भारत-ब्राझीलमध्ये क्रिटिकल मिनरल्स, रेअर अर्थचा करार
५ वर्षांत द्विपक्षीय व्यापार २० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा भारत दौ-यावर आले असून, आज पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान भारत-ब्राझील यांच्यात क्रिटिकल मिनरल्स आणि रेअर अर्थ एलिमेंट्सवर करार झाला. हा करार मजबूत पुरवठा साखळी तयार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. […] The post भारत-ब्राझीलमध्ये क्रिटिकल मिनरल्स, रेअर अर्थचा करार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
९ महिन्यांत ३२ हजार ५०० कोटींची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत ३२,५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांचा रेकॉर्ड पाहिल्यास जप्त केलेल्या जमीन-जुमल्यांमध्ये ८ पटींहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षी अनिल अंबानी समूहावर सर्वांत मोठी कारवाई झाली आहे. या कारवाईत ५६०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. […] The post ९ महिन्यांत ३२ हजार ५०० कोटींची मालमत्ता जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब
सुप्रीम आदेश डावलला, १५ टक्क्यांपर्यंत वाढविला जागतिक कर वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेला वाढीव टॅरिफ बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता. त्यामुळे अनेक देशांवरील कर १० टक्क्यांपर्यंत खाली आला. मात्र, आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर दुस-याच दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक कर १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. हे […] The post ट्रम्प यांचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संतांचे पादुका पूजन, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, पालखीसह शोभायात्रा भक्तांच्या गर्दीने दुमदुमली लातूरनगरी लातूर : प्रतिनिधी श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या सांगतेनिमित्त तसेच श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या सांगतेनिमित्त आणि कैवल्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या ७५० व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या सांगतेनिमित्त लातूर शहरात दि. २१ फेबु्रवारी रोजी संतांच्या पादुकांचे हेलिकॉप्टरने […] The post लातुरात भक्तीचा महामेळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. राम बोरगावकर यांना संगीत शंकर दरबार जीवनगौरव पुरस्कार
लातूर : प्रतिनिधी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कै. सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणा-या ज्येष्ठ कलावंताला ‘संगीत शंकर दरबार जीवन गौरव पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीच्या या मानाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीत तज्ज्ञ तालमणी डॉ. राम बोरगावकर (लातूर) यांची एकमताने […] The post डॉ. राम बोरगावकर यांना संगीत शंकर दरबार जीवनगौरव पुरस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाल मिरचीचा ठसका महागला; सामान्यांना फटका
लातूर : प्रतिनिधी परतीच्या पावसाचा यंदा मिरची उत्पादन पट्टयाला मोठया प्रमाणावर फटका बसला आहे. उत्पादनात प्रचंड घट झाल्याने लाल मिरचीचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अचानक गेल्या दोन आठवड्यांपासून लाल मिरचीची झणझणीत दरवाढ झाली आहे. लातूरच्या बाजारात दरवाढीचा ‘ठसका’ जोरात आहे. लातूर जिल्ह्यामध्ये आंध्र, तेलंगणा व कर्नाटकातील लाल मिरचीला मोठी मागणी आहे. दरवर्षी लाल […] The post लाल मिरचीचा ठसका महागला; सामान्यांना फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विधिमंडळांसाठी 'राष्ट्रीय विधिमंडळ निर्देशांक' असावा, ज्यामुळे प्रत्येक राज्यातील कामगिरी पारदर्शकपणे जनतेसमोर येईल, असे मत दिल्ली विधानसभेचे सभापती विजेंदर गुप्ता यांनी व्यक्त केले. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५व्या 'भारतीय छात्र संसदे'च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गुप्ता म्हणाले की, संसदेत जाताना कुठल्याही पक्षाचे नाही, तर जनसामान्यांचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे संसदेचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. येथे विवेक, संयम, तर्क-वितर्क आणि समस्यांच्या मुद्द्यांवर खेळ भावनेने चर्चा व्हावी. संसदेत संवाद, संस्कृती बळकट करण्यासाठी विधायक चर्चा आणि परस्पर आदर-सन्मान आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह, वरिष्ठ पत्रकार व लेखक पद्मश्री राजदीप सरदेसाई आणि जर्मनीच्या हॅम्बुर्ग येथील हवामान बदल व्यवस्थापनाचे प्रा. वॉल्टर लील फिल्हो यांचा समावेश होता. भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस आणि विद्यार्थी प्रतिनिधी सुमित खैरे, पायल झा, निखिल मिश्रा, अक्षिता सक्सेना हेही यावेळी उपस्थित होते. विजेंदर गुप्ता यांनी राजकारण आणि खेळ हे एकाच नाण्याचे दोन पैलू असल्याचे सांगितले. देशाचा विकास, परंपरा आणि भविष्य निर्मितीवर संसदेत चर्चा व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. गुप्ता पुढे म्हणाले की, लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि येथे झालेले समाधान संपूर्ण समाजासाठी असते. दुर्दैवाने आज राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. माध्यमांचीही जबाबदारी आहे की त्यांनी केवळ गोंधळ दाखवण्याऐवजी मुद्द्यांवरील चर्चेला प्राधान्य द्यावे. यावेळी दिग्विजय सिंह यांनी राजकारणात ५६ इंच छाती नाही, तर गरीब आणि पीडित लोकांची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. राष्ट्रवाद म्हणजे द्वेष नव्हे, असे स्पष्ट करत ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी द्वेषाचे राजकारण केले नाही. सध्याचे राजकारण द्वेषाचे आणि शत्रुत्वाचे बनले आहे. राजकारणात खेळाडू वृत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत, धर्म आणि जात नंतर येते. कोणालाही देशद्रोही किंवा देशभक्त ठरवण्याचा अधिकार नाही. लोकशाही सक्षम करण्यासाठी आपल्याला संविधान वाचविण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवजयंतीदिनी देशिकेंद्रच्या विद्यार्थ्यांचा १२ तास अभ्यास
लातूर : प्रतिनिधी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचलित येथील श्री देशिकेंद्र विद्यालयात शिवजयंती उत्साहात व अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सलग १२ तास अभ्यास करून शिवजन्मोत्सव साजरा केला व छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. हा उपक्रम विद्यालयचे गणित शिक्षक तथा स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक सदाशिव अभंगे यांनी राबविला. ८ वी […] The post शिवजयंतीदिनी देशिकेंद्रच्या विद्यार्थ्यांचा १२ तास अभ्यास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती येथील ज्येष्ठ विधीज्ञ ज्ञानेश्वरराव बाबरेकर यांना मरणोत्तर 'विधी महर्षी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड. बाबरेकर यांचे पुत्र माजी जिल्हा सत्र न्यायाधीश अशोक बाबरेकर, अधिवक्ता संजय बाबरेकर, प्रकाश बाबरेकर आणि कन्या कांचन थेटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार मुंबईत 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अधिवक्ता प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रा'च्या उद्घाटन समारंभात वितरित करण्यात आला. कायदे क्षेत्रातील शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने हे केंद्र उभारण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर होते. तसेच, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सन्मानाबद्दल विधी क्षेत्रातील अनेकांनी बाबरेकर कुटुंबीयांचे अभिनंदन केले. ॲड. ज्ञानेश्वर बाबरेकर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ वकील होते. त्यांचा जन्म चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथील एका शेतकरी कुटुंबात झाला होता. कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीशिवाय त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर वकिली क्षेत्रात मोठे नाव कमावले. त्यांनी आपल्या वकिलीची सुरुवात अचलपूर येथून केली. १९८२ ते १५ जून २००५ पर्यंत त्यांनी अमरावती येथे वकिली केली. दिवाणी, फौजदारी, सहकार, कामगार, महसूल आणि भाडेकरू अशा कायद्याच्या सर्व शाखांमध्ये त्यांचा दांडगा अभ्यास होता. १९६७ ते १९७२ या काळात त्यांनी अमरावती जिल्हा परिषदेच्या विधीज्ञ पॅनलचे सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच, १९६७ ते १९७२ दरम्यान नागपूर विद्यापीठाचे आणि १९८९ ते १९९४ दरम्यान अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. १९७४ ते १९७९ या काळात त्यांनी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष म्हणून आणि १९७० ते १९७९ दरम्यान अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली.
श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थिनींना माजी विद्यार्थी संघटनेचा मदतीचा हात
लातूर : प्रतिनिधी येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयातील बी. ए. प्रथम वर्षात शिकणा-या पायल म्हस्के आणि पलक म्हस्के या दोन गरजू विद्यार्थिनींना महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने मदतीचा हात दिला आहे. या विद्यार्थिनींना मुरूड अकोला ते लातूर अशा बस प्रवासासाठी मासिक सवलत पासची आर्थिक मदत करण्यात आली. ग्रामीण भागातून येणा-या आणि शिक्षणाची जिद्द उराशी बाळगणा-या […] The post श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थिनींना माजी विद्यार्थी संघटनेचा मदतीचा हात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत रविवार, २२ फेब्रुवारी रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण २२५ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, सुमारे २९ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. इयत्ता ५ वी साठी जिल्ह्यात १३४ केंद्रे निर्धारित करण्यात आली आहेत, जिथे १८,४४७ परीक्षार्थी परीक्षा देतील. त्याचप्रमाणे, इयत्ता ८ वी साठी ९१ परीक्षा केंद्रे असून, तेथे १०,५५१ परीक्षार्थी आपली क्षमता सिद्ध करतील. अशाप्रकारे, संपूर्ण जिल्ह्यात एकूण २२५ केंद्रांवर ही परीक्षा पार पडत आहे. परीक्षेच्या पारदर्शक आणि सुरळीत संचालनासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्र संचालक याप्रमाणे एकूण २२५ संचालक नेमण्यात आले आहेत. तसेच, परीक्षेच्या संचालनासाठी एकूण १ हजार ४३९ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हा स्तरावर २ भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र एक पथक कार्यान्वित केले आहे.
अंबुलगा साखर कारखान्याचा विस्तार होणार
निलंगा : प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील अंबुलगा (बु.) येथील डॉ. शिवाजीराव निलंगेकर सहकारी साखर कारखाना (लिज: ओंकार साखर कारखाना प्रा. लि.) च्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कारखान्याची गाळप क्षमता आता दुप्पट होणार असून, नवीन १५० केएलपीडी डिस्टिलरी प्रकल्पालाही मंजुरी मिळाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार संभाजीराव पाटील […] The post अंबुलगा साखर कारखान्याचा विस्तार होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींवर आता सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सरपंचांसोबतच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनाही दिलासा मिळाला आहे. याबाबतचे रितसर आदेश सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जारी केले जातील. यापूर्वी, राज्य शासनाने गेल्या आठवड्यात या ग्रामपंचायतींवर पंचायत, कृषी व इतर विभागांच्या विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र, राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघ आणि इतर काही सरपंच संघटनांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेची तातडीने दखल घेऊन शासनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली होती, ज्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेले प्रशासक नियुक्तीचे आदेश आपोआप रद्द झाले. त्यानंतर, १७ फेब्रुवारी रोजी न्या. अनिल किलोर व न्या. राज वाकोडे यांच्या द्विसदस्यीय न्यायासनासमोर या याचिकेची सुनावणी झाली. पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार असतानाच, शासनाने ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केला. त्यानंतर, आज, शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी सरपंचांनाच सहा महिने किंवा निवडणुका होईपर्यंत (यापैकी जे आधी येईल ते) प्रशासक म्हणून नेमण्याचा आदेश जारी केला. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला आहे, परंतु प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत, तेथे सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त केले जाईल. तसेच, ग्रामपंचायतींचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती तयार करावी, असेही या अधिसूचनेत नमूद आहे. सरपंच संघटनांच्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. या संदर्भात धामणगाव रेल्वे तालुक्यातील मुकुंद माहुरे यांनी याचिका दाखल केली होती, ज्यांच्या वतीने ॲड. निलेश गावंडे यांनी युक्तिवाद केला. राज्य शासनाची बाजू अतिरिक्त शासकीय वकील ॲड. डी.पी. ठाकरे यांनी मांडली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या (१९५९ चा ३) कलम १५१ च्या उप-कलम (१) च्या खंड (अ) मधील दुसऱ्या परंतुकानुसार, प्रशासक नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत.
मुला-मुलींनो सोशल मीडियापासून लांब रहा
भेटा : : प्रतिनिधी आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवून चला. तसेच मुला-मुलींनी मोबाईल, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मिडीयापासून लांब रहा मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने करा, अशी भावनिक साद वसंत हंकारे यांनी […] The post मुला-मुलींनो सोशल मीडियापासून लांब रहा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती विद्यापीठाच्या 67 पदकांवर मुलींचे वर्चस्व:दीक्षांत समारंभात 85 विद्यार्थ्यांना मिळणार सन्मान
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एकूण ८५ विद्यार्थ्यांना विविध पदके व पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. विशेष म्हणजे, यापैकी ६७ पदकांवर मुलींनी हक्क मिळवला असून, केवळ १८ पदके मुलांना मिळाली आहेत. पहिल्या तीन क्रमांकांवरही मुलींनीच बाजी मारली आहे. सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या समारंभाविषयी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमात एकूण १२२ सुवर्ण, २२ रौप्य आणि २४ रोख पारितोषिकांचे वितरण केले जाईल. भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते हे सन्मान प्रदान केले जातील. कुलगुरू डॉ. बारहाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित राहतील. यावर्षी नेर परसोपंत येथील निकीता पुनसे हिने ६ सुवर्ण आणि एका रोख पारितोषिकासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. वाशिमच्या पल्लवी राठोड हिने ५ सुवर्ण आणि एक रौप्य पारितोषिक मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले. विद्याभारतीची साईश्वरी इंदुरकर आणि शेगावची तेजस्वीनी भगत या दोघींनी प्रत्येकी चार सुवर्ण पदके मिळवून तिसरा क्रमांक पटकावला आहे. याशिवाय, पाच सुवर्ण, एक रौप्य आणि एक रोख पारितोषिक अशा एकूण ७ पदकांसाठी यावर्षी कोणीही पात्र ठरले नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या दीक्षांत समारंभाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री आणि दिवंगत खासदार व राज्यपाल दादासाहेब गवई यांच्या पत्नी डॉ. कमलताई गवई यांना 'वाङ्मय पंडित' (डी.लिट) हा विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान प्रदान केला जाईल.
अद्वय हिरेंसाठी आम्ही रक्त का आटवायचे?:खटला आता भाजपचा, संजय राऊत यांचा अतुल भातखळकरांवर पलटवार
राजकीय वर्तुळात अत्यंत गाजलेला मंत्री दादा भुसे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यातील १७८ कोटींच्या कथित घोटाळ्याचा कायदेशीर लढा अखेर संपुष्टात आला आहे. मालेगाव न्यायालयात राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर दादा भुसे यांनी आपला मानहानीचा खटला मागे घेतला. मात्र, या प्रकरणावरून भाजपने केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी, आरोप करणाराच आता भाजपमध्ये असल्याने आम्ही कशाला रक्त आटवायचे? असा खोचक टोला लगावला आहे. २२ जून २०२५ रोजी 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे हा वाद पेटला होता. गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअर्समध्ये १७८ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी तत्कालीन कृषीमंत्री दादा भुसे यांच्यावर केला होता. हे आरोप अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आले होते. याप्रकरणी भुसे यांनी राऊतांविरुद्ध मालेगाव न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत यांनी न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. या आरोपांमध्ये कोणतीही सत्यता नसल्याचे निदर्शनास आल्याने राऊतांनी माफी मागितली. राऊतांच्या या भूमिकेनंतर आणि त्यांनी दाखवलेल्या दिलगिरीनंतर दादा भुसे यांनी सामोपचाराने हा खटला मागे घेण्याची विनंती केली, जी न्यायालयाने मान्य केली. या घडामोडीनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी, माफी मागून आनंदी झालेला जगातला पहिला माणूस, अशा शब्दांत राऊतांना डिवचले. यावर संजय राऊतांनी सोशल मीडियावरून पलटवार केला. नेमके काय म्हणाले संजय राऊत? अतुल जी, माणसाने पाप केले नसेल तर तो नेहमीच आनंदी राहील, असे संजय राऊत म्हणाले. दादाजी भुसे यांच्यावर मूळ आरोप अद्वय हिरे यांचे होते. त्यांनी गिरणा कारखान्यातील व्यवहाराबाबत आधीच खटला दाखल केला आहे. हिरे यांनी आता भाजपात प्रवेश केल्या मुळे हा खटला चालवण्याची जबाबदारी भाजपची आहे. आम्ही का रक्त आटवायचे? आम्ही या खटल्यातून आनंदाने आणि हसत हसत बाहेर पडलो आहोत समजलं? असा टोलाही संजय राऊत यांनी अतुल भातखळकर यांना लगावला. प्रवासाचे कारण आणि राजकीय सोय संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लांबचा प्रवास जमत नसल्याचेही न्यायालयात नमूद केले होते. दुसरीकडे, ज्या अद्वय हिरे यांच्या माहितीवरून हा सर्व गदारोळ झाला, तेच आता भाजपमध्ये गेल्याने या खटल्याला राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व उरले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच 'समजूतदारपणा' दाखवत दोन्ही नेत्यांनी हा कायदेशीर लढा संपवण्यावर शिक्कामोर्तब केले.
महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी भेट घेतली. यावेळी तिघांची कमराबंद चर्चा झाल्याने जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा लवकरच सुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत महायुतीचीच सत्ता, असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं आहे. त्यामुळे भाजपला सोबत घेतले जाणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी मित्र पक्षांना टार्गेट केले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात तर भाजप नेत्यांनी टोकाची टीका केल्याने शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नाराज आहेत. निकालात भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. तरी देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचे सांगत आव्हान देत आहेत. मंत्री देसाई-पाटलांचा जयकुमार गोरेंवर रोष साताऱ्यात निर्माण झालेल्या सत्ता संघर्षात भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र समंजस्यपणा दाखवला. परंतु, मंत्री जयकुमार गोरे अजूनही आव्हानाचीच भाषा करत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती एकनाथ शिंदेंना दिली. तसेच भाजपला सत्तेत बरोबर घेण्यास शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांचा विरोधच आहे. दोन्ही नेत्यांचा रोष हा मंत्री गोरे यांच्यावरच आहे. सातारा जिल्हा परिषदेतील बलाबल जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपला २७, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, शिवसेनेला १५ जागा, राष्ट्रीय काँग्रेसला १, स्वाभिमानी शेतकरी संघटना (राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत) १ आणि अपक्ष १, अशा जागा मिळाल्या. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारा ३३ हा आकडा कुणालाच गाठता आला नाही. सत्ता स्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या सदस्यांची कायदेशीर गटनोंदणी केली. काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सहयोगी गट म्हणून पाठिंबा दिला आहे. गट नोंदणी नंतर दोन्ही पक्षांचे सदस्य टूरवर गेले आहेत.
शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन अत्यंत चालाकीने चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही टोळी दर अर्ध्या तासाला कपडे बदलून पुन्हा गर्दीत मिसळत असे. या कारवाईत दोन महिला, एक पुरुष आणि एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. काही दिवसांपूर्वी एका भाविकाची पर्स गर्दीत ब्लेडने कापून चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती. यानंतर पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासादरम्यान काही महिला आणि पुरुष संशयास्पदरीत्या हालचाली करताना दिसले. धक्कादायक बाब म्हणजे, हे संशयित काही वेळाने कपडे बदलून पुन्हा त्याच भागात वावरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. तिघांना अटक, एक आरोपी फरार टोळीतील महिलांनी सुरुवातीला पंजाबी ड्रेस परिधान केला होता, मात्र अवघ्या काही वेळातच त्यांनी साड्या नेसून पुन्हा गर्दीत प्रवेश केला. हे वेशांतर पोलीस आणि सुरक्षारक्षकांना चकवा देण्यासाठीच होते. पोलिसांनी या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झटापटीत एक पुरुष आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला, तर इतर तिघांना पोलिसांनी अटक केली. १० महागडे मोबाईल, रोख रक्कत जप्त झडती दरम्यान आरोपींकडून १० महागड्या कंपन्यांचे मोबाईल, रोख १ हजार १७० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय पर्स कापण्यासाठी वापरले जाणारे टोकदार ब्लेड्स आणि कटर पोलिसांनी हस्तगत केले. या टोळीसोबत असलेल्या एका अल्पवयीन बालकाला देखील ताब्यात घेण्यात आले असून, त्याला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे. शिर्डी पोलिसांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. गेल्या काही दिवसांपासून परप्रांतीय भिक्षेकऱ्यांचा प्रश्न गंभीर असतानाच, आता परप्रांतीय चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वेशांतर करून चोरी करण्याची ही 'प्रोफेशनल' पद्धत पाहून पोलीसही अचंबित झाले आहेत. मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे आणि अशा टोळ्यांना आळा घालण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. हे ही वाचा… राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीत दावे-प्रतिदावे:शरद पवारांनाच संसदेत पाठवायची अजितदादांची इच्छा होती, रोहित पवारांचा खुलासा देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक खुलासा केला. अजितदादांना शरद पवारांनीच राज्यसभेवर जावे अशी इच्छा होती, असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा खोडून काढला आहे. सविस्तर वाचा…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सुमारे १० हजार कोटी रुपयांचा महा-घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट द्वारे केला आहे. राज्य सरकारने सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX या कंपन्यांनी कथितरित्या बनावट बँक गॅरंटी देऊन कंत्राटे मिळवली आहे . महावितरणमधील काही अधिकारी आणि संबंधित कंपन्यांचे संचालक दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू यांच्या संगनमताने हा प्रकार घडला आहे का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला आहे. सदरील प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) पाच गुन्हे दाखल होणे राज्यासाठी नामुष्कीचे असून शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार पाडला जात असल्याचा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व नुकसानीची भरपाई वसूल करण्यात यावी. तसेच अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणाऱ्या मंत्र्यांच्या संभाव्य सहभाग असल्याची शक्यता सुद्धा दानवे यांनी वर्तवून चौकशीची मागणी केली आहे. हे ही वाचा… अनधिकृत होर्डिंग काढताना मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू:33 केव्ही वीजतारेचा शॉक लागून अंत, संभाजीनगरातील घटना;VIDEO छत्रपती संभाजीनगर शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या एका २७ वर्षीय कर्मचाऱ्यावर आज काळाने घाला घातला. मुकुंदवाडी परिसरात कारवाई दरम्यान लोखंडी होर्डिंगचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने एका तरुण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सविस्तर वाचा… नागपुरात बारावीचा पेपर फुटला:परीक्षेच्या तासाभराआधीच व्हॉट्सॲपवर केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका, खासगी शिकवणीतील शिक्षकावर संशय राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेचे 'केमिस्ट्री' आणि 'फिजिक्स'चे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
खेड जवळील प्रतापसिंहनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादावादीच्या रागातून एका १७ वर्षीय युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आश्रूबा दत्ता गायकवाड (वय १७) असे मृत युवकाचे नाव असून, शनिवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, हा मृत्यू आत्महत्या नसून मारहाण करून केलेला खून असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, आश्रूबा गायकवाड (रा. प्रतापसिंहनगर, खेड) याचे परिसरातील एका गटाशी वादावादी झाली होती. त्यानंतर आश्रूबा हा नैराश्य अवस्थेत होता. दरम्यान शुक्रवारी (दि. २०) रात्री तो अचानक बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. त्यावेळी त्याचे काही नातेवाईक सातारा पोलिसांत त्याबाबत तक्रार देण्यास गेले होते. शुक्रवारी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास तो परिसरात असल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस व नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तो तेथील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत उपस्थितांना आढळून आला. त्यानंतर उपस्थित नातेवाईक, नागरिक व पोलिसांनी त्याला तातडीने सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शनिवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात समजताच काही काळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृत युवकाच्या नातेवाईकांनी आश्रूबा याला मारहाण करणाऱ्या युवकांच्या टोळीनेच त्याचा खून केला असल्याचा आरोप केला आहे. तर आश्रूबा गायकवाड याने नैराश्येतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे आणि शनिवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, वादावादीच्या घटनेच्या अनुषंगाने पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत असून रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्याचे काम सातारा पोलिसांत सुरू होते. त्यामुळे अधिकची अधिकृत माहिती समजू शकली नाही. मात्र, या घटनेमुळे शनिवारी शहर व परिसरात एकच खळबळ उडाली होती.
शिवजयंतीचे औचित्य साधून वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीत फुलोरा निर्मित 'घरोघरी हवाच शिवबा' या प्रेरणादायी गीताचे नुकतेच दिमाखदार विमोचन करण्यात आले. वाकड येथील वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटीच्या शिवजयंती उत्सवात हा सोहळा पार पडला. प्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहचावेत, हा या गीताचा मुख्य उद्देश आहे. “दान मागते आयाबायांनो, देशासाठी पुन्हा एकदा… घरोघरी हवाच शिवबा, पुन्हा नव्याने पुन्हा एकदा…” या ओळींनी सजलेले हे प्रेरणादायी गीत कवी शब्दाभिषेकी श्याम खांबेकर यांनी लिहिले आहे. अभय–अर्पिता यांनी संगीतबद्ध केले असून अथर्व यांनी संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळली आहे. गायन अर्पिता आणि भाग्यदा यांनी केले आहे. मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण विक्रम कुलकर्णी, सुगंधाताई शिरवळकर, आनंद दीक्षित, राहुल वाळंके, सचिन बोर्डे आणि पूनम पाटील यांच्या हस्ते गीताचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गीताचे सादरीकरणही करण्यात आले. तालबद्ध शब्द आणि संगीताच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित शिवप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांचा सहभाग स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीचे विद्यार्थी ओंकार, योगेंद्र, कृतिका, श्रिया, मिताली, अमेय, आरती, कल्पा, पुष्पलता, मीनल, ऋतुजा, वैष्णवी आणि राकेश यांनी सहगायनातून कार्यक्रमात रंग भरला. वेस्टर्न एव्हेन्यू सोसायटीचे सुशील घारे, संतोष मोरे, नवनाथ पवार, सुधाकर दिवाण, सुमित काळे आणि प्रदीपकुमार गडगे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘शिवविचार घराघरात’चा संदेश या गीतातून प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचे विचार रुजले पाहिजेत, असा संदेश देण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी हे गीत काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करत निर्मितीबद्दल समाधान व्यक्त केले. शिवाजी महाराजांचे विचार शब्द आणि संगीताच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘घरोघरी हवाच शिवबा’ हे गीत ‘geetfulora’ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असून सर्वांनी ते ऐकावे, असे आवाहन संगीतकार–गायक अभयार्पिता यांनी केले.
राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये लवकरच इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शनिवारी केली. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनासाठी व्यासपीठ मिळावे, हा यामागील उद्देश आहे. डॉ. देवळाणकर हे इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे आयोजित 'इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.०' च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, एआयएसएसएमएस आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने यांच्यासह टेकॅथॉन २.० चे विजेते गणेश खोसे, तेजस यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वर्षीच्या 'इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.०' मध्ये ४५० संघांमधील १७०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. हे स्पर्धक पुढील २४ तास नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्य करतील. या स्पर्धेला एआयएसएसएमएस आयओआयटीने सहकार्य केले आहे. डॉ. देवळाणकर यांनी यावेळी सांगितले की, त्यांच्या शिक्षणकाळात अशा व्यासपीठांची कमतरता होती, ज्यामुळे नावीन्यपूर्ण संकल्पनांना पुढे आणता आले नाही. 'इनोव्हेशन फाउंडेशन'चा टेकॅथॉन हा उपक्रम विद्यार्थ्यांना कल्पना मांडण्यासाठी उत्तम व्यासपीठ देत आहे, ज्यामुळे समाजाभिमुख संशोधक घडत आहेत. ते म्हणाले की, टेकॅथॉन किंवा हॅकेथॉनमध्ये प्रामुख्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी सहभागी होतात, तर पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कमी संधी मिळते. ही तफावत दूर करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवले जात आहे, जे आंतरविद्याशाखीय शिक्षणाची संधी देते. याच दिशेने पुढे जात, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅब लवकरच सुरू होतील. पहिल्या टप्प्यात, उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या ११३२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये या लॅबची निर्मिती केली जाईल. त्यानंतर विनाअनुदानित महाविद्यालयांनाही अशा लॅब स्थापन करण्यासाठी मदत केली जाईल. यावेळी बोलताना इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले की, पहिल्या 'इनोव्हेट यू टेकॅथॉन'मध्ये विविध राज्यांतील २३० संघ सहभागी झाले होते, तर आता हा आकडा ४५० संघांपर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थी चळवळीत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासोबतच ते सोडवण्याचे काम आम्ही करतो, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कशी विकसित होईल आणि ते नोकरी देणारे कसे बनतील, यावर विचार करणे महत्त्वाचे आहे. हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून, त्यातून नाविन्यपूर्ण संशोधक आणि उद्योजक घडवण्याचा उद्देश आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले. डॉ. माने म्हणाले की, टेकॅथॉन ३.० ही राज्यातील क्रमांक एकची स्पर्धा असून, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन सहभागी झाले आहे. आपल्याला विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास न्यायचे असेल, तर त्यासाठी सामाजिक समस्या सोडविणारे संशोधक हवे आहेत. या स्पर्धेतून विकसित भारताची संकल्पना होण्यास हातभार लागणार आहे. खोसे म्हणाले की, गेल्यावर्षीच्या टेकॅथॉन २.० मध्ये आम्हाला व्यासपीठ मिळाले. यातून आम्ही ॲक्वाड्रो प्रकल्पाच्या अंतर्गत पाण्यावर चालणारी दुचाकी विकसित करण्याची संकल्पना यशस्वीपणे मांडली आणि आता ती पूर्णत्वास नेण्याचे प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला इनोव्हेशन फाउंडेशन आणि सरकारचे सहकार्य लाभले. त्यामुळे वर्षभरात आम्हाला १ कोटींपेक्षा व्यवसाय करता आला आहे. सूत्रसंचालन बालुशा माने यांनी केले. इनोव्हेट यू टेकॅथॉन हा उपक्रम राज्य पातळीवर इनोव्हेट यू टेकॅथॉन हा उपक्रम राज्य पातळीवर नेण्याची गरज आहे त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विभागीय स्तरावर अशा पद्धतीची स्पर्धा घेण्यात येईल. त्यातून निवडलेल्या चांगल्या संकल्पना आणि विजेत्यांना पुण्यात बोलवून सादरीकरणाची संधी मिळेल. त्यासाठी उच्च व त्यांचे शिक्षण विभागाचे इनोव्हेशन फाउंडेशनला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिले.
पुण्यातील गुलटेकडी परिसरात अल्पवयीन मुलांनी देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करत दहशत माजवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. मीनाताई ठाकरे वसाहत परिसरात २० फेब्रुवारी रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास चार अल्पवयीन दुचाकीवरून आले. त्यांनी नागरिकांना 'आम्ही या भागातील भाई आहोत, येथे आमचीच चालणार. या भागात राहायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल,' असे धमकावले. यावेळी त्यांनी त्यांच्याकडील पिस्तूल उगारून दहशत निर्माण केली. नागरिकांना शिवीगाळ करत त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला आणि शस्त्राचा धाक दाखवला. या घटनेनंतर अल्पवयीन मुले दुचाकीवरून पसार झाली. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आणि पसार झालेल्या चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ‘एपीके फाईल’ पाठवून साडेसहा लाखांची फसवणूक वाहतूक नियमभंगाचे चलन, तसेच बँकेच्या नावे बनावट कागदपत्रे एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांनी दोघांची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी आणि मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रांतवाडी भागातील एका तक्रारदाराची सायबर चोरट्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात आलेल्या कारवाईचे बनावट दंडात्मक चलन पाठवून तीन लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात तीन जानेवारी रोजी दंडात्मक कारवाईचे बनावट चलन तक्रारदाराला पाठविले होते. हे चलन एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात आले होते. ही फाईल उघडताच चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून तीन लाख ६४ हजार रुपयांची रोकड स्वत:च्या खात्यात वळविली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रा दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावर कात्रज भागात भरधाव डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परिमा हेमंत प्रधान (वय ३८, रा. थ्री ज्वेलस सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अभिषक निगडे (वय ३५, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डंपर चालक संजय प्रभाकर जाधव (वय २८, रा. मानकर चौक, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे यांच्या नातेवाईक परिमा प्रधान पुणे-सातारा रस्त्यावरून जात होत्या. कात्रज चौकातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातानंतर डंपरचालक याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही डंपर, ट्रक आणि सिमेंट मिक्सरसारखी जड वाहने पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. भरधाव वेग आणि बेदरकारपणामुळे अशा गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामुळे वाहतूक नियमांचे पालन न करण्याचे गंभीर परिणाम समोर येत आहेत.
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेत 'ज्ञानसागर' प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्राचीन इतिहासाच्या दस्तऐवज, साहित्य आणि स्मारकांच्या संरक्षण व संवर्धनाची गरज अधोरेखित केली. भांडारकरसारख्या संस्था या कामात वर्षानुवर्षे कार्यरत असून, त्यांना सरकारसोबतच समाजाच्या दातृत्वाचीही आवश्यकता असल्याचे महापौर नागपुरे म्हणाल्या. त्यांच्या हस्ते महाभारत-सांस्कृतिक सूची या संशोधन प्रकल्पातील 'भीम' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. महापौर मंजुषा नागपुरे यांनी जुन्या गोष्टींचे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात अधिक संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. अशा प्रदर्शनांमुळे तरुण संशोधकांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे त्या म्हणाल्या. भांडारकर संस्थेच्या पुढील कार्यासाठी पुणे महानगरपालिका सर्वतोपरी सहाय्य करेल, तसेच राज्य व केंद्र सरकारकडेही पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी खेलरत्न पुरस्कार विजेत्या ऑलिंपिकपटू नेमबाज अंजली भागवत यांनी भांडारकर संस्थेचे कार्य गौरवले. जगातील सर्वात मोठे भांडार असलेली तिजोरी म्हणजे ही संस्था असून, तिच्याकडील प्राचीन साठा बहुमूल्य आहे. तो समाजाला दिसावा यासाठी 'ज्ञानसागर' प्रदर्शन स्तुत्य उपक्रम असल्याचे भागवत म्हणाल्या. संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी सांगितले की, गेली १०८ वर्षे संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या भांडारकर संस्थेच्या कार्यात तरुणांचा सहभाग वाढायला हवा. भारताचा अलौकिक प्राचीन इतिहास सर्वांनी अभ्यासावा यासाठी संस्था चिकाटीने काम करत आहे. 'ज्ञानसागर' प्रदर्शनात संस्थेच्या संग्रहातील महत्त्वाची हस्तलिखिते, ग्रंथ, मौल्यवान वस्तू आणि संशोधन प्रकल्प यांचा समावेश आहे. हे प्रदर्शन भांडारकर संस्थेत येत्या सोमवारपर्यंत (२३ फेब्रुवारी) सर्वांसाठी खुले राहील. या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्मिता लेले, संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, विश्वस्त प्रदीप रावत उपस्थित होते. संस्थेच्या नियामक परिषदेचे सदस्य व प्रदर्शनाचे समन्वयक मनोज एरंडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संतोष रासकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे निबंधक श्रीनन्द बापट यांनी केले.
