महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आणि दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारपासून (२१ जानेवारी) अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार असून, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उघड बंड केले होते. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम गुजरात व तेथून गुवाहाटीला प्रयान केले होते. शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला. त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासोबतच, शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयालाही शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले असून, या दोन्ही याचिकांवर आता बुधवारी एकत्र सुनावणी होणार आहे. सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये मागील सुनावणी झाली होती. त्या सुनावणीवेळीच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करत, प्रकरणाचा निकाल लवकरच दिला जाईल, असे संकेत दिले होते. त्यावेळी न्यायालयाने 21 व 22 जानेवारीला सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेऊ, याव्यतिरिक्त दुसरे प्रकरण सूचिबद्ध केले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाने कोर्ट मास्टरना दोन्ही दिवशी इतर प्रकरण कार्यतालिकेत सूचिबद्ध न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘राष्ट्रवादी’ आणि 'घड्याळ' बाबत सुनावणी दुसरीकडे, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हाचा वादही सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष व चिन्हाबाबत याचिका दाखल केली असून, अजित पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिलं आहे. शिवसेनेच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. आता जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचदरम्यान शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अंतिम सुनावणीला वेग मिळणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता बिहार सरकारची ठळक आणि भक्कम उपस्थिती दिसणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, हा प्रकल्प केवळ एक इमारत नसून बिहारच्या प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीचा नवा अध्याय ठरणार आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या लाखो बिहारवासीयांसाठी हे भवन एक महत्त्वाचे आधारकेंद्र ठरणार असल्याचं मानलं जात आहे. प्रस्तावित बिहार भवन हे 30 मजली असणार असून, बेसमेंटसह इमारतीची एकूण उंची सुमारे 69 मीटर इतकी असेल. ही इमारत अत्याधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, आधुनिक शहरी नियोजन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आधुनिकतेसोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. या भव्य इमारतीत सौर पॅनेल बसवण्यात येणार असून, ऊर्जेच्या गरजांसाठी नवीकरणीय स्रोतांचा वापर करण्यात येईल. पाण्याच्या पुनर्वापरासाठी अत्याधुनिक एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय, इमारतीभोवती हिरवळीचे क्षेत्र विकसित करण्यात येणार असून, हा प्रकल्प ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेनुसार उभारला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणीय जबाबदारी जपत आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा बिहार सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतो. दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवरच मुंबईतील हे भवन देखील सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे. या इमारतीत बिहार सरकारच्या विविध विभागांची कार्यालये, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र विभाग, तसेच बैठका आणि कार्यक्रमांसाठी 72 आसनांची अत्याधुनिक सभागृहे असतील. याशिवाय, अधिकाऱ्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी आधुनिक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या बिहार सरकारच्या अधिकाऱ्यांना तसेच राज्याशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठी सोय होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारितील एलफिंस्टन एस्टेट परिसरात उभारला जाणार आहे. यासाठी सुमारे 0.68 एकर म्हणजेच 2952.77 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलं आहे. इतक्या मोक्याच्या ठिकाणी बिहार भवन उभारल्यामुळे मुंबईतील प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रांशी बिहार सरकारचा थेट संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 314.20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च बिहार सरकारकडून करण्यात येणार आहे. एक महत्त्वाचं संपर्क आणि मदतकेंद्र मुंबई ही रोजगार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि उपचार यासाठी देशभरातील लोकांचं प्रमुख केंद्र आहे. बिहारमधील हजारो विद्यार्थी, कामगार, उद्योजक आणि रुग्ण दरवर्षी मुंबईत येत असतात. अशा परिस्थितीत, बिहार भवनामुळे या नागरिकांना निवासाची सोय, शासकीय मार्गदर्शन, तसेच विविध प्रकारच्या सहकार्याची सुविधा एका छताखाली मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या बिहारवासीयांसाठी हे भवन एक महत्त्वाचं संपर्क आणि मदतकेंद्र ठरणार आहे. मुंबईत बिहार सरकारची उपस्थिती अधिक बळकट दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, एलफिंस्टन एस्टेट परिसरातील सीमा भिंतीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईत बिहार सरकारची प्रशासकीय उपस्थिती अधिक बळकट होणार असून, बिहार राज्याच्या विकासात्मक धोरणांना राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा देणारा ठरणार आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या करड्या शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यामु्ळे ते कोणत्याही कार्यक्रमासाठी जात असताना तेथील आयोजक सर्वकाही ठिकठाक आहे की नाही याची दहावेळी तपासणी करतात. पण अनेकदा काही ना काही तरी राहून जाते आणि मग अजित पवार संबंधितांची चांगलीच कानउघाडणी करतात. असाच प्रकार आज पुण्यातील एका बैठकीपूर्वी घडला. त्याचे झाले असे की, अजित पवार सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. ते नियोजित भेटींसाठी आज सकाळीच पुण्यातील बारामती हॉस्टेलवर धडकले. ते येणार म्हणून कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा व भेटीसाठी आलेले नागरीक तिथे गोळा झाले होते. पण एवढी गर्दी असूनही हॉस्टेलच्या कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले नव्हते. कार्यालयाचे दार बंदच होते. तेवढ्यात अजित पवारांचा ताफा हॉस्टेलवर पोहोचला. तेव्हाही दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे अजित पवारांवरही काही वेळ ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. अखेर पीए व कर्मचाऱ्यांवर संतापले राज्याचा उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री बारामती हॉस्टेलच्या बाहेर उभे असूनही दरवाजा उघडत नव्हता. अखेर हा प्रकार पाहून अजित पवारांचा पारा चढला. त्यांनी तिथे उपस्थित कर्मचारी व कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पीएलाही बोलावून या प्रकाराची विचारणा केली. कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना आत बसू का दिले नाही? कार्यालय कशाला बंद ठेवले? चावी आणायला त्रास होत आहे का? अशा कडक शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांचा हा रौद्रावतार पाहून उपस्थित कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अखेर घाईघाईने कार्यालय उघडण्यात आले. त्यानंतर अजित पवार आत गेले व पुढील कार्यक्रम सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अजित पवार बारामती हॉस्टेलच्या बाहेर पांढऱ्या पेहरावात उभे असल्याचे व कर्मचारी दार उघडताना कावरेबावरे झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांना पुणे, पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत धक्का उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत जबर झटका बसला आहे. या दोन्ही महापालिका त्यांच्या हातून गेल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले होते. पण त्याची कोणतीही जादू पुण्याच्या मतदारावर दिसून आली. त्यांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर थेट टीका केली. त्यानंतर महेश लांडगे यांनी अजित पवारांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महेश लांडगे यांची साथ दिली. यामुळे अजित पवारांना योग्य तो संदेश मिळाला. या घडामोडींनंतर आता अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करून जिल्हा व नगरपंचायतीच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीसाठी एकीकडे आनंदाची लाट असताना, दुसरीकडे एका मोठ्या महानगरपालिकेत सत्तेला हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईसह अनेक महापालिकांवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता स्थापन केली असली, तरी नागपूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या 40 नगरसेवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पुढील 48 तासांत या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास नागपूर मनपात पुन्हा पोटनिवडणुकांचा सामना करावा लागू शकतो. नागपूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. एकूण 151 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत 102 जागांवर विजय मिळवला आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसने 35 जागा जिंकत दुसरा क्रमांक मिळवला, तर एमआयएमने 6, मुस्लीम लीगने 4, ठाकरे गटाने 2 जागा जिंकल्या. याशिवाय अजित पवार गट आणि बसपाला प्रत्येकी एक जागा मिळाली. या निकालामुळे नागपूरमध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित मानली जात असतानाच, आता या 40 नगरसेवकांवरील अपात्रतेची टांगती तलवार भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. या संपूर्ण वादाचं मूळ ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहे. नागपूर महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गातून 40 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, एकूण आरक्षणाची टक्केवारी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे या 40 नगरसेवकांच्या निवडीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर मानली जात असून, या निवडणुका घटनात्मक चौकटीत बसतात की नाही, याचा फैसला न्यायालयाला करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, 2021 साली न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या ऐतिहासिक निकालात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती. त्या निकालानुसार, एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही, असा स्पष्ट आदेश आहे. जर या निर्णयाचा थेट आधार घेतला गेला, तर नागपूरसह चंद्रपूर महानगरपालिकेतील आरक्षणाच्या आधारे निवडून आलेल्या जागांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा मुद्दा केवळ नागपूरपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. या प्रकरणी 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय नेमका कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचे मान्य करत निवडणुका रद्द केल्या, तर नागपूर महानगरपालिकेतील 40 जागांवर पुन्हा पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. यामुळे भाजपचे संख्याबळ कमी होऊ शकते आणि मनपातील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. काही कायदेतज्ज्ञांच्या मते, असा निर्णय झाल्यास त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू शकतात. राज्यातील अनेक नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील ओबीसी आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. परिणामी, अनेक ठिकाणी निवडणुका रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी लागण्याची वेळ येऊ शकते. ही परिस्थिती प्रशासकीय यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरेल, तसेच राजकीय अस्थिरतेलाही खतपाणी घालणारी ठरू शकते. पुढील दिशा निश्चित करणारा निकाल मात्र, याचबरोबर काही तज्ज्ञ असा अंदाज व्यक्त करत आहेत की, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने आणि प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालय या निवडणुकांना एकदाच दिलेला अपवाद, म्हणून वैध ठरवू शकते. मात्र, भविष्यातील निवडणुकांसाठी आरक्षणाची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे कडक निर्देश दिले जाऊ शकतात. त्यामुळे 21 जानेवारीचा निकाल केवळ नागपूरमधील 40 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ठरवणार नाही, तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण धोरणाची पुढील दिशा निश्चित करणारा ठरणार आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. विशेषतः ज्या मंत्र्यांकडे आणि आमदारांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांच्या सुमार कामगिरीवर मुख्यमंत्री प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देताना ही त्यांच्यासाठी 'लिटमस टेस्ट' असल्याचे संकेत दिले होते. मात्र, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर यांसारखे बालेकिल्ले वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालेले नाही. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी नेत्यांची पकड सैल असल्याचे दिसून येत आहे. या अकार्यक्षमतेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे 'भाकरी फिरवण्याच्या' तयारीत असून, लवकरच काही मंत्र्यांची सुट्टी होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदेंच्या या हालचालींमुळे पालिका पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांची गटबांधणी आणि मंत्रिमंडळातील चेहरा-फेर यांमुळे पुढील काही आठवड्यांत राज्याच्या राजकीय वर्तुळात लक्षणीय हालचाल दिसू शकते. गटनेते निवडीसाठी अनुभवी नावांची चर्चा एकीकडे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे नवनिर्वाचित नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिकेत आज शिवसेनेच्या अधिकृत 'गटाची' स्थापना केली जाणार आहे. या गटनेते पदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांच्यासारख्या अनुभवी आणि तरुण नावांची चर्चा सुरू आहे. आजच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगरसेवक फुटणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. 'ताज' हॉटेलमधील पॉलिटिक्स आणि सुरक्षा चक्र नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर आता त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर गट नोंदणी करण्यावर भर दिला जात आहे. जोपर्यंत पालिकेत सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ही 'हॉटेल वारी' सुरूच राहणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या या हालचालींमुळे मित्रपक्ष भाजप आणि विरोधक ठाकरे गट यांच्यातही खळबळ उडाली आहे. हे ही वाचा… उल्हासनगरमध्ये 'वंचित'ला मोठा धक्का!:दोन नगरसेवकांचा शिंदे सेनेला पाठिंबा, उपमुख्यमंत्र्यांना भेटून पाठिंब्याचे पत्र सुपूर्द उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या समीकरणांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा…
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत वारंगाफाटा शिवारात नांदेड परिक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने सोमवारी ता. १९ पहाटे चार वाजता छापा टाकून तीन वाहनांसह २४.६७ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्हयात अवैध व्यवसायासोबतच गुटखा विक्री, अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकासह नांदेड परिक्षेत्रातचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून अवैध व्यवासायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहे. या शिवाय नागरीकांनीही माहिती द्यावी यासाठी ‘खबर’ हि संकल्पना देखील हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत वारंगाफाटा शिवारात तीन वाहनांमधून गुटखा आणून तो आखाडा बाळापूर व परिसरात पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दशरथ तलदेवार, जमादार प्रदीप खानसोळे, संजीव जिंतकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांच्या पथकाने आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वारंगाफाटा शिवारात पाहणी केली. यावेळी एका काँम्प्लेक्स जवळ दोन पीकअप व एक महिंद्रा टीयूव्ही वाहन उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या दोघांची चौकशी सुरु केली असता त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पोती आढळून आली. दरम्यान, पोलिसांनी तीन वाहने ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणली. वाहनातील पोत्यांमध्ये राजनिवास, विमल, मुसाफीर, जाफराणी दर्जा नावाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी तीन वाहनांसह गुटख्याची पोती असा २४.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरमी करण अवचार, प्रभाकर अवचार (रा. भोसी, ता. कळमनुरी) यांना ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पडद्यामागे संवाद सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या संभाव्य चर्चांचा केंद्रबिंदू म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न. मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीत भाजपला शिंदे गटावर पूर्णपणे अवलंबून राहावं लागू नये, यासाठी ठाकरे गटाशी एक वेगळी रणनीती आखली जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या चर्चांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे तो म्हणजे महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहण्याची शक्यता. जर असं घडलं, तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्यामुळे भाजपचा उमेदवार थेट महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल. यालाच राजकीय वर्तुळात 2017 सालाची परतफेड म्हणून पाहिलं जात आहे. मात्र या चर्चांवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट शब्दांत आक्षेप घेतला असून, ठाकरे गटासोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महापौरपदाबाबत कोणतीही बोलणी झालेली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे एकीकडे सूत्रांकडून चर्चांची माहिती समोर येत असताना, दुसरीकडे दोन्ही बाजूंनी अधिकृत नकार दिला जात असल्याने या संपूर्ण प्रकरणावर सस्पेन्स कायम आहे. मात्र, मुंबईच्या राजकारणात जेव्हा अशा चर्चांना हवा मिळते, तेव्हा त्यामागे काहीतरी घडामोडी सुरू असतात, अशी धारणा अनुभवी राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर 2027 सालातील महापौर निवडीची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्या वेळी भाजपकडे संख्याबळ असूनही, ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी भाजपने माघार घेतली होती. भाजपने सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेत पहारेकरीची भूमिका स्वीकारली होती. इतकंच नव्हे, तर भाजपने विरोधी पक्षनेतेपदही न स्वीकारल्यामुळे ते पद काँग्रेसकडे गेलं होतं. आज पुन्हा तशीच रणनीती वापरली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या निवडणूक निकालांकडे पाहिल्यास, मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनासाठी 114 नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपचे 89 आणि शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले असून, दोघांची बेरीज 118 होते. दुसरीकडे ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक आहेत. या आकड्यांवरून स्पष्ट होतं की, भाजपला सत्तास्थापनासाठी शिंदे गटाची मदत अपरिहार्य आहे. हीच बाब एकनाथ शिंदे यांना ताकद देते आणि त्यामुळेच अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी शिंदे गटाकडून होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदेंची मुंबईत जोरदार हालचाल सुरू झाली आहे. नगरसेवकांची संभाव्य फूट टाळण्यासाठी शिंदे गटाकडून वेगाने पावलं उचलली जात आहेत. आज शिंदे शिवसेनेच्या नव-निर्वाचित नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन केला जाणार असून, त्यासाठीची सर्व कायदेशीर आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. गट नेत्यांच्या यादीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या तरुण आणि अनुभवी नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत. प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास धोका कमी राजकीय जाणकारांच्या मते, गट स्थापन करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास नगरसेवक फुटीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळेच शिंदे गटाकडून ही प्रक्रिया तातडीने राबवली जात आहे. एकीकडे ठाकरे-भाजप चर्चांची कुजबुज आणि दुसरीकडे शिंदेंची धावपळ, यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार, हा प्रश्न केवळ संख्याबळाचा न राहता रणनीती, विश्वासघात आणि राजकीय शह-काटशहाचा बनत चालल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
सुप्रसिद्ध विधिज्ञ असिम सरोदे यांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये चोरी झाली आहे. चोरांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात असणारी चंदनाची 2 झाडे तोडून नेली आहेत. या घटनेचा पुणे पोलिस तपास करत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, वकील असिम सरोदे यांचे पुण्यातील डेक्कन परिसरात भांडारकर रोडवर कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयापुढे चंदनाची 2 झाडे होती. त्यांचे वय अंदाजे 15 वर्षांच्या आसपास होते. चंदन चोरांनी आज सोमवारी पहाटे 3.30 च्या सुमारास या कार्यालयात प्रवेश करून ही दोन्ही झाडे तोडून नेली. ही झाडे तोडून नेईपर्यंत या कार्यालयाच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याची माहिती मिळाली नाही. आज सकाळी हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर या प्रकरणी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कार्यालयाच्या कुंपण भिंतीला चिकटून असणारी 2 झाडे तोडून नेण्यात आल्याचे दिसून येत आहे. डेक्कन परिसरात अनेकदा घडल्या घटना उल्लेखनीय बाब म्हणजे डेक्कन परिसरात चंदन चोरी होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे असीम सरोदे यांनी पोलिसांकडे झाडांच्या सुरक्षेबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी आली आहे. महागडच्या गाड्यांतून आलेल्या काही चोरट्यांनी ही झाडे तोडून नेल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिस या चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. चंदन चोरांनी एका वकिलाच्याच कार्यालयात ते ही असीम सरोदेंसारख्या चर्चित वकिलाच्या कार्यालयातच डल्ला मारल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोण आहेत असीम सरोदे? असीम सरोदे हे एक नामवंत वकील आहेत. त्यांचा भारतीय संविधान व कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. ते सातत्याने राज्यासह देशभरातील विविध सामाजिक व राजकीय मुद्यावर आपले परखड मत मांडत असतात. मानवी हक्कांवरही त्यांचा सखोल अभ्यास आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण बार असोसिएशनचे ते पुण्याचे अध्यक्ष आहेत. ते सध्या शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आपली बाजू मांडत आहेत. एवढेच नाही तर संसदेत घुसखोरी करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या घटनेतील आरोपी असणाऱ्या अमोल शिंदे नामक तरुणालाही ते कायदेशीर मदत पुरवत आहेत. हे ही वाचा… फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने राजकारण सोडले:'आता मला थांबायचंय' म्हणत संदीप जोशी यांचा तडकाफडकी राजकीय संन्यास भाजप नेते तथा विधानपरिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर तथा निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा कथित अन्याय यावर परखड मत व्यक्त करत 13 मे रोजी आपल्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने राजकारण सोडणे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. वाचा सविस्तर
भाजप नेते तथा विधानपरिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर तथा निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा कथित अन्याय यावर परखड मत व्यक्त करत 13 मे रोजी आपल्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने राजकारण सोडणे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. खाली वाचा संदीप जोशींचे पत्र जशास तसेच आमदार संदीप जोशी आपल्या पत्रात म्हणतात, नमस्कार, हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे. आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे. मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणे आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणे हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे. माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन. राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो. राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली. हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरू राहील. कोरोनाच्या काळात एकल पालकत्त्व नशिबी आलेल्या बहिणींसाठीचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, मोहगाव झिल्पी येथील गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे सामाजिक प्रकल्प, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन, खासदार क्रीडा महोत्सव या क्रीडा क्षेत्रातील विविध पदांना न्याय देईन, तरुण खेळाडूंसोबत उभा राहून त्यांना प्रोत्साहन देईन. काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच राहतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि तोच निर्णय आज मी घेतला आहे. कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले. मला घडवले. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत राजकारणात अनेक संधी दिल्या. या सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत सन्मान दिला. याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शीर्षस्थ नेतृत्वाचा कायम ऋणी राहीन. राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो. मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच अधिक काही न बोलता, आज मी हा निर्णय घेत आहे. शेवटी एवढेच… _*कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ,*__*शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ।*__*किसी और की राह रोशन हो सके,*_*_इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।*_ आता मी थांबतोय. धन्यवाद मित्रांनो, असे संदीप जोशी यांनी म्हटले आहे.
मुंबईत महापौर बसवणे सहज शक्य नाही:भाजप विजयोत्सव करत असला, तरी त्यांचा विजय झालेला नाही - संजय राऊत
मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत, याचा अर्थ मुंबईचा महापौर कोण असावा हे दिल्लीतून आधीच ठरवण्यात आले आहे. यामध्ये केवळ भाजपच नाही, तर गौतम अदानी सुद्धा निर्णय घेणार आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईकरांनी दिलेले आकडे पाहता महापौर बसवणे इतके सोपे नाही, असेही ते म्हणाले. शिवाय महापौरपदासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त संजय राऊत यांनी फेटाळून लावले. मोदी आपल्या भाषणात म्हणतात की, ज्या मुंबईत काँग्रसेचा जन्म झाला, त्या मुंबईत काँग्रेसचा आम्ही पराभव केला. मोदी यांना राजकीय इतिहासाचे भान नाही. गेली किमान २५ वर्षे या मुंबईवर शिवसेनेचेच राज्य आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रात जरी असली, तर मुंबईत शिवसेना होती. तेव्हा मोदींचे भाषण लिहिणाऱ्या माणसांच्या इतिहासाचे भान कच्चे आहे, असे संजय राऊत म्हणाले. आम्ही सध्या मजा बघतोय महापौर पदाच्या शर्यतीत उबाठा पक्ष आहे की, विरोधी पक्षात बसण्याचे ठरवलंय? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, अजुन आम्ही काहीच ठरवले नाही. आता आम्ही फक्त मजा बघत आहोत. कुणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे भाजपच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी हलवत आहेत. कोण कोणाला घाबरतंय? सरकार त्यांचे आहे. मुख्यमंत्री दावोसमध्ये बसून मुंबईकडे लक्ष ठेवत आहेत. आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. त्यांची बैठक मातोश्रीवरच होत आहे. पण तुमचे मुंबईतील, केडीएमसीतील नगरसेवक डांबून का ठेवावे लागले? याचे उत्तर शिंदेनी द्यायला पाहिजे. कदाचित मराठी पंतप्रधान बनतोय… संजय राऊत पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीसांचे दावोसमध्ये पंतप्रधानांसारखे स्वागत करण्यात आले. ही चांगली गोष्ट आहे. एका मराठी माणूस म्हणून फडणवीस यांची पंतप्रधानपदाकडे पावले पडत असतील, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी दिल्लीत जावे, पंतप्रधानपदावर दावा ठोकावा. महानगरपालिका, नगरपालिका जिंकल्या. दावोसमध्ये त्यांचे प्रचंड स्वागत झाले. कोणत्या मुख्यमंत्र्यांचे अशाप्रकारचे स्वागत मी आतापर्यंत पाहिले नाही. नवीन प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्यात की, देशाला मराठी पंतप्रधान मिळतो.” ठाकरे अन् फडणवीसांची कोणतीही चर्चा नाही मुंबईच्या महापौरपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या वृत्तपत्रातील बातम्या आहेत. आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही. शिंदेंसाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू एकनाथ शिंदेंना महापौरपदासाठी दिल्लीतून चावी लावली जात आहे. मुंबईत भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा महापौर होऊ नये, यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
प्रतिनिधी | दर्यापूर आजचा काळ प्रचंड स्पर्धेचा आहे. या स्पर्धेत टिकणे हे फार मोठे आव्हान आहे. त्यासाठी लागते कठोर मेहनत. सातत्यपूर्ण अभ्यास याची ज्या विद्यार्थ्यांची तयारी आहे, त्याला यश नक्की मिळते. म्हणून कठोर व सातत्यपूर्ण मेहनतच स्पर्धा परीक्षेत यशस्वी करू शकते असे प्रतिपाद जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी केले. शहरातील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित स्व.बाबासाहेब सांगळूदकर स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प स्पर्धा ‘परीक्षा आव्हान व उपाय’ या विषयावर भाकरे बोलत होत्या.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. प्रभाकर कोलखेडे, दुसऱ्या वक्त्या म्हणून मोर्शीच्या सहाय्यक निबंधक स्वाती गुडधे, तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास व शाळा समितीचे सदस्य डॉ.वसंत टाले, शिवाजी देशमुख नरेंद्र लढ्ढा, शेषराव काळे, प्राचार्य डॉ.अतुल बोडखे, समन्वयक प्रा.डॉ.मिलिंद भिलपवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा.राजेश तायडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा.प्रभाकर कोलखेडे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेत जबाबदारीने विद्यार्थी जीवनाची वाटचाल करून जीवन सार्थकी लावले पाहिजे. असे आवाहन केले. दरम्यान प्रमुख वक्त्या वर्षा भाकरे व स्वाती गुडघे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेची लेखी सराव चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची माहिती देऊन विद्यार्थ्यांसाठी त्याची उपयुक्तता मांडली. पाहुण्यांच्या परिचय प्रा.निलय अढाऊ यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.राजेश बुरंगे यांनी तर आभार प्रा.डॉ.तुषार वानखडे यांनी मानले. स्वागत गीत व गौरव गीत प्रा.डॉ.सुरेंद्र शेजे, प्रा.डॉ.राजेश उमाळे व विद्यार्थी यांनी सादर केले. या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य, पत्रकार, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सहायक निबंधक स्वाती गुडधे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. शिस्त, अचूक नियोजन व सातत्यपूर्ण अभ्यास तसेच या दरम्यान येणारे विविध अडथळे यावर मात करून जे विद्यार्थी प्रयत्नपूर्वक कार्यरत राहतात, तेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. असे मार्गदर्शन केले. त्यांनी या प्रवासातील अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
आता जि. प. मध्येही वॉर रुम:सर्व अधिकाऱ्यांशी संवाद सुरू
प्रतिनिधी | अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर आता जिल्हा परिषदेतही ‘वॉर रुम’ उघडण्यात आली आहे. या वॉर रुम च्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि पंचायत समिती स्तरावर कार्यरत बीडीओंना एकमेकांशी जोडण्यात आले असून, त्यांच्याशी संवादाची देवाण-घेवाण सुरू झाली आहे. एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्याची वेळ आली किंवा एखादी सूचना एकाचवेळी सर्वांपर्यंत पोहोचवण्याची वेळ उद्भवली की पूर्वी फोन कॉल अथवा मेलचा वापर केला जायचा. आता वॉर रुम तयार झाल्याने अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणे शक्य झाले असून, हवी ती उपाययोजना त्वरेने अंमलात आणणे शक्य झाले आहे. सीईओ यांच्यासह जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विभागांचे डेप्युटी सीईओ या वॉर रुमचा उपयोग करीत असून, त्यामुळे प्रशासनाला अधिक दक्ष व लोकांप्रती उत्तरादायी केले जात आहे.जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून ही वॉर रुम सुरू झाली असून, त्यांच्याच हस्ते या उर्वरित. पान ४
स्वच्छता, सुंदरता, पुनर्वापर या तत्त्वावर कुष्ठरुग्णांची सेवा करणारे विदर्भ महारोगी सेवा संस्थान, तपोवन येथे शेण, पालापाचोळा, काड्या, कचऱ्यातून यंत्राद्वारे पर्यावरणपूरक लाकडाची निर्मिती केली जात आहे. यातून कुष्ठ मुक्त बांधवांना दिवसाला ५०० रु. रोजगार मिळत आहे. तपोवन येथे गोशाळा असून, तेथे ७० गायी- म्हशी आहेत. त्यापासून दिवसाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेण मिळते. ३८८ एकर अशा विस्तीर्ण परिसरात या संस्थेची व्याप्ती असून, येथे १ लाखापेक्षा जास्त विविध प्रजातींची झाडे आहेत. त्यांचा पालापाचोळा दररोज मोठ्या प्रमाणात गोळा केला जातो. त्यामुळे स्वच्छता राहते. हा पाला-पाचोळा, लहान काड्या, भुसा न जाळता एकत्र करून तो शेणात मिसळला जातो. गोशाळेत बसवलेल्या यंत्राद्वारे लाकडाची निर्मिती होते. यासाठी काम करणाऱ्या कुष्ठ मुक्ताला दिवसाला ५०० रु. रोजगार मिळतो. कुष्ठ रुग्णांच्या सेवेसाठी शहरातील तपोवन परिसरात पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांनी उभारलेल्या विदर्भ महारोगी सेवा संस्थानात कुष्ठरोगातून बरे झालेल्या (कुष्ठमुक्त) बांधवांना रोजगार मिळावा, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत कुष्ठरुग्णांवर नि:शुल्क उपचार करणारे रुग्णालय, केनिंग, सागवानी लाकूड व स्टीलपासून निर्मित फर्निचर, गोशाळा, शेती, झाडांची मशागत, सतरंजी, चादरींची निर्मिती, प्रिंटींग प्रेस चालवली जाते. यासाठी शासनाकडून निधी मिळत नाही. ७० आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा काढली असून, तेथे त्यांना नि:शुल्क शिक्षण दिले जात आहे. त्यांचा खर्च विदर्भ महारोगी सेवा संस्थेद्वारे केला जातो. शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत वेतन मिळते. रोजगार देणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून आता शेणापासून उर्वरित. पान ४ ^शहरातील हिंदू तसेच विलासनगर येथील स्मशानभूमीला मृतदेहांवर अंत्य संस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाची आवश्यकता भासते. त्यांना आम्ही गोवऱ्या पुरवतो. मात्र, भविष्यात शेणापासून निर्मित लाकडाचे उत्पादन वाढवून ते लागत मुल्याच्यापेक्षा किंचित जास्त मुल्यावर दोन्ही स्मशानभूमींना पुरवण्याची भविष्यातील आमची योजना आहे. यामुळे झाडांची कत्तल काही प्रमाणात कमी होईल. -प्रा. डॉ. सुभाष गवई, अध्यक्ष, विदर्भ महारोगी सेवा संस्था, तपोवन.
पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच, आज पहाटे मालेगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून मालेगावकडे येणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स आणि समोरून जाणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. तसेच बसमधील २० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. पुण्याहून प्रवाशांना घेऊन मालेगावकडे निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स वेगात असताना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाशी तिची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, पिकअप वाहन थेट बसच्या पुढील भागामध्ये घुसले. या धडकेत बसच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि गोंधळ उडाला. या घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, हे सर्व मालेगाव येथिल रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. मदतकार्य आणि जखमींवर उपचार अपघाताचा आवाज ऐकताच वऱ्हाणे गावातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मालेगाव पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कार आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. गंभीर जखमी असलेल्या दोन प्रवाशांसह इतर किरकोळ जखमींना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चालकाला डुलकी किंवा धुक्यामुळे अपघात? या भीषण अपघातामुळे मालेगाव-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने साहाय्याने बाजूला केल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, दोन्ही वाहनांच्या वेगाबाबत आणि चालकाच्या चुकीबाबत तपास सुरू केला आहे. पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्यामुळे किंवा धुक्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे ही वाचा… सत्यनारायणाच्या पूजेसाठी जाणाऱ्या रोहिल्यातील प्रौढाचा रस्त्यात मृत्यू:दुचाकी घसरून झालेल्या अपघातात जागीच ठार वैजापूर तालुक्यातील गारज येथील टोलनाक्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. किर्तीकांत रामचंद्र कुलकर्णी (४५, रा. रोहीला बु. जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. सविस्तर वाचा…
प्रतिनिधी | मूर्तिजापूर अवैध कत्तल आणि गोवंशीय प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात माना पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत जोरदार धडक देत मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पहाटेच्या अंधारात टाकण्यात आलेल्या छाप्यात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेले ५ गोवंशीय बैल पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले. या प्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उबळ उडाली आहे. या प्रकरणी अपराध क्र. २०/२०२६ अन्वये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ९, ११ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारे अधिनियम १९६० चे कलम ११(१) (अ) (फ) (ह) (आय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या गोवंशीय बैलांची अंदाजे किंमत १ लाख १६ हजार रुपये इतकी आहे. माना पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैध कत्तली करणारऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा कारवाया अधिक तीन केल्या जातील, असा इशारा ठाणेदार गणेश नावकार यांनी दिला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश नावकार, मनोहर इंगळे, मंगेश इंगोले, पोलिस कॉन्स्टेबल सुशील आठवले, प्रमोद हिवराळे, मंगेश पवार, ललिता बनचरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४.१० ते ४.५० वाजेच्या सुमारास माना येथील इदगाहच्या मागील बाजूस ही थरारक कारवाई पार पडली. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पाहणी केली असता, गोवंशीय बैलांना आखूड दोराने घट्ट बांधून, हालचालही करता येणार नाही, अशा अवस्थेत ठेवण्यात आल्याचे आढळून आले. थंडीमध्ये वेदना सहन करत असलेले हे मुके प्राणी कत्तलीसाठीच ठेवले होते.
जुने शहरात कर्ता हनुमान मंडळातर्फे आरोग्य तपासणी शिबिर:८७ गरजूंनी घेतला लाभ
प्रतिनिधी | अकोला जुने शहरात कर्ता हनुमान मंडळातर्फे रविवारी आरोग्य शिबिर आयोजित येते. गत १५ वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येतो. त्यानुसार १८ जानेवारी सकाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात प्रारंभी ८७ गरजूंनी लाभ घेतला. शिबिरात डॉ. विवेक गोतमारे बालरोग तज्ञ यांनी १६ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला. रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शस्त्रक्रिया दम्माणी नेत्र रुग्णालयात करण्यात येणार आहे. शिबिरात अन्य डॉक्टरांनी ७० रुग्ण तपासून औषधोपचार केला. डॉ. प्रकाश मेटागे यांनी रुग्णांची तपासणी केली. पुढील रविवारी आयुर्वेदिक तज्ञही उपचार करणार आहेत. शिबिरात ज्ञानदेव बदरखे, गजानन धरमकर यांनी सेवा दिली. विठ्ठल चिकटे, संजय वेध यांनी नोंदणी केली सूत्र संचालन केले. शिबिरासाठी माजी सैनिक सुभाषराव म्हैसने, मंगला म्हैसने, आशा वेध, संजय बहाळ, हिंमतराव पोहरे, चंद्रकांत ताठे, गजानन माळी, मुरलीधर आवटे, संतोष जाधव, दत्ता वेध, संजय देशमुख, विलास आगरकर, प्रकाश जाधव, रमेश शेरेकर, प्रकाश कुलट,सेलसींग सिसोदिया, महादेराव खडसाळे.
प्रतिनिधी | अकोला मकर संक्रांतीला वाण म्हणून रोप, कापडी पिशवी देण्याचा संकल्प सोबत पर्यावरणप्रेमी व संरक्षक डॉ. मनीषा पालीवाल यांनी केला आहे. त्यांच्या कार्यात डॉ. योगेश पालीवालही सहभागी होत असून, वर्षभर ते प्लास्टिक निर्मूलन मोेहिम राबवतात. यंदा किमान १०० रोप (कुंड्यांसह), १०० कापडी पिशव्या वितरणाचे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवले आहे. प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान सर्वश्रुत आहे. कळते पण वळत नाही', अशी काहीशी भूमिका समाजाची आहे. समाजात याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी डॉ. पालीवाल दाम्पत्याने स्थापन केलेल्या माय वसुधा विकास' या संस्थेच्या वतीने जनजागृती करण्याचे कार्य सुरू आहे. दरम्यान सध्या मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू असून, वाण म्हणून महिला संसारोपयोगी साहित्याचे वितरण करतात. दरम्यान पर्यावरण संवर्धनाच्या विचारांचेही ‘वाण’ द्या, असे आवाहन डॉ. मनीषा पालीवाल यांनी केले आहे. त्यानुसार त्यांनी वाण म्हणून रोप व कापडी पिशव्यांचे नियोजन केले आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि त्याबाबत वाढत चाललेली जागरूकता आज समाजात दिसून येत असली, तरी प्रत्यक्ष कृती करणाऱ्यांची संख्या अजूनही मर्यादित आहे. काही पर्यावरणप्रेमी वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन, तर काही कापडी पिशव्या व रोपांचे मोफत वितरण अशा उपक्रमांतून योगदान देत आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक भगिनींनी कापडी पिशव्या किंवा रोपांचे ‘वाण’ म्हणून वाटप करावे. तसेच यासोबतच पर्यावरण संवर्धनाच्या विचारांचेही ‘वाण’ देण्याचे आवाहन डॉ. मनीषा पालीवाल यांनी केले आहे. रोपे जगवून ६०० कुंड्या दिल्या डॉ. पालीवाल दाम्पत्य १५ वर्षांपासून प्लास्टिक मुक्त अकोल्यासाठी कार्य करत आहे. आतापर्यंत त्यांनी ४१ हजारांवर कापडी पिशव्यांचे वितरण केले असून, तसेच २०१६ पासून रोप जगवून ६०० कुंड्यांचे वितरण केले आहे. गुणकारी रोपांचे वितरण मायवसुधा विकास'तर्फे वृक्ष संस्कार मोहिमेंतर्गत गुणकारी रोपांचे वितरण करण्यात येत आहे. यात सीता, अशोक, आंबा, वड, पिंपळ, उंबर, बहावा, बेहडा, पपई, शेवगा, बेल, कवीट, करंज, सिताफळ, रामफळ, जांभूळ, कडूलिंब, चिंच, कडिपत्ता, तुळस, तगरसह फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांसाठी फुलझाडे गुलाब, गीलाटी, गोकर्ण, बटमोगरा, कणेर, मनी प्लांट, शेवंती इत्यादी एकूण ३०० रोप वाटण्यात आले. भक्तांनीही मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत वृक्षलागवड व संगोपनाची झाड वाढवण्याची ग्वाही दिली.
हिवरखेडच्या ८ जणांची एकदाचभारतीय सैन्यदलात झाली निवड:गावातून मिरवणूक काढून सत्कार
प्रतिनिधी | हिवरखेड कर्मचारी निवड आयोग (एसएससी) मार्फत घेण्यात आलेल्या कॉन्स्टेबल भरतीत हिवरखेडच्या आठ विद्यार्थ्यांची एकाचवेळी निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रोहित येनकर, वैभव भालतिलक, ऋषिकेश कौसकार, अनिकेत निंबोकार, मयूर व्यवहारे, चतुर्थी हागे, शिवानी वाकोडे आणि निकिता गावंडे यांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे चतुर्थी हागे हिचे दोन्ही भाऊ भारतीय सैन्यात अग्निवीर पदावर कार्यरत आहेत. आता तिघेही देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. गौतम इंगळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. निवडीबद्दल गावात मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. हिवरखेड शहर व ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने महेंद्र कराळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच पुढील आयुष्यातही उच्च पदावर कार्यरत होऊन गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन केले.
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या समीकरणांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर विजय मिळवलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या दोन नगरसेवकांनी नुकतीच मुंबईत एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या स्वाक्षरीचे पाठिंब्याचे पत्र शिंदे यांना सुपूर्द केले. या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. या दोन्ही नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे शिंदे सेनेचे पालिकेतील संख्याबळ अधिक मजबूत झाले आहे. विकासासाठी घेतला निर्णय आपल्या प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नगरसेवकांनी स्पष्ट केले. पाठिंबा देताना त्यांनी प्रामुख्याने 'दलित वस्ती सुधार योजने'वर भर दिला. आमच्या प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून प्रलंबित कामे तातडीने पूर्ण व्हावीत, ही आमची प्रमुख मागणी आहे. विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याने आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दिग्गजांची उपस्थिती या राजकीय घडामोडीवेळी शिंदे सेनेचे अनेक स्थानिक आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, नगरसेवक योगेश जानकर आणि प्रवक्ते राहुल लोंढे यांनी या नगरसेवकांचे स्वागत केले. या पाठिंब्यामुळे उल्हासनगर पालिकेतील सत्तास्थापनेत शिवसेना शिंदे गट आता अधिक प्रबळ स्थितीत आली आहे. उल्हासनगर महापालिकेत 'वंचित'ने आपले अस्तित्व दाखवून दिले होते, मात्र निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीला हा मोठा झटका मानला जात आहे. उल्हासनगर महापालिका संख्याबळ (78/78) हे ही वाचा… भिवंडीत भाजप-माजी महापौरांच्या समर्थकांमध्ये हाणामारी:भाजप आमदाराचा आरोप - मुलांना मारहाण, कार्यालयावर दगडफेक भिवंडी येथे रविवारी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि कोणार्क विकास आघाडी (KVA) च्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. हा वाद छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली. भाजप आमदार महेश चौघुले आणि KVA नेते तसेच माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगवले. सविस्तर वाचा…
प्रतिनिधी|कोपरगाव शहरातील दर रविवारी भरणारा भाजीपाला बाजार आता अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित व नियोजनबद्ध स्वरूपात भरवण्यात येत असून याबाबत कोपरगाव नगरपरिषदेने घेतलेला निर्णय दिलासादायक ठरत आहे. तहसील मैदान येथे हा भाजीपाला बाजार अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने भरवण्यात आला असून यासाठी नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत आखणी करण्यात आली होती. यापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवर भाजीपाला बाजार भरत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता. वाहनचालक, रुग्णवाहिका तसेच वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नगरपरिषदेने शेतकरी, भाजीपाला विक्रेते यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सर्व घटकांचे मत विचारात घेऊन एकमताने निर्णय घेत रस्त्यावर बाजार न भरवता तो तहसील मैदानातील आखीव व निश्चित जागेत भरवण्याचे नियोजन करण्यात आले. या नव्या व्यवस्थेमुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला असून शहरातील रहदारी सुरळीत झाली आहे. भाजीपाला विक्रेत्यांनाही स्वतंत्र, मोकळी व सुरक्षित जागा उपलब्ध झाल्याने ते समाधान व्यक्त करत आहेत. ग्राहकांनाही स्वच्छ, प्रशस्त आणि एकाच ठिकाणी सर्व भाजीपाला उपलब्ध होत असल्याने खरेदी करणे अधिक सोयीचे झाले आहे. नगराध्यक्ष पराग संधान व उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर व नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून बाजाराची पाहणी केली तसेच व्यवस्थेवर लक्ष ठेवले. नगरपरिषदेच्या या लोकाभिमुख निर्णयामुळे शहरातील शिस्त, सुरक्षितता आणि सुव्यवस्था यांना चालना मिळाली असून सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. कोपरगाव नगरपरिषद भविष्यातही अशाच नियोजनबद्ध आणि जनहिताच्या निर्णयांसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे नागरिकांनाही फायदा होणार आहे. बऱ्याचदा रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. भाजीपाला बाजारामुळे या समस्येत वाढ होत होती. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता या निर्णयामुळे त्यांनाही दिलासा मिळाला आहे. वाहनचालक अन् नागरिकांना दिलासा नगरपरिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीची कोंडी होणार नाही. यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचा वेळ आणि त्रास वाचणार आहे. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांच्या दृष्टीने हा निर्णय फायद्याचा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांचे निरुपण:संतांच्या विचारांवर श्रद्धा ठेवल्यास जीवन सुखकर
प्रतिनिधी |नेवासे फाटा संतांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून आपण आपले जीवन व्यतीत केल्यास आपल्या जीवनाचा प्रवास सुखकर होतो. व देव, देश आणि धर्माचे संरक्षण सुद्धा होते, असे निरुपण गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी केले. प्रवरासंगम येथील देवरे वस्तीवर श्री क्षेत्र देवगड दत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबा व उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महान तपस्वी साध्वी संत पुंजाई यांची पुण्यतिथी कीर्तन सोहळयाने भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. देवरे वस्तीवरील संत पुंजाई यांच्या मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संत पुंजाई यांच्या मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर राष्ट्र संत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या हस्ते संत पुंजाई मातेसह शिवलिंगाचे पूजन करण्यात आले. देवरे परिवाराच्या वतीने कैलास देवरे, सुखदेव देवरे,ईश्वर देवरे,शंकरराव देवरे यांच्या हस्ते संतपूजन करण्यात आले. गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज म्हणाले, साध्वी संत पुंजाई यांची भक्ती तपश्चर्या साधना भक्तांच्या कल्याणासाठी व समाजाच्या उद्धारासाठी होती. गणेश महाराज तनपूरे यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,उमेश महाराज जाधव,मृदुंगाचार्य दादा महाराज साबळे,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, उद्योजक दिनकरराव कदम, माजी सरपंच सुनील बाकलीवाल उपस्थित होते.
निघोज येथे रंगले शेकोटी कवी संमेलन:कवितेची निर्मिती ही आध्यात्मिक प्रक्रिया - पठाडे
प्रतिनिधी |निघोज कविता म्हणजे आत्म्याचा पवित्र आवाज आहे. कवितेची निर्मिती ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार संजय पठाडे यांनी केले. ते निघोज येथे रंगलेल्या शेकोटी कवी संमेलन प्रसंगी बोलत होते. पारनेर तालुक्यातील साहित्य साधना मंच द्वारा नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध साहित्यिक उपक्रमांचे नियोजन करण्यात येते. तसेच कवींना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून निघोज येथील ज्ञानांकुर शिक्षण संस्थेच्या सहकार्याने कै. लहू तुकाराम राठोड यांच्या स्मरणार्थ भूक छळते तेव्हा कविता संग्रहाचे प्रसिद्ध कवी संदीप राठोड, दिलीप राठोड, पारुबाई राठोड, प्रियंका राठोड यांच्या परिवाराने शेकोटी कवी संमेलनाचे आयोजन केले होते. कवी संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून आळे येथील प्रसिद्ध कवी संदीप वाघोले, पुणे येथील कवी प्रा. विजय लोंढे, साहित्यिक कारभारी बाबर, रामदास पुजारी, ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे इत्यादी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. लहू राठोड यांच्या प्रतिमेचे पूजन व शेकोटी प्रज्वलन करून कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध ठिकाणांहून निमंत्रित करण्यात आलेल्या २५ कवींनी एकाहून एक सरस कविता व गझल सादर केल्या. उत्तरोत्तर कवी संमेलन अधिकाधिक बहारदार होत गेले. बहुसंख्येने उपस्थित असलेल्या रसिक श्रोत्यांनी कविता ऐकताना उत्स्फूर्त दाद दिली. ज्येष कवी संदीप वाघोले, प्रा. विजय लोंढे, कारभारी बाबर, रामदास पुजारी, सोमनाथ चौधरी, डॉ. प्रवीण जाधव, गणेश भोसले, कवयित्री स्वाती ठुबे, शब्दगंधच्या शर्मिला गोसावी, मंजुश्री वाळुंज, सुवर्णलता गायकवाड, योगिता भिटे, साहेबराव घुले, संजय ओहोळ, डॉ. बाबा शिंदे, विजय रोहोकले, भाऊसाहेब गवळी, सतिश शेटे, बी. एन. सोनवणे आदी निमंत्रित कवींनी कविता व गझल सादर केल्या.
प्रतिनिधी|अहिल्यानगर किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती, निमगाव वाघा (ता. नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील साकूर येथील श्री बिरोबा देवस्थान मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ‘मेरा युवा भारत’ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष नाना डोंगरे यांच्या पुढाकाराने हे अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानात मंदिर परिसरातील कचरा संकलन, परिसरातील स्वच्छता, प्लास्टिक व टाकाऊ वस्तू हटविण्याचे काम करण्यात आले. ‘स्वच्छ भारत’ या राष्ट्रीय अभियानाचा संदेश देत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. स्वच्छ व पवित्र परिसर राखण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला. नाना डोंगरे म्हणाले, सार्वजनिक स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. युवक व नागरिकांनी पुढाकार घेतल्यास स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहू शकते आणि त्यातूनच स्वच्छ भारताचे स्वप्न साकार होईल. स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. या अभियानात सुभाष जाधव, सुनील जाधव, साहेबराव बोडखे, संदीप डोंगरे, सुखदेव जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते, युवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. सर्वांनी श्रमदान करत स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमासाठी ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे तसेच रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. या अभियानात मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये नागरिकांनीही सहभाग घेतला. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानातील संदेशही देण्यात आला. स्वच्छता फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांचे कर्तव्यही आहे. युवक व नागरिकांनी पुढाकार घेतल्यास स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहू शकते असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते नाना डोंगरे यांनी व्यक्त केला. स्वच्छता फक्त एका दिवसापर्यंत मर्यादीत न ठेवता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे असेही डोंगरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या स्वच्छतेच्या विशेष अभियानात साकूर गावातील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
प्रतिनिधी|अहिल्यानगर देशाच्या रक्षणासाठी माजी सैनिकांनी देशभर सेवा केलेली असते. ते अनुभवाने समृद्ध असतात. त्यांच्या अनुभवाचा उपयोग तरूणांना सैन्य, पोलिस दलात भरती होण्यासाठी दिशादर्शक असतो. माजी सैनिक हे गावाच्या विकासासाठी महत्वाचे घटक आहेत. गावाच्या विकासासाठी माजी सैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याच्या आदर्शगाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथील ७४ आजी-माजी सैनिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जयहिंद सैनिक सेवा संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी सरपंच रूथा वैराळ, संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब कळमकर, उपाध्यक्ष भगवान कोल्हे आदी उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, खातगावला देशसेवेची मोठी परंपरा आहे. गावामध्ये ७४ आजी-माजी सैनिक आहेत. सर्व संघटित असल्याने गावाच्या विकासासाठी योगदान देत आहेत. कोरोना साथीच्या वेळेस आजी-माजी सैनिकांनी भरीव रक्कम कोरोना उपचार केंद्रासाठी दिली. यावेळी ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
प्रतिनिधी|नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे पौष महिन्यात येणाऱ्या पाचव्या व अंतिम रविवारी (दि. १८) पौष रविवार यात्रेची भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली. या संपूर्ण यात्रा कालावधीत जागृत देवस्थान असलेल्या श्री कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लापशी शिरा वाटप करण्यात आले. “नाथाचे चांगभलं” या जयघोषाने संपूर्ण बहिरवाडी परिसर दुमदुमून गेला होता. नेवासे शहरापासून उत्तरेस चार किलोमीटर अंतरावर असलेले बहिरवाडी तीर्थक्षेत्र आहे. महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या कृपा-आशीर्वादाने या क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला आहे. पौष महिन्यातील रविवार नवसाचे मानले जात असल्याने या अंतिम पाचव्या रविवारी सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पौष यात्रा उत्सवाची सांगता होत असल्याने दर्शनासाठी कुटुंबासह आलेल्या अनेक महिला भाविकांनी श्री कालभैरवनाथांना डाळ-रोडग्याचा नैवेद्य अर्पण केला. भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने येथे विविध विकासकामे मार्गी लागली असून भक्तांच्या आर्थिक योगदानातून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चून प्रवरा नदीच्या मध्यधारेवर भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. पौष महिन्यातील शेवटचा रविवार असल्याने पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. भाविकांना शिस्तबद्ध दर्शन मिळावे यासाठी पोलीस यंत्रणा, पोलीस मित्र, होमगार्ड, स्थानिक भक्त मंडळ, तरुण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वयंसेवक म्हणून सेवा बजावली.
शहरीभागात प्लास्टिक प्रक्रिया प्रकल्प आहेत, परंतू ग्रामीण भागात प्रथमच प्लॅस्टिक प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी होणार आहे. गावपातळीवर निर्माण झालेला प्लॅस्टिक कचरा ग्रामपंचायत स्तरावर संकलीत करून प्रकल्पांत आणला जाईल. तेथे श्रेणीनुसार प्लॅस्टिकचे वर्गीकरण करून पुनर्रवापर करणाऱ्या कंपन्यांना ते पाठवले जाईल. पहिल्या टप्प्यात १.६० कोटींची ८ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. महिनाभरात ही प्रक्रिया सुरू करण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने केली आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात १४ प्रकल्प उभारण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने आखले होते. एका प्रकल्पासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च केले जातील. आतापर्यंत अकोले, संगमनेर, नेवासे, कोपरगाव, राहता, राहुरी, पाथर्डी, जामखेड या ठिकाणीचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. परंतू अद्याप ते कार्यान्वित झाले नाहीत. गावपातळीवर संकलीत केलेल प्लॅस्टिक प्रकल्पापर्यंत वाहतूक करणे व प्रकल्प कार्यान्वीत करण्यासाठी जि. प. स्तरावर, बचतगट अथवा पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्थांची चाचपणी सुरू आहे. ग्रामीण भागात निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न ग्रामपंचायतींना भेडसावत आहे. गावात निर्माण झालेला कचरा एकत्र टाकला जातो. परंतू, स्थानिक पातळीवर प्रक्रिया प्रकल्प नाहीत, तसेच घंटागाडीतून संकलित केलेल्या कचऱ्याचे विलगीकरण केले जात नाही. यापार्श्वभीवर जिल्हा परिषदेने सर्व ग्रामपंचायतींना प्लास्टिक संकलनाची विशेष मोहिम राबवण्याच्या सूचना चार महिन्यांपूर्वी दिल्या होत्या. त्यानसुार संकलीत केलेले प्लास्टिक ग्रामपंचायत स्तरावर जमा आहे. ग्रामपंचायतीमार्फत कचरा संकलन व विलगीकरण सुरू होऊन, प्रकल्पापर्यंत प्लॅस्टिक पोहोचल्यास, गावे प्लास्टिक कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. महिनाभरात प्रकल्प सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी सूचना दिल्या आहेत. या प्रकल्पात असा होईल, प्लास्टिकचा पुनर्रवापर ग्रामपंचायत स्तरावर संकलीत केलेले प्लास्टिक प्रकल्पापर्यंत वाहून नेले जाईल. त्याठिकाणी सर्वप्रथम मशिनमध्ये धूळ, माती इतर भाग बाजुला केले जातील. जे प्लास्टिक हायड्रोलिकवर प्रेस करणे शक्य आहे, ते प्रेस केले जाईल. जे शक्य नाही, ते ग्राइंडिंग केले जाणार आहे. त्यापासून पन्नास ते शंभर किलोचे ब्लॉक तयार करून ते प्लास्टिकचा पुनर्रवापर करणाऱ्या प्रकल्पांना विकले जाणार आहे.
भिवंडी येथे रविवारी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि कोणार्क विकास आघाडी (KVA) च्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. हा वाद छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ झाला. दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार महेश चौघुले आणि KVA नेते तसेच माजी महापौर विलास पाटील यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पांगवले. घटनास्थळाची दोन छायाचित्रे… डीसीपी झोन-2 शशिकांत बोराटे यांनी सांगितले की, दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये झटापट झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी हटवली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. भाजप आमदार म्हणाले- मुलांवर हल्ला, कार्यालयावर दगडफेक भाजप आमदार महेश चौघुले यांनी आरोप केला की, केव्हीए अध्यक्ष विलास पाटील त्यांच्या परिसरात कोणालाही प्रवेश करू देत नाहीत. त्यांनी सांगितले की, निवडणुका संपल्या आहेत. काल काही गरीब मुलांवर हल्ला करण्यात आला होता. आज संध्याकाळी सुमारे 5 वाजता दोन मुलांना मारहाण करण्यात आली. यानंतर माझ्या कार्यालयावर दगडफेक झाली. पोलिस आणि माझ्या समर्थकांवरही हल्ला करण्यात आला. पोलिसांनी वेळेवर परिस्थिती हाताळली. महेश चौघुले यांनी सांगितले की, ते पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. आता पोलिस या प्रकरणात काय कारवाई करतात, ते पाहू. भिवंडीत काँग्रेसचे 30 नगरसेवक विजयी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत एकूण 90 जागा आहेत. काँग्रेसच्या सर्वाधिक 30 नगरसेवकांनी विजय मिळवला. भाजपला 22 जागा मिळाल्या, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना प्रत्येकी 12-12 जागा मिळाल्या. केव्हीएने 4 जागा जिंकल्या आहेत. हे ही वाचा… शिवसेना घाबरणारी पार्टी नाही:त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, हॉटेलमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँडस् एन्ड' या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे. सविस्तर वाचा…
उत्तर प्रदेशातील 'बुलडोझर राजकारण' महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. तुम्ही एका फहीम खानला अटक केली, तर आज सहा नेते निवडून आले आहेत. बुलडोझरच्या माध्यमातून तुम्ही मुस्लिमांचे एक घर तोडाल, तर शंभर नेते निर्माण होतील, असा जळजळीत इशारा नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खान याने दिला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत फहीम खानची पत्नी अलिशा खान हिने प्रभाग क्रमांक ३ मधून एमआयएमच्या (AIMIM) तिकिटावर मोठा विजय मिळवला आहे. १७ मार्च २०२५ रोजी नागपूरच्या महाल परिसरात भीषण दंगल उसळली होती. महालपासून अनेक किलोमीटर लांब राहत असूनही पोलिसांनी फहीम खानवर दंगलीचा कट रचल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल केला होता. दंगलीनंतर महापालिकेने फहीम खानच्या कुटुंबीयांचे घर बेकायदेशीर ठरवत बुलडोझरने पाडून टाकले होते. सुमारे चार महिने तुरुंगात राहिल्यानंतर फहीम खान सध्या जामिनावर बाहेर आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत फहीम खानच्या पत्नीसह AIMIM चे एकूण सहा नगरसेवक निवडून आले आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना फहीम खान याने नाव न घेता भाजपला उपरोक्त इशारा दिला आहे. नेमके काय म्हणाला फहीम खान? “उत्तर प्रदेशातील 'बुलडोझर राजकारण' महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. तुम्ही एका फहीम खानला अटक केली, तर आज सहा नेते निवडून आले आहेत. बुलडोझरच्या माध्यमातून तुम्ही मुस्लिमांचे एक घर तोडाल, तर शंभर नेते निर्माण होतील. त्यामुळे बुलडोझरच्या माध्यमातून तुम्ही न्याय करण्याचा प्रयत्न कराल, एक घर तोडाल, तर तुम्ही मुस्लिमांमध्ये 100 नेते निर्माण कराल,” असे फहीम खान म्हणाल आणखी एका फहीमला चुकीच्या पद्धतीने अटक कराल, तर आज फक्त दोन प्रभागातून हद्दपार झालेला तुमचा पक्ष उद्या संपूर्ण शहरातून साफ होईल, असा इशारा फहीम खान याने भाजपचे नाव न घेता दिला. आता पत्नीच्या महापालिका निवडणुकीतील विजयानंतर पालिकेने पाडलेले तेच घर पुन्हा उभारणार असल्याचे फहीम खान याने सांगितले. नागपूरच्या राजकारणात फहीम खानच्या या वक्तव्यामुळे आता नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात एमआयएमची ऐतिहासिक मुसंडी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने महाराष्ट्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. राज्यातील २९ पैकी १३ महानगरपालिकांमध्ये एमआयएमने एकूण १२५ जागा जिंकल्या आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात एमआयएमचे एकूण ६ नगरसेवक निवडून आले आहेत. ही कामगिरी ऐतिहासिक आहे. आम्ही भाजप किंवा 'इंडिया' आघाडी कोणासोबतही जाणार नाही. आमची लढाई ही केवळ आम्हाला जनादेश देणाऱ्यांसाठी असेल, असे ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिनिधी | इगतपुरी पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायतीत एकल महिलांचा सन्मान करण्यात आला. मुलगी १८ वर्षाच्या आत आणि मुलगा २१ वर्षाच्या आत असेल, तर बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही आणि त्याला मदत करणार नाही, अशी शपथ यावेळी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानांतर्गत महिला सक्षमीकरणासाठी एकल महिला मेळावा घेण्यात आला. यावेळी हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांना कुंकवाचा करंडा भेट देण्यात आला. सरकारने बाल विवाहमुक्त भारत मोहीम सुरू केली आहे, ज्या अंतर्गत बालविवाहाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी शपथ घेतली जात आहे.यामध्ये नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायती सहभागी होत आहेत. या अभियानाचा उद्देश २०२६ पर्यंत बालविवाह १० टक्क्याने कमी करून २०३० पर्यंत भारत बालविवाह मुक्त करणे हा आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर यांनी दिली. या उपक्रमासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बचत गटांच्या महिलांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी | दिंडोरी येथील बसस्थानकात एक हजार विद्यार्थ्यांनी बालविवाह करणार नाही आणि होऊ देणार नाही, अशी सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमामुळे परिसरात सामाजिक जनजागृतीचा संदेश गेला आहे. दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूलच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्राचार्य शरद शेजवळ यांनी सध्याच्या काळात शिक्षणाचे महत्त्व वाढत असतानाही काही ग्रामीण भागांत अजूनही बालविवाहाच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये या अनिष्ट प्रथेविरुद्ध जाणीव झाली पाहिजे. बालविवाहामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही, तर मुला-मुलींच्या शिक्षणातही अडथळा निर्माण होतो. विद्यार्थ्यांनी स्वतः जागरूक राहून आपल्या आसपास असा कोणताही प्रकार घडत असल्यास प्रशासनाला किंवा चाइल्डलाईन १०९८ या क्रमांकावर तात्काळ कळवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य उत्तम भरसट, संतोष कथार, डी के टोपले आदी उपस्थित होते. दिंडोरी येथील बस स्थानकात एक हजार विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंधक शपथ घेतली बालविवाह प्रतिबंधक शपथ घेताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.आम्ही आमचे शिक्षण पूर्ण करू आणि समाजातून बालविवाह हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करू, असा निर्धार विद्यार्थ्यांनी यावेळी केला. यावेळी विद्यार्थ्यांसह बसस्थानक परिसरातील प्रवाशी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामाचा वेग व दर्जा कायम राखा:विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
व्हिटीसी फाटा ते साकुरफाटा रस्ता कामाची पाहणी प्रतिनिधी | इगतपुरी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित सुलभ वाहतुकीसाठी रस्त्याची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असल्याने कामे काटेकोरपणे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. गुणवत्ता नियंत्रण चाचण्या नियमितपणे घेऊन कामाचा वेग व दर्जा दोन्ही राखण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील व्हिटीसीफाटा ते साकुरफाटा रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. या कामाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, इगतपुरीचे उपविभागीय अभियंता शशांक गजभिये आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी | गारज वैजापूर तालुक्यातील गारज येथील टोलनाक्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. किर्तीकांत रामचंद्र कुलकर्णी (४५, रा. रोहीला बु. जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. कुलकर्णी हे ताडपिंपळगाव येथे मामाकडे सत्यनारायण पूजेसाठी जात होते. गारज येथील नव्याने सुरू असलेल्या टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीचा (एमएच २० एल ३१३२) अपघात झाला. रस्त्यावर पडलेल्या वाळूमुळे दुचाकी घसरली. दुचाकी सुमारे १५ फूट घसरली. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गावकऱ्यांनी धाव घेत दुचाकी बाजूला केली. मांसाचे तुकडे गोळा केले. शिऊर पोलिसांना माहिती दिली. मृताच्या मोबाईलवर कॉल आला. कॉल करणाऱ्याने विचारले, गुरु पूजेसाठी कधी येणार?’ नागरिकांनी सांगितले, गुरुचा अपघात झाला, ते जागीच मरण पावले.’ हे ऐकून अंगावर शहारे आले. कुलकर्णी हे पूजाअर्चा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. गावकऱ्यांनी वाळूमाफियांविरोधात संताप व्यक्त केला. काहींनी अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा संशय व्यक्त केला. सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली. शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी वैभव रणखांब यांनी पोलिस कर्मचारी सविता वरपे यांना घटनास्थळी पाठवले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला होता. पुढील तपास बिट जमादार गणेश गोरक्ष करत आहेत. वाळूमाफियांविरोधात नागरिकांमधून संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव दिगंबर मोरे यांनी वाळूमाफियांविरोधात संताप व्यक्त केला. रस्त्यावर सांडलेल्या वाळूबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करावी. अन्यथा गावकरी आंदोलन करतील, असा इशारा दिला.
आदिवासी कुटुंबामधील अविनाश पवारची सीमा पोलिस दलात निवड:यशाचे सर्वत्र कौतुक
प्रतिनिधी | खंडाळा कोल्ही गावातील ऊसतोड कामगाराच्या मुलाने स्पर्धा परीक्षेत यश मिळवत भारत-तिबेट सीमा पोलिस दलात (आयटीबीपी) स्थान मिळवले. अविनाश अण्णासाहेब पवार असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अविनाशचे वडील अण्णासाहेब पवार आणि आई आशाबाई पवार हे वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील रहिवासी आहेत. दोघेही ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. चार मुली आणि एका मुलासह पाच जणांचे कुटुंब. आर्थिक परिस्थिती हलाखीची. तरीही आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. अविनाशचे प्राथमिक शिक्षण शिवूर येथील जय बाबाजी आदिवासी आश्रमशाळेत झाले. अकरावी-बारावी संत बहिणाबाई कनिष्ठ महाविद्यालय, शिवूर येथे पूर्ण केली. त्यानंतर येवला येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून डिप्लोमा पूर्ण केला. ऑगस्ट २०२५ पासून अविनाश शिऊर पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होता. कर्तव्य बजावत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. दोन वर्षे सातत्याने मेहनत घेतली. शिस्त, चिकाटी आणि शारीरिक तंदुरुस्तीवर भर दिला. अखेर १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या निकालात त्याला यश मिळाले. गावात त्याच्या यशानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. खंडाळा व कोल्ही गावातील आदिवासी कुटुंबातून स्पर्धा परीक्षेतून आयटीबीपीमध्ये निवड होणारा अविनाश पहिलाच आहे. यापूर्वी कोल्ही गावातील रामा साईनाथ पवार हे भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. ते गेली १० वर्षे जम्मू-काश्मीरमधील किस्तवाड येथे देशसेवा करत आहेत.
