मोक्काअंतर्गत कारवाई केल्याचे कळताचटिप्या ऊर्फ जावेद शेख याने हर्सूलकारागृहाच्या गेटवरील पोलिसहवालदारासह साक्षीदाराला धक्काबुक्की, शिवीगाळ केली. त्यामुळे त्याच्यावर शासकीयकामात अडथळा आणि शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा गुन्हा हर्सूलपोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. टिप्यावर मोक्काची कारवाई केल्यानंतरत्याला सोमवारी (१३ ऑक्टोबर)न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीच्या वेळी त्याला आपल्यावरमोक्काची कारवाई केल्याची माहितीमिळाली. तेव्हापासूनच तो बिथरला होता. सुनावणीपूर्ण होऊन बाहेर आल्यापासून त्याने कुरबुरसुरू केली होती. त्याची वारंवार समजूतघालूनदेखील तो ऐकत नव्हता. दुपारीदोनच्या सुमारास त्यास पुन्हा कारागृहातडांबत असताना त्याने गेटवरच गोंधळघालण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडकरून, ‘माझ्यावर मोक्काची कारवाई कशीकाय केली?’ असे म्हणत त्याने शिवीगाळसुरू करून कारागृहात जाण्यास नकारदिला. त्याला समजावून सांगणाऱ्याउपनिरीक्षक कैलास जाधव यांच्यासहसाक्षीदाराला त्याने धक्काबुक्की करण्याससुरुवात केली. काही वेळातच त्याने जाधवयांची कॉलर पकडून ‘बाहेर आल्यावर तुलाबघून घेतो’ अशी धमकी दिली. टिप्याचामाज उतरत नसल्याचे बघून अन्यपोलिसांचा बंदोबस्त मागवून त्यालाकारागृहात डांबले. अधिक तपासहेडकॉन्स्टेबल विनोद जाधव करत आहेत. धिंडीनंतरही माज कायम टिप्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर१५ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखलआहेत. अडीच महिन्यांपूर्वी जुन्या गुन्ह्यातजमिनावर बाहेर आल्यावर त्यानेव्यापाऱ्याला तलवारीचा धाक दाखवूनअडीच लाख रुपये लुटले होते. तेव्हापासूनतो महिनाभर फरार होता. मात्र शहरपोलिसांच्या धडाकेबाज धिंड पॅटर्नलाघाबरून तो थेट न्यायालयात हजर झाला.त्यानंतर पुंडलिकनगर ठाण्याचे निरीक्षकअशोक भंडारे यांच्या पथकाने त्याचीअक्षरश: फरफटत धिंड काढली. त्यानंतरमोक्काची कारवाई करण्यात आलीतरीदेखील टिप्याचा माज कायम आहे.
पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेचा हिस्सा म्हणून राज्य सरकारने दिलेले ८२२ कोटी रुपये स्वतंत्र खात्यात ठेवा, ते इतरत्र खर्च करू नका, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. आश्विन भोबे यांनी दिले. त्याचबरोबर पाणीपुरवठा योजनेच्या दैनंदिन कामाच्या देखरेखीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्याकडे दिली आहे. औरंगाबाद खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी मनपाचा हिस्सा शासन २ आठवड्यांत जमा करणार असल्याचे स्पष्ट केले. शहरासाठीच्या २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिकेचा हिस्सा राज्य शासनाने देण्याचे निश्चित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधीची सुनावणी सुरू आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती मुंबई उच्च न्यायालयाकडून घेतली जात आहे. कामात सातत्य राहावे यासाठी उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती. महापालिकेच्या वाट्याचे ८२२ कोटी रुपये अप्राप्त असल्याचे सुनावणीप्रसंगी मनपाकडून अनेक वेळा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. राज्य शासनाने सॉफ्ट लोनच्या स्वरूपात रक्कम मंजूर केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासंबंधीची घोषणा करण्यात आली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हायकोर्टात उपाययोजनांची माहिती सादर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगनायक व्यक्तिश: मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीप्रसंगी उपस्थित होते. प्राधिकरणाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांच्या वतीने उच्च न्यायालयास देण्यात आली. राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, मजीप्रातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, ॲड. विनोद पाटील, जीव्हीपीआर कंपनीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, मनपा ॲड. संभाजी टोपे, न्यायालयाचे मित्र ॲड. शंभूराजे देशमुख, मूळ याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अमित मुखेडकर यांनी काम पाहिले. मजीप्रा अभियंत्यांनी निर्णय मागे घेतलामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी काही बिलांसंबंधी यापूर्वी घेतलेला निर्णय मागे घेतल्याचे सुनावणीदरम्यान सांगण्यात आले. कंपनीला कामापोटी दिली जाणारी बिले तपासली जातील. बिलांचा तपासणी अहवाल जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगनायक यांच्याकडे पाठवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. जीवन प्राधिकरणाला गरजेनुसार पैसे द्यावेत महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी राज्याकडून मिळणारी रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवण्याचे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारने २ आठवड्यांत संबंधित ८२२ कोटींचा निधी मनपाकडे वर्ग करावा. मनपाने पुढील २ आठवड्यांत संबंधित रक्कम लागेल त्याप्रमाणे जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी. मनपाला सॉफ्ट लोन मंगळवारी (१४ ऑक्टोबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीप्रसंगी राज्य सरकारतर्फे माहिती सादर करण्यात आली. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर फंड कंपनीने सॉफ्ट लोनबाबत ८ ऑक्टोबर २०२५ रोजी महापालिकेला पत्र दिले आहे. काही बाबींची पूर्तता करण्यास सांगितल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. संबंधित बाबींची महापालिकेने पूर्तता केल्यानंतर शासनाकडून ८२२ कोटी रुपये दिले जातील. मनपाचा हिस्सा राज्य शासन २ आठवड्यांत जमा करणार असल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीनंतर बनावट भारतीय चलनाच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिस आणि अन्य तपास यंत्रणांनी केलेल्या अथक प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोच्या “क्राइम इन इंडिया २०२३’ अहवालानुसार, राज्यात गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत २०२३ या वर्षात बनावट नोटांच्या जप्तीमध्ये थेट ३९.५१% घट नोंदवण्यात आली आहे. या आकडेवारीवरून राज्यात बनावट नोटांचे संपूर्ण नेटवर्क तोडण्यात यश आले असून, आता खुल्या बाजारात बनावट चलनाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी झाला असल्याचे स्पष्ट होते. नोटबंदीनंतर खुल्या बाजारात बनावट भारतीय चलनाच्या व्यवहाराला मोठा आळा बसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने नुकत्याच जारी केलेल्या ‘क्राइम इन इंडिया २०२३’ अहवालातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात २०२१ या वर्षाच्या तुलनेत २०२३ या वर्षात बनावट नोटांच्या जप्तीमध्ये लक्षणीय ३९.५१% घट नोंदवण्यात आली आहे. जप्तीच्या आकडेवारीचा तपशील देशभरातील बनावट नोटा जप्तीचे 3 वर्षाचे आकडे
राज्यातील साखर उद्योगात मोठी आर्थिक स्थिरता आणणारा एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने एका शासन निर्णयाद्वारे साखर कारखाना कामगारांचा पुढील पाच वर्षांसाठीचा (१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२९) वेतन करार मंजूर केला आहे. या निर्णयामुळे केवळ कामगारांनाच आर्थिक दिलासा मिळाला नाही, तर ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक या दोन्ही घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या करारामध्ये सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे, संपूर्ण पाच वर्षांसाठी कामगार संघटनांनी ‘औद्योगिक शांतता’ राखण्याची स्पष्ट हमी दिली आहे. यामुळे गाळप हंगामात होणारे वारंवारचे संप, घेराव किंवा आंदोलने आता थांबतील. परिणामी, शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप होईल. हा निर्णय साखर हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर झाल्यामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे, असा दावा केला जात आहे. या करारामुळे सर्व सहकारी, खासगी आणि भाडेतत्त्वावरील कारखान्यांतील कामगारांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. त्यांच्या एकत्रित वेतनात सरसकट १०% वाढ मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, हा करार १ एप्रिल २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू झाला असल्यामुळे कामगारांना जवळपास दीड वर्षाच्या थकीत फरकाची (Arrears) रक्कम टप्प्याटप्प्याने मिळणार आहे, जिल्हा परिषद निवडणुकीवर परिणामवैद्यकीय भत्ता दरमहा ३३८/- रुपये आणि रात्रपाळी भत्ता प्रति रात्र ३०/- रुपये करण्यात आला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय हजारो कामगार आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारला कामगार आणि शेतकरी स्तरावर मोठा राजकीय पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. विशेषत: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत याचा महायुतीला लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
मज्जातंतूच्या दुर्धर आजारावर उपचारासाठी २२ महिन्यांच्या बाळाच्या वडिलांनी अठरा कोटींचा खर्च कुठून भागवायचा, यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली अाहे. अमेरिकेतील झोलेझ्मा जीवनथेरपीचा एकवेळच्या डोसचा खर्च अठरा कोटी आहे. विशेष म्हणजे, हा डाेस बाळ जन्मल्यापासून २४ महिन्यांच्या आत द्यावा लागणार अाहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेनेगावकर यांनी केंद्र व राज्याला नोटीस बजावून कळवले आहे. शासकीय मदतीसाठी याचिकाकर्त्यास पोर्टलवर मदतीसाठी अर्ज करण्यास सांगितले. नागरिकांतून काही निधी मिळेल (क्राऊड फंड) का, असेही शासनाला विचारले आहे. २४ महिन्यांच्या आत मुलास योग्य ते उपचार मिळाले नाही, तर कंबरेखाली कायम अपंगत्व येते. हातपाय लुळे पडतात, असा आजार जडतो. जळगाव येथील देवांश भावसार नामक बाळाला हा आजार जडला असून ताे २२ महिन्यांचा आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार प्यारेलाल गुप्ता यांनी ॲड. शिवराज कडू यांच्या वतीने खंडपीठात याचिका दाखल करून अशा रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र अथवा राज्याने काय उपाययोजना केल्या, अशी विचारणा केली. या आजारासाठी प्रतिमाह सहा लाखांचे इंजेक्शन द्यावे लागत आहे. मेंदूच्या संप्रेरकात बिघाड झाल्याने आयुष्यभर अपंगत्व येते. मुंबईच्या नायर हॉस्पिटल व बेंगळुरू येथील बाप्तिस्ट हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. अशा आजारासाठी केंद्र आणि राज्यस्तरावर समिती स्थापन करावी. यासाठी पॉलिसी करावी, अशी विनंतीही केली. केंद्रातर्फे ॲड. राहुल बागुल तर राज्यातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुभाष तांबे यांनी काम पाहिले. अमेरिकेत उपचार अमेरिकेच्या थेरपीने आजार पूर्णत: बरा होऊ शकतो. त्यासाठी सोळा ते अठरा कोटींचा एकच डोस एकदाच घ्यावा लागतो. २४ महिने वय व्हायच्या आत मणक्यात हा डोस घ्यावा लागतो. बाळ २२ महिन्यांचे असून २४ महिने वय व्हायला केवळ दोन महिने शिल्लक आहेत. याचिकेत केंद्र व राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव आदींना प्रतिवादी केले.
जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुरेश भगवान उंबरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, सेंट फ्रान्सिस स्कूलच्या समोरील बाजूस दुकाने आहेत. त्यामागील मैदानावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांना समजली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मैदानावर एका तरुणाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत होता. पोलिसांपाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. रात्री सव्वानंतरही मृतदेह घटनास्थळी होता. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, संभाजी पवार, कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुरेश उंबरकर (२७) कुक म्हणून काम करत होता. हा तरुण जाफराबाद येथील रहिवासी असून शहरात भानुदासनगर भागात तो राहत होता. रात्री साडेअकराच्या सुमारास मृताचे कुटुंबीय घटनास्थळी आले. खुनाचा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी आक्रोश केला. खुनाची माहिती समजल्यानंतर रात्री जालना रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला.
भारतीय वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले ‘एचटीटी-४०’ जातीचे पहिले विशेष प्रशिक्षण विमानही ‘तेजस’च्या साेबत शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) आकाशात झेपावणार आहे. नाशिककरांच्या दृष्टीने ही दाेन्ही उड्डाणे ऐतिहासिक असतील. केंद्र शासनाने २०२३ मध्ये ७० एचटीटी-४० विमान बांधणीचे काम ओझर येथील एचएएल प्रकल्पाला दिले हाेते. त्यासाठी ६ हजार ८०० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली हाेती. दाेन वर्षांत ते उड्डाणासाठी तयार झाले संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे गुरुवार आणि शुक्रवार ( १६ व १७ ऑक्टाेबर) एचएएलमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समक्ष स्वदेशी बनावटीचे पहिले ‘तेजस एम के १ ए’ विमान हवाई दलाकडे सुपूर्द केले जाईल. याच साेहळ्यात पहिले एचटीटी-४० विमानही आकाशात झेपावेल. या दाेन्हीही विमानांसाेबत पाचव्या पिढीतील तंंत्रज्ञानाने अद्ययावत सुखाेई विमानही उड्डाण घेणार आहे. नेव्हिगेशन व नाइट फ्लाइंगची भूमिका एचटीटी-४० चा वापर मूलभूत उड्डाण प्रशिक्षण, एरोबेटिक्स, इन्स्ट्रुमेंट फ्लाइंग आणि क्लोज फॉर्मेशन फ्लाइटसाठी केला जाईल, त्याच्या दुय्यम भूमिकांमध्ये नेव्हिगेशन आणि नाइट फ्लाइंगचा समावेश अाहे. भारतीय संरक्षण सेवांच्या प्राथमिक प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा पुरावा आहे. काटेकोरपणे चाचणी केलेल्या टर्बो-प्रॉप इंजिनच्या भोवती उभारलेेले हे विमान आधुनिक एव्हिओनिक्स, वातानुकूलित केबिन आणि इजेक्शन सीटसह सुसज्ज आहे. यात पायलट बदलणे, हवेतच इंधन भरणे आणि अल्प-वेळात तीव्र वळण यासारख्या अद्वितीय वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ३ तास उड्डाणाची क्षमता, ४०० किमी वेग अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले ‘एचटीटी-४०’ हे विशेष प्रशिक्षण विमान तयार करण्याचे काम एचएएलला देण्याचा निर्णय सरंक्षण विभागाने २०२३ घेतला. यापैकी १० विमानांची निर्मिती बंगळुरू येथील एचएएलमध्ये तर उर्वरित ६० विमानांची निर्मिती ओझर एलएएलमध्ये करण्यात येत आहे. संपूर्णत: भारतीय बनावटीच्या या विमानाचा ताशी वेग ४०० किलोमीटर प्रती तास असून हे विमान एकाच वेळेस तीन तास उड्डाण करू शकते.
विक्रमी पूर्वमोसमी पाऊस आणि दमदार मान्सूनमुळे या वर्षी महाराष्ट्रातील धरणांतील उपयुक्त जलसाठा ९१.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे. गेल्या १० वर्षांतील हा सर्वांधिक जलसाठा आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात रब्बी, उन्हाळी हंगामासाठी पुरेसे पाणी मिळू शकेल. त्याचबरोबर पुढील वर्षी पावसाला उशीर झाल्यास खरिपाच्या संरक्षित पाणीसाठा शिल्लक राहू शकेल, असे मानले जाते. गेल्या २५ वर्षांत ९० टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त साठा असण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००६-०७मध्ये राज्यांतील धरणांत उपयुक्त जलसाठा ९२ टक्के होता.जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार, राज्यातील २९९७ लहान, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता ४८,४२३.६६ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पांत ३७,९५२.५७ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. २००६मध्ये २५ वर्षांतील सर्वाधिक जलसाठा २००६ मध्ये राज्यातील गोदावरी, कृष्णा खोऱ्यातील नद्यांसह कोकणातील नद्यांना पूर आला होता. त्या वर्षी राज्यातील धरणांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता २९,५३१ दशलक्ष घनमीटर होती. धरणांमध्ये २७,३०९ दलघमी, सुमारे ९२ टक्के जलसाठा होता. महाराष्ट्रातील धरणांतील उपयुक्त जलसाठा ९२ टक्के झाला होता. दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू - जे. एन. हिरे, निवृत्त सहायक अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्रधिकरण शेती, उद्योग, शहरांचीही चिंता मिटली महाराष्ट्रात ५६ लाख हेक्टरपेक्षा जास्त निर्मित सिंचन क्षेत्र आहे. या सर्व शेतीला आता पाणी देता येऊ शकेल. त्याचबरोबर पिण्याचे पाणी, उद्योग यांच्यासमोरील जलचिंता मिटेल. रब्बी, उन्हाळी हंगामातील जास्तीत जास्त पिकांना पाणी देणे शक्य आहे. निर्मित सिंचनक्षमतेपैकी जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे आव्हान आता समोर आहे. त्याचबरोबर पाणी शिल्लक राहिल्यास पुढील वर्षी पावसाला उशीर झाल्यास खरिपाला संरक्षित पाणीपाळी देता येईल.
राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर राज्य सरकारने घोषित केलेल्या ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या मदत पॅकेजच्या वितरणास सोमवारी सुरुवात झाली. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यामुळे अतिवृष्टीग्रस्त २८२ तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अशी माहिती राज्याच्या मदत व पुर्नवसन विभागातील एका अधिकाऱ्याने दिली. राज्यातील २५१ पूर्णतः बाधित आणि ३१ अंशतः बाधित तालुक्यांमध्ये आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत, शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई, पशुधन व घरांच्या नुकसानीसाठी अनुदान दिले जात आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकांसाठी ८,५००, बागायत १७,००० आणि बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये प्रति हेक्टर भरपाई मिळणार आहे. जमिनीवरील गाळ काढण्यासाठी १८,००० तर दरड कोसळणे किंवा जमीन वाहून जाण्याच्या प्रकरणात ४७,००० रुपये प्रति हेक्टर मदत दिली जात आहे. रब्बी हंगामासाठी अतिरिक्त १०,००० रुपये प्रति हेक्टर, तसेच मृत पशुधनासाठी अट शिथिल करून नुकसानभरपाई दिली जाणार आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये, तर घरांच्या नुकसानीसाठी १.२० लाख ते १.३० लाख रुपयांपर्यंत मदत मिळेल. याशिवाय, मनरेगा योजनेतून लागवडीयोग्य जमीन पुनर्संचयित करण्यासाठी कमाल ५ लाख रुपये, सिंचन विहिरी दुरुस्तीसाठी ३० हजार रुपये आणि पायाभूत सुविधा दुरुस्तीसाठी १० हजार कोटींचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. असेही अधिकाऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांच्या अभ्यास दौरा खर्चात दुप्पट वाढीचा निर्णय; आधुनिक, प्रगत शेती तंत्रज्ञानाविषयी केले जातात दौरे प्रतिनिधी | मुंबई राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि प्रगत कृषी पद्धतींची माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अभ्यास दौऱ्यांवरील खर्चात राज्य सरकारने मोठी वाढ केली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला कमाल १ लाख रुपयांऐवजी २ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. वाढती महागाई आणि डॉलर-युरोच्या विनिमय दरातील वाढ लक्षात घेऊन हा बदल झाला. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी काढण्यात आला. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा, हा या दौऱ्यांचा मुख्य उद्देश आहे. या दौऱ्यांत विविध प्रगत देशांतील विकसित तंत्रज्ञान, शेतमालाची निर्यात प्रक्रिया, कृषी मालाचे पणन, बाजारपेठेतील मागणी आणि प्रक्रिया उद्योगांची माहिती मिळते. प्रत्यक्ष क्षेत्र, संस्थांना भेटी आणि विदेशी शेतकऱ्यांशी चर्चा करून राज्यातील शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता वाढवणे हे कृषी विभागाचे उद्दिष्ट आहे. अनुदान मर्यादा १ लाखावरून २ लाखांवर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१२ ते २०२५ या १३ वर्षांच्या कालावधीत विमानाची तिकिटे, संबंधित देशातील निवास व्यवस्था आणि इतर अनुषंगिक खर्चांच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच, डॉलर आणि युरो या आंतरराष्ट्रीय चलनांच्या रूपयांतील विनिमय दरातही मोठी वाढ झाली आहे.
ड्रग्ज तस्करी अन् ड्रग्ज निर्मितीचे भारतातील प्रमाण २०१९ ते २०२४ पर्यंतच्या ६ वर्षांत अक्षरश: सहापटीने वाढले आहे. वर्ष-२०१९ मध्ये १,८९० किलो ड्रग्ज जप्त केले होते. त्यावेळी ५७,८६७ गुन्हे दाखल होते. २०२४ दरम्यान ११,९९४ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. ७२, ४९६ गुन्हे नोंदवलेत. विशेष म्हणजे, पूर्वी रस्ते अन् समुद्री मार्गे ड्रग्जची तस्करी केली जायची. मागील वर्षी तर अफगाणिस्तान पाकिस्तानातून ड्रोनद्वारे ड्रग्ज पंजाब, राजस्थानात ‘लँड’ झाले. अशा १७९ घटना घडल्यात. २३६ किलो हेरॉइन, ओपियम ड्रोनला टांगून आणण्यात आले. केंद्रिय गृहमंत्रालयाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २०२४ चा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ‘ड्रोन’चा उल्लेख पहिल्यांदाच आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या मते अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण हा मृत्यूचा चंद्रकोर तर म्यानमार, थायलंड अन् लावोस मृत्यूचा त्रिकोण आहे. काँग्रेस आणि भाजपच्या सरकारांशी तुलना केली तर भाजप सरकारच्या काळात ड्रग्ज जप्तीचे प्रमाण चौपट आहे. २००४ ते २०१३ दरम्यान १० वर्षांत २६ लाख किलो ड्रग्ज जप्त केले. त्याची किंमत ४० हजार कोटी होती. नरेंद्र मोदींच्या काळात १.६५ लाख कोटी रुपयांचे १ कोटी किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पुण्याच्या तीन पोलिस ठाण्यातच ८५ % ड्रग्ज वर्ष-२०२४ दरम्यान महाराष्ट्रात एकूण ४२४९.९० कोटी रूपयांचे ड्रग्ज पकडले होते. पैकी तब्बल ८५ टक्के ड्रग्ज एकट्या पुण्यातील ३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून हस्तगत केले होते. पुणे क्राइम ब्रँच,अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंटने फेब्रुवारी-२०२४ मध्ये ३,६७२ कोटींचे १८३६ किलो मेफेड्रोन पकडले होते. त्यामध्ये कुरकुंभ एमआयडीसी, धानोरी आणि विश्रांतवाडी पोलिस ठाणे हद्दीतील ही कारवाई होती. या गुन्ह्यांत सर्वाधिक १५० आरोपी गजाआड करण्यात आले आहेत. करकुंभ ठाण्याच्या हद्दीतील ३ गोदामांवर गुन्हे शाखेने छापे टाकले होते. या गुन्ह्यातील आरोपींनी दिल्ली, सांगलीत ड्रग्ज लपवले होते. पुण्यात त्यावेळी वर्षभरात १२९ गुन्ह्यांमध्ये २०४ आरोपींना अटक होती. मुंबईत १,१५३ गुन्हे होते, पण आरोपी १३४२ अटकेत होते. मुंबईतून २०२४ मध्ये ५१३ कोटींचे ड्रग्ज हस्तगत केले होते महाराष्ट्रात गांजामहाराष्ट्रात ८ प्रकारचे अमली पदार्थ पकडले. त्यात ५५,३५१ किलो. गांजा. २०१०३ कि. कोडाईन कोकेन-३७.१२ कि., एटीएस-३.९८ कि, हशिश-८३.२२, हशिश ऑइल ८५ लि.,हेराॅइन ५.४४ कि. आहे. ६६० विदेशी गजाआड६६० विदेशींना अटक केली. सर्वाधिक २०३ नेपाळचे आहेत, नायजेरिया-१०६,म्यानमार-२५, बांगलादेश-१८, घाणाचे १३ आहेत. आता देशातील १६ हजार विदेशींना शोधण्याचे गृह मंत्रालये टास्क आहे.
लेकरांनो आई-बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा
नळेगाव/आष्टा : वार्ताहर बदलती जीवनशैली आणि व्यसनाधीनतेच्या मार्गामुळे आई- बाप आणि पोटची बाळं यांचं नातं दुरावत चाललेलं आहे. ही समाजासाठी गंभीर बाब असून आई-बाप आणि पोटची लेकरं यांचं नातं टिकवून ठेवायचं असेल तर लेकरांनो आई-बापाच्या प्रत्येक श्वासाला व त्यांच्या कष्टाला जीव लावा, अशी भावनिक साद समाजपरिवर्तनकार वसंत हंकारे यांनी आजच्या युवक युवतींना घातली. चाकूर तालुक्यातील […] The post लेकरांनो आई-बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साकोळ सोसायटीच्या अॅग्रो मॉलचा शुभारंभ होणार
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ सेवा सहकारी सोसायटीकडून शेतक-यांच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या अॅग्रो मॉल’चा शुभारंभ सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोसायटीच्या वतीने त्यांना निमंत्रण देण्यात आले असून हा मॉल सभासद शेतक-यांना उपयोगी ठरणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, व्हाईस […] The post साकोळ सोसायटीच्या अॅग्रो मॉलचा शुभारंभ होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळकोट तहसीलवर कामगार संघटनेचा मोर्चा
जळकोट : प्रतिनिधी समता अधिकार कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोमवारी जळकोट तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार राजेश लांडगे यांना संघटनेचे अध्यक्ष डी. आर. शिंदे यांनी निवेदन दिले. निवेदनात शेतकरी व भूमिहीन शेतमजुरांना पंचवीस हजारांच्या आर्थिक मदतीसह हाताला काम द्यावे, बांधकाम कामगारांचे खाजगी क्षेत्रात कामाचे तास १२ ऐवजी ८ तास करण्यात यावे, बांधकाम कामगारांना […] The post जळकोट तहसीलवर कामगार संघटनेचा मोर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या लता पाटील
लातूर : प्रतिनिधी खास दिवाळीच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूरच्या वतीने दोन दिवसीय ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’ चे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दि. १४ रोजी झाला. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत ‘खेळ पैठणीचा’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडला. या स्पर्धेच्या प्रथम विजेत्या ठरल्या लता पाटील. माजी मंत्री, […] The post ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या लता पाटील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सामाजिक आधार मिळत नाही हे शेतक-यांच्या आत्महत्येमागचे मूळ कारण
लातूर : प्रतिनिधी संत साहित्याचा विचार घराघरात पोहोचवणे आवश्यक आहे. त्यामुळे मानसिक आधारही मिळतो. आपला हा लढा संतांचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आहे. सगळ्या जगाचा पोशिंदा असणा-या बळीराजाला कोणाकडूनही अपेक्षित सामाजिक आधार मिळत नाही. हेच शेतक-यांच्या आत्महत्येमागचे मूळ कारण असल्याचे प्रतिपादन वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील (काकाजी) यांनी केले. मराठवाड्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांना […] The post सामाजिक आधार मिळत नाही हे शेतक-यांच्या आत्महत्येमागचे मूळ कारण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंताला सुरुवात रशियाच्या हल्ल्याने जगात खळबळ
मॉस्को : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार घडवून आणला आहे. या करारानंतर आता गाझा पट्टीतील संघर्ष थांबला आहे. आता समस्त जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाकडे लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही देशांतील थांबवतील अशी आशा आता बाळसे धरू लागली आहे. दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की हेदेखील रशियावर […] The post अंताला सुरुवात रशियाच्या हल्ल्याने जगात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र या कराचा कोणताही परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने(आयएमएफ) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमएफने जीडीपी ०.२ टक्क्यांनी वाढून तो ६.६ % असेल असे म्हटले […] The post भारताचा जीडीपी वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धामणगाव रेल्वे: आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये सभापतीपद महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले असून, आठपैकी केवळ एकाच जागेवर कोणत्याही संवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे. उर्वरित जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकूण आठ जागांपैकी चार जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, तर दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) आणि प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव आहे. खुल्या प्रवर्गातील चारपैकी अंजनसिंगी, पिंपळखुटा आणि तळेगाव दशासर या तीन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे चिंचोली ही एकमेव जागा अशी आहे, जिथे कोणत्याही संवर्गातील पुरुष किंवा महिला उमेदवार निवडणूक लढवू शकतील. नामाप्रसाठी राखीव असलेल्या दोन जागांमध्ये निंभोरा-बोडखा आणि मंगरुळ दस्तगीर यांचा समावेश आहे. यापैकी मंगरुळ दस्तगीरची जागा महिलेसाठी राखीव असल्याने तेथे पुरुष उमेदवाराला संधी मिळणार नाही. अनुसूचित जातीसाठी जुना धामणगाव, तर अनुसूचित जमातीसाठी शेंदुरजनाखुर्द हे मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही जागांवर पुरुष आणि महिला असे दोन्ही उमेदवार निवडणूक लढवू शकतील. तहसीलदार आशिष घोरपडे यांच्या उपस्थितीत सोमवारी आठ गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षणामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर काही जणांना निवडणूक लढवता येणार नसल्याने त्यांना नव्या संधी शोधाव्या लागणार आहेत. महिलांना मिळालेल्या या मोठ्या संधीमुळे अनेक नवीन चेहरे राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांच्या शांततेनंतर धामणगाव तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, आगामी काळात प्रचाराचा धुरळा उडताना दिसणार आहे. दरम्यान, धामणगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ आहेत आणि हे चारही मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत या तालुक्यातून शंभर टक्के महिलांचे प्रतिनिधित्व असेल. जुना धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, तळेगाव दशासर आणि चिंचोली हे ते चार मतदारसंघ आहेत. यापैकी चिंचोली हा खुला असल्याने तेथे कोणत्याही जाती-जमातीच्या महिलेला निवडणूक लढवता येईल, तर उर्वरित तीन मतदारसंघात केवळ नामाप्र संवर्गातील महिलांना निवडणुकीत उभे राहता येणार आहे.
नेहरु मैदानाच्या संरक्षणासाठी काँग्रेस पक्ष जनआंदोलन उभारणार असल्याची घोषणा आज, मंगळवारी येथे करण्यात आली. काँग्रेसचे महानगर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी अध्यक्ष किशोर बोरकर आणि तीन माजी महापौरांच्या उपस्थितीत श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. त्याचवेळी, कचरा उचलण्याचे कंत्राट नव्याने देण्याच्या महानगरपालिकेच्या भूमिकेला काँग्रेसने पाठिंबा दर्शवला. नेहरु मैदान हे अमरावती शहराचा मानबिंदू असून, शहराच्या मध्यभागी असलेले हे एकमेव मैदान आहे. या मैदानावर अनेक ऐतिहासिक सभा आणि राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा, ज्यात महापौर चषक कबड्डी स्पर्धेचा समावेश आहे, आयोजित करण्यात आल्या आहेत. हे मैदान समाजासाठी एक महत्त्वपूर्ण देणगी असून, महानगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी ते नष्ट करणे योग्य नाही, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले. महानगरपालिकेने या ठिकाणी बहुपयोगी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यात तळमजल्यावर व्यापारी गाळे आणि वरच्या मजल्यावर प्रशासकीय कार्यालये असतील. तसेच, मनपाच्या जुन्या जागेवरही व्यापारी संकुल उभारण्याचा प्रशासकीय प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्थानिक आमदार सुलभाताई खोडके आणि विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला असला तरी, नेहरु मैदानाचे व्यापारीकरण कदापिही होऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन उभारले जाईल, असा पुनरुच्चार काँग्रेसने केला. या पत्रकार परिषदेला माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे नेते मुन्ना राठोड, माजी महापौर आणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मिलींद चिमोटे, माजी महापौर अशोक डोंगरे, युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ व वैभव देशमुख, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती बाळासाहेब भुयार आणि एनएसयुआयचे संकेत कुलट यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शहरात काही व्यक्ती कचरा माफिया बनले असून, महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत काही लोकप्रतिनिधींच्या जवळच्या व्यक्तींनाच कचरा उचलण्याचे कंत्राट मिळाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावर लगाम घालणे आवश्यक असल्याचेही काँग्रेसने म्हटले. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी या संदर्भात कठोर पाऊल उचलले असून, सध्याचे कचरा कंत्राट बदलण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने आयुक्तांच्या या भूमिकेचे स्वागत केले असून, त्यांच्या या स्तुत्य कार्याला पाठिंबा दर्शवला आहे.
नांदगाव खंडेश्वर येथे बस डेपोची अभाविपची मागणी:तहसीलदारांना निवेदन सादर
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नांदगाव खंडेश्वर शाखेने शहरात बस डेपो उभारण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर हे नगरपंचायतीचे शहर तसेच तालुक्याचे मुख्यालय असूनही येथे अद्याप बसस्थानक उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे बस थांबण्यासाठी कोणतीही नियोजित जागा उपलब्ध नाही. बसस्थानक नसल्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. बस निश्चित ठिकाणी थांबत नसल्याने प्रवाशांना धावपळ करावी लागते. पावसाळ्यात भिजत उभे राहावे लागते, तर उन्हाळ्यात तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना बसमध्ये चढ-उतार करताना रस्त्यावरच थांबावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुका शैक्षणिकदृष्ट्या विकसित होत असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवास करतात. बस डेपो उभारल्यास विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. निवेदन सादर करतेवेळी नगरमंत्री ओम मोरे, अभिषेक पवार, सुमित नागपुरे, आनंद जयस्वाल, साहिल जांभुळकर, आदित्य गवळी, अभय राजूरकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
लग्नाच्या ५ वर्षांनंतर पाळणा हलला
मोतीहारी : बिहार येथील मोतीहारी भागात एका विवाहितेने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आई आणि बाळ दोघांची प्रकृती उत्तम आहे. या महिलेचा विवाह होऊन पाच वर्षे झाल्यानंतर तिची ही पहिलीच प्रसूती झाली आहे. या महिलेने एक मुलगा आणि तीन मुलींना जन्म दिला आहे. बिहार राज्यातील मोतिहारी वात्सल्य नर्सिग होम […] The post लग्नाच्या ५ वर्षांनंतर पाळणा हलला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मादागास्करच्या ‘जेन झी’ आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांना पळवले
अंतानानारिव्हो : काही दिवसांपूर्वी जेन झी आंदोलकांनी नेपाळमधील सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर जगातील अनेक देशातील तरूणाई रस्त्यावर उतरली होती. अशातच आता आफ्रिकेच्या पूर्व भागातील देश मादागास्करमध्येही जेन झी आंदोलकांनी सरकार उलथवून टाकले आहे. येथे गेले काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यानंतर आता राष्ट्रीय सभेच्या महाभियोग प्रस्तावानंतर सरकार बरखास्त करण्यात आले आहे. त्यानंतर राष्ट्रपती अँड्री […] The post मादागास्करच्या ‘जेन झी’ आंदोलकांनी राष्ट्राध्यक्षांना पळवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कल महिला सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाल्याने स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. यामुळे अनेक पुरुष उमेदवारांची दशकाहून अधिक काळाची प्रतीक्षा संपुष्टात आली असली तरी, त्यांच्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी आता सुरू झाली आहे. या सर्कलचा राजकीय इतिहास नेहमीच रंजक राहिला असून, आता पुन्हा एकदा महिला नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गेल्या दोन दशकांत तीन वेगवेगळ्या पक्षांनी सत्ता गाजवली आहे. २००२ मध्ये शिवसेनेचे नितीन हटवार यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २००७ मध्ये त्यांच्या पत्नी मनीषा हटवार विजयी झाल्या. २०१२ मध्ये काँग्रेसचे विनोद डांगे यांनी बाजी मारली, तर २०१७ मध्ये भाजपच्या भारती गेडाम यांनी विजय मिळवला होता.सध्या राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत असल्याने, भाजपकडून जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाने यांच्या पत्नी मनीषा गुल्हाने यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसऱ्या बाजूला, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून मनीषा हटवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत.काँग्रेसकडून सुनंदा केचे या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांचे कुटुंब पारंपरिक काँग्रेस विचारसरणीचे असून, त्यांनी २०१२ ते २०१७ या काळात पंचायत समितीत प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन इंगळे यांच्या पत्नी योगेश्वरी इंगळे आणि डिगरगव्हाण येथील सरपंच जिल्लेश्वरी ठाकरे यादेखील संभाव्य उमेदवारांच्या यादीत चर्चेत आहेत.अशाप्रकारे, आगामी निवडणुकीत नांदगाव पेठ सर्कलचा हा राजकीय संघर्ष केवळ पक्षीय लढाई न राहता महिला नेतृत्वाच्या बळकटीकरणाचे प्रतीक ठरणार आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तामिळनाडूमध्ये राज्य मार्केटिंग कॉर्पोरेशनमध्ये कथित घोटाळ््यावरून सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) चांगलेच फटकारले आहे. राज्य पोलिसांकडे तपासाची जबाबदारी असताना ईडीच्या हस्तक्षेपाची काय गरज होती, राज्याच्या पोलिसांमध्ये तपासाची क्षमता नाही का, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारले. तसेच गेल्या ६ वर्षांमध्ये आम्ही तुमच्या अनेक कारवाया पाहिल्या आहेत, त्यावर बोललो तर सोशल मीडियात व्हायरल […] The post सरन्यायाधीशांनी ईडीला फटकारले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिस-या फेरीत वैद्यकीयच्या २,६५० जागा वाढल्या
मुंबई : प्रतिनिधी वैद्यकीय अभ्यासक्रमाची तिसरी फेरी लांबणीवर पडल्याने विद्यार्थी चिंतीत आहेत. त्यातच आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशात २ हजार ६५० नव्या जागा वाढविल्या आहेत. महाराष्ट्रात १५० नव्या जागांना मान्यता मिळाली आहे. या जागांचा तिस-या फेरीत समावेश करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अधिक संधी उपलब्ध होणार आहे. रुग्णांच्या तुलनेत डाक्टरांची संख्या कमी आहे. केंद्र सरकारने […] The post तिस-या फेरीत वैद्यकीयच्या २,६५० जागा वाढल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कारवाई करावी
मुंबई : राज्यात सुमारे १७ हजार गावे सामुदायिक वन हक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत केवळ ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आले आहेत. उर्वरित गावांना सामुदायिक वन हक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास व अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कारवाई करावी. वंचित आदिवासी, गरीब समाजाला सर्व योजनांचे लाभ द्यावेत. अंशत: वन हक्काच्या पात्र दाव्यांवर तातडीने सुनावणी […] The post पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कारवाई करावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई उच्च न्यायालयाने दिव्यांगांसाठीच्या ई-वाहने खरेदी योजनेतील २९.८८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी ११५ दिव्यांग व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारला आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. असीम सरोदे आणि ॲड. श्रीया आवले यांच्या मदतीने महाराष्ट्रातील विविध भागांतील ११५ दिव्यांग व्यक्तींनी ही याचिका दाखल केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, राज्य दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव, वित्त व विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक, मुंबई तसेच फरिदाबाद, हरियाणा येथील मॅक ऑटो इंडिया यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेत नमूद केल्यानुसार, दिव्यांगांना स्वावलंबी होण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या फिरत्या दुकानांसाठी (मोबाइल शॉप व व्हेईकल) मोफत ई-वाहने उपलब्ध करून देण्याची योजना होती. मात्र, हरियाणातील मॅक ऑटो इंडिया कंपनीने पुरवलेली ही वाहने कमकुवत इंजिन आणि अनेक तांत्रिक दोषांनी युक्त होती. महाराष्ट्रात दुरुस्तीसाठी सेवा केंद्रेही उपलब्ध नाहीत. सुमारे १ लाख रुपये किंमत असलेल्या प्रत्येक ई-वाहनाची खरेदी ३ लाख ७५ हजार रुपयांना करण्यात आली. अशा एकूण ७९७ सदोष ई-वाहनांचे महाराष्ट्रात वाटप करण्यात आले. यातून महाराष्ट्र सरकारने २०१८-२०१९ च्या योजनेत दिव्यांगांच्या नावाने २९ कोटी ८८ लाख ७५ हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या सदोष ई-रिक्षांचे वाटप २०२४ मध्ये करण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच अपंग वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. ॲड. असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
पुणे: ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनंत बागाईतकर यांनी म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्य लढा आणि त्याची प्रतीके सध्या सत्ताधाऱ्यांनी 'हायजॅक' केली आहेत. गांधीवादी विचारधारेनुसार ही बाब लोकांना समजावून सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. ते 'सत्याग्रही विचारधारा' या दिवाळी विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. बागाईतकर यांनी नमूद केले की, दिल्लीत 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' उभारले आहे, परंतु त्याला 'राष्ट्रीय शौर्य स्मारक' म्हटले जात नाही. दुसऱ्यांना चिथावणी देणारे सनातनी लोक असून, त्यांचा सामना वैचारिक पातळीवर केला पाहिजे. स्वातंत्र्य लढा आणि त्या काळातील स्मारकांच्या इतिहासाची मोडतोड सध्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी समाजाला टोकाच्या भूमिका घेण्यापासून रोखले होते, परंतु आता समाजात विविध जातीधर्मांमध्ये टोकदार भूमिका मांडल्या जात आहेत. देशातील विविधता टिकवण्यासाठी संसदीय लोकशाही प्रणाली आणली गेली असून, हुकूमशाही भूमिकेपासून तिचे रक्षण केले पाहिजे. उदारमतवादी मध्यममार्गी विचारधारेचे अनुसरण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रस्ता, पुणे येथे 'सत्याग्रही विचारधारा' या ३४व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व संपादक डॉ. कुमार साप्तर्षी, व्यंकटेश केसरी, विश्वस्त ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, ॲड. अभय छाजेड, अन्वर राजन आणि अंजली सोमण उपस्थित होते. अनंत बागाईतकर यांनी सांगितले की, 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाच्या माध्यमातून गांधी विचारांचा प्रसार गेल्या ३४ वर्षांपासून सुरू आहे. याचा अर्थ गांधींनी मांडलेला विचार अजूनही जिवंत आहे आणि तो जनतेमध्ये जागृत आहे. सनातनी विचार आणि गांधी विचार यात फरक असून, सनातनी विचाराला हिंसेचा आधार आहे, तर गांधींनी हिंदुत्वाची उदारमतवादी भूमिका मांडली आणि ते धर्मनिरपेक्ष होते. ज्या गांधींनी अहिंसेचा विचार मांडला, त्यांच्या विरोधात काही जणांनी भूमिका मांडली. अलीकडच्या काळात पुणे शहराची ओळख सर्वात हिंसक शहर म्हणून होऊ लागली आहे, कारण हिंसेला सत्तेचे पाठबळ मिळत आहे. सरसंघचालकांनी विजयदशमीला नागपूर येथे केलेल्या भाषणात कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले, परंतु त्यांच्या इतर संघटनांकडून सुरू असलेल्या हिंसेचा त्यांनी निषेध केला नाही, ही मूकपणे हिंसा मान्य करण्यासारखी बाब असल्याचे बागाईतकर म्हणाले. दिल्लीतील स्वयंघोषित ब्रह्मांडनायक पंतप्रधानांनी पटेल विरुद्ध नेहरू, गांधी विरुद्ध बोस असे वाद विनाकारण निर्माण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध सुरू केला आहे. मूठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रित ठेवण्याचा जो विचार आहे, तो दूर लोटला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन
मुंबई : प्रतिनिधी राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्यानंतर सर्व मतभेद गाडून एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंमधील जिव्हाळा वृद्धिंगत होत चालला आहे. गेल्या महिन्यात सहावेळा परस्परांना भेटल्यानंतर आता मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटनही उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी दीपोत्सवाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी केले होते, यावर्षी उद्धव ठाकरे यांनी त्यांची जागा घेतली आहे. महाराष्ट्राचे राजकारण […] The post उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भंडारा, पवनी व तुमसर ह्या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे. पण वरिष्ठांनी युतीचा निर्णय घेतल्यास त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. नगराध्यक्षाचे उमेदवार वेळेवर ठरवू अशी माहिती आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आज विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. दिवाळी पूर्व संध्येला खांब तलाव भंडारा येथे श्रीरामांच्या मूर्तीसमोर ५१ हजार दिवे पेटविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.आ. नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले. नगर परिषद निवडणूकीच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. प्रत्येक पक्षाचा उद्देश हाच असतो, आमचाही तोच आहे. युतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावरचा आहे. आम्ही विकासासाठी निवडणूक लढणार आहोत. विरोधकांचा विरोध करायचे काम आहे. आम्ही मात्र जे वातावरण खराब करण्याचे काम करतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपले विकासाचे काम करीत आहोत व करीत राहणार. पावसाळ्यामुळे भंडारा शहरातील अनेक रस्त्याची तसेच विकास कामे मंदावली होती. निधीची सुद्धा कमतरता होती. आता मात्र निधींची कमतरता नाही. त्यामुळे मंदावलेली कामे पुन्हा सुरु होत आहेत. खांब तलाव, जल पर्यटन, गटार योजना. पाणी पुरवठा यासह इतर कामे दोन महिन्यांत पूर्ण होतील. अशी आशा आहे. भंडाराचा अभिमान वाढविणारे हे कामे आहेत. कधी नव्हे एवढा निधी आपण भंडारा-पवनी विधानसभेसाठी आणलेला आहे. विरोधक अफवा पसरवित आहे. नागपूर नाका ते राजीव गांधी चौक हे काम लवकरच सुरू होतील. गटार योजनेचे काम पहिल्यांना पूर्ण होणे आवश्यक होते. लवकरच ते काम पूर्ण होतील. त्यानंतर गटाचे काम पहिले होते आवश्यक आहे. हे काम करताना त्रास होतच असते. काम पूर्ण होताच एक ते दिड महिन्यात शहरातील सर्व रस्ते चांगले होतील. माझ्या विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी जो विश्वास टाकला तो शंभर टक्के पूर्ण होईल. त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महिला रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे अयोग्य होते. आपण महिला रुग्णालयासाठी आठ वर्ष संघर्ष केला. आता लवकरच महिला रुग्णालय लवकरच सुरू होणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालय हा सामान्य रुग्णालयात पाहिजे. पण महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय पाहिजेच. निवडणूक होताच आठ गावे नगर परीषदेत येणार आहे. नवीन भंडारा तयार करणार नागपूर मध्ये नवीन नागपूर तयार होणार आहे. त्याच धर्तीवर नवीन भंडारा हा आपला संकल्प करणार आहोत. लवकरच ते स्वप्न सुध्दा पूर्ण होणार आहे. तीन वर्षात नवीन भंडारा तयार होण्याची पूर्ण प्रक्रिया होईल. शहरातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे व राहील, असेही आ. नरेंद्र भोंडेकर यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, बाबू बागडे, नितीन धकाते, दिपक गजभिये, नरेंद्र बुरडे, अॅड. रवी वाढर्ड, शहर प्रमुख सतीश तुरकर, राजेश चोपकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाबोधी महाविहारावर बौद्धांचाच हक्क असून बोधगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजासाठी श्रद्धेचे आणि आस्थेचे सर्वोच्च केंद्र आहे. या पवित्र स्थळाचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडेच असले पाहिजे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा १९४९ तत्काळ रद्द करा आणि बौद्ध समाजाला त्यांचे संपूर्ण हक्क परत द्या, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. महाबोधी महाविहार प्रश्नी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान दरम्यान महामोर्चा काढण्यात आला होता यावेळी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाबोधी महाविहारासाठी देशभरात आंदोलन सुरु आहे. विविध संघटना व पक्षीय पातळीवर हे आंदोलन सुरु आहे. या विषयावर संसदेत आवाज उठवलेला आहे. यापुढेही या प्रश्नावर संसदेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही आवाज उठवत राहू. देशाच्या पंतप्रधांनानाही याविषयावर भेटू पण जोपपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरुच राहिल. देशात मनुवाद वाढला आहे, सरन्यायाधीशांवर कोर्टात हल्ला होतो पण त्या हल्लेखोराला शिक्षा न करता त्याला पाठीशी घातले जात आहे. पंतप्रधान मोदी परदेशात असले की गौतम बुद्ध, महात्मा गांधी व संविधानाचा उल्लेख करतात पण देशात मात्र संविधानाची पायमल्ली केली जात आहे. दलितांवर हल्ले होत आहेत, हरियाणात आयपीएस अधिकाऱ्याला आत्महत्या करावी लागली हे गंभीर आहे असेही खासदार गायकवाड म्हणाल्या. या आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह प्राणिल नायर, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हाध्यक्ष कचरू यादव, क्लाईव्ह डायस, इंदुप्रकाश तिवारी, अवनीश सिंग, आनंद यादव, विष्णू सरोदे, मंदार पवार इत्यादी उपस्थित होते.
‘महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार’मधील कक्षांना संत, कर्तृत्ववान महिलांची दिली नावं
लातूर : प्रतिनिधी खास दिवाळीच्या निमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाला नवी दिशा देण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूरच्या वतीने दोन दिवसीय ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’ चे आयोजन करण्यात आले आहे. याचा शुभारंभ दि. १४ रोजी झाला. या बाजारात महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. परंतु, हे सर्व करीत असताना संयोजकांनी ‘महिला […] The post ‘महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार’मधील कक्षांना संत, कर्तृत्ववान महिलांची दिली नावं appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी २५ लाखांचा निधी
लातूर : प्रतिनिधी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली होती. या अतिवृष्टीने शेतक-यांसह नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटात शेतकरी आणि नागरीकांना मदतीचा हात अपेक्षीत आहे. त्यामुळे सामाजीक बांधीलकी जोपासत लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने अतिवृष्टीबांधीतांच्या मदतीसाठी २५ लाखांचा निधी देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सदर […] The post श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी २५ लाखांचा निधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार कर्तृत्ववान महिलांच्या सक्षमीकरणास बळ देणारे
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेला ‘महिला उद्योजिका व्ही. डी. एफ. बाजार’ हा एक स्तुत्य आणि अभिनव उपक्रम आहे. या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांच्या सक्षमीकरणास बळ मिळेल, असे लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी केले. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि […] The post महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार कर्तृत्ववान महिलांच्या सक्षमीकरणास बळ देणारे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून निलंबित करण्यात आलेले रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी मंगळवारी आपल्या असंख्य समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खेडेकर आणि त्यांच्या सहका-यांचे स्वागत केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळवून देऊ, असा विश्वास खेडेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. यावेळी रत्नागिरी […] The post वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मतदार यादीचा विषय आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही
मुंबई : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणा-या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही तसेच अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज केले. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात आज बैठक […] The post मतदार यादीचा विषय आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट यांनी संशोधक आणि अभियंत्यांच्या कार्याला देशासमोर आणण्याची गरज व्यक्त केली आहे. भारत आत्मनिर्भर होत असून, सैन्यासाठी अनेक वस्तू आता देशातच तयार केल्या जात आहेत. यामागे संशोधक आणि अभियंत्यांचे मोठे योगदान आहे, जे नव्या पिढीला प्रेरणा देईल आणि संशोधनाची नवी दिशा निर्माण करेल, असे बापट म्हणाले. स्नेह सेवा आणि मैत्रेय चॅरिटेबल सोसायटीतर्फे 'सैनिक-स्नेह' या उपक्रमांतर्गत सीमावर्ती भागांतील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठवण्यात आला. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो.जम्मू, लेह, लडाख, सियाचीन तसेच पूर्वोत्तर सीमेवरील दिब्रूगड आणि तवांग येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना हा फराळ पाठवण्यात आला. नवी पेठेतील निवारा सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर, सैनिक स्नेह सदस्य डॉ. दिनेश पांडे, सुधीर पळसुले, अविनाश जोशी, भालचंद्र अंबुलकर, नीला सरपोतदार, शेखर फुलंब्रीकर, चितळे बंधु समुहाचे श्रीकृष्ण चितळे व संजय चितळे उपस्थित होते. स्नेह-सेवा ही संस्था गेली २९ वर्षांपासून हा उपक्रम राबवत असून, यंदा ७५०० दिवाळी फराळाची पाकिटे सैनिकांसाठी पाठवण्यात आली आहेत. बापट यांनी पुढे सांगितले की, भविष्यातील युद्धे केवळ सीमेवरच नव्हे, तर देशांतर्गत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही होतील. त्यामुळे सोशल मीडियावर सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणताही संदेश पुढे पाठवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणे महत्त्वाचे असून, प्रत्येक पिढीला याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. संजय चितळे म्हणाले, पुण्याच्या संस्कृतीत स्नेहसेवा हे अनेक वर्षे काम करीत आहे. त्यांच्या या सत्कृत्यात चितळे समूहाला देखील सैनिकांची सेवा करण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देऊ, असेही त्यांनी सांगितले.प्रत्येक सणाच्या काळात देशातील नागरिक आमची आणि आमच्या कुटुंबीयांची आठवण ठेवतात. त्या वेळी वाटते की आम्ही एकटे नाही, तर संपूर्ण देश आमच्यासोबत आहे. आमच्या कुटुंबाची काळजी घेतली जाते, तेव्हा आम्ही निर्धास्तपणे आणि अधिक जोमाने कर्तव्य पार पाडतो, अशी भावना सैनिकांनी व्यक्त केली. तब्बल ४० शाळेतील मुलांनी तयार केलेली दिवाळी भेट कार्डे ही पाठवली आहेत. सूत्रसंचालन श्याम भुर्के यांनी केले.
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या मतदार यादीत प्रचंड प्रमाणात घोळ असल्याकडे लक्ष वेधले. मतदार याद्यांमध्ये एवढे घोळ होणार असतील तर मग निवडणुकीचा फार्स तरी कशाला करता? असा संतप्त सवाल करताना, जो पर्यंत मतदारयाद्यांमध्ये दुुरुस्ती केली […] The post मतदार यादीत प्रचंड घोळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बच्चू कडू यांना कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय रद्द
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटाच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लावला आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये अनेक निर्णय बदलले गेले, शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद केल्या. त्यात आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या प्रहार या पक्षासाठी मंत्रालयाजवळ जागा दिली होती. तो निर्णय […] The post बच्चू कडू यांना कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कफ सिरप मुळे मध्यप्रदेशमधील 20 बालकांचा मृत्यू झाला आहे. आता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील औषध प्रशासन विभागाने तपासणी सुरू केली आहे. तर भंडारा जिल्ह्यात देखील तपासणी सुरू झाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तपासणीत मृत्यूचे कारण ठरलेले 'कोल्ड्रिफ' कफ सिरपचा साठा आढळून आला नाही. मात्र, 'आरईएसपीआयआरईएसएच टीआर बी' (RESPIRESH TR. B) बॅच क्रमांक R01GL2523 च्या 38 बॉटलचा स्टॉक उपलब्ध असल्याचे दिसून आले. औषध प्रशासनाने हा संपूर्ण साठा तात्काळ प्रतिबंधित करून तो सील केला आहे. भंडाऱ्याचे आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार, शासकीय रुग्णालयांचे ड्रग स्टोअर्स तसेच इतर किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडून चाचणीसाठी प्रत्येकी दोन कफ सिरपचे नमुने घेण्यात आले आहेत. यासोबतच, आयुक्तांच्या आदेशानुसार, भंडारा जिल्ह्यामध्ये किरकोळ मेडिकल दुकानांमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरप विक्री केली जाते का, यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान, डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही कफ सिरपची विक्री करणाऱ्या तीन मेडिकल दुकानांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे. कफ सिरपमुळे 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू यवतमाळ येथील मृत 6 वर्षीय शिवमच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमचे वडील सैन्यात असून बरेली येथे ते कर्तव्यावर आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने ते गावी आले असताना 4 ऑक्टोबर रोजी शिवमला ताप, सर्दी, खोकला झाला. त्याच्यावर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचार सुरू केल्यावर त्याला दोन दिवस बरे वाटले. मात्र नंतर 6 तारखेला शिवमची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच खासगी रुग्णालयात नेले असता त्या रुग्णालयाने शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. शासकीय रुग्णालयात नेले असता शिवमला मृत घोषित करण्यात आले. औषध सुरू असतानाच शिवम अचानक बेशुध्द शिवमला जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाला तेव्हा सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातून काही औषधी लिहून देण्यात आली होती. ती औषधी घेऊन देखील काही फरक पडत नव्हता. त्यामुळे दोन दिवसांनी शिवमला पुन्हा त्या दवाखान्यात दाखवले. यावेळी पुन्हा काही औषधी लिहून देण्यात आली. हे औषध सुरू असतानाच शिवम अचानक बेशुद्ध पडला. शिवम बेशुद्ध पडल्यावर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तिथल्या डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात नेल्यावर शिवमला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
नक्षलग्रस्त दुर्गम भागात आता पोस्टाची ड्रोन डिलिव्हरी!
चंद्रपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या नक्षलग्रस्त आणि दुर्गम अशा गडचिरोली भागात पोहचण्यासाठी पोस्ट खात्याला अनेक काळापासून अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अशा नक्षली भागात पोस्ट खात्याच्या पत्रांची डिलीव्हरी आता ड्रोनने करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या भागातील जनतेचा मोठा फायदा होणार आहे. पोस्ट विभागाने भामरागड, वैरागड आणि सिरोंचा तालुक्यातील २७ दुरस्थ गावामध्ये […] The post नक्षलग्रस्त दुर्गम भागात आता पोस्टाची ड्रोन डिलिव्हरी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वीज, पाण्यासाठी जेन-झेडच्या आंदोलनामुळे सरकार विसर्जित
अॅँटानानरिवो : वृत्तसंस्था नेपाळपाठोपाठ, आफ्रिकन देश मादागास्करमध्ये मादागास्करमधील तरुणांनीही पाणी आणि वीज टंचाईचे कारण देत सरकारवर हल्ला केला. लष्करानेही निदर्शकांना पाठिंबा दिला, यामुळे राष्ट्राध्यक्ष अँड्री यांच्या समस्या आणखी वाढल्या. मोठ्या संख्येने जेन-झेड रस्त्यावर उतरली आणि निदर्शने सुरू केली. पाण्याच्या कमतरतेमुळे तरुण संतापले. त्यांनी सरकारचा राजीनामा मागितला. दरम्यान, मादागास्करचे अध्यक्ष आंद्रे राजोएलिना यांनी सरकार विसर्जित […] The post वीज, पाण्यासाठी जेन-झेडच्या आंदोलनामुळे सरकार विसर्जित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेत शटडाऊनमुळे सरकारी नोकरदारांना धोका
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था सध्या अमेरिकेत शटडाऊन आहे. या शटडाऊनमुळे अनेक शासकीय कर्मचा-यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. शटडाऊनमुळे शासकीय कार्यालयांना वित्तपुरवठा होत नाही. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन वाढवणारा एक इशारा ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पार्टीचे स्पिकर माईक जॉन्सन यांनी दिला आहे. त्यांनी केलेले हे विधान खरे ठरले तर सरकारी नोकरांमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता […] The post अमेरिकेत शटडाऊनमुळे सरकारी नोकरदारांना धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एमिरेट्स एनबीडी ‘आरबीएल’ बॅँक विकत घेण्याच्या तयारीत
मुंबई : वृत्तसंस्था दुबईची दुस-या क्रमांकाची सर्वात मोठी बँक एमिरेट्स एनबीडी ही भारतातील आरबीएल ही बँक विकत घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपये गुंतविणार असून याद्वारे आरबीएलचे ५१ टक्के समभाग विकत घेणार आहे. ही डील झाल्यास बँकिंग क्षेत्रातील अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी घडामोड ठरणार आहे. सध्या ‘आरबीएल’ बँकेचे बाजार भांडवल […] The post एमिरेट्स एनबीडी ‘आरबीएल’ बॅँक विकत घेण्याच्या तयारीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खड्डयांमुळे मृत्यू : द्यावी लागणार ६ लाख भरपाई; हायकोर्टाचा निर्णय; ठेकेदार, अधिकारी थेट जबाबदार
मुंबई : प्रतिनिधी खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास, त्याला रस्त्यांचे बांधकाम करणारा ठेकेदार आणि स्थानिक नागरी संस्था जबाबदार असेल. तसेच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ६ लाख तर जखमी झालेल्या व्यक्तीला ५० हजार ते २.५० लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई द्यावी लागेल, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती […] The post खड्डयांमुळे मृत्यू : द्यावी लागणार ६ लाख भरपाई; हायकोर्टाचा निर्णय; ठेकेदार, अधिकारी थेट जबाबदार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गाझा समिटवेळी ट्रम्प, एर्दाेगानची फ्लर्टिंग
शर्म-अल्-शेख : वृत्तसंस्था परिणामांची अन् कोण काय म्हणतंय याची फिकीर न करता बेधडक वक्तव्य करणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असतील. असाच एक किस्सा इजिप्तमध्ये गाझा समिटवेळी घडला. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी असं काही वक्तव्य केलं की त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. डोनाल्ड ट्रम्प जॉर्जिया मेलोनी यांना म्हणाले, तुम्हाला ब्यूटीफुल म्हटलं […] The post गाझा समिटवेळी ट्रम्प, एर्दाेगानची फ्लर्टिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शहराच्या वाघोली भागातील एका प्रसिद्ध शाळेत सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेने कानशिलात मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण इतकी तीव्र होती की विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले, जिथे वैद्यकीय तपासणीत कानाच्या दुखापतीचा वैद्यकीय अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्याच्या आईने संबंधित शिक्षिका तृप्ती सक्सेना यांच्याविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता चैतन्य टेक्नो स्कूलमध्ये हा प्रकार घडला. 12 वर्षीय विद्यार्थी रिसेसनंतर वर्गात हजर न झाल्याने शिक्षिका सक्सेना यांनी त्याला कानशिलात मारली, ज्यामुळे त्याच्या कानाला दुखापत झाली. वेदना वाढल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पालकांनी आरोप केला आहे की, मुख्याध्यापकांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, उलट मुलाला वर्गातून बाहेर काढण्यात आले आणि नंतर शाळेचा दाखला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी माहिती दिली. शाळेने शिक्षिकेवर केली कारवाई, पण... या घटनेची दखल घेत शाळा व्यवस्थापनाने संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्यावर कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, शाळा व्यवस्थापनाने जारी केलेल्या पत्रकात पालकांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केला आहे. पालकांची आक्रमक भूमिका होती की, त्यांच्या पाल्याने शिक्षिकेला सगळ्यांसमोर मारावे, असा दावा शाळेने केला आहे. त्यामुळेच संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावून शाळेचा दाखला घेऊन जाण्यास सांगण्यात आले, असे स्पष्टीकरण शाळेने दिले. पालकांकडून शाळेच्या आरोपांचे खंडन शाळेच्या या स्पष्टीकरणानंतर विद्यार्थ्याचे पालक विवेक यादव यांनी शाळेचे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी शाळेच्या दाव्याला 'अत्यंत लाजीरवाणं' आणि 'खोटे आरोप' असे संबोधले. पालकांनी अशी कोणतीही मागणी शाळेकडे केली नव्हती. यादव यांच्या मते, विद्यार्थ्याला मारहाण करणे, शाळेतून काढून टाकणे आणि आता खोटे आरोप करणे ही शाळा प्रशासनाची तिसरी घाणेरडी कृती आहे. दरम्यान, मारहाणीमुळे मुलाला गंभीर मानसिक धक्का बसला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पालकांनी सांगितले. पालक-शिक्षक संघटनेचे मत या घटनेवर पालक शिक्षक संघटनेच्या पुणे शहराचे अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे. शिक्षकांना शिस्त लागावी यासाठी ओरडायचा आणि रागवायचा पूर्ण अधिकार आहे, मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य किंवा मारहाण करू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आयटीआयमध्ये आता ‘मंत्रोपचार आणि पौरोहित्य’ अभ्यासक्रम
नाशिक : सरकारतर्फे अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पहिल्यांदाच वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. पुढील वर्षी नाशिकमध्ये भरणा-या कुंभमेळ्यामध्ये वैदिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध व्हावेत म्हणून तेथील आयटीआयमध्ये अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. अभ्यासक्रमासाठी इच्छुकांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेत अर्जाची […] The post आयटीआयमध्ये आता ‘मंत्रोपचार आणि पौरोहित्य’ अभ्यासक्रम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने आणखी एक निर्णायक पाऊल उचलत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांची ‘संघटन महासचिव’ म्हणून नियुक्ती केली. पक्षात सुरू असलेल्या नव्या घडामोडी आणि संघटन बळकटीकरणाच्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘राष्ट्रवादी चिंतन शिबिर’ आणि ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ सारख्या उपक्रमांद्वारे पक्षातील संवाद आणि तळागाळातील संपर्क वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता ‘संघटन महासचिव’ या नव्या पदनिर्मितीमुळे संघटनेतील अडथळे कमी करून संवाद अधिक परिणामकारक करण्यास मदत होणार आहे. संजय खोडके यांची या पदावर नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांना त्यांच्या अडचणी आणि सूचना थेट पक्ष संघटनेपर्यंत पोहोचविण्याचे एक निश्चित माध्यम मिळणार आहे. एनएससीआय, वरळी येथे आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक तयारीचा रोडमॅप ठरविण्यावर चर्चा झाली. ‘राष्ट्रवादी कनेक्ट’ या नव्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून एकसंध संवादयंत्रणा आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पातळीवर नियमित ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा आराखडा देखील आज झालेल्या बैठकीत मांडण्यात आला. तसेच प्रत्येक बूथ स्तरावर संघटन मजबूत करणे, आमदार व जिल्हाध्यक्ष यांच्यातील संवाद सुलभ करणे आणि सर्व स्तरावर निवडणूक नियोजन समन्वयपूर्वक राबविण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. बैठकीदरम्यान शिस्त, संघभावना आणि जबाबदारी ही प्रत्येक कार्यकर्त्याची मूलभूत मूल्ये राहतील, हा पक्ष नेतृत्वाचा संदेश पुन्हा एकदा ठळकपणे देण्यात आला. या सत्रात राज्य व जिल्हास्तरीय यंत्रणेतील समन्वय वाढविणे, संघटनात्मक उपक्रमांचे मूल्यमापन करणे आणि पुढील काही महिन्यांसाठी संवाद व जनसंपर्काचे स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करणे यावर सविस्तर विचारमंथन झाले.
दीक्षाभूमीवर भिक्खुसंघातर्फे बाबासाहेबांचा जयघोष:भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुध्दवंदना संपन्न
नागपूर येथील दीक्षाभूमीवर मंगळवारी भिक्खुसंघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बुद्धवंदना सोहळ्यात मोठ्या संख्येने अनुयायी सहभागी झाले होते. यामुळे दीक्षाभूमी पुन्हा एकदा धम्ममय वातावरणात न्हाऊन निघाली. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत काशाय वस्त्रातील भिक्खु आणि भिक्खुनी संघ सकाळी दीक्षाभूमीवर पोहोचला. भदंत ससाई यांनी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित अनुयायांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करत बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांप्रती निष्ठा व्यक्त केली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी याच दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महास्थवीर चंद्रमणी यांच्या हस्ते त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्म स्वीकारला होता. या ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या स्मृतीमुळे ही भूमी आजही तेजोमय आहे. दरवर्षी या दिवशी भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना आयोजित केली जाते, जो सामाजिक परिवर्तन, समानता आणि बंधुत्वाचा संदेश देतो. याप्रसंगी भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते नागानंद, भंते नागवंश, भंते महानागा, भंते कश्यप, भंते अश्वजित, भंते बुध्दघोष, भंते धम्मप्रकाश, भंते संघ, भंते शांतीनागा, तसेच भिक्खुनी कुंडलिका, अनोमा, चित्ताबोधी, धम्मानंद, सुमेधा, बोधीआर्या, सुपवासा, करुणादीप, शीलानंद आणि विशाखा यांनीही उपस्थित राहून धम्मकार्याची अखंड परंपरा पुढे नेली. तत्पूर्वी, भिक्खुसंघाने इंदोरा बुद्धविहार येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला तसेच संविधान चौक आणि विमानतळ परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे 'जर-तर'च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे का, या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने इंडिया आघाडीच्या आणि मविआच्या सहकारी पक्षांना जिल्हा स्तरावर आणि स्थानिक पातळीवर चर्चा करण्यास सांगितले आहे. राज्य स्तरावर आम्ही कुठलीही आघाडी किंवा युती करणार नाही. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक पातळीवरच सोपवलेली आहे. मनसेच्या प्रस्तावाबाबत टोलवाटोलवी सुरू आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अद्याप प्रस्तावच आलेला नाही त्यामुळे टोलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्ट केले. हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत न घेण्यामागील कारण स्पष्ट करताना इंडिया आघाडीच्या स्थापनेची मूळ तत्त्वे अधोरेखित केली. ते म्हणाले, इंडिया आघाडीची स्थापना भाजपला दूर ठेवून संविधानाचे संरक्षण, संवर्धन करणे आणि भाजपची हुकूमशाही हाणून पाडणे या दोन प्रमुख कारणांसाठी झाली आहे. या मूल्यांवर ज्या पक्षांचा विश्वास आहे, ते सर्वजण इंडिया आघाडीचे घटक आहेत. त्यामुळे, नव्या पक्षाला आघाडीत घ्यायचे असल्यास, केवळ काँग्रेस नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील इतर सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सपकाळ यांनी नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाणारी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नव्याने नावे समाविष्ट करणे किंवा नावे वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे केले. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेल्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात आज बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. त्यासाठी अधिसूचित दिनांक निश्चित केला जातो. त्यानुसार 1 जुलै 2025 या अधिसूचित दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्यांबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात. प्रचारकांची संख्या मर्यादा वाढण्याबाबत विचार प्रमुख प्रचारकांच्या संख्येत आणि उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी बैठकीत केली. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या संख्येची मर्यादा 20 वरून 40 करण्याबाबत विचार करण्यात येईल; तसेच उमेदवारांच्या निवडणूक खर्चातही यथोचित वाढ करण्याबाबत आयोग योग्य तो निर्णय घेईल, असे वाघमारे यांनी सांगितले. संकेतस्थळावर शोधा मतदार यादीतील नाव निवडणुकीच्या पूर्व तयारीसंदर्भात माहिती देताना काकाणी म्हणाले की, राज्यातील सर्व 29 महानगरपालिका, 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. सध्या प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रारूप किंवा अंतिम मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित ठिकाणी उपलब्ध असेल. त्यासाठी प्रतिपृष्ठ दोन रुपयेप्रमाणे शुल्क भरावे लागेल. विनाछायाचित्राची पीडीएफ प्रत https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/DownloadVoterlist या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध आहे.
