लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरातची बेहिशोबी मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आल्यानंतर सोमवारी (दि. 13) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने संयुक्त कारवाई करत नाशिकसह राज्यातील 11 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील खरातचा ‘तृप्ताबाला’ बंगला आणि कॅनडा कॉर्नरमधील ‘ओक्स प्रॉपर्टी’च्या कार्यालयात तब्बल 17 तास कसून चौकशी करण्यात आली. या कारवाईसाठी मुंबईहून रविवारी रात्री 11:30 वाजता केंद्रीय यंत्रणांचे पथक रवाना झाले होते. अत्यंत गुप्तता पाळत हे पथक पहाटे 3 वाजेच्या सुमारात कर्मयोगीनगर परिसरात पोहोचले. परिसराची रेकी केल्यानंतर पहाटे 5 वाजेच्या सुमारात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत चाललेल्या या प्रदीर्घ तपासणीत खरातच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि बँक व्यवहारांची माहिती पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. केवळ नाशिकच नव्हे, तर खरातचे आर्थिक हितसंबंध असलेल्या शिर्डी, सिन्नर, मीरगाव आणि कोपरगाव यांसारख्या शहरांतही पथकाने धाडी टाकल्या. खरातने ‘अध्यात्मिक’ बुरख्याखाली जमवलेली मालमत्ता नेमकी कुठून आली? यामध्ये काही बड्या धेंडांचा सहभाग आहे का? आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचा स्रोत काय? या दिशेने आता ईडीने तपास सुरू केला आहे. विशेषतः तृप्ताबाला बंगल्यासह मिरगाव येथील फार्महाऊस येथून अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्मयोगीनगरमध्ये दहशतीचे सावट; वॉचमनही झाला गायब खरातचे काळे कारनामे उघड झाल्यापासून कर्मयोगीनगर परिसर सातत्याने चर्चेत आहे. आधी पोलिस, मग एसआयटी आणि आता थेट ईडी-आयकर विभागाच्या गाड्यांचा ताफा पाहून परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या कारवाईच्या धसक्याने खरातच्या बंगल्याबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा त्याचा वॉचमनदेखील घर सोडून पसार झाला आहे. पोलिसांच्या वारंवार होणाऱ्या चौकशीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात आहे. ‘समता’मधील 8 कर्मचाऱ्यांची चौकशी भोंदू अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांचे धक्कादायक पैलू समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. समता पतसंस्थेतील कथित बनावट खात्यांप्रकरणी सोमवारी प्रतिभा चाकणकर व त्यांचा मुलगा तन्मय यांची शिर्डी पोलिसांनी सकाळी 10 वाजेपासून रात्री साडेआठपर्यंत चौकशी केली. तर दुसरीकडे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राहाता येथील समता पतसंस्थेत धडक देत दिवसभर कागदपत्रांची छाननी केली. या कारवाईत 8 अधिकारी सहभागी झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, “प्रतिभा चाकणकर यांनी या खात्यांबाबत मला कोणतीही माहिती नाही, तसेच खात्यांवरील व्यवहारांशी माझा किंवा माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही,” असे स्पष्ट केले. मात्र, तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या व त्यांच्या मुलाच्या नावावर समता पतसंस्थेत चार खाती असून, या खात्यांवरून सुमारे अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच पोलिसांनी त्यांना सखोल चौकशीसाठी पाचारण केले होते. खाते असल्याची माहिती माध्यमांतूनच समजल्याचे चाकणकरांनी सांगितले. अद्याप कोणतीही नोटीस मिळाली नाही, पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय नंतर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिरगावातील ‘ब्रह्मा सदन’वर धाड आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) संयुक्त पथकांनी सोमवारी सकाळी 7 वाजेपासून खरातच्या मिरगाव येथील ‘ब्रह्मा सदन’ या आलिशान फार्म हाऊसवर छापा टाकल़ा. प्रचंड गोपनीयता पाळत ही कारवाई करण्यात आली. सोमवारी पहाटे 5 ते 6 वाहनांमधून तपास पथकातील अधिकारी मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिर परिसरात दाखल झाले. खरातच्या ‘ब्रह्मा सदन’ फार्महाऊसमध्ये शिरताच अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वाराचे दरवाजे बंद करून घेतले. या कारवाईची माहिती स्थानिक पोलिसांनाही देण्यात आली नव्हती. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि जमीन फसवणुकीनंतर आता खरातचे आर्थिक कारनामे रडारवर असून, दिवसभर पथकाने फायलींचा कसून शोध घेतला. खरातचे कारनामे ईडीच्या कक्षेत काळ्या धंद्यातून कोट्यवधींचा गंडा घालून खरात याने अफाट माया जमवली आहे. मिरगावसह परिसरात जमीन खरेदीचा त्याने सपाटा लावला होता. खरातशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांमधील आर्थिक धागेदोरे तपासले जात आहेत. त्यात राहता आणि सिन्नरमधील पतसंस्थांचा देखील समावेश आहे. दमानिया म्हणाल्या... अंजली दमानिया : वर्षभरात विशेष पोलिस महानिरिक्षक कराळेंचे खरातला 18 फोन, चौकशी करा मुंबई | नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक दत्तात्रेय कराळे यांनी खरातला वर्षभरात 18 फोन केल्याने त्यांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिस महानिरिक्षक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. तसेच खरातच्या संपर्कात असलेल्या 1825 सरकारी अधिकाऱ्यांचे क्रमांक एसआयटीला दिले असून, बुधवारी याप्रकरणी मोठा खुलासा करणार असल्याचे त्यांनी समाजमाध्यमांमधून जाहीर केले. खरातच्या संपर्कात असणाऱ्या या 1825 फोन नंबंर्समध्ये आयजी, पीआय, सिनिअर पीआय, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, याबाबत कराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या मुद्यावर आपण आता कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, किंवा वक्तव्य करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. कर्मवीरनगरातील बंगल्यावर सकाळी 8 वाजता पोहोचली ईडी समता पतसंस्थेत सुरू असलेल्या चौकशीत ईडीचे 8 अधिकारी सहभागी झाले होते. सकाळी पतसंस्थेत त्यांनी बनावट खात्यांसंदर्भात कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली. दुपारी जेदोन अधिकाऱ्यांनी राहत्यातील हॉटेलमधून जाऊन सर्वांसाठी जेवण आणले. तोपर्यंत आतून बाहेर जाण्याची कुणालाही परवानगी नव्हती. ही कारवाई इतकी गोपनीय होती की फार्महाऊसच्या आत नेमके काय सुरू आहे, याची कल्पना ग्रामस्थांनाही येत नव्हती. रात्री उशिरापर्यंत तपास पथके तिथे ठाण मांडून होती. या कारवाईतून खरातचे कोणते नवीन कारनामे आणि आर्थिक घोटाळे बाहेर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चाकणकर यांच्या वकील ॲड. जयश्री काळे यांनी विविध मुद्दे मांडले. प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांच्या नावाने बनावट खाती उघडली गेली. चुकीचा पत्ता वापरण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सह्यांचे नमुने सादर करण्यात आले. पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘ब्रह्मा सदन’मधील आलिशान दालनांमध्ये असलेल्या कपाटांच्या चाव्या उपलब्ध नसल्याने, पथकाने सोबत आणलेल्या तज्ज्ञ कारागिरांच्या मदतीने बनावट चाव्या तयार केल्या. या कपाटांमधून खरातच्या संपत्तीचे आणि बेनामी व्यवहारांचे महत्त्वाचे दस्तऐवज हाती लागल्याची चर्चा आहे. सकाळी सात वाजेपासून कागदपत्रांची तपासणी सुरू
मुरबाडजवळ सिमेंट मिक्सरवर कार धडकली; 11 प्रवासी ठार:5 प्रवासी क्षमता असूनही 11 जणांना ओम्नीत काेंबले
कल्याण - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर कल्याण तालुक्यातील रायते येथील पुलाजवळ प्रवाशांना घेऊन जाणारी ओम्नी कार आणि सिमेंट मिक्सरची समोरासमोर धडक झाली. त्यात ओम्नीचालकासह ११ जण जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास झालेल्या या अपघातातील मृतांत ८ पुरुष, ३ महिलांचा समावेश आहे. यात एकाच कुटुंबातील दोन बहिणी, एक भाऊ आहे. २ प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. केवळ ५ प्रवासी क्षमता असलेल्या या कारमध्ये ११ जण कोंबलेले होते. ओम्नीचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कल्याणकडून प्रवासी घेऊन येणारी ओम्नी कार (एमएच ०५ जीए ०५२९) मुरबाडच्या दिशेने जात असताना रायते गावाच्या हद्दीत पांजरपोळ गोशाळेजवळील उल्हास नदीवरच्या रायते पुलाजवळ सिमेंट मिक्सरला (एमएच १२ टीव्ही ३६६०) धडकली. परिसरातील लोकांनी जखमींना तातडीने गोवेली रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, दुर्घटना टाळण्यासाठी अवैध तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांतून प्रवास टाळावा, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून ३१ किमीची प्रवासी वाहतूक मुरबाडच्या रहिवाशांनी सांगितले की, एसटीच्या पुरेशा फेऱ्या नसल्याने कल्याण ते मुरबाड या मार्गावर ओम्नी कारने प्रवासी वाहतूक चालते. सर्वच ओम्नीचालक ५ किंवा ८ प्रवाशांचा परवाना असताना ११ ते १५ प्रवासी कोंबतात. ३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून हा सुमारे ३१ किलोमीटरचा जीवघेणा प्रवास होतो. प्रवाशांच्या कोंबाकोंबीकडे वाहतूक पोलिस, स्थानिक पोलिस आरटीओकडून कानाडोळा केला जातो.
राज्यघटनेच्या मूळ प्रतींपैकी एक प्रत नागपूरच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयात आहे. प्रेमबिहारी नारायण रायजादा यांचे सुंदर हस्तलेखन अन् शांतिनिकेतनच्या कलाकारांनी नक्षीकाम केलेली ही प्रत आहे. विशेष म्हणजे, संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ओरिजिनल सह्यादेखील आहेत. नागपूर माहिती विभागमध्ये संरक्षित घटना समितीच्या सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षऱ्या केल्या. हस्तलिखित इंग्रजी प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी इटॅलिक शैलीत तर हिंदी हस्तलिखित प्रत वसंत कृष्ण वैद्य यांनी लिहिली. छापील इंग्रजी प्रत डेहराडून येथे सर्व्हे ऑफ इंडियाने छापली होती. त्याच्या पुढे अनेक प्रती तयार केल्या आहेत. संसदेच्या ग्रंथालयात छापील अन् हस्तलिखित प्रत जतन करून ठेवली आहे. मूळ प्रतीत स्वहस्ताक्षरात केली दुरुस्ती बाबासाहेबांनी ११ एप्रिल १९४७ रोजी संविधान सभेत हिंदू कोड बिल मांडले होते. ५ फेब्रुवारी १९५१ रोजी वादळी चर्चा झाली. हिंदू कोड बिलाची स्थळ प्रत राजीनामा दिल्यानंतर बाबासाहेब संभाजीनगरला घेऊन आले. दुरुस्ती केलेली स्थळ प्रत मिलिंद कॉलेजच्या ग्रंथालयात आहे. नंतर नेहरूंनी हे बिल मंजूर करून घेतले होते. दिल्लीच्या २६ अलिपूर रोड येथील बंगल्यात या वस्तू होत्या. माईसाहेबांनी या वस्तू बाबासाहेबांचे स्वीय सहायक नानकचंद रत्तू यांना दिल्या. रत्तूंनी अखेरच्या दिवसांत या वस्तू नागपूरचे वामनराव गोडबोलेंना दिल्या होत्या. त्यांनीच शांतिवनात वस्तू जतन केल्या आहेत. आता शांतिवनचे काम संचालक संजय पाटील पाहतात. रत्तूंनी दिले होते वामनराव गोडबोलेंना मिलिंद कॉलेजचे बांधकाम सुरू असताना त्यांनी हिंदू कोड बिलमध्ये पेन्सिलने दुरुस्त्या केलेल्या आहेत.शांतिवनात बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंच्या ठेव्यामध्ये २ टाइपरायटर. पैकी एकावर बनवली राज्यघटना
लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याची बेहिशेबी मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आल्यानंतर सोमवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने संयुक्त कारवाई करत नाशिकसह राज्यातील ११ ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील खरातचा ‘तृप्ताबाला’ बंगला आणि कॅनडा कॉर्नरमधील ‘ओक्स प्रॉपर्टी’, शिर्डीतील समता आणि सिन्नरमधील जगदंबा पतसंस्थेच्या कार्यालयात तब्बल १७ तास कसून चौकशी करण्यात आली. मुंबईहून रविवारी रात्री ११:३० वाजता निघालेली पथके पहाटे ५ वाजता पोहोचली. ही कारवाई रात्री १० पर्यंत सुरू होती. मुंबई : १८२५ अधिकारी संपर्कात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एसआयटीला १८२५ फोन नंबर दिले आहेत. खरातच्या संपर्कात असलेल्या या सरकारी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नाशिक : आज पुन्हा कोर्टात गर्भवतीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात खरातला कोर्टात ऑनलाइन हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी देण्यात आली. नरबळीच्या गुन्ह्यात एसआयटी आज पुन्हा पोलिस कोठडी मागणार आहे. ३२ संशयित खात्यांच्या कागदपत्रांची केली तपासणी सिन्नर | सकाळी ८ वाजता ईडी आणि आयकर विभागाचे पथक कुंदेवाडीत पोहोचले. मंदिरासमोर गाडी लावून समता पतसंस्थेत चौकशीसाठी आतमध्ये गेले. खरात वारसदार दाखवण्यात आलेल्या ३२ संशयास्पद खात्यांच्या कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली. शिर्डी : प्रतिभा चाकणकर हजर रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा आणि तिच्या मुलाची शिर्डीत एसआयटीने ११ तास चौकशी केली. त्यांच्या नावे समता पतसंस्थेतील खात्यावरून २.५ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय आहे. ओझरच्या बांधकाम व्यावसायिकासह ५१ मालमत्तांची कागदपत्रे ईडीकडे खरातचे नातलग असलेल्या ओझर येथील एका बांधकाम व्यावसायिकाचीही ईडीने १७ तास चौकशी केली. या व्यावसायिकाने खरातच्या पैशातून ओझरला मोठा गृहप्रकल्प उभा केला आहे. याशिवाय ईडी आणि आयकर विभागाने खरातच्या राज्यभरातील ५१ मालमत्तांचा तपास सुरू केला आहे. पत्नीच्या नावावरील जमिनीचा संशय : ईडी आणि आयकर विभागाने खरातच्या नावावरील ९, पत्नी कल्पनाच्या नावावरील १३, दाेघांच्या नावावरील १०, मुलीच्या नावावरील २ तर इतर नातलगांच्या नावावरील ११ जमिनींची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये सिन्नरमधील ३०, पाथर्डीतील २७, मिरगावमधील १०, नाशिकमधील ४, आडगावमधील ४ यासह ८५ हेक्टर जमिनीची कागदपत्रे ईडीकडून तपासली जात आहेत. संबंधित. पान २
समृद्धी महामार्गावर ट्रकवर कार मागून आदळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.६० वाजता जांबरगाव शिवारात घडली. या अपघातानंतर कारने पेट घेतला. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील आर्किटेक्ट पवन वर्धमान अजमेरा (५०)यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी रीना अजमेरा (४७) आणि मुलगी ईशा अजमेरा (२०) गंभीर जखमी झाल्या. अजमेरा कुटुंबीय क्रेटा कारने (एमएच २० एफयू ४५२७) मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. वाटेत जांबरगाव शिवारात त्यांची कार ट्रकवर मागून आदळली. त्यानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतला. अपघातात पवन यांचे पाय कारच्या पुढील भागात अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या जखमी पत्नी रीना आणि मुलगी ईशा यांना रात्री ९ वाजता उपचारासाठी संभाजीनगरला पाठवण्यात आले. क्षणार्धात कार जळाली, त्यामुळे मदत करता आली नाही अपघाताची माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहोचलो. अपघात इतका भीषण होता की, काही क्षणांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या ज्वाळा वाढेपर्यंत मायलेकी कारबाहेर पडल्या होत्या. मात्र, पुढील काही मिनिटांत कार ज्वाळांनी वेढली. त्यामुळे अजमेरा यांना बाहेर काढण्यासाठी काहीच करता आले नाही.’ शांतिलाल पहाडे, वैजापूर
टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीतील जिहाद आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक झालेली एचआर हेड अश्विनी चेनानी हिचे तौसिफ अत्तारसोबत ३८, दानिश शेखला १ कॉल, रझा मेमनला २२ कॉल व एक आक्षेपार्ह चॅटिंग उघड झाले आहे. पीडित तरुणीने संशयितांविरोधात केलेल्या तक्रारीकडे अश्विनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तिने पीडितांना ‘तुमको क्यू हायलाइट होना है? छोड दो, जाने दो’ असे दरडावून आरोपींना उघडपणे चिथावणी दिली. तिची तीन दिवसांची कोठडी सोमवारी संपल्याने तिला कोर्टात हजर केले. आर्थिक व्यवहारांच्या तपासात ती पोलिसांना अजिबात सहकार्य करत नाही. त्यामुळे तिच्या ५ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने तिला १५ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची कोठडी सुनावली. टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनीही अधिकाऱ्यामार्फत केली चौकशी सुरू टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सोमवारी नाशिक येथील टीसीएस कंपनीतील लैंगिक छळाचा प्रकार “अत्यंत चिंताजनक आणि क्लेशदायक” असल्याचे म्हटले. या प्रकरणाची एका वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी असेही जाहीर केले की, वस्तुस्थिती तपासून आणि या परिस्थितीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी टीसीएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली सखोल चौकशी सुरू आहे. तपासात दोषी आढळलेल्यांवर योग्य आणि कठोर कारवाई केली जाईल. प्रक्रियेत सुधारणा लागू करून त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. लैंगिक छळ रोखण्याची जबाबदारी, तरीही तक्रारीकडे दुर्लक्ष टीसीएस कंपनीत चेनानी असिस्टंट जनरल मॅनेजर (डिलिव्हरी पार्टनर) पदावर आहे. ती ‘पॉश’ (POSH) समितीची सदस्य आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची दखल घेणे व छळ रोखून संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी या समितीची असते. चेनानीने पीडित महिलांच्या तक्रारींची दखल न घेता तिने संशयित आरोपींच्या कृत्याला चिथावणी दिल्याचे निष्पन्न झाले आहे.