हिंगोली शहरातील नवा मोंढा भागातील अर्बन महिला क्रेडीट सोसायटीच्या फसवणूक प्रकरणात पोलिस विभागाने ठेवीदारांकडून आवश्यक कागदपत्रे मागवली आहेत. खातेदारांनी आवश्यक कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे. त्यामुळे अनेक ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नवा मोंढा भागात अर्बन महिला अर्बन क्रेडीट सोसायटीच्या संचालक मंडळ व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना जादा व्याजदराचे अमिष दाखवत ठेवी ठेऊन घेतल्या होत्या. मात्र या ठेवीची मुदत संपल्यानंतरही ग्राहकांना ठेवी परत देण्यात आल्या नाहीत. या प्रकरणी काही ग्राहकांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. या नंतर विशेष लेखा परिक्षण कार्यालयाकडून लेखा परिक्षण करून घेण्यात आले होते. यामध्ये ता. १ एप्रील २०२० ते ता. ३१ मार्च २०२४ या कालावधीत संचालक मंडळाने कट करून ठेवीदार ग्राहकांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली होती. यावरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात संस्थेच्या संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ता. १९ ऑगस्ट २०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणाचा तपास आर्थिक गुुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे यांच्या पथकाने अधिक तपास केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ठेवीदारांमधून एकच खळबळ उडाली होती. आता ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. दररोज पैसे जमा करणाऱ्या खातेदारांनी पिग्मी एजंटांशी संपर्क साधून पैसे परत देण्याची मागणी चालवली होती. त्यामुळे पिग्मी एजंट देखील अडचणीत सापडले होते. दरम्यान, या संदर्भात पोलिस विभागाने खातेदारांकडून माहिती मागवली आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्ज उपलब्ध करून दिला जाणार असून त्याच्या सोबत ठेवीच्या पावत्या, बचत खात्याचे पासबुक, आरडी पासबुक, पिग्मी पासबुक किंवा इतर ठेवीच्या दस्ताची झेरॉक्स तसेच स्वतःचे आधारकार्ड, पॅनकार्डची झेरॉक्स, परतफेडीची रक्कम ज्या बँक खात्यात जमा करायची आहे त्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आर्थिक गुुन्हे शाखेकडे सादर करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे. दरम्यान, पोलिस विभागाकडून आता कागदपत्रे मागविण्यात आल्यामुळे ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी परत मिळण्या्च्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे शनिवार, २१ फेब्रुवारी रोजी ‘कृष्ण शृंगार, फ्लॉवर्स ऑफ द कदंबा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काव्य, संगीत आणि नृत्य यांच्या सुरेल संगमाने साकारलेल्या या संध्याकाळी कला रसिक, अभ्यासक आणि संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रख्यात लेखक व कला इतिहास अभ्यासक हर्षा व्ही. दहेजिया यांच्या फ्लॉवर्स ऑफ द कदंबा या काव्यसंग्रहावर आधारित या कार्यक्रमात कृष्ण शृंगाराची भावमय अनुभूती साकारण्यात आली. हा केवळ प्रेमकथांचा आलेख नसून प्रेमातून आत्मज्ञानाकडे नेणारा काव्यमय प्रवास असल्याचे या सादरीकरणातून अधोरेखित झाले. ओडिसी नृत्यांगना प्राची जरीवाला यांचे मोहक नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं. त्यांच्या भावपूर्ण अभिनयाने आणि नृत्यभंगिमांनी शृंगार रसाची सुंदर अभिव्यक्ती साकारली. प्रतिक शाह आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक अशीत देसाई यांच्या सुरेल संगीतरचनांनी कार्यक्रमाला भावस्पर्शी रंग दिला. पूर्वी आनंद, मनोज देसाई आणि गर्गी वोरा यांच्या मधुर गाण्यांनी वातावरण अधिकच भारावून गेले. ‘भागवत पुराणातील “माझी उपासना विधी-विधाने नव्हे, तर गीत आणि नृत्याने करा” या संदेशाला अनुसरून साकारलेला हा कार्यक्रम प्रेम, भक्ती आणि आत्मचिंतनाचा सुरेल उत्सव ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या सादरीकरणाचा आनंद घेतला. कला आणि अध्यात्म यांचा संगम अनुभवणारी ही संध्या अनेकांच्या स्मरणात राहील अशा रसिकांच्या भावना होत्या.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना होणारा विलंब आणि प्रशासकीय कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपत आहे, अशा ठिकाणी आता बाहेरचा कोणताही सरकारी अधिकारी प्रशासक म्हणून येणार नाही. त्याऐवजी, तेथील विद्यमान सरपंचालाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत. निवडणूक प्रक्रियेला विविध कारणांमुळे विलंब होत असल्याने ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय पोकळी निर्माण होण्याची शक्यता होती. आतापर्यंत सरकारी अधिकाऱ्यांकडे प्रशासक पद दिल्याने स्थानिक प्रश्नांची जाण नसल्यामुळे विकासकामे ठप्प होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. नव्या निर्णयामुळे गावातील कामकाजात सातत्य राहणार असून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. नव्या निर्णयाचे स्वरूप कसे असेल? ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार खालील महत्त्वाचे बदल होतील. निवडणुकीपर्यंत स्थानिक नेतृत्वाला बळ हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुका लांबणीवर पडल्या तरी गावची सत्ता विद्यमान लोकप्रतिनिधींच्याच हातात राहणार असल्याने ग्रामीण भागात या निर्णयाचे स्वागत होत आहे. प्रशासकाचा कालावधी किती? प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कालावधी त्यांच्या नेमणुकीपासून सहा महिने किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक पूर्ण होईपर्यंत, जे आधी होईल तेवढा राहणार आहे. हा तात्पुरता उपाय असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होताच नियमित निवडून आलेले पदाधिकारी कारभार स्वीकारतील. ग्रामीण भागातून संमिश्र प्रतिक्रिया एकीकडे सरपंचांना प्रशासकीय अधिकार मिळाल्याने स्थानिक नेतृत्वाला बळ मिळणार असले, तरी दुसरीकडे निवडणुका लवकर घेऊन लोकशाही प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणीही विरोधी पक्ष आणि काही सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे होणारा गोंधळ आता थांबणार असल्याने गावपातळीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा सक्रिय झाले आहे. हे ही वाचा… नागपुरात बारावीचा पेपर फुटला:परीक्षेच्या तासाभराआधीच व्हॉट्सॲपवर केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका, खासगी शिकवणीतील शिक्षकावर संशय राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये बारावीच्या बोर्ड परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर विज्ञान शाखेचे 'केमिस्ट्री' आणि 'फिजिक्स'चे पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीतर्फे वेशभूषा, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, पोवाडा, मशाल रॅली अशा विविध उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव गुरुवारी (१९ फेब्रुवारी) उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट होते. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे, सहायक महाव्यवस्थापक शिल्पा काबरा, कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख, विलास खंडाळे, समितीचे सचिव संभाजी अथरगण, कोषाध्यक्ष डॉ.कृष्णा काळदाते यांची प्रमुख उपस्थिती होती. मशाल रॅलीतून जनजागृती कर्मचाऱ्यांनी मशाल यात्रा काढून वीजचोरीचे दुष्परिणाम, वीज बचत, वीजबिल भरण्याचे महत्त्व याबद्दल कर्मचाऱ्यांनी जनजागृती केली. शिवस्वरांजली शाहिरी कलापथकाचे शाहीर विलासराजे बडक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर आधारित स्फूर्तीदायी पोवाडे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंतीनिमित्त यंदाही कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात पाल्यांनी राजमाता जिजाऊ, शिवराय व मावळ्यांची हुबेहूब वेशभूषा साकारल्या. स्पर्धांमधील गुणवंतांचा गौरव चित्रकला स्पर्धेत बालगटात काव्या नरवडे, वेदिका साखळे, कृतिका शेळके, सोनम चाबुकस्वार, प्रथमेश शेवाळे, वरिष्ठ गटात भार्गवी जाधव, आदित्यराज जाधव, विरोचन शिंदे, समीक्षा लालसरे, वक्तृत्व स्पर्धेत बालगटात अक्षरा चंदनशिव, अद्विक अथरगण, काव्या तिळवे, शिवम जाधव, वरिष्ठ गटात सृष्टी पोफळे, ऋतुजा चांदणे, परिणीती शिंदे, समीक्षा लालसरे, रांगोळी स्पर्धेत पाल्य गटात स्पृहा गायकवाड, श्रृती सुरडकर, ऋतुजा चांदणे, महिला गटात शारदा थोरात, सुरेखा काकडे, सरला अथरगण, अंजू गोस्वामी, पल्लवी गायकवाड, स्वाती सुरडकर, निबंध स्पर्धेत बालगटात जिया भवर, आराध्या पवार, तन्वी खाडे, अद्विक अथरगण, वरिष्ठ गटात सरला अथरगण, रिया भवर, शौर्य घोगरे, समीक्षा लालसरे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ‘टीमवर्क’चे उदाहरण – कछोट प्रमुख वक्ते डॉ. कोकाटे म्हणाले की, अठरापगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. जागतिक स्तरावरही अनेक योद्ध्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली. आईला आदर्श मानून विज्ञानवादी जीवन जगणारा हा जगाच्या इतिहासातील सर्वगुणसंपन्न राजा होता. महाराजांचे जीवन व कार्य आजही सर्वांना प्रेरणा देते. मुख्य अभियंता कछोट म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या कार्यापासून महावितरण कर्मचाऱ्यांनीही प्रेरणा घेत आपले काम सर्वोत्तम कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. शिवरायांचे जीवन म्हणजे टीमवर्कचे उत्तम उदाहरण आहे. आपणही टीमवर्कद्वारे महावितरणला वीजबिल थकबाकीमुक्त करून प्रगतिपथाकडे नेले पाहिजे. उत्सव समितीने यावर्षी राबवलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. रमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी. विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सातारा नगर पालिकेने एक ते तीन लाख या लोकसंख्या अंतर्गत संपूर्ण विभागात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. या अभियानामध्ये वेगळ्या धर्तीच्या विकास संकल्पना, पर्यावरणाचा समतोल राखणे, नाविन्यपूर्ण योजना राबवणे, तसेच अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून त्या स्त्रोतांना वापरण्यासाठी उत्तेजन देणे यांसारख्या वेगवेगळ्या संकल्पना पालिका प्रशासनाने लोकसहभागातून राबवल्या होत्या. या योजनांची दखल राज्य शासनाने घेऊन सातारा पालिकेला अव्वल दर्जाचे गुणांकन दिले. त्यामुळे पुणे विभागात एक ते तीन लाख लोकसंख्या अंतर्गत सातारा पालिकेला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. या अभियानाचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी मुंबई येथे पार पडला. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट, भाजपचे गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक राजू गोरे इत्यादी यावेळी उपस्थित होते. मुंबई येथे झालेल्या सत्कार सोहळ्यामध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर इत्यादी उपस्थित होते . सातारा पालिकेने यापूर्वी सुद्धा माझी वसुंधरा अभियानात सातत्यपूर्ण कामगिरी केली. 2026 मध्ये जास्तीत जास्त लोकसहभागातून कार्बन शून्य वातावरण आणि अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर जल पुनर्भरण यासारख्या विशेष मोहिमा राबवल्या. यामुळे पुणे विभागांमध्ये सातारा पालिकेने अव्वल क्रमांक पटकावला. या कामगिरीनिमित्त सातारा पालिकेला सहा कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. या कामगिरीचे खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसेराजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्या सातारा जिल्ह्यातील 'दरे' या गावी दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी आले आहेत. हा दौरा वैयक्तिक असला तरी, सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेचा पेच सुटत नसल्याने दरे गाव सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार? यावरून जिल्ह्यात तर्क-वितर्कांना उधाण आले असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ जागांपैकी बहुमतासाठी ३३ हा जादुई आकडा गाठणे आवश्यक आहे. मात्र, कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजप २७, राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना १६, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, काँग्रेस १ आणि अपक्षाला १ जागा मिळालेली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र? शिंदेंचा कौल महत्त्वाचा निवडणुकीच्या काळात साताऱ्यात भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये कमालीचा कडवटपणा पाहायला मिळाला होता. भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये झालेल्या टोकाच्या टीकेमुळे दोन्ही पक्षांतील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (२०) आणि शिवसेना (१६) एकत्र आल्यास ३६ हे संख्याबळ गाठून सत्ता स्थापन करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत शिंदेंनी साताऱ्यात या नव्या समीकरणाला हिरवा कंदील (Green Signal) दिल्याची चर्चा आहे. भाजपची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; गोरेंचा इशारा दुसरीकडे, सर्वाधिक २७ जागा जिंकणारा भाजप सहज हार मानण्याच्या तयारीत नाही. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः वरिष्ठ स्तरावर चर्चा करत आहेत, असे सांगत मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुती म्हणून पुढे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तसे न घडल्यास वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे. जयकुमार गोरेंच्या या विधानामुळे साताऱ्यात पुन्हा एकदा 'ऑपरेशन लोटस' किंवा फोडाफोडी होणार का? अशी चर्चा रंगली आहे. दरे येथे राजकीय नेत्यांची वर्दळ वाढणार? एकनाथ शिंदे दरे मुक्कामी असल्याने पुढील २४ तासांत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील दिग्गज नेते त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीनंतरच साताऱ्याच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होईल. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महायुतीतला हा अंतर्गत कलह साताऱ्याच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… राज्यसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीत दावे-प्रतिदावे:शरद पवारांनाच संसदेत पाठवायची अजितदादांची इच्छा होती, रोहित पवारांचा खुलासा देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक खुलासा केला. अजितदादांना शरद पवारांनीच राज्यसभेवर जावे अशी इच्छा होती, असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा खोडून काढला आहे. सविस्तर वाचा…
छत्रपती संभाजीनगर शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या एका २७ वर्षीय कर्मचाऱ्यावर आज काळाने घाला घातला. मुकुंदवाडी परिसरात कारवाई दरम्यान लोखंडी होर्डिंगचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला झाल्याने एका तरुण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून जाधव कुटुंबावर शोककळा पसरली आहे. महानगरपालिकेकडून सध्या शहरभर अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्ज हटवण्याची मोहीम राबवली जात आहे. आज सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी येथील हनुमान मंदिर परिसरातील एक अनधिकृत होर्डिंग काढण्याचे काम सुरू होते. अमोल दिनकर जाधव (२७) आणि रवी रणधीर रिडलॉन (३८) हे दोन्ही कर्मचारी मंदिरावरील लोखंडी फ्रेम असलेले होर्डिंग उतरवत होते. होर्डिंग खाली घेत असतानाच, लोखंडी फ्रेमचा समतोल बिघडला आणि ती जवळूनच गेलेल्या ३३ केव्हीच्या हायव्होल्टेज तारेला स्पर्श झाला. प्रचंड दाबाचा वीजप्रवाह फ्रेममध्ये उतरल्याने अमोल जाधव यांना भीषण धक्का बसला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहकाऱ्याची मृत्यूशी झुंज या घटनेत अमोल यांचे सहकारी रवी रिडलॉन हे देखील गंभीररीत्या भाजले असून त्यांना तातडीने सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस आणि मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नातेवाईकांचा आक्रोश अवघ्या २७ वर्षांच्या अमोल जाधव यांचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलाचा जीव गेला, असा आरोप करत कुटुंबीयांनी तीव्र आक्रोश व्यक्त केला. प्रशासकीय हलगर्जीपणावर संताप या दुर्दैवी घटनेनंतर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उच्च दाबाच्या वाहिन्यांजवळ काम करताना संबंधित विभागाशी समन्वय साधून वीज पुरवठा बंद करणे आवश्यक होते, ते का झाले नाही? कर्मचाऱ्यांकडे हातमोजे, हेल्मेट किंवा इन्सुलेटेड साधने होती का? एवढ्या जोखमीच्या कामाच्या वेळी तांत्रिक जाण असलेला वरिष्ठ अधिकारी तिथे उपस्थित होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे ही वाचा… पोलिस भरतीला आलेल्या तरुणाचा धावताना मृत्यू:छत्रपती संभाजीनगर येथील धक्कादायक घटना; 1600 मीटर धावताना दुर्दैवी अंत छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीत एका 23 वर्षीय तरुणाचा 1600 मीटर धावताना मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस होण्यासाठी आलेल्या या तरुणाचा मैदानावरच प्राण गेल्याने भरती प्रक्रियेला उपस्थित असलेल्या उमेदवारांवर शोककळा पसरली आहे. आज सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी सुरू असताना ही घटना घडली. सविस्तर वाचा…
देशातील ३७ आणि महाराष्ट्रातील ७ राज्यसभेच्या जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) उमेदवारीवरून मोठे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक खुलासा केला. अजितदादांना शरद पवारांनीच राज्यसभेवर जावे अशी इच्छा होती, असे म्हणत त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला छगन भुजबळांच्या उमेदवारीचा दावा खोडून काढला आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी गौप्यस्फोट केला होता की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याचे अजितदादांनी निश्चित केले होते. ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर भुजबळांसारखा ज्येष्ठ नेता संसदेत असणे गरजेचे आहे, असे दादांचे मत असल्याचे कोल्हेंनी म्हटले होते. मात्र, आज रोहित पवार यांनी याला छेद दिला. ते म्हणाले, विलीनीकरण हा अजितदादांसाठी राजकीय नव्हे तर भावनिक प्रश्न होता. विलीनीकरणानंतर अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा आणि शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा विचार दादांच्या मनात पक्का होता. पक्ष विलीनीकरणासाठी शरद पवार यांनी कोणतीही अट ठेवली नव्हती, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले. रोहित पवारांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांची तिसरी पत्रकार परिषद अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी आज नवी दिल्लीत तिसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही तांत्रिक पुरावे सादर करत हा केवळ अपघात नसून 'घातपात' असल्याची दाट शंका व्यक्त केली. वैमानिकाचा जाणीवपूर्वक वापर करून हा अपघात घडवून आणला गेल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू आणि संबंधित विमान कंपनीच्या मालकाचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्ष होत नाही, असा आरोप करत त्यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विलीनीकरणाबाबत पवारांची भूमिका २ एप्रिल रोजी काही सदस्यांचा कार्यकाळ संपणार असल्याने राज्यातील सात जागांसाठीची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. महाविकास आघाडीच्या वर्तुळात शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच रोहित पवारांच्या दाव्यामुळे संभाव्य उमेदवारीबाबत नवा राजकीय रंग चढला आहे. एकूणच, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील राजकीय समीकरणे अजूनही अस्पष्ट असल्याचे चित्र असून, पुढील काही दिवसांत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… अजितदादांना मोदी, शहाच न्याय देऊ शकतात:VSR कंपनीमागे खूप मोठे लोक; रोहित पवारांनी केली उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या तेदेपाचे व्हीएसआर विमान कंपनीशी साटेलोटे असल्याचा आरोप करत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सविस्तर वाचा…
रणवीर सिंहकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई गँगने १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. बिश्नोई गँगने अभिनेत्याला ज्या नंबरवरून धमकीची व्हॉईस नोट पाठवली होती, तो मेसेज एका अमेरिकन नंबरवरून आला होता. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले की, क्राईम ब्रँच प्रोटोकॉलनुसार त्या नंबरची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेतील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधत आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या […] The post रणवीर सिंहकडे १० कोटींच्या खंडणीची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
क्रिकेटर राहुल चहरने केली घटस्फोटाची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाचा घटस्फोट झाला आहे. क्रिकेटर राहुल चहरने घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली आहे. २६ वर्षीय राहुलने पत्नी इशानी जोहरपासून घटस्फोट घेतला आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटले की, मी स्वत:ला, माझे मूल्य किंवा मला हवे असलेले आयुष्य समजून घेण्यापूर्वीच माझे लग्न झाले. त्यानंतर अनेक […] The post क्रिकेटर राहुल चहरने केली घटस्फोटाची घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशात ७० हजार कोटींचा ‘बिर्याणी घोटाळा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील हजारो कोटींच्या अनेक घोटाळ्यांनी आतापर्यंत मोठा हाहाकार उडवल्याचे दिसून आले आहे. तसेच दुसरीकडे टॅक्स चोरीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्याचे वास्तव आहे. अशातच आता हॉटेल क्षेत्रातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘बिर्याणी’ ऑर्डरच्या काळाबाजारात ७० हजार कोटींचा मोठा आर्थिक फटका सरकारला बसला आहे. देशातील तब्बल ७० हजार कोटींच्या […] The post देशात ७० हजार कोटींचा ‘बिर्याणी घोटाळा’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्याने आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उभय सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्याविना पार पडेल, अशी एकूण चिन्हे आहेत. राज्याच्या इतिहासात दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त असण्याचा प्रकार पहिल्यांदात घडत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर १५ वी विधानसभा गठित झाली. नव्या विधानसभेचे पहिले अधिवेशन डिसेंबर २०२४ मध्ये पार पडले. सर्वसाधारणपणे […] The post अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण : प्रतिनिधी कल्याणमध्ये काल दुपारी धक्कादायक प्रकार घडला. कल्याण एसीपी कार्यालय येथे साडेपाच फुटांचा अतिविषारी इंडियन कोब्रा शिरल्याने एकच खळबळ उडाली. कार्यालयात काम करणा-या महिला पोलिस कर्मचा-यांनी भीतीपोटी तब्बल अर्धा तास स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत नागाला पकडल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रोड परिसरात असलेल्या एसीपी कार्यालयात काल दुपारच्या […] The post एसीपी कार्यालयात शिरला कोब्रा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढला असून उन्हाचे चटके लागू लागले आहेत. राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सर्वांसाठी महत्त्वाचे राहणार आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा […] The post राज्यात अवकाळीचे संकट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नादसप्तक विद्यालयाची १११ गीतांची विक्रमी मैफल:'सूर पहाडी' कार्यक्रमातून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न
पुण्यातील नादसप्तक संगीत विद्यालयाने 'सूर पहाडी' या विशेष मैफलीचे आयोजन केले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.११ वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही मैफल होणार आहे. भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत परंपरेतील लोकप्रिय राग पहाडीवर आधारित १११ हिंदी आणि मराठी गीतांचे सादरीकरण यात केले जाईल. या कार्यक्रमाद्वारे एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रख्यात गायक आणि संगीतकार गिरीश पंचवाडकर यांनी या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन केले आहे. पुण्यातील संगीत, कला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या मैफलीत गिरीश पंचवाडकर यांच्यासह नादसप्तक संगीत विद्यालयाचे २५ विद्यार्थी गाणी सादर करतील. संगीत संयोजनात प्रसिद्ध युवा तबलावादक आणि विद्यालयाचे संचालक अक्षय पंचवाडकर, ज्येष्ठ कीबोर्ड वादक रशीद शेख, तसेच नागेश भोसेकर, प्रसन्न बाम, सचिन वाघमारे, रोहित साने आणि आदित्य निरगुडे या नामवंत वादकांचा सहभाग असेल. १९ ते ९९ वयोगटातील कलाकारांच्या सहभागाने सादर होणाऱ्या या कार्यक्रमात राग पहाडीवर आधारित भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत, लावणी, अभंग, तसेच संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत रामदास यांच्या अभंगांचा समावेश असेल. मराठी व हिंदी चित्रपट संगीतासोबतच शास्त्रीय पहाडी सरगम आणि तराणा हे देखील विशेष आकर्षण ठरणार आहे. लोकप्रिय इन्फ्लुएंसर आणि रील स्टार अथर्व सुदामे हे विशेष पाहुणे कलाकार म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पुणेकर रसिकांसाठी ही मैफल स्वरांची एक अविस्मरणीय पर्वणी ठरेल, असे आयोजकांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, सर्वांनी या मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन नादसप्तक संगीत विद्यालयाने केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जोशी, नीरज फडके, रूपा इनामदार, दीपश्री डोळे, मयुरी देशपांडे, आदिती ताले, धवल ताले, गायत्री उंब्रजकर, भारत कोकीळ आणि रोहित परांजपे हे परिश्रम घेत आहेत.
संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत 3 वेळा मस्साजोगला येऊन गेल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. त्यामुळे पीडित देशमुख कुटुंबीयांनी त्याच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत सुरक्षेची मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीडच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात न्यायालायने सरकारी पक्षाला बचाव पक्षाला योग्य ते सर्व दस्तऐवजांची पूर्तता करण्याचे कडक निर्देश दिले. आजच्या सुनावणीत आरोपींचे वकील, पुराव्यांची कमतरता व सरकारी वकिलांच्या नियुक्तीवर जोरदार खडाजंगी झाली. आरोपी क्रमांक 3 ते 7 यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून वगळण्याची मागणी केली. त्यांनी तसा अर्ज कोर्टात सादर केला. कोर्टाने सरकारी पक्षाला या अर्जावर आपले लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. आरोपी जयराम चाटे याने आपला वकील बदलला आहे. आता त्याच्यातर्फे वकील एम के वाघीरकर हे युक्तिवाद करणार आहेत. आरोपी प्रतीक घुले यानेही वकील लावण्यासाठी कोर्टाकडे 10 ते 15 दिवसांचा वेळ मागितला आहे. कोर्टाने त्यांना हा वेळ दिला. त्यानुसार आता 6 मार्च रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल कृष्णा आंधळे मस्साजोगला आला? दुसरीकडे, आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याविषयी एक नवा दावा केला. ते म्हणाले की, प्रस्तुत प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे मागील 6 महिन्यांत 3 वेळा आमच्या गावी येऊन गेला. यामुळे आमच्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आम्ही ही गोष्ट या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडीच्या कानावर घातली आहे. त्यांनीही हा फरार आरोपी गावात येऊन गेल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याची संपूर्ण बीड जिल्ह्यात धिंड काढण्यात यावी. आतापर्यंत कोणकोणत्या आरोपींना अटक? सदर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. यापैकी काहींवर हत्या व काहींवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत करण्यात आलेल्यांत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडचा समावेश आहे. यापैकी विष्णू चाटे व सुदर्शन घुले यांच्यावर हत्या व खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. तर वाल्मीक कराड याच्यावर खंडणी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले आहे. पण अद्याप त्याचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
फियाट क्लासिक कार क्लब ऑफ इंडियातर्फे शनिवारी पुणे ते महाबळेश्वर दरम्यान क्लासिक फियाट कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत १९५५ पासूनच्या विविध मॉडेल्सच्या २० हून अधिक देखण्या फियाट गाड्या सहभागी झाल्या होत्या. चमकदार क्रोम आणि आकर्षक डिझाइन असलेल्या या गाड्यांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या गाड्यांमध्ये गोलाईदार बॉडी, शांत पण दमदार इंजिन, हलके स्टिअरिंग, हॅन्डगिअर, क्लासिक ग्रील आणि लक्षवेधक हेडलाईट्स ही वैशिष्ट्ये होती. पुणे शहरातून मार्गक्रमण करत हा ताफा निसर्गरम्य महाबळेश्वरकडे रवाना झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांसाठी हा ताफा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अनेक ठिकाणी नागरिकांनी या गाड्यांचे छायाचित्रण करून सहभागी वाहनचालकांना दाद दिली. यावेळी आयोजक संजय प्रकाश ढेरे यांनी सांगितले की, क्लासिक वाहनांचा वारसा जतन करणे आणि तरुण पिढीला या गाड्यांविषयी आकर्षण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. अशा रॅलींमुळे वाहनप्रेमी एकत्र येतात आणि ऐतिहासिक वाहनसंस्कृती जिवंत राहते. ढेरे यांनी माहिती दिली की, १९५५ पासूनच्या विविध मॉडेलच्या फियाट कार असलेले सदस्य हा क्लब चालवतात आणि काळ्या, निळ्या, लाल, पांढऱ्या, हिरव्या अशा विविधरंगी व्हिंटेज कार घेऊन महाबळेश्वर, गोवा, मुंबई, बंगळुरू, कन्याकुमारी अशा विविध ठिकाणी भेटी देतात. रॅलीतील एक सहभागी शीतल सोनकांबळे यांनी सांगितले की, त्यांच्याकडे १९९१ मधील फियाट कार आहे. ही कार त्यांच्या कुटुंबासाठी केवळ एक वाहन नसून आठवणींचा ठेवा आहे. अनेक वर्षे जपून ठेवलेल्या या गाडीची देखभाल ते स्वतः करतात. अशा रॅलीत सहभागी होताना या गाडीचा खरा आनंद अनुभवता येतो, असेही त्यांनी नमूद केले. लोकांच्या उत्सुक नजरा आणि कौतुकाचे शब्द हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक असते.
ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा थाटात प्रारंभ:पुण्यात गायन, वादन, नृत्याची रसिकांना मेजवानी
रौप्य महोत्सवी ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचा पुण्यात थाटात प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रसिकांना दर्जेदार गायन, वादन आणि नृत्याची मेजवानी मिळाली. पूरियाकल्याण, जयजयवंती यांसारख्या रागांची अनुभूती उपस्थितांनी घेतली. ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. धायरी येथील धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानच्या कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयाच्या पटांगणावर हा महोत्सव सुरू आहे. यात युवा आणि प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाने झाले. यावेळी ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर, प्रसिद्ध गायक डॉ. पंडित संजय गरुड, ब्रह्मनाद कला मंडळाच्या सचिव रागिणी गरुड, विश्वस्त सुभाष चाफळकर, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, संचालक अनिकेत चव्हाण, बाबा महाजन, प्रसिद्ध तबलावादक पं. पांडुरंग मुखडे, हेलिकल टेक्नॉलॉजीचे बिभास आंबेकर, गंगोत्री होम्सचे राजेंद्र आवटे, ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले, प्रसिद्ध बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी, पं. प्रमोद गायकवाड आणि रागिणी गरुड उपस्थित होते. सुरुवातीला ब्रह्मनाद संगीत विद्यालयाच्या बालचमूने गणेश वंदना सादर केली. त्यानंतर युवा कथक नृत्यांगना सरगम गरुड यांच्या विद्यार्थिनींनी शिवस्तुती नृत्य सादर केले. सरगम गरुड यांनी स्वतः ताल त्रिताल सादर करत उठान, थाट, आमद, टुकडे या पारंपरिक क्रमाने पदन्यासावरील प्रभुत्व दाखवले आणि तराणा प्रस्तुत केला. मेवाती घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गायिका मधुश्री नारायण यांनी राग पूरियाकल्याण सादर केला. त्यांनी विलंबित एकतालातील ‘आज सो बन’ आणि द्रुत त्रितालातील ‘दिनरैन कछु ना सुहावे’ या पं. जसराज यांच्या बंदिशी गायल्या. मोजक्याच आलापीतून रागरूप दर्शवत मधुश्री यांनी तिन्ही सप्तकांत फिरणाऱ्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी ‘बाजे रे मुरलिया बाजे’ या भक्तिरचनेने आपल्या गायनाची सांगता केली. यावेळी बोलताना मधुश्री नारायण म्हणाल्या की, पुणे हे शास्त्रीय संगीतातील जाणकार रसिकांचे शहर आहे. तसेच माझे ठुमरीगायनातील गुरू पं. अजय पोहनकर स्वतः इथे उपस्थित आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज फेब्रुवारी महिन्याचा तिसरा शनिवार मानहानी व अब्रूनुकसानीच्या प्रकरणांमुळे चांगलाच गाजला. राज्यातील 3 वेगवेगळ्या शहरांत 3 वेगवेगळ्या मोठ्या नेत्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले. योगायोगाने या सर्व प्रकरणांचा धागा मानहानीशी जोडला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात शनिवार हा मानहानी दिन ठरल्याची चर्चा रंगली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडीत नवा जामीनदार हजर करण्यासाठी कोर्टात हजर झाले. तर मालेगावात एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी समजले जाणारे संजय राऊत व मंत्री दादा भुसे यांनी एका प्रकरणात समेटाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले. तिकडे मुंबईत ठाकरे गटाचेच खासदार अरविंद सावंत यांनाही मानहानीच्या एका खटल्यात कोर्टात हजेरी लावावी लागली. भिवंडी कोर्टात राहुल गांधींची हजेरी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्याची आज भिवंडी न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात त्यांना पूर्वीच जामीन मंजूर झाला होता. पण त्यांचे जामीनदार शिवराज पाटील चाकूरकर यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना नवा जामीनदार कोर्टापुढे हजर करणे आवश्यक होते. त्या प्रक्रियेसाठी ते न्यायालयात प्रत्यक्ष हजर झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा जामीन घेतला. यावेळी झालेल्या सुनावणीसाठी न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 15-20 मिनिटे चाललेल्या या सुनावणीत जामीन प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली. या प्रकरणी 4 एप्रिल रोजी मुख्य मुद्द्यांवर सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. मालेगावात 'कट्टर वैऱ्यांची' दिलजमाई दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज वेगळीच राजकीय रंगत पाहायला मिळाली. येथे अनेकदा सार्वजनिकरित्या एकमेकांवर चिखलफेक करणारे ठाकरे गटाचे संजय राऊत व शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे दोघेही मानहानीच्या एका प्रकरणात न्यायालयात हजर झाले. राजकीय वक्तव्यांमधून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण न्यायालयात गेले होते. पण शनिवारी न्यायालयीन प्रक्रियेत दोन्ही बाजूंनी अत्यंत सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून आले. सूत्रांच्या माहितीनुसार, परस्परांवरील आक्षेपार्ह वक्तव्यांबाबत स्पष्टीकरण देत दोन्ही बाजूंनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कट्टर राजकीय विरोधकांमध्ये 'दिलजमाई' झाल्याची चर्चा रंगली. या निमित्ताने राजकारणात कुणीही कुणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतात, ही उक्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. राऊत - भिसे समेटामुळे नवे समीकरण? आजच्या तिन्ही प्रकरणांचे वेगवेगळे राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा राष्ट्रीय पातळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर संजय राऊत व दादा भुसे यांच्यातील समेटामुळे स्थानिक राजकारणात नवी समीकरणे तयार होऊ शकतात. मुंबईत अरविंद सावंतांची कोर्टात उपस्थिती तिकडे मुंबईत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनाही मानहानीच्या एका खटल्यात न्यायालयात हजर राहावे लागले. अरविंद सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शायना एन सी यांचा उल्लेख 'इम्पोर्टेड माल' असा केला होता. शायना एन सी यांनी त्यांचे हे विधान महिलांचा अवमान करणारे असल्याचे नमूद करत त्यांच्याविरोधात मानहानी व विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सावंत आज कोर्टात हजर झाले. यावेळी झालेल्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही बाजूंची बाजू ऐकून घेतली आणि पुढील तारखेची नोंद केली. या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसले. एकाच दिवशी तीन महत्त्वाच्या नेत्यांना मानहानीच्या प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणे हा एक मोठा योगायोग मानला जात आहे. यामुळे राजकीय वक्तव्यांची मर्यादा, सार्वजनिक जीवनातील जबाबदारी व कायदेशीर परिणाम यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. गत काही वर्षांत मानहानीच्या खटल्यांत मोठी वाढ उल्लेखनीय बाब म्हणजे गत काही वर्षांत राजकीय क्षेत्रातील मानहानीच्या खटल्यांत मोठी वाढ झाली आहे. निवडणूक प्रचारातील वादग्रस्त विधाने, पत्रकार परिषदांतील आरोप किंवा सोशल मीडियावरील प्रतिक्रिया यामुळे हे वाद निर्माण होतात. त्यानंतर त्याचे रूपांतर न्यायालयीन लढाईत होते. त्यामुळे राजकीय नेत्यांना केवळ राजकीयच नव्हे तर कायदेशीर लढ्यालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे राजकारणी लोकांनी आपली विधाने अत्यंत जबाबदारीने करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा त्यांना सातत्याने अशा प्रकारच्या दीर्घकालीन न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आजच्या मानहानीच्या खटल्यांनी ही बाब प्रामुख्याने अधोरेखित झाली आहे.
यंदा कडक उन्हात विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा
मुंबई : प्रतिनिधी यंदा विद्यार्थ्यांना कडक उन्हात परीक्षा द्यावी लागणार आहे, कारण शिक्षण विभागाने शालेय परीक्षांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये परीक्षा पूर्ण करून एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास झाला नव्हता. पण यंदा एप्रिलमध्ये परीक्षा घेतल्या जाणार असल्याने कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. या निर्णयाला शिक्षक […] The post यंदा कडक उन्हात विद्यार्थ्यांना द्यावी लागणार परीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : बारावी परीक्षेचे दोन पेपर फुटले असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे, याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू होता अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नागपूरच्या सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थिनीचा स्मार्टफोन जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात […] The post बारावीचे दोन पेपर फुटले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापुरात एक मनाला चटका लावणारी, पण तेवढीच प्रेरणादायी घटना घडली आहे. दहावीच्या पहिल्या पेपरला निघालेल्या एका मुलीला ऐनवेळी आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी कळली. यामुळे क्षणभर तिच्या पायाखालची वाळू सरकली. तिच्या आयुष्याचा आधार हरपला होता. पण त्याही स्थितीत तिने आपले दुःख बाजूला सारत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने परीक्षा केंद्र गाठून आपला पेपर दिला. यासाठी तिला तिच्या शिक्षकांनी मोठी मदत केली. धनश्री भिकाजी पवार असे या धाडसी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती शहरातील शरदचंद्र पवार प्रशालेची दहावीची विद्यार्थिनी आहे. शुक्रवारी तिचा मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी 10 वा. ती सोलापुरातील भू. म. पुल्ली कन्या प्रशाला परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी निघण्याची तयारी करत होती. त्याचवेळी रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या तिच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिला समजली. या कठीण प्रसंगात परीक्षा देण्याची तिची मानसिकता नव्हती. ती घरातच ओक्साबोक्सी रडत होती. मुख्याध्यापकांनी धीर दिला अन् धनश्री परीक्षा केंद्रावर पोहोचली धनश्रीच्या वडिलांचे निधन झाल्याची बातमी तिच्या शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांच्या कानावरही पोहोचली. त्यांनी तत्काळ वेळ न दवडता धनश्रीच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी तिला धीर दिला. तसेच तिचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्यांनी तिच्या कुटुंबीयांना विश्वासात घेतले. तसेच धनश्रीला वर्ष वाया जाऊ न देता परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तिला घेऊन ते स्वतः परीक्षा केंद्रावर पोहोचले. शिक्षकांचे पाठबळ मिळताच धनश्रीने आपले दुःख बाजूला ठेवत मराठीचा पहिला पेपर दिला. यावेळी केंद्रप्रमुख गीता सादूल यांनीही तिला मोठा धीर दिला. हा पेपर देताना तिला अनेकदा वडिलांच्या आठवणीने हुंदका दाटून येत होता. पण त्याही परिस्थितीत तिने आपला पेपर सोडवला. पेपर दिल्यानंतर धनश्री रडतच घरी पोहोचली. तिने वडिलांचे अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर भिकाजी पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यंदा 16,15,489 विद्यार्थी देत आहेत परीक्षा यंदा दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 65 हजार 740 मुले, 7 लाख 49 हजार 736 मुली आणि 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील 23 हजार 683 शाळांमधील विद्यार्थी या परीक्षेला बसणार असून, 5 हजार 111 मुख्य परीक्षा केंद्रांवर परीक्षा पार पडणार आहे. परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. राज्यभरात 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समित्याही कार्यरत आहेत. परीक्षा केंद्रांच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अनेक केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे परीक्षा प्रक्रिया कैमेराबद्ध केली जाणार आहे. गैरप्रकार करणाऱ्यांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, 1982 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असून, हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
रत्नागिरीत लवकरच विमानतळ सुरू होणार
रत्नागिरी : प्रतिनिधी भविष्यात नगरपरिषदेच्या कामकाजात वाढ होईल, या दृष्टीने आपण काम करत असल्याचे सांगून रत्नागिरीतील विमानतळाचा आढावा आपण वेळोवेळी घेत असून, आताही घेतला आहे. टर्मिनल बिल्डिंगदेखील तयार होत आहे. लवकरच रत्नागिरी विमानतळ सुरू होईल, असे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […] The post रत्नागिरीत लवकरच विमानतळ सुरू होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला जवळपास एक महिना झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जाताहेत. अजित पवारांच्या कुटुंबातील त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित के केले असून विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. रोहित पवारांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, […] The post विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रोटोकॉल डिझाइनिंग व एक्स्ट्राम्युरल फंडिंग संधी विषयक पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी ता २१ उत्साहात पार पडला. हि परिषद दोन दिवस चालणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची मार्गदर्शन करतांना परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा देत संशोधनाधारित वैद्यकीय सेवेमुळे समाजाला अधिक परिणामकारक व वैज्ञानिक आरोग्यसेवा मिळू शकते, असे नमूद केले. यावेळी आयोजक अध्यक्ष व अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी परिषदेचे प्रास्ताविक सादर करत प्रोटोकॉल डिझाइनिंग व बाह्य निधी संधींचे महत्त्व स्पष्ट केले. संशोधन प्रस्तावांची गुणवत्ता, नैतिक मानके आणि निधी प्राप्तीची प्रक्रिया यांविषयी या परिषदेत सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एमएमसी निरीक्षक डॉ. कांचन अग्रवाल, डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, हिंगोलीचे संचालक डॉ. हंसराज खुराना, डॉ. सचिन मुंबरे, डॉ. योगेश बहुरूपी, डॉ. सतीश वड्डे आणि डॉ. विजय डोम्पले यांची उपस्थिती होती. विविध विषयांवरील शैक्षणिक मांडणीमुळे प्रतिनिधींना संशोधनविषयक मार्गदर्शन मिळणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.हिंगोली येथे नव्याने स्थापन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित या परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधनाची जाणीव व दिशा दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून प्रत्येक वैद्यकीय व्यावसायिकाने संशोधनाभिमुख दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. देशभरातून 500 पेक्षा अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले असून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनवृत्तीला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक सचिव व उप-अधिष्ठाता डॉ. राजहर्ष हनमंते यांनी आभार मानले.
माजी महापौर अभिषेक कळमकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. शाळेत नोकरीला लावून देतो, असे अमिष दाखवून, वारंवार अत्याचार केल्याचे युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. पीडित युवतीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. अभिषेक कळमकर हा पसार झालेला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप […] The post माजी महापौर अभिषेक कळमकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीत एका 23 वर्षीय तरुणाचा 1600 मीटर धावताना मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस होण्यासाठी आलेल्या या तरुणाचा मैदानावरच प्राण गेल्याने भरती प्रक्रियेला उपस्थित असलेल्या उमेदवारांवर शोककळा पसरली आहे. आज सकाळच्या सत्रात मैदानी चाचणी सुरू असताना ही घटना घडली. मृत तरुणाचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. पोलिस दलात भरती होण्याचे त्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून कठोर सराव करत होता. पोलिस भरती प्रक्रियेसाठी तो छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाला होता. आज सकाळी सुमारे 8.15 वाजता शहरातील ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर 1600 मीटर धावण्याची चाचणी सुरू होती. त्यात सहभागी झालेल्या संग्रामने धाव सुरू केली; मात्र काही अंतर पार केल्यानंतर त्याला अचानक चक्कर आल्याचे सांगितले जाते. धावत असतानाच तो मैदानावर कोसळला. ही बाब लक्षात येताच तेथे उपस्थित पोलिस कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तात्काळ धाव घेतली. त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर भरती प्रक्रियेत काही काळ खंड पडला आणि उपस्थित उमेदवारांमध्ये भीती पसरली. मित्रांना शोक अनावर संग्राम शिंदे हा अत्यंत जिद्दी व मेहनती तरुण असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितले. पोलिस दलात दाखल होऊन कुटुंबाची परिस्थिती सुधारण्याचा त्याचा निर्धार होता. मात्र नियतीने त्याचे स्वप्न अधुरे ठेवले. त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराचा झटका किंवा तीव्र शारीरिक ताण यामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे; मात्र अधिकृत कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिस प्रशासनाने या घटनेची नोंद करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. हे ही वाचा… जळगावातील बड्या पदाधिकाऱ्याचा विधवेवर बलात्कार:एकनाथ खडसे यांच्या आरोपाने खळबळ; पोलिसांवर आरोपीला अभय दिल्याचा ठपका सत्ताधारी पक्षाच्या जळगावमधील एका बड्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंनी या प्रकरणी सदर बड्या नेत्याचे नाव घेतले नाही, पण पोलिसांवर त्याला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. यामुळे हा बडा पदाधिकारी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर
पुणे सायबर गुन्हे शाखेने दोन कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात कर्नाटकातून दोन सायबर चोरट्यांना अटक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अजय रामविलास यादव (वय २२) आणि सलमान गौस मोहियुद्दीन अजनाल (वय ३२, दोघे रा. कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी एका नामांकित कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर समाज माध्यमातील खात्यांमध्ये केला होता. त्याद्वारे ते कंपनीच्या ग्राहकांशी संपर्क साधून, पैसे थकले असून तातडीने जमा करण्याची मागणी करत होते. ग्राहकांनी संदेशाची खातरजमा न करता आरोपींच्या खात्यात पैसे जमा केले. अशा प्रकारे चोरट्यांच्या खात्यात एकूण १ कोटी ९५ लाख रुपये जमा झाले होते. या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे अनेक ग्राहक बळी पडले. तांत्रिक तपासामध्ये आरोपींचे बँक खाते कर्नाटकातील बेळगाव भागातील एका बँकेत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांच्या पथकाने बेळगाव परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींकडून तीन मोबाइल संच, बँकेची खातेपुस्तिका आणि डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अशाच पद्धतीने फसवणुकीचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी समाज माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही संदेशाबाबत खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. काही संशयास्पद आढळल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, उपनिरीक्षक सुशील डमरे, संदीप कणसे, प्रवीणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शीतल डांगरे आणि अनिकेत भिंगारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
हडपसरमध्ये मजुरांच्या वसाहतीला आग:१९ झोपड्या जळून खाक, जीवितहानी टळली
पुण्यातील हडपसर भागात राममनोहर लोहिया उद्यानाजवळ असलेल्या मजुरांच्या वसाहतीला शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत १९ झोपड्या आणि तीन दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने, आग लागल्यानंतर मजूर आणि त्यांचे कुटुंबीय वेळीच बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुणे-सोलापूर रस्त्यावरील राममनोहर लोहिया उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या या वसाहतीत मध्यरात्री अडीचच्या सुमारास एका झोपडीला प्रथम आग लागली. या झोपड्या तात्पुरत्या स्वरूपात बांबू आणि पत्र्याचा वापर करून बांधलेल्या असल्याने, तसेच घरातील वस्तू पेट घेतल्याने आग वेगाने भडकली आणि शेजारील झोपड्यांमध्ये पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब आणि टँकर तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी चहुबाजूंनी पाण्याचा मारा करत सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कपडे, धान्य आणि इतर घरगुती साहित्यासह १९ झोपड्या पूर्णपणे भस्मसात झाल्या, तसेच तीन दुचाकींचेही मोठे नुकसान झाले. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे आणि विलास दडस यांच्या मार्गदर्शनाखाली ही बचाव मोहीम राबवण्यात आली. हडपसरमधील या तात्पुरत्या वसाहतीत राहणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय हातावर पोट असणारे आहेत. मध्यरात्रीच्या वेळी आग लागूनही प्रसंगावधान राखत सर्वजण बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कामासाठी विविध ठिकाणावरून संबंधित ठिकाणी राहण्यासाठी आलेल्या मजुरांचा संसार अशा प्रकारे जळाल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मालेगाव येथील न्यायालयात आज घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः उपस्थित राहिले. मात्र यावेळी वातावरण आधीपेक्षा वेगळे होते. न्यायालयीन प्रक्रियेनंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र येत माध्यमांशी संवाद साधला आणि वादावर पडदा टाकल्याची घोषणा केली. संजय राऊत यांनी न्यायालयात आणि माध्यमांसमोर स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या माहितीच्या आधारे आपण मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी मान्य केले. आम्हा दोघांना न्यायालयाने पहिले, विषय आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला मिळालेली माहिती चुकीची होती आणि त्यातून गैरसमज निर्माण झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. दादा भुसे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आपण अब्रुनुकसानीचा दावा मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम, तसेच त्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय आता संपला आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी नमूद केले. वादाची पार्श्वभूमी 178 कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याशी संबंधित होती. संजय राऊत यांनी सामाजिक माध्यमांवर हा आरोप केला होता. दादा भुसे यांनी तो आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत आधीच स्पष्टीकरण दिल्याचे नमूद केले. संबंधित सर्व पैसे आर्मस्ट्राँग कंपनीकडे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही आरोप मागे घेतले गेले नाहीत, म्हणूनच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिली यावेळी दादा भुसे यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी चुकीची माहिती पसरवून हा वाद निर्माण केला. ज्यांच्याकडून माहिती आली तेही आता दुसऱ्या पक्षात गेले असल्याचे सूचक विधान करण्यात आले. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. मात्र राऊत यांनी स्वतः आरोप मागे घेतल्याने आणि खोटेपणा मान्य केल्याने पुढील कारवाईची गरज उरली नसल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य संजय राऊत यांनीही दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे म्हणत विषयाला मैत्रीपूर्ण शेवट दिला. राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक पातळीवर संवाद आणि समज कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सत्ता पक्षात दोघेही वेगवेगळ्या टप्प्यांवर असले तरी वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. एकंदरीत, न्यायालयात सुरू झालेला हा वाद अखेर समझोत्याने मिटला. आरोप, प्रत्यारोप, खटला आणि दंड या सगळ्या प्रक्रियेनंतर दोन्ही नेते एकत्र येत विषय समाप्त झाल्याची घोषणा करताना दिसले. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. त्यामुळे आता हा राजकीय वाद अधिकृतपणे संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरात सध्या दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री थंडीचा फटका असा हवामानाचा लपंडाव सुरू आहे. दुपारी पारा ३४ अंशांवर असताना रात्री तो १६ अंशांपर्यंत खाली येत आहे. या विचित्र हवामानामुळे शहरात व्हायरल इन्फेक्शनचा उद्रेक झाला असून, दर १० पैकी ४ रुग्णांना घसादुखी आणि खोकल्याने ग्रासले आहे. हा त्रास कमी होण्यासाठी किमान ७ ते ८ दिवस लागत असल्याने, नागरिकांनी उन्हातून आल्यावर थेट फ्रिजचे पाणी पिणे टाळून वाफ घेण्यावर भर द्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर भारतात पश्चिमी विक्षोप सक्रिय झाला आहे. याचे वारे पठारी प्रदेशाकडे सरकत असल्याने येत्या ७२ ते ९६ तासांत छत्रपती संभाजीनगरचे किमान तापमान १९ अंशांवरून १५ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. फ्रिजचे पाणी आणि बाहेरचे खाद्यपदार्थ टाळा मेडिकव्हर हॉस्पिटलचे डॉ. समिध पटेल, डॉ. आनंददीप अग्रवाल आणि डॉ. अविनाश कचरे यांनी सांगितले की, जानेवारीत कमी होणारा व्हायरल यंदा फेब्रुवारीत वाढत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दुपारच्या उन्हातून आल्यावर नागरिक थेट फ्रिजमधील अतिथंड पाणी पीत आहेत. तसेच मुलांमध्ये बाहेरचे थंड पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढल्याने घसादुखीचे प्रमाण बळावले आहे. व्हायरल रोखण्यासाठी हे उपाय करा दिव्य मराठी एक्स्पर्ट- श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र. तापमानात २ ते ३ अंशांपर्यंत घट होईल पश्चिमी विक्षोपाचे वारे हे उत्तर भारतात सक्रिय असल्यामुळे त्याचा परिणाम पठारी प्रदेशावर होणार आहे. वातावरणाच्या या बदलामुळे मराठवाडा आणि विदर्भातील किमान तापमानात ३ ते ४ अंश तर कमाल तापमानात २ ते ३ अंशांपर्यंत घट होईल. हा बदल येत्या ७२ ते ९६ तासांत होईल असा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणारी निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील चौथी जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीत भाजपचे अपक्षांसह 136 आमदार, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 56 आमदार आहेत. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा निश्चित मानल्या जात आहेत, तर शिंदे गटाची एक जागा ठरलेली आहे. मात्र उरलेल्या अतिरिक्त मतांवरून चौथ्या जागेवर खरा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. भाजपकडे 16 जादा मते आहेत, तर शिवसेनेकडे 18 अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे शिवसेना आपली 18 मते भाजपला देणार की भाजपची 16 मते शिवसेनेच्या उमेदवारासाठी वापरली जाणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. राज्यातील विधानसभेची एकूण सदस्यसंख्या 286 आहे. अजित पवार आणि शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत. राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत असल्याने कोटा ठरवताना 286 ला 8 ने भाग देऊन त्यात 1 मताची भर घालावी लागते. या गणितानुसार 286 /8 = 35.75 आणि त्यात 1 मत जोडल्यास 36.75 असा आकडा येतो. म्हणजेच प्रत्यक्षात एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान 37 मतांची गरज आहे. हेच गणित लक्षात घेऊन सर्व पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षनिहाय संख्याबळ पाहिल्यास चित्र स्पष्ट होते. भाजपकडे 132 आमदार होते; त्यापैकी एका जागेअभावी सध्या 131 सदस्य आहेत. शिवसेना (शिंदे गट)कडे 57 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडे 41 पैकी एक जागा रिक्त असल्याने 40 आमदार आहेत. काँग्रेसकडे 16, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडे 10 आणि शिवसेना (ठाकरे गट)कडे 20 आमदार आहेत. याशिवाय समाजवादी पक्षाचे 2, जनसुराज्य शक्तीचे 2, राष्ट्रीय युवा स्वाभीमान पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष (रासप), एमआयएम, सीपीआय (एम), पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (पीडब्ल्यूपीआय) आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रत्येकी 1 आमदार आहेत. अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे असे दोन सदस्यही आहेत. या संख्याबळानुसार महायुतीची ताकद 234 पर्यंत पोहोचते. यात भाजप 131, शिवसेना (शिंदे) 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40, तसेच काही छोटे पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीची एकूण ताकद 49 आमदारांपर्यंत मर्यादित आहे. काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10, शिवसेना (ठाकरे गट) 20 आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा धरून ही संख्या 49 होते. उर्वरित तीन आमदार इतर गटांत मोडतात. 37 मतांच्या कोट्यानुसार भाजपकडे 131 आमदार आणि एका अपक्षाचा पाठिंबा धरून 132 मते होतात. 132 ला 37 ने भाग दिल्यास 3.56 असा आकडा येतो. म्हणजे भाजपचे तीन उमेदवार निश्चिंतपणे निवडून येऊ शकतात आणि चौथ्या जागेसाठी त्यांच्याकडे अतिरिक्त मते उरतात. शिवसेना (शिंदे गट)कडे 57 आमदार असून एका अपक्षाच्या पाठिंब्यासह 58 मते मानल्यास 58/37 = 1.56 होते. म्हणजे शिंदे गटाचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो आणि जवळपास 20 मते उरतात. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडे 40 आमदार आहेत. 40/37 = 1.08 या प्रमाणात त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो आणि सुमारे 3 मते जादा राहतात. या सगळ्या गणितातून महायुतीकडून तीन भाजप, एक शिंदेसेना आणि एक अजित पवार गटाचा उमेदवार असे पाच उमेदवार जवळपास निश्चित मानले जात आहेत. उरलेली अतिरिक्त मते एकत्र आल्यास सहाव्या उमेदवारालाही संधी मिळू शकते. त्यामुळे महायुतीकडून सहा खासदार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीचे चित्र मात्र वेगळे आहे. काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि शिवसेना (ठाकरे गट) 20 अशी एकूण 46 मते होतात. समाजवादी पक्ष आणि माकपचा पाठिंबा धरल्यास ही संख्या 49 पर्यंत पोहोचते. 49/37 = 1.32 या गणितानुसार महाविकास आघाडीला केवळ एकच उमेदवार निश्चितपणे निवडून आणता येईल. उरलेली मते अपुरी पडतात. त्यामुळे महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने 10 राज्यांतील 37 रिक्त जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून 5 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. 6 मार्च रोजी छाननी, 9 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आणि 16 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. संपूर्ण प्रक्रिया 20 मार्च 2026 रोजी पूर्ण होणार आहे. 2 एप्रिल 2024 रोजी डॉ. भागवत कराड, डॉ. फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, शरदचंद्र पवार, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले यांची मुदत संपत असल्याने या जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ औपचारिक नसून पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे. विशेषतः महायुतीतील सहाव्या जागेवरून भाजप आणि शिंदे गट यांच्यातील अंतर्गत समन्वय कसोटीवर लागणार आहे. भाजपची 16 जादा मते आणि शिवसेनेची 18 जादा मते यांचा मेळ एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील सात जागांची ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. विधानसभेतील संख्याबळ महायुतीच्या बाजूने असले तरी अतिरिक्त मतांचा वापर कसा होतो, यावर अंतिम चित्र ठरेल. भाजपची 16 जादा मते आणि शिवसेनेची 18 जादा मते यांचा मेळ कसा बसतो, हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत राज्यातील राजकीय वर्तुळात चौथ्या जागेच्या चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
वसमत येथील केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालयातील एका शिक्षीकेला शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या आरोपावरून प्राचार्य पी. के. जगताप याच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २० अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता केंब्रीज महाविद्यालयात नव्याने वादाला तोंड फुटले आहे. वसमत येथील केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बाराबीचे परिक्षा केंद्र आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून विद्यार्थ्यांना उत्तरे सांगण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार परिक्षा केंद्रावरील विभाग प्रमुखांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर दहा ते पंधरा मिनीट सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसून आले. याप्रकरणी अनोळखी शिक्षकावर सीसीटीव्ही बंद करून गाईडमधून उत्तरे सांगितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालय चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान, याच महाविद्यालयातील एका शिक्षीकेची हयातनगर येथील विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयात बाह्य परिक्षक म्हणून बोर्डाकडूनच नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार विश्वशांती महाविद्यालयाने केंब्रीज महाविद्यालयास संबंधित शिक्षीकेचे बाह्य परिक्षक म्हणून नियु्क्तीचे पत्र पाठविले होते. मात्र प्राचार्य जगताप यांनी सदर पत्र स्विकारले नाही. या संदर्भात संबंधित शिक्षीकेने प्राचार्य जगताप यांच्याकडे जाऊन बाह्य परिक्षक म्हणून नियुक्तीचे पत्र का स्विकारले नाही अशी विचारणा केली. मात्र यावेळी प्राचार्य जगताप याने शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप शिक्षीकेने केला आहे. या प्रकरणी त्या शिक्षीकेच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात प्राचार्य पी. के. जगताप विरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहे. दरम्यान, या घटनेनंतर केंब्रीज कनिष्ठ महाविद्यालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला अाहे.
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची वाय प्लस सुरक्षा गृह विभागाने काढून घेतल्याच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुरक्षा पुनरावलोकन समितीच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि संघावर जोरदार टीका केली. राऊत मालेगाव न्यायालयात हजर होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. त्यांच्या विरोधात मंत्री दादा भुसे यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला असून, त्यासंदर्भातील सुनावणीसाठी ते मालेगावात आले होते. याच वेळी त्यांनी दानवेंच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. या देशात फक्त भाजप आणि संघाच्या लोकांनाच धोका आहे, असा त्यांचा आव आणला जातो. प्रत्यक्षात त्यांना कोणी चापटीही मारणार नाही, अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. सुरक्षा हा केवळ स्वतःचे महत्त्व दाखवण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले. राऊत पुढे म्हणाले की, कोणत्याही नेत्याने सुरक्षेचा फार बाऊ करू नये. झेड प्लस, डबल झेड प्लस किंवा एनएसजी कमांडो यांची गरज फक्त भाजप, संघ किंवा शिंदे गटातील लोकांना भासते, अशी टीका त्यांनी केली. इतर पक्षांचे कार्यकर्ते निर्भय आहेत आणि त्यांच्याजवळ येण्याची कुणाची हिंमत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सुरक्षा ठेवली काय किंवा काढली काय, त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही, असे ते म्हणाले. भाजप आणि संघाचे लोक निरर्थक आहेत, त्यांना कोणताही धोका नसताना ते स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रकार्याच्या नावाखाली सुरक्षा घेऊन स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करताना राऊत म्हणाले, त्यांचं राष्ट्रकार्य काय आहे, हे जनतेला दिसत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सुरक्षा ही गरजेपुरती असावी; पण तिचा वापर राजकीय दिखाव्यासाठी केला जाऊ नये. दानवेंची सुरक्षा काढल्यावरून निर्माण झालेला वाद हा प्रत्यक्षात सुरक्षेच्या राजकारणाचे उदाहरण आहे, असे त्यांनी सुचवले. दरम्यान, चंद्रपूरच्या राजकारणावरही राऊतांनी भाष्य केले. उबाठा गटामुळे चंद्रपूरमध्ये महापौर होऊ शकला नाही, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता. या विधानाला राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्यामुळे काहीही बिघडलेले नाही. तुमच्या आपापसातील गटबाजीमुळे हा परिणाम झाला, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दिल्लीमध्ये दोन्ही गटांना समज देण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली होती, असेही त्यांनी नमूद केले. राऊतांच्या मते, चंद्रपूरमधील दोन गट एकत्र आले नाहीत, त्याचाच परिणाम स्थानिक राजकारणावर झाला. आम्ही त्यांच्यासोबत होतो, मात्र अंतर्गत मतभेद मिटवता आले नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे दोष उबाठा गटावर ढकलणे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले असून, सुरक्षा, गटबाजी आणि परस्पर आरोप-प्रत्यारोप यामुळे आगामी काळात वातावरण आणखी ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहेत.
सत्ताधारी पक्षाच्या जळगावमधील एका बड्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंनी या प्रकरणी सदर बड्या नेत्याचे नाव घेतले नाही, पण पोलिसांवर त्याला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. यामुळे हा बडा पदाधिकारी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ खडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सावदा परिसरातील एका मोठ्या गावातील विधवा महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. हा बलात्कार एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. पीडित महिला या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी सावदा पोलिस ठाण्यात गेली होती. ती तिथे दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत थांबली. पण त्यानंतरही तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. आरोपी मोठ्या पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे. तर पीडित महिला विधवा आहे. तिची तक्रार दाखल करून न घेणे हा गंभीर गुन्हा आहे. तब्बल 7 तास ताटकळत ठेवून गुन्हा नोंद नाही संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकाने पीडित महिलेची तक्रार दाखल करून न घेता उलटपक्षी तिलाच धमकावले. तिला बळजबरीने घरी पाठवून दिले. हा सर्व प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मी त्या फुटेजची मागणी केली आहे. आम्हाला ते फुटेज अद्याप मिळाले नाही. पण ही माझी माहिती आहे. एका मोठ्या पदाधिकाऱ्याने विधवा महिलेवर बलात्कार करणे व पोलिसांनी त्याची दखल न घेणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. विशेषतः 7-7 तास पोलिस ठाण्यात ताटकळत उभे करूनही बलात्कार पीडितेला न्याय मिळत नसेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे खडसे म्हणाले. पोलिस अधिकाऱ्यावर केले गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी सावदा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांनी यासंबंधी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक फोटो पत्रकारांना दाखवला. त्याद्वारे त्यांनी पोलिस अधिकारी कशा प्रकारे मंत्र्यांसोबतचे फोटो आपल्या स्टेटसवर ठेवून त्यांना संरक्षण देतात हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत प्रकरणातील आरोपी पदाधिकाऱ्याला राजकीय संरक्षण मिळत असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात मोठी हेराफेरी केली जात आहे. संबंधित पोलिस अधिकारी केवळ गुन्हेगारांना पाठिशी घालत नाही, तर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करत आहे, असे खडसे म्हणाले.
शासकीय कामात अडथळा, 44 जणांवर गुन्हा दाखल:हट्टा येथील प्रकरण; महापुरुषाचा पुतळा अनधिकृतरित्या बसविला
हट्टा येथे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या ४४ जणांवर हट्टा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २० रात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हट्टा येथे जमावबंदी आदेश असतांनाही काही जणांनी एकत्र येऊन महापुरुषाचा पुतळा अनधिकृतरित्या बसविला. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच त्या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याला जमावाने शिवीगाळ केली. पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव प्रक्षोभक झाला होता. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी सावध भूमिका घेतली. मात्र जमावातील काही जणांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच शासकिय कामात अडथळा आणला. या प्रकरणी जमादार ताम्रध्वज कासले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांनी पुष्पक देशमुख, दीपक हातागळे, विशाल चव्हाण, शुभम कदम, चेतन देशमुख, मुकुंद देशमुख, आंबादास भवर, पवन देशमुख, कृष्णकांत देशमुख, गोटू देशमुख, अर्जुन चट्टे, विजय वैद्य, ओमकार देशमुख, बाळू देशमुख, कृष्णा हातागळे, गोविंद शिंदे, माधव चट्टे, गोविंद पवार, गजानन व्यवहारे, लक्ष्मीकांत देशमुख, गजानन डोळस, शिवलिंग पवार, नागनाथ पवार, दिलीप देशमुख, अज्जू पवार, जी. एन. बांगर, विजय कंगळे, रामप्रसाद बांगर, डॉ. मुकुंद देशमुख, भास्कर देशमुख, मनोज वानरे, मुंजा चट्टे, सतीष ठाकूर, कोंडबा देशमुख, अशोक वंजे, प्रदीप देशमुख, संदीप आहेर, शुभम कदम, गोविंद होळकर, ओम कदम, बबलू देशमुख, ओमकार चट्टे, बाबा शिंदे, किशन ठाकुर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी पुढील तपास करीत आहेत.
चंद्रपूर महापालिकेत सर्वाधित जागा मिळूनही महापौर बसवण्यात अपयशी आल्याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींची माफी मागितल्याचा दावा केला जात आहे. पण स्वतः वडेट्टीवारांनी हा वादा जोरकसपणे फेटाळला आहे. चंद्रपूर महापालिकेतील वादाप्रकरणी माझी कोणतीही चूक नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. विशेषतः काँग्रेसच्या बैठकीत यासंबंधी कोणती चर्चाच झाली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे तिथे काँग्रेसचा महापौर बसणे जवळपास निश्चित झाले होते. पण ऐनवेळी भाजपने ठाकरे गटाला हाताशी धरून तिथे सत्ता स्थापन केली. आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादामुळे भाजपने चंद्रपुरात संधी साधल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत या प्रकरणी माफी मागितल्याचा दावा केला जात आहे. पण वडेट्टीवारांनी आज पत्रकारांशी बोलताना हा दावा फेटाळून लावला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा - वडेट्टीवार विजय वडेट्टीवार म्हणाले, हे सगळे बकवास आहे. बैठक झाली. पण बैठकीत हा विषयच आला नाही. चंद्रपूरच्या विषयावर चर्चाही झाली नाही. मग हे आले कुठून? हा असा कुठून करतात? मी कशाला माफी मागू? माफी मागायला माझी काय चूक आहे? हे कुणीतरी पेरले आहे. काही आमचे हितशत्रू आहेत. त्या हितशत्रूंनी मी माफी मागितल्याची अफवा पसरवली असेल. पण मी कुठेही माफी मागितली नाही. माझे चुकलेच नाही, तर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कालच्या बैठकीत पुढे आपल्याला काय करावे लागेल यावर चर्चा झाली. त्याच्या आंदोलनाची रुपरेषा ठरवण्यावरही चर्चा झाली. त्यामुळे चंद्रपूरचा विषय मुळात नव्हताच. कुठेही अशी चर्चा झाली नाही. मी माफी मागितली आहे असे कुणी सांगत असेल तर हा निव्वळ बकवासपणा, खोडसाळपणा, नालायकपणा व मूर्खपणा आहे, असेही वडेट्टीवार यावेळी संतापाच्या सूरात म्हणाले. वडेट्टीवारांच्या माफीविषयी नेमका काय केला जात आहे दावा? चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या होत्या. तसेच काँग्रेस पुरस्कृत जनविकास आघाडीनेही 3 जागा आपल्या खिशात टाकल्या होत्या. काँग्रेसला बहुमतासाठी येथे केवळ काही जागांची आवश्यकता होती. ठाकरे गटाच्या मदतीने हे बहुमत मिळवणे फार सोपे होते. पण खासदार प्रतिभा धानोरकर व विजय वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे भाजपने ठाकरे गटाला हाताशी धरून चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन केली. यामुळे धानोरकर व वडेट्टीवार यांच्यावर तीव्र टीका केली जात आहे. काँग्रेस हायकमांडनेही याची गंभीर दखल घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी कालच्या दिल्लीतील बैठकीत या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी व के सी वेणुगोपाल यांची माफी मागितली. त्यावर नंतर बोलू असे म्हणत काँग्रेस नेत्यांनी या विषयावर बोलणे टाळले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासासाठी काही महत्त्वाचे दस्तऐवज सादर करू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघाती नसून घातपात असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत विमानाच्या वैमानिकाला हाताशी धरून अजित पवारांचा घातपात केल्याचा दावा केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते दिल्लीत पत्रकारांना सामोरे जात आपल्या दाव्याची खातरजमा करणारे काही तांत्रिक पुरावे सादर करण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांनी गत 18 तारखेला मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी अजित पवारांच्या अपघातावेळी विमानातील इंधनाचे प्रमाण, स्फोटाची तीव्रता, इतर तांत्रिक गोष्टी व तपास प्रक्रियेतील काही कच्च्या दुव्यांवर बोट ठेवले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अजितदादांच्या निधनाविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. आजही रोहित पवार याविषयी काही नवे पुरावे, तांत्रिक माहिती व तपासाशी संबंधित काही महत्त्वाचे दस्तऐवज सादर करण्याची चिन्हे आहेत. रोहित पवारांनी टोर्लर्सचा घेतला होता समाचार रोहित पवार यांनी नुकतेच या प्रकरणी त्यांच्यावर टीका करणाऱ्या ट्रोलर्सचा खरपूस शब्दांत समाचार घेतला होता. भाजप व इतर काही ट्रोलर्स, मी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जे काही बोलत आहे, त्यावरुन मला वेड लागल्याची टीका करत आहेत. होय, मला अजितदादांवरील प्रेमापोटी वेड लागलंय. पण भाजप आणि इतर ट्रोलर्सना पैसे घेऊन काम करण्याचं वेड लागलंय. मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलं आहे. मला एकट्यालाच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला हे वेड लागले आहे. आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणूस आहे. या सगळ्या लोकांना मला एक सांगायचं आहे की, तुम्ही मला पाण्यात बघत आहात. पण माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. या महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी नागरिक माझ्यासोबत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही केले होते भाष्य रोहित पवारांनी यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणावरही भाष्य केले होते. ते म्हणाले होते, मला विलीनीकरणावर बोलायचे नव्हते. पण जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि अजितदादांची इच्छा दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची होती. भावनिक दृष्टीने ते विचार करत होते. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आले असते. दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला भारी वाटते. त्यांच्या पत्रकार परिषद पाहिल्या तर त्यांना विलीनीकरणावर बोलायला फार आवडते. आम्हीच अजितदादांचा अपघात की घातपात या विषयावर बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे आहे त्यावर मी बोलले पाहिजे असे वाटत नाही, असे ते म्हणाले होते.
प्रतिनिधी | अमरावती जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांनी शासन दरबारी प्रलंबित ११ न्याय मागण्यांच्या मान्यतेसाठी मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषद मुख्यालय प्रवेशद्वारा लगत अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आहे. जो पर्यंत मागण्यापूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार मागील अनेक महिन्यांपासून मागण्यांबाबत जिल्हा स्तरावर चर्चा झाली. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. समुदाय आरोग्य अधिकारी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मातृ-बाल आरोग्य सेवा, लसीकरण, संसर्गजन्य रोग नियंत्रण, आरोग्य जनजागृती आदी कार्यांमध्ये ते सक्रिय सहभाग घेत आहेत. मात्र, त्यांच्या सेवेशी संबंधित समस्या आणि मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. यावेळी आंदोलकांनी सांगितले की, आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने केले जात असून शासनाने तातडीने चर्चा करून न्याय द्यावा. अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेने स्पष्ट केले आहे की मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. शासनाने संवाद साधून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आंदोलनात डॉ. मनोज दाणे, डॉ. अनुराधा उभाळे, अपेक्षा देशमुख, डॉ. समाधान तायडे, डॉ. साकिब अहमद, अनिल एकडे, डॉ. अंकुश मानकर, गजानन शिंगणे, मयूर भगत, निखिल कावळे, डॉ. प्रतीक्षा पार्डीकर, देविदास बनसोड, जबीउल्ला बेग, दत्तू सुरुशे, श्रुती रिपूरकर, डॉ. निखिल देशमुख यांच्यासह अधिकारी सहभागी झाले आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी यांचे प्रलंबित असलेले सर्व इन्सेंटिव तात्काळ अदा करण्यात यावे. भविष्यात इन्सेन्टिव अदा करण्यासाठी निश्चित वेळापत्रक लेखी स्वरूपात जाहीर करण्यात यावे. बिगर आदिवासी भागात आदिवासी , दुर्गम (मेळघाट) भागात सक्तीने ड्युटी लावण्यात येऊ नये. सर्व राष्ट्रीय, राज्यस्तरीय कार्यक्रमांचे अतिरिक्त काम फक्त सीएचओ कडूनच करून घेण्यात येऊ नये. आंतर-जिल्हा बदली आदेश प्राप्त झालेल्या सीएचओ यांना कोणताही विलंब न करता तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे. आदिवासी व बिगर आदिवासी भागात कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था, विमा संरक्षण व निवास सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी. नियमित कामा व्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामासाठी स्वतंत्र मानधन देण्यात यावे. दुर्गम व नेटवर्क अभावी अडचणी असलेल्या मेळघाट भागासाठी ऑफलाईन प्रणाली अधिकृतपणे मान्य करण्यात यावी. पगार व इन्सेंटिवअदा प्रक्रियेमध्ये पूर्ण पारदर्शकता ठेवून त्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यात यावी. आदिवासी व बिगर आदिवासी भागासाठी स्वतंत्र एसओपी निश्चित करण्यात यावे. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या ११ मागण्यापुढीलप्रमाणे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती:मोर्शी नगरी शोभायात्रा रॅलीमुळे दुमदुमली
प्रतिनिधी | मोर्शी शिवतीर्थ प्रतिष्ठान व शिवजयंती उत्सव समिती मोर्शीच्या वतीने शिवजयंती निमित्ताने काढलेल्या शोभायात्रा रॅलीने मोर्शी नगरी दुमदुमली. या रॅलीत ट्रॅक्टरवर सजवलेल्या देखावे, वारकरी संप्रदाय दिंडी, मलखांब पथक, आदिवासी नृत्य व ढोल ताशा प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले. शिंभोरा रोडवरील वृंदावन मंगल कार्यालयापासून सायंकाळी ६ वाजता या शोभायात्रा रॅलीची सुरुवात केली. सर्वप्रथम माधवदास महाराज, खासदार डॉ.अनिल बोंडे, शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील सोमवंशी, नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने, नगरसेवक रवींद्र गुल्हाने, अक्षय राऊत यांच्या शुभहस्ते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पूजा आणि महाआरती करून रॅलीची सुरुवात केली. ही रॅली छत्रपती शिवाजी चौक, जयस्तंभ चौक, व्यापारी बाजारपेठ, गांधी चौक, गुजरी बाजार, सूर्योदय मंडळ, कामगार चौक ते पंजाबबाबा सभागृह येथे रॅलीची सांगता केली. शोभायात्रेदरम्यान ११ ट्रॅक्टर सजवण्यात येऊन त्यावर लवकुश, जय हनुमान, गोवर्धन पर्वत, राम सीता, लक्ष्मण, वामन अवतार, झाशीची राणी, श्रीराम दरबार, अहिल्या उद्धार, केवट प्रसंग, लक्ष्मीनारायण, शिवपार्वती, गोमाता, भारतमाता मूर्ती, बजरंग बलीची विशाल मूर्ती अशा विविध प्रकारच्या साकारलेल्या चित्ररथांमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. समोर घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज व झाशीची राणी त्यामागे वारकरी सांप्रदायीक दिंडी लेझीम पथक, शौर्य रुद्राक्ष बँड पथक सहभागी होऊन या शोभायात्रा रॅलीचे जागोजागी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशाच्या निदानात स्वागत केले. विविध सामाजिक संघटनेच्या वतीने शोभायात्रा रॅली मार्गावर थंड पाणी, मठ्ठा, सरबत, बर्फी व नाश्त्याची व्यवस्था केली होती. स्थानिक जयस्तंभ चौक येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती मंदिरासमोर मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंदू यावलकर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन उमाळे यांच्या हस्ते महाआरती केली. या शोभायात्रा रॅली मार्गावर मुलींनी सडा रांगोळ्या टाकून रस्ता सुशोभित केला होता. छत्रपती शिवाजी चौक, जयस्तंभ चौक व रामजीबाबा मंदिर चौक येथे नागरिकांना विशेष झाकीचे दर्शन प्राप्त झाले. शोभायात्रा रॅली मार्गावर दोन्ही बाजूंना शहरातील व गाव खेड्यातील महिलांनी विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी रॅली बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गजबजलेल्या चौकातील तीनही झाक्या नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या. यावेळी मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवजयंती उत्सव समिती व सर्वपक्षीय कार्यकर्ते,शिवउत्सव समितीचे मार्गदर्शक, सल्लागार इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
प्रतिनिधी | अमरावती विद्यार्थ्यानी भौतिकशास्त्राच्या पारंपरिक अभ्यासाबरोबरच पर्यावरण व परिसंस्था अभ्यासामधील भौतिक शास्त्राच्या आंतर शाखीय उपयोगांची ओळख व्हावी, या उद्देशाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात फिजिक्स क्लब अंतर्गत ‘फिजिक्स ऑफ रेनफॉरेस्ट इकॉलॉजी’ वर विशेष व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील भौतिक शास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख व प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ प्रा. डॉ. सुभाष बेहेरे यांनी वर्षावन परिसंस्थेच्या अभ्यासामध्ये भौतिक शास्त्राची भूमिका सोप्या आणि उदाहरणांसह स्पष्ट केली. ऊर्जा प्रवाह, ऊष्मागतिकी, द्रवगतिकी, किरणोत्सर्ग संतुलन, आर्द्रता चक्र, पर्जन्यमानाचे स्वरुप आणि जैवविविधतेचे वितरण या सर्व घटकांचा अभ्यास भौतिक शास्त्रीय तत्त्वांच्या साहाय्याने कसा करावा, आधुनिक वैज्ञानिक साधने, गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विश्लेषण यांचा वापर करून पर्यावरणीय बदलांचा अभ्यास कसा केला जातो, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणीय भौतिकशास्त्र आणि परिसंस्था संशोधनातील करिअर व संशोधनाच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना हवामान बदल, जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय संतुलन यांसारख्या जागतिक समस्यांच्या निराकरणामध्ये भौतिक शास्त्रज्ञांची भूमिका कशी महत्त्वाची आहे. याविषयी व्याख्यानाच्या माध्यमातून महत्वाची माहिती मिळाली. विद्यार्थ्यानी आंतर शाखीय संशोधन क्षेत्रांकडे वळावे आणि भौतिकशास्त्राच्या ज्ञानाचा समाजोपयोगी संशोधनासाठी उपयोग करावा, असे आवाहन व्याख्याते डॉ. बेहरे यांनी केले. यावेळी डॉ. बेहरे यांनी विद्यार्थ्यांना विविध शंकांचे निरसन केले. प्रास्ताविकेतून विभागप्रमुख डॉ. संदीप वाघुळे यांनी व्याख्यानाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. आभार फिजिक्स क्लबचा अध्यक्ष व एम.एस्सी. भाग-दोनचा विद्यार्थी आदित्य प्रधान याने मानले. व्याख्यान कार्यक्रमाला विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी | अमरावती शिवरायांच्या संस्कारांची आणि मूल्यांची आजच्या काळात गरज असून तरुण पिढीने शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपावा, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली, या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तथा प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, प्रादेशिक कला विभागाचे समन्वयक डॉ. भोजराज चौधरी व आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते. कुलगुरू पुढे म्हणाले की, आजच्या काळात सर्वांना आपल्या हक्कांची जाणीव आहे, परंतू, आपण आपल्या जबाबदाया विसरत चाललो आहोत. तरुण पिढीने अमली पदार्थांच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. वाढता स्क्रीन टाईम तरुणांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि सहनशीलतेवर विपरीत परिणाम करत आहे. शिवजयंती म्हणजे केवळ रॅली किंवा उत्सव नसून, ती स्वतःच्या भूमिकेचे आणि राष्ट्रभक्तीचे आत्मचिंतन करण्याची संधी असल्याचेही ते म्हणाले. तसेच विद्यापीठात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या शस्त्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्फूर्ती गीत स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, एकपात्री प्रयोग स्पर्धा आणि पोवाडा स्पर्धा अशा उपक्रमांद्वारे शिवरायांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्याबद्दल कुलगुरूंनी विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. केवळ उत्सव साजरा न करता, शिवरायांच्या विचारांचा जागर करून आपण समाजासाठी काय करू शकतो, याचा विचार प्रत्येकाने करावा, असे आवाहनही कुलगुरूंनी याप्रसंगी केले. तत्पूर्वी, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने सुरु झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रा. शुभम पाचखंडे यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. प्रास्तविक भाषणातून संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी १६ ते २१ फेब्राुवारी दरम्यान शस्त्र प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, स्फूर्ती गीत स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, एकपात्री प्रयोग स्पर्धा आणि पोवाडा आदी स्पर्धा आयोजना मागील भूमिका मांडली. श्री वैभव म्हस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. पेटेन्ट मिळाल्या बद्दल डॉ. रत्नशील खोब्रागडे यांचा, सॉफ्टबॉल स्पर्धेत मेडल मिळविल्याबद्दल राधिका उमेश दानखेडे हिचा, तर उत्कृष्ट छायाचित्र काढल्याबद्दल ईारी गांजरे हिचा कुलगुरूंनी सत्कार केला. याप्रसंगी सहा वर्षाचा शिवांश इंगळे याने ‘छत्रपती संभाजी महाराजांवर’, तसेच अमरजित वानखडे व चमूने ‘अफजलखानचा वध’ सुरुवातीला पोवाडा सादर केला. संचालन प्रा. आदित्य पुंड याने, तर आभार डॉ. भैय्यासाहेब चिखले यांनी मानले. कार्यक्रमाला उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, श्री विक्रांत मालवीय, डॉ. अनिता पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते. प्र- कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांचे वर्णन करताना लिहिलेल्या शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप या ओव्यांचा उल्लेख करत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आठवण करून दिली. समाजाला आपल्या हक्कांची पूर्ण जाणीव आहे, परंतू, आपण आपल्या जबाबदाया विसरत चाललो आहोत, अशी खंत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. नागरी शिस्तीचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले रस्त्यावरील खड्ड्यांसाठी प्रशासनाला दोष देतानाच, रस्त्यावर न थुंकणे ही आपलीही जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. शिवजयंती केवळ रॅली काढून साजरी न करता, शिवरायांनी दिलेला राष्ट्र भक्तीचा मंत्र अंगीकारून आपण समाजासाठी आणि देशासाठी काय करू शकतो, याचे चिंतन प्रत्येकाने करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत. राहुल यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात एक वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात मानहाणीचा दावा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आज ते भिवंडी कोर्टात हजर होणार आहेत. यासाठी ते काही वेळापूर्वीच मुंबईत पोहोचलेत. राहुल सकाळी 11.30 वा. कोर्टात पेशीसाठी हजर होणार असल्याची माहिती आहे. आजची त्यांची पेशी जामीन प्रक्रियेच्या औपचारिकतेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
प्रतिनिधी | अकोला जुने शहरातील डाबकी रोडवरील वानखडे नगर येथे शिवशंभू सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शिवप्रेमींनी अत्यंत आकर्षक किल्ल्याचा देखावा उभारून शिवरायांचा जयघोष केला. सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून अन्नपूर्णेश पाटील, संग्राम गावंडे, उपमहापौर अमोल गोगे, कृष्णा शर्मा, मनोज गायकवाड, शशीकांत चोपडे, वैशाली शेळके, माधुरी क्षिरसागर, सोनाली सरोदे, प्रिया सिरसाट आदी उपस्थित होते. शिवप्रमींसाठी शिवभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी शिवशंभू सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वानखडे नगरातील रहिवाशांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी | अकोला माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या शालांत (दहावी) परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. परीक्षेला २२८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील ११८ परीक्षा केंद्रांवर २१,४५५ विद्यार्थ्यांनी मराठीचा पहिला पेपर दिला तर ४६७ विद्यार्थी अनुपस्थित होते. कोठेही कॉपीचा प्रकार घडला नाही. भरारी पथकांसह २० संवेदनशील केंद्रांवर बैठे पथक तैनात होती, असे उपशिक्षणाधिकारी प्रमोद टेकाडे यांनी सांगितले. ^कॉपीमुक्त वातावरणात आणि सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने सर्व उपाययोजना केल्या आहेत. भरारी पथके व बैठ्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, याबाबत शिक्षण विभाग दक्ष आहे. - प्रमोद टेकाडे, उपशिक्षणाधिकारी (मा.). भयमुक्त वातावरणात परीक्षा होण्यासाठी दक्षता
प्रतिनिधी | अकोला पोलिस दलातर्फे पोलिस शिपाई पदांच्या १६१ जागांसाठी सुरू असलेल्या पोलिस भरतीसाठी शुक्रवारी १५०० महिला उमेदवारांना बोलावण्यात आले, त्यापैकी १२६८ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यामधून २५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन ६९९ उमेदवार पात्र ठरले. उन्हाची तीव्रता पाहता पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आजची ८०० मीटर चाचणी ही सकाळी पावणेअकरा वाजता संपली. भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांत महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या मोठी जवळपास ६० टक्के होती. पोलिस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पहाटे ४ वाजेपासूनच या महिला मुलींनी भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली होती. पोलिस प्रशासनानेही भरती प्रक्रिया लवकर सुरू करुन ऊन होण्याच्या आत ती लवकर पूर्ण केली. भरतीसाठी बाहेरगावाहून आलेल्या महिला उमेदवारांनी याबद्दल पोलिस प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. या भरती प्रक्रियेत शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी व कागदपत्र तपासणीचा समावेश आहे. भरती प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ नुसार सुरळीत, पारदर्शक व सुरक्षित पद्धतीने राबवण्यात येत आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, मोबाइल टॉयलेट, पी.ए. सिस्टीम आदी सुविधा उपलब्ध आहेत. ओळख तपासणीसाठी डिजिटल फोटो, बायोमेट्रिक प्रणाली व आरएफआयडी बाहेर गावाच्या उमेदवारांसाठी निवास व्यवस्था बाहेरगावाहून येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था मल्टिपर्पज हॉल, निमवाडी पोलिस वसाहत, अकोला येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रक्रियेदरम्यान केळी, बिस्किट, ग्लुकोज वाटप करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त चांदा येथे मिरवणूक:विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने वेधले लक्ष
प्रतिनिधी|चांदा नेवासा तालुक्यातील चांदा येथे ग्रामपंचायत, अखिल भारतीय मराठा महासंघ प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जि.प. प्राथमिक शाळा व चांदा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला चांदा गावचे सुपुत्र व डीवायएसपी आशिष भाऊसाहेब दहातोंडे व सायली पाटील- दहातोंडे विक्रीकर आयुक्त मुंबई, सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या हस्ते अभिषेक-महापूजा आरती करण्यात आली. त्यानंतर जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची सवाद्य मिरवणूक, लेझीम पथक, शिवजन्माचा पाळणा, विद्यार्थी मनोगते, पोवाडा सादरीकरण अशा विविध उपक्रमांमुळे शिवजयंती उत्सव हा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनोद गुंदेचा उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी संजय लखवाल, सोनई पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, डॉ. दीपक शिंदे, चांदा ग्राम महसूल अधिकारी बोरुडे, प्रशांत कदम, विष्णूपंत दहातोंडे, कारभारी जावळे, भाऊसाहेब जावळे, अरुण दहातोंडे, सरपंच रावसाहेब दहातोंडे, माजी सरपंच सुनंदाताई दहातोंडे, उपसरपंच संगीता दिवटे, बाबासाहेब दहातोंडे, हरिभाऊ दहातोंडे आदींसह जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन वाकचौरे, उपप्राचार्य रघुनाथ भोजने, पर्यवेक्षक राजेश शेंडगे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एम.एम.गर्जे उपस्थित होते. यावेळी लेझीम पथकाचे मार्गदर्शक शिक्षक रोशन सरोदे, अर्जुन वैरागर व प्रा.रावसाहेब राशिनकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजीराजे दहातोंडे यांनी केले. संभाजी गवळी व किरण जावळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व ज्येष्ठ शिक्षक संजय ढेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी|अहिल्यानगर गुणे आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालयाचे संस्थापक वैद्य पंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गुणे महाविद्यालयाच्यावतीने आयुर्वेद ग्रंथांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. दिंडीच्या पालखीत स्व. गुणेशास्त्रींची प्रतिमा व यांनी लिहिलेले दुर्मिळ आयुर्वेद ग्रंथ ठेवण्यात आले होते. आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी गुणे शास्त्रींच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रंथ दिंडीतील पालखीचे भोई होत या दिंडीस प्रारंभ केला. यावेळी प्रमुख पाहुणे नानासाहेब फाटके, ट्रस्टचे सचिव डॉ. विजय भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय लोडे उपस्थित होते. सहभागी प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थ्यांनी गांधी टोपी व वारकरी पोशाख तसेच विद्यार्थिनींनी मराठमोळी वेशभूषा करून हातात भगवे झेंडे घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात व विठ्ठल नामाचा, ज्ञानोबा माऊली तुकाराम गजर करत ही दिंडी मार्गस्थ झाली. सचिन जगताप म्हणाले, गुणे शास्त्री यांनी १०० वर्षांपूर्वी गोरगरीब, गरजू रुग्णांना चांगले आयुर्वेदिक उपचार मिळावे, तसेच तज्ञ वैद्य घडावेत यासाठी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत व तळमळीने हे आयुर्वेद रुग्णालय व महाविद्यालय सुरू केले. अत्यल्प दरात गुणे शास्त्रींनी गोरगरीब रुग्णांवर दर्जेदार आयुर्वेद उपचार करत सेवा केली. आजही स्व. गुणेशास्त्रींच्या विचारांवरच हे रुग्णालय व महाविद्यालय काम करत असून आम्ही मोठ्या अभिमानाने त्यांचा वारसा पुढे चालवत आहोत. स्व. अरुणकाका जगताप यांनी या संस्थेची धुरा सांभाळत या संस्थेला नावारूपाला आणले. त्यांच्या पश्चात आता आम्ही त्यांचे कार्य पुढे नेत आहोत. यावेळी आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे संचालक परिमल निकम, अरविंद शिंदे, वैशाली ससे, ज्ञानेश्वर रासकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरजसिंग ठाकूर, माजी प्राचार्य डॉ.अंजली देशमुख, डॉ. ए. टी. देशमुख आदी उपस्थित होते. दिंडीतील गोल रिंगणाने वेधले नागरिकांचे लक्ष यावेळी ग्रंथदिंडीमध्ये गुणेशास्त्रींनी लिहिलेले जुने व दुर्मिळ आयुर्वेदीय उपचार ग्रंथ ठेवण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वारकऱ्यांची वेशभूषा करुन टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली... तुकाराम महाराजांच्या जयघोषाबरोबरच गुणे शास्त्रींचाही जयघोष करत होते. ही दिंडी वाजत गाजत ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा आयुर्वेद महाविद्यालयात आली. गणपती मंदिर परिसरात व महाविद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथ दिंडीचे झालेले गोल रिंगण यावेळी लक्ष वेधून घेणारे ठरले.
प्रतिनिधी|अहिल्यानगर भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक मावळ्यांचा पोशाख परिधान करून, भगवे फेटे व भगवे झेंडे हातात घेत घोषणांनी संपूर्ण शालेय परिसर दणाणून गेला. ढोल-ताशे, झांज पथक, लेझीम पथक व लाठीकाठी पथक अशा विविध पथकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा यावेळी सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका वैशाली कोतकर, ज्येष्ठ संचालक रघुनाथ लोंढे, विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड, बन्सी नरवडे, प्रा. एकनाथ होले उपस्थित होते. प्रा. एकनाथ होले यांनी शिवचरित्रातून संकटांचा सामना कसा करायचा, अडचणींवर मात कशी करायची याची शिकवण मिळते. विद्यार्थ्यांची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागण्यासाठी शिवचरित्राचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, सुरक्षितता, अष्टप्रधान मंडळाची रचना, राज्यकारभार, किल्ल्यांचे संवर्धन व जतन, नेतृत्वगुण, शक्तीपेक्षा युक्ती भारी ही संकल्पना अशा अनेक गुणांची माहिती शिवचरित्रातून मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक संस्थेचे ज्येष्ठ संचालक रघुनाथ लोंढे होते. इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका वैशाली कोतकर व भाग्योदय विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी|अहिल्यानगर ग्रामीण साहित्य संमेलन ही केवळ काव्याची मैफल नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. शाहिरी, पोवाडे आणि काव्य यांच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न मांडले गेले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमधील स्वराज्य, न्याय आणि समानतेची तत्त्वे आजही तितकीच प्रेरणादायी आहेत. युवकांनी साहित्याच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवण्याचा संकल्प करावा असे आवाहन ॲड. भूषण बऱ्हाटे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे पाचवे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. युवकांनी समाजातील जबाबदाऱ्या ओळखून आदर्श नागरिक म्हणून पुढे यावे. साहित्य आणि संस्कृती ही समाजघडणीची प्रभावी साधने आहेत. अशा उपक्रमांमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मत सुपे पोलीस स्टेशनच्या पोलीस निरिक्षक ज्योती गडकरी यांनी व्यक्त केले. साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार, एकोप्याचा संदेश देत या संमेलनाने ग्रामीण भागात वैचारिक चळवळीचा जागर घडवला. शाहिरी पोवाडे, काव्यवाचन आणि सामाजिक आशयाच्या सादरीकरणातून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’, सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आदी विषय प्रभावीपणे मांडण्यात आले. हे संमेलन ‘मेरा युवा भारत’, जिल्हा क्रीडा कार्यालय, किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. ॲड. भूषण बऱ्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर, कोतवाली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, संमेलनाचे संयोजक नाना डोंगरे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराच्या क्रीडा वैभवात भर टाकणाऱ्या वाडियापार्क मैदानाचे नूतनीकरण होणार असून खेळाडूंचे जागतिक दर्जाच्या सुविधांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. ५३ कोटींच्या निधीतून या मैदानावर अत्याधुनिक सोयीसुविधा उभारल्या जाणार आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन शुक्रवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी प्राप्त झाला असून, पहिल्या टप्प्यातील १५ कोटींच्या कामांना सुरुवात होत आहे. या प्रकल्पामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार असून स्थानिक खेळाडूंना सरावासाठी हक्काचे आणि दर्जेदार व्यासपीठ मिळणार आहे. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मनपा आयुक्त यशवंत गाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदी उपस्थित होते. वाडियापार्क लवकरच आधुनिक क्रीडा संकुलाच्या रूपात उभे राहील, असा विश्वास व्यक्त करुन केडगावात ७ एकर जागेवर आयपीएल आणि वनडे मॅचेस होतील असे स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. जागतिक दर्जाची प्रमुख कामे . धावपटूंसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार १५ मिमी जाडीचा आणि ४०० मीटर लांबीचा ८ लेनचा ‘सिंथेटिक ट्रॅक’ उभारण्यात येणार आहे. .क्रिकेटसाठी विशेष खेळपट्टी (टर्फ विकेट) तयार केली जाणार असून, मैदानावर फ्रेश गार्डन सॉइल आणि फार्मयार्ड मॅन्युअरचा वापर करून दर्जेदार लॉन विकसित केले जाईल. . मैदानाच्या देखभालीसाठी २० एच.पी. मोटारसह ‘ऑटोमॅटिक पॉपअप स्प्रिंकलर सिस्टीम’ बसवण्यात येईल, यामुळे मैदानाची हिरवळ कायम राहील.. बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी (२ मैदाने) आणि खो-खो (२ मैदाने) या खेळांच्या मैदानांवर स्टील स्ट्रक्चर आणि कलर कोटेड शीट वापरून मजबूत छत उभारले जाईल. खेळाडूंना कोणत्याही हवामानात सराव करणे शक्य होईल.
मनमानी नियमांनी वाढवला विद्यार्थ्यांचा तणाव:दहावी परीक्षा - पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्हाभरात एकही कॉपीकेस आढळली नसल्याचा दावा, जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे. या परीक्षेला ८८९ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परंतू काही केंद्रांमध्ये कक्षात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे पॅड बाजुला ठेवण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांना बूट कक्षा बाहेरच काढण्याच्या सूचना दिल्या. प्रत्यक्षात बूट घालू नये, किंवा लिहिण्यासाठी पॅड कोणता वापरावा याची कोणतेही आदेश बोर्डाने दिले नाहीत. परंतू, परीक्षा केंद्रांमध्ये मनमानी नियम लावून, विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढवण्याचा प्रकार घडला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने नियोजित दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू झाली, परंतू या परीक्षेत पहिल्याच पेपरला कॉपीबहाद्दर आढळून आले. कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व परीक्षा केंद्रांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तथापि, बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यानुसार शुक्रवारी दहावीचा पहिला पेपर होता. या परीक्षेत कॉपी आढळून येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन डमी विद्यार्थी शोध तसेच कॉपीमुक्तीसाठी सूचना दिल्या होत्या. समर्थ विद्यालयासह काही केंद्रांमध्ये गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याच्या उपक्रमाचे कौतूक उर्वरित पान ४ बूट व पॅडबाबत सूचना देऊ मी काही केंद्रांना भेट दिली, त्यावेळी एक पॅड बाहेर दिसला. तर मी पॅड पाहिले तर त्यावर लिहिण्याची संधी होती. शूजमध्ये कॉपी चेकिंग करण्यात आली असावी. किंवा कक्षात जाण्यापूर्वी ते काढून ठेवले असावेत. परंतू, बूट व पॅडबाबत मी लगेच सूचना जारी करणार आहे. विनाकारण विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होऊ नये, याची काळजी घेतली जाईल. - संध्या गायकवाड, जिल्हा शिक्षणाधिकारी.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या वादावर माफी मागून पडदा टाकला आहे. पण काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी पुन्हा एकदा टिपूची तुलना छत्रपतींशी करून या वादाला फोडणी दिली आहे. त्यामुळे या वादाचे भूत पुन्हा एकदा काँग्रेसच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या टिपू सुलतानच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. मालेगावच्या नगरसेविका शान ए हिंद यांनी आपल्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावल्यावरून हा वाद सुरू झाला. नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कथितपणे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. या प्रकरणी विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर त्यांनी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकला. त्यामु्ळे हे प्रकरण शांत झाल्याचे वाटत असतानाच आता शाहू महाराज छत्रपती यांनी पुन्हा एकदा या वादाला फोडणी देण्याचे काम केले आहे. नेमके काय म्हणाले शाहू महाराज? खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी कथितपणे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊनच म्हैसूरच्या टिपू सुलतानने काम करायचे ठरवले होते. आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो. तेव्हा टिपू सुलतानसुद्धा ब्रिटिशांविरोधात लढत होते. या काळात ब्रिटिशांना मदत कुणी केली हे पाहण्याची गरज आहे. शिवाजी महाराज सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. राज्य कारभार, प्रशासन व शत्रूविरोधातील लढाई यामध्ये शिवरायांनी दाखवलेला आदर्श अनेक राजांनी स्वीकारला होता. त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनीही शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत पुढील वाटचाल केली आहे, असे ते म्हणाले होते. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी इतिहासातील घटनांवर रोज नवे वाद होत असल्याची खंत व्यक्त करत ऐतिहासिक घटनांवर वाद घालण्यापेक्षा त्यातून योग्य ती प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला. सध्या इतिहासातील अनेक घटनांवर रोज नवे वाद होत आहे. पण इतिहासातील घटनांवर वाद घालण्यापेक्षा त्यातून योग्य ती प्रेरणा घेण्याची गरज असते, असे ते म्हणालेत. वादानंतर सपकाळांनी मागितली होती माफी हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या विधानाप्रकरणी माफी मागितली होती. तसेच या वादाचे खापर सत्ताधारी भाजपवर फोडले होते. ते म्हणाले होते, सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे 70 सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे. मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती. प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू, असे ते म्हणाले होते.
शिंदोळ येथे तालुकास्तरीय खुली क्रीडा स्पर्धा:२७३ युवक-युवतींचा सहभाग
प्रतिनिधी | सोयगाव दैनंदिन धावपळीच्या युगात माणसाची मानसिक ताणतणावातून मुक्तता व्हावी, मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी मैदानी खेळ खेळणे खूप महत्त्वाचे आहे. आयुर्वेदातही मैदानी खेळाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. याच उद्देशाने युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, भारत सरकार' यांच्या संकल्पनेतून माय भारत, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय' यांच्या नेतृत्वाखाली सेवा संकल्प युवा मंडळ, शिंदोळ' आयोजित शिंदोळ येथे सोयगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली. स्पर्धेत तालुक्यातील एकूण २७३ युवक व युवतींनी सक्रिय सहभाग नोंदविला. युवक व युवती गटासाठी १०० मी. धावणे, गोळाफेक, रस्सीखेच, कबड्डी या स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी ग्राम युवक कल्याण व क्रीडा समिती, आपदा मित्र समिती, सिद्धिविनायक मित्रमंडळ व शंभूराजे मित्रमंडळ यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी | खुलताबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व श्री सरस्वती भुवन विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय विशेष शिबिराचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोमीनाथ खाडे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश पाटील होते. दरम्यान, शिबिराच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी मावसाळा गावात कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावली. हे सात दिवसीय शिबिर १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, पाणलोट व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, जनजागृती आणि विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यावर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य “पाणलोट व्यवस्थापन व पडीक जमिनीच्या शाश्वत विकासासाठी युवा” या संकल्पनेवर आधारित आहे. विद्यार्थ्यांकडून श्रमदान आणि जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. या शिबिरात महाविद्यालयातील एकूण ८५ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. योगेश रेड्डी व डॉ. सोनल नंदनूरवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. सोमीनाथ खाडे यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. प्राचार्य डॉ. सतीश पाटील यांनी समाजाभिमुख कार्यातून नेतृत्वगुण विकसित करण्याचे आवाहन केले. दरम्यान, राष्ट्रीय सेवा योजनेच्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि ग्रामविकासासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण होत असल्याचे चित्र मावसाळा येथे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे. स्वच्छता आणि जनजागृती अभियान : शिबिराच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी मावसाळा गावात व्यापक स्वच्छता जनजागृती अभियान राबवले. विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम आणि रॅली काढून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी गावातील प्लास्टिक कचरा जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली. संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मावसाळा येथील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर अक्कर, ग्रामविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, प्रा. सागर गवळी, आतिश देवगिरीकर, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी | वरूड पिंप्री सिल्लोड तालुक्यातील पिंप्री वरूड गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा झाला. बालयोगी महंत श्री सर्वानंद सरस्वती महाराज पंचक्रोशी आश्रम धानोरा, बालयोगी महंत स्वामी जगन्नाथ गिरी महाराज पीठाधीश्वर श्री गहिनीनाथ महाराज संस्थान सारोळा यांच्या हस्ते अनावरण झाले. छत्रपती संभाजीनगर येथून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने आणण्यात आला. सकाळी ११ वाजता निघालेली मिरवणूक छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, आळंद, भवन, सिल्लोडमार्गे सायंकाळी पिंप्रीत पोहोचली. मार्गातील प्रत्येक गावात ग्रामस्थांनी पुष्पहार घालून स्वागत केले. पिंप्रीत महाराजांच्या आगमनाच्या उत्सुकतेने प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावला. घरासमोर रांगोळी काढली. सायंकाळी प्रत्येक दारी दिवे लावले. पुतळ्याचे गावात आगमन होताच जल्लोष झाला. त्यानंतर गावात अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील लहान मुलांच्या लेझीम पथकाने मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर महाराज सिंहासनावर विराजमान झाले. फुलांचा वर्षाव झाला. गुलालाची उधळण झाली. फटाक्यांची आतषबाजी झाली. बालयोगी महंत स्वामी जगन्नाथ गिरी महाराज यांनी उपस्थितांना संबोधित केले. शिवाजी महाराजांचे आचार-विचार आचरणात आणा, असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब घाळगीळ, सर्जेराव सिरसाट यांनी आभार मानले.
प्रतिनिधी |खामगाव /आळंद श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता नायगव्हाण येथे झाली. उपस्थितांनी चहा, पोहे व बुंदीचा अल्पोपाहार घेतला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य मोहनराव पाटील सोनवणे यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक अभिलाष पाटील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा पार पडला. बॅन्जो पथक, लेझीम पथक, स्काऊट गाइड पथक तसेच सजविलेल्या रथांसह भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. पथक क्रमांक १ ने ‘जिजाऊंचे संस्कार', पथक क्रमांक २ ने ‘रायरेश्वरवरील शपथ', पथक क्रमांक ३ ने ‘शिवराज्याभिषेक सोहळा', तर पथक क्रमांक ४ ने ‘शिवराय आणि संत तुकाराम : धर्म, नीती आणि स्वराज्याचा संगम' हे देखावे सादर केले. रथामध्ये शिवराय व माँ जिजाऊ साहेबांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात व भगव्या पताकांच्या लहरीत निघालेल्या या मिरवणुकीमुळे परिसर शिवमय झाला होता. जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक आळंद येथे पोहोचली. तेथे अश्वारूढ पुतळ्याला मोहनराव पाटील सोनवणे, सरपंच गायके, सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष आदींनी पुष्पहार अर्पण करून महाआरती केली. त्यानंतर स्काऊट गाइड विद्यार्थ्यांनी मार्चपासद्वारे मानवंदना दिली. मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके ः क्रीडा शिक्षक मयूर बोढारे यांनी रोपमल्लखांब व मल्लखांबवरील शिवकालीन मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. मुलींनी स्वसंरक्षणासाठी घेतलेल्या प्रशिक्षणांतर्गत लाठी-काठी व तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. दिगंबर देवरे यांनी सूत्रसंचालन केले.
शिवजयंतीनिमित्ताने गव्हाली गावात पालखी मिरवणुकीसह नाटिका सादर:ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली
प्रतिनिधी | गव्हाली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती गव्हाली गावात मोठ्या उत्साहात साजरी झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ यांची वेशभूषा साकारली होती. गावातून पालखी मिरवणूक काढली. वेशभूषेमुळे मिरवणुकीत विशेष आकर्षण निर्माण झाले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली. गावातील माता-भगिनींनी शिवाजी महाराज, माँ जिजाऊ वेशभूषेचे पूजन केले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी गव्हाली परिसर दुमदुमला. मिरवणुकीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिजाऊ वंदना झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाली. गव्हाली येथील महाराणा प्रताप विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरवाडीतील शाळेतील वस्तीवरील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, अफजल खान यांच्या जीवनचरित्रावर छोट्या नाटिका सादर केल्या. उपस्थित गावकऱ्यांचे लक्ष वेधले.
उत्पादकांतून नाराजी:वैजापूरला मका खरेदीचा कोटा संपला; अजूनही २० हजार क्विंटल मका बाकी
शासकीय भरडधान्य मका खरेदी केंद्राने तब्बल १ कोटी २२ लाख ४९ हजार ६०० रुपयांचा ५ हजार १०४ क्विंटल मका खरेदी करून परवानगीपेक्षा अधिक खरेदीचा आकडा गाठला आहे. असे असले तरी तालुक्यात अजूनही सुमारे २० हजार क्विंटल मका शेतकऱ्यांकडे पडून आहे. आता कोटा पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची कोंडी झाली असून खरेदीचा कोटा वाढणार की शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात फिरावे लागणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. वैजापूर शहरातील नौगाजीबाबा दर्गावेस परिसरातील शासकीय गोदाम तसेच शिऊर व लाखगंगा येथे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत मका खरेदी सुरू आहे. तालुक्यातील सुमारे २,४०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली असतानाही सुरुवातीला केवळ १,८८३ क्विंटल खरेदीची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात १ कोटी २२ लाख ४९ हजार ६०० रुपयांची ५,१०४ क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. तरीदेखील तालुक्यात अजूनही २० हजार क्विंटलपेक्षा अधिक मका शेतकऱ्यांकडे पडून असल्याने खरेदी कोटा वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. प्रति शेतकरी २७ क्विंटल ९० किलो खरेदीचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. मात्र खरेदी-विक्री संघाचा कोटा संपल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजारात मक्याला प्रतिक्विंटल १५०० रुपयांपेक्षा कमी दर मिळत असताना शासकीय केंद्रावर २४०० रुपयांचा हमीभाव आहे. त्यामुळे शेतकरी तोट्यात विक्री करण्याऐवजी हमीभावाच्या प्रतीक्षेत थांबले आहेत. डेडलाइन जवळ; शेतकरी प्रतीक्षेत मका खरेदीची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी असून ४५० शेतकऱ्यांना ऑनलाइन संदेश पाठवण्यात आले आहेत. मात्र कोटा संपलेला असताना तालुक्यात अजूनही २० हजार क्विंटलपेक्षा अधिक मका शिल्लक आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. कोटा वाढवण्याचा शासनाकडे अधिकार जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने खरेदी-विक्री संघाला केवळ १,८८३ क्विंटल मका खरेदीची परवानगी दिली होती. मात्र शेतकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आतापर्यंत १ कोटी २२ लाख ४९ हजार ६०० रुपयांची ५,१०४ क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. तरीही तालुक्यात २० हजार क्विंटलपेक्षा अधिक मका शिल्लक आहे. पुढील कोटा वाढवण्याबाबत शासन काय निर्णय घेते, हे सध्या सांगता येणार नाही. - अनिल चव्हाण, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ, वैजापूर
ताजनापूरला भगवान एकलव्य जयंती उत्साहात:परिसरात सामाजिक एकात्मतेचे वातावरण
प्रतिनिधी | खुलताबाद तालुक्यातील ताजनापूर येथील एकलव्यनगर, भिल्ल समाज वस्तीमध्ये भगवान एकलव्य जयंती उत्साहात साजरी झाली. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरात सामाजिक एकात्मतेचे वातावरण दिसले. कार्यक्रमाला नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या रेखाताई चव्हाण, पंचायत समिती सदस्या सुनीता खंडागळे, संजय खंडागळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी एकलव्यांच्या त्याग, निष्ठा, शिक्षणनिष्ठ जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात पंचायत समिती सदस्या सुनीता खंडागळे यांनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. स्वखर्चातून बोअरवेल, इलेक्ट्रॉनिक पंप उभारणीचे काम पूर्ण केले. या वेळी जलपूजन झाले. कामाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर दिलासा मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांना फराळाचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्या रेखा चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, रावसाहेब देशमुख, अंकुश काळे, रामेश्वर गायकवाड, किशोर कारभार, कैलास काळे, अनिल कारभार, मनोज काळे, दीपक काळे, गणेश काळे, नितीन काळे, नीलेश काळे, संदीप काळे, अलीम पठाण आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी | पिशोर येथील शिव प्रबोधन प्रतिष्ठाण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात शिवजयंतीसाठी महिला, पुरुषांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला अबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. ६ तास चाललेल्या मिरवणुकीत रंगत आली. लहान मुलींनी पैठणी साडी परिधान केली. डोक्यावर भगवे फेटे बांधले. मिरवणुकीला वेगळेपण आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक मोठा गणपती मंदिरापासून निघाली. कसबा गल्ली दिगर मार्गे सिल्लोड नाका बाजारपेठेत आली. ग्रामपंचायत मैदानासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक पोहोचली. लहानांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेवच्या घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला. यावेळी शिवरायांची महाआरती झाली. मिरवणूक शफेपुर मारुती मंदिराकडे वळली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत गेली. त्यानंतर पुन्हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असलेल्या मोठा गणपतीजवळ आली. मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. सांगता करण्यात आली. मुख्य मार्केटमधील दुकानांमध्ये पंधरा दिवसांपासून शिवजयंतीची तयारी सुरू होती. लहानांपासून सर्वांत मोठे झेंडे आकर्षणाचे केंद्र ठरले. दुकानदारांनी मोठ्या संख्येत भगवे झेंडे आणले. तरीही यंदा काही दुकानदारांना भगवे ध्वज कमी पडले. पुन्हा झेंडे आणून विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले.
पैठण | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील जय महाकाल मित्र परिवारातर्फे ३९६ किलो मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ प्रथम महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. येथे येणाऱ्या शिवप्रेमी नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुनील नलभे, संदेश मुथा, नरेश खोचे, रोहन भुमरे, दत्ताभाऊ निवारे, सुमित दाभाडे, विजय नलावडे, प्रेम विघ्ने, ऋषी फलके, सचिन पोटे, राम कर्डिले, बाळू ठाणगे, संजय गुलालकर आदींनी पुढाकार घेतला होता.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन जागेवर जाऊन डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरला लागलेल्या भीषण आगीत टँकर जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन- देवगाव रंगारी रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळील श्रेयस जिनिंगजवळ घडली. आगीमुळे धुराचे मोठे लोळ दिसत होते. काही काळ देवगाव रंगारी-लासूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. लासूर स्टेशन येथील मयूरी पेट्रोल पंपाचे डोअर स्टेप डिलिव्हरी व्हॅन (जागेवर जाऊन डिझेल पुरवठा करणारे टँकर) एमएच २० ईएल ५८८०) शुक्रवारी दुपारी माळीवाडगाव मयूरी पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक योगेश निघोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पंपावरून ३९०० लिटर डिझेल भरून (डोअर स्टेप डिलिव्हरी) छोटे टँकर घेऊन चालक बाळू राऊत नेहमीप्रमाणे निघून गेले होते. सुरुवातीला पोटूळ येथील तीन हजार लिटर डिझेल दिले. त्यानंतर माळीवाडगावजवळ पुलाचे काम करणाऱ्या ठिकाणी २५३ लिटर डिझेल टाकले. उर्वरित चारपाचशे लिटर डिझेल असलेले टँकर दुपारी पंपाकडे जात होते. येथे डिझेलचा पुरवठा करण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना लासूर स्टेशन- देवगाव रस्त्यावर असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पुलालगत टँकरने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालक बाळू राऊत टँकर सोडून सुरक्षित अंतरावर पळून गेला. घटनेची माहिती मिळताच शशिकांत देशमुख, नारायण ठोळे, नितीन कांजुणे, कुणाल वाघ, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे विनोद बिघोत, राजेंद्र निसर्गे, छोटू पठाण आदी मदत केली. अग्निशामनचे वाहन येईपर्यंत डिझेल टँकर जळून खाक झाले होते.
प्रतिनिधी | सिल्लोड लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या आयशरने वीज खांबाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला दगावली असून, २ जण गंभीर तर ७ जण किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २०) पहाटे सिल्लोड- भराडी रस्त्यावरील आंबा फाट्याजवळ घडली. एका लग्नानिमित्त जळगाव जिल्ह्यातून काही वऱ्हाडी श्रीरामपूर येथे लग्नासाठी शुक्रवारी रात्री जात होते. सिल्लोड शहरापासून अवघ्या सात किलोमीटर पुढे गेल्यावर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. आयशरची रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला धडक बसल्यामुळे ते उलटले. याचदरम्यान पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास भराडी रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू होती. त्यांना आयशर (एमएच १९ सीएक्स ३२५४) पलटी झाल्याचे दिसून आले. यात ३० ते ३५ नागरिक, वृद्ध, लहान मुले असे प्रवासी आढळून आले. दरम्यान, विजेच्या खांबाच्या तारा तुटून पडल्याने स्पार्किंग होत होती. अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी मोठमोठ्याने मदतीसाठी ओरडत होते. पोलिसांनी सतर्कता बाळगत आयशरजवळ पडलेली वीजतार काठीच्या साहाय्याने तत्काळ बाजूला केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातग्रस्त वाहनातील प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून त्यांना ॲम्ब्युलन्सद्वारे सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी अर्चना सपकाळ यांनी जखमी महिला रेखाबाई वसंत गोसावी (रा. बोधवड, जि. जळगाव) यांना मृत घोषित केले. इतर जखमी रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेनंतर पोलिस अधिकारी रवींद्र ठाकरे, सहकारी पोलिस भिकन सतुके यांच्यासोबत मी अवघ्या पाच मिनिटांत अपघातस्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी अपघातग्रस्त वाहनातील प्रवासी मदतीसाठी आरडाओरडा करीत होते. टेम्पोच्या बाजूला विजेची तार तुटून पडलेली होती. त्यातून स्पार्किंग होत होती. सुदैवाने तार अपघातग्रस्त आयशरला चिटकली नव्हती. आम्ही सतर्कता बाळगत ती वीजतार बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. - यतीन कुलकर्णी, पोलिस हवालदार चालकाला डुलकी लागल्याने अपघात चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भास्कर गोसावी यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लहू घोडे करीत आहेत.
पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी असलेल्या वैभव गोपीनाथ जाधव याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूर पालिकेच्या जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी विभागाचे निबंधक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश शंकरराव पाटील यांच्या तक्रारीनुसार, आरोपीने २३ मे २०२३ ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत खोटी कागदपत्रे लातूर महापालिकेत सादर करत अधिकाऱ्यांची दिशाभूल करत आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे दाखवले. त्याआधारे त्याने जिवंत पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळवले. या प्रमाणपत्राच्या आधारे त्याने दुसरे लग्न करून त्या विवाहाची नोंदणीही लातूर महापालिकेतील अधिकृत नोंदवहीत करून घेतली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागाने अंतर्गत पडताळणी केली असता कागदपत्रांत विसंगती आढळली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवला आहे.

27 C