'तीन भारतरत्न' मैफलीतून पूरग्रस्तांसाठी निधी संकलन:रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे शनिवारी आयोजन
रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे 'तीन भारतरत्न' या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन करणे हा या मैफलीचा मुख्य उद्देश आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर आणि प्रख्यात कवी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या रचना, गाणी आणि आठवणी या मैफलीतून रसिकांना अनुभवता येणार आहेत. ही दिवाळी संध्या येत्या शनिवारी (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजता मोडक सभागृह, आपटे वसतिगृह, विद्यार्थी सहायक समिती, शिवाजीनगर पोलीस ग्राउंड शेजारी, फर्ग्युसन रस्ता, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. मनीषा निश्चल्स महक निर्मित, गेट सेट गो हॉलिडेज प्रस्तुत आणि सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, मराठवाडा मित्र मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. या मैफलीत प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल, गायक अमोल निसळ व संजीव मेहेंदळे यांचे बहारदार गायन होईल. मनीष आपटे यांचे ओघवते निवेदन आणि अमेय ठाकूरदेसाई यांचे संगीत संयोजन असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमातून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी निधी संकलन केले जाणार आहे. बीड, लातूर, धाराशिव येथील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी विद्यार्थी सहायक समितीमध्ये राहत आहेत. भीषण पूर परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांना गावाहून पैसे मागवणे शक्य होत नाही. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने काही विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च उचलला जाणार आहे. कार्यक्रमातून संकलित निधी विद्यार्थी सहायक समितीमधील मुलांच्या शैक्षणिक शुल्कासाठी दिला जाईल, असे रोटरी क्लबचे अध्यक्ष जीवराज चोले यांनी सांगितले.
पाक आणि अफगाणमध्ये ४८ तासांसाठी युद्धविराम
काबुल : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूलजवळील काही ठिकाणांना लक्ष्य करून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर हा संघर्ष चिघळला होता. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानकडून चालवल्या जाणा-या प्रशासनाने बुधवार दि. १५ ऑक्टोबर संध्याकाळी ६ वाजल्यापासून पुढील ४८ तासांसाठी तात्पुरता युद्धविराम घोषित करण्यास सहमती दर्शवली आहे. सीमेवर नव्याने झालेल्या संघर्षानंतर […] The post पाक आणि अफगाणमध्ये ४८ तासांसाठी युद्धविराम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रम्पविरोधात अमेरिकेत जनआंदोलन!
न्यू यॉर्क : वृत्तसंस्था फ्रान्सनंतर आता अमेरिकेमध्ये सर्वात मोठं आंदोलन होणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी अमेरिकेतली जनता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. तब्बल २,५०० ठिकाणी एकाचवेळी हे आंदोलन होणार आहे. लाखो लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे याच नावाचे एक आंदोलन चार महिन्यांपूर्वी देखील ट्रम्प यांच्या विरोधात करण्यात आलं होतं. त्यावेळी अमेरिकेच्या […] The post ट्रम्पविरोधात अमेरिकेत जनआंदोलन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री पदाच्या सर्व्हेक्षणात तेजस्वी यादव आघाडीवर
पाटणा : वृत्तसंस्था बिहारमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की आरजेडी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सध्या आघाडीवर आहेत. ऑक्टोबरमध्ये केलेल्या ताज्या सी-व्होटरच्या सर्वेक्षणात तेजस्वी यादव यांना ३६.२ टक्के पाठिंबा मिळाला, तर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना फक्त १५.९ टक्के पाठिंबा मिळाला. जन सूरज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर हे सध्या […] The post मुख्यमंत्री पदाच्या सर्व्हेक्षणात तेजस्वी यादव आघाडीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोलीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत बुधवारी ता. १५ सायंकाळी पुणे येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा सत्कार केला. या पक्ष प्रवेशामुळे हिंगोलीत शरद पवार गटाला चांगलाच हादरा बसला असून यामुळे राजकिय समितीकरणे बदलणार असल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या निवडणुकीचे आरक्षण सोडती नंतर राजकिय भुकंप सुरु झाले आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून पक्षांतर होऊ लागले आहे. तीन वेळेस काँग्रेसचे आमदार म्हणून हिंगोलीचे प्रतिनिधीत्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, या राजकिय भुकंप नंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला राजकिय भुकंपाचा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आज दुपारी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा अजित पवार गटात पक्ष प्रवेश निश्चित झाला होता. त्यांच्या सोबत माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे पहेलवान, माजी उपनगराध्यक्ष बिरजू यादव, माजी शिक्षण सभापती अमेरअली, आरेफ बागवान, ॲड. स्वप्नील गुंडेवार, शेख निहाल, शेख शकील, ॲड. अमित कळासरे, महेंद्र धबाले, संतोष गुठ्ठे, माजी नगरसेवक बाबाभाई यांच्यासह कळमनुरी येथील माजी नगरसेवकांनी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत (अजित पवारगट) प्रवेश केला. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजेश नवघरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनिल पतंगे यांची उपस्थिती होती. दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसोबतच ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर मातब्बरांनी शरद पवार गटाची तुतारी सोडून हाती घड्याळ बांधल्यामुळे हिंगोली शहरात राजकिय समीकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
रशियाचा युक्रेनवर हल्ला; वीज प्रकल्पाचे नुकसान
मॉस्को : वृत्तसंस्था रशियन सैन्याने युक्रेनमधील दुस-या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किव्हला लक्ष्य केले. रात्रभर त्यांनी शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले, एका हॉस्पिटलवर हल्ला केला. यामध्ये सात लोक जखमी झाले. एका वीज प्रकल्पाचेही नुकसान झाले, यामुळे सुमारे ३०,००० लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची […] The post रशियाचा युक्रेनवर हल्ला; वीज प्रकल्पाचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहार विधानसभा निवडणुकीतून प्रशांत किशोर यांची अखेर माघार
पाटणा : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतिकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किशोर यांनी म्हटले की, जर मी स्वत: निवडणूक लढलो, तर पक्षाकडे लक्ष देता येणार नाही. प्रशांत किशोर म्हणाले, मी […] The post बिहार विधानसभा निवडणुकीतून प्रशांत किशोर यांची अखेर माघार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मृत्युदंडाच्या शिक्षेची पद्धत का बदलत नाही?
