SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

भाजप आता 'कार्यकर्तामुक्त पक्ष' झाला:लवकरच रिमोट कंट्रोल रेशीमबागेकडून अदानी-अंबानींकडे जाईल; काँग्रेसची बोचरी टीका

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भारतीय जनता पक्षामध्ये अभूतपूर्व अराजकता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या निष्ठावंतांना डावलून 'आयारामां'ना रेड कार्पेट अंथरल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि महायुतीतील गुन्हेगारीकरणावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला, अशी टीका सपकाळ यांनी केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये जो गोंधळ सुरू आहे, तो आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम असेल. मूळ भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून हा पक्ष आता 'उपऱ्यांच्या' हाती गेला आहे. मूळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल. अजित पवारांचा पक्ष गुंडांचा, याआधी माफियांना प्रवेश अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांचा पक्ष हा आता केवळ गुंडांचा आणि माफियांना आश्रय देणारा पक्ष उरला आहे. मराठवाड्यातील गुन्हेगारी साम्राज्यातील नेत्यांना आणि कोयता गँगशी संबंधित लोकांना त्यांनी पक्षात स्थान दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले, असे सपकाळ म्हणाले. 2026 काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष सरत्या वर्षाला निरोप देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी नवीन वर्षातील काँग्रेसची रणनीती स्पष्ट केली. 2026 हे वर्ष काँग्रेससाठी पूर्णपणे 'संघटनात्मक वर्ष' असेल. डिसेंबरपासूनच आम्ही याची तयारी सुरू केली आहे. सध्या पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. नवीन वर्षात आम्ही वैचारिक मूठ बांधून अधिक ताकदीने जनतेसमोर जाणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे ही वाचा... संभाजीनगर भाजपमधील गोंधळात संजय केणेकरांची मध्यस्थी:रडणाऱ्या कार्यकर्त्याला कुरवाळले; 'सी-फॉर्म' आणि सत्तेत पदे देण्याचे आश्वासन महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. सावेंच्या गाडीला काळं फासणे आणि कराडांची गाडी रोखून धरल्याने निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी अखेर आमदार संजय केणेकर रिंगणात उतरले. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची आर्त हाक ऐकून घेत त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 4:47 pm

लोकमान्य नगर पुनर्विकासाला हायकोर्टाचा हिरवा कंदील:राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल म्हाडाला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील लोकमान्य नगर (सदाशिव पेठ) येथील पुनर्विकास प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली असून, राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांना कडाडून फटकारले आहे. म्हाडाची भूमिका मनमानी, तथ्यहीन आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे न्यायालयाने ठामपणे नमूद केले. सन ग्लोरी आणि नूतन सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला म्हाडाने दिलेली स्थगिती न्यायालयाने रद्द ठरवली. कोणत्याही प्रशासकीय निर्णयात राजकीय दबावाला स्थान देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. लोकमान्य बचाव कृती समिती आणि ॲड. गणेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी याविरोधात संघर्ष केला. काळ्या फिती लावून आंदोलन, घंटानाद, मोर्चे, घेराव आणि निदर्शने अशा विविध मार्गांनी नागरिकांनी आपला आवाज बुलंद केला. या लढ्यादरम्यान पंतप्रधानांना शेकडो पत्रे पाठवण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला. हिवाळी अधिवेशनात सचिन अहिर आणि आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न ठामपणे मांडला. आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष लोकमान्य नगरला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान असे समोर आले की, संग्लोरी सीएचएसला एप्रिल २०२५ मध्ये एनओसी देण्यात आली होती. नूतन सीएचएसचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच पुनर्विकासावर एकतर्फी स्थगिती लादण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी “पुढील आदेश येईपर्यंत स्थिती कायम ठेवावी” अशी हस्तलिखित टिप्पणी केली होती; मात्र म्हाडाने ती ‘ब्लँकेट स्टे’ म्हणून अंमलात आणल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी व न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने सांगितले की, म्हाडा अधिकाऱ्यांनी कोणताही कायदेशीर आधार नसताना निर्णय घेतले. यामुळे नागरिकांच्या संविधानिक हक्कांचे उल्लंघन झाले असून, भारतीय संविधानातील कलम १४ आणि ३००(अ) चे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने म्हाडाला नूतन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एनओसीबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. पुनर्विकास तातडीने सुरू करण्यासही मोकळीक दिली आहे. या निर्णयामुळे लोकमान्य नगरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक महिन्यांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. ॲड. गणेश सातपुते यांनी या लढ्याला अखेर यश मिळाल्याचे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 4:17 pm

ऊरळी कांचन खून प्रकरणाचा गुंता सुटला:किरकोळ वादातून झालेल्या खुनाप्रकरणी दोघांना सोलापूरमधून अटक

ऊरळी कांचन येथील महिनाभरापूर्वीच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, याप्रकरणी दोघांना सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. किरकोळ वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. संपत तुकाराम चौधरी (वय ४८, रा. वडाची वाडी, ता. हवेली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. १९ डिसेंबर रोजी थेऊर ते पेठ रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी ऊरळी कांचन पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांना खुनामागचे कारण स्पष्ट नव्हते. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्नील शिवाजी चौधरी आणि मृत संपत यांच्यात वाद झाले होते. याच वादातून स्वप्नील आणि आदेश रेवलनाथ चौधरी यांनी संपत यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. दोघे जण सोलापूरमध्ये पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सचिन वांगडे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगिरे, उपनिरीक्षक प्रवीण कांबळे, अमित सिद पाटील, पोलीस कर्मचारी योगेश नागरगोजे, अजित भुजबळ आणि राजू मोमीन यांनी ही कारवाई केली. डीएसके प्रकरणात ठेवीदारांची अंतिम यादी प्रसिद्ध दरम्यान, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्यावरील फसवणूक प्रकरणात आवश्यक कागदपत्रे सादर केलेल्या ठेवीदारांची अंतिम यादी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यापूर्वी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात ठेवीदारांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, जिथे ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. ज्या ठेवीदारांनी कागदपत्रे दिली, त्यांची यादी आर्थिक गुन्हे शाखेने तयार केली आहे. ही यादी पुणे पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर (punepolice.gov.in) उपलब्ध आहे. ठेवीदारांची वैयक्तिक माहिती 'टेलिग्राम बीओटी'वरही प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा संखे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 4:15 pm

मुंबईत तेजस्वी घोसाळकरांच्या उमेदवारीला विरोध:भाजप कार्यकर्तीने 'मी कुठे चुकले?' असा प्रश्न करत पक्षनेत्यांना सुनावले खडेबोल

भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. या प्रकरणी एका इच्छुक महिला उमेदवाराने थेट व्यासपीठावरून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपुढे नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील भाजप कार्यकर्त्यांचा पक्षाविरोधातील रोष राज्यभरात गाजत आहे. त्यातच आता मुंबईतही भाजपला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून प्रस्थापित, नेतेमंडळांचे नातलग व उपऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर दहिसरमध्ये भाजपधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपने येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे. या प्रकरणी पक्षाच्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात एका इच्छुक महिला कार्यकर्तीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचा निर्णय मान्य, पण आमचे काय? ही इच्छुक महिला थेट व्यासपीठावरून म्हणाली, पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. पण कार्यकर्त्यांचे काय? मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मी बोलणार. मी कुणालाही शिवीगाळ किंवा दादागिरी करत नाही. केवळ मनातील भावना व्यक्त करत आहे. त्यामुळे मला बोलू द्या. मी मागील 10 वर्षांपासून दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपची कार्यकर्ती म्हणून काम कर आहे. आमदार मनिषा चौधरी यांनी ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या संधी मानून पार पाडल्या. माझ्यासह माझ्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. असे असूनही पक्षाने मला उमेदवारी नाकारली. मी कुठे चुकले? पक्षाच्या निर्णयाचा मी आदर करते. पक्षाने उमेदवारी दिलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारीही मला माहिती आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. पण मी कुठे चुकले याचे उत्तर आमदार मनिषा चौधरी व खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले पाहिजे. जीव तोडून काम केल्यामुळे मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असेही या कार्यकर्तीने यावेळी ठणकावून सांगितले. पक्षात कुणीही समाधानी नाही इच्छुक महिला उमदेवार पुढे म्हणाली, मी ज्यांना आयुष्यभर गुरू मानले, त्यांनीच मला डावलले. यामुळे मी प्रचंड नाराज आहे. कार्यकर्ता आयुष्यभर समर्पित भावनेने पक्षासाठी काम करत असतो. तो राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतो. पक्षाचा अचानक आदेश आल्यास महिला हातातील काम टाकून ते काम करतात. पुरुष नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळत असतात. पण भाजपने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला. खोट्या मुलाखती व खोटे अर्ज भरून घेतले. अखेरीस तिकीट कापले. वर्षानुवर्षे एवढे काम करूनही आज पक्षात कुणी समाधानी नाही, असेही ही महिला इच्छुक यावेळी बोलताना म्हणाली.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 4:09 pm

पुण्यात 'ट्रिपल सीट' हुल्लडबाजांचा राडा:कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण करून फाडला गणवेश; तिघांना बेड्या

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी पोलीस हवालदाराला मारहाण केली आणि त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी लकी गौरव आनंद (वय २१), साहिल प्रकाश चिकणे आणि श्रावण रमेश हिरवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सेंगर हे सिंहगड रस्ता वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. आरोपी तिघे जण एकाच दुचाकीवरून प्रवास करत असताना, सेंगर यांनी त्यांना धायरी फाटा चौकात अडवले. ट्रिपल सीट प्रवास करत असल्याने सेंगर यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यामुळे चिडलेल्या आरोपींनी सेंगर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादादरम्यान, आरोपी हिरवे याने सेंगर यांना चापट मारली. आरोपींनी आरडाओरडा करत त्यांचा गणवेश फाडला. शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घरफोडीच्या दोन घटना दरम्यान, पुणे शहरात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. विश्रांतवाडी आणि हडपसरमधील सय्यदनगर भागात चोरट्यांनी सदनिकांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. विश्रांतवाडीतील विद्यानगर भागातील नवआकांक्षा सोसायटीत एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज, ज्यात सोन्याचे दागिने आणि रोकड होती, तो लांबवला. तक्रारदार कुटुंब बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत. हडपसरमधील सय्यदनगर परिसरातील गल्ली क्रमांक १२ मध्ये एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे गंठण आणि कपाटातील ५ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 4:09 pm

थर्टी फर्स्टचा जल्लोष आता पहाटे 5 वाजेपर्यंत:राज्य सरकारकडून हॉटेल्स, बारना मोठी सवलत; पोलिसांची 'ड्रंक अँड ड्राईव्ह'वर करडी नजर

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्य सरकारने सेलिब्रेशनच्या वेळेत मोठी वाढ केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पार्टीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, ही सवलत देताना प्रशासनाने काही कडक अटीही लागू केल्या आहेत. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, पहाटे 5 वाजेपर्यंतची ही सवलत केवळ बंदिस्त किंवा इनडोअर आस्थापनांसाठीच लागू असेल. खुल्या जागा, इमारतींचे टेरेस किंवा मोकळ्या मैदानावरील सेलिब्रेशनला ही वेळ मर्यादा लागू असणार नाही. तिथे प्रचलित नियमांनुसारच वेळेचे पालन करावे लागेल. इनडोअर कार्यक्रम करतानाही ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे अनिवार्य असेल. नाक्या-नाक्यावर पोलिसांचा 'वॉच' नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये, यासाठी गृह विभागाने सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली आहे. राज्यभरात विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या शहरांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले असून ठिकठिकाणी ब्रेथ ॲनालायझरसह तपासणी केली जाणार आहे. रेव्ह पार्ट्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेची विशेष करडी नजर असणार आहे. आनंद साजरा करा, पण कायदा पाळा नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, नागरिकांनी उत्साहात आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत जरूर करावे, मात्र कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. हे ही वाचा... नववर्ष स्वागतासाठी वाहतूक बदल, मद्यपींवर कारवाईचा इशारा:पुण्यातील लष्कर, डेक्कन भागात गर्दी टाळण्यासाठी पोलिसांची कडक पाऊले पुण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर हे बदल लागू होतील. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 4:05 pm

नाशिक, संभाजीनगरमधील घटनांची पक्षाकडून नोंद:नाराज कार्यकर्त्यांची समजून काढू - बावनकुळे; आयारामांच्या उमेदवारीचे केले समर्थन

महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत भाजपमध्ये उडालेल्या गोंधळावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भूमिका स्पष्ट केली. जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे काही ठिकाणी नाराजी पसरली आहे, हे सत्य आहे. मात्र, 51 टक्के मतांची लढाई जिंकण्यासाठी आम्हाला काही ठिकाणी पक्षप्रवेशाचे प्रयोग करावे लागले, असे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिक आणि संभाजीनगरमधील घटनांची पक्षाने गांभीर्याने दखल घेतल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जागा कमी आणि इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या जास्त त्यामुळे काही ठिकाणी वातावरण खराब झाले होते. नाशिकमध्ये 122 जागा आहेत, तर अर्ज 700 आलेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची थोडी नाराजी झाली आहे. संभाजीनगरला मी स्वत: होतो. त्याठिकाणी 561 अर्ज आलेत. आपण एकाला उमेदवारी देऊ शकतो, पण त्याठिकाणी 20 लोकांनी मागणी केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. पण कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील. पक्षादेश समजून घेतील आणि खराब झालेले वातावरण आम्ही शांत करू. निष्ठावंत विरुद्ध 'आयाराम': बावनकुळेंचे स्पष्टीकरण बाहेरून आलेल्यांना लगेच उमेदवारी दिली जाते, असा आरोप भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, काही ठिकाणी आम्ही कधीच जिंकू शकत नाही. काही ठिकाणी कधीच जिंकलो नाही. नाशिकमध्ये 18-20 वॉर्ड असे आहेत, जिथे भाजप कधीच जिंकली नाही. त्यामुळे 51 टक्क्यांची लढाई जिंकण्यासाठी आम्हाला पक्षप्रवेश करावे लागले. शेवटी जो जीता वो सिंकदर. जिथे भाजपचा ओरिजिनल कार्यकर्ता जिंकू शकतो, तिथे कुठेही पक्षप्रवेशाचे प्रयोग केले नाहीत किंवा तसा प्रयोग झाला नाही. जिथे कमी आहोत, तिथे ॲडिशन केलेत, त्यामुळे नवीन उमेदवाराला जागा देण्यात आल्या आहेत, असे बावनकुळे म्हणालेत. कार्यकर्त्यांना एकसंघ लढण्याच्या सूचना नाशिक आणि संभाजीनगर मधील घटना नोंद घेण्यासारख्या आहेत. पक्षाने या घटनांची नोंद घेतलेली आहे. चंद्रपूरमध्येही अशीच परिस्थिती झाली होती. पक्षाने तिथेही नोंद घेतलेली आहे. त्यामुळे जे काही झालंय, त्यातून बाहेर निघून आपल्याला एकसंघपणे लढून महानगरपालिकेत यश मिळवायचे आहे, अशा आमच्या कार्यकर्त्यांना सूचना आहेत. निवडणुकीची तिकिट वाटप करतात, जे काही कमी जास्त झाले, ते आपण दुरुस्त करू, असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 51 टक्के नगरसेवक निवडून येतील मतदानाआधीच भाजपचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वा आम्हाला यश मिळाले आहे. ही आता सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आम्हाला समर्थन मिळत आहे. डबल इंजिन सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकते, असा विश्वास जनतेचा भाजप महायुतीवर आहे. जनता आता टोमण्यांवर विश्वास ठेवत नाही, तर विकासावर विश्वास ठेवते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात दोन तृतीयांश बहुमताने आणि 51 टक्क्यांच्यावर नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 3:44 pm

आदित्य ठाकरेंना मालाडमध्ये धक्का:ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच अपक्ष उमेदवारी; बंडखोरी, उमेदवारी बाद आणि तिरंगी लढतीचे चित्र

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजीचा उद्रेक झाला असून, त्याचे रूपांतर थेट बंडखोरीत होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचे अश्रू आणि कार्यकर्त्यांचा संताप हे चित्र ठळकपणे दिसून आले आहे. मुंबईतील मालाड परिसरातील प्रभाग क्रमांक 43 मध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. हा प्रभाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जात असताना, याच ठिकाणी बंडखोरी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय, तसेच आमदार सुनील प्रभू यांच्या मतदारसंघातील युवासेना सहसचिव समृद्ध शिर्के यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जागावाटपात हा प्रभाग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दिल्याने शिर्के नाराज होते आणि अखेर त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ठाकरेंच्या युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढत देत आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महायुती आहे, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीमुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, या सर्व आघाड्यांना बंडखोरीचा मोठा फटका बसताना दिसतोय. प्रभाग क्रमांक 43 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा प्रभाग ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, जागावाटपात हा प्रभाग तुतारीला गेल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यातूनच समृद्ध शिर्के यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आपल्या कामावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास ठेवत आपण निवडून येऊ, असा दावा शिर्के यांनी केला आहे. त्यामुळे या प्रभागात ठाकरे गटाचा शिलेदार विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीलाही धक्का बसला असून मुंबई महानगरपालिकेतील दोन वॉर्डमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाद झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात राहिलेला नाही. त्यामुळे मतदान होण्यापूर्वीच या दोन प्रभागांमधून महायुती निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. एकूणच, मुंबई महापालिका निवडणूक बंडखोरी, नाराजी आणि बदलत्या समीकरणांमुळे अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 3:39 pm

महापालिका निवडणूक:महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कशी होतेय निवडणूक, कुठे युती आणि कुठे आघाडी, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी युती आणि आघाडींमध्ये फाटाफूट झाली. मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेसेनेमध्ये युती झाली असून त्यांच्याविरोधात ठाकरे बंधू आणि स्वतंत्र लढणाऱ्या काँग्रेसचे आव्हान असेल. पुण्यात भाजप स्वबळावर लढत आहे. येथे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून, मविआ सुद्धा रिंगणात आहे. नागपूरमध्ये भाजप-शिंदेसेनेची युती झाली आहे. येथे काँग्रेस स्वबळावर रिंगणात आहे. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर असून त्यांचा सामना मविआशी होईल. संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसना दोघेही स्वबळावर लढत आहेत, तर मविआ एकत्र रिंगणात आहे. त्यामुळे येथे तिरंगा सामना होईल. जाणून घेऊयात कुठल्या महापालिकेमध्ये कोण-कोणाविरुद्ध लढत आहे ते एका क्लिकवर...

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 3:35 pm

गडकरींच्या माजी PRO चा मुलगा फॉरवर्ड ब्लॉकचा उमेदवार:निनाद दीक्षितने भाजपला डावलत महापालिका निवडणुकीसाठी भरला अर्ज

काँग्रेस आणि भाजपाचे टेंशन वाढवणारे तिकीट वाटप एकदाचे झाले. दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याची वेळ उलटून गेल्या नंतर यादी जाहीर केली. त्यामुळे बंडखोरी टाळण्यात यश आले. अशा हवेतही काही उमेदवारांनी लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे माजी जनसंपर्क अधिकारी जयंत दीक्षित यांचा मुलगा निनाद दीक्षित याने संघ मुख्यालय परिसरातील वाॅर्डातून फाॅरवर्ड ब्लाॅकचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. तीन पिढ्यांचा स्वयंसेवक असलेल्या निनादने भाजपाकडे तिकीट न मागता फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. भाजपात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक दिग्गजांना घरी बसवण्यात आले आहे. यातच महापालिकेची तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये मोठा असंतोष खदखदत आहेत. नव्या आणि जुन्यांचा वाद निर्माण झाला आहे. नाराज झालेल्यांनी आम्ही सतरंज्यांच्याच उचलायच्या का असा सवाल करून बंडाचा झेंडा फडकावला आहे. ही परिस्थिती उद्‍भवणार आहे याची आधीच कल्पना असल्याने घेऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे माजी जनसंपर्क अधिकारी जयंत दीक्षित यांच्या मुलाने भाजपकडे उमेदवारीसाठी अर्जच केला नाही. त्यांनी एकेकाळी डाव्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या फॉरवर्ड ब्लॉकचा झेंडा खांद्यावर घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. निनादने प्रभाग क्रमांक २५मधून त्याने आपली दावेदारी दाखल केली आहे. या प्रभागातील एका जागेसाठी मागीलवेळी दोन कट्टर स्वयंसेवकांमध्ये मोठा राडा झाला होता. गडकरी यांच्या वाड्यापर्यंत हे भांडण गेले होते. त्यामुळे दोन्ही स्वयंसेवकांना तिकीट नाकारण्यात आले होते. यावेळी पुन्हा भाजपने तीच चूक केली. श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य या दोघांनाही या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली. दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आला आहे. या पैकी एकाला माघार घ्यावी लागणार असल्याने पुन्हा वाद पेटणार आहे. हे बघून भाजपकडे उमेदवारी मागण्याच्या भानगडीतच पडलो नाही असे निनादने सांगितले. अपक्ष लढल्यास चिन्ह भेटायला वेळ लागतो. त्यामुळे फॉरवर्ड ब्लॉकचे ‘सिंह' हे चिन्ह घेतले. एवढाच त्या पक्षासोबत संबंध आहे. असे निनाद दीक्षित यांनी सांगितले. भाजप आता नेत्यांचा पक्ष झाला आहे. कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. नेता म्हणेल त्यालाच भाजपचे तिकीट दिल्या जाते. सध्या राज्यभर तिकिटी वाटपावरून असंतोष उफाळून आला आहे, कार्यकर्त्यांना डावलल्याचे चित्र आहे. त्यावरून हे स्पष्ट होते. हे बघूनच निनाद याने वेगळी वाट निवडली.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 3:16 pm

छ. संभाजीनगरमध्ये छाननी दिवशी इच्छुकांचा राडा

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये सलग दुस-या दिवशीही मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील भाजप पक्ष कार्यालयाला घेराव घालत जोरदार राडा केला होता. यावेळी संतापलेल्या इच्छुक उमेदवारांची आमदार केनेकरांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे दिव्या मराठे यांच्यासह इतर काही महिलांनी उपोषणाला सुरुवात केली […] The post छ. संभाजीनगरमध्ये छाननी दिवशी इच्छुकांचा राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 3:06 pm

‘लाडकी’ चा निधी सरकारी कर्मचा-यांच्या खात्यात

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असलेल्या हजारो सरकारी कर्मचा-यांनी थेट शासकीय निधीचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […] The post ‘लाडकी’ चा निधी सरकारी कर्मचा-यांच्या खात्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 3:03 pm

घरकुलाच्या हप्त्याचा वाद:सेनगावात भाजप पदाधिकाऱ्याचा लाभार्थ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते मिळत नसल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सेनगाव पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ येथे गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजना राबवली जात असून त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हयातील पाचही तालुक्यांमधून सुमारे ३ हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड झाली असून काही जणांना घरकुलाच्या अनुदानाचा १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला तर काही जणांना अद्यापही अनुदानाचा हप्ता दिलाच नाही. दरम्यान, घरकुल मंजूर झाल्यामुळे लाभार्थ्यांनी त्यांची कच्ची घरे पाडून ठेवली आहेत. मात्र आता अनुदानाचा हप्ता मिळत नसल्याने लाभार्थ्यांना घराच्या बाजूने मेनकापडाच्या फाऱ्या बांधून रहावे लागत आहे. सध्या कडाक्याची थंडी सुरु असून यामुळे लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. घरकुलाचे हप्ते शासनस्तरावरून ऑनलाईन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने लाभार्थ्यांकडून बँकेत चकरा वाढू लागल्या आहेत. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील पळशी गावातील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदानाचे हप्ते मिळाले नसल्याने भाजपाचे अनुसुचीत जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर खिल्लारे यांनी लाभार्थ्यांसह प्रभारी गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ता. ५ जानेवारी पर्यंत अनुदानाचे हप्ते न मिळाल्यास लाभार्थ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या शिवाय काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, नंदू पाटील, ॲड. पोले, बबन डुकरे, नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांची भेट घेऊन सुमारे १५०० लाभार्थ्यांचे अनुदानाचे हप्ते का पडले नाहीत याबाबत जाब विचारला. सदर हप्ते तातडीने बँक खात्यात जमा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 3:02 pm

१५ जानेवारीला राज्यात शासकीय सुटी; शाळाही राहणार बंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी. १५ जानेवारी रोजी मुंबई, ठाण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ‘भरपगारी सुटी’ जाहीर केली आहे. खासगी कंपन्या, आयटी पार्क्स आणि मॉलमधील कर्मचा-यांनाही हा नियम लागू असेल. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सुटी न देणा-या आस्थापनांवर कडक कारवाईचा इशारा उद्योग आणि कामगार […] The post १५ जानेवारीला राज्यात शासकीय सुटी; शाळाही राहणार बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 2:59 pm

महाड हिंसाचार प्रकरण:मुलगा फरार नाही, माझे त्याच्याशी बोलणे सुरू आहे; भरत गोगावलेंची कबुली; अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाद

रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर पोलिसांनी विकाससह 29 जणांवर गुन्हे दाखल केले असून तो पोलिस दप्तरी 'फरार' आहे. मात्र, मुलगा फरार नसून मी त्याच्या संपर्कात आहे, अशी जाहीर कबुली स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी तुळजापूर येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे मंत्र्यांच्या दबावाखाली पोलिस यंत्रणा काम करत आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपरिषदेच्या मतदानावेळी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. या हाणामारीत विकास गोगावले यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच विकास गोगावले भूमिगत झाला. स्थानिक न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने तो सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. तुळजाभवानीच्या दरबारात गोगावलेंची कबुली धाराशिव दौऱ्यावर असताना भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझा मुलगा फरार नाही, माझे त्याच्याशी नियमित बोलणे सुरू आहे. आम्ही अटकपूर्व जामिनासाठी आधी प्रयत्न केले होते, मात्र ते फेटाळले गेले. आता आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. जर सुप्रीम कोर्टानेही जामीन दिला नाही, तर आम्ही त्याला स्वतःहून पोलिसात हजर करू, असे भरत गोगावले म्हणाले. प्रशासनावर दबावाचा आरोप? पोलिस दप्तरी जो आरोपी 'फरार' म्हणून नोंदवला गेला आहे, तो जर मंत्र्यांच्या संपर्कात असेल, तर पोलिस त्याला अटक का करत नाहीत? असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मंत्र्याचा मुलगा कुठे लपला आहे हे 24 दिवस पोलिसांना माहित नाही, पण वडिलांना माहित आहे; हे पोलिसांचे अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचा दबाव? असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. नेमके प्रकरण काय? महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 2 मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाड पोलिस ठाण्यात विकास गोगावले यांच्यासह एकूण 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी भूमिगत झाले आणि आजपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 2:57 pm

राज्य मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय:अंबादेवी संस्थानाला चिखलदऱ्यात मोठी जमीन मंजूर; चिखलदऱ्यात धार्मिक विकासाला चालना; एमटीडीसीची जमीन वर्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभागाशी संबंधित या एकमेव निर्णयानुसार, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा तालुक्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची, एमटीडीसीची 3 एकर 8 आर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन आणि देवस्थान विकासाला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. चिखलदरा येथील ही जमीन मूळत: 1975 साली पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली होती. मात्र, अनेक दशकांनंतरही सुमारे साडे सात एकर क्षेत्रातील ही जमीन वापरात न आल्याने ती पडून होती. शासनाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या जमिनीचा उपयुक्त वापर व्हावा, यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यात येत होता. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाकडे चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या दोन्ही देवस्थानांचा विकास, सुविधा विस्तार आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानाने शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. देवस्थान विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जागेचा अभाव असल्याने ही मागणी करण्यात आली होती. संस्थानाच्या या मागणीला मंत्रिमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निर्णयानुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे 3 एकर 8 आर जमीन शासनाकडे जमा करून घेण्यात येणार असून, ती श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य देण्यात येईल. ही जमीन भोगवटादार वर्ग–2 या स्वरूपात संस्थानाला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या जमिनीचा वापर केवळ धार्मिक प्रयोजनांसाठीच करता येणार असून, कोणत्याही व्यावसायिक किंवा अन्य कारणांसाठी वापर करण्यास मनाई राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयामुळे चिखलदरा परिसरातील धार्मिक स्थळांच्या विकासाला गती मिळेल, तसेच श्रद्धाळू आणि पर्यटकांसाठी सुविधा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यटनासाठी वापरात न आलेली जमीन आता धार्मिक विकासासाठी वापरात येणार असल्याने, स्थानिक पातळीवर रोजगार आणि पर्यटनालाही अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 2:39 pm

NCP च्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू:मीरा भाईंदर येथील घटना; शिंदे गटाने आईला मुखाग्नि देणाऱ्याला स्मशानभूमीतच दिला एबी फॉर्म

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीरा - भाईंदर येथील एका उमेदवाराचा निवडणुकीच्या धावपळीत हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आईला मुखाग्नि देणाऱ्या एका उमेदवाराला स्मशानभूमीतच पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची घटना घडली आहे. या घटनेची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. यासाठी मंगळवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यासाठी सर्वच उमेदवाराची चांगलीच दमछाक झाली. मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावेद पठाण (66) यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग क्रमांक 22 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास शहरातील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अजित पवारांनी व्यक्त केले दुःख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावेद पठाण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. जनसेवेचं ध्येय मनी बाळगणाऱ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्याचं असं निघून जाणं मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. मात्र काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मी जावेद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शिंदे गटाने स्मशानभूमीतच दिला एबी फॉर्म दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेने निवडणुकीच्या रणधुमाळीत मृत्यू झालेल्या आईला मुखाग्नि देणाऱ्या एका उमेदवाराला स्मशानभूमीतच पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची घटना नागपुरात घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शिवसेनेने नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून योगेश गोन्नाडे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी गोन्नाडे यांच्या आईचे आईचे निधन झाले. मंगळवारी नागपूर येथील एका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत होती. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते थेट स्मशानभूमीत गेले आणि त्यांनी गोन्नाडे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. त्यानंतर योगेश गोन्नाडे यांनी तातडीने निवडणूक कार्यालय गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते चांगलेच भावुक झाले. शिंदे गटाने योगेश यांची कन्या कृतिका गोन्नाडे यांनाही प्रभाग क्रमांक 8 मधून पक्षाची उमेदवारी दिली आहे. तेजस्वी घोसाळकरांना भाजपतून विरोध दुसरीकडे, भाजपने मुंबई महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत मोठा असंतोष पसरला आहे. एका इच्छुक महिला उमेदवाराने यासंबंधी तेजस्वी घोसाळकर यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे व्यासपीठावरूनच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. पण कार्यकर्ता काय असतो? मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मी बोलणार. मी कुणालाही शिवीगाळ किंवा दादागिरी करत नाही. केवळ मनातील भावना व्यक्त करत आहे. भाजपने आमच्याकडून फॉर्म भरून घेण्याची खोटी कारवाई केली, असे या उमेदवाराने म्हटले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 2:35 pm

वर्ध्यात वाघाचा मृतदेह कॅनलच्या पाण्यात आढळला:वनविभागाच्या दुर्लक्षावर सवाल, मृत्यू की शिकार; शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुडपाड परिसरात कॅनलच्या पाण्यात पट्टेदार वाघाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. कॅनलमध्ये पाण्यात तरंगत असलेला वाघाचा मृतदेह पाहून शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाचा परिसर सील करून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर बाह्य जखमा स्पष्टपणे दिसून न आल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार अथवा विजेचा धक्का, विषबाधा किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वन्यजीव जंगल सोडून पाण्यासाठी किंवा भक्ष्यासाठी मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जंगलातील पाणी, खाद्यसाखळी आणि अधिवासाची योग्य व्यवस्था न झाल्यास अशा घटना वाढण्याची शक्यता असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, तसेच परिसरात गस्त वाढवण्यात येईल, असे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 2:00 pm

पुण्यातील युतीचा निर्णय 'शिंदे-फडणवीस' घेतील:स्थानिक नेत्यांची विधाने अधिकृत मानू नका - उदय सामंत; कृपाशंकर सिंगांच्या विधानाचाही घेतला समाचार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप युतीबाबत कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्माण झालेला भाजप-शिवसेना युतीचा पेच आणि मुंबईच्या महापौराबाबत भाजप नेत्यांकडून होणारी विधाने यावर मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. पुण्यामध्ये युती असल्याचे उदय सामंत काल म्हणाले होते. तर आम्ही अर्ज मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा रवींद्र धंगेकर यांनी घेतला आहे. यावर उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, धंगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्त नाही. ते महानगरप्रमुख आहेत. काल मी एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने पुण्यात गेलो होतो. त्यावेळी मी धंगेकर आणि नीलम गोरे यांच्याशी चर्चा केलेली आहे. फॉर्म ठेवायचा की नाही, यासंदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने मला देखील दिलेले नाहीत. त्यामुळे पुण्याच्या संदर्भात आमची सगळ्यांची एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल. स्थानिक नेत्यांच्या विधाने अधिकृत मानू नका उदय सामंत म्हणाले की, मी काल पुण्यातही सांगितले की, युती तुटली ही एका महानगरपालिकेची बातमी महाराष्ट्रभर होऊन उपयोग नाही. आज आम्ही युती म्हणून सरकारमध्ये काम करतोय. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या रोषामुळे, माध्यमांमध्ये केली जाणारी वक्तव्ये अधिकृत मानू नये. ज्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने भूमिका स्पष्ट करतील, तीच भूमिका पक्षाची असल्याची मानावी. यशस्वी युतीची चर्चा करा, वादाची नको पुण्यातील वादावरच चर्चा होत असल्याबद्दल उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. युती तुटली ही एका शहराची बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरवून उपयोग नाही. आपण सकारात्मक बाजूही पाहिली पाहिजे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पनवेल, कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती यशस्वी झाली आहे, असे उदय सामंत म्हणालेत. कृपाशंकर सिंगांच्या विधानाचा तीव्र विरोध उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणा म्हणजे उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मिरा-भाईंदरमध्ये केले होते. यावर सामंत यांनी कडक भाषेत प्रतिक्रिया दिली. भाजपमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंग यांना दिले असतील असे मला वाटत नाही. मुंबईचा किंवा कोणत्याही पालिकेचा महापौर कोण असावा, याचे धोरण कृपाशंकर सिंग ठरवू शकत नाहीत. त्याचा निर्णय महायुतीतील सर्व प्रमुख नेते चर्चा करूनच घेतील, असे सांगत त्यांनी हे विधान फेटाळून लावले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 1:52 pm

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा भगवा हिरवा केला:भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप; मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाल्याचा दावा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. भाजप मुस्लिम मुंबई करण्याचे कारस्थान केव्हाही यशस्वी होऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी बाकावरील राजकीय पक्षांत सातत्याने चिखलफेक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे ठाकरे बंधू विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाली आहे. किरीट सोमय्या किंवा अमित शहा यांचा नव्हे तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा हा रिपोर्ट आहे. 2025 मध्ये हिंदू लोकसंख्या 54 टक्क्यांखाली व मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांवर जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर 1.3 टक्के, तर मुस्लिमांचा जन्मदर 2.6 टक्के म्हणजे दुप्पट आहे. ठाकरे बंधूंचे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कारस्थान उद्धव ठाकरेंचा सहकारी एमआयएम पक्ष म्हणतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखाधारी व्हावा. हे आमचे लक्ष्य आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यावर एक शब्दही बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यावरही ते चकार शब्द बोलत नाहीत. मुंबईतून माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात. त्यामुळे एमआयएम, उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कटकारस्थान रचत असतील. पण महायुती त्यांचे कट कारस्थान कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, सध्या मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आलेत. ते मुंबई ही मराठी माणसांची असल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मुस्लिम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभाग घेतात. माझ्याकडे जनगणनेची आकडेवारी आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा मुंबईत मुस्लिम लोकसंख्या 8.8 टक्के होती. 2011 मध्ये हा आकडा 20.68 टक्क्यांवर पोहोचला. 2025 मध्ये हा आकडा 24.98 टक्क्यांवर पोहोचला. मुस्लिम जन्मदर झपाट्याने वाढत आहे. गत काही वर्षांत बांगलादेशींचे आक्रमण वाढले आहे. जगातील राजधानीच्या मोठ्या शहरांत असेच षडयंत्र सुरू आहे. लंडन व न्यूयॉर्कचा महापौर पाहा. बल्गेरियातही तेच सुरू आहे. बांगलादेशात हिंदूंना मारले जात आहे आणि इथे बांगलादेशींना घुसवले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व मुंबई महापालिकेला अधिक जागरूक रहावे लागेल. 2026 माझी बांगलादेशी घुसखोरावर बारीक नजर असेल, असे ते म्हणाले. ठाकरेंनी मुस्लिमांपुढे शरणागती स्वीकारली सोमय्या म्हणाले, गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी व्होट जिहाद केला. त्यांनी धारावीत 25 हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशिदींसाठी पुढाकार घेतला. बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या हिंदुत्त्वामुळे 1992 मध्ये मुंबई वाचली. पण उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांपुढे सपशेल शरणागती स्वीकारली. उत्तर भारतीय असो, गुजराती असो, राजस्थानी असो, हिंदू हा हिंदूच आहे. पण उद्धव ठाकरेंना मुंबईचा महापौर नाही तर महापालिकेतील माफिया कंत्राटदारांवर त्यांचे नेतृत्व हवे आहे. याऊलट भाजपचे लक्ष मुंबईच्या विकासावर आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 1:50 pm

धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासकामांमध्ये तसेच धोरणनिर्मितीमध्ये सुसूत्रता राहावी,या उद्देशाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.केंद्र शासनाची ‘उडान’ योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण केंद्र शासनासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहते,तर राज्यात ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा […] The post धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 1:43 pm

मुंबईचा उत्तर भारतीय महापौर होईल:भाजप नेते कृपाशंकर सिंहांचे वक्तव्य; मराठी माणसा जागा हो, म्हणत मनसेचा पलटवार

मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण मुंबई, मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांना विरोध करूनच सुरुवात झाले. उत्तर भारतीयांना अनेकदा या पक्षांनी वेगवेगळी कारणे पुढे करत मारझोडही केली. आता ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा मुद्दा मुंबईत पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी माणसा जागा हो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृपाशंकर सिंहाना उत्तर दिले आहे. नेमके प्रकरण काय? कृपाशंकर सिंह यांनी विशेषतः मीरा-भाईंदर महानगरपालिकेबाबत मोठा दावा केला आहे. उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौरपदावर बसवण्यासाठी आवश्यक तेवढे नगरसेवक निवडून आणले जातील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. उत्तर भारतीय मतदारांची संख्या आणि त्यांचा राजकीय सहभाग लक्षात घेता, हा समाज निर्णायक ठरू शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करून महापौरपदापर्यंत मजल मारण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राबाबत अंदाज कृपाशंकर सिंह यांनी केवळ एका महानगरपालिकेपुरता मुद्दा न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्राबाबत भाकीत केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा ठाम दावा त्यांनी केला. या विधानामुळे महायुतीकडून निवडणुकांची तयारी जोरात सुरू असल्याचे संकेत मिळतात. विशेषतः मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदरसारख्या शहरी भागांमध्ये सत्ता मिळवण्याचा निर्धार महायुतीने केल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट होते. निवडणूक रणनीतीचा भाग महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांची एकत्रित ताकद आणि विविध समाजघटकांवर असलेली पकड लक्षात घेता, सिंह यांचे विधान केवळ राजकीय घोषणा नसून निवडणूक रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना राजकीय प्रतिनिधित्वाची भावना देण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू दरम्यान, कृपाशंकर सिंह यांच्या या विधानामुळे मुंबई आणि राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या प्रभावाखाली असलेल्या मुंबईत उत्तर भारतीय महापौराचा दावा केल्याने आगामी निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीची ही भूमिका प्रत्यक्ष निवडणुकांत कितपत प्रभावी ठरते, आणि उत्तर भारतीय मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच या वक्तव्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेचे प्रत्युत्तर कृपाशंकर सिंह यांच्या या विधानावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील प्रत्यत्तर दिले आहे. या संदर्भात मनसेने म्हटले की, मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल... हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं... चरितार्थासाठी आलेल्या, उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय नाचायला सुरुवात केली आहे. मराठी माणसा आतातरी जागा हो..!

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 1:30 pm

संभाजीनगर भाजपमधील गोंधळात संजय केणेकरांची मध्यस्थी:रडणाऱ्या कार्यकर्त्याला कुरवाळले; 'सी-फॉर्म' आणि सत्तेत पदे देण्याचे आश्वासन

महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. सावेंच्या गाडीला काळं फासणे आणि कराडांची गाडी रोखून धरल्याने निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी अखेर आमदार संजय केणेकर रिंगणात उतरले. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची आर्त हाक ऐकून घेत त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला. भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाबाहेर आज दुपारी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. नेते आणि कार्यकर्त्यांमधील संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच संजय केणेकर तेथे दाखल झाले. केणेकरांना पाहताच वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला. भाऊ, आम्ही काय गुन्हा केला? आम्हाला का डावलले? अशी विचारणा करत कार्यकर्ते केणेकरांच्या गळ्यात पडून रडू लागले. प्रशांत भदाणे यांना 'सी-फॉर्म'चा शब्द या आंदोलनात सर्वात जास्त संतापलेला निष्ठावंत कार्यकर्ता प्रशांत भदाणे याला केणेकर यांनी जवळ घेतले. भदाणे यांना अश्रू अनावर झाले होते. मी कुठे कमी पडलो? अशी विचारणा भदाणे यांनी संजय केणेकरांना केली. यावर तू चिंता नको करू, मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी तुझ्यासाठी 'सी-फॉर्म' (C-Form) प्राप्त करतो, तू आता शांत हो, असे आश्वासन संजय केणेकर यांनी प्रशांत भदाणे यांना दिले. एकाचवेळी सगळ्यांना न्याय देता येत नाही - केणेकर यानंतर संजय केणेकर यांनी माध्यमांश संवाद साधला. ते म्हणाले, पक्ष एकाचवेळी सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. वर्षानुवर्षे, एकनिष्ठपणे कार्यकर्ता काम करत असतो. त्यामुळे कार्यकर्त्याच्या संतापाचा अनावर होणे सहाजिकच आहे. भाजपचे संस्कार आहेत. ३८ वर्षांपासून मी पक्षात काम करतोय. संयम बाळगणे, समजूतदारपणा घेणे आपल्या संस्कृतीत आहे. नाराजांची 'सरकार'मध्ये सोय करणार? काही कार्यकर्ते १० वर्षांपासून समर्पितपणे काम करत आहेत, त्यामुळे त्यांचा संताप अनावर होणे सहाजिकच आहे. परंतु, त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललो आहे. ज्यांना ज्यांना पक्ष संधी देऊ शकला नाही, त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वॉर्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे. आपले सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या पोझिशनमध्ये या सरकारमध्ये बसवण्याचे काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू, असेही केणेकर म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 1:11 pm

नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज!

मुंबई : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे वातावरणही आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई, पुणे, नागपूर यांसह बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. […] The post नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 1:11 pm

भाजपचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षाची उदयनराजेंकडून गळाभेट:डोळ्यात पाणी, मित्रासाठी पक्षभेद बाजूला; राजकीय चर्चा

सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेतील सत्तास्थापनेनंतर एक भावनिक आणि तितकाच राजकीय अर्थ लावला जाणारा प्रसंग मध्यरात्री पाहायला मिळाला. भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची घेतलेली गळाभेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे राजेंद्रसिंह यादव हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते असून त्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तरीही उदयनराजेंनी वैयक्तिक मैत्रीपोटी घेतलेली ही भेट आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून ओघळलेले आनंदाश्रू अनेक राजकीय संकेत देणारे मानले जात आहेत. कराड नगरपालिकेत शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या युतीने सत्ता स्थापन केली असून राजेंद्रसिंह यादव यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. या विजयानंतर मध्यरात्री उदयनराजे भोसले थेट यादव यांच्या भेटीसाठी पोहोचले. गळाभेट घेताच उदयनराजेंना भावना आवरता आल्या नाहीत. पार्टी पाहिजे, पार्टी, असे मिश्कील शब्द उच्चारत मित्राला शुभेच्छा देताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू स्पष्टपणे दिसत होते. हा क्षण उपस्थितांसाठी अनपेक्षित आणि भावूक करणारा ठरला. राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव हे दोघेही उदयनराजे भोसले यांचे जुने मित्र असल्याची माहिती आहे. वैयक्तिक मैत्रीचे नाते जरी घट्ट असले, तरी याच नगरपालिकेच्या निवडणुकीत यादव बंधू आणि भाजप आमनेसामने होते. त्यामुळेच या निवडणूक प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले मुद्दामहून लांब राहिले होते. पक्षीय भूमिका आणि वैयक्तिक संबंध यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे बोलले जात होते. मात्र निकालानंतर मित्र नगराध्यक्ष झाल्याचे कळताच उदयनराजेंनी कोणताही राजकीय विचार न करता थेट भेट घेतल्याचे चित्र समोर आले. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने नगराध्यक्षपद पटकावल्यानंतर, भाजप खासदाराने त्याची गळाभेट घेणे हा केवळ भावनिक क्षण नसून त्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारणात उदयनराजे भोसले यांचे वजन मोठे आहे. अशा परिस्थितीत ही भेट केवळ वैयक्तिक मैत्रीपुरती मर्यादित आहे की त्यामागे भविष्यातील काही राजकीय संकेत दडले आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या भेटीदरम्यान उदयनराजेंनी राजेंद्रसिंह यादव यांचे मनापासून अभिनंदन केल्याचे सांगितले जाते. मित्राच्या यशाचा आनंद व्यक्त करताना त्यांनी कोणताही पक्षीय रोख न ठेवता मोकळेपणाने संवाद साधल्याचे उपस्थितांनी सांगितले. मित्र जिंकला, एवढंच महत्त्वाचं आहे, अशी भावना त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत होती. निवडणुकीच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळणारा हा भावनिक क्षण असल्याने तो अधिकच लक्षवेधी ठरला. दरम्यान, या गळाभेटीनंतर साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत असतानाही उदयनराजेंनी घेतलेली ही भूमिका अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. आगामी स्थानिक राजकारणात या मैत्रीचे प्रतिबिंब कसे उमटते, आणि याचा कोणता राजकीय परिणाम होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी मित्र नगराध्यक्ष झाल्याचा आनंद, हीच या भेटीची अधिकृत ओळख असली, तरी राजकारणात अशा भेटी कधीच केवळ भावनिक राहत नाहीत, हेही तितकेच खरे आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 12:53 pm

भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलल्याने राडा:विजय वडेट्टीवारांचा दावा; काँग्रेसमध्येही उपरे लोक घेतल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली

भाजपने निष्ठावंतांना डावलून उपऱ्या लोकांना तिकीट दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या संयमाचा उद्रेक झाल्याची भावना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केली आहे. भाजपचे सध्याचे धोरण वापरा व फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात इच्छुक उमेदवारांचा आक्रोश दिसून येत आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आमच्या पक्षातही काही ठिकाणी उपरे लोक घेतल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली दिली. महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू झालेला गृहकलह आता जवळपास नियंत्रणाबाहेर गेला आहे. मंगळवारी रात्री भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयापुढे संतप्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घाला. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची गाडी रोखून धरली. तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी प्रशांत भदाने नामक इच्छुक उमेदवाराने आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी सावे व कराड यांनी पोलिस संरक्षणात तेथून काढता पाय घेतला. भाजपमध्ये राडा तर होणारच या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या अंतर्गत कलहावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजमध्ये राडा तर होणारच आहे. कारण, सर्वच पक्षांमध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरे लोकं घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याची ओरड होत आहे. निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची चर्चा जोरात आहे. त्यातून हा उद्रेक झाला आहे. खरे तर भाजपचे धोरण वापरा आणि फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात जो आक्रोश दिसत आहे, तो बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे होत आहे. पूर्वी काँग्रेसची जी स्थिती होती ती स्थिती आता भाजपची झाली आहे. ते पुढे म्हणाले, संभाजीनगरमध्ये भाजप - शिवसेनेची युती होण्याचे शेवटपर्यंत संकेत होते. पण काल त्यांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांना जागा देण्याचा स्कोप होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. सध्या जे वातावरण तयार झाले ते त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला त्यावर अधिक भाष्य करणे चुकीचे वाटते. पण एक गोष्ट नक्की आहे की, काँग्रेस वैचारिक दृष्टिकोनातून लढत आहे, तर भाजप हा सत्ता मिळवण्यासाठी निष्ठा बाजूला ठेवून निवडणूक लढवत आहे व त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी तिकीट वाटप केले हे स्पष्ट होते, असे वडेट्टीवार म्हणाले. काय म्हणाले भाजपचे इच्छुक उमेदवार? भाजपचे इच्छुक उमेदवार प्रशांत भदाने आपल्या पक्षावर संताप व्यक्त करताना म्हणाले की, मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो. रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला. मला अंधारात ठेवले गेले. आता मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 12:48 pm

नवीन वर्षाची सुरुवात अन् शेवटही गुरुवारनेच:हिंदूंसह जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख आणि मुस्लिम धर्मातही गुरुवारचे महत्त्व‎; 100 वर्षांत 2026 ला 13व्यांदा शुभ संयोग

नवीन वर्षाची सुरुवात आणि शेवट ‎गुरुवारने होणे हे बृहस्पती ग्रहाच्या‎ प्रभावामुळे शुभ मानले जाते. हिंदू‎नववर्षाचा शुभारंभ १९ मार्च (चैत्र)‎२०२६ रोजी गुरुवारनेच तर इंग्रजी ‎नवीन वर्षाचा शुभारंभ १ जानेवारी‎ २०२६ रोजी गुरुवारनेच होत आहे. ‎२०१५ नंतर म्हणजेच १० वर्षांनी असा‎योग जुळून आला आहे. गुरुवार हा‎भगवान विष्णू, गुरू व ज्ञान-समृद्धी‎यांना समर्पित आहे. तसेच गुरुवारी‎ सुरू होणारे नववर्ष ज्ञान, धर्म व‎ आर्थिक स्थिरतेचे सूचक मानले ‎जाते. अंकशास्त्रानुसार विचार केला‎तर २०२६ या वर्षाच्या आकड‌्यांची‎ बेरीज (२+०+२+६) १० येते. ‎म्हणजे या वर्षाचा मुलांक १ असेल.‎ १ क्रमांक हा नेतृत्वगुण दर्शवतो.‎ अंकशास्त्रानुसार १ या क्रमांकाचा‎अधिपती सूर्यदेव असतो. ज्योतिष‎शास्त्रानुसार, सूर्य हा ऊर्जेचा सर्वात‎मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे आगामी‎नवीन वर्ष देश व समाजाला नवीन‎ ऊर्जा देणारे ठरेल, अशी आशा‎ देखील आहे.‎ मंगळ व शनी ग्रहाच्या योगामुळे ‎काही नैसर्गिक व रस्ते‎ अपघातासारख्या दुर्घटनांचे संकटही‎ ओढावू शकते. ज्योतिषाचार्यांच्या‎मते हे नवीन वर्ष देशाच्या प्रगतीसाठी ‎महत्त्वाचे ठरेल. आंतरराष्ट्रीय ‎व्यापारी संबंध मजबूत होतील.‎ यातून देशाचा मान वाढेल. मार्च‎महिन्यात गुरू जेव्हा मिथुन राशीत‎थेट प्रवेश करेल तेव्हा उद्योग,‎ व्यापार व शिक्षण क्षेत्राला लाभ‎मिळू शकेल. पूर्व व उत्तरेत कृषी व‎व्यवसायाच्या संधी वाढतील. शनी‎व राहूच्या प्रभावामुळे शेअर‎ बाजारातही तेजी येण्याची आशा‎आहे. सध्या दिवसेंदिवस महाग होत‎चाललेल्या चांदीचे दर नवीन वर्षात‎काही प्रमाणात कमी होऊ शकतात.‎मंगळाच्या प्रभावामुळे भूखंड व ‎रिअल इस्टेटमध्ये खरेदीचे प्रमाण‎वाढेल. नवीन वर्षाची सुरुवात ‎गुरुवारने होण्याचा १०० वर्षांतील हा ‎१३ वा योग आहे. गुरुवारने‎ नववर्षाची सुरुवात होणे हिंदूच नाही‎तर जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख,‎ मुस्लिम धर्मातही आस्था, ज्ञान, दान‎व शुभकार्याचे प्रतीक मानले गेले ‎असल्याचे ज्योतिष-पुरोहितांनी‎‘दिव्य मराठी’ला सांगितले.‎ दिव्य मराठी नॉलेज‎ - १ ते ९ मूल्यांक असणाऱ्यांवर परिणाम‎ १ कार्यक्षेत्रात प्रगती,‎मान- सन्मान वाढेल.‎ २ धार्मिक क्षेत्रातील‎लोकांशी भेटीगाठी‎वाढतील. भाग्याचे योग.‎ ३ सामाजिक प्रतिष्ठा‎वाढेल. प्रवासाचे योग.‎ ४ कार्यक्षेत्रात अडचणी‎येतील, खर्चही वाढेल.‎ ५ कुटुंबीय, स्वकीयांच्या‎मदतीने अपूर्ण राहिलेले‎कार्य पूर्ण होतील.‎ ६ गुप्त शत्रूंपासून‎ सावधान राहणे गरजेचे.‎ ७ जागा आणि वास्तू‎खरेदीचे योग येतील.‎ नवीन खरेदीला प्राध्यान.‎ ८ भागीदारांसोबत ‎कुरबुरींमुळे व्यवसायात ‎अडचणी येऊ शकतात.‎ ९ बुद्धिचातुर्यामुळे नवीन‎कार्यात यश मिळेल.‎धनप्राप्तीचे यंदा चांगले‎ योग येणार आहे.‎ सर्व धर्मात असे आहे गुरुवारचे महत्त्व‎ जैन : जैन परंपरेत हा‎दिवस गुरुवंदना, ज्ञान,‎ स्वाध्याय, संयमाशी ‎जोडलेला आहे. अनेकदा‎गुरुवारी धर्मप्रवचन, शास्त्र‎ अध्ययन होते.‎ बौद्ध : गुरुवार ध्यान,‎करुणा व प्रज्ञा याचे प्रतीक‎मानले जाते. या दिवशी‎बौद्ध विहारात धम्मदेसना,‎ध्यान सत्र व प्रार्थना होते.‎ शीख : शीख धर्मात‎गुरुवारला गुरू परंपरा व‎ज्ञानाशी संबंधित दिवस‎मानला जातो.‎ मुस्लिम : मुस्लिम‎बांधवात गुरुवार‎(जुमेरात)ला पूर्वजांच्या‎कबरीवर फातेहा‎(प्रार्थना) म्हणतात.‎तसेच त्यांच्या आठवणीत‎दानही देतात.‎ ख्रिश्चन : ख्रिश्चन‎धर्मात गुरुवार हा मॉडी‎थर्सडे (होली थर्सडे) चे‎विशेष महत्त्व आहे. हा‎दिवस येशूंच्या अंतिम‎भोजनाशी संबंधित आहे.‎या दिवशी सेवाकार्याला‎अधिक प्राधान्य देतात. पहिल्याच दिवशी चतुर्ग्रही योग, कुंडलीत सूर्य-मंगळ फलदायी‎ ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार,‎नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्य धनू‎राशीत आणि मंगळ, बुध व शुक्राचे‎चतुर्ग्रही योग आहेत. जेव्हा एकाच राशीत‎चार ग्रह एकत्र येतात तेव्हा तयार होणारी‎शक्तिशाली ग्रहस्थिती म्हणजे चतुर्ग्रही‎योग. सूर्य- चंद्राच्या प्रभावामुळे देश‎प्रगतिपथावर जाईल. लष्कराचे शौर्य‎वाढेल व खेळांतही देशाचा नावलौकिक‎वाढेल. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य व‎मंगळाची स्थिती चांगली आहे, त्यांना‎विशेष लाभ मिळू शकेल.‎ आता पुढील गुरुवारचा संयोग हा २०४३ वर्षालाच येणार‎ सन १९२६ ते २०२५ या १०० वर्षांत‎ आतापर्यंत १२ वेळा वर्षाची सुरुवात‎गुरुवारने झाली आहे. यात १९३१,‎१९४२, १९५३, १९५९, १९७०, १९७६,‎१९८१, १९८७, १९९८, २००४, २००९ व‎१०१५ या वर्षात नवीन वर्षाचा पहिला‎दिवस गुरुवारी आला होता. २०२६‎या वर्षानंतर आता नवीन वर्षाची‎गुरुवारने सुरुवात होण्याचा संयोग हा‎२०४३ मध्ये येईल. यंदाच्या २०२६‎मध्ये आलेला गुरुवारचा योग हा ‎खूपच फलदायी असा आहे.‎ दिव्य मराठी एक्सपर्ट‎- विनोद त्रिपाठी, ज्योतिष तज्ज्ञ‎ गुढीपाडवा शालिवाहन शकाचा प्रारंभ‎दिवस, तो ७८ इसवी सनात सुरू झाला‎ इंग्रजी वर्ष २०२६ आणि भारतीय वर्ष शके १९४८ ची‎सुरुवात गुरुवारी आहे. हा योग अतिशय दुर्मीळ असून, हे‎वर्ष सर्वांसाठी लाभप्रद आहे. गुढीपाडवा हा शालिवाहन‎शकाचा प्रारंभ दिवस आहे, जो सुमारे ७८ इसवी सनात‎सुरू झाला तर विक्रम संवत याच दिवशी सुरू होते; हे‎दोन्ही विक्रम (शालिवाहन शक आणि विक्रम संवत)‎हिंदू कालगणनेतील महत्त्वाचे संवत्सर आहेत.‎गुढीपाडवा हा चैत्र शुक्ल प्रतिपदेला येणारा मराठी व हिंदू‎नववर्षाचा पहिला दिवस असतो. त्यामुळे तो जल्लोषातसाजरा करण्याची प्रथा देखील आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 12:17 pm

ठाकरे गटाने मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला:भाजपचा आरोप; काँग्रेसने वंचितचे जे केले तेच उद्धव यांनी राज ठाकरेंचे केल्याचा दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू व मनसेची युती झाली आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे. काँग्रेसने वंचित सोबत जे केले तेच उद्धव यांनी राजसोबत केले भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी म्हणाले की, आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे. पडेल जागा देत काँग्रेसने मुंबईत वंचितशी आघाडी केली, तर किरकोळ जागा देत उबाठाने मनसेला गुंडाळलं. सन्मानाच्या नावाखाली बोलावणं, वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारण… ठाकरे ब्रॅन्डच्या घोषणा करण हे सगळं उबाठा ने केलं, पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम ५० जागांवर समाधान मानायला लावलं. यालाच आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचा 2019 नंतर भाजप विरोध हाच केंद्रबिंदू केशव उपाध्ये यांनी नुकतीच एका लेखातूनही उद्धव व राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून आजवर एकदाही महाराष्ट्राचा व मुंबईचा विकास करण्यासंदर्भातील आपल्या दृष्टिकोनाचा एकदाही परिचय करून दिलेला नाही. 2019 नंतर त्यांनी आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू भाजपच्या विरोधात स्थिर करताना काँग्रेस, शरद पवार, कम्युनिस्ट, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल अशा राष्ट्रीय राजकारणातील म्होरक्यांबरोबर पाट लावला. उद्धव ठाकरेंना सक्रिय राजकारणात येऊन 25 वर्षे होऊन गेली आहेत. या काळात मुंबई महापालिका ताब्यात ठेवताना आणि अडीच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना उद्धव ठाकरेंना मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणसाच्या कल्याणाचे काहीच देणे-घेणे नाही, हे अनेकदा दिसले आहे, असे ते म्हणाले होते. ते पुढे म्हणाले होते, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपणच घरातून बाहेर काढलेल्या चुलत-मावस भावाची आठवण झाली. ज्या मनसेची संपलेला पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी हेटाळणी केली होती, त्याच राज ठाकरेंच्या दारात जाण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली. आता मनोमिलनानंतरही ठाकरे बंधू मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, यासारख्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या मुद्यावरच बोलू लागले आहेत. मुंबापुरीचा विस्तार होत असताना मुंबईकरांपुढे दररोजच्या जगण्यातील हजारो प्रश्न तयार झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, याविषयी गांभीर्याने बोलण्याऐवजी ठाकरे बंधू पुन्हा मुंबई, मराठी या भावनात्मक विषयामध्ये मराठी मतदाराला गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 12:13 pm

संभाजीनगर सलग दुसऱ्या दिवशी 'राडा':भागवत कराडांच्या गाडीला कार्यकर्त्यांचा घेराव, निष्ठावंतांचा बळी दिल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी

महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडाळीचा वणवा पेटला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आज भाजप कार्यालयात आले असता, संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी अनेक जुन्या नगरसेवकांचे आणि दिग्गजांचे पत्ते कट केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आज सकाळी डॉ. भागवत कराड आज सकाळी प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी भाजप कार्यालयात पोहोचले. मात्र, तेथे आधीच जमलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला वेढा घातला. कार्यकर्त्यांचा संताप इतका अनावर झाला होता की, काहींनी कराडांच्या गाडीवर हात मारत आपला संताप व्यक्त केला. निष्ठावंतांना डावलल्याचा गंभीर आरोप ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, आंदोलने केली आणि पक्षाला शहरात मोठे केले, त्यांनाच आज उमेदवारी नाकारण्यात आली आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून तिथे नवख्या किंवा बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याने निष्ठावंतांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. कालही दिव्या मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी असाच पवित्रा घेतला होता, आज दुसऱ्या दिवशी हा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 12:08 pm

मुंबईत 'वंचित बहुजन आघाडी'मुळे काँग्रेससमोर मोठा पेच:आता बंडखोरांना पाठिंबा देण्याची नामुष्की, नेमके काय घडले?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. यंदा भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युती टिकवण्यासाठी मोठे मन दाखवत वंचितला 62 जागा देऊ केल्या होत्या. मात्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर समोर आलेल्या माहितीने काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. वंचितला दिलेल्या 62 जागांपैकी तब्बल 16 जागांवर पक्षाने उमेदवारच उभे केलेले नाहीत. त्यामुळे आता काँग्रेससमोर मोठी नामुष्की ओढावली आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून 62 जागा मागून घेतल्या. मात्र, मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितने 62 जागांच्या कोट्यापैकी केवळ 46 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. उर्वरित 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नसल्याची चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे उमेदवार नाहीत याची पुसटशी कल्पनाही वंचितने काँग्रेसला दिली नाही. जर काँग्रेसला वेळीच माहिती मिळाली असती, तर त्यांनी त्या 16 जागांवर आपले प्रबळ उमेदवार उभे केले असते. मात्र, मुदत संपल्यानंतर ही बाब समोर आल्याने काँग्रेसला आता तिथे 'एबी' फॉर्म देता येणे अशक्य झाले. आता बंडखोरांना पाठिंबा देण्याची नामुष्की ज्या 16 जागांवर वंचितने उमेदवार दिलेले नाहीत, त्यातील अनेक प्रभागांत काँग्रेसची ताकद चांगली आहे. युतीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे मन करत, या जागा वंचितला सोडल्या होत्या. आता या जागांवर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने, पक्षाला तिथे बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिलेल्या स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाच पाठिंबा देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाईल. मुंबईत वंचितने दिलेल्या या अनपेक्षित धक्क्यामुळे काँग्रेसच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत असून, आगामी प्रचाराच्या काळात या युतीचे भवितव्य काय असेल? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 1999 नंतर काँग्रेसचा सर्वाधिक जागांवर लढणार जागावाटपातील हा गोंधळ सोडला तर, काँग्रेसने यंदा राज्यात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस महापालिका निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वबळावर आणि आघाडी करून मैदानात उतरली आहे. काँग्रेस कोणत्या शहरात किती जागा लढवत आहे? काँग्रेसचा स्वबळाचा नारा कोणत्या शहरांत? नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या महापालिकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तर लातूर महानगरपालिका निवडणुकीत 5 जागा वंचितला सोडण्यात आल्या असून बाकी सर्व जागा काँग्रेस लढत आहे. नांदेडमध्ये 20 जागा वंचितला बाकी सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 11:33 am

मतदानाआधीच भाजपचा विजय:रेखा चौधरी-आसावरी नवरे ठरल्या नगरसेविका; भाजपने उघडलं विजयाचं खाते, दोन जागा खिशात

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना प्रचंड वेग आला असून, काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी तर काही ठिकाणी मतदानाआधीच निकाल लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशाच घडामोडींमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदान होण्याआधीच आपलं विजयाचं खाते उघडलं आहे. महापालिकेच्या 122 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 18-अ मधून रेखा राजन चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26-क मधून आसावरी केदार नवरे या नगरसेविकापदी बिनविरोध विजयी ठरल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी प्रचंड गडबड, गोंधळ आणि हायव्होल्टेज राजकीय नाट्य पाहायला मिळालं. मात्र, कल्याण-डोंबिवलीत काही प्रभागांमध्ये वेगळंच चित्र दिसून आलं. प्रभाग क्रमांक 18-अ मधून भाजपच्या रेखा चौधरी यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत त्यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. परिणामी निवडणूक अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी अधिकृत माहिती देत रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे रेखा चौधरी यांची ही दुसरी टर्म असून, याआधीही त्यांनी नगरसेविकेची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 26-क मधून खुल्या प्रवर्गात पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी केदार नवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याही विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. राजकीय क्षेत्रात नवख्या असलेल्या आसावरी नवरे यांचा हा पहिलाच निवडणूक विजय असून, भाजपसाठी हा विजय उत्साहवर्धक मानला जात आहे. दोन वेगवेगळ्या प्रभागांतून विरोधक न उभे राहिल्याने भाजपने कोणतेही मतदान न होता थेट दोन जागांवर विजय मिळवला आहे. रेखा चौधरी यांचा विजय भाजपने केवळ राजकीय नव्हे, तर वैचारिक विजय म्हणून साजरा केला आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, त्या भाजप महिला मोर्चाच्या कल्याण विभागाच्या जिल्हाध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना भाजपने याला हिंदुत्वाचा पहिला विजय असे संबोधले आहे. प्रभाग क्रमांक 18-अ मधून एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची नगरसेविकापदी बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने अधिकृतपणे विजयाचं खाते उघडल्याचं मानलं जात आहे. या बिनविरोध विजयामागे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांची चर्चा सुरू आहे. संघटनात्मक ताकद, योग्य उमेदवारांची निवड आणि स्थानिक पातळीवर केलेल्या रणनीतीमुळे भाजपला हा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. या दोन उमेदवारांच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचे अभिनंदन केल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाआधीच मिळालेल्या या यशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, आगामी निकालांसाठी पक्ष अधिक आक्रमक रणनीती आखताना दिसत आहे. दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर यांसारख्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी राजकीय नाट्य शिगेला पोहोचलेलं दिसून आलं. अनेक ठिकाणी बंडखोरी, उमेदवार बदल, एबी फॉर्मसाठी झुंबड अशी स्थिती होती. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार असून, 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधीच कल्याण-डोंबिवलीत भाजपने मिळवलेला हा बिनविरोध विजय राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 11:22 am

पालिका रणधुमाळीत 5 कोटींच्या तिकिटांसाठी शिंदे गटात झुंबड:संजय राऊतांचा थेट आरोप; म्हणाले- राज ठाकरेंचे उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार

निष्ठावंतांना वर्षानुवर्षे पक्षासाठी झटूनही उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो, मग दुसऱ्या पक्षातून गेलेल्यांना लगेच तिकीट कसं मिळतं? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, सध्या शिंदे गटात उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी झाली असून त्यामागे केवळ विचारसरणी नव्हे, तर आर्थिक व्यवहार आहेत. उमेदवारीसोबत पाच कोटी रुपये दिले जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच तिकडे अचानक इच्छुकांची रांग लागली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ही राजकारणाची नव्हे तर बाजाराची प्रक्रिया असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, निष्ठा, त्याग आणि संघर्ष याला किंमत न उरता पैशाच्या जोरावर तिकीट मिळत असेल, तर ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे राऊत म्हणाले. मतदार हुशार असून अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांच्या पक्षाने जास्तीत जास्त जागा जिंकाव्यात, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ठाकरे गट आणि मनसेमधील समन्वयाबाबत महत्त्वाचे संकेत दिले. मुंबईसह राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला भक्कम यश मिळावे, यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर राहिलेल्या व्यक्तींनी पुन्हा निवडणूक लढवू नये, असा अलिखित संकेत पूर्वी काही प्रमाणात पाळला जात होता. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा संकेत कोणताही पक्ष गांभीर्याने पाळताना दिसत नसल्याचे राऊत यांनी नमूद केले. आज सर्वच पक्षात जुने संकेत मोडले जात आहेत. त्यामुळे निवडणुका आता केवळ परंपरेवर नाही, तर राजकीय गणितांवर लढवल्या जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या कामगिरीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने किमान 80 टक्के जागा जिंकाव्यात, यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतांचे विभाजन टाळून मराठी मतदारांची ताकद एकत्र आणणे, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये मराठी नेतृत्व अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य संयुक्त सभेबाबतही माहिती दिली. लवकरच ठाकरे बंधू संयुक्त सभा घेतील. त्याचबरोबर संयुक्त जाहीरनाम्याचंही प्रकाशन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. ही संयुक्त भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरेल, असा दावा करत राऊत यांनी येत्या निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरण आकाराला येणार असल्याचे संकेत दिले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 10:52 am

तीन दशकांचा संघर्ष संपला!:14 गावांतील शेतकऱ्यांवरचा कर्जाचा डोंगर उतरला; ऐतिहासिक कर्जमाफीची यादी जाहीर

सन २०२५ हे वर्ष वैजापूर तालुक्याच्या‎इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले‎जाणारे ठरले आहे. तब्बल तीन‎दशकांपासून डोक्यावर असलेले‎कर्जाचे ओझे अखेर उतरले आणि‎रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन‎योजनेतील १४ गावांतील शेतकऱ्यांना‎खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. २६‎मार्च २०२५ रोजी ६३ कोटी ६७ लाख‎रुपयांच्या कर्जमाफीवर अधिकृत‎शिक्कामोर्तब झाले आणि‎पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या‎संघर्षाची सांगता झाली.‎ या योजनेपोटी तालुक्यातील १४‎ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या‎ डोक्यावर तब्बल २१० कोटी रुपयांचे‎ कर्ज होते. सुरुवातीला जिल्हा‎मध्यवर्ती सहकारी बँकेकडून‎ शेतकऱ्यांच्या सातबारावर ३४ कोटी‎रुपये कर्ज घेऊन योजना सुरू झाली.‎मात्र जायकवाडी धरणासाठी‎ पाणीसाठा आरक्षित करणे, ढिसाळ‎ नियोजन आणि भ्रष्टाचारामुळे ही‎ योजना बंद पडली आणि शेतकरी‎ कर्जाच्या गर्तेत अडकले. राज्य‎शासनाने १८ जून २०२४ रोजी‎ योजनेच्या थकीत मुद्दल रकमेची‎ म्हणजेच ६४ कोटी २६ लाख ५९‎हजार रुपयांची कर्जमाफी जाहीर‎केली. मात्र व्याजाचा डोंगर कायम‎होता. अखेर जिल्हा मध्यवर्ती‎ सहकारी बँकेने पुढाकार घेत १६ जुलै‎२०२४ रोजी १४५ कोटी २७ लाख‎रुपयांची कर्जमाफी मंजूर केली.‎नागपूर हिवाळी अधिवेशनात निधीची ‎घोषणा झाल्यानंतर २०२५ मध्ये प्रत्यक्ष ‎धनादेश सुपूर्द झाला आणि‎ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याचा‎ मार्ग मोकळा झाला. ही कर्जमाफी‎ केवळ आर्थिक निर्णय नसून‎ वैजापूरच्या शेतकऱ्यांच्या संयम,‎ संघर्ष आणि न्यायाच्या लढ्याला‎ मिळालेली ऐतिहासिक पावती ठरली.‎ लाभार्थी गावे‎महालगाव, भगूर,‎पानवी, टेंभी, सिरसगाव,‎ बल्लाळीसागज,‎ एकोडीसागज, खिर्डी,‎ माळीसागज,‎ कनकसागज,‎ टाकळीसागज,‎ गोळवाडी, पालखेड,‎ दहेगाव या गावांतील‎शेतकरी कर्जमाफीसाठी‎ पात्र ठरले.‎ नॉलेज‎: १९९१-९२ मधील योजना‎ रामकृष्ण गोदावरी योजनेची स्थापना‎ १९९१-९२ मध्ये झाली. एकूण २,११७ ‎शेतकऱ्यांकडे सुमारे व्याजासह २१० ‎कोटींचे कर्ज होते. यात शासनाकडून‎मुद्दल माफी ६४.२६ कोटी रुपये होती. ‎जिल्हा बँकेकडून कर्जमाफी १४५.२७ ‎कोटींची झाली. १९९५ मध्ये‎जायकवाडीचे पाणी आरक्षण पडले.‎या वेळी ढिसाळ नियोजन व‎ भ्रष्टाचारामुळे योजना बंद झाली.‎