राज्यातील आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची आणि रुग्णालयांची अवस्था सध्या व्हेंटिलेटरवर आहे. “तारीख पे तारीख’ देणाऱ्या प्रशासनाला अखेर जाग आली असून जपानच्या “जायका’ कंपनीकडून ३ हजार ७०८ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याच्या प्रस्तावावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यातून लातूर, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत अद्ययावत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. ७ जिल्ह्यांत नर्सिंगची “नर्सरी’; मनुष्यबळ वाढवण्यावर भर : केवळ इमारती उभ्या करून आरोग्यसेवा मिळत नाहीत हे शहाणपण सरकारला उशिरा सुचले आहे. जळगाव, लातूर, बारामती, मिरज, कोल्हापूर, नंदुरबार आणि गोंदिया या सात जिल्ह्यांत प्रत्येकी १०० प्रवेश क्षमतेची शासकीय बीएस्सी नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रिक्त असलेल्या परिचारिकांच्या पदांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असली तरी त्यांच्या नियुक्तीसाठी पुन्हा शासन दरबारी पायघड्या घालाव्या लागणार का, हा कळीचा मुद्दा आहे. ४ नवनिर्मित महाविद्यालयांचे भाग्य उजळणार; यंत्रसामग्रीचा वनवास संपणार? “स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलिव्हरी’ या गोंडस नावाखाली राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात वर्धा, पालघर, रत्नागिरी आणि अहिल्यानगर या नवनिर्मित वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी ओतला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील जीटी, सेंट जॉर्जसह धुळे, सोलापूर, अकोला आणि धाराशिव येथील नर्सिंग महाविद्यालयांचे नूतनीकरण होणार आहे. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे गंजलेल्या यंत्रसामग्रीच्या जागी आता अत्याधुनिक उपकरणे दिसतील, अशी अपेक्षा आहे. कौशल्य विकास विभाग : मुंबईच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवत वांद्रे येथे “आयईएस स्किल टेक विद्यापीठ’ उभारणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. २०२६-२७ पासून सुरू होणारे हे खासगी कौशल्य विद्यापीठ ‘कुशल महाराष्ट्र’ मोहिमेला बळ देईल आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचे काम करेल. नियोजन विभाग : आकांक्षित जिल्ह्यांचा ‘कायापालट’ होणार : ६ नवीन जिल्हे आणि १५० तालुक्यांची आकांक्षित कार्यक्रमात भर टाकण्यात आली आहे. आरोग्य, शिक्षण आणि सिंचनाच्या १९ निकषांवर आधारित या १७७ तालुक्यांमध्ये आता सरकारी तिजोरीचा ओघ वळणार असून पायाभूत सुविधांचे जाळे. वैद्यकीय शिक्षण विभाग : कौन्सिलमध्ये ‘थेट नियुक्ती’: महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील निवडणुकांच्या वादाला पूर्णविराम देत आता सदस्यांच्या नियुक्तीचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. १८ वरून २३ सदस्य संख्या करत पारदर्शक नामनिर्देशन पद्धतीद्वारे क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांना स्थान. जपानचा ‘अॅप्रोच’ : केवळ निधी नाही, तर प्रशिक्षणाचीही जोड मिळणार या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे भारत-जपान शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत रुग्णालय व्यवस्थापन आणि प्रशासन क्षमता वृद्धीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. अहिल्यानगर, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, जालना, परभणी आणि सातारा यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आणि साध्या क्ष-किरण यंत्रासाठी रुग्णांना खासगी लॅबमध्ये धाव घ्यावी लागते.
खाकीचे स्वप्न 2 मार्कांनी हुकले; तरुणीची आत्महत्या:नाशिकच्या घोटीमधील घटना, मिळाले 125 गुण
पोलिस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (२०, रा. उभाडे, ता. इगतपुरी) असे या मृत तरुणीचे नाव आहे. वर्दी मिळवून घरची परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र नियतीने दोन गुणांच्या अंतराने घात केला. प्रतीक्षा ही गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस भरतीसाठी कठोर परिश्रम घेत होती. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गाचे मेरिट १२७ गुणांवर थांबले होते. प्रतीक्षाला १२५ गुण मिळाले होते. अवघ्या दोन गुणांनी वर्दी हुकल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. शनिवारी (दि. ११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. जिद्दी स्वभावाचा असा अंत प्रतीक्षा अत्यंत मेहनती आणि जिद्दी होती. पोलिस दलात भरती होऊन कुटुंबाचा आधार बनण्याचे तिचे ध्येय होते. दोन गुणांच्या फरकाने तिला मानसिक नैराश्यात लोटले. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण धकाटे तपास करत आहेत. अशा प्रकारे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये पोलिस भरतीत केवळ दोन मार्क कमी मिळाले म्हणून तिने हे पाऊल उचलले आहे. स्पर्धा परीक्षेत यश-अपयश येतच असते. एकदा अपयश आले तर दुसऱ्यांदा जिद्दीने प्रयत्न करून यश मिळवता येते. विद्यार्थ्यांनी असा टोकाचा विचार करू नये. - योगेश सुरुडे, (मृत मुलीचे चुलते)
लता-आशा मंगेशकर यांच्या नावे रुग्णालय उभारणार
१६ तारखेला मुख्यमंत्री, सरसंघचालकांच्या हस्ते हॉस्पीटलचे भूमिपूजन पुणे : प्रतिनिधी मंगेशकर कुटुंबीयांकडून पुण्याजवळ उभारल्या जाणा-या भव्य हॉस्पिटलसंदर्भात हृदयनाथ मंगेशकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आधी या हॉस्पिलटलचे नियोजित नाव लता मंगेशकर हॉस्पिटल असे होते. त्यामध्ये आता बदल करून नवे नाव हे लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असे ठेवण्यात येणार असल्याची माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी […] The post लता-आशा मंगेशकर यांच्या नावे रुग्णालय उभारणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ३ हजार ७०८ कोटींचे वित्तसहाय्य
जायकाची मदत, प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता सोलापूर, अंबाजोगाई, धाराशिवच्या नर्सिंग कॉलेजचे श्रेणीवर्धन होणार मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य देणा-या जपानच्या जायका या संस्थेकडून आता राज्यातील वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी ३ हजार ७०८ कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य घेतले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. या वित्तीय मदतीतून वर्धा, […] The post आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी ३ हजार ७०८ कोटींचे वित्तसहाय्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१०२ संवर्गातील पदांची लोकसेवा आयोगाकडून भरती
नियमांमध्ये मोठा बदल, सरकारी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता परीक्षांची संख्या कमी, पदांची संख्या वाढणार मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध पदांवरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी, यासाठी पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणेमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणा-या विविध […] The post १०२ संवर्गातील पदांची लोकसेवा आयोगाकडून भरती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रासह देशात ९२ टक्के पावसाचा अंदाज, चिंता वाढली नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवामान विभागाकडून आज नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडू शकतो, असे म्हटले आहे. म्हणजेच देशात सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाचे प्रमाण जेव्हा ९० ते ९५ टक्के असते, त्यावेळी सामान्यपेक्षा कमी […] The post यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजस्थानचा प्रथमच विजयी रथ रोखला
हैदराबाद : वृत्तसंस्था सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्याची नाणेफेक हे राजस्थानच्या संघाने जिंकली आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २१६ धावा केल्या. लक्ष्यप्राप्ती करताना राजस्थानचा संघ अपयशी ठरला. त्यांना ५७ धावांनी सामना गमवावा लागला. राजस्थानच्या संघाने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट गमावल्या. त्यामुळे अतिशय वाईट सुरुवात झाली. आयपीएल […] The post राजस्थानचा प्रथमच विजयी रथ रोखला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तणाव वाढला, ब्रिटन-फ्रान्स घेणार ४० देशांची बैठक तेहरान : वृत्तसंस्था इराण-अमेरिकेतील चर्चा फिस्कटल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव वाढला आहे. अमेरिकेने नाकाबंदी करण्याचा इशारा दिल्याने इराण-अमेरिकेतील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कच्चे तेल आणि गॅस आयातीचा प्रश्न पुन्हा जटिल बनू शकतो. त्यामुळे वाढता तणाव कमी करण्यासाठी ब्रिटन आणि फ्रान्सने पुढाकार घेतला असून, होर्मुझ सामुद्रधुनीतून समुद्री रस्ता […] The post होर्मुझ सामुद्रध्वनीवरून पेच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एआयबीईए’च्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय क्रिकेट स्पर्धा
लातूर : प्रतिनिधी येत्या २० एप्रिल रोजी भारतातील बँक कर्मचा-यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘एआयबीईए’ या संघटनेस ८० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने लातूर येथे विभागीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात पार पडली. बँक कर्मचारी आज कामाच्या ओझ्याखाली प्रचंड दबलेले असताना त्यांच्या […] The post ‘एआयबीईए’च्या ८० व्या स्थापना दिनानिमित्त विभागीय क्रिकेट स्पर्धा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चलन तुटवड्याने बँकांची अडचण; नागरिकांची गैरसोय
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील सहकारी, खाजगी सर्वच बँकांमध्ये चलन तूटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यवहार करताना बँकांची अडचण तर नागरिकांची गैरसोय होत आहे. एसबीआय ही बँक लातूर जिल्ह्याची चेस्ट बँक आहे. या बँकेकडून जिल्ह्यातील सर्वच बँकांना चलन पुरवठा केला जातो. परंतू, गेल्या दोन-तीन दिवसांपासून चलन तूटवडा निर्माण झाला आहे. एसबीआय बँकेकडून दररोज भारतीय रिजर्व […] The post चलन तुटवड्याने बँकांची अडचण; नागरिकांची गैरसोय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला
लातूर : प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त लातूर शहर सजले आहे. विद्युत रोषणाईने शहर नटले आहे. तरुणांमध्ये प्रचंड जोश दिसून येत आहे. संपूर्ण शहरात विविध ठिकाणी बॅनर्स, पोष्टर्स, फलक लावण्यात आलेले आहेत. जयंतीचा उत्साह शिगेला पोहोंचला आहे. आज दि. १४ एप्रिल रोजी सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात […] The post डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१० सरपंच पदांसाठी ३९ नामनिर्देशनपत्र दाखल
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयातील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य अनेक कारणामुळे अपात्र ठरले होते. तर कांही सदस्य मयत झाले, तर कांही ठिकाणी एकही नामनिर्देशनपत्र न आल्यामुळे ग्रामपंचायतीच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यासाठी पोटनिवडणूक जाहिर झाली आहे. या पोट निवडणूकीत जिल्हयातील ६० ग्रामपंचायतीमधील १० सरपंच थेट निवडले जाणार आहेत. तसेच ५८ ग्रामपंचायत सदस्यही निवडले जाणार आहेत. […] The post १० सरपंच पदांसाठी ३९ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख चषक टर्फ क्रिकेट स्पर्धा
लातूर : प्रतिनिधी रेणा सहकारी साखर कारखाना लि., दिलीपनगर, निवाडा, रेणापूर, जि. लातूर यांच्या वतीने सहकार महर्षी, माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त ‘सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख चषक-२०२६ टर्फ क्रिकेट स्पर्धा दि. १७ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते रात्री ८ यावेळेत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये मांजरा परिवारातील सर्व साखर कारखान्यांमधील अधिकारीवर्गाच्या प्रत्येकी एका संघाचा […] The post सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख चषक टर्फ क्रिकेट स्पर्धा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराने राजहंस कांबळे सन्मानित
लातूर : प्रतिनिधी धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘एकमत’चे उपसंपादक राजहंस कांबळे यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचे वितरण दि. १२ एप्रिल रोजी धाराशिव येथे झाले. धाराशिव येथील नगरपालिकेच्या सभागृहात कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराने उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते ‘एकमत’चे उपसंपादक राजहंस कांबळे यांना सन्मानीत […] The post कै. अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराने राजहंस कांबळे सन्मानित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नोंदणी करूनही २ हजार शेतक-यांचा हरभरा खरेदी होईना
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या आडत बाजारात हरभ-याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळले. जिल्हयातील २३ हमीभाव खरेदी केंद्रावर शेतक-यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली. या हमीभाव खरेदी केंद्रावरचा बारदाना ८ ते १० दिवसापूर्वीच संपला आहे. त्यामुळे या हमीभाव खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी ठप्प झाली आहे. याचा फटका जिल्हयातील तब्बल २ हजार शेतक-यांना […] The post नोंदणी करूनही २ हजार शेतक-यांचा हरभरा खरेदी होईना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३ मे रोजी सामूहिक उपनयन संस्कार
लातूर : केशवराज मंदिर ट्रस्ट लातूरच्या वतीने ३ मे रोजी सामूहिक उपनयन (मौंजी बंधन) कार्यक्रम लातूर शहरातील पुरातन केशवराज मंदिर येथे आयोजीत करण्यात आला असून गेली ४४ वर्षापासून चालू असलेल्या सामूहिक मौंजी बंधन कार्यक्रमात यावर्षी यामध्ये ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी मुंजाची नोंदणी करावी अशी विनंती सचिव केशवराज मंदिर लातूर यासाठी संपर्क मुकेश कुलकर्णी, मधुकर […] The post ३ मे रोजी सामूहिक उपनयन संस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयांतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जलसंपदा विभागाने जल व्यवस्थापन पंधरवडा दि.१५ एप्रिल पासून केले आहे.याचाच एक भाग म्हणून गोदा ते नर्मदा जल यात्रेची संकल्पना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं होळकर यांनी जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा विचार कृतीत उतरविण्याच्या उद्देशाने गोदा ते नर्मदा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले. यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेण्यसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यात्रेच्या यशस्वीतेसाठी अनेक मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या.यात्रेच्या निमिताने तयार करण्यात आलेल्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले आले.जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ दोन ठिकाणाहून करण्यात येणार आहे.गोदानदीचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षैत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षैत्र चौंडी येथून करण्यात येईल यात्रेचा समारोप मध्यप्रदेश मधील महेश्वर येथे नर्मदा तिरी होणार आहे.यात्रेच्या मार्गावर विविध सांसकृतिक अध्यात्मिक कार्यक्रम तसेच जलसंवर्धनाच्या संदर्भात सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून शेतकरी विद्यार्थी महीला तसेच जलवव्यस्थापन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तीच्या सहभागातून यात्रेचा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले. हे ही वाचा… उष्णतेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज:नागपुरात उभारणार राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था - मंत्री गिरीश महाजन वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. उष्णतेसारख्या आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ठोस प्रणाली निर्माण केली जात असून यासाठी मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर वाचा…
मराठा साम्राज्याचा नकाशा पुनर्स्थापित करण्याची मागणी:युवासेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन
इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्यात आल्याचा आरोप करत तो तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी युवा सेना, कॉलेज कक्ष मराठवाड्याचे पदाधिकारी निखिल काकडे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले. रविवारी (दि. १२) संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या खासदार शिंदे यांची भेट घेऊन काकडे यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. मराठा साम्राज्य हे भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडणीत मोलाचे योगदान देणारे साम्राज्य असून, अशा महत्त्वपूर्ण घटकाचा नकाशा वगळल्याने विद्यार्थ्यांची इतिहासाविषयीची समज अपूर्ण राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात पेशवे दप्तरातील कागदपत्रे, राजपूताना गॅझेटमधील उल्लेख, अहमदनामा करार तसेच ब्रिटिशकालीन नकाशे असे विविध ऐतिहासिक पुरावेही सादर करण्यात आले. त्यामुळे या निर्णयाचा गांभीर्याने विचार करून इयत्ता ८ वीच्या एनसीईआरटी इतिहास पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा तात्काळ पुनर्स्थापित करावा, अशी मागणी करण्यात आली.
नाशिकच्या बहुचर्चित अशोक खरात फसवणूक प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर यांनी खाती बनावट असून सह्या देखील खोट्या आहेत असा दावा केला होता. प्रतिभा चाकणकर यांच्या दाव्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. KYC केलेले खाते कधीही बनावट असू शकत नाही, असे सांगत दमानिया यांनी चाकणकर कुटुंब आणि आरोपी अशोक खरात यांच्यातील कथित संपर्काची धक्कादायक आकडेवारीच सादर केली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण चार खाती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात प्रतिभा यांच्या नावे दोन आणि त्यांचा मुलगा चिन्मय याच्या नावे दोन खाती आहेत. विशेष म्हणजे, या खात्यांमधून आतापर्यंत सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. याच संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी आज प्रतिभा चाकणकर यांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. यावरून आता अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील कॉल रेकॉर्ड्सचा 'डाटा' सादर केला. २१८ मेसेजेस कशासाठी? दमानियांचा रोकठोक सवाल प्रतिभा चाकणकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात आपला खरातशी संबंध नसल्याचे म्हटले होते. मात्र, दमानिया यांनी १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीतील कॉल रेकॉर्ड्सची माहिती सादर केली आहे. त्यानुसार प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात एकूण २३६ कॉल आणि मेसेज रेकॉर्ड्स समोर आले आहेत. यात आरोपी खरातने त्यांना १७ कॉल्स केले आहेत, तर धक्कादायक बाब म्हणजे २१८ मेसेजेस स्वतः प्रतिभा चाकणकर यांनी खरातला केले आहेत. तन्मय चाकणकरांचे खरातसोबत ३७ कॉल रेकॉर्ड प्रतिभा यांचा मुलगा तन्मय याचेही ३७ कॉल रेकॉर्ड्स आढळले आहेत. यात ११ कॉल्स तन्मयने खरातला केले, तर २० कॉल्स खरातने तन्मयला केले आहेत. यात ८ मेसेजेसचाही समावेश आहे. जर खरातशी संबंध नव्हता आणि खाती बनावट होती, तर वर्षभरात हे शेकडो मेसेजेस आणि कॉल्स नक्की कशासाठी झाले? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. वकिलांच्या भूमिकेवरही कायदेशीर आक्षेप या प्रकरणात प्रतिभा चाकणकर यांची बाजू मांडणाऱ्या वकील जयश्री काळे-पालवे यांच्यावरही दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. काळे-पालवे या 'महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या' सदस्या आहेत. हे शासन नियुक्त 'पूर्णवेळ' सरकारी पद असल्याने त्यांना खासगी वकिली करण्यास कायदेशीर प्रतिबंध आहे. असे असतानाही त्या चाकणकरांची वकिली कशी करत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत, बहुदा राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पाठवले असेल, अशी शंका दमानिया यांनी उपस्थित केली.
अंजनगाव सुर्जी: विहिगाव फाटा ते विहिगाव मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी आणि भगवान अभ्यंकर यांनी हे उपोषण सुरू केले होते. खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. हा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून, त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना प्रवासात प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. 'खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे' अशी या मार्गाची स्थिती झाली होती, ज्यामुळे पावसाळ्यात प्रवास करणे धोकादायक बनले होते. या रस्त्यावर अनेक अपघात घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर कुरेशी आणि अभ्यंकर यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता, ज्याला नागरिकांनीही जाहीर पाठिंबा दिला होता. खासदार बळवंतराव वानखडे यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्ता दुरुस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर फिरोज कुरेशी यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी खासदारांनी त्यांना शरबत पाजून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अघम, शाखा अभियंता राऊत, काँग्रेसचे प्रमोद दाळू, रामेश्वर अभ्यंकर, प्रदीप देशमुख, सुधाकर टिपरे, कुशल चौधरी, मंगेश इंगळे, मूरसलीन खान, माजी पंचायत समिती सदस्य श्रीकांत पोटदुखे, भैय्यासाहेब अभ्यंकर, बाबाराव अभ्यंकर, संतोष गावंडे, राजीक सौदागर यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली असून, प्रशासनाच्या आश्वासनाची अंमलबजावणी होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती जिल्ह्यात मे महिन्यापासून रेशन दुकानदारांनी स्वस्त धान्याची उचल व वितरण करण्यास नकार दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या स्वस्त धान्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यात अंत्योदय योजनेचे १ लाख २९ हजार ४६६ कार्डधारक आणि प्राधान्य गटातील १५ लाख ५६ हजार १६ लाभार्थी समाविष्ट आहेत. गेल्या पंधरा दिवसांत जिल्हा प्रशासनाने काही रेशन दुकानदारांचे परवाने निलंबित केले होते. या कारवाईमुळे रेशन दुकानदार संघटनेत प्रशासनाप्रती तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उल्हे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन हा इशारा दिला. दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यापर्यंत पोहोचणारे धान्य सरकारी गोदामातून येते आणि वाहतूकदार ते घेऊन येतो. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी दुकानदारांना कोणतीही माहिती दिली जात नाही किंवा संबंधित कागदपत्रांवर त्यांच्या सह्या घेतल्या जात नाहीत. त्यामुळे धान्याच्या अनियमिततेत दुकानदारांचा कोणताही दोष नसतो. संघटनेने स्पष्ट केले की, खरे दोषी गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदार आहेत. रेशन धान्य दुकानदारांना या प्रकरणात विनाकारण गोवले जात आहे. पूर्वी दुकानदारांना किती धान्य पाठवले, याची माहिती फोनद्वारे दिली जात होती, परंतु आता तसे होत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आलेल्या धान्यात किती अतिरिक्त धान्य आहे, याची त्यांना कल्पना नसते. लाभार्थ्यांना वितरित केलेल्या धान्याचा संपूर्ण लेखाजोखा ई-पॉस मशीनमध्ये उपलब्ध असतो. त्यामुळे अतिरिक्त धान्याची विल्हेवाट लावली म्हणून दुकानदारांवर ठपका ठेवणे चुकीचे आहे. जर घोटाळा झालाच असेल, तर त्यात केवळ दुकानदारालाच दोषी कसे ठरवता येईल, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला. गोदाम व्यवस्थापक आणि वाहतूकदार यांच्या सहभागाशिवाय असे होऊ शकत नाही, असे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, संघटनेचे उपाध्यक्ष विजय देशमुख आणि इतर पदाधिकारी श्रीराम कुटाफळे उपस्थित होते.
अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) १२ वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडातील अत्यंत गुंतागुंतीची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मुलीला नवजीवन मिळाले असून, तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. गाठीमुळे या बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते. त्यामुळे तिला अन्न गिळण्यास, श्वास घेण्यास आणि चालण्यासही खूप त्रास होत होता. गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांच्या चमूने घेतला. तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यावर सोनोग्राफी व सीटी स्कॅनद्वारे तिच्या स्वादुपिंडात 'स्युडोसिस्ट ऑफ पॅनक्रियाज' नावाची मोठी गाठ असल्याचे निदान झाले. या गाठीमध्ये सुमारे दोन लिटर द्रव साचला होता. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या सल्ल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. नरोटे आणि डॉ. मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडियाट्रिक सर्जन डॉ. उषा गजभिये, बधिरीकरण तज्ञ डॉ. संजय महातपुरे, डॉ. ऋषिकेश नागलकर, डॉ. नितीन बरडिया, डॉ. नम्रता भस्मे, समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, डॉ. पायल रोकडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, अधीसेविका चंदा खोडके, इन्चार्ज सिस्टर विद्या चुडे, श्रद्धा पटोरकर, ज्योती गोंडसे आदींनी या शस्त्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. पोटाचा पुढील व मागील भाग कापून पुन्हा जोडण्याची ही अत्यंत जटिल प्रक्रिया अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेचा खर्च आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे विनामूल्य करण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनामुळे गरीब कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. सध्या रुग्ण बालिका पूर्णपणे बरी असून तिला लवकरच रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पळसखेड शिवारात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी मध्यरात्री बिबट्याने शेतात घुसून एका वासरावर हल्ला करत त्याला ठार केले. ही घटना मंगळवारी, १३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकरी बाबराव पवार यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांचे शेत गावाच्या हद्दीतच आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने गोठ्याजवळ प्रवेश केला आणि वासरावर हल्ला केला. सकाळी शेतात गेल्यावर वासराचा मृतदेह आढळला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. वासराच्या शरीरावर बिबट्याने ओरबाडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात मागील महिन्यातही अशीच घटना घडली होती. डॉ. ईश्वरकर यांच्या शेतातील वासरूही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले होते. त्यामुळे बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सततच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे. शिवाय ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशीही मागणी पुढे आली आहे. दरम्यान, गावातील नागरिकांनीही रात्रीच्या वेळी बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, लहान मुलांना आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे पळसखेड परिसरात दहशतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे अत्यावश्यक झाले आहे.
आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी अमरावती शहरात 'लव्ह जिहाद', 'ड्रग्ज जिहाद' आणि 'खनिज जिहाद' फोफावल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. मात्र, त्याचवेळी हा 'जिहाद' थांबवण्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत असल्याचे सांगून त्यांनी अनेकांना बुचकळ्यात पाडले. देशभरात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांपासून देशाटन करत असलेले डॉ. तोगडिया सोमवारी अमरावतीत होते. त्यांनी या निमित्ताने दोन वेगवेगळ्या ठिकाणी माध्यमांशी संवाद साधला. सकाळी एका हॉटेलमध्ये संवाद साधताना त्यांनी अमरावती जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील 'जिहादी' तयार होत असल्याचे म्हटले. याचा परिणाम म्हणून येथे 'लव्ह जिहाद', खनिजाची चोरी करून विल्हेवाट लावण्यासाठी 'खनिज जिहाद' आणि तरुण पिढीला बिघडवण्यासाठी 'ड्रग्ज जिहाद' घडवून आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या 'जिहादा'ला कोण थांबवणार, असे विचारले असता, त्यांनी सरकार योग्य दिशेने पाऊल टाकत असल्याचा निर्वाळा दिला. त्यांच्या या उत्तराने अनेकांनाच बुचकळ्यात पाडले. या विषयाच्या खोलात जाण्यापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवले. सरकार चांगले काम करत असले तरी यंत्रणा सर्वच कामे करू शकत नाहीत, असे त्यांचे मत होते. ते म्हणाले की, हनुमान चालीसा पठणाच्या माध्यमातून आम्हीच सरकारला मदत करू आणि सर्व हिंदूंना एकत्रित करून 'जिहादीं'ना नमवू. दुपारी एका पदाधिकाऱ्याच्या निवासस्थानी पुन्हा माध्यमांशी बोलताना डॉ. तोगडिया यांनी काही नवे मुद्दे मांडले. त्यांच्या मते, देशात एक लाख ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू झाल्यास प्रत्येक ठिकाणचे १०० लोक गृहीत धरल्यास एक कोटी लोक यानिमित्ताने एकत्रित होणार आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, प्राध्यापक असे सर्वच जण असतील. या सर्व हिंदूंच्या माध्यमातून 'हिंदू प्रथम' हा विचार रुजवून 'जिहादीं'चा पत्ता साफ करण्यास मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया आणि आंतरराष्ट्रीय विहिंपचे महेश साहू आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक पातळीवर सध्या अमरावतीत नऊ ठिकाणी हनुमान चालीसा पठण सुरू असून, लवकरच ही संख्या शंभरावर नेली जाईल. या शहरात असे जाळे तयार झाल्यानंतर 'हिंदू हेल्पलाईन' सुरू केली जाईल. त्याआधारे आरोग्य तपासणी, वैद्यकीय मदत, रोजगाराची उपलब्धता अशा बाबी पूर्णत्वास नेऊन समृद्ध, सुरक्षित व संपन्न हिंदू समाजाचे निर्माण केले जाईल, असेही डॉ. तोगडिया यांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगर: विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. चंगोळे यांनी केले. समता आणि मानवतेचे मूल्य जपणे आजही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी विज्ञानवाद, मानवतावाद आणि समतेच्या विचारांचा संगम घडवून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. त्या काळात जात, धर्म आणि लिंगभेदामुळे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध नव्हते. मात्र, फुले दांपत्याने या अन्यायाला आव्हान देत शिक्षणाचा मार्ग खुला केला. सावित्रीबाई फुले यांनीही या कार्यात मोलाचे योगदान दिले. डॉ. चंगोळे यांनी 'महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रनिर्माणातील योगदान' या विषयावर भाष्य केले. महात्मा फुले यांनी १८४८ साली स्त्रीशिक्षणाची पहिली शाळा सुरू करून समाजात क्रांतिकारी बदल घडवला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि संधी मिळावी, हा फुले यांच्या विचारांचा गाभा असून तो आजही अधिक महत्त्वाचा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. अरविंद गायकवाड यांनी फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वाचन, आकलन आणि आचरण केल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे मत व्यक्त केले. हे विचार केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहेत. डॉ. गायकवाड यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९५२ साली अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लॉज' (LL.D.) ही मानद पदवी बहाल केली होती. या सन्मानपत्रात त्यांचा उल्लेख 'एक महान समाजसुधारक, मानवाधिकारांचे पुरस्कर्ते, भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि राष्ट्रनेते' असा करण्यात आला होता. या कार्यक्रमाला घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, उपाधिष्ठाता डॉ. प्रभा खैरे, डॉ. प्रसाद देशपांडे, डॉ. एम.बी. लिंगायत, डॉ. भारत सोनवणे, डॉ. राधेय खैत्री, डॉ. अनिल धुळे, डॉ. अविनाश लांब, मेट्रन सरोजिनी गायकवाड, यासह फुले-आंबेडकर जयंती समितीचे सदस्य उपस्थित होते.
राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 'डीआरआय'च्या नागपूर प्रादेशिक युनिटला एका महिला प्रवाशाकडून अंमली पदार्थांची खेप नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी हजरत निजामुद्दीन–केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेस नागपूर स्थानकावर पोहोचताच डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. संशयित महिलेची ओळख पटल्यानंतर तिला पुढील चौकशीसाठी अजनी रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. तस्करीची अनोखी शक्कल, शॅम्पूच्या बाटलीत कॅप्सूल महिलेच्या सामानाची झडती घेतली असता, तिच्या बॅगेत शॅम्पूच्या दोन बाटल्या आढळल्या. या बाटल्यांचे वजन सामान्यपेक्षा जास्त असल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. बाटल्या उघडल्या असता, त्यातील शॅम्पूच्या द्रावणाखाली ५० पिवळ्या रंगाच्या सीलबंद कॅप्सूल लपवल्याचे दिसून आले. या कॅप्सूल फोडल्या असता त्यात पांढरी पावडर सापडली. अंमली पदार्थ चाचणी कीटद्वारे (Drug Test Kit) तपासणी केली असता, हा पांढरा पदार्थ 'कोकेन' असल्याचे स्पष्ट झाले. आंतरराज्यीय रॅकेटची शक्यता सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी शॅम्पूच्या बाटलीत कॅप्सूल लपवण्याची ही पद्धत अत्यंत चाणाक्षपणे आखण्यात आली होती. मात्र, डीआरआयच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला. प्राथमिक तपासानुसार, ही महिला एका मोठ्या आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटचा भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही खेप नक्की कुठून आणली गेली, तिचा मुख्य पुरवठादार कोण आहे आणि हे ड्रग्ज कोणाला पोहोचवले जाणार होते, या दिशेने डीआरआय आता सखोल तपास करत आहे. हे ही वाचा… भोंदू अशोक खरात प्रकरण:प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी; 'समता'मधील कोट्यवधींचे व्यवहार अन् सह्या बनावट असल्याचा दावा नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा करत, पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा केला आहे. सविस्तर वाचा…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अंतर्गत पातळीवर सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. हिंगोलीचे आमदार आमदार संतोष बांगर यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असून, ज्या मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यांना घरचा रस्ता दाखवा, अशी थेट मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. नांदेड आणि सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकांमध्ये शिवसैनिकांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांविरोधात संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. नांदेड येथे शिवसेना शिंदे गटाच्या तीन जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली, मात्र यावेळी त्यांचे लक्ष्य विरोधक नसून स्वपक्षीय मंत्री होते. संतोष बांगर म्हणाले, काही मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. हे मंत्री उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत. कार्यकर्त्यांचे फोन उचलत नाहीत की त्यांची कामे करत नाहीत. अशा अहंकारी मंत्र्यांना वेळीच घरी पाठवा, तरच पक्ष टिकेल. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच बांगर यांनी हा 'घरचा आहेर' दिल्याने उपस्थित पदाधिकारी अवाक झाले. धाराशिवच्या शिवसैनिकांचा सोलापुरात संताप दुसरीकडे, शिंदेंच्या शिवसेनेने सोलापूर येथे आयोजित धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीतही मोठा राडा पाहायला मिळाला. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांनी अन्यायाचा पाढा वाचला. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीत जाणीवपूर्वक शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधले जात आहे, असा खळबळजनक आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. तुळजापूर, कळंब आणि धाराशिवमध्ये पक्ष संघटनेची गळचेपी होत असून भाजप वरचढ ठरत असल्याची भावना सैनिकांनी व्यक्त केली. श्रीकांत शिंदेंचा पारा चढला; 'शिस्त' पाळण्याचे बजावले बैठकीत पदाधिकारी एकमेकांशी भिडल्याचे पाहून खासदार श्रीकांत शिंदे यांचा संयम सुटला. तुम्हाला बोलायला संधी दिली तर तुम्ही शिस्त सोडून एकमेकांशी मारामारी करता का? अशा कडक शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. संघटनात्मक कामात सुधारणा करा आणि शिस्त पाळा, अन्यथा कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शोक केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित? आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गजांची दांडी
मुंबई: गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुवर्णयुग संपले आहे. सोमवारी (१३ एप्रिल २०२६) मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आशा ताईंच्या गाण्यांवर आपली कारकीर्द घडवणारे बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार आणि दिग्गज या वेळी गैरहजर असल्याचे दिसून आले. यावरून आता नेटिझन्सनी चित्रपटसृष्टीतील ‘दिखाऊ’ आदरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले […] The post शोक केवळ सोशल मीडियापुरताच मर्यादित? आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला अनेक दिग्गजांची दांडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सायबर भामट्यांकडून वीजग्राहकांना बनावट मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणने ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या फसव्या मेसेजला प्रतिसाद देऊ नये, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वीजग्राहकांना 'मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे, त्वरित दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा' अशा प्रकारचे बनावट मेसेज येत आहेत. या मेसेजमध्ये वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. याला प्रतिसाद दिल्यास मोबाईल किंवा संगणक हॅक होऊन बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची शक्यता असते. गेल्या काही महिन्यांपासून असे बनावट मेसेज मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, महावितरणकडून कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून असे एसएमएस किंवा व्हॉट्सॲप मेसेज पाठवले जात नाहीत. या प्रकरणी सायबर सेलमध्ये यापूर्वीही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, असे महावितरणने म्हटले आहे. महावितरण केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टिमद्वारे अधिकृत माहिती पाठवते. यात पूर्वनियोजित देखभाल, दुरुस्ती किंवा तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास लागणारा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलांची रक्कम, मीटर रीडिंग पाठवण्याचे आवाहन, रीडिंगची तारीख, वापरलेली युनिट संख्या, देय दिनांक आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटीसचा समावेश असतो. या अधिकृत मेसेजचा सेंडर आयडी 'एमएसईडीसीएल' (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा असतो आणि त्यात कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले जात नाही. ग्राहकांनी वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या बनावट मेसेजला प्रतिसाद देऊ नये, बिलाच्या पेमेंटसाठी कोणतीही लिंक किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये. तसेच मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू नये. काही शंका किंवा तक्रारी असल्यास, वीजग्राहकांनी २४ तास उपलब्ध असलेल्या १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे मेसेज आल्यास cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहनही महावितरणने केले आहे.
रात्रपाळीत झोपण्यावरून वाद:सुरक्षारक्षकाचा गमछाने गळा आवळून खून; खराडी पोलिसांकडून आरोपीला अटक
खराडी येथील एका सोसायटीच्या आवारात रात्रपाळीत झोपण्यावरून झालेल्या वादातून एका सुरक्षारक्षकाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी एका सुरक्षारक्षक तरुणाला अटक केली आहे. पांडुरंग भाऊराव हरवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग हरवणे आणि सुदर्शन काळे हे खराडीतील स्पॅनोलाईफ सोसायटीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. घटनेच्या दिवशी, शनिवारी, ते दोघे रात्रपाळीत कामावर होते. काळे हा आठ ते नऊ महिन्यांपासून सोसायटीत काम करत होता, तर हरवणे यांनी काही महिन्यांपूर्वी नोकरी सोडली होती आणि नुकतेच ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. रात्रपाळीत कामाची विभागणी करताना, रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत तीन तास झोप घेण्याचे दोघांमध्ये ठरले होते. मात्र, झोपायला पहिले कोण जाणार या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादातून काळे याने हरवणे यांच्या गळ्यातील गमछाने (डोक्याला गुंडाळण्याचे फडके) त्यांचा गळा आवळला. गळा आवळल्याने हरवणे बेशुद्ध पडले. त्यानंतर घाबरलेल्या काळेने तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बेशुद्धावस्थेतील हरवणे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काळे याला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास खराडी पोलिस करत आहे.
किरकोळ वादातून खासगी बस चालकाला कारखाली चिरडले:हडपसर-सासवड रस्त्यावरील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल
हडपसर-सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात एका मद्यधुंद मोटार चालकाने किरकोळ वादातून खासगी बस चालकाला मोटारीखाली चिरडले. या धक्कादायक घटनेत बस चालकाचा मृत्यू झाला आहे. सागर बाळासाहेब सायकर (रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृत बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक कृष्णा गोपाळ कोईलवाड (वय ३०, रा. बोथरी, जि. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय तानाजी शिर्के (वय ४१, रा. सातववाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिर्के आणि सायकर हे खासगी बसवर चालक म्हणून काम करतात. रविवारी मध्यरात्री ते सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागातील महिलांना दोन बसमधून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी घेऊन जाणार होते. रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्यावर कोईलवाडची मोटार आडवी आली. मोटार चालकाने बसला पुढे जाण्यास जागा दिली नाही, त्यामुळे सायकर यांनी कोईलवाडला विचारणा केली. बस रस्त्याच्या कडेला थांबवून सायकर यांनी मोटार चालक कोईलवाडला जाब विचारला. त्यावेळी तिथे अभिजित जमदाडे उपस्थित होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कोईलवाडने सायकर यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्या अंगावर मोटार नेली. मोटारीच्या धडकेने सायकर फरफटत गेले. त्यांनी मोटारीचे बोनेट पकडले होते, पण ब्रेक लावल्याने ते रस्त्यात पडले. या परिस्थितीत मोटार चालक कोईलवाडने कोणताही विचार न करता पुन्हा सायकर यांच्या अंगावर मोटार नेली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक एस. जाधव पुढील तपास करत आहेत.
पुण्यात स्वारगेट येथील एका औषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने १० लाख २६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुकानाच्या मालक असलेल्या एका डॉक्टरांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश रामधन ढगे (रा. येवलेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरांचे स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात औषध विक्रीचे दुकान आहे. ढगे हा या दुकानात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होता. गेल्या वर्षभरात ढगे याने औषध विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा वेळोवेळी अपहार केला. डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने एकूण १० लाख २६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करत आहेत. कार्यालयातून 1 लाख 61 हजारांचे लॅपटॉप, मोबाईची चोरी हडपसर येथील क्रिएटिव्ह कट्टा ॲडर्वटायझींग या डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्या कार्यालयाचा दरवाजा उघडा ठेऊन झोपी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी आत प०वेश करून 1 लाख 61 हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेला. यामध्ये दोन लॅपटॉप, एक आयपॅड आणि एक ड्रोन कॅमेरा व कॅमेरा सेटअप साहित्य होते. याबाबत वैभव भिमराव थोरबोले (25, रा. भंडलकरनगर, शेवाळवाडी, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 एप्रिल रोजी रात्री एक ते सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.
स्वरसाम्राज्ञीचा अखेरचा विसावा; आशा भोसले अनंतात विलीन
मुंबई: भारतीय संगीत क्षेत्रातील एक झळाळते नक्षत्र आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी, १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज, सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी ४ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतातील ‘आशा’ नावाचा एक सुवर्णकाळ मावळला […] The post स्वरसाम्राज्ञीचा अखेरचा विसावा; आशा भोसले अनंतात विलीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकच्या गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास आता थेट राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची सोमवारी शिर्डी पोलिस ठाण्यात तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी धक्कादायक खुलासा करत, पतसंस्थेतील ती खाती बनावट असून सर्व सह्या खोट्या असल्याचा दावा केला आहे. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे एकूण चार खाती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यात प्रतिभा यांच्या नावे दोन आणि त्यांचा मुलगा चिन्मय याच्या नावे दोन खाती आहेत. विशेष म्हणजे, या खात्यांमधून आतापर्यंत सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व खात्यांवर वारसदार (नॉमिनी) म्हणून मुख्य आरोपी अशोक खरात याचे नाव नोंदवण्यात आले आहे. याच संशयास्पद व्यवहारांचा धागा पकडून पोलिसांनी चाकणकर माय-लेकांचा जबाब नोंदवला. देवस्थानाच्या नावाखाली कागदपत्रांचा गैरवापर चौकशीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, संबंधित खाती मी उघडलेली नाहीत, तसेच त्यावर असलेल्या माझ्या सह्या खोट्या आहेत. या खात्यांमधून आम्ही एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही. देवदर्शनाच्या बहाण्याने अशोक खरातने आमची कागदपत्रे घेतली होती आणि व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या त्याच कागदपत्रांचा गैरवापर करून ही बनावट खाती उघडली असावीत, असा दावा प्रतिभा चाकणकर यांनी केला. दरम्यान, आपल्याला कोणतीही अधिकृत नोटीस मिळाली नव्हती, तरीही बातम्या पाहून आपण स्वतःहून जबाब देण्यासाठी पोलिसांसमोर हजर झालो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. चुकीचा पत्ता अन् बनावट सह्या; वकिलांचा दावा प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी या प्रकरणातील तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावाने समता पतसंस्थेत बनावट खाती उघडण्यात आली आहेत. त्या कधीही या पतसंस्थेत गेल्या नाहीत. खाते उघडताना अर्जावर चुकीचा पत्ता वापरण्यात आला आहे. आम्ही पोलिसांना सह्यांचे नमुने दिले असून, पुढील तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. पोलिस तपासाची दिशा शिर्डी पोलिसांकडून आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. बनावट खाती उघडण्यासाठी पतसंस्थेच्या नियमांचे उल्लंघन झाले का? या कोट्यवधींच्या व्यवहारांचा मूळ स्रोत काय आहे? आणि यामागे कोणते मोठे नेटवर्क कार्यरत आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणातील धागेदोरे मोठे असण्याची शक्यता असून येत्या काळात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पिंपळगाव शिवारातील जुगार अड्डयावर धाड
नांदेड : प्रतिनिधी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत कुंडलवाडी हद्दीत मौजे पिपळगांव (कु) शिवारात चालणा-या जुगार अड्डयावर पोलिसांनी दि. १२ रोजी धाड टाकली. यात १२ जुगा-यांवर कारवाई करून २ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील ४ जुगा-यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कुंडलवाडी हद्दीत मौजे पिपळगांव (कु) शिवारात दगडे यांच्या शेताचे जवळ कांही इसम […] The post पिंपळगाव शिवारातील जुगार अड्डयावर धाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धावत्या कारला अचानक भीषण आग; चालक थोडक्यात बचावला
कंधार : प्रतिनिधी जळकोट ते नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर दि. १३ एप्रिल दुपारी एक धक्कादायक घटना घडली. कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील मार्गावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागून कार पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून अंबुलगा येथे एक चालक हुंडाई कंपनीची कार घेऊन जात […] The post धावत्या कारला अचानक भीषण आग; चालक थोडक्यात बचावला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या आदेशाची नांदेडात होळी
नांदेड : प्रतिनिधी शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आंबेडकर चळवळीतील पदाधिका-यांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या आदेशाची होळी केली. भाजपशासित राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड आधारित उपवर्गीकरणाचे आदेश १० एप्रिल रोजी काढले आहेत. विशेष म्हणजे एका जातीशिवाय इतर ५७ जातींनी या उपवर्गीकरणाची मागणी केलेली नाही. तसेच बदर कमिटीचा अहवाल सुद्धा सार्वजनिक करण्यात आला नाही. […] The post अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या आदेशाची नांदेडात होळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोनू कल्याणकर खून प्रकरणाला वेगळे वळण
नांदेड : प्रतिनिधी शहरात घडलेल्या सोनू कल्याणकर खून प्रकरणातील आरोपी गजाआड असले तरी आता यास वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणात भाजपा नगरसेवक व त्याच्या भावाची चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दिलीपसिंग सोडी यांनी थेट आयजी तथा पोलीस उपमहानिरीक्षकांकडे केली आहे. शहरातील श्रीनगर भागात असलेल्या बीके हॉल परिसरात शिवसेनेचा पदाधिकारी सोनू कल्याणकर यांचा […] The post सोनू कल्याणकर खून प्रकरणाला वेगळे वळण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कृषी विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. हा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार, १३ रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे आणि अनिल महामुलकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. कृषीमंत्री भरणे यांनी ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगितले. चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असून, योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते, असे त्यांनी नमूद केले. पावसाअभावी होणाऱ्या मोठ्या आर्थिक नुकसानीवरही त्यांनी प्रकाश टाकला. कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करताना, भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका स्पष्ट केली. शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट घेतात आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडावी, असे ते म्हणाले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातून विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा आपला प्रवास संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे त्यांनी सांगितले. दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यासह संपूर्ण परिसरात प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर, देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. पुणे विभागाच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनीही या ठरावाला मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत. मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. बांधकामाशी संबंधित यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर बंद असले तरी, श्री महागणपतींची नित्य पूजा, अभिषेक आणि इतर धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे धार्मिक परंपरा अखंडितपणे सुरू राहतील. मंदिर प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, मंदिराची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि सुव्यवस्थेसाठी ही विकासकामे अत्यंत आवश्यक आहेत. कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. पुरातत्त्व विभाग, देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानेही नागरिकांना संयम ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत-२०४७' च्या संकल्पपूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेतले जात आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरात बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळातील लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शी प्रशासनाच्या प्रेरणेतून या अभियानाला 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर' असे नाव देण्यात आले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. या शिबिरात जवळपास २० गावांचा समावेश असून, विविध विभागांच्या ४५ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शिबिराच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे ५ लाख कुटुंबांना लाभ मिळाला आहे. यामध्ये ४० हजार फेरफार दुरुस्ती, २० हजार सातबारा दुरुस्ती, १ लाख ५० हजार संगणकीकृत सातबारा वाटप, ७५ हजार ८ अ नोंदीचे वाटप, १ लाख ७५ हजार विविध प्रमाणपत्रांचे वाटप, ३४ हजार एक खिडकी योजनेतून प्रमाणपत्र वाटप आणि २ हजार कमी जास्त पत्रक तयार करण्यात आले. पुणे जिल्ह्यात १३ हजार ३३ दाखल्यांचे वितरण झाले आहे. मंत्री बावनकुळे यांनी यावेळी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या. पीएमआरडीए क्षेत्रात तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल. भामा-आसखेडसंदर्भात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील शेरे कमी करण्याबाबत पुनर्वसन मंत्री आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेतली जाईल. देवस्थानांच्या इनाम जमिनींबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येणार आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंदला स्वामित्व योजनेत आणून भूमिअभिलेख विभागामार्फत ड्रोन सर्वेक्षण करावे आणि मालमत्ता पत्रक व सनद देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी खासगी सर्व्हेअरची तातडीने नेमणूक करून मोजणी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असेही ते म्हणाले. लोकोपयोगी कामे करण्यासाठी सलोखा योजनेमध्ये १५० हेक्टर जागेचा प्रस्ताव तयार करुन सादर करावा, याप्रस्ताव जमीन देण्यात येईल.नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नवसखी योजनेअंतर्गत २ हजार २०० महिला बचत गटांना एक लाख रुपये फिरते भांडवल देण्यात येत आहे. याप्रमाणे अशा प्रकारची योजनांची पुणे विभागात अंमलबजावणी करण्याची विभागीय आयुक्तांना मंत्री बावनकुळे यांनी सूचना केली.
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जीडीपी वाढवणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी ज्ञानाधारित अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल, असे मत भारताच्या नवनिर्मिती परिसंस्थेचे शिल्पकार व एआयसीटीईचे माजी उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले. एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित 'स्टुडंट्स कन्व्हेन्शन २०२५-२६' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागाचे चेअरमन आणि एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागाचे सचिव केशव ताम्हणकर, एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बोरमाने, कार्यक्रमाचे निमंत्रक प्रा. डॉ. अविनाश वाघमारे (मेकॅनिकल विभाग, एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालय) आणि एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागाचे सहसंचालक मोहन पाटील उपस्थित होते. डॉ. जेरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, औद्योगिक क्षेत्राच्या बदलत्या गरजा पाहता 'चलता है' हा दृष्टिकोन सोडून व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे. भारत अभियंते घडवण्यात चीनलाही मागे टाकत आहे, ही तरुणाई आपली ताकद आहे. मात्र, या तरुणांमध्ये उद्योग क्षेत्राला अपेक्षित कौशल्यांची कमतरता असल्याने दरवर्षी मोठ्या संख्येने शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या अभियंत्यांमध्ये रोजगारक्षमतेचा अभाव दिसतो. ते पुढे म्हणाले की, आता 'रट्टा मारून' शिक्षण घेण्याची वेळ राहिलेली नाही. विद्यार्थ्यांनी सर्जनशीलता आत्मसात करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानामुळे आव्हाने निर्माण झाली असली तरी, त्याचबरोबर अनेक संधीही उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनी या आव्हानांचे संधींमध्ये रूपांतर करून स्वतःला सिद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. रेजी मथाई यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली. यावर योग्य पर्याय शोधण्याची गरज असून, भविष्यातील या समस्येवर मात करण्यासाठी औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन काम करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुण्यातील भवानी पेठेतील काशेवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका १८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अबूबकर अमजद खान (वय १८, रा. एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अम्मार शेख (वय १९, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), कमरअली सय्यद (वय १८, रा. विमाननगर), तुफेल सय्यद (वय १९) आणि अबूझर कुरेशी (वय १८, रा. काशीवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. अल्तमश अन्सार पिंजारी (वय १९, रा. मोमीनपुरा, घोरपडे पेठ) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबूबकर आणि आरोपींमध्ये यापूर्वी वाद झाला होता. घटनेच्या दिवशी अबूबकर आपल्या मित्रांसह काशीवाडी भागातील त्रिकोणी उद्यानाजवळ थांबला होता. त्याचवेळी आरोपी धारदार शस्त्रे घेऊन तिथे आले. आरोपींनी अबूबकर आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी अबूबकरवर धारदार शस्त्राने अनेक वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अबूबकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रउभारणीसाठी संवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली. पुणे येथे आयोजित 'धर्माचार्य परिषदे'त ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी 'पंचपरिवर्तन' या विषयावर प्रभावी प्रबोधन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 'विद्यापीठ भाग' आणि 'धार्मिक श्रेणी संपर्क विभाग' यांच्या वतीने पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकूर यांनी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजींचा संघाच्या स्थापनेमागील दृष्टिकोन आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिका स्पष्ट केली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघाचे कार्य पोहोचणे आणि राष्ट्रउभारणीत संवाद व समन्वय वाढणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या परिषदेत ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी 'पंचपरिवर्तन' या विषयावर मार्गदर्शन केले. स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि नागरी कर्तव्य या पाच सूत्रांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. समाजपरिवर्तनासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, प्रत्येकाने या पाच घटकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. या परिषदेच्या यशस्वी आयोजनात विद्यापीठ भाग संघचालक सुभाष कदम आणि धार्मिक श्रेणी संपर्क प्रमुख दत्ता मारुती सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विविध मठांचे धर्माचार्य, वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि परिसरातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परस्परातील स्नेह आणि संवाद वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेची सांगता उत्साहात झाली.
सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
मुंबई : सूर सम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर सोमवार दि. १३ एप्रिल रोजी अन्त्यसंस्कार करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार, संगीत विश्वातील दिग्गज, राजकीय नेते यांनी उपस्थिती लावली होती. आशा भोसले यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. […] The post सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेत माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. वनविभागाने बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध केल्यानंतर, स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि जमावाने त्याला काठीने अमानुष मारहाण केल्याचा आरोप होत असून, यावरून आता राजकीय संघर्ष पेटला आहे. रविवारी सकाळी ११ च्या सुमारास शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनास्थळी वनविभाग आणि पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला भूल देणारे 'डार्ट' मारले. डार्ट लागल्याने बिबट्याला ग्लानी आली. मात्र, याच वेळी स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील आणि तिथे उपस्थित असलेल्या जमावाने हातात लाकडी दांडके घेऊन बिबट्यावर तडाखे ओढले. या झटापटीत आमदार चंद्रकांत पाटील हे देखील जखमी झाले. मात्र, जमावाने केलेल्या मारहाणीत बिबट्या गंभीर जखमी झाला असून, या अमानुष कृत्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 'खडसे विरुद्ध पाटील' : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदारांच्या वागणुकीवर कडाडून टीका केली आहे. बिबट्याला आधीच बेशुद्धीचे इंजेक्शन दिलेले असताना त्याला अशा प्रकारे मारहाण करणे हे नियमबाह्य आणि गुन्हा आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधींनी असे वागणे चुकीचे आहे. जर शुद्धीत असलेल्या बिबट्याला पकडले असते, तर त्यांचे कौतुक केले असते, अशा शब्दांत खडसेंनी टोला लगावला. आमदार चंद्रकांत पाटलांचा पलटवार या आरोपांना उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले की, बिबट्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, म्हणून त्याला रोखण्यासाठी काठीचा वापर करावा लागला. खडसे हे केवळ 'पोटदुखीचे' राजकारण करत असून त्यांची विचारसरणी विकृत आहे. वनविभागाच्या भूमिकेकडे लक्ष वनविभागाने सध्या बिबट्याला ताब्यात घेतले असून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्याची तयारी सुरू आहे. मात्र, बेशुद्ध प्राण्याला मारहाण करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा मानला जातो. अशा परिस्थितीत, प्रत्यक्षदर्शी पुरावे आणि व्हिडिओ समोर आल्यावर वनविभाग आमदार आणि जमावावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी; राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी राज्य सरकारनेह्या ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी स्वत: आशाताईंनी वांद्रे-अंधेरी परिसरात […] The post आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी; राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गटबाजीवर उपाय नाही अन् म्हणे मी बिनटाक्यांचे ऑपरेशन करतो!
अय्यूब कादरी धाराशिव : मी ऑपरेशन करतो, ते बिनटाक्याचे करतो… असे लोकप्रिय विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिवच्या दौ-यात केले. स्वत:ला इतके सक्षम समजणारे शिंदे हे धाराशिव जिल्ह्यातील शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीवर उत्तर शोधण्यात अद्याप तरी अयशस्वी ठरले आहेत. काल त्यांच्या दौ-यावेळी शिवसेनेच्या एका गटातील नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांना स्थानबद्ध केले होते. अशाप्रसंगी विरोधी […] The post गटबाजीवर उपाय नाही अन् म्हणे मी बिनटाक्यांचे ऑपरेशन करतो! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी ता. १३ गावकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून इतर प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली आहे. भांडेगाव येथे आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, नरेंद्र इंगळे, मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे, पोलिस पाटील ज्ञानेश्वर जाधव, खांबाळा पोलिस पाटील सुरेश पुरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. अलोक गट्टु, मुख्याध्यापक वानखेडे, माजी जि.प.सदस्य माधव कोरडे, भुमि अभिलेख उप अधिक्षक प्रमोद माळे आदी उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी बोधवड, उपविभागीय अधिकारी घुटुकडे यांनी मार्गदर्शन केले. या अभियानामध्ये मंडळस्तरावर शिबीर आयोजित करून नागरीकांचे प्रश्न सोडविले जात आहेत. शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांची सोडवणुक केली जात असून त्यांच्या तक्रारी, अडचणी एेकून घेत त्या मार्गी लावल्या जात आहे. या अभियानाच्या माध्मयातून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याचेे प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना द्वारपोच सेवा पुरविल्या जात असून सातबारा मोहिमे अंतर्गत वारसा नोंदी, फेरफार घेऊन त्याला मंजुरी दिली जात आहे. हिंगोली तालुक्यातील मंडळांमधून आयोजित या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गावकऱ्यांना प्रमाणपत्रांचे तसेच मालकी हक्काच्ाय सनदचे वाटप करण्यात आले. शिबारीसाठी ग्राम महसुल अधिकारी अनिल काळे, तलाठी विनोद ठाकरे, दिनकर धरणे, ग्रा.म.अ.वैभव सोसे, कुलकर्णी, वाठोरे, नारायण जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण 'सामान्य पेक्षा कमी' या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यंदाच्या मान्सूनवर 'एल निनो' (El Nio) या हवामान स्थितीचे सावट राहण्याची शक्यता आहे. डॉ. मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या काळात 'एल निनो'ची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची भीती असते. दिलासादायक बाब म्हणजे, याच काळात हिंदी महासागरात 'इंडियन ओशन डायपोल' (IOD) सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. हा सकारात्मक आयओडी 'एल निनो'च्या नकारात्मक प्रभावाला रोखण्यास मदत करतो, त्यामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघू शकते. जून ते ऑगस्ट दरम्यान पावसाची स्थिती सुरुवातीला सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. पावसाचे मोजमाप : IMD च्या पाच श्रेणी भारतीय हवामान विभागाने पाऊस मोजण्यासाठी पाच प्रमुख स्तर निश्चित केले आहेत: बळीराजा आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम? खाजगी हवामान संस्थांनी यापूर्वीच मान्सून कमकुवत राहण्याचे संकेत दिले होते, त्यावर आता सरकारी मोहोर उमटली आहे. पावसाचे प्रमाण ९२ टक्के राहिल्यास शेतीकामांचे नियोजन, पेरण्या आणि पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने मान्सूनवर अवलंबून असल्याने, हा अंदाज धोरणकर्त्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. मे महिन्यात दुसरा अंदाज जाहीर होणार पावसाचे प्रमाण कमी असले तरी त्याचे वितरण (Distribution) कसे राहते, हे महत्त्वाचे आहे. जूनमध्ये मान्सूनचे आगमन आणि त्याची वाटचाल कशी होते, यावर खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असेल, असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच अखेरच्या टप्प्यात पावसाचे वितरण कसे राहते, यावर बरेच काही अवलंबून असेल. हवामान विभाग मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर करेल, ज्यामध्ये प्रादेशिक पातळीवरील पावसाच्या वितरणाची अधिक स्पष्ट माहिती मिळेल.
लिंगपिसाट खरातला १ हजार ८२५ बड्या असामींचे कॉल
मुंबई : प्रतिनिधी भोंदूबाबा अशोककुमार खरात याच्या लैंगिक अत्याचार व फसवणुकीचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. अनेक बड्या असामी, अधिकारी व राजकारणी त्याच्या संपर्कात होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी १,८२५ लोकांची नावे उघड करण्याचा दावा केला आहे, ज्यात आयजी, तहसीलदार, राजकारण्यांचा समावेश आहे. बुधवारी मोठा खुलासा होणार असून, सध्या ईडी आणि पोलिस तपास करत […] The post लिंगपिसाट खरातला १ हजार ८२५ बड्या असामींचे कॉल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सारथी आणि महाज्योती यांसारख्या इतर स्वायत्त संस्थांनी २०२३ च्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली असताना, बार्टीने मात्र ३० ऑक्टोबर २०२३ च्या 'समान निकष' धोरणाचा चुकीचा आधार घेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना या लाभापासून वंचित ठेवले आहे. हा संविधानातील कलम १४ (समानतेचा अधिकार) चा उघड भंग असून यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार आयोगाकडे करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संशोधक विद्यार्थी ऋषिकेश अशोक कांबळे यांच्या पुढाकाराने ही याचिका आयोगासमोर दाखल करण्यात आली होती. बार्टीने जाणीवपूर्वक जाहिरात रोखून धरल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते, ज्याची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. आयोगाचे संचालक डॉ. जी. सुनील कुमार बाबू यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे की, जर ३० दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर आयोग संविधानाने दिलेल्या दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करून महासंचालकांना वैयक्तिकरित्या समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश देईल. काय आहेत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या? १. बार्टीने २०२३ ची फेलोशिप जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करावी. २. पात्र सर्व (१००%) विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती लागू करावी. ३. 'समान निकष' धोरणाची अंमलबजावणी करताना जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा. या नोटीसमुळे आता राज्य सरकार आणि बार्टी प्रशासनावर २०२३ च्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा करण्यासाठी मोठा दबाव निर्माण झाला आहे.
चिनी कॅमे-यांच्या माध्यमातून पाकची घुसखोरी
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तानने ज्याचा विचारही केला नाही, असा दणका भारताने दिला. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने आपली ट्रॅकिंग क्षमता पुन्हा एकदा अपडेट केली. नुकताच याबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने आयएसआयने भारतीय सेना, बीएएसएफ यांच्या पंजाब, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीरमधील सैन्य तैनातील. लॉजिस्टिक्स अशा महत्वाच्या […] The post चिनी कॅमे-यांच्या माध्यमातून पाकची घुसखोरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर येथील कोराडी औष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ४ मध्ये सोमवारी सकाळी एक अपघात घडला. बॉयलरमधून अचानक वाफ बाहेर पडल्याने एकूण आठ जण जखमी झाले. यामध्ये महानिर्मितीचे चार अधिकारी-कर्मचारी आणि चार कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संच बंद असताना सुमारे १३ मीटर उंचीवरील मजल्यावर ‘क्लिंकर’ काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी बॉयलरमधील पिप होलमधून अचानक वाफ बाहेर पडली, ज्यामुळे कामगारांना दुखापत झाली. या अपघातात सचिन भागेवार, विवेक पाटील, तेजस सोनवणे, निखिल जायतगुडे, कमलेश बारमटे, गुलाबसिंग टिकाम, विलास बन्सोड आणि एन. के. काझी हे जखमी झाले. घटनेनंतर तात्काळ सर्व जखमींना नागपूर येथील मॅक्स हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सचिन भागेवार, तेजस सोनवणे आणि विलास बन्सोड यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, अधिकारी एन. के. काझी यांनाही सायंकाळपर्यंत सुटी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार पुरवत आहे. उर्वरित चार जणांवर उपचार सुरू असून, महानिर्मिती अपघातातील कर्मचाऱ्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार आहे. दरम्यान, या घटनेची सुरक्षा विभागाकडून सखोल चौकशी (सेफ्टी ऑडिट) सुरू करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार, कोणत्याही सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे अद्याप आढळून आलेले नाही. गेल्या महिन्यातही वाफ गळतीमुळे चार कामगार जखमी दरम्यान, गेल्या महिन्यात देखील कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाफ गळती झाल्याने चार कामगार किरकोळ जखमी झाले होते. ही घटना केंद्राच्या टर्बाइन देखभाल विभागात घडली होती. ६६० मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पात काम सुरू असताना गरम वाफ वाहून नेणाऱ्या नळीत अचानक गळती झाली. मोठ्या प्रमाणात गरम वाफ बाहेर पडल्याने जवळच काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हात आणि पायांवर वाफ गेली, ज्यामुळे त्यांना भाजले.
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आशाताईंनी मराठी आणि हिंदीच नाही तर तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा जवळपास २० भाषांमधील गाणी गायली. सुख-दु:खात त्यांची गाणी ऐकायचो. खासकरुन दु:खाच्या प्रसंगी त्यांची गाणी आधार वाटतात. आजही त्यांनी गायलेली हजारो गाणी कालची ताजी गाणी असल्याचा भास होतो. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत आशाताईंची गाणी अजरामर राहतील आणि संगीत प्रेमींना आनंद देत राहतील, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. आशा ताईंना अनेक पुरस्कार मिळाले पण मुख्यमंत्री असताना त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचे संधी मला मिळाली, याबद्दल मी भाग्यवान समजतो, असे ते म्हणाले. आशाताईंनी लाडकी बहिण योजनेचे कौतुक केले होते. १५०० रुपयांचे मोल किती आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यांच्या सुरुवातीच्या काळात ही योजना हवी होती, असेही आशाताई म्हणाल्या होत्या. कारण त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गरिबीचे चटके सहन केले होते, अशी आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवली. या दु:खद प्रसंगातून सावरण्याचे त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो, आशाताईंना शिवसेना पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राज्यातील पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत' आता वराह पालनाचा समावेश करण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) आज, १३ एप्रिल २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि मंत्री नितेश राणे यांनी या व्यवसायाला चालना देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, वराह पालनासाठी आता कुक्कुटपालन आणि मेंढी पालनाप्रमाणेच सवलती मिळणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाईल. या व्यवसायासाठी कर्जावर ४ टक्के व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. वराह पालनाचा ५+१ चा गट निश्चित करण्यात आला असून, यासाठी २,०८,१८७ रुपये प्रकल्प खर्च निश्चित करण्यात आला आहे. कोणाला मिळणार लाभ? (पात्रता आणि निकष) या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील दुर्बल घटकांना मिळणार आहे. यामध्ये खालील क्रमाने प्राधान्य दिले जाईल: विशेष आरक्षण: या योजनेत ५० टक्के जागा महिलांसाठी आणि ५ टक्के जागा दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. निवडीसाठी अटी व शर्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे खालील गोष्टी असणे अनिवार्य आहे: हे ही वाचा… राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय जाहीर:विकसित महाराष्ट्र 2047 कडे मोठी झेप; आशा भोसले यांच्या नावाने मुंबईत संगीत अकॅडमी राज्य सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाची स्थापना यांसारख्या मुद्द्यांसह ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या नावाने संगीत अकॅडमी उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. सविस्तर वाचा…
नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून युवकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सदर परिसरातील माऊंट रोडवरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार वारंवार घडत असून, यात संबंधित हॉटेलचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट डेटिंग ॲपवरून युवकांशी ओळख केली जाते. त्यानंतर संबंधित मुलगी त्यांना सदरमधील 'सुआ क्लब अँड रेस्ट्रो' येथे भेटण्यासाठी बोलावते. नागपूरमधील सदर भागात, माउंट रोडवर असलेला हा क्लब रात्री १ वाजेपर्यंत सुरू असतो. भेटीदरम्यान, मुलगी स्वतःहून मेन्यू कार्ड न दाखवता महागड्या पदार्थ आणि मद्याची ऑर्डर देते. युवकाला याची कल्पना नसताना मोठ्या प्रमाणात बिल तयार केले जाते. पीडितांकडून तब्बल ३० ते ३५ हजार रुपयांपर्यंत बिल वसूल करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारात, मुलगी मद्यपान केल्यानंतर अचानक हॉटेलमधून निघून जाते आणि संपूर्ण बिलाची जबाबदारी युवकावर टाकली जाते. एका पीडित युवकाने हिंमत करून सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत तीन ते चार पीडित समोर आले आहेत. यामागे हॉटेल व्यवस्थापन आणि संबंधित मुलगी यांच्यात संगनमत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुलगी प्रत्येक व्यवहारातून सुमारे १० ते २० टक्के कमिशन घेत असल्याची शक्यता आहे. हा प्रकार आतापर्यंत ४ ते ५ पीडितांसोबत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, संबंधित मुलीने शनिवारी रात्री ११ वाजल्यापासून फोन स्विच ऑफ केला आहे, मात्र व्हॉट्सॲप सुरू असल्यामुळे ती ऑनलाइन असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे नागपुरातील युवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी डेटिंग ॲपवरून भेटताना सतर्क राहावे, तसेच कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी पूर्ण माहिती घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील संशोधकांनी एक अभिनव उपाय शोधला आहे. त्यांनी ॲल्युमिनियमपासून 'स्मार्ट पिंजरा' तयार केला आहे, जो बिबट्याच्या हल्ल्यापासून संरक्षण देण्यासोबतच आजूबाजूच्या लोकांना सतर्क करतो. विद्यापीठाच्या पदव्युत्तर भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय जानराव ढोबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. अमित रमेश बनसोड यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. या पिंजऱ्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन नोंदणी प्रमाणपत्रही मिळाले आहे. या विशेष पिंजऱ्याची रचना जाळीदार असून तो डोक्यावर घट्ट बसवता येतो. उर्वरित भाग पाठीवर सुरक्षितपणे बसवलेला असतो. बिबट हल्ला करण्याच्या क्षणी पिंजऱ्यावरील हुक ओढताच तो संपूर्ण शरीराभोवती संरक्षक कवच तयार करतो. या पिंजऱ्यामध्ये आठ स्पीकर बसवलेले आहेत, जे त्वरित सक्रिय होऊन 'वाचवा-वाचवा', ढोल आणि इतर मोठ्या आवाजांचे सिग्नल निर्माण करतात. यामुळे बिबट घाबरून पळ काढतो, तसेच आसपासच्या लोकांना मदतीचा इशारा मिळतो. हा पिंजरा वापरण्यास सोपा असून त्यातील स्पीकर घरच्या घरी चार्ज करता येतात. सध्या विदर्भ आणि मराठवाडा भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जंगलक्षेत्र घटणे आणि पाण्याच्या टंचाईमुळे वन्यप्राणी गावांकडे येत असल्याने हल्ल्यांचा धोका वाढला आहे. अनेक ठिकाणी बिबट हल्ल्यांच्या घटना घडल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असताना या संशोधनाने आशेचा किरण दाखवला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिया पानेकर यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी बाजारात लिंबाच्या दराने विक्रमी उसळी घेतल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ईश्वरपूर परिसरात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यांवरची वर्दळ कमी होत आहे. त्याचबरोबर दुपारी नागरिक थंड पेयांकडे वळताना दिसत आहेत. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी टिकवण्यासाठी लिंबूपाणी पिण्याचा सल्ला देखील डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या […] The post आवक घटल्याने लिंबू महागले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (१२ एप्रिल) प्रचाराचा नारळ फोडला. यावेळेस आयोजित सभेत राजकीय भाषणांपेक्षा भावनांचा कल्लोळ अधिक पाहायला मिळाला. मंत्री अदिती तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मानस असल्याचे म्हटले होते. मात्र, याच विधानावरून आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये वाकयुद्ध पेटले आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या पहिल्याच सभेत मंत्री आदिती तटकरे अत्यंत भावूक झाल्या होत्या. आम्हा सर्व कार्यकर्त्यांची अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा होती. दुर्दैवाने ते स्वप्न अधुरे राहिले, पण सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून आम्ही दादांचे हे स्वप्न पूर्ण होताना पाहू इच्छितो, असे विधान त्यांनी केले. या विधानाने राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार या आगामी मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आहेत का? अशा चर्चांना उधाण आले. संजय राऊतांचा 'मास्टरस्ट्रोक' आणि भाजपला टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संधीचा फायदा घेत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राऊत म्हणाले, अजितदादांना मुख्यमंत्री होता आले नाही, पण जर भाजप सुनेत्रा वहिनींना मुख्यमंत्री करणार असेल, तर तो त्यांचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्यापूर्वी आपला वारसदार म्हणून एकनाथ शिंदेंऐवजी सुनेत्रा वहिनींचीच निवड करतात की काय? मला तर असे वाटतंय. गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर: उद्धव ठाकरेंना विसरलात का? संजय राऊतांच्या या टीकेला भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. महाजन म्हणाले, सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्री व्हावे असे कोणाला वाटत असेल, तर त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. पण संजय राऊत यांनी स्वतःच काही काळापूर्वी उद्धव ठाकरे हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे म्हटले होते, त्याचे काय? राऊतांच्या अशा बोलण्याने राजकीय वातावरण तापत नाही. 'पवार' आणि 'ठाकरे' नावाचे वलय दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करत सुनेत्रा पवारांना आठवण करून दिली. तुम्ही आज जे काही आहात, ते केवळ शरद पवारांमुळेच आहात. जसे आम्ही 'ठाकरे' या नावामुळे आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी जे वैभव निर्माण केले, त्यामुळे आमची ओळख आहे. तसेच बारामतीमध्ये 'पवार' नावाचे वलय हे शरद पवारांनीच निर्माण केले आहे, याचा विसर पडू देऊ नका. बारामती म्हणजे शरद पवार हे समीकरण विसरू नका, असे राऊत म्हणाले होते.
नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली आहे, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये पु्न्हा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्याला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फटका भारतासह जगभरातील देशांना बसण्याची शक्यता आहे. अशातच आता या संकटाच्या काळात भारताला मोठा […] The post ४० लाख बॅरल कच्चे तेल भारतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आशाताईंच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्याविषयीचे किस्से तसेच आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकातून आशाताईंच्या स्वभावावर भाष्य करत त्यांचे अनेक किस्सेही सांगितले आहेत. 'जीवलगा, राहिले दूर घर माझे' हे शांत शेळके यांनी लिहिलेले गाणे आशा भोसले यांनी गायले आहे. या गाण्याच्या वेळी घडलेला एक प्रसंग 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे. शांता शेळके लिहितात, आशा भोसले, माझी आशाची पहिली ओळख झाली तेव्हा तिची छबी ही साधे पाचवारी पातळ, पोलके, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, गच्च केसांच्या दोन वेण्या आणि हातात खूपशा सोन्याच्या बंगड्या घालणारी स्त्री अशी होती. जी मनमोकळ्या, लाघवी व थट्टेखोर स्वभावाची होती. 'जिवलगा, राहिले रे दूर घर माझे' हे मी लिहिलेले गाणे आशाने गायले अहे; त्याच्या रेकार्डिंगच्या वेळी तिने काठावर फाटलेली पांढरी रेशमी साडी घातली होती. त्या फाटलेल्या साडीला मी सुई दोऱ्याने चार टाके घातले होते. फाटकी साडी केवळ लकी आहे. म्हणून नेसणारी आशा ही अशी जरा मन:स्वी आहे. आशाचे तिच्या सर्व भावंडांवर प्रेम आहे व त्याचीच प्रचिती लता दीदींवर तिने लिहिलेल्या 'आमचे छोटे दादा' यामध्ये आली आहे, पण जिभेने ती जरा तिखट असल्याचेही शांत शेळके यांनी लिहिले आहे. पुढे शांता शेळके लिहितात, आशाला वाचनाची देखील विलक्षण आवड आहे,थोडक्यात काय तर मंगेशकरांच्या सोन्यासारख्या कलासंपन्नते बरोबरच या घराचे साधे निर्मळपणही आशाच्या रक्तात पुरेपूर भिनलेले आहे, स्वकष्टाने, जिद्दीने, धैयनि आणि कलेच्या अखंड साधनेने आशाने चित्रपटसृष्टीमध्ये आजचे हे मानाचे स्थान मिळवले आहे, अशी आठवण या पुस्तकात त्यांनी लिहिली आहे.
पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतgक केले आहे. राज्यात पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये गुन्हयांची ऑनलाईन नोंद करणे, गुन्ह्याचा तपास सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरणे, गुन्हेगारांची माहिती व पूर्वेतिहास पडताळून कारवाई करण्याचे काम केले जाते. त्यासाठी सीसीटीएनएस प्रणाली महत्वाची मानली जाते. हिंगोली जिल्ह्याचे कामकाज अधिक दर्जेदार व उत्कृष्ट व्हावे यासाठी पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांची नियुक्ती केली आहे. या शिवाय प्रत्येक पोलिस ठाण्यात दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे काम केले जाते. यासाठी जिल्हास्तरावर जमादार राजू हमाने, राहुल तडकसे, पूजा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून १३ पोलिस ठाण्याच्या कामगिरीकडे लक्ष ठेवले जाते. या सोबतच पोलिस ठाण्यांना येणाऱ्या अडचणीची सोडवणूक केली जाते. दरम्यान, राज्यात पोलिस दलाच्या ५३ घटनांमधून या प्रणालीचा आढावा घेत त्यांना गुण देण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात पहिला क्रमांक मिळविला आहे. सीसीटीएनएस विभागाच्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी सीसीटीएनएस विभागाचे अभिनंदन केले आहे.