आवाज केला तर अजून लोकांना बोलवू
दुर्गापूर : पश्चिम बंगालच्या दुुर्गापूरमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. जेवणासाठी बाहेर गेलेल्या विद्यार्थिनीवर नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. दुसरीकडे, सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणीने त्या दिवशी नेमके काय घडले हे सांगितले आहे. तिने तिच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांना सांगितले […] The post आवाज केला तर अजून लोकांना बोलवू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या फरार प्रकरणावरून राजकारण तापले असताना, शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय समीर पाटील यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर 'मकोका' अंतर्गत कारवाई झाली असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर आक्रमक झालेले समीर पाटील यांनी आता धंगेकर यांच्यावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला आहे. दोन दिवसांत त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाची पुरावे दाखवले नाही, तर न्यायालयात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे समीर पाटील म्हणाले. रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांनंतर समीर पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी धंगेकरांचे आरोप फेटाळून लावले. रवींद्र धंगेकर गेल्या आठ दिवसांपासून माझे नाव घेत आहेत, पण त्यांनी आजपर्यंत एकही पुरावा सादर केलेला नाही. मी चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात कामाला आहे, किंवा मी 'मोक्का' मधील गुन्हेगार आहे, याचे कोणतेही पुरावे त्यांच्याकडे नाहीत. आरोप करण्याआधी पुरावे गोळा करायचे असतात,'' असे समीर पाटील म्हणाले. मी कोणत्याही अधिकाऱ्याला फोन केला नाही समीर पाटील यांनी यावेळी एका इसमाचा व्हिडिओ दाखवत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, या व्हिडिओमधील सागर गवसणे नावाच्या व्यक्तीवर धाराशिव, नगर, जामखेड, शिवाजीनगर येथे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. 13 तारखेला गोळीबार झालेला आहे. मी या इसमाला ओळखत नाही आणि मी कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याला फोन केलेला नाही, असे पाटील यांनी ठामपणे सांगितले. समीर पाटलांकडून 50 कोटींचा दावा दाखल आपली बाजू स्पष्ट करताना समीर पाटील म्हणाले, धंगेकर यांनी मी मोक्कातील आरोपी आहे, हे सांगितले. मी अशा लोकांना उत्तर देणार नाही. धंगेकर म्हणतात माझ्यावरही गुन्हे आहेत, तर मी त्यांना उत्तर का देऊ? मी तर स्वच्छ आहे. पुढे त्यांनी कोथरूडमधील जनतेला आवाहन करत 'गुन्हेगारांना पाठीशी कोण घालत आहे?' हे ठरवावे, असे सांगितले. अखेरीस, माझ्या वकिलांनी रवींद्र धंगेकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून, मी त्यांच्यावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे, अशी माहिती समीर पाटील यांनी दिली. तसेच रवींद्र धंगेकरांनी दोन दिवसांत माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे दाखवली नाही तर न्यायालयात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे समीर पाटील म्हणाले.
माजी सैनिकाने घातला नातेवाईकाला गंडा:४.२६ लाखांचे दागिने चोरले, पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुंढवा पोलिसांनी एका निवृत्त लष्करी जवानाला नातेवाईकाच्या घरातून ४ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक केली आहे. ही घटना पुण्यात उघडकीस आली आहे. अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव संदीप सुरेश चव्हाण (वय ४३, रा. साईसिद्धी कॉलनी, आदर्शनगर, दिघी) असे आहे. याबाबत एका महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचे पती लष्करात जवान असून, ते चेन्नईत कार्यरत आहेत. आरोपी संदीप चव्हाण हा लष्करातून निवृत्त झाला असून, तो तक्रारदार महिलेच्या नात्यातील आहे. महिला आणि तिचा मुलगा २६ सप्टेंबर रोजी नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेले होते. चार दिवसांनंतर महिला घरी परतली असता, सदनिकेतील बॅगेत ठेवलेले ४ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर महिलेने मुंढवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक तपासात सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून दागिने चोरल्याची माहिती समोर आली. चौकशीत निवृत्त जवान चव्हाण यानेच दागिने चोरल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने दागिने चोरल्याची कबुली दिली. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक माया देवरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम, सहायक निरीक्षक राजू महानोर, पोलिस कर्मचारी राजू कदम, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, राहुल मोरे, शिवाजी धांडे, रुपेश तोडेकर यांनी ही कारवाई केली.
राज्यात सुमारे १७ हजार गावे सामुदायिक वन हक्क मिळण्यासाठी पात्र असून आतापर्यंत केवळ ५ हजार गावांना सामुदायिक वन हक्क देण्यात आले आहेत. उर्वरित गावांना सामुदायिक वन हक्क देण्यासंदर्भात आदिवासी विकास व अन्य सर्व संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी. वंचित आदिवासी, गरीब समाजाला सर्व योजनांचे लाभ द्यावेत. अंशतः वन हक्काच्या पात्र दाव्यांवर तातडीने सुनावणी घेऊन जळगाव,धुळे, नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी ते निकाली काढावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात वन हक्क कायदा २००६ च्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात तसेच जळगाव, धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या विविध विषयासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, लोक संघर्ष समितीच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख हे मंत्रालयातून तर नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम,आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त दीपा मुधोळ - मुंडे, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. वनपट्टेधारकांनाही लाभ मिळावेत.. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, आदिवासी वनपट्टेधारकांना सातबारा प्रमाणे पीक कर्ज, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, वारसा हक्क आदी योजनांचा लाभ मिळवून द्यावा. वनपट्टे धारकांना फार्मर आयडी ओळखपत्र मिळेपर्यंत आधार कार्डवर आधारित लाभ देण्यात यावे.वनपट्टा मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांनाही लाभ मिळावा. वनपट्टेधारकांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी शासन निर्णयात योग्य त्या सुधारणा करण्यात याव्यात. राज्यातील सर्व वनपट्टेधारकांना त्यांच्या मागणीनुसार विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य करून कर्ज पुरवठा करावा. एरंडोल येथे उप प्रकल्प कार्यालय सुरू करावे जळगाव जिल्ह्यात 'पेसा' क्षेत्र वगळता उर्वरित काही तालुक्यांमध्ये नऊ लाखांपेक्षा जास्त आदिवासींची संख्या असून त्यांच्यासाठी एरंडोल हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे उप प्रकल्प कार्यालय सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) (पेसा) मध्ये १ हजार ७३४ आदिवासी बहुल गावांचा नव्याने समावेश करण्याबाबत केंद्र सरकारकडे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रस्ताव पाठवावा. जंगल नसलेल्या परंतु ५० टक्के पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही 'पेसा'मध्ये समावेश करावा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'सर्वांसाठी घरे' या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला घरकुल मिळवून देण्याचे स्वप्न आहे. या योजनेची सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करून नियमाप्रमाणे सर्व कब्जाधारकांना जमिनीचा मालकी हक्क मिळण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांना घरे देण्यात यावीत, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिले. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वन हक्कधारकांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर आधारित महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रमांतर्गत क्लस्टर उभे करणे, भिल्ल समाजाचे स्वतंत्र बेंच मार्क सर्वेक्षण करणे, चोपडा तालुक्यातील कर्जाने येथे महावितरणचे सब स्टेशन कार्यान्वित करणे इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल
गांधीनगर : गुजरातच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठा बदल पाहायला मिळू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळात उद्या किंवा परवा मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात अनेक नव्या चेह-यांना स्थान मिळणार असून काही विद्यमान मंत्र्यांना पदोन्नती दिली जाऊ शकते. नवीन मंत्र्यांमध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तर मतदारसंघाच्या आमदार […] The post गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर शहरातील भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष चांगलाच पेटला आहे. आमदार विजयकुमार देशमुख सहकार्य करत नसल्याचा आरोप करत शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी त्यांच्या उत्तर मतदारसंघात पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी पक्षाकडे परवानगी मागितली आहे. तर भाजपचे सर्वाधिक काम ‘उत्तर’मध्येच होते असा दावा करून देशमुखांनी शहराध्यक्षांवर लोकसभेत गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. तडवळकर यांनी मात्र हे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत. ‘गद्दारी कोणी केली हे सर्वांनाच माहिती आहे. लिंगराज वल्याळ, किशोर देशपांडे, मोहिनी पत्की, बंडू कुलकर्णी या ज्येष्ठ नेत्यांना राजकारणातून कुणी संपवलं, ती गद्दारी नव्हती का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी देशमुखांना उद्देशून केला आहे. ‘दिव्य मराठी’ला त्यांनी दिलेली सविस्तर मुलाखत... विजयकुमार देशमुख यांच्या उत्तर मतदारसंघात स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी तुम्ही वरिष्ठांना पत्र दिले का? - सोलापूर मध्य व दक्षिण मतदारसंघात भाजपचे कार्यक्रम उत्तमपणे राबवले जात आहेत. मात्र उत्तर मतदारसंघात पक्षाने सांगितलेली कामे आमदार, मंडल अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांकडून केली जात नाहीत. त्यांचा अहवाल दिला जात नाही. ते (देशमुख) पक्षाच्या कार्यक्रमालाही येत नाहीत. त्यामुळे मी अनुशासन समितीकडे पत्र देऊन वस्तुस्थिती मांडली आहे. त्याला तक्रार म्हणता येणार नाही. म्हणून तिथे पक्षकार्यासाठी पर्यायी यंत्रणेची गरज आहे. लोकसभेत तुम्ही भाजपशी गद्दारी केल्याचा आरोप आहे? - आम्ही लोकसभा व विधानसभेत प्रामाणिकपणे भाजपचाच प्रचार केला. त्याचे पुरावेही आहेत. जर काँग्रेसचे काम केले असेल तसे पुरावे द्यावेत. गद्दारी कुणी केली ते राम सातपुते सांगतील. मी गद्दार असते तर पक्षाने मला शहराध्यक्ष केले असते का? उलट यापूर्वी माजी महापौर किशोर देशपांडे यांना कोणी पाडले? माजी खासदार लिंगराज वल्याळ यांना त्रास कोणी दिला. मी महापौर होऊ नये म्हणून तिकिट कापले. बंडू कुलकर्णी, मोहिनी पत्की, रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिड्डी यांचे तिकिट कुणी कापले? हे सर्वांना माहितीय. मध्य मतदारसंघ शिवसेनेला सोडा, असा आग्रह करणाऱ्यांकडे कसली आलीय पक्षनिष्ठा. कार्यकारिणीत तुम्ही देशमुखांच्या मुलाला डावलले? - डॉ. किरण देशमुख यांना आम्ही युवा मोर्चाचे शहराध्यक्षपद देऊ केले होते. फोनवर बोलताना आधी त्यांनी होकार दिला, मात्र दुसऱ्या दिवशी नकार कळवला. त्यामुळे आम्ही अन्य कार्यकर्त्याची निवड केली. पण त्यांनी (देशमुखांनी) इतर पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. आता या रिक्त जागांबाबत पक्षच निर्णय घेईल. लोकसभेत तुम्ही भाजपशी गद्दारी केल्याचा आरोप आहे? - आम्ही लोकसभा व विधानसभेत प्रामाणिकपणे भाजपचाच प्रचार केला. त्याचे पुरावेही आहेत. जर काँग्रेसचे काम केले असेल तसे पुरावे द्यावेत. गद्दारी कुणी केली ते राम सातपुते सांगतील. मी गद्दार असते तर पक्षाने मला शहराध्यक्ष केले असते का? उलट यापूर्वी माजी महापौर किशोर देशपांडे यांना कोणी पाडले? माजी खासदार लिंगराज वल्याळ यांना त्रास कोणी दिला. मी महापौर होऊ नये म्हणून तिकिट कापले. बंडू कुलकर्णी, मोहिनी पत्की, रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिड्डी यांचे तिकिट कुणी कापले? हे सर्वांना माहितीय. मध्य मतदारसंघ शिवसेनेला सोडा, असा आग्रह करणाऱ्यांकडे कसली आलीय पक्षनिष्ठा. तडीपार गुंडाच्या कार्यक्रमात तुम्हीही हजर होता? - तो वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता, तिथे अनेक लोक आलेले होते. ती व्यक्ती (तडीपार गुंड) कोण होता हे मला माहिती नाही. ते (देशमुख) मात्र माहिती असूनही त्याच्या व्यासपीठावर गेले होते. त्या कार्यक्रमातील फलकावर पक्षाचे चिन्हही होते. समाजाच्या कार्यक्रमात आम्हीही जातो, पण तिथे पक्षाचे जोडे बाजूला काढून ठेवलेले असतात. भाजपात ज्युनिअर सिनियर्सना त्रास देत आहेत का? त्रास तर आम्हालाच होतोय. त्यांनी (देशमुखांनी) ज्युनिअर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करावे. आम्हाला मार्गदर्शन करावे. पक्षात दुही नाही. पण वस्तुस्थिती वरिष्ठांना कळवली आहे, तेच आता लक्ष घालतील. पण महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न आहेत, आणि त्यात आम्हाला यश येईलच.
संजीवनी अभियान कार्यक्रमाला देशपातळीवर मानांकन मिळवून देण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असून त्यांच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मंगळवारी ता १४ येथे केले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने संजीवनी अभियान गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विशाल पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले की जिल्ह्यातील महिलांची संख्या विचारात घेऊन कर्करोगाचे निदान होऊन लवकर उपचार व्हावेत, यासाठी जिल्ह्यात संजीवनी अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील महिलांची स्क्रींनींग करण्यात आली. संशयित महिलांची सर्व तपासण्या केल्यानंतर त्यामध्ये 35 महिलांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. या सर्व महिलांना वेळीच निदान केल्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे सोयीचे झाले. शेवटच्या टप्प्यावर रुग्ण गेल्यावर त्याला वाचवणे शक्य होत नाही. या संजीवनी अभियानामुळेच हे शक्य झाले आहे. या सर्व भगिनीच्या आशिर्वादामुळेच अभियानाला देशपातळीवर मानांकन मिळाले आहे. आशा कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू यांनी प्रत्यक्षात फिल्डवर जाऊन महिलांचा डाटा गोळा केल्यामुळे शक्य झाले आहे. सदर उपक्रम आता राज्यभर राबविण्यात येत आहे, ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा प्रशासनामार्फत आता कुपोषण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्तनदा महिला, गर्भवती महिलांचा डाटा गोळा करण्यासाठी यंत्रणा काम करणार आहे. आपणामार्फत हे अभियानही यशस्वी करुन प्रधानमंत्री ॲवार्ड मिळवाल, अशी अपेक्षा व्यक्त करुन जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सर्व गौरवमूर्तीचे अभिनंदन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी केले.
कोंढवा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. पोलिस शिपायासाठी निवृत्त पोलिस उपनिरीक्षक हप्ते गोळा करत असताना दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांची तातडीने नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सोमनाथ बापू महारनवर (वय ३४, रा. ओम नमो सोसायटी, शेवाळवाडी) आणि निवृत्त पोलिस उपनिरीक्षक युवराज कृष्ण फरांदे (वय ५९, रा. वृंदावन सोसायटी, उरळीकांचन) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, महारनवर याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका व्यावसायिकाने याबाबत फिर्याद दिली आहे. त्याच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि कागदपत्रांमध्ये मदत करण्याच्या बहाण्याने पोलिस शिपाई महारनवर याने व्यावसायिकाकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. वाटाघाटीनंतर ही रक्कम पाच हजार रुपयांवर निश्चित झाली. महारनवर लाचेच्या रकमेसाठी तगादा लावत असल्याने व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तांत्रिक पडताळणीनंतर, सोमवारी रात्री कोंढवा पोलिस ठाण्याच्या आवारात ACB ने सापळा रचला. तेथे महारनवर याच्या वतीने निवृत्त पोलिस उपनिरीक्षक युवराज फरांदे याने लाचेची रक्कम स्वीकारली. ACB पथकाने त्याला रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर महारनवर यालाही ताब्यात घेतले. पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की, ज्या पोलिस ठाण्याच्या आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होईल, तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला तातडीने हटवण्यात येईल. कोंढवा पोलिस ठाण्याच्या आवारात झालेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांची सोमवारी रात्री नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. या पोलिस ठाण्याचा पदभार आता पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील न्यू एज्युकेशन सोसायटी आर्वी येथे संचालक मंडळाने शाळेमध्ये शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती अपहार व बोगस शिक्षक भरती प्रकरणी १५ दिवसांत वस्तुस्थिती अहवाल सादर करा असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. न्यू एज्युकेशन सोसायटी, आर्वी संचालित एस. एस. शेणगे परिवार हायस्कूल आर्वी व व्ही. एन. पाटील माध्यमिक विद्यालय चौगांव या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती अपहार व बोगस शिक्षक भरती, कागदोपत्री दाखविण्यात आलेली वाढीव विद्यार्थी पटसंख्या प्रकरणी विधानभवन येथे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या दालनात आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्र शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, धुळे शिक्षण अधिकारी डॉ. मनीष पवार, शाळा प्रशासन संचालक मंडळ, तक्रारदार शोभा अल्लोर पाटील व इतर तक्रारदार उपस्थित होते. शासनाकडून प्राप्त झालेली शिष्यवृत्ती शाळेच्या खात्यावर जमा झालेली आहे व विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा न करता शाळेच्या खात्यामधून काढण्यात आलेली आहे. तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर सदर रक्कम परत खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे.शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही कार्यवाही का केलेली नाही असा सवाल उपाध्यक्ष यांनी उपस्थित केला. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, तक्रारदाराने दिलेल्या मुद्द्यांची आयुक्त शालेय शिक्षण पुणे यांचे वरिष्ठ अधिकारी,पोलीस अधीक्षक धुळेचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक निधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांचे वरिष्ठ अधिकारी, धुळे कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी,यांची एक समिती गठीत करत चौकशी करण्यात यावी व सदर समितीने येत्या १५ दिवसांत वस्तुस्थिती अहवाल सादर करावा.
अहमदाबादमध्ये कतार एअरवेजचे इमर्जन्सी लँडिंग
अहमदाबाद : दोहाहून हाँगकाँगला जाणा-या कतार एअरवेजच्या एका विमानाचे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली. ही घटना मंगळवार दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली असून सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित […] The post अहमदाबादमध्ये कतार एअरवेजचे इमर्जन्सी लँडिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्याय विभागात २ हजार २२८ पदांची भरती करणार
मुंबई : मंत्रिमंडळ बैठकीत विधि व न्याय विभागासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांसाठी गट ‘अ’ ते ‘ड’ संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे विधि व न्याय विभागातील पदांची पूर्ती होऊन कामकाजाला वेग मिळणार आहे. […] The post न्याय विभागात २ हजार २२८ पदांची भरती करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रेयसीकडून वारंवार ब्लॅकमेलिंग आणि लग्नासाठीच्या दबावाला कंटाळून नागपुरात एका विवाहित कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईश्वरलाल चौधरी (वय 21) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी ईश्वरलालने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्र्यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, काचीपुरा चौकातील मुलांच्या वसतिगृहात राहणारा ईश्वरलाल विवाहित असून तो कृषी अभ्यासक्रमाच्या सातव्या सेमिस्टरला शिकत होता. ईश्वरलालचे गुंजन नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून गुंजन त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करून लग्नासाठी दबाव टाकू लागली. तसेच त्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊ लागली. त्यामुळे ईश्वर तणावात होता या सततच्या छळामुळे आणि धमक्यांमुळे ईश्वर तणावाखाली होता. अखेर 1 ऑक्टोबर रोजी त्याने वसतिगृहातील खोलीत दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी पोलिसांनी ईश्वरच्या पत्नीचा जबाब नोंदवला. तिने पोलिसांना सांगितले की, ती तरुणी ईश्वरवर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि त्याचा मानसिक छळ करत होती. तसेच, 'मी मुलगी आहे, तुझे कोणी ऐकणार नाही, न्यायव्यवस्था माझ्या बाजूने आहे,' अशी धमकी ती सातत्याने देत होती. त्यानंतर बजाजनगर पोलिसांनी पोलिसांनी गुंजनविरुद्ध ब्लॅकमेल व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. चिठ्ठीतून पंतप्रधानांना विनंती पोलिसांनी ईश्वरने आत्महत्येपूर्वी लिहिलेली दोन पानी चिठ्ठी आणि त्याचा मोबाईल जप्त केला आहे. या चिठ्ठीत त्याने पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना कळकळीची विनंती केली आहे. भारतात सर्वांसाठी कायदा सारखाच असायला हवा. मुली कायद्याचा गैरफायदा घेत आहेत. माझ्यासोबत ज्यांनी चुकीचे केले, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. न्यायालयावर माझा विश्वास आहे, अशी न्यायाची मागणी ईश्वरने पंतप्रधान आणि कृषि मंत्र्यांकडे केली आहे. तसेच मी ज्यांना मदत केली त्यांनी माझ्या आई-वडिलांना मदत करा, माझी कमतरता भासू देऊ नका. मी आत्महत्या केल्यानंतर माझे सॅड स्टेटस ठेऊ नका. त्याने काहीही होणार नाही. मी एकुलता एक मुलगा आहे. मी हरलो आहे. मी चुकीचे पाऊल उचलत आहे. याची शिक्षा माझ्या नातेवाइकांना भोगावी लागेल, असेही ईश्वरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. हे ही वाचा... ठाकरे गट-मनसे युती; भाजपला धोका:राजकीय सर्वेक्षणांनुसार निवडणुकीवर निर्णायक परिणाम; पुन्हा वाटाघाटी करण्याचे प्रयत्न आगामी काळात होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. सध्या ठाकरे बंधू एकत्र येऊन युती करण्याची चर्चा जोर धरत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्यास मराठी मतदारांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. या युतीमुळे भाजपचा ब्रँड ठाकरे विरोधक म्हणून महापौर पदासाठी आपले नाव पुढे ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मत आहे. सविस्तर वाचा...
बिहार पॅटर्न राज्यात तूर्त नाही
मुंबई : बिहारच्या धर्तीवर विशेष मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात राबविला जाण्याची शक्यता नाही. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत केलेली विनंती मान्य केली जाईल असे सूत्रांनी सांगितले. बिहारमधील विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमावरून वादळ निर्माण झाले होते. विरोधी पक्षांनी त्यावर आक्षेप घेतले. तरीही त्याची चिंता न करता केंद्रीय […] The post बिहार पॅटर्न राज्यात तूर्त नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेतून निलंबित झाल्यानंतर चर्चेत असलेले खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आज १४ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील झालेल्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. खेडेकर यांच्या प्रवेशाचा मुहूर्त […] The post वैभव खेडेकर भाजपमध्ये दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खेडचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे निलंबित नेते वैभव खेडेकर यांनी अखेर आज भाजपचा झेंडा हाती घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या राजकीय दिशेबाबत सुरू असलेले सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संतोष नलावडे यांच्या उपस्थितीत खेडेकरांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. वैभव खेडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांचे निष्ठावान समर्थक म्हणून त्यांची प्रतिमा होती. मनसेच्या संघटनेच्या बांधणीपासून ते स्थानिक प्रश्नांवर लढा देण्यापर्यंत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्या भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाशी वाढलेल्या संपर्कामुळे मनसेच्या नेतृत्वाचा रोष ओढवला. भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा सुरू होताच मनसेने त्यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करत पक्षातून निलंबित केले. त्या निर्णयानंतर खेडेकरांनी उघडपणे भाजपकडे झुकते माप दिले. पण त्यांच्या प्रवेशाचा निर्णय मात्र वारंवार पुढे ढकलला जात होता. त्यामुळे ‘भाजपने खेडेकरांना झुलवतंय का?’ असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला होता. पक्षप्रवेश रखडल्यानंतर भाजप नेत्यांच्या भेटीगाठी याआधी वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त तब्बल तीन वेळा पुढे ढकलला गेला होता. प्रत्येक वेळी काही ना काही कारणांमुळे समारंभ स्थगित होत होता, त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. पक्षप्रवेश पुढे ढकलल्यानंतर वैभव खेडेकरांनी गेल्या काही दिवसांत मुंबईत भाजप नेत्यांची अनेकदा भेट घेतली. रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्याशी झालेल्या चर्चांनंतर अखेर आज त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाल्याने त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले वैभव खेडेकर? भाजप प्रवेशानंतर वैभव खेडेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. पक्षप्रवेश कोणी रखडवला हे एका बाईटमध्ये सांगण्यासारखे नाही. तुम्ही माझी सविस्तर मुलाखत घ्या, मी जरुर सांगेन. मात्र आज तो दिवस नाही, असे वैभव खेडेकर म्हणाले. माझ्या देवाने स्वत:पासून दूर केले, काही कारणे झाली असतील मात्र दुरावा निर्माण झाल्याने मला दुःख आहे, असेही ते म्हणाले. आता जोमाने भाजप वाढवण्यावर आमचा भर असेल. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शतप्रतिशत भाजप करण्यावर भर असेल. मनसेतील अनेक नेत्यांसोबत भावनिक नाती तयार झाली होती. ती आज थांबत असल्याचं दुःख आहे. मात्र, भाजपने देखील मला आपलेसे केलंय याचा आनंद वाटतो, असेही त्यांनी म्हटले.
कॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर येथील कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. यातील संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजपर्यंत एकूण १२ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यापैकी ९ जणांना यापूर्वीच […] The post कॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
'हेल्मेट मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे राघवेंद्रसिंह यांनी मंगळवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट वापराच्या महत्त्वावर संवाद साधला. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी, सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल मोहित गौर, जोबिझ्झाचे संस्थापक डॉ. गौरव शर्मा, आयटी व्यावसायिक पवनकुमार द्विवेदी, तसेच विद्यापीठातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राघवेंद्रसिंह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, दररोज हजारो विद्यार्थी दुचाकीवरून प्रवास करतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी 'सेल्फ डिसिप्लिन हीच खरी सेफ्टी' हा संदेश दिला आणि रस्ता सुरक्षा ही वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. आपल्या मोहिमेमागील प्रेरणा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये ग्रेटर नोएडामध्ये त्यांच्या एका मित्राचा हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांनी हेल्मेट वाटप आणि रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम सुरू केली. आजपर्यंत त्यांनी २२ राज्यांमध्ये सुमारे ७५,००० हेल्मेट मोफत वाटले असून, देशभरात रस्ता सुरक्षिततेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अशा समाजोपयोगी उपक्रमांमधून प्रेरणा घ्यावी आणि रस्ता सुरक्षा हा स्वतःचा संकल्प मानावा. राघवेंद्रसिंह हे भारतीय लष्कर व नेव्ही मुख्यालय, नवी दिल्ली येथे 'रोड सेफ्टी ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या 'मिशन सेफ इंडिया' अंतर्गत देशातील २४ राज्यांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांमधून जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. त्यांनी आयोजित केलेल्या 'सुरक्षा यात्रा', 'सेवाक्रांती अभियान' आणि 'शिव शिष्य परिषद' यांसारख्या उपक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राघवेंद्रसिंह यांच्या कार्याची दखल 'इंडियन आयडॉल', 'मिस इंडिया' आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांद्वारे घेण्यात आली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे युवकांमध्ये रस्ता सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ होत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
हिंगोली जिल्हा पोलिस दलाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसांचे वेतन दिले असून या वेतनाचा २३ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यासाठी मंगळवारी ता. १४ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यातून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. पोलिस अधिकारी अन कर्मचारी म्हणजे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्ह्यांचे तपासासाठी असतात असा समज रुढ झाला आहे. मात्र पोलिस अधिकारी अन कर्मचारी देखील माणूसच आहे याची प्रचिती हिंगोली जिल्हा पोलिस दलाने वेळोवेळी दाखवून दिली आहे. यापुर्वी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या पुढाकारातून पोलिस दलाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. हिंगोली जिल्हा रक्तपेढीतील रक्तबाटल्यांची कमतरता लक्षात घेऊन हे शिबीर घेण्यात आले होते. दरम्यान, यावर्षी खरीप हंगामात जूलेै महिन्यापासूनच पाऊस लागून राहिला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाने कहर केल्याने जिल्हयात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. ्त्यामुळे हाती आलेले सोयाबीनच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी शासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी संघटनेने एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एक दिवसांच्या वेतनाचा २३.८१ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश आज पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांची उपस्थिती होती.
एसबीआय फाउंडेशनच्या ग्राम सक्षम' प्रकल्प अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सावंगी (बु) व सावंगी (खुर्द) या कोरडवाहू व पाणी टंचाई ग्रस्त गावात पावसाच्या पाण्याचे संधारण, संवर्धन व भूजलाचे पुनर्भरण प्रकल्प कार्य साकार झाले. या प्रकल्पा अंतर्गत जलस्त्रोत सावंगी नाल्याचे वाटरशेड विकास आधारित नाल्याचे गाळमुक्तीकरण, खोलीकरण व रुंदीकरण कार्य सदभावना ग्रामीण विकास संस्था, वर्धा यांचे माध्यमातून पूर्ण झाले. या कार्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील जलस्त्रोताची साठवण क्षमता व भूजल पुनर्भरण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण व कृषि क्षेत्रासाठी पिण्याचे पाणी, घरगुती वापराचे पाणी, पशुपालनासाठी पाणी व शेती करिता खरिप व रब्बी पिका करिता आवश्यक संरक्षित सिंचनाचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले आहे. यामुळे पाण्याच्या दुष्काळापासून परिसर दुष्काळमुक्त झाला त्याच बरोबर जलस्रोताच्या विकासामुळे पावसाच्या पाण्याचा पुरामुळे दरवर्षी होणारे नुकसान टळले आहे. या पुरमुक्त व दुष्काळमुक्त स्थितीमुळे ग्रामीण व शेतकरी लोकांचे अर्थकारन वाढत्या उत्पादनामुळे व वाढलेल्या उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. या जलसंधारण कार्या व्यतिरिक्त, एसबीआय फाउंडेशनने त्यांच्या सीएसआर निधीतून गावात किसान भवन' उभारले आहे. यामध्ये खुर्ची, टेबल, इंटरनेट, शुद्ध पाण्याचे फिल्टर आणि इतर सर्व आवश्यक वस्तूंचा समावेश आहे आणि त्याची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक ग्रामस्थांवर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पात कृषी उपजीविका मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राच्या एक दिवसाच्या अभ्यास दौऱ्याद्वारे ग्रामस्थांना कृषी आणि पूरक व्यवसाय व्यवस्थापनावर मार्गदर्शन मिळाले. याव्यतिरिक्त, शेतकऱ्यांना लहान आकाराचे बियाणे आणि भाजीपाला पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले आणि लागवड पद्धतींवर कार्यशाळा घेण्यात आल्या. नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण केल्याने शेतकऱ्यांमध्ये शेतीबद्दल नवीन उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी त्यांचे अनुभव सांगितले की, यावर्षी मुसळधार पाऊस असूनही, नाल्याची खोली आणि रुंदी वाढल्याने शेतात पाणी शिरु शकले नाही, त्यामुळे पिकांचे नुकसान टाळता आले. कृषी विज्ञान केंद्र नागपूर चे कृषीतज्ज्ञ डॉ. मयूर मेश्राम, हरीश भगत आणि मारुती चवरे सारख्या तज्ञांनी शेती, माती आणि पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व यावर प्रशिक्षण दिले. या प्रकल्पाचे समन्वयक सत्यजित जांभुळकर, व सुपरवायझर गौतम मेश्राम यांच्या देखरेखीखाली झालेल्या या कार्यक्रमात शेकडो पुरुष आणि महिलांनी उत्साहाने भाग घेतला.
राज्य सरकार पूर्णपणे सतर्क : आरोग्य मंत्री आबिटकर
कोल्हापूर : प्रतिनिधी जगभरात थैमान घालणा-या मंकी पॉक्सनं महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळला आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकार या प्रकरणात पूर्णपणे सतर्क असून, आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील गरीब नवाज नगर येथील […] The post राज्य सरकार पूर्णपणे सतर्क : आरोग्य मंत्री आबिटकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तुम्ही मनसेच्या कार्यकर्त्यांना बोट लावले, तर आम्ही हात लावू, असा निर्वाणीचा इशारा तथा सज्जड दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मंगळवारी भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांना दिला. त्यांच्या या इशाऱ्यामुळे पुण्यात एबीव्हीपी विरुद्ध मनसे अशा नव्या वादाला तोंड फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये मनसेची शाखा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमात अभाविपचे पोस्टर लावण्यात आल्यामुळे दोन्ही संघटनांत वादाची ठिणगी पडली आहे. या पोस्टरमध्ये अभाविपने इतर विद्यार्थी संघटनांना दुय्यम लेखून वाडिया कॉलेजमध्ये केवळ आपल्यास संघटनेचे वर्चस्व असेल असा मजकूर विषद केला होता. मनसेने या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील अभाविपच्या मुख्य शाखेला टाळे ठोकले. तुम्ही बोट लावा आम्ही संपूर्ण हात लावू या घटनाक्रमानंतर अमित ठाकरे यांनी मंगळवारी तातडीने पुण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, काल वाडिया कॉलेजमध्ये राडा झाला. त्यानंतर आज मी आयुक्तांची भेट घेतली. असा प्रकार दुसऱ्यांदा झाला. ते सत्तेत असले तरी किंवा आमच्यावर कितीही दबाव टाकला तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. तुमच्या प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळेल. तुम्ही बोट लावले तर आम्ही तुम्हाला हात लावू. मला येथील कायदा सु्व्यवस्था बिघडवायची नाही. पण कायदा सर्वांना समान असावा एवढेच माझे म्हणणे आहे. ..तर अभाविपचे सर्वच कार्यालये बंद करावी लागतील दुसऱ्यांच्या मार्गात अडसर निर्माण करण्यापेक्षा स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. मनसेच्या कार्यकर्त्यांनी काल त्यांच्या एका कार्यालयाला टाळे ठोकले. जे पोस्टर लावण्यात आले आहे, त्या प्रकरणी मी आयुक्तांशी चर्चा केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आहे. पोस्टर लावणारे अभाविपचे कार्यकर्ते निघाले तर त्यांची सर्वच कार्यालये बंद करावे लागतील. ती मुले कोण आहेत? हे तपासून आमची यापुढे अशीच रिअॅक्शन मिळेल, असे अमित ठाकरे म्हणाले. दरम्यान, अमित ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर पुण्यात अभाविप विरुद्ध मनसे यांच्यातील वाद नव्या टोकाला पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे.