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 10:36 am

मामूंच्या तिकीटावर ठाकरेंच्या शिवसेनेत यादवी:चंद्रकांत खैरेंच्या उघड विरोधानंतरही अंबादास दानवे यांची रशिद खान यांना उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ रशीद मामू यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे ठाकरे गटातील दोन प्रभावी नेते, चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या उमेदवारीने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरही अस्वस्थता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम निवडणुकीत शिवसेनेच्या कामगिरीवर होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने रशीद मामू यांचा मुंबईतील शिवसेना भवनात पक्षप्रवेश पार पडला होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाकडे केवळ एक पक्षप्रवेश म्हणून पाहिले गेले नाही, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक रणनीतिक पाऊल म्हणूनही त्याकडे पाहण्यात आले. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईसह राज्यभर मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरमध्येही हे मतदारसंघीय गणित मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच रशीद मामू यांचा प्रवेश आणि नंतर उमेदवारी हा अंबादास दानवे यांचा महत्त्वाकांक्षी राजकीय डाव असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, हा पक्षप्रवेश सहज पार पडलेला नव्हता. शिवसेना भवनाबाहेरच चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू यांची थेट आमनेसामने भेट झाली आणि तिथेच तणावाचे चित्र स्पष्ट झाले. रशीद मामू यांनी खैरेंशी गळाभेट घेऊन वातावरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला असतानाच, चंद्रकांत खैरे यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत झिडकारले. गळाभेट घेतली तरी उमेदवारी मिळणार नाही, असा ठाम इशारा देत खैरेंनी सर्वांसमोर आपला विरोध जाहीर केला होता. इतकेच नव्हे, तर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे सुमारे पन्नास हजार मतांचे नुकसान होईल, असा दावा करत खैरेंनी या निर्णयावर तीव्र टीका केली होती. त्या घटनेनंतरही अंबादास दानवे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. खैरेंच्या उघड विरोधानंतरही दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून देत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यास मी पाहतो काय करायचं ते, असा सूचक इशारा चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वीच दिला होता. त्यामुळे आता खैरे पुढील काळात नेमकी कोणती भूमिका घेतात, बंडखोरी करतात की, पक्षातच राहून विरोधाची धार कायम ठेवतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या संघर्षामुळे ठाकरे गटासाठी छत्रपती संभाजीनगरची निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला मुस्लीम मतदारांचे समर्थन टिकवून ठेवण्याचा अंबादास दानवे यांचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक शिवसैनिक आणि जुने नेते नाराज होण्याची भीती चंद्रकांत खैरे व्यक्त करत आहेत. हा अंतर्गत वाद प्रचारात कितपत उफाळून येतो आणि मतदारांपर्यंत कोणता संदेश जातो, यावरच निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहणार आहे. शिवसेनेची एकसंघ प्रतिमा या वादामुळे डागाळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, रशीद मामू यांच्या उमेदवारीने छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ निवडणूक लढतच नाही, तर ठाकरे गटातील अंतर्गत शक्तीप्रदर्शनही सुरू झाले आहे. अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे हा संघर्ष उघडपणे समोर येत असताना, याचा थेट फटका मतपेटीत बसणार का? की ठाकरे गट शेवटच्या क्षणी एकत्र येऊन नुकसान टाळणार, हे येणारे दिवसच ठरवतील.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 10:25 am

संकटात उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभ्या राहणाऱ्या फायर आजी संतप्त:साहेबांनी निष्ठावंतांना का डावललं? मुंबईत शिवसेनेत अंतर्गत बंड

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सर्वच पक्षांसाठी कसोटीचा ठरला. इच्छुकांची संख्या मोठी, वेळ कमी आणि अंतर्गत समीकरणे गुंतागुंतीची असल्याने उमेदवार निवडताना प्रत्येक पक्षाची दमछाक झाल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मुंबईत उमेदवार निवडताना मोठे आव्हान उभे राहिले. अनेक प्रभागांत इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचे, या निर्णयामुळे पक्ष नेतृत्वाला नाराजी पत्करावी लागली. काही ठिकाणी निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने असंतोष निर्माण झाला, तर काही ठिकाणी जुने चेहरे पुन्हा उमेदवारी मिळाल्याने नव्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये उमेदवारीवरून अस्वस्थता दिसून आली असली, तरी प्रभाग क्रमांक 202 मधील घडामोडींनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली. प्रभागातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नेतृत्वाकडे थेट मागणी केली होती की, यावेळी श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ नये आणि त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करत पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा श्रद्धा जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि त्यांना एबी फॉर्म दिला. या निर्णयामुळे मातोश्रीबाहेर संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. साहेबांनी असं का केलं?, तिलाच पुन्हा तिकीट का दिलं? अशा सवालांनी परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे शिवसेनेतील फायर आजी, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिक महिलांनीही या निर्णयाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट जाऊन श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यांच्या तीन-चार टर्म झाल्या आहेत, आता नव्या चेहऱ्याला संधी देणे गरजेचे आहे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याच उमेदवाराला पुन्हा तिकीट देण्यात आल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रभागात शाखाप्रमुख विजय इंदुलकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचे काम करत असून, यंदा पक्षाने आपल्याला संधी द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी तयारीही केली होती आणि कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, फॉर्म भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी पक्षाने श्रद्धा जाधव यांनाच एबी फॉर्म दिल्याने विजय इंदुलकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली. पक्षाच्या या निर्णयामुळे केवळ एका व्यक्तीचीच नव्हे, तर स्थानिक पातळीवर मेहनत करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची निराशा झाल्याचे चित्र आहे. मुंबईपुरतेच नव्हे, तर राज्यभरात उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेत अशीच अस्वस्थता पाहायला मिळाली. बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवार निश्चितीपासून ते एबी फॉर्म वाटपापर्यंत कमालीची गुप्तता पाळली. उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर न करता, ऐनवेळी निर्णय घेण्यात आले. काही ठिकाणी तर उमेदवार बदलण्यात आले, तर काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना तातडीने संधी देण्यात आली. या सगळ्या निर्णयांचा उद्देश एकच होता, पक्षांतर्गत बंडखोरी रोखणे. अनेक प्रभागांमध्ये एकाच जागेसाठी दोन किंवा त्याहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी जाहीर होताच नाराजीचे नाट्य घडणे स्वाभाविक होते. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय लांबवण्याची रणनीती स्वीकारली. काही ठिकाणी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासांपर्यंत उमेदवार निश्चित करण्यात आले. परिणामी, कोणाला एबी फॉर्म देण्यात आला आणि कोण अधिकृत उमेदवार आहे, याची संपूर्ण यादी वेळेत तयार होऊ शकली नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अनेक ठिकाणी गैरसमजही पसरले. या पार्श्वभूमीवर अधिकृत उमेदवारांच्या अंतिम याद्या जाहीर करण्यास उशीर का होत आहे, याचे कारणही स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि उद्या दुपारी तीन वाजता अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना आपल्या अधिकृत अंतिम याद्या जाहीर करतील, अशी माहिती पुढे आली आहे. तोपर्यंत कोण अधिकृत उमेदवार आहे, यावरून राजकीय सस्पेन्स कायम राहणार आहे. हा विलंब पक्षांतर्गत असंतोष कमी करतो की आणखी वाढवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच, महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उमेदवारी निवडीचा प्रश्न शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा की अनुभवी चेहऱ्यांवर पुन्हा विश्वास ठेवायचा, या द्वंद्वात नेतृत्व अडकलेले दिसते. श्रद्धा जाधव प्रकरणामुळे हे द्वंद्व अधिक ठळकपणे समोर आले आहे. येत्या काळात या नाराजीचा निवडणूक प्रचारावर आणि पक्षाच्या अंतर्गत एकजुटीवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:47 am

अश्रूंचा बांध फुटला, एकीला आली भोवळ; आमदाराच्या फलकालाही काळे फासले:भाजपने 10 माजी नगरसेवकांच्या कुटुंबात दिले तिकीट; काँग्रेसचा 2 माजी नगरसेवकांना नकार‎

महापालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत घमासान झाले. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह थेट निवडणूक प्रमुखांच्या घरीच धाव घेतली. तेथे त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. एक महिला तर भोवळ येऊन पडली. त्यांनी थेट पैशांचा आरोप करत आपल्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. भाजपने २१ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. मात्र उमेदवारी न दिलेल्या या २१ पैकी १० माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देत रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेसनेही दोन माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली नाही. परिणामी उमेदवारी न मिळालेल्या समर्थकांनी आमदारांचा फोटो असलेल्या फलकाला काळे फासत संताप व्यक्त केला. एकूणच निष्ठावानांना बाहेरचा रस्ता अन् आयारामांना ‘रेट कार्पेट’ असे काहीसे चित्र होते. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला. युती-आघाडीसाठी त्या-त्या घटक पक्षांमध्ये चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात युती झाली तर शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वबळावर लढावे लागत आहे. तसेच महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली असून, शिवसेनेने (ठाकरे गट) एकला चलोरे'चा नारा दिला. परिणामी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक घमासान सत्ताधारी भाजप व विरोधक असलेल्या काँग्रेस, शिवसेनेत झाले. स्वपक्षाने उमेदवारी नाकारलेल्यांनी अन्य पक्षातून उमेदवारी अर्ज भरला. आता राजकीय व अधिकृत उमेदवारांसमोर बंडोबांना शात करत त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. आम्हाला हे फळ मिळत आहेत : महायुतीमध्ये राकाँच्या वाट्याला प्रभाग सुटल्याने उर्वरित पान ४ शिवसेना ठाकरे गट : ५५ उमेदवार असून, यात काँग्रेसचे २ , भाजपच्या दोघांनाही संधी दिली आहे. भाजपने ठाकरे गटातील एका माजी नगरसेविकेला तिकीट दिल्याने हिशेब चुकता केला. वंचित बहुजन आघाडी : पक्षाने ५७ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, एका माजी नगरसेविकेला तिकिट नाकारले आहे. मुंबईत काँग्रेससोबत आघाडी असली तरी शहरात नाही. निवडणुकीपूर्वी भाजपमधील दुरावलेल्यांकडून तिसरी आघाडीची तयारी करण्यात आली. काहींनी थेट जनतेमध्ये जात बैठकही घेतली. यात माजी नगरसेवक हरिश आलीमचंदानी, डॉ.अशोक ओळंबे, आशिष पवित्रकार, गिरीश गोखले आदींचा समावेश होता. मात्र मंगळवारी यापैकी प्रतुल हातवळणे, गिरीश गोखले यांचे निलंबन परत घेऊन पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला; परंतु त्यापैकी केवळ हरिश आलीमचंदानी यांनाच उमेदवारी देण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षापासून दुरावलेल्या काहींना जवळ करीत मोट बांधूच द्यायची नाही, अशी खेळी भाजपकडून खेळण्यात आली. काँग्रेस : पक्षाने १३ पैकी ११ माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली असून दोन जणांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने एकूण ५५ उमेदवार उभे केले आहेत. शरद पवार गटासोबत आघाडी आहे. भाजपचे १९९४ ते २०१९पर्यंत आमदार असलेले दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या जुने शहरातील अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आली. आ. शर्मा यांनी जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातून आपली राजकीय कारकिर्द १९८५मध्ये सुरू केली. याच भागातून ते नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. मात्र आता मनपामध्ये याच भागातील प्रभागातून उमेदवारी जाहीर झालेल्या चारपैकी दोन जण मूळचे काँग्रेसचे तर एक उमेदवार शिवसेनेच्या ठाकरे गटाची आहे. आयात उमेदवारांना संधीत देत निष्ठावानांना मात्र डावलण्यात आले. तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दिवंगत आ. शर्मा यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता माजी महापौरांना संधी देण्यात आली. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ३० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने खेचून आणला. आता मनपा निवडणुकीतही आ. शर्मा यांच्या समर्थकांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राकाँ शरद पवार पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकूण ८० पैकी २४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात सर्व नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : राकाँ अजित पवार गटाची भाजपसोबत युती आहे. राकाँने १४ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, यात माजी महापौरांच्या कुटुंबातील महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गट : शिवसेनेने ७४ जणांना उमेदवारी दिली. उपजिल्हा प्रमुख, एक विद्यमान नगरसेवक व उपशहर प्रमुखाला उमेदवारी नाकारून अन्य पक्षातील इच्छुकांना संधी दिली. पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याची आखली रणनिती भाजप : उमेदवारीसह अन्य मुद्द्यांसाठी भाजपने सर्वेक्षण केल्याचा दावा केला. मनपामध्ये सत्ता असताना अनेक मुद्द्यांवर काही नगरसेवकांनी स्थानिक पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला विरोध केला. प्रभागात विकास कामे मंजूर करण्यावरून अर्थात ‘रसद’वरुनही वाद झाले. विधानसभा, राज्य पातळीवरील नेत्यांनी मनपाच्या राजकारणात फार ढवळाढवळ करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. तसेच त्यापैकी काहींनी अकोला पश्चिमच्या विधानसभा निवडणुकीत ‘काम’ दाखवले. परिणामी भाजपचा पराभव झाला. त्यामुळे आता स्थानिक नेतृत्वाकडून अनेकांना उमेदवारी नाकारून पक्षांतर्गत काहींचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस : मनपामध्ये १३ पैकी अल्पसंख्यांक बहुल भागातील २ नगरसेवकांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराला पक्षांतर्गत विरोध झाला. तसेच काही जण एमआयएमच्याही संपर्कात होते. परिणामी काँग्रेसमध्येही कुरघोडीचे राजकारण रंगले. तिसऱ्या आघाडीतील हवाच काढली सत्ताविरोधी लाट थोपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप रस्ते, पथदिवे, काही भागात भूमिगत नाली बांधण्याचा दावा करत असले तरी सध्या अवाढव्य मालमत्ता कर व अवाजवी पाणी कर, हे दोन मुद्दे प्रचंड तापले आहेत. त्यामुळे सत्ताविरोधी लाट थोपवण्याच्या नावाखाली २१ माजी नगरसेवकांना संधी नाकारण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली. जेणे करुन विरोधक आणखी कमकुवत होईल आणि आयात केलेला उमेदवारच जनतेला फेस करेल. मात्र हे करताना त्या-त्या भागातील बंडखोरांना शांत करण्याचे आणि संधी न मिळूनही पक्षात कायम राहिलेल्यांना सक्रिय करण्याचे आव्हान पक्षासमोर उभे ठाकणार आहे. दिवंगत आमदार शर्मा यांच्या समर्थकांना डावलले

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:43 am

माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा अखेर शिवसेना शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’

सुमारे सात महिन्यांपूर्वीच शिवसेनेत (शिंदे गट) आलेले माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता यांनी मंगळवारी (दि. ३०) राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे पक्षाने पश्चिम विदर्भ संघटक प्रमुख अशी जबाबदारी दिली होती. त्यांनी पक्षाचा व आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. अशी माहीती जगदिश गुप्ता यांनीच पत्रकार परिषदेत दिली. जगदिश गुप्ता यांनी सांगितले कि, अलीकडे सर्व राजकीय पक्ष सारखेच झाले आहे. या पक्षांमध्ये नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याचे भले होत नाही, येथेही हीच परिस्थिती बघितल्याने निराश झालो. माझ्यासोबत अनेक ‘कमिटमेंट’ करण्यात आल्या, त्या काही वैयक्तिक नव्हत्या. ज्या लोकांनी मला अनेक वर्षांपासून साथ दिली, त्यांच्यासाठी मी या ‘कमिंटमेंट’ स्वीकारल्या होत्या. पण, बोलणी झाल्यानंतर लगेच गोष्टी बदलत होत्या. पक्षात प्रवेश घेतल्यापासून ते आतापर्यंत वारंवार हे होत असल्याने आपण शिवसेना पक्ष ( शिंदे गट) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही. आता कोणत्याही पक्षात जायचे नाही, हा निर्णय मी घेतला आहे. त्या निर्णयावर मी ठाम आहे. आता अपक्ष म्हणून लढण्याची तयारी असलेल्या हिंमतबाज कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम मी करणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:30 am

3 जानेवारीला दिसणार सुपरमून:नववर्षात अवकाश नवलाई; खगोलप्रेमींसाठी वर्षभर घडामोडींची पर्वणी‎

जेव्हा पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सर्वात कमी असते, तेव्हा सुपरमून होतो. यामुळे चंद्र मोठा आणि उजळ दिसतो. ३ जानेवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी सूपरमून दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहिल. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार कि.मी.च्या आत असते त्याला सुपरमून असे म्हणतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तिव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरुन आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ३ जानेवारीला संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. नवीन वर्षातील ही पहिली संधी आहे. हा सूपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे. सुपरमून काय आहे? सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे. ज्यामध्ये चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसतो. वर्षातून तीन ते चार वेळा सुपरमून दिसतात. सुपरमून दिसण्याचे कारण खूपच रंजक आहे. या काळात, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या अगदी जवळ येतो. या अवस्थेला पेरिजी म्हणतात. दरम्यान, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर जातो तेव्हा त्याला अपोजी म्हणतात. ज्योतिषी रिचर्ड नोले यांनी पहिल्यांदा १९७९ मध्ये सुपरमून हा शब्द वापरला. चंद्र दर २७ दिवसांनी पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. दर २९.५ दिवसांनी एकदा पौर्णिमा देखील येते. प्रत्येक पौर्णिमा हा सुपरमून नसतो, परंतु प्रत्येक सुपरमून पौर्णिमेला येतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो, म्हणून पृथ्वी आणि चंद्रातील अंतर दररोज बदलते. जुलैच्या सुपर मूनला बक मून असेही म्हणतात.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:29 am

विद्यार्थ्यांनी मानसिक, शारीरिक स्वास्थ्याकडे आवर्जून लक्ष द्यावे:विद्यापीठात फिटनेस वीकचे उद्घाटन‎

आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवणे सर्वांचे प्रथम कर्तव्य झाले आहे. स्पर्धेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ नये, तो निरोगी आणि सुदृढ रहावा. म्हणून विद्यापीठाच्या वतीने फिटनेस कॅम्पचे केलेले आयोजन आजची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सांभाळावे आणि फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनात्मक प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने सहा दिवसीय शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनप्रसंगी कुलगुरू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम, फिट इंडियाचे उज्ज्वल जाधव, पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. तनुजा राऊत. उपस्थित होते. यावेळी फित कापून फिटनेस वीकचे उद्घाटन झाल्याची घोषणा कुलगुरू यांनी केली. मार्गदर्शन करताना कुलगुरू पुढे म्हणाले, आजच्या युगात करिअर घडवण्याच्या आणि पैसे कमवण्याच्या मागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शुगर व बी.पी.च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाढीमुळे भारत भारत कॅपिटल होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. तरुणांमध्ये सुध्दा हे आजार पसरत असून ते चिंताजनक आहे. सर्वांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी अशाप्रकारच्या फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक क्षमता तपासून घ्यावी. असे आवाहन करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी प्रत्यक्ष चाचणी केंद्राची पाहणी केली. तसेच स्वत: शारीरिक चाचणी करुन घेतली. ३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये बी.एम.आय., स्टॅबिलिटी, ग्रीप स्ट्रेंग्थ, रियाक्शन टाईम, फॅट पर्सेंटेज, व्ही.ओ.२ मॅक्स, एक्झॅल कॅपेसिटी, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबीन, फ्लेक्झिबिलीटी, फिंगर डेक्स्टेरिटी, फोर्टी यार्ड शटल रन, हँड-आय-को-ऑर्डीनेशन, फुट-आय-को-ऑर्डीनेशन, होल बॉडी को-ऑर्डीनेशन, मेमरी स्कोप अशा चाचणी करण्यात येणार आहेत. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षकांकरिता ही चाचणी नि:शुल्क असून सर्वांनी आपली शारीरिक क्षमता चाचणी करुन घ्यावी. अशी विनंती पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी प्रास्ताविकेतून केली व आयोजनामागील भूमिका मांडली. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालन निखिलकुमार डोंंगरे, अमिता डुंगडुंग व मुशरफ अली, तर आभार रोजा गुरुंग हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अनुल बिजवे, डॉ. विजय निमकर, डॉ. निलेश इंगोले, डॉ. सौरभ त्रिपाठी, कु. सविता बावनथडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विभागातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. आरोग्य दूत म्हणून काम करा यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम म्हणाले, प्रत्येकाने फक्त स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देवून चालणार नाही, तर आरोग्य दूत म्हणून निरोगी आरोग्याचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. तरच या फिटनेस कॅम्पचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. असे प्रतिपादन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:27 am

डॉ. पंजाबराव देशमुख महान कृषी क्रांतिकारक:शिक्षक साहित्य संघातर्फे जयंती साजरी‎

जोपर्यंत शेतकरी आणि बहुजन समाज शिक्षित होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. केवळ पुस्तकी ज्ञान न देता शेतीवर आधारित तांत्रिक शिक्षण मिळावे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. मध्य प्रांताचे शिक्षणमंत्री असताना प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे कायदे केले. ज्यांच्या हातात नांगर आहे, त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक हवे, हे भाऊसाहेबांचे ब्रीदवाक्य होते. भाऊसाहेब महान कृषी क्रांतिकारक होते. असे विचार जयदीप सोनखासकर यांनी व्यक्त केले. शिक्षक साहित्य संघाच्या राज्य शाखा व अमरावती शाखेतर्फे शिक्षणमहर्षी - कृषिमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती शिक्षक साहित्य संघाच्या श्याम नगर येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते. यावेळी जयदीप सोनखासकर, प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी अरविंद चौधरी, सुरेश मडावी, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.सुशीला मळसणे, गजेंद्र पाथरे, छाया पाथरे, प्रा.विशाल देशमुख, आशीष इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषिमंत्री असताना त्यांनी जे कृषकांसाठी कायदे केले ते कृषकांच्या विकासासाठी वरदान ठरले. श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून जशी शैक्षणिक क्रांती केली. तशीच त्यांनी कृषी क्रांती सुद्धा केली. असे विचार व्यक्त केले. यावेळी प्रा.अरुण बुंदेले यांनी भाऊ ज्ञानदीप या स्वरचित अभंगाचे गायन केले. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे यांचा शिक्षक साहित्य संघ व कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक प्रा.सुशीला मळसणे तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक साहित्य संघाचे, कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. शैक्षणिक क्रांती आणि तसेच कृषी क्रांती याबद्दल अनेकांनी विचार व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:27 am

तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांसाठी शिक्षण विभागातर्फे कार्यशाळा सुरू:समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये केली जागरूकता‎

भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या तालुका स्तरीय पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ‘तंबाखू मुक्त पिढी : शाळांसाठी आव्हान’ या विषयाच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये उपशिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, शाळा केंद्र प्रमुख आणि विषय साधन व्यक्ती उपस्थित होते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराच्या दुष्परिणामांबाबत समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावर निरंतर प्रयत्न सुरू आहेत. ज्यामध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्था केंद्र व राज्य शासनाच्या निकषांनुसार तंबाखूमुक्त करण्यासाठी रॅली, पोस्टर, घोषवाक्ये, कविता आणि पथनाट्ये यांसारखे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करणे हा दंडात्मक गुन्हा असून १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणे किंवा तसे करण्यास भाग पाडणे, हा कठोर शिक्षेस पात्र गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील शाळांकरिता विशेष पोस्टर्स, बॅनर्स आणि बोर्ड्सचे वाटप करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक डॉ. मंगेश गुजर यांनी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या निकषांची माहिती दिली, तर मंगेश गायकवाड यांनी तंबाखू नियंत्रण कायदा २००३ बाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, संभाजी नगर यांनी संयुक्त सहभाग नोंदवला असून, कार्यशाळेतील प्रशिक्षित अधिकारी आता शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन व पर्यवेक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:26 am

सेनगाव येथे क्षुल्लक कारणावरून एकास चाकूने भोसकले:9 जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, दोघे ताब्यात

सेनगाव येथे घुरुन पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून एकास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी ९ जणांवर बुधवारी ता. ३१ सकाळी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव शहरातील धुमाळगल्ली भागातील दिलीप हरण हे कडाक्याची थंडी असल्यामुळे मंगळवारी ता. ३० रात्री शेकोटी करून शेकत बसले होते. यावेळी त्यांचा करण हरण याच्यासोबत वाद झाला. माझ्याकडे घुरून का बघतो या कारणावरून करण याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शाब्दिक चकमकीनंतर वादाला तोंड फुटले. यावेळी भांडण होत असतांना करण याच्या सोबत इतर आठ जण आले. त्यांनीही दिलीप यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक होत असलेल्या मारहाणीमुळे दिलीप प्रतिकार करू शकला नाही. यामध्ये दिलीप यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यांच्या पोटात, पाठीत, हातावर चाकूचे वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दिलीप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिलीप हरण यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी करण हरण, प्रकाश हरण, गणेश हरण, केशव हरण, अर्जुन हरण, शंकर हरण यांच्यासह अन्य तिघांवर बुधवारी ता. ३१ गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींची शोध मोहिम सुरु केली असून केशव व शंकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:26 am