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंड देण्याच्या पद्धतीवर सरकारला कठोर शब्दांत सुनावले आहे. न्यायालयाने विचारले की सरकार काळानुसार बदल स्वीकारायला तयार का नाही? ही टिप्पणी त्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान करण्यात आली, ज्यात फाशीऐवजी घातक इंजेक्शन, फायरिंग स्क्वाड, इलेक्ट्रिक चेअर किंवा गॅस चेंबर यांसारख्या आधुनिक आणि मानवीय पद्धतींचा विचार करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती विक्रम […] The post मृत्युदंडाच्या शिक्षेची पद्धत का बदलत नाही? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तामिळनाडूत हिंदी गाणी, फिल्म, जाहिरातींवर बंदी
चेन्नई : वृत्तसंस्था तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा भाषावाद पेटण्याची चिन्हे आहेत. राज्यातील सत्ताधारी ‘डीएमके’ने हिंदी भाषेच्या वापरावर बंदी घालणारे विधेयक विधानसभेत सादर केले आहे. या विधेयकात हिंदी गाणी, चित्रपट, जाहिराती आणि होर्डिंग्जवर निर्बंध लावण्याचा प्रस्ताव आहे. सरकारचा दावा आहे की, हा कायदा संविधानाच्या मर्यादेत राहून तमिळ भाषा आणि संस्कृतीचे संरक्षण करेल. ‘तमिळ संरक्षणाचा’ कायदा : […] The post तामिळनाडूत हिंदी गाणी, फिल्म, जाहिरातींवर बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात नवनियुक्त कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, त्यांना अद्याप गणवेश आणि आगीपासून बचाव करणारे स्वसंरक्षण साहित्य (फायर सूट) पुरवण्यात आलेले नाही. माहिती अधिकार कायद्यातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मानवाधिकार कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या 23 उपकेंद्रांमध्ये सन 2024 मध्ये तब्बल 167 अग्निशामक विमोचक/फायरमन नव्याने नियुक्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना दीड वर्ष पूर्ण होऊनही गणवेश आणि अत्यंत आवश्यक असलेले 'फायर सूट' देण्यात आलेले नाही. दुर्घटना होऊनही दखल नाही विशेष म्हणजे, कोंढवा-उंड्री परिसरात नुकत्याच घडलेल्या एका दुर्घटनेत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. त्यावेळी फायर सूट नसलेल्या नवनियुक्त फायरमन जवान विश्वजीत वाघ आणि पृथ्वीराज खेडकर यांना गंभीर दुखापत झाली होती आणि ते भाजले गेले होते. अशी गंभीर घटना घडूनही प्रशासन अजूनही या समस्येकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही. कायदेतज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी महापालिकेच्या या अनास्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना फायर सूट न देणे म्हणजे त्यांचा जीव जोखिमेत टाकणे आणि त्यांच्या प्रती महापालिकेने असंवेदनशीलता दाखवणे आहे, असे ते म्हणाले. मनीष देशपांडे यांनी यापूर्वी महापालिका आयुक्त, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे आणि पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट यांना लेखी तक्रार केली होती, मात्र कुणीही या विषयावर गांभीर्य दाखवले नाही. दिवाळीच्या तोंडावर आगी लागण्याच्या घटना वाढतात, अशा वेळी महापालिकेची ही अनास्था कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतू शकते, अशी चिंता ॲड. सरोदे यांनी व्यक्त केली आहे. कायदेतज्ञ ॲड. सरोदे यांनी मुख्यमंत्री महोदयांनी या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, ॲड. श्रिया आवले यांनी या मानवी हक्क उल्लंघनाच्या समस्येबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
शेतक-यांना विदेश दौ-यासाठी आता २ लाख रुपये अनुदान
मुंबई : जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतक-यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौ-याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. २०१२ नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता, विद्यमान १ लाख रुपयांच्या मर्यादेत शेतक-यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून २ लाख रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय […] The post शेतक-यांना विदेश दौ-यासाठी आता २ लाख रुपये अनुदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लक्ष्मीपूजन 20 ऑक्टोबरला प्रदोषकाळात साजरे करा:गौरव देशपांडे यांचे महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या तिथी बाबत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक पंचांगकर्त्यांमध्ये मतभेद असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मात्र, या गोंधळाला बळी न पडता संपूर्ण महाराष्ट्रात अमावस्या तिथीला येणाऱ्या प्रदोषकाळात, म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी सूर्यास्तानंतर पुढील अडीच तासांत लक्ष्मीपूजन साजरे करावे, असे आवाहन सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगाचे गौरव देशपांडे यांनी केले आहे. या संदर्भात बोलताना गौरव देशपांडे यांनी स्पष्ट केले की, अमावस्या तिथीला साजरे केले जाणारे लक्ष्मीपूजन प्रदोषकाळी (सूर्यास्तानंतर साधारण अडीच तासांचा कालावधी) करावे. ज्या दिवशी प्रदोषकाळात अमावस्या तिथी मिळते, त्याच दिवशी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत आहे. दोन्ही दिवशी प्रदोषकाळात अमावस्या मिळत असल्यास दुसऱ्या दिवशी पूजन करावे. तसेच, दोन्ही दिवशी प्रदोषकाळात किमान एक घटिका (२४ मिनिटे) अमावस्या मिळत असेल, तरीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे, असे शास्त्रात नमूद आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये २० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदोषकाळात संपूर्ण अमावस्या मिळत असल्याने, या दिवशी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत ठरेल.भारतातील इतर प्रांतांचा विचार केल्यास, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, आसाम, त्रिपुरा आणि झारखंड या राज्यांमध्ये २१ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मीपूजन साजरे करणे योग्य ठरेल. याउलट, गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये २० ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदोषकाळात संपूर्ण अमावस्या मिळत असल्याने, येथेही २० ऑक्टोबर रोजीच लक्ष्मीपूजन करावे.जागतिक स्तरावर, मध्य आणि पूर्व युरोपमधील दुबई, अबूधाबी, रियाध, जेद्दा, कुवेत, मस्कत, लंडन, पॅरिस, कैरो, नैरोबी, रोम, इटली, दोहा आणि बर्लिन या ठिकाणी २० ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन साजरे करावे, असे देशपांडे यांनी सांगितले. तसेच, संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामध्ये, ज्यात वॉशिंग्टन डी. सी., शिकागो, न्यूयॉर्क, मेक्सिको सिटी, लॉस एंजेलिस, डॅलस, ह्युस्टन, फिलाडेल्फिया आणि बोस्टन यांचा समावेश आहे, तेथेही २० ऑक्टोबर रोजीच लक्ष्मीपूजन करावे. आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा विचार केल्यास, बँकॉक, सिंगापूर, टोकियो, थायलंड, सिडनी, हाँगकाँग, क्वालालंपूर, सोल, शांघाय आणि मेलबर्न या सर्व ठिकाणी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावे, असे देशपांडे यांनी नमूद केले. त्यांनी असेही सांगितले की, ज्या गावात तुम्ही राहता, त्या गावात सूर्यास्तानंतर पुढील अडीच तासांत म्हणजेच प्रदोषकाळात लक्ष्मीपूजन साजरे करावे. यावेळी राहुकाळ किंवा इतर कोणत्याही गोष्टी पाहण्याची गरज नाही.
