धर्मस्वातंत्र्याचे विधेयक मंजूर
धर्मस्वातंत्र्याचे विधेयक मंजूरविधान परिषदेतही शिक्कामोर्तब, लवकरच कायदा मुंबई : प्रतिनिधी धर्मपरिवर्तन करण्यापूर्वी ६० दिवस नोटीस देणे अपेक्षित आहे, हा नियम कशासाठी तर धर्मांतर बळजबरीने तर होत नाही ना, याची खात्री करण्यासाठी हा नियम आहे. विरोधक आम्हाला विचारत आहेत की, आकडेवारी आहे का, तर त्यांना सांगणे आहे की जिथे कायदा नाही, तिथे तुम्ही आकडेवारी कुठून आणणार, […] The post धर्मस्वातंत्र्याचे विधेयक मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात आज अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसही झाला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मिरजच्या बेडग आणि आरगसह येथील परिसरात पाऊस पडला आहे. हवामान विभागाने सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जो अंदाज वर्तवला होता, तो आज तंतोतंत खरा ठरला असून जिल्ह्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला असून, पावसासोबतच झालेल्या मोठ्या गारपीटीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्येही गारपीट झाली. यामुळे तालुक्यातील गहू, ज्वारी आणि द्राक्षे या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यातील तीन जिल्ह्यांना गारपीटीने झोडपून काढले आहे. यात सांगली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी 'हाय अलर्ट' जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असून, या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि विजांपासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर साखरगाठी महागल्या
लातूर : प्रतिनिधी अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यानिमित्त साखर-खोबरेच्या हारांना मोठी मागणी वाढली आहे. या सणाला साखरेच्या हारांची विशेष मागणी असते. गतवर्षाच्या तूलनेत यंदा साखर-खोबर हारांची बाजारात मागणी वाढल्यामुळे व्यापारी आणि कारखानदारांसाठी नवीन वर्षारंभाचा हा सण गोड होणार आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल १० टक्के वाढ झाली असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले. साखरहाराच्या किंमतीत […] The post गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर साखरगाठी महागल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे उपमहापौर वाडेकर पदाच्या सन्मानावरून नाराज:महापौर कार्यालयाकडून दुर्लक्ष, भाजपवर अप्रत्यक्ष टीका
पुणे महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी पदाला योग्य सन्मान मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. सत्तेत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने मोठेपणा दाखवत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला उपमहापौरपद दिले, मात्र प्रत्यक्षात त्या पदाचा मान राखला जात नसल्याचे वाडेकर यांनी सांगितले. वाडेकर यांच्या मते, अनेक अधिकृत बैठका आणि कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासाठी योग्य बसण्याची व्यवस्था केली जात नाही. काही वेळा त्यांना निमंत्रणही दिले जात नाही. शहरात आयोजित ‘महापौर चषक क्रीडा स्पर्धा’सारख्या कार्यक्रमांमध्येही उपमहापौरपद जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. औंध-बोपोडी परिसरात झालेल्या एका स्पर्धेतही त्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. “मी या पदापर्यंत मोठा संघर्ष करून आलो आहे आणि पुढेही संघर्ष करत राहणार,” असे सांगत वाडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी उपमहापौर पदाला योग्य सन्मान दिला जात होता, मात्र आता त्या परंपरेचा विसर पडल्याचे त्यांनी नमूद केले. महापौर कार्यालयाकडून वारंवार केवळ समजूत काढली जाते, पण प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर भाजप आणि आरपीआयमधील अंतर्गत तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे उद्याच्या परीक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनेचा अहवाल पुणे बोर्डाने तातडीने मागवला होता, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. भूगोलाचा पेपर फुटण्याची किंवा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर, पुणे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाची घोषणा करत उद्याचा भूगोलाचा पेपर पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतपणे परीक्षेची तयारी करावी आणि आत्मविश्वासाने पेपर सोडवावा, असे आवाहन केले आहे. सांगोल्यातील चोरीच्या घटनेमुळे वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, हे आता अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची शिक्षण तज्ञांनची मात्र, बोर्डाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चोरीला गेलेल्या 50 प्रश्नपत्रिकांचे जर कोणी फोटो काढले असतील किंवा त्या झेरॉक्स करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या असतील, तर त्याची जबाबदारी बोर्ड स्वीकारणार का? प्रश्नपत्रिकांची गोपनीयता धोक्यात आलेली असतानाही परीक्षा रेटून नेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. प्रश्नपत्रिका चोरी प्रकरणी कारवाई सांगोला येथील दहावीच्या प्रश्नपत्रिका चोरीच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. या घटनेत कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवत प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय, सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यावरही प्राप्त अहवालानुसार निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे. सोलापूरचे सहाय्यक पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, बोर्डाचे प्रतिनिधी उकिरडे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या शिस्तभंगविषयक कारवाईवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या संदर्भातील ही बातमीही वाचा दहावीचा उद्याचा भूगोलाचा पेपर फुटला:सांगोल्यातील परीक्षा केंद्राच्या स्ट्राँगरूममधून तब्बल 50 प्रश्नपत्रिका चोरीला दहावी बोर्डाचा उद्याचा भूगोल विषयाचा पेपर फुटला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. यामुळे या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार? याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बोर्डाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाचा सविस्तर
लातूर शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग विभागातील बेकायदेशीर कारभाराची एक-एक प्रकरणे आता चव्हाट्यावर येत आहेत. या विभागातील अधिका-यांचा भ्रष्टाचार आणि मुजोरीचा फटका थेट लातूर शहराच्या विकासावर होत आहे. अनाधिकृत ले-आऊट टाकुन शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या विभागाची उच्चस्तरीय अधिका-यांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी […] The post लातूर शहरातील ११० सर्व्हिस रोड गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्री स्वामी समर्थ महाराजांचा सूर्यमणी आणि त्यांच्या पवित्र पादुकांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात उत्साहात स्वागत करण्यात आले. इतिहासात प्रथमच अक्कलकोटच्या राजवाड्याबाहेर पुणेकरांना या पवित्र वस्तूंचे दर्शन घेता येत आहे. 'श्री स्वामी समर्थ' च्या नामघोषात सूर्यमणी आणि पादुकांचे पूजन करण्यात आले. सर्वप्रथम या पवित्र वस्तू दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या. श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट, सोलापूर यांच्या वतीने या दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वागत व पूजनावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अक्कलकोटचे राजे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले (तिसरे) यांचा ट्रस्टतर्फे सन्मान करण्यात आला. श्री स्वामी समर्थ सूर्यमणी व पादुका दर्शन सोहळा १७ व १८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० आणि १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत एरंडवणे, पुणे येथील सिद्धी साज बँक्वेट येथे संपन्न होत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाशी आणि त्यांच्या अद्भुत लीलांशी संबंधित अनेक पवित्र वस्तू भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहेत. त्यामध्ये सूर्यमणी ही सर्वात विशेष व दिव्य मानली जाते. हाच श्री स्वामी समर्थांचा सूर्यमणी आणि त्यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन सर्वसामान्य भक्तांना घेता येणार आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या पुणे शहर कार्यकर्त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत शैलेश चव्हाण यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही बैठक पुणे शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, जिथे अनेक महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर झाले. पुणे महानगरपालिका निवडणुकीनंतर पक्षात निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व होते. कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तत्कालीन शहराध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडला, जो बहुमताने मंजूर झाला. त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शैलेश चव्हाण यांची पुणे शहराध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीचे आभार मानण्याचा ठरावही यावेळी संमत झाला. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत रिपब्लिकन नेते जगन्नाथ गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांचा अभिनंदनाचा ठराव संमत झाला. रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेविका हिमाली कांबळे यांची महानगरपालिकेतील गटनेतेपदी आणि निलेश आल्हाट यांची नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहिदास गायकवाड, आसित गांगुर्डे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य अशोक शिरोळे, अशोक कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुराव घाडगे, महेंद्र कांबळे, अल्पसंख्यांक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रफिक दफेदार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भगवान गायकवाड, तसेच कोर कमिटी सदस्य वसंत बनसोडे, महादेव दंडी, महादेव कांबळे, सुगत धसाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश सदस्य अशोक कांबळे यांनी ठरावाचे वाचन केले, तर अशोक शिरोळे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले. पुणे शहर सरचिटणीस महादेव कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. पुणे शहरातील विविध मतदारसंघांतील पदाधिकारी, प्रभाग अध्यक्ष आणि विविध आघाड्यांचे प्रमुखही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरावती येथे आयोजित 'जागर स्त्री शक्तीचा' मिनी सरस वैदर्भी महोत्सवात लोककलावंत प्रमोद पोकळे यांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. बडनेरा येथील लोककलावंत आणि अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जीवन प्रचारक असलेल्या पोकळे यांना प्रभावी जनजागरण केल्याबद्दल हा सन्मान मिळाला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, महापौर श्रीचंद तेजवानी, आमदार संजय खोडके, सुलभाताई खोडके, रवि राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, गजानन लवटे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, माजी शहराध्यक्ष किरण पातुरकर, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशीष येरेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीतिताई देशमुख, माविमचे संचालक रंजन वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमोद पोकळे यांची यापूर्वी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार म्हणून निवड झाली होती. या निवडीबद्दलही पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले, तर सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास संस्था, महिला व बाल विकास विभाग, समाज कल्याण विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला बचत गट तसेच जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेंदुरजना घाट येथील महिला बचत गटांचे दिल्ली येथे अमृत मित्र महोत्सवात कौतुक करण्यात आले. या महोत्सवात त्यांना वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या नवनवीन पद्धती शिकायला मिळाल्या. भारत सरकारच्या शहर सुधार मंत्रालयातर्फे 'अमृत - २' योजनेअंतर्गत या अमृत मित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शेंदुरजना घाट येथील सहा बचत गटांची निवड करण्यात आली होती. प्रत्येक गटातून अध्यक्ष किंवा सचिवांपैकी एका पदाधिकाऱ्याला दिल्ली येथे कार्यशाळेसाठी बोलावण्यात आले होते. देशभरातील ३० राज्यांमधून सुमारे १५०० बचत गटांच्या महिला या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेत बचत गटातील महिलांचे वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपनातील योगदान यावर चर्चा झाली. तसेच, नगर परिषदेमार्फत अधिकाधिक कामे कशी करता येतील आणि महिलांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील, यावरही मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेत शेंदुरजना घाट येथील सेजल महिला बचत गटाच्या अध्यक्ष नीता पोटे, अवंतिका बचत गटाच्या माला कंगाले, निधी बचत गटाच्या मेघा महल्ले, संबोधिनी बचत गटाच्या सविता घोरपडे, कीर्ती महिला बचत गटाच्या कीर्ती चौधरी, रणरागिनी शहर तर संघाच्या अध्यक्ष मीना कपले यांचा सहभाग होता. नगर परिषदेचे प्रतिनिधी म्हणून या योजनेचे सहायक प्रकल्प अधिकारी विलास आठवले देखील उपस्थित होते.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात विज्ञान केंद्र आणि वस्तुसंग्रहालय (म्युझियम) उभारण्यात येणार आहे. तसेच, जिल्ह्यातील आदिवासीबहुल मेळघाट परिसरात 'ट्रायबल स्किल डेव्हलपमेंट सेंटर' स्थापन करण्याची योजना आहे. अमरावती विभागातील लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावांना अनुकूलता दर्शवली आहे. विद्यापीठाला विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमधून प्राप्त होणाऱ्या भेटवस्तूंच्या एकत्रित संग्रहासाठी कायमस्वरूपी वस्तुसंग्रहालय उभारले जाईल. यासाठी शासनाकडे १ कोटी ९८ लाख ५२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनाला गती देण्यासाठी विद्यापीठाच्या परिसरात 'सायन्स सेंटर'चीही मागणी असून, त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. मेळघाटातील धारणी किंवा चिखलदरा या दोन तालुक्यांपैकी एका ठिकाणी 'ट्रायबल स्किल डेव्हलपमेंट सेंटर' उभारले जाईल. विद्यापीठ प्रशासनाने यासाठी प्राथमिक पाहणी केली असून, या प्रकल्पासाठी २९ कोटी ९२ लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. अमरावती विद्यापीठाची ओळख क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांसाठीही आहे. येथील खेळाडू आणि कलावंतांनी अखिल भारतीय स्तरावर विद्यापीठाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे, सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉलसह इतर खेळांच्या मैदानांसाठी १५ कोटी १० लाख ४१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, महाविद्यालयांच्या प्रगतीसाठी लागू केलेल्या सी.एम. उषा योजनेंतर्गत ३० कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. शासनाकडे पाठवलेल्या या प्रस्तावांची मांडणी नुकत्याच झालेल्या अधिसभेच्या (सिनेट) अर्थसंकल्पीय बैठकीत करण्यात आली. सिनेट ही विद्यापीठाची सर्वोच्च प्राधिकारिणी असल्याने, सभेत पारित झालेला प्रस्ताव अंतिम मानला जातो. कुलगुरूंनी कामकाज सांभाळले असले तरी, राज्यपाल प्रतिनिधी म्हणून ते या बैठकीचे अध्यक्ष असतात. त्यामुळे नजीकच्या काळात यावर तातडीने अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि इतर लोकप्रतिनिधींचाही याला पाठिंबा आहे. अमरावती विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. शासनाच्या निर्देशानुसार, या पाचही जिल्ह्यांमध्ये उपपरिसर (सब-कॅम्पस) उभारणे अपेक्षित आहे. अकोला येथे उपपरिसरासाठीचा प्रस्ताव शासनाने स्वतःहून मागवला होता. त्यानुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अकोला उपपरिसरासाठी शासनाकडे ६ कोटी ८७ लाख ३९ हजार रुपयांची मागणी केली आहे.
मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी, १७ मार्च रोजी स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. वरुड-अमरावती मार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने १७ एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे आतापर्यंत सुमारे १५ अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी होती. काँग्रेसचे मोर्शी विधानसभाप्रमुख क्षणीत राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाच्या बांधकामासाठी पाठपुरावा सुरू होता. आंदोलनादरम्यान, जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर संबंधित प्रशासनाने १७ एप्रिलपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कामासाठी १६ मार्च २०२६ रोजी एलओए (लेटर ऑफ ॲक्सेप्टंस) निर्गमित करण्यात आले असून, करार प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेस पक्षाने दिला आहे. या आंदोलनात ॲड. यशोमतीताई ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, नगरसेवक भूषण उर्फ सुनील कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर डहाणे, श्यामभाऊ कासार, अल्पनाताई बडोले, रमाताई इंगोले, मिलिंद कांबळे, समीरराव काळे, सचिन कोल्हे, आशिष गाडगे, मनीष ठाकरे, संजय कडूळकर, चंदू जाधव, श्याम ठाकरे, महेश राऊत, गजानन ढवळे, विजय झाडे, संदीप रोडे, डॉ. गजानन चरपे, निलेश तट्टे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, सरकार अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च करत आहे, परंतु मुख्य मुद्द्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजिबात लक्ष नाही. अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे आजोळ असूनही त्यांचे लक्ष केवळ नागपुरात आहे. आठ-आठ वर्षे कामे होत नसल्याने आम्ही या सरकारचा निषेध करतो, असे त्यांनी नमूद केले.
अचलपूर पुरवठा विभागाने शहरातील दोन हॉटेलांवर छापा टाकून घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी चार सिलेंडर जप्त केले आहेत. धारणी मार्गावरील हॉटेलांवर ही कारवाई करण्यात आली. निरीक्षण अधिकारी राहुल केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाम सहाय्यक अमोल मनोहरे, पुरवठा लिपिक राहुल भोंगे आणि वाहन चालक नंदू पावडे यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. धारणी मार्गावरील 'शेरे पंजाब' आणि 'वऱ्हाडी सुगरण फॅमिली रेस्टॉरंट' या दोन हॉटेल्समध्ये तपासणी केली असता, तिथे व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान दोन्ही ठिकाणांहून एकूण चार घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. संबंधित व्यावसायिकांवर नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. शहरातील इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्येही घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर होण्याची शक्यता असून, अशा ठिकाणी नियमित तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पुरवठा विभागाने दिला आहे.
राज्यभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, मुंबईतील एका पोलिस अधिकाऱ्यासह पालघर जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. आता पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या. मुंबई आणि पालघरमधील या लागोपाठच्या धाडसत्रामुळे पोलिस प्रशासनासह इतर सरकारी विभागांतील भ्रष्ट कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील मंत्रालयातील लाचखोरीच्या गाजलेल्या प्रकरणानंतर राज्यभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडसत्र अधिक तीव्र केले असून, आता पालघर जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील गंजाड अंतर्गत आंबेसरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 34 वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माणिक सांगळे यांना 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. मंत्रालयातील कारवाईनंतर जिल्ह्या-जिल्ह्यांत सुरू असलेल्या या मोहिमेमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तक्रारदार यांच्या इको वाहनाचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी डॉ. सांगळे यांनी वारंवार पैशांची मागणी केली होती. या जाचाला कंटाळून 40 वर्षीय तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, 17 मार्च 2026 रोजी आरोग्य केंद्र परिसरात सापळा रचण्यात आला आणि 35 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना डॉ. सांगळे यांना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरुद्धच्या या धडक मोहिमेचे सर्वत्र स्वागत होत आहे. सदर प्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 (सुधारित 2018) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पोलिस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ही यशस्वी कारवाई पूर्ण केली आहे.
महसूल पथकावर हल्ला, 5 जणांविरुद्ध गुन्हा:दर्यापूरमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई
दर्यापूर येथे महसूल पथकावर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी दर्यापूर-अंजनगाव सुर्जी टी-पॉईंट परिसरात घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्याच्या कारवाईदरम्यान हा प्रकार घडला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार, रविवारी दर्यापूर शहरात महसूल पथकाने नऊ हॉटेलची तपासणी केली. या तपासणीत घरगुती सिलिंडरचा गैरवापर करून हॉटेल चालवले जात असल्याचे आढळून आले. पथकाने यावेळी १५ सिलिंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना हॉटेल जमजमचे संचालक आणि त्यांच्यासोबतच्या काही लोकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यांनी पथकातील सदस्यांना धक्काबुक्की केली आणि पंचनाम्याची कागदपत्रे फाडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा निवासी नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या तक्रारीवरून दर्यापूर शहर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. शुभम दादाराव पारवे, मोहम्मद जुनेद अब्दुल रऊफ, मोहम्मद इम्रान अब्दुल अमीन, दादाराव पारवे आणि अब्दुल अमीन अब्दुल मोबीन (सर्व रा. दर्यापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या पाचही जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
एमआयएमच्या बडनेरा येथील नगरसेविका मीरा कांबळे यांच्या सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीवरील याचिकेची सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी मंगळवार, १७ मार्च रोजी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या दालनात नियोजित होती. कांबळे यांच्या वकिलांनी दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने सुनावणीसाठी अधिक वेळ मागितल्याने ती पुढे ढकलण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रवीण कापडणीस यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. कापडणीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या काही दिवसांत घेतली जाईल. नेमके प्रकरण असे आहे की, एमआयएमच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मीरा कांबळे यांनी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केले होते. वास्तविक पाहता, एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता आणि तसा पक्षादेश (व्हीप) देखील बजावला होता. कांबळे यांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी एमआयएमने केली आहे.
वर्ध्यात गॅस सिलिंडरची लूट!:अधिकृत दरापेक्षा 135 रुपये जादा वसुली; VIDEO व्हायरल
वर्धा जिल्ह्यातील गिरड येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भारतगॅस एजन्सीच्या एका वितरण केंद्रावर 965 रुपयाच्या अधिकृत दरापेक्षा तब्बल 135 रुपये जादा वसूल केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, यासंदर्भातील ग्राहकाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. युद्धाची झळ ग्रामीण भागात पोहचली असल्याने त्याचाच फायदा व्यावसायिक घेत आहेत. वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत संबंधित वितरण पॉईंटवर ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम आकारली जात आहे. 965 रुपये सिलिंडरचे दर असताना, अधिकृत दरापेक्षा 135 रुपये जास्त पैसे मागितल्याने काही ग्राहकांनी विरोध दर्शविल्यानंतर वाद निर्माण झाला. एका ग्राहकाने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करून सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यामुळे गिरड येथील प्रकरण उघडकीस आले. तसेच, जास्त पैसे देण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांशी कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तन व शिवीगाळ केली जात असल्याचेही आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, गॅस वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निष्क्रियतेलाही जबाबदार धरले जात आहे. नियंत्रण यंत्रणेच्या अभावामुळेच अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेपूर्वीचे आणि ब्रिटीश काळातील कालबाह्य झालेले कायदे रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना, हे बदल करताना विदर्भाच्या अस्मितेचा आणि ऐतिहासिक 'नागपूर कराराचा' विसर पडू देऊ नका, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभेत दिला. हे विधेयक घाईघाईने मंजूर न करता त्यावर सखोल चर्चेसाठी ते 'जॉइन्ट सिलेक्ट कमिटी'कडे पाठवण्यात यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली. विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना नितीन राऊत म्हणाले की, राज्य सरकार ब्रिटीशकालीन कायदे रद्द करून 'समुद्रमंथन' करण्याचा प्रयत्न करत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, हे करताना विदर्भातील जनतेच्या भावना आणि त्यांच्याशी झालेले करार केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. 1960 साली जेव्हा विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला, तेव्हा 'नागपूर करार' झाला होता. या करारानुसार विदर्भातील नोकऱ्यां, शिक्षण, कृषी व सिंचनाचा बॅकलॉग, आणि इतर वैधानिक संरक्षणाचे काय होणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हलबा आणि गोवारी समाजाच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले ब्रिटीश गॅझेटिअरचा दाखला देत डॉ. राऊत यांनी समाजातील प्रलंबित प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ब्रिटीश काळात हलबा आणि गोवारी समाजाची जी कायदेशीर व्याख्या ब्रिटिश गॅझेटीअर मध्ये दिली आहे, ती नंतरच्या काळात विदर्भ महाराष्ट्र राज्यात सामील झाल्यामुळे आज हे समाजघटक आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. नागपुरात 114 गोवारी बांधवांनी दिलेले बलिदान आजही विसरता येणार नाही. जुने कायदे बदलताना या समाजघटकांना न्याय मिळेल अशा तरतुदी त्यात समाविष्ट असायला हव्यात. नागपूर महानगरपालिकेतील सेवा विषयक पेच नागपूर महानगरपालिकेचा संदर्भ देत नितीन राऊत यांनी सांगितले की, सीपी अँड बेरार काळातील कायदे आणि महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील विसंगतीमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचा प्रश्न वारंवार निर्माण होतो. हे कायदे रद्द करताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अशा तांत्रिक अडचणी दूर होणे गरजेचे आहे. नितीन राऊत यांनी यावेळी काही महत्त्वाच्या कायद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले, ज्यांचा उल्लेख या विधेयकात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यात भूसंपादन सुधारणा कायदा (1939), शिक्षण विषयक जुने कायदे आणि घरभाडे नियंत्रण आणि वस्तू नियंत्रण कायदे यांचा समावेश आहे. केवळ प्रशासकीय स्तरावर किंवा कायदेशीर समित्यांद्वारे हे बदल करणे पुरेसे नाही. यात लोकभावनांचा विचार होणे आवश्यक आहे. विदर्भातील विविध समाजघटक आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून हे विधेयक 'जॉइन्ट सिलेक्ट कमेटी'कडे पाठवावे, जेणेकरून एक सर्वसमावेशक कायदा तयार होईल, असे राऊत यांनी शेवटी नमूद केले.
बीडमधील बोगस कामगार प्रकरण:चौकशी करून दोषींवर कारवाई करणार, मंत्री आकाश फुंडकरांची ग्वाही
कामगार विभागाने राज्यभरात दक्षता पथकांच्या माध्यमातून 46 ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत, बीड प्रकरणातही स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल. तसेच, उपलब्ध पुरावे सादर करण्याचे आवाहन करत, दोषींवर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली. बीड जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत मार्च 2020 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान बोगस मृत कामगार दाखवून कोट्यवधींचा अपहार झाल्याच्या आरोपाबाबत विधानसभेत सदस्य सुरेश धस यांनी लक्षवेधी सूचना मांडली. उत्तर देताना कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी सांगितले की, राज्यात काही ठिकाणी बोगस एजंटांकडून बनावट कागदपत्रे आणि खोटे सही-शिक्के तयार करून शासनाच्या योजनांचा गैरफायदा घेतला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा प्रकारांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नसून दोषी अधिकारी, संबंधित संस्था किंवा इतर कुणीही असले तरी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पूर्वी कामगार नोंदणी प्रक्रिया ऑफलाइन असल्यामुळे अशा गैरप्रकारांना वाव होता. ही त्रुटी दूर करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून त्यात बायोमेट्रिक प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे. मंत्री फुंडकर यांनी सांगितले की, 2020 ते 2026 या कालावधीत बीड जिल्ह्यात 115 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी एक अपघाती मृत्यूचा अर्ज खरा आढळला असून उर्वरित 114 अर्जांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 53 प्रकरणांमध्ये अनियमितता आढळलेली नाही, तर उर्वरित प्रकरणांची पडताळणी सुरू आहे.
हिंगोली येथील गजराज बाल गणेश मंडळा पुढाकारातून प. पू. रमेशभाई ओझा यांचे श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाला गुरुवारी ता. १९ दुपारी शोभायात्रेने सुरवात होणार आहे. यावेळी सुमारे ३० हजार भाविकांची आसन व्यवस्था करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही नजर राहणार आहे. हिंगोली येथील रामलिला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने रमेशभाई ओझा याचे श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाला गुरुवारपासून ता. १९ सुरवात होणार आहे. या निमित्ताने रामलिला मैदानावर भव्य शामीयाना उभारण्यात आला असून या ठिकाणी सुमारे ३० हजार भाविकांच्या आसनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय संपूर्ण रामलिला मैदान परिसर तसेच कथा कार्यक्रमाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान म्हणून नंदकिशोर शर्मा म्हाळसापुरवाले हे असणार आहेत. दरम्यान, गुरुवारी ता. १९ दुपारी साडेबारा वाजता शास्त्रीनगर येथून शोभायात्रा काढली जाणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली शोभायात्रा रामलिला मैदानावर पोहोचल्यानंतर दुपारी चार ते रात्री सातेसात यावेळेत भागवत कथा सुरु होईल. यामध्ये शुक्रवारी ता. २० आणि शनिवार ता. २१ नित्य कथा, रविवारी ता. २२ श्रीकृष्ण जन्म, सोमवारी ता. २३ गोवर्धन पूजा, मंगळवारी ता. २४ रुख्मीनी विवाह तर बुधवारी २५ रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी एक या वेळेत पूर्णाहुती होईल. त्यानंतर कथा वाचनाची समाप्ती होमार आहे. या कथेसाठी आमदार तानाजी मुटकुळे यांचे विशेष सहकार्य मिळाले असून श्रीमद भागवत कथेसाठी सात दिवस वेगवेगळे यजमान पूजेसाठी उपलब्ध राहणार आहेत या श्रीमद भागवत कथेचे आस्था, धर्म संदेश या धार्मिक चॅनल वरून थेट प्रसारण होणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी १८ ते २२ मार्च दरम्यान दुपारी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत लागू राहील. या कालावधीत राज्यभरातून कुस्ती शौकीन लोणीकंद परिसरात मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. स्पर्धेसाठी होणारी गर्दी आणि रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदीमध्ये मालवाहतूक करणारे ट्रक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस, बल्कर आणि जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर यांसारख्या मंदगती वाहनांचा समावेश आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्ग तसेच उपरस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक आणि रस्त्याच्या कडेला जड वाहने लावण्यासही मनाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी जड वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. पिस्तुल बाळगणारा अटकेत बेकायदेशिररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटी पिस्तुल सापडले आहे. विनयसिंग विनोदसिंग बावरी (19, रा. पोते वस्ती, अशोकनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस अमंलदार राहुल मनोहर परदेशी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 16 मार्च रोजी रात्री लक्ष्मीनगर चिमटा नदीपात्र शादलबाब रोड येथे एकजण पिस्तुलासह असल्याची माहिती लक्ष्मीनगर पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पथकाने चिमटाघाट परिसरातून बावरी याला ताब्यात घेतले. दरम्यान त्याने हे पिस्तुल कोठून आणले, त्या आधारे तो कोणता गुन्हा करणार होता का याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक कदम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
विष्णू ऊर्जा चुलीमुळे 40 टक्के गॅसची बचत:शेफ विष्णू मनोहर यांचा गॅस टंचाईवर अभिनव उपाय
सध्याच्या गॅस टंचाईवर मात करण्यासाठी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 'विष्णू ऊर्जा चूल' विकसित केली आहे. ही चूल पारंपरिक गॅस शेगडीच्या तुलनेत 40 टक्क्यांपर्यंत गॅसची बचत करते आणि सहज उपलब्ध होणाऱ्या टाकाऊ बायोमास इंधनावर चालते. यामुळे स्वयंपाकाचा खर्च कमी होण्यास मदत होते. जागतिक घडामोडींमुळे अनेक भागात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी मेन्यू कमी करण्याची किंवा काही पदार्थ बंद करण्याची वेळ आली आहे. शेफ विष्णू मनोहर यांना देश-विदेशात हजारो लोकांसाठी स्वयंपाकाचे कार्यक्रम करताना गॅसचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर, वाढता खर्च आणि उष्णतेचा अपव्यय या समस्यांचा अनुभव आला. या पार्श्वभूमीवर, त्यांनी कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षमतेने स्वयंपाक करता येईल अशी शेगडी विकसित करण्याचा प्रयोग सुरू केला. 'विष्णू ऊर्जा चूल' बायोमास इंधनावर आधारित आहे. यामध्ये ऊसाची चिपाडे, नारळाच्या बुच्या, लाकडाचे छोटे तुकडे, शेतीतील काडीकचरा, लाकडी भुसा आणि इतर टाकाऊ पदार्थ एकत्र करून तयार केलेल्या कांड्यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. यामुळे एलपीजी गॅसवरील अवलंबित्व कमी होते आणि स्वयंपाकाचा खर्च लक्षणीयरीत्या घटतो. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये, जिथे हे इंधन सहज उपलब्ध होते, तिथे ही चूल अधिक उपयुक्त ठरू शकते. या चुलीची रचना इंधनाला आवश्यक तेवढी हवा मिळेल अशा प्रकारे केली आहे. त्यासाठी चुलीत संगणकामध्ये वापरला जाणारा लहान पंखा बसवण्यात आला आहे, जो लहान बॅटरीवर चालतो. तसेच, चुलीतील ज्वाला नियंत्रित करण्यासाठी एक विशेष बटन दिले आहे, ज्याच्या साहाय्याने ज्वाला कमी-जास्त करता येते. या कार्यक्षम रचनेमुळे ज्वलन अधिक प्रभावी होते आणि निर्माण होणारी उष्णता थेट भांड्याकडे पोहोचते. परिणामी, उष्णतेचा अपव्यय कमी होतो आणि अन्न लवकर शिजते. चुलीच्या वरच्या भागावर मोठी कढई, तवा किंवा भांडे ठेवण्याची सोय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजी, भात, खिचडी तसेच इतर पदार्थ सहज तयार करता येतात.
विधानसभेत महाराष्ट्र स्वयं अर्थ संहिता शाळा आस्थापना अधिनियम विधेयक संमत झाले आहे. या विधेयकातील काही गोष्टींवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आपले मत परखडपणे व्यक्त केले. ज्या शाळांना अनुदान मिळत नाही, अशा शाळांतील शिक्षकांचा पगार देखील कमी असतो. परंतु ज्या शासकीय शाळा आहेत, तिथल्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग दिले जाते. हा दुजाभाव मिटवला गेला पाहिजे, यासे भास्कर जाधव यांनी यावेळी म्हटले आहे. भास्कर जाधव म्हणाले, महाराष्ट्र स्वयं अर्थ संहिता शाळा आस्थापना अधिनियम 212 यामध्ये सुधार करण्यासाठी जे विधेयक आले आहे, हे विधेयक आणत असताना मंत्रीमहोदयांनी सांगितले की महाराष्ट्र स्वयं अर्थ संहिता ज्या शाळा आहेत, त्या स्वयं अर्थ संहिता याविषयी मला जरा संभ्रम होता. तेव्हा अध्यक्षांनी खुलासा की सरकारकडून एकही रुपया न घेता ती संस्था स्वतःच्या पैशांवर शाळा, संस्था उभी केली जाणार असा त्याचा अर्थ मी समजला. स्वयंचलित शाळांना कोणीही मदत करत नाही पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, सरकार एकही रुपया देणार नाही, ते ठीक आहे. पण हे शहरातील शाळांपूर्ते ठीक आहे. ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा वाढ राहू द्या. कारण या शाळांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. या शाळा ज्या अनुदानावर चालतात, त्या ग्रामीण भागात सरकार कुठलीही मदत करत नाही. जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत, शासकीय माध्यमिक शाळा आहेत, या शाळांना केंद्र सरकारच्या खासदारांचा सुद्धा फंड वापरता येतो, आमदाराचा सुद्धा फंड वापरता येतो, जिल्हा परिषदेचा फंड वापरता येतो. परंतु, या ज्या स्वयंचलित शाळा आहेत विशेषतः इंग्रजी शाळा आहेत, त्यांना कोणीही मदत देत नाही. वेतनातील विषमता कशी दूर करणार? भास्कर जाधव म्हणाले, या शाळा चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. आज आपण सरकारी शाळेतल्या शिक्षकांना 7 वा वेतन आयोग चालू झाला. आणि या मात्र शाळेत 10-15 वर्ष काम करणारे शिक्षक त्यांना अत्यंत कमी पगार दिला जातो. ही विषमता कशी दूर करणार? प्रत्येक गोष्टीचा दर्जा वाढ तुम्ही मागणार. इतर शाळांच्या पॅटर्न प्रमाणे या शाळांनी फॅसिलिटी तयार कराव्या लागतात, पण या शाळांना तुम्ही मदत करणार नाही. या शाळांना सरकारी अनुदान देण्याची थोडी तरतूद केली पाहिजे. ज्या शाळांना अनुदान मिळते त्यांचा निकाल 100 टक्के लागतो की नाही माहीत नाही. पण ज्या स्वयंचलित शाळा संस्था आहेत, त्यांचा निकाल सातत्याने 100 टक्के लागतो. कारण त्यांना अॅडमिशन याच गोष्टीवरून मिळत असते. हा माझा अनुभव आहे. त्यांना आपल्या संस्थेचे नाव मोठे झाल्याशिवाय आपल्याला अॅडमिशन मिळणार नाही, हे नैतिक बंधन त्यांच्यावर असते म्हणून ते दिवस रात्र, पगार कमी मिळून देखील 100 टक्के निकाल लावण्याचा प्रयत्न करत असतात. भौतिक वाढीसोबत आर्थिक बळ दिले पाहिजे भास्कर जाधव म्हणाले, शिक्षक शेवटी एकच असतो. एकीकडे लाख लाख रुपये पगार दिला जातो, तर दुसरीकडे 10-20 हजार पगार दिला जातो. यात समानता आणायची असेल तर भौतिक वाढीसोबत आर्थिक बळ दिले पाहिजे. हा दुजाभाव आहे. यात अन्याय होत आहे. यात समानता आणली तर हेतु सध्या होईल. अन्यथा आहेत त्या शाळा आणखी कोलमडून पडतील. संस्थाचलक त्यांची संस्था बंद करून टाकतील आणि त्यांची जमीन जी आहे ती विकून टाकतील. माझा या विधेयकाला विरोध नाही. यात आमचा राजकीय स्वार्थ नाही. हे विधेयक आणत असताना केवळ मंजूरी सहजासहजी देणे एवढ्यापुरते मर्यादित नाही. यात आर्थिक शिस्तीच्या बेड्या तुम्ही टाकत आहात. या संस्था तुम्ही अत्यंत अडचणीत आणत आहेत, असे माझे मत आहे.
पुणे जिल्ह्याचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ८३.१२ टक्के पूर्ण झाले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या एकूण उद्दिष्टापैकी ६ हजार ६७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ही माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, सन २०२५-२६ साठी जिल्ह्याचा एकूण पतपुरवठा ३ लाख ६२ हजार २०० कोटी रुपये निश्चित करण्यात आला होता. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत यापैकी ३ लाख ३४ हजार ३२५ कोटी रुपयांचा पतपुरवठा झाला असून, हे उद्दिष्टाच्या ९२.३० टक्के आहे. विशेषतः, प्राथमिक क्षेत्रासाठी असलेल्या ९२ हजार २०० कोटी रुपयांपैकी ९६ हजार ८७५ कोटी रुपयांचा पतपुरवठा झाला आहे, जो उद्दिष्टाच्या १०५.०७ टक्के आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांचे अभिनंदन केले. तसेच, शासनाने सुरू केलेल्या जनसमर्थ पोर्टलचा लाभ सर्व शेतकरी बंधूंनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी बँकांना काही महत्त्वाचे निर्देश दिले. पुणे जिल्ह्यातील सर्व बँकांनी वार्षिक पत आराखड्यानुसार पीक कर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करावे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसाठी सर्व बँकांनी पाठपुरावा करावा. नागरिकांची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँकांनी जनजागृतीपर मेळावे आयोजित करण्यासह समाज माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा, असे राऊत यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा सल्लागार समिती (डी.सी.सी.) आणि जिल्हास्तर आढावा समितीच्या (डी.एल.आर.सी.) आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक तथा जिल्हा अग्रणी अधिकारी अक्षय कोंडेकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक रामचंद्र रागिरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राऊत म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पीएम विश्वकर्मा योजना, स्वनिधी योजना, स्टँड अप इंडिया आदी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार, कौशल्य विकासाच्या अनुषंगाने बँकेकडे कर्जमागणीबाबत नागरिकांकडून प्रकरणे सादर करण्यात येतात, या प्रलंबित प्रकरणांचा विचार करता ती वेळेत मंजूर करण्याची कार्यवाही करावी. कर्ज मंजुरीच्या अनुषंगाने बँकांनी आपल्या शाखांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना कर्ज प्रकरणे मंजुरीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावे. विविध योजनांच्या निकषांबाबतची माहिती अनुषंगाने बँक, तलाठी सजा आणि ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात माहिती माहिती प्रदशित करावी. कर्ज मंजूरीच्या अनुषंगाने कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याकडे विशेष लक्ष द्यावे, याप्रकरणी जिल्हा प्रशासनातील विविध विभागाची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.विविध योजनांचे लाभ देणे, सायबर फसवणुकीबाबत अद्यावत माहिती देऊन जनजागृती करणे आदींसाठी बँकांनी अधिकाधिक आर्थिक साक्षरता मेळावे आयोजित करावेत. स्वयंसहायता समुहाच्या महिलांना त्यात सहभागी करून घ्यावे, असेही अपर जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.
मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील मरोळ पोलिस कॅम्पमध्ये पोलिस भरती सुरू आहे. या वेळी भरती साठी आलेल्या मुलांनी मोठा गोंधळ निर्माण करत रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिस भरतीसाठीचा आजचा शेवटचा दिवस होता. सकाळपासून मुलांना मैदान चाचणीसाठी आतमध्ये न घेतल्यामुळे मुलांनी संताप व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून ही मुले भरतीसाठी आलेली होती व कॅम्पच्या बाहेर रस्त्यावर उभी होती. अखेर आज शेवटी त्यांना आंदोलनाचा मार्ग निवडावा लागला. त्यानंतर मुलांना कॅम्पमध्ये घेतले व मैदान चाचणी घेतली गेली. मरोळ पोलीस कॅम्पमधील मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, यामुळे रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे परिसरातील सोसायट्यांचे प्रवेशद्वारही बंद झाले आहेत. या परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असून, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळेच हा सर्व गोंधळ निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. मरोळ पोलिस कॅम्पबाहेर मोठा गोंधळ मुंबई पोलिस शिपाई भरती प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांनी मरोळ पोलिस कॅम्पबाहेर मोठा गोंधळ घातला. काही उमेदवारांना ई-मेलद्वारे चाचणीसाठी बोलावण्यात आले होते, तर काहींना कोणताही अधिकृत संपर्क करण्यात आला नसल्याचे समोर आल्याने संतापलेल्या तरुणांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. सकाळपासून प्रवेश न मिळाल्याने उमेदवारांमध्ये मोठा रोष होता, ज्यामुळे मरोळ-मरोशी रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे रोखला गेला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कारवाईनंतर मरोळ-मरोशी रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत वाढता गोंधळ आणि आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर रस्त्यावर ठिय्या मांडलेल्या सर्व आंदोलनकर्त्या उमेदवारांना समजूत काढून मैदानी चाचणीसाठी कॅम्पच्या आत प्रवेश देण्यात आला. या कारवाईनंतर मरोळ-मरोशी रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत झाली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
नागपूर शहरातील मोतीबाग परिसरात अमली पदार्थ (ड्रग्ज) तस्करांविरोधात झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन अमली पदार्थांविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविणार आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपींची संपत्ती जप्त करण्यासह कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मोतीबाग येथील ड्रग्ज तस्करांच्या घरांवर छापे टाकून गांजा व अग्निशस्त्रांचा साठा जप्त करण्यात आल्याबाबत सदस्य प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत विकास ठाकरे, विक्रम पाचपुते आणि डॉ. नितीन राऊत यांनी सहभाग घेतला. आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संबंधित प्रकरणात सामाजिक गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील टप्प्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाणार आहे. बेकायदेशीर बांधकाम आढळल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नोटीस देऊन महानगरपालिकेमार्फत योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच संबंधित भागात विशेष मोहीम राबवून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज नेटवर्कवर करणार कारवाई नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया करत गेल्या 11 महिन्यांत 907 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे 1254 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत अंदाजे 10 कोटी रुपये आहे. राज्यात ड्रग्जविरोधी कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी 31 ऑगस्ट 2023 रोजी अँटी नार्कोटिक टास्क फोर्स (ANTF) स्थापन करण्यात आली आहे. ही यंत्रणा राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांपर्यंत विस्तारण्यात आली असून नवीन पदनिर्मितीद्वारे ती अधिक बळकट करण्यात आली आहे. केंद्र शासन व इतर राज्यांशी समन्वय वाढवून इंटेलिजन्स शेअरिंग केल्यामुळे आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कवर कारवाई शक्य होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. ड्रग्स प्रकरणांमध्ये केवळ गुन्हा नोंदवून थांबणार नसून ‘फॉरवर्ड’ आणि ‘बॅकवर्ड’ लिंक शोधून संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्यावर भर दिला जात आहे. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये थेट किंवा अप्रत्यक्ष सहभाग आढळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाऐवजी थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल. अल्पवयीन मुलांचा ड्रग्स तस्करीत वापर होत असल्याची बाब गंभीर असल्याचे नमूद करत, अशा गुन्ह्यांसाठी कायदेशीर वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षे करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
हिंगोली येथील अथर्व मुकुंद घन याची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झाली असून सैन्य दलात मोठ्या पदावर निवड झालेला तो तिसरा उच्चपदस्थ अधिकारी आहे. यापुर्वी आखाडा बाळापूर येथील अभिषेक सुर्यवंशी याची वायूसेनेत तर चाफनाथ येथील भैरव चौतमाल याची नौदलात अधिकारी पदी निवड झाली आहे. हिंगोली येथील अथर्व याचे शिक्षण हिंगोलीच्या माणिक स्मारक आर्य विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. लहानपणापासून सैन्यात अधिकारी होण्याची आवड असल्याने त्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करून सैन्य दलात अधिकरी पदाच्या परिक्षा दिल्या. यामध्ये त्याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. नुकतेच त्याने कठीण व खडतर प्रशिक्षण पूर्ण केले असून त्याला काही दिवसांतच नियुक्ती मिळणार आहे. त्यानिमित त्याचा हिंगोलीत सत्कार करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट अथर्वने याने विचार मांडले. लहानपणापासूनच देशसेवा करण्याची इच्छा होती. त्यानुसार हिंगोलीत शिक्षण घेतल्यानंतर थेट पुणे गाठले अन त्या ठिकाणी पदवी अन पदव्यूत्तर शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षेची तयारी केली. सैन्य दलात प्रवेशासाठी कोणत्या परिक्षा द्याव्या लागतात त्याचा अभ्यास कसा करायचा याची सर्व माहिती घेऊन तायरीला लागलो अन सर्वांच्या आशिर्वादाने अधिकारी पदावर निवड झाल्याचे त्याने सांगितले. यावेळी मुकुंद घन, राधीका घन यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अथर्वची भारतीय सैन्यात झालेल्या निवडी बद्दल अभिनंदनपर पाठवलेल्या संदेशाचे सुबोध मुळे यांनी वाचन केले. यावेळी अनिलराव दंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अश्विनी आसेगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्चना डोंगरे, सायली दंडे, मंजुषा देशमुख, अथर्व आसेगावकर, रितिक मास्ट, शेखर देशमुख यांनी पुढाकार घेतला. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मी ही निवडणूक लढवतो व जिंकूनही दाखवतो. तुम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्या, असे ते म्हणालेत. त्यामुळे बारामतीची निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बारामतीत विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वीच या निवडणुकीची घोषणा केली. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असा दावा केला जात होता. तसे सर्वच राजकीय पक्षांनी संकेतही दिले होते. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने येथून अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पण लक्ष्मण हाके यांनी उपरोक्त भूमिका घेतल्यामुळे आता बारामती विधानसभा मतदार संघात निवडणूक होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. अजित पवारांच्या निधनाचे आम्हीच दुःख का पाळायचे? लक्ष्मण हाके मंगळवारी याविषयी बोलताना म्हणाले, सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधान परिषदेवर घ्या. बारामतीत पवार वगळता इतर कोणताही उमेदवार द्या. आमचीही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण आमच्यामुळे काही जणांच्या पोटात दुखते. पण राज्य सरकारच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. राजकीय पक्षांनी शरद पवारांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवले. आता सुनेत्रा पवारांनाही बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. मी स्वतः उमेदवार असेन असे नाही. येथील स्थानिक उमेदवारही निवडणूक लढवू शकतो. मी ही पोटनिवडणूक लढवावी हा आमच्या बारामती येथील कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो. मग आम्हीच त्यांच्या निधनावर दुःख का व्यक्त करायचे? असा सवालही लक्ष्मण हाके यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. कोण आहेत लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके हे एक ओबीसी नेते आहेत. लक्ष्मण सोपान हाके असे त्यांचे संपूर्ण नाव आहे. सोलापूर जिल्ह्यातील जुजारपूर येथील एका मेंढपाळ कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आजही आपले पारंपरिक काम करतात. लक्ष्मण हाकेंनी मेंढीपालन करताना शिक्षण घेतले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेऊन ते प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले. नोकरी करताना ते धनगर - ओबीसी चळवळीत ओढले गेले. त्यांनी चांगल्या पगारीची नोकरी सोडली. लक्ष्मण हाके यांनी सुरुवातीला यशवंत सेनेच्या माध्यमातून काम केले. पुढे ते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या संपर्कात आले. त्यांनी जानकरांबरोबर काम करण्यास सुरूवात केली. सोलापूर जिल्ह्याचे रासपचे जिल्हाध्यक्ष म्हणून लक्ष्मण हाके यांची नियुक्ती करण्यात आली होती. नंतर त्यांनी स्वतंत्रपणे आपली वाटचाल सुरू केली.
