अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड
जळगाव : प्रतिनिधी राज्यात अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेली गुंतवणूक किंवा खरेदी घरात कायमस्वरूपी समृद्धी घेऊन येते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. याच पार्श्वभूमीवर आज सराफा बाजारात मोठी गर्दी […] The post अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला. भाजपने जे विधेयक आणले त्यात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. मनुस्मृती मानणाऱ्या भाजपत महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते, असे ते म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा एखाद्या महिलेच्या हातात देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी संघाला केला. विजय वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मोदींनी 50 हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे भाषण राजकीय प्रचारासारखे होते. त्यांनी आचारसंहितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान व पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा दिल्या आहेत. काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते? सत्ता कायम आपल्या हाती ठेवण्याचा हा भाजपचा कुटिल डाव होता. तो विरोधकांनी हाणून पाडला, असे वडेट्टीवार म्हणाले. भाजपच्या विधेयकात एससी, एसटीसाठी काहीच नव्हते भाजपने आणलेल्या विधेयकात अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. 33 टक्के आरक्षण देताना बहुजन समाजातील महिलांचा हक्क डावलून केवळ आपल्या मर्जीतील लोकांना सत्तेत बसवण्याचे ते षडयंत्र होते. मनुस्मृतीचा विचार मानणारी भाजप महिलांना आपल्या संघटनेत केवळ दुय्यम स्थान देते. ते संघाच्या प्रमुखपदी एखाद्या महिलेला नियुक्त करण्याचे धाडस दाखवणार का? भाजपचा देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचा डाव होता. तो असफल ठरला, असेही विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले. सर्वच उद्योग गौतम अदानींच्या घशात विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्योग गौतम अदानींच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप केला. देशातील रेल्वे, विमानतळ, वीज, सिमेंट, स्टील प्रकल्प हे सर्व नियम धाब्यावर बसवून अदानींच्या घशात घातले जात आहेत. देशातील जनता गरीब होत आहे. याऊलट अदानी श्रीमंत होत आहेत. भाजप व अदानी एकमेकांना पुरक आहेत. ते देशाची लुट करत आहेत, असे ते म्हणाले. महिलांना भाजपचा कावा समजेल हा विश्वास भाजप पुरस्कृत भोंदूबाबा व धर्मांध शक्ती देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महिलांच्या नावाखाली स्वतःची सत्ता वाचवण्याचे प्रयत्न देशातील जागरूक महिलांना नक्कीच समजतील असा आम्हाला विश्वास आहे. अत्याचार व शोषणाच्या घटनेत जात-धर्म शोधणे घृणास्पद आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवनीत राणा व डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारे डॉक्टर अनिल बोंडे यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले पाहिजे, असेही वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.
पाकिस्तानी फुगे मिळाल्याने खळबळ
भरमौर/चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी शेतात एक संशयास्पद फुगा सापडल्याने खळबळ उडाली. त्यावर पीआयए असे लिहिलेले होते, तसेच उर्दूमध्ये काही शब्द आणि पाकिस्तानचा झेंडा काढलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एक ग्रामीण आपल्या जनावरांना चरायला घेऊन शेतात गेला होता. याचवेळी त्याची नजर या असामान्य फुग्यावर पडली. जवळ जाऊन पाहिल्यावर फुग्यावर बनवलेली चिन्हे आणि […] The post पाकिस्तानी फुगे मिळाल्याने खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता
यवतमाळ : प्रतिनिधी सध्या राज्यात महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातून तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही एक अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. राळेगावातील जवळपास ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या […] The post राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट […] The post राज्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉक्टरांच्या हलगर्जीने एकाचा मृत्यू?
लातूर : लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली असून एका १७ वर्षांच्या कोवळ्या तरुणाला साध्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केले पण डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे त्या तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. लातूरचे शासकीय रुग्णालय आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अभिजीत आनंद काळे, वय अवघे १७ वर्ष. कानाच्या वर असलेल्या साध्या चरबीच्या गाठीवर शस्त्रक्रिया […] The post डॉक्टरांच्या हलगर्जीने एकाचा मृत्यू? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती पोलिसांना परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेल्या आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे. यामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता वाढली आहे. परतवाडा लैंगिक शोषणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर पीडित तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचे 5 मोबाईल फोन जप्त केले होते. या मोाईल्समध्ये सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो व चॅट्स होते. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी ते डिलीट केले होते. स्थानिक पातळीवर हा डेटा रिकव्हर करणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी हे पाचही मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळे पाठवले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, 3 मोबाईलमधील डेटा पूर्णपणे रिकव्हर झाला आहे. त्यामुळे डिलीट केलेले व्हिडिओ व फोटो पुन्हा रिस्टोअर झालेत. या रिकव्हर डेटाच्या मदतीने आता पोलिस या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? तसेच या प्रकरणी आणखी काही तरुणींची फसवणूक झाली आहे का? याचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रकरणी आरोपींच्या बँक खात्यांची व आर्थिक व्यवहाराचीही चौकशी केली जाणार आहे. 15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवण्यात यश दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणातील एका 15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांना न घाबरता समोर येण्याचे आवाहन केले होते. अमरावतीचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने यासंबंधी रात्रंदिवस तपास करून या पीडित मुलीचा नागपुरात शोध घेतला होता. अखेर ती शनिवारी अमरावतीत आली आणि तिने आपला जबाब नोंदवला. नेमके काय आहे परतवाडा प्रकरण? अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणींना प्रेम जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल करण्याची गंभीर समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद नामक मुख्य आरोपीसह इतर काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने सोशल मीडियाच्या मदतीने पीडित तरुणींशी मैत्री केली. त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. त्यांचे अश्लील व्हिडिओ व फोटोही व्हायरल केले. पोलिसांनी या प्रकरणी आता आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2026 असणार आहे. 2 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 मे आहे. तर 12 मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. रूपाली ठोंबरे यांचे पत्र जशास तसे रूपाली पाटील ठोंबरे आपल्या पत्रात लिहितात की, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून मा. अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यांने लढा दिला आहे. माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे. मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगत आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे. आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल. त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे. म्हणून आपणास नम्म्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, ही नम्र विनंती, असे रूपाली पाटील यांनी पत्रात लिहिले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण रूपाली पाटील-ठोंबरे या पुण्यातील एक आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या नेहमीच मीडियामध्ये सक्रिय असतात. सध्या महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, रूपाली पाटील यांनी थेट उमेदवारीची मागणी केल्यामुळे पुणे राष्ट्रवादीत आता कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझ्या कार्याचा आणि अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. आता पक्षश्रेष्ठी रूपाली पाटील यांच्या या मागणीवर काय निर्णय घेतात आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर!
मुंबई : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून (२१ एप्रिल) राज्यातील सरकारी कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास तब्बल १७ लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले. संपामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि अन्य अत्यावश्यक सेवांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी […] The post राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लेन्सकार्टच्या ‘टिकली-हिजाब’वादाचे वादळ शमेना; सीईओ पियुष बन्सल यांच्या स्पष्टीकरणानंतरही संताप कायम
नवी दिल्ली: प्रसिद्ध आयवेअर ब्रँड ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कंपनीच्या एका लीक झालेल्या ‘ड्रेस कोड’ पॉलिसीवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या पॉलिसीमध्ये ‘हिजाब’ला परवानगी देण्यात आली होती, मात्र ‘टिकली’ (Bindi) आणि ‘टिळा’ (Tilak) लावण्यावर बंदी घालण्यात आली होती. कंपनीचे सीईओ पियुष बन्सल यांनी यावर स्पष्टीकरण देऊन माफी मागितली […] The post लेन्सकार्टच्या ‘टिकली-हिजाब’ वादाचे वादळ शमेना; सीईओ पियुष बन्सल यांच्या स्पष्टीकरणानंतरही संताप कायम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशभरातील राज्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हयाचा मोलाचा सहभाग रहिला आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रथम आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या प्रशिक्षणामुळे आता कामांमध्ये अचूकता अन गतीमानता येणार आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम देशभरात हाती घेतला आहे. या उपक्रमांमध्ये विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रमासह इतर उपक्रम जिल्हा परिषद व इतर शासकिय कार्यालयांनी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अभियानांतर्गत केंद्राच्या सूचने नुसार ता. २ ते ता. ८ एप्रील या कालावधीत साधना सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमधून सुमारे ५०९८ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५०२२ कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर ४७२२ कर्मचाऱ्यांनी चारतासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्हयांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचे कळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. देशभरात या अभियानांमध्ये महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली असून राज्याच्या या कामगिरीमध्ये हिंगोलीचा मोलाचा सहभाग राहिला आहे. या शिवाय मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद (९० टक्के) सहाव्या क्रमांकावर, नांदेड जिल्हा परिषद (८५टक्के) चौदाव्या क्रमांकावर, लातुर जिल्हा परिषद (८४ टक्के) सतराव्या क्रमांकावर, जालना जिल्हा परिषद (८३ टक्के), एकेवीसाव्या क्रमांकावर, बीड जिल्हा परिषद (७८ टक्के) सव्वीसाव्या क्रमांकावर, धाराशिव (७४टक्के) एकतीसाव्या तर परभणी जिल्हा परिषद (६८ टक्के) बत्तीसाव्या क्रमांकावर आली आहे. कामामध्ये सुधारणा अन गतीमानता येणार - सीईओ विवेक गायकवाड हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला हि जिल्हयासाठी आनंदाची बाब आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा येणार असून कामात गतीमानता व अचुक कामे होतील. त्यामुळे प्रशासन गतीमान होऊन नागरीकांची कामे जलदगतीने होतील.
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) 'एसआयटी'ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या पापाचा पाढा वाचताना पोलिसही चक्रावून गेले आहेत. यातील ८ गुन्हे हे थेट महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित ७ गुन्हे खंडणी, बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. एका बाजूला पोलिस कोठडीतून सुटका होत नाही, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खरातच्या १०० कोटींहून अधिक मालमत्तेची आणि आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत दुपटीने वाढ झाली आहे. कोर्टात काय घडले? अशोक खरात याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टासमोर हजर केले होते. आजची ही महत्त्वाची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची गरज स्पष्ट करताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. आरोपीची पद्धत एकच असली, तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. ते द्रव्य कुठून आणले आणि यामागे कोणाचे मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी ही मागणी खोडून काढताना सांगितले की, पोलिस तेच जुने मुद्दे मांडून पुन्हा पुन्हा कोठडी मागत आहेत. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांची वाढती संख्या विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खरातचे डोके दुखायचे थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही दरम्यान, अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टाकडे एक मागणी केली आहे. अशोक खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. त्याच्या वेदनांवर पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे खरातला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप ११ गुन्ह्यांची चौकशी बाकी आतापर्यंत अशोक खरातच्या केवळ ४ गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित ११ गुन्ह्यांमध्ये अद्याप त्याची सखोल चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पाचव्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला आता पोलिस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. एसआयटीने खरातच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे मोठे दुवे समोर येण्याची शक्यता आहे. तपासातील ७ धक्कादायक आणि थरारक बाबी : रिमोट कंट्रोलचा साप: भक्तांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी खरात २० फुटांचा एक बनावट नाग 'रिमोट कंट्रोल'ने फिरवत असे. या 'चमत्कारा'ला नागरिक दैवी शक्ती मानून घाबरत होते. बनावट चमत्कार: दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसारख्या वस्तूंचा वापर करून तो चमत्काराचा बनाव करायचा. बड्या हस्तींशी 'कनेक्शन': तपासादरम्यान खरातचे अनेक बडे नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी असलेले जवळचे संबंध उघड झाले आहेत. त्या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ५०० कोटींची मालमत्ता: खरातची संपत्ती ५०० कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. 'ईडी' आता त्याच्या मालमत्तेची चौकशी करत आहे. पत्नी अद्याप फरार: खरातची पत्नी कल्पना ही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून ती सध्या फरार आहे. अटकेपासून वाचण्यासाठी तिचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुंगीच्या द्रव्याचा वापर: पीडित महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा गुंगी येण्यासाठी तो विशिष्ट औषधांचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ब्लॅकमेलिंगचे रॅकेट: फसवणूक आणि अत्याचारासोबतच खंडणी उकळण्याचे मोठे रॅकेट तो चालवत होता.
हिंदू खतरे मै कुठे आहे असा सवाल संजय राऊत विचारत आहेत, 1992 ला शिवसेना रस्त्यावर उतरली हे सांगत आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहे, औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात? अफजल खानाच्या पिल्लावळींना सांभाळत आहात? आता अचानक तुम्हाला हिंदूंबद्दल ऐवढी काळजी वाटू लागली का? आजान स्पर्धेवेळी ही काळजी कुठे गेली होती, जनाब राऊत म्हणून घेत होतात तमेव्हा काळजी नव्हती का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला त्यावेळी तुम्ही गप्प होतात त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? याकूब मेमनच्या कबरींचे सुशोभीकरण झाले त्यावेळी तु्म्हाला हिंदूची काळजी नव्हती का? महाराष्ट्रात अनेक धर्मांतरण झाले त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? टीसीएसवर बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंची झाली नाही. म्हणून त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुम्हाला दाढ्या कुरवळायच्या आहेत हे जनतेला माहिती आहे. उबाठा गट लुळा-पांगळा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलण्याचा राष्ट्रीय रोग झाला आहे असे संजय राऊत यांनी टीका केली होती यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, जनतेने तुम्हाला लुळं पांगळं केले आहे. विधानसभा निवडणूक असो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक उबाठा गट लुळा-पागळा केला आहे. नरेंद्र मोदी हे आजार नाही तर देशाचा आधार आहेत. ते राष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहे. राऊतांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित करावे नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना देशाबद्दल काही वाटत नाही कारण त्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे. महिला विधेयक बिल मंजूर झाले नाही हा देशाला अपमान झाला आहे. महिलांना सन्मान देण्याचा तो प्रयत्न भाजप सरकारने केला, पण तुम्ही ते मंजूर न करू देत नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम केले आहे. 2023 मध्ये तत्वत मान्यता मिळालेल्या या विधेयकाच्या अंमलबजावणीस अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, याचा हिशेब जनता नक्कीच घेईल. तुम्ही माध्यमांचा वापर कसा करायचा हे सांगू नका. राऊतांनी पाकिस्तानच्या जनतेनला संबोधित करावे त्यांना तिथले लोकं ऐकतील. उबाठाची अवस्था बघा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे नाव किती वेळा घेतले हे मोजत बसण्यापेक्षा आपल्यापक्षाची अवस्था बघितली असती तर किमान उबाठा गट महाराष्र्टात वाढला असता. काँग्रेस मुक्त देश करण्याचे काम जनतेने केले आहे. काँग्रेसला किंमत नाही हे जनतेने दाखवून दिले आहे. लोकसंख्या वाढल्याने खासदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. तुम्ही त्याला विरोध का केला. दक्षिण राज्यातील खासदार संख्या वाढणार होती त्यांचे संजय राऊत यांनी नुकसान केले आहे. त्यावेळी मोदी सरकार गप्प बसले नाही नवनाथ बन म्हणाले की, पहलगाम हल्यानंतर मोदी सरकार गप्प बसले नाही. हल्ला करणाऱ्या एकाएका दहशतवाद्यांना मारण्याचे काम सैनिकांनी आणि मोदी सरकारने केले आहे. उलट पहलगाममध्ये धर्म विचारत लोकांना मारलेच नाही असे मुक्ताफळे काँग्रेसच्या लोकांनी उधळली होती. त्यावर संजय राऊत गप्प बसले होते. उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला पेटवायचा आहे. कारण त्यांना वाटते की यामुळे आपल्याला राजकीय फटका बसू शकतो.
नाशिक येथील टीसीएस कंपनीत घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने आपले लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जबरदस्थीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. पीडितेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपी व आपली ओळख 4 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले आहे. महाविद्यालयात एकत्र शिकत असताना त्यांच्यात मैत्री झाली होती. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. जुलै 2022 मध्ये त्याने पीडितेवर पहिल्यांदा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे अगोदरच लग्न झाले होते. पण त्याने ही वस्तुस्थिती लपवून पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही काळानंतर पीडितेला टीसीएसच्या नाशिक येथील युनिटमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा आरोपीही तिथे कार्यरत होता. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी पीडितेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीच्या पत्नीनेच पीडितेशी साधला संपर्क या घटनेनंतर फेब्रुवारी 2026 मध्ये पीडितेला आरोपी विवाहित असल्याची व त्याला 2 मुले असल्याची बाब समजली. ही माहिती मिळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने स्वतः पीडितेशी संपर्क साधून तिला ही माहिती दिली. त्यानंतर पीडितेने या प्रकरणी आरोपीला जाब विचारला. तेव्हा त्याने स्पष्ट् केले की, त्याचा तिच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता. कारण, तो अगोदरच विवाहित होता. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी हा आपल्या इतर 2 सहकाऱ्यांसोबत कंपनीच्या उपहारगृहात तिच्याशी वारंवार भेटत होता. हे तिघे मिळून अनेकदा देवदेवतांविषयी अवमानकारक शेरेबाजी करत होते. आरोपी तरुणाने आपल्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी माझे लैंगिक शोषण केले. मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. निदा खान अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात दुसरीकडे, या प्रकरणातील अन्य एक संशयित निदा खान हिने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे. निदाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला आहे की, एका महिलेवर दुसऱ्या महिलेच्या विनयभंगाचा आरोप ठेवता येत नाही. शिवाय, निदा खान 2 महिन्यांची गर्भवती असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. जामीन मंजूर करण्यासाठी हे तथ्य एक आधार म्हणून सादर करण्यात आले आहे. निदा खान सध्या फरार आहे. तिच्या शोधासाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात पोलिसांचे एक पथक तळ ठोकून आहे. टीसीएसची काय आहे भूमिका? टीसीएसने शुक्रवारी स्पष्ट केले की, निदा खान ही कंपनीमध्ये 'एचआर मॅनेजर' (HR Manager) या पदावर कार्यरत नव्हती. प्राथमिक चौकशीच्या आधारे, कंपनीला 'नैतिकता' (Ethics) किंवा 'POSH' (लैंगिक छळ प्रतिबंधक) यंत्रणांद्वारे अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. कंपनीने पुढे असेही नमूद केले की, ते या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत; यासाठी एका देखरेख समितीची (Oversight Panel) स्थापना करण्यात आली आहे. तपासात मदत करण्यासाठी बाह्य संस्थांचीही (External Agencies) मदत घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती, छळवणूक किंवा गैरवर्तन याबाबत कंपनीच्या धोरणात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) बाळगली जाते. पीडितेला अश्लील मेसेज पाठवल्याचे स्पष्ट न्यायालयाने या प्रकरणातील रजा मेमन व शफी शेख या 2 अन्य सहआरोपींची पोलिस कोठडीत 20 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप संभाषणांतून (चॅट्समधून) असे उघड झाले की, आरोपींनी पीडितेला अश्लील संदेश पाठवले होते आणि त्याद्वारे तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केला होता. लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारींनंतर, नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणी एकूण 9 एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. तसेच या संदर्भात 8 जणांना अटकही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एका उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी या प्रकरणाची अत्यंत सखोल व सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश दिले. राज्यात धर्मांतराशी संबंधित घटना कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे या घटनेच्या चौकशीत कोणत्याही पैलूकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे ते म्हणालेत. हे प्रकरण उजेडात आणल्याप्रकरणी त्यांनी नाशिक पोलिसांचे कौतुकही केले.
गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन
मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू दर्शन कुमार यांचे शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दर्शन कुमार हे जरी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले असले, तरीही या उद्योगामध्ये एक दयाळू आणि उदार मनाचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. […] The post गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दीपिका-रणवीर पुन्हा होणार आई-बाबा
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ही जोडी दुस-यांदा आई-बाबा होणार असून, रविवारी सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. या घोषणेनंतर सिनेसृष्टीसह चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दीपिका आणि रणवीरने इन्स्टाग्रामवर एक अतिशय गोंडस फोटो शेअर करत ही […] The post दीपिका-रणवीर पुन्हा होणार आई-बाबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर महिलांना संसदेत येण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे सामान्य महिलांना संसदेत येण्याची संधी होती, मात्र विरोधी पक्षांनी हे प्रयत्न हाणून पाडले, असे आठवले म्हणाले. महिलांना लोकसभेत आरक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या चांगल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी धुळीस मिळवले, असे आठवले यांनी सांगितले. या विरोधात रिपब्लिकन पक्ष (रिपाइं) देशभरात काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. आठवले यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने महिलांना आरक्षण दिल्यामुळे देशभरात लोकसभेच्या जागा वाढणार होत्या. नियमानुसार, दक्षिण आणि उत्तर दोन्हीकडील राज्यांच्या जागा समसमान वाढणार होत्या, त्यामुळे कोणत्याही राज्याला झुकते माप देण्याचा प्रश्नच नव्हता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये त्यांच्या सध्याच्या जागेनुसार जागा वाढल्या असत्या. हे सर्व माहीत असतानाही, केवळ सत्ताधारी पक्षांना याचा फायदा होईल या एकाच भावनेपोटी महिलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. या प्रकरणी रिपाइंच्या माध्यमातून देशभरात महिलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, राज्यात रिपाइंला एक विधान परिषद सदस्य (MLC) आणि दोन महामंडळांची अध्यक्षपदे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपाइंला जागा न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सरकारने महामंडळांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महामंडळांचा कालावधी निघून जात असून कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याचे आठवले यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, युवक उपाध्यक्ष शरद शेगावकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, राज्य उपाध्यक्ष ब्रह्मानंद चवहाण, राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, गजानन बागुल, संतोष सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग
पुणे : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महानैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात […] The post अक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
समृद्धी महामार्गावर बस अपघात; चिमुकली ठार, २५ प्रवासी जखमी
मेहकर: प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी सहाच्या सुमारास चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मेहकर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती पुढील कारवर आदळली, ज्यामुळे कारचेही […] The post समृद्धी महामार्गावर बस अपघात; चिमुकली ठार, २५ प्रवासी जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी महापौर सुरेश पवार यांचे निधन
लातूर : प्रतिनिधी अनेक वर्षांपासून लातूरच्या राजकारणात कार्यरत असणारे माजी सुरेश पवार यांचे निधन झाले आहे. पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे अकाली निधन झाले. अनेक वर्ष लातूरच्या राजकारणात कार्यरत असताना कधी कोणाशीही मनभेद , वैरभाव नसणारे सर्वांचे तात्या, यशस्वी राजकारणी एक चांगले व्यक्तिमत्व जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. […] The post माजी महापौर सुरेश पवार यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून केलेले संबोधन पाहता विरोधकांच्या ताकदीपुढे केंद्र सरकार अक्षरशः थंड पडल्याचे स्पष्ट होते, अशी टीका एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केंद्रावर निशाणा साधताना केली आहे. सत्ताधारी भाजपची सत्तेतून उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. पंतप्रधानांचे हे संबोधन, जे साधारणपणे अर्धा तास चालले, ते 'नारी शक्ती वंदन अधिनियम' या विषयावर केंद्रित होते. त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या संबोधनानंतर आता त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएमचे (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर सडकून टीका केली आहे. मोदींचे भाषण पाहता आता सत्ताधारी भाजपची सत्तेतील उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजपची उलटगणती सुरू झाली वारिस पठाण रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र यांचे भाषण काही वेळच पाहिले. आता भाजपची उलटगणती सुरू झाली आहे. पंतप्रधानांचे रडगाणे व विलाप हे त्याचे द्योतक आहे. नेमक्या याच कारणामुळे मी त्यांचे भाषण बंद करून आयपीएल पाहण्याचा आस्वाद घेतला. याच सरकारने 2023 मध्ये 5 दिवसांचे अधिवेशन बोलावले होते. त्यात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा ते पारित करण्यात आले. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्याची गरज होती. पण त्यांनी ते केले नाही. आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पद्दुचेरी या 5 राज्यांत विधानसभेची निवडणूक सुरू आहे, असे ते सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले. मोदींचे रडगाणे हा जनतेला मूर्ख बनवण्याचा फंडा माझ्या मते आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. याहून अधिक महिलाचा सन्मान काय असू शकतो? सरकारने हे विधेयक का आणले? त्यांचा हेतू काय आहे? हे जनतेला समजले आहे. त्यामुळे हे रडगाणे केवळ मूर्ख बनवण्याचे काम आहे. आज 12 वर्षांत पहिल्यांदाच भाजप सरकारने आणलेले एखादे विधेयक पडले आहे, असे वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले. देशाच्या जनतेला वाटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनात देशाच्या विकासाची गोष्ट करती. पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की, ते घाबरलेले आहेत. विरोधकांची ताकद पाहून सरकार अक्षरशः थंड पडले आहे. नरमले आहे, असेही वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले.
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी पुणेकरांची गर्दी
पुणे : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा नैवेद्य देवाला दाखवण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक फळ बाजार शनिवारी बंद असतो. मात्र (दि. १९) रविवारी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी बाजार […] The post अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी पुणेकरांची गर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोणतेही ऑपरेशन हे त्याच्या आवश्यकतेनुसारच करायचे असते. मला पक्के ठाऊक आहे की कोणते ऑपरेशन केव्हा करायचे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, योग्य वेळी योग्य 'सर्जरी' होईल आणि त्याचे परिणामही सर्वांना दिसतील, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला मिश्किल टोला लगावला. तसेच, वारकरी संप्रदायावरून सुरू असलेल्या वादात उडी घेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संप्रदायाला बदनाम करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. सोलापूर जिल्ह्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा रंगली आहे. या प्रवेश सोहळ्यात भालके यांनी जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, 'ऑपरेशन लोटस' थंडावले आहे का? असा प्रश्न विचारला असता गोरे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय विरोधकांना सूचक इशारा दिला. राजकारणात वेळ महत्त्वाची असते, आणि आमची शस्त्रक्रिया कधी करायची हे आम्हाला माहित आहे, असे म्हणत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय उलटफेरचे संकेत दिले आहेत. वारकरी संप्रदायाचा अपमान खपवून घेणार नाही दुसरीकडे, वारकरी संप्रदाय आणि शरद पवार गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरही पालकमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली. खासदार शरद पवार यांनी संप्रदायात 'प्रतिगामी शक्ती' शिरल्याचे विधान केले होते, त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह अनेक वारकरी नेत्यांवर सोशल मीडियातून टीका केली होती. पवार गटाने बदनाम करू नये याचा निषेध करत जयकुमार गोरे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा मानबिंदू आणि आमचा अभिमान आहे. राजकीय स्वार्थासाठी या पवित्र परंपरेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. संप्रदायाची स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यात आपली राजकीय विचारधारा घुसवून त्याला डाग लावण्याचे काम पवार गटाने थांबवावे. ..तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार दरम्यान, विकास लवांडे यांच्या विधानामुळे वारकरी संप्रदाय प्रचंड आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत लवांडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने कारवाई न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे. आता पालकमंत्र्यांनी या वादात थेट भूमिका घेतल्याने हा वाद राजकीय पटलावर अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आज झालेल्या राज्यस्तरीय दूरदर्शन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉन्फरासिंगद्वारे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर लक्ष ठेवून बालविवाह होणार नाहीत यासाठी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे. तालुका व ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करून देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर विवाहस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. बालविवाहाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलिस व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हानिहाय कृती आराखडे तयार केले जात आहेत. सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश आहेत. याशिवाय, विवाहाशी संबंधित सेवा देणारे जसे की मंगल कार्यालये, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर, वाजंत्री तसेच धर्मगुरू यांनी मुलगा-मुलगी यांच्या वयाची खात्री केल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणार आहे. बालविवाहाविरोधात जनजागृती वाढवण्यासाठी गावोगावी दवंडी, पोस्टर मोहीम, विशेष ग्रामसभा, शाळांमध्ये पालक बैठक तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, बालविवाहासंदर्भातील कोणतीही माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा डायल 112 वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, राज्यात बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी यावेळी केले आहे. वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ‘एआय’चा वापर करा - मुख्यमंत्री वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी ‘एआय’चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील ‘पीक डिमांड’ संदर्भात वीज वितरण आढावा बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उन्हाळा व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
गोरेगाव पश्चिम येथील ऐतिहासिक मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकासाचा म्हाडाचा मास्टर प्लॅन सादर होत असताना, म्हाडा अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी भरसभेत तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन अशी धमकी दिल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) नुकताच गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठीचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन सादर केला, ज्याअंतर्गत ३,७०० हून अधिक कुटुंबांना १,६०० चौरस फूट (रेरा कार्पेट एरिया) क्षेत्रफळाची घरे मिळणार आहेत. म्हाडाने मोतीलाल नगर पुनर्विकासासाठीचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन सादर करण्यासाठी रहिवाशांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात एक स्थानिक रहिवासी शांततेने आणि संविधानिक अधिकारानुसार आपली मागणी मांडत होता. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्याने त्याला दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत नेमके काय? गोरेगावच्या मोतीलाल नगर येथे म्हाडाचा पुर्नवसन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका स्थानिकाने आपल्या हातात पोस्टर घेऊन आपली मागणी मांडत प्रकल्पाला विरोध दर्शवला. पण म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यालाच धमकावले. तरुणाने आपले प्रश्न मांडताच, तुम्हाला मराठी येत नाही का? अशी विचारणा म्हाडाचे सीईओ संजय जयस्वाल यांनी केली. त्यावर मला मराठी येत नसल्याचे तरुणाने सांगितले. यानंतर जयस्वाल यांनी तरुणाला खाली बसण्यास सांगितले. तरुण खाली बसल्यानंतर, त्या माणसाचे ओळख पत्र माझ्याकडे आणून द्या. अशा सूचना पोलिसांना केल्या. जयस्वाल त्या तरुणाला म्हणाले, तुझे आयकार्ड आम्हाला द्या. तुझी शहानिशा मी करतो. कुठून आला? कधी आला? कोणत्या वर्षी आला? येथे जन्म झालाय की नाही? ही सर्व माहिती मी काढतो. तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळवतो. जर तू घुसखोर निघालास, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन, अशा भाषेत दमदाटी केली. अधिकाऱ्यांनी संवाद न साधताच सभा गुंडाळली हा प्रकार झाल्यानंतर तुमचा इथे संवाद करण्याची इच्छा नाहीये. तुमची पुर्नवसनसाठी इच्छा नाहीये. याच कारणामुळे मी सभा संपवतोय, असे म्हणून संजय जयस्वाल यांनी संवाद न साधताच सभा गुंडाळली आणि तिथून निघून गेले. आपल्या हक्कांची मागणी करणे गुन्हा आहे का? दरम्यान, शांततेने आपल्या हक्कांची मागणी करणं हा गुन्हा आहे का? भारतासारख्या लोकशाही देशात, नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मोतीलाल नगर हे केवळ एक प्रकल्प नाही, तर हे हजारो कुटुंबांचं घर, इतिहास आणि आयुष्य आहे. ५०+ वर्षांपासून येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भविष्यासंदर्भात विश्वासात का घेतलं जात नाही? असा सवाल नागरिकांकडून सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत? रहिवाशांनी यापूर्वीही अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवली आहे. आजही त्यांची मागणी एकच आहे न्याय्य, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक पुनर्विकास. शेजारील प्रकल्पांमध्ये (उदा. पत्रा चाळ, उन्नत नगर) जे अनुभव आले जसे की उशीर, विस्थापन, असमान फायदे त्यातून धडा घेणे आवश्यक आहे. मग मोतीलाल नगरच्या रहिवाशांना समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत? पुनर्विकास हा लोकांसाठी असतो, लोकांवर लादण्यासाठी नाही. रहिवाशांचा सहभाग, विश्वास आणि सन्मान हाच कोणत्याही प्रकल्पाचा पाया असायला हवा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. लोकशाही फक्त कागदावरच का? आम्ही राज्य सरकार आणि संबंधित सर्व निर्णयकर्त्यांना विनंती करतो की, रहिवाशांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि एक सकारात्मक, विश्वासार्ह वातावरण निर्माण करावं. लोकशाही फक्त कागदावर नसावी. ती प्रत्यक्षातही जाणवली पाहिजे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या स्वतःच्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रसंगामुळे हादरलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी सोमा मेश्राम (36) याची मुलगी आणि पीडिता या एकाच वर्गात शिकतात. गुरुवारी पीडिता तिच्या मैत्रिणीच्या (आरोपीच्या) घरी थांबली असताना, सोमा मेश्रामने तिला दुचाकीवर फिरवून आणण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडितेने घरच्यांना हा आपबिती सांगितली. पीडितेची प्रकृती आणि पोलिसांची कारवाई या घटनेच्या मानसिक धक्क्यातून पीडितेने विषप्राशन केले. तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. भंडारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी सोमा मेश्राम याला तातडीने अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. नाशिकमध्ये तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव पंचवटी परिसरात आणखी एक लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीचे लैंगिक शोषण केलेच पण तिची धार्मिक ओळख पुसून टाकण्याचाही प्रयत्न केला. पंचवटी पोलिसांनी संशयित तांजिर इनामदार याला अटक केली. शनिवारी (दि.19) त्याला न्यायालयात हजर केले असता 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिली. पंचवटीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना 2024 मध्ये संशयित तांजिर सोबत ओळख झाली. फिरण्याचा बहाणा करत मेरी, म्हसरुळ परिसरातील सार्वजनिक उद्याने, लॉजमध्ये नेत बळजबरीने मिठी मारत तिच्या गळ्याला लव्ह बाईटच्या नावाखाली गंभीर जखमा करत मोबाईलमध्ये फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. निरीक्षक ज्योती आमणे तपास करत आहे.
हिंगोलीच्या भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याशी जवळीस साधून अत्याचाऱ्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बळसोंड भागातील भाजपाचे माजी पदाधिकारी आशिष वाजपेयी हे युवा विकास सोसायटी अंतर्गत शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमध्ये काम करतात. बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात काम सुरु केले होते. यामध्ये त्यांनी नांदेड जिल्ह्यातील एका महिलेची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर मागील दोन वर्षापासून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर ते लिव्ह इनमध्ये आले. या जवळीकतेचा गैरफायदा घेत त्या महिलेने आशिष यांच्याकडे सतत पैशाची मागणी सुरु केली. त्यानंतर त्यांनी महिलेस वीस लाख रुपये व पाच तोळे सोने दिले. त्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी केली जात असल्याने त्यांनी एका वेळी एक लाख, तीन लाख व सहा लाख रुपयांच्या रकमेचे धनादेश त्या महिलेला दिले. दरम्यान, त्या महिलेकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. काही दिवसांपुर्वीच तिने पैशाची मागणी केली. पैशासाठी ती महिला ता. 15 एप्रिल रोजी बळसोंड येथील घरी देखील आली होती. त्या महिलेकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून आशिष यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्या महिलेने समाजात बदनामी करेल तसेच अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे आशिष यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी त्या महिले विरुध्द ता. 17 एप्रिल रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत.
हिंगोलीचा येलो गोल्ड ब्रँण्डला आता देशभरातून मागणी होऊ लागली असून पुजा महिला बचतगटाने हळदी पासून तयार केलेल्या उत्पादनांची नागरीकांनी मागणी नोंदवली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली येथील नागरीकांनी टर्मरिक शॉटस या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या तब्बल 9 हजार बॉटल्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आता बचतगटातील महिलांनी दिवसरात्र एक करुन काम सुरु केले आहे. हिंगोलीच्या मातीतील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या हळदीला जागतिक दर्जाची ओळख निर्माण करत आहे. हिंदू ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राने हळदीचे संशोधन सुरु केले असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हळदीला चांगला भाव मिळावा यासाठी हळदीला भौगोलिक मानांकन मिळवून दिले आहे. दरम्यान, जिल्ह्यात हळदीवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करणारे महिलांचे बचतगट असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी हिंगोली येलो गोल्ड या ब्रँडखाली पूजा महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांची ब्रँण्डींग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, दिल्ली, पुणे येथे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हळदीच्या वस्तूंचे बॉक्स लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेटस्वरुपात देऊन त्यांची माहिती दिली. एवढेच नव्हे तर मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हळदीपासून तयार केलेल्या वस्तूंचे बॉक्स दिले. या शिवाय मुंबई येथे झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये महिलांनी उत्पादीत वस्तूंची माहिती दिली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर हळदीपासून तयार केलेल्या वस्तूंना मोठी मागणी मिळाली होती. या ठिकाणी चार दिवसांतच तब्बल 10 लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता. दरम्यान, यानंतर आता मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, नागपूर, गोवा, बेंगलुरुया ठिकाणावरून यलो गोल्ड बॉक्सची मागणी सुरु झाली आहे. या संदर्भात बचत गटाच्या वनिता दंडे यांनी सांगितले की, टर्मरिक शॉटच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध तयार केले असून त्यांची नोंदणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांची विक्री सुरु झाली असून तब्बल 9000 बॉटल्सची मागणी आली आहे. या शिवाय सौंदर्यप्रसाधनामध्ये टर्मरिक क्रिमची 1700 बॉक्स, टर्मरिक साबण 2500 बॉक्सची मागणीही नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातून बचतगटातील दहा महिलांना दररोज रोजगार उपलब्ध झाला असून बचतगटाची आर्थिक उलाढाल देखील लाखोंच्या घरात गेली आहे. नैसर्गिक उत्पादने आरोग्यासाठी वरदान- वनीता दंडे, सदस्या पुजा महिला बचतगट हळदीपासून बनवलेली ही नैसर्गिक उत्पादने नागरीकांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत. महिलांच्या कष्टाला आता खऱ्या अर्थाने ग्लोबल ब्रँडची ओळख मिळाली आहे. या शिवाय महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे.
अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील प्रसिद्ध आंबा व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा महानैवेद्य अर्पण केला. या मंगलदिनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रविवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे 4 वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी 8 वाजता गणेशयागही संपन्न झाला. अर्पण करण्यात आलेला आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, तसेच वृद्धाश्रम आणि दिव्यांग मुलांच्या संस्थांना वाटण्यात येणार आहे. याशिवाय, मंदिरात उपस्थित भाविकांनाही हा प्रसाद दिला जाईल. अक्षय तृतीयेनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल - छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (19 एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ‘अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी मध्यभागातून काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. ‘गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवावगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले
माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे मी मानतो. जात आणि धर्मामध्ये भांडण लावून सत्तेची पेाळी कशी शेकता येईल, अशा प्रकारे पाणी घालून पोसलेली विषवल्ली आहे, असे म्हणत त्यांनी नवनीत राणांवर एकेरी टीका केली आहे. अत्याचार प्रकरणात जात-धर्म नसतो विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिलांवर अत्याचार झाला असेल तर तिथे जात-धर्म-पंथ येतो कुठे? असे कृत्य करणारा नालायकच असतो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अमरावती प्रकरणी कोणी बुरख्या वाल्या नव्हत्या म्हणता ते त्यांना कसे माहिती? कशाच्या आधारावर हे बोलल्या? या बाईची सवय आहे ही अतिशय जातीयवादी आणि धर्मांदली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडले आणि जिरवली तरी हे शुद्धीवर येत नाही. तुमच्याकडे पोलिस आहे सर्व यंत्रणा आहेत तुम्ही प्रकरणाची माहिती घ्या, उगाच तोंडाचा वाफा कशाला काढत आहात, तुमच्या शब्दांना आवर घाला, माहिती घेऊन बोला. राणांनी खरातबद्दल ब्र शब्द काढला नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, अमरावती प्रकरणातील मुली या कोण आहेत हे महत्त्वाचे नाही. या प्रकरणात काय जात आणि धर्म महत्त्वाचा नसतो. खरात संदर्भात ब्र शब्द न काढणारी बाई मुस्लीम तरुण दिसताच बावचळल्यासारखी बोलते हे अत्यंत घृणास्पद आहे, त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन मलिदा गँग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झालेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे भाषण सत्यापासून कोसो दूर होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत झालेल्या पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपएवढे जगात कुणीही माहीर नसेल, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. त्यात त्यांनी महिला आरक्षणाला विधेयकाला कथित विरोध केल्याप्रकरणी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांच्या या भूमिकेवर आता राजकीय वर्तुळात संमिश्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी उपरोक्त टीका केली आहे. ते म्हणाले, पराभवाचंही भांडवल करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर जगात कुणीच नसेल…! सत्यापासून कोसो दूर असलेलं आजचं भाषण म्हणजे कालच्या पराभवाचं भांडवल करुन त्यावर आगामी तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीत सत्तेचा डाव जिंकता येतो का, यासाठी केलेला एक प्रयत्न दिसतो. या तिन्ही ठिकाणी कमळ काही फुलणार नाहीच, पण एकमात्र खरंय की, आजच्या भाषणात तीन प्रमुख पक्षांचा चार-चार वेळा झालेला उल्लेख ऐकून तमिळनाडूमध्ये DMK, प. बंगालमध्ये TMC आणि उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेस युतीची सत्ता येणार असल्याचा तर 2029 मध्ये देश INDIA आघाडीला साथ देणार असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेवरूनही साधला निशाणा रोहित पवार यांनी यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, जगाची चौथी अर्थव्यवस्था बनण्याचा मार्गावर असलेली आपली अर्थव्यवस्था एका वर्षातच सहाव्या क्रमांकावर घसरली असून युके आणि जपानच्या अर्थव्यवस्थेने आपल्याला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी भारत चौथी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज IMF ने दिला असता संपूर्ण देशभर स्वतःची वाहवा करून घेणारे केंद्र सरकार आज आपला देश पुन्हा सहाव्या स्थानावर घसरल्याच्या IMF च्या अंदाजावर गप्प का आहे ? केंद्र सरकारची धरसोडीची धोरणे त्यांच्या आश्वासनाप्रमाणेच अत्यंत volatile असल्यानेच भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. केंद्र सरकार यामागचे कारण जीडीपी मोजण्याची बदललेली पद्धत सांगत आहे. जेव्हा नवी पद्धत सुरू केली तेव्हा मात्र नव्या पद्धतीमुळे accuracy येईल, अचूक मोजणी करता येईल असे सांगणारे केंद्र सरकार आज जीडीपी मोजण्याच्या पद्धतीवर आपल्या अपयशाचे खापर फोडत आहे, हे दुर्दैवी नाही का ? केंद्र सरकारची चुकीची धोरणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, जगात होणारी सततची युद्धे, या युद्धाच्या संदर्भात आपल्या सरकारने घेतलेल्या संदिग्ध भूमिका, जागतिक स्तरावर असलेली मोठी अनिश्चितता आणि त्याहून अनिश्चित असलेली आपल्या सरकारची भूमिका, कच्चे तेल आयातीसाठी असणारे अवलंबित्व, अमेरिकेने केलेला एकत्तर्फी आणि भारतासाठी मारक असलेला व्यापारी करार आणि एकंदरीतच जागतिक पटलावर केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या डिप्लोमसीचा अभाव यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा परिणाम झाल्याचं स्पष्ट असून सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. असो, केंद्र सरकारला वेळेत जाग येईल ही अपेक्षा, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने पाहात नाहीत. ते नियमबाह्य आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन पंतप्रधान करत असतात. कायदा माझे काय वाकडे करणार या भूमिकेत ते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महिला विधेयकाची गो हत्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. ते विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले आहे. त्यानंतर तुम्ही राष्ट्राला संबोधित सुद्धा केले होते ते भाषण ऐका. देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट बघा. 2023 ला मंजूर झालेले विधेयक अमलात आणले नाही म्हणून तुम्ही माफी मागितली पाहिजे. खोटे अश्रू पाहून देशातील जनता आता फसणार नाही. एक विधेयक मंजूर झाले नाही हे काही राष्ट्रावर संकट नाही तर भाजपवर संकट आहे. त्यांच्या पक्षावरील संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणे योग्य नाही. तुमच्यासाठी देशाचे माध्यमे वापरणे अगदी चुकीचे आहे. 2023 मध्ये संसदेत काय झाले हे एकदा तपासले पाहिजे. म्हणून भाजपला 850 जागा हव्या संजय राऊत म्हणाले की, मोदी यांनी कालच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. जे काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते त्यांच्या डोक्यातून काँग्रेस निघायला तयार नाही. त्यांच्या नसात, आणि रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेसशिवाय देशाला कोणी नेतृत्व देऊ शकत नाही हे मोदी त्यांच्या कृतीमधून सिद्ध करत आहेत. भाजपला लोकसभेच्या 850 जागा करायच्या होत्या त्यापासून आम्ही त्यांना रोखले, त्यांचा आणि महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही. 543 पैकी 33 टक्के जागा महिलांना देण्यास आमची काही हरकत नाही. पण त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या जागा आरक्षित होऊ शकतात. त्या होऊ नये म्हणून त्यांना 850 जागा करायच्या आहेत. खोटे धंदे बंद करा संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश कायम पेटवायचा होता. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी काय खावे हे मुद्दे निर्माण करतात. पण त्यांना कधी असे काही वाटत नाही काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या घरातील महिलांचा आक्रोश त्यांना कधी दिसला नाही, तुम्ही हे खोटे धंदे बंद करा. आम्ही सर्वांनी मिळून या बिलाचा पराभव केला. 1992 मध्ये घरात बसले होते संजय राऊत म्हणाले की, दक्षिणेतील राज्यांवर त्या बिलामुळे अन्याय झाला असता. भाजप देश तोडायला निघाले आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा हे त्यांचे काम सुरू आहे. पण आम्ही सर्व जण एकत्र येत त्यांचा पराभव केला. धर्मांतरण विरोधी कायदा आणला असला तरी प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. सरकारपेक्षा आमच्याकडे जास्त माहिती असते. खरात जर सलीम असता तर आतापर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली असती. खरात भाजपचे प्रचारक असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. पण टीसीएस प्रकरणी जसे काही खूप मोठे झाले असा कांगावा करत हिंदू खतऱ्यामध्ये आला असे सांगातात. 1992 मध्ये आम्ही रस्त्यावर होतो तेव्हा हे लोकं घरात बसले होते.
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत स्फोटक दावे केले आहेत. हे प्रकरण आज घरोघरी पोहोचले कारण याचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले आहेत. हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा नसता आणि रूपाली चाकणकर यांची त्याच्यावर भक्ती नसती, तर कदाचित पोलिसांनी हे प्रकरण दाबले असते, असा खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केला आहे. प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत. खरातचे आयपीएस महिला अधिकारी आणि अनेक बडे अधिकारी शिष्य आहेत. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय पाठबळामुळेच या भोंदूचे प्रस्थ वाढले होते. बनावट 'आयटी' रेड आणि खंडणीचे रॅकेट अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना श्याम मानव यांनी सांगितले की, हा भोंदू बाबा अत्यंत चलाखीने लोकांच्या काळ्या कमाईची माहिती काढायचा. त्यानंतर स्वतःचे बनावट 'इन्कम टॅक्स ऑफिसर' तयार करून तो संबंधित व्यक्तीवर धाडी टाकायचा आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळायचा. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकारात आतापर्यंत कोणाही पोलीस अधिकारी किंवा राजकीय नेत्याने हस्तक्षेप केला नाही, ही चिंतेची बाब आहे. महिला स्वतःला बाबांना अर्पण करतात, ही देशाची शोकांतिका देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना श्याम मानव यांनी तीव्र खंत व्यक्त केली. खरात सोबतच्या महिलांचे व्हिडिओ कदाचित बघितले असतील. कोणत्याही महिलांचे कपडे त्या बाबाने काढले नाही. जे बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत. कारण, बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं 'मी गुरु आहे तुमचा', बसं सगळं संपलं. सर्व आयतं उपलब्ध होत, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते. आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. आज एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात. आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहे. हजारो वर्षांपासून या देशात हे बिंदासपणे सुरु आहे, नव्हे तो आपल्या कल्चरचा भाग मानला जातोय, असेही श्याम मानव यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्र्यांचे 'आभार' मानण्यामागचा टोला हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर यांची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना मिळाल्या असत्या. पण, एकनाथ शिंदें आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे, म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या. एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातशी समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करू देत आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाल्याबद्दलं 'एकनाथ शिंदे' यांचे आभार मानले पाहिजे. म्हणूनचं खरात प्रकरणाचा सर्वार्थाने तपास होतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे साेमवारपासून आंदोलन:दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम हाेण्याची चिन्हे
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील कर्मचारी संघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ यांनी सोमवार (दि. 20) पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचा परिणाम पेपर तपासणी आणि पर्यायाने दहावी-बारावीच्या निकालावर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मंडळातील बढती व बदली संदर्भातील पूर्वनियोजित निकष रद्द करून नव्याने शासनपद्धती लागू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नोव्हेंबर 2025 पासून नियुक्त आयएएस अधिकाऱ्यांच्या निर्णयशैलीवर “हुकूमशाही”चा आरोप होत आहे. मंडळ ही स्वायत्त संस्था असल्याने व मंडळाची महाराष्ट्रभर नऊ कार्यालय असल्याने कर्मचाऱ्याऱ्यांच्या बढती, बदली संबंधी मंडळ प्रशासन व कर्मचारी संघटनांसोबत करार होऊन बढतीसंबंधी निकष तयार करण्यात आलेले होते. मात्र, मंडळात नोव्हेंबर 2025 पासून आयएएस अधिकारी राज्यमंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. सदर अधिकाऱ्याने मंडळाच्या कामकाजाची व कर्मचाऱ्यांची कोणतीही पूर्वमाहिती न घेता हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी करताना थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कामाचा अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ताण मंडळात एकूण 891 पदांपैकी तब्बल 386 पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अपरिहार्य ठरत असून, त्याचा थेट परिणाम दहावी-बारावीच्या निकाल प्रक्रियेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने तोडगा काढण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.
महिलांच्या बँक खात्यात थेट ‘कॅश ट्रान्सफर’ करणे आता निवडणूक जिंकण्याचा ‘हीट फॉर्म्युला' ठरला आहे. 2020 दरम्यान आंध्र प्रदेशातील योजनेपासून सुरू झालेला ‘फ्रीबीज’चा हा फंडा आता 16 राज्यांनी लागू केला आहे. 2020 मध्ये यावर अवघे 1600 कोटी खर्च झाले होते. आता 6 वर्षांत हा खर्च (2026) 2.82 लाख कोटींवर पोहोचला आहे. ‘दिव्य मराठी'च्या डेटा इन्व्हेस्टिगेशनमध्ये लोकसंख्येतील 72 कोटी महिलांपैकी 13.5 कोटी महिला ‘फ्रीबीज’चा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच देशातील प्रत्येक पाचवी महिला आता लाभार्थी बनली आहे. 4 राज्यांत 24 हजार कोटींचा पाऊस आता तामिळनाडूत समर पॅकेजचे प्रत्येक महिलेला 2 हजार मिळाले. आसामात बिहू सणासाठी 4 हजार दिले. बंगालमध्ये लक्ष्मीर भांडार योजनेत 500 रुपये वाढवले. केरळने डिसेंबर-2025 मध्ये स्त्री सुरक्षेसाठी एक हजार दिले. 4 राज्यात 17.89 कोटी पैकी 4 कोटी (23 %) महिला आहेत. 242 विद्यापीठे किंवा 2 समृद्धी महामार्ग बनले असते महाराष्ट्रात महिलांसह पुरुषांच्या ‘फ्रीबीज’ वर वर्षाला 1.21 लाख कोटी खर्च होताहेत. त्यात लाडकी बहीणवर 36,000 कोटी, शेतकरी कर्जमाफी अन् मोफत वीजवर प्रत्येकी 20,000 कोटी.अन्नपूर्णा योजना : 10,200 कोटी, या योजनेत राज्याचा वाटा : 8,500 कोटी. शेतकरी सन्मान निधीत 7,000 कोटीजलयुक्त शिवार व इतर कृषी सबसिडी 6,000 कोटी. युवा प्रशिक्षण योजना 5,500 कोटी एसटी प्रवास 4,500 कोटी मुलींना मोफत उच्च शिक्षण 2,500 कोटी.
आज जगप्रसिद्ध वेरूळ येथे वेरूळ लेणी परिसरात जागतिक वारसा दिनाचे (World Heritage Day) औचित्य साधून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भारतीय स्थापत्यकलेचा हा अजोड नमुना न्याहाळला. वारसा दिनानिमित्त लेणी प्रवेश मोफत असल्याने सुमारे साडेपाच ते सहा हजार पर्यटकांनी या जागतिक वारशाचा आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांकडून कैलास लेण्याचे कौतुक मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शनिवारी वेरूळ लेणीला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः १६ क्रमांकाच्या 'कैलास लेण्या'ची पाहणी केली. एकाच अखंड पाषाणात कोरलेल्या या भव्य मंदिराचे सौंदर्य पाहून त्यांनी भारतीय कारागिरांच्या कौशल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा हा वारसा थक्क करणारा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ६ हजार पर्यटकांनी लुटला मोफत प्रवेशाचा आनंद भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे (ASI) दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त ऐतिहासिक वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जातो. या सवलतीचा फायदा घेत सकाळपासूनच वेरूळ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. वेरूळ लेणीचे मुख्य अधिकारी निलेश कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ५.५ ते ६ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती वेरूळ लेणी प्रमुख निलेश कोळी यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वारसा दिनाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील पी. यु. जैन विद्यालय आणि वेरूळ लेणी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन या विषयावर आपले विचार मांडले. हर्ष कोपरेकर ठरला विजेता या निबंध स्पर्धेतून एकूण पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये हर्ष कोपरेकर याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. विजेत्या विद्यार्थ्यांचे अधिकारी निलेश कोळी आणि शाळा प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची भेट आणि दुसरीकडे हजारो पर्यटकांचा उत्साह, यामुळे यंदाचा जागतिक वारसा दिन वेरूळ लेणीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला.
अजितदादांच्या बारामती येथील विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ज्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमानात हा अपघात झाला, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात रोहित पवारांनी आघाडी उघडली आहे. VSR ची विमाने म्हणजे उडते 'डेथ ट्रॅप' असून, आता खुद्द कंपनीचे पायलट आणि कर्मचारीही या विमानात बसण्यास घाबरत आहेत, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली आहे. कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप कंपनीचे कर्मचारी आणि पायलटने केला आहे. कंपनी कर्मचाऱ्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली असून, याविषयीचा खुलासा आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, महाराष्ट्रातील काही नेत्यांचा वरदहस्त असल्याचाही आरोप केला आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून उड्डाणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता कंपनीचे पायलट आणि क्रू मेंबर यांना देखील अपघाताची भीती वाटतेय. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदोष विमानात बसण्याची भीती बोलून दाखवली, परंतु सरकारमधील काही लोकांचा वरदहस्त असल्याने ‘सरकार आपल्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असा शाब्दिक धीर त्यांना देण्यात आला. पण दुर्दैवाने अपघात झाला तर व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या या शाब्दिक धीराने त्यांचा जीव वाचणार आहे का, असा प्रश्न पडतो. व्ही. के. सिंग सरकारपेक्षाही वरचढ झाला का? एकीकडे अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने VSR कंपनीची ८० कोटींची बिलं अदा केली, दुसरीकडे नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवूनही VSR कंपनीवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळंच या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला कुणाचीही भीती राहिली नसून दिवसेंदिवस त्याची गुर्मी वाढतच चालल्याचं दिसतंय..! तो सरकारपेक्षाही वरचढ झाला का? ज्यामुळं सरकार त्यावर कारवाई करायला घाबरतंय! अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच आता उघडपणे भीती व्यक्त केल्यामुळे, व्हीएसआर कंपनीच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या दाव्यांनंतर आता राज्य सरकार आणि नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… चालक-वाहकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 25 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना सोशल मीडियावरील 'रील' बनवण्याचे वेड किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयावह अनुभव समृद्धी महामार्गावर आला आहे. चालक आणि वाहक रील बनवण्याच्या नादात असताना, मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा…
पावसाळ्यापूर्वी फिडर सेपरेशन पूर्ण करा; वीजपुरवठा होणार सक्षम
अकोला महावितकरण कंपनीच्या अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होवून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता . राजेश नाईक यांनी दिले आहेत. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्युत भवन येथे झालेल्या पायाभूत आराखडा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी फिडरनिहाय कामाचा आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक सोनोने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यामिनी पिंपळे, तसेच विभागातील क्षेत्रीय सहाय्यक अभियंते आणि कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत मुख्य अभियंत्यांनी कंत्राटदारांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या. तसेच दर आठवड्याला प्रगती आढावा बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले. असा होतोय खर्च आरडीएसएस योजनेअंतर्गत अकोला परिमंडळात कृषी व गावठाण फिडरचे विलगीकरण करण्यात येत असून या कामासाठी एकूण २६५.८४ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. या प्रकल्पात १७८ नवीन फिडर उभारले जात असून २५२९ किमी नवीन वीजवाहिन्या, ९६ किमी भूमिगत केबल, १६४ किमी लघुदाब वाहिन्या, ९५ एसडीटी आणि ७७१ नवीन वितरण रोहित्रांची उभारणी केली जात आहे. फिडरची लांबी कमी होऊन वितरणातील वीज हानीत लक्षणीय घट होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज उपलब्ध होणार असून इतर ग्राहकांना २४ तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देणे शक्य होणार आहे, असा दावा आहे. अशी आहे फिडरची संख्या परिमंडळातील १७८ फिडरपैकी अकोला जिल्ह्यात ९६ फिडर असून त्यापैकी ३७ कार्यान्वित झाले आहेत, २० पूर्ण झाले असून ३९ प्रगतीपथावर आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ६३ फिडरपैकी ४३ कार्यान्वित, ६ पूर्ण व १४ प्रगतीपथावर आहेत. वाशिम जिल्ह्यातील १९ फिडरपैकी ५ कार्यान्वित, ४ पूर्ण व १० फिडरचे काम सुरू आहे. एकूणच, फिडर सेपरेशन प्रकल्पामुळे अकोला परिमंडळातील वीज पुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि गुणवत्तापूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सोशल मीडियावरील 'रील' बनवण्याचे वेड किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयावह अनुभव समृद्धी महामार्गावर आला आहे. चालक आणि वाहक रील बनवण्याच्या नादात असताना, मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सदर खाजगी बस (मुंबई ते पुसद) शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ आली होती. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, बसचा चालक आणि वाहक दोघेही मोबाईलवर 'रील' बनवण्यात दंग होते. याच नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस एका कारवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील २५ प्रवासी जखमी झाले, तर कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दीड वर्षांच्या चिमुकल्याचा अंत या अपघातातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, एका दीड वर्षांच्या लहान मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाचा निष्काळजीपणा; डॉक्टर गायब! अपघातानंतर जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर प्रशासनाचा आणखी एक गलथान कारभार समोर आला. गंभीर जखमी रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात असतानाही रुग्णालयात तब्बल एक तास एकही डॉक्टर हजर नव्हता. वेळेवर उपचार मिळत नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच मोठा आक्रोश केला. डॉक्टरांच्या या अनुपस्थितीमुळे जखमींच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर दरम्यान, समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला झाल्यापासून त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजच्या अपघातात चालक आणि वाहकाची चुकी असली तरी, इतर अपघातासाठी मात्र विविध कारणे कारणीभूत आहेत. 17 दिवसांपूर्वीच भरधाव कंटेरनने महिला मजुरांच्या पिकअपला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघात झाला होता. या घटनेत ८ महिला मजूर ठार झाल्या तर ३ जखमी झाले होते. या मजूर महिला समृद्धीवर साफसफाईचे काम आटोपून घरी परतत होत्या. वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वर्षभरातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या उद्या, रविवारच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नागरिकांनी घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागीने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बुकींग तसेच खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. यासंदर्भात सदर प्रतिनिधीने संबंधित व्यसायिकांशी संपर्क साधला असता भाववाढ आणि इतर बाबींचा यावर कोठलाही परिणाम झाल्याचे पुढे आले नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये बऱ्यापैकी वाढ असल्याची वास्तविकता त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान उद्या, रविवारी शहरातील सुमारे ६० कुटुंब नव्या घरात प्रवेश करणार आहेत. काहींनी गुंतवणुकीचे उत्तम पर्याय तर काहींनी गरज म्हणून सोने-चांदी व डायमंड ज्वेलरीला पसंत केले आहे. घर, फ्लॅट, प्लॉट आणि शेतीच्या बाबतीतही असेच आहे. आजची खरेदी म्हणजे भविष्यातील फायदा, असे सूत्र या व्यवहारामागे असल्याचे काही खरेदीदारांनी सांगितले. अमरावती महानगरात चारचाकी वाहनांपासून ते गृहपयोगी वस्तूंचे उर्वरित.पान,४ इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीत १० टक्के वाढ ^गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसी सयंत्राला ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. नव्या घरांसाठी नव्या वस्तू लागतात म्हणूनही नागरिकांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. बुकींगबद्दल बोलायचे तर गतवर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्के वाढ आहे. यात यापेक्षाही अधिक वाढ झाली असती, परंतु सध्याची युद्धजन्य स्थिती पाहू जाता स्पेअर पार्टस् च्या किंमतीत मोठी वाढ झाली असल्याने त्याचा काहीसा परिणाम बुकींगवरही झाला आहे. - निलेश साबू, संचालक, दूरदर्शन (इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन) ‘मारुती’ कंपनीचे शहरात दोन शो रुम आहेत. येथून मारुतीच्या सर्वच चारचाकी वाहनांची विक्री केली जाते. याबाबत संचालक रणजीत बंड म्हणाले, अरिना (शोरुमचे नाव) येथून उद्या, रविवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साधारणत: ४५ वाहनांची डिलीव्हरी केली जाईल. त्याचवेळी नेक्सा या शोरुममधून १७ वाहनांच्या चाव्या खरेदीदारांना दिल्या जाणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीही नागरिकांनी मारुतीच्या वाहनांना बऱ्यापैकी पसंती दर्शविली आहे. बुकींगसह, गृहप्रवेशाचाही बेत ^घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यातही त्याला मुहूर्ताची जोड ही ठरलेलीच. यावर्षीदेखील अनेकांनी गेल्या महिनाभरापासूनच आज, शनिवारपर्यंत बुकींगकडे कल वळविला आहे. गेल्या महिनाभरात सुमारे १२० नागरिकांनी बुकींग केले. यापैकी निम्म्या खरेदीदारांनी खरेदीचा व्यवहार पूर्ण केला असल्याने ते उद्या, रविवारी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार आहेत. तर साधारणत: तेवढ्याच नागरिकांनी उद्याच्या मुहूर्तावर व्यवहार पूर्ण करण्याचे ठरविले आहे. - राजन पाटील, अध्यक्ष, क्रेडाई. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चमकले ^अक्षय्य तृतीया या वर्षभरातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या मुहूर्तावर शुभकार्य आदीच्या अनुषंगाने सोन्याचे दागीने आणि डायमंड ज्वेलरीला ग्राहकांनी बऱ्यापैकी पसंत केले आहे. सोने-चांदीचे दर वाढले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांच्या संख्येत वाढच झाली आहे. - बापूसाहेब कारवाड, सेल्स हेड, पीएनजी, अमरावती.
पक्ष्यांची तहान भागवणारी माणुसकी:वन्यजीवप्रेमींच्या संवेदनशील उपक्रमाची सर्वत्र चर्चा
एप्रिल महिन्यातील कडाक्याच्या उन्हामुळे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याचा सर्वाधिक फटका वन्यजीव आणि पक्ष्यांना बसत आहे. पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी ‘ओंजळभर पाणी, मूठभर दाणे ठेवाल का कुणी आमच्यासाठी ?’ अशी भावनिक साद घालणारा संवाद पुढे करुन एक संवेदनशील व समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. ‘पक्ष्यांसाठी अन्न व पाणी’ या उपक्रमांतर्गत त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या जागांमध्ये व सुरक्षित ठिकाणी पाण्याची भांडी (परळ) ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच पक्ष्यांसाठी धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिवसा व अमरावती तालुक्यातील मोझरी, अनकवाडी, मालधुर, ब्राम्हणवाडा गोविंदपूर, शिवणगाव आणि काटपूर या गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक पक्ष्यांना उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळत असून, स्थानिक नागरिकांकडूनही या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. या उपक्रमात उर्वरित.पान,४ लवकरच तालुकाभर वाढणार व्याप हा उपक्रम केवळ काही गावांपुरता मर्यादित न ठेवता संपुर्ण तालुकाभर राबविण्याचा संबंधितांचा मानस आहे. शिवाय येत्या काही दिवसात भटक्या जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवले तर अनेक पशु पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात.
काँग्रेसला शहर आणि जिल्हास्तरावर नवे पदाधिकारी मिळवून देण्यासाठी सध्या देशभर ‘संघटन सृजन अभियान’ सुरू आहे. या अभियानांतर्गत चांदूर बाजार व तिवसा येथे काँग्रेसच्या सभा पार पडल्या. निरीक्षक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे पाठविण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आफताब अहमद व प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आमदार भाई जगताप उपस्थित होते. या निरीक्षकांनी तेथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्या-त्या शहरासह जिल्ह्याच्या नेतृत्वस्थानी कोण असावे, हेही यावेळी जाणून घेण्यात आले. काँग्रेसला गावपातळीवर मजबूत करण्यासाठी जनतेत कोणते मुद्दे घेऊन जावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अचलपूर विधानसभा मतदारसंघात चांदूर बाजार येथे सभा घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय दुबे, संजय खाडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या कांचनमाला गावंडे, वासंतीताई मंगरोळे, अता शाह, नामदेवराव तनपुरे, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, राहुल गवई तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत विविध विभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावान काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यावर यावेळी भर देण्यात आला. “संघटन सृजन अभियानामुळे पक्षाची पाळेमुळे अधिक मजबूत होत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला जोडून काँग्रेसला पुन्हा जनतेच्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा निर्धार आहे. अचलपूरमध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू,” असे मत यावेळी बबलु देशमुख यांनी व्यक्त केले.
शहराचा विकास करताना पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर द्यावा, अशी सूचना करतानाच अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय राखून काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. अमरावती शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आज, शनिवारी दुपारी त्यांनी महापालिकेचा आढावा घेतला. आढावा सभेला अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, बडनेराचे आमदार रवि राणा, विधान परिषद सदस्य संजय खोडके व धीरज लिंगाडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, तसेच पालिकेच्या बहुतेक सर्वच विभागांचे अधिकारी अशी जम्बो उपस्थिती होती. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले. बैठकीस महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, गटनेता नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, महिला बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा काहाळे, आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, नगरसेवक व विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रासाठी देणार ४५ कोटी शहरातील शाळा, अंगणवाड्या आणि दवाखान्यांची गुणवत्ता फारशी चांगली नाही. वास्तविकता लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत. अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करून बालकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावरही त्यांचा भर आहे. बेघर नागरिकांची यादी करा तयार पालकमंत्र्यांच्या मते शहरातील बेघर नागरिकांना प्राधान्य देत घरांचे पट्टे (हक्कपत्रे) वाटप करण्यात यावे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा नागरिकांची सर्वंकष यादी तयार करावी. त्यांना विविध गृहनिर्माण योजनांद्वारे घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलविस्तार योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सर्व भागांमध्ये नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.
30 हजार लोकसंख्येचे गाव; बसस्थानक अद्यापही बेवारस:शिरजगाव कसबा बसस्थानकाची दुरवस्था
चांदूर बाजार तालुक्यातील तब्बल ३० हजार लोकसंख्या असलेले गाव शिरजगाव कसबा आहे. या गावातून दररोज शेकडो प्रवासी व विद्यार्थी राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथील बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी आगारातून येथे नियमित बस फेऱ्या सुरू आहेत. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे गाव शिक्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे बसस्थानक नेहमीच वर्दळीचे ठिकाण असते. असे असूनही येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकातील नियंत्रण कक्षाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या कक्षात व बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दारे-खिडक्या तुटलेल्या आहेत. स्थानक परिसरात प्रवाशांना बसण्यासाठी साधी स्वच्छ जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक तेथे जाणे टाळतात. परिणामी, चालक बस आत न नेता मुख्य रस्त्यावरूनच वळवतात. तेथे प्रवाशांना जीव धोक्यात घालून चढ-उतार करावा लागतो. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीत पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहाची योग्य सोय नाही. तसेच वीजपुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळी येथे अंधाराचे साम्राज्य असते. यापूर्वी स्थानकावर उभ्या असलेल्या बसमधून डिझेल चोरीच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेचा अभाव आहे. त्यामुळे रात्री मुक्कामी असलेल्या बसेस स्थानकावर न लावता पोलीस स्टेशनसमोर उभ्या कराव्या लागतात. बसस्थानकाला संरक्षक भिंत व गेट उभारणे सुरक्षेच्या दृष्टीने गरज बनली आहे. काहींनी बसस्थानक परिसरात अतिक्रमण केले आहे. शेती साहित्य, खाजगी वाहने, शेणाचे ढिगारे लावले आहेत. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. शिरजगाव कसबा हे गाव प्रसिद्ध कार्तिक उत्सवासाठी ओळखले जाते. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे गावाला “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून बसस्थानकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करावे. कार्तिक मंदिराचे सुशोभकरण करावे. अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासक प्रवीण खेरडे यांनी केली आहे. ^येथील बसस्थानकाची दुरवस्था व प्रवाशांच्या तक्रारींबाबत मुख्य कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाकडून आवश्यक सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध होण्याचे नियोजन झाले आहे. - प्रवीण डायलकर (आगार व्यवस्थापक, चांदूर बाजार) तातडीने सुधारणा करणे गरजेचे ^बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर व परिसरात सांडपाण्याचे डबके साचले आहे. दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने नागरिक व प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. - अमित लवटे (सामाजिक कार्यकर्ते)
एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सर टाळता येतो:डॉ. विकास नेहटकर यांचे गर्भाशय मुखाचा कॅन्सरवर मार्गदर्शन
गर्भाशयाचा कॅन्सर हा जगातील कॅन्सरपैकी दुसऱ्या क्रमांकावर आढळणारा गंभीर आजार असून, एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाद्वारे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो, असे प्रतिपादन आयुष्मान आरोग्य मंदिर, शिरजगाव बंड येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नेहटकर यांनी केले. ज्ञानोदय विद्यामंदिर येथे आयोजित पालक-विद्यार्थी-शिक्षक-कर्मचारी यांच्या सभेत ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डकरे तसेच तळवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. नेहटकर (सीएचओ) व सारिका सातव (आरोग्य सेविका) यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. एचपीव्ही विषाणू हा गर्भाशयाच्या कॅन्सरचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यभर एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली ही लस सुमारे ४ हजार रुपये किमतीची असून, १४ ते १५ वयोगटातील मुलींना ती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत दिली जात आहे. जगातील सुमारे १५० देशांमध्ये हे लसीकरण सुरू असून, ५० देशांमध्ये मुलांनाही ही लस दिली जाते. आतापर्यंत जगभरात सुमारे ५० कोटी महिलांनी ही लस घेतली आहे. या मोहिमेदरम्यान लस घेतलेल्या मुलींना कोणताही गंभीर त्रास झाला नसल्याचेही डॉ. नेहटकर त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालकांनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस जवळच्या आरोग्य केंद्रात घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळेस केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांनी आपल्या मुलींना लस देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच ही लस इतर वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठीही मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती खांडे, आरोग्य सेवक अशोक जावरे, आशा सेविका अर्चना यादव, सोनाली गणोरकर कर्मचारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. ५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते? असा सवाल करत, मोदींनी आपल्या भाषणात १५० पेक्षा जास्त वेळा काँग्रेसचा उल्लेख करून आपली हतबलता दाखवून दिली आहे. महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी सुरू असून, मणिपूरवर मौन का? असा बोचरा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या या राजकीय कलगीतुऱ्यात नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या प्रत्येक दाव्याचा समाचार घेतला. २०२६ उजाडले, तरी आरक्षणाचे आश्वासन हवेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक आणले तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी २०२४ मध्ये जनगणना करून मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे आश्वासन दिले गेले होते. आज २०२६ साल उजाडले आहे, तरीही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. देशाचा पंतप्रधान वारंवार खोटे बोलत असल्याने जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. ओबीसी जनगणना आणि मणिपूरवरून कोंडी राहुल गांधी यांच्या दबावामुळे सरकारने जनगणना सुरू केली, मात्र त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना (Column) नाही, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. यावरून पंतप्रधान बहुजनांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे नारीशक्तीला नमन करायचे आणि दुसरीकडे मणिपूरमध्ये महिलांचे वस्त्रहरण झाले, तेव्हा मौन बाळगायचे, हा कसला सन्मान? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. हे नमन नारीशक्तीला नव्हे, तर खुर्चीला! पंतप्रधानांचे भाषण हे देशातील महिलांसाठी नसून सत्ता टिकवण्यासाठी आणि 'मनूवादी' व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला. हे नारीशक्तीला नमन नसून केवळ खुर्चीसाठी केलेले नमन आहे. पंतप्रधान टेलिप्रॉम्टर समोर येऊन केवळ 'नौटंकी' करत आहेत. त्यांचा नकलीपणा आता देशासमोर आला आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या भाषणावर टीकास्त्र सोडले. भाजप वि. काँग्रेस: महिला प्रतिनिधित्वाचा आकडा भाजपच्या महिला प्रेमाचा दावा खोडून काढताना पटोले यांनी आकडेवारी सादर केली. लोकसभा निवडणुकीत भाजपने केवळ १० टक्के महिलांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने १३ टक्के महिलांना संधी दिली. भाजपला प्रत्यक्षात महिला नको आहेत, काँग्रेसनेच नेहमी महिलांचा सन्मान केला आहे, असा दावा त्यांनी केला. बहुजन महिला जागा दाखवेल! तुम्ही कितीही अश्रू ढाळण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही अभिनय केला, तरी देशातील बहुजन आणि दलित समाज तुम्हाला माफ करणार नाही. बहुजनांना न्याय मिळावा ही भूमिका राहुल गांधींनी सातत्याने मांडली आहे. आगामी काळात देशातील महिलाच तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असा इशारा देत नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा तीव्र निषेध केला.
आयुष व्यसनमुक्ती केंद्राची नशामुक्तीवर कार्यशाळा:सफाई कामगारांचा जिल्हा नशामुक्तीचा निर्धार
जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जामगाव (ता.बार्शी) येथील आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र यांच्या पुढाकारातून सोलापूर महापालिकेतील सफाई कामगारांसाठी शुक्रवारी (दि.१७) हुतात्मा स्मृती मंदिर येथे नशामुक्ती कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत सुमारे ३५० महिला व पुरुष सफाई कामगारांनी सहभाग घेत सोलापूर जिल्हा नशामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यशाळा सामाजिक न्याय मंत्रालयाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत आयोजित केली होती. जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात विविध नशामुक्ती उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले तसेच समाजकल्याण निरीक्षक स्वाती गायकवाड उपस्थित होते. कार्यशाळेत विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. . सूत्रसंचालन मृणालिनी मोरे यांनी केले. शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज, उमरगा येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित कामगारांचे मानसिक आरोग्य तपासणी व मूल्यांकन केले.
मानवतेचा संदेश देणाऱ्या सुफी संतांचा ऊरूस व यात्रा ही भारतीय संस्कृतीची एक फार जुनी परंपरा आहे. ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जोपासली जात आहे. अशा या ऊरूसात राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडते, जिथे हजारो भाविक धर्म, जात, पंथ आणि वर्ण असे सर्व भेद विसरून एकत्र येतात. करमाळा तालुक्यातील कंदर येथील हिंदू-मुस्लिम ऐक्यतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शहानुरशाह साहेब यांचा ऊरुस येत्या १९ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.यात्रेनिमित्त अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कंदर येथील हजरत सय्यद शहानुरशाह साहेब नाना हे परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ऊरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुस्लिम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हिंदू बांधव सर्व धार्मिक विधी पार पाडतात. आपसातील वैराची भावना मिटवून 'आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत' हा उदात्त संदेश या निमित्ताने दिला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि शांततेत साजरा करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून यात्रेची तयारी सुरु झाली आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संदलची मिरवणूक , 'बारा गाड्या ओढण्याचा' उपक्रम , आखाडा व मनोरंजनाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन आहे. सांस्कृतिक कार्यक्रम
शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘शक्तीपीठ महामार्गा' ला माळशिरस तालुक्यातील बागायतदारांनी आता निकराचा विरोध सुरू केला आहे. नेवरे, जांबुडपासून ते तरंगफळ पर्यंतच्या ११ गावांनी या महामार्गा विरोधात ‘आरपारची लढाई' पुकारली आहे. वेळापूर येथे शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत या रस्त्याला तालुक्याची वेस ओलांडू न देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी या आंदोलनात सहभागी होणार असून तालुक्यातील ११ गावांचा विरोध असल्याचा ‘ग्रामसभा ठराव' घेतला जाणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेची मोठी कोंडी होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. माळशिरस तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गा विरोधात शेतकरी वर्गात दाहकता वाढत असून दररोज बाधितांच्या बैठका वाढल्या आहेत. आंदोलनात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही उतरत असून त्यासाठी लवकरच माजी खा.राजू शेट्टी या भागात भेट देऊन शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ देणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाधितांनी निवेदन दिले आहे. माळशिरस तालुक्यातून हा रस्ता होऊ न देण्याचा निर्धार वेळापुरात जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी निमगाव येथे झालेल्या बैठकीत शेतक-यांनी प्रशासनाशी दोन हात करण्याचा इशारा दिला होता. आता या मार्गावरील ११ गावात ग्रामसभा होऊन त्यामध्ये या महामार्गास विरोध करणारे ठराव करून ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठवण्याचा निर्णय झाला आहे. . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन शेतक-यां यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली, तसेच पंढरपूर येथे आलेल्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी भेटून या मार्गास विरोध असल्याचे निवेदन दिले आहे. . वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरात या मार्गातील ११ गावच्या बाधित जवळपास १०० शेतकऱ्यांची बैठक झाली. सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. . या ११ गावात ग्रामसभा घेऊन विरोधासाठी ग्रामसभेचा ठराव करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठवण्याचा निर्णय झाला. धरणे, रस्ता रोको, उपोषणे अशा आंदोलनाचा इशारा दिला. . यावेळी भाजप नेते के. के. पाटील, ॲड. लक्ष्मण मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर, मदन माने देशमुख, ॲड सागर जाधव, चंद्रकांत मगर आदी उपस्थित होते. ^माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या शक्ती पीठ महामार्गाची मला निमगावच्या शेतकऱ्यांनी येऊन माहिती दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. शेतकरी संघटना या बाधित शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहील. - खा.राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना. माळशिरस तालुक्यातील नेवरे, जांबुड, विठ्ठलवाडी, माळखांबी, उघडेवाडी, वेळापूर, मगरवाडी, घुमेरा ओढ्यावरील पूल, निमगाव, गारवाड, चांदापुरी, तरंगफळ आदी गावांचा समावेश होत आहे. मात्र या महामार्गास विरोधाची ठिणगी निमगाव मधून पडली. नेवरे ते तरंगफळ गावातून महामार्गाला विरोध सुरु माळशिरस तालुक्यात येऊन आंदोलन करू उपमुख्यमंत्री शिंदे यांना सभापती मगर यांचे निवेदन
रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्या 'अपने-अपने राम' या संगीतमय रामकथेचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले आहे. आजपासून (दि.१९) राम कथेला सुरुवात होणार आहे. मंगळवारपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळेत राष्ट्रीय पाठशाळेच्या प्रांगणात ही संगीतमय रामकथा होणार आहे. शहरातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या या धार्मिक सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. या सोहळ्यासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत, अशी महिती नगरसेवक विकी जगताप यांनी दिली. अनिल मुरकुटे म्हणाले, डॉ. कुमार विश्वास यांच्या संगीतमय राम कथेसाठी सुमारे १ लाख स्क्वेअर फुटाचा जर्मन हँगर पद्धतीचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. हजारो भाविकांसाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. कथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. श्रीराम मंदिराचा आकर्षक व भव्य सेटही उभारण्यात आला आहे. राजेश भंडारी म्हणाले, हजारो भाविकांची तिन्ही दिवस महाप्रसादाची व्यवस्था काका ट्रस्टच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी कार्यक्रम स्थळाच्या समोरील भागात भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहनांसाठी आयटीआय कॉलेजचे मैदान, पॉलिटेक्निक कॉलेज मैदान, रयत शिक्षण संस्थेचे मैदान आनंदधाम शेजारील भक्तनिवास जवळ वाहनतळाची व्यवस्था केली आहे. माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त होणाऱ्या या ऐतिहासिक रामकथा सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे व तिन्ही दिवस महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत नकारात्मक विचारांना थारा न देता सकारात्मक आणि बलाढ्य विचारसरणी स्वीकारावी, असे आवाहन प्रेरणादायी वक्ते आणि लेखक दत्तात्रय वारकड यांनी केले. येथील जिल्हा कोषागार कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 'जीवनातील ताणतणावापासून मुक्ती व आनंदी जीवन' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी अप्पर कोषागार अधिकारी कुशाबा पिसे, रवींद्र काजळकर, संतोष ताठे, सहाय्यक कोषागार अधिकारी राजकुमार पुंड (नेवासे) व सुधीर देशपांडे आदी उपस्थित होते. वारकड म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या युगात मानव भौतिक सुखाच्या मागे धावताना स्वतःलाच विसरला आहे. जगातील कितीही मौल्यवान वस्तूंचा उपभोग घेतला, तरी शांत झोप आणि निरोगी शरीर हेच खऱ्या आनंदी जीवनाचे गमक आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर... या कवी कुसुमाग्रजांच्या ओळींचा दाखला देताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आव्हानांना न डगमगता सामोरे जाण्याचा मंत्र वारकड यांनी देताच श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. जीवनात स्थैर्य हवे असेल तर धैर्य धरणे आवश्यक आहे. धावपळीच्या जीवनात मनःशांती जपण्याचे तंत्र त्यांनी मांडले. व्याख्यानाला कोषागार कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्शांचा वारसा जोपासण्याची आज खरी गरज संत ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या विचारांचा सांस्कृतिक वारसा आपण अंगीकारला पाहिजे. हीच आदर्श शिकवण भावी पिढीला देणे ही काळाची गरज आहे, असे वारकड म्हणाले.
अलीकडे करिअरच्या नावाखाली सर्व पळापळ सुखासाठी चालली असली तरी परमशांती भगवान श्रीकृष्णांच्या नामातच मिळते. कथा श्रवणाने आपले रूप, स्वरूप, व्यवहार बदलतो. भाव जागृती होते. जीवनातील संकट, विपत्ती, कष्ट, शारिरीक व्यथा, परिवारातील द्विधा अवस्था केवळ श्रीकृष्णांच्या स्मरणाने निघून जाते. एकांतात बसून श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे भजन म्हणण्यास सुरुवात केली की, सर्व संकटे दूर चालल्याचे जाणवते असे प्रतिपादन इंद्रेश उपाध्याय यांनी केले. येथील कौशल्यादेवी गुप्ता, महेश गुप्ता आणि आयुष गुप्ता यांनी सावेडीमधील मिस्कीन मळ्यात आयोजित केलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. उपाध्याय पुढे म्हणाले, वयाच्या ७ व्या वर्षात करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलण्याची लिला श्रीकृष्णांनी करून दाखवताना त्याचे श्रेय मात्र ब्रजवासींना दिले. इतरांना मान-सन्मान-श्रेय देणे हा श्रीकृष्णांचा स्वभावच आहे. आपण दुसऱ्यांचा मान, श्रेय हिसकावून घेतो. कृष्ण भक्त बनण्याची इच्छा असल्यास आपला मान-श्रेय इतरांना देणे शिकले पाहिजे. आज भारताला संतांची गरज आहे. शुद्ध आचरण असलेल्या मातापित्याच्या पोटी भक्त जन्म घेतात. भक्तीचा प्रवाह खळाळता ठेवण्याचे मौलिक कार्य भक्त करतात असेही इंद्रेश उपाध्याय यांनी सांगितले. उपस्थित हजारो भाविकांना दर्जेदार सात्विक महाप्रसाद प्रसाद वाटप समितीच्यावतीने करण्यात आला. कडाक्याचे ऊन असूनही गर्दीचा उच्चांक झालेला पहावयास मिळते आहे. सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. दुपारच्या वेळी तापमान प्रचंड वाढते. या कडाक्याच्य उन्हातही भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. कथा ऐकण्यासाठी भाविक कथा स्थळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहत आहेत. हरिनामाचा जयघोष सुरू आहे. त्यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. दुसऱ्यांना मान सन्मान द्यायला शिका इतरांना मान-सन्मान-श्रेय देणे हा श्रीकृष्णांचा स्वभावच आहे. आपण दुसऱ्यांचा मान, श्रेय हिसकावून घेतो. कृष्ण भक्त बनण्याची इच्छा असल्यास आपला मान-श्रेय इतरांना देणे शिकले पाहिजे असे इंद्रेश उपाध्याय यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
फक्त रोखीने लूट, पावती मात्र अन्नदानाची' अन्नदानाच्या नावाखाली ३ हजार ते ५१ हजार रुपयांची थेट रोख वसुली केली जायची. गडगे स्वतः आकडा ठरवायचा. मात्र, काळा पैसा लपवण्यासाठी आणि कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी पावतीवर चलाखीने अन्नदान' असे छापले जायचे. राहण्यासाठी व्हीआयपी आणि साध्या रूम्स, तसेच २ ते ३ हजारांत एसी हॉल भाड्याने देऊन पैशांची खाण चालवली जात होती. व्हिडिओ बनवण्यासाठी ७ जणांची टीम भोंदूगिरीचे मार्केटिंग करण्यासाठी त्याने ७ जणांची एक खास आयटी टीम' पोसली होती. या टीममध्ये धिप्पाड बाउन्सर होते. हे लोक आजार बरे झाल्याचे' खोटे व्हिडिओ बनवून व्हायरल करायचे. या खोटारडेपणाला तब्बल २ कोटी व्ह्यूअर्स आहेत, ज्यातून तरुण आणि सुशिक्षित वर्गही या जाळ्यात ओढला गेला. गौतम गायकवाड | वडगावपान (ता.संगमनेर) वडगावपान येथून महामार्गापासून उजव्या बाजूला ७ ते ८ किमी आतमध्ये गेल्यानंतर मनोली, वडगावपान व कोल्हेवाडी यांच्या सीमेवर भोंदू राजेंद्र गडगेने अंधश्रद्धेचा एक भयंकर बाजार मांडला आहे. हात न लावता कॅन्सर, शरीरातील गाठी, पोटाचे विकार, कमरेची गादी सरकणे यावर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या गडगेने मागील अनेक वर्षांत तेथे येणाऱ्या भाविकांच्या भावनांशी खेळ केला. निसर्गरम्य वातावरणात चार एकरांवर भोंदूचे साम्राज्य पसरले आहे. उपचाराला येणाऱ्यांच्या निवासासाठी शेकडो खोल्यांची व्यवस्था केली आहे. तुमच्या अंतर्मनातील शक्तीने मी आजार बरा केला, गाठ पातळ करून नष्ट केली अशा भूलथापा मारून तो लोकांच्या जिवाशी खेळत होता. मंत्रोच्चाराच्या आधारावर अपत्यप्राप्तीसाठीही भक्तांना लुटल्याचे समोर आले. १२ व्या वर्षापासून तपश्चर्या केल्याचा दावा करणारा हा भोंदू चौथी नापास असल्याचे तेथील ग्रामस्थ सांगतात. दरम्यान, अमावस्येच्या दिवशी गरिबांसाठी ३५०० रुपयांचे साधे हवन, तर श्रीमंतांसाठी आरोग्य हवन'च्या नावाखाली सुवर्ण आणि चांदीचे भस्म वापरल्याचा दावा करत ११ हजारांची उकळले जायचे. गडगेकडे आलिशान कार व बीएमडब्ल्यू दुचाकी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गोरखधंदा उघड होऊ नये म्हणून गडगेने एका बीएएमएस डॉ. मोहन पुरी याला पगारावर ठेवले होते पाळत ठेवण्यासाठी ग्रामस्थांच्या घरांवर ड्रोनची नजर ग्रामस्थ शिवाजी शिंगोटे यांच्या माहितीनुसार, गडगे जेमतेम तिसरी-चौथी शिकलेला आहे. लोकांची थेट नजर पडू नये म्हणूनच त्याने महामार्गापासून आत, निर्जन आणि कच्च्या रस्त्यावर हे भोंदूगिरीचे साम्राज्य उभे केले. ग्रामस्थांवर पाळत ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी लोकांच्या घरांवर ड्रोन उडवले जायचे. ग्रामस्थांनीही याची तक्रार केलेली होती. वैद्यकीय उपचारांशिवाय पर्याय नाही ^ मंत्रोच्चारातून कॅन्सरच्या गाठी विरघळून जात असल्याचा दावा खोटा आहे. कॅन्सरवर जगभरात सर्वाधिक संशोधने झाली आहेत. कॅन्सरसाठी वैधानिकदृष्ट्या वैद्यकीय उपचार घ्यावेच लागतात. सध्या अत्याधुनिक पद्धतीच्या शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडीओथेरपी हे उपचार आहेत. कॅन्सरसाठी या गोष्टीवर रुग्णांना विश्वास न ठेवता, तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच उपचार करुन घेणे गरजेचे आहे. - डॉ. प्रकाश गरुड, कॅन्सर तज्ज्ञ.
वाकडी येथील अनधिकृत कमिटीने बाहेर गावातील शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन पेटीवर अनधिकृत नोटीस लावून त्यांच्या पाइपलाइन फोडून नुकसान केले आहे. याबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी. अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. वाकडी येथील धरणावरून वाकडीसह कासली, राहेरा, तळेगाव, शेळगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी पाइपलाइन करून आपल्या शेतात पाणी आणले आहे. रब्बी पिकासह फळबागा व केळीसारख्या भागा आज घडीला उभ्या आहेत. गेल्या काही दिवसात तापमान वाढल्याने हातातून अशी आलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशावेळी वाकडी येथील अनधिकृत कमिटीने वाकडी धरणावरून कनेक्शन असलेल्या शेतकऱ्यांच्या कनेक्शन पेटीवर अनधिकृत नोटीस लावून पाइपलाइनचे तोडफोड केली, वायर कापून टाकल्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंधित शेतकरी करीत आहेत. पोलिस तक्रार, कारवाई नाही गेल्या वर्षीही अशाच अनधिकृत कमिटीने शेतकऱ्यांचे पाइप फोडून कनेक्शन कट केले होते. याबाबत गणेश राजपूत यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्याकडे तक्रार केली होती. मात्र पोलिस ठाण्यातर्फे कुठलीही चौकशी किंवा कार्यवाही करण्यात आली नसून आता पुन्हा तसाच प्रकार करण्यात आला आहे. कमिटी अनधिकृतच : ^धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी पाणी वापर संस्था असते. वाकडी येथे अशा प्रकारची कुठलीही कमिटी अस्तित्वात नाही. याबाबत शेतकऱ्यांची तक्रार आल्यास चौकशी करू. -पी.एम.पाटील, उप अभियंता, पाटबंधारे विभाग, जामनेर.
युद्धजन्य परिस्थिती व इतर कारणे पाहता लवकरच दरवाढ होईल असा मेसेज कंपनीतर्फे आला होता. म्हणून दहा लाख रुपयांवर रकमेचा माल नुकताच भरला होता. मात्र गुरुवारी लागलेल्या आगीत संपूर्ण दुकानाची राख रांगोळी झाली. अशी कैफियत तरुण व्यापारी आकाश शार्दुल यांनी भेटण्यासाठी आलेल्या व्यापारी मंडळींकडे व्यक्त केली. दरम्यान जामनेर शहर व्यापारी संघ असा सोशल मीडियावर व्यापाऱ्यांचा ग्रुप आहे. शार्दुल यांच्या दुकानाला आग लागल्याने शार्दुल यांचे नुकसान झाले आहे. त्यांना व्यापारी बांधवांनी शक्य ती मदत करावी, अशी पोस्ट हॉटेल चालक किशोर पाटील यांनी टाकली. प्रथम स्वतः अर्थसहाय्य केल्याचा स्क्रीनशॉटही टाकला. त्यानंतर शहरातील व्यापारी बांधवांकडून शार्दुल यांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला आहे. आधी कुशल कारागिरांच्या हाताखाली मजुरी केली, नंतर स्वतः फर्निचर चे काम चालू केले. त्यातून उभारी घेत पावणे दोन वर्षांपूर्वी दुकान टाकले. आता स्थिर-स्थावर होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत दुकानासह स्वप्नांची राख रांगोळी झाल्याची कैफियत आकाश शार्दुल यांनी व्यापाऱ्यांजवळ व्यक्त केली.
पिंपळगावी खरेदीचा ‘अक्षय्य’ उत्साह:सीएनजी व ईव्ही वाहनांना मिळाली अधिक पसंती
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सोने-चांदीच्या दागिन्यांसह वाहन खरेदीवर नागरिकांतर्फे भर दिला जातो. मुहूर्त साधन्यासाठी नागरिकांनी १२ चारचाकी आणि २५० हून अधिक दुचाकींची बुकींग केली आहे. घरांच्या आगाऊ बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा तेजी दिसली. महामार्गावरील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेले पिंपळगाव बसवंत झपाट्याने विकसित होत आहे. द्राक्ष उत्पादकांची मोठी संख्या आणि येथील मोठी बाजार समिती यामुळे आर्थिक उलाढाल वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ऑटोमोबाईल शोरूम्समध्ये अक्षय्यतृतीयेसाठी आगाऊ बुकिंग पूर्ण झाले आहे. १२ चारचाकी वाहने, २५० दुचाकींची बुकींग झाली. वाढत्या इंधन दरांमुळे सीएनजी कार खरेदीला ग्राहक पसंती देत आहेत तर ईव्हीकडे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पाहीले जात असल्याने त्यांची मागणी वाढल्याचे दिसून आले. उन्हाळ्यामुळे एसी आणि फ्रीजच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ टक्के वाढ झाली आहे. मोबाईल मार्केटमध्ये सवलतींमुळे नवीन मॉडेल्सच्या विक्रीतून कोट्यवधींची उलाढाल होईल.
लोकप्रतिनिधी दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र प्रशासकीय अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असतात. त्यामुळे जनतेची कामे तत्काळ मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. जर अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये वेळेवर पार पाडली असती, तर आज अशा शिबिरांची गरजच भासली नसती, अशा शब्दांत जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड पाटील यांनी प्रशासनाचे कान टोचले. आदर्श ग्राम पाटोदा येथे महसूल विभाग व पंढरपूर मंडळाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार उमेश पाटील, माजी सरपंच भास्कर पेरे, उपसभापती बाळासाहेब गाढे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात सातबारा वाटप, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेकडो लाभार्थींना जागेवरच देण्यात आला. तहसीलदार उमेश पाटील यांनी अभियानामागील हेतू स्पष्ट केला, तर उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी पाटोदा गावाने राबवलेल्या विकासकामांचा आढावा घेत गाव कसे ‘स्मार्ट' बनले, याची माहिती दिली. या शिबिराला पंढरपूर मंडळातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. अडचणी आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सहकार्य करू, मात्र कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही सचिन गरड यांनी शेवटी दिला. पंढरपूर गावातील घरे नियमित करा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी पंढरपूर गाव सध्या अनियमित असल्याने नागरिकांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. महसूल विभागाने सर्व घरे नियमित करून गावठाण मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी २०११ पूर्वीच्या वसाहतींमधील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
कन्नड-नागदला गौताळा अभयारण्य मार्गे जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३९ वरील म्हैसघाटातील रस्ता अनेक दिवसांपासून धोकादायक झाला होता. अखेर म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वन विभागाने मंजुरी दिली. आमदार संजना जाधव यांनी ही माहिती दिली. यामुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या आता मार्गी लागणार आहे. कन्नड-नागद मार्ग म्हैसघाटातून गौताळा अभयारण्य क्षेत्रात जातो. दुरुस्ती, डांबरीकरणासाठी वन विभागाची परवानगी गरजेची होती. या रस्त्याचे डांबरीकरण १९८० साली झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या रुंदीमध्ये कोणताही बदल झाला नाही. १९८० पूर्वीच्या मंजुरीच्या आधारे वन विभागाने दुरुस्ती, डांबरीकरणाला हिरवा कंदील दिला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आमदार जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागांशी समन्वय साधला. प्रश्न मार्गी लागला. सोलापूर-धुळे महामार्गावरील कन्नड-चाळीसगाव औट्रम घाट अवजड ^कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाट रस्त्याच्या कामासाठी आम्ही सातत्याने निधीची मागणी करत आहोत. मात्र, हा रस्ता वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगी मिळवणे अत्यंत कठीण ठरत आहे. म्हैसघाटातील खराब झालेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यासाठीही वन विभागाकडून परवानगी मिळत नाही. परवानगी मिळाल्यास आम्ही तत्काळ, अगदी दुसऱ्याच दिवशी रस्त्याचे काम हाती घेऊ. दरम्यान, म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित होता. त्यास आता मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. - रवींद्र जारवाल, सहायक कार्यकारी अभियंता, सा. बां. उपविभाग, पूर्व कन्नड वाहनांसाठी बंद आहे. अनेक वाहनचालक पर्यायी, जवळचा मार्ग म्हणून कन्नड-नागद रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. वाहतुकीचा ताण वाढल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली. घाटात लहान-मोठे अपघात झाले. तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा कलाकार तोताराम पवार, सागर पाटील, गंगाधर पाटील, ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलने केली होती. या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. वाहनचालक, प्रवासी, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रस्त्याच्या उर्वरित कामासाठी पाठपुरावा
आई-वडिलांची सेवा म्हणजेच खरे पंढरपूर आहे, असा हितोपदेश चंद्रकांत महाराज यांनी दिला. सिल्लोड तालुक्यातील भवन येथे ११ ते १८ एप्रिलदरम्यान सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी (दि. १८) हभप चंद्रकांत महाराज खळेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. भक्तीचा गाढ संदेश भाविकांपर्यंत पोहोचला. संत तुकाराम महाराज यांच्या ‘या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी देव संतांच्या संग राहिला’ या अभंगावर चिंतन करताना महाराज म्हणाले, भक्ताच्या निर्मळ प्रेमामुळे देवही संतांच्या सहवासात रमतो. केवळ पंढरपूरची वारी केल्याने पाप दूर होत नाही, जीवनातील आचरण शुद्ध हवे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिखाऊ भक्ती नको. कृतीतून दिसणारी सेवा महत्त्वाची. आई-वडिलांवर प्रेम करा. त्यांची घरीच सेवा करा. हेच खरे पंढरपूर. मायबापच आपले विठ्ठल-रुक्माई, असे त्यांनी सांगितले. कर्माचे फळ नक्की मिळते, त्यामुळे सद्वर्तन जोपासा. निष्ठा ठेवा, असा संदेश देत त्यांनी भाविकांना अंतर्मुख केले. कीर्तनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सप्ताह सोहळ्यामुळे आठवडाभरात गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. दररोज नामवंत महाराजांची कीर्तने झाली. रामकथा झाली. ज्ञानेश्वरी पारायण झाले. शनिवारी सर्व ग्रामस्थांनी घरोघरी गुढी उभारल्या होत्या. दारी रांगोळी काढली. पालखीचे स्वागत केले.
जागतिक वारसादिनी वेरूळ लेणीला 6 हजार पर्यटकांची भेट:अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री लेणी पाहून भारावले
शनिवारी जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणीत जागतिक वारसा दिनानिमित्त मोफत प्रवेश देण्यात आला होता. या संधीचा लाभ घेत एकाच दिवसात सहा हजार पर्यटकांनी या जागतिक वारशाचा आनंद घेतला. पर्यटक भेटीचा आतापर्यंतचा विक्रम असून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भारतीय स्थापत्यकलेचा हा अजोड नमुना न्याहाळला. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शनिवारी वेरूळ लेणीला भेट दिली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त ऐतिहासिक वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जातो. या सवलतीचा फायदा घेत सकाळपासूनच वेरूळ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. वेरूळ लेणीचे मुख्य अधिकारी निलेश कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ५.५ ते ६ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती.अशी माहिती वेरूळ लेणी प्रमुख निलेश कोळी यांनी दिली. जागतिक वारसा दिनाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील पी. यु. जैन विद्यालय आणि वेरूळ लेणी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन या विषयावर आपले विचार मांडले. निबंध स्पर्धेतून एकूण पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये हर्ष कोपरेकर याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. विजेत्या विद्यार्थ्यांचे अधिकारी निलेश कोळी आणि शाळा प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्र्यांसारख्य ा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची भेट आणि दुसरीकडे हजारो पर्यटकांचा उत्साह, यामुळे यंदाचा जागतिक वारसा दिन वेरूळ लेणीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला. भारतीय कारागिरांच्या कौशल्याबद्दल अभिमान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भारतीय स्थापत्यकलेचा हा अजोड नमुना न्याहाळला. त्यांनी १६ क्रमांकाच्या ‘कैलास’ लेण्यांची पाहणी केली. एकाच अखंड पाषाणात कोरलेल्या या भव्य मंदिराचे सौंदर्य पाहून त्यांनी भारतीय कारागिरांच्या कौशल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. तसेच भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा हा वारसा थक्क करणारा असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी नमूद केले.
कन्नड येथील मोहसीन शेखची कोलंबो येथे भारत व श्रीलंका या दोन संघादरम्यान १ मे ते ६ मे या कालावधीत होणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी तसेच एक कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय दिव्यांग संघात निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या दिनांक २२ मार्च रोजीच्या पत्रानुसार शेख मोहसीनसह भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस कोलंबो साठी रवाना होणार असून टी२० व कसोटी मालिका दोन्ही संघादरम्यान खेळवली जाईल. शेख मोहसीन हा कन्नड शहरातील एक गुणी व होतकरू खेळाडू असून पान टपरीच्या आधारे आपला उदरनिर्वाह करत असतो. एका हाताने दिव्यांग असूनही त्याने कन्नड येथील यस क्लब येथे योगेश पाटील व प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून यापूर्वी देखील बांगलादेश व श्रीलंका या संघाविरूद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. निवडी बद्दल कन्नडच्या आमदार संजना जाधव, नगरअध्यक्षा फरीनबी अब्दुल जावेद, माजी नगराध्यक्ष विलास वाडेकर यांनी अभिनंदन केले.
वैजापूर तालुक्यातील खंडाळा व परिसरातील अनेक गावात शेळी-मेंढपाळांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून त्यांना चाऱ्याच्या शोधात या गावाहून त्या गावात अशी भटकंती करावी लागते. खंडाळा येथील धनगर समाज बांधव मोठ्या प्रमाणात असून त्यांचा उदरनिर्वाह हा मेंढी व्यवसाय आहे. वास्तविक शेकडो रिकाम्या हातांना उद्योग म्हणून चांगला रोजगार देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. परंतु दुर्लक्षित असलेल्या मेंढपाळ व्यवसायाला पाहिजे तशी शासन मदत करत नसल्याचे व्यावसायिकांकडून बोलले जात आहे. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना येथील व्यावसायिकांना करावा लागतो. त्यातच या वर्षी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला असल्याने तोंडी आलेला घास हिरावून घेतलाय तर चारा देखील सडून गेला. फेब्रुवारी मार्च महिन्यात या भागातील छोटे प्रकल्प कोरडे पडले व विहिरींनी तळ गाठला असल्याने काही मोजके ठिकाण वगळता पाणी कुठेच बघावयास मिळत नसल्याने मेंढीपालन करणे सर्वात गंभीर बाब झाली आहे. चारा पाण्यासाठी भयंकर हाल होत असल्याचे चित्र परिसरात बघावयास मिळत आहे. शेळी-मेंढी व्यवसायातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा तीव्र उन्हाळ्यामुळे अडचणीत सापडला असून व्यावसायिकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. हा व्यवसाय वडिलोपार्जित व परंपरागत म्हणून केला जातो. शासनाने या समाजासाठी विविध सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु या योजनांचा त्या व्यक्तीस सवलत मिळत नसल्यामुळे हा नागरिक अद्यापही प्रगती पासून दूर असल्याची खंत काही व्यावसायिकांनी व्यक्त केली. फिरल्याशिवाय पर्याय उरला नाही पुर्वी चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय गायरान उपलब्ध होते. त्यामुळे मेंढ्या चारण्यासाठी मुबलक चारा उपलब्ध होता. परंतु गायरान जमीनीवर सोलार सारखे प्रकल्प राबवण्यात येत आहे तर काही जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण देखील झाले आहे. त्यामुळे आता चाऱ्यांची कमतरता भासत असल्याने गावोगावी फिरल्याशिवाय पर्याय उरला नाही, असे खंडाळा येथील मेंढपाळ रतन गायकवाड म्हणाले.
सिल्लोड तालुक्यातील म्हसला फाटा ते अंधारी या मुख्य १० किमी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी १० वाजता सिल्लोड-कन्नड हायवेवर २ तास रास्ता रोको आंदोलन केले. अनेक वर्षांपासून रस्ता खराब आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आंदोलनामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. म्हसला फाटा येथे सकाळी १० वाजल्यापासून शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले. आंदोलनात जि.प. सदस्य राधाकृष्ण काकडे, सुखदेव सपकाळ, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर तायडे, जगदीश कवाळ, मनोज बैनाडे, महेंद्र मोरे, जय जैस्वाल यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. लवकरच रस्ता होईल प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाचे अभियंता मंगेश डापके यांनी सांगितले. म्हसला फाटा ते अंधारी १० किमी रस्त्यासाठी नवीन प्रस्ताव तयार होत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ता होईल. पाठपुरावा सुरू आहे. यासाठी४ महिने कालावधी लागेल.
भूतानचे गृहमंत्री लिओनपो अजिंठा लेणी पाहून भारावले
जागतिक वारसा दिनानिमित्त भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी शनिवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. लेणी पाहून ते भारावून गेले. मी लवकरच पुन्हा अजिंठा लेणीला येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सोबत ५४६ पर्यटकांनीही भेट दिली. सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांचे अजिंठा लेणीत मोटारीने आगमन झाले. भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लेणी क्रमांक १, २, ५, ९, १०, १२, १७, २६ पाहिल्या. गाईड राहुलदेव निकम यांच्याकडून अजिंठा लेणीची सविस्तर माहिती घेतली. लेणीतील चित्रशैली, निसर्गरम्य परिसर, आदरातिथ्य पाहून आपण भारावून गेलो, अशी भावना लिओनपो शेरिंग यांनी व्यक्त केली. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पुन्हा अजिंठा लेणीला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाईड राहुलदेव निकम यांच्यासह उपस्थितांना त्यांनी भूतानला भेट देण्याचे निमंत्रण दिले. लिओनपो शेरिंग यांच्या आगमनापासून प्रयाणापर्यंत फर्दापूर पोलिसांच्या पथकाने अजिंठा लेणी परिसर, फर्दापूर टी पॉइंट, व्ह्यू पॉइंट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. जागतिक वारसा दिनानिमित्त भारतीय पुरातत्व विभागाने शनिवारी पर्यटकांसाठी मोफत प्रवेश दिला होता. या संधीचा फायदा पर्यटकांनी घेतला. दिवसभरात ५४६ पर्यटकांनी अजिंठा लेणीचे मोफत दर्शन घेतले.
पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी शनिवारी (दि. १८) सकाळी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पैठण तहसील कार्यालयात गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांच्या अपेरिक्षाला अपघात झाल्याने ९ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयातील एका दलालाने ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी १०० रुपये घेतल्याचा आरोप आहे. संगायो विभागात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये घेतल्याचाही आरोप आहे. प्रक्रिया पूर्ण करून सर्वजण ढाकेफळकडे निघाले होते. बोरगाव-ढाकेफळ रस्त्यावर दुपारी सुमारे अडीच वाजता रिक्षात (एमएच २० एस ४८६) ९ जण प्रवास करत होते. टाकळी-बोरगाव शिवारात रिक्षाच्या टायर बेरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला. चालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली. वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरातील शेतकरी, वाहनधारकांनी मदत केली. जखमींना बाहेर काढले. ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिका चालक विजय गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बिडकीन शासकीय रुग्णालयात दाखल केले. बिडकीन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांवर प्रथमोपचार केले. प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. काहींना मुकामार, किरकोळ जखमा झाल्या. जखमींमध्ये मारोती संपत शिरसाठ (८०), हौसाबाई विश्वनाथ शिंदे (७०), सरसाबाई काशिनाथ दळे (६७), केसरबाई अर्जुन मोरे (८०), द्रोपदाबाई देविदास कोल्हे (७५), सरसाबाई जनार्धन कोल्हे (७५), हौसाबाई मुरलीधर गोन्टे (७८), द्वारकामाई मारोती शिरसाट (७१), राजू यादव मोरे (३०) यांचा समावेश आहे. कर्मचारी, दलालांवर कारवाई करा घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख किरण काळे यांनी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तत्काळ, योग्य उपचार करण्याची विनंती केली. पैठण तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संगायो विभागातील संबंधित कर्मचारी, दलालांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंधनकारक असलेल्या ‘विशाखा’ व ‘पोश’ समित्या नाशिकमध्ये केवळ नावापुरत्याच असल्याचे वास्तव समोर आले असून, यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय कार्यालयांपासून खासगी कंपन्यांपर्यंत नियमांचे पालन होत नसल्याने महिलांना तक्रार करण्यासाठी विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप बैठकीत केला. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत आमदार चित्रा वाघ, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांनी शासन व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर थेट बोट ठेवले. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नाशिकचे नाव बदनाम होत असल्याची चिंताही व्यक्त केली. ..तर कठोर कारवाई टीसीएसमधील प्रकरणाचा संदर्भ देत आ. फरांदे यांनी नाशिकच्या प्रतिमेबाबत चिंता व्यक्त केली. महिलांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जाईल, असे सांगितले. अधिकाऱ्यांनाच विसर आ. वाघ यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयातच विशाखा समितीचे फलक दिसत नाहीत. घटनांची पुनरावृत्ती होत असताना प्रतिबंधात्मक यंत्रणा निष्क्रिय आहे. समित्यांच्या बैठकाच होत नसल्याने अडचण समित्यांकडे तक्रारी येत नाहीत, कारण बैठका होत नाहीत. महिलांना न्याय देण्यासाठी समित्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी. - सीमा हिरे, आमदार ९० दिवसांत निकाल देण्याचे बंधनघटनेनंतर तीन महिन्यांपर्यंत तक्रार करता येते आणि ९० दिवसांत निकाल देणे बंधनकारक आहे. आयसीसी समित्यांना प्रत्यक्ष अधिकार दिल्याशिवाय खासगी क्षेत्रातील महिलांना दिलासा मिळणार नाही. - चित्रा वाघ, आमदार
दोन दिवसांपूर्वी हनुमाननगरात गावठी कट्टा आणि बिअरची बॉटल नाचवत गोळीबार करणाऱ्या पवन दिवेकर व त्याच्या पीडी कंपनीवर अखेर पोलिसांनी कारवाई केली. गुंडांवर पोलिस कसे भारी पडतात, याचा प्रत्यय शनिवारी (१८ एप्रिल) रात्री आला. अवघ्या ४८ तासांपूर्वी ज्या चौकात त्यांनी हवा केली होती, तेथेच पुंडलिकनगर पोलिसांनी हातकड्या लावून आणि माना खाली घालायला लावून पवन अनिल दिवेकर, कुणाल किशार साळवे, महेश गौतम साळवे, रोहन अनिल दिवेकर, सतीश अण्णाराव हिवराळे, सिद्धांत शाहू चाबुकस्वार या गुंडांची धिंड काढली. गुंड जेलमधून सुटल्यावर शस्त्रांसह रील्स बनवून दहशत माजवत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले होते. यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी घटनास्थळी तपास केला. “हे रीलस्टार नसून गुंड आहेत. यांच्यासोबत व्हिडिओ काढू नका. असे पोलिसांनी या वेळी सांगितले. पोलिसावरच उगारला होता चाकू दरम्यान, अटकेच्या वेळी पवन दिवेकरने पळून जाण्याच्या प्रयत्नात फौजदार अर्जुन राऊत यांना ढकलून दिले. तसेच, एका पोलिसावर चाकू उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील पोलिस दलासाठी आपत्कालीन मदतीचा आधार असलेल्या डायल ११२ मोहिमेला शहरात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शहर पोलिसांच्या दाव्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोहोचण्याचा वेळ (रिस्पॉन्स टाइम) ६ मिनिटे आहे, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या अनुभवात हा वेळ १२ मिनिटांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. वाढती वाहतूक कोंडी, मर्यादित साधनसामग्री आणि विनाकारण येणारे फेक कॉल्स यामुळे पोलिसांच्या गतीला ब्रेक लागत आहे. डीजीपी अन् आयुक्तांडून तपासणी पोलिस महासंचालक सदानंद दाते व आयुक्त प्रवीण पवार यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत हे वरिष्ठ अधिकारी अचानक कॉल लिस्ट उघडून तक्रारदारांना फोन करतात. पोलिसांकडून वेळेत मदत मिळाली की नाही, याची थेट विचारणा त्यांच्याकडून केली जात असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आहे. १८ पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक वाहन १८ पोलिस ठाण्यांमध्ये एक दुचाकी, १ चारचाकी उपलब्ध आहेत. या वाहनांची संख्या वाढविण्याची गरज आहे. प्रत्येकी केवळ १ दुचाकी आणि १ चारचाकी उपलब्ध आहे. एकाच वेळी दोन कॉल आल्यास दुसऱ्या गाडीची वाट पाहावी लागते. दारू पाण्यासारखी लागते, असे कॉल्स वाढले अनेक दारुडे कॉल करून दारू पाण्यासारखी लागते आहे, दारू विक्रेत्याला अटक करा अशा तक्रारी करतात. अशा कॉल्समुळे खरंच संकटात असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना उशीर होतो. बायकोने भाजी चांगली केली नाही, चकणा चांगला नाही अशा कारणांसाठी येणाऱ्या कॉल्समुळे यंत्रणेचा वेळ वाया जात आहे. डायल ११२ : स्थिती माहिती समजून घ्यारोजचे सरासरी कॉल्स : १५० ते १७०सर्वाधिक कॉल्स : वाळूज, मुकुंदवाडी, सिडको, जिन्सीउपलब्ध बळ : प्रत्येकी ठाण्यास १ दुचाकी, १ चारचाकीपोलिसांचा दावा : ६ मिनिटे रिस्पॉन्स टाइमप्रत्यक्ष वेळ : १२ मिनिटांहून अधिक विलंब होणार नाही रिस्पॉन्स टाइम १० मिनिटांच्या आत आणण्यासाठी रोज काम करत आहोत. काही वेळा गाडी कॉलवर असेल तर दुसऱ्या ठिकाणचे वाहन रुजू केले जाते. मदतीसाठी विलंब होणार नाही. -जयश्री कुलकर्णी, सहायक निरीक्षक, डायल ११२ फेक कॉल्स, मर्यादित वाहनांना ट्रॅफिकचे ग्रहण शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सिडको-वाळूज पट्ट्यात ट्रॅफिकमुळे पोलिसांच्या गाड्या अडकून पडतात.
तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव:तरुणीची तुळशीची माळ तोडली, गजवा-ए-हिंदची धमकी
पंचवटी परिसरात आणखी एक लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीचे लैंगिक शोषण केलेच पण तिची धार्मिक ओळख पुसून टाकण्याचाही प्रयत्न केला. पंचवटी पोलिसांनी संशयित तांजिर इनामदार याला अटक केली. शनिवारी (दि. १९) त्याला न्यायालयात हजर केले असता २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिली. पंचवटीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना २०२४ मध्ये संशयित तांजिर सोबत ओळख झाली. फिरण्याचा बहाणा करत मेरी, म्हसरुळ परिसरातील सार्वजनिक उद्याने, लॉजमध्ये नेत बळजबरीने मिठी मारत तिच्या गळ्याला लव्ह बाईटच्या नावाखाली गंभीर जखमा करत मोबाईलमध्ये फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. निरीक्षक ज्योती आमणे तपास करत आहे. मद्य पाजून अत्याचार संशयिताने पीडितेला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केला. तिच्या गळ्यातील तुळशी माळ व हातातील पवित्र धागे तोडले. मला मुस्लिम रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंद करायचे आहे, असे बोलून तिला धर्मांतर करण्याकरीता धमकावले. जानेवारी २०२६ मध्ये पीडितेला लॉजवर नेले.बळजबरीने संबध केले.त्या क्षणाचे फोटो,व्हिडीओ काढून ठेवले. कुटुंबियांनी दिले बळ पीडित तरुणी काही दिवसांपासून घरात एकाकी राहत होती. आई-वडीलांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली. मुलीसोबत घडलेल्या प्रकाराने वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगीतले. कॉर्पोरेट जिहाद : राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी नाशिक येथे टीसीएस कंपनीत धर्मांतर, महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची ३ सदस्यीय समिती शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाली. समितीने एका पीडितेसह तिच्या कुटुंबीयांशी डिजिटल माध्यमांद्वारे संवाद साधला. ही समिती २० एप्रिलपर्यंत नाशिकमध्ये थांबून चौकशी करेल. दरम्यान, कोर्टाने आरोपी रझा रफिक मेमन, शफी भिकन शेखला २० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
देह पंचतत्वात विलीन होतो, पण काही दैवी सूर अवकाशात कायमचे रेंगाळत राहतात. दूरवर, प्रदीर्घ काळासाठी आणि कधीकधी तर युगायुगांसाठी. 'नया दौर'मधील तो साधेपणा, 'तीसरी मंज़िल'मधील विद्युलतेसारखी चपळता, 'हरे रामा हरे कृष्णा'मधील पाश्चात्य ढब, 'उमराव जान'ची ती अवीट नजाकत, 'इजाज़त'मधील व्याकुळ भावूकता आणि 'रंगीला'मधील तो बेधुंद तारुण्यातला उत्साह... काळ बदलला, पिढ्यानपिढ्यांची परंपरा बदलली आणि पडद्यावरच्या नायिकांची रूपेही पालटली. मात्र, या सार्या स्थित्यंतरात आशा भोसले यांचा तो मंत्रमुग्ध करणारा, उत्स्फूर्त आणि मखमली आवाज नेहमीच चिरतरुण आणि चैतन्यमयी राहिला. काळाच्या ओघात सगळे काही धूसर होते, पण आशाताईंच्या स्वरांनी सजलेली ही स्वरगाथा मात्र सदाबहार आणि अविस्मरणीय आहे. असे असले तरी त्यांच्या गायकीच्या कौतुकासोबतच त्यांच्या संघर्षाचा सुद्धा उल्लेख नेहमीच केला जातो. रागदरबारच्या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्याविषयी. ज्यांच्या आवाजाने केवळ मोठ्यांनाच नाही, तर त्या काळातल्या तरुणाईलाही अक्षरशः वेड लावले होते. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत झाला. संगीताशी त्यांचे नाते त्यांच्या जन्मापासूनच होते. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक आणि मराठी संगीत रंगभूमीवरचे एक दिग्गज कलाकार होते. त्यांच्या घरात लता, मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या पाच भावंडांच्या रूपात सप्तसुरांचे चैतन्य बालपणापासूनच नांदत होते. त्या कोवळ्या वयात लता आणि आशाची जोडी अविभाज्य होती. मोठी बहीण जिथे जाईल, तिथे छोटी आशा तिची सावली होऊन अगदी मागे-मागे असायची. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. आशा केवळ 9 वर्षांच्या असतानाच त्यांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले. वडिलांच्या निधनामुळे सुखी-समाधानी असलेल्या मंगेशकर कुटुंबावर आर्थिक विवंचनेचं आणि संकटाचे काळे ढग दाटून आले. उदरनिर्वाहाच्या शोधात मंगेशकर कुटुंब पुणे, कोल्हापूर असा प्रवास करत 1945 मध्ये मुंबईच्या धकाधकीच्या मायानगरीत दाखल झाले. तिथे अवघ्या 14 वर्षांच्या लतादीदींनी आपल्या कोवळ्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली आणि चित्रपटसृष्टीच्या अनिश्चित व काट्याकुट्यांच्या वाटेवर आपला अहोरात्र संघर्ष सुरू केला. लवकरच, आपल्या मोठ्या बहिणीला साथ देण्यासाठी आशादेखील या तप्त संघर्षाच्या रणांगणात हिरिरीने उतरल्या. लतादीदींच्या सावलीतून स्वतःच्या अस्तित्वाकडे वाटचाल आपल्याला हे मान्यच करावे लागेल की, विलक्षण प्रतिभा आणि अफाट कसब असूनही, आशा भोसले यांना प्रदीर्घ काळ दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावरच समाधान मानावे लागले. कारण त्यांच्या समोर 'नंबर एक'च्या सिंहासनावर त्यांच्या थोरल्या भगिनी, साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर नावाचे एक विराट आणि अविचल व्यक्तिमत्व उभे होते. हिंदी पार्श्वगायनाच्या क्षितिजावर जेव्हा 'लता मंगेशकर' नावाचा सूर्य आपल्या तेजस्वी प्रकाशाने अवघे विश्व उजळून टाकत होता, तेव्हा त्या प्रकाशात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची आशाताईंसमोर एक मोठे आव्हान होते. परंतु, आपल्या अदम्य चिकाटीच्या आणि अद्वितीय प्रतिभेच्या बळावर, आशा भोसले लता मंगेशकर यांच्या सावलीतून धैर्याने बाहेर पडल्या. त्यांनी केवळ स्वतःला सिद्धच केले नाही, तर संगीताच्या अथांग विश्वात स्वतःचे एक स्वतंत्र, दैदीप्यमान आकाश निर्माण करून दाखवले. हा प्रवासही काही सोपा नव्हता. पहिल्या गाण्याचा किस्सा.. जेव्हा माइक सोडून पळून जावे वाटले.. एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी त्यांच्या पहिल्या गाण्याचा किस्सा सांगितला होता. त्या सांगतात, 1943 साली कोल्हापुरात वयाच्या 10 व्या वर्षी मी पहिले गाणे गायले. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी अक्षरशः थरथर कापत होते. असे वाटले की हा माईक सोडून पळून जावे. पण, जर पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारले असते, या एकाच भीतीपोटी मी तिथे गायले. जर तेव्हा आशाताईंनी भीतीपोटी गाणे गायले नसते, तर आज त्यांचे सूर अजरामर कदाचित झाले नसते. त्यानंतर आशाताईंना याच साली म्हणजे 1943 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'माझा बाळ' या मराठी चित्रपटातील 'चला चला नव बाला' या गाण्याने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षातच आशा भोसले यांनी हिंदी चित्रपट विश्वात प्रवेश केला. 1948 साली 'चुनरिया' या चित्रपटाच्या माध्यमातून आशा भोसले यांनी हिंदी चित्रपट पार्श्वगायनाच्या विशाल क्षितिजावर आपले पहिले पाऊल ठेवले आणि गीता दत्त व शमशाद बेगम यांसारख्या स्थापित गायिकांच्या साथीने 'सावन आया रे' या गाण्यातून आपला मधुर स्वर रसिकांच्या दरबारी पोहोचवला. या यशस्वी पदार्पणानंतर अवघ्या एकाच वर्षात, म्हणजे 1949 मध्ये, 'रात की रानी' या चित्रपटामुळे त्यांना आपले पहिले स्वतंत्र आणि लखलखीत सोलो गीत गाण्याची सुवर्णसंधी लाभली, जिथून त्यांच्या एका अलौकिक आणि अविस्मरणीय सांगीतिक प्रवासाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला. आशा भोसलेंच्या शब्दोच्चारांवरही झाली होती टीका आशा भोसले यांच्यासमोर सर्वात मोठे अग्निदिव्य होते ते म्हणजे मोठी बहीण लता मंगेशकर यांच्या प्रभावाखाली स्वतःचे एक स्वतंत्र आणि मौलिक अस्तित्व निर्माण करणे. कारण त्याकाळी लता मंगेशकर यशाच्या उत्तुंग आणि अभेद्य शिखरावर विराजमान होत्या. सुरुवातीच्या काळात आशाजींच्या वाट्याला केवळ दुय्यम दर्जाचे चित्रपट किंवा प्रस्थापित गायिकांनी नाकारलेली गाणी येत असत, इतकेच नव्हे तर त्यांच्या शब्दोच्चारांवरही टीकेची झोड उठवली जात होती, मात्र आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि अचल जिद्दीच्या जोरावर त्यांनी कधीही हार मानली नाही. आशाजींना इतर समकालीनांपेक्षा अद्वितीय ठरवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा समृद्ध आणि अस्सल सांस्कृतिक गाभा जागतिक संगीतपटलावर अत्यंत दिमाखात पोहोचवण्याचे त्यांचे विलक्षण कसब. मग ते मराठी भावगीतांमधील गूढ आर्तता असो वा हिंदी चित्रपटगीतांमधील बेधुंद ऊर्जा, त्यांच्या गळ्यातील प्रत्येक स्वर ही त्यांची ओळख बनली. तगड्या स्पर्धेत आशाजींचे नाव कुठे दूरवरही नसायचे चित्रपट इतिहासकार राजू भारतन यांनी आशा भोसले यांच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाचे वास्तव मांडताना म्हटले होते की, प्रारंभीच्या काळात आशा भोसले म्हणजे काही चमत्कारी जादू नव्हती, तर त्या एक सामान्य 'स्ट्रगलर' होत्या. निर्मात्यांना जर लतादीदींची साथ लाभली नाही, तर त्यांची पुढची पसंती गीता दत्त किंवा शमशाद बेगम असायची. त्या तगड्या स्पर्धेत आशाजींचे नाव कुठे दूरवरही नसायचे. पुढे राजू भारतन सांगता की, अशा परिस्थितीत, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आशाजींच्या वाट्याला जे काही काम आले, ते त्यांनी अखंड जिद्दीने स्वीकारले. त्यांच्यासमोर भाषेचीही एक मोठी अडचण होती. त्यांच्या हिंदीत 'मराठी भाषेचा लहेजा' अधिक जाणवायचा आणि उर्दू शब्दोच्चारांवर त्यांनी लतादीदींसारखे प्रभावी काम केले नव्हते. या व्यावसायिक मर्यादांसोबतच, त्यांचे खासगी आयुष्य आणि वैवाहिक जीवन कमालीच्या वादळांनी, संघर्षाने आणि कटू अनुभवांनी वेढलेले होते. वयाच्या 16 व्या वर्षीच 31 वर्षांच्या गणपतराव भोसलेंशी लग्न वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आशाजींनी एका अविचारी निर्णयापोटी घर सोडले आणि 31 वर्षांच्या गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध घेतलेल्या या धाडसी पावलामुळे दोन बहिणींच्या नात्यात एक दुर्दैवी दरी निर्माण झाली, जी पुढे कित्येक वर्षे सांधली गेली नाही. लतादीदींना हे नाते आपल्या धाकट्या बहिणीसाठी योग्य वाटत नव्हते. खुद्द आशाताईंनीच एका मुलाखतीत कबूल केले होते की, त्यांच्यातील संबंध इतके विषारी झाले होते की अनेक वर्षे त्यांच्यात संवादही उरला नव्हता. गणपतरावांसोबतचा तो संसार म्हणजे आशाजींच्या आयुष्यातील एक भीषण शोकांतिका ठरली. ते एक अत्यंत रूढीवादी कुटुंब होते, ज्यांना पडद्यावर चमकणारी 'सिंगिंग स्टार' सून म्हणून मुळीच मान्य नव्हती. आशाजींच्या पतीचा स्वभाव अत्यंत तापट आणि संशयी होता. कदाचित इतरांना वेदना देण्यात त्यांना एक विकृत आनंद मिळत असे, मात्र घराबाहेर कोणालाही याची पुसटशी कल्पना नसायची. या मानसिक कोंडमारे आणि घरगुती छळामुळे आशाजींचे करिअर संथ गतीने चालले होते. आशा भोसलेंच्या जीवनप्रवासला वळण देणारे ओ.पी. नैय्यर आशाजींच्या कारकिर्दीला बिमल रॉय यांच्या 'परिणीता' (1953) आणि राज कपूर यांच्या 'बूट पॉलिश' (1954) मधील गाण्यांनी एक आश्वासक बळ दिले. मात्र, त्यांच्या जीवनप्रवासाला खरे निर्णायक आणि क्रांतिकारी वळण मिळाले ते दिग्गज संगीतकार ओ.पी. नैय्यर यांच्या भेटीमुळे. लतादीदींच्या अनुपस्थितीतही संगीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू शकते, असा ठाम विश्वास बाळगणाऱ्या नैय्यर यांनी 'सी.आय.डी.' नंतर आशाजींना आपल्या संगीतात अढळ स्थान दिले. त्यांनी आशाजींच्या आवाजातील खालच्या सुरांची गूढ खोली आणि त्यातील मादकता अचूक ओळखली. 'नया दौर' (1957) मधील 'उडे जब-जब जुल्फें तेरी' आणि 'मांग के साथ तुम्हारा' सारख्या धुंद गीतांनी इतिहास रचला आणि आशाजी पहिल्यांदाच चित्रपटातील मुख्य नायिकेचा खणखणीत आवाज बनून बी.आर. चोप्रांसारख्या प्रतिष्ठित निर्मिती संस्थेचा अविभाज्य भाग बनल्या. दोन बहीणीत काहीशी कटुता.. त्याच सुमारास (1957), महान संगीतकार एस.डी. बर्मन आणि लता मंगेशकर यांच्यातील तात्पुरत्या वितुष्टामुळे आशाजींसाठी यशाची नवी कवाडे उघडली गेली. पुढील पाच वर्षे जेव्हा बर्मनदांनी लतादीदींसोबत काम करणे थांबवले, तेव्हा आशाजी त्यांच्या गोटातील प्रमुख आणि अपरिहार्य गायिका म्हणून उदयास आल्या. या काळात दोन बहिणींमधील नात्यात काहीशी कटुता निर्माण झाल्याच्या चर्चा सिनेसृष्टीत चवीने चर्चिल्या गेल्या, परंतु याच संघर्षातून आशाजींनी आपल्या अद्वितीय प्रतिभेचे लोह साऱ्या जगाला मानायला लावले. एस.डी. बर्मन, किशोर कुमार, आशा भोसले आणि मजरूह सुलतानपुरी या दिग्गज चौकडीने रोमँटिक आणि मिश्किल गीतांचे एक नवे पर्व सुरू केले. 'हाल कैसा है जनाब का' आणि 'छोड दो आंचल' सारखी अवीट आणि सदाबहार गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. विशेष म्हणजे, बर्मनदांनी आशाजींच्या आवाजाला केवळ चपळ आणि चुलबुल्या गाण्यांपुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्यांच्या आवाजातील भावविवशतेला आणि गांभीर्याला अत्यंत कौशल्याने पैलू पाडले. 'काला पानी' चित्रपटात जिथे 'अच्छा जी मैं हारी' सारखे छेलछबेले रोमँटिक गाणे होते, तिथेच 'नजर लगी राजा तोरे बंगले पर' सारखी शास्त्रीय नजाकत असलेली ठुमरीही त्यांनी आशाजींकडून तितक्याच समर्थपणे गाऊन घेतली. तर दुसरीकडे 'सुजाता' आणि 'लाजवंती' सारख्या चित्रपटांमधून अत्यंत संजीदा, मर्मभेदी आणि आर्त सुरांचा आविष्कार घडवून, आशाजी संगीताच्या प्रत्येक रंगात लीलया संचार करू शकतात, हे त्यांनी निक्षून सिद्ध केले. आशा भोसलेंना मिळायचे केवळ 100-150 रुपये मानधन आशा भोसले आणि ओ.पी. नैय्यर या जोडीने चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात 60 चित्रपटांतून तब्बल 324 गीतांचा विक्रमी टप्पा गाठला. म्हणजे सरासरी प्रत्येक चित्रपटात पाच गाणी. मात्र, इतकी लोकप्रिय आणि अजरामर गाणी देऊनही, संगीताच्या जगातील सर्व मुख्य रस्ते लतादीदींच्या अविचल साम्राज्यातूनच जात होते. आशाजींनी कष्टाने आपली जमीन तर सुपीक केली होती, पण हिंदी पार्श्वगायनाच्या क्षेत्रावर लता मंगेशकर यांचे एकछत्र आणि अभेद्य वर्चस्व कायम होते. राजू भारतन यांच्या नोंदीनुसार, 50-60 च्या दशकात मानधनामध्येही धक्कादायक तफावत होती, जिथे लतादीदी एका गाण्यासाठी 500 रुपये घेत, तिथे आशाजींना अवघ्या 100-150 रुपयांत समाधान मानावे लागे. लतादीदींकडे गाण्याची आणि संगीतकाराची निवड करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते, तर आशाजींकडे असा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. ही दुजाभावाची वागणूक आशाताईंच्या मनात एखाद्या शल्यासारखी टोचत होती. मात्र, या उपेक्षेला हतबल न होता त्यांनी एका बंडखोर आव्हानासारखे स्वीकारले आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला. दोन बहिणींमधील हा सांगीतिक संघर्ष, त्यातील ईर्षा आणि दुरावा इतका गाजला की, प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांनी 1997 मधील 'साज' या चित्रपटातून याच नातेसंबंधांचे गुंतागुंतीचे आणि भावनिक पदर मोठ्या पडद्यावर अत्यंत प्रभावीपणे रेखाटले, असे मानले जाते. 'ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली' मधील ती वादळी लय एस.डी. बर्मन यांच्याकडे काम करत असतानाच आशा भोसले यांची भेट त्यांचे सुपुत्र आर.डी. बर्मन ऊर्फ 'पंचम' यांच्याशी झाली. वडिलांचा भव्य वारसा पाठीशी असूनही पंचम आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होते. 1966 मध्ये नासिर हुसैन यांच्या 'तीसरी मंज़िल' या चित्रपटाने या जोडीच्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात झाली आणि येथूनच एका अशा सर्जनशील आणि रूमानी युगाचा पाया रचला गेला, ज्याने हिंदी चित्रपट संगीताचा चेहरामोहराच बदलून टाकला. एका बाजूला 'ओ मेरे सोना रे' मधील मखमली गोडवा होता, तर दुसरीकडे 'ओ हसीना ज़ुल्फ़ों वाली' मधील ती वादळी लय होती. या गाण्यात आशाताईंनी आपल्या श्वासांवर जे विस्मयकारक नियंत्रण मिळवून सुरांशी खेळ केला, ते पाहून अवघ्या संगीत विश्वाच्या भुवया उंचावल्या. आर.डी. बर्मन जेव्हा या क्षेत्रात आले, तेव्हा त्यांच्या मनात जागतिक संगीताचा अथांग साठा होता. त्यांना हिंदी सिनेसृष्टीत फंक, जॅझ, कॅबरे आणि रॉक-एन-रोल यांसारख्या धाडसी पाश्चात्य शैलींचा प्रयोग करायचा होता. या क्लिष्ट आणि आव्हानात्मक धुनांना न्याय देण्यासाठी त्यांना अशा आवाजाची गरज होती जो कमालीचा लवचिक असेल आणि ज्यामध्ये धोके पत्करण्याचे अदम्य धाडस असेल. आशा भोसले हाच तो परिपूर्ण आवाज ठरल्या. पंचम यांनी त्यांच्या संगीतात पाश्चात्य मिजास ओतली, तर आशाजींच्या स्वरांनी त्या संगीताला एक निर्भीड आकर्षण आणि मुक्त विचारांचे नवे जिवंत रंग मिळवून दिले. पंचम यांची नजर केवळ धुंद संगीतापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी आशाजींच्या आवाजाची ती विशाल व्याप्तीही ओळखली होती, जी तोपर्यंत जगासाठी अस्पर्शित होती. एकीकडे 'पिया तू अब तो आजा' आणि 'दम मारो दम' सारख्या गाण्यांनी आशाजींना 'कॅबरे क्वीन' किंवा आधुनिक 'वेस्टर्न वाइब' असलेल्या गायिका म्हणून ओळख मिळवून दिली, तर दुसरीकडे 'इजाज़त' (1987) मधील 'मेरा कुछ सामान' आणि 'खाली हाथ शाम आई है' सारख्या गीतांतून या जोडीने शब्दांतील मूक वेदना आणि कातरता किती सात्विकतेने मांडता येते, याचे उत्तम उदाहरण दिले. विशेषतः 'मेरा कुछ सामान' या गाण्यात आशाजींनी ती गद्यमय कविता ज्या रूहानी आणि विलक्षण पद्धतीने गायली, ती आजही गायकीच्या क्षेत्रातील एक पवित्र आणि आदर्श पाठशाळा मानली जाते. कॅबरेची चपळाई, गझलेचा ठहराव आणि शास्त्रीय संगीताची गुंतागुंत या प्रत्येक साच्यात स्वतःला लीलया ढळणाऱ्या आशाताईंच्या या बहुरूपी स्वरांची बरोबरी करणारा दुसरा कोणीही नाही.. 'मेरा कुछ सामान' या गाण्याचा रंजक किस्सा 1987 मधील 'इजाजत' या चित्रपटातील 'मेरा कुछ सामान' हे गाणे म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील एक विलक्षण आणि प्रयोगशील चमत्कार मानला जातो, ज्याच्या निर्मितीचा किस्साही तितकाच रोचक आहे. जेव्हा गुलजार यांनी या गाण्याचे अलंकारिक परंतु मुक्तछंदातील बोल आर.डी. बर्मन (पंचमदा) यांच्यासमोर ठेवले, तेव्हा त्यातील शब्दांची लांबी पाहून पंचमदा काहीसे अस्वस्थ झाले आणि आपल्या विशिष्ट मिश्किल शैलीत बंगालीत टिप्पणी केली की, पुढच्या वेळी येताना वर्तमानपत्रातील एखादी बातमीच घेऊन ये, मी तिलाही चाल लावून देईन, कारण हे गाणं नसून एखाद्या खासगी पत्रासारखं वाटतंय!; मात्र तिथेच उपस्थित असलेल्या आशाताईंनी त्या शब्दांमधील अथांग व्याकुळता आणि भावसौंदर्य क्षणात ओळखून ते शब्द मनातल्या मनात गुणगुणायला सुरुवात केली. आशाजींच्या त्या अवीट स्वरांनी पंचमदांना अशी काही जादुई प्रेरणा दिली की, अवघ्या दहा मिनिटांत एक अविस्मरणीय आणि अजरामर धून साकारली गेली. या गाण्याने पुढे इतिहास रचला आणि आशाताईंच्या मर्मभेदी आवाजाला 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा' तर गुलजार यांच्या समृद्ध लेखणीला 'सर्वोत्कृष्ट गीतकाराचा' राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. दीदी तुझे सूर चुकले.. आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्या नात्यात काही काळासाठी कटुता जरी आली असली, तरी दोघींमधील बहिणीचे नाते फार वेगळे होते. एका कार्यक्रमात आशाताईंनी दीदीबद्दल एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, मी आणि दीदी रेकॉर्डिंगला अतिशय संध्या साड्या आणि काचेच्या बांगड्या घालून जायचो, कारण आमचे चित्त केवळ सुरांवर असायचे. पुढे त्या म्हणाल्या, 10 वर्षांपूर्वी माझ्या दीदीने एक गाणे गायले होते. त्यावेळी मी दीदीला म्हणाले की, दीदी तुझा आवाज ठीक वाटत नाहीये आणि तुझे सूर कच्चे वाटत आहेत. त्यावेळी दीदी म्हणाल्या, 'अच्छा, असंय? तुला जास्त माहिती आहे..' दुसऱ्या दिवशी लतादीदी सकाळी सकाळी तानपुरा घेऊन रियाज करायला बसल्या आणि त्यानंतर तेच गाणे मला पुन्हा गाऊन दाखवले. त्यांचा हा रियाज म्हणजे संगीतप्रती असलेले समर्पण. 'उमराव जान'साठी कठोर रियाज हिंदी चित्रपटसृष्टीत गझल म्हणजे केवळ लता मंगेशकर असे समीकरण असताना, मुजफ्फर अलींच्या 'उमराव जान'साठी संगीतकार खय्याम यांच्यासमोर 'पाकीजा'सारख्या महान आणि अजरामर वारशापुढे एक नवी रेघ ओढण्याचे मोठे आव्हान होते. खय्याम यांनी एक साहसी आणि क्रांतीकारी निर्णय घेत या चित्रपटासाठी आशा भोसले यांची निवड केली, पण त्यासोबत एक अटही घातली, ती म्हणजे, आम्हाला या गाण्यांमध्ये 'आशा' नकोय. त्यांचा स्पष्ट संकेत होता की, आशाजींनी आपली चिरपरिचित चपळाई, शोखपणा आणि चुलबुलपणा बाजूला सारून एका प्रगल्भ शास्त्रीय बैठकीच्या गायकीचा अंगीकार करावा. खय्याम यांची अशी इच्छा होती की आशाजींनी आपला मूळ स्वर 'दीड पट्टी' खाली नेऊन गावे. इतक्या खालच्या स्वरात गाणे आशाजींसाठी पूर्णपणे अपरिचित आणि आव्हानात्मक होते. सलग 8 दिवसांच्या अथक आणि खडतर रियाजानंतर जेव्हा प्रत्यक्ष रेकॉर्डिंगला सुरुवात झाली, तेव्हा एक क्षण असा आला की जिथे आशाजींची हिंमत डळमळीत झाली. त्यांना वाटले की आपण हे गाऊ शकणार नाही. मात्र, जेव्हा रेकॉर्डिंग पूर्ण झाले आणि आशाजींनी स्वतःचाच तो मखमली आवाज ऐकला, तेव्हा त्या स्वतः थक्क झाल्या. 'दिल चीज़ क्या है', 'इन आंखों की मस्ती के' आणि 'ये क्या जगह है दोस्तों' यांसारख्या कालजयी गझलांनी जगाला आशाजींच्या आवाजातील तो गंभीर, आर्त आणि अत्यंत अभिजात पैलू दाखवला, ज्यापासून आतापर्यंत रसिक पूर्णपणे अनभिज्ञ होते. या अपूर्व प्रयोगाचा निकाल इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदवला गेला, 'उमराव जान'साठी खय्याम आणि आशा भोसले या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. काळानुसार बदलत गेलेल्या आशाताई काळाचे चक्र फिरत राहिले, संगीताचे साज आणि तंत्रज्ञान बदलले, पण आशाजींच्या आवाजातील चैतन्य आणि ऊर्जा तसूभरही कमी झाली नाही. पुढील वर्षांत ए.आर. रहमान यांच्यासोबत 'रंगीला', 'लगान' आणि 'ताल' यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले की, त्यांच्या सुरांवर वाढत्या वयाची कोणतीही बंधनं नाहीत. ज्या काळात त्यांच्या पिढीतील अनेक गायक संगीताच्या बदलत्या स्वरूपाबद्दल आणि 'रिमिक्स' संस्कृतीबद्दल नाराजी व्यक्त करत होते, तिथे आशाजींनी मात्र मोठ्या मनाने या नव्या युगाचा उत्साहाने स्वीकार केला. त्यांनी स्वतः आपल्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स अल्बम काढले आणि नव्या पिढीला त्या जादुई आणि मोहिनी घालणाऱ्या संगीताची नव्याने ओळख करून दिली. आशा भोसले यांचा हा संपूर्ण प्रवास काट्याकुट्यांनी भरलेला होता. स्वतःच्याच थोरल्या बहिणीच्या विराट आणि वटवृक्षासारख्या सावलीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला, पण सरतेशेवटी त्यांच्या बंडखोर जिद्दीचा विजय झाला. त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की त्या प्रत्येक रंगात, प्रत्येक भावनेत लीलया मिसळून जाणाऱ्या एक परिपूर्ण कलाकार आहेत. आशाजी म्हणजे एक असा दैवी आवाज आहे, जो कालही तितकाच चिरतरुण होता आणि ज्याची भुरळ पडणारा मोहकपणा प्रत्येक येणाऱ्या पिढीच्या मनाला अखंड साद घालत राहील..
लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन
५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर : प्रतिनिधी लातूरकरांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न मूर्त स्वरूपात येत असून काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज १०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले तरी या ठिकाणी ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह पुरेसा […] The post लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
होर्मुझमधील धक्कादायक प्रकार, भारताकडून निषेध तेहरान : वृत्तसंस्था मध्य-पूर्वेतील परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र असतानाच शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन भारतीय व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. ब्रिटिश लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार इराणच्या लष्करी नौकांकडून एका तेल टँकरला लक्ष्य करण्यात आले. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून शांत असलेला हा सागरी मार्ग पुन्हा एकदा धोकादायक बनला आहे. या गोळीबारानंतर भारताने […] The post भारतीय जहाजांवर गोळीबार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भर उन्हाळ््यात ठेवली चिमुकल्यांची शिष्यवृत्ती परीक्षा
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब, असंवेदनशील आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ऐन उन्हाळ््यात चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. राज्यात उन्हाचा पारा ४४ अंशापर्यंत वाढलेला असताना २६ एप्रिलला चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात […] The post भर उन्हाळ््यात ठेवली चिमुकल्यांची शिष्यवृत्ती परीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरक्षणाच्या नावाखाली सत्ता टिकविण्याचा डाव
महिला अत्याचार होताना मोदी कुठे होते? नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपला महिलांचे मसीहा बनायचे आहे. पण महिलांनी उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमध्ये काय घडले ते पाहिले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर बसलेल्या महिला खेळाडूंना कोणी विचारले, केवळ संसदेत उभे राहून मसीहा म्हणवून घेतल्याने फरक पडत नाही, तर तसे करून दाखवावे लागते, अशा शब्दात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी पीएम […] The post आरक्षणाच्या नावाखाली सत्ता टिकविण्याचा डाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिलांच्या हक्कांसाठी यापुढेही लढत राहणार
महिला विधेयक नामंजूर झाल्याने मोदींची नाराजी नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करत महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली. ज्या-ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणात अडथळे आणले, त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. दरम्यान, विधेयकाच्या अपयशासाठी कॉंग्रेस, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पक्षाला जबाबदार धरले आणि हा […] The post महिलांच्या हक्कांसाठी यापुढेही लढत राहणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हैदराबाद : आयपीएल २०२६ च्या २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून ६ सामन्यांत ६ गुणांसह टॉप-४ मध्ये एन्ट्री मारली. हैदराबादने अत्यंत स्फोटक सुरुवात केली. […] The post अटीतटीची लढत, हैदराबाद विजयी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा बँकेच्या १०२ कर्मचा-यांनी केले रक्तदान
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी व गटसचिव संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या मुख्यालयात दि. १८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात १०२ कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वैजनाथराव शिंदे व लातूर […] The post जिल्हा बँकेच्या १०२ कर्मचा-यांनी केले रक्तदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोकरा योजने अंतर्गत खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यशाळा
लातूर : प्रतिनिधी बदलत्या हवामानाचा शेतीवर होत असलेल्या प्रतिकूल परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी शेतक-यांनी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीस शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्याअनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातूर व मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र […] The post पोकरा योजने अंतर्गत खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यशाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मल्लिका फॅशन लाइफस्टाइल प्रदर्शनाला प्रतिसाद
लातूर : प्रतिनिधी सेन्ट्रल इंडियाची सुप्रसिद्ध मल्लिका फॅशन अॅण्ड लाइफस्टाइल एक्झीबिशन लातुर येथील दिवानजी मंगल कार्यालयामध्ये दि. १८ व १९ एप्रिलपर्यंत सुरु आहे. या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन फॅशन डिझायनर वैशाली गिरी, रेसीन आर्टिस्ट तनिष्का मनिष बोरा, डॉ संध्या करड, सानिका ककनाटे, आकांशा नवदिंगे, प्रो. डॉ. क्रांती विठ्ठलराव मोर, गायत्री […] The post मल्लिका फॅशन लाइफस्टाइल प्रदर्शनाला प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिक्षण संस्थाचालक संघाच्या शिबिरात १५१ जणांचे रक्तदान
लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १५१ जणांनी रक्तदान केले. यानिमित्त १५१ अंध व्यक्तींना कपडेही वाटप करण्यात आले. शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या साने गुरुजी विद्यालयात झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून […] The post शिक्षण संस्थाचालक संघाच्या शिबिरात १५१ जणांचे रक्तदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार
लातूर : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून दि. १८ एप्रिल रोजी सर्वात मोठा ‘आरोग्य जागर’ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरात एकचवेळी १३ ठिकाणी झालेल्या शिबिरांत ८ हजार ९१६ पेक्षा अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व […] The post ८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विलास साखर कारखान्यातर्फे अन्नधान्य वाटप
लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर (निवळी) यांच्या वतीने शहरातील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहात अन्नधान्य वाटप करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार तथा कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव […] The post विलास साखर कारखान्यातर्फे अन्नधान्य वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर शहरात ‘दुर्मिळ झाडांची देवराई’ साकारणार
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात ख-या अर्थाने वृक्ष चळवळ रुजवणारे संवेदनशील नेतृत्व, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा देवराई येथे १०० दुर्मिळ झाडे लावण्याच्या प्रकल्पाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. येथील औसा रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील परिसरात हा कार्यक्रम पार पडला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी १९९३ मध्ये […] The post लातूर शहरात ‘दुर्मिळ झाडांची देवराई’ साकारणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घाटलाडकी परिसरात आगीच्या दोन घटना:संत्रा बागा जळाल्या, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी
घाटलाडकी परिसरात आगीच्या घटनांमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण प्रणालीतील बिघाडामुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या आणि गवत पेटल्याने आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने या घटनांचा पंचनामा केला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महावितरणकडे माहिती पाठवली आहे. गेल्या चार दिवसांतच दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरवाडी येथील शेतकरी मंगेश तर्हेकर यांच्या शेतात विजेच्या स्पार्किंगमुळे आग लागली. यात त्यांच्या संत्रा बागेला मोठी झळ पोहोचली असून, अनेक फळधारक झाडांचे नुकसान झाले आहे.तसेच, मौजा सांभोरा येथील शेतकरी जानराव लोखंडे यांच्या शेतात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे मुजीबुर रहमान यांच्या शेतातील संत्रा, सागवान आणि सीताफळाची झाडे जळून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व घटनांचे पंचनामे झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे. वीज वितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई द्यावी, तसेच वीज यंत्रणेची तातडीने देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यजीव आणि पक्ष्यांना मोठा फटका बसत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी 'पक्ष्यांसाठी अन्न व पाणी' हा संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या जागांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी पाण्याची भांडी (परळ) ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच पक्ष्यांसाठी धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिवसा आणि अमरावती तालुक्यातील मोझरी, अनकवाडी, मालधुर, ब्राम्हणवाडा गोविंदपूर, शिवणगाव आणि काटपूर या गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमामुळे अनेक पक्ष्यांना उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. समाजसेविका सोनिया गुप्ता, तसेच साहिल चावके, पवन भिवगडे, भूषण निकोशे, दर्शन खुळे, आकाश भुयार आणि कुणाल खुळे यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे, ज्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक होत आहे. याबाबत बोलताना शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा परिसरात लहान पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे ते म्हणाले. आपल्या छोट्या प्रयत्नातून मोठा बदल घडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. हा उपक्रम केवळ काही गावांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तालुकाभर राबवण्याचा संबंधितांचा मानस आहे. येत्या काही दिवसांत भटक्या जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवल्यास अनेक पशु-पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश ही चमू सर्वदूर पोहोचवत आहे.
गतवर्षीचा पीक विमा मिळाला नाही:खंडाळा खुर्दच्या शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना आणि मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांना मागील हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाचा विमा अद्याप मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली आणि आपली कैफियत तहसीलदारांपुढे मांडली. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे करून नुकसानाची नोंद घेतली आणि काही प्रमाणात मदतही दिली. मात्र, पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात एकत्र येत तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना खंडाळा खुर्दचे सरपंच उमेश दहातोंडे, रोहना येथील सरपंच अमरीश काकडे, तसेच नरेश ठाकरे, निलेश ठाकरे, मोहन ठाकरे, नयन ठाकरे, कैलास लांडे, अर्पित काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. केवळ नांदगाव खंडेश्वरच नव्हे, तर इतर तालुक्यांतूनही पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या अशाच तक्रारी समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांना तर मागील वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाईही अद्याप मिळालेली नाही. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान होऊनही, त्यांची शेतं ज्या महसूल मंडळात येतात, तेथे अतिवृष्टीची नोंद नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, अशी स्थिती आहे. मागील वर्षीची ही परिस्थिती असताना, यावर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळसदृश स्थितीची नोंद झाली, तर आता रबीची पिके काढणीला असताना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.
परसापूर येथील गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठत्वाचा गौरव, कर्तृत्वाचा सन्मान या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामनारायणसिंह खनवे आणि त्यांच्या पत्नी सजलाबाई खनवे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. रामनारायणसिंह खनवे यांचा जन्म १ जुलै १९४७ रोजी परसापूर येथे झाला. त्यांनी बी.ए., डी.पी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. १९६६ ते १९७१ या काळात त्यांनी अचलपूर व धारणी येथे शिक्षक म्हणून सेवा बजावली. वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. सन २००९ मध्ये त्यांनी परसापूर येथे ग्रामीण भागातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. सध्या ते फेस्कॉम संघटनेचे संपर्क सचिव म्हणून चौथ्या टर्ममध्ये कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या गोपाळकृष्ण ज्येष्ठ नागरिक संघाला २०२६ मध्ये भुवनेश्वर येथे राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. खनवे दाम्पत्याने आपल्या सहा अपत्यांना उच्चशिक्षित केले असून, त्यांची ज्येष्ठ कन्या न्यायाधीश तर ज्येष्ठ पुत्र समाजकल्याण विभागात निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. वयाच्या ७८ व्या वर्षीही सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या खनवे दाम्पत्याचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र व महाराणा प्रतापची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. माजी प्राचार्य दिलीपसिंह खांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे, अखिल भारतीय वरीष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाशराव पिंपरकर, अंतर्गत तपास अधिकारी विनायकराव पांडे, प्रभाकरराव उमक, ले. कर्नल लक्ष्मणराव गाले, माजी प्र-कुलगुरु वसंतराव जामोदे, डॉ. मुरलीधर वांगे, जयानंद खरड, प्रभाकरसिंह टेहरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. पवार यांनी केले, तर ॲड. प्रमोद खनवे यांनी आभार मानले. पारंभी प्रभुदास फंदे, अनिलराव वानखडे व वैष्णवी यांनी सुमधुर संगीत रजनीचा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता, श्री गजानन महाराज आणि दर्शनसिंह ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. भुवनेश्वर येथील अधिवेशन व सहलीसाठी सहभागी असलेले सचिव डॉ. श्री चंदनसिंह राजपूत, वेणूताई गावंडे, संजय खोंडे, नीताताई खोंडे, अनिल वानखडे, मायाताई वानखडे, मधुकरराव भोपाळे, प्रदीप सातपुते, राजेंद्र राठी, घनश्याम मेश्राम, सुरेश शिर्के, प्रभाताई शिर्के, ॲड. शामराव कपाळे, राधे राधे महिला मंडळाच्या अध्यक्ष शांताबाई खांबरे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
भाजपचे तिवसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण बडकस (वय ४३, रा. मारडा) यांचे शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. मारडाजवळ त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडकस हे कुऱ्हा येथील कामे आटोपून रात्री दुचाकीने आपल्या गावी मारडा येथे परतत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारडाजवळ अचानक त्यांचे वाहन अनियंत्रित झाले आणि ते एका विद्युत खांबावर आदळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी मारडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रदीप गौरखडे, धीरज केने, संदीप आमले, अजय गुल्हाने, रवींद्र हांडे, मनोज अडसड, विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे अतुल ठाकरे, सरपंच, उपसरपंच आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे.
मोर्शी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे 'खुशियों का पासवर्ड' या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सचिन परब यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या तणावपूर्ण जागतिक परिस्थितीत 'परिस्थिती कठीण आहे पण मी स्थिर आहे,' हे वाक्य मनाला सांगणे हाच 'खुशियों का पासवर्ड' आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या स्थानिक केंद्रात सुरू झालेल्या या सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या कार्यक्रमात डॉ. परब यांनी तणावमुक्त जीवनासाठी योगा आणि मेडिटेशनचे महत्त्व अधोरेखित केले. मोर्शीकर जनतेसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची ही एक चांगली संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम १९ एप्रिलपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या मोर्शी केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा स्थानिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. परब यांनी यावेळी केले. डॉ. परब यांनी आपल्या संबोधनात अनेक उदाहरणे दिली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला प्रतिकूल परिस्थितीतही धीराने कुटुंब सांभाळते, तसेच अरुणिमा सिन्हा या खेळाडूचे उदाहरण देत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगितले. सध्याच्या जागतिक युद्धजन्य स्थितीत राजयोगाचे मेडिटेशन खूप उपयुक्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सीतादीदी, नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, रवींद्र गुल्हाने, डॉ. दीपक ढोले, बबलूभाऊ अंगनाणी, नितीन पन्नासे, धावडेताई, प्रदीप खोडस्कर आणि मोर्शी शहरातील माध्यमस्नेही उपस्थित होते.

30 C