डॉक्टरला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी म्हसवड (ता. माण) येथील पाच जणांविरोधात खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका डॉक्टरच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे आणि दीपक रुपनवर (सर्व रा. म्हसवड, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब मारुती दोलताडे (वय ४६, रा. दोलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, म्हसवड) यांचे म्हसवड येथे खासगी रुग्णालय आहे. त्यांच्या रुग्णालयात कार्यरत असलेला लक्ष्मण राखोंडे याने सुमारे ७ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. याशिवाय डॉक्टरांनी राखोंडे याला उचल स्वरूपात दिलेली रक्कम सुमारे २७ लाख रुपयांच्या आसपास होती. त्यानंतर राखोंडे पत्नीसमवेत रुग्णालय सोडून पळून गेला. या संदर्भात डॉक्टरांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी संशयितांनी संगनमत करून एका महिलेमार्फत सीएमएस पोर्टलवर बलात्काराची खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप आहे. सदर बलात्कार प्रकरण मिटवण्यासाठी डॉ दोलताडे यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. रक्कम न दिल्यास ठार मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या डॉक्टरांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. त्यानंतर खंडणी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा पुढील तपासासाठी म्हसवड पोलीस ठाण्यात ‘झिरो’ क्रमांकाने वर्ग करण्यात आला असून, तपास सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.ऑक्टोबर २०२५ ते १० डिसेंबर या कालावधीत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे करीत आहेत.
पुणे पुस्तक महोत्सवाला पहिल्या दोन दिवसांत (शनिवार-रविवार) दीड लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली. या कालावधीत पुस्तकांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल झाल्याची माहिती मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली. यामध्ये युवक-युवतींचा सहभाग लक्षणीय होता. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी महोत्सवाचे जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन झाल्यानंतर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी सुमारे ७० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी हजेरी लावली, जी सहसा शेवटच्या दिवशी दिसते, असे संयोजकांनी सांगितले. पांडे यांच्या माहितीनुसार, महोत्सवाच्या दोन्ही मंडपांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध विषयांवरील पुस्तके खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यामध्ये परदेशी नागरिकांचाही सहभाग होता. अनेक नागरिकांनी केवळ एकच पुस्तक न घेता, अधिक पुस्तके खरेदी करण्याला प्राधान्य दिले. पुस्तकप्रेमींनी विविध दालनांना भेट देण्यासोबतच आपल्या पाल्यांना चिल्ड्रेन कॉर्नरची सफर घडवली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद लुटला. पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्राध्यापकही महोत्सवाला आवर्जून भेट देत आहेत. एनबीटीचा महोत्सव असल्याने पुस्तकांच्या खरेदीवर १० टक्के सवलत दिली जात आहे. तसेच, नामवंत प्रकाशकांकडूनही काही प्रमाणात सवलत मिळत आहे. यामुळे पुस्तक खरेदी-विक्रीच्या उलाढालीवर सकारात्मक परिणाम झाला असून, पहिल्या दोन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. कोणत्या पुस्तकांची अधिक विक्री झाली आणि एकूण उलाढाल याबाबत सविस्तर माहिती महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात दिली जाईल, असे राजेश पांडे यांनी नमूद केले.
पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात 'बोलती छायाचित्रे' या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन पुणेकरांच्या मनाला स्पर्श करणारे आणि शब्दांविना संवाद साधणारे आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक युवराज मलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, संपादक सुनील माळी, सुनंदा मेहता, अरुण निगवेकर, श्रीधर लोणी, श्रीकांत साबळे, मुनीफ शर्मा, शैलेंद्र सिंग, संदीप कोल्हटकर, अर्चना मोरे आणि अनिकेत जोशी उपस्थित होते. वृत्तपत्रांतील अनुभवी छायाचित्रकारांनी टिपलेली ही छायाचित्रे पुणे शहरातील सामाजिक वास्तव, राजकीय घडामोडी, धार्मिक श्रद्धा, शैक्षणिक प्रवाह आणि पर्यावरणाविषयीची काळजी अशा विविध पैलूंनी पुण्याचे अंतरंग उलगडतात. प्रत्येक छायाचित्र एक स्वतंत्र कथा सांगते, जी अनेकदा पुणेकरांच्या मनात असते पण शब्दांत व्यक्त केली जात नाही. या प्रदर्शनात केवळ छायाचित्रकारांचे कौशल्यच नाही, तर समाजाचे भान, माणसांशी असलेले नाते आणि काळाची नोंदही स्पष्टपणे दिसून येते. हे प्रदर्शन पाहताना प्रेक्षक केवळ छायाचित्रे पाहत नाहीत, तर पुणे शहराला एका नव्या दृष्टिकोनातून अनुभवतात. हे छायाचित्र प्रदर्शन २१ डिसेंबरपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयात सर्वांसाठी खुले राहील. पुण्याच्या आत्म्याशी संवाद साधण्याची आणि शहराकडे नव्या नजरेने पाहण्याची ही एक दुर्मिळ संधी असून, जास्तीत जास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय (एमएसएमई) आणि एआयसी पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम यांच्यातर्फे तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही दोन दिवसीय यात्रा १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथील हॉटेल लेमन ट्री प्रीमिअर येथे होणार आहे. 'एआयसी पिनॅकल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल यांनी ही माहिती दिली. या आयपी यात्रेची मध्यवर्ती संकल्पना 'विकसित भारत @२०४७ साठी बौद्धिक संपदा-आधारित अर्थव्यवस्था उभारणी' अशी आहे. भारत सरकारने बौद्धिक संपदा कायद्याबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, डिझाईन आणि जीआय यांसारख्या बौद्धिक संपदेच्या हक्कांबाबत जागृती करणे, सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन देणे, कल्पना आणि नवनवीन शोधांचे संरक्षण करणे तसेच प्रगत तंत्रज्ञान वापरून एमएसएमईंना सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या बौद्धिक संपदेची नोंद करण्यास सहकार्य करण्याचे ध्येय या उपक्रमाचे आहे. एमएसएमईंना देशभरातील आयपी फॅसिलिटेशन सेंटरशी जोडण्याचे काम सुरू आहे. तसेच, नवोन्मेषकांना त्यांच्या सर्जनशील कामाचे प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन, मार्गदर्शन, निधी आणि सहाय्य पुरवले जात आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फॅसिलिटेशन सेंटरमार्फत (आयपीएफसी) मोफत आयपी सेवा पुरवल्या जातात आणि एआयसी पिनॅकल हे एक अधिकृत 'आयपीएफसी' केंद्र आहे. या आयपी यात्रेचा मुख्य उद्देश एमएसएमई, उद्योजक, आयपी तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि कायदेशीर व्यावसायिकांना जागतिक स्तरावर आयपी संरक्षण, मार्केटमधील संधी, तंत्रज्ञान आदानप्रदान आणि आयपीचे व्यावसायिकीकरण धोरण जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. यामध्ये एमएसएमई मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, आयपी प्रॅक्टिस करणारे वरिष्ठ व्यावसायिक, विधिज्ञ, यशस्वी स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. मार्गदर्शन सत्रे, कार्यशाळा आणि नेटवर्किंग सत्रांतून बौद्धिक संपदेचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. आयपी क्लिनिकच्या माध्यमातून एमएसएमईंना आर्थिक साहाय्य आणि आयपी नोंदणीविषयी मार्गदर्शन केले जाईल. ही आयपी यात्रा पूर्णतः विनामूल्य असून, एमएसएमई उद्योजक, आयपीआर प्रोफेशनल्स, डिझाईन प्रोफेशनल्स, स्टार्टअप्स, विधिज्ञ आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. इच्छुकांनी आपली विनामूल्य नावनोंदणी www.aic-pinnacle.org किंवा https://forms.gle/qwLtCoHuHrpsdkuBA या गुगल फॉर्मद्वारे करावी. अधिक माहितीसाठी ९०४९७९४०३५/९३०७३०५१८१ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. यंदाच्या आयपी यात्रेमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये 'भारत @२०४७' उद्दिष्टपूर्तीच्या राष्ट्रनिर्मितीत बौद्धिक संपदा हक्कांची (आयपी) भूमिका, एमएसएमईसाठी आयपी प्रोत्साहन, धोरणे आणि शासकीय सहाय्य कार्यक्रमांद्वारे बळकटीकरण यावर चर्चा होईल.
७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या पाचव्या आणि शेवटच्या सत्राचा पूर्वार्ध रविवारी कंठसंगीताच्या मानकऱ्यांनी सुरेल सादरीकरणाने गाजवला.या सत्रात बुजुर्गांसह तरुण कलाकारांच्या सांगीतिक प्रतिभेचे अनेक आश्वासक पैलू रसिकांना अनुभवता आले. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित हा महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात सुरू आहे. रविवारी महोत्सवाच्या पाचव्या सत्राची सुरुवात पं.भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य आणि प्रसिद्ध गायक पं.उपेंद्र भट यांच्या गायनाने झाली. पं. भट यांनी राग कोमल रिषभ आसावरीमधील 'सबही मेरा होत...' या विलंबित एकतालातील रचनेने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यानंतर 'मै तो तुमरो दासी...' ही रचना आणि हिंडोलबहार रागातील 'कोयलिया बोले चली जात...' ही बंदिश त्यांनी सादर केली.त्यांनी राघवेंद्र स्वामींचे कन्नड भजन,'समचरण तुझे देखिले...' हा वारकरी संप्रदायातील अभंग आणि 'याचसाठी केला होता अट्टाहास...' ही भक्तीरचना सादर करत आपल्या सादरीकरणाला विराम दिला. त्यांना निरंजन लेले (हार्मोनिअम), सचिन पावगी (तबला), रमाकांत परांजपे (व्हायोलिन),गणेश चाकणकर (पखवाज),माऊली टाकळकर (टाळ) आणि विनायक हेगडे, धनंजय भाटे (तानपुरा) यांनी साथसंगत केली. यानंतर युवा गायिका श्रृती विश्वकर्मा मराठे यांनी आपली कला सादर केली. त्यांनी राग पटदीपमधील 'नैया मोरी पार...' ही त्रितालातील बंदिश आणि त्याला जोडून 'जागे मोरे भाग महाराज...' या बंदिशीतून रागरूप समर्थपणे मांडले. या दोन्ही बंदिशी श्रृती यांच्याच रचना होत्या. त्यांनी द्रुत एकतालातील 'तानुम तनन तदरे दानी...' हा तराणाही पेश केला आणि 'निर्भय निर्गुण...' या कबीरांच्या निर्गुणी भजनाने आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांच्या सुरेल आणि तयारीच्या आवाजाने तसेच प्रसन्न सादरीकरणामुळे पटदीप रागाने सुरुवातीपासूनच रसिकांची पकड घेतली. द्रुत लयीतील गायनातून श्रृती यांची लयकारी आणि आकर्षक तानांचा प्रत्यय आला. यावेळी श्रृती यांनी 'सवाई’ च्या स्वरमंचाला आणि गुरुपरंपरेला साष्टांग अभिवादन करत, येथे सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना लीलाधर चक्रदेव (हार्मोनिअम), प्रणव गुरव (तबला) आणि अदिती पोटे व तेजल कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथ दिली. महोत्सवातील सर्वात तरुण गायक अनिरुद्ध ऐताळ यांनी राग मुलतानीमधील 'एरी बात ना माने...' या विलंबित एकतालातील रचनेने आपल्या गायनाची सुरुवात केली. अतिशय शांत आणि संथ आलापीतून राग उलगडत नेण्याचे त्यांचे कौशल्य उल्लेखनीय होते. त्यांच्या गायनातील सहजता आणि सुरेलता लक्षवेधक ठरली. 'साहेब झमाल...' या रचनेतून रागाची परिपूर्ण मांडणी समोर आली. 'लागी लागी रे सावरिया...' या द्रुत त्रितालातील रचनेतून आणि 'नैननमे आनबान...' या रचनांमधून अनिरुद्ध यांचा लवचिक आवाज, गमक प्रयोग, स्वरांची आकर्षक पुनरावृत्ती आणि स्पष्ट दाणेदार ताना यामुळे त्यांचे गायन अतिशय प्रभावी ठरले.
संविधान रक्षणाची जबाबदारी सर्व नागरिकांची आहे. आपले अधिकार दुसऱ्यांना हिसकवू देऊ नका. रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्यांवर दंडुका चालवला जात असला तरी, आंदोलनाच्या माध्यमातून सामुदायिक शक्ती निर्माण होते, असे प्रतिपादन युवक क्रांती दलाचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते रंगा राचुरे यांनी केले. संघर्षमय जीवन माणसाला समृद्ध बनवते आणि मोर्चे लोकांना चर्चेस प्रवृत्त करतात, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाने आयोजित केलेल्या २६ व्या गांधी दर्शन शिबिरात ते बोलत होते. 'परिवर्तनाच्या प्रक्रियेत आंदोलनाचे महत्त्व काल आणि आज' या विषयावर त्यांनी सविस्तर मांडणी केली. यावेळी व्यासपीठावर अन्वर राजन आणि लक्ष्मीकांत देशमुख उपस्थित होते. कोथरूड येथील गांधीभवन येथे रविवारी हे शिबिर पार पडले. या शिबिरात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पैगंबर शेख यांनी 'सर्वसमावेशक समाजकारण आणि राजकारण' यावर, तर चैतन्य संस्थेच्या संस्थापक सुधा कोठारी यांनी 'सामाजिक कार्यातील माझा प्रवास: शोध आणि बोध' या विषयावर आपले विचार मांडले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अन्वर राजन यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. रंगा राचुरे पुढे म्हणाले की, आता मोर्चे हे नेत्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनले आहेत. कार्यकर्त्यांना नेत्यांची गरज नसते, तर नेत्यांना कार्यकर्त्यांची गरज असते. लोकांनी राजकारणी बनले पाहिजे. बेधडक बोलणारे कार्यकर्ते नेत्यांना नको असतात. लोकांचा संघर्ष नेत्यांना वठणीवर आणेल आणि लोकशाही वाढवण्यास मदत करेल. जेव्हा आंदोलन सत्तेला आव्हान देते, तेव्हा सत्ता ते चिरडून टाकण्याचा प्रयत्न करते. तुरुंग आणि पोलीस अत्याचाराची भीती घालवण्याचे काम गांधीजींनी केले. पैगंबर शेख यांनी संविधानाचा प्रचार-प्रसार अधिक होण्यावर भर दिला. संविधान घराघरात आणि मनामनात पोहोचले पाहिजे, कारण त्यामुळेच आपल्याला मूलभूत अधिकार मिळाले आहेत, असे ते म्हणाले. सामाजिक चळवळींमुळे समाज विचार करायला प्रवृत्त झाला, असेही त्यांनी नमूद केले. सुधा कोठारी यांनी बचत गटांच्या माध्यमातून झालेल्या परिवर्तनाची माहिती दिली. बचत गटातून एक महासंघ तयार झाला असून, त्यात एक लाख सदतीस हजार महिला सदस्य आहेत. आठवड्याला एक रुपया बचतीपासून सुरू झालेला हा प्रवास महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी मार्ग बनला आहे. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला, त्यांचे आयुष्य बदलले आणि त्या दारूबंदी, विवाह, वारसा, जमीन यांसारखे प्रश्न सोडवू लागल्या. आंदोलन करणारे आणि रचनात्मक काम करणारे एकत्र येऊन परिवर्तन घडवू शकतात, हे यातून सिद्ध झाले, असे कोठारी यांनी सांगितले.
पुणे विमानतळावर संगणक अभियंत्याकडे गांजा आढळला:बॅगेत 12 ग्रॅम अंमली पदार्थ, गुन्हा दाखल
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका संगणक अभियंत्याच्या बॅगेत गांजा हा अंमली पदार्थ सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा २८ वर्षीय संगणक अभियंता ११ डिसेंबर रोजी विमानाने उत्तर प्रदेशात जाण्यासाठी निघाला होता. देशांतर्गत विमान प्रवासात सामानाची तपासणी होत नाही, असा त्याचा समज होता. विमानात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्याकडील बॅगेची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत लायटर सापडले. लायटर काढत असताना बॅगेतून दोन प्लास्टिक पिशव्या खाली पडल्या. या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा असल्याचे तपासणीत उघडकीस आले. दोन्ही पिशव्यांतील गांजाचे वजन केले असता ते १२ ग्रॅम भरले. आरोपी तरुण मूळचा उत्तर प्रदेशातील आझमगडचा रहिवासी असून, तो खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. तसेच तो खराडी भागातील एका सोसायटीत राहतो. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक एन. माने पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थ तस्करीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. नुकतेच सीमाशुल्क विभागाने (कस्टम) परदेशातून आलेल्या एका महिलेकडून चिप्सच्या डब्यातून ७२ लाख २० हजार रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला होता. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली होती. याशिवाय, काही दिवसांपूर्वी बँकॉकहून पुणे विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाकडून कस्टम विभागाने २ कोटी २९ लाख रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला होता. हायड्रोपोनिक गांजाची लागवड नियंत्रित वातावरणात केली जाते आणि आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत जास्त असते.
राज्यात गावपातळीवर काम करण्यासाठी लॅपटॉप, स्कॅनर, प्रिेंटर देण्याच्या मागणीसाठी १५००० ग्राम महसूल अधिकारी व ५ हजार मंडळ अधिकाऱ्यांनी सोमवारपासून ता. १५ प्रशासनाच्या ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात गाव पातळीवर तसेच मंडळस्तरावर काम करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना कामकाजासाठी लॅपटॉप, स्कॅनर व प्रिंटर देण्याची मागणी मागील काही वर्षापासून केली जात आहे. मात्र प्रत्येक वेळी शासनाकडून आश्वासनेच मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या महसूल प्रशासनाची सर्वच कामे ऑनलाईन केली जात आहे. मात्र ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे लॅपटॉप देण्यात आला नसल्याने कामे करणे कठीण झाले आहे. दरम्यान, शासनाने सदर साहित्य पुरवठा करावा या मागणीसाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी सोमवारपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत. कर्मचाऱ्यांकडे असलेल्या डीजीटल स्वाक्षऱ्या देखील तहसील कार्यालयात जमा केल्या जाणार आहेत. या संदर्भातील निर्णय संघटनेच्या काही दिवसांपुर्वीच नंदूरबार येथे झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या बैठकीत इतर प्रलंबित प्रश्नावरही चर्चा झाली असून या प्रश्नासाठीही लवकरच आंदोलनाची भुमीका घेण्याचे ठरले आहे. दरम्यान, सोमवारपासून सुरु होणाऱ्या ऑनलाईन कामावरील बहिष्कार आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे. आंदोलन काळात ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आपापल्या सज्जावर हजर रहावे. मात्र कोणतेही ऑनलाईन कामे करू नये. या शिवाय आपापल्या तालुकास्तरावर तहसीलदारांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्याचे आवाहन संघटनेचे राज्य संघटक सय्यद अब्दूल सय्यद रसुल यांनी केले आहे.
अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात 3 दिवसांच्या 'GOAT इंडिया' दौऱ्यावर आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, टायगर श्रॉफ, आर. अश्विन आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री उपस्थित होते. यावेळी प्रोजेक्ट महदेवाचे उद्घाटन मेस्सी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अनेक वर्षांनी पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियममध्ये सचिन.. सचिन.. सचिन आवाज पुन्हा एकदा दुमदुमला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील यावेळी उपस्थित होते. सचिन तेंडुलकरने यावेळी मेस्सीसोबत हस्तांदोलन करत त्यांची जर्सी मेस्सीला भेट दिली. हा क्षण अनेक क्रिकेट चाहते आणि फुटबॉल चाहत्यांनी आपल्या डोळ्यात तसेच कॅमेऱ्यात कैद केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना 'गणपती बाप्पा मोरया'ने आपल्या प्रतिक्रियेला सुरुवात केली. ते म्हणाले, महान खेळाडू मेस्सीचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे आणि ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की तो आमच्या 60 मुलांना मार्गदर्शन करत आहे, जे 2024 मध्ये फुटबॉलच्या मैदानात आपले वर्चस्व गाजवणार आहेत. 'प्रोजेक्ट महादेवा'चा उद्देश आपल्या राज्यात फुटबॉलला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणणे हा आहे आणि आमच्या 60 मुलांना मार्गदर्शन केल्याबद्दल मेस्सी, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही त्यांना प्रेरणा दिली आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की, त्यापैकी एक खेळाडू तुम्हाला फिफा विश्वचषकात खेळताना दिसेल. दरम्यान, या कार्यक्रमाला क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, अभिनेता अजय देवगण, अमृता फडणवीस, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे आणि इतर अनेक दिग्गज उपस्थित होते. अमृता फडणवीस यांनी मेस्सीसोबत एक सेल्फीदेखील काढला. लिओनेल मेस्सी-देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन अर्जेंटीनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारतात 3 दिवसांच्या 'GOAT इंडिया' दौऱ्यावर आहे. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचे उद्घाटन करण्यात आले आहे. वाचा सविस्तर
नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी काँग्रेसची वोट चोर गद्दी छोड रॅली सुरू आहे. पक्षाचे खासदाार राहुल गांधी म्हणाले की, मोहन भागवत म्हणतात की, जग सत्याला नाही तर शक्तीला पाहते. भागवत यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची आहे तर आमच्यासाठी सत्य महत्त्वाचे आहे. राहुल यांच्यापूर्वी पक्षाच्या सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या की, जीवनात मताचे महत्त्व […] The post मोदीजींचा आत्मविश्वास संपला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : दिल्लीच्या रामलीला मैदानातून काँग्रेसकडून ‘मत चोरी’च्या मुद्यावर महारॅली काढण्यात येणार आहे. मात्र, रॅली सुरू होण्यापूर्वीच काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन मोदी तेरी कब्र खुदेगी अशाप्रकारची घोषणाबाजी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. संबित पात्रा म्हणाले, काँग्रेस विसरते आहे […] The post मोदींवरील टीकेवरून नवा वाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोच्ची : शनिवारी लागलेल्या केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यात दहा वर्षांपासून सत्ता असलेल्या डाव्या पक्षांचा आघाडीची मोठी पीछेहाट झाली. तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. तसेच आतापर्यंत केरळमध्ये नाममात्र अस्तित्व असलेल्या भाजपने राज्यातील शहरी भागांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. आता या निकालांमुळे केरळमधील राजकीय हवा बदलत असल्याचे […] The post केरळात काँग्रेसचे पुनरागमन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यूयॉर्क : प्रशांत महासागरामध्ये आता तणाव प्रचंड वाढला आहे, महाशक्ती देश मैदानात उतरले आहेत. तैवानच्या मुद्यावरून चीन आणि जपानमध्ये आधीच संघर्ष पेटलेला होता, त्यामध्ये चीनच्या बाजूने रशियानं कारवाई केली, त्यानंतर आता याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. जपानच्या समर्थनार्थ अमेरिकेने आता आपले सर्वात खतरनाक बी-२ बॉम्बर फायटर जेट बाहेर काढले आहे, सध्या अमेरिकेचे […] The post बी-२ बॉम्बर विमानांचे उड्डाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१००० कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड
नवी दिल्ली : ऑनलाइन गुंतवणूक, कर्ज आणि नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करणा-या एका मोठ्या आणि संघटित सायबर फ्रॉड नेटवर्कचा केंद्रीय तपास ब्यूरो (सीबीआय) ने पर्दाफाश केला आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून देश-विदेशात १००० कोटींपेक्षा अधिक रकमेची हेराफेरी झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात सीबीआयने १७ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले असून त्यात ४ […] The post १००० कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकिस्तानात आता गिरवण्यात येणार संस्कृतचे धडे
इस्लामाबाद : फाळणीनंतर पहिल्यांदाच, पाकिस्तानच्या एका विद्यापीठाने औपचारिकपणे प्राचीन भाषा संस्कृत शिकवण्यास सुरुवात केली आहे. लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसने हा उपक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात संस्कृतसह महाभारत आणि भगवतगीता यासारख्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास विद्यार्थांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असेल. या पाऊलाकडे शिक्षण आणि संस्कृतीच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण बदल म्हणून पाहिले जात आहे. हा नवीन अभ्यासक्रम […] The post पाकिस्तानात आता गिरवण्यात येणार संस्कृतचे धडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘महाज्योती’मार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन -ऑफलाईन प्रशिक्षण
नागपूर : ‘महाज्योती’मार्फत एकूण ११ अभ्यासक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी सहा अभ्यासक्रम ऑफलाईन तर पाच अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने दिले जात असल्याची माहिती विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. सदस्य राहुल कुल, विजय वडेट्टीवार, रणधीर सावरकर, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सावे बोलत […] The post ‘महाज्योती’मार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन -ऑफलाईन प्रशिक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी
नागपूर : राज्यातील बेरोजगार युवकांसाठी सुरू असलेल्या कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू राहील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य राहुल पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री लोढा बोलत होते. मंत्री लोढा यांनी सांगितले की, २००७ नंतर बेरोजगारांसाठी कोणतीही ठोस […] The post कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहार प्रकरणी दोन कर्मचारी अटकेत
नागपूर, : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर (शनिशिंगणापूर) देवस्थानात ऑनलाईन पूजा, चढावा व लाईव्ह दर्शन सेवांमधून मोठ्या आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवस्थानातील दोन कर्मचा-यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य विठ्ठल लंगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, […] The post शनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहार प्रकरणी दोन कर्मचारी अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या चौथ्या सत्रात शनिवारी कंठसंगीत, वाद्यवादन आणि नृत्याचा त्रिविध कला संगम रसिकांनी अनुभवला. 'गीतं वाद्यं तथा नृत्यं, त्रयं संगीतमुच्यते' या उक्तीचा प्रत्यय या त्रिवेणी संगमाने रसिकांना आला. सत्राचा उत्तरार्ध प्रसिद्ध गायक डॉ. भरत बलवल्ली यांच्या गायनाने सुरू झाला. ग्वाल्हेर घराण्याची तालीम घेतलेल्या बलवल्ली यांनी राग शहाणा कानडा सादर केला. त्यांनी 'मोरे आये कुवर कन्हाई...' ही झपतालातील रचना सविस्तर मांडली, तर 'मंदिरवा मै मोरे आज...' हा द्रुत एकताल ऐकवताना उत्तम दमसास आणि तयारीच्या तानांचे दर्शन घडवले. त्यानंतर राग शंकरामधील स्वरराज छोटा गंधर्व यांची 'प्रथम नाद पहचानो...' ही त्रितालातील रचना पेश केली. संगीत मानापमान नाटकातील 'युवतिमना दारुण रण रुचिर प्रेमसे...' हे हंसध्वनी रागातील नाट्यगीत त्यांनी आक्रमकपणे सादर केले आणि 'हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा...' या भक्तीरसपूर्ण रचनेने गायनाचा समारोप केला. त्यांना रामकृष्ण करंबेळकर (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनिअम), गंभीर महाराज (पखवाज), दिगंबर जाधव आणि मुबिन मिरजकर यांनी साथ केली. रात्रीसोबत सवाईचा उत्तरार्ध अधिक रंगतदार करणारा व्हायोलिन आणि सरस्वती वीणा वादनाचा स्वराविष्कार रसिकांना स्वर समृद्ध करणारा ठरला. विदुषी कला रामनाथ यांचे व्हायोलिन आणि डॉ. जयंती कुमरेश यांचे सरस्वती वीणावादन, असा दुहेरी स्वरयोग राग चारुकेशीच्या माध्यमातून साधला गेला. आलाप, जोड, झाला यातून चारुकेशी रंगतदार झाला. व्हायोलिन आणि सरस्वती वीणा यांच्यासोबत ज्येष्ठ तबलावादक पं. योगेश समसी आणि जयचंद्र राव (पखवाज) यांचे सवालजवाब श्रोत्यांना आनंद देणारे ठरले. कबीर शिरपूरकर व सावनी जोशी यांनी तानपुरा साथ केली. आसाम येथील प्रसिद्ध कथक नृत्यांगना मेघरंजनी मेधी यांचे कथक नृत्य अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले. मेघरंजनी यांनी देवीस्तुतीने आपल्या नृत्याचा प्रारंभ केला. देवीची सौम्य, उग्र, दैत्यनाशिनी, असुरसंहारिणी, युद्धसन्मुख अशी विविध रूपे तसेच देवीचे मंगल, शांत असेही रूप त्यांनी पदन्यास आणि अभिनयातून साकारले. त्यानंतर कथकच्या लखनौ घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे थाट, आमद, परण, टुकडे, चक्रधार व चक्कर त्यांनी विलंबित, मध्य आणि द्रुत लयीत सादर केले. कथक नृत्यातील भावपक्ष अधोरेखित करणारी कृष्णलीलाही त्यांनी साकारली.
सर्व शासकीय विभागांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा कार्यरत
नागपूर : राज्यातील सर्व शासकीय विभागांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा आधीपासून कार्यरत असून त्याचे कामकाज योग्य पद्धतीने सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत दिली. सदस्य अनुराधा चव्हाण यांनी विविध विभागांमध्ये क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम आणि क्वालिटी ऍश्युरन्स अॅथॉरिटी उभारण्याबाबतचा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. त्यास राज्यमंत्री नाईक यांनी उत्तर दिले. हरियाणाच्या धर्तीवर राज्यातील […] The post सर्व शासकीय विभागांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा कार्यरत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडल्याचे दिसून आले. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे विरोधकांनी उचलून धरले होते. परंतु, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आता या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कोणत्या घोषणा केल्या आहेत तसेच त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पाहुयात. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवीन सरकार आल्यावर एक वर्ष झाले. आम्ही महायुतीमधील तिन्ही नेते एकत्रित निर्णय करतो. अंमलबजावणीचा प्रयत्न सातत्याने करतो. नगरपालिका निवडणुका झाल्या. महापालिका व जिल्हा परिषद होतील. अनेक वर्षे निवडणूक न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दु:ख होते. आता लोकशाही खालच्या स्तरापर्यंत पोहोचण्यास महाराष्ट्र गतीने काम करेल. मध्यंतरी महाराष्ट्राला भोगावे लागले. या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या. कारण महाराष्ट्र आता थांबणार नाही. सकारात्मकतेने पुढे जायचा आमचा विचार आहे. अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्यासाठी वाटचाल करायची आहे. सभागृहातील दोन्ही बाजूच्या नेत्यांना आवाहन आहे, महाराष्ट्राला पुढे नेण्याचा विचार करूयात. कोणतीही योजना बंद होणार नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकांनी योजनांवर शंका घेतली. निवडणूक झाली की योजना बंद करतील बोलले. कुठलीही योजना बंद होणार नाही. पाच वर्षे योजना सुरु राहतील. व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्राच्या विकासाचे तयार केले आहे. 2030, 2035 व 2047 असे तीन टप्पे केले आहे, 2029-30 दरम्यान देशातील पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्र असेल. देशात 3 राज्य आहेत. ज्यांचे दायित्व 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यात, गुजरात ओरिसा व महाराष्ट्र आहे. राजकोषीय तूट ही 3 टक्क्यांच्या आत ठेवणे गरजेचे आहे. लाडकी बहीण व शेतकऱ्यांना पैसे देऊन 3 टक्क्यांपर्यंत ठेवण्यात यशस्वी ठरलो आहोत. त्यामुळे आपण दिवाळखोरीकडे चाललो नाही. देशातील इतर राज्याच्या तुलनेत राज्याने भांडवली गुंतवणूक जास्त केलेली आहे. कुठलीही तडजोड आपण केलेली नाही. एफडीएमध्ये महाराष्ट्र नंबर वन महाराष्ट्रातील गुंतवणुकीविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हा गुंतवणुकीत पुढे चालला आहे. दावोसमध्ये आपण पाहिले की 15 लाख कोटी रुपयांचे करार होते. त्यातील 5 लाख कोटी ही विदर्भातील होती. कोकणात 2 लाख कोटी गुंतवणूक होती. 2022 ते 25 विचार केला, तर दावोस गुंतवणूक ही 17 लाख कोटींवर जाते सामंजस्य करारापैकी अंमलबजावणी झाली त्याचे प्रमाण 75 टक्के आहे. पहिल्या 2 वर्षांतील 90 टक्क्यांपर्यंत आहे. म्हणजे करार अंमलबजावणी सुरु आहे. 13 लाख 75 हजार कोटींची गुंतवणूक आहे. 7 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. एफडीए मध्ये महाराष्ट्र नंबर वन आहे. सोलर मॉड्युलमध्ये विदर्भ हे देशात एक नंबर होईल 2025-26 मध्ये 91 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. देशातील एकूण गुंतवणूक पैकी 31 गुंतवणूक फक्त महाराष्ट्रात आली आहे. विदर्भात गडचिरोली हे नवे मॅग्नेट तयार झाले आहे. सर्वाधिक गुंतवणूक ही गडचिरोलीमध्ये आली आहे. गुंतवणूक केलेल्या कंपनीतील काहींचे उत्पादन सुरु झाले आहे, त्यामुळे सोलर मॉड्युलमध्ये विदर्भ हे देशात एक नंबर होईल, अशा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. ईव्ही कॅपिटल म्हणून मराठवाडा तयार होतोय स्टीलमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक आहे. तर 1 लाख रोजगार निर्माण होईल. गोल गॅसिफिकेशनमध्ये देशातील सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे 70 हजार कोटींची गुंतवणूक विदर्भात आली आहे. ईव्ही कॅपिटल म्हणून मराठवाडा तयार होत आहे. 50 हजार कोटींची व 30 हजार रोजगार गुंतवणूक आली आहे. टोयोटा, स्कोडा, अशा जगातील सर्वात मोठे ब्रँड मराठवाड्यात आले आहेत. इतर क्षेत्रातही चांगली गुंतवणूक येत आहे. आता पाण्यासोबत सातारा व कोल्हापूर येथेही गुंतवणूक येतेय. मिहान हे देशातील आयटीमधील बिग 6 आहेत, ते सर्व मिहानमध्ये आहेत. प्रत्यक्ष रोजगार हा 1 लाख 25 हजार लोकांना मिळाला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत महाराष्ट्रात महाभरती सुरु केली. या 3 वर्षांत 1 लाख 20 हजार सरासरी नोकरी दिल्या. पुढील 2 वर्षांत तेवढ्याच नोकरी देणार आहोत. इतिहासातील सर्वात मोठी भरती असेल. शेतकरी 32 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. त्यात 10 हजार कोटी पायाभूत सुविधा तर 2 हजार कोटी मनरेगा योजनेसाठी तर उरलेले थेट मदत देत होतो. 27 हजार विहिरींना दुरुस्तीसाठी 80 कोटी रुपये दिले आहेत. पुढच्या बजेटमध्ये पैसे उपलब्ध करून देऊ हे सुद्धा सांगितले आहे. याबाबत 2 जीआर काढले. एक 10 हजार तर दुसरा 9 हजार कोटींचा होता. 15 हजार कोटी रुपये थेट शेतकरी खात्यात गेले आहेत. 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत गेली आहे. तर 91 लाख शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कापूस संदर्भात सीसीआयने उत्पादकतेवर आधारित खरेदी ठरवली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. तेव्हा उत्पादकता पकडताना पहिल्या 3 जिल्ह्यांची सरासरी उत्पादकता पकडावी. त्यामुळे 2368 किलो प्रति हेक्टर ही खरेदी चालली आहे. कुठल्याही शेतकऱ्यांचा पैसा परत जाणार नाही. विदर्भ व मराठवाडा येथील शेतकऱ्यांसाठी शेतकरी कृषी संजिवनी योजना गेमचेंजर आहे. सर्व अर्जांना मान्यता दिली आहे. सरपंचांना प्रशिक्षण दिले आहे. 5 हजार गावांचे सूक्ष्म नियोजन केले आहे. वीज निर्मितीत मेगा पाऊल देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्र 2026 पर्यंत 12 हजार मेगावॅट वीज निर्मितीचे मोठे लक्ष्य गाठत आहे. यामुळे वीज खरेदीमध्ये कंपनीला 10 हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. या 16 मेगावॅट प्रकल्पांसाठी लागणाऱ्या पर्यावरणाच्या नियमानुसार, सुमारे पावणे तीनशे कोटी झाडांचे मेटीगेशन (पर्यायी वृक्षारोपण) केले आहे, म्हणजे आपण पावणे तीनशे कोटी झाडे लावली असे म्हटले पाहिजे. महावितरणने एका महिन्यात 45 हजार कृषी पंप लावून विक्रम केला असून, दिवसा पाणी मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. त्यांनी सांगितले की, शेतकरी आता अभिनंदन करत आहेत. महाराष्ट्र आता आशियातील ग्रीड स्थिरता साधणार आहे. 76 हजार मेगावॅटचे पंप स्टोरेज करार झाले असून, नॅशनल ग्रीडला पॉवर दिली जाईल. पुढील सहा महिन्यात 1 लाख मेगावॅटचे 24 बाय 7 चालणारे ग्रीड तयार करण्याचे नियोजन आहे. या प्रयत्नांमुळे, गेल्या 20 वर्षांपासून दरवर्षी 9 टक्क्यांनी वाढणारे वीज दर आता 2 टक्क्यांनी कमी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि दिलासा राज्यावर अतिवृष्टीचा ताण आल्याने अर्थव्यवस्था काहीशी अडचणीत असली तरी, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, कर्जमाफीचा फायदा थेट बँकेला होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. 2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी करूनही शेतकरी पुन्हा कर्जमाफी मागत असल्याने, यावर एकदम उपाययोजना येणार नाही, पण काहीतरी करावे लागेल. या दृष्टीने एक समिती काम करत आहे आणि 1 जुलैपर्यंत सर्व घोषणा करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. सिंचन अनुशेष पूर्णत्वास मुख्यमंत्र्यांनी सिंचन अनुशेषाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. राज्यात फक्त 49 हजार एकरचा अनुशेष राहिला आहे, ज्यात अकोला, हिंगोली, बुलढाणा हे तीनच जिल्हे शिल्लक आहेत. अकोल्यात 14 हजार ऐवजी 19 हजार एवढी सिंचन क्षमता होईल, तर बुलढाण्यात 29 हजार हेक्टर अनुशेष असून, चार प्रकल्पात 1 लाख 68 हजारची सिंचन क्षमता तयार होत आहे. यामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातून अधिशेषात जाणार आहे. विदर्भात 485 प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर केवळ 74 प्रकल्प बांधकामाधीन आहेत. गोसी खुर्दची सर्व कामे पूर्ण केली असून, जून 2027 पर्यंत 2 लाख 54 हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल. सिंचन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल केंद्र सरकारने राज्याला 'सिंचनातील सर्वोच्च' पुरस्कार दिला असल्याचे त्यांनी सांगितले. पुरामुळे दरवर्षी वाहून जाणारे 100 टीएमसी पाणी आता अडवून त्यातील 30 टीएमसी पाणी उजनीमध्ये आणले जाईल, जे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी गावे व मराठवाड्यातील गावांना दिले जाईल. हे प्रकल्प झाल्यावर महाराष्ट्रातून दुष्काळ भूतकाळ होईल. तसेच, वैधानिक विकास मंडळ पुन्हा जीवंत करून निधी वाटपात विदर्भ व मराठवाड्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. लातूर-मुंबई चार तासात राज्यात पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार होत आहे. नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग हा समृद्धी महामार्गाचा विस्तार असून, यामुळे एका बाजूने 'नाना पटोले' तर दुसऱ्या बाजूने 'प्रफुल्ल पटेल' जातील, असा चिमटाही त्यांनी काढला. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्यालाही जोडणार असून, यामुळे 32 जिल्ह्यांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लातूर ते मुंबई हे अंतर आता केवळ साडेचार तासांचे होणार आहे. अभिमन्यू पवार यांनी मागणी केल्यामुळे हा 450 किमी लांबीचा 36 हजार कोटींचा महामार्ग दिला आहे. हा मार्ग ठाणे, पुणे, बीड, अहिल्यानगर व लातूर यांना जोडेल. बदलापूरजवळ टनेल केल्यामुळे अवघ्या 15 मिनिटांत अटल सेतूवर पोहोचता येईल आणि 20 मिनिटांत मुंबई गाठता येईल, तसेच पुढे वाढवण बंदर व नवी मुंबई विमानतळही गाठता येईल.
सारंगवाडी प्रकल्पातील अनियमिततेची एसआयटीमार्फत चौकशी
नागपूर : प्रतिनिधी बुलडाणा जिल्ह्यातील सारंगवाडी जलसंधारण प्रकल्पाच्या खर्चवाढीबाबत आणि संभाव्य अनियमिततेबाबत विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून तीन महिन्यांत चौकशी केली जाईल तसेच दोषी आढळणा-यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य श्वेता महाले यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री राठोड म्हणाले […] The post सारंगवाडी प्रकल्पातील अनियमिततेची एसआयटीमार्फत चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई-पुण्यात ‘धुरंधर’चे मध्यरात्रीचे शो सुरू
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनानंतर नऊ दिवस उलटूनही चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली दिसत नसून, अजून वाढत आहे. अनेक ठिकाणी अजूनही शो हाऊसफुल होत आहेत. यामुळे प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता आता या चित्रपटाचे मध्यरात्रीचेही शो मुंबई-पुण्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत ‘धुरंधर’साठी रात्री […] The post मुंबई-पुण्यात ‘धुरंधर’चे मध्यरात्रीचे शो सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरात कुंपणाच्या तारेत अडकलेल्या एका बिबट्याची रविवारी सकाळी यशस्वी सुटका करण्यात आली. वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त पथकाने अवघ्या दीड तासात हे बचाव कार्य पूर्ण केले. बिबट्याला सुरक्षितपणे बेशुद्ध करून पुण्यातील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता मुळशीजवळ बिबट्या तारेत अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली. माहिती मिळताच पुणे वन विभागाने तात्काळ रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या पथकाला कळवले. बावधन, पुणे येथील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधून रेस्क्यू पथक अवघ्या तीन मिनिटांत घटनास्थळी रवाना झाले. वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त पथकाने बचाव कार्य सुरू केले. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव पशुवैद्य डॉ. सात्विक पाठक यांनी बिबट्याला सुरक्षितपणे बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवून बावधन येथील वन्यजीव ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात आले. तिथे त्याची सखोल वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचार केले जाणार आहेत. या संदर्भात माहिती देताना पुणे उपवनसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले की, माहिती मिळाल्यापासून ते बिबट्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात सुरक्षित करण्यापर्यंत संपूर्ण बचाव कार्य दीड तासांत पूर्ण झाले. वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टची पथके अशा गंभीर वन्यजीव आपत्कालीन परिस्थितींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नेहमीच सज्ज असतात. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव पशुवैद्य डॉ. सात्विक पाठक यांनी सांगितले की, बिबट्या कुंपणाच्या तारेत अडकल्याने प्राणी तसेच बचाव पथकासाठीही धोका निर्माण झाला होता. पायी चालत जाऊन परिस्थिती तपासणे धोकादायक ठरू शकले असते, त्यामुळे वाहनातूनच सुरक्षित पद्धतीने त्याला बेशुद्ध करण्यात आले. बिबट्या आता बेशुद्धावस्थेतून पूर्णपणे सावरला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्ष नेहा पंचामिया यांनी या बचाव कार्यात स्थानिक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. स्थानिक गावकऱ्यांनी शांतता राखून पूर्ण सहकार्य केल्यामुळे कोणताही गोंधळ किंवा अडथळा न येता बचाव कार्य जलद आणि सुरळीत पार पडले. यामुळे पथकांना प्राण्याच्या सुरक्षिततेवर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले.
कोल्हापूर शहरात सध्या सुरू असलेल्या 100 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी या प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट चौकशीची मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्यांच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी करत, कामाच्या गुणवत्तेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, पाटलांच्या या टीकेनंतर कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी लागलीच जोरदार पलटवार केला असून, सतेज पाटलांना कुठल्याही मंचावर प्रकल्पांसंबंधी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत खुले आव्हान दिले आहे. विधान परिषदेत बोलताना सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील 100 कोटी प्रकल्पांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. रस्त्यांच्या निकृष्ट दर्जावरून सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाली असून, कामावरून ताशेरे ओढले गेल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री महोदयांनी चांगल्या मनाने निधी मंजूर करून शंभर कोटी दिले यासाठी मी त्यांचे आभार मानतो, मात्र रस्त्यांची गुणवत्ता राहिली आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे. 100 कोटी दिले असले, तरी 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव आहे. त्यांनी पुढे असाही टोला लगावला की, मी राजकीय आरोप करत नाही, मात्र 100 कोटींच्या रस्त्यांची अवस्था काय आहे? पुढील पावसाळ्यापर्यंतही हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानवी लागेल. पाटलांनी स्वतःचे उद्योग, बाकी काहीच केले नाही- राजेश क्षीरसागर सतेज पाटलांच्या या आक्रमक भूमिकेवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी पलटवार केला. क्षीरसागर म्हणाले की, सतेज पाटलांना माझे खुले आव्हान आहे. कुठल्याही मंचावर या, सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. ते पुढे म्हणाले की, आम्ही किती प्रकल्प आणले आणि तुम्ही किती प्रकल्प आणले, याची तुलना करायला तयार आहोत. पाटलांनी फक्त स्वतःचे उद्योग वाढवले, बाकी काहीच केले नाही, अशी टीका क्षीरसागर यांनी केली. दरम्यान, कोल्हापुरातील प्रमुख मार्गांवर 100 कोटींमधून कामे सुरू आहेत, परंतु पहिल्याच पावसात या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते करताना अर्धवट स्थितीत काम केल्याने कामाचा दर्जा खालावला असून, पावसाळा संपल्यानंतर केलेल्या रस्त्यांवर आता नव्याने सीलकोट करण्याची वेळ आली आहे. या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे आता 100 कोटींच्या रस्ते प्रकल्पाच्या गुणवत्तेचा मुद्दा शहरात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने वाद
अहिल्यानगर : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यातील थाटमाट आणि त्या कार्यक्रमासाठी लागलेला खर्च यावरून इंदुरीकर महाराज यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली. दरम्यान, हा वाद मागे पडत असतानाच आता इंदुरीकर महाराज यांच्या पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाची चर्चा होत आहे. इंदुरीकर महाराज यांचे […] The post इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाने वाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तर फडणवीस पंतप्रधान होतील: अब्दुल सत्तार
नागपूर : प्रतिनिधी प्रकाश आंबेडकर जे बोलले आहेत ती काळाची गरज आहे. माझा नेता मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांच्या तोंडात मी पेढा टाकायला हवा. त्यांचे आभार मानायला हवेत. शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांना काही तरी समजत असेल म्हणून ते बोलत आहेत. सध्या जर बघितले तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ […] The post तर फडणवीस पंतप्रधान होतील: अब्दुल सत्तार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंना फायदा नाही, तर त्यांचे नुकसानच होईल. यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडेल आणि त्याचा थेट फायदा महायुतीला होईल, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधुंच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना आठवले यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे महायुतीसोबत होते, पण आम्हाला त्याचा फारसा फायदा झाला नाही. याउलट, विधानसभा निवडणुकीत ते आमच्यासोबत नसतानाही महायुतीला मोठे यश मिळाले. त्यामुळे राज ठाकरे सोबत आल्याने निवडणुकीत फायदा होईलच, असे गणित मांडणे चुकीचे आहे. उलट त्यांच्यामुळे उद्धव ठाकरेंचे नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. मुंबईवर महायुतीचाच झेंडा, १६ जागांची मागणी मुंबई महापालिकेवर मिळवण्यासाठी महायुती सज्ज झाली आहे. यावेळी मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, हे निश्चित आहे, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच जागावाटपाबाबत बोलताना, मुंबईत आरपीआयला २५ पैकी किमान १६ जागा मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सांगली महापालिकेतही ५ ते ६ जागांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 'एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील', असे भाकीत केले होते. यावर बोलताना आठवले म्हणाले, आंबेडकर यांनी हे कोणत्या आधारावर म्हटले, हे माहीत नाही. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भाजप सहजासहजी मुख्यमंत्रीपद सोडेल, असे मला वाटत नाही. भाजप छोटे पक्ष संपवत नाही, मी पक्ष वाढवतोय आम्ही सत्तेत नसू, पण महायुतीमध्ये आहोत. भाजप छोटे पक्ष संपवत आहे, असे बोलले जाते. मात्र मी माझा पक्ष वाढवला आहे. आणखी दोन राज्यांत मान्यता मिळाल्यास आरपीआयला 'राष्ट्रीय पक्षा'चा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधींच्या आरोपांचा घेतला समाचार रामदास आठवले यांनी यावेळी राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांचा समाचार घेतला. मतदार यादीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, “मतांची चोरी झाली नाही पाहिजे, मतदार यादी दुरुस्त केली पाहिजे, हे योग्य आहे. मात्र राहुल गांधी सतत मतचोरी झाल्याचे आरोप करतात. मग लोकसभा निवडणुकीत काय मतचोरी झाली होती का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
२०२९ पर्यंत मोदीच पंतप्रधान: संजय गायकवाड
नागपूर : प्रतिनिधी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काही घडामोडी घडतील असे काही वातावरण नाही, भाजप आणि शिवसेना एकसंध आहे. ३३२ लोकांचे बहुमत आपल्याकडे आहे. शरद पवार असतानाच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकत होता आता तसे चित्र नाही. २०२९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान असतील असे चित्र आहे. संजय गायकवाड म्हणाले की, वेगळ्या विदर्भाचे […] The post २०२९ पर्यंत मोदीच पंतप्रधान: संजय गायकवाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैसे खर्च करण्यासाठी अधिवेशन झाले.सरकारकडून ज्या काही घोषणा झाल्या त्या मुंबई,ठाणे,नवी मुंबई यासाठी झाल्या पण विदर्भासाठी एकही घोषणा करण्यात आली नाही.त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक करणारे हे अधिवेशन होते अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे अधिवेशन झाले. सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले यांबाबत प्रश्न विचारूनही सरकारने कारवाई केली नाही अशी टीका सचिन अहिर यांनी केली. विदर्भातील धान,सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता.धानाला आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारने कारवाई केली नाही.राज्यातील तरुणांना. ड्रगचा विळखा आहे पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील म्हणाले या अधिवेशनात घोषणांचा नुसता पाऊस पडला. कापूस खरेदीचे केंद्र वाढवा ही मागणी केली पण त्याचा ही निर्णय झाला नाही. पैसे नाही खिशात पण घोषणा मात्र अपार अशी अवस्था महायुती सरकारची आहे. या सरकारने इतक्या घोषणा केल्या की त्यासाठी बजेट कमी पडेल अशी अवस्था आहे, अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यात गुंतवणूक येते, Mou झाले याबाबत सभागृहाला माहिती दिली पण ज्यांच्याबरोबर करार झाले त्या कंपन्या राज्यात येत नाही,प्रत्यक्षात गुंतवणूकच झालेली नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न उपस्थित केले त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी सभागृहात आक्रमकता दाखवत प्रश्न उपस्थित केले पण सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिली नाही अस शशिकांत शिंदे म्हणाले.
नागपूर येथील सात दिवसीय हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली, मात्र सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात विदर्भाच्या पदरात काहीच पडले नसल्याने विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. हे अधिवेशन म्हणजे केवळ 'निवडणुकीचा जुमला' असून, सरकारने विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अधिवेशनावर नाराजी व्यक्त करत, सरकारवर जोरदार हल्ला चढवला. कर्जमाफीचा पत्ता नाही, तारीख पे तारीख! अधिवेशनाच्या समारोपानंतर पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होती, पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. काल-परवापर्यंत सरकार ३० जूनला कर्जमाफी करणार, असे सांगत होते. मात्र, आज मुख्यमंत्र्यांनी भाषणात '१ जुलैला निकष आणि धोरण सांगू', असे म्हटले आहे. याचाच अर्थ सध्या तरी कर्जमाफीचा कोणताही पत्ता नाही. 'लाडकी बहीण' आणि युवकांचा विसर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे नाव सुद्धा घेतले नाही. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मुद्द्याच्याबाबत एक शब्दही काढला नाही. त्याचबरोबर अनेक विषय आहेत, ज्याबद्दल सरकारने एक शब्दही काढला नाही. त्यामुळे आजचे अधिवेशन वैदर्भीय जनतेला फसवणे, भावनांशी खेळणे, विदर्भातील जनतेला गृहीत धरणे, अशा अर्थानेच हे अधिवेशन पार पडले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वार्थाने सहकार्य केले, परंतु त्या सहकार्याच्या माध्यमातून पदरात काहीच पडले नाही, अशी टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. हे अधिवेशन 'वांझोटे' ठरले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या अधिवेशनाचा उल्लेख 'वांझोटे अधिवेशन' असा केला. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील आकडेवारी पाहिली तर ते भारताचे बजेट वाटत होते, पण प्रत्यक्षात पदरात काहीच पडले नाही. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपये बोनस आणि सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल अनुदानाची मागणी केली होती, पण त्याचा कुठेही उल्लेख नाही. संत्रा-मोसंबीला मार्केट नाही, बांगलादेशच्या निर्यात शुल्कावरही सरकार गप्प आहे. त्यामुळे हे अधिवेशन पूर्णपणे निष्फळ ठरले आहे. सिंचन प्रकल्पांवरून सरकारला आव्हान विजय वडेट्टीवार यांनी सरकारला थेट आव्हान दिले. २०१४ ते २०२५ या काळात महायुती सरकारने सुरू करून पूर्ण केलेले विदर्भातील एका धरणाचे नाव सांगावे, असे आम्ही विचारले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे याचे उत्तर नव्हते. विदर्भ वनसंपदेने आणि साधनसामग्रीने समृद्ध असूनही येथील प्रश्न सुटलेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. संत्रा उत्पादकांचे प्रश्न जैसे थे आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपये बोनस मागितला. त्याचा कुठेही पत्ता नव्हता. सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी प्रतिक्विंटल बोनस मागितला. त्याचाही कुठे उल्लेख केलेला नाही. विशेष म्हणजे, संत्रा-मोसंबीला विदर्भात कुठेही मार्केट नाही. त्यावरही सरकारने काही उल्लेख केलेला नाही. मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जाणारा आपला संत्रा, त्यावर जी निर्यात ड्युटी लावलीये, त्यामुळे आपल्या संत्र्याला मार्केट मिळत नाही. पण सरकारने या कोणत्याही प्रश्नावर भाष्य केले नाही. विदर्भात शिक्षणाच्या संदर्भात मोठे प्रश्न आहेत. कापूस उत्पादकांचे मोठे प्रश्न आहेत. ड्रग्जचा विळखा आणि गुन्हेगारी राज्यात वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून वडेट्टीवार यांनी चिंता व्यक्त केली. विदर्भासह महाराष्ट्र सध्या ड्रग्जच्या विळख्यात सापडला आहे. या ड्रग्जमुळे पूर्ण युवा पिढी उद्ध्वस्त होत आहे. पण त्यावर कुठलीही ठोस उपाययोजना नाही. एवढ्या प्रमाणात ड्रग्ज येतो कुठून? त्याच्या मुख्य लिंक कुठपर्यंत आहे? मुख्य आरोपी का पकडले जात नाहीत? याचे उत्तर भेटले नाही. मुख्य आरोपींना का पकडले जात नाही? याचे उत्तर मिळत नाही. ४६ हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला, पण त्यावरही ठोस उपाययोजना नाही. गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचे मान्य करूनही सरकार केवळ जुजबी उत्तरे देत आहे, असा आरोप त्यांनी केला. मुंबईचे लाड, विदर्भाकडे पाठ यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचे निवडणुकीचा जुमला असे नामकरण करता येईल. तसेच हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन होते. फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्राचा विचार करता, मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी असे होते. अधिकाधिक प्रश्नांवर मुंबईच्या लक्षवेधी होत्या. त्याला अमर्याद असा वेळ गेला. धोरणांवर चर्चा करण्यासाठी अजिबात वेळ नव्हता, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. अधिवेशन गुंडाळण्यासाठी घाई केली कुपोषणाचा प्रश्न मोठा आहे. ४६ हजार नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यावर काही उपाययोजना नाही. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही काही उदाहरणे दिलीत. त्यालाही काही उत्तर मिळाले नाही. हे अधिवेशन गुंडाळण्यासाठी घाईगडबड केली आणि थातुरमातुर उत्तरे देऊन विदर्भातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केले, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
क्षेत्र त्रिधारा देवस्थान विश्वस्तपदी राजकुमार भांबरे यांची निवड
परभणी : परभणी शहरा जवळ असलेल्या श्री ओंकारेश्वर देवस्थान श्री क्षेत्र त्रिधारा येथील विश्वस्तांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात संपूर्ण शहरासह जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्यासाठी परीचित असलेले करसल्लागार राजकुमार भांबरे यांची विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. संपूर्ण मराठवाड्यात श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान प्रसिध्द असून या ठिकाणच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल भांबरे यांचे विविध स्तरातून […] The post क्षेत्र त्रिधारा देवस्थान विश्वस्तपदी राजकुमार भांबरे यांची निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हे अधिवेशन फक्त बिल्डरांच्या फायद्याचे
नागपूर : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे आहेत. अशामध्ये नागपूर येथे ७ दिवसीय हिवाळी अधिवेशन घेण्यात आले. पण आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला न्याय मिळण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन व्हायला हवे होते. पण, विदर्भाच्या पदरात काहीच पडले नाही. हे अधिवेशन […] The post हे अधिवेशन फक्त बिल्डरांच्या फायद्याचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत शासन कटिबद्ध
नागपूर : वांद्रे शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच घेतला असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न विचारला असता त्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माहिती दिली. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, […] The post वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत शासन कटिबद्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली,यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं असा आक्रमक पवित्रा वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतला. यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले. शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील भाकड जनावरांबाबत प्रश्न उपस्थित केले. गोवंश हत्याबंदी कायदा आहे. जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते ऐकले नाही तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकऱ्याला इतकी मारहाण केली की त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकऱ्यांना काही पैसे तरी मिळतात. पण आता या बोगस टोळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे,ही वसुली थांबवली पाहिजे. वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरफायदा घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत शेतकरी संघटनेकडून तक्रारी देखील आल्या आहेत. शेतकरी जनावरांची वाहतूक करताना अडवणूक झाली तर अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. महाज्योती राबवण्याऱ्या परीक्षेचे प्रशिक्षण ऑफलाईन करावे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार असल्याने त्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यार्थ्यांनी काल आंदोलन देखील केले. यावर्षी महाज्योतीला जो निधी दिला आहे तो कमी आहे.. लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा निधी द्यावा तसेच महाज्योतीचे गेल्यावर्षीचा निधी देखील प्रलंबित आहे. तो ही देण्यात यावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ऑफलाईन प्रशिक्षणाची मागणी असेल तर ऑफलाईन ही देण्यात येईल हे स्पष्ट केले. निधी कमी दिला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले ज्या विभागाला कमी निधी देण्यात आला आहे याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक झाली आहे, मार्च मधील पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मराठी माणूस पंतप्रधान होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
पुणे : प्रतिनिधी दिल्लीच्या राजकारण मोठा भूकंप होणार असून आत्ताचे पंतप्रधान बाजुला होतील आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. ते म्हणाले होते की महिनाभरात हा बदल होईल. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी थेट तारीख सांगत १९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे सांगितले. ते म्हणाले, नवीन पंतप्रधान […] The post मराठी माणूस पंतप्रधान होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह
पुणे : प्रतिनिधी येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच-२०२५) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीत ओप्टीवीस (एआयसीटीई), वेलोट्रीज (रक्षा मंत्रालय) आणि ट्रेलब्रेजर्स (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) या संघांनी विजेतेपद पटकावले. तर इनो-कोर (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), क्लच एसआयएच […] The post ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लग्नात घोडा लावला नाही, तसेच वऱ्हाडींना फेटे दिले नाही, आता फ्लॅट घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील सासरच्या सहा जणांवर शनिवारी ता. 13 औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील कोंडशी येथील माधुरी यांचा विवाह परभणी जिल्ह्यातील आळंद येथील गजानन सांगडे याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. तुझ्या कुटुंबियांना लग्नामध्ये घोडा लावला नाही तसेच वऱ्हाडी ्मंडळींनी फेटे दिले नाही या कारणावरून त्यांचा छळ केला जाऊ लागला होता. त्यांनतर फ्लॅट घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून त्यांना त्रास दिला जाऊ लागला होता. दऱम्यान, सासरी होणारा छळ असह्य झाल्याने माधुरी ह्या माहेरी कोंडशी येथे राहण्यासाठी आल्या. त्यानंतर सासरची मंडळीही त्यांच्या माहेरी आली त्यांनी माधुरी यांना मारहाण केली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी माधुरी यांचे आई, वडिल मधे पडले असता त्यांच्या आई, वडिलांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांचाकडून होणारा छळ असह्य झाल्याने माधुरी यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गजानन सांगडे, किसन सांगडे यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सिद्दीकी पुढील तपास करीत आहेत.
एकनाथ शिंदे यांना दिल्लीने आदेश दिला आहे की भाजपमध्ये मर्ज व्हा अशी माहिती मला मिळाली आहे. त्यांची सुरवात म्हणून हे संघ कार्यालयात जाऊन कशा प्रकारचे एकत्रिकरण करायचे अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे सेनेचे लोक रेशीम बागेत गेले असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, भाजपची आणि अजित पवारांची विचारधारा वेगळी असली तरी धोरणं राबवण्याचे काम हे भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे त्या विचारधारेसोबत किती फारकत घ्यायची हा अजित पवार यांचा प्रश्न आहे. अधिवेशनातून जनतेला काही मिळाले नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, नागपूरमध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन असते त्यावेळी नागपूरला आणि विदर्भाला काही मिळेल अशी अपेक्षा असते. शेतकऱ्यांना काही तरी मिळेल अशी अपेक्षा असते पण या अधिवेशन काळात असे काहीच घडले नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले पण अद्यापही नागपूर आणि शेतकऱ्यांना काही मिळालेले नाही. एकही मंत्री उत्तर देत नाही, प्रश्न विचारल्यावर त्यावर काही ठोस निर्णय दिला जात नाही. अधिवेशनामध्ये केवळ कार्यक्रम उरकण्याचा प्रयत्न झाला. जाता-जाता घोषणा करतील पण पैसे कुठे? शशिकांत शिंदे म्हणाले की, नागपुरात झालेल्या अधिवेशनामुळे विदर्भाला काही न्याय मिळाला असे मला वाटत नाही. आता जाता जाता काही तरी पॅकेज जाहीर करतील. पण त्या पॅकेजला पैसे पाहिजे ना? केवळ मोठ्या आकड्यांची घोषणा करुण काही फायदा नाही. त्यासाठी सरकारकडे पैसे तर पाहिजे ना. प्रत्यक्षात कृतीत काही येत नाही हे जनतेने पाहिले आहे. आता विदर्भाच्या जनतेने विचार केला पाहिजे. पोलिसांच्या लक्षात कसे आले नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्याच्या आजू बाजूच्या शकरामध्ये ड्रग्ज निर्मीतीचे कारखाने आहेत.कराडला सुद्धा काही दिवसांपूर्वी एक कारखाना उद्ध्वस्त झाला. पण दुर्गम भागात असलेला कारखाना जर पोलिसांना सापडतो तर यामागे किती मोठी प्लॅनिंग आहे विचार करण्याची गोष्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाच्या बाजूला हा कारखाना असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी अनेकवेळा पोलिस जात असतात मग त्यांना हे कसे समजले नाही. त्यामागे पोलिसांची मदत आहे का? शिंदेंचे निकटवर्तीय यामध्ये असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे मोठे नेते एनडीएबद्दल भाकीत करत आहे, तिकडे त्यांचा पक्ष संपत चालला आहे. या मोठ्या नेत्यांना काय झाले हेच समजत नाही. असे काही बदल होणार अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत त्यांना चांगले माहिती आहे कायदा काय सांगतो. विरोधी पक्षनेत्यासाठी काय अडचण आहे हे अभ्यासू नेत्यांना माहिती आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेता नेमला जाऊ शकत नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, ही कायद्याची अडचण आहे. राज्यात ड्रग्जचे प्रमाण वाढत चालले आहे. बंदुकीने गोळ्या घालण्यापेक्षा मुलांना ही सवय लावत वेगळ्या मार्गावर नेले जात आहे. दहशतवादी पकडण्यापेक्षा या ड्रग्ज माफियांना पकडणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही रेशीमबागेत येतो संजय शिरसाट म्हणाले की, संघाचा बेस हा देशप्रेमाचा आहे. या देशामध्ये सौदंर्याचे वातावरण असावे ही संघाची भूमिका राहत आलेली आहे. म्हणून आम्ही जेव्हा नागपूरच्या अधिवेशनात येतो त्यावेळी रेशीमबागेत येत सर्वांची भेट घेत असतो. हिंदूत्व सोडल्याने हाल त्यांचे हाल संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेचे दोन भाग झाले कारण ज्यांनी हिंदूत्वांचा विचार सोडला त्यांना त्या गोष्टीचा परिणाम भोगावे लागले. शिवसेना प्रमुखांनी ज्या कडवडपणे हिंदुत्व पुढे नेले ते हिंदूत्व जे विसरले त्यांचे हाल तुम्ही पाहात आहात. तर आम्ही ते विसरल्याने आमची प्रगती सुरू आहे. अजित पवार आले नाही हा त्यांचा प्रश्न संजय शिरसाट म्हणाले की, रा.स्व.संघाच्या बौद्धिकसाठी अजित पवार मागील वेळेस सुद्धा आले नव्हते यावेळीही आले नाही. कुणी आले कुणी आले नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. संघ कोणाला बोलवत नसतो, हे काही बंधंनकारक नाही असे शिरसाट यांनी म्हटले आहे. शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! - एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या कार्याचे स्मरण केले. विशेषतः शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळतीजुळती असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला संघाच्या शाखेतून प्रेरणा घेतली होती. आरएसएसच्या आपत्कालीन मदतकार्यात आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचाही त्यांनी गौरव केला.
छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसेनेच्या शिंदे गटात पुत्र प्रेमातून निर्माण झालेली नाराजी शनिवारी 13 डिसेंबर रोजी उघडपणे फुटली. ‘दिव्य मराठी’त ही बातमी छापल्यानंतर त्याचे पडसाद दिवसभर उमटले. तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल या दोघांच्या नाराजीमुळे गुलमंडी प्रभागात राजकीय ताप वाढला. काल घडलेल्या घटनांचा अंक दुसरा शनिवारी पाहायला मिळाला. दोघांनी आपण या तिकिटासाठी दावेदार का हे स्पष्ट केले. माझा त्याग, गुलमंडीची मागणी रास्त : तनवाणी तनवाणी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदू मतदार विभागू नये आणि एमआयएमचा आमदार होऊ नये म्हणून “मी हिंदुत्वासाठी त्याग केला. सध्या माझ्याकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभासंपर्क प्रमुखाचे पद आहे, पण कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण मला दिले जात नाही. पेपरमध्ये बातमी आली की मला कळते. जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ मला ज्युनिअर आहेत, पण तरीही याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे. माझ्या मुलासाठी तिकीट मागितले आहे; माझा भाऊ गुलमंडीवर अपक्ष जिंकलेला आहे.” त्यामुळे आमचादावा रास्त असल्याचे तनवाणी म्हणाले. यावर प्रतिसाद देताना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की,कसला त्याग? आम्ही विकासाची कामे करून निवडून आलो. एका गुलमंडी वॉर्डावरून निवडून येत नाही. प्रभाग मोठा असतो. समिती तिकीट मुलगा म्हणून नाहीतर कामामुळे दिले जाईल, असे प्रदीप जैस्वाल यांनी सांगितले, तर ऋषिकेश जैस्वाल यांनी देखील मी गुलमंडीहूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. जंजाळ-तुपे यांच्यात शीतयुद्धदेखील सुरूच शिवसेनेकडे दोन दिवसांत 836 अर्ज आले आहेत. यामध्ये सर्व नगरसेवकांनी देखील अर्ज भरले आहेत, तर काही उबाठा आणि भाजप आणि काँग्रेसमधील इच्छुकांनी देखील अर्ज केल्याची माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी यावेळी दिली आहे. दरम्यान, समन्वय समितीमधील सदस्य त्र्यंबक तुपे यांनी अर्ज घेण्यासाठी इतरांना पाठवले होते. मात्र या ठिकाणी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ उपस्थित होते. त्यांनी गावाकडे गेले असेल म्हणून फॉर्म देता येणार नाही. उमेदवारांनी स्वत: अर्ज घेण्यासाठी यावे, असे संबंधितांना बजावले. त्यानंतर अवघ्या वीस मिनिटांत तुपे या ठिकाणी अर्ज नेण्यासाठी आले. अर्ज लगेच घेऊन ते निघून गेले. इनसाइड स्टोरी विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार तनवाणी यांनी उबाठाचे मिळालेले तिकीट परत करत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जैस्वालांनी किमान मनपाचे तिकीट तरी आमच्यासाठी सोडावे, अशी अपेक्षा आहे, तर जैस्वाल यांची प्रकृती पाहता त्यांना आपला राजकीय वारसदार तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी हीच मनपा निवडणूक मोठी संधी आहे. मुलाला निवडून आणण्यासाठी एक खात्रीशीर प्रभाग पाहिजे. तो गुलमंडीच आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा यासाठी आग्रह आहे. शिरसाट-जंजाळ यांच्यातील वादानंतर जैस्वाल-तनवाणी या बड्या नेत्यांनी छोट्या उमेदवारांच्या अडचणी सोडवणे अपेक्षित आहे. मात्र या दोघांमध्ये वाद सुरु झाले आहेत. या पुन्हा पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे.
प्रकाश आंबेडकर हे जे बोलले आहेत ती काळाची गरज आहे. माझा नेता मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांच्या तोंडात मी पेढा टाकायला हवा. त्यांचे आभार मानायला हवे. शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांना काही तरी समजत असेल म्हणून ते बोलत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असे म्हटले यावर बोलताना बोलताना शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी असे म्हटले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोणताही पुढारी जर पंतप्रधान झाला तरी आम्हाला त्याचा आनंद होईल. पृथ्वीराज चव्हाण बोलले म्हणजे त्यांना काही तरी माहिती असेल म्हणूनच ते बोलले असतील. सध्या जर बघितले तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरीष्ठ नेता म्हणून चांगले काम करत आहे. ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. दिल्ली चव्हाणांना चांगल्या पद्धतीने माहिती अब्दुल सत्तार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची खूर्ची रिकामी झाली तर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड होऊ शकते. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानात किती सत्यता आहे हे पाहावे लागेल. ज्या वेळेस घडायचे ते दिल्लीमधून घडते. दिल्लीत काय घडते हे माझ्यापेक्षा जास्त पृथ्वीराज चव्हाण यांना चांगल्या पद्धतीने माहिती असते. ते जे बोलले त्यात किती सत्य आहे हे आपण 19 तारखेला पाहून घेऊ. ..तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री होतील अब्दुल सत्तार म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व पक्षीय नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांच्याइतका राजकारणाचा अभ्यास देशात आता काहीच लोकांना आहे. ते जर काही बोलत असतील तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री होतील. मुस्लीम मते ही कोणत्या एका पक्षाची नाहीत ती विकासाच्या मागे असतात. सामाजिक आणि धामिर्क भावना जपणाऱ्यांसोबत ही मते राहतात. माजी खासदार जलील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर बोलू नये. भाजपसोबत युती होणार नाही अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोडमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची भाजपसोबत युती होणार नाही. भाजप आमच्याविरोधात सर्व पक्ष घेऊन लढत आहे. एकटा भाजप तिथे आमच्याविरोधात लढू शकत नाही. एमआयएम आणि भाजनप सिल्लोडमध्ये एकत्र आले आहेत. तिथे भाजपचा एकाधा नगरसेवक निवडून येईल बाकी सर्व नगरसेवक आमच्या शिवसेनेचे निवडून येतील. गेली 43 वर्षे सिल्लोड माझ्यासोबत आहे मी कोणत्याही पक्षात गेलो तरीही लोकं माझ्यासोबत असतात.
नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला न्याय मिळण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन व्हायला हवे होते. मात्र, विदर्भाच्या पदरात काहीच पडले नाही. हे अधिवेशन कोणालाही न्याय देण्यासाठी नसून केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यासाठी आणि त्यातून आगामी निवडणुकांसाठी मते विकत घेण्यासाठीच होते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. आज नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. तत्पूर्वी भास्कर जाधव यांनी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढले. महानगरांवर डोळा, विदर्भाकडे पाठ अधिवेशनाच्या सांगतेच्या वेळी बोलताना जाधव म्हणाले, विदर्भ वेगळा होऊ नये म्हणून झालेल्या करारानुसार वर्षातून एक अधिवेशन नागपूरला होते. या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे अपेक्षित असते. मात्र, सभागृहात ज्या घोषणा झाल्या, त्या केवळ मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरसारख्या मोठ्या महानगरपालिकांत मते मिळवण्यासाठीच होत्या. बिल्डरांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले, पण विदर्भातील सामान्य माणसाला काय मिळाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घातक विधेयके चर्चेविना मंजूर सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जाधव म्हणाले, कालच सभागृहात एमपीडीए कायद्याचे १०८ क्रमांकाचे विधेयक अचानक आणले गेले. त्यात अनेक घातक तरतुदी असतानाही कोणतीही चर्चा न करता ते मंजूर करण्यात आले. हे अधिवेशन केवळ आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आणि लोकांना पैसे वाटण्यासाठीच घेतले गेले, हे माझे म्हणणे आता खरे ठरले आहे. विधानभवनाचे नाव 'लक्षवेधी भवन' ठेवा लक्षवेधींना वेळच्यावेळी उत्तरे मिळाली नाही, तर राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणावा असे अध्यक्ष महोदय म्हणाले. २०२२ पासून आपल्या विधानभवनाचे नाव लक्षवेधी भवन ठेवा, असे मी म्हणालो होतो. इतके हे लक्षवेधीचे प्रकरण बरेच पुढे गेलेले आहे. या विषयात जे बोलायचे ते बोलून झालेले आहे. परंतु, त्यातून फारशी काही सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे त्यावर फार भाष्य करण्यात काही अर्थ नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.
माऊली संकुल सभागृहात नुकत्याच पारपडलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा रंगभूमीवरील बदलते सकारात्मक चित्र प्रकर्षाने दिसून आले. विशेष म्हणजे, यंदा एकूण 22 नाटके सादरझाली असून यात ग्रामीण नाट्यसंघांचा मोठा प्रतिसाद लाभला.यंदा कलाकार म्हणूनच नव्हे तर लेखक, दिग्दर्शक आणि बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढलेला दिसून आला. कल्पना नवले (माझं घर), विद्या जोशी (लास्ट स्टॉप) व ज्योती खिस्ती (फार्महाऊस) या 3 महिला दिग्दर्शिकांनी यंदा नाटकाचे दिग्दर्शन करत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पेलली. तर ‘जन्मवारी’ या नाटकाचे लेखन हर्षदा बोरकर यांनी केले.या पैकी कल्पना नवले दिग्दर्शित ‘माझं घर’ हेनाटक स्पर्धेत तिसरे आले. आशयघन कथा, सामाजिक जाणिवा आणि सशक्त सादरीकरण यामुळे या नाटकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय प्रकाश योजना, रंगमंच व्यवस्थापन, वेशभूषा, रंगभूषा अशा बॅकस्टेज विभागांमध्येही महिला व युवतींची उपस्थिती ठळकपणे जाणवली. ही स्पर्धा नव्या पिढीतील कलाकारांना व्यासपीठ देणारी व समाजातील सकारात्मक बदल अधोरेखित करणारी ठरली.अहिल्यानगरची रंगभूमी अधिक समावेशक,सशक्त आणि प्रेरणादायी होत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. पारंपरिक शहर केंद्रितरंगभूमी पलीकडे जाऊन ग्रामीण कलाकारांनी आपली ताकद दाखवून दिली. अभिनय, नेपथ्य, वेशभुषासंगीत दिग्दर्शनात बाजी यंदाची राज्य नाट्य स्पर्धा अधिक चुरशीची होऊन निकालातही महिलांनी बाजी मारली.उत्कृष्ट अभिनय व नेपथ्याचे प्रत्येकी एक,अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रे 5 जणींनी,उत्कृष्ट वेशभूषेची 3 व संगीत दिग्दर्शनात दोघींनी, असा एकूण 12 जणींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. समृद्ध करणारा अनुभव स्पर्धेत 15 वर्षांपासून अभिनय करत असून बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकावले.म्हणून 4 वर्षांपासून या स्पर्धेतही अभिनय व दिग्दर्शनाची दुहेरी जबाबदारी उचलली.अभिनयासोबत महिलांना दिग्दर्शन व लेखनाच्या संधी मिळणे, ही मोठी बाब आहे.रंगभूमीवर स्त्री दृष्टीकोन अधिक ठळकपणे मांडला जावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- विद्या जोशी, दिग्दर्शिका
महापालिकेच्या वाहतुक सेलतर्फे शहरात 28 ठिकाणी 4155 वाहनांसाठी पे ॲन्ड पार्क तत्वावर पार्किंग सुरू केले जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत पार्किंग सुरू झाल्यानंतर त्याच्यापासून बाहेर 500 मिटर अंतरात जर वाहने लावलेली दिसली तर त्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. दुचाकीसाठी 700 तर चार चाकीसाठी 1150 रुपये मोजावे लागतील. यामुळे अधिकृत पार्किंगच्या बाहेर लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे येणारे अडथळे, होणारी कोंडी दूर होण्यास मदत होईल असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी सुटण्याच्या दृष्टीने पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती. मात्र 35 लाख हा जादादर 19 लाखावर आणूनही निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी सिंहस्थापूर्वी शहरात पार्किंगची कामे मार्गी लावायचे असल्याने वाहतूक सेलने ही रक्कम 12 लाखावर आणली. त्यानंतर आता हे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मल्टी पार्किंगचा विचार व्हावा महापालिकेने पुणे, मुंबईच्या धर्तीवर गर्दीच्या ठिकाणी मल्टी पार्किंगचा विचार केल्यास एकाच जागेवर मोठ्या संख्येने वाहने लावली जातील. पण नाशिकमध्ये तशी पार्किंग होणार नाहीये. तरीही जेथे पार्किंग होईल त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होते. परदेशात नियमानुसार पे ॲण्ड पार्कमध्येच वाहने लावली जातात. आपल्याकडे मात्र तशी शिस्त नाही. ती शिस्तही लावण्याची गरज आहे. या पार्किंगमध्ये वाहने सुरक्षित राहतात. ठिकठिकाणी मल्टीलेवल व मॅकेनिकल ट्रॅक पार्किंगची व्यवस्था केल्यानंतरच पार्किंगचा प्रश्न मार्गी लागेल. पार्किंग स्थळांपासून 500 मी अंतरावरील अनधिकृत पार्क वाहनांवर कारवाई स्मार्ट पार्किंगसाठी 3 निविदाधारकांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदा सेलकडून तांत्रिक तपासणी सुरू असून अटी शर्थींची पूर्तता करणाऱ्यास कार्यारंभ आदेश दिले जातील. - रवींद्र बागुल, कार्यकारी अभियंता, वाहतूक सेल, मनपा
तुम्ही कधी विचार केला आहे का, हवामान विभागाने (आयएमडी) नोंदवलेले कमाल, किमान तापमान आणि प्रत्यक्षातील थंडीत विंड चिल्ड इफेक्टमुळे फरक जाणवतो. हवामान विभागाचे तापमान मापक अचूक असूनही, सामान्य माणसाला येणारा रिअल फील मात्र वेगळा असतो. या फरकाचे उत्तर दडले आहे ते स्टीव्हन्सन स्क्रीन नावाच्या पांढऱ्या लाकडी पेटीत. वैज्ञानिकदृष्ट्या या माध्यमातून मोजण्यात येणारे तापमान अत्यंत अचूक असले तरी मानवी अनुभव, स्थानिक वातावरणातील बदल यामुळे प्रत्यक्ष नोंद आणि आपल्याला जाणवणारे तापमान याच्यात फरक दिसून येतो. हिवाळ्यात वाऱ्याच्या वेगामुळे शरीरातील उष्णता वेगाने कमी होते. त्यामुळेही प्रत्यक्ष तापमानापेक्षा जाणवणारे तापमान कमी असते. अर्थात तापमान जास्त नोंदवले तरी, थंडी त्यापेक्षा जास्त जाणवते, असे चिकलठाणा वेधशाळेतील हवामान शास्त्रज्ञ राजेश कुमार यांनी सांगितले. स्टीव्हन्सन का आवश्यक आहे? हवेतील तापमान उपकरणे जर थेट उन्हात ठेवली तर मोजलेले तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त निघते. ही चूक टाळण्यासाठी स्टीव्हन्सन स्क्रीनचा वापर केला जातो, ज्यामुळे तापमान आणि आर्द्रतेची नोंद आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करता येते. ...म्हणून थंडी वेगळी जाणवते स्टीव्हन्सन स्क्रीनमध्ये ठेवलेल्या तापमापीला तापमान मोजण्यासाठी मोकळ्या हवेची आवश्यकता असते, परंतु स्क्रीनची रचना अशी असते की ती वाऱ्याचा थेट प्रवाह तापमापीवर पडू देत नाही. त्यामुळे वातावरणातील वास्तविक तापमान अचूकपणे दाखवते, परंतु वाऱ्याचा परिणाम आणि आर्द्रता यांसारख्या समावेश स्क्रीनच्या नोंदीत नसतो. यामुळेच वाऱ्यामुळे जाणवणारी थंडी ही नेहमी अधिकृत तापमानापेक्षा वेगळी जाणवते. स्क्रीनची वैशिष्ट्ये दुहेरी छप्पर : वरचा भाग गरम होऊ नये म्हणूनजाळीदार भिंती : नैसर्गिक हवेचा प्रवाह राखण्यासाठीपांढरा रंग : सूर्यकिरणे परावर्तित करण्यासाठीजमिनीपासून उंची : सुमारे १.२५ ते २ मीटरभारतामध्ये दाराची दिशा : उत्तरेकडे काय असते स्टीव्हन्सन स्क्रीन? स्टीव्हन्सन स्क्रीन हे हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे एक खास, पांढऱ्या रंगाचे, जाळीदार फळी असलेले लाकडी किंवा धातूचे छोटे घरट्यासारखे बनलेले आवरण आहे. यामध्ये तापमान आणि आर्द्रता मोजण्यासाठी आवश्यक उपकरणे ठेवली जातात. स्टीव्हन्सन स्क्रीनचे उद्दिष्ट थेट सूर्यप्रकाश, पाऊस, हिमवृष्टी आणि वाऱ्यापासून उपकरणांचे संरक्षण. तापमान व आर्द्रतेचे अचूक आणि प्रमाणित निरीक्षण सूर्याच्या किरणांमुळे तापमानात होणारी चूक टाळणे. जगभरात याच पद्धतीचा वापर जगभरात या एकाच पद्धतीने हवेतील तापमान मोजण्यात येते. स्टीव्हन्सन स्क्रीनमुळे तापमापीवर उन्हाची किरणे पडत नाहीत, त्यामुळे मोजण्यात येणारे तापमान अचूक ठरते. तापमापी ठेवण्यात आलेल्या उंचीवरनही तापमानात फरक पडू शकतो. -राजेशकुमार, हवामानशास्त्रज्ञ, प्रभारी अधिकारी, भारतीय हवामान विभाग, छत्रपती संभाजीनगर.
कौलखेड परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर स्कूलने वीर तानाजी-स्वराज्यस सिंह' हे संस्कृत भाषेतील ऐतिहासिक नाटक सादर करून शिवकालीन इतिहास जागवला. विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर संस्कृत भाषेत नाटक सादर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे या इतिहासात गाजलेल्या जोश पूर्ण प्रतिज्ञेवर आधारित नाटकाने स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला. वीर तानाजी' या नाटकाच्या अनुवाद, लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्ना लांडे यांनी पार पाडली. सहाय्यक शिक्षिका भारती काळे व उज्वला कावरे यांनी त्यांना सहकार्य केले. सदर नाटकात किंजल पालखेडे, सिद्धी ठाकूर, स्वराज गावंडे, स्पृहा फुलाने, अन्वित चव्हाण, मिहीर केतकर, देवस्वी काळे, रजत गिरी, अथर्व आव्हाळे, सनी भोकरे, तनवी पाटील, भिमरत्न पळसपगार, स्पर्श जोशी व स्वराली राऊत या बालकलावंतांनी ऐतिहासिक वेशभूषेत उत्तम भूमिका वठवल्या. गत वर्षी करंडक पटकवणाऱ्या प्रभात किड्स च्या आहुती' या नाटकाने करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या अत्याचारांशी सामना करीत देश प्रेम व स्वातंत्र्याची प्रेरणा या नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आली. विविध बालनाट्यांमुळे अकोलेकर रसिकांना उत्तम नाटकांची मेजवानी मिळत आहे. ८ नाटकांचे सादरीकरणाचे नियोजन आहे. त्यात जेआरडी टाटा स्कूलचे बिंदू संदेश' प.पू. श्री हेडगेवार शाळा चे बोन्साय', एज्युविला पब्लिक स्कूल पातुरचे लाली', किड्स झोन इंग्लिश स्कूल बार्शीटाकळीचे कष्टाची जाणीव', सातपुडा इंग्लिश स्कूल वरवट बकालचे अण्णा', व स्कूल ऑफ एक्सलन्स स्वयंपूर्ण आर. जे. चवरे हायस्कूल कारंजा लाडचे खेळताड' व डॉ. नीना वंदे आदर्श विद्यालय वरूड, अमरावतीचे जैसा राजा तैसी प्रजा' या नाटकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी व एकापेक्षा एक सरस असलेल्या या नाटकांचे प्रयोग झाले. यात ज्ञानदीप इंग्लिश स्कूल आणि सदाफुली रंगीत झाली, स्कूल ऑफ स्कॉलर आनंदाचे झाड' श्री संताजी कॉन्व्हेंट कसांडी एक परिक्रमा', प्लॅटिनम जुबली स्कूल जाने कहा गये वो दिन' विवेकानंद इंग्लिश स्कूल असं कसं', जुबिली इंग्लिश स्कूल कुंभारीचे आरसा', मनुताई कन्या शाळा वृक्षवल्ली आम्हा सोयरे', गीतांजली विद्यालय मोबाईल मायाजाल' व भारत विद्यालय लेक वाचवा हो' या नाटकांचा समावेश होता. नाट्य महोत्सवाची जबाबदारी महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधू जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, जेआरडी टाटा स्कूलच्या प्राचार्या प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
देवस्थानांना दान स्वरूपात मिळणाऱ्या किंवा समाजहितासाठी मंदिरांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनींच्या हस्तांतरणावर आकारले जाणारे मुद्रांक व नोंदणी शुल्क त्वरित माफ करावे, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याबाबत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील देवस्थानांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. मंदिरांचा उद्देश नफा नसतानाही त्यांना कंपनी किंवा सहकारी संस्थांप्रमाणे शुल्क लावणे, ही प्रशासकीय विसंगती त्वरित दूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दान-जमिनींना व्यावसायिक' शुल्क लावणे सांस्कृतिक परंपरेला बाधक असल्याची भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली. सध्या मंदिरांना मिळणारे जमिनीचे हस्तांतरण व्यवहार हे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कक्षेत येतात. मंदिराचे कार्य पूर्णतः धार्मिक व धर्मदाय स्वरूपाचे असतानाही, या व्यवहारांवर व्यावसायिक दराने शुल्क आकारले जाते. यामुळे अनेक लहान मंदिरांना दान किंवा खरेदी व्यवहार पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले आहे, असे विश्वस्तांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र मंदिर महासंघाने महासंघाकडून भूमिका जाहीर करण्यात आली. मंदिर महासंघ २०२३ पासून राज्यातील १५,००० हून अधिक मंदिरांचे संघटन आणि सुव्यवस्थापन करत आहे. ही शुल्क रचना सांस्कृतिक परंपरेला व भक्त भावनेला बाधक असल्याचे महासंघाचे मत आहे. दरम्यान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. देवस्थानांच्या जमिनीवरील शुल्कमाफीचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून, तो दानसंस्कृतीशी आणि सामाजिक जबाबदारीशी निगडित आहे. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी देवस्थांकडून होत आहे. अकोल्यातील बहुसंख्य मंदिरांचा पाठिंबा निवेदना महासंघाचे पदाधिकारी तसेच अनेक देवस्थानांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रा. राजू इंगळे, अधिवक्ता राधा मिश्रा, अधिवक्ता श्रुती भट, अधिवक्ता अक्षय नवलकर, अमोल वानखडे, अजय खोत, सुनील पाटील व अश्विनी सरोदे यांनी या शुल्कामुळे मंदिरांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला.या मागणीला अनेक संस्थानतर्फे पाठिंबा देण्यात आला. श्री चंडिकादेवी संस्थान, कुरणखेड, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थान, अकोला, श्री काळा मारुती मंदिर, रामनगर, अकोला, श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, जुने शहर, अकोला, संत गजानन महाराज मंदिर, गंगानगर, अकोला, श्री जागेश्वर अंबिका संस्थान, जुने शहरचा सामवेश आहे. महासंघाकडून या आहेत मागण्या महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील देवस्थानांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. यात पुढील काही प्रमुख मागण्या केल्या. यामध्ये संपूर्ण शुल्कमाफी: धार्मिक व धर्मदाय संस्थांचा उद्देश नफा नसल्याने, हस्तांतरण व्यवहारांवरील सर्व शुल्क-मुद्रांक, नोंदणी व इतर कर पूर्णपणे माफ करण्यात यावे. कायद्यात स्पष्ट दुरुस्ती: सध्या असलेल्या तुटपुंज्या आणि अटींसह असलेल्या शुल्कसवलती व्यवहार्य नाहीत. त्यामुळे कायद्यात आवश्यक दुरुस्ती करून स्पष्ट व निर्विवाद धोरण तयार करण्यात यावे. व्यवसायीकरण थांबवा: मंदिरांच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीला व्यावसायिक व्यवहाराप्रमाणे शुल्क लावणे थांबवावे.
तालुक्यातील सस्ती येथील महावितरण उपकेंद्राचा कारभार ढेपाळला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी व समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. पावसाळ्यात वाहून गेलेल्या डीपी संदर्भात पांगरताटी येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. ९ जूनपासून सस्ती उपकेंद्रांतर्गत पांगरताटी येथील शेतकरी किशोर शिवराम जाधव, गौतम रामलाल दुग्गड, प्रकाश नामदेव चोंडकर यांच्या तीनही डीपी गौतम रामलाल दुग्गड यांच्या शेतात आहेत. त्या पावसाळ्यात आलेल्या पुरात वाहून गेली. तेंव्हापासून डीपी बंद आहेत. तत्काळ दुरूस्ती करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सस्ती येथील महावितरण कार्यालयाला वारंवार भेटी देत निवेदन दिले. परंतु शेतकरी बांधवांच्या मागणीकडे सस्ती येथील महावितरण उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दुर्लक्ष करत आहेत. शेतकरी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वात सस्ती उपकेंद्रासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमच्या शेतात गहू, हरभरा पेरला आहे. तो पाण्याअभावी सुकून जात आहे. आम्ही सावकाराचे कर्ज फेडल्याशिवाय आम्ही शांततेत आयुष्य जगू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाने आम्हाला गळफास घेण्याची परवानगी द्यावी, नसता शेतकरी गळफास का घेतात, हे नाटकाच्या माध्यमातून सस्ती उपकेंद्रासमोर आंदोलनाच्या माध्यमातून सादर करणार आहोत.- निलेश तुकाराम कापकर
अकोला शहरासह जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा दोन दिवसांत घसरल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडीत वाढ झाली आहे. शुक्रवारी शहराचा किमान पारा तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. गेल्या चार दिवसांपासून गारठा वाढल्याने सर्दी, खोकला आणि त्वचारोगांसह विविध साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. वाढलेल्या थंडीचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत असून, लहान मुले आणि वयोवृद्धांना थंडीचा त्रास होत आहे. शासकीय जिल्हा रूग्णालयासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या आठवडाभरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, आकाश स्वच्छ आणि वातावरण कोरडे असल्याने सूर्यास्तानंतर तापमान वेगाने कमी होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट नोंदवली गेली आहे. हवेत ओलावा कमी व वाऱ्याचा वेग मंद असल्याने रात्रीचा गारवा अधिक वाढला आहे. केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. किमान तापमानात घट: काही भागांत पहाटे धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी घसरण होऊ शकते. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. आता वातावरणातील बदल स्पष्टपणे जाणवत असून, सकाळच्या धुरकट प्रकाशात, मंद वारा आणि रात्री थंड हवा वाढत आहे. थंडीमुळे गोरक्षण भागात स्वेटरच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. ^मुले आणि वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यामुळे वाढत्या थंडीत त्यांना आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यांना उबदार कपडे घाला, विशेषतः त्यांचे डोके, कान, हात न पाय झाकून घ्या. वृद्धांना कोमट पाणी, सौम्य सूर्यप्रकाश आणि औषधे वेळेवर द्या. मुलांना थंड पदार्थ देणे टाळा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ द्या. - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, एमडी, फिजिशियन, जीएमसी अकोला.
मालवाहू ट्रक उलटल्याने दोघांचा मृत्यू, 11 जखमी:खरप बु. ते घुसर रोडवर घडली घटना
कापूस वेचून घरी परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ मजूर गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता अकोला तालुक्यातील खरप बु. ते घुसर रोडवर घुसरनजीक घडली. अपघाताची माहिती मिळताच अकोट फाईल पोलिस आणि वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक व जखमींना तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, अकोला शिवारात कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मूळ रहिवासी असलेले मजूर आले होते. या मजुरांचे सध्या वास्तव्य आपातापा परिसरात होते. दिवसभर कापूस वेचणीचे काम आटोपून शनिवारी रात्री सर्व मजूर (एमएच-२८- एबी ९१५०) या वाहनाने घरी परतत होते. रात्रीच्या सुमारास घुसरनजीक विद्युत कंपनीच्या पॉवर हाऊससमोर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात इतका भीषण होता की, वाहनातील काही मजूर रस्त्यावर फेकले गेले. मृतांमध्ये मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील कालापाड (ता. खकणार) येथील मुन्नीबाई जांभेकर (४९) आणि मनीष कासदेकर (३७) यांचा समावेश आहे. ११ गंभीर जखमींना तातडीने अकोला जिल्हा सर्वापचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या वेळी सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांनी मदतकार्य केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
20 प्रभागांची अंतिम मतदारसंख्या जाहीर:पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार संख्येत वाढ
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांत ८० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी पाच लाख ५० हजार ६० मतदार मतदान करणार आहेत. यावेळी पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मतदार यादीतील संख्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मतदार संख्या जाहीर झाली आहे. या आकडेवारीनुसार, एकूण मतदारांची संख्या ५ लाख ५० हजार ६० इतकी आहे, जी प्रारूप ५ लाख ५० हजार १२८ मतदारांच्या तुलनेत ६८ ने कमी आहे. अंतिम मतदार संख्येच्या आकडेवारीनुसार, पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे तर, इतर मतदारांची संख्या कायम आहे. अंतिम आकडेवारीत एकूण २ लाख ७४ हजार ८७७ पुरुष मतदार तर २ लाख ७५ हजार १४२ महिला मतदार आणि ४१ इतर मतदारांची नोंद आहे. प्रारुप मतदार संख्येच्या तुलनेत पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येत प्रत्येकी ३४ मतांची घट नोंदवण्यात आली आहे. तर एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा २६५ ने जास्त आहे. प्रभागनिहाय आकडेवारी पाहिल्यास प्रभाग क्र. १८ मध्ये सर्वाधिक ३२ हजार १५९ मतदार, त्याखालोखाल प्रभाग क्र. १४ मध्ये ३१ हजार ७८१ मतदार आहेत. याउलट, प्रभाग क्र. ६ मध्ये सर्वात कमी म्हणजे २१ हजार १८९ मतदार आहेत. प्रारुप मतदार संख्येच्या तुलनेत प्रभागनिहाय बदलांमध्ये प्रभाग क्र. १६ मध्ये मतदारांच्या संख्येत सर्वाधिक २२६ मतांची वाढ नोंदवण्यात आली तर प्रभाग क्रमांक १९, ३ आणि १ मध्ये देखील वाढ दिसून येत आहे. सुधारित कार्यक्रम {प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या अधीप्रमाणित करून प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२५ {मतदान केंद्रांच्या स्थळांची यादी प्रसिद्ध करणे : २० डिसेंबर २०२५ {मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी: २७ डिसेंबर २०२५ पुरुष, महिला मतदारांची संख्या { पुरुष मतदार संख्या- २,७४,८७७ { महिला मतदार संख्या -२,७५,१४२ { इतर मतदारांची संख्या -४१ एकुण मतदार संख्या- ५५००६०
जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) रुग्णांसाठी खाटांची संख्या २०० वरून ४०० झाली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी चारशे खाटांच्या नवीन इमारतीत रुग्णालयाचे स्थानांतरण झाले आहे. रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढल्यामुळे निश्चितच रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे. मात्र, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वी होती तेवढीच कायम आहे. वास्तविकता २०० खाटांच्या रुग्णालयासाठीच मनुष्यबळाची कमतरता होती. आता रुग्णांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे, मात्र डॉक्टर किंवा मनुष्यबळ वाढलेले नाही. त्यामुळे आहे त्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने महिला रुग्ण दाखल होत असतात. जुन्या इमारतीमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव लक्षात घेता रुग्णालय परिसरात ४०० बेडची नवी इमारत उभारण्यात आली आणि या नव्या इमारतीमध्ये मागील आठ महिन्यांपासून रुग्णालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. नव्या सर्व सुविधायुक्त या इमारतीमध्ये आता रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. सध्या स्थितीत दररोज सुमारे ३०० रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतात. त्यामुळे येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण देखील वाढला आहे. तसेच येथे दररोज सरासरी २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. त्यामुळे रुग्णालयातील कामाचा ताण लक्षात घेता येथील रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे महिला व नवजात शिशूंवर उपचार असतात. परंतू असे असताना देखील येथील बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बधिरीकरणतज्ज्ञ, क्ष-किरणतज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. वर्ग एक वर्गवारीतील डॉक्टरांबरोबरच येथे वर्ग दोन वर्गवारीतील डॉक्टरांचीही पदे रिक्त आहेत. मेळघाटसह, मध्य प्रदेशातून येतात उपचारासाठी रुग्ण जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातील इतर बारा तालुक्यांच्या तुलनेत मेळ घाटातून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या व्यतिरीक्त जिल्ह्याच्या सीमेला मध्य प्रदेश राज्य लागून आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रुग्ण सुध्दा जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मंजुरात मिळाली;पदे भरणार ^मनुष्यबळाची पुर्वीच कमतरता होती. यातच आता अतिरिक्त दोनशे खाटांची वाढ झाली आहे. मनुष्य बळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त पदे मंजूर झाली आहे. आगामी बदली प्रक्रियेत काही वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी रुग्णालयासाठी मिळणार आहे. डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय. पदांची स्थिती अशी
अमरावती संत गाडगे बाबांचा ६९ वा यात्रा उत्सव आज रविवार, १४ डिसेंबरपासून येथील गाडगेबाबा समाधी मंदिर समोरच्या पटांगणात सुरु होत आहे. या महोत्सवानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी गाडगेबाबांचे महानिर्वाण झाले होते. त्यानिमित्त दरवर्षी आठवडाभराच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते.यात्रोत्सवात विविध नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाची मेजवानी ऐकायला मिळणार आहे. या दरम्यान भजन, पूजन, ज्ञानदान, अन्नदान असे विविध कार्यक्रमही होतील. २० डिसेंबर, शनिवारी सकाळी दहा वाजता गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजनाने पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ होईल. महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त सौम्या चांडक शर्मा यांच्या हस्ते व संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख आणि समाजसेवक डॉ. राजकुमार लंगडे व इतर मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमामध्ये परमपूज्य सितारामजी बाबा यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री महेश्वरी देवी यांची श्रीमद् भागवत कथा आयोजित केली असून दररोज दुपारी १ ते ४.३० ही या कथेची वेळ आहे. तत्पूर्वी १४ ला दुपारी १२.३० ते १ या वेळात नामदेवरावजी रोडे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ अंध अपंगांना अन्नदान केले जाईल. या ज्ञानदान सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त बापूसाहेब देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे व उत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख गजानन देशमुख-दर्यापुरकर यांनी केले आहे. गुरुवारी सत्यपाल महाराजांची सत्यवाणी दररोजच्या कीर्तनासाठी देशातील नामवंत कीर्तनकारांना ही निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प नारायण महाराज पडोळे, राष्ट्रीय कीर्तनकार विवेक कुरुंदकर, राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प प्रशांत महाराज ठाकरे,श्याम वानखडे यांचा समावेश असून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी १८ डिसेंबरला रात्री ८ वाजता सादर होणार आहे. पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्रीय कीर्तन इतर दैनंदिन कार्यक्रमांमध्ये ह भ प लक्ष्मीबाई गहूकार यांचे गाडगे बाबांच्या जीवनावर आधारित प्रवचन, हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळात ज्ञानेश्वर जी सौदागरे व त्यांचा संच यांचे भक्ती संगीत सादर होईल. रात्री ९ ते १०.३० या वेळात सोनी मराठी फेम ह भ प पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्रीय कीर्तन होणार आहे. सप्त खंजेरी वादनाचे शनिवारी आयोजन यात्रोत्सवादरम्यान २० डिसेंबरला रात्री ह भ प ऋषिकेश रेडे यांची खंजेरी एक्सप्रेस तर ह भ प भरतजी महाराज रेडे यांचा सप्त खंजिरी कार्यक्रम होईल. त्यानंतर संत गाडगे बाबांच्या महानिर्वाण बद्दल बापूसाहेब देशमुख माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर सामुहिक श्रद्धांजली गीत कार्यक्रमाने स्मृतिदिन व पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावरून जिल्ह्यातील ५ हजार घरकुलांसाठीच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी भागातील प्रामुख्याने २०११ पूर्वी अतिक्रमण असल्यास ते नियमानुकूल करण्यात आले आहे. त्यामुळे हा लाभशहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांनाही झाला आहे. सध्या पीएमएवायच्या अंमलबजावणीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत अमरावती महा पालिकेमध्ये एकूण २ हजार ८१२ अतिक्रमणे नियमानुकूल करून संबंधिताना हक्काचे घर देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आल. तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांच्या शहरांमध्येही ९२० लाभार्थींना जमिनीची मालकी उपलब्ध करून घरकुल मंजूर केले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातील १२०० लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी घरे हा अतिशय स्तुत्य उपक्रम केंद्र शासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने देखील हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून घरासाठी अनुदान मंजूर होण्यास पात्र असणारे, मात्र ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, अशा व्यक्तींसाठी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदरची योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्याबाबत निर्देशही दिले आहेत. याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची (पीएमएवाय) अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे, त्यांच्यासाठी यामध्ये फारसे अडथळे येत नाहीत. परंतु जे शासकीय जागांवर राहतात, त्यांना अतिक्रमणधारक म्हणून त्रास होतो. अशा नागरिकांनी त्या-त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महापालिकेशी संपर्क साधावा. जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे प्रस्ताव नियमानुकूल केले जात असल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी विभागाकडून आता जनजागृती मोहिम राबवली जात आहे. यातून नागरिकांना याची माहिती मिळेल. आता ३०५ प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनीदेखील ही योजना प्राधान्याने राबवण्यावर भर दिला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या समितीने सादर केलेल्या ३०५ पात्र लाभार्थींच्या यादीला जिल्हाधिकारी यांनी एका दिवसातच मंजुरी दिली आहे. ज्यामुळे महापालिकेतील समितीने पात्र केलेली सर्व प्रकरणे जिल्हास्तरावरील समितीने मान्यता देऊन त्यांना पट्टे वाटप करण्याचा मार्ग खुला केला आहे. आजमितीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही प्रकरण प्रलंबित नाही.
खापर्डे बगीचा स्थित आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रांगणात बाल शिक्षण मंडळाच्या भागीरथीबाई कलंत्री बालक मंदिर, माई हर्षे प्राथमिक शाळा व बालक मंदिर ,आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा या सर्व शैक्षणिक शाखांचे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यश खोडके, प्रा. डॉ. अरविंद देशमुख, डॉ.श्रीगोपाल राठी, मनीषा आष्टीकर, अॅड. रचना पिंपळगावकर, वंदना कुळकर्णी, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्या. सोळंके, मुख्याध्यापिका आळशी, माई हर्षे, प्राथ. शाळेच्या मुख्या. विरूळकर, बाल शिक्षण मंडळाच्या निरीक्षिका मुक्ता सराफ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी औक्षण करून लेझीमच्या तालावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते हस्तकला प्रदर्शनाचे व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मान्यवरांनी कौतुक करत शाबासकी दिली. यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यश खोडके यांच्या हस्ते त्यांनी शाळेला भेट दिलेल्या डिजिटल स्मार्ट इंटर अॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंकुर व भरारी या हस्त लिखितांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच दहावीत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केल्या गेला. कैवल्य खंडारे ह्या विद्यार्थ्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या या खेळात प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. एम.टी एस परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा, तसेच इयत्ता चौथीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, पाचवीचा विद्यार्थी स्वरूप फसाटे याने जिल्ह्यातून चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत प्रलंबित असलेल्या लक्षवेधी सूचनांवर संबंधित खात्याचे मंत्री उत्तरे देतील. 'या' ज्वलंत मुद्द्यांवरून सरकारची कोंडी होणार आजच्या कामकाजात विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी विविध मुद्दे तयार ठेवले आहेत
‘नवोदय’साठी 10 हजार परीक्षार्थी:ग्रामीण विद्यार्थ्यांचा मिळाला मोठा प्रतिसाद
पोखरापूर (ता. मोहोळ) येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गातील ८० जागांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रांवर एकूण १० हजार ८१७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर प्रवेशपत्रासह परीक्षा लेखन साहित्य व ओळखपत्रासह आले होते. प्रवेशपत्र पाहून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्राच्या भोवताली पोलिस बंदोबस्तही होता. अर्ज रजिस्ट्रेशन क्रमांक हा लॉगीन आयडी व जन्मतारीख हा पासवर्ड होता. पंढरपूर तालुक्यात ७ परीक्षा केंद्र होते. उर्वरित तालुक्यांमध्ये एक- दोन परीक्षा केंद्रे होती. या परीक्षांसाठी ३३ परीक्षा केंद्र प्रमुखांची नियुक्ती होती. त्यांच्या सोबतीला ३३ केंद्र निरीक्षक आणि ४८९ पर्यवेक्षक होते. शिक्षणाधिकाऱ्यांच्या विशेष भरारी पथकाने परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षेचा आढावा घेतला. तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याही फिरत्या पथकाने केंद्रांना भेटी दिल्या. सर्वच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा उत्साही वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. परीक्षा संपल्यानंतर मात्र, विद्यार्थी एकमेकांशी परीक्षेतील प्रश्नांविषयी चर्चा करीत होते. हमीदखाँ पठाण, मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा चंदननगर( लांबोटी) शिस्तीत झाली परीक्षा, गैरप्रकार घडला नाही सर्वच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पारदर्शी व शिस्तीत पार पडली. ९३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक होता. - सचिन जगताप, शिक्षणाधिकारी. परीक्षेतील काठीण पातळी जास्त होती नवोदयच्या परीक्षेसाठी १०० मार्कांसाठी ८० प्रश्न असतात. एका प्रश्नाला १.२५ मार्क आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत बुध्दीमत्ता चाचणी व भाषेचे प्रश्न सोडले तर गणिताचे ४ प्रश्न कठीण होते. विद्यार्थ्यांचे वय आणि त्यांच्या बुध्दीनुसार प्रश्नांची काठीण्य पातळी जास्तच होती. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गणिताचे प्रश्न अवघड असल्याचे सांगितले.
बार्शी लोकअदालतीत 1469 प्रकरणे निकाली:लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी सात पॅनलची नियुक्ती
येथील न्यायालयात शनिवारी (दि.१३) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीत एकूण १ हजार ४६९ प्रकरणे तडजोडीने निकाली काढून ३ कोटी ७५ लाख २१ हजार ९१६ रूपयांचा महसूल जमा करण्यात आला. बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा समिती बार्शीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी राष्ट्रीय महा लोक अदालतमध्ये २३१ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोड पात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व १२३८ असे एकुण १ हजार ४६९ प्रकरणे तडजोडीने मिटवून प्रलंबित प्रकरणात अनुक्रमे ३ कोटी २६ लाख ६६ हजार ८२४ व दाखल पुर्व प्रकरणांत ४८ लाख ५५ हजार ९२ रुपयांची वसुली झाली. या राष्ट्रीय महा लोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे ३७३८ व दाखल पुर्व ४६२४ असे एकुण ८३६२ प्रकरणे लोकअदालत पॅनलमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी एकुण सात पॅनल करण्यात आले होते. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य के. मांडे, जिल्हा न्यायाधीश वर्ग २ व्ही. एस. मलकलपटट्टे रेड्डी , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. बी. लोखंडे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पी. व्ही. राऊत, २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर जी. एस. पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एच. यु. यु. पाटील, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर आर.पी. बागडे यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे पॅनल क. ३ मधील दिवाणी न्यायालय व स्तर पी. बी. लोखंडे यांचे न्यायालयातील १० वर्षे जुनी दरखास्त तडजोडीने निकाली काढण्यात आले. न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र फौजदारी प्रकरणांत १२ इतकी प्रकरणे व कबुलीची ९२ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. त्यात सुमारे ८० हजार ७०० रुपयांची दंड वसुली करण्यात आला. या लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग नोंदविला. राष्ट्रीय महालोकअदालत यशस्वितेसाठी बार्शी वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका यांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले. मोटार अपघाताची दोन प्रकरणे मिटवले जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण २ प्रकरणे तडजोडीने मिटुन त्यात सुमारे ३२ लाख ५० हजार इतक्या रकमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. ऍक्ट १३८ च्या एकुण १७ प्रलंबित प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे ३२ लाख २८ हजार ५१ रुपयांची वसुली, तर रक्कम वसुलीच्या ४२ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात २ कोटी ५६ लाख ८४ हजार ६६९ रुपयांची वसुली झाली.
मार्गशीर्ष महिन्यातील अखेरच्या शनिवार आणि रविवारी गोपाळपूर येथील श्री विष्णुपद येथे दर्शनासाठी दररोज ५० हजाराहून अधिक भाविकांची गर्दी होत आहे, तसेच या ठिकाणी हजारो भाविकसह भोजनाचा आस्वाद घेत आहेत. दरम्यान, भाविकांची प्रचंड गर्दी होत असताना सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस बळ दिसत नाही, तसेच धोकादायक हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांमुळे भाविक हैराण झालेले आहेत. गोपाळपूर येथील विष्णुपद हे तीर्थस्थान वारकरी संप्रदायात श्रद्धेचे स्थान आहे, मार्गशीर्ष महिन्यात साक्षात विठ्ठल विष्णुपद येथे गाई चारण्यासाठी गोपाळांसोबत जातो, तिथेच महिनाभर वास्तव्यास असतो, त्याच ठिकाणी गोपाळांसोबत सह भोजन घेतो, अशी आख्यायिका सांगितली जाते, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद येथे भाविकांची मोठी गर्दी होते. पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आलेला प्रत्येक वारकरी विष्णुपद येथे जाऊन भीमा नदीच्या पात्रातील मंदिरात असलेल्या गाईच्या खुरांचे दर्शन घेतो. तसेच याच ठिकाणी असलेल्या वनात सहभोजन घेतो. यंदाचा मार्गशीर्ष महिना आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, येत्या शुक्रवार पासून भाद्रपद महिना सुरु होत आहे, त्यामुळे अखेरच्या शनिवार आणि रविवार रविवार सुट्टीचे दिवस साधून पंढरपूर शहर आणि तालुक्यातील हजारो भाविकांची विष्णुपद येथे दर्शन आणि वन भोजनासाठी गर्दी होत आहे. त्यातून वाट काढत भाविकांना चालावे लागते. धोकादायक हॉटेल्स आणि खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स रस्त्यावर अतिक्रमण केले विष्णुपदाकडे जाणारा रास्ता अतिशय अरुंद आहे, आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रासादिक वस्तू, चुडे, बांगड्या आदी सौभाग्य अलंकार, फळे विक्रेत्यांनी पथाऱ्या पसरलेल्या असतात. त्यातून वाट काढत भाविकांना चालावे लागते. शिवाय मोटार सायकली, रिक्षा यातूनच चालत असतात. त्यामुळे भाविकांना चालणे अवघड होऊन जाते. याच बरोबर नदीच्या अगदी किनाऱ्यावर हॉटेल्सच्या गॅस शेगड्या पेटलेल्या आणि उकळत्या तेलाच्या कढई दिसून येतात. रसपान गृहे, खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवलेले दिसतात. मात्र पोलीस या अतिक्रमणाला मनाई करीत नाहीत असे दिसते.
3000 जणांनी घेतला आमटीचा आस्वाद:औदुंबर कुंभार यांच्याकडून गेल्या 21 वर्षांपासून गाव जेवणाची पंगत
करकंबची बाजार आमटी म्हटलं की, जो तो ती खाण्यासाठी धडपडत असतो. ही बाजार आमटी आता महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरील राज्यातही प्रसिद्ध झाली असून अनेक खवय्यांची मागणी होताना दिसत आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी करकंबच्या औदुंबर, अरुण व अशोक बंधूंच्या वतीने सर्व ग्रामस्थ व मित्र परिवारांना बाजार आमटीचे आमंत्रण देण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून जेवणासाठी लोक येऊ लागले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत जेवणाच्या पंगती चालू होत्या. गेल्या २१ वर्षांपासून कुंभार बंधू ८ डिसेंबरला बाजार आमटीचे जेवण देत असतात. पण यावर्षी ८ तारखेला सोमवार आल्याने व गावचा आठवडी बाजार असल्याने त्याचे नियोजन शुक्रवारी १२ तारखेला करण्यात आले. जवळपास ९०० लिटर बाजार आमटी तयार करण्यात आली होती. याचा आस्वाद जवळपास ३ हजार जणांनी घेतला. प्रत्येक वर्षी ८/१२ या तारखेला सर्व मित्र परिवार व आप्तेष्टांना बाजार आमटीचे जेवण देत आहे. गेली २०/२२ वर्षे झाली हा उपक्रम चालू आहे. समाजऋण म्हणून हे चालू आहे. गेल्या दोन वर्षांत आमच्या कुंभार बंधूंच्या बाजार आमटीच्या मिक्स मसाला पॅकेजला भरपूर मागणी वाढली आहे. याच बरोबर शिपी आमटी, गावरान भरलं वांग, गावरान झुणका (पिठलं) या प्रिमिक्सलाही मागणी आहे. बाजार आमटी बरोबर चपाती, भाकरी कांदा, लिंबू, शेंगदाणे, काकडी इत्यादी ही असते त्यामुळे खाताना कोणताही त्रास जाणवत नाही, असे औदुंबर कुंभार यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता प्रति टन ३ हजार रुपये जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून तालुक्यातील सर्व कारखान्यांची ऊस गव्हाण बंद ठेवण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिला आहे. ते संत दामाजी कारखान्यावर बोलत होते. उसाच्या दरांसाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलन पेटले असून सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पहिला हप्ता ३ हजार रुपयांनी जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी ठामपणे उभे राहिले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.चेअरमन शिवानंद पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी रविवारी संचालक मंडळाची बैठक असून, या बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दामाजीसह तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी रविवारपर्यंत ऊस दर जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन मंगळवेढा तालुक्यातील सर्व कारखान्यांची ऊस गव्हाण दर जाहीर होईपर्यंत बंद ठेवू, असा ठोस इशारा दिला. आंदोलनावेळी युवराज घुले, श्रीमंत केदार, अनिल बिराजदार, आबा खांडेकर, शंकर संगशेट्टी, पांडुरंग बाबर, रोहित भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
सीना नदीच्या पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेज मंजूर करावे:आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात केली मागणी
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि भीषण पुरपरिस्थितीमुळे अभूतपूर्व संकट ओढवले होते. सीना नदीला जवळपास ९०० क्युसेस पाण्याची क्षमता असताना एका रात्रीत तब्बल २ लाख १२ हजार क्युसेस पाणी नदीपात्रात आले. यामुळे माढा तालुक्यातील १७ गावे पूर्णतः जलमय झाली. अनेकांच्या घरांवर २० ते २५ फूट पाणी आले आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. गावाच्या गावात उध्वस्त झाले. या भागातील नुकसानग्रस्तांसाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात केली. माढा तालुक्यावर १०० वर्षांत असा महापूर आला नाही. या संकटातून नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सीना नदीच्या पुराची पाहणी केली. अतिशय भयान परिस्थितीमध्ये माढा तालुक्यातील नागरिकांनी या संकटाचा सामना केला. शासनाने जाहीर केलेले पॅकेज अपूरे असून, माढा तालुक्यास सोलापूर जिल्ह्याला स्वतंत्र विशेष पॅकेज देणे अत्यावश्यक आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी माढा मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि महापुरामध्ये विस्कटलेला संसार उभा राहण्यासाठी सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी केली.
कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात शिकार केलेल्या वासराचा बिबट्यांनी फडशा पाडल्याचे रविवारी ता. 14 सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे आता या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविली जाणार असून अहिल्यानगर व परभणी येथून प्रत्येकी एक पिंजरा मागविण्यात आला आहे. या शिवाय ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या 15 वरून 25 पर्यंत केली जाणार आहे. कळमनुरी तालुक्यातील पोतरा व तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांच्या शेतातील दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी ता.13 बिबट्याने पोतरा शिवारातील गजानन पतंगे यांच्या शेतातील वासराची शिकार केली. या घटनेनंतर विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक सुधाकर कऱ्हाळे, खंडागळे, योगीता सहारे यांच्या पथकाने पाहणी करून पिंजरा लावण्याची तयारी केली होती. त्यानुसार शनिवारी ता. 13 रात्री पोतरा शिवारात एक पिंजरा लाऊन त्यात शेळी बांधली होती. दरम्यान, आज सकाळी पाहणी केल्यानंतर पिंजऱ्यात बिबट्या आलाच नाही. तर पोतरा शिवारात पतंगे यांच्या शेतात वासराची शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या आला अन त्याने या शिकारीचा फडशा पाडल्याचे रविवारी ता. 14 सकाळी दिसून आले आहे. त्यामुळे आता वन विभाग अलर्ट मोडवर आले असून या परिसरात आणखी दोन पिंजरे लावण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी अहिल्यानगर व परभणी येथून प्रत्येकी एक पिंजरा मागविण्यात आला आहे. त्यानंतर आज या परिसरात तीन पिंजरे बसविले जाणार आहेत. या शिवाय ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्याही 15 वरून 25 केली जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. सायंकाळपर्यंत दोन्ही ठिकाणचे पिंजरे पोतरा येथे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या परिसरात वन विभागाचे तब्बल 25 पेक्षा अधिक कर्मचारी गस्तीसाठी तैनात करण्यात आले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न- मीनाक्षी पवार, वन परिक्षेत्र अधिकारी या भागात एक मादी बिबट्या व दोन बछडे असल्याची शक्यता आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याचे वन विभागाचे प्रयत्न असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावले जात आहेत. शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक या भागात एक बिबट्या व दोन बछडे शेतकऱ्यांच्या नजरेस पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शेतात एकट्याने जाऊ नये तसेच शेतात जाणे आवश्यक असल्यास गटाने जावे तसेच जातांना मोबाईलवर गाणे ऐकत किंवा एकमेकांशी बोलत जावे. त्यामुळे बिबट्या जवळ येणार नाही.
मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक बब्रूवान रूद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील प्रतापनगर स्मशानभूमीत आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. ..हे वृत्त अपडेट होत आहे
भारत देश हा जगातील क्रमांक एकची महासत्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच या कौशल्यांच्या सहाय्याने देशाच्या आर्थिक विकास योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन व्हीआरडीईचे संचालक जीआरएम राव यांनी केले. पीएमश्री केन्द्रीय विद्यालय येथे वार्षिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. व्हीआरडीईचे संचालक जीआरएम राव व महिला संघाच्या अध्यक्षा माधवी राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवात विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. भारतातील सांस्कृतिक विविधता आणि एकात्मता वेगवेगळ्या नृत्य, गीतगायन व नाटक सादरीकरणातून दाखवण्यात आली. भारतीय संस्कृती आणि सांस्कृतिक एकात्मता यांचे दर्शन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घडवले. राव पुढे म्हणाले, भारत देश आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे आणि त्यासाठी केंद्रीय विद्यालय संगठन कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवोक्रपमांच्या मदतीने कार्य करत आहे. प्राचार्य लोंढे यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात केवीएस क्षेत्रिय कार्यालय, मुंबईकडून दहावी व बारावीच्या परीक्षेत १०० % निकाल दिल्याबद्दल शिक्षकांना पुरस्कार व प्रशस्तीपत्र माधवी राव यांच्या हस्ते देण्यात आले. शैक्षणिक यशाबद्दल व सह-शैक्षणिक उपक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके व प्रमाणपत्रे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. डीआरडीओ नेहमीच शालेय शिक्षणात प्रभावीपणे आपले योगदान देत आले आहे. विशेषतः या विद्यालयाच्या विकासासाठी भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्यालयात अधिक एक तुकडी मंजूर करण्यात केवीएसने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आहील्यानगर जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरालगतच्या मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्त संचार झपाट्याने वाढत आहे. शेतकरी, मेंढपाळ आणि सर्वसामान्य नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. विशेषतः ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने उसाच्या दाट शेतात लपलेले बिबटे अचानक बाहेर पडत आहेत. यामुळे शेळ्या-मेंढ्या, कुक्कुट, वासरे यांच्यासह माणसांवरही हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बिबट्यांच्या भीतीमुळे अनेक भागांत मजूर शेतात काम करण्यास नकार देत आहेत. परिणामी उभी पिके, पाणी देणे, निगा राखणे अशी कामे अक्षरशः “राम भरोसे” सुरू आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नदीकाठच्या जंगलातील बिबटे आता जिरायती व मानवी वस्तीकडे सर्रास वळले आहेत. गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन दगावले असून मेंढपाळ, गुराखे आणि शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत. जिल्ह्यात सध्या अंदाजे १,१५० बिबट्यांचा मुक्त संचार आहे. ९७० गावे बिबट्याप्रवण ठरली आहेत. दरम्यान, बिबट्यांचा जंगलाबाहेरचा वावर रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडलेला ‘शेळ्या जंगलात सोडाव्यात’ हा उपाय ग्रामीण भागात संताप आणि टीकेचा विषय ठरला आहे. शेळ्या जंगलात सोडून बिबट्यांचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. वन्यप्राण्यांपेक्षा नागरीकांचे व शेतीचे संरक्षण महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. वनविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, तर १७८ जण जखमी झाले आहेत. केवळ गेल्या वर्षभरात ८ मानवी मृत्यू झाले असून ४,५१२ पशुधनावर बिबट्यांनी हल्ले केले आहेत. या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांबाबतचे विद्यमान कायदे बदलून माणसांच्या आणि शेतीच्या संरक्षणासाठी ठोस धोरण राबवावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासन व वनविभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय बिबट्याप्रवण गाव संख्या तालुकानिहाय पाहता अकोले (१९१), संगमनेर (१७१), पारनेर (१३१), नेवासे (१२७), राहुरी (९६), कोपरगाव (७९), श्रीरामपूर (५६), शेवगाव (२४), अहिल्यानगर (२०) आणि श्रीगोंदे (१४) तालुके सर्वाधिक बिबट्याप्रवण ठरले आहेत.
शिरूर–श्रीगोंदे सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जा व अनियमितता होत असल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल नामदेव बनकर यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. हे उपोषण गुरुवारपासून ११ डिसेंबर सुरू आहे. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे. हे आंदोलन वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, शिरूर–श्रीगोंदे रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य व्हावे, या उद्देशाने करण्यात येत असल्याचे बनकर यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. खडी उघडी पडली आहे. तसेच पुलाच्या कामात वापरण्यात आलेले. पाइप हे मंजूर इस्टिमेटप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात बनकर यांनी प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत. झालेल्या पुलांच्या कामाचे बिल संबंधित ठेकेदारास देऊ नये. सदोष सिमेंट काँक्रेट रस्ता काढून पुन्हा नव्याने करावा. पुलांमध्ये इस्टिमेटनुसार पाइप वापरून काम करण्यात यावे. रस्त्यावर पाण्याच्या टँकरची संख्या वाढवून दररोज किमान तीन वेळा पाणी मारावे. कामात स्क्रॅपिंग मशीनचा वापर करावा. इस्टिमेटप्रमाणे लांबी व जाडी नसलेले काम काढून पुन्हा करावे व तोपर्यंत काम बंद ठेवावे. रस्त्याची रुंदी ७ मीटरवरून १० मीटर करण्यात यावी. सध्या काम करत असलेला ठेकेदार बदलण्यात यावा. या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
छावा, कोळीगीत, आदिवासी नृत्य, वंदे मातरम, ऑपरेशन सिंदूरच्या सादरीकरणाने शुक्रवारी सायंकाळी केडगावातील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर मनपा प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन गाजले. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पोस्ट मास्तर संतोष यादव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका सुनिता कोतकर, सविता कराळे,माजी नगरसेवक अमोल येवले, सुनील कोतकर,उपायुक्त शाहनवाज तडवी,सोमनाथ बनकर,बलभीम कर्डिले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मधुबाला चोरडिया, पोलिस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, तुषार देशमुख,अशोक कुरापाटी, दादासाहेब शेळके, विक्रम लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले. यावेळी शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व इयत्ता दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कोळीगीत, आदिवासी नृत्य, अशा गीतांवर नृत्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या समूहनृत्याला उपस्थित प्रमुख पाहुणे, पालक व नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. त्याचबरोबर 'छावा, वंदे मातरम, ऑपरेशन सिंदूर, मतदान जनजागृती अशा विषयांवरील सादरीकरणही उपस्थितांना भावले. अनेक सादरीकरणांना उपस्थितांनी प्रतिसाद देत बक्षिसांचा वर्षाव केला. यावेळी मनपा शाळांचे मुख्याध्यापक अक्षय सातपुते, विजय घिगे, शशिकांत वाघुलकर, संदीप राजळे, अनिल बडे, युवराज मोरे, योगेश राजळे, विठ्ठल आठरे,प्रियंका पुंडे, प्रशांत पुंडे उपस्थित होते. स्वागत शिवराज वाघमारे यांनी, सुत्रसंचलन अरुण पवार यांनी, तर आभार वृषाली गावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्विततेसाठी शिवराज वाघमारे, वृषाली गावडे, पल्लवी भुजबळ, दुर्गा घेवारे, प्राजक्ता शिंदे, कवित वाघमारे, प्रियंका लोळगे, दीपाली साळवे, पूनम बडे, शिलाबाई देसाई, सायली पवार यांनी परिश्रम घेतले. ओंकारनगर मनपा शाळेचा प्रवास प्रेरणादायी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे ही शाळा जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम या शाळेच्या गुणवत्तेचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व डिजिटल शिक्षणाची गरज लक्षात घेता शाळेसाठी नवीन वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपा प्रशासनाचे आभार. स्मार्ट क्लासरूम, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा वाढवण्याची गरज पोस्ट मास्तर संतोष यादव यांनी व्यक्त केली. उपक्रमांमुळे शाळा जिल्ह्यात ठरतेय आदर्श
कार अपघातामध्ये आई-मुलाचा मृत्यू:पाथर्डी–शेवगाव राज्य मार्गावर डांगेवाडी शिवारातील घटना
पाथर्डी–शेवगाव राज्य मार्गावर डांगेवाडी शिवारात झालेल्या भीषण समोरासमोरच्या कार अपघातात आई व मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात सुनिता नवनाथ आव्हाड (वय ३१) व त्यांचा मुलगा जयेश नवनाथ आव्हाड अशी मृतांची नावे आहेत. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. पाथर्डी–शेवगाव रोडवरील आव्हाड वस्ती येथे वास्तव्य असलेले हे कुटुंब पाथर्डी येथून घरी जात असताना शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास फोर्ड इकोस्पोर्ट व स्विफ्ट कार यांच्यात डांगेवाडी शिवारात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारमध्ये प्रवासी अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक उपनिरीक्षक नितीन दराडे, हेडकॉन्स्टेबल भगवान गरगडे, सुखदेव धोत्रे, सचिन गणगे, संदीप नागरगोजे, बाबासाहेब बडे, अमोल जवरे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा रस्सीने बांधून एका बाजूला झाडाला गाडी बांधण्यात आली, तर दुसऱ्या बाजूने ट्रॅक्टरला दोर लावून दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर सुनिता आव्हाड व इतर जखमींना बाहेर काढले. मात्र उपचारापूर्वीच सुनिता आव्हाड व त्यांचा मुलगा जयेश यांचा मृत्यू झाल्याचे अहिल्यानगर येथे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
कौटुंबिक कलहातून दोन कुटूंबाचा दुभंगलेला संसार समुपदेशनाने पुन्हा जुळविण्यात आला. शनिवार (१३ डिसेंबर) रोजी पाटोदा न्यायालयात पार पडलेल्या लोकन्यायालयात पार पडलेल्या समुपदेशनानंतर पती-पत्नीने वाद संपवून एकत्रीतपणे राहण्याचा निर्णय घेतला.या लोकन्यायालयात इतरही २३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या प्रकरणातून ८ लाख २४ हजार ८८७ रुपयांची वसूली केली. हे लोकन्यायालय पाटोदा न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश एम. ए. शिंदे, वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पती-पत्नीत मतदभेद, वाद विवाद होतच असतात परंतु यातूनच होणारा कौटूंबिक कलह दोघांचेही जीवन उध्दवस्त करतो. अशा दांपत्यांच्या जीवनातील कलहाला दुर करुन त्यांची संसार पुन्हा जुळवण्यासाठी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. अशाच प्रकारे पाटोदा येथे पार पडलेल्या लोकन्यायालयात दोन कुटूंबाचा वाद मांडण्यात आला. पॅनल क्रमांक १ चे प्रमुख दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एम.ए. शिंदे, सदस्य बी.जी. थोरवे, पॅनल क्रमांक २ चे प्रमुख म्हणुनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. डी. गीते, विधीज्ञ बी.आर. लऊळ यांनी या प्रसंगी समुपदेशनाचे कर्तव्य पार पाडले. सदर लोकन्यायालयात चालू वर्षातील एकूण ८८५ दाखल प्रकरणांपैकी २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये दोन कौटुंबिक वादांमध्ये समेट घडवून पती-पत्नींचे वैवाहिक जीवन पूर्ववत करण्यात आले. दाखल असलेल्या ८९८ प्रकरणांपैकी २११ प्रकरणे यशस्वीपणे निकाली निघाली . लोकन्यायालय माणुसकीचे व्यासपीठ लोकन्यायालयाच्या माध्यमातून प्रकरणे समुपदेशन व समन्वयाने निकाली काढली जातात. आरोप-प्रत्यारोप आणि निर्णयाच्या प्रतिक्षेत न्यायालयाच्या चकरा मारण्याऐवजी पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समन्वयातून प्रकरणे निकाली काढल्यास वाद त्वरीत मिटत आहेत. यामुळे लोकन्यायालय हे केवळ प्रकरणे निकाली काढण्याचेच नव्हे तर समाजाता सलोखा, समेट आणि माणुसकी जपणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे अधोरेखीत झाले आहे. या लोकन्यायालयातून अनेकांना दिलासा मिळाला .
वैजापूर तालुक्यातील खंडाळा-पानगव्हाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रस्ता गेल्याने विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा कायमचा मार्ग बंद झाला असल्याने शेताची बांध ओलांडत जीव मुठीत धरुन नदी काठावरून ये-जा करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याने लवकरात लवकर या रस्त्यावर पुल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाने गावाजवळ २००१ मध्ये पाझर तलाव बांधला. त्यामुळे बहुतांश शेती सिंचनाखाली आली व पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात दूर झाली. प्रकल्पाच्या पश्चिम दिशे कडील कायमचा असलेला १२ फुटी गाडीवाट धरणाच्या पाणलोट क्षेत्राखाली गेल्याने रस्त्याच्या उत्तरेकडील खंडाळा गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या दळण वळणाचा असलेला हा मार्ग कायमचा बंद झाला. थोरात वस्ती परिसरातील विद्यार्थ्यांना परिसरातच शिक्षण मिळावे यासाठी माझ्या मालकीची पाच गुंठे जागा शाळेला दान दिली. परंतु प्रकल्प झाल्यापासून प्रकल्पाचे बॅकवॉटर रस्त्यावर थांबून राहिल्याने या परिसरातील शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचा कायमचा रस्ता बंद झाला. अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केला होता. तहसीलदार व आमदार येऊनही प्रश्न सुटला नाही. ^खंडाळा केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेवर जाण्यासाठी अनेक वर्षापासून रस्ता नसल्याने विद्यार्थ्यासह शिक्षकांना देखील शेतीच्या बांधावरून पायपीट करावी लागत आहे. पंचायत समिती या कार्यालयांना पत्रव्यवहार करुणदेखील रस्ता नाही. -बबनराव तगरे, केंद्रप्रमुख खंडाळा. खंडाळा येथून दीड किमीवर थोरात वस्तीवर जिल्हा परिषदेची शाळा असून येथील शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. २१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच ५ वीपासून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गावातील जिल्हा परिषद प्रशालेत यावे लागते. परंतु जाण्यासाठी मधेच बोर नदी असून विद्यार्थ्यांना या बोर नदीतून जाने शक्य नाही. बोर नदीवर प्रकल्प झाल्याने या नदीत कायम मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना पर्याय नसल्याने त्यांना बांध तुडवत व नदीकाठावरून ये-जा करावी लागत आहे. यामुळे मुलांचा जीव धोक्यात असून यावर उपाययोजना कराव्यात. प्रशासनाला पत्रव्यवहार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा म्हणून ख्याती असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची उद्यापासून सुरुवात होणार आहे. येथील शेफेपूर भागातील जागृत मारुती मंदिर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि .१४ रविवार पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. कथा प्रवक्ते गुरुवर्य भानुदास महाराज चातुर्मास अन्वेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता दि .२१ रोजी होणार आहे. या सप्ताहात सकाळी चार ते सहा काकडा भजन, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी ११ ते २ शिव महापुराण कथा होईल. ५ ते ७ हरीपाठ व रात्री ८: ३० ते ११ पर्यंत कीर्तन व हरीजागर होईल. व्यासपीठाचे वाचक पुढील प्रमाणे- ह. भ. प. एकनाथ सपकाळ, ह. भ. प. सूर्यकांत मोकासे, ह. भ. प. विष्णु मोकासे, ह. भ. प. काळुबा ओपळकर व ह. भ. प. विठोबा मोकासे हे ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत. तसेच या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित विचारवंत, कीर्तनकारांचे अमृततुल्य वाणीतून विचार श्रवण करण्यास मिळणार आहे. दिनांक १४ रविवार रोजी ह. भ. प. समाधान महाराज शर्मा, दिनांक १५ सोमवार रोजी ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे (परभणी), दिनांक १६ मंगळवार रोजी ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), दिनांक १७ बुधवार रोजी ह. भ. प. संजय बाबा पाचपोर (विदर्भ), दिनांक १८ गुरुवार रोजी ह. भ. प. संग्राम बापू भंडारे (पुणे), दिनांक १९ शुक्रवार रोजी ह. भ. प. संतोष वनवे (बीड), दिनांक २० शनिवार रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी), व दिनांक २१ रविवार रोजी ह. भ. प. गुरुमाऊली बाबा महाराज चातुर्मासे अनवे यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे. त्यानंतर दुपारी दोन ते चार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मृदंगाचार्य ह.भ.प. गिरजानाथ महाराज जाधव, ह. भ. प. महेश महाराज कावले व ह. भ. प. कृष्णा महाराज मोरे, ह. भ. प. शंकर महाराज साबळे व ह. भ. प. शंकर महाराज हे गायनाचार्य असणार आहे . दिनांक मंगळवार रोजी कुमारी हर्षदा ताई ठाकूर हिंदुजागरण मंच यांचे व्याख्यान दुपारी १२ ते २ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शफेपूर पंच कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. दरवर्षी या होणाऱ्या या भव्य अशा धार्मिक सोहळ्याप्रसंगी परिसरातील वातावरण अत्यंत धार्मिक झाल्याचे बघायला मिळते. तसेच ग्रामस्थ व भाविकांमध्ये यावेळी मोठा उत्साह दिसुन येतो. भाविकांची सोहळ्यास गर्दी असते. मोफत रोगनिदान शिबिराचे देखील आयोजन दरम्यान दिनांक १८ गुरुवार रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत सर्व मोफत रोग निदान शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. यात एम.आय. टी. हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर असणार आहेत . यात आरोग्य समस्यांची मोफत तपासणी तसेच निदान करण्यात येणार आहे.
कन्नड न्यायालयाची व्याप्ती वाढवून आता अतिरिक्त सत्र व वरिष्ठ न्यायालयास मान्यता मिळाली आहे. कन्नड तालुक्यासह आता सोयगाव, खुलताबाद हे तालुके या न्यायालयाशी संलग्न झाल्याने न्यायासाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती वकील संघाचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णा जाधव यांनी दिली. कन्नड शहरात नव्या अद्ययावत न्यायालय इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी ४७ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यात पाच न्यायालये चालणार आहेत. त्यातच आता कन्नड, खुलताबाद व सोयगाव तालुक्यांना या न्यायालयात संलग्न करण्यात आले आहे. न्यायालय स्थापना समितीने कन्नड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नवीन न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यानुसार सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय स्थापन करण्यात येत आहे. तालुका वकील संघाचे सदस्य ॲड. विजयसिंह मोहिते यांनी सांगितले की, वकील संघाने दहा वर्षांपासून नवीन न्यायालय इमारत, न्यायाधीशांचे निवासस्थान तसेच सत्र न्यायालय व जिल्हा न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी यासाठी पाठपुरावा केला. यास खुलताबाद येथील वकील संघाने सहमती दर्शवली. त्यामुळे उच्च न्यायालय, सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र शासनाने ही मागणी मान्य केली आहे. यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. यू. वारे, उपाध्यक्ष ॲड. शेख आरेफ, सचिव ॲड. शुभम राऊत व सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्याला हे मोठे यश प्राप्त झाले आहे. छत्रपती संभाजीनगरला जाण्याची गरज नाही या नवीन वास्तूत जिल्हा न्यायालय होत असल्याने आता पक्षकारांना कन्नड तालुक्यासह खुलताबाद, सोयगाव या तालुक्यातील पक्षकारांना न्यायासाठी सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावरील जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही .यापूर्वी कन्नड न्यायालयात पाच लाखांपर्यंतच दाव्यांची मर्यादा होती ती आता अमर्याद होणार आहे . तसेच ३७६, ३०२ या कलमांतर्गत खटल्यासाठी उच्च न्यायालयात म्हणजे जिल्हा ठिकाणी जावे लागत होते तेसुद्धा खटले आता कन्नड जिल्हा न्यायालयात चालणार आहेत.
‘तुला ते आठवेल का सारे...?’ गिरणगावातील गिरण्यांच्या सहवासात तब्बल १०३ वर्षे असलेला रेल्वेपूल माझ्या स्वप्नात आला आणि त्याने मला हा प्रश्न विचारला. मी दचकलोच! दगड, विटा, चुना, वाळू, पोलाद अजून काय काय वापरून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम तंत्रज्ञान कौशल्य वापरून ब्रिटिशांनी बनवलेला हा पूल म्हणतो...‘विसरशील मला दृष्टिआड होताना..?’ मी स्वप्नातच ओरडलो, ‘मी तुला कधीच विसरणार नाही. कसं विसरणं शक्य आहे? झुकझुक अगीनगाडी, पहिल्यांदा तुझ्याच पाठीवर उभारून रेल्वेच्या दगडी कोळशाचा धूर अनुभवला. पहिली वंदे भारत ट्रेन पुलाखालून येताना फोटो काढला. कसं विसरेन तुला? तुझ्या कुशीत वसलेल्या एनजी मिल, लक्ष्मी-विष्णू मिल, जाम मिल... लाखो कष्टकरी पावलांनी या पुलावरून पायपीट केली. किती तरी सायकलींच्या कॅरियरवर कामगारांनी बायका, पोरं बसवून पायडल मारत पूल ओलांडला. किती मोर्चे, आंदोलनांची गर्दी पुलावर उसळली! कुणी तंगीत तणतणत, कुणी धुंदीत नाचत, कुणी झिंगून, कुणी खंगून, कुणी गळ्यात गळे घालून हा पूल ओलांडला. गळ्यातील घुंगरांचा मंजुळनाद करत गाई-गुरांनी पूल ओलांडला,”माझा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला म्हणत’ ट्रॅक्टर ट्रॉल्या दणाणत गेल्या. सिमेंटच्या ट्रका, गोडाऊनच्या धान्याच्या ट्रका, एसट्या, लक्झरी, दुचाक्या, चारचाक्यांची गिनतीच नाही. सगळा भार सहन करत पूल कणखरपणे उभाच होता.’ अगदी पार इंग्लंडहून रिटायरमेंटचे लेटर आलं तरी काम ओढतोच आहे अशी स्थिती. अखेर रिटायरमेंटची तारीख निघाली १४ डिसेंबर. मग सुरू झाली पाठवणीची तयारी. पुलाचा कार्यभार देण्यासाठी तीन रस्त्यांची निवड झाली. त्यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास नाराजी दर्शवली. मग कडक आदेश निघाले. शेवटच्या क्षणापर्यंत पूल मात्र ड्युटीवरच होता. अखेर सगळे झोपेत असतानाच पुलाने रिटायरमेंट स्विकारली. लाखो, करोडो पावलांचा भार सोसलेल्या पूलाचे पाय जाताना लटपटत होते. मला दचकून जाग आली! सत्यातला पूल आता आठवणीतला पूल झाला होता. नव्या पुलाच्या स्वप्नाचे सत्यात रूपांतर होण्यासाठी सगळ्यांनाच आता वर्षभर वाट पहावी लागणार आहे. रेल्वेचा ११ तासांचा ब्लॉक रविवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेसात या वेळेत रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. पुलाचे पाडकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वेसेवा ठप्प राहील. परंतु वंदे भारत, हुतात्मा, कर्नाटक, सिध्देश्वर एक्सप्रेस या गाड्या सकाळी साडेआठपर्यंत स्थानकातून नियोजित वेळेप्रमाणेच बाहेर पडतील, अशी माहिती देण्यात आली. अशी असेल यंत्रसामग्री१५० कामगार मक्तेदाराकडून आलेले२०० कामगार रेल्वे विभागातील असणार२०० टन क्षमतेचे ३ क्रेनच्या साह्याने काम२२० किलो क्षमतेचे ४ ब्रेकरने तोडणार. पूल पाडण्याचे नियोजन : १२ तासांचा ब्लॉक सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत रेल्वे इलेक्ट्रीक लाईन खाली आणणार.१०.३० वाजल्यापासून पुलावरील चुना, वाळूचे बांधकाम ब्रेकरनेतोडणार.पुलाच्या खाली २० गर्डर आहेत, ते क्रेनच्या साह्याने पाच टप्प्यांत काढणार. इंद्रधनुपासून दमाणी इस्टेटला जाण्यासाठी बोगदा १०० मीटर लांब : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकपर्यंत १०० मीटरचा नवीन पूल असेल. ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या उड्डाणपुलाला अडचण होणार नाही. पुलाची पुढची बाजू मरिआई चौकपर्यंत असणार.रुंदी १९ मीटर : नवी पुलाची रुंदी १९ मीटर असणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला साडेपाच मीटरचा सर्व्हीस रोड असेल. नरसिंग गिरजी मिलच्या दिशेन अधिक तर रेल्वे ग्राऊंडच्या दिशेने कमी जागा जाईल.रेल्वे स्थानकाच्या मागे बाहेर पडण्यासाठी नवीन प्रवेशद्वार आहे. तिथून इंद्रधनु गृहप्रकल्पाकडे जाणारा रस्ता आहे. तो नवीन पुलापर्यंत येईल. तिथून दमाणी इस्टेटकडे जाण्यासाठी लहान बोगदा केला जाणार आहे.उंची २ मीटरने वाढणार : नवीन पूल चारपदरी बांधला जाईल. जुन्या पुलापासून त्याची उंची दोन मीटर वाढणार आहे. पुलाची उंची वाढली तरी दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास नाही. वर्षभरात होणार १०० मीटर लांब अन् १९ मीटर रुंद नवीन पूल ब्रिटिश साम्राज्यात १९२२ मध्ये बांधलेल्या दमाणीनगर रेल्वेपुलाचे आयुष्य संपल्याने रविवारी पाडण्यात येणार आहे. त्याने गिरणगावचा ऐतिहासिक साक्षीदार इतिहासजमा होईल. पण, पुढील वर्षभरात नवीन पूलही अस्तित्वात येणार आहे. नवीन पूल १०० मीटर लांब आणि १९ मीटर रुंदीचा असेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याची निविदा दिल्लीच्या गोयला कंपनीला दिली. त्याला ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पूल पाडण्याची पूर्वतयारी शनिवारी सायंकाळी पूर्ण झाली. त्यासाठी महामार्ग प्राधिकरण, मध्य रेल्वे प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेवून होते. रविवारी सकाळी आठच्या आतील सर्व नियोजित रेल्वेगाड्या स्थानकातून ये-जा करतील. आठनंतर मात्र ११ तासांचा ब्लॉक असेल. पुलाच्या खालील रेल्वेरुळ झाकण्यात येणार आहेत. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पूल पाडण्याची प्रक्रिया असेल ब्रिटिशकालीन पूल एका विशिष्ट प्रकारातील रचनेचा आहे. लोखंडी गर्डरच्या वर शाबादी फरशीच्या कमानी अणि त्यावर चुना-वाळूचे बांधकाम असल्याने त्याला ‘मद्रास टेरेस’ रचना म्हणतात. पाडकामासाठी १५० कर्मचारी आणि रेल्वे प्रशासनाचे २०० कर्मचारी कार्यरत असतील. प्रत्येक कामगाराला त्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुलाचा आजोरा रेल्वेरुळावर पडू नये म्हणून खाली प्लायवूड टाकला जाणार आहे. एका बाजूने पूल पाडला जाईल आणि दुसऱ्या बाजूने रेल्वे रुळावरची स्वच्छता केली जाणार आहे. ठरलेल्या वेळेत पूल पाडून रुळ स्वच्छ करण्यात येईल. 1. जेसीबीच्या साह्याने वायरी काढल्या2. २०० टन क्षमतेचे क्रेन आणले गेले3. क्रेनने लोखंडी सुरक्षा कठडे काढले4. पुलाखालील १५० टन वजनाचे गर्डर आहेत. त्यावरील लोखंडी प्लेट काढण्यासाठी रेल्वे इंजिनची मदत घेण्यात आली होती.
सुमारे ४०० वर्षांपासून शहराचीठळक ओळख व इतिहासाचा साक्षीदार असलेली माळीवाडा वेस पाडण्याबाबत महापालिकेने हरकतीव सूचना मागवल्या होत्या. त्यावर शहरातील नागरिक, इतिहासप्रेमी व सर्वसामान्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हा विरोध लक्षात घेतामनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा प्रसिद्धीपत्रक काढून ‘नागरिकांच्या जनभावना व लोकहित लक्षातघेऊन ही कार्यवाही रद्द करत असल्याचे’ जाहीर केले. शुक्रवारी स्थानिकवर्तमानपत्रांमध्ये जाहीर प्रकटन देत महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली माळीवाडा वेस''या नावाने ओळखली जाणारीसुमारे ४०० वर्षे जुनी, ऐतिहासिकवास्तू पाडण्याचा निर्णय घेतला.त्यावर नागरिकांच्या हरकती वसूचना १७ डिसेंबरपर्यंत मागवल्याहोत्या. मात्र, महापालिकेच्या याभूमिकेबद्दल नागरिकांमध्ये,इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचीभावना व्यक्त होण्यास सुरुवातझाली. शनिवारी काही संघटनांनीनिवेदने देत निषेधही नोंदवला.त्यामुळे अखेर शनिवारी सायंकाळीआयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगेयांनी माळीवाडा वेस निष्कासीतकरण्याबाबत आलेली निवेदने वमागवलेल्या हरकती, सूचना,याबाबतची कार्यवाही रद्द करतअसल्याचे जाहीर केले आहे. याचेइतिहासप्रेमी व नागरिकांनी स्वागतकेले असून इतिहास जपण्यासाठी वशहरातील पर्यटन वाढवण्यासाठीप्रयत्न करण्याचे आवाहन केलेआहे. आता इतिहासाला पर्यटनाची जोड द्या माळीवाडा वेस पाडण्याचानिर्णय रद्द केल्याबद्दल आयुक्तांचेअभिनंदन व आभार. शहराच्याऐतिहासिक वारशाबाबत त्यांचीसंवेदनशील भूमिका स्वागतार्हआहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन वसंवर्धन हे महापालिकेचे कर्तव्यअसून त्यासाठी इतिहासप्रेमीनिश्चितच सहकार्य करतील.पर्यटन विकासासाठी नियोजनबद्धकृती आराखडा व भरीव तरतूदकेल्यास अहिल्यानगरच्याविकासाला नवी दिशा मिळेल. – भूषण देशमुख, इतिहासाचेअभ्यासक, हेरिटेज वॉकअहिल्यानगर.
साधूग्रामला जागा द्या, मठ-मंदिरांना नोटीस:तपोवनातील महंतांचा पालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा
तपोवनात साधूग्रामसाठी वृक्षतोडीवरुन पालिकेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आता पालिकेने साधूग्रामसाठीच तपोवनातील मठ-मंदिराना आरक्षणाबाबत देण्यात आलेल्या नोटीसावरुन साधू-महंत आता आक्रमक झाले आहेत. स्थानिक महंतांनी दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री महंत बलरामदासजी महाराज यांना याबाबत माहिती दिली आहे. याबाबत वैष्णव पंथाचे तीनही आखाड्यांचे महंत आधी बैठक घेणार असून प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. त्यात मंदिर हस्तांतरण, तपोवनातील वृक्षतोड, साधुग्राम व्यवस्थापन तसेच सिंहस्थपूर्व नियोजनातील त्रुटींवर तोडगा काढण्यात येणार आहे. प्रशासनाशी एकमत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असे महंत रामस्नेहीदास महाराजांनी सांगितले. यांना दिल्या नोटीसा प्रशासनाशी चर्चा; प्रसंगी आंदोलन करु तीनही आखाड्यांचे प्रमुख महंत प्रशासनाशी चर्चा करणार आहोत. अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदासजी, श्री महंत रामजीदासजी, श्री महंत नरेंद्रदासजी, श्री महंत महेशदासजी, तसेच श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे श्री महंत मुरलीदासजी आदींनी एकत्रित भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. - श्रीमहंत बलारामदासजी महाराज साधूग्राम उभारण्यात प्रयत्नांचा देखावा साधूग्रामसाठी १८२५ वृक्षांवर तोडण्यासाठी खुणा केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. राष्ट्रीय हरित लवादाने १५ जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली. संपूर्ण वातावरण पालिकेच्या आणि विशेषत: सरकारच्या विरोधात गेले आहे. प्रत्यक्षात कुंभमेळ्यात या मठ-मंदिरांमध्ये साधू-महंत राहतातच. त्यातच आम्ही केवळ वृक्षतोड नव्हे तर साधूग्रामसाठी परिसरातील मंदिर-महंतांकडेही जागा मागत आहोत हे दाखविण्यासाठी पालिका आणि सरकारची धडपड आहे अशी चर्चा पालिका वर्तुळातही सुरू होती.
सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्ट्याच्या गाडीवर काम करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणाचे शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी ३.१५ वाजता फिल्मीस्टाइलने अपहरण करण्यात आले. एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या महिलेसह १० ते १२ अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. प्रेमप्रकरणातून मुलीच्या आईने हे कृत्य केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी रात्री उशिरा महिलेला अटक केली आहे.अपहरण झालेल्या तरुणाचे नाव विशाल आबासाहेब येडके (२३, रा. मिसारवाडी) असे आहे. फिर्यादी सुरेश नरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा विशाल येडके हा सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्टा सेंटरवर काम करतो. त्याचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी अचानक एक गाडी आली. त्यात त्याला टाकून घेऊन गेले. त्यानंतर ही घटना घडली. अपहरणानंतर बेदम मारहाणीचा थरार अपहरणकर्त्यांनी विशाल येडकेला गाडीत कोंबून नेल्यावर काय घडले याची माहिती पीडित विशालने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत दिली आहे. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सिडको बसस्थानकातून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये विशालला कोंबण्यात आले. कारमधून सातारा परिसरात घेऊन जात असताना आरोपींनी विशालला बेदम मारहाण केली. साताऱ्यामध्ये पोहोचल्यावर आरोपींनी आणखी १० ते १२ जणांना बोलावून घेतले आणि त्या सर्वांनी मिळून विशालला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी विशालला सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली आणून सोडून दिले. तेथून विशालने मामाला फोन केला. त्यानंतर मामा नरवडे यांनी त्याला सोबत घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले आणि अपहरणाची तक्रार दाखल केली. एक वर्षापूर्वीच्या घटनेतूनच सूड या अपहरणामागे एक वर्षापूर्वी घडलेला प्रकार कारणीभूत ठरला आहे. एक वर्षापूर्वी विशाल आणि तरुणी हे दोघेही घरातून पळून गेले होते. तेव्हा विशालच्या मामाने (सुरेश नरवडे) मध्यस्थी करत दोघांनाही पोलिस ठाण्यात हजर केले होते. पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगितले आणि तरुणीला तिच्या आईच्या, म्हणजेच आरोपी महिलेच्या स्वाधीन केले होते. मात्र, या घटनेनंतरही आरोपींच्या मनात राग कायम होता. याच जुन्या रागातून मुलीच्या आईने सूड घेण्याच्या उद्देशाने शनिवारी आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन फिल्मीस्टाइलने विशालचे अपहरण केले.
राज्यातील शिक्षकांवर सोपवण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यासारख्या अशैक्षणिक कामांतून मुक्त करण्यासाठी आता खुद्द राज्याच्या मुख्य सचिवांच्या स्तरावरून संबंधित विभागांना निर्देश दिले जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ऑक्टोबर २०२५ च्या सुमारास खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिग्रहित केले जात आहे. एकाच शिक्षकाकडे अनेक वर्गांची जबाबदारी असताना त्यांना मतदार नोंदणीसारख्या महसुली कामांना जुंपल्याने आरटीई कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा आमदारांनी लावून धरला होता. तसेच इतर मुद्देही लावून धरले होते. अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा शिक्षणमंत्र्यांनी मान्य केले की, काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या जात आहेत. मात्र, शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा ही सरकारची भूमिका आहे. ज्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही त्यांच्यावर होणारी प्रशासकीय कारवाई आणि शिक्षकांवरील कामाचा अतिरिक्त भार कमी करण्यात येईल. पीएचडी निकष ठरवण्यासाठी समिती स्थापन : अजित पवार नागपूर| टीआरटीआय, बार्टी, सारथी व महाज्योतीच्या किती विद्यार्थ्यानी, कोणत्या विषयावर पीएचडी केली पाहिजे याचे निकष ठरवून नियमावली करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात दिली. बार्टी, सारथी व महाज्योतीमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही या संबंधीचा तारांकित प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या वेळेस निवडणुकीचा काळ होता. त्या काळात विद्यार्थी नाराज नको म्हणून कोणतेही निकष न लावता सरसकट शिष्यवृत्ती देण्यात आली. मागे काय झाले ते राहु द्या. आता निकष ठरवून लक्ष्यांक ठरवले पाहिजे, असेही ते म्हणाले. निकषानंतर शिष्यवृत्ती प्रारंभी या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पीएचडीचे विषय समाजोपयोगी असले पाहिजे, असा आमचा कटाक्ष आहे. अनेकदा समाजाशी काडीचाही संबंध नसलेल्या विषयांवर पीएचडी केली जाते. विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर करावी याचे निकष ठरवून यापुढे शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बारावे ज्योतिर्लिंग असलेले वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव पूर्वाभिमुख शिवलिंग असलेले मंदिर आहे. या मंदिराचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या आराखड्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेली मंदिराच्या पूर्ण प्रदक्षिणेची धार्मिक पद्धत बदलून ‘अर्ध प्रदक्षिणा’ मार्गाचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिर विकासकामाच्या आराखड्याचे काम होत आहे. गट नं.४ मध्ये २१० कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. याबाबत आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सांगितले की, जलाधारी ओलांडू नये तसेच शिवपिंडीच्या दर्शनापूर्वी नंदीचे दर्शन घ्यावे असे काही लोकांचे मत होते. यानुसार नव्याने मार्ग तयार करण्यात येत आहे. ५३ कोटींतून कामे २१० कोटींपैकी मंदिर परिसरासाठी ५३ कोटींचा निधी मंजूर केला. यात ४ कोटींचे भक्तनिवास, २५ लाखांचे फर्निचर, अडीच कोटींचा भूमिगत रस्ता, १६ कोटींचा बायपास रोड, २ कोटींची इलेक्ट्रिक कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचे नियोजन, सोलार सिस्टिम, दगडी वाट, दर्शनबारी, वृक्षारोपण आदी कामे केली जाणार आहेत. दर्शनरांगेचा तोडगा काढू बारावे ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण प्रदक्षिणा घालावी लागते. जर विकास कामात अशा पद्धतीने अर्ध प्रदक्षिणेचा मार्ग होत असेल तर भाविकांच्या श्रद्धा, भावना लक्षात घेता यावर तोडगा काढण्यात येईल. -कुणाल दांडगे, अध्यक्ष, घृष्णेश्वर मंदिर मंदिराचा मूळ प्रदक्षिणा मार्ग प्रारंभ : दक्षिण भागातून मंदिरात येणारा भाविक प्रथम गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेतो.दर्शनक्रम : शिवलिंगाचे दर्शन झाल्यानंतर भाविक गणपती आणि नंदीचे दर्शन घेतात.प्रदक्षिणा पूर्ण करणे : ही दर्शने घेऊन भाविक परत पूर्व दिशेतील दरवाजातून बाहेर पडत होते आणि गोलाकार (पूर्ण) प्रदक्षिणा पूर्ण करत होते.मुख्य अडचण : या मार्गात शिवलिंगाच्या जलाधारीतून बाहेर पडलेले पाणी ओलांडून जावे लागत होते.अनंत पांडव, वेदमूर्ती ज्योतिष्याचार्य ...तर १२ ज्योतिर्लिंगांचे पुण्य मिळणार नाही १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्याशिवाय संपूर्ण पुण्य प्राप्त होत नाही. ज्योतिर्लिंग मंदिरातील शिवलिंगाची जलाधारी उत्तरेला असते. परंतु घृष्णेश्वर हे एकमेव पूर्वाभिमुख शिवलिंग आहे. येथे शिवसोबतच ब्रह्म, विष्णू आणि महेश निवास करतात. त्यामुळे पूर्ण प्रदक्षिणा याच ठिकाणी घालण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे. अर्ध प्रदक्षिणा झाल्यास १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होणार नाही. त्यामुळे बदल करताना पुरातत्त्व विभागाने शास्त्राची मदत घ्यावी. नव्याने प्रस्तावित अर्ध प्रदक्षिणा मार्ग (विकास आराखड्यानुसार)उद्देश : जलाधारीतून (दूध, दही, पंचामृत) निघालेले जल भाविकांना ओलांडावे लागणार नाही यासाठी हा मार्ग तयार करण्यात येत आहे.प्रारंभ : भाविक पूर्व दिशेच्या दरवाजातून मंदिरात प्रवेश करतील.नवा दर्शनक्रम :पहिल्यांदा नंदीचे दर्शन त्यानंतर गणपतीचे दर्शन सर्वात शेवटी शिवलिंगाचे दर्शनप्रस्थान : दर्शन घेऊन भाविक दक्षिण दरवाजातून बाहेर पडतील.स्वरूप : या पद्धतीने केवळ अर्ध प्रदक्षिणा पूर्ण होईल.
मनपा निवडणुकीचा बिगुल सोमवारनंतर:12 ते 15 जानेवारीदरम्यान मतदानाची शक्यता
नागपूर येथे ८ डिसेंबरपासून सुरू असलेल्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा रविवारी समारोप होणार आहे. आता सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या महापालिकांच्या निवडणुका येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहेत. मुख्यमंत्री सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतात. राज्यातील २९ पैकी २८ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान १२ ते १५ जानेवारी दरम्यान घेण्याबाबत निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. अर्ज ऑफलाइन भरता येणार मुंबई | आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) ऑफलाइन पद्धतीने भरण्याची परवानगी दिली जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या विनंतीवरून यापूर्वी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठीही ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. मुंबईसाठी वेगळी तारीख? महायुतीला मुंबईवर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक २५ डिसेंबरच्या आसपास जिल्हा परिषदांच्या तारखांसोबत घोषित होऊ शकते, अशीही चर्चा आहे.
राजस्थानातील गाव सोडून जैन धर्माच्या प्रसारासाठी देशाच्या भ्रमंतीवर निघालेले सर्वात ज्येष्ठ जैन मुनी कुंथूसागर महाराज शनिवारी सोलापुरातहोते. ‘दिव्य मराठी’ने त्यांची भेट घेऊन मुंबईतील कबुतरखान्यावर सुरू झालेले आंदोलन, पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्री प्रकरणावर प्रश्न केले. त्यावर महाराजांनी परखड मते मांडली. ‘सर्व जीवांना जगण्याचा अधिकार आहे. मारण्याचा अधिकार तर कोणालाच नाही. परंतु कोणी चुकीची भूमिका घेतली तर अहिंसापालकांना त्यावर भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मुनीगण निवडणुकीत उतरण्याची भाषा करत असतील तर त्यात गैर ते काय? मुनी लढले नाहीत तर त्यांचे शिष्यगण निवडणुकीत उतरतील. मुनी त्यांच्या पाठीशी राहतील, आशीर्वाद देतील. त्यात काहीही चूक नाही’, अशी भूमिका महाराजांनी मांडली. भ्रमंतीतून काय संदेश देता? आम्ही धर्माचा संदेश घेऊनच फिरतो. दयाधर्माचे पालन करावे, व्यसनांपासून दूर राहा, असाच उपदेश समाजाला देत असतो. अनवधानाने कोणी वाममार्गाने लागला तर त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचे काम असते. मुख्यत: अहिंसा हाच संदेश. मुंबईत जैन मुनींचे कबुतरखान्यावरून आंदोलन सुरू झाले. काय वाटते? माणूस स्वार्थासाठीच योग्य आणि अयोग्य या गोष्टी ठरवतो. कबुतरांचा विषय त्यातूनच आलेला आहे. कोणताही पक्षी एक जीव आहे. त्यांची सुरक्षा करणे आमचे कर्तव्य आहे. कबुतरे काही आजचे नाहीत. दिल्ली, राजस्थानात कबुतरांची आश्रयस्थाने आहेत. तिथे लोकांना त्रास नाही, मग इथल्या लोकांनाच कसा होतो? निवडणुकीत उतरण्याची भाषा? अहिंसा पालनकर्त्यांची हीच भाषा असते. त्यात चुकीचे काहीही नाही. जैन मुनींनी निवडणूक लढवली तर त्यात गैर काय? पण ते लढवणार नाहीत तर त्यांचे शिष्यगण निवडणुकीत उतरतील. त्यांना मुनिवर्य आशीर्वाद देऊन पाठीशी राहतील. यात गैर असे काहीही नाही. पुण्यात जैन बोर्डिंग विक्रीचा प्रकार घडला, काय सांगाल? जैन समाजासाठी असलेले बोर्डिंग विकत असाल तर ते चुकीचे आहे. मंदिर, संस्था, शाळा, महाविद्यालयांच्या सुरक्षेसाठी विश्वस्त असतात. मालक नव्हे. अशा मालकहोऊ पाहणाऱ्यांना मुनींनी रागावले तर चुकले कुठे? विश्वस्तांनी विश्वस्तांचीच भूमिका घ्यावी. मालक होऊ नये. जुन्या जैन मंदिरांवर अतिक्रमणहोत आहे... नवीन जैन मंदिरे उभी राहत आहेत हे चांगले आहे. पण ते करताना जुन्या मंदिरांचेही जतन होणे आवश्यक आहे. जुने ते जुने आहे. त्यांच्या संवर्धनाचे काम समाजानेच केले पाहिजे. अतिक्रमण हटवण्यासाठी काम करावे लागेल. ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे आवश्यकच आहे. ६० वर्षांपूर्वी आपण दीक्षा घेतलीत? हा निर्णय कसा झाला? वयाच्या २० व्या वर्षी मी घरातून बाहेर पडलो. मी या गोष्टीकडे आकर्षित झालो. त्यानंतर सहा महिन्यांनी दीक्षा घेतली. हे मला सुचलेले नाही. ते ईश्वराचे देणे आहे. दीक्षा म्हणजे काय? हे समजल्यानंतरच दीक्षा सोहळा झाला.
साताऱ्यात 15 कोटींचे एमडी ड्रग्ज केले जप्त:मुंबई पोलिसांची जावळी तालुक्यात कारवाई
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावरी येथे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय पद्धतीने मोठी कारवाई करत तब्बल १५ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. सावरी गावातील एका शेडमध्ये हे बेकायदेशीर ड्रग्जनिर्मिती युनिट सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर मुंबई क्राइम ब्रँचने छापा टाकला. या धडक कारवाईमुळे साताऱ्याची पोलिस यंत्रणा तत्काळ “अलर्ट मोड’वर आली. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याच्या पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन कारागीर आणि एक स्थानिक व्यक्ती अशा एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. याआधी मुंबई आणि पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावळी गावात एमडी ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याचे उघड झाले आहे. सूत्रधाराचा शोध घेण्याचे आव्हान बामनोली, दरे, सावरीसारख्या संवेदनशील व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनचे उत्पादन घेतले जात होते, याची कोणालाही माहिती नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या फॅक्टरीमागे कोणाचा राजकीय वरदहस्त होता का, याबाबत पोलिस अत्यंत सावध पावले टाकून तपास करत आहेत. मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींचा ताबा कायदेशीर कार्यवाहीसाठी सातारा पोलिसांकडे दिला जाणार आहे.
संभाजीनगरसह बारा मनपांना सरकारकडून 74 कोटींचा निधी:नागरी सोयी-सुविधांचा विकास गतिमान करण्यावर भर
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्य सरकारने “विकासा’च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. नगरविकास विभागाने शनिवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील छत्रपती संभाजीनगरसह १२ प्रमुख महानगरपालिका आणि नगरपालिकांना विविध विकासकामांसाठी एकूण ७४ कोटी ६४ लाखांचा निधी वितरित केला आहे. राजकीय वर्तुळात या निधीवाटपाकडे थेट निवडणुका स्पेशल बूस्टर म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत नागरी सोयी-सुविधांचा विकास गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विविध महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, गटार, ड्रेनेज व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. “टार्गेट’ महापालिका आणि वितरित निधी १ कोकण विभाग : मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर, मीराभाइंदर, वसई-विरार या महापालिकांना १७२ कोटी मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ४३ कोटींचा सर्वाधिक निधी वितरित करण्यात येणार आहे.२ पुणे विभाग : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर सोलापूरसाठी ९० कोटी मंजूर करण्यात आले असून २२ कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.३ छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड-वाघाळा या महापालिकांसाठी १३.६५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ३ कोटी ४१ लाख निधी वितरित दिला.४ नाशिक विभाग : नाशिक, धुळे महापालिकांसाठी १३० कोटी मंजूर करण्यात आले असून ३ कोटी २५ लाख वितरित करण्यास मंजुरी. राज्यातील मतदारांवर डोळा आचारसंहितेपूर्वी तातडीने रस्ते, पाणी आदी विकासकामांसाठी निधी देऊन मतदारांना आकर्षित करण्याची मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेले प्रकल्प आता तातडीने पूर्ण करून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच स्थानिक नेत्यांनाही यातून खुश करण्याचे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. पकड मजबूत करण्यावर भर महत्त्वाच्या मनपांवर लक्ष केंद्रित करून विकास प्रकल्पांची गती वाढवण्याचा प्रयत्न आहे. नाशिकसह खान्देश, मराठवाडा व विदर्भातील शहरांतील विकासकामांना हातभार लावून सत्ताधाऱ्यांकडून राजकीय पकड मजबूत करण्याची रणनीती आहे.
लक्ष्यवेधींची वेळेत उत्तरे द्या अन्यथा हक्कभंग आणणार
विधानसभा अध्यक्षांचा मुख्य सचिवांना इशारा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन संपत आले तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तरे अद्याप प्रलंबित आहेत. त्यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही त्याला प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्ष्यवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा […] The post लक्ष्यवेधींची वेळेत उत्तरे द्या अन्यथा हक्कभंग आणणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वर्षानुवर्षे संचालकपदावर राहणा-यांना कोर्टाचा दणका
कोल्हापूर : प्रतिनिधी सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणा-या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने २०२१ मध्ये दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळून लावली. बँक्स असोसिएशनने ही याचिका दाखल केली होती. आता याबाबतची अंतिम सुनावणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. २०२१ साली रिझर्व्ह बँकेने आदेश जारी करत […] The post वर्षानुवर्षे संचालकपदावर राहणा-यांना कोर्टाचा दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कॉंग्रेसचा हल्लाबोल, नाव बदलण्याची मोदींची सवय जुनीच नवी दिल्ली : वृत्तसंस्था यूपीए सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मनरेगा योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये संसदेत बोलताना मनेरगा काँग्रेसच्या ६० वर्षांच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हटले होते. आता त्याच योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असे केले असून, कामांच्या दिवसांची संख्या […] The post केंद्राने मनरेगाचे नाव बदलले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जीएसटी कपातीमुळे राज्याला १५ हजार कोटींचा फटका
उपमुख्यमंत्र्यांची माहिती, विकासकामांच्या निधीत कपात? नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वस्तू आणि सेवा करात कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्याला १२ ते १५ हजार कोटींचा फटका बसणार आहे. परिणामी सरकारला विविध कामांसाठीच्या निधीत कपात करावी लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबईसह […] The post जीएसटी कपातीमुळे राज्याला १५ हजार कोटींचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बँकांच्या बीएसबीडी खात्यांसाठी मोफत सुविधा
मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने झिरो बॅलेन्स असलेल्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यांसाठी मोफत सुविधा वाढविली आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या बदलांमध्ये अमर्यादित मासिक ठेवी, कोणत्याही नूतनीकरण शुल्काशिवाय मोफत एटीएम किंवा डेबिट कार्ड वापर, […] The post बँकांच्या बीएसबीडी खात्यांसाठी मोफत सुविधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जमीन व्यवहारात अधिका-यांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न
अंजली दमानियांचा थेट अजित पवारांवर प्रहार मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकारपत्रधारक (कुलमुखत्यारधार) शितल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात संबंधित अधिका-यांनी कागदपत्र पडताळणी करणे […] The post जमीन व्यवहारात अधिका-यांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

29 C