विचार, नवाचार आणि तंत्रज्ञानाच्या मार्गानेच भारत स्वयंपूर्ण बनेल, असे मत भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (एमआयटीसॉग) द्वारे आयोजित 'मास्टर्स इन पॉलिटिकल लीडरशिप अँड गव्हर्नमेंट' (एमपीजी) या अभ्यासक्रमाच्या २१ व्या बॅचच्या शुभारंभप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राजकीय क्षेत्रात चारित्र्यवान व्यक्तींची गरज असून, तेच समाजाला परिपूर्ण बनवतील. समाज आणि देश चालवण्यासाठी चारित्र्यवान नेत्यांची आवश्यकता असते. राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तत्पर असावे, असे जाजू यांनी नमूद केले. यावेळी पुणे व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) माजी अध्यक्ष डॉ. डी.पी. अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल कराड , प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, एसओजीचे प्रा. डॉ. सुधाकर माया परिमल आणि डॉ. अभिजीत ढेरे हे देखील उपस्थित होते. जाजू पुढे म्हणाले की, 'ज्याला काहीच येत नाही तो राजकारणी बनतो' ही धारणा आता बदलून सुशिक्षितांनी राजकारणात यावे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. शैक्षणिक आणि व्यावहारिक शिक्षण पद्धती आवश्यक असून, त्यामधूनच चांगले नेतृत्व उदयास येईल. एसओजीचे शैक्षणिक मॉडेल आदर्श असून, शासकीय यंत्रणेत अशा मॉडेलचा अंतर्भाव आवश्यक आहे. ॲड. जयंत जायभावे यांनी भारतीय राज्यघटना लोकशाहीचा आत्मा असून, संवाद हा तिचा श्वास असल्याचे सांगितले. संविधानाची उद्देशिका आपल्याला चांगला व्यक्ती आणि नागरिक बनण्यासाठी मूल्ये देते. हीच मूल्ये मुलांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. राजकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी सदनातील भाषणांचा अभ्यास करावा, यातून वैश्विक लोकशाहीची परिभाषा लक्षात येईल, असेही ते म्हणाले. डॉ. राहुल कराड यांनी राजकारणात सुशिक्षित व चांगल्या लोकांनी येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. राजकारणी मंडळांनी प्रशिक्षण घेतले तर देशाची नोकरशाही (ब्युरोक्रसी) व स्थिती सुधारण्यास वेळ लागणार नाही. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये एसओजीचे मॉडेल सुरू आहे. आमदारांसाठी देशात ज्या पद्धतीने एनएलसीचे आयोजन केले होते, त्याच धर्तीवर अमेरिकेत १५० आमदारांच्या संमेलनाचे आयोजन केले होते. आता देशातील जुन्या गोष्टींचे फ्रेमवर्क बदलणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. डी.पी. अग्रवाल यांनी राष्ट्रीय स्तरावर देशाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी सखोल विचार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. एमआयटीने सुरू केलेला एसओजीचा पाठ्यक्रम केवळ शैक्षणिक स्तरावर मर्यादित न राहता व्यापक आहे. या देशाला अशा नेत्यांची गरज आहे जे तळागाळात जाऊन कार्य करतील, असे त्यांनी नमूद केले.
राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ. रमेश शिंदे यांनी बुधवारपासून ता. १५ केसापूर (ता.हिंगोली) येथील स्मशानभूमीत चितेवर बसून उपोषण सुरु केले आहे. दिवसभरात प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नसल्याने शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त होत आहे. या आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देण्याची तयारी सुरु केली आहे. राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहिर केला जात नाही. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या तर हाती आलेली पिके वाहून गेली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. बँकेचे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्या ऐवजी ८५०० रुपयांची तुटपुंजी मदत देत आहे. या शिवाय हिंगोली शहराजवळ कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवले जाणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हयातील शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार असून जिल्हयातील शेतीचे वाळवंट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर बंधारा तातडीने रद्द करावा अशी मागणी डॉ. रमेश शिंदे यांनी केली आहे. शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली तालुक्यात तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहिर झाला नाही. त्यामुळे डॉ. शिंदे यांनी बुधवारी ता. १५ सकाळ पासून केसापूर (ता.हिंगोली) येथील स्मशानभूमीत चितेवर बसून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदवण्याची तयारी सुरु केली आहे.
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी म्हटले आहे की, केवळ वैयक्तिक संपत्ती वाढवण्याऐवजी सामूहिक अर्थनिर्मिती केल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या अर्थकारण आणि उद्योजकता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेचे आयोजन हिंदू इकॉनॉमिक फोरमने केले होते. यावेळी वर्ल्ड हिंदू फाऊंडेशनचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद, फोरमचे पुणे जिल्हा अध्यक्ष गौरव त्रिपाठी, न्यायमूर्ती मदन गोसावी, चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे आणि बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते स्वामी विज्ञानानंद लिखित 'द हिंदू मॅनिफेस्टो' आणि आदित्य पित्ती लिखित 'विकसित भारत – इंडिया २०४७' या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. वर्मा यांनी पुढे सांगितले की, व्यावसायिक, औद्योगिक, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रांसह सर्व व्यवसायांमधून निर्माण होणाऱ्या समृद्धीचा पाया नैतिकतेचा असावा. व्यवहारात पारदर्शकता राखली जावी आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे हिंदू उद्योजक एकत्र यावेत. हिंदू इकॉनॉमिक फोरमची मुळे देशात घट्ट रुजलेली असावीत, पण त्यांचे कार्य जागतिक स्तरावर दिसावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्थसमृद्धीचे फायदे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असेही राज्यपाल म्हणाले. त्यासाठी समर्पित आणि राष्ट्रीयत्वाने परिपूर्ण अशा मानसिकतेचे उद्योजक हवे आहेत. आपली समृद्धी सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्याच्या भावनेने युक्त असावी, तरच आर्थिक समृद्धीचे लाभ खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचून विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना स्वामी विज्ञानानंद म्हणाले की, आता आपल्याला पारंपरिक पूजाअर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. आर्थिक प्रणाली सुधारण्याची आणि विकसित होण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता आणि प्रतिभा आहे, जी सध्या विखुरलेल्या अवस्थेत वैयक्तिक पातळीवर काम करते. ती एकत्र आल्यास आपल्या गतिमान अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होईल. युवा पिढीने या प्रयत्नांना साथ देणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योजकांना, व्यापार्यांना सन्मान मिळाला पाहिजे. स्थानिकपासून जागतिक पातळीपर्यंत अशा एकत्रित प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. |
88 वर्षीय ज्येष्ठाची 19 लाखांची फसवणूक:अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी लुबाडले
पुणे येथे सायबर चोरट्यांनी अटक करण्याची भीती दाखवून एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची १९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. डेक्कन जिमखाना परिसरात ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला ९ जुलै रोजी सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. 'नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने ५३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असून, त्यात तुमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरले आहे. तुमच्या बँक खात्याची तपासणी करायची आहे आणि या प्रकरणात तुम्हाला अटक केली जाईल,' अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात वेळोवेळी १९ लाख ८० हजार रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली असता, त्यांना संशय आला. चौकशीअंती आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी नुकतीच डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणाची नऊ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा दुसरा प्रकारही समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोहगाव येथील रहिवासी असलेल्या या तरुणाला चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले. सुरुवातीला तरुणाने थोडी रक्कम जमा केली असता, चोरट्यांनी त्याला परतावा मिळाल्याचे भासवले. मात्र, प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता, त्यांनी तरुणाला आणखी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. जेव्हा तरुणाला मूळ मुद्दल आणि परतावा दोन्ही मिळाले नाहीत, तेव्हा त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुण्यामध्ये न्याय व्यवस्थेतील विलंबामुळे हतबल झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने थेट जिल्हा न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गेली तब्बल 27 वर्षे कोर्टात खटला सुरू असतानाही न्याय मिळत नसल्याने नामदेव जाधव (रा. वडकी, पुणे) यांनी नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नामदेव जाधव यांचा जमिनीच्या व्यवहारातून उद्भवलेला वाद पुणे जिल्हा न्यायालयात गेल्या 27 वर्षांपासून प्रलंबित होता. इतक्या दीर्घकाळ खटला चालूनही कोणताही निकाल लागत नसल्यामुळे ते अत्यंत निराश झाले होते. आज सकाळी (दि. 15 ऑक्टोबर) नामदेव जाधव न्यायालयात हजर झाले होते. काही वेळानंतर त्यांनी अचानक कोर्टाच्या नव्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांकडून तपास सुरू या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, न्याय मिळण्यास होत असलेला विलंब आणि खटला दीर्घकाळ चालल्यामुळे जाधव मानसिक तणावाखाली होते. 27 वर्षांपासून न्यायालयाचे चक्कर मारूनही काही निर्णय मिळत नाही, त्यामुळे त्यांनी नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला असून, आत्महत्येपूर्वी जाधव यांनी कोणती सुसाइड नोट लिहिली आहे का? याचाही शोध घेत आहेत. हे ही वाचा... दारूसाठी पैसे न दिल्याने डोक्यात घातला वरवंटा:मुलाकडून आईची निर्दयी हत्या, घटनेनंतर बहिणीला केला फोन; कोल्हापुरातील घटना दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 15 ऑक्टोबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरातील भारतनगर भागात घडली. या घटनेत सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) या महिलेचा मुलगा विजय अरुण निकम (वय ३५) याने वरवंट्याने डोक्यावर वार करून आईचा निर्घृण खून केला. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी मुलाला अटक केली आहे. सविस्तर वाचा... संभाजीनगरात एसएफएस शाळेच्या मैदानावर तरुणाचा गळा चिरून खून:पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी, रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुरेश भगवान उंबरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वाचा...
मुंबई : प्रतिनिधी एक अतिशय महत्त्वाची बातमी. दिवाळी अगदी चार दिवसांवर आली असताना अजूनही महाराष्ट्रातून पावसाचा मुक्काम हलताना दिसत नाही. हवामान विभागाने ताजा अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार गुरुवार १६ ऑक्टोबर ते शुक्रवार १७ ऑक्टोबर दरम्यान १५ जिल्ह्यांना यलो देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाने धुमाकूळ घातलाय. शेतक-यांचे पीक सोडा जमिनीसुद्धा खरडवून गेल्यात. राज्यात ओला […] The post महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चक्क १९ गावंच गायब?; राज्यात मतदार याद्यांचा घोळ
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. ही निवडणूक जवळ आल्याने आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाडीची गणिते जुळवून पाहिली जात आहेत. हीच निवडणूक लक्षात घेऊन विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने आज (१५ ऑक्टोबर) राज्य निवडणूक आयोगाच्या अधिका-यांची भेट घेऊन मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे, असा गंभीर […] The post चक्क १९ गावंच गायब?; राज्यात मतदार याद्यांचा घोळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेतकऱ्यांना परदेश दौऱ्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या संदर्भात माहिती देताना भरणे म्हणाले, जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषि विभागामार्फत आयोजन केले जाते, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे. मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, 2012 नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता, विद्यमान 1 लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, या निर्णयामुळे आता देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रवास खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण अनुभव घेता येईल तसेच प्रगत देशांतील शेतीपद्धतींचा अभ्यास करून त्या आपल्या शेतीत राबवण्याची प्रेरणा मिळेल. तसेच ही योजना 2004-05 पासून कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना विदेशात जाऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील यशस्वी मॉडेल्स आणि बाजारपेठीय पद्धतींचा अभ्यास करता यावा, यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येईल. योजनेअंतर्गत निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्जांची छाननी जिल्हा कृषी अधिकारी, राज्यस्तरीय समित्या आणि कृषी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून केली जाईल, अशी माहिती भरणे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना कोणत्या देशांमध्ये जाता येणार? महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या महत्त्वाकांक्षी योजनेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या या योजनेत आता प्रति शेतकरी अनुदानाची कमाल मर्यादा 1 लाखांवरून वाढवून 2 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. कृषी विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, या बदलामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड यांसारख्या देशांमधील शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पिक उत्पादन व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया आणि निर्यातक्षम शेतीपद्धती यांचा अधिक प्रभावीपणे अभ्यास करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना काय फायदा होईल? या अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खाली गोष्टींच्या बाबतीत फायदा होऊ शकतो.
एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा
मुंबई : प्रतिनिधी एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मोठा राडा झाला आहे. शिवसेना शिंदे गट आणि सदावर्ते गट यांच्यात हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत अपमानास्पद भाषा वापरल्याने आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ही हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. यानंतर आता नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीचा […] The post एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागण्यांवर आणि त्यांच्या एकत्रित भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली आहे. विरोधकांनी आपला पराभव मान्य केल्याचे आणि त्यांचे अवसान गळाल्याचे दिसत असल्यामुळेच ते एकत्र आले, असे शिंदे म्हणाले. तसेच सन्नाटा कोणाकडे होता? आमच्याकडे की त्यांच्याकडे? असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदार याद्यांतील चुकांवर बोट ठेवत आयोगावर धारदार प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे मत व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? सगळे पक्ष एकत्र आल्यामुळे आपण जिंकू, असा विश्वास त्यांना वाटायला हवा होता. मात्र, त्यांना जिंकण्याची खात्री वाटत नाही, उलट महायुती 100 टक्के जिंकणार असा विश्वास त्यांना निर्माण झाला आहे. म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणुका रद्द करण्याची आणि मतपत्रिकेवर घेण्याची मागणी केली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. विरोधक पराभवानंतर सगळ्यांनाच दोष देतात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या, तेव्हा निवडणूक आयोग त्यांना चांगला वाटला. तेव्हा त्यांनी आयोगावर कोणतेही आक्षेप घेतले नाहीत. जेव्हा त्यांना निवडणुकीत यश मिळते, ते जिंकतात, तेव्हा मात्र सगळेच चांगले असते. पण जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला दोष देण्याचे काम ते करत असतात, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीबद्दल बोलताना त्यांनी 'ईव्हीएम मशीन प्रक्रिया काँग्रेसच्या काळात सुरू झाली,' याची आठवण करून दिली. सन्नाटा कोणाकडे होता? शिंदेंचा राज ठाकरेंना टोला विधानसभा निवडणुकीत २३२ जागा जिंकल्यानंतरही महाराष्ट्रात सन्नाटा होता. तसेच मतदार याद्या न दाखवणे हाच पहिला घोळ असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. सन्नाटा कुणाकडे होता? आमच्याकडे की त्यांच्याकडे? असा टोला शिंदे यांनी राज ठाकरेंना लगावला. हे गोंधळून गेल्याचे मी आधीच म्हणालो आहे. आता निवडणुका पुढे ढकला म्हणताय म्हणजे त्यांना निवडणुका जिंकण्याची खात्री नाहीये. त्यांना पराभव चाहूल लागली असून, तो समोर दिसू लागलाय. त्यामुळे अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाकरेंच्या काळातील हुकूमशाही पाहिलीये लोकशाहीच्या नावाखाली चालू असलेली हुकूमशाही आम्ही खपवून घेणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात हुकूमशाही पाहिलीय. नेहमीच्या अधिकाऱ्याला मारणे, कंगना राणावतचे घर तोडणे, नारायण राणेंना जेवताना अटक करणे, पत्रकारांना अटक करणे ही हुकुमशाही त्यांनी दाखवलीय, असे एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर याला जेलमध्ये टाकणार, त्याला जेलमध्ये टाकणार, बर्फाच्या लादीवर झोपवून मारणार ही कुणाची वक्तव्ये होती. ही कुठली लोकशाही आहे. त्यामुळे जे काही बोलतो, ते विचारपूर्वक बोललो पाहिजे. समोरच्या बोट दाखवताना तीन बोटे आपल्याकडे असतात, याचा विचार केला पाहिजे. विरोधकांनी आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.
कळमनुरी तालुक्यातील एका वसतिगृहामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या एका शिक्षकासह दोघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १५ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दोन्ही शिक्षक फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील एक गावात इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत एका संस्थेद्वारे आश्रमशाळा व वसतिगृह चालविले जाते. या वसतिगृहात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी व विद्यार्थिनी राहतात. आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था वसतिगृहात करण्यात आलेली आहे. आश्रमशाळेतील शिक्षकांची या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह देखरेखीसाठी नियुक्ती केली जाते. सोमवारी ता. १३ आश्रमशाळेतील शिक्षक महालिंग पटवे याची वसतिगृहामध्ये नियुक्ती होती. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे जेवण झाल्यानंतर शिक्षक पटवे याने एका विद्यार्थिनीला तू माझ्या सोबत जेवायला ऑफीसमध्ये चल असे म्हटले. शिक्षकाने बोलावल्यामुळे विद्यार्थिनी ऑफीसमध्ये गेल्यानंतर पटवे याने त्या मुलीचा विनयभंग केला. शिक्षकांकडून होत असलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरून गेली. तिने ऑफीसमधून पळ काढला. अन्य एका शिक्षकाचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सदर विद्यार्थिनीने घडलेला प्रकार शाळेतील दुसरे शिक्षक मोहन जाधव यांच्या कानावर टाकला. मात्र शिक्षक जाधव याने या प्रकाराची माहिती आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांना न देता लपवून ठेवली. मात्र या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीनेच शाळा प्रशासनाला व तिच्या कुटुंबीयांना सांगितला. तर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आज पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश गोटके, जमादार शेख बाबर, शिवाजी पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी त्या विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी आश्रम शाळेचे शिक्षक महालिंग पटवे व मोहन जाधव यांच्यावर बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उपाधीक्षक केंद्रे, निरीक्षक केंद्रे पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातील दोन्ही शिक्षक फरार असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश या प्रकरणात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने या प्रकरणात सखोल चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश शाळा प्रशासनाला दिला आहेत. या अहवालानंतरच वसतीगृहाबाबत पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.
निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरून कोणी तर चालवतंय
मुंबई : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरं कोणतरी चालवतो’, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केला. आज विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार याद्यांतील घोळाबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्याची मागणी […] The post निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरून कोणी तर चालवतंय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बीडच्या जेलरची नागपूर कारागृहात उचलबांगडी!
बीड : प्रतिनिधी येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर नागपूर कारागृहात बदली करण्यात आली आहे. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा गंभीर त्यांच्यावर आरोप होता. यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि जामिनावर बाहेर आलेल्या कैद्यांनी गायकवाड यांच्यावर हे गंभीर आरोप केले होते. कैद्यांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे, नकार देणा-या […] The post बीडच्या जेलरची नागपूर कारागृहात उचलबांगडी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बंदी असलेले खोकल्याचे औषध विक्रीला
भंडारा : मध्य प्रदेशात उत्पादित करण्यात आलेल्या कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर घटना समोर आल्या आहेत. या नंतर महाराष्ट्रातही औषध निर्माण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. यात काही कफ सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील हे कफ सिरप विक्रीसाठी मेडिकलमध्ये असल्याचे भंडा-यात समोर आले आहे. हा बंदी असलेल्या कफ सिरपचा साठा विक्रेत्यांकडून जप्त […] The post बंदी असलेले खोकल्याचे औषध विक्रीला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वाचनाच्या सवयीमुळे मनुष्याची ज्ञान समृध्दी
मुंबई : प्रतिनिधी ग्रंथ हे मनुष्याचे मित्र असावेत. प्रत्येकाने सतत वाचत राहिले पाहिजे. ही वाचनाची सवय मनुष्याला ज्ञान समृद्धी मिळवून देत असल्याचे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ […] The post वाचनाच्या सवयीमुळे मनुष्याची ज्ञान समृध्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मंत्रालयात अभिवादन
मुंबई : प्रतिनिधी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सचिव मनीषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे विशेष चौकशी अधिकारी-२, सचिव पंकज कुमार, उपसचिव हेमंत डांगे, अवर सचिव गोविंद साबणे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, […] The post माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना मंत्रालयात अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पुन्हा एकदा भाजप हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनल्याचा आरोप केला. स्वाती पाचुंदकर व त्यांचे पती दत्तात्रय पाचुंदकर यांचा काल भाजपमध्ये प्रवेश झाला. या दोघांवरही भूखंड हडप केल्याप्रकरणी हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे भाजप हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान असल्याचे पुन्हा एकवार स्पष्ट होते, असे त्या म्हणाल्यात. सुषमा अंधारे आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या, काल रांजणगावच्या स्वाती पाचुंदकर आणि दत्तात्रय पाचुंद कर यांचा भाजपा प्रवेश झाला आहे. या दांपत्याने केलेले जमीनघोटाळे यावर एक संपूर्ण वेब सिरीज निघू शकेल. या दाम्पत्यावर रांजणगावच्या सरकारी जमीन घोटाळ्याच्या संबंधाने अनेक जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्याचे आरोप आहेत. हे केवळ आरोप नाहीत, तर उच्च न्यायालयानेही या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. याचा अर्थ असा आहे की, भाजपकडे जी - जी माणसे येतात, ती कुठून ना कुठून अत्यंत कष्टप्रद अवस्थेतील असतात, गुन्हेगारीचा ठपका ठेवलेली असतात किंवा कोणत्या तरी आरोपातून वाचण्यासाठी, घोटाळ्यातून वाचण्यासाठी त्यांना भाजपचे वॉशिंग मशिन फार गरजेची असते हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. भाजपचा चांगली माणसे का मिळत नाहीत? आत्ता मुद्दा असा आहे की, भाजपची अशी कोणती मजबुरी आहे की त्यांना चांगली लोकं मिळतच नाहीत. भाजपकडे येणारी सर्वच माणसे गुन्हेगारी प्रवृत्तीची व सर्राईतच असणारीच कशी काय येऊ शकतात. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे काही उत्तर आहे का. कदाचित तुमच्याकडे काहीच उत्तर नाही. कारण, तुमचा पक्ष मुळाच भाड्याने जमवलेली पार्टी आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. स्वाती पाचुंदकरांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश स्वाती पाचुंदकर या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. त्यांच्यैावर रांजणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच असताना 72 गुंठे शासकीय जमीन हडपल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या लिपीक व ग्रामसेवकांना अटक झाली होती. तर स्वाती यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन अटकपूर्वी जामीन मिळवला होता. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश वादग्रस्त ठरला आहे. पण पक्ष नेतृत्वाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे गणित डोळ्यापुढे ठेवून त्यांना पक्षात घेतल्याचा दावा केला जात आहे. अंजली दमानियांना मोदींवर टीका करण्याचे आव्हान दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचे धाडस दाखवण्याचे आव्हान दिले आहे. लोकप्रतिनिधी सुशिक्षित असावे तर ही अपेक्षा काही चुकीची नाही. पण शिक्षण असेलच तरच तो ज्ञानी असेल असेही काही नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्तापर्यंतच्या पद्धतीने अर्थ खाते सांभाळलेले आहे ते पाहता त्यांच्या शिक्षणावर शंका घ्यावी असे काही कारणच नाही. पण तरीही त्यांच्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करायचे असतील तर ते नक्की करावेत मात्र तसे प्रश्न उपस्थित करत असताना देशाच्या पंतप्रधानांच्या डिग्री संदर्भात ज्या अनेक शंका कुशंका आहेत त्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित व्हायला हवेत. अंजली दमानियांकडून अपेक्षा असेल की त्यांनी किमान एकदा तरी , जरी देशाचे पंतप्रधान हे भाजपाचे असले तरीसुद्धा मोदीजींच्या शिक्षणाबद्दल सुद्धा प्रश्न विचारायला हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
एक अतिशय महत्त्वाची बातमी. दिवाळी अगदी चार दिवसांवर आली असताना अजूनही महाराष्ट्रातून पावसाचा मुक्काम हलताना दिसत नाही. हवामान विभागाने ताजा अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार उद्या गुरुवार 16 ऑक्टोबर ते परवा शुक्रवार 17 ऑक्टोबर दरम्यान 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाय. महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाने धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांचे पीक सोडा जमिनीसुद्धा खरडवून गेल्यात. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होतेय. येणारी दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यातच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. बुधवार, 15 ऑक्टोबर हवामान विभागाने आज बुधवारी दुपारी ताजा अंदाज जाहीर केला. त्यानुसार बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. गुरुवार, 16 ऑक्टोबर हवामान विभागाने गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा घाट, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवार 17 ऑक्टोबर नाशिक, नाशिक घाट, पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या काळात सोसाट्याचा वारा रारण्याचा अंदाज असून, त्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यताय. सर्वाधिक जलसाठा विक्रमी पूर्वमोसमी पाऊस आणि दमदार मान्सूनमुळे या वर्षी महाराष्ट्रातील धरणांतील उपयुक्त जलसाठा 91.41 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. गेल्या दहा वर्षांतील हा सर्वाधिक जलसाठा आहे. त्यामुळे यंदा रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी मुबलक पाणी मिळू शकेल. गेल्या 25 वर्षांत 90 टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त साठा असण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2006-2007 मध्ये राज्यातील धरणांत उपयुक्त जलसाठा 92 टक्के होता. जलसंपदा विभागाच्या नोंदीनुसार, राज्यातील 2997 लहान, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता 48,423.66 दशलक्ष घनमीटर आहे. या प्रक्लपांत 37,952.57 दलघमीं उपयुक्त जलसाठा आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर राज्य सरकारने घोषित केलेल्या 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजच्या वितरणास सोमवारी सुरुवात झाली. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचोवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. यामुळे अतिवृष्टीग्रस्त 282 तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अतिवृष्टीमुळे सुमारे 65 हजार लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. जिरायत पिकांसाठी 8500 रुपये, बागायत 17000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22500 रुपये प्रतिहेक्टर भरपाई मिळणार आहे. शेतकरी दौरा खर्चात दुप्पट वाढ राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि प्रगत कृषी पद्धतीची माहिती मिळावी यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अभ्यास दौऱ्यांवरील खर्चात राज्य सरकारने मोठी वाढ केली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला एक लाख रुपयांऐवजी दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. वाढती महागाई आणि डॉलर-युरोच्या विनिमय दरातील वाढ लक्षात घेऊन हा बदला झाला असून, याचा शासन निर्णय मंगळवारी काढण्यात आला.
मुंबईच्या एसटी बँकेत अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदेंच्या संचालकांमध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबई एसटी बँकेच्या संचालकांची आज बैठक होती. या बैठकीत चर्चा सुरू असताना अचानक गुणरत्न सदावर्ते आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत...