प्रतिनिधी | बोरदहेगाव जि. प. प्राथमिक शाळा चांडगाव येथे स्वामी विवेकानंद आणि आजचा युवक’ या विषयावर विशेष व्याख्यान झाले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मनात ध्येयवादाची ज्योत प्रज्वलित झाली. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका!’ या त्यांच्या विचारांनी परिसर भारावून गेला. प्रसिद्ध व्याख्याते उदय कुलकर्णी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे, तर विचार. त्यांनी धर्माचा प्रसार करताना माणूस घडवण्याचे शिक्षण दिले.’ युवकांनी केवळ पदव्या मिळवून थांबू नये. त्यांच्याकडे लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जासंस्था असावी. एकाग्रता हीच ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. स्वतःवर विश्वास असणारा युवकच राष्ट्राचे भविष्य बदलू शकतो. शिवभावे जीवसेवा’ हा मंत्र आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिकागो धर्मपरिषद आणि भारतभ्रमणाचे दाखले देत त्यांनी विद्यार्थ्यांना ध्येयनिष्ठ होण्याचा संदेश दिला. चांडगाव शाळेच्या गुणवत्तेचा चांडगाव पॅटर्न’ आज तालुक्यात ओळखला जातो. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे हे या शाळेचे वैशिष्ट्य ठरले आहे. सूत्रसंचालन करताना गोरखनाथ त्रिभुवन यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक काका पाटील होते. सरस्वती पूजन आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोहन साळुंखे, रामेश्वर राहणे, राजू जानराव, रेवन्नाथ राहणे, भाऊसाहेब राहणे, अप्पासाहेब जाधव, कोंडीराम राहणे, अरुण वाणी, माधव रहाणे, मंगेश मलिक, योगेश रहाणे, ज्ञानेश्वर वाघ, मीराबाई तुपे उपस्थित होते. भीमराज राहणे यांनी आभार मानले. चांडगाव येथील कार्यक्रमात प्रथम प्रतिमांचे पूजन करून प्रमुख मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
वरूड खुर्दच्या शाळेमध्ये हळदीकुंकूला नवा साज:मातांना पेन-तिळगूळ वाटप
प्रतिनिधी | वरूड खुर्द वरूड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मकरसंक्रांतीनिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. पारंपरिक हळदीकुंकू कार्यक्रमाला फाटा देत शाळेच्या वतीने सर्व माता पालकांना पेन आणि तिळगुळ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माता पालकांसाठी उद्बोधन सत्र घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. मातांनी मुलांना घरी वेळ कसा द्यावा, अभ्यास कसा घ्यावा, वाईट सवयींपासून त्यांना कसे परावृत्त करावे, शैक्षणिक, शारीरिक, भावनिक आणि सामाजिक विकास कसा साधावा यावर शाळेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. विजया चापे आणि अनिता बोळेगावे यांनी मुलींच्या शिक्षणावर, काळजी आणि सुरक्षिततेवर मातांशी संवाद साधला. मुख्याध्यापक सज्जन टाकसाळे यांनी शिक्षणासोबत संस्कारक्षम मूल्यांची रुजवणूक करण्याचे महत्त्व सांगितले. शिक्षकांसोबतच पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनिल जाधव यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमानिमित्त वरूड खुर्दच्या शाळेत एकत्रित आलेल्या महिला.
महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे नेते कलीम कुरेशी आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यात झालेला राडा या निवडणुकीतील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला आहे. या वादाचे पडसाद मतदानात उमटल्याने त्याचा थेट फटका काँग्रेसला बसला, तर एमआयएमला मोठा फायदा झाला. निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्यानंतर इम्तियाज जलील यांनी आक्रमक न होता संयमाची भूमिका घेतली. “आम्ही राड्याला प्रत्युत्तर दिले नाही, तर मतदारांना दहशतीच्या राजकारणाविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन केले,’ असे जलील यांनी सांगितले. या भावनिक आवाहनामुळे मतदारांनी मोठ्या प्रमाणावर एमआयएमच्या बाजूने कौल दिला. दुसरीकडे, कलीम कुरेशी यांनीही मान्य केले की, एमआयएमसोबतचे भांडण त्यांच्या अंगलट आले. मतदार भावनिक झाल्याने एकगठ्ठा मतदान एमआयएमकडे वळले आणि आपला पराभव झाला, अशी कबुली त्यांनी दिली. कुरेशी कुटुंबाला धक्का गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेत कुरेशी कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. एकाच कुटुंबातील तीन नगरसेवक निवडून येण्याची परंपरा यावेळी खंडित झाली. तीनपैकी दोन जागांवर पराभव झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत कुरेशी कुटुंबातून केवळ मलेका बेगम या एकमेव नगरसेविका म्हणून निवडून येऊ शकल्या.एमआयएमने रेशनच्या प्रश्नावर केलेला प्रचार आणि वादातून निर्माण झालेली भावनिक लाट यामुळे काँग्रेसचा हा जुना बालेकिल्ला ढासळला असल्याचे या निकालावरून स्पष्ट होत आहे.
मनपा निवडणुकीत पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेचा पराभव झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेची सूत्रे स्वत:च्या हाती घेण्याचा निर्णय माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतला आहे. त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच उद्धवसेनेचे दत्ता गोर्डे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मनपा निवडणुकीत उद्धवसेनेला केवळ ६ जागा मिळाल्या. उद्धवसेनेत चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात मोठे वाद झाले. त्याचे पडसाद निवडणुकीत दिसले. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, या महापालिकेत मी सत्ता आणून महापौर बसवले आहेत. मात्र, इतक्या कमी जागा मिळणे हे अपयश पाहवत नाही. मी कोणता उमेदवार द्यायचा यावर चर्चा करायचो, तर दानवे वेगळाच निर्णय घेत होते. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत सत्ता आणण्यासाठी मीच नियोजन करणार आहे. पर्यायच उरला नाही याबाबत गोर्डे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, नगराध्यक्ष निवडणुकीनंतर कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मी प्रवेश करणार आहे. आता निवडणुकीमुळे कुठलाही पर्याय उरला नाही. माझी पक्षात कोणाबाबतही तक्रार नाही. इनसाइड स्टोरी - खासदार भुमरे यांनाही धक्का दत्ता गोर्डे हे संदिपान भुमरे यांचे विरोधक मानले जातात. त्यांचा पक्षप्रवेश भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सूचित करतो. त्याचबरोबर हा शिंदेसेनेसाठी इशारा मानला आहे. खासदारांच्या मतदारसंघातच तगडा उमेदवार देऊन भाजप शिंदेसेनेची कोंडी करत आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ५७ जागा जिंकल्या, पण महापौरपदासाठी ५८ नगरसेवक आवश्यक आहेत. पाचपेक्षा अधिक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे एकहाती सत्ता आणि बहुमताचा आकडा जुळण्याची खात्री असल्याने अनेकांनी महापौरपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून प्रस्थापितांना बाजूला सारून महापौरपदासाठी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते, अशीदेखील चर्चा आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी १,४०० उमेदवारांनी अर्ज केले होते. ९२ जागा लढवत ५७ ठिकाणी विजय संपादन केला. आता महापौरपदासाठी मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहर जिल्हा अध्यक्ष किशोर शितोळे, माजी अध्यक्ष शिरीष बाेराळकर यांच्यासह कोअर कमिटीमधील नेते आपापल्या समर्थकांसाठी आग्रही आहेत. महापौरपदाचे आरक्षण लोकसंख्येनुसार की टक्केवारीप्रमाणे? महापौर आरक्षण सोडत नगरविकास विभाग मुंबईत काढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये प्रथमच प्रभाग रचनानिहाय निवडणूक झाली. त्यामुळे आरक्षणाचे रोटेशन सूत्र लागू होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. आरक्षण लोकसंख्येनुसार ठरते की टक्केवारीनुसार याचे मार्गदर्शन आयोगाने केलेले नाही. ओपन, ओबीसी, एससी या प्रवर्गाचे भाजपकडे उमेदवार आहेत. एसटी प्रवर्गासाठी नाही. उद्धवसेनेचे रशीदमामू व एमआयएमच्या विजयश्री जाधव या आहेत. भाजपकडील पर्याय; एसटी वगळता सर्व प्रवर्गातील नगरसेवक दिव्य मराठी ॲनालिसिस- पद मिळवण्यासाठी लॉबिंग महापालिका निवडणुकीचे प्रभारी मंत्री अतुल सावे यांच्या शब्दाला महापौर बनवताना महत्त्व राहील, अशी चर्चा आहे. स्थानिक स्तरावर विरोध झाला तर प्रदेशाकडून राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात. एकदा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. मात्र सर्व निर्णय हे कोअर कमिटीच घेईल. यात रा. स्व. संघाचे मतदेखील विचारात घेतले जाईल. इनसाइड स्टोरी - तरुण चेहऱ्याला संधी शक्य शहरात येऊ घातलेली मोठी गुंतवणूक, विविध योजनांचा केंद्र व राज्याचा निधी, यातून चांगली कामे करून घेणे एक आव्हान असेल. त्यामुळे सुशिक्षित, तरुण चेहऱ्याला प्राधान्य मिळू शकते. मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणात मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहरे देण्यात आले. त्याचप्रमाणे महापौरपदासाठी प्रस्थापितांना बाजूला सारले जाऊ शकते. मनपाच्या कामावरच पुढे लोकसभा, विधानसभेसाठी मते मागावी लागतील याचा विचार केला जाईल. स्थायी समितीवर भाजपचे ८, एमआयएमचे ५ नगरसेवक जाणार छत्रपती संभाजीनगर| मनपाची स्थायी समिती १६ सदस्यांची आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला ८ सदस्य, तर एमआयएमला ५ सदस्य, शिंदे गटाला २ आणि उद्धवसेनेला १ सदस्यपद मिळेल. सोमवारी सर्वप्रथम नगर सचिव यांच्याकडे प्रमाणपत्र सादर करून नगरसेवक म्हणून राजपत्रात नावे प्रसिद्ध करावी लागणार आहेत.
समाजातील रूढी-परंपरांमुळे अनेकदा उपेक्षित ठरणाऱ्या एकल, विधवा व परित्यक्त्या महिलांना सन्मानाचे स्थान देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘हळदी-कुंकू’ उपक्रमाच्या माध्यमातून एक नवे सामाजिक पर्व सुरू केले आहे. सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला दिशा देणारा आहे. सामान्यतः एकल अथवा विधवा महिलांना समाज हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवतो. त्यांना मंगलमय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. अशा एकल महिलांसाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक जिल्हाभर हळदी-कुंकू मेळाव्यांचे आयोजन करून त्यांच्या आत्मसन्मानाला नवे बळ दिले आहे. या माध्यमातून सण-उत्सवांच्या आनंदात त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग निश्चित करण्यात आला. एकाच छताखाली समन्वय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभागंातर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. २५ हजार महिलांचे सर्वेक्षण गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५,७३२ एकल महिला असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने सुनियोजित कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. उमेद अभियानांतर्गत कार्यभांडवल, समुदाय गुंतवणूक निधी व बँक लिंकेजद्वारे स्वयंरोजगारासाठी साहाय्य, संजय गांधी निराधार योजना व इतर माहिती देण्यात आली. मेळाव्यात धनादेशांचे वाटप समाजकल्याण सभागृह, गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या गडचिरोली तालुक्यातील मेळाव्यात स्मिता चौधरी, बहिणाबाई आत्राम, विमल मडावी व शशिकला दुमाने या एकल महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
महापालिकेत मोठा विजय मिळाल्यानंतर निवडणुकीसाठी कायम अॅक्शन मोडवर असलेल्या भाजपने जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६२ गट आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी तब्बल ९५० जणांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी पक्षाला माहिती सादर केली. इच्छुकांची संख्या मोठी असली तरी भाजप युतीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे प्रयत्न करणार असल्याचे संजय खंबायते यांनी सांगितले. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील न. प. आणि महापालिका निवडणुकीत युती झाली नसल्यामुळे या युतीची शक्यता धूसर वाटत आहे. जिल्हा परिषदेसाठी सर्वच पक्षांनी त्यांच्या बैठका मुलाखती घेत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपकडे उमेदवारी अर्ज आल्याचे चित्र आहे. आघाडी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न: महाविकास आघाडीत सर्वच पक्षांना जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता वंचितसह महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व पक्ष एकत्र आले तरच विजय मिळू शकतो, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसनेही यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले. वंचितच्या कार्यालयावर जिल्हा परिषदेसाठी मोठी गर्दी वंचित बहुजन आघाडीला मनपात मिळालेल्या यशानंतर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शहर जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ८२ तर पंचायत समितीसाठी १७० उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या वेळी योगेश बन,रामेश्वर तायडे, रूपचंद गाडेकर, पंकज बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. एमआयएम १२ जिल्ह्यांत निवडणूक लढणार : नासेर सिद्दिकी छत्रपती संभाजीनगरसह १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय केल्याची घोषणा एमआयएमचे नेते नासेर सिद्दिकी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात परिषद झाली. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले आहेत. शहरी भागातील या यशाने उत्साहित होऊन पक्षाने आता प्रथमच ग्रामीण भागातील निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष शेख अहमद, शारेक नक्षबंदी आणि माजी नगरसेवक विकास एडके यांची प्रमुख उपस्थिती होती. या माध्यमातून नाराज उमेदवारांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मनपा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर एमआयएमने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. वंचित आघाडीने काँग्रेसला प्रस्ताव दिला : किरण पाटीलकाँग्रेसने जिल्हा परिषदेसाठी १३६, पंचायत समिती २४५ जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत, तर मंुबईत रविवारी सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावून आघाडी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आघाडी करण्यासाठी आमचे प्राधान्य असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा यांच्यासोबत आघाडी असणार आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे त्यांंनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याला चकित केले आहे. या निवडणुकीत केवळ प्रस्थापित नेत्यांनाच कौल मिळाला नाही, तर विविध गंभीर गुन्ह्यांखाली तुरुंगात असलेल्या उमेदवारांनीही दणदणीत विजय मिळवला आहे. हे पाहिल्यानंतर आजचे राजकारण सज्जनांचे राहिलेच नाही असे वाटते. अर्थात यात गुन्हेगारांची तरी काय चूक? राजकीय पक्षांनी त्यांना तिकिटच दिले नसते तर ते उमेदवार झालेच नसते. राजकीय पक्षांना उमेदवार म्हणून […] The post गजाआडचे महापालिकेत! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विविध संघटना पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. १८ जानेवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेत संवाद साधला. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत […] The post विविध संघटना पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बनावट देशी व परराज्यनिर्मित विदेशी मद्याच्या साठ्यावर धाड
लातूर : प्रतिनिधी गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार बनावट देशी मद्याचा व परराज्यातील विदेशी मद्याचा साठा असल्याचे समजल्याने जिल्ह्यातील मौजे पानगाव ता. रेणापूर जि. लातूर येथील एका इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता देशी दारू भिंगरी संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या एकूण ४ हजार ३०० बॉटल प्रथमदर्शनी बनावट मिळून आल्या व गोवा राज्यातील १८० मि.ली. […] The post बनावट देशी व परराज्यनिर्मित विदेशी मद्याच्या साठ्यावर धाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले गेले : प्रकाश शेंडगे
लातूर : प्रतिनिधी राज्य शासनाने विविध जीआरच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला. राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण या आघाडीची स्थापना केल्याचे सांगत शेंडगे म्हणाले की, एकंदर राजकीय […] The post सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले गेले : प्रकाश शेंडगे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा सहकारी बोर्डाची पंचवार्षिक निवडणूक दि. १८ जानेवारी रोजी पार पडली. या मतदानाच्या अगोदरच काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित चार जागेसाठी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील यांनी काँग्रेस पुरस्कृत पॅनल तयार केले होते. त्यात जिल्ह्यातील लातूर, […] The post पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झेंडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘जागल’मधून साहित्याची ओळख होऊन रूची वाढेल
अहमदपूर : प्रतिनिधी सद्य: स्थितीत समाजातील तरुण दिशाहीन बनला असून तो सोशल मीडियाकडे ओढला गेल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना साहित्य माहीत व्हावे, या हेतूने ग्रामीण भागात ‘जागल’ एक दिवसीय साहित्य संमेलनात सहभागी होऊन मराठी साहित्याविषयी रुची वाढेल, असे आग्रही प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. किनी कदू येथील ‘बसवसृष्टी’, […] The post ‘जागल’ मधून साहित्याची ओळख होऊन रूची वाढेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसमत शहरालगत भरधाव कार कालव्यात पडली:दैव बलवत्तर म्हणून कार मधील दोघेही बालंबाल बचावले
वसमत ते परभणी मार्गावर वसमत शहरापासून काही अंतरावर भरधाव वेगाने धावणारी कार कालव्यात पडल्याने रविवारी तारीख 18 रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. दैव बलवत्तर असल्याने कार मधील दोघेही बचावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील शिवराज रामराव तिमेवार (३०) हे त्यांचा मित्र विनायक जगदीश दवणे (२०) यांच्यासोबत त्यांच्या कारने वसमत कडून खांडेगाव कडे निघाले होते. भरधा वेगाने धावणारी कार वसमत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कालव्याजवळ आली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कार थेट कालव्यात कोसळली. विशेष म्हणजे कालव्याला असलेले कठडे तुटलेले असल्यामुळे कुठेही अडथळा निर्माण झाला नाही. दरम्यान सदरील कार सुमारे पंधरा ते वीस फूट खोल कालव्यात कोसळली. कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे शिवराज व विनायक दोघांनी प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा उघडून बाहेर पडले. कार पासून काही अंतरावर येऊन ते कालव्यावर आले. सुदैवाने त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र किरकोळ मुक्कामार लागल्यामुळे दोघेही उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघेही रुग्णालयातून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, बेंगाळ, प्रशांत मुंढे, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान कालव्यात पडलेली कार क्रेनची मदत घेऊन बाहेर काढली जाणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशीर झाल्यामुळे कार बाहेर काढण्याचे काम सोमवारी तारीख १९ हाती घेतली जाणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याची पोलिसांनी स्पष्ट केले. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अपघातातील या दोघांना आज आल्याचे बोलले जात आहे.
12 सौर प्रकल्पांतून 59 मेगावॅट वीज निर्मिती:20,225 शेतकऱ्यांना लाभ, दिवसा सिंचन झाले शक्य
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार २२५ शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणारे १२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमधून एकूण ५९ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. या मालिकेतील बारावा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील जवर्डी येथे हा बारावा प्रकल्प उभारण्यात आला आहे. १० मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प ४० एकर जमिनीवर पसरलेला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या ३३ केव्ही तोंडगाव उपकेंद्राला जोडण्यात आली आहे. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चार कृषी वाहिन्यांमुळे अचलपूर तालुक्यातील बेलज, बोरगाव मोहना, रामापूर, नारायणपूर, कविठा, कांडली, विठ्ठलपूर, तळेगाव, पिंपरी, मोचखेडा, आमलापूर, तोंडगाव आणि घोडगाव येथील १ हजार ८७४ शेतकऱ्यांना आता सौर ऊर्जेचा लाभ मिळत आहे. जवर्डी प्रकल्पाचे लोकार्पण महानिर्मितीचे मुख्य अभियंता श्याम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे आणि धीरज गादे उपस्थित होते. महानिर्मिती कंपनीने महावितरणसाठी विदर्भात उभारलेला हा दुसरा आणि जिल्ह्यातील पहिला मोठा सौर प्रकल्प आहे. मुख्य अभियंता श्याम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी स्पष्ट केले की, डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत ९० विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारून एकूण ३२८ मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट गाठले जाईल. या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना आता दिवसा सिंचन करणे सहज शक्य झाले आहे. पूर्वी विजेच्या अनुपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना वन्यजीवांचा धोका पत्करून रात्री-बेरात्री शेतावर जाऊन सिंचन करावे लागत होते, ज्यामुळे अनेकदा संघर्ष आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. आता या समस्या दूर झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कार्यान्वित झालेल्या इतर सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये कापूसतळणी (५ मेगावॅट), डाबका (५ मेगावॅट), धारणी (११ मेगावॅट), शेंदुरजना बाजार (३ मेगावॅट) आणि भातकुली (४ मेगावॅट) येथील प्रकल्पांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, जळगाव दस्तगीर, अनकवाडी (मोझरी), उसळगव्हाण (देवगाव) आणि पिंप्री निपाणी (पापळ) येथे प्रत्येकी ३ मेगावॅटचे प्रकल्प आहेत.
खासदार बळवंतराव वानखडे यांनी अचलपूर येथे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष खुर्शीदा बानो अताशाह आणि स्वीकृत नगरसेवक अ. मुजीब यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना वानखडे यांनी काँग्रेस पक्ष शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस हा नेहमीच जनतेच्या पाठिशी उभा राहणारा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारा पक्ष आहे. याच कारणामुळे जनतेने पक्षाला सक्रिय पाठिंबा देत जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्ष पदे दिली आहेत, असे वानखडे म्हणाले. हा सत्कार सोहळा खासदार बळवंतराव वानखडे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंचावर अचलपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत झोडपे, परतवाडा शहर अध्यक्ष राहुल गवई, तालुका अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, माजी नगरसेवक मेहरूलाभाई, आत्ताशाहभाई आदी मान्यवर उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने दर्यापूर आणि चिखलदरा येथील नगराध्यक्षपद जिंकले आहे. याशिवाय धारणी, चिखलदरा, दर्यापूर आणि अचलपूर येथे उपनगराध्यक्ष पदेही प्राप्त केली आहेत. खासदार वानखडे यांनी काँग्रेसच्या ऐतिहासिक योगदानावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, काँग्रेस हा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेला जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर देशात अनेक गोष्टींची कमतरता असतानाही काँग्रेसने औद्योगिक क्रांती, धवल क्रांती, कृषी क्रांती आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती साधली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा आणि सर्वसमावेशक राजकारण करणारा पक्ष आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने चार नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते, त्यापैकी दोन ठिकाणी थेट विजय मिळवला. उर्वरित ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने उपाध्यक्षपदही काँग्रेसकडेच आले. हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक असून, दोन नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्षांसह काँग्रेस हा जिल्ह्यात सर्वाधिक उपनगराध्यक्षपद प्राप्त करणारा पहिला पक्ष ठरला आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.
युवासेना शहरप्रमुखाचा पदाचा राजीनामा:अंजनगाव सुर्जी स्वीकृत सदस्य निवडीत आर्थिक व्यवहाराचा आरोप
नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीत वरिष्ठांकडून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) युवासेना शहर अध्यक्ष अक्षय गवळी यांनी १८ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्थानिक विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही अधिकृत घोषणा केली. नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी अंजनगावमध्ये उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, शिवसेना (उबाठा) कडे पुरेसे संख्याबळ असतानाही स्वपक्षाचा उमेदवार न निवडता उपाध्यक्षपदासाठी भाजपाला समर्थन देण्यात आले होते. या चर्चेनंतर आता स्वीकृत नगरसेवक निवडीतून नव्या वादाला तोंड फुटले आहे. गवळी यांच्या मते, स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांनी स्वतः (अक्षय गवळी), राजेंद्र टांक, राजेंद्र पाटील आणि पंकज मोदी यांनी अर्ज दाखल केले होते. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शब्द दिल्याने ते निश्चिंत होते. मात्र, ऐनवेळी नव्या नावाचा प्रस्ताव पुढे येत पंकज मोदी यांची निवड झाल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे. या घडामोडीमुळे पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांची किंमत शून्य झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेत कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या घडामोडींनंतर शिवसेना (उबाठा) मध्ये मोठी गळती लागणार का, असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित झाला आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने आगामी काळात याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अंजनगाव सुर्जीच्या स्थानिक राजकारणात नव्या वादळाचा स्पष्ट इशारा या घटनेतून मिळाला आहे. या आरोपांवर युवासेना, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख अंकुश कवाडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अक्षय गवळी यांना सलग चार वेळा युवा सेनेचे शहर अध्यक्षपद देऊन नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदाकरिता उमेदवारी सुद्धा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी श्रेष्ठींसोबत या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती. आर्थिक व्यवहाराबाबतचा त्यांचा आरोप निखालस खोटा असून, आमच्या पक्षात असा कुठलाच प्रकार होत नाही.
अमरावती शहरात मकर संक्रांतीनिमित्त सुरू असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांदरम्यान दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बडनेरा आणि राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयपथनगर, एसओएस शाळेजवळ घडली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ५७ वर्षीय महिला घराजवळून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्याने चेनचे पेंडंट खाली पडले, मात्र चोरट्यांनी उर्वरित चेन घेऊन पळ काढला. या चेनची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे. दुसरी घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तविहार कॉलनी परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ३८ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसोबत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जात असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटला. महिलेने आरडाओरड करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पसार झाले. विशेष म्हणजे, या दोन्ही घटना सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने घडल्या आहेत. चोरट्यांची कार्यपद्धती समान असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बडनेरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने आणि राजापेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस विभागाने महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हळदी-कुंकू तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना सोन्याचे दागिने घालणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, सोबत कुणी नसल्यास महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे आणि आवश्यक असल्यास अधिक काळजी घ्यावी, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टी विकास कामांच्या जोरावर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे .अमुक एखादा उमेदवार माझ्याजवळचा म्हणून त्याला तिकीट दिले जाणार नाही .सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये गटातटाचे राजकारण न पाहता सर्वसमावेशक आणि जिंकण्याची क्षमता असणारा उमेदवार दिला जाईल अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली . सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये उमेदवारांच्या मुलाखतीचे दुसऱ्या दिवसाचे सत्र पार पडले दोन दिवसांमध्ये तब्बल बाराशे उमेदवारांनी आपली राजकीय इच्छा जाहीर केली आहे . या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने चौदाशे हून अधिक नगरसेवक 25 नगरपालिकांमधून निवडून आणले आहेत त्यात यशाची आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुनरावृत्ती करावयाची आहे .येथे गटातटाचे कोणतेही राजकारण नाही तसेच कोणी कोणाच्या जवळचा असेही काही नाही .गटातटाच्या राजकारणाला विराम देऊन सर्वसमावेशक आणि जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार दिला जाईल .जो उमेदवार निश्चित होईल त्याच्या मागे सर्वांनी एकजूट पणे उभे राहून भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन शिवेंद्रसिंह राजे यांनी केले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, कार्यकारणी सदस्य धनाजी पाटील,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, माजी आमदार मदन भोसले इत्यादी उपस्थित होते . ना. जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टी आता कोणाच्या सांगण्यावरून थांबणारी पार्टी नाही. कार्यकर्त्यांनी अभेद्य एकजूट दाखवून आपापल्या गटातील उमेदवार निवडून आणावयाचे आहेत पाटण तालुक्यामध्ये मोठ्या शक्तीशी आपला संघर्ष आहे .तेथे निधी कमी पडू दिला जाणार नाही .पालकमंत्री कोणीही असो तेथील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निश्चित ताकद दिली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहेत असे थेट आव्हान जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले . जयकुमार गोरे व शिवेंद्रसिंह राजे यांची कमराबंद बैठक शिवेंद्रसिंह राजे व जयकुमार गोरे या दोन कॅबिनेट मंत्र्यांची लेक व्ह्यू हॉटेलच्या दालनामध्ये कमरा बंद बैठक झाली ही बैठक सुमारे वीस मिनिटे सुरू होती .सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने कोणती रणनीती राबवायची तसेच गटाचे उमेदवार देताना कशा पद्धतीने परिस्थिती हाताळायची या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे मात्र या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही .
सातारा क्राइम:दुचाकीवरील टोळीने महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले, चेनस्नॅचर महिला असल्याने खळबळ
सातारा शहरातील सदरबझार परिसरात भरदिवसा झालेल्या चेनस्नॅचिंगच्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांच्या टोळीने एका महिलेच्या गळ्यातील तब्बल ९० हजार रुपये किंमतीचे २ तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या टोळीतील चेन हिसकावणारी व्यक्ती अज्ञात महिला असल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी पूनम नानासाहेब मोहिते (वय ३९, रा. खेड, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूनम मोहिते या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या दुसऱ्या दुचाकीवरील तिघांपैकी एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून घेतले व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला आहे. अजंठा चौकात तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला सातारा शहरातील अजंठा चौक परिसरात दुचाकीवर कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झाले. या प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंकज शिवाजी नावडकर (वय २३, रा. सोनगाव, ता. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. दि. १७ जानेवारी रोजी अजंठा चौकात दुचाकी कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून निखिल जगदीप पवार व पृथ्वीराज भिमराव साळुंखे (दोघे रा. अमरलक्ष्मी स्टॉप परिसर, सातारा) यांनी पंकज नावडकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच शिवीगाळ व धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सातारा तालुक्यात बेकायदा दारूविक्रीवर कारवाई सातारा तालुक्यात अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. देगाव (ता. सातारा) येथे बेकायदा दारू विक्री करताना एका व्यक्तीस पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी सुनील लक्षण माने (वय ३९, रा. देगाव, ता. सातारा) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ९२० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अवैध दारूविक्रीमुळे सामाजिक समस्या वाढत असून अशा कारवायांमुळे गावागावात पोलिसांची दहशत निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव!
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांना संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या संपर्कामुळे शिवसेनेचे नगरसेवक मुंबईतील ताज लँडसमध्ये ठेवण्यात आले आहेत, असे सांगितले जात आहे. त्यातच महायुतीला काठावर बहुमत मिळाल्याने बार्गेनिंग पॉवर वाढल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपकडे अडीच वर्षे महापौरपदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा आहे. […] The post अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताने सामन्यासह मालिका गमावली
इंदूर : न्यूझीलंड क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडिया विरूद्धच्या तिस-या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतावर ४१ धावांनी मात केली आहे. न्यूझीलंडने भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या धावांचा पाठलाग करताना ५० षटकंही खेळता आली नाहीत. न्यूझीलंडने भारताला २४ बॉलआधी ऑलआऊट केले. न्यूझीलंडने भारताचा डाव ४६ षटकांत २९६ धावांवर गुंडाळला. […] The post भारताने सामन्यासह मालिका गमावली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँडस् एन्ड' या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे. शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. नवीन नगरसेवकांना आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेलमध्ये एकत्र ठेवले होते. ओळखी पाळखी, बोलणे-चालणे, काम कसे करायचे, जुने नगरसेवक कसे काम करत होते, त्यांचे अनुभव, निधीची तरतूद कशी करायची यावर आम्ही चर्चा केली. मला यांना भेटायचे होते. निवडणुकीत ते व्यस्त होते आणि इकडे जरा त्यांना वेगळा आनंद म्हणून हॉटेलमध्ये बोलावले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत 29 नगरसेवक आम्ही निवडून आणले आहेत. जनतेचा हा आशीर्वाद आहे. लोकांनी आमचे काम स्वीकारले आहे आणि उबाठाचे नाकारले आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. त्यांना त्यांची भीती आहे, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच आता बीडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. तसेच संगीता ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशाने बीडमध्ये शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. संगीता ठोंबरे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संगीता ठोंबरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा सुरू आहे. संगीता ठोंबरे या एकेकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जात होत्या. केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देण्याऐवजी नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे संगीता ठोंबरे नाराज झाल्या होत्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिल्यानंतर संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला होता, ज्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जात होते. मात्र, आता संगीता ठोंबरे यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला केज मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. ठोंबरे यांच्या या सत्तेतील पक्षासोबतच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा कोणाला फायदा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत ७ जवान जखमी
किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे रविवारी दुपारी झालेल्या दहशतवादी चकमकीत लष्कराचे ७ जवान जखमी झाले आहेत. अधिका-यांच्या माहितीनुसार, ३ जवानांना उपचारासाठी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना किश्तवाडच्या वरच्या जंगली भागातील सोनार येथील आहे. येथे लष्कराच्या व्हाईट नाईट कोरचे दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन त्राशी-१’ सुरू आहे. याच दरम्यान जवानांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार […] The post जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत ७ जवान जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठीजनांनी केलेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. महाराष्ट्राचे राज्यगीत सुद्धा यावेळी सादर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दावोस येथे आगमन होताच मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने ओवाळून स्वागत केले. स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्रारंभी स्वागत केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मार्गात आणि इतरही नागरिकांनी त्यांची भेट घेतली तेव्हा प्रत्येक जण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत होता. एकूणच महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीची धूम तेथेही पाहायला मिळाली. बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या कार्यक्रमात 'स्वागत देवाभाऊ' असा फलक लागला होता. 'बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड'तर्फे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. राज्यात आपण महा-एनआरआय फोरम तयार केला असून, त्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले. कोणत्याही प्रगतीचा मूलभूत विचार हा सांस्कृतिक वैभव जपण्याचा असतो. त्यातूनच भौतिक प्रगती साध्य होत असते. आता मुंबईच्या विकासाचे आणखी ठोस नियोजन आपण हाती घेतले असून पुढच्या 5 वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा आपली मुंबई अधिक प्रगत असेल. कोणत्याही देशात जा, तेथे मराठी माणूस आज प्रगती करतो आहे. मेहनती आणि विश्वासार्ह हीच त्याची ओळख आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी प्रवास सुरू, संजय राऊतांचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या स्वागतावरून खोचक टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे करण्यात आले ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे, महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय!, असे त्यांनी म्हटले आहे.
लातेहार : झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआडांड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओरसा व्हॅलीत बस उलटून भीषण अपघात झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलिस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनाकडून […] The post झारखंडमध्ये भीषण अपघात; ५ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काझीरंगा : आज भाजप देशभरातील जनतेची पहिली पसंत बनला आहे. गेल्या दीड वर्षात देशाचा भाजपवरील विश्वास सातत्याने वाढत आहे. बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये, जनतेने २० वर्षांनंतरही भाजपला विक्रमी संख्येने मतदान केले. आम्ही विक्रमी जागा जिंकल्या. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये महापौर आणि नगरसेवकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पहिल्यांदाच, जगातील सर्वात मोठ्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या […] The post जनतेला सुशासन आणि विकास हवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रेया पाचपासे हिने राष्ट्रीय पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक
हिंगोली : उत्तराखंड राज्यातील रूरकी येथील कोअर विद्यापीठाच्या मैदानावर १६ ते १८ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत हिंगोलीतील श्रेया इंद्रजित उर्फ संदिप पाचमासे हिने सुवर्ण पदक पटकावले. श्रेया पाचमासे सध्या वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत आहे. राज्य स्तरावर झालेल्या पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. […] The post श्रेया पाचपासे हिने राष्ट्रीय पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र भागीदारी वाढवण्याबाबत अमेरिकेशी चर्चा
दावोस : अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अमेरिकेची महाराष्ट्रातील गुंतवणूक तसेच महाराष्ट्रातील व्यवसायांना अमेरिकेत संधी यावर चर्चा झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान व उत्पादन या विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र व अमेरिकेतील भागीदारी अधिक दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रीत […] The post महाराष्ट्र भागीदारी वाढवण्याबाबत अमेरिकेशी चर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी जलमंदिर येथे राजेंची भेट घेऊन आपली दावेदारी मांडली. या भेटीदरम्यान उमेदवारीची मागणी करताना क्षीरसागर यांनी, उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला दोरी द्या, अशी मिश्कील टिप्पणी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी ओढाताण सुरू आहे. मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी आता आपली दावेदारी प्रबळ केली आहे. यापूर्वी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, मात्र उदयनराजेंच्या शब्दाखातर त्यांनी माघार घेतली होती. राजेंच्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या क्षीरसागर यांनी आता जिल्हा परिषदेसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी मागितली आहे. उदयनराजेंनाही हासू आवरेना जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसलेंची भेट घेत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी आपल्या खास शैलीत ही मागणी केली. आता उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला इथंच दोरी द्या, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी राजेंशी बोलताना केली. त्यांची ही उपरोधिक पण मजेशीर मागणी ऐकून खुद्द उदयनराजेंनाही आपले हसू आवरता आले नाही. निष्ठेची आणि जुन्या त्यागाची आठवण करून देत क्षीरसागर यांनी केलेल्या या विधानाची सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकमत झाले नाही तर स्वतंत्र लढण्यास मोकळे- शिवेंद्रसिंहराजे भोसले साताऱ्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी महायुती काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, महायुतीत सर्वसहमतीने एकमत झाले तर चांगलीच गोष्ट आहे, मात्र तसे न झाल्यास सातारा जिल्ह्यात प्रत्येक पक्षाची स्वतःची मोठी ताकद असल्याने सर्वजण स्वतंत्रपणे लढायला मोकळे आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या समन्वय बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचा निर्णय पक्षातील सर्व नेते एकत्रितपणे घेतील, असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले. मात्र, या बैठकीतून नेमके काय निष्पन्न होईल, याचा अंदाज वर्तवणे सध्या कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. जर जागावाटपाबाबत किंवा अन्य मुद्द्यांवर एकमत झाले नाही, तर प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीवर निवडणूक रिंगणात उतरेल, अशी रोकठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात महायुतीमध्ये समन्वय राहणार की पुन्हा एकदा 'स्वबळाचा' नारा दिला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बद्रीनाथ, केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोनला बंदी
डेहराडून : बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरात परिसरात आता मोबाईल फोन नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गढवालचे विभागीय आयुक्तांच्या ध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर परिसराबाहेर योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात दर्शन घेतल्यावर भाविक तिथेच फोटो आणि सेल्फी काढण्यात व्यस्त […] The post बद्रीनाथ, केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोनला बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संगमावर जाताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी रोखले
वाराणसी : मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर प्रयागराज येथे संगम नगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, येथे एक मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांनी ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ताफ्याला संगम तीरावर जाण्यापासून रोखले, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसर नो-व्हेइकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, […] The post संगमावर जाताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी रोखले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भिका-याचे ३ बंगले, कार आणि व्याजाचा धंदा
इंदूर : आपण अनेकदा रस्त्यावर बसलेल्या भिका-यांकडे सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना चार दोन पैसे देतो. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आलेली बातमी वाचून तुमचा भिका-यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. सराफा बाजारात गेली अनेक वर्षे भीक मागणा-या मांगीलाल नावाच्या भिका-याचा रॉयल थाट उघड झाला असून, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभागाने […] The post भिका-याचे ३ बंगले, कार आणि व्याजाचा धंदा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिवाळ्यात हृदयविकारासाठी आळस कारणीभूत
नवी दिल्ली : हिवाळ्यात आळस आणि आळशीपणामुळे लोकांची शारीरिक हालचाल कमी होते. याशिवाय या ऋतूत लोक अनेकदा गाजराची खीर, पराठे आणि पकोडे यासारखे पदार्थ जास्त खातात आणि व्यायाम करत नाहीत, ज्यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते, वजन वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. हिवाळयात, रक्त गोठण्याचा धोका ब-याचदा वाढतो. खरं तर, शरीरात हार्मोनल बदलांमुळे […] The post हिवाळ्यात हृदयविकारासाठी आळस कारणीभूत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा व्यवसाय नसून, व्रत आहे. त्यामुळे पत्रकारांनी सत्याचा शोध घेऊन समाजाला दिशा देणे आणि लेखणीतून समाजहितासाठी आवाज बुलंद करणे ही पत्रकारांची जबाबदारी आहे. कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक दबावाला बळी न पडता निष्पक्ष आणि निर्भिडपणे वार्तांकन करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील […] The post पत्रकारांनी निर्भिड पत्रकारिता करावी;राज्यस्तरीय पुरस्कार सोहळयात अॅड. अण्णाराव पाटील यांचे प्रतिपादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईच्या महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, 'डॉन' अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांना मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालानंतर त्यांचे पती आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत योगिता यांच्या जिद्दीचे व त्यांनी दिलेल्या लढ्याचे मनापासून कौतुक केले आहे. पराभवाने खचून न जाता योगिता यांनी केलेल्या कष्टाचा आणि जनसेवेचा आपल्याला अभिमान असल्याचे अक्षयने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. योगिता यांना भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. योगिता यांच्या पराभवानंतर त्यांचे पती अभिनेते अक्षय वाघमारे यांनी पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, प्रिय बायको, सर्वप्रथम तुझे मनापासून आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे. प्रेग्नन्सी आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई असताना, एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन तू ज्या धैर्याने ही निवडणूक लढवलीस, ते खरंच थक्क करणारं आहे. पुढे अक्षय लिहितात, सत्ताधारी असो किंवा विरोधक, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे...कोणाच्याही तुलनेत वैयक्तिक पातळीवर तुला सर्वाधिक 6300 मतं मिळाली. तुझ्या आसपासही कुणी नाही, हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस. मम्मी, पप्पा, तू आणि अखिल भारतीय सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणितक कष्टाची ही पावती आहे. भायखळाच्या जनतेनं तुला भरभरून प्रेम दिलं. हे प्रेम पाहून स्पष्ट होतं की, लोकांसाठी तू आधीच निवडून आली आहेस. जनतेनं जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुझ्या कामावर अन् विकासावर विश्वास ठेवला आहे. गेल्या काही महिन्यांत तू घेतलेले कष्ट आणि तुला होणाऱ्या वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. आपली मोठी मुलगी आणि नुकतंच जन्मलेलं बाळ.. या दोघींना सोडून तू 12-12 तास काम करायची. कधी कधी तुझी आणि मुलींची भेट व्हायची नाही. तरीही तू फोनवरून त्यांची काळजी घ्यायची. तुझ्यातली हळवी आई मी अनुभवली आहे तुला बऱ्याचदा शारीरिक वेदना झाल्या. परंतु, तू कधीही याची तक्रार केली नाहीस. चिडली नाहीस, किंवा रागावली नाही. तुझा शांत अन् संयमी स्वभाव हीच तुझी खरी ताकद आहे. जनतेने तुझ्यावर आणि डॅडी यांच्या कतृत्वावर मोहोर उमटवली आहे. हा पराभव नक्कीच तुझा नाही. तर, तुझी ही राजकारणातील धमाकेदार एन्ट्री आहे. मला तुझा खूप अभिमान आहे. आता आणखी जिद्दीने कामाला लागूया. लव्ह यू आलवेस, असे अक्षय वाघमारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी हे बहुमत काठावरचे असल्याने राजकीय वर्तुळात 'घोडेबाजारा'ची चर्चा सुरू झाली आहे. फोडाफोडीच्या भीतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. महापालिकेत महापौर आणि स्थायी समिती सभापती यांसारखी महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी आपली 'बार्गेनिंग पॉवर' वाढवण्याचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. या अनपेक्षित हालचालीमुळे आगामी काळात सत्तास्थापनेसाठी महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या असताना, शिवसेना शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी या कृतीमागचे नेमके कारण स्पष्ट करत विरोधकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. नवख्या नगरसेवकांसाठी हॉटेलमध्ये शिबिर शीतल म्हात्रे म्हणाल्या, आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. आम्ही महायुती म्हणूनच सत्तेत येणार आहोत. तसेच नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भात त्या म्हणाल्या, आमचे जवळपास 20 नगरसेवक नवखे आहेत, त्यांना मनपाचे कामकाज माहित नाही. त्यामुळे त्यांच संदर्भाने दोन दिवसीय शिबिर घेतले आहे. त्यासाठीच हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. हे उबाठाच्या नगरसेवकांना हरवून आले आहेत, असेही म्हात्रे म्हणाल्या. इतकेच नव्हे तर महायुती ही बाळासाहेब यांनी केलेली नैसर्गिक युती आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नसल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊतांवर बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाश्ता करण्यासाठी हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये जाणार आहेत, यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना बोचरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, संजय राऊत म्हणजे चाकरी सिल्व्हर ओकची आणि भाकरी मातोश्रीची असे आहे. सगळ्यांना खड्ड्यात घातले, खासदारकी संपत आली आहे. तीही शिंदेंच्या कृपेमुळे आली होती. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील नाहीतर मला शिंदेंकडे घेऊन चला म्हणायला येतील, असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान पाटील यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समरजित घाटगे हे शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. घाटगे हे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच घाटगे यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. तसेच समरजित घाटगे हे महायुतीच्या बैठकीला देखील उपस्थित असल्याचे समजते. विधानसभेच्या वेळी केला होता शरद पवार गटात प्रवेश कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर, समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे निवडणूक लढवली, मात्र या थेट लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर घाटगे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच स्थानिक राजकारणात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला सारून, कागल नगरपरिषद निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनी ऐतिहासिक आघाडी केली. या नव्या समीकरणाने निवडणुकीत मोठी किमया साधली असून, शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत मुश्रीफ-घाटगे आघाडीने 23 पैकी 23 जागांवर विजय मिळवून पूर्ण 'व्हाईट वॉश' केला आहे. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांची निवड झाली असून, या एकतर्फी विजयामुळे कागलमधील दोन्ही दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्यावर मतदारांनी मोहोर उमटवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत, म्हणूनच अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अहिल्यादेवींचा 300 वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेच्या समोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे. अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजप व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे म्हणाले, अहिल्यादेवींनी 1771 मध्ये वाराणसी मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर 10 जानेवारी रोजी भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला. यावेळी अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. 27 तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावर बुलडोझर चालवून धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार गोपीचंद पडळकरसारखे धनगर समाजाचे नेते म्हणवणारे गप्प कसे बसले, असा सवालही यशपाल भिंगे यांनी केला आहे.
बीडमध्ये अधिका-याचा संशयास्पद मृत्यू
बीड : बीडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जीएसटी विभागातील अधिका-याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सचिन जाधवर असे मृत अधिका-याचे नाव आहे. ते मागील २४ तासांपासून बेपत्ता होते. सोलापूर-धुळे महामार्गालगत कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे कारमध्ये पोलिसांना कोयता आणि मडकं आढळल्याने खळबळ उडाली आहे. जाधवर यांच्या कारमध्ये एक पत्रही मिळाले […] The post बीडमध्ये अधिका-याचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार, पद्मविभूषण श्री. इलयाराजा (राज्यसभा सदस्य) यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने श्री. इलयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे. पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७,००० हून अधिक गाणी तसेच १,५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती केली आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आदी विविध भारतीय भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकी संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीताच्या बाजावर आधारलेले, तसेच पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त लाभलेले संगीत ही त्यांची प्रमुख ओळख आहे. चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना हि इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे. कला, करुणा आणि सर्जनशील साधनेचे प्रतीक मानल्या जाणार्या पद्मपाणि पुरस्कारासाठी इलयाराजा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संगीतातील आध्यात्मिकता, शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेमुळे ते जनमानसात ‘इसैग्नानी’ (संगीतक्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व) म्हणून ओळखले जातात. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. सॉलीटेअर टॉवर्स, कालिका स्टील, डेली हंट हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात देशभरातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ.आशिष गाडेकर, कला संचालक डॉ.शिव कदम, डॉ.रेखा शेळके, डॉ.प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा जागेवरच मृत्यू
सोलापूर : प्रतिनिधी पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एका कारचा शनिवारी रात्री भयंकर अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. सर्वजण पनवेलहून एर्टिका कारने अक्कलकोटला देवदर्शनला […] The post पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा जागेवरच मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा आणि सुनीता आहुजा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. सुनीता अनेकदा तिचा पती गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. सुनीता अनेक वेळा गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरही बोलली आहे. आता, तिने पुन्हा एकदा तिच्या पतीच्या अफेअरवर मत व्यक्त केले आणि धक्कादायक खुलासा केला आहे. नवीन पॉडकास्ट मिस मालिनीशी झालेल्या मुलाखतीत […] The post मी त्याला माफ करणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोल्यात बंडखोर आशिष ठरणार गेम चेंजर
अकोला : अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला महापालिकेत एकूण ८० जागा आहेत. बहुमतासाठी ४१ चा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या दोन अपक्ष, शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेत. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेत. भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित […] The post अकोल्यात बंडखोर आशिष ठरणार गेम चेंजर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण?
कल्याण : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला, अनेकांना पक्षांनी तिकिट दिले नाही म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली. आता ते नगरसेवक पुन्हा आपल्या जुन्या पक्षाकडे परत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे कल्याण-डोंबिवलीमधील रात्री झालेल्या गाठीभेटी… कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. यातील प्रभाग […] The post कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर तांत्रिक बिघाडांमुळे रखडलेले दोन निकाल 'पाडू' (PADU - Printing Auxiliary Display Unit) या यंत्राच्या सहाय्याने निकाली काढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी या यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, निवडणूक आयोगाने या यंत्राचा आधार घेत कुर्ला आणि घाटकोपरमधील दोन प्रभागांतील निकाल घोषित केले असून, येथे अनुक्रमे भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली आहे. मतदान यंत्रात (EVM) तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणीत अडथळा येऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने 'पाडू' यंत्राचा पर्याय निवडला होता. मात्र, मतदानाच्या काही तास आधीच या यंत्राचा वापर होणार असल्याचे जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. हे यंत्र म्हणजे ईव्हीएममधील डेटा चोरण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा प्रकार आहे, अशी टीका करत दोन्ही ठाकरे बंधूंनी याला कडाडून विरोध केला होता. मात्र, प्रशासनाने तांत्रिक पेच सोडवण्यासाठी या यंत्राचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. कुर्ला प्रभाग १५९: प्रकाश मोरे यांची सरशी सर्वात मोठी चुरस कुर्ला येथील 'एल' वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १५९ मध्ये पाहायला मिळाली. येथे भाजपचे प्रकाश मोरे आणि काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी यांच्यात काटाजोड लढत होती. दुसऱ्या फेरीत एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोजणी थांबवण्यात आली होती. इतर सर्व मशिनची मोजणी पूर्ण झाल्यावर मोरे आणि शेट्टी यांच्यात केवळ ४८३ मतांचा फरक होता. बिघडलेल्या मशिनमध्ये ५३१ मते होती, ज्यामुळे जय-पराजयाचे पारडे कोणत्याही बाजूला झुकू शकले असते. अखेर 'पाडू' यंत्राच्या सहाय्याने या ५३१ मतांची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये प्रकाश मोरे यांना अधिक मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले. घाटकोपर प्रभाग १२५: शिंदे गटाचे सुरेश आवळे विजयी असाच तांत्रिक पेच घाटकोपर येथील 'एन' वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १२५ मध्ये निर्माण झाला होता. येथेही ईव्हीएम सुरू होत नसल्याने मतमोजणीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असताना प्रशासनाने 'पाडू' यंत्राचा आधार घेतला. या यंत्राद्वारे आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सुरेश आवळे यांनी विजय संपादन केल्याचे जाहीर करण्यात आले. भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेले कुर्ला आणि घाटकोपर येथील निकाल 'पाडू'मुळे मार्गी लागले असले, तरी या यंत्राच्या वापरामुळे विरोधकांच्या हाती नवीन कोलीत मिळाले आहे. ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होतोच कसा आणि त्यात 'पाडू'सारख्या बाह्य यंत्राचा हस्तक्षेप का केला जातो? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत या यंत्राच्या विश्वासार्हतेवरून न्यायालयीन लढाई किंवा मोठे राजकीय आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई : राज्यात भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. आता महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अशी विविध पदे निवडून आलेल्या नगरसेवकांना खुणावत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून प्रशासक राज होते. त्यामुळे अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग, लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. पण या सगळ्यांच्या अपेक्षांवर सध्या पाणी फेरले गेले आहे. ही सर्वच प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे समोर येत आहे. राज्यात […] The post राज्यात महापौर निवड लांबणीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मॅरेथॉनमध्ये आमिर खानने घेतला भाग
मुंबई : प्रतिनिधी रविवार, १८ जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास ३.५४ कोटी रुपये आहे. ४२ आणि २१ किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणा-या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसह या […] The post मॅरेथॉनमध्ये आमिर खानने घेतला भाग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमधील १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचा 'शाळा परिवर्तन प्रकल्प' (स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प) अंतर्गत कायापालट करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा प्रकल्प, शासन आणि खासगी भागीदारीतून गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि भविष्यमुखी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत आहे. या प्रकल्पाची सुरुवात ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारानंतर झाली. राष्ट्रीय देयके महामंडळ या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य पुरवत असून, लर्निंग लिंक्स फाउंडेशनमार्फत त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा परिषद, शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांचा सक्रिय समन्वय आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जात आहे. डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पहिल्या ते चौथ्या टप्प्यात एकूण १२५ शाळांचा विकास करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यात (जून २०२५ ते नोव्हेंबर २०२६) आणखी ५० शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आरमोरी, आहेरी, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, गडचिरोली, कोरची आणि कुरखेडा या आठही तालुक्यांमधील एकूण १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांपर्यंत प्रकल्पाची व्याप्ती वाढली आहे. या प्रकल्पांतर्गत शाळांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये माहिती व तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वर्गखोल्या, अद्ययावत ग्रंथालये, विज्ञान प्रयोगशाळा, गणित व क्रीडा शिक्षण साधने यांचा समावेश आहे. तसेच, 'इमारतच शिक्षणाचे साधन' (Building as Learning Aid) या संकल्पनेनुसार शैक्षणिक भित्तीचित्रे, शाळा परिसर व दर्शनी भागांचे सौंदर्यीकरण, आधुनिक स्वच्छतागृहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची (जलशुद्धीकरण यंत्रणा) व्यवस्था केली जात आहे. याव्यतिरिक्त, शिक्षक प्रशिक्षण व क्षमता वृद्धी कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व तंदुरुस्ती उपक्रम, शाळा व्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे.
देवाभाऊ हे तुमच्यासारखे घरात बसणारे मुख्यमंत्री नाहीत. त्यांना महाराष्ट्राला नंबर एकवर न्यायचे आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते साधे मंत्रालयात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. देवाभाऊ हे जनतेत सुद्धा असतात आणि दावोसला जाऊन गुंतवणूक सुद्धा आणतात हे त्यांचे काम आहे, घरात बसून पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी हे काय कळणार. तुम्ही स्वत:च्या घरात तुमचा पक्ष क्र एकचा करु शकले नाही याचे भान ठेवा, असे म्हणत मुंबई मनपाचे नगरसेवक तथा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नवनाथ बन म्हणाले की, मुंबईचा महापौर कोण होणार हे संजय राऊत यांनी ठरवायची गरज नाही. मुंबईकरांनी ठरवले आहे की भाजपा आणि महायुतीचा महापौर होणार आहे. राऊतांनी आपल्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबई आमचा गड असे जे तुम्ही सांगत होतात तो तुमचा गड महायुतीने सर केला आहे. तुमच्या पक्षाचे नगरसेवक तुमच्याकडे राहतील का? पक्षाचे काय होईल याकडे लक्ष द्या. तुमच्या पक्षाला उतरती कळा लागलेली आहे. उगाच दिवा स्वप्न पाहू नका. उबाठा गटाला घसरगुंडीकडे संजय राऊत यांनी नेले आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवले पाहिजे. राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का? नवनाथ बन म्हणाले की, एकनाथ शिंदे हे अंगवस्त्र नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे शिवसैनिक आहेत. तुम्हीच राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का हा माझा सवाल आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांची तुम्ही गुलामी करतात. तर शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले आहे तर उद्धव ठाकरे हिरव्या मतांसाठी गुलामी करण्याचा प्रयत्न करत आहे. पवार- काँग्रेसला धोका दिला नवनाथ बन म्हणाले की, बहुमत कधीच अस्थिर नसते ते कायमच एकजूट असते. अस्थिर काय असते तर ती तुमची भूमिका असते. तुम्ही ज्या पद्धतीन भूमिका बदलत आहात ते महाराष्ट्राने पाहिले आहे.बहुमत मजबूत असते. त्यामुळे आमचा झेंडा मुंबई मनपावर फडकणार आहे. तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसला धोका दिला आहे, आता तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही. ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकं गेली नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊ हे भयाचे नाही तर कायद्याचे आणि विकासाचे नाव आहे. त्याच्यामुळे कोणाला घाबरण्याची गरज नाही. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे. भाजपा आणि महायुती अतिशय भक्कम आहे, आमचाच महापौर मुंबई मनपामध्ये होणार आहे. देवाभाऊ हे विकासाने मुंबईला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, त्यामुळेच सर्वाधिक मनपा निवडून आणल्या. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व गहान ठेवले त्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करु नये. तुमचे आमदार हे काही ईडी सीबीआयला घाबरून गेले नव्हते ते उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून निघून गेले. नगरसेवक फोडण्याची भीती कुणालाही नाही, एकनाथ शिंदेंना देखील नाही, उलट तुमचे किती नगरसेवक तुमच्यासोबत राहतात याकडे लक्ष द्या, हा अहंकार ठेवलात तर नगरसेवकही तुम्हाला सोडून जातील.
तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टीऑनलाइन झाल्या आहे. महत्त्वाचीकागदपत्रे डिजिलॉकरमध्येऑनलाइन ठेवून सुरक्षित करण्यातयेत आहे. याच डिजिलॉकरमध्येआता आधार कार्ड, ड्रायव्हिंगलायसेन्स, उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला यासोबतच ग्राहकक्रमांक टाकून विजेची बिलेदेखील ठेवता येणार आहे. महत्त्वाची कागदपत्रे हवे तेव्हाउपलब्ध करून देणाऱ्या केंद्रसरकारच्या डिजिलॉकर याऑनलाइन सुविधेत आतावीजबिलेही उपलब्ध झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीअत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचावापर करून वीज ग्राहकांना‘इजऑफ लिव्हिंग’च्या आधारेअधिकाधिक सेवा देण्याची सूचनाकेली आहे. त्यानुसार महावितरणनेकेंद्र सरकारच्या डिजिलॉकरशीवीज बिले जोडली आहेत. त्यामुळेवीज ग्राहकांना आपल्या मोबाइलफोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्येठेवलेल्या महत्त्वाच्यादाखल्यांसोबतच वीज बिलेहीउपलब्ध झालेली आहेत. कामाची माहिती- अशी करावी प्रक्रिया मोबाइलमधील डिजिलॉकर अॅप सर्वात आधी उघडावे.किंवा digitallocker.gov.inया वेबसाइटला भेट द्या. तुमच्याआधार नंबर व पिनच्या मदतीनेलॉगिन करा. होम स्क्रीनवर‘Search'' (भिंगाचे चिन्ह) यापर्यायावर क्लिक करा. तिथे‘Utilities'' पर्याय निवडा किंवासर्च बारमध्ये ‘ElectricityBill'' असे टाइप करा. आता वीज कंपन्यांची यादी दिसेल. तुमच्या वीज पुरवठादार कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर ग्राहक क्रमांक टाका. आवश्यक असल्यास बिलिंग युनिट भरा. माहिती भरल्यानंतर ‘GetDocument'' या बटणावर क्लिक करा. सिस्टिम तुमच्याकंपनीच्या डेटाबेसमधून बिल शोधून काढेल. काही सेकंदात वीजबिल डिजी लॉकरमध्ये दिसेल. आता हे बिल तुमच्या‘Issued Documents'' याविभागात कायमस्वरूपी सेव्हहोईल आणि पाहता येईल.
महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची दोघांची युती आहे. एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्मासाठी बाधक आहेत, त्यांनी फिक्स करत ही निवडणूक लढवली, यामुळे त्यांच्या दोघांची ताकद वाढलेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. जिन्ना आणि हिंदू महासभेची युती होती. बंगालमध्ये मुस्लीम लीगचा मुख्यमंत्री, तर जनसंघाचे मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. ही दोघांची नैसर्गिक युती आहे, जी या निवडणुकीत समोर आली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता जर वेळीच सावध झाली नाही तर ही लोकं राज्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे औवेसी(एमआयएम) आणि देवेंद्र फडणवीस(भाजप) यांची जी मैत्री आहे एकाच विचाराने ते दोघे पुढे वाटचाल करत आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. हा काय नवीन विषय नाही. वंचितसोबत सत्तेसाठी नाही विचारांसाठी युती हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेना गेली अनेक वर्षे मुंबई मनपा एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने वंचितसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.आमच्यावर होणारी टीका ही चुकीची आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांची भावना आम्ही जाणून घेणार आहोत. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पण जय-पराजय नाही तर आमच्यासाठी विचारांचा मेळ आहे. गांधी-आंबेडकर पॅटर्नने आम्हाला पुढे जायचे आहे त्या दृष्टीने आम्ही युती केली. गायकवाड-जगताप यांच्यात समन्वय घडवणार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पक्षांतर्गत आहे त्यावर कारवाई सुरू आहे. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यातील अंतर्गत संघर्षावर लवकरच समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व काँग्रेस नेते एकत्रित काम करत आहोत. या टीम वर्कच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत पक्ष पुढे नेणार आहोत.
२०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कोविडनंतरचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले आहे. तिकीट खिडकीवरील कमाईत वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमध्ये तिकीट दरातील २० टक्के वाढीचाही मोठा वाटा आहे. हिंदीत या वर्षी कमी चित्रपट आले असले तरी 'धुरंधर 'सारख्या चित्रपटामुळे हिंदी सिनेमाने पॅन इंडिया स्तरावर मोठी झेप घेतली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने देशात ९५० कोटी आणि जगभरात १३०० कोटींहून अधिक व्यवसाय केला. यामुळे हा हिंदी चित्रपट इतिहासातील (या संदर्भात) सर्वात यशस्वी चित्रपट मानला जात आहे. याव्यतिरिक्त 'छावा', 'सैयारा' आणि 'वॉर-२' सारख्या हिंदी चित्रपटांनीही टॉप-१० मध्ये स्थान मिळवले. देशभरात ३७ चित्रपटांनी १०० कोटींहून अधिक कमाई केली. २०२४ मध्ये ही संख्या केवळ २२ होती. मल्याळम चित्रपटांचा व्यवसाय २०२४ मधील ५७२ कोटींवरून वाढून १,१६५ कोटींवर पोहोचला. तमिळ सिनेमाच्या तिकीट विक्रीत १७ टक्के, तर तेलुगू सिनेमात १५ टक्क्यांनी घट झाली. ९ वर्षांत चौथ्यांदा हिंदी चित्रपट कमाईत अव्वल
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे सध्या डिप्रेशनमध्ये गेले असून ते जे बोलतात त्याला वास्तवाचा कोणताही आधार नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का? अशा बोचऱ्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने यश मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. ठाकरे बंधुंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंच्या या सूचक विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उपरोक्त विधान केले. नेमके काय म्हणाले नारायण राणे? उद्धव ठाकरे यांनी 'देवाच्या इच्छेने महापौर आमचाच होईल' असे विधान केले होते. त्यावर टोला लगावताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहत आहेत, पण त्यांनी देवाला आतापर्यंत कधी जोडलेच नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मग तुमचा महापौर कसा होणार? एकदा संख्याबळ तपासून बघा. एवढा मोठा फरक तुम्ही कसा भरून काढणार? त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का? ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही नारायण राणेंनी निशाणा साधला. सुरुवातीला जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होते, तेव्हा ते काही करू शकले नाहीत. वेगळे झाल्यावरही त्यांना काही करता आले नाही आणि आता पुन्हा एकत्र येऊनही ते काही करू शकले नाहीत. आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवल्यामुळे आता नफा-तोटा काय असतो, याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत आहे. त्यांची शिवसेना आता फक्त नावाला उरली आहे, असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंना दिला घरी बसण्याचा सल्ला राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहताय का? पण देवाला आतापर्यंत कधी जोडले नाहीत. त्यांनी संख्या बघावी. त्यांचा महापौर कसा होणार? त्यामुळे उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत. ते बोलतात ते वास्तव नाही. भाजप, शिवसेना शिंदे युतीची महाराष्ट्रातील जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये सत्ता आली आहे. आता तरी शहाणे बनून घरी बसावे आणि जे ऑपरेशन करायचे ते करून घ्यावे”, असा बोचरा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मोठ्या शिष्टमंडळासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या ‘जागतिक आर्थिक परिषदेसाठी’ रवाना होत आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या पाच दिवसीय दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका करत गुंतवणुकीच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये जागतिक कंपन्या महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांना पसंती देत असल्याची उदाहरणे दिली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डिस्ने’ आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील ‘हनीवेल’ यांनी विस्तारासाठी बंगळुरूची निवड केल्याचे त्यांनी नमूद केले. डिस्नेने बंगळुरूमध्ये 1.74 लाख चौरस फूट, तर हनीवेलने 4 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. तसेच, डेलॉइटने मंगळुरूमध्ये 50 हजार नोकऱ्यांची घोषणा केली असून, मारुती सुझुकीने 35 हजार कोटींची गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राला जागतिक कंपन्यांची गुंतवणूक का मिळत नाही, असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी सरकारच्या गुंतवणूक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि राज्यातील बेरोजगार तरुणांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केवळ कागदावरचे सामंजस्य करार न करता प्रत्यक्ष उद्योग उभे राहावेत, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडताना मागील वर्षीच्या दावोस दौऱ्याचे यश अधोरेखित केले आहे. गेल्या वेळी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे 72 टक्के करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील वर्षी 16 लाख कोटी रुपयांचे करार झाले होते आणि यंदाही तितकीच गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राजकीय वादाच्या घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष करताना एका भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनी भव्य रॅली काढत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रभागातील भाजपच्या पराभूत उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुष्पा ताजनपुरे यांच्या दाव्यानुसार, विजयाची रॅली काढत असताना नवले यांच्या कार्यकर्त्यांनी ताजनपुरे यांच्या घरात शिरून अश्लील कृत्य केले आणि घरावर ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले, त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह १५ ते २० संशयित समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. एकटी लढली अन् जिंकली, आभा पांडेंचे शक्तीप्रदर्शन नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी, प्रभाग २१ मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी पक्षाची अब्रू राखली आहे. आज त्यांनी शांती नगर परिसरातून भव्य 'आभार रॅली' काढून मतदारांचे आभार मानले. रॅली दरम्यान बोलताना आभा पांडे म्हणाल्या की, माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषक कार्ड आणि पैशांचा वारेमाप वापर केला होता. मात्र, जनतेने माझ्या कामावर विश्वास दाखवला. अजित पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता, तो मी सार्थ ठरवला आहे. आता यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध राहीन. निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग लावल्याची घटना समोर आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवल्याचा आरोप आकाश बारणे यांनी केला आहे.

28 C