माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. औषध कंपन्यांच्या दरांवर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. औषध कंपन्यांकडून खते, कीटकनाशके, पीजीआर (PGR) आणि बुरशीनाशकांचा वापर कोणत्या पद्धतीने करावा, याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा पिकासाठी जवळपास ७० हून अधिक कंपन्यांनी औषधांची विक्री केली आहे. या कंपन्यांच्या औषधांच्या किमतीत मोठी तफावत असून, शेतकरी रोखीने औषध खरेदी केल्यास मूळ किमतीच्या ६० ते ६५ टक्के सवलत दिली जाते. गुण नियंत्रण विभागाकडून मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी करण्यात येते, यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी बोलताना माजी आमदार बाळा माने यांनी, आंबा पिकांच्या कीड रोगांच्या औषध फवारणीमध्ये संशोधन विभागाने नेमके काय संशोधन केले, तसेच ज्या औषध कंपन्या बोगस आहेत, त्यांच्यावर गुणनियंत्रण विभागाने काय कारवाई केली, असे प्रश्न उपस्थित केले. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग व कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतेच संशोधन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला संचालक गुण नियंत्रक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे, प्रकाश बालवडकर, अजय तेली, उमेश वाळके, तिमीर माणगांवकर, सुजीत चौकेकर, दीपक कदम, विनय पाडावे, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.
पुणे महापालिकेकडून यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा जयंती उत्सव संस्मरणीय ठरेल, अशी ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जयंती उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आंबेडकर पुतळा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक नीलेश आल्हाट, मनपा उपायुक्त परिमंडळ १ माधव जगताप, उपअभियंता बाळासाहेब पंडित, विठ्ठल गायकवाड आणि राहुल डंबाळे उपस्थित होते. महापालिका यावर्षी प्रथमच अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा आंबेडकर पुतळा, मंगळवार पेठेतील आंबेडकर भवन आणि कॅम्प परिसरातील आंबेडकर पुतळा या संपूर्ण मार्गावर मंडपाचे आच्छादन घालण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर वाडेकर यांनी दिली. आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा प्रसार करणारी पुस्तके नागरिकांना पाहता यावीत आणि विकत घेता यावीत यासाठी फोटोझिंकोच्या गल्लीत पुस्तकांच्या स्टॉल्ससाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार जयंती उत्सव काळात संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार असल्याचेही वाडेकर यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ज्या ठिकाणी उत्सव साजरा केला जाईल, तेथे रात्री बारा वाजेपर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील. तेथील सुविधा आणि स्वच्छतेचे नियोजन त्यांच्याकडून केले जाईल. पोलिसांच्या सहकार्याने काही मार्गांमध्ये बदल करून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जाईल, अशी माहिती उपायुक्त जगताप यांनी दिली. उत्सवाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि अग्निशामक दलही तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर वाडेकर यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. आंबेडकर जयंती किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांच्या उत्सवावेळी वेळेच्या किंवा आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाडेकर यांनी व्यक्त केला. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचेही उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी एका वयोवृद्ध व्यक्तीच्या खून आणि जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खून, दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दामोदर जयराम मिंडे (वय ६२, रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे त्यांच्या शेतातील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लोखंडी पहाराने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला. आरोपींनी सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. मिंडे यांच्या मुलगी गीतल गावडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान, आरोपींनी पॅशन मोटारसायकलचा वापर करून खोडद-बेल्हे मार्गे पारनेरकडे पलायन केल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणेवाडी परिसरात सापळा रचून कबीर उंबऱ्या काळे (वय २४) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासात आणखी चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास आरोपींकडे करत आहे.
बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई!
मुंबई : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणा-या डॉक्टरांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही बाहेरील प्रिस्क्रिप्शन देण्याच्या प्रकारांवर राज्य सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सर्व अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना स्पष्ट निर्देश दिले […] The post बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सीजफायरनंतर पाकची नोबेल शांतता पुरस्काराची मागणी
इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या सशर्त युद्धविरामाचे श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानचा जोरदार आटापिटा सुरू आहे. आता पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी म्हणजे अजबच विनोद आणि अत्यंत हास्यास्पद वाटते. स्थानिक माध्यमे आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. खरेतर, युद्धविरामाची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड […] The post सीजफायरनंतर पाकची नोबेल शांतता पुरस्काराची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
28 वा कलाश्री संगीत महोत्सव उत्साहात पडला पार:पिंपळेगुरव येथे घराणेदार गायकांच्या मैफलीने समारोप
गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित २८ वा कलाश्री संगीत महोत्सव नुकताच पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात दिमाखात संपन्न झाला. घराणेदार गायक कलाकारांच्या मैफलीने या महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवाच्या उद्घाटनाला आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, संतपिठाचे संचालक राजू महाराज ढोरे, बासरीवादक दीपक भानुसे, गायक पं. रघुनाथ खंडाळकर आणि वास्तू उद्योजक अजित घुले आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या तिन्ही दिवसांची सुरुवात राधानंद व कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाच्या कार्यक्रमाने झाली. पहिल्या दिवशी युवा शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांचे शास्त्रीय गायन रंगले. अभयसिंह यांनी राग पुरिया धनश्री सादर केला. यात त्यांनी विलंबित एक तालात ‘अब तो ऋतु मान आये...’ ही बंदिश आणि ‘पायलिया झनकार मोरी...’ हा छोटा ख्याल गायला. त्यांच्या ‘याद पियां की आयें...’ या लोकप्रिय ठुमरीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. अभयसिंह वाघचौरे यांना हरिभाऊ असतकर यांनी संवादिनी, चेतन ताम्हणकर यांनी तबलासाथ दिली, तर आयुष सोनावणे, रवी पांचाळ आणि ईशान भंडारी यांनी तानपुरा व गायनसाथ केली. यानंतर कृष्णा साळुंखे यांच्या पखवाजवादनाने महोत्सवाचा माहोल बदलला. त्यांनी राग आदिताल निवडत प्रस्ताराने वादनाला सुरुवात केली. शिवपरण सादर करत त्यांनी एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. काही रेले आणि विविध जती या तांत्रिक व लयकारीच्या प्रकारांच्या सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाला विराम दिला. साळुंखे यांना यशवंत थिट्टे यांनी संवादिनीसाथ केली. २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा समारोप संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायनाने झाला. अंकिता यांनी राग दरबारी कानडा आणि राग हंसध्वनी गायले. राग दरबारी कानडामध्ये त्यांनी ताल झपतालात ‘असी दरबारी गुणीजन गावे...’ ही रचना, त्यानंतर तीनतालात ‘बनवारी बनायके गए...’ आणि एकतालातील ‘मान जा मोरे पिया...’ या रचना सादर केल्या. यानंतर राग हंसध्वनीमध्ये अंकिता यांनी ‘पवन पूत हनुमान लला…’ ही रचना गायली. ‘नाम गाऊ...’ या अभंगाने त्यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला. अंकिता यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी), भाग्यश्री टोमके, तेजल कोठावळे, मानसी महाजन यांनी तानपुरासाथ केली.
शिर्डी साईबाबा संस्थानला रिलायन्सकडून अन्नदानासाठी मोठी देणगी!
शिर्डी : प्रतिनिधी उद्योगपती अंबानी कुटुंबीय शिर्डी साईबाबांचे भक्त असून साईबाबांच्या दर्शनासाठी अनेकवेळा येत असतात. तसेच वस्तू आणि रोख स्वरूपात साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा प्रसादालयात अन्नदानासाठी देणगी दिली आहे. तसेच अंबानी कुटुंबीय नेहमी साईबाबांच्या चरणी निळ्या रंगाचे वस्त्र […] The post शिर्डी साईबाबा संस्थानला रिलायन्सकडून अन्नदानासाठी मोठी देणगी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटींची सायबर फसवणूक
पुणे : देशभरात गेल्या काही वर्षांपासून गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अनेक लोकांची मोठ्या रकमेची फसवणूक होतानाची प्रकरणे समोर येत आहेत. असे असताना पुण्यात ७५ वर्षीय निवृत्त व्यावसायिकाची शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी १२ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पुण्यातील हडपसर भागातील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फसवणुकीची पोलिसांत तक्रार […] The post पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची १२ कोटींची सायबर फसवणूक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तेल नेण्यासाठी मोजावा लागणार प्रति बॅरल १ डॉलर टोल
तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या अरुंद जलमार्गातून जहाजांची वाहतूक करण्यासाठी इराण आता शिपिंग कंपन्यांकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये टोलची मागणी करण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणच्या तेल, गॅस, आणि पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स एक्सपोर्टर्सचे प्रवक्ते हमिद हुसैनी […] The post तेल नेण्यासाठी मोजावा लागणार प्रति बॅरल १ डॉलर टोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जेरुसलेम : इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये बुधवारी रात्रभर भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हेझबोलचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी याला ठार करण्यात आल्याचा दावा इस्रायलने गुरुवारी दिली आहे. टेलिग्रामवर जारी करण्यात आलेल्या आपल्या निवेदनात इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, आयडीएफने बैरुतमध्ये हेझबोलाचा सेक्रेटरी जनरल […] The post हेझबोल संबंधीत हर्शी ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा, लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केला. या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, करमाड येथील गणपती मंदिराजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पूजा सुदाम गावंडे ही तरुणी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. आज दुपारी १२:३० च्या सुमारास ती आपल्या कामात व्यस्त असताना, तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे हा दुचाकीवरून तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक खिशातील धारदार चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या पाठीत बुक्का मारून तिला जमिनीवर पाडले आणि तिच्या गळ्यावर सपासप वार केले. एक व्यक्ती वाचवण्यासाठी आला, पण... या हल्ल्यात पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सत्यम हा पूजावर चाकुने वार करत असताना, पेट्रोल पंपावर उपस्थित एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी पुढे आला, मात्र नराधम सत्यमने त्यालाही चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मागे हटवले. यानंतर सत्यम दुचाकीवर बसून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला असून, आरोपीच्या डोळ्यात माणुसकीचा लवलेशही उरला नसल्याचे त्यात दिसत आहे. प्रेम प्रकरणातील संशय किंवा वादातून खून झाल्याचा अंदाज घटनेची भीषणता पाहून परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी सत्यम गावंडे घटनास्थळावरून फरार झाला. करमाड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, प्रेमप्रकरणातील संशयावरून किंवा वादातून हा पाशवी खून झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला पोलिसांकडून अटक भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारांमध्ये येतेच कसे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. फरार आरोपी सत्यमच्या मुसक्या आवळण्यासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके पाठवली. विविध ठिकाणी छापेमारी करत अखेर आरोपीला कचनेर येथून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा… सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या:वरिष्ठांनी अपमानित केल्याची फिर्याद, आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हा नोंद आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. सविस्तर वाचा…
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिकामी झाली. सध्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात येत होते. पण काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम होती. काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला असून, बारामतीची निवडणूक आता 'बिनविरोध' होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. सुनील तटकरेंनी व्यक्त केली कृतज्ञता काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला आहे. अजित पवार यांनी १९९१ आणि १९९२ मध्ये काँग्रेसच्याच तिकिटावर निवडणूक जिंकली होती. तसेच १९९९ ते २०१४ या काळात लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहून महत्त्वाची पदे भूषवली आहेत. काँग्रेसने दाखवलेल्या या सामंजस्याचे मी बारामतीच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो. दिल्लीतून सुटला माघारीचा 'टॅब' यावेळी सुनील तटकरे यांनी यावेळी एक महत्त्वाची माहिती दिली की, ही उमेदवारी मागे घेण्यासाठी स्वतः त्यांनी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधला होता. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर झालेल्या या चर्चेनंतरच माघारीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, साहेबांची भूमिका लोकशाही मूल्यांना धरून होती. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. परंतु, जशी नाशिकच्या पोटनिवडणुकीत राजकीय परिपक्वता पाहायला मिळाली होती, तशीच आता बारामतीतही दिसत आहे. काँग्रेससोबतच्या वादावर पडदा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत (NDA) हातमिळवणी केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिले. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि ही भूमिका आम्ही उघडपणे मांडली आहे. सपकाळ यांचे राजकारणातील ज्ञान मोठे आहे, आम्हीही अनेक वर्षे काँग्रेससोबत काम केले आहे. आजच्या घडीला त्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे सांगत तटकरेंनी वादावर पडदा टाकला.
शबरीमलाचा निकाल पुरुषांच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारित
नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाबाबतची सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे घटनापीठासमोर सुरु आहे. या प्रकरणामुळे धार्मिक स्थळांमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत आणि धार्मिक स्वातंर्त्याच्या व्याप्तीबाबत व्यापक प्रश्न उपस्थित होतात, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने आजच्या सुनावणीवेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, हे प्रकरण […] The post शबरीमलाचा निकाल पुरुषांच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशातील ६५ टक्के लोक सकारात्मक दिशेने
नवी दिल्ली : या वर्षी जगभरात अनेक महत्त्वाचे अडथळे दिसून आले आहेत, ज्यात पश्चिम आशियातील सध्याचा संघर्षही समाविष्ट आहे. जागतिक अर्थव्यवस्थांसाठी आव्हाने वाढली आहेत. संपूर्ण जगातील लोक भविष्याबद्दल चिंतित आहेत आणि निराशा वाढत आहे. या दरम्यान, भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांमध्ये आशेचा किरण कायम आहे. ग्लोबल रिसर्च फर्म इप्सोसने मार्च २०२६ चा एक अहवाल […] The post देशातील ६५ टक्के लोक सकारात्मक दिशेने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली शहरात 4.97 लाखांचा गुटखा जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगारअड्डे, गुटखा विक्री, बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणे तसेच इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन,अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दरम्यान हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात किरायाने घेतलेल्या एका घरात गुटख्याची पोती साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, चालक प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने एका घरावर छापा टाकला. पोलिसांनी घराची तपासणी केली असता घरामध्ये पोत्यात साठवून ठेवलेला रजनीगंधा पान मसाला, विमल पान मसाला, आर के पान मसाला, तसेच इतर गुटख्याची पोती आढळून आली. पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला असून या गुटक्याची किंमत चार लाख 97 हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आर्यन खान मुस्ताक खॉन, रा. पेन्शनपुरा, शेख अमर शेख अनिस रा. आजम कॉलनी हिंगोली यांच्या सह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, गणेश लेकुळे, शेख मुजीब पुढील तपास करीत आहेत.