नोएडा : येथे पगारवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करणा-या फॅक्टरी कर्मचा-यांचे आंदोलन सोमवारी सकाळी हिंसक झाले. सुनावणी न झाल्याने कर्मचारी संतप्त झाले. रस्त्यावर उतरले आणि दगडफेक केली. अनेक गाड्या आणि बसेसना आग लावली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची गाडी उलटवली. परिस्थिती बिघडल्याने जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कर्मचा-यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर […] The post कर्मचारी वेतनवाढीसाठी आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळगावात ‘ई-केवायसी’साठी शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करुन देण्याच्या नावाखाली जळगावात एका नराधमाने महिलांच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांकडे शरीरसुखाची आणि प्रेमसंबंधाची मागणी केल्याप्रकरणी गोकुळ चव्हाण नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-केवायसीच्या नावावर होणा-या खोट्याआमिषांना बळी पडू नका, असे आवाहन […] The post जळगावात ‘ई-केवायसी’साठी शरीरसुखाची मागणी, गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुरेंद्रनगरमध्ये ट्रकची धडक; सात ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक
राजकोट : वृत्तसंस्था सुरेंद्रनगर-विरमगाम महामार्गावरील ‘भास्कर पराना पाटिया’ जवळ एक भीषण अपघात घडलाय. या भयानक अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झालाय. एका ट्रक चालकाने १० जणांना धडक दिली, ज्यापैकी सात जणांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले; त्यांनी ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. राजकोट जिल्ह्यातील […] The post सुरेंद्रनगरमध्ये ट्रकची धडक; सात ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची ग्वाही दिली आहे. भोंदू अशोक खरातला 1825 मोठ्या आसामींचे कॉल आले होते. यात राकारणी, आयजी व तहसीलदारांसह अनेकांची नावे आहेत. त्यांची नावे ऐकूण सर्वांनाच हादरा बसेल. मी या प्रकरणी दोन दिवसांत मोठा खुलासा करेल, असे त्या म्हणाल्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे रान पेटले आहे. या प्रकरणात अनेक राजकाण्यांची नावे समोर आल्यामुळे एकच हल्लकल्लोळ माजला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणी पुढील दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची घोषणा केली आहे. त्या म्हणाल्या, मी येत्या बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात अशोक खरातचे सर्व कारनामे सांगणार आहे. आताच्या घटकेला माझ्याकडे जी माहिती व एक्सेलशिट आहे, त्यात 1825 नंबर आहेत. या लोकांनी अशोक खरातला कॉल केले व खरातने त्यांना कॉल केले. सर्वात धक्कादायक म्हणजे या नंबर्समध्ये आयजी पातळीवरील अधिकारी, पीआय, सीनिअर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर व राजकारण्यांचाही समावेश आहे. त्यांची नावे ऐकूण तुम्हा सर्वांना धक्का बसेल. या व्यक्तीची पोहोच किती मोठी आहे हे खरेच कळत नाही. कारण, यात ट्रॅफिक हवालदारापासून पोलिस ठाण्यातील असंख्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही संपूर्ण माहिती आता पोलिस अधिकाऱ्यांना पाठवली आहे. पण बुधवारी मी याचा नक्की खुलासा करेन. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीवरही भाष्य अंजली दमानिया यांनी यावेळी रुपाली चाकणकर यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, भोंदू अशोक खरात प्रकरणात अजूनही असंख्य खुलासे होतील. विशेषतः आज प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. त्यांची जी माहिती होती ती अफाट आहे. त्यांचे कॉल्स कमी होते, पण त्यांचे एसएसएमस प्रचंड प्रमाणात होते. म्हणजे हे सर्व व्यवहाराचे मेसेज होते. काही महत्त्वाच्या डिटेल्स मी शिर्डी पोलिस ठाण्याला पाठवल्या आहेत. ईडीची खरातच्या 11 ठिकाणांवर छापेमारी दुसरीकडे, ईडीने आज अशोक खरातच्या विविध ठिकाणांवर छापेमारी केली. अंजली दमानिया यांनी यावरही भाष्य केले. ईडीची सध्या 11 ठिकाणी चौकशी सुरू आहे. रोज नवनवे खुलासे होत आहेत. हे पाहून अतिशय धक्का बसतो. अशोक खरातचा ठाण्याशीही संबंध आढळला आहे. मी या प्रकरणी बुधवारी गुगल मॅपसह खुलासा करेल, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
नाशिक येथील धर्मांतर प्रकरणामागे महिला ‘मास्टरमाईंड’
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील हिंदू महिला कर्मचा-यांच्या लैगिंक शोषण आणि जबरधस्तीने धर्मांतर प्रकरणात एक महिला ‘मास्टरमाइंड’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनी अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल होताच सावध झाल्याने ती फरार झाली असून, तिचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांना तपासात अडचण येत आहे. निदा खान असे संशयित फरार महिलेचे नाव आहे. तीच […] The post नाशिक येथील धर्मांतर प्रकरणामागे महिला ‘मास्टरमाईंड’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मतदार यादीच्या फिल्टरचा बंगालच्या सत्तेवर परिणाम
कोलकाता : यंदा प. बंगालमध्ये ख-या अर्थाने विजयाचे गणित २९४ पैकी ६५ ते ७० मतदारसंघांतील ठराविक मतदान केंद्रांवर अवलंबून असणार आहे. कारण, राज्यात मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणानंतर (एसआयआर) या मतदारसंघांतील चित्रच बदलून गेले आहे. एसआयआरनंतर बंगालमध्ये सुमारे ९१ लाख नावे मतदारयाद्यांतून वगळली आहेत. याचा परिणाम या मतदारसंघांत निश्चित जाणवणार आहे. यात प्रामुख्याने नंदीग्रामपासून भवानीपूरपर्यंतच्या जागा, तसेच […] The post मतदार यादीच्या फिल्टरचा बंगालच्या सत्तेवर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गडचिरोली : छत्तीसगडमध्ये माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळत असून पखांजूर भागातील माचपल्ली जंगलात १३ एप्रिल रोजी सकाळी झालेल्या भीषण चकमकीत सुरक्षा दलाने जहाल माओवादी आणि मेढकी एलओएस कमांडर रूपी हिला कंठस्रान घातले. रूपीच्या खात्म्यामुळे नक्षल्यांच्या नेटवर्कला मोठा हादरा बसला असून बड्या कॅडरचा प्रभाव आता ओसरू लागला आहे. छत्तीसगडच्या बस्तर मध्ये शेवटच्या सहा जहाल माओवादी कमांडरसाठी […] The post जहाल नक्षल कमांडर ‘रूपी’ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी ७ वर्षात भारत ऑटो इंडस्ट्रीचा किंग
नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र सातत्याने विस्तारताना आणि नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना दिसत आहे. आगामी ७ वर्षांत भारत जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ बनेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. भारत जपानला मागे टाकत सध्या जगातील तिस-या क्रमांकाची सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठेच्या रुपात समोर आला आह. […] The post आगामी ७ वर्षात भारत ऑटो इंडस्ट्रीचा किंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कंपन्यांकडून लाचार कर्मचा-यांचे पगारी शोषण
नोएडा/नवी दिल्ली : मागील ३ दिवसांपासून खासगी कर्मचा-यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले. कालपर्यंत जे आंदोलक घोषणाबाजी आणि शांततेत विरोध प्रदर्शन करत होते त्यांनी सोमवारी हिंसक पाऊल उचलले. शेकडोंच्या संख्येने कर्मचारी रस्त्यावर उतरले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. जाळपोळीचे प्रकारही सुरू झाले. परिस्थिती बिघडताच पोलिसांनी तातडीने मोर्चा […] The post कंपन्यांकडून लाचार कर्मचा-यांचे पगारी शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रासह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारतरत्न सचिन तेंडुलकरने अंत्यदर्शनावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात त्यांच्याशी झालेल्या संभाषणाचे हृदयस्पर्शी आठवणींचे पदर उलगडत आपला शोक व्यक्त केला आहे. तसेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आशाताईंसोबतचा एक किस्सा सांगितला आहे. अलौकिक, अवलिया आशा ताई! असे म्हणत विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिले की, नुकतीच सचिननी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. उमंग या पोलीस कल्याण कार्यक्रमात आम्ही सचिनचा सत्कार करायचे योजिलें होते. तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तीच्या हातून सचिनचा सन्मान व्हायला हवा होता. त्यावेळी पहिल्यांदा आशाताईंशी बोललो. निमंत्रण दिले. त्यांनीही आढेवेढे न घेता स्वीकारले. कार्यक्रम नक्षत्रासारखा देखणा झाला. या प्रासंगिक निमित्ताने ताईंशी माझा ऋणानुबंध जमला. संभाजीनगरला मी आयजी होतो त्यावेळी आशाताईंचा शो होता. दहा वाजले. मी सहकुटुंब हजर होतो. शो रंगात आला होता. प्रेक्षक बेभान होऊन 'दम मारो दम' वर नाचत होते. वन्स मोर चा नादघोष बंद होईना. त्यावेळी आशा ताई माईक वरून बोलल्या माझा भाऊ इथं आयजी आहे, त्याला मला धर्मसंकटात टाकायचं नाही आणि कार्यक्रम डॉट टाइम वर बंद केला. पोटभर चिकन मटण फिश खाऊ घालायच्या.. काहीतरी कारणाने आशाताईंचा फोन यायचा अधून मधून ! भेटही व्हायची! महिन्याभरापूर्वी फोन करून मला लोअर परेलला घरी बोलावले. एका अबलेच्या गाऱ्हाण्यासाठी! परित्यक्ता होती पण सोडून गेलेला नवरा दारू पिऊन येऊन मारत होता. बिचारीच्या नावावर एक खोली होती. ती लाटण्यासाठी तिचा खून करेल अशी तिला भीती वाटत होती. मला तर पोलिसांनी ऍक्शन घ्यावी हे सांगितलेच. पण एका प्रथितयश महिला वकीलाला फोन करून तिची डोमेस्टिक व्हायलंस ची केस घ्यायला लावली. जी काही फी आहे ती मी देईन असे त्या वकील बाईंना सांगितले. ज्या ज्या वेळी घरी बोलवायच्या, पोटभर चिकन मटण फिश खाऊ घालायच्या. अशा कशा आशाताई मला जेऊ न घालताच गेल्या शेवटचा फोन गेल्या आठवड्यात आला. आंध्रप्रदेशमधील एका गरीब महिला त्यांच्या घरी काम करते. तिच्या घरी घरफोडी झाली होती. होते न्हवते ते सगळे चोरीला गेले होते. मी माझ्या बॅचमेटला फोन केला. त्याने सूत्रे हलवली. चोर सापडला आणि सगळा मुद्देमालही. आशाताई सॉलिड खुश झाल्या. मला हरखून फोन केला. पुन्हा जेवायचे आमंत्रण दिले. मी त्यांच्या सहवासासाठी आणि चवदार मेजवानीसाठी आसुसलेला असायचो . पण अशा कशा आशाताई मला जेऊ न घालताच भुर्रर्र उडून गेल्या. आशाताईंच्या सुरांच्या मैफिलीत भिजून चिंब होण्याची मजा वेगळीच त्यांची गाणी ही अशीच झटका देणारी. आर्त भावना जागवणारी, प्रेमात पाडणारी, विरह, वेदना,प्रणय, सौंदर्य, साफल्य सगळ्या भावांचा अविष्कार घडविणारी! प्रचंड वैविध्याच्या छटा आपल्या हरहुन्नरी, ऊर्जादायी, विजिगिषु आवाजातून आशाताई श्रावकाच्या हृदयात, मनात आणि रोमारोमांत भिनवायच्या. त्यांचा सुरेल आवाज हा नखशिखांत रोमांच उभे करायचा. त्यांच्या सुरांच्या मैफिलीत भिजून चिंब होण्याची मजा वेगळीच! स्वरविश्वाचं आकाश आता पुरत रीत झालं स्वतःला एवढं सुंदर जपणाऱ्या, सर्वांची सदोदित काळजी घेणाऱ्या, इतरांच्या जीवनात मोगरा फुलवणाऱ्या, स्वरांचा अगाध बेबंद धबधबा असणाऱ्या, चिरतरुण आशाताई नावाप्रमाणेच प्रचंड आशावादी होत्या. लतादीदीनंतर मोकळं झालेलं स्वरविश्वाचं आकाश आता पुरत रीत झालं आहे. ती अवीट गोडी, ते चंचल तारुण्य, ते थिरकणार डौलदार पाऊल, ती अप्रतिम अदा कुठे कशी शोधून सापडणार ! ताई तुम्ही अनंतात विलीन झाल्या आहात ! त्या अनंताला किती आनंद झाला असेल. तुम्हाला आणि तुमच्या सर्वांगसुंदर व्यक्तित्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमधील बिल्डर लॉबीमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, शहरातील 49 नामांकित बिल्डरांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नियमांनुसार, चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये 20 टक्के जागा किंवा घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ही घरे किंवा जमीन म्हाडाकडे वर्ग करणे आवश्यक असते. मात्र, काही विकासकांनी प्रकल्पाचे क्षेत्र कागदोपत्री कमी दाखवून किंवा नियमांतील पळवाटा वापरून ही जबाबदारी टाळल्याचा प्राथमिक तपासात उलगडा झाला आहे. या गैरप्रकारामुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप आहे. जे घरकुल गरजूंना मिळायला हवे होते, तीच घरे विकासकांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणामुळे गृहनिर्माण क्षेत्रातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनावरही टीका होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर गठीत करण्यात आलेल्या एसआयटीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती तयार करण्यात आली असून त्यात जमाबंदी आयुक्त, नोंदणी महानिरीक्षक, नाशिक पोलिस आयुक्त, नगररचना संचालक आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या पथकाला सर्व कागदपत्रांची तपासणी करून संपूर्ण घोटाळ्याचा तपशील उघड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या विकासकांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. इतकेच नव्हे तर या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा बिल्डरांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवरही कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि विकासक या दोघांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दरम्यान, या एसआयटीला एका महिन्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील मोठ्या बिल्डरांची नावे पुढे येऊ शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात निर्माण झालेल्या या वादाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजनला अनुसरून विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः शासन सेवेतील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देण्यात आला असून, यामुळे भविष्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासन सेवेतील पदभरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध सेवांच्या संवर्गांची संख्या 53 वरून थेट 153 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त परीक्षा योजनेतही काही नव्या सेवांचा समावेश करण्यात येणार असून, त्यामुळे उमेदवारांसाठी संधी वाढणार आहे. याशिवाय, केंद्रातील यूपीएससीच्या धर्तीवर ‘महाजॉब्स पोर्टल’च्या माध्यमातून ‘निपुण सेतू’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे भरती प्रक्रिया अधिक सुलभ आणि आधुनिक होईल. नगरविकास विभागाने कुळगाव-बदलापूर परिसरातील विकास आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये स्टेडियमसाठी राखीव असलेल्या जागेचा काही भाग वीज उपकेंद्रासाठी देण्यात येणार आहे. सुमारे चार एकर जमीन टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित केली जाणार असून, यामुळे परिसरातील वीज पुरवठा व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. मुंबईमध्ये आयईएस स्किल टेक विद्यापीठ शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये ‘आयईएस स्किल टेक विद्यापीठ’ स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. हे विद्यापीठ कायमस्वरूपी स्वयंअर्थसहाय्यित खासगी स्वरूपात उभारले जाणार आहे. या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर देण्यात येणार असून, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मच्छिमारांसाठी मूलभूत सुविधा ग्रामीण आणि सागरी भागांच्या विकासासाठीही महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत सागरी जिल्ह्यांतील मच्छिमारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी 61 कोटी 24 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मच्छिमारांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल. आरोग्य व्यवस्थेत गुणात्मक बदल आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली, नर्सिंग सेवा आणि आरोग्य सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून 3 हजार 708 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या निधीतून सशक्तीकरण प्रकल्प राबवून आरोग्य व्यवस्थेत गुणात्मक बदल घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमात सुधारणा याशिवाय, नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या सहा जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील 177 तालुक्यांमध्ये संतुलित आणि गतिमान विकासाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमात सुधारणा करून सदस्यांची नियुक्ती निवडणुकीऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीने करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सर्व निर्णयांमुळे प्रशासनिक आणि विकासात्मक कामकाजाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्रिमंडळ निर्णय
रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून बिष्णोई गँगची उघड धमकी:RTO अधिकाऱ्याला धमकीने खळबळ
मुंबईत रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावामुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी जगतातील बिष्णोई गँगने थेट हस्तक्षेप करत मिरा-भाईंदरमधील RTO अधिकाऱ्याला धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथील वाहतूक विभागातील अधिकारी नलावडे यांना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून धमकी देण्यात आली. ही धमकी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. बिष्णोई गँग अमराठी रिक्षाचालकांच्या बाजूने उभी राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या घटनेमुळे प्रशासनात आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, मुंबईत रिक्षा चालवायची असल्यास चालकाला मराठी भाषा येणे बंधनकारक करण्यात येईल. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचाही इशारा त्यांनी दिला होता. या वक्तव्यामुळे विविध स्तरांवरून प्रतिक्रिया उमटल्या आणि भाषिक वाद पुन्हा चर्चेत आला. या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिंदी भाषिक विभागाचे प्रमुख मनीष दुबे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, रिक्षाचालक हे मुंबईच्या वाहतुकीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. अनेक चालकांनी कर्ज काढून रिक्षा घेतली असून ते लाखो प्रवाशांना सेवा देतात. अशा परिस्थितीत अचानक भाषिक अट लादणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मनीष दुबे यांनी पुढे सुचवले की, मराठी भाषा शिकण्यास विरोध नाही, मात्र त्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांनी सांगितले की, जर सरकारने एक वर्षाचा कालावधी दिला आणि 1 एप्रिल 2027 पर्यंत मराठी शिकण्याची अट ठेवली, तर त्याला समर्थन देता येईल. पण अल्प कालावधीत सक्तीचा निर्णय घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात बिष्णोई गँगच्या धमकीने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. प्रशासनाने या धमकीची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही उपाययोजना करण्यात येत आहेत. या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. प्रशासनासमोर मोठे आव्हान एकूणच, मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आणि गुन्हेगारी अशा दोन्ही पातळ्यांवर पोहोचला आहे. पुढील काळात सरकार या मुद्द्यावर काय भूमिका घेते आणि तपास यंत्रणा या धमकीप्रकरणी काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील भाषिक समतोल राखताना प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर केलेले लैंगिक अत्याचार आणि त्याचे समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले संतापजनक व्हिडिओ यामुळे संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या गंभीर प्रकरणाची आता एसआयटी मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे पडसाद राजकीय वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर उमटत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आणल्याने खळबळ आणखी वाढली आहे. रोहित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, या प्रकरणात केवळ सामान्य लोक किंवा अराजकीय व्यक्तींचे नव्हे तर राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ आहेत. खरातसोबत राजकीय लोकांचेही व्हिडिओ आहेत का? असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. तसेच या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. खरातसोबत राजकीय नेत्यांचेही व्हिडिओ पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, नाशिकमध्ये 35 हनी ट्रॅप प्रकरणे समोर आली आहेत. त्यात काय कारवाई झाली? संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला का? काही अधिकाऱ्यांना गप्प केले गेले का? हे व्हिडिओ बाहेर कसे आले? हे सामान्य लोकांचे व्हिडिओ आहेत असे सांगितले जाते, पण खरेतर यात राजकीय लोकांचे व्हिडिओ आहेत. कोणाचे आहेत, कोण कोण त्यांच्यासोबत होते, हे सर्व उघडपणे समोर यायला हवे. रोहित पवारांची भाजपवर टीका रोहित पवारांनी भाजपवर गंभीर आरोप करताना म्हटले की, भाजप नेहमी आपल्या मित्र पक्षांना संपवण्यासाठी असे प्रकार करते. नितीश कुमारचे काय झाले? साताऱ्यात काय चालले आहे? आता जर चौकशी करायची असेल तर सगळ्यांना करा. सर्व नेत्यांची चौकशी व्हायला पाहिजे. त्या गेल्या पण इतर लोक का बाहेर येत नाही. एसआयटीचा चुकीचा वापर लोक करत असतील, काही लपवत असतील, काही नेते म्हणत आहेत की आमच्या लोकांचे व्हिडिओ पुढे येऊ देऊ नका. एसआयटीचा वापर सिस्टम क्लियर करण्यासाठी करा, असेही पवार म्हणाले. खरातच्या जमिनी विका आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरा अशोक खरातच्या जमीन व्यवहार प्रकरणी रोहित पवार म्हणाले, समृद्धी मार्ग कसा जाणार हे माहीत असल्याने काही राजकीय लोकांनी जमिनी घेतल्या. खरातला आतून माहिती मिळाली त्यामुळे भोंदूबाबाचाही फायदा झाला. खऱ्या शेतकऱ्याचा या समृद्धी महामार्गाला विरोध होता. आता जे खरे शेतकरी आहेत त्यांचा शक्ती मार्गाला विरोध आहे. तसेच पुढे रोहित पवार म्हणाले, खरातच्या जमिनी विका आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरा, पण लवकर करा, असेही त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.
महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली आहे. अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी त्याच्यावर तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत. विशेष तपास पथक या सर्वच प्रकरणाचा कसून तपास करत आहे. आज त्याची पोलिस कोठडी संपत असल्यामुळे त्याला व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून कोर्टापुढे हजर करण्यात आले. सुनावणीला सुरुवात होताच, न्यायाधीशांनी खरातला त्याचे नाव विचारले. त्यानंतर पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का? अशी विचारणाही केली. त्यावर खरातने हात जोडत नकार दर्शवला. खरातला उद्याही कोर्टापुढे हजर करणार यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सरकारी पक्षाने तिसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीचा हक्क अबाधित राखून खरातला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्याची परवानगी मागितली. त्यावर कोर्टाने वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा ताबा घेण्याची सूचना केली. त्यानुसार, आता वैद्यकीय तपासणीनंतर पुन्हा उद्या त्याला कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याही त्याला आजच्यासारखेच ऑनलाईन पद्धीतने कोर्टापुढे हजर केले जाण्याची शक्यता आहे. ईडीची नाशिक, पुणे, शिर्डीत छापेमारी दुसरीकडे, ईडीने या प्रकरणी अशोक खरातच्या नाशिक येथे 5, पुण्यात 3 व शिर्डी परिसरातील 3 ठिकाणांवर छापेमारी केली आहे. नाशिकच्या तृप्ताबाला निवासस्थानीही ईडीने छापेमारी केली आहे. तिथे खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहता येथील शाखेत ईडीचे अधिकारी पोहोचलेत. ते तिथे अशोक खरात नॉमिनी असलेल्या 100 खात्यांची चौकशी करत आहेत. या खात्यांमधून तब्बल 60 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे. हे ही वाचा… प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिसांपुढे हजर:पतसंस्थेतील 2 कोटी 40 लाख रुपयांचा हिशोब देणार; प्रतिभा ह्या रुपाली चाकणकरांच्या भगिनी भोंदू अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकर यांची बहीण असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला होता. अशोक खरातने जी खाती वापरली, त्या खात्यांमध्ये प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्यांचे मुलांच्या खात्यांचा सुद्धा समावेश होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांची चौकशी होणार आहे. वाचा सविस्तर
स्वरस्वामिनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
मुंबई : ख्यातनाम पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या लोअर परळमधील निवासस्थानी सर्वसामान्यांना त्यांचे अंतिमदर्शन घेता येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, आयपीएस विश्वास नांगरे पाटील, माजी […] The post स्वरस्वामिनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात मंगळवारी ता. १४ सलग १० तास अभ्यास करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाणार आहे. या उपक्रमात दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहे. त्याबाबतचे नियोजनही महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मिरवणुक, समाज प्रबोधन कार्यक्रम, अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली शहर निळ्या ध्वजांनी सजले आहे. या शिवाय भव्य आकाराचे निळे ध्वज, रुमाल, टोप्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. दरम्यान, हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाने यावर्षी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी प्रत्यक्ष कृतिशील अभ्यासात्मक अभिवादन करावे या उद्देशाने १० तास अभ्यास करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी ता. १४ सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत १० तास अभ्यास केला जाणार आहे. महाविद्यालयातील अभ्यासिकेमध्ये सुमारे २०० विद्यार्थी बसू शकतील असे नियोजन करण्यात आले आहे. उपक्रमात सहभागी सर्वांसाठी सकाळी चहा-बिस्कीट, फळे त्यानंतर ज्यूस, नाश्ता व भोजनाची व्यवस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यानी फक्त अभ्यासाची पुस्तके ,साधने सोबत आणणे आवश्यक आहे. या उपक्रमात डॉक्टर्स, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. पालकांनी या उपक्रमास भेट देऊन प्रोत्साहन द्यावे - डॉ. चक्रधर मुंगल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यार्थ्यांनी अभ्यासात्मक अभिवादन करून कठोर, दीर्घ अभ्यासाची प्रेरणा घ्यावी यासाठी या अभ्यासाच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. वैद्यकिय महाविद्यालयासह इतर विद्यार्थ्यांनीही याउपक्रमात सहभागी नोंदवावा. तसेच पालकांनी या उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर चक्रधर यांनी केले आहे.
अविनाश धर्माधिकारी स्थापन करणार विद्यापीठ:भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देणार
चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुणे येथे आयोजित एका नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने अविनाश धर्माधिकारी यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चाणक्य मंडल परिवाराच्या तीन दशकांच्या वाटचालीच्या आणि चाणक्य मंडल विश्वविद्यालयाच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार करण्यात आला. केसरी वाड्याच्या लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना धर्माधिकारी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ आव्हान नसून त्यात अनेक संधी दडल्या आहेत. संस्कृत भाषा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदमसाठी अत्यंत उपयुक्त असून परदेशात त्यावर अभ्यास सुरू आहे, मात्र आपल्याला त्याची पुरेशी माहिती नाही. नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांचा वारसा लाभलेला असताना, पाश्चात्त्य शिक्षण प्रणालीचे अनुकरण न करता जागतिक पातळीवर सिद्ध होईल असे विद्यापीठ येत्या काळात आकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, ज्ञानाधिष्ठित समाज घडवणे ही काळाची गरज आहे. अविनाश धर्माधिकारी केवळ स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी घडवत नाहीत, तर राष्ट्राला समर्पित शिस्तबद्ध फळी निर्माण करत आहेत. ते या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिल्पकार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, समाजाला ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत करून देण्याचे धर्माधिकारींचे कार्य मोलाचे असून ते राष्ट्रनिर्मितीचे अखंड साधक आहेत. भारतीय ज्ञानाला जगभरात नेण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे योगदान महत्त्वाचे आहे.
शरद मोहोळ खून प्रकरण:वकील आरोपी संजय उधाणचा जामीन फेटाळला; आरोपींना मदत केल्याचे आढळले पुरावे
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणात आरोपी असलेल्या वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी संजय उधाण याने गुन्ह्याच्या कटकारस्थानात सहभाग घेतला होता, तसेच गुन्ह्यानंतर आरोपींना मदत केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आढळल्याचे न्यायालयाने नमूद केले. संजय उधाण असे या वकिलाचे नाव आहे. विशेष सरकारी वकील ॲड. प्रदीप सिंग राजपूत यांनी, तसेच मूळ फिर्यादीचे वकील ॲड. खेतराम सोलंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव आणि ॲड. तेजस सावंत यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. घटनेनंतर लगेचच आरोपी संजय उधाण यांचा मुख्य आरोपी नामदेव कांगुडे याच्याशी फोनवर संपर्क झाला होता. त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गोळीबार करणारे साहिल पोळेकर, नामदेव कांगुडे आणि चंद्रकांत शेलके यांना आपल्या गाडीतून पळून जाण्यास मदत केली, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. उधाण यांनी सहआरोपी वकील रवी पवार यांच्याशी संपर्क साधून इतर आरोपींना गाडीतून हलविण्याची व्यवस्था केली. तसेच, सहआरोपींना सिम कार्ड नष्ट करण्याचा सल्ला दिला गेला आणि खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ नवीन सिम कार्ड पुरविण्यात आले. आरोपीने नवी मुंबई क्राईम ब्रांचमधील अधिकाऱ्याशी संपर्क साधून आत्मसमर्पणाबाबत चर्चा करण्याचाही प्रयत्न केला होता, यावरून त्यांना गुन्ह्याची पूर्वकल्पना असल्याचे दिसून येते, असे ॲड. राजपूत आणि सोलंकी यांनी जामीनाला विरोध करताना सांगितले. बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, संजय उधाण हे व्यवसायाने वकील असून आरोपी त्यांचे पूर्वीचे पक्षकार होते. त्यांच्याशी झालेला संपर्क केवळ व्यावसायिक स्वरूपाचा होता. तसेच, सहआरोपी रवी पवार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने समानतेच्या तत्त्वावर त्यांनाही जामीन द्यावा, अशी मागणी बचाव पक्षाने केली. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावताना नमूद केले की, रवी पवार यांची भूमिका मर्यादित होती आणि त्यांचा थेट शूटरांशी संपर्क नव्हता. उलट, संजय उधाण यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत करणे, त्यांच्या हालचालींचे समन्वय करणे आणि आत्मसमर्पणाबाबत प्रयत्न करणे यावरून त्यांचा गुन्ह्यातील सक्रिय सहभाग प्रथमदर्शनी दिसून येतो. न्यायालयाने 'कायदेशीर सल्ला' या बचावालाही नाकारले.
खासदार श्रीकांत शिंदेंचा ग्रामीण दौरा सुरू:छत्रपती संभाजीनगरमध्ये ३०० पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर शिवसेना नेत्यांनी पक्ष विस्ताराला प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ग्रामीण महाराष्ट्राचा दौरा रविवारपासून सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात खासदार डॉ. शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सुमारे ३०० पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री उदय सामंत, खासदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, हिकमत उढाण, संजना जाधव, रमेश बोरनारे, विलास भुमारे, प्रदीप जैस्वाल, संपर्क प्रमुख विलास पारकर, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, प्रकाश महाजन आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर आणि जालना लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक घेण्यात आली. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना कशा पद्धतीने काम करत आहे, याचा आढावा घेण्यात आला. शेवटच्या स्तरावरील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. शिवसेना राज्यात आणि केंद्रात सत्तेत असल्याने, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश खासदार डॉ. शिंदे यांनी दिले. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवावेत आणि महायुती सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. भविष्यात पक्षाकडून वारंवार बैठका घेतल्या जातील, असेही ते म्हणाले. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, नगर परिषदा आणि पंचायत समितींमध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून पक्ष विस्तारासाठी काम करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. ज्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला, तिथली कारणे शोधून कामात सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यापूर्वी खासदार डॉ. शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांचा तसेच मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. दरम्यान, बैठकीपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी दोन मिनिटे मौन पाळून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. दैवी शक्ती आणि तंत्र-मंत्राच्या आड महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे. आता या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब उघड झाली असून, सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही खरातने लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टीज’ या कार्यालयावर छापा टाकला असता, तेथे हिरवट रंगाचे संशयास्पद द्रव्य सापडले आहे. हे द्रव्य नेमके काय आहे, याबाबत मोठे गूढ निर्माण झाले आहे. प्राथमिक तपासात हे द्रव्य महिलांना गुंगी आणण्यासाठी किंवा त्यांच्यावर मानसिक प्रभाव टाकण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या द्रव्याचे नमुने तातडीने रासायनिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तपास यंत्रणांच्या मते, या प्रकरणात जप्त करण्यात आलेला पेनड्राइव्ह आणि हे हिरवे द्रव्य हे दोन अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरू शकतात. या पुराव्यांच्या आधारे खरातच्या गुन्हेगारी जाळ्याचा अधिक खोलवर उलगडा होण्याची शक्यता आहे. तपासाचा वेग वाढवण्यात आला असून, प्रत्येक बाब बारकाईने तपासली जात आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या द्रव्याचे खरे स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या प्रकरणात खरातची पोलिस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज, 13 एप्रिल रोजी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे. एसआयटीकडून पुढील तपासासाठी त्याची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरातविरोधात आतापर्यंत लैंगिक शोषण, खंडणी, सावकारी आणि फसवणूक अशा विविध प्रकारचे एकूण 14 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात चिंचोंक्याचे खडे बनवणारा व्यावसायिक महेश कलंत्री तसेच खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीतून खरातच्या कार्यपद्धतीबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तपास अधिकाऱ्यांनी तयार केलेला सविस्तर अहवाल आज न्यायालयात सादर केला जाणार आहे. यामध्ये खरातने महिलांना कशा प्रकारे जाळ्यात ओढले, त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या, याचा तपशील दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, सात महिन्यांच्या गरोदर महिलेशी संबंधित प्रकरणामुळे या तपासाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आजच्या सुनावणीत सरकार पक्षाची भूमिका आणि न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, तिसऱ्या गुन्ह्यातील आरोपीला चौथ्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी एसआयटीकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

29 C