SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

23    C
... ...View News by News Source

देशात ८० टक्के मनोरुग्ण उपचारापासून वंचित!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि खर्चिक उपचार मोफत व्हावेत, या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजना जाहीर करतात. मात्र, प्रत्यक्षात देशात लाखो रुग्ण कोणत्या ना कोणत्या कारणावरून उपचारापासून वंचित राहात आहेत. त्यातच देशातील तब्बल ८० टक्के रुग्ण उपचारापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. इंडियन सायकेट्रिक सोसायटीने (आयपीएस) […] The post देशात ८० टक्के मनोरुग्ण उपचारापासून वंचित! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:11 am

ट्रम्पचे डोके बिघडले?

दुस-यांदा अमेरिकेची सत्ता हाती आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आश्चर्यकारक अन् धोकादायक निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकामागून एक धक्कादायक निर्णय घेतले जात असल्यामुळे ट्रम्प यांचे डोके निश्चितच बिघडले आहे असे सा-या जगाचे ठाम मत बनत चालले आहे. ट्रम्प सत्तेत आल्यापासून सातत्याने भारतासह जगाची चिंता वाढवणारे निर्णय घेत […] The post ट्रम्पचे डोके बिघडले? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:10 am

सोयाबीन-तुरीची गंज जळून खाक

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर तालुक्यातील समसापूर गट क्रमांक ४६ व ४७ मधील शेतात ठेवलेला सोयाबीन आणि तुरीची गंज कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दि. ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी प्रल्हाद मारुती मुदामे […] The post सोयाबीन-तुरीची गंज जळून खाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:09 am

मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है…?

लातूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत भाजपाने प्रभाग क्र. ११ मध्ये प्रभागा बाहेरील उमेदवार दिले आहेत. प्रचारा दरम्यान हे भाजपाचे उमेदवार जेंव्हा तुमच्याकडे येतील तेंव्हा त्यांना तुम्ही त्यांना ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है..’, असा प्रश्न मतदारांनी त्या उमेदवारांना विचारावा, या उलट काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीने स्थानिक प्रभागातील विकासाची जाण व तळमळ असणारे […] The post मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है…? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:07 am

मतदारांनी काँग्रेस-वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे

लातूर : प्रतिनिधी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळापासून धोरणं आखून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. तोच धागा पकडून लोकनेते विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचा विकास केला. त्यांच्या विचारावर पाऊल टाकत आमदार अमित देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख हे सुध्दा काम करीत असून काँग्रेस पक्षाचा हात आम आदमी के साथ, या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांच्या विकासाच्या योजना […] The post मतदारांनी काँग्रेस-वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:06 am

लातूर शहराच्या रस्त्यांवर घुमला लोकशाहीचा जयघोष

लातूर : प्रतिनिधी येणा-या काळात लातूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जागरूक मतदार ही ओळख निर्माण व्हावी, यासाठी शहरात गुरुवारी एक अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. ५३ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी कॅडेट्स आणि लातूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती रॅलीने लातूरकरांना मतदानाचा संदेश अतिशय प्रभावीपणे दिला. शहरातील दोन महत्त्वाच्या भागातून ही रॅली निघाली. स्वामी […] The post लातूर शहराच्या रस्त्यांवर घुमला लोकशाहीचा जयघोष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:04 am

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी जी-२४ ग्रुपचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी संविधानिक संस्थाचे स्वातंत्र्य संपुष्टात आणून सर्व सत्ता एका विचारसरणीच्या हातात केंद्रित केल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आज भाजपने देशावर हुकूमशाही लादली आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आरएसएसच्या आधीपत्याखाली काम करणा-या जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी जी-२४ या ग्रुपने लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. हुकूमशाही […] The post जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी जी-२४ ग्रुपचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:03 am

प्रभाग १४, १५, १७ मधील माफियाराज मोडून काढा

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच इकडून तिकडे उडी मारुन गेलेल्यांनी प्रभाग क्रमांक १४, १५ आणि १७ मधील नागरिकांचा छळ केला. या भागात दहशत पसरवली आहे. या परिसरात माफियाराज सुरु आहे. हे मोडून काढायचे असेल तर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या चारित्र्यवान, उच्च शिक्षीत, कर्तव्यदक्ष, कर्तबगार, प्रामाणिक, गतिशील, सुसंस्कृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, […] The post प्रभाग १४, १५, १७ मधील माफियाराज मोडून काढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:02 am

राज ठाकरेंचे नाशिककरांना भावनिक आवाहन:म्हणाले- 1500 रुपयांसाठी आई-वडील विकले गेले, असे मुलांना वाटू देऊ नका

भविष्यात तुमच्या मुलांना पश्चाताप होऊ नये, 1500 रुपयांसाठी आपले आई-वडील विकले गेले असे म्हणू नये अशी जर इच्छा असेल शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत बोलताना केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली. नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामे विसरली. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा आलेच नाहीत. 2012 साली आमची सत्ता असताना त्यावेळी कुंभमेळा झाला. त्याचे नियोजन उत्तम करण्यात आले. त्यासाठी एकही झाड कापले नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा सत्कार झाला. मग आता काय झाले? भाजपचे आगोदरच ठरते. कुंभमेळ्याच्या नावाखाली आता झाडे तोडायची, नंतर साधू परत गेल्यानंतर ती जागा उद्योगतपीच्या घशात घालायची. यांचे हे सगळे आधीच ठरलेले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. फडणवीसांनी एकही काम केले नाही पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केले. पण एकही काम त्यांनी केले नाही. भाजपने फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोकांना भुलवले. 2017 साली आमची सत्ता गेली आणि भाजप निवडून आला. एवढे काम करूनही मला पराभव पाहायला लागला आणि ज्या लोकांनी काहीही केले नाही ते सत्तेत आले. आजही तेच सुरू आहे. पैसे वाटायचे आणि सत्ता मिळवायची हे काम सुरू आहे. आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली राज ठाकरे म्हणाले, नाशिकमध्ये आमची सत्ता असताना रतन टाटा यांच्या मदतीने आम्ही बोटॅनिकल गार्डन तयार केले होते. गेल्या पाच वर्षात यांनी त्याची काय अवस्था केली? नाशिकमध्ये आमची सत्ता असताना महापालिकेवर 700 कोटी कर्ज होते. पुढच्या पाच वर्षात आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली. पाच वर्षात विरोधकांकडूनही कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला नाही. मी कंत्राटदारांची बैठक घेतली होती. तुमच्याकडे जर कुणी पैसे मागितले तर सांगा, पण जर रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असे सांगितले होते. हे होऊ शकते, पण यांना आता करायचे नाही. कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर महाराष्ट्रात 60-70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, 1952 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते होते ना, मग बाहेरून का घेता? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे ठिक आहे, पण सगळीकडेच हे सुरू. त्यातून तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त कामंच करायची. भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला आमचा आई-बाप 1500 रुपयांसाठी विकले गेले, विकास झालाच नाही असे जर तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये असे वाटत असेल तर आम्हाला सत्ता द्या. आज आमच्या पाठिशी उभे राहा, भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला. हे शहर उत्तम करायचे असेल तर तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 10:01 pm

ज्येष्ठाची 17 लाखांची फसवणूक:कायदेशीर कारवाईची भीती दाखवत सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची कायदेशीर कारवाईची भीती दाखवून १७ लाख ४३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या बँक खात्याचा वापर केल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास करत असल्याची बतावणी त्यांनी केली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवाद्यांनी केला असून, जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले. कायदेशीर कारवाईची आणि अटकेची भीती दाखवून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला धमकावले. अटक टाळण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा केली. परंतु आणखी पैशांची तक्रारदार यांना संशया आला त्यांनी खातरजमा केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा विविध घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:42 pm

खराडीत युवकाची दगडाने ठेचून हत्या:इन्स्टाग्राम वादातून मित्रानेच केला खून, आरोपी अटकेत

खराडी परिसरात सोशल मीडियावरील जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास स्वीट इंडिया चौकाजवळील स्वास्थ क्लिनिक इमारतीसमोर घडली. आकाश उर्फ अक्षय किसन तराले असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी खराडी पोलिसांनी विजय उर्फ जलवा संजय वाघमारे याला अटक केली आहे. मृत आकाश हा मूळचा लोहगाव येथील खांडवे नगरचा रहिवासी होता आणि सध्या तो वाघोली येथे राहत होता. तो नेहमी त्याचा मित्र अमित चंद्रकांत भोसले याच्यासोबत खराडी परिसरात येत-जात असे. आकाश, अमित आणि आरोपी विजय हे तिघेही एकमेकांना ओळखत होते आणि त्यांची स्वीट इंडिया चौक परिसरात अनेकदा भेट होत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे सोशल मीडियावरील जुना वाद होता. आकाश त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर सूरज सालबे नावाच्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ ठेवत असल्याने विजय नाराज होता. यावरून त्यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. ८ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आकाश आणि अमित दुचाकीवरून खराडीत आले होते. रात्री नऊच्या सुमारास विजय हातात बिअरची बाटली घेऊन तिथे आला आणि आकाशला शिवीगाळ व धमक्या देऊ लागला. वाद वाढल्यानंतर विजयने बिअरच्या बाटलीने आकाशच्या डोक्यात वार केला. आकाश जमिनीवर कोसळताच आरोपीने जवळचा मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यावर पुन्हा वार करत निर्घृणपणे हल्ला केला. या घटनेने घाबरलेल्या अमितने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत आकाशला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खराडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:40 pm

आमचे आरोग्य तुमच्या जाहीरनाम्यात दिसू द्या:'आम्ही पर्यावरण प्रेमी' संघटना आक्रमक; खुलेआम जळतोय कचरा, सार्वजनिक वाहतूक ‘पंक्चर’

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणाकडे व त्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी जागरूक नागरिकांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पर्यावरण आणि पर्यायाने शुद्ध हवेशी संबंधित मुद्यांना स्थान देऊन कृती करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या शहरांमध्ये निवडणुका आहेत तेथील नागरिकांना देखिल मदत करण्याचा निर्णय ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ने घेतला आहे. शहरात खुलेआम कचरा जाळला जातो, सर्व वाहतूक सिग्नलला टायमर नाहीत. बसची संख्या तोकडी आहे, स्मशानभूमीतील प्रदूषणाबाबत उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत, बांधकाम करतानाचे नियम पाळले जात नाहीत, पार्किंगच्या जागा बेकायदा विकल्याने कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. यामुळे शहरात पीएम 2.5 आणि पीएम 10 ची स्थिती वर्षभरात जवळजवळ 200 ते 290 दिवस खराब राहिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हवेचा दर्जा दर्शवणा-या तीन पैकी एका केंद्राची माहिती नियमित मिळतच नाही. या गंभीर विषयाला राजकारणी महत्त्व देत नाहीत. त्यामुळे विविध संस्थांच्या या मंचने एक पत्र राजकीय पक्षांना पाठवले. प्रत्यक्ष भेटी घेण्याचाही प्रयत्न आहे. पत्राला आमदार संजय केणेकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत सविस्तर चर्चा केली. शिवाय पक्षाला पत्र लिहिणार असल्याचे स्पष्ट केले. दमा, कॅन्सर, हृदय रोग ते मधूमेह हवेचे प्रदूषण आता केवळ पर्यावरणाशी संबंधित समस्या राहिलेली नाही, तर ती सार्वजनिक आरोग्य, उपजीविका आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित गंभीर संकट बनली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उघड्यावर काम करणारे कामगार, विक्रेते आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना बसतो. हवा प्रदूषण म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण आहे. त्यामुळे लोकांमध्येही या अभियानातून जागृती होईल अशी ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ची अपेक्षा आहे. सर्व पक्षांना, उमेदवारांना आवाहन स्वच्छ हवा, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन या बाबींना निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये व कृतीत प्राधान्य देण्यात यावे, अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आपण तसे करत असाल तर कृपया 9049067888 या क्रमांकावर कळवावे. ‘जबाबदार उमेदवार’ म्हणून आपली दखल घेतली जाईल. आपणही सहभागी व्हा ‘हवी शुद्ध हवा’ अभियान अनेक संस्था मिळून प्रत्यक्ष पालापाचोळा व्यवस्थापन करत आहे. यात औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा), रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इस्ट, इको ग्रीन, बेस्ट फाऊंडेशन, क्रेझी फ्रेंड्स ग्रुप, दीपशिखा फाऊंडेशन, ग्रीन बार्टर, प्लॉगर्स ग्रुप, जनसहयोग प्रतिष्ठान, गरवारे कम्युनिटी सेंटर, रीड ॲंड लीड फाऊंडेशन, अम्ब्रेला फाऊंडेशन, संडे क्लब, जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, अर्बन रिसर्च फाऊंडेशन यांचा सहभाग आहे. आपणही सहभागी होऊ शकता.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:38 pm

पाकने शोधली ‘युपीआय’पेक्षा वेगवान, सुरक्षित पेमेंट प्रणाली

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानने आपल्या अडाणी जनतेसाठी भारताच्या प्रगत आणि सुरक्षित युपीआय सिस्टीमपेक्षाही फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली आहे. एखाद्याला पैसे पाठवायचे असतील तर पाकिस्तानी लोकांना बोटांनी टाईप करण्याची किंवा विशिष्ट मेनू शोधण्याची गरज राहणार नाही. पाकिस्तान आपल्या बँकिंग क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत असून, लवकरच तिथे व्हॉइस-अ‍ॅक्टिव्हेटेड बँकिंग अ‍ॅप्स लाँच केले जाणार आहेत. या सुविधेमुळे […] The post पाकने शोधली ‘युपीआय’पेक्षा वेगवान, सुरक्षित पेमेंट प्रणाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:35 pm

तामिळनाडूत भाजपची रणनीती; ५६ जागा, ३ मंत्रिपदावर ठाम

चेन्नई : वृत्तसंस्था भाजपाने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. २०२६ वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडू दौरा केला. त्यात भाजपा आणि एआयडिएमके दोन्ही पक्षात युती, जागावाटप आणि सत्ता फॉर्म्युल्याची चर्चा झाली. एआयडिएमकेचे महासचिव माजी मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी यांची नुकतीच अमित शाह यांच्यासोबत बैठक […] The post तामिळनाडूत भाजपची रणनीती; ५६ जागा, ३ मंत्रिपदावर ठाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:32 pm

सबरीमाला सोने चोरी; मुख्य पुजारी ताब्यात

सबरीमाला : वृत्तसंस्था सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी आज एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने मंदिर परिसरातील सोन्याचे दागिने गायब झाल्याप्रकरणी मंदिराचे मुख्य पुजारी कंडारारू राजीवारू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन सरकारने चोरीचा तपास […] The post सबरीमाला सोने चोरी; मुख्य पुजारी ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:29 pm

शेअर मार्केटमध्ये पाचव्या दिवशी घसरण; ११.५६ लाख कोटी बुडाले!

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण सुरूच असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, जवळपास दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा ८३ हजारांच्या पातळीवर आला आहे. गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल ११.५६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शुक्रवारी सेन्सेक्स सुमारे ४७० अंकांनी घसरून ८३,७०८ च्या आसपास पोहोचला. सकाळी सेन्सेक्स ८४,०२२ वर […] The post शेअर मार्केटमध्ये पाचव्या दिवशी घसरण; ११.५६ लाख कोटी बुडाले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:28 pm

पत्नीवर गर्भधारणेस सक्ती करता येत नाही!

नवी दिल्ली : प्रतिनिधी वैवाहिक कलह किंवा पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना पत्नीवर गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. असे करणे हे केवळ तिच्या शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन नसून तिच्या मानसिक त्रासात भर टाकणारे आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या टिप्पणीसह न्यायालयाने पतीकडून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यातून पत्नीची निर्दोष मुक्तता […] The post पत्नीवर गर्भधारणेस सक्ती करता येत नाही! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:26 pm

इराणच्या १०० शहरांत महागाईविरोधी भडका! हिंसाचारात ४५ ठार; तेहरान एअरपोर्ट, इंटरनेट-फोन बंद

तेहरान : वृत्तसंस्था इराणमध्ये महागाईविरोधात १३ दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान गुरुवारी रात्री परिस्थिती आणखी बिघडली. देशभरातील १०० पेक्षाही अधिक शहरांमध्ये हिंसक निदर्शनांचा वणवा पसरला आहे. निदर्शकांनी रस्ते अडवले, जाळपोळ, तोडफोड केली. लोकांनी खोमेनीचा मृत्यू आणि इस्लामिक रिपब्लिकचा अंत झाला अशा घोषणा दिल्या. काही ठिकाणी निदर्शक क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांनी […] The post इराणच्या १०० शहरांत महागाईविरोधी भडका! हिंसाचारात ४५ ठार; तेहरान एअरपोर्ट, इंटरनेट-फोन बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:25 pm

माजी खासदार सुरेश कलमाडींना पुण्यात श्रद्धांजली:विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना दिला उजाळा

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, पुण्याचे खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना शुक्रवारी पुण्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथे आयोजित श्रद्धांजली सभेत या लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. सुरेश कलमाडी (वय ८१) यांचे मंगळवारी निधन झाले होते. कलमाडी कुटुंबीयांच्या वतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी, चिरंजीव सुमीर, सून नंदिता आणि कन्या सोनाली व पायल यांचे मान्यवरांनी सांत्वन केले. पूना क्लबमधील हिरवळीवरील मांडवात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. फुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर सुरेश कलमाडी यांची तसबीर ठेवण्यात आली होती. मान्यवरांनी तसबिरीला फुले वाहून आणि दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. संपूर्ण मांडवात उदबत्तीचा सुवास दरवळत होता. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर सुरेश कलमाडी यांची विविध छायाचित्रे झळकत होती. बालपणापासून ते तरुणपणातील, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), हवाई दलातील, राजकारणातील, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि क्रीडा स्पर्धांमधील छायाचित्रांनी त्यांच्या जीवनाचा पट उपस्थितांसमोर उलगडला. सुरेश कलमाडी यांच्या विविध क्षेत्रांतील कार्यामुळे राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण, आर्थिक आणि आरोग्य अशा क्षेत्रांतील नामवंतांची मांदियाळी या सभेला जमली होती. कलमाडी यांनी नावीन्याचा ध्यास घेऊन शहराचा केलेला कायापालट, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव आणि पुणे व्यासपीठ यांसारख्या त्यांच्या कल्पक योजनांना पुणेकरांनी यावेळी आदराने स्मरण केले. कलमाडी हे एक उत्तम क्रीडा संघटक होते. त्यांनी पुणे शहरात सुरू केलेली मॅरेथॉन जागतिक पातळीवर नेली. पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे तसेच दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे त्यांनी केलेले दिमाखदार आयोजन या आठवणींना क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला. या श्रद्धांजली सभेत 'रघुपती राघव राजाराम', 'सूर निरागस हो', 'शिवनंदना हे शुभनायका' यांसारख्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. सरिता कुमठेकर (गायन), सायली चितोडकर (गायन), श्लोक मोकलकर (गिटार), शिवानंद वैरागकर (तबला), ओंकार डांगमाळी (किबोर्ड) आणि अभय ओक (बासरी) यांनी यात सहभाग घेतला. विवेक भागवत यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:01 pm

भाजपने महापालिकेला अक्षरशः 'ओरबाडून खाल्ले':वाहतूक, पाणी, शिक्षण, ड्रग्ज, गुन्हेगारी समस्यांवरून कॉंग्रेसची जोरदार टीका