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून काँग्रेसने अखेर माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. परंतु आज आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केले. पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा […] The post बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईतील मलाड पूर्व भागातील दिंडोशी परिसरात घडलेल्या दंगलप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. संतोष नगर परिसरात झालेल्या या हिंसाचारानंतर संबंधित आरोपींच्या अवैध बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये काही महिला आणि अल्पवयीनांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही दंगल 5 एप्रिलच्या रात्री संतोष नगरमध्ये देवी मरियम्मा पूजेसाठी निघालेल्या त्रिशूल यात्रेदरम्यान घडली होती. लाउडस्पीकरवर भजन लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यानंतर दोन समुदायांमध्ये हिंसक झटापट सुरू झाली. काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासादरम्यान या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दंगल भडकवणाऱ्या शेख कुटुंबाचा ड्रग्सच्या अवैध व्यापाराशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली असता तेथून ड्रग्सचे पॅकेट्स जप्त करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मते, हे कुटुंब बराच काळ परिसरात दहशत निर्माण करत होते. त्यांनी बेकायदेशीरपणे तीन मजली इमारत उभारून त्यावर मोबाईल टॉवरही बसवला होता. दंगलीनंतर महानगरपालिकेने या अवैध बांधकामांबाबत नोटीस बजावली होती. 24 तासांचा कालावधी देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गुरुवारी प्रशासनाने थेट कारवाई करत बुलडोजरच्या सहाय्याने हे बांधकाम पाडले. या मोहिमेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईदरम्यान प्रमुख आरोपी सोहेल शेख, शब्बू शेख, फिरोज शेख आणि मुनीर शेख यांच्यासह एकूण 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. मात्र काही स्थानिकांनी आरोप केला की, मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी काही निरपराधांवरही कारवाई केली. या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाहीत. दंगल, अवैध बांधकाम आणि ड्रग्स तस्करी या सर्व बाबींवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
गरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार
नाशिक : प्रतिनिधी भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. शेकडो महिलांचे शोषण करणा-या खरातला आज गुरुवारी सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिका-यांनी कोर्टात कागदपत्रे आणि लॅपटॉप देखील आणला. भोंदू खरात हा लॅपटॉप समोर ठेवून महिलांवर लैंगिक […] The post गरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘ग्रीन आशा’ नावाचे भारताच्या ध्वजाखालील एलपीजी वाहतूक करणारे जहाज सुरक्षितपणे जेएनपीए बंदरात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर या मार्गाने पोहोचलेले हे पहिले जहाज ठरले आहे. त्यामुळे या घटनेला मोठे सामरिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे जहाज अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करून भारतात पोहोचले. या मार्गावर सध्या तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे जहाजांच्या हालचालींवर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ‘ग्रीन आशा’ने हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याने भारतीय सागरी व्यवस्थेची क्षमता आणि नियोजनशक्ती अधोरेखित झाली आहे. ‘ग्रीन आशा’ या जहाजामध्ये एकूण 15,400 टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) होता. हे जहाज जेएनपीएच्या द्रव टर्मिनलवर सुरक्षितरीत्या आले असून हा टर्मिनल भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे. या मोठ्या प्रमाणातील एलपीजीमुळे देशातील इंधन पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. या प्रवासादरम्यान जहाज, त्यावरील माल आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग पूर्णपणे सुरक्षित राहिल्याची माहिती देण्यात आली आहे. तणावपूर्ण परिस्थितीतही जहाजाने आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले, यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. जहाजाच्या सुरक्षित आगमनामुळे संबंधित यंत्रणांनीही समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या सागरी ताकदीचे आणि दृढतेचे प्रतीक या घटनेमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक सकारात्मक संदेश गेला आहे. जागतिक स्तरावर तणाव वाढत असताना देखील देशातील आवश्यक इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची क्षमता भारताकडे असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात अशा आव्हानात्मक परिस्थितींमध्येही पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. एकूणच, ‘ग्रीन आशा’चे जेएनपीए बंदरात आगमन हे केवळ एक साधे जहाज आगमन नसून, ते भारताच्या सागरी ताकदीचे आणि ऊर्जा व्यवस्थापनाच्या दृढतेचे प्रतीक ठरले आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या छायेतही देशाने आपली पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवत मोठे उदाहरण घालून दिले आहे.
नागपुरात गॅस सिलिंडरचा काळा बाजार; संतप्त नागरिकांनी अक्षरश: सिलिंडर पळवले
नागपूर : प्रतिनिधी नागपुरातील जरीपटकाच्या नारा दहन घाटाच्या जवळच असलेल्या एका एलपीजी गॅस सिलिंडर एजन्सीच्या गोडाऊनमध्ये आज गोंधळ उडाला होता. गॅस सिलिंडर आज तरी मिळेल या आशेने सकाळपासून तर दुपारपर्यंत उन्हा-तान्हात रांगेत उभे असलेल्या नागरिकांना ज्यावेळी कळलं की आजही सिलिंडर मिळणार नाही, त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरश: सिलिंडरच घेऊन पळ काढल्याची घटना घडली. सिलिंडरचा काळा […] The post नागपुरात गॅस सिलिंडरचा काळा बाजार; संतप्त नागरिकांनी अक्षरश: सिलिंडर पळवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे : नवीन हंगामातील ज्वारीची आवक सुरू झाली असून, आवक वाढल्याने क्विंटलमागे ३०० रुपयांनी घट झाली आहे. गॅसटंचाईच्या काळात ज्वारी स्वस्त झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. ‘हंगामाच्या सुरुवातीला ज्वारीच्या दरात घट झाली असून, यापुढील काळात दर स्थिर राहणार आहेत. मार्च महिन्यापासून ज्वारीचा हंगाम सुरू झाला आहे. ज्वारीची तीन टप्प्यांत लागवड करण्यात येते. त्यानंतर बाजारात ज्वारीची […] The post नवीन हंगामातील ज्वारी बाजारात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे. सपकाळ यांनी सांगितले की, या निर्णयामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा मोठा प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 5 एप्रिलपासूनच संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर काल आणि आजही त्यांनी फोन करून पुन्हा आग्रह धरला. याशिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसेच अजित पवार गटातील इतर नेत्यांनीही काँग्रेसकडे माघारीची विनंती केली होती. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडत भावनिक दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन केले होते. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा झाली आणि शेवटी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सपकाळ यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काँग्रेसची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची योग्य चौकशी व्हायला हवी. एफआयआर दाखल होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार म्हणून आकाश मोरे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता मुख्य लढत टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असून काँग्रेसच्या माघारीनंतर त्यांचा मार्ग सुकर होण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट
नागपूर : प्रतिनिधी सर्वांचंच लक्ष बारामतीतकडं लागले आहे. काँग्रेसचा उमेदवार आपला अर्ज मागे घेईल की नाही याबाबत तर्क लढवले जात असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचा उमेदवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार अर्ज माघारी घेतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […] The post बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय कलाटणी देणारा ट्विस्ट समोर आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गावात प्रयत्न सुरू असतानाच, दिवंगत संतोष देशमुख यांच्याकडून पूर्वी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी अचानक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. स्वरूपानंद देशमुख यांनी आपण सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आज दुपारी एक ते तीन या वेळेत ते आपला अर्ज सादर करणार आहेत. गावातील लोकांनी बिनविरोध निवडणुकीची इच्छा व्यक्त केली तर आम्ही त्याचा आदर करू, पण अंतिम निर्णय मतदारच घेतील, असे त्यांनी सांगितले. गावात एकूण 2,284 मतदार असून, 29 तारखेला सगळं स्पष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय देशमुख कुटुंबीयांनी घेतला आहे. त्या आज सकाळी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. कुटुंबीयांशी चर्चा आणि ग्रामस्थांचा सल्ला घेऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अश्विनी देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, असे मत व्यक्त केले. अण्णांचे अपूर्ण स्वप्न आम्ही पूर्ण करू. गावात पाणीटंचाई होऊ नये आणि विकासाची कामे थांबू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्या म्हणाल्या. तसेच लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या उमेदवारीवर संयमित प्रतिक्रिया दिली. या घडामोडींवर धनंजय देशमुख यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, आजचा अर्ज साध्या पद्धतीने दाखल केला जाणार आहे. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्यांनी आपला माणूस गमावला आहे, त्यांनाच त्या दुःखाची जाणीव असते. गावाने आमच्या वहिनींच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या या पदासाठी निवडून येणाऱ्या नव्या सरपंचाचा कार्यकाळ सुमारे 18 महिन्यांचा असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ गावाचाच नव्हे, तर जिल्ह्याचाही लक्ष लागले आहे. आता बिनविरोधीचा मार्ग मोकळा होतो की थेट लढत रंगते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
नाशिकमधील बहुचर्चित आयटी हब आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातला आज नाशिक सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच्या दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायाधीश बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात खरातच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. आरोपी लोकांना नकली साप आणि वाघाची भीती दाखवून लुटत होता. मंतरलेले खडे आणि चिंचोके विकून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलांना वश करण्यासाठी तो त्यांना विशिष्ट प्रकारचे द्रव्य किंवा पेढे खाऊ घालत असे. या पदार्थांमध्ये नक्की काय मिसळले जात होते आणि ते कुठून आणले जात होते, याचा तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद: आरोपी सहकार्य करत नाही! सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना सांगितले की, आरोपी अत्यंत हुशार असून तो तपासात सहकार्य करत नाही. त्याच्याकडून जप्त केलेला पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप यातील माहितीच्या आधारे त्याची समोरासमोर चौकशी करायची आहे. तसेच, नकली खडे पुरवणाऱ्या महेश कलंत्री याच्याशी असलेल्या संबंधांचा आणि गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याचा शोध घेणे बाकी असल्याचे वकिलांनी नमूद केले. बचाव पक्षाचा विरोध आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटी (SIT) करत आहे. नकली साप, नाग आणि खड्यांचे विषय यापूर्वीच्या तपासातही आले होते. एकाच विषयावर वारंवार कोठडीची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गुन्ह्याचा कालावधी आणि पेनड्राईव्हच्या जप्तीवरही त्यांनी शंका उपस्थित केली. न्यायालयाचा निकाल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील अपूर्ण दुवे लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याच्याकडून 'आयटी जिहाद' आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेतील प्रवेशावर चर्चा सुरू होती. त्यांच्या सोबतच्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या इतर सर्व खासदारांचा शपथविधी आधीच झाला होता. त्यामुळे पार्थ पवार कधी शपथ घेणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांच्या शपथविधीने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या सोहळ्यात मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी जॅकेट परिधान केले होते. अजित पवार यांचा खास ओळख बनलेला हा पेहराव पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या आवाजात आणि देहबोलीतही काही प्रमाणात अजित पवारांची छटा जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत पार्थ पवारांच्या शपथविधीला अधिकच भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जात होते. दरम्यान, पार्थ पवारांच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शपथविधी सोहळ्यातील त्यांचा साधा पण प्रभावी अंदाज आणि अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणारा पेहराव यामुळे हा क्षण अनेकांसाठी विशेष ठरला.
सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा
पुणे : बारामती अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचे आकाश मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर […] The post सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात एका धक्कादायक घटनेत, प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले. या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील मार्शल तथा सोशल मीडियावरील 'रील स्टार' सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. अजित बडे सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. आरोपींनी संगनमत करून एका शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याला लक्ष्य केले. त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी 7 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या प्राचार्याने ही रक्कम आरोपींना दिली. हा प्रकार खंडणीखोरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित प्राचार्यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार, बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपी सोनाली हिंगे सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून लोकप्रिय आहे. पोलिस गणवेशातील तिचे रिल्स मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र, खंडणीच्या गुन्ह्यात नाव आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आणि पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पुण्यात तरुणावर गोळीबार, एक गंभीर जखमी:वडगाव बुद्रुकमध्ये पूर्ववैमनस्यातून हल्ला; आरोपींचा शोध सुरू
पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चरवड वस्तीमधील एका मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला. या हल्ल्यात सुरज गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज गायकवाड आपल्या मित्रासह वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्ती परिसरातील एका मोकळ्या मैदानात थांबला होता. त्यावेळी सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते, प्रेम जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्याला गाठले. जुन्या वादाचे निमित्त करून या टोळक्याने प्रथम सुरज आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असतानाच, टोळक्यातील एकाने पिस्तूल काढून सुरजवर थेट गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते आणि प्रेम जाधव यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. जखमी तरुणाच्या मित्राचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी पार पडली. या खटल्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतली. उलटतपासणीदरम्यान, सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दावे मान्य केले. त्यांनी कबूल केले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही पुस्तके इतरांच्या नावाने प्रकाशित केली होती. तसेच, इतर लेखकांनी सावरकरांच्या नावाने पुस्तके प्रकाशित केली असण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. सावरकरांच्या नावावर असलेल्या सर्व लिखाणाबाबत स्वतःला संपूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले. 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी सरकारने बहाल केलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्टपणे कबूल केले. ही पदवी जनतेकडून बहाल करण्यात आली असावी, परंतु त्याचा कोणताही अधिकृत किंवा कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही, असेही त्यांनी सांगितले. 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी सर्वप्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी त्यांच्या चरित्रग्रंथामध्ये वापरली होती. रानडे यांनी ही पदवी त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून दिली होती किंवा कसे, याची आपल्याला माहिती नसल्याचे सात्यकी सावरकर यांनी नमूद केले.या खटल्याची पुढील नियमित सुनावणी 13 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. जुन्या वादातून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल जुन्या वादातून महिलेला व तिच्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष इंद्रजीत जाधव (32, रा. गणेशनगर, आव्हाळवाडी रोड, वाघोली), सागर सातव (रा. श्रावणी हॉटेल, लोहगाव रोड, वाघोली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अश्र्वनी लक्ष्मण उघडे (37, रा. विकास सातव यांच्या भाडेतत्वावरील खोली, गणेशनगर, आव्हाळवाडीरोड, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे एक तासापूर्वी खरगे आणि पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत बारामती पोटनिवडणुकीतील राजकीय परिस्थिती, स्थानिक भावना आणि पुढील रणनीती यावर विचारविनिमय झाला. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या चर्चेदरम्यान, बारामतीतील निवडणूक ही भावनिक आणि संवेदनशील पार्श्वभूमीवर होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार, राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. खरगे यांनी स्वतः शरद पवारांना याबाबत आश्वासन दिल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून, आता अधिकृत घोषणा आणि पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत लाईव्ह अपडेट खाली पहा…..
