नेस्लेच्या बेबी मिल्क पावडरमध्ये विषारी घटक?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जागतिक अन्न आणि पोषण उद्योगाताली आघाडीची कंपनी नेस्ले सध्या मोठ्या अन्न सुरक्षा संकटाला सामोरे जात आहे. बाळाच्या दूध पावडरमध्ये विषारी घटक आढळण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने तब्बल २५ देशांतील बालक पोषण उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. या परत मागविलेल्या बॅचेस केवळ व्यावसायिक दृष्टीनेच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य, ग्राहकांचा विश्वास आणि जागतिक अन्नसुरक्षा […] The post नेस्लेच्या बेबी मिल्क पावडरमध्ये विषारी घटक? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रशियाकडून तेल खरेदी केल्यास ५०० टक्के कर?
अमेरिकेचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब, भारतालाही धक्का? वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेत द्विपक्षीय निर्बंध विधेयकाचा मार्ग मोकळा केला आहे. या विधेयकात भारतासह रशियासोबत व्यापार सुरू ठेवणा-या देशांवर ५०० टक्के प्रचंड टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारचा कर लादण्याचा थेट इशारा दिला आहे. रशियाकडून थेट […] The post रशियाकडून तेल खरेदी केल्यास ५०० टक्के कर? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात
लातूर : प्रतिनिधी विरोधक दरवर्षी दोन कोटी नोक-या देतो म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रूपये टाकतो म्हणाले, पण लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नसते. तर दुसरीकडे लोकनेते विलासराव देशमुखसाहेबांनी लातूरसाठी खूप योजना आणून चौफेर विकास केला. अन् कांही लोक त्यांचे नाव पुसणार म्हणात. तुम्ही काय नाव पुसणार, लोकनेते विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात कोरलेले आहेत, असे प्रतिपादन […] The post विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दडपशाही, हुकूमशाही आमची संस्कृती नाही
लातूर : प्रतिनिधी आम्ही लोकशाही मार्गाने चालणारी माणस असून आम्हाला दडपशाही हुकूमशाही टक्केवारी कधी जमलीच नाही ती आमची संस्कृती ही नाही लाकशाही मार्गाने तुमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आमच्या हाती महापालिका निवडणूकीत काँगे्रस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच्या सर्व उमदवारांना विजयी करून मतदान स्वरुपी ताकत द्या, असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवृत्ती बँकेचे […] The post दडपशाही, हुकूमशाही आमची संस्कृती नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपणा-यांपासून सावध राहा
लातूर : प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक ५ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. काँगेसला आव्हान देण्यासाठी काही लोकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सामिल झाले आहेत. त्यांच्यापासून सावध राहा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक ५ मधील उमेदवार […] The post काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपणा-यांपासून सावध राहा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस-वंचित आघाडीला अपक्ष उमेदवार वैरागे यांचा पाठिंबा
लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातुर शहरातील प्रभाग ११ मधील अपक्ष उमेदवार आनंद वैरागे, प्रभाग क्रमांक ६ मधील अपक्ष उमेदवार महोव घोडके यांनी आपल्या समर्थकांसह लातुर शहर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी महादेव घोडके यांची […] The post काँग्रेस-वंचित आघाडीला अपक्ष उमेदवार वैरागे यांचा पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपने बंडखोरांसह ३२ जणांचे केले ६ वर्षासाठी निलंबन
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी भाजपने चांगलीच गंभीरतेने घेतली आहे. बंडखोरांसोबतच पक्षविरोधी कारवाया करणा-या ३२ जणांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून उमेदवारांविरोधात छुपा प्रचार करणा-या काही माजी नगरसेवकांमध्ये आता धास्ती निर्माण झाली आहे. २०१७ साली भाजपने अशाच पद्धतीने ६५ जणांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. शहरातील […] The post भाजपने बंडखोरांसह ३२ जणांचे केले ६ वर्षासाठी निलंबन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात शूटर अब्दुल रऊफ मर्चंट याचा आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मर्चंटची प्रकृती खालावलेली होती आणि आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. गुलशन कुमार हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या मर्चंटच्या निधनामुळे या प्रकरणातील एका वादग्रस्त प्रकरणाचा अंत झाला आहे. 30 डिसेंबर रोजी सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रऊफ मर्चंटला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने 4 जानेवारीला त्याला पुन्हा कारागृहात हलवण्यात आले. त्यानंतर आज गुरुवारी (दिनांक 8 जानेवारी) सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मर्चंटच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून, त्याच्यावर योग्य उपचार न झाल्यामुळेच हा मृत्यू ओढवल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. गुलशन कुमार यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या होत्या ऑगस्ट 1997 मध्ये टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची मुंबईत अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ते मंदिरातून परतत असताना कुख्यात गँगस्टर अबू सालेमचा शूटर अब्दुल रऊफ मर्चंट याने त्यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या होत्या. केवळ हत्या करणे हाच उद्देश नसून अंडरवर्ल्डची दहशत पसरवण्यासाठी त्याने हे क्रूर कृत्य केले होते. असे म्हटले जाते की, गोळीबार केल्यानंतर मर्चंटने अबू सालेमला फोन केला आणि सुमारे दहा मिनिटे मृत्युशी झुंज देणाऱ्या गुलशन कुमार यांच्या वेदनादायी किंकाळ्या त्याला ऐकवल्या होत्या. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. उपचार सुरू असतानाच मृत्यू याच हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अब्दुल रऊफ मर्चंट याचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात तो आपली शिक्षा भोगत होता. गुरुवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, ज्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. गेल्या अनेक वर्षांपासून तुरुंगात असलेल्या मर्चंटच्या निधनामुळे गुलशन कुमार हत्याकांडातील एका मुख्य गुन्हेगाराचा अंत झाला आहे. खंडणी देण्यास नकार दिल्याने केली होती हत्या एकेकाळी ज्यूसचे दुकान चालवणारे गुलशन कुमार आपल्या कष्टाने 'कॅसेट किंग' बनले, मात्र त्यांच्या या यशासोबतच शत्रूंची संख्याही वाढत गेली. लेखक एस. हुसैन जैदी यांच्या 'माय नेम इज अबू सालेम' या पुस्तकातील उल्लेखानुसार, कुख्यात गँगस्टर अबू सालेमने त्यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. परंतु गुलशन कुमार यांनी ती देण्यास स्पष्ट नकार देत, 'इतक्या पैशात मी वैष्णो देवी मंदिरात भंडारा आयोजित करेन' असे धाडसाने सुनावले होते. याच रागातून 12 ऑगस्ट 1997 रोजी मुंबईतील अंधेरी येथील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर 16 गोळ्या झाडून गुलशन कुमार यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
आज भाजप पक्षाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. 'ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे, अशा शेरोशायरीतून जयंत पाटलांनी भाजपला टोला लगावला आहे. सांगलीत प्रचार सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करुन सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजप काय करतेय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत. आता आपले गडी देखील तिथे चाललेत. काँग्रेस सर्व धर्मभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ती परिस्थिती नाही. भाजपवाले ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएम सोबत युती करतात. ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा व्यक्तीला मतदान करा. साध्या मनाची, सुशिक्षित उमेदवार आम्ही दिले आहेत. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा. विचाराच्या मागे सांगली राहते हे दाखवण्याची हीच वेळ आहे, असे म्हणत जयंत पाटलांनी मतदारांना आवाहन केले आहे. तसेच नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला स्वीकारतील, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात प्राथमिक शिक्षकांना भोवली बोगसगिरी
कोल्हापूर : नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील ३ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले असून यामुळे शिक्षक खात्यात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण खाते हादरले असतानाच कोल्हापुरात देखील तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई […] The post कोल्हापुरात प्राथमिक शिक्षकांना भोवली बोगसगिरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा : प्रतिनिधी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या टाका येथील विद्यार्थिनी अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय १२) हिच्यावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मूळ टाका या गावी अश्रूंनी भरलेल्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकीच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचितांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट […] The post अनुष्का पाटोळेस न्याय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५३ हजारांचे वीज बिल चक्क २ हजारांवर
निलंगा : प्रतिनिधी निलंगा महावितरणचा मीटर रीडिंग घेणारा कंत्राटी विभाग ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा बिल मिटर रीडिंग न घेताच देत असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने निलंगा महावितरण कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी शेतक-यास ५३ हजार रुपयांचे आलेले वीजबिल चक्क २ हजार रुपये करुन दिले. मीटरचे रिडींग घेणा-याची चूक असल्याचे दिसून आले आहे. डॉ. भिकाने […] The post ५३ हजारांचे वीज बिल चक्क २ हजारांवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खरोळा येथील सेवा संस्थेचे संचालक मंडळ अपात्र
रेणापूर : प्रतिनिधी खरोळा (ता. रेणापूर) येथील सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने संस्थेच्या कारभारात अनियमितता, नियमांचे उल्लंघन तसेच सहकार अधिनियमाचे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तक्रारदार डॉ. महेंद्र पिंपळे हे एकमेव संचालक वगळता उर्वरित १२ विद्यमान संचालक मंडळास अपात्र करीत संस्थेच्या सचिवास ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा आदेश रेणापूर सहायक सहकारी निबंधक […] The post खरोळा येथील सेवा संस्थेचे संचालक मंडळ अपात्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या प्रचार सभेत आज दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे दोघे एकत्र पाहायला मिळाले. यावेळी प्रचार सभेत बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांचा 'केजीएफ' चित्रपटातील 'रॉकी भाई' असा उल्लेख केला. पिंपरीतील दोन गरुडा म्हणजे दोन्ही भाजप आमदारांचा भ्रष्टाचार संपवण्यासाठी अजितदादा रॉकी भाई प्रमाणे काम करतील, असे रोहित पवार म्हणाले. प्रचार सभेत बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, केजीएफ चित्रपटात जसे एक गरुडा आहे, तो सर्व मायनिंगवर ज्या प्रकारे आपले नियंत्रण ठेवतो तसे या शहरातील दोन गरुडा हे सगळीकडे आपले नियंत्रण ठेवता आहेत. ते प्रत्येक टेंडरमध्ये रिंग करतात आणि पैसे खातात. या दोन्ही गरुडांना असे वाटते हे सामान्य लोकांचे साम्राज्य नाही, त्यांचे साम्राज्य आहे. त्यावेळी रॉकी हा हीरो सर्वसामान्य जनतेला जसे गुंडागर्दीच्या दहशतीतून बाहेर काढतो, अगदी त्या प्रकारे अजित पवार हे देखील रॉकीप्रमाणे या शहराला आणि जनतेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढतील. आपले रॉकी भाई म्हणजे अजितदादा भाजपने शहरवासीयांना चुना लावलाय. कुत्र्यांची नसबंदी, टीव्ही खरेदीत सर्वात जास्त भ्रष्टाचार केला. केजीएफमधील गरुडा पाहिलाय का? पिंपरी चिंचवडमध्ये एक दाढीवाला गरुडा अन् दुसरा बिन दाढीवाला गरुडा आहे. या दोन्ही गरुडांनी पालिका लुटली. केजीएफमध्ये जशी रॉकीने गरुडाची मक्तेदारी संपवली, तशी शहरातील दोन गरुडांची मक्तेदारी संपवायची आहे. यासाठी आपले रॉकी म्हणजे अजितदादा आहेत, असे रोहित पवार म्हणाले. महेश लांडगे भ्रष्टाचारात बरबटलेला बोका भाजप आमदार महेश लांडगेंनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, महेश लांडगे हे या शहरातला भ्रष्टाचाराने बरबटलेला बोका आहे असे स्थानिक लोक म्हणतात. स्थानिक लोक जे बोलतात त्याला ते जास्त महत्त्वाचे आहे. महेश लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचार केला. पिंपरीतील कचऱ्यात आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप पवारांनी केला. भाजपाला सत्तेपासून थांबवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावे अशी आमच्या पक्षाची दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती त्यामुळे आम्ही महापालिका निवडणुकीत एकत्र आलो आहोत, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले. हिंदू संस्कृतीमध्ये पवार एकत्र असणे याला खूप महत्त्व आहे. दोन्ही परिवार एकत्र रहावे ही माझी देखील इच्छा आहे. मात्र राजकारणात सर्व गोष्टी साध्य होत नाहीत, असेही ते म्हणाले.
मुंबई येथील कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानाकादरम्यान कचरा उचलणाऱ्या लोकल ट्रेनला अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत लोकल ट्रेनचा एक संपूर्ण डब्बा जळाला असल्याचे समजते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील सायडिंगमध्ये उभ्या असलेल्या कचरा लोकल ट्रेनच्या दुसऱ्या डब्याला आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवनांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव साधारण पावणे नऊ वाजल्यापासून अप स्लो लोकल मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानाकाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी स्लो लोकल ट्रेन वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची माहिती देण्यात आली असून या आगीची घटना 8 वाजून 38 मिनिटांनी समोर आली होती. यानंतर अवघ्या काही मिनिटांत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. 8 वाजून 55 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ही आग नेमकी का लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईची लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन समजली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकलमधून प्रवास करत असतात. तसेच लोकलच्या वेळापत्रकानुसार मुंबईकरांचा दिवस ठरलेला असतो. परंतु, अशा काही घटना घडल्या की प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.
काँग्रेसचा एमआयएमवर हल्लाबोल:'धर्माच्या नावाखाली फूट पाडून मते मागतात', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एमआयएमवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एमआयएम धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडून मते मागत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. दिव्य मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एमआयएम केवळ जाती-धर्माचे विष पसरवून लोकांमध्ये द्वेष निर्माण करत आहे. काँग्रेस पक्ष लोकांना जोडण्याचे काम करतो, तर एमआयएम एकमेकांविरोधात बोलून तोडण्याचे काम करते. धर्माच्या नावाखाली मते मागून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. अकोटमध्ये भाजपसोबत जाऊन एमआयएमने ते कोणासोबत आहेत हे दाखवून दिले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी नमूद केले. सपकाळ यांच्या हस्ते युसुफ शेख यांचे पुत्र शेख सलीम यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष खासदार कल्याण काळे, युसुफ शेख, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, माजी आमदार एम.एम. शेख, जितेंद्र देहाडे, कृष्णा बनकर, सविता सालापुरे, शेख सलीम आणि अस्मा खान यांची उपस्थिती होती. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि त्याने कधीही कुठल्याही जाती-धर्माचा पुरस्कार केला नाही. याउलट, भाजप आणि एमआयएम जाती-धर्मात फूट पाडून द्वेष पसरवत आहेत. हा देश सर्वांचा आहे. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई अशा सर्व जाती-धर्माच्या लोकांचा आहे. मात्र, एमआयएम द्वेष पसरवून जातीय आणि धार्मिक प्रचार करत आहे. त्यांना केवळ तोडफोड हवी आहे, तर काँग्रेस प्रेमाचा संदेश देत असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, निवडणूक आयोगाची ईव्हीएमसह सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि नागरिकांना आपला हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी मुंबईसह सर्व 29 महापालिका क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. प्रशासनाकडून मतदारांना या सुट्टीचा लाभ घेत मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने संबंधित निवडणूक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयाबाबतची अधिकृत अधिसूचना राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, निवडणुकीच्या दिवशी सर्वत्र सुट्टीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ही अधिसूचना सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे आणि मंडळांना कळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जे मतदार संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील रहिवासी आहेत, परंतु कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत आहेत, त्यांनाही या सार्वजनिक सुट्टीचा लाभ घेता येणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.दरम्यान, मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी गुरुवारी अमरावती येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, सांघिक भावना आणि चिकाटी वाढते, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी एक चांगला मंच असल्याचेही त्या म्हणाल्या. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आजपासून तीन दिवसीय शालेय क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल होते. जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीईओ संजीता महापात्र यांनी यावेळी मिशन स्कॉलरशिप आणि निपुण महाराष्ट्रमध्येही यशस्वी कामगिरी करण्याचे आवाहन केले. मुलांची गुणवत्ता महाराष्ट्रात वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान धारणी पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शाळा उकुपाटी येथील विद्यार्थिनी दुर्गा छगन कास्देकर हिचा गौरव करण्यात आला. दुर्गाने लांबउडी या वैयक्तिक खेळ प्रकारात राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी तिचे मार्गदर्शक महादेव राठोडही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने यांनी केले. संचालन अजय अडीकने आणि संध्या जामकर यांनी केले, तर आभार क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी मानले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते, निखिल मानकर, इम्रान खान, चांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ, तिवसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, धामणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भटेसिंग गिरासे, अंजनगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे, चांदूर बाजारचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात, भातकुली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे, धारणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गुणवंत वरघट, गटशिक्षणाधिकारी विनोद गाडे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले आदी मान्यवर उपस्थित होते.
माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगरच्या फैजान ए-कन्झूल इमान या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून गुलजार ए-रझा ट्रस्टच्या नावाने लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली चार कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. संबंधित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी […] The post माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेंदुरजनाघाट शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुवर्णा वरखेडे आणि नगरसेवकांनी गुरुवारी पदाची सूत्रे स्वीकारली. नगर परिषद सभागृहात यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच भेटीत त्यांनी विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. पदभार स्वीकारण्यापूर्वी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुवर्णा वरखेडे आणि सर्व नगरसेवकांनी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांन बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी नगर परिषदेत प्रवेश केला. मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टीने स्वागत केले. नगर परिषद सभागृहात पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुरेंद्र आंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर प्रमुख उपस्थित होते. मुख्याधिकारी भोयर यांनी अध्यक्ष सुरेंद्र आंडे आणि नगराध्यक्षा सुवर्णा वरखेडे यांचा शाल व वृक्ष भेट देऊन सत्कार केला. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केले. मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक पिंटूभाऊ सावरकर, संदीप खडसे आणि नीलिमा कुबडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी विलास आठवले यांनी केले, तर समुदाय संघटक उमेश मोरे यांनी आभार मानले. याप्रसंगी बांधकाम अभियंता दयानंद डेहनकर, संगणक अभियंता विनय मालधुरे, पाणीपुरवठा अभियंता सोनाली खडेकर, बांधकाम लिपिक दीपक दवंडे, तसेच कार्तिक होले, महेश पोटे आणि केशव वंजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सावळापूर गाव विविध योजनांमुळे चर्चेत:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अभिनव उपक्रम राबवले
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सावळापूर गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे चर्चेत आले आहे. या अभियानांतर्गत गावात लोकाभिमुख, अभिनव आणि विकासात्मक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी आणि महिला सक्षमीकरण या प्रमुख घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये मोफत दळण केंद्र, पूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांसाठी मोफत पाणी कॅन वितरण, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, परसबाग उपक्रम, 'उमेद' अंतर्गत महिला उद्योग, अंगणवाडी केंद्रातील सुधारित व्यवस्था, 'अभ्यासाचा भोंगा' हा अभिनव उपक्रम, तसेच ग्रामपंचायतीच्या विविध योजना, आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी स्वतः उपस्थित राहून यापैकी अनेक कार्यक्रमांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि विविध ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या कार्यक्रमादरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश रहाटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वृक्ष देऊन सीईओ महापात्र यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. विस्तार अधिकारी (पंचायत) महादेव कासदेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी तालुक्याची माहिती देताना देवगाव, उपातखेडा, जवर्डी, हनवतखेडा, निमकुंड, मल्हारा, सावळी दातुरा यांसारख्या इतर ग्रामपंचायतीही उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे नमूद केले. या सर्व प्रयत्नांमुळे सावळापूर हे अचलपूर तालुका आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून उदयास आले आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सावळापूर ग्रामपंचायतीचा राज्यात चर्चेचा विषय ठरलेला अभ्यासाचा भोंगा हा अभिनव उपक्रमही यावेळी पाहण्यात आला. या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ वाजता सायरन (भोंगा) वाजवून संपूर्ण गावात टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जातात, जेणेकरून विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी प्रत्यक्ष घराघरांत जाऊन विद्यार्थी अभ्यास करत आहेत की नाही, याची पाहणी केली आणि अभ्यासात मग्न असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. सावळापूर गावाची लोकसंख्या २३२९ असून, साक्षरता दर ८५ टक्के आहे. हे गाव जिल्ह्यापासून ८८ किलोमीटर अंतरावर असून, खाजगी वाहन किंवा एसटीने येथे पोहोचता येते. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत एकूण ७२ ग्रामपंचायती असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. यापैकी २० टक्के ग्रामपंचायती गुणांकन पद्धतीनुसार अग्रेसर ठरल्या आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विकासासाठी लागणारा निधी आपण आणण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दसरा मैदानात गुरुवारी दुपारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अनुपस्थित राहिल्याने पालकमंत्री बावनकुळे यांनी ही सभा घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर होते. यावेळी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, आमदार प्रवीण तायडे, पुलगाव-देवळीचे आमदार राजेश बकाने, विधीज्ञ प्रशांत देशपांडे आणि महानगर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बावनकुळे यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपने तयार केलेला सन २०४७ चा आराखडा सादर केला. त्यांनी शहराच्या आतापर्यंतच्या विकासाचा आढावा घेत भविष्यातील योजनांचे स्वप्न मांडले. या आराखड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), वैमानिक प्रशिक्षण केंद्र, टेक्सटाईल पार्क, सिंभोरा ते अमरावती नवी जलवाहिनी, अंबादेवी मंदिराचा विस्तार, अंबानाल्याचा विकास आणि भुयारी गटार योजनेची पूर्णाहुती या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. शालेय शिक्षणमंत्री डॉ. भोयर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. सभेची सुरुवात एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या भाषणाने झाली. बावनकुळे यांनी विकासाची तुलना चारचाकी वाहनाशी केली. या वाहनाचे पहिले चाक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चौथे चाक आपण स्वतः (पालकमंत्री) असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विकासरथाचा चालक (ड्रायव्हर) आगामी महापौर असल्याने तो भाजपचाच असला पाहिजे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सभेत राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे आणि भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांचीही भाषणे झाली. त्यांच्या भूमिकांमध्ये काही प्रमाणात तफावत दिसून आली. डॉ. बोंडे यांनी नवनीत राणा यांना सबुरीचा सल्ला देत, काही पदाधिकाऱ्यांनी भूतकाळात घेतलेली पक्षविरोधी भूमिका विसरून जावी आणि आता ते सोबत असल्याने भाजपचाच विजय होईल, अशी भूमिका घेण्याचे आवाहन केले. याउलट, नवनीत राणा यांनी डॉ. बोंडे यांचा सल्ला न मानता, ज्यांनी यापूर्वी भाजपशी बेईमानी केली, त्यांना आपला उघड विरोध राहील असे स्पष्ट केले. यामुळे काही विशिष्ट उमेदवारांविरुद्ध त्यांची आघाडी प्रचारात कायम राहील, असे संकेत मिळाले आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय प्रचार सभा सुरू आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू केली असून दुसरीकडे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात 70 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी टीका केली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विरोधी पक्षातील नेत्यांनी याचिका दाखल केली होती. यावर आता नवी मुंबईतील प्रभाग 17 (अ) च्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता 15 तारखेला मतदान होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 (अ) मधून भाजप उमेदवार नीलेश भोजने यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कारण निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता. त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणी न्यायालयाने येथील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली असून येत्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. भाजप उमेदवार नीलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याने महाराष्ट्र म्यूनिसिपल कार्पोरेशन कायद्याच्या कलम 10(1ड) अंतर्गत भोजने यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता. मात्र, येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने अधिकारांचा वापर केल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाचे भाजप उमेदवार निलेश भोजने यांना दिलासा दिला. त्यानुसार, पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. नवी मुंबईत 117 अर्ज अवैध दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पात्रांची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून 839 अर्ज वैध ठरले, तर 117 अर्ज अवैध ठरले आहेत. एकूण 956 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. नेरूळ विभागात सर्वाधिक 28 अर्ज अवैध ठरले असून घणसोली विभागात तब्बल 39 अर्ज बाद झाले आहेत.
पाक पंतप्रधान शरीफ यांना अटक होणार?
इस्लामाबाद : पाकिस्तानात पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याविरोधात त्यांच्याच देशात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतातील बंडखोर सरकारने जारी केले आहे. त्यात शहबाज शरीफ यांच्यावर बलूचिस्तानातील व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे. बलूचिस्तानच्या सार्वभौमत्वाला गंभीर आणि जाणुनबुजून नुकसान पोहचवल्याचा आरोप आहे. शहबाज शरीफ यांच्या अटकेच्या वॉरंटची घोषणा मीर यार बलोच […] The post पाक पंतप्रधान शरीफ यांना अटक होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एक ड्रायव्हर चालवणार ५ ट्रक; मालवाहतूक क्षेत्रात नवे ‘मॅजिक’
बीजिंग : वृत्तसंस्था वाहतूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारी झेप घेतली आहे. चीनमधील प्रसिद्ध ट्रक उत्पादक कंपनी रअठने आपल्या चौथ्या पिढीतील ‘ऑटोनॉमस’ (विनाचालक) ट्रकचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, रस्त्यावर धावणा-या पाच ट्रकचा ताफा आता केवळ एक चालक चालवणार आहे. २०२६ या […] The post एक ड्रायव्हर चालवणार ५ ट्रक; मालवाहतूक क्षेत्रात नवे ‘मॅजिक’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वदेशी सुसाईड ड्रोन लवकरच सेना दलात
नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतीय सेना स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’ म्हणजेच लोइटरिंग म्युनिशनची मोठी खेप खरेदी करण्याच्या तयारीत आहे. हे आत्मघाती ड्रोन स्फोटकांनी सज्ज असतील आणि शत्रूच्या हद्दीत घुसून त्यांच्या ठिकाणांचा पूर्णपणे नाश करतील. हे ड्रोन असे असतील की, जॅमिंग (रडार सिग्नल अडवणे) आणि स्पूफिंग (खोटे रडार सिग्नल पाठवणे) अशा परिस्थितीतही ते आपले लक्ष्य अचूकपणे साध्य […] The post स्वदेशी सुसाईड ड्रोन लवकरच सेना दलात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सूस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने वेग घेतला असून, प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजप उमेदवारांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मयुरी कोकाटे आणि लहू बालवडकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. नुकतीच काढण्यात आलेली पदयात्रा हे या प्रतिसादाचे द्योतक ठरली. ही पदयात्रा भगवती नगर येथून सुरू होऊन भैरवनाथ मंदिर येथे समाप्त झाली. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी फुलांची उधळण करून आणि घोषणाबाजी करत भाजपचे स्वागत केले. हा प्रतिसाद सूस गावाच्या विकासासाठी भाजपला पसंती दर्शवणारा होता. सूस गावातील प्रत्येक घरातून भाजपला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा विश्वास यामुळे भाजपचा प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे. यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजप आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने ही निवडणूक सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असल्याची भूमिका मांडली आहे. मतदारांनी दिलेले प्रत्येक मत सूस गाव आणि प्रभाग क्रमांक ९ च्या प्रगतीचा पाया ठरेल, असे पक्षाने म्हटले आहे. विकासालाच प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भाजपने पुढील पाच वर्षांसाठीचा विकास आराखडा जनतेसमोर सादर केला आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक व्यवस्थेचा विकास करण्याचे आश्वासन देण्यात आले. विकास केवळ कागदावर न राहता तो थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसेल, असे लहू बालवडकर यांनी सांगितले. यावेळी भाजप नेते लहू बालवडकर यांनी नागरिकांना संबोधित केले. त्यांनी मतदारांना सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले आणि पुढील पाच वर्षे प्रभागाच्या विकासाची असतील असे सांगितले. शब्दांपेक्षा कामातूनच भाजप आपली विश्वासार्हता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पदयात्रेनंतर प्रभागात भाजपला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नऱ्हे-वडगाव बु.-धायरी आणि येरवडा-गांधीनगर येथे जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेत भगवा फडकवण्याचे आवाहन केले. प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बु.-धायरीमध्ये शिवसेना उमेदवार गिरमे निलेश दशरथ, गिरमे राधिका दशरथ, सुप्रिया ईश्वर भूमकर आणि तांबे विठ्ठल ज्ञानेश्वर यांच्या प्रचारासाठी कालभैरव मंदिर चौक, नऱ्हे रोड येथे सभा झाली. तसेच प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगरमध्ये उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, वाघचौरे कोमल अभिजीत, स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांच्या प्रचारार्थ गाडीतळ येरवडा येथेही सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, उपनेते इरफानभाई सैय्यद, निलेश घारे आदी मान्यवर उपस्थित होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाविष्ट गावे पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमी सामान्य लोकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कदम पुढे म्हणाले की, या गावांच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवणे गरजेचे आहे. नगर विकास खात्यासह महत्त्वाची खाती शिवसेनेकडे असल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल. सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून पुणे महापालिकेत भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात नऱ्हे गावातील पाण्याच्या पाईपलाइनसाठी निधी दिल्याचे नमूद केले, ज्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. आता फिल्टरची मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाविष्ट गावांच्या करमाफीचा मुद्दा मांडला आहे, मात्र प्रशासकामुळे त्यावर दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी म्हटले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, दिवसेंदिवस पुण्याला पाण्याची समस्या भीषण होत चालली आहे. त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे गरजेचे आहे. ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. नवे पोलीस स्टेशन योगेश कदम यांच्यामुळे सुरू झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माणसाची भीती ओळखून भटके कुत्रे हल्ला करतात! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या सुळसुळाटावर आणि त्यांच्यामुळे होणा-या त्रासावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. कुत्रे माणसांमधील भीती ओळखू शकतात आणि त्याच भीतीमुळे ते हल्ला करतात किंवा चावा घेतात असे निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ यांनी नोंदवले. आज […] The post माणसाची भीती ओळखून भटके कुत्रे हल्ला करतात! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चंद्रपुरात बावनकुळेंच्या सभेत गोंधळ
चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपमधील अंतर्गत असंतोष चंद्रपूरमध्ये उघडपणे समोर आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभांदरम्यान तिकीट नाकारलेल्या इच्छुकांनी दोन ठिकाणी थेट हस्तक्षेप केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनांमुळे भाजपमधील नाराजी अजूनही धगधगत असल्याचे स्पष्ट झाले. सपना टॉकीज चौकातील सभेत भाजपकडून तिकीट नाकारलेले राकेश बोमनवार हे बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच […] The post चंद्रपुरात बावनकुळेंच्या सभेत गोंधळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे येथे 'कन्स्ट्रो २०२६' या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी बांधकाम क्षेत्रात संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर दिला. पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ११ जानेवारी २०२६ पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला नवी दिल्ली येथील कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्कि. अभय पुरोहित, कन्स्ट्रो प्रदर्शनाचे चेअरमन इंजि. जयदीप राजे, 'पीसीईआरएफ'चे अध्यक्ष इंजि. नरेंद्र कोठारी, सचिव आर्कि. शिरीष केंभावी आणि जयंत इनामदार उपस्थित होते. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. रणजित नाईकनवरे यांनी सांगितले की, स्थापत्य अभियंत्यांनी केवळ नोकरीवर लक्ष केंद्रित न करता ज्ञानार्जन सुरू ठेवावे. बांधकाम क्षेत्रात वेगाने बदल होत असून, त्यात नाविन्यता आणणे आवश्यक आहे. 'कन्स्ट्रो'सारख्या प्रदर्शनांमुळे क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि बदल समजून घेण्यास मदत होते. शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास यांचा बांधकाम क्षेत्रात समावेश होणे महत्त्वाचे आहे. आर्कि. अभय पुरोहित यांनी नमूद केले की, बांधकाम आणि स्थापत्य क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. या क्षेत्रात शाश्वतता, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक नैतिकता यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल डिझाइन टूल्स आणि प्रगत बांधकाम साहित्य वापरून प्रकल्पांची गुणवत्ता व कार्यक्षमता वाढवावी, असे त्यांनी सुचवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना स्वीकारणे आवश्यक आहे. रस्ते, पूल, स्मार्ट शहरे आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत. खर्च कमी करून टिकाऊ, दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक बांधकामावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वेळ, खर्च आणि गुणवत्ता या तिन्ही बाबींमध्ये सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू आणि शिंदे-फडणवीस सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, 'दै. सामना'साठी दिलेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीतून शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात गेलेले नेते प्रकाश महाजन यांनी थेट राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे? चंदू मामा कुठे आणि रशीद मामूला त्यांनी जवळ केले, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. पुढे बोलताना प्रकाश महाजन यांनी संजय राऊत तसेच अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज्यात तीन वर्षांपूर्वी एक मुलाखत झाली, त्याचा हा सिक्वल आहे. त्या मुलाखतीत राज ठाकरे सहज नव्हते, चित्रपट सृष्टीतील कोणी नसेल तर एका संपादकाला मुलाखत दिली, असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली. तसेच महेश मांजरेकर यांना कशाची भीती? त्यांचे मित्र अन्डरवर्ल्डचे आहेत, असा टोला महाजन यांनी लगावला आहे. मराठीसाठी यांनी काय केले? मराठी माणूस हा त्यांच्या प्रचाराचा मुखवटा आहे, त्यांना मराठी माणसाची काळजी आहे म्हणून ते सोबत नाहीत. तीन वर्षापूर्वीच्या मिळकतीत काही बदल झाला नाही, त्यांची सत्ता येणार नाही हे 100 टक्के आहे. मुंबईत सत्ता महायुतीची येणार आहे. मराठीसाठी यांनी काय केले? असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. तसेच राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाऊन आनाडी नाहीत. आज मनसेतून लोक बाहेर पडत आहेत, पण मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी हे चालले आहे, असेही महाजन यांनी म्हटले. राज ठाकरेंभोवती ठरावीक वर्तुळ संतोष धुरींनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केला. यावर प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरेंभोवती ठरावीक वर्तुळ आहे. संदीप देशपांडेही आनंदी नाही, धुरी यांनी संदीपला विचारल्याशिवाय ते बाहेर पडले नसतील. पन्नास खोके मला माहीत नाही. पण, एकनाथ शिंदे यांना एक खोके दिले आहे हे माहीत आहे. तुमचा विषय पैशाचा आहे. तुम्ही आरोप कोणावर करता. एकजण गुजरातला जातो, त्याच्या मागे जातीधर्माचे नाही तरीही पन्नास लोक बाहेर जातात, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचेही महाजन यांनी समर्थन केले. उद्या सत्ता आली तर दोघांच्या बायकोत भांडण लागेल पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काय लिहिले आहे, राज ठाकरे यांचे पांचट वक्तव्य आहे. मराठवाड्यात शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलेच नाही. उद्या सत्ता आली तर दोघांच्या बायकोत भांडण लागेल. तुम्ही चावडीवर आले, तुमचे सूप काढले. ठाकरे बंधूंना उद्देशून बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मराठी हे बुजगावणे उभे केले आहे. हे मुंबईत कुठे जन्मले? ते एसीत जन्मले आहेत. निवडणुकीत यश मिळावे म्हणून मराठीचा मुद्दा काढला. कोहिनूर मिलमध्ये मराठी माणसाला काम देऊ म्हणाले, पण मायकल जॅकसनचा कार्यक्रम घेतला त्याचा हिशोब देत नाहीत, असेही महाजन म्हणाले.
अमेरिकेची मोठी ‘एक्झिट’ ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार
वॉशिंग्टन : वृत्तसंस्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेला अधिकृतपणे बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. द गार्डियननुसार, यात ३५ बिगर-संयुक्त राष्ट्र संघटना आणि ३१ संयुक्त राष्ट्र संस्थांचा समावेश आहे. व्हाईट हाऊस आणि स्टेट डिपार्टमेंटनुसार, या संघटना अमेरिकेच्या हिताच्या विरोधात आहेत. यात पैशांचा अपव्यय होतो. याशिवाय, त्या अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने चालवल्या जात […] The post अमेरिकेची मोठी ‘एक्झिट’ ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिलांच्या सुरक्षेत चेन्नई, बंगळुरू अव्वल; टॉप-५ मध्ये पुणे, मुंबई
पुणे : प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत बंगळुरू आणि चेन्नई देशातील सर्वोत्तम शहरे ठरली आहेत. पुणे, मुंबई आणि हैदराबाद ही शहरे टॉप ५ मध्ये आहेत. वर्क प्लेस कल्चर कन्सल्टिंग फर्म अवतार ग्रुपच्या ‘टॉप सिटीज फॉर वुमेन इन इंडिया’ च्या चौथ्या आवृत्तीत ही माहिती समोर आली आहे. या अहवालात १२५ शहरांना महिलांचा सहभाग, सुरक्षितता आणि करिअर वाढीच्या […] The post महिलांच्या सुरक्षेत चेन्नई, बंगळुरू अव्वल; टॉप-५ मध्ये पुणे, मुंबई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एआय’ने ओळखले मनुष्याला झोपेद्वारे होणारे १३० आजार!
स्टॅनफोर्ड : वृत्तसंस्था अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ‘स्लीप एफएम’ नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल (अक) तयार केले आहे. ‘नेचर मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे मॉडेल माणसाच्या एका रात्रीच्या झोपेच्या आधारावर १३० आजारांच्या धोक्याची भविष्यवाणी करू शकते. ‘एआय’ मॉडेलच्या भविष्यवाणीची सी-इंडेक्सवरील अचूकता ०.७५ पेक्षा जास्त आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ती ७५% […] The post ‘एआय’ने ओळखले मनुष्याला झोपेद्वारे होणारे १३० आजार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी 'पुणे फर्स्ट' या आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी तीन पक्षांवर पुणे शहराचे लचके तोडल्याचा आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. चव्हाण म्हणाले की, पुण्यातील उद्योग, वाहतूक समस्या आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक उद्योग पुणे सोडून जात आहेत. नवीन उद्योगांची गुंतवणूक पुण्यात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकार अनेक गुंतवणुकीच्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक दिसत नाही. उद्योगांना पुण्यात यायचे असले तरी नागरी सुविधा कोलमडल्यामुळे सेमीकंडक्टरसारखे उद्योग येथे येत नाहीत. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारमुक्त सरकार देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीने गुरुवारी काँग्रेस भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षाचा डिजिटल जाहीरनामा देखील प्रकाशित करण्यात आला. माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चौधरी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर आणि शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, पुण्यात वाहतूक समस्यांचे निवारण केले जाईल. मेट्रोचे भूमिपूजन आम्ही पाठपुरावा करून पुण्यात आणले आणि ते पूर्ण केले. मी मुख्यमंत्री असताना मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो आणण्याचा निर्णय घेतला, याचे कागदोपत्री पुरावे आहेत. त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच नाही. घोषणा करण्यासाठी पैसे लागत नाहीत, पण चुकीच्या पद्धतीने योजना राबवून सत्ताधारी भ्रष्टाचार करत आहेत. शहरातील भाजपने स्मार्ट सिटी योजना गुंडाळली आहे. एकेकाळी शिक्षण आणि रोजगारात पुणे अग्रणी होते, पण सध्या तशी परिस्थिती दिसत नाही. सर्वत्र महायुती असली तरी निवडणुकीत तसे चित्र राहणार नाही. देशात दोन विचारधारा कायम असून जनतेने गांधींच्या विचारधारेस पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बायोडायव्हर्सिटीबाबत आम्ही गांभीर्याने निर्णय घेतले होते, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केल्याने टेकड्या नष्ट होत आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर त्यावर पुन्हा काम करू. 'लाडकी बहीण' योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेल्याने अनेक गैरप्रकार घडले आहेत, असेही चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे गेले असताना एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या नगरसेवकाच्या काळातला किस्सा विचारण्यात आला, यावर फडणवीसांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. तसेच महापौर आणि नगरसेवकाचा जॉब एकदम टफ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो, असेही फडणवीस यांनी गंमतीने विधान केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी 21 व्या वर्षी नगरसेवक झालो. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका वगैरे काढल्या आणि पहाटे 4 वाजता मी आमच्या घराच्या हॉलमध्ये झोपलो. आणि सकाळी 7 वाजताच घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर एक गृहस्थ उभे होते. मी त्यांना विचारले इतक्या सकाळी सकाळी कसेकाय? त्यावर म्हणाले, माझे गटार चोक झाले आहे म्हणून तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे आलो. त्या दिवशी आपण काय स्वीकारले आहे हे मला समजले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी गमतीने म्हणतो की, ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो. पण मला असे वाटते की तेव्हाच्या महानगरपालिकेत आणि आताच्या महानगरपालिकेत खूप फरक पडला आहे. तेव्हा नागपूर शहर विकासाची आस बघत होते. मी महापौर झालो तेव्हा नागपूरमध्ये पाण्याच्या आठ टाक्या होत्या, आज 108 पाण्याच्या टाक्या आहेत. हा नागपूरमधला बदल आहे. आज नागपूर एक आधुनिक शहर म्हणून बघायला मिळत आहे. आमच्या काळात दिवे लावण्याचे दिव्य होते आमचा तो काळ होता जेव्हा नगरसेवक फक्त गटर, रस्ता आणि दिवे याचा विचार करायचा. तेव्हा अक्षरशः स्पर्धा लागायची की जो स्टोअर किपर असायचा, ज्याच्याकडे ते सगळे दिवे ठेवलेले असायचे, त्याला पटवून तो दिवा लावण्याचे एक दिव्य होते. आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ..तर देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले नसते तेव्हाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नसत्या तर देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले नसते, यावर बोलताना त्यांनी सांगितले की, हे खरे आहे. मला ज्यावेळी सांगितले की या वॉर्डमधून लढायचे आहे. त्यावेळी मी कोणाला सांगितले नाही की माझे वय झाले नव्हते, माझे वय पूर्ण व्हायचे बाकी होते. पण तेव्हा ती निवडणूक काही कारणांमुळे पुढे ढकलली गेली आणि माझे वय त्या निवडणुकीसाठी भरले, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितला.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा पारंपरिक पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवार अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे की, निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून, अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून त्यांच्या भेटीसाठी पुढे येत आहेत. ही निवडणूक केवळ प्रचाराची नसून, विश्वासाचे जनआंदोलन असल्याचे बालवडकर यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून विविध परिसरांतील नागरिक, सोसायटी प्रतिनिधी, युवक-युवती, महिला मंडळे, व्यापारी संघटना आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बालवडकर यांना भेटण्यासाठी येत आहेत. ते एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच नागरिक जमा झालेले असतात. अनेकजण फोन करून 'आम्हीच येतो, भेटायचं आहे' असे सांगतात. नागरिक 'आम्ही तुमच्यासाठी कोपर सभा घेतो, मेळावा घेतो, प्रचार करतो' अशी भावना व्यक्त करत आहेत. ही ऊर्जा शब्दांत सांगता येणार नाही, असे बालवडकर म्हणाले. सातत्याने ११ वर्षे जनतेची केलेली सेवा हेच यामागचे एकमेव कारण असून, काम करणाऱ्या माणसाला जनतेची साथ हेच लोकशाहीचे खरे रूप असल्याचे त्यांनी नमूद केले. बालवडकर यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, ही साथ केवळ त्यांच्यावरील वैयक्तिक सन्मान नाही, तर प्रभागाच्या भविष्यासाठीचा जनादेश आहे. लोकांना काम हवे आहे आणि ते विकासाचे काम करणारे व्यक्ती आहेत. प्रत्येक भेटीत ते 'संवाद, पारदर्शकता आणि काम' हेच वचन देतात. अनेक वर्षापासून मतदारसंघांमध्ये विविध प्रश्नावर काम केले असल्याने नागरिकांना कोणत्या समस्या आणखी जाणवत आहे त्याची जाण मला चांगल्या प्रकारे आहे.केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करण्यावर आपला भर असल्याचे अमोल बालवडकर यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठी देखील समान नियम लागू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना जुन्या इमारातींच्या संदर्भात बदल करण्यास अनुकूलता दर्शवली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शहरातील उद्योजक आणि संघटनांशी संवाद साधला असता, नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबई-पुणे आणि ठाण्याप्रमाणे समान नियम लागू करण्याची मागणी क्रेडाईतर्फे करण्यात आली. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सामंत यांनी तत्काळ एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून क्रेडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. ज्यावर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर नाशिकमध्येही पुनर्विकासाचे समान नियम लागू करण्याचे आश्वासन दिले. मुंबई, पुणे आणि ठाणे येथे नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार 9 मीटर रस्त्यालगतच्या इमारतींना 2.5 पर्यंत एफएसआय मिळत असल्याने तेथील पुनर्विकास सुलभ झाला आहे. मात्र नाशिकमध्ये हा लाभ केवळ 1.4 पर्यंतच मर्यादित असून अतिरिक्त एफएसआय विकत घ्यावा लागत असल्याचे क्रेडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी निदर्शनास आणून दिले. नाशिकमधील या तांत्रिक तफावतीमुळेच 9 मीटर रस्त्यांवरील अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या संवादात निदर्शनास आणून दिले. मुंबई-पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही समान नियम लागू नाशिकमधील पुनर्विकासातील तांत्रिक अडचणी मांडताना क्रेडाईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले की, मुंबई, पुणे आणि ठाण्यात इमारतीची उंची मोजताना पोडियम पार्किंग वगळले जाते, मात्र नाशिकमध्ये ती पार्किंगसह मोजली गेल्यामुळे विकासकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, निवडणुकीनंतर नाशिक शहरासाठीही मुंबई-पुण्याप्रमाणेच समान नियम लागू केले जातील आणि त्याबाबतचे आवश्यक निर्देश नगरविकास विभागाला दिले जातील, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी फोनवरून दिले. नाशिकमध्ये 8-10 हजार जुन्या इमारती नाशिक शहरात 9 मीटर रस्त्याला लागून सुमारे 8 ते 10 हजार जुन्या इमारती असून, हे नवीन नियम लागू झाल्यास त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. विकासकांच्या या प्रलंबित प्रश्नावर तातडीने ठोस पावले उचलल्याबद्दल आणि आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवल्याबद्दल नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर आणि उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
बांगलादेशाने केली भारताकडे सुमारे २ लाख टन डिझेलची मागणी
ढाका : हिंदूंवर होणारे हल्ल्यामुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध गेल्या काही काळापासून बिघडले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील कट्टरतावादी बांगलादेश सरकार पाकिस्तानच्या बाजूने झुकत आहे. एकीकडे ते भारतावर टीका-टिप्पणी करत आहेत, तर दुसरीकडे भारताकडूनच मदत मागत आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने २०२६ या वर्षात भारताकडून १ लाख ८० हजार टन डिझेल आयात करणार आहे. हे डिझेल […] The post बांगलादेशाने केली भारताकडे सुमारे २ लाख टन डिझेलची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कळमनुरी तालुक्यातील तक्रारदार व त्याच्या भावाचे बीपीएल योजनेत नाव समाविष्ट करून स्वस्त धान्याचा लाभ देण्यासाठी 3 हजाराची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. 8 दुपारी रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील एका लाभार्थ्याने त्याचे व त्याच्या भावाच्या कुटुंबियांचे बीपीएल योजनेत नाव समाविष्ट करून स्वस्त धान्याचा लाभ देण्याबाबत तहसील कार्यालयात ता. 18 सप्टेंबर 2022 रोजी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना शिधापत्रिका मिळाली होती. मात्र या शिधापत्रिकेवर त्यांना धान्यच मिळाले नाही. त्यावरून तक्रारदाराने पुन्हा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे वारंवार विचारणा केली. मात्र त्यांना दाद मिळाली नाही. त्यानंतर पुरवठा विभागातील लिपीक चक्रधर कदम याने बीपीएल योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्याच्या योजनेत नाव समाविष्ट करून अन्नधान्य मिळणे बाबत अंतिम आदेश काढून देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर चक्रधर याने दोन्ही प्रस्तावाचे एकूण तीन हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, गजानन पवार, शिवाजी वाघ, अमोल जाधव, शेख अकबर यांच्या पथकाने कळमनुरी तहसीलच्या पुरवठा विभागाच्या परिसरात सापळा रचला होता. दुपारी लिपीक चक्रधर याने तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच टेबलाच्या ड्राव्हरमध्ये टाकून घेतली त्यानंतर सदर रक्कम घेताच त्यास पकडण्यात आले. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पुढील आठवड्यात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज फेटाळल्या गेलेल्या इच्छुक उमेदवारांना आता उच्च न्यायालयाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे बाद ठरवण्यात आलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या विभाग क्रमांक 1 ते 227 च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी उमेदवारांचे अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली हे अर्ज बाद करण्यात आल्याचा संशय याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला असून, अर्ज भरण्यासाठी दिलेली सात दिवसांची मुदत अत्यंत अपुरी असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत हे प्रकरण शुक्रवारी सूचीबद्ध केले आहे. काय आहे याचिकाकर्त्यांचा दावा? प्रतिज्ञापत्रे किंवा प्रश्न-उत्तर पत्रके योग्य स्वरूपात नसल्याच्या अथवा कायदेशीररीत्या आवश्यक नसलेली पोलीस, पाणी, कर, मलनिस्सारण आणि मालमत्ता यासह पाच विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) सादर करण्यात अयशस्वी झाल्याच्या कारणास्तव कारणास्तव अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. परंतु, पाणी, मालमत्ता कर आणि बांधकाम प्रस्ताव यासारखे विभाग महानगरपालिकेच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली असल्याने ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी मनमानी, अवाजवी आणि घटनेच्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब करून राजकीय कटकारस्थान होण्याची शक्यताही याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे. अधिकाऱ्यांची कृती असंवैधानिक वांद्रे पूर्व येथील मोझम अली मीर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, किरकोळ आणि तांत्रिक कारणांचा आधार घेऊन विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मनमानीपणे फेटाळल्याचा दावा केला आहे. अधिकाऱ्यांची ही कृती असंवैधानिक आणि अरेरावीची असून, यामुळे अनेक इच्छुकांना निवडणूक लढवण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागले आहे, असे मीर यांनी म्हटले आहे. महापालिका प्रशासनाचा हा पवित्रा राज्य निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारा असल्याची टीकाही या याचिकेतून करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून अधिकारांचा गैरवापर राज्य निवडणूक आयोगाच्या 12 डिसेंबर 2025 च्या अधिसूचनेतील अटींमध्ये बदल करून महानगरपालिका प्रशासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. महापालिका ही केवळ अंमलबजावणी करणारी संस्था असतानाही, तिने आयोगाचे विशेष अधिकार डावलून उमेदवारीसाठी स्वतःच्या अटी लादल्या असून, आयोगाने आधी जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या यादीचे उल्लंघन करून नवीन कागदपत्रांची मागणी केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
चंद्रपूर : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याआधी देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी आले नव्हते, किंवा गृहमंत्री देखील प्रचारात सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान व गृहमंत्री यांची नजर मुंबईवर आहे. त्यांना महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबईला लुटायचे आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे आहे. त्यांची वाईट नजर मुंबईवर आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसचे […] The post मुंबईवर भाजपची वाईट नजर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : देशात सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर ठग आता फेक लिंक किंवा बनावट ऍप्सच्या माध्यमातून नव्हे, तर मोबाईलमधील एक सर्वसामान्य फीचर वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. या नव्या प्रकाराला कॉल फॉरवर्डिंग स्कॅम असे म्हटले जाते. यामुळे बँक खात्यांपासून सोशल मीडिया अकाउंटपर्यंत सर्व काही धोक्यात येऊ शकते. या गंभीर धोक्याबाबत गृह मंत्रालयाअंतर्गत […] The post देशात ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील ८६ हजार एसटी कामगारांचा पगार रखडला
मुंबई : प्रतिनिधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील एसटी महामंडळाच्या ८६ हजारांहून अधिक कर्मचा-यांचा पगार रखडला आहे. एसटी कर्मचा-यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला देऊ, असे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी गेल्या वर्षी दिले होते. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत पगाराचा ‘जीआर’ही काढण्यात आला नाही. त्यामुळे ‘सात’चा मुहूर्त चुकण्याबरोबर जीआर जारी न केल्यामुळे पगार नेमका होणार कधी? असा प्रश्न एसटी कर्मचा-यांना […] The post राज्यातील ८६ हजार एसटी कामगारांचा पगार रखडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी
नाशिक : प्रतिनिधी राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. अनेक राजकीय पक्ष पुरुषांसोबतच महिलांना रोजंदारी देऊन प्रचारात सहभागी करून घेतात. सामान्यत: या महिलांना तीनशे ते पाचशे रुपये एवढी मजुरी दिली जाते. अशाच एका प्रचारादरम्यान महिलांमध्ये पैसे न दिल्याच्या रागातून तुफान हाणामारी झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. सदर […] The post प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. बेलतरोडी पोलिसांनी ही कारवाई करत खंडणीचा कट उधळून लावला. मुख्य आरोपी बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक अडचणीत असल्याने त्याने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार प्रकाश ढगे हे भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक आहेत. १७ डिसेंबर २०२५ रोजी ते भंडाऱ्याहून नागपूरकडे परत येत असताना वेळाहरी बायपास रोडवर आरोपींनी त्यांची कार अडवली. कारच्या मागील आणि समोरील दरवाज्याच्या काचा फोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर १९ डिसेंबर २०२५ रोजी ढगे यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. फोनवरील आरोपींनी ढगे यांना, तुम्हाला मारण्यासाठी २० लाखांची सुपारी देण्यात आली आहे. जीव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये द्या, अशी धमकी दिली. आरोपींनी जबलपूर रिंगरोडवरील महादेव ढाब्यावर पैसे आणण्यास सांगितले. ढगे यांनी तात्काळ बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून बनावट नोटांनी भरलेली बॅग ढगे यांच्याकडे देऊन त्यांना ठरलेल्या ठिकाणी पाठवले. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी बॅग घेऊन पसार झाले. या घटनेनंतर आरोपींनी सतत सिमकार्ड आणि मोबाईल फोन बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पैसे आणण्यास सांगण्यास सुरुवात केली. २९ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा धमकीचा फोन करून ढगे आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत छापे टाकून पोलिसांनी अखेर सर्व आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल अनिल तागडे (वय ३०, रा. देवरी, गोंदिया), राहुल मीताराम पटले (वय २१), हिंदुस्तान वासुदेव रामटेके (वय २७), निखिल राजू नांदेकर (वय २८) आणि प्रेक्षा बाबू कांबळे (वय ३०) यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल तागडे हा देवरी येथे मोबाईल शॉपी चालवतो. तो बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. प्रेक्षा कांबळे ही त्याची मावस बहीण असून ती भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहे. 'विक्रम' आणि 'शिवाजी द बॉस' यांसारख्या दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी हा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड
कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात आज पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने निवडणूक रणनीतीकार संस्था आयपीएसीचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या कोलकात्यातील निवासस्थानासह देशभरातील १५ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईची बातमी समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी संताप व्यक्त करत थेट छापेमारी सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचल्या आणि आयटी ऑफिसमधील अनेक […] The post तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आज पुण्यात भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सुधीर काळे यांचा भाजपमध्ये उशिराने प्रवेश झाला असला तरी, ते पक्षात यावे अशी आमची इच्छा होती. निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक असताना कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आम्हाला अभिमान आहे. काळे यांची सर्वसमावेशक काम करणारा नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्यासारखे कार्यकर्ते सोबत आल्याने पक्षाचा उत्साह वाढतो, असेही मोहोळ यांनी नमूद केले. मोहोळ यांनी पुढे सांगितले की, सुधीर काळे यांना अनेक वर्षांचा राजकीय अनुभव आहे आणि पक्षात त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. एक चांगला आणि कार्यक्षम नेता भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्याचा त्यांना कधीही पश्चाताप वाटणार नाही, याची जबाबदारी आमची आहे, असे आश्वासनही मोहोळ यांनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि राजेश येनपुरे उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सुधीर काळे यांचे पक्षात स्वागत केले. काळे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असून, जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये त्यांचे आगमन महत्त्वाचे आहे. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असून, पुण्यात पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकेल, अशी स्थिती आहे, असे घाटे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'विकसित भारत' आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'विकसित महाराष्ट्र' हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. पुणे महानगरपालिकेतून १२५ नगरसेवक निवडून येऊन प्रभागाचे नेतृत्व करतील, असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला. मागील मनपा निवडणुकीत सुधीर काळे आणि आपण विरोधात लढलो असलो तरी, आमचे मैत्रीपूर्ण संबंध कायम होते, असेही त्यांनी सांगितले. संघाचे स्वयंसेवक राहिलेले काळे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपमध्ये आले आहेत. त्यांचा सन्मान पक्षात कायम राहील आणि प्रभागाचा विकास एकत्रितपणे पुढे नेऊ, असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक २७ मध्ये त्यांच्या विजयात काळे यांचा वाटा महत्त्वपूर्ण राहील, असेही ते म्हणाले. आपल्या पक्षप्रवेशावेळी बोलताना सुधीर काळे म्हणाले की, आजपासून मी भाजपचा एक घटक झालो आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने मी आतापर्यंत काम करत आलो आहे. ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये काम केले, त्याच पद्धतीने यापुढेही भाजपमध्ये काम करत राहीन. शहरातील भाजप उमेदवारांचा मी यापुढे प्रचार करणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कामांनी प्रेरित होऊन आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले.
‘ना खान, ना बाण. आता फक्त भगव्याची शान’, अशी नवी घोषणा गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. येथील युती फक्त शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमुळे तुटली असा दावा त्यांनी केला. सोबतच शहर खड्डेमुक्त करू. संभाजीनगरचा पाणीप्रश्न दोन महिन्यात सोडवू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यात त्यांनी संभाजीनगरच्या विकासासाठी करण्यात आलेल्या योजना तसेच निधींच्या तरतुदीबद्दल माहिती दिली. तसेच शहराच्या विकासाचे नवे व्हीजनही मांडले. संभाजीनगरात खड्डेमुक्त रस्ते होणार देवेंद्र फडणवीस म्हणाले, डीएमआयसीमध्ये देखील आपल्याला अधिकची जागा लागणार आहे. दोन एमआयडीसीला जोडण्याचे काम हाती घेतले आहे. 2015 साली छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांसाठी 100 कोटी दिले होते आणि तेव्हापासून रस्ते आपल्याला मोठे करता येतात ही भावना तयार झाली. आता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. शहरातील सगळे डीपी रोड अतिक्रमणमुक्त करणार असल्याचा अजेंडा असणार आहे. तसेच खड्डेमुक्त संभाजीनगर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील 2 महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटेल पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे की आज आपण पाण्याच्या योजनेच्या पंपाची चाचणी यशस्वी केली आहे. इथला जो पाण्याचा प्रश्न होता, मागच्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण एका झटक्यात 1600 कोटींची योजना आपण मंजूर केली होती. तसेच अनुदानावर ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंची सत्ता आल्यानंतर या योजनेचा खोळंबा झाला. आता ही योजना 2700 कोटींची झाली असून पुढील 2 महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटेल. औद्योगीक विकासामुळे संपूर्ण शहराचा विकास होणार औद्योगिक विकासासोबत आपल्याला अर्बन इनफ्रास्ट्रक्चर देखील सुरू विकसित करावे लागणार आहे. 2014 साली मोदीजी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा शहराचच्या विकासावर काम करण्यास सुरू केले. संभाजीनगर सारख्या शहराला पूर्वी निधी मिळत नव्हता, आता शहरांच्या विकासासाठी निधी पुरवठा केला जात आहे. तसेच जोपर्यंत शहराचा आर्थिक विकास होत नाही, तोपर्यंत अर्बन इनफ्रास्ट्रक्चर कोपअप होत नाही. या औद्योगीक विकासामुळे संपूर्ण शहराचा विकास होणार आहे, असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एआयबाबतचे जागतिक सतरावरील काम संभाजीनगरातून उद्योजकासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्योजक संभाजीनगरच्या प्रेमात पडतात. आता दावोसमधून संभाजीनगरसाठी आणखी निधी आणणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर एआयबाबतचे जागतिक सतरावरील काम संभाजीनगरातून होत असल्याची देखील माहिती फडणवीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गाची कल्पना कधी आली? समृद्धी महामार्गासारखा महामार्ग असावा अशी कल्पना कधी आली? असा प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, याची कल्पना मी 2001 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली होती. नागपूर ते मुंबई असा महामार्ग तयार करण्यात यावा, अशी माझी कल्पना होती. त्याकाळी मी कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे म्हटले होते, तेव्हा आयटीचा कल होता. परंतु, तेव्हा ते झाले नाही. पण जेव्हा मी 2014 ला मुख्यमंत्री बनलो आणि या महामार्गाचे काम सुरू करण्याचे ठरवले. नागपूर ते मुंबई अशी मी सरळ रेष मारली आणि असा रोड आपल्याला हवा आहे, असे मी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांना सांगितले की या महामार्गासाठी एक इंच जागा देऊ नका, पण मी यावर मात करत हा रस्ता पूर्ण केला. औरंगजेबाची निशाणी जपण्याची गरज नाही छत्रपती संभाजीनगर शहराविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, इतिहास पुसायचा नाही, पण इतिहासातून ज्या ठिकाणी गुलामगिरीची जाणीव होते त्या ठिकाणी मात्र जो खरा इतिहास आहे तो मांडायचा आहे. औरंगजेब हा काही भारतीय नव्हता, अगदी भारतीय मुस्लिम समाजाचा सुद्धा तो हीरो नव्हता. त्याने आक्रमण करून हिंदूंची मंदिरे पाडली, त्यामुळे त्याची निशाणी जपण्याची गरजच नाही. हिंदवी स्वराज्याचे तेज छत्रपती संभाजी महाराजांचे असे जीवंत ठेवले की औरंगजेबाची कबर इथे तयार झाली पण हिंदवी स्वराज्य संपले नाही. ना बाण ना खान, राखो भागव्याची शान छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेची निवडणूक ही बाण की खान अशी व्हायची, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ना बाण ना खान, राखो भागव्याची शान, अशी नवी घोषणाच फडणवीस यांनी यावेळी दिली. मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. दुर्दैवाने इथली शिवसेना ही स्प्लिट होती. शिवसेनेत काही गट होते, त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की दूसरा त्यावर आक्षेप घ्यायचा. असे चार पाच वेळा झाल्यानंतर मी म्हणायचो चला नवीन प्रस्ताव मांडू. संजय शिरसाट यांच्याशी देखील मी चर्चा केली. पण दुर्दैवाने निर्णय होऊ शकला नाही आणि त्यांनी युती तोंडली. याचे मला दुःख झाले. याचा अर्थ असा नाही की आम्ही शत्रू आहोत, आमची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी भगव्याचा विषय येईल तेव्हा आम्हाला विचार करावाच लागेल. जे भगव्याची पाठराखण करतील त्यांना आम्ही सोबतच ठेऊ.
सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलिस दलाने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलली असून, यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आझम काझी यांच्यासह त्यांच्या टोळीतील एकूण आठ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उद्या ९ जानेवारी रोजी मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार असतानाच ही कारवाई झाल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही धडक कारवाई केली आहे. टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहमद युसूफ साहेबपीर चमनमलीक काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजीरे, अस्लम काझी, उमेदवार आझम काझी, अल्ताफ रोहीले आणि मोहसिन गोदड या आठ जणांना सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागले जात होते, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही पोलिसांचे हद्दपारीचे सत्र केवळ मिरजच नव्हे, तर कुपवाड, विटा आणि आटपाडी भागातही पोलिसांनी गुन्हेगारांना कडक दणका दिला आहे. कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरज ऊर्फ रमजान मौला शेख, शब्बीर शेख, सौरभ जावीर आणि अर्जुन गेजगे या चौघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. विटा येथील राजाराम बोडरे आणि सुदाम बोडरे यांच्यावरही सहा महिन्यांची हद्दपारी लादली आहे. आटपाडी येथील जितेंद्र ऊर्फ जिच्या काळे आणि त्याच्या टोळीला सांगली, सोलापूर आणि सातारा अशा तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सतर्क ही धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्यासह मिरज, कुपवाड, विटा आणि आटपाडी येथील पोलिस निरीक्षकांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आगामी महानगरपालिका निवडणूक निर्भय आणि शांत वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस दल पूर्णपणे सतर्क असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. हे ही वाचा… अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का:सचिन खरातांची निवडणुकीतून तडकाफडकी माघार, आता गुन्हेगार उमेदवारांची जबाबदारी कोणावर? पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्यावरून सुरू असलेल्या वादात अजित पवारांनी ज्यांच्याकडे बोट दाखवले होते, त्या सचिन खरात यांनीच आता निवडणुकीतून तडकाफडकी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. कुख्यात गुंड नीलेश घायवाळ प्रकरणातील गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आला होता. अजित पवारांनी देखील मोहोळ यांच्यावर या संदर्भात टीका करत आरोप केला होता. या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध करून दाखवा, जर ते सिद्ध झाले तर मी आजच राजकारणातून संन्यास घेईन, असे थेट आव्हान मोहोळ यांनी दिले आहे. पुण्यातील गुन्हेगारी आणि टोळीयुद्ध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नीलेश घायवाळ या कुख्यात गुंडाशी संबंधित काही गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई सुरू असताना, त्यांना देशाबाहेर पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी रसद पुरवली आणि राजकीय दबावाचा वापर करून मदत केली, असा खळबळजनक आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. गुन्हेगारांना कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी मोहोळ यांनी आपले वजन वापरले आणि त्यांना विदेशात सुरक्षित स्थळी धाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे या आरोपांचे स्वरूप आहे. निवडणुकीच्या काळात हा मुद्दा समोर आल्याने मोहोळ यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, निवडणूक जवळ आली की अशा प्रकारचे बिनबुडाचे आणि खालच्या पातळीवरचे आरोप करणे ही विरोधकांची पद्धत झाली आहे. मी कोणत्याही गुन्हेगाराला कधीही मदत केलेली नाही. ज्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहेत, त्यांना मी जाहीर आव्हान देतो की त्यांनी पुरावे समोर आणावेत. जर हे आरोप खरे ठरले तर मी राजकारणातून कायमची एक्झिट घेईन. मात्र, जर आरोप खोटे ठरले तर ज्यांनी हे आरोप केले आहेत, त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची हिंमत दाखवावी, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. एकाच व्यासपीठावर चर्चेचे आव्हान मुद्दयाचे राजकारण करण्याऐवजी विरोधक वैयक्तिक चिखलफेक करत असल्याचे सांगत मोहोळ यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मी कोणत्याही व्यासपीठावर यायला तयार आहे. विरोधकांनी समोरासमोर येऊन बोलावे आणि पुराव्यानिशी चर्चा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आव्हानामुळे आता विरोधक यावर काय भूमिका घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून पुण्याचे राजकारण आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
डॉ. प्रवीण बीडकर आणि डॉ. अनघा बीडकर यांचे संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातले कार्य उल्लेखनीय आहे. कोविडसारख्या भीतीदायक काळात त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या कामातून विशेष योगदान दिले, असे कोडकौतुक मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. डॉ. प्रवीण बीडकर आणि डॉ. अनघा बीडकर यांच्या रुग्णालयाचा उद्घाटन व स्थानांतर कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमधील न्यू उस्मानपुरातल्या श्री गोविंद भुवन येथे झाला. यावेळी ते बोलत होते. तीस वर्षांनंतर… नवीन वर्षाच्या सुरुवातीला तीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर डॉ. प्रवीण बीडकर व डॉ. अनघा बीडकर यांच्या संकल्प मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथिक दवाखान्याचे स्थानांतर श्री गोविंद भुवन उस्मानपुरा येथे झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मंत्री अतुल सावे व प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि फित कापून हा सोहळा पार पडला. सहज, सुलभ उपचार कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, जनसामान्यात होमिओपॅथीचा प्रसार, प्रचार आणि लोकप्रियता वाढली आहे. सहज आणि सुलभ उपचार पद्धतीमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. आयुष मंत्रालयाकडून होमिओपॅथिक संशोधनकार्यासाठी व अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना व निधीची डॉ. भागवत कराड यांनी माहिती दिली. विविध आजारांवर संशोधन माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी यावेळी डॉ. प्रवीण बीडकर आणि डॉ. अनघा बीडकर यांनी होमिओपॅथिक क्षेत्रात केलेल्या विविध कामांची, संशोधन प्रबंधांची व कोविड काळातील सामाजिक कार्याची प्रशंसा केली. 'व्हीएचएफ'चे अध्यक्ष डॉ. माळी यांनी बीडकर यांचा आंत्र ग्रंथी, विविध क्लिष्ट आजार, कॅन्सर, मुतखडा, गर्भाशयातील आणि स्तनातील गाठी, बालदमा, मुळव्याध, त्वचा विकार उपचारात हातखंडा असल्याचे सांगितले. तसेच डॉ. प्रवीण बीडकर यांच्या संशोधनकार्याची, विविध आजारांवर सादर केलेल्या शोध निबंध, प्रबंधांची राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय व आंतरराष्ट्रीय शोध परिषदांमध्ये झालेल्या सहभागांची तपशीलवार माहिती दिली. बुलढाणा केस गळती नाशिक विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. अजित फुंदे यांनी आयुष मंत्रालयातील संशोधन, अभ्यास, रुग्णसेवेसाठी आयुष हॉस्पिटलच्या विविध योजना व निधी उपलब्धतेची माहिती दिली. डॉ. प्रवीण बीडकर व 'व्हीएचएफ' टीमच्या सर्व डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून बुलढाणा येथील कठोरा गावातील केस गळती साथ रोगाच्या व त्वचा विकारात केलेले उपचार व संशोधनपर कार्याचे महत्त्व विषद केले. या कामाची राष्ट्रीय संशोधन समिती (आयसीएमआर) दखल घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमाला 'व्हीएचएफ'चे सचिव डॉ. गंगवाल, उपसचिव डॉ. गोपाळघरे, डॉ. व्यवहारे, डॉ. मुसमाडे, डॉ. पटेल, डॉ. थोरात, डॉ. वैशाली. डॉ. हिना, डॉ. लुनिया, डॉ. समीक्षा आदी होमिओपॅथिक तज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजनात संजय खनाळे यांनी मार्गदर्शन केले, तर आदित्य बीडकर यांनी आभार मानले.
डॉक्टरविना चीनमध्ये ६० सेकंदात तपासणी, औषधही हजर!
बीजिंग : वृत्तसंस्था चीनने तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाला पुन्हा एकदा थक्क केले. सोशल मीडियावर सध्या चीनमधील एका अशा रुग्णालयाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे एकही डॉक्टर प्रत्यक्ष हजर नसताना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हे एआय संचालित क्लिनिक (एआय क्लिनिक) पाहून नेटिझन्स म्हणत आहेत की, ‘चीन सध्या ३०२६ सालात जगत आहे. व्हायरल व्हिडीओमधील हे रुग्णालय म्हणजे […] The post डॉक्टरविना चीनमध्ये ६० सेकंदात तपासणी, औषधही हजर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन
पुणे : प्रतिनिधी देशातील पर्यावरण चळवळीला दिशा देणारे, निसर्ग आणि माणसातील नातं जपण्याचा सातत्याने आग्रह धरणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. अल्पशा आजाराने पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे मंगळवारी (७ जानेवारी) रात्री ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकासासाठी आयुष्यभर […] The post ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण अधिकच तापत चालले असून, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाकयुद्ध आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने भाजपवर, विशेषतः पुण्यातील भाजप नेत्यांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेतेही आक्रमक भूमिका घेत असून, या संघर्षामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. पिंपरीतील भाजप आमदार महेश लांडगे यांनी केलेली टीका या वादाला नवी धार देणारी ठरली. अजित पवार हे महाराष्ट्राचे आणि पुण्याचे ‘आका’ असल्याचा आरोप करत, त्यांनी अजित पवारांवर थेट भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप केला. एक तर स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी भाजपमध्ये आलात, त्याआधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा. मुळात तुम्ही स्वतःच आका आहात, हे जाहीर करा, अशा शब्दांत लांडगे यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र नेहमीप्रमाणे संयमित प्रतिक्रिया देत विषय एका वाक्यात आटोपण्याचा प्रयत्न केला. मी कोण आहे हे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत कळ काढा, त्यानंतर उत्तर देतो, असे म्हणत त्यांनी थेट वादात न पडता अप्रत्यक्षपणे जनतेच्या निकालावर विश्वास व्यक्त केला. मात्र, अजित पवारांच्या या मोजक्या प्रतिक्रियेनंतरही राष्ट्रवादीकडून भाजपवर जोरदार पलटवार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महेश लांडगेंच्या टीकेला अत्यंत तीव्र आणि उपरोधिक शब्दांत प्रत्युत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय वारसा हा शरद पवार आणि अजित पवार या सिंह आणि वाघाचा आहे. त्यामुळे आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. महेश लांडगेंना उद्देशून त्यांनी चिमटा काढत, कदाचित त्यांना पुण्याचे आणि महाराष्ट्राचे पुढचे ‘काका’ कोण हे म्हणायचं असावं, पण त्यांनी चुकून ‘आका’ शब्द वापरला असावा, अशी उपहासात्मक टिप्पणी केली. अमोल मिटकरी यांनी आपल्या प्रतिक्रियेत संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा संदर्भ देत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा अर्थ व्यक्त केला. या माध्यमातून त्यांनी भाजपच्या टीकेकडे दुर्लक्ष करण्याचा संदेश देतानाच, भाजप नेत्यांच्या आरोपांची खिल्ली उडवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. दरम्यान, पुण्यातील राजकारणात आणखी एक वाद समोर आला असून, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही शब्दिक चकमक सुरू झाली आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर मोहोळ यांनी जोरदार आक्षेप घेतला. निवडणुकीत मुद्दे उरले नाहीत म्हणून भाजपवर खोटे आरोप केले जात आहेत, अशी टीका त्यांनी केली. भाजपकडून अजित पवारांवर हल्ले; तितकेच आक्रमक प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना थेट आव्हान देत, जर अजित पवार विकासकामांबाबत आरोप करत असतील किंवा काही दावे मांडत असतील, तर त्यांनी त्याचे ठोस पुरावे सादर करावेत, असे स्पष्टपणे सांगितले. भाजपच्या विकासकामांवर शंका उपस्थित करणाऱ्या वक्तव्यांमुळेच हा वाद निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. एकीकडे पिंपरीत महेश लांडगे, तर दुसरीकडे पुण्यात मुरलीधर मोहोळ अशा दोन्ही आघाड्यांवर भाजपकडून अजित पवारांवर हल्ले होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसही तितक्याच आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर देत असल्याचे चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात विविध योजनेमध्ये लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान द्यावे या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. ८ दुपारी गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवा वरून मिरवणुक काढली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेमधे लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाचा हप्ता देण्यात आलेला नाही. काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता काही जणांना दुसरा देण्यात आला. या अनुदानामुळे लाभार्थ्यांनी त्यांची कच्ची घरे पाडून पक्की घरे बांधण्यास सुरवात केली. मात्र मागील काही दिवसापासून अनुदानाचा हप्ताच देण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मागील सहा ते आठ महिन्यापासून त्यांचेही अनुदान वाटप झाले नाही. हिच परिस्थिती जनावरांच्या गोठ्याच्या बांधकामाबाबत आहे. कामांचे हजेरीपत्रक बंद झाल्यामुळे मजूरांची मजूरी थकली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने वाटप करण्याच्या मागणीसाठी लाभार्थ्यांनी वेळोवेळी कार्यालयाकडे चकरा मारल्या मात्र अनुदान वाटप झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. ८ दुपारी गटविकास अधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याची गाढवावरून मिरवणुक काढण्यात आली. औंढा नागनाथ बसस्थानकावरून काढण्यात आलेली मिरवणुक पंचायत समिती कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झटे, माऊली मगर, दत्ता अंभोरे, संजय भामिरगे, डॉ. चंद्रमणी पाईकराव, विष्णू कटके, पांडूरंग मेटकर, सुरेश दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंधरा दिवसानंतर कुटुंबासह आंदोलन करणार औंढा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते वाटप करण्यास पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पंधरा दिवसांत अनुदान न मिळाल्यास लाभार्थी कुटुंबासह पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, मनसे नेते अमित ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील वैयक्तिक आठवणी, राजकीय भूमिका आणि स्वतःच्या प्रवासाबाबत मोकळेपणाने भाष्य करत एक भावनिक चित्र उभं केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे, मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित आठवणी सांगत, राजकारणापलीकडचं ठाकरे कुटुंबाचं वास्तव समोर आणलं. या संवादातून ठाकरे कुटुंबातील नातेसंबंध, मतभेद आणि काळानुसार बदललेली परिस्थिती स्पष्टपणे जाणवली. अमित ठाकरे म्हणाले की, माझे आजोबा नेमके काय होते, हे मला खूप उशीरा समजू लागलं. लहानपणी मातोश्रीवर जात असताना बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मोकळेपणाने बोलायचे. त्या काळात मातोश्रीवर कोणतंही राजकीय वातावरण नव्हतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. आजोबा आणि नातवामधील नातं हे अत्यंत साधं आणि आपुलकीचं होतं. लहान वयात राजकारणाची जाणीव नसतानाही, त्या घरातील माणुसकी आणि स्नेह त्यांच्या मनावर खोलवर ठसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालपणीच्या आठवणी सांगताना अमित ठाकरे अधिकच भावूक झाले. मीना ताई मातोश्रीवर असायच्या, त्या गेल्या तेव्हा मी केवळ तीन-चार वर्षांचा होतो, असं सांगत त्यांनी त्या काळाचा उल्लेख केला. लहानपणी डोळे बारीक असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे त्यांना प्रेमाने ‘ब्रुस ली’ म्हणायचे. मातोश्रीवर गेलो की आजा विचारायचे,आलास का रे ब्रुस ली?, अशी गंमतीशीर आठवण त्यांनी सांगितली. या आठवणींमधून बाळासाहेब ठाकरे यांचा घरातील आजोबा म्हणून असलेला हळवा स्वभाव अधोरेखित झाला. त्या काळात आदित्य ठाकरे यांच्याशी असलेली जवळीकही अमित ठाकरे यांनी सांगितली. मी आदित्यकडे खूपदा जायचो. पहिलीत असताना आदित्यकडेच मी बॅटमॅनचा चित्रपट पाहिला, असं ते म्हणाले. मात्र, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हे सगळं अचानक थांबलं, असं त्यांनी नमूद केलं. राजकीय फाटाफुटीचा परिणाम कुटुंबातील वैयक्तिक संबंधांवर कसा झाला, हे त्यांच्या या विधानातून स्पष्टपणे समोर आलं. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी युतीला उशीर झाला, हा दावा ठामपणे फेटाळून लावला. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद होते, हे सत्य आहे. मात्र, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांना एकत्र यावंसं वाटलं. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आणि एक नशीब असतं. योग्य वेळ आली की गोष्टी घडतात, असं सांगत त्यांनी शिवसेना आणि मनसेच्या जवळिकीचं समर्थन केलं. त्यांच्या मते, या युतीला उशीर झाला असं म्हणणं चुकीचं आहे. मनसेच्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी वडील राज ठाकरे यांच्याविषयी कृतज्ञतेने उल्लेख केला. माझ्या वडिलांनी प्रचंड कष्ट करून मनसे पक्ष उभा केला. एकेकाळी मनसेचे 13 आमदार निवडून आले, अनेक नगरसेवक होते आणि नाशिक महानगरपालिकेत सत्ता आली, असं त्यांनी सांगितलं. त्या काळात मनसेने प्रशासन आणि विकासाच्या दृष्टीने चांगलं काम केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, 2014 नंतर पक्षाचा उतरता काळ सुरू झाला, हेही त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलं. याच उतरत्या काळात आपण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितलं. पक्षाच्या चढत्या काळात येण्यात काही अर्थ नव्हता. उतरत्या काळात वडिलांना एकटे पडू द्यायचं नव्हतं, असं ते म्हणाले. राजकारणात विशेष रस नसतानाही, वडिलांना मदत करण्यासाठी आपण पुढे आलो, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन वर्षे मेहनत घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षात जबाबदारी दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीवर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. गेल्या दहा वर्षांत आम्ही सत्तेत नाही. आमचा पैसा हा आमच्या व्यवसायातून आलेला आहे, असं स्पष्ट करत त्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
प्रचार साहित्य महागले; झेंडे, बिल्ले, टोप्यांना मोठी मागणी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवारांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर अनेक उमेदवार भर देत आहेत. प्रचारावेळी आपाल्या पक्ष व पक्षचिन्हाची ठळक ओळख मतदारांना व्हावी यासाठी प्रचार साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. सध्या बाजारात टोपी, बिल्ले, […] The post प्रचार साहित्य महागले; झेंडे, बिल्ले, टोप्यांना मोठी मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपने नाकारलेल्या उमेदवारांना पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे, असा आरोप भाजपचे पुणे शहर निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांनी केला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची सखोल छाननी केली होती. पक्षाच्या अपेक्षेनुसार काम न करणारे, चुका करणारे आणि कामगिरीत अपयशी ठरलेल्या काही जणांची उमेदवारी भाजपने नाकारली होती, असे बीडकर म्हणाले. बीडकर यांनी सांगितले की, भाजपमधील एकही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेला नाही. पक्षात कोणतीही नाराजी नसून कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी काम करत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा आणि सून भाजपकडून निवडणूक लढवत असल्याचा मुद्दाही मांडला. पुणे शहरातील भाजपचे संघटन मजबूत असून, ११० माजी नगरसेवकांच्या सोबतीने यंदा १२० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे शहराच्या विकासावर बोलताना बीडकर यांनी भाजपच्या कामांचा उल्लेख केला. भाजपने विविध विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. मेट्रोचे विस्तारीकरण, नदीपात्र सुशोभीकरण, २४x७ पाणीपुरवठा योजना, अत्याधुनिक विमानतळ टर्मिनल, चांदणी चौक पुनर्विकास, रिंग रोड, उड्डाणपूल आणि रस्ते रुंदीकरण यांसारख्या प्रकल्पांमुळे पुणे झपाट्याने बदलत आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असून, राज्याच्या 'ग्रोथ इंजिन' म्हणून पुण्याकडे पाहिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना बीडकर यांनी स्पष्ट केले की, युतीसाठी प्रयत्न झाले होते. मात्र, काही स्वार्थी लोकांनी अडथळे निर्माण केले. भाजपच्या नगरसेवक असलेल्या जागांवरही मागणी करण्यात आली, तसेच एकाच घरातून दोन तिकिटांची मागणी झाल्यामुळे युती होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. बीडकर यांनी निवडणुकीतील मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसशीच असल्याचे म्हटले. त्यांनी अजित पवारांवर टीका करताना सांगितले की, कोयता गँग आणि गुन्हेगारीवर बोलण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीकडे राहिलेला नाही, कारण त्यांच्या उमेदवार यादीतच गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येते. अजित पवार पालकमंत्री असताना मेट्रो भूमिगत की उड्डाणपूल यावर सहा वर्षे चर्चा चालू होती, तसेच बीआरटी बसच्या दरवाजांवरून तीन वर्षे वाया गेली, असेही त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे पुण्याचा खरा विकास केवळ भाजपच्या काळातच होऊ शकतो, असा दावा बीडकर यांनी केला.
संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच, राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली. या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. […] The post संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सेनेशियो (Senecio) या इस्रायली संस्थेने बीव्हीजी इंडिया लिमिटेडसोबत (BVG India Limited) भारतात डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. या सहकार्यामुळे रोबोटिक्स-आधारित आणि निसर्गाधारित सार्वजनिक आरोग्य उपायांना चालना मिळेल, ज्याचा उद्देश डासांवर दीर्घकाळ आणि सुरक्षित नियंत्रण मिळवणे आहे. या करारानुसार, भारतात प्रगत 'स्टेराइल इन्सेक्ट टेक्निक' (SIT) ही डास नियंत्रण उपाययोजना सुरू केली जाईल. सेनेशियो संस्थेने यापूर्वी सीओपी29 साठीच्या अधिकृत इस्रायली तंत्रज्ञान शिष्टमंडळात सहभाग घेतला होता, ज्यामुळे रोबोटिक्सच्या माध्यमातून विस्तारक्षम आणि निसर्गाधारित सार्वजनिक आरोग्य उपायसुविधा विकसित करण्यातील त्यांची भूमिका अधोरेखित झाली होती. या सहयोगाचा मुख्य भर भारतात स्थानिक उत्पादन क्षमता उभारणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रभावी मार्ग विकसित करण्यावर आहे. यासाठी केंद्र व राज्यस्तरीय प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य यंत्रणा तसेच तांत्रिक व औद्योगिक भागधारकांच्या समन्वयाने काम केले जाईल. स्थानिक गरजा, हवामान, पर्यावरण आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन उपाय विकसित करण्यावर विशेष भर दिला जाईल. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश डासजन्य आजारांवर दीर्घकालीन, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक नियंत्रण मिळवणे आहे. पारंपरिक रासायनिक कीटकनाशकांमुळे इतर प्रजाती आणि परिसंस्थांना होणारी हानी टाळून, निसर्गाधारित व तंत्रज्ञान-सक्षम उपायांद्वारे डास प्रादुर्भाव रोखण्याच्या व्यवस्थापनाला पाठबळ देणे हा या प्रकल्पाचा गाभा आहे. रोबोटिक्स आणि स्मार्ट सिस्टीम्सच्या सहाय्याने निरीक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण अधिक अचूक, कमी खर्चिक आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल, शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे डासजन्य आजारांचा धोका वाढत असताना, अशा प्रकारचे शाश्वत आणि विस्तारक्षम उपाय सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहेत. भारतात स्थानिक उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, तसेच दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. या सहयोगामुळे भारतात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण, पर्यावरणस्नेही आणि भविष्यासाठी उपयुक्त उपायांची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जळगावात गाडीला भीषण अपघात; ३ ठार
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे. उज्जैन येथे देवदर्शनासाठी जाणा-या तिघांवर काळाने घाला घातला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिस या घटनेचा तपास करत असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथे दर्शनासाठी […] The post जळगावात गाडीला भीषण अपघात; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवारांविरोधातील पुरावे गेले कुठे?
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेले उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला करप्शन आणि कन्फ्युजनची युती म्हटले, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यांवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांची […] The post अजित पवारांविरोधातील पुरावे गेले कुठे? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरात दररोज सुमारे ३४७ दशलक्ष लिटर (MLD) सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. पुणे महानगरपालिका (PMC) गेल्या अनेक वर्षांपासून केवळ ३० ते ४० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करत असून, उर्वरित मोठ्या प्रमाणातील सांडपाणी नदीप्रवाहात मिसळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) पुणे मनपाला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार, मनपाने सात दिवसांच्या आत एक स्वतंत्र खाते उघडून त्यात दररोज ३४ लाख ७० हजार रुपये जमा करणे बंधनकारक होते. ही रक्कम प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सांडपाणी शुद्धीकरणासाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, माहिती अधिकारातून केलेल्या तपासणीत असे उघड झाले आहे की, पुणे मनपाने आजतागायत ना स्वतंत्र खाते उघडले, ना एक रुपयाही जमा केला. मनपाने या आदेशाचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर मनपाने दररोज ही रक्कम जमा केली असती, तर आतापर्यंत एकूण रक्कम एक हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली असती. या निधीमुळे पुण्यातील नद्या, भूजल आणि विहिरींच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत झाली असती. यावेळी विजय कुंभार आणि विवेक वेलणकर उपस्थित होते. वर्षानुवर्षे विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत सोडल्यामुळे नदीतील मासे नष्टप्राय झाले आहेत. तसेच, उजनी धरणातील पाणी आणि नदीकाठच्या परिसरातील भूजल मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. यामुळे उजनी आणि सोलापूर भागात रोगराई पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. इंदूरसारख्या स्वच्छ शहरात पाणी प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंच्या घटना पुण्यासाठीही एक इशारा असल्याचे यादवाडकर यांनी नमूद केले. या प्रकरणात केवळ पुणे महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारीच नव्हे, तर आदेश असूनही कारवाई न करणारे राज्य सरकारही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १०० टक्के सांडपाणी प्रक्रियेला प्राधान्य न देता केवळ सुशोभीकरणावर हजारो कोटी रुपये खर्च करणे बेजबाबदार आणि बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या प्रकरणी जबाबदार असलेल्या सर्वांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खुर्चीसाठी विचारधारेशी तडजोड नाही: उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई : प्रतिनिधी अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप-काँग्रेस आघाडीबद्दल आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. तिथे पाहा काय होतंय ते. जे होतंय, ते विचारसरणीशी सुसंगत नाही, याची जाण करून दिली होती. हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी लढत नाही. अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ येथे झालेल्या काँग्रेस-भाजप युतीवर केली. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व […] The post खुर्चीसाठी विचारधारेशी तडजोड नाही: उपमुख्यमंत्री शिंदे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावतीत महायुतीमध्ये 'बिघाडी' झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही प्रभागांत नवनीत राणा भाजपच्या प्रचारासाठी मैदानात आहेत, तर काही ठिकाणी भाजप उमेदवाराच्या विरोधातच राणा दाम्पत्याने धुराळा उडवला आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित भाजपच्या प्रचार सभेत खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्यात जाहीर व्यासपीठावरच जुंपली. 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा संदर्भ देत सुरू झालेली ही चर्चा थेट एकमेकांच्या निष्ठेपर्यंत जाऊन पोहोचली. अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राजकारणातील वेगवेगळे रंग देखील अनुभवायला मिळत आहेत. नवनीत राणा या एकीकडे भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे आपल्या पतीच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी देखील सभा घेत आहेत. यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी भाजपच्या सभेत नवनीत राणा यांना टोला लगावला. यानंतर नवनीत राणा यांनी देखील अनिल बोंडे यांच्यावर पलटवार केला. नेमके काय म्हणाले अनिल बोंडे? सभेत बोलताना खासदार अनिल बोंडे यांनी सुरुवातीला काँग्रेस आणि 'एमआयएम'वर निशाणा साधला. महापौर हिंदूच झाला पाहिजे, असे ठणकावून सांगताना त्यांनी आपला मोर्चा नवनीत राणांकडे वळवला. बोंडे म्हणाले, कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका, केवळ कमळासाठी मते मागा. एकदा भगवा खांद्यावर घेतला की जुनं विसरून जा. माझा सखा भाऊ जरी 'युवा स्वाभिमान' (YSP), राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून उभा असता, तरी मी माझ्या भगव्याशी (भाजपशी) प्रामाणिक राहिलो असतो, असा थेट चिमटा त्यांनी नवनीत राणा यांना काढला. नवनीत राणांचा पलटवार: बेईमानांना भीती वाटणारच! खासदार बोंडे यांनी काढलेल्या चिमट्यानंतर नवनीत राणा यांनीही आक्रमक पवित्रा घेत भरसभेतच उट्टे काढले. बोंडेंना प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या, बोंडे भाऊ, मीही मोर्शी फिरून आली आहे आणि तिथे माझी सभाही झाली आहे. मला कोणालाही सांगण्याची गरज नाही. जो भगव्याशी आणि भाजपशी बेईमानी करेल, त्यांच्या पाठीशी नवनीत राणा कधीच उभी राहणार नाही. लोकसभेतील आपल्या पराभवाचा उल्लेख करत त्यांनी अनिल बोंडेंवर निशाणा साधला. लोकसभेच्या वेळी याच लोकांनी म्हटले होते की, 'अमरावतीची एक जागा हरलो तर काय फरक पडतो?' त्यावेळी ज्यांनी कमळाविरोधात काम केले, त्यांना आता भीती वाटणारच. बेईमानांना आम्ही सोडणार नाही, असा जबरी टोला नवनीत राणा यांनी लगावला. चंद्रशेखर बावनकुळेंसमोरच वादाचा धुरळा विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घडला. पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील हा वाद पाहून सभेला उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि मतदारही अवाक झाले. अमरावतीत भाजपमधील एक गट नवनीत राणा यांच्या विरोधात सक्रिय असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची घेतलेली भेट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. परळ-लालबाग परिसरातील राजकीय समीकरणांवर या भेटीचा नेमका काय परिणाम होणार, याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असताना झालेली ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे काही राजकीय संकेत आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या भेटीनंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना, ही केवळ सदिच्छा भेट होती. दगडू सकपाळ यांची तब्येत खराब होती, त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो, असे स्पष्ट केले. मात्र, शिंदे आणि सकपाळ यांची भेट सार्वजनिक होताच राजकीय चर्चांना वेग आला. विशेषतः परळ-लालबागसारख्या संवेदनशील आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात या भेटीमुळे मोठा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दगडू सकपाळ यांनी आपली मनोवेदना मोकळेपणाने व्यक्त केली. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, या शब्दांत त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली. पक्षासाठी आयुष्यभर काम करूनही आज आपल्याला बाजूला सारण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेषतः आपल्या मुलीला नगरसेवकपदाची उमेदवारी न दिल्यामुळे ते अधिक भावनिक झाले. बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते, आणि त्यांचा आवाजही अनेकदा भरून येत होता. दगडू सकपाळ म्हणाले की, मी नाराज आहे, पण या नाराजीचा आणि एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आपण कोणाच्याही भेटीला आलेल्या व्यक्तीला घराबाहेर काढू शकत नाही. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री माझ्या घरी आला, त्यामुळे त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं, असे त्यांनी सांगितले. मात्र, आपल्याला ज्यांनी घडवलं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोठं केलं, त्यांच्यापासून आपण आज दूर कसे झालो, हा प्रश्न त्यांना सतावत असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत मांडले. आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना दगडू सकपाळ म्हणाले की, पक्षासाठी मी खूप खस्ता खाल्ल्या. मला आमदार केलं, पण आम्हीही पक्षासाठी घासलो. आज मात्र आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, त्यांना वाटतं माझी गरज संपली, हा म्हातारा झाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हे शब्द बोलताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि उपस्थितांनाही त्या क्षणाने भावूक केले. त्यांची ही प्रतिक्रिया केवळ वैयक्तिक वेदना नव्हे, तर पक्षातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची स्थिती काय आहे, याचं प्रतीक मानली जात आहे. दरम्यान, पक्षप्रवेशाबाबत विचारले असता दगडू सकपाळ यांनी अतिशय संयमित भूमिका घेतली. एकनाथ शिंदेंनी मला कोणताही प्रस्ताव दिला नाही आणि मीही तो विषय काढलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, माझ्या मनात असतं तर मी माझ्या मुलीला अपक्ष म्हणून उभं केलं असतं आणि निवडूनही आणलं असतं. पक्ष बदलण्याबाबत सध्या काहीही बोलणार नसल्याचे सांगत त्यांनी, आज नाही, उद्या मनात आलं तर करू शकतो. जोपर्यंत मनात नाही, तोपर्यंत डोक्यात कशाला आणायचं? अशी सूचक प्रतिक्रिया दिली. कुणाच्याही मुलीसाठी बाप रडला असता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एवढी नाराजी आणि वेदना असूनही दगडू सकपाळ यांनी मातोश्रीवर टीका करण्यास स्पष्ट नकार दिला. मातोश्री आमचं मंदिर आहे. कुठे गेलो तरी मातोश्रीवर टीका करणार नाही, असे ठाम शब्द त्यांनी वापरले. आपल्या मुलीसाठी उमेदवारी न मिळाल्याने जे दुःख आहे, ते कोणत्याही बापाला झालं असतं, अशी भावनिक टिप्पणी करत ते म्हणाले, माझीच नाही, कुणाच्याही मुलीसाठी बाप रडला असता. या संपूर्ण घडामोडीमुळे शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात दडलेली अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली असून, आगामी काळात परळ-लालबागच्या राजकारणात नेमका कोणता वळण येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये पडद्याआड सुरू असलेल्या हालचालींनी नाट्यमय वळण घेतले आहे. स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने ज्या १२ नगरसेवकांचे निलंबन केले, त्याच नगरसेवकांनी आता थेट भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदीप नाना पाटील आणि त्यांच्यासह इतर ११ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. याची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, काँग्रेसच्या या कारवाईला जुमानता प्रदीप पाटील यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड, कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे. अंबरनाथच्या नगर परिषदेवर आता भाजपचे वर्चस्व प्रदीप पाटील यांनी अनेक वर्षांपासून अंबरनाथमध्ये काँग्रेसचे संघटन मजबूत ठेवले होते. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपची ताकद प्रचंड वाढली असून, काँग्रेसचे अस्तित्व संकटात आले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'काँग्रेससोबत युती करणार नाही' असे स्पष्ट केले होते, मात्र नगरसेवकांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने तांत्रिकदृष्ट्या हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. भाजप आपल्या नेत्यांवर कारवाई कधी करणार? या घडामोडींवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.जर काँग्रेसने आपल्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली, तर ज्या भाजप नेत्यांनी या नगरसेवकांना आघाडीचा प्रस्ताव दिला, त्यांच्यावर भाजपने अद्याप कारवाई का केली नाही? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी अकोटमधील भाजप-एमआयएम युतीचा दाखला देत भाजपच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली. यावरून स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगच्या युतीची आठवण होते. भाजप आणि एमआयएम पडद्याआड एकच आहेत, हे आता उघड झाले आहे. सत्तेसाठी तत्त्वे आणि विचार बाजूला ठेवणारा हा पक्ष आहे, अशी टीका त्यांनी केली.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्यावरून सुरू असलेल्या वादात अजित पवारांनी ज्यांच्याकडे बोट दाखवले होते, त्या सचिन खरात यांनीच आता निवडणुकीतून तडकाफडकी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत 'गुन्हेगारी' आणि 'राजकारण' यावरून सुरू असलेल्या वादात आता नवीन वळण आले आहे. ज्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अजित पवारांवर टीका होत होती, ते उमेदवार आपले नसून मित्रपक्ष असलेल्या 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता सचिन खरात यांनीच या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने अजित पवारांची मोठी अडचण झाली आहे. नेमके काय म्हणाले सचिन खरात? सचिन खरात यांनी पुणे महापालिका निवडणुकीतून माघार घेताना अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. मी सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात या अपेक्षेने अजित पवारांसोबत गेलो होतो. मात्र, तशा जागा आम्हाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी आणि माझा पक्ष या निवडणूक प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर पडत आहोत. आता कोणत्याही प्रभागात आमच्या पक्षाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसेल, असे सचिन खरात यांनी स्पष्ट केले. आंबेडकरी विचारांशी तडजोड नाही आपल्या भूमिकेचे समर्थन करताना सचिन खरात यांनी वैचारिक भूमिका स्पष्ट केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर माझा पक्ष चालतो. त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतेही चुकीचे काम करणार नाही. राजकारणात दोन पावले मागे आलो तरी चालेल, पण तत्त्वांशी तडजोड करणार नाही, असे सांगत त्यांनी अजित पवारांना एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे. गुन्हेगार उमेदवारांची जबाबदारी आता कोणावर? पुण्यातील आंदेकर टोळी आणि इतर कुख्यात टोळ्यांच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे 'एबी फॉर्म' भरल्याने अजित पवारांवर चौफेर टीका झाली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले होते की, आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला उमेदवारी दिलेली नाही. सचिन खरात यांच्यासोबत आमची युती असल्याने त्यांनी त्यांच्या कोट्यातील जागांवर कुणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा अधिकार आहे. अजित पवारांनी या प्रकरणाचे खापर खरात गटावर फोडून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता सचिन खरात यांनी पाठिंबाच काढून घेतल्यामुळे, राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या त्या 'गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या' उमेदवारांची जबाबदारी आता थेट अजित पवारांवर आली आहे. पुण्याच्या राजकारणात पेच वाढला सचिन खरात यांच्या माघारीमुळे पुण्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकाकी पडण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना दिलेले समर्थन आणि मित्रपक्षाने ऐनवेळी फिरवलेली पाठ, यामुळे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी कांदिवली येथील जाहीर सभेत बोलताना अत्यंत आक्रमक पवित्रा घेत बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुस्लिमांना मुंबई सोडण्याचा थेट इशारा दिला आहे. मी सर्व मुस्लिमांच्या विरोधात नाही, राष्ट्रवादी विचारांचे मुस्लिम आमच्यासोबत आहेत. पण ज्यांना ठोकायचं आहे, ते मला चांगलं माहिती आहे. १५ तारीख याद राखा आणि आपल्या बॅगा भरून ठेवा. १६ तारखेनंतर एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या मुंबईत दिसणार नाही, असे नीतेश राणे म्हणालेत. त्यांच्या या भाषणामुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित या सभेत नितेश राणे यांनी घुसखोरांना मुंबईबाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, १६ जानेवारीला आम्ही विजयाचा जल्लोष करू आणि मुंबईत 'I Love Mahadev' म्हणणारा महापौर बसवू. त्यानंतर १७ तारखेला या जिहाद्यांसाठी डेडलाईन असेल. १७ तारखेची सकाळ ते मुंबईत पाहू शकणार नाहीत. मालवणीत जे 'हिरवे साप' वळवळत आहेत, ते लवकरच कमी होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ठाकरे गटावर भाषिक राजकारणावरून टीका उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नितेश राणे यांनी उत्तर भारतीयांना साद घातली. ठाकरे म्हणतात की सर्वांना मराठी आलीच पाहिजे. मी उत्तर भारतीय बांधवांना सांगेन की, जेव्हा ते तुमच्याकडे येतील तेव्हा त्यांना सांगा की आम्ही मराठी बोलतो, पण तुम्ही आधी बेहराम पाड्यात जाऊन तिथल्या लोकांना मराठी शिकवा, असा टोला त्यांनी लगावला. विकासाचे राजकारण आणि कार्यकर्त्यांना बळ सभेत उपस्थित असलेल्या उमेदवार प्रीती शर्मा यांना धीर देताना राणे म्हणाले, प्रीती ताई, तू रडू नकोस, आता दुसऱ्याला रडवण्याची वेळ आली आहे. हफ्त्याची मागणी करणाऱ्यांना आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त विकासावर लक्ष द्या. यावेळी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या कामाचे कौतुक केले आणि १७ तारखेनंतर लोकांची कामे केवळ दरेकर साहेबच करू शकतील, असा दावा केला. पीयूष गोयल साहेब खासदार म्हणून उत्तम काम करत आहेत. मुंबईत मोठ्या संख्येने असलेल्या कोकणवासीयांची सेवा ते करत आहेत, असे राणे म्हणाले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत नारायण राणे यांनी खासदार म्हणून कसा विकास केला आहे, याचे उदाहरण देत त्यांनी लातूर आणि कोकणच्या विकासाची तुलना केली. अकोटमधील युतीवर स्पष्टीकरण अकोट नगरपालिकेत भाजपने एमआयएमसोबत केलेल्या युतीवर भाष्य करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. अकोटमधील युती चालणार नाही, असे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केले आहे, असे सांगत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तडजोड केली जाणार नसल्याचे संकेत दिले. हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम काही लोक करत आहेत, मात्र कितीही संकटे आली तरी भाजप लोकांची सेवा करत राहील, असा विश्वास व्यक्त नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूरमध्ये पोलिसांवर कोयत्याने हल्ला
पुणे : पुण्याच्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पथक श्रीरामपूरमध्ये एका आरोपीला पकडण्यासाठी आले असता, त्यांच्यावर ३० ते ४० जणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केला. श्रीरामपूरच्या इराणी गल्ली इथे ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचा-याच्या कोयत्याचा वार झाला. यात तो गंभीर जखमी झाला असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षकाने स्वसंरक्षणार्थ […] The post श्रीरामपूरमध्ये पोलिसांवर कोयत्याने हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनसे सोडणार नाही; नाराजीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी मनसेचे दिग्गज नेते संदीप देशपांडे हेदेखील मनसेच्या पक्षात नाराज असल्याचे विधान केले होते. यानंतर स्वत: संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. गुरुवारी (८ जानेवारी) संदीप देश्पणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून आपण नाराज […] The post मनसे सोडणार नाही; नाराजीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंचे स्पष्टीकरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील वडगाव शेरीमध्ये दगडफेक; कारवाईची मागणी
पुणे : प्रतिनिधी राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सोलापूर, अकोल्यातील अकोट, खोपोलीतील इथे झालेल्या हत्यांमुळे निवडणुकीच्या काळातील गुन्हेगारी घटनांबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात काल रात्री मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या व्हिडिओत वडगाव शेरीतील सोपाननगरमध्ये दोन गटात राडा दिसून […] The post पुण्यातील वडगाव शेरीमध्ये दगडफेक; कारवाईची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर शिगेला पोहोचलेला असतानाच, मुंबईच्या राजकीय वर्तुळात गुरुवारी एक अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरलेली घडामोड घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकाच ठिकाणी समोरासमोर आले आणि त्यांनी एकमेकांशी थेट संवाद साधला. राजकीयदृष्ट्या एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन्ही नेते सौहार्दपूर्ण वातावरणात भेटल्यामुळे, निवडणूक काळात या प्रसंगाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतील एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान ही भेट घडली. गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन स्टुडिओबाहेर पडत होते. त्याचवेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे याच कार्यक्रमासाठी मुलाखत देण्याकरिता स्टुडिओच्या दिशेने जात होते. स्टुडिओच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक दोघे समोरासमोर आले. एकमेकांना पाहताच दोघांनीही क्षणभर थांबून अभिवादन केले. यानंतर सुरू झालेली अल्प संवादाची ही भेट अवघ्या काही मिनिटांची असली, तरी तिचे राजकीय पडसाद मात्र मोठ्या प्रमाणात उमटताना दिसत आहेत. या भेटीत सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची आवर्जून विचारपूस केली. संजय राऊत हे नुकतेच एका गंभीर आजारातून सावरले असून काही काळ ते उपचारासाठी घरीच होते. राऊत आजारी असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बंधू खासदार सुनील राऊत यांना फोन करून राऊतांच्या तब्येतीबाबत चौकशी केली होती. त्यानंतर गुरुवारी प्रत्यक्षपणे दोघे समोरासमोर आल्यानंतर शिंदे यांनी राऊतांच्या तब्येतीची चौकशी करत आता तब्येत कशी आहे? अशी आपुलकीने विचारणा केली. यावर संजय राऊत यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली. या क्षणिक भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये साधारण एक-दोन मिनिटे जुजबी संवाद झाला. कोणतीही राजकीय चर्चा किंवा निवडणूकविषयक वक्तव्य टाळत, दोघांनीही केवळ वैयक्तिक पातळीवरील विचारपूस आणि औपचारिक बोलणे केले. त्यानंतर दोघेही आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. मात्र, या छोटेखानी भेटीचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत घडलेली ही भेट असल्याने, राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले, त्यामुळे शिंदे गट अधिकृत शिवसेना ठरला. या घडामोडींनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला. त्याचा परिणाम म्हणून ठाकरे गटातील नेते, विशेषतः संजय राऊत, सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आले आहेत. पत्रकार परिषदांमध्ये, भाषणांमध्ये आणि सोशल मीडियावर राऊत यांची आक्रमक भूमिका कायम दिसून आली आहे. मतभेद अत्यंत तीव्र असतानाही वैयक्तिक पातळीवर सौजन्य मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून ठाकरे कुटुंबीय आणि ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांना थेट लक्ष्य केले आहे. प्रचारसभांमध्ये आणि माध्यमांशी बोलताना शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत, संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट होणे आणि त्यात कोणतीही कटुता न दिसता सुसंस्कृत संवाद घडणे, हे अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरले आहे. राजकीय मतभेद अत्यंत तीव्र असतानाही वैयक्तिक पातळीवर सौजन्य जपले जाऊ शकते, याचेच हे उदाहरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. भेट चांगलीच चर्चेत राहणार या भेटीनंतर तात्काळ कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली, तरी या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच उत्सुकता निर्माण केली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेली ही भेट केवळ योगायोग होती की यामागे काही संकेत आहेत, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, सध्या तरी या भेटीकडे राजकीय समजुतीपेक्षा मानवी आणि सुसंस्कृत वर्तनाच्या दृष्टीने पाहिले जात असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट चांगलीच चर्चेत राहणार, हे निश्चित मानले जात आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. काही शहरांमध्ये मोठ्या पक्षांनी युतीचा मार्ग स्वीकारला आहे, तर काही ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतील महायुतीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. ठाण्यात भाजपने शिवसेनेसोबत युती करताना काही जागांबाबत नमतं घेतल्याचे त्यांनी उघडपणे मान्य केले असून, त्यामागचे कारणही त्यांनी सविस्तरपणे मांडले आहे. ठाणे भाजपतर्फे बुधवारी गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आपलं ठाणे, आपला देवाभाऊ’ या विशेष मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक राजकीय आणि स्थानिक मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केले. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी घेतलेल्या या संवादात्मक मुलाखतीत ठाणे महानगरपालिकेतील जागावाटपाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. मुंबईत भाजपने ज्या पद्धतीने स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरला, तोच आग्रह ठाण्यात का सोडण्यात आला, असा थेट प्रश्न बल्लाळ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. तसेच भाजपचे 24 नगरसेवक असताना आणि आणखी संख्या वाढण्याची शक्यता असताना युतीचा निर्णय का घेतला, याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या संभ्रमाचा उल्लेख करण्यात आला. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिकपणे कबुली दिली की, ठाण्यातील भाजपचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचीच होती. सर्वांनाच वाटत होतं की, आपली ताकद वाढलेली आहे आणि आपण स्वबळावर अधिक नगरसेवक निवडून आणू शकतो, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र, त्यांनी याच वेळी हेही अधोरेखित केले की, निर्णय घेताना केवळ आकडेमोड नव्हे तर दीर्घकालीन राजकीय आणि सामाजिक परिणामांचा विचार करणे गरजेचे असते. त्यामुळे केवळ उत्साहाच्या भरात निर्णय न घेता व्यापक दृष्टिकोन ठेवून विचार करण्यात आला, असे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ एक निवडणूक नसून ती राजकीय पिढ्या घडवणारी प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. गेल्या दहा वर्षांतील निवडणुकांमधून वेगवेगळ्या पिढ्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. 2017 नंतर एक पिढी तयार झाली, 2022 च्या आसपास दुसरी पिढी उदयास आली आणि आता आणखी नवी पिढी मैदानात उतरली आहे. अशा परिस्थितीत, जर युती करताना सर्वांना संधी मिळाली नाही, तर कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते, याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यात भाजप मोठा पक्ष असला तरी वर्षानुवर्षे शिवसेना ही शहरात बलशाली राहिली आहे, हे वास्तवही त्यांनी मान्य केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, भाजपच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी मिळायला हवी, अशी भावना होती आणि त्यासाठी स्वतंत्र लढण्याचा आग्रहही होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा हा मुद्दा ठामपणे मांडला होता. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि तिचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने, केवळ जागावाटपाच्या कारणावरून वेगळे लढणे योग्य ठरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. वेगळे लढलो असतो तर कदाचित सत्ता मिळाली असती, पण त्यातून मनभेद आणि कटुता वाढली असती, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. ठाणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत आवडते शहर राहिले आहे, याची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अशा शहरात युतीतील पक्षांमध्ये वाद-विवाद आणि संघर्ष निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे गरज भासल्यास भाजपने काही जागांबाबत पडती बाजू घेण्याचा निर्णय घेतला. कमी जागा घ्यायच्या, पण एकत्र लढायचं, हा स्पष्ट संदेश आपण दिल्यानंतर पक्षातील सर्वांनी तो स्वीकारला, असे फडणवीस यांनी सांगितले. आज ठाण्यात भाजप आणि शिवसेना एकत्र लढत आहेत आणि हा निर्णय योग्य असल्याचा आपल्याला ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजकारणापेक्षा शहराचा विकास महत्त्वाचा या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवरही भाष्य केले. दळणवळण, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, शिक्षण आणि रोजगार या प्रश्नांवर सरकार गंभीरपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राजकारणापेक्षा शहराचा विकास महत्त्वाचा आहे, हा दृष्टिकोन ठेवूनच युती आणि निर्णय घेतले जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राजकीय फायद्यांपेक्षा दीर्घकालीन स्थैर्य आणि विकासाला प्राधान्य शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम शब्दांत सांगितले की, ठाणे असो वा मुंबई, युतीबाबत घेतलेले निर्णय योग्य असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. अल्पकालीन राजकीय फायद्यांपेक्षा दीर्घकालीन स्थैर्य आणि विकासाला प्राधान्य देण्याची ही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाण्यातील मतदार या निर्णयावर आपला कौल देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सोशल मीडियावर आपल्या विनोदी रिल्सने लाखो चाहत्यांची मने जिंकणारा रिल्स स्टार अथर्व सुदामे आता एका कायदेशीर फेऱ्यात अडकला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने अथर्वला दोन रिल्सप्रकरणी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, त्याला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली आहे. वारंवार दिलेल्या नोटिसींना प्रतिसाद न दिल्याने पीएमपी प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. अथर्व सुदामे याने काही दिवसांपूर्वी पीएमपीच्या बसमध्ये कंडक्टरच्या पोशाखात एक रिल तयार केले होते. मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केलेल्या या रिलमध्ये त्याने प्रवाशांचे चित्रण केले होते. मात्र, हे चित्रीकरण करताना त्याने पीएमपी प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती. सरकारी मालमत्तेचा व्यावसायिक किंवा मनोरंजनासाठी वापर करताना रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते, ज्याचा भंग केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पीएमपी प्रशासनाचे आक्षेप पीएमपी प्रशासनाने या रिल्सबाबत दोन मुख्य आक्षेप नोंदवले आहेत. पहिला म्हणजे प्रवाशांचा अपमान. संबंधित रिलमध्ये प्रवाशांना आक्षेपार्ह आणि अपमानजनक पद्धतीने दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे संस्थेची प्रतिमा मलिन झाल्याचे पीएमपीएमएलचे म्हणणे आहे. दुसरे म्हणजे परवानगीचा अभाव. पीएमपीच्या मालमत्तेचा जसे की, बस आणि गणवेश वापरताना अथर्व सुदामेने पीएमपी प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई यापूर्वी पीएमपीने अथर्वला दोनदा नोटीस बजावून त्याची बाजू मांडण्याची संधी दिली होती. मात्र, अथर्वकडून या दोन्ही नोटिसींना कोणताही लेखी प्रतिसाद मिळाला नाही. प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बसमध्ये चित्रीकरण केले. याबाबत खुलासा करण्यासाठी अथर्व सुदामे यांना सात दिवसांची मुदत दिली होती, मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाला खुलासा प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आणखी एक नोटीस दिली असून, यात ५० हजारांचा दंड केला आहे. दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा करू, असा इशारा पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी दिला आहे. तिसऱ्या नोटीसमध्ये काय म्हटले आहे? आपण पुणे महानगर परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई मशिन आणि बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर करुन, परिवहन महामंडळाचे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड आणि प्रसारित केला. या प्रकरणी आपल्याला ०२/०१/२०२६ रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. आपणास सदरील नोटीस प्राप्त दिनांकापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा पुणे महानगर परिवहन महामंडळ, मुख्य कार्यालय, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे ४११०३७ येथे सादर करणेबाबत सुचित केले होते. परंतु अद्यापही आपला खुलासा परिवहन महामंडळास विहित मुदतीत सादर केलेला नाही. परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई मशिन व बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर केल्याने दोन रीलचे प्रत्येकी रक्कम रु. २५,०००/- प्रमाणे एकुण रक्कम रु. ५०,०००/- इतकी रक्कम पुणे महानगर परिवहन महमहामंडळाकडून दंड म्हणून आकारण्यात येत आहे. सदरची रक्कम त्वरीत महामंडळाकडे जमा करावी. दंड रक्कम प्राप्त न झाल्यास आपल्या विरुद्ध भारतिय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदयानुसार एफआयआर दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे देखील या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. रिल्स स्टार्ससाठी धोक्याची घंटा? अथर्व सुदामे याच्यावर झालेली ही कारवाई इतर सोशल मीडिया इन्फ्ल्यूएनसर्ससाठी एक धडा मानली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी यंत्रणेचा वापर करून रिल्स बनवताना नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
'अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप-काँग्रेस आघाडीबद्दल आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. तिथे पाहा काय होतंय ते. जे होतंय, ते विचारसरणेशी सुसुंगत नाही, याची जाण करून दिली होती. हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी लढत नाही. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,' असे म्हणत भाजपला घरचा आहेर तर दिलाच, सोबत आरसाही दाखवला. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ‘कोल्ड वॉर’ असल्याचा चर्चा होते. यावरही ते मनमोकळेपणाने बोलले. मुंबईत आजतक वृत्तावाहिनीच्या मुंबई मंथन या कार्यक्रमाच्या मंचावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर भाष्य करताना शिंदे यांनी विरोधकांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकल्या तेव्हा विरोधकांनी कुठेही धांधलीचा आरोप केला नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अचानक गैरप्रकारांची भाषा सुरू झाली, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्यामुळे ते केवळ आरोपांची आणि टीका-टिप्पणीची राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. महायुतीतील उमेदवार निवडीवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिंदे यांनी आत्मविश्वासाने भूमिका मांडली. महायुतीकडे उमेदवारांची मोठी रांग होती, इतकी की अनेक ठिकाणी निवड करताना अडचण निर्माण झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. याउलट विरोधकांकडे ना विश्वासार्ह मुद्दे आहेत, ना जनतेला सांगण्यासारखा अजेंडा आहे, त्यामुळे ते आरोपांवरच अवलंबून आहेत, असे त्यांनी नमूद केले. निवडणूक लढताना किंवा प्रचार करताना आपण कधीही विरोधकांवर वैयक्तिक टीका करत नाही, कारण ते आपले राजकीय संस्कार नाहीत, असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले. अंबरनाथमध्ये शिवसेना (शिंदे गट)ला बाजूला ठेवून भाजपने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्याच्या प्रश्नावरही शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी पक्षसंस्था आहे आणि त्याच विचारधारेवर आपण ठामपणे उभे आहोत, असे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करून निवडणूक लढवत आहोत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवर युती न झाल्यामुळे स्वतंत्र किंवा मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. जिथे ‘फ्रेंडली फाईट’ आहे, तिथेही स्थानिक प्रश्नांवरच प्रचार केला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथमधील परिस्थितीबाबत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. सत्तेच्या राजकारणावर भाष्य करताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ते कधीही खुर्चीसाठी राजकारण करत नाहीत. सत्ता आजही महायुतीकडे आहे आणि भविष्यातही जनतेच्या पाठिंब्याने तीच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आम्ही डॉक्टर नाही, तरीही ऑपरेशन केलं,” अशा शब्दांत त्यांनी 2022 मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला. मात्र, त्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या हितासाठीच होत्या, असे त्यांनी ठामपणे सांगितले. राज्याच्या विकासासाठीच आपले प्रत्येक पाऊल असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ठाकरे बंधूंविषयी विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी थेट नाव घेण्याचे टाळले. मात्र, स्वतःच्या कार्यशैलीबद्दल बोलताना त्यांनी आपण मेहनतीने काम करणारा माणूस असल्याचे सांगितले. मी एकदा काही ठरवलं की ते पूर्ण करतो, असे सांगत त्यांनी 200 पेक्षा कमी जागा आल्या तर राजकारण सोडून शेती करीन, अशी पूर्वी केलेली घोषणा आठवण करून दिली. आपण जे बोलतो ते करून दाखवतो आणि कधी कधी न बोलताही काम करून दाखवतो, असे सांगत त्यांनी आपल्या कामगिरीवर भर दिला. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड नाही ओवैसी आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युतींच्या प्रश्नावर शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्थानिक पातळीवरील गणित, कार्यकर्त्यांची भूमिका आणि परिस्थिती पाहून कुठे एकत्र लढायचं आणि कुठे स्वतंत्र जायचं हे ठरवलं जातं. मात्र, काहीही करा आणि सत्ता मिळवा, हा आमचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ता आली किंवा गेली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. फडणवीस यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी कथित ‘कोल्ड वॉर’च्या चर्चांवरही शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. हे सगळे माध्यमांनी रंगवलेले विषय असल्याचे सांगत त्यांनी फडणवीस यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे अधोरेखित केले. फडणवीस आमदार असतानापासून आपली ओळख आहे आणि आम्ही एकमेकांना कधीही मोठे-छोटे मानले नाही, असे त्यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री असताना देखील फडणवीस यांना मुख्यमंत्रीच मानत होतो, असे सांगत त्यांनी दोघांचा समान अजेंडा राज्याचा विकास असल्याचे स्पष्ट केले. अर्थव्यवस्थेत मोदींचे योगदान महत्त्वाचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली, यासाठी मोदींचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये एक ट्रिलियन डॉलर्सची आर्थिक क्षमता आहे, हे आम्ही नाही तर नीति आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईच्या वाहतूक कोंडी, पाणी साचणे आणि रस्त्यांच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वेळ द्या, आम्ही काम करणारे लोक मुंबईतील पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना शिंदे यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. बांद्रा-वर्सोवा सी लिंक विरारपर्यंत नेण्याचा प्रकल्प, छेडानगर ते साकेत ते फाउंटन कट चौक असा एलिव्हेटेड रस्ता, बीकेसी ते कुर्ला अंडरग्राउंड टनल, पॉड टॅक्सी आणि बोरिवली टनल या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईची वाहतूक सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. थोडा वेळ द्या, आम्ही काम करणारे लोक आहोत, असे सांगत मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पुणे महानगरपालिका निवडणुका सध्या केवळ स्थानिक राजकारणापुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या घडामोडींमुळे पुण्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे. भाजपकडून अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. या घटनेमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, बालेवाडी परिसरातील ही लढत राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. भाजपने अमोल बालवडकर यांना डावलत त्याठिकाणी लहू बालवडकर यांना उमेदवारी दिल्याने राजकीय समीकरणे बदलली. एका बाजूला भाजपचा अधिकृत उमेदवार, तर दुसऱ्या बाजूला भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला माजी इच्छुक उमेदवार, अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, प्रत्येक पक्षाकडून शक्तिप्रदर्शन सुरू आहे. या राजकीय संघर्षात आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे वातावरण आणखी तापले आहे. लहू बालवडकर यांच्या प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी थेट भविष्यवाणी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राच्या राजकारणात आपली भाकिते नेहमी खरी ठरल्याचा दावा करत त्यांनी लहू बालवडकर हे संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतं मिळवून नगरसेवक म्हणून निवडून येतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. मी आज स्पष्ट शब्दांत सांगतो, लिहून ठेवा, महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेणारा नगरसेवक लहू बालवडकर असेल, असं ठाम विधान त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा दाखला देत यापूर्वी केलेल्या भविष्यवाण्यांची आठवण करून दिली. 2017 च्या निवडणुकीत मुंबई महापालिकेच्या निकालाबाबत आपण आधीच 82 जागांचा अंदाज वर्तवला होता आणि प्रत्यक्षात तितक्याच जागा मिळाल्या, असा दावा त्यांनी केला. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा मोठमोठे नेते मला विचारतात, दादा काय होईल? आणि मी जे सांगतो ते खरे ठरते, असे सांगत त्यांनी आपल्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. बालेवाडीमध्येही लहू बालवडकर मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना पाटील यांनी लहू बालवडकर यांचे नाव ईव्हीएम मशीनवर चौथ्या क्रमांकावर असले तरी मताधिक्याच्या बाबतीत ते आघाडीवर असतील, असा दावा केला. “घोडा मैदान लांब नाही,” असा वाक्प्रचार वापरत त्यांनी निवडणुकीचा निकाल जवळच असल्याचे सूचित केले. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या निवडणुकांच्या वेळी नेहमीच आपली भविष्यवाणी खरी ठरते, असं सांगत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भविष्यवाणी केवळ एका उमेदवारापुरती मर्यादित न राहता, भाजपची ताकद आणि रणनीती अधोरेखित करणारी मानली जात आहे. अमोल बालवडकर यांच्या पक्षांतरामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचे हे विधान भाजपसाठी मनोबल वाढवणारे ठरू शकते. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जोरदार प्रचार सुरू असून, या मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची बनली आहे. एकूणच, पुणे महानगरपालिका निवडणूक आता केवळ स्थानिक प्रश्नांवर आधारित न राहता, राज्यस्तरीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे आणि भविष्यवाण्यांमुळे अधिकच गाजत आहे. लहू बालवडकर यांना मिळणाऱ्या मताधिक्याची चंद्रकांत पाटील यांनी केलेली ठाम भविष्यवाणी खरी ठरणार की नाही, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. मात्र, या विधानामुळे पुणे महापालिकेची निवडणूक राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आली असून, सर्वांचे लक्ष आता बालेवाडीतील निकालाकडे लागले आहे.
मनपा निवडणुकीत यंदा उमेदवारांना अर्जासोबत स्थानिक संस्थेच्या विकासासाठी काय करणार? यावर १०० ते ५०० शब्दांत निबंध लिहिणे बंधनकारक केले होते. उमेदवारांचे निबंध आणि शपथपत्रे महापालिकेने ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड केली असून, जळगावकरांच्या स्वप्नातील प्रभागाचा मसुदा यातून उलगडू लागला आहे. उमेदवारांनी सुरक्षित प्रभाग या संकल्पनेवर भर दिला आहे. आपल्या प्रभागात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि संपूर्ण प्रभागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणण्याचे आश्वासन दिले आहे. काही उमेदवारांनी चक्क पोलिस चौकी सुरू करण्याचेही आपले स्वप्न निबंधात उतरवले आहे. आरोग्य आणि शिक्षणावर फोकस केवळ सिमेंटचे जंगल न उभारता विकासाकडेही कल दिसून येत आहे. महापालिकेचे दवाखाने आणि शाळा आधुनिक करणे, रेशन, मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि रक्त तुटवडा कमी करण्यासाठी नियमित रक्तदान शिबिरे घेण्याचे संकल्प अनेक निबंधातून व्यक्त झाले आहेत. वृद्धाश्रम आणि युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या मुद्द्यांनीही या निबंधांमध्ये स्थान मिळवले आहे. कनेक्टेड नगरसेवक होण्याचे स्वप्नही दाखवले वृक्षारोपण आणि प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचाही विचार मांडला आहे. महावितरणच्या लोंबकळणाऱ्या केबल्स भूमिगत करणे, ओपन स्पेस विकसित करणे आणि पावसाळ्यापूर्वी सांडपाण्याचे नियोजन करण्यावरही उमेदवारांनी कसब दाखवले आहे. तक्रारी निवारण्यासाठी स्वतःचा हेल्पलाईन नंबर देण्याचे आश्वासन देऊन कनेक्टेड नगरसेवक होण्याचे स्वप्नही अनेकांनी दाखवले आहे. आता निबंधाची प्रचिती कधी? शपथपत्रांची चर्चा या निबंधांमध्ये आश्वासनांची खैरात असली, तरी प्रत्यक्ष यातले किती उमेदवार आपल्या निबंधातील ओळी प्रत्यक्षात उतरवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या मात्र मतदारांमध्ये या ऑनलाईन शपथपत्रांची आणि त्यातील विकासाच्या निबंधांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
मुंढवा जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन महिन्यांपूर्वी नेमलेल्या खारगे समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा घोटाळा आता केवळ चौकशीचा विषय राहिला नसून, तो सरकारी अनास्थेचा जिवंत नमुना ठरला आहे, असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी व्यक्त केले आहे. कुंभार यांनी सांगितले की, पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीला शासकीय जमीन विक्रीप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव (विकास) खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ नेमण्यात आली होती. या समितीने दोषी कोण, कोणाला फायदा झाला आणि कोण जबाबदार आहे, या बाबींवर प्रकाश टाकणे अपेक्षित होते. मात्र, समितीतील सदस्यांवरच अशी प्रकरणे थांबवण्याची जबाबदारी असताना, ते चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. त्यांच्या मते, समितीतील सदस्य मुख्य लाभार्थ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य लाभार्थी अजूनही कायद्याच्या आणि चौकशीच्या कक्षेबाहेर आहे. त्यामुळे ही समिती न्यायासाठी नसून, हा योजनाबद्ध घोटाळा आणि त्याच्या संरक्षणाचा प्रकार असल्याचा दावा कुंभार यांनी केला आहे. कुंभार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील शिवाजीनगर येथील कार्यालयाच्या जागेचा मुद्दाही उपस्थित केला. ही जागा गैरप्रकारे हडप करण्यात आल्याचे कागदोपत्री पुरावे त्यांनी सादर केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या काळात आपल्यावर वेगवेगळे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, असे सांगून सारवासारव करत असल्याचा आरोप कुंभार यांनी केला. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी अशाप्रकारे बोलणे योग्य नाही. या आर्थिक व्यवहारात त्यांच्या पक्षाशी संबंधित लोक गुंतलेले आहेत. पक्ष कार्यालय असलेली जागा खासगी कंपनीने ६० वर्षांच्या भाडेकराराने घेतलेली असताना, ती परस्पर विकण्यात आली आणि त्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्जही काढण्यात आले. या प्रकरणी महारेराने कारवाईचे आदेश दिले आहेत. अजित पवारांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणे आवश्यक असल्याचे कुंभार यांनी म्हटले आहे. मुंढवा जमीन गैरप्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचेही नाव समोर येत आहे. चौकशी टाळून 'मला काही माहिती नाही' असे सांगणे चुकीचे आहे, असे कुंभार यांनी नमूद केले.
पुणे शहरात एका ज्येष्ठ महिलेला मारहाण करून दागिने लुटणाऱ्या चोरट्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव बुद्रुक येथील महापालिका वसाहतीत ही घटना घडली होती. या प्रकरणी ऋग्वेद चंद्रकांत भिसे (वय २४, रा. पीएमसी कॉलनी, वडगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली आहे. एका ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वडगाव बुद्रुकमधील महापालिका वसाहतीत राहतात. आरोपी भिसे हा देखील याच वसाहतीत राहणारा आहे. महिलेच्या घरात कोणी नसताना आरोपी भिसे घरात शिरला. त्याने ज्येष्ठ महिलेला मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कर्णफुले असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लुटला आणि पसार झाला. महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी भिसे याला अटक केली. पोलिस उपनिरीक्षक एस. काजळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. किरकोळ वादातून शेजाऱ्याचा खुनाचा प्रयत्न करणारा गजाआड किरकोळ वादातून शेजाऱ्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारुन त्याचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना येरवड्यातील यशवंतनग भागात घडली. याप्रकरणी एका आरोपीला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. हरिदास भगवान सातपुते (वय ४२, रा. यशवंतनगर, येरवडा ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक तुकाराम साठे (रा. यशवंतनगर, येरवडा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सातपुते यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपुते आणि साठे हे शेजारी आहेत. यशवंतनगरमधील स्वच्छतागृहाजवळ दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला. वादातून साठे याने सातपुते यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारला. सातपुते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिस उपनिरीक्षक एल दळवी पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीवरील महिला आणि एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटना नगर रस्त्यावरील वाघोली आणि कात्रज परिसरात घडल्या आहे. कात्रज येथील जांभुळवाडी रस्त्यावर भरधाव दुचाकीच्या धडकेत १८ वर्षीय पादचारी तरुण आर्यन रामदास आधवडे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आर्यनचे काका मोहन हरिभाऊ आधवडे यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन आणि त्याचा मित्र अनिकेत चोरगे रात्री जांभुळवाडी रस्त्याने जात असताना एका भरधाव दुचाकीने आर्यनला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध सुरू असून, पोलिस उपनिरीक्षक एन. डोईफोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. डंपरची दुचाकीला धडक दुसऱ्या एका घटनेत, नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने सहप्रवासी ३४ वर्षीय प्रतिमा अरुण नोनंदकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दुचाकीस्वार अरुण हनुमंत नोनंदकर (वय ३८) जखमी झाले आहेत. अरुण यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण आणि त्यांची पत्नी प्रतिमा आव्हाळवाडी फाटा चौकातून जात असताना डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात प्रतिमा यांना गंभीर दुखापत झाली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक एस. राघू या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ऑनलाईन सेवा देण्यात हिंगोली जिल्हा मराठवाड्यात अव्वल:90 टक्के सेवा मुदतीमध्ये, नागरीकांची झाली सोय
राज्य सेवा हमी कायद्यांर्तत सर्व विभागांच्या १२१२ सेवा अधिसुचीत करण्यात आल्या असून या सेवा देण्यात हिंगोली जिल्हयाने मराठवाड्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. नागरीकांना ऑनलाईन सेवा मिलत असल्याने त्यांची मोठी सोय झाली असून केवळ कागदपत्रांसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ राहिली नाही. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्य सेवा हक्क आयोगाने हिंगोली जिल्ह्याच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. राज्य सेवा हमी कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा महत्त्वाचा कायदा असून प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने तो लागू करण्यात आला आहे. जनतेला पारदर्शकपणे व विहित कालमर्यादेत सेवा मिळणे आवश्यक असून, येणाऱ्या काळातही शासकीय अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशीलता व तत्परतेने सेवा देणे अपेक्षीत आहे. या कायद्या नुसार शासनाने विविध कार्यालयांमधून १२१२ सेवा ऑनलाईन केल्या आहेत. नागरीकांनी कागदपत्रांसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना विहीत मुदतीमध्ये कागदपत्रे उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. या शिवाय नागरीकांनी दाखल केलेल्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्यास त्यांना तातडीने माहिती देऊन त्याची पुर्तता केली जाते. या सर्व सेवा ऑनलाईन मिळत असल्याने नागरीकांनाही आता कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ राहिलेली नाही. दरम्यान, हिंगोली जिल्हयात माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेला अधिक गतिमान, पारदर्शक व कालमर्यादेत सेवा दिली जात असल्याने हिंगोली जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर विभागात सेवा पुरवठ्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. हिंगोली येथे राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा समन्वयक गंगाधर लोंढे यांनी माहितीचे सादरीकरण केले. हिंगोली जिल्हयाच्या उपक्रमाच्या अंमलबजवाणीबद्दल डॉ. जाधव यांनी प्रशसानाच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना हडपसर परिसरात बुधवारी रात्री राडा झाला. शिवसेना शिंदे गटाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या ताफ्यावर ताफ्यावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काही अज्ञातांनी नाना भानगिरे यांच्या वाहनावर दगडफेक केली. या हल्ल्यात प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार जखमी झाल्या असून भानगिरे यांच्या कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी, ७ जानेवारी) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नाना भानगिरे आणि उमेदवार सारिका पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह हडपसरमधील काळेपडळ भागातील 'मयूर जेएमएनएस' सोसायटी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले होते. घरोघरी जाऊन प्रचार सुरू असताना अचानक काही अज्ञात इसमांनी त्यांच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू केली. गाडीच्या काचा फुटल्या, उमेदवार जखमी या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ झाली. दगडफेकीत नाना भानगिरे यांच्या कारची काच फुटून गाडीचे नुकसान झाले. ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यात एक दगड लागल्याने उमेदवार सारिका पवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. पोलिसांचा तपास आणि सीसीटीव्हीवर नजर घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की, आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात असून, हल्ले करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. हा हल्ला लोकशाहीला काळिमा फासणारा - नाना भानगिरे या हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना भानगिरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे भ्याड हल्ले करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब आहे. आम्ही या संदर्भात कायदेशीर लढा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे हडपसर परिसरात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, पुण्यातील या घटनेमुळे आगामी निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हे ही वाचा… मुंबईत शिंदेंच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला:प्रचारादरम्यान हाजी सालीन कुरेशींच्या पोटात चाकू भोसकला, बांद्रामध्ये खळबळ मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात घडलेली मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला हादरवणारी ठरली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने निवडणूक प्रक्रियेभोवतीचे राजकारण किती हिंसक व अमानवी होत चालले आहे, याचे भयावह चित्र समोर आले आहे. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी झालेल्या दबावातून हा प्रकार घडल्याचा आरोप होत असून, या घटनेनंतर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेसह विविध स्तरांतून स्थानिक भाजप नेत्यांवरही टीकेची झोड उठवली जात आहे. या हत्याकांडानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी थेट सोलापूर गाठत बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अमित ठाकरे भावूक झाले होते. घरातील वातावरण, कुटुंबीयांची अवस्था आणि विशेषतः बाळासाहेबांच्या दोन लहान मुलींचा आक्रोश पाहून ते अंतर्मुख झाले. या घटनेने केवळ एका कार्यकर्त्याचा जीव गेला नसून, एका संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. पत्रात अमित ठाकरे यांनी सोलापुरात घडलेल्या घटनेला अविश्वसनीय आणि असह्य असे संबोधले आहे. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाईल, याचा कधी विचारही करता आला नसल्याचे त्यांनी नमूद केले. बाळासाहेब सरवदे यांची ज्या निर्दय आणि क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे वर्णन करताना अमित ठाकरे यांनी ती घटना आजही मन सुन्न करणारी असल्याचे म्हटले आहे. कुटुंबाला भेटल्यानंतर जे पाहिले आणि जे ऐकले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी तातडीने प्रत्यक्ष भेटण्याची गरज वाटल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही भेट होऊ शकली नाही, याची खंतही त्यांनी व्यक्त केली. बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती पत्रात विशेषतः अधोरेखित करण्यात आली आहे. घरात गेल्यानंतर त्यांच्या दोन चिमुकल्या मुलींचा आक्रोश ऐकून मन स्तब्ध झाल्याचे अमित ठाकरे यांनी लिहिले आहे. त्या मुलींना अजूनही हे उमगलेले नाही की त्यांचे वडील आता कधीच परत येणार नाहीत. अवघ्या काही दिवसांपूर्वीच त्या लहानग्या मुलींनी आपल्या हातांनी वडिलांचे अस्थी-विसर्जन केल्याचा प्रसंग असह्य असल्याचे सांगत अमित ठाकरे भावनिक झाले. पत्नी आणि आईसमोर उभे राहिल्यावर काय बोलावे, हेच सुचले नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. या पत्रातून अमित ठाकरे यांनी केवळ संवेदना व्यक्त केल्या नाहीत, तर ठाम शब्दांत मागण्या देखील मांडल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की निवडणुका येत राहतील, पण सत्तेसाठी कोणाचे घर उद्ध्वस्त होणे ही कोणती संस्कृती आहे, हा प्रश्न राज्याला पडायला हवा. पहिली मागणी म्हणून त्यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबाची, विशेषतः त्यांच्या दोन्ही मुलींच्या संपूर्ण भविष्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी मागणी केली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबाला आधार देणे ही राज्यप्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले आहे. सर्व दोषींवर कठोरातील कठोर कारवाईची मागणी दुसऱ्या मागणीत अमित ठाकरे यांनी या हत्येमागे असलेल्या सर्व दोषींवर कठोरातील कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही शिक्षा केवळ कायद्यापुरती मर्यादित न राहता, ती त्या कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने न्याय देणारी असावी, असे त्यांनी नमूद केले. अशी कडक कारवाई व्हावी की भविष्यात कोणीही निवडणुकीच्या नावाखाली हिंसाचार करण्याची हिंमत करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तिसऱ्या महत्त्वाच्या मागणीत त्यांनी निवडणूक आचारसंहितेत कडक बदल करण्याची गरज अधोरेखित केली आहे. प्रचार, उमेदवारी आणि राजकीय वाद यांचे रूपांतर हिंसक घटनांमध्ये होऊ नये, यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चर्चा दरम्यान, या प्रकरणामागील नेमकी पार्श्वभूमीही आता समोर येत आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या घरातील महिला सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र ऐनवेळी पक्षाकडून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि विरोधकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. याच कारणावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या दरम्यान बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोलापूरसह संपूर्ण राज्यात राजकीय हिंसाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चर्चा सुरू झाल्या आहेत.
यंदा २३ वर्षांनंतर मकरसंक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आली आहे. १४ जानेवारीला दुपारी ३ वाजून ६ मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यंदा २८ दिवसांची नाही, तर फक्त १२ दिवसांची संक्रांत असणार आहे. त्यासाठी महिलांची तयारी सुरू झाली आहे.बाजारात वाण, काळ्या रंगाच्या साड्या, शून्य वयापासूनच्या मुलींचे कपडे सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. मकरसंक्रांत हा सण पूर्णतः सूर्य संक्रमणावर आधारित आहे. तो रथसप्तमीपर्यंत चालतो. त्यामुळे महिलांना हासण धावपळीचा ठरणार आहे. संक्रांत देवीचे वाहन वाघ आहे. उपवाहन घोडा आहे. देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेआहे. हातामध्ये गदा आहे. अंगाला केशराचागंध आहे. गळ्यात मोत्यांची माळ धारण केलीआहे. देवी कुमारी, बसलेल्या अवस्थेत आहे.हातात जाईचे फूल आहे. अन्न म्हणून पायसाचेभक्षण करत आहे. ही संक्रांती पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करून वायव्य दिशेकडेदृष्टिक्षेप टाकत आहे. संक्रांतीचे नक्षत्र व वारनाव मंदाकिनी आहे. याचा प्रभाव २७ नक्षत्रांवर होतो. त्यामुळे प्रवासयोग, सुखवस्तूंची प्राप्ती, मानसिक त्रास, वस्त्रप्राप्तीचे योग, फसवणूक व नुकसान, धनप्राप्तीचे योग बनत आहेत. मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर राशीनुसार दान आणि त्याचे फळमेष : सुवर्ण-आर्थिक भरभराटवृषभ : पांढरे वस्त्र- मानसिकस्वास्थ्य लाभेल.मिथुन : गाईला हिरवा चारा-व्यवसाय-नोकरीत वृद्धीकर्क : दही, पोहे- लौकिकता,प्रसिद्धी प्राप्त होईल.सिंह : लाल वस्त्र-उत्तम आरोग्यकन्या आणि तूळ : अन्नदान,नवीन भांडे -मनोबल वाढेल.संततीविषयक चिंता मिटतील.वृश्चिक : गूळ- कौटुंबिक सौख्यलाभेल.धनू : पिवळे वस्त्र व गूळ- नवीननोकरी आणि व्यवसायात संधी.मकर : तीळ -लौकिकता,प्रसिद्धी व धनवृद्धी प्राप्त होईल.कुंभ : तीळ व गूळ-आध्यात्मिकक्षेत्रात प्रगती, मनोबल वाढेलमीन- सुवर्ण व तीळ पात्र-धनवृद्धी,वास्तू योग प्राप्त होईल. षट्तिला एकादशीला सहा प्रकारे करा तिळाचा उपयोग १. तिलोदकी स्नान: अंघोळीच्या पाण्याततीळ टाकून स्नान करणे.२. तिलोद्वर्तन :शरीराला तिळाचे उटणे लावणे.३. तीळहवन :अग्नीमध्ये तिळाचीआहुती देणे.४. तिलोदक :पितरांना तीळ मिश्रित पाणी अर्पण करणे (तर्पण).५. तीळभक्षण :अन्नरूपात तीळ खाणे.६. तीळदान :गरजूंना तिळाचे दान करणे. यंदा दुर्मिळ योग; पुन्हा २०४५ ला येईल असा योग मकरसंक्रांत १४ किंवा १५ जानेवारीला येते. एकाच दिवशीएकादशी, मक रसंक्रांत येण्याचा योग दुर्मिळ आहे. १४ जानेवारी १९८५ साली, १४ जानेवारी २००३, १५ जानेवारी २००४, १४ जानेवारी २०२६, १४ जानेवारी २०४५ येईल. काळे कपडे घालण्यास शास्त्रीय आधार नाही- अनंत पांडव, वेदमूर्ती संक्रांतदेवी जेवस्त्र परिधान करतेते पदार्थ महाग होतात, असा लोकसमज आहे. किंवा काळी वस्त्रे परिधान करतात. यालाही शास्त्रीय आधार नाही. परंतु शास्त्रात सूर्यमकर राशीत प्रवेश करताना सूर्याचीपत्नी छाया काळे वस्त्र परिधान करते. याचे प्रतीक म्हणून नवविवाहित महिला काळे वस्त्र परिधान करतात.
दिवसभर सिनेमे बघायचे, घरच्यांसोबत फाफडा-जिलेबी खायची आणि मित्रांसोबत गप्पा मारायच्या, यापलीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केले? जेव्हा मुंबईकर २६ जुलैच्या पुरात अडकले होते, तेव्हा हे दोघे कुठे होते? कोणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते, तर कोणी बंगल्यावर. लोकांसाठी हे कधीच रस्त्यावर उतरले नाहीत, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राज ठाकरे यांना अमित ठाकरेंच्या पराभवाचीही आठवण करून दिली. ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक मुलाखतीनंतर शेलार यांनी त्यांच्या 'अस्तित्वाच्या लढाई'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईच्या संकटात ठाकरे बंधू कधीच जनतेच्या मदतीला धावले नाहीत, अशी टीका करताना शेलार म्हणाले की, मुंबईकरांनी आता या दोघांनाही ओळखले आहे. ज्यांनी कधी मुंबईकरांचे दुःख पाहिले नाही, त्यांना आता मुंबईकर मतदान करणार नाहीत. २०१४ आणि २०१७ मध्येही त्यांनी 'फेक नरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी त्यांना झिडकारले. आजही हे दोन्ही भाऊ अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसले आहेत, असा टोला शेलार यांनी लगावला. राज ठाकरे चंडू खानची डॉक्युमेंट्री बघून बोलतात राज ठाकरे यांनी 'भाजप मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल' असा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना शेलार यांनी त्यांची खिल्ली उडवली. राज ठाकरे यांनी मुलाखत देण्याआधी चंडू खान याची डॉक्युमेंट्री बघितली असेल. या डॉक्युमेंट्रीमध्ये अशा गोष्टी दाखवतात, ते दुसऱ्या दिवशी ते बोलतात. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत, तोवर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही. विषय असेल, तर तो ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघत आहोत, शुभा राहुड ते संतोष धुरी यांना सोडून चालली आहेत. त्यांच्या सोबतची अनेक लोक त्यांच्या मतांवर आणि त्यांनी मांडलेल्या विषयांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत, त्यामुळे मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास ठेवायचा प्रश्नच नाही, असे शेलार यांनी सुनावले. अमित ठाकरेंच्या पराभवावरून जिव्हारी लागणारा टोला राज ठाकरे यांनी 'राज्यातील सरकार दिल्लीच्या आशीर्वादाने बसवले' अशी टीका केली होती. याला उत्तर देताना शेलार यांनी राज ठाकरेंवर जिव्हारी लागणाऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिले. तुमच्या घरातील व्यक्तीला (अमित ठाकरे) तुम्ही निवडणुकीत जिंकवू शकला नाहीत, लोकांनी त्यांना घरी बसवले. आणि विशेष म्हणजे ज्यांनी त्यांना घरी बसवले (उद्धव ठाकरे गट), त्यांच्याशीच तुम्ही आता हातमिळवणी केली आहे. सत्तेवर टीका करण्याआधी तुमच्या घरातील लोकांना कोणी पाडले, ते आधी बघा, असा टोला शेलार यांनी राज ठाकरेंना लगावला. मुंबई कुणासोबत? शेलारांचा दावा आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, ही निवडणूक केवळ ठाकरे कुटुंबाच्या अस्तित्वाची नसून मुंबईच्या विकासाची आहे. मुंबईकर आता अहंकाराला स्थान देणार नाहीत. ही निवडणूक मराठी संस्कृती आणि विकासाची आहे. यामध्ये मुंबईची जनता पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेलारांनी महेश मांजरेकरांनाही सुनावले मुंबईत कुठे जायचे असेल, तर एक ते दीड तास लागतो. त्यामुळे मी मुंबईकर असल्याची लाज वाटते, असे महेश मांजरेकर यांनी मुलाखतीत म्हटले. यावरही आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. महेश मांजरेकर हे एका पक्षाचा प्रचार करत असतील, आमचे काही म्हणणे नाही. पण अभिनेता म्हणून आपण निपक्ष असल्याचे दाखवून एका पक्षाच्या प्रचारासाठी बोलत असतील, तर त्यांनाही सडेतोड उत्तर देऊ. मांजरेकरांनी अटल सेतू, कोस्टल रोडने प्रवास केला नाही का? त्यांना उपनगरीय रेल्वेतून फिरण्याची माहिती आहे का? ते ॲक्वा मेट्रोतून कधी फिरलेत का? त्यामुळे महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये. त्यांना राजकारणात पडायचे असेल, तर घोषित करावे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी महेश मांजरेकर यांना सुनावले.
राज्यातील राजकारण सध्या कमालीचे तापले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीमुळे निर्माण झालेल्या वातावरणात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी फडणवीसांच्या जुन्या विधानांचा आधार घेत त्यांनाच लक्ष्य करत सणसणीत टोले लगावले. महापालिका निवडणुका, बिनविरोध उमेदवारी, पक्षांतराचे राजकारण आणि शरद पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही राऊतांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. एकाच वेळी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका जुन्या वक्तव्याचा संदर्भ घेत राऊतांनी त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. “जो नगरसेवक होतो तो पाप करतो, जो महापौर होतो तो महापाप करतो,” असे विधान फडणवीसांनी पूर्वी केले होते, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता राऊतांनी त्याच शब्दांचा वापर करत मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास मांडला. फडणवीसांची राजकीय सुरुवात नागपूर महापालिकेच्या नगरसेवक म्हणून झाली, त्यानंतर ते महापौर झाले, मग आमदार आणि अखेरीस मुख्यमंत्री झाले, यावर भाष्य करत “मोठं पाप केल्यावर आमदार आणि महापाप केल्यावर मुख्यमंत्री झाले,” असा खोचक टोला राऊतांनी लगावला. महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बिनविरोध निवडणुकांवरही संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सध्या दबाव, भीती आणि राजकीय ताकदीच्या जोरावर उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीत निवडणूक ही लढली जावी, मतदारांना पर्याय मिळावा, पण सध्याची परिस्थिती ही लोकशाहीसाठी घातक असल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी भूतकाळातील उदाहरणांचा दाखला देत सांगितले की, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांपैकी कोणीही बिनविरोध निवडून आले नव्हते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई निवडणूक लढवत असताना तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नव्हता, अशी आठवण राऊतांनी करून दिली. केवळ प्रसिद्धीसाठी चाललेलं हे राजकारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि काँग्रेसमधील काही नेते भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करत असल्याबाबत विचारणा केली असता, संजय राऊत यांनी या फोडाफोडीच्या राजकारणावर उपरोधिक टिप्पणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फक्त एका दिवसाची बातमी हवी असते, असा टोला त्यांनी लगावला. आज कोणाला फोडलं, उद्या कोण पक्षात घेतलं, अशा बातम्या सतत येतात, पण जे लोक तिकडे जातात त्यांच्या राजकीय भवितव्याचं पुढे काय होतं, याकडे कुणीही लक्ष देत नाही, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. केवळ प्रसिद्धीसाठी चाललेलं हे राजकारण असल्याचा आरोपही त्यांनी केला. शरद पवार राजकीय कारकीर्दीवर डाग लागू देणार नाही दरम्यान, महापालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएत जाणार असल्याच्या चर्चांवरही संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या चर्चा फोल आणि निराधार असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या राजकीय अनुभवाला आणि वयाला हे शोभणारे नाही. या टप्प्यावर ते असा कोणताही निर्णय घेतील, असे वाटत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शरद पवार आपल्या राजकीय कारकीर्दीवर कोणताही डाग लागू देणार नाहीत, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला. निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे सध्याच्या राजकीय घडामोडींवरून राज्यातील वातावरण अधिकच अस्थिर होत असल्याचे दिसत आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीनंतर विरोधक आक्रमक झाले असून सत्ताधारीही प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे हे स्पष्ट झाले आहे की, आगामी महापालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची लढत न राहता राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहेत. बिनविरोध निवडणुका, पक्षांतर आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह एकंदरीत, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधकांवर केलेली टीका ही केवळ व्यक्तिगत नसून सध्याच्या राजकीय व्यवस्थेवरचा हल्ला असल्याचे चित्र आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊतांनी आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात शब्दयुद्ध आणखी धारदार होण्याची शक्यता आहे.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसस्टेशनच्या हद्दीत दीर-भावजयीच्या अनैतिकसंबंधांची माहिती वडिलांपर्यंत पोहोचवतअसल्याचा राग मनात धरून, एका निर्दयीचुलत्याने आपल्या १३ वर्षीय पुतण्याचादिवसाढवळ्या खून केला. ही संतापजनकघटना तामलवाडी साठवण तलावाजवळसोमवारी (५ जानेवारी) उघडकीस आलीआहे. ओमकार कांबळे असे आरोपीचे तरकृष्णा कांबळे (१३) असे मृताचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक गोकूळ ठाकूरयांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी पोलिसांनीअवघ्या २४ तासांत खुनाचा छडा लावतआरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीलासोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडीसुनावली. सोलापूर-धुळे राष्ट्रीयमहामार्गालगत तामलवाडी शिवारात कदमयांची शेती आहे. ही शेती दत्ता कोरे हे बटईनेकरीत होते. उमरगा तालुक्यातील कोळसूरगावचा ओमकार देविदास कांबळे हाआपल्या भावजयीसोबत सालगडी म्हणून काम करत होता. महिलेचा १३ वर्षीय मुलगा कृष्णा उर्फसदानंद कांबळे हा कधी वडिलांकडेतर कधी आईकडे राहत होता. कृष्णाहा आई व काका यांच्यातील अनैतिकसंबंधांची माहिती आपल्या वडिलांनादेत असे. त्यामुळे तोदीर-भावजयीच्या प्रेमसंबंधातअडसर ठरत होता. याच रागातून १जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्यासुमारास, आरोपी ओमकार कांबळेयाने तलावातील पाणी उपसाकरणाऱ्या विद्युत पंपाचा पाइपबसवण्याच्या बहाण्याने कृष्णालातामलवाडी साठवण तलावाजवळनेले. तिथे कुऱ्हाडीचे वार करूनकृष्णाचा खून केला आणि मृतदेहतलावाशेजारील गवतामध्ये फेकूनआरोपी पसार झाला. नंतर त्यालापोलिसांनी ताब्यात घेतले. पुढीलतपास सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर करत आहेत. आईला ठेवले अंधारात घटनेनंतर मुलगा घरी न परतल्यानेत्याच्या आईने ओमकारला विचारणाकेली. त्यावेळी आरोपीने कृष्णा वडिलांकडे गेला असे खोटे सांगूनगुन्हा लपवला होता. मृतदेहआढळल्यावर खोटेपणा उघड झाला. मोबाइल लोकेशनद्वारे गाठले कृष्णा कांबळे खूनप्रकरणी तपास सुरूकरताना तामलवाडी पोलिसांनी प्रथमबसस्थानक परिसरात शोधमोहीमराबवली. त्यानंतर आरोपीचे मोबाइललोकेशन ट्रेस करत पथक थेट तलमोड,उमरगा तालुका येथील टोलनाक्यापर्यंतपोहोचले. पुढे कोळसूर गावात आरोपीओमकार देवीदास कांबळे हा घरीपरतत असतानाच तामलवाडीपोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्यास तामलवाडीपोलिस ठाण्यात आणले. २४ तासांत पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला. इनसाइड स्टोरी: गुराख्याच्या सतर्कतेने गुन्हा उघड ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्यासुमारास, धनाजी नेटके हे तलाव परिसरातजनावरे चारत असताना गवतामध्ये त्यांनामृतदेहाचे पाय दिसून आले. त्यांनी तत्काळतामलवाडी पोलिसांना माहिती दिली.सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनीपथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामाकेला. मृतदेहावरील गंभीर जखमांवरून हाखून असल्याचे स्पष्ट झाले. प्रथम अकस्मातमृत्यूची नोंद करण्यात आली. नंतर पोलिसांनीआरोपी ओमकार कांबळेला अटक केली.

24 C