शिवराज पाटील यांना लातूरकरांकडून श्रद्धांजली अर्पण
लातूर : प्रतिनिधी सभ्यतेचे, नैतिकतेचे आणि तत्वनिष्ठतेचे दीपस्तंभ असलेले देशाच्या लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकुरकर यांना दि. २३ डिसेंबर रोजी लातूरकरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभेत असंख्य मान्यवरांनी शिवराज पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. शहरातील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या श्रद्धांजली सभेस पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, […] The post शिवराज पाटील यांना लातूरकरांकडून श्रद्धांजली अर्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अझरुद्दीन, राज बब्बर, रेवंथ रेड्डी, सचिन पायलट, आमदार अमित देशमुख काँग्रेसचे स्टार प्रचारक
महापालिका निवडणूक, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर मुंबइ : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने मंगळवारी आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज, मोहम्मद अझरुद्दीन, राज बब्बर आदींचा समावेश आहे. या शिवाय तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, कन्हैया कुमार, माजी मंत्री […] The post अझरुद्दीन, राज बब्बर, रेवंथ रेड्डी, सचिन पायलट, आमदार अमित देशमुख काँग्रेसचे स्टार प्रचारक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मधुमेहाच्या रुग्णांना श्वासाद्वारे मिळणार इन्सुलिन!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सिपला कंपनीने डायबिटीजच्या रुग्णांसाठी इन्हेल (श्वासाद्वारे घेण्यात येणारी) इन्सुलिन अफ्रेजा लॉंच करण्याची घोषणा केली आहे. या इन्सुलिनला गेल्या वर्षी केंद्रीय औषधी मापदंड नियंत्रण संघटनने (सीडीएससीओ) अफ्रेजाच्या वितरण आणि विपणनासाठी मंजुरी दिली आहे. ही इन्सुलिन श्वासाद्वारे घेतली जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात इंजेक्शनद्वारे इन्सुलिनपासून कायमची मुक्तता मिळणार आहे. भारतात १० कोटीहून जास्त […] The post मधुमेहाच्या रुग्णांना श्वासाद्वारे मिळणार इन्सुलिन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा लाठीमार गुवाहाटी : वृत्तसंस्था आसाममधील कार्बी आंगलोंगमध्ये पुन्हा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. या घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावेळी जमावाने ३ दुचाकींना आग लावली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. […] The post आसाममध्ये पुन्हा हिंसाचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत पहिल्याच दिवशी ४ हजारांवर अर्ज विक्री
महापालिका निवडणूक लढण्यासाठी भाऊगर्दी मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी आज २३ डिसेंबर २०२५ पासून नामनिर्देशन पत्रे वितरणास सुरूवात झाली आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेसाठी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्यात आले. मात्र, पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. राज्य निवडणूक, महाराष्ट्र राज्य यांनी महानगरपालिका […] The post मुंबईत पहिल्याच दिवशी ४ हजारांवर अर्ज विक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आणखी एक शिक्षणाधिकारी जाळ््यात
शिक्षक भरती घोटाळा, १२ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका नागपूर : प्रतिनिधी शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी आणखी एका शिक्षणाधिका-यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एसआयटीने अटक केली. शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापराच्या संदर्भात एसआयटीच्या सायबर सेलने ही कारवाई केली. त्यांच्यावर तब्बल १२ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात […] The post आणखी एक शिक्षणाधिकारी जाळ््यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोल्हापूर पोलिसांची 'सुपरफास्ट' कारवाई!:बसवरील 1.22 कोटींचा दरोडा 12 तासांत उघड; 7 दरोडेखोर जेरबंद
कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी आराम बसवर कोयत्याचा धाक दाखवून 1 कोटी 22 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत चोरीला गेलेले संपूर्ण सोने, चांदी आणि मोबाईल सुटे भाग हस्तगत केले आहेत. ही घटना 22 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर घडली. कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या या बसमध्ये पार्सलद्वारे मौल्यवान दागिने आणि साहित्य नेले जात होते. दरोडेखोरांनी आधी या बसचा पाठलाग केला आणि निर्मनुष्य ठिकाणी बस अडवली. दरोडेखोरांनी क्लिनरच्या गळ्याला कोयता लावून गाडी थांबवण्यास भाग पाडले आणि चालकाला बेदम मारहाण केली. या दहशतीच्या जोरावर त्यांनी 1 कोटी 22 लाख रुपयांचे सोने-चांदी आणि मोबाईलचे स्पेअर पार्ट्स लुटून पोबारा केला होता. पोलिस तपासाचे चक्रे फिरली घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि आपल्या खबऱ्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी अक्षय कदम (रा. विक्रमनगर, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले. अक्षय कदमची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या सहा साथीदारांची नावे उघड केली. पोलिसांनी तातडीने छापेमारी करून सातही आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडून दरोड्याचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या चातुर्यापुढे दरोडेखोरांचा डाव फसला. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वडगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अवघ्या 12 तासांत गुन्ह्याचा उलगडा केल्याबद्दल कोल्हापूर पोलिसांचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.
‘महाडीबीटी’मध्ये कृषी विभागाची पूर्वसंमती बंद
जळकोट : प्रतिनिधी शासनाचे काम आणि सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे. या म्हणीप्रमाणे सध्या महाडीबीटीचे काम सुरू आहे. या महाडीबीटी अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने शेतक-यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. सध्या शेकडो शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळेनासा झाला आहे . सध्या महाडीबीटीमध्ये पूर्वसंमती देणे बंद झालेले आहे. तब्बल महिनाभरापासून ही पूर्वसंमती बंद झाली […] The post ‘महाडीबीटी’मध्ये कृषी विभागाची पूर्वसंमती बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मरशिवणीजवळ कार-दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार
अहमदपूर : प्रतिनिधी या शहरातुन नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर नेहमीच अपघाताचे दृश्य पहायला मिळत असून अहमदपूर शहरातून नांदेडकडे बाहेर जाणा-या मरशिवणी वळणावर दि. २३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भरधाव कारचालकाने दुचाकी उडविल्याने दुचाकी स्वार रोहित अरुण ठाकूर याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वेगात येणारी कार वाहन क्रमांक […] The post मरशिवणीजवळ कार-दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची रक्कम स्वीकारताना सीबीआयच्या सापळ्यात अडकले. आरोपी अधिकाऱ्याने एका प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी तब्बल 17 लाख रुपयांची मागणी केली होती, ज्यापैकी 5 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, 26 नोव्हेंबर रोजी संबंधित अधीक्षकांनी तक्रारदाराच्या कंपनीचे ऑडिट केले होते. यावेळी कंपनीने 98 लाख रुपयांचा कर बुडवला असल्याची खोटी धमकी आरोपीने दिली होती. हे प्रकरण मिटवण्यासाठी आणि कर दायित्व कमी करण्यासाठी सुरुवातीला 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 17 लाख रुपयांवर निश्चित झाली. त्यापैकी पहिला हप्ता 22 डिसेंबर रोजी देण्याचे ठरले होते. सापळा रचून रंगेहाथ अटक तक्रारदाराने या संदर्भात 22 डिसेंबर 2025 रोजी सीबीआयकडे लेखी तक्रार केली होती. सीबीआयने त्वरित दखल घेत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेचा पहिला भाग म्हणून 5 लाख रुपये घेऊन पोहोचले असता, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अधीक्षकांना रंगेहाथ पकडले. घराच्या झडतीत बेहिशेबी मालमत्तेचे घबाड अटकेनंतर सीबीआयने आरोपीच्या मुंबईतील निवासस्थानी धाड टाकली. या झडतीमध्ये अधिकाऱ्यांनी 18 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली, ज्याचा हिशोब आरोपीला देता आला नाही. एप्रिल 2025 मध्ये 40.30 लाख रुपयांची आणि जून 2024 मध्ये 32.10 लाख रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याची कागदपत्रे सापडली आहेत. आरोपीच्या कार्यालयातूनही डिजिटल पुरावे आणि ऑडिट अहवालाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यात सध्या शिपाई ते तहसीलदारांपर्यंतच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर एसीबीने लक्ष केंद्रित केले असताना, सीबीआयने केलेल्या या मोठ्या कारवाईने केंद्रीय विभागांमधील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सीबीआयचे अधिकारी करत आहेत.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी आज, मंगळवार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) वितरणास जोमाने सुरुवात झाली. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुकांची उत्सुकता पहिल्याच दिवशी दिसून आली असून, मुंबईतील 23 निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून एकूण 4 हजार 165 अर्ज नेण्यात आले आहेत. मात्र, पहिल्या दिवशी एकही अर्ज अधिकृतपणे दाखल झाला नाही. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांना 30 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज प्राप्त करून घेता येतील आणि ते सादर करता येतील. 23 ते 29 डिसेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध असतील, तर 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच अर्ज दिले जातील. अर्ज स्वीकारण्याची वेळ दररोज सकाळी 11 ते दुपारी 5 अशी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, 25 डिसेंबर रोजी नाताळची सार्वजनिक सुट्टी आणि 28 डिसेंबर रोजी रविवार असल्याने या दोन दिवशी अर्ज वितरण किंवा स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून अर्जांची छाननी केली जाईल. छाननी प्रक्रिया पूर्ण होताच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यायची आहे, त्यांच्यासाठी 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर, 3 जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. मुंबई महापालिकेच्या या प्रतिष्ठेच्या लढाईसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान पार पडणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल घोषित केले जातील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक कार्यालयात आवश्यक तांत्रिक सुविधा आणि मनुष्यबळ तैनात केले आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अमरावती जिल्हा परिषदेने नवी कार्यपद्धती (SOP) तयार केली आहे. यानुसार, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन प्रस्तावाची तयारी आता त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दोन वर्षांपूर्वीच सुरू केली जाईल. महाराष्ट्र नागरी सेवा १९८२ च्या तरतुदींनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी संबंधित विभागांना यासंदर्भात विशेष निर्देश दिले आहेत. राज्य शासनाने यासाठी काही टप्पे निश्चित केले आहेत. सेवानिवृत्तीला दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच संबंधित कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. यामध्ये कर्मचाऱ्याला मिळालेल्या पदोन्नती, बढत्या आणि पुरस्कारांची नोंद योग्य प्रकारे झाली आहे की नाही, याची खात्री केली जाईल. ही जबाबदारी संबंधित कर्मचारी ज्या संस्था किंवा शाळेत कार्यरत आहे, त्या विभागप्रमुखाची असेल. गटशिक्षणाधिकाऱ्यांद्वारे या सर्व बाबी पूर्ण केल्या जातील. मृत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत संपूर्ण प्रस्ताव तयार करून कुटुंब निवृत्तीवेतनासाठीची प्रक्रिया पूर्ण केली जावी, असे शासनाचे म्हणणे आहे. प्रस्ताव तयार करण्यात यंत्रणेकडून विलंब झाल्यास व्याजाची तरतूद करण्यात आली आहे. निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव तयार करण्यास उशीर झाल्यास संबंधित कर्मचारी व्याजाची मागणी करू शकतो. या व्याज देयकाची संपूर्ण जबाबदारी संबंधित पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. यामुळे विलंब टाळण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे येथील कुऱ्हा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या मीरा इंडस्ट्रीज या चणाडाळ प्रक्रिया मिलमध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत चणाडाळ, चणा, कुटार आणि मिलमधील महागडी यंत्रसामग्री जळून खाक झाली. यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग इतकी भीषण होती की, चांदूर रेल्वे येथील अग्निशमन विभाग ती आटोक्यात आणण्यासाठी पुरेसा ठरला नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावतीसह धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि तिवसा येथूनही अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. एकूण पाच ठिकाणांहून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला ही आग कुणाच्याही लक्षात आली नाही. मंगळवारी सकाळी मिलमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मिल मालक पियुष गंगन आणि सचिन गंगन यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ मिलचे शटर उघडताच आगीचे रौद्र रूप दिसून आले आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चांदूर रेल्वे येथील पंपिंग स्टेशनमधून अंदाजे ३० ते ३५ फेऱ्या मारत पाण्याचा मारा केला. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मोहिमेत अग्निशमन विभागाचे प्रमुख अमोल भुजाडे, जितू कर्से, पंकज इमले, वाहन चालक अमोल कडू, फायरमन नीरज दुबे, मयूर घोडेस्वार यांच्यासह अमरावती, धामणगाव, नांदगाव खंडेश्वर आणि तिवसा येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आगीची माहिती मिळताच शहरातील अनेक नागरिक आणि परिसरातील तरुणांनीही घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलास मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, आगीच्या नुकसानीचा पंचनामा सुरू आहे. आगीचे नेमके कारण तपासादरम्यान स्पष्ट होईल. धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे-अडसड यांनीही घटनास्थळी भेट दिली.
सोमानींच्या स्मृत्यर्थ 84 जणांनी केले रक्तदान:आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन
अमरावती येथे दिवंगत अशोक सोमानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३९ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना आमदार खोडके यांनी अमरावती रक्तदान समितीच्या कार्याचे कौतुक केले. ऐच्छिक रक्तदानाच्या क्षेत्रात समितीने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातही नाव कमावले आहे. त्यामुळे अमरावतीला 'रक्तदात्यांचे शहर' म्हणून ओळखले जाते, असे त्या म्हणाल्या. सोमानी कुटुंब आणि रक्तदान समितीच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. श्री गणेशदास राठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंतबाबू मालपाणी, माहेश्वरी पंचायतीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश साबू, सचिव अशोक जाजू आणि सामाजिक कार्यकर्ते गोपालदासजी राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी गेल्या ३९ वर्षांपासून आयोजित या रक्तदान शिबिराचे आणि रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ५० वर्षांपासून स्वेच्छा रक्तदानाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचे कौतुक केले. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (पीडीएमसी) रक्तपेढीच्या चमूने रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. यात सचिन काकडे, डॉ. ऋचा अचिंतलवार, डॉ. मेघा, अमोल कुचे, नितीन आखरे, वंदना चौधरी, हरीश खान आणि प्रतीक नेवारे यांचा समावेश होता. यावेळी आयोजकांनी प्रतिभा शिवनारायण राठोड आणि मालती पाठक यांना शिवणयंत्राची भेट दिली. यावेळी रक्तदान समितीचे पदाधिकारी सिमेषभाई श्रॉफ, शैलेश चौरसिया, किशनगोपाल सादानी, प्रा. संजय कुलकर्णी, उमेश पाटणकर, युसूफभाई बारामतीवाला, रितेश व्यास, प्रा. राजेश पांडे, निषाद जोध, मोहन लड्ढा, संदीप खेड़कर, योगेंद्र मोहोड़, हरी पुरवार यांच्यासह सोमानी कुटुंबातील सदस्य आणि संतोष गांधी, निर्मल लड्ढा, संजय टावरी, संजय धूत, नरेश डागा, सुभाष चांडक, रोशन साबू, संतोष चांडक, डॉ. नंदकिशोर भुतड़ा, सुरेश हेड़ा, अजय सारड़ा, संजय सारड़ा, शांती सारड़ा, सुरेश चांडक, चंदन मंत्री, संजय राठी, प्रदीप मोहता, दामोदर खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
चांदूरबाजार तालुक्यातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या लिलावातून यावर्षी जिल्हा परिषदेला ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल दहा लाख रुपयांनी अधिक आहे, जे एक महत्त्वाचे आर्थिक यश दर्शवते. या लिलाव प्रक्रियेत एकूण ६८७ प्लॉटचा यशस्वी लिलाव करण्यात आला. काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे १५ प्लॉटचा फेरलिलाव घेण्यात आला, जो दुसऱ्या टप्प्यात यशस्वी ठरला. बहिरम यात्रा ही चांदूरबाजार तालुक्यातील एक मोठी आणि पारंपरिक यात्रा म्हणून ओळखली जाते, जिथे दरवर्षी मोठ्या संख्येने व्यापारी, फेरीवाले आणि भाविक उपस्थित राहतात. मागील वर्षी या यात्रेच्या लिलावातून जिल्हा परिषदेला सुमारे ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, यात्रेचे उत्तम नियोजन आणि पारदर्शक लिलाव प्रक्रिया यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली, परिणामी ४२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. या संपूर्ण लिलाव प्रक्रियेचे आयोजन आणि अंमलबजावणी सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश घोगरकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यात्रेचे अधीक्षक रामेश्वर रामागडे यांनी संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवले. याशिवाय, सहाय्यक अधीक्षक निखिल नागे, रितेश देशमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी समीर लेंडे, विस्तार अधिकारी सुरेश लांडगे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप गोहत्रे, शिवप्रसाद सोनोने आणि विकी देशमुख यांच्यासह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. लिलावाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. नियम व अटी स्पष्टपणे जाहीर करण्यात आल्या होत्या, तसेच प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राखण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आणि लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला.
दिल्लीत विहिंपची निदर्शने; निदर्शक-पोलीसांत चकमक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेशमधील हिंदू, अल्पसंख्याकावरील हिंसाचाराचे पडसाद भारतामध्ये उमटत असून बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंसाठी भारतामध्ये आवाज उठवला जात आहे. विश्व हिंदू परिषदेने २३ डिसेंबर रोजी दिल्लीत निदर्शने केली. बांगलादेशमध्ये अलिकडेच झालेल्या हिंदू तरुण दीपू चंद्राच्या हत्येमुळे दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर तणाव निर्माण झाला आहे. निदर्शकांनी बांगलादेश उच्चायुक्तालयासमोरील बॅरिकेड्स हटवण्याचा […] The post दिल्लीत विहिंपची निदर्शने; निदर्शक-पोलीसांत चकमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे गावात उपसरपंचासह २५ ते ३० महिलांनी अवैध देशी दारू विक्रीला पायबंद घातला. सोमवारी सायंकाळी अंदाजे ७.३० वाजता महिलांनी घरातून दारू विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती दारूबंदी विभागालाही देण्यात आली होती, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या कारवाईनंतर महिला रात्री दहा वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात थांबून होत्या. यावेळी अवैध दारू विकणाऱ्या व्यक्तीच्या घरातून सुमारे ११ हजार १०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. यापूर्वीही गावातील महिलांनी याच व्यक्तीला अवैध दारू विक्रीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते, मात्र तरीही त्याचा व्यवसाय सुरूच होता. यामुळे संतप्त झालेल्या उपसरपंच संगीता बद्रे, ताराबाई सोनसागडे, रेश्मा भंडारी, प्रतिभा चाचने, ऐश्वर्या चाचने यांच्यासह २५ ते ३० महिलांनी संबंधित व्यक्तीच्या घरावर धडक दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन आपला निषेध नोंदवला. शहर आणि तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून, यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला त्रस्त झाल्या आहेत. काही नागरिकांच्या मते, शहराच्या अनेक भागांत देशी दारूच्या नावाखाली रसायनयुक्त बनावट दारू तयार केली जात आहे. या बनावट दारूमुळे काही तरुणांचा बळीही गेल्याचा आरोप आहे. असे असतानाही, दारूबंदी विभाग आणि पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
‘मृत्युपत्रा’आधारे जमिनीच्या वारसाची नोंद करणे वैध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मृत्युपत्राच्या आधारे जमिनीच्या महसूल नोंदींमध्ये (सात-बारा आणि मालमत्ता नोंदणी) फेरफार करण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नाही. केवळ दावा मृत्युपत्रावर आधारित आहे म्हणून असा फेरफार नाकारला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. केवळ मृत्युपत्राच्या आधारावर केलेला दावा आहे, या कारणास्तव महसूल विभाग वारस नोंद नाकारू शकत नाही, असे स्पष्ट […] The post ‘मृत्युपत्रा’आधारे जमिनीच्या वारसाची नोंद करणे वैध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
षटकात पाच बळी; प्रियंदानाचा विक्रम
जकार्ता : वृत्तसंस्था क्रिकेट या खेळात प्रत्येक चेंडूगणिक नवा विक्रम घडू शकतो, या वाक्याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. इंडोनेशियाचा २८ वर्षीय वेगवान गोलंदाज गेडे प्रियंदाना याने क्रिकेटच्या इतिहासात आश्चर्यकारक कामगिरीची नोंद केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एकाच षटकात पाच बळी घेतले असून, अशी कामगिरी करणारा प्रियंदाना हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. कंबोडियाविरुद्धच्या […] The post षटकात पाच बळी; प्रियंदानाचा विक्रम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये आठ स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार महिला नगराध्यक्षांच्या हाती आला आहे. उर्वरित चार ठिकाणी पुरुष नगराध्यक्ष शहराचा कारभार सांभाळतील. शेंदुरजनाघाट, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, अचलपूर आणि मोर्शी या सात नगरपालिका, तसेच नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये महिला नगराध्यक्षा निवडून आल्या आहेत. याउलट, धारणी नगरपंचायत, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा आणि वरुड नगरपालिकांमध्ये पुरुष नगराध्यक्षांनी विजय मिळवला आहे. महिला नगराध्यक्षांमध्ये शेंदुरजनाघाट येथे भाजपच्या सुवर्णा वरखडे, चांदूर रेल्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका विश्वकर्मा, चांदूर बाजारमध्ये प्रहारच्या मनीषा नांगलिया, धामणगाव रेल्वेमध्ये भाजपच्या अर्चना रोठे, दर्यापूरमध्ये काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे, अचलपूरमध्ये भाजपच्या रुपाली माथने, मोर्शीमध्ये शिंदे सेनेच्या प्रतीक्षा गुल्हाने आणि नांदगाव खंडेश्वरमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) प्राप्ती मारोटकर यांचा समावेश आहे. नागरिकांनी त्यांना आपापल्या शहराचा कारभार चालवण्याची संधी दिली आहे. पुरुष नगराध्यक्षांमध्ये चिखलदरा येथे काँग्रेसचे शेख अब्दुल, वरुड येथे भाजपचे ईश्वर सलामे, अंजनगाव सुर्जीमध्ये भाजपचे अविनाश गायगोले आणि धारणी नगरपंचायतीमध्ये भाजपचे सुनील चौथमल यांनी विजय मिळवला आहे. आगामी पाच वर्षांसाठी या शहरांची सत्ता त्यांच्या हातात राहील. दरम्यान, काही नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत, त्या पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणता आलेले नाहीत. यामुळे त्यांना कारभार चालवताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे एकूण १२ जागांपैकी निम्म्या जागा महिलांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात त्याहून अधिक महिला निवडून आल्या आहेत. विशेषतः दर्यापूर येथील नगराध्यक्षपद सर्वांसाठी खुले होते. या जागेसाठी पुरुष आणि महिला दोघांनीही प्रयत्न केले, परंतु पुरुषांना मागे टाकत एका महिलेने विजय मिळवला.
केंद्रशासन पुरस्कृत योजनांतून राज्याला रु. १.४७ लाख कोटी;
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्राला केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत १.४७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला. या कालावधीत उत्तर प्रदेश आणि दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. २०२०-२१ मध्ये एकूण ३.८६ लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले. हा आकडा २०२३-२४ मध्ये ४.१९ लाख कोटी रुपये झाला; मात्र २०२४-२५ मध्ये तो ३.६३ लाख […] The post केंद्रशासन पुरस्कृत योजनांतून राज्याला रु. १.४७ लाख कोटी; appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
…तर ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते? मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा हल्ला
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने मे २०२५ मध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यामध्ये भारतीय वायुसेना आणि लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. या कारवाईनंतर पाकिस्तानचे लष्कर बॅकफूटवर गेले, देशांतर्गत विरोधकांना उत्तर देताना त्यांची दमछाक होत आहे. यावरून मौलाना यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांना चांगलेच सुनावले. तुम्ही पाकिस्तानविरोधी दहशतवादी लपल्याचे […] The post …तर ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते? मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पहिल्या दिवशी १४४ नामनिर्देशनपत्रांची विक्री
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. पहिल्याच दिवशी १४४ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. अद्याप एकही नामनिर्देनपत्र दाखल झालेले नाही. दि. ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १ मधून ८, प्रभाग […] The post पहिल्या दिवशी १४४ नामनिर्देशनपत्रांची विक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांशी साधला संवाद
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २३ डिसेंबर रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था तसेच संघटना पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक महिला भगिनी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या. […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांशी साधला संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशात 19 डिसेंबर रोजी मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवल्यानंतर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानाचे समर्थन करत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. अमेरिकेतील गाजत असलेल्या 'एपस्टिन फाईल्स'चा संबंध थेट भारतीय राजकारणाशी जोडत त्यांनी देशाचा पंतप्रधान बदलू शकतो आणि तो मराठी माणूस असू शकतो, असे खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले की, 19 डिसेंबरबाबत मी केवळ शक्यता वर्तवली होती, तो माझा दावा नव्हता. एपस्टिन फाईल्स संदर्भात अमेरिकेत अद्याप मोठा संघर्ष सुरू आहे. या फाईल्समध्ये अनेक अल्पवयीन मुलींच्या नावांचा समावेश असून काही ठिकाणी कागदपत्रे काळी करण्यात आली आहेत. यात भारतातील अनेक बड्या नावांचा समावेश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच भारतीय राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे चव्हाण म्हणाले. पंतप्रधान बारामती किंवा कराडचे नसतील मराठी पंतप्रधान होण्याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, होणारा पंतप्रधान हा मराठी माणूस असेल आणि तो भाजपमधीलच असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे, हा पंतप्रधान बारामती (पवार कुटुंब) किंवा कराड (स्वतः चव्हाण) येथील नसेल. भारताचे नवीन पंतप्रधान कोण असतील, हे आता सर्वांना माहीत आहे, असे म्हणत त्यांनी नाव न घेता सस्पेन्स वाढवला आहे. इंडिगो एअरलाईन्स आणि अदानी कनेक्शनवर प्रश्नचिन्ह राजकीय भाकितांसोबतच पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिगो विमान कंपनीच्या कारभारावरही ताशेरे ओढले. इंडिगोच्या मक्तेदारीमुळे प्रवाशांचे हाल होत असून कंपनीला त्यांच्या मालमत्तेच्या 10 टक्के दंड करण्याची तरतूद असलेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. अदानी यांनी पायलट ट्रेनिंग सुरू केल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत हा सर्व घोळ सुरू झाला आहे. या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वी काय दावा केला होता? 19 डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. त्यात भारताचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी ठाम विश्वास व्यक्त करत या तारखेविषयी उत्सुकता वाढवली आहे. पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते आहेत. त्यांनी पीएमओमध्येही काम केले आहे. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे . पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानपदी एखादा मराठी माणूस विराजमान होणार असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेतील एका इस्त्रायलच्या गुप्तहेराने एक मोठे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात जगभरातील दिग्गज नेत्यांची नावे आहेत. पण ती नावे कुणाची आहेत याची कल्पना अद्याप कुणाला आली नाही. अमेरिकन सरकार एक कायदा करून ही नावे उघड करत आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता असून, त्याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे ते म्हणाले होते. यासाठी त्यांनी 19 डिसेंबरची तारीख दिली होती.
राज्यात गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि शालार्थ वेतन प्रणाली घोटाळ्यात नागपूर विशेष तपास पथकाने मोठी कारवाई केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र शंकरराव काटोलकर यांना सायबर सेलने अटक केली असून, त्यांच्यावर 12 कोटी रुपयांहून अधिक रकमेची शासकीय फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. नागपूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर या महाघोटाळ्याचे पदर उलगडण्यास सुरुवात झाली. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपींनी 'शालार्थ' या ऑनलाइन वेतन प्रणालीचा बेकायदेशीररीत्या वापर केला. बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार करण्यात आले. अस्तित्वात नसलेल्या किंवा बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतन आणि इतर देणी काढण्यात आली. या प्रक्रियेत सरकारी तिजोरीचे 12 कोटी 3 लाख रुपयांचे नुकसान झाले. काटोलकरांची भूमिका आणि 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष रवींद्र काटोलकर हे 2021 ते 2022 या काळात नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. तपासात समोर आले की, बनावट विद्यार्थी ओळखपत्रे आणि बोगस शिक्षकांच्या माहितीबाबत कल्पना असतानाही, काटोलकर यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पगाराचे प्रस्ताव मंजूर केले. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी त्यांनी पदाचा गैरवापर करत शासनाची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 26 आरोपींना बेड्या या हायप्रोफाईल घोटाळ्यात एसआयटीने आतापर्यंत 26 जणांना अटक केली आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, लिपिक, शाळांचे मुख्याध्यापक, संचालक आणि शिक्षकांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी अटक केल्यानंतर रवींद्र काटोलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्यांना 25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात या घोटाळ्यातील आणखी काही धागेदोरे आणि लाभार्थींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपने 122 हून अधिक जागांवर विजय मिळवत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी महायुती सज्ज असल्याचा एल्गार पुकारला आहे. मात्र, भाजपच्या या यशावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपच्या कार्यपद्धतीवर अत्यंत प्रखर शब्दांत टीका केली आहे. भाजपला मिळालेल्या या पाशवी बहुमतावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जल्लाद' असा केला. ते म्हणाले की, नगरपालिकांमध्ये मिळालेले हे यश म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. सोबत असलेल्या मित्रपक्षाचा विश्वासघात करणे हा भाजपचा जुना स्वभाव आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हे दोन्ही नेते भाजपसोबत दिसणार नाहीत. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे असाही दावा केला की, भाजपच्या या विस्तारवादी धोरणामुळेच महायुतीमधील एक गट आता पडद्यामागून विरोधकांशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालानंतर काँग्रेसने प्रथमच आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. महापालिकेतील जागावाटप आणि आघाडीचे सर्व अधिकार स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला देण्यात आले आहेत. तसेच 'इंडिया अलायन्स'सोबतच वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी संघटना यांच्याशी काँग्रेसची चर्चा सुरू आहे. होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा जिंकेल, असा दावा सपकाळ यांनी केला आहे. दुसरीकडे, भाजपने या विजयाला आपल्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठे यश म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांच्या मेहनतीला दिले असून, आता पूर्ण ताकदीनिशी मुंबई महापालिकेच्या रणांगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पुरंदर विमानतळ प्रकल्पाने बाधित होणाऱ्या सात गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुरंदर विमानतळामुळे पुणे आणि परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन केले. तसेच प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला देण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. हे केवळ प्रवासी विमानतळ नसून कार्गो विमानतळही असल्याने नाशवंत मालाच्या व्यापारासाठी विशेष उपयुक्त ठरेल. या प्रकल्पामुळे पुरंदर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) किमान दोन टक्क्यांची वाढ होईल. या बैठकीला माजी मंत्री विजय शिवतारे, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह बाधित सात गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी भूसंपादनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, पुरंदर येथील विमानतळ महाराष्ट्र आणि पुण्याच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प व्यवहार्य होण्याच्या दृष्टीने सर्व बाबींचा सखोल विचार करून, संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पुरंदर येथील एरोसिटी प्रकल्पामध्ये टीडीआर संदर्भातील सर्व लाभ दिले जातील. तसेच प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत शंभर टक्के प्राधान्य दिले जाईल. भूसंपादनाचा दर अंतिम झाल्यानंतर, त्या भागातील युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करून उद्योगांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. प्रकल्पासंदर्भातील पूर्वीच्या आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. ते म्हणाले की, बाधित होणाऱ्या शेतकरी व नागरिकांच्या योग्य पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य आहे. शेतकऱ्यांना व त्यांच्या पुढील पिढीला संरक्षण मिळेल, याचा विचार करून मूळ जमिनीच्या दरापेक्षा जास्त दर देण्याचा विचार करण्यात येईल. त्यासाठीच रेडिरेकनरनुसार भूसंपादन न करता वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचा दर ठरविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सिडकोच्या प्रकल्पात यापूर्वी साडेबावीस टक्के लाभ देण्यात आला असून, पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी त्याहून अधिक लाभ देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. प्रकल्पबाधित घरांसाठी कुटुंबाची रचना लक्षात घेऊन पुनर्वसन करण्यात येत असून, यामध्ये सज्ञान मुलांसाठी अतिरिक्त जागा देण्यात येते. कुटुंबांतील बहिणीच्या हिश्यासंदर्भातही योग्य मार्ग काढण्यात येईल. अल्पभूधारक व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी काही वेगळे करता येईल का, याचाही विचार करण्यात येईल.
साहित्य अकादमीच्या २०२५ च्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे स्थगित करण्यात आली आहे. १८ डिसेंबर रोजी होणारी पत्रकार परिषद अचानक रद्द करण्यात आली. या प्रकारावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, हा साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर घाला असल्याचे म्हटले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १२ मार्च १९५४ रोजी साहित्य अकादमीची स्थापना केली होती. ही एक स्वायत्त संस्था असून, भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देऊन साहित्य, कला आणि संस्कृतीच्या विकासाला प्रोत्साहन देते. तत्कालीन शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी संस्थेचे औपचारिक उद्घाटन केले होते. यंदा प्रथमच केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने पुरस्कार प्रक्रियेत हस्तक्षेप केला आहे. जुलै महिन्यात चार स्वायत्त संस्थांशी (साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) केलेल्या सामंजस्य कराराचा हवाला देत मंत्रालयाने पुरस्कारांच्या पुनर्रचनेचा सल्ला दिला. मंत्रालयाच्या नोटनुसार, पुरस्कारांची पुनर्रचना मंत्रालयाच्या सल्ल्याने करावी लागेल आणि त्याची मंजुरी मिळेपर्यंत घोषणा थांबवावी. या निर्देशामुळे अकादमीच्या कार्यकारी मंडळाने पुरस्कार जाहीर करण्याची प्रक्रिया स्थगित केली. गोपाळदादा तिवारी यांनी हा हस्तक्षेप ७० वर्षांच्या अकादमीच्या इतिहासात प्रथमच घडल्याचे नमूद केले. त्यांनी मोदी-शहा सरकार साहित्यिकांच्या मुक्त लेखन हक्कांवर आणि अकादमीच्या स्वायत्ततेवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप केला. तिवारींच्या मते, हे सरकारला पुरस्कार प्रक्रियेवर 'वेटो पॉवर' मिळवण्याचा प्रयत्न आहे. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी स्थगितीबाबत मंत्रालयाकडे खुलासा मागितला होता, परंतु त्यांना त्वरित उत्तर मिळाले नाही, असेही तिवारींनी सांगितले. मराठी साहित्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक साहित्य अकादमी पुरस्कार मिळवले आहेत, ज्यात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, शिवाजी सावंत, दुर्गा भागवत, भालचंद्र नेमाडे यांचा समावेश आहे. असा हस्तक्षेप साहित्यिकांच्या अस्मितेवर घाला घालणारा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसने या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला असून, साहित्य जगतातूनही विरोधाचे सूर उमटत आहेत. अनेक साहित्यिकांनी याला सांस्कृतिक संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न म्हटले आहे.
बांगलादेशात हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार आणि तरुण दिपू चंद्र दास याची जमावाकडून झालेली निर्घृण हत्या, याच्या निषेधार्थ आज मुंबईत संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बांगलादेशातील मैमनसिंग येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या 27 वर्षीय दिपू चंद्र दास या हिंदू युवकाची 18 डिसेंबर रोजी जमावाने अमानवी पद्धतीने हत्या केली होती. त्याच्या एका मुस्लिम सहकाऱ्याने त्याच्यावर ईशनिंदेचा खोटा आरोप केला होता. जमावाने दिपूला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचे प्रेत एका झाडाला टांगून पेटवून देण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे, मात्र या घटनेमुळे जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईत कफ परेड परिसरात तणाव या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील कफ परेड भागात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांगलादेश सरकार आणि कट्टरपंथीयांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी दिपू दास याला न्याय देण्याची आणि बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता आणि आंदोलनाला सुरुवात होताच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान, बांगलादेशमधील या घटनेच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीसह कोलकात्यातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. बांगलादेशात हिंदूंचे जगणे कठीण झाले आहे. दिपू दासची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणून तिथल्या हिंदूंच्या सुरक्षेची हमी मिळवावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
एका मौलानाने त्यांना 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सांगितले होते. यावरून भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुले आहेत. तो म्हणतो की मला 30-35 मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका 19 मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन-चार-चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे राणा यांनी म्हटले आहे. मौलाना सय्यद कादरी यांनी आपल्याला 4 बायका आणि 19 मुले असल्याचे सणीतले होते. यावरून राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा म्हणाल्या, मी सगळ्या हिंदू लोकांना सांगते की जर ते खुलेपणे सांगत असतील की 4 बायका आणि 19 मुले आहेत तर आपण किमान तीन-तीन चार-चार मुले जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे. ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत यामध्ये काही दुमत नाही. नवनीत राणा यांनी मुर्शिदाबाद येथील मशिदीच्या मुद्द्यावरून मोठे विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, कॉंग्रेसने आजवर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनरजी यांच्या आमदारांनीही तेच करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. तसेच जर बाबरच्या नावाने मशीद बांधली गेली, तर कारसेवक तिथे जातील, कारसेवा करतील आणि ती तोडण्याचे काम करतील, असेही विधान राणा यांनी केले. मजबूरी म्हणून ठाकरे बंधूंची युती दरम्यान, पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, शरद पवार हे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. अजित दादा शरद पाव हा त्यांचा परिवार आहे. अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले होते की मला भाजप सोबत जायला शरद पवार यांनी सांगितले होते. त्यामुळे दोन पवार एकत्र होत असतील, तर चांगलेच आहे. दोन ठाकरे एकत्र येत आहेत, त्यांची मजबूरी आहे. त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, असेही नवनीत राणा म्हणाल्या.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ३८ नगराध्यक्ष आणि राज्यात पक्षामार्फत लढल्या गेलेल्या ३ हजार ६८१ जागांपैकी जवळपास ११०० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर अधिकृत निवडून आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक-शेख, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, सुरज चव्हाण, लतिफ तांबोळी उपस्थित होते. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने व महायुतीतील भाजप - शिवसेना या मित्र पक्षांना राज्यातील जनतेने प्रचंड पाठबळ व चांगला प्रतिसाद दिला आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढली तर काही ठिकाणी भाजप - राष्ट्रवादी युती आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी - शिवसेना अशी युती झाल्याचेही सुनिल तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. या निवडणूकांना सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ३८ नगराध्यक्ष आणि तर राज्यात एकंदरीत पक्षामार्फत लढल्या गेल्या ३ हजार ६८१ जागांवर नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर १ हजार ९० म्हणजे जवळपास ११०० नगरसेवक अधिकृत घड्याळ चिन्हावर निवडून आले असल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले. ग्रामीण भागात स्ट्राईक रेट चांगला काही ठिकाणी स्थानिक आघाडी, काही ठिकाणी विकास आघाडी अशाही आमच्या आघाड्या झाल्या होत्या आणि यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत ते पक्षाच्या अधिकृत आकडेवारीमध्ये धरलेले नसले तरी राज्यात झालेल्या या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद मिळालाच शिवाय ग्रामीण भागात स्ट्राईक रेट चांगला राहिला हेही सुनिल तटकरे यांनी सांगितले. सर्व ठिकाणी यश आलेच असे नाही परंतु... पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल व मंत्री मंडळातील आमचे सहकारी, पक्षाने नेमलेल्या स्टार प्रचारकांनीही प्रचाराची धुरा चांगल्या पध्दतीने हाताळली. आम्हाला सर्व ठिकाणी यश आलेच असे नाही परंतु हे घडत असताना ९ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणूकांचे जनतेत औत्सुक्य होते शिवाय निवडणूका न झाल्याने जनतेमध्ये नाराजीसुध्दा होती. पण निवडणूका होत आहेत याची स्वीकृतीही होती, असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले. आगामी निवडणुकांसाठी चांगले नियोजन करणार पक्षाने सामुदायिक मेहनत करत टीमवर्क म्हणून आपले काम दाखवले ते वाखाणण्याजोगे होते. आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन सुरू आहेच. शिवाय येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही अशाच पध्दतीचे नियोजन करणार आहोत, अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.
भाजपला जिथे गरज असते, तिथे ते मित्रपक्षांना जवळ करतात. मात्र, जिथे त्यांची ताकद वाढते, तिथे ‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझं’ अशी त्यांची वृत्ती आहे. सध्या भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याचे ठरवले आहे, मात्र शिंदे भाजपच्या दबावाखाली येतील असे वाटत नाही, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले की, सरकारकडे पाशवी बहुमत आहे, तरीही ते मला विरोधी पक्षनेते बनवायला घाबरतात. ही भीती म्हणजे कोकणी माणसाचा आणि इथल्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, उमेदवार देताना त्याचे समाजातील स्थान आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना यांचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये इटलीत बंदी घातलेले 'परमानेंट केमिकल' हे विषारी रसायन बनवले जात असल्याचा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी यावेळी केला. हे रसायन मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिली असली, तरी स्थानिक आणि पर्यावरण तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात एक क्लिप समाजमाध्यमांवर फिरत असून, मी त्याची सत्यता पडताळून पाहत आहे. तथ्य आढळल्यास याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विनायक राऊतांवर मिश्किल टिप्पणी खासदार विनायक राऊत यांच्या नाराजीच्या चर्चांवर बोलताना भास्कर जाधव यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. विनायक राऊत नाराज आहेत की खुश, हे मला माहित नाही. माहिती घेऊन सांगतो, असे ते मिश्किलपणे म्हणाले. तसेच, वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस दिल्यानंतर घेतलेल्या सभेचा फायदा आगामी निवडणुकीत नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी पक्षातील काही लोक शहर विकास आघाडी करून आमच्यासोबत येत आहेत, याचा अर्थ काहीतरी चुकीचे घडत असताना समान धागा पकडून लोक एकत्र येत आहेत. दरम्यान, राणे बंधूंवर मी काहीही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अरावली पर्वतरांगांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री अरावली पर्वतरांगा उद्ध्वस्त करण्याचे समर्थन करतात, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज अरावली, उद्या पश्चिम घाट आणि हिमालयातही हे खाणकामाला परवानगी देतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वतरांगेची व्याप्ती ठरवण्यासाठी केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने सुचवलेली व्याख्या स्वीकारली. या नव्या व्याख्येनुसार जमिनीपासून ज्या भू-आकृतींची उंची किमान 100 मीटर आहे, त्यांनाच 'अरावली पर्वतरांग' मानले जाईल. 100 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या टेकड्या किंवा भाग आता तांत्रिकदृष्ट्या 'अरावली'च्या व्याख्येतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या भागांत आता खाणकाम आणि बांधकामासाठी खुला होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, केंद्र सरकारवर सडकून टीका करत, भाजप पर्यावरणाचा विनाश करायला निघाल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरे यांनी अरावलीतील खाणकामाला दिलेल्या परवानगीबाबत केंद्र सरकारला काही रोकडे सवाल विचारले आहेत. ते म्हणाले, या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतरही सरकार यावर खोटे का बोलत आहे? अरावली टेकड्यांचा एखादा छोटा भाग जरी असला, तरी तो खाणकामासाठी खुलाच का केला जात आहे? ज्याप्रमाणे भाजप देशाची सामाजिक वीण नष्ट करत आहे, त्याचप्रमाणे ते देशाची पर्यावरण व्यवस्थाही नष्ट करण्यासाठी का उतावीळ आहेत? आज अरावली, उद्या पश्चिम घाट-हिमालय अरावली टेकड्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी भविष्यातील धोक्याचा इशाराही दिला आहे. आज अरावली टेकड्यांवर खाणकामाची परवानगी दिली जात आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर उद्या ते खाणकामासाठी पश्चिम घाट किंवा हिमालय देखील खुले करतील, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. राजस्थानमधील जनआंदोलनाचे कौतुक अरावली टेकड्यांच्या रक्षणासाठी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचे आदित्य ठाकरेंनी समर्थन केले आहे. अरावली टेकड्या वाचवण्यासाठी संपूर्ण राजस्थान ज्या प्रकारे रस्त्यावर उतरला आहे, ते पाहून प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. सध्याच्या सरकारकडून अपेक्षा नाही नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी विद्यमान केंद्र सरकारवर अविश्वास दर्शवला. सरकारने आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी आता दुप्पट वेगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, अशा प्रकारच्या संरक्षणाची आणि सकारात्मक कामाची आशा सध्याच्या सरकारकडून मुळीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. अजित पवार यांचे नेते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, त्यामुळे जर पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत ते हातमिळवणी करणार असतील, तर त्यांना महायुतीत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. तसेच, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिवसेना ठाकरे शरद पवारांच्या गटासोबत न जाता मनसे आणि काँग्रेसला सोबत घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी माहिती दिली की, मुंबईत काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, ती यशस्वी झाल्यास उद्याच्या पत्रकार परिषदेला शरद पवार स्वतः उपस्थित राहू शकतात. काँग्रेस मुंबईबाहेर इतर काही शहरांमध्ये शिवसेनेसोबत राहू शकते, त्यादृष्टीने अद्याप चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या या रणधुमाळीत ठाकरे बंधूंसमोर मतदारांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन टाळणे ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी असेल. तसेच, मुंबईतील उत्तर भारतीय मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता असल्याने, मराठी बहुल भागातील जास्तीत जास्त मराठी मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांना विशेष रणनीती आखावी लागणार आहे.
हिंदूंनीही चार –चार मुलांना जन्म द्यावा: नवनीत राणा
अमरावती : प्रतिनिधी एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि १९ मुले आहेत. तो म्हणतो की, मला तीस-पस्तीस मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका १९ मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन, चार-चार मुलं जन्माला घातली […] The post हिंदूंनीही चार – चार मुलांना जन्म द्यावा: नवनीत राणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर आरोप निश्चित
बीड : प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी बीडमधील विशेष मकोका न्यायालयात पार पडली. आजच्या सुनावणीत न्यायालयानं आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या खटल्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याप्रसंगी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना खटल्याच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे […] The post संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर आरोप निश्चित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे येथे प्रसिद्ध लेखिका गजाला शेख यांच्या 'द फिनिक्स पाथ' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. द पूना क्लब, कॅम्प येथे आयोजित या प्रकाशन समारंभात गजाला शेख यांनी आयुष्यातील आव्हानांवर मात करत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घेण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना शेख म्हणाल्या की, आयुष्यातील प्रश्न, मृत्यू आणि बदल या तीन गोष्टी कधीच बदलत नाहीत. या गोष्टी समजून घेत आयुष्य आनंदाने जगावे. अडचणींवर मात केल्यास आयुष्य सुखावह होते, अन्यथा ते व्यर्थ ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्यात अंशुमन आनंद यांनी गजाला शेख यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उदयन पाठक, ज्योतिषतज्ज्ञ संदीप अवचट आणि पार्थो सारथीदास यांची प्रमुख उपस्थिती होती. शेख यांनी आपल्या बालपणापासूनचे अनेक अनुभव सांगितले. चांगले-वाईट प्रसंग आयुष्यात चढ-उतार आणतात, पण अशा काळात न डगमगता सामोरे गेल्यास आयुष्य अधिक सुंदर होते, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातूनच या पुस्तकाची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. मोहन आगाशे यांनी गजालाच्या पुस्तकातून तिच्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याची आणि स्वतःला सावरण्याची क्षमता दिसून येते, असे सांगितले. तिला कोणाच्याही पाठिंब्याची किंवा सहानुभूतीची अपेक्षा नाही. तिने स्वतःच आपली लढाई लढली आहे. हे पुस्तक वाचकांना अडचणींवर मात करत स्वतःला कसे सांभाळावे हे शिकवते आणि स्त्रीची ताकद काय असते हे दर्शवते, असे आगाशे म्हणाले. ज्योतिषतज्ज्ञ संदीप अवचट यांनी गजाला यांचे व्यक्तिमत्व विलक्षण असल्याचे म्हटले. त्यांनी केवळ पुस्तकासाठी नव्हे, तर आपले अंतरंग उलगडले आहे. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांचे आयुष्य आहे. हे पुस्तक पथदर्शी असून त्याची मराठी आवृत्तीही प्रकाशित व्हावी, अशी अपेक्षा अवचट यांनी व्यक्त केली. उदयन पाठक यांनी गजाला यांच्या धैर्याचे कौतुक केले. 'महाराष्ट्राची मलाला' या त्यांच्यावरील कथेमुळे त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी अनेक अनाथ मुलांना आणि संस्थांना मदतीचा हात दिला आहे, असे पाठक यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुंढवा येथील जमीन प्रकरणात ही मागणी करण्यात आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे दमानिया यांनी म्हटले आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया आणि विजय कुंभार दोघेही आज बावधन पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पार्थ पवार यांच्याविरोधात मिळालेल्या सगळ्या कागदपत्रांवरील प्रत्येक पानावर त्यांची सही आणि व्यवहारासंबंधी नोटरी आहे. यावरून पार्थ पवारांना कुणीच वाचवू शकत नाही. हे डॉक्युमेंट्स पोलिसांना देण्यासाठी आम्ही बावधन पोलिस ठाण्यात आलो. दरम्यान, ही कागदपत्रे १८ डिसेंबरला पोलिसांकडे गेले होते, मात्र अजुनपर्यंत काही होत नव्हते, म्हणून आज आम्ही तक्रार देण्यासाठी आलो, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. पोलिसांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यात मुंढवा प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाल्या आहेत. याशिवाय, बावधन येथील एका प्रकरणात केवळ मुद्रांक शुल्क बुडवल्याची तक्रार आहे, ज्यात पुढे काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी असल्याचे दमानिया यांनी सांगितले. त्यांनी पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना या गुन्ह्याच्या स्वरूपाबाबत माहिती दिली असून, पोलिसांची कारवाई टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे नमूद केले. दमानिया यांच्या मते, या गुन्ह्यात एकच एफआयआर आणि एकच तपास अधिकारी असणे आवश्यक आहे, अन्यथा तपास भरकटू शकतो. खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील आले नाहीत, तर पार्थ पवार कधी येणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय पाटील यांची पोलिसांनी गोडीगुलाबीत चौकशी केल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्ष ही केस विसरून जाईल अशी अपेक्षा करत असल्याचे दमानिया म्हणाल्या. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए वारंवार अमेडिया कंपनीचे गुंड मुंढवा येथील जागा ताब्यात घेण्यासाठी गेले असताना त्यांच्या संपर्कात होते, असा दावा दमानिया यांनी केला. अजित पवार यांना जागा खरेदी करताना सर्व गोष्टींची माहिती होती, असेही त्यांनी म्हटले. मात्र, या चौकशीतून काही निष्पन्न होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दमानिया यांनी सिंचन घोटाळ्याचाही उल्लेख केला, ज्यात अजित पवार यांच्याविरोधात सर्व पुरावे दिले होते. तरीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत शपथविधी केला, ही गोष्ट चुकीची होती, असे दमानिया म्हणाल्या. शीतल तेजवानी यांनी न्यायालयात अनेक खटले दाखल केले असल्याने खरी चौकशी होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
इयत्ता 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून स्टंपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात घडली आहे. या घटनेने महाविद्यालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या मारहाणीच्या घटनेत जखमी झालेल्या विद्ययार्थयाचे नाव प्रसिक बनसोडे असे असून त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या प्रसिक बनसोडेने दिलेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करत स्टंपने मारहाण केली. तब्बल तीन तास मला मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे. तसेच रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने ही मारहाण केल्याचा पीडित विद्यार्थ्याने आरोप केला आहे. पीडित प्रसिक बनसोडेने असाही आरोप केला की, या आधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले आहेत. तसेच महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप प्रसिकने केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर अल असून पालक वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. 3 वर्षांच्या चिमूकल्याची आईच्या प्रियकराने केली हत्या दरम्यान, सोलापूरमध्ये तीन वर्षांच्या फरहान जाफर शेख या चिमूकल्याची त्याच्या आईच्या प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे असून त्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चिमुकल्याची आई शहनाज आणि आरोपी मौलालीचे विवाहबाह्य संबंध होते. 11 डिसेंबरच्या रात्री फरहान झोपलेला असताना कपडे खराब झाल्याच्या कारणावरून आरोपीने रागाच्या भरात मारहाण करून गळा दाबला. त्यानंतर फरहान खाली पडून जखमी झाल्याचे खोटे सांगून त्याला विजयपूरला नेण्यात आले. मात्र एसटी स्टँडवरून आरोपी पळून गेला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी फरहानचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनात गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात 19 वर्षांनंतर दोन 'ठाकरे' बंधू पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून उतरणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युती आता एक 'ओपन सीक्रेट' आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणालेत. तसेच मनसेला समाधानकारक जागा मिळतील का? या प्रश्नावर उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी मोठे विधान केले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा उद्या (बुधवारी) दुपारी 12 वाजता होणार असल्याचे जाहीर केले आहे. 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने मुंबईतील मराठी मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटात काही जागांबाबत तिढा असल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोणत्याही जागेबाबत तिढा नसल्याची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. नेमके काय म्हणाले संदीप देशपांडे? गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' आणि राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या दोन्ही निवासस्थानांवर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्यात मुंबईतील जागावाटपांसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे. याविषयी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, युती तर झालेलीच आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे. जागावाटपाबाबत आमचे नेते चर्चा करत आहेत. कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, कोणाचा डेटा काय सांगतो, याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे. यात कोणताही तिढा नाही, केवळ विजयाचे गणित जुळवले जात आहे. मनसेला समाधानकारक जागा मिळतील का? मनसेला समाधानकारक जागा मिळतील का? जागावाटपावरून पक्षात नाराजी नाट्य घडणार का? या प्रश्नावर संदीप देशपांडे यांनी अत्यंत भावनिक उत्तर दिले. ते म्हणाले, मला असे वाटते की, शेवटी मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. ही लढाई आम्ही लढणार आहोत. त्यात जागा हा विषय असला, तरी चर्चा होत राहील. आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही. त्यांच्याकडूनही कोणी नाराज होणार नाही.'' मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बलिदानाचीही तयारी देशपांडे म्हणाले, ''मला वाटते की, मुंबईसाठी त्याग करायला सगळे जण तयार आहेत. बलिदान द्यायला सगळे जण तयार आहेत. परंतु, कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो. काय परिणाम होऊ शकतात. कोणत्या वॉर्डात कोण येऊ शकते. या सगळ्या गोष्टी चर्चेचा भाग आहेत. ती चर्चा आमची नेतेमंडळी करत आहेत 100 चा आकडा पार करण्याचा राऊतांचा निर्धार दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत अत्यंत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच आम्ही सगळे एकमेकांच्या संवादात आहोत. जागावाटप झाल्याशिवाय कोणतीही युती जाहीर होत नाही. आमच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आम्ही दोन्ही पक्ष मनापासून एकत्र आहोत. दोन्ही पक्षात जागावाटपावरून कोणताही तणाव, रस्सीखेच, विसंवाद नाही. दोन्ही पक्षांमध्ये एका कोणत्या जागेसाठी कोणी अडून बसले आहेत, असे अजिबात झालेले नाही. वरळी येथे दोन भाऊ एकत्र आले, तेथेच युतीची घोषणा झाली. घोषणेबाबत अन्य कुणी चिंता करू नये. आमचे जागावाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेले आहे. शिवसेना आणि मनसे युती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तेव्हा आम्ही 100 चा आकडा 100 टक्के पार करू, असा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला.
कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडता यावी या एकाच उद्देशाने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख राजू उर्फ रेणुकादास वैद्य यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताच राजू वैद्य यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडली असल्याचा आरोप केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या प्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैद्य यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राजू वैद्य यांनी पक्षांतराबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयीन जीवनापासून हिंदुत्व या एकाच अजेंडावर आम्ही काम करत आलो आहोत. मात्र आता मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षात हिंदुत्ववादी भूमिका मांडणे शक्य नाही. त्यामुळे आपण पक्षांतर केले असल्याचे राजू वैद्य यांनी यावेळी सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासासाठी आपण हा पक्ष प्रवेश केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजू वैद्य यांचे पक्षांतर अनाकलनीय - अंबादास दानवे राजू वैद्य यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे म्हणाले की, परवापर्यंत राजू वैद्य आमच्यासोबत होते. अचानक काय घडलं हे समजत नाही. ते एक सक्षम आणि चांगले कार्यकर्ते होते. पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. तरीही त्यांनी हा निर्णय का घेतला, हे अनाकलनीय आहे. पक्षांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना दानवे यांनी स्पष्ट केलं की, प्रत्येक पक्षात काही ना काही अंतर्गत मतभेद असतात. मात्र उखाळ्या-पाखाळ्या काढण्यातून राजकीय संस्कृती सुधारत नाही. कोणत्या पक्षात मतभेद नसतात? पण त्यावर सार्वजनिक टीका करणे योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन ठाकरे गटावर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांच्या प्रवेशावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. रशीद मामूंना कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळू देणार नाही, अशी ठाम भूमिका खैरे यांनी घेतली आहे. चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू यांच्यामध्ये वादावादी देखील झाले. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. त्यात आता राजू वैद्य यांनी देखील हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन ठाकरे गटावर आरोप केले आहेत. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातले राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव सेनेला मोठा धक्का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांच्या या राजीनाम्यामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. यापूर्वी उद्धव सेनेच्या नऊ नगरसेवकांनी पक्ष सोडून शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पक्षाला आधीच अनेक धक्के बसले होते. आता आगामी निवडणुकांपूर्वी भाजपने थेट महानगरप्रमुखांना आपल्याकडे खेचून उद्धव सेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा... राजू वैद्य परवापर्यंत आमच्यासोबत होते, हे अनाकलनीय:प्रलोभनांच्या राजकारणावर अंबादास दानवे यांची टीका; मशाल यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून संभाजीनगरात उद्धव सेनेत वाद:चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध, म्हणाले- 'तिकीट मिळू देणार नाही'
‘ग्रंथदिंडी’त होणार भारतीय संस्कृतीचे दर्शन
पुणे : प्रतिनिधी सातारा येथे दि १ ते ४ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात येणा-या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाज सुधारकांचे कार्य,भारतीय संस्कृती,लोकसाहित्य तसेच साता-यातील शिक्षण,पर्यटन आणि साहित्य परंपरांचे चित्रण दिसून येणार आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद […] The post ‘ग्रंथदिंडी’त होणार भारतीय संस्कृतीचे दर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे पुस्तक महोत्सवातात कोटींची उलाढाल
पुणे : पुस्तक महोत्सवात साडेबारा लाख नागरिकांनी भेट देत सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली असून, त्यातून सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि पुस्तक खरेदी करणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महोत्सवात ६० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांचा सहभाग होता. त्यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव […] The post पुणे पुस्तक महोत्सवातात कोटींची उलाढाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रुझोन सोलर या प्रमुख ब्रँडतर्गत कार्यरत असलेल्या सनटेक एनर्जी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडने दिग्गज क्रिकेटपटू, जागतिक क्रीडा क्षेत्रातील आयकॉन आणि कल्याणकारी वृत्तीचे प्रतीक असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यासोबत धोरणात्मक गुंतवणूक तसेच दीर्घकालीन भागीदारीची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. सचिन तेंडुलकरबरोबरील ही ऐतिहासिक भागीदारी ट्रुझोन सोलरच्या विकासाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. येत्या २०३० पर्यंत भारतात आघाडीच्या तीन सोलर ईपीसी कंपन्यांमध्ये स्थान मिळविण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षा असून या भागीदारीमुळे या महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळाली आहे. विश्वास, दर्जेदार कामगिरी आणि राष्ट्रीय अभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले तेंडुलकर यांच्याशी केलेल्या सहकार्यामुळे ट्रुझोन सोलरच्या ब्रँड विश्वासार्हतेला नवीन उंची प्राप्त झाली आहे, तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ-ऊर्जा कंपनीच्या दिशेने वाटचालीला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. तेंडुलकर यांच्या या धोरणात्मक गुंतवणूकीमुळे ट्रुझोन सोलरच्या आगामी विस्तारात विविध योजनांची अंमलबजावणी करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच कामकाजात पायाभूत सुविधा वाढण्याबरोबरच सौर मूल्य साखळीमध्ये कंपनीची वितरण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कंपनी तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये आपली स्थिती आणखी बळकट करणार आहे, तर उत्तरप्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि केरळ यासारख्या उच्च-क्षमतेच्या बाजारपेठांमध्ये अधिक वेगाने विस्तार करण्यावर भर देणार आहे. भागीदारीबद्दल भाष्य करताना ट्रुझोन सोलरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक चारुगुंडला भवानी सुरेश म्हणाले, “सचिन तेंडुलकर यांच्यासोबतची ही भागीदारी केवळ एक गुंतवणूक नसून तिला त्यापेक्षाही अधिक मूल्य आहे. ही भागीदारी म्हणजे आमची मूल्ये, प्रशासन आणि दूरदृष्टीला लाभलेले एक शक्तिशाली पाठबळ आहे. ग्राहकांचा विश्वास वृध्दींगत करणारा त्याचबरोबर विस्तारत जाणारा आणि भविष्यासाठी सज्ज असा सौर ऊर्जा उद्योग उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला ट्रुझोन सोलरवर तेंडुलकर यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे बळकटी मिळालेली आहे. भारतातील घरांना, व्यवसायांना आणि उद्योगांना स्वच्छ ऊर्जापुरवठा हा प्रमुख आणि उपयुक्त पर्याय बनवण्याचे ध्येय आम्ही या भागीदारीतून आखलेले आहे.’’ ट्रुझॉन सोलार ही कंपनी निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक (CI), तसेच मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे आणि सौरऊर्जा विकास प्रकल्प उभारणीपासून ते ऊजानिर्मिती ते वापर या संपूर्ण जीवनचक्राची जबाबदारी घेत संपूर्ण सौरऊर्जा योजनाच प्रदान करते. युटिलिटी-स्केल ईपीसी प्रकल्प, छतावरील सौरऊर्जा प्रणाली, पीएम-कुसुम कृषी सौर कार्यक्रम, औद्योगिक सीएसजी प्रकल्प आणि सर्वसमावेशक संचालन व देखभाल सेवा आदी घटक कंपनी सध्या एकत्रितरित्या पुरविते. उत्कृष्ट कामगिरी, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि देशभरात वाढता विस्तार यामुळे ट्रुझोन सोलरने गुणवत्ता, विश्वासार्हता आणि दीर्घकालीन परिणाम या घटकांवर लक्ष केंद्रित करत आगळेवेगळे सौर ऊर्जा व्यासपीठ तयार केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच्या भागीदारीमुळे भागधारकांचा कंपनीवरील विश्वास आणखी वृध्दिंगत होणार आहे, तसेच धोरणात्मक सहकार्यासाठी नवनवीन संधीही उपलब्ध होतील आणि भारतात वेगाने विकसित होत असलेल्या अक्षय ऊर्जा परिसंस्थेमध्ये कंपनीची आघाडीचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. लाखो ग्रामीण आणि शहरी ग्राहकांना सौरऊर्जेकडे वळण्यासाठी सक्षम करताना भारताच्या अक्षय ऊर्जा ध्येयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे आणि त्याव्दारे भावी पिढ्यांसाठी एक स्वच्छ, उज्वल आणि आत्मनिर्भर भविष्य निर्माण करणे, हा या भागीदारीमागील दीर्घकालीन दृष्टीकोन आहे.
कोल्हापूर-मुंबई खासगी बसवर ‘सिनेस्टाईल’ दरोडा
कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणा-या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे १ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस रविवारी रात्री ११ च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेलजवळ तीन […] The post कोल्हापूर-मुंबई खासगी बसवर ‘सिनेस्टाईल’ दरोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सहा लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत श्यामलाल तलरेजा (वय ३५, रा. फ्लेमिंगो सोसायटी, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. तलरेजानगर, जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागात राहतात. त्यांची आरोपी तलरेजासोबत २०१८ मध्ये ओळख झाली होती. तलरेजाने महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाने आरोपीने महिलेकडून वेळोवेळी सहा लाख ९६ हजार रुपये घेतले. महिलेने नोकरीबाबत विचारणा केली असता, त्याने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत, आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची दोन लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. चोरट्यांनी त्यांना 'तुमची पॉलिसी बंद पडली असून, परताव्यापोटी १२ लाख रुपये मिळतील' असे सांगितले. ही रक्कम मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून त्यांनी तक्रारदाराला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख ५७ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मुंंबई : प्रतिनिधी राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातही उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात फक्त तीन शब्दांत आपले नेमके म्हणणे मांडले आहे. ‘उद्या […] The post उद्धव-राज ठाकरे एकत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रातील सत्तलोभी राजकारणाला आव्हान देईल, असे दिल्लीचे माजी आमदार आणि आपचे प्रभारी प्रकाश जरवाल यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली विचारधारा सोडून सामान्य जनतेचा अपेक्षाभंग केला असून, राज्यात भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडून आल्यानंतर नगरसेवक कोट्यधीश बनले आहेत, असे निरीक्षण जरवाल यांनी नोंदवले. विकासाची गंगा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, दवाखाने, वाहतूक आणि रोजगाराचे सक्षमीकरण करणे हे 'आप'चे धोरण असेल. पंजाब आणि दिल्लीमध्ये 'आप'ने जे बदल घडवून आणले, तेच 'आप'चे विकासाचे मॉडेल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असून, सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करेल. आमच्याकडे प्रामाणिक आणि इमानदार कार्यकर्ते असल्याने, आम्ही अनेक नगरपालिकांमध्ये उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे, असे जरवाल यांनी सांगितले. 'आप'ने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राखी बिडलान यांचा समावेश असून, हे नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती प्रकाश जरवाल यांनी दिली. यावेळी बोलताना 'आप'चे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे 'आप'च्या उमेदवार शालिनीताई सुखधान निवडून आल्या आहेत. या विजयामुळे महाराष्ट्रात 'आप'ने आपले खाते उघडले आहे. या पत्रकार परिषदेला 'आप'चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई : कडाक्याच्या थंडीत अंड्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. एक डझन अंड्यासाठी १०० रुपयांची नोट कामी येत आहे. त्यामुळे खवय्यांच्या तोंडची चव गेली आहे. यापूर्वी त्यापेक्षा स्वस्तात अंडी येत होती. पण थंडी वाढताच मागणी वाढल्याने अंड्याच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्यामुळे थंडीत ऑम्लेट आणि अंडा करीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात […] The post अंड्यांचे भाव कडाडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकासांठी काँग्रेसने आज 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपका, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अमित देशमुख, अझरूद्दीन, राज बब्बर अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. ही यादी 19 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. काँग्रेसच्या महापालिका निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, छत्रपती शाहू महाराज, सतेज उर्फ बंटी पाटील, मुकुल वासनिक, रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटून मोहम्मद अझरूद्दीन, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसिम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिन पटेल यांचीही या यादीत नावे आहेत. नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, विश्वजित कदम, भाई जगताप, अनिल अहेमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजीद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुझफ्फर हुसेन, एम. एम. शेख, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, हनुमंत पवार यांचीही स्टार प्रचारकांच्या यादीत नावे आहेत.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीय वाढला असून, त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील तूर पिकावर होताना दिसत आहे. तापमानात झालेल्या तीव्र घसरणीमुळे तुरीची वाढ मंदावली असून, शेंगा भरण्याची प्रक्रिया संथ झाली आहे. परिणामी, यंदा तुरीची काढणी अपेक्षेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता असून, तूर हंगाम लांबण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचा थेट फटका पुढील […] The post तूर हंगाम लांबणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ॲड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप सहभागी झाले होते. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी स्वतंत्र चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रवादी एकत्र लढल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. दरम्यान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नसून, ते मुंबईत असल्याने बैठकीला अनुपस्थित राहिले. मात्र, ते पक्षासोबतच राहतील, असा विश्वास अंकुश काकडे यांनी व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडून ठाकरे गटालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे पुण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकीत कोणती समीकरणे आकाराला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या संभाव्य युतीमुळे शरद पवार गटातच अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतर्गत नाराजीचे सूर उघडपणे ऐकू येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण पक्षातून राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. हा इशारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असला, तरी त्याचा दोन्ही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्वावर फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. कारण, जगताप यांच्या भूमिकेनंतरही पुण्यात दोन्ही गटांतील नेत्यांची गुप्त बैठक सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार गटाकडून अंकुश काकडे आणि विशाल तांबे, तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे सहभागी झाले आहेत. स्थानिक पातळीवरील या चर्चेनंतर महापालिका निवडणूक आणि इतर राजकीय मुद्द्यांबाबतचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला जाणार असल्याचे समजते. जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची- प्रशांत जगताप दरम्यान, प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. आपण लवकरच मुंबईत सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याशी आपला वैयक्तिक वाद नसल्याचे सांगत त्यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला की, एकीकडे अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी असताना, दुसरीकडे त्यांच्यासोबत आघाडी कशी करायची? पुणेकरांना सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, असे ते म्हणाले. महायुती सरकारमुळे पुण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अजित पवार त्या सरकारचा भाग असल्याने जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपण हट्टाग्रही नसून विचारधारेशी निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पक्षांतरांच्या हालचालींनाही वेग आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, पैलवान आणि माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि त्यांची कन्या दीप्ती कांबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अंबरनाथ कांबळे हे यापूर्वी भाजपमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांतील हालचाली अधिक तीव्र दुसरीकडे, पुणे शहरातही पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि माजी नगरसेवक संजय भोसले हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांतील हालचाली अधिक तीव्र झाल्या असून, युती, आघाड्या आणि नाराजी यांचा गुंता अधिकच वाढताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची नाराजी आणि पक्षांतरांची लाट, यामुळे पुणे महानगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही, त्यामुळे मला त्याबद्दल अधिकृत माहिती नाही, असे सांगत सुळे यांनी या राजीनामा नाट्यावर सस्पेन्स कायम ठेवला आहे. तसेच, २६ डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार असल्याच्या अजित पवारांच्या दाव्यावरही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. प्रशांत जगताप यांच्या नाराजीबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजीनामा द्यायचा असेल तर तो प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जाणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप तरी तसे काही घडल्याचे माझ्या कानावर नाही. कालच मी स्वतः, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी प्रशांत जगताप यांच्याशी मुंबईत दोन तास सविस्तर चर्चा केली. महापालिका निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असावे आणि समोर कोणते पर्याय आहेत, यावर आमचे सकारात्मक बोलणे झाले आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. मतांचे विभाजन टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मुंबईतील निवडणुकीबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या ऐक्यावर भर दिला. आमची मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत चर्चा सुरू आहे. आजही आम्ही त्या चर्चेसाठी पुन्हा बसणार आहोत. दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. मताचे विभाजन होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. आम्ही जे काही करतोय, ते विकासासाठी करतोय, असेही त्यांनी नमूद केले. २६ डिसेंबरच्या 'मुहूर्ता'वर सुळेंची प्रतिक्रिया अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना २६ डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होणार असल्याचे विधान केले आहे. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार हे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी जर काही विधान केले असेल, तर ते नक्कीच विचार करून आणि जबाबदारीने केले असेल. मात्र, अद्याप माझ्याकडे किंवा पक्षाकडे असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. या विधानातून सुळे यांनी युतीची शक्यता पूर्णपणे नाकारली नाही, मात्र चेंडू अजित पवारांच्या कोर्टात ढकलला आहे. कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू महापालिका निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कार्यकर्त्यांचे हित आणि त्यांची मते महत्त्वाची ठरणार आहेत. आघाड्यांबाबत अनेक स्तरावर चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत काही ठोस हातात पडत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जागावाटप सध्या अंतिम टप्प्यात असून कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवूनच आम्ही पुढील पाऊल उचलू, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या सिनेस्टाईल दरोड्यामुळे प्रवाशांमध्ये आणि खासगी बस चालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक MH 09 GJ 7272) रविवारी रात्री 11 च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेलजवळ तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. ही बस पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील 'भुताचा माळ' परिसरात आली असता, बसमध्ये आधीच बसलेल्या त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले. पाठलाग करून गाठले आणि लुटले बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या पाच ते सहा साथीदारांनी बसला वेढा घातला. हे सर्व दरोडेखोर बसमध्ये शिरले आणि त्यांनी अरेरावी करत प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी बसमधील सुतळी बारदानातील 34 किलो आणि प्लास्टिक पोत्यातील 26 किलो अशी एकूण 60 किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 1 कोटी 22 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. थांबलात तर मारून टाकू! लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी जाताना बस चालक आणि प्रवाशांना सज्जड दम भरला. या परिसरात अजिबात थांबायचं नाही, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी देऊन ते पसार झाले. प्रचंड घाबरलेल्या बस चालकाने बस तशीच पुढे नेली आणि सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबवून '112' क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच सांगली आणि कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि बसमधील प्रवाशांच्या वर्णनावरून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. निवडणुकीच्या जल्लोषात न्हाऊन निघालेल्या जिल्ह्यात या घटनेमुळे भीती पसरली असून, अशा प्रकारे महामार्गावर बस लुटली गेल्याने खासगी बस कंपन्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नेमके कुणासोबत जाणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात बोलताना आंबेडकरांनी इतर पक्षांसोबतच्या आघाडीबाबत सूचक विधान केले. नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहापाण्याच्या चर्चा सुरू आहेत, मुलगी पसंत पडली की लगीन लावू, असे म्हणत अद्याप कोणत्याही पक्षाशी अधिकृत युती झाली नसल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी मुंबईतील जागावाटपाचा '50-50' फॉर्म्युला मांडत मित्रपक्षांना मोठा इशाराही दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई आणि नागपुरात काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मान्य केले असले तरी, त्यांनी जागावाटपाच्या अटी कडक केल्या आहेत. आम्ही मुंबईत 200 जागांवर तयारी केली असून 50 टक्के जागांच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. नगरपालिका निवडणुकीत आमची ताकद काय आहे हे दिसले आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अजूनही एकत्रित निर्णय घेऊ शकत नसल्याने आम्हाला स्वतंत्र विचार करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिंदे यांची शिवसेना (12 जागा) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (१० जागा) यांच्याशीही प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. अकोल्याचा निधी बारामतीला; संजय धोत्रेंवर गंभीर आरोप पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी अकोल्याचे भाजपचे माजी खासदार संजय धोत्रे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. अकोल्यातील भूमिगत गटार योजनेच्या अपयशाला धोत्रे जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय धोत्रे यांनी ही योजना नको म्हणून केंद्राला पत्र लिहिले होते. त्यामुळे अकोला महापालिकेला मिळणारा 350 कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीला पळवला. खुद्द अजित पवारांनी मला फोन करून हा निधी बारामतीकडे वळवल्याचे सांगितले होते, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या आरोपामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आता या आरोपावर भाजप काय उत्तर देते, हे पाहावे लागणार आहे. यशवंत भवन'वर इच्छुकांची गर्दी अकोला महापालिकेत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने तिकिटासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या कृषीनगरमधील 'यशवंत भवन' या निवासस्थानी आज इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील 80 जागांसाठी आतापर्यंत २०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेषतः मुस्लिम आणि दलित बहुल प्रभागांमध्ये वंचितच्या तिकिटासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?
पुणे : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील सर्व २९ महापालिका निवडणुकांत महायुती म्हणून लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. मात्र, पुण्यात भाजप-शिवसेना यांच्यात युती होत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची वारंवार चर्चा होत होती. अखेर त्यांच्यात सोमवारी (२२ डिसेंबर) मुंबईत चर्चा […] The post पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी नगरसेवक आणि गटनेते पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, भाजप हे जगातील सर्वात मोठे संघटन असून, आम्ही केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर वर्षभर काम करतो. जे लोक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि पक्षविस्तारासाठी ज्यांची आम्हाला गरज आहे, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. भाजप हा कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात अनेक विकासकामे झाली आहेत. मोहोळ यांनी पुढे सांगितले की, सुतार आणि भोसले हे दोघे अनेक वर्षांपासून शहराच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत. भाजप आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती होती आणि त्यांनी राजकीय हिंदुत्ववादी वारसा जपला आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संजय भोसले यांनी वर्षानुवर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून येरवडा परिसरात काम केले असून, ते तीन वेळा नगरसेवकही होते. या पक्षप्रवेशावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस सुशील मेंगडे, पुनीत जोशी, रवींद्र साळगावकर, प्रियांका शेंडगे, अमोल कविटकर आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे भाजपमध्ये स्वागत केले. ते म्हणाले की, मनपात आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले आहे आणि हिंदुत्वाचा धागा कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्ती पक्षात आल्या आहेत. शिवसेनामध्ये काम करत असताना त्यांना जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्यापेक्षा अधिक स्थान आम्ही देऊ. या प्रवेशामुळे त्यांच्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार असून, मनपावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आपण सज्ज होऊ. संजय भोसले म्हणाले, मागील दोन निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. ज्या काँग्रेसचा विरोध कायम केला पण आघाडी मध्ये त्यांच्या सोबत काम केले.मात्र, आम्हाला लोकांनी शिव्या घातल्या आहे.नंतर काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नसून काँग्रेसने येरवडा परिसरात निवडणुकीस तीन जागा सोडल्या नाही. भाजप सोबत आम्ही २५ वर्ष एकत्रित काम केले. त्यांची साथ सोडल्यावर आम्हाला दुःख होते. काँग्रेस आघाडी धर्म पाळत नाही. भाजप हिंदुत्ववादी पक्ष असून त्याकरिता आम्ही आज पक्षप्रवेश केला आहे. पृथ्वीराज सुतार म्हणाले, ४० वर्षापासून आम्ही हिंदुत्व मुद्द्यावर कोथरूड परिसरात आम्ही काम करतो आहे. पंतप्रधान मोदी यांनी हिंदुत्व मुद्द्यावर देशवासी एकत्र केले असून विकासाच्या मार्गावर ते सर्वांना घेऊन जात आहे त्यामुळे आज आम्ही पक्ष प्रवेश करत आहे.
राज्यात थंडी ओसरली!; कमाल तापमानात वाढ
मुंबई : प्रतिनिधी राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार असून निफाड आणि धुळ्यात तापमानाचा पारा ६ अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे. वातावरणात होणा-या सततच्या बदलांमुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. काल म्हणजेच सोमवारी निफाड […] The post राज्यात थंडी ओसरली!; कमाल तापमानात वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर सज्ज; हॉटेल्स फुल्ल, रस्ते जाम
मुंबई : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. नाताळपासून सुरू झालेला पर्यटकांचा ओघ नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. यंदा कोकण पर्यटनाने गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले आहेत. सलग […] The post नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर सज्ज; हॉटेल्स फुल्ल, रस्ते जाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागाने नागपूरमध्ये २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष आणि तक्रार हाताळणी केंद्र स्थापन केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जनतेकडून तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये संशयास्पद स्थितीत मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा वस्तू नेताना आढळल्यास नागरिक ०२२-२२६३५५११, २२६२७२७५ आणि १८००-०२२-०११५ (टोल फ्री) या क्रमांकांवर तक्रार करू शकतात. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, आयकर विभागाकडून संबंधित प्रकरणाची आयकर कायद्यातील तरतुदींनुसार चौकशी केली जाईल. जर संबंधित व्यक्ती समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकली नाही, तर तिच्याकडील रक्कम किंवा वस्तू जप्त केली जाईल. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा वस्तू सोबत घेऊन जाताना अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र आणि पॅनकार्ड सोबत ठेवावे, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सेमिनेरी हिल्स परिसरातील प्रधान आयकर विभागातर्फे (अन्वेषण) १८००-२३३-०३५५ आणि १८००-२३३-०३५६ हे टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. काळ्या पैशाच्या वापराशी संबंधित छायाचित्रे, ध्वनीचित्रफित किंवा ध्वनीफित यांसारखे पुरावे ९४०३३-९०९८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवता येतील. रोख रकमेचे वाटप किंवा वाहतूक करण्यासंबंधीची माहिती मिळाल्यास ती विभागातर्फे देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. याव्यतिरिक्त, नागरिक nagpur.addldit.inv@incomtax.gov.in आणि nashik.addldit.inv@incomtax.gov.in या ईमेल पत्त्यांवरही आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण घाडगे यांना गंभीर अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात सेवेतून बडतर्फ करण्याची विभागीय प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. गोपनीय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. चौकशीत प्रवीण घाडगे यांनी आपल्या पदाचा आणि पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करून एका वादग्रस्त बिल्डरला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. संबंधित बिल्डरचा आंदेकर टोळीशी थेट संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांनी पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करत सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आंदेकर टोळीशी संबंधित बिल्डर अविनाश पवार याला जमीन वादाच्या प्रकरणात मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकण्यात आला होता. मात्र, एसीपी खटके यांनी कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार देत हा प्रकार थेट पोलिस उपायुक्त निखिल पिंगले यांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, जमीन वादाच्या एका प्रकरणात काही तक्रारदार अविनाश पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. तक्रार दाखल होऊ नये म्हणून अविनाश पवार याने तक्रारदारांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ‘स्टॅनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे समोर आले असून, त्याचा थेट संपर्क प्रवीण घाडगे यांच्याशी असल्याचे तपासात उघड झाले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने स्टॅनली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत स्टॅनलीने धक्कादायक खुलासा करत सांगितले की, प्रवीण घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आणि तडजोडीसाठी २० लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार याचे प्रकरण स्वतः प्रवीण घाडगे यांच्याकडे नेल्याची कबुलीही त्याने दिली. एका बाजूला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आंदेकर टोळीविरोधात कठोर कारवाई सुरू असताना, पोलिस दलातीलच एक कर्मचारी त्या टोळीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. तपासात यापूर्वीही प्रवीण घाडगे यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याचे समोर आले असून, ते पोलिस आयुक्तांच्या नावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप होता. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच प्रवीण घाडगे यांची ‘भरोसा सेल’मध्ये बदली करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी गैरप्रकार थांबवले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते पुन्हा पीआरओ पदावर येणार असल्याचा दावा करत लोकांना फोन करत होते आणि आईच्या आजारपणाचे कारण देत साइड पोस्टिंग मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर पीआरओ पदाचा गैरवापर करून अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सातत्याने सहभाग आढळल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली. राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. त्यातही उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आलेत. राऊतांचे म्हणणे काय? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात फक्त तीन शब्दांत आपले नेमके म्हणणे मांडले आहे. 'उद्या १२ वाजता' असे वाक्य लिहून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एक फोटो ट्विट केलाय. त्यात ठाकरे बंधूंच्या हातांमध्ये गुलाबांच्या फुलांचा एक मोठा गुच्छ दिसतोय. एकाद्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. उद्धव यांनीच पक्ष सोडायला भाग पाडले ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते राम कदम म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडायला भाग पाडले होते. मात्र, आता त्यांना राज यांची आवश्यता आहे. त्यामुळे ते त्यांच्या दारी गेलेत. कोविडच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. जनतेच्या कफनमध्ये पैसे खाल्ले. आता दोघेही मराठी माणसांवर बोलतील. मात्र, यांना आवश्यकता असेल, तेव्हा मराठी माणूस आठवतो. हे किती एकत्र येऊ द्या. त्यांचा आकडा ३५-४० च्या वर जाणार नाही,' अशी टीका त्यांनी केली. (बातमी अपडेट होत आहे...)
खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा ठपका अखेर न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्टपणे समोर आला आहे. बीड येथील विशेष मकोका न्यायालयात आज या बहुचर्चित हत्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, न्यायालयाने सर्व आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असला, तरी न्यायालयाने त्याला आळा घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली असून त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जनआक्रोश आणखी वाढला. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून उर्वरित सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेनंतर बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. मारहाणीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. या हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आल्यानंतर थेट मुंडे यांच्यावरही आरोप झाले. वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. पुढील सुनावणी आता 8 जानेवारी रोजी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचे वकील उपस्थित होते, तर सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींवरील आरोपांचे वाचन करून दाखवले. मात्र, वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप मान्य नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 8 जानेवारी रोजी होणार आहे. न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, खंडणी मिळण्यास अडथळा निर्माण झाला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपींच्या वकिलांकडून ‘डी फॉर डिले’ आणि ‘डी फॉर डिरेल’ म्हणजेच खटला लांबवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, न्यायालयाने तो ओळखून योग्य आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष पुराव्यांचे सादरीकरण लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात असो वा अन्य कोणत्याही न्यायालयात, न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला वेग मिळाल्याने पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याला न्यायाची अपेक्षा आहे.
'चला कवितेच्या बनात'चा गौरव:उदगीरचे अनंत कदम यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर
यंदाचा रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार उदगीरचे अनंत कदम यांना जाहीर केल्याची माहिती, साहित्यिक सुरेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केलाय. साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक, संस्था किंवा व्यक्तीसाठी पाच हजार रुपये, ग्रंथभेट, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी कसलीही प्रवेशिका मागवली जात नाही. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. उदगीरचे अनंत कदम हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी वाचन चळवळीची गरज लक्षात घेऊन जून २०११ पासून 'वाचक संवाद' हा उपक्रम सुरू केला तो आजही समविचारी मित्रांना घेऊन अखंडपणे चालू आहे. आत्तापर्यंत ३५१ वक्त्यांनी त्यांच्या या उपक्रमात हजेरी लावलेली आहे. आतापर्यंत ३५१ पुस्तकांवर तितक्याच संवादकांनी 'वाचक संवाद'मध्ये संवाद साधलेला आहे. 'चला कवितेच्या बनात' हा उपक्रमही ते राबवतात. या यशस्वी उपक्रमशीलतेमुळे त्यांची निवड केल्याचे सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. येत्या जानेवारीमधे त्यांच्या घरी जाऊन अनंत कदम यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराने अनंत कदम यांच्या कार्याची दखल घेतल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे या पुस्तकास मिळाला होता. सचिन पाटील यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. संबंधित वृत्त जिद्दी लेखकाचा सन्मान:सचिन पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे पुस्तकाला पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला बसलेला जबर धक्का, त्यानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यावर आलेल्या विविध प्रतिक्रिया यामुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते आशिष देशमुख यांच्या भूमिकांमुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांपैकी केवळ एक नगरपरिषद आणि एक नगरपंचायत भाजपला जिंकता आल्याने पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. या पराभवावरून मुनगंटीवारांनी थेट पक्ष संघटनेवर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर भाजपमधील सुप्त मतभेद उघडपणे समोर आले. चंद्रपूरमधील निकाल जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी या पराभवाची जबाबदारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टाकली. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा रंगली. मुनगंटीवारांनी यानंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची घोषणा केली होती. या दौऱ्याच्या घोषणेला अनेकांनी अंतर्गत नाराजीचा सूर असल्याचे मानले. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने, पक्षाच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, काही दिवसांतच या राज्यव्यापी दौऱ्यावर मुनगंटीवारांनी स्वतःच पडदा टाकला. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यभर दौऱ्याचा विषय आता संपला आहे. तो विषय आता बंद झाला आहे. भेटीगाठी होत राहतील, चर्चा होतील, असे सांगत त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलणे टाळले. सध्या आपण काही नेत्यांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे मुनगंटीवारांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केल्याचे संकेत मिळाले. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे भाजपमध्ये सुरू असलेली चर्चा काही प्रमाणात शांत होत असल्याचे चित्र आहे. मुनगंटीवारांचा दौरा रद्द होण्यामागे पक्ष नेतृत्वाशी होणारा संवाद दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील पराभवावर भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी मुनगंटीवार यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार आज सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत चंद्रपूरच्या निकालासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुनगंटीवारांचा दौरा रद्द होण्यामागे पक्ष नेतृत्वाशी होणारा थेट संवाद हेच कारण असल्याची चर्चा आहे. सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? - आशिष देशमुख या संपूर्ण वादावर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया देत मुनगंटीवारांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मुनगंटीवारांची तुलना थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी करत, सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला. देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणतीही इच्छा नाही की पक्षात मतभेद निर्माण व्हावेत. मुनगंटीवारांनी फडणवीसांवर श्रद्धा आणि संयम ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुनगंटीवार हे वरिष्ठ नेते असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची मेहेरनजर राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. सख्खे भाऊ एकत्र यावेत, ही आमची सदिच्छा दरम्यान, राजकीय चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. दोन सख्खे भाऊ एकत्र यावेत, ही आमची सदिच्छा आहे. मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे, त्यामुळे मुंबईसाठी ते सर्व प्रयत्न करतील, असे मुनगंटीवार म्हणाले. या वक्तव्यामुळे भाजपचा ठाकरे बंधूंच्या युतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्पष्ट झाला. मुंबईतील राजकारणात या घडामोडींचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुनगंटीवारांची माघार आणि बावनकुळेंची समन्वयाची भूमिका महायुतीबाबत बोलताना मुनगंटीवारांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टी जिथे शक्य आहे, तिथे महायुती एकत्र लढत आहे. मात्र, प्रत्येक शहराची राजकीय परिस्थिती, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच युती किंवा आघाड्यांचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे कुठे महायुती, कुठे महाविकास आघाडी किंवा स्थानिक समीकरणे पाहून निर्णय होतात, असे त्यांनी नमूद केले. एकंदरीत, चंद्रपूरच्या पराभवातून निर्माण झालेला भाजपमधील वाद, त्यावर मुनगंटीवारांनी घेतलेली माघार, बावनकुळेंची समन्वयाची भूमिका आणि देशमुखांनी उपस्थित केलेले प्रश्न, या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाची दिशा स्पष्ट होत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.
डोंबिवलीत २.५ लाख रंगेबिरंगी पणत्यांमधून साकारलेली भारतमातेची एक अफलातून मोझॅक चित्रनिर्मिती सध्या अतिशय लक्षवेधक ठरत आहे. रंगीत पणत्यांच्या माध्यमातून आकारलेल्या चित्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही अभिनव कलाकृती तयार करण्यात आली आहे. ही रेकॉर्ड ब्रेक कलाकृती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक डोंबिवली जिमखाना मैदानावर गर्दी करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण डोंबिवलीसारख्या मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचं माहेरघर असलेल्या शहराचं प्रतिनिधित्व करतात. या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, भारतमातेचे पूजन हे संस्कार बालपणातून झालेले असल्याने आणि त्या भारतमातेचे गुणगान गाणारे व वंदन करणारे राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरम. अशा श्रद्धा व आस्थेच्या वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डोंबिवलीत जागतिक विक्रम करण्याचा डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने निर्णय घेतला. चेतन राऊत तसेच प्रभू कापसे व वैभव कापसे या पितापुत्रांच्या जोडीने आणि अन्य कलाकार-साथीदारांनी मिळून सतत नऊ दिवस खपून पणत्या रंगवून कलात्मकतेचा अविष्कार सादर केल्याचे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी काढले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की भारतमाता आपल्यासाठी देवी स्वरूप आहे म्हणून तिचं सनातन संस्कृतीत आपण पूजन करतो. आपण सर्वजण त्याच धरतीची लेकरं आहोत आणि या मातीतूनच तयार केलेल्या पणत्यांनी मोझॅक साकारण्याची कल्पना सुचली आणि भारतमातेला, वंदे मातरम गीताला अनोखी मानवंदना देण्याचे ठरले. ९५ फूट उंची आणि ७५ फूट रुंदीची, सुमारे अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांचा (दिव्यांचा) वापर करून साकारलेली भारतमातेची अद्भुत मोझॅक कलाकृती निर्माण करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अंतर्गत एक नवा जागतिक विक्रम यशस्वीपणे प्रस्थापित झालेला आहे. ही भव्य कलाकृती कलाकार चेतन राऊत, वैभव प्रभू कापसे तसेच डोंबिवलीकर आर्टिस्ट टीम यांनी अवघ्या नऊ दिवसांत साकारली. डोंबिवली जिमखानातर्फे उत्सव या नावाने वार्षिक मेळा आयोजित केला जातो. तिथे ही कलाकृती २८ डिसेंबर २०२५ पर्यंत खुली ठेवण्यात आली असून प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आवाहन केले.
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यातील कलगीतुरा अधिकच तीव्र झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केलेल्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा सौदा केला आणि मराठी माणसाची पत्राचाळ लुटली, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात बन यांनी राऊतांना सुनावले आहे. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य करताना त्यांनी राज ठाकरेंना 'सावध' राहण्याचा इशारा दिला आहे. भ्रष्टाचार आणि कोविड घोटाळ्यावरून टोला नवनाथ बन यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेताना महाविकास आघाडी काळातील कथित घोटाळ्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, राऊतांनी टीका करण्यापूर्वी पत्राचाळ लूट, खिचडी घोटाळा आणि वसुली रॅकेटवर बोलावे. संपूर्ण जग आणि मुंबईतील जनता जेव्हा कोविडच्या संकटात होरपळत होती, तेव्हा सत्तेचा मलिदा खाणारे आज लोकशाहीसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहेत. हा दुटप्पीपणाचा कळस आहे. उबाठा गटात कार्यकर्ते बेवारस नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून शंका घेणाऱ्या राऊतांना टोला लगावताना बन म्हणाले की, देशातील लोकशाही पूर्णपणे सुरक्षित आहे, मात्र 'उबाठा' गटात लोकशाही आणि कार्यकर्ते दोन्ही बेवारस झाले आहेत. निवडणुका जाहीर होऊनही या पक्षाचा एकही मोठा नेता मैदानात सभा घ्यायला तयार नव्हता. घरात बसून निवडणुका लढवायच्या आणि निकाल प्रतिकूल लागला की यंत्रणेवर शंका घ्यायची, ही राऊतांची जुनी सवय आहे. खंजीर खुपसण्याचे फळ भोगावे लागतंय देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून राऊतांनी जे राजकारण केले, त्याचे फळ त्यांना आता भोगावे लागत आहे, असा दावा नवनाथ बन यांनी केला. केवळ विशिष्ट मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. विधानसभेप्रमाणेच आगामी महापालिका निवडणुकीतही त्यांना या कृत्याचा पश्चात्ताप करावा लागेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. राज ठाकरेंना धोक्याचा इशारा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना नवनाथ बन यांनी राज ठाकरेंना जुन्या इतिहासाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची परंपरा ही नेहमीच जवळच्यांना धोका देण्याची राहिली आहे. २००८ चा इतिहास पाहता राज ठाकरेंनी अत्यंत सावध राहावे. ही मिठी नसून पुन्हा एकदा पाठीत वार करण्याची तयारी असू शकते. मनसैनिकांनी राऊतांच्या नादाला लागू नये, हे 'मनोमिलन' नसून केवळ सत्तेच्या भीतीपोटी झालेले 'मिलन' आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ठाकरेंच्या युतीने चित्र बदलणार नाही संजय राऊत यांना वाटते की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर सर्व काही बदलून जाईल, परंतु चित्र बदलणार नाही. मुंबईतील मराठी माणूस हा भाजपच्या पाठिशी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यापद्धतीने कामे केलीत, आम्ही घोटाळ्याबद्दल बोलत नाहीत. आम्ही मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू बद्दल बोलतो. संजय राऊतांन मुंबईतील ही कामे बघावीत. तुम्हाला बोलण्यासारखे खूप काही, त्यावर बोला, असा टोला नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना लगावला.
कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारातील एका शेतात आठ फुट लांबीची जिवंत मगर मंगळवारी ता. २३ सकाळी आढळून आली असून वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन मगर ताब्यात घेतली आहे. इसापूर धरणाच्या जलाशयातून मगर शेतात आली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारात आनंदराव फटींग यांचे शेत आहे. त्यांच्या शेतापासून काही अंतरावरच इसापूर धरण असून एक छोटा कालवा देखील आहे. या पाण्याचा ऊसासाठी वापर केला जातो. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. आज सकाळी कामगार ऊस तोडणी करीत असतांना त्यांना ऊसाच्या फडात मोठी हालचाल जाणवली. कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे जिवंत मगर आढळून आली. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वन कर्मचारी शिवरामकृष्ण चव्हाण, सुधाकर कऱ्हाळे, संग्राम भालेराव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनीही घटनास्थळी भेट दिली. वन विभागाचे पथक तसेच गावकरी शामराव ढाकरे, गणपत पाचपुते, बाळू धनवे, भागोराव खुडे यांनी मगरीला दोरीने बांधून ताब्यात घेतले. वन विभागाच्या पथकाने सदर मगरीला वाहनाद्वारे हिंगोली येथे आणले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नैसर्गिक अधिवासात सोडणार - वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार कळमनुरी तालुक्यात पहिल्यांदाच मगर आढळून आली आहे. गावकरी अन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत रेस्क्यू करण्यात आले आहे. आता वरिष्ठांच्या आदेशानुसार मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल असे वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी सांगितले.
राजकीय निवडणुकीतील जय-पराजय हे पाचवीलाच पुजलेले असतात, मात्र कधी कधी एखाद्या उमेदवाराचा पराभव त्याच्या इतका जिव्हारी लागतो की, तो थेट सार्वजनिक नात्यालाच छेद देण्याचा प्रयत्न करतो. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुधीर शिंदे यांनी निवडणुकीत मतदारांनी नाकारल्याने संतप्त होऊन आपल्या दुकानाबाहेर 'कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये' असा जाहीर फलक लावला आहे. चिपळूणच्या राजकारणात सध्या या फलकाची जोरदार चर्चा रंगली आहे. सुधीर शिंदे हे चिपळूण शहराच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. भाजी विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी मोठा लोकसंपर्क निर्माण केला होता. या जनसंपर्काचा फायदा घेत त्यांनी या निवडणुकीत मोठी मदार ठेवली होती. सुधीर शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासह प्रभाग 12 मधून नगरसेवक पदासाठी नशीब आजमावले होते, तर त्यांच्या पत्नी सुजीता शिंदे यांना प्रभाग 11 मधून रिंगणात उतरवले होते. मात्र, मतदारांनी या पती-पत्नीला पूर्णपणे नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले. काम चालू राहील, पण देणगी नाही! निवडणुकीत मतदारांनी आपल्याला दगा दिल्याची भावना सुधीर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मी लोकांसाठी रात्रंदिवस धावलो, मदतीला धावून गेलो. मला ठाम विश्वास होता की जनता माझ्या पाठीशी उभी राहील, पण मतदारांनी मला नाकारले. मी हरलेलो नाही, माझे सामाजिक कार्य यापुढेही सुरूच राहील, पण आता मी कोणालाही वैयक्तिक देणगी देणार नाही, अशा शब्दांत सुधीर शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला. बलाबल आणि निकालाचे गणित सुधीर शिंदे यांनी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांच्या अनेक उड्या मारल्या होत्या. प्रथम शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या सुधीर शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे उमेदवारी मागितली होती, मात्र तिथे डावलले गेल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसचा हात धरला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांना अवघी 121 मते मिळाली, तर त्यांच्या पत्नीला तिसऱ्या क्रमांकाची 536 मते मिळाली. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतही ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. वर्षानुवर्षे सामाजिक कामात आघाडीवर असूनही मतदारांनी इतक्या मोठ्या फरकाने पराभूत केल्याने शिंदे व्यथित झाले आहेत. हे ही वाचा... महाराष्ट्रात महापालिका रणधुमाळीला प्रारंभ:अर्ज प्रक्रियेला सुरुवात, पण युतींचा अजूनही गोंधळ; तणाव शिगेला, राजकीय चित्र अजून धूसर राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाईल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अवघे 23 दिवस हातात असताना, राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, निवडणूक तयारीपेक्षा युती-आघाडीच्या गोंधळानेच अधिक चर्चा रंगत आहेत. सविस्तर वाचा...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि मनसे युतीबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम उरलेला नसल्याचे स्पष्ट करत, ही युती प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि मनोमिलन झाल्याचे चित्र दिसत असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्षात आकाराला आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर काल रात्री अंतिम तोडगा निघाला असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची रणनिती आता स्पष्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही गोंधळ नाही, सर्व स्तरावर समन्वय साधला जात असून संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रक्रियेत आता केवळ एक औपचारिक घोषणा बाकी असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन युतीची अधिकृत घोषणा करायची असून, ती लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घोषणेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, सेना-मनसे युतीची औपचारिक घोषणा झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळेत बोललो नाही, तर नंतर पश्चात्ताप करावा लागेल संजय राऊत यांनी भाजपवर आणि घटनात्मक संस्थांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र आणि बिहारमधील निवडणूक निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, त्यातून लोकशाहीचा गळा घोटला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व घटनात्मक संस्था सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चिरडल्या जात असल्याची भावना राऊत यांनी व्यक्त केली. वेळेत बोललो नाही, तर नंतर पश्चात्ताप करावा लागेल, असे सांगत त्यांनी सध्याच्या घडीला संघर्ष आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आम्ही जिवंत आहोत, म्हणूनच लढतोय, असा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यांनी केलेल्या पोस्टवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... हमें बोलना चाहिये था…..! pic.twitter.com/f3W632VJCm— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025 आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...
कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा बसथांब्यावर एका तरुणाचा रुमालाने गळा आवळून खून झाल्याचा प्रकार मंगळवारी ता. २३ सकाळी उघडकीस आला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणात एक जण चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालु्क्यातील रामेश्वरतांडा येथील बसथांब्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळया भोवती रुमालाने आवळल्याचे स्पष्ट झाले असून सदर प्रकार खूनाचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामेश्वरतांडा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तर घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार रिठ्ठे, शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह वडगाव येथील ज्ञानेश्वर गाडेकर (३०) या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ज्ञानेश्वर हा सोमवारी रात्री परिसरातील यात्रेमध्ये गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले आहे. या शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. सदर खून नेमका कशामुळे झाले याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मयत ज्ञानेश्वर हा वडगाव शिवारात शेती करीत असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता या योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून, सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे योजनेतून अपात्र लाभार्थी बाहेर काढणे आणि केवळ पात्र महिलांनाच मदत मिळावी हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक महिलेला ई-केवायसी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी आधी दिलेली मुदत वाढवून आता थेट 31 डिसेंबर 2025 पर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील काळात योजनेचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र अजूनही 30 ते 40 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, ही बाब शासनासाठी चिंतेची ठरली आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील एकूण 2 कोटी 47 लाख महिलांना दिला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होत असताना, योजनेत अपात्र महिलांचा समावेश झाला आहे का, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे महिला व बालविकास विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळेच ई-केवायसी ही प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवली जात आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण झाली नाही, तर 40 लाखांहून अधिक महिला या योजनेतून थेट अपात्र ठरू शकतात. याचा थेट परिणाम त्यांच्या दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मदतीवर होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचावा, यासाठी ई-केवायसी ही अट लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठीच 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. आधार क्रमांक, ओटीपी प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जात असून, महिलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात येत आहे. अंतिम मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही दरम्यान, जुलै 2024 पासून सुरू असलेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. अनेक महिलांसाठी हा निधी घरखर्च, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे केवळ ई-केवायसी न केल्यामुळे हा लाभ बंद पडू नये, यासाठी महिलांनी तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असा सल्ला देण्यात येत आहे. शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या अंतिम मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे हाच एकमेव पर्याय आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नांदेड शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचं भरदिवसा अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झालं आहे. आपणास जबरदस्तीने पळवून नेऊन जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्वतः जीवन घोगरे यांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये आपण गंभीर जखमी झालो असून, अपहरणकर्त्यांनी तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. घटनाक्रमाबाबत माहिती देताना जीवन घोगरे यांनी सांगितलं की, सोमवारी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास ते कामानिमित्त घराबाहेर पडले होते. हडको परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर अचानक त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात बसवलं आणि अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी सात जणांनी आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप घोगरे यांनी केला आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळानंतर मुसलमानवडी परिसरात त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात जीवन घोगरे यांनी अजित पवार गटातील लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वृत्त वाहिन्यांशी बोलताना घोगरे यांनी सांगितलं की, या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि प्रवीण पाटील चिखलीकर असल्याचा त्यांना संशय आहे. अपहरणकर्त्यांनी मारहाण करताना चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस, अशी धमकी दिल्याचाही दावा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर, जमीन बळकावणे, कब्जे करणे हेच या लोकांचे उद्योग असल्याचा गंभीर आरोपही घोगरे यांनी केला आहे. सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार या हल्ल्यानंतर जीवन घोगरे यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला तुम्ही मंत्री करणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नांदेडमधील गुंडाराज संपवण्याचं आवाहन केलं. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांना अटक केली असून, घोगरे यांच्या फिर्यादीनुसार संबंधित आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, राजकीय दबावाखाली तपास होणार नाही ना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिडको परिसर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी नांदेड शहरातील सिडको परिसर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, निवडणुकांच्या तोंडावर शहरात अशा प्रकारची गुंडगिरी वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहंमद अफ्रोज फकीर (चालक) आणि देवानंद भोळे अशी आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना नांदेडच्या राजकारणाला कोणती दिशा देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
जिल्ह्यात भाजपच्या बरोबरीचेम्हणजे पाच आमदार, एक मंत्रिपदआणि नगराध्यक्ष पदाच्यानिवडणुकीत पक्षाची भाजपच्यादुप्पट चांगली कामगिरी असतानाहीजळगाव महापालिका निवडणुकीतमात्र, शिवसेना जागांची मागणीकरीत भारतीय जनता पक्षाच्यानेत्यांच्या मागे फरफटत जातानादिसते आहे. पक्षाच्या नेत्यांची हीलाचारी का, असा प्रश्न शहरातीलशिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनापडू लागला आहे. नुकत्याच झालेल्यानगरपालिका आणि नगरपंचायतीनिवडणुकीत शिवसेनेचे सहापैकीसहाही उमेदवार नगराध्यक्षपदासाठी निवडून आले आहेत.म्हणजे पक्षाला १०० टक्के यशमिळाले आहे. भाजपने १५ उमेदवारउभे करून त्यांचे केवळ आठउमेदवार नगराध्यक्ष झाले. म्हणजेयशाचे प्रमाण ५३ टक्के राहिले.त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचीचकामगिरी प्रभावी ठरली असून,जनतेचा त्यांना पाठिंबा असल्याचेचित्र तयार झाले आहे. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात जितके आमदार भाजपचे निवडले गेले तितकेच शिवसेनेचेही निवडले गेले आहेत. भाजपकडेगिरीश महाजन ज्येष्ठ मंत्री आहेततर शिवसेनेकडेही गुलाबरावपाटील ज्येष्ठ मंत्री आहेत आणि तेअनेक वर्षांपासून जिल्ह्याचेपालकमंत्रीही आहेत. सर्व ताकदमहापालिकेत लावायची म्हटले तरजिल्ह्यातील चार आमदार आणिस्वत: मंत्री गुलाबराव पाटील यांचीशक्ती उपयोगात येऊ शकते.सर्वांचे आर्थिक आणि मनुष्यबळकामाला लागले तर शहरात मोठाविजय शिवसेना मिळवू शकते.पैशांच्या बाबतीत दोन्ही पक्षतुल्यबळ आहेत, हे लपून राहिलेलेनाही. त्या तुलनेत भाजपचेआमदारही शहरात उतरले तरीचारच नेते काम करू शकतील.कारण मंत्री गिरीश महाजनयांच्याकडे नाशिकची जबाबदारीअसणार आहे. अशी अनुकूलपरिस्थिती असतानाही शिवसेनेचेपदाधिकारी भारतीय जनतापक्षाकडे जागांचा जोगवा मागत काफिरत आहेत, असा प्रश्नशिवसैनिकांना आणि राजकीयविश्लेषकांनाही पडला आहे. भाजपच्या तुलनेत निरुत्साह का? अनुकूल स्थिती असताना शिवसेनानेत्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्यातुलनेत उत्साहाची कमी जाणवतेआहे. भाजपकडे शहरात आमदारआहे. शिवाय चाळीसगावचेआमदार मंगेश चव्हाण यांनाहीपक्षाने प्रभारी बनवून शहरातपाठवले आहे. शिवसेनेचा गाडामात्र, स्थानिक पातळीवरचेपदाधिकारीच ओढताना दिसतआहेत. शिवसेनेनेही जिल्ह्यातल्याएखाद्या आमदाराची प्रभारी म्हणूननियुक्ती केली असती तर त्यांच्याउमेदवारांमध्येही आत्मविश्वासआणि अधिक उत्साह संचारलाअसता, असे राजकीय निरीक्षकांनावाटते आहे. सध्या लोकप्रियझालेल्या लाडक्या बहिणीसारख्यायोजना, एसटीत निम्मे भाड्याचीयोजना शिवसेनेचे नेते एकनाथशिंदे मुख्यमंत्री असतानाच सुरूझाल्या. त्यामुळे शिंदे यांची एखादीसभा शहरात महिला मतदारांवरमोठा प्रभाव पाडू शकते. तसेनियोजन शिवसेनेचे स्थानिक नेतेकरीत आहेत का, असा प्रश्न आहे.या पार्श्वभूमीवर जागा वाटपबैठकीत सेनेचे नेते काय भूमिकाघेतात, हे जिल्ह्यातील शिवसेनेच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाईल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अवघे 23 दिवस हातात असताना, राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, निवडणूक तयारीपेक्षा युती-आघाडीच्या गोंधळानेच अधिक चर्चा रंगत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची अधिकृत घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील कुरबुरी उफाळून आल्याचे दिसत आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने येण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका असून, येथे भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेमध्ये जागावाटपावरून अद्यापही खणाखणी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर समन्वयाचे प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक नेत्यांमधील मतभेद युतीच्या वाटचालीत अडथळा ठरत आहेत. महाविकास आघाडीकडे पाहिले तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यातही अद्याप अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यातच सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू असून, जागावाटपावरून झालेल्या चर्चांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवडी परिसरातील तीन प्रभागांवरील वादावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दोन जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला, तर एक जागा मनसेला देण्यावर सहमती झाल्याची माहिती आहे. मात्र, सर्वच ठिकाणी हा समन्वय सहजसोप्या पद्धतीने होताना दिसत नाही. भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 वरून ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद असल्याने, उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून तोडगा काढला जात असल्याची माहिती आहे. या युतीकडे मुंबईसह राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रत्यक्ष घोषणा झाली तर त्याचे पडसाद इतर महापालिकांवरही उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ही युती राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकते, असे निरीक्षकांचे मत आहे. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. उमेदवारांकडून अर्ज भरण्याची तयारी सुरू असून, राजकीय पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाकडे लॉबिंग सुरू केले असून, काही ठिकाणी बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. युती आणि आघाड्यांच्या अंतिम घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, उमेदवार निवड, प्रचार रणनीती आणि स्थानिक प्रश्न या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या काही आठवड्यांत होणाऱ्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आले असून, महापालिकांचे निकाल आगामी विधानसभा राजकारणाची दिशा ठरवतील, असेही बोलले जात आहे.
तेल्हारा तालुक्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील तुरीचे पीक वाळत असून, उत्पादन प्रचंड घटणार असल्याने शेतकरी हवालादिल झाला आहे. जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या प्रारंभी वरूणराजाने फारशी कृपा केली नाही. मृगनक्षत्रात पावसाने पाठ फिरवल्याने अनेकांची चिंता वाढली. मात्र जूनच्या अखेरीस दोन वेळा मुसळधार पाऊस झाला होता. जुलै महिन्यात मात्र पावसाने सरासरी गाठली नाही. ऑगस्ट महिन्यात कधी संततधार तर कधी जोरदार पाऊस पडत सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. याचा परिणाम पिकांवर झाला. दरम्यान आता रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आल्याचे तेल्हारा तालुक्यातील शेतीवर नजर टाकल्यास दिसून येते. तेल्हारा तालुक्यात सुरुवातीला अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. शेतकऱ्यांची तूर पिकावर आशा असतांनाच गत काही दिवसांपासून शेतातील तूर पिक वाळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पिकाच्या रुपाने हाता तोंडांशी आलेला घास हिरावून घेतल्या जात आहे. गत आठवड्यापासून धुवारी पडत असल्याने शेतातील तूर पिक जोमदार असतांनाच सुकु लागल्याने फुलोर गळत आहे. शेतकरी पार खचून गेले आहे. तूर पिकावरील संकटाकडे कृषी विभागाने लक्ष देऊन उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी : सोयाबीन उत्पादनात जवळपास ३० ते ४० टक्के घट झाली आहे. मजुरी, खत, औषधे, डिझेल आणि इतर शेतीखर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पंचनामा करून मदत देण्याची केली मागणी ^मी १० एकर क्षेत्रावर तुर लागवड केली. तूर पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र सध्या आठवड्यापासून धुवारी पडत असल्याने शेतातील पिक सुकत आहे. शासनाने सदर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. - प्रवीण पाटील , शेतकरी तळेगाव बाजार.
ख्रिश्चन धर्मियांच्या सर्वात मोठ्या ख्रिसमस अर्थात नाताळ सणाला अवघे तीन दिवस उरले आहेत. ख्रिसमसच्या अनुषंगाने अकोला महानगरातील परिसरात बेकऱ्या, केक शॉप, चॉकलेट, ब्लॅॅक फॉरेस्ट, स्ट्रॉबेरी, कॉफी विथ क्रीम, पाइनॅपल अशा विविध फ्लावर्सच्या कुकीज, पेस्ट्रीज आणि चॉकलेट्सने सजल्या आहेत. महानगरातील आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चच्या बाहेर रोषणाई करण्यात येत आहे. ख्रिसमस हा सण ख्रिश्चन जिल्ह्यात दरवर्षीच उत्साहात साजरा करण्यात येते. ख्रिश्चन बांधवांकडून उत्सवासाठी तयारी करण्यात येते. यंदाही अशीच तयारी करण्यात येत आहे. ख्रिसमस हा सण ख्रिश्चन बांधवांचा असला, तरी सर्वच धर्मीय उत्साहाने हा सण साजरा करतात. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच ख्रिसमस ट्री पासून ते सांताक्लॉज, खाद्यजत्रा आणि चर्चेतील रोषणाईबद्दल कुतूहल असते. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठमोठ्या मॉल बरोबरच लहान दुकाने रोषणाईने उजळून निघतात. ख्रिसमसला अवघे तीन दिवस राहिल्याने शहर परिसरातील वातावरण सध्या बदलले आहे. ख्रिश्चन कॉलनीमध्ये दिव्यांच्या माळा आणि चांदण्यांनी लहान-मोठ्या गल्ल्या सजविल्या आहेत. येथील बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री सजवण्याचे अनेकविध प्रकार उपलब्ध असून, नागरिक हौस म्हणून या वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. ख्रिसमस आणि केक हे समीकरणच असल्याने नामवंत बेकऱ्यांमध्ये केकचे विविध प्रकार दाखल झाले आहेत. दीड वर्षांचा इतिहास असलेली कॉलनी महानगरातील एकमेव सुमारे दीडशे वर्षचा इतिहास असलेली ख्रिश्चन कॉलनीदेखील ख्रिसमसच्या स्वागतासाठी सजू लागली आहे. गांधी रोडवरील दुकानांमध्ये सजवलेले ख्रिसमस ट्री, आकाशकंदील आणि सांजाक्लॉजचे छोेटे- मोठे पेहराव सगळ्यांचे आकर्षण ठरत आहेत.
प्रतिनिधी |अकोला श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त ‘नो व्हेईकल डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारूशीला रुमाले यांनी संबोधित केले. ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कमीत कमी ऊर्जेचा वापर करून ऊर्जा संवर्धन करावे. तसेच शक्यतो अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या विविध वस्तू व साधने यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले, उपप्राचार्य डॉ. अंबादास पांडे, डॉ. संजय विटे आय.क्यू.ए.सी. समन्वयक हे उपस्थित होते. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त ‘नो व्हेईकल डे' साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन सेलचे समन्वयक डॉ. स्वप्नील देशपांडे, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. अजय शिंगाडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सुमेध सगणे, डॉ. विद्या ध्रुवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयातील बहुसंख्य कर्मचारी तसेच विद्यार्थिनी सार्वजनिक वाहन, सायकलने किंवा पायी महाविद्यालयात आले आणि नो व्हेईकल डे साजरा करण्यास सहकार्य केले.
अयोध्या नगरीतील प्रभु श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या १० लाख १९ हजार ५२० सेकंदांच्या पावन पूर्णतेचा उत्सव जठारपेठ बिर्ला राम मंदिरात साजरा होणार आहे. सोहळ्याला ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. अकोल्यातील इतिहासात प्रथमच ५०१ विद्यार्थी-विद्यार्थ िनी एकत्र येऊन ५० मिनिटांचा विराट शंखनाद करणार असून, या नादातून प्रभु श्रीरामाच्या स्मरणाची दिव्य ऊर्जा अवतीभवती प्रसारीत होणार आहे. भक्त वर्षाला निरोप देताना व नव वर्षाचा पहिल्याच दिवशी राम नामात दंग होणार आहेत. मन रामरंगी रंगण्याचा २४ तासांचा अखंड सोहळा होणार आहे. अनेक वर्षांच्या अविरत संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना जानेवारी महिन्यात झाली होती. प्रभू श्रीरामांचे अयोध्येत होणारे भव्य मंदिर हा श्रद्धेचा, त्यागाचा, अभिमानाचा विषय आहे. श्रीराम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण होता. दरम्यान यंदा वर्षाच्या अखेरच्या दिवशी व नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी राम नामाचा गजर होणार आहे. नववर्षाची सुरुवात प्रभु रामाच्या नामाने होणार असून, अकोल्याचा आध्यात्मिक शंखध्वनी गुंजणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा हा दिव्य उत्सव अकोल्याच्या अध्यात्मिक ओळखीला नवे उंची देणारा व महाराष्ट्रभरात अकोल्याचे नाव उजळवणारा ठरणार आहे. असा होणार सोहळा भव्य शंखनादानंतर सोहळ्याचा श्रीगणेशा होणार आहे. सोहळ्याला ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार असून, सुमारोप १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. २४ तास अखंड रामनाम जप होणार आहे. या पवित्र काळात प्रत्येक श्वासावर ‘श्रीराम’ अंकित करत भक्तीची अविरत मुद्रिका भक्तांच्या हृदयात उमटणार आहे.
येथील श्री संताजी महाराजनगरमधील व ऐतिहासिक दगडी मस्जिद ते पोलिस स्टेशनपर्यंतचा रस्ता तत्काळ करण्यात यावा. या मागणीसाठी श्री संताजीनगरमधील नागरिकांनी रस्त्यावर फुलांचे तोरण लावून अनोखे आंदोलन केले. मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा हे जवळपास २५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. अध्यात्मिक व ऐतिहासिक अशी गावाची ओळख आहे. गावामध्ये गल्ली बोळात रस्ते झाले. मात्र, व्यावहारिकदृष्ट्या दैनंदिन जीवन निगडित असलेला हा मुख्य मार्गावरील रस्ता संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला. मुख्य बाजारपेठेला जाण्या येण्यासाठी हाच रस्ता आहे. या रस्त्यावर जिल्हा परिषद कन्या शाळा, पोलिस स्टेशन आहे. सर्व महापुरूषांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुका, रॅली, धार्मिक दिंड्या मुख्य चौकातून याच रस्त्यावरून निघतात. आता परिसरातील नागरिक रस्ता तत्काळ व्हावा, या मागणीसाठी एकवटले आहेत. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २१ डिसेंबर रोजी रस्त्याला फुलांचे तोरण लावून अनोखे आंदोलन केले. लवकर दखल न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला. या आंदोलनामध्ये गजानन इंगळे, गोपाल मानकर, विजय इंगळे, गोपाल शीलवंत, सोमेश इंगळे, गणेश जैताळकर, सुनील जैन आदींची उपस्थिती होती.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरणात महायुती आणि भाजपच्या विजयाची चर्चा सुरू झाली असली, तरी या निकालांमधून काँग्रेसच्या पराभवापेक्षा संघर्षाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाने मिळून अनेक ठिकाणी सत्ता हस्तगत केली असली, तरी दुसरीकडे सलग पराभवांच्या मालिकेत अडकलेल्या काँग्रेससाठी हे निकाल काही अंशी दिलासादायक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 2014 नंतर सातत्याने निवडणुकांत अपयशाचा सामना करणाऱ्या काँग्रेसने या नगरपरिषद निवडणुकीत राज्यभरात आपली उपस्थिती अधोरेखित करत, पक्ष पूर्णपणे संपलेला नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या यशाइतकीच चर्चा काँग्रेसने मिळवलेल्या मर्यादित पण महत्त्वपूर्ण यशाची होताना दिसत आहे. या नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने राज्यभरात नगराध्यक्ष पदाच्या एकूण 43 जागांवर विजय मिळवला असून नगरसेवक पदाच्या 1006 जागा जिंकल्या आहेत. सलग अनेक निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करत असलेल्या काँग्रेससाठी हा आकडा निश्चितच दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. या यशामुळे काँग्रेसची पराभवाची दीर्घ मालिका काही अंशी खंडित झाल्याचे मानले जात आहे. विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले असून या विभागात 23 नगराध्यक्ष पदांवर काँग्रेस किंवा काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाड्यात 5, पश्चिम महाराष्ट्रात 3, कोकणात 1 तर स्थानिक पातळीवरील काँग्रेस पुरस्कृत आघाड्यांना 7 ठिकाणी यश मिळाले आहे. हे यश महायुतीच्या तुलनेत संख्येने कमी असले, तरी काँग्रेससाठी राजकीय पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली. महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रचारापासून दूर असताना, सपकाळ यांनी मात्र एकाकीपणे संपूर्ण राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे त्यांनी प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर टाळत, जमिनीवर उतरून जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या काळात राज्यभरात 64 जाहीर सभा आणि 22 बैठका घेतल्या. काही ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर उमेदवार उभे केले, तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना पाठिंबा देत पुरस्कृत उमेदवारांच्या माध्यमातून निवडणूक लढवली. हे यश म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे आणि तळागाळातील संघटनेच्या ताकदीचे प्रतिक असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. हार कर भी जो जीता है, उसे बाजीगर कहते है निवडणूक निकालांनंतर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली. हार कर भी जो जीता है, उसे बाजीगर कहते है, या शब्दांत त्यांनी काँग्रेसचा संघर्ष अधोरेखित केला. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट ज्या पद्धतीने सत्ता मिळवत आहेत, त्या मार्गाने काँग्रेसला सत्ता नको असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि जनतेच्या मनातील विश्वासाची सत्ता महत्त्वाची आहे, असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही काँग्रेस याच विचारधारेवर ठाम राहून लढेल, असा इशाराही त्यांनी दिला. बचेंगे तो और भी लढेंगे…! असा सूचक नारा त्यांनी दिला.
सीन रिक्रिएटसाठी आरोपी पंचवटी चौकात:मंथन खुन प्रकरण; आतापर्यंत आठ आरोपींना केली अटक, तपास वेगाने
चार दिवसांपुर्वी मंथन पाळणकर या तरुणाचा बोर नदी प्रकल्पा जवळ टोळीयुद्धातून खुन करण्यात आला आहे. पुर्व नियोजीत कट रचून हा खुन केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. खुन करण्यापुर्वी आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून मंथनला पंचवटी चौकात बोलावले होते. याच प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ‘सीन रिक्रिएट’ करण्यासाठी नांदगाव पेठ व गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींना घेऊन सोमवारी (दि. २२) सायंकाळी पंचवटी चौकात गेले होते. मंथन पाळणकर (१९) या तरुणाचा खुन करण्यापुर्वी आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला पचवटी चौकात बोलवले होते. त्यावेळी आरोपी मात्र मंथन समोर आले नव्हते. त्यानंतर त्या मुलीसह मंथन बोर नदी प्रकल्पावर पोहचला. तो प्रकल्पाजवळ पोहचताच आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राचे सपासप वार करुन खुन केला होता. या प्रकरणाचा सुक्ष्म तपास नांदगाव पेठ पोलिसांकडून सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आज ‘सीन रिक्रिएट’ केला. त्यासाठी गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण, नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे व पथकाने आरोपींना पंचवटी चौकात आणले होते. त्यांनी मंथनला कुठे बोलवले, त्यावेळी तो कुठे बसला, मंथन बसला असताना आरोपी कुठे होते, त्याच्यावर आरोपीने घटनेपूर्वी कशी पाळत ठेवली. अशी प्रत्यक्ष पाहणी केली.
मेळघाटातील जरीदा रेंजमध्ये हल्लेखोर वाघांच्या गस्तीत व्यस्त असल्याने कोलकासची हत्ती सफारी सुरू होण्यास उशीर झाला. हत्तीची सफारी हे पर्यटकांचे विशेषत: बालकांचे मुख्य आकर्षण आहे. ते बघता पाचपैकी दोन हत्तींची सफारी सुरू करण्यात आली आहे. तर दोन हत्ती हे अजुनही गस्तीवर आहेत. जयश्री ही हत्तीण म्हातारी झाल्यामुळे तिला सफारीसाठी वापरले जात नाही. ती सध्या कोलकासमध्येच विश्रांती घेत आहे. त्यामुळे सध्या सुंदरमाला व चंपाकली या दोन हत्तीणीच सफारीसाठी वापरल्या जात आहेत. तर लक्ष्मी व सुंदरकली या दोन हत्तीणी गस्तीवर आहेत. कोलकास येथे जास्तीत जास्त प्राणी सफारीदरम्यान बघता येतील, असे ३ कि.मी.चे काही ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. या ट्रॅकवरच सफारीतील हत्ती फिरतात. एक फेरी ही ३० ते ४५ मिनिटांची असते. यात विविध वन्य प्राणी पर्यटकांना बघता येत आहेत. या हत्तींच्या खानपानावर वन विभागाद्वारे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना मोसमी फळे जसे केळी, ऊस, कलिंगड, खरबुज, तेल, गुळ, गव्हाच्या परातीएवढ्या आकाराच्या पोळया त्यात मिठ दिले जाते. यासाठी वन विभाग, शासन आणि काही समाजसेवी संघटनाही मदत करत असतात. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हत्तींचा सांभाळ करणे शक्य होत आहे. कारण, हत्तीच्या आहारासह त्यांच्या देखभालीचा खर्च हा बराच मोठा आहे. त्यांच्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वेतनही मिळते. तसेच निवृत्त झाल्यावर निवृ़त्ती वेतनही दिले जाते, अशी माहिती वन विभागाद्वारे देण्यात आली. ....अडीच महिने उशीर हत्तीची सफारी सुरू करण्यास यंदा प्रथमच अडीच महिने उशीर झाला. दिवाळीतही ती सुरू करण्यात आली नाही. कारण पाचही हत्ती हे जरिदा रेंजमध्ये वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पेट्रोलिंगच्या कामी होते. परंतु, ख्रिसमस व नवीन वर्षाची सुटी व पर्यटनाचा मोसम बघता हत्तीची सफारी १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. ऐरवी ती २ ऑक्टोबरला सुरू होते, अशी माहिती कोलकास,सेमाडोहचे आरएफओ प्रदीप तळखंडकर यांनी दिली.
शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावतीच्या यजमानपदाखाली तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत आयोजित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सांघिक रौप्य पदक जिंकून देणारा धनुर्धर तुषार शेळके व आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मदतीमुळेच आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारता आली. संस्थेने आम्हा दोघांना अगणित मदत केली .त्यामुळे आम्ही आशियाई स्पर्धेपर्यंत पोहचू शकलो, याचा आम्हाला आयुष्यात कधीच विसर पडणार नाही, असे मनोगत सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. महोत्सवाचे आयोजन १८ ते १९ डिसेंबर या कालावधीत श्री शिवाजी बीपीएड महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते. समारोप व पुरस्कार वितरण १९ रोजी दु. ४ वाजता झाले होते. सदर स्पर्धेचे समारोपीय समारंभाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, समारंभाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष ॲड.जयवंत उपाख्य भैय्यासाहेब वि. पाटील (पुसदेकर), कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाष बनसोड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.भैय्यासाहेब मेटकर, आंतरराष्ट्रीय धनुर्धर तुषार शेळके, यशदीप भोगे, श्री शिवाजी बीपीएडचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, आजीवन सदस्य सुभाष पावडे, बबन चौधरी, शिक्षण विभाग उपव्यस्थापक पंडित पंडागळे उपस्थित होते. त्यानंतरबक्षीस समारंभात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी,खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येत आवर्जून उपस्थित होते. क्रीडा महोत्सवचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव प्राचार्य वी.गो ठाकरे,आयोजन समितीचे सचिव डॉ. सुभाष गावंडे,पंडित पंडागळे व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नागपूर विभागाला सर्वसाधारण विजेतेपद प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी आपले प्रास्ताविकात महाविद्यालयातील खेळाडू व स्पर्धेसंबंधी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. तसेच महोत्सवाचा उद्देश विषद केला. यानंतर लगेचच शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून सहभागी झालेल्या १७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या झालेल्या कबड्डी, हॉलीबॉल व खो-खो स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना पुरस्कार वितरित करण्यात आले. क्रीडा महोत्सवात नागपूर विभागाने वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये सर्वाधिक विजेतेपदं मिळवून प्रथम क्रमांकासह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मान्यवरांचे उत्साहात स्वागत सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हारर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व लगेचच सन्माननीय मान्यवरांचे स्वागत फुलझाड देऊन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सर्वप्रथम विजेत्या चमूचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे दिलीपबाबू इंगोले यांनी याप्रसंगी खेळाडूंनी खेळाच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पुढील वाटचालीच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामार्फत नव्यानेच महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यात गुरुकुंज मोझरी नाव न लिहिता केवळ गुरू मोझरी नावाने फलक लावण्यात आले आहे. अर्थात गावाचे नामकरणच चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. गुरुकुंज मोझरी,या गावाचे नाव बदलवून चक्क गुरू लिहिण्याचा प्रताप महामार्ग प्राधिकरण विभागाने केला आहे.परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासांना फलकावरील गावाची ओळख दर्शवणाऱ्या नावाचा अर्थ बोध होत नसल्याने कित्येक वेळा चुकून दुसऱ्या गावाला आलो की, काय? असा संभ्रम त्यांच्यात निर्माण होत आहे. अखिल विश्वाला मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांची कर्मभूमी म्हणून नावलौकिक असलेले गुरुकुंज मोझरी, हे गाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेर देखील प्रसिद्ध आहे. ''अ'' तीर्थक्षेत्र दर्जा असलेल्या या गावात पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने मौन श्रद्धांजलीच्या हृदयस्पर्शी कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. दरवर्षी भाविकांची गर्दी लक्षात घेता शासनाच्या वतीने नव्यानेच बायपास वळण मार्ग तयार करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून महामार्गाच्या दोन्ही दिशेला मोठमोठे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. अन्यथा प्रहार स्टाइलने करणार आंदोलन बायपास वळण मार्गावर लावण्यात आलेल्या फलकावर गुरुकुंज मोझरी ऐवजी गुरू असा उल्लेख करणे ही प्रशासनाकडून झालेली चूक की मुद्दाम केलेला खोडसाळपणा हे समजायला मार्ग नसून २४, डिसेंबर पर्यंत जर ही चूक दुरुस्त करण्यात आली नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात प्रहार स्टाइलने शेकडो कार्यकत्यांसमवेत डेरा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख, यांनी महामार्ग प्राधिकरण विभागास सादर केलेल्या एका निवेदनातून दिला आहे. लवकरच चुकीची दुरुस्ती करू :प्रकल्प संचालक महामार्ग प्राधिकरण विभागाकडून बायपास वळण मार्गावर चुकीचे गावाचे नाव असलेले फलक लावण्यात आले ते लवकरच दुरुस्त करण्यात येईल. तयार करताना त्यात चुक झाली हे मान्य आहे. गुरुकुंज मोझरी असे नाव असलेले फलक लावणार,अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय विभागाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे यांनी दिली. भाविकांसह पर्यटकांत संभ्रम आपले गाव व त्याचे नाव हा आमच्यासाठी अभिमानासह अस्मितेचा विषय असल्याने चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या नामफलकात तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुकुंज मोझरी, या गावाचे नाव बदलवून चक्क फलकावर गुरू, लिहिण्याचा प्रताप प्राधिकरणाने केला आहे.चुकीने या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसह प्रवासी संभ्रमात पडले असून परिणामी अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. नवा फलक लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेबाबत (मनरेगा) कायदा रद्द करुन त्याऐवजी नव्याने आणण्यात आलेले प्रस्तावित व्हीबीजीरामजी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आज, सोमवार, २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. म.रा. लाल बावटा शेतमजूर युनियनच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. युनियनचे पुढारी तथा भाकपचे माजी राज्य सचिव तुकाराम भस्मे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोनलनकर्त्यांच्या मते मनरेगाचा कायदा हा कामाची किमान हमी देणारा कायदा आहे. परंतु शासनाने तो आता बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न चालविला असून त्याऐवजी व्हीबीजीरामजी विधेयक आणले आहे. हे विधेयक येत्या काळात मंजूर केले जाऊन त्याचा पुढे कायदा केला जाणार आहे. त्यामुळे त्याला आतापासूनच विरोध करणे आवश्यक आहे. शेतमजूर युनियनने त्यासाठीची आघाडी उघडली असून आज देशव्यापी आंदोलन करण्यात आले. याही आहेत पुरक मागण्या प्रस्तावित व्हीबीजीरामजी विधेयक रद्द करा या प्रमुख मागणीसह मनरेगाचा कायदा कायम ठेवा, त्या कायद्यातील राष्ट्रपित्यांचे नाव गहाळ करु नका, मनरेगा कायद्यातील भ्रष्टाचार निखंदून काढत त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, मनरेगाच्या माध्यमातून वर्षभरात किमान २०० दिवस काम पुरवा, मनरेगाचा प्रतिदिन दर किमान ७०० रुपये करा, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा वाढतील अशी कामे निवडा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १० मे १९२४ रोजी बार्शीच्या भूमीमध्ये ऐतिहासिक ‘मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद' झाली होती. या महान घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने, येत्या रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी बार्शीत शतकोत्तर वर्षानिमित्त धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. श्रावस्ती बुद्ध विहार प्रांगणात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ही परिषद होणार आहे. या परिषदेचे नियोजन दोन महत्त्वपूर्ण सत्रांत करण्यात आले आहे. पहिले सत्र सकाळी १० ते १ या वेळेत ‘प्रांतिक बहिष्कृत परिषद' या विषयावर आधारित असेल. याची सुरवात माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते होणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे भूषवणार असून, मुख्य वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. कृष्णा मस्तुद तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बी. वाय. यादव व प्रशांत पैकेकर उपस्थित राहणार आहेत. दुसरे सत्र दुपारी १ ते ५ या वेळेत बौद्ध धम्म परिषद म्हणून पार पडेल. याची सुरवात माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते होईल. या सत्राचे अध्यक्षपद पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) भूषवतील. या सत्रात विशेष आकर्षण म्हणून श्रीलंकेहून आलेले पूज्य भिक्खू यश थेरो व पूज्य भिक्खू गुणानंद थेरो यांची धम्मदेसना लाभणार आहे. त्यांच्यासोबतच भिक्खू सुमेधजी नागसेन, भिक्खू एन. धम्मानंद थेरो, भिक्खू धम्मबोधी थेरो, भिक्खू विनितधम्म आणि भिक्खू शासनसुरी हे देखील मार्गदर्शन करतील. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, मातोश्री रमाई महिला मंडळ आणि बार्शीतील सर्व पुरोगामी व आंबेडकरी संघटनांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विष्णू कांबळे, जगन्नाथ शिवशरण, डॉ. शशिकांत गायकवाड, टी. एस. मोरे, अशोक वाघमारे, डी. डी. मस्के, नागनाथ सोनवणे व सहकाऱ्यांनी केले आहे. गायकवाड, वाघमारे, शिंदे यांना देणार मानपत्र या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून श्रावस्ती बुद्ध विहार परिसरात ‘अशोक स्तंभाचे लोकार्पण' करण्यात येणार आहे. तसेच ‘समग्र विचार' या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होईल. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्ता गायकवाड, योगिराज वाघमारे आणि सावळा (तात्या) शिंदे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वा. संगीत विशारद शंकर वाघमारे यांच्या सुरावलींनी होईल. शाहीर राजेश ननवरे आपल्या शाहिरीतून प्रबोधन करतील. संपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थितांना भोजनाची व्यवस्था सावळा शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
अक्कलकोट स्टेशन ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग, अक्कलकोट आणि श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ, चपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन पार पडले आहे. यावेळी विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करावा, असे प्रतिपादन नीलकंठ पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर तालुका गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, लकप्पा पुजारी, विस्तार अधिकारी पं. स. अक्कलकोट, संस्था सचिव प्रभाकर हंजगे, कार्याध्यक्ष पंडित पाटील, ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन मामा पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी नीलकंठ पाटील म्हणाले की, या विज्ञान प्रदर्शनाचे हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आहे. संस्था स्थापनेपासून या पंचक्रोशीत शिक्षणातून विज्ञाननिष्ठा रुजवणूक करण्याचे कार्य अविरत चालू आहे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या शाळेची निवड झाली म्हणून प्रशाला व संस्थांकडून अरबाळे यांचे आभार मानतो. तदनंतर प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ, भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम व सीव्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनवलेले चांद्रयान ३ चे स्वयंचलित प्रतिकृती चालू करून प्रदर्शनाचे औपचारिक निसर्ग हेच विज्ञान आहे. सध्याचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञानाचे विविध प्रकार आहेत आणि त्यातील गुणधर्म, संयोग, उपयोगिताबद्दल आपण परिचित व्हावे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी संस्था अध्यक्ष रविकांत पाटील यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिले. रोबोटच्या प्रतिकृतीतील सेल्फी पॉईंट व विज्ञान प्रदर्शनाचे फलकलेखन विशेष लक्षवेधी होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागाचे सर्व गुरुजन वर्ग आणि इतर गुरुजन यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन करण्यात आले. संस्था व प्रशालेकडून उपस्थित सर्व अभ्यागताचे सत्कार करण्यात आले. अरबाळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विज्ञान म्हणजे विशुद्ध ज्ञान जे पुन्हा प्रयोग करून सिद्ध करता येते. विज्ञान हे पुस्तकातून बाहेर रोजच्या जीवनात यावे आणि प्रत्येकानी वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करावे. चपळगाव प्रशाला ही विविध उपक्रमासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आदर्श शाळा आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी इ. ६ वी ते इ. ८ वी पूर्व माध्यमिक गटात १२० नाव नोंदणी तर इ.९ वी ते इ. १२ वी माध्यमिक गटात १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदणी केली. तालुक्यातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण करतील.
पांडे करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या गावरान कांदा तसेच पूर्व हंगामी ऊस लागवडीला वेग आला आहे. मात्र या दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी लागणारे मजूर, बियाणे, तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गावरान कांद्याची बेडवर व वाफ्यात लागवड करण्यासाठी एकरी तब्बल पंधरा ते सोळा हजार रुपये मजुरी मोजावी लागत असून, ऊस लागवडीसाठी हा खर्च एकरी आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्रामीण भागात मजुरांची तीव्र टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहेत. परिणामी मजुरीबरोबरच वाहतूक खर्चाचा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या शेती क्षेत्रात विविध समस्या उभ्या राहिल्या असून अनेक शेतकरी उसनवारी, दागदागिने गहाण ठेवून, तर काही कर्ज काढून भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर लागवड करत आहेत. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील काही शेतकऱ्यांनी तर खोडवा केळीचे पीक मोडून कांद्याची लागवड केल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने चांगली साथ दिली असली तरी बियाणे, खते व औषधांच्या वाढलेल्या किमती शेतीसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. एवढ्या अडचणींवर मात करून पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळेल की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. तरीही ‘पर्याय नाही’ या वास्तवाला सामोरे जात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करताना दिसत आहेत. बाजारभावात अनिश्चितता यावर्षी नऊ एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. दरवर्षी सरासरी चार ते पाच हजार गोण्या कांद्याचे उत्पादन घेतो. कांद्याच्या बाजारभावात अनिश्चितता असली तरी सातत्य ठेवल्यास हमखास यश मिळते, असा माझा अनुभव आहे.” अमोल दुरंदे, शेतकरी, राजुरी. यंदा अधिक मासाचा आधार यंदा अधिक मास म्हणजेच ‘धोंड्याचा महिना’ असल्याने कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. याच अपेक्षेने यावर्षी कांदा लागवड जोमात होत असल्याचे चित्र दिसत आहे.

26 C