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात उद्भवलेल्या ऊर्जा संकटामुळे एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, नागरिकांना सिलिंडरसाठी ताटकळत रांगा लावाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, गॅसचा तुटवडा रोखण्यासाठी सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून राज्यात कुठेही टंचाई निर्माण होणार नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. या संदर्भात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच गॅस सिलिंडरचा अवैध वापर करण्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अचानक जी परिस्थिती निर्माण झाली, 15 जी लढाई सुरू झाली, त्याच्या आधी सुद्धा असे वाटत नव्हते की लढाई सुरू होईल आणि तेल साठ्यावर परिणाम होईल. परंतु, लढाई सुरू झाल्यानंतर आपण पाहिले की तिथल्या खाडीतून येणारे जे जहाज आहेत, त्यावर बंदी आली. गल्फ देशातून सुद्धा येणारे तेल बंद झाले. यातून सुद्धा भारत सरकारने मार्ग काढला आहे. रशियामधून तेल सुरू झाले, व्हेनेझुएलामधून सुरू झाले, अजून कुठून कुठून जेवढे तेल लागणार आहे ते मिळवणे सुरू झाले. 3-4 जहाजे आपली आली सुद्धा आहेत. इराणने देखील स्पष्ट केले आहे की आम्ही जहाज आमच्या शत्रूंचे अडवणार आहोत. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पूर्ववत परिस्थितीवर यायला थोडा अवधी लागणार हे निश्चित. अनेक ठिकाणी लोक घरात सिलिंडर असून अजून 2-4 सिलिंडर आणून ठेवत आहेत. तसेच जे कोणी अवैध पद्धतीने गॅस सिलिंडर आणत आहेत त्यांच्यावर कारवाई देखील केली जात आहे. अनेक ठिकाणी तपासणी सुरू झाली आहे. भारत सरकारने देखील वेळोवेळी सांगितले आहे की एलपीजी, पीएनजी या गॅसचा साठा आमच्याकडे भरपूर आहे, त्याची काळजी करू नका. एलपीजीचा पुरवठा फक्त घरगुती वापरासाठी पुरवण्याचे आदेश निवेदन सादर करताना छगन भुजबळ म्हणाले, पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा करणे, त्यावर नियंत्रण ठेवणे व त्यांचे दर निश्चित करणे या बाबी केंद्र शासनाच्या आखत्यारीत आहेत. राज्य शासन पेट्रोलियम पदार्थांच्या किमती निर्धारित करण्यास अधिकृत नाहीत. तथापि, राज्यातील नागरिकांना अखंड व सुरळीत पुरवठा होण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केंद्र शासनाचे 9 मार्च 2026 च्या आदेशान्वये, एलपीजीचा पुरवठा फक्त घरगुती वापरासाठी पुरवण्याचे आदेश तेल कंपन्यांना देण्यात आले आहे. तसेच प्रोपेन, ब्युटेन या सारखे पदार्थ केवळ एलपीजी निर्मितीसाठीच वापरण्याचे देखील आदेश तेल कंपन्यांना दिले आहेत. घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत वाढ पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, केंद्र शासनाने मध्य-पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत 7 मार्च 2026 पासून घरगुती व व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये पुढील प्रमाणे वाढ केली आहे. घरगुती सिलिंडर- 852.50 रुपायांवरून 912.50 रुपये (60 रुपयांची वाढ) आणि व्यावसायिक सिलिंडर जे आहे ते 1720.50 रुपायांवरून 114.50 रुपये वाढ केलेली आहे. पेट्रोल-डिझेलचा साठा किती? छगन भुजबळ यांनी माहिती देताना सांगितले की, सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा साठा पुरेसा शिल्लक आहे. राज्यात एलपीजीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी रिफायनरीमधील एलपीजी दैनिक उत्पादक 9000 मेट्रिक टनावरून 11000 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलिंडरवर दिल्या जाणाऱ्या अनुदानावर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 75 लाख 81 हजार लाभार्थींना प्रत्येक वर्षी 3 घरगुती गॅस सिलिंडरचे मोफत पुनर्भरण करण्यात येते. राज्यात 17 मार्च 2026 रोजी पेट्रोल-डिझेलचा साठा पुढील प्रमाणे आहे: पेट्रोल 1 लाख 95 हजार 589 किलो लिटर, डिझेल 4 लाख 55 हजार 46 किलो लिटर. त्यात पेट्रोल डिझेलचा साठा असून सुरळीत वितरण सुरू आहे. घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्यांवर कारवाई गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने अत्यंत कठोर उपाययोजना केल्या आहेत. दिनांक 8 मार्च 2026 रोजीच्या पत्राअन्वये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा स्तरावर दक्षता फिरते पथक स्थापन करून आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. घरगुती गॅसचा अवैध वापर करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
भारतात अंड्यांच्या किमतीत ३०-४० टक्के घसरण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अंड्यांच्या किमतीत अचानक ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी व्यापा-यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. या बदलामागे स्थानिक कारण नसून मध्यपूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. सध्या भारतीय पोल्ट्री उद्योगासाठी परिस्थिती अस्थिर बनली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे खाडी देशांकडे होणा-या […] The post भारतात अंड्यांच्या किमतीत ३०-४० टक्के घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दहावी बोर्डाचा उद्याचा भूगोल विषयाचा पेपर फुटला आहे. या पेपरच्या प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. यामुळे या पेपरच्या गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवले जाणार? याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे बोर्डाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात सध्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात उद्या म्हणजे 18 मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर होता. पण या पेपरच्या 50 प्रश्नपत्रिकांचा एक संच आज सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर या परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममधून चोरीला गेला. आज सकाळी 8.30 वा. शिक्षण विभाग व कस्टोडियन कालचे उरलेले पेपर बोर्डाला पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यासाठी आले असता त्यांना स्ट्राँग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसले. तेव्हा ही चोरी निदर्शनास आली. या स्ट्राँग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद आहे. त्यामुळे या चोरीचे कोणतेही फुटेज उपलब्ध नाही. भूगोल विषयाचा पेपर चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डीवायएसपी बसवराज शिवपुजे व स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या घटनेची सविस्तर माहिती घेऊन शिक्षण विभागाला योग्य त्या सूचना केल्या. त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलिस अधीक्षकांशीही संवाद साधून या प्रकरणी चर्चा केली. कुलूप तोडून पळवल्या प्रश्नपत्रिका दहावीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. पण अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्री केव्हातरी या रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका लंपास केल्या. मंगळवारी सकाळी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच धावपळ उडाली. स्ट्राँग रूमसारख्या ठिकाणी ही चोरी झाल्याने शिक्षण मंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. 24 तास पहारा तिथे चोरी झालीच कशी? या चोरीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, ज्या स्ट्राँग रूमसमोर 24 तास कडक बंदोबस्त असणे अपेक्षित होते, तिथे चोरी झालीच कशी? असा सवाल या प्रकरणी उपस्थित होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांनी अत्यंत सुनियोजितपणे हे कृत्य केल्याचा संशय आहे. विशेषतः ड्युटीवर असलेला कर्मचारी त्यावेळी नेमका कुठे होता? असा संतप्त सवालही या प्रकरणी उपस्थित केला जात आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर मध्यरात्री तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदा म्हात्रे यांची काल रात्री प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सध्या त्यांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून सर्व वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल समाधानकारक आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विचारपूस आमदार म्हात्रे यांच्या आजारपणाचे वृत्त समजताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेतली. एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मंदा म्हात्रे यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. घाबरण्याचे काहीच कारण नाही, तुमच्या मतदारसंघातील गोर-गरीब जनतेचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला आणि त्या लवकरच जनसेवेच्या कार्यात सक्रिय होतील, असा विश्वासही व्यक्त केला. रुग्णालयाबाहेर समर्थकांची गर्दी मंदा म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच नवी मुंबईतील कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी अपोलो रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. म्हात्रे या नवी मुंबईतील राजकारणातील एक कणखर आणि प्रभावी नेतृत्व मानल्या जातात. त्यांच्या प्रकृतीसाठी विविध मंदिरांमध्ये प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, संसर्गाचा धोका टाळण्यासाठी आणि त्यांना विश्रांती मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने कोणालाही भेटण्याची परवानगी दिलेली नाही.
गुढीपाडव्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढणा-या किमतींमुळे सोनं खरेदी करणं सामान्य ग्राहकांसाठी अवघड झालं होतं. मात्र आता परिस्थितीत काहीसा बदल दिसून येत आहे. मागील तीन दिवसांत सोनं आणि चांदीच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदी करण्याचा विचार करणा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशन यांनी दिलेल्या […] The post गुढीपाडव्यापूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० जणांचा मृत्यू
कराची : वृत्तसंस्था इस्रायल-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज १८ वा दिवस आहे. अशातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष वाढला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये पाकिस्तानने केलेल्या भीषण एअरस्ट्राईकमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे, सोमवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकने काबुल येथील एक नशामुक्ती केंद्र उद्ध्वस्त झाले आहे. यात ४०० जणांचा मृत्यू […] The post पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक; ४०० जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘ब्लॅकबॉक्स’ सुरक्षित, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले?
मुंबई : प्रतिनिधी जर बारामती विमान दुर्घटनेतील ‘ब्लॅकबॉक्स’ सुरक्षित आहे, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले? ब्लॅकबॉक्स हा कोणत्याही विमान अपघातातील सर्वांत महत्त्वाचा पुरावा असतो. तो सुरक्षित असतानाही जळाल्याची खोटी माहिती का दिली गेली, याचे उत्तर मंत्र्यांनी तातडीने द्यावे, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित […] The post ‘ब्लॅकबॉक्स’ सुरक्षित, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फायदा घेऊन सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा नाशिक पुरवठा विभागाने पर्दाफाश केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांच्या पथकाने सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईस संकुल परिसरात मध्यरात्री मोठी कारवाई केली. या छाप्यात तब्बल २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात गॅस टंचाईच्या तक्रारी वाढत असतानाच, सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात सिलिंडरची अवैध साठवणूक आणि वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने पोलिसांसह सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत एका मोठ्या ट्रकमधून घरगुती गॅस सिलिंडरची संशयास्पद हालचाल सुरू असल्याचे दिसून आले. तपासणीअंती पथकाने १६८ भरलेले आणि जवळपास २८९ रिकामे असे एकूण ४४७ घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. वाहतूक की काळाबाजार? पोलिसांकडून पडताळणी या कारवाईत सिलिंडरसह एक मोठा ट्रक आणि दोन छोटे टेम्पो देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. संबंधित गॅस एजन्सी चालकाने, हे सिलिंडर गोदामात नेले जात असल्याचा दावा केला आहे. मात्र, टंचाईच्या काळात नियमांचे उल्लंघन करून रात्रीच्या वेळी होणारी ही वाहतूक संशयास्पद असल्याने, पुरवठा विभाग आणि सातपूर पोलीस या दाव्याची सखोल चौकशी करत आहेत. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हॉटेल्स आणि वितरकांवर 'वॉच' गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या जागतिक संकटामुळे घरगुती गॅस वितरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, व्यावसायिक वापरावर मर्यादा आल्याने काळाबाजाराची शक्यता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने गॅस टंचाई आणि रेशनिंग रोखण्यासाठी कंबर कसली असून, जिल्ह्यातील १३५ गॅस वितरकांची तपासणी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी १२ ठिकाणी अचानक पाहणी करण्यात आली. घरगुती वापराच्या सिलिंडरला प्राधान्य मिळावे, यासाठी व्यावसायिक वापरावर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. तसेच, हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत नाही ना, याचीही तपासणी करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन गॅस बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना २ ते ३ दिवसांत सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हे ही वाचा… ऑपरेशन यशस्वी, पण पेशंट डेड; अशी LPGची परिस्थिती:हिंदुत्ववादी सरकारने किमान मंदिरांना तरी गॅस द्यावा - संजय राऊत राज्यातील निधी वाटपातील असमतोल, विधानसभा अध्यक्षांची कार्यपद्धती आणि सर्वसामान्यांना भेडसावणारा एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा यांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर बोचरी टीका केली. राज्यात सध्या 'ऑपरेशन यशस्वी पण पेशंट डेड' अशी एलपीजी तुटवड्यासंदर्भात परिस्थित आहे. अशा शब्दांत त्यांनी सरकारी दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली. हिंदुत्ववादी सरकारने किमान मंदिरांना तरी गॅस द्यावा, असा खोचक सल्ला राऊतांनी सरकारला दिला. सविस्तर वाचा…
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भीषण आग; तीन हॉटेल्स जळून खाक
पहलगाम : वत्तसंस्था जम्मू-काश्मीरच्या पहलगामच्या लारीपोरा भागात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी तीन हॉटेल्सना भीषण आग लागली आहे. आग विझविण्यासाठी पहलगाम, सल्लार, अनंतनाग आणि अश्मुकाम येथील अग्निशमन दले घटनास्थळी दाखल झाली आहेत. पहलगाम अग्निशमन विभागाचे अधिकारी मुंझूर अहमद म्हणाले, दोन-तीन इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे परिस्थिती अधिकच बिकट […] The post जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये भीषण आग; तीन हॉटेल्स जळून खाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीलंकेतही इंधनाचा तीव्र तुडवडा; फक्त क्यूआर कोडने मिळणार पेट्रोल
कोलंबो : वृत्तसंस्था मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि गंभीर ऊर्जा संकटामुळे दक्षिण आशियाई देश हतबल झाले आहेत. पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेलाही तीव्र इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. देशातील तेलाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सरकारने एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. श्रीलंका सरकारने अधिकृतपणे चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची अंमलबजावणी जाहीर केली. सरकारी संस्था, शाळा आणि विद्यापीठे […] The post श्रीलंकेतही इंधनाचा तीव्र तुडवडा; फक्त क्यूआर कोडने मिळणार पेट्रोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
'आयटी करिअर गुरू' चे लोकार्पण:मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळणार आयटी करिअर मार्गदर्शन
डिजिटल साक्षरता दिनाचे निमित्त साधून कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता आणि प्रादेशिक भाषांचे सशक्तीकरण यांचा समन्वय साधणाऱ्या ख्यातनाम संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांच्या द्विभाषिक ‘आयटी करिअर गुरू’ या जगातील पहिल्या चॅटबॉटचे आज लोकर्पण करण्यात आले. खासकरून आयटी क्षेत्रातील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल हा चॅटबॉट मराठी व इंग्रजी भाषेत संवाद साधण्यात सक्षम आहे. आयटी क्षेत्रातील क्रांती ठरणाऱ्या ‘आयटी करिअर गुरू’ या चॅटबॉटचे लोकार्पण पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. दीपक शिकारपूर यांच्यासह बेलराईज इंडस्ट्रिजच्या सुप्रिया बडवे, दिमाख कन्सल्टंट्सचे दिमाख सहस्रबुद्धे, गौरी शिकारपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. मल्टिव्हर्सिटी, बावधन येथे मंगळवारी लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मभूषण डॉ. विजय भटकर म्हणाले, एखाद्या तज्ज्ञाची शिकविण्याची शैली आणि ज्ञान डिजिटल स्वरूपात जतन करून ते सर्वांसाठी उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज आहे. ‘आयटी करिअर गुरू’ हे त्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे. चॅटबॉट विषयी माहिती देताना डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, हा अभिनव द्विभाषिक एआय चॅटबॉट विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शक ठरणार असून याचा वापर अभियांत्रिकी, उत्पादन आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रभावीपणे होऊ शकतो. आजच्या काळातील डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन दिमाख कन्सल्टंट्सच्या सहकार्याने याची निर्मिती करण्यात आली आहे. सुप्रिया बडवे म्हणाल्या, द्विभाषिक चॅटबॉटची संकल्पना अनोखी असून मराठी भाषेतून वैज्ञानिक उत्तरे मिळणे हे तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाचे पाऊल आहे. ही संकल्पना मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाईल.
राज्याची जीवनवाहिनी असलेल्या 'लालपरी'चा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. प्रवाशांना विनाअडथळा सेवा देणे हा या भरतीमागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नियमित कर्मचारी भरतीसाठीचा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, नवीन बसेस ताफ्यात येण्यास सुरुवात झाली असून, त्या डेपोमध्ये उभ्या न राहता रस्त्यावर धावणे गरजेचे आहे. त्यामुळे ही नियमित प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. महामंडळाच्या ताफ्यात आम्ही लवकरच 8300 बसेस समाविष्ट करणार आहोत. त्यासाठी, एसटी महामंडळात 17,742 ड्रायव्हर, कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात नव्याने येणाऱ्या 8300 बसेससाठी ही कंत्राटी भरती केली जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत बोलताना सांगितले. मुंबईकरांसाठी 'लोकल' ते 'लक्झरी' प्रवास मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने खास पावले उचलली आहेत. लवकरच मुंबईच्या ताफ्यात ३० स्लीपिंग कोच आणि १७० वातानुकूलित (Volvo) बसेस दाखल होणार आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसेस अत्यंत सोयीस्कर ठरणार आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट महायुती सरकारने एसटी प्रवाशांसोबतच आता कर्मचाऱ्यांच्या कल्याणाकडेही लक्ष दिले आहे. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के सवलत दिल्यानंतर, आता एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसह वर्षभर मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या सेवेचा सन्मान म्हणून हा निर्णय घेतल्याचे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले. शिस्तभंग कारवाईत पारदर्शकता येणार कर्मचारी संघटनांच्या बैठकीत चालक-वाहकांना येणाऱ्या दैनंदिन अडचणींवरही चर्चा झाली. आगार स्तरावर (डेपो) होणारी निर्णयप्रक्रिया आणि कर्मचाऱ्यांवरील शिस्तभंग कारवाईच्या बाबतीत न्याय्य आणि पारदर्शक पद्धती अवलंबण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विधानभवनात सोमवारी विशेष बैठकही पार पडली. हे ही वाचा… राज्यात ६ हजारांहून अधिक प्राध्यापक भरती:विद्यापीठांना ७००, अनुदानित महाविद्यालयांना ५४०० प्राध्यापक मिळणार - चंद्रकांत पाटील राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सविस्तर वाचा…
काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याप्रकरणी केलेले आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जोरकसपणे फेटाळून लावले आहेत. माझ्यावरील स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे आरोप पूर्णतः निराधार आहेत. राजकीय शत्रूंनी दिलेल्या सुपारीवरून माझ्यावर ही चिखलफेक केली जात आहे, असे ते म्हणालेत. महसूल विभागाच्या एका पत्रात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा उल्लेख चक्क भूमाफिया असा करण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. महसूल वनिभागाने 20 जून 2025 च्या आपल्या पत्रात सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शनचे मालक नरेंद्र लालचंद मेहता यांनी मुद्रांक शुल्क व दंड थकवल्याचा उल्लेख आहे. या पत्रात मेहता यांचा उल्लेख स्पष्टपणे भूमाफिया असा करण्यात आला आहे. या पत्रावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे आता त्यांनी मेहतांवर कारवाई करून दाखवावी, असे पटोले यांनी म्हटले आहे. माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे नाना पटोले यांच्या या आरोपांना नरेंद्र मेहता यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. आमचे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. राजकीय शत्रूंनी दिलेल्या सुपारीवरून ही चिखलफेक करण्यात येत आहे. नाना पटोले यांनी ज्या योजनेचा उल्लेख केला, ती योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेषतः पटोले सभापती असतानाच आणली गेली. या योजनेत काही त्रुटी असतील तर मविआ सरकारने बिल्डरांना खूश करण्यासाठी ही योजना आणली होती का? याचा खुलासा नाना पटोले यांनी करावा. माझ्या नावावर आमदार होण्यापूर्वी केवळ एकच जागा होती. तिची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमची कोणतीही स्टॅम्प ड्युटी थकलेली नाही. आमच्याकडे 4-5 लोक असे आहेत जे केवळ ब्लॅकमेलर व चीटर आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हे पेड वर्कर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे सतत खोट्या तक्रारी करत असतात. पण त्यात कोणतेही तथ्य नसते. राजकीय द्वेषापोटी आरोप नरेंद्र मेहता पुढे म्हणाले, आम्ही मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे अस्तित्व संपवले. याचा राग मनात धरून हे स्थानिक नेते नाना पटोले यांना चुकीची माहिती पुरवत आहेत. माझ्यावर 5-6 महिन्यांपूर्वीच्या एका जुन्या पत्राचा आधार घेऊन केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप केले जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे नरेंद्र मेहता यांनी यावेळी रुग्णालयात उंदीर चावल्यामुळे महिलेच्या झालेल्या मृत्यूवर तीव्र संताप व्यक्त् केला. ही अत्यंत गंभीर घटना असून, संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सक्तीचे कायदे का?
मुंबई : प्रतिनिधी सरकार धर्मस्वातंत्र्य विधेयक हे ताकदीच्या जोरावर लागू करू इच्छित आहे. महाराष्ट्रात दमणकारी व्यवस्था निर्माण करण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरू आहे. काही जातींना, काही धर्मांना टार्गेट करण्याचे काम सुरू केले आहे. शाहू-फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे कायदे कशासाठी असा सवाल काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी फडणवीस सरकारला केला आहे. नाना पटोले म्हणाले की, […] The post शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सक्तीचे कायदे का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिखर बँक घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबियांना ‘क्लीन चिट’
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’ कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाची फाईल अखेर बंद झाली आहे. या घोटाळा प्रकरणात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांना पूर्णत: […] The post शिखर बँक घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबियांना ‘क्लीन चिट’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरातल्या फोडणीला महागाईचा फटका
मुंबई : प्रतिनिधी इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा वणवा आता थेट सामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचला आहे. आता फोडणी महाग होणार आहे. परिणामी घरात तेल कमी वापरावे लागणार आहे. कारण पुन्हा एकदा खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेचा फटका बसून गॅस सिलिंडर महागल्यानंतर, आता खाद्यतेलाच्या किमतींनीही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले […] The post घरातल्या फोडणीला महागाईचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आखाती युद्धामुळे कृषी निर्यातीसमोर मोठे संकट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणापुरता मर्यादित न राहता भारताच्या कृषी क्षेत्रावरही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. सागरी मार्गांवरील अडथळे, जहाज वाहतुकीतील घट आणि वाढलेला मालवाहतूक खर्च यामुळे भारताच्या कृषी निर्यातीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अहवालानुसार, पश्चिम आशियाकडे जाणारी भारताची सुमारे १ […] The post आखाती युद्धामुळे कृषी निर्यातीसमोर मोठे संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी आणि पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर व शेवाळवाडी परिसरात या घटना घडल्या. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानकासमोर एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका ज्येष्ठ दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अल्ताफ हनीफ बेलीम (वय ३०, रा. कुमार पिनकॅल सोसायटी, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक एन. सरोदे तपास करत आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावर हडपसर येथील गाडीतळ परिसरात वाहनाच्या धडकेत गौरव राजा सातपुते (वय ३१, रा. रमाईनगरी, नागपूर) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. गौरव कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाला होता. त्याची आई इंदू राजा सातपुते (वय ५९) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या गौरवचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. कोलेवाड तपास करत आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळवाडी परिसरात दुचाकीवरील सहप्रवासी आदित्य बापू देवकर (वय २१, रा. सोलापूर) याचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. आदित्य त्याचा मित्र अतुल सूर्यकांत म्हस्के (वय २०, रा. उत्कर्षनगर, जुळे सोलापूर) याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना मांजरीतील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रासमोर भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सहप्रवासी आदित्य गंभीर जखमी झाला, तर दुचाकीस्वार अतुलला किरकोळ दुखापत झाली. उपचारादरम्यान आदित्यचा मृत्यू झाला. अतुल म्हस्के याने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ बिनवडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आज (दि. १७) सकाळी ११ ते १२.२० या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'लोककल्याण मार्ग' या निवासस्थानी भेट घेऊन दीड तास सखोल चर्चा केली. कोण काय बोलते, ते बोलू द्या.. मला जे करायचे ते करतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर दिली. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ही चर्चा सुमारे ८० ते १२० मिनिटे चालली. अधिकृतपणे ही 'सदिच्छा भेट' असल्याचे सांगितले जात असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी निवडणुकांमधील जागावाटप आणि महायुतीतील समन्वयावर यात सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. विशेषतः, मागील काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून शिवसेनेला अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा एक 'अंतर्गत अहवाल' शिंदे यांनी पंतप्रधानांसमोर मांडल्याचे समजते. काही विशिष्ट मतदारसंघांतील पराभवाचे विश्लेषण आणि आगामी निवडणुकीतील चुका टाळण्यासाठीची रणनीती यावर या बैठकीत भर देण्यात आला. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? अधिवेशन सोडून दिल्लीत जाण्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतूनच जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या खासदारांना भेटायला येत असतो, त्यांच्यासोबत काल बैठक झाली. आज पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक विषयावर चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली. अधिवेशन सुरू असेल तेव्हा मी दिल्लीत येत असतो. तशीच ही सदिच्छा भेट होती. एकनाथ शिंदे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी इराण आणी इस्रायल यांच्यातील युद्धाबाबत चर्चा केली. देशातल्या सगळ्यांनी एकसंघ राहिले पाहिजे. एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठिशी आहे. दुबई, मस्कत, कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याचे कामही केले आहे. मी मोदींना हेदेखील सांगितले की अनेक देशांशी तुमचे चांगले संबंध आहेत. देश जेव्हा अडचणीत असतात तेव्हा एकमेकांना मदत करतो. इराणजवळील होर्मुझ मार्गातून दोन जहाजे आली आहेत. याबाबतही चर्चा झाली आहे. कोण काय टीका करतंय यापेक्षा मला जे करायचे आहे ते मी करत असतो. मी टीकाकारांना माझ्या कामातून उत्तर देतो. पंतप्रधान मोदींनी युद्धात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले, अशा जागतिक विषयांवर आणि देशाच्या विकासावर आमची चर्चा झाली. पाच राज्यांच्या निवडणुकीतही एनडीएला मोठे यश मिळेल, असेही शिंदे म्हणाले. संसदेत रंगली 'रिजिजू-शिंदे' केमिस्ट्री दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज संसदेत देखील गेले होते. तिथे त्यांची भेट केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्याशी झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही सोबत होते. रिजिजू यांनी श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख 'मेरा छोटा भाई' असा केल्याने या आपुलकीच्या संभाषणाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यापूर्वी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन विविध संसदीय विषयांवर चर्चा केली.
राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला मंत्री पाटील यांनी उत्तर दिले. मंत्री पाटील म्हणाले की, २००१ मध्ये राज्य सरकारने नव्या महाविद्यालयांना विना-अनुदानित तत्त्वावर परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्या धोरणानुसार महाविद्यालयांमध्ये सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना विविध सवलती दिल्या जातात. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के शुल्क माफी, ओबीसी विद्यार्थ्यांना ५० टक्के तर मुलींना १०० टक्के सवलत दिली जाते. या व्यवस्थेमुळे महाविद्यालयांचा खर्च भागवला जात असल्याने सध्या अनुदानित धोरणात बदल करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र राज्यातील १२०० अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५४०० प्राध्यापक भरतीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ७०० प्राध्यापकांची भरती होणार असून एकूण ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले. २००१ पूर्वी स्थापन झालेल्या ७८ महाविद्यालयांना अनुदान दिल्यास राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडेल याचा अहवाल तयार करून वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले. सदस्य जयंत पाटील यांनी जाहिरातीवरील खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, २०२० मध्ये जाहीर झालेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात २०२२ पासून सुरू झाली. २०२२ ते २०२५ या कालावधीत त्याची अंमलबजावणी करण्यात राज्य देशात आघाडीवर आहे. या धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जाहिराती आवश्यक होती. त्यामुळे जाहिरातीवर खर्च झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे जर मुस्लीमांना त्रास होणार असेल तर तो हिंदूंना, बौद्धांना,जैन, पारशी, शीख आणि ख्रिश्चनांनादेखील होईल, अन् होणार नसेल तर कोणालाही होणार नाही, पण कालचे बिले हे सर्व धर्मांना त्रास देणारे आहे असे उबाठाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. भास्कर जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडले आणि त्याचबरोबर शिवसेनेची भूमिका म्हणून मी त्यालार पाठिंबा दर्शवला आहे. शिवसेनेची भूमिका म्हणून आम्ही त्यांचे समर्थन केले आहे, त्यातून सरकारची लबाडी आमच्या तात्काळ लक्षात आली होती. आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही ती तात्काळ लक्षात आली. बाहेर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांचे उथळ वक्तव्य करणारे काही लोकं पाळले गेले आहेत त्यांच्याकडून हे मुस्लीमांच्याविरोधात आणि हिंदूच्या रक्षण करणारे विधेयक आहे अशा चर्चा घडवल्या जात होत्या. प्रत्यक्षात बिलामध्ये कुठेही तसे काहीही नाही. त्यामुळे राडा करायला संधी मिळाली भास्कर जाधव म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांकडून काल एक शब्द चुकीचा गेला तो जायला नको होता. त्याचे मी समर्थन करणार नाही. त्यांना त्यांचवेळी मी माफी मागायला सांगत होतो पण सत्ताधारी पक्षाला जे अपेक्षित होते, त्यांना या बिलच्या माध्यमातून सभागृहात हिंदू-मुस्लीम प्रकारची राडेबाजी करायची होती, ते करायला संधी मिळाली. जितेंद्र आव्हाडांच्या एका वाक्यामुळे सत्ताधाऱ्यांना सभागृहात राडा घालायला संधी मिळाली हे खरे आहे. त्यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो भास्कर जाधव म्हणाले की, अबु आझमी या बिलाबद्दल काय म्हणता यावर बोलणे मला काही महत्त्वाचे वाटत नाही. पण या बिलामुळे टार्गेट झाले तर सर्वच धर्म टार्गेट होतील, नाहीतर कुणीच टार्गेट होणार नाही. दोन धर्मातील मुले-मुली लग्न करू इच्छित असतील तर त्यांना 60 दिवस आधी अधिकाऱ्याला सांगावे लागेल. असे लग्न लपवाछपवी करत होत असतात. यामुळे समाजात मोठा राडा होऊ शकतो, हे एका धर्मासाठी नाही तर सर्वच धर्मांसाठी त्रासदायक होऊ शकते.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील एका बड्या तांदूळ व्यापाऱ्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने राईस मिलर्सकडून कोट्यवधींची वसुली केल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांनी मंगळवारी विधानसभेत केला. आकाश अग्रवाल असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्याने पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरले आहे. त्याने शासकीय धानाचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू केला आहे. संबंधित व्यापाऱ्याकडे अरवा तांदूळ तयार करण्याची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. असे असतानाही केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून 'उसणा' तांदूळ तयार केला जातो, जो सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी नियमानुसार ग्राह्य धरला जात नाही. तरीही शासकीय धानाची उचल करून तो तांदूळ खुल्या बाजारात चढ्या दराने विकला जात आहे. पुरवठा विभागाने या व्यापाऱ्याला दोनदा रंगेहात पकडूनही त्याच्यावर ठोस कारवाई का झाली नाही? असा सवाल पटोलेनी लक्षवेदीद्वारे केला. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचीही मागणी केली. कधी राष्ट्रवादी, कधी काँग्रेस, तर कधी भाजपच्या नेत्यांशी संधान साधून मंत्रालयातील कामे पदरात पाडून घेणे, हा आकाश अग्रवाल याचा जुना हातखंडा आहे. याच बळावर त्याने भाजपच्या एका माजी आमदाराच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एवढेच नाही तर राईस मिलर्सकडून जमा केलेल्या वसुलीतून मुख्यमंत्र्यांना धनादेशही दिला, असा आरोपही नाना पटोले यांनी यावेळी केला. रेशनमार्फत निकृष्ट दर्जाच्या तांदळाचे वितरण राज्यातील गोरगरिबांना रेशन दुकानांमार्फत दिला जाणारा तांदूळ पौष्टिक असण्याऐवजी अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. राईस मिलर्स व पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू आहे, असे नाना पटोले याकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे याकडे लक्ष वेधताना म्हणाले. या प्रकरणी त्यांनी त्यांना धारेवरही धरले. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत स्थानिक धानाची भरडाई करून तोच तांदूळ वाटणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी व व्यापाऱ्यांच्या अभद्र युतीमुळे लगतच्या आंध्रप्रदेशातून निकृष्ट तांदूळ स्वस्तात आयात केला जातो. शासनाकडून मिळालेले दर्जेदार धान खुल्या बाजारात वळवून, त्याऐवजी आयात केलेल्या निकृष्ट तांदळाला वारंवार पॉलिश करून रेशन दुकानांमार्फत वितरित केले जात आहे. या निकृष्ट अन्नामुळे राज्यात, विशेषतः गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. कुपोषणामुळे सुमारे 2 हजार बालकांचा व अनेक गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत? असा सवालही नाना पटोले यांनी या प्रकरणी उपस्थित केला सरकार अजित पवारांचा शब्द पाळणार का? नाना पटोले यांनी या प्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोपही केला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगळे यांची त्यांच्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी बदलीचे आदेश दिले होते. पण मंत्रालयातील काही बड्या अधिकाऱ्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत आगळे यांना त्याच ठिकाणी दुसरी जबाबदारी दिली. त्यांच्या जागी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आघाव पाटील यांची नियुक्ती केली. अजित पवार आता हयात नाहीत, पण त्यांनी सभागृहात दिलेला शब्द सरकार पाळणार का? असा प्रश्नही पटोलेंनी यावेळी सरकारला केला.
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौ-यावर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ते […] The post भाजप- शिंदेसेनेत धुसफूस? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत विद्यार्थी जखमी झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे. सोमवारी सकाळी एका अल्पवयीन आरोपीने परीक्षा केंद्रात शिरून परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला केला. विद्यार्थ्याने हा वार हातावर झेलल्याने मोठी दुर्घटना टळली. पण त्यात तो जबर जखमी झाला. हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे सांगितले आहे. ओतूर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीसह इतर 4 जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेविषयी परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. कोयता हातावर लागल्यामुळे तिथे मोठा गोंधळ सुरू झाला. विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकूण आम्ही घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर आरोपी अकरावीत शिकतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ज्या मुलाच्या हातावर वार झाले, त्याच्यावर औषधोपचार करण्यात आलेत. त्यानंतर त्याने रायटरच्या मदतीने परीक्षा दिली. आरोपी व जखमी विद्यार्थ्यांत यापूर्वीही वाद झाल्याची चर्चा आहे. एकूण 13 शाळांचे हे परीक्षा केंद्र आहे. येथे सुरक्षेसाठी रोज पोलिस व आरोग्य केंद्राचे 2 अधिकार असतात. यापूर्वीही झाला हल्ल्याचा प्रयत्न दुसरीकडे, जखमी विद्यार्थ्याने आरोपीने यापूर्वीही आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले आहे. आरोपी व त्याच्या सहकार्यांनी गत 6 तारखेलाही माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असे तो म्हणाला. पण मुख्याध्यापकांनी त्या दिवशी असे काहीही घडले नसल्याचा दावा केला. जखमी विद्यार्थी यापूर्वीही आपल्यावर असा हल्ला झाल्याचे सांगत असला तरी आमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे काहीही दिसत नाही. तसे काही घडले असते तर पालकांनी आम्हाला द्यायला हवी होती. आमच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला असे काही घडल्याची माहिती नाही, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, प्रस्तुत घटना सकाळी 10.35 वा. घडली. त्यावेली वर्गात कोणताही शिक्षक किंवा कर्मचारी नव्हता. प्रस्तुत सेंटर हे या भागातील सर्वात मोठे आहे. आम्ही बेल वाजल्यानंतर मुलांना गेटमधून आत घेतले. त्यांचे हॉलतिकीट वर्गातच चेक केले. यापुढे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजनाही केल्या जातील. या प्रकरणी यापुढे गेटवरच हॉलतिकीट तपासून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाईल.
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; ३ ठार
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील इंदापूरमध्ये १७ मार्च रोजी सकाळी भीषण अपघात झाला असून ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. लोणी देवकरजवळ क्रुझरला ट्रकने जोरात धडक दिल्याने अपघाताची घटना घडली. वेगात असणा-या क्रूझर गाडीचं टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. क्रूझर थेट समोरून येणा-या ट्रकला जोरात धडकल्याने अपघात झाला. या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. तात्काळ […] The post पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईमध्ये गॅस पुरवठा अतिशय सुरळीत आहे. ग्रामीण भागात थोडासा विस्कळीत झाला आहे, तो सुरळीत करण्याचा प्रयत्न येत्या काही दिवसांमध्ये केला जाईल. 25 दिवसांच्या गॅपने बुकींग केल्यावर सिलिंडर जरूर मिळत आहे. मविआ गॅसवर असल्याने त्यांना राजकीय गॅस पुरवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये संजय राऊत ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या पद्धतीने कुणीही बोलायला तयार नाही. अधिवेशन सुरू आहे जर खरेच इतका गॅस तुटवडा असता तर सर्व आमदार तिथे बोलले असते, पण हे फेक नरेटीव्ह पसरवण्याचे काम राऊत यांच्यामार्फत सुरू आहे. लोकांमध्ये अराजकता निर्माण झाली पाहिजे यासाठी राऊत प्रयत्न करत आहेत. तेव्हा उबाठा-राऊत गप्प होते नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानसोबत केली तेव्हा संजय राऊत आणि उबाठा गट शांत होता.जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत अपमानकारक वक्तव्य केले त्यानंतर देखील संजय राऊत आणि उबाठा गप्प आहेत.संजय राऊत यांनी या प्रकरणी आवाल उठवत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करायला हवा होता. या प्रकरणी पत्रकारांनी प्रश्न विचारला पण त्यांनी बोलणं टाळले. मतांसाठी आव्हाड वारंवार अपमानकारक वक्तव्य करतात. त्यावेळीही राऊत गप्प होते. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गट छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान अशा पद्धतीने सहन करत औरंगजेब, अफजल खान यांचा उदोउदो करण्याचे काम करत आहे. राऊत मतांसाठी किती लांगूनचालन करणार याचे उदाहरण आज बघायला मिळाले आहे. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही कितीही लांगूनचालन केले तरी उद्धव ठाकरे, संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांना शिवरायांचे मावळे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. LPG पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू नवनाथ बन म्हणाले की, गॅसच्या बाबतीमध्ये ऑपरेशन सक्सेसफूल आणि विरोधक डेथ अशी अवस्था आहे. इराणमधून आपल्याकडे काल 3 जहाजे आली आहेत, आज एक जहाज पोहचत आहे. एलपीजीचा पुरवठा सुरळीत करण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू आहे. काही ठिकाणी जाणीवपूर्वक समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून गॅसच्या टाक्या काळ्या बाजारात साठवण्याचे काम करण्यात आले होते, ते सुद्धा उद्ध्वस्त करणे सुरू आहे. पुन्हा एकदा हे सुरळीत करण्यात येईल.
विधिमंडळाच्या अधिवेशनात सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुरावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. फडणवीसांनी अधिवेशनात तत्त्वज्ञान झाडताना 'कंसात' हे देखील स्पष्ट करावे की, ही कारवाई फक्त भाजपची बदनामी झाल्यावरच होणार का? असा बोचरा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत बोलताना सोशल मीडियाद्वारे कोणत्याही पुराव्याविना होणारी बदनामी टाळण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियाचा वापर करून कोणत्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्याचा सामना करावा लागतो. महिलांना तर विशेषतः करावा लागतो. यासंदर्भात कायद्यात काही तरतूद करता येईल का? हे पडताळून पाहण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली जाईल. त्यांच्या शिफारशीनुसार, पुढील कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. आता याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारेंची सोशल मीडिया पोस्ट काय? सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बॉलिवूड चित्रपट 'लुटेरे' पोस्टर असून, त्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, संजय राऊत यांचे फोटो एडिट करून लावले आहेत. या फोटोवर 'महाराष्ट्र के लुटेरे' असे नाव दिले असून, दिग्दर्शन उद्धव ठाकरे आणि संगीत शरद पवार असे एडिट केलेले आहे. 'दुजाभावा'च्या भूमिकेवर अंधारेंचा निशाणा सुषमा अंधारे यांनी लिहिले, सो कॉल्ड मुख्यमंत्री फडणवीस हे अधिवेशनात तत्त्वज्ञान झाडत असताना म्हणाले की, सोशल मीडियावर कुणीही बदनामीकारक मजकूर लिहिल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण फडणवीसांनी कंसात हे लिहिले पाहिजे की फक्त आणि फक्त भाजपाची बदनामी झाल्यावरच आम्ही कारवाई करू इतरांच्या कारवाईचा आम्ही आनंद घेऊ. विकृत संस्कारांची पिलावळ आवरून दाखवा सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवर अंधारे यांनी अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, जर खरंच कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात असेल, तर सोशल मीडियावर वावरणारी भाजपची ही 'विकृत संस्कारांची पिलावळ' रोखून दाखवा. अशा पद्धतीने आपल्या आई-वडिलांचे आणि भाजपचे संस्कार दाखवणाऱ्यांना आवर घालण्याची हिंमत शासन दाखवणार का? असे आव्हान सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी महायुती सरकारने विधानसभेने पारित केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकावर जोरदार आक्षेप घेता आहे. प्रस्तुत कायद्याच्या नावातच विरोधाभास आहे. जबरी धर्मांतराला विरोध झाला पाहिजे यात शंका नाही. पण या विधेयकातील परिभाषा ही यामागचा धार्मिक ध्रुविकरणाचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. विशेषतः कायद्यातील भोळी भाबडी व्यक्ती कोणती? याची व्याख्या सरकारने स्पष्ट करण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. काँग्रेस सचिव सचिन सावंत या प्रकरणी म्हणाले, भाजपातर्फे धर्मस्वातंत्र्य हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायद्याचे विधेयक मांडले गेले आहे. मूलतः या कायद्याच्या नावातच विरोधाभास आहे. आपला धर्म कोणता असावा याचे संविधानिक स्वातंत्र्य यात अभिप्रेत नाही. त्यामुळे संविधानाच्या विरोधात हे विधेयक आहे हे स्पष्ट होते. जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला विरोध झाला पाहिजे यात शंका नाही. परंतु विधेयकातील परिभाषा ही यामागचा धार्मिक धृवीकरणाचा उद्देश स्पष्ट करणारी आहे. याअगोदर इतर काही राज्यांत असेच आणलेले कायदे हे न्यायालयीन चिकित्सेत अडकले आहेत. मग न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली असती तर अधिक बरे झाले असते. भोळी भाबडी व्यक्ती कोणती? व्याख्या स्पष्ट करा ते पुढे म्हणाले, या कायद्याचा उद्देश आणि कारणे स्पष्ट करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन पाहिले तर त्याचे धर्मांतर होणार किंवा झाले ती व्यक्ती भोळी भाबडी आहे असे गृहीतक ठरवण्यात आले आहे परंतु संविधानात अल्पवयीन नसलेल्या व्यक्तीला सज्ञान म्हटले आहे. यातून अशा व्यक्तीला धर्मांतराबाबत केवळ सल्ला दिला तरी दुसरा व्यक्ती गुन्हेगार ठरवला गेला आहे. आता भोळी भाबडी व्यक्ती कोणती? याची व्याख्या सरकारने स्पष्ट केली पाहिजे. दुसरे गृहीतक म्हणजे व्यक्ती व कुटुंब सामाजिक व आर्थिक दुर्बलतेमुळे धर्मांतरास बळी पडतात. मग सामाजिक आणि आर्थिक दुर्बलता दूर करण्यासाठी सरकार काय करणार? हे स्पष्ट झाले पाहिजे. बहुतांश गुन्हेगारांची पार्श्वभूमी ही सामाजिक व आर्थिक दुर्बलच असते. मग गुन्हेगारांनाही भोळाभाबडा म्हणणार का? उद्या जनतेमधून मी भोळा भाबडा आहे आणि माझी पार्श्वभूमी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहे. मी धर्मांतराला बळी पडू शकतो त्यासाठी शासनाने आर्थिक व माझ्या पुनर्वसनासाठी मदत करावी असे मुख्यमंत्र्यांकडे अर्ज आले तर शासन मदत करणार का? शासनाची जबाबदारी ती काय? जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हिरावला जाणार सचिन सावंत यांनी यावेळी धर्म स्वातंत्र्य कायद्यामुळे नागरिकांचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हिरावला जाणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, भाजपातर्फे महिला व अनुसूचित जाती जमातीचे लोक आमिषे दाखवून झालेल्या धर्मांतराला वा लव्ह जिहादला बळी पडतात असे गृहीतक जाहिरपणे मांडले जाते. ढोल, गवार, क्षूद्र और नारी, सब ताडन के अधिकारी ही मानसिकता खरेतर मनुस्मृतीमधून आली आहे. महिलांना व अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना स्वतःची अक्कल नसते हे गृहीतक 21 व्या शतकात असूनही अजून वर्णभेद ,जातीभेद आणि महिलांना हीन लेखणारी मानसिकता हे किती खोलवर रुजलेली बाब आहे हे स्पष्ट करते. देशात मतदानाचा अधिकार हा 18 वर्षांच्या युवा व्यक्तींना देण्यात आला आहे. भारतीय कायद्यानुसार सज्ञान व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार आपला जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. परंतु त्यांचे हे स्वातंत्र्य या विधेयकामुळे हिरावून घेतले जाणार आहे. अल्पवयीन मुलींना कायद्याने संरक्षण आधीच दिले आहे. मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात हिंदू धर्माचे दुष्टीकरण भाजपा तर करत आहेच पण आपली मनुवादी विचारधाराही अधोरेखित करत आहे. नाहीतरी गोळवलकरांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे समर्थन केले आहेच, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर सध्या शहरात गॅस सिलिंडरचे दर 1750 रुपयांच्या घरात पोहोचले असून, भविष्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी भीती माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन आयातीवर परिणाम होत असून, आपण इतर देशांच्या दयेवर अवलंबून राहण्याऐवजी नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. हर्षवर्धन जाधव म्हणाले की, भारताला लागणाऱ्या एकूण गॅसपैकी 50% गॅस आपण आयात करतो, तर 50% देशांतर्गत उत्पादित होतो. मुंबईपासून 140 किमी अंतरावर 'मुंबई हाय'मध्ये नैसर्गिक गॅसचा प्रचंड साठा उपलब्ध आहे. जर तेथील उत्खनन वाढवले आणि सध्या हजिरा गॅस लाईनद्वारे इतर उद्योगांकडे वळवला जाणारा गॅस काही काळासाठी घरगुती व व्यावसायिक वापरासाठी राखीव ठेवला, तर गॅसचा तुटवडा कायमचा संपू शकतो. याबाबत त्यांनी विधानसभा अध्यक्षांना आणि राज्य सरकारला निवेदन दिले आहे. ब्रिटीश पेट्रोलियमसोबतच्या कराराचा उल्लेख हर्षवर्धन जाधव म्हणाले की, उत्खननासाठी ब्रिटीश पेट्रोलियमसोबत झालेला करार हा केवळ विशिष्ट भागापुरता मर्यादित न ठेवता, संपूर्ण ऑईल फिल्डसाठी लागू करावा, जेणेकरून आपण केवळ स्वतःची गरज भागवून इतर देशांनाही गॅस पुरवू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात गॅसचा जो तुटवडा जाणवतो आहे तो दूर करण्यासाठी मी राज्य सरकारला निवेदन दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. महसूल वाढीसाठी भाडेतत्वावरील जमिनींचा मुद्दा हर्षवर्धन जाधव म्हणाले की, आपल्याकडे सर्व काही पुरेसे उपलब्ध आहे. त्यांचा उपयोग करण्याची गरज आहे. सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवावा ज्यातून काहीतरी घडेल. इंधनासोबतच राज्याच्या तिजोरीतील भर टाकण्यासाठी जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. शहरांमधील सरकारी जमिनींचे संपलेले भाडेकरार पुन्हा नूतनीकरण करून किंवा त्या जमिनी सील करून नवीन धोरण राबवल्यास मोठा आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात न्यायालयाने सरकारला नोटीस बजावल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत दिलेले उत्तर निव्वळ दिशाभूल करणारे असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. मंत्र्यांचे उत्तर 'थातूरमातूर' आणि वेळ मारून नेणारे आहे. ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही जळाल्याचे का सांगितले? असे म्हणत रोहित पवारांनी थेट मंत्र्यांच्या पारदर्शकतेवर आणि विमान कंपनीशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. अपघाताचा तपास आंतरराष्ट्रीय निकषांनुसार सुरू असल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना रोहित पवारांनी आरसा दाखवला आहे. त्यांनी विचारले की, जर बारामती विमान दुर्घटनेतील 'ब्लॅक बॉक्स' (Black Box) सुरक्षित आहे, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले? सत्य लपवण्यासाठी आणि पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी ही चुकीची माहिती दिली जात आहे का? ब्लॅक बॉक्समधील डेटा एडिट केला जात असल्याचा संशयही त्यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. विमान कंपनीच्या मालकाकडे पाहुणचार रोहित पवार यांनी मंत्र्यांवर वैयक्तिक हितसंबंधांचे गंभीर आरोप केले आहेत. ज्या 'VSR Ventures' कंपनीचे विमान अपघातात सापडले, त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मंत्र्यांनी पाहुणचार घेतला होता, असा दावा त्यांनी केला. अशा परिस्थितीत मंत्री त्या 'मिठाला' जागून चौकशीत पारदर्शकता टाळत आहेत का? अशा मंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा कशी करायची? असा बोचरा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. अहमदाबाद अपघाताचा संदर्भ केवळ बारामतीच नव्हे, तर अहमदाबादमध्ये झालेल्या 'एअर इंडिया' विमान अपघाताच्या संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अमेरिकन सुरक्षा एजन्सीने या अपघाताबाबत माहिती मागितली असतानाही ती का दिली जात नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. माहिती लपवून केंद्र सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे? असा आरोपही त्यांनी केला. संसदेत 'इंडिया' आघाडी आक्रमक होईल या प्रकरणात न्यायासाठी काँग्रेससह 'इंडिया' (INDIA) आघाडीतील सर्व मित्रपक्ष संसदेत आक्रमक भूमिका घेतील आणि हा विषय प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे. विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न असल्याने यात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री दिलेले उत्तर काय? खासदार मनोज झा यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री किजरापू राममोहन नायडू म्हणाले, मनोज झा यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. मागील वर्षभरापासून या अपघातांविषयी लोकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. पण या प्रकरणात सर्वच तपास एएआयबीच्या माध्यमातून होतो. हा तपास आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयण संघटनेच्या प्रोटोकॉलनुसार निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होतो. हा तपास कसा होणार? हे भारत ठरवत नाही. तो आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच होतो. आपण त्याचे सदस्य होतो. आपल्याला त्याच्या नियम व अटी पालन कराव्याच लागतात. विमान अपघात जगात कुठेही झाला तरी हेच केले जाते.
जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जाणूनबुजून असे वक्तव्य केले जाते हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून अनावधानाने हे वक्तव्य गेले हे बिलकुल जाणवत नाही, मी सभागृहातच होतो. ते मुद्दाम अशी वक्तव्य करतात. त्यांना याची कठोर किंमत मोजावी लागणार आहे,असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. शंभुराज देसाई म्हणाले की, दिल्लीमध्ये जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असते त्यावेळी शिवसेना खासदारांची बैठक घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये जात असतात. त्या बैठकीसाठी ते दिल्लीत गेले आहेत. राज्यातील प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते तिथे जात असतात. जिल्हा परिषद निवडीसंदर्भात दिल्लीला जाण्याची गरज नाही, तो राज्यातील प्रश्न आहे. केवळ खासदारांच्या बैठकीसाठी आणि राज्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले आहेत. आव्हाडांना वक्तव्याचे गांभीर्य नव्हते शंभुराज देसाई म्हणाले की, काल धर्मांतरविरोधी बिलावर सभागृहात चर्चा सुरू होती. यावर जितेंद्र आव्हाड बोलताना त्यांनी ऐतिहासिक संदर्भ देत असताना शिवरायांच्या राज्याभिषेकांच्या अनुषंगाने अपमानास्पद असे वक्तव्य केले. मी ते ऐकूण त्यावर हरकत घेतली, तालिका अध्यक्षांकडे मागणी केली की हे वक्तव्य काढून टाका, आव्हाडांना माफी मागायला लावा.पण आव्हाड काही माफी मागायला तयार नव्हते. सभागृह तहकूब झाले. अध्यक्षांनी आव्हाडांना 3 वेळा सांगितले की दिलगिरी व्यक्त करत शब्द मागे घ्या. अध्यक्षांनी निर्देश देऊन सुद्धा आव्हाड सभागृहात मोबाईलवर काही तरी बघत होते. कुणाशी तरी बोलत होते. इतकं अपमानास्पद वक्तव्य करुणही त्यांना त्यांचे काहीच गांभीर्य नव्हते. आव्हाडांना निलंबित करायला हवे होते शंभुराज देसाई म्हणाले की, आपल्याकडून जर एखादे वक्तव्य चुकीने गेले असेल तर चेहऱ्यावरील हावभावावरुन ते लक्षात येते. पण जितेंद्र आव्हाडांच्या चेहऱ्यावर ते वक्तव्य चुकीने गेले असे काहीच हावभाव नव्हते. शेवटी अध्यक्षांनी निर्देश दिले की माफी मागावी. निर्देश दिल्यावरसुद्धा त्यांनी केवळ त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अध्यक्षांनी कारवाई करू अशी कडक भूमिका घेऊ म्हटल्यावर त्यांनी ते शब्द माघारी घेतले. त्यांना निलंबित करावे अशी आम्हा सर्वांची इच्छा होती. पण अध्यक्षांनी त्यांना अखेरची समज दिली. महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल शंभुराज देसाई म्हणाले की, महायुतीच्या समन्वय समितीची बैठक अजून झालेली नाही. राज्यभरात ज्या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढवली गेली नाही त्या ठिकाणांचा रिपोर्ट एकनाथ शिंदेंना देण्यात आलेला आहे. उदय सामंत, मी, बावनकुळे, तटकरे, मुश्रीफ या समितीमध्ये आहे. मित्रपक्षांबद्दल समन्वय समितीमध्ये चर्चा करू.
मुंबईतील बोरीवली परिसरात भाजपच्या एका नगरसेविकेची 'दबंगगिरी' समोर आली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वॉर्ड क्रमांक १५ च्या भाजप नगरसेविका जिज्ञासा निकुंज शाह यांनी एका खासगी दुकानात बेकायदेशीरपणे घुसून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दुकानातील मंदिरात चपलांसह प्रवेश करून त्यांनी 'सनातन धर्माचा' अवमान केल्याचा दावा करत स्थानिक भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानाच्या मालमत्तेचे पूर्ण कायदेशीर हक्क पीडिताकडे असतानाही वॉर्ड क्रमांक 15 च्या भाजप नगरसेविका जिज्ञासा निकुंज शाह यांनी तेथे सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असतानाही, नगरसेविकेने कोणाचीही पर्वा न करता दुकानातील सामान रस्त्यावर फेकून दिले. या बेकायदेशीर तोडफोडीमुळे दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चपलांसह मंदिरात प्रवेश केल्याने संताप तोडफोडीच्या दरम्यान नगरसेविका जिज्ञासा शाह यांनी दुकानात असलेल्या छोट्या मंदिरात चपला घालून प्रवेश केला. या कृत्यामुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत स्थानिकांनी भाजप नगरसेविकेचा निषेध केला आहे. सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्याऐवजी लोकप्रतिनिधीच अशी मुजोरी करत असतील, तर दाद कोणाकडे मागायची? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष या गंभीर घटनेनंतरही स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी नगरसेविकेवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अशा प्रकारच्या 'गुंडगिरी'ला पाठबळ देत आहे का, अशी बोचरी टीका आता विरोधकांकडून आणि सामान्य जनतेतून होत आहे. लोकप्रतिनिधीने कायद्याचे उल्लंघन करून खासगी मालमत्तेचे नुकसान केल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हे ही वाचा… कौटुंबिक वादातून पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले:मुलुंड स्थानकावरील घटना, पतीला अटक; हत्येपूर्वी पत्नीची पोलिसांत तक्रार मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर काळजाचा ठोका चुकवणारी एक भीषण घटना उघडकीस आली आहे. सततच्या कौटुंबिक वादातून एका नराधम पतीने आपल्या ३६ वर्षीय पत्नीला चक्क धावत्या लोकलसमोर ढकलून देऊन तिची हत्या केली. ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेनंतर मुलासह फरार झालेल्या राजुकुमार गुप्ता याला रेल्वे पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या काही तास आधीच मृत महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा…
पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात एका तरुणाचा धारदार कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव करण गिरीश काशीद (वय 19, रा. धायरी, सिंहगड रस्ता, पुणे) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, करणचा आठवडाभरापूर्वी काही जणांशी वाद झाला होता. तो सनसिटी परिसरातून दुचाकीवरून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याला अडवले आणि भररस्त्यात कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे सनसिटी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. खुनी हल्ल्या कोयता अडकला डोक्यात शिवीगाळ केल्याच्या वादातून टोळक्याने रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. विशेष बाब म्हणजे तरूणाच्या डोक्यात कोयता अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धेश बबनराव भोसले (वय 22, सध्या रा. वाघोली, नगर रस्ता, मूळ रा. अंबड, जि.जालना), नागेश सुनील जगताप अशी जखमी झालेल्यांची नाव आहेत. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिद्धेश याने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश आणि त्याचा मित्र नागेश हे वाघोलीतील रायसोनी महाविद्यालय परिसरात एका चहा टपरीवर थांबले होते. त्या वेळी टोळके तेथे आले. शिवीगाळ का केली, असा जाब विचारुन आरोपींनी सिद्धेश आणि त्याचा मित्र नागेश यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. दोघांपैकी एकाच्या डोक्यात आरोपींनी ज्या कोयत्याने हल्ला केला तो कोयताच डोक्यात अडकला. या घटनेनंतर आरोपी पळून गेले. त्याला त्याच्या मित्राने डोक्यात कोयता अडकलेल्या अवस्थेत दुचाकीवर बसवून उपचारासाठी रूग्णालयात नेले.
पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याची विक्री करणाऱ्या एका युनिटवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जांबेगाव येथील 'चैतन्य फूड गोदाम' येथे टाकलेल्या छाप्यात पती-पत्नीला अटक करण्यात आली असून, 6 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास दत्तात्रय मांढरे (वय 54) आणि अनुराधा कैलास मांढरे (वय 54, दोघे रा. माळसाकांत चौक, आकुर्डी, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी अमली पदार्थांचे मिश्रण तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान, कैलास मांढरे हा अमली पदार्थ मिश्रित पावडर तयार करून पान आणि गुटखाजन्य पदार्थांमध्ये मिसळून विकत असल्याची खात्रीशीर माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून 'चैतन्य फूड गोदाम' येथे छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी अमली पदार्थांचे मिश्रण तयार करताना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अमली पदार्थ मिश्रित पावडर, द्रव स्वरूपातील अमली पदार्थ, तीन मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, तसेच विविध मशीन आणि साहित्य असा एकूण 6 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 17(ब), 22(ब) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पहिल्यांदाच एका कंपनीने विकसित केलेल्या 'ड्रग ॲनालाईझर किट'चा वापर करण्यात आला. या किटच्या मदतीने तपासणी केली असता, जप्त केलेल्या पदार्थांमध्ये अफिमसारख्या अमली पदार्थाचा अंश असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, तसेच पथकातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सेनगाव तालुक्यातील गूुगुळपिंपरी शिवारात गोरेगाव पोलिसांच्या पथकाने एका शेतात छापा टाकून कांद्याच्या पिकात लावलेली गांजाची 80 झाडे जप्त केली आहे. या गांजाची किंमत सुमारे 85 ते 90 हजार रुपये आहे. या प्रकरणी एका शेतकऱ्या विरुध्द गोरेगाव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 16 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत अवैध व्यवसाय करणाऱ्या विरुध्द कारवाईची मोहिम सुरु आहे. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच 13 पोलिस ठाण्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाकडून अवैध व्यवसायाविरुध्द कारवाई केली जात आहे. दरम्यान सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंपरी शिवारात एका शेतकऱ्याच्या शे्तात कांद्याच्या पिकात गांजाची झाडे लावण्यात आल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भआरती, राहुल मैंदकर, नवले यांच्यासह पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारपासूनच शोध मोहिम हाती घेतली होती. तब्बल तीन तासानंतर पोलिसांनी गुगुळपिंपरी शिवार फिरल्यानंतर विठ्ठळ ढोक याच्या शेतात गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने पाहणी केली असता काही झआडे तीन ते चार फुट तर काही झाडे दोन फुटापर्यंत वाढली होती. पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 80 झाडे जप्त केली आहेत. या झाडांचे वजन साडेआठ किलो भरले असून त्याची किंमत 85 ते 90 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी उपनिरीक्षक नितीन लेनगुळे यांच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी विठ्ठल ढोक (रा. माहेरखेडा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक झळके, उपनिरीक्षक लेनगुळे पुढील तपास करीत आहेत.
शहरात पीएनजी (पाईप्ड् नॅचरल गॅस) ग्राहकांची संख्या वाढत असतानाच, आता सायबर भामट्यांनी आपला मोर्चा एमएनजीएल ग्राहकांकडे वळवला आहे. अधिकृत वाटावा असा लोगो आणि नाव वापरून ग्राहकांना बनावट बिले अन् घातक एपीके फाईल्स पाठवल्या जात आहेत. या लिंकवर क्लिक करताच ग्राहकांची बँक खाती रिकामी केली जात असल्याने गॅस ग्राहकच गॅसवर असल्याचे चित्र आहे. गेल्या 15 दिवसात अशा 15 हून अधिक घटना समोर आल्या असून, यात लिंकला प्रतिसाद देणाऱ्या चार ग्राहकांच्या बँक खात्यातू 10 लाखांहून अधिकची रक्कम लंपास झाल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारांवर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझोत... शहरात गेल्या तीन वर्षांपासून घरगुती गॅस लाईनद्वारे पुरवठा करण्यासाठी काम सुरू आहे. अनेक ठिकाणी जोडण्या केल्या गेल्या आहेत. तर काही ठिकाणी कामे सुरू आहेत. मात्र, ज्या नागरिकांनी एमएनजीएल कंपनीकडे नोंद केली आहे. त्यांचा तपशील सायबर भामट्यांकडून चोरला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरात पाईपद्वारे गॅस पुरवठादार एमएनजीएल कंपनीच्या ग्राहकांना पहिले बिल हाती येण्यापूर्वीच सायबर भामट्यांचे फ्रॉड कॉल येत आहेत. यात ग्राहकांना त्यांच्या व्हॉट्सॲपवर एपीके स्वरूपातील एक फाईल पाठवली जाते. ती डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. मात्र, असे करताच मोबाईल स्क्रीन क्लोनिंग करून सायबर भामटे संबंधित ग्राहकाच्या बँक खात्यावरील रक्कम गायब करत असल्याचे प्रकार वाढले आहेत. थकबाकी भरण्यासाठी दबाव टाकणे, फोनवर अरेरावी करणे आणि गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवणे अशा नवीन फंड्यामुळे नाशिककर ग्राहक सध्या प्रचंड तणावाखाली आहेत. “डिजिटल गॅस बिला’च्या नावाखाली होणारी ही लूट थांबवण्यासाठी आता प्रशासकीय सतर्कतेची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 8583084688 क्रमांकावरून फोन, पण सतर्कतेमुळे वाचले एमएनजीएलमधून बोलत असल्याचा 8583084688 क्रमांकावरून एका ज्येष्ठ नागरिकाला फोन आला. बिलाच्या रकमेची मागणी करण्यात आली. मात्र, हा फसवा कॉल असल्याचे ओळखून ज्येष्ठाने तोकट केला. तत्काळ एमएनजीएलच्या कस्टमर केअरला कॉल करून विचारणा केली, तेव्हा संबंधित क्रमांक फ्रॉड असल्याचे सांगण्यात आले. सतर्कतेमुळे फसवणूक टळली. एपीके फाईल डाउनलोड केली अन् दोन तासांत 50 हजार गेले एमएनजीएल कंपनीच्या नावाने सिडकोतील एका महिला गॅस ग्राहकाला फोन आला. समोरील व्यक्तीने तुमच्या गॅस कनेक्शनसंदर्भातील प्रक्रियेसाठी एक ॲप पाठवले असून, ते डाउनलोड करण्यास सांगितले. ही फाईल डाउनलोड करून माहिती भरली. मात्र, यानंतर दोन तासांत टप्प्याटप्प्याने करत 50 हजार रुपये काढून घेण्यात आले. सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 6 लाख 70 हजारांचा गंडा शहरातील एका सेवानिवृत्त अधिकारी यांना एमएनजीएल गॅस कनेक्शनचे बिल भरण्याबाबत मेसेज आला. बिल भरले नाही तर कनेक्शन कट केले जाईल, असे सांगत बिल भरण्यासाठी लिंक पाठवली गेली. ग्राहकाने लिंक अोपन केल्यानंतर बँक खाते हॅक करण्यात येऊन 6 लाख 70 हजारांची रक्कम खात्यातून ऑनलाईन काढून घेण्यात आली. तेजस मोयल, सायबरतज्ज्ञ, नाशिक अशी केली जातेय फसवणूक सायबर भामट्यांकडून व्हॉट्सॲपवर एमएनजीएलच्या गॅस कनेक्शनसंदर्भात एक संदेश पाठवला जात आहे. या मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांची माहिती भरून घेतली जाते आणि त्यानंतर या मेसेजच्या माध्यमातून ग्राहकांच्या मोबाइलचा ताबा सायबर भामटे घेत आहेत. ‘एपीके’ फाईल डाउनलोड करू नका.. सायबर गुन्हेगारांकडे एमएनजीएल कंपनीच्या ग्राहकांचा मोबाइल/ व्हॉट्सॲप क्रमांक, पूर्ण नाव, पत्ता, बिलाची रक्कम अशी सर्व माहिती असल्याचे आजवर घडलेल्या गुन्हेगारी घटनांवरून दिसून येत आहे. ही माहिती चोरट्यांपर्यंत पोहोचली कशी, याबाबत नागरिकांसह सायबर पोलिसही आवाक् असून, एमएनजीएल कंपनीकडील संपूर्ण डाटा लीक अथवा चोरला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने ग्राहकांच्या फसवणुकीच्या घटना शहरात कमालीच्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांनी खबरदारी घेणे हाच पर्याय ग्राहकांनी कुठल्याही अनोळखी कॉलला प्रतिसाद देऊ नये. व्हॉट्सॲप किंवा एमएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. ही फसवणूक एपीके फाईलद्वारे होत असल्याने अशा फाईल डाउनलोड करू नये. फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क रहावे. - संजय पिसे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस अँड्रॉइड पॅकेज फिट म्हणजे एपीके. हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे ॲप्लिकेशन्स इन्स्टॉल करण्यासाठीची फाईल असते. ही फाईल हानिकारक नसली, तरी त्याचा स्त्रोत मात्र अत्यंत धोकादायक असतो. प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवर खात्रीशीर ॲप असतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम, व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेल्या अशा एपीके फॉरमॅटमधील फाईल असुरक्षित असतात. एपीके ॲपवर क्लिक करताच ॲप इन्स्टॉल होते. जे ॲप लिस्टमध्ये दिसत नाही. मोबाईलधारकाला अज्ञात स्त्रोतांकडून (फ्लॅश मेसेज) विविध मेसेज सुरू होतात. हे ॲप कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन, कॉन्टॅक्स, एसएमएस, गॅलरीची परवानगी मागते. तुमचे सर्व मेसेज एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होतात. अशा फाईल काही केबी (केबी) साईजच्या असतात.
नारेगावातील विवाहितेचा बळजबरीने गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात माहेरच्या मंडळींनी पोलिसांना फोन केल्यावर पथक तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत सर्व आरोपी पळून गेले असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल तीनगोटे ही त्याच घरात लपून होती. सर्व पथक माघारी गेल्यावर ती मागच्या दाराने पळून गेली. तिचा अद्यापही पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, यात शनिवारी अटक केलेला आरोपी शंकर आढावे याला न्यायालयाने 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय कैलास लहाने यांनी दिली. यापूर्वी या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी पती अरबाज सय्यद, सासू आसिया आणि सासरा फेरोज सय्यद या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील मनपाचा कंत्राटी कर्मचारी शंकरवर संशयाची सुई होती. पोलिस पथकाची कसलीही भीती न बाळगता तो दुसऱ्या दिवशी कामावर हजर झाला. मनपाच्या आरोग्य विभागाने संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यावर त्यांनाही या कटात शंकरचा सहभाग असल्याचे दिसून आले होते. त्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क करून तो कामावर हजर झाल्याची माहिती दिल्यावर पथकाने त्यास बेड्या ठोकल्या तर कुख्यात आरोपी सतीश सोनवणेचा शोध सुरू आहे. संघटित गुन्हेगारी असल्याने मकोका कलम आवश्यक संबंधित गुन्ह्याचे स्वरूप पाहता हे कृत्य टोळीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने केल्याचे स्पष्ट होते. संघटित गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी केवळ सामान्य कलमे पुरेशी नाहीत. अशा प्रकरणांत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना सहजासहजी जामीन मिळणार नाही. समाजात जरब बसेल.
छत्रपती संभाजीनगरात जिल्हा परिषदेच्या युतीबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युलामध्ये अध्यक्षपद कुणाला द्यायचे, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सहलीवर पाठवण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत अजूनही शिवसेना आणि भाजपची एकत्रित बैठक झालेली नाही. मात्र, कुठलीही गडबड होऊ नये यासाठी पूर्ण नियोजन दोन्ही पक्षांनी केले आहे. गेल्या वेळी तीन पंचायत समिती सदस्य फुटल्यामुळे उद्धवसेनेने चार दिवसांपासून सदस्य सहलीवर पाठवले आहेत. बुधवार (दि.18) रोजी विशेष सभा होईल. छत्रपती संभाजीनगरमधील निवडणूक चुरशीची ठरू लागली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने बहुमत नसतानाही छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड पंचायत समितीमध्ये बाजी पलटवली होती. त्यामुळे शिवसेनेकडूनही ऐनवेळी दगाफटका होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, याबाबत अतुल सावे यांनी सांगितले की अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे. सुरुवातीची अडीच वर्षे कोण घेणार, याचा निर्णय बाकी आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. चार दिवसांपूर्वीच सदस्य बाहेर उद्धवसेनेच्या सदस्यांना पंचायत समितीत मोठी नामुष्की आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा सदस्य फोडू नयेत, यासाठी चार दिवसांपूर्वीच आम्ही सदस्य सहलीवर पाठवले आहेत. आमचा युतीचा पर्याय खुला असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचा निर्णय मुंबईतच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांचा निर्णय मुंबईतच होणार आहे. त्यामुळे भाजपचे निवडून आलेले 23, एक अपक्ष, तसेच काँग्रेसमधून प्रवेश केलेला एक सदस्य असे 25 जण मुंबईत सहलीवर आहेत. पक्षाकडून दिलेल्या निर्देशांचे पालन करत असल्याचे भाजपकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर नाव असलेल्या सदस्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. प्रक्रिया पारदर्शक; ट्रायल घेतली बुधवारी (दि.18) होणाऱ्या सभेला अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे पीठासीन अधिकारी असतील. सकाळी 10 ते 12 नामनिर्देशन, दुपारी 2 ला सभा. छाननीनंतर माघारीची संधी, हातवोटिंगने निर्णय व्हिडिओ रेकॉर्डिंगसह. पंचायत समिती सभापती हजर राहणार, पण मतदान नाही. सोमवारी याची ट्रायल झाली. शिवसेनेची सावध भूमिका गतवेळी पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या सदस्यांची मते फुटली. त्यामुळे आता ही मते फुटू नयेत यासाठी शिवसेनेच्या सदस्यांना सहलीसाठी मुंबईत पाठवले. सध्या शिवसेनेकडून 21 निवडून आलेले सदस्य आहेत. इतर अपक्षांपैकी तीन सदस्य शिंदेसेनेकडे आल्याचा दावा शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या चार सदस्यांची भूमिकादेखील निर्णायक राष्ट्रवादीच्या 4 सदस्यांची भूमिकादेखील निर्णायक ठरणार असून याबाबत राष्ट्रवादीचे जि.प. सदस्य पंकज ठोंबरे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण जे सांगतील तो आमचा निर्णय असेल. राष्ट्रवादी (शप) चे सदस्य वरुण पाथ्रीकर म्हणाले की, पक्षाचा जो निर्णय असेल त्यानुसार निर्णय घेणार आहेत. भाजपचे 25, शिंदेसेनेनेही अपक्षांना घेऊन जमवले 25, त्यामुळेच पेच भाजप (23) व शिवसेना (21) यांच्यात पहिल्या टर्मवरून स्पर्धा सुरू असून उबाठा (9), अजित पवार राकॉ (4) यांची भूमिका महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईकडून युतीसाठी प्रयत्न, पण भाजप अपक्ष घेऊन दबाव टाकतोय. संख्याबळावर शिवसेनेला कमी महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता आहे.
मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकावर काळजाचा ठोका चुकवणारी एक भीषण घटना उघडकीस आली आहे. सततच्या कौटुंबिक वादातून एका नराधम पतीने आपल्या ३६ वर्षीय पत्नीला चक्क धावत्या लोकलसमोर ढकलून देऊन तिची हत्या केली. ही संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, घटनेनंतर मुलासह फरार झालेल्या राजुकुमार गुप्ता याला रेल्वे पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या काही तास आधीच मृत महिलेने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृत ३६ वर्षीय पुष्पा आणि तिचा पती राजुकुमार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. सततच्या भांडणांना कंटाळून पुष्पाचा भारतीय सैन्यात जवान असणारा भाऊ कमलेश कुमार गुप्ता हा आपल्या बहिणीला आणि तिच्या १५ वर्षांच्या मुलाला उत्तर प्रदेशातील मूळ गावी घेऊन जाण्यासाठी मुंबईत आला होता. १४ मार्च रोजी सकाळी पुन्हा एकदा पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या राजुकुमारने क्रूर कट रचला. चतुराईने पत्नीच्या भावाला घरात कोंडले पुष्पा, तिचा भाऊ कमलेश आणि मुलगा मुलुंड स्थानकावर जाण्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेत कमलेशला आपले लष्करी ओळखपत्र (ID Card) घरीच विसरल्याचे लक्षात आले. तो आणि त्याचा पुतण्या ओळखपत्र आणण्यासाठी घरी परतले असता, राजकुमार त्यांच्या पाठोपाठ गेला. राजुकुमारने दोघांनाही बाहेरून कडी लावून घरात कोंडून ठेवले. यानंतर त्याने थेट मुलुंड स्थानक गाठले, जिथे पुष्पा एकटीच त्यांची वाट पाहत उभी होती. लोकलसमोर ढकलून केला खून स्थानकावर पोहोचताच राजुकुमार आणि पुष्पा यांच्या पुन्हा काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर राजुकुमारने प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल जवळ येताच मागून जोराचा धक्का देऊन पुष्पाला रुळावर ढकलले. या अपघातात पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. या क्रूर कृत्यानंतर आरोपीने आपल्या लहान मुलाला सोबत घेतले आणि मुंबईतून पळ काढला. दरम्यान, घरात कोंडलेल्या कमलेशने शेजाऱ्यांच्या मदतीने आपली सुटका करून घेतली आणि स्थानकावर धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व संपले होते. सीसीटीव्ही आणि पोलिसांची कारवाई रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सर्व धक्कादायक प्रकार कैद झाला आहे. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सुरतमध्ये असल्याचे निष्पन्न झाले, जिथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. राजुकुमार गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा धुराळा उडत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आज (मंगळवार, दि. १७) ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, या दौऱ्यात आगामी निवडणुकांचे जागावाटप आणि महायुतीमधील समन्वयावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याचा 'अंतर्गत अहवाल' घेऊनच शिंदे दिल्लीत दाखल झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेने एक गोपनीय अहवाल तयार केला आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांच्या असहकार्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये अशा चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि समन्वय अधिक घट्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा अहवाल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडून आपली भूमिका आक्रमकपणे मांडू शकतात. दिल्लीत खासदारांची घेतली भेट दिल्लीत आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पक्षाची भूमिका काय असावी, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात पसरवल्या जाणाऱ्या 'फेक नॅरेटिव्ह'चा पर्दाफाश करण्यासाठी खासदारांनी आक्रमक व्हावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक आव्हाने आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यावर केंद्र सरकारच्या उपाययोजनांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले. 'पक्ष नाव व चिन्हा'बाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा एकनाथ शिंदे हे राजकीय चर्चांसोबतच सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या न्यायालयीन लढाईबाबतही शिंदे कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत. या कायदेशीर लढाईत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी ते स्वतः वकिलांच्या भेटी घेऊन आढावा घेत आहेत. उद्या देवेंद्र फडणवीसही दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्या (बुधवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 'केंद्रीय संचलन समिती'ची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तिकीट वाटप आणि निवडणूक रणनीतीवर खलबतं होणार असून, महाराष्ट्रातील दोन्ही बड्या नेत्यांच्या दिल्ली भेटींमुळे महायुतीच्या आगामी वाटचालीचे चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. हे ही वाचा… शिखर बँक घोटाळा प्रकरणाची फाईल बंद:विशेष न्यायालयाने 'क्लोजर रिपोर्ट' स्वीकारला, अजित पवारांसह 70 जणांना क्लीन चिट गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांना या प्रकरणात विशेष न्यायालयाने पूर्णतः 'क्लीनचीट' दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सादर केलेला 'सी-समरी' (Closer Report) न्यायालयाने अधिकृतपणे मंजूर केल्याने आता हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. सविस्तर वाचा…
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची सहा महिन्यातच दुरावस्था झाल्याने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्रा घेत सोमवारी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. शिवसैनिकांनी गांधीगिरी करत योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांचा सत्कार केला. या रस्त्यावर ४६.४० कोटी रुपये झाले असून, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अवस्था अवघ्या सहा महिन्यांतच दयनीय झाली आहे, असे शिवसेनेचे म्हणणे होते. जिल्ह्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे होत असून, अनेक कामे ही रखडली आहेत. काही कामेही संथ गतीने सुरु असून, याचा फटका परिसरातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे करून अतिवृष्टीच्या काळात तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली. दरम्यान सोमवारी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनातून करण्यात आले. आंदोलनात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख विकासराव पागृत, उपजिल्हाप्रमुख सुरेंद्र विसपुते, शहरप्रमुख आशिष गावंडे (अकोला पश्चिम), शहरप्रमुख राहुल कराळे (अकोला पुर्व), मनपा गटनेता विजय इंगळे, नगरसेवक शंकरराव लंगोटे, अभय खुमकर, संजय भांबेरे, राजु वरोकार आदी उपस्थित होते. तीन रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ्या भेगा, उभे तडे आणि उखडलेले काँक्रीट दिसून येत असल्याने या कामातील दर्जाहीनता आणि संभाव्य भ्रष्टाचार समोर आल्याचा आरोप शिवसेनेने केला. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच कोणताही अतिरिक्त निधी न देता त्याच्याकडूनच गुणवत्तापूर्ण पद्धतीने रस्ते नव्याने करून घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. असे आहेत ते तीन रस्ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत बाभुळगाव ते गुडधी- अलियाबाद- घुसर हा १०.७५ कि.मी. लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता सुमारे २१ कोटी रुपयांत बांधण्यात आला. तसेच उगवा ते घुसर हा ६ कि.मी. लांबीचा रस्ता १२ कोटी रुपयांच्या खर्चातून, तर घुसर ते दोनवाडा हा ७.१० कि.मी. लांबीचा रस्ता १३.६७ कोटी रुपयांत उभारण्यात आला.
उन्हाळ्यामधे तहानलेल्यांना पाणी पाजण्यासाठी लागणाऱ्या पाणपोइंची (पाणेरी) संख्या यावर्षी घटली आहे. त्यामुळे पाण्याचा धर्म आटला की काय, असे चित्र सध्या अकोट शहरात दिसून येत आहे. वऱ्हाडात उन्हाचा कडाका दरवर्षीच असतो. दरवर्षी गुढीपाडवा झाल्यावर उन्हाची तीव्रता वाढते. या उन्हाळ्यामधे वाटसरूंसाठी मोफत पेयजल उपलब्ध करुन देण्याची अकोटवासियांची परंपरा आहे. जवाहर मार्ग बसस्थानक मार्ग, नरसिंग रोड, गोलबाजार, अंजनगाव रोड आदी मार्गावर पाणपोया लागतात. काही दानशूर मंडळी स्वखर्चाने पाणपोया लावतात. काही समाजबांधव वर्गणी गोळा करुन पाणपोई लावतात. दिवंगत नातेवाइकांच्या स्मरणार्थ सुद्धा पाणपोई लावतात. परंतु यावर्षी उन्हामुळे पारा ४० पेक्षा जास्त असला तरीही पाणपोईची संख्या वाढली नाही. पाणपोई लागल्यास बाहेर गावांहून अकोटात विविध कारणांसाठी येणाऱ्या नागरिकांना सोईचे होते. अकोला जिल्ह्यातील दोन अग्रणी सहकारी बँक पाणपोई लावत होत्या. स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी या पाणपोयांचे उद्घाटन करत होते. परंतु आता या पाणपोई बंद झाल्या आहेत. या पाणपोइंमुळे नागरिकांची सोय होत होती. अकोटला जोडून अनेक खेडी आहेत. ही खेडी वैद्यकीय कारणांसाठी व विविध सामानाच्या खरेदीसाठी अकोटवर अवलंबून आहेत. या खेडेगावांतील नागरिक विविध कामासाठी अकोटला येतात. त्यांना पेयजलाचे गरज असते. सर्वच जण पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाहीत. त्यांना पाणेरीचा आधार होता. परंतु पाणपोई कमी झाल्याने नागरिकांना फटका बसत आहे. पाणेरीचालक हे गुराढोरांनाही पाणी पाजत होते. गेल्या वर्षी एका व्यावसायिकाने आरओ थंड पाण्याच्या कॅनची पाणपोई लावली होती. दररोज सुमारे ४० ते ५० कॅन पाणी तहानलेले पित होते. गतवर्षी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी मिळाली होती. व्यावसायिकाने स्वखर्चाने तो उपक्रम राबवला होता. परंतु यंदा तो बंद पडला आहे. भरपूर पाणी प्या, उष्माघात टाळा : डॉ. व्यवहारे उन्हाचा कडाका पाहता शरीराचे तापमान कायम ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या व उष्माघात टाळा. घराबाहेर निघताना डोक्यावर टोपी किंवा दुपट्टा बांधा. शक्य झाल्यास दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू नका. तसेच उन्हात काळे कपडे घालू नका. भरपूर पाणी प्या व उष्माघात टाळा,असा सल्ला डॉ. सूरज व्यवहारे यांनी दिला. सामाजिक संघटना निष्क्रिय देशभरातील कोणत्याही घटनेला पाठिंबा किंवा निषेध करणाऱ्या संघटनांना पाणपोया लावाव्यात असे वाटले नाही. त्यांचे पत्रकबाज नेते सुध्दा पाणपोया लावण्यासाठी पुढे आले नाहीत. निषेध करणारे, अभिनंदन करणारे पत्रकबाज नेते उन्हाळ्यात दिसेनासे झाले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पवार कुटुंबाला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांच्यासह ७० हून अधिक माजी संचालकांना या प्रकरणात विशेष न्यायालयाने पूर्णतः 'क्लीनचीट' दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सादर केलेला 'सी-समरी' (Closer Report) न्यायालयाने अधिकृतपणे मंजूर केल्याने आता हे प्रकरण कायमचे बंद झाले आहे. २०११-१२ च्या सुमारास शिखर बँकेने राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला होता. हे कारखाने डबघाईला आल्यानंतर ते कवडीमोल किमतीत विकले गेले आणि त्यामुळे बँकेचे सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा करण्यात आला होता. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, प्रदीर्घ तपासानंतर आता न्यायालयाने हा विषय निकाली काढला आहे. नेमका निकाल काय? मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे सांगत दुसऱ्यांदा 'सी-समरी' अहवाल न्यायालयात सादर केला होता. त्यावर सुनावणी करताना विशेष न्यायालयाने मोठे निरीक्षण नोंदवले. संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी, लबाडी किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा हेतू दिसून येत नाही. तसेच, संचालकांमध्ये कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी पूर्वनियोजित कट किंवा संगनमत झाल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला सापडलेले नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. क्लोजर रिपोर्टला आव्हान देणाऱ्या याचिकाही फेटाळल्या या क्लोजर रिपोर्टला आव्हान देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व अन्य याचिकाकर्त्यांच्या निषेध याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रदीर्घ काळ राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या या हजारो कोटींच्या कथित घोटाळ्याच्या कायदेशीर प्रक्रियेवर आता पडदा पडला आहे. राजकीय वळण आणि ई़डी चौकशीवर परिणाम या निर्णयामुळे पवार कुटुंबावरील राजकीय आरोपांची धूळ आता खाली बसली आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल स्वीकारल्यामुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीतही आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कायदेशीर तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. फौजदारी गुन्हाच सिद्ध न झाल्याने ईडीच्या तपासाचा आधारही कमकुवत होणार असल्याचे बोलले जात आहे.
पुण्यात नोकरी करणाऱ्या २४ वर्षीय इंजिनिअर मुलीला ट्रॅव्हल्स पॉइंटवर सोडून देण्यासाठी जाताना वडिलांच्या दुचाकीला मद्यधुंद सुसाट कार चालकाने धडक दिली. त्यात इंजिनिअर मुलीसह, तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तर २२ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी १५ मार्चला रात्री बारा वाजताच्या सुमारास अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेवर झाला. धडक देणाऱ्या कारचा चालक दारु पिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. गजानन श्रीरामजी माकोडे (५२), सपना गजाननराव माकोडे (२४, रा. प्रकाश कॉलनी, मायानगर.) असे मृतक वडील व मुलीचे नाव आहे. प्रियंका गजाननराव माकोडे (२२) असे जखमी मुलीचे नाव आहे. गजानन वाकोडे यांची मोठी मुलगी सपना ही इंजिनीअर असून, पुण्यात नोकरी करत होती. ती शहरात आली होती. सोमवारी १६ मार्चला कामावर रुजू होण्यासाठी ती रविवारी रात्री १२. १० वाजताच्या खासगी बसने पुण्याला जाणार होती. सपनाला ट्रॅव्हल्स पॉइंटवर सोडून देण्यासाठीच तिचे वडील गजाननराव हे मुलगी प्रियंकासह दुचाकीने तिघे जात होते. अमरावती ते बडनेरा एक्स्प्रेस हायवेवरील एमआयडीसी परिसरात खासगी बस थांबते. तिथे सपनाला सोडायचे होते. एमआयडीसीतील त्याच क्रॉसिंगवर गजाननराव दुचाकीने रस्ता क्रॉस करत होते, त्याचवेळी अमरावतीकडून बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या एक्ययुव्ही ७०० या कारच्या दारुड्या चालकाने गजाननराव मोकोडे यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती. दुचाकीचा चेंदामेंदा झाला, सोबतच गजाननराव, सपना व प्रियंका तिघेही रस्त्यावर रक्तबंबाळ होवून गंभीर जखमी झाले. यामध्ये सपना व गजानन यांच्या पायाला व डोक्याला जबर दुखापत झाली. तिघांनाही नातेवाईक व पोलिसांनी इर्वीन रुग्णालयात आणले, उर्वरित. पान ४ अपघातात कारची गती जास्त होती. दुचाकीला धडकताच गजानन वाकोडे यांचा पाय शरीरापासून वेगळा झाला. तो पोलिसांनी नेला होता. कारच्या बोनेट मधील सुटे भाग चेपले. माकोडेंची दुचाकी चेंदामेंदा झाली दुचाकीच्या पेट्रोल टँकसह इतर भाग तुटले. कारच्या दोन एअर बॅग उघडल्या, यावरुन धडक दिली त्यावेळी कारची गती ताशी ११० ते १२० च्या असावी, अशी चर्चा होती. वाकोडे यांच्या कुटुंबांत गजानन, त्यांची पत्नी, तीन मुली व एक मुलगा असे सदस्य आहेत. दरम्यान एकाचवेळी गजाननराव व त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी एकाचवेळी त्यांच्या मायानगर परिसरातील घरुन वडील व मुलीची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्या, तसेच त्यांच्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने माकोडे कुटूंबियावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत व सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सालोरा बुद्रूकने स्तुत्य पुढाकार घेत गावात जन्मलेल्या कन्यारत्नाच्या कुटुंबाचा सन्मान करून मुलींच्या जन्माबद्दल सकारात्मक संदेश दिला. १७ सप्टेंबर २०२५ नंतर गावात जन्माला येणाऱ्या मुलींचे स्वागत व सन्मान करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून या अंतर्गत कन्यारत्न जन्म झालेल्या कुटुंबाला प्रोत्साहनपर सानुग्रह म्हणून ५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. या उपक्रमामागे मुलींचा सन्मान वाढवणे, समाजात स्त्री-पुरुष समानतेची जाणीव निर्माण करणे तसेच ‘बेटी बचाओ – बेटी पढाओ’ या संकल्पनेला बळकटी देणे हा मुख्य उद्देश असल्याचे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रसंगी सरपंच ममता जाधव, उपसरपंच नीता धाकडे, सदस्य वैशाली राठोड, हिरालाल राठोड, शिक्षण समिती अध्यक्ष गणेश दयाराम राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायक तसरे, चापालाल महाराज बहुउद्देशीय संस्थाध्यक्ष मदन महाराज यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक खेमराज जाधव, साहेब धाकडे, नंदू नागपुरे, राजा राऊत, प्रीतम तसरे, सुरेश तसरे, स्वप्निल राऊत, नंदू धाकडे, प्रकाश चव्हाण, अरविंद चव्हाण, निलेश राठोड, विश्वजीत बाखडे, निरंजन राठोड, विशाल जाधव, विशाल चव्हाण, अमर राठोड, सचिन जाधव, उमेश राठोड, अजय राठोड, गजानन राठोड, परसराम राठोड उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी वसुदेव चव्हाण, रोजगार सेवक बळीराम राठोड, उकंड राठोड, विजय जाधव, गणेश जाधव, गजानन वानखडे, संजय जाधव, आर्यन राठोड, प्रफुल कांबळे, गजानन मोहोळ, श्रीकृष्ण मनोहरे, पंजाब थोरात, सोनूसिंग बावरी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामपंचायत सालोरा बुद्रूकचा हा उपक्रम समाजात कन्यारत्न जन्माबाबत सकारात्मक विचार निर्माण करणारा, मुलींच्या सन्मानाला बळ देणारा ठरत असून, त्याचे कौतुक केले जात आहे. गावकरी मानतात अभिमानाची बाब ग्रामपंचायतीच्या या अभिनव उपक्रमामुळे गावात मुलगी जन्माला येणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण मानला जात असून ग्रामस्थांमध्येही सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. मुलगी ही कुटुंबाची व समाजाची संपत्ती असून, तिच्या जन्माचे स्वागत करण्याची परंपरा रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत सालोरा बुद्रूक गावाने मुलीच्या जन्माचा सन्मान करण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.१७ सप्टेंबर २०२५, नंतर गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्यारत्नाच्या कुटूंबाला ५ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर धनादेश देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.या उपक्रमाने मुलीचा सन्मान वाढवणे समाजात स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणे व मुलींच्या जन्माकडे सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा उद्देश आहे.
अमरावती पती-पत्नीमध्ये वाद-संवाद हा काही नवीन प्रकार नाही. परंतु वादाचे पर्यावसान थेट घटस्फोटाच्या मागणीपर्यंत जावे आणि पुढे न्यायालयीन लढा उभा ठाकल्यानंतर ‘त्या’ दोघांनी सहजीवनाचा जुनाच मार्ग निवडावा, हा प्रकार मात्र विरळा आहे. गोड शेवटाचा असाच एक प्रकार अमरावतीच्या लोकअदालतीत घडला. त्यामुळे आले होते घटस्फोट घेण्यासाठी, मात्र परत गेले हातात-हात घेऊन अशी अलगद प्रतिक्रिया अनेकांच्या ओठातून बाहेर पडली. शनिवारी येथील कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीमध्ये पहिलेच प्रकरण निघाले ते म्हणजे आपसी संमतीने घटस्फोटाचे. ग्रामीण भागातील पती-पत्नीने ते दाखल केले होते. परंतु कालांतराने दोघांनीही फेरविचार केला आणि अखेर लोकअदालतीमध्ये या प्रकरणाचा शेवट करण्याचे ठरवून टाकले. त्यासाठी अर्थातच दोन्ही बाजूंचे वकील, न्यायालयाच्या समन्वयक आणि पॅनल ऑफ ॲडव्होकेटस् च्या सदस्यांचा सल्ला मात्र अत्यंत मोलाचा ठरला. आपसी सहमतीने घटस्फोट मिळावा, यासाठी हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश शेळके यांच्या समोर ठेवण्यात आले. दोघांमध्ये समन्वय रहात नसल्याने २ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रकरणाचा न्यायालयीन प्रवास सुरु झाला. पुढे कौटुंबिक न्यायालयाच्या समन्वयक, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश तसेच उभयतांचे वकील यांनी हे कुटुंब तुटू नये आणि संसार उध्वस्त होऊ नये याकरिता विशेष प्रयत्न केले. पती-पत्नी दोघांचीही योग्य समजूत घातली. भविष्यातील दुष्परिणाम, विशेषत: त्यांच्या अपत्यांची होणारी आबाळ याचा नीट अंदाज त्यांच्या ठायी रुढ केला. अशाप्रकारे दोघांचेही समुपदेशन करण्यात आले. त्यामुळे दोघांनीही आपली मागणी मागे घेत काही कारणास्तव रखडलेला सहजीवनाचा मार्ग पुन्हा एकदा स्वीकारला. कौटुंबीक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शेळके आणि पॅनल ऑफ ॲडव्होकेटस् समोर त्यांनी स्वत:च या बाबी स्पष्ट केल्या. अशाप्रकारे संपुष्टात येण्याच्या मार्गावर असलेला उभयतांचा संसार लोकअदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुरू झाला. यासाठी सर्व उपस्थितांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या. लोक अदालतीमध्ये समेट घडल्यानंतर सदर्हु दाम्पत्याने न्यायाधीश व वकीलांचे आभार मानले. निकालानंतर काय म्हणाले दाम्पत्य... कौटुंबिक न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शेळके तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या पॅनल ॲडव्होकेट यांच्या उपस्थितीमध्ये पती-पत्नी न्यायालयात हजर झालेत आणि त्यांनी विद्यमान न्यायालयाला सांगितले की आम्ही आमच्या लहान मुलाचा आणि आमच्या संसाराचा विचार करून आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. मागील तीन महिन्यापासून आम्हा दोघांचेही वकील ॲड. चंद्रशेखर डोरले, ॲड. सुयश डोरले, ॲड. प्रथमेश गणेशकर आणि ॲड. निसार खान यांचे सांगणे आम्हाला पटले आहे. हेच आहे उद्दीष्ट माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या हेतूने लोक अदालत सुरू केली आहे, त्याचा असा सकारात्मक प्रभाव या प्रकरणाच्या निकालावरून किंवा तडजोडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे. तुटण्याच्या काठावर पोहोचलेले एक सहजीवन पुन्हा एकदा सावरले, ही या उपक्रमाची सर्वात चांगली व जमेची बाजू ठरल्याची प्रतिक्रिया पॅनल ऑफ ॲडव्होतकेटसने दिली.
नगरपालिकेचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी शहरातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, त्याचाच भाग म्हणून ९ मार्च रोजी सर्वात जुनी ‘किल्ला’ शाळेला त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी शाळेतील अस्वच्छ, दुर्लक्षित अवस्था पाहून संतापलेल्या नगराध्यक्षांनी कठोर कारवाई करत संबंधित शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याचे आदेश दिले. नगरपालिकेअंतर्गत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत मराठी व उर्दू माध्यमाच्या एकूण ९ प्राथमिक शाळा असून मराठी व उर्दू माध्यमाच्या दोन माध्यमिक शाळा आहेत. तसेच एक विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेजही शहरात कार्यरत आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांमधून अनेक मोठे अधिकारी घडल्याचा इतिहास असला, तरी काही वर्षांपासून शाळांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे.वर्गखोल्यांच्या कोपऱ्यात कचऱ्याचे ढिग दिसत होते. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी जनावरेही राहू शकणार नाहीत, अशा अस्वच्छ जागी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात असल्याचेही दिसून आले. ही अवस्था पाहून नगराध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ सूचना देऊन न थांबता नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी स्वतः नगरसेवकांसह हातात झाडू घेऊन संपूर्ण शाळा व वर्गखोल्या स्वच्छ केल्या. त्यानंतर अस्वच्छता व कामातील हलगर्जीपणाबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याचा शेरा शेरेबुकात नोंदवत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. पुढील काळात नगरपरिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांची पटसंख्या किमान पाच पटीने वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही नगराध्यक्ष याप्रसंगी म्हणाले.यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून शाळेतील कचरा स्वच्छ केला. वर्गखोल्यांमधून दीड ट्रॉली कचरा बाहेर निघाल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अशा परिस्थितीत कसे सुरू होते, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी नगराध्यक्षांनी यापूर्वी वाशीम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेला भेट दिली होती. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी माजी प्राचार्य रवींद्र कोकाटे, विनोद हाडोळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप कावलकर, गोपाल वानखडे,मो. नईम यांचे मार्गदर्शनही घेतले जात असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्याध्यापकांच्या खोलीत सापडल्या गुटख्याच्या पुड्या ः किल्ला शाळेच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष गायगोले यांना अनेक धक्कादायक बाबी आढळल्यात. मुख्याध्यापकांच्या खोलीत गुटख्याच्या पुड्या सापडल्या, तर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत गाळ साचलेला होता. महापुरुषांचे फोटो धुळीत माखलेले होते, तर विद्यार्थ्यांना वाटपासाठी ठेवलेली सुमारे ४०० ते ५०० प्रमाणपत्रे निष्काळजीपणामुळे खराब झाली होती. शासनाकडून दिलेले संगणक, मोठ्या स्क्रीनचा टीव्ही व ऑनलाइन शिक्षणाचे साहित्य वापराविना धूळ खात पडले होते. विद्यार्थ्यांसाठी आलेले नवीन टेबल-बेंच एका बंद खोलीत ठेवून दिले होते. ^शाळेला अचानक भेट दिली असता जागोजागी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेची स्थिती पाहायला मिळाली. ही बाब गंभीर असून त्याबाबत संबंधित शिक्षकांची एक पगारवाढ रोखण्याची कारवाई करण्याचे तसेच शिपायाला निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.गावातील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नगरपरिषद अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व शाळा सुधारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अविनाश गायगोले , नगराध्यक्ष, नगरपरिषद अंजनगाव सुर्जी.
घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्या असून, दुसरीकडे गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने गृहिणींसह संपूर्ण कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. गॅस संपल्यामुळे नागरिकांना कामधंदा सोडून गॅस सिलिंडरसाठी लाईनमध्ये उभे राहावे लागत असून, त्यामुळे रोजगारावरही परिणाम होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी नांदगाव खंडेश्वर येथे नाल्यालगत अनोखे प्रतीकात्मक आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘नरेंद्र सिलेंडर’ अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. देशाच्या संरक्षणापासून ते नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सीमावरील सुरक्षेपासून ते देशांतर्गत महागाईपर्यंत सर्वच बाबतीत सरकारने शरणागती पत्करल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्यामुळे तेथील मालावर भारतात शुल्कमाफी मिळत असून, भारतातील शेतमाल अमेरिकेत निर्यात करताना ३० टक्के टॅरिफ लावण्यात येत असल्याने शेतमालाचे भाव घसरल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पंतप्रधानांनी गटारातून गॅस गोळा करून त्यावर चहा बनवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत युवक काँग्रेसने नाल्यालगत आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित दादा जगताप, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक भगत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश जोगे, मो. रियाज सय्यद मोफिक, अतुल ठाकूर, रमेश ठाकरे, राजेंद्र पारधी (सरपंच म.च.), पवन कारेकर, सुशील थोरात, समीर दहातोंडे, प्रमोद भाऊ इंझडकर, प्रदीप ब्राम्हणवाडे, रणजीत मेश्राम, पंकज वानखडे, सुरज सोनोने, तन्वीर , पंकज जगणे तसेच इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव सुरू आहेत. परंतु, पंढरीच्या या पावन नगरीतील ग्रंथोत्सव वाचन आणि ग्रंथालय चळवळीचा उद्देश खरोखर सफल करणारा ठरला आहे. ग्रंथ आणि वाचन ही पवित्र, समाज हिताची चळवळ वाढली पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. ग्रंथालयांनी वाचकांची वाट न पाहता आपणच वाचकांपर्यंत जाण्याचा संकल्प नवीन वर्षात करावा, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि सोलापूर ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा समारोप झाला. याप्रसंगी गाडेकर प्रमुख उपस्थित होते, अध्यक्षस्थानी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष जोतिराम गायकवाड, मराठी भाषा अधिकारी प्रमोद पाटील, ग्रंथालय निरीक्षक संजय ढेरे, प्रदीप गाडे प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षपदावरून बोलताना कुंडलिक मोरे यांनी जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीचा आढावा घेतला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी प्रास्ताविक केले. साहित्य आणि ग्रंथ हे समाजात परिवर्तनाचे काम करतात. वाचकांना अंतर्मुख होऊन जगण्याचे बळ देतात. वाचक हा या चळवळीचा आत्मा आहे. ग्रंथोत्सवाचे औचित्य साधून अनेक प्रकाशकांनी पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल उभारले होते. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक संचालक सुनील हुसे यांनी अधिकाधिक ग्रंथ खरेदीचे आवाहन केले. त्यानुसार दोन दिवसांत प्रत्येक ठिकाणी शेकडो पुस्तकांची विक्री झाली. वाचन चळवळीसाठी ही बाब अतिशय सुखद असल्याचे हुसे यांनी नमूद केले. वाचक वाढले तरच चळवळीला अर्थ आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करूयात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ठ ग्रंथपाल, वाचक तसेच पुस्तक प्रकाशकांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. दोन दिवसांत प्रत्येक ठिकाणी शेकडो पुस्तकांची विक्री झाली कार्यक्रमासाठी तानाजी जाधव, प्रशांत जाधव, विनोद गायकवाड, फुलचंद नागटिळक, अन्सर शेख, कृष्णदेव मदने, रवी गाजरे, सुभाष सुडके, राजेश पवार, रामदास नागटिळक, हणमंत शिंदे, विनायक गुरव आदींनी परिश्रम घेतले. जिल्ह्यातील पदाधिकारी, वाचक, कार्यकर्ते उपस्थित होते. जोतिराम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले. ग्रंथोत्सवात पुस्तकांची मोठी विक्री
स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केरळमध्ये आयोजित १२ व्या राष्ट्रीय तांत्रिक प्रकल्प प्रदर्शन व स्पर्धा ''सृष्टी-२०२६'' मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाने राष्ट्रीय स्तरावर स्वेरी महाविद्यालयाचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे. केरळ राज्यातील कोट्टायम येथील सेंटगिट्स अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २३ व २४ फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा पार पडली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातून संपूर्ण भारतातून ७३ प्रकल्पांची नोंदणी झाली होती. त्यापैकी अत्यंत उत्कृष्ट अशा निवडक १० प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरासाठी संधी मिळाली. यामध्ये महाराष्ट्रातून निवडलेला ‘स्वेरी'चा हा एकमेव गट ठरला, ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी ‘अॅटोमेटीक सिडबॉल मेकिंग मशीन’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे सादरीकरण केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या प्रकल्पाने पदवी स्तरावरील मेकॅनिकल गटात देशात तृतीय क्रमांक पटकावला. मानसी कंदी, शुभांगी सगर, गोविंद भंडारे व आशिष शिंदे या विद्यार्थ्यांच्या चमूने ही चमकदार कामगिरी केली. संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅम्पस इंचार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. एस. बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले. या प्रकल्पासाठी त्यांना प्रा. चेतन जाधव यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले. केरळ येथे विभागप्रमुख डॉ. मन्नू रेमनन यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
लातूर- मुरुड, ढोकी- येडशी, बार्शी- टेंभुर्णी महामार्गाचे चौपदरीकरण जलद गतीने पुर्ण करण्यासाठी अधिकचे २०५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. या मार्गाच्या चौपदरीकरणाकरीता यापूर्वीही ५७४ कोटी रुपये मंजुर करुन घेतले आहेत. धाराशिव, लातूर व बार्शी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लातूर, मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, टेंभुर्णी या प्रमुख मार्गाचे चौपदरीकरण व्हावे, अशी बऱ्याच वर्षापासून मागणी प्रलंबित होती. या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खा. राजेनिंबाळकर यांनी लोकसभेच्या अधिवेशनात तसेच मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत दि.२९ सप्टेंबर २०१९, दि. २१ नोव्हेंबर २०२१ लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान प्रश्न विचारला होता. त्यानंतर दि. ९ मार्च २०२१ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लक्षवेधी प्रश्न विचारुन सभागृहाचे लक्ष वेधले होते. दि. ६ एप्रिल २०२१ रोजी मंत्री गडकरी यांची प्रत्यक्ष निवासस्थानी भेट घेवून प्रश्न मार्गी लावणे बाबत चर्चा केली. दि. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासोबत बैठक घेवून त्यानंतर दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनादरम्यान नितीन गडकरी यांची भेट घेवून पाठपुरावा केला. दि. १८ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रीमहोदयांच्या निवासस्थानी या प्रश्नाच्या अनुषंगाने भेट घेवून अश्वासक चर्चा केली. सदर मार्गाच्या चौपदरीकरणाबाबत वारंवार पाठपुरावा करुन या मार्गाच्या चौपदरीकरणाकरीता अखेर दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी लातूर, मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, टेंभुर्णी महामार्गाच्या चौपदरीकरणाकरीता ५७४ कोटी मंजुर करुन घेतले. या मार्गाच्या कामास गती देवून काम लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता नियमीत पाठपुरावा चालू असून मार्गावरील येडशी बायपास व उर्वरित कामांसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या रस्त्याच्या उन्नतीकरणासाठी केंद्र सरकारकडून २०५.२३ कोटी रुपये मंजूर करुन घेतले. तसेच प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी मिळाली असून या निधीमुळे प्रलंबित कामांना गती मिळणार आहे. या कामामुळे या परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. सदरील काम लवकरात लवकर पुर्ण करण्याकरिता संबंधितांना सुचना केल्या असून कामाचा नियमीत आढावा घेणार असल्याचेही खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या मार्गाच्या विकासामुळे लातूर, मुरुड, ढोकी, येडशी, बार्शी, टेंभुर्णी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून व्यापार, उद्योग व दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बार्शी- टेंभुर्णी महामार्गाच्या सततच्या पाठपुराव्याला मिळाले यश
माळशिरस पं. स. नूतन सभापतींचा पदग्रहण:शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर यांची सभापती म्हणून वर्णी
माळशिरस पंचायत समितीच्या नवनिर्वाचीत सभापती व उपसभापती यांचा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच निमगाव व तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत पद ग्रहण समारंभ झाला. माळशिरस जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मोहिते पाटील व आ.जानकर यांनी दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना तसेच रिपाईशी युती करत तालुक्यातील १८ पैकी १२ जागा मिळवल्या होत्या. त्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या प्रत्येकी २ तर मुळ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ८ जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये मोहिते पाटील यांच्यातील माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील तसेच आमदार उत्तमराव जानकर यांच्या पत्नी विमल जानकर या विजयी उमेदवार असताना सभापती निवडी वेळी अचानक नाट्यमय घडामोडी होत सभापती पदासाठी दाखला केलेला वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांचा अर्ज मागे घेण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर यांची सभापती म्हणून वर्णी लागली. यावेळी गटविकास अधिकारी आर.बी.पांढरे यांनी विजयसिंह मोहिते- पाटील यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केल्यानंतर सभापती दत्ता मगर व उपसभापती मनीषा पाटील यांनी पदग्रहण केले.त्या वेळी बाहेर हालग्या तुताऱ्या यांचा गलागलाट सुरू होता. मोहिते पाटील व जानकर यांची ही राजकीय खेळी असली तरी त्यामुळे यानिमित्ताने निमगावला प्रथमच सभापती पदाची संधी मिळाली त्यामुळे निमगाव मध्ये जल्लोष झाला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ११ वाजता या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ आयोजित केला होता.राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्यासाठी आवर्जून उपस्थित होते. पदग्रहण कार्यक्रमासाठी पंचायत समिती कार्यालयाला फुलांनी सजविण्यात आले होते.मुख्य रस्त्यावर कमान करून तिथपासून सभापती कक्षापर्यंत फुलांचा सडा टाकण्यात आला होता. सभापती कक्ष व सभापती फलक,खुर्ची फुलांनी सजवली होती. कार्यालय फुलांनी सजवले
भाषा हे ज्ञान निर्मितीचे प्रमुख साधन आहे. ज्याला भाषेचा प्रभावी वापर करता येतो तो व्यक्ती विविध क्षेत्रांत यशस्वी होतो असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी केले. न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे स्मृतिकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, विश्वासराव काळे, उपप्राचार्य डॉ. संजय कळमकर, डॉ. अनिल आठरे, प्रा. पोपटराव काळे, अशोकराव काळे आदी उपस्थित होते. भगवान श्रीकृष्णाने आपल्या वक्तृत्वाच्या सामर्थ्यावर अर्जुनाची बाजू अत्यंत चातुर्याने कशी मांडली हे सांगून वक्तृत्वाच्या कौशल्यामुळे योग्य-अयोग्य ठरवण्याची ताकद निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारण, समाजकारण व सार्वजनिक जीवनात वक्तृत्वाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने बोलण्याचा सल्ला दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी मनोगत व्यक्त करताना कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांनी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची विस्तृत ओळख करून दिली. संस्थेच्या सदस्या अरुणा काळे यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. तर प्रा. मेधाताई काळे यांनी कै. ह. कृ. तथा बाळासाहेब काळे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. वैशाली भालसिंग यांनी करुन दिला. सूत्रसंचालन डॉ. अशोक गायकवाड यांनी तर आभार प्रा. राजेंद्र साबळे यांनी मानले. वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘जग तिसऱ्या महायुध्दाच्या छायेत’, ‘कृत्रिम बुध्दिमत्तेची शेती क्षेत्रातील भरारी’, ‘रिल्स संस्कृती’ असे विषय होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. शांतिलाल घेगडे व प्रा. रामदास कातकडे यांनी काम पाहिले. महाराष्ट्रातील विविध भागातून स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. मीना साळे, प्रा. निलेश लंगोटे, प्रा. निखिल गोयल, प्रा. अनिकेत डमाळे, प्रा. भागवत ठाकूर, प्रा. मयूर रोहोकले, प्रा. विजया कोळेकर, प्रा. किशोर ताके व प्रा. सुवर्णा कदम आदींनी परिश्रम घेतले. वक्तृत्व स्पर्धेत आकाश मोहितेला प्रथम क्रमांक या वर्षीचा ह. कृ. तथा बाळासाहेब काळे करंडक न्यू आर्ट्स कॉलेज, पारनेरचा विद्यार्थी आकाश मोहिते याने पटकाविला, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सी. टी. बोरा महाविद्यालय, शिरूर येथील विलास दसगुडे, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पी. एन. पी. महाविद्यालय, अलिबाग येथील पंकज पांडुळे तर उत्तेजनार्थ पारितोषिक निखिल बोडखे यांनी मिळविले.
भगवंताच्या नामस्मरणाने मानवी देह पवित्र होतो. जीवनातील साध्य गाठायचे असेल तर त्यासाठी योग्य साधनांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन हभप रामेश्वर महाराज राऊत यांनी केले. वद्य एकादशीनिमित्त सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा बुद्रुक येथे आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज तसेच सकल देवतांची पूजा व आरतीने करण्यात आली. सकाळी १० वाजता हभप रामेश्वर महाराज राऊत यांची कीर्तनरूपी सेवा पार पडली. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाये राम सर्वभावे या अभंगावर त्यांनी प्रभावी निरूपण केले. माणसाचे अंतिम साध्य सुख आहे. मात्र माणूस प्रपंचरूपी साधना निवडतो, जी अनेकदा दुःखाचे मूळ ठरते. त्यामुळे खऱ्या सुखासाठी भजन, नामस्मरण आणि सेवा हीच खरी साधना आहे. कलियुगात कीर्तन व भजन ही साधना सर्वात सोपी आणि प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले. परमार्थ करताना अहंकार नसावा, भक्ताच्या जीवनात मोह-ममता नसावी आणि मनुष्याने काम, क्रोध व लोभ या तीन विकारांचा त्याग करावा, असेही त्यांनी मार्गदर्शन केले. संतांना समाजाकडून अनेकदा अवहेलना आणि त्रास सहन करावा लागला. तरीही साधूचा स्वभाव हा समाजाचा त्रास सहन करण्याचा असतो. आपल्याकडून कुणाचे चांगले होत नसेल तरी हरकत नाही; पण आपल्या कृतीमुळे कोणाचे नुकसान होऊ नये. आपल्या प्रमाणे दुसऱ्याला पाहणे हा सर्वोच्च परमार्थ आहे, असे त्यांनी सांगितले. कीर्तनानंतर विविध प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा राऊत महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हिंदू समाजाकडे शत्रुबोध, इतिहास बोध आणि स्वयंबोध असला पाहिजे, इतिहासातून आपण शिकलो पाहिजे. धर्माचे पालन करणे सर्वांचे काम आहे. संतांनी जाती भेदाच्या पुढे जाऊन कार्य केले. वारकरी संत मध्ये सर्व जाती धर्माचे संत होते, असे प्रतिपादन सरला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. श्रीगोंदे शहरात विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूषण महाराज महापुरुष, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस,उपनगराध्यक् ष अलका अनभुले, नगरसेविका मीरा शिंदे,अनिल रामदासी, नगरसेवक वारकरी, भाविक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महंत रामगिरीजी महाराज म्हणाले, सनातन संस्कृती ही कधी नाश पावणारी नाही. सनातन हीच भारतीय संस्कृती आहे. अनेक परकीय आक्रमण आपल्यावर झाली पण सनातन संस्कृती टिकून आहे. हिंदू असंघटित असल्याचा फायदा आक्रमकांनी घेतला. सर्वांना एकत्रित करण्याचे काम संतानी केले.धर्म टिकवण्याचं काम संतानी केले.संत शेख महमद महाराज हे मुस्लिम असून वारकरी जीवन जगले ते पांडुरंगाचं भक्त होते. गझनीच्या मुहमदाने १७ वेळा सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. अशा अनेक आक्रमणांचा मारा होऊनही धर्म टिकून आहे. औरंगजेबचा भाऊ दारशुकोह हा उपनिषधाचा अभ्यासक होता. त्याला औरंगजेबाने मारले. इतिहासातून काही शिकलो नाही तर त्याची पुनरावृत्ती होते. याप्रसंगी संघाचे विभाग बौद्धिक प्रमुख कृष्णाजी घरोटे म्हणाले, समाज निर्माण करेल आणि हा समाज सर्व करील.संघ जीवनमान संघटना आहे. रोज समाज एकत्र येतो तो समाज सुसंघटित होतो. समाज परिवर्तनसाठी शक्ती गरजेची आहे. प्रास्ताविक डॉ.रविंद्र जंजिरे यांनी, सूत्रसंचलन श्रीपाद कुलकर्णी आणि आदित्य अनवणे यांनी तर आभार सुनील अनभुले यांनी मानले. चांगल्या विचाराच्या लोकांनीच पुढे यावे हिंदू धर्मात अनेक समाजसुधारक झाले. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्या प्रमाणे इतर धर्मातील समाज सुधारकांनी पुढे आले पाहिजे. प्रत्येक धर्मात चांगल्या वाईट विचाराचे लोक असतात पण वाईट बाजूला करण्यासाठी चांगल्या विचाराच्या लोकांनीच पुढे आले पाहिजे, असे आवाहन रामगिरी महाराज यांनी केले.
दहिगाव येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टमध्ये पदाधिकारी निवड आणि बँक खात्याच्या कारभारावरून वाद निर्माण झाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे पदाधिकारी निवड केल्याचा आरोप ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळावा, बँकेतील खाते क्रमांक ५१९४२ पूर्ववत करून सह्यांचे अधिकार पूर्ववत करावे या मागणीसाठी संबंधित विश्वस्त जिल्हा बँकेसमोर उपोषणास बसले. ट्रस्टचे अध्यक्ष नागेश वाघ, ट्रस्टचे विश्वस्त मधुकर म्हस्के, लक्ष्मण वाघ, अजिनाथ म्हस्के, संजय सावंत, गौतम हंबर्डे, महादेव म्हस्के, सचिन म्हस्के यावेळी उपस्थित होते. ट्रस्टची निवड धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार २२ डिसेंबर २०२३ रोजी केली होती. १४ जानेवारी रोजी पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली आणि १३ मार्च रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात बदल अर्ज दाखल केला. काही विश्वस्त बैठकांना गैरहजर राहिल्याने ९ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या सभेत पाच विश्वस्तांना कमी करण्याचा ठराव केला. दरम्यान, कमी केलेल्या विश्वस्तांनी नाराजी व्यक्त करत ट्रस्टमधीलच एका विश्वस्ताला सोबत घेऊन स्वतःचा गट तयार केला. त्यांनी ६ विश्वस्त असल्याचे दाखवत १५ डिसेंबर २०२४ रोजी पदाधिकारी निवड केल्याचे दर्शवून त्याचा बदल अर्ज ३१ डिसेंबर २०२४ रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केला व जिल्हा बँक दहिगाव शाखेतील ट्रस्टच्या बचत खात्याच्या सही नमुन्यांत बदल केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, खात्याचे व्यवहार बंद करण्याचे शाखाधिकाऱ्यांना कळवले. पैसे खात्यात टाकता येतील पण काढता येणार नाही, असे बँकेचे लिगल अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेच्या लाटेमुळे फळबागांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.विशेषतः डाळिंब बागांमध्ये फूल आणि फळगळती वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जुन्नर तालुक्यातील आळे येथील प्रगतशील बागायतदार सुधीर तानाजी लाड यांनी आपल्या दोन एकर डाळिंब बागेला शेडनेटचे संरक्षण कवच देत एक वेगळा प्रयोग केला आहे. या प्रयोगामुळे कडक उन्हाच्या झळांपासून फळांचे संरक्षण करण्याचा नवा पर्याय समोर आला आहे. मार्चच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील तापमान झपाट्याने वाढू लागले आहे.दिवसा कडक उन्हामुळे झाडांवरील कोवळी फुले आणि फळे करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.यामुळे डाळिंब बागायतदारांसह इतर फळ उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. यावर उपाय म्हणून लाड यांनी आपल्या बागेवर शेडनेटचे संपूर्ण आच्छादन घातले आहे. लाड म्हणाले, ढगाळ वातावरणामुळे आधीच कीड-रोग नियंत्रणासाठी औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.त्यात आता वाढत्या तापमानामुळे झाडे कोमेजण्याची आणि फळगळती होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाग वाचवण्यासाठी शेडनेटचा पर्याय स्वीकारावा लागला. हा उपाय खर्चिक असला तरी उन्हाच्या तीव्र झळा कमी करण्यास आणि बागेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होते. सध्या शेतकऱ्यांवर खत, औषधे आणि शेडनेटसारख्या अतिरिक्त उपायांचा मोठा आर्थिक भार पडत आहे. त्यातच बाजारात डाळिंबाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याची खंत लाड यांनी व्यक्त केली. दरम्यान, लाड यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या बागेला भेट देत आहेत.उन्हापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी शेडनेटचा पर्याय किती परिणामकारक ठरू शकतो,याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात डाळिंब आणि इतर फळबागांमध्येही अशा प्रकारचे आच्छादन करण्याचा विचार अनेक बागायतदार करत आहेत. उन्हापासून संरक्षणासाठी शेडनेटचे फायदे : झाडांवर थेट सूर्यप्रकाशाचा तडाखा कमी होतो,बागेतील आर्द्रता टिकून राहते,फूल व फळगळती कमी होण्यास मदत, फळांची गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागतो.
अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पतसंस्थांकडून बोगस ‘१०१’ वसुली दाखले देऊन कर्जदारांची लूट होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले. पारंपरिक संबळ, हलगी आदी वाद्यांच्या गजरात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष उत्तम पवार, युवा जिल्हाध्यक्ष राम कराळे, तालुका अध्यक्ष दत्ता वामन, पोपटराव दोंदे, विक्रम बेरड, संतोष खामकर, शिवराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जागरण-गोंधळ सादर करणारे शाहीर कान्हू सुबे, नारायण सौदागर, जगन्नाथ शिकारी, साहेबराव पाटोळे, लक्ष्मण सौदागर, संतोष शेलार, रावसाहेब दातीर आदींचाही सहभाग होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, जिल्ह्यातील काही पतसंस्थांनी ‘१०१’ वसुलीच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात दाखले वितरण केले आहे. एनपीएचे निकष डावलून खोट्या खात्यांच्या आधारे वाढीव रक्कम वसूल केली जात असून त्यामुळे कर्जदारांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या सर्व प्रकरणांचे फेरलेखापरीक्षण करण्यात यावे तसेच संबंधित संस्थांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणीही त्यांनी केली. अनेक संस्थांनी बोगस ‘१०१’ वसुली दाखले मिळवून संस्था आणि निबंधक कार्यालयाच्या आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. सहकार कायद्याचे नियम डावलून एनपीएचे निकष, वसुली अंमलबजावणीची नियमावली आणि इतर कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रकरणांत खोट्या खात्यांच्या आधारे वैयक्तिक कर्ज देऊन त्यावर एकाच वेळी ‘१०१’ दाखले काढून बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. काही संस्थांकडून संस्थेच्या नावाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे निधी व ठेवी गोळा केल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला. सहकार खात्याच्या नावावर खुलेआम निधी उभारून गुंतवणुकदारांची फसवणूक केली जात असल्याने या सर्व व्यवहारांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. संबंधित संस्थांचे परवाने तत्काळ रद्द करावेत वाहन कर्ज प्रकरणांतही नियमबाह्य पद्धतीने वाहन जप्त करून त्याची कायदेशीर प्रक्रिया न राबवता लिलाव केल्याचे प्रकार घडत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले. अनेक संस्थांनी ‘१०१’ दाखले आणि ‘१३८’ अंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणांची खाते-निहाय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित संस्थांचे परवाने तात्काळ रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बिबट्याचा हल्ला, युवक जखमी:इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा येथील घटनेने दहशत
इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा परिसरात २५ वर्षीय तरुणावर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. १६) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. कुलदीप पंडित असे जखमी तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप पंडित हे घराबाहेर गेले असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. प्रसंगावधान राखत त्यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; मात्र पळताना बिबट्याने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. लोकांची चाहूल लागताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला. जखमी कुलदीप पंडित यांना प्रथम कॅन्टोन्मेंट बोर्ड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, तेथे काही वेळ उपचार घेतल्यानंतर तेथून सुट्टी घेत सध्या साकूर फाटा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वन विभागाने तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. घटना सकाळी घडूनही वन विभागाचे अधिकारी सायंकाळपर्यंत घटनास्थळी न पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. साकूर फाटा परिसरात अलीकडे बिबट्याचा वावर वाढल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात होत्या. याकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बिबट्याचा हल्ला होऊनही विलंबाने पोहोचल्याने वन विभाग प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ^साकूर फाटा येथील घटनेची माहिती आम्हाला मिळाली आहे. मात्र, संबंधित जखमी युवक आमच्या संपर्कात आला नाही. जोपर्यंत पुढील अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत पुढील कारवाई करता येणार नाही. - दत्तू भोये, वनपाल, भंडारदरावाडी
नांदगाव विधानसभा मतदारसंघातील महिलांनी सक्षम व आत्मनिर्भर बनून जीवनमान उंचावण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. घराघरातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो. महिलांनी घराची जबाबदारी सांभाळत सर्वांगीण प्रगती साधावी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे यावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अंजुम कांदे यांनी केले. मनमाड नगरपरिषद व महिला-बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी, शिवसेना गटनेते महेंद्र शिरसाट, करूणा योगेश पाटील, महिला व बालकल्याण सभापती पूजा लालसरे, उद्योजिका स्वाती गुजराथी आदींसह नगरसेवक उपस्थित होते. प्रारंभी महिला व बालकल्याण सभापती पूजा लालसरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. उद्योजिका गुजराथी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत महिलांनी त्यांचे गुण अंगीकारल्यास समाजात मोठा बदल घडू शकतो, असे सांगितले. सावित्रीबाईंचा एक गुण जरी प्रत्यक्षात आणला तरी आपल्या जीवनात मोठी क्रांती घडू शकते, असे गुजराथी म्हणाल्या. नृत्यांकुर नृत्य संस्थेच्या संस्थापिका नेहा गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी विशेष आकर्षण म्हणून पैठणी लकी ड्रॉ काढण्यात आला. या लकी ड्रॉमध्ये भाग्यवान ठरलेल्या ११ महिलांना पैठणीचे वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पैठणी प्राप्त झालेल्या महिलांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. या उपक्रमामुळे उपस्थित महिलांचा उत्साह द्विगुणित झाला.
मातीशी नातं जपा; तीच तुमची ओळख:काकासाहेबनगर महाविद्यालयामध्ये स्वानंद बेदरकर यांचे प्रतिपादन
कलेचा उगम हा ग्रामीण भागातच होतो. तुम्ही ज्या मातीत श्वास घेता त्या मातीला कधीही विसरू नका. हीच माती तुमच्यावर संस्कार करत असते आणि तीच तुम्हाला जगात तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करून देते, असे प्रतिपादन व्याख्याते व कवी स्वानंद बेदरकर यांनी केले. ते काकासाहेबनगर येथील के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित के. के. वाघ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील लोकसाहित्याच्या संपत्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी लोकगीत सादर करत विद्यार्थ्यांची दादही मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ होते. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव यांनी विद्यार्थ्यांमधील क्रियाशीलता आणि प्रतिभा ओळखण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले. व्यासपीठावर समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य रामभाऊ पाटील, रघुनाथ कोल्हे, रामनाथ पानगव्हाणे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे आदी उपस्थित होते. शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांत विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पदके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सुनिता शिरसाठ यांनी केले तर आभार डॉ. प्रतिभा बाहेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
तहसील कार्यालयाच्या वतीने येथे महाराजस्व शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शासनाच्या तेरा विविध शासकीय विभागांच्या वतीने एकाच दिवशी ४१९ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये १५ वनपट्टेधारकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामण खोसकर हे होते. यावेळी तहसीलदार गणेश जाधव, रवींद्र भोये, हिरामण जाधव, पुंडलिक साबळे, गोकुळ बत्तासे, राहुल शार्दुल आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये नागरिकांना मार्गदर्शन व प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल्स् लावण्यात आले होते. पोषण आहार, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, महिला बालकल्याणच्या योजनांची माहिती, निबंधक विभाग स्टॉलवर सहकारी संस्थांची नोंदणी, पीक कर्ज वाटप प्रक्रिया आणि विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात आले. कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, अशा शिबिरांचा लाभ कागदावर न दाखवता प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत व्यक्त करून शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र भोये यांनी सरकारला घरचा आहेर दिला. अध्यक्षीय भाषणात आमदार हिरामण खोसकर यांनी शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचतात. तसेच या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक विभागाने लाभार्थ्यांना योग्य लाभ मिळावा, यासाठी महसूल विभागासह सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असा आदेश दिला. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिबिरात उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, सातबारा वाटप व फेरफार नोंदी दुरुस्ती, शेतकरी योजना, पीक विमा माहिती, नवीन बी-बियाणे व खत मार्गदर्शन, मृदा आरोग्य पत्रिका वाटप, अनुदानित कृषी अवजारे (ट्रॅक्टर, नांगर, फवारणी यंत्र) यांची माहिती, नवीन आधार नोंदणी, पत्ता/नाव/मोबाईल क्रमांक बदल व अद्ययावत करणे, बायोमेट्रिक अपडेट या सुविधांचा समावेश होता.

25 C