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ‘ब्रेथ ॲनालायझर'चा होणार वापर:प्रमुख चौकात पोलिस सज्ज; ड्रंक अँड ड्राइव्ह पडणार महागात

सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार झाले असून तरुणाई सज्ज झाली आहे. परंतु थर्टी फर्स्टच्या दिवशी ड्रंक अँड ड्राईव्ह करणे मद्यपींना महागात पडणार आहे. दर्यापूर शहर पोलिस नववर्षाच्या निमित्ताने ठिक-ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवणार असून मद्यपी चालकांना तपासण्यासाठी ब्रेथ अनालायझरचा वापर करणार आहे. त्यामुळे मद्यपिंनो सावधान,अशी म्हणण्याची वेळ आली आहे. दरवर्षी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार असते. काहीजण तर नववर्षाची सुरुवात चांगली व्हावी, यासाठी नियोजन करत असतात. तर दुसरीकडे थर्टी फर्स्टच्या दिवशी उत्साही तरुण मद्यपानासह पार्टी करण्याचा बेत आखतात. नववर्षाच्या धुंदीत दारू पिऊन वाहन चालवताना लहान-मोठे अपघात घडू नये तसेच रस्त्यावर कोणताही वाद होऊ नये, यासाठी शहर पोलिसही सज्ज झाले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याने ड्रंक अँड ड्राईव्ह करणे चांगलेच महागात पडणार आहे. विशेष म्हणजे नशेत वाहन चालवताना पोलिसांच्यावतीने अपघात रोखण्यासाठी व मद्यपी चालकांना तपासण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. शहरातील एस.टी.आगार चौक, गांधी चौक, अकोला-अंजनगाव-अकोट टी.पाईंट, अमरावती-आसेगाव रोड यासोबतच बुटी चौक, बाभळीसह चौका-चौकात मद्यपी चालकांना चाप लावण्यासाठी शहर पोलिस तैनात राहणार आहे. बेकायदेशीर कृत्य करणारे तसेच सर्वच वाहनधारकावर पोलिसांची करडी नजर राहणार असून थर्टी फर्स्टचा आनंद आपल्याच आवाक्यात घ्यावा, दुसऱ्यांना त्रास होणार नाही व शांतता अबाधित राहील, याची काळजी तरुणाईने घेणे गरजेचे झाले आहे. सुनील वानखडे, ठाणेदार, दर्यापूर. तर सहा महिण्यांची शिक्षा २०२५ या वर्षाला निरोप व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मध्यरात्री अनेकजण विशेषतः हौशी तरुणाई मद्यपानासोबतब सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, ट्रिपल सीट, लायसन्सशिवाय ड्रायव्हिंग, रॉग साइड इत्यादी नियमांचे उल्लंघन करतात. असे केल्यास पोलीस प्रशासनाकडून चालकांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:25 am

नगराध्यक्षांकडून कचरा डेपो, जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी:विल्हेवाट लावण्याच्या सूचना- मुख्याधिकारी अनुपस्थित‎

येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वात स्थानिक नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्र व कचरा डेपोची पाहणी केली. तेथे आढळलेल्या अव्यवस्था दूर करण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या. त्यांच्या या भेटीमुळे पदभार स्वीकारण्याआधीच पदाधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले. या भेटीवेळी मुख्याधिकारी मात्र सुटीवर होते. मंगळवारी सकाळी १० वाजताच नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर व नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात पोहोचले. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. दरम्यान विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या अचानक भेटीमुळे नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. स्वत: मुख्याधिकारी सुट्टीवर असल्याने न.पं. कार्यालयातील अनेक कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आढळून आले. अशा सर्व कर्मचाऱ्यांना लगेच कारणे दाखवा नोटीस देऊन योग्य कारवाईचे निर्देश दिले. लाखो रुपये खर्च करूनही कचऱ्याच्या नियोजनासाठी अद्याप जागा तयार करण्यात आली नाही, याबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने डम्पींग ग्राउंड निर्माण केले. मात्र सदर डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे अस्तव्यस्त झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी आधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे निर्देशही नगराध्यक्षांमार्फत देण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी यावेळी नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणोऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचीही पाहणी केली. जल शुद्धीकरण केंद्रात योग्य त्या सुधारणा करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. या भेटीदरम्यान पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य इत्यादी विभागाचा आढावा घेण्यात आला. बस स्थानक परिसरातील शौचालयाची दुर्गंधी पाहून नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगरसेवक प्रकाश मारोटकर, प्रीती इखार, कांता लोमटे, वासुदेव लोखंडे, राष्ट्रवादीचे मो.साजिद इत्यादी उपस्थित होते. जलशुद्धीकरणची मशीन नादुरुस्त नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असता पाणी स्वच्छ करणाऱ्या बहुतांश मशीन नादुरुस्त होत्या. मशीन नादुरुस्त असल्यामुळे पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात शुद्ध होत नाही, असाही मुद्दा पुढे आला. याबाबत नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. परंतु मुख्याधिकारीच उपस्थित नसल्याने ते निरुत्तर झाले. दरम्यान मशीनची दुरुस्ती तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:24 am

एमआयडीसी परिसरात 25 लाखांचे 11,820 किलो प्लास्टिक जप्त:मनपाच्या पथकाची आजवरची सर्वात मोठी कारवाई‎

शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मनपा प्रशासनाच्या ठोस व कठोर निर्देशांनुसार एमआयडीसी परिसरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका गोदामातून ३९४ पोते प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण वजन ११ हजार ८२० किलो आहे. जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची अंदाजे किंमत २५ लाख रु.आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक विरोधातील ही मनपा पथकाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. सदर ठिकाणी पंचनामा करून प्लास्टिक बंदी नियमांनुसार संबंधितावर रु. ५ हजाराचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई सोमवारी २९ रोजी उशिरा रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू होती. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठवणूक व वापर करणाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा इशारा मिळाला असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईच्या वेळी प्लास्टिक कारवाई नोडल अधिकारी विनोद टांक, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, बिटप्युन नरेंद्र दुगलज तसेच अतिक्रमण विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याआधी २८ रोजी १२७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. शहरात कुठेही कितीही मोठा प्लास्टिकचा साठा पहिल्यांदा जप्त करण्यात आला तर त्या साठेबाजाविरोधात फार मोठी कारवाई होत नाही. त्याला केवळ ५ हजाराचा दंड आकारला जातो. अर्थात एक किंवा दोन किलो बंदी असलेले प्लास्टिक आढळले तरी ५ हजार व ११ हजार किलो प्लास्टिक आढळले तरी ५ हजार रुपयेच दंड करून त्या गोदामाला सील ठोकले जाते. यामुळेच बंदी असलेले प्लास्टिक विकणाऱ्यांना कोणताही वचक बसत नाही. एक गोदाम सील झाले तरी ते दुसऱ्या ठिकाणावरून त्यांचा व्यावसाय करीत आहेत. दुसऱ्यांदा तोच साठेबाज बंदी असलेले प्लास्टिक विकताना आढळला तर १० हजाराचा दंड होतो. तिसऱ्यांदा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे शहरातून सिगल युज प्लास्टिकचे समूळ उच्चाटन होत नसल्याचा ठपका सुज्ञ नागरिकांनी ठेवला आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:23 am

पुण्यात महायुतीला पूर्णविराम:15 जागांच्या यादीने युतीचा खेळ संपवला; ती मागणी भाजपच्या जिव्हारी; असे काय घडले?

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तीव्र मतभेदांमुळे चांगलाच गाजला. 165 नगरसेवकांची संख्या असलेल्या पुणे महापालिकेत सत्ता स्वबळावर मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपने शिंदेसेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, या 15 जागांच्या बदल्यात शिंदेसेनेने भाजपसमोर ज्या उमेदवारांची यादी ठेवली, ती पाहून जागावाटपाची चर्चा करणारे भाजपचे नेते अक्षरशः अवाक झाले. या एका यादीने पुण्यातील शिवसेना-भाजप युतीचे गणित पूर्णपणे बिघडवले आणि अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट झाले. पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून सलग बैठका सुरू होत्या. सोमवारी रात्री साडेबारा वाजता शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचा संदेश प्रसारमाध्यमांना पाठवण्यात आला होता. त्या परिषदेत युती तुटल्याची औपचारिक घोषणा होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पाऊण वाजता अचानक ही पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटातील उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज भरण्यास सुरुवात केली आणि युती जवळपास संपुष्टात आल्याचे संकेत मिळाले. भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदेसेनेने त्यांच्याकडे 15 उमेदवारांची अधिकृत यादी सुपूर्द केली होती. मात्र, या 15 जागा सोडणे भाजपसाठी अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. भाजपला केवळ 15 जागा देण्याची तयारी होती, पण त्या बदल्यात शिवसेनेने मागितलेल्या जागा आणि उमेदवार भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रभागांमधील होते. त्यामुळे हा प्रस्ताव भाजपच्या जिव्हारी लागला. परिणामी, पुण्यात युतीत निवडणूक लढवण्याचा विचार भाजपने पूर्णपणे सोडून दिला आणि आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, भाजपशी युती शक्य नसल्याचे लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईहून पुण्यासाठी 165 एबी फॉर्म पाठवून दिले. या घडामोडीनंतर नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना-भाजप युती तुटल्याची स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली. मात्र, काही वेळातच विजय शिवतारे यांनी यू-टर्न घेत अजूनही भाजपशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तरीही अंतर्गत चर्चांमधून समोर आलेली माहिती पाहता, शिंदेसेनेच्या पुण्यातील शिलेदारांनी ज्या पद्धतीने भाजपला 15 जागांवरून अडचणीत आणले, त्यामुळे युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. या वादामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने शिवसेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली असली, तरी शिंदेसेनेने त्या 15 जागांसाठी जी नावे पुढे केली, ती भाजपला मान्य होणे शक्यच नव्हते. या यादीत प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे, 41 क मधून स्वाती अनंत टकले, 24 ड मधून प्रणव रवींद्र धंगेकर, 23 क मधून प्रतिभा रवींद्र धंगेकर, 26 ड मधून उल्हास उर्फ वसंतराव बागुल, 37 क मधून गिरीराज तानाजी सावंत, 37 ड मधून रूपाली रमेश कोंडे, 38 क मधून वनिता जालिंदर जांभळे, 38 इ मधून स्वराज नमेश बाबर, 39 क मधून मनिषा गणेश मोहिते, 6 ड मधून आनंद रामनिवास गोयल, 3 क मधून गायत्री हर्षवर्धन पवार, 16 ड मधून उल्हास दत्तात्रय तुपे, 40 ड मधून दशरथ पंढरीनाथ काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे आणि 11 क मधून वैशाली राजेंद्र मराठे यांच्या नावांचा समावेश होता. विशेष म्हणजे या यादीतील एक मागणी भाजपसाठी अत्यंत डिवचणारी ठरली. प्रभाग क्रमांक 24 ड मधून शिंदे गटाने रवींद्र धंगेकर यांच्या पुत्र प्रणव धंगेकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती. याच प्रभागातून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर रिंगणात असल्याने ही मागणी मान्य करणे भाजपसाठी अशक्य होते. परिणामी, भाजपने या 15 जागा सोडण्यास ठाम नकार दिला आणि त्याचाच थेट परिणाम शिवसेना-भाजप युती तुटण्यात झाला. आता पुणे महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढवली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:20 am

ठाकरे आणि शिंदे सेनेच्या गुप्त खेळीने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम:एबी फॉर्म वाटप, पण यादी गायब! दोन्ही गटांनी नावे गुप्त का ठेवली?

महाराष्ट्र महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि ठाण्यातील राजकारण कमालीचे गूढ बनले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांकडून अर्ज भरण्याची अंतिम वेळ संपूनही अधिकृत उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर न झाल्याचे चित्र दिसून आले. ऐनवेळी उमेदवार देणे, संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी नावे गुप्त ठेवणे आणि शेवटच्या क्षणी निर्णय बदलणे या सगळ्या घडामोडींमुळे निवडणूक प्रक्रियेत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. परिणामी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक नेते यांच्यात संभ्रमाचे वातावरण पसरले असून, कोणाचा एबी फॉर्म अंतिम आणि कोण अधिकृत उमेदवार, याबाबत स्पष्टता नसल्याने अस्वस्थता वाढली आहे. सामान्यतः महापालिका निवडणुकीच्या आधी युती किंवा आघाड्यांचे जागावाटप निश्चित केले जाते, त्यानंतर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होते आणि त्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन अर्ज दाखल केले जातात. मात्र, यंदाच्या निवडणुकीत ही पारंपरिक पद्धत जवळपास बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसत आहे. ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना या दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली. काही ठिकाणी तर अर्ज भरण्याच्या वेळेपर्यंतही अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नाही. त्याचवेळी, काही प्रभागांमध्ये दुसऱ्या पक्षातून ऐनवेळी प्रवेश केलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याने राजकीय गणिते आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. अधिकृत यादी जाहीर करण्यात उशीर होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे संभाव्य बंडखोरी टाळणे, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. अनेक प्रभागांमध्ये एकाच पक्षाकडून दोन किंवा त्याहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी जाहीर होताच नाराजी, बंडखोरी किंवा अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता वाढते. हे टाळण्यासाठीच ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना यांनी एबी फॉर्म देण्यापासून ते उमेदवार निश्चितीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया शक्य तितकी गुप्त ठेवली. काही ठिकाणी तर उमेदवार शेवटच्या काही तासांत बदलण्यात आले किंवा दुसऱ्या पक्षातील उमेदवारांना तातडीने उमेदवारी देण्यात आली, अशी उदाहरणे समोर आली आहेत. या गुप्त रणनीतीमुळे अनेक प्रभागांमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक 192 मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीअंतर्गत ही जागा मनसेला देण्यात आली. मनसेकडून यशवंत किल्लेदार यांचे नाव जाहीर होताच ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी तात्काळ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिंदेंच्या सेनेने आपला आधीचा उमेदवार बदलत प्रीती पाटणकर यांनाच ऐनवेळी उमेदवारी दिली. या घटनेने केवळ त्या प्रभागातीलच नव्हे, तर संपूर्ण शहरातील राजकीय वातावरण तापले. प्रभाग क्रमांक 204 मधील घडामोडी तर अधिकच गुंतागुंतीच्या ठरल्या. अर्ज भरण्याच्या शेवटच्या एक-दोन तासांत माजी आमदार अनिल कोकीळ यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि किरण तावडे यांना संधी देण्यात आली. यामुळे नाराज झालेले अनिल कोकीळ यांनी तातडीने शिंदे सेनेत प्रवेश केला आणि शिंदे सेनेचा एबी फॉर्म घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्याआधीच अरुण दळवी यांनी भाजपमधून शिंदे सेनेत प्रवेश करून याच प्रभागातून अर्ज भरल्याने आता शिंदे सेनेचा अधिकृत उमेदवार नेमका कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. हीच स्थिती अनेक प्रभागांमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत उमेदवारीवर निर्णय न झाल्याची उदाहरणे इतर प्रभागांमध्येही दिसून आली. प्रभाग क्रमांक 202 मध्ये श्रद्धा जाधव यांचे पुत्र पवन जाधव आणि स्थानिक शाखाप्रमुख विजय इंदुलकर यांच्यात उमेदवारीसाठी स्पर्धा होती. त्यामुळे अंतिम नाव निश्चित होण्यासाठी बराच वेळ लागला. प्रभाग क्रमांक 81 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा दोन्हींकडून अर्ज दाखल झाल्याने तेथील चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले. अशा अनेक प्रभागांमध्ये शेवटच्या तासापर्यंत उमेदवारीवर पडदा कायम राहिला. शिंदेंच्या शिवसेनेत सोमवारी रात्रीपासून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली. मात्र इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आणि अनेक ठिकाणी उमेदवार निश्चित नसल्याने अधिकृत यादी जाहीर करण्यात आली नाही. काही प्रभागांमध्ये तर ठाकरेंच्या शिवसेनेतून आलेल्या दोन उमेदवारांना ऐनवेळी शिंदे सेनेने उमेदवारी दिली. या सगळ्या घडामोडींमुळे कोणत्या प्रभागात कोण अधिकृत उमेदवार आहे, याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते शेवटपर्यंत निर्देशांची वाट पाहत राहिले. एकूणच, मुंबई आणि ठाण्यातील महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडीची प्रक्रिया यंदा अत्यंत वेगळी आणि गुप्ततेने भरलेली ठरली आहे. बंडखोरी टाळणे, अंतर्गत नाराजी नियंत्रणात ठेवणे आणि शेवटच्या क्षणी राजकीय डावपेच खेळणे, हा या दोन्ही शिवसेनांचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र या गुप्ततेची किंमत कार्यकर्त्यांच्या संभ्रमाच्या रूपाने मोजावी लागत असल्याचेही दिसत आहे. अधिकृत उमेदवारांच्या यादीवरून निर्माण झालेला हा सस्पेन्स निवडणूक प्रचाराच्या पुढील टप्प्यात काय रंग दाखवतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:05 am

रानमसलेत लोकमंगल कृषिदूतांनी दाखवला:सेंद्रिय शेतीचा नवा मार्ग, माती, उत्पादन आणि खर्च वाचवण्याचा शेतकऱ्यांसमोर प्रभावी पर्याय‎

सोलापूर जिल्ह्यातील शेती सध्या दुहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता. या पार्श्वभूमीवर रानमसले गावात लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा येथील कृषी दूतांनी गांडूळ खत निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा ठोस संदेश दिला आहे. श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचालित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील कृषी दूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत हा उपक्रम राबवला. राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर व छत्रपती शिवाजी महाराज चौक, रानमसले येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांडूळ खतामुळे जमिनीची रचना सुधारते, ओलावा टिकतो, सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढते, हे मुद्दे शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. रासायनिक खतांवर अवलंबून राहण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर केल्यास शाश्वत शेती शक्य असल्याचा विश्वास या प्रात्यक्षिकातून निर्माण झाला. या कार्यक्रमास ब्रह्मा गायत्री विद्यामंदिरचे प्राचार्य महादेव गवळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी तसेच जमीन जिवंत ठेवायची असेल तर तिला रसायनांपासून मुक्त करावे लागेल, हा ठळक संदेश कृषी दूतांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. कृषीदूत अभिषेक पवार यांनी गांडूळ खत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवत त्याचे शास्त्रीय फायदे समजावून सांगितले. कमी खर्चात घरच्या घरी गांडूळ खत कसे तयार करता येते, कोणते सेंद्रिय अवशेष वापरावेत, तसेच तयार खताचा पिकांच्या वाढीवर होणारा सकारात्मक परिणाम यावर भर दिला. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल गरड आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषीदूत प्रतीक नांगरे, सुमित जाधव, सूरज अनपट, ओम साई लिंगायत आणि गणेश केदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मितीविषयी विचारलेल्या प्रश्नांमधून त्यांची बदलत्या शेतीकडे असलेली उत्सुकता स्पष्ट झाली. कृषी दूतांनी सर्व शंकांचे निरसन केले. एकूणच, रानमसले येथे झालेला हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरताच मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्यात सेंद्रिय शेतीच्या दिशेने सुरू असलेल्या बदलाचा ठळक दाखला ठरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:05 am

कडाक्याच्या थंडीत विदेशी पाहुण्यांचे आगमन:अनेक देशांतून सफर करत ‘रोझी स्टर्लिंग’ पक्षी माढ्यात दाखल‎

माढा थंडीचा कडाका हुडहुडी भरवणारा असल्याने अगदी दुपारच्या वेळी सुद्धा गारठा जाणवत आहे. कडाक्याच्या थंडीत मात्र माढ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शेतात व फळबागांमध्ये परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. हे पाहुणे आहेत सुमारे १०-११ देशांना पार करून आलेले परदेशी पक्षी ज्यांना रोझी स्टर्लिंग किंवा मराठीत गुलाबी मैना''पळसमैना' किंवा भोरड्या' असे म्हटले जाते.हे पक्षी पाहण्यासाठी पक्षी प्रेमी गर्दी करीत असून पक्ष्याचे फोटो कॅमेरात कैद करण्यासाठी पक्षी प्रेमी कॅमेरामन देखील येताना पहायला मिळत आहेत. या पक्षांचे मूळ स्थान तसे पूर्व युरोप व पश्चिमी जगतात व मध्य आशियात आहे. रोमानिया, युक्रेन, ग्रीस, इराण, तुर्कस्त ान, मंगोलिया, कझाकस्ता न, उझबेकिस्तान, पाकिस्तान , चीन, नेपाळ इ. देशांतून हजारो कि.मी. प्रवास करत हे पक्षी लाखोंच्या संख्येने भारतात येतात. मे ते जुलै हा यांचा विणीचा काळ संपल्यानंतर ते स्थलांतर करतात. या पक्षांच्या शरीराची ठेवण मनमोहक असते. डोके व मान काळीभोर असते तर पोटावर व पाठीवर चमकदार गुलाबी रंगाची झालर शोभून दिसते. पंख निळसर- हिरवट- तपकिरी असतात, डोक्यावर आकर्षण तुरा असतो, मादीचा डोक्यावरील तुरा आखूड असतो. भोरड्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बिया पावसाळ्यात लवकर रूजून मोठमोठे वृक्ष निर्माण होतात व वनस्पतींची पुन निर्मिती होऊन परागकणांची देवघेव होते. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पक्षी हजारोंच्या संख्येने आकाशात विहंगम समूहनृत्य करतात,यावेळी त्यांची विष्ठा ज्या जमीनीवर पडते ती शेतीसाठी सुपीक जमीन समजली जाते यावर जागतिक पातळीवरील अनेक शास्रज्ञांनी संशोधने केली आहेत.या पक्षांची विष्ठा नैसर्गिक खत म्हणून काम करते.त्यांचे मुख्य खाद्य किटक,फळे व धान्य आहे. माढा महाविद्यालयाच्या शेतीत असलेल्या फळबागांमध्ये व परिसरातील वृक्षांवर विहार करताना हे पक्षी आढळून आल्याने महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पोषक ठरत आहे. गावखेड्यातील दुर्मिळ पक्षांचे पक्षीप्रेमींना ठरले आकर्षण गावखेड्यांतून आता दुर्मिळ होत चाललेल्या रानपिंगळा, मधुबाज, तिर ंगी मुनिया, माळकरी वटवट्या, सुलतान बुलबुल, ससाणा, तांबट, चष्मेवाला, यासारखे अनेक पक्षांचा आढळ या परिसरात दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:04 am

भूमिपूजनाचा नारळ‎ कशासाठी फोडला‎:आ. राजू खरे यांचा राजन पाटील यांना टोला

कोन्हेरी गावचा रस्ता तुम्हाला करायचाच नव्हता तर चार वेळा भूमिपूजनाचा नारळ कशासाठी फोडला, असा सवाल करत पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्ष त्यानंतर काँग्रेस पुन्हा शरद पवार यांची राष्ट्रवादीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आता भाजपामध्ये प्रवेश केला. जरी तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी मोहोळ नगर परिषदेमध्ये तुमचा पराभव आम्ही केला असल्याचा टोला आमदार राजू खरे यांनी अनगरचे राजन पाटील यांचे नाव न घेता लगावला. कोन्हरे ते चिखली ग्रामा मार्ग- ८२ रस्ता सुधारणा करणे कार्या आमदार स्थानिक विकास निधी सन- २०२५-२६ अंतर्गत मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन समारंभा संपन्न झाला. प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आ. राजू खरे म्हणाले, या रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करून त्याचे भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, पूर्वी निधी यायचा सगळं अनगरला जायचा ५० वर्षापासून अनगरकरांची सत्ता आहे. ती मंडळी आम्हाला एक वर्षात किती निधी आणला म्हणून विचारतात तुम्हाला काय विचारण्याचा अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला. याप्रसंगी राजकुमार पाटील, सुनील पाटील, दीपक पुजारी, दीपक गवळी, अण्णासाहेब पाटील, बालाजी खुर्द, नितीन निळे, दत्तात्रेय मुळे, भिवाजी कांबळे, अतुल गाडे, शंकर शेळकेसह पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 9:02 am

जिल्ह्यात मद्यप्राशनासाठी घेतले अकरा हजार परवाने:पहाटे 1 वाजेपर्यंत मद्य विक्री राहील सुरू, पोलिसांकडून ‘ब्रेथ अनालायजर’द्वारे तपासणी‎

बुधवारी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा ठिकाणी दारू पिण्यासाठी मद्यपींनी एक दिवसाचा परवाना काढला आहे. जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांना ११ हजार मद्य सेवन परवान्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्री केली आहे. यामुळे विदेशी दारूचा परवाना घेऊन एक दिवस मद्य प्राशनचा आनंद घेता येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री व मध्यरात्री (१ जानेवारी २०२६) विदेशी, देशी मद्य विक्री (वाइन शॉप, बिअर शॉपी) पहाटे १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर परमीट बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ३१ डिसेंबरला नियमबाह्य पध्दतीने मद्यप्रशान केल्याचे आढळल्यास थेट ‘ब्रेथ अनालायजर’द्वारे आहे त्या जाग्यांवर तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक प्रमोद सोनाने यांनी दिली. नवीन वर्षांच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व्यावासायिक देखील सज्ज झाले आहेत. नवीन वर्ष साजरे करत असताना अवैद्य मद्य विक्री व वाहतुकीवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी ८ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे.या पथकात प्रथमच अकार्यकारी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.हे पथक अवैद्य मद्य विक्री, वाहतूक, निर्मिती तसेच विनापरवाना हॉटेल,ढाब्यांवरील अवैद्य मद्यावर कारवाई करणार आहेत.ज्या नागरिकांना एक वर्षासाठी व कायमस्वरुपी मद्य सेवन परवाने लागत असतील त्यांनी ऑनलाइन संकेतस्थळावरुन घ्यावेत, असे आवाहन सोनाने यांनी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ ते २९ डिसेंबर या कालावधीत ३ हजार १५२ मद्य विक्रीसह अन्य प्रकरणांत ३ हजार १५२ गुन्हे दाखल केले. यात ३ हजार २६५ संशयित आरोपींना अटक केली. ११६६ वाहने जप्त केली.या प्रकरणांत ६ कोटी ९९ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:53 am

लोकार्पण सोहळा:शिक्षणामुळे राष्ट्र निर्माण होण्यास मदत, प्रबुध्द विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांचे प्रतिपादन‎

अवघ्या दोन वर्षात वर्धमान महावीर नॉलेज हे शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे. ही गुरु देवांची कृपा आहे. या शैक्षणिक उपक्रमास भगवान वर्धमान महावीर यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे येथील शिक्षा कार्य नेहमीच बहरत राहील. शिक्षणामुळेच राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल. येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठे कार्य करण्यास सक्षम होतील, असे प्रतिपादन प्रबुध्द विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांनी केले. नगर-कल्याण रोडवर जैन सोशल फेडरेशनमार्फत उभारण्यात आलेल्या वर्धमान महावीर नॉलेज पार्क अंतर्गत ऑप्टेमेट्री कॉलेज, नर्सिंग कॉलेज व सीबीएसई स्कूलचे लोकार्पण रविवारी साधूसाध्वीजींच्या सान्निध्यात व आशीर्वादाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अहिल्यानगर शहरात उच्च दर्जाच्या शिक्षणाची कवाडे या नॉलेज पार्कच्या माध्यमातून खुली झाली आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर मूल्यशिक्षण, व्यावहारिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत या उद्देशानेच या तीनही संस्था कार्यरत असणार आहेत. हा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी, युवाचार्य पूज्य महेंद्रऋषीजी,प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी, उपप्रवर्तक तारकऋषीजी, गौरवमुनीजी, सत्यप्रभाजी, श्रुतीदर्शनाजी, विपुलदर्शनाजी आदी साधू साध्वीजींच्या सान्निध्यात व उद्योजक प्रकाश धाडीवाल, दिना धाडीवाल, आदित्य धाडीवाल, पेमराज बोथरा, मनिषा बोथरा, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, हस्तीमल मुनोत, सीए रमेश फिरोदिया आदींच्या उपस्थितीत झाला. पूज्य महेंद्रऋषीजी महाराज म्हणाले, आयुष्य स्थिरस्थावर असावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. हेच ज्ञान देण्याचे काम वर्धमान महावीर नॉलेज पार्क येथे होणार आहे. भविष्यात या शिक्षण संस्थेचा नावलौकिक भारतभर होईल यात शंका नाही. सुनील मालू म्हणाले, याठिकाणी र्धमान महावीर नर्सिंग कॉलेज मध्ये बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम उपलब्ध आहे.वर्धमान महावीर ऑप्टोमेट्री कॉलेजमध्ये दोन वर्षांचा ‘डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री' अभ्यासक्रम सुरू केला आहे. वर्धमान महावीर सीबीएसई स्कूलमध्ये अहिल्यानगरमध्ये प्रथमच इस्रो ट्यूटर-संचलित सॅटेलाइट व रॉकेटरी स्पेस लॅब, तसेच ट्रिपल आयटी अलाहाबादच्या तज्ज्ञांनी डिझाइन केलेली रोबोटिक्स व एआय लॅब आणि हॅलो ब्रिटानिका लँग्वेज लॅब आहे. आधुनिकतेसोबतच मुलांचे बालपण जपण्यासाठी ही शाळा डे-बोर्डिंग आणि बॅगलेस व टिफिनलेस स्वरूपाची असेल. स्वागत डॉ.प्रकाश कांकरिया यांनी, तर आभार निखिलेंद्र लोढा यांनी मानले. या शैक्षणिक संकुलामुळे नगरची वेगळी ओळख आचार्यश्रींच्या कृपाशीर्वादाने नगर परिसरात सेवा, श्रद्धा आणि शिक्षा या तीन तत्त्वांवर १९९२ पासून निरंतर कार्यरत असलेल्या जैन सोशल फेडरेशनमार्फत दर्जेदार व सुसंस्कारित शिक्षणासाठी वर्धमान महावीर नॉलेज पार्कची स्थापना केली आहे. याठिकाणी २ लाख स्क्वेअर फूट जागेत शैक्षणिक इमारती उभारल्या जात आहेत. भविष्यात येथे हायटेक शिक्षण सुविधा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आणखी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आरोग्य सेवेनंतर आचार्यश्रींचे आणखी एक स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे. आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेमुळे नगरची एक वेगळी ओळख या शैक्षणिक संकुलामुळे होईल, असा विश्वास आहे, असे संतोष बोथरा म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:52 am

जिल्हा परिषदेच्या 11 शिक्षकांना ‘नेशन बिल्डर’ पुरस्कार:रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचा उपक्रम, 11 जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप‎

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने ‘हॅपी मॉडेल स्कूल प्रकल्प’ आणि ‘नेशन बिल्डर पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत राहून उल्लेखनीय योगदानाबद्दल ११ आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले, ११ जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरीच्या 'हॅपी मॉडेल स्कूल' प्रकल्पांतर्गत ११ शाळांना भौतिक सुविधा पुरवल्या. यात शाळांसाठी ऑफिस कपाट, आरओ वॉटर प्युरिफायर आणि वाचनालयासाठी दर्जेदार पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आणि वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने हे साहित्य देण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत कार्यरत राहून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर’ (राष्ट्र उभारणीचे शिल्पकार) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात नारायण चंद्रकांत मंगलारम (डोंगरगण - राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी), बाबा भीमराज पवार (दैठणे गुंजाळ), योगेश जनार्दन सूर्यवंशी (यशवंत नगर), मंगेश खिल्लारे (टाकली धोकेश्वर), खिल्लारे मॅडम (पारनेर), खरदास मॅडम(श्री मार्कंडेय विद्यालय) यांच्यासह ११ शिक्षकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन प्रमोद जेजुरीकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षक हे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. असिस्टंट गव्हर्नर मधुरा झावरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष सुनील कटारिया यांनी केले. त्यांनी रोटरीच्या सेवाकार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन नेशन बिल्डर अवॉर्डचे चेअरपर्सन रो. राजेश परदेशी यांनी, तर आभार सचिव रो. अमर गुरप यांनी मानले. या प्रसंगी कोषाध्यक्ष धीरज मुनोत व रोटरीचे पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रोटरी क्लबतर्फे ११ आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:51 am

खान्देशातील स्त्री- साहित्यिकांचे योगदान अतिमोलाचे- डॉ. सूर्यवंशी:जामनेर येथे जिल्हास्तरीय ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलनाचा समारोप‎

खान्देशच्या साहित्य विश्वाला स्त्री साहित्यिकांनी भरीव योगदान देत ते समृद्ध केले आहे, असे गौरवोद्गार धुळे येथील साहित्यिक व समीक्षक डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी काढले. खान्देशातील स्त्री साहित्यिकांचे योगदान या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळातर्फे आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलनाचा मंगळवारी समारोप झाला. प्रा. बी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. जिल्हाभरातून आलेल्या कवींनी मोठ्या संख्येने आपल्या कविता सादर केल्या. याप्रसंगी झालेल्या परिसंवादात डॉ. रमेश माने (कविता, धुळे), साहेबराव मोरे (कथा, चाळीसगाव),लतिका चौधरी (आत्मचरित्र, दोंडाईचा), अ. फ. भालेराव (कादंबरी) तसेच रमेश धनगर (बालसाहित्य, गिरड) यांनी खान्देशातील स्त्री साहित्यिकांच्या साहित्य प्रतिमेचा सखोल आढावा घेत नवोदित स्त्री साहित्यिकांनी लेखन क्षेत्रात सक्रिय व्हावे, असे आवाहन केले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. आर. महाजन, सचिव गोरख सूर्यवंशी, विश्वस्त सुखदेव महाजन, रुपेश बिऱ्हाडे, नागनंदा मघाडे, पी. डी. पाटील यांच्यासह सर्व साहित्यिकांनी सहकार्य केले. दोन दिवसीय या साहित्य संमेलनाचा जिल्हाभरातल्या साहित्यिकांनी लाभ घेतला. गझल गायन सत्राने उपस्थित मंत्रमुग्ध पहाडी आवाजातील तुकाराम ढिकले यांच्या गझल गायनाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. समारोपप्रसंगी काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:08 am

सटाणा मराठा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे खाद्य पदार्थांसह भाजीपाल्याचे 160 स्टॉल:उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमवा, शिका व शिस्तीचा अनुभव‎

येथील लोकनेते पंडीतराव धर्मा पाटील मराठा इंग्लिश स्कूलमध्ये स्काऊट गाईड आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध १०५ खाद्य पदार्थांसह ५५ भाजीपाल्याचे स्टॉल लावण्यात आले होते. या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी मेळाव्यात कमवा, शिका व शिस्तीचा अनुभव घेतला. मुख्याध्यापक विनायक बच्छाव यांनी स्काऊट गाईड आनंद मेळावा घेण्याबाबतचा हेतू प्रास्ताविकातून सांगितला. स्काऊट हा सदैव तयार असतो, स्काऊट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सुरू केलेल्या महत्त्वपूर्ण स्काऊट गाईड आनंद मेळाव्याबाबत त्यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे दिलीप दळवी, संस्थेचे संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, महिला संचालिका शालनताई सोनवणे, नगराध्यक्ष हर्षदा पाटील, नगरसेवक राहुल पाटील आदींसह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी सरस्वती व स्काऊट गाईडचे जनक बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांनी ऊट गाईड आनंद मेळाव्याचे उद्घाटन करून तंबू सजावटीची पाहणी व विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी मांडलेले खाद्य पदार्थ, भाजीपाला स्टॉलला उपस्थितांनी भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौतूक करून त्यांनी प्रोत्साहान दिले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी स्काऊट मास्टर रोहित शिंदे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, स्काऊटचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांकडून स्टॉलवर या पदार्थांची विक्री - पुरणपोळी, व्हेज बिर्याणी, मटन बिर्याणी, अंडा करी, इडली सांबर, बटाटा वडा, पोहे, दाबेली, मेथी पराठा भोपळा पराठा, मेदूवडा, गरमागरम बासुंदी, बुंदी, उपमा, गरमागरम चहा, फ्रुट डिश, मटकी उसळ, सँडविच, तवा पुलाव, लागली, उडीद मसाला पापड, पाणीपुरी, दाबेली, चिकन टिक्का. फळे - द्राक्ष, बोर, पपई, पेरू. भाजीपाला-पपई, चिल भाजी, शेवगा , कारले ,वांगे, गिलकी, आवळा, चिंच, पाणीपुरी यांच्यासह अनेक घरगुती विविध पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. फूड पदार्थाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यावसायिक मार्गदर्शन व चटपटीत पदार्थांचा आनंद घेत खरेदी विक्रीतून आलेला नफा तोटा समजून घेतला.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:04 am

परधाडी येथील पुरकर दांपत्याकडून संत जनार्दन स्वामी संस्थानास 4एकर जमीन:मूळ गावी संस्थेचे बालसंस्कार केंद्र व गोशाळा व्हावी, यासाठी जमीन दान‎

मूळचे नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील रहिवासी व सध्या ओझर येथे वास्तव्यास असलेले जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक रमेश पुरकर यांनी गावातील चार एकर बागायत जमीन जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज संस्कारित बाणेश्वर महादेव मंदिर संस्थान, ओझर यांना दान केली आहे. सोमवारी दुपारी नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पुरकर दांपत्य, संस्थेचे अध्यक्ष शांतीगिरी महाराज, येथील भक्त परिवाराचे तालुका सेवक हरेश्वर सुर्वे यांच्या उपस्थितीत कायदेशीर सोपस्कार पार पडले. संत जनार्दन स्वामी यांनी १९६६ मध्ये पुरकर यांना दीक्षा दिली होती. तेंव्हापासून ते स्वामींचे निस्सीम भक्त आहेत. आतापर्यंत त्रंबकेश्वर, नाशिक, पिनाकेश्वर आणि बाणेश्वर ओझर असे पाच वेळा सलग सात दिवस अन्न पाण्याविना पारायण केले आहे. स्वामी कृपेने आयुष्यात खूप काही मिळाल्याने मूळ गावी संस्थेचे बालसंस्कार केंद्र व गोशाळा व्हावी, यासाठी जमीन दान करण्याचा निर्णय घेतला, निर्णयाला संपूर्ण कुटुंबाचीही साथ लाभली. बागायती जमिनीला सरासरी २० ते २५ लाख रुपये एकर असा दर मिळतो. शिक्षक दांपत्याने विहीर असलेली बागायती जमीन दान केली.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:03 am

मनमाडला अधिक प्रगत शहर म्हणून विकसित करण्यासाठी कटिबद्ध:आमदार सुहास कांदे यांची ग्वाही; नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण‎

शहराचा पाणीप्रश्न करंजवण योजनेमुळे कायमस्वरूपी सुटला असून, एमआयडीसीलाही मंजुरी मिळाली आहे. भूमिगत गटार योजनेसारखी लोकोपयोगी कामे सुरू असून, यापुढे मनमाडला गतीशील व प्रगतीशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी दिली. जनतेने प्रचंड विश्वासाने पालिकेची सत्ता महायुतीच्या हाती दिली असून, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. निवडून दिलेले प्रतिनिधी गैरवर्तन करत असतील, तर प्रसंगी त्यांचे राजीनामे घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या मनमाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे थेट निवडून आलेले नगराध्यक्ष योगेश पाटील आणि २४ नगरसेवकांनी प्रचंड बहुमत मिळवून विजय संपादन केला. यानिमित्त सोमवारी रात्री एकात्मता चौकात नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, युतीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नक्षीदार रांगोळ्या, सनई-चौघडा, तुतारी, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत योगेश पाटील यांनी नगराध्यक्षपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. पाणी व विकासाअभावी शहर सोडून गेलेले नागरिक पुन्हा मनमाडमध्ये स्थायिक होत असून, व्यापार-उद्योग वाढावा आणि स्वच्छ, सुंदर मनमाड घडावे यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कांदे यांनी केले. प्रारंभी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी आमदार सुहास कांदे, अंजूम कांदे, फरहान खान, नूतन नगराध्यक्ष योगेश पाटील व सर्व नगरसेवकांचे सत्कार केले. ब्रह्मवृंदांच्या विधीनंतर शपथविधी पार पडला. माजी नगराध्यक्ष, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:01 am

इगतपुरीत नववर्षाच्या स्वागताला हुक्का व रेव्ह पार्ट्यांना पूर्ण बंदी:हॉटेल-रिसॉर्ट चालकांना पोलिसांच्या सूचना; कारवाईचा इशारा‎

नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलिस सतर्क झाले असून, शहर व परिसरातील हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खासगी बंगले, रो-हाऊसेस, धाबे व रेस्टॉरंट चालकांना अमली पदार्थ, हुक्का व इतर नशेच्या पदार्थांवर कडक बंदी घालण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिला. इगतपुरी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत त्यांनी आस्थापनांच्या मालक व प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. सर्व रजिस्टर अद्ययावत ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवणे, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच आस्थापना सुरू व बंद करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. विनापरवाना हुक्का, मादक पदार्थांची विक्री किंवा मद्यपानास परवानगी देऊ नये. लाउडस्पीकरचा वापर परवानगीप्रमाणेच करावा व डीजे, साऊंड सिस्टिममुळे ध्वनीप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. इगतपुरी हे पर्यटनस्थळ असल्याने नववर्षानिमित्त मोठी गर्दी होते. मागील काही वर्षांत रेव्ह पार्टी व अमली पदार्थांच्या प्रकरणांमुळे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे यापुढे अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही, अशी तंबी उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधिकारी सागर इंगळे यांनी दिली. बैठकीच्या शेवटी गोपनीय विभागाचे पोलिस कर्मचारी नीलेश देवराज यांनी आभार मानले. इगतपुरीत नववर्षाच्या रात्री पूर्वी काही ठिकाणी बेकायदा रेव्ह पार्टी आणि हुक्क्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यातून पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली होती. याच अनुभवातून यंदा पोलिसांनी आधीच आस्थापनांवर बंधने घालत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली. पूर्वी घडलेल्या गुन्ह्यांमुळे पोलिसांकडून दक्षता

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:01 am

पेंच प्रकल्पातील गिधाडाचे दारणा सांगवीत रेस्क्यू:ए. आर. इ. ए. एस. फाउंडेशन संस्था व निफाड वनविभागाची संयुक्त मोहीम‎

पेंच व्याघ्र प्रकल्प येथून ११ डिसेंबरला झेपावलेले गिधाड १७ दिवसात ७०० किलोमीटरचा प्रवास करून नाशिक जवळील अंजनेरी येथे दाखल झाले.वनविभागाकडून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले तसेच पायात १३२ नावाने टॅगिंग करून सोडलेले हे गिधाड निफाड तालुक्यातील दारणा सांगवी या गावात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सोमवारी (दि.२९) दारणा सांगवी येथे ए.आर. इ. ए. एस. फाउंडेशन व निफाड बचाव पथकाने गिधडाला सुरक्षित रेस्क्यू केले. नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशन संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे, मंगेश चारोस्कर, करण पवार, साहिल कदम यांच्यासह आधुनिक बचाव पथकाने ही मोहीम यशस्वीपणे राबविली. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जालना, संभाजीनगर मार्गे हे गिधाड नाशिक मध्ये दाखल झाले. प्रवास १७ दिवस ७५० किलोमीटर डोंगर कड्यांवर मुक्काम करत प्रवासात दोन वेळा भोजन घेतले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 8:00 am

मिक्सर हायवा- दुचाकीची समोरासमोर धडक, 1 ठार:बिडकीनजवळ अपघात, एक जण गंभीर जखमी‎

मिक्सर हायवा आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाला. दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी दुर्गा हायस्कूलसमोर घडली. यामध्ये विशाल भगवान राठोड (२२, रा. सहयोगनगर, बिडकीन) याचा मृत्यू झाला. सचिन जाधव (२१, रा. खंडाळे, ता. अहमदपूर) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मिक्सर हायवा (एमएच २०-ईजी ८०३३) बिडकीन येथून चित्तेगावकडे जात होता. दरम्यान, दुचाकी (एमएच २० जीएम ७९५७) यांच्यात धडक झाली. दुचाकीचा चक्काचूर झाला. घटना घडताच अनेक नागरिकांनी धाव घेऊन ॲम्ब्युलन्स बोलावली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदपाठक यांनी विशाल राठोड यास मयत घोषित केले. जखमी सचिन जाधव यास प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशाल राठोड हा मूळचा परळी येथील होता. त्याने बिडकीन येथे मैत्र चहाचा कट्टा दुकान चालू केले होते. विशालचे वडील भगवान राठोड हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून ते बिडकीन येथेच राहतात. विशाल हा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी असून एक विवाहित आहे. विशालने बिडकीन येथे मैत्र चहाचा कट्टा दुकान थाटले होते. त्याच्या स्वभावामुळे दुकानही चांगल्या प्रकारे चालू होते. अशातच बिडकीन येथे घराचे बांधकामही त्यांनी चालू केले होते. विशाल हा सकाळी सहा वाजताच चहाचे दुकान उघडायचा. मंगळवारी त्याला उशीर झाल्याने वडिलांनी दुकान उघडले. नंतर तो दुकानाकडे दुचाकीवरून जात होता. घरी होता एकुलता एक

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:45 am

अजिंठा लेणीला दिवसभरात 4 हजार 200 पर्यटकांची भेट:थर्टी फर्स्टमुळे गर्दी वाढू लागली, पण फिल्टरचे पाणी नाही‎

थर्टी फर्स्टच्या आदल्या दिवशी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला ४,२०० पर्यटकांनी भेट दिली. विदेशी पर्यटकांकडून ६०० रुपये, तर भारतीय पर्यटकांकडून ४० रुपये शुल्क घेतले जाते. तरीही लेणीत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. फिल्टर मशीन असूनही त्याची साफसफाई आणि दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे पर्यटकांना कुंडाचे पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. थंडीच्या दिवसांत सोयगाव आगाराकडून एसी बसेस जास्त चालवल्या जातात. एसी बसचे भाडे २५ रुपये, तर नॉन एसीचे १५ रुपये आहे. थंडीत एसी बस का, असा सवाल पर्यटक करत आहेत. अजिंठा लेणीला आलेल्या शालेय सहलींना कोणतीही सवलत दिली जात नाही. सर्वसामान्य भाडे आकारले जाते. त्यामुळे सहलीचे बजेट बिघडते. एका शाळेच्या शिक्षकांनी दोन बसेसमधील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अजिंठा टी पॉइंटपासून लेणीपर्यंत ४ किमी पायी नेले. निदान विद्यार्थ्यांना तरी बसची सुविधा द्यावी, अशी मागणी होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:45 am

बाजार समिती सभापतिपदाची माळ अखेर श्रीराम शेळके यांच्या गळ्यात

छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी दुपारी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत श्रीराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण १८ संचालकांपैकी १७ संचालक उपस्थित होते. सर्वांनी एकमताने श्रीराम शेळके यांना पाठिंबा दिला. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व उपस्थित संचालकांनी सभापतिपदासाठी एकमुखी पाठिंबा दिला. श्रीराम शेळके हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक २०२३ मध्ये झाली होती. त्या वेळी भाजपचे ९, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी १, व्यापारी २ आणि हमाल मापारी मतदारसंघातून १ संचालक निवडून आले होते. काँग्रेस वगळता इतर सर्वांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मंगळवारी काँग्रेसचे तीन संचालक वगळता उर्वरित १५ संचालक सकाळी राजस्थानमधून परतले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी उपनिबंधक समृद्ध जाधव होते. त्यांना सचिव विजय शिरसाट यांनी सहकार्य केले. विजयानंतर आ. अनुराधा चव्हाण यांनी श्रीराम शेळके यांचा सत्कार केला.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:44 am

नोंदणी केली, अप्रूव्हलच नाही; पैठणचे हजारो शेतकरी कापूस विक्रीपासून वंचित:ऑनलाइन नोंदणीचा पेच, नोंदणी प्रक्रियेत अडकलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरातच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह पैठण तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. शासनाने कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली आहे. मात्र, तांत्रिक अडचणी, अपुरी माहिती, आणि वेळेवर न मिळणारे अप्रूव्हल’ यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी हमीभाव केंद्रावर कापूस विकण्यापासून वंचित राहिले आहेत. ७६ हजार हेक्टरवरील कापूस धोक्यात : यंदा तालुक्यात ७६ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच उत्पादनात घट झाली आहे. आता विक्री प्रक्रियेतील अडथळ्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सध्या बालानगर आणि पाचोड येथे कापूस खरेदी केंद्रे सुरू आहेत, परंतु नोंदणी प्रक्रियेत अडकलेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच पडून आहे. अज्ञानाचा फायदा आणि आर्थिक लूट : ‘कपास किसान' अ‍ॅपवर नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. तांत्रिक ज्ञानाचा अभाव असल्याने शेतकरी सायबर कॅफे किंवा त्रयस्थ व्यक्तींची मदत घेत आहेत. याचाच फायदा घेत काही घटक नोंदणी आणि स्लॉट बुकिंगसाठी शेतकऱ्यांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. ज्यांना नोंदणी करता आली नाही, त्यांना खाजगी व्यापाऱ्यांना कमी दराने कापूस विकावा लागत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले ^ पैठण तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली नाही, त्यांना हमीभाव केंद्रावर कापूस विकता येणार नाही. यामुळे त्यांना खुल्या बाजारात कमी दरात कापूस विकावा लागत असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. - माऊली मुळे, शेतकरी नेते

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:43 am

जि.प. कें.शाळेत राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँकेचे केले उद्घाटन

दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने ‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँक' हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन तिरुपती अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापक विकास देसाई यांच्या शुभहस्ते पार पडले. या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत गायकवाड, उपाध्यक्षा राधाबाई सोनवणे, माजी विद्यार्थी संघाचे रवींद्र काळे, एच. के. काळे, शिक्षणप्रेमी राजेंद्र दुतोडे, सुनील ठोंबरे, दुर्गाबाई निकुंभ, रवींद्र साखळे, रामेश्वर शिरसाठ, वैशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे या बँकेत खऱ्या बँकेप्रमाणेच संपूर्ण व्यवहार प्रक्रिया विद्यार्थी स्वतः करून प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. या संपूर्ण उपक्रमामागे शाळेचे कृतिशील व दूरदृष्टी असलेले मुख्याध्यापक किरण कुमार पाटील यांची संकल्पना व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्यावर भर देणारा हा उपक्रम त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. कार्यक्रमास पंकज रगडे, मंगला बोरसे, रामचंद्र महाकाळ, सुरेखा चौधरी, प्रतिभा कोळी, गणेश बाविस्कर, बिलाल बागवान आदी उपस्थित होते. सर्व व्यवहार बँकेप्रमाणे : शाळेने या उपक्रमासाठी छापील बँक चेक, विड्रॉल स्लिप (रक्कम काढण्याचे अर्ज), नोंदवही व आवश्यक कागदपत्रे तयार करून आणली होती. प्रत्यक्ष बँकेत जसे चेक भरून पैसे काढले जातात, त्याच पद्धतीने रक्कम काढण्यासाठी विड्रॉल स्लिप व रक्कम भरण्यासाठी भरणा स्लिप विद्यार्थ्यांच्या बचत बँकेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जणू शाळेच्या आवारातच एक स्वतंत्र बँक सुरू असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येत आहे. या व्यवहारात विद्यार्थी कॅशियर, लिपिक व व्यवस्थापक यांनी पैसे मोजणे, नोंद करणे, चेक तपासणे, जमा–खर्चाची नोंद घेणे अशी सर्व कामे मोठ्या जबाबदारीने पार पाडत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:43 am

चार महिन्यांनंतर घाटनांद्रा घाटातून धावली ‘लालपरी':सिल्लोड-पाचोरा बस पूर्ववत, अतिवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या घाटनांद्रा घाटातील रस्त्याची डागडुजी पूर्ण‎

अतिवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या घाटनांद्रा घाटातील रस्त्याची डागडुजी पूर्ण झाली आहे. तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारपासून या मार्गावर एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. सिल्लोड आगाराच्या पाचोरा मार्गावरील सर्व बसेस सुरू झाल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटनांद्रा घाटातील रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे, भगदाडे व उखडलेला मुरूम यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने या घाटातील वाहतूक बंद केली होती. परिणामी सिल्लोड, पाचोरा व सोयगाव या आगारांच्या बसेस चार महिन्यांपासून बंद होत्या. याचा फटका प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार व व्यापाऱ्यांना बसत होता. खाजगी वाहनांद्वारे किंवा पर्यायी मार्गाने अधिक खर्च करून प्रवास करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल कन्नड–सोयगाव तालुक्याच्या आमदार संजना जाधव यांनी घेतली. त्यांनी १९ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष घाटाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. पाच ते सहा दिवसांत घाटातील डागडुजी पूर्ण करण्यात आली. यामध्ये वळण रस्ते मोकळे करणे, रस्त्यावर पडलेले मुरूमाचे ढिग बाजूला करणे, दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकतील अशी रुंदीकरण करणे तसेच भगदाडे बुजवण्याचे काम करण्यात आले. विभागीय प्रमुखांच्या पाहणीनंतर हिरवा कंदील : रस्त्याची डागडुजी पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या विभागप्रमुखांनी घाटाची पाहणी केली. रस्ता सुरक्षित असल्याचा अहवाल प्राप्त होताच मंगळवारपासून बस सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:42 am

सोनखेड्यातील 9 सिंचन विहिरींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप:खुलताबादेत संतोष लाटे यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच‎

खुलताबाद सोनखेडा गावातील ९ सिंचन विहिरींच्या कामात मोठ्या अपहाराचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संतोष अंबादास लाटे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारपासून (दि. २९) आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास उपोषण थांबवणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरींच्या कामात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप लाटे यांनी केला आहे. कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून निधीचा गैरवापर झाल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी जाणीवपूर्वक दडपली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पंचायत समितीसमोर ठाण मांडले आहे. गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी नेमलेल्या चौकशी समितीमधील पदाधिकारी उपोषणस्थळी आले होते. त्यांनी चौकशी अहवाल सादर केला. मात्र लाटे यांनी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “चार महिन्यांपूर्वी अर्ज दिल्यानंतरही अहवाल रखडला. अर्जानंतरच जेसीबीने खड्डे खोदले. माती अजूनही ताजी आहे. तरीही अहवालात विहिरी ढसळल्या, असे कसे नमूद केले?” असा सवाल त्यांनी केला. मंगळवारी दुपारी खिर्डी ग्रामपंचायत सदस्य आकाश हिवर्डे, साईनाथ मातकर, दरेगावचे राजेंद्र गायकवाड, सोनखेडा उपसरपंच नवनाथ खिल्लारे, माजी सरपंच शेषराव वाकळे, सुभाष वाकळे यांच्यासह अनेक सदस्यांनी लाटे यांची भेट घेतली. खोटा आरोप असल्यास मला शिक्षा द्या ः संतोष लाटे दोन महिन्यांत विहीर कशी पडू शकते? शासन निधी विहीर पडण्यासाठी देतो का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. “कामे बोगस असतील तर दोषींवर गुन्हे दाखल करा. कामे खरी असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी खोटा आरोप केला असेल तर शिक्षा भोगण्यास तयार आहे,” असे लाटे यांनी स्पष्ट सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:42 am

मुंबईत ‘पॉवर गेम’ ! ठाकरे बंधूंसोबत शरद पवार,:केवळ 11 जागा लढणार, राज ठाकरे यांच्या मनसेचे 52 जागांवर उमेदवार, शिवसेना उबाठा 164जागांवर निवडणूक लढवणार

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय घडामेाडींना वेग आला आहे. मुंबईवर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी उबाठा आणि मनसे यांची युती झाली असतानाच आता ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटानेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात एक नवीन “पॉवर गेम’ पाहायला मिळणार आहे. एकूण २२७ जागांसाठी या नव्या समीकरणाने कंबर कसली आहे. मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने ५२ जागांवर उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. तर सर्वात मोठा वाटा उचलत शिवसेना (उद्धव ठाकरे) गट १६४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने मविआतून बाहेर पडत “स्वबळाचा’ नारा दिला आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या “वंचित बहुजन आघाडी’सोबत युती करून निवडणुक रिंगणात उतरले आहेत. मुंबईत मराठी मतांचे होणारे विभाजन ही नेहमीच शिवसेनेसाठी चिंतेची बाब राहिली आहे. मात्र, आता दोघे भाऊ एकत्र आले आहेत. शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार! ठाणे महापालिकेत महायुतीचे काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. ठाण्यातील या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेने आपला वरचष्मा कायम राखला आहे. ठाण्यात शिंदेसेना ८७ आणि भाजप ४० जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, ठाकरे बंधू यांनीही दंड थोपाटले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाला किती यश मिळते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजप- शिंदेसेनेला ठाकरेंचे आव्हान भिवंडी- निजामपूर महायुतीमध्ये भाजप ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित जागांवर मित्रपक्ष किंवा स्थानिक अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. ठाकरे गट आणि मनसे येथे एकत्र लढणार असल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. मनसे बहुजन विकास आघाडीसोबत काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरारमध्ये ठाकरे गट सुमारे ८० जागांवर निवडणूक लढेल, तर बविआ देखील येथे लढत देईल. तसेच येथे भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिंदेंना ६६, भाजपला ५६ जागा कल्याण डोंबिवली महापालिका ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाते. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागा आहेत. शिंदे गट ६६ जागा लढणार आहेत. तर भाजपच्या वाट्याला ५६ जागा लढेल. एकनाथ शिंदे - गणेश नाईक सामना रंगणार नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक असा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मागितलेल्या १३ जणांना उमेदवारी न मिळाल्याने म्हात्रे संतप्त झाल्या असून, त्यांनी नाईकांना थेट आव्हान दिले आहे. नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ जागा आहेत. मात्र भाजपकडून शिंदे गटाला अवघ्या २० जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याने नव्हता. भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने मीरा भाईंदर हा भाजपचा मजबूत गड मानला जातो. माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन (ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे) यांच्यातील अंतर्गत वाद मिटवून भाजप येथे स्वबळावर लढत आहे. शिवसेना (शिंदे गट): प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने या शहरात आपली ताकद वाढवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:40 am

पथदिवे बंद, पाणीही अनियमित; अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी:सिडकोतील राजीव गांधी स्टेडियम परिसरात कचरा तुंबला

प्रभाग क्रमांक ११ हा सुखवस्तू मध्यमवर्गीयांचा प्रभाग आहे, पण पथदिवे, पाणीपुरवठा आणि अतिक्रमणासारख्या समस्यांचा विळखा आहे. गणेश कॉलनी, आविष्कार कॉलनी, एन-६, चिश्तिया कॉलनी, जिव्हेश्वर कॉलनी या भागांमध्ये नवी बाजारपेठ वसली असल्याने या ठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठानांची अतिक्रमणे, घरांची अतिक्रमणे, यामुळे रस्त्यावरच होणारी पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या आहे. याशिवाय पथदिव्यांकडे नियमित लक्ष दिले जात नाही. यामुळे टवाळखोर तरुण, दारुडे अंधार पडल्यावर सर्रास फिरतात. यामुळे सायंकाळी परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या घटना लक्षात घेता, नागरिकांना अंधार पडल्यावर घराबाहेर पडणे भीतिदायक वाटते. याशिवाय पाण्याची समस्या आहे. ६ दिवसांनी येणारे पाणी अनेकदा ९ ते १० दिवसांनी येते. पाणी येण्यास उशीर होत असल्यास टँकर पाठवले जात नाही. क्र. ११, गणेश कॉलनी, आविष्कार कॉलनी, रहेमानिया कॉलनी २०१५ : नगरसेवक, पक्ष, मतदानवॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान४०. मकरंद कुलकर्णी, शिवसेना २,१५०६२. शीतल गादगे, शिवसेना १,७६९६३. अब्दुल रहीम, एमआयएम १,७१९४१. इर्शद खान, एमआयएम २,१७९ या प्रभागात मकरंद कुलकर्णी यांच्या वॉर्डात सर्वाधिक ११ कोटींची कामे झाली आहेत. याशिवाय १२ कोटींचा सावरकर संग्रहालयाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. बॉटनिकल गार्डन संपूर्ण प्रभागाच्या नागरिकांसाठी जमेची बाजू आहे. शीतल गादगे यांनीही १२ कोटींची कामे केली आहेत. 1. पथदिवे: बंद दिव्यांमुळे रात्री घराबाहेर पडणे कठीणया भागातील नागरिकांना बंद पथदिव्यांमुळे रात्री घराबाहेर पडताना भीतीचा सामना करावा लागतो. असुरक्षित वातावरण असल्याची भावना निर्माण होते. 2. पाणीपुरवठा: १० दिवसांनंतर पाणी येत असल्याने नागरिक त्रस्तप्रभागात ८ ते १० दिवसांनंतर नळावाटे पाणी येते. पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त आहेत. 3. अतिक्रमण: चौकांमध्ये कायम वाहतुकीची कोंडीपरिसरातील बाजारपेठांमध्ये सातत्याने होणाऱ्या अतिक्रमणांवर नियंत्रण नाही. आझाद चौक, बजरंग चौक, आविष्कार चौकांत वाहतूक कोंडी कायम होते.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:36 am

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक:6 माजी महापौरांना शिंदेसेनेचे तिकीट नाही, अनिता घोडेले, त्र्यंबक तुपे यांना मिळाली उमेदवारी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ८ माजी महापौरा‌ंच्या प्रवेशाची चर्चा कायम केली जात होती. मात्र, शिंदेसेनेने ५ महापौरांना उमेदवारी दिली नाही. केवळ माजी महापौर अनिता घोडेले आणि त्र्यंबक तुपे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेत गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेच्या राहिलेल्या नंदकुमार घोडेले यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. माजी महापौर विकास जैन, विमल राजपूत, कला ओझा, नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, गजानन बारवाल, किशनचंद तनवाणी, त्र्यंबक तुपे हे उद्धवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र, आता निवडणुकीत केवळ दोनच माजी महापौर दिसणार आहेत. दरम्यान, माजी महापौर बारवाल यांनी शिंदेसेनेत उमेदवारी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्धवसेनेशी संपर्क साधला. उद्धवसेनेने त्यांना ए, बी फॉर्म दिले. मात्र उशीर झाल्याने बारवाल यांच्या पत्नी प्रभावती बारवाल यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जैन यांनी नाकारली उमेदवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर पक्षातील काही नेत्यांनी आरोप केल्यामुळे विकास जैन यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. जैन ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले की, पालकमंत्री शिरसाट हे पक्षाचे पालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातीलच नेत्याने आरोप केले. त्यामुळे मी दुखावलो आहे. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत काही जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, पुन्हा तिकीट घेतले. मी लढवणार नाही. काही लोकांनी तिकिटासाठी आंदोलन केले. मला तसे करायचे नाही. नव्यांना संधी द्यावी लागेल नव्या लोकांना संधी द्यावी लागेल. माजी महापौर विकास जैन यांनी पक्षाची शिस्त पाळत आमच्यावर आरोप झाले म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. - संजय शिरसाट, पालकमंत्री

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:33 am

मी महापालिका बोलतेय...:ठरावातील दुरुस्त्या करताना अधिकाऱ्यांची दमछाक, ‘मला जेवण करायचं... तुम्ही जेवण करू नका...’ अशी असावी ठरावातील दुरुस्ती

सर्वसाधारण सभेत अनेक गमतीजमती घडतात. अनेक वादग्रस्त विषय पुढं येतात. आपण आज काही गमतीदार विषयांवर बोलणार आहोत. मी सांगते काही किस्से. बऱ्याच वेळा ठराव करताना काही त्रुटी राहून जातात. मग त्या दुरुस्त करण्याची मागणी होते. अशीच एक मागणी सभागृहात झाली, पण त्याआधी आपण हे पूर्ण प्रकरण समजून घेऊयात. हा विषय होता नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीचा. मागील सभेत त्याबाबत एक ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यात प्रशासनानं नियमानुसार दुरुस्ती केली आणि तो विषय सभेपुढे आणला. आता ही दुरुस्ती करताना नेमकं काय चुकलं होतं तेच लिहिलेलं नव्हतं. त्यात म्हटलं होतं की, मागील सभेतील विषय क्रमांक ६२ पृष्ठ क्रमांक ३५ वरील मुद्दा क्रमांक ४ नुसार नगरसेवक आपल्या स्वेच्छानिधीतून एखाद्या नोंदणीकृत खासगी संस्थेला १५ हजार रुपयांपर्यंतचे खेळणी किंवा इतर साहित्य देऊ शकतात. त्यासंबंधीची देयकं अर्थात बिलं पुढील ३ महिन्यांत सादर करावीत. आता हे वाचून नगरसेवकांना काहीच कळेना. त्यावर थोडा वेळ चर्चा झाली. मग अलफखान हुसैनखान उभे राहिले, ते म्हणाले, ‘कोणत्याही ठरावात दुरुस्ती करायची असल्यास ती मुद्देसूद असली पाहिजे. म्हणजे मी जर म्हणालो की, मला जेवण करायचे आहे. आणि जर तुम्हाला सांगायचंय की, तुम्ही जेवण करू नका... तर ते सविस्तर आलंच पाहिजे.’ यावर सभागृहात एकच हशा पिकला. अधिकाऱ्यांनाही त्यांची चूक कळली. ही दुरुस्ती पुढे ढकलण्यात आली. अर्थात १५ हजारांच्या साहित्याचा विषय असल्याने फार ताणाताणी कुणी केली नाही. शासकीय भाषेची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांकडून काय चूक होईल याचा नेम नसतो. एकदा महात्मा गांधी यांच्याबाबत महापालिकेनं प्रसिद्धीस दिलेल्या मजकुरावरून असाच वाद पुढं आला. महात्मा गांधी यांच्याबाबत लिखित स्वरूपातील तो मजकूर वर्तमानपत्रात प्रसिद्धदेखील झाला. हा मुद्दा सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी लावून धरला आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास भाग पाडलं. ही झाली काही उदाहरणं, पण पांडुरंग पैठणकर यांचं नावच चुकीचं लिहिलं गेल्यामुळे त्यांनी सभेत आक्षेप नोंदविला. नगरसेवकांच्या नावाचा चुकीचा उल्लेख अशा पद्धतीनं का करण्यात आला, हा मुद्दा त्यांनी लावून धरला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याला माफी मागावी लागली. या चुकांमुळे अधिकारी हैराण व्हायचे. एक तर इतिवृत्त मराठी आणि उर्दूतून दिले जायचे. अनेक प्रस्तावात ‘संभाजीनगर’ असा उल्लेख असायचा. तो काढण्याची मागणी झाली की उर्दूतील इतिवृत्त बंद करण्याची मागणी यायची. त्यात अधिकाऱ्यांची दमछाक तर होणारच ना...

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:30 am

तिकीटवाटपात घोळ झाला, इम्तियाज ‎जलील यांना पदावरून हटवा- सिद्दिकी:संभाजीनगरात विजयी नगरसेवकांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने नाराजी‎

२०१५ च्या निवडणुकीत महानगरपालिकेत मोठी मुसंडी‎मारणाऱ्या एमआयएम पक्षामध्ये यंदा उमेदवारी‎वाटपावरून मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. माजी‎खासदार इम्तियाज जलील यांनी २०१५ मधील विजयी‎नगरसेवकांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने‎पक्षात उघड नाराजी पाहायला मिळत आहे. मनपात‎विरोधी पक्षनेता राहिलेले नासेर सिद्दिकी यांनी जलील‎यांच्या ‎विरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे.‎निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना संधी दिल्याचा तसेच‎तिकीटवाटपात घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला.‎ मंगळवारी दुपारी एकीकडे अर्ज भरण्याची लगबग‎सुरू असताना दुसरीकडे गणेश कॉलनी येथील‎कार्यालयाबाहेर नासेर यांच्या नाराज समर्थकांनी मोठी‎गर्दी करत घोषणाबाजी सुरू केली. तिकीटवाटपावरून‎झालेल्या नाराजीसंदर्भात नासेर सिद्दिकी म्हणाले की,‎महानगरपालिकेमध्ये एमआयएम हा सर्वात महत्त्वाच्या‎पक्षांपैकी एक आहे. आमची शहरात ताकद आहे. मात्र,‎या निवडणुकीच्या तिकीटवाटपात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज‎जलील यांनी व्यापार केला. ज्यांना तिकीट मिळाले ते‎आम्ही फुकटात आलो नसल्याचे सांगतात. यावरून सर्व‎स्पष्ट होते. इम्तियाज जलील यांनी मुंबई, धुळे येथे घोळ‎केले. हाच प्रकार ते शहरात करत आहेत. त्यामुळे त्यांना‎प्रदेशाध्यक्षपदावरून हटवा तसेच छत्रपती संभाजीनगर‎महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेतूनही दूर करा,‎अशी मागणी नासेर सिद्दिकी यांनी केली.‎ राजकीय समीकरणे बदलली?‎ इम्तियाज यांनी जितेंद्र आव्हाड, विनोद ‎पाटील आणि समीर राजूरकर यांच्या‎ सांगण्यावरून तिकिटे वाटप केल्याचा ‎गंभीर आरोप सिद्दिकी यांनी केला आहे.‎कदीर मौलाना आणि इम्तियाज जलील‎ यांच्यातील जुना संघर्ष सर्वश्रुत असतानाही‎ ओसामा कदीर यांना मिळालेल्या ‎तिकिटामुळे जुन्या शहरात चर्चांना उधाण‎ आले आहे. मन्नत''वर जल्लोष, दुसरीकडे‎ सिद्दिकी गटाने केला संताप उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या ‎टप्प्यात इम्तियाज जलील यांच्या मन्नत''‎या निवासस्थानासमोर उमेदवारी ‎मिळालेल्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ‎सायंकाळी ५ वाजेनंतर मोठा जल्लोष ‎केला. मात्र, दुसरीकडे नासेर सिद्दिकी‎ आणि त्यांच्या समर्थकांनी इम्तियाज‎ यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. ॲनालिसिस‎ १. नो रिपीट फॉर्म्युला ‎एमआयएमने या वेळी नो रिपीट‎फॉर्म्युला वापरून नवीन रक्ताला‎संधी देण्याचा प्रयत्न केला आहे.‎मात्र, यामुळे २०१५ पासून पक्षाची‎बांधणी करणारे जुने नगरसेवक‎दुखावले गेले आहेत. ही नाराजी‎मतांच्या विभाजनाला निमंत्रण‎देणारी ठरू शकते.‎ २. इम्तियाज यांचा ‎मास्टरस्ट्रोक? कदीर मौलाना ‎यांच्या मुलाला उमेदवारी देणे हा‎ जलील यांचा एक मोठा मास्टरस्ट्रोक ‎मानला जात आहे. ज्या‎विरोधकासोबत कायम संघर्ष झाला,‎त्यांनाच आपल्या गोटात खेचून‎ इम्तियाज यांनी नवीन राजकीय‎ समीकरण मांडले आहे.‎ ३. बंडखोरीचे तगडे आव्हान सिद्दिकी यांच्यासह अनेक जुन्या‎चेहऱ्यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे‎बंडखोरीचे आव्हान आहे.‎‎‎‎

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:19 am

सातव्या वेतन आयोगाची मुदत आज संपणार; नव्याची प्रतीक्षा:नवी वेतनश्रेणी लागू हाेईपर्यंत जुनीच वेतनश्रेणी

केंद्र आणि राज्य सरकारचे १.७५ कोटी कर्मचारी आणि १.४४ कोटी पेन्शनधारकांसाठी २५ जुलै २०१६ पासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. १ जानेवारी २०२६ पासून नवीन वेतनश्रेणी लागू होणे अपेक्षित होते, परंतु ती अद्याप तयार नाही. त्यामुळे जानेवारी २०२६ पासूनही या सर्व कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी (स्लॅब) पूर्वीप्रमाणेच राहील. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थापन करण्यात आलेल्या आठव्या वेतन आयोगाला आपल्या शिफारशी मे २०२७ पर्यंत केंद्र सरकारला सादर करायच्या आहेत. सरकारच्या मंजुरीनंतर, हे नवीन वेतनमान २०२७ च्या अखेरीस किंवा २०२८ च्या सुरुवातीला लागू केले जाऊ शकते. जोपर्यंत या शिफारशी येत नाहीत, तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच वेतन आणि महागाई भत्ता मिळत राहील. विशेष म्हणजे, आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासूनच लागू झाला असे मानले जाईल. त्यामुळे, हा वेतन आयोग लागू होण्यास जो काही विलंब होईल, त्या कालावधीची थकबाकी सर्व कर्मचाऱ्यांना दिली जाईल.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:12 am

लेखाजोखा:राज्यांच्या कमाईचा 80% हिस्साफ्री स्कीम, वेतन-पेन्शनवर खर्च, विकासासाठी राज्यांकडे पैसाच उरेना

मोफत योजना व सबसिडी हा सत्ता मिळवण्याचा ‘खात्रीशीर मार्ग’ बनला आहे. मात्र, राज्यांची खालावलेली आर्थिक स्थिती या मार्गाचा मोठा ‘साइड इफेक्ट’ म्हणून समोर येत आहे. राज्यांकडे वीज, रस्ते आणि घरांसाठी पैसाच शिल्लक नाही. राज्यांच्या कमाई आणि खर्चाचा ताळेबंद सांगतो की, सबसिडी, वेतन, पेन्शन आणि व्याजाचा परतावा यांसारख्या महत्त्वाच्या खर्चांनंतर राज्यांच्या हाती त्यांच्या कमाईचा केवळ २०-२५% हिस्साच उरत आहे. पंजाबसारख्या राज्याच्या हाती तर खर्चासाठी केवळ ७% रक्कम उरली आहे. कर्जावरील व्याजाचा परतावा हा एक ‘प्रतिबद्ध खर्च’ मानला जातो. मात्र, या वर्षी राज्यांना वर्षांनुवर्षांपासून घेतलेल्या प्रचंड कर्जाची मूळ रक्कमही फेडायची आहे. अनेक राज्यांकडे तर त्यासाठी निधीच उपलब्ध नाही. राजस्थानला या वेळी १.५० लाख कोटींच्या कर्जाची मूळ रक्कम फेडायची आहे. बिकट अवस्था: बंगालवर व्याजाचा बोजा शिक्षण बजेटपेक्षा जास्त, मप्रवर कर्ज वाढतेय हे रेड सिग्नल आहेत ... उत्पन्नाचे सोर्सही पाहावे मोफत योजना किंवा सबसिडीची घोषणा करताना उत्पन्नाची साधने किती आहेत हे पाहणे गरजेचे आहे. नवीन योजनांसह सत्तेत आलेली सरकारे जुन्या सरकारची योजना बंद करत नाहीत. लोक नाराज होतील अशी भीती त्यांना वाटते. आसाम सरकारने जुन्या सरकारची योजना बंद केली होती. इतर सरकारांनीही अशी पावले उचलली तर काही प्रमाणात बोजा कमी होऊ शकतो. -अजित केसरी, निवृत्त आयएएस (तज्ज्ञ, स्टेट फायनान्स)

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:10 am

विनयभंगाचा गुन्हा नोंदवल्याने महिलेच्या पतीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न:नांदेड जिल्ह्यातील घटना, मुख्य संशयित पसार, दोघे ताब्यात

विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून तक्रारदार पीडित महिलेच्या पतीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे सोमवारी (२९ डिसेंबर) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पीडितेचा पती ५० टक्के भाजला असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी माधव बेंद्रीकर व शिवकुमार बेंद्रीकर या दोघांना ताब्यात घेतले आहे, परंतु मुख्य संशयित संतोष बेंद्रीकर पसार झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बेंद्री गावात भीती व संतापाचे वातावरण पसरले असून आहे. बेंद्री येथील संशयित संतोष बेंद्रीकर याची परिसरातील महिलेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. पीडित महिलेला अश्लील शेरेबाजी करणे, छेड काढण्याचा प्रकार २२ डिसेंबर रोजी घडला होता. संशयितांच्या वडिलांची पीडितेच्या पतीला अरेरावी विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयिताचे वडील माधव बेंद्रीकर यांनी सोमवारी पहाटे ५.३० वाजता पीडित महिलेच्या पतीला गाठले. तुझ्या बायकोने माझ्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला, असा जाब विचारला. या वेळी संशयित संतोष बेंद्रीकर व त्याचा भाऊ शिवकुमार बेंद्रीकर हे घटनास्थळी हजर होते. गुन्हा नोंद करण्यावरून वादावादी झाली. अचानक तिघांनी पीडित महिलेल्या पतीवर पेट्रोल ओतून आग लावली.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:01 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:मार्केटमध्ये महापालिकेचेच अतिक्रमण, माणूस मरणाच्या दारी, पण ॲम्ब्युलन्स यायलाही जागा नाही; ड्रेनेज मिक्स होऊन येतं पिण्याचं पाणी!

भोलेश्वर मार्केटमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या महापालिकेनेच अतिक्रमण केले आहे. आमचा माणूस मरणाच्या दारी असतो, अनेकदा ॲम्ब्युलन्स येते. मात्र, जागाच नसल्यामुळं ती घरापर्यंत येऊच शकत नाही. त्यामुळंच इथं घंटागाडीही येत नाही. त्यामुळे कचरा नाल्यात फेकतो. ड्रेनेजच मिक्स होऊन पिण्याचं पाणी येतं. इथं रहायचं तरी कसं? असा प्रश्न पडतो. दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा'मध्ये प्रभाग क्रमांक 15 मधल्या नागरिकांनी पोटतिडकीने आपल्या समस्या मांडल्या. ना रस्ते, ना जागा, ना पाणी...आम्हाला हे सारे प्रश्न कधी सुटतील असे वाटते. आम्हाला हा प्रश्न सोडवणारा नगरसेवक हवाय. चार-चार पिढ्यांपासून येथे असलेले रहिवासी सांगतात की, 'पूर्वीचा आमचा भाग चांगला होता आता मोकळा परिसर बघायलाच मिळत नाही.' या लोकांना कोणत्या समस्यांना सामोर जावं लागतं, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून... घराच्या बाजूला नाला... प्रभागात राहणारे लोक जागा नसल्यामुळं इतके परेशान आहेत की, प्रभागात राहणारी रितिका रिडलॉन म्हणते 'रस्ते एवढे छोटे - छोटे झाले आहे की, आमच्या भागात जर कोणाला इमर्जन्सी आली तर आमच्याकडे ॲम्ब्युलन्ससुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे लोक मरणाच्या दारात असतात पण इथे गाडी येऊच शकत नाही.' या भागात केवळ जागेचा नाही तर पावसाळयात येथील नागरिकांच्या घरात गुडघा इतके पाणी शिरते. यावर बोलताना रितिका म्हणते 'आम्ही इथे खूप वर्षांपासून राहतो. यामुळं जो भाग वाढला आहे तो वरच्या भागात गेलाय आणि आमच्या घरासमोर सगळं उतार करून टाकला आहे. त्यामुळं जेव्हा - जेव्हा पाणी येत किंवा पावसाळा सुरू होतो तेव्हा सगळं ड्रेनेजच पाणी आमच्या दारात येतं. त्याचा एवढा वास सुटतो की, आम्ही तो सहनच करू शकत नाही. घराच्या बाजूलाच नाला आहे. त्यामुळे तिथला सुद्धा वास. म्हणजे समोरून, पाठीमागून नुसती दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे जो कोणी निवडून येईल त्याने एवढा रास्ता नीट करावा आणि इथले अतिक्रमण हटवावे. घंटागाडी येत नाही, कचरा नाल्यात... अंगुरी बागेजवळ असलेल्या भागात राहणारे श्याम मोईम म्हणतात की, 'आमच्याकडे घंटा गाडी येत नाही. त्याचं कारण म्हणजे पूर्वी आमच्याकडे जागा खूप मोठी होती. पण आता अतिक्रमण एवढं वाढला आहे की, आमची टू - व्हीलरसुद्धा काढायला त्रास होतो. मग घंटागाडीवाले कसे येणार? ते येतात मुख्य रस्त्यावर, आम्ही राहतो आतल्या भागात. त्यामुळं गाडी कधी आली, कधी गेली काही समजत नाही. म्हणून मग आमच्याकडं काहीच पर्याय उरत नाही. आम्हाला पाठीमागच्या नाल्यात कचरा फेकावा लागतो. त्यात आमचा काय दोष आहे. आम्ही अनेकदा महानगरपालिकेत फोन केले, तक्रार दाखल केली. त्यांनी काही ॲक्शन घेतली. मात्र, अजूनही इथले रस्ते छोटे - छोटे होत चालले आहेत.'येणाऱ्या नगरसेवकांकडून हीच अपेक्षा आहे की, त्यांनी एकदा यावं बघावं की आम्ही कसे राहतो.' पहिले १५-२० मिनिट घाणच पाणी येत भागात राहणाऱ्या शमीम बेगम म्हणतात की, 'आमच्या भागाला १०-१५ दिवसाला, तर कधी २० दिवसाला पाणी येते. जेव्हा पाणी येतं, तेव्हा पहिलं १५-२० मिनिट इतकं घाण पाणी येत की त्याचा वास सुद्धा सहन होत नाही. तेच पाणी आम्हाला प्यावं लागतं. रस्त्यावर चढ - उतार असल्यामुळं सगळं पाणी जिथे जिथे खड्डे तयार झाले आहेत तिथे तुंबतं. सगळं ड्रेनेजेच पाणी आणि पिण्याचं पाणी मिक्स होऊन आमच्यापर्यंत पोहोचतं. आमची लेकरं त्या साचलेल्या पाण्यात खेळतात. आलेल्या घाण पाण्यामुळे पोटदुखीसारखे आजार होऊ नयेत म्हणून आम्ही पाण्यात औषध टाकून टाकून त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो.' रस्त्याच्या मधोमधच पार्किंग! प्रभागातील रहिवासी सुधीर नाईक म्हणतात की, 'मी जगात अशी पार्किंग कुठेच पाहिली नाही. जिथे मधोमध गाड्या लावल्या जातात. गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरासमोर अगदी मधोमध पार्किंग केली जाते. त्याचा एवढा त्रास होतो की, लावलेली गाडी काढता सुद्धा येत नाही. त्या जागेवर प्रचंड अतिक्रमण आहे. भोलेश्वर मार्केटमध्ये महापालिकेचेच अतिक्रमण आहे. त्यांनी जर ते काढलं, तर गाड्या व्यवस्थित बसतील. तर ते काढायला तयार नाहीत. प्रभाग पंधरामध्ये जर बघायला गेलं तर लोकांच्या घरापर्यंत रस्ते आहेत. मात्र, त्याच रस्त्यांमुळं त्यांचं जीवन धोक्यात येतंय. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. ड्रेनेज, पाणी, कचरा आणि अतिक्रमण या येथील मुख्य समस्या असून अनेकवेळा तक्रार करून सुद्धा त्यास दाद मिळत नाही हीच गोष्ट या नागरिकांना गेली अनेक वर्ष त्रास देत आहे. अशी आहे प्रभागाची रचना प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नारळीबाग, सिटी चौक, कुंभारवाडा, मछली खडक, दिवान देवडी, केळी बाजार, खाराकुँवा, अंगुरी बाग, राजाबाजार, कुआरफल्ली, जाधवमंडी भाग,लक्कडमंडी, मोतीकारंजा, किराणा चावडी,सराफा, शहागंज भाजीमंडी, नवाबपुरा, धावणी मोहल्ला, न्यू मोंढा, कबीर मंदिर, काली मस्जिद, बारुदगर नाला, गुलमंडी भागशः, पानदरीबाग, गांधीनगर, खोकडपूरा भागशः या भागांचा समावेश होतो. या भागाची एकूण लोकसंख्या 41796 एवढी आहे.

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 7:00 am

अपहरणकर्त्यांनी शेतकऱ्याचे हात बांधून 2 दिवस कारमध्ये कोंबले:छऱ्यांचे पिस्तूल, दोन चाकू, 4 रॉड, 80,500 रुपये जप्त; तोंडाला चिकटपट्टी, हातावर, छातीवर मारहाणीच्या खुणा

कुणाला संशय येऊ नये म्हणून अपहरण ‎केलेले शेतकरी तुकाराम पाटील गव्हाणे ‎यांना अपहरणकर्त्यांनी शनिवारी रात्रभर ‎तसेच रविवारी दिवसभर शेतकऱ्याच्या ‎तोंडाला चिकटपट्टी लावून तसेच हात ‎बांधून ब्रिझा कारमध्ये दोन दिवस कोंबून ‎ठेवले होते. मात्र गुन्ह्याची सर्वत्र चर्चा ‎झाल्याने बदनामी होऊ नये म्हणून रविवारी ‎रात्री आरोपींनी शेतकरी गव्हाणे पाटील ‎यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून ‎केला व मृतदेह कन्नड घाटात फेकून ‎‎दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.‎‎आरोपींकडून एक छऱ्याची पिस्तूल, दोन‎‎चाकू, चिकटपट्टी, तीन मोठे रॉड, एक‎‎लहान रॉड, ब्रिजा कार, तसेच रोख‎रक्कम ८० हजार ५०० रुपये जप्त केले.‎ या दरम्यान आरोपींनी तुकाराम पाटील‎यांच्या तोंडाला चिकटपट्टी, हात बांधून‎लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर‎जखमी केले होते. कारण तुकाराम पटेल‎यांच्या हातावर छातीवर मारहाण‎केल्याची निशाणी दिसत होती. दुसऱ्या‎दिवशी अजिंठा पोलिस मृत‎शेतकऱ्याच्या दुचाकीचा शोध घेत होते.‎मात्र, उशिरापर्यंत दुचाकी सापडली‎नाही. अपहरणच्या घटनेनंतर स्थानिक‎व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट‎पसरली आहे.‎ बदनामी टाळण्यासाठी खून‎ शेतकरी अपहरणाची माहिती‎मिळताच आम्ही लगेच सर्व यंत्रणा‎कामी लावली. सर्वत्र सर्च‎ऑपरेशन केले. मात्र तरी शेतकरी‎तुकाराम गव्हाणे पाटील हे वाचू‎शकले नाही याचे आम्हाला दुःख‎आहे. बदनामी होऊ नये आपली‎ओळख पटू नये म्हणूनच‎आरोपींनी शेतकरी तुकाराम‎गव्हाणे पाटील यांचा खून केला,‎अशी माहिती अजिंठा येथील‎सहायक पोलिस निरीक्षक अमोल‎ढाकणे यांनी दिली.‎ दुचाकी लपवल्याचा संशय‎ उंडणगाव-बोदवड रस्त्यावर शेतकरी गव्हाणे‎पाटील हे दुचाकीने जात होते. त्याचवेळी‎अपहरणकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडवून‎त्यांना कारमध्ये कोंबले. या घटनेनंतर‎संशयितांनी त्यांची दुचाकी लपवून ठेवल्याचा‎संशय आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशी‎पोलिसांनी या दुचाकीचा परिसरात शोध‎घेतला. मात्र, दुचाकी सापडली नाही. पाच‎आरोपींपैकी एकाने आपल्या घरी दुचाकी‎लपवल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिस‎माहिती घेत आहेत. तसेच मृताचा‎मोबाइलदेखील आरोपींनी कुठे फेकला,‎याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.‎‎‎‎‎‎‎

दिव्यमराठी भास्कर 31 Dec 2025 6:59 am

बंडोबांचे आव्हान !

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार (३० डिसेंबर) ही अंतिम तारीख असून सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी लपवाछपवीचा मार्ग स्वीकारला आहे. कारण त्यांच्यासमोर बंडोबांचे आव्हान कायम आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी सर्वपक्षीय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तेच चित्र आहे. सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत बंडखोरी उफाळून आली. त्यामुळे बंडखोरांची नाराजी […] The post बंडोबांचे आव्हान ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:52 am

साठोत्तरी साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी अभिजात मराठी भाषेला समृद्ध इतिहासाचा वारसा लाभला आहे.इस.पू.२२२० चा नाणेघाट, दोन हजार वर्षांपूर्वीचा ‘गाथासप्तशती’,’बृहत्कथा’,’कुवलयमाला’ या ग्रंथामुळे भाषेचे प्राचीन सामर्थ्य स्पष्ट होतेच, परंतु अभिजात मराठी भाषेला खरी प्रतिष्ठा व सन्मान साठोत्तरी मराठी साहित्याच्या भाषेने प्राप्त करून दिला आहे, असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले. मराठी विभाग महाराष्ट्र […] The post साठोत्तरी साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:50 am

वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई 

लातूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १जानेवारी ते दि. २८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतूक विरोधात लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभाग व भ.प. यांनी संयुक्तरित्या एकूण १६४९ गुन्हे नोंद करण्यात आले. यात १८०५ […] The post वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:47 am

वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर प्रभावी वचक 

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि क्लिष्ट तसेच गंभीर गुन्ह्यांचा वेगवान तपास करणे, हे कोणत्याही सक्ष्म पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. या दृष्टीने लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा ही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, गुन्हेगारीविरोधात एक प्रभावी, विश्वासार्ह आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा म्हणून ओळखली जाते. […] The post वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर प्रभावी वचक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:46 am

१०० टक्के मतदानाचा विद्यार्थ्यांचा निर्धार

लातूर : प्रतिनिधी आगामी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ‘स्वीप’ मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून येथील दयानंद महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी विशेष मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘मतदार प्रतिज्ञा’ आणि ‘संकल्प पत्र’ वितरणाद्वारे युवकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात […] The post १०० टक्के मतदानाचा विद्यार्थ्यांचा निर्धार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:44 am

मनपा आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी

लातूर : प्रतिनिधी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी विविध मतदान केंद्रांची पाहणी पाहणी केली. बुथवर मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. श्रीमती मानसी यांनी मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक १३ मधील प्रकाशनगर भागात ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, विशालनगर भागातील निर्मलादेवी प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्रभाग क्रमांक ८ मध्ये […] The post मनपा आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:43 am

अंतर्गत कलह; बंडखोरीने लातूर भाजपात नाराजी उफाळली

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपामध्ये गोंधळाची स्थिती पहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने असंख्य निष्ठावंतांना डावलून इतर पक्षांतून नूकतेच आलेल्या उप-यांना उमेदवारी बहाल केल्याने अंतर्गत कलह आणि बंडखोरीने भाजपा हतबल झालेली दिसत आहे. लातूर भाजपात प्रचंड नाराजी उफाळुन आल्याचे दिसून येत आहे. लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन […] The post अंतर्गत कलह; बंडखोरीने लातूर भाजपात नाराजी उफाळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:42 am

७० जागांसाठी एकूण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. दि. २३ ते दि. ३० डिसेंबरपर्यंत ७० जागांसाठी एकुण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी ५३४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. या नामनिर्देशनपत्रांची आज छाननी होणार आहे. प्रभाग क्रमांक १, २, ३ मधील अ-१६, ब-६, क-११, ड-११, एकुण ११९, प्रभाग […] The post ७० जागांसाठी एकूण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:42 am

टीम इंडियाकडून श्रीलंकेचा ५-० ने सुपडा साफ

तिरुवनंतपुरम : वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात २०२५ या वर्षाचा अफलातून शेवट केला आहे. टीम इंडियाने तिरुवनंतपुरममधील पाचव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १५ धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १६० धावाच करता आल्या. यासह भारताने हा सामना जिंकला. भारताचा हा […] The post टीम इंडियाकडून श्रीलंकेचा ५-० ने सुपडा साफ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:02 am

कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयाचे खाते उघडले:रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित, विरोधात एकही अर्ज नाही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने विजयाचे खाते उघडत मोठी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला असून, या विजयामुळे भाजप गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला असून, इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने येथून अर्ज भरलेला नाही. परिणामी, या प्रभागात निवडणूक न होताच भाजपने आपला पहिला विजय नोंदवला असून, अधिकृत घोषणेनंतर रेखा चौधरी या महापालिकेच्या पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका ठरतील. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला असून, प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपचे खाते उघडले आहे. या प्रभागातील 'नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला' या राखीव जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा राजन चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली असून, निकालाआधीच मिळालेल्या या मोठ्या यशाचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना आणि निवडणूक नियोजनाला दिले जात आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:34 pm

संभाजीनगर भाजप कार्यालयात 'हायव्होल्टेज ड्रामा':तिकीट कापल्याने दिव्या मराठे उपोषणाला; म्हणाल्या- स्वीकृत नगरसेवक करा, तरच उपोषण सोडणार

तिकीट कापल्यामुळे नाराज असणाऱ्या प्रभाग क्र.20, गादीया विहारच्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पक्षाच्या सर्वेक्षणात नाव असताना निष्क्रीय कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा जाब त्यांनी विचारला. आता स्विकृत नगरसेवक पदावर नियुक्तीचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या भाजप प्रचार कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. दिव्या मराठे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारण्यासाठी प्रचार कार्यालय गाठले. यावेळीच त्यांनी तिकीट मिळेपर्यंत उपोषणाचा इशारा दिला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 वाजेची वेळ संपल्यावर भाजप कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र, दिव्या मराठे एकट्याच येथे उपस्थित होत्या. कार्यालयातील स्टेजवर असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली सतरंजी टाकून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. दिवसभरात मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे किंवा अन्य कोणाकडूनही फोन आला नाही. कोणी विचारणा केली नाही. मुंबईहून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कार्यालयातून विचारणा झाली. मात्र, स्विकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचे उपोषण सुरू होते. दिव्या मराठे 18 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहे. अतुल सावे यांनी त्यांचे सर्वेक्षणात नाव आल्याचे सांगितले होते. मात्र, शितोळे नाव नसल्याचे सांगतात. पक्षातील नेत्यांमध्येच समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. 2010 मध्येही ऐनवेळी त्यांना एबी फॉर्म नाकारला होता. यावेळीही त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:05 pm

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात दीप्ती शर्मा अव्वलस्थानी

तिरुवनंतपूरम : आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत नंबर वनचा ताज पटकवल्यानंतर आता दीप्ती शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने या विक्रमाला गवसणी घालत वर्षाचा शेवट एकदम अविस्मरणीय केला. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम दीप्ती […] The post आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात दीप्ती शर्मा अव्वलस्थानी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 10:58 pm

पुणे महापालिका निवडणूक:अजित दादांकडून आणखी एका गुन्हेगाराला तिकीट, हत्या प्रकरणात जामिनावर असलेल्या बापू नायरला उमेदवारी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवसभर झालेल्या 'एबी' फॉर्मच्या वाटपात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मिळालेल्या संधीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुख्यात गजा मारणेची पत्नी आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली व लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर, आता दीपक मारटकर हत्या प्रकरणातील जामीनावर असलेला आरोपी बापू ऊर्फ या कुमार प्रभाकर नायर यालाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 39 मधून मैदानात उतरवले आहे. गुन्हेगारांना टायरमध्ये घालू, अशा आक्रमक वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत मात्र आपली सर्व तत्त्वे धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याला गुन्हेगारीमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजकीय फायद्यासाठी चक्क कुख्यात टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अजित पवारांच्या शब्दांत आणि प्रत्यक्ष कृतीत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या रिंगणात 'तत्वे' बाजूला ठेवून केवळ 'निवडून येण्याची क्षमता' या निकषावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसत आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून, या दोघी आता जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच कुख्यात गजा मारणे याच्या पत्नीलाही उमेदवारी देऊन पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांवर सढळ हाताने मेहेरनजर दाखवली आहे. एका बाजूला गुन्हेगारांविरुद्ध कठोर भाषेचा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच उमेदवारी देऊन राजकीय प्रतिष्ठा मिळवून द्यायची, अशा दुटप्पी भूमिकेमुळे 'पालकमंत्री' म्हणून अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 10:42 pm

मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक घटना:अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू तर भाजपच्या महिला नेत्याला हृदयविकाराचा झटका

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच, मीरा-भाईंदरमध्ये दोन अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एबी फॉर्म मिळवण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड झुंबड उडालेली असतानाच, मिरा रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याच तणावपूर्ण वातावरणात भाईंदरमध्ये भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक अर्जाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या दुःखद घटनांमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपली कन्या श्रद्धा बने हिला भाजपकडून उमेदवारी नाकारली गेल्याच्या धक्क्याने माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने मिरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी रुग्णालयातून त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत भावूक होती. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी असलेली निष्ठा आणि पक्षकार्यासाठी अंगावर घेतलेले खटले यांचा विचार न करता, ऐनवेळी डावलले गेल्याची भावना त्यांनी अश्रू अनावर होत व्यक्त केली. पक्षासाठी आयुष्य वेचूनही आज आपल्याकडे दुर्लक्ष झाले, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. मीरा भाईंदरमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती तुटली मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेर अधिकृतरीत्या तुटली असून, यावरून दोन्ही पक्षांतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन मेहता यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मेहता यांचा अहंकार आणि घमेंडीमुळेच ही युती तुटली आहे. भाजपला सुरुवातीपासूनच शिवसेनेला सोबत घ्यायचे नव्हते. शहरात स्वतःचेच वर्चस्व राखणे आणि शिवसेनेला सातत्याने कमी लेखणे हीच भाजपची रणनीती होती, असा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला. युतीसंदर्भातील चर्चेचा तपशील सांगताना सरनाईक यांनी भाजपच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला. चर्चेसाठी बोलावून आपल्याला तब्बल 50 मिनिटे ताटकळत ठेवले गेले आणि केवळ 13 जागांची अपमानास्पद ऑफर देण्यात आली, असा दावा त्यांनी केला. शिवाय, भाजपने सहकार्य केले तरच तुमच्या या 13 जागा निवडून येतील, असे अहंकारपूर्ण विधान करून शिवसेनेचा अपमान करण्यात आल्याचेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने आता स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेतला असून मीरा-भाईंदर महापालिकेच्या 95 पैकी 81 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 10:05 pm