पहिल्याच संयुक्त सभेत राज ठाकरे यांचा जोरदार घणाघात मुंबई : प्रतिनिधी वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात. विजयाचे तंत्र माहीत असते, तेव्हा सत्तेचा माज येतो. भाजपचे सध्या तसेच सुरू आहे. यांनी मुंबई, महाराष्ट्र, देश विकायला काढला. हे मनाला वाटेल ते करायला लागले आहेत. आली कुठून हिंमत, कुणाला विचारायचे नाही, जनता नाही, काय नाही. आम्हाला वाटले म्हणून […] The post भाजपने देश विकायला काढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लंडनमध्ये राहणारे, मूळचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि सोशल मीडियावरून आपले विचार मांडणारे डॉ. संग्राम पाटील यांना शनिवारी (१० जानेवारी) मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. लंडनहून मुंबईत उतरताच पहाटे २ वाजता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली ही चौकशी करण्यात आली असून १५ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. भाजपच्या […] The post दडपशाहीविरुद्धचा ‘संग्राम’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खडी उघडी पडल्याने अपघाताच्या घटनांत वाढ
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शहरातून नागेवाडी, कारेवाडी, धामणगाव, बोळेगाव या मार्गावरुन जाणा-या डांबरी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात घडण्याच्या घटनामध्ये वाढ झाली असून या रस्त्यावरील खड्डे बुजवून उखडलेला रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. शिरुर अनंतपाळ, चाकूर यांसह उदगीर लातूर या प्रमुख […] The post खडी उघडी पडल्याने अपघाताच्या घटनांत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भ्रष्ट कमाईतून परत सत्ता मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न
लातूर : प्रतिनिधी जिल्हा निर्मितीपासून ते आजतागायत काँग्रेस पक्षाने लातूचा विकास केला, असे असताना ही २०१७ च्या महानगरपालिका निवडणूकीत लातूरच्या जनतेने विकासाच्या नावाखाली मते मागणा-या भाजपाला संधी दिली. पण या संधीसाधू लोकांना संधीच सोन करता आल नाही. या संधी साधू लोकांनी मागील काळात कमावलेल्या भ्रष्ट पैशातून आता परत महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या […] The post भ्रष्ट कमाईतून परत सत्ता मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस
लातूर : प्रतिनिधी मागील काळात आपन सर्वानी काँग्रेस पक्षाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत. त्याच आशिर्वादाचे सोने करीत काँग्रेस पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेचा चौफेर विकास केला आहे. मात्र भाजपच्या लोक महानगरपालिकेत सत्ता हाती घेऊन लातूर शहराच्या विकासाची गती थाबली. आज आपण पाहतो लातूर शहरात मोठ्या प्रमाणात घन कचरा, स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न असताना भाजप सरकार […] The post भाजप सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोरोना काळात तत्कालिन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे ख-या अर्थाने पालकत्व निभावले
लातूर : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या जागतिक संकटादरम्यान राज्याचे तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि लातूर जिल्ह्राचे पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याची विशेष काळजी घेतली. महामारीच्या काळात पहिल्या लाटेच्यावेळी ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ लातूरमध्ये थांबून नागरीकांना कोरोना उपचार व इतर सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून […] The post कोरोना काळात तत्कालिन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे ख-या अर्थाने पालकत्व निभावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांशी संवाद साधला. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले. पुण्यात आगामी काळात सरकार काय उपाययोजना राबवणार याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पुणे हे माझे आवडते शहर असल्याचे म्हटले आहे. मुलाखतीदरम्यान 'देवाभाऊ काय म्हणतायत?' या प्रश्नावर फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, देवाभाऊ काही म्हणत नाहीत, देवाभाऊंचे काम बोलते. अजित पवार यांच्याकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रबळ पक्ष असल्याने आम्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. मी संयम पाळला आहे, पण सध्या दादांचा संयम ढळलेला दिसतोय. १५ तारखेनंतर (मतदानानंतर) ते काही बोलणार नाहीत. सध्या आम्ही एकमेकांविरोधात लढत असलो, तरी प्रचारात मर्यादा पाळणे आवश्यक आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर टिप्पणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीवर बोलताना फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंदच आहे. राज ठाकरेंनी यासाठी मला क्रेडिट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दोन भाऊ एकत्र यावेत हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. त्यांनी प्रयत्न केले पण ते एकत्र आले नाहीत, मात्र माझ्यामुळे (राजकीय परिस्थितीमुळे) ते एकत्र आले. यासाठी बाळासाहेब मला आशीर्वादच देतील. पण आता दोन भाऊ-बहीण एकत्र येणार का, हे मला माहीत नाही, ते १५ तारखेनंतर कळेल. पुणेकरांना फुकट नको, उत्तम सेवा हवी अजित पवार यांनी महिलांना मेट्रोतून मोफत प्रवासाचे आश्वासन दिले होते, त्यावर फडणवीस यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, मी तर आज जाहीर करणार होतो की पुण्यातून उड्डाण करणाऱ्या महिलांना विमानातून मोफत प्रवास मिळेल! घोषणा करायला काय जाते, पण ते पटले पाहिजे. मेट्रो ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त मालमत्ता आहे, तिचे दर 'फेअर सिस्टम' ठरवते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याची आश्वासने देणे चुकीचे आहे. पुणेकरांना मोफत काहीही नको आहे, त्यांना रिलायबल, डिपेंडेबल आणि उत्तम सेवा हवी आहे. ही आश्वासनं पुणेकरांना नीट समजली आहेत. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर 'पाताळ लोक'चा उतारा पुण्याच्या भविष्यातील विकासावर बोलताना फडणवीस यांनी ३२ हजार कोटी रुपयांचा भव्य आराखडा मांडला. पुण्यात खाली आणि वर कुठेही जागा उरली नसल्याने आता आम्ही 'पाताळ लोक' म्हणजेच टनेल (बोगदे) तयार करणार आहोत. येरवडा ते कात्रज, पाषाण, कोथरूड, औंध आणि संगमवाडी अशा ५४ किलोमीटरच्या टनेलचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच पुण्यात २३ नवीन उड्डाणपूल उभारले जातील, त्यापैकी ८ पुलांचे काम सुरू झाले असून उर्वरित १५ पुलांचे काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल. हे पूल असे असतील की पुढील २५ वर्षे ते तोडावे लागणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. नागपूरकरांनी आपल्याला सहा वेळा निवडून दिले असले, तरी पुणे हे आपले अत्यंत आवडते शहर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. उद्धव ठाकरेंच्या 'इगो'मुळे मेट्रोचा खर्च वाढला या मुलाखतीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. मुंबई मेट्रोच्या आरे कारशेड वादावर बोलताना ते म्हणाले की, मेट्रो कामाला लोकांचा विरोध नव्हता, तर आमचे मित्र उद्धव ठाकरे यांनाच अडचण होती. आरेची जागा राखीव जंगल नाही, असा स्पष्ट अहवाल असूनही केवळ इगोसाठी त्यांनी कामाला स्थगिती दिली. यामुळे साडेतीन वर्षांचे काम तीन वर्षे पुढे गेले आणि प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला. आम्ही दहापट झाडे लावून ती मोठीही केली, पण ठाकरेंच्या हट्टामुळे जनतेच्या पैशांचे नुकसान झाले, असा आरोप त्यांनी केला.
अमरावती जिल्ह्यातील ५५७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ १५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. निवडणुकांची प्रक्रिया सुरू न झाल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी काही सरपंच संघटनांनी केली आहे. राजकीय जाणकारांनुसार, ग्रामपंचायत निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे त्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा विचार करत आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. विधी अभ्यासकांच्या मते, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ नुसार प्रशासकाला सरपंचाचे सर्व अधिकार मिळतात. मावळत्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून प्राधान्य दिल्यास गावातील विकासकामे थांबणार नाहीत आणि प्रशासनही सुरळीत चालेल, असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सर्व पंचायत समित्यांना पत्र पाठवून १ जानेवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही माहिती प्रपत्र–१ व प्रपत्र–२ मध्ये भरून सॉफ्ट व हार्ड कॉपी स्वरूपात दोन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या कार्यरत सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे राष्ट्रीय प्रधान मुखिया संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची अनेक कारणे आहेत. निवडणुका घोषित करण्यापूर्वी प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती आणि मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली आहे. तसेच, मार्चमध्ये शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांमुळे मतदान केंद्रे व शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, तर जूनपासून पावसाळा सुरू झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबवणे कठीण होईल. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या काळातच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरावती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी तालुक्याने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम पुरस्कार पटकावला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोर्शी पंचायत समितीने, तर निदर्शनांमध्ये अंजनगाव सुर्जी पंचायत समितीने अव्वल स्थान प्राप्त केले. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. यावेळी तिन्ही विजेत्यांना गौरवून पुरस्कृत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने व रजनी शिरभाते, ओपन लिंक फाउंडेशनच्या (ओएलएफ) राज्य समन्वयक चित्रा खन्ना, विस्तार अधिकारी संगीता सोनोने तसेच जिल्ह्यातील बहुतेक पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवात धारणीच्या खेळाडूंनी प्राथमिक विभागात कबड्डी (मुली), लंगडी (मुली) आणि खो-खो (मुली) मध्ये अजिंक्यपद मिळवले. तसेच, माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी (मुली) आणि खो-खो (मुले-मुली) मध्येही धारणीच्या विद्यार्थ्यांनी अव्वल यश संपादन केले. वैयक्तिक खेळांमध्येही धारणीच्या विद्यार्थ्यांनी शंभर मीटर धावणे, उंच उडी, गोळा फेक यांसारख्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोर्शीच्या विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणातून उत्कृष्ट कामगिरी बजावली. तर निदर्शनांमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार प्रदर्शन केले. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना त्यांच्या संबंधित प्रकारात प्रथमांक देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी केले. मनीष काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रसिद्धी समितीचे विनोद गाढे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले, पूनम उके आदी उपस्थित होते.
तिवसा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री एका मालवाहू ट्रकला भीषण आग लागली. टायर फुटल्याने ही घटना घडली असून, प्लास्टिकचे दाणे भरलेला ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेमुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जाणारा हा ट्रक दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळून जात असताना त्याच्या मागील चाकाचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्याने मोठा आवाज झाला आणि टायरजवळ असलेले लायनर घासल्याने ट्रकला खालून आग लागली. ट्रकमध्ये प्लास्टिकचे दाणे असल्याने आगीने त्वरित रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणातच संपूर्ण ट्रक जळून कोळसा झाला. आगीची घटना निदर्शनास येताच दोन्ही बाजूंनी येणारी वाहने थांबवण्यात आली. घटनेची माहिती तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. वृत्त लिहिपर्यंत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
तिजोरी ही जनतेच्या पैशातून तयार होते. सत्तेवर येणाऱ्यांनी त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य यासाठीच व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे, असे थोरात यांनी नमूद केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर आणि सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते. प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसत नसली तरी, काँग्रेस लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध अमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले, त्यामुळे आज भाजपामध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून, काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली तरी पक्षाची ताकद कायम आहे, असे थोरात यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी थोरात यांनी केली. भाजपाने सर्व नियम मोडीत काढून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, गुन्हेगारी आणि पाण्याची भीषण समस्या यावर सत्ताधारी ठोस भूमिका घेत नाहीत. सत्ता मिळवून भ्रष्टाचार करणे हे भाजपाचे धोरण आहे. केवळ प्रगतीच्या गप्पा मारून काहीही साध्य होणार नाही. सुसंस्कृत, विचाराधिष्ठित आणि निकोप महाराष्ट्र घडवण्यासाठी मतदारांनी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन थोरात यांनी शेवटी केले.
भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय
वडोदरा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वडोदराच्या मैदानात रंगलेल्या पहिला वनडे अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३०० धावा करत टीम इंडियासमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले होते. ते आव्हान भारताने ४९ व्या षटकात पूर्ण करीत दणदणीत विजय मिळविला. भारताने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करीत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० […] The post भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाकरे संपले अशी स्वप्ने पाहणाऱ्यांनी हे समोर बसलेले जनसागर पहावे. ठाकऱ्यांचे अस्तित्व ठरवणारा अजून जन्माला यायचा आहे! अशा कडक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. १९ वर्षांनंतर शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्यासोबत ऐतिहासिक व्यासपीठ सामायिक करताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या 'हिंदू महापौर' कार्डाचा समाचार घेतला आणि फडणवीसांना सडेतोड आव्हान दिले. आज राज यांनी मांडलेल्या पोटतिडकीच्या विचारांनी प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यात तिडीक गेली पाहिजे, तरच आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आहे, असेही ते भावूकपणे म्हणाले. महापौर पदावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने हा वाद सुरू केला. ते 'हिंदू महापौर' म्हणतात आणि आम्ही 'मराठी महापौर' म्हणतो. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? असा सवाल करत त्यांनी विचारले की, आम्हाला हिंदुत्व तपासायला सांगणारे स्वतः कोण आहेत? आम्ही प्रबोधनकारांचे नातू असून आमचे हिंदुत्व आणि मराठी प्रेम रक्तात आहे. भाजप केवळ निवडणूक आली की हिंदू-मुस्लिम आणि मराठी-अमराठी असा 'रोम्बासोम्बा' खेळायला लागते. लाचार माकडे कधीच वाघ बनू शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला. फडणवीसांना १ लाखांचे जाहीर चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विकासावरचे एक भाषण दाखवण्याचे आव्हान दिले होते. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आम्हाला चोराचा पैसा नको. मी उलट चॅलेंज देतो की, पंतप्रधान मोदींपासून तुमच्या चेल्याचपाट्यांपर्यंत, ज्यांनी हिंदू-मुस्लिम न करता केवळ विकासावर भाषण केले आहे, असे एक तरी भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला १ लाख रुपये देऊ. भाजप हे केवळ घरे पेटवून आपल्या पोळ्या भाजणारे लोक आहेत. आपलीच माणसे आपल्यावर सोडून रक्तपात घडवून आणणे हा त्यांचा धंदा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. गुजरातचा मुंबईवर डोळा मुंबईच्या इतिहासाची आठवण करून देताना उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रबोधनकारांच्या योगदानाचा उल्लेख केला. ज्या वेळी मुंबई मिळवण्यासाठी लढा सुरू होता, तेव्हा प्रबोधनकार पाच प्रमुख नेत्यांपैकी एक होते. आजही गुजरातचा मुंबईवर डोळा आहे, असा आरोप त्यांनी केला. मोरारजी देसाई या 'नरराक्षसाने' १०६ हुतात्म्यांवर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले होते, तोही हिंदूच होता. अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी हा लढा लढला. मराठी माणूस कधीही विकला जाणार नाही, हे अमर शेख यांनी तेव्हाच ठणकावून सांगितले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. अदानीचे हित जपण्यासाठी मुंबईचे 'बॉम्बे' करण्याचा डाव मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी भाजपला महापालिका हवी असल्याचा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केला. मुंबईत सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटपैकी ७० टक्के सिमेंट हे केवळ अदानीकडून घेतले जात आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपचा 'अण्णामलाई' मुंबईत येऊन जे बोलला, तेच भाजपच्या मनात आहे. मुंबईचे पुन्हा 'बॉम्बे' करणे आणि इथला मराठी टक्का संपवून शहर अदानीला देणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचा पर्दाफाश उद्धव ठाकरेंनी केला.
‘अदानीवर घाव, लाव रे तो व्हीडीओ लाव…’!
मुंबई : मुंबई महानगपालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये सर्वांचे लक्ष लागलेली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावर सुरू झाली आहे. तसेच या सभेमधून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हीडीओ’ अंदाज दाखवला. तसेच यामधून राज ठाकरे यांनी पहिला घाव उद्योगपती अदानी यांच्यावर घातला. २०१४ साली केंद्रात मोदी सत्तेवर आल्यापासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या झालेल्या प्रगतीचा आलेख […] The post ‘अदानीवर घाव, लाव रे तो व्हीडीओ लाव…’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मंगला मानवतकर यांचा सन्मान
मेहकर(बुलडाणा) : नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौ. मंगला सुरेश मानवतकर यांचा दणदणीत विजय झाला. दरम्यान सिने अभिनेते व जय साई नटराज चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्ष विजय मानवतकर व त्यांच्या सोबत सौ. सुलोचना विजय दुतोंडे जिल्हा (अध्यक्ष लहुजी सेना महिला आघाडी) व त्यांचे पती विजय […] The post नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मंगला मानवतकर यांचा सन्मान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया खोडून काढण्यासाठी भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने राबवलेल्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेले एक सक्रिय सॅटेलाईट कम्युनिकेशन डिव्हाइस सापडले आहे. यामुळे सीमापार बसलेल्या देशविरोधी कारवाया करणा-या गटांशी संपर्क साधण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले गेले आहेत. जम्मूच्या दुर्गम […] The post दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू
जिंतूर : शहरातील साबळे गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुर्त्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुनेशा तौफिक कुरेशी (९ महिने) या चिमुकलीचा उपचारादरम्यान रविवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास परभणी येथील एका खासगी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास साबळे गल्ली […] The post पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इंडियन आयडल फेम प्रशांत तामांगचे निधन
नवी दिल्ली : इंडियन आयडलच्या तिस-या पर्वाचा विजेता गायक आणि अभिनेता प्रशांत तामांग याचे रविवार दि. ११ जानेवारी निधन झाले. वयाच्या ४३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील राहत्या घरी प्रशांतचा मृतदेह आढळून आला असून, या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. प्रशांतचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत […] The post इंडियन आयडल फेम प्रशांत तामांगचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१०८ अश्वांसह काढली शौर्य यात्रा
सोमनाथ : सोमनाथ मंदिराच्या स्वाभिमान पर्वामध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. येथे १०८ अश्वांसह काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेमध्ये ते सहभाही झाले होते. ही शौर्य यात्रा सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या अगणित वीर योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिरावर झालेल्या […] The post १०८ अश्वांसह काढली शौर्य यात्रा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेचा सीरियात इसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ला
वॉशिंग्टन : अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री सीरियामध्ये दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) विरुद्ध हवाई हल्ले केले आहेत. ही कारवाई गेल्या महिन्यात पाल्मायरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एका नागरिकाच्या मृत्यूनंतर करण्यात आली. अमेरिकन सेंट्रल कमांड नुसार, हल्ल्यांमध्ये सीरियाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये इसिसच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. सेंटकॉमने सांगितले की, या ऑपरेशनमध्ये इसिसच्या ठिकाणांना, शस्त्रास्त्रांना […] The post अमेरिकेचा सीरियात इसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाच्या एका वरिष्ठ नेत्याने पाकिस्तानी लष्कराचे या दहशतवादी संघटनेसोबत असलेले थेट संबंध उघड केले आहेत. पाकिस्तानी लष्कर आपल्याला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नियमितपणे निमंत्रणे पाठवते आणि शहीद सैनिकांच्या अन्त्यविधीचे नेतृत्व करण्यासाठी बोलावते असे या नेत्याने म्हटले आहे. हाफिज सईदच्या संघटनेचा प्रमुख आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसूरी याने पाकिस्तानमधील एका शाळेत […] The post भारत मला घाबरतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णक्षरांची नोंद होणार आहे. दादर येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त विराट जाहीर सभा आज पार पडत आहे. तब्बल १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच राजकीय मंचावरून मुंबईकरांना संबोधित करणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी ही ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची वेळ अत्यंत सूचक मानली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे हा 'गेम चेंजर' ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दोन्ही नेत्यांचे वक्तृत्व आणि त्यांच्या पाठीशी असलेली मराठी माणसाची ताकद यामुळे मुंबईतील राजकारणाला आता एक नवी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या सभेत दोन्ही नेते काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
भारताने अमेरिकेतील गुंतवणूक २१ टक्क्यांनी घटविली
न्यू यॉर्क : ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक तब्बल २१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही गुंतवणूक २४१.४ अब्ज डॉलरने कमी होऊन १९०.७ अब्ज डॉलर एवढीच राहिली आहे. गेल्या चार वर्षातील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. […] The post भारताने अमेरिकेतील गुंतवणूक २१ टक्क्यांनी घटविली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लडाख आणि कारगिल या केवळ भारताच्या सीमा नसून, त्या भारताचा आत्मा आहेत. लडाखमध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे भारताशी लडाखचे नाते अतूट आहे, असे प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केले. ‘सरहद, पुणे’ संस्थेच्या वतीने आयोजित लडाख महोत्सवांतर्गत ‘कारगिल गौरव नॅशनल अवॉर्ड २०२५’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना कविंदर गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, लडाखच्या प्रथम नागरिक बिंदू गुप्ता, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सुषमा नहार, अर्हम इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश पगारिया आणि संवाद फाउंडेशनचे संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकरे, मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, ज्येष्ठ आर्किटेक्ट दिलीप काळे, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, निर्भय भारत फाउंडेशनचे संचालक तरुण उत्पल आणि राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गुप्ता पुढे म्हणाले की, लडाख भावनात्मकतेने भारताशी अखंड जोडलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या हिवाळ्यात काही काळ हा भूभाग विलग होत असला तरी, भारताशी लडाखचे नाते कायम अतूट राहते. लडाखच्या सीमाक्षेत्रात शिक्षण, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रांत विकासाची कामे सुरू आहेत. ‘सरहद’सारख्या संस्थांचे या विकासातील योगदान मोलाचे आहे. राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम कारगिल येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होतो, असे गुप्ता यांनी सांगितले. राष्ट्राची सुरक्षा केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर नागरिकांच्या सहभाग आणि सहकार्यावर अवलंबून असते. कारगिल युद्धात नागरिकांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय सैन्याला मोठी मदत केली होती, असे त्यांनी नमूद केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात सध्या सुरू असलेले ऐतिहासिक परिवर्तन आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लष्कराचे मनोबल उंचावले आहे. सीमाक्षेत्रांचा विकास होत असून, तिथे आवश्यक सुविधा मिळत आहेत. केवळ सुरक्षेच्या दृष्टीने नव्हे, तर सन्मान आणि विकासाच्या दृष्टीने लडाख व कारगिलकडे पाहिले जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भूभाग देशाचा सन्मान आहेत आणि प्रत्येक नागरिकाला त्यांचा अभिमान आहे. ‘सरहद’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून तिथे सातत्याने सुरू असलेले काम अद्वितीय आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. विस्तारवादाचा धोका भविष्यात वाढत जाणार असल्याने देशातील नागरिकांनी एकत्र येऊन उभे राहणे गरजेचे आहे. आपण एक आहोत ही भावना प्रबळ करण्यासाठी काश्मीर आणि लडाखमध्ये सातत्याने जायला हवे. प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी सरहदच्या वाटचालीचा आढावा घेतला ते म्हणाले, सरहदने गेल्या अनेक वर्षांपासून सीमावर्ती भागात चांगले काम केले आहे. हे काम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. लवकरच पुण्यामध्ये लडाख भवन आणि कारगील भवन उभारण्यात येणार आहे. मिनी काश्मीर उभे करण्याचाही प्रयोग पुण्यात सुरू आहे.
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र
तेहरान : इराणमधील सरकारविरोधी आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले असून २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनांनी आता संपूर्ण देश व्यापला आहे. आतापर्यंत किमान ३०० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३,६०० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. राजधानी तेहरानमध्ये सुरू झालेले आंदोलन […] The post इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर प्रगती अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या अपेक्षा आणि जनतेच्या हितासाठी तयार करण्यात आलेला जनहितनामा देखील प्रसारित करण्यात आला. या प्रगती अहवालात प्रभाग क्रमांक ९ मधील पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी राबवलेले उपक्रम आणि पुढील काळात करण्यात येणाऱ्या विकासकामांचा ठोस आराखडा मांडण्यात आला आहे. येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसमावेशक आणि व्यवहार्य उपाययोजनांचा समावेश असलेला जनहितनामा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामे अधिक गतीने पूर्ण करून नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देणे आणि दिलेली आश्वासने पूर्णत्वास नेणे हा आमचा संकल्प आहे, असे उपस्थित उमेदवारांनी स्पष्ट केले. जनहितनामा पूर्णपणे जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. प्रगती अहवालात प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रम, स्मार्ट सुविधा, नागरिक सेवा केंद्र, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांसह झालेल्या कामांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. प्रभागातील वाढत्या गरजा आणि भविष्यातील प्राधान्यक्रमांवरही स्पष्ट दिशानिर्देश मांडण्यात आले आहेत. या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जनहितनामा पूर्णपणे जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. प्रभागातील पाच हजारहून अधिक नागरिकांचे मत, तसेच रहिवासी संस्था, नागरिक संघटना आणि विविध सिटिझन ग्रुप्स यांच्या सूचना, समस्या आणि अपेक्षा नोंदवूनच हा जनहितनामा साकारण्यात आला आहे. या दस्तऐवजात लोकांनी ज्या मुद्द्यांना प्राधान्य दिले, जिथे प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याची गरज आहे आणि ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळू शकतो, त्या सर्व बाबींना स्थान देण्यात आले आहे. जनतेला जे हवे आहे, जिथे त्यांचा हक्क आणि हित आहे, त्या गरजांवर आधारित हा आराखडा तयार करण्यात आला आहे.
पती अथवा वडील नसणा-या एकल महिलांना दिलासा
मुंबई : प्रतिनिधी ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना अजूनही केवायसी करता येणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे त्यांच्या लॉगईनवरून केवायसी करत आहेत. त्यामुळे आता आशा लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजूनही राज्यातील तब्बल […] The post पती अथवा वडील नसणा-या एकल महिलांना दिलासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित ३००० रुपये बहिणींच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या होत्या. मात्र, काँग्रेसने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, १४ जानेवारीनंतरच हे पैसे देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जर निवडणूक आयोगाने सांगितले, तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता १६ जानेवारीला देऊ, असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी गेमचेंजर ठरलेली ही योजना आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे मुख्य हत्यार बनली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि मुंबईतील उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर केल्या होत्या. याला काँग्रेसने 'निवडणूक आचारसंहितेचा भंग' असल्याचे मानत विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, आपण योजनेच्या विरोधात नसून, केवळ निवडणुका संपेपर्यंत हप्ता न देण्याची विनंती केली आहे. या राजकीय पेचप्रसंगामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'रॉकी भाई' टिप्पणीवर मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख 'रॉकी भाई' असा केला होता. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल उत्तर दिले आहे. मी अद्याप केजीएफ सिनेमा पाहिलेला नाही. आधी मी तो चित्रपट पाहतो आणि मगच ठरवतो की रोहितने मला 'रॉकी भाई' म्हटले ते योग्य आहे की अयोग्य, असे दादांनी हसत हसत सांगितले. युती धर्मावरून देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर महायुतीमधील अंतर्गत वादावर बोलताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रत्युत्तर दिले. मी इथे महापालिकेची निवडणूक लढवत आहे, मग मी प्रशासनातील चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असे होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'आता कुठे कंठ फुटला' या विधानाचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले की, जर गेल्या नऊ वर्षांपासून निवडणुकाच झाल्या नसतील, तर जनतेच्या समस्या मांडण्यासाठी कंठ फुटणारच ना? महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमधील हे शाब्दिक युद्ध आता विकोपाला पोहोचल्याचे दिसत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, महेश लांडगे हा खूप मोठा नेता आहे, तो स्वयंपूर्ण आहे आणि त्याचा बोलवता धनी कोणी नाही, तसेच भोसरीतील लोक हे स्वयंभू आणि स्वाभिमानी असतात, असे म्हणत त्यांनी लांडगे यांना टोला लगावला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे बंधू प्रत्यक्ष मैदानात उतरून सभांचा धडाका लावत असताना, दुसरीकडे कार्यकर्त्यांमधील संघर्ष आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात आज भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. प्रभाग क्रमांक ५८ मधील अमृत नगर भागात प्रचाराचे टेबल लावण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील अमृत नगर परिसरात आपापल्या पक्षाचे प्रचार साहित्य आणि टेबल लावण्यावरून भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, काही वेळातच या वादाने उग्र रूप धारण केले आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की करण्यात आली. या हाणामारीत मनसेचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने अमृत नगर भागात धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या राड्यामुळे गोरेगाव परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली असून, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले आहेत. सध्या या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ही घटना नेमकी कोणाच्या चिथावणीमुळे घडली आणि यामध्ये दोन्ही बाजूने नक्की किती जण जखमी झाले आहेत, या संदर्भात गोरेगाव पोलिस सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, निवडणुकीच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबईच्या राजकीय रणांगणावर कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शीर्ष स्तरावरील नेते मोठ्या सभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, स्थानिक पातळीवर मात्र जागेवरून आणि वर्चस्वावरून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड इर्षा पाहायला मिळत आहे. गोरेगावातील या राड्यामुळे आता आगामी मतदानाच्या दिवशी देखील अशा प्रकारच्या संघर्षाची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
‘तान्हाजी’ सिनेमाचा येणार सीक्वल?
मुंबई : प्रतिनिधी अभिनेता अजय देवगणच्या २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा दाखवणा-या या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेत्री काजोल हिची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. यशानंतर आता या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे अजय देवगणने शेअर […] The post ‘तान्हाजी’ सिनेमाचा येणार सीक्वल? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांच्या बूथवर कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध कामे सुरू असतानाच, डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आणल्याचा दावा केलेल्या या महापालिकेत, आता भाजपच्याच एका उमेदवाराच्या प्रचारार्थ पैशांचे वाटप केल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात एका महिलेच्या घरात पैशांची पाकिटे सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी चक्क रोख पैशांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. डोंबिवलीच्या तुकाराम नगरमधील दशरथ भुवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून नागरिकांच्या घरी पांढऱ्या रंगाची पाकिटे पोहोचवली जात होती. या प्रत्येक पाकिटात ५०० रुपयांच्या सहा नोटा, म्हणजे ३ हजार रुपये असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या दक्ष कार्यकर्त्यांनी या पैसे वाटपाचा छडा लावत संबंधितांना रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे भरारी पथक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. महायुतीमधील 'मैत्रीपूर्ण' लढत ठरतेय संघर्षाची डोंबिवलीतील या विशिष्ट प्रभागात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात 'मैत्रीपूर्ण' लढत होत आहे. भाजपचे उमेदवार विशू पेडणेकर आणि शिवसेनेचे नितीन पाटील यांच्यात येथे थेट सामना आहे. महायुती म्हणून एकत्र असणारे हे दोन्ही पक्ष या ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने मोठी रसाखेच पाहायला मिळत आहे. विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचे समोर आल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याचे व्हिडिओ बनवून हा डाव उधळला. महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षच अशा प्रकारे समोरासमोर आल्याने आणि त्यातही पैसे वाटपाचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बिनविरोध विजयाचा विक्रम करणाऱ्या भाजपची नाचक्की? कल्याण-डोंबिवलीत भाजपने यापूर्वीच अनेक जागा बिनविरोध जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीतही एका जागेसाठी उमेदवाराला पैशांचे वाटप करावे लागते, यावरून भाजपच्या स्थानिक गोटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. बिनविरोध विजयाचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पक्षातच अशा प्रकारे 'पाकीट संस्कृती' फोफावल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर आता संबंधित उमेदवारावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण डोंबिवलीचे लक्ष लागले आहे.
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अयोध्या हे संवेदनशील ठिकाण असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावत एका व्यक्तीने राम मंदिराच्या परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षा दलांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तो काश्मिरी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी […] The post काश्मिरी व्यक्ती ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा
नवी दिल्ली : हल्ले, गुलामगिरीच्या वेदनादायक इतिहासाचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताला केवळ सीमांवरच नव्हे, तर आर्थिकदृष्टया तसेच प्रत्येक पातळीवर स्वत:ला सामर्थ्यशाली करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी केले. दिल्लीमध्ये आयोजित एका समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग आदी महनीय व्यक्तींनी स्वातंर्त्यचळवळीत दिलेल्या योगदानाचा […] The post देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’चे मालक इलॉन मस्क यांनी कंटेंटसंदर्भातील आपली चूक मान्य करत, यापुढे भारतीय कायद्यांनुसारच काम करण्याचे आश्वासन दिले आहे. खरे तर, ‘एक्स’वरील आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात मोदी सरकारने गंभीर दखल घेतल्यानंतर, कंपनीने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर संबंधित मजकूर ब्लॉक केला. मोदी सरकारने एक्सवरील आक्षेपार्ह मजकुराची गांभीर दखल […] The post ‘एक्स’वरील ६०० अकाउंट मिटविले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तणाव, प्रदूषणामुळे पुरुषांमधील थायरॉईड ग्रंथींवर परिणाम
नवी दिल्ली : थायरॉईड ही केवळ महिलांची समस्या समजली जात होती. मात्र, बदलती जीवनशैली, सततचा तणाव, प्रदुषण, आहाराच्या अनियमित वेळा आणि वाढते प्रदूषण यामुळे आता पुरुषांमध्येही थायरॉईड विकारांचे प्रमाण वाढले आहे. थायरॉईडच्या समस्या या सर्वच वयोगटातील पुरुष आणि महिलांना प्रभावित करू शकतात. वाढता ताण, चुकीची जीवनशैली आणि प्रदूषण यांसारखी विविध कारणे विशेषत: शहरी भागात थायरॉईडच्या […] The post तणाव, प्रदूषणामुळे पुरुषांमधील थायरॉईड ग्रंथींवर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ तालु्क्यातील जवळाबाजार ते शिरला रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणतांना ग्राम महसूल अधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर रविवारी ता. ११ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले असून अन्य एकाचा शोध सुरु करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस व महसूल विभागाची पथके सक्रिय झाली असून यापथकांकडून सुट्टीच्या दिवशीही वाळू घाटावरील मार्गावर वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास पोटा शिवारातून पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसील व पोलिस विभागाच्या पथकाला मिळाली होती. ्त्यावरून तहसीलदार हरिष गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी नवनाथ गोडसे व त्यांचे पथक तसेच पोलिसांचे पथक जवळा बाजार ते शिरला मार्गावर वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी पोलिसांनी पुरजळ शिवारात एका ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेण्याच्या सूचना चालक बालाजी बोंगाने याला दिल्या. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी नवनाथ गोडसे ट्रॅक्टरवर बसले होते. यावेळी चालक बालाजी याने ट्रॅक्टर काही अंतरावर नेल्यानंतर वडद शिवारातील रोडने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविण्यास सुरवात केली. यावेळी नवनाथ यांनी थांबण्याची सुचना केली असतांनाही बालाजी याने भरधाव वेगात ट्रॅक्टर नेऊन त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर प्रकार पोलिस व महसूलच्या पथकाच्या लक्षात येताच त्यांनी वाहनाद्वारे पाठलाग करून ट्रॅ्क्टर पकडले. या प्रकरणी नवनाथ यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी बालाजी बोंगाने (रा. उमरा), कैलास आव्हाड, रामेश्वर जाधव (रा. पोटा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बालाजी व रामेश्वर यांना ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत. हे ही वाचा… सेनगाव तालु्क्यात अवैध वाळू वाहतूक:दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल सेनगाव तालुक्यातील बन शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 10 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा…
‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संशयास्पद […] The post ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा (वय ८७) यांचे आज रविवारी दुपारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, मानवतावादी समाजसुधारकांच्या विचारांचा एक मोठा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार सातत्याने मांडला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी साहित्याच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण काम केले. प्रामुख्याने बौद्ध साहित्य आणि मानवतावादी समाजसुधारकांच्या कार्यावर आधारित त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यातून नेहमीच समता आणि मानुसकीचा संदेश दिला गेला, ज्यामुळे त्यांना साहित्य वर्तुळात आदराचे स्थान प्राप्त झाले होते. महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा आणि आत्मचरित्राचा ठेवा रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्यकृतींनी वाचक वर्गावर मोठा प्रभाव टाकला आहे. यामध्ये संत कबीरांच्या विचारांवर आधारित 'कबीर वाणी' हा त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच 'तिमिरातुनी तेजाकडे' या ग्रंथामधून त्यांनी प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचा आणि जीवनप्रवासाचा ठेवा असलेल्या 'सोनजातक' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचा १४ भागांचा संच साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरला आहे. या ग्रंथातून त्यांनी केवळ स्वतःचा प्रवासच नाही, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचेही दर्शन घडवले आहे. उद्या सकाळी पार पडणार अंत्यविधी आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पार्थिव उद्या सोमवारी सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत त्यांच्या विमान नगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता येरवडा येथील विद्युत दाहिनी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
दोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली
नाशिक : एटीएम कटरने फोडून रक्कम लुटण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र नाशिकच्या सटाणा येथे चोरट्यांनी एटीएम चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट जीपला दोरखंड बांधून एटीएम उखडून काढले आणि ते जीपमध्ये टाकून अवघ्या १२ मिनिटांत घटनास्थळावरून पोबारा केला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातील ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर परिसरात असलेल्या स्टेट […] The post दोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजितदादांंचा एकेरी उल्लेख लांडगेंना शोभत नाही
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना आमदार महेश लांडगेंवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना महेश लांडगे यांनी एकेरी भाषेत अजित पवार यांचा उल्लेख केला होता. यानंतर आता […] The post अजितदादांंचा एकेरी उल्लेख लांडगेंना शोभत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये असलेली युती आता केवळ नावापुरतीच उरली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ (ड) मध्ये भाजपने अधिकृत युती असतानाही चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (१० जानेवारी) रात्री उशिरा अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याने आता या प्रभागात भाजप समर्थित अपक्ष विरुद्ध युवा स्वाभिमान अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती आहे. प्रभाग क्रमांक १८ ही जागा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात आली होती. तिथे युवा स्वाभिमानने स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपने रणनीती बदलत अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा दिलेल्या या पाठिंब्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अमरावतीत रवी राणा यांनी ८७ पैकी ४१ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे आता युतीमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत. भाजपला मतांच्या विभाजनाची भीती भाजप आणि युवा स्वाभिमानमधील या अंतर्गत वादामुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊन भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संभाव्य धोका ओळखून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः अमरावतीत तळ ठोकून आहेत. यापूर्वी त्यांनी रवी राणा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जागावाटपावरून आणि उमेदवार देण्यावरून झालेला वाद न मिटल्याने अखेर भाजपने अपक्ष उमेदवाराला साथ देण्याचा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमधील दरी अधिकच रुंदावली आहे. साईनगरमधील प्रतिष्ठेची लढाई आज अमरावतीत प्रचाराचा 'सुपर संडे' असून सर्वच उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. यामध्ये सर्वाधिक चुरशीची लढत साईनगर प्रभागात पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपचे वजनदार नेते तुषार भारतीय आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडे यांच्यात थेट सामना रंगला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात रवी राणा यांनी दिलेले आव्हान तुषार भारतीय कसे पेलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रवी राणांची पदयात्रा आणि विजयाचा विश्वास सचिन भेंडे यांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांनी आज साईनगर प्रभागात मोठी पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी बोलताना रवी राणा यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. साईनगर प्रभागाची निवडणूक आता जनतेनेच आपल्या हातात घेतली आहे, त्यामुळे सचिन भेंडे यांचा विजय निश्चित आहे, असे विधान त्यांनी यावेळी केले. प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात रवी राणा यांनी आपली सर्व ताकद सचिन भेंडे यांच्या पाठीशी लावली असून, भाजपनेही तुषार भारतीय यांच्यासाठी कंबर कसली आहे.
डीवायएसपी वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; २ ठार
कोल्हापूर : प्रतिनिधी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणा-या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बंगळुरूवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे […] The post डीवायएसपी वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; २ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणुकीत प्रचाराचे स्वरूप बदलले; राजकीय पक्षांचा ‘डिजिटल’वर भर
मुंबई : प्रतिनिधी राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या काळात राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रचारावर भर दिल्याचे दिसत आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीची तयारी करत असताना, राजकीय पक्ष प्रचाराची रणनीती ठरवताना अधिकाधिक डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळत आहेत. ज्यामुळे यंदाच्या महानगरपालिका निवडणुका लढवण्याच्या पद्धतीत […] The post निवडणुकीत प्रचाराचे स्वरूप बदलले; राजकीय पक्षांचा ‘डिजिटल’वर भर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पूरमुक्त मुंबई, ११ लाख घरे, छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचे काय झाले?
मुंबई : प्रतिनिधी महायुतीने मुंबईसाठी वचननामा जाहीर केल्यानंतर काँग्रेसने तोफ डागली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी २०१७ चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून २०२६ […] The post पूरमुक्त मुंबई, ११ लाख घरे, छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचे काय झाले? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बडतर्फ IAS पूजा खेडकर यांच्या घरी मोठी चोरी:औंध निवासस्थानी आई-वडील, वॉचमनसह पाच जण बेशुद्ध आढळले
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंध येथील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पूजा खेडकर यांचे आई-वडील, घरातील वॉचमन, वाहनचालक आणि कुक असे एकूण पाच जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चतुःशृंगी पोलीस ठाण्यात औंध परिसरातील साकाळ नगर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील बंगला क्रमांक ११२ येथे चोरी झाल्याची माहिती फोनद्वारे मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पूजा खेडकर यांच्यासह त्यांचे दोन भाऊ विनय बुधवंत आणि हर्षद बुधवंत उपस्थित होते. पाहणीदरम्यान, कार पार्किंग परिसरात वॉचमन जितेंद्र सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर पूजा खेडकर यांनी पोलिसांना त्यांच्या आई-वडिलांची खोली दाखवली, जिथे दोघेही पलंगावर बेशुद्ध अवस्थेत होते. खोलीतील लाकडी कपाटे फोडलेली असून त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बंगल्यातील इतर तीन खोल्यांची तपासणी केली असता, तेथेही कपाटांमधील सामान विखुरलेले आढळले. यानंतर रुग्णवाहिका बोलावून पूजा खेडकर यांचे आई-वडील आणि वॉचमन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपासात तळमजल्यावरील एका खोलीत वाहनचालक दादासाहेब ढाकणे आणि बंगल्याच्या बाहेरील खोलीत कुक सुजित रॉय हेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. दरम्यान, पूजा खेडकर यांना तक्रार दाखल करण्याबाबत विचारले असता, आई-वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने सध्या तक्रार देणे शक्य नसून, नंतर तक्रार देऊ, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, चोरीत नेमके काय आणि किती साहित्य लंपास झाले, याचा तपशील तक्रार मिळाल्यानंतर स्पष्ट होईल.
एक गेल्याशिवाय शंभर येत नाही:रामदास आठवलेंची पुण्यात विरोधकांवर काव्यातून फटकेबाजी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथील नागपूरचाळ येथे भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) च्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी विकास आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर भाजप-आरपीआय एकत्र असल्याचे प्रतिपादन केले. प्रभाग क्रमांक २ मधील अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. आठवले यांनी आपल्या छोटेखानी पण प्रभावी भाषणात विरोधकांवर कवितेच्या माध्यमातून टीका केली. एक गेल्याशिवाय शंभर येत नाही. ज्यांना संधी दिली, ते निघून गेले; मात्र जनता विकासाच्या बाजूने भक्कमपणे उभी राहते, असे ते म्हणाले. प्रभाग क्रमांक २ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असून, येथील मतदार भाजप-आरपीआयच्या उमेदवारांना निवडून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारांच्या दैनंदिन प्रश्नांकडे लक्ष वेधत आठवले यांनी विकासाच्या मुद्द्यावर आरपीआय भाजपसोबत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागामार्फत बेरोजगारांना रोजगाराची संधी, प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा, विधवा भगिनींना मदत तसेच परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी भाजप-आरपीआयच्या चारही अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ऍड. रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे, आदिती बाबर आणि राहुल जाधव हे उमेदवार या सभेत उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी, ऍड. भगवान जाधव, अशोक कांबळे, मंगेश गोळे, बाळासाहेब जानराव, सुभाष चव्हाण, नानासाहेब नलावडे, महेश पाटील, मंदार खरात, प्रकाश साळुंखे, राजू बाफना, राकेश मोहिते, हर्षद जाधव, डॉ. योगेश कदम, प्रकाश सोनवणे, विनोद टोपे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३८ मधील महाविकास आघाडीतील जागावाटपाचा पेच अखेर सुटला आहे. काँग्रेसने एकाच उमेदवाराला अधिकृत उमेदवारीचे पत्र दिल्याने, आता काँग्रेसचा एक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चार उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. यापूर्वी प्रभाग ३८ मध्ये काँग्रेसकडून तीन, तर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला होता. आघाडीच्या जागावाटपात या प्रभागातील चार जागा शिवसेनेला आणि एक जागा काँग्रेसला असे निश्चित झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांच्या दोन कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या दिवशीही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने काँग्रेसचे तीन उमेदवार रिंगणात होते. यामुळे आघाडी धर्म पाळून काँग्रेसने एकाच जागेवर उमेदवारी निश्चित करावी, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने केली जात होती. हा पेच सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ३८-अ गटातून उभ्या असलेल्या अस्मिता भूषण रानभरे याच एकमेव अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र जारी केले. या पत्रामुळे काँग्रेसचे अन्य दोन्ही उमेदवार बंडखोर ठरले आहेत. शिंदे यांनी प्रभाग ३८ मधील अस्मिता रणभरे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, कल्पना थोरवे आणि वसंत मोरे या पाचही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बंडखोर यांच्यावर यापुढे पक्षा मार्फत कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत चांगला प्रतिसाद दिला. या जाहीर सभेत प्रभाग क्रमांक ०९ साठीचा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख जाहीरनामा (वचननामा) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. हा वचननामा तयार करताना प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या, विकासाच्या गरजा आणि भविष्यातील आव्हानांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. यावेळी उमेदवार लहू गजानन बालवडकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, प्रभागात विकास घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून देणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल, त्यामुळे शहरासह प्रभागाचा विकास अधिक वेगाने साध्य होईल. बालवडकर यांनी पुढे सांगितले की, प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. मी २०१९ पासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून नागरिकांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध लोकहिताचे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. या वचननाम्यात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, सुरक्षित व अपघातमुक्त रस्ते, पादचारी सुविधा, अत्याधुनिक मल्टीलेव्हल पार्किंग, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल आणि अतिक्रमणमुक्त फूटपाथ यांसारख्या महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश आहे. यासोबतच स्वच्छ, झिरो-वेस्ट आणि पर्यावरणपूरक प्रभाग घडवण्यासाठी कचरा विलगीकरण केंद्रे, आधुनिक कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व हरित पट्ट्यांची निर्मिती करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता व गती आणण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’, दर तीन महिन्यांनी जनसंवाद सभा आणि २४ तास कार्यरत जनसेवा कार्यालये यांसारख्या लोकाभिमुख निर्णयांचाही या वचननाम्यात समावेश आहे. तसेच, सौर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर, रस्ते बांधणीपूर्वी पीएमसी, एमएसईबी, मेट्रो व इतर यंत्रणांमध्ये समन्वय साधून टिकाऊ व दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, तरुणांसाठी क्रीडा संकुले, ओपन जिम आणि वाचनालये या सुविधांचाही वचननाम्यात उल्लेख आहे. याशिवाय, बेबी डे केअर सेंटर्स, पाळीव प्राण्यांसाठी पेट्स केअर सेंटर्स, बसस्टॉप नूतनीकरण आणि ड्रग्समुक्त प्रभाग या संकल्पनांचाही समावेश आहे. बाणेर–बालेवाडी–पाषाण–सुस–महाळुंगे परिसरासाठी स्वतंत्र विशेष विकास आराखडा तयार करण्याचे आश्वासनही या वचननाम्यात देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर लगेचच विकासकामांना सुरुवात करून पुढील पाच वर्षे नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेच्या शेवटी नागरिकांनी या विकासाच्या संकल्पाला जोरदार पाठिंबा दिला.
मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पलटवार केला आहे. मुंबईतील सांताक्रुज विमानतळ बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल महाजन यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून सांगतो, तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून तुम्ही असे बेलगाम झाले आहात. मग तुम्ही कशाला अमित शहा, सोनिया गांधी यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्री या पदाचा मान ठेवा, प्रत्येक पक्ष चालवण्यासाठी एक पद्धत असते, असा पलटवार महाजन यांनी केला आहे. पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मुंबईतील सांताक्रुज एअरपोर्ट बंद झाले, ते काय विकले का सरकारने? कदाचित यांचे व्यवसाय बिल्डर असल्यामुळे त्यांचा डोळा त्या जागेवर असेल. सुगीत संधी की संधीत सुगी ते शोधत आहेत, हे माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बाळासाहेबच ब्रॅंड होते, त्यांच्या पुढची पिढी बोलताना ब्लॅंक होते, भविष्यात एक बोलेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि दूसरा बोलेल राज ठाकरे मुख्यमंत्री होतील, काही सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर देखील प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे राजकीय विधान आहे, असा माझा अनुभव आहे. कोणत्याही ठाकरेला त्यांची चूक दाखवलेली अजिबात आवडत नाही. त्यांना सल्ला दिलेला देखील आवडत नाही. उद्धव ठाकरेंचे हे राजकीय विधान आहे. स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी हे एक चावट विधान आहे. दोन्ही भावांमध्ये वितुष्ट आणणारा संजय राऊतच प्रकाश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, जे उद्धवला बोलता येत नाही ते याच्या तोंडात टाकून दिले जाते. आता दोन्ही भावाचा संजय राऊत प्रवक्ता झाला आहे. शिवसेनेच्या वचनाला 2019 मध्ये तडा याचमुळे गेला. दोन्ही भावांमध्ये वितुष्ट आणणारा हाच आहे. आता दोन्ही भावांना बोहल्यावर उभा करणारा हाच भटजी आहे. याच्या मनात सुप्त राग आहे. याच्या भावाला आणि याला कधीच केंद्रात आणि राज्यात मंत्री केले नाही, त्याचा राग याच्या मनात आहे आणि तो राग अशा पद्धतीने सगळ्यांचे कसे वाटोळे होईल हे पाहून संजय राऊत करतो आहे, अशी खरमरीत टीका महाजन यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून 2026 साठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध झाला. यावर आता कॉंग्रेसने टीका केली आहे. त्यांनी 2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. 4 वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले, गेले दोन महिने हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम केल्यानंतर प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी महायुतीने आपला जुमलानामा जाहिर केला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी 2017 चा भाजपचा जाहिरनामा पाहण्याची तसदी त्यांनी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न आहे. यातील काही आश्वासने आम्ही आठवण करून देत आहोत. 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले? अजून काही भाजपच्या हायलाइट्स आम्ही लवकरच जाहिर करु, असे सावंत यांनी म्हटले आहे. पुढे सचिन सावंत म्हणाले, मुख्यमंत्री हे सपनों के सौदागर म्हणजे स्वप्नांचे व्यापारी आहेत. त्यामुळे सोनेरी भविष्याचे रंग दाखवताना वर्तमान किती काळा आहे हे सांगत नाहीत. त्यांच्या सर्व मुलाखतीतून भविष्यातील संकल्पना सांगतात पण आतापर्यंतची आश्वासनांचे काय झाले हे सांगत नाहीत. ईस्टर्न फ्री वे 2017 साली ठाण्याला जोडण्यात येणार होते. पूरमुक्त मुंबई 2017 साली आश्वासन होते ते आश्वासन आजही आहे. मुख्यमंत्री जी तारीख देतात ती कधीच पूर्ण होत नाही. तारीख पर तारीख हा डायलॉग मुख्यमंत्र्यांकडून घेतला असावा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलर होणार यासाठी 2019 पासून वेगवेगळ्या तारखा देत आले. अद्याप जवळपासही पोहोचलो नाही. एलेव्हेटेड रोडचे काय झाले? बांगलादेशी-रोहिंग्या सर्वात जास्त शोधून काढले असे मुख्यमंत्री म्हणतात मग आकडेवारी जाहीर करा, असे आव्हान सावंत यांनी केले आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट; महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा जाहीर मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे. वाचा सविस्तर
भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद-श्रीनगर येथे कर्तव्य बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर गावी आले असताना अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या स्वागतासाठी आणि आनंदाच्या क्षणी सहभागी होण्यासाठी घरी परतलेल्या या वीर जवानाचा अशा प्रकारे अपघाती अंत झाल्याने दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यावर शोककळा पसरली असून परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. काळाचा अत्यंत क्रूर खेळ या घटनेतून समोर आला असून, आईच्या पश्चात पत्नीच्या बाळंतपणासाठी आठ दिवसांपूर्वीच सुट्टीवर आलेल्या जवान प्रमोद जाधव यांचा वाढे फाट्याजवळ आयशर टेम्पोच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. एकीकडे आज सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मूळ गावी दरे येथे आणले जात असतानाच, दुसरीकडे त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. घरात नव्या जीवाच्या आगमनाचा आनंद साजरा होण्याऐवजी कुटुंबाचा आधारवड गेल्याने, पित्याचा मृत्यू आणि मुलीचा जन्म अशा हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. वीर जवान प्रमोद जाधव यांच्या अंत्यसंस्कारावेळी एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारा प्रसंग पाहायला मिळाला. अवघ्या काही तासांपूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीला जेव्हा आपल्या वडिलांच्या अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले, तेव्हा उपस्थित जनसमुदायाचे डोळे पाणावले. शासकीय इतमामात आणि 'वीर जवान अमर रहे'च्या घोषणांमध्ये या देशपुत्राला साश्रू नयनांनी अखेरची मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा पाहण्यापूर्वीच काळाने हिरावून नेलेल्या या पित्याच्या अकाली निधनामुळे आणि नियतीच्या या क्रूर खेळामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
2.38 कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोन संचालक अटकेत:आर्थिक गुन्हे शाखेची हैद्राबाद विमानतळावर कारवाई
ठेवीदारांची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.' कंपनीच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ३० डिसेंबर रोजी हैद्राबाद विमानतळावर ही कारवाई केली. सचिन खडतरे (रा. करकंब, पंढरपूर, सोलापूर) आणि प्रसाद कुलकर्णी (वय ३६, रा. सारंग सोसायटी, नांदेडसिटी, पुणे) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. या प्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी खडतरे आणि कुलकर्णी यांनी ठेवीदारांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा आठ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यांनी ठेवीदारांकडून २ कोटी ३८ लाख रुपये जमा केले. कंपनीच्या संकेतस्थळावर परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांना कोणताही परतावा मिळाला नाही. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याविरुद्ध 'लूक आऊट नोटीस' बजावली होती. ३० डिसेंबर रोजी सचिन खडतरे आणि प्रसाद कुलकर्णी हे शारजा येथून हैद्राबादला विमान प्रवास करत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने हैद्राबाद विमानतळावर सापळा रचून दोघांना अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहायक निरीक्षक चेतन मोरे, राजेश लांघी, विनोद चव्हाण आणि मुसळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याणीनगर परिसरात भरदिवसा एका सदनिकेत घुसून दरोडा टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एका अल्पवयीन पुतणीने मित्राचे थकीत घरभाडे भरण्यासाठी काकूच्या घरीच दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन पुतणीसह तिघांना २४ तासांच्या आत अटक केली आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास कल्याणीनगर भागात घडली. तक्रारदार महिला आपल्या सदनिकेत असताना, चेहरा झाकलेले दोन अज्ञात व्यक्ती सुरी आणि दोरी घेऊन घरात घुसले. महिलेने त्यांना पाहताच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी जमा होऊ लागल्याने दोन्ही आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक व्यक्ती सोसायटीच्या परिसरात थांबलेला दिसला, ज्याने आपला चेहरा झाकलेला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. दरोड्याचा प्रयत्न झाला तेव्हा महिलेची अल्पवयीन पुतणी घरात उपस्थित होती. पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशीनंतर पुतणीने मित्राचे घरभाडे थकल्यामुळे काकूच्या घरात दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिली. पुतणीने तिच्या साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. काकूने आरडाओरडा केल्यामुळे तिचे मित्र आणि साथीदार घटनास्थळावरून पळून गेल्याचे तिने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी यश मोहन कुर्हाडे (वय २०, रा. केसनंद), वृषभ प्रदीप सिंग (वय २१, रा. चऱ्होली, आळंदी रस्ता) आणि प्राज विवेक भैरामडगीकर (वय १८, रा. येरवडा) या तिघांना अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे उपायुक्त चिलूमला रजनीकांत आणि सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठाकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदीप सुर्वे, पोलीस कर्मचारी नटराज सुतार, संदीप जायभाय, गणेश पालवे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे आणि बालाजी सोगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महानगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 200 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून लवकरच हे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका होत असून यामध्ये कोकण, नाशीक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नागपूर विभागातील महानगर पालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांतेत पार पडावी तसेच कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या पोलिस बंदोबस्तासोबतच राज्य राखीव दलाचे जवान देखील तैनात केले जाणार आहेत. या महानगर पालिकांसाठी गुरुवारी ता. 15 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून शुक्रवारी ता. 16 रोजी मतमोजणी होणार आहे. या पालिका निवडणुकीत मतदान कालावधीत तसेच मतमोजणीच्या वेळी कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस दला सोबतच इतर जिल्हयातील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हयातील 200 पोलिस कर्मचारी पाठविले जाणार आहेत. यामधे जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत काही कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी नियुक्त कर्मचारी रवाना केले जाणार आहेत. यामध्ये 80 पोलिस कर्मचारी मुंबई येथे पाठविले जाणार असून 20 पोलिस कर्मचारी छत्रपती संभाजीनगर येथे तर 100 पोलिस कर्मचारी नाशीक येथे पाठविले जाणार आहेत. शनिवारपर्यंत ता. 17 रोजी हे कर्मचारी त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणावर बंदोबस्तासाठी राहणार आहेत. त्यानंतर संबंधित जिल्हयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच या कर्मचाऱ्यांची हिंगोलीत पुन्हा रवानागी होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत असलेल्या मराठी माणसाच्या हिताचे आणि मराठी भाषेचे रक्षण करणे आणि वाढवणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमचे वचन देखील आहे. तसेच मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला, याला जबाबदार कोण? मुंबईत मराठी माणसाला परत आणण्याची देखील आमची जबाबदारी आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. 20 हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून याची अंमलबजावणी पुढील एक वर्षात केली जाईल. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते. 40 लाख लोकांना घर देणे. परंतु, मागच्या अनेक वर्षात काहीच झाले नाही. वारसा सांगणाऱ्यांची ती जबाबदारी होती. परंतु आता आम्ही ते पूर्ण करणार आहोत. सुनियोजित मुंबईचा विकास करण्याचे आमची जबाबदारी असून ती आम्ही या वचननाम्यातून करणार आहोत. गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचे आम्ही काम सुरू केले आहे. आतापर्यंत 12 हजार लोकांना घरे दिली आहेत. देशाच्या पंतप्रधानानांनी देखील घोषणा केली आहे की सर्वांसाठी घरे यानुसार आम्ही काम करत आहोत. मुंबईतला माणूस हा बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेलेला पुन्हा यावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, अशी टीका विरोधक आमच्यावर करत असतात. पण पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्त्व दिले आहे. मुंबईला फीनटेक सीटी करण्याचा निर्धार आमचा आहे. बीकेसीला इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, स्टार्टअप हब उभारले जाणार आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष असून महापालिकेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न करण्याचा आमचा मानस आहे. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत, लघु उद्योजकांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कोळीवाडा आणि गावठाण यांचे स्वतंत्र डीसीआर तयार करून पुनर्विकास, पुनर्विकास प्रकल्प राबवताना जी काही अडथळे येत होती, सगळे अडथळे आम्ही दूर केले आहेत. पाणीपट्टीत दरवर्षी 8 टक्के वाढ होते, पण ही वाढ पुढील 5 वर्षांसाठी स्थगित केली आहे. प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी 17 हजार कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणे, प्रदूषित पाणी समुद्रात सोडणे बंद केले जाणार. मुंबई खड्डेमुक्त करणार, असे आश्वासन शिंदेंनी दिले आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबई सोडून जावे लागणार नाही- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचा वचननामा आज प्रकाशित केला आणि उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे हायलाइट आपल्या समोर ठेवले आहे. आम्ही मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना केवळ हातच घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास आम्ही निर्माण केला आहे. आम्ही जो काही वचननामा देत आहोत, ते पूर्ण करणार आहोत. या वचननाम्यावर आधारित अॅक्शन टेकन रिपोर्ट आम्ही फॅक्ट शीट म्हणून लोकांसमोर मांडू. गृहनिर्मणाचा जो प्रश्न आहे मुंबईकरांचा, यातील विविध निर्णय आम्ही घेतले आहेत. एक संकल्प आम्ही आज घेतला आहे, मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे, याला काहीही झाले तरी मुंबई सोडून जावे लागणार नाही. त्याला मुंबईतच घर देणार आणि हे आम्ही करून दाखवत आहोत. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच घर देणार पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जमिनीचा एक इंचही आम्ही विकणार नाहीत. तसेच वेगवेगळ्या एसआरएच्या योजना मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. तसेच मी पुन्हा एकदा सांगतो धारावीचा विकास हा डीआरपी करणार आहे. यात स्वतः शासन भागीदार आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, त्याला धारावीमध्येच किमान 350 स्क्वेर फूटाचे घर देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे लघू व्यवसाय चालतात, त्यांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने एकोसिस्टम तयार करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळा आधुनिक करणार महानगरपालिकेत काम करणारे जेवढे सफाई कामगार आहेत, त्यांना मुंबईत मालकी हक्काचे घर देणार आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रात देखील महापालिकेच्या माध्यमातून शाळा आधुनिक करणे, कौशल्ययुक्त करणे आणि हे करत असताना महापालिकेच्या प्रत्येक शाळेत आमच्या मुलांना मराठी नीट शिकता आली पाहिजे त्यासाठी मराठी लॅब तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शिक्षणात ज्या काही आता नवीन शैक्षणीत सुविधा आल्या आहेत, त्या सगळ्या आम्ही वापरणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात चांगल्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. 2 हजार नवीन बेड तयार करण्याचे काम करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार मिठी नदीला निर्मळ करणार आहोत, यासाठी 5-6 वर्ष लागतील. यासोबत जेवढे मुंबईचे डंपिंग ग्राउंड आहेत त्यांना कॅपिंग करणे आणि डंपिंग बंद करणे, या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार आहोत, गॅस निर्मिती देखील करता येऊ शकेल. यासाठी 17 हजार कोटींचा क्लायमेट अॅक्शन प्लॅन हाती घेतला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतल्या लोकल बंद दरवाजाच्या आणि एसीयुक्त करणार मुंबईतील लोकल ट्रेनसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंद दरवाजाचे डबे आणि पूर्णपणे एसी डबे तयार करणार आहोत. लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास येणाऱ्या काळात करता येणार आहे. तसेच मुंबई लोकलला आणखी 3 डबे वाढवण्यासाठी चाचणी सुरू आहे. तसेच वॉटर टॅक्सी देखील सुरू करत आहोत. नवी मुंबईच्या विमानतळापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सीने येता येईल, अशी सुविधा आम्ही करणार आहोत.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, असे निराशाजनक विधान सकपाळ यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर त्यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दगडू सकपाळ यांनी त्यांच्या मुलीला, रेश्मा सकपाळ यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडे केली होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर सकपाळ नाराज झाले होते. लालबाग, परळ तसेच शिवडी परिसरात त्यांनी शिवसेनेचे मोठे वर्चस्व निर्माण केले होते. परंतु, पदरी निराशा पडल्याने त्यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे. आपले संपूर्ण कुटुंब शिवसेनेत (ठाकरे गट) कार्यरत आहे. अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी झाल्यानंतर आपल्यावर गुन्हे दाखल झाले. पक्षासाठी झोकून काम केले. गेल्या 15 वर्षांमध्ये पक्षाकडे आपण काहीच मागितले नाही. आपल्या हयातीत मुलगी नगरसेविका व्हावी अशी इच्छा होती. त्यामुळे मुलीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु पदरी निराशा आली. शिवसेनेनेच मला मोठे केले. पण इतकी वर्षे सक्रिय सहभागानंतर पक्षाने आपल्याला दणका दिला, अशी खंत दगडू सकपाळ यांनी बोलून दाखवली. दगडू दादांचे नेतृत्व दगडासारखे कणखर आणि मजबूत- एकनाथ शिंदे दगडू सकपाळ यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दगडू सकपाळ यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले. दगडू दादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने लालबाग राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे. दगडू दादांचे नेतृत्व बघितले तर दगडासारखे कणखर आणि मजबूत आहे. दगडू दादा हे मुंबईतल्या शिवसेनेच्या पायाचा दगड आहे. पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते. बाळासाहेबांनी हेरलेली माणसे शिवसेना पुढे घेऊन जात होती. परंतु, त्याचे मोल आताचे उबाठा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात, याचा विचारही करत नाही. गेला की तो कचरा, असे बदनाम करतात. याने पक्ष मोठा होत नाही. ज्यांनी कष्ट केले, जेल भोगले, त्यांची अवहेलना करणे हे दुर्दैवी आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील 'सुवर्णगड' या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगेमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, मंत्र्यांच्या निवासस्थानासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे बेवारस वस्तू सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संशयास्पद बॅगेची सध्या तज्ज्ञ पथकांकडून कसून तपासणी केली जात असून, यात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात ‘प्लीज टेक फ्री शूज अँड क्लोथ्स’ असे लिहिल्याचे आढळून आले. या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस सर्व तांत्रिक बाबींची कसून चौकशी करत आहेत. आमदार नितेश राणे यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आणि त्यांना लाभलेली कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहता, त्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे संशयास्पद वस्तू मिळणे ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे. उच्च सुरक्षा क्षेत्रात घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेतील त्रुटींबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पोलिसांच्या सखोल तपासात नेमकी काय माहिती समोर येते आणि यामागे कोणाचा उद्देश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सेनगाव तालु्क्यात अवैध वाळू वाहतूक:दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
सेनगाव तालुक्यातील बन शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 10 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस विभाग व महसूल विभागाची पथके कार्यरत आहेत. या पथकाकडून दररोज वाळू घाटांची पाहणी केली जात असून दिवसा व रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी पोलिस विभागाने स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे. या शिवाय गाव पातळीवर खबऱ्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील बन शिवारात अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण, के. एम. थिट्टे, जे. एस. गायकवाड, पाचपुते यांच्या पथकाने शनिवारी ता. 10 वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी बन शिवारातील सुदाम वाघ यांच्या घराजवळ एका टिप्परची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. पोलिसांनी वाहन चालक स्वप्नील उर्फ पप्पू घुले (रा. रायगाव जि. बुलढाणा) याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी टिप्पर व वाळू जप्त केली. या सोबतच बन शिवारातच पोलिसांनी आणखी एक टिप्पर जप्त केले आहे. दोन्ही घटनेत पोलिसांनी दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी स्वप्नील घुले, सुरेश वाघ यांच्या विरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार के. एम. थिट्टे पुढील तपास करीत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटरवर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक एका व्यक्तीला अमानुष मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच यातील एक व्यक्ती तर थेट दगडाने मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. मारहाण करणारी व्यक्ती ही भाजप नेते व मंत्री अतुल सावे यांच्या जवळची असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रिपद गमावले तर कोणी तुरुंगात तुरुंगात सडत आहे. पण मंत्री अतुल सावे यांचा 'खास माणूस' असलेला हा मारकूटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही, असे दानवे म्हणाले. पुढे अंबादास दानवे म्हणाले, 'पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची 'भक्ती' करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ? असा सवाल अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगरमधील असून काही महीने आधीचा आहे. हा जुना व्हिडिओ दानवे यांनी बाहेर काढला आहे. तसेच ज्या व्यक्तीला मारहाण केली गेली, ती व्यक्ती जीवंत आहे की मेली, हेही आपल्याला माहित नसल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. अमानुष मारहाण, हत्या, धमक्या, अशा घटना सर्रास सुरू असून यात गृहखाते कुठेतरी कमी पडत आहे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे.
काही जण मतांचे दान घेऊन पळणारे- मंत्री बावनकुळे:विराेधकांवर निशाणा, विकास आराखडा तयार
काही जण मतांचे दान घेऊन पळणारे आहेत; मात्र आम्ही ते काम करीत नाही, अशा शब्दात भाजप नेते तथा महसूल मंत्री बावनकुळे यांनी शनिवारी विरोधकांवर निशाणा साधत थेट नाव न घेता शिवसेनेच्या शिंदे गटालाही टोला हाणला. तुमचे एक चुकीचे मत विकासपासून वंचित ठेवणार असून, विकसित अकोल्याचा आराखडाही तयार असल्याचे ते म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात जनसंवाद सभा जुने शहरातील शिवाजी नगरात झाली. येथून जवळच असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. सभेत ना. शिंदेंनी भाजपचे थेट न घेता पिण्याच्या पाण्यावरून टिकास्त्र डागले होते. निवडणुकीत राज्यातील महायुतीमधील प्रमुख प्रमुख घटक असलेले भाजप व शिवसेना (शिंदे गट) एकमेकांविरोधात मनपा निवडणूक लढत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणूक ही खासदार-आमदार-नगसेवका ंच्या राजकीय उर्वरित. पान ४ महानगरात सीसीटीव्हीचे जाळे विणण्यात येणार असल्याचे ना. बावनकुळे म्हणाले. यातून विशेषत: महिलांच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे. तसेच लाडकी बहीण योजना महायुती सरकारच्या काळात बंद होणार नसल्याचा पुर्नउल्लेख करीत लखपती दीदी योजना सुरु होणार आहे. प्रत्येक नगरसेवकाकडून महिलांचे २० गट तयार करून घेण्यात येणार असून, या गटाला १ लाख रुपये अनुदान देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. घरकुलांचा लाभही मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. हिंदुत्वाच्या मुद्दावरुन अकोला पश्चिम मतदारसंघ हा भाजपकडे गत ३० वर्षे होता. मात्र गतवर्षी कांँग्रेसने हा गड जिंकला. हिंदूंच्या मत विभाजनाचा फटका भाजपला बसला. केवळ १२९३ मतांनी पराभव झाला होता. आता महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा शिंदे गट, शिवसेना (उबाठा) स्वतंत्र लढत असून, हिंदुत्ववादी मते प्रामुख्याने या दोन गटांसह भाजपमध्ये विभाजित होणार आहेत. मात्र हिंदूंची सर्वाधिक मते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी या तीन पक्षांसह कांॅग्रेस-राकॉँनेही रणनिती आखली आहे. अशातच भाजपने जुने शहरात अनेक निष्ठावानांना डावलून कांॅग्रेसमधून आलेल्यांना संधी दिल्याने बंडखोरीही झाली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी भाजपने रणनिती आखली असून, नेते हिंदुत्वाचा एकाही मुद्दा सोडत नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर विशेष लक्ष
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श विज्ञान, ज. भा. कला व बिर्ला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित जिज्ञासा' तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री छत्रपती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी क्षितिज राजेंद्र कठाणे व प्रेम निरंजन दहेकर यांनी सादर केलेल्या प्रयोगाने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक डी.डी. चौधरी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पासाठी त्यांना शाळेतील शिक्षक रोंगे, गोळे, सुलके, जगताप, राणे, ढोणे व धवणे, ठाकरे, व मसराम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे परिसरात व शैक्षणिक वर्तुळात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. हे विज्ञान प्रदर्शन स्व. श्री लक्ष्मीनारायण अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केले होते. शाश्वत भविष्य आणि पर्यावरण' यासारख्या विविध विषयांवर आधारित या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. क्षितिज आणि प्रेम यांनी नावीन्य पूर्ण प्रयोगातून परीक्षकांची मने जिंकली. त्यांना या यशाबद्दल रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
भारत देश हा लोकशाही शासन पद्धती असलेला सर्वात मोठा देश आहे. या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्र ओळखले जाते. समाजातील वंचित दुर्बल घटनांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे, व लोकशाही जिवंत ठेवावी. असे प्रतिपादन खासदार बळवंत वानखडे यांनी केले. दर्यापूर येथील कृषी भवन येथे रोहिणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून खा.वानखडे बोलत होते. या कार्यक्रमाला रोहिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर तर उद्घाटक खासदार बळवंतराव वानखडे, प्रमुख वक्ते म्हणून प्रा.पृथ्वीराजसिंह राजपूत, आमदार गजानन लवटे, नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, ॲड.गजानन पुंडकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, रामू मालपाणी, युवासेना अंकुश कावडकर आदी उपस्थित होते. रोहिणी फाउंडेशनच्या वतीने शब्दाच्या सामर्थ्यातून समाज घडवणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार व नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा गौरव करण्यात आला. या वेळी पाहुण्यांच्या हस्ते रोहिणी फाउंडेशनच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.दरम्यान दर्यापूर तालुक्यातील पत्रकार गजानन देशमुख, शशांक देशपांडे, धनंजय धांडे, सचिन मानकर, अमोल कंटाळे, विलास महाजन, गौरव टोळे, अनंत बोबडे, अजय वर, विनोद शिंगणे, गणेश साखरे, धनंजय देशमुख, युवराज डोंगरे, रवी नवलकार, नावेद सय्यद, आदेश खांडेकर, सूरज देशमुख, मोहन खरबरकर, शिलवंत रायबोले, शुभम घाटे, नासिर शहा, गजानन चौरपगार यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे व उपस्थित विविध पक्षांच्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाल तबला वादक शंभू मालवे याचाही सत्कार करण्यात आला. तसेच हरिना फाउंडेशन महिला शाखा व विश्वशांती महिला सहकारी पतसंस्था दर्यापूर यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख व नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी फाउंडेशनचे सचिव निलेश पारडे व संचालन प्रा.धनंजय देशमुख आणि आभार रोहिणी फाउंडेशनचे सहसचिव अमोल कंटाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर, सचिव नीलेश पारडे, सहसचिव अमोल कंटाळे, संचालिका रितिका देशमुख, कार्यालय प्रतिनिधी समीक्षा चौरपगार यांनी परिश्रम घेतले. या सदस्यांचा सत्कार कार्यक्रमा दरम्यान प्रदीप मलीये, रमा सावळे, हबीब खान असद अल्ला, मुनिफा बी अयुब शहा, रामेश्वर चव्हाण,कविता गवई, रेखा चव्हाण, रामेश्वर तांडेकर, समीना परवीन सैय्यद नदीम, शेख नसीब शेख इस्माईल, वर्षा बोरेकर, अहमद खा शादत खा, मंदा इंगळे, मंगला तराळे, उद्धव नळकांडे, स्नेहा देशमुख, सुनीता चव्हाण, प्रवीणा गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.
‘जुलमी सत्ताधाऱ्यांसोबत लढण्याची क्षमता धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये उरली नसल्याने त्यांच्या पाठिशी उभे राहण्यात हशील नाही. त्यामुळेच पाना, घड्याळ, हात या चिन्हांवर शिक्का मारणे म्हणजे मत वाया घालवणे होय,’ अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. वलगाव रोडवरील ॲकडेमीक हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी ओवेसी यांची जाहीर सभा झाली. या वेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांवर तोफ डागली. काँग्रेस गेली अनेक वर्षे सत्तेत होती. मात्र त्याच काळात अल्पसंख्यकांवर अनेकदा हल्ले झाले. त्यांना उर्वरित. पान ४ केंद्राने चीनसाठी का घातल्या पायघड्या? केंद्र सरकार चीनला पायघड्या घालत आहे. ‘आमच्या देशात या गुंतवणूक करा’, असे म्हणत आहे. मात्र हाच चीन देशाविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या पाकिस्तानला मदत करतो .देशाची सुमारे १५ हजार चौ. कि.मी. जमीन चीनने हस्तगत केली . त्यावर सैनिकी चौक्या बसवल्या असून, देशाच्या नाकावर टिच्चून देशावरच हल्ले करतो. तरीही मोदी सरकार त्याला देशात गुंतवणुकी साठी आमंत्रण देत आहे.
अंबरनाथमध्ये भाजपकडून लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला नगरपालिकेचे सदस्यत्व दिले असून यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाजा वाटत नाही? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एक निवडणूक दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू-मुस्लिम वाद लावलेला नाही, माझ्याकडून मी 11 लाख इनाम देईल, असे थेट आव्हान राऊतांनी केले आहे. संजय राऊत म्हणाले, भाजपला असे वाटते की जनता मूर्ख आहे. त्यांनी केलेल्या सर्व पापकर्मांना जनता मान्यता देईल, असे त्यांना वाटते. माघार घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. एमआयएमसोबत जेव्हा युती केली आणि गोंधळ झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले, अंबरनाथमध्येही कॉंग्रेससोबत युती केली तेव्हाही मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सांगावे लागले की ही युती नाही. तरीही निर्लज्जपणे अंबरनाथ-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित आरोपी, तुषार आपटे, ज्याच्याविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता, त्यांना अटक झाली होती आणि उघडपणे ते संघाचे काम करतात आणि त्यांना तुम्ही निर्दोषत्व सिद्ध न होता स्वीकृत सदस्य करतात अंबरनाथ नगरपालिकेत. एवढे धाडस यांच्यात येते कुठून? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे? पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी संशोधन करणार आहे. भाजपमध्ये त्यांच्यात एवढे धाडस येते कुठून? महाराष्ट्रात ज्या विषयावर लैंगिक अत्याचार प्रकरणी संतापाची लाट उसळली होती, त्या प्रकरणातील आरोपी, त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाजा वाटत नाही? ते असतील संघाचे कार्यकर्ते, केली असेल भाजपला मदत म्हणून त्याला ही बक्षिसी देता? उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला. तिथे निर्लज्जपणा दिसला तोच इथे दिसला. या महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे? हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भाजपचे किंवा फडणवीसांचे ते मोकाट सुटले आहेत. आम्ही काही केले तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे आणि तो आम्हाला पाठीशी घालेल हा जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यातून या गोष्टी घडत आहेत. मुंबई पालिकेत हिंदू-मुस्लिम करतायत उद्धव ठाकरेंनी असे चॅलेंज केले आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू-मुस्लिम असा वाद लावलेला नाही आणि असे नसेल तर मी त्यांना एक लाख रुपये इनाम देईल. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि माझे अधिक 5 लाख रुपये. कधीही घेऊन जाऊ शकतात. त्यांना अमाऊंट वाढवायची असेल तरी चालेल. 11 लाख रुपये देईल मी. एक निवडणूक दाखवा ज्यात हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तान असा वाद लावलेला नाही. फडणवीस सारख्या शूर माणसाने हे आव्हान स्वीकारायला पाहिजे. मुंबई पालिकेत हिंदू-मुस्लिम करत आहेत. इथे पण अयोध्या आणत आहेत. आमचे सगळे आयुष्य या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी गेले आहे. हा विकासच आहे. बाकी इनफ्रास्ट्रक्चर आहेच. राज्याचे मुख्यमंत्री आहात, कशाला खोटे बोलायचे? असेही राऊत म्हणाले. ठाकरे कुटुंबाची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की मी राज ठाकरेंकडे कधीही जाऊ शकतो पण उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे खरे बोलतात. त्यांनी जो धोंडा गळ्यात बांधला आहे शिवसेनेच्या नावाखाली, तो त्यांना बुडवणार. म्हणजे कसे आहे की वेश्येच्या गळ्यात मणीहार आणि पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, अशा प्रकारचे धोरण भाजपच्या अमित शहा यांनी राबवले. उद्धव ठाकरेंसारखा सच्चा मित्र त्यांनी गमावला आहे, प्रखर हिंदुत्ववादी. भाजपला ज्याने हिंदुत्वाचा मार्ग दाखवला ते बाळासाहेब ठाकरे आहेत. मातोश्री हे हिंदुत्वाचे सर्वात मोठे केंद्र आहे. ठाकरे कुटुंबाची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी. ही बदनामी थांबवा, आम्ही त्यांचे स्वागत करू.
अमरावती मकरसंक्रांत सणाच्या खरेदीसाठी शनिवारी १० जानेवारीला महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सुटीची पर्वणी साधत तीळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तूंसह वाण खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.मात्र, यंदाही साहित्याच्या किंमती वाढल्याने वस्तू खरेदीसाठी महिलांनी हात आखडता घेतला आहे. बुधवारी १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे. त्या निमित्ताने रविवारी सुटीचा मुहूर्त साधत महिलांसह तरुणींची बाजारपेठेत गर्दी होणार आहे. बाजारातील रेडिमेड तीळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की, गुळाची रेवडी, साखरफुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात आले. संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके, गजरे, मोहनमाळ, सुट्टे तनमणी, मंगळसूत्र, बांगडी, घड्याळ, नथ, छल्ला, हार, फुलगुच्छ, नेकलेस, अशा दागिन्यांना महिलांनी पसंती दिली. हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी अधिक होती. महिलांसाठी वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण म्हणून मकर संक्रातीचा सण ओळखला जातो. या सणाला तीळगुळ द्या, गोड गोड बोला, असे म्हणत मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. शहरातील बाजारात तीळगुळासह विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, यंदाही तीळगुळाचे भाव वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे स्थानिक तीळाचे आवश्यक उत्पन्न मिळाले नाही. यामुळे तीळाचे भावही वाढले आहे. सध्या बाजारात रेडिमेड तीळगुळ १२० ते १६० रुपये प्रति किलोने मिळत आहे. गुळाच्या रेवडीची किंमत १५० रुपये किलो आहे. मात्र, संक्रातीला तिळाला अन्यसाधारण महत्व आहे. तसेच तीळगुळ आरोग्यासाठी सर्वात लाभदायक आहे. सध्या बाजारात तिळाचे भाव १६० ते २०० रुपये प्रति किलो असून, गुळ ४५ ते ८० रुपये किलो आहे. साहित्य खरेदीला वेग मकर संक्रातीसाठी अनेक महिला एक महिन्यापासून तयारीला लागतात. साडी, रांगोळी चे डिझाइन तयार करणे, लुटण्यासाठी कोणती वस्तू ठेवायची, हळदी कुंकु, सुगड यासह इतर साहित्याचे नियोजन केले जाते. खरेदीसाठी तीन दिवस असल्याने शनिवारी महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
कॉटन मार्केट परिसरात फळ बाजाराला आग
येथील जुना कॉटन मार्केटमधील फळ बाजारात शेतकऱ्यांसाठी शेड बांधले आहेत. या शेडमध्ये असलेल्या पपईच्या ढिगाला शनिवारी १० जानेवारीला आग लागली. यामध्ये पाच ते सात फळ उत्पादकांची तेथे ठेवलेली फळे जळाली. आगीचे नेमके कारण कळाले नाही, मात्र शार्ट सर्कीटमुळे असे झाले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. आगीची माहिती मिळतात जवळच असलेल्या मनपाच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळ गाठले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. तरीही पाच ते सात फळ उत्पादकांना मात्र मोठा फटका बसला आहे. बहुतेक फळ उत्पादकांनी याठिकाणी आपापली फळे ठेवली होती. यामध्ये पपईचा सर्वाधिक भरणा होता. पपईचे प्रत्येक फळ हे कागदात गुंडाळून ठेवले होते. ही सर्व फळे प्लास्टीकच्या कॅरेटमध्ये होती. आगीने लगेच रौद्र रुप धारण केल्याने फळांनी भरलेले असे अनेक कॅरेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान आगीच्या ज्वाळा दिसून येताच तेथे असलेल्या दुकानदारांनी शेडकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच अग्नीशमन दलाचा बंब पोहोचल्याने आग लवकर आटोक्यात आणण्यात आली.
यंदाच्या हंगामात समाधानकारक पावसामुळे तुरीचे पीक चांगलेच बहरले होते. अनेक शेतकऱ्यांनी चांगल्या उत्पादनाची अपेक्षाही धरली होती. परंतु अधून-मधून होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे काही शेतकऱ्यांची शेतीपिके पूर्णत: नष्ट झाली आहे. यावर्षीच्या शेतीसाठी शेतकऱ्यांनी चांगली मेहनत केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या वन्य प्राण्यांच्या संख्येमुळे तुरीच्या शेतात प्रचंड हानी होत असून अनेक ठिकाणी पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून ते आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी सांगतात की, रात्रीच्या वेळी रानडुक्कर, हरिण, नीलगाय यांसारखे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात शेतात घुसून उभे पीक फस्त करीत आहेत. काही तासांच्या त्यांच्या अस्तित्वामुळे संपूर्ण हंगामाचे स्वप्न उध्वस्त होत आहेकेले. अनेक शेतकऱ्यांनी स्वतः पहारा देऊनही परिस्थिती आटोक्यात आणणे कठीण होत असल्याचे सांगितले. यावर्षी तुरीचे पीक चांगले आले होते. पण वन्य प्राण्यांनी एका रात्रीत सर्व नासधूस केली. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जफेड, नियमित करावा लागणारा घरगुती खर्च असे सगळेच प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळेच या भागातील शेतकऱ्यांनी वाढत्या आर्थिक तणावाबद्दल चिंता व्यक्त करत प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी संबंधित विभागाशी चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तुरीच्या उत्पादनावर अनेक शेतकऱ्यांचा वर्षभराचा महसूल अवलंबून असतो. त्यामुळे पिकाचे झालेले नुकसान त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणार आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा आणि प्रभावी पिकसंरक्षणाची आवश्यकता असल्याचे स्थानिक कृषीतज्ञांनी सांगितले. ...तरच शेतकऱ्यांना मिळेल दिलासा ^वन्य प्राण्यांच्या सततच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नुकसानभरपाई आणि संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्यास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. शिवाय पुढच्या त्रासालाही आळा बसेल. - अनिकेत शिरभाते, शेतकरी, मंगरूळ चव्हाळा, ता. नांदगाव खंडेश्वर
गौणखनीज तपासणी करताना दोन दिवसांपूर्वी महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला केला होता. या हल्ला प्रकरणातील ४ आरोपींना कुन्हा पोलिसांनी शुक्रवार, ९ जानेवारीला चांदूररेल्वे येथून अटक केली. लक्ष्मण तुळशीराम चौधरी (३५) रा. बग्गी ता. चांदूररेल्वे, शहबाज मुल्ला शफीमुल्ला (३७) रा. काजीपुरा चांदूररेल्वे, स्वप्नील संजयराव कावरे (२४) रा. चमननगर कुऱ्हा व भावेश ज्ञानेश्वर देशमुख (२५) रा. पळसखेड ता.चांदूररेल्वे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ५ जानेवारीला कुन्हा पोलिस ठाणे हद्दीत १० चाकी ट्रक क्र. एमएच ४९ सीडी ८७३७ हा वाळू भरून अंजनसिंगीवरून कुऱ्ह्याकडे येत असताना पोलिसांनी त्याला थांबवले. त्यांना वाळू वाहतुकीचा परवाना मागितला, परंतु परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. महसूल पथकाच्या पाहणीवेळी त्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गौण खनीजही आढळून आले. त्यामुळे तहसीलदारांनी सदर ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाण्याकरिता त्यांना सांगितले. दरम्यान ट्रक कुऱ्हामार्गे तिवसा तहसीलमध्ये नेत असताना ट्रकमागे एक कार आली. त्यामधील चालकाने खाली उतरुन ट्रक पळवून नेण्याबद्दल इशारा केला. तेव्हा महसूल कर्मचाऱ्यांनी आरडा-ओरड केली. मात्र त्यांना आरोपींनी मारहाण केली आणि ट्रक पळवून नेला. तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करुन ट्रक पळवून नेल्याचा गंभीर प्रकार घडल्यानंतर जिल्हाभरातील महसूल यंत्रणा दक्ष झाली होती. वाळू व्यवसायिकांनी काही एक न जुमानता हा प्रकार केला होता. चालता ट्रक पळवून नेल्याने पोलिसांनी गुप्तपणे सर्वत्र संदेश पाठवून आरोपींचे वर्णन सार्वजनिक केले होते. दरम्यानच्या काळात हे आरोपी चांदूर रेल्वे येथे लपून बसल्याची खबर एका गोपनीय सूत्राने पोलिसांना दिली. त्या खबरीची पडताळणी केल्यानंतर कुऱ्हा पोलिसांनी तेथे पोहोचून चौघांनाही अटक केली.
या वेळी लोहारा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढवण्याची तयारी करावी. सन्मानजनक जागा वाटप होऊन इतर पक्षांबरोबर आघाडी झाली तरच मिळून लढणार आहोत. आपसातील मतभेद बाजूला सारत एकीने निवडणुकीत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची आढावा बैठक लोहारा येथील बसवेश्वर मंदिरात संपन्न झाली. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही बैठक संपन्न झाली. लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील होते. या वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख, काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, ॲड. सयाजी शिंदे, माजी सभापती नानासाहेब भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीस चंद्रकांत जाधव, बसवराज पाटील-कास्तीकर, रौफ बागवान, प्रकाश होनराव, अॅड. संगमेश्वर माशाळाकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्ता गाडेकर,भुजंग देशमुख यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे यांनी तर सूत्रसंचलन केशव सरवदे यांनी केले. आभार दत्ता गाडेकर यांनी मानले. कार्यकर्त्यांना धडे, आढावा मात्र राहिला काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्याचे नियोजन केले होते. परंतु या बैठकीला उशीर झाल्याने बैठक झाली. पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परंतु वेळेअभावी आढावा घेणे राहून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांना मत मांडण्यास संधी मिळाली नाही.
सुर्डी (ता. बार्शी) येथे तुरीच्या गोदावरी या सुधारित वाणाच्या वापरामुळे तूर उत्पादनात लक्षणीय वाढ होत असून कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तुरीच्या गोदावरी वाणाचे पीक पैदासकार डॉ. दीपक पाटील यांनी केले. तेशबरी कृषी प्रतिष्ठान संचालित कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर यांच्या वतीने सुर्डी येथे बुधवार दि. ७ जानेवारी रोजी तुरीच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कडधान्य उत्पादकांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कडधान्य संशोधन केंद्र, बदनापूर येथील पीक पैदासकार डॉ. दीपक पाटील व कीड-रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत सोनटक्के उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दीपक पाटील यांनी गोदावरी वाण, बीज प्रक्रिया, मूलस्थानी जलसंधारण व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या वापरामुळे तूर पिकात झालेला सकारात्मक बदल प्रत्यक्ष दिसत असल्याचे सांगितले. पुढील वर्षी शेतकऱ्यांनी गोदावरी वाणाचे बियाणे सत्यप्रत बियाणे म्हणून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. तूर हे पीक ऊसाला सक्षम पर्याय ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. लालासाहेब तांबडे यांनी तूर तूर उत्पादन वाढीसाठी सुधारित बियाणे, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन शक्य असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राकडून दिलेले सुधारित वाण प्रचलित वाणापेक्षा ३५ ते ४० टक्के अधिक उत्पादन क्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १ किलो बियाणे प्रति एकर वापर, जैविक कीटकनाशकांचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्याचा सल्ला दिला प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी गोदावरी वाण व एकात्मिक पीक व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेल्या बदलाची माहिती दिली. सेंद्रिय कर्ब वाढणार ^तुरपिक शेतकऱ्याला ही समृद्ध करतं आणि जमिनीलाही समृद्ध करत. पालापाचोळा पडलेला असतो. त्यातून जमिनीला सुद्धा ४ ते ५ टन पालापाचोळ्या पासून खत भेटले जाते. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी खूप मदत होते. धीरज शेळके, शेतकरी
वाढेगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज हे अभियान म्हणजे महाराष्ट्र शासनाने तुमच्या गावासाठी दिलेली एक अभिनव संधी आहे. या संधीचे सोनं करत स्थानिक मतभेद बाजूला ठेवून गावचा विकास पुढे न्यावा. या अभियानात चांगले काम केले तर रोख रकमेचा पुरस्कार मिळेल. गावाच्या विकासात चांगल्या पद्धतीने बदल करता येईल, तेव्हा मतभेद बाजूला ठेवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करा, असा संदेश सिने कलावंत संदीप पाठक यांनी दिला. याप्रसंगी सिने अभिनेत्री शिवाली परब म्हणाली की, या गावाला मोठी नैसर्गिक देणगी चांगल्या पद्धतीची आहे. आज दिसणारे गाव प्रगतीपथावर दिसत आहे, तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर गाव पुरस्कारासाठी योग्य व सुंदर होईल. तुम्हाला आणखी ३ महिने वाढवून मिळाल्यामुळे कामाची संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग करून घेऊन गाव समृद्ध करा, या स्पर्धेचे स्वरूप न देता या नैसर्गिकतेला कार्याची जोड द्या. आपले गाव पुरस्कारात पुढे राहावे, अशा शुभेच्छा दिल्या. सिने कलावंत व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचे वाढेगावमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये जुन्या वाद्य,वृंदाचा सहभाग करण्यात आला होता. सिने कलावंतासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा अभियान कक्षातील शिवराज राठोड, सुहास चिळेकर, पं. स. विस्तार अधिकारी अमोल तोडकरी यांचा सहभाग होता. रस्त्यावरून मिरवणूक जात असता अनेक नागरिकासह महिला स्वागत करत होते. सिने कलावंत व अधिकारी यांना वाढेगाव येथील त्रिवेणी संगमावर नेण्यात आले. संगमावर आगमन झाल्यानंतर जि. प. मुख्याध्यापक इंगोले गुरुजी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या गावचे उपसरपंच शिवाजी दिघे यांच्या हस्ते संदीप पाठक यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाढेगावमध्ये झालेल्या कामाची तपशीलवार माहिती दिली. तसेच नदीवर व पाण्याच्या संदर्भात वृक्ष लागवडीच्या संदर्भात व नावीन्यपूर्ण राबवलेल्या कामाचा तपशील उपस्थितांच्या पुढे सादर केला. शेवटी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. बीट अंमलदार विलास बनसोडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. झालेल्या कामांचे तपशील मांडले
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीला दि.१३ जानेवारी रोजी श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ३ ते ४.३० या वेळेत करण्यात येणार आहे. यावेळी दि. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरिता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच माता व भगिनींना श्री रुक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे ४.३०ते ५.३० या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे ५.३० नंतर श्री रुक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील. सकाळी ६.३० वाजेपर्यंत दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दि. १३ जानेवारी रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत होऊन पदस्पर्श दर्शन पहाटे ६ नंतर सुरू करण्यात येणार आहे. दि. १४ जानेवारी रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झाल्यानंतर श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान केले. नंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे. तसेच दि.१५ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग व्यवस्थापन, कमांडोज नियुक्ती, टोकन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद, चांगली स्वच्छता व्यवस्था, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदरचा उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच सर्व सदस्य महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत असल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगितले.
सहकारमहर्षी स्व.शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते ९ जानेवारी मध्ये आयोजित केलेल्या २० व्या लेझीम स्पर्धेतील शेवटच्या दिवशी शहरी मुली ब गटात जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर संघाने प्रथम क्रमांक मिळवला. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त गेली २० वर्षांपासून या लेझीम स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी स्पर्धेत शहरी, ग्रामीण मुले व मुली मिळून ५८ संघात सुमारे ३ हजार लेझीम खेळाडू तसेच २०० वादक सहभागी झाले होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, नूतन नगरसेवक सयाजीराजे मोहिते- पाटील, कृष्णप्रिया मोहिते-पाटील, दिपकराव खराडे-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर प्रथम, हनुमान विद्यालय लवंग द्वितीय व कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शहरी मुली अ गटात महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर व सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी विभागून प्रथम, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज द्वितीय तर लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेमध्ये या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावले पारितोषिके
‘क्रेडाई पंढरपूर'च्या वतीने ‘ क्रेडाई गृहोत्सव २०२६' या प्रदर्शनाचे १६ ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. १६ जानेवारी रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, सचिव आशिष पोखरना यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. येथील रेल्वे मैदानाच्या जागेमध्ये या भव्य गृहोत्सव प्रदर्शनाच्या शामियाना उभारणी व इतर कामांचे विधिवत भूमीपूजन नुकतेच ह.भ.प. कबीर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी पंढरपूर क्रेडाईचे अध्यक्ष आशिष शहा यांनी या प्रदर्शनाबाबत माहिती देताना सांगितले की, पंढरपूर शहरात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात येत असलेला यावर्षीचा गृहोत्सव केवळ घरांपुरता मर्यादित न राहता, ग्राहकांना एकूणच सर्व बांधकाम क्षेत्राची माहिती देणारा आणि अधिक व्यापक स्वरूपाचा असेल. यामध्ये नामांकित बांधकाम व्यायसायिक तसेच बांधकाम क्षेत्रातील पुरवठादार, मटेरियल विक्रेते आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे स्टॉल्स देखील उपलब्ध असतील. २०२४ सालच्या गृहोत्सव प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या महोत्सवालाही पंढरपूर शहर आणि ग्रामीण नागरिक भेट देतील आणि त्यांना प्रदर्शनाचा उपयोग होईल. यावर्षी देखील प्रदर्शनाला असाच प्रतिसाद मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. यावेळी प्रमुख पाहुणे हभप कबीर महाराज यांनी या गृहोत्सव प्रदर्शनाला शुभेच्छा देतानाच पंढरपूर क्रेडाईच्या या ग्राहकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पंढरपूर क्रेडाईचे उपाध्यक्ष शार्दुल नलबिलवार, सचिव शशिकांत सुतार, खजिनदार महेश आराध्ये, सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी, पी.आर.ओ. मिलिंद वाघ, वूमन विंग कोऑर्डिनेटर श्रिया शिरगावकर आणि युथ विंगचे यश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापालिका निवडणुकीत महिलांची मते पारड्यात पडावीत म्हणून महिलांसह पुरूष उमेदवारही भरपूर प्रयत्न करत आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाडक्या महिला मतदारांना भेटवस्तू म्हणून देण्यात येणाऱ्या वाणावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष राहणार आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवर कारवाईसाठी नेमलेल्या १७ पथकांमार्फत वाणाच्या देवाणी-घेवाणीवर वॉच असणार आहे. संक्रातीच्या दिवशी तिळगुळ पाकिटे, महिलांसाठीच्या वस्तूंवर उमेदवाराचे नाव असल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा धुराळा उडत आहे. मनपाच्या ६८ नगरसेवकांच्या निवडीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा तर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या रॅली झाल्या, प्रचार शिगेला पोहचला आहे. शहरात विविध पक्षाचे उमेदवार प्रचारात मग्न झालेले आहेत. मतदानाच्या १ दिवस अगोदर बुधवारी (१४ जानेवारी) महिलांचा महत्त्वाचा सण असलेला संक्रांतीचा सण आहे. या सणाच्या दिवशी महिला एकमेकींना वाण म्हणून विविध वस्तू भेट म्हणून देत असतात, यंदाची संक्रात ही मनपा निवडणुकीच्या कालावधीत आली आहे. मतदानाच्या काही तास अगोदरच प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मतदान असल्यामुळे संक्रांतीच्या दिवशी रिंगणातील महिला उमेदवार एकमेकींना वाणाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या वस्तू देणार आहेत. मात्र या वाणांच्या भेट वस्तूवर निवडणूक आयोगाचे लक्ष राहणार आहे. वाणांवर संबधित उमेदवाराचे छायाचित्रे, नावे, चिन्ह असल्यास त्याची दखल आयोगाकडून घेतली जाणार आहे. छायाचित्रकारांचे लक्ष महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यानंतर १७ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सामाजिक कार्यक्रमांद्वारे प्रचार होत असल्यास त्या कार्यक्रमांवर देखील हे पथके लक्ष ठेवणार असून, उमेदवारांच्या हालचालीवर छायाचित्रकारांचेदेखी ल विशेष लक्ष राहणार आहे. थेट तक्रार आल्यास कारवाई ^ मतांसाठी प्रलोभन म्हणून वाणांच्या पाकिटावर किंवा अन्य वस्तूवर उमेदवाराचे नाव चिन्ह किंवा छायाचित्र असल्यास आणि त्याबाबत अधिकृत आमच्याकडे तक्रार आल्यास संबंधित उमेदवारांवर आचारसंहितेच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका.
एटीएम फोडून 25 लाख केले लंपास:कटरचा केला वापर, चार जण सीसीटीव्हीत कैद
भाळवणी येथे बँकेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी टाकलेल्या धाडीत सुमारे २५ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शनिवारी पहाटे २ ते २.३० या वेळेत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्यात आले. या प्रकरणात चार संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पारनेर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. भाळवणी येथील रोहिदास संभाजी रोहोकले यांच्या गाळ्यात गेल्या बारा वर्षांपासून बँकेचे एटीएम कार्यरत आहे. २४ तास सेवा देणाऱ्या या एटीएमला सुरक्षा रक्षक नसतानाही यापूर्वी चोरीचा कोणताही प्रकार घडलेला नव्हता. मात्र, शनिवारी पहाटे अचूक वेळ साधत चोरट्यांनी धाड टाकल्याने गावात चिंता व्यक्त केली जात आहे. एटीएममध्ये रोकड भरणे व देखभाल करण्याचे काम खाजगी एजन्सीकडे असून त्याचे नियंत्रण नाशिक येथील कार्यालयातून केले जाते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित पान ४ तपासाला वेग; रॅकेटचा संशय घटनेनंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम हाती घेतले आहे. ही चोरी एखाद्या संघटीत टोळीचा भाग आहे का, तसेच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकीस्वाराला उडवून डंपर उलटला:एकाचा दुर्दैवी अंत
नेवासे-शेवगाव राज्यमार्गावरील भानसहिवरे शिवारात शनिवारी सकाळी ८:४५ वाजेच्या सुमारास एका भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राजेंद्र गंगाधर भोईटे (५२) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात भोईटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर पळवण्याच्या प्रयत्नात थोड्या अंतरावर उलटला, मात्र काही लोकांनी जेसीबीच्या सहाय्याने तो सरळ करून पसार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला . दुचाकीस्वार राजेंद्र भोईटे हे शनिशिंगणापूरहून दर्शन घेऊन परतत होते. भानसहिवरे येथील एका दूध डेअरीजवळ फोन आल्यामुळे त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. ते फोनवर बोलत असताना, भानसहिवरेकडून नेवासे फाट्याकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की भोईटे यांचा जागीच अंत झाला. नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार अपघातानंतर डंपरचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण डंपर पुढे जाऊन पलटी झाला. पोलिसांची सकाळी नऊ ते दुपारी ३ पर्यंत धावपळ डंपरचा पत्ता न लागल्याने पोलिस आणि नातेवाईकांमध्ये मोठी खडाजंगी उडाली. शेवटी पोलिसांनी तपास चक्रे फिरवून दुपारी ४ वाजेच्या सुमारास डंपर व चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
परभणी विद्यापीठाने संशोधित केलेला परभणी शक्ती' या वाणाचे बियाणे महाबीजमार्फत कृषी विभागाच्या माध्यमातून श्रीगोंदे तालुक्यातील दीड हजारांवर शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात पेरणी झालेली, ज्वारी अवघी दोन ते अडीच फूट वाढ झाली. डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना ही बाब कळाल्यावर त्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. पण त्यावर उत्तर न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर कृषी विभागाने महाबीज बियाणे महामंडळाचे अधिकारी तसेच परभणी कृषी विद्यापीठातील तज्ञांना संपर्क करत १० जानेवारीला तातडीने पाहणी दौरा आखला. यावेळी शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांसमोर प्रश्नांचा भडीमार केला. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अरविंद कापसे (रा. पेडगाव रोड, श्रीगोंदे) यांनी याबाबत सर्वप्रथम आवाज उठवला. कापसे यांनी ज्वारीसह मुख्यत: जनावरांच्या चाऱ्यासाठी पाच एकरवर या वाणाची पेरणी केली. पण त्याची वाढच झाली नाही. शनिवारच्या पाहणी दौऱ्यात ज्वारी संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ज्वारी पैदासकार डॉ. अंबिका मोरे, विभागीय व्यवस्थापक, जालना येथील राजाभाऊ मोराळे, दौंड साहेब, जिल्हा व्यवस्थापक महाबीज रवींद्र काळभोर, कृषी अधिकारी महाबीज तसेच तालुका कृषी अधिकारी चौधरी मॅडम आदींची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी कापसे तसेच भोळे वस्ती येथील अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटला प्रत्यक्ष भेट दिली. दरम्यान, दोषींवर कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कापसे यांनी केली. या उदाहरणातून समजून घ्या नुकसान कापसे हे शेतीसह दुग्ध व्यवसायही करतात. जनावरांसाठी त्यांनी पाच एकरवर परभणी शक्ती वाण लावले. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना ४ किलोच्या बियाणांची प्रत्येकी एक बॅग मोफत मिळाली. या बॅगची अंदाजे किंमत ४०० रुपये आहे. याचाच अर्थ त्यांना दोन हजार रुपयांचे मोफत बियाणे मिळाले. पण ज्वारी लावलेल्या क्षेत्रावर जर त्यांनी तूर किंवा दुसरे पीक घेतले असते तर एकरी दीड लाख उत्पन्न झाले असते. त्यामुळे कापसे यांचे पिकाचे दीड लाख अन् वर्षभरात चाऱ्यासाठी अतिरिक्त दीड लाख असे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप कापसे यांनी केला. श्रीगोंदेत १५०० शेतकऱ्यांनी या वाण लावल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी व शाश्वत विकासाचे कार्य शिबिरात घडावे. ही योजना केवळ अतिरिक्त गुण मिळवण्याचे माध्यम नसून ती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संस्काराची शाळा आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने या योजनेत काम करावे, असे आवाहन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अरुण तनपुरे यांनी केले. लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने तालुक्यातील सडे येथे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. “आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी, देशासाठी आणि स्वतःसाठी कार्य केले पाहिजे. स्वतःचा विकास झाला तर कुटुंबाचा विकास होतो आणि कुटुंबाचा विकास झाला तर देशाचा विकास होतो.” शिबिरातून गावकऱ्यांचे मन बदलले नाही तरी स्वतःचे मन बदलले तर खऱ्या अर्थाने शिबिर यशस्वी झाले असे म्हणता येईल असे स्पष्ट करत तनपुरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे व महत्त्व स्वयंसेवकांना स्पष्ट करून सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सडे गावचे प्रगतशील शेतकरी भगवान झडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी पैसा ही माणसाची प्राथमिक गरज आहे. मात्र ती शेवटची गरज नाही. समाजात आपले नाव टिकेल असे कार्य केले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःतील प्रभावी गुण ओळखून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले. प्र. प्राचार्य डॉ. अनिता वेताळ यांनी विद्यार्थ्यांना वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी सरपंच सविता पानसंबळ, राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भाउसाहेब मोरे, उपसरपंच अर्चना देठे, सुरेश वाबळे, ज्ञानेश्वर कोळसे, मधुकर पवार, गणेश गाडे, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दत्तात्रय खिलारी यांनी तर विक्रम फाटक यांनी आभार मानले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.योगिता मोरे , प्रा.डॉ.मनोज तेलोरे कार्यालयीन अधीक्षक गणेश देशमुख तसेच सडे गावचे प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय सहलीचा आनंद केवळ फिरण्यापुरता मर्यादित न ठेवता, साक्री येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे. ऐतिहासिक शिवनेरी गडावर नुकताच ‘एक मूठ कचरा’ हा विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी गड परिसराची स्वच्छता केली आणि पर्यावरण संरक्षणाचा कृतिशील संदेश या अभियानातून विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यालयाची सहल शिवनेरी गडावर गेली असता, पर्यटकांकडून परिसरात फेकण्यात आलेला प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू पाहून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा ध्यास घेतला. पर्यवेक्षक एस. एन. पाटील व शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसरातून कचरा संकलित केला आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून गडाचा परिसर चकाचक केला. मान्यवरांकडून शाबासकीची थाप विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव व दादासाहेब रामराव पाटील बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अध्यक्षा मंगला पाटील, उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील तसेच गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे आणि प्राचार्य डी. एन. पाटील यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्कार आणि टीम वर्कची शिदोरी या उपक्रमाबाबत माहिती देताना विद्यालयाचे प्राचार्य नैनेश शिंदे म्हणाले की, हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहीम नसून, विद्यार्थ्यांमध्ये आपल्या गौरवशाली गड-किल्ल्यांप्रती आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण करणारा एक संस्कार आहे. यातून विद्यार्थ्यांना सांघिक कार्य आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली.
आज अभिषेक असता तर घोसाळकरांचे घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती, मला विनोद घोसाळकरांचा अभिमान वाटतोय. पण यावेळी भावनेत अडकू नका, मी तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात आलो नाही, तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर आता भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचार कार्यालयात उद्धव ठाकरेंनी भेट दिली होती. त्यावेळी भाजपने घोसाळकरांच्या घरात भांडण लावून फोडाफोडी केली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, मी आणि अभिषेकने दोघांनी मिळून प्रत्येक निर्णय घेतले होते. अभिषेक असता तर जे काही असेल ते दोघांनी मिळूनच केले असते. मला असे वाटते की, अजूनही अभिषेक माझ्याबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे अभिषेकचे नाव घेऊन उगाचच प्रचार करत आहेत. निष्ठावंत वैगरे...ते चुकीचे आहे. उगाचच तुम्ही अभिषेकचे नाव कशाला घेत आहात. माझा नवरा आहे, मी काहीही करु शकते, अशी प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांनी दिली आहे. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुक्ताईनगर येथील तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बालवाडी व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांनी पालक व श्रोत्यांची मने जिंकली. विविध रंगीबेरंगी वेशभूषेत सादर केलेल्या मराठी, हिंदी, बालगीत, रिमिक्स, अहिराणी व पोवाड्यांनी चैतन्य निर्माण केले. अध्यक्षस्थानी आमदार एकनाथ खडसे, व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, संचालक चंद्रशेखर बढे, रमेश खाचणे, शाळा समिती अध्यक्ष पुरुषोत्तम महाजन, महेश पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीलाल जोगी, मुख्याध्यापिका चित्रा भारंबे उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धेतील विजेते, शासकीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका चित्रा भारंबे यांनी केले. बक्षीस वाचन आशा कोळी, सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले. शिक्षक शाळेत राबवत असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. प्राथमिक शाळा ही आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आठवण असते, असे आमदार खडसे यांनी सांगितले. शाळेचा माजी विद्यार्थी हितेश पोतदार यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणून निवड होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतो : आमदार खडसे
येथील नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नुकसान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष यतीन कदम व आमदार राहुल आहेर यांच्याकडे केली आहे. नगरपालिकेची निवडणुकीत पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दोन जागेसाठी युती करून भारतीय जनता पार्टीचे नुकसान करणाऱ्या मंडल अध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांना पदमुक्त करावे, अशी मागणी निवेदनात म्हटले आहे. दत्तराज छाजेड यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला असताना पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता निवडणुकीतून माघार घेतली. याची पक्षाने नोंद घ्यावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन कवडे, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, अभय निकम यांच्या स्वाक्ष्ऱ्या आहेत.
लासलगाव ते विंचूर या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झालेले आहे, मात्र प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते महेश होळकर यांनी मुरूम टाकत खड्डे बुजवून सामाजिक बांधीलकी जपली. लासलगाव ते विंचूर काँक्रिटीकरण चौपदरीकरणाचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब आहे. तत्पूर्वी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात घडत असल्याने अनेक दुचाकी चालकांना प्राण गमवावे लागले आहेत. मंजुळा पॅलेस तसेच होळकरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. सामाजिक कार्यकर्ते महेश होळकर यांनी जेसीबीच्या आधारे स्वखर्चाने मुरूम टाकत अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवले. शहरात असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या काँक्रीटमधून लोखंड बाहेर आल्याने दुचाकीमध्ये अडकून अनेक वाहन चालक जखमी होत आहेत. काँक्रिटीकारणाचे काम जेव्हा करायचे तेव्हा करा, मात्र तात्पुरती का होईना या रस्त्याची डागडुजी करा, अशी मागणी होत आहे. वर्षभरात १७ जणांचा अपघाती मृत्यू लासलगाव- विंचूर मार्गाच्या चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळालेली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात या रस्त्यावर झालेल्या अपघातात १७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या रस्त्यात तीन ते चार ठिकाणी वळण असल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठ्या गाड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघात होतात. चौपदरीकरण रस्त्याचे काम होईपर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवले शहरातील काँक्रिटीकरण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. होळकरवाडी येथे चारचाकी गाड्या देखील नुकसानग्रस्त होत आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकला आहे. मंजूर रस्त्याचे काम तातडीने कराच, मात्र त्यापूर्वी तात्पुरती डागडूजी करावी. - महेश होळकर, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव
घसरल्याने साताळ्यात फुलकोबीमध्ये सोडल्या मेंढ्या:कोबी 5, वांगी 7, भेंडीसह टोमॅटो 10 रुपये किलो
फुलंब्री बाजारामध्ये आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर अल्प प्रमाणात आले असून साताळ्यासह अनेक ठिकाणी फुल व पत्ताकोबीच्या शेतात शेतकऱ्यांनी जनावरे सोडली आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी ४० रुपये प्रतिकिलो असलेली फुलकोबी आता ५ रुपयांवर आली आहे. तर, मेथीसह पालक भाजीचेही दर चारपटीने घसरले आहेत. महिनाभरापूर्वी या भाज्यांची एक जुडी २० रुपयांना होती, ती आता दहा रुपयांत ३ जुड्या मिळत आहेत. दर घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. गतवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तालुक्यात रब्बीचा पेरा वाढलेला आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पाणी असल्यामुळे भाजीपाल्याची लागवड केली आहे. तालुक्यात ३९१ हेक्टरवर भाजीपाला आहे. आता बाजारात मागणीपेक्षा जास्त भाजीपाला आल्यामुळे भाव घसरल्याचे दिसून येत आहे. नेहमी भाजीपाल्याचे दर वाढल्याची ओरड करणारे आता शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे. भाजीपालानिहाय दर भाजीपाला आता गत महिना मिरची ४० ७० (किलो) फुलकोबी ५ ४० टोमॅटो १० ६० वांगी ७ ४० भेंडी १० २० मेथी ३ (जुडी) २० (जुडी) कोथिंबीर ५ (जुडी) २० (जुडी) केलेला खर्चही निघत नाही, यामुळे जसे मका, कपाशी पिकांना विम्याचे कवच असतात तसे भाजीपाल्याला विम्याचे कवच द्यावे. जेणेकरून भाजीपाला पीक उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत येणार नाही. - सतीश बलांडे, भाजीपाला उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ बेडके म्हणाले, ‘‘भाजीपाल्यासाठी खर्चात वाढ झाली आहे. त्यातच वन्यप्राणी व कीड तसेच रोगांपासून पिकांच्या रक्षणासाठी रात्र रात्र थंडीत जागावे लागते. परंतु, आता दर घसरल्याने आमचा त्रास दिसत नाही का?’’
शूलिभंजन येथील वीटभट्टीवर झोपलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. दीपक देवसिंग मानधरे असे मृताचे नाव असून तो शूलिभंजनचा रहिवासी होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र अमोल कचरू सौदागर होता. अमोल कसाबखेडा येथील असून सध्या शूलिभंजन येथे राहतो. दोघे गेल्या चार वर्षांपासून मित्र होते. मृत दीपक व अमोल हे मित्र होते. शुक्रवारी सायंकाळी दोघांची भेट झाली. रात्री त्यांनी एका दुकानातून पँट व शर्ट खरेदी केला. दहा वाजता हॉटेलमध्ये जेवण केले. ११ वाजता दीपक मित्रासोबत शूलिभंजन येथील वीटभट्टीवर पोहोचला. रात्री बारा वाजता दोघे भट्टीवर झोपले. सकाळी अमोल विटा थापण्यासाठी खाली उतरला. त्याच वेळी त्याला चक्कर येऊन तो कोसळला. दरम्यान, दीपकला मजुरांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मृतावस्थेत आढळला. वीटभट्टी पेटवल्यानंतर ती शिजण्यासाठी किमान दहा दिवस लागतात. त्यामुळे झोपलेल्या ठिकाणी थेट धूर किंवा उष्णता पोहोचण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. तरी वीटभट्टीतील उष्णतेचा अप्रत्यक्ष परिणाम झाला का, जेवणातून विषबाधा झाली का, की अन्य कारण होते, याचा तपास सुरू आहे. दीपकच्या नातेवाइकांनी, ‘झोपलेल्या अवस्थेत मृत्यू कसा होऊ शकतो?’ असा सवाल उपस्थित केला. शवविच्छेदनात कोणताही संशय राहू नये यासाठी शवविच्छेदन खुलताबाद शासकीय रुग्णालयाऐवजी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. नातेवाइकांची शंका
येथे शिवजयंतीचा उत्साह आतापासूनच सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता आणि रंगरगोटी करण्यात आली आहे. आळंद ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी विशेष कारागीर पाचारण केले असून, आधुनिक मशीनच्या साहाय्याने पुतळ्याचे सौंदर्य अधिक खुलवण्यात आले आहे. पुतळ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला. केवळ सणापुरती स्वच्छता न ठेवता, शिवस्मारकाचे पावित्र्य वर्षभर जपण्यासाठी आळंद ग्रामस्थांनी एक आदर्श निर्णय घेतला आहे. शिवस्मारक समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने आता दररोज दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे. हे स्वयंसेवक दररोज पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करतात.
‘दिव्य मराठी’च्या छत्रपती संभाजीनगर दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गुरुवारी ( ८ जानेवारी) सायंकाळी हॉटेल सयाजी येथे झाले. व्यासपीठावर सिल्लोडचे सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी यांच्यासह फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अभिलाष मोहन सोनवणे आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गणोरकर आदी उपस्थित होते. या बहुचर्चित दर्जेदार दिनदर्शिकेचे वितरण आज, रविवारी ‘दिव्य मराठी’च्या अंकासोबत होणार आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, आमचे मित्र शिक्षणमहर्षी मोहन सोनवणे यांनी खामगाव येथे श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत शिक्षणाची गंगा आणली. शाळा- कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री गोरक्ष आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजही काढले. यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनींचे उच्च शिक्षणाचे, करिअरचे स्वप्न पूर्ण झाले. कायम विविध उपक्रम राबवणारे मोहन सोनवणे यांनी यंदा दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची दिनदर्शिकाही काढली आहे. याबद्दल त्यांचे व दिव्य मराठीचे अभिनंदन. श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अभिलाष मोहन सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना व अपघात विम्याचे कवच दिले आहे, सरकारच्या कोणत्याही योजना पासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नाही, अधिकार्यानी शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळुन दिला पाहिजे असे मत आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केले. ते आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण विलास बापू भुमरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी अधिकारी विकास पाटील, नंदु अण्णा काळे,दादा बारे, भुषण कावसाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत एकूण १७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना एकूण ३४ लाख रुपयांचे अनुदान आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ या वर्षासाठी एकूण १० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यांच्यासाठी १९ लाख रुपयांचे अनुदान वितरणासाठी उपलब्ध झाले आहे. या अनुदानाचे वितरण तातडीने करण्यात यावे व कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार भुमरे यांनी यावेळी दिल्या. या योजनेअंतर्गत मेघलता रामा मुळे, शिवाजी पंढरीनाथ रहाटवाडे, रमेश अंबादास गायके, पियुष राजू शिंदे, मनीषा मलाजी शेकडे, योगेश अंबादास गरजे, मंदाबाई दत्ता घायाळ, गंगुबाई लक्ष्मण भावले, रामभाऊ केशव गालफाडे, मोनिका प्रवीण वाकडे यांना लाभ देण्यात आला. यापुढील काळात शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी. विकास पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपकृषी अधिकारी अशोक वाकचौरे व शाम कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
येथील घृष्णेश्वर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खुलताबाद येथे आज शुक्रवार, दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील विविध शाळांमधून लहान व मोठा गट अशा दोन गटांत एकूण ३० विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक विषयांवर प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक/ प्राचार्य संजय वरकड होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ललिता मेवाळ, उच्च माध्यमिक पर्यवेक्षक परमेश्वर हजारे, माध्यमिक पर्यवेक्षक हरिश्चंद्र धांडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर उर्फ भाऊ व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुणे व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेसंदर्भात राजेंद्र सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य संजय वरकड यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याचे कौतुक करत आत्मविश्वास, वाचन व विचारस्वातंत्र्य जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपान आढाव, रामेश्वर राठोड, रामेश्वर धारे, मनोज दोडेवार, धीरज मगरे, निलेश बागडे, आनंद पाटील, राजेश बांगे, बिराजदार, मिलिंद बोडके, संगीता शिंदे, प्रभाकर काकडे, रवी सावजी, भगवान कोलते, आढाव, साजिद कुरेशी यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते व लहान गट प्रथम : कु. सबुरी दादासाहेब पवार, कमला नेहरू कन्या विद्यालय, खुलताबाद द्वितीय : कु. आराध्या रामेश्वर मिसळ, सामंतभद्र विद्यामंदिर, वेरूळ तृतीय : कु. दिव्या हरिभाऊ पाडले, न्यू हायस्कूल, गदाना मोठा गट प्रथम : अर्जुन संतोष ठाले, संत जनार्दन स्वामी विद्यालय, वेरूळ द्वितीय : कु. वैष्णवी जनार्दन कोरडे, जि. प. शाळा, कसाबखेडा तृतीय : कु. प्रगती प्रकाश बरडे, न्यू हायस्कूल, गदाना

25 C