धुळे : प्रतिनिधी निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रबी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी धुळे जिल्ह्याच्या साक्री आणि शिंदखेडा […] The post बळिराजा पुन्हा संकटात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
'आयएएस' तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय शंभर असल्याचे समजते. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी उद्या 3 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालच्या निवडणूक कर्तव्यावर आहेत. त्यांना आईच्या निधनाची माहिती समजताच हे पुण्याकडे रवाना झालेत, अशी माहिती मुंढे परिवाराकडून देण्यात आली. आसराबाई मुंढे यांना गावकरी, कुटुंबीय, नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी यंत्रणेत ओएसडी पदाला असलेला मान आणि प्रभाव याचा गैरफायदा घेत आरोपीने थेट पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश मिळवला. या प्रकरणामुळे प्रशासनातही खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी असल्याचे सांगत पुण्यातील परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला. कोणतीही अधिकृत ओळख नसताना अशा पद्धतीने सरकारी कार्यालयात घुसखोरी केल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. ओएसडी पद हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पदावरील व्यक्ती अनेकदा प्रशासकीय कामे पाहत असल्याने त्यांचा प्रभाव मोठा असतो. याच पार्श्वभूमीवर आरोपीने त्या पदाचा धाक दाखवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगत या संशयास्पद हालचालींची दखल घेतली. कठोर कारवाई करण्याची यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपासात त्याने अशाच प्रकारे इतरत्रही स्वतःची बनावट ओळख वापरली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शासकीय यंत्रणेत ओळख पडताळणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून अशा बनावट अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 876 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, महापालिकेच्या स्थापनेनंतर एका वर्षात झालेली ही सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. विशेष म्हणजे, एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महापालिकांच्या तुलनेतही नवी मुंबई महापालिका करवसुलीत आघाडीवर राहिली आहे. नियोजनबद्ध मोहिमा आणि अभय योजनेचा प्रभाव यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा या यशाचा महत्त्वाचा घटक ठरला. नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे एकूण वसुलीपैकी सुमारे 60 टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली आहे. याशिवाय एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश, नोटीस आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. यामुळे करदात्यांचा प्रतिसाद वाढला आणि वसुली प्रक्रियेला गती मिळाली. सुट्ट्यांच्या दिवशीही कर संकलन केंद्र सुरू ठेवून महापालिकेने विशेष प्रयत्न केले. थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी 10 मार्च ते 31 मार्च 2026 दरम्यान अभय योजना राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास विलंब शुल्कात 50 टक्क्यांची सवलत देण्यात आली. या सवलतीमुळे अनेक मालमत्ताधारकांनी थकबाकी भरून प्रतिसाद दिला, ज्याचा थेट फायदा महसूल वाढीस झाला. सोयीस्कर सेवा देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने केलेल्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, डिजिटल सुविधा आणि नागरिकांशी सातत्याने संवाद या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे यंदाची करवसुली विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. भविष्यातही अशाच पद्धतीने अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारावरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. उकसान गावातील सुमारे 30 गुंठे जमिनीच्या खरेदीत नियमभंग आणि फसवणूक केल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे या सेलिब्रिटी जोडप्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मौजे उकसान येथील सर्व्हे क्रमांक 121/1 मधील जमीन परस्पर खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदार चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने वकील वनराज शिंदे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन ही त्यांच्या कुटुंबाच्या वहिवाटीत असून 1957 पासून त्यांच्या आजोबा केसू बाबाजी शिंदे यांच्या नावावर आहे. त्यामुळे या जमिनीवर कुळ हक्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या मते, मूळ मालकाने ही जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्या व्यक्तीला विकली आणि त्यानंतर कुळ हक्काची माहिती लपवून ती पुढे सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांना विकण्यात आली. याशिवाय, डिसेंबर 2025 मध्ये या जागेवर भेट दिली असता सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांशी वाद घातल्याचाही आरोप करण्यात आला आहे. फक्त सातबारा आणि खरेदीखतावर नाव असणे म्हणजे मालकी सिद्ध होत नाही. कुळ हक्क लपवून व्यवहार करण्यात आला आहे, असा दावा तक्रारदारांच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, या सर्व आरोपांना बचाव पक्षाने ठामपणे फेटाळले आहे. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या वतीने वकील राजू शिंदे यांनी सांगितले की, संबंधित जमीन प्रत्यक्षात सोनाली बेंद्रे यांच्या नावावर नाही, त्यामुळे त्यांचा या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 8 जून 1965 रोजी तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार केसू शिंदे हे त्या जमिनीचे मालक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष याशिवाय, यापूर्वीही या प्रकरणावर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर अनेक वेळा सुनावण्या झाल्या असून प्रत्येक वेळी निर्णय तक्रारदारांच्या विरोधात गेला असल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. ऑक्टोबर 2025 मध्येही मावळ तहसीलदारांनी तक्रारदारांचे अपील फेटाळले होते. त्यामुळे केवळ पैसे उकळण्यासाठी वारंवार हे प्रकरण उकरून काढले जात असल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे. आता या प्रकरणावर न्यायालयात पुढील सुनावणी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोलीचया शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील बंद लिफ्टच्या दरवाजावर फुले वाहून तसेच गणवेशात नसलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर यांनी गुरूवारी ता. २ गांधीगिरी केली. या शिवाय मुख्य प्रवेशद्वारावरही त्यांनी फुले वाहिली. त्यांच्या गांधीगिरीनंतर तरी रुग्णालय प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय मशीन सुरुच करण्यात आली नाही. कोट्यावधी रुपये खर्चुन रुग्णांसाठी उपलब्ध केलेली मशीन अद्यापही सुरुच झाली नसल्याने रुग्णांची एमआरआयसाठी नांदेडवारी सुरुच आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय रुग्णालयातील लिफ्ट बंद असून शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये नेतांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागले. लिफ्ट सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कांडेलकर यांनी वेेळोवेळी केली मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासोबतच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही अनेक कर्मचारी गणवेश परिधान करून येत नाहीत. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक कोण अन रुग्णालयातील कर्मचारी कोण याची ओळख होत नाही. विशेष म्हणजे रुग्णालयाचे आधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेशामध्ये कर्तव्यावर हजर रहावे असे स्पष्ट आदेश असतांनाही त्यांच्या आदेशाकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र होते. या सर्व प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्ण कल्याण समितीचे माजी सदस्य निनाजी कांडेलकर यांनी आज रुग्णालयाच्या लिफ्टच्या दरवाजावर फुले वाहिली. त्यानंतर एमआरआय विभागात जाऊन मशीनला फुले वाहिली तर तेथील कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यासोबतच गणवेश परिधान न करता कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अधिष्ठाता डॉ. मुंगल यांनी काढलेल्या आदेशाचे पालन करावे अशी विनंती करून गांधीगिरी केली.
राष्ट्र सेवा दलाचा निर्धार मेळावा 4 व 5 एप्रिल 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. साने गुरुजी स्मारक येथे होणाऱ्या या मेळाव्यात राज्यभरातून 500 हून अधिक सक्रिय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. संविधान मूल्यांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा निश्चित करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षाच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. बदलत्या राष्ट्रीय परिस्थितीत संघटनेला नव्या जोमाने उभारी देण्यासाठी आणि राज्य व देशातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून धोरणात्मक चर्चा करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्र सेवा दलाने सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकशाही चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात अनेक जनआंदोलने उभी करून विविध क्षेत्रांत नेतृत्व घडवण्याचे कार्य या संघटनेने केले आहे. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी, शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 'गांधी टॉक' या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण होणार आहे. यावेळी दिग्दर्शक किशोर बेळेकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार, 5 एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण व उदघाटन समारंभ पार पडेल. या मेळाव्याचे उदघाटक म्हणून संपादक संजय आवटे आणि सचिन गोस्वामी उपस्थित राहतील. 'आजचा आणि पुढचा भारत' या विषयावर मार्गदर्शनासाठी प्रा. डॉ. अजय गुडावर्थी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत हे देखील उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात विविध विषयांवर गटचर्चा करून त्यावर सादरीकरण केले जाईल, ज्यामुळे पुढील दिशा निश्चित केली जाईल. सायंकाळी समारोपाने या दोन दिवसीय मेळाव्याची सांगता होईल. या मेळाव्यास राज्यभरातून किमान 500 क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मेळाव्याचे प्रमुख प्रकाश कांबळे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील संजय गायकवाड, विलास किरोते, दत्ता पाकिरे, संदेश दिवेकर, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश डोंबाळे, भिमराव अडसूळ, अश्विनी सातव आणि मनिषा पाटील हे कार्यकर्ते आयोजनात सक्रिय सहभागी आहेत.
शिवसेना शिंदे गटाच्या स्नेहभोजनानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर आता ठाकरे गटाच्या खासदारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठीच गेलो होतो, कोणत्याही राजकीय चर्चेसाठी नाही, असं स्पष्ट केलं आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या खळबळीला उत्तर देताना त्यांनी ऑपरेशन टायगर, सारख्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमाला ठाकरे गटाचे दोन खासदार, नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हजर राहिले होते. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. विशेषत: राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा रंगत असताना या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे ही केवळ सामाजिक भेट की त्यामागे राजकीय संदेश आहे, याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र नागेश आष्टीकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितलं की, प्रतापराव जाधव यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता आणि सभागृहातच त्यांनी निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी जाऊन 5 ते 10 मिनिटांत शुभेच्छा देऊन परतलो. याचा अर्थ कुठल्याही गुप्त बैठकीचा किंवा राजकीय हालचालींचा लावू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं. एकाच सभागृहातील सदस्य असल्याने सुख-दु:खात भेटणं स्वाभाविक आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपशी संबंधित मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या पार्श्वभूमीवर आष्टीकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितलं की, त्या भेटीचा आणि आमच्या उपस्थितीचा काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याच नेतृत्वात काम करतो. प्रतापराव जाधव यांच्या घरी जाणं ही फक्त सौजन्याची भेट होती, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे सहा आणि शरद पवार गटाचे सहा खासदार आपल्या बाजूला वळवण्याची रणनीती आखली असल्याची चर्चा आहे. सध्या शिंदे गटाकडे सात खासदार असून, ही संख्या 19 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मात्र या हालचालींना भाजपकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. त्यामुळे सध्या तरी या भेटीमुळे निर्माण झालेलं राजकीय वातावरण आणि चर्चांचा वेग कायम असला, तरी ठाकरे गटाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
प्रवीण मसाले कंपनीच्या कार्यालयात आग:शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय; जीवितहानी नाही, मोठे नुकसान
पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रवीण मसाले कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गुरुवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी तत्परतेने परिस्थिती हाताळत बी.ए. सेट परिधान करून धुराने भरलेल्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी दोन्ही जिन्यांच्या साहाय्याने वरती पाण्याच्या लाईन नेल्या आणि कार्यालयाच्या खिडक्या उघडून धूर बाहेर जाण्यास मार्ग मोकळा केला. यानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. जवानांच्या वेगवान आणि नियोजनबद्ध कामगिरीमुळे आग इतर भागात पसरू न देता वेळेत विझवण्यात यश आले. या आगीत कार्यालयातील एसी, फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. सदर आगी मध्ये नेमके किती नुकसान झाले आहे याबाबतचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात येत आहे. या बचावकार्यामध्ये हडपसर अग्निशमन केंद्रासह बी.टी. कवडे रोड, काळेपडळ अग्निशमन केंद्र आणि सेंट्रल फायर स्टेशन येथील जवानांचा सहभाग होता. सर्वांनी समन्वयाने काम करत परिस्थिती लवकर नियंत्रणात आणली. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आग आटोक्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुढील तपास सुरू असून नुकसानाचे नेमके मूल्यांकन करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रार अर्जाची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. भरत पोपट गायकवाड (वय ४६, रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गायकवाड याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जागेत गावातील काही जणांनी अतिक्रमण करून घर बांधले होते. तसेच, ग्रामसेवकाने कोणतीही कागदपत्रे न पाहता ‘८ अ’ उतारा तयार करून दिला होता. याबाबत तक्रारदाराने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी हा अर्ज कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घासले यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला होता. याच अर्जाची चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गायकवाड याने तक्रारदाराकडे सुरुवातीला दहा ते पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तडजोडीअंती गायकवाड याला दोन हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला आणि गायकवाड याला रंगेहाथ पकडून अटक केली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सतीश वाळके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हिंजवडी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 27 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी ही माहिती दिली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत 24 मार्च 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथक हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विनोदे वस्ती, वाकड परिसरात एक व्यक्ती चारचाकी वाहनातून एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि अतुल शंकर बालगुडे (वय 35, रा. पाथरगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 42 ग्रॅम वजनाचा, सुमारे 4 लाख 20 हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ आणि 3 लाख 24 हजार 200 रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान, बालगुडेचा साथीदार शाहरुख उर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यालाही मुंबईतून अटक करण्यात आली. अन्सारीकडून 200 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिसांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता कायम:सभापती पदाची निवडणूक बिनविरोध, औपचारिकता बाकी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सभापती पदावरही भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. अध्यक्षपदानंतर आता सभापती पदाची निवडणूकही बिनविरोध होणार आहे, ज्यामुळे भाजपची सत्ता अधिक मजबूत झाली आहे. महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून वरून पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, निर्धारित वेळेत अर्ज दाखल न केल्याने त्यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. भाजपने मीनाक्षी पवार आणि अनिता मोठे यांना सभापती पदासाठी संधी दिली आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बालाजी सोनटक्के आणि अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत सचिन गरड यांचाही समावेश आहे. दुपारी दोन वाजेनंतर अधिकृत विजयाची घोषणा अपेक्षित आहे. यापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना गट एकत्र येऊन भाजपविरोधात समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत सत्ता आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळवले. यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे. कृष्णा डोंणगावकरांनी घेतला होता अर्ज उबाठा गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोंणगावकर यांनी पक्षाचा 'व्हीप' झुगारत उमेदवारी अर्ज विकत घेतला. यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांची भेट घेत तुमचे आणि भाजपचे पटत नसेल, तर तटस्थ राहण्याऐवजी मला मतदान करून मदत करा, असे म्हटले. मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यामुळे आता भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
नाशिकच्या अशोक खरातचे लैंगिक शोषण प्रकरण सुरू असतानाच आता नेमका असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या शिवदत्त आश्रमात समोर आलाय. या प्रकरणी नवनाथ पंढरीनाथ गवळी उर्फ मामा या भोंदूबाबाविरोधात राजगुरू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालीय. त्यानंतर हा भोंदूबाबा फरार झाल्याचे समजते. पुण्यातल्या या भोंदूबाबाविरोधात तक्रार देऊनही पोलिस कारवाई करत नाहीत, असा आरोप पीडितेने एका व्हिडिओद्वारे केलाय. खरेच पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी चर्चा आता सुरू झालीय. नेमके प्रकरण काय? पुण्यातील खेड तालुक्यात चांडोलीमध्ये नवनाथ गवळी हा शिवदत्त आश्रम चालवतो. त्याला अनेकजण आदराने मामा म्हणतात. हा मामा आश्रमात आलेल्या महिलांशी अश्लील चाळे करतो. अनेकांकडे त्यांने शारीरिक संबंधांची मागणी केली. महिलांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे समोर आले आहे. महिलेने दाखवले धाडस भोंदूबाबाच्या या छळाविरोधात एका महिलेने धाडस दाखवत राजगुरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपी फरार झाला. मात्र, त्यावर कसलिही कारवाई होत नाही, अशी खंत पीडित महिलेने एका व्हिडिओद्वारे मांडली आहे. दरम्यान, भोंदू पंढरीनाथ गवळीच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे समजते. पीडिता काय म्हणाली? पीडित महिलेने एका व्हिडिओतून आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, ‘नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदूबाबा. ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते. त्याने माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली. माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलिस कंप्लेन केली.' अजून कारवाई नाही पीडिता पुढे म्हणाली की, 'आम्ही पोलिसांत तक्रार दिली. मात्र, अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. मला असे वाटते, माझ्याबाबत जो प्रकार झाला. तोच प्रकार कोणत्याही महिलेबाबतीत होऊ नये. त्यामुळे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याचा आश्रम चांडोली येथे आहे. याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात. मात्र, याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही सुरूच आहेत.’ अशोक खरातची पुनरावृत्ती नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातने महिला भाविकांचे लैंगिक शोषण केले. त्याने विविध पूजा, विधी याचे निमित्त साधून महिलांशी शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर सरकारने हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याविरोधातही कारवाई करणे सुरू केले. मात्र, पुण्यातला हा बाबा भोंदूबाबा अजूनही फरार आहे. वसईतही भोंदूबाबा वसईतील एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. स्वतःला शंकर म्हणवून घेत मी शंकर, तर तू माझी पार्वती आहेस असे सांगत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्याविरुद्ध वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूबाबाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विशेष तपास पथकाने यासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने मान्य केला. न्यायालयात चार स्क्रीनच्या माध्यमातून ही ऑनलाईन सुनावणी पार पडली. या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सुरुवातीलाच न्यायाधीशांनी आरोपीला त्याचे नाव विचारले. मात्र आवाज स्पष्ट ऐकू न आल्याने न्यायाधीशांनी जरा मोठ्याने बोला, असे सांगितले. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला की, तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहेत, तेच तुमचे वकील आहेत का? यावर अशोक खरातने होकारार्थी उत्तर दिले. सुनावणीच्या शेवटी न्यायाधीशांनी त्याला तुम्हाला काही सांगायचे आहे का? असा प्रश्न विचारला असता, खरातने हात जोडून नाही असे उत्तर दिले. या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप न्यायालयासमोर मांडले. त्यांनी सांगितले की, आरोपीकडून एका महिलेसोबत अत्याचार करण्यात आला असून ती गर्भवती राहिली होती. त्यानंतर तिला काही औषधे देऊन गर्भपात घडवून आणल्याचा संशय आहे. ही औषधे कुठून आणली, त्यामध्ये नेमके काय होते, याचा तपास अद्याप सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरोपी पीडितांकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड मागत होता, त्यामागील उद्देश काय होता, याचाही तपास बाकी असल्याचे सांगण्यात आले. सरकारी वकिलांनीही या प्रकरणातील गंभीर बाजू अधोरेखित केली. त्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी पीडित महिलांना फसवण्यासाठी तू अप्सरा आहेस, अशा शब्दांचा वापर करत होता. जडीबुटीच्या नावाखाली दिली जाणारी औषधे नेमकी काय होती, हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पीडितांच्या नातेवाईकांकडून कागदपत्रे मागण्यामागे मालमत्तेचा काही डाव होता का, याचाही तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. दुसरीकडे, बचाव पक्षाने या मागणीला विरोध केला. आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, हा दुसरा गुन्हा असून याआधीच 14 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. तसेच अद्याप त्यांच्याकडे पूर्ण फिर्याद पोहोचलेली नाही. गर्भपाताच्या आरोपांबाबतही नेमका कालावधी काय होता, हे स्पष्ट नाही, असे त्यांनी मांडले. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यावरही गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी वकिलांनी पुन्हा युक्तिवाद करताना आरोपी हा मास्टरमाईंड, असल्याचा दावा केला. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यात आले असून आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे सखोल चौकशीसाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे स्पष्ट करत त्यांनी कोठडी वाढवण्याचा आग्रह धरला. या सर्व युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी शेवटी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. म्हणजेच पुढील सात दिवस एसआयटीला तपासासाठी मिळणार आहेत. या कालावधीत प्रकरणातील विविध पैलूंवर सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. वाढत्या आरोपांमुळे आणि नव्या खुलाशांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनत असून पुढील सुनावणीपर्यंत काय नवे उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
७१ लाख बहिणींना योजनेतून वगळले
मुंबई : प्रतिनिधी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष, नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि आता ७१ लाख बहीणींना त्यापासून वंचित केले जात असून एक प्रकारे महिलांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस […] The post ७१ लाख बहिणींना योजनेतून वगळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे धागेदोरे आता अधिक खोलवर जात आहेत. खरातवर असलेल्या प्रचंड रागामुळे आणि त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, आजची न्यायालयीन सुनावणी अत्यंत कडक बंदोबस्तात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे पार पडली. विशेष तपास पथकाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात आणणे जोखमीचे असल्याचे अर्जाद्वारे कळवले होते. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने कोर्ट रूममध्ये चार मोठे स्क्रीन बसवून सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी खरात, न्यायाधीश आणि वकील यांच्यात थेट संवाद झाला. महिलेचा गर्भपात घडवला सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. खरातने एका महिलेला तू अप्सरा आहेस असे सांगून धार्मिक भुरळ घातली आणि तिचे लैंगिक शोषण केले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असता, खरातने तिला अज्ञात गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. हे औषध त्याने कुठून आणले आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास SIT करत आहे. खरातकडून तपासात सहकार्य नाही तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, खरात हा पीडितेच्या नातेवाईकांकडे वारंवार आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. याद्वारे तो संबंधितांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हडपण्याच्या बेतात होता का? या दिशेने आता SIT ने तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला. खरातच्या वकीलाचा पोलिस कोठडीला विरोध सुनावणीदरम्यान न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांनी खरातला तुला काही सांगायचे आहे का? असे विचारले, त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. खरातच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, ही घटना 2022 मधील असून आरोपीने यापूर्वी 14 दिवस कोठडी भोगली आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप आणि खरातची गुन्हेगारी कार्यपद्धती पाहता, न्यायालयाने त्याला पुन्हा पोलिस कोठडी सुनावली. एका कुटुंबाला मृत्यचे भय दाखवून रचला ‘कुटिल डाव’ अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांपासून धनिकांपर्यंत सर्वांनाच लुटणाऱ्या भोंदू खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. भोंदूगिरीच्या बळावर त्याने केवळ लोकांची दिशाभूलच केली नाही, तर चक्क “मृत्यूची भीती’ दाखवून मोक्याच्या जमिनी कवडीमोल भावात लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नरच्या मिरगाव येथील एका कुटुंबाने 1997 मध्ये 16 लाखांची शेतजमीन घेतली होती. शेजारीच जमीन घेणाऱ्या भोंदू खरातची या जमिनीवर नजर होती. त्याने ‘तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात अनर्थ होईल’, अशी अंधश्रद्धेची भीती घातली. दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा गैरफायदा घेत खरातने, ‘जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू अटळ आहे’, अशी भीती दाखवत त्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली हडपलेली जमीन कुटुंब मुलीच्या मृत्यूनंतर भयग्रस्त असताना खरातने 2003 मध्ये आपला कुटिल डाव यशस्वी केला. 1997 मध्ये 16 लाखांना घेतलेली जमीन त्याने अवघ्या 4 लाखांत स्वतःच्या आणि पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली. या जमिनीवर नंतर त्याने मंदिर उभारले, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये आणि कुणी विरोध करण्याचे धाडस करू नये. गरीब शेतकऱ्यांना भीती दाखवून जमिनी लाटताना खरातने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या व्यवहारांवरील सरकारचा महसूलही बुडवल्याचेदेखील या भागातील रहिवाशांनी सांगितले.
मराठावाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूने योग्य तपास सुरू आहे. पोलिसांकडे जी माहिती येते आहे त्या आधारावर पोलिस काम करत आहे. कोणाकडे अजून काही माहिती असेल त्यांनी जर ती पोलिसांना दिली तर तपासाला चालना मिळेल. या प्रकरणी संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे सुरू आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले आहे. खरात प्रकरणी चौकशी सुरू चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यांना जे जमीनीचे गैरव्यवहार दिसून येतील त्यानंतर त्यावर आम्ही चौकशी करू. पोलिस तपास सुरू असताना दुसऱ्या चौकशा लावणे योग्य नाही. यापुढे कोणाला गैरफायदा घेता येणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचा काही लोकांनी गैरफायदा घेतला असेल तर शासन ते शोधून काढते. नंतर मात्र त्यांना लाभ होणार नाही. काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला तसा घ्यायला नको होता पण यापुढे त्यांना लाभ मिळणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गोष्टींबद्दल मला काही माहिती नाही, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रावर बोलणं टाळले. राहुल गांधींवर टीका राहुल गांधी यांना 'वंदे मातरम'चा नेमका अर्थही माहित नाही. त्यांनी हे राष्ट्रगीत कधी मनापासून वाचले नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे की, त्यांना 'वंदे मातरम'च्या चार ओळीही नीट म्हणता येत नाहीत, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.
बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीने आता खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, अचानक 30 जणांनी उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीभोवती रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. 6 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असून या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. पक्षाने बारामती शहर आणि तालुक्यात ‘घोंगडी बैठकां’च्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. कार्यकर्ते गावागावांत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. केवळ विजयच नव्हे, तर दिवंगत अजित पवारांपेक्षा अधिक मतांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. 30 अर्जांनी वाढवली उत्सुकता महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, तब्बल 30 जणांनी अर्ज नेल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, यापैकी किती जण प्रत्यक्ष अर्ज भरतात? किती अर्ज वैध ठरतात? आणि किती जण माघार घेतात? यावरच या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. राजकीय वर्तुळात बारामतीत एकतर्फी विजय होणार की थेट चुरस पाहायला मिळणार अशी एकच चर्चा सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीरबारामती पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रमही जाहीर झाला आहे: आतापर्यंत तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), सागर भिसे (अपक्ष), राजू घुटूकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार बारामतीबाहेरील असल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणे अजून स्पष्ट झालेली नाहीत. विरोधकांचा आक्रमक पवित्रा दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “आम्ही आमचा उमेदवार उभा करणारच. मी स्वतः उभा राहणार की अन्य कोणी, हे लवकरच स्पष्ट करू,” असे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीकाही केली. “निवडणुकीत आश्वासने दिली जातात, पण ती पाळली जात नाहीत,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राजकीय समीकरणे आणि मोठे प्रश्न या पोटनिवडणुकीत केवळ एक जागा भरली जाणार नाही, तर सहानुभूतीची लाट निर्णायक ठरणार का? विरोधक एकत्र येऊन लढत देणार का? की शेवटच्या क्षणी बिनविरोधाचा मार्ग मोकळा होणार? असे अनेक मोठे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. बारामती केवळ एक मतदारसंघ नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘पॉवर सेंटर’ मानली जाते. त्यामुळे येथील प्रत्येक हालचाल राज्यभर परिणाम घडवू शकते. सध्या तरी 30 अर्जांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. पुढील काही दिवसांत माघारी, उमेदवारी आणि राजकीय चर्चांच्या फेऱ्यांमुळे चित्र अधिक स्पष्ट होईल. बिनविरोध असो किंवा थेट लढत— बारामतीचा निकाल आता संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
भोंदू बाबा अशोक खरातनंतर आता संजूबाबा राऊत ने नवा धंदा उघडला आहे. जसा खरात लोकांना फसवायचा तसे राऊत भविष्यवाणी सांगत लोकांना फसवण्याचे काम करत आहे.कोणाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीत राऊत यांनी जाऊ नये, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्यांची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व आहे ते लोकांमधून निवडून आलेले आहेत. खरात सारखे संजूबाबा राऊत हे दुसरे दुकान मांडत आहेत. नवनाथ बन म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल जनतेने विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीतून दिला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी सुनेत्रा अजित पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आता कोर्ट काय निर्णय देईल तो नक्की देईल. उबाठा गटाचा शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर हक्क उरला नाही हे आता सिद्ध झाले आहे. तुम्ही हरामशास्त्री अन् कामशास्त्री नवनाथ बन म्हणाले की, कोण रामशास्त्री आहे आणि कोण कामशास्त्री आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. कारण संजय राऊत आणि उबाठा गट स्वत: हरामशास्त्री आहेत. कामशास्त्रांत तर त्यांची पीएचडी झाली आहे. अलिबागच्या बंगल्यात तुम्ही काय पीएचडी करता हे जनतेने पाहिले आहे. तिथले काळे कारनामे समोर आले तर तुम्हाला जनतेच्या समोर जाता येणार नाही. तुम्ही हरामशास्त्री आणि कामशास्त्री आहात. .. काँग्रेसच्या उपकारावर आमदारकी नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात जावे असे संजय राऊत यांना वाटते आहे. पण जनतेने तुम्हाला नाकारले आहे. उद्धव ठाकरे विधीमंडळात जाणार का नाही, त्यांना संधी मिळणार का नाही हे तुमच्या हातात नाही तर काँग्रेस ठरवणार आहे. काँग्रेसने उपकार केले त्यांनी आशीर्वाद दिले तरच उद्धव ठाकरेंना विधीमंडळात जाता येणार आहे. एक काळ होता शिवसेनेला स्वाभिमान होता. आता आमदारकीसाठी सोनिया गांधीसमोर मुजरा करावा लागणार आहे. ..देवाभाऊंनी काय बोलावे हे राऊतांनी सांगू नये नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलावे हे संजय राऊत यांनी सांगू नये. शिवरायांच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांना काही सल्ले देऊ नये. सौदेबाजीची भाषा तर तुम्ही करूच नये. कारण तुम्ही सौदेबाजी करत पक्ष काँग्रेसला विकला, हिंदूत्व सोडले. यामध्ये राऊतांना राज्यसभेची पुन्हा संधी मिळावी हे तुमचे डील राहुल गांधीसोबत सुरू आहे. देवाभाऊ जनतेमधून निवडून आले आहेत, ते मागच्या दाराने राजकारण करत नाही. त्यांनी काय बोलावे हे राऊतांनी सांगायची गरज नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वेग घेताना दिसत आहेत. सत्ताधारी गट आणि विरोधकांमधील दरी कमी होतेय की राजकीय समीकरणांची नवी जुळवाजुळव सुरू आहे, असा प्रश्न निर्माण करणारी घटना नुकतीच घडली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) दोन खासदार उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘डिनर डिप्लोमसी’ने खळबळ या स्नेहभोजनाला नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख उपस्थित होते. शिंदे गट आणि ठाकरे गटातील तीव्र राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही उपस्थिती ‘साधी शिष्टाचार भेट’ की काही मोठ्या राजकीय हालचालींचा इशारा, यावर खमंग चर्चा रंगली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर या कथित राजकीय रणनीतीची चर्चा सुरू होती. विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या आधीपासूनच समोर येत होत्या. अशातच ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आष्टीकरांचे स्पष्टीकरण दरम्यान, नागेश आष्टीकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. “हा केवळ वैयक्तिक कार्यक्रम होता. आम्हाला सभागृहात निमंत्रण देण्यात आले होते. आम्ही फक्त 5-10 मिनिटांसाठी जाऊन शुभेच्छा दिल्या. यामागे कोणतीही राजकीय चर्चा नव्हती,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “एकाच सभागृहात काम करत असल्याने सुख-दुःखात भेटणे स्वाभाविक आहे,” अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मोठी राजकीय गणिते सुरू? राजकीय सूत्रांनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीर्घकालीन रणनीती मोठी असल्याची चर्चा आहे. शिवसेना (शिंदे गट) कडे सध्या 7 खासदार आहेत. जर ठाकरे गटाचे 6 आणि शरद पवार गटाचे 6 खासदार त्यांच्याकडे आले, तर एकूण संख्या 19 पर्यंत पोहोचू शकते. अशा संख्याबळामुळे केंद्रात आणि राज्यात शिंदे गटाची ‘बार्गेनिंग पॉवर’ मोठ्या प्रमाणात वाढू शकते. 2029च्या निवडणुकांसाठीही ही रणनीती महत्त्वाची मानली जात आहे. भाजपकडून अद्याप ‘ग्रीन सिग्नल’ नाही? मात्र, या कथित रणनीतीला अद्याप भाजपकडून पूर्ण पाठिंबा मिळालेला नाही, अशीही माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, अलीकडील दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांची भेट घेतली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण ‘ऑपरेशन’बाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. सध्या तरी ठाकरे गटाच्या खासदारांची ही उपस्थिती ‘सौजन्य भेट’ म्हणूनच सांगितली जात असली, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. राजकीय हालचालींच्या या पार्श्वभूमीवर, येत्या काळात कोणते नवे समीकरण तयार होते आणि ‘ऑपरेशन टायगर’ खरोखरच आकार घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष ,नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि आता 71 लाख बहीणींना त्यापासून वंचित केले जात आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो हे सरकार केवळ मतांसाठी राजकारण करते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यामध्ये बरेच काही माहिती समोर येत आहे. आपण पोलिस आणि एसआयटी चौकशीला वेळ दिला पाहिजे. खरातची पत्नी दोन दिवसांपासून फरार आहे त्या का भेटत नाही याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. ..अजितदादांच्या पक्षावर आम्ही बोलणार नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाने जर जय पवारांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी राजकारणात यायला काही अडचण नाही. जय पवारांनी त्यांचे कर्तृत्व दाखवावे. त्यांच्या पक्षाची अंतर्गत काही चर्चा झाली यावर आम्ही बोलणे योग्य नाही. पण सुनेत्रा पवारांनी घेतलेला निर्णयावर त्या सांगू शकतील. अजित पवार यांच्यापक्षाबद्दल बोलण्याचा माझा काहीही संबंध नाही. त्यावर मी बोलणार नाही. त्यांनी सत्य तरी मान्य केले शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत आमची विलनीकरणाबद्दल चर्चा झालीच होती हे आम्ही अधीच सांगितले होते. जे काही त्या चर्चेत ठरले होते ते ठरले होते. आता काही लोकांनी सत्य सांगितले आहे. आता त्यावर काही लोकांनी उशिरा का होईना सत्य मान्य केले. हे वृत्तही वाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 71 लाख महिला अपात्र:ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी! 1 कोटी 75 लाख महिलांना मिळणार लाभ राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. वाचा सविस्तर
राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होत आहेत. सुरुवातीला तब्बल 2 कोटी 62 लाख अर्ज दाखल झाले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या. चारचाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे किंवा तांत्रिक कारणांमुळे जवळपास 10 लाख महिला आधीच अपात्र ठरल्या होत्या. योजनेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांची खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली होती. 30 एप्रिलपर्यंत करा दरम्यान, ई-केवायसी करताना अनेक लाभार्थींना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने तसेच राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे या योजनेतील अनेक पात्र लाभार्थीना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेषतः कुटुंबातील सरकारी नोकरीबाबत चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेक बहिणींचे 1500 रुपये बंद झाले होते. या तक्रारींची आणि ज्या महिलांची ई-केवायसी प्रलंबित राहिली होती, त्याची दखल घेत सरकारने पून्हा 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. ज्या महिला आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या खात्यात मे महिन्यापासूनचे पुढील हप्ते जमा केले जाणार नाहीत. तसेच, त्यांचे नाव तात्पुरते निलंबित होऊ शकते. या योजनेत अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि सरकारी नोकरीत असूनही लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. ‘अर्ज भरा आणि लाभ मिळवा’ या धोरणामुळे लाभार्थ्यांचा आकडा 2 कोटी 47 लाखांवर गेला होता. मात्र, आता ई-केवायसी आणि डेटा शुद्धीकरण मोहिमेत यातील 71 लाख महिला निकषात बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारचे दरमहा 1065 कोटी वाचणार महिला व बालविकास विभागाने केलेल्या या पडताळणीमुळे आता सरकारचे दरमहा होणारे 1065 कोटी रुपयांचे नुकसान टळणार आहे. एप्रिल 2026 पासून या अपात्र महिलांना मिळणारे 1500 रुपये बंद केले जाणार आहेत. मात्र, गेल्या 20 महिन्यांपासून जे मानधन दिले गेले, त्या अवाढव्य खर्चाची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जाण्याची शक्यता आहे.
सेनगाव-रिसोड मार्गावर एका कारसह 5.30 लाखांचा गुटखा जप्त:दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सेनगाव ते रिसोड मार्गावर सेनगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह 5.30 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी भोगाव (ता.जिंतूर) येथील दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 2 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील रिसोड येथून एका कारमध्ये गुटख्याची पोते सेनगाव मार्गे जिंतूरकडे नेला जाणार असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मक्के, जमादार तुकाराम मारकळ, गजानन सरकटे, सुभाष चव्हाण, विष्णू डांगे, संतोष जाधव, क्षिरसागर यांच्या पथकाने बुधवारी ता. 1 रात्री पासून सेनगाव ते रिसोड मार्गावर वाहन तपासणी सुरु केली. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास एक कार पोलिसांनी थांबवली. पोलिसांनी कारमधील दोघांची चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांना पाहताच कारमधील दोघांची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी त्यांची नांवे विचारली असता त्यांनी योगेश मेगुणे , पांडुरंग तुरे (रा. भोगाव, ता. जिंतूर) असे सांगितले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात राजनिवास सुगंधित पानमसाला तसेच जाफरानी जर्दा असा गुटखा पोत्यांमध्ये आढळून आला. पोलिसांनी कार व गुटखा असा 5.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सेगनाव पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी जमादार मारकळ यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी योगेश व पांडूुरंग या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली असता सदर गुटखा रिसोड येथून जिंतूरकडे नेला जात असल्याचे दोघांनी सांगितले. त्यावरून आता पोलिसांनी रिसोड येथील गुटखा विक्रेत्याचा शोध चालविला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के पुढील तपास करीत आहेत.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने नापीकी अन कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 1 अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील शेतकरी गजानन माणिकराव दळवी (40) यांना कुरुंदा शिवारात साडेचार एकर शेत आहे. या शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या शेतीवर त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक कुरुंदा शाखेतून दोन वर्षापुर्वी 1.48 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र मागील दोन वर्षापासून नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. यावर्षी त्यांनी शेतात केळीची 2 हजार झाडे लावली होती. आता केळीचे घड विक्रीसाठी आले होते. मात्र आखाती युध्दाच्या परिस्थितीत केळीला भाव मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनीही केळी विक्रीकडे पाठफिरवली. त्यामुळे दोन हजार केळीचे घड शेतातच पिकले. तर सोयाबीनचे केवळ दोन क्विंटल उत्पादन मिळाले. लागवडीचाही खर्च निघाला नसल्याने आता कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा यामुळे ते अस्वस्थ होते. दरम्यान, शेतात हळद काढणीचे काम सुरु होते. मात्र हळदीचे उत्पन्नही हाती आले नसल्याने त्यांनी शेतातच विषारी औषध पिले. सदर प्रकार काही वेळानंतर हळद काढणीचे काम करीत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आला. त्यांनी तातडीने गावात नातेवाईकांना फोन करून बोलावले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. मयत गजानन यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ कामाजी दळवी यांनी दिलेल्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार भगवान वडकिले पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.
सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी होते. ते सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीवर दुसऱ्या पक्षाने का बोलावे. त्यांनी पत्रात काय लिहले हा त्यांचा विषय आहे. भविष्यात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल, त्यासोबतच शिंदेंचेही 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील, त्यांची तशी मानसिकता आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, त्या आमदारांना काळी काळ थांबवण्यासाठी सांगण्यात आले आहे. या दोन्ही पक्षाला भाजपमध्ये विलीन व्हावेच लागेल. शिवसेना पक्ष-चिन्हावरील सुनावणी प्रत्येकवेळी पुढे ढकलली जाते. मग सुप्रीम कोर्टावर विश्वास कोण ठेवणार? 50-50 वेळा घटनात्मक पीठ असलेल्या खटल्याच्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात. हे काम मुख्य न्यायाधीश करतात. हे नरेंद्र मोदी, अमित शहांचे गुलाम झाले आहे. या प्रकरणी एकदाच निर्णय देता येत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टावरच संशय संजय राऊत म्हणाले की, न्याय व्यवस्था ही राजकारण्याच्या दबावाखाली आहे. तसे नसते तर गौतम अदानींच्याविरोधात इतके खटले सुप्रीम कोर्टात गेले आणि एकाही खटल्यात ते हरले नाही. शिवसेना,राष्ट्रवादीच्या सुनावणीसंदर्भात विचार केला तर ते गंभीरपणे घेतले जात नाही. न्यायाधीशांना दबाव असेल तर सांगितले पाहिजे. यावर काहीतरी उत्तर मिळावे म्हणून आम्ही कोर्टात गेलो आहोत. निवडणूक आयोगावर संशय घेता येत नाही असे म्हणणाऱ्या सुप्रीम कोर्टावरच संशय यायला लागला आहे. संविधानिक संस्थेवरच लोकांना संशय येत आहे. अनेक राज्यात बोगस मतदान झाले. त्याच पद्धतीने पश्चिमबंगालमध्ये होणार. नाहीतर कोण एकनाथ शिंदे त्यांचे इतके उमेदवार कसे विजयी होतात. विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंचं बोलतील संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षासंदर्भातील निकाल पुढे ढकलले जात आहेत कारण सर्वांना माहिती आहे की पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एकतर ते स्थगित होईल. किंवा आम्हालाच मिळेल. फुटीर गटाच्या बाजूने निर्णय असता तर आतापर्यंत निकाल लागला असता. हे लोकं भाजपमध्ये विलीन होतील. विधान परिषद निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी पु्नहा विधान परिषदेत जावे ही आमची इच्छा आहे. पण त्यावर उद्धव ठाकरेंच बोलतील. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधलेल्या रस्त्याची सहा महिन्यातच दूरवस्था झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. आता अत्यंत निकृष्ट व जीवघेण्या रस्त्यांच्या शांती पूजन व होमहवन कार्यक्रमास आपणास प्रमुख यजमान म्हणून निमंत्रित करण्यात येत आहे, असे गांधीगिरी पद्धतीने आंदोलनाचे पत्र शिवसेनेने कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. या रस्त्यावर तब्बल ४६.४० कोटी रुपये झाले असून, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अवस्था अवघ्या सहा महिन्यांतच दयनीय झाली आहे, असे शिवसेनेचे म्हणणे होते. जिल्ह्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे होत असून, अनेक कामे ही रखडली आहेत. काही कामेही संथ गतीने सुरू असून, याचा फटका परिसरातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे करून अतिवृष्टीच्या काळात तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली. अकोला तालुक्यात आपल्या विभागामार्फत उभारण्यात आलेले बाभुळगाव ते गुडधी-अलियाबाद- घुसर रस्ता, उगवा- घुसर रस्ता तसेच घुसर ते दोनवाडा हे सुमारे ४६.४० कोटी रूपयांचे रस्ते आज नागरिकांसाठी विकासाचे प्रतीक नसून धोका आणि दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण बनले आहेत, असा खेद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात शिवसेनेने अभियंत्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करीत गांधीगिरी पद्धतीने निषेधही नोंदवला होता. आता थेट रस्त्यावर उतरून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. असे आहेत ते तीन रस्ते : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बाभुळगाव ते गुडधी-अलियाबाद-घुसर हा १०.७५ कि.मी. लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता सुमारे २१ कोटी रुपयांत बांधण्यात आला. तसेच उगवा ते घुसर हा ६ कि.मी. लांबीचा रस्ता १२ कोटी रुपयांच्या खर्चातून, तर घुसर ते दोनवाडा हा ७.१० कि.मी. लांबीचा रस्ता १३.६७ कोटी रुपयांत उभारण्यात आला. अवघ्या सहा महिन्यात सदर तीनही रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. तीन रस्त्यांवर मोठ्या भेगा, उभे तडे आणि उखडलेले काँक्रीट दिसून येत असल्याने या कामातील दर्जाहीनता आणि भ्रष्टाचार समोर आल्याचा आरोप शिवसेनेने केला. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच कोणताही अतिरिक्त निधी न देता त्याच्याकडूनच गुणवत्तापूर्ण पद्धतीने रस्ते नव्याने करून घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. रस्त्यांची दूरवस्था झाल्याने वाहनचालकांसाठी धोका
कलियुगात नाम साधना ही भगवंत प्राप्तीच्या मार्गात ज्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे कलियुगात श्रवण भक्ती ही श्रेष्ठ आहे. भगवंताचे नाम श्रवण कथा कीर्तनाच्या अनुषंगाने करून शाश्वत सुखाची प्राप्ती श्रवण भक्तीच्या माध्यमातून करणे, या कलियुगात अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राजेंद्र महाराज वकटे यांनी केले. ते डाबकी रोडच्या कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने कर्ता हनुमान मंदिरात सुरू असलेल्या संगीतमय शिवपुराण कथेत हितोपदेश करत होते. पाळोदी येथील कथाकार राजेंद्र महाराज वकटे यांनी कथेचे पंचम पुष्प गुंफले. ते म्हणाले, भक्तीचे आपल्या परंपरेत अनेक मार्ग आहेत. यामध्ये श्रवणभक्ती असून यात भगवंताच्या कथा, पुराण, गीतासारख्या धार्मिक ग्रंथांचे श्रवण करण्यात येत असते. त्याचप्रमाणे दुसरी कीर्तनभक्ती असून यात भजन, संकीर्तन, नामसंकीर्तन, गायनाद्वारे भगवन्नामाचा उच्चार करण्यात येतो. तृतीय श्रेणी ही स्मरणभक्ती होय. यात मनात नेहमी भगवंताचे स्मरण केले जाते. त्याचप्रमाणे पादुका भक्ती असून यात भगवंताच्या पादुकांची, शाब्दिक किंवा आध्यात्मिक रूपाने सेवा केली जाते. या नंतर अर्चनभक्ती येते. यात मूर्ती, प्रतिमा, तुलसी, देवगृहाची पूजा, नैवेद्यदान आदी केले जाते. वंदनभक्तीमध्ये भगवंताला प्रणाम, नमस्कार, शिरनमस्कार करून भक्ती केली जाते. या नंतर दास्यभक्ती येते. यात भगवंताला स्वामी' मानून दासासारखे विनम्र भावनेने उभा राहणे होय. हनुमान, विठ्ठलभक्त संत हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे वकटे यांनी सांगितले. गुरुवारीपर्यंत रोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान मंडळाचे अध्यक्ष सुभाष म्हैसने, माजी नगरसेविका मंगला म्हैसने, विठ्ठलराव चिकटे, वसंत जायदे, शरद कोकाटे, विलास आगरकर, गजानन धरमकर, अनिल गावंडे, चंद्रकांत ताठे, प्रभाकर ठाकरे, संजय देशमुख, वसंत माळी, संजय वैद्य, संतोष जाधव आदींनी केले आहे. नामश्रवणातून भगवंताला प्राप्ती शक्य : सख्यभक्ती ही या भक्ती प्रकारात येत असून, यामध्ये भगवंताशी मैत्रीचा भाव, समान वातावरणातील सख्य केली जाते. यात सुदामा, अर्जुन आदींची उदाहरणे येत असल्याचे वकटे महाराज यांनी सांगिले. आत्मनिवेदनभक्ती या भक्तीचा प्रकार येतो. यामध्ये भगवंताजवळ पूर्ण स्वतःच्या सुख‑दुःख, भावना, जीवनाचा सर्वस्व भगवंताला समर्पित केली जातात. सर्वच भक्तीचे प्रकार भगवंताला प्राप्त करण्यासाठी सुयोग्य व अधिकृत असतानाही ज्याप्रमाणे कलींयुगात नामाचे महिमा श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे या धकाधकीच्या व्यवस्थेत प्रभूच्या नामश्रवणाच्या माध्यमातून आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. यासाठी नामस्मरणाच्या माध्यमातून प्रभुला प्राप्त करून आपले जीवन कृतार्थ करण्याचे आवाहन वकटे महाराज यांनी केले. जाणता राजा महिला भजनी मंडळाकडून सादरीकरण कार्यक्रमात बालिका शिवाई सचिन म्हैसने हिने छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाबाई यांची शौर्य गाथा सादर करून आपल्या वकृत्व कलेची चुणूक दाखवली. यावेळी टाळ्यांच्या गजरात तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम मंडळाचे अध्यक्ष सुभाष म्हैसने व माजी नगरसेविका मंगला म्हैसने यांनी वकटे महाराज यांचे स्वागत केले. तर दैनिक अन्नदाते अजिंक्य येंडोले तथा रमेशराव बोराखडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गजानन धरमकर यांनी केले.
आलेगाव, पातुरात पाऊस; आजही शक्यता:ढगाळ वातावरणामुळे पारा घटला, शहराचे तापमान 40.1 अंशांपर्यंत खाली
शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ४०.१ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी गार वारे सुटले होते. तसेच मंगळवारी रात्री जिल्ह्यातील आलेगाव, पातूरसह काही भागात पावसाची सरी कोसळल्या. जिल्ह्यातील कडक ऊन आणि अरबी समुद्रावरून आलेल्या आर्द्रतेचे एकत्रीकरण झाल्यामुळे कडक ऊन ते पाऊस हा बदल केवळ दोन दिवसात झाल्याचे दिसून येत आहे. शहरात प्रचंड उष्णतेमुळे जमीन तापते व हवा हलकी होऊन ती वर जाते. उर्वरित पान ४ प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. आंबा, कांद्याचे नुकसान कांदा, आंबा आदी पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक काढायचे आहे. वादळी वारे व अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक झोपले आहे. गहू पाण्याने भिजून त्याचा दर्जा घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे गहू काळे पडण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले किंवा वाळत घातलेले तूर, गहू आदी पावसाने भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताडपत्रीच्या मदतीने धान्य झाकून त्याचे संरक्षण आवश्यक आहे. यामुळे उन्हाळ्यात पाऊस कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जातात. ते उष्ण हवेला मिळाल्यानंतर पावसाचे वातावरण होते. एप्रिलमध्ये वाऱ्यांची दिशा बदलते. यामुळे अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येतात. उन्हामुळे या बाष्पाचे ढगात रुपांतर होऊन पाऊस पडतो.
पश्चिम विदर्भातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निर्मित सिंचन क्षमता ही ८५ हजार ००२ हेक्टर, तर जलसाठा ५६४.०५ दलघमी आहे. या प्रकल्पातून अमरावती व वर्धा तालुक्यामध्ये कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. या प्रकल्पाचे पाणीपट्टी वसुलीत अव्वल स्थान पटकावले आहे. २०२५-२६ या वर्षाकरीता सिंचनासाठी २.१६४ कोटी रुपये वसुली करण्याचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले होते. २०१६ मध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्प विभागाचे रूपांतरण सिंचन पाटबंधारे विभागामध्ये करण्यात आले. कामाचे नियोजन व सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यांमुळे थकीत लाभधारकांना पाणीपट्टी भरण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे या विभागाने सुमारे ०.७६ कोटी रुपये वसुली केली आहे. तसेच या प्रकल्पामधून बिगर सिंचनासाठी पाणी उचल करणाऱ्या सर्व यंत्रणांना मार्च २०२६ पूर्वी थकबाकीचा भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बिगर सिंचनासाठी ४० कोटी उद्दिष्टांपैकी ५०.७५ कोटी रुपयांचा विक्रमी वसुली झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी दिली. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी मिळून सुमारे ५१.५१ कोटी रुपये सर्वाधिक वसुलीच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. इतिहासामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात सिंचन पाणीपट्टी वसुली झाली आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधीक्षक अभियंता मनिष राजभोज यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामुळे उद्दिष्टाच्या १२२.१७ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. सर्व वसुलीच्या मोहिमेमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीचे योगदान महत्वाचे आहे. या मोहिमेत सहभागी सर्व उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कालवा निरिक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून व तसेच सर्व क्षेत्रीय तथा विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
सोलापूरच्या विक्रम गायकवाडने मारली बाजी:नेहरू मैदान येथे पुरुष व महिला भव्य शिवकेसरी कुस्ती स्पर्धा
नमो युवक क्रीडा संस्था, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, करण डेंढवाल व मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने तसेच विदर्भ कुस्तीगिर संघाच्या मान्यतेने नेहरू मैदानावर झालेल्या पुरुष व महिला शिवकेसरी कुस्ती स्पर्धेत पुरुष गटामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक सोलापूरच्या विक्रम गायकवाडने पटकावला. त्याला चांदीची गदा व ७१ हजार रु. रोख रकमेचा पुरस्कार देण्यात आला. वाशीमच्या विजय शिंदेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला ४१ हजार रु. रोख देण्यात आले. विदर्भस्तरीय गटात प्रथम क्रमांक अकोल्याच्या सिद्धार्थ गवईने पटकावला. त्याला चांदीची गदा व ३१ हजार रु. रोख रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावतीच्या अर्जुन यादवला उपविजेतेपद मिळाले. त्याला २१ हजार रु. रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिलांच्या विदर्भस्तरीय गटामध्ये वाशीमच्या कल्याणी गादेकरने सहकारी अनुष्का गादेकरला नमवून विजेतेपद पटकावले. महिला केसरी गटातील प्रथम बक्षीस २१ हजार रु. रोख कल्याणी गादेकरला तसेच द्वितीय बक्षीस ११ हजार रु. रोख अनुष्का गादेकरला देण्यात आले. इतर सहभागी स्पर्धकांना लाखो रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा देण्यात आले. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेला शहरातील कुस्तीप्रेमींकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. दोन्ही दिवस मोठ्या संख्येत कुस्तीप्रेमी उपस्थित होते. नेहरू मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवकेसरी २०२६ कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना उपस्थित राहण्याचा मला अतिशय आनंद व अभिमान वाटतो. या स्पर्धेत हजारो प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. खेळाडूंना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन भारावून गेले. कुस्ती हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. हा अभिमान वाटावा असा खेळ आहे. या स्पर्धेमुळे आपल्या तरुण पिढीमध्ये खेळाची आवड वाढीस लागते. त्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळते, असे वायएसपीचे मार्गदर्शक सुनील राणा म्हणाले. पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांचे तसेच महिला गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या मेहनती, जिद्दी व चिकाटीचे हे यश आहे. सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेची शोभा वाढवल्याचे इतर मान्यवरांनी सांगितले. यावेळी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक व कुस्ती मार्गदर्शक डॉ. संजय तीरथकर, नगरसेवक प्रशांत देशपांडे, आशिष अतकरे, प्रशांत वानखडे, पोलीस निरीक्षक राजुरकर, नितीन बोरेकर, विनोद गुहे, विनोद जायलवाल, दिनेश सेठीया, समाधान वानखडे, किशोर पिवाल, जितू ठाकूर, अॅड. परवेज खान, बाळू इंगोले, अनुप अग्रवाल, श्रीकांत इंगळे, पराग चिमोटे, बंटी इंगळे, अविनाश काळे, विजय खंडेलवाल, सतीश कागडे, सतपाल रुपनवार, मोहनजी जाधव, क्यामउद्दिन पठान, मिथुन बारसे, राहुल सारवान, साक्षी उमक, शुभम उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाचवेळा विदर्भ केसरी पुरस्कार पटकावणारे डॉ. संजय तीरथकर यांच्या मार्गदर्शनात जितेंद्र भुयार, समीर देशमुख, राहुल बागडे, आरिफ खान, नदिम खान, जितेंद्र डिके, रोहित बोखडे, त्रिदेव ढेडवाल, समीर डोंगरे, लखन शेरेकर, रोहित बकरे, नितीन इंगोले, भूषण वाटकर, किसना श्रीवास, राम अहेरवार, गोलु पार्डीकर, विशाल वन्ने, अर्जुन डेढवाल, उमेश संकत, रिंकू काकडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. शिव केसरी ही शहरात मागील काही वर्षांत झालेली मोठी कुस्ती स्पर्धा ठरली. कारण, विविध गटात सुमारे २०० पहिलवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी विजेतेपदाच्या शर्यतीत आपले कसब पणाला लावले. अमरावती हा विदर्भातील कुस्तीचा गड समजला जातो. परंतु, सध्या अमरावतीत तगड्या पहिलवानांची उणीव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेत अर्जुन यादव वगळता इतर पहिला फारशी छाप पाडू शकले नाहीत. त्यामुळे अमरावतीत उत्तम पहिलवान घडवण्यासाठी आखाड्यांना आता आधीसारखेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
दहावीची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी मोकळे असतात. तसेच त्यांच्यासह पालकांनाही आता पुढे काय करायचे, कशाप्रकारे १२ व्या वर्गातील परीक्षेची तयारी करून घ्यायची, कुठे शिकवणी लावायची, जेईई करायचे की नीटसाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेऊन तयारी करून घ्यायचे, असे अनेक प्रश्न त्रस्त करीत असतात. शैक्षणिक भविष्याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाने मागील चार वर्षांपासून नि:शुल्क ‘ब्रिज कोर्स' तयार केला असून दरवर्षी आवश्यकतेनुसार त्यात नवीन अभ्यासक्रमविषयक बाबींचा अंतर्भाव केला जातो. १८ दिवसांच्या या ‘ब्रिज कोर्स'नंतर विद्यार्थी, पालकांच्या मनात कोणताही संभ्रम राहत नाही. ते आत्मविश्वासाने १२ वीच्या परीक्षेची तयारी करतात, असा मागील तीन वर्षांचा अनुभव असल्याची माहिती दीपक धोटे यांनी दिली. बुधवार १ रोजी या ‘ब्रिज कोर्स'चे उद्घाटन अगदी साधेपणाने करण्यात आले. याप्रसंगी नुकतीच दहावीची परीक्षा दिलेले १५० विद्यार्थी उपस्थित होते. या ‘ब्रिज कोर्स'करिता एकूण २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गुरुवार २ रोजी स. ८ ते ११ या वेळेत १८ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या ‘ब्रिज कोर्स'ला नियमितपणे उपस्थित राहतील. यातून त्यांची फसवणूक टळली तर आम्हाला निश्चितच आनंद होईल, असे ‘ब्रिज कोर्स'करिता झटणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सांगितले. सोबतच कोणकोणत्या नव्या क्षेत्रात भविष्य करता येईल, यासाठीही मार्गदर्शन करतो, असेही ते म्हणाले.
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती (दंड) माफी योजनेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेने मार्च महिन्यात विक्रमी कर वसुली करत इतिहास घडवला आहे. अवघ्या महिनाभरात २.२५ कोटी रुपयांच्या जवळपास मालमत्ता कर जमा झाल्याने नगर परिषद प्रशासनात समाधानाचे वातावरण आहे. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी केलेल्या आवाहनाला शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात थकीत कर भरला. ‘अभय योजना’मुळे दंडात मिळालेल्या सवलतीचा लाभ घेत नागरिकांनी पुढाकार घेतल्याने कर वसुलीला मोठी गती मिळाली. या ऐतिहासिक वसुलीत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेले विशेष परिश्रम मोलाचे ठरले. मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर प्रशासन विभागाने घराघरात संपर्क साधत कर भरण्याबाबत जनजागृती केली. परिणामी कर संकलनात अभूतपूर्व वाढ झाली. चांदूर शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर वसुली झाल्याबद्दल नगराध्यक्षांनी शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले. “शहराच्या विकासासाठी नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी सांगितले. तर या यशात विशेष योगदान दिल्याबद्दल नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तसेच कर प्रशासन विभागातील कर्मचारी कर निरीक्षक शारदा कावळे, कनिष्ठ लिपिक विशाल सुरकार व कॉम्प्युटर ऑपरेटर सागर हटवार यांचा शाल देऊन सन्मान केला. सत्कारानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “याआधी कोणत्याही नगरपालिकेत आमच्या कामाचा असा सन्मान झाला नव्हता. आमच्या कार्याची पावती म्हणून सर्व कर्मचाऱ्यांसमोर आमचा गौरव करणाऱ्या या पहिल्या नगराध्यक्षा आहेत. अभय योजनेचा लाभ, नगराध्यक्षांचे नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेत झालेली ही विक्रमी कर वसुली शहराच्या विकासासाठी मोठे पाऊल मानले जात आहे. शहरवासीयांचे आभार ^निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेल्या मालमत्ता कर माफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आम्हाला यश आले , याचा मनापासून आनंद व समाधान वाटते. चांदूर रेल्वे शहरातील नागरिकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात कर भरून नगरपरिषदेला मोलाचे सहकार्य केले, याबद्दल मी सर्व शहरवासीयांची मनःपूर्वक आभारी आहे. नागरिकांच्या या सकारात्मक सहभागामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. - प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा, नगराध्यक्ष, चांदूर रेल्वे
वादावर पडदा:अंजनगावात रातोरात पुतळा; दोन गटात तणाव, शिवरायांच्या पुतळ्यावरून गावात सामाजिक तणाव
महापुरुषांचे पुतळे रातोरात उभे करण्याच्या अनोख्या 'पॅटर्न'ने आता माढा तालुक्यातील अंजनगाव (खे.) येथे प्रशासकीय आणि सामाजिक पेच निर्माण केला आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विनापरवाना आणि रातोरात बसवल्याने दोन समाजांत वादाची ठिणगी पडली. तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवसभर पोलिस गावात ठाण मांडून होते. एकगट मंदिर परिसरात रातोरात बसवलेला पुतळा हटवण्यासाठी तर दुसरा गट पुतळा तेथेच ठेवण्याची भूमिका घेऊन मैदानात उतरला होता. दिवसभर हा हाय व्होल्टेज ड्रामा चालला. रात्री ८ नंतर पोलिस बंदोबस्तात पुतळा काढताना हिंसक वळण लागले. परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती. दुपारी या प्रकरणी माढा पोलिसांत दाखल तक्रारीवरून तिघांना ताब्यात घेतले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर मंदिराचे मानकरी फरांडे महाराज, आप्पाराव वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थांना पुतळा उभारल्याचे समजताच माढा पोलिस ठाण्यात धाव घेत मंदिर परिसरात उभारलेला पुतळा हटवण्याची मागणी केली. याची तात्काळ दखल घेत माढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसरा गट पुतळा हलवण्यास तयार नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, पोलिस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णमूर्ती, गटविकास अधिकारी सुळे यांच्यासह महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पुतळा हटवण्यासाठी अंजनगाव खे व परिसरातील महिला व ग्रामस्थांनी सुमारे एक तास रस्ता रोको करत रस्त्यावर ठिय्या मांडला. या दरम्यान वाघमोडे यांनी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी महाराजांचा पुतळा मंदिर परिसरात उभारला असल्याची तक्रार दाखल केले. ४.२० पहाटे पुतळा उभा ५.०० पोलिस पाटलांकडून खबर ५.३० माढा पोलिस दाखल ६.०० ग्रामस्थांचा जमाव ९.०० माढा पोलिसांत तक्रारदार ९.३० अंजना कृष्णमूर्ती घटनास्थळी दाखल १०.०० प्रांताधिकारी आव्हाड दाखल १२.०० प्रांताकडून जमावबंदी आदेश १.०० तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले १.३० समर्थकांचा आंदोलनाचा इशारा ४.०० पर्यायी जागेवर प्रशासनाची तयारी ६.३० पर्यायाअभावी जमाव बंदीची सूचना ७.३० पुतळा हटवण्याची प्रशासनाची तयारी ७.४० पुतळा ताब्यात देण्याची मागणी ८.४५ प्रशासनाने क्रेन बोलावले तीन आठवड्यापूर्वी दत्तात्रय पाटेकर,ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाळ यांनी अंजनगाव खे ग्रामपंचायतीकडे पुतळा उभा करण्यासाठी अर्ज केला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने रितसर परवानगी घेऊन पुतळा उभारण्याचे सांगत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. पोलिस प्रशासनास माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तिघांना नोटिस बजावली होती, असे साहा.पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. पुतळा उभा केल्याने दोन गटात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांनी दुपारी बारा वाजता जमाव बंदीचा आदेश दिला होता. परंतु पोलिस प्रशासनाने याची तात्काळ अंमलबजावणी न केल्याने सायंकाळ पर्यंत परिस्थिती तणावपूर्ण राहिली. सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी जमाव बंदीची अंमलबजावणी करीत गर्दी पांगवली. परंतु वातावरणातील तणाव कायम होता. मागील महिन्यात चिखलठाण व पूनवर (ता.करमाळा), मोहोळ, कुरूल (ता.मोहोळ), पडसाळी, मोडनिंब (ता. माढा), या ठिकाणी रातोरात पुतळे उभारण्यात आले आहेत. हे सत्र सुरूच असून अंजनगाव खे. येथे पुतळा उभारण्यात आला. ^खेलोबा देवा प्रमाणेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे कुलदैवत मानतो. परंतु ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा उभा केला आहे, ती जागा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येत असल्याने धार्मिक विधी करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. संबंधितांनी इतर ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करावा, आम्ही त्यास मदत करू. राजाभाऊ वाघमोडे महाराज, मुख्य मानकरी ^महापुरुषांचा पुतळा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार परवानगी घेऊनच उभारावा. नियमबाह्य पध्दतीने पुतळा उभा केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. नियम डावलून पुतळा उभा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रोहित शिंदे, साहा. पोलिस निरीक्षक, माढा
विद्यार्थ्यांनो चिकाटी, जिद्द, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा, यश नक्की मिळेल, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचालित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, व्यासपीठावर संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ. एस. आर. लोखंडे, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, क्रिस्टोयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी, नीरज चोप्रा या खेळाडूंनी कठोर परिश्रम करून सराव आणि सातत्य यांच्या जोरावर जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांनी देखील केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेऊन यश मिळवावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पारितोषिकाचे अहवाल वाचन प्रा. राजशेखर पवार, मनीषा शिंदे, भीम सोनकांबळे, सोनाली कटकधोंड व सौरभ भस्मे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. आर. गुणवंत शिक्षक आणि महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्याविद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करताना मान्यवर. लोखंडे यांनी केले. तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांनी देखील केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेऊन यश मिळवावे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीतल झिंगाडे भस्मे यांनी केले, आभार प्रा. भीम सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शरणय्या मसुती, बसवराज कामाठी, प्राची गणेचारी, डॉ. बाळासाहेब पाटील, मधुबाला लोणारी, शीतल फुटाणे, हर्षदा गायकवाड, विद्याश्री वाले यांनी प्रयत्न केले. कल्याणशेट्टी महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी कुमारी प्रियंका गोंडाळ हिने एम. कॉम.च्या परीक्षेत ७९.६७ टक्के गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने तिचा गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
कुरुल ( ता. मोहोळ ) येथील जि.प. शाळेतील आयोजित ‘बाल आनंद बाजार’ उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून तब्बल २२ हजार रुपयांची उलाढाल झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. या उपक्रमाचे उद्घाटन माजी पोलिस अधीक्षक शशिकांत माने यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी सभापती जालिंदर लोंडे, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील व परिसरातील ताज्या भाज्या व फळांचे स्टॉल लावून विक्री केली. यामध्ये शेवगा, वांगी, टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर तसेच कैरी, चिकू यांचा समावेश होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, खरेदी-विक्री प्रक्रिया आणि ग्राहकांशी संवाद कौशल्य शिकण्याची अनोखी संधी मिळाली. काही विद्यार्थ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर्स व सवलतीही दिल्या. ज्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नफिसा शेख, युवराज खराडे, संतोष इंगे, कमलाकर बनकर, संगीता सावंत-खराडे, अंजली डोले, रुपाली डोके, सुवर्णा तोडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सोलापूर जिल्ह्यातील बालविकास प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या अंगणवाड्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण ४०८२ अंगणवाड्या कार्यरत असताना, त्यापैकी तब्बल १२६४ अंगणवाड्यांकडे स्वतःचे स्वतंत्र अंगणच उपलब्ध नाही. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी ही महत्त्वाची शैक्षणिक व पोषण केंद्रे मानली जातात; मात्र आवश्यक भौतिक सुविधांच्या अभावामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या या अंगणवाड्या विविध पर्यायी ठिकाणी चालवल्या जात आहेत. काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये, तर काही ठिकाणी ग्रामपंचायत इमारती, समाज मंदिर, खाजगी विनाभाडे जागा किंवा भाड्याच्या इमारतींमध्ये अंगणवाड्या भरल्या जात आहेत. या ठिकाणी जागेची मर्यादा, स्वच्छतेची समस्या आणि सुरक्षिततेच्या बाबीमुळे बालकांना अपेक्षित वातावरण मिळत नाही.अंगणवाडीमध्ये लहान बालकांना खेळत-खेळत शिक्षण देणे, पोषण आहार देणे आणि आरोग्य तपासणी करणे या महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. यासाठी खुल्या जागेची, म्हणजेच अंगणाची गरज अत्यावश्यक असते. अंगण नसल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी योग्य योग्य जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढते. तसेच गर्दीच्या जागेमुळे स्वच्छता राखणे कठीण जाते आणि संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढतो.अनेक अंगणवाडी सेविका आणि पालकांनीही या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्वतंत्र इमारत आणि अंगण नसल्यामुळे काम करताना अडचणी येतात, असे मत काही सेविकांनी मांडले आहे. पालकांच्या दृष्टीनेही मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन व लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात खूप ठिकाणी ग्रामपंचायतची जागा मिळत नाही. काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून त्याबाबत कोर्टमध्ये केसेस चालू आहेत. नवीन जागा उपलब्ध नसल्याने आज ही अंगणवाड्या ना अंगण नाही. इमारती देण्याचे नियोजन सुरू ^यापूर्वी मिनी अंगणवाडी इमारत बांधकाम केले जात नव्हते. परंतु मागील वर्षी १००० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यामध्ये श्रेणी वर्धन झाल्याने त्या अंगणवाड्यांना इमारती देण्याचे नियोजन सुरू आहे. प्रसाद मोरकले, महिला व बालविकास विभाग
द्राक्षाला उच्चांकी दर मिळू लागल्याने शेतकरी समाधानी:द्राक्षाचे दर वधारले,बेदाण्याला मागणी
प्रतिनिधी | कुर्डुवाडी अमेरिका- इराण युद्धाच्या सावटामुळे व्यापाऱ्यांनी द्राक्ष दर ३०-४० रुपयांपर्यंत खाली आणले होते. निसर्ग आणि हवामान बदलांमुळे ५० टक्के उत्पादनच निघाले. दराबाबत शेतकरी चिंतेत होते. आता मात्र बेदाणा निर्मितीला वेग आला असून मार्केट द्राक्षालाही उच्चांकी दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. उच्च प्रतीच्या बेदाण्याला प्रति किलो २५० ते ३५० रुपये मिळत आहेत, तर मार्केट द्राक्षांना ६० ते ८० रुपये भाव लाभला आहे. माढा, उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर तालुक्यांत द्राक्षबागा प्रमुख उत्पन्नस्रोत आहेत. गेल्या चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांनी बागा काढल्या होत्या. २०२२- २३ मध्ये जिल्ह्यात २.७० लाख मॅट्रिक टन बेदाणा तयार झाला होता. बदलत्या हवामानामुळे यंदा ५० टक्क्यांपर्यतच द्राक्ष उत्पादन झाले असतानाही व्यापाऱ्यांकडून दर कमी केल्याने द्राक्ष बागायतदारांकडून चिंता व्यक्त होत होती. यंदा अवघे १.५ लाख टन होण्याची शक्यता आहे. कमी पुरवठ्यामुळे उच्च दर शेवटपर्यंत टिकतील, असे तज्ज्ञ सांगतात. युरोपमधून मागणीत वाढ बेदाणाला २५० ते ३५० रुपये, मार्केट द्राक्षाला ६० ते ८० रुपये मिळत आहेत. उत्पादन ५० टक्के असल्याने दर उच्च राहतील. युरोपमधून मागणी वाढली आहे, युद्धाचा फारसा परिणाम नाही. कमी भावात विक्री करू नका, असे कृषीनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे, कापसेवाडी यांनी आवाहन केले.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला वैराग भागातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवल्याने शासनाने महामार्गात बदल करुन सातारा जिल्ह्यातून नेला जाणार आहे. सुमारे ५४ किलोमीटरने अंतर वाढले असून पूर्वी मोहोळ, पंढरपूर, सांगोल्याहून आटपाडी तालुक्यातून महामार्ग जाणार होता. सांगली जिल्ह्यातील १० टक्के क्षेत्र कमी करुन धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातील गौडगाव, रुई, मालेगाव, रातंजन सर्जापूर, राळेरास, सासुरे, तडवळे मार्गे माढ्यामधून पंढरपूरच्या करकंबमार्गे माळशिरस तालुक्यात वळवला असल्याचे सांगण्यात येते. सुधारित आराखड्यास मिळालेल्या मंजुरी नुसार हा महामार्ग सुमारे ८५६.७६४ किमी लांबीचा असणार आहे. या महामार्गामुळे नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १० जिल्ह्यांमध्ये वाहतूक सुलभ होणार आहे. धार्मिक पयर्टनाबरोबर तसेच ग्रामीण भागातील संपर्क वाढून आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. शासन निर्णयानंतर आता भूसंपादन, तांत्रिक मंजुरी आणि प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. सुधारित आराखड्याला मंजुरी मिळाल्याने राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठी झेप घेण्याची संधी निर्माण झाली आहे. . माळशिरस तालुक्यातील वेळापूर, पिलीव परिसरातून शिखर शिंगणापूरच्या जवळून मायणीकडे शक्तिपीठ नेण्यात येत आहे. तेथून येरळा-कृष्णा नदी ओलांडून हा मार्ग सागरेश्वर अभयारण्याजवळ पोहोचेल. ईश्वरपूर, आष्टा या दोन गावांच्या परिसरातून तुजारपूर-इटकरे जवळून पुणे- बंगळुर हायवे क्रॉस करेल. . शिराळा तालुक्याला स्पर्श करत पन्हाळा परिसरात जाईल. कोडोली जवळून पुढं जोतिबा डोंगराला लांबून वंदन करून हा हायवे कोल्हापूर शहराच्या पश्चिमेकडून सह्याद्री घाटातून राधानगरी तालुक्याच्या सीमेजवळून भुदरगड तालुक्यात सरकेल. बाळू मामांच्या आदमापूरचं दर्शन घेत आजऱ्या जवळ पोहोचेल. तेथून चंदगडला येऊन ठेपणार आहे. ^बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र या नव्या झालेल्या शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. आम्ही १३ जिल्ह्यातून विविध मोर्चा काढून शासनाला नव्याने झालेल्या नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला देखील विरोध दर्शवणार आहोत. सुहास गायकवाड, शेतकरी, शेळगाव आर. आराखड्यातील महत्त्वाचे बदल १-पूर्वी मंजूर झालेल्या आराखड्यात काही तांत्रिक व स्थानिक अडचणी लक्षात घेऊन सुधारणा करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहण्या, लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला. २-सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी लागणारा वेळ मोठा आहे. मात्र या नवीन महामार्गामुळे प्रवासाचा वेळ सुमारे १८ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक अधिक वेगवान होईल. ३-महामार्गामुळे औद्योगिक गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून, कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारपेठेत जलद पोहोच मिळेल. तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
आज संगमनेरमध्ये जेव्हा हनुमान जयंतीचा रथ ओढला जातो, तेव्हा पहिला मान महिलांना मिळतो. ही केवळ परंपरा नाही, तर ब्रिटीश सत्तेचा मग्रुरी उतरवणाऱ्या एका अचाट साहसाची स्वाक्षरी आहे. १९२९ साली ५०० सशस्त्र पोलिसांच्या संगिनींना न डगमगता संगमनेरच्या लेकींनी जो गनिमी कावा' केला, त्याचा हा रोमहर्षक थरार..! स्वातंत्र्यपूर्व काळात १९२७ पासून ब्रिटीश प्रशासन आणि संगमनेरकर यांच्यात रथाच्या मार्गावरून तीव्र संघर्ष सुरू होता. १९२९ साली तर मारुती मंदिराभोवती ५०० सशस्त्र पोलिसांचा वेढा होता. कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट यांनी स्थानिक लोकांना धमकावूनही जनसमुदाय मागे हटला नाही. सकाळी ९:३० च्या सुमारास वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले असतानाच, महिलांचा एक मोठा जमाव रथापाशी पोहोचला. यामध्ये झुंबराबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि पार्वतीबाई संत या रणरागिणी अग्रभागी होत्या. या महिलांनी अत्यंत शिताफीने गनिमी काव्याचा वापर केला. एका मुलाला अटक करताना पोलिसांचे लक्ष विचलित झाले आणि नेमक्या त्याच क्षणी झुंबराबाईंनी विजेच्या वेगाने रथावर उर्वरित पान ४ ब्रिटिशांवर बत्ताशांचा केला महिलांनी मारा पोलिसांनी एका तरुणाला पकडताच तिथे वाद निर्माण झाला होता. सर्व पोलीस तिकडे धावले. हीच संधी साधून झुंबराबाई अवसक क्षणात रथावर चढून मारुतीची प्रतिमा आत ठेवली. अडीचशे महिलांनी गुलालाच्या मुठी पोलिसांच्या डोळ्यांत फेकल्या व प्रसादासाठी आणलेल्या बत्ताशांचा मारा केला. महिलांनी ‘गनिमी कावा’ वापरुन रथ पुढे नेला. ब्रिटिशांविरुद्ध नागरी उठाव, महिलांचे धाडस ^ संगमनेरचा हा लढा केवळ धार्मिक नव्हता, तर तो ब्रिटीश सत्तेविरुद्धचा नागरी उठाव होता. महिलांनी दाखवलेले धाडस आणि गनिमी कावा हे तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीतील महिलांच्या वाढत्या सहभागाचे उत्तम उदाहरण आहे. हा वारसा संगमनेरची अस्मिता असून तो आजही तितकाच प्रेरणादायी आहे. – डॉ. संतोष खेडलेकर, इतिहास अभ्यासक.
तालुक्यातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व पारायण सोहळ्याची बुधवारी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. मुख्य यात्रा असल्याने सकाळी आठ वाजता गंगेवरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने भगवान कालभैरवनाथांना जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर भास्करगिरी महाराज व मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत ऋषिनाथ महाराज यांनी मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले. टाळ-मृदुंगाच्या गजरात भजने गात भास्करगिरी महाराजांचे स्वागत करण्यात आले. भास्करगिरी महाराज म्हणाले, बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथ हे जागृत दैवत असून दृष्ट प्रवृत्तीचा संहार करण्यासाठी ते अवताररूपाने कार्य करतात. त्यांच्या भक्तीमुळे परिसराचा कायापालट झाला असून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. या भागातील युवा संत मंडळीही उत्तम कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पारमार्थिक कार्याची ज्योत तेवत ठेवत नियम व शिस्तीने देवस्थानाचे धार्मिक वैभव जपण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. बहिरवाडीकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामांना खडीकरणाने सुरुवात झाल्याने भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते आमदार लंघे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या सोहळ्यात योगदान देणाऱ्या दात्यांचा व संत मंडळींचा श्री कालभैरवनाथ देवस्थानच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी देवगडचे सेवेकरी बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, विजय महाराज पवार, शुभम महाराज बनकर, गणेश महाराज तनपुरे यांच्यासह श्री कालभैरवनाथ पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष-विश्वस्त, समस्त ग्रामस्थ, श्री कालभैरवनाथ युवा मंच, श्री कालभैरव तरुण मंडळ, श्री कालभैरवनाथ यात्रा समितीचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. बहिरवाडी येथे आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व काल्याच्या कीर्तनासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाची क्षमता सुमारे ७ हजार होती. मात्र यापेक्षाही अधिक भाविक उपस्थित राहिल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात भजने, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.
मनुष्याने समाजामध्ये वावरताना नम्रता अंगिकारणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जागी स्थिर राहायचे असेल तर त्याने नम्रतेने वागले पाहिजे. संतांच्या जीवनात नम्रता, प्रेम, दया आणि जगाच्या कल्याणासाठी असलेले धार्मिक विचार यांचा मोठा साठा आहे. त्यांच्या विचारांमुळेच समाजाला योग्य दिशा मिळते असे प्रतिपादन हभप श्वेताताई महाराज बडे यांनी केले. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हभप श्वेताताई महाराज बडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनातून संत विचारांचे महत्त्व, परमार्थाची गरज यावर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संतांचे विचार हे प्रेरणादायी असून आजच्या काळात त्यांची खरी गरज आहे. जसे भाजीमध्ये मीठ महत्त्वाचे असते, तसेच आपल्या जीवनामध्ये संतांचे स्थान आहे. संतांचे विचार नसतील तर जीवनाला चव राहत नाही. आपल्या जीवनामध्ये साधू सेवा, परमार्थ आणि चांगले कार्य असणे गरजेचे आहे. आपल्याला मिळालेला मानव जन्म काहीतरी चांगले करण्यासाठी आहे. संत आपल्याला थेट धन देत नाहीत, मात्र मिळालेले धन कसे जपायचे, कसे योग्य वापरायचे याचे ज्ञान देतात. त्यांच्या विचारांमधून जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. कीर्तनादरम्यान संतांच्या जीवनातील विविध उदाहरणे देत त्यांनी उपस्थित भाविकांना संत विचारांचा संदेश दिला. या प्रभावी कीर्तनामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी सांगितले की, गेल्या ३४ वर्षांपासून श्री हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून मोठ्या प्रमाणात आयोजित केली जात असलेली स्नेहसंमेलने चिमुकल्यांचा उत्साह वाढविणारी आहेत. मात्र त्यांच्यात लपलेल्या सुप्तगुणांना चालना देणारीही आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत या स्नेहसंमेलनाचे आयोजन होत होते. मात्र प्राथमिक शिक्षकांच्या अशा कार्यक्रम आयोजनाचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे प्रतिपादन रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे यांनी केले. तालुक्यातील चिंचोली येथील भटारकरवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच शोभा लाटे होत्या. याप्रसंगी विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, बाळासाहेब लाटे, धनंजय आहेर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते व समूह सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित पालक व ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून शाळा, पालक आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे या कार्यक्रमातून प्रकर्षाने पुढे येत असल्याच्या प्रतिक्रीया स्थानिक ग्रामस्थांनी दिल्या. यावेळी मुख्याध्यापक भिमराज चिंधे, शाळा समिती अध्यक्ष शंकर लाटे, गिताराम पठारे, रायभान नलगे, विलास लाटे, संजय लाटे, दत्तात्रय लाटे, विनोद चोखर, यशवंत लाटे उपस्थित होते. देशभक्तीपर गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते व समूह सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित पालक व ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.
मोह फुलाविषयी जनजागृतीचे आवाहन:बिरसा ब्रिगेडचे रामदास पवार यांनी सांगितले महत्त्व
निसर्गाशी अतूट नात जपणाऱ्या आदिवासी संस्कृतीमध्ये ‘मोह’ या वृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात मोह फुलांचा दरवळ पसरू लागला असून, आदिवासी बांधवांसाठी हा वृक्ष केवळ झाड नसून त्यांच्या जीवनाचा ‘अक्षय कल्पवृक्ष’ ठरत आहे. बिरसा ब्रिगेडचे जळगाव जिल्हाध्यक्ष रामदास पावरा यांनी मोहवृक्षाच्या संवर्धनासोबतच त्याच्या बहुगुणी उपयोगांविषयी समाजात जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. उन्हाचा पारा चढताच मोहफुले गळण्यास सुरुवात होते. पहाटे ४ वाजल्यापासूनच आदिवासी कुटुंबे टोपल्या घेऊन रानात जातात. ही परंपरेचा वारसा जपण्याची एक अनोखी साधना आहे. मोहफुलांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत, तसेच स्थानिक स्तरावर फूड प्रोसेसिंग युनिट्स उभारण्यासाठी तरुणांना अर्थसाहाय्य देण्याची गरज व्यक्त होत आहे. यामुळे आदिवासी भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळू शकते. मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक, खीर व भाजी, मोह तेल, जॅम, जेली, बिस्किटे यांसारख्या उत्पादनांमध्ये वाढता वापर यामुळे मोहफुलांना ‘सुपरफूड’ म्हणून नवी ओळख मिळत आहे. आदिवासी परंपरेत मोहवृक्षाला देववृक्षाचा मान आहे. मोहफुलांचा अर्क हा केवळ पेय नसून सांस्कृतिक विधींचा अविभाज्य घटक आहे. जन्म, विवाह किंवा अंत्यसंस्कार कोणताही विधी असो, मोहाच्या अर्काचे अर्पण केल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. सण-उत्सवांची सुरुवातही याच पूजनाने होते, इतके पवित्र स्थान या वृक्षाला लाभले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत नाते
नामपूरसह परिसरात सोमवारी (दि.३०) मेघगर्जनेसह वादळी पाऊस व गारपीट झाली. प्राथमिक अंदाजानुसार, नामपूर मंडळातील मोराणे, अंबासन, काकडगाव, बिजोरसे आणि नामपूर या परिसरात सुमारे ११०० हेक्टरवरील कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मोराणे शिवारात गारपिटीमुळे २७५ हेक्टरवरील कांदा पूर्णपणे मातीमोल झाला असून, १२ हेक्टरवरील डाळिंबबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सोमवारी नामपूरचा आठवडे बाजार असल्याने भाजीपाला विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. नामपूर-ताहाराबाद रस्त्यावरील वीटभट्टीचालक सुनील खैरनार आणि श्याम कुंभार यांच्या कच्च्या विटा पावसात भिजल्याने त्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. केळी, सीताफळ, आंबा, पपई आणि द्राक्षबागांनाही या अवकाळीचा मोठा तडाखा बसला आहे. कांदा लागवड, महागडी खते आणि औषध फवारणीचा खर्च डोळ्यादेखत पाण्यात गेल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडला आहे. सरकारने कोणतेही निकष न लावता तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि प्रशासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. एकीकडे निसर्गाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत, तर दुसरीकडे कृषी विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्याप पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाही. मंगळवारी (दि.३१) महसूल किंवा कृषी विभागाचा कोणताही अधिकारी मोराणे परिसरात फिरकला नाही . त्वरित पंचनामे करून नुसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. मोराणे परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची कृषी आणि महसूल विभागाच्या वतीने संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक क्षेत्राचा वस्तुनिष्ठ पंचनामा करून त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे त्वरित पाठविण्यात येईल. - मनोज देसले , कृषी सहाय्यक, मोराणे.
‘जी-रामजी’ ॲपमध्ये तांत्रिक अडचणी:इगतपुरीतील ग्रामरोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन; मानधनही रखडले
शासनाने नव्याने सुरू केलेल्या विकसित भारत जी-रामजी या योजनेतील जाचक अटी आणि तांत्रिक बदलांमुळे तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. ‘फेस ऑथेंटिकेशन' (चेहरा ओळखून उपस्थिती) आणि 'एनएमएमस' ॲपद्वारे उपस्थिती नोंदवताना उद्भवणाऱ्या तांत्रिक त्रुटींमुळे कामाचा व्याप वाढला आहे. या जाचातून मुक्तता करावी या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांनी १ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारला आहे. शासनाने जाहीर केलेले मानधन आणि भत्ते गेल्या १८ महिन्यांपासून मिळालेले नाहीत, तसेच नवीन योजनांच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी येत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश वळवी यांना निवेदन देऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शासनाने जाहीर केलेले मानधन आणि भत्ते दीड वर्षांपासून रखडल्याने ग्रामरोजगार सेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यातच, काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून सेवकांना कामावरून काढले जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. तीव्र आंदोलनाचा इशारा मागण्या पूर्ण होईपर्यंत तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक संपावर ठाम राहणार आहेत. प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी इशारा ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
शिरपूरच्या मानाच्या रथाचे कळवण नगरीत स्वागत:पाच लाखांहून अधिक भाविक सप्तश्रृंग गडावर
आदिशक्ती सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या शिरपूरच्या मानाच्या रथाचे कळवण नगरीत मंगळवारी (दि.३१) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास स्वागत करण्यात आले. देवीला माहेरची साडी घेऊन जाणाऱ्या या रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या सहा दिवसांपासून कळवण-नांदुरी मार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला असून, संपूर्ण परिसरात भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. शिरपूरचा हा मानाचा रथ कळवणमध्ये दाखल होताच गणेशनगर येथे भाविक अजय मालपुरे यांच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसाद (जेवण) देण्यात आले. येथील सप्तश्रृंगी मंदिरात रथाचे मानकरी आबा चौधरी आणि धीरज चौधरी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी सुमारे २० हजार भाविक उपस्थित होते. यानंतर शिवस्मारक समितीच्या वतीने भूषण पगार व त्यांच्या सहकाऱ्यांनी रथाचे पूजन केले. यावेळी चौधरी बंधूंनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली. मानूर येथे प्रशांत पवार आणि ग्रामस्थांनी, तर कोल्हापूर फाटा येथे आविष्कार भुसे व गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश पवार यांनी मानाच्या रथाची आरती करून दर्शन घेतले. कळवण ते मानूर या अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरासाठी मिरवणुकीला सहा तासांचा वेळ लागला. पोलिस उपनिरीक्षक जगदीश बोरसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी वाहतूक व्यवस्था चोख सांभाळली. गडावर दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे.
वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये सरकारने वारंवार कांदा निर्यात बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा गमावल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून निर्यातीला लागलेल्या लगामामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून, ही एक प्रकारची लूटच आहे. ही लुटलेली रक्कम शेतकऱ्यांना परत करावी, अशी आक्रमक मागणी बागलाण तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांनी २०२४-२५ मध्ये कष्टाने कांदा व मका पीक घेतले. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा सरासरी केवळ १ हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला. वास्तविक, एकरी १०० क्विंटल उत्पादन झाल्यास शेतकऱ्याला ३ लाख रुपये मिळणे अपेक्षित होते, परंतु प्रत्यक्षात फक्त १ लाख रुपये मिळाले. म्हणजेच, सरकारने शेतकऱ्याचे एकरी २ लाख रुपये लुटले आहेत, असा आरोप संघटनेने केला आहे. बागलाण तालुक्यात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, गहू, मका आणि हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी धोरण अशा दोन्ही बाजूंनी शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आर्थिक मदत देऊन शेतकऱ्याला सक्षम करावे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी, उपाध्यक्ष देविदास अहिरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनील बिरारी, विवेक सोनवणे (निकवेल), वैभव अहिरे यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. मका पिकाचीही कमी दराने खरेदी मका पिकाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. सरकारने मक्याला २ हजार ४०० रुपये हमीभाव जाहीर केला असताना, प्रत्यक्षात १५०० ते १७०० रुपये दराने मक्याची विक्री झाली. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे सरकारकडे सुमारे २ लाख २० हजार रुपये येणे बाकी असून, ही रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात आयोजित ‘विराट हिंदू संमेलनाला’ पावसाची तमा न बाळगता नागरिकांनी विक्रमी उपस्थिती लावली. संमेलनादरम्यान अचानक पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, मात्र उपस्थितांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. या सोहळ्यात शहरातील सुमारे २०० स्वच्छता कर्मचारी आणि ३४ घंटागाडी कर्मचाऱ्यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला, जो या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. व्यासपीठावर भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी मार्गदर्शन करताना आरएसएसचे जिल्हा कार्यवाह गंगाधर पगार यांनी हिंदू ही केवळ धर्माची ओळख नसून, ती एक प्रगल्भ जीवनपद्धती आहे. विविधतेत एकता हेच हिंदुत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे. धर्माचार्य नरसिंह कृपादास प्रभू यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाने पारंपरिक मूल्ये जपत संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. पंच परिवर्तन या संकल्पनेवर आधारित चिमुकल्यांनी सादर केलेल्या नाटिकेतून सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली . ब्रह्मचित्त कला भजनी मंडळाच्या भजनाने व पुष्पा लोढा यांच्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजेश घुगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
तालुक्यातील नांदगाव बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या सोहळ्यात इयत्ता पहिलीची प्रवेशपात्र मुले तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महाराष्ट्राची लोकपरंपरा, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देणारे नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विशेषतः राष्ट्रप्रेम, शेतकरी जीवन, ऐतिहासिक प्रसंग, स्वच्छता संदेश आणि शिक्षणाचे महत्त्व सांगणारे कलाविष्कार या चिमुकल्यांनी सादर करून सर्वांचीच मने जिंकली. याप्रसंगी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतूक केले. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यातील सुप्त गुण जगासमोर आणणे ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले. आजच्या बालकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता इतर क्षेत्रांतही आपला ठसा उमटवावा. ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड जिद्द असून, त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते नक्कीच प्रगती करतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी, पालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास गट विस्तार अधिकारी मनोहर बच्छाव, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या सोहळ्याला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शालेय शिक्षण पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यशस्वी नियोजनाबद्दल ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांच्या वतीने आयोजकांचा सत्कार करण्यात आला.
देवगाव रंगारीत भगवान महावीरजन्मकल्याणक उत्साहात साजरा:दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मंगळवारी (ता.३१) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. येथील सकल जैन समाजातर्फे सकाळी भगवान महावीर यांची प्रतिमा एका सजविलेल्या रथात ठेवून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मिरवणूक येताच सरपंच कांताबाई गोरे, उपसरपंच रुबीना पठाण, माजी पं. स. सदस्य गोकुळ गोरे, पंचायत समिती उपसभापती माया ललित सुराशे यांनी प्रतिमेचे पुजन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन धस, ललित सुरासे, कमलाकर चौधरी, प्रदीप दिवेकर, संतोष फाळके, अजबसिंग राजपूत, सतीश करडे आदींची उपस्थिती होती. यावेळी पारस पांडे, सुशील गंगवाल, राजू पांडे, संतोष गंगवाल, फंदुलाल ठोळे, शीतल महिंद्रकर, अनिल ठोळे, मनोज बाफना, प्रकाश वायकोस, मधुकर वायकोस, धीरज ठोळे, हेमंत पांडे, अतुल ठोळे, सन्मती ठोळे, राहुल वायकोस, संतोष वायकोस, अभिजित गंगवाल, अमोल ठोळे, आनंद वायकोस, महावीर गंगवाल, सुयोग पांडे, सौरभ पांडे, संजोग गंगवाल, आगम ठोळे, समाधान वायकोस, श्लोक वायकोस, अलोक वायकोस आदींसह ग्रामस्थ समाजबांधव, महिला मंडळ उपस्थित होते. भगवान महावीर यांच्या प्रतिमेचा पंचामृत अभिषेक मिरवणुकीची सांगता श्री १००८आदीनाथ दिगंबर जैन मंदिरात करण्यात आली. मंदिरात भगवान महावीर यांच्या प्रतिमेचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी इंद्राचा मान प्रतिक व सुयोग पांडे यांना मिळाला. सुशील अंबेकर परिवाराकडून महाप्रसाद वाटप करण्यात आला.
पैठण येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचालित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. येथे अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवनांनी प्रात्यक्षिक दाखवले. याप्रसंगी अग्निशमन अधिकारी जुम्मा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मॉकड्रीलमध्ये प्रमुख अग्निशमन (जवान) विमोचक अनिल सातपुते, संतोष पवार, चालक देविदास पाटील तसेच तुळशी दास वखरे, बाळू पवार आणि दिशांत वनवे यांनी प्रात्यक्षिके सादर केली. गॅस गळतीमुळे लागलेली आग, विद्युत आगीसारख्या गंभीर प्रसंगांवर कशी नियंत्रण मिळवायची, याचे थरारक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले. धुराचे लोट, सायरनचा आवाज आणि क्षणार्धात आगीवर नियंत्रण मिळवणारी टीम पाहून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेसोबतच आत्मविश्वासही निर्माण झाला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मुलांच्या शंकांचे निराकरण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमास स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. पद्मकुमार कासलीवाल, विजय चाटुपळे तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या मॉकड्रीलमुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीऐवजी सजगतेची ज्योत प्रज्वलित झाली असून, सुरक्षित भविष्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रदर्शन उज्वला कुटे यांनी केले.
राज्यात बेकायदार वाळू तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून दरवेळी कडक आदेश, बंदी आणि कारवाईची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र पिंप्रीराजा नदीपात्रामधून सुरू असलेली वाळू लूट थांबलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे या अवैध धंद्याला काही पोलिस अधिकारी-कर्मचारी व महसूल विभागाचा यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष वरदहस्त असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. रात्रीच्या अंधारात नदीपात्रांमध्ये जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने वाळू उपसा केला जातो. नियमांनुसार यंत्रांचा वापर पूर्णतः प्रतिबंधित असताना, प्रशासनाच्या नाकाखाली हा सगळा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठराविक वाळू तस्करांकडून महिन्याला ‘हप्ता’ वसूल केला जातो. त्याबदल्यात संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणतीही अडथळा न आणता वाळू वाहतूक सुरू राहते. एखादी तक्रार किंवा वरिष्ठांचा दबाव आला की, एखाद्या छोट्या वाहनावर कारवाईचा देखावा केला जातो, पण मोठे मासे मात्र नेहमीच सुटतात, असा आरोप आहे.वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेले परवाने, ई-रॉयल्टी, वजनकाट्याच्या पावत्या यांचे नामोनिशाण अनेक वाहनांवर दिसत नाही. तरीही हे ट्रक, टिप्पर आणि ट्रॅक्टर दिवसाढवळ् याजालना रस्त्यावरून ठाण्यासमोरून जात असतात. तालुक्यात टेंडर नाही, आमच्याकडून कारवाई सुरू ^ तालुक्यात सध्या कुठेही वाळू उपशासाठी टेंडर किंवा परवानगी नाही. जेव्हा आम्हाला गोपनीय माहिती मिळते, तेव्हा महसूल विभागाच्या वतीने कारवाही येते. दोन दिवसांपूर्वी आम्ही तीन हायवांवर कारवाही केली. तसेच यापुढेही महसूल विभागाची कारवाई सुरू राहणार आहे. - डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर तक्रारदारांवरच दबाव? या अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना धमक्या, दबाव आणि मानसिक त्रास दिला जात असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. “तक्रार केली तर अडचणीत याल,” असा अप्रत्यक्ष इशारा दिला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे भीतीपोटी अनेक जण गप्प बसत असल्याचे वास्तव आहे.
सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवा:अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प (एनसीएलपी) अंतर्गत काम केलेल्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या टाळाटाळीमुळे त्रस्त झालेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी १० एप्रिलपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तोडगा न निघाल्यास १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. २०१९ मध्ये राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकारी, कामगार उपायुक्त संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा घेऊन शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती झाली होती. त्यानंतर कोरोना महामारी आली. कर्मचाऱ्यांना आर्थिक, मानसिक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. पुढे शासनाने प्रकल्प बंद केला. अनेक उच्चशिक्षित कर्मचारी अचानक बेरोजगार झाले. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सातत्याने पाठपुरावा झाल्यानंतर कामगार उपायुक्त ग्रामीण मुंबई यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये परिपत्रक काढले. कार्यरत कर्मचाऱ्यांची माहिती मागवली. मात्र संभाजीनगर येथील कामगार उपायुक्त कार्यालयाने मूळ पात्र कर्मचाऱ्यांची यादी न पाठवता दुसरीच माहिती सादर केल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे पुनर्नियुक्ती, अन्य पर्यायांवर पाणी फिरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
जळगाव हा भारतातील दुसरा सर्वात मोठा केळी उत्पादक जिल्हा आहे. येथून दररोज सरासरी २ ते ३ हजार टन जीआय टॅग असलेली प्रीमियम दर्जाची केळी आखाती देश आणि युरोपमध्ये निर्यात होतात, मात्र पश्चिम आशियातील युद्धामुळे ९०% निर्यात ठप्प झाली आहे. सुमारे ८०० कंटेनर विविध बंदरांवर अडकले आहेत. एका कंटेनरमध्ये अंदाजे २० टन केळी असतात. या हिशेबाने सुमारे १६ हजार टन केळी खराब होत आहेत. यामुळे केळीवर अवलंबून असलेले जिल्ह्यातील सुमारे २ लाख शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना देशांतर्गत बाजाराचा पर्याय उरला आहे. यामुळे केळीचे भाव नीचांकी पातळीवर आले आहेत. दोन महिन्यांपूर्वीपर्यंत १६०० रुपये प्रतिक्विंटल विकली जाणारी केळी आता ४०० ते ५०० रुपयांना विकली जात आहेत. शेतकरी जनावरांना केळी खाऊ घालत आहेत. ‘महाजन बनाना’ चे संचालक प्रेमानंद सांगतात की शिपिंग कंपन्यांनी वॉर रिस्क सरचार्ज लावला आहे. पूर्वी एका कंटेनरचे भाडे २-३ लाख रुपये होते, ते आता १२-१५ लाखांवर पोहोचले आहे. त्यातच कंटेनर बंदरांवर अडकले आहेत, त्यामुळे भाडे वाढतच चालले आहे. आणखी १०-१५ दिवस अशीच स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणे निश्चित आहे. संपूर्ण जिल्ह्याची उलाढाल वार्षिक ३ ते ४ हजार कोटी रुपये आहे. सीसीएस: मोदींचे निर्देश- फळभाज्यांच्या किमतींवर लक्ष ठेवा नवी दिल्ली| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ’सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती’ची (सीसीएस)बैठक झाली. यात मोदींनी फळभाज्यांच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचे आणि युरियाचा काळाबाजार रोखण्याचे कडक निर्देश दिले. साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मोदींनी सर्व राज्यांना दिले. सामान्य जनतेला त्रास होईल असे कोणतेही कृत्य खपवून घेता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. युद्धाचा परिणाम : व्यावसायिक सिलिंडर ~१९५ तर विमानाचे ईंधन ८.५% महाग, विमान प्रवास महागणार नवी दिल्ली |पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात इंधनाचे दर वाढत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १९५ रुपये वाढ केल्याने दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता २०७८.५० रु. झाली. यापूर्वी १ मार्च रोजीही दर ११४.५० रु.नी वाढले होते. सिलिंडर महागल्याने रेस्टॉरंट चालकांचा खर्च वाढणार आहे. तेल कंपन्यांनी देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी जेट इंधन ८.५% महाग केले. मात्र, सरकारने ही दरवाढ २५ टक्क्यांपर्यंतच मर्यादित ठेवण्यास सांगितले. दिल्लीत जेट इंधनाचा दर १.०४ लाख रुपये प्रति किलोलीटरवर पोहोचला. इंडिगो: तिकीट ९५० ते १० हजारांपर्यंत महागणार जेट इंधनाचे दर वाढताच देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने देशांतर्गत विमानांच्या तिकिटांवर २७५ ते ९५० रुपये, तर आंतरराष्ट्रीय तिकिटांवर ९०० ते १० हजार रुपयांपर्यंत इंधन शुल्क लागू केले. यामुळे विमान प्रवास महागला. नवे दर २ एप्रिलपासून लागू असतील. प्रीमियम पेट्रोलच्या किमतीत ११ रु. वाढ झाली. आता एक लीटर पेट्रोल १६० रु.मध्ये मिळणार आहे.खासगी कंपनी ‘शेल इंडिया’ने पेट्रोल ७.४१, तर डिझेल २५.०१ रु. प्रति लीटर महाग केले. देशात या कंपनीचे ३०० आउटलेट्स आहेत. हजारो टन बिकानेरी भुजिया अडकला: आखातात जाणाऱ्या १०० कंटेनरच्या मालाची निर्यात रखडली; आयातही ठप्प आखाती देशांमध्ये दरवर्षी ५० हजार टन बिकानेरी भुजिया आणि इतर पदार्थांची निर्यात होते. मात्र, युद्धामुळे सुमारे १०० कंटेनरची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. एका कंटेनरमध्ये २५ टन माल असतो. सध्या दुबई आणि इतर देशांमध्ये हे कंटेनर अडकून पडले आहेत. ‘बिकाजी फूड्स’चे व्यवस्थापक शंभुदयाल गुप्ता यांनी सांगितले की, दरमहा १५ ते २० कंटेनर भुजिया, पापड आणि नमकीनची निर्यात केली जाते, जी सध्या बंद आहे.नोखा येथील प्रमुख निर्यातदार राजेश कुमार झंवर यांनी सांगितले की, “आम्ही ८५० डॉलर भाड्याने कंटेनर घेऊन जिरे, मेथी आणि भुईमुगाचे दाणे इराककडे पाठवले होते. मात्र, हा माल वाटेतच कुठे तरी उतरवण्यात आला आहे.
राज्यातील अवर्षणग्रस्त भागाला दिलासा देण्यासाठी आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या नद्यांना नवजीवन देण्यासाठी मंत्रिमंडळाने बुधवारी धोरणात्मक निर्णय घेतले. अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित साकळाई उपसा सिंचन योजनेला १,२३४ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच देशात सर्वाधिक प्रदूषित नद्यांचे पट्टे महाराष्ट्रात असल्याचा शिक्का पुसण्यासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय आरक्षणाचे उपवर्गीकरणाविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत पाचपट वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक प्रदूषित ५४ नदी पट्टे महाराष्ट्रात आहेत. ते प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधिकरण काम करेल. प्राधिकरणाला २,१०० कोटींचा प्राथमिक निधी (प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून २,००० कोटी + शासन योगदान १०० कोटी) मिळेल. मिठी, मुळा-मुठा, भीमा, पंचगंगा यांसारख्या नद्यांचे प्रदूषण रोखणे आणि सांडपाणी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले जाईल. शिशुवर्ग ते आठवीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना आता दरमहा ५००, नववी-दहावी निवासीसाठी ८००, तर अनिवासींना ६००, अकरावी-बारावीसाठी अनुक्रमे १,००० व ८०० रुपये मिळतील. अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता, अभ्यास दौऱ्यासाठी १,५०० रुपयांचे विशेष अर्थसहाय्य मिळेल. भूकरमापकांना आता एस-६ ऐवजी एस-८ ही सुधारित वेतनश्रेणी मिळेल. एकूण १०,६८३ पदांना मंजुरी. २. अमरावती मनपा क्रीडा संकुलासाठी नवसारी येथील १६,७०८ चौ.मी. जमीन मिळणार. अनुसूचित जाती आरक्षण: उपवर्गीकरणासाठी हालचाली राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने हालचाली वेगवान केल्या आहेत. निवृत्त न्यायाधीश अनंत बदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, आता त्यावर आलेल्या सूचना आणि हरकतींचा अभ्यास करण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सादर करेल. एक निर्णय समितीचा, दुसरा प्राधिकरणाचा राज्यातील ५४ प्रदूषित नद्यांच्या पट्ट्यांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत होता. त्यामुळेच सरकारने केवळ समिती न नेमता, थेट २,१०० कोटींच्या निधीसह प्राधिकरण स्थापन केले आहे. तसेच, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही वाद उद्भवू नये म्हणून मुख्य सचिवांच्या समितीला केवळ एका महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी यावर मोठा निर्णय घेता येईल.
शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणात एक खळबळजनक वास्तव समोर आले आहे. विकास यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि त्यांच्या भावाने दिलेल्या अधिकृत फिर्यादीत भोंदू अशोक खरातचे नाव प्रामुख्याने होते. मात्र, पोलिसांनी त्याचे नाव दोषारोपपत्रातून (चार्जशीट) वगळल्याचे उघड झाले आहे. भोंदू अशोक खरातला सलग १५ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर बुधवारी (१ एप्रिल) पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. एसआयटीने खरातचा दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताबा मिळवण्याकरिता न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तो मंजूर केल्यानंतर सायंकाळी पथकाने पुन्हा त्याचा ताबा घेतला. एसआयटीकडून गुरुवारी खरातला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सीबीआय, एटीएसच्या दहा खटल्यांचे काम असल्याचे सांगत खरात प्रकरणात बाजू मांडण्यास विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी नकार दिला. दरम्यान, भोंदू खरातने व्यापारी, महिलांना गंडा घालून कमावलेले कोट्यवधी रुपये तो काही काळ संचालक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील जगदंबा पतसंस्थेकडे वळवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या शिवाय जैन व्यापाऱ्याला समुद्री वनस्पती सांगून ६ वर्षे मासे खाऊ घालत त्याच्याकडून खरातने लाखो रुपये लुबाडले, असे तपासात समोर आले आहे. खरातच्या कार्यकाळामध्ये ठेवीत ८ कोटी रुपयांची वाढ सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत नोव्हेंबर २०२१ मध्ये शिरकाव करीत खरात बिनविरोध संचालक आणि ऑगस्ट २०२२ ते सप्टेंबर २०२४ या कार्यकाळात पतसंस्थेचा अध्यक्ष झाला. त्या काळात पतसंस्थेच्या ठेवींमध्ये एक ते दोन कोटींची होणारी वाढ सुमारे चारपटींनी वाढली. पतसंस्था व्यवस्थापक वामन कांडेकर म्हणाले ही वाढ नैसर्गिक आहे. सुसाइड नोटमध्ये होता खरातचा स्पष्ट उल्लेख ९ जून २०२२ रोजी दिवटेंनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात त्यांच्या भावाने फिर्याद दिली होती. त्यात विकास यांना त्यांचे सासरे अशोक सदाफळ, मेहुणा प्रदीप सदाफळ आणि साडू विलास गवळी यांच्यासह भोंदूबाबा खरातने मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हटले होते. विकास यांना त्यांच्या सासरच्या लोकांनी भोंदू खरातकडे नेले होते. तिथे त्याने विकास यांना ‘जीवे ठार मारीन’, ‘तुझी नोकरी घालवीन’ अशी धमकी दिली होती. खरात आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासामुळेच विकास यांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना मृताने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठीही सापडली होती, त्यात या सर्वांच्या त्रासाचा उल्लेख होता, असे निदर्शनास आले आहे.
आज हनुमान जन्मोत्सव:भरपावसात हनुमानाचा जयघोष करीत भाविक खुलताबादकडे रवाना
हनुमान जन्मोत्सवनिमित्त भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून हजारो भाविक बुधवारी (१ एप्रिल) भरपावसात खुलताबादकडे पायी रवाना झाले. पावसामुळे या मार्गावरील पथदिवे बंद पडले. भाविकांनी अंधारात मोबाइल टॉर्च लावून मार्गक्रमण केले. या वेळी ‘जय श्रीराम जय हनुमान’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. खुलताबाद मार्गावर भाविकांच्या सेवेत ३४ स्टॉल उभारले होते. तेथे पाणी, चहा, चिप्स, लसी, दूध, रसना, फ्रूट्स, साबुदाणा खिचडी, मसाला भात यांचे वाटप करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर फ्रेंड्स ग्रुप, सहायता प्रतिष्ठान, जय चतुर्थी प्रतिष्ठान, बंटी काळे मित्रमंडळ, छत्रपती संभाजीनगर रायडर ग्रुप,पटेल शिवजी, पीव्ही पाटील कन्स्ट्रक्शन, जय श्रीराम मित्रमंडळ, शिंदे परिवार शरणापूर, रामदरबार ग्रुप, जयभद्रा ग्रुप बालानगर, परिहार मिलन मिठाई, सुखकर्ता गणेश मंडळ अंगुरीबाग, श्रीराम प्रतिष्ठान हर्सूल, मंजित प्राइड ग्रुप, सुभाष कच्छवाह, एरॉक्स टेक्नॉलॉजी ग्रुप, वेल राइज इंडस्ट्रीज, कुलस्वामिनी सेवाभावी मंडळ, जय बजरंग ग्रुप संजयनगर, जय भद्रा मित्रमंडळ, अब्दीमंडी मित्रमंडळ, सुपारी हनुमान मित्रमंडळ, आनंद भारुका आदींचे खुलताबादच्या मार्गावर स्टॉल होते. दरम्यान, खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी यंदा १० ते १५ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. मात्र, सामान्य भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यंदा व्हीआयपी आणि विशेष दर्शन पास बंद करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. यामुळे अवघ्या अर्ध्या तासात हनुमंताचे दर्शन घेता येईल, अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ यांनी दिली. अर्ध्या तासात दर्शन यंदाच्या वर्षी ट्रस्टने व्हीआयपी आणि विशेष दर्शन पास बंद केले आहेत. यामुळे दर्शन बारीत असलेल्या भाविकांना दर्शनासाठी अर्ध्या तासाचा अवधी लागेल. महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. बुधवारी रात्री ९ वाजेपासून ते गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर खुले असेल. दर्शनबारीत राहणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ५० हून अधिक सीसीटीव्ही मंदिराच्या परिसरात ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. ६० सुरक्षा रक्षक आणि १५० सामाजिक संस्थेतील स्वयंसेवक, २०० पोलिस कर्मचारी भाविकांच्या सेवेसाठी नियुक्त केले आहेत. ‘धर्मादाय’मुळे व्हीआयपी पासला ब्रेक मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी आणि विशेष दर्शन पासच्या माध्यमातून शुल्क आकारले जात असल्याची तक्रार धर्मादाय आयुक्तांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी ट्रस्टला पत्र बजावून हे पास बंद करण्याचे आदेश दिले. वाहतूक बदल : कोणता रस्ता बंद आणि कुठून जावे? (वाहतूक बदल ३ एप्रिलपर्यंत) धुळे-सोलापूर महामार्गाकडे उन्हापासून बचावासाठी मंदिरासमोर १५० बाय २०० फुटांचा मंडप उभारला आहे. तसेच आणखी १०० बाय ८० फूट, १०० बाय १०० फूट अशा प्रकारे मंडपांची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र रांगा असतील.
शासन निर्णय जारी:शक्तिपीठ महामार्गात साताऱ्याचा समावेश, लांबी 856 किमी
राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला महाराष्ट्र शासनाने अखेर अधिकृत मंजुरी दिली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी शासन निर्णय जारी केला. या नवीन निर्णयामुळे महामार्गाची एकूण लांबी आता ८५६.७६५ कि.मी. होणार असून, यामध्ये सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यातील विरोधानंतर सरकारने जुनी आखणी रद्द करून सुधारित मार्ग निश्चित केला आहे. यापूर्वीच्या आखणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल यांसारख्या तालुक्यांमधील जमिनी अधिग्रहित केल्या जाणार होत्या. मात्र, स्थानिक विरोध आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन सरकारने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीची जुनी अधिसूचना रद्द केली आहे. ८ जिल्ह्यांत सुधारणा नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या ८ जिल्ह्यांतील जुन्या मार्गात सुधारणा करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचा या प्रकल्पात आता नव्याने समावेश करण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा कोकणाशी जोडला जाणार सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी प्रवाशांना साधारण १८ तास लागतात. मात्र, या ८५६.७६५ किमी लांबीच्या महामार्गामुळे हे अंतर अवघ्या ८ तासांत कापता येईल. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र थेट कोकणाशी जोडला जाणार आहे. प्रवासाच्या वेळेत मोठी बचत सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी साधारण १८ तास लागतात. मात्र, हा प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ८ तासांत पूर्ण होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. असा आहे मुख्य बदल महामार्गातील मुख्य बदल शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या आराखड्यात आता साताऱ्याचा समावेश झाला आहे. कोल्हापूर-सांगलीच्या आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, या संपूर्ण महामार्गाची नवीन एकूण लांबी ८५६.७६५ किमी झाली आहे. दळणवळणाची गती वाढवण्याचा प्रयत्न या सुधारित आखणीमुळे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या जमिनी वाचवण्यासोबतच दळणवळणाची गती वाढवण्याचा समतोल साधण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आता प्रत्यक्ष भूसंपादन आणि कामाला लवकरच वेग येण्याची शक्यता आहे. २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार हा महामार्ग केवळ दळणवळणाचे साधन नसून, राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारा दुवा ठरणार आहे. माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर या प्रमुख शक्तिपीठांसह एकूण २१ धार्मिक स्थळांना हा महामार्ग जोडणार आहे. यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होणार असून पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
अल्पवयीन मुलीची प्रसूती प्रकरण आले अंगलट:अर्भक मृत्यू प्रकरणात सातारा जिल्हा शल्यचिकित्सक निलंबित
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील एका अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांची आता कोल्हापूर येथील आरोग्य विभागाच्या विभागीय कार्यालयात विभागीय चौकशी होईल. काय आहे नेमके प्रकरण? अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात कायदेशीररीत्या गर्भपात करणे अपेक्षित असताना, त्याऐवजी प्रसूती करण्यात आली. यामुळे अकाली जन्मलेल्या अर्भकाचा मृत्यू झाला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने थेट उच्च न्यायालयाच्या खंडपीठापर्यंत पोहोचले असून, उद्या गुरुवारी (२ एप्रिल) यावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली. या समितीने सादर केलेल्या अहवालाच्या आधारेच ही कारवाई केली.
अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांपासून धनिकांपर्यंत सर्वांनाच लुटणाऱ्या भोंदू खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. भोंदूगिरीच्या बळावर त्याने केवळ लोकांची दिशाभूलच केली नाही, तर चक्क “मृत्यूची भीती’ दाखवून मोक्याच्या जमिनी कवडीमोल भावात लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १६ लाख रुपये किमतीची जमीन केवळ ४ लाखांत हडपली आहे. विशेष म्हणजे, खरातने शापित ठरवलेल्या याच जमिनीवर ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, खरात याचे दररोजन नवीन कारनामे समोर येत आहेत. त्यामुळे आणखी नवीन काय उघडकीस येते याचीच सध्या चर्चा सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरातची ‘नार्को टेस्ट’ करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी मुंबई | “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण हे केवळ फसवणुकीचे नसून त्याचे धागेदोरे सत्तेच्या उच्च पदरस्थ गोटात गुंतलेले आहेत. या प्रकरणाची केवळ वरवरची चौकशी करून चालणार नाही, तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ते म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्रात मंत्र्यांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घालणे हे संतापजनक आहे. अशोक खरातच्या दरबारात ज्या मंत्री, आमदार, नेत्यांनी हजेरी लावून त्याचा लाभ घेतला, त्या सर्वांवर अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, असेही सपकाळ म्हणाले. आता सत्ताधारी पक्ष यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एका कुटुंबाला मृत्यचे भय दाखवून रचला ‘कुटिल डाव’ सिन्नरच्या मिरगाव येथील एका कुटुंबाने १९९७ मध्ये १६ लाखांची शेतजमीन घेतली होती. शेजारीच जमीन घेणाऱ्या भोंदू खरातची या जमिनीवर नजर होती. त्याने ‘तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात अनर्थ होईल’, अशी अंधश्रद्धेची भीती घातली. दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा गैरफायदा घेत खरातने, ‘जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू अटळ आहे’, अशी भीती दाखवत त्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली हडपलेली जमीन कुटुंब मुलीच्या मृत्यूनंतर भयग्रस्त असताना खरातने २००३ मध्ये आपला कुटिल डाव यशस्वी केला. १९९७ मध्ये १६ लाखांना घेतलेली जमीन त्याने अवघ्या ४ लाखांत स्वतःच्या आणि पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली. या जमिनीवर नंतर त्याने मंदिर उभारले, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये आणि कुणी विरोध करण्याचे धाडस करू नये. गरीब शेतकऱ्यांना भीती दाखवून जमिनी लाटताना खरातने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या व्यवहारांवरील सरकारचा महसूलही बुडवल्याचेदेखील या भागातील रहिवाशांनी सांगितले.
लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी 30 एप्रिलपर्यंत करा:महिला- बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती
राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय ठरलेली’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्य शासनाने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ही मुदत वाढवून ३० एप्रिल २०२६ पर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला. २०२४ पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होत आहेत. सुरुवातीला तब्बल २ कोटी ६२ लाख अर्ज दाखल झाले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या. चारचाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे किंवा तांत्रिक कारणांमुळे जवळपास १० लाख महिला आधीच अपात्र ठरल्या होत्या. योजनेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांची खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारने १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी बंधनकारक केली होती. दरम्यान, ई-केवायसी करताना अनेक लाभार्थींना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने तसेच राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे या योजनेतील अनेक पात्र लाभार्थीना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेषतः कुटुंबातील सरकारी नोकरीबाबत चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेक बहिणींचे १५०० रुपये बंद झाले होते. या तक्रारींची आणि ज्या महिलांची ई-केवायसी प्रलंबित राहिली होती, त्याची दखल घेत सरकारने पून्हा ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. या योजनेत अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि सरकारी नोकरीत असूनही लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. शासनाकडून सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ दिल्याने महिलांना मोठा दिलासा 1 ई-केवायसी पूर्ण न केल्यास काय होईल?ज्या महिला ३० एप्रिल २०२६ पर्यंत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या खात्यात मे महिन्यापासूनचे पुढील हप्ते जमा केले जाणार नाहीत. तसेच, त्यांचे नाव तात्पुरते निलंबित होऊ शकते. 2 महिलांनी ई-केवायसी कुठे आणि कशी करावी?अंगणवाडी सेविका: गावातील किंवा वॉर्डातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन महिला आपली माहिती अद्ययावत करू शकतात.सेतू सुविधा केंद्र : महा-ई-सेवा केंद्रात जाऊन आधार कार्ड आणि बँक पासबुक लिंक करून ई-केवायसी करता येते.नारी शक्ती दूत ॲप: ज्या महिलांना स्मार्टफोन वापरता येतो, त्या घरी बसून ॲपच्या माध्यमातून करता येईल. 3 सायबर भामट्यांपासून सावधान राहावेई-केवायसीच्या नावाखाली महिलांना फोन करून ओटीपी मागणाऱ्या सायबर भामट्यांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने आवाहन केले आहे की, ई-केवायसीसाठी कोणताही फोन करून ओटीपी मागितला जात नाही. अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती देऊ नका.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नेतृत्वावरून आणि अधिकारावरून राजकीय युद्ध सुरू झाल्याचे दिसते. पक्षाच्या घटनेत बदल करून सर्व अधिकार कार्याध्यक्षांकडे घेण्याचा प्रयत्न सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी केल्याने पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणावर तटकरे आणि पटेल यांनी दिलेले स्पष्टीकरण सुनेत्रा पवार यांनी फेटाळून लावले असून, त्या या उत्तराने समाधानी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार गुरुवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. या पत्रात पक्षाच्या घटनेत बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. अध्यक्षांसोबतच कार्याध्यक्षांनाही सर्व निर्णय घेण्याचे समान अधिकार द्यावेत, अशी खेळी त्यांनी केली. मात्र, ही बाब लक्षात येताच सुनेत्रा पवार यांनी थेट निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे-पटेल यांचा सर्व पत्रव्यवहार रद्द करण्याचे सांगितले. पक्षावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जे काही सुरू आहे, तो केवळ प्रशासकीय बदल नसून पक्षावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. तटकरे आणि पटेल यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद केवळ नावापुरते ठेवण्याचा हा प्रयत्न होता का, असा सवाल आता राजकीय विश्लेषक विचारत आहेत. या वादामुळे महायुतीमधील या गटाची शक्ती कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांसाठी ५० किलोची मर्यादा
-पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या-पिशव्यांच्या वजनाची मर्यादा ५० किलोपर्यंत करण्यात आली. या निर्देशाची राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. […] The post बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांसाठी ५० किलोची मर्यादा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करणार
५४ प्रदूषित नदी पट्ट्यांचे पुनरुज्जीवन करणार मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून नदीच्या संवर्धन-पुनरुज्जीवनासाठी नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यास बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्राधिकरणाच्या माध्यमातून नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे केली जातील. या प्राधिकरणासाठी आवश्यक २ हजार कोटींचा निधी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून उभारण्यास तसेच सरकारचे योगदान […] The post नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३ चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या
मुले अत्यवस्थ, रुग्णालयात उपचार सोलापूर : प्रतिनिधी उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावात वडिलांनी स्वत:च्या तीन चिमुकल्या मुलांना विष पाजून स्वत:ही विष प्राशन केल्याची घटना उघडकीस आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे गावात ही घटना घडली. भीमाअण्णा वाघमारे (३४) असे विष प्राशन केलेल्या व्यक्तीचे नाव असून, तो एका सिमेंट कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होता. भीमा […] The post ३ चिमुकल्यांना विष पाजून पित्याची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाल समुद्रातील मार्ग अडविल्यास भारताची कोंडी!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था युरोपसोबत भारताचा जो व्यापार सुरू आहे, तो लाल समुद्र आणि सुएझा कालव्यातून होतो. त्यामुळे बाब अल-मंडेब मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आधीच होर्मुझ सामुद्रधुनी अडविल्याने जगाचा तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. बाब अल-मंडेब सामुद्रधुनीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे बाब अल-मंडेबवर स्पीड-ब्रेकर लागल्यास भारतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. हा मार्गही […] The post लाल समुद्रातील मार्ग अडविल्यास भारताची कोंडी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अटी मान्य करा अन्यथा विनाशाला तयार राहा
ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था पश्चिम आशियातील तणाव टोकाला पोहोचला असून, इराणला सातत्याने धमक्या देऊनही इराण माघार घ्यायला तयार नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा मोठा इशारा दिला असून, इराणच्या नवीन अध्यक्षांनी केलेली युद्धविरामाची विनंती ट्रम्प यांनी धुडकावून लावली आणि कडक अटी समोर ठेवत इराणने सर्व अटी मान्य कराव्यात […] The post अटी मान्य करा अन्यथा विनाशाला तयार राहा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जालन्याजवळ अपघातात ६ महिला मजुरांसह ८ ठार
२ गंभीर, समृद्धी महामार्गावर ट्रकची मजुरांच्या पिकअपला धडक, मजूर महिलांच्या पिकअपचा चक्काचूर जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर जामनेर-कडवंची शिवारात मुंबईकडे जाणा-या भरधाव ट्रकने बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी महामार्गावर सफाईचे काम करून जालन्याकडे परतण्यासाठी पिकअपमध्ये बसलेल्या महिला मजुरांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात ८ महिला मजुरांचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर अन्य […] The post जालन्याजवळ अपघातात ६ महिला मजुरांसह ८ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर रोड-बोधन रेल्वे मार्गाचा प्रश्न ऐरणीवर
जळकोट : ओमकार सोनटक्के एकीचे बळ आणि मिळते फळ ही म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. अशीच एकी मराठवाड्यातील महत्त्वपूर्ण अशा रेल्वे मार्गासाठी लातूर व नांदेड जिल्ह्यातील खासदारांनी लोकसभेमत दाखवली आहे. मराठवाड्यातील या तीन खासदारांनी गत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लातूर रोड-जळकोट- मुखेड- बोधन रेल्वेमार्गाचा प्रश्न लोकसभेत वारंवार उपस्थित केला आहे तसेच प्रत्यक्षपणे रेल्वे मंत्र्यांचीही भेट […] The post लातूर रोड-बोधन रेल्वे मार्गाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर तालुक्यात वादळी वा-यासह गारांचा पाऊस
रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यात बुधवारी (दि. १ एप्रिल) सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी गारपीट व वादळी पावसाने शेतक-यांचे मोठे नुकसान केले. मोरवड, गरसुळी, लखमापूर, चाडगाव वाला व ततापूर परिसरात गारपिटीचा तडाखा बसला तर पानगाव, खरोळा, कामखेडा, रेणापूरसह तालुक्यातील बहुतांश भागात वादळी वारा व मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात रेणापूर, पळशी, पानगाव, कारेपूर, […] The post रेणापूर तालुक्यात वादळी वा-यासह गारांचा पाऊस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे पद केवळ नाममात्र असून, त्यात काम करण्यास स्वारस्य नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. त्यांनी बुधवारी आपला राजीनामा सादर केला. ॲड. एडतकर यांची साधारणतः वर्षभरापूर्वी या पदावर निवड करण्यात आली होती. मात्र, हे पद केवळ नाममात्र असल्याचे त्यांना वाटले. त्यामुळे या पदावर काम करण्यात त्यांना कोणतेही स्वारस्य राहिले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपले राजीनामा पत्र काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेत्या तथा राज्याच्या माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांना ई-मेलद्वारे पाठवले आहे. व्यवसायाने पत्रकार असलेले ॲड. एडतकर यांच्याकडे काँग्रेस पक्षाने प्रदेश प्रवक्ते पदही सोपवले आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे नेमके आणखी काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला धक्का बसल्याचे मानले जात आहे.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांनी अमरावतीत 'मुख्यमंत्री सावत्र बहीण' महिला मोर्चाची स्थापना केली आहे. केवळ 'केवायसी' (KYC) प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांचा ऑक्टोबर २०२५ पासून योजनेचा हप्ता बंद झाला आहे. हा हप्ता पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या महिलांच्या म्हणण्यानुसार, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत 'केवायसी' करण्याची अंतिम मुदत होती, परंतु ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या, सेतू केंद्रांवरील ताण, वीजपुरवठ्यातील अडथळे आणि ओटीपी न मिळणे यांसारख्या कारणांमुळे त्या वेळेत प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. पात्र असूनही त्यांचे लाभ रोखण्यात आल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघटनेच्या नेतृत्वाखाली या महिलांनी 'केवायसी'साठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर नजीकच्या भविष्यात जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 'मुख्यमंत्री सावत्र बहीण' महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिला गरीब आणि गरजू आहेत. त्यांच्याकडे चारचाकी वाहन किंवा शेती नाही; त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शासनाने त्यांचे हप्ते रोखून त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी आहोत का? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला. जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक डॉ. कटके यांनी या महिलांचे निवेदन स्वीकारले. शासनाकडे त्यांची भूमिका कळवण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयानंतर हा मोर्चा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयावरही नेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाला पत्राद्वारे कळवण्याचे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनेही या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. या आंदोलनात प्रधान मुखिया सरपंच संघटनेचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष तथा खेडपिंप्रीचे सरपंच मंगेश कांबळे, शारदा कोडापे, प्रा. उद्धव पारवे, पार्वता राऊत, जयश्री विटकरे, शालू खंडारे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
सातुर्णा फ्लॅटमध्ये देहविक्रीचा भंडाफोड:रॅकेट चालवणाऱ्या महिलेसह चार जणांना अटक
अमरावती शहर गुन्हे शाखेने बुधवारी सातुर्णा एमआयडीसी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोन तरुणी आणि दोन पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहरात अवैध देहविक्रीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी ही धाडसी कारवाई केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिलांगण रोडवरील सातुर्णा एमआयडीसी परिसरातील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये हा देहव्यवसाय सुरू होता. पथकाने खात्री करून छापा टाकला असता, तेथे हा गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात रॅकेट चालवणाऱ्या मुख्य महिलेसह दोन युवती आणि दोन पुरुष ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी रॅकेट चालवणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (जीएमसी) इर्विन, डफरीन आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचा ताबा मिळवण्यात अडचणी येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग या हस्तांतरणास तयार नसल्याने जीएमसीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके रखडली आहेत. जीएमसीचे व्यवस्थापन वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येते, तर जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन), जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) आणि संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) ही तिन्ही रुग्णालये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित आहेत. या दोन विभागांमधील असमन्वयामुळे हस्तांतरणाची प्रक्रिया थांबली आहे. यापूर्वी दोन्ही विभागांमध्ये एक सामंजस्य करार (एमओयू) झाला होता, ज्यानुसार जीएमसीला केवळ जिल्हा सामान्य रुग्णालयाचा ताबा मिळणार होता. मात्र, नवीन डीन डॉ. नंदकिशोर राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जुन्या एमओयूतील त्रुटी दूर करून तिन्ही रुग्णालयांचा ताबा मिळावा यासाठी नवीन एमओयू तयार केला आहे. या नवीन एमओयूला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. डीन डॉ. नंदकिशोर राऊत यांनी यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईशी संपर्क साधला असून, आज खास दूतामार्फत हा विषय सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. डॉ. नंदकिशोर राऊत यांनी सांगितले की, केवळ इर्विनचा ताबा घेऊन काम भागणार नाही, त्यामुळे डफरीन आणि सुपर स्पेशालिटीचाही ताबा मिळणे आवश्यक आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने हा नवीन एमओयू योग्य ठरवला असून, दोन्ही विभागांच्या मंत्रीस्तरीय समितीने त्याला तत्वतः मान्यता दिली आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांची स्वाक्षरी अद्याप बाकी आहे. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाची बाजू मांडताना जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) डॉ. विनोद पवार यांनी सांगितले की, जीएमसीला प्रात्यक्षिकांसाठी ४३० खाटांच्या रुग्णालयाची आवश्यकता आहे. इर्विनची सध्याची क्षमता ४०० खाटांची असून, सीएस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध झाल्याने तिथे ३० खाटांचा नवा कक्ष तयार करण्यात आला आहे. याशिवाय ५० खाटांची वाढ करण्याची व्यवस्था केली जात आहे, त्यामुळे ही पायाभूत सुविधा पुरेशी आहे. भविष्यात गरजेनुसार त्यांना आणखी काही विभाग ताब्यात घेता येतील.
मोर्शीत रेल्वे पुलाचा भाग कोसळला:सिलिंडर आणायला गेलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू
मोर्शी नजीक रिद्धपुर येथे निर्माणाधीन रेल्वे पुलाचा लोखंडी भाग अंगावर कोसळल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ईश्वर उदेभान भुरभुरे (३५, रा. दाभेरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना आज, बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. पोलिस सूत्रांनुसार, मुंबई-नरखेड रेल्वे मार्गावरील रिद्धपुरजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ईश्वर हा दाभेरी येथील प्रभाकर वानखडे यांच्या मोटरसायकलवर मागे बसून घरगुती गॅस सिलिंडर भरण्यासाठी चांदूरबाजार येथे जात होता. मोटारसायकल पुलाखालून जात असतानाच सेंट्रिंगची लोखंडी प्लेट अचानक त्यांच्या अंगावर पडली. घटनेनंतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने ईश्वरला तात्काळ चांदूरबाजार येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शिरखेड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. संबंधित कंत्राटदार घटनास्थळी येईपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. अखेर कंत्राटदाराच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले. त्यांनी मृत युवकाच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत देण्याचे मान्य केले. त्यानंतर नागरिक व पोलिसांमधील तणाव निवळला. ईश्वरच्या डोक्यासह शरीराच्या इतर अवयवांवर मोठा आघात झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. रुग्णालयीन सूत्रांनी याची अधिकृत घोषणा केल्यानंतर घटनास्थळावरील नागरिक आणखी संतप्त झाले. ज्या रुग्णवाहिकेतून त्याला दवाखान्यात नेण्यात आले होते, तीच रुग्णवाहिका दाभेरी येथे परत नेताना घटनास्थळी आणली गेली. नागरिकांनी मृतदेह पुन्हा त्याच जागेवर थांबवून आंदोलन केले, ज्यामुळे कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला.
हनुमान जयंतीनिमित्त अमरावतीजवळील चांगापूर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने 'वन वे' वाहतूक व्यवस्था लागू केली आहे. भाविकांना मंदिरात जाण्यासाठी रेल्वे अंडरपासचा वापर करावा लागणार आहे, तर परतीसाठी अयोध्यानगरी-रेवसा फाटा मार्गाचा वापर करावा लागेल. वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नेहमीच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. ही 'वन वे' व्यवस्था गुरुवार, २ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील. चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदिर (चांगापूर) हा मार्ग सर्व प्रकारच्या जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी चांगापूर रेल्वे अंडर बायपासचा वापर करावा लागेल. या मार्गावरून केवळ दर्शनासाठी जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांनी आपली वाहने अयोध्यानगरी ले-आऊट ते रेवसा फाटा या मार्गाने अमरावतीकडे न्यावीत. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मंदिर परिसरात लावलेल्या फलकांद्वारे कळवण्यात येईल, असे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त, जनहित लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार नियोजित अधिसूचनेत वाहतुकीच्या नियमांबाबत अंशतः बदल करण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाने राखून ठेवले आहेत.
मेळघाटच्या आकी गावात आगीत वृद्धेचा मृत्यू:घरांना आग लागल्याने बाहेर पडता न आल्याने अनर्थ
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील आकी मोरघड गावात अचानक आग लागल्याने दोन ते तीन घरे जळून खाक झाली. या आगीत बाहेर पडता न आल्याने ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. मानकया गणसा बेलसरे असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. स्थानिक माहितीनुसार, अग्निशमन दलाची मदत वेळेत न मिळाल्याने ही घटना घडली. गावात पाण्याचा तीव्र अभाव असल्याने आग विझवणे अत्यंत अवघड झाले होते. यामुळे आगीने मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांनी आग विझवण्यासाठी धावपळ केली. धरमडोह गावातील रामबाबू दहीकर, रामदास हिवराळे, अजयबाबू धांडेकर आणि मृत महिलेचा मुलगा तुलसीराम बेलसरे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्यांनाही हा अनर्थ टाळता आला नाही. आकी मोरघड हे गाव टेंब्रुसोंडा पीएचसी अंतर्गत येते.
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्राने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पत्रात केवळ दोनच महत्त्वाच्या पदांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, सुनेत्रा पवार यांचा 'राष्ट्रीय अध्यक्ष' तर शिवाजीराव गर्जे यांचा 'खजिनदार' असा उल्लेख आहे. विशेष म्हणजे, या पत्रात एकूण 14 पदाधिकाऱ्यांच्या नावांची यादी देण्यात आली असली तरी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह इतर 12 नेत्यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रमुख नेत्यांच्या पदनामाबाबत ठेवलेली ही गोपनीयता राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार यांच्या कार्यकाळात निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदनामांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. मात्र सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच पाठवलेल्या नव्या पत्रात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या नावांपुढे कोणत्याही पदाचा उल्लेख टाळण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पक्षाची संपूर्ण कार्यकारिणी आणि संबंधित अधिकृत कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असते. या प्रक्रियेचा भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले. मात्र, या पत्रात केवळ सुनेत्रा पवार यांचा 'राष्ट्रीय अध्यक्ष' आणि शिवाजीराव गर्जे यांचा 'खजिनदार' असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, इतर कोणत्याही पदाधिकाऱ्याच्या नावापुढे त्यांच्या पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, ज्यावेळी सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली, त्याच वेळी प्रफुल्ल पटेल यांची 'राष्ट्रीय कार्याध्यक्ष' आणि सुनील तटकरे यांची 'प्रदेशाध्यक्ष' म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. असे असतानाही निवडणूक आयोगाला दिलेल्या अधिकृत पत्रात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पदनामांचा उल्लेख का टाळण्यात आला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीच्या निकालासंदर्भात 'परिवर्तन' गटाने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. या याचिकेद्वारे नव्या मानकऱ्यांना पदांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए. अंखद यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. मसाप निवडणूक मंडळाचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. प्रताप परदेशी, संजीव खडके आणि गिरीश केमकर यांच्या वतीने ॲड. अभिषेक अवचट आणि ॲड. प्रल्हाद परांजपे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने त्यांचे मुद्दे ग्राह्य धरले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारले की, निवडणूक मतमोजणीबाबतच्या तक्रारी सक्षम अधिकाऱ्यांकडे का केल्या नाहीत? तसेच, नव्या कार्यकारिणीस प्रतिबंध का घालावा आणि निवडणूक कोणत्या कारणासाठी तातडीने रद्द करावी? यावर अर्जदारांकडून समाधानकारक खुलासा न झाल्याने, 'परिवर्तन' गटाचे मिलींद जोशी, विनोद कुलकर्णी आणि सुनीता राजे पवार यांची याचिका न्यायालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. 'परिवर्तन' गटाकडून ॲड. निखिलेश पोटे यांनी बाजू मांडली. मसाप निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 'परिवर्तन' गटाने निवडणूक मुक्त व निष्पक्ष पद्धतीने झाली नसल्याचा आरोप केला होता. निवडणूक मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी रिट याचिका तातडीने सुनावणीस घेण्याचा अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता. ॲड. अवचट यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, याचिकाकर्त्यांना ही रिट याचिका दाखल करण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी ही याचिका वैयक्तिक पातळीवर न करता मसाप संस्थेच्या नावाने दाखल केली होती. निवडणूक मंडळ अस्तित्वात असताना निवडणूक अधिकाऱ्यांना व्यक्तिगत पक्षकार म्हणून दाखवून त्यांच्यावर आरोप करण्यात आले. तसेच, निवडून आलेल्या उमेदवारांना पक्षकार करण्यात आले नव्हते. मसापच्या मावळत्या कार्यकारिणीने नियुक्त केलेल्या निवडणूक मंडळाने घटनेनुसार निःपक्षपणे काम केले, असे निवडणूक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. निवडणुकीतील पराभवानंतर 'परिवर्तन' गटाच्या सदस्यांनी याच निवडणूक मंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि नव्या कार्यकारिणीस संस्थेचा ताबा मिळू नये, या उद्देशाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वास्तविक पाहता, 'परिवर्तन' गटाने धर्मादाय आयुक्तांकडे जाण्याऐवजी थेट उच्च न्यायालयात फेरमतमोजणीची मागणी केली होती. निकालाच्या दिवशी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला असता तो निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला, असा दावा त्यांनी केला होता. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले होते की, निकालाच्या दिवशी सादर केलेल्या तक्रार अर्जात 'फेरमतमोजणी' हा शब्दच नव्हता. निकाल जाहीर होण्याच्या वेळी कोणताही फेरमतमोजणीचा अर्ज सादर केला गेला नव्हता, ही माहिती उच्च न्यायालयापासून दडवून ठेवल्याचा आरोपही करण्यात आला.
'गानवर्धन' संस्थेतर्फे ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर यांना कै. पंडित आप्पासाहेब जळगावकर संवादिनीवादक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उस्ताद फैयाज खाँ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना ज्येष्ठ व्हायोलिन वादक उस्ताद फैयाज खाँ यांनी पंडित आप्पासाहेब जळगावकर यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, साथसंगत कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेब जळगावकर होते. गायकाच्या विचारांना खीळ न घालता सादरीकरणाला प्रोत्साहन देणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. उस्ताद खाँ यांनी पंडित अजय जोगळेकर यांनाही उत्तम साथसंगतकार म्हटले, ज्यांच्या साथीने गायकाचे गायन बहरते. उस्ताद फैयाज खाँ यांनी भारतीय शास्त्रीय संगीतातील गहनतेवरही प्रकाश टाकला. त्यांच्या मते, कलाकार जेवढा खोलवर विचार करेल, तेवढे त्याला अधिक शिकायला मिळते. प्रत्येक कलाकाराने सांगीतिक दृष्टीने सखोल अभ्यास करून अनेक गुरूंकडून ज्ञान मिळवणे आवश्यक आहे, कारण एका गुरूकडून मिळालेले ज्ञान परिपूर्ण नसते. या कार्यक्रमाला 'गानवर्धन' संस्थेचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, कोषाध्यक्ष सविता हर्षे, संवादिनीवादक सुरेश फडतरे आणि तबलावादक हनुमंत फडतरे उपस्थित होते. पंडित आप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंडित अजय जोगळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'गानवर्धन'सारख्या जुन्या संस्थेतर्फे पंडित आप्पासाहेब जळगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मिळालेला हा पुरस्कार अत्यंत आनंददायी असल्याचे ते म्हणाले. कोकणातील एका लहानशा खेड्यातून संगीत साधनेच्या ओढीने पुण्यात आल्याचे आणि पंडित जळगावकर यांच्या भावपूर्ण वादनाने आपण प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ. दयानंद घोटकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी या पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट करत 'गानवर्धन' आणि पंडित आप्पासाहेब जळगावकर यांच्यातील स्नेहबंध उलगडले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित आप्पासाहेब जळगावकर यांचे शिष्य सुरेश फडतरे यांचे एकल संवादिनीवादन झाले. त्यांनी पंडित जळगावकर यांच्या वादनशैलीला अनुसरून गायकीअंगाने राग झिंझोटी सादर केला. त्यांना हनुमंत फडतरे यांनी तबलासाथ केली. त्यानंतर देवांशी भट्ट यांची गायन मैफल रंगली. त्यांनी पूरिया धनाश्री रागातील विलंबित झुमरा तालातील 'बल बल जाऊं' या बंदिशीने गायनाची सुरुवात केली. त्यानंतर मध्यलय तीन तालातील 'सैय्या मोरा परदेस गईलवा' ही बंदिश सादर करून तराणा ऐकविला. त्यांना हनुमंत फडतरे (तबला) आणि पंडित अजय जोगळेकर (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली.
'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती, या शब्दामुळे जर माझे बंधू-बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पोंक्षे यांनी आपली बाजू एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. ते म्हणाले, सध्या माझे एक वक्तव्य मीडिया फिरवत आहे. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून-मोडून फोडून मीडियावाले फिरवत असतात. संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातले मागचे पुढचे सगळे कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन नेहमी माझी वक्तव्य टाकत असतात. पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, माझी दोन वक्तव्य त्यांनी चालवलेली आहेत. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरे मनुस्मृती जर वाचली असती, तर ती जाळली नसती, असे मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळे आपण वाचतच नाहीये. हे जर वाचले तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमके काय म्हटले आहे. हा माझ्या मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असे म्हटले असल्याचे स्पष्टीकरण पोंक्षे यांनी दिले आहे. हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केला तसेच सगळे वेद, उपनिषद संपूर्ण भाषण युट्युबवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, हे त्यांनी स्वतः म्हटले आहे, असेही शरद पोंक्षे यांनी यावेळी म्हटले. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही शरद पोंक्षे म्हणाले, मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अभ्यास करत आहे. खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत, कळावेत, ते कसे होते, ते सांगण्यासाठी माझी धडपड सुरु आहे. काही दिवसांनी ते तुम्हाला दिसेल. 'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', या शब्दामुळे जर माझे बंधू -बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो माझा मूळ हेतू आणि मूळ उद्दिष्ट हे आहे की, हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे. माझी सगळी व्याख्यानं तुम्ही ऐकू शकता, मी कधी काही लपवत नाही. माझी जास्त व्याख्यानं बहुजन समाजातीलच लोक ठेवतात. काही लोक बावळटासारख्या प्रतिक्रिया देत असतात. पण माझ्या काही चांगल्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे मला असे वाटले की, एक व्हिडीओ करावा आणि दिलगिरी व्यक्त करावी. मुळात मी बाबासाहेबांचा, सगळ्या महापुरुषांचा अत्यंत आदर करणारा माणूस आहे. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो. त्यामुळे मनुस्मृतीबाबतच्या वाक्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी मनापासून माफी मागतो, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
लातूर : प्रतिनिधी सध्या उन्हाळ्याचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर सुर्यदेव आग ओकत आहे. यातच किरकोळ बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात काही प्रमाणावर वाढ झाली असली तरी, बाजारपेठेत लिंबू सध्या चांगलाच भाव खात आहे. बाटलीबंद शीतपेयांपेक्षा लिंबु शरबत अधिक पसंद केले जात असल्याने लिंबुला सर्वाधिक मागणीही आहे. उन्हाळयात घशाला कोरड पडली की आठवते शीतपेय किंवा लिंबू शरबत. केवळ […] The post कडक उन्हात लिंबू खातोय भाव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर अर्बन को-ऑप. बँकेचा ऑपरेटिंग नफा रुपये २०.५३ कोटी
लातूर : प्रतिनिधी दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि.,लातूरने आपला मार्च-२०२६ अखेर प्रगतीचा आलेख चढता ठेवला आहे. आर्थिक वर्षाअखेर बँकेचे भाग भांडवल रू. २७.५६ कोटी, ठेवी रू. ८७२ कोटी असून बँकेचे कर्ज वाटप रू. ५२४.९८ कोटी तसेच नेट एन.पी.ए. शुन्य टक्के आहे. व बँकेला यंदा ऑपरेटिंग इन्कम रू. २०.५३ कोटी झाला आहे. बँकेच्या व्यवस्थापनाने, अधिकारी […] The post लातूर अर्बन को-ऑप. बँकेचा ऑपरेटिंग नफा रुपये २०.५३ कोटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सेवालयाच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश
लातूर : प्रतिनिधी सोलापूर येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव स्पर्धेत हासेगावच्या सेवालय बालगृहातील एचआयव्ही संक्रमित अनाथ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन एका सुवर्णपदकासह अन्य पारितोषिके पटकावत यश संपादन केले आहे. राज्य शासनाचा महिला व बाल कल्याण विभाग व सोलापूर येथील सिंहगड इन्स्टिट्युटच्या वतीने पहिल्यांदाच राज्यस्तरी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या […] The post सेवालयाच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कलिंगडाची आवक ३०० टनांवर; भाव कवडीमोल
लातूर : प्रतिनिधी आखातातील युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याने महाराष्ट्रात कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून, दरात मोठी घसरण झाली आहे. लातूर जिल्ह्यात कलिंगड शेतात पडून असल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, फळ बाजारात दि. १ एप्रिल रोजी ३०० टन कलिंगडाची आवक झाली. त्यामुळे फळ मार्केट कलिंगड ५ रुपये तर किरकोळ बाजारात १० रुपये किलोने […] The post कलिंगडाची आवक ३०० टनांवर; भाव कवडीमोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या कामगार धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन, बंदर व गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत जोरदार निदर्शने केली. हिंद मजदूर सभेच्या नेतृत्वाखालील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन आणि ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने 1 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान जेवणाच्या सुट्टीत कर्नाक बंदर येथे गोदीमधील विविध खात्यातील कामगार कर्मचाऱ्यांनी चार लेबर कोड विरुद्ध घोषणा देत जोरदार निषेध व्यक्त केला. याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के.शेट्ये यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ब्रिटिश काळात कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कामगार कायदेच या सरकारने मालकांना खुश करण्यासाठी काढून घेतले आहेत. कामगार भरती होत नसल्यामुळे आता सरकारी नोकऱ्या मिळत नाहीत. बेरोजगारांची संख्या वाढत चाललेली आहे. कामगार संघटना बनविणे आणि संपासारखं हत्यार देखील या कायद्यामुळे संपुष्टात येणार आहे. या विरुद्ध कामगारांना लढावेच लागणार. अन्यथा भविष्यातील पिढी आपल्याला माफ करणार नाही. अन्यायाविरुद्ध संघर्ष करा. एकजुटीने रहा. शेवटी विजय कामगारांचाच होईल. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोदीमध्ये आता फक्त 2300 कामगार शिल्लक राहिले आहेत. कामाची परिस्थिती कठीण असताना देखील कमी कामगारमध्ये गोदी कामगारांनी 75 दशलक्ष टन मालाची चढउतार केली. हे निश्चितच अभिमानास्पद आहे. औद्योगिक कलह कायदा 1947 नुसार मिळणारे बरेच फायदे या चार लेबर कोडमुळे गेले आहेत. हायर व फायर आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट पॉलिसीमुळे मालक कामगारांना केव्हाही कामावरून काढू शकतो. कायद्याने कामगारांना मिळणारे अनेक फायदे या चार लेबर कोडमुळे केंद्र सरकारने काढून घेतले आहेत. या बदलाचे परिणाम गोदी कामगारांवर देखील होणार आहेत. याची कामगारानी जाणीव ठेवावी. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केंद्र सरकारने चार लेबर कोड आणून कामगारांना एक वर्षात ग्रॅज्युएटी मिळेल, किमान वेतन मिळेल. असे गाजर दाखविले आहे. एखाद्या मालकाला कारखाना बंद करायचा असेल तर सध्या 100 कामगार संख्येची मर्यादा आहे. मात्र या कायद्यामध्ये ती आता 300 कामगार मर्यादा करण्यात आली आहे. भविष्यात कामगारांचे करार होतील की नाही, ही शंका आहे आणि कामगारांना मिळणारी चांगली पेन्शन देखील केव्हाही बंद होऊ शकते. पेन्शनवर मिळणारा महागाई भत्ता देखील बंद होईल. त्यासाठी गोदी कामगारांना एकजुटीने सरकारविरुद्ध लढावे लागेल. या प्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे यांनी सरकारच्या धोरणाविरुद्ध कामगारांना मार्गदर्शनपर भाषणे केली. सभेचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे यांनी केले. याप्रसंगी युनियनचे पदाधिकारी विष्णू पोळ, संदीप चेरफळे, आप्पा भोसले, मीर निसार युनूस, कार्यकर्ते व गोदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोरदार घोषणा देऊन सभेची सांगता झाली.
पुणे मनपाची अनधिकृत केबल्सवर धडक कारवाई:शहरात 3600 किमी केबल्स अनधिकृत, जीवितहानीचा धोका
पुणे महानगरपालिकेने शहरात पसरलेल्या अनधिकृत आणि धोकादायक ओव्हरहेड केबल्स हटवण्यासाठी बुधवारपासून धडक मोहीम सुरू केली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शहराचे विद्रुपीकरण आणि जीवितहानीचा धोका यामुळे ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ही मोहीम दर आठवड्याला विविध भागांत राबवली जाईल. या मोहिमेअंतर्गत, पुणे-सातारा रस्त्यावरील आदिनाथ सोसायटी परिसरात आज अनधिकृत केबल्सवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिकेचा विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, कार्यकारी अभियंता योगेश माळी, उप अभियंता जयदीप अडसूळ, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, मुख्य अग्निशमन अधिकारी पोटफोडे, सहाय्यक विभागीय अधिकारी विजय भिलारे, स्टेशन ऑफिसर प्रभाकर उमरकर, समीर शेख आणि प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. भिमाले यांनी सांगितले की, नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल्स टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी खांबांवर अनधिकृतपणे केबल्स टाकल्या आहेत. यामुळे शहरात अनेक ठिकाणी केबल्सचे गुंतागुंतीचे जाळे निर्माण झाले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. विशेषतः गायरोप केबल्समध्ये ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याचा धोका आहे. केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य आहे. विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी रितसर परवानगी घेऊन केवळ भूमिगत केबल्स टाकाव्यात, असे आवाहन भिमाले यांनी केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर भविष्यात कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांनी माहिती दिली की, जानेवारीपासून काही भागांत प्राथमिक कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत १२३.६ किलोमीटर लांबीच्या अनधिकृत केबल्स हटवण्यात आल्या आहेत. ही मोहीम आता अधिक तीव्र केली जाईल.
लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी बुधवारी लष्कराच्या दक्षिण कमांडचे 'जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ' म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जागा घेतली असून, सेठ यांनी त्याच दिवशी 'उप-लष्कर प्रमुख' म्हणून पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल संदीप जैन जून १९८८ मध्ये 'महार रेजिमेंट'मध्ये नियुक्त झाले. जवळपास चार दशकांच्या त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या अधिकारपदांवर महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. जैन यांनी निम-विकसित भूप्रदेशासह, दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये एका सैनिकांच्या तुकडीचे, स्ट्राइक कोअरमधील एका पायदळ ब्रिगेडचे, दहशतवादविरोधी दलाचे आणि उत्तर कमांडमधील एका महत्त्वाच्या कोअरचे नेतृत्व केले आहे. ऑपरेशन पवनमधील सहभाग, इथिओपियामधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये लष्करी निरीक्षक म्हणून केलेली सेवा आणि नियंत्रण रेषेसह ईशान्य भारतात उंचीवरील क्षेत्रात व दहशतवादविरोधी कारवायांमध्ये बजावलेल्या अनेक मोहिमांचा त्यांना अनुभव आहे. ते महार रेजिमेंटचे कर्नल म्हणूनही कार्यरत आहेत. दक्षिण कमांडचे नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी त्यांनी मुख्यालय दक्षिण कमांड येथे चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहिले होते. या पदावर असताना त्यांनी लष्करी क्षमतावृद्धी, दलाची पुनर्रचना आणि एकूणच कार्यसज्जता वाढविण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आर्मी वॉर कॉलेज येथून उच्च कमांड अभ्यासक्रम, तसेच केनियाच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमधून नॅशनल डिफेन्स कोर्स पूर्ण केला आहे. त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक आणि सेना पदक प्रदान करण्यात आले आहे. कमांडची सूत्रे स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी दक्षिण कमांडच्या युद्ध स्मारकावर युद्धात हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांना आदरांजली अर्पण केली आणि मुख्यालय दक्षिण कमांड येथे गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला. त्यांनी वाळवंट क्षेत्र, रण व खाडी प्रदेश, किनारपट्टी, बेटे तसेच अंतर्गत भाग अशा विविध कार्यक्षेत्रांमध्ये परिचालनात्मक सज्जतेवर कमांडचा सातत्याने भर राहील, असे सांगितले. तसेच, संयुक्त कार्यपद्धती अधिक मजबूत करणे, स्वदेशी क्षमताविकास आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले. बदलत्या कार्यात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी व जवानांनी उच्च दर्जाची सज्जता, व्यावसायिकता आणि लढाऊ तत्परता कायम राखावी, असेही त्यांनी नमूद केले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी लोकसहभागातून आरोग्य समृद्ध महाराष्ट्रासाठी गावांना आरोग्य संपन्न करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. ही कार्यशाळा जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. आबीटकर म्हणाले की, 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' हे केवळ एक अभियान नसून ती एक व्यापक लोकचळवळ बनावी, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणे, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामूहिक वर्तणुकीत बदल घडवणे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवणे यावर या मोहिमेत भर दिला जाईल. या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा व तालुका यंत्रणा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेवक, सेविका, आशा आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. एकात्मिक कार्यप्रणाली व पारदर्शक मूल्यांकन प्रणालीच्या आधारे, गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना आरोग्य संपन्न ग्राम म्हणून मानांकन व प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य रुग्णालय येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, आरोग्य विभागाचे प्रधान डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रविंद्रन, शहरी आयुक्त डॉ. सुनील भोकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मारुती नवले आदी उपस्थित होते. मंत्री आबीटकर यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव' अभियान राबविण्याचा आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अभियानाला आजपासून सुरुवात झाली असून, ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासोबतच लोकसहभागातून आरोग्याचा जागर करण्यात येणार आहे. हे केवळ शासकीय अभियान न राहता, व्यापक आरोग्य चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

31 C