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन करून बारामतीतील निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या संवादामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसने सुरुवातीपासूनच माघार न घेण्याची भूमिका घेतल्याने लढत अटळ मानली जात होती. अशा परिस्थितीत फडणवीसांनी थेट काँग्रेस नेतृत्वाशी संपर्क साधल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती फडणवीसांनी केली. अचंबित करणारा क्षण राज्यातील सत्ताधारी पक्षाचा प्रमुख नेता विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना थेट फोन करून निवडणुकीसंदर्भात चर्चा करणे, ही दुर्मीळ बाब मानली जात आहे. त्यामुळे या घटनेला राज्याच्या राजकारणातील अचंबित करणारा क्षण मानले जात आहे. फडणवीसांच्या या फोननंतर काँग्रेसची भूमिका बदलते का, याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. उमेदवारी मागे घेण्याच्या विषयावर काँग्रेसमध्ये विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. याआधी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी संपूर्ण पाठिंबा देण्याचा शब्द दिल्याची माहिती आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेसशी संपर्क साधल्याने या हालचालींना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग जवळपास मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज दुपारपर्यंत आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. काल प्रदेशाध्यक्षांसोबत पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक नेत्यांनी माघार घेण्याच्या बाजूने भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी मागील काही दिवसांत विविध स्तरांवर चर्चा, बैठका आणि संपर्क सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांकडून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुपारपर्यंत केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळाल्यास काँग्रेस अधिकृतपणे उमेदवारी मागे घेईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता असून, आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील खालील बातम्या देखील वाचा…. शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. पूर्ण बातमी वाचा…. रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. पूर्ण बातमी वाचा…
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली आहे. काही चूक-भूल झाली असेल तर माफ करा, अशी विनंती रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार का नाही हे दोन-4 तासात समजेलच, असेही त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवारांच्या विधानावर पत्रकारांनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आत्या म्हणून मला पार्थला जे काही सांगायचे आहे, ते मी घरात सांगेन. अशा गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात. रोहित पवारांनी या प्रकरणी मध्यस्थी करत दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे आता काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. FIR का नोंदवला गेला नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सर्वात जास्त पाठपुरावा घेण्याचे योगदान हे रोहित पवारांचे आहे. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा संसदेत मांडला. आम्ही सर्वांनी दोन्हीकडे हा मुद्दा मांडला. आम्हाला वाटले होते तशी चर्चा यावर झाली नाही. रोहित पवारांनी मांडलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की आम्ही करू. अजित पवार हे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते पण काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात या प्रकरणी FIR केला. म्हणजे काँग्रेससोबत अजित पवारांनी अनेक वर्षे काम केले. दादा गेल्यानंतर रोहित पवार यांना FIR दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या सरकारकडे जावे लागले. पण अजित पवार ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारने FIR नोंदवण्यास नकार का दिला हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहे. दमानियांच्या आरोपांची नोंद घ्यावी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अंजली दमानिया एक जबाबदार भारतीय आहेत. त्या सातत्याने चुकीच्या होणाऱ्या गोष्टीवर आवाज उठवताना दिसतात. त्या न घाबरता पारदर्शकपणे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर मांडत आलेल्या आहेत. दमानियांनी जी माहिती माध्यमांसमोर मांडली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. अंजली दमानियांनी सर्व माहिती सरकारला द्यावी आणि महाराष्ट्र सरकारने त्यांची नोंद घेतली पाहिजे. दुसऱ्या कामात व्यस्त होते सुनेत्रा पवार यांनी काल हर्षवर्धन सपकाळ यांना काल फोन केल्यावरून बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, देशावर सध्या मोठे आर्थिक संकट आहे. जागतिक युद्धाचे सावट जरी कमी झाले असले, तरी पेट्रोल-डिझेलचे दर आणि वाढती महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे. मी या प्रश्नांवर काम करण्यात व्यस्त असल्याने बारामतीच्या निवडणुकीकडे माझे लक्ष नव्हते. प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे राजकारणासोबतच सुळे यांनी स्थानिक प्रश्नांवरही प्रशासनाला धारेवर धरले. शहरात नालेसफाईसाठी मोठा निधी दिला जातो, पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. नाल्यांवर रस्ते आणि इमारतींचे अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबते. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी मदतीची हाक अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन
बीड : प्रतिनिधी बीडमध्ये पुन्हा भीषण अपघात झाला आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या नेहरूनगर कॉर्नरवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बीडच्या केज येथे कार्यरत असलेले तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तहसीलदाराच्या मृत्यूने प्रशासकीय कर्मचा-यांवर शोककळा पसरली आहे. बीडमधील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज बुधवारी ( ९ एप्रिल) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ भीषण कार […] The post केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम अव्वल ठरले असून 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील ई पिक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. तर सर्वात कमी 46 टक्के काम कळमनुरी तालुक्याचे झाले आहे. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या नियोजनामुळे मुदतीमध्ये सर्वात जास्त काम झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्व साधारण क्षेत्र सुमारे 1.50 हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. शासनाकडून नुकसान भरपाईसाठी ई पिक पाहणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधून जास्तीत जास्त क्षेत्रावरील ई पिक पाहणी करून पिकांचे छायाचित्र ॲपवर अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पाचही तालुक्यांनी नियोजन करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यांनी तातडीने रब्बी हंगामासाठी ई पिक पाहणीचे काम हाती घेण्यात आले होते. ता. 31 मार्च हि अखेरची मुदत असल्याने या मुदतीत कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु होती. त्यासाठी प्रत्येक गावांमधून बैठका घेऊन शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, वसमत तालुक्यात उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शारदा दळवी यांनी पोलिस पाटील, कोतवाल व रोजगार सेवकांची बैठक घेऊन ई पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी वेळोवेळी आढावा घेऊन येणाऱ्या अडचणींची सोडवणुक देखील केली होती. त्यामुळेच वसमत तालुक्याचे ई पिका पाहणीचे काम 75 टक्के झाले आहे. तालुक्यातील 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील पिकांची ई पिक पाहणी झाली आहे. या शिवाय औंढा नागनाथ तालुक्याचे 64 टक्के काम झाले असून 25 हजार पैकी 16 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली. कळमनुरी तालुक्यात 46 टक्के काम झाले असून 50हजार पैकी 23 हजार हेक्टरवर पाहणी झाली. सेनगाव तालुक्यात 49 टक्के काम झाले असून 27 हजार हेक्टरपैकी 13 हजार हेक्टरवर पाहणी झाली. तर हिंगोली तालुक्यात 63 टक्के काम झाले असून 31 हजार पैकी 19 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी विनंती सुरू आहे, त्यासाठी आम्ही चर्चा करतो आहोत. बारामतीमध्ये काँग्रेस संदर्भात बोटं दाखवणे चुकीचे तिथे 53 अर्ज दाखल झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीअजित पवार गटातील नेत्यांनी या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी संपर्क इतक्यादिवस का साधला नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना या निवडणुकीसंदर्भात काही देणं घेणं नव्हते का? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. इतके दिवस त्यांनी संवाद का साधला नाही. पक्षश्रेष्ठींना का संवाद साधला नाही. भाजपकडे सगळी सुत्रे सोपवली होती का? असा प्रश्न निर्माण होतो. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामतीसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी चर्चा करत आम्ही पुढची भूमिका घेऊ. सुनेत्रा पवारांशिवाय आणखी कोणीही आमच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसशी संपर्क केलेला नाही. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार आहे. त्यांच्या वाक्यासंदर्भात त्यांना कधीतरी पश्चताप होईल. अजित पवार यांचे पुत्र असल्याने त्यांनी भान राखले पाहिजे. सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आम्ही जी अट ठेवली आहे ती काय चुकीची नाही. अजित पवार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला तर काँग्रेसचे आकाश मोरे उमेदवारी अर्ज मागे घेणार ही त्यांची भूमिका आजपण कायम आहे. हे होत असताना गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. पोलिस स्टेशनमध्ये जात बसावे लागते तिथे पोलिसांशी हुज्जत घालावी लागते. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही म्हणून तो कर्नाटकात दाखल करावा लागतो. हे सर्व सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार आहे. फडणवीस गुन्हा नोंदवू देत नाही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवू देत नाही. त्यांच्या मृत्यूची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे. गु्न्हा दाखल करा अशी मागणी आम्हाला करायची गरजच पडायला नको होती. त्यापूर्वीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. हे सरकार मुकं, आंधळं, बहिरं सरकार आहे हे आम्ही विरोधक म्हणून सांगतच होतो. आता हे बेशर्म असल्याचेही दिसून येत आहे.
नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, ऐंरडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, लव्ह जिहाद हा शब्द सर्वांना लागू झाला पाहिजे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना हा शब्द लागू पडतो. मोदी संसदेत महिलांच्या न्याय हक्कासाठी बिल आणताय पण त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे असे हक्क देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना असे हक्क दिले होते. याचे श्रेय महाराष्ट्राला जाते. अशा राज्यात बुआ उदयाला येत आहेत ते सर्व भाजपचे प्रचारक आहेत. याचा भाजपशी संबंध आहे त्यावर बोलले पाहिजे. FIR बद्दल मागणी सुनेत्रा पवारांनी करायला हवी संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघतासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा ही रोहित पवार यांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री सांगताय की अजित पवार यांच्या अपघाताबद्दल खोलपर्यंत जात तपास करू. त्यासाठी FIR नोंदवावा लागेल. विमान कंपनीवर गुन्हा दाखल करायला तुम्ही तयार नाहीत मग या प्रकरणी तुम्ही सखोल तपास कसा करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. खरंतर ही मागणी सुनेत्रा पवार यांनी करायला पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी केली पाहिजे. पण ती मागणी रोहित पवार, काँग्रेस, आकाश मोरे आणि आम्ही सर्व जण करत आहोत. मोरे यांच्या मागणीचा विचार झाला तर उपकार होतील. कर नाही त्याला डर कशाला? असा सवाल राऊत यांनी केला आहे. यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे का? संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल केले जातात, पण त्यांचा जवळचा सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा जीवाभावाचा सहकाऱ्यांच्या मृत्यू संदर्भात गुन्हा का दाखल केला जात नाही. लहान भावाचा मृत्यू कसा झाला याचा तपास झाला पाहिजे की यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर सर्वांचे एक मत होईल. पण जी मागणी आहे, FIR करा ती का सोडत आहेत. निवडणूक एक निमित्त आहे ही संधी आहे गुन्हा दाखल करूण घेण्याची. सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हे सांगायला कोणाची गरज नाही. पार्थ पवारांना अभ्यास करावा लागेल संजय राऊत म्हणाले की, पार्थ पवार यांना अभ्यास करावा लागेल. त्यांनी आजोबांकडून काही धडे घेतले पाहिजे. त्यांच्या वडीलांचा इतिहास त्यांनी चाळला पाहिजे. त्यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्यांनी त्या पद्धतीने काम केले पाहिजे.
सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात बुधवारी तारीख 8 सकाळी मृत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून सदर मृतदेह विदर्भातील लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या खुनाचे नेमके कारण शोधण्याची प्रयत्न सुरू केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची वय सुमारे पंचवीस वर्षे असून त्याच्या उजव्या हातावर सचिता व एक पाऊल गोंदलेले (टॅटू )काढला असून तर दुसऱ्या हातावर मॉम डॅड व आई वडील लहान मुलाचा हात धरलेला असे छायाचित्र (टॅटू) काढलेले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सेनगांवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील,जमादार जीवन मस्के, सुभाष चव्हाण, ओमनाथ राठोड,अमोल चिकने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणे केली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याचे प्रयत्न चालवले होते. यासोबतच पोलिसांनी मृतदेहाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. उमरदरा शिवारापासून विदर्भ सीमा लागूनच असल्यामुळे पोलिसांनी विदर्भातही मृतदेहाची माहिती व्हायरल केली होती. मृतदेहाची ओळख पटेपर्यंत मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील शवागारामध्ये ठेवण्यात आला. दरम्यान रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटली असून सदरील मृतदेह लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यानुसार पोलिस ांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. मयत सचिन हा पुणे येथे कामाला होता. मागील पाच वर्षापासून तो गावाकडे राहू लागला होता. त्याचा विवाह झाला होता मात्र काही कारणामुळे फारकत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता मयत सचिन याचा खून कोणी केला याचा शोध लावण्यासाठी सेनगाव पोलिसांचे पथक लोणार कडे रवाना झाले आहे याशिवाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार धनंजय क्षीरसागर, भुजंग कोकरे, आकाश टापरे विशाल खंडागळे,साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, गजानन पोकळे यांचे पथकही अधिक माहिती घेण्यासाठी लोणार कडे रवाना झाल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अनैतिक संबंधातून खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. एका कर्तव्यदक्ष आणि तरुण अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रेणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गाडीत ते एकटेच होते. पहाटेचा वेळ असल्याने परिसरात फारशी वर्दळ नव्हती. मात्र अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तव्यनिष्ठ आणि कामसू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या राकेश गिड्डे यांच्या अकाली जाण्याने महसूल विभागाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने सहकारी, मित्रपरिवार आणि नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिवपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवाकाळात ही 25 वी बदली ठरली असून, या निर्णयामुळे प्रशासनात तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बदल्यांवर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, नांदेड दौऱ्यावर असलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीसाठी ते नांदेडमध्ये आले होते. पत्रकारांनी मुंढे यांच्या वारंवार बदल्यांबद्दल विचारले असता खोत यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. माझं घराणं वारकरी संप्रदायाचं आहे. संत तुकाराम महाराजांविषयी मला चांगली माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते. पण नव्या युगातील तुकारामांबाबत मला फारशी माहिती नाही, असे वक्तव्य खोत यांनी केले. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबद्दल थेट भाष्य करण्याऐवजी त्यांनी असा टोला लगावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मुंढे यांनी दिव्यांग विभागात अल्पावधीत केलेल्या कामाची दखल घेत त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नांदेडमध्ये दिव्यांग संघटनांनी राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. मुंढे यांची बदली रद्द झाली नाही, तर अंदाज समितीच्या आमदारांना घेराव घालू, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यापूर्वी मंत्रालयातही या मागणीसाठी आवाज उठवण्यात आला होता. याचदरम्यान, नांदेड दौऱ्यात सदाभाऊ खोत यांनी परिवहन विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणीत विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर अनुपस्थित असल्याचे आढळल्याने खोत संतापले. ठरलेल्या वेळेनंतरही अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण आपला निषेध नोंदवण्यासाठी खोत यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण केला. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. या सर्व घडामोडींमुळे मुंढे यांच्या बदलीसह प्रशासनातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिस दलाच्या ताफ्यात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ३ सर्व्हिलन्स वाहने नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या वाहनांचा शुभारंभ ७ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या सर्व्हिलन्स वाहनांच्या माध्यमातून शहरातील संवेदनशील भाग, गर्दीची ठिकाणे, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रभावी देखरेख ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे, तसेच चोरी, दंगल, संशयास्पद हालचाली यांसारख्या घटनांवर वेळीच आळा घालणे शक्य होणार आहे. पोलिस दलात दाखल होणाऱ्या सर्व्हिलन्स व्हेईकलमधील कॅमेरे अंधारातही काम करतील. दाट झाडीत लपलेल्या संशयित या वाहनातील कॅमेरे टिपतील. अकोला पोलिसांना शासनाने अशा प्रकारची तीन वाहने उपलब्ध करून दिली आहेत. एका वाहनाची किंमत साधारणपणे दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. वाहनांमध्ये आधुनिक सुविधा वाहनात हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे ३६० अंशात परिसरावर सतत नजर ठेवण्याची क्षमता असून डिजटस व्हिडिआे रेकॉर्डर प्रणाली व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षितपणे साठवण्याची सुविधा आहे. लाइव्ह मॉनिटरिंग स्क्रीन घटनास्थळी थेट दृश्य पाहण्याची सुविधा, इन्व्हर्टर व बॅटरी बॅकअप प्रणाली वीज नसतानाही अखंडित कार्य क्षमता, वायरलेस कम्युनिकेशन प्रणाली नियंत्रण कक्षाशी सतत संपर्क, नागरिकांना सूचना व जनजागृती संदेश देण्यासाठी पब्लिक अॅड्रेस सिस्टम, मोबाइल नेटवर्क-इंटरनेट कनेक्टिव्हिटी, इमर्जन्सी लाइट व सायरन सिस्टम उपलब्ध आहे. संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे होणार शक्य ^ही वाहने खास पोलिस दलासाठी तयार करण्यात आली आहेत. या वाहनांमध्ये घटनास्थळाचे चित्रीकरण करण्याची सुविधा आहे. शहरातील संवेदनशील भागात अशा प्रकारची वाहने तैनात केली जाणार आहेत. या वाहनांमध्ये असलेले कॅमेरे ३६० अंशात फिरणारे असतील. या वाहनात ड्रोन कॅमेरेही आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. सभा, मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणी हे वाहन तैनात केले जाणार आहे. कॅमेरे पोलिस नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. आहे. - डॉ. अर्चित चांडक , पोलिस अधीक्षक.
शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलकुंभीमुळे जुने शहर परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती वाढली आहे. सायंकाळी सहा नंतर कानाभोवती घोंगावणाऱ्या आणि हाता पायांना चावणाऱ्या डासांचा उपद्रव रात्री बारा वाजेपर्यंत कायम असतो. जुने शहरासह अकोट फैल, खदान, शिवणी, खडकी, उमरी, कृषीनगर, कैलास टेकडी भागातील कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या वसाहतीसह शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून आेळखल्या जाणाऱ्या राम नगरातही डासांचा कहर झाल्याने त्यामुळे शहरवासीयांची रात्रीची झोप उडाली आहे. महापालिकेचे फॉगिंग, धुरळणीकडे दुर्लक्ष झाले आहे. महिनाभरात शहरात डेंग्यूचे १०, चिकुनगुनियाचे ४ आणि मलेरियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. डास निर्मूलनासाठी महापालिका प्रशासन कोणतेही प्रयत्न करत नाहीत. गेल्या वर्षभरात महापालिकेने डासांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जुने शहरातील डाबकी रोड, जुने शहर, भीमनगर, नायगाव, जुल्फेकार दर्गा परिसर, आरपीडीएस रोड, गुलजार पुरा, शरीफनगर, रामजीपीर नगर, शिवाजीनगर, शिवसेना वसाहत, खैर मोहंमद प्लॉट, भगतवाडी, गीता नगर, उर्वरित पान ४ धुरळणी, फवारणीचे नियोजन ^डासांचा उपद्रव पाहता मोर्णेतील जलकुंभी काढण्याची महापालिकेने मोहीम सुरु केली आहे. शहरात धुरळणी, फवारणी प्रत्येक वॉर्डात दुचाकीवरील दोन स्प्रे पंपासह दोन कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन स्प्रे पंपासह फॉगिंग मशिनची खरेदीचे नियोजन केले असून मनपाने मलेरिया विभागात कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे. शहरात नियमित नाले, गटारींची साफसफाई आणि कचरा उचलण्याचे निर्देश सर्व स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत.- विजय अग्रवाल, सभापती, स्थायी समिती, महापालिका. शौचालयांच्या व्हेन पाइपला जाळ्या बसवा,तोंड झाकावे ^शहरात डासांचा उपद्रव वाढला हे सत्य आहे. जलकुंभी वनस्पती, उघड्या नाल्या, सांडपाण्याची साचलेली डबकी तसेच शहरातील शौचालयांचे व्हेन पाइप यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. सायंकाळच्या वेळी कानाभोवती घोंगावणारे क्युलेक्स डास यांची उत्पत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या शौचालयांच्या पाइपला जाळ्या बसवाव्यात किंवा पाइपचे वरचे तोंड कापडाने बांधून घ्यावे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. - डॉ. अतुल शंकरवार , जिल्हा िहवताप अधिकारी. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात- 44| महापालिका शहरी भागात- 49
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. तसेच, अजितदादांना न्याय द्या, असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आल्याचेही समजते. या भेटीत रोहित पवार यांचा काँग्रेसचे प्रभारी नेते चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद झाला, ज्यामुळे या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस जवळ आला असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सुरुवातीला वैध ठरलेल्या 53 अर्जांपैकी आता 47 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. मात्र अंतिम आकडेवारी सायंकाळनंतर स्पष्ट होणार असून, शेवटच्या दिवशी आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने आतापासूनच प्रचाराची तयारी सुरू केली असून, बारामतीत थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुरी पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या मतदारसंघात भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. राहुरीत शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून, तसेच ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबतही उत्सुकता आहे. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत मोठे राजकीय निर्णय आणि अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता या शेवटच्या टप्प्याकडे लागले आहे.
कुर्डुवाडी ९ वर्षांच्या प्रशासकीय कालानंतर २०२५ मध्ये झालेल्या कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने नगराध्यक्षपद मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत (१३ नगरसेवक) आहे. शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य असून एक अपक्षही शिवसेना(उबाठा) गटाशी जोडला गेला. नगरपालिकेत विरोधी गटच नसल्याने सत्ताधारी गटांतच मानापमान नाट्य आणि खेकडी चाल सुरू झाली असून, यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न व विकासकामे रखडली आहेत असा आरोप नागरिक करत आहेत. निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाकडे नगराध्यक्षसह सहा सदस्य (पाच सदस्य + एक अपक्ष), राष्ट्रवादीकडे १३ नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य निवडून आले. राष्ट्रवादीकडे बहुमत असले तरी नगराध्यक्षपद शिवसेना गटाकडे गेल्याने दोन्ही पक्ष सत्ताधारी झाले. यामुळे सभागृहात विरोधकांचा अभाव असून, सत्ताधारी गटांतच एकमेकांना आव्हान देण्याची खेकडी चाल सुरू आहे. जनतेने दिलेल्या कौलानुसार दोन्ही पक्ष एकमेकांविना पुढे जाऊ शकत नाहीत, पण मानापमानाच्या निमित्ताने विषय हाणून पाडण्याचा प्रकार वाढला आहे . नागरिकांच्या हितांना धक्का आणि भीती थकीत मालमत्ता कर शास्ती माफीला सभागृहात मंजुरी मिळाली, कारण हा नागरिकहिताचा जिव्हाळ्याचा मुद्दा होता. मात्र राष्ट्रवादी आरोग्य सभापती मोहसीन मकणू यांच्या अखत्यारीतील न्यायालयीन आदेशित भटक्या श्वानांच्या नसबंदीचा विषय नामंजूर झाला. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधाला विरोध म्हणून हा विषय पुढील सभेसाठी ढकलला. तसेच राष्ट्रवादी शिक्षण सभापती संजय टोणपे यांनी आरोग्य विभागाची जेटींग मशीन बाहेर पैसे कमावत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचेच सर्व सभापती असतानाही हे आरोप होत असल्याने सत्ताधारी गटातील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारखे प्रकल्प रखडले असून शहराच्या धुळ मुक्तीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. दुसऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी राष्ट्रवादीचे सदस्य नगराध्यक्षांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असल्याचा आरोप शिवसेना गटातील स्वीकृत नगरसेवक धनंजय डिकोळे यांनी केला. नगराध्यक्षांनी न्यायालयीन आदेशाप्रमाणे भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफी हे दोनच विषय मांडले. राष्ट्रवादीने या विषयांपूर्वी आयत्यावेळीचा विषय म्हणून भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील एका रस्त्याला भगवान महावीर पथ नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. डिकोळे यांनी सदर समाजाने कोणालाही विश्वासात न घेता व गांधी यांच्या सांगण्यावरुन मिटींगलाही बोलावले नसल्याचा आरोप करून, आधी अध्यक्षांचे दोन विषय मंजूर करा, मग हा घेऊ अशी सूचना मांडली. यावरून सभागृहात जोरदार नाट्य घडले. या खेकडी चालीमुळे नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रभागातील मूलभूत कामे करता येत नाहीत. भटक्या कुत्र्यामुळे आरोग्य- सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाले असून, रस्त्यांची अर्धवट कामे, पाण्याची कमतरता, कचरा संकलन व फवारणी यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. हे मानापमान नाट्य असेच चालू राहिले तर कुर्डुवाडी शहराला मोठे नुकसान होईल, अशी भीती आहे.
शासन व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपयोगी यंत्रे व औजारांच्या अनुदानित योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली विविध यंत्रसामग्री अनुदानावर किंवा कमी दरात दिली जातात.मात्र, बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित किटचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस व इतर नगदी पिकांच्या क्षेत्रात मागील काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः केळी आणि डाळिंब, द्राक्ष उत्पादकांनी मोठी आघाडी घेतली आहे. आगामी काळात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठी होईल तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतक-यांना किटसाठी सुमारे २५ हजार खर्च करावा लागतो. त्यामुळे अनुदानित योजनांमधून एआय किट द्यावे, अशी मागणी होत आहे. लक्ष्य फवारणी: जिथे गरज आहे तिथेच औषध फवारणी करून खर्चात बचत. प्रिसिजन फार्मिंग: माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, ठिबकचा वापर. निर्यात दर्जा : बंच स्प्रे, स्कर्ट बॅग, बड इंजेक्टर या साधनांमुळे केळीचा दर्जा. ^सोलापूर जिल्ह्यात एकूण सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. करमाळा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आहे. जिल्ह्यात डाळिंब व द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी, तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादनासाठी कृषी यंत्र औजार या अनुदानित योजनेत एआय किटचा समावेश करण्यात यावा. संतोष झांझुर्णे, प्रगतशील शेतकरी, रामवाडी . खते व पाणीवापर खर्चात मोठी बचत . कीड व रोग नियंत्रणामुळे उत्पादनात वाढ . केळीला जागतिक बाजारपेठेत चांगला दर . टिश्यू कल्चर, मल्चिंगमुळे दर्जा सुधारणा ^कृषी यंत्र औजार अनुदान योजनेत एआय किटचा समावेशाची मागणी होत आहे. कोणती यंत्रे, औजारांसाठी योजना राबवण्याचे धोरण शासनस्तरावर ठरते. वरिष्ठांकडे मागणीचा प्रस्ताव पाठवून योग्य कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. - राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी , करमाळा. ^मागील २ वर्षापासून माझ्या शेतात एआय तंत्रज्ञान वापरुन शेती करत आहे. त्यामुळे मोठा बदल घडून आला असून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून तब्बल एकरी ११० टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. धुळाभाऊ कोकरे, कुगाव, ता करमाळा. शेतकऱ्यांना होणारे फायदे योजनेत एआय किट करता पाठपुरावा करु हवामानाचा अंदाज घेऊन पिकांना आवश्यक तेवढेच पाणी नियोजन.
नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आधीच अनेक गंभीर गुन्ह्यांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या नव्या प्रकरणामुळे खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या चौदा झाली असून तपास यंत्रणांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरात जमीन व्यवहाराच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2003 ते 2004 या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करताना मंदिर उभारण्याचा बहाणा केला. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्यांनी शेतजमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचे उघड झाले आहे. ईशान्येश्वर मंदिर, फार्महाऊस, आंब्याची बाग आणि इतर मालमत्ता या व्यवहारात समाविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, शेतकऱ्यांनी विरोध केल्यास जादूटोणा करून नुकसान करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 16.50 एकर जमीन केवळ 15 लाख रुपयांत विकत घेतल्याची नोंद असून या व्यवहाराची चौकशी आता सखोलपणे केली जाणार आहे. फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दरम्यान, अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी विशेष तपास पथकाने अर्ज केला असून तो मंजूर करण्यात आला आहे. या तिसऱ्या गुन्ह्यात महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असून, एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हाही दाखल आहे. फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे खरातचे नवे कारनामे उघड होत आहेत. भाविकांची फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. स्वस्त वस्तू महागात विकणे, बनावट साधनांचा वापर करून भीती निर्माण करणे अशा प्रकारांमुळे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता न्यायालयात पुढील सुनावणीत काय घडते आणि तपास यंत्रणा कोणती भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्ष जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय देतात. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणारे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ज्यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात, त्यांना कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही. मी एक रुपयेही खर्च न करता मला खासदार केले. गोरगरिबांच्या घरातील व्यक्तीला मोठे केले. कुठलाही प्रकाराचे अन्याय, त्रास होऊ देणार नाही. तसे झाल्यास मी स्वतः तुमच्या सोबत संघर्षासाठी असणार आहे. अक्कलकोटमध्ये पाटील, तानवडे, म्हेत्रे हे तिन्ही मातब्बर परिवार एकत्र आहेत हे महत्त्वाचे आहे. त्रिशूल तयार झाले आहे. सिद्धाराम म्हेत्रे आमदार, नामदार नसूनही दमदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे कमी असूनही जिंकले आहेत, असे प्रतिपादन नूतन खासदार डॉ.ज्योती वाघमारे यांनी केले. नागरी सत्कार सोहळा व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना अक्कलकोट शहर व ग्रामीणच्यावतीने येथील जुना आडत बाजार येथे बुधवारी सायंकाळी उत्साहात पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती सदस्य महेश साठे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, शिवानंद पाटील, सागर पाटील, धानेश अचलेरे, जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, प्रवीण तानवडे, पंचायत समिती सदस्या शीतल म्हेत्रे, दुधनीचे उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार, महिला जिल्हाप्रमुख रवीना राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आनंद तानवडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश सुरवसे यांनी केले. विश्वा जवळगे यांनी आभार मानले. यावेळी व्यंकट मोरे, ॲड. फारिया टिनवाला यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील शिवसेनेचे आजी- माजी पदाधिकारी नेते, कार्यकर्ते, मतदार बंधूभगिनी, म्हेत्रेप्रेमी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते. तालुक्यात द्वेषचे राजकारण सुरू झाले आहे. तानवडे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी भाजपा रुजवली पण यांना भाजपने डावलले. सर्वांचे योगदान आहे. हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे. जिद्दीने काम करावे लागणार आहे. गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक ही योजना राबवावे लागणार आहे. मतदार याद्यांचे पुनर्लेखन सुरू आहे. त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. एक महिना चांगले लक्ष द्यावे लागणार आहे. मतदार यादी साठी दक्ष राहा. काम केले तर पदे मिळतील असे सांगितले. सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने जुन्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी १ एप्रिलपासून ‘ग्रीन टॅक्स'मध्ये (पर्यावरण कर) थेट दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सामान्य वाहनधारकांचे कंबरडेच मोडणार आहे. सेकंडहँड वाहनांच्या विक्री व्यवसायिकांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. वाहन परवान्यांची १५ वर्षांची मुदत संपलेली जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी, टेम्पो, माल ट्रकसह २६ हजार ८४५ वाहने आहेत. ग्रीन टॅक्स दुप्पट केल्याने या गाड्या भंगाराच्या भावात विकण्याची वेळ मालकांवर येऊ शकते. जुन्या वाहनांच्या प्रदूषणामुळे नैसर्गिक वातावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून २०१० पासून जुन्या वाहनांवर पर्यावरण कर आकारणी केली जात आहे. हा कर दुचाकींसाठी २ हजार रुपये होता, आता ४ हजार रुपये केला जात आहे. तीनचाकी साठी ७५० वरुन १५०० रुपये तर पेट्रोल चार चाकी वाहनांचा ३ हजार वरुन ६ हजार रुपये झाला. डिझेल चारचाकीला ३ हजार ५०० रुपयांवरून ७००० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर वाहनांमुळे प्रदूषण होत नाही, याची खात्री करून, आवश्यक सुरक्षा निकष पूर्ण केल्यास फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनंतर ही अद्याप या निर्णयाचा जीआर परिवहन विभागाला प्राप्त झाला नसला तरी हा भुर्दंड भरावा लागणार आहे. सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला की प्रदूषण नियंत्रणासाठी असा सवाल केला जात आहे. शासनाचा कल प्रदूषण रोखण्यापेक्षा महसूल वाढवण्यावर अधिक दिसतो आहे. जी वाहने प्रदूषण करतात, त्यांना परवानगीच दिली जात नाही, तर मग हा कर का वाढवला असा सवाल व्यक्त होत आहे. ^जुनी वाहने जास्त प्रदूषणकारी असल्याने सरकारने हा कर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धन ठेवण्यास मदत होईल. अमरसिंह गवारे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.
शहरात महापालिकेची सुमारे ३३ उद्याने आहेत. त्यापैकी तीन उद्याने खासगी संस्थेकडे देण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित ३० पैकी ठराविक १० ते १५ उद्याने वगळता उर्वरीत उद्याने भकास अवस्थेत आहेत. या उद्यानात नागरिकांना विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधाच नाहीत. मनपाने मागील वर्षभरात या उद्यानांच्या देखभालीसाठी अवघे ९८ हजार रुपये खर्च केले आहेत. तर दुसरीकडे उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षभरात ४.९० कोटींचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांकडून क्रीडांगणे, उद्याने उभारण्याची, उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून उद्यानांच्या दुरवस्थेचा विषय गंभीर झाला आहे. शहरात महापालिकेची ३३ उद्याने असल्याची नोंद कागदावर आहे. त्यातील गंगा उद्यान, सिद्धीबाग व महालक्ष्मी उद्यान खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहेत. उर्वरित उद्यानांपैकी काही ठराविक उद्याने स्थानिक नगरसेवक व काही संस्था, कंपन्यांच्या पुढाकारातून विकसित झाली. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक उद्यानांची भकास अवस्था झाली आहे. महापालिका सतत आर्थिक अडचणीचे कारण पुढे करते. उद्यानांची देखभाल व तेथील खेळण्यांची दुरुस्तीही महापालिका करत नाही. गेल्या वर्षात उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी फक्त ९८ हजार खर्च झालेत. सावेडी उपनगरात लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या नंदनवन कॉलनी येथील उद्यानाची देखभालीअभावी झालेली दुरावस्था. वसुंधरा अभियानांतर्गत लाखोंचा खर्च राज्य शासनाच्या वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क विकसित करणे यासारखे उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र, केवळ सर्वेक्षणासाठीच हे उपक्रम राबविले जातात. सर्वेक्षण झाल्यावर याची देखभाल न झाल्याने त्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. महापालिकेने सध्या सुस्थितीत असलेल्या उद्यानांची देखभाल करण्यासाठी ठोस धोरण निश्चित करण्याची गरज आहे. वृक्ष लागवडीचा पाच कोटींचा खर्च वाया केंद्र शासनाच्या हरित क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांत महापालिकेने ५ कोटी रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केला आहे. यातून २३ उद्याने व सीना नदी काठावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. मात्र, देखभाल न झाल्याने हा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत अनेक नगरसेवक उद्यान विकसित करण्याऐवजी लाखो रुपये खर्चून केवळ सुशोभीकरण करण्यावर उधळपट्टी करत आहेत.
प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन ‘कक्ष अधिकारी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०१८ च्या विशेष कायद्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान सरकारी अखत्यारीत आले असले, तरी अद्याप नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झालेली नाही. सध्या नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम हेच सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त होईपर्यंत, या नवीन नियुक्तीमुळे देवस्थानचा कारभार अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार पारदर्शक व सुरळीत करण्याची मागणी केली होती. नवीन कायद्यानुसार सरकारकडून लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत तोपर्यंत कार्यकारी अधिकारीपद भरण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. कारभारात शिस्त आणि अचूकता येईल मंत्रालयीन कक्ष अधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त केल्यामुळे देवस्थानच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि अचूकता येईल. मंत्रालयातील कामाचा अनुभव असल्याने त्यांना कायदेशीर बाबी, सरकारी नियम आणि धोरणात्मक निर्णयांची सखोल समज असते. यामुळे देवस्थानच्या विकासकामांना वेग येईल, आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता राहिल आणि सरकारी नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे शक्य होईल. नेमका काय होईल बदल { पात्रता: शासकीय सेवेतील कक्षाधिकारी' पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. { बदल: यापुढे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांऐवजी शासननियुक्त अधिकारी कार्यभार पाहणार. { भूमिका: देवस्थान, विश्वस्त मंडळ आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कामकाज. { फायदा: देवस्थानच्या कारभारावर आता सरकारचे थेट नियंत्रण आणि प्रशासकीय पारदर्शकता येणार.
असफल झालेल्या विद्यार्थ्यांना सफल कसे व्हावे याची प्रेरणा भागवत कथेमधून मिळते. विद्या धन प्राप्त करण्यापूर्वी परमात्म्याचे स्मरण आवश्यक असते. दिवसाची सुरुवात भगवंताचे स्मरण करून करावी. आपल्या भारतीय संस्कृतीत भगवंताच्या स्मरणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळ निश्चित करून दररोज भगवंताचे भजन करावे, जीवनातील अडीअडचणी कमी होत चालल्याचे अनुभवास येते. जीवनात यशस्वी होण्याचे आणि आनंद मिळवण्याचे गूज भागवत कथा सांगते, असे प्रतिपादन राधाकृष्णजी महाराज यांनी केले. येथील रामनिवास इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर हभप भास्करगिरी महाराज होते. महेश इंदानी यांच्या हस्ते भास्करगिरी महाराजांचा तर दिव्या इंदाणी यांच्या हस्ते महापौर ज्योती गाडे यांचा सन्मान करण्यात आला. राधाकृष्ण महाराज म्हणाले, राजा परीक्षित आपल्या प्रपंचाचा आणि राज्य कारभाराचा भार भगवंताकडे सोपवून निरंतर कथा श्रवणाचा आनंद घेत होते. त्यामुळे ते श्रवण भक्तीचे आचार्य आणि आदर्श झाले. राजा असून राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना कधीही युद्ध करावे लागले नाही. अंत:करण निर्मळ असले की भगवंताचा प्रभाव दिसून येतो. चित्तात भजन उतरले की, चिंतामुक्त होण्याचा आनंद मिळतो. सीमेवरील सैनिक भययुक्त नसतो तर भयमुक्त असतो. आपल्या देशातील सैनिक महात्मा पेक्षा कमी नाही, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट होत भारत मातेचा उत्स्फूर्त जयघोष उपस्थित भाविकांनी केला.भजनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, भक्त मागील दहा पिढ्यांचा आणि पुढील दहा पिढ्यांचा उद्धार करतो हे सत्य आहे. त्यामुळेच आजही संतांची नावे घेतली की, मन प्रसन्न होते. भक्तांशी संबंध जोडला की, मन शाश्वत आनंदाची अनुभूती घेत रहाते. लहानांप्रती स्नेह आणि मोठ्यांबद्दल आदर ठेवावा, जीवन आनंददायी होते. व्यापाऱ्यांना इमानदारीने व्यापार करतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. हभप भास्करगिरी महाराजांनी भागवत कथा जीवनातील भिती घालवणारी आहे असे सांगितले. कथा श्रवण करण्यासाठी शहराच्या विविध उपनगरातील भाविकांची अलोट गर्दी होऊ लागली आहे. दररोज गर्दीचा उच्चांक होऊ लागल्याचे दिसून येते आहे.
गहू पिकासाठी शासनाच्या हमी भावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे बाजार समितीच्यावतीने तहसील डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात १८,७८६ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र असून यावर्षी हवामान अनुकुल असल्यामुळे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी गहु पिकावर अवलंबून आहेत. परंतु मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात गहु पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. शासनाने गहू या पिकासाठी २५८५ रुपये प्रती क्विंटल इतका हमीभाव जाहीर केलेला असताना काही व्यापारी मालाची प्रत खूप कमी आहे असे कारणे देऊन गहू अवघ्या १८०० ते २२०० रुपये भावाने खरेदी करत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे प्राप्त होत आहेत. सध्या तालुक्यात शासनाने गहु खरेदी करण्यासाठी अधिकृत हमीभाव खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने गहू विकावा लागत आहे. तसेच वाहतूक खर्च, मजुरी खर्च आणि इतर शेतीसंबंधित खर्च वाढलेले असल्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. शासनाने नेवासा तालुक्यात तात्काळ गहू खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करावे तसेच खरेदी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने राबवावी जेणे करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. या बरोबरच खरेदी केंद्रावर पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, संचालक गणेश ढोकणे, नारायण लोखंडे, अरुण शिंदे, राजेंद्र सानप, अण्णासाहेब पटारे आदी उपस्थित होते.
केवळ शास्त्रज्ञान, उच्च शिक्षण किंवा मोठे पद मिळवणे यावरून मनुष्य शहाणा ठरत नाही. जो स्वतःच्या खऱ्या हिताचा आणि आत्मकल्याणाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने शहाणा असतो, असे प्रतिपादन रामभाऊ महाराज राऊत यांनी केले. नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहाव्या दिवशी रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराजांनी “देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज” हा अभंग घेऊन अत्यंत परखड व हृदयस्पर्शी अध्यात्मिक विवेचन केले. देहाभिमान विसरून आत्मज्ञानाकडे वळणे हाच खरा स्वहिताचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्य देहाच्या मोहात अडकतो; मात्र देहाचा विसर पडल्यावरच खरा आत्मिक आनंद आणि समाधान प्राप्त होते, असे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले. संत महात्मेच आपल्याला खऱ्या हिताचा मार्ग दाखवतात. त्यामुळे नामस्मरण, भजन आणि संतसंग यांना जीवनात महत्त्वाचे स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केले. दरम्यान, रामभाऊ महाराज राऊत यांची कीर्तन सेवा सात व आठ तारखेलाही होणार असून भाविकांना त्यांच्या ओजस्वी वाणीतील सखोल अध्यात्मिक विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे. याप्रसंगी हभप देविदास महाराज म्हस्के, हभप भगवान महाराज जंगले, हभप नंदकिशोर महाराज खरात, हभप रामनाथ महाराज पवार, हभप आदिनाथ महाराज भोगे, हभप गणेश महाराज आरगडे, हभप श्रीहरी महाराज वाकचौरे, हभप सागर महाराज टेमक, हभप ऋषिकेश महाराज वाल्हेकर यांच्यासह अनेक महाराज मंडळी उपस्थित होती. पंचक्रोशीतील भजनी मंडळ, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व विठ्ठल-रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र, गोणेगाव चौफुला येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. कीर्तनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होत आहे. त्यामुळे या सोहळ्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत आहे.
पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात एक वेगळीच आर्थिक चळवळ पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनहून दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापाऱ्यांनी विविध जातींच्या कोंबड्या व बदकांसह हजेरी लावली असून, या पंखांच्या बाजाराला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पारंपरिक दुग्ध व्यवसायाबरोबरच आता कुक्कुटपालन आणि विशेषतः बदक पालनाकडे शेतकरी झुकताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यात चिनी कोंबडी, राजहंस डक आणि व्हाईट डक यांची मागणी वाढली असून अनेक शेतकरी या व्यवसायाकडे उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून पाहत आहेत. या पक्ष्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जलद वाढ आणि तुलनेने चांगली रोगप्रतिकारक क्षमता. त्यामुळे कमी वेळात उत्पन्न देणारा हा व्यवसाय म्हणून त्यांना पसंती मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता अशा नव्या संधींचा शोध घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरांच्या बाबतीतही या बाजारात चांगली उलाढाल होत आहे. बदकाची जोडी सुमारे १३०० रुपये, व्हाईट डक ४००० रुपये, राजहंस ७००० रुपये, तर चिनी कोंबडीची जोडी सुमारे १२०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. विशेष म्हणजे या जाती पुणे जिल्ह्यात सहज उपलब्ध नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा थेट खरेदीचा मोठा पर्याय ठरत आहे. दरवर्षी उज्जैनहून येणाऱ्या या व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दूरवर भटकंती न करता दर्जेदार पक्षी मिळत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या शेतात छोट्या प्रमाणात का होईना,पण पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात हा छोटा पण परिणामकारक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
धुळगावची दिव्या बनली पोलिस:आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असतानाही यशाला गवसणी
एकीकडे आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असताना आणि दुसरीकडे नातेवाईकांकडून विवाहासाठी होणारा दबाव झुगारून, धुळगाव (ता. येवला) येथील दिव्या बारहाते हीने पोलीस दलात झेप घेत आपले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही दिव्याने जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात नाशिक पोलिस दलात स्थान मिळवले आहे. दिव्याचे प्राथमिक शिक्षण धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण नारायणराव पवार माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने येवला येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने नाशिक येथील संघर्ष करिअर अॅकेडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, तयारी सुरू असतानाच गेल्या आठ महिन्यांपूर्वी तिच्या आजारी आईचे निधन झाले. या मोठ्या दुःखातून सावरत असतानाच नातेवाईकांकडून तिचे लग्न लावून देण्यासाठी वडिलांवर दबाव वाढू लागला. अशा परिस्थितीतही खचून न जाता दिव्याचे वडील तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. तिला तिचे काका सचिन बारहाते यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला.
कन्नडला क्रीडा संकुलात भाजी मंडई:मोकाट जनावरे, डुकरांचा सुळसुळाट, कचऱ्यामुळे पसरली अस्वच्छता
येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये नगर परिषदेने कोरोना काळापासून सुरू केलेली भाजी मंडई अद्यापही सुरू असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुका क्रीडा संकुल कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर आहे. कन्नड शहराच्या हृदयात २ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तालुका क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी मल्टिपर्पज सभागृह, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान, धावपट्टी, तसेच कुस्ती, व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामीण भागातील खेळाडू निर्माण करणे, विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे शासकीय धोरण आहे. मात्र हे क्रीडा संकुल समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारातच भाजी मंडई बसल्याने अमूल्य क्रीडा संकूलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या क्रीडा संकुलासाठी तत्कालीन माजी आमदार किशोर पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. ^मी मुख्याधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालो आहे. क्रीडा संकुलाच्या आवारातील भाजी मंडईला पर्यायी जागा देण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. क्रीडा संकुल अतिक्रमणमुक्त करण्यात येईल. क्रीडा संकुलालगतचे अतिक्रमण हटवण्यात येईल. -रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, न.प. ^क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारात व आवारातील अतिक्रमण हटवण्यासाठी न.प.ला पत्रव्यवहार केला आहे. बैठकीत मल्टिपर्पज हॉल जीर्ण अवस्थेत असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला पत्र दिले आहे. -तुषार आहेर, तालुका क्रीडा अधिकारी क्रीडा संकुलाच्या आवारात भाजी मंडई भरल्याने क्रीडा संकुलाचा मुळ उद्देश संपला आहे. तसेच प्रवेशद्वारात शंभर टपऱ्यांचे अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी खेळाडूंसाठी होस्टेल उभारले तर अनेक खेळाडूंना राहण्याची संधी उपलब्ध होईल. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा येथे होऊ शकतात. त्यासाठी अतिक्रमण हटवावे लागणार आहे. तालुक्यात आजपर्यंत तेजस्विनी बारवाल राज्यस्तरीय कुस्तीपटू निर्माण झाली, समृद्धी शिंदे सॉफ्टबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकली. सुनील वाघ यांनी व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरीय यश मिळवले. आता संकुल मरणासन्न अवस्थेत आहे, अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली. भाजी मंडईमुळे मोकाट जनावरे, डुकरे यांचा सुळसुळाट आहे. उरलेला काडीकचरा येथे साचत असल्याने डास, घाणीचे साम्राज्य आहे. या ठिकाणी यापूर्वी राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा, सायकल पोलिस स्पर्धा, विभागीय शिपाई, मार्शल आर्ट व दरवर्षी शासनाच्या वतीने दहा मैदानी खेळांच्या स्पर्धा होत होत्या, त्या आता थांबल्या आहेत. या ठिकाणी अविनाश काळे, प्रवीण शिंदे हे क्रीडा प्रशिक्षक नेमलेले आहेत. पर्यायी जागेसाठी निर्णय घेऊ पत्रव्यवहार केला, प्रतिसाद नाही
आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे भाऊ पोपट विठ्ठल भिवसने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, भाऊ शरद हे सिल्लोड आगारात सहायक वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. मागील एक महिन्यापासून हृदयविकाराचा आजार असल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. त्यांची बढती झाल्याने माझी सिल्लोडलाच नियुक्ती करावी म्हणून त्यांनी विनंती अर्ज सिल्लोड आगारप्रमुखांना दिला. दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता ते हजर होण्यासाठी सिल्लोड आगारात गेले असता, तेथील आगारप्रमुख विजय काळवणे, सहायक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल व विकास चव्हाण यांच्याकडे गेले असता तुम्ही हजर होण्यासाठी आले असताना असे मळालेले कपडे, पायात चप्पल का घातली नाही, दाढी का केली नाही व आपल्या हुद्द्याचा पोशाख का घातला नाही?' असे म्हणून त्यांनी जातीचा उल्लेख करून अपमानित केले. तो अपमान सहन न झाल्याने शरद भिवसने यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भराडी रस्त्यावरील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरालगत असलेल्या बोजगाव येथे सुमारे साठ वर्षांपासून खंडित झालेली लक्ष्मी मातेची पारंपरिक यात्रा यंदा गावातील तरुणांच्या पुढाकारातून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक पुनरुज्जीवनामुळे गावासह परिसरात आनंद, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोजगाव येथे पूर्वीपासून लक्ष्मी मातेची यात्रा मोठ्या भक्तिभावाने भरत होती. गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा हा महत्त्वाचा भाग होता. मात्र, काही कारणास्तव ही यात्रा सुमारे सहा दशकांपूर्वी बंद पडली होती. काळाच्या ओघात ही परंपरा लोप पावत चालली होती. दरम्यान, आसपासच्या गावांमध्ये दरवर्षी उत्साहात जत्रा भरत असल्याचे पाहून बोजगावातील तरुणांमध्ये आपल्या गावाची परंपरा पुन्हा जिवंत करण्याची भावना निर्माण झाली. आपल्या गावातही यात्रा का नसावी? या विचारातून त्यांनी पुढाकार घेतला. यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ आणि विविध घटकांशी चर्चा करून नियोजनबद्ध तयारी सुरू करण्यात आली. यात्रेच्या आयोजनासाठी स्वच्छता मोहीम, मंदिर परिसराची सजावट, वीज-प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तरुणांनी स्वतः पुढाकार घेत आर्थिक व श्रम दानाच्या माध्यमातून सर्व व्यवस्था उभारल्या. यात्रेदरम्यान पारंपरिक विविध सोंगे, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक, तसेच जागरण-गोंधळ यांसारख्या लोक परंपरा जिवंत करण्यात आल्या. या कार्यक्रमांनी ग्रामस्थांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. सामाजिक एकात्मता अधिक दृढ या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील एकजूट आणि सामूहिक सहभाग. जात, धर्म, वय या सर्व भेदांपलीकडे जाऊन ग्रामस्थांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला. यामुळे गावातील सामाजिक एकात्मता अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
खुलताबाद भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद येथे प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत आरोग्य, वीज, सुरक्षा व्यवस्थेवर ठोस निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक आणि समाज बांधव उपस्थित होते. जयंती उत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्वंकष नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ यांनी मिरवणुकीतील आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. मिरवणुकीदरम्यान २४ तास रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत, अशी त्यांनी आग्रही मागणी केली. यावर प्रशासनाने मिरवणुकीत रुग्णवाहिका व डॉक्टरांची व्यवस्था नक्की करण्यात येईल, असे आश्वासन दिले. उत्सव काळात वीज अखंडित राहावा यासाठी महावितरणला सूचना देण्यात आल्या. मिरवणूक मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा दुरुस्तीचे आदेश दिले. नगर परिषदेला मिरवणूक मार्ग स्वच्छ ठेवणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि वाहतुकीची सोय सुरळीत राखण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन जाधव, माजी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर, नगरसेवक अनीस जागीरदार, ज्येष्ठ समाजसेवक आबेद जहागिरदार, शशिकांत मुसळे, दिनेश अंभोरे, कारभारी ढवळे, किशोर जाधव, रवींद्र ढवळे, विकास घाटे, अनिल घुसाळे, राहुल जाधव, अमोल ढवळे, स्वप्निल लोखंडे, महेंद्र घुसळे, राहुल बनकर, राजेश निकाळजे, मिलिंद जाधव, रोहित घुसाळे, छबू कांबळे आदींची उपस्थिती होती. खुलताबाद येथील बैठकीत बोलताना निरीक्षक धनंजय फराटे, समोर उपस्थित नागरिक. नियमांचे पालन करावे तहसीलदार संतोष गुट्टे आणि पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत उत्सव निर्विघ्न पार पाडण्यावर भर दिला. शहरातील सर्व मंडळे व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक ऐक्य जपत जयंती साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उंडणगावचे आरोग्य केंद्रच आजारी:जिल्हा परिषद सदस्यांची अचानक भेट, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
उंडणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ यांनी नुकतीच मंगळवारी सकाळी अचानक भेट दिली असता रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे हे रुग्णालयच आजारी असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य केंद्रातील अनेक गंभीर त्रुटींमुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी तपासणी दरम्यान ओपीडी नोंद रजिस्टर मेंटेन नसल्याचे व फार्म शिष्ट जवळचे रजिस्टर उपलब्ध नसल्याचे आढळले. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांची नोंद व्यवस्थित ठेवली जात नसल्याचे दिसून आले तसेच केंद्रातील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत दयनीय असून परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरलेली दिसून आली. आरोग्य केंद्रात दोन डॉ. शुभम माने, डॉ. विशाल साळुंखे नियुक्त असतानाही तपासणी वेळी एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. त्यामुळे येथे आलेल्या रुग्णांना त्रास सहन करावा लागला. ऑपरेशन थिएटरमध्ये अत्यावश्यक सुविधा नसून फोकस लाइटच्या अभावी केवळ १० कॅटच्या सीएफएल बल्बच्या उजेडात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली. लाईट नसल्यास मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात शस्त्रक्रिया पार पाडाव्या लागतात असे कर्मचाऱ्यांनी सांगितले पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही अत्यंत खराब असून वापरास लागणाऱ्या पाण्याच्या हौदात कचरा साचलेला होता. त्याच दूषित पाण्याचा वापर होत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पंखे बंद अवस्थेत तसेच लाईट व्यवस्था निकृष्ट तसेच इमारतीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळलेले आणि फरशा निघालेल्या अवस्थेत आढळले. आरोग्य केंद्रातील शौचालयांची स्थितीही दयनीय दिसून आली. चारपैकी दोन शौचालये पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत तर उर्वरित दोन सुरू असली तरी त्यामध्ये प्रचंड अस्वच्छता असून रुग्ण व नातेवाईकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य केंद्रात किमान ६ कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचेही स्पष्ट झाले. या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. जि.प. सदस्य वाघ यांनी या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल तयार करून संबंधित अधिकाऱ यांकडे सादर करण्याची माहिती दिली असून तातडीने सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नाही, काही कर्मचारी गैरहजर उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून येथे मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. कर्मचाऱ्यांवर वचक नसून काही कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन वाघ यांनी दिली. डोळे दुखत असल्यामुळे मी नेत्रतज्ञांकडे तपासणीसाठी गेलो होतो. तपासणीस काही वेळ लागल्यामुळे मला उंडणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यास उशीर झाला. तोपर्यंत जिल्हा परिषद सदस्य भेट देऊन निघून गेले होते. त्यानंतर मी येऊन रुग्ण तपासणी केली डॉ. शुभम माने आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, उंडणगाव
मराठवाड्याचे कुलदैवत असलेल्या लासूरगाव येथील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाला मंगळवारपासून (७ एप्रिल) उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवार, बुधवार या दोन दिवसांत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे २० हजार भाविकांनी देवी दाक्षायणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या पहिल्या, दुसऱ्या दिवशी सकाळ, दुपार, संध्याकाळच्या आरतीचा मान दर्शन रांगेतील सहा सपत्नीक भाविक दांपत्यांना मिळाला. तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य दर्शन रांगेतील भाविकांना आरतीचा मान मिळत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंद, उत्साह दिसून आला. वस्त्रालंकार पूजेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव दिंडीतील १५० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम गत २० वर्षांपासून अखंडित सुरू आहे. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांच्या हस्ते साड्या देण्यात आल्या. परंपरेनुसार तब्बल २५ वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथून २०० भाविकांची पायी पालखीसह दिंडी सोमवारी सायंकाळी दक्षनगरीत दाखल झाली. मंदिर प्रशासनाने महिला, पुरुष भाविकांना सोयीसुविधा दिल्या. मंगळवारी दिंडीतील सर्व महिला भाविकांना देवीला अर्पण केलेल्या वाहिक साड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी सहायक व्यवस्थापक संतोष शेलार, आदिनाथ वाघुडे, स्वयंसेवक उपस्थित होते. पीआयने घेतला आढावा ः वैजापूरचे पीआय सत्यजित ताईतवाले यांनी मंगळवारी सायंकाळी श्री देवी दाक्षायाणी मंदिरात दर्शन घेतले. मंदिरावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेतील भाविकांची गर्दी, सोयीसुविधांबाबत मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे यांच्याकडून आढावा घेतला. उद्यापासून ५० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येईल. यात्रेत स्वतः लक्ष देणार. रात्री पेट्रोलिंग करणार, असे पीआय ताईतवाले यांनी सांगितले.
लासूर स्टेशन शिल्लेगाव येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंथन परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. शाळेचे नाव उंचावले. यावर्षी इयत्ता पहिली ते सातवीतील २४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनी १०० पेक्षा अधिक गुण मिळवले. गुणवत्ता यादीत स्थान मिळाले. अभिजित सुनील तुपे इयत्ता पाचवी याने जिल्ह्यात सर्वाधिक २७० गुण मिळवले अन् प्रथम क्रमांक पटकावला. जिल्ह्यात तो प्रथम ठरला. अथर्व सीताराम राऊत इयत्ता चौथी याने तालुक्यात सर्वाधिक २२२ गुण मिळवले. गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला. तालुक्यात प्रथम ठरला. रुद्र लहू बोराडे याने २१२ गुण मिळवले. द्वितीय क्रमांक मिळवला. प्रतीक्षा रवींद्र चंदेल हिने १८२ गुण मिळवले. तृतीय क्रमांक मिळवला. आनंद भाऊसाहेब जाधव १८०, विराज विनोद चंदेल १६६, आदित्य प्रकाश चंदेल १६६, ईश्वरी सचिन राऊत १५६, अनिकेत बाळू राऊत १४६, तनुष्का जालिंदर बो-हाडे १२८, श्रावणी गणेश गव्हाणे १२२, सुशांत बाबासाहेब नरोडे ११८, सत्यम नितीन गव्हाणे ११२, आयुष सतीश जाधव ११२, पार्थ गोविंद बोऱ्हाडे ११२, प्रणव अरुण नरोडे १०४, वेदांत गणेश जाधव १०४, ईश्वर गणेश नरोडे १०२, स्वरा अनिल माताडे, लावण्य गणेश तुपशेंद्रे, सत्यजित सचिन गव्हाणे, श्रद्धा कृष्ण नरोडे, गौरी नरसु मदन, प्रसिक अमोल अमराव यांनी यश मिळवले आहेत. या यशामागे मुख्याध्यापक एम. के. बडोगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदाचे परिश्रम आहेत. बोरकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रेरित केले. वर्गशिक्षिका अर्चना परिहार, पल्लवी गजेवार, ताराबाई जाधव, श्वेता रोकडे, मोहन बोरकर यांचे योगदान लाभले. राजूकाका वाघ यांच्या हस्ते प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस देण्यात आले. शिल्लेगाव शाळेचे गुणवंत विद्यार्थी. या वेळी शिक्षक, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
पोफळा गावात दत्त मंदिरासह दोन वर्गखोल्या:स्मशान शेडचे भूमिपूजन
तालुक्यातील पोफळा गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध कामांचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी उत्साहात झाला. आमदार अनुराधा चव्हाण, महामंडलेश्वर दयानंद महाराज प्रमुख उपस्थित होते. श्री दत्त मंदिर बांधकाम, जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्गखोल्या, स्मशानभूमी शेड बांधकामाचा यात समावेश आहे. सदगुरु दयानंद महाराज यांनी कानिफनाथ गडाचा अधिक व्यापक, भव्य, आध्यात्मिक विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार अनुराधा चव्हाण यांच्या विकासाभिमुख नेतृत्वामुळे पोफळा परिसर येत्या काळात नंदनवनासारखा फुलेल, असा विश्वास व्यक्त केला. गावातील महिला भगिनींनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासाठी सभागृह उभारणीची मागणी केली. आमदार अनुराधा चव्हाण यांनी त्वरित प्रतिसाद दिला. कानिफनाथ मंदिरासमोरील सभागृह बांधकामाची घोषणा केली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृह, कानिफनाथ गड रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामस्थ, महिला मंडळींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पोफळा गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्था प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मतदारसंघात मंजूर १२ स्मशानभूमी कामांपैकी एक काम पोफळा येथे मंजूर झाल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजांकडे संवेदनशीलतेने पाहणाऱ्या नेतृत्वाचे हे उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी विकास पाटील- गायकवाड, चंद्रकांत घुगे, बाजीराव गाडे, दादाराव पाटील पवार, ग्रामविकास अधिकारी श्री. चित्ते, पंचायत समिती बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. कंठाळे, श्रीमंत गायकवाड, संजय कावळे, रामेश्वर गायकवाड, आत्माराम गायकवाड, भागवत घुगे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या ‘महाएआय मिशन’ अंतर्गत राज्यातील पहिल्या तीन ‘एआय’ प्रयोगशाळांची घोषणा झाली. मराठवाडा विभागातून फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्रशालेची एकमेव शाळा म्हणून निवड झाली. ग्रामीण विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तोडीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याचा मार्ग मोकळा झाला. महाराष्ट्र राज्य देशाला ‘एआय हब’ म्हणून विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील तीन शाळांची निवड झाली. यात गणोरी, उमरेड, मावळ येथील शाळांचा समावेश आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रक जारी केले. सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये हा राज्यातील पहिलाच अभिनव प्रयोग ठरणार आहे. २० ऑक्टोबर २०२५ रोजी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल आणि एचपी इंडिया यांच्यात सामंजस्य करार झाला. प्रकल्पाची अंमलबजावणी ‘लर्निंग लिंक्स’ संस्थेमार्फत होणार आहे. एचपी फाउंडेशनचे नवीन चावला आणि लर्निंग लिंक्सच्या प्रतिनिधींनी गणोरी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन पाहणी केली. प्रयोगशाळेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी येथे प्रत्यक्ष शिक्षण घेऊ शकणार आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेची पायाभूत ओळख करून देण्याचे उद्दिष्ट आहे. गणोरी शाळेत मशीन लर्निंग, डेटा विश्लेषण, कोडिंग हे विषय शालेय स्तरावर शिकवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढणार आहे. भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्यांसाठी त्यांना तयार केले जाणार आहे. आता आणखी जबाबदारी वाढणार ः मुख्याध्यापक जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी ही निवड अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक अनिल प्र. देशमुख यांनी निवड आनंदाची असून जबाबदारी वाढवणारी असल्याचे म्हटले. विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, शिक्षण सहसंचालक रवींद्र वाणी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, विस्तार अधिकारी दिलीप शिरसाठ, राजेश महाजन यांनी शाळेचे अभिनंदन केले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. या वेळी भाजपने ‘मोठा भाऊ’ म्हणून खंबीरपणे पाठीशी उभे राहण्याचा आणि सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी सर्व आवश्यक मदत करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान, काँग्रेसने या जागेवर आपला उमेदवार उभा केल्याने आता बारामतीची लढत प्रतिष्ठेची झाली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस बॅकफूटवर नाहीच! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “बारामतीची जागा लढवण्यावर काँग्रेस अद्यापही ठाम आहे. ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढली जाईल आणि आमचा कार्यकर्ता मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे.’
तेलंगण व छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. नक्षल्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’चा (पीएलजीए) प्रमुख कमांडर सोडी केशालू ऊर्फ ‘मल्ला’ ४० सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर शस्त्रास्त्रांसह शरण आला. या नक्षल सदस्यांनी एके-४७, इन्सास आणि एसएलआर यांसारखी आधुनिक शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द केली. केशालूवर २० लाखांचे बक्षीस जाहीर असण्याची शक्यता आहे. कोण आहे मल्ला.... यापूर्वी शरण आलेल्या जहाल नक्षल नेता बारसे देवानंतर केशालू हाच संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावी नेता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. वयाची चाळिशी ओलांडलेला केशालू कार्रेगुट्टा टेकड्यांच्या दुर्गम परिसरात २० ते ३० नक्षल सदस्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत होता.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धविरामाच्या घोषणेमुळे शहरात मागील काही दिवसांपासून निर्माण झालेली इंधन आणि गॅसटंचाईची परिस्थिती आता निवळू लागण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्यांसह उद्योग जगताला या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्ववत होत असून नागरिकांनी गॅसची पॅनिक बुकिंग थांबवल्यास येत्या १० दिवसांत घरपोच सिलिंडर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि थांबलेली निर्यात पूर्वपदावर येऊन महिनाभरात उद्योग चक्र पुन्हा वेगाने धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर आता पेट्रोल व डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे. मागील काही दिवसांत पेट्रोल-डिझेल संपणार असल्याच्या अफवेमुळे नागरिकांनी रांगा लावून अतिरिक्त साठा करून ठेवला होता. त्यामुळे शहरातील अनेक पंप ड्राय झाले होते. मात्र, आता पुरवठा सुरळीत होत असल्याने परिस्थिती पूर्णपणे पूर्वपदावर येत आहे. इंधनासाठी होणारी गर्दी ओसरली असून अनेक पंपांवर आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पॅनिक बुकिंग थांबल्यास परिस्थिती पूर्ववत होईल सध्या पुरेशा प्रमाणात डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅस साठा उपलब्ध आहे. इंडस्ट्री आणि व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्याबाबतही कंपन्यांना प्रशासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. केवळ पॅनिक बुकिंगमुळे शहरात कृत्रिम टंचाई निर्माण होत होती. आता युद्ध थांबल्याने ग्राहकांची ही घाई थांबेल - प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी महिनाभरात उद्योग पूर्वपदावर येतील युद्ध थांबल्याने तणाव नक्कीच निवळला आहे, मात्र विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे उद्योगचक्र पूर्ववत होण्यासाठी किमान महिनाभराचा कालावधी लागेल. तत्काळ होणारा सर्वात मोठा बदल म्हणजे कृषी उत्पादनांच्या निर्यातीला पुन्हा गती मिळेल. - उत्सव माच्छर, अध्यक्ष, सीएमआयए गॅसची पॅनिक बुकिंग थांबल्यास साठा पुरेसा जिल्ह्यामध्ये सर्वसाधारणपणे दररोज १० ते १२ हजार घरगुती गॅस सिलिंडरची मागणी असते. मात्र, युद्ध आणि संभाव्य टंचाईच्या भीतीने मागील काही दिवसांपासून ही मागणी २० हजारांच्या पुढे गेली होती. या दुप्पट मागणीमुळे तिन्ही पुरवठादार कंपन्यांकडे शॉर्टेज निर्माण झाले होते व गॅस पोहोच करण्यासाठी १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ लागत होता. नागरिकांनी भीतीपोटी केलेली ही पॅनिक बुकिंग थांबल्यास मागणी नियंत्रणात येईल. १५ दिवसांचा काळ अत्यंत महत्त्वाचा युद्धविरामाचा निर्णय सध्या १५ दिवसांसाठी असल्याने त्यानंतर काय परिस्थिती राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शहरातील उद्योग यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी किमान ३ आठवड्यांचा कालावधी लागणारआहे. होर्मुजची कोंडी सुटल्यानंतर औद्योगिक गॅस आणि तेलाच्या दरांवरही सकारात्मक होईल. - प्रीतेश चटर्जी, कन्व्हेनर, ईईपीसी इंडिया टाळेबंदी टळली, पण ‘बजेट’ कोलमडले होर्मुजच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना परवानगी मिळाल्याने उद्योगांची टाळेबंदी तूर्त टळली आहे. मात्र, गॅस आणि इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे उत्पादन खर्च (कॉस्टिंग) प्रचंड वाढला आहे. इंजिनिअरिंग व मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील ‘हीट प्रोसेस’ महागल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.
जागतिक हवामान बदलाचे पडसाद आता थेट भारताच्या मान्सूनवर उमटण्याची चिन्हे आहेत. प्रशांत महासागरातील न्यूट्रल (तटस्थ) स्थिती आगामी काळात अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम भारताच्या पावसाळ्यावर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या नॅशनल एन्व्हायर्नमेंटल प्रेडिक्शन सेंटर आणि नोव्हा क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर यांसारख्या जागतिक संस्थांच्या रिअल-टाइम मॉनिटरिंगनुसार, प्रशांत महासागरातील तापमानाचा वेग चिंताजनक आहे. यामुळे यंदाचा उन्हाळा सुसह्य वाटला तरी पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र चिंतेचे सावट राहण्याची शक्यता आहे. यंदाचा उन्हाळा : तडाखा कमी, पण उकाडा जास्त : हवामानतज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, ७ फेब्रुवारीपासून सुरू झालेला यंदाचा उन्हाळा तुलनेने सुसह्य असेल. जुलैपर्यंत प्रशांत महासागरातील स्थिती तटस्थ राहणार असल्याने तापमानात मोठी वाढ अपेक्षित नाही. महाराष्ट्रात सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सियसच्या आसपास राहील. मात्र, किमान तापमानात किंचित वाढ झाल्यामुळे कडक उन्हापेक्षा हवेतील उकाडा अधिक जाणवेल. ७ जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. पावसाळ्याचे दोन भिन्न टप्पे: सुरुवातीला दमदार, नंतर घट पहिला टप्पा (जून-जुलै): या काळात परिस्थिती तटस्थ असल्याने पावसाची सुरुवात समाधानकारक आणि दमदार असेल. पहिल्या दोन महिन्यांतच पावसाची सरासरी गाठली जाईल. एल निनो : तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियसने वाढल्यास एल निनो सक्रिय होतो. तटस्थ स्थिती एल निनोकडे झुकल्याने, ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान तीव्रता अधिक असेल. जागतिक हवामानाचा कणा मानल्या जाणाऱ्या प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील निनो ३.४ सेक्शनमधील तापमानावर सर्व गणित अवलंबून असते. अरबी समुद्रात चक्रीवादळाची शक्यता सध्याची तटस्थ स्थिती महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पावसासाठी पोषक आहे. याच काळात इंडियन ओशन इंडेक्स (भारतीय सामुद्रिक स्थिरांक) सकारात्मक स्थितीकडे सरकत असल्याने अरबी समुद्राकडून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असेल. मात्र, मान्सूनपूर्व काळात अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र. न्यूट्रल स्थिती : जेव्हा प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील तापमान सरासरी इतके असते, तेव्हा त्याला न्यूट्रल स्थिती म्हणतात. ला निना : तापमान सरासरीपेक्षा ०.५ अंश सेल्सियसने घटल्यास ला निना सक्रिय होतो, जो भारतासाठी पावसाळ्यात कायम चांगल्या पावसाचे लक्षण मानला जातो. दुसरा टप्पा (ऑगस्ट-सप्टेंबर): जुलैअखेर परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल. निनो ३.४ ची तीव्रता वाढून अल निनो सक्रिय झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटेल. परिणामी, पावसाळा केवळ सरासरी गाठेल, परंतु सरासरीपेक्षा अधिक पावसाची अपेक्षा यंदा फोल ठरू शकते.
राज्य सरकार महावितरणचे 32 हजार कोटींचे कर्ज फेडणार:स्वतंत्र कंपनी आणि बिगर शेतीसाठी आयपीओ आणणार
राज्यातील वीज क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणाऱ्या अत्यंत धाडसी आणि दूरगामी निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. सततच्या तोट्यात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या महावितरणची आर्थिक सर्जरी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. महावितरणचे विभाजन करून शेतीसाठी स्वतंत्र कंपनी आणि बिगर शेतीसाठी आयपीओ आणण्याच्या या निर्णयामुळे ऊर्जा क्षेत्रात आता खाजगी कॉर्पोरेट संस्कृतीचा उदय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणवर सध्या विविध पायाभूत योजनांसाठी घेतलेल्या सुमारे ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जाचे ओझे आहे. हे कर्ज दायित्व आता थेट महाराष्ट्र शासन आपल्या अंगावर घेणार असून त्यासाठी १५ वर्षे मुदतीचे दीर्घकालीन सरकारी रोखे जारी केले जातील. यामुळे महावितरणची बॅलन्सशीट कोरी होणार असून कंपनीला नव्याने भरारी घेता येईल. या आर्थिक पुनर्रचनेमुळे महावितरणची पत (क्रेडिट रेटिंग) सुधारण्यास मोठी मदत होईल. मंत्रिमंडळाने “एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड’ (एमएसएपीएल) या स्वतंत्र कंपनीच्या स्थापनेला हिरवा कंदील दिला आहे. ही कंपनी केवळ कृषी ग्राहकांना वीज पुरवठा आणि संबंधित सेवा देईल. शेतीला दिवसा वीज मिळणार, पण सरकारची तिजोरी ♥ओव्हरलोड एक्स्पर्ट व्ह्यू अशोक पेंडसे, वरिष्ठ ऊर्जा तज्ज्ञ प्रश्न : सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या वीज दरांवर काय परिणाम होईल? - शेतीला मिळणाऱ्या विजेवर मोठ्या प्रमाणात “क्रॉस सबसिडी’ द्यावी लागते. सध्या ९ रुपये प्रतियुनिट असलेला पुरवठा खर्च सोलारमुळे ७ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. मात्र, शेतकऱ्यांना १.५ रुपयाने वीज दिली तरी उर्वरित ३.५ ते ५ रुपये सरकारलाच द्यावे लागतील. जोपर्यंत सरकार ही सबसिडी देत नाही, तोपर्यंत नवीन कंपनी टिकणे कठीण आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, नवीन कंपनी झाली तरी वीज बिल वसुलीचे प्रमाण सुधारल्याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांवरील बोजा कमी होणे कठीण आहे. प्रश्न : आयपीओ गुंतवणूकदारांसाठी किती फायदेशीर ठरेल. निधीचा विनियोग होईल? - आयपीओ आणण्यासाठी सरकार शेतीचा विभाग वेगळा करत आहे आणि जुनी थकबाकी स्वतःच्या अंगावर घेऊन “बाँड्स’द्वारे पैसे उभारत आहे. हे पैसे व्यवस्थेत सुधारणा करून आलेले नसून ते कर्ज घेऊन उभे केले जात आहेत. गुंतवणूकदारांसाठी हे किती फायदेशीर ठरेल हे सांगताना पेंडसे यांनी वसुलीच्या संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
व्हिएतनाममधील दिग्गज ‘विनग्रुप’ कंपनीने राज्यात तब्बल ६.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ५५,००० कोटी रुपये) गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारानुसार विनग्रुपची मुंबई महानगर परिसरात येत्या २७०० एकरवर स्मार्ट टाऊनशिप, इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा, चार्जिंग नेटवर्क, सौर ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करेल. यामुळे २४,७०० थेट रोजगार निर्माण होतील, असा दावा आहे. असा आहे विनग्रुपचा गुंतवणुकीसंदर्भातील मास्टर प्लॅन स्मार्ट सिटीचा नवा अवतार: २,७०० एकरवर २ लाख लोकांसाठी स्मार्ट टाऊनशिप उभारणार. इलेक्ट्रिक क्रांती: ईव्ही निर्मितीसोबत राज्यभर चार्जिंग नेटवर्क व इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करणार. पर्यटनाचा ग्लोबल टच : ८६५ एकरवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क,झू व सफारी प्रकल्प. स्वच्छ ऊर्जा : ५०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारणार. महाराष्ट्राच्या स्थिर धोरणामुळे सकारात्मक परिणाम विनग्रुप टाऊनशिप, इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्ट, शिक्षण, आरोग्य व पर्यटन क्षेत्रांत उतरणार आहे. नीती आयोगाच्या लक्ष्यानुसार मुंबईचा जीडीपी वाढीसाठी हे इंधन ठरेल. जागतिक कंपन्या ‘चीन प्लस वन’ धोरण राबवत असताना व्हिएतनाममधील मोठ्या कंपनीने महाराष्ट्र निवडणे हे राज्याच्या स्थिर धोरणांचे यश आहे.
एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला (युवती) कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण झाले. एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. २५ मार्च रोजी पहिल्यांदा तक्रार झालेल्या या प्रकरणाबाबत शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली होती. याप्रकरणी २५ मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे, तर २ एप्रिल रोजी ७ आणि ३ एप्रिल रोजी १ असे एकूण ८ गुन्हे मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यात २ गुन्ह्यांतील ५ संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी आधी मुलींची मुलाखत घेऊन त्यांची नोकरीसाठी शिफारस केली. मग ‘तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली’, असे वारंवार सांगितले. काही दिवसांनी तिच्यावर सुटी घेण्यासाठी दबाव टाकला. सुटीच्या दिवशी मुलींना विविध रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. तेथे जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केला. ‘केरला स्टोरी’प्रमाणेच घडले सूत्रांनी सांगितले की, संशयितांनी ‘द केरला स्टोरी’ सिनेमाप्रमाणेच युवती व तरुणावर धर्मांतरासाठी वारंवार दबाव टाकला. तरुणाच्या मनात स्वधर्माबाबत द्वेष निर्माण करून त्याला विशिष्ट धर्माचे विधी करण्यास आणि त्या धर्माच्या परंपरांचे पालन करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढील विधी व धर्मांतरासाठी त्याला मुंबईलाही नेण्यात आले होते. सुमारे चार वर्षे हा प्रकार सुरू होता. तरुणाने धारिष्ट दाखवून थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. आयटी कंपन्यांतील मुलींनी सतर्कता रहावे : आ. पडळकर पुणे | नाशिकला मोजक्याच आयटी कंपन्यात आहेत. तरीही तेथील उच्चशिक्षित मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर नियोजनबद्ध लैंगिक अत्याचार केले जात आहेत. पुणे तर आयटी हब आहे. येथेही असे काही घडत आहे का, याची कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे व मुलींनी सतर्क राहणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये तरुणाच्या धर्मांतराचा प्रकारही उघडकीस आला. त्यावर मकोकानुसार कारवाई अपेक्षित आहे, असे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. नऊ पीडितांनी पोलिसांकडे तक्रार केली, असेही त्यांनी सांगितले. ९९२३३२३३११ वर तक्रार करा हे प्रकरण संवेदनशील आहे. तपासासाठी स्वतंत्र विशेष पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. ९९२३३२३३११ या क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल. तक्रार करणारे तसेच अधिक माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. -संदीप मिटके, सहायक पोलिस आयुक्त, नाशिक
तिसऱ्या विवाहात अडचण ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच आपल्या ११ महिन्यांच्या मुलाला कपडे धुण्याच्या दगडावर आपटून निर्घृणपणे संपवल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकून दिला. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पूजा रवींद्र पवार (२२, रा. भांबार्डे) हिला अटक केली आहे. यश रवींद्र पवार असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे १९ व्या वर्षी पहिले लग्न झाले होते. पहिल्या पतीने सोडून दिल्यानंतर तिने २०२४ मध्ये भांबार्डे येथील ३७ वर्षीय रवींद्र पवार यांच्याशी दुसरा विवाह केला. त्यांना यश हा मुलगा झाला. मात्र, रवींद्रसोबत राहण्याचा कंटाळा आल्याने ८ मार्च रोजी पूजा घरातून निघून गेली. पत्नी व मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार रवींद्र यांनी पोलिसांत दिली. यादरम्यान, २० मार्च रोजी पूजाने निघोज येथील एका तरुणाशी गुपचूप तिसरे लग्न केले. दोन एप्रिल रोजी तिने नव्या पतीसोबत इन्स्टाग्रामवर फोटो टाकला. तो पाहून रवींद्र यांनी पूजा आणि तिच्या नव्या पतीशी संपर्क साधून मुलाला परत देण्याची विनवणी केली. नव्या पतीनेही तिला मुलगा परत देण्यास सांगितले, मात्र तिने मूल आपल्याकडे सुखरूप असल्याची बतावणी केली. ५ एप्रिल रोजी पोलिसांनी पूजाला जांबूत परिसरातून ताब्यात घेतले. सुरुवातीला ‘झोपेत असताना मुलगा ओट्यावरून पडून मरण पावला आणि मृतदेह पोत्यात भरून विहिरीत फेकला’ असा बनाव तिने रचला. त्यामुळे पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या सखोल चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. दुसऱ्या संसारात अडचण ठरू नये म्हणून ८ मार्च रोजीच मुलाला घरी दगडावर आपटून त्याला ठार मारत मृतदेह पोत्यात भरून विहिरीत टाकला. अशी कबुलीही तिने दिल्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. मुलगा सारखा रडायचा, म्हणून दगडावर आपटले पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुन्हा चौकशी केली. ‘मुलगा सारखा रडत असे. मला दुसरा विवाह करायचा होता. मुलगा दुसऱ्या विवाहात अडथळा ठरत होता, म्हणून ८ मार्च २०२६ रोजी त्याचा कपडे धुण्याच्या दगडावर आपटून खून केला. एका पोत्यात मृतदेह आणि दगड भरून पोते विहिरीत फेकून दिले’, अशी कबुली तिने दिली.
धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांच्या खिशात उसाचे २००० कोटी!
सिंचन वाढल्याचा फायदा : यंदा विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप, ६० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन सुभाष कदम धाराशिव : मागास जिल्हा, ही धाराशिवची ओळख आता पुसत चालली आहे. धाराशिव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या खिशात यंदा २ हजार कोटी रुपये आले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने, गूळ पावडर कारखान्यांनी यंदा विक्रमी ७१ लाख टन उसाचे गाळप […] The post धाराशिव जिल्ह्यातील शेतक-यांच्या खिशात उसाचे २००० कोटी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील १४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते. या अटीतटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने थरारक विजय मिळविला. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने चांगली सुरुवात […] The post गुजरात टायटन्सचा थरारक विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले तेहरान : वृत्तसंस्था पाकिस्तानने इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवला, त्यावेळी इस्त्रायल लेबनॉनवर हल्ले करणार नाही, अशी एक अट ठेवण्यात आली होती. मात्र इस्त्रायलने पाकिस्तानची ही अट फेटाळून लावली. आमचा युद्धविराम हा फक्त इराणशी आहे. आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार, असे इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटले होते आणि अवघ्या […] The post युद्धविराम फसला? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील साखर कारखान्यांना गाळपानंतर प्रतिटन ७०० रुपयांपर्यंत तोटा होत असल्याचा दावा कारखानदारांकडून केला जात आहे. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्यातील साखर कारखानदार सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी करत आहेत. या संदर्भात नुकतीच एक बैठक सहकारमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीत साखरेच्या कमी विक्री दराबरोबरच इथेनॉल उत्पादनात वाढ, मागणीत घट […] The post साखर उद्योग संकटात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंगा येथे ग्रामरोजगार सहायकांचा बेमुदत संप सुरू
निलंगा : प्रतिनिधी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी निलंगा तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी दि ८ एप्रिलपासून कामबंद संप सुरू केला आहे. तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी पंचायत समितीसमोर एकत्र येत निदर्शने केली व गटविकास अधिका-यांना निवेदन दिले. या निवेदनात शासनाने ग्रामरोजगार सहायक मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयानुसार दरमहा ८ हजार […] The post निलंगा येथे ग्रामरोजगार सहायकांचा बेमुदत संप सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कलेच्या क्षेत्रात करिअर करताना पाय जमिनीवर असावेत
लातूर : प्रतिनिधी तरुणांनी कॉलेज जीवनात शिक्षणासोबतच वेळेचे आणि संधीचे भान ठेवणे आवश्यक आहे. गेलेली वेळ आणि संधी पुन्हा येत नाही, त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करा. विशेषत: कलेच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर यश मिळवूनही तुमचे पाय जमिनीवर असायला हवेत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रूपलक्ष्मी शिंदे यांनी केले. शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या येथील राजर्षी […] The post कलेच्या क्षेत्रात करिअर करताना पाय जमिनीवर असावेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनपाकडून क्षयरोग रुग्णांना न्युट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप
लातूर : प्रतिनिधी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून दि. ७ एप्रिल रोजी महापौर जयश्रीताई सोनकांबळे, आयुक्त मानसी मीना, सभागृह नेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, नगरसेवक अॅड. फारुक शेख, उपायुक्त फड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शंकर भारती, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन राऊत यांच्या उपस्थितीत १०० क्षयरुग्णांना फूड बास्केट देण्यात आले. लातूर जिल्हा क्षयरोग मुक्त […] The post मनपाकडून क्षयरोग रुग्णांना न्युट्रिशनल सपोर्ट किटचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठांना स्नेहभोजन
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा बँक कर्मचारी संघाच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. वृद्धाश्रमातील […] The post धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठांना स्नेहभोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जनसामान्यांची मते जाणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडले जाणार
लातूर : प्रतिनिधी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी, खासदार श्रीमती सोनिया गांधी यांनी संगठन सृजन अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत जनसामान्यांची मते जाणुन त्यातून काँग्रेसचे पदाधिकारी निवडले जाणार आहेत, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे केंद्रीय निरीक्षक हरमिंदरसिंग लकी यांनी बुधवारी सायंकाळी येथील काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. […] The post जनसामान्यांची मते जाणून काँग्रेसचे पदाधिकारी निवडले जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आजपासून ८ व्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यास सुरुवात
लातूर : प्रतिनिधी भारत देशाचं उज्वल भविष्य ज्यांच्या हातात आहे, अशा आपल्या भारत देशातील प्रत्येक बालकाचा बौद्धिक विकास व्हावा, हे उत्कृष्ट उद्दिष्ट समोर ठेवून, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ८ वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा गुरूवार दि. ९ एप्रिलपासून सुरूवात होऊन तो २३ एप्रिल या कालावधीपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या थीमनुसार लातूर जिल्ह्यातील […] The post आजपासून ८ व्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यास सुरुवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय लिमिटेड लातूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध संचालक मंडळ माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले आहे. त्यात नूतन चेअरमन म्हणून लक्ष्मण मोरे (खोपेगाव) तर व्हॉईस चेअरमन म्हणून भीमाशंकर बावगे (हासेगाव) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याबद्दल आशियाना बंगल्यावर बुधवारी नूतन संचालक मंडळ व […] The post जिल्हा सहकारी साहित्य मुद्रणालय अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करावे
लातूर : प्रतिनिधी शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. शिक्षकांकडून समाजाला मोठ्या अपेक्षा असतात. शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करणे हे समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी केले. एज्युकॉन पुरस्काराने केंद्रे दाम्पत्याचा सन्मान करण्यात आल्याबद्दल येथील संगमेश्वर विद्यामंदिरच्यावतीने राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव […] The post शिक्षकांनी समर्पणाच्या भावनेतून ज्ञानदानाचे कार्य करावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या संपणार आहे. अशातच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे बारामतीचा हा रणसंग्राम 'तुल्यबळ' होणार की 'बिनविरोध', याचा फैसला आता काँग्रेसच्या दिल्लीतील 'हाय कमांड'च्या निर्णयावर अवलंबून आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भावनिक ओलावा आणि राजकीय सौहार्द जपण्यासाठी महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार स्वतः रिंगणात आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याने काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवारांनी सपकाळांशी चर्चा करून काँग्रेसने माघार घ्यावी, अशी विनंती केली आहे. काँग्रेसची 'वेट अँड वॉच' भूमिका सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, बारामती पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय हा पक्षाच्या दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाचा आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घ्यायची की नाही, यासाठी दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्या ९ एप्रिल हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष काँग्रेसच्या भूमिकेकडे लागले आहे. 'वर्षा'वर खलबते; फडणवीसांकडून सुनेत्रा पवारांना पाठिंबा दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. सुमारे २० मिनिटे चाललेल्या या बैठकीत पोटनिवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी भाजप 'मोठा भाऊ' म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे निवडणुकीत भाजप सुनेत्रा पवारांना आवश्यक ती मदत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीचा तिढा सुटणार का? दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. मात्र, शरद पवारांच्या पक्षाने या जागेवर उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेसने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. आता सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेस 'बॅकफूट'वर जाते की आकाश मोरे यांच्या माध्यमातून महायुतीला तगडे आव्हान देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. बारामती पोटनिवडणुकीतून 6 उमेदवारांची माघार दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, आज दिवसभरात 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. विलास होळकर ,माऊली कांबळे, रजाक मुलाणी ,राहुल थोरात, अमोल कोकरे ,अशोक खामगळ यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या गुरुवार 9 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या किती जण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला 53 वैध अर्जांपैकी सहा जणांनी माघार घेतल्याने सध्या तरी 47 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मात्र उद्या अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होण्याची आणि चित्र बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवनिर्माण, सर्जनशील विचार यशाची गुरुकिल्ली:व्हीएनआयटी नागपूरचे डॉ. सतीश श्रीवास्तव यांचे प्रतिपादन
व्हीएनआयटी नागपूरच्या फायनान्शिअल इंजिनिअरिंग विभागाचे डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी 'आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग'चे महत्त्व सांगितले. अमरावती येथील जी. एच. रायसोनी विद्यापीठात 'सदा ज्ञान व्याख्यानमाला' अंतर्गत सोमवारी त्यांनी हे प्रतिपादन केले. डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी नेहमी नवीन आणि रचनात्मक विचार करणे आवश्यक आहे. हीच 'आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग'ची कला तुम्हाला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर काढते, तणाव, नैराश्य आणि निराशापासून दूर ठेवते आणि भविष्यात तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत करते. यावेळी कुलपती डॉ. विनायक देशपांडे अध्यक्षस्थानी होते, तर कुलसचिव डॉ. स्नेहिल जायस्वाल आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. श्रीवास्तव यांनी प्रगतीसाठी नवीन विषय, नवाचार आणि स्वतंत्र विचारांची गरज असल्याचे अधोरेखित केले. हे सर्व 'बॉक्स'च्या बाहेर विचार करण्यातूनच शक्य होते. ते पुढे म्हणाले की, आपले विचार स्वतःचे, स्वतंत्र आणि स्पष्ट असावेत, त्यात कोणतीही दुविधा किंवा संदिग्धता नसावी. विचार केवळ मनात न ठेवता त्यांची अंमलबजावणी गांभीर्याने करावी. अनेकदा युवक काही नवीन करण्याचा निश्चय करतात, परंतु त्यांचे विचार स्वतंत्र नसल्याने ते दुविधेत अडकतात. परिणामी इच्छित यश मिळत नाही आणि त्यामुळे नैराश्य, तणाव व निराशा वाढते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी सतत 'आउट ऑफ बॉक्स' विचारसरणी ठेवणे गरजेचे आहे. व्याख्यानादरम्यान डॉ. श्रीवास्तव यांनी देशातील अनेक यशस्वी उद्योजकांच्या उदाहरणांचा उल्लेखही केला. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रकाश नारायण यांनी आभार मानले. सचिन देशपांडे, कुणाल बोरकर आणि अश्विनी राठी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
तिवसा तालुक्यातील जळका येथील पौराणिक खंडोबा मंदिर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीस्थळापर्यंत जाणाऱ्या मुख्य 'दिंडी मार्गा'ची गेल्या १५ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे गंभीर रुग्ण आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी तातडीने रस्ता नूतनीकरण आणि रुंदीकरण करण्याच्या मागणीसाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना निवेदन दिले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या मार्गावर केवळ तात्पुरते खड्डे बुजवण्याचे काम केले जाते, ज्यामुळे रस्त्याची स्थिती सुधारत नाही. हृदयविकार, कॅन्सर आणि गर्भवती महिलांना याच मार्गावरून अमरावती येथील 'अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल'मध्ये ने-आण केली जाते. मात्र, रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमुळे रुग्णांना रुग्णालयात पोहोचताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. निवेदन स्वीकारल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी यासंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याच मागणीसाठी ९ ते १२ मार्च या कालावधीत माणिकग्राम धोत्रा येथे बेमुदत उपोषणही करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या आंदोलनात प्रकाश चिचखेडे, अमोल वावरे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते. जळका ते मोझरी हा मार्ग अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात किंवा वाहतूक कोंडी झाल्यास जड वाहनांसाठी एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो. असे असूनही, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त या मार्गावरून १०० हून अधिक दिंड्या पायी प्रवास करतात, त्यामुळे वारकऱ्यांनाही या खड्ड्यांचा सामना करावा लागतो.
जायकवाडी धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान चार आवर्तन दिले जातील. तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी राखीव तरतूद करण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली. पैठण येथील संतपीठात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार विजयसिंह पंडित, राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश बोरणारे, हिकमत उढाण, विलास भुमरे उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, प्रकाश दादा सोळंके सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, निम्न दुधना प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती जगताप यांच्यासह बीड, परभणी, जालना जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. सिंचनासाठी जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून ज्याप्रमाणे चार आवर्तन दिले जातात, त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातूनही चार आवर्तन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. या मागणीला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली. याशिवाय, नांदूर मधमेश्वर कालव्यात उन्हाळी हंगामासाठी चार आवर्तन आणि निम्न दुधना प्रकल्पातून चार आवर्तन देण्यासही मंजुरी देण्यात आली. भविष्यातील सिंचन सुविधांच्या उपाययोजनांसाठी केटी वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. जायकवाडी धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी राज्य स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली. बीड, परभणी, जालना, संभाजीनगर येथील विविध मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या पाणी वाटपाच्या संदर्भात तसेच बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबतच्या मागण्यांना बैठकीत मान्यता देण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने कला शाखेतील बीए भाग दोनच्या अभ्यासक्रमातून 'ते पन्नास दिवस' ही कादंबरी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला स्थगिती देऊन कादंबरी पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनने (एआयएसएफ) केली आहे. या मागणीच्या पुष्ट्यर्थ एआयएसएफच्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. ढोरे यांना एक निवेदन सादर केले, ज्यात 'ते पन्नास दिवस' कादंबरी पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. पवन भगत यांनी लिहिलेली ही कादंबरी बीए भाग २ च्या चौथ्या सेमिस्टरच्या मराठी साहित्य मेजर-एक या विषयात समाविष्ट होती. या कादंबरीमध्ये कोरोना काळात सामान्य नागरिक आणि विशेषतः मजुरांची झालेली फरफट मांडण्यात आली आहे. एआयएसएफच्या मते, ही कादंबरी समाजाचे त्यावेळचे वास्तव चित्रण वाचकांसमोर उभे करते. त्यातून सामाजिक असमतोल, राज्यकर्त्यांची भूमिका आणि जबाबदारी स्पष्ट होते, ज्यामुळे विद्यार्थी अधिक परिपक्व व चिंतनशील बनतात. त्यामुळे ती रद्द करू नये, असे एआयएसएफने प्र-कुलगुरुंना सांगितले. काही व्यक्ती आणि संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ४ एप्रिल रोजी अधिसूचना क्रमांक ५२/२०२६ नुसार सदर कादंबरी अभ्यासक्रमातून वगळली. त्याऐवजी 'धग' ही दुसरी कादंबरी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. एआयएसएफने निदर्शनास आणले की, परीक्षा जवळ आली असताना इतक्या कमी कालावधीत नव्या कादंबरीचे अध्यापन विद्यापीठाच्या कोणत्याही महाविद्यालयात होणे शक्य नाही. यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे यांनी एआयएसएफने दिलेले निवेदन विद्या परिषदेकडे पाठविण्यात येईल, असे यावेळी सांगितले. दरम्यान, विद्यापीठाच्या शैक्षणिक कॅलेंडरनुसार अध्यापनाचे दिवस ३ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होऊन १८ एप्रिलला संपणार आहेत, तर मे महिन्यात परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे ऐन परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम बदलण्याच्या या निर्णयाबद्दल विद्वतजन आणि विद्यार्थीही बुचकळ्यात पडले आहेत.

29 C