केंद्राकडून ६४१८ कोटी हस्तांतरित
कराचा आगाऊ हप्ता, अजित पवारांनी मानले आभार मुंबई : प्रतिनिधी सणासुदीच्या काळात केंद्राकडून महाराष्ट्राला कराचा एक आगाऊ हप्ता देण्यात आला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यापैकी ६,४१८ कोटी रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आभार मानले. आता मराठवाड्यातील पूरग्रस्तांना त्यातून काही मदत होणार […] The post केंद्राकडून ६४१८ कोटी हस्तांतरित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गंगापूर तालुक्यात चार मुले बुडाली
ट्रॅक्टर धुवायला गेलेल्या चौघांवर काळाचा घाला छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे अंत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. येथील एका तलावात बुडून ४ मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. दस-याच्या निमित्ताने सर्व मुले ट्रॅक्टर धुण्यासाठी लिंबेजळगाव तलावातील बॅकवॉटरमध्ये गेले होते, यावेळी एकापाठोपाठ एक असे चारही मुले पाण्यात बुडाल्याची […] The post गंगापूर तालुक्यात चार मुले बुडाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेत आता सरकारी नोक-या धोक्यात
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेत शटडाऊन लागून २४ तास उलटून गेले. अमेरिकन काँग्रेसमध्ये निधी विधेयक मंजूर न झाल्याने देशात शटडाऊन लागू झाले असून त्याचा फटका आता ट्रम्प सरकारला बसायला सुरुवात झाली आहे. शटडाऊनमुळे आता अमेरिकेत सरकारी आस्थापनांची कार्यालये बंद होण्यास सुरुवात झाली आहे. हा शटडाऊन थांबावा, यासाठी सिनेटमध्ये तातडीने एक प्रस्ताव आणण्यात आला. मात्र, या प्रस्तावावरही […] The post अमेरिकेत आता सरकारी नोक-या धोक्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेतक-यांसाठी सरकारशी दोन हात करु
लातूर : प्रतिनिधी अतिवृष्टीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. मात्र सरकार गप्प आहे. अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना मदतीसाठी सरकार काही करताना दिसत नाही. सरकार उदासीन आहे. परंतू, शेतक-यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही. वेळ प्रसंगी सरकारशी दोन हात करु, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. यंदा अतिवृष्टी झाली. शेतकरी अडचणीत आहेत. […] The post शेतक-यांसाठी सरकारशी दोन हात करु appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महात्मा गांधी यांना आमदार अमित देशमुख यांनी केले अभिवादन
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार […] The post महात्मा गांधी यांना आमदार अमित देशमुख यांनी केले अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर तालुक्यातील ११२ ग्रामपंचायती वेबसाईटवर
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जात आहे. या अभियानातंर्गत लातूर तालुक्यातील ११२ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. लातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा कारभार वेबसाईटमुळे हायटेक होणार असून नागरीकांनाही घरबसल्या अनेक सेवा, सुविधा उपलब्ध होणार आहेत. लातूर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून बळकटीकरण होत आहे. शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख […] The post लातूर तालुक्यातील ११२ ग्रामपंचायती वेबसाईटवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सणासुदीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह सर्व राज्य सरकारांना कराचा आगाऊ हप्ता हस्तांतरित केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला 6 हजार 418 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे हस्तांतरण 10 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामान्य मासिक हस्तांतरणाव्यतिरिक्त असून, राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला गती देण्यासाठी तसेच कल्याणकारी आणि विकास योजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत. सणासुदीच्या काळात राज्याला भांडवली खर्चात वाढ करण्यास सक्षम करण्यासाठी तसेच विविध योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी या निधीचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या या अतिरिक्त निधीमुळे, विशेषतः मराठवाड्यातील पूरग्रस्तांना यातून काही तातडीची मदत मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याला मिळालेला हा मोठा निधी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी कशा प्रकारे वापरला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याच्या निर्णयाला साखर संघाचा विरोध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघाने विरोध केला आहे. राज्यात 1 नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत यंदा मराठवाड्यामध्ये महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली असून, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध मार्गांनी निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून निधी गोळा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आदेशानुसार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसामागे प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे. या कपातीपैकी 5 रुपये थेट बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरले जातील, तर उर्वरित 10 रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जातील. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जाणार आहे.
महाराष्ट्रातून विमानाने दिल्लीला जाऊन महागड्या आलिशान कार्सची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय 'फ्लाईट मोड' चोरट्यांच्या टोळीचा सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 5 कार आणि मोबाईलसह तब्बल 83 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीमुळे दिल्लीतील 5 गुन्हे उघडकीस आले असून, 4 सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. बनावट नंबरप्लेटमुळे लागला सुगावा जिल्ह्यात वाढलेल्या कार चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने तपास करताना सोलापूर पोलिसांनी एका संशयित फॉर्च्यूनर कारचा तपास केला. यावेळी या कारचे इंजिन नंबर आणि चेसी नंबर बनावट असल्याचे आढळून आले. या क्लूच्या आधारे पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता, ही टोळी दिल्ली आणि उत्तर भारतातून गाड्या चोरून त्यांची बनावट कागदपत्रे तयार करत असे आणि महाराष्ट्रात त्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले. 4 आरोपींना अटक; दोघांचा शोध सुरू या प्रकरणी पोलिसांनी अजीम पठाण (रा. सातारा), प्रमोद वायदंडे (रा. सातारा), फिरोज मोहम्मद (रा. बेंगलोर) आणि इरशाद सय्यद (रा. कोलार, कर्नाटक) या ४ सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांचे साथीदार हफिज (रा. मेरठ) आणि लखविंदर सिंग (रा. रायपूर) यांचा शोध अजूनही सुरू आहे. या टोळीकडून पोलिसांनी 1 फॉर्च्युनर, 3 हुंडाई क्रेटा आणि 1 ब्रेझा कार अशा एकूण 5 वाहनांसह 83 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांनी महाराष्ट्रात आणखी किती गाड्या विकल्या आहेत आणि कुठून-कुठून या गाड्यांची चोरी केली आहे, याबाबतचा तपास सोलापूर पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अशाच एका विमानाने प्रवास करून दुसऱ्या राज्यांत चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता, आणि आता पुन्हा ही 'फ्लाईट मोड' टोळी उघड झाली आहे.
गत काही महिन्यांत राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतक-यांच्या झालेल्या प्रचंड नुकसानीसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली. प्राथमिक अंदाजानुसार राज्यात सुमारे ६० लाख हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतक-यांना दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यात मदत वितरीत करण्याचे राज्य सरकारने […] The post दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एकनाथ शिंदे यांनी गोरेगावातील दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत आणि थेट आरोप करत हल्लाबोल केला. त्यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरही शिंदेनी जोरदार टीका केली. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी नेला का? असा सवाल शिंदेंनी केला. तसेच एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सर्वच गमावले, अशी टीकाही शिंदे यांनी केली. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या शेजारी बसता. बाळासाहेब असते, तर उलटे टांगून धुरी दिली असती, असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यांपर्यंत आणि काँग्रेसशी केलेल्या युतीपर्यंत अनेक आघाड्यांवर उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोला चढवला. आम्ही आधी मदतीचे ट्रक पाठवले, नंतर मी गेलो; पण काही लोक फक्त फोटो काढायला आणि नौटंकी करायला गेले, असा टोला लगावत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना कठोर शब्दांत सुनावले. फोटोग्राफरला फोटोशिवाय दुसरे काय दिसणार? पूरग्रस्तभागात शिंदेंच्या शिवसेनेकडून मदत देण्यात आली होती. मात्र, त्यावर फोटो असल्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदेंवर जोरदार टीका झाली. या टीकेला एकनाथ शिंदे आज दसरा मेळाव्या जोरदार प्रत्युत्तर दिले. विरोधकांना फोटो दिसतात, पण त्यातील सामान दिसत नाही. पूरग्रस्तांना २६ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू दिल्यात. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी घेऊन गेलात का? तेवढा तरी न्यायचा असता. तेवढी तरी दानत दाखवायची होती. तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते आपत्तीच्यावेळी मदत करत होते ना? तेव्हा बरं वाटत होते. कार्यकर्ते लावतात फोटो. पण फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार? असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. काही लोक फक्त जाऊन नौटंकी करून आले. पण आम्ही जायच्या आधी मदतीचे ट्रक गेले. आधी मदत गेली, नंतर एकनाथ शिंदे गेला, असे ते म्हणाले. पीएम केअर फंड कोविडसाठी होता, एवढे कळत नाही का? केंद्र सरकारने पीएम केअर फंडातून पूरग्रस्तांसाठी निधी द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावरून एकनाथ शिंदे हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले, पीएम केअर फंडातून पैसे द्या म्हणत आहेत, पण तो फंड कोविडसाठी होता, एवढे कळत नाही का? तुम्ही कोविडमध्ये सहाशे कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला का? तुम्हाला पंतप्रधानांवर आरोप करण्याचा अधिकार आहे का? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. बाळासाहेबांनी उलटे टांगून धुरी दिली असती एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी सावरकरांवर मुद्दामहून टीका करतात, हे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि आम्ही हिंदुत्व असल्याचे सांगतात. हे तुमचे बेगडी हिंदुत्व आहे. बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगून खालून मिरचीच धुरी दिली असती. सावरकरांचा अपमान केल्यावरही मूग गिळून, त्यांच्या बाजुला जाऊन बसता. पाकिस्तानचे झेंडे फडकवता. बॉम्बस्फोटातील आरोपींना तुमच्या प्रचारात फिरवता. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या कबरी सजवता, हे हिंदुत्व आहे का तुमचे? बाळासाहेबांचे हिंदुत्व तुम्ही २०१९ ला काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हाच सोडले. माझी शिवसेना काँग्रेस होऊ देणार नाही. काँग्रेसी पंचसुत्री काढून टाका असे बाळासाहेबांनी म्हटले होते. ते काढायचे सोडून तुम्ही त्यांना डोक्यावर घेतले. उद्धव ठाकरेंनी एका खुर्चीसाठी सर्व गमावले एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार येतोय का? एका खुर्चीसाठी सगळं घालावले. पक्षाचा प्रमुख हा पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो का? हे पक्षप्रमुख नाहीत, तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नंबरवरून टीका केली, ते वरून खाली आले. तुम्ही घरात बसून वर गेला. किती टीका करता. तुमच्या सारखा रंग बदलणारा मी कधीच पाहिला नाही. 30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? मुख्यमंत्री सहायता निधीतून तुम्ही अडीच वर्षात अडीच कोटी रुपये दिले. या एकनाथ शिंदे अडीच वर्षात साडेचारशे कोटी दिलेत. एकनाथ शिंदेने जे दिले, या हाताचे त्या हाताला कळू दिले नाही. जात-पात-धर्म-पाहिला नाही. तीस वर्ष मुंबई महापालिका ओरबाडून घेतले, ते कुठे गेले. एवढी माया कुठे गेली, लंडनला? असा बोचरा सवाल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला. आम्ही दिल्लीत १० जनपथला मुजरे करायला जात नाहीत आम्ही दिल्लीला जातो, पण तुमच्यासारखे १० जनपथला मुजरे करायला जात नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी पैसे आणायला जातो. केंद्राने महाराष्ट्राच्या विकासासाठी १० लाख कोटी रुपये दिले. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे, काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न कुणी पूर्ण केले? मोदींनी बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांच्यावर तुम्ही टीका करताय.
श्री रेणुकादेवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन
रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण साडेतीन मुहूतपैकिी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दस-यानिमित्त ग्रामदैवत आदिशक्ती श्री. रेणुकादेवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. लाखो भाविक भक्तांनी रेणुका मातेचे दर्शन घेतले . रात्री देवीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता झाली. ठिकठिकाणी रेणुकामातेच्या पालखीवर पुष्प वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. ग्रामदैवत […] The post श्री रेणुकादेवीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सिध्दी शुगर्सचा २०२६-२७ चा बॉयलर अग्नीप्रदिपन
अहमदपूर : प्रतिनिधी या तालुक्यातील सिध्दी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि, महेशनगर, उजना या कारखान्याचा सन २०२६-२७ चा १४ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नप्रिदिपन सोहळा विजयादशमीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. कृष्णा महाराज धानोरकर (कोंडीबा महाराज संस्थान, धानोरा.) व कारखान्याचे मार्गदर्शक व माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री बाबासाहेबजी पाटील (सहकारमंत्री, महाराष्ट्र […] The post सिध्दी शुगर्सचा २०२६-२७ चा बॉयलर अग्नीप्रदिपन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बाजार समितीचे सभापती हुडे आज पदभार स्वीकारणार
उदगीर : प्रतिनिधी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी अण्णा हुडे हे आज दि ३ ऑक्टोबर रोजी बाजार समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यानिमित्ताने उदगीर आडत व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक २०२३ मध्ये झाली. या निवडणुकीत शिवाजीराव पुढे यांच्या […] The post बाजार समितीचे सभापती हुडे आज पदभार स्वीकारणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रोटरी भूषण पुरस्कार कायम स्मरणात राहणारा : सहकारमंत्री
अहमदपूर : प्रतिनिधी रोटरी क्लबच्या वतीने दिला गेलेला रोटरी भूषण पुरस्कार हा मला कायम स्मरणात राहणारा असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले. अहमदपूर येथील किलबिल इंटरनॅशनल स्कूल येथे रोटरी क्लब अहमदपूर यांच्या वतीने राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांना रोटरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला उत्तर […] The post रोटरी भूषण पुरस्कार कायम स्मरणात राहणारा : सहकारमंत्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी गुरुवारी नेस्को सेंटर येथील दसरा मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत स्फोटक आणि खळबळजनक आरोप केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह दोन दिवस तसाच ठेवून दिला होता, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता, काढा माहिती. हे मी जबाबदारीने बोलत आहे. मी खूप मोठे विधान करत आहे याची मला जाणीव आहे, असे ते म्हणाले. रामदास कदम यांनी यावेळी बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विचारण्याची मागणी केली. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले रामदास कदम पुढे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? आतमध्ये तुमचे काय चालले होते? बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आल्याची चर्चा मातोश्रीवर होती, ते कशासाठी घेण्यात आले होते, असा सवालही त्यांनी केला. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र कधी करण्यात आले आणि त्यावर कोणाची सही होती, याबद्दलची माहिती बाहेर काढण्याची मागणी कदम यांनी केली. उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा हव्यास यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाचा हव्यास असल्याचा आरोप केला. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत जात शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली, असे ते म्हणाले. सध्या उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याकडे भीकेचा लोटा घेऊन जात असल्याची टीकाही त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी 30 वर्षे फक्त टक्क्यांचे राजकारण केले, असा आरोप करत, त्यांच्या काळात मुंबईचा महापौर शिवसेनेचा असूनही शिवसैनिकांना महापालिकेत जायचा अधिकार नव्हता, असेही रामदास कदम यांनी म्हटले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात सत्ताधारी पक्षावर आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळाचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी तातडीने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. एकनाथ शिंदेंवर टीका आणि भाजपवर हल्लाबोल पक्षातील फुटीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, अनेक पक्षांनी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. काही जणांना त्यांनी पळवले, पण जे पळवले ते पितळ होते, सोनं माझ्याकडेच आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना 'भगवी शाल पांघरलेले गाढव' असे म्हणत हिणवले. सध्याची परिस्थिती मोठी आहे, असे नमूद करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ओला दुष्काळ' ही संज्ञाच नसल्याचे म्हटले होते, यावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. खड्ड्यात घाला सगळे निकष आणि शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या कार्यकाळात केलेली कर्जमाफी व नियमित कर्ज भरणार्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा गद्दारांमुळे अपूर्ण राहिली, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल बोलताना त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना उद्धव ठाकरे यांनी थेट प्रश्न विचारला. संघाच्या 100 वर्षांच्या मेहनतीला लागलेली विषारी फळे (भाजपचे राजकारण) यावर तुम्ही समाधानी आहात का? तसेच, मोहन भागवत यांनी मुस्लिम धर्मगुरूंच्या भेटी घेतल्या. त्यांना म्हणू शकता का मोहन भागवत यांनी हिंदुत्व सोडले? आहे का हिंमत भाजपमध्ये? असा सवालही त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले. मणिपूर तीन वर्षांपासून जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे ते म्हणाले. लडाखमधील न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या सोनम वांगचूक यांना तुरुंगात टाकण्यावरही त्यांनी टीका केली. मुंबई महापालिका आणि मराठी अस्मिता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना, भाजपला 'अमिबा' (एकेपेशीय प्राणी) म्हणून संबोधले. ते व्यापारी म्हणून मुंबईकडे बघत आहेत, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो, असे ते म्हणाले. भाजपकडून निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात पैसे टाकून 'पगारी मतदार' तयार करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. बिहारमधील महिलांना 10 हजार रुपये दिले जात आहेत, मत विकत घेण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांसाठी नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. 5 जुलैला आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. जिथे मातृभाषेचा घात होत असेल, तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही, असे ते म्हणाले. मराठी भाषेवर हिंदीची सक्ती सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मराठीला हात लाऊन दाखवाच, हात जागेवर ठेवणार नाही, असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. सरकारला आंदोलनाचा इशारा भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला. शेतकऱ्यांची त्वरित कर्जमुक्ती आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर झाली नाही, तर मराठवाड्यासह राज्यभर मोठे मोर्चे काढणार आणि रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
३० वर्षांची माया कुठे गेली, लंडनला?
मुंबई : विजयादशमी दिवशी दसरा मेळाव्याने मुंबई गाजते, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातून विचारांचे सोनं लुटण्याची प्रथा शिवसेनाप्रमुख दिवंग बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. आता, हीच परंपरा पुढे जात असून गेल्या २-३ वर्षांपासून शिवसेनेतील फुटीनंतर दोन दसरा मेळावे संपन्न होत आहेत. एकीकडे ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होत आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा […] The post ३० वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत फूट पडल्यापासून दस-याच्या दिवशी दोन मेळावे होऊ लागले. त्यातील दादरच्या शिवाजी पार्क येथील मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. बहुप्रतिक्षित दसरा मेळाव्यात आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपावर टीकेचे बाण सोडले. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून गृहमंत्री अमित शाह आणि कउउ प्रमुख जय शाह यांच्यावर […] The post जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम… appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नशीब…, नाही तर फडणवीस म्हणून २० वे आले असते…!
मुंबई : आमचे हे जे मुख्यमंत्री आहेत, हे मुख्यमंत्री आम्हाला शिकवतायेत, मी बातमीच घेऊन आलो आहे, इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय, ‘मोस्ट पॉप्यूलर सीएम अॅक्रॉस इंडिया’ (भारतातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री). गेल्या दोन-तीन महिन्यांतलाच सर्व्हे आहे. यामुळे मी त्याचा कागदच घेऊन आलो आहे. आपल्या वेळेला पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येत होता. माझं कर्तृत्व नव्हते ते, हे […] The post नशीब…, नाही तर फडणवीस म्हणून २० वे आले असते…! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी राजकीय पक्षांना पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी-नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या याद्या तयार करण्याबाबत राजकीय पक्षांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर, निवडणूक तहसीलदार राहुल सारंग आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पाटील यांनी सांगितले की, २०२६ मध्ये होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वीच्या मतदार यादीत नाव असले तरी पात्र मतदारांना नव्याने नोंदणी करावी लागेल. तसेच, मतदार नोंदणीसाठी एकगठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची राजकीय पक्षांनी नोंद घ्यावी. पदवीधर मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पदवी परीक्षा किंवा पदवी समकक्ष पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिक्षक मतदारसंघासाठी मतदार हा १ नोव्हेंबर २०१९ ते १ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत माध्यमिक शाळेत किमान तीन वर्षे पूर्णवेळ अध्यापन केलेला असावा. संबंधित शिक्षकाने शाळेत अध्यापन केल्याबाबतचे संस्थाप्रमुखचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. मतदार नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी अर्ज भरण्याबाबत अधिक माहिती देतील. सन २०२० च्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी १ लाख ३६ हजार ६११ आणि शिक्षक मतदारसंघासाठी ३१ हजार २०१ मतदार आहेत. पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता ही संख्या कमी आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतदारांनीही आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी केले. मीनल कळसकर यांनी सांगितले की, मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक पात्र मतदारांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीत मतदार नोंदणीचे टप्पे, अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, अर्जाची छाननी प्रक्रिया, मतदार अर्हता आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
ई-रजिस्ट्रेशनने 5 वर्षांत 31,785 दस्तऐवजांची नोंदणी:नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांची माहिती
ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सोयीस्कर झाली असून गेल्या पाच वर्षांपासून याची यशस्वीपणे अंमलबजावणी होत आहे . आजअखेर एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाच्यावतीने पुणे येथे ई-रजिस्ट्रेशन आणि ई-एसबीटीआर प्रणालीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते, यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक ( मुख्यालय) उदयराज चव्हाण व विभागाचे इतर अधिकारी तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बिनवडे म्हणाले, नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रथम विक्री करारनामा प्रक्रियेसाठी नागरिकांनी नोंदणी कार्यालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सन २०२०-२१ पासून ही सुविधा सुरू केली आहे व यासाठी नोंदणी अधिनियम १९०८ आणि महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन नियम २०१३ अंतर्गत तरतूद करण्यात आली आहे. ई-एसबीटीआर हा मुद्रांक शुल्क भरण्याबाबतचा कायदेशीर व सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये डुप्लीकेशन व अन्य गैरप्रकारांना वाव राहणार नसल्याने त्याची विश्वासार्हता आहे. ई-एसबीटीआर या उपक्रमाची सन २०२४ पासून अंमलबजावणी सुरु असून अद्यापपर्यंत यामध्ये गैरप्रकार झाल्याची कोणतीही बाब समोर आलेली नाही.ई-एसबीटीआरवर मुद्रित केलेले, डिजिटली स्वाक्षरी असलेले व ई-रजिस्ट्रेशनद्वारे नोंदणीकृत केलेले दस्त हे मूळ दस्त म्हणून ग्राह्य धरण्यात येते, त्यामुळे हे दस्त बँकांनी कर्जविषयक अथवा इतर कामकाजासाठी मूळ दस्त म्हणून ग्राह्य समजण्यात यावे अशी सूचना बिनवडे यांनी केली.|
नवीन २५ घंटा गाड्या सोलापूरकरांच्या सेवेत रुजू
सोलापूर : गेल्या काही महिण्यांपासून कमी घंटागाड्यांमुळे सोलापुरातील कचरा उचलण्याची व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्या पार्श्वभूमीवर नवीन २५ घंटागाड्यांचे दस-याच्या शुभमुहूर्तावर गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सोलापूरच्या कचरा व्यवस्थापनाच्या समस्येला उपाय म्हणून नवीन ३८ घंटा गाड्या मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी २५ घंटागाड्यांचे पालकमंत्री […] The post नवीन २५ घंटा गाड्या सोलापूरकरांच्या सेवेत रुजू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. काँग्रेस भवन येथे आयोजित कार्यक्रमात शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना लक्ष्मीकांत देशमुख यांनी गांधी विचारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सध्या समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. महात्मा गांधींचे विचार आणि काँग्रेसची मूल्ये यांच्या आधारावरच भारताची वाटचाल व्हायला हवी. देशमुख यांनी लालबहाद्दूर शास्त्री यांच्या 'जय जवान, जय किसान' या घोषणेची देशात पुन्हा एकदा आवश्यकता असल्याचे सांगितले. सध्याचे सत्ताधारी असंविधानिकपणे देशाचा कारभार चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासाठी संविधान आणि गांधी विचारांची जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेवक रफिक शेख, अजित दरेकर, उस्मान तांबोळी, प्राची दुधाणे, मेहबुब नदाफ, सुजित यादव, डॉ. राहुल सावंत, द. स. पोळेकर, अनुसया गायकवाड, प्रकाश पवार, मारूती राऊत, माधवराव बारणे, संदिप मोकाटे, अनिल पवार, सुनील काकडे, अकबर शेख, रेखा जैन, सुरेख नांगरे, जीवन चाकणकर, आसिफ शेख, कुणार चौबारे, विनायक तामकर, अशोक लोणकर, महेश विचारे, रामदास केदारी, हर्षद हांडे, ॲड. बाळासाहेब बाणखेले, दिलीप लोळगे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यात तीन अपघातांत दोन महिलांसह तिघांचा बळी:आरटीओ चौक, गुलटेकडी आणि खडकी येथे अपघातांच्या घटना
पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. मंगळवार पेठेतील प्रादेशिक परिवहन चौक (आरटीओ), गुलटेकडी आणि मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी रेल्वे स्थानकासमोर या अपघाताच्या घटना घडल्या. आरटीओ चौकात बुधवारी (१ ऑक्टोबर) सकाळी एका भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सोनाली संदीप बेलगमवार (वय ४४, रा. वारजे माळवाडी) यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती संदीप बेलगमवार (वय ४८) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बेलगमवार दाम्पत्याचा मुलगा प्रणव (वय २१) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पोचालक वैभव विनायक जगताप (रा. अंबोजोगाई, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर नागरिकांनी टेम्पोचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. दुसऱ्या एका घटनेत, गुलटेकडी-मार्केट यार्ड रस्त्यावर मालवाहू गाडीच्या (पिकअप) धडकेत पादचारी ज्येष्ठ महिला पुष्पा सुरेश रुगवाल (वय ७२, रा. कात्रज) यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास गिरीधर भवन चौकाजवळ घडली. या प्रकरणी पुष्पा रुगवाल यांचे पुत्र गणेश सुरेश रुणवाल (वय ३०) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या पिकअप चालकाचा शोध पोलीस घेत आहेत. तिसऱ्या अपघातात, मुंबई-पुणे रस्त्यावरील खडकी रेल्वे स्थानकासमोर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक मोहंमद सलीम अब्दुलखलीद शेख (वय ६७, रा. दापोडी) यांचा मृत्यू झाला. शेख यांच्या पत्नीने खडकी पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शेख हे बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरुन निघाले होते. खडकी रेल्वे स्थानकासमोर भरधाव मोटारीने दुचाकीला समोरून धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता मोटारचालक पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांचा मृत्यू झाला.
स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) यांनी संयुक्तरीत्या केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत, शहरातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या एका देह व्यापार अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई दिनांक ०१/१०/२०२५ रोजी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे भंडारा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका दुमजली राहत्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईदरम्यान, संगीता धारगावे (वय ४५ वर्ष) ही मुख्य आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले. तिच्यासोबत अन्य दोन आरोपीही यात सामील असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १,०००/- रुपये रोख रक्कम आणि २०,०२०/- रुपये किमतीचे दोन मोबाईल (विवो आणि ओप्पो) असा एकूण २१,०२०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गंभीर प्रकरणी, आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन भंडारा येथे अप. क्र. १३४६/२०२५ अन्वये कलम ३, ४, ५ (१) स्त्री अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा (The Immoral Traffic Prevention Act, १९५६) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. ही कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री. नूरुल हसन साहेब, मा. अपर पोलिस अधीक्षक श्री. निलेश मोरे साहेब, आणि पोनि. चिंचोळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मपोहवा. कुथे, मपोहवा. घरडे, अ.मा.वा.प्र. कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.
तत्त्वज्ञान ही आपल्याकडे प्रचंड क्लिष्ट करून टाकलेली गोष्ट आहे. मात्र तत्त्वज्ञान हे स्वतंत्र आणि उकल करून सांगणारे असते. फ्रान्समध्ये बारावीपर्यंत तत्वज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना शिकणे आवश्यक आहे, तर आपल्याकडे तत्वज्ञानाचे विभाग बंद पडत आहेत. प्रत्येक जणच तत्त्वज्ञ असतो. आपल्या पुरते थोडेफार तो सगळे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याकडे मात्र तत्त्वज्ञानाला फार अवघड किंवा क्लिष्ट करून टाकले आहे' असे मत दिल्ली येथील जेएनयूचे प्राध्यापक तथा तत्त्वचिंतक प्रा. शरद बाविस्कर यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन येथे 'पाश्चात्त्य तत्त्वज्ञान समजून घेतांना' या विषयावर आयोजित संवाद या कार्यक्रमात शरद बाविस्कर बोलत होते. प्रगतिशील लेखक संघ, लोकसंवाद फाउंडेशन आणि महात्मा गांधी स्मारक निधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ विचारवंत डॉ. उमेश बगाडे यांनी भूमिका मांडली. प्रगतिशील लेखक संघाचे सचिव डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी आभार मानले. यावेळी मंचावर प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्राचे कार्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी शहरातील साहित्यिक आणि वैचारिक चळवळीतील मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. यामध्ये माजी न्यायाधीश प्रकाश परांजपे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे ॲड. के. ई. हरिदास, प्रा. एच. एम. देसरडा, बाबा भांड, विजय राऊत, प्राचार्य डॉ. राम चव्हाण, माजी प्राचार्य बागुल, साथी सुभाष लोमटे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. अर्जुन मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने तत्त्वज्ञानाचे महत्त्व जाणणारे अभ्यासकही उपस्थित होते. ज्यामध्ये युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
कोलंबिया/नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (बीजेपी) यांच्या विचारसरणीतील भ्याडपणा हेच मूळ आहे अशी टीका काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधींनीकोलंबियातून भारत सरकारवर जोरदार टीका केली आणि म्हटले की, भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे. राहुल गांधी यांनी भारताच्या रचनात्मक त्रुटी या […] The post भ्याडपणा हे भाजप-आरएसएसचे मूळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लेह : भारत खरोखरच स्वतंत्र आहे का? १८५७ मध्ये राणीच्या आदेशानुसार २४००० ब्रिटिशांनी १३५००० भारतीय शिपायांचा वापर करून ३० कोटी भारतीयांवर अत्याचार केले. आताच्या घडीला गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एक डझन प्रशासक २४०० लडाख पोलिसांचा गैरवापर करून ३००००० लडाख नागरिकांवर अत्याचार आणि छळ करत आहेत अशी घणाघाती टीका सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो वांगचूक यांनी […] The post भारत खरोखरच स्वतंत्र आहे का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नौदलाने गाझाच्या मदतीसाठी आलेली ४५ जहाजे रोखली
जेरुसलेम : इस्त्रायल नौदलाने गाझातील लोकांच्या मदतीसाठी येणा-या ४५ जहाजे रोखल्या आहेत. या नौकांना इस्त्रायलची सुरक्षा भेदता आलेली नाही. त्यामुळे गाझामधील लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचा शेवटचा प्रयत्नदेखील अयशस्वी झाला आहे. इस्त्रायलने पॅलेस्टाईन भागात येणारी सर्व मदत रोखून धरली आहे. पॅलेस्टाईनमधील युद्धग्रस्त लोकांना मदतीचा हात देण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले होते. त्याअंतर्गत फ्लोटिला या ४५ मदतीची […] The post नौदलाने गाझाच्या मदतीसाठी आलेली ४५ जहाजे रोखली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(आरएसएस) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या प्रस्थापित अर्थव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करत, स्वदेशी आणि स्वावलंबन हाच यावरील खरा उपाय असल्याचे स्पष्ट केले. गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजी आरएसएसच्या दसरा मेळाव्यात संघाच्या स्वयंमसेवकांना संबोधित करताना भागवत यांनी सध्याच्या विकास पद्धतीमुळे निर्माण झालेल्या दोषांवर बोट ठेवले. ते म्हणाले की या अमर्याद विकासामुळे […] The post देशात श्रीमंत गरीब दरी वाढतेय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधानांनी केली खर्गेंच्या तब्येतीची विचारपूस
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान मोदींनी एक्स पोस्ट करत माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले खर्गेजी यांच्याशी बोललो. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली […] The post पंतप्रधानांनी केली खर्गेंच्या तब्येतीची विचारपूस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-युरोप यांच्यात मुक्त व्यापार करार
नवी दिल्ली : भारत आणि चार युरोपीय देशांमधील (स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेंस्टाईन) मुक्त व्यापार करार(एफटीए) बुधवारपासून अंमलात आला असून या चार विकसित युरोपीय देशांसोबत भारताचा हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे. या कराराचे प्रमुख वैशिष्टये म्हणजे, पहिल्यांदाच, त्यात गुंतवणूक आणि रोजगाराशी संबंधित बंधनकारक वचनबद्धता समाविष्ट आहेत. याचा अर्थ असा की हे चार देश पुढील […] The post भारत-युरोप यांच्यात मुक्त व्यापार करार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
न्यूयॉर्क : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे एलन मस्क संपत्तीतील वाढीमुळे नव्या उंचीवर पोहोचले आहे. मस्क यांनी नवा जागतिक विक्रम केला आहे, जो आतापर्यंत कुणालाच करता आलेला नाही. एलन मस्क हे जगातील पहिले हाफ ट्रिलियन संपत्ती असणारे व्यक्ती बनले आहेत. त्यांची नेटवर्थ ५०० बिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. टेस्ला कंपनीसह इतर काही कंपन्यांचे एलन मस्क […] The post एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पीओकेत आतापर्यंत १२ नागरिकांचा मृत्यू
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसक निदर्शने सुरू आहेत. काल पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत किमान १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. […] The post पीओकेत आतापर्यंत १२ नागरिकांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकला जेटचे इंजिन देण्याचा रशियाचा निर्णय
नवी दिल्ली : भारत आणि रशियाचे संबंध अद्यापपर्यंत अत्यंत चांगले राहिले आहेत. मात्र असे असतानाही, भारताच्या सातत्याने केलेली विनंती बाजूला सारून, रशियाने पाकिस्तानला जेएफ-१७ फायटर जेटचे इंजिन सप्लाय करण्याचा निर्णय घेतला आहे. हे इंजिन चीन जेएफ-१७ जेटसाठी तयार करतो. मात्र, त्याची निर्मिती रशियावर अवलंबून आहे. डिफेंस सिक्योरिटी एशियाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने रशियाला दीर्घकाळ हे इंजिन […] The post पाकला जेटचे इंजिन देण्याचा रशियाचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
…मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही
बरेली : उत्तर प्रदेशमधील बरेली येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी मौलाना तौकिर रजा आणि त्याच्या संघटनेवर कारवाई केली आहे. दरम्यान, या हिंसाचारावेळी पोलिसांची हत्या करण्याचीही दंगेखोरांची योजना होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी नदीम याने पोलिस चौकशीमध्ये ही माहिती दिली आहे. या लोकांनी आमच्या नबीचा अवमान केला तर […] The post …मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार
नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता चक्रीवादळात रूपांतरित झाला असून तो वेगाने उत्तर-वायव्य दिशेने किना-याकडे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार हे चक्रीवादळ गुरूवार दि. २ ऑक्टोबर रोजी रात्रीपर्यंत ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ धडकेल तेव्हा या भागात ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता […] The post बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यूयॉर्क : मागील काही दिवसांपासून गाझामध्ये हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यामुळे गाझाची परिस्थिती बिघडली आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिक देशांच्या लष्कर प्रमुखांची परिषद १४ ते १६ ऑक्टोबर दरम्यान राजधानी दिल्ली येथे होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकी कारवायांमध्ये योगदान देणा-या सुमारे ३० […] The post भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशातील सर्व कुटुंबांकडे २५ हजार टन सोने
नवी दिल्ली : भारतातील कुटुंबांकडे खुप मोठ्या प्रमाणावर सोने असून अमेरिकेसह चीन आणि जपानच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यालाही टाकले मागे टाकले आहे. भारतातील लोकांकडे असलेले एकूण सोने अंदाजे २५,००० टन इतके आहे. हे अमेरिका, जर्मनी, चीन आणि अगदी आरबीआयकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही जास्त आहे. भारतातील नागरिकांमध्ये सोन्याची क्रेझ अनोखी असून दस-याच्या दिवशी केवळ वर्षभरात सोने ४२ […] The post देशातील सर्व कुटुंबांकडे २५ हजार टन सोने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेचा दसरा मेळावा आज गोरेगावातील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा प्रामुख्याने आगामी राजकीय आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे. यात एकनाथ शिंदे प्रामुख्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विशेषतः शिवसेना व तिच्या मंत्र्यांकडून करण्यात येणाऱ्या मदतीचा आढावा घेतील. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मुंबई मनपावर महायुतीचा भगवा' फडकवण्यावर एकनाथ शिंदे यांचा मोठा जोर असेल. ते आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचा आणि विजयाचे लक्ष्य गाठण्याचा संदेश देतील. दरम्यान, गतकाळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आजच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र सोडले जाण्याची दाट शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात पिक नुकसानीची पाहणी करणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेतली. मात्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कोणतीही दखल घेतली नाही. परिणामी, टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी बुधवारी ऑनलाईन बैठकीद्वारे नुकसानीचा आढावा घेतला. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे शेतकऱ्यांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. जिल्ह्यात पीक नुकसान झाल्यानंतरही पालकमंत्री हिंगोलीत आले नसल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर ता. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्री झिरवळ यांनी हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांना भेट देऊन पाहणी केली. या भेटीनंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देणे अपेक्षीत होते. मात्र त्यांनी अतिवृष्टीची पाहणी करून आल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची बैठक घेतली. याच बैठकीत जिल्हा नियोजनाचे मुद्दे उपस्थित करून ही बैठकही आटोपती घेतली अन जिल्ह्यातून काढता पाय घेतला. पालकमंत्र्यांच्या या भूमिकेवर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी बुधवारी ता. १ अतिवृष्टीची ऑनलाईन आढावा बैठक घेतली. यावेळी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांना किती नुकसान झाले, शासनाकडून मिळालेल्या किती नुकसान भरपाईचे वाटप किती झाले याची माहिती घेऊन आवश्यक सूचना दिल्या. तर पूरग्रस्त नागरिकांना तातडीने १० किलो गहू व तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या शिवाय शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, स्मशानभूमीचे नुकसान झाल्यास तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र हिंगोलीत येऊन अतिवृष्टीबाबत अधिकाऱ्यांची बैठक न घेता आता ऑनलाईन बैठक घेऊन काय उपयोग होणार असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे शेतकऱ्यांतून तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
मुंबई : ‘वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन’ असे म्हणणा-या प्रवाशांना आता एसटीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही. प्रत्येक थांब्यावरील एसटीचा अचूक ठावठिकाणा ‘आपली एसटी’अॅपद्वारे कळणार आहे. ‘आपली एसटी’ या नावाच्या नवीन अॅपचे दस-याच्या मुहूर्तावरण लोकार्पण करण्यात आले असून, या अॅपचा प्रवाशांना लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बस वेळेत येत […] The post ‘आपली एसटी’अॅपचे लोकार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पारंपरिक दसरा मेळावा आज मुंबईतील शिवतीर्थावर पार पडणार आहे. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना थेट मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची, विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची, पार्श्वभूमी लक्षात घेऊन या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सभेतून उद्धव ठाकरे निवडणूक लढाईचे रणशिंग फुंकतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेवरील आपला प्रभाव कायम ठेवण्याचा उद्देश ठेवून उद्धव ठाकरे आपले भाषण रचतील, असे बोलले जात आहे. याचबरोबर, आजच्या भाषणात ते मनसेसोबत संभाव्य युतीबाबतही संकेत किंवा भाष्य करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जाते.
पत्नी पीडित पुरुषांकडून शूर्पणखेचे दहन
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा आणि अंध:कारावर प्रकाशाचा विजय म्हणून विजयादशमी या सणाकडे पाहिले जाते. तसेच यादिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून विजयोत्सव साजरा केला जातो. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये एकेठिकाणी रावणाऐवजी त्याची बहीण शूर्पणखा हिचे दहन करण्यात आले आहे. दहन करण्यापूर्वी आरती गाण्यात आली. तसेच विधीवत हा कार्यक्रम पार पडला. पत्नी पीडित आश्रमातील […] The post पत्नी पीडित पुरुषांकडून शूर्पणखेचे दहन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद
मुंबई : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या वादात समाजवादी पक्षाचे (सपा) प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. भिवंडीत मराठी बोलण्याची गरज आहे का असा प्रश्न आझमी यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले, ‘मराठी आणि हिंदीमध्ये काय फरक आहे?’ या टिप्पणीमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडीला भेट देताना […] The post अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी सुरू झाली आहे. त्यात काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व काही नेते महायुतीमध्ये प्रवेश करत आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाण्याचा जिल्हाध्यक्षच अजित पवारांनी फोडला असून आमदार जितेंद्र आव्हाड यांना हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सुहास देसाई यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकल्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जात आहे. ठाण्यात सुहास देसाई यांचे मोठे वर्चस्व असल्याने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. या पक्ष प्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलली गेली आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हा पक्षप्रवेश झाल्याने शरद पवार गटाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकेकाळी ठाणे जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे वर्चस्व होते. पक्षाच्या या अभेद्य ताकदीमुळे अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाचा दबदबा कायम होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर येथील राजकारण ढवळून निघाले आहे. आव्हाड यांनी आपल्या गटात मोठी फूट पडू दिली नसली तरी, गेल्या काही दिवसांपासून अनेक कार्यकर्ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, ज्यामुळे आव्हाड यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरत आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी आव्हाड यांची साथ सोडून अजित पवार यांच्या गटात प्रवेश केल्यानंतर, आता पुन्हा एकदा देसाई यांचा प्रवेश आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाणे महापालिका निवडणुका तोंडावर असताना, आव्हाड यांच्या गटातील नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे झालेले हे प्रवेश त्यांच्या राजकीय वर्चस्वाला हादरा देणारे आणि त्यांच्यासाठी चिंता वाढवणारे ठरले आहेत.
ओबीसीचा कटऑफ मागास प्रवर्गापेक्षा जास्त
सावरगाव (बीड) : प्रतिनिधी मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी दाखले दिले जात आहेत. आम्ही कोणाला विरोध केला नाही, ना आम्ही कोणाच्या विरोधात आलो. हा अध्यात्म आणि शिक्षणाशी जोडला गेलेला समाज आहे. परंतु ओबीसी समाजाचा कटऑफ मागास प्रर्वगापेक्षा जास्त असून भविष्यात ओबीसी समाजाला मोठ्य स्पर्धेस सामोरे जावे लागेल. बीडमध्ये सुरु असलेले जातीपातीचे आणि एकमेकांकडे दुषित […] The post ओबीसीचा कटऑफ मागास प्रवर्गापेक्षा जास्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मी थोड्या दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे पाटलांचे भावनिक भाषण
बीड : प्रतिनिधी विजयादशमी दस-याचा आजचा दिवस विविध ठिकाणच्या दसरा मेळाव्यांनी गाजत असून सारवगाव येथे पंकजा मुंडेंच्या नेतृत्वातील दसरा मेळाव्यातून धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडेंनी जातीवादावर प्रहार करत भाषण जागवले. त्यानंतर, नारायण गडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनीही मराठा समाजाला उद्देशून भाषण केले. तत्पूर्वी नारायण गडावर जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी, त्यांच्या डोळ्यातून […] The post मी थोड्या दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे पाटलांचे भावनिक भाषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयाशेजारील उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित धर्मगुरुंनी प्रार्थना सादर केल्या. महात्मा गांधी स्मारक समितीचे सचिव देवराज सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्य अतिथी आमदार अमिन पटेल यांनीही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महात्मा गांधी स्मारक समिती […] The post राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजभवन येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी राजभवन येथे अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले. त्यानंतर परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी अभिवादन केले. The post राजभवन येथे महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मंत्री पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आज पार पडला. मात्र, यंदाच्या मेळाव्यात एका प्रसंगामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही तरुणांच्या हातात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडे फोटो झळकले. यावरून अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्या निशाणा साधला आहे. पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. तसेच यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांना गॉन केस म्हटले. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मीक कराडचे पोस्टर्स झळकावण्यात आले. काही तरुणांनी आपल्या हातात वाल्मीक कराडचे फोटो घेतले होते. We support walmik anna, कराड आमचे दैवत असा मजकूर या पोस्टरवर होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे काहीसा वाद निर्माण झाला आहे. नेमके काय म्हणाल्या अंजली दमानिया? या प्रकरणावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडेंवर हल्लाबोल केला. मला हे ऐकून अतिशय धक्का बसला आहे. एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी मान शरमेने खाली घालणे गरजेचे आहे. या राजकारणात आता इतकी विकृती आलेली आहे. लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती आली आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील, तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे, असेही दमानिया यांनी म्हटले. धनंजय मुंडे गॉन केस यावर तुमचे म्हणणे काय? पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मीक कराड यांच्या बाबत काय वाटते? असे प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारले पाहिजे, असे दमानिया म्हणाल्या. धनंजय मुंडे यांना याबाबत विचारून काही फायदा नाही, कारण ती गॉन केस आहे, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. हे ही वाचा... पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा:सभास्थळी वाल्मीक कराडचा फोटो; आमचा मेळावा हा साध्या, फाटक्या अन् कष्टकरी माणसांचा - पंकजा भाजपच्या नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा आज भगवानगडावर दसरा मेळावा झाला. यावेळी पंकजांनी आपला मेळावा साध्या, फाटक्या अन् कष्टकरी माणसांचा असल्याचे नमूद करत त्यांच्यासाठी यापुढेही कायम संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. आपण नवरात्रात 9 दिवस देवीची पूजा केली. त्या देवीने महिषासूर व रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला. आजच्या कलयुगातही असे राक्षस जन्माला आलेत. त्यामुळे आपणही या जातीपातीच्या राक्षसांचा नाश केला पाहिजे, असे त्या यावेळी म्हणाल्या. सविस्तर वाचा...
हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सामान्य प्रशासन विभागात ६० कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या मुहूर्तावर पदोन्नतीचे सोने मिळाले. मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आहेत. पारदर्शकपणे झालेल्या या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांनी दसरा सणाला पदोन्नतीचे सोने लुटल्याचे मानले जात आहे. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मागील काही दिवसांपासून पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट देण्यात आली. पंचायत विभाग, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर सर्वात मोठा विभाग असलेल्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची प्रतिक्षा होती. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी पात्र कर्मचाऱ्यांची माहिती तयार करून सर्व प्रस्ताव अद्यायावत केले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बारकाईने आढावा घेत पदोन्नतीचा निर्णय घेतला गेला विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यात आली. कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक यापदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्ग चार संवर्गातील २५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना वर्ग तीन मध्ये पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आहेत. कर्मचाऱ्यांत आनंदाची भावना दसऱ्याच्या दिवशी पदोन्नतीची भेट मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी 'ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने सोन्याची दसरा भेट ठरली आहे' अशी भावना व्यक्त केली. अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनिक पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनात पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सकारात्मक निर्णय घेतले जात असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होण्यासोबतच कार्यक्षमतेतही निश्चितच भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आमच्या ताटातील हिरावून घेऊ नका
बीड : मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावर त्यांनी भाष्य केले. मुंडे साहेबांनी जो वसा आणि वारसा दिला. तो पुढे नेईन. पण तुम्हाला मान खाली घालायला लावू देणार नाही. सत्तेत असो नसो. मी आठरा पगड जातीच्या लोकांसाठी मी लढणार आहे. काल बराडे धनगर आरक्षणासाठी बसले होते. मी त्यांच्याजवळ होते. गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला […] The post आमच्या ताटातील हिरावून घेऊ नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सामान्य प्रशासन विभागात ६० कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या मुहूर्तावर पदोन्नतीचे सोने मिळाले असून मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आहेत. पारदर्शकपणे झालेल्या या पदोन्नतीमुळे कर्मचाऱ्यांनी दसरा सणाला पदोन्नतीचे सोने लुटल्याचे मानले जात आहे. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये मागील काही दिवसांपासून पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची भेट देण्यात आली. पंचायत विभाग, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. त्यानंतर सर्वात मोठा विभाग असलेल्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची प्रतिक्षा होती. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनाही पदोन्नती देण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांनी पात्र कर्मचाऱ्यांची माहिती तयार करून सर्व प्रस्ताव अद्ययावत केले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या बारकाईने आढावा घेत पदोन्नतीचा निर्णय घेतला गेला विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक ठेवण्यात आली. कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्ग चार संवर्गातील २५ पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना वर्ग तीन मध्ये पदोन्नती मिळाली आहे. या पदोन्नतीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी काढले आहेत. कर्मचाऱ्यांना दसऱ्याची भेट दसऱ्याच्या दिवशी पदोन्नतीची भेट मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी 'ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने सोन्याची दसरा भेट ठरली आहे' अशी भावना व्यक्त केली. अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद कार्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनिक पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनात पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सकारात्मक निर्णय घेतले जात असल्याचे या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या मनोबलात वाढ होण्यासोबतच कार्यक्षमतेतही निश्चितच भर पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
बीड : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याच्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि सध्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेला वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकल्याचे दिसून आले आहे. भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत. पंकजा मुंडे सकाळी ११ वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या. […] The post पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी
अहिल्यानगर : प्रतिनिधी अनेकदा या पॅकेटबंद खाद्यपदार्थांना विकताना दुकानदारांकडून ब-याचदा योग्य ती काळजी घेतली जात नाही. त्यामुळे जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. कॅडबरी विकणा-या दुकानदाराने चॉकलेटचा साठा २५ डिग्रीपेक्षा कमी तापमानात ठेवल्याने त्याला बुरशी लागली होती. या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत कारवाई केली आहे. शहरातील धूपर अँड सन्स […] The post कॅडबरीच्या २५४ बॉक्समध्ये बुरशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
झेंडूला किलोमागे विक्रमी ३०० रुपये भाव
मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचा फुलांच्या शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दादर फूल मार्केटमध्ये फुलांची आवक घटून झेंडूच्या दराने ‘सीमोल्लंघन’ करत किलोमागे थेट ३०० रुपये असा विक्रमी दर गाठला आहे. इतिहासात पहिल्यांदाच झेंडूची फुले किलोमागे ३०० रुपये झाली आहेत, अशी माहिती दादर येथील फूल व्यापारी गणेश मोकल यांनी दिली. […] The post झेंडूला किलोमागे विक्रमी ३०० रुपये भाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गुगलच्या मदतीने कुंभमेळ्याच्या गर्दीवर नियंत्रण!
नाशिक : प्रतिनिधी प्रयागराज येथे कुंभात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनही सजग झाले असून, गर्दी आटोक्यात यावी, वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे अडीच हजार सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गुगलच्या मदतीने मोबाईल लोकेशनवर गर्दीचे नियंत्रण मिळविले जाणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेने आराखडा करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक व्यवस्थेच्या आराखड्याला आणखी बळकटी […] The post गुगलच्या मदतीने कुंभमेळ्याच्या गर्दीवर नियंत्रण! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दस-याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण
जळगाव : प्रतिनिधी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दस-याला सोनं खरेदी करणं शुभ मानलं जात. आज मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. दस-याच्या दिवशी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोन्याच्या दरात आज सकाळच्या टप्प्यात मोठी घट झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये आज तब्बल ५५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी […] The post दस-याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जुन्या वादातून रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी गॅस व्यावसायिकासोबत असलेल्या जुन्या वादातून एका टोळीने रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर शहरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. यावेळी रिक्षाचालकाची मुले देखील सोबत होती. ही घटना पाहून मुलगा भेदरला आहे. रेल्वे स्टेशन परिसरातल्या उड्डाणपुलाखाली सदरची घटना घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेनंतर पोलिस दाखल झाले असून […] The post जुन्या वादातून रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला न्यायालयाचा झटका
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांच्यावर ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. २०१५- २०२३ या काळात इन्व्हेस्टमेंट डीलच्या नावाखाली त्यांनी गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना […] The post शिल्पा शेट्टी-राज कुंद्राला न्यायालयाचा झटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ममुराबाद मार्गावरील विदगाव जवळच्या तापी नदी पुलावर मंगळवारी रात्री 10.30 वाजता अत्यंत भीषण अपघात झाला.वाळूने भरलेल्या बेदरकार डंपरने कारला दिलेल्या धडकेत शिक्षिका मीनाक्षी नीलेश चौधरी (वय 38)आणि तिचा मोठा मुलगा पार्थ (वय14) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात शिक्षिकेचे पती नीलेश चौधरी (वय 39) व त्यांचा लहान मुलगा ध्रुव चौधरी (वय 6) हे गंभीर जखमी झाले असून,त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी डंपरचालक दीपक दगडू ठाकूर(रा. डांभुर्णी) यास अटक करण्यात आली आहे. अपघातात चौधरी कुटुंबाची कार थेट पुलाचे कठडे तोडून 50 ते 60 फूट खोल नदीपात्रात झुडपात कोसळली.अपघातानंतर परिसरात गर्दी झाली.परंतु कार दिसत नव्हती. मात्र,कारमधील जखमी चिमुकला ध्रुवयाचा पाय फ्रॅक्चर झाल्याने तो रडत असल्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी खाली धाव घेतली व अपघातग्रस्त कारचा शोध लागला. मूळचे चोपडा येथील रहिवासीव धानोऱ्याच्या ए.व्ही. मिशन शाळेतील शिक्षक नीलेश चौधरी जळगावात विठ्ठल-वाडीतील मनिप्रभा अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या पत्नी मीनाक्षी चौधरी या शिवाजी नगरातीलइंदिराबाई पाटणकर प्रायमरी स्कूलमध्ये नोकरीला होत्या.मंगळवारी सकाळी अष्टमीच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण चौधरी कुटुंबकारने (एमएच 19, डीव्ही 8032)चोपड्याला गेले होते. रात्री 10वाजता ते चोपड्यातून जळगावात येत होते.रात्री 10.30 वाजता विदगाव तापी पुलावर समोरून आलेल्या पिवळ्या रंगाच्या वाळूने ओव्हरलोड भरलेल्या डंपरने (क्र.एमएच 19, सीडब्ल्यू 5180)कारला धडक दिली. यात डंपरचे दोन्ही चाक निखळून गेले आणि कारचा चुराडा झाला. मृत मीनाक्षी यांचे वडील पांडुरंग चौधरी यांच्या तक्रारीवरून डंपर चालकाविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे. डंपरचा स्टिअरिंग रॉड तुटला रस्त्यावर रोज 30 ते 40 वाळूचे डंपर सुसाट वेगाने धावत असतात.डंपरच्या वेगामुळेच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. डंपर भरधाव वेगाने येत असताना पुलावरील जॉइंटच्या उंचवट्यावर आदळला. आदळल्याने वाळूने भरलेल्या डंपरचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची माहिती रात्री अपघात पाहिलेल्या ग्रामस्थांमधून समोर आली.
सामाजिक कार्यकर्त्या आणि 'अनाथांची आई' श्रीगौरी ताई सांवत आणि सामजिक कार्यकर्त्या श्री गायत्री देवी यांनी प्रथमच विरार (पश्चिम) येथील पद्मावती मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्रौउत्सव मंडळाला भेट दिली. या ऐतिहासिक भेटीमुळे गेली 19 वर्षे सातत्याने गरबा उत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळाच्या उत्साहात आणखी भर पडली. नवरात्रीच्या पवित्र पर्वावर श्रीगौरी ताई सांवत यांनी आपल्या कुटुंबासमवेत गरबा उत्सवात उत्साहाने भाग घेतला. समाजात सर्वसमावेशकता आणि समानतेचा संदेश देणाऱ्या श्रीगौरी ताईंच्या उपस्थितीने मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आणि स्थानिक रहिवाशांचा आनंद द्विगुणित झाला. सर्वसमावेशकतेचा संदेश श्रीगौरी ताई सांवत, ज्यांनी अनेक अनाथ मुला-मुलींना आधार दिला आहे आणि तृतीयपंथी समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला आहे, त्यांच्या भेटीमुळे या नवरात्र उत्सवाला एक वेगळी सामाजिक किनार लाभली. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने आणि प्रेमाने सामावून घेण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. पद्मावती मित्र मंडळाने गेल्या 19 वर्षांपासून हा नवरात्र उत्सव यशस्वीपणे आयोजित केला आहे. मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. मंडळाचे अध्यक्ष आनंद कांबळे, सचिव राकेश भामरे, खजिनदार विवेक धुरी आणि सर्व कार्यकारी सभासद यांनी श्रीगौरी ताई सांवत आणि श्री गायत्री देवी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मंडळाचे सचिव राकेश भामरे म्हणाले, श्रीगौरी ताईंसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाने आमच्या उत्सवाला भेट देणे हे मंडळासाठी सन्मानाचे आहे. त्यांच्या येण्याने आमच्या उत्सवाचे पावित्र्य आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ झाली आहे. श्रीगौरी ताई सांवत यांनीही मंडळाचे विशेष आभार मानले आणि इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व भाविक आणि गरबाप्रेमींना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. ही भेट स्थानिक लोकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरली.
‘आरएसएस’ च्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध : हर्षवर्धन सपकाळ
मुंबई : प्रतिनिधी गरीब अधिक गरीब तर श्रीमंत अधिक श्रीमंत करण्याची व्यवस्था भाजपा केली असून, त्याचे मुळ आरएसएस आहे. बहुजन समाजाचे फक्त शोषण सुरु आहे. मुठभर लोकांच्या हातात धर्मसत्ता व राजसत्ता असावी हे त्यांचे धोरण आहे. त्यांच्या या धोरणाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा आम्ही जाहीर निषेध व धिक्कार करतो. असे महाराष्ट्र […] The post ‘आरएसएस’ च्या १०० वर्षाच्या काळ्याकुट्ट कारभाराचा जाहीर निषेध : हर्षवर्धन सपकाळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी संध्याकाळी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले आणि त्यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. माळेगाव साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेची तारीख व वेळ ठरवण्यासाठी ही बैठक झाली असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले असले, तरी तब्बल एक तास चाललेल्या चर्चेमुळे आगामी निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांतील सत्ता समीकरणे आणि राजकीय घडामोडींवरही सविस्तर संवाद झाला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. अजित पवारांनी भेटीबाबत प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, माझ्या मतदारसंघात विविध साखर कारखाने आहेत. माळेगाव साखर कारखान्याचा मी व्हाईस चेअरमन आहे. शिक्षण संस्था आणि कारखान्याच्या कामकाजात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. शरद पवार हे कारखान्याचे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांच्या उपस्थितीत निर्णय घेणे गरजेचे होते. असे ते म्हणाले. अजित पवार यांनी भेटीला पूर्णतः संस्थात्मक आणि कारखान्याच्या कामाशी निगडित असा रंग देण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील, या चर्चेला राजकीय छटा प्राप्त झाल्याचे स्पष्ट दिसून आले. कारण, शरद पवारांसोबतच्या या भेटीत अजित पवारांनी केवळ आर्थिक विषय नव्हे तर राजकीय चर्चाही साधली असावी, अशी कुजबुज सुरू आहे. याचवेळी, शरद पवार यांनी दोन दिवसांपासून प्रकृतीच्या कारणामुळे सर्व भेटी रद्द केल्या होत्या. तरीदेखील बुधवारी संध्याकाळी ते खास करून यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आले आणि पाठोपाठ अजित पवारही तेथे दाखल झाले. काका-पुतण्यामध्ये तासभर चर्चा झाली. फूट पडल्यानंतर प्रथमच ठरवून झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींचा सुगावा मिळत असल्याची चर्चा रंगली आहे. अनेकदा शरद पवार आणि अजित पवार एका व्यासपीठावर कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसले होते, परंतु ठरवून झालेल्या या भेटीचे महत्त्व वेगळे आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुका, विधान परिषद निवडणुका तसेच लोकसभा 2024 च्या पार्श्वभूमीवर या भेटीत राजकीय समीकरणांची चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भेटीला राजकीय रंग देण्याचे काही कारण नाही - आनंद परांजपे दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाने या भेटीचं स्वागत केले आहे. राष्ट्रवादी नेते आनंद परांजपे म्हणाले की, दोन वरिष्ठ नेते भेटले तर त्यात गैर काही नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक प्रश्नांवर चर्चा करणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग देण्याचे काही कारण नाही. मात्र राजकीय वर्तुळात या भेटीबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील वैचारिक मतभेद असूनही विकासाच्या प्रश्नांवर दोघे एकत्र येऊ शकतात, असा संदेश या भेटीतून गेला आहे. मराष्ट्राच्या राजकारणातील नवे अध्याय सुरू होण्याची चाहूल हा सध्या राज्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा रंगलेली असताना राष्ट्रवादीच्या या खास भेटीमुळे लक्ष वेधलं गेलं आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादीच्या युतीतील राजकीय ताणतणाव, स्थानिक पातळीवरील निवडणूक समीकरणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोघांमधील संवादातून राजकीय दुरावा कमी होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी वर्तवली आहे. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या सभेच्या निमित्ताने झाली असली, तरी या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे अध्याय सुरू होण्याची चाहूल लागली आहे.
हिंसा योग्य नाही, लोकशाही मार्गानेच बदल शक्य
नागपूर : प्रतिनिधी नागपूरमध्ये विजयादशमीच्या दिवशी संघटनेच्या शताब्दी समारंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. आपल्या ४१ मिनिटांच्या भाषणात त्यांनी समाजात होत असलेले बदल, सरकारांचा दृष्टिकोन, सार्वजनिक अशांतता, शेजारील देशांमध्ये अशांतता आणि अमेरिकेचे शुल्क यांचा उल्लेख केला. यापूर्वी भागवत यांनी आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली आणि शस्त्रांची पूजा केली. पहलगाम […] The post हिंसा योग्य नाही, लोकशाही मार्गानेच बदल शक्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास दुणावण्याचा प्रयत्न करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होणार आहे. त्यामुळे ठाकरे या मेळाव्यातून या निवडणुकीचे रणशिंग फुंकतील असे मानले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा आज सायंकाळी 7 वा. शिवतीर्थावर दसरा मेळावा होईल. त्यात सुरवातीला पक्षाच्या काही नेत्यांची भाषणे होतील. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल. त्यात ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील महायुती सरकारवर ताशेरे ओढण्यासह आपल्या पक्षाच्या भावी वाटचालीवरही भाष्य करतील. विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ते आपल्या भाषणाची रचना करतील. आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे हे मनसेसोबतच्या संभाव्य युतीवरही भाष्य करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे पक्षाची रणनीती स्पष्ट करणार मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे गटाच्या अस्तित्वाची लढाई आहे. या निवडणुकीपूर्वीच मराठीच्या मुद्यावर राज व उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेत. राज ठाकरे यांच्यासाठीही ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या आघाडीविषयी आजच्या मेळाव्यातून बरेच काही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे याविषयी आपल्या भाषणातून बरेच काही स्पष्ट करतील असा अंदाज आहे. विशेषतः राज व उद्धव एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय? या प्रश्नाचे उत्तरही या मेळाव्यातून मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंचा सायंकाळी 6 वा. मेळावा दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचा मेळावा गोरेगावातील नेस्को मैदानावर होणार आहे. हा मेळावा सायंकाळी 6 वाजता होईल. यात एकनाथ शिंदे प्रामुख्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून विशेषतः शिवसेना व तिच्या मंत्र्यांकडून करण्यात येणाऱ्या मदतीचा आढावा घेतील. तसेच मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यावरही त्यांचा जोर असेल. गतकाही दिवसांत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्ल्यांत वाढ केली आहे. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती आजच्या मेळाव्यातही होण्याची दाट शक्यता आहे. भाजपचा मेळाव्यावरून कोंडी करण्याचा प्रयत्न दुसरीकडे, भाजपने दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा रद्द करून त्यावर होणारा खर्च पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजपने केली होती. पण ठाकरे गटाने ती जोरकसपणे फेटाळून लावली. भाजपने आम्हाला सल्ले देण्याच्या भागनगडीत पडू नये, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. विशेषतः शिवतीर्थावर पावसामुळे चिखल झाला असला तरी आजचा मेळावा होणारच असेही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे. अतिवृष्टीचा फटका उभ्या महाराष्ट्राला बसला आहे. तर पावसामुळे उद्धव सेनेच्या दसरा मेळाव्याच्या ठिकाणी दादर येथील शिवतीर्थावर पाण्याने चिखल झाला आहे. पण आमच्या शिवसैनिकांकडून मैदानावरील पाणी व चिखल दूर करण्याचे काम सुरू आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. ती कसोशीने पार पाडण्याचे काम करण्यात येत आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिक आज मुंबईत आला आहे, असे ते म्हणआले.
उल्हास नगरमधील एका गरबा कार्यक्रमात एका सराईत गुन्हेगाराने मी इकडचा भाई आहे, माझ्या परवानगीशिवाय गरबा कसा ठेवला? असे म्हणत थेट शिवसेना शाखा प्रमुखावर बंदूक रोखली आणि हवेत गोळीबार केला. मंगळवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलगा आणि त्याला साथ देणाऱ्या वडिलांना अटक केली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 2 येथील 24 नंबर शाळेजवळ बाळाजी मित्र मंडळ आणि शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांनी गरब्याचे आयोजन केले होते. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कार्यक्रम रंगात आला असताना, सोहम पवार (वय 19) नावाचा स्थानिक गुन्हेगार तिथे पोहोचला. त्याने दमबाजी करत बाळा भगुरे यांच्यावर पिस्तुल रोखले आणि मी इकडचा भाई आहे, गरब्याची परवानगी माझ्याकडून घेतली का? अशी धमकी दिली. वडिलांची आरोपी मुलाला साथ यावेळी भगुरे यांच्या भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, सोहमने दहशत पसरवण्यासाठी हवेत दोन गोळ्या झाडल्या. या प्रकारामुळे गरबा खेळणाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि धावपळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सोहमचे वडील अनिल पवार हे देखील मुलाला साथ देत दहशत निर्माण करत होते.पोलिसांकडून दोघांना अटक घटनेची माहिती मिळताच उल्हास नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष आव्हाड आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. बाळा भगुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी वेगाने तपास करत बुधवारी कॅम्प क्रमांक 4 येथून आरोपी सोहम पवार आणि त्याचे वडील अनिल पवार या दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल जप्त करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. संघाच्या शताब्दी स्थापना दिनानिमित्त त्यांचे व्यासपीठावर आगमन हे फक्त औपचारिकतेपुरते मर्यादित नव्हते, तर त्यातून एक मोठा सामाजिक व राजकीय संदेश देण्यात आला. नागपूरात दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रथम दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. 1956 मध्ये डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारलेली हीच ती ऐतिहासिक भूमी. कोविंद यांनी या ठिकाणी प्रार्थना करून नंतर आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आपल्या भाषणात त्यांनी आंबेडकर, हेडगेवार, संत तुकाराम, संत रविदास, बिरसा मुंडा आदी समाजसुधारक आणि दलित-महात्म्यांचा उल्लेख करत एकात्मतेचा संदेश दिला. रामनाथ कोविंद यांनी व्यासपीठावरून सर्वांत जास्त भर दिला तो म्हणजे जातिवाद आणि छुआछूत नसलेला संघ यावर. गेल्या काही वर्षांत विरोधकांकडून संघ आणि भाजपवर ‘दलित विरोधी’ असल्याचे आरोप सातत्याने केले जात होते. विशेषतः 2019 च्या लोकसभा निवडणुकीत याचा तोटा भाजपला बसल्याचे राजकीय समीक्षकांचे म्हणणे आहे. अशा पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती व देशातील सर्वांत मोठ्या दलित नेत्यांपैकी एक असलेल्या रामनाथ कोविंद यांची उपस्थिती हा एक प्रकारे प्रतिउत्तर मानले जात आहे. त्यांनी आपल्या भाषणात संघाने कधीही जातिवादाला खतपाणी घातले नाही, उलट सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे, असा ठाम दावा केला. संघात ऊंच-नीच नाही, छुआछूत नाही. येथे सर्व एकसमान आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना दूरदर्शी सामाजिक वैज्ञानिक संबोधत त्यांचे विशेष कौतुक केले. आपल्या भाषणात कोविंद यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अधोरेखित केले. संविधानामुळे एका सामान्य व्यक्तीला राष्ट्रपतीपदावर पोहोचता आले, हे त्यांनी आवर्जून नमूद केले. तसेच आपण आधी भारतीय आणि नंतर इतर काही आहोत, असा आंबेडकरांचा संदेशही त्यांनी जनतेसमोर पुन्हा ठेवला. त्यांनी संत तुकाराम, संत रैदास, महात्मा फुले, भगवान बिरसा मुंडा यांसारख्या महान विभूतिंचा उल्लेख करून, समाजातील विविध घटकांना संघ कसा एकत्र आणतो हे स्पष्ट केले. एकात्मतेवर भर देताना त्यांनी म्हटले की, जिथे एकता आहे तिथे अस्मिता आहे, आणि जिथे विभागणी आहे तिथे पतन आहे. डॉ. हेडगेवार आणि बाबासाहेबांच्या विचारांमध्ये आश्चर्यकारक साम्य असल्याचे ते म्हणाले. दलित संगम रॅलीचा उल्लेख राजकीय दृष्टिकोनातून पाहता, कोविंद यांचा हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण गेल्या काही काळापासून दलित समाजात भाजपची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संघावर दलित समाजाला उपेक्षित ठेवण्याचे आरोप वेळोवेळी झाले, परंतु कोविंद यांच्या भाषणातून त्या सर्व आरोपांना थेट प्रत्युत्तर देण्यात आले. त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या 2001 च्या लाल किल्ल्यावर झालेल्या दलित संगम रॅलीचा उल्लेख करत सांगितले की, आमचे सरकार मनुस्मृतीवर नाही तर भीमस्मृतीवर म्हणजेच संविधानावर चालते. हा संदेश समाजात पोहोचणे ही आजच्या राजकीय समीकरणात भाजप व संघासाठी अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे. दलित समाजाचा विश्वास परत मिळवणे हा उद्देश रामनाथ कोविंद यांचे भाषण हे केवळ औपचारिक नव्हते, तर सामाजिक समरसतेचा आणि राजकीय भविष्याचा संदेश होते. दलित, मागासवर्गीय आणि उपेक्षित घटकांना थेट संबोधित करत त्यांनी संघातील सर्वसमावेशकतेचा गौरव केला. संघ समाजसुधारणेसाठी कायम काम करीत आला आहे आणि पुढेही करीत राहील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे संघाविषयी समाजातील गैरसमज दूर होणे, तसेच दलित समाजाचा विश्वास परत मिळवणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश स्पष्टपणे दिसून आला. शताब्दी महोत्सवात माजी राष्ट्रपतींची उपस्थिती ही केवळ ऐतिहासिक नव्हे, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप-आरएसएससाठी अत्यंत रणनीतिक पाऊल असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या कार्यक्रमात देशभक्तीचे धडे दिले गेले. पण या कार्यक्रमात ना राष्ट्रगीत गायले गेले ना तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण केले गेले. मग यातून जगात काय संदेश जाईल? असा उपरोधिक सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संघाच्या दसरा मेळाव्यावर निशाणा साधला आहे. नागपुरातील रेशीमबाग मैदानात आज संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंसा हे कोणत्याही प्रश्नांचे उत्तर नसून, लोकशाहीतूनच अमुलाग्र बदल शक्य असल्याचे मत व्यक्त केले. भारतावर मोठ्या काळापासून विविधता असूनही समाजात एकता आहे. पण काही लोक हेतुपुरस्सर या एकतेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः श्रद्धास्थाने, महापुरुष व प्रार्थनास्थळांविषयी अनादराच्या घटना घडतात. लहान-सहान गोष्टींवरून किंवा संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी, हिंसाचार आदी गोष्टी घडता. ही अयोग्य पद्ध आहे. अशा घटना पूर्वकल्पित कल्पनेने किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी घडवल्या जातात. त्यांच्या जाळ्यात अडकणे हे तत्काळ व दीर्घकालीन ध्येसाठी हानिकारक आहे. हिंसा हे कोणत्याही प्रश्नांचे उत्तर नाही. लोकशाहीतूनच अमूलाग्र बदल शक्य आहे, असे सरसंघाचलक म्हणाले होते. संघाला राष्ट्रगीत अन् राष्ट्रध्वजाचे वावडे आमदार रोहित पवार यांनी संघाच्या कार्यक्रमावरून निशाणा साधला. ते म्हणाले, संघाच्या कार्यक्रमात सेवाभावाचे धडे दिले गेले पण आज महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर उध्वस्त झाला असताना या भीषण पुरस्थितीबाबत एका शब्दाची संवेदना मात्र व्यक्त केली गेली नाही. राष्ट्रनिर्माण यावर भरभरून गप्पा मारल्या गेल्या परंतु राष्ट्रनिर्माणकरिता महत्वपूर्ण योगदान देणारा युवा, कामगारवर्ग बेरोजगारीने त्रस्त असताना, महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना त्याबद्दल एक शब्द बोलला जात नाही. संघाच्या कार्यक्रमात देशभक्तीचे धडे दिले जातात परंतु शतकपूर्तीच्या कार्यक्रमात ना राष्ट्रगीत गायले जाते ना तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण केले जाते. आजच्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय पाहुणे आले असताना तरी तिरंगा ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत गायन होत नसेल तर जगात काय संदेश जाणार ? असो संघाला शतकपूर्तीच्या शुभेच्छा, असे ते उपरोधिकपणे म्हणाले. फडणवीसांनी गजनी सरकारसारखे वागू नये दुसरीकडे, रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी विरोधी पक्षनेते असताना तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या केलेल्या विनंतीची आठवण करून दिली आहे. ते म्हणाले, फडणवीस साहेब, विरोधात असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आपण पत्र लिहिले होते आणि आज सत्तेत असताना स्वतःच्या हातात पूर्ण ताकद असताना मात्र ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही अशी भूमिका आपण मांडत आहात. हे योग्य आहे का? आपल्या संवेदना आणि शेतकऱ्यांप्रति असलेला कळवळा खोटा होता का? सत्तेत येताच आपल्या संवेदना बोथट झाल्या का? शेतकरी अतिवृष्टीने पार मोडून पडला आहे, त्यामुळे तत्काळ ओला दुष्काळ, हेक्टरी 50 हजार मदत आणि कर्जमाफीचा निर्णय घ्या अन्यथा महाराष्ट्र माफ करणार नाही. शेतकरी अडचणीत असताना तरी सरकारने गजनी सरकार सारखे वागू नये, ही विनंती, असे ते म्हणाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगात सर्वाधिक कर्ज घेणारा देश ठरल्याचा उपरोधिक टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केंद्रातील रालोआ सरकारवर निशाणा साधताना हाणला. देशातील 18 ते 29 वयाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 16 टक्के वर आहे. बेरोजगारी कमी करायची असेल तर GDP वाढला पाहिजे. दुसरीकडे जगात सर्वात जास्त कर्ज घेणारा देश भारत ठरला आहे. हे या मोदी सरकारचे कर्तृत्व आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील अस्मानी संकट, बेरोजगारी, अर्थव्यवस्था आदी विविध मुद्यांवरून केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, आज वर्तमानपत्रात एक लेख आला आहे. त्यात भारताचा जीडीपी 6.1 एवढा दाखवण्यात आला आहे. पण एका तज्ज्ञाने हा दावा खोडून काढला आहे. त्यांच्या मते, भारतात 18 ते 29 वर्ष वयाचे तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण 15.9 म्हणजे जवळपास 16 टक्क्यांवर आहे. आणि 6.1 जीडीपी ग्राह्य धरला, तर ती बेरोजगारी कमी होणार नाही, तर ती अशीच वाढत जाणार. भारत ठरला सर्वाधिक कर्ज घेणारा देश बेरोजगारी कमी करून रोजगार उपलब्ध करायचा असेल, तर या देशाचा जीडीपी हा साडेबारा टक्क्यांवर असला पाहिजे. परंतु, त्यावर काहीच होत नाही. आत्ता तर जागतिक बँकेने कर्ज घेणाऱ्या देशांच्या सर्वोच्च स्थानी भारत असल्याचे स्पष्ट केले आहे. ही उपाधी व हा विक्रम नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नावे करून दिला आहे. आज भारत हा सर्वात जास्त कर्ज घेणारा देश ठरला आहे. आज या देशावर 2 लाख 49 कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. जे की 2014 पर्यंत हे कर्ज केवळ 52 हजार कोटी होते. आता हा आकडा 2.49 लाख कोटींवर पोहोचले आहे. जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणारा देश हा भारत ठरला आहे. हे केवढे मोठे यश आहे. हा केवढा मोठा फायदा आहे, असे वडेट्टीवार मोदींना टोला हाणताना म्हणाले. सरकारला शेतकरीच लुटण्यासाठी दिसत आहे ते पुढे म्हणाले, या कर्जबाजारीपणात सरकारला केवळ शेतकरीच लुटण्यासाठी दिसत आहे. त्यामुळे त्यांची लूट सुरू झाली आहे. मरणाराही तोच आणि वाचवणाराही तोच आहे. महाराष्ट्रात अजून विदारक स्थिती आहे. येथे सर्रासपणे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आहेत. येथे 38.5 टक्के एवढ्या शेतकरी आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यांत पुढे आहे हेच सर्वात विदारक सत्य आहे, असे ते म्हणालेत. ही फार मोठी नामुष्की आहे. या सरकारने ओंजळभर पाण्यात जीव दिला पाहिजे अशी लाजीरवाणी स्थिती या लोकांनी राज्याची करून ठेवली आहे. हे सरकार महापुरात उडी मारून मरणार नाही. हे लोकांना मारायला बसलेले सरकार आहे, असेही विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले. नोटीसा देणाऱ्या बँकवाल्यांना बदडा उल्लेखनीय बाब म्हणजे विजय वडेट्टीवार यांनी परवाच शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीसा घेऊन येणाऱ्यांना बदडून टाकण्याचा बदडण्याचा सल्ला दिला होता. अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. पण त्यानंतरही बँकांनी त्यांना कर्जवसुलीच्या नोटीसा दिल्या. अशा नोटीस देणाऱ्या बँकवाल्यांना बदडून काढा. त्यांच्यासोबत सरकारचा माणूस येत असल्यास त्यालाही ठोकून काढा. प्रसंगी कायदा हातात घ्या, असे ते म्हणाले होते.
राज्यातील महिलांसाठी मोठ्या धडाक्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुरुवातीला सरसकटपणे लागू झालेली ही योजना आता कठोर निकषांमुळे अनेक महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषत: या योजनेचा अनुचित फायदा घेतलेल्या 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून, त्यांच्या खात्यात जमा झालेले सर्व हप्ते सरकार परत घेणार आहे. या निर्णयामुळे तब्बल 15 कोटी रुपयांची वसुली केली जाणार असल्याचे अर्थ विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नुकतेच सरकारने सर्व लाभार्थींना ई-केवायसी प्रक्रिया (eKYC) पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात पतीचे आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक महिलांचा या प्रक्रियेतून पत्ता कट होणार हे निश्चित झाले आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवरील भार कमी होणार, असा थेट अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुकीपूर्वी धुमधडाक्यात सुरू झालेल्या या योजनेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आता सरकारसाठी अडचणीचे कारण ठरत आहे. काही महिलांना तर त्यांच्याकडून मिळालेल्या हप्त्यांची पै ना पै परत करावी लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्यक्षात आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना द्यायचा होता. विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिलांसाठी ही योजना आशेचा किरण मानली जात होती. योजनेच्या निकषांनुसार महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच तिच्या नावावर आधार लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे. किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय मर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी व अधिकारी वर्गाला मात्र या योजनेचा लाभ घेण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली होती. तरीसुद्धा हजारोंनी सरकारी महिलांनी नियम मोडत लाभ घेतल्याचे धक्कादायक वास्तव तपासणीत समोर आले. गैरव्यवहारामुळे सरकारला मोठा फटका वित्त विभागाच्या अहवालानुसार, या 8 हजार सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेला 15 कोटी रुपयांचा हप्ता आता वसूल केला जाणार आहे. शिवाय संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची तयारी देखील सुरू आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांचे आर्थिकच नव्हे तर प्रशासकीय नुकसानही होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पहिला हप्ता जमा झाला होता. त्यावेळी निकषांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने न झाल्याने सरसकट अर्जदारांना लाभ मिळाला. एवढेच नव्हे तर सरकारने सुरुवातीला दरमहा 1500 रुपयांच्या ऐवजी हा हप्ता 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात आलेल्या गैरव्यवहारामुळे सरकारला मोठा फटका बसला. आधार जोडण्याची अट अनेक महिलांसाठी त्रासदायक योजनेतील या घडामोडींमुळे आता खरी पात्र असलेल्या बहिणींच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. ई-केवायसीची सक्ती आणि पतीचे आधार जोडण्याची अट अनेक महिलांसाठी त्रासदायक ठरते आहे. दुसरीकडे, योजनेचा गैरवापर करून हप्ते लाटणाऱ्यांवर सरकारने कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याने नाराजगी वाढत आहे. निवडणुकीपूर्वी लोकप्रिय ठरलेली ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकली असून, येत्या काही महिन्यांत योजनेचा पुढील प्रवास कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरंच ही योजना गरजू महिलांसाठी तारणहार ठरेल की राजकीय गाजावाज्यातच अडकून राहील, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
रा.स्व.संघाचा दसरा मेळाव्या नागपूरमध्ये पार पडत असतो त्यांची एक परंपरा आहे. संघाचे लोक नागपूरमध्ये संचलन करत असतात त्यांच्या हाती काठी असते, काठीच्या माध्यमातून देशाचे रक्षण करण्याची त्यांची परंपरा आहे. दसऱ्याच्या मेळाव्यात बोलताना बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की आम्हाला ak47 हव्या आहेत. काठ्यांना तेल लावून देशाचे रक्षण करता येणार नाही. पण शिवसैनिकांच्या हाती जर ak47 आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा सुरक्षीत करण्यासाठी आम्ही बलिदानाला तयार राहू ही भूमिका बाळासाहेब ठाकरेंची होती. आज त्यांच्या हाती एक काठी असते ते संचलन करतात एक विचार देतात. त्यांनी राज्यपाल, पंतप्रधान नेमलेले आहे. त्यांनी काय राष्ट्रकार्य केले म्हणून त्यांचे नाणे काढण्यात आले असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, मोदी आणि शहा सत्तेत आल्यापासून मुंबई-महाराष्ट्रात गद्दारांचे मेळावे होऊ लागले आहेत. गद्दार म्हटलेले कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी सांगायला हवे की आम्ही गद्दार कसे नाही. देव्हाऱ्यात दरोडा टाकत बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण चोरला आणि हे लोक दसरा मेळावा घेत आहे. आली बाबा 40 चोर आहेत, यांचे आली बाबा गुजरातमध्ये बसले आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे. हे मराठी माणसाला पटण्यासारखे नाही. शहांची कंपनी काय विचार देणार अमित शहा यांची बेनामी कंपनी शिंदे सेना हा अमित शहांनी स्थापन केलेला पक्ष कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे. लुटमार करा, पैसे गोळा करा, घोटाळे करत महाराष्ट्राची लुट करा, मुंबई महाराष्ट्रापासून तोडून टाका. पाकिस्तान सोबत मॅच खेळा या सर्व अमित शहा यांच्या भूमिका आहेत. एकनाथ शिंदे सेना ही बेनामी कंपनी असून त्यांनी काय करावे हा त्यांचा पक्ष आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. डॉ.आंबेडकरांनी संघाचे समर्थन केले नाही संजय राऊत म्हणाले की, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज संघासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण यांनी कधीच संघाचे समर्थन केले नव्हते. डॉ.आंबेडकरांनी तर संघ हा विष आहे असे म्हटले होते. त्यांच आंबेडकरी विचारांच्या कमला-ताई गवई यांनी संघाच्या कार्यक्रमासाठी बोलावून संघ आणि आंबेडकरी विचारांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहात. पण कमला-ताई यांचे अभिनंदन करतो की त्या यामध्ये अडकल्या नाहीत. पवार कधीच जातीय शक्ती सोबत जाणार नाही संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांमध्ये अमित शहा यांची कंपनी सोडून दुसरीकडे जाण्याचे धाडस नाही. ते धाडस नव्हते म्हणून त्यांनी अमित शहांचे उपरणे पकडले. शरद पवार हे कधीच जातीय शक्ती सोबत जाणारा नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच भारताचा डीएनए असल्याचा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांच्या संघाच्या व्यासपीठावर जाण्याच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य करताना केला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांचा अगदी खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. कमलताई गवई यांना संघाच्या अमरावती येथील एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यांचे नाव या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरही छापण्यात आले होते. पण गवई यांनी या कार्यक्रमापासून अंतर राखण्याचा निर्णय घेतला. त्यांचे सुपुत्र राजेंद्र गवई यांनी आपल्या मातोश्रींनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारल्याचे नमूद केले. पण नंतर त्यावरही पडदा पडला. अखेर कमलताई गवईंनी स्वतः आपण या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी वाद उत्पन्न करणाऱ्या भाजपतेर पक्षांवर निशाणा साधला. भाजपतेर पक्षांचा हाच खरा विकृत चेहरा केशव उपाध्ये म्हणाले, ‘डॅा बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान उलथवून हिंसाचाराच्या मार्गाने देशाचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या नक्षलवादाचे स्वागत आणि प्रखर राष्ट्रवादाचे संस्कार करणाऱ्या, जातिभेद, असमानता, उच्च नीचतेची भावना व मनुवाद आपल्या विशुद्ध कृतीतून संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघाचा द्वेष’ हा स्वतःस पुरोगामी व उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या लोकांचा, भाजपेतर पक्षांचा खरा विकृत चेहरा आहे. म्हणूनच, संघाच्या व्यासपीठावर जाण्याच्या मुद्यावरून हा स्वयंघोषित पुरोगामी कंपू अकांडतांडव करतो! गेल्या आठवड्यात येथे दोन घटना घडल्या. 1- नक्षलवाद्यांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारला पाहिजे अशी मागणी डाव्या पक्षांचे नेते डी राजा यांनी केली आहे. , I demand that the government accept the proposal made by the Naxals. What is this Naxal Mukt Bharat? हे त्यांचं वाक्य आहे. - नक्षलवादाच्या नावाखाली गरीब-आदिवासींच्या हत्या, अपहरण, भीती पसरवणाऱ्यांच्या मागण्या स्वीकारणार नाही आणि मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचा केंद्र सरकारचा ठाम निर्धार आहे. 2- रा स्व संघाच्या दसरा महोत्सवात श्रीमती गवई यांनी व्यासपीठावर जावे की न जावे यावर याच कंपू कडून सुरू असलेले ओंगळवाणा प्रदर्शन तर आपण पहातोच आहोत. - त्या व्यासपीठावर जातील, वा न जातील, हा भाग अलहिदा. पण या कंपूने कितीही आकांडतांडव केले तरी संघावर काहीच परिणाम होत नाही! कारण, संघ वाढत राहतो. संघ चालत राहिला देशभक्ती, समरसतेचे वाण घेऊन अशा आकांडतांडवाने संघाला कधी फरक पडला नाही, ना त्या वाटचालीत बदल झाला. म्हणूनच 100 वर्षांचा संघ आजही तितक्याच ताकदीने वाढतोय, कारण संघ हा केवळ विचार नाही तर संघ आहे या देशाचा डीएनए, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावरही निशाणा केशव उपाध्ये यांनी कालच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्याची 63 कोटींचा दसरा मेळावा म्हणून खिल्ली उडवली होती. ते म्हणाले होते, नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती. मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले. सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था……. असं सगळं मिळून हे 63 कोटी लागणार आहेत म्हणे. या 63 कोटी मध्ये अतीवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांच सोनं असायच. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून 36 चा आकडा मोडून 63 ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा!! नाकी नऊ आले म्हणतात ते हेच!! रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच 63 कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे 63 कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा, असे ते म्हणाले होते.
कोथरूड परिसरातील गोळीबार आणि कोयत्याच्या हल्ल्यानंतर चर्चेत आलेली घायवळ गॅंग आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या गँगचा प्रमुख नीलेश घायवळ पोलिसांच्या रडारवर असताना, त्याने अत्यंत चलाखीने पासपोर्टवरील नावात फेरफार करून युरोपमध्ये पलायन केले आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर तो तीन महिन्यांचा व्हिसा घेऊन बायको आणि मुलासह युरोपला गेला होता. मात्र आता पत्नी आणि मुलगा भारतात परतले असून नीलेश घायवळ परत न आल्याने त्याच्या हालचालींवर संशय व्यक्त केला जात आहे. याचदरम्यान पोलिसांनी घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली असली तरी घायवळ परदेशात असल्याने ही कारवाई केवळ औपचारिकतेपुरतीच राहिल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, नीलेश घायवळच्या पत्नी आणि मुलगा भारतात परतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु त्यांनी थेट घरी न जाता इतरत्र थांबण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. कारण त्यांना चौकशीला सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांनी मनात आहे. त्यामुळे घायवळचा परिवाराने गुप्त ठिकाणी राहणे पसंत करीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र नीलेश घायवळ मात्र अजूनही परदेशातच असून, तो भारतात परतण्यास टाळाटाळ करीत असल्याची शंका आहे. त्याचा व्हिसा तीन महिन्यांसाठी असल्याने तो संपण्याआधीच त्याला परतावे लागेल, अन्यथा तो ‘ओव्हरस्टे’मध्ये गणला जाईल. त्यामुळे नेमका घायवळ कधी परततो आणि पोलिसांच्या ताब्यात कधी येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कायदेशीर कागदपत्रांत फेरफार करून यंत्रणेला चकवा यामध्ये सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे, नीलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी स्वतःचे नाव बनावट पद्धतीने वापरले. त्याने ‘Ghaywal’ या आडनावातील ‘h’ काढून टाकत ‘Gaywal’ असे स्पेलिंग लावले. या छोट्या बदलामुळे त्याचा पासपोर्ट आणि त्यावरील तपशील पूर्णपणे अधिकृत दिसत राहिला. त्यामुळे त्याला सहजतेने व्हिसा मिळाला आणि युरोपला जाण्यात कोणतीही अडचण आली नाही. पाच वर्षे या स्पेलिंगच्या गडबडीबाबत पोलिसांना वा पासपोर्ट अधिकाऱ्यांना काहीही कळले नाही, ही गोष्ट अधिकच धक्कादायक ठरली आहे. एका कुख्यात गुंडाने अशा प्रकारे कायदेशीर कागदपत्रांत फेरफार करून यंत्रणेला चकवा देणे हे पोलिस व प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरले आहे. मकोका अंतर्गत कारवाई इतक्यावरच तो थांबला नाही तर, नीलेश घायवळच्या न्यायालयीन प्रकरणातही अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. 2021 साली त्याला पुण्यातील एका दरोड्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये त्याला या प्रकरणात जामिन मिळाला, मात्र त्यावेळी न्यायालयाने घायवळला आपला पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. तरीसुद्धा घायवळने पासपोर्ट जमा केला नाही आणि आश्चर्य म्हणजे पोलिसांनीदेखील तो स्वतःकडे घेतला नाही. हीच गंभीर त्रुटी घायवळसाठी मोठ्या फायद्याची ठरली. त्याने याच पासपोर्टचा वापर करून परदेश प्रवास केला आणि सध्या कायद्याच्या कचाट्यातून वाचलेला आहे. कारवाई फक्त टोळीतील खालच्या पातळीवरील गुंडांपुरती मर्यादित या सर्व प्रकरणामुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एका कुख्यात गुन्हेगाराकडे पासपोर्ट जमा करून घेण्यास अपयश आल्याने त्याने परदेशात पळ काढला. दरम्यान त्याची टोळी पुण्यात गोळीबारासारख्या गंभीर घटना घडवित होती. त्यामुळे पोलिसांची कारवाई फक्त टोळीतील खालच्या पातळीवरील गुंडांपुरती मर्यादित राहिली. नीलेश घायवळ कधी परततो, त्याचा शोध कसा घेतला जाणार, आणि त्याच्या पासपोर्ट घोटाळ्याबाबत पोलिस व पासपोर्ट यंत्रणा कोणावर जबाबदारी ढकलेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील नागरिक मात्र या घडामोडींमुळे अस्वस्थ झाले असून पोलिस यंत्रणेनं अधिक गंभीरपणे काम करण्याची मागणी केली जात आहे.
अकोट शहरात बुधवारी १ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन शांततेत पार पडले. ५९ मंडळांनी या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला होता. गेल्या दहा दिवस शहरात भक्तिमय वातावरणात आदी शक्तीची भक्तिभावाने पूजाअर्चा करण्यात आली होती. दरम्यान जड अंतकरणाने भक्तांनी आदिशक्तीला निरोप दिला. या वेळी मानाची देवी असलेल्या कबूतरी मैदान येथील नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीला अग्रस्थानी होती. २२ सप्टेंबरपासून अतिशय धार्मिक व उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवाची १ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीने सांगता झाली. नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी शहरात विविध धार्मिक तसेच सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. काही मंडळांनी देवीसमोर गरबा नृत्यांसह विविध स्पर्धाही आयोजित केल्या होत्या. संपूर्ण नवरात्रात शहर भक्तिरसात न्हावून निघाले होते. १ ऑक्टोबर रोजी सकाळपासूनच विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ होवून मिरवणुकीत एकुण ५९ सार्वजनिक नवदुर्गा मंडळांनी सहभाग घेतला होता. विसर्जन मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी विविध ठिकाणांवरून बँडपथक, पारंपरिक भजनी मंडळांना आमंत्रित केले होते.गुलालाची व फुलांची उधळण करीत वाद्यांच्या तालावर भक्त थिरकत होते. विसर्जन मिरवणूक रथांवर मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली तर काही मंडळांनी विविध प्रकारचे देखावे सादर केले होते. यावर्षी बहुतांश मंडळांनी डिजेला ला फाटा देत पारंपरिक वाद्य आणि भजनी मंडळांना आमंत्रित केल्याचे दिसून आले होते. संपूर्ण मिरवणूक मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून, दिवे लावून पूजाअर्चा केली होती. विसर्जन मिरवणुकीत मानाचे मानल्या जाणारे सार्वजनिक नवदुर्गा मंडळ कबुतरी मैदान हे मिरवणुकीत अग्रस्थानी होते. त्या पाठोपाठ शिस्तीत इतरही मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणुकीआधी पोलिस अधीक्षक यांनी अकोट शहराला भेट देत, मिरवणूक मार्गाची पाहणी केली होती.दरम्यान पार पडलेल्या विसर्जन मिरवणुकमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी,उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील, शंकर शेळके, शहर ठाणेदार अमोल माळवे, मनोज लोणारकर, तहसीलदार सुनील चव्हाण आदींची उपस्थिती होती.
धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अकोला पश्चिम तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने हे आंदोलन अकोला ते पातूर महामार्गावरील चिखलगाव येथे करण्यात आले. गत काही दिवसात मराठा कुणबी एकच असल्याचे समजून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देणार असल्याचे फडणवीस सरकारने शासन निर्णय जारी केला. अशातच आता धनगर समाजाकडूनही आरक्षणाबाबत आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. गत अनेक दिवसांपासून जालना येथे धनगर समाजाचे नेते दिपक बोऱ्हाडे हे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू ठेवून ठाम भूमिका घेत आहेत. त्यांच्या या लढ्याला समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या आदेशानुसार १ ऑक्टोबर रोजी, बुधवार चिखलगाव येथे हे आंदोलन करण्यात आले. प्रतिनिधी | बोरगाव मंजू सकल धनगर समाजाकडून आरक्षणासाठी बुधवारी एल्गार पुकारत बोरगाव मंजूनजीक महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. गत काही दिवसांपासून धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांच्यासह सकल धनगर समाजाचे वतीने जालना येथे धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण लागू करण्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांना समर्थन करत बोरगाव नजीक राष्ट्रीय महामार्गावर शेकडो सकल धनगर समाज बांधवांनी १ ऑक्टोबर रोजी ठिय्या मांडुन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणा देत शासनाने दखल घ्यावी; अन्यथा भविष्यात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. आंदोलनस्थळी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, मूर्तिजापूर पोलिस उपविभागीय अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिल गोपाळ, उपनिरीक्षक रवींद्र धुळे, हेडकॉन्स्टेबल सचिन सोनटक्के, किशोर सोळंके , महादेव पातोंड , प्रमोद डोईफोडे यांच्या सह बोरगाव मंजू पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. असे झाले आंदोलन आंदोलनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी महामार्गावर उतरत घोषणा देत जोरदार आंदोलन केले. यळकोट यळकोट जय मल्हार', आरक्षण आमच्या हक्काचं- नाही कोणाच्या बापाचं' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार:लग्नासाठी केली जबरदस्ती, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केला . तिचे फोटो काढण्यात आले. महिलेला लग्नासाठी जबरदस्ती करीत फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. ही घटना मंगळवारी, ३० सप्टेंबरला गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश प्रकाश गोमकाळे (२८) रा. यवतमाळ असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिला व आकाश हे एकमेकांच्या परिचयातील आहेत. आकाश हा महिलेच्या पतीचा मित्र होता. त्यामुळे त्याचे महिलेकडे नेहमी येणे-जाणे होते. तो महिलेसोबत मोबाइलवरसुद्धा बोलत होता. या काळात पीडित महिला व आकाश हे एकमेकांच्या प्रेमात पडले. दरम्यान, या प्रकाराबाबत महिलेच्या पतीला माहित झाले. त्यामुळे महिला व तिच्या पतीचा वाद झाला. त्यामुळे महिला ही तिच्या माहेरी निघून गेली. दरम्यान, एक दिवस आकाशने महिलेला कॉल केला. त्याने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे महिला ही आकाशला भेटायला गेली. त्यावेळी आकाशने तिला मित्राच्या खोलीवर नेले. त्या ठिकाणी त्याने महिलेला चॉकलेट खाऊ घातले. चॉकेट खाल्ल्यानंतर महिलेला गुंगी आली. ती बेशुद्ध झाली. त्या अवस्थेत आकाशने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तथा त्याचे फोटोसुद्धा काढले. त्यानंतर आकाश हा महिलेला लग्न करण्यासाठी जबदस्ती करू लागला. त्याला महिलेने नकार दिला. त्यावर आकाशने तिला तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आकाशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत आयोजित सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांना उघडपणे टोले मारत मोठे वक्तव्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी आधीच जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशावर टीका केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यावरून वक्तव्य केले. पाटील यांनी सांगितले की, जर जयंत पाटील भाजपत आले तर सांगली जिल्ह्यात पडळकरच सीनियर राहतील आणि जयंत पाटील ज्युनियर म्हणून मागे बसतील. तसेच पडळकरांच्या समर्थनार्थ जयंत पाटीलांना घोषणाबाजी करावी लागेल. पाटील यांनी आपल्या भाषणात पाच वेगवेगळ्या घोटाळ्यांच्या चौकशीची जबाबदारी घेतली पाहिजे असे ठरवण्याचा इशारा देत म्हटले की, आम्ही रावण जाळून या विकृतीचा नाश करीत आहोत; उद्यापासून सांगली जिल्ह्यात शांतता पाहिजे. पण आम्हाला हलक्यात घेऊ नका. त्यांनी सांगली जिल्हा बँकेच्या घोटाळ्यापासून ते लॉटरी ऑनलाईन घोटाळा व सर्वोदय कारखान्याच्या ताब्यापर्यंत पाच प्रकरणे उघड करण्याचा इशारा दिला. चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सर्व प्रकरणांची चौकशी सुरु केली तर काहीजणांना आपल्या गावातून पळून जावं लागतील, कारण त्यांना जेलची भीती वाटेल. राजकीय चर्चेतून पाटील यांनी आक्रमक भाषण करत प्रत्यक्ष नाव न घेता विरोधकांवर तीव्र आरोप केलेत. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जयंतरावांचा फोन आला; मी जाहीरपणे बोलतो, मी कोणाला घाबरत नाही. पडळकरांनी कालच केली होती विखारी टीका जतमध्ये आयोजित दसरा मेळाव्यात जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आधीच समज दिल्यानंतरही पडळकरांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. तुझ्या कुठल्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं? असा सवाल करत त्यांनी जयंत पाटलांना थेट आव्हान दिले होते. जातीवंत पाटील असाल तर वेळ, तारीख आणि ठिकाण सांगा, मी तिथे हजर राहतो, असेही पडळकर म्हणाले होते. या भाषणात पडळकरांनी आक्षेपार्ह भाषा वापरत जयंत पाटलांसोबतच त्यांच्या निकटवर्तीय दिलीप पाटील यांच्यावरही टीका केली होती. त्यांनी दिलीप पाटील यांचा वाळव्याचा कुत्रा असा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी; सदाभाऊ खोत यांचाही हल्लाबोल भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने हाणले असल्याचा गंभीर आरोप करत, राष्ट्रवादी हा पक्ष नसून लुटारूंची आणि गुंडांची टोळी आहे, अशी थेट टीका केली. राजारामबापू पाटील यांनी अनेक माणसे उभी केली, पण जयंत पाटील यांनी तीच माणसे उभी केलेल्यांचे साखर कारखाने घ्यायला सुरुवात केल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली. जयंत पाटलांनी जिल्ह्यातील अनेक कारखाने हाणले. त्यांनी संभाजी पवार यांचा कारखाना हाणला, त्याचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत खोत यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. खंडे नवमीच्या निमित्ताने बोलताना खोत म्हणाले, खंडे नवमीला हत्यारांचे पूजन होते, आता ही हत्यारे आम्ही हातात घेणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
देशाला बलवान करायचे असेल तर समाजाला बलवान करावेच लागणार. याच राष्ट्रभक्तीच्या ध्येयांनी प्रेरित (कै.) अंबादासपंत व अनंत वैद्य बंधुंनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना १९१४ मध्ये केली. समाजाला युवापिढीला मैदानी खेळांतून सक्षम करण्यासाठी १९२५ पासून विजयादशमी महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. १०१ वर्षांहून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ विजयादशमी महोत्सवाचे आयोजन करीत असून, यंदा गुरूवारी २ ऑक्टोबरला दसरा मैदान येथे सायंकाळी ५ वा. १०१ व्या विजयादशमी या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. देशातील ५ हजार विद्यार्थी पारंपारीक व आधुनिक खेळ, कवायती व सांस्कृतिक सादर करणार आहेत. विदर्भाचे कुलदैवत श्री अंबादेवी व श्री एकवीरा देवी शारदीय महोत्सवाचा समारोप दशमीला अंबामातेच्या सिमोल्लंघन सोहळ्यातून होतो. या वेळी देवीच्या स्वागतासाठी दसरा मैदान येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विजयादशमी सोहळा राष्ट्रभक्तीला स्फुरण चढवणार ठरतो. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, डायरेक्टर जनरल व सीईओ बिहार राज्य खेळ प्राधिकरणाचे रवींद्रन शंकरन, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, अपर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी, मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव डॉ. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, प्रा. प्रणव चेंडके, प्रा. दीपा कान्हेगावकर यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी व सर्व विभागप्रमुख, उर्वरित. पान ४ राष्ट्रनिर्मीतीचा महोत्सव श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विजयादशमी महोत्सव राष्ट्रनिर्मितीचा महोत्सव आहे. महापुरूषांचा पदस्पर्श, त्यांच्या विचारांचे समाजात बीजारोपण युवा पिढीत व्हावे, त्यांना राष्ट्र निर्मिती साठी प्रेरीत करण्यासाठी १०० वर्षांपासून दसरा मैदान येथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विजया दशमी महोत्सव साजरा करीत आहे. पारंपरिक व आधुनिक खेळांच्या कवायती सादरीकरणातून युवा शक्तीला प्रेरीत करण्याचा ध्यास या महोत्सवाचा आहे. त्यात सहभागाचे आवाहन एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांनी केले.
आजच्या काळात फक्त कमाई करणे पुरेसे नाही, तर मिळालेल्या उत्पन्नाचे सुयोग्य नियोजन आणि गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. शेअरबाजार, म्युच्युअल फंड, विमा, निवृत्ती नियोजन या क्षेत्रांविषयी माहिती असेल, तरच खरी आर्थिक स्वावलंबनाची वाटचाल शक्य होते' तसेच शेअरबाजाराचे ज्ञान म्हणजे आर्थिक सशक्ततेची गुरूकिल्ली होय,’ असे प्रतिपादन सेक्युरिटी मार्केट ट्रेनर प्रा.डॉ.प्रशांत पिसोलकर यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय येथील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतर्फे एकदिवसीय वित्तीय साक्षरता कार्यशाळा व अभ्यास मंडळाचे उद्घाटन' जिजाऊ सभागृहात उत्साहात झाले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.मिलिंद भिलपवार होते. प्रमुख उपस्थितीमध्ये आयक्युएसी समन्वयक डॉ.मनीष होले, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा प्रमुख डॉ.मंगलावती पांण्येय, डॉ.राजेंद्र जदुवंशी, प्रा.नरेंद्र नजरधने, प्रा.पूनम मेश्राम, प्रा.भूषण सावरकर, प्रा. अमोल कवलकर, तसेच कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालयाचे प्रा.डॉ.गजानन हेरोळे व प्रा.डॉ.चंदा खंडारे व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना पिसोलकर यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीची तत्त्वे, फायदे-तोटे, सुरक्षित गुंतवणुकीची साधने, दीर्घकालीन गुंतवणुकीची धोरणे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गुंतवणुकीत संयम, शिस्त आणि माहितीवर आधारित निर्णय हेच यशाची गुरूकिल्ली आहेत, असेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्रा.डॉ.मंगलावती पांण्डेय यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन गायत्री विल्हेकर हिने केले तर आभार रोहिणी सूर्यवंशी हिने मानले.या कार्यशाळेत जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालय तसेच कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तर सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले शंका निरसन करून घेतले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन व गुंतवणुकीच्या मूलभूत तत्त्वांचे ज्ञान देणारी ठरली. आर्थिक शिस्त आयुष्य घडवते प्रा.डॉ. मिलींद भीलपवार यांनी विद्यार्थ्यांनी फक्त पदवीपुरते शिक्षण न घेता आर्थिक शहाणपण शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले. ‘आर्थिक शिस्त आयुष्य घडवते. अशा कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थी आयुष्यभर उपयुक्त ठरेल असे व्यावहारिक ज्ञान आत्मसात करत राहा. असे मत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व व कर्तृत्वावर आराध्या ठाकरेचे व्याख्यान
येथील नेताजी चौकात दुर्गोत्सव निमित्त नेहमी प्रमाणे यावर्षीही नेताजी दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरणपूरक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पौर्णिमा सवई यांनी भूषविले. मंडळाचे अध्यक्ष नीलेश जामठे, प्रमुख अतिथी प्रा. प्रवीण ठाकरे, प्रा. स्वप्निल ठाकरे, पत्रकार संतोष शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात बाल व्याख्याती आराध्या ठाकरे हिचे ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व व कर्तृत्व ' यावर व्याख्यान आयोजित केले होते. शिव चरित्रातील विविध पैलूंवर बोलताना तिने महाराजांची दूरदृष्टी, प्रशासन व्यवस्था, अठरापगड जातींना सोबत घेऊन घडविलेले स्वराज्य याचे महत्व स्पष्ट केले. तसेच महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातून आजच्या तरुणाईला मिळणारी प्रेरणा, नेतृत्व गुण, शौर्य आणि दूरदृष्टी यांची उत्तम मांडणी केली. आराध्या ही केवळ बाल वयातसुद्धा प्रभावी व्याख्यान सादर करणारी व्याख्याती म्हणून ओळखली जाते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच तिने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक व्याख्याने केली आहेत. तिला विदर्भ टॉप वुमन्स अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले असून, उत्सव माझ्या राजाचा या विदर्भस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून तिने तीन ग्रॅम सुवर्ण राजमुद्रेची मानकरी ठरली आहे. अशा अनेक स्पर्धांमध्ये तिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नीलेश जामठे, गजानन लांडगे, पंकज कानतोडे, राजेश कोठार, रुजेश सवाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार संघाचे भातकुली तालुका यांची उपस्थिती
अमरावती महापालिका स्वच्छता विभागाच्या वतीने प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत मंगळवारी मध्य झोन क्र. २ राजापेठ प्रभाग क्र. ७, जवाहर स्टेडियम परिसरात बच्छराज प्लॉट भागात विशेष कारवाई करण्यात आली. या छाप्यात २३५ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशव्या, डिस्पोजल ग्लास व चमचे जप्त करण्यात आले. प्लास्टिकचा साठा केल्याबद्दल आस्थापनाधारकावर १० हजार रुपये दंड आकारला. याशिवाय परिसरातील सर्व आस्थापनांना प्लास्टिक पिशव्या वापरू नये, ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र डस्टबिन वापरावे तसेच परिसर स्वच्छ ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या. कारवाई दरम्यान दोन आस्थापनांकडे डस्टबिन नसल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये असे एकूण १ हजार रुपयांचा दंड ठोठावला. या मोहिमेत एकूण ११ हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली. मनपा आयुक्त सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांचे आदेश तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहायक आयुक्त भूषण पुसतकर झोन क्र.२ यांच्या निर्देशानुसार ही मोहीम पार पडली. या कारवाई दरम्यान वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव यांच्या उपस्थितीत सारडा पॅकेजिंगच्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अविनाश रघटाटे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाधव, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, झोन क्र. २ चे स्वच्छता निरीक्षक विजय भुरे, स्वच्छता निरीक्षक (प्लास्टिक मोहीम व हॉकर्स तपासणी) अनिकेत महल्ले, धनिराम कलोसे, शैलेश डोंगरे, रोहित हडाले, मनीष हडाले उपस्थित होते. नागरिकांना प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे, ओला व सुका कचरा वेगळा ठेवून दोन डस्टबिनचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. प्लास्टिक जप्त करताना महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी.
झेंडूच्या फुलांचे भाव घसरले; शेतकरी चिंतेत
दसरा, झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणाच्या पूर्वसंध्येला अमरावती शहरातील मुख्य मार्गांवर केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या राशी पडल्या आहेत. सणासाठी झेंडूची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असली तरी यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळू शकला नाही. गत वर्षी दीडशे ते दोनशे रुपये किलो होता. यंदा तो ७० ते ८० रुपये किलोवर आला आहे. मागील दोन महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे अनेक शेतकरी फुले विक्रीसाठी बाजारात आणू शकले नाहीत, तर भिजलेल्या फुलांना कवडीमोल दर मिळत होता. पाऊस ओसरल्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू बाजारात आणला, परंतु अचानक झालेल्या आवकीमुळे दर खाली आले. झेंडूला ७० रुपयांना किलो तर १०० रुपयांना दीड किलो या दराने विक्री झाली. यामुळे खर्च भागवणे कठीण झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसामुळे बरीच फुले शेतातच नासली, उरलेली बाजारात आणली तरी ७०–१०० रुपयांचा दर मिळतोय. मेहनतीला न्याय मिळत नाही, असे शेतकरी अशोक जाधव यांनी सांगितले. तर दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात आवक झाली, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे दर टिकला नाही. ग्राहकांची मागणी जरी होती तरी पुरवठा खूप वाढल्याने भाव कमी झाले, असे विक्रेते अजय महिंगे यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे गुलाब, शेवंती, आस्टर, गुलछडी आदी फुलांना समाधानकारक भाव मिळाला. दसऱ्याच्या मुहूर्तावर गोंडे, तोरणासाठी लागणारी पाने आणि झेंडूच्या माळा खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. एकीकडे सणाचा उत्साह शिगेला असताना दुसरीकडे झेंडूला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी निराश झालेले दिसले. घाऊक बाजारातील फुलांचे दर असे झेंडू (सुका) – १०० ते १२० रुपये झेंडू (ओला) – ३० ते ४० रुपये गुलछडी – ५०० ते ७०० रुपये शेवंती – १०० ते २५० रुपये
प्रतिनिधी | तिवसा सरसकट कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी गुरुकुंज मोझरी येथून शेतकरी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात ट्रॅक्टर मोर्चा काढला. या वेळी शासना विरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी तहसीलदार यांना निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व माजी पालकमंत्री मंत्री यशोमती ठाकूर, यांच्यासह खासदार बळवंत वानखडे यांनी केले. तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी समस्यांमुळे अडचणीत सापडले आहे. निवडणुकीपूर्वी शासनाने दिलेली आश्वासने अपूर्ण आहेत. यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, निवडणुकीतील आश्वासना प्रमाणे कर्जमाफी करा, अतिवृष्टीमुळे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अश्या विविध मागण्यांसाठी तिवसा तालुका काँगेसने माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी दुपारी १२ वाजता गुरुकुंज मोझरी येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांच्या महासमाधीस अभिवादन करून ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात झाली. यावेळी शासन विरोधी घोषणाबाजी व फलक उंचावत हा मोर्चा काही तासातच शहरातील पेट्रोलपंप चौकात दाखल झाला. यावेळी आंदोलनस्थळीं खजडी भजन आंदोलन व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी तिवसा शहरातील मुख्य पेट्रोलपंप चौकात एक तास राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला होता. यावेळी तिवसा महामार्गावर जवळपास एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब, रांगा लागून काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वेळी सभेला संबोधीत करतांना माजी मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले एकही आश्वासन या सरकारने पाळले नाही. नुकसान भपाईचे पैसे अडकले आहेत. परंतु, शेतकऱ्यांच्या मागण्यांकरीता स्वस्थ बसणार नाही. यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. असे मत यशोमती ठाकूर, यांनी व्यक्त केले. त्यानंतर हा ट्रॅक्टर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार यांना मगण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनस्थळी पोलिस व दंगा नियंत्रण पथक प्रशासनाचा चोख बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनात वैभव वानखडे, पंकज देशमुख, नरेंद्र विघ्ने, योगेश वानखडे, दिलीप काळबांडे, मुकुंद पुनसे,, विश्वजीत बाखडे, प्रणव गौरखेडे, जसबीर ठाकूर, शेतु देशमुख, रितेश पांडव, सूरज धुमनखेडे, आकाश डेहनकर, प्रशांत प्रधान, प्रतिभा गौरखेडे, प्रिया विघ्ने, यासह हजारो शेतकरी या ट्रॅक्टर मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या शासनाकडून अद्यापही प्रलंबित आहे. खऱ्या अर्थाने केंद्र व राज्य शासन शेतकर्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु, आम्ही शेतकऱ्याचा हात कधी सोडणार नाही. त्यांच्या प्रश्नांकरिता वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन आणखी तीव्र आंदोलन करू. हे केवळ अदानी आणि अंबानीचेच सरकार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांचे नाही. असे सभेला संबोधित करतांना खासदार बळवंत वानखडे म्हणाले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे आयोजित जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत एकलव्य गुरुकुल स्कूल, येथील १७ व १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने जिल्हा स्तरावर अप्रतिम खेळासह विजेतेपद मिळवून विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. एकलव्यचा १४ वर्षांखालील मुली व मुलांचा तसेच १७ वर्षांखालील मुली व मुलांचा संघ जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांकावर राहिला. १४ वर्षांखालील मुलाच्या संघात नैतिक मोहकार, जीत पवार, सुयोग पोपळघाटे, यश बारसे, ओम गुल्हाने, अर्पित ब्राह्मणवाडे, समर भगत, सार्थक हाडके, आराध्य महल्ले, संकेत टेळे, पार्थ घोडेराव, दक्ष जेवढे, मुलींच्या संघात श्रेया खानझोडे, अक्षरा चौधरी, वैदही गुल्हाने, लावण्या घोडेस्वार, अवनी काकडे, अक्षरा भोयर, आराध्या सोनोने, अनुराधा भोयर, अनन्या चव्हाण, राधिका ठाकरे, अर्पिता निकोडे, दिपकौर जाधव, १७ वर्षांखालील मुलांच्या संघात मंथन बिटले,श्रेयश पकडे, कुणाल ढगे, नैतिक गुल्हाने, नैतिक भोयर, अलोक श्रावगी, साहिल बावनकुळे, आराध्य जोगदंडे, प्रतीक काळेकर, स्वराज शेबे, सुशांत मारोटकर, आयुष गुल्हाने तर मुलींच्या संघात संस्कृती कोठार, ईश्वरी मासोतकर, अक्षरा लाड, आरुषी चौधरी, कृष्णाई दांदळे, तनवी वर्धेकर, श्रद्धा गुल्हाने, सेजल धवस, नंदिनी शेबे, चंचल बाभुळकर, दर्शना मंडलिक, गौरी ढोके यांचा समावेश होता. एकलव्य गुरुकुल स्कूलचे खेळाडू क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य मिळवत आहेत.सर्व खेळाडूंसह विजयी संघाचे एकलव्य गुरुकुल स्कूलचे मार्गदर्शक सदानंद जाधव( शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त ) एकलव्य क्रीडा अकादमीचे अध्यक्ष विशाल ढवळे, व्यवस्थापक अनुप काकडे, धनुर्विद्या मार्गदर्शक अमर जाधव एकलव्य गुरुकुल स्कूलचे शिक्षक प्रा. गजानन काकडे,सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नेटबॉल स्पर्धेचा सराव. मुख्याध्यापक विलास मारोटकर व प्रशिक्षक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनात खेळाडू सराव करतात. अॅथलेटिक्समध्येही उत्तम कामगिरी नेटबॉल सोबतच मैदानी स्पर्धेतही एकलव्यच्या अॅथ्लीटने बाजी मारली असून तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये १४ वर्ष वयोगटात ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अवनी काकडे प्रथम, ६०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रसाद मुरादे द्वितीय तर १७ वर्षांखालील २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नंदिनी शेबेने द्वितीय क्रमांक पटकावला. ४०० मीटर शर्यतीत सेजल धवस प्रथम तसेच १७ वर्षे वयोगटातील ४ गुणिले १०० मी. रिलेमध्ये मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. यामध्ये सहभागी विद्यार्थी चंचल बाभुळकर, सेजल धवस, नंदिनी शेबे, माधवी मेश्राम, यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धे करिता निवड करण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणताही भक्कम निर्णय घेण्यात आला नाही. सरकारच्या मदतीवर झालेले नुकसान न भरून येणारे आहे. यावर मात करण्यासाठी पाहणी ऐवजी स्थानिक पुढाऱ्यांसह सामाजिक संस्थांनी तालुक्यातील पडझड घरासह वाहून गेलेली शेती पूर्व स्थितीवर आणण्यासाठी तालुक्यातील एक-एक गाव दत्तक घेऊन निर्वाणी काळात मदत करावी, अशी मागणी नागरिकांसह शेतकरी वर्गातून होत आहे. मोहोळ तालुक्यातील सीना नदीमध्ये चांदणी, खासापुरी, सीना कोळेगाव, भोगावती नदी पात्रातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने १९ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पूर ओसरला आहे. नागरिक आपापल्या घरांची साफसफाई सुरू केली आहे. महसूल प्रशासन पडझड घराच्या पंचनामेसह चारा, धान्य किट वाटप करण्यात मग्न आहे. खरडून गेलेले जमीन त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. कोरडवाहू जमीन हेक्टरी साडेआठ हजार रुपये, बागायत पिकांसाठी साडेसतरा हजार रुपये, बहुवार्षिक पिक म्हणजे फळबागा यांच्यासाठी साडे बावीस हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनीचा दुरुस्त होणारे असेल, तर त्यासाठी १८ हजार रुपये, खरडून गेली आहे. परंतु दुरुस्त होणार नाही त्यासाठी कमीत किमान ५ हजार ते कमाल ४७ हजार रुपये शासनामार्फत दिले जाणार आहे. पुराचे पाणी घरात गेल्यानंतर सानुग्रह अनुदानासाठी घराचा पंचनामा, घर पडझडीचा पंचनामा, शेतात कुठले पीक आहे. पाहणी करून पंचनामा,कोरडवाहू,बाग ायत,फळबागांचा असे तीन प्रकारचे पंचनामे होणार आहेत. गुरांच्या गोट्याचा पंचनामा असे विविध प्रकारे पंचनामे होणार आहेत. घर पडझडीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान, पक्के घर पडल्यास १ लाख २० हजार रुपये प्रतिघर. पडझड नष्ट झालेला झोपडी यासाठी प्रति झोपडी ८ हजार रुपये, घराला जोडून असलेला जनावरांचा गोट्यासाठी प्रति गोठा ३ हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहेत. आरोग्य खात्याकडून आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले आहेत. मात्र पाणी ओसरलेल्या गावांमध्ये दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत. काकासाहेब चितळे फाउंडेशन सांगली भिलवडी येथून २५ स्वयंसेवकाच्या माध्यमातून लोकनेते बाबुराव आण्णा पाटील साखर कारखान्याच्या फवारणी यंत्रणाच्या माध्यमातून बोपले, एकुरके गाव स्वच्छ करण्याचे मोफत काम सुरू आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व्यवस्था करण्यात आली. महिला पुरुष सदर टँकरमधून घरामध्ये स्वच्छ पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. मात्र मंगळवार दि.३० सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची पूरग्रस्तांना मदत करण्या संदर्भामध्ये बैठक होऊन तुटपुंजी मदत दिली. Share with facebook तीन प्रकारानुसार पंचनामे शासनाकडून अनुदान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) गुरुवारी विजयादशमीला संघटनेची शताब्दी साजरी करत आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सर्वप्रथम आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहिली. प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनीही श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मोहन भागवत यांनी शस्त्र पूजा केली. भागवत थोड्याच वेळात सभेला संबोधित करतील. हा कार्यक्रम नागपूरमधील रेशम बाग मैदानावर होत आहे. २१,००० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. देशभरातील ८३,००० हून अधिक संघ शाखांमध्ये विजयादशमी उत्सव साजरे केले जात आहेत. संघ विजयादशमीला आपला स्थापना दिन साजरा करतो. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये विजयादशमीला संघाची स्थापना केली. कार्यक्रमाशी संबंधित ५ छायाचित्रे... घाना आणि इंडोनेशियातील पाहुणे देखील उपस्थित विजयादशमी उत्सवासाठी दक्षिण भारतीय कंपनी डेक्कन ग्रुपचे लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलित, केव्ही कार्तिक आणि बजाज ग्रुपचे संजीव बजाज यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. आरएसएसने त्यांच्या उत्सवांसाठी घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके आणि यूएसए या देशांमधून परदेशी पाहुण्यांनाही आमंत्रित केले आहे.
नवरात्रोत्सवात तालुक्यातील मोहटादेवी येथे रोज लाखो भाविक दर्शनासाठी येत आहेत. देवस्थानतर्फे भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच ट्रस्टतर्फे नवरात्र काळात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. काल महिषासूरमर्दिनी स्तोत्रासह वेदमंत्रांच्या जयघोषात अष्टमी होम हवन, महापूजा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पूर्णाहुती झाली. त्यावेळेस उपस्थित सर्व भाविकांनी देवीचा एकच जयजयकार करत होमासाठी नारळ अर्पण केले. प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे-सोनटक्के, प्रेमानंद सोनटक्के यांच्या हस्ते होमहवन, पूजा धार्मिक विधी, कुमारीका पूजन व पूर्णहुती सोहळा पार पडला. सर्वांना दीर्घायुष्य आरोग्य लाभून भारत राष्ट्र समृद्ध आत्मनिर्भर व्हावे. नैसर्गिक व मानवनिर्मित सर्व संकटांपासून देशाचे व धर्माचे रक्षण व्हावे. राष्ट्र बलशाली होऊन राष्ट्रातील सर्व लोकांच्या हातून मानवसेवा, ईश्वरसेवा, सर्व प्राणीमात्रांची, निसर्गाची सेवा घडावी अशी वैश्विक प्रार्थना करण्यात आली. वेदशास्त्र संपन्न भूषण साखरे, बाळासाहेब क्षीरसागर, भास्कर देशपांडे, नागेश घायाळ, सुहास रामदासी, भगवान जोशी, महेश झेंड आदींनी पौरोहित्य केले. संबळ ढोलकी वादक काशिनाथ पवार यांच्या पारंपारिक वाद्याने पूर्णाहुती सोहळा अतिशय भावपूर्ण बनला. मोहटा देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश महेश लोणे, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश रवीकिरण सपाटे, अँड कल्याण बडे, विक्रम वाडेकर, डॉ. श्रीधर देशमुख, शशिकांत दहिफळे, बाळासाहेब दहिफळे, अक्षय गोसावी, विठ्ठल कुटे आदी विश्वस्त धार्मिक कार्यामध्ये सहभागी झाले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, मुख्य सेवेकरी अंकुश ठोंबरे आदींनी सर्व कर्मचाऱ्यांसह विविध मान्यवरांचे स्वागत करत सर्व कार्याचे संयोजन केले. पावसाने उघडीप दिल्याने तसेच ज्या भाविकांना नवरात्र कालावधीमध्ये देवीच्या दर्शनासाठी येता आले नाही असे भाविक होमाच्या दर्शनासाठी व पूर्णाहुती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. मंगळवारी आठवी माळ असल्याने भाविकांची गर्दी वाढली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली. स्वयंसेवक, देवस्थानचे कर्मचारी व स्थानिक पोलिसांच्या मदतीने यात्रा बंदोबस्त सुरळीत पार पडला. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता सीमोल्लंघन, शुक्रवारी देवीची यात्रा त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येत्या सोमवारी यात्रोत्सवाची सांगता होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. भाविकांचा उत्साह कायम यंदा राज्यात अतिवृष्टीने कहरच केला. सर्वदूर पावसाने हजेरी लावली. नवरात्रात पावसाचा जोर जास्त होता. नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली होती. एसटी महामंडळानेही भाविकांसाठी जादा बसची व्यवस्था केली होती. पायी चालून येणाऱ्या भाविकांची संख्याही लक्षणीय होती. त्यामुळे मोहटादेवीकडे येणारे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते.