मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर समोर येताच प्रेक्षकांसह मनोरंजन विश्वातही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. टीझर पाहिल्यानंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केलेली […] The post तान्ह्याचं नमन राजे…! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपवर्गीकरणाच्या विरोधात अहवालाचे सामूहिक दहन
लातूर : प्रतिनिधी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात दि. २० एप्रिल रोजी सकाळी शहरातील महात्मा गांधी चौकात मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाने जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी न्या. बद्दर अहवालाचे प्रतिकात्मक सामुहिक दहन करून शासनाच्या भूमिकेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […] The post उपवर्गीकरणाच्या विरोधात अहवालाचे सामूहिक दहन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लिंगायतांनी जनगणनेमध्ये नोंद करताना धर्माच्या रकान्यात लिंगायत लिहावे
लातूर : प्रतिनिधी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी १२ व्या शतकात मानवतावादी अनुभव मंटपाच्या माध्यमातून लिंगायत धर्म संस्कार दिले. त्यामुळे लिंगायतांनी जनगणनेमध्ये आपली नोंद करताना धर्माच्या रकान्यात ‘लिंगायत’ म्हणून धर्माची नोंद करावी, असे आवाहन लिंगायत शरण फांऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले. यासंदर्भात कर्नाटक राज्यात प्रबोधनात्मक चळवळ सुरू झाली आहे. तशी चळवळ आम्ही महाराष्ट्रात […] The post लिंगायतांनी जनगणनेमध्ये नोंद करताना धर्माच्या रकान्यात लिंगायत लिहावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे ७३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान
लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्र. १७ मधील तुळजाभवानीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-या ७३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे […] The post विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे ७३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी परशुराम जयंती साजरी
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरांमध्ये परशुराम जयंती २०२६ समितीच्या वतीने तीन दिवसीय सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. तर या निमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये १२ वर्षातील रेकॉर्ड ब्रेक तब्बल १५३ जणांनी रक्तदान केले. परशुराम जयंतीच्या पहिल्या उपक्रमामध्ये १७ एप्रिल रोजी येथील कल्पतरू मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या गृह उद्योग प्रदर्शनीमध्ये बिबियन महिला मंडळ लातूरच्या सदस्याकडून […] The post धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी परशुराम जयंती साजरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
८९, ५०० रुपयांची अवैध दारू जप्त
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत दि. १९ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेने २ ठिकाणी प्रभावी कारवाई करून ८९ लाख ५०० रुपयांचीर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णा भाऊ […] The post ८९, ५०० रुपयांची अवैध दारू जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात यावे. यासाठी सर्व विभागांनी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह कृषी, मदत व पुनर्वसन, वित्त, जलसंपदा, जलसंधारण, भारतीय हवामानशास्त्र विभाग, वित्त व नियोजन विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत एल निनोचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता असून पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मे महिन्यात उष्णतेची तीव्रता तुलनेने कमी राहील, मात्र उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली. दरम्यान, पॉझिटिव्ह ‘आयओडी’ विकसित झाल्यास एल निनोच्या परिणामांची तीव्रता काही प्रमाणात कमी होऊ शकते, असेही यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, २०१५ मध्ये पावसाळा संपल्यानंतर राज्यातील पाणीसाठा केवळ ४५ टक्के होता, मात्र सध्या पावसाळा सुरू होण्यापूर्वीच तितका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास राज्याला या परिस्थितीचा सक्षमपणे सामना करता येईल. २०१५ मधील एल निनोच्या कालावधीतील अनुभवावरून २०१८ या वर्षी उपाययोजना केल्यामुळे पिके वाचविता आली. एल निनोच्या कालावधीत पावसातील अनियमिततेमुळे विशेषतः मराठवाड्यात मोठा परिणाम दिसून आला होता. दोन पावसाच्या सरींमध्ये दीर्घ खंड पडल्यास पिकांवर ताण येतो, मात्र संरक्षित सिंचनाच्या माध्यमातून पिकांचे नुकसान कमी करता येते. त्यामुळे जलसंधारण व पाणी साठवण क्षमतेत वाढ करणे अत्यावश्यक आहे. जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार या योजनांची कामे तातडीने आणि मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या कामांसाठी वित्त विभागाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच जुन्या जल स्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवनाच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे. यामुळे कमी पैशात जास्त पाणी साठा उपलब्ध होईल. कमी पावसाच्या परिस्थितीतही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारी हीच साधने प्रभावी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘जी रामजी योजने’तून होणारी जलयुक्त शिवारची कामे योग्य प्रकारे झाली आहेत की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जी रामजी मधून जास्तीत जास्त कामे मिळविण्यासाठी टास्क फोर्स तयार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील पर्जन्यमान ९० टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीवर मोठा परिणाम होतो. अशा परिस्थितीत नुकसान कमी करण्यासाठी पूर्वतयारी करण्यात यावीत. मनरेगा योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करण्याचेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच पिण्याच्या पाण्याबाबत केवळ चालू वर्षाचा नव्हे, तर पुढील उन्हाळ्याचाही विचार करून नियोजन कराव्यात. पावसातील संभाव्य घट लक्षात घेऊन पाणी साठवून ठेवणे आणि त्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पाणी बचतीसाठी आणि इतर पूरक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यात यावे. जिल्हाधिकारी, सिंचन विभागाचे अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून पाण्याचा काटेकोर वापर आणि साठवणूक सुनिश्चित केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत पशुधनासाठी चारा टंचाई होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एल निनोचा परिणाम इतर राज्यांवरही होण्याची शक्यता असल्याने बाहेरील राज्यांवर अवलंबून न राहता राज्यातच वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवावेत. धरणांच्या बॅक वॉटर क्षेत्रात वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात यावा. मोठ्या प्रमाणात पशुधन असणाऱ्या तसेच चारा टंचाई जाणविणाऱ्या सोलापूर, सांगली आणि मराठवाडा या भागांमध्ये चारा उपलब्ध कसा होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या. खतांच्या उपलब्धतेबाबत तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी. ‘अॅग्रीस्टॅक’ प्रणालीशी खत वितरण जोडून पारदर्शकता वाढविणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तपासणी यंत्रणा मजबूत करण्यावर भर देण्यात यावा, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. शेततळे योजनेवर भर द्यावा - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी विषय प्रभावीपणे हाताळण्यासाठी कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली असून विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. उद्भवू शकणाऱ्या संभाव्य अडचणींचा पूर्वानुमान करून त्यासाठी आवश्यक तयारी करण्यावर भर देण्यात आला आहे. यंदाच्या पावसातील अनिश्चिततेमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर खतांचा पुरवठा होणे अत्यावश्यक आहे. विशेषतः डीएपी खताचे वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले जाणार आहेत. खते आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सर्व विक्री केंद्रांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे भरणे यांनी सांगितले. कृषिमंत्री भरणे म्हणाले की, पावसाच्या अनियमिततेमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावरही उपाययोजना करण्यात येत आहेत. महाबीज तसेच इतर बियाणे व चारा पुरवठा करणाऱ्या संस्थांना आवश्यक साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुबार पेरणीची वेळ उद्भवल्यास अतिरिक्त बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठीही संबंधित संस्थांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पाणी साठवणुकीसाठी शेततळे योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात यावा. त्यासाठी आवश्यक साहित्य, विशेषतः प्लास्टिक लाइनिंग उपलब्ध करून देण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी कृषी विभाग पूर्णपणे सज्ज असून शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येत असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पर्यावरण विभागाचे सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन सचिव एन रामास्वामी, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव माणिक गुरसाळ, राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण, भारतीय हवामान शास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक साई कृष्णन आदींसह उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थानचे संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक, आयमेट वेदर सर्व्हिसेसचे संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र संचालक उपस्थित होते.
कौटुंबिक वादाचा भीषण अंत:लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईने विहिरीत उडी मारली; परिसरात खळबळ
लातूर जिल्ह्यात हृदयद्रावक घटनांची मालिका सुरूच असून, चाकूर येथील 6 वर्षीय चिमुरड्याचा त्याच्याच चुलतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता खरोसा येथे एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. एकामागून एक घडलेल्या या भीषण आणि खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, खरोसा येथील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे कौटुंबिक वादातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय 25) या विवाहित महिलेने पतीसोबत झालेल्या टोकाच्या वादातून आपली दोन लहान मुले, शिवानी आणि शिवांश यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून मोठे भांडण झाले होते. याच रागाच्या भरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास निकिता आपल्या दोन्ही चिमुरड्यांना घेऊन घराबाहेर पडल्या, ज्याचा शेवट या भीषण दुर्घटनेत झाला. सोमवारी सकाळपासून निकिता आणि मुलांचा शोध घेतला जात होता, मात्र दुपारच्या सुमारास घराशेजारील विहिरीत तिघांचेही मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच किल्लारी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले आहेत. एकाच वेळी आईसह दोन निष्पाप जीवांचा अंत झाल्याने खरोसा गावासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-2026 ची घोषणा:जीव वाचवणाऱ्यांचा हेल्प रायडर्सतर्फे सन्मान होणार
हेल्प रायडर्स संस्थेने 'संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६' ची घोषणा केली आहे. मानवतेची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पुढाकार घेतलेल्या हेल्प रायडर्स संस्थेने समाजात एक सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे आणि इतर आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी धावून जाणे. या कार्यामुळे अनेक जीव वाचले आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ उभी राहिली आहे. कोरोना काळात प्लाझ्मा, औषधे आणि अत्यावश्यक वस्तू पुरवून संस्थेने अनेकांचे प्राण वाचवले. तसेच पूरग्रस्त भागात मदतकार्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या संस्थेचे कार्य विविध शहरांमध्ये विस्तारले असून शेकडो स्वयंसेवक या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत कनोजिया म्हणाले की, समाजात जीव वाचवण्याच्या कार्यात योगदान देणारे, अपघातग्रस्तांना मदत करणारे किंवा आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने पुढाकार घेणाऱ्या नागरिकांनी संस्थेशी संपर्क साधावा. महाराष्ट्रासह देशभरातील अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पुढे येऊन आपल्या कार्याची नोंद संस्थेकडे करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 'संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६' सोहळ्याचे आयोजन पुण्यात शनिवार, ६ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे. या पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी ९९७०२३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. या पत्रकार परिषदेला हेल्प रायडर्सचे समन्वयक अनुपम शहा, बाळासाहेब ढमाले आणि श्रीकांत कापसे उपस्थित होते.
युवक काँग्रेसने राज्यात 'पाच अभियानां'ची घोषणा केली आहे. सामाजिक तणाव, जातीय प्रश्न आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे आणि अभिषेक अवचार यांनी ही माहिती दिली. ‘रोहित वेमुला, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश’ या विचारवंतांच्या नावाने ही पाच अभियानं राबवली जातील. शिवराज मोरे यांनी सांगितले की, समाजात, विशेषतः ग्रामीण भागात आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये जात विचारण्याची प्रवृत्ती वाढत आहे. ही बाब चिंताजनक असून, लहान मुलांमध्येही ही प्रवृत्ती दिसून येत आहे, जी समाजासाठी धोकादायक आहे. विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी ताकद म्हणून युवक काँग्रेस उभी राहावी, या उद्देशाने ‘रोहित वेमुला अभियान’ सुरू करण्यात येत आहे. अंधश्रद्धेविरोधात लढा देण्यासाठी ‘दाभोळकर अभियान’ राबवले जाईल. या अंतर्गत ग्रामीण भागात बुवाबाजी आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती केली जाईल. ‘पानसरे अभियान’ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वसमावेशक इतिहासाची माहिती युवकांपर्यंत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करेल. इतिहासाचे विकृतीकरण थांबवून योग्य विचार पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. ‘कलबुर्गी अभियान’ आणि ‘गौरी लंकेश अभियान’ अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विचारस्वातंत्र्य याबाबत जागृती करतील. पत्रकारांमध्ये वाढत चाललेली भीती आणि दबाव यावरही या मोहिमेतून आवाज उठवला जाईल, असे मोरे यांनी नमूद केले. अभिषेक अवचार यांनी स्पष्ट केले की, ही मोहीम कोणत्याही राजकीय फायद्यासाठी नसून समाजप्रबोधनासाठी आहे. टीका आणि विरोध सहन करत हे काम सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. विविध ठिकाणी विज्ञान परिषद, पदयात्रा, चर्चासत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जनजागृती केली जाईल. या अभियानाची सुरुवात पुण्यातून होणार असून, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पहिला मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात मोहिमेची सविस्तर रूपरेषा मांडली जाईल. पुणे हे शिक्षणाचे केंद्र असल्याने येथून दिलेला संदेश संपूर्ण राज्यात पोहोचतो, त्यामुळे सुरुवात पुण्यातून केली जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
पुणे बालपुस्तक जत्रा 30 एप्रिलपासून:गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे 4 मे पर्यंत विनामूल्य आयोजन
पुणे बालपुस्तक जत्रेचे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही जत्रा विनामूल्य भरवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती मिळावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा स्पर्श व्हावा, हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे. मुलांसोबत पालक आणि शिक्षकांनाही नावीन्यपूर्ण कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार उपस्थित होते. मागील वर्षी या महोत्सवाला मुलांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता, ज्यात सुमारे ५५ ते ६० हजार मुलांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी बालसाहित्याची ७५ दालने होती, जी यंदा १०० पर्यंत वाढवण्यात आली आहेत. या वर्षीच्या जत्रेत साहित्य आणि कलासंस्कृतीच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. यात बालसाहित्याची शंभर दालने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामीण व साहसी खेळ, तसेच खाद्यजत्रेतून खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येणार आहे. मुलांचे गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, बाल साहित्य लेखन स्पर्धा, मुलांचे कविसंमेलन, पपेट शो, पथनाट्य कार्यशाळा, लेखक तुमच्या भेटीला, चिंटू तुमच्या भेटीला, नाट्यनगरी कार्यशाळा, जादूचे खेळ आणि विविध प्रकारचे प्रशिक्षण असे कार्यक्रम अनुभवता येतील. मुलांना साहित्य आणि कलेची गोडी लागावी यासाठी अधिकाधिक पुणेकरांनी आपल्या मुलांसोबत या जत्रेला भेट देऊन साहित्य संस्कृतीला पुढे नेण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सुनील महाजन यांनी केले आहे. जत्रेत सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
पुणे शहरात बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे विमान अपघाताचा धोका निर्माण झाला असून, विकासक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. विकासक आणि महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने हे बनावट परवाने मिळवून इमारतींना मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी आणि सिंहगड रोड परिसरातील उंच इमारतींच्या मंजुरीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे. एअर फोर्सच्या गांधीनगर कार्यालयाने महापालिकेला कळवले आहे की, आंबेगाव येथील एका प्रकल्पासाठी सादर केलेली परवानगी 'पूर्णपणे बनावट' आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे परवाने मिळवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. याबाबत शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले आहे. ६ एप्रिल रोजी पुरावे देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप घरत यांनी केला. एनडीए आणि मिलिटरीची संवेदनशील ठिकाणे पुण्यात असताना, सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवणे हा राष्ट्रद्रोहाचा प्रकार असल्याचे घरत यांनी म्हटले आहे. खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भ्रष्टाचाराच्या या इमारतींना तात्काळ टाळे ठोकून दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही घरत यांनी दिला.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन 'अमृत भारत' रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून या संदर्भातील अधिकृत मंजुरी कळवली आहे. पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने भाविक काशी, वाराणसी आणि प्रयागराजला जात असतात. प्रवाशांची ही गरज ओळखून मंत्री मोहोळ यांनी हडपसर ते बनारस दरम्यान नवीन रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याला सकारात्मक प्रतिसाद देत 'अमृत भारत' या आधुनिक रेल्वेला मंजुरी दिली आहे. ही गाडी हडपसर टर्मिनलवरून सुटणार असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना थेट वाराणसीपर्यंत जलद सेवा मिळेल. मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन या गाड्यांच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा केली होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि रेल्वेचे अर्थकारण या दोन्ही बाबी रेल्वे मंत्रालयाला पटवून देण्यात त्यांना यश आले. या गाड्यांमुळे केवळ पर्यटनच नाही, तर व्यापार आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळणार आहे. लवकरच या दोन्ही गाड्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होऊन त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. दुसऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात, पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणारी विशेष गाडी (०२१३१/०२१३२) आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. यापुढे ही गाडी गाडी संख्या २०१६१/२०१६२ 'पुणे-जबलपूर एक्सप्रेस' म्हणून ओळखली जाईल. ही गाडी नियमित झाल्यामुळे प्रवाशांना आता वर्षभर आगाऊ आरक्षण करणे सोपे होणार असून, विशेष गाड्यांचे जास्त तिकीट दरही कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. पुणे आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना काशी-प्रयागराजच्या तीर्थयात्रेसाठी थेट आणि आरामदायी रेल्वे हवी होती. अमृत भारत एक्सप्रेसच्या मंजुरीमुळे आणि पुणे-जबलपूर गाडी नियमित झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे.
महिला विधेयकावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यांवरून विरोधकांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली असून जोरदार हल्लाबोलही केला. तसेच त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डीबेटसाठी तयार असल्याचे म्हटले होते. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, मला असे वाटतेय बारामतीच्या मोठ्या ताई त्यांनी म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत डीबेट करायला तयार आहे. ताईंनी जितके प्रश्न उपस्थित केले त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवेंद्रजींनी त्यात म्हटले आहे की माझे समकक्ष जे नेते असतील त्यांच्यासोबत मी डीबेट करायला तयार आहे. म्हणजे पवार साहेब यांनी जर विनंती केली आणि ते तयार असतील तर निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री हे माननीय पवार साहेबांसोबत डीबेट करतील, असे म्हणत वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील महिला विधेयकाला विरोध केला. त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, दुर्दैव आहे की ज्या महिलांनी, ज्या महिला खासदारांनी विरोध केला, या सगळ्या कुठल्या न कुठल्या राजकीय पार्श्वभूमीच्या महिला आहेत. कोणाचे वडील आहेत, कोणाचा पती आहे, कोणाचा भाऊ आहे. आज या 33 टक्क्यांची आवश्यकता होती, ज्यासाठी मोदीजींचा प्रयत्न आहे की सर्वसाधारण ज्यांच्या मागे कुठल्याही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही, अशा महिला संसदेतही येणार होत्या आणि देशाच्या प्रत्येक विधानसभेतही येणार होत्या. पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, इतक्या महिलांनी जे स्वप्न पाहिले होते, त्याचा चक्काचूर करण्याचे काम यांनी केले आहे. आणि त्यात महिला खासदार ज्या त्या ठिकाणी आहेत, त्यांचाही समावेश आहे, हे दुर्दैव आहे. जल्लोष केला गेला हे आणखी दुर्दैव आहे. मला त्यांना सांगायचे आहे की नक्की जल्लोष कराच तुम्ही, आता देशातल्या आणि राज्यातल्या महिलांचा शंखनाद तुम्हाला ऐकायला येईल, तो शंखनाद तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. चित्रा वाघ म्हणाल्या, संसदेत इतक्या सध्या सोप्या भाषेत हे बिल समजावले आहे, या बिलावर जे काही आक्षेप होते ते सुद्धा सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्याचे निरासण करण्यात आले आहे. असे असून सुद्धा जर सभागृहात बसलेल्या महिला प्रश्न विचारात असतील तर मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्यावरच आहे.
धक्कादायक! लातूरमध्ये सात वर्षांच्या चिमुरड्याची सख्ख्या काकूनेच केली हत्या; आरोपी महिलेला अटक
लातूर (प्रतिनिधी): चाकूर परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या सात वर्षीय देवांश मंगेश स्वामी याच्या खून प्रकरणाचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत यशस्वी उलगडा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या पतीला आणि त्याच्या कथित प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी सख्ख्या काकूनेच या निरागस बालकाचा बळी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला पोलिसांनी बेड्या […] The post धक्कादायक! लातूरमध्ये सात वर्षांच्या चिमुरड्याची सख्ख्या काकूनेच केली हत्या; आरोपी महिलेला अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘आरएसएस’च्या सुरक्षेचा खर्च हा जनहिताचा विषय नाही
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस ) आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पुरवण्यात येणा-या ‘झेड प्लस’ व्हीव्हीआयपी सुरक्षेचा खर्च करदात्यांच्या पैशातून केला जात आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असून हा खर्च सरसंघचालक यांच्याकडूनच वसूल करण्यात यावा, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते ललन […] The post ‘आरएसएस’च्या सुरक्षेचा खर्च हा जनहिताचा विषय नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रम्प यांना ‘वॉर रूम’पासून दूर ठेवले
वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील संघर्षादरम्यान इराणमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सहाय्यकांवर ओरडत होते. यादरम्यान जेव्हा प्रशासनाचे अधिकारी हे इराणध्ये अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्यासाठी ‘हाय-रिस्क’ मोहिमेची आखणी करत होते, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना त्या खोलीच्या म्हणजेच वॉर-रूमच्या बाहेर ठेवण्यात आले होते, असे वृत्त वॉल स्ट्रीट […] The post ट्रम्प यांना ‘वॉर रूम’पासून दूर ठेवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनी महिला आरक्षणावरून काँग्रेसवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत महिला नेत्या उपस्थित होत्या. पण महिलांचा पुळका दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या महिलांना साधे आपले मत मांडू द्यावे असेही वाटले नाही. अर्थात भाजपच्या राज्यात नारीशक्ती अशीच बाजूला राहते, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री साहेबांच्या पत्रकार परिषदेत महिला मंत्री व नेत्या उपस्थित होत्या; मात्र महिलांचा पुळका दाखवणाऱ्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना या महिलांना आपले मत मांडू द्यावे, अशी आवश्यकता वाटली नाही. असो. मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, जनगणना आणि परिसीमनाचा महिला आरक्षण विधेयकाशी संबंध जोडताना त्यांची गाळण उडालेली स्पष्ट दिसली. त्यांची संपूर्ण पत्रकार परिषद मूलतः परिसीमन आणि जनगणना या विषयांवरच केंद्रित होती. भाजपच्या राज्यात ‘नारीशक्ती’ अशीच बाजूला सारून ठेवलेली आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले. ते म्हणाले, आमचा मुख्य प्रश्न असा आहे की, २०२३ च्या ‘नारीशक्ती’ विधेयकाचा जनगणना व परिसीमनाशी संबंध कोणी आणि का जोडला? २०२३ चे हे विधेयक एकमताने मंजूर झाले होते; परंतु त्यात मोदी सरकारने जनगणना आणि परिसीमनाची अट तसेच १० वर्षांची मुदत का घातली? काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी तेव्हाही केली होती. ती मागणी मान्य केली असती, तर २०२४ मध्येच महिलांना आरक्षण मिळाले असते. आताही विद्यमान ५४३ खासदारांमध्येच महिलांना आरक्षण लागू करता येऊ शकते; परंतु तसे केल्यास निवडून आलेल्या सुमारे १/३ म्हणजेच १८१ पुरुष खासदारांना घरी बसावे लागेल, म्हणून ते टाळले जात आहे. ही भूमिकाच महिला विरोधी आहे. जनगणनेची अट घालण्याची गरज काय होती? सचिन सावंत म्हणाले, आता मूळ मुद्दा २०२३ च्या ‘नारीशक्ती’ विधेयकातील जनगणना आणि परिसीमनाची अटीचा! २००९ मधील परिसीमन २००१ च्या जनगणनेनंतर लागू करण्यात आले होते. मग २०२६ च्या जनगणनेची वाट पाहण्यात नेमकी अडचण काय आहे? या जनगणनेत जातीय जनगणना होणार आहे. मग ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींवर २०११ च्या जनगणनेच्या आधारे अन्याय होत नाही का? या विधेयकात ओबीसी महिलांचा समावेश का नाही? आणि जर २०११ ची जनगणनाच ग्राह्य धरणार होता, तर २०२३ च्या विधेयकात जनगणनेची अट घालण्याची गरज काय होती? शिवाय, हे विधेयक आणले तेव्हा कोविडचा काळही संपलेला होता. जर सर्व प्रदेशांत ५०% जागा वाढवायच्या असतील, तर ते विधेयकात स्पष्ट का करण्यात आले नाही? याचे समाधानकारक उत्तर अमित शहा यांनी दिलेले नाही. संविधानाच्या कलम ८१ नुसार १९७१ च्या जनगणनेला ‘फ्रीज’ करण्यात आले आहे, त्यामुळे छोट्या राज्यांना प्रतिनिधित्वाचे संरक्षण मिळते. ५०% वाढ केली, तरी हे संरक्षण धोक्यात येऊ शकते. प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचनेनंतर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व ८० वरून १२०, बिहारचे ४० वरून ६०, मध्य प्रदेशचे २९ वरून ४७, तामिळनाडूचे ३९ वरून ५९ आणि केरळचे २० वरून ३० जागांपर्यंत वाढेल. जरी सर्व राज्यांच्या जागा वाढणार असल्या, तरी उत्तरेकडील राज्यांना सुमारे २७० जागांची वाढ मिळेल, तर दक्षिणेकडील राज्यांना केवळ ६६ जागांची वाढ होईल. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात उत्तरेकडील राज्यांचे वर्चस्व अधिक बळकट होईल, असे सावंत म्हणाले. हा संघराज्य व्यवस्थेवर आघात नाही का? ते पुढे म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील जागांचा फरक ३२ वरून ४८ पर्यंत वाढेल. याची चिंता मुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे. मोठ्या राज्यांचा सरकार स्थापनेत आणि कायदे प्रक्रियेत प्रभाव अधिक वाढेल, तर दक्षिणेकडील राज्यांची वाटाघाटीची ताकद तुलनेने कमी होईल. सर्वात गंभीर बाब म्हणजे, परिसीमन हे प्रत्येक जनगणनेनंतर करणे संविधानाने बंधनकारक केले आहे (सध्या १९७१ ची जनगणना ‘फ्रीज’ आहे). मात्र या विधेयकातून कोणती जनगणना ग्राह्य धरायची, हा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. राज्यांमध्ये परिसीमन कशा पद्धतीने करायचे, हेही संसद ठरवणार असेल, तर हा संघराज्य व्यवस्थेवर आघात नाही का? २०२३ मध्ये महिला आरक्षणासाठी १० वर्षे वाट पाहावी लागेल, असे सांगणाऱ्या भाजपला अचानक महिला आरक्षणाची घाई लागली. तीही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेच्या काळात, हे न समजण्याइतके जनता भोळी नाही. सचिन सावंत म्हणाले, मणिपूर दंगलीदरम्यान दोन महिलांवर झालेले अत्याचार, हाथरस आणि उन्नाव येथील घटना, महिला ऑलिम्पियन खेळाडूंशी झालेले वर्तन, तसेच बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना दिलेला सन्मान, या प्रत्येक वेळी मोदीजी शांत राहिले. मोदी सरकारमध्ये हरदीप सिंह पुरी यांसारखे मंत्री आहेत, ज्यांचे दोषी लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीन यांच्याशी संबंध असल्याचे आरोप झाले आहेत. १६५४ आमदारांपैकी फक्त १६४ महिला भाजपच्या २४० खासदारांपैकी केवळ ३१ महिला (सुमारे १२%) आहेत. तसेच देशभरातील १६५४ आमदारांपैकी फक्त १६४ महिला (१०% पेक्षा कमी) आहेत. २१ मुख्यमंत्र्यांपैकी भाजपकडून केवळ एकच महिला मुख्यमंत्री आहे. याशिवाय, भाजपाच्या देशातील काही आमदारांवर गंभीर बलात्काराचे आरोप आहेत, आणि ५४ खासदार व आमदारांची नावे खून व बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आहेत. महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या बरोबर भाजपा मधील महिला विरोधी नेत्यांच्या वाढीची चिंता मुख्यमंत्र्यांनी असली पाहिजे, असे सावंत म्हणाले.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वाराकडील दोन लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नऱ्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली असून, आरोपींकडून दोन लाख रुपये रोख, दुचाकी, कोयता आणि मोबाईल असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना नऱ्हे परिसरातील एका मद्य विक्री दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत घडली होती. चोरट्यांनी त्याला कोयत्याचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले आणि पसार झाले होते. या प्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नऱ्हे पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. तपास पथकाला माहिती मिळाली की, लूटमार करणारे दोघे जण बाह्यवळण मार्गावरील श्री स्वामी नारायण मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून यश सतीश खवले (वय २०, रा. स्वास्तिक सोसायटी, नऱ्हे) आणि ऋषीकेश उद्धव लाखे (वय २०, रा. साई व्हिला सोसायटी, नऱ्हे) या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत दोघांनी लूटमार केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून लुटलेली दोन लाख रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, कोयता आणि मोबाईल असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार, नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक किरण लिटे, विजयसिंह घाडगे, नीलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, पुरुषोत्तम गुन्ला आणि योगेश झेडे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
सातारा जिल्ह्यात जर शिवसेनेची ताकद नाही असे आमदार महेश शिंदे म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असे म्हणत असतील तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल, असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच पक्षात कोणालाही डावलले जात नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे. महेश शिंदे यांनी पक्षात आपल्याला वेगळी वागणूक मिळत असल्याची टीका केली होती. यावर आता शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले की, शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या दौऱ्यावेळी वेगळे निमंत्रण देण्याची पद्धत नाही. कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. काही बॅनरवर महेश शिंदे यांचे फोटो नव्हते, मात्र त्यांना कार्यक्रमाची माहिती देण्याचे आदेश जिल्हाप्रमुखांना देण्यात आले असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे. महेश शिंदे यांना डावलले जात आहे का? यावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, अनेक बैठकीत त्यांनी स्वतः शिंदे उपस्थित आहेत का याची चौकशी केली आहे. जर त्यांना निमंत्रण मिळाले नाही, असा दावा केला जात असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असेही देसाई यांनी म्हटले आहे. तसेच महेश शिंदे यांनी स्वतःच्या ताकदीवर निवडून आल्याचे वक्तव्य केले असेल तर ते शिवसैनिकांचा अपमान ठरेल. जिल्ह्यातील सर्व निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे शिवसैनिकांच्या ताकदीवरच निवडून आले असल्याचे देसाई यांनी म्हटले. सातारा जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने 37 जागा जिंकून बहुमत मिळवले असून, जिल्ह्यात 100 हून अधिक लोकप्रतिनिधींच्या निवडीतून शिवसेनेची ताकद सिद्ध झाल्याचे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीपासूनच शंभुराज देसाई आणि आमदार महेश शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असून, या वादावर आगामी काळात पक्षश्रेष्ठी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा जिल्ह्यात शिवसैनिक आहेत कुठे?:महेश शिंदेंचा स्फोटक सवाल, शिंदे गटात खदखद उफाळली; साताऱ्यात शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर? साताऱ्यातील राजकारणाला पुन्हा एकदा ताप आला असून शिवसेना शिंदे गटातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतली. विशेष म्हणजे त्यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्याला कार्यक्रमांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा दावा केला. या विधानामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर
‘‘आम्हाला खानाचे मस्तक पाहिजे शिवबा…’’!
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथा ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येत आहे. अभिनेते रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत चित्रपट शुक्रवार दि. १ मे रोजी जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सोमवार दि. २० एप्रिल रोजी या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर समोर […] The post ‘‘आम्हाला खानाचे मस्तक पाहिजे शिवबा…’’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. वारकरी संप्रदायाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने लवांडे यांना या धमक्या येत असल्याचे समजते. यावरून विकास लवांडे यांनी ट्विट करत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणावसी यांच्याकडे केली आहे. विकास लवांडे म्हणाले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र पोलिस आपणास पुनश्च विनंती की, मला संभाजी भिडे यांचे धारकरी आणि काही हिंदुत्ववादी बुवा बाबांचे समर्थक मला फोन करून दररोज शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मेसेज करत आहेत, फोन करून त्रास देत आहेत. मी कुठेही कोणाचाही कसलाही अवमान केलेला नाही. मी वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे. पुढे विकास लवांडे म्हणाले, भागवत वारकरी संप्रदायाच्या संदर्भात तात्विक वैचारिक मांडणी करत आहे. मात्र माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच पंढरपूर, श्रीरामपूर, नेवासा इत्यादी ठिकाणी माझ्या विरुद्ध खोट्या निराधार तक्रार अर्ज देऊन गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मला फोन करून मेसेज करून त्रास देणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी. मी कायदा आणि लोकशाही पाळणारा जबाबदार कार्यकर्ता आहे. माझ्या जीवितास काही कमी जास्त झाल्यास मला फोन करणारे संभाजी भिडे यांचे धारकरी आणि कट्टर हिंदुत्ववादी सर्वस्वी जबाबदार राहतील त्यांनी यापूर्वी सुद्धा मला एक वर्षापूर्वी धमक्या व घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता. तसेच मला संरक्षण मिळावे, अशी मागणी विकास लवांडे यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी म्हणजे 17 एप्रिल रोजी विकास लवांडे यांनी ट्विट करत म्हटले होते की, भास्कर गिरी महाराजांचे नेवासा भागातील हिंदुत्ववादी भक्त मला सकाळपासून फोन करून जीवे मारण्याची दमबाजी, शिवीगाळ करत आहेत. याचा अर्थ तिकडे किती कट्टरवाद जोपासला गेला आहे ते कळते. खरे वारकरी असे हिंसक गुंड प्रवृत्तीचे नसतात. केवळ धर्मांध रुजवली आहे. मला दमबाजी, धमक्या, शिवीगाळ करणाऱ्या व फोन, मेसेज करून जाणीवपूर्वक रीतसर कायदेशीर तक्रार करतोय, अशी माहिती त्यांनी दिली होती.
लोकसभेत शुक्रवारी (दि.17 एप्रिल) महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करणारे विधेयक (131 वी घटनादुरुस्ती) मतदानानंतर नामंजूर झाली. या मतदानात एनडीए दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयशी ठरली. या विधेयकाच्या बाजूने 298 मते पडली, तर 230 मते विरोधात पडली. त्यानंतर महिला आरक्षण विधेयकावरून सरकारने विरोधकांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. 18 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशाला संबोधित करताना कॉंग्रेस आणि विरोधकांवर भ्रूणहत्या केल्याचा आरोप करत जोरदार टीका केली होती. आता मुंबईच्या वर्सोवा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून देखील कॉंग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. 'महिलांच्या हक्कांवर कॉंग्रेसचा घाव' 'महिलांच्या हक्कांवर कॉंग्रेसचा घाव' असे म्हणत शिवसेना शिंदे गटाने संजय निरुपम यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच हे आकडे फक्त मतदान नाही तर कॉंग्रेसची महिला विरोधी असणारी खरी मानसिकता आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध म्हणजे महिलांच्या सशक्तीकरणालाच नकार, अशी टीका शिंदे गटाने केली आहे. पंतप्रधान मोदींची कॉंग्रेसवर टीका दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना म्हटले की, देशातील कोट्यवधी महिलांची नजर संसदेकडे लागलेली होती. नारी शक्तीचा हा प्रस्ताव जेव्हा फेटाळला गेला, तेव्हा काँग्रेस, सपा, टीएमसी, डीएमके सारख्या घराणेशाही पक्षांनी आनंद साजरा केला, हे पाहून मला दुःख झाले. वैयक्तिकरित्या मला अपेक्षा होती की आपली दशकांपूर्वीची चूक सुधारेल आणि पापांचे प्रायश्चित्त करेल. पण काँग्रेसने इतिहास घडवण्याची आणि महिलांच्या पाठीशी उभे राहण्याची संधी गमावली, अशी टीका मोदींनी केली होती. दरम्यान, केंद्र सरकारच्या कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 16 एप्रिल 2026 पासून 'महिला आरक्षण कायदा 2023' लागू झाला असून त्याद्वारे संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, प्रस्तावित 131 व्या घटनादुरुस्ती विधेयक 2026 नुसार हे आरक्षण मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर (डिलिमिटेशन) लागू करण्याचे सरकारने प्रस्तावित केल्यामुळे विरोधकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला असून, हे आरक्षण भविष्यातील वाढीव जागांच्या निकषावर नव्हे, तर लोकसभेच्या विद्यमान 543 जागांवरच तत्काळ लागू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आगामी मतदानापूर्वी राज्यातील मतदार यादीत सुमारे ७ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या वाढीव मतदारसंख्येमुळे राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली, तरी आयोगाने या मतदारांचे सखोल तपशील जाहीर केलेले नाहीत. सात लाख नवीन मतदारांपैकी सुमारे ३.२२ […] The post पश्चिम बंगालमध्ये ७ लाख नवीन मतदारांची भर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिशीतील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय रक्तदाब
नवी दिल्ली : तरुण वयात, विशेषत: तीशीच्या आसपास रक्तदाब किंचित वाढला तरी भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, अशी माहिती एका नव्या संशोधनातून समोर आली आहे. सामान्य समजल्या जाणा-या पातळीत असलेला रक्तदाबही पूर्णपणे सुरक्षित नसून त्यात होणारी वाढ दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करू शकते, असे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनात सुमारे ६,००० प्रौढ व्यक्तींचा २० […] The post तिशीतील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय रक्तदाब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी भेंडवळच्या पाऊस व हवामानाविषयी अंदाज वर्तवणाऱ्या घटमांडणीला आव्हान दिले आहे. आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. घटमांडणी करणाऱ्यांनी त्याची 90 टक्क्यांहून अधिक अचूक भविष्यवाणी करून दाखवावी. असे केले तर त्यांना 80 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे ते म्हणालेत. बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दरवर्षी घटमांडणीद्वारे वर्षभरातील पीकस्थिती, पावसाचे प्रमाण, तसेच सामाजिक, आर्थिक व राजकीय घडामोडींसह देशाची संरक्षण स्थितीचा अंदाज वर्तवण्यात येते. नुकतीच ही घटमांडणी जारी करण्यात आली. त्यात देशाच्या सद्यस्थितीवर विविध भाष्य करण्यात आले. या पार्श्वभूमीवर श्याम मानव यांनी या घटमांडणीला आव्हान दिले आहे. ते म्हणाले, मागील 5 वर्षांत ह्या घटमांडणीचे कोणतेही अंदाज खरे ठरले नाहीत. वारंवार त्याच त्या गोष्टी फिरवून सांगितल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी या घटमांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. ही घटमांडणी करणाऱ्यांना आम्ही 10 कुंडल्या व सध्याची माहिती देऊ. त्यांनी त्याचा 90 टक्क्यांहून अधिक अचूक अंदाज वर्तवून दाखवावा. असे केले तर आम्ही त्यांना तब्बल 80 लाख रुपयांचे बक्षीस देऊ. आजच्या काळात हवामान अंदाजासारख्या गोष्टी विज्ञान व अभ्यासावर आधारित आहेत. त्या विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून पाहता येतात. पण भेंडवळ किंवा ज्योतिषाच्या दाव्यांना तेवढी शास्त्रीय पडताळणी नाही. पूर्वी शेतकरी अनुभवानुसार निर्णय घेत होते. पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे परिस्थिती बदलली. लोकांना फसवण्यासाठी आता श्रद्धेचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रथांविरोधात जनजागृती करण्याची गरज आहे, असे श्याम मानव म्हणाले. भेंडवळची भविष्यवाणी आजच जाहीर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी भेंडवळची घटमांडणी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी तिचे अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार, देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील. पण ते कायम तणावात राहतील. देशाची संरक्षण स्थितीही कमकुवत राहील. त्याचा संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल. शेतकऱ्यांना हे वर्ष अडचणीचे ठरू शकते. यंदा सर्व पिकांवर रोगराईचे सावट राहील. पण कापूस व तीळ मोठ्या प्रमाणात पिकेल. त्यांना चांगला भावही मिळेल. ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण येतील. श्याम मानवांचा भोंदूबाबांवरही संताप व्यक्त उल्लेखनीय बाब म्हणजे श्याम मानव यांनी रविवारीच नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला होता. तसेच एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठीच हे प्रकरण पुढे आणल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, एकनाथ शिंदेंमुळे आज अशोक खरात घरोघरी पोहोचले आहे. खरात हा शिंदेंचा बाबा नसता आणि रुपाली चाकणकर त्याची भक्त नसती, तर हे प्रकरण केव्हाच समोर आले नसते. कदाचित पोलिसांना सुरुवातीलाच हे प्रकरण दाबण्याच्या सूचना मिळाल्या असत्या. पण शिंदे व राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी पोलिसांना हे प्रकरण उत्तमपणे हाताळण्याच्या सूचना मिळाल्या.
सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री, बागेश्वर यांच्या सारखे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे. अशोक खरातवर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले. पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला. राज्यात बुवा बाबांचे प्रस्थ वाढवण्याचे, त्यांना प्रतिष्ठा देण्याचे काम सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या पार्श्वभूमीवर अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून 'वृक्ष तिथे छाया... बुवा तिथे बाया' जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत असून बुलढाणा येथे श्याम मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विश्राम भवन येथे आज 20 एप्रिल रोजी शाम मानव यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्याची स्थिती व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य यावर त्यांनी भूमिका मांडली. पुढे बोलताना प्रा. मानव म्हणाले, काँग्रेसच्या काळात बुवा बाबांवर एफआयआर दाखल करताना पोलीस स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचे तर आता सरकारच्या संमतीशिवाय काहीही करता येत नाही. खरातसारख्या भोंदू बुवा बाबांना प्रतिष्ठा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातूनच सुरू आहे. ते पुढे म्हणाले, बीजेपी मंत्रिमंडळातील एका मोठ्या मंत्र्यांने मुख्यमंत्री होण्यासाठी खरात बाबाकडे पूजा केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर त्यावर कारवाई झाली. वास्तविक पाहता धीरेंद्र शास्त्री व प्रदीप मिश्रा यांच्यावरही आरोप आहे. कायद्यानुसार या दोघांवर कारवाई करने सहज शक्य आहे. मात्र खरात सारखा न्याय या लोकांना लावण्यात आलेला नाही. खरात वाईट व इतर चांगले असे होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षापासून जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार व प्रचार आणि अंमलबजावणी करण्यात येत नाही. अजितदादा पवार यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली होती. कामही सुरू झाले, मात्र फडणवीस यांनी नुसते झुलवत ठेवले. सरकारने या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत पूर्ण उदासीनता दाखवली आहे. हा कायदा राबवायचाच नाही असे त्यांचे ठरले असल्याचे श्याम मानव म्हणाले. अधिकाऱ्यांवर, यंत्रणांवर फार मोठे दडपण आहे. अशी अवस्था आपण अख्या आयुष्यात कधी पाहिली नाही. काँग्रेसच्या काळात गुलाब बाबाचे भक्त शंकराव चव्हाण आणि सत्यसाईबाबा भक्त विलासराव देशमुख सारखे मोठे मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करीत. आता साधा नगरसेवक येऊन काम बंद पाडतो. अलीकडच्या काळात जादूटोणाविरुद्ध कायद्याचा प्रचार प्रसार झाला असता तर खरात सारखा बाबा उदयास आलाच नसता. या प्रकरणात अनेक लोक अडकले त्याला जबाबदार राज्य सरकार असल्याचा घनाघात त्यांनी केला. रूपाली चाकणकर देखील आरोपीच खरात प्रकरणाची सुरुवात एका पत्रकारापासून झाली. ज्या पत्रकाराने आवाज उठवला त्याला फोन करून रूपाली चाकणकर यांनी दम भरला होता. आरोपीला सहाय्य करणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हा आहे.त्यामुळे रूपाली चाकणकर यामध्ये आरोपी आहे असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा सहभाग तपासला पाहिजे खरात वर ॲक्शन होण्याचे पुन्हा एक कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि रूपाली चाकणकर यांच्याशी असलेली जवळीक असू शकते. त्याचे संबंध कसे आहे हा पोलिस तपासाचा भाग आहे.भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने मुख्यमंत्री होण्यासाठी पूजा केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष प्रकरणाकडे गेले व खरात वर कारवाई झाली असे श्याम मानव पत्रकार परिषदेत म्हणाले. या पत्रकार परिषदेला अ.भा. अंनिस राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, मराठवाडा संघटक किशोर वाघ,जिल्हा संघटक प्रमोद टाले, जिल्हा अध्यक्ष डॉ. मनोहर तुपकर,सुनील भाऊ जावंजाळ पाटील, दत्ताभाऊ सिरसाठ, महिला संघटक प्रतिभा भुतेकर, सचिव आशिष गवई, विवेक हिवाळे, सुमेध जाधव ,नानाभाऊ मोरे आदींची उपस्थिती होती.
गझल लिहिताना आकृतिबंधाचा विचार गरजेचा : प्रा. मिलिंद जोशी
पुणे : प्रतिनिधी गझल लिहिताना आकृतिबंधाचा विचार होणे ज्याप्रमाणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे लिखाणात आशय आणि शब्दांचा ओलावा असणे आवश्यक असते. गझल लेखनात आचारसंहिताही पाळली गेली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने गझलकारा अमिता पैठणकर यांचा (दि. १९) […] The post गझल लिहिताना आकृतिबंधाचा विचार गरजेचा : प्रा. मिलिंद जोशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, १७ एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय व सामाजिक वाटचालीतील एक महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा होती. एक निर्णायक क्षण ठरेल असे वाटले होते. पण दुर्दैवाने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट, समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते दोन […] The post विरोधकांनी ७० कोटी महिलांचा विश्वासघात केला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या 'भारताची प्रतिभा' या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, त्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप असल्याचे म्हटले. धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही, तसेच आपली राज्यघटना धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई नेहमी मांडत असत, असेही डॉ. मुजुमदार यांनी नमूद केले. 'भारताची प्रतिभा' या पुस्तकात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी देश आणि राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले निवडक लेख मराठी भाषेत समाविष्ट करण्यात आले आहेत. पुणे परिवारतर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, महापौर मंजुषा नागपुरे, राजेश पांडे, मधुकर भावे, आयोजक ज्योती राठोर, सुरेश उज्जैनवाला, पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी आणि भाग्यश्री ठाकरे आदी उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले की, प्रतिभाताईंनी आयुष्यभर समाजसेवा केली आणि नवे विचार रुजवले. त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यांच्या कार्यकाळात अनेक महामंडळे स्थापन झाली. त्यामुळे शासन म्हणून 'भारताची प्रतिभा' हे पुस्तक जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, हे पुस्तक प्रतिभाताईंच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा प्रवास उलगडते. जळगावमधील एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा राष्ट्रपती पदापर्यंतचा प्रवास विलक्षण आहे. एक हळवी माता ते देशाच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा कणखर प्रवास या पुस्तकातून अनुभवता येईल. प्रास्ताविकात पुणे परिवाराचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी यांनी सांगितले की, प्रतिभाताई पाटील यांच्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळातील राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवासावर आधारित 'भारताची प्रतिभा जीवन गौरव ग्रंथ' यापूर्वीच प्रकाशित झाला आहे. प्रस्तुत पुस्तकात त्यातील मान्यवरांचे निवडक लेख घेण्यात आले आहेत. हे पुस्तक त्यांच्या दुर्दम्य व्यक्तिमत्त्व व गुणवैशिष्ट्यांचा ठेवा असून, नव्या पिढीसाठी राज्यातील सर्व शाळा व ग्रंथालयांना वितरित करण्यात येणार आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये सैनिकांसाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारणाऱ्या वीरमाता सुमेधा चिथडे, आंतरराष्ट्रीय मल्लखांब पटू अदिती देशपांडे, डॉ.विनिता आपटे, भाग्यश्री चौंडे यांचा समावेश होता. मधुकर भावे यांनी देखील आठवणी सांगितल्या.
नागपूरमध्ये धर्मांतराचा दबाव ; संचालक रियाज काझी अटकेत
नागपूर : प्रतिनिधी नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणानंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही तत्सम स्वरूपाचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मानकापूर परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणींवर मानसिक छळ, विनयभंग आणि धर्मांतरासाठी दबाव करण्यात आल्याच्या घटना घडत आहेत. ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ या नावाने ही संस्था चालवली जात असल्याचे समोर आले आहे. या […] The post नागपूरमध्ये धर्मांतराचा दबाव ; संचालक रियाज काझी अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील सभेपूर्वी शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आणि राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. त्यांना आव्हान देणारे कसे मातीमोल झाले, हे सर्वांना माहीत आहे, असे सामंत म्हणाले. पुणे दौऱ्यावर असलेल्या उदय सामंत यांनी सोमवारी कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघातील पक्ष संघटनेची बैठक घेतली. साताऱ्याचे आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीबाबत विचारले असता, सामंत म्हणाले की, साताऱ्यात आमचे ज्येष्ठ मंत्री शंभूराज देसाई सक्षमपणे काम पाहत आहेत. तिथे कोणालाही डावलून काम होत नाही. ते पुढे म्हणाले, साताऱ्यात शिवसेनेचे साम्राज्य मोठे असून आजची गांधी मैदानावरील सभा विक्रमी होईल. ज्यांना साहेबांनी मोठे केले, त्यांनी किमान त्यांना आव्हान देऊ नये, असे त्यांनी नाव न घेता सुनावले. पुणे दौऱ्यादरम्यान सामंत यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर दिला. पुणे शहर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांत शिवसेनेचे काम वेगाने सुरू आहे. पुढच्या आठवड्यात विधानसभा निहाय स्वतंत्र बैठका घेतल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकांमध्ये पक्षाची भविष्यातील शिस्त आणि रचना कशी असावी, यावर चर्चा करण्यात आली. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवर बोलताना सामंत म्हणाले की, नाशिक आणि अमरावतीमधील घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलत आहे. आयटी कंपन्यांमध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी योग्य खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले. विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. युतीच्या वाट्याला येणाऱ्या सर्व जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य करताना सामंत यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उद्यापासून दोन दिवस बारामतीत तळ ठोकणार आहेत. सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा दावाही उदय सामंत यांनी केला.
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हिंदुत्वादी संघटनांनी आज राळेगाव बंदची हाक दिली आहे. यामुळे वातावरण तंग झाले असताना जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी या प्रकरणातील संशयित कुरेशी दाम्पत्याचा या घटनांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेषतः या प्रकरणी अद्याप धर्मांतर व शोषणाची तक्रार प्राप्त झाली नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे. पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, गायब झालेल्या मुलींविषयी कुरेश दाम्पत्याचा अद्याप कोणताही सहभाग आढळला नाही. तसेच शोषणाची तक्रारही दाखल झाली नाही. पण बालविवाहाच्या प्रकरणात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मजहर कुरेशी नामक व्यक्तीविरोधात घरात तलवार आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरेशी दाम्पत्याचे केवळ लग्न जुळवण्याचे काम पोलिस अधीक्षक या प्रकरणाची अधिक माहिती देताना म्हणाले, राळेगावात एक बालविवाह होणार होता. त्यात मुलगी 15 वर्षांची, तर मुलगा 44 वर्षांचा होता. हे सर्व आदिवासी समाजाचे होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पूर्णतः वेगळे होते. पण नंतर त्याची सरमिसळ झाली. राळेगावातील कल्याणी कुरेशी व तिचा पती मजहर कुरेशी नामक दाम्पत्य राहते. हे नवरा-बायको लग्न जुळवण्याचे काम करतात. त्यांनी आदिवासी मुलींचे लग्न लावून दिल्याच्या प्रकरणात अजून काही आढळले नाही. पण त्यांनी इतर समाजाच्या मुलींची लग्ने जुळवली आहेत. या दाम्पत्याच्या मध्यस्थीने चंद्रपूर, नागपूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर येथील मुलींचे लग्ने झाली आहेत. पण हे प्रकरण वेगळे आहे. त्यात अद्याप धर्मांतर किंवा शोषणाची तक्रार दाखल झाली नाही. ते पुढे म्हणाले, संशयित मजहर कुरेशीची पत्नी हिंदू आहे. पण त्यातही धर्मांतराचा प्रकार कुठे समोर आला नाही. असे असले तरी गायब 34 मुलींच्या प्रकरणाचा विस्तृत तपास केला जाईल. या प्रकरणी संशयितांचा आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्डही तपासला जाईल. मजहरच्या घराची झडती घेतली असता तिथे तलवार आढळली. त्यामुळे त्याच्याविरोधात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण शोषणाची तक्रार अद्याप समोर आली नाही. तशी एखादी तक्रार आली तर पोलिस तत्काळ कारवाई करतील, असे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्पष्ट केले. बेपत्ता मुलींविषयी अद्याप तक्रार नाही ते पुढे म्हणाले, काही संघटना व महिलांकडून मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. रेकॉर्डवर तपास केल्यानंतर 2025 मध्ये 38 मुली बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी 37 मुलींचा शोध घेण्यात यश आले. 2025 मध्ये 14 मुलींचे अपहरण झाले होते. त्यातील 12 मुलींना शोधण्यात यश आले. इतर 2 प्रकरणे तपासात निकाली निघाले आहेत. 2026 मध्ये 9 मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील 8 जणींचा शोध लागला आहे. आता गायब असलेल्या 34 मुलींविषयी पोलिस ठाण्यात एकही तक्रार दाखल नाही. त्यांच्या नावांचीही माहिती समोर आली नाही. त्यानंतरही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस योग्य तो तपास करतील. त्यात काही ठोस निष्पन्न झाल्यास कारवाई होईल. या प्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही, असेही कुमार चिंता यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे व आमदार संग्राम जगताप यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुरीत मागील 3-4 वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे, असे ते या दोन्ही नेत्यांचे नाव घेत म्हणाले. या प्रकरणी त्यांनी राणे यांचा उल्लेख भाजपचे दोन फुटांचे नेते असा केला. तर जगपात यांना ते आयटम असे म्हणाले. राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक येत्या 23 तारखेला होत आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने संतोष चोळके यांना उमेदवारी दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यानंतर आज सुजात आंबेडकर त्यांच्या प्रचारसाठी मैदानात उतरले. यावेळी त्यांनी आमदार संग्राम जगताप व मंत्री नीतेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. वंचितने नीतेश राणेंना त्यांची जागा दाखवली ते म्हणाले, राहुरीत गेल्या तीन चार वर्षांपासून धार्मिक वातावरण बिघडवून दंगल घडवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हिंदू - मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. एक भाजपचे दोन फुटाचा नेते आहेत नीतेश राणे. त्यांनी इथे येऊन लव्ह जिहाद विरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केले होते. ज्या चौकात त्यांनी गरळ ओकली होती, त्याच चौकात वंचित बहुजन आघाडीने सभा घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले होते. नीतेश राणे यांच्यानंतर राहुरीत भडकाऊ वक्तव्य करणारा अजून एक आयटम तयार झाला आहे. संग्राम जगताप असे त्याचे नाव आहे. तो सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाला. त्याला मते कोणी दिली तर मुस्लिमांनी दिली. मग या पठ्ठ्याचा पक्ष फुटला, अजित दादा एका बाजूला गेले. आता शरद पवार सुद्धा भाजपमध्ये जाणारच आहेत. मग संग्राम जगताप यांनी स्वतःच मार्केट वाढवण्यासाठी मुस्लिमांना शिव्या द्यायला सुरू केली. पण हा पठठ्या हे विसरला की, यांना पहिल्यांदा धर्मनिरपेक्ष मतदारांनी, इथल्या मुस्लिमांनी मते देऊन आमदार केले होत, असे सुजात आंबेडकर म्हणाले. शरद पवार गटावर डमी उमेदवार दिल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी राहुरीतील पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व भाजपत मुख्य लढत असल्याचाही दावा केला. तसेच भाजपला पराभूत करायचे असेल, तर वंचितशिवाय पर्याय नसल्याचेही स्पष्ट केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा उमेदवार हा केवळ डमी आहे. तो भाजपच्या फायद्यासाठी उभा करण्यात आला आहे. या प्रकरणी काही आर्थिक व्यवहार आणि राजकीय समन्वय झाला असून, त्यातूनच त्यांनी उमेदवार दिला आहे. ही लढत ‘सेटिंगच्या राजकारणा’ची आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहून ‘सेटिंगच्या राजकारणा’ला नाकारावे आणि पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीला संधी द्यावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
प्रसिद्ध आयवेअर ब्रँड 'लेन्सकार्ट' (Lenskart) सध्या आपल्या एका धोरणामुळे मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या नाझिया इलाही खान यांनी एका लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन या धोरणाचा तीव्र निषेध केला. यावेळी त्यांनी स्टोअर मॅनेजरला धारेवर धरत कर्मचाऱ्यांना टिळा लावला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, 'बॉयकॉट लेन्सकार्ट'चा ट्रेंड सुरू झाला आहे. लेन्सकार्ट कंपनीची एक अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) सोशल मीडियावर लीक झाली आहेत. या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना कामावर असताना कपाळावर टिळा लावणे, बिंदी लावणे किंवा जनेऊ परिधान करण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, विवाहित हिंदू महिलांना अत्यंत कमी प्रमाणात सिंदूर लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही समोर आले आहे. दुसरीकडे, याच नियमावलीत हिजाब आणि पगडी (काळ्या रंगाची) घालण्यास परवानगी देण्यात आली आहे. एका विशिष्ट धर्माच्या चिन्हांना लक्ष्य करून हिंदू रीतिरिवाजांवर बंदी घातल्याचा आरोप करत नाझिया खान यांनी आक्रमक पवित्रा घेतला. व्हिडिओत नेमके काय? नाझिया खान यांनी लेन्सकार्ट स्टोअरमध्ये गेल्यानंतर स्टोअर हेडला बोलावले आणि त्याचे नाव विचारले. त्यावर स्टोअर हेडने त्याचे नाव मोहसिन खान सांगितले. नाव ऐकताच नाझिया खान चांगल्याच संतापल्या. मोहसिन खान आहात म्हणून टिळा लावायला बंदी घातली का? असा सवाल करत, आपल्या सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना मोहसिन खानला टिळा लावण्यास सांगितले. नाझिया खान म्हणाल्या, लेन्सकार्टचे नोटिफिकेशन निघालेले आहे. त्यात स्पष्ट लिहिले की, लेन्सकार्टमध्ये काम करणारा कर्मचारी टिळा, जाणवे, तुळशीमाळ, रुद्राक्ष वापरण्यास मनाई केलेली आहे. मात्र, हिजाब वापरण्यास परवानगी आहे. याचा काय अर्थ समाजायचा? भारत देशात शरिया लागू करायचा आहे का? मुस्लिमांनी तर पाकिस्तान घेतला, आता इथे का छाती बडवली जात आहे. तू मोहसिन खान असल्यामुळे सर्वांना मोहसिन खान बनवणार आहात का? असा सवाल केला. स्टोअरमध्येच कर्मचाऱ्यांना लावला टिळा यानंतर नाझिया खान यांनी स्टोअरमधील कर्मचाऱ्यांच्या कपाळावर भगवा टिळा लावला. यावेळी नाझिया खान यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी 'जय श्री राम' आणि 'हर हर महादेव'च्या घोषणाही दिल्या. हिंदू रीतिरिवाजांचे दमन करणाऱ्या धोरणांना आम्ही खपवून घेणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, नाझिया खान यांनी लेन्सकार्टच्या कोणत्या शोरूममध्ये निदर्शन केले हे समजू शकले नाही. लेन्सकार्टच्या मालकाच्या अटकेची मागणी नाझिया खान यांनी केवळ स्टोअरमध्येच विरोध केला नाही, तर सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कंपनीने मुद्दाम एका विशिष्ट धर्माचा मॅनेजर नियुक्त करून हिंदू कर्मचाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. नी या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कार्यालय आणि NIA, NSG सारख्या यंत्रणांना टॅग केले आहे. कंपनीच्या अंतर्गत धोरणांची आणि कथित दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांची चौकशी करून मालकाला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर 'बॉयकॉट'चा ट्रेंड या वादाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदू संघटना आणि सामान्य नागरिकांनी लेन्सकार्टवर जोरदार टीका केली आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच करणाऱ्या कंपन्यांना धडा शिकवा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, अद्याप ही घटना नेमक्या कोणत्या स्टोअरमधील आहे, याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. लेन्सकार्टची भूमिका काय? या संपूर्ण वादावर आणि व्हायरल व्हिडिओवर लेन्सकार्ट कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही. कंपनीच्या मौनामुळे सोशल मीडियावरील संताप अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे.
साता-यात बूथप्रमुखांचे सामूहिक राजीनामे
सातारा : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज सातारा शहरातील गांधी मैदानावर सायंकाळी सात वाजता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला अवघे काही तास उरलेले असताना शिवसेनेत राजीनामास्त्राने खळबळ उडाली आहे. शहरप्रमुख नीलेश मोरे यांच्यासह बूथ प्रमुखांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत, त्यामुळे सातारा शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर विजयी […] The post साता-यात बूथप्रमुखांचे सामूहिक राजीनामे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी सोमवारी ता २० येथे केले. येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक निलाभ रोहन म्हणाले की हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय वाढले असून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी व वित्तहानी होत आहे, एकंदरीत अपघाताचा अभ्यास केल्यास 50 टक्के पेक्षा जास्त अपघातात मोटरसायकलस्वार मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात आजपासून मोटार सायकल चालवणारा व पाठीमागे बसणाऱ्या इसमास हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा, दारू पिऊन वाहन चालू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, ट्रिपल सीट मोटार सायकल चालू नये, वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे , वेळोवेळी चालकांनी मेडिकल चेकअप करून घ्यावे, वाहनाचे फिटनेस तपासावे अशा प्रकारच्या सुद्धा सूचना त्यांनी दिल्या. अपघात स्थळी नागरिकांनी जखमी लोकांना मदत करावी, तात्काळ 112 व 108 वर निशुल्क कॉल करून पोलीस व वैद्यकीय मदत बोलावून घ्यावी व हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. अपघातात मदत करणाऱ्या लोकांची ओळख देणे बंधनकारक नाही तसेच त्यांना कोर्ट कचेरी सुद्धा करावी लागणार नाही . तसेच पीएम राहत योजनेअंतर्गत अपघातात जखमी इसमांना मान्यता प्राप्त रुग्णालयामध्ये दीड लाखापर्यंत मोफत उपचार असणार आहे असे त्यांनी सांगितले. परिवहन अधिकाऱ्यांतर्फे सुद्धा वाहतूक नियमाबाबत जनजागृती करून विद्यार्थ्यांनी विनापरवाना वाहन चालू नये, पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना वाहन देऊ नये अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले.सदर प्रसंगी वैद्यकीय पथकाद्वारे प्रथमोपचार बाबत व सीपीआर बाबत प्रात्याक्षीक दाखवण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी कुंदनकुमार वाघमारे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, संदीप मोदे जमीर नाईक, शरद मरे, परिवहन विभागाचे चंद्रकीर्ती टिपले, विक्रांत भोईने यांचे सह डॉक्टर पथक , सर्व ठाणेदार तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन सपोनि शिवसांब घेवारे यांनी केले.
३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मदात्या पित्यासह आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : प्रतिनिधी पवई येथे एका तीन वर्षांच्या अल्ववयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या पित्यासह वयोवृद्ध आजोबांनी लैंगिक चाळे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आरोपी पित्यासह वयोवृद्ध आजोबाविरुद्ध पवई पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर ती तिच्या मुलीला तिच्या वडिलांकडे घेऊन जात होती. मुंबईत तिचे […] The post ३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; जन्मदात्या पित्यासह आजोबांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाने मोठी कारवाई करत १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष आणि शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गस्ती पथकाने तात्काळ सापळा रचून पाठलाग केला आणि १२ जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत शिकाऱ्यांकडून चार शेकरू, एक उडणारी खार, एक हरीनाल पक्षी आणि घुबडांच्या काही प्रजातींसह इतर वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात वन्यजीवांच्या अवैध शिकारीचे प्रमाण समोर आले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक दिपाली तळमले आणि उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम यशस्वी केली. वनविभागाने स्पष्ट केले आहे की, आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि भविष्यात अशा कारवाया आणखी तीव्र करण्यात येतील.
पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील संत गाडगे महाराज वसाहतीत पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात सौरभ किशोर गायकवाड (वय २३, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गौरव बबन राजगुरु (वय २७, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सौरभ गायकवाड हा 'डिलिव्हरी बॉय' म्हणून काम करतो. आरोपी गौरव राजगुरुसोबत त्याचा पूर्वीपासून वाद होता. याच वादातून आरोपीने संत गाडगे महाराज वसाहत परिसरात गायकवाडला अडवून शिवीगाळ केली आणि त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. या घटनेनंतर आरोपी गौरव राजगुरु घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पिस्तुल बाळगणाऱ्याला बेड्या, गुन्हे शाखेच्या युनिट 2 ची कारवाई बेकायदेशिररित्या लोखंडी पिस्तुलासह दोन पिस्तुल, मॅगझीन व दोन जिवंत काडतुसे बाळणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने बेड्या ठोकल्या त्याकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. ओकांर महेश थोरात (25, रा. साई माऊली हाईट्स, पिणी वस्ती, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार उज्ज्वल शांताराम मोकाशी यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. आंबेगाव येथील दरी पुलाखाली जांभुळवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेत विकासकामांच्या टक्केवारीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) आक्रमक झाली आहे. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या बिलाच्या टक्केवारीवरून भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये झालेल्या भांडणामुळे पालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याविरोधात 'आप'ने भ्रष्टाचारमुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. पुणे शहरात कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येणारी विकासकामे अधिकारी आणि नगरसेवकांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप आहे. निकृष्ट कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदारांना लाखो रुपयांची खंडणी आणि टक्केवारी आजी-माजी नगरसेवकांना द्यावी लागत असल्याचे समोर आले आहे. बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या तीन कोटी रुपयांच्या बिलाच्या टक्केवारीवरून सत्ताधारी भाजपच्या आजी आणि माजी नगरसेविकांमध्ये जोरदार भांडणे झाली. या घटनेने पालिकेच्या विकासकामांमध्ये कामाच्या दर्जापेक्षा टक्केवारी किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा उघडकीस आले. टक्केवारीचे कुरण बनलेल्या पुणे पालिकेच्या विरोधात आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून, टक्केवारीला पायबंद घालण्यासाठी पालिका भवनात भ्रष्टाचारमुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार केला आहे. या संदर्भात 'आप'चे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले. 'आप'चे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले की, समाजसुधारक महात्मा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत पालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त व्हावा यासाठी लढा दिला होता. स्वातंत्र्यसेनानी गणपतराव नलावडे, ज्येष्ठ विचारवंत एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, नानासाहेब पुरुळेकर, बाबुराव सणस, नामदेवराव मते, भाई वैद्य आदींच्या निस्वार्थी व त्यागी नेतृत्वामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली. मात्र, अलिकडच्या काळात पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडत चालला आहे. बेनकर पुढे म्हणाले की, पालिकेच्या मुख्यालयातच भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे व विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांचे कामाच्या टक्केवारीवरून जोरदार भांडण झाले. शहर आणि जनतेच्या विकासाऐवजी स्वतःला टक्केवारी मिळावी यासाठी आजी-माजी नगरसेविका अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भांडण करतात, यामुळे पुणेकरांच्या विश्वासाला तडा गेला आहे. या घटनेचा आम आदमी पार्टी आणि पुणेकरांच्या वतीने तीव्र निषेध करतो. शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी मागणी केली की, या प्रकरणाचे संपूर्ण सत्य बाहेर यावे, ताबडतोब चौकशी समिती स्थापन करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी. या प्रकरणाची प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसांत तात्काळ दखल घ्यावी. विषय प्रचंड गंभीर असून, अन्यथा पुणेकरांच्या भ्रष्टाचारमुक्तीसाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरून जन आंदोलन सुरू करणार आहे.
गॅस टंचाईमुळे मजुरांचा रोजगार हिरावला
मुंबई : प्रतिनिधी आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी संकटाचा परिणाम देशात जाणवत आहे. अनेक कंपन्यांच्या इमारतींना कुलूप लागल्याने मजुरांना पुन्हा आपल्या गावी परतण्याची वेळ आली आहे. सूरतमधील उधना रेल्वे स्थानकावर रविवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणा-या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो लोक स्टेशनवर जमा झाले होते. या गोंधळात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चेंगराचेंगरीसारखी […] The post गॅस टंचाईमुळे मजुरांचा रोजगार हिरावला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील एक संशयित असणाऱ्या निदा खानवर टीसीएसने अखेर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. कंपनीने गत 9 एप्रिल रोजीच तिच्यावर ही कारवाई केली. पण आज ही बाब समोर आली आहे. दरम्यान, आजच निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. TCS ने गत 9 एप्रिल रोजी जारी केलेल्या एका अधिकृत पत्राद्वारे निदा खानला निलंबित केले आहे. 'आज तक'च्या वृत्तानुसार, कंपनीने म्हटले आहे की, निदा खानशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. त्या सध्या न्यायालयीन किंवा पोलिस कोठडीत आहेत. या परिस्थितीमुळे त्या आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यास असमर्थ आहेत. याच आधारावर त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबन आदेशात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, निदा खान या 27 डिसेंबर 2021 पासून कंपनीशी संलग्न होत्या. त्या 'प्रोसेस असोसिएट' या पदावर कार्यरत होत्या. कंपनीने त्यांचा नेटवर्क ॲक्सेसही तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. याव्यतिरिक्त, सध्या त्यांच्या ताब्यात असलेल्या कंपनीच्या सर्व मालमत्ता परत करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना कोणत्याही कार्यालयात उपस्थित राहण्यास अथवा घरून काम करण्यासही मनाई करण्यात आली आहे. कंपनीने आपल्या आदेशात असेही नमूद केले आहे की, निदा खान हिने या प्रकरणी कोणत्याही कर्मचाऱ्याशी चर्चा करू नये. यासंबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी. त्यांनी या निर्देशांचे पालन करण्यात कसूर केली, तर त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाऊ शकते. हा आदेश कंपनीचे 'एचआर हेड' (HR Head) शेखर कांबळे यांनी जारी केला आहे. त्यांच्याकडे पुणे, नाशिक आणि गोवा या विभागांची जबाबदारी आहे. आज निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी दुसरीकडे, आज निदान खान यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाचे गांभिर्य पाहता न्यायालय त्यांना दिलासा देईल की त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावेल? याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते, या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, न्यायालयाचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. त्याचा या प्रकरणाच्या पुढील तपासावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. महिला आयोगाच्या तथ्यशोधन समितीचा तपास सुरू महिला आयोगाने स्थापन केलेली एक 'तथ्यशोधन समिती' (Fact-finding committee) देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. आज या चौकशीचा तिसरा दिवस आहे. समितीचे पथक या प्रकरणी पुरावे गोळा करण्याच्या कामात व्यस्त आहे. आयोगाचा उद्देश या प्रकरणातील आरोपांची सत्यता पडताळून पाहणे, तसेच यात कोणत्याही प्रकारची हलगर्जी किंवा इतर संबंधित घटक कारणीभूत आहेत का? हे निश्चित करण्याचा आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉर्पोरेट (संस्थात्मक) आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका बाजूला, कंपनीने आपल्या अंतर्गत धोरणांनुसार कठोर कारवाई केली आहे, तर दुसऱ्या बाजूला, कायदेशीर प्रक्रियाही वेगाने पुढे सरकत आहे. न्यायालयाचा निकाल आणि तपास अहवालातील निष्कर्ष यांच्या आधारे, या प्रकरणाची पुढील दिशा येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणानंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही तत्सम स्वरूपाचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मानकापूर परिसरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या आड तरुणींवर मानसिक छळ, विनयभंग आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संस्थेचा संचालक रियाज काझी याला अटक केली असून, या घटनेमुळे शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी’ या नावाने ही संस्था चालवली जात असल्याचे समोर आले आहे. या संस्थेत काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तक्रारीनुसार, आरोपी रियाज काझी हा तरुणींना आपल्या केबिनमध्ये बोलावून त्यांच्याशी अश्लील वर्तन करत असे. यासाठी तो अनेकदा सीसीटीव्ही कॅमेरे बंद करत असे, जेणेकरून कोणताही पुरावा राहू नये. इतकेच नव्हे, तर इतर काही तरुणींनाही चुकीच्या हेतूने स्पर्श केल्याचे आरोप तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. या प्रकरणात केवळ शारीरिक किंवा मानसिक छळच नव्हे, तर धार्मिक बाबींमध्येही सक्ती केल्याचे समोर आले आहे. संस्थेत काम करणाऱ्या तरुणींना नमाज अदा करण्यास, रोजे पाळण्यास आणि दुवा म्हणण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे. याशिवाय, अभिवादन करताना ‘खुदा हाफिज’ म्हणणे बंधनकारक करण्यात आले होते. या सर्व गोष्टींमुळे तरुणींवर मानसिक ताण वाढत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. तरुणींच्या हालचालींवर डिजिटल पद्धतीने नजर ठेवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट सोशल मीडिया खात्यांचा वापर करून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात होते. या माध्यमातून त्यांच्यावर दबाव निर्माण करून त्यांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले आहे. यामुळे पीडित तरुणी अधिकच घाबरलेल्या अवस्थेत होत्या. आतापर्यंत या प्रकरणात चार तरुणींनी पुढे येत तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रियाज काझी याला अटक केली. मानकापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्ष कळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली कामकाजावर प्रश्नचिन्ह या घटनेमुळे स्वयंसेवी संस्थांच्या नावाखाली सुरू असलेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, आणखी पीडित समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणातून उघड झालेल्या बाबी अत्यंत गंभीर असल्याने, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर 70 कोटी महिलांचा विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार पलटवार केला आहे. सत्ताधारी भाजपच्या कथनी अन् करणीत फरक आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला 5 महिला नेत्या हजर होत्या. पण त्यापैकी एकाही महिलेला बोलण्याची संधी देण्यात आली नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रृणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले. त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत जोरदार पलटवार केला. महिलांची उपस्थिती केवळ दिखाऊपणाची विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपची कथनी आणि करनी. भाजपचा महिलांबाबत कळवळा किती दिखाऊ स्वरूपाचा आहे हे आजच्या पत्रकार परिषदेत दिसून आले. मंचावर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री, विधान परिषदेच्या महिला उपसभापती, राज्यसभेच्या महिला खासदार, भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उपस्थित असताना बोललं कोण? केवळ देवेंद्र फडणवीस... मंचावर बसलेल्या एकाही महिलेला बोलण्याची संधी नाही, केवळ दिखाऊ उपस्थिती. मोदींचे भाषण आचारसंहिता भंग करणारे उल्लेखनीय बाब म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी रविवारी महिला आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण आचारसंहितेचा भंग असल्याचाही आरोप केला होता. ते म्हणाले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मोदींनी 50 हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे भाषण राजकीय प्रचारासारखे होते. त्यांनी आचारसंहितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान व पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा दिल्या आहेत. काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते? सत्ता कायम आपल्या हाती ठेवण्याचा हा भाजपचा कुटिल डाव होता. तो विरोधकांनी हाणून पाडला, असे वडेट्टीवार म्हणाले.
उधमपूर : जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागात भीषण अपघात घडला. खगोट भागात भरधाव बस अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस बचाव कार्यासाठी धावले. त्यांनी तातडीने घटनास्थळी रुग्णवाहिका पाठवली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. […] The post उधमपूरमध्ये बस अपघात; १७ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण काँग्रेसमध्ये शनिवारी एक धक्कादायक प्रकार घडला असून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसच्या नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांना भर बैठकीत मारहाण केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाश्त्याच्या व्यवस्थेवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान थेट मारहाणीत झाल्याने काँग्रेसच्या शिस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी सायंकाळी कल्याण पूर्वेकडे 'संघटन सृजन' अभियानांतर्गत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीनंतर कार्यकर्त्यांच्या नाश्त्याच्या व्यवस्थेवरून चर्चा सुरू असताना वादाची ठिणगी पडली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी नगरसेविका कांचन कुलकर्णी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याची माहिती एका कार्यकर्त्याने कुलकर्णी यांना दिली. यामुळे संतापलेल्या कुलकर्णी यांनी थेट पातकर यांना गाठले आणि सर्वांसमोर त्यांच्या कानशिलात लगावली. या अनपेक्षित प्रकारामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला आणि उपस्थित कार्यकर्ते अवाक झाले. माझ्या कृत्याचा पश्चाताप किंवा खंत नाही - कांचन कुलकर्णी या धक्कादायक प्रकारानंतर बैठकीत एकच गोंधळ उडाला. या घटनेवर प्रतिक्रिया देताना नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, “जिल्हाध्यक्षांनी महिला कार्यकर्त्यांबाबत अर्वाच्य भाषा वापरली. मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी पुन्हा तोच उद्धटपणा केला. एका महिला लोकप्रतिनिधीबद्दल अशी भाषा वापरणे अयोग्य आहे, म्हणूनच मी त्यांच्या कानशिलात लगावली आणि मला या कृत्याचा कोणताही पश्चाताप किंवा खंत नाही.” भाजपचा काँग्रेसवर निशाणा या घटनेवर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये महिलांना आदर दिला जात नाही आणि हीच त्या पक्षाची संस्कृती आहे. बैठकीत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा असून अशा घटना कोणत्याही पक्षात घडू नयेत. पक्षांतर्गत कारवाईकडे सर्वांचे लक्ष या प्रकारामुळे कल्याण काँग्रेसमधील गटबाजी उघड झाली आहे. जिल्हाध्यक्षांनी महिला नगरसेविकेचा अपमान केला की नगरसेविकेने शिस्तभंग केला, याबाबत आता प्रदेश नेतृत्वाकडे तक्रारी जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पक्ष नेतृत्व जिल्हाध्यक्ष पातकर यांच्यावर की नगरसेविका कुलकर्णी यांच्यावर कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… मोहन भागवतांच्या सुरक्षेचा खर्च सरकारवर का?:उच्च न्यायालयात जनहित याचिका; हा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिल्या जाणाऱ्या ‘Z Plus’ दर्जाच्या सुरक्षेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या सुरक्षेसाठी होणारा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असल्याने तो संबंधित व्यक्तीकडूनच वसूल करावा, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…
वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात आता आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घडली आहे. या घटनेत एक महिला आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाली असून, यामुळे सामाजिक व कौटुंबिक नैतिक मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर आता उपरोक्त संतापजनक घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील एका व्यक्तीला 2 मुले व 2 मुली आहेत. त्याच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत. या व्यक्तीची पत्नी सततच्या वादामुळे मागील 15 वर्षांपासून नवऱ्याला सोडून माहेरी राहते. तर तिची दोन्ही मुले आपल्या वडिलांसोबत राहून शेती करतात. कौटुंबिक कारणांमुळे सदर व्यक्तीने 4 वर्षांपूर्वी एका परित्यक्त्या महिलेशी दुसरे लग्न केली. पती देवदर्शनाला गेल्यानंतर साधली संधी या महिला आपल्या सवतीच्या दोन्ही मुलांसोबत सुखाने संसार करत होती. पण कालांतराने तिचे आपल्या सावत्र मुलाशी प्रेमसंबंध जुळले. एकाच घरात राहून त्यांचे संबंध सुरू होते. त्याची कुणकुण गावकऱ्यांनाही लागली होती. सदर महिलेचा पती गत 12 तारखेला देवदर्शनासाठी मुंबईला गेला. त्यावेळी ही संधी साधून सदर 40 वर्षीय महिला आपल्या सावत्र मुलासोबत पसार झाली. देवदर्शनाहून परतल्यानंतर सदर व्यक्तीला आपली पत्नी व मुलगा पसार झाल्याची गोष्ट कळली. त्यामुळे त्याने तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब बांगर करत आहेत. जावयाच्या दुचाकीवरून झाले पसार दुसरीकडे, महिला व मुलगा तेलंगणात गेल्याची माहिती आहे. कारण, ते ज्या दुचाकीवरून (एमएच 13 बी.यू. 1587) पसार झाले, ती दुचाकी त्या महिलेच्या जावयाची आहे. ही दुचाकी वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी पकडली. त्या दुचाकीला 1, 235 रुपयांचा दंड ठोकल्याचा मेसेज 16 एप्रिल रोजीस काळी 11.56 वा. जावयाच्या मोबाईलवर आला. त्यामुळे हे दोघेही तेलंगणात गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, आता पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. परळी कृउबाच्या उपसभापतीवर प्राणघातक हल्ला दुसरीकडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा गोवर्धन गावचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्यावर रविवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. संजय देशमुख हे गोवर्धन गावातून सिरसाळ्याकडे येत असताना 2 दुचाकींवरून आलेल्या 6 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवा. त्यात देशमुख जबर जखमी झाले. त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. पण हा हल्ला नेमका कुणी व का केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परळी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
गणवेश-पुस्तकांसाठी शाळांची सक्ती बंद!
मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्य ठरावीक दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करणा-या शाळांवर आता कारवाई होणार आहे. राज्यातील सर्व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अशा सक्तीपासून दूर राहण्याचे स्पष्ट निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्यातील सर्व खासगी शाळा शैक्षणिक साहित्य आणि […] The post गणवेश-पुस्तकांसाठी शाळांची सक्ती बंद! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बळीराजा साखर कारखाना परिसरात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी
पूर्णा : प्रतिनिधी येथील कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा कर्मचा-यांच्या क्वार्टर्सवर डल्ला मारत धाडसी घरफोड्यांची मालिका रचल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे. या घटनेत सोन्या-चांदीचे दागिने, तसेच सुमारे दीड लाखांची रोकड असा एकूण १० ते १५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत अधिक […] The post बळीराजा साखर कारखाना परिसरात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा तगादा लावल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मृत तरुण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. त्याची नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मागील 7-8 वर्षांपासून घनिष्ट मैत्री होती. पण कालांतराने या मैत्रीचे रुपांतर छळात झाले. गत शनिवारी (18 एप्रिल) हे दोघे वडगाव व आखाडा बाळापूर परिसरात एकत्र फिरत होते. यावेळी सातपुते यांनी मृत तरुणाकडे अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणाने वडगाव शिवारातील एका झाडाला गळ्यातील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली. आरोपी पोलिसाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ही घटना उजेडात आल्यानंतर संतप्त कुटुंबीय व गावकऱ्यांनी आरोपी अभिषेक सातपुते याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास विरोध केला. यामुळे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला. अखेर पोलिस उपाधीक्षक राजकुमारे केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीनुसार, अभिषेक सातपुते याच्यावर आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जवळपास 22 तासांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून तरुणावर हल्ला दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील हरदोली गावात प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका तरुणावर रविवारी मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत राजू राऊत नामक 24 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा तरुण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घराच्या अंगणात झोपला होता. त्यावेळी 4-5 जणांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. यावेळी जिवाच्या आकांताने सदर तरुणाने आरडाओरडा केला असता हल्लेखोर पसार झाले. जखमी तरुणावर सध्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. ही घटना प्रेम प्रकरणाच्या संशयातून घडल्याची चर्चा आहे. या प्रकरणी सिहोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांच्या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. २०२३ मध्ये हे बिल मंजूर झाले आणि आता आपण २०२६ मध्ये आहोत. अडीच-तीन वर्षे उलटूनही महिलांना अद्याप ३३ टक्के आरक्षण का मिळाले नाही? असा रोखठोक सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिला आरक्षणाचे बिल एकमताने संसदेने पास केलेले आहे. त्याची अंमलबजावणी २०२४ च्या लोकसभेत करणे आम्हाला अपेक्षित होते आणि आजही विनम्र विनंती करते की, या क्षणी तुम्ही अंमलबजावणी करा. ५४३ मधील ३३ टक्के महिलांना लगेच आरक्षण द्या. आम्ही पूर्ण त्यासाठी तयार आहोत. हे कालच करायला पाहिजे होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे बिल प्रत्यक्षात महिला आरक्षणाचे नव्हतेच, तर ते 'डिलिमिटेशन'चे (मतदारसंघ पुनर्रचना) बिल होते. नारीशक्तीला ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी जे घटनात्मक बदल करायचे होते, ते आम्ही तीन वर्षांपूर्वीच एकमताने केले आहेत. मग आता पुन्हा त्यावर चर्चा कसली? सरकारने अंमलबजावणीत टाळाटाळ का केली? डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? अधिवेशन आधी अनेक गोष्टी आम्हाला सांगण्यात आल्या, मग त्या विधेयकात का आल्या नाहीत? त्यामुळे महिला आरक्षणाच्या विरोधाचा विषय येतोच कुठे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, मुख्यमंत्री संसदेतील चर्चासत्रात नव्हते. विधेयकात झालेले दोन तीन बदल झालेले आहेत. ही क्रोनोलॉजी माहीत असली पाहिजे. त्यावेळेस असे ठरले होते, डिलिमिटेशन आणि सेन्सेस या दोन्ही गोष्टी याची चर्चा त्या बिलामध्ये आहे. पण सेन्सेस कुठला? जो येईल तो. मग भारत सरकारने शब्द दिला होता की, सेन्सेस करणार. त्यानंतर मागणी झाली की, जातीय जनगणना करा. मात्र जातीय जनगणनेसाठी सरकारकडून पैसे देण्यात आलेले नाहीत. हे मी वारंवार केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणात बोललेले आहे. जर १२ तुमचे सरकार आहे. मागणी झालेली आहे. जातीय जनगणनेसाठी तुम्ही हो म्हटलेले आहात. मग ती वेळेवर का सुरू केली नाही? कारण त्यांची हे करण्याची इच्छाशक्ती नव्हती. सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकारने मागील तीन दिवसाचे अधिवेशन बोलावण्याची गरज काय होती? त्यांना काय मिळाले? चार राज्यांत निवडणुका सुरू आहेत. तातडीने सगळे कामे सोडून त्या अधिवेशनासाठी गेले. पण काय मिळवले? राज्यसभा तीन दिवस उगाच चालली. तीन दिवस लोकसभा चालली. काय हाती लागले? करोडो रुपयांचा चुराडा करायची काय गरज होती? त्याऐवजी आज पश्चिम आशियात जे संकट आहे, त्यावर भारत सरकारने काही का बोलले नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि त्यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांना दिल्या जाणाऱ्या ‘Z Plus’ दर्जाच्या सुरक्षेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या सुरक्षेसाठी होणारा खर्च सरकारी तिजोरीतून केला जात असल्याने तो संबंधित व्यक्तीकडूनच वसूल करावा, अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. ही याचिका नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी दाखल केली आहे. त्यांनी आपल्या याचिकेत स्पष्ट केले आहे की, आरएसएस ही नोंदणीकृत संस्था नसतानाही तिला सर्वोच्च स्तराची सुरक्षा दिली जाते. या सुरक्षेचा खर्च थेट करदात्यांच्या पैशातून केला जात असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे हा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत केंद्र सरकारचे गृहमंत्रालय, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राज्य शासनाच्या वित्त विभागाला प्रतिवादी करण्यात आले आहे. या प्रकरणावर 20 एप्रिल रोजी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचिकाकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार, ‘Z Plus’ सुरक्षेवर दरमहा सुमारे 40 ते 45 लाख रुपये खर्च होतो. हा खर्च करदात्यांच्या पैशातून केला जात असल्याने तो सार्वजनिक निधीचा गैरवापर असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच 27 फेब्रुवारी 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाचा संदर्भ देत, अशा सुरक्षेचा खर्च संबंधित व्यक्तीकडून वसूल करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, याचिकाकर्त्याने यापूर्वी 12 फेब्रुवारी 2026 आणि 27 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने सादर केली होती. मात्र, या निवेदनांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचिकेमध्ये करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर व्हावा, यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याचिका पूर्णपणे सार्वजनिक हितासाठी असल्याचा दावा ही याचिका पूर्णपणे सार्वजनिक हितासाठी असल्याचे याचिकाकर्त्याने नमूद केले असून, यामध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसल्याचेही स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून ‘Z Plus’ सुरक्षेचा खर्च संबंधितांकडून तातडीने वसूल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. आता उच्च न्यायालय यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पुणे शहरातील सारसबाग परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळा चौकात ज्येष्ठ लेखक डॉ. संपत गणपत जाधव यांना शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्यावर बंदुकीच्या दस्ताने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. मातंग समाजाच्या आरक्षणासंदर्भात एक बैठक संपल्यानंतर फिर्यादी दीपक कुंडलीक कसबे आणि डॉ. संपत जाधव तेथे उपस्थित होते. त्यावेळी आरोपी सहदेव ढावरे आणि प्रमोद नाडे यांनी डॉ. जाधव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दीपक कसबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी प्रवीण शेलारने त्यांना तुझा मर्डर करीन अशी धमकी देऊन मारहाण केली. या हल्ल्यात कसबे यांच्या खिशातील रोख रक्कमही गहाळ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी त्यांच्या गाड्यांमधून उतरून दीपक कसबे यांना घेरले. आरोपी स्वप्निल सोनवणे याने आपल्याकडील बंदूक प्रमोद नाडे याच्याकडे दिली. नाडेने बंदुकीच्या दस्ताने कसबे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यावेळी याच्या डोक्यात गोळी घालून संपवून टाका असे आदेशही देण्यात आले. कसबे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत स्प्रे मारून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. स्वारगेट पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी सहदेव ढावरे, प्रवीण शेलार, प्रमोद नाडे, स्वप्निल सोनवणे आणि ओंकार हिंगे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), १८९(४), १९१(२), १९१(३), ३५१(१) आणि आर्म्स ॲक्ट ३(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात शस्त्राचा वापर झाल्यामुळे तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात १७ एप्रिल रोजी मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा 'चड्डी-बनियान गँग' सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने एटीएम मशिनचे नुकसान केले असले तरी बँकेची अभेद्य सुरक्षा यंत्रणा भेदण्यात त्याला अपयश आल्याने लाखो रुपयांची रोकड बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ एप्रिलच्या मध्यरात्री सुमारास एका अज्ञात चोरट्याने आकाशवाणी परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्यानुसार, हा चोरटा केवळ चड्डी आणि बनियान परिधान केलेल्या अवस्थेत होता. त्याने अतिशय सराईतपणे मशिन तोडण्यासाठी अवजारांचा वापर केला. मात्र, मशिनचे बाह्य कवच तोडल्यानंतर आतील तिजोरी उघडणे त्याला अशक्य झाले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर आणि सुरक्षा अलार्म वाजण्याची भीती वाटल्याने चोरट्याने रिकाम्या हाताने तेथून पलायन केले. चड्डी-बनियान गँगची दहशत पुन्हा? या घटनेचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, त्यावरून पोलिस तपासाला नवीन दिशा मिळाली आहे. चोरट्याची वेशभूषा पाहता, ही चोरी चड्डी-बनियान गँगनेच करण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. ही गँग आपल्या अंगाला तेल लावून आणि कमी कपड्यांमध्ये चोरी करण्यासाठी कुख्यात आहे, जेणेकरून पकडले गेल्यास निसटणे सोपे होईल. शहरातील इतर भागांतही अशा प्रकारची टोळी वावरत असल्याची भीती आता व्यापारी आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बँकेकडून तक्रार आणि पोलिसांची कारवाई एटीएम मशिनची तोडफोड झाल्याचे निदर्शनास येताच बँक प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र, गारखेडा शाखेचे व्यवस्थापक अभिनव इंगळे यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये शहरात सक्रीय होती गँग दरम्यान, यापूर्वी मार्च २०१७ मध्ये, शहरातील सातारा परिसरातील सुधाकर नगर पोलिस हाउसिंग सोसायटीमध्ये या टोळीने दरोडा टाकला होता. विशेष म्हणजे, या सोसायटीत पोलिस कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक वास्तव्यास आहेत. चोरांनी येथून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पोलिस वसाहतीतही या टोळीने निर्भयपणे चोरीची ही घटना घडवून आणली होती. टोळीची कार्यपद्धती कशी? या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत वेगळी आहे. टोळीचे सदस्य अनेकदा रात्रीच्या वेळी केवळ चड्डी आणि बनियान परिधान करून येतात. कोणाच्या हाताला लागू नये किंवा पकडले जाऊ नये म्हणून ते आपल्या शरीराला तेल किंवा ग्रीस लावतात. त्यांच्याकडे काठी किंवा चाकू यांसारखी घातक शस्त्रे असतात, ज्याचा वापर ते प्रतिकार करण्यासाठी करतात.
हिंगोली शहरातील सराफा बाजारात किरकोळ कारणावरून सराफा व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणातील चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन अर्ज हिंगोलीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याबाबत अ्रॅड. अविनाश बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील सराफा बाजार भागात सराफा व्यापारी साईनाथ उदावंत व त्यांचा मुलगा सागर उदावंत यांनी दुकानाचे बांधकाम सुरु केले होते. काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या या बांधकामामुळे इतर सराफा व्यापाऱ्यांसोबत त्यांची कुरबुर होऊ लागली होती. त्यातून किरकोळ वाद होत होते. मात्र त्यानंतर प्रकरण शांत होऊ लागले होते. त्यानंतर बांधकामाची भिंत उभारणीचे काम हाती घेतल्यानंतर चौघांनी त्या ठिकाणी येऊन उदावंत यांना शिवीगाळ सुरु केली. तुझ्या बांधकामामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असून ग्राहक कमी होत आहे. त्यामुळे तु बांधकाम करू नको असे म्हणत सराफा व्यापारी शुभम शहाणे, दिलीप शहाणे, वैभव शहाणे, देवेश शहाणे यांनी लोखंडी पंच लोखंडी मुसळ व लाकडाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले होते. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात वरील चौघांवर ता. २० मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलिसांनी चौघांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना हिंगोलीच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. यामध्ये चारही आरोपींनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर केला होता. यावेळी फिर्यादी सराफा व्यापारी उदावंत यांच्या वतीने ॲड. अविनाश बांगर व ॲड. हर्ष बनसोडे यांनी न्यायालयात युक्तीवाद मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एेकल्यानंतर न्यायालयाने वरील चारही सराफा व्यापाऱ्यांचा जामीन फेटाळून लावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांनी संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून देशातील 70 कोटी महिलांचा विश्वासघात केला. त्यांनी या विधेयकाची भ्रूणहत्या केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ही हत्या केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून त्यांनी भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर एकप्रकारे तांडवच केले, असे ते म्हणाले. महिला आरक्षण व लोकसभेच्या जागा वाढवण्याशी (परिसीमन) संबंधित अत्यंत महत्त्वाचे असणारे संविधान दुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरकारला हे विधेयक पारित करण्यासाठी आवश्यक असणारे दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयश आले. परिणामी, बहुमताअभावी हे विधेयक फेटाळले गेले. या प्रकरणी आता सत्ताधारी व विरोधकांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी आयोजित एका पत्रकार परिषदेद्वारे विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणाले, 17 एप्रिल हा दिवस देशाच्या राजकीय व सामाजिक वाटचालीतील एक महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा होती. एक निर्णायक क्षण ठरेल असे वाटले होते. कारण, त्या दिवशी महिला आरक्षणाचे विधेयक हे मंजूर होणार होते. सर्व लोक त्याला मदत करतील असा विश्वासही होता. पण दुर्दैवाने काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, ठाकरे गट, शरद पवार गट, समाजवादी पार्टी आदी विरोधी पक्षांनी आपल्या महिलाविरोधी मानसिकतेचे प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते दोन तृतीयांश मते मिळू दिली नाही. 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या विरोधकांनी केली. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला, तो एक प्रकारे भारतातील समाजसुधारकांच्या विचारांवर केलेले तांडव होते. मला अतिशय दुःख आहे की, महात्मा जोतिबा फुले यांची 200 वी जन्मशताब्दी सुरू असताना विरोधकांनी त्यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम केले. त्यात भाषणापुरते महात्मा फुलेंचे नाव घेणारे हे पक्ष पूर्णतः उघडे पडले. सभागृहात 3 विधेयके मांडण्यात आली होती. 134 वे घटनादुरुस्ती विधेयक, परिसीमन विधेयक व केंद्रशासित प्रदेश विधेयक यांचा त्यात समावेश होता. आपल्याला कल्पना असेल की, 1976 मध्ये देशात डीलिमिटेशन झाले, तेव्हा घटनादुरुस्ती करून आपण निर्णय घेतला की, 1971 ची लोकसंख्या फ्रिज ठेवून 2000 सालापर्यंत डीलिमिटेशन होणार नाही. यासंदर्भात 2002 साली डीलिमिटेशन कमिशन अस्तित्वात आले, तेव्हा महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होऊ नये यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्याला पुन्हा 20 वर्षांची वाढ दिली. त्यानंतर 2002 मध्ये 1971 च्याच लोकसंख्येवर आधारित राज्यांत डीलिमिटेशन करण्यात आले, असे ते म्हणाले. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसारख्या संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी जनतेशी सत्य बोलण्याची शपथ घेतलेली असते. मात्र, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी सातत्याने जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. २०२३ मध्येच संसदेत नारी शक्ती अधिनियम मंजूर झाला आणि १६ एप्रिल रोजी त्याची अधिसूचनाही निघाली, मग आता पुन्हा या नावाचा डमरू वाजवून कोणाला फसवताय? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २० सप्टेंबर २०२३ च्या एका जुन्या ट्वीटचा संदर्भ दिला. दीड वर्षांपूर्वी ज्या विधेयकाचे स्वागत फडणवीसांनी 'ऐतिहासिक पाऊल' म्हणून केले होते, त्याच मुद्द्यावरून आता पुन्हा आंदोलन किंवा निषेध करणे हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि फडणवीसांनी आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आणि खोट्या प्रचाराबद्दल देशाची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली. हे आरक्षण नव्हे, तर मतदारसंघ तोडण्याचे बिल संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या हेतूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणत आहात, ते प्रत्यक्षात महिलांना न्याय देण्यासाठी नसून मतदारसंघ तोडण्याचे बिल होते, अशी बोचरी टीका त्यांनी केली. संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांनी संविधानाची शपथ घेऊन खोटे बोलू नये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श न घेता किमान महाराष्ट्राच्या जनतेसमोर तरी सत्य मांडावे, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. अधिसूचना निघाली, मग आता कसला निषेध? १६ एप्रिल रोजी केंद्र सरकारने महिला आरक्षणच्या कायद्याची अधिसूचना काढून तो लागू केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. ३३ टक्के आरक्षण आता कायद्याने लागू झाले आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस कोणत्या भ्रूणहत्येबद्दल बोलत आहेत? राज्यात भ्रूणहत्येवर बंदी आहे हे ते विसरले का? २०२३ ला संसदेने कायदा मंजूर केला, राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली, मग आता कसला डमरू वाजवत आहात? असे प्रश्न विचारत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेतील तफावत उघड केली. पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी यावेळी संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी २०२३ च्या ट्वीटबद्दल माफी मागायला हवी. मी त्यावेळी जे म्हटल आहे ते खोटं आहे. माझं ट्वीट खोटं आहे. त्यावेळी मोदींनीही संदेश दिला होता. मग तो संदेश खरा होता की काल दिलेला संदेश खरा होता, असे म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय श्रेयावादाचा निषेध केला.
भाजपचे स्वीकृत सदस्य जाहीर:पाच नावांवर शिक्कामोर्तब; कराड, खाजेकर, मलके, झाला आणि पालोदकर यांना संधी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवर अखेर पडदा पडला असून भाजपने आपल्या कोट्यातील पाच नावांवर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला. प्रदेश भाजपकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर ही नावे निश्चित करण्यात आली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपकडून स्वीकृत सदस्यपदासाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होती. त्यामुळे पक्षाने आधी 12 जणांची यादी महापालिका प्रशासनाकडे सादर केली होती. या यादीतून अंतिम 5 सदस्यांची निवड करण्यात आली. अधिकृत पत्रानुसार हरवर्धन कराड, छाया खाजेकर, गोकुळ मलके, विजय सिंह झाला आणि अमृता पालोदकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या नावांवर पक्षाने अखेर शिक्कामोर्तब केल्याने आता पुढील प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान भाजपने सामाजिक समतोल साधण्यावर विशेष भर दिल्याचे दिसून आले. विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी अंतिम निवड करताना काळजी घेण्यात आली. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध स्तरांवरील प्रतिनिधित्व लक्षात घेऊनच ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत संतुलन राखण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. दरम्यान, स्वीकृत सदस्यांची नावे थेट सर्वसाधारण सभेत जाहीर करण्याची तयारी होती. मात्र, प्रदेशाकडून पत्र उशिरा मिळाल्यामुळे ही प्रक्रिया थोडी विलंबित झाली होती. शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अंतिम पत्र मिळाल्यानंतरच अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता प्रशासनाकडे अंतिम नावे सादर झाल्याने औपचारिक घोषणा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवड प्रक्रियेत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाराज गटाची भूमिका होती. मनपा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काहींनी उपोषण, आंदोलन करत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पक्षाने स्पष्ट भूमिका घेत अशा प्रकारे दबाव टाकणाऱ्यांना संधी दिली जाणार नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या यादीत अशा व्यक्तींना स्थान देण्यात आलेले नाही. रणनीती आणि संतुलन यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न एकूणच, भाजपने स्वीकृत सदस्यांच्या निवडीत रणनीती आणि संतुलन यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छुकांची संख्या मोठी असतानाही मर्यादित जागांमध्ये योग्य उमेदवारांची निवड करत पक्षाने अंतर्गत असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला. आता या नव्या सदस्यांवर महापालिकेच्या कामकाजात सक्रिय भूमिका बजावण्याची जबाबदारी असेल.
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत पेठवडगाव येथे मयताच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन पंचनामा करण्यापासून रोखत मृतदेहाची अवहेलना केल्याच्या आरोपावरून तिघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २० गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेेठवडगाव येथील नवनाथ लाखाडे या तरुणाने पेठवडगाव शिवारात शनिवारी सायंकाळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, बालाजी गोणारकर, जमादार शिवाजी पवार, राजेश घोंगडे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान, मयत नवनाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणला होता. मात्र त्याच्या आत्महत्येस नांदेड पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीक अभिषेक सातपुते जबाबदार असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहाचा पंचनामा करू नका तसेच उत्तरीय तपासणी करू नये अशी भुमीका गावकरी व मयत नवनाथ यांच्या कुटुबियांनी घेतली होती. या मागणीसाठी गावकऱ्यांचा मोठा जमाव रविवारी ता. १९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आला होता. आखाडा बाळापूर पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी त्यांच्ा भुमीकेवर ठाम होते. त्यानंतर रात्री उशीरा अभिषेक याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या प्रकरणात पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये गावातील बालाजी देवकर, सोमनाथ रणखांब, निकेश गायकवाड यांनी मयत नवनाथ यांच्या नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन मयत नवनाथ याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी व पंचनामा करू दिला नाही तसेच मृतदेहाची अवहेलना केल्याचे नमुद केले. यावरून वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक बालाजी गोणारकर पुढील तपास करीत आहेत.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीने राज्यासह देशाचं लक्ष वेधून घेतलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या मते, ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती, मात्र काही राजकीय हालचालींमुळे तसे घडले नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक उमेदवार उभे करून ही निवडणूक स्पर्धात्मक बनवली, असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे बारामतीतील राजकारण पुन्हा तापले असून विविध स्तरांवर चर्चा रंगू लागली आहे. पार्थ पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बारामतीत अनेकांची इच्छा होती की पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. काही उमेदवारांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या मागे वेगवेगळ्या मागण्या असल्याचेही त्यांनी सूचित केले. काही प्रतिस्पर्ध्यांना मुद्दाम मैदानात उतरवले गेले, असा त्यांचा आरोप आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. दरम्यान, या निवडणुकीतून माघार घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे पार्थ पवार यांनी स्पष्ट केले. आम्ही निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहोत, असे सांगत त्यांनी विजयाबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असल्याचेही त्यांनी मान्य केले. सध्याच्या तीव्र उन्हामुळे प्रचार आणि मतदान प्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सांगता सभेबाबतही पार्थ पवार यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सभेची तयारी जोरात सुरू असून स्थळाची पाहणीही करण्यात येत आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पार्थ पवार यांनी पुढे सांगितले की, सध्या बारामतीत उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे मतदारांना घराबाहेर काढणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. तरीही कार्यकर्त्यांच्या मदतीने हे आव्हान पेलले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उन्हातही लोकांना मतदानासाठी बाहेर काढणे हा मोठा टास्क आहे, पण आम्ही त्यासाठी तयारी केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विजय नव्हे तर मोठा विक्रम करण्याचे आमचे लक्ष्य विजयाबाबत बोलताना पार्थ पवार यांनी मोठा दावा केला. त्यांनी सांगितले की, आम्ही निश्चितपणे चांगल्या मतांनी विजयी होऊ. मात्र, केवळ विजय नव्हे तर मोठा विक्रम करण्याचे आमचे लक्ष्य आहे. यापूर्वीचा 2,70,000 मतांचा विक्रम मोडण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे बारामतीतील निवडणूक अधिकच रंगतदार झाली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील (DGCA) भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) उघडकीस आणले आहे. ड्रोन आयातीच्या परवानग्या देण्यासाठी लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून सीबीआयने डीजीसीएमधील उपमहासंचालक (Deputy Director General) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी DGCA वर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अनेक गंभीर दावे केले आहेत. सीबीआयने DGCA च्या एअरवर्थिनेस विभागाच्या डेप्युटी डायरेक्टरला अटक केल्यामुळे, या संस्थेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. अटक झालेला अधिकारी केवळ एक 'छोटा मासा' असून, या यंत्रणेत अनेक बडे अधिकारी सामील असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. अजित पवारांच्या अपघात तपासावर प्रश्नचिन्ह डीजीसीए मधील लाचखोरीचे प्रकार पाहता, व्ही. के. सिंग (V. K. Singh) सारख्या व्यक्तीने कागदपत्रांमध्ये फेरफार करून अजित पवारांच्या अपघातासंदर्भातील अहवाल 'क्लीन' केला असण्याची शक्यता रोहित पवार यांनी वर्तवली आहे. TDP आणि केंद्र सरकारमधील राजकीय साटेलोटे एकीकडे दादांच्या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याची विनंती करून दोन महिने उलटले तरी सीबीआयने तपास हातात घेतला नाही, परंतु दुसरीकडे सीबीआय स्वतःहून ऍक्शन घेते हे विशेष म्हणावे लागेल. कदाचित TDP च्या मंत्रालयाला इशारा किंवा अप्रत्यक्ष मेसेज दिला असावा म्हणूनच प्रादेशिक अस्मिता बाजूला सारून TDP कडून डिलीमिटेशन संदर्भात केंद्र सरकारच्या आदेशांचे तंतोतंत पालन केले जात असावे! असेही रोहित पवार म्हणालेत. नेमके प्रकरण काय? केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातील एका उपमहासंचालकासह रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वरिष्ठ उपाध्यक्षांना लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये डीजीसीए मुख्यालयातील 'एअरवर्थिनेस' संचालनालयाचे उपमहासंचालक मुदावत देवुला आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत माथूर यांचा समावेश आहे. माथूर हे 'अॅस्टेरिया एरोस्पेस लिमिटेड' या कंपनीशीही संबंधित आहेत. सीबीआयने या प्रकरणी १८ एप्रिल रोजी गुन्हा (FIR) दाखल केला होता. अॅस्टेरिया एरोस्पेसच्या ड्रोन आयातीसंदर्भातील काही अर्जांना मंजुरी मिळवण्यासाठी हा व्यवहार झाला होता. मार्च महिन्यात झालेल्या संवादानुसार, प्रलंबित असलेल्या तीन अर्जांपैकी प्रत्येक फाईल मंजूर करण्यासाठी ५ लाख रुपये, असे एकूण १५ लाख रुपयांची लाच ठरवण्यात आली होती. १८ एप्रिल रोजी आयआयटी दिल्ली फ्लायओव्हरजवळ लाचेची रक्कम स्वीकारली जात असताना सीबीआयने सापळा रचून ही कारवाई केली. सुरुवातीला २.५ लाख रुपयांच्या देवाणघेवाणीचा आरोप आहे. छाप्यात घबाड हस्तगत अटकेनंतर सीबीआयने दिल्लीतील चार वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवली. यामध्ये आरोपींकडे ३७ लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याची आणि चांदीची नाणी, तसेच अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या मालमत्तेचा स्त्रोत आणि अन्य कोणाचे यात हितसंबंध आहेत का, याचा तपास आता सीबीआय करत आहे. एअरवर्थिनेस संचालनालयाची जबाबदारी काय? डीजीसीएच्या संकेतस्थळानुसार, हे संचालनालय विमानांची नोंदणी, हवाई पात्रतेचे प्रमाणपत्र (Airworthiness Certificate) जारी करणे आणि विमानांच्या उत्पादनात व देखभालीत गुंतलेल्या संस्थांना मंजुरी देण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम करते. अशा संवेदनशील विभागातच लाचखोरी झाल्याने सुरक्षेच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. 'डीजीसीए' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात २०२५ च्या उत्तरार्धात झालेल्या 'इंडिगो एअरलाईन्स'च्या गोंधळानंतर डीजीसीए आधीच वादात सापडली होती. त्यावेळी ५,००० हून अधिक उड्डाणे रद्द झाली होती आणि १० लाख प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला होता. त्या प्रकरणानंतर तत्कालीन महासंचालक फैज अहमद किडवाई यांना पायउतार व्हावे लागले होते. आता या ताज्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे विमान वाहतूक नियामक संस्थेच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रतिनिधी | नांदगाव खंडेश्वर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने द ग्रॅज्युएट फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नोकरी महोत्सवात २७१ जणांना नोकरी मिळाली. यापैकी १२२ उमेदवारांना लगेच नियुक्तीपत्रे देण्यात आली असून इतरांना यथावकाश नियुक्तीपत्र पाठवले जाणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा स्वरूपाचा रोजगार मेळावा पार पडल्याने परिसरातील युवकांमध्ये मोठा उत्साह पाहायला संचारला आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. निकु खालसा होते. उद्घाटन नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मोहम्मद जमीर, नगरसेवक अक्षय पारस्कर, योगेश चव्हाळे, वासुदेव लोखंडे, मोहम्मद साजिद, अविनाश ब्राम्हणवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. “कंपन्या आपल्या दारी” या संकल्पनेतून विविध नामांकित कंपन्यांना थेट नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना मोठ्या शहरात न जाता आपल्या परिसरातच मुलाखती देण्याची व रोजगार मिळविण्याची संधी उपलब्ध झाली. अनेक मान्यवरांच्या भेटी, कौतुकाचा वर्षाव या उपक्रमाला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजप्रेमी व्यक्ती व मान्यवरांनी भेट देऊन आयोजकांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावनादेखील अनेकांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर असे उपक्रम वरचेवर आयोजित केले जावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी | अकोला सध्या बुवाबाजीवरुन अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी महायुतीवर सरकारवर टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारकडून अंधश्रद्धा आणि बुवाबाजीला खतपाणी घालण्यात येत असून, अंधश्रद्धा निर्मूलन कायदाही प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरले असा खळबळजनक आरोप प्रा. मानव यांनी केला. ते मराठा मंडळ सभागृहात पार पडलेल्या बुवाबाजी विरोधी परिषद बुवाबाजीवर सडेतोड मते मांडली. खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत प्रा. श्याम मानव यांनी बुवाबाजीवर जोरदार हल्ला चढवत खरातसारख्या भोंदू बाबांच्या कृत्यांवर गंभीर आरोप केले.विचारपीठावर शेतकरी नेते प्रकाश पोहरे, सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज, आमदार अमोल मिटकरी, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, राष्ट्रीय प्रवक्ते पुरुषोत्तम आवारे, अंनिसचे सहसंघटक अशोक घाटे, डॉ. सीमा तायडे, विजय कौसल, धनंजय मिश्रा, अंनिसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत तराळ, डॉ. पुरुषोत्तम तायडे, डॉ. मिलिंद चौखडे, रमेश हिंगणकर, सौरभ वाघोडे, जिल्हा संघटक अॅड. अनिल लव्हाळे, विदर्भ संघटक किशोर वाघ, प्रतिभा भुतेकर, अॅड. रूपाली राऊत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. महिलांची होत असलेली फसवणूक, शोषण आणि अंधश्रद्धेचे जाळे याचा प्रा. मानव यांनी पर्दाफाश केला. बुवा तिथे बाया या विषयावर बोलताना त्यांनी नागरिकांना सावध केले. कोणताही चमत्कार' हा विज्ञानावर आधारित हातचलाखी असते. ढोंगी बाबांना ओळखण्यासाठी प्रश्न विचारणे, पुरावे मागणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. आजपर्यंत अनेक बुवा-बाबांचा भंडाफोड केल्याचा उल्लेख करत त्यांनी अशा प्रवृत्तीविरोधात लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला. खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सूत्रसंचालन चंद्रकांत झटाले तर आभार प्रदर्शन जिल्हा संघटक अॅड. अनिल लव्हाळे यांनी केले. देशात हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद अशा धार्मिक वादात लोकांना गुंतवून ठेवण्यात येत असल्याचे प्रकाश पोहरे म्हणाले. अनेकांना लोकशाही कळाली नसल्यानेच उच्चशिक्षित लोक खरातसारख्या भोंदूबाबांच्या नादी लागत असल्याचा घाणाघाती आरोप त्यांनी केला. महिलांना बनवले जाते गुलाम महिलांना भविष्य, मानसिक आधार, आजारांवर उपचार, नवस-पूजा, सांगण्याच्या नावाखाली आमिषने देण्यात येतात. त्यातूनच त्या जाळ्यात अडकतात, अशा बाबांकडून महिलांचे केवळ आर्थिकच नव्हे, तर शारीरिक शोषणही होते. अज्ञान, भीती आणि श्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांना गुलाम बनवले जाते, अशात राज्यात बुवा बापू टाकून चा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे असे प्रा. मानव म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरनंतर आता उपराजधानी नागपूरमध्येही 'पाकिस्तानी ब्युटी क्रीम'च्या वापरामुळे अनेक महिलांना किडनीचे गंभीर आजार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरील रील आणि जाहिरातींना बळी पडून झटपट गोरे होण्यासाठी वापरण्यात येणारी ही क्रीम आता महिलांसाठी 'स्लो पॉयझन' ठरत आहे. नागपुरातील एकाच रुग्णालयात गेल्या दोन वर्षांत तब्बल १८ महिलांना या क्रीममुळे किडनीचे आजार जडल्याचे डॉक्टरांच्या निदानातून स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, पाकिस्तान निर्मित या क्रीम्समध्ये पारा (Mercury) या धातूची मात्रा प्रमाणाबाहेर असते. जेव्हा ही क्रीम चेहऱ्यावर लावली जाते, तेव्हा त्यातील मर्क्युरी त्वचेच्या छिद्रांमधून शरीरात प्रवेश करतो. शरीरात गेलेला हा घातक घटक थेट रक्तात मिसळतो. रक्तातील हे विष फिल्टर करताना किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि कालांतराने किडनी निकामी होण्यासारखे गंभीर विकार उद्भवतात. अन्न व औषध प्रशासनाची (FDA) मोठी कारवाई नागपूर शहरात या क्रीम्सची खुलेआम विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच 'एफडीए'ने (अन्न व औषध प्रशासन) शोधमोहीम राबवली. मार्केटमधून या क्रीम्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत मल्लिका, झलक, गोरे, गोल्डन पर्ल, चांदणी, उजूबा, फेस फ्रेश, नूर हर्बल, न्यू फेस ब्युटी क्रीम यांसह विविध पाकिस्तानी क्रीम्स जप्त करण्यात आल्या. तसंच पारले गोल्ड, गोरे साबण आणि मल्लिका व्हिटॅमिन-C सिरम यांचाही समावेश आहे. तज्ज्ञांचा इशारा : रीलच्या नादी लागू नका! अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियावरील 'इन्स्टंट फेअरनेस'चे दावे पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या क्रीम्स वापरतात. चेहऱ्यावर चकाकी आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या क्रीम्स प्रत्यक्षात शरीराच्या अंतर्गत अवयवांना पोखरत आहेत. नागरिकांनी लेबल न वाचता किंवा बनावट विदेशी बनावटीची उत्पादने वापरणे टाळावे. अशा क्रीम्स वापरून कोणीही कायमस्वरूपी गोरे होऊ शकत नाही. उलट, यामुळे त्वचेचा कर्करोग आणि किडनी निकामी होण्याचा धोका १०० टक्के असतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी | अकोला आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे मराठा समाजात संतप्त प्रक्रिया उमटत आहे. वगळलेला नकाशा पूर्ववत समाविष्ट करा, अशी मागणी करीत अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक दिली. यापूर्वी अनेकदा इतिहास बदलण्यात येत असल्याचा आरोप करत शिवप्रेमी आक्रमक झाले होते. कधी जाहीर भाषण तर कधी लिखाणातून इतिहासाचे संदर्भ बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. दरम्यान आता इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये पूर्वी समाविष्ट असलेला मराठा समाजाचा नकाशा अलीकडील आवृत्यामध्ये वगळण्यात आलेला आहे, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे म्हणणे आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आणि केंद्रीय कार्यकारिणीचे आदेशान्वये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून तो नकाशा इतिहासाच्या पुस्तकात पूर्ववत समाविष्ट करून राजपुताना प्रदेश मराठा प्रभाव क्षेत्रात दाखवावा, अशी मागणी होत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर मागणीचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार, विभागीय अध्यक्ष कृष्णा अंधारे, विभागीय महिला अध्यक्ष कल्पना बिडवे, जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, सिंधू पवार, राजेश पाटील, राखी पटेकर, मीना लांडे, योगेश थोरात, अरुण खोटरे, विठ्ठलराव वाघ, माधुरी वाघमारे, श्रीकांत सरोदे, प्रदीप लुगडे, शंतनू वस्तू, विपुल माने, शाम देशमुख, अजिंक काळे, रोहित बारस्कर, नितीन पाटील, अंकीत कदम, विक्रांत वाघमारे, नरेश सूर्यवंशी, उमेश साबळे आदींच्या सह्या असल्याचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन पाटील गोमासे यांनी कळवले आहे. नकाशा पुन्हा समाविष्ट करून त्यामध्ये राजपुताना (राजस्थान) हा मराठा साम्राज्याचा प्रभाव क्षेत्रात दाखवावा. या संदर्भात ऐतिहासिक पुरावे सुध्दा निदर्शनास आणून दिले आहेत. मराठा-मारवाड संबंध (१७२४-१८४३) या ग्रंथांमध्ये राजस्थान हिंदी ग्रंथ अकादमी जयपूर यांनी प्रकाशित केलेल्या दस्तऐवजांमध्ये मराठा आणि राजपूत राज्यांमधील संबंध स्पष्टपणे नोंदलेले आहे. या पत्रांमध्ये मराठा सरदारांकडे मदत संरक्षण व सैन्य पाठवण्याच्या विनंत्या करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते. संबंधित पत्रव्यवहारामध्ये विविध राजपूत शासकांनी मराठा सरदारांना (उदा . विसाजी पंत बिनीवाले) थेट विनंती करून सैन्य मदत मागितल्याचे उल्लेख आहे. यावरून त्या प्रदेशावर मराठ्यांचा प्रभाव व राजकीय वर्चस्व होते,हे सिद्ध होते, असे महासंघाचे म्हणणे आहे. सन १७५२ च्या करारानंतर मुघल बादशहा मराठ्यांच्या संरक्षणाखाली गेला होता. परिणामी मुघलांचे मंडलिक असलेले अनेक राजपूत शासन अप्रत्यक्षपणे मराठा सत्तेखाली आले होते, असा इतिहासकारांचा सर्वमान्य निष्कर्ष आहे. विविध ऐतिहासिक कागदपत्रानुसार मराठ्यांनी राजस्थानातील प्रदेशातून चौथाई व सरदेशमुखी वसूल केली. ही बाब त्यांच्या प्रभावी राजकीय अधिकाराचे द्योतक आह, असेही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मराठा समाजाचा नकाशा हा केवळ भौगोलिक सीमांचा नसून प्रभावक्षेत्र दर्शवणारा आहे. त्यामुळे राजपुताना प्रदेश मराठा प्रभाव क्षेत्रात दाखवणे हे ऐतिहासिकदृष्ट्या योग्य व आवश्यक आहे. मराठा साम्राज्याच्या नकाशा पुन्हा पाठ्य पुस्तकात समाविष्ट करावा. संबंधित नकाशामध्ये राजपुताना प्रदेश मराठा प्रभाव क्षेत्र म्हणून दाखवावा. या संदर्भात इतिहास तज्ञांची समिती नेमून योग्य शास्त्रीय पडताळणी करून निर्णय घ्यावा. शासनाने निवेदनाचा सकारात्मक विचार करून विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ व पुराव्याधारित इतिहास उपलब्ध करून द्या असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रतिनिधी | अकोला सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग आणि ऊर्जापर्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सामंजस्य करार कार्यक्रमांतर्गत पदव्युत्तर इतिहास विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. समाजसेवा ही केवळ कर्तव्य नसून समाजाचे ऋण फेडण्याची एक संधी असल्याचे अॅड. संजय तिकांडे पाटील म्हणाले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऊर्जापर्व फाउंडेशनचे संचालक अॅड. संजय तिकांडे पाटील होते. अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख डॉ. संतोष कुलकर्णी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड. तिकांडे यांनी विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. समाजसेवा ही केवळ कर्तव्य नसून समाजाचे ऋण फेडण्याची एक संधी असल्याचे त्यांनी सांगितले. उपक्रमांमध्ये आदिवासी बांधवांना हिवाळ्यात उबदार कपड्यांचे वाटप, दिवाळीनिमित्त किल्ले बांधणी स्पर्धा, महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा. रोशन वानखडे यांनी केले. प्रा. राकेश मुदिराज यांनी गुरुऋण, पितृऋण आणि समाजऋण यांचा उल्लेख केला. समाजऋण हे सर्वांत श्रेष्ठ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक व्यक्ती समाजाचे काही ना काही देणे लागतो. ते फेडणे जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. जबाबदारी ओळखणे गरजेचे डॉ. संतोष कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत मार्गदर्शन केले. शिक्षणासोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून प्रत्येक घटकांपर्यंत मदतकार्य पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आवाहन केले. सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना आणि सेवाभाव अंगीकारल्यासच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे त्यांनी सांगितले.
प्रतिनिधी | अकोला रुग्णसेवा ही सर्वोच्च सेवा असून या आदर्श व्यवसायात आपण सर्व रुग्णांना समान मानून सेवा करावी, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केले. १९ व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना बछेर पुढे म्हणाले की, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील डीन आणि मुन्नाभाई यांचा रुग्णांप्रती अनुक्रमे असलेला वैज्ञानिक व भावनिक, मानवीय दृष्टिकोन आपण निदान व उपचार करताना ठेवला, तर यश निश्चितच आपल्या मागे धावत येईल. याप्रसंगी त्यांनी आठवण करून दिली की, या महाविद्यालयाची पहिली बॅच १९ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्या मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांच्या शुभसंदेशाने बाहेर पडली होती. आज जिल्हाधिकारी तथा रेड क्रॉसच्या अध्यक्षा वर्षा मीना यांनी नव्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. बछेर यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच रेड क्रॉस सोसायटीने मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमाला रेड क्रॉसचे कार्यकारी सदस्य ॲड. सुभाषसिंह ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी अधिष्ठाता डॉ. गजानन आत्राम, कम्युनिटी मेडिसिन विभागप्रमुख डॉ. नीलम सुखसोले, फिजिओलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रवीण शेगावकर व प्रा. डॉ. प्रज्ञा अत्राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. दिलीप सराटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना अंतःकरणापासून रुग्णसेवा करण्याची शपथ दिली. हा पदवीदान समारंभ अधिष्ठाता डॉ. उत्कर्ष सोनवाने व उपअधिष्ठाता डॉ. आशिष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सांस्कृतिक समितीचे डॉ. गौरव जिलगिलवार, डॉ. करण तायडे, डॉ. अद्वैत हागे, डॉ. रूपानजीता त्रिपाठी व डॉ. चेतना पारखी तसेच डॉ. अनिकेत उचे, डॉ. श्रेय सिंग, डॉ. नितीन अबुज, डॉ. साहिल तायडे, डॉ. श्रद्धा पीडुरकर, डॉ. श्रेयस घुबडे, डॉ. अभिषेक हाडे आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
प्रतिनिधी | अकोला संत परंपरेचा अमूल्य वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा जागर आजही तितक्याच श्रद्धेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने केला जातो. याच पार्श्वभूमीवर अकोल्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मंगळवारी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख सभागृहात संपन्न होणार आहे. गत काही दिवसांपासून सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातून संस्कृती जतनाचा संदेश देण्यात येत आहे. या कार्यक्रमांना अकोलेकरांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून आयोजित या विशेष कार्यक्रमास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा पुढाकार लाभला असून सांस्कृतिक जतन आणि प्रसाराच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान अकोल्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित एक बहारदार सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले असून, या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. अकोला आणि परिसरातील रसिक नागरिक, विद्यार्थी, तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि संगीताचा हा अनोखा संगम अनुभवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संगीत आणि निरूपण यांचा सुंदर संगम : कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे आपल्या मधुर आणि भावस्पर्शी गायनातून या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची देणार आहेत. अभंग, ओव्या आणि भक्तिगीतांच्या सादरीकरणातून त्या संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचे भावविश्व उलगडून दाखवतील. संगीत आणि निरूपण यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळणार आहे. प्रभावी, ओजस्वी निरुपण या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात निरुपणकार गणेश शिंदे यांचे प्रभावी आणि ओजस्वी निरूपण. ते संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण, त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास, अध्यात्मिक साधना, तसेच त्यांनी समाजाला दिलेला ज्ञानाचा अमृतस्रोत याचे जिवंत चित्र उभे करणार आहेत. त्यांच्या निरूपणातून ज्ञानेश्वरांच्या विचारांची गूढता आणि व्यापकता प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचेल.
प्रतिनिधी | अकोला / बोरगाव मंजू म्हैसांग परिसरात कारवाईसाठी गेलेल्या बोरगाव मंजू पोलिसांच्या अंगावर वाळू माफियांनी ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न करत उघडपणे दादागिरी केली. शिवीगाळ, धमक्या आणि बेधडक वर्तनामुळे पोलिसांना माघार घ्यावी लागली. वाळू माफियांकडून पोलिसांना धमकी देणारा या प्रकाराचा धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर आठ दिवसांनी पोलिस प्रशासन खळबळून जागे झाले फिर्यादी पोलिसाने १८ एप्रिल रोजी उशिरा रात्री दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक शुभम मानकर (रा. भुईखेड) याच्या विरोधात १९ एप्रिलला विविध कलमान्वये बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. म्हैसांग येथील पूर्णा नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून, जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने नदीचे पात्र अक्षरशः पोखरून काढले जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत असून पर्यावरणाचेही गंभीर नुकसान होत आहे. स्थानिकांकडून वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. उर्वरित पान ४ वेळीच पोलिस कर्मचारी बाजुला झाल्याने पुढील अनर्थ टळला.त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, या घटनेची दखल पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घेतली आहे. एकाच रॉयल्टीवर दिवसभर शेकडो ब्रास वाळूचा उपसा एकाच रॉयल्टीवर दिवसभर शेकडो ब्रास वाळूचा उपसा होत असतानाही महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणा मात्र डोळेझाक करत असल्याचे चित्र आहे. नियमांची सर्रास पायमल्ली होत असताना संबंधित अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत आहेत, यामुळे अवैध वाळू उपशाला जणू मोकळे रान मिळाले आहे. हा वाळू घाट शासनाने लिलावातून दिला असला तरी प्रत्यक्षात ‘दोन हजार रुपये द्या आणि रात्रंदिवस उपसा करा’असे बिनधास्त सूत्र राबवले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. एकाच रॉयल्टी वर दिवसभर शेकडो ब्रास वाळू काढली जात असल्याने शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. अनियंत्रित उत्खननामुळे पूर्णा नदीचे पात्र खोलवर जात असून, पाण्याची पातळी खालावली आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडतात आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे.
प्रतिनिधी | संगमनेर निळवंडे धरण आणि त्याचे कालवे पूर्ण करून दुष्काळी भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शिवारात पाणी पोहोचवणे, हेच माझ्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राजकारण हे सत्तेसाठी नाही, तर गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी असते, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या वतीने आयोजित युवा संगम कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देताना थोरात म्हणाले, पुण्यात लॉ कॉलेजचे जनरल सेक्रेटरी असताना अनेक आंदोलनांत सहभाग घेतला. मीटर हटाव, टेंभे आंदोलन, मराठवाडा नामांतर आणि निळवंडे पाणी प्रश्नासाठी केलेल्या आंदोलनात ९ दिवसांचा कारावासही भोगला. संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निळवंडे धरणाबाबतचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, १९९९ मध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळत असतानाही निळवंडेचे काम मार्गी लावण्यासाठी मी मुद्दाम राज्यमंत्रिपद मागून घेतले. अनंत अडचणींवर मात करून धरणाची भिंत आणि कालव्यांची कामे पूर्ण केली. आता प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. काही लोक स्वार्थासाठी किंवा ईडीच्या भीतीपोटी पक्ष बदलून गेले आहेत. इतिहास केवळ लढणाऱ्यांचीच नोंद घेतो, पळून जाणाऱ्यांची नाही. नाशिक-पुणे रेल्वे नियोजित मार्गानेच व्हावी यासाठी आपला पाठपुरावा आहे, मात्र तालुक्याची प्रगती रोखण्यासाठी मुद्दाम काही अडचणी निर्माण केल्या जात असल्याची टीका त्यांनी केली. सध्या राजकारणात जातीयता वाढली आहे. सत्ताधाऱ्यांनी राजधर्माचे पालन करणे गरजेचे आहे, मात्र सध्या तसे चित्र दिसत नाही. कार्यक्रमात युवकांनी विचारलेल्या रॅपिड फायर प्रश्नांना थोरातांनी दिलखुलास आणि मिश्किल उत्तरे दिली. आभार संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी मानले. प्रसिद्धीसाठी खालच्या पातळीवरील टीका दुर्दैवी आमच्या कुटुंबाला वारकरी आणि पुरोगामी विचारांची बैठक आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे मोठे नेतृत्व असून वडीलधाऱ्यांचा मान ठेवून राजकारण झाले पाहिजे. प्रसिद्धीसाठी केली जाणारी खालच्या पातळीवरील टीका दुर्दैवी आहे, असेही थोरात म्हणाले.
^आजचा तरुण हा उद्याच्या प्रगत भारताचा पाया आहे. पारंपरिक चौकटीबाहेर विचार करून नवीन संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी जिद्द, धाडस आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. तरुणांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते. डॉ. रंगनाथ आहेर, प्राचार्य, न्यू आर्टस महाविद्यालय, पारनेर. प्रतिनिधी | पारनेर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा 'नोकरी देणारे' व्हा, हा मंत्र आता पारनेरचे तरुण आत्मसात करत आहेत. येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात बीबीए विभागाच्या वतीने आयोजित 'उद्योजकता विकास' प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची उत्साहात सांगता झाली. एक महिना चाललेल्या या मंथनातून तालुक्याला भविष्यातील उद्योजक मिळतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांच्यातील व्यावसायिक कौशल्ये जागी करण्यासाठी या विशेष कोर्सची आखणी करण्यात आली होती. ३० दिवसांच्या या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगाची खऱ्या अर्थाने ओळख करून देण्यात आली. यात व्यवसायाची संकल्पना कशी सुचवावी आणि ती कशी विकसित करावी?, बाजारपेठेचा अभ्यास करून ग्राहकांची नाडी कशी ओळखावी?, व्यवसायासाठी आर्थिक नियोजन आणि जोखीम व्यवस्थापन कसे करावे?, प्रभावी संवादकौशल्ये, निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांचा विकास हे विद्यार्थी शिकले. बीबीए विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर गुलगे यांच्या नेतृत्वाखाली या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला होता. प्रा. मनीष पागिरे आणि प्रा. ऋतुजा गोरे यांनी महिनाभर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रत्यक्ष व्यवसायातील बारकावे शिकवले. उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे आणि समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे यांनीही या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. अभ्यासक्रमाच्या सांगता समारंभात विद्यार्थ्यांचा उत्साह दांडगा होता. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष व्यावसायिक आराखडा तयार केल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसून आला. येणाऱ्या काळात हेच विद्यार्थी पारनेरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवे चेहरे म्हणून समोर येतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली. व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रतिनिधी |राहुरी राहुरी नगरपरिषदेच्या सुस्त कारभारावर माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी कडक शब्दांत ओढले ओढले. प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावा आणि जनतेची कामे विनाविलंब करा. लोकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावले, तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकारी आणि नगरसेवकांना सुनावले. राहुरी नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षांच्या दालनासमोर मोकळ्या जागेत खुर्च्या टाकून तनपुरे यांनी बैठक घेतली. मुख्याधिकारी अभिजित हराळे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, गटनेते हर्ष तनपुरे, पालिकेतील विरोधी पक्षनेते अरुण साळवे, नगरसेवक चंद्रकांत उर्फ राजेंद्र उंडे, अविनाश म्हस्के, शहाजी ठाकूर, नीलेश जगधने, आरिफ शेख उपस्थित होते. तनपुरे यांनी नगरपरिषदेच्या विविध खात्यांच्या खाते प्रमुखांना बोलावून त्यांच्या संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. मुळा धरण येथील पिण्याच्या पाणी योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम चालू एप्रिल महिना अखेर पूर्ण करावे. जेणेकरून एक मे पासून पाणी योजनेचे वीजबिल बचतीला सुरू होईल. नगरपरिषद हद्दीतील झाडांची गणना करून कार्बन क्रेडिट मिळविण्याचा प्रयत्न करावा. भूमिगत गटार योजनेच्या एचटीपी प्लांटची प्रलंबित कामे युद्धपातळीवर मार्गी लागावी. १ जून रोजी एचटीपी प्लांट कार्यान्वित करून शहरातील गटारीचे निम्मे पाणी शुद्धीकरणास सुरुवात करावी. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूच्या गटारीच्या पाण्याच्या जलवाहिन्या एचटीपी प्लांटला जोडाव्यात. हे काम तीन महिन्यात पूर्ण करून भूमिगत गटार योजना पूर्ण क्षमतेने सुरू करावी. नगरपरिषद इमारतीला आतून रंगकाम करावे. थकित कर वसुलीला प्राधान्य द्यावे. संगणकीकरणातील त्रुटी दूर कराव्यात. नागरिकांना थकीत कर भरण्यासाठी, जन्म-मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत. प्रशासन गतिमान करावे. कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांनी गळ्यात ओळखपत्र घालावे. शिस्त बाळगावी, अशा सूचना तनपुरे यांनी दिल्या. राहुरी नगरपरिषद येथे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी भेट देऊन अधिकारी व नगरसेवक यांची झाडाझडती घेत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले . आता बायोमेट्रिकचा वॉच नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांच्या लेट-लतीफ कारभाराला चाप लावण्यासाठी आता बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आले आहे. चेहरा किंवा बोटांच्या ठशाशिवाय हजेरी लागणार नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहावेच लागेल.
प्रतिनिधी | शेवगाव शासनाकडून विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी येतो, पण अधिकारी आणि ठेकेदारांचे 'रिंगण' तो निधी कसा फस्त करते, याचे जिवंत उदाहरण शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्ती अंतर्गत १२ लाख रुपये खर्चून सुरू असलेले पार्किंग शेड आणि पेव्हिंग ब्लॉकचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एक शेड थेट संरक्षक भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावरच उभारले आहे. या कामाचा दर्जा इतका सुमार आहे की, आगामी पावसाळ्यात जोराचा वारा सुटल्यास हे शेड उडून जाण्याची शक्यता आहे. पेव्हिंग ब्लॉक बसवण्यापूर्वी जमिनीची योग्य खोदाई करून डबर आणि मुरूम भरून 'पिचिंग' करणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे असते. मात्र, ठेकेदाराने तांत्रिक निकष पायदळी तुडवून केवळ मुरूम टाकून त्यावर ब्लॉक बसवण्याचा 'पराक्रम' केला आहे. यामुळे काही दिवसांतच हे ब्लॉक उखडून निघणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उप अभियंता आणि ठेकेदार यांच्यात अर्थपूर्ण 'मॅच फिक्सिंग' झाल्याची चर्चा परिसरात आहे. निकृष्ट काम सुरू असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून सरकारी निधीची विल्हेवाट लावली जात असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे संबधित पंचायत समिती विभागाने निकृष्ट काम पाहून वापरलेल्या मटेरिअल चे मोजमाप करून पाहणी करण्यात यावी अन्यथा बिले काढण्यात येऊ नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. शासन एकीकडे विकास कामासाठी लाखो रूपये निधी उपलब्ध करून देत असताना संबधित अधिकारी व ठेकेदाराच्या मिलीभगत मुळे कामाचा दर्जा ढासळलेला आहे. कुंपणच शेत खात असतील तर जायचे कोणाकडे हा भविष्याच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे. दरम्यान, संबंधित कार्यालयाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. सीईओंकडे तक्रार करणार! कामाच्या दर्जाबद्दल राम राजळे व दत्तात्रय कर्डिले या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी मोजमाप करून बिले काढू, असे मोघम उत्तर दिले. अधिकारी जाणीवपूर्वक ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत. या कामाची त्वरित पाहणी करून कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. — शरद खोसे, ग्रामस्थ, ढोरजळगाव.
तांत्रिक बिघाड आणि विलंबाचे सत्र पाचवीला पूजलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी सोमवारची सकाळ पुन्हा एकदा मनस्तापाची ठरली आहे. डोंबिवली स्थानकाजवळ रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, ऐन कामावर जाण्याच्या वेळी ही घटना घडल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, एक लोकल ट्रेन कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जात होती. ही ट्रेन प्रवाशांशिवाय रिकामी होती. सोमवारी सकाळी ही ट्रेन डोंबिवली स्थानकाच्या परिसरात आली असता, अचानक एका डब्याची चाके रुळावरून खाली घसरली. ट्रेन रिकामी असल्याने सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही, मात्र यामुळे रेल्वेच्या मुख्य लाईनचा मार्ग ब्लॉक झाला आहे.या अपघातामुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावर म्हणजेच मुंबईकडे जाणाऱ्या लोकलवकर मोठा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा खोळंबा आणि संताप सकाळी ८ ते १० ही वेळ मुंबई आणि उपनगरातील चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. याच वेळी डोंबिवलीत डबा घसरल्याने सध्या अप मार्गावरील ३ गाड्या जागीच थांबल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठा विलंब होत आहे. तसेच सध्या स्थानकांवर गर्दी पाहायला मिळत आहे. कल्याण, डोंबिवली, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांवर लोकलच्या रांगा लागल्या आहेत. या घटनेमुळे कल्याणकडून मुंबईच्या दिशेने येणारी आणि मुंबईकडून कल्याणकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक प्रवाशांनी लोकलमध्ये अडकून पडण्यापेक्षा रुळांवरून चालत जवळचे स्थानक गाठणे पसंत केले. रिक्षा आणि बस थांब्यांवरही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे तांत्रिक पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. रुळावरून घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे (Re-railing) काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, तोपर्यंत पुढील काही तास मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचे आश्वासन रेल्वेने दिले आहे.
प्रतिनिधी|अहिल्यानगर स्पर्धा करायची ती स्वतःशी करायची. काल मी काय होतो आज मी काय आहे उद्या मला काय व्हायचंय ही स्पर्धा आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी असली पाहिजे. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे यांनी केले. हिंद सेवा मंडळाच्या बागडपट्टी विभागातील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना उद्योजक श्रीगोपाल जाखोटिया यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित आले. सुमतीलाल कोठारी यांची हिंद सेवा मंडळाचे नुतन कार्याध्यक्षपदी व विलास बडवे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीत निवृत्त प्राचार्य खासेराव शितोळे, हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष सुमतीलाल कोठारी, उपाध्यक्ष विलास बडवे, शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदिश झालानी, शालेय समिती सदस्य रविंद्र गुजराती, विष्णू सारडा, लक्ष्मीनिवास सारडा, मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदी उपस्थित होते. जाखोटिया म्हणाले, मी हिंद सेवा मंडळाचा विद्यार्थी आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा व मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे हे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवीत असतात. त्यामुळे शाळेची प्रगती वेगाने होत आहे. सुमतीलाल कोठारी म्हणाले, चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभ प्रथमच पाहत आहे. हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळेत नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात येतात. मधुसूदन सारडा म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांची दरवर्षी स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. प्रज्ञाशोध परीक्षा, स्टुडन्ट टॅलेंट सर्च, डॉ.हेडगेवार प्रतिष्ठानची स्पर्धा परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात व जिल्ह्यात शाळेतील विद्यार्थी चमकले आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हिंदसेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी नेहमीच सहकार्य करीत असतात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी केले. आभार गौरी ब्रम्हे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिषा साळी, धाडगे अरुणा, पोतदार विद्या, अभिजित जवादे, जंगम मनिषा, चावरे कल्पना, सोनाली मच्चा, सपना धोत्रे, अर्चना वाकचौरे, अर्चना परभणे, माधुरी धायतडक, संदीप कळसकर, नंदा देवतरसे, दिपाली कोल्हे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ग्रामदैवत विशाल गणेशाला ११ हजार १११ आंब्यांचा नैवेद्य:सकाळी अभिषेक दुपारी महापूजा करुन आरती
प्रतिनिधी|अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात अक्षय तृतीयानिमित्त श्री विशाल गणेशाला १११११ आंब्यांचा नैवेद्य दाखवून आंब्यांची सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक करण्यात आला. दुपारी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छाया फिरोदिया, आशा फिरोदिया, अनुष्का फिरोदिया, गौरव भंडारी, काव्या फिरोदिया यांच्या हस्ते महापूजा करुन आरती करण्यात आली. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, ज्ञानेश्वर रासकर, विजय कोथिंबिरे, प्रा. माणिकराव विधाते, नितीन पुंड, गणेश राऊत आदी उपस्थित होते. खरपुडे म्हणाले, ‘अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास देवतेच्या कृपादृष्टी कायम आपल्यावर राहते. या काळात केलेले दानही सर्वात पवित्र मानले जाते. यावेळी प्रा. माणिकराव विधाते यांनी देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दानशूर भाविकांचे आभार मानले.
प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्या प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व बीएड दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादाराम ढवाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी हजेरी लावली. प्रा. डॉ. अमरनाथ कुमावत यांनी प्रास्ताविक केले. परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी शिक्षण थांबवू नये. सातत्याने शिक्षण घेत राहा आणि उच्च पदापर्यंत पोहोचा असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. वार्षिक अहवाल विद्यार्थी शिक्षिका धनश्री अवसरे व विद्यार्थी शिक्षक अथर्व काळे यांनी सादर केला. पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव प्रा. डॉ. अविनाश भांडारकर यांच्या निवेदनातून करण्यात आला. आर्थिक साक्षरता कोर्सबाबतची माहिती आर्थिक साक्षरता विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रदीप शेळके यांनी दिली. पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. विलास पांढरे यांनी केले. मनोगत सत्रात प्रा. डॉ. अविनाश भांडारकर, विद्यार्थी शिक्षिका साक्षी लोंढे, निकिता मोकाटे, ईशा साळवे व सोनाली दारुंटे यांनी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधी कुलदीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. रावसाहेब पवार यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना भविष्यकालीन आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात दादाराम ढवाण यांनी शिक्षणातील गुणवत्ता, मूल्याधिष्ठित शिक्षण आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. उपप्राचार्य डॉ. गोकुळदास लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी प्रा. रुपाली ओक, प्रा. डॉ. आश्लेषा भांडारकर, प्रा. डॉ. दादासाहेब काजळे, प्रा. मनिषा वर्पे - सहाणे, प्रा. अनिता लवांडे, प्रा. विशाल जाधव, प्रा. सुनील वाकचौरे, मंजूषा बोरुडे, कल्याणी चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्राक्षे शीतल व साक्षी शिंदे यांनी केले.
वॉशिंग्टन : मध्य पूर्वेतील तणाव आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपला आहे. ओमानच्या आखातात अमेरिकन नौदलाने इराणचे एक मोठे मालवाहू जहाज ‘तुस्का’ (Touska) ताब्यात घेतल्याने उभय देशांमधील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या शांतता चर्चेवरही संकटाचे ढग जमा झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर […] The post इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकणार? अमेरिकन नौदलाने इराणचे मालवाहू जहाज पकडले; शांतता चर्चेवर टांगती तलवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील यांनी १५ मिनिटांत ६०० मीटर बारागाड्या ओढल्या. पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालय असा उत्सव होता. गतवर्षी बारागाड्या निघाल्या त्या दिवशी पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र, या वर्षी रविवारी तापमान ४१ अंशांवर होते. म्हणून सायंकाळी बारागाड्या ओढल्या. गुलालाचे ताट फिरवले महिनाभर भगत हिरामण भील यांनी कोणाकडेही अन्न-पाणी घेतले नाही, की अंत्ययात्रेला गेले नाही. बारागाड्या ओढण्याच्या १० दिवस आधी पिंप्राळा गावातून घरोघरी गुलालाचे ताट फिरवण्यात आले. या ताटात भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे टाकून गुलाल कपाळाला लावतात. याच पैशातून पूजाविधीचे साहित्य आणलेले होते. -छायाचित्र : आबा मकासरे
परशुराम जयंती महोत्सवानिमित्त भद्रकाली ते काळाराम मंदिरापर्यंत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील भाविक, जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने या यात्रेची शोभा वाढवली. यानिमित्त सामूहिक रामरक्षा पठण करून भक्तिमय वातावरणात महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जय परशुरामच्या जयघोषात भाविकांनी जयघोष केला. मिरवणुकीतील विविध वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत १५०० भाविक उपस्थित होते.
प्रतिनिधी | नाशिकरोड अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि या दिवशी घरोघरी आमरस-पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असतो. हाच मुहूर्त साधत नाशिकच्या बाजारपेठेत आंब्यांचा गोडवा चांगलाच दरवळला. यंदा अक्षय तृतीयेनिमित्त नाशिकमध्ये तब्बल साडे सहा हजार क्विंटल आंब्यांची विक्रमी विक्री झाली असून, यामध्ये हापूस आणि केसर आंब्याने बाजी मारली आहे. बाजार समितीत आवक वाढली नाशिक बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरात आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. सचिव निवृत्ती बागूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरात सुमारे साडे पाच हजार क्विंटल हापूस आणि केसर आंब्याची आवक झाली. घाऊक बाजारात हापूस २०० ते ३५० रुपये (सरासरी ३०० रु.) तर केसर १५० ते २५० रुपये (सरासरी २०० रु.) प्रति किलो दराने विक्री झाला. किरकोळ बाजारात मागणी वाढल्याने ऐन सणासुदीला दरात किलोमागे ५० रुपयांची वाढ दिसून आली. लालबागचा आधार हापूस आणि केसरचे दर चढे असल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांनी लालबाग आंब्याला अधिक पसंती दिली. चवीला उत्तम आणि खिशाला परवडणारे दर असल्याने लालबागची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, उद्यापासून आंब्यांच्या दरात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दरावर वातावरणाचे सावट अक्षय तृतीयेला मागणी प्रचंड होती, मात्र आता ढगाळ वातावरणामुळे आंब्यांच्या साठवणुकीवर परिणाम होत आहे. मागणी घटण्याची शक्यता असल्याने उद्यापासून दरात घसरण पाहायला मिळू शकते. - एयाज शेख, फळविक्रेता
प्रतिनिधी | घाटनांद्रा कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा मोठा कल दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. यंदा लागवडीचा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. तरीही ‘जोखीम घेतल्याशिवाय नफा नाही’ या विश्वासावर शेतकरी मिरचीला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये घाटनांद्रा परिसरात २५० ते २७५ हेक्टरवर मिरची लागवड होत होती. यंदा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ३५०० हेक्टरच्या वर लागवड झाली आहे. मे महिन्यापर्यंत लागवड सुरू राहणार असल्याचे शेतकरी सांगतात. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरही उत्साह कमी झालेला नाही. यंदा मिरची लागवडीचा एकरी खर्च ४० हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. मल्चिंग पेपर, रोपे, खत, मजुरी या सर्व घटकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी ११०० रुपयांना मिळणारा मल्चिंग पेपर यंदा १८०० रुपयांवर गेला आहे. रोपांची किंमत १.२० रुपयांवरून १.७० रुपयांपर्यंत वाढली आहे. मजुरी ३०० रुपयांवरून ५०० रुपयांवर पोहोचली आहे. खतांचे दर १९०० वरून २१०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. खर्च वाढत असतानाच मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. सध्या बाजारात मिरचीला सुमारे ४००० रुपये दर मिळत आहे. हा दर खर्चाच्या तुलनेत अपुरा ठरत आहे. पुढे भाव वाढेल, नुकसान भरून निघेल, या आशेवर शेतकरी टिकून आहेत. शालिक मोरे म्हणाले, यंदा मिरची लागवडीचा खर्च खूपच वाढला आहे. मल्चिंग पेपर, मजुरी सगळंच महागलंय. दुसरा पर्याय नाही. मिरचीच लावली. आता भाव वाढेल अशी अपेक्षा आहे. सागर मोरे म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा जवळपास दुप्पट खर्च आला. सध्या बाजारभाव परवडणारा नाही. पुढे दर वाढतील, या आशेवर टिकून आहोत. दोन एकरावर मिरचीची लागवड केली आहे. दिगंबर मोरे म्हणाले, मिरचीचं पीक पटकन पैसे देतं म्हणून लागवड वाढवली. खर्च परवडत नाही. योग्य बाजारभाव हवा आहे. खर्च निघून थोडाफार नफा मिळाला तरी समाधान आहे. व्यापाऱ्यांनी यंदा चांगला दर द्यावा. यंदा तरी व्यापाऱ्यांनी मिरचीला चांगला दर द्यावा, अशी अपेक्षा आकाश मोरे, विलास मोरे, रवी निकम, अनिल मोरे, दिगंबर मोरे, दीपक मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनिश्चित बाजारभाव याच्या कचाट्यात शेतकरी पुन्हा आशेच्या जोरावर शेती करताना दिसत आहे.
नळाला मोटार लावतानाउंडणगावात मुलाचा मृत्यू:गावात सण साजरा नाही
प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तो सकाळी घरासमोर नळाला पाण्याची मोटर लावत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुटुंबाला मदत म्हणून मोटर सुरू करत होता. त्याचवेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातील आजी, वडिलांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही जोरदार धक्का बसला. ते दूर फेकले गेले. आरडाओरड झाली. शेजारी धावत आले. वीज बंद केली. कुटुंबीय, शेजाऱ्यांनी गणेशला तातडीने गावातील दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सिल्लोडला नेण्याचा सल्ला दिला. त्याला उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड येथे नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दवाखान्यात वडिलांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. “डॉक्टर साहेब, मला एकच मुलगा आहे, त्याला वाचवा हो,” अशी विनंती त्यांनी केली. गणेशवरवर दुपारी दोन उंडणगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. गणेश अभ्यासात हुशार, नम्र होता. सर्वांचा लाडका विद्यार्थी होता. त्याच्या जाण्याने शाळा, मित्रपरिवार, गावात हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय तृतीया आनंदाचा सण असतो. या घटनेमुळे नागरिकांनी सण साजरा केला नाही. अनेकांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. घरात होता एकुलता एक गणेशची आई रोजनदारीने शेतात काम करते. वडील हमाली करतात. एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून अधिक भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी ही माहिती देताना भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तर वेरूळला घृष्णेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजल्यापासूनच मंदिर परिसर ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दिवसभरात २० हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने दिली. भद्रा मारुतीच्या सजावटीसाठी लागणारे आंबे छत्रपती संभाजीनगरचे अप्पा धुळे यांच्या पुढाकारातून आणण्यात आले होते. १५ हजार रुपये किमतीचे हे आंबे होते. या सजावटीची जबाबदारी संतोष बारगळ यांनी सांभाळली. सोहळ्यावेळी श्रीपाद जोशी गुरू, सुरेश गुज्जर, दत्ता इंगळे, मदन जाजू, कमलेश भाटिया आदी उपस्थित होते. वेरूळ | भाविकांसाठी पिण्याचे पाणी व वैद्यकीय पथकाची सोय केली होती. बंदोबस्तामुळे दर्शन रांग शिस्तबद्ध सुरू होती. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांसाठी सवलत देऊन सुरळीत दर्शन करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. अनेक भाविकांनी अक्षय्य तृतीयेला केलेले दान व खरेदी अक्षय राहते, या श्रद्धेतून अभिषेक व दानधर्म केला. पुजारी दीपक शुक्ला म्हणाले, आजच्या दिवशी घृष्णेश्वराचे दर्शन घडणे हे भाग्याचे लक्षण आहे. खुलताबादला गतवर्षी सुमारे ५५ ते ६० हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा हा आकडा ८० हजारांवर गेल्यामुळे मंदिर प्रशासनासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी ५ वाजल्यापासून ते साडेअकरापर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी गर्दीत काहीशी घट झाली होती.
देवगाव रंगारी | ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला कन्नड पंचायत समिती उपसभापती माया सुराशे यांच्या वतीने ललित सुराशे, गोकुळ गोरे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुनील गोंधळे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती दिली. याप्रसंगी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे ग्रामीण अध्यक्ष सुभाष भायभंग, काकासाहेब सोनवणे, धरम राजमुकुट, प्रकाश गोंधळे, सागर वाडकर, नीलेश गोंधळे, अभिषेक राजमुकुट, सोमीनाथ बरबंडे, विजय सोनवणे, केदार सावजी, संतोष मोरे, अशोक दिवेकर, शांताबाई उपेवाड आदी उपस्थित होते. सुभाष भायभंग यांनी आभार मानले.
निलजगाव पीएचसीतर्फे हनुमंतगावात टीबीमुक्त मोफत तपासणी अभियान:राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग
ढोरकीन | पैठण तालुक्यातील हनुमंतगाव येथे निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत टीबीमुक्त अभियान नुकतेच राबविण्यात आले. राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत निदान व उपचार अभियान घेण्यात आले. ग्रामस्थांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोगाचे निदान, उपचार याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक महेश कोरडे, टीबी हेल्थ व्हिजिटर इर्शाद सय्यद, रेडिओलॉजिस्ट रमेश तांबारे, वरिष्ठ पर्यवेक्षक आरिफ सय्यद, आरोग्य कर्मचारी वैभव कांबळे, चंद्रकांत व्ही. मगरे, अंगणवाडी कार्यकर्ते के. एम. लोमटे, एन. एम. गवांदे, आशा कार्यकर्ती पुजा भादे उपस्थित होते.
जळगाव शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता शिंदे:तर उपाध्यक्षपदी डोंगरे
प्रतिनिधी | लासूर स्टेशन जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता बाळकृष्ण शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर काशिनाथ डोंगरे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, जळगाव (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे शनिवारी नुकतीच पालकांची बैठक आयोजित कारण्यात आली होती. ८ वर्गामधून ९ सदस्य निवडून आले. सदरील ९ सदस्यांनी अध्यक्ष म्हणून कविता शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर डोंगरे यांची बिनविरोध निवड केली. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी मुख्याध्यापक प्रभाकर पवार, शिक्षक सुधाकर तुपे, रामनाथ चापडे, सुधीर वाघमारे, दत्तात्रय भालसिंग, मावळते अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे, सुनील पेंभरे, नंदू शिंगाडे यांनी पुढाकार घेतला.
केळगावात बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक:लेझीमचे आकर्षण
प्रतिनिधी | सिल्लोड महात्मा बसवेश्वर यांची जयंती रविवारी केळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. मारुती मंदिरापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ट्रॅक्टरवर महात्मा बसवेश्वर यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली. मिरवणूक गावातून काढण्यात आली. मिरवणूक सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. सुमारे १० वाजेपर्यंत चालली. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन झाले. परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजवला होता. प्रत्येक ठिकाणी श्रद्धेने पूजन झाले. मिरवणूक पुढे सरकत राहिली. गावात जल्लोषाचे वातावरण होते.
प्रतिनिधी | वेरूळ स्थानिक विकास, ऐतिहासिक वारसा जतन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी छावा संघटनेने पुढाकार घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीत विविध विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी आपले सहकारी श्रीकांत तौर यांच्यासह ही भेट घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण, आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. बैठकीदरम्यान परिसरातील रस्ते, इतर पायाभूत सुविधा आणि वेरूळ येथील ऐतिहासिक शहाजीराजे भोसले गढीच्या जतन व संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. छावा संघटनेतर्फे शासनासमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये २००७ मध्ये स्थापन समितीच्या कार्यकाळ व वैधतेबाबत स्पष्ट माहिती जाहीर करणे, समितीचे पुनर्गठन करून त्यामध्ये छावा संघटनेचे प्रतिनिधी व आमदार प्रशांत बंब यांचा समावेश करणे, छावा संघटनेच्या कार्याचा गौरव म्हणून गढी परिसरात संगमरवरी शिलालेख उभारणे, गढीचे संवर्धन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नियमांनुसार करण्यासाठी शासनाने आवश्यक सहकार्य करणे, या सर्व मागण्यांवर उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

30 C