पुणे महापालिकेच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात आणि चार वर्षांच्या प्रशासकीय काळात भाजपने महापालिकेला अक्षरशः 'ओरबाडून खाल्ले' आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या मते, भाजपच्या काळात पुणे शहर वाहतूक कोंडी, पिण्याचे पाणी, शिक्षण, ड्रग्ज आणि गुन्हेगारी यांसारख्या गंभीर समस्यांनी ग्रासले आहे. शिंदे यांनी दावा केला की, महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपचे नगरसेवक कमी आणि ठेकेदार जास्त होते. त्यांनी निधी वाटपात मोठ्या प्रमाणात असमानता असल्याचा आरोप केला. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या प्रभागासाठी १३४ कोटी ८ लाख, गणेश बिडकर यांनी ३० कोटी, धीरज घाटे यांनी ३२ कोटी, हेमंत रासणे यांनी ९० कोटी, श्रीनाथ भिमाले यांनी ८३ कोटी, सुनील कांबळे यांनी ५१ कोटी आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी ३० कोटी रुपये महापालिकेच्या निधीतून घेतले. या सात जणांनी मिळून सुमारे ४०० कोटींचा निधी घेतला, मात्र विकास कुठेच दिसत नाही, असे शिंदे म्हणाले. एका प्रभागासाठी दीडशे कोटी आणि दुसऱ्या प्रभागासाठी एक-दोन कोटी देणे हा समतोल विकास आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. २०१९ मध्ये आलेल्या पुरावेळी राज्य सरकारकडून आलेले १६५ कोटी रुपये परत गेले. तसेच, २०१६ मध्ये आणलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसतानाही पाणीपट्टीत पाच-पाच टक्क्यांची वाढ करून दहा वर्षे नागरिकांकडून ती वसूल केली गेली. ही योजना आजही केवळ कागदावर असून, कामे न करताच ठेकेदारांना पैसे दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी ८५० कोटींचे अनुदान असतानाही ६६१ कोटींचा अतिरिक्त भार महापालिकेने करदात्यांवर लादला. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि ५५ किलोमीटरच्या वाहिन्यांचे नियोजन असूनही निविदांची अंमलबजावणी झाली नाही. नदी सुधारण्याऐवजी केवळ सुशोभीकरण करून 'मलमपट्टी' करण्याचे काम केले, असे शिंदे म्हणाले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निविदा १३०० कोटींवरून अचानक १८०० कोटींवर कशी गेली, यात ५०० कोटींची फुगीर वाढ कशी झाली, हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोरोना काळात ९५६ पीएमपीएमएलच्या बस नऊ महिने एका जागेवर उभ्या होत्या. या बस चालू नसल्याने ठेकेदारांना पैसे देणे अपेक्षित नव्हते, तरीही मुरलीधर मोहोळ यांनी ठेकेदारांना ९९ कोटी रुपये देण्याचा घाट घातल्याचा आरोप शिंदे यांनी केला. पूर्वी भाजप 'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा देत होते, परंतु आता पुणेकरच 'भाजपमुक्त पुणे' करून त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:00 pm

विरोधकांना 'कात्रजचा घाट' दाखवा!:पुणे महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचा आक्रमक एल्गार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील जाहीर सभेत पुणेकरांना आक्रमक आवाहन केले. पुणे महापालिकेसाठी शिवसेनेची पाटी कोरी असली तरी, त्यावर विकासाची अक्षरे लिहिण्याची ताकद शिवसेनेत आहे. पुणेकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान करून विरोधकांना कात्रजचा घाट दाखवावा आणि पुणे महापालिकेवर भगवा फडकवावा, असे ते म्हणाले. पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय आमचाच होणार, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेला व्यासपीठावर नीलम गोऱ्हे, तानाजी सावंत, रवींद्र धंगेकर, प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, नमेश बाबर, आबा बागुल यांसह शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांकडे लक्ष वेधत शिंदे म्हणाले की, प्रत्येक सभा, रोड शो आणि प्रचार रॅलीत 'लाडक्या बहिणींची' संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. महिलांचा सहभाग हा विजयाचा पाया असून, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला ठाम उभ्या असतात, त्यांचा मतपेटीत क्रमांक पहिलाच असतो, असा अनुभव त्यांनी विधानसभा ते नगरपरिषदांपर्यंत घेतला आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेत हॅट्ट्रिक झाली असून, आता महापालिकेत चौकार मारायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुणे हे महाराष्ट्राचे चैतन्य आणि विद्येचे माहेरघर असल्याचे सांगत, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे महापालिकेला विकासाचे अमृत देण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. आमचा अजेंडा सत्ता नसून विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा विकास हाच शिवसेनेचा झेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत विकासाभिमुख व लोककल्याणकारी निर्णय घेतल्याचा दाखला देत, त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवल्याचा अनुभव सांगितला. तसेच, कात्रजची वाहतूक कोंडीही दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द त्यांनी पुणेकरांना दिला. शिवसेना स्वबळावर लढत असल्याने तिला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही शिंदे यांनी विरोधकांना दिला. मी बोलतो ते करतो. एकदा कमिटमेंट केली की मागे हटत नाही, असे सांगत त्यांनी 'लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही, याची ग्वाही दिली. विरोध झाला, कोर्टात गेले तरीही योजना सुरू राहिली, कारण तुमचा एकनाथ शिंदे ठामपणे उभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेत मालक-नोकर नाहीत, सर्वजण सहकारी आहेत. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारी शिवसेना नाही. छातीवर वार घेणारे, कार्यकर्त्यांसाठी पुढे उभे राहणारे नेते आणि पदाधिकारी आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळालाच पाहिजे, कारण निवडणुकीत विजयाचा कणा कार्यकर्ताच असतो, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 8:57 pm

1952 साली जन्माला आलेल्या पक्षाला आज पोरं भाड्याने घ्यावी लागताय:राज ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले- महाराष्ट्रात सावळा गोंधळ सुरू

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर उभय नेत्यांची संयुक्त सभा पार पडत आहे. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाइलमध्ये भाषणाची सुरुवात केली, तेव्हा एकच जल्लोष पाहायला मिळाला. राज ठाकरे म्हणाले, आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारने कोणालाही देता येणार नाहीत, कारण काळलीच नाहीत. चार वर्षांपूर्वी मुदत संपून देखील या निवडणुका का होत नव्हत्या याचे उत्तर या सरकारने दिले पाहिजे. आता या निवडणुका होत आहेत, आणि ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार सुरू आहे. इतका चुकीचा कॅरम फुटला की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहे तेच समजत नाही. प्रत्येकाला विचारावे लागते, आज कुठे?, असा खरमरीत टोला लगावला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:57 pm

दुुचाकी-कार अपघातात तीन मित्र ठार

गंगाखेड : लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील उरूसावरून गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी या गावी परत येत असताना दि. ८ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आनंदवाडी गावातील तीन मित्र ठार झाले. या घटनेमुळे आनंदवाडी गावात शोककळा पसरली असून शुक्रवारी चूल पेटली नाही. गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी गावचे तीन मित्र मोटारसायकलवरून (दुचाकी […] The post दुुचाकी-कार अपघातात तीन मित्र ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 7:20 pm

एप्रिल-मे 2026 पर्यंत पीएमपीला 2500 नव्या गाड्या:खासदार मुरलीधर मोहोळ यांची घोषणा; 20 लाख प्रवाशांना फायदा

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी एप्रिल-मे २०२६ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २,५०० नव्या गाड्या दाखल केल्या जातील, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यामुळे पीएमपीचा ताफा ४ हजार गाड्यांचा होईल आणि दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. खासदार मोहोळ शुक्रवारी पर्वती विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा व रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपचा भर असून, त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळही पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. विस्तारित पीएमआरडीएसह शहरातील बस मार्ग व फेऱ्यांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. ताफ्यात एक हजार ई-बस आणण्याची प्रक्रिया सुरू असून, या गाड्यांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सध्या ३९४ मार्गांवर सेवा देणाऱ्या पीएमपीच्या मार्गात आणखी किमान १०० नवीन मार्गांची भर पडेल. यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होत असलेले शहराबाहेरील परिसर तसेच औद्योगिक आणि आयटी हब्सपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे मोहोळ यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएमपीकडून २५ इलेक्ट्रिक दुमजली (डबल-डेकर) गाड्या भाडेतत्त्वावर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या वर्षात पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा डबल-डेकर धावणार आहेत. सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर मार्गांवर १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. बॅटरी क्षमता, ऊर्जा कार्यक्षमता आणि शहरातील वाहतूक परिस्थितीसाठीची उपयुक्तता तपासणाऱ्या तज्ज्ञ समितीच्या सकारात्मक अहवालानंतर या गाड्यांना हिरवा कंदील मिळाल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. या प्रस्तावित डबल-डेकर बस प्रमुख मार्गांवर धावतील. यामध्ये हिंजवडी फेज ३ (वर्तुळाकार), रामवाडी मेट्रो स्थानक - खराडी, मगरपट्टा सिटी - कल्याणी नगर मेट्रो, पुणे रेल्वे स्थानक - लोहगाव विमानतळ, देहू - आळंदी आणि चिंचवड - हिंजवडी या मार्गांचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:18 pm

बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात घडली घटना

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे आहे. हियांश त्याच्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ शेकत बसला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत त्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट चिमुकल्याला ठार करून जंगलात पसार झाला. खडकी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून, यापूर्वीही ग्रामस्थांनी वन विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. वेळेवर उपाययोजना न झाल्याने एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबाला तत्काळ मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:17 pm

बोपोडीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार:सनी निम्हण यांची घोषणा, आरोग्य सुविधा बळकट करणार

पुण्यातील बोपोडी परिसरात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. बोपोडी परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निम्हण यांनी दिले. या भागात महापालिकेचे दोन दवाखाने असून, त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच एक ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ही घोषणा चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड आणि सपना छाजेड यांच्या बोपोडी परिसरात काढलेल्या पदयात्रेदरम्यान करण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारांशी संवाद साधताना सनी निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसराचा सर्वांगीण व समतोल विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या बोपोडीतील नागरिकांना उपचारासाठी पिंपरीतील वाय.सी.एम. हॉस्पिटल, खडकीतील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये जावे लागते. येथील शेवाळे दवाखाना कार्यरत असला तरी, त्यात सोयी-सुविधांचा अभाव असून केवळ ओपीडी सेवा उपलब्ध आहे. खेडेकर दवाखान्यात अत्याधुनिक सोयी-सुविधांसह ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे निम्हण यांनी स्पष्ट केले. तसेच, संजय गांधी दवाखाना, जो सध्या बांधून तयार आहे पण सुरू झालेला नाही, तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू केला जाईल. यामुळे बोपोडीच्या नागरिकांची आरोग्यसेवा बळकट होईल, असे निम्हण यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:16 pm

नागपुरात वाळू व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी:चौकशी टाळल्याने कारवाई, पहाटेपासून 10 पथके सक्रिय

नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात वाळू व्यवसायाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून नागपूर आणि दिल्ली येथील ईडीच्या सुमारे १० पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणलेल्या वाळू विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. हे प्रकरण चार वर्षांपूर्वीचे असून, शासनाची वाळू रॉयल्टी चुकवून २०२१ मध्ये कोट्यवधी रुपयांचा वाळू व्यवसाय केल्याप्रकरणी काही वाळू व्यावसायिकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीकडून ही कारवाई करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी चौकशीसाठी अनेकदा बोलावण्यात आले होते. मात्र, चौकशीत अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे ईडीने थेट छापेमारीचा मार्ग स्वीकारला. सावनेरमध्ये प्रफुल्ल आणि उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते यांच्यावर, तर पाटणसावंगी येथे शरद रॅाय आणि मनोज गायकवाड यांच्यावर ईडीने धाडी टाकल्याची चर्चा आहे. खापा येथे अमित राय यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही कारवाई करण्यात आली. यातील एक व्यावसायिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संबंधित असल्याचे समजते. या व्यावसायिकांविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून या कारवाईबाबत गुप्तता बाळगली जात आहे. व्यावसायिकांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:12 pm

'मित्रा मिशन'चा नागरिक जाहीरनामा, वॉर्डनिहाय समस्यांवर लक्ष:पुणे महापालिका निवडणुकीसाठी '2026 सवाल 26!!' सादर

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मित्रा मिशन' या थिंक टँकने 'नागरिक जाहीरनामा' सादर केला आहे. शहरातील नागरी समस्यांचे वास्तव स्वरूप समजून घेण्यासाठी संस्थेने व्यापक आणि शास्त्रोक्त अभ्यास मोहीम राबवली. केवळ कागदी माहितीवर अवलंबून न राहता, संस्थेच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देत वॉर्ड क्रमांक ८ (बोपोडी), २५ (सदाशिव-नारायण पेठ), ३० (वारजे-कर्वेनगर) आणि ३९ (अप्पर इंदिरानगर) या भागांचा सखोल अभ्यास केला. या प्रक्रियेत विविध सामाजिक स्तरांतील ४८ नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या अभ्यासातून असे दिसून आले की, प्रत्येक वॉर्डमधील समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. बोपोडीमध्ये रेल्वे लगतच्या वस्त्या आणि पडीक जमिनींचे प्रश्न समोर आले. सदाशिव-नारायण पेठेत जुन्या वाड्यांचा पुनर्विकास, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी ही प्रमुख आव्हाने आहेत. वारजे-कर्वेनगरमध्ये वेगाने वाढणारे शहरीकरण, तर अप्पर इंदिरानगरसारख्या डोंगरउतारावरील दाट वस्तीत मूलभूत सुविधांची देखभाल ही मुख्य समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. या अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित 'मित्रा मिशन'ने '२०२६ सवाल २६!!' हा नागरिक जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरनाम्यात पाणीपुरवठा, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, रस्ते व वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि प्रशासकीय पारदर्शकता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठोस प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जाहीरनाम्यात शुद्ध पाणीपुरवठा, कार्यक्षम मलशुद्धीकरण केंद्रे, खड्डेमुक्त रस्ते, सक्षम बससेवा, दर्जेदार महापालिका शाळा आणि सरकारी आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी स्पष्ट उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हा जाहीरनामा केवळ मतदानाच्या प्रक्रियेपुरता मर्यादित नसून, प्रशासनाला जबाबदार धरण्याची एक संधी आहे, असा संदेश देतो. पुण्याच्या शाश्वत आणि सक्षम भविष्यासाठी हा नागरिकांचा कृती आराखडा ठरू शकतो, असे 'मित्रा मिशन'ने म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:09 pm

राष्ट्रीय 'इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0' हॅकेथॉन पुण्यात:400 हून अधिक संघांचा सहभाग अपेक्षित

राष्ट्रीय स्तरावरील 'इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० – २०२६' चे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे आयोजित ही स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयओआयटी) येथे होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला चालना मिळावी, हा या हॅकेथॉनचा मुख्य उद्देश आहे. इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, यंदा या हॅकेथॉनचे तिसरे वर्ष असून, दरवर्षी स्पर्धेचा प्रतिसाद आणि व्याप्ती वाढत आहे. मागील वर्षी देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ४०० हून अधिक संघांनी यात सहभाग घेतला होता. यंदाही देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. या हॅकेथॉनमध्ये एज्युटेक, पर्यावरण, आरोग्यसेवा, ट्रॅफिक मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन आणि ॲग्रिटेक यांसारख्या विषयांवरील सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना दिले जाईल. एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास २ लाख रुपये, उपविजेत्या संघास १ लाख रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. प्रत्येक विषय गटातील विजेत्यांनाही स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार असून, सर्वाधिक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्पाला ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एआयसीटीई, तंत्रशिक्षण संचलनालय, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे आणि सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ यांचा पाठिंबा लाभला आहे. विद्यार्थ्यांनी innovateyou.in या संकेतस्थळावर ५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन यादव यांनी केले आहे. नोंदणी करताना अडचणी आल्यास विद्यार्थी +91 83900 38371 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. नोंदणीकृत स्पर्धकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, विजयी संघांना पुढील टप्प्यात बूट कॅम्प, स्टार्टअप एक्स्पो आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:04 pm

काळाचा क्रूर घाला!:पुण्यातील कॅनालमध्ये चौघांचे प्राण वाचवणाऱ्या 'देवदूता'चा वीर धरणात बुडून दुर्दैवी अंत

पुण्यातील कॅनालमध्ये बुडताना चौघांना वाचवणाऱ्या तरूणाचाच साताऱ्यातील वीर धरणात बुडून मृत्यू झाला आहे. विनोद सुरेश गेंडे (वय 34. मूळ रा. विठ्ठलवाडी-मुळशी, सध्या रा. कोथरूड, पुणे), असे मृत तरूणाचे नाव आहे. घटनेनंतर तब्बल 30 तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर, प्रतापगड आणि शिरवळ सर्च अँड रेस्क्यू टीमना यश आलं आहे. पोलिस आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहणारा रिक्षा चालक आणि अपार्टमेंटच्या सुरक्षा गार्ड या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बुधवारी (7 जानेवारी) वीर धरण परिसरात आला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. अवघ्या वर्षापुर्वीच त्याचा विवाह झाला होता. तो उत्तम जलतरणपटू होता. विनोद गेंडे हा सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीचा विक्री प्रतिनिधी होता. पुण्यातील कोथरूड परिसरातील अपार्टमेंटमध्ये तो वास्तव्यास होता. त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रिक्षा चालक आणि सुरक्षा गार्ड सोबत तो पार्टी करण्यासाठी बुधवारी दुपारी वीर धरण परिसरात आला होता. धरणाच्या पाण्यात उतरल्यावर विनोद पोहत दूरवर गेला, तर एका मित्राला चांगले पोहता नेत नसल्याने तो काठावरच होता. खोल पाण्यात गेलेला विनोद अचानक धरणात बुडाला. त्यामुळे दोन्ही मित्र घाबरले. त्यांनी विनोदच्या मोबाईलवरून त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. विनोदच्या पत्नीने कॉल रिसिव्ह केला. मात्र, तिला धक्का बसेल म्हणून दोघांनी तिला घटनेबद्दल कल्पना दिली नाही. त्यानंतर पत्नीने विनोदच्या बहिणीला फोन करून पतीच्या मित्रांचा फोन आल्याचे सांगितले. विनोदच्या बहिणीने तिच्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी विनोदच्या मित्रांशी संपर्क साधला असता नेमकी घटना समोर आली. त्यानंतर विनोदचे भावजी हे तातडीने शिरवळला आले. शिरवळ पोलिसांनी या घटनेची माहिती महाबळेश्वर, प्रतापगड आणि शिरवळ रेस्क्यू टीमला दिली. परंतु, बुधवारी अंधार पडल्याने शोध मोहीम राबवता आली नाही. गुरुवारी सकाळी 10 वाजता महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड आणि शिरवळ सर्च अँड रेस्क्यू टीमने बोटीच्या सा‌ह्याने शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी 6 वाजता विनोदचा मृतदेह गळाला लागला. धरणाच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे कारण शवविच्छेदनातून समोर आले. विनोद गेंडे याच्या आई-वडीलांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. विनोद हा एका सौंदर्य प्रसाधने कंपनीच्या उत्पादनाचा विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्याचा वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. संसार वेलीवर फूल उमलण्यापुर्वीच विनोदचा मृत्यू झाल्याने विनोदच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. विनोद हा पट्टीचा पोहणारा होता. मुळशी धरणात देखील तो पोहायचा. पुण्यातील खडकवासला-एनडीए मार्गावरील कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या तीन जणांना आणि सेव्हन लव्ह चौक, स्वारगेट येथील कॅनालमध्ये बुडणाऱ्या एकाचा जीव विनोदने वाचवला होता. मात्र, त्याचाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कोथरूड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 6:58 pm

भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करेन:गणेश नाईकांचे विधान; 'नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं' म्हणत प्रत्युत्तर

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुती बहुतांश ठिकाणी एकत्रच लढत असली, तर काही ठिकाणी मात्र स्वबळावर लढत आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे, तर नवी मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप स्वबळावर लढत आहेत. येथील निवडणूक ही एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशी रंगणार आहे. भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करेन, असे म्हणत थेट आव्हानच दिले आहे. नवी मुंबईत शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. गणेश नाईक आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई शहरात सुरू केलेल्या 'नवी मुंबई, नवे सरकार' या प्रचाराला 'नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं' असल्याचे प्रत्युत्तर गणेश नाईक यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिले. गणेश नाईक म्हणाले की, ठाणे हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. केंद्रीय नेतृत्वाने रोखले नसते आणि माझ्याकडे जबाबदारी दिली असती तर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटून दाखवले असते. तसेच गेल्या पाच वर्षात प्रशासकीय कालावधीत नवी मुंबईला लुटणाऱ्यांना येथील मतदार घरचा रस्ता दाखवतील, असेही गणेश नाईक यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. गणेश नाईकांना हलक्यात घेतले एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना गणेश नाईक म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याशी माझे काहीही वैयक्तिक मतभेद नाही. पण एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात, मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार करेन. पण तुम्ही गणेश नाईकांना हलक्यात घेतले ना.... तुमच्या आधी मी इथे तीन वेळा ठाणे जिल्ह्याचा पालमंत्री होतो. तुमच्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबईत समावेश करताना मंत्रालयात बैठक बोलावली. त्यात आम्हाला विचारले देखील नाही, अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली. टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करून टाकेल तसेच हा प्रस्ताव पूर्वी मीच मांडला होता. पण त्यात काही तरी अटी होत्या. गणेश नाईकांना हलक्यात घेतले. भाजपने मला परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करून टाकेल, असा इशाराच नाईकांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. तसेच यावर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 6:16 pm

परभणी शहर मी दत्तक घ्यायला तयार:फक्त घड्याळ आणि तुतारीचे उमेदवारांना निवडून द्या, अजित पवारांचे मतदारांना आवाहन

परभणी शहर मी दत्तक घ्यायला तयार आहे, पण महापालिकेत राष्ट्रवादीच्या घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच माझ्या विचारांची महानगरपालिका निवडून दया. सर्व स्तराचा विकास करायचे काम माझे आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वतः करणार, असेही पवारांनी यावेळी म्हटले. परभणीत प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, परभणीचा जसा पाहिजे तसा विकास दुर्दैवाने झाला नाही. सर्व धर्मातील उमेदवार मग नवीन असो की जुने देण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. पिंपरी चिंचवडचा विकास कसा केला हे विचारा, असे अजित पवार म्हणाले. इथल्या विकासाचा पाठपुरावा करणार पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, केंद्राचा आणि राज्याचा निधी कसा आणायचा याची सांगड घालावी लागते. परभणीत पिण्याच्या पाण्याची योजना, भूमिगत गटार योजना हातात घेतली आहे. सर्व रस्ते चांगले करू. सर्व जाती धर्मातील नागरिकांना सुविधा देऊ. जाती पातीचा, नात्याचा उमेदवार आहे म्हणून बघू नका, विकास कोण करेल हे बघा. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वतः करणार, असे आश्वासन देखील पवारांनी यावेळी दिले. परभणीला धूळमुक्त आणि खड्डेमुक्त करणार परभणी धूळ आणि खड्ड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मी धुळमुक्त, खड्डेमुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घेतो. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असेल तिथे कॅन्सरचे रुग्णालय उभे करणार. राज्याचा केंद्राचा निधी आणू, जसे पिंपरी चिंचवड, बारामती केले तसेच परभणी करू, असे आश्वासन अजित पवारांनी दिले. इथली एमआयडीसी बंद आहे ती चालू करू, तसेच उद्योगपती पाणी, जमीन, लाईट आणि रस्ते आहेत का नाही ते पाहत असतात, असेही पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पहिले जकात मिळत होता, पुन्हा एलबीटी मिळत होता, त्यात सर्व होत होते. मात्र, आता जीएसटी मिळतोय, पण त्यात आमचे भागत नाही. आम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळत नाही. सगळी काम करता येतात, पण पैशांचे सोंग करता येत नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा पाहिजे असतात, मी त्या 100 टक्के परभणीला देणार. महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू माझे अनेक उद्योगपती मित्र आहेत. मध्यंतरी बारामतीला गौतम अदानी आले होते. त्यांनाही मी बोलू शकतो. 35 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक महत्त्वाच्या विकास कामांना निधीही दिला. परभणी महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू. महापालिकेत सरकारने मान्यता दिली तर भरती करू. परभणीकरांना हेवा वाटेल असे क्रीडा संकुल तयार करून देईल, क्रीडा खाते माझ्याकडेच असल्याचेही पवारांनी सांगितले. परभणीतील सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाह,परदेश्वर मंदिर परिसर याचा विकास आराखडा तयार करून निधी देवू. परभणी शहर दत्तक घ्यायला तयार पण महापालिकेत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:47 pm

दडपशाहीमुळे जनता दहशतीत

मुंबई : सत्ताधारी महायुतीच्या धाक, दडपशाहीमुळे जनता दहशतीत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिकेच्या निवडणुकीत पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात आहे. राज्यात येत्या १५ तारखेला मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधीलच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या ३ घटकपक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला […] The post दडपशाहीमुळे जनता दहशतीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 5:26 pm

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का?:रोहित पवार राज्यात, तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? सुळेंनी केला मोठा खुलासा

राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांना पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचया युतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, कार्यकर्त्यांची इच्छा, जे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते होते, त्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांची ही इच्छा होती आणि ते एक टीमवर्क होते. याच टीमवर्कच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? महापालिकेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएबरोबर जाईल का? तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि रोहित पवार राज्यात मंत्री होतील अशा चर्चा सुरू आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या चर्चा मी व्हॉट्सअप ग्रुपवर वाचल्या आहेत. मात्र, मी त्या चर्चांवर फार विचार करत नाही. जे माझ्या कामाच्या बाहेर आहे, त्याचा विचार मी कशाला करू? मी वास्तवात जगत असते. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे लोक वेगवेगळ्या माध्यमातून मते मांडत असतात. लोक काय बोलतात, लोक पक्षाबाबत काय बोलतात, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, या ऐकून घ्यायच्या असतात, असे सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? तसेच सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार अशा देखील चर्चा सुरू असतात, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, 11 वर्षांपासून मी चर्चा ऐकते. लोक बोलत असतात, पण आपण आपले काम करत राहायचे. बारामतीच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्यांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे माझी पहिली जबाबदारी माझ्या मतदारसंघातील मूलभूत सुविधा सोडवणे आहे. लोकांनी मला ज्या कामांसाठी दिल्लीत पाठवले ते काम मी पूर्ण केले पाहिजे, ते काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे सुळे यांनी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:17 pm

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे २१ वे अधिवेशन आळंदीत:देशभरातून १ हजारहून अधिक बँक अधिकारी सहभागी होणार

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे २१ वे त्रैवार्षिक अधिवेशन १० व ११ जानेवारी २०२६ रोजी आळंदी येथे आयोजित करण्यात आले आहे. आळंदी येथील आर.एम.डी. सभागृह, फूटवाले धर्मशाळा येथे होणाऱ्या या अधिवेशनात देशभरातून १ हजारहून अधिक बँक अधिकारी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. अश्विनी देव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना, भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महासचिव रविंद्र हिमते, अखिल भारतीय सचिव (वित्तीय क्षेत्र) गिरीशजी आर्य आणि असोसिएशनचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. या अधिवेशनात भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने, तसेच अधिकारी व सामान्य ग्राहकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाईल. या चर्चांमधून विविध धोरणात्मक ठराव संमत केले जाणार आहेत. अधिवेशनातील प्रमुख ठरावांमध्ये आयकर कायदा १९६१ मधील कलम १७ (२) (viii) मध्ये दुरुस्ती करून परिक्विझिट करातून दिलासा देण्याची मागणी समाविष्ट आहे. तसेच, एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रकरणात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय, एनपीएस लागू होण्यापूर्वी जाहीर झालेल्या जाहिरातींमधून भरती झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणीही केली जाईल. पदोन्नती परीक्षांमध्ये पारदर्शकता आणणे, अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या कामकाजाच्या तासांवर नियंत्रण ठेवून काम-जीवन समतोल राखणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणीही या अधिवेशनात ठळकपणे मांडण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:09 pm

आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट २३ जानेवारीपासून:एमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय स्पर्धा

पुणे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२६) या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वराजबाग येथील विद्यापीठाच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलात २३ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत स्पर्धेचा आठवा हंगाम पार पडेल. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २३ जानेवारी रोजी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेते मुष्टीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि डॉ. सुनीता कराड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ बुधवार, २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त रोईंगपटू कॅप्टन बजरंग लाल ताखर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल. या समारंभाला ऑलिंपियन जलतरणपटू विरधवल खाडे आणि मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, टेनिस, टेबल टेनिस, खो-खो, वॉटर पोलो, बुद्धिबळ, जलतरण, इनडोअर रोईंग, बॉक्सिंग आणि तिरंदाजी अशा १५ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. देशभरातील १३५ हून अधिक शिक्षण संस्थांमधील ५ हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. ‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रीदवाक्यासह आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजेल आणि देशाला नवे प्रतिभावान खेळाडू मिळतील, असा विश्वास प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:08 pm

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण:गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल

येरवडा कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकरप्पा गराळे (वय ६५) असे जखमी कैद्याचे नाव आहे, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैदी फजिल अहमद अब्दुलकयुम अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहातील हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षा भोगत असलेले गराळे आणि अन्सारी यांना कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे खुल्या कारागृहात काम देण्यात आले होते. खुल्या कारागृहातील बराक क्रमांक एक परिसरात त्यांच्यात वाद झाला. या वादातून अन्सारीने गराळे यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारले, ज्यामुळे गराळे फरशीवर पडून जखमी झाले. मारहाणीत गराळे यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या महिन्यात याच येरवडा कारागृहात एका कैद्याचा फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. कारागृहात अशा हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तरुणाला दगडाने मारहाण पुणे शहरात कोथरूड भागात एका तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन बाळू कोंढाळकर (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढाळकर हे सुतारदरा परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी दोघांनी काही कारण नसताना त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन रस्त्यात पडलेल्या दगडाने मारहाण केली. पोलीस हवालदार योगेश सुळ तपास करत आहेत.|

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:07 pm

चार हजार गृहप्रकल्पांपासून ‘महारेरा’ अनभिज्ञ

मुंबई : ‘महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण’ (महारेरा) कडे २०१७ पासून नोंदणी झालेल्या राज्यातील सुमारे चार हजार प्रकल्पांबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणी महारेराने विविध ४४५ नियोजन प्राधिकरणे, यंत्रणांना पत्रे पाठवून या प्रकल्पांविषयी अधिक माहिती मागविली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाले का अथवा या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा […] The post चार हजार गृहप्रकल्पांपासून ‘महारेरा’ अनभिज्ञ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 4:53 pm

शिंदे गटाने भाजपच्या तोंडचा घास पळवला:भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने अंबरनाथमध्ये स्थापन करणार सत्ता

अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने जोरदार झटका दिला आहे. शिंदे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून अंबरनाथमध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने अंबरनाथची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला मोठा हादरा बसला आहे. शिंदे गटाच्या या राजकारणामागे एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे असल्याचा दावा केला जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे 16, तर शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. पण भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रथम काँग्रेससोबत आघाडी केली. पण वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्यानतंर भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यानंतर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. पण भाजपच्या या खेळीमुळे शिंदे गट दुखावला गेला. परिणामी, त्याने भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटून टाकण्याची धूर्त राजकीय खेळी खेळली. श्रीकांत शिंदेंनी फिरवले फासे शिंदे गटाचे खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या संपर्कात गेलेल्या अजित पवारांच्या पक्षाशी संधान साधले. त्यांना विश्वासात घेत त्यांच्यापुढे अंबरनाथमध्ये युती करून संयुक्त सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला तत्काळ होकार दिला. त्यानुसार आता शिदे गटाचे 27, राष्ट्रवादीचे 4 व एका अपक्ष उमेदवाराच्या मदतीने त्यांनी 32 नगरसेवकांचा एक गट स्थापन केला. या सर्वांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला, तसेच तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे अंबरनाथमध्ये शिंदे गटाचा झेंडा फडणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप - शिंदे गटासाठी होती प्रतिष्ठेची लढाई उल्लेखनीय बाब म्हणजे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर व भजापच्या तेजश्री करंजुले यांच्यात नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. त्यात भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या. भाजपच्या ताब्यात नगराध्यक्षपद गेले असले तरी इथे शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपने काँग्रेसच्या मदतीने येथील सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. पण शिंदे गटाच्या चलाख खेळीमुळे त्यांचा प्रयत्न फसला. खाली पाहा अंबरनाथमधील पक्षीय बलाबल

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 4:49 pm

मिशन ॲडमिशन:जवाहर नवोदय विद्यालयातील रिक्त जागेवर प्रवेश; 7 फेब्रुवारी रोजी चाचणी परीक्षेचे आयोजन

कन्नड येथील जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता 6 व 11 वीच्या काही जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या जागांवर प्रवेश देण्यासाठी पुन्हा चाचणी परीक्षा होणार आहे. कन्नड येथे पाच केंद्रावर शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.15 ते 01.45 दरम्यान ही परीक्षा होईल. चाचणी परीक्षेकरिता ज्या विदयार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, अशा संबंधित पालकांनी सदर परीक्षेचे परीक्षा हॉल टिकीट / अॅडमिटकार्ड www.navodaya.gov.in, https://cbseitms.nic.in/2025/nvsix 9 किंवा https://cbseitms.nic.in/2025/nvsxi 11 या संकेतस्थळावरून रजिस्ट्रेशन नंबर व Password (Dateof Birth) चा उपयोग करून डाउनलोड करून प्रिंट घ्यावी. हे अॅडमीट कार्ड परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन प्राचार्य बुल्लन सरोज यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 4:29 pm

एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल:MIM च्या असदुद्दीन ओवैसी यांचा विश्वास; अजित पवारांवर साधला निशाणा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिलाही भारताची पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैंसी यांनी शुक्रवारी येथील एका सभेत बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. राष्ट्रवादीला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला पाठिंबा, असे ते म्हणाले. सोलापूरचे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते सध्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी त्यांच्याविरोधात सभा घेतली. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. तसेच एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ..पण तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन ओवैसी म्हणाले, आपण सोलापूरला पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथे एवढ्या वर्षांपासून राहत आहेत. पण काहीच करत नाहीत. पाकिस्तानच्या राज्यघटनेत एकाच धर्माचा माणूस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो असे नमूद आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कोणताही व्यक्ती भारतीय पंतप्रधान होऊ शकतो. एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. पण कदाचित तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन. पण एक दिवस हा दिवस नक्की उजडेल. ते पुढे म्हणाले, मी देशाच्या संसदेत बोलणारा माणूस आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्या मांडीवर जाऊन बसलेत. त्यामुळे त्यांना मत देणे हे नरेंद्र मोदींना मत देण्यासारखे आहे. अजित पवारांना मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काहीही देणेघेणे नाही. पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही एकच त्रिमूर्ती आहे. ते तुमच्यापुढे येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करतली. पण त्यांना तुम्ही मतपेटीतून उत्तर द्या. एमआयएम हा गरिबांचा पक्ष आहे. तो गरिबांसाठी काम करतो. ..तर मग मी तुमच्या बापावर बोलेन कुणी तरी माझ्या शेरवाणीला हात घालण्याचे विधान केले. त्यांनी त्यांच्या राजकीय बापाला म्हणजे अजित पवारांना माझ्यापुढे आणून बसवावे. मी त्यांना 3 मिनिटांत मूके केले नाही तर मग सांगा. येथील नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी एमआयएमला संजिवनी मिळाली. आज पुन्हा येथील जनतेने एमआयएमच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार व शिंदे गटाचे लोक या परिसराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एवढेच लक्षात घ्यावे की, हा परिसर माझा आवडता आहे. हा परिसर सोलापूरचे हृदयस्थान आहे. त्यामुळे तुम्ही या परिसराविषयी काही बोललात, तर मग मी तुमच्या बापावर बोलेन, असा इशाराही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी आपल्या विरोधकांना दिला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 4:19 pm

‘आरटीई’ प्रवेशांची प्रक्रिया सुरू

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, ९ ते १४ जानेवारी या कालावधीत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीबाबत […] The post ‘आरटीई’ प्रवेशांची प्रक्रिया सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:54 pm

भाजप देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष

इचलकरंजी : भाजप हाच सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचतात. भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते कैद्यासारखे आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, निवडणुकीमध्ये उमेदवारांची पळवापळवी, दबावतंत्राचा वापर, दमदाटी […] The post भाजप देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:52 pm

भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप म्हणजे ‘नुरा कुस्ती’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप म्हणजे ‘नुरा कुस्ती’ आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपचे आमदार भ्रष्टाचाराचे ‘आका’ म्हणतात, मात्र या ‘आकां’ना भाजपच्याच नेत्यांनी मांडीवर घेतले आहे, अशी टीका उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार […] The post भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप म्हणजे ‘नुरा कुस्ती’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:50 pm

शक्तिपीठ महामार्ग कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार

मुंबई/कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे. काही लोकांनी त्याला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून तो कमीत कमी बागायती शेतीमधून जाणारा असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी केला. महापालिका निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आम्ही आवाहन करणार असून कोल्हापूरकर त्याला प्रतिसाद […] The post शक्तिपीठ महामार्ग कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:42 pm

सेनगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद ठाकरे गटाला:यमुनाबाई देशमुख नगराध्यक्षा; शिलानंद वाकळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड, काँग्रेसचे एक मत ठाकरेंना

सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ठाकरे गटाच्या यमुनाबाई देशमुख तर उपनगराध्यक्षपदी शिलानंद वाकळे यांची शुक्रवारी ता. ९ निवड झाली आहे. या निवडीच्या घोषणानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सेनगाव नगर पंचायतीमध्ये ठाकरे गटाचे पाच, राष्ट्रवादीचे (अजित पवारगट) पाच, काँग्रेस दोन तर भाजपाचे पाच सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठी ठाकरे गटाच्या यमुनाबाई देशमुख तर भाजपाच्या मिराबाई खाडे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज पिठासन अधिकारी तथा तहसीलदार सखाराम मांडवगडे, प्रभारी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी आज बैठक झाली. यावेळी हातवर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये ठाकरे गटाच्या देशमुख यांना ११ तर भाजपाच्या खाडे यांना पाच मते मिळाली. उपनगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचे शिलानंद वाकळे व भाजपाचे अमोल तिडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये वाकळे यांना ११ तर तिडके यांना पाच मते मिळाली. या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या एका सदस्याने ठाकरे गटाच्या बाजूने मतदान केले तर एक सदस्य गैरहजर होता. दरम्यान, पिठासन अधिकारी मांडवगडे, मुख्याधिकारी मुंडे यांनी नगराध्यक्षपदी देशमुख व उपनगराध्यक्षपदी वाकळे यांच्या निवडीची घोषणा करताच नगरपंचायत परिसरात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यांचा सत्कार करण्यात आला. नुतन अध्यक्ष व उपनगराध्यक्षांना आता सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळणार असून या कालावधीत पिण्याचे पाणी, शहर स्वच्छतेसह नागरी सुविधा देण्यासाठी काम करावे लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 3:32 pm

चारठाणकर संगीत महोत्सव:सेलू येथे 10 जानेवारीपासून आयोजन, हुबळीचे कुमार मर्डुर यांच्यासह तळवलकर, टाक यांचे गायन रंगणार...!

