महाराष्ट्रात सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकीचे वातावरण झाले असून कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते कैलास शिंदे यांनी पत्राद्वारे थेट हकालपट्टी करण्याची विनंती केली आहे. शिवसेना पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात यावी ही नम्र विनंती. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा शिष्य म्हणून त्यांना अपेक्षित असा निष्ठावान 24 तास गोर गरिबांकरिता कार्य करणारा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा, अनुभवी सुशिक्षीत निष्कंलक 20 वर्ष निःस्वार्थपणे कुष्ठ रुग्णांची सेवा करणारा अशा कार्यकर्त्याची पक्षाला गरज नसल्याने शिवसेना पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात यावी ही नम्र विनंती, अशा शब्दांत माजी सभागृह नेते, गटनेते कैलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पैसा असेल तरच निवडणूक लढवण्यास पात्र कैलास शिंदे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले की, साहेब सध्या देशात राज्यात जिल्ह्यात-शहरांत तसेच गावात ज्या प्रकारे राजकारण सुरु आहे. तर हल्ली तुमच्या एकनिष्ठ असणे, किती कार्य केले, तुमचा अनुभव, शिक्षण, यांना शुन्य महत्त्व असून तुम्ही आर्थिक किती मजबूत आहात याला महत्त्व आहे. तुमच्याकडे फक्त पैसा असेल तरच तुम्ही निवडणूक लढवण्यास पात्र आहात असा अधोरेखीत नियम झाला आहे, असे शिंदे यांनी म्हटले. आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही पुढे कैलास शिंदे लिहितात की, त्यामुळे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि गुरुबंधू एकनाथ शिंदे साहेब यांना एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यास पात्र नाही. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, ही नम्र विनंती. तसदी बद्दल क्षमस्व आणि आपणांस शुभेच्छा, अशा शब्दांत कैलास शिंदे यांनी आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून, जळगाव आणि पुणे या दोन शहरांतून उमेदवारीवरून दोन वेगवेगळी चित्रे समोर आली आहेत. जळगावमध्ये तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्तीला रडू कोसळले, तर पुण्यात भाजप नेत्याने उमेदवारी मिळाल्यावर चक्क मंत्र्यांच्या चरणी लोटांगण घातले. जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाठ यांनी उमेदवारी अर्ज तर दाखल केला, मात्र पक्षाकडून 'एबी' फॉर्म मिळण्याची चिन्हे कमी दिसताच त्यांना भररस्त्यात रडू कोसळले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एबी फॉर्म मिळण्याची शक्यता कमी असल्याने कलाबाई यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. मी मागासवर्गीय असल्यामुळेच कुलभूषण पाटील माझ्या उमेदवारीला विरोध करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. प्रभाग 10 मध्ये शिवसेना राष्ट्रवादीला एकही जागा सोडायला तयार नसल्याचे सांगत, कलाबाई यांनी अपक्ष लढण्याचा आणि उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. जळगावात काँग्रेसची स्वबळाची तयारी? महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र असल्याचे भासवत असले, तरी काँग्रेसच्या भूमिकेने संभ्रम वाढला आहे. आघाडीचा अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेसने आज जळगावात आपले सहा उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले आहे. पुण्यात तिकीट मिळताच नेत्याने डोके टेकवले दुसरीकडे, पुण्यातील भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आपल्या कृतीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. भाजपने यंदा उमेदवारांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट फोन करून उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भाजपचे पुणे शहराचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आज अर्ज दाखल केला. गणेश बिडकर अर्ज भरण्यासाठी भवानी पेठ विभागीय कार्यालयात आलेले असता, त्यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथे उपस्थित होते. फॉर्म भरण्यापूर्वी गणेश बिडकर यांनी आपली चप्पल काढली आणि थेट गुडघ्यावर बसून चंद्रकांत पाटील यांच्या पायावर डोके टेकवले. गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक 24 (ड) मधून निवडणूक लढत आहेत. गणेश बिडकर यांच्या या कृतीने खुद्द चंद्रकांत पाटील आणि उपस्थित आमदार हेमंत रासने हे देखील अचंबित झाले. उमेदवारी मिळाल्याचा आनंद बिडकर यांनी अशा प्रकारे व्यक्त केला.
धनुष्यबाणाचे बटन दाबणा-यांना स्वर्गातच जागा : शहाजीबापू पाटील
सोलापूर : प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटलांनी अजब वक्तव्य केले आहे. शिवसेनेला मतदान करणारे स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले त्याला स्वर्गातच जागा आहे, तो नरकात जाणारच नाही अस विधान करत शहाजीबापू पाटलांनी अकलेचे तारे तोडले आहेत. सांगोल्याच्या सभेत बोलताना बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, मी खात्रीने सांगतो, ज्यांनी […] The post धनुष्यबाणाचे बटन दाबणा-यांना स्वर्गातच जागा : शहाजीबापू पाटील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात एका मराठी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा तरुण स्थलांतरीत मजूर होता. या घटनेत तो जबर जखमी झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हा नृशंस घटनेची दाहकता दिसून येत आहे. तामिळनाडूचे भाजप उपाध्यक्ष के अन्नामलाई यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात 4 अल्पवयीन तरुण सूरज नामक मराठी तरुणावर ऊस तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कत्तीसारख्या शस्त्राने हल्ला चढवला. सूरज असे 34 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. पण तामिळनाडू पोलिसांनी अद्याप स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला नसल्याने त्याची पुष्टी होऊ शकली नाही. तामिळनाडूच्या थिरुथानी रेल्वे स्थानकालगत ही घटना घडली. पीडित तरुण रेल्वेस्थानकाच्या भिंती पलीकडे गंभीर स्थितीत पडला होता रिल तयार करण्यावरून झाला हल्ला यासंबंधीच्या माहितीनुसार, हल्लेखोर तरुणांनी सूरजच्या गळ्याला कत्ती लावून रिल तयार करण्याचा प्रयत्न केला. सूरजने त्यांना त्याचे कारण विचारले असता त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी कत्तीने त्याचा चेहरा, डोके, गळा, मान, पाठ, पोट, हात, पाय आदी सर्वांगावर वार केले. त्यात तो रक्तबंबाळ झाला. यावेळी त्याने मारकऱ्यांना आपल्याला सोडून देण्याची विनंतीही केली. पण मारेकऱ्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्याच्यावर हल्ला करणे सुरूच ठेवले. एवढेच नाही तर त्यांनी या संपूर्ण मारहाणीचा एक व्हिडिओही तयार केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. काय म्हणाले तामिळनाडू पोलिस? थिरुथानी पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज चेन्नईहून एका इलेक्ट्रिक रेल्वेतून प्रवास करत होता. तेव्हा थिरुवलंगडू स्टेशनवर हल्लेखोर तरुण त्याच्या डब्ब्यात शिरले. त्यांनी कथितपम सूरजच्या मानेवर कत्ती ठेवून रिल तयार केली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. सूरजने यावेळी त्यांचा विरोध केला असता त्यांनी त्याला रेल्वेबाहेर खेचून अत्यंत क्रूरपणे त्याच्यावर हल्ला चढवला. सहप्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सूरजला थिरुथानी सरकारी इस्पितळात दाखल केले. तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तिरुवल्लूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज व व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी काही तासांतच चारही अल्पवयीन आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर लगेचच त्याच्या मुसक्या आवळल्या. नंदगोपाल (17), संतोष (17), विकी (17) व संतोष (17) अशी आरोपींची नावे आहेत. हे चौघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. भाजपची द्रमुक सरकारवर टीका दुसरीकडे, या घटनेवरून भाजप नेते के अन्नामलाई यांनी तामिळनाडूच्या द्रमुक सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. थिरुथानी येथे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सूरज नामक एका स्थलांतरीत मजूरावर गांजाच्या नशेत असलेल्या टोळीने क्रूर हल्ला केला. त्याच्या मानेवर कत्ती ठेवून रिल बनवण्यास त्याने विरोध केला होता. हा विरोध त्याचा गुन्हा ठरला. ही आजच्या द्रमुक शासित तामिळनाडूची विचलित करणारी वास्तविकता आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली असली तरी मूळ समस्या तशीच कायम आहे. या राजवटीत अमली पदार्थांची सहज उपलब्धता, हिंसेचे उघडपणे उदात्तीकरण, स्थलांतरीत मजुरांविरोधात राजकीय प्रचार व तलवारींसारखी प्राणघातक शस्त्रांचा वापर ही सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. एकेकाळी सुव्यवस्थित असणाऱ्या राज्याला जंगलराजमध्ये रुपांतरीत करण्यासाठी द्रमुक सरकारला जबाबदार धरले पाहिजे, असे ते म्हणालेत.
सांगोल्याच्या सभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटलांनी अजब वक्तव्य केले आहे. शिवसेनेला मतदान करणारे स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले त्याला स्वर्गातच जागा आहे, असेही शहाजीबापू पाटलांनी म्हटले आहे. सभेत बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, मी खात्रीने सांगतो, ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाण दाबला त्यांना त्यांना स्वर्गातच जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात तुम्ही गेल्याशिवाय राहत नाही. देव तुम्हाला नरकात जाऊच देत नसतो. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणं दाबली त्यांचे काय खरे नाही त्यांच्यात रामच उरला नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच यावेळी बोलताना शहाजीबापू पाटलांनी विधानसभेतल्या पराभवावरून देखील दीपक साळुंखेंवर टीका केली. ते म्हणाले, मी भाकरीत साप पाळला होता म्हणूनच मला विधानसभेला पराभवाचा फटका बसला, असे ते म्हणाले. तसेच आपण आजही महायुतीत आहे. आपल्याला युतीचेच काम करायचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपला लगावला टोला पुढे शहाजीबापू पाटील म्हणाले, हा मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवा आम्ही तुमचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही. पण तुम्ही तसे केले नाही, तर आम्ही पुन्हा एकट्या वाटेने जाऊ, असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिला. शिवाय तुम्ही आताच्या निवडणुकीत ऐकले असते तर तुम्ही सत्तेत निम्मे भागीदार झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. दीपक साळुंखेंवर टीका माजी आमदार व शहाजीबापू पाटलांचे कट्टर विरोधक समजले जाणारे दीपक साळुंखे यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, दीपक साळुंखे स्वतःला किंग मेकर म्हणतात. मी जिथे जाईल त्याचा गुलाल असतो असे ते सांगतात. मात्र, ते पांढऱ्या पायांचे असल्यामुळे ते ज्यांच्याकडे जातील त्यांचा पराभव नक्की, अशी जहरी टीका पाटलांनी केली.
‘भाबीजी’ वर आली हॉटेलमध्ये राहण्याची वेळ
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे चांगलीच चर्चेत आहे. शिल्पा आता पुन्हा एकदा ‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेत दिसत आहे. पण मुंबईत तिच्याकडे सध्या राहण्यासाठी घर नाही. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘भाबीजी घर पर हैं’ पाहिली जाते. या मालिकेचा ‘भाबीजी घर पर हैं २.0’ हा नवा […] The post ‘भाबीजी’ वर आली हॉटेलमध्ये राहण्याची वेळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यास सुरुवात झाली असून, मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार हे या युतीचे पहिले अधिकृत उमेदवार ठरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः किल्लेदार यांना एबी फॉर्म सुपूर्द केला. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 192 ची जागा युतीमध्ये कुणाकडे जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड रस्सीखेच सुरू होती. हा वॉर्ड सध्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे त्यांचे विद्यमान नगरसेवक होते. मात्र, दोन्ही पक्षांतील प्रदीर्घ चर्चेनंतर ही जागा मनसेला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेवरून आता यशवंत किल्लेदार नशीब आजमावणार आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर करण्याऐवजी थेट फॉर्म देण्याची रणनीती दोन्ही पक्षांनी अवलंबली आहे. अनेक वर्षांच्या निष्ठेची आणि कामाची ही पोचपावती उमेदवारी मिळाल्यानंतर यशवंत किल्लेदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज साहेबांच्या हस्ते पहिला एबी फॉर्म मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षांच्या निष्ठेची आणि कामाची ही पोचपावती आहे, असे ते म्हणाले. राज ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून या वॉर्डात 100 टक्के विजय मिळवू, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, बहुमताने उमेदवार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. कोण आहेत यशवंत किल्लेदार? यशवंत किल्लेदार हे दादर-माहीम परिसरातील मनसेचे विभाग अध्यक्ष असून राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाच्या बांधणीत आणि विविध सामाजिक आंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, मात्र पक्षाकडून तिकीट न मिळूनही त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट, त्यांनी पक्षाप्रती आपली निष्ठा कायम राखत 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ' या दोन्ही विचारांच्या प्रवाहात स्वतःचे स्थान टिकवून ठेवले. किल्लेदार यांनी स्वतःला उमेदवारी नसतानाही प्रकाश पाटणकर आणि संदीप देशपांडे यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती. कालांतराने राजकीय गणिते बदलली. प्रकाश पाटणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला, तर संदीप देशपांडे यांना पक्षाने विधानसभेच्या रिंगणात उतरवले. या सर्व घडामोडींत किल्लेदार डगमगले नाहीत आणि त्यांनी पक्षसंघटनेचे काम सुरूच ठेवले. अखेर त्यांच्या या प्रदीर्घ संयमाची आणि निष्ठेची दखल घेत, राज ठाकरे यांनी त्यांना आगामी निवडणुकीत उद्धवसेना-मनसे युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवले असून, त्यांच्या रूपाने एका हक्काच्या कार्यकर्त्याला कामाची पोचपावती मिळाली आहे.
शिवसेनेचे माजी उपमहापौर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आज दुपारी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. जंजाळ यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या जागावाटपात युती होणार की नाही, याबाबत कोणतीही निश्चिती नाही. भाजपसोबत जागावाटपाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच, शिवसेनेला अत्यंत कमी जागा मिळत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे आपण कालपासून जागावाटप प्रक्रियेतून बाजूला झालो आहोत, असे जंजाळ यांनी सांगितले. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. आमच्या वाट्याला येणाऱ्या जागा अतिशय कमी आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या छातीवर बसून मला निवडणूक लढायची नाही, असे जंजाळ म्हणाले. या कारणास्तव त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, इतक्या दिवसांपर्यंत मी युतीच्या जागावाटप प्रक्रियेत सहभागी होतो, मात्र कालपासून मी या प्रक्रियेत नाही. त्यामुळे आता नेमके काय सुरू आहे, याची माहिती मला किंवा खासदार संदिपान भुमरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही नाही.
मनसेला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने मला 3 महिने ताटकळत ठेवले. त्यामुळे भाजपला आता मुंडे, महाजनांची गरज उरली नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. प्रकाश महाजन यांनी गत आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष प्रवेशानंतर लगेचच त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवरही शरसंधान साधले आहे. ते म्हणाले, मी भाजपमध्ये गेलो नाही. कारण, त्यांनी मला तब्बल 3 महिने ताटकळत ठेवले. मी त्यांची प्रवेश परीक्षा पास झालो नाही. पण ज्यांनी भाजपवर टीका केली, ते सर्वजण आज भाजपमध्ये आहेत. दिनकर पाटील भाजपवर बोलले, ते आज भाजपत आहेत. भाजपच्या घराला दार नाही, पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. मी तीन महिने वाट पाहिली. कारण, मला हिंदुत्त्वावर काम करायचे होते. ठाकरे बंधूंवरही साधला निशाणा प्रकाश महाजन यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी केव्हाच हिंदुत्त्व सोडले. त्यांना केवळ मुंबईतील आपले अस्तित्व टिकवायचे आहे. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की विचार, देशहित असे म्हटले जाते. उलट गरिबांवर शेण खाल्ल्याचा आरोप होतो. मी 5 वर्षे मनसेत होतो. तिथे तपश्चर्या केली. आता माझ्यावर पैशांसाठी पक्ष सोडल्याची टीका करणारे लोक जनावरांच्या बाजारात दलाली करतात. आमच्यावर विठ्ठलाचे प्रेम नव्हते. विठ्ठलाच्या नातवाचे काम करायचे. मी म्हणालो होतो विठ्ठल बदलणार नाही, पण विठ्ठलाने लक्ष दिले पाहिजे की नाही? चंदूमामा सोडा, रशीद मामू आला छोट्या कार्यकर्त्याने निष्ठा सोडली की त्यांना गद्दार म्हटले जाते. मी आता अस्तित्व आहे तोपर्यंत शिवसेनेत राहणार. मी दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पण ते मराठी माणसांपासून दूर जाताना दिसले. ते मला खटकले. चंदूमामा सोडा, रशीद मामू आला. पण ते राज ठाकरे यांना खटकले नाही. आता एकत्र आल्यानंतर अनेकजण आठवत आहेत. शिवेसना - मनसे युतीत मनसेला ज्या जागा पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे अनेकजण नाराज झालेत. ठाकरे गट व मनसेची युती झाली तेव्हा बाळा नांदगावकर कुठे गेले होते? असा सवालही प्रकाश महाजन यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे बाळा नांदगावकर मनसेत नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबईच्या जिल्हाध्यक्षा राखी जाधव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतर यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे राखी जाधव यांच्यासह उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर भाजप माज करत असल्याची टीका केली होती. यावर प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. ठाकरेंवर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले, ठाकरेंचा विश्वास आता मराठी माणसावर राहिलेला नाही, हिंदू मतांवर राहिलेला नाही. त्यांना मराठी माणसाची आणि हिंदूंच्या मतांची परवा नाही. तसेच राज ठाकरे यांनी मोदींवर व भाजपवर टीका केली होती, यावर बोलताना दरेकर म्हणाले, मुंबईकडे आमचे लक्ष आहे, देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष मुंबईकडे आहे, त्यामुळे वैफल्यातून आलेले हे विधान असल्याची टीका दरेकरांनी केली आहे. उमेदवारी मिळावी म्हणून कोणी भाजपमध्ये येत नाही प्रवीण दरेकर म्हणाले, केवळ उमेदवारी मिळावी म्हणून कोणी भाजपमध्ये येत नाही. तर विकासाचे राजकारण जे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस करत आहेत. तसेच मुंबईचा चेहरा-मोहरा जे काही बदलत आहे. राखी जाधव या कुठल्याही पक्षातल्या असल्या तरी त्या ग्राउंडवरच्या कार्यकर्त्या आहेत. हे आपण बघितले आहे की त्या जनतेमध्ये राहिलेल्या कार्यकर्त्या आणि नेत्या आहेत. पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, राखी जाधव यांना खात्री होती की, माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा विकास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विकासाचे राजकारण करूया. कारण शेवटी पक्ष नेते, हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची अध्यक्षा आज मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार आणि पराग शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्या ज्या पक्षात चांगली लोक आहेत, ज्यांना राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे, ज्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, ती सगळी लोक भाजपमध्ये येत आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच विकास कोण करू शकते तर भाजप करू शकते, त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश होत आहेत.
पुणे : प्रतिनिधी माहापालिका निवडणुकीत आमदार, खासदार किंवा आजी-माजी नगरसेवक यांच्या नातलगांना उमेदवारी देऊ नये, अशा प्रकारचा आदेश भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला आहे. त्यामुळे पुण्यात इच्छुक असलेल्या आमदार किंवा नगरसेवक यांच्या नातेसंबंधातील दावेदारांची पंचायत होणार आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीवर भारतीय जनता पक्षाने सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गेल्या काही […] The post भाजपमध्ये घराणेशाहीला चाप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आघाडीची घोषणा केली आहे. हे पक्ष मनसे व महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षालाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे याठिकाणी भाजप - शिवसेना विरुद्ध काँग्रेस - ठाकरे गट - मनसे - रासप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. यासाठी सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काही ठिकाणी या दोन्ही आघाड्यांतील घटकपक्ष एकमेकांविरोधात लढतानाही दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेस व ठाकरे गटाने आघाडी करत भाजप व दोन्ही राष्ट्रवादींना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर व काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे या युतीची घोषणा केली. पुण्यात ठाकरे अन् काँग्रेसचाच पर्याय पुण्यात बदल घडवायचा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांचाच पर्याय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यास नकार दिला आहे. यामागे त्यांची एक रणनीती आहे. राज्यात विरोधकच शिल्लक राहू नये ही यामागील भूमिका आहे. पण आम्ही असे होऊ देणार नाही, असे सचिन अहिर यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. सतेज पाटील म्हणाले, पुण्यात महापौर कुणाचा? हा प्रश्न महत्त्वाचा नाही. आमच्यासाठी पुणेकरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोणत्याही पदापेक्षा पुणेकर ज्या समस्यांना तोंड देत आहेत, त्या सोडवण्याकडे आमचा कल असणार आहे. वाहतुकीचा प्रश्न असो किंवा शहरातील इतर प्रश्न असोत ते नागरिकांना भेडसावू नयेत असा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीत आमच्या आघाडीला सत्ता मिळाली तर आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊले उचलू. मनसेला सोबत घेणार का? पत्रकारांनी यावेळी सतेज पाटील व सचिन अहिर यांना पुण्यात मनसेला सोबत घेणार का? असा प्रश्न केला. त्यावर सतेज पाटील म्हणाले, आमच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. मनसे व रासप सारख्या घटकपक्षांशी आमची आमच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. या प्रकरणी आज उशिरापर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपविरोधी सर्वच विरोधी पक्ष आमच्यासोबत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर आठवड्याला एकत्र बसणारे पक्ष या निवडणुकीत वेगळे लढत आहेत. यावरून सर्वकाही स्पष्ट होते. आमचा उद्देश भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवणे एवढाच आहे, असे ते म्हणआले. हे ही वाचा...
ठाकरेंच्या शिवसेनेकडून १०२ जणांना एबी फॉर्मचे वाटप
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत १०२ जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. मातोश्रीवर आज दिवसभर एबी फॉर्मचे वाटप सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षातील कार्यकर्त्यांनी ‘‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’’ आणि ‘‘आदित्य साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’’ अशा घोषणा देत नेतृत्वाला […] The post ठाकरेंच्या शिवसेनेकडून १०२ जणांना एबी फॉर्मचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पैशासाठी शेतक-याचे अपहरण करून निर्घृण हत्या
सिल्लोड : प्रतिनिधी तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या शेतक-याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले आहे. एक कोटी रुपयांची खंडणी मागणा-या अपहरणकर्त्यांनी अखेर गव्हाणे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिला. सोमवारी पहाटे ५ वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अजिंठा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने ५ आरोपींना अटक केली असली, […] The post पैशासाठी शेतक-याचे अपहरण करून निर्घृण हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महानगरपालिकेच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या असून एबी फॉर्मही पुढील दोन दिवसात सर्वच राजकीय पक्षांना भरावे लागणार आहेत. परंतु, महायुतीमध्ये अजून जागावाटप देखील काही ठिकाणी रखडली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच जळगावमध्ये चांगलेच नाराजीनाट्य पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील अवघ्या 15 मिनिटांत बैठकीतून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात जागांच्या वाटपावरून रविवारी दुपारी 1.20 वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठक सुरू झाल्यावर अवघ्या 15 मिनिटांतच वातावरण तापले. उभय नेत्यांमध्ये केवळ 15 मिनिटे चर्चा झाली आणि 2.36 वाजता जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून निघून गेले. पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण दोन वेळा बाहेर आले आणि फोनवर चर्चा करून पुन्हा आत गेल्याचे पाहायला मिळाले. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची ही बैठक झाल्यानंतर साधारण सायंकाळी 4.20 च्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांना टाळण्यासाठी आपला ताफा दुसऱ्या गेटवर बोलवला. पत्रकार तिकडे जाताच, गिरीश महाजन प्रवेशद्वारातून बाहेर पडले, तर आमदार भोळे आणि चव्हाण मागच्या दाराने निघून गेले. इतके करूनही पत्रकारांनी गिरीश महाजन यांना गाठलेच. यावेळी बोलताना महाजन म्हणाले, अजून चर्चा सुरू आहे, लवकरच अंतिम निर्णय होईल. तसेच गुलाबराव पाटील यांची नाराजी नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बैठक फिस्कटल्याने वरिष्ठ पातळीवरून कुठल्याही परिस्थितीत महायुती म्हणूनच निवडणूक लढवावी, असे आदेश मिळाले असल्याची माहिती आहे. त्यानुसार भाजपला 50, शिवसेना शिंदे गटाला 20 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
मुंबई महापालिकेचा रणसंग्राम आता चांगलाच तापला आहे. सत्ताधारी महायुतीमधील भाजप व शिवसेना हे दोन पक्ष ही निवडणूक एकत्रपणे लढत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःची वेगळी वाट निवडली आहे. महाविकास आघाडीतही असेच काहीसे चित्र आहे. विरोधी बाकावरील या आघाडीतील काँग्रेसने स्वबळ आजमावण्याची घोषणा केली आहे. तर ठाकरे गटाने मनसेला सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यांच्या गोटात मिळण्याची शक्यता आहे. या बातमीत आपण पाहूया भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व ठाकरे गटाने आतापर्यंत घोषित केलेले उमेदवार एकाच ठिकाणी... भाजपचे घोषित उमेदवार 1) वॉर्ड क्रमांक २ - तेजस्वी घोसाळकर 2) वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर 3) वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल 4) वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी 5) वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे 6) वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह 7) वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर 8) वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे 9) वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर 10) वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे 11) वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा 12) वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल 13) वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव 14) वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा 15) वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे 16) वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा 17) वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी 18) वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना 19) वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम 20) वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले 21) वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल 22) वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर 23) वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी 24) वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर 25) वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड 26) वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह 27) वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी 28) वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव 29) वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक 30) वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे 31) वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत 32) वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे 33) वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर 34) वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला 35) वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत 36) वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे 37) वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर 38) वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे 39) वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती 40) वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे 41) वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या 42) वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग 43) वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार 44) वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील 45) वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा 46) वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव 47) वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत 48) वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते 49) वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन 50) वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ 51) वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे 52) वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण53) वॉर्ड क्रमांक - १७२ - राजश्री शिरोडकर 54) वॉर्ड क्रमांक - १७४ - साक्षी कनोजिया 55) वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा 56) वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई 57) वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 58) वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत 59) वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे 60) वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील 61) वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले 62) वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर 63) वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप 64) वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित 65) वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर 66) वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर शिवसेना ठाकरे गटाचे घोषित उमेदवार १) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड४) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर५) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर६) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे७) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील८) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार१०) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू११) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे१२) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे१३) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने१४) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत१५) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी१६) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर१७) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान१८) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे१९) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत२०) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे२१) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री२२) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर२३) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे२४) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत२५) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर२६) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव२७) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे२८) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे२९) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख३०) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार३१) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले३२) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील३३) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे३४) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते३५) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू३६) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे३७) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर३८) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे३९) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे४०) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे४१) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे४२) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर४३) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर४४) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर४५) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले४६) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके४७) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे४८) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड४९) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ५०) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे५१) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर५२) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ५३) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर५४) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर५५) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे घोषित उमेदवार १) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३) २) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),४) बबन रामचंद्र मदने (७६)५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)६) सचिन तांबे (९३)७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६)८) सज्जू मलिक (१०९)९)शोभा रत्नाकर जाधव (११३)१०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५)११) अक्षय मोहन पवार (१३५)१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)१३) रचना रविंद्र गवस (१४३)१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)१५) सोमू चंदू पवार (१४८)१६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५)१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)१८) दिशा अमित मोरे (१७१)१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)२०) विलास दगडू घुले (४०)२१) अजय विचारे (५७)२२) हदिया फैजल कुरेशी (६४)२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)२५) अमित अंकुश पाटील (९५)२६) धनंजय पिसाळ (१११)२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)२८) नागरत्न बनकर (१३९)२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)३१) अंकिता संदीप द्रवे (१४७)३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)३३) डॉ. सईदा खान (१६८)३४) बुशरा परवीन मलिक (१७०)३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५)३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)३७) श्रीम. फरीन खान (१९७) या उमेदवारांचा समावेश आहे.
सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू
सांगली : प्रतिनिधी सांगली जिल्ह्यात एका कंपनीच्या सेप्टिक टँकमध्ये गुदमरून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अडकलेल्या तिघांना वाचवायला गेलेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे. प्रकृती गंभीर असलेल्या पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये पेठ येतील गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या सेप्टिक टँक […] The post सेप्टिक टँकमध्ये गुदमरून ३ कामगारांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोलीत पुढील महिन्यात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनास राज्यभरातील हजारो वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी रविवारी ता. २८ येथे दिली आहे. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी ता. २८ पार पडली. सदरील बैठकीत महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनाच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला. त्यानंतर पवार यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना हि राज्यातील वृत्तपत्र विक्रेतयांची एकमेव शिखर संघटना आहे. या संघटनेचे हिंगोलीत होणारे राज्यस्तरीय दुसरे अधिवेशन असून यासाठी राज्यभरातून मुंबई विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पुर्व व पश्चिम विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील वृत्तपत्र विक्रेता बांधवांना मेहनतीचे फळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. तेंव्हा सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी बांधवांनी ताकदीने कामाला लागले पाहिजे असे पवार यांनी यावेळी सांगितले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप पाचमासे यांनी कामांचा आढावा मांडला. तसेच जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हलवाई यांनी दररोज होणा-या बैठका त्यामध्ये कशाप्रकारे तयारी चालू आहे त्याची माहिती दिली. नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, बांबू जल्देवार, परभणीचे राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्यकारीणी सदस्य किरण क्षीरसागर, मनोज कटकुरी यांनी सुध्दा आपले अनुभव व काही सुचना केल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अधिवेशनाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या बैठकीस हरिश किर्तीवार, माणिक पंडीत, काशिनाथ कदम, गजानन तळवणकर, शेख शकील शेख बशीर, सुभाष अपुर्वा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईनंतर ठाणे महापालिकेकडेही विशेष लक्ष असणार आहे. ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसे असे एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. मनसेणे 24 जागांवरील उमेदवारांना रविवारी रात्रीच एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. यातील आता 7 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. ठाण्यात मनसेने आपली सक्रियता वाढवली असून, रविवारी रात्री उशिरा जिल्हा सचिव नैनेश पाटणकर यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना 'एबी' फॉर्मचे वाटप करण्यात आले. ठाण्यात मनसे आणि ठाकरे गटाची ताकद मोठी असल्याने, या निवडणुकीत 'ब्रँड ठाकरे' भाजप आणि शिंदे गटाच्या वर्चस्वाला धक्का देण्यात यशस्वी ठरणार का, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पक्षाने अनेक नवीन चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे धोरण स्वीकारले असून, आतापर्यंत 24 उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत, तर उर्वरित 10 ते 12 इच्छुकांना आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सोपवले जाणार आहेत. ठाण्यातील मनसे उमेदवारांची नावे: रवींद्र मोरे- (प्रभाग क्रमांक 2)नीलेश चव्हाण- (प्रभाग क्रमांक 3)पुष्कर विचारे- (प्रभाग क्रमांक 5) सचिन कुरेल- (प्रभाग क्रमांक 8)सविता मनोहर चव्हाण- (प्रभाग क्रमांक 20) संगीता जोशी- (प्रभाग क्रमांक 21)रश्मी सावंत- (प्रभाग क्रमांक 16) 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व ठाणे महानगरपालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली होती, ज्यात त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेने 67 जागा जिंकून महापालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. या निवडणुकीत 34 जागांसह राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळवले होते, तर भाजपला केवळ 23 जागांवर विजय मिळवता आल्याने त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे. या निर्णयानुसार, काँग्रेस सर्वाधिक 129 जागांवर निवडणूक लढवणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अनुक्रमे 12 व 10 जागा सोडण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या 3 जागांवर तुतारीचे उमेदवार लढणार आहेत. याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार प्रकाश गजभिये, शेखर सावरबांधे, ठाकरे गटाचे लोकसभा प्रमुख सतीश हरडे, जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, किशोर कुमेरिया, काँग्रेस आमदार अभिजित वंजारी, गिरीश पांडव, बंटी शेळके, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, शेख हुसैन आदी नेते उपस्थित होते. शरद पवार गटाची 12 जागांवर तडजोड प्रस्तुत बैठकीत राष्ट्रवादीने 24 जागांची मागणी केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 4 जागा पक्षाला सोडल्या जाव्यात असा आग्रह त्यांनी धरला. पण काँग्रेस नेते 10 जागांच्या पुढे सरकण्यास तयार नव्हते. यावेळी दोन्ही पक्षांनी आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण हा तिढा सुटत नव्हता. शेवटी ही चर्चा थांबून हे पक्ष स्वबळाच्या दिशेने जातात की काय? अशी स्थिती निर्माण झाली. पण ऐनवेळी 12 जागांवर तडजोड झाली आणि मुद्दा निकाली झाला. शरद पवार गटाला आणखी झुकते माप देत काँग्रेसने आपल्या 3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार लढतील असा तोडगा या प्रकरणी काढण्यात आला. ठाकरे गटाने मागितल्या 30 जागा, पण मिळाल्या 10 दुसरीकडे, ठाकरे गटाने काँग्रेसकडे 30 जागांची मागणी केली. पण त्यांना अवघ्या 10 जागा सोडण्यात आल्या. दुनेश्वर पेठे यांनी याविषयी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले, आम्ही जास्त जागा मागितल्या, पण काँग्रेसने 10 हून अधिक जागा सोडता येणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका घेतली. त्यानंतर विधानसभानिहाय जागांवर चर्चा झाली. त्यात अखेरीस 10 जागा देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली. अखेर आम्ही त्यावर तयार झालो. काँग्रेस उद्या करणार एबी फॉर्मचे वाटप नागपुरात काँग्रेसचे चांगले प्राबल्य आहे. त्यामुळे इथे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. परिणामी, इथे बंडखोरीची शक्यताही तेवढीच जास्त आहे. काँग्रेसने येथील आपले जवळपास 25 टक्के उमेदवार निश्चित केले आहेत. पण बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केली नाहीत. ही नावे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवारी घोषित केली जातील. त्यानंतर उमेदवारांना किंवा झोनल निवडणूक कार्यालयांतील निवडणूक अधिकाऱ्यांकडे एबी फॉर्म पोहोचवले जातील, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे. हे ही वाचा... राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अखेर एकत्र:पुणे, पिंपरी चिंचवड मनपा एकत्र लढवणार -रोहित पवार; कुणाला किती जागा? हे गुलदस्त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहोर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
समृद्धी महामार्गावर राज्यमंत्री जाधव यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर
वाशिम : प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील मालेगावनजीक ही घटना घडली. कारने ट्रकला जोरदार धडक दिली. हा अपघात झाला तेव्हा मंत्री कारमध्ये नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस या अपघाताचा तपास करत […] The post समृद्धी महामार्गावर राज्यमंत्री जाधव यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिकेच्या मुद्यावरून अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच ही महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पण आता ठाकरे गटातच तिकीट वाटपावरून जोरदार राडा सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आमदार अनिल परब व आमदार वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. त्यानंतर परब रागारागाने बैठकीतून निघून गेले. त्यामुळे आता ठाकरे गटात सर्वकाही ठिकठाक आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. रविवारी रात्री सर्व उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्म देण्यात आले. त्यानंतर आजही या फॉर्मचे वाटप करण्यात येत आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हे काम आजच आटोपून उद्या उमेदवारांना आपला अर्ज भरता येईल. पण आता एबी फॉर्म देण्याच्या मुद्यावरून ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांत जोरदार खडाजंगी रंगत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांतच ही वादावादी सुरू झाल्यामुळे पक्ष पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे. प्रभाग क्रमांक 95 वरून मतभेद यासंबंधीच्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 95 मधील उमेदवारीवरून अनिल परब व वरुण सरदेसाई यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या प्रभागातून अनिल परब यांचे निकटवर्तीय शेखर वैंगणकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती होती. पण ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हरी शास्त्री हे स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांच्या गोटातील आहेत. त्यामुळे इथे त्यांच्या निकटवर्तीय नेत्याला प्राधान्य देण्यात आले. यामुळे अनिल परब नाराज झाले. अनिल परबांनी नाराजी व्यक्त करत सोडली बैठक अनिल परब यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली. त्यानंतर लगेचच बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री 2.30 वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीकांत सरमळकर हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. त्यांचा या प्रभागात चांगला प्रभाव आहे. पण अनिल परब यांनी त्यांचे जावई हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. पण सरदेसाई यांनी शास्त्री यांची बाजू घेतली. त्यावरून दोघांत तीव्र मतभेद झाले. त्यानंतर ते तडक मातोश्रीवरून निघून गेले. वादाच्या ठिकाणी एबी फॉर्मचे वाटप रोखले उल्लेखनीय बाब म्हणजे अनिल परब हे विधान परिषदेचे आमदार आहेत. तर वरुण सरदेसाई हे वांद्र्याचे आमदार आहेत. हे दोन्ही नेते ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यातही वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे बंधू लागतात. पण आता या नेत्यांमधील मतभेदांचा फटका या वॉर्डातील ठाकरे गटाच्या ताकदीला बसण्याची भीती व्यक्त केली आहे. यावर उपाय म्हणून ठाकरे गटाने वादाच्या ठिकाणी एबी फॉर्मचे वाटप करणे थांबवले आहे. हे ही वाचा... राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अखेर एकत्र:पुणे, पिंपरी चिंचवड मनपा एकत्र लढवणार -रोहित पवार; कुणाला किती जागा? हे गुलदस्त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहोर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शेवटपर्यंत महाविकास आघाडीशी चर्चा केली. पण त्यानंतर त्यांनी आम्हाला धोका देत अजित पवारांशी हातमिळवणी केली, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हातमिळवणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या प्रकरणी शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांना गृहीत धरले होते. आमच्या मागील 3-4 महिन्यांत अनेक बैठकाही झाल्या. त्यात पिंपरी चिंचवड निवडणूक मिळवून लढवण्याचा निर्णय झाला. पण अचानक त्यांनी अजित पवारांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय महाविकास आघाडीसाठी धक्काच आहे, असे ते म्हणाले. अजित पवारांशी घरोबा करत केली फसवणूक महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात आहे तशी ती पिंपरी चिंचवडमध्येही असावी अशी आमची ठाम भूमिका होती. त्यानुसार जागावाटपावर चर्चाही झाली होती. पण दुर्दैवाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या. आमची फसवणूक झाली. त्यांनी आमच्याशी शेवटपर्यंत चर्चा केली. त्यानंतर अजित पवारांशी घरोबा करत आमची फसवणूक केली. महाविकास आघाडीचा प्लॅन A फोल ठरला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाला वगळून प्लॅन B तयार केला जात आहे, असे चाबुकस्वार म्हणाले. भाजप - शिवसेना युतीची घोषणाही रखडली दुसरीकडे, पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजप व शिवसेनेची युतीही रखडली आहे. असे असले तरी दुसरीकडे, भाजपचे 128 जागांचे सर्व एबी फॉर्म प्रदेश कार्यालयात पोहोचले आहेत. भाजपने याला दुजोरा दिला आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांत जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे इथे युती तुटली तर भाजप व आठवलेंची रिपाइं एकत्र लढणार आहे. विशेषतः या प्रकरणी शिंदे गटाने अधिक जागांची मागणी केली तर भाजपने सर्व 128 जागांचे एबी फॉर्मही तयार ठेवलेत. त्याची माहिती त्यांनी शिवसेनेलाही दिली आहे. हे ही वाचा... राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट अखेर एकत्र:पुणे, पिंपरी चिंचवड मनपा एकत्र लढवणार -रोहित पवार; कुणाला किती जागा? हे गुलदस्त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहोर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, गेल्या 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मनसे युतीमध्ये निवडणूक लढवत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करणे आणि मराठी माणसाचा स्वाभिमान जपणे हेच पक्षाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगतानाच, राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना 'युती धर्म' पाळण्याचे आणि विजयासाठी झोकून देऊन काम करण्याचे आदेश दिल्याचे नांदगावकर यांनी यावेळी नमूद केले. मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, देशासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी विशेषतः मराठी माणसांसाठी मुंबई खूप महत्त्वाची आहे. निवडणुका येतात आणि जातात. पण जे काही लोकांचे स्वप्न आहे, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, त्यानुसार त्यांनी प्लॅनिंग सुरू केले आहे. बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत, मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे आणि त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त करायचे आहे. ही मुंबई आपली आहे, महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे. साहेब नेहमी बोलतात, भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्याला ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. झोकून देऊन काम करा, राज ठाकरेंच्या सूचना पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, काही जागा येतात काही जागा जातात, काही लोकांना वाईट वाटले असेल. गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच युतीमध्ये लढत आहोत. त्यामुळे युती धर्मही पाळायचा आहे आणि प्रत्येक जागा आपल्याला महत्त्वाची आहे. रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे झोकून देऊन काम करायचे आहे, अशा सूचना राज साहेबांनी दिल्या आहेत. तसेच जिथे शिवसेनेचे उमेदवारी अर्ज भरत असतील, आपल्याला तिथे देखील सहभागी व्हायचे आहे, असा संदेश साहेबांनी दिला आहे. आज एबीफॉर्म दिले जाणार आज एबीफॉर्म दिले जाणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. तसेच किती जागा आम्ही लढवणार आहोत हे फॉर्म आल्यावरच समजेल. आत्तापर्यंत आमच्या पक्षाने 20 वर्षात स्वतंत्र निवडणुका लढवल्या आहेत. आम्ही कधीही युती, आघाडीमध्ये गेलो नाही. ही पहिली निवडणूक आहे, ज्यात आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवत आहोत. युतीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुभव आम्हाला नाही, यात काही जागा इकडे तिकडे होतात. त्यामुळे नाराजी होऊ शकते. पण ही एकच निवडणूक नाही, वारंवार निवडणुका ठाकरे बंधू लढवणार आहेत आणि सगळ्यांना संधी दिली जाईल, अशी ग्वाही नांदगावकर यांनी दिली आहे. मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर भाजप माज करत आहे- राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना देताना राज ठाकरे म्हणाले, इतकी वर्षे आपण सत्तेविना राहिलो पण आपल्या पक्षाचा दबदबा कमी झालेला नाही. आज भाजपकडे नरेंद्र मोदी आणि ईव्हीएम आहे, या जीवावर ते माज करत आहेत. अशाप्रकारे सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाच्या इतिहासात अनेकदा आले आहेत. अनेकांना वाटते की भाजपमध्ये गेले तर फायदा होईल. पण भाजपमधील लोकांवर टांगती तलवार आहे. ही सगळी बसवलेली माणसे आहेत.
नाशिक : दुपारी ४ वाजता मंगलाष्टक वाजण्यापूर्वीच नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी १० वाजता गंगापूरोडवरील एका रिसोर्टमध्ये घडल्याचे उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपक्षिका गोडबोले (२८) असे या नवधूची नाव आहे. या घटनेमुळे लग्नाआधीच आनंदाचा सोहळा अंत्ययात्रेत बदलला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिसॉर्टमधील खोलीत नववधू बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तत्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. लग्नास आलेल्या पाहुण्यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. वधूचे पिता ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. वधूच्या मृत्यूची बातमी समजताच बांधकाम व्यावसायिक, वकील, न्यायाधीश व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गोडबोलेंचे सांत्वन केले. वधूच्या हातावरील मेहंदी बघून नातेवाई अश्रू अनावर वधूच्या हातावर रंगलेली मेहंदी बघून नातेवाइकांचे अश्रू अनावर झाले. लग्न अवघ्या काही तासात होणार असल्याने आनंदाचे वातावरण होते. त्यासाठी आलेल्या नातेवाईकांना लग्न मंडपाऐव स्मशानभूमीत जावे लागले. नाशिक: उभ्या ट्रकला कारची धडक; ३ वर्षांच्या मुलीसह कुटुंब गंभीर रस्त्याच्या कडेला धोकादायक उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ वर्षाच्या मुलीसह कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. ९ वा मैल महामार्गावर हा अपघात घडला. आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश मुळे (रा. जेलरोड) यांनी तक्रार दिली. उपेंद्र गवळी, पत्नी रेश्मा, मुलगी मोहिनी (८) चैताली (३) यांना घेऊन कारमध्ये घेऊन देवदर्शन आटोपून महामार्गाने नाशिककडे येत असताना ९ वा मैल अमृत पंजाब ढाबासमोर रस्त्यावर ट्रक (एमएच १८ बी.जी.८९६८) असुरक्षितपणे अंधारात उभा केलेला होता. कार चालकाला उभा ट्रक न दिसल्याने कार ट्रकला धडकल्याने कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेले गवळी यांची लहान मुलगी चैताली हिच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. रेश्मा यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. चालक मुळे आणि गवळी यांना किरकोळ दुखापत झाली. इनसाइड: धोकादायक पार्किंग महामार्गावर अवजड वाहने पार्किंग लाइट न लावता असुरक्षितपणे उभे राहतात. नियम न पाळता वाहने उभी केली जातात. जुना ओझर जकात नाका ते ट्रक टर्मिनल पर्यंत ट्रक महामार्गावर कडेला उभ्या केलेल्या दिसून येतात.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेने ठाकरे गटाने आपली कंबर कसली असून, रविवारी रात्रीपासून उमेदवारांना 'एबी' फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः 'मातोश्री' निवासस्थानी बोलावून अनेक उमेदवारांच्या हातात उमेदवारीचा अधिकृत कौल दिला. विशेष म्हणजे, पक्षात संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी हे वाटप अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, त्यांना काल रात्री तातडीने 'मातोश्री'वर पाचारण करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या हातात 'एबी' फॉर्म सुपूर्द केले. काही उमेदवारांना काल रात्रीच फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना आज सकाळी 11 वाजेनंतर बोलावण्यात आले आहे. कोणाला उमेदवारी दिली जात आहे, याची माहिती बाहेर पडू नये यासाठी प्रचंड खबरदारी घेतली जात असून, पक्ष कार्यालयाकडूनही याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी होणारी बंडखोरी आणि नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेने ही विशेष रणनीती आखली आहे. अधिकृत यादी जाहीर करण्यापूर्वीच 'एबी' फॉर्म देऊन उमेदवारांना तातडीने अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करतील, जेणेकरून बंडखोरांना संघटित होण्यास वेळ मिळणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली अधिकृत उमेदवारांची यादी आजच जाहीर होण्याची शक्यता असून, यात संभाव्य नावे समोर आली आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी प्रभाग क्र. ५४- अंकित प्रभू प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे प्रभाग क्र. ६०- मेघना विशाल काकडे माने प्रभाग क्र. ६१- सेजल दयानंद सावंतप्रभाग क्र. ६२- झीशान चंगेज मुलतानी प्रभाग क्र. ६३- देवेंद्र (बाळा) आंबेरकर प्रभाग क्र. ६४- सबा हारून खानप्रभाग क्र. ४०- सुहास वाडकर प्रभाग क्र. २०६- सचिन पडवळ प्रभाग क्र. ९३- रोहिणी कांबळेप्रभाग क्र. १००- साधना वरस्कर प्रभाग क्र. १५६- संजना संतोष कासले प्रभाग क्र. १६४- साईनाथ साधू कटके प्रभाग क्र. १६८- सुधीर खातू वार्ड प्रभाग क्र. १२४- सकीना शेखप्रभाग क्र.१२७- स्वरूपा पाटील प्रभाग क्र. ८९- गितेश राऊत प्रभाग क्र. १४१- विठ्ठल लोकरे प्रभाग क्र. १४२- सुनंदा लोकरे प्रभाग क्र. १३७- महादेव आंबेकरप्रभाग क्र. १३८- अर्जुन शिंदे प्रभाग क्र. १६७- सुवर्णा मोरे प्रभाग क्र. १५०- सुप्रदा फातर्फेकरप्रभाग क्र. ९५- चंद्रशेखर वायंगणकर प्रभाग क्र. २१५- किरण बालसराफ प्रभाग क्र. २१८- गीता अहिरेकर प्रभाग क्र. २२२- संपत ठाकूर प्रभाग क्र. २२५- अजिंक्य धात्रक
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत युती देखील केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यात काही कार्यकर्ते नाराज असल्याचे देखील समोर आले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पुण्यातील निर्णय दुपारपर्यंत होणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत म्हणाले, आम्ही कामाला लागलो आहोत. कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. जेव्हा दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्यात ज्यांचा जागा जातात, अशा सगळ्याच पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे इच्छुक असतात ते अस्वस्थ होणारच. मग ते कोणत्याही पक्षातले असोत, त्यामुळेच अजित पवार वेगळे लढत आहेत. संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात आमच्या पक्षातले लोक रस्त्यावर आले नाहीत, जसे शिंदे गटात दिसत आहे. जे नाराज असतील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू बंडाची नाराजी कशी दूर करणार, या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे कशाचे बंड आहे? देशासाठी, क्रांतीसाठी बंड आहे का? नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. ज्या पक्षाने आपल्याला इतकी वर्षे सगळे काही दिले आहे. एखाद्या वेळी एखादा पक्ष नाही देऊ शकत. याला बंड म्हणता येत नाही. तसेच जे नाराज असतील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. शिंदे गट म्हणते आम्ही बंड केले, कसला? जाऊन भाजपचे बूटच चाटत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. आम्ही सगळेच स्टार प्रचारक अनेक नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अंकित प्रभू गेली अनेक वर्षे काम करत आहे. तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर हा पक्ष पुढे जाणार कसा? आमच्या पिढीने मागे राहून तरुणांना संधी दिली पाहिजे. तसेच स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली नाही, त्यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही सगळेच स्टार प्रचारक आहोत, आम्ही यादी जाहीर करत नाही. वंचित आणि कॉंग्रेसच्या युतीवर प्रतिक्रिया पुढे बोलताना वंचित आणि कॉंग्रेसच्या युतीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही या युतीचे स्वागत केले आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी, ते आमच्यासोबत आले नाही. ठीक आहे. आज कॉंग्रेस आणि वंचित एकत्र येऊन भाजपच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही स्वागत करू. तसेच आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटासाठी जागा सोडल्या आहेत. तसेच त्यांना ज्या जागा पाहिजे होत्या त्यातल्या अनेक जागा आम्ही सोडल्या आहेत. शरद पवारांनीच गौतम अदानीला उद्योजक बनवले गौतम अदानी यांनी शरद पवार यांना आपले गुरु असे म्हटले होते. तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील गौतम अदानी हे भावा सारखे असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हा प्रश्न नव्याने विचारात आहात का आपण? यात नवीन काय आहे? ज्यांनी शरद पवारांचे आत्मचरित्र वाचले आहे, त्यात ब्लॅक अँड व्हाइट आहे. शरद पवारांनीच गौतम अदानीला उद्योजक बनवले आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. परंतु, गौतम अदानी यांच्यासोबत आमची मुंबई संदर्भातली नैतिक लढाई सुरूच राहील. ज्या पद्धतीने मुंबईचा घास गिळण्याचे काम भाजप अदानीच्या मदतीने करत आहेत, आम्ही त्याच्या विरोधात आमचा लढा कायम ठेऊ, तुमच्या सोबत किंवा तुमच्याशिवाय, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहोर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सध्या वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे समीकरण तयार होत आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात काही गोष्टी पटत नाही अशी चर्चा आहे. पण नाशिकमध्ये या दोघांचेही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्या - त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढावे लागते. आज महापालिकेची निवडणूक आहे. त्यात विलिनीकरणाचा विषयअसता तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात युती केली असती. पण असे काही झाले नाही. फक्त पुणे व पिंपरी चिंचवड येथे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. शरद पवार या विषयात कुठेच नाहीत. त्यांचे मत एवढेच आहे की, जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या. त्यांचे म्हणणे काय? हे समजून घ्या. महापालिकेत कधीही एवढ्या मोठ्या पातळीवरचे नेते कधीही इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते. शरद पवारांना पूर्वीच्या काळची सवय असल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे सांगितले. त्यानुसार, वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे समीकरण आपल्याला पहावयास मिळत आहे. पण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ व तुतारी आपल्याला एकत्र लढताना दिसून येतील. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...
आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात रविवारी दुपारीघटस्थापना करून तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. ३ जानेवारीपर्यंत ७दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या शेवटी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी १२ वाजता होमकुंडात पूर्णाहुती देण्यात येणार आहे. तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवारी दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली मंचकी निद्रा संपवूनरविवारी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावरप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर लगेच मातेच्यापंचामृत अभिषेक पुजेस प्रारंभ करण्यात आला. तर रात्री उशिरा छबिना मिरवणूक काढण्यात आली. उद्या मुरली अलंकार पूजा ४ दिवसांत ८ लाख भाविक यावर्षी नाताळात भाविकांच्या गर्दीत वाढझाली असून गुरूवारपासून (दि. २५)रविवारपर्यंत (दि. २८) तब्बल ८ लाखभाविकांनी तीर्थक्षेत्र तुळजापुरात हजेरीलावली. दरम्यान, भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळेप्रशासनाचे नियोजन बिघडले आहे. विशेषम्हणजे यावेळी पहिल्यांदाच नाताळातमहाद्वार बंद करत भाविकांना कुंभार गल्लीमार्गे मंदिरात सोडण्यात आले होते. यजमानपद उपाध्ये मंडळालाधर्मादाय आयुक्तांचा निर्देशानुसारशाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमानपदरोटेशन पध्दतीने देण्यात येत असून, यावर्षी यजमान पदाचा मान उपाध्येमंडळाला असणार आहे. उपाध्येमंडळाच्या वतीने यजमान पदासाठीउल्हास कागदे यांचा नावाची मंदिराकडेशिफारस करण्यात आली. त्यांच्याहस्तेसर्व पुजा विधी करण्यात येत आहेत. प्रत्येक घरात घटस्थापना : मंदिरातील घटस्थापनेनंतर शाकंभरी नवरात्रमहोत्सवानिमित्त तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली. शाकंभरी नवरात्र वशारदिय नवरात्र महोत्सव अशा दोन वेळा घटस्थापना करण्याची प्रथा आहे. दोन्ही नवरात्रातउपवास धरण्यात येत असून पोर्णिमेला घट उठल्यावर उपवास सोडण्यात येतात. यजमान कागदे यांनी निंबाळकर दरवाजातून घटकलश आणला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठे भगदाड पडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत पक्षाचा किल्ला एकहाती लढवणाऱ्या आणि मुंबई जिल्हा अध्यक्षा राखी जाधव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार गटाच्या वाट्याला केवळ 5 ते 10 जागा आल्याने जाधव या प्रचंड नाराज असून, या नाराजीतूनच त्यांनी तुतारी सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात संघटनात्मक बांधणी करण्यात राखी जाधव यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ठाकरे गटासोबतच्या युतीत पक्षाला अत्यंत कमी जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. मिळालेल्या माहितीनुसार, जागा कमी असल्याने पक्षातील इच्छुकांना थेट अजित पवार गटात जाऊन निवडणूक लढवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या. पक्ष कार्यालयातूनच तसे फोन गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आपल्याच कार्यकर्त्यांची दुसऱ्या पक्षात पाठवणी कशासाठी? असा सवाल करत राखी जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर राखी जाधव यांच्यापूर्वीच शरद पवार गटातील अनेक महत्त्वाच्या शिलेदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामध्ये माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, यामिनीबेन पंचाल, नितीन देशमुख आणि अशोक पांचाल यांसारख्या बड्या नावांचा समावेश आहे. या गळतीमुळे आणि पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या राखी जाधव आता सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यांना घाटकोपरमधील त्यांच्याच वॉर्डमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत ऐनवेळी जिल्हा अध्यक्षांनीच साथ सोडल्याने मुंबईत शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची अजित पवार गटाकडे होणारी पाठवणी आणि आता मुख्य नेतृत्वानेच भाजपची वाट धरल्याने, मुंबईतील पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचा समारोप रविवारी झाला. समारोपीय सत्रात ‘सारा भारत रहे सिपाई’ या विषयावर युवक-युवती संमेलन पार पडले. राष्ट्रसंतांच्या विचारातून सर्वांगीण विकास शक्य आहे, असा सूर संमेलनातून उमटला. समाज व राष्ट्र बदलण्याची अभूतपूर्व शक्ती ही युवा विश्वात समाविष्ट आहे. युवक हे देशाचे भक्कम आधारस्तंभ असून, देशाला विलक्षण कलाटणी देण्याचे सामर्थ्य या युवाशक्तीत आहे. मात्र आजची प्रचलित युवाशक्ती ही भरकटलेली असून दिशाहीन होत आहे. अशा युवाशक्तीला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सारख्या तत्त्ववेत्त्यांची खरी आवश्यकता असून, ही गरज अशा वैचारिक महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. गत १७ वर्षांपासून महानगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करत वैचारिक प्रबोधन करणाऱ्या पुण्यस्मरण महोत्सवाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे शनिवारी प्रारंभ झाला होता. महोत्सव सिव्हिल लाइन परिसरातील जि.प. कर्मचारी भवनात झाला. सचिन बुरघाटे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या संमेलनात पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर महाराज वाघ, प्रा. नितीन बाठे, धनंजय मिश्रा, प्रा. ममता इंगोले, उज्वला देशमुख, शिवाजी ठाकरे, प्रा. स्वप्निल इंगोले, डॉ. आरतीलता देशमुख, समितीचे अध्यक्ष शिवाजीराव म्हैसने, कार्याध्यक्ष अॅड. संतोष भोरे, डॉ. दीपाली सोसे आदी उपस्थित होते. युवा वक्त्यांनी राष्ट्रसंतांच्या वैचारिक प्रबोधनाचा आपल्या वक्तव्यात उहापोह करत युवाशक्तीवर विचार व्यक्त केले. युवक संमेलनाचे संचालन पवन गवळी यांनी तर आभार संयोजक शुभम वरणकार यांनी मानले. किती जगला यापेक्षा कसा जगाला हे महत्त्वाचे, मात्र यापेक्षाही मृत्यूनंतर किती दिवस जगाच्या स्मरणात राहिलो, हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ म्हणाले. खऱ्या अर्थाने संत समाजाला जगवतात. संतच समाजाला कर्तव्याची जाणीव करून देतात, असेही महाराज म्हणाले. प्रा. स्वप्निल इंगोले यांनी कास्तकारांच्या आत्महत्येबाबत विचार व्यक्त केले. राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेत कृषी नीतीचा मोठ्या प्रमाणात उहापोह केला आहे. हा देश केवळ मातीचा तुकडा नसून याच्यासाठी आम्ही मरण्यासाठी तयार असल्याचे महाराज सांगतात. तरुणांना सशक्त विचार देण्यासाठी असे युवक युवती संमेलन ही काळाची गरज असल्याचे प्रा. इंगोले म्हणाले. आदर्श भाव हा संपूर्ण जीवनात जैसे थे राहिला पाहिजे यासाठी, अशा महोत्सवाची खरी गरज आहे, असे अध्यक्षीय मनोगतात शिक्षण तज्ज्ञ सचिन बुरघाटे म्हणाले. युवकांनी अशा कार्याची इतरांना जाणीव करून देणे हेच युवाशक्तीचे प्रथम कार्य आहे. येणाऱ्या पिढीसमोर हाच आदर्श निर्माण झाला पाहिजे. सध्या सर्वात जवळ मोबाईल फोन असून, कोणीच एकमेकांसोबत संवाद साधत नाही. कुटुंब व्यवस्था मर्यादित व घेरबंद होत आहे. परिवार हा कमजोर होत आहे. राष्ट्रसंतांनी सर्वांच्या कल्याण व सन्मान करण्याचे शिकवले असून या शिकवणीची युवकांनी कास धरून इतरांसमोर नवा आदर्श यांचा पायंडा निर्माण केला पाहिजे, असेही ते म्हणाले. संतांची महिमा विशद करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी संत असल्याचे सांगितले शेतकरी नेते प्रकाश पोहरे म्हणाले. कर्जबाजारी कास्तकार व कृषी क्षेत्राच्या पीछेहाटीमागे अनेक कारणे आहेत. मोडकळीस आलेल्या कास्तकारीला जीवनावश्यक वस्तूचा कायदा कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीता ग्रामव्यवस्थेच्या बदलाचे अनेक संकेत दिले आहेत. ग्राम व्यवस्था हे सुरळीत राहिली पाहिजे. यासाठी ग्रामीण क्षेत्रात ग्राम गीतेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. असा झाला समारोप : मौन श्रद्धांजली कार्यक्रमात राष्ट्रसंत भक्तांनी राष्ट्रसंतांना सामूहिक श्रद्धांजली गीत रूपाने वाहली.रात्री संदीपपाल महाराज व रामपाल महाजन यांचा कीर्तन कार्यक्रम होऊन दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप करण्यात आला. ग्रामीण व्यवस्था जैसे थेच : खेडेकर युवक युवती संमेलनात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर तथा अशोक पटोकार हेही सहभागी झाले. खेडेकर म्हणाले कि, इतकी वर्ष होऊनही ग्रामीण व्यवस्था ही बदललेली नाही. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत अभिप्रेत असलेले विचार वास्तविक आचरणात आणणे खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. राष्ट्रसंतांच्या नावाने विद्यापीठ होतात पण वैचारिक अधिष्ठान युवकांमध्ये होत नाही यावर युवकांनी विचार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
एकीकडे शिवणी विमानतळाच्या रुंदीकरणाला गती मिळाली असून, दुसरीकडे आता शहरात वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे रोजगारासह अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे. आगामी वर्षात हे मुद्दे मार्गी लागणार असून, तरुणाईला त्यांच्या कौशल्यानुसार संधी उपलब्ध होणार आहे. विमानतळ िवस्तारीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रखडला आहे. िवस्तारीणाबाबत स्थानिक प्रशासन-शासन स्तरावर बैठका झाल्या. विधिमंडळाच्या अनेक अधिवेशानांमध्येही लोकप्रतिनिधींकडून चर्चा घडवून आणली. काहींनी सवालही उपस्थित केले होते. मात्र तरीही हा मुद्दा मार्गी लागला नाही. पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी महत्त्वाचे असलेल्या या विमानतळाच्या धावपट्टीचा मुद्दा एक दशकापेाही जास्त वर्षांपासून रखडला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी निधी मंजूर कण्यासह भूसंपादचा मार्गही मोकळा झाला. आता अकोल्यात पायलट ट्रेनिंग सेंटरही मंजूर झाले असून, याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. विमान पायलट प्रशिक्षण केंद्रासाठी भाजपकडून अकोल्यातून मुख्यमंत्री व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. केंद्र मंजूर झाल्याने विदर्भाच्या पश्चिम विदर्भाच्या युवकांना अकोल्यातच दर्जेदार वैमानिक प्रशिक्षणाची सोय होणार आहे. ट्रेनिंगसाठी अकोल्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, चेन्नई अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. तसेच अकोल्याचा विकासाला चालना मिळणार आहे. याकडे तरुणाईचे लक्ष शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले भूसंपादन आदेशात आदेश सामान्य प्रशासन विभागाने काही महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या. धावपट्टीच्या विस्तारासाठी अतिरिक्त २२.२४ हेक्टर आर क्षेत्र संपादित करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस भूसंपादन संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या जागेच्या संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले होते. आता पायलट ट्रेनिंगसाठी कोठे जागा मंजूर होते व पुढील प्रक्रिया केव्हा सुरू होते, याकडे तरुणाईचे लक्ष लागले आहे.
संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या जीवनातून स्वच्छता, समाजसेवा आणि मानवतावाद यांचा आदर्श घालून दिला. गावोगावी जाऊन त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि दारू, अंधश्रद्धा व सामाजिक दुर्गुणांविरुद्ध जनजागृती केली. भिक्षेतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी धर्मशाळा, शाळा, रस्ते व विहिरी उभारण्याचे कार्य केले. कर्मकांडाला विरोध करून त्यांनी माणुसकी, समता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. समाजातील उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी अविरतपणे कार्य केले. स्वच्छता, समाजसेवा आणि समतेचा संदेश देणारे गाडगेबाबांचे कार्य आजच्या समाजासाठी, तरुण पिढीसाठी आणि विषेशतः विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावतीचे सीईओ प्रा. पी. आर. एस. राव यांनी केले.ते तक्षशिला विधी महाविद्यालय येथे संत गाडगेबाबा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्याम तंतरपाळे, तर अतिथी म्हणून, प्रा. डॉ. राजेश देशमुख, प्रा. ॲड. विशाखा सोनटक्के, प्रा. ॲड. भारत ढोके, ॲड. हरीश निंभाळकर, ॲड. उज्वल सोनवणे, प्रा. स्वप्नील मानकर , प्रा. मेघा चिमणकर, प्रा. ज्योती टाले, प्रा. राधा काळे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश म्हस्के, सहा प्रा. दीपाली पडोळे, प्रा. डॉ. अंभोरे , प्रा. डॉ. खेडकर, प्रा. डॉ. शुद्द्धोधन कांबळे , प्रा. दीपाली गवई आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. राव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे दोघेही राष्ट्राच्या समाज सुधारणेच्या परंपरेतील महत्त्वाचे समन्वयी व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांनी सामाजिक समता, मानवाधिकार, शिक्षण आणि संविधानिक मार्गाने अन्यायाविरुद्ध संघर्ष केला, तर गाडगेबाबांनी स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि करुणेच्या मूल्यांद्वारे समाजजागृती घडवली. बाबासाहेबांचा विचार बौद्धिक व संघटनात्मक पातळीवर क्रांती घडवणारा होता, तर गाडगे बाबांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यामुळे विचारांची दिशा वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच असल्याने बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यात वैचारिक व कृतीशील समन्वय स्पष्टपणे दिसून येतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी ही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी, शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व सहकारी आदींनी परिश्रम घेतले. अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यास सक्रिय भूमिका अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. तंतरपाळे म्हणाले की,संत गाडगे बाबांचे विचार अत्यंत व्यवहार्य आणि समाजाभिमुख होते. त्यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, नैतिकता आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी समाजातील दु:ख, अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे ते मानत. सामाजिकतेच्या दृष्टीने शिक्षणाने माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि सेवाभाव विकसित झाला पाहिजे, हा गाडगेबाबांचा आग्रह होता. विद्यार्थी हा परिवर्तनाचा सक्रिय घटक असावा, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्ष पूर्ण व नियोजनशून्य कामकाजामुळे मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरपिंगळाई गावचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून थांबला आहे. अमरावतीला व्यवस्थित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नवी पाइपलाइन अंथरणे सुरु आहे. मात्र त्यामुळे काही ठिकाणी जुनी पाइपलाइन फुटली असून नेरपिंगळाईचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐनवेळी उद्भवलेल्या या संकटामुळे नेरपिंगळा वासियांना गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरपिंगळाई गावाची पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन पिंगळादेवी गड परिसरातून गावात येते. याच मार्गाच्या समांतर दिशेने सध्या अमरावतीकडे जाणारी नवीन मुख्य पाइपलाइन अंथरण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच ५० ते ६० वर्षांपूर्वीची नेरपिंगळाईची जुनी सिमेंटची पाइपलाइन वारंवार फुटत आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा वारंवार गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी विनोद मनवर म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अमरावती येथील अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता या दोन्ही अधिकाऱ्यांशी याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. पाइपलाइन सिमेंटची व अतिशय जुनी असल्याने ती निकामी होण्याची शक्यता त्यांना आधीच कळवण्यात आली होत. शिवाय ती बदलवून देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, प्राधिकरणाच्या विरोधामुळे सध्या केवळ लिकेज दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ती पाइपलाइन मजीप्रा कशी बदलणार ? पिंगळादेवी गडावरून नेरपिंगळाईपर्यंत पाणी पोहोचवणारी पाइपलाइन ही ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. त्यासाठीची पाणीपट्टी ही ग्रामपंचायतीलाच मिळते. त्यामुळे ते काम मजीप्रामार्फत करणे शक्य नाही. मजीप्राने सिंभोरा ते अमरावती या नव्या पाईपलाईनसाठी अमृत योजनेअंतर्गत निधी मिळविला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावात पिंगळादेवी गड ते नेरपिंगळाईपर्यंतची पाइपलाइन बदलवण्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे पिंगळादेवी गड ते नेरपिंगळाई गावादरम्यानच्या पाईपलाईनसाठीचा नवा प्रस्ताव तयार करुन त्यासाठी शासनाकडून निधी मिळवून घ्यावा लागणार आहे.
अडूळाबाजार जि.प. उर्दु शाळेत घेतला बोअरवेल:नितेश गावंडे यांचा कौतुकास्पद उपक्रम
तालुक्यातील अडूळा बाजार येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत उर्दु प्राथमिक शाळा कार्यरत आहे. येथील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती. शाळेत पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नेहमीच पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यावर उपाय म्हणून शाळेत बोअरवेल व्हावी. असे येथील मुख्याध्यापक शकील व शिक्षकांना वाटत होते. जैनपुर येथील युवा समाजसेवक नितेश गावंडे हे धावून आले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांनी आमदार गजानन लवटे यांच्या मार्गदर्शनात या शाळेत स्वखर्चाने बोअरवेल तयार करून दिली. यामुळे या लहान चिमुकल्यांची कायमची तहान भागली आहे. नितेश गावंडे यांच्या कार्याचे येथील गावकरी नागरिकांनी व पालकांनी कौतुक केले आहे. या बोअरवेल भूमिपूजन प्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख जगदीश मोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नरेंद कुंडलवाल, जिल्हा परिषद उर्दु शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुबारक पटेल, उपसरपंच रिजवान बेग, माजी सरपंच अश्फाक अली, ग्राम पंचायत सदस्य अयाझ खान, माजी तंटामुक्त अध्यक्ष हमीद खा, फिरोज अली, मेहमूद खा, मुख्याध्यापक अब्दुल शकील तसेच शिक्षक कैसर नियाजी, अब्दुल रफीक,रेहान अहमद, रकत अली, जाबीर शाह, मोहम्मद इम्रान ,रियाज खान, साबीर भाई, इरफान भाई, शामिउल्ला खा,अब्दुल हफीझ राजा, इर्शाद अली, अमोल मोरे, शाहरुख खान, दिलावर अली, अब्दुल मोहसीन, किरण रायबोले व गावकरी उपस्थित होते.
आजचा विद्यार्थी हा देशाच्या उज्वल भवितव्याचा आधार आहे. खेडगी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाल्याने त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सोलापूर सायन्स सेंटरचे माजी संचालक डॉ. व्यंकटेश गंभीर यांनी केले. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचालित सी.बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी सुभाष धरणे, संचालिका शोभाताई खेडगी, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, उपप्राचार्य वैदेही वैद्य, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, कार्यशाळेचे समन्वय श्रीकांत जिडीमनी उपस्थित होते. प्रारंभी उप प्राचार्य वैदेही वैद्य यांनी प्रास्ताविकातून विज्ञान कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणातून बोलताना संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी म्हणाले की, केंद्र सरकारच्या पीएम उषा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५ कोटी निधीपैकी १ कोटी १० लाख रुपये निधी विज्ञान प्रयोगशाळा आणि अक्कलकोट सारख्या सीमावर्ती ग्रामीण भागात केजी टू पीजी ज्ञानदान करणारी ही शिक्षण संस्था या तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल करणारी संस्था आहे. अशी कार्यशाळा भरवण्याचा मनोदय संस्थापकांच्या मनात आल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. या प्रात्यक्षिक कार्यशाळेतून अनेक विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या वाटा शोधता येतील, अशा कार्य शाळांमधूनच उद्याचे डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, संशोधक घडत असतात. असे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले यांनीही मनोगत व्यक्त केले. आणि साहित्यांच्या उपलब्धतेसाठी तरतूद केली आहे. सदर प्राप्त निधीचा उपयोग तालुक्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे, या हेतूने ही विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यास अक्कलकोट विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शंभूलिंग बशेट्टी, शहाजी प्रशालेचे एम. एम. साळुंखे, नसरीन तांबोळी, मंजूषा भोसले, उर्दू हायस्कूलचे फुरकान मणियार, म्हैसलगे हायस्कूलचे एच. डी. हळी, एस. एच. बिराजदार आदींसह तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित दर्शवली होती. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर प्रा. श्रीकांत जिडीमनी यांनी आभार मानले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे पक्षातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नाहीत. केदार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाला सातत्याने अपयश येत आहे. आजवरच्या सर्व पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या राजश्री नागणे यांनी सांगोला येथे पत्रकार परिषद घेऊन केली. या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टी किसान सेलचे प्रदेश सदस्य शिवाजीराव गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष संजय गंभीरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सावंत, माजी शहराध्यक्ष नवनाथ पवार, महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष वैजयंती देशपांडे, नागेश जोशी, मधुकर बनसोडे, भारत गडहिरे, संजय बाबर, शिवाजी ठोकळे आदीसह भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले, मी १९९५ पासून पक्षाचे काम करत आहे. २००४ ला सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आजवर पक्षाचे अनेक पदाधिकारी पाहिले मात्र, चेतनसिंह केदार हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या दोन लोकसभा व ५ विधानसभा मतदारसंघात पक्षाला दारून पराभव स्वीकारावा लागला. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात दोन्ही जागेवर पूर्वी भारतीय जनता पक्षाचे खासदार होते. परंतु केदार यांच्या मनमानी कामामुळे सांगोला, करमाळा, अकलूज, कुर्डुवाडी या नगरपालिका निवडणुकीतही पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. प्रतिनिधी | सांगोला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा केला जाईल. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांची बैठक घेतली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष हा कमळ चिन्हावर लढवण्याचा निर्धार केला असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले. दरम्यान, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे हे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, संभाजी आलदर, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, भाऊसाहेब रुपनर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, नंदकुमार दिघे, वासूदचे उपसरपंच अनिल केदार, राजू मगर, बाळासाहेब झपके, वसंत सुपेकर, राजश्री नागणे, नवनाथ पवार, शिवाजीराव गायकवाड भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना केदार सावंत म्हणाले, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरण करून सज्ज होऊन कामाला लागावे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रति आत्मीयता निर्माण करावी. जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला कायम टिकवून ठेवत आगामी काळात पक्ष, संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, यावर आपण काम करणार आहे. भाजप सरकारच्या योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ साधला पाहिजे जुन्यांना विसरून चालणार नाही, नव्यांबरोबर जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. तरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने ते यश मिळू शकेल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकजूट होत निवडणुका जिंकण्याचा निर्धार करावा असे आवाहन केदार यांनी केले. अन् पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले होते मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यांच्या आल्याने पक्षाला पराभवाची मालिका सुरू झाली. ही पराभवाची मालिका थांबविण्यासाठी केदार यांनी राजीनामा देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांनी केली.
मोहोळ शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या जीवितेस धोका निर्माण होणाऱ्या कन्या प्रशाला चौकामध्ये उड्डाणपूल करण्यात आला. मात्र हा धोका कमी होण्याऐवजी अधिक भर पडली आहे. तसेच शहरासह तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता बायपास होणे, आवश्यक बाब बनली आहे. बायपास केल्यास शहरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. बायपास व्हावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मोहोळ बस स्थानकावर पुणे मुंबई वरून येणाऱ्या एसटी बससह खाजगी प्रवासी वाहतूक गाड्यांची सर्व्हिस रोड वरती मोठी गर्दी होत आहे.तर सोलापूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस सह खाजगी प्रवासी वाहतूक गाड्यांची सर्व्हिस रोड वरती मोठी गर्दी होत आहे. या दोन्ही सर्व्हिस रोडवरील वाहन वाहतूक वर्दळ कमी करण्यासाठी मोहोळ बस स्थानका समोरील रॅम्प प्रमाणे कुरुल उड्डाणपूल नजीकच्या रिकाम्या जागेमध्ये तर मोहोळ डाग घर समोरील रॅम्प प्रमाणे सोलापूर वरून येणाऱ्या गाड्यांसाठी शुभम हॉटेल समोर अशा दोन्ही ठिकाणच्या बाजूस रॅम्प केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तर मोहोळ शहराची वाढती लोकसंख्या पाहता मोहोळ शहरातील वाहतूक कोंडीवर आळा बसवण्यासाठी बायपास केल्यास वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. अशी मागणी सातत्याने शहरासह तालुक्यातील नागरिक करीत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच प्रशासन वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. सदर ठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन कोणाचातरी बळी गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पंढरपूरहून येणारी सर्व वाहने,जड वाहतूक, पुण्याहून येणाऱ्या सर्व एसटी बसेस या मोहोळ शहरातील सर्व्हिस रोडने वळविण्यात आल्याने मोहोळ शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवर कायम वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होत आहे. कन्या प्रशाला चौक येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला ४ शाळा व २ महाविद्यालये आहेत. तालुक्यातील अनेक गावांचा शहराला जोडणारा प्रमुख चौक त्याठिकाणी रस्ता ओलांडत असताना अनेक अपघात झाले होते.काही जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या विषयावर मोहोळ शहरातील नागरिकांनी या चौकामध्ये उड्डाणपूल व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. त्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने भुयारी मार्ग केला.परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडीचा कोणताही विचार न करता भुयारी मार्ग करण्यात आला आहे.
नगर- मनमाड महामार्गावरील अपघाताचे दृष्टचक्र थांबता थांबत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. आठ दिवसांत दुसरा अपघात आणि २ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी रस्त्यावर तिसऱ्यांदा आंदोलन यामुळे शासनाचे निष्ठूर धोरण आणि प्रशासनाचे बेदरकारपणाचा प्रत्यय या रस्त्यावर चालणाऱ्या वाहनधारकांना येत असताना आज पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीमुळे एका तरुणाचा बळी गेला. रविवारी दुपारी सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास डिग्रस फाटा परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, त्याचासहकारी जखमी झाला. नकारात्मक बातमी पण तुमच्या माहितीसाठी मार्च २०२५ ते २८ डिसेंबर २०२५ या २६८ दिवसांत या रस्त्यावर १४५ अपघात झाले, त्यात ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ ते आतापर्यंत या रस्त्यावर ४२५ जणांचा अपघातात मृत्यू झाला . जूनमध्ये एकाच आठवड्याच ४ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातामुळे संतप्त नागरिकांनी केलेले हे सहा महिन्यातील तिसरे रास्ता रोको आंदोलन झाले. नदीम आदम शेख वय १९ वर्ष व उमर अब्बास शेख दोघे रा. डिग्रस,ता. राहुरी हे दुचाकीवरून राहुरी येथून डिग्रसकडे येत असताना डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात उर्वरित पान ४ २६८ दिवसांत १४५ अपघातात ७३ जणांचा मृत्यू
ज्या शाळेमुळे अक्षरांची ओळख झाली अन् आयुष्याला नवी दिशा मिळाली त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी पाथर्डीच्या इंदिरानगर भागातील जिल्हा परिषदेचे माजी विद्यार्थी एकवटले. पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना भौतिक सुविधांसह साधे पिण्याचे पाणीही मिळत नसल्याचे कळताच एक, दोन नव्हे तर १२० वर माजी विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे एका व्यासपीठावर आले. शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित केला. जे येऊ शकले नाहीत त्यांनी मदतीची तयारी दाखवली आणि आता सर्वांच्या साथीने शाळेचे रुपडे पालटणार आहे. शाळेच्या आठवणी जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेची पायरी चढत आम्ही या शाळेचे देणे लागतो हे कृतीतून दाखवून देत समाजात वेगळा संदेश दिला. राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजनेअंतर्गत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये कुणी पोलिस विभागात कार्यरत आहेत, कुणी शिक्षक आहेत तर अनेकजण व्यावसायिकही आहेत. या सर्वांनी त्यांच्या परीने मदतीचे तयारी दाखवली. मेळाव्यातच सर्वांनी एकत्र येत ३५ हजारांवर निधी जमवला. व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्वजण आता इतर कामांसाठी निधी जमवणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते इजाज शेख होते. यावेळी मेळाव्यास नवनियुक्त नगरसेवक प्रतीक नांगरे, मनिषा उदमले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजना काटकर, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, दिलीप मिसाळ, बजरंग सोळसे, शैलेश ऊगार, दत्तात्रय डिगे, सचिन तरटे उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन व प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती उनबेग यांनी, तर आभार अनुराधा ओतारी यांनी मानले. शाळेसाठी काय करणार विद्यार्थी . शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. त्याची डागडुजी करणार . इमारतीच्या डागडुजीनंतर वर्गखोल्यांची आतून व बाहेरून रंगरंगोटी केली जाणार . शाळेच्या बाहेर व आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणार . शाळेला डिजीटल करण्यासाठी साहित्य व उपकरणे देण्याची तयारी . शिक्षण विभागाच्या मदतीने अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्धतेसाठीही प्रयत्न करणार
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांच्या कलात्मक, सांस्कृतिक व नैतिक विकासालाही तितकेच महत्त्व आहे. रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून समाज घडवणारी चळवळ आहे. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, देशभक्ती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे सुंदर दर्शन घडले, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. केडगाव देवी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री अंबिका प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘स्नेहतरंग’ हा दोन दिवसीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा सादर केला. या सांस्कृतिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपट पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे, संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भक्तिगीते, भावगीते, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, एकांकिका व नाटिका यांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. बालकलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थित पालक, नागरिक व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. स्नेहसंमेलमनातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. उपस्थित पालकांनी आणि विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख जयश्री भोस व प्रियंका सातपुते यांनी केले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा गोरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनात सांस्कृतिक अन् देशभक्तीपर उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भक्तिगीते, भावगीते, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, एकांकिका व नाटिका यांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. बालकलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थित पालक, नागरिक व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
कोपरगाव पंचायत समिती व तालुका विज्ञान–गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला, अशी माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. चित्रकला प्रदर्शनात आदर्श मोरे याने सादर केलेल्या सोशल मीडियाचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम' या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रास तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. तसेच गणित व विज्ञान प्रदर्शनात समर्थ कुशारे याच्या अॅक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट' या उपकरणाला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला. प्राचार्य शेख यांनी सांगितले, जानेवारी २०२६ मध्ये नागेश्वर विद्यालय जामखेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलचे द्वितीय क्रमांक प्राप्त अॅक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट हे उपकरण सादर करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलकडून एकूण तीन गणित व विज्ञान उपकरणे सादर करण्यात आली होती. पहिली ते पाचवी गटात विद्यार्थी इनामदार आर्यन याने मॅथेमॅटिकल पार्क (गणितीय उद्यान) हे अभिनव उपकरण सादर केले. या संकल्पनेत खेळ, मनोरंजन आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून मुलांना भूमिती, अंकगणित, मोजमाप, आकार ओळख अशा विविध गणिती संकल्पना सहजरीत्या समजावून देणारे उपकरण सादर केले. ६ वी ते ८ वी गटात विद्यार्थी शेख मोईन याने पॅराबोलिक सोलर कुकर म्हणजेच सौर ऊर्जेवर चालणारी सौरचूल उपकरण सदर केले. पर्यावरणपूरक व ऊर्जा बचतीचा संदेश देणारे हे उपकरण सूर्यप्रकाशाचा उपयोग करून स्वयंपाक कसा करता येतो हे दाखवून दिले. ९ वी ते १२ वी गटात विद्यार्थी कुशारे समर्थ याने अॅक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट (अपघात नियंत्रण लिफ्ट) हे अत्यंत उपयुक्त व समाजोपयोगी उपकरण सादर केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला दाद याच प्रदर्शनात आयोजित चित्रकला स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या आदर्श मोरे, गौरव सोनवणे, अथर्व उगले, प्रत्यूष गारे, मुजम्मील पठाण व ओमकार वाघ या विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक चित्रे सादर केली.
पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यात दैनंदिन शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेसह शहरात विविध विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. आठवड्यातून एक दिवस विविध प्रभागातील नगरसेवकांनी एकत्र जमून शहरात स्वच्छता मोहीम राबवावी असा निश्चय आम्ही केला आहे, अशी माहिती नूतन नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी दिली. रविवारी सकाळी पालिकेतील गटनेते मुन्नाभाई शाह, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक डॉ.विजय सदाफळ, सुयोग शेळके, अरूण आग्रे, प्रदीप बनकर, उदय बोठे आदिंसह नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांनी शहरात सकाळी स्वच्छता मोहीम राबवली. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, शहरातून जाणाऱ्या नगर कोपरगाव राज्यमार्गावरील दुभाजकांची स्वच्छता केली. त्यापूर्वी त्यांनी या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष डॉ.गाडेकर म्हणाले, दैनंदिन शहर स्वच्छतेला आम्ही सर्वजण प्राधान्य देणार आहोत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अडचणी आम्ही आज जाणून घेतल्या. स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांसह त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. पालक मंत्री विखे आणि डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ राहाता-सुंदर राहाता ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलणार आहोत. माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीची सुरवात आज स्वच्छता मोहीमेत सहभाग घेऊन केली आहे. दैनंदिन शहर स्वच्छता करण्यात काही छोट्या अडचणी आणि समस्या देखील आहेत. त्या मार्गी लावणे हे आम्ही आमचे पहिले कर्तव्य समजतो. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग साठणे हे शहराला भुषणावह नाही याची जाणीव आम्हाला आहे. शहरातील निरंतर स्वच्छतेची यंत्रणा मार्गी लागली की सुशोभिकरणाचे शहरवासियांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले टाकणार आहोत. स्वच्छ राहाता-सुंदर राहाता हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणणार शहरातील जनतेने विक्रमी मतांनी निवडून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहोत. विकासाचा अनुशेष भरून काढताना स्वच्छ राहाता-सुंदर राहाता हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणणार आहोत, असे नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले.
आयुष्मान कार्ड असूनही रुग्णाची आर्थिक लूट:शिरूरमधील हॉस्पिटलमधील प्रकार
शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही अपघातग्रस्त रुग्णांना मोफत उपचार नाकारून हजारो रुपये आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार शिरूर येथे उघडकीस आला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे व पत्रकार अमोल बोरगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. तालुक्यातील ढवळगाव येथील येथील सयाजी तबाजी आडगळे व सारिका सयाजी आडगळे यांना १९ डिसेंबर रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. आडगळे यांच्या डोक्याला जबर मार लागून १९ टाके घालावे लागले. जखमींना शिरूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णांचे मिळून सुमारे ७० हजार रुपयांचे बिल आकारले. विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबाकडे आयुष्यमान भारत कार्ड आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही कार्ड चालत नाही व या कार्डावर उपचार होणार नाहीत असे सांगून मोफत उपचार नाकारले. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आकारलेली रक्कम परत मिळवून द्यावी, दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी तसेच आवश्यक असल्यास शासकीय मान्यता रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात येणार आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे, सागर घोलप, संदीप कडेकर, फिरोज सय्यद, अशोक गुळादे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, माजी नगरसेवक दादाभाऊ लोखंडे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता बिलात तफावत असल्याचे समोर आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासकांनी पाचर्णे यांना अरेरावी केली. पाचर्णे यांनी औषधांचे वाढवून लावलेले दर, रुग्ण शासकीय योजनेत बसत असल्याचे दाखवून दिल्याने या हॉस्पिटल प्रशासनाला कान धरून उठाबशा काढण्याची व माफी मागण्याची वेळ आली. याबाबत रुग्णालयाचे व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी मुख्य शाखेशी चर्चा करून पुढील काळात औषधांचे दर व डॉक्टरांच्या तपासणी शुल्कात कपात करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
नव्याने नोकरीत रुजू होणारे अधिकारी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेणारे सामाजिक कार्यकर्त्यांची जडणघडण हिवरेबाजार मुळे होते. हिवरेबाजार हे आपल्यासाठी ग्रामविकासाचे तीर्थक्षेत्र आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे सहअध्यक्ष आनंद भंडारी यांनी केले. आदर्शगाव हिवरेबाजार येथे जलसाक्षरता केंद्र यशदा,पुणे व यशवंत कृषी, ग्राम व पाणलोट विकास संस्था तथा विस्तार प्रशिक्षण केंद्र हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जलप्रेमी,जलदूत व जलकर्मींसाठी आयोजित पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भंडारी बोलत होते. आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,यशदाचे महासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, जलनायक रमाकांत कुलकर्णी, सत्र समन्वयक सुखदेव फुलारी व्यासपीठावर उपस्थित होते. भंडारी म्हणाले, जल साक्षरता असो किंवा कोणतीही योजना असेल ती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पाझरली पाहिजे. तुकड्या तुकड्यात काम करण्यापेक्षा टीम बिल्डिंग करून काम केले तर त्याची परिणामकारकता अधिक असते. हिवरेबाजार प्रमाणे शेवटच्या माणसाला सुद्धा या चळवळीत जोडून घेतले पाहिजे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कुटुंबातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचता येईल याचे आम्ही नियोजन करत आहोत. जलसाक्षरता,घनकचरा किंवा सांडपाणी व्यवस्थापन वा कोणतीही थीम असू दे, त्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांना सहभागी करून घेण्यात आपण कमी पडत आहोत. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत बऱ्यापैकी जनजागृती आहे,परंतु तरीही कळते पण वळत नाही अशी परिस्थिती असल्याने पाणी जाईपर्यंत कोणीही नळाची तोटी बंद करत नाही. समाज हा अनुकरणप्रिय आहे, त्यामुळे अगोदर आपण कृती करणे महत्वाचे आहे. वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. स्वतःही वाचले पाहिजे आणि मुलांना वाचनाची सवय लावण्याची गरज आहे. मास्टर ट्रेनर हा साचेबद्ध न राहता त्याला समोरील समुदायाला प्रेरित करता आले पाहिजे असेही भंडारी म्हणाले. पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात जलसाक्षरतेची खूप चांगली चळवळ सुरू आहे. या चळवळीत आवड असलेले आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास असणारी माणसं आहेत. स्वातंत्र्याच्या शंभरी कडे जात असतांना पुढील २५ वर्षात जे द्यायचे आहे ते देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व आनंद पुसावळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
परिसरातील अवजड वाहनांच्या पार्किंगने समस्या आणखी वाढली:वाहनचालक व नागरिकांना धुळीचाही त्रास
अहिल्यानगर नव नागापूर औद्योगिक वसाहतीतील नागापूर- निंबळक रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यासाठी कच्चा माल टाकण्यात आल्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय याच परिसरात मोठ्या संख्येने अवजड वाहने उभे केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. उद्योजक व कामगारांसाठी निंबळक-नागापूर हा महत्त्वाचा रस्ता मानला जातो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले होते, मात्र ते काम अर्धवट होते. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. तसेच पथदिवे व दुभाजक नसल्यामुळे सातत्याने अपघात होत होते. उद्योजकांच्या मागणीनंतर या रस्त्याचे नव्याने काम हाती घेण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वीची रस्त्याचे काम सुरू झाले आहे. काम सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावर पहिल्या टप्प्यात दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने उद्योजक व कामगारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याच परिसरात मोठे उद्योग असल्यामुळे हा रस्ता कायम वर्दळीचा असतो. वर्दळीच्या या रस्त्यावरच मोठ-मोठे कंटेनर जातात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. विशेष करून कारखान्यातून कामगार परतत असताना ही वाहतूक कोंडी होत असते. सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे वाहनचालकांना तोंडाला रुमाल बांधून वाहने चालवावी लागत आहेत. शहरात रस्ते चांगले असावेत अशी मागणी असते. मात्र रस्त्यांचे काम हाती घेताना वाहनचालक आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागापूर ते निंबळक या रस्त्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यासाठी बांधकामासाठीचा कच्चा माल आणून टाकण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याने वाहने चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.
सलग सुट्या आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसांत सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज ट्रस्टने वर्तविला आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता भाविकांचा विना अडचण दर्शन व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. नाताळ सुट्यांमुळे शुक्रवारी सकाळपासूनच गर्दी सुरू झाली होती. घाटातील रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने २ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घाटात पंधरा दिवसापूर्वी अपघात झाल्यामुळे धोकादायक ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. वाढत्या गर्दीसाठी नियोजन करण्यात येत आहे.
वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच या वृक्षांची लागवड नीलेश देसाई | लासलगाव पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने होत असलेल्या काळात लासलगाव शहरातील युवकांनी दिलेला हिरवाईचा संदेश आज संपूर्ण शहरासाठी आशेचा किरण ठरत आहे. ‘हरित सेना’ या पर्यावरणप्रेमी समूहाच्या माध्यमातून शहरात तब्बल १,५०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या झाडांचे संगोपन चार वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. केवळ झाडे लावून थांबायचे नाही, तर ती जगवायची, असा निर्धार हरित सेनेने केला असून त्यासाठी दर शनिवारी कामावरून सुट्टी घेऊन संपूर्ण दिवस झाडांना पाणी देण्यासाठी देतात. त्यांच्या या कामाचे फलीत म्हणून शहर हिरवाईने नटू लागले आहे. या लागवडीत वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, गुलमोहर, कदंब, आकाशनीम, ताम्हण, कांचन, बहावा, स्पेथोडिया, खाया, कोरडिया, बेल, करंज, अर्जुन, बकुळ आणि कैलासपती यांसारख्या दीर्घायुषी व पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश आहे. भविष्यात या झाडांमुळे शहराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होणार असून, स्वच्छ हवा आणि निसर्गसंपन्न वातावरण निर्माण होणार आहे. हरित सेनेच्या वतीने शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना लोकसहभागातून जमा झालेल्या रकमेतून संरक्षण जाळी बसविली जाते. ज्या वृक्षांची लागवड केली जातात ती आणतानाच थोडी मोठी आणली जातात. त्यामुळे अनेक वृक्ष जतन करण्यामध्ये हरित सेनेला यश आलेले आहे. शिव नदी परिसरात मोठ्या प्रमाणात त्यांच्या वतीने लागवड करण्यात आलेले वृक्ष आज डेरेदार झाले आहेत.
रिक्षाचालक, इडली विक्रेता, मेकॅनिक नगरसेवक:इगतपुरीत सामान्यांचा विजय; प्रस्थापितांना जोरदार धक्का
इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीने स्थानिक राजकारणात नवा इतिहास घडवला आहे. मतदारांनी यावेळी प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारत सामान्य नागरिकांच्या हातात सत्तेची सूत्रे दिली आहेत. नावं, पदं आणि राजकीय परंपरा गौण ठरवत, कामगिरी, थेट संपर्क आणि उपलब्धता यांना मतदारांनी प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. रेल्वे स्थानकावर चहा विक्री करणारे सतीश मनोहर, रिक्षा चालक सागर आढार आणि कार मेकॅनिक रोहिदास डावखर यांना नगरसेवकपदी निवडून देत मतदारांनी सामान्य माणसावरचा विश्वास अधोरेखित केला आहे. या विजयामुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, शुभांगी दळवी यांच्यासह अपर्णा धात्रक, संपत डावखर, नईम खान, रत्नाबाई जाधव आणि राजेंद्र पंचारे यांसारख्या अनुभवी आणि मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या राजकारणावर पकड असलेल्या नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी विजय ठरला तो पोलिस दलातील नोकरी सोडून राजकारणात उतरलेल्या मंगेश शिरोळे यांचा. त्यांनी माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मंगेश शिरोळे यांची थेट उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निकालातून मतदारांचा बदलता कौल स्पष्टपणे दिसून येतो. चेहऱ्यांपेक्षा कामाला आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष सहभागाला मतदारांनी महत्त्व दिले आहे. आता चेहरा नाही, तर काम पाहणार हा संदेश इगतपुरीकरांनी या निवडणुकीतून दिल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. इगतपुरी नगरपरिषदेच्या या निकालाने स्थानिक राजकारणाची दिशा बदलली असून, नव्या चेहऱ्यांकडून विकास, पारदर्शकता कारभाराच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. गृहिणीं राजकारणात नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या शालिनी संजय खातळे या गृहिणी आहेत. शांत आणि संयमी असलेल्या खातळे यांच्यासोबत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या टीममध्येही विकत वसीम सय्यद, भारती मंगेश शिरोळे, आशा थोरात, वैशाली सतीश कर्पे, आशा प्रशांत भडांगे, माला गवळे, नाझनीन खान, अंजुम कुरेशी, ललिता लोहरे या सर्व ९ महिला गृहिणी आहेत. तर मयुरी राहुल पुरोहित या शिक्षिका आहेत. भाजपकडून निवडून आलेल्या वंदना सुनील रोकडे यादेखील गृहिणी आहेत.
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदीस शुक्रवारी (दि. २६) बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, उपसभापती पंढरीनाथ खताळ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. केंद्र शासनाने सन २०२५-२६ साठी सोयाबीन शेतीमालास प्रति क्विंटल ५३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. या दराने सोयाबिन खरेदीसाठी यावर्षी प्रथमच बाजार समित्यांना हमीभाव खरेदी केंद्र मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकरी हितासाठी चांदवड बाजार समितीने त्यात सहभाग घेतला. त्यानुसार शुक्रवारपासून सोयाबिन खरेदीस प्रारंभ करण्यात आला. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बाजार समितीत सोयाबीन शेतीमाल विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत २५३ शेतकर्यांनी नोंदणी केली आहे व नोंदणीप्रक्रिया सुरु आहे. सोयाबीन खरेदीसाठी एनसीसीएफमार्फत योगेश सावकार यांची ग्रेडर म्हणून नियुक्ती केलेली असून शुभारंभाप्रसंगी संबंधित ग्रेडर यांनी शेतीमालाचा दर्जा तपासणी केल्यानंतर सोयाबिन खरेदीस सुरुवात करण्यात आली. यावेळी सोयाबिन विक्रेत्या शेतकर्यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेतकरी बांधवांनी ५३२८ हमीभाव दराने सोयाबीन विक्री करण्यासाठी बाजार समितीशी संपर्क करुन आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता करुन नोंदणी करुन घ्यावी, तसेच माल विक्रीसाठी एसएमएस आल्यानंतर सोयाबीन स्वच्छ व प्रतवारी करुन केंद्रावर विक्रीसाठी आणावे, असे आवाहन सभापती नितीन आहेर व संचालक मंडळाने केले आहे.
चांदवड येथील वनपरिक्षेत्र कार्यालय व एआरइएएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथे मानव-बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात आले. नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. वनपाल सुनील खंदारे यांनी बिबट्याच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्याचे निवासस्थान, हालचालीचे मार्ग व मानव- बिबट संघर्ष वाढण्याची सुशांत रणशूर यांनी विविध जातीच्या सर्पाची शास्त्रीय ओळख करून दिली. त्यांनी विषारी व बिनविषारी सर्प यामधील फरक, त्यांचे वर्णन तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. यात सर्पदशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी, चुकीच्या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली. यासह बिबट्या दिसल्यास काय करावे, याविषी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कारणे, मानव-बिबट सहजीवन, बिबट्या दिसल्यास घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपायोजना तसेच अन्नसाखळीचे महत्त्व याबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली. तसेच ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशनचे यावेळी वनरक्षक सुरेखा मरशीवणे, वनसेवक भरत वाघ, अशोक शिंदे, राहुल नाईक, श्रीकांत उपस्थित होते.
तळणी मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत सहशालेय उपक्रमांतर्गत आयोजित बाल आनंद मेळावा उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. हायस्कूलमध्ये ९१ विविध विविध दुकाने लावण्यात येऊन विद्यार्थ्यांनी ४५ हजारांची उलाढाल केली. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाकरवडी, विदर्भ पातळी, रोटी, मोसंबी, पोंगे, कळण्याची भाकरी, धिरडे, बाजरी भाकर, ठेसा, भेळ, मसाला पापड-मुगवडे, मठ्ठा, गुलाबजाबून, चहा, कटलेट, आप्पे, इडली डोसा, पाणीपुरी यांसह उपवासाचे पदार्थ ठेवण्यात आले होते. विविध चविष्ट पदार्थांचे ९१ स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांना ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापक बी. के. मुंडकर यांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग जनकवार, ज्ञानेश्वर सरकटे, नितीन सरकटे, ज्ञानेश्वर सरकटे, सुधाकर सरकटे, सुनील लाड, योगेश जोशी, शिवाजी भावसार, दारासिंग चंदेल, किशोर हाणवते आदींची उपस्थिती होती. सदस्यांच्या हस्ते फीत कापून बाल आनंद मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यास गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण मंडळी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि पदार्थांचा आस्वाद घेतला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. बी. मुंडकर, डी. एम. ढाकरे, बी. एन. पंदे, एन. बी. पंडागळे, पी. ए. डोईफोडे, ओ. आर. शर्मा, जी. एन. गवई, आर. एल. तापडिया, जी. ए. धातरकार आदींनी विशेष परिश्रम घेतले. जी. एन. गवई यांनी आभार मानले. मंठा तालुक्यातील तळणी येथे बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देणे गरजेचे याप्रसंगी अध्यक्ष जनकवार यांनी बोलताना सांगितले की, शालेय शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देणे सध्या गरजेचे आहे. सोशल मीडियाचा होत असलेला अतिवापर यामुळे व्यावहारिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा बाल आनंद मेळाव्यातूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक आनंदाची गोडी लागेल. यासाठी शाळा व विद्यार्थी यांच्यात व्यावहारिक ज्ञानासाठीचा समन्वय असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात येत्या २० जानेवारीपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरू होत असून भोकरदन शहरातील शेकडो तरुण-तरुणी क्रीडा संकुल मैदानावर कसून सराव करत आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या मैदानाची अवस्था अत्यंत बिकट असून त्याचा फटका सराव करणाऱ्या युवकांना बसत होता. ही बाब लक्षात घेत नवनिर्वाचित नगरसेवक दीपक पाटील मोरे व राजू पाटील सहाणे यांनी स्वतः मैदानात उतरून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे भरतीचा सराव करणारे युवक व त्यांच्या पालकांनी या कार्याचे कौतुक होत आहे. भोकरदन येथील तालुका क्रीडा संकुल मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून देखभालीचा अभाव होता. धावपट्टीवर जागोजागी खड्डे पडले होते, ठिकठिकाणी दगड-धोंडे असल्याने सराव करताना मुला-मुलींना दुखापत होऊ लागली. मैदानाची अक्षरश: चाळण झाल्याने सराव करायचा कसा? असा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला होता. यातच पोलिस भरती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. ही अडचण समजताच नगरसेवक दीपक पाटील मोरे व राजू पाटील सहाणे यांनी शनिवारी सायंकाळी प्रत्यक्ष मैदानाला भेट देऊन पाहणी केली. केवळ पाहणी करून न थांबता त्यांनी मुलांच्या अडचणी समजून घेत मैदानाची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे तातडीने आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करत मैदानाचे सपाटीकरण सुरू केले. तसेच अडथळे दूर करण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या शेकडो मुला-मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिस भरतीच्या ऐन तोंडावर लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल युवकांनी समाधान व्यक्त केले. कृतज्ञता व सत्कार आपल्या समस्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष धावून आलेल्या दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांचे मुला-मुलींनी आभार मानले तर मैदानावर सराव करणाऱ्या उमेदवारांच्या वतीने दीपक पाटील मोरे व राजू पाटील सहाणे यांचा सत्कार करण्यात आला. निर्णय समाधानकारक नगरसेवक मोरे व सहाणे यांनी स्वतः मैदानावर येऊन आमची अडचण जाणून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. याबद्दल त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया युवक अमोल जाधव याने दिली आहे. जास्तीत-जास्त तरुण पोलिस दलात भरती व्हावेत पोलीस भरतीची तयारी करणारी ही मुले-मुली शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील असून अहोरात्र मेहनत करून खाकी वर्दीचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, मैदानाची दुरवस्था झाल्यामुळे त्यांच्या सरावात अडथळे येत होते, शारीरिक दुखापत होण्याची भिती होती. त्यामुळे आम्ही तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. केवळ आश्वासन नाही, तर दर्जेदार मैदान उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे. भोकरदनमधील जास्तीत-जास्त तरुण पोलीस दलात भरती होऊन शहराचे नाव उज्वल करतील, त्यांच्या स्वप्नांच्या आड कोणतीही अडचण येऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. -दीपक मोरे, नगरसेवक
वैजापूर तालुक्यातील माळीसागज परिसरातील शेतकरी गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत आहेत. यातच रविवारी (दि. २८) दुपारी बिबट्याने माळीसागज येथील डरे वस्तीवरील २६ वर्षीय शेतकरी प्रथमेश अशोक डरे यांच्यावर हल्ला केला, पण डरे यांनी मोठ्या हिमतीने बिबट्यावर खोऱ्याने प्रतिकार करत त्याला पळवून लावल्याने मोठी दुर्घटना टळली. माळीसागज येथील प्रथमेश डरे रविवारी नेहमीप्रमाणे शेतातील हरभरा पिकाला पाणी देत होते. दुपारी शेजारील मक्याच्या शेतातून बिबट्याने बाहेर येत प्रथमेश यांच्यावर हल्ला केला. यावेळी डरे यांनी खोऱ्याने बिबट्यावर मारा केला. त्याच वेळी शेजारी शेतात काम करत असलेले त्यांचे आई- वडील व शेजारील शेतकरी मदतीला धावून आल्याने बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात शेतकरी प्रथमेश यांच्या पोटाला व डोळ्याला बिबट्याने पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. वनरक्षक ए. एन. सय्यद यांनी सोमवारी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार अशी माहिती दिली. २०२५ वर्षात बिबट्याने वैजापूर तालुक्यात नागरिकांवर हल्ला केल्याची ही घटना तिसरी आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात वळण येथे शेतवस्तीवर खेळत असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात तिचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा काही दिवसांतच जिरी या गावातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. यात तिचाही मृत्यू झाला होता. बुधवारी (दि.२४) रात्री टाकळी सागज येथील वाडेकर वस्ती येथील शेतकरी नानासाहेब पवार यांच्या वस्तीवरील गोठ्यात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर फडसा पाडला होता. त्यावेळी वन विभागाने हा बिबट्या नसून तरस असल्याचे सांगून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वन कर्मचऱ्यांनी दिल्या होत्या. वैजापूर तालुक्यातील माळीसागज, टाकळी सागज, भरतवाडी या पारिसरात बिबट्याने गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. शेतातील कामे करणे अवघड झाले आहे, तर शेत वस्तीवरील विद्यार्थी शाळेत जाण्यास भीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तिसरा हल्ला, दोघींचा झाला मृत्यू राजू डरे म्हणाले, मी व माझा मुलगा आमच्या शेतात १०० फुटांच्या अंतरावर असलेल्या कांद्याच्या पिकाला पाणी भरत असताना बिबट्याने रविवारी आमच्या पुतण्यावर हल्ला केल्याचे आम्ही बघितले. क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मदतीला धावून गेलो, आरडाओरडा केला. आम्हाला बघून बिबट्या शेजारी असलेल्या मक्याच्या पिकात पळून गेला.
मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियानातून हळदा ग्रामपंचायतीने विकासाची नवी दिशा घेतली आहे. जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये संगणक, इंटरनेटसह डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे. शालेय अभ्यासासोबतच संगणक ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि स्पर्धात्मक जगासाठी लागणारी तांत्रिक तयारीही करता येणार आहे. शाळेच्या सुरक्षिततेसाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरावर सतत नजर राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मुख्य चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावले गेले आहेत. त्यामुळे चोरी, अनुचित प्रकार आणि समाजविघातक घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. गावात सुरक्षिततेची भावना वाढली आहे. या सर्व उपक्रमांमुळे हळदा गाव स्वच्छ, सुरक्षित आणि तंत्रज्ञानस्नेही बनत आहे. शिक्षण, सुरक्षितता आणि तंत्रज्ञान या तिन्ही बाबींना ग्रापमंचायतीने प्राधान्य दिले आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गुलाबी थंडीने जोर धरला असला तरी दरवर्षी जायकवाडी धरण परिसरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या विदेशी पाहुण्या पक्षी अद्याप आले नाहीत. बदलते हवामान, अधिकचे पर्जन्यमान आणि धरणातील खाद्यपदार्थ केमिकलयुक्त सोडलेले पाणी यामुळे यंदा विदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र आहे. यात काही स्थानिक पक्षी आहेत, मात्र त्याची संख्यादेखील कमी आहे असे पक्षिमित्र प्रा.संतोष गव्हाणे यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात जायकवाडी परिसरात दाखल होणारे स्थलांतरित पक्षी यंदा तुरळक दाखल झाले आहेत. तब्बल २१ हजार चौ. किमी परिसर असलेल्या जायकवाडी पाणथळ क्षेत्रात पक्ष्यांसाठी मुबलक अन्नसाठा उपलब्ध असतो. मात्र यंदा अतिवृष्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परिणामी दलदलीच्या भागात पक्ष्यांसाठी आवश्यक खाद्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. हे पक्षी दाखल, मात्र संख्या कमी : जायकवाडी पलगसै तलवार बदक, भुवई बदक, कुकरी गरुड, रंगीत करकोचे, तरांग बदक, चक्रवाक बदक, चक्रांग बदक, रोहित, पानघार, माळ भिंगरी, कुरवं, शिरवा सूरय आणि पिनटेल या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. मात्र दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणारे हे पाहुणे यंदा तुलनेने कमी संख्येत दिसून येत आहेत. प्रचंड थंडी तरीही पक्षी नाही यंदा प्रचंड थंडी असतानादेखील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झालेले नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले हे पक्षी थंडी असेपर्यंत जायकवाडी परिसरात मुक्काम करतात,मात्र यंदा थंडी असूनदेखील पक्षी संख्येत वाढ झाली नाही किंवा अधिक प्रमाणात आले नाहीत. {प्रा. संतोष गव्हाणे, पक्षिमित्र जायकवाडी पक्षी अभयारण्यामधे सध्या स्थानिक, स्थलांतरित पक्षी आढळत असून विदेशातून येणारे फ्लेमिंगो (रोहित) आलेले नाहीत, तर स्पूनबिल (चमचा), पेंटेड स्टॉर्क (रंगीत करकोचा), नॉर्दर्न शोव्हेलर, हे कमी प्रमाणात आलेले आहेत. नोव्हेंबर ते मार्च या काळात या ठिकाणी मोट्या प्रमाणावर पक्षी आढळत असत मात्र या वर्षी हे प्रमाण खूप कमी झाले आहे, यास बदललेले हवामान प्रमुख कारण आहे, अशी माहिती पैठण येथील पक्षिमित्र प्रा. संतोष गव्हाणे यांनी दिली आहे. गतवर्षी फ्लेमिंगो येथे मोठ्या प्रमाणात आले होते.
काद्राबाद येथे ७ व ८ जानेवारी रोजी तब्लिगी इज्तेमा होणार आहे. गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, लाडसावंगी, करमाड, पिंप्रीराजा, आडूळ या भागातील मुस्लिम समाजासाठी हा इज्तेमा आयोजित करण्यात आला आहे. ७ जानेवारीला इज्तेमाची सुरुवात होईल. ८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता दुआने सांगता होणार आहे. दोनदिवसीय इज्तेमासाठी १२ डिसेंबरपासून तयारी सुरू आहे. एक लाख स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे. यामध्ये पन्नास हजार भाविक बसू शकतील. सात हजार स्क्वेअर फुटाची तात्पुरती मशीद उभारण्यात येत आहे. २० ते ३० एकर क्षेत्रात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. ४०० वजुखाने, १०० शौचालये तयार करण्यात आली आहेत. तीन विहिरींमधून पाणीपुरवठा केला जात आहे. चार जनरेटर आणि नवीन विद्युत मीटरद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. भाविकांना अल्पदरात जेवण मिळावे यासाठी दोन जेवणाचे झोन तयार करण्यात आले आहेत. पन्नास हॉटेल्स आणि इतर दुकानांचे नियोजन झाले आहे. गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पिंप्रीराजा, आडूळ, काद्राबाद परिसरातील पाचशेहून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस काम करत आहेत. या इज्तेमातून २५ ते ३० जमाती ४० दिवसांच्या दौऱ्यावर निघणार आहेत. अनेक विवाहही यामध्ये ठरणार आहेत. दररोज पाचशेहून अधिक स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. अनेक अन्नदाते अन्नधान्य व आर्थिक मदत करत आहेत. जागा सपाट करण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर मोफत चालवले जात आहेत. हिंदू बांधवांनी दिली जागा ः ज्या ठिकाणी इज्तेमा होत आहे ती जागा हिंदू समाजबांधवांची आहे. त्यांनी ही जागा आणि विहिरी मोफत दिल्या आहेत. राजकारणी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करत असताना सामान्य नागरिक मात्र एकतेचा संदेश देत आहेत. चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा, हुसेन कॉलनी, भारतनगर, करमाड, पिंप्रीराजा, गाढेजळगाव, लाडसावंगी, बनगाव, शेकटा, कचनेर, लायगाव, शेंद्रा, ढवळापुरी, आडूळसह दीडशेहून अधिक गावांतील भाविक या इज्तेमात सहभागी होणार आहेत.
विहामांडव्यातील स्वप्निल साळुंखे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही मोठे यश मिळवू शकतो, हे विहामांडवा येथील स्वप्नील संजय साळुंखे यांनी सिद्ध केले. त्यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. त्यांची नियुक्ती नांदेड परीक्षेत्रात करण्यात आली आहे. या यशामुळे विहामांडवा गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. स्वप्नील हे सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी संजय साळुंखे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा (विहामांडवा) येथे पूर्ण केले. मर्यादित शैक्षणिक सुविधा, आर्थिक अडचणी आणि स्पर्धा परीक्षांची तीव्र स्पर्धा असूनही त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यामुळे त्यांना हे यश मिळाले. निवडीची बातमी समजताच गावात आनंदोत्सव साजरा झाला. फटाके फोडण्यात आले. पेढे वाटण्यात आले. ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ देऊन स्वप्नील यांचे स्वागत केले. शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आई-वडिलांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांच्या यशामागे महत्त्वाचे ठरले. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश नक्की मिळते,” असा संदेश स्वप्नील साळुंखे यांनी तरुणांना दिला. त्यांच्या यशामुळे विहामांडवा व परिसरातील युवकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
डीएमआयसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची महादेव मंदिर परिसरामध्ये २८ डिसेंबर रोजी बैठक झाली. डीएमआयसी प्रकल्पासाठी जमीन संपादित करून बारा वर्षे पूर्ण होत आहेत तरीही आजपर्यंत डीएमआयसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबितच आहे. विशेष म्हणजे या कामामध्ये अधिकारी वर्गाची उदासीनता असल्याने प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २ जानेवारीपासून आंदोलन करण्याचे ठरवले आहे. २ जानेवारी रोजी डीएमआयसी प्रकल्प कार्यालयास कुलूप ठोकणार असून डीएमआयसी प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांची बैठक चालू असताना आमदार विलास बापू भुमरे यांनीही या बैठकीस आपली उपस्थिती लावली व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे खासदार संदिपान भुमरे यांनी विशेष लक्ष देऊन काही प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सोडवले. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणाने ती प्रलंबित आहे, अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे आमदार विलास भुमरे यांनी याप्रसंगी सांगितले. आपण प्रकल्पग्रस्तांचे पूर्ण प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रकल्पग्रस्तांसोबतच आहोत, असेही त्यांनी सांगितले. बिडकीनचे सहायक पोलिस निरीक्षक यांना आंदोलनाबाबतचे निवेदन देतानाही त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होते. मंत्र्यांनी सांगूनसुद्धा कामे केली नाहीत शेतकऱ्यांनी व खासदार संदिपान भुमरे यांनी डीएमआयसी प्रशासन व उद्योगमंत्री सामंत यांच्या भेटी घेतल्या होत्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरला झालेल्या बैठकीत एका महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे जाहीर सभेत सांगितले होते. मंत्र्यांनी सांगूनसुद्धा अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांची कामे केली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले DMIC प्रकल्पग्रस्त शेतकरी, बेरोजगार युवक व नागरिक दोन जानेवारीपासून तीव्र आंदोलन छेडणार आहेत. याबाबत सर्वांनीच आपण शांततेमध्ये भूसंपादन प्रक्रिया पार पाडली त्याचा गैरफायदा प्रशासन घेत असून सद्य परिस्थितीत आंदोलन छेडणे हाच त्यावर उपाय असेल असे सांगितले व सर्वांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला. सरपंच अशोक धर्मे, मनोज पेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, काकासाहेब टेके, उपसरपंच किरण गुजर, ॲड. संचित पातूनकर, मधुकर सोकटकर, प्रवीण चव्हाण, अमोल कोथिंबिरे, शिवाजी गव्हाणे, बाबुराव आगाज, अंकुश धर्मे, राजू कोथिंबिरे, सागर फरताळे व शेतकरी उपस्थित होते. या आहे प्रलंबित मागण्या डीएमआयसी भूसंपादन करताना प्रकल्प शेतकऱ्यांना विकसित करून प्लॉट जमिनीच्या भावातच दिले जातील असे ठरले असताना डीएमआयसी प्रशासन आता प्लॉट देताना झाडे, विहीर,रस्ता याचे पैसे लावत आहे ते लावू नका व प्लॉट जमिनीच्या भावातच द्या, कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने काम द्यावे, फळझाडे, पोटखराब जमीन, विहीर, रस्त्यामध्ये गेलेल्या जमिनीचे पैसे द्यावे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनर्वसन धोरण लागू करावे, डीएमआयसी प्रकल्पामधील कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने काम द्यावे, भूसंपादन प्रमाणपत्र देण्यात यावे.
प्रतिनिधी | करमाड दुधड येथे ३ कोटी ३७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी या भागाचे माजी आमदार व सध्या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या भागातील एकही गाव शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. चव्हाण म्हणाल्या, दुधड हे गाव इतरांसाठी आदर्श ठरावे. गावाच्या विकासासाठी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून लोकसहभागातून कामे व्हावीत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावेत. बागडे यांनी सुरू केलेल्या विकासकामांची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी लहुकी नदीवरील संरक्षक भिंत व घाट बांधकाम, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत, आर. आर. आबा स्मार्ट ग्राम बक्षिसातून गट क्रमांक १६८ मध्ये पेव्हर ब्लॉक व भूमिगत गटार, तलाठी भवन, वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून सिमेंट रस्ता व लाइट, ग्रामनिधीतून सेफ्टी टँक, चर्चेसाठी संरक्षण भिंत, व्यायामशाळेचे साहित्य अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला दामुअण्णा नवपुते, सजनराव मते, भावराव मुळे, अप्पासाहेब शेळके, सजन बागल, संजयसिंग गोलवाल, विठ्ठल सादरे, अर्जुन गाडेकर, जनार्दन ठोंबरे, अशोक पवार, प्रकाश चांगुलपाये, ऋषी नरवडे, शिवाजी मते, राजू काळे, शेषराव दौंड, राजेश मते, बाबासाहेब घावटे, त्रिंबकसिंग सुलाने, सरपंच गंगासागर चौधरी, उपसरपंच बळीराम बोर्डे, ग्रामसेवक संतोष मरमट, प्रभाकर काकडे, मधुकर बोर्डे, सुदाम घोडके, सुरेश घोडके उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व आकाराने मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या पिशोर येथील ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे. पोलिस ठाण्याच्या आवारातील निजामकालीन कौलारू व लोखंडी पत्र्यांचे सरकारी निवासस्थान (क्वार्टर्स) पूर्णपणे जीर्ण झाले आहे. गळती, भगदाडे व असुरक्षित संरचनेमुळे पोलिसांना अक्षरशः जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. पिशोर पोलिस ठाण्यात मंजूर असलेल्या २८ कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने (क्वार्टर्स) असले तरी त्याची अवस्था दयनीय असल्याने सध्या केवळ ५ ते ६ कर्मचारीच ठाण्याच्या परिसरात वास्तव्यास आहेत. उर्वरित २२ ते २३ कर्मचारी गावात व आजूबाजूच्या परिसरात भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री एखादी गंभीर घटना घडल्यास पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास अर्धा ते एक तासाचा विलंब होत असून याचा थेट परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर होत आहे. पावसाळ्यात निवासस्थानामध्ये (क्वार्टर्स) थेट पाणी शिरते, तर हिवाळ्यात कौलारू व लोखंडी पत्र्यांतील भगदाडांमुळे कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. कुटुंबासह राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून कोणत्याही क्षणी अपघात किंवा जीवितहानी होण्याची भीती नाकारता येत नाही. पिशोर हे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून तालुका स्तरावरील महत्त्वाचे केंद्रबिंदू आहे. पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिशोर, वासडी, चिंचोली, नाचनवेल, करंजखेड व नागापूर अशा सहा बीट्सअंतर्गत एकूण ९२ गावे, खेडी व वस्त्यांचा समावेश आहे. तब्बल ३० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या हद्दीत गौताळा अभयारण्याचा डोंगराळ भागही येतो. एवढ्या मोठ्या व संवेदनशील हद्दीचा कारभार अवघे २८ कर्मचारी सांभाळत आहेत. इतक्या मोठ्या हद्दीचा कारभार पाहणाऱ्या पिशोर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या निवासाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पोलिसांच्या कार्यक्षमतेवर व नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून नवीन व सुरक्षित पोलिस वसाहत उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाण्याचा कारभारही निजामकालीन वास्तूतूनच चालत आहे. संबंधित विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून संबंधित विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून नवीन पोलिस निवासाची (क्वार्टर्स) मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
अंधानेर ग्रामपंचायतीचा अन्य गावांनी आदर्श घ्यावा:आ. संजना जाधव यांचे प्रतिपादन, कुंडी वाटप
अंधानेर ग्रामपंचायतीने राज्य सरकारचा पर्यावरण पूरक गावाचा दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला. या यशस्वी वाटचालीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे आवाहन आमदार संजना जाधव यांनी केले. गावात प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंडी वाटप करण्यात आले. गावातील नऊ अंगणवाड्यांतील मुलांना बसण्यासाठी खुर्च्या देण्यात आल्या. या उपक्रमांतून आदर्श ग्रामपंचायत उभारण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमात आमदार संजना जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, अंधानेरने कोरोनानंतर पाच हजार झाडे लावली. ती झाडे जगवून ऑक्सिजन हब उभा केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवला. गावात एकी, शिस्त आणि जिद्द यांचा संगम आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अशोक दाबके यांनी केले. यावेळी उपसरपंच रिजवाना शेख, सदस्य कैलास मालकर, संदीप गायकवाड, मनोज बागले, सतीश काळे, अर्जुन करवंदे, बाळू वाघ, अहमद पठाण, कमलबाई दाबके, माधुरी करवंदे, मंगलबाई राहणे, अंकुश सोनवणे, प्रा. राजेंद्र शेवडे उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी माणिकराव पगारे यांनी केले. आभार उपसरपंच रिजवाना शेख यांनी मानले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अधिक गडद होत चालला आहे. दोन्ही पक्ष युती करण्यास तयार असले तरी ‘मोठा भाऊ कोण?’ या मुद्द्यावर एकमत होत नसल्याने निर्णय रखडलेला आहे. असे असतानाच मात्र शहरात हिंदुबहुल असलेल्या ८८ जागांवर उमेदवार द्यायचे हे निश्चित झाले आहे. एवढेच नव्हे तर ४१: ४७ असा फॉर्म्युलादेखील ठरला आहे, परंतु तो कुणी स्वीकारायचा यावर अद्याप एकमत झालेले नाही. भाजप राज्यभरात नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या जोरावर मोठ्या भावाची भूमिका घेत आहे, तर शिवसेना स्थानिक पातळीवरील वर्चस्व, आमदारांची संख्या आणि शहरावरील पकड दाखवत माघार घेण्यास नकार देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे रविवारी (२८ डिसेंबर) दुपारी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना फोन करून मंत्री अतुल सावे यांच्याशी बोलून युतीचा तिढा सोडवा असे सांगितले. मात्र अतुल सावे यांनी दिवसभरात सकाळी ११, संध्याकाळी ६ आणि रात्री ९ अशा बैठकीच्या तीन वेळा दिल्या, मात्र बैठकच घेतली नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू दोन्ही पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. आपल्या पदरी जास्तीत जास्त जागा वाढवून घेण्यासाठी नेते चर्चा करीत होते. शिवसेनेने प्रस्थापित नगरसेवक आणि आमदारांच्या मुलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा होती. दरम्यान, रात्री बारा वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर युती तुटल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या वृत्ताला कुठलाही दुजोरा दिला नाही. २०१० : शिवसेनेची सरशीच निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. शिवसेनेला सुमारे ३० जागा मिळाल्या, तर भाजपला १५ जागांवर समाधान मानावे लागले. २०१५ : भाजपचा स्ट्राइक रेट जास्त शिवसेनेला २८ जागा मिळाल्या, तर भाजपने ३३ जागा लढवून त्यातील २२ जागा जिंकल्या. याच टप्प्यावर भाजपने शहरात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. राजकीय गणित कुठे अडले? हिंदुबहुल ८८ जागा लढवण्याचे ठरले आहे. यात ४१ जागा शिवसेना तर ४७ जागा भाजपने लढवण्यास काही अंशी शिवसेना सहमत आहे. मात्र शिवसेनेने कमी जागा घ्याव्यात यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे भाजपचे लोक खासगीत सांगताना शिंदेसेना ४१ सीटांची ऑफर देत असल्याचे सांगत आहे. भाजप नगरपालिका निवडणुकांतील यश दाखवून ‘आता आम्ही मोठा भाऊ’ असल्याचा दावा करत आहे. शिवसेनेतील फूट, आमदार-खासदारांची अदलाबदल, राज्यात होणाऱ्या २९ मनपांपैकी विदर्भातील बहुतांश जागा या भाजपकडे येतील. पश्चिम महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीची स्थिती तशी चांगली आहे. त्यामुळे संभाजीनगरात मोठा भाऊ होण्याची संधी आत्ताच आहे हे भाजपला कळाले आहे. त्यामुळे ‘अभी नहीं तो कभी नहीं’ हे माहिती असल्यामुळे भाजप जेवढे ताणता येईल तेवढे ताणण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेनेसाठी मात्र मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर याशिवाय हे तीनच हक्काचे पर्याय आहेत. त्यात शहरात शिवसेनेचे दोन आमदार, एक खासदार आणि पालकमंत्री असल्यामुळे ‘आम्हीच येथे प्रमुख आहोत’ असा दावा शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे येथे कमी जागा स्वीकारणे म्हणजे संघटनात्मक आत्महत्या ठरेल, असे शिवसेना नेत्यांचे मत आहे. त्यामुळे हे गणित अधिक अवघड झाले आहे. किशोर शितोळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी खूप स्पर्धा होती. स्थानिक पातळीवर तिढा सुटत नव्हता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पॅराशूट निवड करत किशोर शितोळे यांच्याकडे ही जवाबदारी दिली. फडणवीस यांनी टाकलेली जवाबदारी सार्थ करून दाखवावी लागणार आहे. भाजपत वाढत जाणाऱ्या स्थानिक नेतृत्वाच्या स्पर्धेत सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी शितोळे यांना ही एकमेव संधी आहे. शिरसाट आणि जंजाळ यांच्यात निवडणुकी-पूर्वी वाद झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला जागा कमी आल्यास त्याचा फटका जंजाळ यांना बसू शकतो, तर जास्तीच्या जागा आल्यास जंजाळ यांचे जिल्हाप्रमुखपद आणखी मजबूत होईल. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीचे ते प्रमुख दावेदार ठरू शकतील. मात्र निवडणुकीत इच्छित जागा निवडून न आल्यास त्यांच्या राजकीय ताकदीवर परिणाम होऊ शकतो. भाजपने मोठी जबाबदारी मंत्री अतुल सावे यांच्याकडे दिली. नगरपालिका निवडणुकीतील पिछाडीनंतर मनपात यश प्राप्त करून द्यावे लागेल. भाजपने अनेकांना डावलून सावेंच्या निवडणूक व्यवस्थापनावर विश्वास व्यक्त केला. कोट्यवधींच्या गुंतवणुकीसाठी मनपाच्या चाव्या हाती ठेवाव्या लागतील. अपयश आले तर शिवसेना मोठा भाऊ राहिल्यास अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. संघटनात्मक वर्चस्वाला हादरा बसेल. नगरपालिका निवडणुकीत सिल्लोड-मध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि पैठणमध्ये खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांच्या नगरपालिका ताब्यात घेत त्यांचे नेतृत्व दाखवून दिले. आता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. पालकमंत्री झाल्यानंतर शहरावर वर्चस्व सिद्ध करावे लागेल. शिवसेना तुटल्यानंतर प्रथमच मनपा लढत असल्याने व पालकमंत्री असल्याने यश मिळवणे गरजेचे. महायुतीचा तिढा हा तिढा सुटेल की नाही याबाबत सांशकता असताना दोन्ही पक्षांनी मात्र स्वतंत्र तयारी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने सोमवारपासून आपले मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे, तर शिवसेनेने भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. युती केली नाही तर त्याचा फायदा उद्धवसेना आणि एमआयएमला होणार हे युतीतील नेत्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे ही संधी विरोधकांना द्यायची नाही. शिवाय युती तोडणारे व्हिलन अशी जनतेत प्रतिमा नको म्हणून मॅरेथॉन बैठकीचे हे सत्र सुरू असल्याची चर्चा आहे. २००५ : शिवसेना मोठा भाऊ शिवसेना-भाजप युतीने एकत्रित लढत दिली होती. त्या वेळी शिवसेनेने सुमारे २६ जागा जिंकल्या, तर भाजपला सुमारे २१ जागांवर समाधान मानावे लागले होते.
बजाजनगर भागात शाळेतून वडिलांसोबत दुचाकीवर घरी परतणाऱ्या एका ५ वर्षांच्या चिमुरडीच्या नाकाला आणि गालाला मांजाचा फास लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तन्वी सचिन वाघमारे असे या बालिकेचे नाव असून या घटनेत तिला तब्बल ६ टाके पडले आहेत. बजाजनगर (पंढरपूर) येथील रहिवासी असलेल्या तन्वीचे वडील सचिन वाघमारे हे नेत्र चिकित्सक आहेत. तन्वी स्थानिक शाळेत ज्युनियर केजीमध्ये शिकते. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सचिन हे तन्वीला शाळेतून घेऊन दुचाकीवर घरी परतत होते. तन्वी गाडीवर समोर बसलेली असताना अचानक लोंबकळणारा नायलॉन मांजा तिच्या चेहऱ्याला अडकला. काही कळण्याच्या आतच धारदार मांजाने नाकावर आणि गालावर खोल जखम केल्याने तन्वी रक्ताळली. कारवाईचा दावा फोल पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध मोहीम उघडली असली तरी बजाजनगर आणि वाळूज परिसरात अद्यापही हा जीवघेणा मांजा सर्रास विकला जात आहे. एमआयडीसी वाळूज ठाण्यात या घटनेची नोंद झाली. तातडीने शस्त्रक्रिया वाघमारे यांनी तन्वीला खासगी रुग्णालयात दाखल केले. जखम खोल असल्याने तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून ६ टाके घालण्यात आले. नायलॉन मांजाच्या या जीवघेण्या प्रकारामुळे वाघमारे कुटुंब पुरते हादरून गेले आहे.
शहरात १९८८ च्या निवडणुकीपासून ‘खान हवा की बाण?’ या घोषणेवर शिवसेनेने राजकारण केले. मात्र, २०२५ च्या महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली रणनीती पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार करणारी ही शिवसेना आता ८ ते १२ मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती नेते अंबादास दानवे यांनी दिली. यावरून आता राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून धनुष्यबाण गेल्याने खान सोबत घेण्याची वेळ आली, अशी टीका शिंदेसेनेकडून केली जात आहे. अंबादास दानवे यांनी सांगितले की, २०१० मध्ये आम्ही ५० ते ५५ जागा लढवल्या होत्या. यंदा उद्धवसेना इतिहासातील सर्वाधिक जागा लढवणार आहे. आघाडी न झाल्यास यावेळी आम्ही स्वबळावर १०१ पेक्षा अधिक जागा लढवणार आहोत. सध्या खासदार कल्याण काळे यांच्यासोबत यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान काँग्रेसबरोबर आघाडीसाठी रात्री उशिरा खासदार डॉ. कल्याण काळे आणि उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या आघाडीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिथून गद्दारी, तिथूनच ताकद दाखवणार शहरातील आमदारांनी गद्दारी केली असली तरी या निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक उमेदवार निवडून आणेल. गद्दारीचा कलंक पुसून आम्ही आमची खरी ताकद पुन्हा दाखवून देऊ.-चंद्रकांत खैरे, नेते, उद्धवसेना. जाती-धर्मांना प्रतिनिधित्व सर्वसामान्यांना तिकीट देणार आहोत. यात ८ ते १२ मुस्लिम उमेदवारांचाही समावेश असेल. युतीला आमचे हे चोख उत्तर आहे.-अंबादास दानवे, नेते, उद्धवसेना. मुस्लिम समाजाचे मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न लोकसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागातून महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले होते. छत्रपती संभाजीनगरच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मुस्लिम मतदारांचा प्रभाव लक्षणीय आहे. एमआयएमची ताकद कमी करणे आणि आपले हक्काचे मतदान वाढवणे या दुहेरी उद्देशाने उद्धवसेनेने हा पवित्रा घेतला आहे. सुरू आहे. दरम्यान काँग्रेसबरोबर आघाडीसाठी रात्री उशिरा खासदार डॉ. कल्याण काळे आणि उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या आघाडीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाण गेला, खान जवळ उबाठाचे धनुष्यबाण चिन्ह गेले आहे म्हणून आता खानला सोबत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. -किशनचंद तनवाणी, शिंदेसेना.
मनपा निवडणुकीसाठी ८ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी (२८ डिसेंबर) घेण्यात आले. या प्रशिक्षणाला तब्बल २,०१६ अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यांना नोटीस बजवावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश मनपा आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. निवडणुकीसाठी १,२६४ मतदान केंद्रे आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ४ ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाकडे ६८९ मतदान केंद्राध्यक्षांनी पाठ फिरवली, तर तब्बल १,३२७ मतदान अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला गैरहजर होते. गैरहजर राहणाऱ्या एकूण २,०१६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त, निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. असे होते प्रशिक्षण केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी, ‘सीयू’ला ‘बीयू’ जोडणे, मशीन सील करणे, मतदान प्रक्रिया आदींबाबत पॉवर पॉइंटद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण केंद्रावर १० ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या मशीनवर ईव्हीएम हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एखाद्या मतदाराने चारऐवजी एक किंवा दोन उमेदवारांनाच मत दिले व उर्वरित मते देण्यास नकार दिल्यास मतदान केंद्राध्यक्षाने उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नोटा बटण दाबून उर्वरित मते देऊन प्रक्रिया पूर्ण करावी. आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या डायरीमध्ये नकार देणाऱ्या मतदारांची नोंद घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही या वेळी देण्यात आल्या. ४ मते दिली तरच मत वैध आतापर्यंत महापालिकेच्या निवडणुका या वॉर्डनिहाय झालेल्या आहेत. एकच मत द्यावे लागत होते. यंदा मात्र प्रभागनिहाय निवडणूक होत असून एका मतदाराला ४ उमेदवारांना मतदान करावे लागेल तरच त्याचे मत वैध ठरेल. इतर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅट राहणार नाही, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. तसेच स्वत:ची बुद्धी न वापरता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे स्पष्ट निर्देश प्रशिक्षणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत ३ मते द्यावी लागत होती. तेथे काही गोंधळ उडाला नाही, असा अनुभव अधिकाऱ्यांनी सांगितला.
छत्रपती संभाजीनगरात युतीचे ठरेना:राष्ट्रवादीने 18 उमेदवार केले घोषित, महायुतीतून ‘राष्ट्रवादी’ बाहेर
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या यादीत १८ उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत स्पष्टता न झाल्याने आणि प्रतीक्षा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. भाजप, शिवसेनेसोबत महायुती झाल्यानंतर आमच्यासाठी जागा सोडल्या जातील, असा शब्द देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीच अंतिम न झाल्याने राष्ट्रवादीला स्वबळाचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी चर्चा आहे. महायुतीतील समन्वयाच्या अभावामुळे स्वबळाचा निर्णय महायुतीच्या चर्चांवर अवलंबून न राहता ‘राष्ट्रवादी’ने स्वतंत्रपणे लढल्यास शहरातील राजकीय समीकरणे बदलू शकतील. भाजप, शिवसेनेतील समन्वयाचा अभाव आणि जागावाटपाबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे वाट पाहणे टाळून राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे. पक्षाने पहिली यादी जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला असून उर्वरित जागांवर कोणती व्यूहरचना आखली जाते याकडे लक्ष आहे. स्वबळाच्या निर्णयामुळे पक्षाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना ‘न्याय’ देता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारप्रभाग उमेदवार४ डॉ. चारुता सुनील मगरे६ अजीज खान गणी खान७ तुषार रामचंद्र सुरशे८ हेमंत गोविंदराव देशमुख९ अब्बास मेहबूब शेख९ विशाल ओमप्रकाश इंगळे९ फरीन अकबर पठाण१६ डॉ. मधुर मोहनराव सोनवणे१६ वैशाली अनिल निलावार१६ मोहंमद इसा मोहंमद कुरेशी१७ उल्हास वसंतराव नरवडे२१ अंकिता अनिल विधाते२२ ज्योती राजाराम मोरे२२ सदानंद धोंडीबा साळुंखे२२ विशाल बाबासाहेब पुंड२३ दत्तात्रेय सुंदरराव भांगे२६ फिरोज पटेल२८ पल्लवी उत्कर्ष पल्हाळ
प्रभाग क्रमांक नऊमध्ये महापालिकेचे आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची धावपळ उडते. नागरिकांना थेट मिनी घाटी रुग्णालय गाठावे लागते किंवा खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. परिणामी गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे या भागात एका शासकीय रुग्णालयाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. नारेगाव, उत्तरनगरी, मिसारवाडीच्या काही भागात जलवाहिनीच नसल्याने पाण्याचा प्रश्न भीषण आहे. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. गरजेच्या वेळी टँकर मिळेलच याची खात्री नसते. जलवाहिनी असलेल्या भागांत नळांना ८ ते १० दिवसांनंतर पाणी येते. जलवाहिनी नसलेल्या भागात पाण्यासाठी वणवण, तर जलवाहिनी असलेल्या भागात पाण्याची प्रतीक्षा करावी लागते, प्रभागात नवीन जलकुंभाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नव्या जलवाहिनीचेही काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना पाणी मिळेल, अशी आशा आहे. पथदिवे नाहीत. घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे कचरा पडून राहतो. त्याची दुर्गंधी सुटते आहे. क्र. ९ मिसारवाडी, आरतीनगर, नारेगाव, चिकलठाणा २०१५ : नगरसेवक, पक्ष, मतदानवॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान३३ शबनम बेगम, काँग्रेस १२०४३४ संगीता वाघुले, एमआयएम ८९३३६ सुरेखा सानप, अपक्ष १६८३३८ राजू शिंदे,भाजप २७४२प्रभाग आरक्षण : अ-एससी, ब- ओबीसी महिलाक- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण ९० कोटींची कामे प्रभाग क्रमांक ९ मध्ये रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. तरीही काही ठिकाणी रस्ते नाहीत. या भागातील मिसारवाडी, आरतीनगर, नारेगाव, चिकलठाणामध्ये ९० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. नारेगावमध्ये छोटे-मोठे ३० पेक्षा जास्त रस्त्यांची कामे केली आहेत. 1. कचरा संकलन : घंटागाडीनियमित नाही, नागरिक त्रस्तघंटागाडीचा प्रश्न मोठा आहे. मिसारवाडी, आरतीनगर भागात घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे स्वत: कचरा नेऊन टाकावा लागतो. परिणामी नागरिक त्रस्त आहेत. 2. पाणीपुरवठा : जलवाहिनीचनसल्याने कायम पाणीटंचाईकाही भागात पाण्याची नेहमी टंचाई असते. अनेक ठिकाणी जलवाहिनी नाही. तेथे जलवाहिनी व जलकुंभाचे काम सुरू आहे. भविष्यात पाणी मिळेल, अशी आशा आहे. 3. रस्ते : पाऊस पडल्यानंतरवाहने चालवणेही कठीणचिकलठाणा भागात रस्ते गुळगुळीत आहेत, परंतु त्यांना भेगा पडल्या आहेत. इतर भागात रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून वाहने नेता येत नाहीत.
25 वर्षांनंतर मुंबई मनपात काँग्रेस-वंचित यांच्यात युती:महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान
मुंबईत तब्बल २५ वर्षांनंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. दलित आणि मुस्लिम मतांचे समीकरण जुळवत या नव्या आघाडीने भाजप-शिंदेसेनेची महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. मुंबई मनपाच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे, तर उर्वरित जागांवर काँग्रेस लढणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर २८ महापालिकांमध्येही अशाच प्रकारची युती करण्याचे संकेत सपकाळ यांनी दिले. मतांचे विभाजन रोखणार मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाल्याने त्यांचा फोकस मराठी मतांकडे असणार आहे. मुंबईत मुस्लिम मते २० ते २२ टक्के तर दलित मते ८ ते १० टक्के आहेत. त्यामुळे दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतांची एकजूट साधण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला वंचितच्या साथीने आपली गमावलेली ताकद पुन्हा मिळवण्याची संधी आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी टीका केली. अशोक चव्हाण यांना हिरवा भाजप करायचा आहे. त्यांचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. एवढे दिवस सत्तेत राहूनही उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका आहे, असे चिखलीकर म्हणाले. काँग्रेसचे माजी नगरसेवक एमआयएममध्ये पाठवण्यामागेही अशोक चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या माजी महापौर शीला भवरे आणि त्यांच्या पती किशोर भवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक मुस्लिम कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले. चिखलीकरांच्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, एमआयएमशी माझा काहीही संबंध नाही. तुमच्यात ताकद असेल तर उमेदवार थांबवून दाखवा, असे आव्हान त्यांनी चिखलीकर यांना दिले. वंचितसोबत चर्चा : खा. चव्हाण काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनीही अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक एमआयएममध्ये पाठवण्यामागे अशोक चव्हाण कारणीभूत आहेत. ते पक्षात असो वा नसो, काँग्रेसवर त्याचा परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. वंचितसोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर मधील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गेलं असता नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचला. दिव्य मराठीने सुरु केलेल्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शो ला संभाजीनगरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागात अनेक समस्या आहेत. ज्यावर नागरिक अतिशय कळकळीने बोलताना दिसून येत आहेत. प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या काय समस्या आहेत. जाणून घ्या या रिपोर्टमधून ... शहरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गुन्हेगारी इतकी पराकोटीला गेली आहे की, नागरिकांनी समस्या सांगताना हात जोडून विनंती केली. प्रभागातील काही भाग हा गुन्हेगारीने व्यापला आहे. नशा करणारे तरुण, मारामारी, ड्रेनेज लाईन आणि पाणी यासारख्या मुद्द्यांना येथील नागरिकांनी हात घातला. गुन्हेगारी ही मुख्य समस्या प्रभागातील रहिवासी महेंद्र मगरे यांनी सांगितले की, 'आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढती गुन्हेगारी आणि नशाखोरी आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून या भागात राहतो. इथे ड्रग्स आणि बटन गोळ्या सर्रासपणे विकल्या जातात. त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास जास्त होतो. आम्ही तक्रार केली तर त्यांच्याकडे राजकीय पाठिंबा असतो आणि ते लगेच बाहेर निघून येतात. त्यामुळे तक्रार करूनसुद्धा काही फायदा नाहीये. एवढंच नाही तर ही पोर पोलिसांना देखील पैसे देतात आणि निघून येतात. कोणी विरोधात बोललं तर गाड्या फोडणं आणि मारामारी करणं असे प्रकार घडतात. त्यामुळे संपूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.' प्रभाग २५ म्हणजे ड्रग्स स्मग्लरचा अड्डा... प्रभागातील विठ्ठलनगर मधील नागरिकांशी संवाद साधला असता समजले की, घराच्या पाठीमागे असलेली मोकळी जागा ही ड्रग्स स्मग्लरचा अड्डा आहे. या भागात राहणाऱ्या महिला म्हणाल्या की, 'आम्हाला आमच्याच घरातून बाहेर निघता येत नाही. घराच्या पाठीमागे खूप मोठी जागा आहे पण ती जागा काहीच कामाची नाहीये. एकतर ड्रेनेज लाईन फुटलेली आहे आणि दुसरीकडे नशा करणारे पोरं पोरी येतात. त्यांनी इथे त्यांचा अड्डाच तयार केला होता. आम्ही तक्रार केली तर आम्हाला म्हंटल जात होत की, तुम्हाला काय एकट्यालाच त्रास होतो का? म्हणजे आमच्या समस्येकडे कोणी बघायला सुद्धा तयार नाही. वारंवार तक्रार केल्यानंतर अतुल घडामोडे आले आणि त्यांनी जेसीपीने सगळी झाड तोडली. त्यानंतर फक्त ८ दिवस सगळं चांगल चाललं मात्र त्यानंतर पुन्हा ही पोर येऊन इथे बसायला लागली आहेत. आम्हाला इथे एक कंपाऊंड वॉल तयार करून द्यावी म्हणजे आम्ही आणि आमचे मुलं सुरक्षित राहू.' महिलांनी पुढे सांगितले की आम्ही त्यांना अनेकदा हाकलण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यांच्याकडे हत्यार असतात त्यामुळे भीती वाटते. एकतर नशा केलेली असते आणि त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नाही. रात्री ३ -४ वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू असतात. प्रभागातील वाढती गुन्हेगारी ही खूप गंभीर विषय बनत चालला आहे. त्यामुळे या समस्येला कुठेतरी आळा घालणे गरजेचे असल्याचं येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. महिन्यातुन दोनदा पाणी पुरवठा होतो प्रभागात राहणारे सुरेश जाधव म्हणतात की, 'आमच्याकडे १५ दिवसातून एकदा पाणी येत म्हणजे महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येकाकडे पाण्याचा साठा असेलच असं नाही ना. कोणाकडे १००० आहे तर कोणाकडे ५०० लिटरची टाकी असते आणि आम्ही प्रत्येक दिवसाला टँकर बोलावू शकत नाही. म्हणजे आमचेच पैसे घेऊन आम्हालाच पाणी द्यायचं नाही हे चुकीचं आहे. अनेकदा तक्रार केली तर नुसतं कागद घेतात आणि लिहितात. पण अजूनही त्यावर काही कारवाई नाही. तीन दिवसाला पाणी देऊ अशी नुसती घोषणा केली होती. तीन दिवसाला नाही पण कमीत कमी ८ दिवसाला तरी पाणी द्या...' अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक २५ मध्ये रामनगर भागशः, प्रकाश नगर, तानाजी नगर, संघर्ष नगर, श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी, सदाशिव नगर, तोरणागड कॉलनी, शाहु नगर, कामगार कॉलनी, पुष्पक गार्डन, जय भारत कॉलनी, चिकलठाणा गाव, चिकलठाणा भागशः बौद्धवाडा, मोतिवाला नगर, हनुमान नगर चौक, पायलट बाबा नगरी यांचा समावेश आहे. या भागाची एकूण लोकसंख्या 39847 एवढी आहे.
वर्ग-२ ची इनामी जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांची मान्यता आवश्यक असते. महाराष्ट्र शासनानेच असे नियम केले आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगरात वरील पैकी एकाही अधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय गंगापूर तालुक्यातील ३१ एकर जमीन अवघ्या २ कोटीत विकली आहे. ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही जमिनीची ऑनलाइन रजिस्ट्री करणे आवश्यक असते. पण दुय्यम निबंधकांनी निवृत्त तलाठी तथा जमिनीचे खरेदीदारांना चक्क ऑफलाइन रजिस्ट्री करून दिली आहे. शिवाय कोर्टाने दिलेले वारसाहक्क प्रमाणपत्रही खरेदी-विक्रीच्या वेळी जोडले नाही. गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा येथील गट क्रमांक २१४ मधील ३१ एकर १९ गुंठे जमिनीचा हा व्यवहार आहे. अब्दुल गनी फाजल खान यांनी निवृत्त तलाठी अनिल ठोंबरे आणि मयूर टेटवार यांना ही जमीन १७ नोव्हेंबर २०२५ रोजी २.३ कोटीत विकली आहे. गंगापूरच्या दुय्यम निबंधकाने रजिस्ट्री करून दिली. ‘दिव्य मराठी’च्या हाती या व्यवहाराचे लागले दस्तऐवज लागले आहेत. ...तर रजिस्ट्री रद्द करू सातबाऱ्यावर स्पष्ट उल्लेख असताना पूर्वपरवानगीशिवाय वर्ग-२ ची जमीन विकण्यात आली. ऑफलाइन रजिस्ट्रीसाठीही परवानगी नाही घेतली. संबंधित दुय्यम निबंधकावर नियमानुसार कार्यवाही करू. रजिस्ट्री रद्द करू. -विवेक गांगुर्डे, सह निबंधक वर्ग-१, छत्रपती संभाजीनगर 1 अधिकाऱ्याची परवानगी नाही जमीन हैदराबाद इनामे व रोख अनुदान अधिनियम, १९५४ अंतर्गत ‘मदतमाश’ची आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदीचा सातबाऱ्यावर उल्लेख आहे. दिवाणी न्यायालयात खटला असल्याचीही नोंद आहे. तरीही परवानगी न घेता जमीन विकली आहे. 2 ई-म्युटेशनला दिली बगल वर्ग-२ च्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवेळी ऑनलाइन फेरफार म्हणजेच ई-म्युटेशन गरजेचे असते. पण असे केले तर सक्षम अधिकाऱ्यांना ओटीपी जाऊन व्यवहार ब्लॉक होण्याची शक्यता असते. म्हणून ते स्कीप करून या प्रकरणात ई-म्युटेशनला सपशेल बगल देण्यात आली आहे. 3 वारसाहक्क प्रमाणपत्र नव्हते अब्दुल गनी फाजलखान यांचे भाऊ, बहिणी, पाच मुले आणि दोन मुली असे एकूण २४ वारसदारांची व्यवहाराला संमती दाखवली आहे. पण व्यवहार करताना न्यायालयाने दिलेले वारसाहक्क प्रमाणपत्र आवश्यक असते. पण असे प्रमाणपत्र न काढताच कुटुंबीयांची संमती दाखवली. 4 गॅझेटचा काढला सोयीप्रमाणे अर्थ गंगापूरचे दुय्यम निबंधक, खरेदीदार तथा निवृत्त तलाठी अनिल ठोंबरेंनी १७ ऑगस्ट २०१५ च्या गॅझेटचा संदर्भ दिलाय. वर्ग-२ च्या जमिनीसाठी पूर्वपरवानगीची गरज नाही असा गॅझेटमध्ये उल्लेख आहे. प्रत्यक्षात गॅझेट हस्तांतरणास परवानगी नाकारते. नंतर नियमितीकरण आवश्यक आहे. संभाजीनगरात डीडीआरने केला ऑफलाइन रजिस्ट्रीतून घोटाळा परवानगी न घेता इनामी जमीन विक्री-खरेदी करता येत नाही असा स्पष्ट उल्लेख ३१ एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर आहे. गंगापूरच्या दुय्यम निबंधकाने तरीही रजिस्ट्री करून दिली. ‘दिव्य मराठी’कडे रजिस्ट्री, सातबारा आदी कागदपत्रे आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाढती गुन्हेगारी, पाणीटंचाई आणि मोकळ्या मैदानावर सुरू असलेली नशेखोरी या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.दिव्य मराठी ॲपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या व्यासपीठावर उमेदवारांच्या भूमिकांवर सवाल होत असून शहराच्या विकासासाठी नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न थेट जनतेकडून उपस्थित केला जात आहे. काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले असून, मैदानात सुरू असलेल्या नशेखोरीला सत्ताधारीच पाठबळ देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आम्ही हिंदुत्ववादी असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरएसएसपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावर भाजपचे नेते भगवान घडामोडे यांनी प्रत्युत्तर देत, आमच्यामुळे काँग्रेसच्या लोकांना हिंदुत्वासाठी काम करावे लागत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असा टोला लगावला. दरम्यान, सत्ताधारी पक्षावर मैदानाचा वापर ‘टुकार मुले घडवण्याचा कारखाना’ म्हणून केल्याचा आरोप काँग्रेसच्या राहुल सावंत यांच्याकडून करण्यात आला. यावर सत्ताधारी पक्षाचे मनोज गांगवे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर पलटवार केला. काँग्रेसचे लोक जर मुलांबाबत अशा प्रकारची विधाने करत असतील, तर त्यांनी ती तात्काळ मागे घ्यावीत, असे ते म्हणाले. तसेच या मैदानावर खेळत अनेक मुलांनी पुढे जाऊन चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळवल्याचेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस अ्न भाजपमध्ये वाद काँग्रेसच्या राहुल सावंत म्हणाले की, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही आरएसएसपेक्षा एक पाऊल पुढे आहोत असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हणताच भाजपचे नेते भगवान घडामोडे म्हणाले आमच्यामुळे काँग्रेसच्या लोकांना हिंदुत्वासाठी काम करावे लागत असल्याचा अभिमान आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मैदानाचा वापर करत टुकार मुले घडवण्याचा कारखाना म्हणून केल्याचा म्हणतात सत्ताधारी पक्षाचे मनोज गांगवे म्हणाले की, काँग्रेसचे लोकं जर मुलांबद्दल असे बोलत असतील तर त्यांनी ते शब्द मागे घेतले पाहिजे. त्या मैदानावर खेळत अनेक मुलांनी चांगल्या ठिकाणी नौकरी मिळवली आहे. पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवणार भाजपच्या पदाधिकारी उषा कदम म्हणाल्या की, आमच्या प्रभागात महिला सुरक्षेचा प्रश्न आहेच. महिलांना होणाऱ्या त्रासासाठी आम्ही कायम आवाज उठवला आहे. पाण्याचा जो प्रश्न आहे तो अवघ्या दोन महिन्यात सोडवली जाणार आहे. आमच्यामुळे काँग्रेसचे लोकं हिंदुत्ववादी झाले माजी महापौर आणि भाजपचे नेते भगवान घडामोडे म्हणाले की, एक ते दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. मागच्या काळातील मुख्यमंत्र्यांनी पाइपलाइनचे काम थांबवल्याने आजपर्यंत जनतेला पाणी यायला वेळ लागला. महिला सुरक्षेसाठी आमची टीम काम करत असते. आमच्याकडे असलेली युवकांची फळी महिला सुरक्षेसाठी काम करत असते. आमच्यामुळे काँग्रेसचे लोकं हिंदुत्वासाठी काम करत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रभागातील गुंडे कुणाशी निगडीत आहेत याचा विचार केला पाहिजे. प्रभागात महिला सुरक्षित नाही ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार वैशाली कोरडे म्हणाल्या की, आमच्या प्रभागात नशेखोरीचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी कधीच वेळेवचर येत नाही. आमच्याकडे 15 दिवसांनंतर पाणी येते त्यामुळे आम्हाला सर्व काही कामे सोडून पाण्याची वाट पाहावी लागते. आम्ही बाहेर पडल्यानंतर घरी परतेपर्यंत आमच्यासह घरच्यांना आम्ही सुरक्षित आहोत की नाही ही काळजी वाटते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही RSS पेक्षा एक पाऊल पुढे काँग्रेसचे पदाधिकारी राहुल सावंत म्हणाले की, आमच्या विभागाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा महिला सुरक्षेचा आहे. आमच्याकडे ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनीच व्यसन करणाऱ्या मुलांना शिदोरी देण्याचे काम केले आहे. सत्ताधाऱ्यांना बदलले तरच ही परिस्थिती बदलेल. आम्ही पोलिस चौकी आणायसाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही हिंदुत्व म्हणून कुठेही आरएसएस पेक्षा मागे राहिलेलो नाही. आम्ही सप्ताहाचे आयोजन करत आहोत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरएसएसपेक्षा आम्ही एक पाऊल पुढे आहोत. RSS च्या गतीने आम्हीही काम करत आहोत. भाजपच्या लोकांना वॉर्डात काय कामे केली हे माहिती नाही, ते बाहेर राहायला गेले आहेत. याच्याकडे सर्व पदे असताना यांनी कामे केली नाहीत. सर्व प्रश्नांवर मशाल हाच पर्याय ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष लिंबेकर म्हणाले की, मशाल या चिन्हावर जर मतदान केले तर महिला असुरक्षित राहणार नाहीत. आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी काम करत राहू. तर ठाकरे गटाचे विभागप्रमुख म्हणाले की आमच्या परिसरात वेळेवर पाणी येत नाही आमची सत्ता आली की पाणी वेळेवर यावे यासाठी आम्ही प्रयत्न करु. उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनात पाण्याची योजना आली होती पण काही लोकांनी राजकारण केल्याने ही योजना थांबली असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. आमच्या नगरसेवकांनी विकास केला आहे, पण ते भाजपमध्ये गेल्याने आता आमच्याकडे सांगायला मुद्दाच राहिला नाही. महिलांना होणारा त्रास थांबवणे गरजेचे माजी नगरसेवक मनोज गांगवे म्हणाले की, आमच्या परिसरातील महिलांना जो त्रास होत आहे तो आमच्या प्रभागातील तरुणांकडून होत नाही. बाहेरील नशेखोरांमुळे आमच्या माता-बहिणींना त्रास होत आहे. 12 ते 17 वर्षांपर्यंतचे मुले ही नशेखोरी करतात. आम्ही त्यांच्या पालकांना याबद्दल बोललो तर ते आमच्यासोबत भांडतात. हा महिलांना होणारा त्रास थांबवणे गरजेचे आहे. मी प्रभागाच्या विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कामे करुण घ्यायची असेल तर विकासासोबत आपल्याला रहावे लागेल. नागरिकांची गुंठेवारी घेतली जात नाही काँग्रेसचे चंद्रमुनी काळे म्हणाले की, प्रकाशनगरमध्ये नागरिकांची गुंठेवारी घेतली जात नाही. गट नंबर 16 मधील मते चालतात पण त्यांच्यासाठी काम करावे वाटत नाही. तिथल्या लोकांना काहीच सुविधा नाही. तिथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचा वेळ ठरलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री राजपूत म्हणाल्या की, आमच्या प्रभागात पाण्याची वेळ ठरलेली नाही. कधी-कधी अर्ध्या रात्री पाणी येते. परिसरातील कोणीही पाणी, गटार या मुद्यावर बोलत नाही. ड्रेनेज लाइनचा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकसंख्या वाढलेली आहे पण ड्रेनेजलाईन बदललेली नाही. अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. प्रभागात काही ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहेत. महिलांना सक्षम करणार ठाकरे गटाच्या पदाधिकारी माधुरी काळे म्हणाल्या की, आमच्या प्रभागात महिलेंची सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. महिला नोकरीवरुन घरी येताना आंधार पडल्यानंतर त्यांना असुरक्षित वाटते. केवळ कॅमेरे लावत हा प्रश्न सुटणार नाही. मुंगळ सूत्र चोरी होती त्याकडे कुणाचे लक्ष नाही असा आरोप त्यांनी केला आहे. तर महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रभागात या आहेत समस्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्र 25 मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात समस्या आहे ती वाढती गुन्हेगारी, ओपन स्पेसमध्ये बसणाऱ्या नशेखोरांचा आणि महिन्यातून दोन ते 3 वेळेस येणाऱ्या पाण्याची समस्या या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे दिसून येते. नवीन वसाहत निर्माण झाली त्यावेळी तिथे कोणतेही नवे मैदान देण्यात आलेले नाही. मैदानावर ड्रेनेजचे पाणी साचलेले असते. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक 25 मध्ये रामनगर भागशः, प्रकाश नगर, तानाजी नगर, संघर्ष नगर, श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी, सदाशिव नगर, तोरणागड कॉलनी, शाहु नगर, कामगार कॉलनी, पुष्पक गार्डन, जय भारत कॉलनी, चिकलठाणा गाव, चिकलठाणा भागशः बौद्धवाडा, मोतिवाला नगर, हनुमान नगर चौक, पायलट बाबा नगरी यांचा समावेश आहे. या भागाची एकूण लोकसंख्या 39847 एवढी आहे.
१०७ हुतात्म्यांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ‘हे दोन गुजराती’ गिळायला निघालेत, असा गंभीर आरोप शिवसेनाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट झालो तरी चालेल, पण तुम्ही तुमची निष्ठा विकून नका, असे आवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मुंबई आणि मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही ज्यांना मोठे केले आज तेच आमच्यावर वार करत आहेत. इतकी वर्ष लढलो, मुंबई कोणीही आमच्यापासून हिसकावू शकला नाही. २ गुजराती आपल्याला गिळायला निघालेले आहेत. अशावेळी जर आपण ‘तुझे-माझे’ करण्यात वेळ घालवला, तर ही मुंबई त्यांना आंदण दिल्यासारखी होईल. मला तुमच्यापैकी एकही माणूस फुटलेला चालणार नाही. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका, असे आवाहन करत ठाकरेंनी शिवसैनिकांना भगव्याची शपथ दिली. शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे मुंबईचा घास घेणे. हे पाप आपल्या हातून घडता कामा नये. धनुष्यबाण चोरला तरी आमचा बाणा चोरता येणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी प्रादेशिक अस्मितेचा हुकमी एक्का बाहेर काढला उद्धव ठाकरेंची ही आक्रमकता केवळ संताप नसून मुंबईवरील पकड कायम ठेवण्यासाठीची रणनीती आहे. आगामी निवडणुकांमध्ये ‘मराठी माणूस विरुद्ध भाजप’ असा टोकाचा संघर्ष उभा करून शिवसैनिकांमधील मरगळ झटकणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. ‘दोन गुजराती’ असा थेट उल्लेख करून त्यांनी प्रादेशिक अस्मितेचा जुना हुकमी एक्का बाहेर काढला आहे. ही भावनिक साद मतदारांना भावली तर मुंबईत भाजपची वाट बिकट होईल; मात्र अंतर्गत फूट न थांबल्यास शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
महाराष्ट्र अमली पदार्थ प्रतिबंधक कृती दलाने (एएनटीएफ) आंतरराज्य अमली पदार्थ निर्मिती व वितरणाचे जाळे उद्ध्वस्त करत बेंगळुरूमधील मेफेड्रोनच्या तीन कारखान्यांवर कारवाई केली. यात ५५.८८ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. छाप्यांमध्ये घन व द्रव स्वरूपातील एकूण २१.४ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या अमली पदार्थांविरोधातील मोहिमेचा भाग असलेली ही कारवाई गेल्या आठवड्यात पुणे–मुंबई महामार्गावर एका व्यक्तीच्या अटकेपासून सुरू झाली. एएनटीएफच्या कोकण युनिटने २१ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी गावाजवळ पुणे–मुंबई महामार्गावर आरोपी अब्दुल कादर राशिद शेख याच्याकडून १.४८ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केले. तपासादरम्यान बेळगाव येथील रहिवासी प्रशांत यल्लप्पा पाटील याचा ड्रग्ज निर्मितीत सहभाग असल्याचे उघड झाले. तसेच बंगळुरूमध्ये तीन कारखाने सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एएनटीएफ पथकाने याच आठवड्यात कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे अवैध कारखाने चालवणारे राजस्थानचे रहिवासी सूरज रमेश यादव आणि मलकान रामलाल बिश्नोई यांना अटक केली, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी २ मुख्य संशयितांचा शोध सुरू आहे. वर्षभरात १०० किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त २०२५ मध्ये मुंबईतील डोंबिवली, नालासोपारा, वाशी तसेच सातारासह महाराष्ट्रात अातापर्यंत सुमारे १०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आणि त्यांचे बाजारमूल्य सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांदरम्यान असल्याचे अहवालांतून दिसून येते.
शरद पवारांना मी तीन दशकांपासून ओळखतो. ते माझे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी बारामतीतील एका कार्यक्रमात केले. या वेळी शरद पवारांनीही अदानींचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. तर गौतमभाई माझे मोठे बंधू असल्याचे भावुक वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. राजकारण विसरून या दिग्गजांनी एकमेकांबाबतचा व्यक्त केलेला जिव्हाळा चर्चेचा विषय ठरला आहे. बारामती येथे ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) चे अदानी, त्यांची पत्नी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या वेळी बोलताना अदानींनी शरद पवारांचा उल्लेख आपले मार्गदर्शक असा केला. ‘या ज्येष्ठ नेत्याने जमिनीवरील वास्तव आणि राष्ट्रीय अजेंडा यांचा उत्तम मेळ घातला आहे. पवार साहेबांना मी तीन दशकांहून अधिक काळापासून ओळखतो, हे माझे भाग्य आहे. त्यांच्याकडून मला जे शिकायला मिळाले, त्याला तोड नाही. त्यांच्याकडील ज्ञान आणि शहाणपण मनावर खोल ठसा उमटवते. शरद पवारांनीही अदानींचा जीवन प्रवास मोठी स्वप्ने पाहणाऱ्या कष्टाळू तरुणांसाठीअत्यंत प्रेरणादायी आहे, असे म्हटले. तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमचे अदानी कुटुंबाशी ३० वर्षांपासूनचे संबंध आहेत. मला काही चांगली किंवा वाईट बातमी द्यायची असेल, तर मी एक बहीण म्हणून गौतमभाईंना स्पष्टपणे सांगते. ते माझे मोठे भाऊ आहेत. नातेसंबंधांमधील हा जिव्हाळा जीडीपीच्या आकड्यांमध्ये मोजता येत नाही.‘ कार्यक्रमात काका-पुतण्यासह संपूर्ण पवार कुटुंबिय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अदानींचे स्वागत केले. अदानींना घेऊन येणाऱ्या वाहन आमदार रोहित पवार यांनी चालवले. तर अजित पवारही चालकाशेजारील सीटवर बसले होते. कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनीही यावेळी हजेरी लावली होती. मनपा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान काका-पुतणे एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यामुळेही गेली काही दिवसांपासून राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अदानी यांच्याकडून एआय सेंटरसाठी २५ कोटी निधी पवार कुटुंबीयांच्या अधिपत्याखालील ‘विद्या प्रतिष्ठान’ या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत हे केंद्र उभारण्यात आले आहे. अदानी समूहाने या केंद्रासाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कृषी, आरोग्यसेवा, प्रशासन आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून प्रगत एआय संशोधन आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
राज्यातील २९ मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असतानाही काही मनपासाठी महायुतीतील फाटाफुट चव्हाट्यावर आले तर काही ठिकाणी जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच सोलापुरात सोलापुरात जागावाटपाची चर्चा ऐनवेळी थांबवून एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला बाजुला सारून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्येही या दोन्ही पक्षांच्या भूमिकेमुळे महायुतीची शक्यता धूसर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, मीरा भाईंदरमध्येही शिंदे गट-भाजप युतीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून हा तिढा निर्णायक वळणावर आलेला आहे. अजित गटाने पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षासोबत युती जाहीर केली. त्यांचा पक्ष मुंबई व पुण्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्येही स्वबळावर लढत आहे. संभाजीनगरमध्ये शिंदेगट व भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरूच आहे. संबधित. दिव्य सिटी सोलापुरात शिंदे गट-अजित गटाचे जागावाटपही ठरले... सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेत भाजपला धक्का दिला. शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. दोन्ही पक्षांचा ५१-५१ जागावाटपाचा फॉर्म्युलाही त्यांनी जाहीर केला. नाशिक : शिवसेना-राष्ट्रवादी युती शक्य नाशिकमध्ये भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची स्वतंत्र युती निश्चित मानली जात आहे. रविवारी रात्री शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. शिवसेनेने भाजपकडे ४५ जागा जिंकण्यासारख्या असल्याने त्यांची मागणी केली. त्यावर भाजपकडून केवळ ३० जागांच देण्याची तयारी केल्याने नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने २५ जागांची मागणी केलेली असताना केवळ ५ जागा देण्याची तयारी दर्शवल्याने त्यांनीही काढता पाय घेतला आहे. मुंबई : भाजप-शिंदे गट २० जागांचा तिढा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीमध्ये एकूण २२७ जागांपैकी २०७ जागांवर एकमत झाले आहे. यामध्ये भाजपने १२८ जागा स्वतःच्या वाट्याला ठेवल्या, तर शिंदे गटाला ७९ जागा देऊ केल्या. उर्वरित २० जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या आघाडीपुढे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किमान ८७ जागा मिळाव्यात म्हणून शिंदे गट सुरुवातीपासून आग्रही आहे. महायुतीतील पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी येथे स्वबळावर लढत भाजप युतीला आव्हान देत आहे. ठाणे, वसई-विरारमध्ये युती, पण मीरा-भाईंदरमध्ये पेच... ठाणे आणि वसई-विरारमध्ये महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्याच वेळी मीरा-भाईंदरमध्ये मात्र शिंदे गट आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी युतीसाठी भाजपला ‘२४ तासांचा अल्टिमेटम’ देत निर्णय न झाल्यास आमचा पक्ष सर्व ९५ जागा स्वतंत्र लढायला तयार असल्याचे म्हटले आहे. नगरपालिका व पंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे महापालिकेतील जागावाटपातही भाजपने आपला दबादबा सुरुवातीपासून ठेवला. तिथे जागावाटप झाले तिथेही पूर्ण जागांचे गणित अद्याप स्पष्ट नाही. कारण काही जागांवर आपलाच उमेदवार निवडणूक आणण्याचा विश्वास किंवा जास्त जागा जिंकत महापालिकेतील बहुमताजवळचा आकडा मिळवण्याचा पवित्रा भाजपने घेतल्याचे एकूण परिस्थितीवरून स्पष्ट होते.
शेती तोटा होत असतानाही हार न मानता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळ्याच्या शेतकऱ्याने चांगलीच शक्कल लढवली. आधी बाजारपेठेचा अभ्यास केला आणि नंतर वडिलोपार्जित ७ एकर शेतीवर एकच पीक घेण्याऐवजी सात वेगवेगळी पिके घेतली. याचा फायदा असा झाला की, आधी तोट्यातील शेती नफ्यात गेली आहे. एखाद्या पिकाला हंगामात कमी भाव मिळाला तर दुसऱ्या पिकाला चांगला भाव मिळतो व तोट्यातील पिकाची भरपाई दुसऱ्या पिकाच्या नफ्यातून होते. वर्षाकाठी विविध पिकातून त्यांना ३ ते ४ लाखांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. केऱ्हाळ्यातील शेतकरी राजू अजबसिंग बारवाल यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून तोट्यातील शेतीतून फायदा मिळवला. विशेष म्हणजे ही सर्व पिके त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीवर घेतली असून पाणी, खत व खर्चाचे योग्य नियोजन केले आहे. राजू बारवाल यांनी त्यांच्या ७ एकर शेतीत गहू, मका, कपाशी, तूर, कांदा, सीड्स, डॉलर हरभरा, आले, कोथिंबीर यासह एक एकरात फळबाग विकसित केली आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत त्यांनी पीकनिहाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुरू केला आहे. पिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राजू यांनी अजित-१०८ या सुधारित गव्हाच्या वाणाची निवड केली आहे. गेल्या चार वर्षांपासून टोकन यंत्राद्वारे गव्हाची पेरणी करून उत्पादन खर्चात बचत करत आहेत. त्यांनी केवळ २० गुंठ्यात ७ किलो बियाणे पेरून तब्बल १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले आहे. बारवाल यांच्या यशाची पंचसूत्री' राजू बारवाल यांच्या शेतीसाठी पंचसूत्री यशस्वी ठरली. यात त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता ७ प्रकारची पिके घेतली. दुसरे म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब मोजून वापरल्याने पिकांची जोमदार वाढ झाली. टोकन यंत्रामुळे पेरणीसाठी आधुनिक यंत्राचा वापर केल्याने बियाणे आणि मजुरी खर्चात बचत झाली. योग्य खत व्यवस्थापन झाल्याने विद्राव्य खतांचा वापर थेट मुळाशी केल्याने उत्पादनात वाढ झाली. सर्वात शेवटी म्हणजे कोणत्या पिकाला कधी चांगला भाव मिळेल, याचे आगाऊ नियोजन केल्याने त्यांना यश मिळाले. विविध पिकांचे खर्च उत्पन्नाचे गणित राजू यांनी शेतात कांदा लावला. यात त्यांना ३० हजार बियाणांवर व मजुरीसाठी २० हजार खर्च झाला. तर उत्पन्न २ लाख झाले. खर्च वजा जाता दीड लाखांचा निव्वळ नफा झाला. २० गुंठे अद्रकमधूनही त्यांना १ लाखांचा निव्वळ नफा झाला. असेच गहू, कोथिंबिर, हरभरा, मकापासूनही उत्पन्न मिळत आहे. सरासरी ३ ते ४ लाखांपर्यंत राजू यांना नफा मिळत आहे. या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती....9923738657
न्यूमोनिया, ‘यूटीआय’सारख्या आजारांमध्ये औषधे ठरतायेत कमकुवत
नवी दिल्ली : आयसीएमआरने नुकत्याच एका अहवालात सांगितले की, न्यूमोनिया आणि यूटीआयसारख्या आजारांमध्ये औषधे कमकुवत ठरत असल्याची माहिती पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी २०२५ वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’ मधून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या १२९ व्या भागात २०२५ मध्ये देशाच्या उपलब्धींवर चर्चा केली. २०२५ च्या शेवटच्या भागात नवीन वर्ष २०२६ च्या आव्हाने, […] The post न्यूमोनिया, ‘यूटीआय’सारख्या आजारांमध्ये औषधे ठरतायेत कमकुवत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ४८ तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घोडे अडलेलच आहे. महायुतीमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बोलणी सुरु […] The post युती-आघाडीचा ‘घोळात घोळ’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी
लातूर : प्रतिनिधी रविवार दि. २८ डिसेंबर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. २८ डिसेंबर रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या समजून […] The post काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तब्बल ५६ कोटींचे ड्रग्ज बंगळुरातून जप्त
पुणे : महाराष्ट्राच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाने बंगळूरू येथे कारवाई करीत तब्बल ५५ कोटी ८८ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. तसेच या अमली पदार्थाचे तीन कारखानेही नष्ट केले आहेत. या कारखान्यांतील ड्रग्ज देशातील अनेक शहरांत वितरित केले जात होते. त्यातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात शहरात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. आतापर्यंत […] The post तब्बल ५६ कोटींचे ड्रग्ज बंगळुरातून जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शीतलहरी दक्षिणेकडे सरकतायेत; राज्यात पुन्हा थंडीचा कडाका
पुणे/मुंबई : प्रतिनिधी नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्यभरातच थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: पहाटे आणि रात्रीच्या सुमारास गारठा अधिक वाढत आहे. दिवसा काही काळ ऊबदारपणा जाणवत असला, तरी एकूणच […] The post शीतलहरी दक्षिणेकडे सरकतायेत; राज्यात पुन्हा थंडीचा कडाका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मॉडीफाय १२ बुलेटवर कारवाईचा बडगा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य तसेच पर्यावरणाचे संरक्षण या अनुषंगाने लातूर पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात वाढत असलेल्या फटाका सायलेन्सर लावलेल्या बुलेट मोटारसायकलींमुळे होणारे प्रचंड ध्वनी प्रदूषण, नागरिकांची होणारी गैरसोय, रुग्ण, वृद्ध, लहान मुले व विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण तसेच कायदा व सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात […] The post मॉडीफाय १२ बुलेटवर कारवाईचा बडगा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणुकीच्या मतदान प्रशिक्षणास १६४ कर्मचा-यांची दांडी
लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लातूर शहर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असून या निवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान दि. १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रीमती मानसी यांच्या आदेशाने मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर सभागृह लातूर येथे दि. २८ […] The post निवडणुकीच्या मतदान प्रशिक्षणास १६४ कर्मचा-यांची दांडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सावरीकरांचे कार्य तरूण पिढीसाठी मार्गदर्शक
लातूर : प्रतिनिधी मोठे यश साध्य करण्यासाठी कोणत्याच पदाची गरज नाही, हे अॅड. किशनराव सावरीकर ऊर्फ भाऊ यांच्या कार्यातून आपणाला दिसून येते. या काळात या नेत्यांवर महात्मा गांधी, पंडित नेहरू, स्वामी रामानंद तिर्थ आदींच्या कार्याचा प्रभाव होता. महात्मा गांधी यांनी सांगीतले होते की, खेडयाकडे चला, खेडयाचा विकास म्हणजे देशाचा विकास, हीच संकल्पना आजही कायम आहे. […] The post सावरीकरांचे कार्य तरूण पिढीसाठी मार्गदर्शक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विचारवंतांनी लोकशाही वाचविण्यासाठी काम करावे
शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख देशाचे वातावरण आज पूर्णत: बिघडले असून हा चिंतेचा विषय आहे. राज्यकर्ते सत्तेसाठी सहिष्णुतेच वाटोळे करत असून सत्य सांगणा-यास गोळ्या मिळत असतील तर इथले राज्यकर्ते देशाला नेमके कुठे घेऊन जात आहेत. सत्य सांगणारांचा दाभोळकर होत असेल तर हे खुप चिंताजनक असून लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे विचारवंतांनी लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी […] The post विचारवंतांनी लोकशाही वाचविण्यासाठी काम करावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘त्या’ तरुणाच्या परिवाराची भेट
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका घरपोडी प्रकरणातील आरोपीने पोलिसांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल करीत आत्महत्या केली होती. या प्रकरणी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान संबंधित तरुणाच्या परिवाराची रविवारी दि २८ डिसेंबर रविवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी भेट घेऊन सांत्वन करून सदर […] The post पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘त्या’ तरुणाच्या परिवाराची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांनी माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, ‘रेणापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन नगरसेवकांनी एकसंघपणे काम करावे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक कारभार करणे हीच […] The post सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांचा सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्मृतीने ओलांडला १० हजार धावांचा टप्पा
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने रविवारी क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी २० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारी ती जगातील चौथी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात स्मृतीला […] The post स्मृतीने ओलांडला १० हजार धावांचा टप्पा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

32 C