‘पोषण आहार’ कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शालेय पोषण आहार कर्मचा-यांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार न मिळाल्याने दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे. या १.६५ लाख कर्मचा-यांनी पगारवाढ, वेळेवर मानधन आणि शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागण्या केल्या आहेत.आम्हाला लवकरात लवकर पगार द्या, नाहीतर राज्यभर मोठे आंदोलन करू, असा इशारा शालेय पोषण आहार बनवणा-या कर्मचा-यांनी दिला आहे. राज्यात […] The post ‘पोषण आहार’ कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर मनसेचे माजी नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे काँग्रेससोबत गेल्यास वाईट वाटेल, असे प्रकाश महाजन म्हणालेत. तसेच यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीवरून राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरे काँग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांवर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरे काँग्रेससोबत गेल्यास मला व्यक्तीशः वाईट वाटेल. आम्ही काँग्रेसकडून जे भोगले आहे, त्यामुळे वाईट वाटेल. राज ठाकरेंच्या हिंदुत्व आणि मराठी माणसांविषयीच्या कल्पनांना काँग्रेसमध्ये फारसा वाव नाही. आपला पराभव झाल्यास आयोग वाईट असतो राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात सहभागी होऊन मतचोरी आणि ईव्हीएममधील गोंधळाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाची भेट घेतली. यावरून प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे कठोर टीका केली आहे. मनाप्रमाणे निकाल लागला नाही, आपला पराभव झाला आणि आपण सत्तेतून बाहेर पडलो की, निवडणूक आयोग वाईट असतो आणि मतचोरी झाली असते, अशी काही राजकीय पक्षांची धारणा झालेली आहे, असे प्रकाश महाजन म्हणाले. राहुल गांधींनी आरोप केले, अन् परदेशात गेले मतचोरीच्या आरोपांवर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मतचोरी किती असते? याबद्दल आरोप करणारे लोक मतचोरीबाबत दहा माणसे सुद्धा कोर्टात उभे करू शकले नाहीत. राहुल गांधींनी तर मतचोरीचा आरोप केला आणि त्यानंतर ते कोलंबियात निघून गेले, असा टोला महाजन यांनी लगावला. आता गुंडच राजकारणी पाळतात यावेळी त्यांनी गुंडगिरी आणि राजकारणातील संबंधांवरही सडेतोड भाष्य केले. नीलेश घायवळ प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, पूर्वी राजकारणी गुंड पाळत होते, पण आता गुंड लोकच राजकारणी पाळायला लागले आहेत. काही ठिकाणी गुंडांनी डीपीडीसी (जिल्हा नियोजन व विकास परिषद) चालवली, जिल्हा चालवला आणि अब्जावधी रुपयांची माया जमा केली. बीड जिल्ह्याच्या संदर्भात (धनंजय मुंडे यांचे नाव न घेता) त्यांनी टीका केली. जे लोकांना दिसले, ते मला दिसले. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी जो इशारा दिला होता, तो ऐकला असता तर धनंजय मुंडेंवर ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले. संत भगवान बाबांच्या भूमीत दसऱ्याच्या मेळाव्यात ते (विवादास्पद) फोटो लावले जातात. पोलीस स्टेशनमध्ये अडकवायचं यांनीच आणि मदत करायची यांनीच असा 'दानशूरपणा' दाखवायचं सुरू होतं, असा हल्लाही त्यांनी चढवला.
ऐन दिवाळीत पुन्हा वादळी पावसाचे संकट
अकोला : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे. नैऋत्य मोसमी पावसाने राज्यातून निरोप घेतला. मात्र, १५ ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतक-यांना […] The post ऐन दिवाळीत पुन्हा वादळी पावसाचे संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी महसूल विभागाने मुंबईकरांसाठी दिवाळीची खास सुविधा जाहीर केली आहे. आता मुंबईतील कोणत्याही स्टॅम्प कार्यालयात दस्तऐवज नोंदणी करता येणार आहे. राज्य सरकारने क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि उपनगरातील नागरिक, व्यावसायिक व कंपनी मालक आता आपल्या क्षेत्रावर मर्यादित न राहता मुंबईतील कोणत्याही […] The post महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांचा पगार रखडला
बीड/पुणे : प्रतिनिधी राज्यातील आरोग्य सेवेत काम करणा-या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या सुमारे ३२ हजार कंत्राटी कर्मचा-यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. दिवाळी तोंडावर असताना वेतन न मिळाल्याने हे कर्मचारी दिवाळी कशी साजरी करणार? असा संतप्त सवाल विचारत आहेत. अनेकांनी पुरवून पुरवून पैसे वापरले आहेत. […] The post कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांचा पगार रखडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई उच्च न्यालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंगळवारी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना जामीन मंजूर केला. पोलिसांनी या बहुचर्चित प्रकरणात एकूण 12 आरोपींना अटक केली होती. पैकी 9 आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला होता. आता उर्वरित तिन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अवघ्या राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणातील सर्वच आरोपी तुरुंगाबाहेर आहेत! कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सुमारे 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. पानसरे 16 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानापासून जवळच दोन व्यक्तींनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. या हत्याकांडामुळे राज्यासह अवघ्या देशभरात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी या हत्येप्रकरणी 12 आरोपींना अटक केली. पण आज अखेर या सर्वच आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने आज मंगळवारी या प्रकरणातील संशयित डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे व शरद कळसकर या 3 आरोपींना जामीन मंजूर केला. यापूर्वी या प्रकरणातील 9 आरोपींना जामीन मंजूर झाला होता. तेव्हा या तिघांना जामीन नाकारण्यात आला होता. त्याला या आरोपींना आव्हान दिले होते. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने जामीन मंजूर करत त्यांना दिलासा दिला. डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे हिंदू जनजागृतीचा सदस्य आज जामीन मिळालेला डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे हा हिंदू जनजागृतीचा सदस्य आहे. एसआयटीने 2016 मध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तो पानसरे यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. दुसरीकडे, अमोल काळे याला कर्नाटक पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा संबंध गोविंद पानसरे यांच्या हत्येशी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, एसआयटीने त्याला अटक केली होती. 2018 मध्ये त्याच्या कोठडीची मागणी करताना पोलिस म्हणाले होते, पानसरे यांच्या हत्येसाठी 2 गावठी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. या दोनपैकी एका पिस्तूलाचा वापर दाभोलकर व दुसऱ्या पिस्तूलाचा वापर कलबुर्गी यांच्या हत्येसाठी करण्यात आला. दरम्यान, एसआयटीने शरद कळसकरला 2019 मध्ये अटक केली होती. त्याच्यावर बेळगावमध्ये गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी ज्या मीटिंग झाल्या त्यात कळसकर उपस्थित होता असा आरोप आहे.
मतदारयाद्यांमध्ये घोळ मग निवडणुकीचा फार्स कशाला?
मुंबई : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र आले. विशेष म्हणजे या नेत्यांमध्ये राज ठाकरेंचा देखील समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे या भेटीदरम्यान निवडणूक अधिकारी यांना एक निवदेन देण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. आगामी स्थानिक […] The post मतदारयाद्यांमध्ये घोळ मग निवडणुकीचा फार्स कशाला? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी मंगळवारी ता. १४ दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी आमदार संतोष बांगर यांची उपस्थिती होती. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे हिंगोली जिल्हयात शिंदेसेनेला बळ मिळणार आहे. हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून मागील विधानसभा निवडणुक अपक्ष म्हणून लढवली होती. ऐनवेळी काँग्रेसने हिंगोलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे माजी आमदार गोरेगावकर यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर गोरेगावकर काहीसे नाराज होते. मागील काही दिवसांपासून शिंदेसेनेचे आमदार संतोेष बांगर यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. त्यामुळे गोरेगावकर हे शिंदेसेनेत प्रवेश करतील हे स्पष्ट होऊ लागले होते. त्यानंतर रविवारी ता. १२ त्यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भुमीकेशी सहमत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांचा शिंदेसेनेच पक्ष प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तर खुद्द गोरेगावकर यांनी हि भुमीका जाहिर केली होती. दरम्यान, आज दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोरेगावकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, संजय देशमुख, द्वारकादास सारडा, मदन शेळके, माजी सभापती फकिरराव मुंडे, धिरज देशमुख, भास्कर बेेंगाळ, गजानन पोहकर, शेख नईम, शेख नौमान नवेद, कांतराव हराळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार गोरेगावर यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्हाभरात शिंदेसेनेला मोठे बळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेसेनेला मोठा फायदा होणार असून राजकिय समिकरणे बदलणार आहेत.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी आज (मंगळवार) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. या भेटीवेळी विरोधकांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध गंभीर त्रुटींवर आवाज उठवला. यावेळी राज ठाकरे यांनी विशेषतः मतदार याद्यांमधील 'घोळ' आणि 'मतदार नोंदणी' थांबवल्याच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (शिवसेना-उबाठा), मनसेप्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उबाठा) नेते अनिल देसाई, अनिल परब आणि शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते जयंत पाटील यांचा समावेश होता. राज ठाकरे काय म्हणाले? निवडणूक जाहीर झालेली नसतानाही मतदार नोंदणी का बंद करण्यात आली आहे? जे तरुण आज 18 वर्षे पूर्ण करत आहेत, त्यांनी मतदान करू नये का? असे राज ठाकरे म्हणाले. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. एकाच मतदाराचे नाव दोन-दोन ठिकाणी आढळत आहे. तर काही ठिकाणी वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवले आहे. इतका घोळ असताना तुम्ही निवडणुकांना सामोरे कसे जाता? असा सवाल राज ठाकरेंनी केला. 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत. तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात की नाही? याचे आम्हाला उत्तर द्या, असेही राज ठाकरे निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत म्हणाले. तसेच त्यांनी ईव्हीएम मशीनसोबत व्हिव्हिपॅट मशीन लावण्याची मागणी देखील केली. शिष्टमंडळाचे निवडणूक आयुक्तांना निवेदन दरम्यान, विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या निवेदनातूनही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. परंतु 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांपासून ते सामान्य माणसाच्या मनात खूपच शंका आहेत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असे आम्ही सगळेच मानतो, पण सध्याच्या एकूणच निवडणूक आयोगाच्या कारभाराकडे बघितल्यावर, खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, अशी शंका उत्पन्न होत आहे. असो. निवडणूक आयोग आजही स्वायत्त आहे असं. आम्ही मानतो आणि त्यामुळेच एकूण राजकीय व्यवस्थेच्या मनात आणि सामान्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि त्यावर काही ठोस कृतीदेखील अपेक्षित आहे. 1) 2024 मध्ये लोकसभेच्या आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या दोन्ही निवडणुकांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर नवीन मतदार नोंदणी झाली आणि नावं वगळलीदेखील गेली… पण जी नावं वगळली त्याची यादी किंवा त्याचा तपशील राजकीय पक्षांना किंवा मतदाराला बघायला का मिळत नाही? एखाद्या व्यक्तीचं नाव का वगळलं गेलं याची कारणं त्याला किंवा राजकीय व्यवस्थेला कळायला नको का? त्यामुळे निवडणूक आयोगाने जी नावं वगळली आहेत, त्याचा पूर्ण तपशील आणि ती नावे ही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलीच पाहिजेत. कारण तो प्रत्येक मतदाराचा अधिकार आहे. 2) महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 ला झाल्या आणि त्यादरम्यानची मतदार यादी 30 ऑक्टोबर 2024 ला प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 च्या दरम्यान यादीत जी नावं समाविष्ट झाली. ती नावं व नवीन यादी अजूनही प्रसिद्ध का झाली नाही? मतदार यादीवर अभ्यास करणे हा प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क आहे, पण राजकीय पक्षांनाच किंवा आम्ही तर म्हणतो अगदी सामान्य माणसालासुद्धा मतदार यादी का बघायला मिळत नाही आहे. ही यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की, कोणाचा तरी दबाव आहे? असं काही असल्यास निवडणूक आयोगाने तसं स्पष्ट सांगावं आणि जर यादी प्रसिद्ध करायचीच नसेल तर निवडणुकीचा फार्स कशाला करायचा? 3) निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 च्या मतदार यादीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असं घोषित केलं. म्हणजे जुलै 2025 नंतर ज्यांचं वय 18 पूर्ण होईल त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे 5 वर्षे थांबायचं? निवडणुकीची घोषणा होईपर्यंत जो जो मतदार 18 वर्षाचा होईल त्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळायलाच हवा. 4) महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातून कामासाठी येणाऱ्यांचा भरणा आहे. यातील अनेक मतदार त्यांच्या मूळच्या राज्यातदेखील मतदार असतात आणि इथे पुन्हा महाराष्ट्रात पण मतदार म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतात. मुळात दोन दोन ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी करणे, मतदान करणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण मुळात दुवार नोंदणी होऊ नये, ही जवाबदारी निश्चितच आहे निवडणूक आयोगाची आहे. पण अशी दुबार नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोग नक्की काय प्रयत्न करत आहे? जर बिहारमध्ये दुबार नाव नोंदणी काढण्यासाठी तेथील निवडणूक आयोगाने विशेष मोहीम राबवली तर मग महाराष्ट्रात तसा प्रयत्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी का दिसत नाही आहे? दुबार नोंदणी काढण्यासाठी ‘डी-डुप्लिकेशन’ पद्धतीचा वापर करावा. 5) महापालिका निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट वापरले जाणार नाही असं निवडणूक आयोगाने सांगितलं, असं का? निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की, व्हीव्हीपॅटसोबत जोडण्याकरिता आवश्यक असलेल्या ईव्हीएम त्यांच्याकडे पुरेशा नाहीत? मुळात 2022 मध्ये होणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता 2026 मध्ये होणार आहेत. मग 4 वर्षात निवडणूक आयोग तयारी तरी कसली करत होते? आजपर्यंत हजारो करोड रुपये खर्च करून जी व्हीव्हीपॅट मागवली गेली ती नक्की कुठे आहे? सामान्य जनतेचा ईव्हीएमवरच विश्वास नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी खातरजमा करून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्हीव्हीपॅट. तोच मार्ग तुम्ही बंद करणार असाल तर निवडणूक आयोगाच्या कारभारावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? 6) बरं, प्रभाग पद्धतीने जिथे निवडणुका होणार आहेत, तिथे व्हीव्हीपॅट पद्धत वापरता येणार नाही असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, अरे मग प्रभाग पद्धतच रद्द करा की! खर तर प्रभाग पद्धत मुळात आणलीच कशासाठी? त्यांचा मतदारांना काय उपयोग? मतदारांनी तरी चार चार वेळा मतदान का करायचं? निवडणुकांनंतर कामासाठी त्यांनी कोणत्या नगरसेवकाकडे जायचं? तेच नगरसेवक आपापसात क्रेडिटसाठी आणि (इतर) गोष्टींसाठी भांडत बसतात. मग प्रभागातील कोण बघणार? ही अशी निवडणूक पद्धत तर संपूर्ण भारतात कुठेच नाहीये मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे? सत्ताधायींच्या सोयीसाठी का? असो. पण मुंबईत जिथे प्रभाग पद्धतच नाही, तिथे पण निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट सुविधा असलेली ईव्हीएम मशिन्स देऊ शकत नसेल तर आमची अशी मागणी आहे की, मग मुंबई महापालिकेच्या निवडणुका या बैलेट पेपरवरच घ्या. निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराबद्दल संपूर्ण देशपातळीवर शंका आहेत. निवडणूक आयोगानेच जर स्वायत्ता दाखवली नाही तर कोण दाखवणार? त्यामुळे निवडणूक आयोगाने आता तरी कोणाच्या तरी दबावाच्या बाहेर येऊन भेदभाव न करता आम्ही उपस्थित केलेल्या मागण्या आणि त्यावरचे उपाय यावर कार्यवाही करावी. या मागण्या किंवा उपाय या फक्त राजकीय पक्षांच्यांच आहेत असं नाही, तर एकूणच सामान्य माणसांच्या मनातील प्रश्नांचं प्रतिबिंब आहे आणि याचं संपूर्ण भान महाराष्ट्र निवडणूक आयोग ठेवेल, अशी आशा व्यक्त करतो. तुमच्याकडून या सर्व प्रश्नाांची निश्चित अशा कार्यवाहीची अपेक्षा आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप व भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवी टीका केली आहे. त्यांनी रस्ते बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराचा पैसा भाजप व संघाच्या तिजोरीत जात असल्याचा आरोप करत पूर्वीच्या संघाच्या तुनलेत आत्ताचा संघ पूर्णतः वेगळा असल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी मंगळवारी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात रेल्वे उड्डाणपूलावरील एक रस्ता खचल्याचे दिसून येत आहे. यावरून दमानिया यांनी नितीन गडकरी, भाजप व संघावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. नितीन गडकरी, मला खात्री आहे की या भ्रष्टाचाराच्या पैशाचा एक भाग तुमच्या पक्षाच्या निधीत जातो. पण यातील काही कोटी रुपये नागपूर आणि दिल्लीतील आरएसएस कार्यालयाच्या बांधकामासाठी देणग्या म्हणूनही जातात. हे माझ्यासाठी लज्जास्पद आहे. संघ आता भ्रष्टाचाराशी जुळवून घेताना दिसतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याचा अर्थ नॅशनल व्हॅल्यून्टियर ऑर्गनायझेशन असा होतो. पण आता ही संघटना भ्रष्टाचाराच्या नवीन राजकी यनियमांशी जुळवून घेताना दिसून येत आहे. आरएसएस खरोखरच देशासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांचा समूह असता तर त्यांनी तुम्ही केलेल्या फसवणुकीविषयी तुम्हाला काढून टाकले असते. अदानी व अंबानी यांनी सर्व मालमत्ता, बंदरे, विमानतळ, जमीन व जंगले पूर्णपणे ताब्यात घेतली आहेत. पण आरएसएसला हे मान्य आहे असे दिसते. त्यामुळे अशा संघटनेला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणता येणार नाही. माझे वडील पूर्वी या संघटनेचा भाग होते. त्यामुळे मी या संघटनेचा अनादर होईल असे शब्द वापरणार नाही. पण मी फक्त एवढेच म्हणेन की, भूतकाळातील आरएसएस व आत्ताची आरएसएस हे एकमेकांपासून फार वेगळे आहेत, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. टोलचा पैसा गडकरींच्या मुलांच्या कंपनीत उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी गत काही दिवसांपूर्वी टोलमधून मिळणारा पैसा गडकरींच्या मुलांच्या कंपनीत जात असल्याचा आरोप केला होता. त्या म्हणाल्या होत्या, रस्ते व टोलच्या माध्यमातून मिळणारा पैसा आयडीयल एनर्जी प्रोजेक्ट्स नामक कंपनीत जमा करण्यात आला. याच कंपनीतून हा पैसा कंपन्यांचे जाळे उभारून व यंत्रणांच्या मदतीने गडकरी यांच्या दोन्ही मुलांच्या कंपनीत पाठवला गेला. हा सर्व प्रकार मनी लाँडरिंगचा आहे. चौकशी केल्यास यात नक्कीच शिक्षा होईल. गडकरींच्या दोन्ही मुलांनी पैशांची अफरातफर करत जनतेची आर्थिक फसवणूक केली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या कुटुंबीयांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. गडकरी तो गुन्हा सातत्याने करत आहेत. यात चौकशी केली तर शिक्षा नक्कीच होईल. इथेनॉल व रस्ते क्षेत्रात गडकरींशी संबंधित अनेक कंपन्या आहेत. माझ्याकडे अशा 108 कंपन्यांचे तपशील आहेत. या कंपन्यांची माहिती उघड झाल्यास ती वर्षभर पुरेल, असे दमानिया म्हणाल्या होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे शिक्षण, उद्योग आणि न्यायव्यवस्था या तिन्ही क्षेत्रांमध्ये मोठी गती येणार आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या प्रस्तावानुसार, राज्य सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी व्यापक योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत सोसायटीच्या अधीन असलेल्या मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शैक्षणिक संस्था आणि दोन वसतिगृहांचे जिर्णोद्धार आणि अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. या कामांसाठी पुढील पाच वर्षांत 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून बाबासाहेबांनी उभारलेल्या संस्थांचे आधुनिकीकरण, संरचनात्मक सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उभारण्याचा मानस राज्य सरकारने व्यक्त केला आहे. शिक्षण क्षेत्रातील हा निर्णय समाजातील वंचित घटकांना अधिक सक्षम शैक्षणिक संधी देणारा ठरणार आहे. मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय देखील पहा... उद्योग विभाग - महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर. धोरण कालावधीत ५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती. राज्यात १५ समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करणार. कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार.राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना. शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना. सोसायटीच्या शैक्षणिक संस्था, वसतिगृहांच्या इमारतींचा जिर्णोध्दार, जतन आणि संवर्धन करण्याकरीता नियोजन केले जाणार. मुंबई, छत्रपती संभाजीनगरमधील नऊ शिक्षण संस्था, दोन वसतीगृहांचे अद्ययावतीकरण. पाच वर्षांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद. विधि व न्याय विभाग - मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह, अपील शाखा आणि नागपूर, औरंगाबाद खंडपीठांकरीता गट अ ते ड संवर्गात २ हजार २२८ पदांची निर्मिती. त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता.
भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे संगणक परिचलक यांचे सन-2024 काळातील तांत्रिक अडचणीमुळे जवळपास १०० संगणक चालकांचे मानधन प्रलंबित होते या बाबत अनेक वेळा जि. प स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आले. परंतु प्रशासन मात्र संगणक परिचालकाच्या समस्या सोडविण्यासाठी, उदासिन दिसून येत होते व उळवा-उळवीचे उत्तर देऊन विषय मोकळा करन्याचा प्रयत्न करीत होते. अशा उत्तरांना व प्रशासनाच्या उदासिन, धोरणाला कटाळून जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन खांगर व प्रमुख मार्गदर्शक दिगंबर वंजारी यांच्या नेतृत्त्वात दि.१३ ऑक्टोबर रोजी पासून जल त्याग व अन्न त्याग आंदोलन करणार असल्याचे निवेदन जि.प. येधील संबधीत विभागाला देयात आले. तत्पूर्वी बांधकाम भवन मुंबई येथे जाऊन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपसचिव प्रशांत पाटील तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान RGSA पुणे चे संचालक गिरीश भालेराव यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत अवगत करण्यात आले. मात्र तरीही मागण्या पूर्ण झालेल्या नसल्या कारणाने नाईलाजास्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन खंगार व जिल्हा मार्गदर्शक दिगांबर वंजारी यांनी अन्न व जलत्याग आंदोलनाचे टोकाचे पाऊल उचलले आणि याचाच धसका घेत आंदोलनाला बसल्याचा एका तासातच 15 महिन्यांपासून तांत्रिक अडचणीमुळे थकीत असलेले 93 संगणक परिचालकांचे 23 लाख रुपये मानधन संगणक परिचालकांच्या खात्यात जमा करण्यात आले. निवेदनात ठेवल्याप्रमाणे काही संगणक संगणक परिचालकांची तांत्रिक अडचणीमुळे थकीत मानधनाची एक मागणी पूर्ण झाली असली तरी अजून राज्यातील सर्वच संगणक परिचालकांचे माहे जून 2025 पासून ते सप्टेंबर 2025 या चार महिन्यांचे मानधन अजूनही थकीत आहेत. आणि जोवर संपूर्ण मानधन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोवर सुरू असलेले अन्न व जलत्याग आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा संगणक परिचालक संघटनेचा ठाम निर्धार आहे. अन्न व जलत्याग आंदोलनाला जिल्हाध्यक्ष सचिन खंगार व जिल्हा मार्गदर्शक दिगंबर वंजारी दोघेच बसले असले, तरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील एक न एक संगणक परिचालक आंदोलन स्थळी उपस्थित आहेत. आतापर्यंत आंदोलन स्थळी जिल्हा परिषद सभापती नरेश ईश्वरकर, एकनाथ फेडर, शितल राऊत, माजी सभापती शीतल राऊत यांनी भेट दिली. संपूर्ण मानधन मिळेपर्यंत आंदोलनावर ठाम जिल्हा परिषदेकडून आमच्या मानधनासाठी आवश्यक रक्कम RTGS कडे जमा करूनही आम्हाला काम केलेल्या हक्काचे मानधन मिळत नाही आहे ही नेहमीचीच अडचण असून. यावेळी आमचे संपूर्ण मानधन मिळाल्याशिवाय अन्न व जलत्याग आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना भंडारा जिल्हा मार्गदर्शक दिगंबर वंजारी यांनी म्हटले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाची तोडफोड करुन कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह 20 ते 30 जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या संजीवनी कसबे (वय 20) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘मनविसे’चे पदाधिकारी धनंजय दळवी, केतन डोंगरे, आशितोष माने, महेश भोईबार, हेमंत बोळगे यांच्यासह 20 ते 30 जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते १३ ऑक्टोबर दुपारी साडेतीनच्या सुमारास सदाशिव पेठेतील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात शिरले. अभाविपच्या कार्यालयातील कार्यकर्ते सार्थक वेळापुरे यांनी शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. कार्यालयाची तोडफोड करुन त्यांनी अभाविपच्या कार्यालयातील भिंतीवर पत्रक चिकटवले. कार्यालयाला कुलूप लावून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथून निघून गेले, असे संजीवनी कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, सहायक निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक एस सुरवसे तपास करत आहेत. गांजा विकणार्या एकाला अटक बेकायदेशिर रित्या गांजा विकणार्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. शिवम तेजराव धोरण (24, रा. जीव्हीसेव्हन, सोसायटी, माउंट व्हीव बिल्डिंग, आंबेगाव मुळ रा. मलकापूर, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई तुकाराम पंडीत सुतार (38) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार आंबेगा बुद्रुक येथील ऐश्वर्या बॅक्वेट हॉलच्या मागील बाजुस असलेल्या निर्माण विवा सोसायटीकडे जाणार्या रस्त्यावर घडला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एन मोकाशी करत आहेत.
आगामी काळात होणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. सध्या ठाकरे बंधू एकत्र येऊन युती करण्याची चर्चा जोर धरत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाल्यास मराठी मतदारांमध्ये व्यापक प्रतिसाद मिळू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करतात. या युतीमुळे भाजपचा ब्रँड ठाकरे विरोधक म्हणून महापौर पदासाठी आपले नाव पुढे ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मत आहे. राजकीय सर्वेक्षणांनुसार, जर उद्धव-राज ठाकरे यांची युती जुळली, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना एकूण 52 टक्के मते मिळू शकतात. भाजपकडून खासगी कंपनीद्वारे केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये असे निष्पन्न झाले की, दोन्ही गटांनी जागा योग्य प्रकारे वाटून लढल्यास, मराठी बहुल क्षेत्रात भाजपवर त्याचा मोठा परिणाम होईल. विधानसभा निवडणुकांतील अनुभव लक्षात घेतल्यास, मनसेच्या मराठी बहुल वॉर्डमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांना निर्णायक फायदा होऊ शकतो. मुंबईतील विशिष्ट क्षेत्रांमध्ये मनसेची ताकद वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, दिंडोशी आणि मालाड यासारख्या भागांमध्ये मनसेच्या उमेदवारांची उपस्थिती ठळक दिसून येते. या भागांमध्ये मनसेला नेहमीच मतांची खात्री असते आणि हे मत मुंबईत भाजपच्या आघाडीवर निर्णायक ठरू शकतात. मुंबई महानगरपालिकेतील 225 वॉर्डंपैकी 90 वॉर्डमध्ये मनसेचे मतदार निर्णायक ठरतात. जिथे ठाकरे गट-मनसे युतीमुळे भाजपच्या उमेदवारांना पराभव पत्करण्याची शक्यता निर्माण होते. युतीमुळे भाजपला होणारा धोका मुंबई महानगरपालिकेतील बऱ्याच वॉर्डमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा मताधिक्य कमी असल्याने, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती ही निर्णायक ठरू शकते. विधानसभा निवडणुकांतील आकडेवारी पाहता, काही वॉर्डमध्ये मनसेच्या उमेदवारांना विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा 30 टक्के अधिक मते मिळाली होती. यामुळे मुंबईत युती झाल्यास ठाकरे गटाला महापौर पदासाठी निर्णायक संधी मिळू शकते, तर भाजपच्या आकांक्षांना मोठा धक्का बसू शकतो. युतीमुळे संभाव्य धोरणात्मक बदल भाजपकडून उद्घाटन कार्यक्रम आणि विकासकामांचे जोरदार प्रचार सुरु असून, या माध्यमातून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र प्राथमिक सर्वेक्षणाच्या निकालानुसार, युती झाल्यास राज-उद्धव ठाकरे यांची ताकद वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने राज ठाकरे यांच्याशी पुन्हा काही तांत्रिक वाटाघाटी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, तर ठाकरे बंधू ही स्थिती बळकट करण्यासाठी रणनीती आखत आहेत. मतदानाचे संभाव्य निकाल आणि रणनीती मुंबई महानगरपालिकेतील 225 वॉर्डंपैकी काही भागांमध्ये महायुती आघाडीवर असून, काही ठिकाणी ठाकरे गट-मनसे युती निर्णायक ठरते. विशिष्ट वॉर्डमध्ये मतसंख्या कमी असतानाही मनसेच्या लहान पॉकेट्समुळे मतदानाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, दिंडोशी वॉर्ड 43 मध्ये महायुतीच्या उमेदवाराला 1088 मतांनी आघाडी होती, तर मनसेच्या उमेदवाराला 1728 मते मिळाली होती. यामुळे युती झाल्यास राज आणि उद्धव ठाकरे यांना निर्णायक फायदा मिळू शकतो. निवडणूक परिणामांवर निर्णायक परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती महत्त्वाची ठरू शकते. मराठी बहुल वॉर्डमध्ये मनसेच्या निर्णायक मतांचा विचार करता, युतीमुळे भाजपवर मोठा दबाव येऊ शकतो. या निवडणुकीत कोणत्या पक्षाची सत्ता किती प्रमाणात मिळेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, मात्र प्रारंभिक सर्वेक्षण आणि मतसंख्येचा अभ्यास सांगतो की, ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय मुंबईत निवडणूक परिणामांवर निर्णायक ठरू शकतो.
कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्याविरुद्ध पुणे शहरात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्याच्या नावाने सीमकार्ड वापरल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला. कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी असलेल्या घायवळविरुद्ध आतापर्यंत एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायवळ 2020 पासून दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावर असलेले सीमकार्ड वापरत होता. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणूक, माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि टेलीकम्युनिकेशन ॲक्ट 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली. कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेला नीलेश घायवळ युरोपात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी इंटरपोलशी संपर्क साधला असून, ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. घायवळविरुद्ध बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्या प्रकरणीही गुन्हा दाखल आहे. त्याने अहिल्यानगरमधून पारपत्र मिळवताना 'घायवळ' ऐवजी 'गायवळ' असे नाव वापरले होते. या प्रकरणी अहिल्यानगरमधील अहमदपूर विभागातील तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याने त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, घायवळचा भाऊ सचिन याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी नुकतीच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. कोथरूड पोलिसांनी घायवळच्या शास्त्रीनगर येथील घर आणि कार्यालयाची झडती घेतली होती. या झडतीत दोन काडतुसे, चार पुंगळ्या, धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनींसंदर्भात खरेदीखत, साठेखत आणि दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. कोथरूडमधील एका नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन आणि अन्य सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सचिन फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कायद्यात बदल करून जिल्हा परिषदेत 5 व पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची मागणी केली आहे. बावनकुळे यांची ही मागणी सभागृहातील पक्षीय संख्याबळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. झेडपीत 5, पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य हवेत चंद्रशेखर बावनकुळे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. तिथे पत्रकारांशी संक्षिप्त संवाद साधताना त्यांनी वरील मागणी केली. ते म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्याची मागणी केली आहे. ज्या पद्धतीने महापालिका, नगरपालिकेत स्वीकृत सदस्य असतात, त्याप्रमाणे जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्य असले पाहिजे आणि पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य असले पाहिजेत. ज्याला आपण कोऑप म्हणतो. त्यानुसार मी कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली. मला विश्वास आहे की, मुख्यमंत्री अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्य व पंचायत समितीत 2 स्वीकृत सदस्य नेमण्याची माझी मागणी करतील, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय दुसरीकडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईतील जनतेला मुंबई व मुंबई उपनगरातील नागरी, व्यावसायिक व कंपनी मालक आपल्या क्षेत्रासहित मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयांत दस्त नोंदणी करता येईल. या निर्णयांतर्गत ज्या भागातील रहिवासी किंवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, तेथीलच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट काढून टाकण्यात आली. आता मुंबई शहर व उपनगरातील नागरिकांना कोणत्याही मुद्रांक कार्यालयात म्हणजे बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक व दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. या सुधारणेमुळे मुंबईकरांचा वेळ, धावपळ वाचेल. निर्णय प्रक्रिया व कार्यालयीन कामकाज जलद होईल. शासन राजपत्र जारी करण्यात आले. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे महसूल सेवकांच्या अन्नत्याग आमरण उपोषणस्थळी भेट दिली. सर्वांच्या मागण्या समजून घेतल्या. या सर्व विषयांबाबत चर्चा करण्यासाठी 16 तारखेला 11 वाजता मी बैठक बोलावली आहे. सर्व उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. माझ्या विनंतीचा मान ठेऊन त्यांनी यावेळी उपोषण मागे घेतले.
मुंबईत सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले
मुंबई : प्रतिनिधी जपानमध्ये तापाची साथ जाहीर केली असून भारतातही हिवतापाचे रुग्ण वाढल्याने साथीची चिंता असताना ताप, सर्दी, खोकला आणि थकव्याने मुंबईकरही त्रस्त आहेत. या २० टक्के रुग्णांत वाढ झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दिर्घकाळ पावसाळा संपल्यानंतर दिवसभर सुर्यनारायण मुंबईवर कोपत आहे. चार दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ अंशावर गेला आहे तर ५५ टक्के आर्द्रता आहे. […] The post मुंबईत सर्दी,खोकल्याचे रुग्ण वाढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .