भारतीय हवाई दलाचा वेश परिधान करून बनवाबनवी:25 वर्षीय तरुण पुण्यात अटकेत
भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहरातील खराडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत भारतीय हवाई दलाच्या जवानाच्या वेशात सोशल मीडियावर वावरून फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरव दिनेश कुमार ( वय 25 ,स सध्या रा. खराडी, पुणे, मु. रा. अलिगढ, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो खराडी येथील स्टे बर्ड हॉटेल मध्ये कर्मचारी आहे. हवाई दलाच्या वेशात त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोच्या अनुषंगाने त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने एक वर्षांपूर्वी हवाई दलाचा गणवेश जाळून टाकल्याची कबुली दिली आहे. पोलिस हवालदार रामदास पालवे यांनी आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव कुमार याच्या भारतीय हवाई दलाच्या वेशातील संशयास्पद हालचालींबाबत गोपनीय माहिती लष्कराच्या गुप्तचर खात्यास मिळाल्यानंतर त्याच्यावर देखरेख ठेवण्यात आली. सोशल मीडियात आपण हवाई दलाचे अधिकारी असल्याचे भासवून तो सामान्य नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.सखोल पडताळणी आणि निगराणीच्या प्रक्रियेनंतर, दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि खराडी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने पुणे शहरातील खराडी परिसरात आरोपीला ताब्यात घेतले. शोध मोहिमेदरम्यान, आरोपीकडून फसवणुकीसाठी वापरले गेलेले काही साहित्य जप्त करण्यात आले, ज्यामध्ये दोन हवाई दलाचे टी-शर्ट, एक हवाई दलाचा कॉम्बॅट पँट, एक जोडी हवाई दलाचे कॉम्बॅट शूज, दोन हवाई दलाचे बॅजेस, एक ट्रॅक सूट अप्पर समाविष्ट आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली. पुणे पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिताच्या कलम 168 अंतर्गत खराडी पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीचा चौकशी सुरू असून, त्याच्या कृत्यामागील हेतू आणि संभाव्य सुरक्षेशी संबंधित परिणाम तपासले जात आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी ऑपरेशन पाकवरील कथित विजयावर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या सत्ताधारी भाजपसह सर्वच सत्ताधारी पक्षांना खडेबोल सुनावलेत. याविषयी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली आहे. आपण पाकविरोधात विजय मिळवला नाही. त्याच्याशी केवळ यु्द्धविराम झाला आहे. त्यामु्ळे देशभरात सुरू असणारा जल्लोष मनाला वेदना देणारा आहे, अशी खंत अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. अमित ठाकरे यांच्या या पत्रावर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. खाली वाचा अमित ठाकरे यांचे पत्र जशास तसे प्रति,आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी,सस्नेह जय महाराष्ट्र,आपल्या नेतृत्वाखाली देशाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यांवर निर्णायक वाटचाल केली आहे. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेबाबत आपण घेतलेले कठोर पण आवश्यक निर्णय देशहितासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहेत, याबद्दल आपले आभार.सध्या सीमारेषेवर निर्माण झालेल्या स्थितीमुळे जनतेचं लक्ष पूर्णपणे आपल्या भारतीय सैन्याकडे केंद्रित झालं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपल्या शूर सैनिकांनी दाखवलेले धाडस, शिस्त, समर्पण आणि राष्ट्रासाठीचा त्याग हे संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. भारतीय लष्कराने आपल्या शौर्याने संपूर्ण देशाच्या हृदयात अढळ स्थान मिळवलं आहे.आज देशात प्रत्येक घरातून, चौकात, सोशल मीडियावरून सैनिकांच्या कार्याला सलाम केला जात आहे. सैन्याच्या प्रत्येक हालचालीकडे आज देश प्रेमाने आणि गर्वाने पाहत आहे. त्यांच्या अद्वितीय शौर्यामुळेच आपण सुरक्षित आहोत आणि म्हणूनच त्यांचे कार्य कुठल्याही सन्मानापेक्षा मोठे आहे.या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.त्यासोबतच, सध्याच्या घटनाक्रमाचा विचार करता, देशात काही गंभीर बाबींविषयी अजूनही अनिश्चितता आहे. उदाहरणार्थ, पहलगाममध्ये घडलेला क्रूर दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये २६ निरपराध पर्यटकांनी आपला जीव गमावला, हा अजूनही जनतेच्या मनात जिवंत आहे. त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे. याशिवाय, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल.तसेच, जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे, आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा.मा. मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा.आपल्या निर्णयक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास आहे आणि आपल्याकडून या भावनांची योग्य दखल घेतली जाईल, हीच अपेक्षा.आपला नम्र,अमित राज ठाकरे(नेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
मुंबईच्या दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये रविवारी सायंकाळी दोन कुटुंबांमध्ये जुन्या वादातून तुफान हाणामारी झाली. हातघाईपासून थेट चाकू आणि कोयत्यांपर्यंत गेलेल्या या राड्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गणपत पाटील नगर येथील गल्ली क्रमांक 14 मध्ये राम नवल गुप्ता यांच्या नारळ विक्री स्टॉलसमोर अमित शेख नावाचा व्यक्ती दारूच्या नशेत आला. यावेळी त्याचा राम नवल गुप्ताशी वाद झाला. वादाचा कडेलोट होऊन दोघांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले आणि काही क्षणातच परिस्थिती हिंसक झाली. कोयते- चाकू घेऊन थेट जीवघेणा हल्ला एमएचबी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गणपत पाटील नगर येथील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शेख आणि गुप्ता कुटुंबांमध्ये 2022 पासून वाद वाढले होते. हा वाद पोलिस स्टेशन पर्यंतही गेला होता. पोलिसात दोन्ही कुटुंबांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आजच्या घटनेत या जुन्या वादाला उधाण आले. परिसरातील दुकानांतून चाकू आणि कोयते घेऊन दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांवर थेट प्राणघातक हल्ला चढवला. या घटनेत राम नवल गुप्ता (वय 50 वर्षे) अरविंद गुप्ता (वय 23 वर्षे), हमीद नसीरुद्दीन शेख (वय 49 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख, हसन शेख हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी,वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ गावी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत. जंगलातील कोअरझोन मधील क्षेत्रात त्यांनी ठाण मांडून संसार थाटला. भिवंडी तालुक्यातील एकसळ, सागाव येथे झालेले पुनर्वसन मान्य नसून तेथील आदिवासी आम्हाला जगू देणार नाहीत, पुनर्वसनाच्या चांगल्या सुविधा नाहीत त्यामुळे आम्ही आता येथेच राहणार व इथेच मरणार अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी आडोशीतील मूळ गावच्या जंगलातच चुली पेटवल्या आणि रात्र जागवली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांचे एकसळ, सागाव (ता. भिवंडी जि. ठाणे ) या ठिकाणी 2015 साली पुर्नवसन करण्यात आले. एकूण 120 प्रकल्पग्रस्त खातेदारांकरीता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून 242 हेक्टर जागा दिली होती. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या एकूण 70 कुटुंबांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. त्यापैकी खिरखंडी येथील सहा कुटुंबे वगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले. मात्र गावातील असलेल्या आदिवासी लोकांचा त्रास, मारहाण या लोकांना गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी होत आहे. त्या त्रासाला कंटाळून तसेच पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या रस्ते, पाणी, वीज यासह अन्य सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावी परतण्याचे निश्चित केले. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एकसळ सागाव (जि. ठाणे ) येथून सुमारे 22 प्रकल्पग्रस्त मिनी ट्रॅव्हल्सने महाबळेश्वरात आले. तेथून कुरोशी पुलावरून वाघावळे, उचाट, आकल्पे येथे पोहोचले. त्यानंतर आकल्पे तून पायी चालत दुपारी बाराच्या सुमारास आडोशी हे मूळ गाव त्यांनी गाठले. तेथील पडक्या, उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या इमारती समोर संसार मांडून तेथे ठाण ठोकले. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावी येण्याची भूमिका स्पष्ट करून आता आम्ही येथेच राहणार आणि इथेच मरणार असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. परंतु प्रकल्पग्रस्त मागण्यांशी ठाम रहात भुमिकेत बदल न करता त्यांनी त्याच ठिकाणी चुली पेटवून संसार थाटला. शुक्रवारची संपूर्ण रात्र आडोशी तील जंगलातच जागविली. पायी मार्गाने चालत मुळ गाव गाठलेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या जंगलातील मूळ गावी येऊ नये म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली होती. ड्रोनच्या साह्याने प्रकल्पग्रस्तांवर नजर ठेवली होती .तर बफर क्षेत्रातील बोटी कोअर क्षेत्रात येऊ दिल्या नाहीत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पग्रस्त हे कोअर क्षेत्रात बोटीने न जाता सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर अंतर चालत पायी मार्गाने आपल्या मूळ गावी पोहोचले. शाळेच्या बंद शेडमध्ये म्हशीचे सांगाडे ज्यावेळी सर्व प्रकल्पग्रस्त आडोशी येथील त्यांच्या मूळ गावातील शाळेसमोर पोहोचले. त्यावेळी त्यांनी जुन्या पडक्या शाळेमध्ये आसरा घेण्याचे ठरवले. मात्र या शाळेतील खोलीमध्ये मेलेल्या म्हशीचे सांगाडे आढळून आले. दुर्गंधीही पसरली होती. या म्हशी प्रकल्पग्रस्तांच्या असल्याचे बोलले जात होते तर मेलेल्या म्हशीचे सांगाडे पाहून वृद्ध प्रकल्पग्रस्तांना अश्रू अनावर झाले. निवेदन देऊनही अधिकाऱ्यांची चालढकल तानसा नदीवरील एकसळ, सागाव या ठिकाणी येथील 70 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले असून त्या ठिकाणी दिलेली जागा दलदलीची आहे. शेती करण्यायोग्य नाही, बांधलेल्या घरांना भेगा गेल्या आहेत, पावसाळ्यात जमीन खचत आहे. चिखल तुडवत शेताकडे जावे लागते. 18 नागरी सुविधांपैकी बहुतांश सुविधा त्या ठिकाणी दिल्या गेल्या नाहीत. रेशनकार्ड दिले आहे मात्र त्यावर ऑनलाईन नसल्याच्या कारणास्तव रेशन मिळत नाही. गुरांसाठी चरण्यासाठी गायरान नाही. त्यामुळे चारा उपलब्ध होत नाही. ज्या ठिकाणी जागा वाटप केली त्यातील बहुतांश जागेवर आदिवासी लोकांनी अतिक्रमण केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वनविभाग, पुनर्वसन विभाग, ठाणे, सातारा जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही आजपर्यंत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचा कोणताही प्रश्न निकाली न लागल्याने आम्ही शेवटी आमच्या मूळ गावी परतलो आहोत. शासनाने आम्हाला येथेच मरण्याची परवानगी द्यावी अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळील जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट नदीच्या 100 ते 150 फूट खोल पात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने क्रेनच्या साहाय्याने कार नदीबाहेर काढण्यात आली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा वरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. पोलिसांनी कारचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढले. कार पूर्णपणे नष्ट झाली होती. सोमवारी सकाळी 5.15 वाजता रेकॉर्ड झालेल्या एका व्हिडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार दिसून येतो. या व्हिडिओमध्ये क्रेनने कार बाहेर काढताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गर्दी झालेली स्पष्ट दिसते. घटनास्थळी शोककळा पसरली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईहून देवरुखकडे जाणारी ही कार जगबुडी नदीच्या पुलावर आली असताना अचानक पुलाची कठडा तोडून नदीत कोसळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे. तपासानंतरच खरी माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याचा अपघातात मृत्यू ही कार विवेक श्रीराम मोरे यांच्या मालकीची असून, कारमधून खालील प्रवासी प्रवास करत होते: मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत, विवेक श्रीराम मोरे, परमेश पराडकर या प्रवाशांपैकी मेघा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे व श्रेयस सावंत यांचा मृत्यू झाला आहे. तर कारचा चालक विवेक मोरे व परमेश पराडकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रेनच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने नदीत कोसळलेली कार वर खेचण्यात आली. कारची अवस्था पाहून अपघाताच्या भीषणतेचा अंदाज येत होता. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी दरवाजे फोडावे लागले.
पिशोरमध्ये गवंडीकाम करणाऱ्याचा शस्त्राने खून:जुन्या वादातून प्रकार, आरोपीही गंभीर जखमी
कन्नड तालुक्यातील पिशोर येथील झोपडपट्टीत शनिवारी रात्री गवंडीकाम करणाऱ्या शेख शकील शेख जमील या ४० वर्षीय व्यक्तीचा खून झाला. शेख शकील घरात पलंगावर बसलेला असताना आरोपी अलीम सलीम पठाण (२५) याने घरात घुसून धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. यात शेख शकील याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचा सावत्र मुलगा शेख राहील शेख अहमद (१९) याने पिशोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जुन्या वादातून खून झाल्याचे समजते. मृताच्या पत्नी व नातेवाइकांनी यापूर्वी झालेल्या वादानंतरही पोलिसांनी अलीम पठाणवर कारवाई न केल्याचा आरोप केला. रविवारी सकाळी त्यांनी पोलिस ठाण्यात ठिय्या दिला होता. आरोपी अलीम पठाणही जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस मुख्यालयातील दंगा काबू पथक झोपडपट्टी परिसरात तैनात करण्यात आले होते. न्यायवैद्यक पथकाच्या विजया पाडळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. सिल्लोडचे उपविभागीय पोलिस अधिकारी कोल्हे यांनीही घटनास्थळी भेट दिली. घटनेची माहिती समजताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. सपोनि नागवे यांनी दिवसभर दंगा काबू पथकाचे जवान पिशोर परिसरात तैनात ठेवले होते. दिवसभर दंगा काबू पथक
पैठण तालुक्यात २९६ पेक्षा अधिक अनधिकृत वीटभट्ट्या सुरू आहेत. एकाही वीटभट्टीकडे परवानगी नाही. बिडकीन, चितेगाव, पारोळा, शेकटा, पाटेगाव, शहागड रोड परिसरात रस्त्यालगत आणि गावालगत या वीटभट्ट्या सुरू आहेत. यामुळे पैठण शहर आणि परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तहसील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. पैठण शहरासह ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात घर बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या विटांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बिडकीन, चितेगाव, पारोळा, शेकटासह पैठण शहरालगत शेकडो अनधिकृत व कुठल्याही नियमांचे पालन न करता २९६ हून अधिक वीटभट्ट्या सुरू आहेत. या वीटभट्ट्यांमुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण वाढले आहे. विनापरवाना तीनशेंच्या जवळपास अनधिकृत वीटभट्ट्या सुरू आहेत. या बेकायदेशीर वीटभट्ट्यांमुळे पैठण शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. दगडी कोळशाची भट्टी तयार करून धुराच्या लोटात वीटभट्ट्या सुरू असतात. याकडे राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. दगडी कोळशापासून सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉऑक्साईड आणि नायट्रोजनमधील ऑक्साईड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. दिनेश झांपले, प्रभारी तहसीलदार पैठण तालुक्यात ३०० च्या जवळपास वीटभट्ट्या असून एकाही वीटभट्टीला परवानगी नाही, असे असताना छत्रपती संभाजीनगर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे. वीटभट्टी चालक प्रदूषण नियंत्रक मंडळाची कुठलीही परवानगी न घेता व स्थानिक तहसील प्रशासनाला हताशी धरून वीटभट्ट्या चालवित आहेत. या संदर्भात गौण खनिज विभागाचे सतीश पेंडशे म्हणाले, पैठण तालुक्यात एकाही वीटभट्टीला परवानगी देण्यात आलेली नाही. या विषारी वायूंमधील सल्फर डायऑक्साईडमुळे डोळ्यांचे विकार आणि हवेतील नायट्रोजनमधील ऑक्साईडमुळे फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात. तसेच कार्बन मोनॉऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंमुळे वीटभट्ट्यांच्या परिसरातील तापमानात वाढ होऊन सभोवतालच्या शेतीवर, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. Q. किती वीटभट्ट्या अनधिकृत आहेत? A. पैठण तालुक्यात अनधिकृतपणे असणाऱ्या वीटभट्ट्यांची माहिती घेतली जाईल, त्यानंतर आकडेवारी समोर येईल. Q. शहरालगतच्या वीटभट्ट्यांमुळे आरोग्याला धोका आहे का? A. शहरालगत वीटभट्ट्या नसाव्यात, त्या इतर ठिकाणी हलविल्या जाव्यात, या संदर्भात मंडळ अधिकारी यांच्याकडून माहिती घेऊन संबंधितांना सूचना करू. Q. आता वीटभट्टी चालकांवर कारवाई कधीपर्यंत करणार? A. वरिष्ठांना अनधिकृत असणाऱ्या वीटभट्ट्या संदर्भात माहिती देऊन त्यानंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल. कोटींची उलाढाल, महसूल मात्र झीरो वीटभट्ट्यांच्या परवानगीसाठी नियम असून ते नियम एकही वीटभट्टी चालक पाळत नाही. मात्र, तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने यातून शासनाला मिळणारा कोटीचा महसूल मात्र बुडत आहे. संबंधित विभागाने वेळीच लक्ष देवून वीटभट्ट्यांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी होत आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भाजपच्या वतीने सैनिकांच्या सन्मानार्थ रविवारी (दि. १८) सकाळी फुलंब्रीत तिरंगा यात्रा काढण्यात आली. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पार पडली. महात्मा फुले चौकातून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून यात्रा पुढे निघाली. यात्रेत माजी सैनिक सर्वात पुढे होते.
सोयगाव जरंडी येथील आदर्श ग्राम पंचायतीतर्फे गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामुळे आदर्श ग्राम पंचायतीला राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट ग्राम पंचायत म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. जरंडी येथे ठिबक सिंचनाचा वापर करत अडीच वर्षांत २७ हजार झाडांची लागवड करत ही झाडे जगवून निसर्ग संवर्धनाचे काम करण्यात आले. शिवाय ग्रापने स्वतःच्या जमिनीतून उत्पन्न घेत गाव सुसज्ज केले आहे, अशी माहिती ग्रामसेवक ग्रामसेवक सुनील मंगरूळे यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या शेतात शेवगा, आंबा लागवड सुसज्ज स्मशानभूमी : गावात पाच एकर समितीवर सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. जिथे अडीच हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यात आले. त्या झाडांवर बोलकी चित्र काढून, वेगवेगळ्या क्षणी लिहिण्यात आल्या. झाडाच्या भोवती ओटा तयार करून बसण्याची व्यवस्था केली आहे. जरंडी येथील ग्राम पंचायतीने माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्टरीत्या जगविलेली झाडे. ग्रापने पाच एकर जागेत उद्यान साकारले आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्यात आले. या उद्यानाचे वैशिष्ट म्हणजे मोठ्या झाडांबरोबर औषधी वनस्पती देखील लावण्यात आल्या आहेत. हे उद्यान पाहण्यासाठी परिसरातील शिक्षण संस्था शैक्षणिक सहलींचे आयोजन करत आहेत. यामाध्यमातून जवळपास ५० हजारांचे वार्षिक उत्पन्न ग्राम पंचायतीला मिळत आहे, त्यातून गावाच्या विकासासाठी उपयोग केला जातो. ग्रामपंचायतीच्या मालकीची पाच एकर शेती आहे. या शेतात शेवगा आणि आंबे यांचे पिक घेतले जाते. त्यातून तीन लाख रुपयांचे वार्षिक उपन्न ग्रापला मिळत आहे, अशी माहिती उपसरपंच संजय पाटील यांनी दिली. जरंडीची लोकसंख्या ३४५३ असून गेल्या २ वर्षातच गावाचा कायापालट करण्यात आला. गावात वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, अशी माहिती माहिती सरपंच स्वाती दिलीप पाटील यांनी दिली.
पैठण तहसीलमध्ये अवैध वाळूच्या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या कारवाईत आजपर्यंत चार तहसीलदार गेले आहेत. सारंग चव्हाण यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर आजपर्यंत पैठण तहसीलदार मिळत नसल्याने तहसीलमधील प्रभारी तहसीलदार असल्यामुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबून जात आहेत. रोज येणाऱ्या शेतकऱ्यांना येथे अडवणूक होते. आता दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून १२ हजार विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शिवाय तहसीलमधील इतर कर्मचाऱ्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याने कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करण्याची मागणी शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. तात्कालीन तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या लाचलुचपत कारवाईनंतर तीन तहसीलदार प्रभारी लाभले. आता प्रभारी तहसीलदार म्हणून दिनेश झांपले असून सर्व कारभार राम भरोसे सुरू आहे. नायब तहसीलदार यांच्या कामकाजावर देखील प्रश्न असून एका दिवसात तहसीलमध्ये येऊन सामान्य काम होईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहर व तालुक्यातील अनेकांची कामे खोळंबली असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांपासून तहसीलदारांचे पाणीटंचाई, स्वच्छता हे प्रश्न कमालीचे भेडसावत आहेत. तहसीलमधील विविध विभागातील कर्मचारी देखील प्रभारी तहसीलदारामुळे कामाकडे दुर्लक्ष करतात. यात तहसीलच्या परिसरात दलाली वाढली आहे. पैठणमध्ये येण्यास नकार पैठणमध्ये तीन तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर सध्या पैठणमध्ये नवीन तहसीलदार येण्यास तयार होत नसल्याचे समोर येत आहे. सध्याचे प्रभारी तहसीलदार दिनेश झांपले यांचे कामकाज सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अवैध वाळू ठरतेय अडचणीची पैठण गोदावरी नदीतून होणारी अवैध वाळू उपसा हा महसूलच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळे खुलेपणाने सुरू असतो. अवैध वाळूवर कारवाई केली तर वाळू तस्कर लाचलुचपत विभागाकडे जातात. या भीतीने तहसीलदार कारवाई करत नाहीत. यामुळे नवीन तहसीलदार पैठण येण्यास तयार नसल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील ओतूर धरणाच्या दुरुस्ती कामामुळे ११०० एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या धरणाच्या आवश्यक सर्व कामांसाठी निधी कमी पडू देणार देणार नाही, असे स्पष्ट करत जून २०२६ पर्यंत धरणाचे काम पूर्ण करण्याचे निर्देशराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंत्रणेला दिले. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या ओतूर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती कामाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्ष कौतिक पगार संजय देवरे, जलसंपदा विभागाचेअधीक्षक अभियंता बा. क. शेटे, कार्यकारी अभियंता मनोज ढोकचौळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, धरणाच्या कामावर ४५ कोटी १७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. धरण दुरुस्तीमुळे पावसाळ्यात ९१ दशलक्ष घनफूट जलसाठा होऊन ओतूर खोरे परिसरातील ११०० एकर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे काम पूर्ण करण्याचा सपाटा लावण्याचे आदेश यंत्रणेला देत शासनातर्फे शेतकरी विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. आमदार पवार यांनी सांगितले की, स्व. ए. टी. पवार यांनी धरणाचे पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी माझे प्रयत्न होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी धरणाचे काम मार्गी लावेल हा शब्द देत तो पूर्ण केल्याने धरणाच्या कामाला चालना मिळाली. धरणामुळे परिसर विकासाला चालना मिळणार आहे. उर्वरित कामासाठी पाठपुरावा सुरू असून विविध गावातील शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल, असे सांगितले. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ व खोऱ्यातील शेतकरी उपस्थित होते.
निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथे शनिवारी दि. १७ ते २४ मे दरम्यान जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी अनेक भाविक अनुष्ठानाला बसले होते. भाऊसाहेबनगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर, राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जपानुष्ठाण सोहळ्यादरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत ७ पारायण होणार आहे. सायंकाळी ६ ते सात या वेळेत नित्यनियम विधी, आरती व हरिपाठ होणार आहे. जपानुष्ठान सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांनी केले आहे. दरम्यान, जपानुष्ठाण सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात वातावरण भक्तीमय झाले आहे. शिवपुराण कथा व पारायणासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.जपानुष्ठाण सोहळ्यात शिवपुराण कथा पारायण व विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी आलेल्या भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी सांगितले. संस्कार, संस्कृती , परंपरा जपण्याचे काम जपानुष्ठानच्या माध्यमातून होणार असल्याचे प्रतिपादन महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांनी केले.मानवाची बुद्धी शुद्ध होण्यासाठी सात्विक आहाराची गरज असल्याने अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी फलाहार देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुढील आठ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम या सोहळ्यानिमित्त होणार आहेत. दररोज या ठिकाणी हजारो भाविकांची उपस्थिती कार्यक्रम सोहळ्याला राहणार आहे.
जमिनीखाली नेमके स्थानक कुठे आहे?
जमिनीखाली नेमके स्थानक कुठे आहे?
शहरातील डीके चौक ते सबस्टेशन रोड व पुढे दौलती शाळेपर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीट रस्ते झाले.मात्र मुख्य रस्ते व उपरस्त्यांच्या मध्ये असलेले विद्युत पोल तसेच उभे राहिल्याने हा आधुनिक विकास सध्या उपहासाच्या केंद्रस्थानी आहे. याची जबाबदारी महापालिकेने निश्चित करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सप्तशृंगी पार्क निवासी संकुल ते कृषीनगर जाण्याचा उपरस्ता असून येथील शंभर मीटर अंतरावर या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट काम पूर्ण झाले आहे.जवळपास १० ते१२ फूट रुंदीचा हा मार्ग असून रस्त्याच्या सुरुवातीलाच रस्त्यात दोन विद्युत पोल उभे आहेत.यामुळे हा केवळ दुचाकी वापराचा रस्ता झाला आहे. रस्ता पक्का झाला तरी मार्गाची वेगवान वाहतूक जीवघेणी ठरणारी आहे. अश्याच पद्धतीने डिके चौक ते सबस्टेशन मुख्य रस्त्यावरही विद्युत पोल तसेच ठेवून रस्ता काम झाले आहे. प्रशासनाची बेफिकिरी ठरली आहे. शहरात तयार रस्त्यांची अनेक ठिकाणी वाट लागली आहे.बच्छाव सर्कल ते चर्च रस्त्याला सोयगाव आरोग्य केंद्राजवळ तडा पडलेला आहे.याच मार्गावर माऊली चौकात सुनायना सोसायटीकडे जाणारा सिमेंट काँक्रीट उपरस्ता दीड दोन वर्षांपूर्वी बनला त्याचीही आज बिकट अवस्था आहे. मालेगाव सोयगाव शिवारातील सप्तशृंगी पार्क निवासी संकुल ते कृषीनगर दरम्यान रस्त्याच्या मधोमद उभे असलेले विद्युत पोल. दौलती शाळा ते पुढे मालेगाव सटाणा रस्त्याच्या दरम्यान सोयगाव शिवारातील मधल्या मार्गावरही चार वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाला आहे. यात रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत पोल तसेच पुढील दोन पोल न हटवतात रस्त्याचे काम झाले आहे. रात्रीच्या वेळी हे विद्युत पोल वाहनधारकांना अपघाताची निमंत्रणे देणारे ठरले आहेत.
राष्ट्रनिर्मानाचे काम करण्यासाठी सज्ज असलेल्या शिक्षण संस्थेला सगळ्यांनी आपल्या परिने मदत करा. तर शिक्षण संस्थेने दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि आधुनिक इमारतीसाठी सर्वस्व पणाला लावून काम करण्याचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. येथील कळवण एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या नाविन्यपूर्ण इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी आर.के.एम महाविद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा व शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन पवार होते. व्यासपीठावर कळवण एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, नगराध्यक्ष कौतिक पगार, खासदार भास्कर भगरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, वातावरणात झपाट्याने होणारे बदल बघता शेतकऱ्यांनी शेती करताना एआयचा वापर करावा. सर्व कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी विविध उत्पादन वाढविण्यासाठी काम करीत आहेत. नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन स्वतः आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करावा. देश महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पर कॅपिटल उत्पन्नात वाढ करायची आहे. यासाठी जायकासारख्या संस्थांची मदत घेत असल्याचे पवारांनी सांगितले. डॉ. रावसाहेब शिंदे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आणि आगामी इमारतीच्या सोयी सुविधांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र भामरे यांनी केले. आभार उपाध्यक्ष हर्षवर्धन पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी सरचीटणीस भूषण पगार, आमदार हिरामण खोसकर, देवीदास पिंगळे आदींसह कळवण एज्युकेशनचे संचालक, माजी विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कळवण दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी छत्रपती स्मारक कामची, ओतूर धरणाच्या कामाची पाहणी केली. तसेच पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन केले. यावेळी सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे, असा इशाराच त्यांनी दिला.
उचंदे (ता.मुक्ताईनगर) येथील तापी पूर्णा परिसर विद्या प्रसारक मंडळ संचालित घाटे आनंदा शंकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष माणिकराव पाटील, तर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातील एपीआय राजेंद्र चाटे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी गुणवत्तेच्या यशपथावर चालताना संस्कारांची सावली विसरू नका. गुणवंत होण्यासोबत ज्ञानवंत व्हा, असे आवाहन केले. एपीआय म्हणाले की, शिक्षण घेताना, यश मिळवताना केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे ठरत नाही. त्यासाठी गुणवंत व्हावे लागते. तुमच्या पाठीमागे उभे असलेले पालक, शिक्षक आणि समाजाचे योगदान विसरू नका. यशाच्या वाटचालीत शिस्त, कृतज्ञता आणि मूल्यांचा आधार असेल तर आयुष्यातील कोणतीही परीक्षा कठीण वाटणार नाही. यानंतर स्पर्धा परीक्षांमधून असलेल्या करिअर संधींबाबत माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:मधील न्यूनगंड दूर करावा. आपण इतरांच्या तुलनेत कुठेही मागे नाहीत, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये निर्माण करावा. सोशल मीडियात अवांतर वेळ खर्ची घालण्यापेक्षा पुस्तकांसोबत मैत्री करावी. दर्जेदार वाचनातून व्यक्तीमत्व घडण्यास मदत होते असे सांगितले. या गौरव समारंभास मंडळाचे सचिव रामभाऊ पाटील, उपाध्यक्ष भागवत पाटील, माजी मुख्याध्यापक व संचालक यू.डी. पाटील, पोलिस पाटील जितेंद्र पाटील, संतोष पाटील उपस्थित होते.
शिवसेना संपर्कप्रमुखांच्या कारचा अपघात:पुलावरून कोसळलीकार; तलाठ्याचा मृत्यू
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांच्या चारचाकी वाहनाचा शनिवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे कार पुलावरून खाली कोसळली. यात कार पलटी झाली असून कारमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तलाठी महेंद्र मालन काळे (वय ४०, रा. भूषणनगर, केडगाव) असे मयताचे नाव आहे. तर चालक भाऊ कांडेकर हे जखमी झाले आहेत. सातपुते व त्यांचे चार सहकारी शनिवारी बीड येथे लग्नासाठी गेले होते. तेथून परतताना रात्री बाराच्या सुमारास सारोळा बद्दी येथे त्यांची कार अचानक छोट्या पुलावरून खाली कोसळली. यात कार पलटी झाल्याने कारमधील तलाठी काळे यांचा मृत्यू झाला. तर कांडेकर हे जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पीएसआय आव्हाड करत आहेत.
शनिशिंगण ापूरातील शनिदेवास दिल्लीतील एका शनिभक्ताने ८० लाख रुपये खर्चाचा २५० किलोवॅटचा सोलर प्रकल्प दान दिला. यामुळे शनिशिंगणापूर सौरऊर्जेच्या प्रकाशाने लखलखणार आहे. भक्ताच्या दानातील या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सूर्यपुत्र शनिदेवाचे शिंगणापूर आता विजेबाबत ५० टक्के स्वयंपूर्ण होणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचा सौरऊर्जेचा मानस अनेक दिवसांचा होता. मात्र हा मानस दिल्लीतील एका शनिभक्ताने पूर्ण केला आहे. देवस्थानला लागणाऱ्या विजेबाबत देवस्थान पूर्णपणे स्वयंपूर्ण होणार आहे. या सोलर प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे, असे देवस्थानचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी दैनिक दिव्य मराठीला सांगितले. या प्रकल्पामुळे देवस्थानच्या विजेची बचत तर होईलच शिवाय वीजबिलाचा निम्म्याने खर्च वाचणार आहे. शनिदेवास यापूर्वी पुण्यातील एका शनिभक्ताने ६० लाख रुपये खर्चाचा शनिदेवाचा चौथरा दान दिलेला आहे. देवस्थानासाठी ६० कोटी रुपये स्वयंनिधी म्हणजेच भक्तांच्या दानातून पानसतीर्थ सुशोभीकरण प्रकल्प बांधला, त्यात सरकारचे अवघे दोन कोटी आहेत. शनिशिंगणापूरचा विकास भक्तांच्या दानातून झालेला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शनिशिंगणापूरच्या विकासाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्याकाळात वीज पुरवठा अधिक लागणार आहे. सौर ऊर्जेच्या वापरात शनिभक्तांच्या सुविधेला अधिक प्राधान्य दिले जाणार आहे, असे देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले. शनिशिंगणापूरला भक्त निवासावरच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे प्रकल्पामुळे वर्षाला वाचतील ५० लाख देवस्थानला दर महिन्याला ५५ ते ६० हजार युनिट वीज लागते. एका वर्षात ७ ते साडेसात लाख युनिट वीज शनैश्वर देवस्थान खर्च करते. दर महिन्याला ११ ते १२ लाख रुपये वीज बिल देवस्थानला भरावे लागते. म्हणजेच वर्षाला सुमारे सव्वा कोटी रुपये वीज बिलावर खर्च होतात. सौर प्रकल्पामुळे यातील ५० टक्के वीज बचत व त्यावरील खर्च वाचणार आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल व देशाच्या सैनिकांविषयी देशवासीयांच्या कृतज्ञता युक्त सद्भावना व्यक्त करण्यासाठी आयोजित तिरंगा रॅलीला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देश प्रेमाच्या जोशपूर्ण घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. आमदार मोनिका राजळे यांच्या पुढाकाराने रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बाजार तळावरून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, तालुकाध्यक्ष धनंजय बडे, तहसीलदार डॉ.उद्धव नाईक, मुख्याधिकारी संतोष लांडगे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, हिंदू रक्षा मंचचे नाना पालवे, महिला आघाडीच्या ज्योति शर्मा, काशीबाई गोल्हार, माजी सैनिक संघटनेचे गोवर्धन गरजे, रोहिदास एडके, रॅलीचे दक्षिण जिल्हा संयोजक सुभाष गायकवाड आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, सामाजिक, स्वयंसेवी, संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे सदस्य सहभागी झाले. मिरवणूक मार्गावर खाटेर परिवार, लालकृष्ण पतसंस्था आदींच्या वतीने पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. मंत्री परिवाराच्या वतीने माजी सैनिक, एनसीसी कॅप्टन, प्रशासन प्रतिनिधी व शासन प्रतिनिधी यांचा सन्मान करण्यात येऊन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. वनदेव मॉर्निंग वॉक ग्रुपच्या सदस्यांनी रॅली मार्गावर विशेष सहकार्य केले. तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने अध्यक्ष संदीप पठाडे व सर्व संचालकांनी रॅलीतील सहभागी सर्वांना अल्पोपहार वितरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गरजे, सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी, तर आभार आमदार राजळे यांनी मानले. नगर ग्रामीण विभागातील सर्वाधिक भव्य रॅली म्हणून प्रमुख पाहुण्यांनी भाषणातून कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुकाने उल्लेख केला. चौका चौकांत देशभक्तीपर गाणे राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, महिला बचत गट पदाधिकारी, रॅलीमध्ये सहभागी झाल्याने भव्यता वाढली. सैनिक, भारत माता अशा वेशभूषेमधील विद्यार्थी नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. चौका चौकांत देशभक्तीपर गाणे वाजवण्यात आली. रॅली पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करत प्रोत्साहन दिले. माजी सैनिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थती अतिशय बिकट असतानाही पद्मश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजारकरांनी जो गावाचा कायापालट घडवून आणला.ते राज्यातील नव्हे तर देशातील इतर गावांनी अनुकरण करावे, असे आदर्श उदाहरण आहे. हिवरेबाजारने कृषीविकास, निसर्ग, शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रात विकासाची सर्वोच्च स्थान निर्माण केले. याचा मला विशेष आनंद आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले. आदर्शगाव हिवरे बाजार येथे उभे राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामिण विकास प्रशिक्षण केंद्राची राज्याचे कृषी आयुक्त मांढरे यांनी पाहणी केली. यावेळी आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांनी प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाच्या प्रगतीची माहिती त्यांना दिली. प्रशिक्षण केंद्राची पाहणी केल्यानंतर मांढरे बोलत होते. कृषी आयुक्त मांढरे म्हणाले, स्वत:च्या क्षमतेतूनच बाह्य परिस्थतीत किती आमुलाग्र बदल होऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण हिवरेबाजार आहे. हिवरेबाजार येथे जे ग्रामविकासाचे प्रयोग झाले आहेत ते प्रयोग पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येतात. या गावात राबवलेल्या प्रयोगांना एक औपचारिक अध्यासन ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने मिळत आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांनी कृषी आयुक्त मांढरे यांचे स्वागत केले. प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी राज्य व केंद्र शासनाच्या आर्थिक सहयोगाचा व प्रशिक्षण केंद्राच्या बांधकामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आदर्श गाव योजनेचे कृषी उपसंचालक वसंत बिनवडे, प्रज्योती बिचकुले, तंत्र अधिकारी आदर्श गाव व इतर अधिकारी उपस्थित होते आदर्शगाव हिवरे बाजार गावाबद्दल आदर अन् अभिमान हिवरे बाजार गावातील प्रयोग यशवंतराव चव्हाण एकात्मिक ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्य,राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी मदत होईल,याचा विश्वास वाटतो. पद्मश्री पोपटराव यांनी मला गावाची पूर्वीची दुरावस्था आणी लोकसहभागातून गावाचा झालेला कायाकल्प याची सर्व माहिती दिली. हिवरे बाजार गावाबद्दल आदर आणि अभिमान निर्माण झाला, असे कृषी आयुक्त मांढरे म्हणाले.
लग्नाअगोदर थॅलेसेमियाची सर्वांनीच तपासणी करणे गरजेची- डॉ. चव्हाण
थॅलेसेमियामुक्त भारत होण्यासाठी प्रत्येकाने लग्नाअगोदर थॅलेसेमियाची तपासणी केली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी केले. थॅलेसेमिया दिनाचे औचित्य साधून आयुष रूग्णालय येथे ऋतुजा फाऊंडेशन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहिल्यानगर, हिमोफिलिया डे केअर सेंटर जिल्हा रूग्णालय, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन, सक्षम संस्था अहिल्यानगर आयोजित थॅलेसेमिया रुग्णांसाठी आणि जनजागृती साठी विविध तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश चंद्रकांत बागल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाऊंडेशनचे नरेंद्रकुमार फिरोदिया, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे नानासाहेब जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डवरे, श्रीधर बापट, डॉ. मनोज घुगे, महेश केवळ आदी यावेळी उपस्थित होते. या शिबिरात थॅलेसेमिया रुग्णांची वार्षिक तपासणी एचएलए टायपिंग बोन मॅरो रजिस्ट्रेशन, रक्तदान, अवयवदान, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी तसेच थॅलेसेमिया रूग्णांच्या नातेवाईकांची थॅलेसिमिया मायनरच इलेक्ट्रोफोरोसिस तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. एकूण २०० मायनरची तपासणी या शिबिरात करण्यात आली. प्रास्ताविकात अॅड. डॉ. अंजली केवळ यांनी विविध शिबहरांची माहिती दिली. जिल्हा न्यायाधीश चंद्रकांत बागल, यांनी ऋतुजा फाऊंडेशन आणि इतर सर्व संस्था एकत्र येऊन जिल्हा रुग्णालयाच्या मदतीने करत असलेल्या कामाचे कौतुक करुन असेच स्तुत्य कार्यक्रम वारंवार झाले पाहिजेत असे सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने गरजू थॅलेसेमिया व सर्वच रूग्ण आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील सेतू व्हावे.तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उपक्रमाबद्दल आणि अनेक योजनांबद्दल माहिती दिली. थॅलेसेमिया रूग्णांना दिव्यांगांचे कार्ड आता कायमस्वरूपी मिळणार आहे हे सांगितले. थॅलेसेमिया मुक्त भारत करायचे स्वप्न : जाधव फिरोदिया म्हणाले, जे जे रुग्ण या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना धीर देण्याचे तसेच योग्य मार्गदर्शन देण्याचे आणि थॅलेसेमिया जनजागृतीचे चांगले काम ऋतुजा फाऊंडेशन करत आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे जाधव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिव्यांगांसाठी काम करते आणि थॅलेसेमिया मुक्त भारत करायचे स्वप्न असल्याचे नमूद केले.
अहिल्यानगर शहरात वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, एकेरी वाहतूक आदींचे नियोजन करत तब्बल ३६ रस्ते व जागांवर ''पे अँड पार्क'' मंजूर करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी होऊन नागरिकांकडून शुल्क वसुली सुरू झाली आहे. मात्र, १३ रस्त्यांवरील सम-विषम पार्किंग व १८ प्रमुख रस्त्यांवर मंजूर नो पार्किंग व नो हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्याचा महापालिकेला विसर पडला आहे. शहरातील ३६ रस्त्यांपैकी बहुतांशी रस्त्यांवर पे अँड पार्कनुसार पार्किंग शुल्काची वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी खासगी संस्थेने कर्मचारीही नियुक्त केले आहेत. मात्र, ज्या प्रमुख चौकांमध्ये व रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आले आहे, त्या ठिकाणीही सर्रास वाहनांचे पार्किंग केले जात आहे. झोपडी कॅन्टीन ते टीव्ही सेंटर रस्त्यावर नो पार्किंग झोनमध्येही सर्रास वाहने लावली जात आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दिवसभर वाहनांचे पार्किंग केले जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. तेथे नो पार्किंगचे फलक आहेत. मात्र, कारवाई होत नाही. शहरात प्रमुख रस्त्यांवर नो पार्किंगसह नो हॉकर्स झोनची करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी अद्यापही न झाल्याने महापालिकेने केवळ वसुलीसाठीच पे अँड पार्कचा घाट घातल्याचे चित्र आहे. १) संत दास गणुमहाराज पथ (कोर्ट गल्ली), पटवर्धन चौक ते शांतीबेन अपार्टमेंट. २) घुमरेगल्लीतील तख्ती दरवाजा मस्जिद/संगम प्रिंटिंग प्रेस ते अमृत किराणा स्टोअर्स, ३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवर, माळीवाडा वेस ते डॉ. आंबेडकर पुतळा, ४) माळीवाडा वेस ते पंचपिर चावडी, ५) पिंजारगल्ली, ६) आडते बाजार, अनिल कुमार पोखर्णा पिंजारगल्ली कॉर्नर ते गदिया शॉप, ७) शरद खतांचे दुकान आडते बाजार कॉर्नर ते कोंड्या मामा चौक, ८) आयुर्वेद कॉलेज कॉर्नर ते माळीवाडा, ९) रामचंद्र खुंट रस्ता ते वस्तुसंग्रहालय रस्त्यावर, १०) श्री महाप्रभुजीमार्ग जुना कापडबाजार, ११) संपूर्ण चितळे रस्ता चौपाटी कारंजापर्यंत, १२) दिल्ली गेट ते चौपाटी कारंजा, १३) दाळ मंडई ते कापड बाजार रस्ता. शहरातील नो पार्किंग व नो हॉकर्स झोन भिस्तबाग चौक, एकविरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्लीगेट चौक, चौपाटी कारंजा चौक, नेताजी सुभाषचंद्र चौक, तेलीखुंट लोकसेवा चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय चौक, न्यू आर्टस् कॉलेज परिसर, भिंगारवाला चौक,झोपडी कॅन्टीन ते मिस्कीन मळा रस्ता, पुणे बस स्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, विशाल गणपती मंदिर माळीवाडा चौक, मार्केटयार्ड चौक, तख्ती दरवाजा मशीद ते शनिचौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग नाही, मार्केट यार्ड चौक ते सक्कर चौक रस्ता. अहिल्यानगर | शहरातील काही उपनगरांमध्ये पाण्याचे टँकर भरले जातात. केडगावात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांकडून पाण्याच्या टँकरला मागणी वाढली आहे. मात्र, अशा टंचाईच्या काळातही टँकर भरतेवेळी व टँकर खाली करताना पाण्याचा अपव्यय होतो. केडगावात दिवसभरात एक टँकर किमान १० ते १२ विहिरीवरुन भरून नेले जातात. टँकर भरताना व खाली होताना पाणी वाया जाते. काटकसरीने पाणी वापरावे लागते, तर दुसरीकडे टँकरमधून पाण्याची नासाडी होते. यामुळे नागरिकांकडून संतप्त होतात. पाण्याचे महत्त्व जाणून घेत त्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नो पार्किंग, झोनमध्ये पार्कींग केल्यास शुल्क . दुचाकी (टोविंग) : ७४२ रु. . दुचाकी (क्लॅंपिंग) : ५०० रु. . चारचाकी (टोविंग) : ९८४ रु. . चारचाकी (क्लॅंपिंग) : ७४२ रु.
पिढ्यान पिढ्या वहिवाट असणाऱ्या रस्त्याची दुर्दशा:रस्ता झाला बंद ; नागरिक आक्रमक, जेऊर येथील प्रकार
अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जेऊर गावात जाण्यासाठी असणाऱ्या खोलओढा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून महामार्गाजवळ रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या रस्त्याबाबत नागरिक आक्रमक झाले असून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पूर्वीपासून इमामपूर, लिगाडे वस्ती, शेटे वस्ती, तोडमल वस्ती येथील नागरिकांना जेऊर गावात जाण्यासाठी मुख्य रस्ता म्हणून खोलओढा हाच रस्ता अस्तित्वात होता. जेऊर गाव व इमामपूर गावाला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून या रस्त्यावर पूर्वी मोठी वर्दळ देखील होती. परंतु सदर रस्त्याकडे अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. छत्रपती संभाजी नगर महामार्गावर तर रस्ताच राहिला नाही. इमामपूर, शेटे वस्ती, लिगाडे वस्ती परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेमध्ये शिक्षणासाठी जेऊर येथे येत असतात. रस्ता काळकाई माता मंदिरापासून जेऊर गावाला जोडला जात होता. परंतु तो बंद असल्याने विद्यार्थ्यांना दुरून वळसा घालत महामार्गावरूनच प्रवास करावा लागत आहे. महामार्गावरून प्रवास करणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. काळकाई माता मंदिरापासून देखील पुढे रस्ता बंद करण्यात आलेला आहे. रस्त्यावर अतिक्रमण झाले असल्याचा आरोप देखील नागरिकांमधून होत आहे. हा रस्ता इमामपूरला जोडणारा जवळचा रस्ता म्हणून ओळखला जातो. रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांमधून वाढत आहे. पिढ्यान पिढ्या इमामपूर परिसरातील नागरिकांना जेऊर गावासाठी जाणारा हा मुख्य रस्ता होता. काळानुरूप सदर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. छत्रपती संभाजी नगर महामार्गाजवळ तसेच काळकाई माता मंदिरापासून गावाला जोडणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी सदर रस्त्याची मोजणी करून तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी लिगाडे वस्ती, शेटे वस्ती, इमामपूर येथील तरुण आक्रमक झाले असून आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. पिढ्यानपिढ्या वहिवाट असणाऱ्या रस्त्याची अशी अवस्था झाली आहे. रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी साधारणपणे २०१० सालापर्यंत या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. विद्यार्थी, वृद्ध ,महिला आठवडे बाजारासाठी जाणारे नागरिक याच रस्त्याचा वापर करत असत. सद्यस्थितीत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी रस्ता बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
वादळी वाऱ्यात झाड पडले, विद्युत खांबही कोसळला
वैरा व भागातील गावांत विजेच्या कडकड्यासह अवकाळी पाऊस जोरदार कोसळला. तर बावी (आ) येथे वादळी वाऱ्याने शाळेच्या मैदानावरील मोठे झाड विद्युत तारांसह कोसळले. या परिसरात गावातील मुले मैदानावर क्रिकेट खेळत होती. वारा सुटल्याने शाळेच्या व्हरांड्यात गेल्याने बालंबाल बचावली आहेत. रविवारी सायंकाळी गडगडाटी वादळी वाऱ्यासह वैराग व भागातील गावांमध्ये हजेरी लावली. शरदचंद्रजी पवार विद्यालय बावी ( आ ) ता. बार्शी येथील शाळेच्या मैदानावरील विद्युत तारालगत असणारे मोठे झाड चालू विद्युत प्रवाहाच्या तारांसह कोसळले. मुले क्रिकेट खेळत होती. वादळामुळे मुले झाडाखाली न थांबता शाळेच्या पोर्च मध्ये गेल्याने मोठी दुर्घटना टळली. यापूर्वी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश गुंड यांनी विद्युत मंडळास शालेय आवारातून विद्युत तारा काढून घेण्याबाबत पत्र विद्युत पारेषण मंडळाकडे केलेला आहे. तरीही पोल काढला नाही. विद्युत तारा काढण्यासाठी पत्रव्यवहार केला होता ^शाळेच्या आवारातील विद्युत तारा बाहेर काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. सध्या शाळेला सुटी आहे. जून महिन्यात शाळा सुरू होत असून, पावसाळ्याचे दिवस येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पोल व विद्युत तारा बाहेर काढण्यात याव्यात. -सुरेश गुंड, मुख्याध्यापक
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामुळे अक्कलकोटचे नाव देशभरात नाव झाले आहे. आता वैभव वाढवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वामींच्या आशीर्वादाने सर्व कामे होत आहेत. प्रवेशद्वाराचे लोकार्पण झाले, ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. भक्तांना प्रेरणा मिळत राहील, असे प्रतिपादन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले महाप्रवेशव्दाराचे लोकार्पण रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न झाले. या वेळी माजी गृहराज्यमंत्री म्हेत्रे अध्यक्षतेखाली पार पडले. या वेळी बसवलिंग महास्वामीजी, अण्णू महाराज, धनंजय पुजारी, चेतन नरोटे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, मनोज कल्याणशेट्टी, अश्पाक बळोरगी, मल्लिकार्जुन पाटील, दिलीप सिद्धे, प्रथमेश इंगळे आदींची प्रमुख उपस्थित होती. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. भावगीते, भक्तिगीते अन् देशभक्तिपर गीतांना दाद उद्घाटनानंतर महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अयाज व सहकलाकार यांच्या सूर सरगम प्रस्तुत संगीत संध्याशहा संगीताचा कार्यक्रम रात्री ८ ते १० या वेळेत शहाजी हायस्कूलच्या प्रांगणात सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी गीतांना उत्स्फूर्त दाद दिली. यांचे लाभले सहकार्य अक्कलकोट नगरपरिषद, उत्तर पोलिस ठाणे, महाराष्ट्र वीज विद्युत मंडळ, अक्कलकोट हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था, अक्कलकोट राजे फतेसिंह चौक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव युवक मंडळ, अवकलकोट, अमोलराजे लेझीम संघ व मित्र मंडळ, अक्कलकोट यांचे महाप्रवेशव्दार उभारण्यासाठी सहकार्य लाभले.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व वेताळ शेळके यांच्या सुमारे ४० मिनिटे तुल्यबळ लढत झाली. यात पिंपळगाव केसरी कुस्ती स्पर्धेचे समान मानकरी ठरले. जन्मभूमी प्रतिष्ठान व पिंपळगाव ग्रामस्थांनी महाराष्ट्र चॅम्पियन सचिन धस यांच्या संकल्पनेतून विठ्ठल बिरदेव यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या पिंपळगाव केसरी कुस्ती स्पर्धेत पाटील व शेळके यांची कुस्ती बरोबरीत सुटली. बार्शीच्या भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदाळे यांनी आयोजित प्रायोजित केलेल्या अडीच लाख रुपयांच्या बक्षिसाचे समान वाटप करण्यात आले. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, सरपंच तुळशीराम वायकर, उपसरपंच अण्णासाहेब धस, माजी सरपंच ज्ञानेश्वर भालेकर, जन्मभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नानासाहेब धस,सचिव स्वप्नील धस उपस्थित होते. स्पर्धेत खुल्या वयोगटातील व वेगवेगळ्या वजन गटातील राज्यभरातून आलेल्या पैलवानांच्या चित्तथरारक कुस्त्या पिंपळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांना पाहायला मिळाल्या. यात्रा समिती व पिंपळगाव ग्रामस्थ यांनी सर्व कुस्तीगीरांच्या निवास व भोजनाची दर्जेदार व्यवस्था केली होती. मानाच्या समजल्या जाणाऱ्या विविध कुस्त्या बरोबर पहिल्या तीन क्रमांकाच्या बक्षिसांसाठी झालेल्या कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्याची पाळणे फेडले. मनोज माने, अमित जगदाळे यांनी केली कुस्ती, माने विजयी दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मनोज माने विरुद्ध हनुमंत पुरी यांच्यात झाली. यात माने विजयी ठरले. तृतीय क्रमांकाची कुस्ती सुरेश धस यांनी ५१ हजार रुपये बक्षीस देऊन रवींद्र खैरे विरुद्ध अमित जगदाळे यांच्यात लढवली. यात जगदाळे विजयी ठरले. बालाजी मांजरे यांनी चांदीची गदा प्रायोजित केली होती. पंच म्हणून धनाजी वाघमोडे, दादा कसबे, नवनाथ धस, विलास धस, अमर धस, शिवाजी मस्तूद यांनी काम पाहिले. राजाभाऊ देवकते व मदने यांनी निवेदन केले.
अस्मानी संकटे आली की, क्षणात होत्याचे नव्हते करतात, हे सरकार काही देत नाही, परवा डीपीडीसीत इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याला मी चांगलेच झापले आहे. तुम्ही देत काहीच नाही, पैसे घेता, पंचनामे करतो असे बोललेत, त्यांना फोन लावा, ताबडतोब भरपाई द्या म्हणावं... माझे नाव सांगा मी येऊन गेले म्हणून, अशा सूचना पापरी येथील गावकामगार तलाठी यांना करत खासदार प्रणिती शिंदे यांनी वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करत शेतकऱ्यास मानसिक आधार दिला. वादळी पावसात मंगळवारी (दि. १३) पापरी परिसरात वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने केळी, डाळिंब, ऊस, विविध वेलवर्गीय पिके भुईसपाट झाली. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे. पापरीतील शेतकरी दत्तात्रय कदम यांच्या भुईसपाट झालेल्या केळी पिकाची पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी दुपारी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. गावकामगार तलाठी, इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी राजेश पवार, सुलेमान तांबोळी यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. गावचे पोलिस पाटील प्रशांत भोसले यांनी गतवर्षी अवकाळी व वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या काहीचे अद्यापही पैसे मिळाले नाहीत. वादळी वारे व अवकाळीने पापरी परिसरातील ४०५ एकरांवरील फळबागांचे नुकसान केले आहे, याचे गांभीर्य लक्षात घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत शेतकऱ्यांचे सांत्वन केले. मात्र डीपीडीसीत व इतरवेळी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यात आक्रमक असणारे मोहोळचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी अद्यापही नुकसान झालेल्या भागास भेट दिली नाही. अनेक ठिकाणी अद्याप वीजपुरवठा सुरळीत नाही वादळी वाऱ्यात पापरी व मोहोळ परिसरात अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त झाले. काही ठिकाणी रोहित्रात बिघाड झाला. नजीक पिंपरी येथील बंद रोहित्र तीन दिवसांपासून सुरू केलेले नाही. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अक्कलकोट स्टेशन आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य रोग निदान शिबिर आयोजित करण्याची काळाची गरज बनली आहे. या साठी सामाजिक उपक्रम म्हणून डॉ. मलगोंडा हॉस्पिटल व आरोग्य विगाग यांच्या विद्यमाने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कॅन्सररोग विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात एकूण १५६० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल स्टॉफ व आरोग्य विभागाने विषेश काळजी घेतले आहे. दरम्यान सदर शिबिरात आरोग्य विभागामार्फत तोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. संशयित कॅन्सर रुग्णांची तपासणी कॅन्सरतज्ञ डॉ. प्रथमेश मलगोंडा यांनी केले. त्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे सात रुग्ण, गर्भाशय मुख कॅन्सर सात रुग्णांचे निदान झाले. निदान झालेल्या रुग्णांची डॉ. मलगोंडा हॉस्पिटल यांच्या सहकार्याने बायोप्सी पॅप स्मिअर व पुढील उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सर्जरी केली आहे. ... तर डॉक्टरांशी संपर्क साधावा कॅन्सरबाबत कोणतेही लक्षण आपणास निदर्शनास आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. कॅन्सर हा बरा होणारा आजार आहे. लवकर निदान केल्यास उपचाराद्वारे रुग्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी न भीता कॅन्सरबाबतच्या सर्व तपासण्या करण्याचे आवाहन डॉ. प्रथमेश मलगोंडा यांनी केले.
शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले आपले सरकार सेतू केंद्रांच्या माध्यमातून मिळवण्यासाठी सध्या पालकांची धावपळ सुरु आहे. त्यातच आता त्यासाठी लागणाऱ्या दरात शासनाने वाढ केली आहे. त्यामुळे जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यासह इतर सर्वच दाखल्यांवर अतिरिक्त शुल्क लागू झाले आहेत. सेतू केंद्रचालक, दलालांकडून विद्यार्थी पालकांची लूट होत आहे. जे दाखले ६९ रुपयांत मिळायला हवे, त्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत. प्रशासकीय महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून बसली आहे. राज्य शासनाने केंद्रातील सेवांवरच्या शुल्कात वाढ केली आहे. त्यात मुद्रांक (१० रुपये), राज्य जीएसटी (४.५० रुपये), केंद्रीय (४.५० रुपये), राज्य सेतू केंद्र (२.५० रुपये), जिल्हा सेतू (५ रुपये), महाआयटी (१० रुपये), आपले सरकार सेवा केंद्र चालक (३२.५० रुपये) अशी शुल्क आकारणी केली आहे. त्यामुळे सर्वच सेवा महागल्या आहेत. थोडक्यात शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे आता प्रति दाखल्यापोटी ६९ रुपये शुल्क झाले आहे. मात्र सेतू केंद्रचालक मर्जीप्रमाणे व समोरची व्यक्ती आणि त्याची निकड पाहून प्रतिदाखला दीडशे ते तीनशे रुपये प्रमाणे शुल्क आकारणी करुन नागरिकांची लूट करत आहेत. मात्र या बाबत प्रशासन गप्प आहे. याबाबत एका सेतू केंद्र चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, ‘या दाखल्यांच्या वितरण प्रणालीत वरपासून खालपर्यंत एक साखळी आहे. जसा ग्राहक येईल, तसे आम्ही त्याच्याकडून शुल्क आकारतो. या भ्रष्ट साखळीला कुणी तोडू शकत नाही. कारण सायंकाळी तहसील कार्यालयातूनच आम्हाला विचारणा होते. आज किती जमा झाले'. दर फलकच नाहीत; ई-सेवा केंद्रात जादा दर आकारणी शैक्षणिक दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र व आपलं सरकार केंद्रात विद्यार्थी, पालकांची लूट केली जात आहे. पोर्टलचा सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून विद्यार्थी व पालकांकडून तत्काळ दाखले मिळवून देण्याच्या नावाखाली दलालांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच नागरिकही तातडीची गरज म्हणून दरफलकाची विचारणा न करताच स्वत:हून जादा पैसे देत असल्याचे चित्र आहे.तसेच ई सेवा केंद्रांनी आपले शासनाने निर्धारित केलेले सेवा शुल्क दर्शनी भागात लावून नागरिकांना सेवा पुरवणे गरजेचे आहे. ^जिल्ह्यात नोंदणीकृत ई सेवा केंद्र चालकांनी केंद्राचा परवाना मिळवताना सरकारने निश्चित केलेल्या दराची अट मान्य करणे तसेच दाखलानिहाय दराचे फलकही बाहेर लावणे बंधनकारक आहे. नागरिकांनीही ई-सेवा केंद्रावर सरकारने निर्धारित केलेले सेवा शुल्क भरावे. केंद्र चालकाने जादा शुल्क घेतल्यास तक्रार दाखल करावी. तक्रारीवरून कारवाई करण्यात येणार आहे. . - विजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला. {सातबारा किंवा ८ अ,७ / १२ उतारा - ३० रुपये {उत्पन्नाचा दाखला- ६९.०० रुपये {उत्पन्नाचा दाखला व अॅफीडेव्हीट- १२८.०० रुपये {वय व अधिवास प्रमाणपत्र -६९.०० रुपये {नॉन क्रिमिलेअर ६९.०० रुपये {रहिवास दाखला ६९.०० रुपये {नॉन क्रिमिलेअर व अॅफीडेव्हीट-१२८ रुपये {वंशावळी प्रमाणपत्र -६९.०० रुपये {वंशावळी प्रमाणपत्र -६९.०० रुपये {सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र-६९.०० रुपये {आर्थिकदृष्टया मागाल प्रमाणपत्र-६९.०० रुपये {अल्पभूधारक/ भूमिहीन प्रमाणपत्र-६९.०० रुपये
सोयाबीन उत्पादकता घटली:हेक्टरी 5 क्विं. उत्पादन कमी
कधी अनियमित तर कधी अतिवृष्टीसह अन्य कारणांमुळे गतवर्षीची सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांची उत्पादक घटल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनची उत्पादकता प्रती हेक्टर क्विंटल १७.७१ राहण्याचे प्रस्तावित होते; मात्र प्रत्यक्षात १२.७८ क्विंटल राहिली. कपाशीचेही असेच झाले. कपाशीचे प्रती हेक्टरी ४६५ गाठी प्रस्तावित होत्या. मात्र प्रत्याक्षात झाल्या ४२५ गाठी झाल्या. सोयाबीनचे उत्पादन ३ लाख ८ हजार ६४१ मेट्रिक टन झाले. सन २०२३-२४ मध्ये मात्र ३ लाख २२ हजार ४७४ झाले. खरीप हंगामात कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांना फटका बसला. जून महिन्यात पहिले दहा दिवस पाऊस झाल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात उघडीप होती. त्यानंतर जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. काही दिवसांचा अपवाद वगळल्यास रोज काही ठिकाणी पाऊस पडला होता. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अनेकदा अतिवृष्टी झाली. १० पेक्षा जास्त मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. परिणामी कापूस, सोयाबीन पिकांची हानी झाली होती. असे नुकसान : जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीतून गत वर्षी झालेल्या पीक नुकसानाची नेमकी आकडेवारी समोर आली. जून व जुलै २०२४ मध्ये ९ हजार ४७४ हेक्टर क्षेत्रावरील १२ कोटी ९० लाखांच्या पिकांची हानी झाली. १० हजार ५०६ शेतकरी बाधित झाले. जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२४ मध्ये ५ हजार ७४० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. ७८ कोटी ७८ लाखाची हानी झाली. तब्बल ५६ हजार १५ शेतकऱ्यांना फटका बसला. २०२४ मध्ये परतीच्या पावसाने १४ हजार ४९३ हेक्टर क्षेत्रावरील २२ कोटी ७३ लाखांचे नुकसान केले. सन २०२४मध्ये संत्र बागेचेही नुकसान झाले. एकूण ३ हजार ४३३ शेतकऱ्यांचे ३ हजार २९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागेला फटका बसला. हे नुकसान १० कोटी ९० लाखांचे झाले.
जेसीआय न्यू प्रियदर्शिनी अकोला, सेंट पॉल अकादमी स्कूल हिवरखेड, संस्कृती संवर्धन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हिवरखेड येथे मुलींचे सक्षमीकरण आणि आंतरिक गुण जागृत करण्यासाठी, शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षणासाठी तेजस्विनी आर्य वीरांगना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १२ ते २० वर्षे वयोगटातील ८० मुलींना योगासन, लाठी काठी, डंबेल, सामान्य व्यायाम, स्वसंरक्षण, स्वावलंबन, अग्निहोत्र, मंत्र, प्रार्थना, पंच महायज्ञ, मैत्री, संगती, शरीरशास्त्र, पौष्टिक आहार, राष्ट्रीय आणि सामाजिक ऋण, जबाबदारी आणि योगदान, देशभक्तीपर गायन, अभ्यास तंत्रे, सार्वजनिक भाषण, करिअर मार्गदर्शन, वर्तन, वेळ व्यवस्थापन, गट चर्चा, गृह व्यवस्थापन, सर्वोत्तम संतती, कौटुंबिक जबाबदारी, समस्या सोडवण्याच्या युक्त्या, पर्यावरण, शारीरिक, आध्यात्मिक आणि वैचारिक विकास आदी सूत्र शिकवण्यात आले. नुकतेच आयोजित या नाविन्यपूर्ण शिबिरात मुलींनी त्यांच्या कलागुण व प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. शिबिरातील बैतुल येथील वक्त्या हर्षिता आर्य वीरा यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, मुलींना जिजामाता, राणी लक्ष्मीबाई बनायचे आहे. पालकांवर खूप मोठी जबाबदारी आहे, त्यांनी त्यांच्या मुलींना योग्य संस्कार दिले पाहिजेत. यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. असे काम करा की ते तुमची ओळख बनेल, प्रत्येक पाऊल अशा प्रकारे चालवा की ते एक छाप सोडेल, माझ्या मुलींनो, प्रत्येकजण आपलं आयुष्य घालवतो. तुम्ही तुमचे जीवन अशा प्रकारे जगले पाहिजे की तुम्ही एक आदर्श व्हाल', असे घोषवाक्य प्रत्येकाच्या मनात रुजवण्यात आले. शिबिराच्या शेवटी सहभागी मुलींना प्रमाणपत्रे आणि जेसीआयचे वार्षिक कॅलेंडर देण्यात आले. शिबिराच्या समारोप समारंभात जेसीआय न्यू प्रियदर्शनीच्या अध्यक्षा शारदा लखोटिया, सेंट पॉल अकादमी स्कूल हिवरखेडचे अध्यक्ष नवनीत लखोटिया, सचिव प्रमोद चांडक, मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, सिंधू पवार, डॉ. संगीता केला, प्रकल्प प्रमुख निशा टावरी, नवल टावरी, पंकज राठी, डॉ. दीपक तारापुरे आदी उपस्थित होते. मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेणे आवश्यक; मान्यवरांचे मत स्वरक्षण स्वत:साठी तसेच देशासाठी महत्त्वाचे स्वरक्षणाचे महत्त्व केवळ स्वतःसाठीच नाही, तर समाजासाठी आणि देशासाठीही आहे. हे आपल्याला सुरक्षित ठेवते, आत्मविश्वास वाढवते आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपाययोजना करण्यास सक्षम करते. आजच्या काळात मुलींनी स्वरक्षणाचे धडे घेणे आवश्यक आहे. यामुळे शारीरिक तसेच मानसिक पाठबळ प्राप्त होते, असे मार्गदर्शन मान्यवरांनी यावेळी युवतींना शिबिरातून केले.
पातूर कधीकाळी उन्हाळा आला की कैऱ्या पाडण्यासाठी झाडावर चढणे, अंगणात गोट्यांचा खेळ, आणि शेताच्या बांधावरून धावणे हेच बालपण होते. तसाच उन्हाळा आहे, झाडे आहेत, कैऱ्या आहेत, पण त्या झाडांवर दगड मारणारी, खेळायला धावणारी आणि खळखळून हसणारी मुले मात्र कुठे आहेत? तर मोबाइलच्या पडद्याने त्यांचे बालपण गिळून टाकले आहे. यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्र येत समाज प्रबोधन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पूर्वी गावाकडे उन्हाळी सुट्या म्हणजे आनंदाचा सण असायचा. शेतात जाऊन पोहणे, आंब्याच्या कैऱ्या पाडणे, भातुकलीचा खेळ, विटी-दांडू, लगोरी, सळ्या-गोट्या हे सगळे जीवनाचा भाग होते. मुले एकत्र खेळायची, भांडायची, हसायची आणि पुन्हा त्या भांडणातून मैत्री उभी रहायची. पण आजचे वास्तव निराशाजनक आहे. शहरातच नव्हे, तर गावातही मुले मोबाइल, टॅब आणि टीव्हीच्या आहारी गेली आहेत. मैदाने ओस पडली आहेत. पारंब्यांवर चढणारी मुलेच उरलेली नाहीत. ‘गेम’ हे शब्द आता खेळण्याशी नाही, तर स्क्रीनवरच्या डिजिटल अॅप्सशी निगडित झाले आहेत. गावाकडे उन्हाळी सुट्या म्हणजे आनंदाचा सण असायचा. शेतात जाऊन पोहणे, आंब्याच्या कैऱ्या पाडणे, लगोरी, सळ्या-गोट्या हे सगळे जीवनाचा भाग झाले होते. आई-वडिलांची अती व्यस्तता, मुलांच्या हातात मोबाइल देऊन शांत ठेवण्याची सवय, सुरक्षित खेळायला जागेचा अभाव, शाळांमध्ये खेळासाठी वेळेचा अभाव आणि कोरोनानंतर ऑनलाइन शिक्षणाच्या आहारी गेलेले बालपण ही सर्व कारणे आहेत. याचा परिणाम, केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक, भावनिक व सामाजिक विकासावरही होत आहे. मुले एकलकोंडी बनत आहेत, संवाद कमी झाला आहे आणि कल्पनाशक्ती लोप पावत आहे. मैदानापेक्षा मुलांना आवडते मोबाइल स्क्रीन ^पूर्वी आमचं बालपण झाडाखाली, धुळीत, कैऱ्या पाडण्यात गेले. पण आज आमचीच मुले मोबाइलशिवाय शांत बसत नाहीत. आम्हीच कधी मोबाइल हातात दिला, हे लक्षातच आले नाही. आता त्यांना मैदानापेक्षा स्क्रीन आवडायला लागली आहे. हे पाहून काळजी वाटते. पण एक गोष्ट नक्की. बदलाची सुरुवात घरीच करावी लागेल आणि ती आम्हालाच करावी लागेल. - प्रणाली वृषभ जैन, पालक, आलेगाव. पालक, शिक्षक अन् समाजाने एकत्र पावले उचलावी ^मागील काही वर्षांत आम्ही मुलांमध्ये मोठा बदल पाहतो आहोत. पूर्वी शाळा सुटली की मुलं मैदानावर धावत जायची, आज ती मोबाइलवरच्या गेमकडे धावतात. वर्गातही त्यांची एकाग्रता कमी झाली आहे, संवादकौशल्य कमी झाले आहे. मुलांना पुन्हा खेळाकडे वळवायचं असेल, तर पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र पावलं उचलायला हवीत. - गजाननराव मुळे, शिक्षक, पळसो बढे.
शासनाच्या महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्यात कोणत्याही जिल्ह्यातील जमीन खरेदी विक्रीचा दस्त कोणत्याही जिल्ह्यात, कोठेही नोंदवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून एक जिल्हा एक दस्त नोंदणी' ही प्रणाली सुरू करण्यात आली. या प्रणालीमुळे कोणीही कोठूनही स्थावर मालमत्तेवर बनावट इसम उभा करून खरेदी विक्री करू शकतो, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे म्हणणे असून, ही प्रणाली स्थगित करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त निवेदन पाठवले आहे. राज्यात दस्त नोंदणी केली जात आहे. मात्र, यात प्रामुख्याने अनेक गैरप्रकार आढळून येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्यात बनावट व्यक्ती उभी राहून दस्त नोंदणी होणे, मृत व्यक्ती जिवंत दाखवून दस्त नोंदणी करणे, शेतकऱ्यांच्या विशेषत: डोंगरी भागातील मोठ्या प्रकल्प लगतच्या जमिनी खरेदी करून फसवणूक करणे, कुटुंबातील हिस्से निश्चित झालेले नसताना एका भावाने कुटुंबातील व्यक्तीचे अन्य जिल्ह्यात हिस्से विकणे, सामायिक मालकीच्या इमारतीत एकाच हिस्सेदाराने लीज लीड करणे, रेरा नोंदणीकृत नसणारे बेकायदा बांधकामा तील प्लॉट व फ्लॅट ची विक्री खरेदी करणे, सातबारा वर इतर अधिकारात सरकारचे नाव असताना होणारी दस्त नोंदणी, भूसंपादनाचे सरकारी शिक्के पडलेले असताना होणारी दस्त नोंदणी, धर्मादाय संस्थांच्या मिळकती विकणे, असे प्रकार घडू शकतात, असे महासंघाचे म्हणणे आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अ. भा. मराठा महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, विभागीय उपाध्यक्ष योगेश थोरात, महानगर जिल्हाध्यक्ष श्रीकांत सरोदे, सरचिटणीस प्रदीप लुगडे, उपाध्यक्ष राजेश देशमुख, विठ्ठलराव वाघ, माधुरी वाघमारे, प्रतीक खराडे, प्रवीण शिंदे, सिंधुताई पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी भरडला जाणार : मिळकत दाव्यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयीन दावा व जाचक कोर्ट फी असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. अन्यायग्रस्त पक्षकारांना न्यायालयाची पायरी चढताना पहिल्यांदा मिळकतीच्या दाव्याच्या किमतीवर कोर्ट फी स्टॅम्प भरून वकिलांची फी ठरवून दावा दाखल करावा लागतो. हा दावा साधारण ५ ते १५ वर्षे चालतो. तसेच त्या जमिनीत थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण झाल्याने िवक्री मूल्य कमी होते. यात सामन्य माणूस, अल्पभूधारक शेतकरी टिकत नाही, हे भूमाफियांना माहीत असल्याने ते अन्यायग्रस्ताला थोडेफार पैसे देऊन, दबाव आणून वडिलोपार्जित मिळकतीतून बेदखल केले जाते. एक राज्य एक नोंदणी प्रकारात शेतकरी भरडला जाईल, असे महासंघाचे म्हणणे आहे. ...त्यामुळे स्थगित करा भाड्याने देण्यासाठी धर्मादाय आयुक्त यांची परवानगी आवश्यक असताना ट्रस्टीनी अधिकार नसताना न्यासाच्या मिळकती विकणे वा भाड्याने देणे, देवस्थानच्या जमिनी गुरवाच्या नावावर असल्याने त्यांचे बेकायदा दस्त करणे, अडाणी लोकांना धनादेश न देता दस्तावेजमध्ये मोबदला नमूद करणे आदी प्रकार उघडकीस येत असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. याबाबतच्या तक्रारी शासन, महसूल, पोलिस विभाग आदींकडे होत असतात. त्यामुळे या गंभीर प्रणालीची दखल घेत शासनाने ही प्रणाली स्थगित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
‘स्वच्छ अकोला, सुंदर अकोला’ अभियानाने आता पाचवा टप्पा पार पाडला. या टप्प्यात शहरातील पूजेनंतर दुर्लक्षित, तुटलेल्या किंवा अवमानित स्थितीत आढळणाऱ्या देवमूर्तींचे सन्मानपूर्वक संकलन आणि विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले. घरांमध्ये, सार्वजनिक गणेशोत्सवांनंतर, नवरात्रोत्सवांनंतर अनेकदा देवी-देवतांच्या मूर्ती झाडांखाली, मंदिरामागे, पुलाखाली, कचऱ्यात किंवा ओसाड जागांमध्ये टाकलेल्या दिसतात. या टाकलेल्या किंवा दुभंगलेल्या देव मूर्ती संकलन धार्मिक शास्त्रांनुसार सन्मानपूर्वक विसर्जन व्हावे. पर्यावरणपूरक, नैसर्गिक विल्हेवाट प्रणालीचा अवलंब, सार्वजनिक जागांतील स्वच्छता आणि श्रद्धा स्थळांचा सन्मान, नागरिकांमध्ये जबाबदारी, श्रद्धा आणि सहभागाची भावना जागृत करणे, मोहिमेची अंमलबजावणी: नोंद, पाहणी आणि कृती अभियानाच्या पाचव्या टप्प्यात नीलेश देव मित्र मंडळ आणि अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मूर्ती संकलन मोहीम राबवली. या मोहिमेत स्वयंसेवक, स्थानिक नागरिक, मंदिर समित्या यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. हे केवळ एक स्वच्छता अभियान नव्हे, तर धार्मिक मूल्यांचा जतन आणि आपल्या संस्कृतीची जाणीव ठेवणारा सामाजिक संकल्प ठरला आहे. येथे राबवली मोहीम पीकेव्ही परिसर, चोपडे लेआऊट, रेणुका माता मंदिर, न्यू तापडिया नगर पुलाजवळील झाडाखालील क्षेत्र, सिद्धिविनायक मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पटांगण, महादेव मंदिर, शंकर नगर, दुर्गा माता मंदिर (रेल्वे क्वॉर्टर), बिर्ला राम मंदिर परिसर या ठिकाणी सापडलेल्या मूर्तींचे संकलन करून गांधीग्राम येथील पूर्णा नदीत शास्त्रसम्मत विधीने विसर्जन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा उपक्रमांतर्गत खामगाव नगर परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. खामगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषदेने घेतलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रभावी अंमलबजावणीला यश मिळाले आहे. जिल्ह्यात प्रथम आलेल्या खामगाव नगर परिषदेने अमरावती विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्य शासन सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांचा गौरव करणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयावर १०० दिवसाचा राज्यस्तरीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम घोषित केला होता. यामध्ये नगर परिषद विभागनिहाय कोणते कार्यालय सरस ठरली याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव नगर परिषदेने बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला तर अमरावती विभागातूनही खामगाव नगरपरिषदने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या योजनेत नगरपरिषदांनी १०० दिवसांच्या कालावधीत ठराविक उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निकष ठरविण्यात आले होते. यामध्ये खामगाव नगर परिषदेने नागरी सेवा सुविधा, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण क्षेत्रीय कार्यालयांना भेटी,जल व्यवस्थापन, कार्यालयीन सोयी सुविधा, ई ऑफिस प्रणाली आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन,हरित क्षेत्र विकास, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवा विषयक बाबी, नागरिकांच्या सहभागातून शहर सौंदर्यीकरण आदि अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याशी समन्वय साधत १०० दिवस कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कामाबाबत सातत्याने मार्गदर्शन करून आढावा घेतला नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विविध सुधारणा उपक्रम राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आवश्यक त्या सुविधा व उपाययोजना केल्यामुळे खामगाव नगर परिषदेची उत्कृष्ट कामगिरी दिसून आली. यामुळे खामगाव नगर परिषदेने जिल्ह्यात नंबर वन होण्याचा मान मिळविला आहे. ^मुख्यमंत्री १००० दिवस कृती आराखडा कार्यक्रम कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. मुख्याधिकारी, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा समन्वय,नियोजन व सातत्यपूर्ण सामूहिक प्रयत्न यामुळे हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही अशीच कामगिरी सुरू राहील. - डॉ. प्रशांत शेळके , मुख्याधिकारी नगर परिषद खामगाव
अमरावती धारणी तालुक्यात रविवारी सायंकाळी ५ ते साडेसहा या दीड तासात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा तालुक्यातील सहा ते सात गावांना जबर फटका बसला आहे. या गावांमधील सात ते आठ शेळ्या व सात ते आठ गाई व बैलांचा वीज पडल्याने तसेच झाडाखाली दबून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज धारणी तहसील प्रशासनाने वर्तवला आहे. तालुक्यातील झापल, चित्री, पोहरा, घोटा यासह अन्य काही गावांमध्ये अवकाळी पाऊस व वादळामुळे मोठे नुकसान झाले आहेत. या गावांमध्ये वीजखांब कोसळले आहे. त्यामुळे चार ते पाच गावातील वीज खंडीत झाली. याचवेळी वीज पडून व काही ठिकाणी वाऱ्यामुळे झाड कोसळून त्याखाली दबून गुरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ज्या गावांमध्ये नुकसान झाले, त्या गावात तलाठ्यांना तातडीने पंचनामे करण्याबाबत सूचित केले आहे. तसेच ज्या ठिकाणी गुरांचा मृत्यू झाला, त्या गावांत पशुचिकित्सकांचे पथक पाठवण्याबाबत आदेश दिले असल्याचे धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले. वादळामुळे विजेचे खांब उखडून जमिनीवर पडले. वरुडमध्ये झाडे कोसळून नुकसान वरुड तालुक्यासह शहरात वादळी पावसामुळे काही झाडे कोसळून नुकसान झाले आहे. वरुड शहरात रविवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे रेस्ट हाऊस परिसरातील मोठे झाड शेख सोहेल शेख गनी यांच्या रसवंतीवर जुने झाड कोसळल्याने संपूर्ण गाडीच नष्ट झाली. शेख सोहेल हे काही वेळापूर्वी कामानिमित्त रसवंतीतून बाहेर गेल्यामुळे सुदैवाने वाचले. रसवंतीचे साहित्य, खुर्च्या, रस काढण्याचे यंत्र हे साहित्य तुटले. शहरात आणखी काही भागात झाडे कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. नंतर ही झाडे बाजूला करण्यात आली. वरुड तालुका हा संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे येथील संत्र्याला जबर फटका बसला आहे. वीज खांब उखडून पडले धारणी परिसरात झालेल्या वादळाने झाडे उन्मळून महावितरणच्या वीज वाहिन्यांवर पडले. तसेच वीज खांबही उखडून जमीनदोस्त झालेत. वादळाचा जोर कमी होताच महावितरणने वीज दुरुस्ती कार्याला सुरुवात केली आहे. मात्र रात्रीची वेळ, पाऊस आणि जंगलाचा भाग असल्याने दुरुस्ती कार्याला अडथळा निर्माण झाला आहे. वादळामुळे अचलपूर व धारणी परिसरातील सात फिडर बाधित झाले. यात प्रामुख्याने हरिसाल मिश्र, दुनी, पाटिया, धारणी, कुटांगा, ढाकरमल आणि दिया या मिश्र फिडरचा समावेश आहे. वादळासह अवकाळी पावसाने रविवारी जिल्ह्यातील चार तालुक्यांत कहर केला. धारणीत वीज कोसळल्यानंतर झाडाखाली दबून १५ जनावरांचा मृत्यू झाला. जोरदार वादळामुळे काही घरांवरील टिनपत्रे उडाली, विजेचे खांब वाकून वाहिन्या तुटल्याने काही गावांमधील वीज प्रवाह खंडित झाला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोना परिसरात वीज पडून दोन बैल ठार झाले. २० एकरावरील केळीचे पीक भुईसपाट झाले. त्याचप्रमाणे उन्हाळी ज्वारीचेही नुकसान झाले आहे. वरुड शहरात रसवंतीवर मोठे झाड कोसळल्याने रसवंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संत्र्यालाही फटका बसला आहे. तिवसा तालुक्यातही उन्हाळी पीक कांदा, ज्वारीचे नुकसान झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात केळीच्या पिकांना फटका : अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी, उन्हाळी ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. तर १७ मे रोजीच्या अवकाळीचा सर्वात जास्त फटका निमखेड बाजार, डोंगरगाव, चिंचोना व परिसरातील केळी पिकाला बसला आहे. तसेच चिंचोना येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. १७ मे रोजी निमखेड-चिंचोना परिसराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दुपारी ३.३० ते ४.३० पर्यंत विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वादळात चार गावांतील २० हेक्टर क्षेत्रातील केळी कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात डोंगरगाव येथील भास्कर ज्ञानदेव ताकोते यांच्या शेताच्या धुऱ्यावर वीज कोसळल्याने तेथे बांधलेले अमोल गजानन वानखडे रा. चिंचोना यांचे दोन बैल जागीच ठार झाले. परिसरातील शेतकरी नाना महारनर, सुनील गिऱ्हे, आकाश गिऱ्हे, सुजित वानखडे, सुभाष थोरात, रवी वानखडे याच्या शेतातील केळीचे पीक वादळाने भुईसपाट झाले असून, २० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
राज्यासह देशभरातील लाखो नागरिकांच्या मनावर सप्त खंजिरी प्रबोधनातून मागील ५५ वर्षांपासून अधिराज्य करणारे सप्त खंजिरीचे जनक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा जन्मदिन प्रबोधन दिन म्हणून साजरा करण्यात आला. सप्त खंजिरी प्रबोधनकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सत्यपाल महाराजांचे शिष्य इंजिनिअर पवन दवंडे यांच्या आयोजना खाली वरुड तालुक्यातील इसंब्री येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या प्रांगणात सत्यपाल महाराज यांच्यासह प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेते किरण माने, डॉ. सय्यद, उद्घाटक डॉ. सत्यानंद महाथेरो, सत्कारमूर्ती राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज, अभिनेते किरण माने, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, माजी मंत्री बच्चू कडू, खा. बळवंत वानखडे, खा. अमर काळे, माजी आ. देवेंद्र भुयार, गिरीश कराळे, नितीन सरदार, इंजि. भाऊसाहेब थुटे, रवी मानव, सीमा बोके यांची उपस्थिती होती. या वेळी अभिनेते किरण माने म्हणाले, की सोशल मीडियावर एखादी पोस्ट आली की, आपण काहीही विचार न करता, मेंदूला थोडावेळ गहाण ठेवून ती पोस्ट खरी मानून इतरांना पाठवतो. सोशल मीडियाचा वापर आपल्या व समाजाच्या उन्नतीसाठी करा. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये जोपासा आणि मेंदूत जागृत माहितीचा भरणा करा, जेणेकरून समाजात शांतता नांदेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते तथा शिव- फुले- शाहू- आंबेडकर विचारवंत किरण माने यांनी इसंब्री येथे केले. या वर्षीचा सत्यपाल महाराज समाज प्रबोधनकार पुरस्कार अभिनेते किरण माने यांना उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच ज्यांनी आदर्श पद्धतीने विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण केला अशा दांपत्याचा स्मृतिचिन्ह देऊन रामदास दवंडे, सत्यपाल महाराज, किरण माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला. या वेळी सत्यपाल महाराजांचा वाढदिवस वृक्षतुला करून साजरा करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी सत्यपाल महाराजांना पुस्तक भेट दिले. कार्यक्रमासाठी पवन दवंडे, उपसरपंच योगेश काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष अजय देशमुख, प्रफुल्ल बरवट, अंकुश बरवट, ओंकार गोहाड, मंगेश गावंडे, हेमंत कोसे, विजय कवटकर, राहुल दवंडे, शत्रुघ्न युवनाते यांच्यासह संदीपपाल महाराज, रामपाल धारकर, प्रेमकुमार बोके, कमलपाल गाठे, श्रीकृष्ण पखाले, वेदांतपाल मुंदाने, संघपाल पवनुरकर, तुषार सूर्यवंशी, आकाश टाले, हेमंत टाले, अमर वानखडे, अंकुश मानकर आदींनी परिश्रम घेतले.
दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा; 44 विजेत्यांचा सन्मान:अमरावती पंचायत समितीच्या वतीने आयोजन
राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत अमरावती पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद व खासगी शाळेतील विविध विजेत्या ४४ शिक्षकांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी व शिक्षक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन, तर महावाचन उत्सवात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषद माध्यमिक मुलींची शाळा कॅम्प, अमरावती येथील सभागृहात बक्षीस वितरण व सत्कार सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, विस्तार अधिकारी संदीप बोडखे, अजित पाटील, सुधीर खोडे, गट समन्वयक अफसर खान यांच्यासह केंद्र प्रमुख यांची उपस्थिती होती. या वेळी उप शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तर, गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे यांनी शिक्षक चांगले कार्य करत आहेत, असे कौतुकास्पद वक्तव्य करून विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी अलका लुंगे, नलिनी गोरे, छाया मिरासे, सारिका काळे, कविता उघडे, वैशाली पाचकवडे, सचिन वानखडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून केंद्र प्रमुख नंदकिशोर झाकर्डे यांनी आभार मानले.
औद्योगिक क्षेत्र वाढत असल्याने नामांकित उद्योग समूह व कंपन्यांची गुंतवणूकही वाढली आहे. या सर्व आस्थापनांना त्यांच्या गरजेनुसार मनुष्यबळ पुरवण्याची गरज आहे. त्यामुळे त्याच पद्धतीचे अभ्यासक्रम तयार केले जावेत, असा सल्ला आ. सुलभा खोडके यांनी दिला. आ. खोडके यांनी नुकतीच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेतले. या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या अमरावती हे जिल्हा मुख्यालयाचे शहर असून येथे सर्वच क्षेत्रात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी ओळखून त्यांना मदत केली पाहिजे. नामांकित उद्योगांच्या मागणीनुसार रोजगारक्षम प्रशिक्षणार्थी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने अद्ययावत व्यावसायिक प्रशिक्षणातून उमेदवारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी आपले सर्वतोपरी प्राधान्य राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी त्यांना माहिती दिली. केंद्र सरकारच्या स्किल इंडिया संकल्पनेला अनुसरून युवक -युवतींचा कौशल्य विकास साध्य करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेले प्रयत्नही सांगितले. जिल्ह्यात तीन ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू केले असून ७४७ उमेदवारांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच जिल्ह्यातील ९ नामांकित महाविद्यालयांत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. त्यामध्ये सध्या १६० उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. तर राज्य शासनाची लाडका भाऊ योजनेत जिल्ह्यात एकूण २५६ आस्थापनांमध्ये एकूण ५,३०७ उमेदवारांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कौशल्य विकास अधिकारी ए. एस. ठाकरे यांनीसुद्धा किमान कौशल्य विकास कार्यक्रमाविषयी माहिती दिली. शासनाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केंद्र व संस्थांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यास संस्था प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास तयार होणार असल्याची माहितीही ए. एस. ठाकरे यांनी दिली. या वेळी शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके, आयटीआय निदेशक संघटनेचे अध्यक्ष भोजराज काळे, राकाँचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी सभापती मनपा अविनाश मार्डीकर, माजी नगरसेवक भूषण बनसोड, प्रा. डॉ. अजय बोंडे, संजय बोबडे, दिनेश देशमुख, अशोक हजारे, गोपाल चिखलकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, रायुकाँचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, रायुकाँ प्रदेश उपाध्यक्ष आकाश हिवसे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संकेत बोके आदी उपस्थित होते. शिक्षण आरोग्यावर जाणीवपूर्वक लक्ष आमदार सुलभा खोडके यांनी अलीकडे शिक्षण आणि आरोग्य या दोन व्यवस्थेवर जाणीवपूर्वक लक्ष पुरवण्याचे ठरविले आहे. त्या अंतर्गत त्या अनेक दवाखाने व शिक्षण संस्थांना भेटी देऊन तेथील अडीअडचणी जाणून घेत आहेत. आरोग्याच्या संदर्भात त्यांनी अलीकडेच जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न सोडवला असून शिक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे.
चांदूर बाजार उपविभाग अमरावती विभागात प्रथम:महावितरणची कार्यालयीन सुधारणा मोहीम
मुख्यमंत्री १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत महावितरणच्या चांदुरबाजार उपविभागीय कार्यालयाने अमरावती महसूल विभागातून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशामुळे चांदूर बाजार उपविभागीय अभियंता दिनेश भागवत व त्यांच्या चमूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम सुरू केली आहे. १० विविध विषयावर आधारीत हा उपक्रम राज्यातील सर्व ३५८ तालुक्यातील १० हजार शासकीय कार्यालयांमध्ये राबवण्यात आला होता. शनिवारी यात महसूल विभागनिहाय कोणती कार्यालये सरस ठरली याचा निकाल जाहिर करण्यात आला. महसूल विभागनिहाय जाहिर झालेल्या या निकालात महावितरणच्या कार्यालयांतर्गत चांदूर बाजार या उपविभागीय कार्यालयाने अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर महावितरणचे शेगाव आणि तिसऱ्या क्रमांकावर मुर्तीजापूर उपविभागाने स्थान मिळविले आहे. शासकीय कार्यालयांचे काम लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीकोनातून राबवण्यात आलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत कार्यालयीन सोयीसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर आदी निकषाचा यात समावेश करण्यात आला होता.
येत्या काळात होऊ घातलेली जिल्हा परिषदेची निवडणूक ५९ जागांसाठी की ६६ मतदारसंघांसाठी याचा फैसला लवकरच होणार आहे. त्यासाठी ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय (तालुका) लोकसंख्येची माहिती मागवली आहे. या माहितीच्या आधारे राज्य शासन जागांबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यभरातील थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ६ मे रोजी मार्ग मोकळा केला. ओबीसी आरक्षणाबाबतचा अंतिम निर्णय होईस्तोवर न थांबता चार आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करून चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषद निवडणूक विभागही सक्रिय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१७ मध्ये जी आरक्षणाची स्थिती होती, त्या सूत्रानुसार निवडणुका घ्यावयाच्या आहेत. न्यायालयाच्या या निर्देशानुसार आरक्षणाचे सूत्र जरी निश्चित झाले असले तरी निवडणुका नेमक्या किती जागांसाठी घ्याव्यात, हा प्रश्न कायम आहे. सन २०१७ च्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आला. नियमानुसार त्यापूर्वीच सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार होती. तशी तयारीही राज्य शासन व निवडणूक आयोगाने केली होती. दरम्यानच्या काळात २०११ च्या जनगणनेऐवजी अद्याप घोषित न करण्यात आलेल्या २०२१ च्या जनगणनेनुसार निवडणूक घेतली जावी, असे राज्य शासनाला वाटले. त्यामुळे २०१७ मध्ये विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच सरासरी वाढ गृहीत धरून मतदारसंघांची फेररचना करण्यात आली. या फेररचनेत अमरावती जिल्हा परिषदेत ७ मतदारसंघांची वाढ झाली असून, एकूण संख्या ५९ वरून ६६ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता या निवडणुका किती जागांसाठी होणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. नेमकी हीच उत्सुकता शमवण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने लोकसंख्येची माहिती मागवली असून, त्याआधारे मतदारसंघांची संख्या सांगितली जाणार आहे. लोकसंख्येची माहिती तयार असून, आयोगालाही पाठवणार ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार मागवण्यात आलेली लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाकडे तयार आहे. राज्य शासन व निवडणूक आयोगाने तीन महिन्यांपूर्वीही हीच माहिती मागवली होती. त्यामुळे नेमका तोच ‘डाटा’ पुढे करून ग्रामविकास विभागाकडे माहिती पाठवण्याची प्रशासकीय तयारी शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वातील जिल्हा परिषद निवडणूक विभागाने केली आहे. त्याचवेळी या माहितीची एक प्रत राज्य निवडणूक आयोगालाही पाठवली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
तालुक्यातील धामोडीसारख्या छोट्या व अल्पसंसाधन असलेल्या गावातील जान्हवी राजेंद्र ढेंगे या मुलीने जिद्द, सातत्य आणि कष्टाच्या बळावर एकापाठोपाठ एक अशी तीन मोठी शैक्षणिक शिखरे सर केली आहेत. या यशामुळे ती आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरली आहे. या नेत्रदीपक यशामुळे शाळा प्रशासनाने तिच्या घरी जाऊन आई-वडीलांसह तिचा सत्कार केला. जान्हवी ढेंगे ही एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. वडील शेती करून कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. तर आई गृहिणी आहे. अशा परिस्थितीतूनही तिने आपल्या अभ्यासातील चिकाटी, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर यशाचा ठसा उमटवला आहे. आठवीत असताना तिने ‘एनएमएस’ या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवली. दरम्यान यावर्षी तिने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) या राष्ट्रीय स्तरावरील सायन्स क्विझमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. दुसरीकडे शैक्षणिक कारकीर्दीतील महत्वाचा दहावीचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण केला. दहावीत तिने ९७ टक्के गुण प्राप्त करून आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावला. ही कामगिरी केवळ तिच्या बुद्धिमत्तेची नव्हे, तर अपार परिश्रमांची, वेळेचे व्यवस्थापन करण्याच्या कौशल्याची आणि शाळा तसेच कुटुंबाकडून मिळालेल्या सहकार्याची साक्ष आहे. तिचे पालक म्हणतात, तिच्या मेहनतीमुळे आम्हालाही सकाळी सहा ते सायंकाळी सहा असा पूर्ण दिवस तिच्यासोबत परिश्रम घ्यायची प्रेरणा मिळाली. मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि वेळोवेळीचे प्रोत्साहन यामुळे जान्हवीला हे यश प्राप्त करता आले. या यशाबद्दल तिचे कौतुक होत आहे. बीआयएसने दिले २५ हजारांचे पारितोषिक ही स्पर्धा केवळ ज्ञानच नव्हे तर तर्कशक्ती, विज्ञानातील आकलन आणि वेगाने विचार करण्याच्या क्षमतेची कसोटी होती, आपल्या कुशाग्र बुद्धिबळाच्या आधारे जान्हवीने ही कसोटी जिंकली. तिने बीआयएसमध्ये मोठे यश संपादन केले. या यशाबद्दल तिला २५ हजार रुपयांचे पारितोषिकही प्राप्त झाले आहे. ती इतरांसाठी दीपस्तंभच ^ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावेत, हे डॉ. पंजाबराव देशमुख यांचे स्वप्न होते. जान्हवीसारख्या विद्यार्थिनीमुळे ते स्वप्न आज सत्यात उतरते आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना आमचे सहकार्य सदैव राहील. ती तर ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ ठरली आहे. -मनोज देशमुख, मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल, दर्यापूर.
गंगापूररोड, काॅलेजरोड परिसरातअचानक केलेल्या कारवाईत ६३ टवाळखोरांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.या कारवाईने परिसरात टवाळखोरांचीसंख्या रोडावली आहे. परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी गंगापूरपोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले. शहरातील वाढती गुन्हेगारीरोखण्याकरीता पोलिस आयुक्तांनी स्टाॅप अँड सर्च, कोंम्बिंग, नाकेबंदी, गुन्हेगार चेकींग कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. गंगापूररोड आणि काॅलेजरोड परिसरात गंगापूर पोलिसांनी अचानक कोंम्बिंग आॅपरेशन राबवत ६३टवाळखोरांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. अल्पवयीनांच्या पालकांना बोलवून चांगली समज देऊनसोडून देण्यात आले. एचपीटी,आरवायके काॅलेज, महात्मानगरपरिसरातील उद्याने, चांदसी रोड,आनंदवली, बापू पुल येथीलटवाळखोरांच्या अड्ड्यावरपोलिसांकडून सर्च आॅपरेशन करतधरपकड केली. रॅश ड्रायव्हिंगकरणारे, ट्रिपल सीट, हुल्लडबाजीकरणाऱ्यांवर पोलिसांचा दंडुकाबरसल्याने महिला तरुणींनी समाधानव्यक्त केले. परिसरातील नागरिकआणि व्यावसायिकांनी पोलिसांच्या याकारवाईचे स्वागत केले. ही कारवाईस्थगिती न देता सुरूच ठेवण्याचीमागणी व्यावसायिकांसह नागरिकांनीकेली आहे. गंगापूर पोलसांच्या याकारवाईची दखल इतर पोलिसठाण्यांनीही घ्यावी अशी अपेक्षानागरिकरांनी व्यक्त केली आहे. कारवाईचा घेतला धसका,रविवारी रोडावली संख्या गंगापूररोड, कॉलेजरोड पोलिसांच्या कारवाईचा टवाळखोरांनी घेतल्याने गंगापूररोड, काॅलेजराेडवरटवाळखोरांनी संख्या रोडावली आहे.ही कारवाई पुढे अधिक व्यापकस्वरुपात सुरुच राहणार आहे.परिसरात कुठेही टवाळखोर,हुल्लडबाज अनुचित प्रकार करतानाआढळल्यास संपर्क साधावा अशीमाहिती वरिष्ठ निरीक्षक जुगवेंद्रसिंग राजपूत यांनी दिली. २ दिवसांत ८७ टवाळखाेर ताब्यात, फिरणाऱ्यांची चौकशी गंगापूर पोलिसांच्या कारवाईत दोनदिवसांत ८७ टवाळखोरांना ताब्यात घेतत्यांच्याकडून हमीपत्र घेण्यात आले.परवाना नसलेल्या दुचाकी चालकांचेवाहने जप्त करण्यात आले. कागदपत्रदाखवल्यानंतर काही वाहने सोडण्यातआले. विनाकारण फिरणाऱ्यांचीहीचौकशी झाली. समाधानकारक उत्तर नदिल्यास कारवाई करण्यात आली.त्यामुळे टवाळखोरांनी कारवाईचाधसका घेतला.
पैठण तालुक्यात २९६ पेक्षा अधिकअनधिकृत वीटभट्ट्या सुरू आहेत. एकाहीवीटभट्टीकडे परवानगी नाही. बिडकीन,चितेगाव, पारोळा, शेकटा, पाटेगाव, शहागडरोड परिसरात रस्त्यालगत आणि गावालगतया वीटभट्ट्या सुरू आहेत. यामुळे पैठण शहरआणि परिसर प्रदूषणाच्या विळख्यातसापडला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणितहसील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत. पैठण शहरासह ग्रामीण भागातील मोठ्याप्रमाणात घर बांधकाम सुरू आहे.बांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्याविटांच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे बिडकीन, चितेगाव, पारोळा,शेकटासह पैठण शहरालगत शेकडोअनधिकृत व कुठल्याही नियमांचे पालन न करता २९६ हून अधिक वीटभट्ट्या सुरूआहेत. या वीटभट्ट्यांमुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण वाढले आहे. विनापरवाना तीनशेंच्या जवळपास अनधिकृत वीटभट्ट्या सुरूआहेत. या बेकायदेशीर वीटभट्ट्यांमुळे पैठण शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासव पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.दगडी कोळशाची भट्टी तयार करून धुराच्या लोटात वीटभट्ट्या सुरू असतात. याकडेराज्य प्रदूषण नियंत्रक मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. दगडी कोळशापासून सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड,कार्बन मोनॉऑक्साईड आणिनायट्रोजनमधील ऑक्साईड या विषारीवायूंचे उत्सर्जन होते. शहरालगत अशा प्रकारे अनधिकृत वीटभट्ट्या थाटण्यात आलेल्या आहेत. थेट सवाल दिनेश झांपले, प्रभारी तहसीलदार Q. किती वीटभट्ट्याअनधिकृत आहेत?A. पैठण तालुक्यातअनधिकृतपणे असणाऱ्यावीटभट्ट्यांची माहिती घेतलीजाईल, त्यानंतर आकडेवारी समोरयेईल.Q. शहरालगतच्यावीटभट्ट्यांमुळे आरोग्यालाधोका आहे का?A. शहरालगत वीटभट्ट्यानसाव्यात, त्या इतर ठिकाणीहलविल्या जाव्यात, या संदर्भातमंडळ अधिकारी यांच्याकडूनमाहिती घेऊन संबंधितांना सूचनाकरू.Q. आता वीटभट्टी चालकांवरकारवाई कधीपर्यंत करणार?A. वरिष्ठांना अनधिकृतअसणाऱ्या वीटभट्ट्या संदर्भातमाहिती देऊन त्यानंतर कारवाईचानिर्णय घेतला जाईल.कोटींची उलाढाल,महसूल मात्र झीरो वीटभट्ट्यांच्या परवानगीसाठीनियम असून ते नियम एकहीवीटभट्टी चालक पाळत नाही.मात्र, तहसील प्रशासनाचे दुर्लक्षअसल्याने यातून शासनालामिळणारा कोटीचा महसूल मात्रबुडत आहे. संबंधित विभागानेवेळीच लक्ष देवून वीटभट्ट्यांवरनियंत्रण मिळवावे, अशी मागणीहोत आहे. या विषारी वायूंमधील सल्फरडायऑक्साईडमुळे डोळ्यांचे विकारआणि हवेतील नायट्रोजनमधीलऑक्साईडमुळे फुफ्फुसाचे व त्वचेचेआजार होतात. तसेच कार्बन मोनॉऑक्साईड आणिकार्बन डायऑक्साईड या वायूंमुळेवीटभट्ट्यांच्या परिसरातील तापमानातवाढ होऊन सभोवतालच्या शेतीवर,नागरिकांच्या आरोग्यावर विपरीतपरिणाम होत असल्याची माहितीदेण्यात आली आहे. एकाही भट्टीला परवानगी नाही पैठण तालुक्यात ३०० च्या जवळपासवीटभट्ट्या असून एकाही वीटभट्टीलापरवानगी नाही, असे असताना छत्रपतीसंभाजीनगर येथील प्रदूषण नियंत्रणमंडळाचे कायम दुर्लक्ष राहिले आहे.वीटभट्टी चालक प्रदूषण नियंत्रक मंडळाचीकुठलीही परवानगी न घेता व स्थानिकतहसील प्रशासनाला हताशी धरूनवीटभट्ट्या चालवित आहेत. या संदर्भातगौण खनिज विभागाचे सतीश पेंडशेम्हणाले, पैठण तालुक्यात एकाहीवीटभट्टीला परवानगी देण्यात आलेली नाही.
शहर व परिसराला रविवारी (१८ मे) जोरदार पावसाचे झोडपून काढले. सायंकाळी साडेपाचपर्यंत ५९. ४ मिमी पावसाची नोंद झाली. फेब्रुवारीतच उदघाटन झालेल्या शिवाजीनगर भुयारी मार्गात या पावसामुळे कंबरेपर्यंत पाणी तुंबले. त्यामुळे तेथील ६ तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद होती. तर अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. मान्सूनपूर्व कामांचा डांगोरा पिटणाऱ्या प्रशासनाची पोलखोल रविवारी (१८ मे) झालेल्या अवकाळी पावसाने केली. शहरातील रस्ते तुंबले, अनेक ठिकाणी वीज गुल झाली तर आपतकालीन सेवा म्हणून ओळख असलेल्या अग्निशमन विभागाचा फोनच स्वीचआॅफ होता. शिवाजीनगर भुयारी मार्गातून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रेल्वे विभागाने तयार केलेले चेंबर (आऊटलेट) फुटल्याने पहिल्याच पावसात कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते. पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजलाइनवर माती आणि कचरा जमा झाला होता. पाऊस सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात हा प्रकार घडला. त्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडाली. चार किमीचा फेरा मारून प्रवाशांना ये-जा करावी लागत होती. सहा तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. या भुयारी मार्गाचे लोकार्पण १५ फेब्रुवारी रोजी पार पडले होते. दरम्यान, रविवारी दुपारी अवकाळी पाऊस पडल्याने भुयारी मार्गात पाणी तुंबले. काही ठिकाणी झाडांची पडझड झाली, तर एन-६ परिसरात पावसामुळे ड्रेनेजचे पाणी घरात घुसले. दरम्यान भुयारी मार्गाचे काम घाईने केले आहे. या कामाची चौकशी करून दोषी अधिकारी, कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. महावितरण : पावसाला सुरुवात, वीज गायब वाऱ्याचा वेग १७ ते ३३ किमी प्रतितास होता. स्थळनिहाय त्यात फरक आहे. मेघगर्जनेसह जोरधार पाऊस पडायला सुरुवात होताच गारखेडा परिसर, शिवाजीनगर, सातारा देवळाई, सिडको, हर्सूल, पडेगाव, विद्यापीठ परिसर, जुने शहर, छावणी आदी भागातील वीजपुरवठा खंडित झाला. दुपारच्या पावसानंतर वातावरणात उकाडा होता. अग्निशमन : ३ तास ‘अग्निशमन’ स्विच ऑफ रविवारी दुपारी दोन वाजेपासून अग्निशमन विभागाचा आपत्कालीन संपर्क क्रमांक बंद होता. याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी संपत भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक अडचणीमुळे संपर्क क्रमांक बंद होता. त्याची तातडीने दुरुस्ती सुरू होती. त्याच वेळेत पाऊस झाला. आम्ही तातडीने पर्यायी क्रमांक दिला. रस्ते : तुंबलेले पाणी शिरले वसाहतीत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था न केल्याने शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाले होते. जळगाव रस्त्यावर टीव्ही सेंटरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. एन-६ सिंहगड कॉलनीतील घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरले. हर्सूल परिसरातील छत्रपती हॉल, टीव्ही सेंटर, जाधववाडी व बीड बायपास, देवळाई चौक परिसर, चिखल साचला. पाणी साचू नये याचे नियोजन रेल्वे विभागाचे चार किमीचा पडला फेरा पाणी तुंबल्याने शहरात आणि देवळाई, सातारा परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची फजिती झाली. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. परिणामी वाहनधारकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरून ये-जा करावी लागली. चार किमीचा फेरा पडला. माती-कचरा साचल्याने पाणी तुंबले शिवाजीनगर भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने वृद्ध पडून जखमी झाल्याच्याही घटना यावेळी घडल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक विस्कळीत होती. तब्बल ६ तास वाहतूक बंद होती. अग्निशमन विभागाचे बंब पोहोचले होते, परंतु हे पाणी काढणे शक्य नसल्याने ते परत माघारी गेले होते. त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पाणी काढण्याचे काम केले. चेंबर कोसळल्याने एक ट्रॅक्टरभर माती जमा झाली होती. कचरादेखील साचला होता. त्यामुळे कंबरेएवढे पाणी तुंबले होते. यातून अनेक वाहतूकदारांनी वाहने काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या वाहनात पाणी जाऊन ते बंद पडले . १५ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवाजीनगर भुयारी मार्गाचे उद्घाटन पार पडले होते. परंतु अर्धवट असलेल्या या मार्गाच्या आऊटलेटचे चेंबर अवकाळी पावसातच फुटल्याने रविवारी या मार्गात कंबरेपर्यंत पाणी साचले होते.
महाराष्ट्रातील नव्याने बांधलेली २०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे आवश्यक पुरवठा आणि कर्मचाऱ्यांसाठी निधीची तरतूद न केल्यामुळे वापराविना पडून आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.गेल्या चार वर्षांत बांधलेली अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे फर्निचर, वीज जोडणी आणि कर्मचाऱ्यांसाठी निधी न मिळाल्याने कार्यान्वित होऊ शकलेली नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत आणि गावांमध्ये वैद्यकीय आणीबाणी आणि रोगांच्या साथीदरम्यान प्रथम प्रतिसाद देणारी केंद्रे आहेत, जी परवडणारे उपचार पुरवतात. ते लसीकरण मोहिमांसारख्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे संचालन करतात आणि महिला व बालकांना आवश्यक आरोग्यसेवा पुरवतात. विभागाने २०२१ ते २०२५ दरम्यान राज्यभरात ४०० हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या बांधकामाला मंजुरी दिली होती, त्यापैकी २१० इमारती बांधल्या आहेत, परंतु अनेक अजूनही कार्यान्वित नाहीत. काही ठिकाणी पूर्णपणे बांधलेल्या इमारती जवळपास दोन वर्षांपासून वापरात आलेल्या नाहीत. भौतिक पायाभूत सुविधा तयार असूनही मूलभूत कार्यात्मक आधार नसल्यामुळे ही केंद्रे अद्याप सुरू होऊ शकलेली नाहीत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली. पूर्वी, बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाल्यावरच फर्निचर खरेदी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या होत. आताआम्ही काम ५० टक्के पूर्ण झाल्यावरच तयारीचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांत ९८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी केवळ ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची आणि आवश्यक वस्तूंची तीव्र कमतरता असल्याने ३४ केंद्रे बंद आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी फर्निचर, औषधे, वीज आणि कर्मचाऱ्यांसाठी निधीची सरकारकडे वारंवार केली. ३०८ उपकेंद्रांपैकी फक्त १२९ कार्यान्वित बांधकामासाठी मंजूर केलेल्या ३०८ उपकेंद्रांपैकी केवळ १२९ कार्यान्वित झाली आहेत आणि उर्वरित १७९ इमारती वापरात आलेल्या नाहीत. विभागाला राज्यभरातून मनुष्यबळ, वीज आणि उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणात विनंत्या येत आहेत. तथापि, प्रत्येक सुविधा पूर्णत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यात असल्याने निधीचे वाटप करणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी अधिकारी म्हणाले, प्रत्येक केंद्राला वेगवेगळ्या स्तरावरील मदतीची गरज असताना आम्ही योग्य प्रकारे निधीचे वाटप करू शकत नाही, त्यामुळे अनेक इमारती तांत्रिकदृष्ट्या तयार असूनही वापरात आलेल्या नाहीत, असे संबंधित अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले.
मुंबई विमानतळावर पाच कोटींचे सोने केले जप्त:दोन वेगवेगळ्या घटनांत सीमाशुल्कची कारवाई
सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग -३ येथील सीएसएमआय विमानतळ आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी १७ मे रोजी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण ५.७५ किलो सोने जप्त केलं असून त्याची अंदाजे किंमत ५ कोटी १० लाख रुपये इतकी आहे. हे सोने संबंधित व्यक्तींच्या आतील कपड्यांमध्ये व जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेले होते. या प्रकरणांमध्ये २ जणांना अटक करण्यात आली आहे. } प्रकरण १ : एका प्रतीक्षालयात काम करणाऱ्या व्यक्तीला तो कर्मचारी मार्गाने प्रस्थान क्षेत्रातून जात असताना अडवण्यात आले. त्याच्या आतील कपड्यांमध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली ६ पाकिटे हस्तगत करण्यात आली. याचे निव्वळ वजन २८०० ग्रॅम (संपूर्ण वजन २९४७ ग्रॅम) असून अंदाजे किंमत २ कोटी रुपये आहे. हे सोने त्याला एका विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. प्रकरण २ : एक कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला तो प्रस्थान क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडण्याच्या ठिकाणी जाताना अडवण्यात आले. त्याच्या अंगावरील जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली ६ पाकिटे हस्तगत करण्यात आली, ज्याचे निव्वळ वजन २९५० ग्रॅम (संपूर्ण वजन ३०७८३ ग्रॅम) असून अंदाजे किंमत २ कोटी ६२ कोटी आहे, हे सोनं त्याला विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात एका ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सीमाशुल्क विभागाने सांगितले आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्यांची अधिकारी चौकशी करत आहेत.
राज्य सरकारने गाजावाजा करत एप्रिल २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘लेक लाडकी’ योजनेच्या अंमलबजावणीतील विसंगती आता समोर येत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींच्या शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकासासाठी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत १ लाख ५८ हजार मुलींनी घेतला असला, तरी मुंबईसारख्या महानगरात केवळ १०० मुलींनाच लाभ मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने आतापर्यंत या योजनेसाठी तब्बल ७९ कोटी ३२ लाख रुपये खर्च केले असून, शहरी भागात योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे यातून अधोरेखित होत असतानाच ग्रामीण आणि आदिवासी भागातही योजना पोहोचवण्यात राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते मे २०२५ या कालावधीत १ लाख ५८ हजार ६५२ मुलींना योजनेचा लाभ मिळाला आहे. अर्ज प्रक्रियेत अडथळे, मार्गदर्शनाचा अभाव ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करता येतो, तर शहरी भागात मुख्य सेविकांमार्फत ही प्रक्रिया होते. मात्र, अर्जाची पडताळणी, अधिकाऱ्यांकडील मंजुरी आणि योजनेबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे अनेक पात्र कुटुंबे योजनेंतर्गत येतच नाहीत. त्यामुळे गरजू लाभार्थींना योजना मिळत नसल्याचे ठळकपणे दिसते. सरकारने ‘लेक लाडकी’ योजनेचा गवगवा केला असला तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीतील हलगर्जीपणा आणि जिल्हानिहाय असमानता यामुळे ही योजना गरीब लाभार्थींपर्यंत पोहोचत टीका होत आहे. हिंगोलीत कमी : राज्यात सर्वाधिक लाभार्थी नाशिक (१०,११८), कोल्हापूर (८,२६९) व सोलापूर (८,४०६) या जिल्ह्यांमध्ये आहेत. परंतु मुंबई शहरात केवळ १०० आणि मुंबई उपनगरात १,१४० मुलींनाच लाभ मिळाल्याचे आकडे स्पष्ट करत आहेत. गडचिरोली (२,६२४), नंदुरबार (३,०५१), धुळे (२,६७१), हिंगोली (२,५७८) यासारख्या जिल्ह्यांत लाभार्थींची संख्या अत्यल्प आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरातील भुयारी मार्ग काल झालेल्या पावसात पार तुडुंब भरला होता. या भुयारी मार्गाला सुरू होऊन केवळ 3 महिनेच उलटले आहेत. त्यातही पहिल्याच पावसात या भुयारी मार्गावर पाणी साचले. त्यानंतर परिसरात रहदारी झाली आणि स्थानिकांची तसेच वाहतुकीचीही गैरसोय झाली. काही लोक तर त्या साचलेल्या पाण्यातूनच चालत येतांना दिसले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी साचल्यानंतर ये-जा करतांना काहीजण पडलेत. त्यांना दुखापत झाल्याचेही त्यांनी सांगितले. जवळपास 18 महिने या पुलाचे काम सुरू होते. हे काम सुरू असतांना याचा तेथील व्यवसायावरही परिणाम झाला. त्या परिसरातील आसपासचे दुकानदार तेथून स्थलांतरित झाले. सोबतच बीड बायपासला जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागत होता. असे असूनही हा भुयारी मार्ग जर पहिल्याच पावसात तुंबायला लागला असेल तर आमची परिस्थिती जैसे थी... अशीच झालेली असल्याचेही नागरिकांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले. दिव्य मराठीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तेथील परिस्थिती आणि नागरिकांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या... स्थानिकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा.... नागरिक म्हणाले की, दुपारच्या सुमारास पाऊस पडला असून आता जवळपास 4 तास उलटले आहेत. तरीदेखील या ठिकाणी प्रशासन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले नाही. त्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडीदेखील बऱ्याच वेळापासून उभी होती. पण प्रत्यक्षात तेथील पाणी बाहेर काढण्याचे काम मात्र सुरू नव्हते. काही वेळाने एक जेसीबी तिथे आला आणि तोदेखील लगेच तिथून निघून गेला. या दरम्यान, लोक पाण्यातूनच ये-जा करत होते. दुचाकी, चारचाकी या पाण्यातून बाहेर काढतांना दिसले. तसेच काही लोक तर पायी पाण्यातून वाट काढत बाहेर येतांना दिसले. एकत्रित या सर्व परिस्थितीवर स्थानिकांचा रोष दिसून येत होता. त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. प्रशासनाकडून मदतीसाठी होत असलेल्या विलंबावरही त्यांनी संताप व्यक्त केला. शिवाजीनगर भुयारी मार्गावर पाणी साचल्याचे फोटो... भुयारी मार्गाशी संबंधित या बाबीही जाणून घ्या... काही महिन्यांपूर्वीच झाले होते उद्घाटन भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी यावर संताप व्यक्त केला. या भुयारी मार्गाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र, पहिल्याच पावसात ही सुविधा निकामी ठरल्याचे चित्र दिसले. तब्बल 6 महिने काम लांबले दरम्यान, या भूयारी मार्गाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) लाइनमुळे सहा महिने काम लांबले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा मार्ग सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात तो बंद पडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 2010-2011 मध्ये सुरू झाला उड्डाणपुलाचा लढा 2010-2011 मध्ये उड्डाणपुलाचा लढा सुरू झाला होता. 2011-2012 मध्ये सातारा-देवळाई जनसेवा कृती समिती स्थापन करण्यात आली. 2013-2014 मध्ये उड्डाणपूल होणार नाही, असे कळल्यानंतर भुयारी मार्गाची मागणी सुरू झाली. त्यानंतर 2017 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. 2021 मध्ये उच्च न्यायालयात याचिकेवर 25 सुनावण्या झाल्या. त्यानंतर निकाल देत चार विभागांची समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना 30 निवेदने देण्यात आली होती. तसेच, नागरिकांची 15 पेक्षा अधिक आंदोलने झाली होती. 200 मीटर लांबीचा भुयारी मार्ग शिवाजी नगर परिसरातील 200 मीटर लांबीचा हा रेल्वे भुयारी मार्ग आहे. यामध्ये 3.5 मीटर मार्गाची उंची आहे. या मार्गासाठी 11.47 कोटी निधी खर्च झाला. 15 ऑक्टोबर 2023 ते 15 ॲाक्टोबर 2024 प्रकल्पाचे काम वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, 6 महिने काम रखडल्याने हा मार्ग खुला होण्यासाठी 18 महिने लागले.
तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली
दोन कुटुंबात चाकू, कोयत्याने वार, ३ ठार मुंबई : प्रतिनिधी मुंबानगरीतील दहिसर पश्चिम एम.एच.बी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटीलनगर परिसरात दोन कुटुंबात तुफान हाणामारीची घटना घडली. दोन कुटुंबातील या भांडणात चक्क चाकू आणि कोयताने एकमेकांवर जोरदार हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. जुन्या वादातून दोन कुटुंबीयांतील मारहाणाच्या घटनेचे […] The post तिहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओडिशातील पुरीपर्यंत पोहोचली हेरगिरीची लिंक? चंदीगड : वृत्तसंस्था हरियाणाच्या हिस्सार येथील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर गुप्तचर विभागाने आता सखोल तपास सुरु केला आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरीचे काम करण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ओडिशाचे कनेक्शन समोर आले आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग आणि पुरीचे पोलिस याचा संयुक्तपणे तपास करीत असून, पुरीपर्यंत याची लिंक पोहचली […] The post आणखी एक युट्यूबर रडारवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तोयबाचा अतिरेकी सैफुल्लाहला गोळ््या घालून केले ठार भारतातील कटात होता सहभाग इस्लामाबाद : वृत्तसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर २००६ मध्ये बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचणारा लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाह याचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आला. अबू सैफुल्लाह याच्यावर अज्ञातांनी गोळ््या झाडल्या. यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याला पाकिस्तानने संरक्षण दिले होते. पण संरक्षण भेदत […] The post पाकमध्ये टॉप कमांडरची हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जरांगे यांच्याशी चर्चेनंतर माघार बीड : प्रतिनिधी मारहाण आणि गु्न्हेगारी टोळींच्या व्हिडिओने गाजत असलेल्या बीडमध्ये पुन्हा एकदा जबर मारहाणीची घटना घडली. शिवराज दिवटे या युवकास वाल्मिक कराडच्या टोळीतील पोरांनी मारहाण केल्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा राज्यात चर्चेत आला. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून उद्या बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्याशी […] The post मराठा संघटनांचा बीड बंद मागे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गुजरातसह पंजाब, आरसीबी प्लेऑफमध्ये
गुजरातचा शानदार विजय, दिल्लीला दे धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात टायटन्सने आयपीएलच्या ६० व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सवर १० गडी राखून शानदार विजय मिळविला. दिल्लीने गुजरातला विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने हे आव्हान १९ षटकांत एकही विकेट न गमावता पूर्ण केले. गुजरातने २०५ धावा केल्या. कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी […] The post गुजरातसह पंजाब, आरसीबी प्लेऑफमध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुरस्कारातून कलाकाराला उत्साह आणि प्रेरणा मिळते. जो ‘पुरे साकार’ करतो त्याला पुरस्कार दिला जातो. मनोरंजन व विचारधारा रसिकांपर्यंत पोहोचविणे हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे. कलाकाराच्या सादरीकरणातून त्याचे विचार रसिकांच्या मनापर्यंत गेले की, रसिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्यातूनच कलाकार आणि रसिक यांचे नाते जुळते, असे मत कोल्हापूर येथील एकपात्री कलावंत, सिने अभिनेते नितीन कुलकर्णी यांनी व्यक्त केले. रंगत-संगत प्रतिष्ठान आणि आम्ही एकपात्री यांच्या वतीने पहिल्या वंदन राम नगरकर स्मृती पुरस्काराने नितीन कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी बोलत होते. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ रंगकर्मी बण्डा जोशी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास डॉ. वैजयंती वंदन नगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, आम्ही एकपात्रीच्या अध्यक्षा अनुपमा खरे मंचावर होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, मानचिन्ह, ग्रंथ आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बण्डा जोशी आणि नितीन कुलकर्णी यांनी ‘हास्यवंदन’ हा कार्यक्रम सादर केला. त्यास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सादरीकरण करताना विनोदी कलाकार माळेमध्ये फुले ओवल्याप्रमाणे प्रसंग ओवत जातो आणि सादरीकरण अधिक मनोरंजक करतो, असे सांगून नितीन कुलकर्णी म्हणाले, कलाकराला रसिकांची रंगत-संगत मिळत गेली की कलाकाराचा कार्यक्रम बहरत जातो. त्याला रंगदेवतेची प्रेरणा असणे आवश्यक असते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बण्डा जोशी म्हणाले, माणूस खळखळून हसतो तेव्हा तो सुंदर दिसतो आणि हा सुंदर माणूस पाहण्याचे भाग्य आम्हा हास्य कलाकारांना लाभते. रसिकांना हसवायचे काम जरी आम्ही कलाकार सातत्याने करत असलो तरी आम्हा कलाकारांना या विषयी गंभीरपणे अभ्यास करावा लागतो. सगळ्या कलांचा संगम असलेला, विनोदाची पातळी सांभाळणारा एकपात्री कलाकार उत्तम ठरतो. प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, वंदन राम नगरकर हे फक्त कलावंत नव्हे तर उत्तम माणूसही होते. त्यांनी आपल्या कलेची समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावे पुरस्कार देण्याचा निर्णय दोन्ही संस्थांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. सकारात्मक काम करण्याच्या ओढीने आम्ही सतत कार्यरत आहोत. डॉ. वैजयंती नगरकर म्हणाल्या, हास्य कलाकार आपल्या सादरीकरणातून रसिकांच्या मेंदूमध्ये अशी रासायनिक प्रक्रिया निर्माण करतो की ज्यातून त्याचे मानसिक आरोग्य जपण्यास मदत होते. वंदन नगरकर यांचे पहिले प्रेम हे एकपात्री कलाच होते. त्यांनी रुजविलेले आम्ही एकपात्री संस्थेचे बीज आणि त्यातून निर्माण झालेला वृक्ष त्यांच्या पश्चात इतर कलाकार उत्तमरित्या सांभाळत आहेत याचा आनंद आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नागपुरात महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांच्या समन्वयातून 'एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ' हे तत्त्व प्रत्यक्षात येणार आहे. नागपुरातील कविवर्य सुरेशभट सभागृहात विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री माणिक कोकाटे आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट उपस्थित होते. आयसीएआरच्या देशभरात ११३ संस्था कार्यरत असून त्यापैकी ११ संस्था महाराष्ट्रात आहेत. संस्थेचे १६ हजार कृषी वैज्ञानिक शेतकऱ्यांना नवीन बियाणे आणि शेतीतील नवोपक्रमांबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. २९ मे ते १२ जून दरम्यान खरीप हंगामाच्या नियोजनासाठी कृषी वैज्ञानिक गावांना भेटी देणार आहेत. रोगमुक्त रोपवाटिकांसाठी क्लिन प्लांट प्रोग्रॅम राबवला जात आहे. रोपट्यांच्या मूळ प्रजातींच्या संशोधनासाठी पुण्यात नवी प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. कृषीमंत्र्यांनी 'नॅशनल सॉईल स्पेक्ट्रम स्पेक्ट्रल लायब्ररी'चे उद्घाटन केले. महाराष्ट्र मृदा नकाशा असलेले देशातील पहिले राज्य ठरले आहे. कापूस पिकांवरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी एआय-आधारित स्मार्ट ट्रॅप तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे.
दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद' रॅली काढण्यात येणार असल्याची घोषणा आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना केली. पुढे बोलताना राज्यमंत्री आठवले म्हणाले, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. काँग्रेसच्या वतीने ही याच धर्तीवर रॅली काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आरपीआयच्या वतीने देखील राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये 'भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद'. रॅली आयोजित करण्यात येईल. भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या युद्धविराम असला तरी देखील ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे, याची जाणीव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी करून दिली आहे. पाकव्याप्त जम्मू काश्मीर जोपर्यंत भारताच्या ताब्यात येत नाही आणि पाकपुरस्कृत दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानची आरपारची लढाई सुरूच ठेवावी, अशी आपल्या पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढवाव्या दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत पार पाडाव्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. या निवडणुका भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या, अशी आपल्या पक्षाची भूमिका आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी देखील आपली आग्रही मागणी आहे. पुणे महापालिका निवडणुकीत किमान 15 प्रभागात आपल्या पक्षाला उमेदवारी मिळावी, संपूर्ण पाच वर्षासाठी उपमहापौर पद मिळावे आणि मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा आपल्या मागण्या आहेत. त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी आपली चर्चा झाली असून आपल्या मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा देखील आठवले यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे आगामी काळात विविध महामंडळे, जिल्हा नियोजन मंडळ यावरील नियुक्तींमध्ये देखील आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष संजय सोनवणे, गंगाधर आंबेडकर, सूर्यकांत वाघमारे असित गांगुर्डे, शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, शाम सदफुले, संदीप धांडोरे, लियाकट शेख, रवी अवसरमल, अक्षय अवसरमल, उमेश कांबळे, आकाश बहुले आदि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज २० मे २०२५ रोजी लाखोंच्या संख्येने मुंबईवर महाआक्रोश मोर्चा काढणार आहे .या महाआक्रोश मोर्चाला मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मातंग समाजातील सर्वपक्षीय व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले . सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आक्रोश महाआंदोलन आयोजित करण्यात आले आहे. हे आंदोलन २० मे २०२५ रोजी,मुंबईच्या आझाद मैदानात दुपारी १ ला होणार आहे.या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून ते येत्या जून२०२५ पासून लागू करवे .उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमधील दुर्लक्षित घटकांना शैक्षणिक संधी, शासकीय नोकरी व योजनांचा थेट लाभ मिळू शकेल.तरी “राज्य शासनाच्या विविध योजनांपासून आणि आरक्षणाच्या थेट लाभापासून अनेक लहान लहान उपगट वंचित राहत आहेत. त्यामुळे हक्काचे आरक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक झाले आहे अशी समाजाची मागणी आहे. या आंदोलनात सर्व पक्षीय अनेक मान्यवर नेते व लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, या आंदोलनाचे नेतृत्व माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे ,आमदार सुनील कांबळे,आमदार अमित गोरखे,आमदार जितेश अंतापूरकर,दलित महासंघाचे नेते प्रा.मच्छिंद्र सकटे,अखिल भारतीय कांग्रेस पक्षाचे सचिव रवींद्र दळवी, माजी आमदार मधुकरराव घाटे, माजी आमदार नामदेव जयराम ससाणे, माजी सभागृह नेते, नगरसेवक सुभाष जगताप, विजय डाकले, अनिल हतागळे, माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, उषा नेटके, अँड. एकनाथ सुगावकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, पंडित सूर्यवंशी, मारुती वाडेकर, अशोक लोखंडे, राम चव्हाण यांसारखे अनेक नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत. सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अजूनतीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे येणार्या मंगळवारी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आले. पुण्यातील या पत्रकार परिषदेस माजी गृहराज्यमंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णूभाऊ कसबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप, माजी नगरसेवक अविनाश बागवे, अनिल हतागळे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, सुखदेव अडागळे, राजश्री अडसूळ, उषा नेटके, यासह पुण्यातील विविध पक्ष संघटनाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
वाळू धक्यावर धाड टाकून ६० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर : प्रतिनिधी शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हालकी जवळील शेंद शिवारातील मांजरा नदी पात्रातील वाळूची अवैधरित्या उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच उपविभाग चाकुरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बी .चंद्रकांत रेड्डी यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय कार्यालयातील पोलीस अधिकारी अमलदार, पोलीस स्टेशन चाकूर व शिरुर अनंतपाळ येथील अधिकारी अमलदारांची पथके तयार करून नमुद ठिकाणी दि. १७ मे […] The post वाळू धक्यावर धाड टाकून ६० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर मेडिकलमधून कैदी पळून जाण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. मध्यवर्ती कारागृहातील घरफोडी आरोपी हर्ष महेंद्र रामटेके याने शनिवारी मध्यरात्री मेडिकलमधून पलायन केले. २३ वर्षीय हा आरोपी भंडारा येथील रहिवासी आहे. प्रकृती बिघडल्याने रामटेकेला मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक ३६ मध्ये दाखल करण्यात आले होते. १७ मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्याने पलायन केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काळे पट्टे असलेला चमकदार गुलाबी रंगाचा टी-शर्ट घातलेला रामटेके स्पष्ट दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पलायनाच्या वेळी एक कॉन्स्टेबल खुर्चीवर बसलेला होता. त्याने आरोपीला अडवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. मुख्य दरवाजा उघडताना रामटेके अडखळला होता. मात्र थोडा जोर लावल्यानंतर त्याला दरवाजा उघडण्यात यश आले. नागपुरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. २०१७ मध्ये तीन घरफोडी आरोपींनी चार पोलिसांना चकवा देत पलायन केले होते. तर २०२० मध्ये नरेश महिलांगे या कैद्याने ट्रामा केअर सेंटरमधून शौचालयाच्या खिडकीतून पाईपच्या सहाय्याने उतरून पलायन केले होते. कैद्यांच्या सुरक्षेबाबत पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे.
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ गावी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत. जंगलातील कोअरझोन मधील क्षेत्रात त्यांनी ठाण मांडून संसार थाटला. भिवंडी तालुक्यातील एकसळ, सागाव येथे झालेले पुनर्वसन मान्य नसून तेथील आदिवासी आम्हाला जगू देणार नाहीत, पुनर्वसनाच्या चांगल्या सुविधा नाहीत, त्यामुळे आम्ही आता येथेच राहणार व इथेच मरणार अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी आडोशीतील मूळ गावच्या जंगलातच चुली पेटवल्या आणि रात्र जागवली. पुनर्वसन झालेल्या ठिकाणी गैरसोय होत असल्याने परतले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जावली, महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांचे एकसळ, सागाव (ता. भिवंडी जि. ठाणे ) या ठिकाणी २०१५ साली पुर्नवसन करण्यात आले. एकूण १२० प्रकल्पग्रस्त खातेदारांकरिता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून २४२ हेक्टर जागा दिली होती. मात्र, पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या एकूण ७० कुटुंबांचे पुनर्वसन त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. त्यापैकी खिरखंडी येथील सहा कुटुंबे वगळता बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले. मात्र गावातील असलेल्या आदिवासी लोकांचा त्रास, मारहाण या लोकांना गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी होत आहे. त्या त्रासाला कंटाळून तसेच पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या रस्ते, पाणी, वीज यासह अन्य सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावी परतण्याचे निश्चित केले. पडक्या इमारतींसमोरच मूळ गावात मांडले ठाण शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता एकसळ सागाव (जि. ठाणे ) येथून सुमारे २२ प्रकल्पग्रस्त मिनी ट्रॅव्हल्सने महाबळेश्वरात आले. तेथून कुरोशी पुलावरून वाघावळे, उचाट, आकल्पे येथे पोहोचले. त्यानंतर आकल्पेतून पायी चालत दुपारी बाराच्या सुमारास आडोशी हे मूळ गाव त्यांनी गाठले. तेथील पडक्या, उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या इमारती समोर संसार मांडून तेथे ठाण ठोकले. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावी येण्याची भूमिका स्पष्ट करून आता आम्ही येथेच राहणार आणि इथेच मरणार असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय करमळकर तसेच बामणोली परिक्षेत्र अधिकारी विजय भाटे मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. परंतु प्रकल्पग्रस्त मागण्यांशी ठाम राहत भूमिकेत बदल न करता त्यांनी त्याच ठिकाणी चुली पेटवून संसार थाटला. शुक्रवारची संपूर्ण रात्र आडोशी तील जंगलातच जागवली. पायी मार्गाने चालत मूळ गाव गाठलेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या जंगलातील मूळ गावी येऊ नये, म्हणून सर्व प्रकारची यंत्रणा कार्यान्वित केली होती. ड्रोनच्या साह्याने प्रकल्पग्रस्तांवर नजर ठेवली होती. तर बफर क्षेत्रातील बोटी कोअर क्षेत्रात येऊ दिल्या नाहीत. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पग्रस्त हे कोअर क्षेत्रात बोटीने न जाता सुमारे दहा ते पंधरा किलोमीटर अंतर चालत पायी मार्गाने आपल्या मूळ गावी पोहोचले. शाळेच्या बंद शेडमध्ये म्हशीचे सांगाडे ज्यावेळी सर्व प्रकल्पग्रस्त आडोशी येथील त्यांच्या मूळ गावातील शाळेसमोर पोहोचले. त्यावेळी त्यांनी जुन्या पडक्या शाळेमध्ये आसरा घेण्याचे ठरवले. मात्र या शाळेतील खोलीमध्ये मेलेल्या म्हशीचे सांगाडे आढळून आले. दुर्गंधीही पसरली होती. या म्हशी प्रकल्पग्रस्तांच्या असल्याचे बोलले जात होते तर मेलेल्या म्हशीचे सांगाडे पाहून वृद्ध प्रकल्पग्रस्तांना अश्रू अनावर झाले. निवेदन देऊनही अधिकाऱ्यांची चालढकल तानसा नदीवरील एकसळ, सागाव या ठिकाणी येथील ७० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले असून त्या ठिकाणी दिलेली जागा दलदलीची आहे. शेती करण्यायोग्य नाही, बांधलेल्या घरांना भेगा गेल्या आहेत, पावसाळ्यात जमीन खचत आहे. चिखल तुडवत शेताकडे जावे लागते. १८ नागरी सुविधांपैकी बहुतांश सुविधा त्या ठिकाणी दिल्या गेल्या नाहीत. रेशनकार्ड दिले आहे, मात्र त्यावर ऑनलाईन नसल्याच्या कारणास्तव रेशन मिळत नाही. गुरांसाठी चरण्यासाठी गायरान नाही. त्यामुळे चारा उपलब्ध होत नाही. ज्या ठिकाणी जागा वाटप केली त्यातील बहुतांश जागेवर आदिवासी लोकांनी अतिक्रमण केले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, वनविभाग, पुनर्वसन विभाग, ठाणे, सातारा जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही आजपर्यंत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचा कोणताही प्रश्न निकाली न लागल्याने आम्ही शेवटी आमच्या मूळ गावी परतलो आहोत. शासनाने आम्हाला येथेच मरण्याची परवानगी द्यावी, अशी भावना प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
धम्म संस्कारामुळे भारताला बुद्धकालीन वैभव प्राप्त होईल
लातूर : प्रतिनिधी तथागत बुद्ध व सम्राट अशोक यांच्या काळातील भारत निर्माण करावयाचा असेल तर धम्म संस्थेच्या वतीने राबविण्यात येणा-या २४ प्रकारच्या शिबिरामध्ये उपासक उपासिकांनी व त्यांच्या पाल्यांनी सहभागी झाले पाहिजे, असे नमुद करुन डॉ. भीमराव आंबेडकर यांनी धम्म संस्कारामुळे भारताला बुद्धकालीन वैभव प्राप्त होईल, असे सांगीतले. लातूर शहरातील बुद्ध गार्डनमध्ये दि. ८ ते १८ […] The post धम्म संस्कारामुळे भारताला बुद्धकालीन वैभव प्राप्त होईल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्हा परिषदेत नियमित परिचर नाही. नोकर भरतीची मुभा नसल्यामुळे त्यांची भरतीही करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने २५ लाख ७९ हजार ३६२ रुपयांचा वार्षिक कंत्राट दिला आहे. या कंत्राटानुसार मुख्यालयाच्या स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला रोज १० हजार ५७१ रुपये मोजावे लागत आहेत. इतर कार्यालयांच्या तुलनेत स्वच्छतेवरील हा खर्च खूप जास्त असून त्यापेक्षा नियमित परिचराची नियुक्ती केल्याने हा खर्च कमी केला जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. सण-उत्सव, शनिवार-रविवार आणि सुटीचे दिवस वगळल्यास इतर शासकीय कार्यालयांप्रमाणेच वर्षभरात जिल्हा परिषदेचे कार्यालय सुद्धा २४४ दिवसच सुरु राहणार आहे. एवढ्या दिवसांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाला सुमारे २६ लाख रुपये मोजावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचे वेगवेगळे विभाग आणि स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसाठी जि.प. प्रशासनाने ३० लाख ५२ हजार ५०० रुपयांची निविदा प्रकाशित केली होती. त्यानुसार पाच जणांनी ही निविदा सादर केली. दरम्यान नोंदणी प्रमाणपत्र नसल्याने पात्रतेच्या निकषांवर दोन निविदा रद्द करण्यात आल्या. उर्वरित तीन निविदांपैकी सर्वात कमी रकमेची (एल-वन) एक निविदा स्वीकारण्यात आली. ही निविदा सुशिक्षित बेरोजगार संवर्गातील आहे. गेल्यावर्षी बांधकाम विभागामार्फत असा कंत्राट देण्यात आला होता. तो संपुष्टात आल्याने यावर्षी नव्याने प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत इ-निविदा मागवण्यात आल्या होत्या. ३२०० रुपये निविदेची किंमत आणि ३१ हजार रुपये बयाना रक्कम निश्चित करण्यात आली होती. सीइओ, कॅफो, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उप मुख्याधिकारी अशा चार अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही निविदा जारी करण्यात आली होती. दरम्यान दरवर्षी हा भुर्दंड सहन करण्याऐवजी कंत्राटी परिचरांची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत स्वच्छता करवून घेणे अधिक सोईस्कर होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. किमान वेतनाच्या नियमानुसार जरी परिचर नेमले तरी एवढ्या रकमेत किमान ८ परिचरांचे वेतन दिले जाऊ शकते. मुळात एवढ्या परिचरांची गरजही नाही. त्यामुळे स्व उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नसलेल्या जिल्हा परिषदेने आर्थिक भुर्दंड वाढवण्याऐवजी बचत कशी साध्य होईल, याकडे लक्ष द्यावे, असे मत जिल्हा परिषदेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मांजरा प्रकल्पाच्या फुटलेल्या उजव्या कालव्याची दुरुस्ती
लातूर : प्रतिनिधी लातूरची जीवनवाहिनी असलेल्या मांजरा नदीवरील लातूर तालुक्यातील मांजरी, सामनगाव जलसेतूजवळ मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा दि. १६ मे रोजी पहाटे फुटला. यामुळे हजारो दशलक्ष घनमीटर पाण्याची नासाडी झाली. शिवाय फुटलेल्या कालव्याचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नूकसान झाले होते. संबंधीत विभागाच्या वतीने या कालव्याची तत्काळ दुरुस्ती करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मांजरा […] The post मांजरा प्रकल्पाच्या फुटलेल्या उजव्या कालव्याची दुरुस्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शहरातील फ्रुट मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य
लातूर : प्रतिनिधी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, सुनिल कॉम्प्लेक्स येथिल फ्रुट मार्केट आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सोन्या मारूती देवस्थान परिसरात सडक्या फळांच्या व कॅरिबॅग मुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी फळ बाजारा असल्याने उरउरीत कचरा येथेच टाकला जात असल्याने येथील नागरीकांना घाणीचा सामना करावा लागत आहे. सुनिल कॉम्प्लेक्स येथिल फ्रुट मार्केट […] The post शहरातील फ्रुट मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नवी माहिती:मतदारसंघांची संख्या निश्चित करण्यासाठी लोकसंख्येचा डेटा मागवला
अमरावती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघांची संख्या निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामविकास विभागाने पंचायत समितीनिहाय लोकसंख्येची माहिती मागवली आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या जागा ५९ वरून ६६ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. गेल्या ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यभरातील थांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. ओबीसी आरक्षणाबाबतचा अंतीम निर्णय होईस्तोवर न थांबता चार आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करुन चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका व नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रशासकीय तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा परिषद निवडणूक विभागही सक्रीय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१७ साली जी आरक्षणाची स्थिती होती, त्या सूत्रानुसार निवडणुका घ्यावयाच्या आहेत. न्यायालयाच्या या निर्देशानुसार आरक्षणाचे सूत्र जरी निश्चित झाले असले तरी निवडणुका नेमक्या किती जागांसाठी घ्याव्यात, हा प्रश्न कायम आहे. सन २०१७ च्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आला. नियमानुसार त्यापूर्वीच सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार होती. तशी तयारीही राज्य शासन व निवडणूक आयोगाने केली होती. दरम्यानच्या काळात २०११ च्या जनगणनेऐवजी अद्याप घोषित न करण्यात आलेल्या २०२१ च्या जनगणनेनुसार निवडणूक घेतली जावी, असे राज्य शासनाला वाटले. त्यामुळे २०१७ साली विजयी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वीच सरासरी वाढ गृहीत धरुन मतदारसंघांची फेररचना करण्यात आली. या फेररचनेत अमरावती जिल्हा परिषदेमध्ये ७ मतदारसंघांची वाढ झाली असून एकूण संख्या ५९ वरुन ६६ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता घ्याव्या लागणाऱ्या निवडणुका किती जागांसाठी होणार, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. नेमकी हीच उत्सुकता शमविण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने लोकसंख्येची माहिती मागवली असून त्याआधारे मतदारसंघांची संख्या सांगितली जाणार आहे. लोकसंख्येची माहिती तयार ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार मागविण्यात आलेली लोकसंख्येची माहिती जिल्हा प्रशासनाकडे तयार आहे. राज्य शासन व निवडणूक आयोगाने तीन महिन्यांपूर्वीही हीच माहिती मागविली होती. त्यामुळे नेमका तोच ‘डाटा’ पुढे करुन ग्रामविकास विभागाकडे माहिती पाठविण्याची प्रशासकीय तयारी शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वातील जिल्हा परिषद निवडणूक विभागाने केली आहे. त्याचवेळी या माहितीची एक प्रत राज्य निवडणूक आयोगालादेखील पाठविली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भरत नाट्य संशोधन मंदिराची वार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी पांडुरंग मुखडे यांची तर उपाध्यक्षपदी भाग्यश्री देसाई यांची निवड झाली आहे. सुमारे 131 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराची निवडणूक बिनविरोध होण्याची सलग दुसरी वेळ आहे. भरत नाट्य संशोधन मंदिराची सर्वसाधारण सभा आणि वार्षिक निवडणूक आज (दि. 18) भरत नाट्य मंदिर येथे झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहन मुळ्ये यांनी काम पाहिले. सन 2025-2026 या वर्षासाठी पदाधिकारी निवड झाली आहे. कार्यकारिणीत अध्यक्ष - पांडुरंग मुखडे, उपाध्यक्ष - भाग्यश्री देसाई, विश्वस्त - अनिवाश ओगले, कार्याध्यक्ष - अभय जबडे, कार्योपाध्यक्ष - चारुलता पाटणकर, कार्यवाह - संजय डोळे, सहकार्यवाह - राजेंद्र उत्तुरकर, खजिनदार - अविनाश बेलसरे, नियामक मंडळ सदस्य - शंतनू खुर्जेकर, श्याम भुर्के, भक्ती पागे, कार्यकारी मंडळ सदस्य - प्रचिती सुरू-कुलकर्णी, विश्वास पांगारकर, राजन कुलकर्णी, प्रियांका गोगटे, अंतर्गत आयव्यय - अपर्णा पेंडसे यांचा समावेश आहे. अध्यक्ष पांडुरंग मुखडे म्हणाले, भरत नाट्य संशोधन मंदिराचे पदाधिकारी रसिकांसाठी आणि संस्थेसाठी राबवित असलेल्या उपक्रमांबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रसिकांच्या मागणीनुसार गेल्यावर्षी दिवाळीत संगीत नाट्य महोत्सव सुरू करण्यात आला. नुकताच वासंतिक नाट्य महोत्सवही रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला. भविष्यातही विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे.
व्यावसायिकाला बाजारभावापेक्षा कमी दरात कपडे विक्रीच्या आमिषाने हडपसर भागातील एका कपडे विक्रेत्याची तीन कोटी ४६ लाख ५९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रोहित हरीश नागदेव, त्याची पत्नी टीना उर्फ मीनाक्षी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कपडे विक्रेत्याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे हडपसर भागात कपडे विक्री दुकान आहे. त्यांच्या पुणे जिल्ह्यात दहा शाखा आहेत. २०२३ मध्ये रोहित नागदेवने कपडे विक्रेत्याची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात घाऊक स्वरुपात कपडे विक्रीचा व्यवसाय असल्याचे नागदेवने त्यांना सांगितले. तसेच नागदेवने त्यांना कपड्यांचे नमुने दाखविले. त्यानंतर जानेवारी महिन्यात त्याने पुन्हा कपडे विक्रेत्याची भेट घेतली आणि चर्चा केली होती. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत कपडे विक्रीचे आमिष त्याने दाखविले. त्यानंतर व्यावसायिकांनी नागदेव आणि त्याची पत्नी टीना यांच्या खात्यात एकूण मिळून तीन कोटी ४६ लाख ५९ हजार ९२० रुपये जमा केले. पैसे जमा केल्याानंतर नागदेव विविध प्रकारचे कपडे त्यांना देणार होता. १० मे रोजी त्यांनी नागदेवच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर व्यावसायिकाने चौकशी केली. तेव्हा नागदेवचा पिंपरी परिसरात घाऊक स्वरुपात कपडे विक्रीचा व्यवसाय नसल्याचे समजले, तसेच नागदेव पिंपरीत वास्तव्यास नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर व्यावसायिकाने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात दुचाकीच्या धडकेनंतर झालेल्या वादातून एका टोळक्याने तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश भालके (21) आणि देवा डोलारे (22) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी रात्री अमित लकडे (28) यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. मध्यरात्री दीडच्या सुमारास लकडे, त्यांचे बहिणीचे पती उमेश शिंदे आणि गणेश सूर्यवंशी हे चिंतामणी हॉस्पिटलमधून औषध घेऊन परतत होते. त्यावेळी अक्षय भालकेची दुचाकी घसरून लकडे यांना धडक दिली. या घटनेनंतर रात्री दोनच्या सुमारास लकडे हनुमान मंदिराजवळ फिरत असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. पोलिसांकडे तक्रार दिल्याचे कारण देत आरोपींनी शिवीगाळ केली. बाळा गाडेने पिस्तुलातून गोळीबार केला. आरोपींनी पिस्तूल हवेत रोखून दहशत निर्माण केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत. तोडफोडीनंतर गोळीबाराची घटना बिबवेवाडी भागात शुक्रवारी मध्यरात्री किरकोळ वादातून टोळक्याने दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री वादातून टोळक्याने तरुणावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. एकापाठोपाठ दोन गंभीर घटना घडल्याने बिबवेवाडीत भागात घबराट पसरली आहे.
मेधा पाटकर यांची भीमनगरला भेट:रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे द्या; पुनर्वसन नोटीस रद्द करण्याची मागणी
झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पौड रस्ता येथील भीमनगरच्या रहिवाशांची सहमती नसताना देखील घरे खाली करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिलेली नोटीस मागे घ्यावी. भीमनगरवासीयांना आहे त्याच ठिकाणी घरे देऊन योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी केली आहे. भीमनगर वाचविण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केलेल्या आवाहनानुसार मेधा पाटकर यांनी भीमनगरला भेट देऊन भीमनगरवासीयांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या. न्यायासाठी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाटकर यांनी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी देविदास ओहाळ यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते. भीमनगरच्या पुनर्वसनासाठी भक्ती इंटरप्राईजेस या संस्थेने भीमनगर वासियांना मोठमोठी आश्वासने दिली. आहे त्याच जागेवर चांगली घरे देण्याचे मान्य केले. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे वस्तीतील 70 टक्के कुटुंबांची संमती मिळण्यापूर्वी 50 कुटुंबांना वारजे येथे पाठवण्यात आले. त्यापैकी पंधरा कुटुंब भीम नगर मध्ये परत आली. या कुटुंबांना ज्या ठिकाणी पाठविण्यात आले, ती इमारत सदर विकासकाने नव्हे तर महापालिकेने बांधलेली असल्यामुळे उर्वरित 35 कुटुंबांना जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली. एक प्रकारे ही भीमनगरवासियांची फसवणूकच आहे, अशी टीका पाटकर यांनी केली. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांमध्ये सर्वात मोठा घोटाळा हा विकास हक्क हस्तांतरणात केला जातो. विकास मोक्याच्या जागा ताब्यात घेऊन गरिबांना दूर कुठेतरी नेऊन टाकतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात घर मिळवण्यासाठी पात्र, अपात्र ठरवताना काही अपात्रांना पात्र तर पात्रांना अपात्र ठरविले जाते, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले. त्यावर, काही राजकीय नेते आणि महापालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून विकासकाने घरे न बांधताच शेकडो कोटीचा टीडीआर घोटाळा केल्याचे भीम नगरच्या रहिवाशांनी पाटकर यांच्या निदर्शनास आणून दिले. ज्याप्रमाणे जुन्या गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासाचा अधिकार आहे त्याचप्रमाणे नागरवस्त्यांना देखील स्वयंव विकासाचा हक्क आहे. मात्र, पुढारी, अधिकारी आणि विकासक यांची अभद्र युती हा हक्क झोपडवासियांना मिळू देत नाहीत, याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले. भीमनगरच्या आंदोलक आणि रहिवाशांना आपला पाठिंबा जाहीर करून पाटकर म्हणाल्या की, भीमनगरमधील रहिवाशांपैकी 90 टक्के रहिवासी दलित आणि कष्टकरी आहेत. ते संविधानाला अनुसरून न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे महापालिका, तक्रार निवारण प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाचा नगर विकास विभाग यांच्याकडून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी देखील मेधा पाटकर यांनी केली.
आयुष्यात गुरू, ग्रंथ हे केवळ तुमचे पथदर्शक म्हणून काम करत असतात. शेवटी जीवनातील प्रत्येक परिस्थितीचा सामना हा तुमचा तुम्हालाच करायचा असतो. त्यामुळे जोपर्यंत तुमच्यात आत्मविश्वास आहे, तोवर तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते शाहू मोडक यांच्या पत्नी, ज्योतिषी, हिंदी कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शाहू मोडक यांनी आयुष्य जगण्याचा मंत्र दिला. निमित्त होते पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने आयोजित ‘मी प्रतिभा शाहू मोडक’ या प्रकट मुलाखतीचे. नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदिका विनया देसाई यांनी मोडक यांची मुलाखत घेतली. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले आणि संस्थेच्या सर्व महिला पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होत्या. 'जैन साध्वी ते सुविद्य पत्नी' असा प्रतिभा शाहू मोडक यांचा प्रेरणादायी व अनोखा प्रवास यानिमित्ताने उपस्थितांसमोर आला. मध्यम कुटुंबात झालेला जन्म आणि मुलगी झाल्यानंतर हिरा सोडून दगड हातात आला ही वडिलांची पहिली प्रतिक्रिया यांबद्दल सांगताना प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या, “वडिलांना हुंडा द्यावा लागला असता म्हणून मुलगी नको होती पण माझा जन्म झाला. नाळ पुरताना त्या ठिकाणी वडिलांना चांदीच्या नाण्यांचा घडा हाती लागल्याने ते खुश झाले. यानिमित्ताने घरात संपत्ती आली म्हणून माझे नाव शांती ठेवले. पुढे मोठ्या बहिणीला बाळंतपणात झालेला त्रास पाहिला आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. जैन धर्मात एकतर लग्न करून नवऱ्याच्या घरी जा अथवा साध्वी व्हा हेच दोन पर्याय असल्याने मी साध्वी झाले. मात्र तिथे असताना मी स्वत:शीच प्रतारणा करत असल्याचे अनेकदा वाटायचे. शेवटी निर्णय घेतला आणि आश्रमातून बाहेर पडले. पुढे शाहू मोडक यांच्याशी लग्न झाले आणि साध्वी ते पत्नी असा प्रवास अनुभवता आला. शाहू मोडक मला कायम त्यांची शक्ती मानायचे, त्यांचे माझ्यावर प्रेम होतेच मात्र ते मला समान दर्जा, मान आणि सन्मान द्यायचे. ते खऱ्या अर्थाने देव माणूस होते. हे मला कायम कोणत्यातरी पुरस्काराहून अधिक मौल्यवान वाटत आले आहे, असे मोडक यांनी आवर्जून सांगितले. मी गेल्यानंतर मुंबई ऐवजी तू पुण्यात रहा. या शहरात तुला आपुलकी, जीवाभावाची माणसे, सामाजिक स्थैर्य आणि समाधान मिळेल असा शाहू मोडक यांनी पुणे शहरावर दाखविलेला विश्वास या शहराने या शहरातील अनेक माणसांनी सार्थ ठरविला अशा कृतज्ञ भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या.
पैठण शहरालगत शहागड रस्त्यावरील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या १४ मजुरांना विषबाधा झाली. रविवारी (१८ मे) सकाळी सुमारे ७ वाजता हा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून उर्वरित 12 मजुरांवर शहरातील एक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ललिता प्रेमलाल पालविया असे मृत महिलेचे नाव असून ती मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी दिली. शिळे मासे आणि चिकन खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पैठण शहरालगत शहागड रोडवर अनेक वीटभट्ट्या आहेत. या ठिकाणी मध्य प्रदेश येथील मजूर काम करतात. शुक्रवारच्या आठवडा बाजारातून मजुरांनी चिकन, मासे खाण्यासाठी घेतले. या कामगारांनी शनिवारी देखील तेच शिळे चिकन खाल्ले. त्यानंतर रविवारी सकाळी अनेक मजुरांना उलटी, मळमळ, पोटदुखी आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. विषबाधा झालेल्यांमध्ये ललिता पालविया यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. उपचार घेत असलेले मजूर पुढीलप्रमाणे या सर्वांची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. शिळे चिकन खाल्ल्याने विषबाधा “शुक्रवारी घेतलेले चिकन आमच्याकडून शनिवारी रात्री शिजवून खाल्ले गेले. त्यानंतरच सगळ्यांना त्रास होऊ लागला.” असे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मंगल ठाकरे यांनी सांगितले.
सोलापूरात टॉवेल कारखान्यात भीषण आग; ८ ठार
सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षारक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळविले. तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळ आल्या. कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी […] The post सोलापूरात टॉवेल कारखान्यात भीषण आग; ८ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर परिसरात नुकताच सुरु करण्यात आलेला भुयारी मार्ग (अंडरपास) पहिल्याच पावसात बंद पडला. रविवारी 18 मे रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे या मार्गावर पाणी साचले. पावसाचे पाणी भिंतींना पडलेल्या तड्यांमधून थेट बाहेर झिरपत होते. मुसळधार पावसामुळे भुयारी मार्गात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. पाणी तड्यांमधून झिरपून बाहेर येत असल्याचे चित्र बघायला मिळाले. काही महिन्यांपूर्वीच झाले होते उद्घाटन भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांनी यावर संताप व्यक्त केला. या भुयारी मार्गाचे उद्घाटन काही दिवसांपूर्वीच करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात ही सुविधा निकामी ठरल्याचे चित्र दिसले. तब्बल 6 महिने काम लांबले दरम्यान, या भूयारी मार्गाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) लाइनमुळे सहा महिने काम लांबले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा मार्ग सुरू झाला. मात्र पहिल्याच पावसात तो बंद पडल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. 200 मीटर लांबीचा भूयारी मार्ग शिवाजी नगर परिसरातील 200 मीटर लांबीचा हा रेल्वे भुयारी मार्ग आहे. यामध्ये 3.5 मीटर मार्गाची उंची आहे. या मार्गासाठी 11.47 कोटी निधी खर्च झाला. 15 ऑक्टोबर 2023 ते 15 ॲाक्टोबर 2024 प्रकल्पाचे काम वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु, 6 महिने काम रखडल्याने हा मार्ग खुला होण्यासाठी 18 महिने लागले. पुलासंदर्भातील सविस्तर माहितीसाठी खालील बातमी वाचा शिवाजीनगर भुयारी मार्ग आजपासून खुला:नागरिकांच्या 14 वर्षांच्या लढ्याला अखेर यश, 30 मिनिटांचा प्रवास अवघ्या एका मिनिटात नागरिकांच्या लढ्याला १४ वर्षांनंतर यश मिळाले आहे. सातारा-देवळाईसह ४८ खेड्यांतील ५ लाख नागरिक, १ लाख वाहनधारकांसाठी शिवाजीनगर भुयारी मार्ग आज शनिवारी (१५ फेब्रुवारी) सुरू करण्यात आला. ८ किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना ३० मिनिटे प्रवास करावा लागत होता. हे अंतर आता २०० मीटरवर आले आहे. हा प्रवास आता १ मिनिटात पूर्ण होणार आहे. दरम्यान, शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भुयारी मार्गातून बस नेऊन ट्रायल घेण्यात आली.
हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा तलावासाठी कंत्राटदाराने रात्रीच्या वेळी ब्लास्टींग केली असून यामुळे परिसरातील चार ते पाच घरांना तडे गेल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी काम बंद पाडले. तर दुसरीकडे रविवारी ता. १८ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला समज देण्याऐवजी गावकऱ्यांवरच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले आहे. या प्रकारामुळे आता गावकरी अन् जलसंपदा विभागात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. हिंगोली तालुक्यात जलसंपदा विभागाकडून पिंपळखुटा तलावाचे काम हाती घेण्यात आले आहे. या तलावासाठी सुमारे ३८० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून यामध्ये पिंपळखुटा, भोगाव, बासंबा शिवारातील जमिनींचा समावेश आहे. या तलावामध्ये ११ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे. या पाणीसाठ्यामुळे १४४१ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. या तलावाचे बांधकाम जलसंपदा विभागाने एका कंत्राटदाराला दिले आहे. संबंधित कंत्राटदाराने तलावाच्या पाळूचे काम करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ब्लास्टींग केली. यामध्ये जमिनीमध्ये छिद्र करून सुमारे ३०० तोटे उडवण्यात आल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या ब्लास्टींगच्या मोठ्या आवाजामुळे गावकरी घाबरून गेले, तर लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या ब्लास्टींगमुळे चार ते पाच घरांच्या भिंतींना तडे गेले असून एका घराच्या टॉवरच्या काचा फुटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास कामबंद करण्याची मागणी केली. त्यानंतर आज जलसंपदा विभागाचे अभियंता धनंजय येस्के यांनी गावकऱ्यांची भेट घेतली. मात्र गावकरी भरपाईच्या मागणीवर ठाम असून नुकसान भरपाई दिल्याशिवाय काम सुरु करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या प्रकरणात अभियंता यस्के यांनी थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार करण्याची तयारी सुरु केली आहे. काही गावकऱ्यांनी तलावाचे काम बंद पाडल्याची तक्रार येस्के यांनी पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणात पोलिसांनीही चौकशी सुरु केली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता ब्लास्टींग केली या तलावाच्या कामाला आमचा विरोध नाही. मात्र कंत्राटदाराने कुठलीही पूर्वसूचना न देता ब्लास्टींग केली. याच्या आवाजामुळे गावकरी भीतीच्या छायेखाली असून चार ते पाच घरांना तडे गेले आहेत. यामध्ये फुटलेली काच लागून एक गावकरी जखमी झाला आहे. दोषींवर कारवाई करून नुकसान भरून द्यावे, असे पिंपळखुटाचे ग्रामस्थ संतोष पाखरे यांनी म्हटले आहे. या कामाची सखोल चौकशी केली जाईल तलावाच्या ठिकाणी झालेल्या ब्लास्टींगबाबत महसूलच्या अधिकाऱ्यांसह चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तलावाच्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात त्यात पाणी साचून दुर्देवी घटना घडू नये, यासाठी काम करू देण्याची विनंती गावकऱ्यांना केली आहे, असे जलसंपदा विभागाचे अभियंता धनंजय येस्के यांनी सांगितले.
संपूर्ण जगामध्ये १८ मे १९७७ पासून जागतिक संग्रहालय दिवस साजरा केला जातो. या दिवशी विविध वस्तु संग्रहालये किंवा ऐतिहासिक संग्रहालयांना जाणकार, रसिक भेट देत असतात. यानिमित्ताने सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयांची माहिती घेऊ. महाराष्ट्रात विविध विषयावरील १३२ संग्रहालये आहेत. व्यक्ती, विविध विषयांवरील वस्तू, कलादालने असे यात मुख्य प्रकार आहेत. सातारा जिल्ह्यात औंध येथील श्री भवानी चित्र संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर समाधी परिसरातील कर्मवीर वस्तुसंग्रहालय अशी संग्रहालये आहेत. सातारा येथे जुन्या काळात सातारा ऐतिहासिक संग्रहालय होते. त्याला पारसनीस संग्रहालय असे म्हटले जायचे. हे संग्रहालय ब्रिटिशांनी सुरुवातीला पुण्यातील मराठा इतिहास संग्रहालयात १९३९ साली विलीन केले. आता सातारा जिल्ह्यातील काही संग्रहालयांची थोडी माहिती पाहू 1) श्री छत्रपति शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा सातारा जिल्हा हा ऐतिहासिक, क्रांतिकारक, शैक्षणिक सांस्कृतिक वारसा लाभलेला जिल्हा आहे. शाहू छत्रपतींनी नियोजनबद्ध पद्धतीने वसवलेले हे शहर असून मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखले जात असे. सातारा येथे सन १८३९ सालापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यांनी राज्य केले. सातारा येथील संग्रहालय आणि ऐतिहासिक स्थळे प्रामुख्याने लोकांना प्रेरणादायी वाटतात. सन १९६६ साली या संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व सन १९७० साली त्याचे काम पूर्ण झाले. या संग्रहालयाचे उद्घाटन सातारच्या राजमाता श्री. छत्रपती सुमित्राराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. हे संग्रहालय काही वर्षे सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या एका इमारतीत होते. आता नव्याने या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाची एक चांगली व भव्य इमारत झालेली आहे आणि या इमारतीत या वस्तू संग्रहालयातील साहित्याची आता व्यवस्थित व नियोजनबद्ध पद्धतीने मांडणी केलेली आहे. लंडनच्या म्युझियम मधून खास आणलेली ऐतिहासिक शिवाजी महाराजांची वाघनखे याच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पर्यटकांना व अभ्यासकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी हजारो पर्यटकांनी व अभ्यासकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या संग्रहालयाला भेट देऊन त्याची पाहणी केली. या संग्रहालयाच्या रचनेतून १७ व्या व १८ व्या शतकातील संस्कृतीचे दर्शन घडते. हे संग्रहालय प्रदर्शित वस्तू आणि मराठा कला दालन, अशा दोन भागात आहे. येथील प्रदर्शित वस्तूंचे शस्त्र विभाग, कोरीव काम विभाग, चित्रकला दालन आणि वस्त्र दालन असे विभाग आहेत. या संग्रहालयात भरपूर शस्त्रास्त्रे, निरनिराळी वस्त्रे पहावयास मिळतात. 2) श्री भवानी चित्र संग्रहालय, औंध ( ता. खटाव जि. सातारा) श्री भवानी चित्र-संग्रहालयाची स्थापना १९३८ साली झाली. या संग्रहालयात प्रदर्शनीय वस्तूंची संख्या ५ हजार ५२ आहे. विविध प्रदेशांत निर्माण झालेली व त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगणारी ऐतिहासिक व पौराणिक चित्रे, संगमरवरी शिल्पे, कोरीव काम केलेल्या धातूच्या व लाकडाच्या वस्तू, पेंढा भरलेले प्राणी, जुनी घड्याळे, हस्तिदंती कोरीव वस्तू या संग्रहालयात आहेत. याशिवाय समृद्ध असा स्वतंत्र बालविभागही येथे आहे. 3) कर्मवीर भाऊराव पाटील वस्तुसंग्रहालय सातारा येथील कर्मवीर समाधी परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील वस्तुसंग्रहालय आहे. यामध्ये कर्मवीरांनी वापरलेल्या काही वस्तू, तसेच त्यावेळची छायाचित्रे, कर्मवीरांची वापरातली गाडी, रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारी काही माहितीची दालने येथे आहेत. कर्मवीरांच्या कार्याचा व रयत शिक्षण संस्थेचा इतिहास समजून घ्यायचा असेल, तर या संग्रहालयाचा नक्कीच भेट देऊन उपयोग करून घ्यावा. 4) वेणूताई चव्हाण स्मारक कराड येथे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा विरंगुळा हा बंगला आहे की जो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे आहे. तेथेही यशवंतराव चव्हाण यांच्या काही वस्तू, फोटोग्राफ्स अभ्यासकांना पाहायला मिळतात. तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणुताई चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ वेणूताई चव्हाण स्मारक मंदिर स्मारक समितीने उभारले असून येथेही यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण ह्या या दोघांची वापरात असलेली मोटर कार, तसेच यशवंतराव चव्हाण यांचे मृत्युपत्र, यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांच्या व्यक्तिगत अभ्यासिकेत असलेली ग्रंथसंपदा, वेणुताई चव्हाण व यशवंतराव चव्हाण यांच्या विवाहाची पत्रिका, त्यांनी वापरलेले कपडे, काही छायाचित्रे, त्यांना मिळालेल्या तलवारी, भेटवस्तू यांचेही दालन आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील इतरही प्रेक्षणीय स्थळे याशिवाय सातारा येथे नवा व जुना राजवाडा तसेच जलमंदिर, आदालत वाडा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाबाई आंबेडकर यांचे जरंडेश्वर नाका परिसरात असलेले स्मारक, सदर बाजार परिसरात असलेले व महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राहते घर, त्याच बरोबर राजवाडा इमारतीत भरणारे श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल व तेथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेल्या वेळचे रजिस्टर हे पाहण्यासारखे आहे. कराड जवळील आगाशिव चा डोंगरातील बौद्ध लेणी व चैत्यगृहे हे सुद्धा अभ्यासासाठी म्हणून बघितलीच पाहिजेत. त्याचबरोबर फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा, हेमाडपंती असलेले जबरेश्वर मंदिर, कृष्णा वेण्णा नदीकाठच्या संगमावर असलेले संगम माहुली, क्षेत्रमाहुली येथील अनेक जुनी देवालये ही नक्कीच शिल्पकलेच्या अभ्यासकांनी पाहिलीच पाहिजेत.
मराठा संघटनांची सोमवारी बंदची हाक
बीड : परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील तरुण शिवराज दिवटे याला सप्ताहात झालेल्या किरकोळ वादावरून १९ ते २० तरुणांनी काठी,बेल्ट आणि रॉडने मारहाण केली. या प्रकरणामध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी सोमवार दि. १९ मे रोजी परळी आणि बीड बंदची हाक दिली आहे. शिवराजला मारहाण करणा-या सात जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोपींवर मकोका […] The post मराठा संघटनांची सोमवारी बंदची हाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज बारामतीमध्ये उत्साही वातावरणात मतदान पार पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. यावेळी मतदान केंद्रात अजित पवार यांची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी अचानक भेट झाली. हर्षवर्धन पाटील हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. या भेटीदरम्यान दोघांमध्ये मिश्किल टोलेबाजी रंगली. यावेळी दोघांनी मुक्तपणे संवाद केला असून दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले. बॅलेट पेपरवर शिक्के मारल्यानंतर अजित पवार ते मतपेटीत टाकण्यासाठी आले असता त्यांना समोर हर्षवर्धन पाटील दिसले. हर्षवर्धन पाटलांना पाहताच अजित पवार हसले, त्यांचा हात हातात घेतला आणि हलक्या स्वरात म्हणाले, लक्ष राहू द्या आमच्यावर! यावर हर्षवर्धन पाटील यांनीही तितक्याच मिश्किल अंदाजात चांगलं ठेवलंय की! असे उत्तर दिले. यानंतर अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना मिश्किल शैलीत विचारले, चिठ्ठी बरोबर काढली का? यावर हर्षवर्धन पाटलांनीही चुकलं नाय ना काय बघा! असे म्हणत त्यांची थट्टा केली. यावर आम्ही पाच संस्थांवर आहोत, आम्हाला माहितीच नाही! असे म्हणत अजित पवारांनी मार्मिक टोला लगावत उत्तर दिले. दोघांच्या संवादाने मतदान केंद्रावर चांगलाच हशा पिकला. या दोघांमधील संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, मतदारांमध्येही या संवादाने मनोरंजनाची लहर निर्माण केली आहे. शेतकरी कामगारांसाठी निवडणूक पाहायला हवी दरम्यान, या प्रसंगानंतर हर्षवर्धन पाटील यांन माध्यमांशी संवाद साधला. बारामती आणि इंदापूरच्या कार्यक्षेत्रात हा कारखाना आहे. या कारखान्याचा मी प्रतिनिधी आहे. मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो. सहकारामध्ये कुठला पक्ष वगैरे काही नसतो. सर्वांनी एकत्रित येऊन इथे पॅनेल केलेला आहे, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. आपण पाहाताय महाराष्ट्रातील सहकारातील साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे. ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आलेला आहे. साखर कारखान्यामध्ये काम करणारे कामगार अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे सहकारी कारखान्यात कुठलेही राजकारण आणले नाही पाहिजे. सर्वच नेत्यांनी राजकीय मतभेद विसरुन शेतकरी कामगारांसाठी निवडणूक पाहायला हवी. सर्वांचे सहकार्य असायला हवे, असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले. अजित पवार आणि माझी नेहमीच भेट होते. ते आले मला म्हणाले, आमच्या पॅनेलला मतदान करा. मी त्यांना म्हटले आमचे तुमचे काय? शेतकऱ्यांचे पॅनेल आहे, असेही ते म्हणाले. आर्थिकदृष्ट्या साखर कारखाना महत्त्वाचा दुसरीकडे अजित पवार म्हणाले, राजकीय दृष्ट्या नाही, तर आमच्या आर्थिक दृष्ट्या आमच्या 53 गावातल्या इंदापूर आणि बारामती तालुक्यातील दृष्टीने हा साखर कारखाना फार महत्त्वाचा आहे. मी सभासद आहे, माझे वडील, माझे आजोबा सभासद होते. आमच्या परिवाराचे अनेक जण सभासद आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
परळी : परळीत शुक्रवारी शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला दहा ते बारा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. अपहरण करून एका टेकडीवर नेत त्याला पट्टा, लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करण्यात आली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण खूनाची दहशत अद्याप कायम आहे. त्यात पुन्हा एका तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण आणि तुझा संतोष देशमुख पार्ट टू […] The post कराडची बी गँग ऍक्टिव्ह! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
परळीत ३ दशकांची सत्ता म्हणूनच माज
बीड : शिवराज दिवटे या युवकाला अपहरण करून मारहाण झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. तुझा संतोष देशमुख पार्ट टू करू, अशी धमकी मारहाण करणा-या आरोपींनी दिल्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आज शिवराज दिवटे याची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्याचा वडीलांशीही त्यांनी चर्चा केली. परळीत […] The post परळीत ३ दशकांची सत्ता म्हणूनच माज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हरिजन सेवक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मोहन जोशी
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतिगृहे आणि शाळा चालविल्या […] The post हरिजन सेवक संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी मोहन जोशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मान्सून वा-याच्या वेगाने दाखल होणार
पुणे : केरळात वा-याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये अंदाजे २७ मे रोजी मान्सून (चार दिवस कमी-अधिक) दाखल होईल, अशी सरासरी तारीख अपेक्षित धरली तरी राज्यात मान्सून कोणत्या क्षणी दाखल होईल, अशी तारीख देता येत नाही. त्यास अनेक कारणे असले तरी यंदा राज्यात मान्सून भरभरून कोसळणार असल्याचे संकेत आहेत. […] The post मान्सून वा-याच्या वेगाने दाखल होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पवार साहेबांमुळेच राज्यात महिलांना आरक्षण
पुणे : महिला आरक्षणाचे विधेयक मान्य होणार नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज थांबणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी घेतली आणि महिलांना ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक मान्य झाले. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरुवात झाली असे मत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. जागतिक मातृदिनानिमित्त बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या ‘मातृनाम […] The post पवार साहेबांमुळेच राज्यात महिलांना आरक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशभरातील 17 खासदारांना यंदाचा 'संसदरत्न पुरस्कार 2025' जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राने या पुरस्कारासाठी बाजी मारली असून, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे यांच्यासह राज्याचे 7 खासदार पुरस्काराच्या मानकरी ठरले आहेत. प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेने प्रत्येक वर्षी संसदेत उत्कृष्ट, सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खासदारांना हा पुरस्कार दिला जातो. या निवडीसाठी प्रश्न विचारणे, वादविवादात सहभाग, कायदेविषयक योगदान आणि समित्यांमध्ये केलेल्या कामांचा मूल्यांकन आधार ठरला. निवडीसाठी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखालील ज्युरी समितीने निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदारांची नावे: सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गट) श्रीरंग बारणे (शिवसेना - शिंदे गट) अरविंद सावंत (शिवसेना - उद्धव ठाकरे गट) नरेश म्हस्के (शिवसेना - शिंदे गट) स्मिता वाघ (भारतीय जनता पक्ष) मेधा कुलकर्णी (भारतीय जनता पक्ष) वर्षा गायकवाड (काँग्रेस) सुप्रिया सुळे यांचा गौरव सुप्रिया सुळे या 16वी आणि 17वी लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांपैकी एक असून यंदाही त्यांचे संसदीय योगदान लक्षणीय ठरले आहे. त्यांच्या सोबतच श्रीरंग बारणे, भर्तृहरि महताब आणि एन. के. प्रेमचंद्रन यांनाही हा विशेष संसदरत्न सन्मान मिळाला आहे. यांचाही होणार सन्मान यावर्षी 4 खासदारांना त्यांच्या दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण योगदानासाठी विशेष संसदरत्न सन्मान देखील देण्यात आला आहे. यामध्ये भर्तृहरि महताब, सुप्रिया सुळे, एन. के. प्रेमचंद्रन, आणि श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. हे चार खासदार 16व्या आणि 17व्या लोकसभेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारे ठरले असून, त्यांच्या कार्यकाळातही ते तितक्याच सक्रियतेने कार्यरत आहेत. प्रवीण पटेल (भाजप), रवि किशन (भाजप), निशिकांत दुबे (भाजप), विद्युत बरण महतो (भाजप), पी. पी. चौधरी (भाजप), मदन राठौर (भाजप), सी. एन. अन्नादुरई (द्रविड मुनेत्र कळघम) आणि दिलीप सैकिया (भाजप) यांचा समावेश आहे.
सोलापुरात टॉवेल कारखान्याला भीषण आग; ३ ठार
सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल कंपनी या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान लागलेल्या या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आणखीही काही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असून प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू […] The post सोलापुरात टॉवेल कारखान्याला भीषण आग; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : क्रिकेटच्या या सर्वात जुन्या फॉरमॅटला जिवंत ठेवल्याबद्दल विराटचे सर्वत्र कौतुक झाले. त्यातच आता भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना याने विराट कोहलीला भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. टीम इंडियाची रनमशिन धडाकेबाज फलंदाज विराट कोहली याने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. टी २० आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर विराट केवळ वनडे क्रिकेट खेळत राहणार आहे. […] The post विराट कोहलीला भारतरत्न द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूरच्या खापरखेडा गावात रविवारी (दि. 18) भाजपने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत 'सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान' अशा शब्दांत इशारा दिला. या रॅलीत त्यांनी 'ऑपरेशन सिंधूर'च्या यशाबद्दल भारतीय सैन्याची स्तुती केली आणि पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधातील लढाईत भारताच्या सैन्याची क्षमता दाखवली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली असली तरी भारतीय सैन्याविषयीचा विश्वास दाखवला पाहिजे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांमुळे सैन्यावरील विश्वास कमी होतो. या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः सहभागी झाले होते आणि त्यांनी एक किलोमीटर अंतर चालत यात्रा पूर्ण केली. यात्रेच्या समारोपानंतर आयोजित सभेत त्यांनी भारतीय सैन्याच्या सामर्थ्याबद्दल बोलताना, 'ऑपरेशन सिंधूर'च्या यशाबद्दल गौरव केला. त्यांनी मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून भारताने स्वतःच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती केली असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पाकिस्तानने गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम जाहीर केला. आज भारताची संरक्षणक्षमता पाकिस्तानपेक्षा चार ते पाच पटीने अधिक आहे. भारत जगातील पहिल्या पाच सामरिक शक्तींपैकी एक आहे. आज 'ऑपरेशन सिंदूर'चे यश हे आपल्या सैन्यबळाचे आणि 'मेक इन इंडिया' शस्त्रसज्जतेचे जिवंत उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय सेनेवर अविश्वास दाखवणाऱ्यांना 'जय हिंद' म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसने ‘जय हिंद यात्रा’ काढली, ही स्वागतार्ह बाब असली तरी ती केवळ राजकीय यात्रा होऊ नये, ही आमची अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलत आहेत, ते पाहता त्यांच्या वक्तव्यात भारतीय सेनेबद्दलचा अविश्वास दिसतो. एकीकडे सेनेवर शंका घेता, दुसरीकडे ‘जय हिंद’ म्हणता – हे दोघे एकत्र चालणार नाही. ‘जय हिंद’ तेव्हाच म्हणता येईल, जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वासाने सेनेच्या पाठीशी उभे राहाल, असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. तुर्कीसंबंधात घेतलेला निर्णय देशभक्तीचाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुर्कीसारखा देश दहशतवादाला उघडपणे पाठिंबा देतो, हे मानवतेविरोधातील अपराध असल्याची टीका करत, भारतीयांनी अशा देशांशी व्यवहार न करण्याचा घेतलेला निर्णय हा देशभक्तीचाच एक भाग आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी भारतीय जनतेचे यासाठी अभिनंदनही केले.
कलाकारांच्या वेट लॉसचे सीक्रेट
मुंबई : बॉलिवूडमधील कलाकार वजन घटविण्यासाठी ड्रग्सचा वापर करत असल्याचा खुलासा सोनाली कुलकर्णीने केला आहे. सोनाली कुलकर्णी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम करते. मात्र ड्रग्सचा वापर करण्याला तिचा विरोध आहे. सिनेइंडस्ट्रीत वजन घटवण्याचा ट्रेंड वाढला आहे. ती म्हणाली की मला कल्पना आहे की याची मागणी आहे, कारण मी इंडस्ट्रीत काम करते. तुम्ही […] The post कलाकारांच्या वेट लॉसचे सीक्रेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावाखाली भाजपने आपलेच राजकारण पुढे नेले आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केली. परराष्ट्र दौऱ्यासाठी निवडलेल्या शिष्टमंडळावर टीका करताना त्यांनी भाजपच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार आहेत, तरीही आम्हाला डावलले गेले. शिष्टमंडळ पाठवताना आमचा विचार करण्यास भाजप तयार नव्हती. शिंदे आणि पवार गटापेक्षा आमचे प्रतिनिधित्व अधिक आहे. ही निवड पक्षीय आधारावर झालेली आहे, देशाच्या हितासाठी नव्हे,” असा आरोप त्यांनी केला. या डेलिगेशनमध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडीचं कोणी दिसतंय का तुम्हाला ? मग सर्वपक्षीय शिष्टमंडळ जातं हे ते कोणत्या आधारावर सांगतात. खासदारांच्या फौजा पाठवायची गरज काय? संजय राऊत म्हणाले की, हे शिष्टमंडळ म्हणजे सरकारच्या गुन्ह्यांचं समर्थन करण्यासाठी पाठवलेलं ‘वऱ्हाड’ आहे. काश्मीर प्रश्नावर, ऑपरेशन सिंदूरवर संसदेत चर्चा घ्यायला तुम्ही तयार नाही, आणि परदेशात जाऊन काय सांगणार आहात? परदेशात हाय कमिशन आहेतच, मग खासदारांच्या फौजा पाठवायची गरज काय? पक्षहिताचे राजकारण थांबायला हवे संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान 200 देश फिरले, तरी एक देश तरी आपल्या बाजूने उभा राहिला का? त्यामुळेच आता हे नौटंकी शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे. यामागे फक्त एकच हेतू आहे तो म्हणजे मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर परदेशात गुळगुळीत मलम लावणे, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. INDIA आघाडीच्या खासदारांनी या शिष्टमंडळावर बहिष्कार टाकावा. देशहिताच्या नावाखाली भाजपच्या पक्षहिताचे राजकारण केले जात आहे, हे थांबायला हवे. वाझे सेवेत येऊ नये म्हणून पवारांना भेटलो होतो सचिन वाझे पुन्हा पोलिस सेवेत येऊ नये यासाठी मी स्वत: शरद पवारांना भेटलो होतो, असा मोठा खुलासा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या नव्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संजय राऊत म्हणाले की, मी पवारसाहेबांना स्पष्टपणे सांगितले होते की, वाझेला पुन्हा सेवेवर घेणे गडबडीचे ठरू शकते. मात्र तोपर्यंत निर्णय घेण्यात आला होता, तेव्हा तिथे अबू आजमी साक्षीला उपस्थित होते.