सेलू येथे १० ते ११ जानेवारी दरम्यान संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हुबळी, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरचे कलावंत रसिकांना मंत्रमुग्ध करतील, अशी माहिती साहित्य संगीत कला मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी दिली. ज्या मराठवाड्याच्या भूमीत देवगिरी किल्ल्यावर 'संगीत रत्नाकर' सारख्या महान ग्रंथाची रचना आचार्य शारंगदेवाने केली, गोपाल नायक सारखा महान गायक ज्या भूमीत जन्मला, अजिंठा वेरूळच्या शिल्पांत चित्रांत मंदिरांवरील शिल्पांमध्ये गायन वादन नृत्याचे पुरावे जिथे आढळून येतात ती ही सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भूमी. मराठवाड्याच्या याच मातीतील भूमीपुत्र सेलूचे महान संगीतकार गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर. त्यांनी चालवलेल्या सांगितीक वारश्याची आठवण म्हणून २०१८ पासून सेलू शहरांत संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवा चे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे हे ८ वे वर्ष असून १०-११ जानेवारी २०२६ रोजी हा संगीत महोत्सव संपन्न होतो आहे. महोत्सवाचे उद्घाटन सूरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी लातूरच्या सायली टाक आणि मुंबईच्या सायली तळवलकर यांचे गायन होईल. सोबतच पुण्याचे कलावंत नीतेश पुरोहित यांचे सरोद वादन होईल. रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या मृगनयनी सिस्टर्सचे भरतनाट्यम रंगेल. छत्रपती संभाजीनगरचे कलावंत वैभव पांडे, हुबळीचे कुमार मर्डुर यांचे गायन होईल. सोबतच मुंबईचे किशोर पांडे यांचे तबला सोलो होईल. या कलावंतांना प्रशांत गाजरे, शांतीभूषण देशपांडे - चारठाणकर, यश खडके, प्रशांत जोशी-सावरगावकर, जगमित्र लिंगाडे (छत्रपती संभाजीनगर) यांची साथसंगत लाभेल. संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवात यापूर्वी पं. रघुनंदन पणशीकर, पं. विजय कोपरकर, पं. कृष्णेंद्र वाडीकर, प्रसाद खापर्डे, पं. कैवल्यकुमार, विदुषी यशस्वी सरपोतदार, नागेश आडगावकर, ईश्वर घोरपडे, अभिजीत अपस्तंब, पंकज देशपांडे, हेमांगी नेने, तबला वादक पं. राम बोरगावकर, सारंगीवादक पं. संगीत मिश्रा, सुंदरीवादक कपिल जाधव, बासरीवादक ऐनोद्दीन वारसी, सनईवादक पं. कल्याण अपार, महागामी गुरुकुलाच्या शिष्यांची ओडीसी व कथ्थक नृत्यं सादर झालेली आहेत. ही सगळी चळवळ लोकसहभागांतून चालू आहे. सेलूसोबतच परभणी, वसमत, फुलंब्री, जालना, शेंदूरवादा, छत्रपती संभाजीनगर, वसमत येथेही शास्त्रीय संगीत विषयक उपक्रम साजरे होतात. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 3:28 pm

रोज खा मटण अन् कमळाचे दाबा बटण:भाजप नेते अशोक चव्हाण यांचे विधान; काँग्रेसची 'आदर्श' चव्हाण म्हणत उपरोधिक टीका

भाजप नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाला महापालिका निवडणुकीत मतदारांना सर्वांचे मटण खाऊन केवळ भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी त्यांचा चिमटा काढत त्यांचा उल्लेख अशोक चव्हाण नव्हे तर 'आदर्श चव्हाण' असा केला आहे. राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगला आहे. यामुळे राज्याचे वातावरण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. नांदेडमध्येही या निमित्ताने राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. त्यात आता भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मतदारांना उद्देशून केलेल्या एका वादग्रस्त विधानाची भर पडली आहे. ते म्हणाले, सध्या निवडणूक सुरू आहे. सर्वच लोक पार्ट्या खाऊ घालतील. याची पार्टी, त्याची पार्टी... मी तर म्हणेन रोज खा मटण, परंतु कमळाचे दाबा बटण. एवढे काम करा. नाही तर एकाचे मटण खाऊन दुसऱ्याला मतदान कराल. मी काही मटण देणार नाही, पण सांगितलेले लक्षात घ्या, असे ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी यावेळी आपल्याला सोडून गेलेल्याची राजकीय कारकिर्द संपल्याचाही दावा केला. ते म्हणाले, जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. एक गेला आणि दुसरा आला. (जवळच्या एका उमेदवाराला उद्देशून म्हणत). जे मला सोडून गेले ते बरबाद झाले. त्यामुळे कुणीही माझ्या नादी लागू नका. कारण, लागले तर तुमचे वाईट होईल, असे ते म्हणाले. आदर्श चव्हाण म्हणत काँग्रेसची टीका दुसरीकडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी अशोक चव्हाणांचा उल्लेक आदर्श चव्हाण असा केला आहे. आदर्श चव्हाण... अच्छा अशोक चव्हाण का? मला वाटले आदर्श चव्हाण. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा असे अजिबात करत नव्हते. आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृतीही बदलली आहे. म्हणजे मतदारांची किंमत त्यांनी एका मटणापुरती केली आहे. हे मतदारांचे महत्त्व कमी करणारी गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक चव्हाण यांनी गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली होती. हे ही वाचा... शरद अन् अजित पवार भाजपला उल्लू बनवत आहेत:प्रकाश आंबेडकर यांचा दावा; सत्तेसाठी तत्त्वांचे राजकारण बाजूला पडत असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद व अजित पवार एकच असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार एकच आहेत. ते सत्तेसाठी फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत. सत्तेसाठी तत्वे बाजूला ठेवून वागत आहेत, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 3:27 pm

घोडबंदर घाटात ११ वाहनांचा विचित्र अपघात

घोडबंदर : येथील गायमुख घाटाच्या उतरणीवर शुक्रवारी सकाळी एक-दोन नव्हे तर तब्बल ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला. सिमेंट वाहतूक करणा-या कंटेनरमुळे हा अपघात झाला. यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. दरम्यान, या घटनेत ४ हून अधिक जण जखमी झाले असून, पोलिसांच्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा कंटेनर (एमएच ०४ केएफ ०७९३) शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास […] The post घोडबंदर घाटात ११ वाहनांचा विचित्र अपघात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:24 pm

ठाकरेंची सत्ता आली मुंबईचे मोहम्मद लँड होईल:नीतेश राणेंची ठाकरे बंधूंवर जहरी टीका; मुंबईचे नाव बॉम्बे होणार असल्याचा दावा फेटाळला

भाजपचे नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी मुंबईत महायुतीची सत्ता आली तर मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे होईल हा उद्धव ठाकरे यांचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुंबईत महायुतीची सत्ता आलाल्यानंतर मुंबईचे नामकरण बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरेंची सत्ता आली तर मात्र मुंबईचे मोहम्मद लँड जरूर होईल, असे ते म्हणालेत. नीतेश राणे यांच्या या टीकेमुळे मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार संजय राऊत व अभिनेते महेश मांजरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर मुंबईचे नाव बॉम्बे करण्याचा आरोप केला होता. मुंबईतील मराठी माणसांचे हित व मराठी अस्मितेच्या मुद्यावर प्रचार केंद्रित करून महायुती सत्तेत आल्यास मुंबईचे अस्तित्वच धोक्यात येईल. महायुती मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे असे करेल, असे ते म्हणाले होते. मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी त्यांचा हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला. मुंबईचे मोहम्मद लँड होईल - नीतेश राणे उद्धव मामु बोलतात की, महायुती सत्तेत आली तर मुंबईचे परत बॉम्बे करून टाकतील. हे तर शक्यच नाही. पण उद्धव मामु सत्तेत आले तर मुंबईचे मोहम्मद लँड नक्कीच करून टाकतील, असे नीतेश राणे शुक्रवारी आपल्या एका ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवत म्हणाले. उद्धव ठाकरेंमुळे मुंबईत बांगलादेशी, रोहिंगे वाढले नीतेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी आहे. मराठी माणूस, हिंदू समाजाला मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. पण त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने नेमका विरोधाभास केला. पूर्वी शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे असे म्हटले जात होते. पण आता उद्धव ठाकरे आहेत म्हणून बांगलादेशी व रोहिंगे आहेत असे नवे समीकरण तयार झाले आहे. टिस्सच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईत बांगलादेशी व रोहिंगे वाडत चालले आहेत. 2030 पर्यंत हा टक्का अधिकच वाढण्याची भिती आहे, असे नीतेश राणे म्हणाले आहेत. आत्ता पाहू काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपचा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही, पण आज मुंबईची संस्कृती मारली जात आहे. कुणीही येते आणि सांगत की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे. आमच्यावर हिंदी सक्ती करणार, आमची अस्मिता, संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवणार तर या गोष्टीला काही अर्थ नाही. बस म्हटले की बस आणि उठ म्हटले की उठ म्हणणारी ही लोक आहेत. त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा?, असे ते भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधताना म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:59 pm

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा

मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. यानंतर आता मुंबईतही एकत्र निवडणूक लढवणा-या या दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडणारी एक घटना घडली. शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येताना दिसले. याठिकाणी भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे […] The post भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 2:34 pm

१४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींचा हप्ता

पुणे : येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट अशा प्रकारचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येत्या १४ जानेवारीपूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे, याबाबतचे पोस्टर सोशल मीडियावरती शेअर केले जात आहेत. तर […] The post १४ जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींचा हप्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 2:26 pm

नागपुरात वर्षातील १५० दिवस हवा खराब:केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून माहिती समोर

नागपुरात वर्षातील सरासरी १५० दिवस हवा प्रदूषित असते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणांवर आधारित एका संशोधन अहवालातून ही बाब उघड झाली आहे. नागपूरकरांना वाहतूक कोंडीसोबतच आता खराब हवेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. अहवालानुसार, शहरातील विविध भागांमध्ये प्रदूषित दिवसांची संख्या लक्षणीय आहे. महाल परिसरात सर्वाधिक १८० दिवस हवा प्रदूषित आढळली, तर जीपीओ चौकात १७४ दिवस, रामनगरमध्ये १५४ दिवस आणि अंबाझरीमध्ये १३७ दिवस हवा प्रदूषित होती. मागील वर्षातील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, अंबाझरी भागात ३६५ दिवसांपैकी २२८ दिवस हवा चांगली किंवा समाधानकारक होती, तर १३७ दिवस प्रदूषित आढळली. महालमध्ये १८० दिवस प्रदूषित आणि १८५ दिवस चांगली हवा होती. रामनगरमध्ये १५४ दिवस प्रदूषित तर २११ दिवस चांगली हवा नोंदवली गेली, तर जीपीओ येथे १७४ दिवस प्रदूषित आणि १९१ दिवस चांगली हवा होती. नागपुरातील वाढत्या प्रदूषणामागे अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने वाहतूक, वाहनांचा धूर, औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि उद्योगांमधून होणारे वायू प्रदूषण यासाठी जबाबदार आहे. याशिवाय, आधुनिक जीवनशैलीमुळे घरात आणि घराबाहेरही वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. कचरा जाळणे, लाकूड आणि कोळसा वापरणे यामुळेही हवेची गुणवत्ता खालावत आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दमा, श्वसन विकार, टीबी, कर्करोग, सर्दी, खोकला, डोळ्यांचे आजार, त्वचेचे विकार आणि हृदयरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:25 pm

राज्यातील पाणंद रस्ते आता सातबारा उता-यावर

पुणे : राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उता-यावर करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे. सातबारा उता-यावर रस्त्याचा उल्लेख झाल्याने असे रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतक-यांना जागा द्यावी लागणार आहे. परिणामी […] The post राज्यातील पाणंद रस्ते आता सातबारा उता-यावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 2:24 pm

भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू:पुण्यात वडगाव बुद्रुक परिसरात अपघात; जीपचालकाला अटक

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी आरोपी जीपचालकाला अटक केली आहे. प्रतिभा दत्तात्रय घडशी (वय ५५, रा. धबाडी, आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकी चालवणाऱ्या मंगला अशोक काकडे (वय ६०, रा. श्री दत्त संस्कृती रेसीडन्सी, धबाडी, पुणे) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी जीपचालक राजकुमार ज्ञानेबा राजपंगे (वय ३८, रा. श्री भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. मंगला काकडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला काकडे आणि प्रतिभा घडशी या वडगाव बुद्रुकमधील धबाडी रस्त्याने जात असताना चरवड बंगल्यासमोर पाठीमागून आलेल्या भरधाव जीपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत घडशी यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोन दुचाकींचे नुकसान झाले. गंभीर जखमी झालेल्या घडशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एस. साळुंके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बेकायदेशिररित्‍या सिलिंडर भरणा प्रकरणी कारवाई लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल बेकायदेशिररित्‍या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना घरगुती वापराचे व हॉटेल व्यासवसायीक सिंलेडरच्‍या टाक्‍यांचा साठा केल्‍याप्रकरणी दोघांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पवनकुमार उर्फ रामवीर लाखनसिंग तोमर (31, रा. केसनंद, पुणे) आणि सागर इंगळे अशा दोघांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. केसनंद रोडवरील छावणी फॅमेली रेस्‍टारंट येथील ओम गॅस सर्व्हिस ॲण्ड रिपेरिंग येथे हा प्रकार सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:20 pm

राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील:देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी; जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही, म्हणत उद्धव ठाकरेंवरही निशाणा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, अशी थेट भविष्यवाणी केली. निकाल आल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्यामुळे बीएमसी निवडणुकीच्या आधीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असले तरी या युतीला आता कोणतेही राजकीय महत्त्व उरलेले नाही. त्यांच्या मते, जर 2009 सालीच शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आज वेगळी असती. त्या काळात या युतीला मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळाला असता. मात्र आता वेळ निघून गेली असून, दोन्ही नेत्यांकडे पूर्वीसारखी मतांची ताकद राहिलेली नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. विशेषतः मनसेबाबत बोलताना त्यांनी अत्यंत परखड मत मांडले. राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. या युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो, मात्र राज ठाकरे यांना त्यातून काहीही मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या मतांचा आधार आता संपलेला असून, त्यांची भूमिका या युतीत दुय्यम ठरेल, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे केवळ निवडणूक हरतील असे नाही, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाची नोंद त्यांच्या नावावर होईल, ही माझी ठाम भविष्यवाणी आहे, असे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही याच मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही, अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारधारेशी संबंधित वारसा मिळालेला नाही, असा आरोप केला. या वक्तव्यामुळे ठाकरे गटात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे थेट वैचारिक वारशावर सवाल उपस्थित केल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्द्यावरून पलटवार दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यांना ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्द्यावरून पलटवार केला. आम्ही सातत्याने सांगत आहोत की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे स्पष्ट केले. मात्र भाजपकडून मुंबईचा महापौर हिंदू असेल, असे वक्तव्य केले जात असल्याने त्यांनी यामागील अर्थावरच सवाल उपस्थित केला. भाजप मराठी माणसाला हिंदू मानत नाही का, असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावर पुढे जात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. वाक्युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाहीत, असा सवाल करत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा संदर्भ दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या झाडणारे मोरारजी देसाई हे हिंदू होते की नव्हते, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यांवरच आव्हान उभे केले आहे. या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध हिंदू या मुद्द्यावरून नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर थेट प्रश्न उपस्थित करत असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवरच सवाल करत आहेत. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वाक्युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:19 pm

चंद्रकांत पाटील यांना वरिष्ठांनी झापले:अमोल बालवडकर यांचा दावा; चुकीच्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याचा ठपका

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये चुकीचा उमेदवार दिल्याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठांनी झापल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. यामुळे पुणे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजील आहे. चंद्रकांत पाटील यांची एकही भविष्यवाणी आजपर्यंत खरी ठरली नसल्याचा दावाही या पदाधिकाऱ्याने केला आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल बालवडकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उमेदवारीबाबत चुकीचे निर्णय घेतल्याने पाटील यांना पक्षातील वरिष्ठांकडून चांगलेच झापले गेल्याचा दावा बालवडकर यांनी केला. त्यांच्या आजवर एकही भविष्यवाणी खरी ठरली नसल्याचेही बालवडकर म्हणाले. बालवडकर यांच्या मते, उमेदवारीच्या चुकीच्या निर्णयामुळे हा आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळेच माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्र्याला प्रभाग ९ मध्ये दारोदारी फिरावे लागत आहे. पाटील जितके प्रभागात फिरतील, तितकी राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी वाढत जाईल, कारण नागरिकांना आता केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाचे राजकारण हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले. ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या निकषांवरच लढली जाईल, असा निर्धार बालवडकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रभाग ९ मधील सुस गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पदयात्रेचे स्वागत करत होते. या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ९ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत सुस परिसरात आजवर करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली, तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबतही चर्चा करण्यात आली. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही पदयात्रा शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि प्रभावी ठरली. यामुळे प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:16 pm

पुण्यात कुत्र्यावर जगातील पहिली कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया:२.५ किलो ट्युमर ७० टक्के घटला, पशुवैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा

पुण्यातील ‘द स्मॉल ॲनिमल क्लिनिक’मध्ये यकृत आणि प्लीहाच्या मोठ्या ट्युमरने ग्रस्त असलेल्या १३ वर्षीय कुत्र्यावर जगातील पहिली यशस्वी कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया पार पडली आहे. या विनाशस्त्रक्रियेमुळे तब्बल २.५ किलो वजनाची गाठ लक्षणीयरीत्या कमी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. 'मफिन झोरे' नावाच्या या लॅब्राडोर कुत्र्याला (नर) गेल्या काही महिन्यांपासून गंभीर ॲनिमिया, प्लेटलेट्सची तीव्र कमतरता, श्वास घेण्यास त्रास आणि पोटात मोठी गाठ अशा लक्षणांनी ग्रासले होते. वैद्यकीय तपासणीत त्याचे हिमोग्लोबिन अवघे ३.५ mg/dl आणि प्लेटलेट्स केवळ ३० हजार असल्याचे समोर आले. अल्ट्रासाऊंड व सीटी स्कॅनमध्ये यकृत व प्लीहेत मोठ्या कर्करोगाच्या गाठी असल्याचे निदान झाले. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेमुळे जीवघेणा रक्तस्राव होण्याचा धोका लक्षात घेता, पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमने किमान आक्रमक कॅथलॅब एम्बोलायझेशन करण्याचा निर्णय घेतला. व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. धर्मेश गांधी, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे आणि कॅथलॅब टीमच्या सहकार्याने ही प्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या प्रक्रियेत, फेमोरल धमनीतून मायक्रो-कॅथेटरद्वारे गाठींना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या बंद करण्यात आल्या. यामुळे गाठीचा रक्तपुरवठा थांबला आणि तिचा आकार हळूहळू कमी होऊ लागला. प्रक्रियेनंतर अवघ्या ४८ तासांत मफिनच्या हिमोग्लोबिन पातळीत सुधारणा दिसून आली. पंधरा दिवसांत गाठीचा आकार ७० टक्क्यांहून अधिक कमी झाला. सध्या मफिनची प्रकृती स्थिर असून, तो पुन्हा सक्रिय जीवन जगत आहे. या दुर्मिळ यशस्वी उपचारामुळे पशुवैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:13 pm

सीमेवरील सैनिकांना ५०० किलो तिळगुळ:पुणेकरांकडून मकर संक्रांतीनिमित्त कृतज्ञता व्यक्त

मकर संक्रांतीनिमित्त सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पुणेकरांनी ५०० किलो तिळगुळ पाठवला आहे. सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित तिळगुळ पूजन कार्यक्रमात विद्यार्थी आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भारत मातेचा जयघोष करत सैनिकांच्या वीरतेला नमन केले. अप्पा बळवंत चौकातील नूमवि प्राथमिक शाळेच्या सभागृहात हा तिळगुळ पूजन कार्यक्रम पार पडला. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजन वडके, १९ मराठा लाईट इन्फंट्रीचे निवृत्त मेजर बजरंग निंबाळकर, गायिका मनीषा निश्चल, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते आणि मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदा २८ वे वर्ष असून, १९९७ पासून सैनिकांसाठी तिळगुळ पाठवण्याची ही परंपरा सुरू आहे. आनंद सराफ यांनी सांगितले की, भारतीय सण माणसाचे नाते दृढ करतात. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या माध्यमातून हा तिळगुळाचा गोडवा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. निवृत्त मेजर बजरंग निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लढण्यासाठी प्रोत्साहन देणारा आणि पाठीवर शाबासकीची थाप देणारा कोणी असेल तर सैनिक सीमेवर अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतो. समाज चांगला असेल तर चांगले सैनिक घडण्यास मदत होते. दिवाळी फराळ, भेटवस्तू आणि तिळगुळ यांसारख्या वस्तू सैनिकांना सर्वाधिक पुण्यातूनच येतात, असेही त्यांनी नमूद केले. या आयोजनात विष्णू ठाकूर, अनिल पानसे, नीला कदम, दत्तात्रय वेताळ, कल्याणी सराफ आणि शेखर कोरडे यांनी सहकार्य केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:11 pm

भाजपचा राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप:बाणेरमध्ये रस्त्यांची कामे अडवून पेैसे खाल्ल्याचा ठपका; कुणी व का केला आरोप? वाचा

पुणे शहरातील बाणेर परिसरात रस्त्यांची कामे थांबवून पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेरमध्ये २१ महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये ज्युपिटर रस्ता ते लक्ष्मीमाता मंदिर रस्ता, एफ रेसिडेन्सी ते वाकड ब्रीज रस्ता व उड्डाणपूल, तसेच पॅनकार्ड ते धनुकडे वस्ती रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये 'लोकप्रतिनिधी' म्हणवणाऱ्यांनी ठेकेदार आणि कंत्राटदारांवर दबाव टाकून पैसे घेतल्याचा आरोप बालवडकर यांनी केला. लहू बालवडकर यांच्या मते, रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचे हे प्रकरण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचले होते. तसेच, अमोल बालवडकर मागील दीड वर्षांपासून पक्षात सक्रिय नव्हते आणि त्यांनी केवळ स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी उद्योग केला. याच कारणांमुळे त्यांचे उमेदवारीचे तिकीट कापले गेले असावे, असे बालवडकर यांनी म्हटले. बाणेर परिसराच्या विकासासाठी ई-लर्निंग स्कूल, रुग्णालय, ओपन थिएटर आणि उद्याने यांसारखी अनेक कामे हाती घेण्यात आली होती. नागरिकांना अल्पदरात रुग्णसेवा मिळावी यासाठी मोठ्या रुग्णालयाची इमारतही उभारली गेली. मात्र, ते सुरू करण्यासाठी आवश्यक निधी आणि कर्मचाऱ्यांची भरती यावर कोणताही पाठपुरावा केला गेला नाही. याउलट, याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही लहू बालवडकर यांनी केला. अमोल बालवडकर यांना यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली असली तरी, मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी देताना पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश बालवडकर यांना तिकीट दिले नव्हते. त्यावेळी प्रकाश बालवडकर यांनी पक्ष न सोडता एकनिष्ठेने काम केले होते. सध्याच्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीत अमोल बालवडकर होते आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांची मदत घेतल्याचा दावाही लहू बालवडकर यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:10 pm

अजित पवार, महेश लांडगेंत 'नुरा कुस्ती':सुषमा अंधारे यांचा भाजप - राष्ट्रवादीवर 'चोर चोर मौशेरे भाई' म्हणत हल्ला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील परस्पर आरोपांवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हे आरोप भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी रंगवलेले नाट्य असून, ती केवळ 'नुरा कुस्ती' असल्याचा घणाघात अंधारे यांनी केला. निवडणुका संपल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन जनतेच्या पैशांची लूट करतील, असेही त्या म्हणाल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुनावळे–ताथवडे–वाकड प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार आणि सागर विजय ओव्हाळ यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, प्रभारी अशोक वाळके, रोमी संधू, रामभाऊ सपकाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अंधारे यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. उबाठा पक्षाच्या 'मशाल' चिन्हाबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रिंटिंगमध्ये चिन्ह स्पष्ट दिसत नसून, मागील निवडणुकीतील 'तुतारी–पिपाणी' चिन्हाप्रमाणेच हा खोडसाळपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत आयोगाकडे अधिकृत तक्रार नोंदवली असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले असले तरी, भाजप आणि राष्ट्रवादीने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी, ड्रग्स रॅकेट, अनधिकृत बांधकामे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. महेश लांडगे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे प्रतिनिधी असून, निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी 'तुझ्या गळा, माझ्या गळा' करतील, असे अंधारे म्हणाल्या. दोन्ही पक्ष 'चोर चोर मौशेरे भाई' असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी आपल्या आरोपांवर ठाम राहिल्याचे स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 2:08 pm

देशासाठी खेळणे आणि विजयात निर्णायक योगदान देणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न

राजापूर : देशासाठी खेळणे आणि विजयात निर्णायक योगदान देणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. १९८६ साली लॉर्ड्सवर केलेल्या नाबाद १२६ धावांच्या खेळीमुळे भारताने इंग्लंडवर कसोटीतील पहिला ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या लॉर्ड्सवर झळकावलेल्या माझ्या तीन शतकांपैकी १९८६ मधील शतकी खेळी विशेष अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे […] The post देशासाठी खेळणे आणि विजयात निर्णायक योगदान देणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 1:53 pm

शरद अन् अजित पवार भाजपला उल्लू बनवत आहेत:प्रकाश आंबेडकर यांचा दावा; सत्तेसाठी तत्त्वांचे राजकारण बाजूला पडत असल्याची खंत

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद व अजित पवार एकच असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार एकच आहेत. ते सत्तेसाठी फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत. सत्तेसाठी तत्वे बाजूला ठेवून वागत आहेत, असे ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या सत्ताधारी महायुतीसोबत आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा दुसरा गट सध्या विरोधी बाकावरील महाविकास आघाडीसोबत आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकाविरोधात टीकाटिप्पणी कर असले तरी त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी युती केली आहे. त्यांच्या युतीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही पवार एकच असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर सोलापूर येथील आपल्या सभेत बोलताना म्हणाले, दोन्ही पवार एकच आहेत. त्यांनी भाजपला उल्लू बनवले आहे. चौकशीचे ससेमिरा मागे लागला म्हणून एक जण भाजपसोबत गेला. स्वतःची चौकशी थांबवली. आता एकजण डोळे दाखवत असताना दुसरा तुझी 70 हजार कोटींची फाईल पेंडिग असल्याची आठवण काढून देत आहे. आमचा भाजपला प्रश्न आहे, तुम्ही एवढे दिवस ही फाईल का दाबून ठेवली? याचा खुलासा करा. जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे. पण पुण्यात व ठाण्यात युती नाही. याचा राजकीय अर्त असा काढतोय की, भाजपला दोन्ही पक्षांना (शिवसेना व राष्ट्रवादी) संपवायचे आहे. म्हणून त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडले आहे. विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तो किती यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे. अभद्र युती करणाऱ्यांना सतेतून बेदखल करा आंबेडकर म्हणाले, मी मागच्यावेळी म्हटले होते की, तुम्हाला भविष्यात अभद्र युत्या पहावयास मिळतील. त्यानुसार अकोटमध्ये भाजप व एमआयएमची युती झाली. भाजपने सत्तेसाठी तत्त्व सोडले. तर एमआयएमने आरएसएस विरोध सोडला. काँग्रेसनेही अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती केली. आता पक्ष व विचार महत्त्वाचा नाही. सत्तेतून मिळणारे टेंडर महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे लोकांनी अभद्र युतीची सरकारने दूर ठेवली पाहिजेत. काँग्रेस व वंचित हे दोन्ही पक्ष सेक्युलर आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईत युती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोटच्या प्रकरणात कारवाई करण्याचा इशारा दिला. पण 24 तास झाले तरी त्यावर काहीही झाले नाही. एकीकडे देशावर संकट आले आहे आणि दुसरीकडे देश चालवणारे अनैतिक पद्धतीने सत्तेत येत आहेत. मतदारांना माझे एवढेच सांगणे आहे की, अनैतिक चालणारे, पाकीट वाटणारे आता बाजूला ठेवा. ते बाजूला गेले तरच शहराचे प्रश्न सुटतील. परिवाहन, चादर सारखे अनेक प्रश्न सोलापुरात आहेत. पण त्याची आखणी झाली नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रणिती शिंदे लवकरच भाजपमध्ये जाणार सुजात आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. प्रकाश आंबेडकरांनी सुजात यांच्या दाव्याचे जोरदार समर्थन केले. सुजात आंबेडकर जे बोलले ते योग्यच आहे. ते खरेच बोललेत. तुम्हाला लवकरच त्याची प्रचिती येईल. कुणाच्या रक्तात किती भाजप आहे हे सर्वांना दिसत आहे. कोण किती एकनिष्ठ आहे हे लवकरच दिसून येईल. पण सध्या महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्याचा अतोनात प्रयत्न केला. मल्ला शिदे नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला. यामुळे आमचे निम्मे उमेदवार फॉर्म भरायला आले नाही, असे आंबेडकरांनी यावेळी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 1:49 pm

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्याचे 10 लाख रुपये लुटले:वसमत ते चोंढी मार्गावरील घटना, दोन संशयीत ताब्यात, भरदिवसा घडलेल्या घटनेने जिल्हाभरात खळबळ

वसमत ते चोंढी मार्गावर कोर्टाफाटा शिवारात बँकेची रोकड नेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला कारने धडक देऊन दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी १० लाखांची रोकड पळविल्याची घटना शुक्रवारी ता. ९ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांच्या पथकाने तातडीने गावकरी व परिसरातील पोलिस ठाण्यांना अलर्ट केल्याने दोन संशयीत हाती लागले आहेत. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा आहे. याशाखेतील कर्मचारी ज्ञानेश्‍वर भोसले हे नेहमी प्रमाणे रोकड आणण्यासाठी त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत येथे गेले होते. वसमत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून १० लाख रुपयांची रोकड घेऊन ते परत चोंढी येथे येत असतांना कोर्टा फाटा शिवारात पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे ज्ञानेश्‍वर हे खाली पडले. यावेळी पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ज्ञानेश्‍वर यांना धमकी देऊन त्याच्याकडील दहा लाख रुपये रोकड असलेली बॅग पळविली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ज्ञानेश्‍वर घाबरून गेले. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. तर या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार संदीप टाक, भगीरथ सवंडकर, भुरके, भालेराव, विनायक जानकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांना माहिती दिली शिवाय काही गावकऱ्यांनाही माहिती दिली. पुयनी शिवारात गावकरी व पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडली आहे. बँक शाखेपर्यंत रोकड पोहोचविण्याची गरज जिल्हामध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांना जिव धोक्यात घालून रोकडची वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे तालुका शाखेने किंवा मुख्य शाखेने जिल्हाभरातील इतर शाखेपर्यंत रोकड पुरवठा केल्यास या घटना घडणार नसल्याचे बोलले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 1:35 pm

हिंगोली जिल्हयात दोन ठिकाणी जुगार अड्यावर छापा:6 दुचाकी, 2 मोबाईलसह 3.94 लाखांचा मुद्देमाल जप्त, 18 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली जिल्हयात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत रेडगाव व वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत वाखारी येथे पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ६ दुचाकी, २ मोबाईलसह ३.९४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १८ जणांवर गुरुवारी ता. ८ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातून अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कार्यान्वीत करण्यात आली आहेत. या शिवाय स्थानिक पोलिसांना देखील अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकण्याचे आदेश पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांनी दिले आहेत. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत रेडगाव येथे झन्नामन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव, शिवाजी पवार, पिराजी बेलो, राजेश घोंगडे यांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये सहा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. मात्र पोलिसांना पाहताच दोघे फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, तीन दुचाकी, दोन मोबाईल असा २.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी धोंडीबा बागल, संतंोष रायवाडे, नकुल जाधव, शशीकांत सवंडकर यांच्यासह इतर दोघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, केशव गारोळे, रामेश्‍वर लोखंडे, विकास राठोड, नामदेव बेंगाळ, संतोष बोथीकर यांच्या पथकाने वाखारी शिवारात जुगार अड्डयावर छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन दुचाकी, रोख रक्कम असा १.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी देविदास येवले, गणेश लेंगडे, आदिनाथ गुंडाळे, राजेश सवराते, राहुल गवंदे, रत्नेश्‍वर डोणे, राजरतन गवंदे, सुरेश गवंदे, दिगंबर नादरे, गंगाप्रसाद बर्वे, विशाल ढोरे, पिराजी हंबडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 1:32 pm

सत्ताधाऱ्यांच्या धाक, दडपशाहीमुळे जनता घाबरली:महायुतीत सत्ता सर्वोच्च, विचार कुठेच नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

सत्ताधारी महायुतीच्या धाक, दडपशाहीमुळे जनता दहशतीत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिकेच्या निवडणुकीत पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात आहे. अजित पवार व पुण्यातील एका स्थानिक आमदाराचे विधान ऐकले तर हे लोक एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जायचेच राहिलेत, असे ते म्हणालेत. राज्यात येत्या 15 तारखेला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधीलच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्यावरून महायुतीवर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत सध्या पातळी सोडून टीका केली जात आहे. काल अजित पवार व पुण्यातील एका स्थानिक आमदाराचे विधान ऐकले, तर हे लोक एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जायचेच राहिलेत. कुणी दरोडा म्हटले, तर कुणी औकात काढली. सत्तेत असणारे हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने एकमेकांसोबत भांडत आहेत, त्यावरून सत्ता हीच त्यांच्यासाठी सर्वोच्च असल्याचे स्पष्ट् होते. त्यांच्यात विचार कुठेच दिसत नाही. या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला त्यांची विचित्र भूमिका बघायला मिळत आहे. निवडणुकीत पोलिस व गुंडांचा वापर केला जात आहे. हे पाहून जनता घाबरली आहे. भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहे. जनतेच्या मनात राग व संताप विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सध्या राग व संताप दिसत आहे. परंतु जनता हतबल आहे असेच म्हणावे लागेल. कारण हे सरकार यंत्रणा, निवडणूक आयोग, पोलिस व गुंडांचा वापर करून चालवले जात आहे. तिन्ही पक्षांनी गुंडांचा आश्रय घेतल्यामुळे जनता दहशतीखाली जगत आहे. अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही अशी अवस्था या या महाराष्ट्रात दिसली असती. मुळात आज निवडणुकीला काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. अंबरनाथमध्ये आमचे नगरसेवक पळवले गेले. यामुळे भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का? यांचा चेहरा स्वच्छ राहिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल जयंत पाटलांनी एक किस्सा सांगितला. 'ये आये थे तवायफ का कोठा बंद करने के लिए, पर सिक्कों की खणक देख खुद ही मुजरा कर बैठे; असे ते म्हणाले. सध्या हेच भाजपमध्ये हेच सुरू आहे. सगळ्या सत्ताधाऱ्यांचे स्वच्छता व स्मार्ट सिटीचे बोर्ड लागलेले असतात, पण त्याखाली कुत्री बसलेली दिसतात. ही यांची स्वच्छता. भाजपचा तेरे राज में युवा हो गया बरबाद..ते पुढे म्हणाले, पैसा आला, पण तो गेला कुठे? चंद्रपूरमध्ये पैसा आला. अमृत योजना आली. भूमिगत गटार योजना आली. पण गेली कुठे? चंद्रपुरात बंद गटार योजना आली. फक्त लाईन टाकली, रोड खोदले. पण त्याचे कनेक्शन एकाही घराला दिले नाही. पूर्ण शहर टक्केवारीसाठी उद्ध्वस्त करून टाकले. शहर भकास करण्याचा प्रकार सुरू झाले आहे. आज शहराला पाणी मिळत नाही. मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पूर्ण शहर ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. चंद्रपूर शहराची ही गती व स्थिती पाहिल्यानंतर भाजपचा तेरे राज में युवा हो गया बरबाद, तू कितना भी चिल्ला फिर से नही करेगा तुझे याद, असे म्हणण्याची वेळ आली आहे. जनता या सर्व गोष्टींचा नक्कीच विचार करेल. बिनविरोध निवडणुकीसाठी उमेदवारांना धमकावण्यात आले विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महापालिका निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर होत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर केला जात आहे. एकेका वॉर्डासाठी 1 कोटीचे बजेट ठेवण्यात आले आहे. नागपुरात 5-5 कोटी, मुंबईत 10-10 कोटींचे बजेट आहे. हा पैसा आला कुठून? पैसा येतो कुठून? आमदार व पक्ष फोडण्यासाठी पैसे आले कुठून? निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारांना पैसे देण्यात आले. त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांना धमकावण्यात आला. हे सर्व पाहिल्यानंतर खरेच आपण लोकशाहीत जगतो का हा खरा प्रश्न पडतो. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल, हा देश संविधानानुसार चालावा असे वाटत असेल ते या निवडणुकीत नक्कीच विचार करतील आणि निवडणुकीचे निकाल आपल्याला बदलेले दिसतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 1:25 pm

तिघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा:अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ; कळमनुरीतील घटना

कळमनुुरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ करणाऱ्या तिघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कळमनुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ८ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावामध्ये एक अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. गावातील एका तरुणाने मागील तीन दिवसांपासून त्या मुलीचा पाठलाग सुरु केला होता. मात्र त्या अल्पवयीन मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारी ता. ५ सदर मुलगी गावाजवळील बसस्थानकाजवळ आली असतांना शेख लोहमान या तरुणाने त्या मुलीकडे पाहून शेरेबाजी करण्यात सुरुवात केली. मात्र त्यानंतरही त्यामुलीने त्याला दाद दिली नाही. दरम्यान, गुरुवारी ता. ८ दुपारी सदर अल्पवयीन मुलगी बाहेर जाण्यासाठी बसस्थानकाजवळ आली असतांना त्या ठिकाणी शेख लोहमान हा देखील आला. त्याने पुन्हा एकदा मुलीचा विनयभंग केला व शेरेबाजी केली. तसेच त्यावेळी शेख एहसान व शेख वकील याने त्या मुलीस अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलीस सोबत घेऊन थेट कळमनुरी पोलिस ठाणे गाठले. यावेळी त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख लोहमान, शेख एहसान, शेख वकील यांच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, उपनिरीक्षक सतीष ठेंगे, जमादार गजानन होळकर यांची दोन पथके आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्याचा सुगावा लागताच आरोपी पसार झाले आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 1:24 pm

लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची भेट, 14 जानेवारीपूर्वी 3 हजार येणार:मकरसंक्रांती-निवडणूक जुळल्याने विरोधक आक्रमक

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी येत्या काही दिवसांत मोठी खुशखबर मिळणार असल्याचा दावा सोशल मीडियावर जोर धरू लागला आहे. देवाभाऊंकडून लाडक्या बहिणींना मकरसंक्रांतीची मोठी भेट, अशा आशयाचे पोस्टर सध्या व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या पोस्टरमध्ये 14 जानेवारीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होतील, असा ठाम दावा करण्यात आला आहे. मात्र, या पोस्टरमुळे केवळ अपेक्षा वाढल्या नसून, राज्यातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला मकरसंक्रांत साजरी होत आहे. अशा वेळी सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेले हे पोस्टर आणि त्यामधील आर्थिक लाभाचे आश्वासन यामुळे निवडणूक आचारसंहितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महायुतीतील दोन घटकपक्षांच्या काही उमेदवारांकडून त्यांच्या अधिकृत तसेच वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवरून लाडक्या बहिणींच्या खात्यात 3 हजार रुपये जमा होणार असल्याचे दावे उघडपणे केले जात आहेत. त्यामुळे सरकारकडून मकरसंक्रांतीच्या दिवशी किंवा त्याआधी निधी वितरित झाला, तर तो आचारसंहितेचा भंग ठरणार नाही का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आलेले पोस्टर मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधून भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या पोस्टमध्ये मकरसंक्रांतीच्या सणाशी जोडून सरकारच्या योजनेचे श्रेय घेतले गेले आहे. सण उत्साहाचा, क्षण मकरसंक्रांतीचा. मकरसंक्रांतीचा गोडवा अधिक वाढवण्यासाठी महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली आहे, असे नमूद करत त्यांनी पुढे स्पष्टपणे लिहिले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच 3000 रुपये 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत. या पोस्टमधून सरकारने बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवले, असा दावा देखील करण्यात आला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी केवळ सोशल मीडियापुरतेच नव्हे, तर प्रचारादरम्यानही मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर 3 हजार रुपये जमा होतील, असा शब्द दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा केवळ माहितीपर संदेश आहे की थेट निवडणूक प्रचाराचा भाग आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे सरकारी योजनेचा उल्लेख करत आर्थिक लाभाचे ठोस आश्वासन दिले जात असल्याने विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘लाडकी बहीण’ योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली होती. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर महिला मतदार महायुतीकडे वळल्याचे मानले जाते. त्याच पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून या योजनेचा प्रचार अधिक आक्रमकपणे केला जात असल्याचे चित्र आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, मात्र डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांच्या हप्त्याची लाभार्थी महिला अजूनही प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे दोन महिन्यांचा एकत्रित हप्ता मिळणार, या चर्चेला आधीपासूनच हवा मिळत होती. 14 जानेवारीला मकरसंक्रांत आणि 15 जानेवारीला थेट मतदान अशी वेळ जुळून आल्याने या निधी वितरणाच्या चर्चेला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी किंवा त्याआधी रक्कम जमा झाली, तर त्याचा थेट फायदा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना होणार नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः सोशल मीडियावरून उमेदवारच जर अशा स्वरूपाचे दावे करत असतील, तर निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी सोशल मीडियावरील पोस्टर, उमेदवारांचे दावे आणि निवडणुकीची वेळ यामुळे संशयाचे वातावरण तयार झाले आहे. लाडक्या बहिणींना मिळणारी आर्थिक मदत ही कल्याणकारी योजना आहे की निवडणूक डावपेच, हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 14 जानेवारीपूर्वी खरोखरच लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होतात की नाही, आणि झालेच तर त्यावर आचारसंहितेच्या उल्लंघनाची कारवाई होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तोपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजनेभोवती फिरणारी ही चर्चा राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 1:16 pm

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या ‘50 खोके’च्या घोषणा:महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर; मुंबईत मित्रपक्षांत ठिणगी, दोस्तीत कुस्ती

छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप व शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा तणाव आता थेट मुंबईतही उफाळून आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणारे हे दोन्ही मित्रपक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर आमनेसामने आल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला, ज्यामुळे मतदानाच्या काही तास आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघडपणे समोर आला असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही उमेदवारांचे प्रचार फेरी सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच परिसरात एकत्र आले. सुरुवातीला वातावरण शांत होते, मात्र अचानक भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माईकवरून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरली जाणारी ही घोषणा आता थेट मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिली गेल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. या घोषणाबाजीमुळे काही वेळातच प्रचाराचे वातावरण तणावपूर्ण बनले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात प्रत्युत्तरात्मक घोषणा देत नाराजी व्यक्त केली. मित्रपक्षाकडूनच अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याने आम्हाला अपमानित केल्याची भावना निर्माण झाली, अशी प्रतिक्रिया अनेक शिंदे समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईतील निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या घटनेचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवरही होऊ शकतो. या वादामागची पार्श्वभूमी पाहिली असता, भाजप–शिवसेना यांच्यातील जागावाटपातील गुंतागुंत पुन्हा समोर येते. वॉर्ड क्रमांक 173 हा अधिकृत जागावाटपानुसार शिंदे सेनेला सुटलेला होता. त्यानुसार शिंदे गटाने पूजा कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनीही भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तो अर्ज वैध ठरला. त्यामुळे दोन्ही पक्षांना नाईलाजाने या वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे जावे लागले. सुरुवातीला ही लढत सौहार्दपूर्ण राहील, असे संकेत होते, मात्र प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतर ‘दोस्तीत कुस्ती’चे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे. या घटनेनंतर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये कोण महारथी आहेत, हे पाहावे लागेल. अशा घोषणा देण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले पाहिजे, असा थेट टोला त्यांनी लगावला. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका, असे म्हणत शिरसाट यांनी भाजपला आठवण करून दिली. तसेच, ज्यांनी या घोषणा दिल्या त्यांची भाषा कुठे गेली, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संबंधित कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. पक्षाच्या मित्रपक्षाबाबत अशा प्रकारची घोषणाबाजी अयोग्य असून, यामुळे चुकीचा संदेश जातो, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. मात्र, मतदानाच्या तोंडावर ही कारवाई कितपत प्रभावी ठरेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते या वादावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रपक्षांतील वाद सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात एकीकडे मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेत असे मतभेद उफाळून येत असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील युती तुटल्याचे पडसादही जाणवत आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर मित्रपक्षांतील हे वाद सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. मतदानाच्या काही तास आधी उघड झालेली ही फूट मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करेल का, की अंतर्गत वाद असूनही महायुतीला अपेक्षित यश मिळेल, याचा फैसला आता मतपेटीतूनच होणार आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मधील ही घटना केवळ स्थानिक वाद न राहता, महायुतीतील अंतर्गत संघर्षाचे प्रतीक ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 12:57 pm

समलैंगिक संबंधांचा नाद भोवला:अपहरणाचे प्रकरण पोहोचले पैसे उकळण्यापर्यंत; कापड व्यापारी करायला गेला एक झाले दुसरेच

समलैंगिक संबंधाच्या नादातून एका 66 वर्षीय कापड व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. हा व्यापारी समलैंगिक संबंधांच्या नादा आग्र्याला गेला. पण तिथे हे प्रकरण प्रथम अपहरण व नंतर पैसे उकळण्यापर्यंतच्या खोट्या गुन्ह्यापर्यंत गेले. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काही तासांतच हे प्रकरण उजेडात आणले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित 66 वर्षीय व्यावसायिकाचा महाराष्ट्रात कापडाचा व्यवसाय आहे. हा व्यक्ती गत काही दिवसापासून गे-डेटिंग अॅप वापरत होता. त्या माध्यमातून त्याची मैत्री काही पुरुषांशी झाली होती. या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची मैत्री समलैंगिक संबंधांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आग्र्यात एकमेकांना भेटण्याचे ठरवले. हा व्यावसायिक आनंदात तिथे पोहोचला. तेथील दरेसी परिसरातील हॉटेलमधील एक खोली त्यांनी बूक केली. तो व्यावसायिक त्या पुरुषांसोबत बाहेर फिरण्यास हाथरसला गेला. तिथेच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. 66 वर्षीय व्यक्ती व त्याच्या पुरुष मित्रांमध्ये कथितपणे वाद झाला. हा वाद एवढा टोकाला पोहोचला की, सदर पुरुषांनी त्या व्यक्तीकडून 1.20 लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली. एवढेच नव्हे तर त्याची अंगठी व मोबाईल फोनही हिसकावून घेण्यात आला. यामुळे कापड व्यावसायिक प्रचंड हादरला. भीती, बदनामी व प्रकरण आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता, यामुळे त्याला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले. तो आग्र्याला परतला आणि रात्री उशिरा एत्माद्दौला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचला. त्याने आपल्यासोबत लुटमार झाल्याची तक्रार नोंदवली. संपूर्ण प्रकरणच निघाले बोगस तो म्हणाला, काही अज्ञात लोकांनी त्याचे अपह्रण केले. त्याच्याकडून पैसे मिळाल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी वृद्ध थांबलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही खंगाळले. त्यात पीडित व्यावसायिक स्वतःहून आरोपींसोबत जात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीने ज्या लोकांविरोधात तक्रार नोंदवली होती, त्यांची चौकशी केली. त्यांचे बँक व्यवहार तपासले. यामुळे पोलिसांना तक्रारदारावर संशय बळावला. त्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली. अखेर वृद्धाने नेमके काय घडले? याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. पोलिसांनी सांगितले की, त्या व्यावसायिकाने मोबाईल अॅपद्वारे काही पुरुषांशी मैत्री केली होती. त्या मैत्रीचे समलैंगिक संबंधांत रुपांतर झाले. हे अपहरणाचे प्रकरण नसून, समलैंगिक संबंध, वाद व बदनामीच्या भितीने रचलेले कुभांड आहे. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत व्यावसायिकासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या बँक खात्यात 1.20 लाख रुपये ट्रान्सफर झाले ते खातेही गोठवले आहे. आता या सर्व आरोपींविरोधात कारवाई केली जात आहे. प्रस्तुत प्रकरणात कुणाचीही फसवणूक झाली नाही. केवळ वैयक्तिक वाद व बदनामीच्या भितीने अपहरण व लुटीचा खोटा प्रकार उभा करण्यात आला, असे पोलिसांनी या प्रकरणी स्पष्ट केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 12:37 pm

घोडबंदर घाटात 11 वाहनांचा विचित्र अपघात:कंटेनरच्या धडकेमुळे वाहने एकमेकांवर आदळली; 4 जण जखमी, कंटेनर चालक पसार

घोडबंदर येतील गायमुख घाटाच्या उतरणीवर शुक्रवारी सकाळी एक-दोन नव्हे तर तब्बल 11 वाहनांचा विचित्र अपघात झाला. सिमेंट वाहतूक करणाऱ्या कंटेनरमुळे हा अपघात झाला. यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. दरम्यान, या घटनेत 4 हून अधिक जण जखमी झाले असून, कंटेनर चालक फरार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा कंटेनर (एमएच 04 केएफ 0793) शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास घोडबंदर स्थित गायमुख घाट उतरून ठाण्याच्या दिशेने येत होते. तब्बल 35 ते 40 टन सिमेंट वाहून नेणाऱ्या या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर सकाळी 7.45 वा. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना लगतच्या रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे गायमुख घाट ते वसई खाडी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव (56) यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर तस्किन शेख (45) व अनिता पेरवाल (45) या 2 महिला प्रवाशांनाही जबर दुखापत झाली आहे. कारचालक रामबली, बाबूलाल (22) यांच्याही कंबरेला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करम्यात आले आहे. इतर काही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. रस्त्यावर ऑईल सांडल्याने परिस्थिती गंभीर या अपघातात होंडा सिटी, व्हॅगनार, इर्टिगा, महिंद्रा XEV 9E, इनोवा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसेच ऑटो रिक्षा अशा एकूण 11 वाहनांचे नुकसान झाले आहे. काही वाहनांचे पुढील व मागील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. पण पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ऑईलवर माती टाकून संभाव्य अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. या अपघातामुळे ठाणे - घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे 2 तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. अखेर अपघातग्रस्त सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हटवण्यात आली असून सध्या घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, कंटेनर चालकाचा शोध घेण्याचे काम कासारवडवली पोलिस करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 12:10 pm

दारोदारी फिरायची वेळ आली नसती:चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी, अमोल बालवडकरांचा खोचक हल्ला; पुण्यात प्रचाराचा जोर वाढला

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक 9 ही निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. ऐनवेळी उमेदवारी कापल्यामुळे या प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले युवा नेते अमोल बालवडकर सध्या भाजपवर आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्या विरोधात प्रचारासाठी थेट भाजपचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात उतरले असून, त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये जोरदार प्रचार करत भाजपची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी मोठी भविष्यवाणी करत राजकीय वातावरण अधिक तापवले. प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार लहू बालवडकर हे केवळ विजयीच होणार नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. आपली भविष्यवाणी नेहमी खरी ठरल्याचा उल्लेख करत, 2017 च्या निवडणुकीत मुंबईतील जागांचा अचूक अंदाज आपण आधीच वर्तवला होता, असेही त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक जण मला विचारतात काय होईल, आणि मी जे सांगतो ते घडते, असे सांगत लहू बालवडकर बालेवाडीतही विक्रमी मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटलांच्या या भविष्यवाणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल बालवडकर यांनी जोरदार पलटवार केला. चंद्रकांत पाटलांनी आता पोपट घेऊन फिरायला हवे, असा खोचक टोला लगावत त्यांनी भाजप नेत्यांना डिवचले. जर मला उमेदवारी दिली असती तर पाटलांवर आज दारोदारी फिरायची वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट निशाणा साधला. भाजपने ऐनवेळी आपले तिकीट कापल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपविरोधात मोर्चा उघडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, पुणे शहरातील महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी घेतलेली पहिली सभा ही अमोल बालवडकर यांच्या समर्थनार्थ होती, यावरून राष्ट्रवादीने त्यांना किती महत्त्व दिले आहे, हेही अधोरेखित झाले. आपली उमेदवारी कशी कापण्यात आली, याबाबत बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी मागितल्यामुळे माझ्यावर राग ठेवून महापालिकेचे तिकीट कापण्यात आले. शेवटपर्यंत तिकीट देतो म्हणून झुलवण्यात आले, असा आरोप करत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ज्यांनी माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात येत्या चार वर्षांत अश्रू आणूनच मी बदला घेईन, असे त्यांनी ठणकावून सांगितले. एका दादाने दीड वर्ष माझ्याविरोधात कटकारस्थान केले, पण दुसऱ्या दादाने म्हणजेच अजित पवारांनी अवघ्या दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म केला, असे म्हणत त्यांनी नव्या पक्षातील समाधान व्यक्त केले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट आणि तीव्र लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 11:37 am

संभाजीनगरमध्ये भरदिवसा तलवारी नाचवत धुमाकूळ:दीड तास दहशत, दोघे जखमी, वाहनांची तोडफोड; सीसीटीव्हीत थरार कैद

वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगरात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी नशेत तर्र असलेल्या ३ तरुणांनी हातात तलवारी घेऊन परिसरात उच्छाद मांडला. या टोळक्याने भररस्त्यात तलवारी फिरवत सामान्य नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. दुपारी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास एका काळ्या-पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून २० ते २२ वयोगटातील तीन तरुण आले. त्यांच्याकडे तीन धारदार तलवारी आणि लाकडी दांडके होते. बजाजनगरातील महाराणा प्रताप चौक, सावरकर कॉलनी आणि मोहटादेवी चौक या भागात या तरुणांनी आरडाओरडा करत दहशत माजवली. गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ : या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्हेगारांची दुचाकी आणि दोन तलवारी जप्त केल्याचे समजते. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. वाहनधारकांसह पादचाऱ्यांवर वार करण्याचा प्रयत्न या माथेफिरूंनी केवळ दहशतच माजवली नाही, तर वाटेत येणाऱ्या वाहनधारकांवर आणि पादचाऱ्यांवर वार करण्याचा प्रयत्न केला. यात दोन जण जखमी झाले आहेत. संतापलेल्या या तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहने फोडून मोठे आर्थिक नुकसान केले. दारू द्या म्हणत दुकानासमोर राडा‎ दारू द्या म्हणत एकाने‎ दुकानदाराला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन‎ जखमी केले. हा प्रकार ६ जानेवारी रोजी रात्री ८.३०‎ वाजेच्या सुमारास इंदिरानगर भाजीमंडई येथे घडला.‎ अमित दाभाडे (रा. गल्ली क्र.३, संजयनगर) असे‎ मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्याच्या विरोधात ‎मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ‎आला आहे.‎ प्रकरणात देशी दारू दुकान चालक सत्यजित शिरीष‎जैस्वाल (२९, रा. पिसादेवी) यांनी फिर्याद दिली.‎त्यानुसार फिर्यादी नेहमीप्रमाणे दुकानावर बसलेले‎असताना अमित दाभाडे नावाचा व्यक्ती तेथे आला.‎त्याने लवकर दारू द्या, अशी मागणी करत शिवीगाळ‎सुरू केली. फिर्यादीने त्याला समजावण्याचा प्रयत्न‎केला असता, आरोपीने अचानक दुकानाजवळ पडलेला‎ दगड उचलून फिर्यादीला मारहाण केली.‎

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 11:26 am

शिंदे गटाची परळीत चक्क MIM शी युती:नवी युती मुबारक म्हणत ठाकरे गटाचा हल्ला; शिंदेंना बंड अन् तत्त्वांच्या गप्पा थांबवण्याचा टोला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने परळी नगरपालिकेत असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वातील एमआयएमशी हातमिळवणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी शिंदे गटावर सडकून हल्ला चढवत त्यांना बंड अन् तत्त्वांच्या गप्पा कायमच्या थांबवण्याचा टोला हाणणला आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत युती व आघाड्यांना चांगलाच जोर चढला आहे. दोन दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप व काँग्रेसने एकमेकांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी युती केली होती. यामुळे राज्याच्या एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस व भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या युत्या करताना नेतृत्वाला अंधारात ठेवण्याचा आरोप केला होता. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिवसेनेने परळी नगरपालिकेत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमशी युती केली आहे. बंड आणि तत्त्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या 'बंड' आणि 'तत्त्वांच्या' गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट 'एमआयएम-वासी' झालात? ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या या नव्या 'सत्तेच्या संसाराचा' चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. ही नवी युती मुबारक एकनाथ शिंदे, असे त्यांनी म्हटले आहे. दानवेंनी आपले हे ट्विट एकनाथ शिदे यांनाही टॅग केले आहे. परळीत नेमके काय घडले? उल्लेखनीय बाब म्हणजे बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परळी नगरपरिषद निवड नुकतीच करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष, 2 अपक्ष आदी 24 जणांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यात एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचाही समावेश करण्यात आला आहे. उर्वरित सदस्यांत अपक्ष, राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. निवडणूक प्रचारात एमआयएमने केली होती मुंडेंवर टीका नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमच्या उमेदवार शेख आयशा मोहसीन यांच्या प्रचारार्थ एमआयएमचे प्रदेश सरचिटणीस समीर बिल्डर यांनी सभा घेतली होती. या सभेत मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्या प्रभागात काँग्रेस व एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. आता हेच उमेदवार राष्ट्रवादीच्या गटात सहभागी झालेत. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 11:09 am

पेरजाबादला खिचडीसाठी तांदूळ कमी दिल्याच्या कारणावरून मुख्याध्यापिकेस जिवे मारण्याची धमकी:दोघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारांतर्गत खिचडीसाठी तांदूळ कमी का दिला या कारणावरून मुख्याध्यापिकेस ढकलून देत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुरुवारी ता. ८ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा असून या ठिकाणी ४७ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजनामध्ये खिचडीचे वाटप केले जाते. खिडचीसाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या तुलनेत तांदूळ व इतर साहित्य् खिचडी शिजविणाऱ्या महिलांना दिले जाते. दररोज वाटप होणाऱ्या तांदूळाचा हिशेब शाळा प्रशासनाला ठेवावा लागतो. दरम्यान, सध्या औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील यात्रा असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली आहे. शाळेत १० ते १२ विद्यार्थीच असल्यामुळे मु्ख्याध्यापिका मंजश्री चौधरी यांनी विद्यार्थी संख्येच्या तुलनेतच तांदूळ खिचडी शिजविण्यासाठी दिला होता. सदर प्रकार माहिती झाल्यानंतर गावातील गजानन जाधव व गोकर्णा जाधव शुक्रवारी ता. ८ शाळेत आले. यावेळी मुख्याध्यापिका चौधरी ह्या वर्गावर शिकवत होत्या. मात्र त्यानंतरही गजानन व गोकर्णा यांनी खिचडी शिजविण्यासाठी तांदूळ कमी का दिला यावरून वाद घालण्यास सुरवात केली. विद्यार्थी कमी असून दररोज वाटप केलेल्या तांदूळाचा हिशेब ठेवावा लागतो असे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान त्यांचे म्हणणे एेकून न घेता दोघांनी त्यांना वर्गातच ढकलून देत त्यांना शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी मुख्याध्यापिका चौधरी यांनी औंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन व गोकर्णा यांच्या विरुध्द शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 10:52 am

भाजप एक नंबरचा बनचुका आणि ढोंगी:अंबरनाथ प्रकरणातून चेहरा उघडा, राऊतांची भाजपवर घणाघाती टीका, म्हणाले- ठाकरेंशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र पांगळा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंबरनाथ महापालिकेतील घडामोडींचा संदर्भ देत राऊत यांनी भाजपच्या भूमिकेला ढोंगीपणाचं उदाहरण ठरवत तीव्र शब्दांत टीका केली. भाजपवाले एक नंबरचे बनचुके आणि ढोंगी लोक आहेत, असे स्पष्टपणे म्हणत त्यांनी भाजपवर दुटप्पी राजकारणाचा आरोप केला. भाजप सार्वजनिकपणे काँग्रेस आणि एमआयएमवर टीका करत असताना, प्रत्यक्षात मात्र सत्तेसाठी त्यांच्याशीच हातमिळवणी करत असल्याचा दावा राऊत यांनी केला. अंबरनाथ प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेस-एमआयएमशी युती केल्याचा ठपका ठेवत कारवाई केल्याचे दाखवले. मात्र, काँग्रेसने संबंधित नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करताच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याच नगरसेवकांवर ससाण्यासारखी झडप घातली, असा आरोप त्यांनी केला. का ही धावपळ? कारण ते काँग्रेसच्या विचारांचे लोक आहेत, असा टोला लगावत राऊत यांनी भाजपची खरी भूमिका उघडी पाडली. शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेसबरोबर अप्रत्यक्ष युती केली आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. फक्त अंबरनाथच नव्हे, तर अकोटमध्येही भाजप एमआयएमच्या निलंबित लोकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. एकीकडे एमआयएमविरोधात बोलायचं आणि दुसरीकडे सत्तेसाठी त्यांच्याच मदतीने सत्ता मिळवायची, हा भाजपचा दुहेरी चेहरा असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, अशी अवस्था भाजपची असल्याचं सांगत त्यांनी पक्षाच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजपला आता सत्तेसाठी चोऱ्यामाऱ्या कराव्या लागत आहेत, अशी टीका करत राऊत यांनी भाजपच्या राजकीय अधःपतनाकडे लक्ष वेधलं. ठाकरेंशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा याचबरोबर संजय राऊत यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरही महत्त्वपूर्ण विधान केलं. ठाकरेंशिवाय मुंबई म्हणजे महाराष्ट्र दुबळा आणि पांगळा, असं ठाम मत व्यक्त करत त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वाचं महत्त्व अधोरेखित केलं. मुंबईच्या राजकारणात ठाकरेंची भूमिका दुर्बल करण्याचा प्रयत्न म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. एकूणच, अंबरनाथ आणि अकोटमधील घटनांचा दाखला देत भाजपचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे, असा निष्कर्ष काढत राऊत यांनी आगामी निवडणुकांत जनताच भाजपला त्याची जागा दाखवेल, असा इशाराही दिला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 10:42 am

जयपूर येथे सततच्या नापिकीमुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद; गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे सततची नापिकी व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेच तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली असून याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ८ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील सुनील उत्तम पायघन (३५) यांना त्यांच्या वडिलांच्या नावे जयपूर शिवारात चार एकर शेती आहे. सुनील हेच वडिलांची शेती करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मागील दोन ते तीन वर्षापासून सतत नापिकी होत होती. मात्र पुढील हंगामात चांगले पिक येईल या आशेवर ते होते. दरम्यान, यावर्षी खरीप हंगामात त्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन लागवडीचा खर्चही निघाला नाही. तर तुरीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती. सदर बाब त्यांनी त्यांच्या पत्नीलाही बोलून दाखवली. त्यानंतर शेतात जाऊन येतो असे सांगून ते शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी जेवणाचा डबा घेऊन गेल्या असतांना त्यांना सुनील यांचा मृतदेह आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण, किशोर कातकडे, पाचपुते यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पुजा पायघन यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूूची नोंद करण्यात आली आहे. जमादार पाचपुते पुढील तपास करीत आहेत. मयत सुनील यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी व एक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 10:37 am

सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, ओवैसींचा आक्रमक हल्ला:म्हणाले- अजित पवार शरद पवारांचे झाले नाहीत, तुमचे काय होणार? महायुतीवरही टोला

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महायुती सरकारवर अतिशय तीव्र शब्दांत टीका केली आहे. मालेगाव येथे आयोजित एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलताना ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून हल्ला चढवला. सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात, असा खोचक टोला लगावत त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर एकाच वेळी निशाणा साधला. मालेगावच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचणे गरजेचे असून, सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, तेव्हाच मालेगावची खरी प्रगती होईल, असे थेट आवाहन त्यांनी नागरिकांना केले. ओवैसी यांनी आपल्या भाषणात मालेगावच्या स्थानिक प्रश्नांवरही सविस्तर भाष्य केले. मालेगावच्या पॉवरलूम उद्योगासमोर उभ्या असलेल्या अडचणींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे पॉवरलूम उद्योगावर मोठा आर्थिक ताण आला आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांचे भवितव्य धोक्यात आले असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र गेली 15 वर्षे लूटमार केल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःचे खिसे भरले. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा निवडून देऊ नका, असा स्पष्ट संदेश ओवैसी यांनी दिला. मालेगावच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. सफाई व्यवस्थेवर बोलताना ओवैसी यांनी महापालिकेतील कचरा कंत्राटाचा मुद्दा उपस्थित केला. सफाईचं कंत्राट कोणाकडे आहे, हे मालेगावकरांना माहीत आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्याचं कंत्राट ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच कचऱ्यासारखं उचलून फेका, असे जहरी शब्द वापरत त्यांनी नागरिकांना एमआयएमला साथ देण्याचे आवाहन केले. मालेगाव स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित करायचं असेल, तर एमआयएमला निवडून देणं हाच पर्याय आहे, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. महापौरपदाच्या उमेदवारीवर बोलताना ओवैसी यांनी एमआयएमचे उमेदवार अब्दुल मलिक यांचं नाव पुढे केलं. अब्दुल मलिक महापौर झाले, तर शाळा, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा नीटपणे राबवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही घणाघाती टीका केली. अजित पवार जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मालेगावमधील अजित पवारांच्या स्थानिक प्रतिनिधींवर नाव न घेता निशाणा साधला. अजित पवार भाजपविरोधात एखादं वाक्य बोलतात आणि काही तासांतच ते मागे घेतात, असा आरोप करत त्यांनी त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत ठरवण्याचा प्रयत्न केला. ओवैसी पुढे म्हणाले की, मालेगाव महापालिकेचं बजेट मोठं आहे, पण हा पैसा नेमका कुठे जातो? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. सत्ताधारी विकासाऐवजी जनतेचं ‘रक्त पिण्याचं’ काम करत असल्याची टीका त्यांनी केली. एमआयएम सत्तेत आल्यास तीन वर्षांत महापालिकेचा चेहरा बदलून दाखवू आणि मालेगावसाठी स्पष्ट व्हिजन प्लॅन तयार करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसून, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईत एकत्र बसून सगळे एकमेकांशी गोड बोलतात, पण निवडणुका आल्या की आपापसात भांडतात, असे म्हणत त्यांनी महायुतीची एकजूट फोल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपवर टीका करताना ओवैसी यांनी बनावट जन्म दाखल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. भाजपचा एक नेता मालेगावला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे, असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केलं की, एमआयएमचा महापौर सत्तेत आल्यानंतर अशा लोकांचाही हिशेब केला जाईल. बिहारमधील एका डॉक्टरच्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी देशभरात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधलं. सरकारमध्ये मुस्लिम प्रतिनिधित्व कमी असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, असं मतही त्यांनी मांडलं. त्यामुळे शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि तुमच्या हक्कांसाठी उभे राहा, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात ओवैसी यांनी मालेगावमधील सामाजिक समस्यांवर थेट भाष्य केलं. महिलांना त्रास, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या, निकृष्ट शाळा आणि वाढती गुन्हेगारी या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी गेली 15 वर्षे मालेगावात गुंडाराज असल्याचा आरोप केला. हा गुंडाराज संपवायचा असेल, तर एमआयएमला साथ देणं आवश्यक आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. एमआयएम तुमच्यासाठी लढते, तुमचा आवाज बनते, असं सांगत त्यांनी मालेगावकरांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. ओवैसी यांच्या या आक्रमक भाषणामुळे मालेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 10:26 am

अजित पवार यांच्या विरुद्ध महेश लांडगेंचा संघर्ष टोकाला:तू आमचा कार्यक्रम करणार? म्हणत एकेरी उल्लेख; म्हणाले- आम्ही बांगड्या घातल्या आहेत का?

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात वातावरण तापले असून, भाजप आमदार पैलवान महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद चिघळताना दिसत आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत अशी जहरी टीका करून लांडगेंनी सुरू केलेला हल्लाबोल आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचला आहे. या टीकेला अजित पवारांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत विषय संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही महेश लांडगेंनी पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य करत संघर्ष अधिक धारदार केला आहे. त्यामुळे येणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत हा संघर्ष निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत. महेश लांडगेंनी आपल्या ताज्या वक्तव्यात थेट केंद्रातील आणि राज्यातील घडामोडींचा संदर्भ देत अजित पवारांवर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असल्याचं सांगितलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी काही लोक भाजपमध्ये दाखल झाले, असा टोला लावत त्यांनी अजित पवारांकडे रोख बोट दाखवलं. पुढे ते म्हणाले की, आता देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे उघड होण्याची भीती असलेले लोकही भाजपमध्ये जमा होऊ लागले आहेत. या विधानामुळे भाजपची कोंडी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण हे आरोप केवळ विरोधकांवर नाहीत, तर सत्ताधारी आघाडीतीलच एका महत्त्वाच्या नेत्यावर आहेत. या वादाला खऱ्या अर्थाने पेटवणारी ठरली ती पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी केलेली भ्रष्टाचाराचा आका, ही टिप्पणी. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे महेश लांडगेंवर निशाणा साधत पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा सूत्रधार कोण आहे, हे जनतेसमोर आणणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर संतप्त झालेल्या महेश लांडगेंनी एकेरी आणि आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं. तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतोस, मग आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? असा सवाल करत, तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको, असा थेट इशारा त्यांनी दिला. इतकंच नव्हे, तर आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्यांनी आपली भाषा आणखी तीव्र केली. महेश लांडगेंनी आपल्या वक्तव्यात वारंवार देवा भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. देवा भाऊ शांत बसतात, पण एकदा का इशारा दिला, की 70 हजार कोटींचे घोटाळे करणारेही घाबरून जातात, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात भाजप कोणतीही तडजोड करणार नाही, असा संदेशही या वक्तव्यातून देण्यात आला. या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. याआधी महेश लांडगेंनी अजित पवारांवर थेट हल्ला चढवत, अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत, असा आरोप केला होता. तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर वैयक्तिक टीका केली. ते पिंपरी-चिंचवडचे आका नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आका आहेत, हे त्यांनीच जाहीर करावं, असा टोमणाही त्यांनी मारला. याच वेळी त्यांनी थेट कुस्तीच्या भाषेत अजित पवारांना आव्हान देत, पूर्वीचे वस्ताद विरुद्ध आजचे पैलवान, अशी लढाई पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात सुरू झाल्याचं चित्र रंगवलं. महेश लांडगेंनी पुढे बोलताना अजित पवारांच्या मानसिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतोय. ते नैराश्यात आहेत, असा आरोप करत त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचाच असल्याचं ठामपणे सांगितलं. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्यांनी आम्हाला भ्रष्टाचार शिकवू नये, असा पलटवार करत, पार्थ पवारांच्या पराक्रमांचा उल्लेखही त्यांनी केला. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी-चिंचवडचे होतील का? असा सवाल करून लांडगेंनी संघर्ष आणखी टोकदार केला. या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र संयम राखलेला दिसतो. मी कोण आहे, हे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत कळ काढा, त्यानंतर उत्तर देतो, असं म्हणत त्यांनी थेट प्रत्युत्तर देणं टाळलं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या ‘एक अलार्म, पाच काम’ या कॅम्पेनची माहिती देताना अजित पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खड्डे, कचरा, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि गुन्हेगारी हे खरे अलार्म आहेत. या मुद्द्यांवर रॅप सॉंगच्या माध्यमातून भाजपच्या स्थानिक कारभारावर टीका करण्यात आली असून, हे गाणं केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरतंच मर्यादित आहे, केंद्र किंवा राज्य सरकारशी त्याचा संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जात असल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसतो, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 10:05 am

राज-उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा उत्तरार्ध:मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही, दिल्लीचे आदेश त्यांना पाळावेच लागतात; मुंबई तोडण्याच्या मुद्यावरुन राज ठाकरेंचा पलटवार

मुंबई आणि महाराष्ट्राच्या भवितव्यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा स्फोटक दावा समोर आला असून, ठाकरे बंधूंनी थेट दिल्लीकडे बोट दाखवत भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू असल्याचा गंभीर दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात, त्याला फारसे महत्त्व उरत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. वर बसलेले दोघेजण (दिल्लीतील सत्ताकेंद्र) वेगळाच विचार करत असतील, तर इथले मुख्यमंत्री काहीही करू शकत नाहीत, असा थेट हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका अधिक महत्त्वाची मानली जात आहे. ‘सामना’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या उत्तरार्धात ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार शब्दांत टीका केली. या मुलाखतीचा हा भाग खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-कलाकार महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला. यावेळी मुंबई, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचं भवितव्य आणि भाजपच्या राजकारणावर ठाकरे बंधूंनी अत्यंत परखड भूमिका मांडली. भाजपलाही एक एक्सपायरी डेट आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत, सध्याची सत्ता शाश्वत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मराठी माणसाने आता आपापसातील भांडणं, मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, विदर्भ वेगळा होईल, अशा शक्यता वारंवार व्यक्त होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, अशी गर्जना केली होती. याच वक्तव्यावर संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना थेट प्रश्न विचारला की, या शब्दांवर विश्वास ठेवायचा का? यावर राज ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट आणि कठोर उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या हातात मुळात काहीच नाही. इच्छा चांगली असू शकते, पण दिल्लीहून जे आदेश येतील, तेच त्यांना पाळावे लागतात, असा आरोप राज ठाकरेंनी केला. वरून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर सही करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नसतो, असे विधान करत त्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, सत्तेचा सगळा कारभार ‘Obey the Order’ या एका तत्वावर चालतो. त्यामुळे मुख्यमंत्री सूर्य-चंद्राचे दाखले कितीही दिले तरी खरी चिंता दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या मनात काय आहे, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. इथल्या लोकांच्या मनात काय आहे, हा विषयच कुणाला महत्त्वाचा वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मोदी-शहा या ‘वर बसलेल्या दोघांच्या’ विचारांनुसारच निर्णय होत असल्याचा आरोप करत, राज्याच्या स्वायत्ततेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण मुंबईची संस्कृती, ओळख आणि आत्मा हळूहळू मारला जातोय, ही खरी चिंता आहे, असे त्यांनी सांगितले. कोणीही येतो आणि एखाद्या भागाची भाषा गुजराती असल्याचं सांगतो, आमच्यावर हिंदीची सक्ती केली जाते. म्हणजेच मराठी अस्मिता, संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. नुसतं नावापुरतं मुंबई महाराष्ट्रात ठेवायचं आणि आतली सगळी ओळख पुसून टाकायची, याला काहीच अर्थ नाही, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईच्या आर्थिक महत्त्वावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण मुंबईची जी लक्ष्मी म्हणतो, ती आज कुठे गेली आहे? कोणाच्या हातात आहे? यावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मराठी माणूस हा पूर्वी कामगार, श्रमिक आणि लढवय्या होता. आज तो शहराबाहेर ढकलला गेला असून, संपूर्ण मुंबईची संपत्ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात केंद्रीत झाली आहे. ही संपत्ती सातत्याने गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, पण संपत्ती आमच्याकडे राहील, हीच सध्याची नीती असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. राज ठाकरे यांनी या चर्चेत आणखी एक वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला. माझं मत थोडंसं वेगळं आहे. आता परिस्थिती फक्त संपत्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता त्यांना मुंबईचा तुकडाही हवा आहे, असा दावा त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातही मुंबई गुजरातला देण्याची मागणी करणारे अमराठी धनदांडगे होते, आणि आजही तीच मानसिकता अधिक मोठ्या प्रमाणात दिसून येते, असे त्यांनी सांगितले. तेव्हा पाच लोक होते, आज पाचशे झाले आहेत, असा इशारा देत धोका किती वाढला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही विमानतळ नवी मुंबईत हलवले जातील एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) संदर्भात सुरू असलेल्या घडामोडींवरही राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केलं. वाढवण बंदर, त्याला लागून विमानतळ, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईतील कार्गो हळूहळू तिकडे हलवणं—ही सगळी एक नियोजित रणनीती असल्याचा दावा त्यांनी केला. आता सुरुवात झाली आहे. पुढे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही विमानतळ नवी मुंबईत हलवले जातील, असा दावा त्यांनी केला. सध्या मुंबईतील विमानतळ अदानी समूहाकडे असून, त्याचं प्रचंड क्षेत्रफळ भविष्यात विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्या जागेत किमान 50 शिवाजी पार्क मैदानं मावतील, असे सांगत, ही सगळी योजना मुंबई तोडण्याचाच भाग असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:52 am

श्री गुरूदेव‌ विद्यालय नरदोडा येथे वार्षिक उत्सव सोहळा उत्साहात‎:उत्तुंग भरारी घेणे हे रंगावर अवलंबून नसते तर अंतरंगावर अवलंबून असते- डाॅ. रणजित गणोदे

डॉ.भाऊसाहेब देशमुख जेव्हा लंडनमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना भारतातील शिक्षण व्यवस्थेचा विचार आला व त्यानुसार त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण हे समाजातल्या तळागाळापर्यंत झिरपलं पाहिजे, असा विचार अंगिकारून आपले कार्य केले. आकाशात भरारी घेणे हे रंगावर अवलंबून नसतं तर अंतरंगावर अवलंबून असतं असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. रणजित गणोदे यांनी केले. गुरूदेव‌ विद्यालय नरदोडा येथे डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचा जयंती उत्सव व वार्षिक उत्सव सोहळा नुकताच झाला. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा.डॉ.गणोदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारीणी सदस्य प्राचार्य केशव गावंडे उपस्थित होते. तसचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पद्मावती तेलगोटे, उत्सव प्रमुख श्रीकृष्ण इंगळे, आजीवन सभासद केशव येवले,सरपंच विलास पोटे, शाळा समिती सदस्य विलास टाले, सुनंदा टाले,अजाब टाले,गणेश टाले, रजनी काळे, शिक्षिका संघमित्रा खंडारे,मृदुला थोरात उपस्थित होत्या. पुढे बोलतांना डॉ.गणोदे यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर सखोल प्रकाश टाकला. दरम्यान अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य केशव गावंडे यांनी भाऊसाहेबांच्या कार्याची उत्तुंग झेप समाजाच्या पर्यंत कशी पोहोचली याचे विवेचन केले. त्यानुसार आजच्या शाळा वाढल्या पाहिजेत, असा मौलिक विचार उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका पी.डी. तेलगोटे यांनी शाळेच्या विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मीळवलेल्या यशाचा व शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला. सूत्रसंचालन एम.आर.थोरात तर आभार प्रदर्शन एस.आर.इंगळे यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:16 am

जसापूरवासीयांनी दिला गजानन वारीच्या वतीने एकात्मतेचा संदेश:जसापूर (भडांगे) येथून श्रीक्षेत्र शेगावकडे निघाली पालखी‎

जसापूरवासीयांनी गजानन माऊली वारी पालखी सोहळ्यातून एकात्मतेचा संदेश दिला असून संपूर्ण गावामध्ये सडा-सारवण, रांगोळ्यांतून श्रद्धा उमटली. गाव गाड्याच्या संस्कृतीचे जतन करून जाती–धर्माच्या पलीकडे भक्ती पोहोचली आहे. श्री. संत भैय्याजी महाराज जसापूर (भडांगे) ते श्रीक्षेत्र शेगावकडे निघोलेली ही पवित्र पालखी पायदळ वारी भक्तिपूर्ण वातावरणात बुधवारी, ७ रोजी ही दिंडी मोठ्या उत्साहात शेगावकडे रवाना झाली. रामकृष्ण महाराज अकोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व धनेश महाराज ढोके, प्रदीप रोडे महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीमय वातावरणात होत आहे. ही दिंडी ११ जानेवारी रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार असून तेथे पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात येणार आहे. वारीच्या प्रारंभी गावातील मंदिरामध्ये पालखीची विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या. सडा-सारवण करून पाणी शिंपण्यात आले. ‘जय गजानन माऊली’च्या जयघोषात दिंडीतील भाविक पावल्या खेळत पुढे सरकत होते. प्रत्येक घरासमोर पालखीचे पूजन करण्यात येत होते. हे भक्तीमय दृश्य पाहून संपूर्ण गाव अक्षरशः माऊलीच्या गजरात न्हाऊन निघाले. जसापूर (भडांगे) वासीयांनी या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून भक्तीचा जागर करत गजानन महाराजांवरील आपली अपार श्रद्धा व्यक्त केली. भक्ती, एकता आणि संस्कारांचा संगम असलेला हा पालखी सोहळा परिसरात भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या पालखी सोहळ्यात सेवाधारी आशिष काळे, विणेकरी प्रतीक महाराज भडांगे, गायनाचार्य विठोबा पांडे, पवन काढणे, विनोद भडांगे, ज्ञानेश्वरी पाटेकर, विजया रोडे, मृदंगाचार्य गजानन भारसाकडे, जय पाटेकर, गोकुळ राऊत, विलास भडांगे, ऋषिकेश मेहरे, मधुकर मेहरे, प्रवीण नागे, सुनील भडांगे, अल्पेश, सोहम राऊत यांच्यासह जसापूर (भडांगे), नायगाव, भांबोरा, आराळा आदी गावांतील असंख्य गजानन भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:15 am

राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत अकोल्याचे यश:आदित्य टोळे, रितेश तिवारी, कौस्तुभ पाचडे पुरस्काराचे मानकरी

डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक यावर्षी अकोला येथील राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. आदित्य टोळे, रितेश तिवारी, कौस्तुभ पाचडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून पुरस्कार प्राप्त केले. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ जयंती निमित्ताने आयोजित स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा यावर्षीचा विषय ‘भारताच्या विकासामध्ये तरुणांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत’ हा होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले वैचारिक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय आणि स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्रा. डॉ. महेंद्र मेटे, परीक्षक प्रा. डॉ. स्वप्नील इंगोले, प्रा. डॉ. एकनाथराव तट्टे, प्रा. मॅझनी बायदनी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे सांघिक पारितोषिक राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय अकोला येथील वैष्णवी पागृत, अंकिता कांगदे यांच्या संघाने पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते फिरता चषक अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम वैयक्तिक पुरस्कार आर.डी.आय. के महाविद्यालय बडनेरा येथील आदित्य टोळ यांनी पटकावले. त्याला रोख रक्कम ७ हजार, स्मृतीचिन्ह, ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी सन्मानित केले. नागपूर येथील रितेश तिवारी याला रोख ५ हजार, ग्रंथ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन द्वितीय पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा कौस्तुभ पाचडे याला देण्यात आले. ३ हजार, स्मृतीचिन्ह, ग्रंथ आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबतच या स्पर्धेत विशाल खर्चवाल नागपूर, पूर्वा मानकर शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती, शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीची पृथा देशमुख, सिपना अभियांत्रिकी बडनेरा ची विद्यार्थिनी श्रावणी रोठे, मुंबई विद्यापीठ येथील सिद्धार्थ साठे, नागपूर विद्यापीठाचा ओम ढोक, भारतीय महाविद्यालय मोर्शी येथील पार्वती आरशिया, आणि श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचा सौरभ वैद्य यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे संचालन प्रा.रत्नाकर शिरसाठ व मयूर चौधरी, प्रास्ताविक प्रफुल्ल घवळे, आभार प्रदर्शन प्रा.डॉ. शितल तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा.डॉ.अमित गावंडे, वैशाली गरकळ (घवळे), प्रा.रणजीत देशमुख, विजय देशमुख, निलेश वानखडे, प्रवीण मिसाळ, प्रा संदिप वानखडे, प्रकाश अवझाड, नरेंद्र जवंजाळ, उमेश पवार, यश इंगोले यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर व डॉ.महेंद्र मेटे यांनी काम पाहिले. तरुणाईंमध्ये बदल घडवण्याची क्षमता आज समाजासमोर अनेक ज्वलंत विषय उभे आहेत, त्यामध्ये शिक्षण, बेरोजगारी, पर्यावरण, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता यांचा समावेश आहे. या प्रश्नांवर गप्प बसणे म्हणजे अन्यायाला साथ देणे होय. म्हणूनच तरुणांनी आता केवळ पाहणारे न राहता बोलते, विचार करते आणि कृती करते झाले पाहिजे. तरुणाईकडे ऊर्जा आहे, विचारांची ताकद आहे आणि बदल घडवण्याची क्षमता आहे. सोशल मीडियावर मत मांडण्यापलीकडे जाऊन संवाद, चर्चा आणि सकारात्मक कृती करणे गरजेचे आहे. असे मत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:14 am

संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो:मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांचे प्रतिपादन‎

महाळुंग मुंडफणेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा मुंडफणेवस्ती येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड, श्रीपूर यांच्या वतीने संगणक भेट देण्यात आला. पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांनी केले. सदर संगणक कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक वाघ व शिक्षक मुलाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब मुंडफणे, कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत व जोशी आदी उपस्थित होते. मुंडफणे जिल्हा परिषद शाळेस ब्रिमा सागर कारखान्याने संगणक भेट दिल्याबद्दल कारखान्याचे नगरसेवक नानासाहेब मुंडफणे यांनी आभार मानले. याप्रसंगी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया म्हणाले की, आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. संगणक हे केवळ एक साधन नसून ज्ञानप्राप्तीने प्रभावी माध्यम आहे. मात्र ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, याची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. लहान वयातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, त्यांची विचारशक्ती विकसित होते आणि भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी ते सक्षम बनतात.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:14 am

परिचारक गटाला उपनगराध्यक्षाची संधी, स्वीकृत सदस्यासाठी देखील मोर्चे बांधणी:नवीन चेहऱ्याला संधी, स्वीकृत नगरसेवक पदासाठीही अनेकजण इच्छुक‎

पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बहुमताच्या जोरावर परिचारक गटाच्या नगरसेवकाची निवड होणार असून या पदासाठी कुणाची वर्णी लागते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. त्याच बरोबर स्वीकृत नगरसेवक पदासाठीही परिचारक गटात अनेक जण इच्छुक आहेत, मात्र परिचारक कुणाला संधी देतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.पंढरपूरच्या नगराध्यक्ष तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके या विजयी झाल्या. परंतु सभागृहात २४ जागा जिंकून परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मोठे बहुमत मिळवले आहे. भाजपकडून उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक जन इच्छुक असले तरी परिचारक यांच्याकडे अद्याप कुणी मागणी केलेली नाही. नगराध्यक्ष भालके या लवकरच उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करतील, त्यानंतर या पदाच्या निवडीसाठी हालचाली गतिमान होतील, असे दिसते. सध्या तरी या पदासाठी आपली वर्णी लागावी म्हणून परिचारक यांच्याकडे फारसे कोणी प्रयत्न सुरू केले नाही. मात्र भालके यांच्या समोर उपनगराध्यक्ष म्हणून प्रभावी राहील अशा नवीन चेहऱ्याला परिचारक संधी देतील, अशी चर्चा सुरू आहे. स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह अधिक प्रमाणात सभागृहातील संख्या बळानुसार परिचारक यांच्या भाजपला २ तर तीर्थक्षेत्रला १ जागा मिळेल. परिचारक गटाकडून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांना स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्तीची मागणी समर्थकांनी केली आहे. संग्राम अभ्यंकर यांच्याही नावाची चर्चा असून आश्वासन दिलेल्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला .

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:13 am

लेझीम स्पर्धेमध्ये मुलींच्या खुल्या गटात रत्नप्रभादेवी महिला महाविद्यालय प्रथम:कोळेगावच्या विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालयाने मुली गटात प्रथम क्रमांक मिळवला‎

येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विसाव्या लेझीम स्पर्धेत मुलींच्या खुल्या गटात येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयाने तर ग्रामीण मुली गटात कोळेगावच्या विजयसिंह मोहिते- पाटील विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. गेली २० वर्षांपासून येथील विजय चौकात या स्पर्धा आयोजित केल्या जातात.त्यानुसार यावर्षी दि. ७ ते ९ जानेवारी या कालावधीत या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.यामध्ये मुलां मुलींबरोबरच शहरी व ग्रामीण असे विभाग केले असून या स्पर्धेत प्राथमिकचे ५, मुलांचे ३१ व मुलींचे २२ असे एकूण ५८ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाना दोन डाव खेळता येत आहेत. स्पर्धेत मुलींच्या खुल्या गटात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालय अकलूज प्रथम, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज द्वितीय, तर श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला वसतिगृह अकलूज आणि औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (पदवी) अकलूज यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला आहे. शहरी मुले अ गटात सदाशिवराव माने विद्यालय शहरी मुले ब गटात विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली प्रथम, जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर यांनी द्वितीय व कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. ग्रामीण मुली गटात विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय कोळेगाव प्रथम, श्री संत तुकाराम विद्यालय बोंडले द्वितीय, सदाशिवराव माने विद्यालय माणकी तृतीय,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय मांडवे चतुर्थ, श्री गणेश विद्यालय पिंपळनेर व श्रीनाथ विद्यालय, लोंढे-मोहितेवाडी यांनी विभागून पाचवा क्रमांक पटकावला. विद्यालय अकलूज प्रथम, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर द्वितीय व मोरजाई विद्यालय मोरोची यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. विजेत्या संघांना जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील,नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सुत्रसंचलन किरण सूर्यवंशी, शकील मुलाणी व ईलाई बागवान यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:10 am

बार्शीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुण्याचा संघ विजेता:कर्मवीर मामासाहेबांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा‎

कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, सोलापूर कबड्डी असोसिएशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत पुणे येथील राकेशभाऊ घुले कबड्डी संघ विजेता ठरला व प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रूपये रोख व आकर्षक चषक पटकावला. स्वास्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर हा संघ २१ हजार रूपये रोख व चषक या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. तृतीय क्रमांकाचे ११ हजार रूपये रोख व चषक विभागून छावा क्रीडा मंडळ, कोल्हापूर व शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ, धाराशिव या दोन संघात विभागून देण्यात आले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, माजी आमदार राजेंद्र राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पवार होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, संस्था अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव व संस्था पदाधिकारी, विद्यापीठ अधिष्ठाता डॉ. शशिकांत तांबे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, महाराष्ट्र महिला कबड्डी असोसिएशनच्या अंधारे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. रोहित डिसले यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ.दामा व माजी आमदार राऊत, राजेंद्र पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. आभार प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रेमा दळवी व प्रा. रूपाली शिंदे यांनी केले. वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान विशाल ताटे यांना बेस्ट रेडर, विक्रम परमार यांना बेस्ट डिफेंडर तर ज्ञानेश्वर जाधव ऑल-राऊंडर म्हणून सन्मानित करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:10 am

श्रम परिहार्य स्वतःसाठी, समाजासाठी अन् निरोगी शरीरासाठी गरजेचा असतो:संतोष पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन‎

श्रमाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली पाहिजे. प्रत्येकाने श्रम करणे आवश्यक आहे. श्रम स्वतः साठी, समाजासाठी, आणि निरोगी राहण्यासाठी गरजेचे आहे. आई-वडिलांचे प्रेम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे. त्यांनी घालून दिलेली शिकवण प्रत्येकाने जपली पाहिजे. वडिलधारी माणसं, गुरुजनांचा आदर करावा. खेळाला महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथील प्र. कुलसचिव प्रा. डॉ. अतुल लकडे यांनी केले. ते बसवनगर ( ता. दक्षिण सोलापूर) येथे मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या २३ व्या विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सी. जी. हविनाळे होते. यावेळी संस्थेचे सचिव एम.डी.कमळे, संस्थेचे विश्वस्त नागेश बिराजदार, सरपंच निखिल राठोड, प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप, सुराज्य भवनचे बलभीम वारे, ग्रामसेवक राजेभाई चितारी आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. सी. जी. हविनाळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी एकाग्र असावे. योग, प्राणायाम केल्यास आरोग्य उत्तम राहते. निरोगी राहण्यासाठी निरोगी अन्न खाल्ले पाहिजे. त्यासाठी शेतीत निरोगी अन्न बनवले पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात होणार नाहीत. प्रत्येकाने आयुष्यात सजग असले पाहिजे. संस्था सचिव एम. डी. कमळे म्हणाले, श्रमसंस्कार शाश्वत शेतीपासून शाश्वत विकास या विषयावर सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे म्हणाले, आपण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न खाल्ले पाहिजे. ज्यामुळे आपल्याला आजार जडणार नाहीत. आहेत आपण निरोगी राहू. अलीकडे रासायनिक खतांचा केला जाणारा अधिक वापर मानवासाठीही धोकादायक आहे. शेती नापीक होत आहे. तर माणसांना अनेक आजार जडत आहेत. त्यामुळे मानवाचे आयुर्मान घटत आहे. सेंद्रिय शेतीतून शाश्वत विकास होईल. श्रमसंस्कार जपण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरातून वैचारिक मेजवानी मिळणार आहे. व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी या शिबिराचा फायदा होईल. यावेळी सुराज्य भवनचे बलभीम वारे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.एच एल जाधव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ.शिवानंद तोरवी यांनी करून दिला. प्रा.डॉ. एस.ए. निंबर्गी यांनी आभार मानले. यावेळी रासेयो सदस प्रा. डॉ. जवाहर मोरे, प्रा. डॉ. एम. सी. हजारे, प्रा. डॉ.बी. एस. कोरे, प्रा. व्ही. एस. आटकर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:09 am

जगताप यांचा झेडपीसाठी मदतीचा हात पुढे:आमदार नारायण पाटील यांची बैठकीत चुप्पी,करमाळ्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी पाटलांचा प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधीचा शब्द‎

करमाळा नगरपालिकेच्या प्रत्यक्ष निवडणूक व जाहीर प्रचारात तटस्थ राहिलेल्या आमदार नारायण पाटील यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. बुधवारी जेऊर (करमाळा) येथे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणा-या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सूतोवाच केले. बैठकीत निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची मते जाणून घेत त्यांच्या मतांचा कानोसा घेतला. दोन दिवसांपूर्वी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी समर्थकांच्या बैठकीत निवडणूक समझोत्यांचे सूतोवाच केले, परंतु राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांनी त्याबद्दल चुप्पी साधली. आमदार नारायण पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही चांगल्या कार्यकर्त्यास संधी दिली जाणार आहे. तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवण्यासाठी आपल्याला पंचायत समितीवर सत्ता हवी आहे. या माध्यमातून अगदी पत्रा दांडी पासून ते घरकुलापर्यंतचा लाभ वंचित लाभार्थी नागरिकांना मिळवून देता येईल. अनेक वर्षाची सत्ता बाजूला सारुन पंचायत समितीवर आपल्या गटाची सत्ता आली होती. पुन्हा एकदा आपल्याला पंचायत समितीवर आपल्या गटाचा झेंडा फडकावयसाठी सज्ज रहा, असे आवाहन केले. मला विधानसभा निवडणुकीत मतदान करुन तुम्ही सेवेची एक संधी दिली. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपण विश्वास व विजयाची परंपरा चालू ठेवाल अशी अपेक्षाही आमदार पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी करमाळा तालुक्यासह माढा तालुक्यातील छत्तीस गावातील इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आपली मते मांडली. पंचायत समिती गण व जिल्हा परिषदेच्या सर्व गटातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी निवडणुकीत संधी मिळावी म्हणुन इच्छा व्यक्त केली. प्रतिनिधी | अक्कलकोट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने अक्कलकोट तालुक्यातील राखीव जि.प व पंचायत समितीच्या जागांवर प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक मैदानात उतरणार असल्याचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी सांगितले. जकापूर येथे रिपाइं शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. येत्या दोन दिवसांत आचारसंहिता लागू शकते. नगर परिषद निवडणुकीत रिपाइंने खाते उघडले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही रिपाइं कार्यकर्त्यांना मैदानात उतरवणार आहे. जागा वाटपाबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी रिपाइं शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याचे मडिखांबे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच आमसिध्द वंटे होते. या प्रसंगी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, अप्पा भालेराव, अजय मुकणार, राजू भगळे, तम्मा दसाडे, अंबादास गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनानिमित्त पाटील गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. युवानेते पृथ्वीराज पाटील मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. सूत्रसंचालन विनोद गरड यांनी केले तर आमदार नारायण पाटील मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी आभार मानले. आदिनाथ कारखाना ताब्यात येऊन‌ केवळ सहा महिने झाले आहेत. मी व माझे सर्व‌ सहकारी संचालक आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी कटिबद्ध आहोत. भविष्यात या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उत्कर्ष साधायाचा असल्याचे पाटील म्हणाले. करमाळा पालिका निवडणुकीत जयवंतराव जगताप गटाच्या हातून सत्ता निसटली. सावंत गटाने करमाळा विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षपद पटकावले आहे. शिवाय २० पैकी ८ जागा जिंकून सर्वांना अचंबित केले आहे. सावंत गट विरोधकांच्या हाती लागू नये, यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार नारायण पाटील हे कोणाशी आघाडी, समझोता करतील हे काळच ठरवेल. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पालिका निवडणुकीत करमाळ्यात लक्ष घातले नव्हते. झेडपी निवडणुकीत मात्र ते नारायण पाटील यांच्या माध्यमातून लक्ष घालतील. मोहिते पाटील यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली वाढतील. सर्व पत्रकार बांधवांचा झाला सत्कार आदिनाथ उभारणीसाठी आम्ही कटिबद्ध

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:08 am

सीबीआयमार्फत सिस्पे घोटाळा तपासाचे मुख्यमंत्र्यांचे संकेत:पालकमंत्री विखेंच्या मागणीनंतर घोषणा

जिल्ह्यातील सिस्पे, ग्रो मोअरसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांची सुमारे पाच हजार कोटींची फसवणूक झाली आहे. सिस्पे घोटाळ्याला राजकीय वरदहस्त असून या घोटाळ्याची सीबीआयमार्फत तपास करावा, अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याला प्रतिसाद देत मी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून सीबीआयमार्फत तपासासाठी प्रयत्न करेल. गोरगरिबांचे पैसे लुबाडणाऱ्यांना जेलची हवा खायला पाठवू, अशी घोषणा घोषणा करत सिस्पेच्या सीबीआय तपासाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महापालिका उर्वरितपान४ आधी सिस्पे, त्यानंतर इन्फिनिटी बिकन, नंतर ग्लोबल अशा विविध कंपन्यांच्या माध्यमातून १०, २० व २५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून हजारो कोटींची गुंतवणूक घेऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी विविध गुन्हे दाखल असून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. यात आत्तापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, पोलिसांकडे केवळ १४ कोटींच्या फसवणुकीची अधिकृत नोंद झाली आहे. शेकडो कोटी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी सध्या सुरू आहे. जिल्ह्यात सिस्पे, ग्रो मोअर सारख्या अनेक कंपन्यांचे, बँकांचे घोटाळे उघड झाले आहेत. शेवगाव येथील घोटाळाही मोठा आहे. अर्बन बँकेच्या घोटाळ्याची व्याप्तीही मोठी असून विविध आर्थिक घोटाळ्यांत सामान्यांचे हजारो कोटी रुपये बुडाले आहेत. मात्र, मंत्री राधाकृष्ण विखे व भाजपकडून केवळ पारनेरशी संबंधित असलेल्या व खा. नीलेश लंके यांच्यासमवेत फोटो व्हायरल झालेल्या आरोपीशी संबंधित सिस्पे घोटाळ्याच्या सीबीआय तपासाची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीच्या माध्यमातून मंत्री विखेंनी खासदार लंके यांना घेरण्याची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. काय आहे सिस्पे घोटाळा?

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:01 am