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारच्या एका निर्णयावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील नरिमन पॉइंट येथे प्रहार जनशक्ती पक्षाला दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेले पक्ष कार्यालय राज्य सरकारने रद्द केले आहे. जागा रद्द करताना कोणतीही पर्यायी जागा न दिल्याने बच्चू कडू संतप्त झाले आहेत. या निर्णयावरून त्यांनी जोरदार टीका करत भाजपला 'विष' संबोधले आहे. तसेच भाजपची तुलना ही सापाशी केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाजवळ असलेल्या 'जनता दल सेक्युलर' (JDS) पक्षाच्या कार्यालयाची जागा कमी करून ती प्रहार जनशक्ती कार्यालयाला उपलब्ध करून दिली होती. फडणवीस सरकारने हा निर्णय बदलला असून, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दल सेक्युलरला पुन्हा संपूर्ण जागा परत देण्यात आली आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या बच्चू कडू यांना मोठा झटका बसला आहे. बच्चू कडू हे गेले काही दिवस महायुतीवर टीका करताना दिसून येत आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नेमके काय म्हणाले बच्चू कडू? बच्चू कडू म्हणाले की, भाजप म्हणजे अख्खे विषच आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी देखील हा पक्ष विषारी बनला आहे. पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या, लढणाऱ्या कार्यकर्त्यालाच तर ते जवळ करत नाहीत. विधानसभा, विधान परिषद सदस्य असो किंवा खासदार, या पदावर मूळ भाजपचा कार्यकर्ता दुर्बिन लावून शोधला, तरी सापडत नाही. ते भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी विषारी ठरत असतील, तर माझी काय स्थिती राहणार आहे अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. भाजपची तुलना विषारी सापाशी बच्चू कडू यांनी यावेळी भाजपची तुलना सापाशी केली. भाजप हा साधासुधा पक्ष नाही, दुधातही आणि पेढ्यातही विष आहे, हे भाजपने दाखवून दिले आहे. साप जसा दूध पाजल्यावरही विष सोडतो, तसा भाजप आहे. ते कधी उलटून विष सोडतील हे सांगता येत नाही. मी भारतीय आहे, असे म्हणण्यापेक्षा मी भारतीय जनता पक्षाचा आहे, असे म्हटले तरच तुम्ही टिकाल, अशी स्थिती त्यांनी करून ठेवली आहे, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. नेमके प्रकरण काय? राज्य सरकारने ऑगस्ट 2023 मध्ये महायुतीच्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉइंट येथील बरॅक क्रमांक 10 मधील जागा (कक्ष क्रमांक एक आणि दोन मिळून सुमारे 700 चौरस फूट) दिली होती. या जागेवर यापूर्वी जनता दल (सेक्यूलर) पक्षाचे कार्यालय होते. प्रहारला जागा दिल्यावर जनता दलाला केवळ 200 चौरस फूट जागा ठेवण्यात आली होती. 2024 च्या निवडणुकीपूर्वी बच्चू कडू यांनी महायुतीशी आपले नाते तोडले आणि सरकारविरोधी भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने प्रहारचे कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आता ही जागा पुन्हा पूर्णपणे जनता दलाला देण्यात येणार आहे. शिवाय राज्य सरकारने प्रहारला पर्यायी जागा देखील दिलेली नाही. सरकारच्या या 'अन्यायकारक' निर्णयाविरुद्ध प्रहार पक्ष मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने स्वतःच्या आईचा निर्दयीपणे खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 15 ऑक्टोबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क परिसरातील भारतनगर भागात घडली. या घटनेत सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३) या महिलेचा मुलगा विजय अरुण निकम (वय ३५) याने वरवंट्याने डोक्यावर वार करून आईचा निर्घृण खून केला. राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी मुलाला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई आणि त्यांचा मुलगा विजय निकम हे दोघेच भारतनगर येथील घरात राहत होते. विजय हा सेंट्रिंग कामगार असून, अधूनमधून डिजिटल फलक लावण्याचेही काम करत होता. मात्र, तो दारूच्या आहारी गेला होता. तो दारूच्या पैशांसाठी सतत त्याच्या आईला त्रात देत होता. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला सोडून आपल्या दोन मुलींसोबत तिच्या माहेरी विजापूर येथे राहायला गेल्या होत्या. आईचा खून केल्यानंतर बहिणीला सांगितले विजय हा आज सकाळी दारूसाठी त्याच्या आईकडे पैशांची मागणी करत होता. मात्र, आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. आईने नकार दिल्याने त्याचा राग अनावर झाला. त्याने संतापाच्या भरात घरातील वरवंटा उचलला आणि आईच्या डोक्यात घालून तिचा खून केला. आईचा खून केल्यानंतर विजयने इस्पुर्ली येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीला फोन करून “मी आईचा खून केला” असे सांगितले. त्यानंतर शेजाऱ्यांना याबाबत सांगून तो तो घराच्या दारात शांत बसला होता. पोलिसांनी आरोपीला केली अटक दरम्यान, घाबरलेल्या शेजाऱ्यांनी तात्काळ राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हे ही वाचा... संभाजीनगरात एसएफएस शाळेच्या मैदानावर तरुणाचा गळा चिरून खून:पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी, रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुरेश भगवान उंबरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. सविस्तर वाचा...
महायुतीला विश्वास आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या ताब्यात येईल, तर विरोधी पक्ष फक्त आरोप करत आहे, ते विकासावर बोलत आज अशी परिस्थिती आहे की विरोधकांना महाराष्ट्रात उमेदवार मिळणार नाही, तर ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही, असे छत्रपती संभाजीनगर खासदार संदीपान भुमरे यांनी म्हटले आहे. संदीपान भुमरे म्हणाले की, ठाकरे गटाचे लोकं केवळ बोलतात त्यांचे काहीच काम नाही. ते केवळ चर्चा करतात. त्यांना मनपा निवडणुकीत उमेदवार भेटणार नाही. मोर्चा काढला तेव्हा धाराशिव, बीड मधून लोकं आले, जिल्ह्यातील कोणीही तिथे नव्हते. 20 ते 25 हजार लोकं येणार म्हणाले अन् केवळ बोटावर मोजण्याइतके लोकं मोर्चाला दिसून आली. अंबादास दानवेंना बोलता येते तर आम्हालाही बोलता येते त्यांनी हे लक्षात ठेवावे. माझ्यावर कितीही आरोप केले तरी मनपावर युतीचाच झेंडा फडकणार. मविआला पराभव दिसल्याने हे सर्व सुरू संदीपान भुमरे म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला पराभव होणार हे मविआच्या लक्षात आले आहे. आता आपली सत्ता येणार नाही हे लक्षात आल्याने निवडणूक आयोगाकडे जायचे चर्चा करता आणि आरोप करतात, पण जनतेच्या हे लक्षात आले आहे. मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्याकडे येत नाही हे लक्षात आल्याने त्यांच्याकडून अशी चर्चा सुरू आहे. आमची निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. ते जसे म्हणतील तसे आम्ही तयार आहोत. ..तर चौकशीसाठी तयार संदीपान भुमरे म्हणाले की, पैठणमध्ये जर बोगस मतदान असेल तर चौकशीसाठी आम्ही तयार आहोत. यात जर तुम्हाला काही आढळले तर आम्ही चौकशीसाठी तयार आहोत. पैठण मतदारसंघातील काही मतदार हे उद्योग-धंद्यासाठी पैठणमधून बाहेर पडले आहेत ते दुसरीकडे राहतात पण त्यांचे पैठणच्या मतदार यादीत नाव आहे, अशा लोकांना आम्ही पैठणमध्ये येत मतदान करावे असे आवाहन केले त्यांना तिथे घेऊन गेलो. कोकण-मधील अनेक जण मुंबईमध्ये राहतात आणि मतदानासाठी येतात हे तसेच आहे. आमच्यात काही वाद नाही संदीपान भुमरे म्हणाले की, मनपा निवडणुकीसाठी मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद न करता मनपावर युतीचा झेंडा कसा फडकेल याकडे महायुतीच्या सर्व पक्षांनी लक्ष दिले पाहिजे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवत ही मनपा आपल्या ताब्यात कशी येईल मनपावर महायुतीचा झेंडा फडकेल यावर लक्ष द्यावे. यात कुणी छोटा मोठा नाही महायुतीमध्ये सर्व जण समान आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे 6 आमदार आणि भाजपचे 3 आमदार असले तरी सुद्धा छोटा-मोठा भाऊ मध्ये न पडता केवळ महायुती म्हणून काम करणे गरजेचे आहे. यावर भाजपने आणि शिवसेनेने लक्ष द्यावे. छोटा-मोठा भाऊ हे जनतेला माहिती आहे, आमच्यात काही वाद नाही मनपावर आम्ही महायुतीचा झेंडा फडकवणार.
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट आणि टीव्ही अभिनेते पंकज धीर यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे ते घराघरात लोकप्रिय झाले होते. ते ब-याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते . पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर आणि सून कृतिका सेंगर हे दोघेही कलाकार आहेत. […] The post ‘महाभारत’च्या कर्णाचा अस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘व्हीव्हीपॅट’ नसेल तर थेट ‘बॅलेट पेपरवर’ निवडणूक घ्या
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या आक्रमकतेपुढे राज्य निवडणूक आयोगाची भांबेरी उडालेली दिसली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,मनसे, शेकाप यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक अधिका-यांना भांडावून सोडले. प्रश्नांच्या सरबत्तीने आयोगाचे अधिकारी गांगारून गेल्याचे दिसून आले. मतदार याद्यातील घोळावरील प्रश्नावरून आयोगाला या नेत्यांनी खिंडीत पकडल्याचे दिसले. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आयुक्त आणि अधिका-यांना […] The post ‘व्हीव्हीपॅट’ नसेल तर थेट ‘बॅलेट पेपरवर’ निवडणूक घ्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत पाच महिन्यांचा खंड
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी बांधकाम कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत तब्बल पाच महिन्याचा विलंब झाल्याने हजारो कामगारांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावं लागत आहे. नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आरोग्य विमा, शिक्षण सहाय्य, प्रसूती लाभ आणि अपघात भरपाईसारख्या महत्त्वाच्या योजना मिळत नाहीत. कामगार नेत्यांच्या मते, नोंदणी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि स्थानिक कार्यालयांमधील कर्मचा-यांच्या कमतरतेमुळे प्रक्रिया ठप्प झाली आहे. अनेक कामगारांनी […] The post बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रियेत पाच महिन्यांचा खंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शैक्षणिकदृष्ट्या प्रगत दिसणाऱ्या तामिळनाडूचा खरा चेहरा दलितविरोधी असून, राज्यात मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, अशी टीका चेन्नई येथील एमआयडीएस विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे माजी प्राध्यापक सी. लक्ष्मणन यांनी केली. केंद्रीय गुन्हे तपास यंत्रणांच्या अहवालानुसार, अॅट्रॉसिटीच्या घटनांमध्ये तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रांत मागासवर्गीयांना स्थान दिले जात नाही, तसेच शासनविरोधी भूमिका घेणाऱ्या दलितांवर कारवाई केली जाते, असेही लक्ष्मणन म्हणाले. ते नागपुरात रिपब्लिकन फेडरेशनतर्फे आयोजित एका अनौपचारिक चर्चेत बोलत होते. प्रा. लक्ष्मणन यांनी सांगितले की, तामिळनाडूमध्ये दलित अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. विषारी दारूच्या घटनांमध्ये दलितच बळी पडतात. द्रविडी क्रांतीची प्रतिमा असलेल्या या राज्यात कामगार कायदे पायदळी तुडवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जात नाही. १९७० पर्यंत 'जस्टिस पार्टी' सत्तेत असताना दलितांचे प्रमाण ६० टक्के होते, ते आता कमी होत आहे. सरकार एसईझेडसाठी हजारो एकर जमीन देते, परंतु गरिबांना भूदान देण्यासाठी जमीन नसल्याचे सांगते. राज्यातील राजकीय, न्याय आणि प्रशासकीय यंत्रणा, विशेषतः पोलीस यंत्रणा जातीयवादी मानसिकतेतून काम करत आहे. माध्यमे, न्यायव्यवस्था किंवा प्रशासन दलितांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी रिपब्लिकन फेडरेशनचे मिलिंद पखाले, डॉ. एस.के. गजभिये, छाया खोब्रागडे, भारती सहारे, नरेश वाहाणे, नरेंद्र धनविजय, विशाल वानखेडे, अनिल वालदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. तामिळनाडूत मागासवर्गीय मंत्रालय अस्तित्वात नाही, त्यामुळे अनुसूचित जाती, जमाती उपयोजना निधीचा प्रश्न निर्माण होतो. गेल्या १० वर्षांपासून अनुसूचित जाती, जमातीच्या ३ हजार पदांची नोकरभरती बंद आहे. विद्यापीठांच्या कुलगुरूपदांसाठीही व्यवहार होतात, असा गंभीर आरोप प्रा. लक्ष्मणन यांनी केला. पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आज कुठेही दिसत नाही, जे होते ते पुसले जात आहे. डीएमकेचे स्टॅलिन सरकार संविधानाविरोधी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आता व्यवस्थेला प्रश्न विचारण्याऐवजी दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारून भूमिका घेणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी नोंदवले.राज्यात १९७० पर्यंत भाजपच्या विचारांनीच सरकार काम करत होते. कलावंतांच्या लोकप्रियतेमुळे मतदारांमध्ये बदल घडला, परंतु त्यानंतरही सामाजिकदृष्ट्या फारसा बदल झाला नाही. आजही मतदार कलावंतांकडे भावनिक दृष्टीने पाहतात. गेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली असून, अभिनेते विजय यांचा उदय होत आहे.
इंद्रनील नाईक यांची गोंदियाच्या पालकमंत्रिपदी वर्णी
मुंबई : प्रतिनिधी ‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले होते. त्यांच्या या असंवेदनशील वक्तव्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव करत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान, पाटील यांनी आता गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचें कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात […] The post इंद्रनील नाईक यांची गोंदियाच्या पालकमंत्रिपदी वर्णी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य निवडणूक आयोगासोबत झालेल्या बैठकीत आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आम्ही राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. पण त्याने आमचे कोणतेही समाधान झाले नाही. आगामी निवडणुका चुकीच्या मतदार याद्यांसह निवडणूक होणार असतील, तर ते निकोप लोकशाहीसाठी घातक आहे, असे ते म्हणालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदारयाद्यांतील चुकांवर बोट ठेवत आयोगावर धारदार प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर आयोजित एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतून आपले कोणतेही समाधान झाले नसल्याचे स्पष्ट केले. घोटाळ्यांनी भरलेल्या मतदार याद्यांवर विधानसभेची निवडणूक झाली थोरात म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण आमचे समाधान झाले नाही. आयोगाने आमच्या प्रश्नांची कोणतीही स्पष्ट उत्तरे आम्हाला दिले नाही. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मतदार यादीतील चुकांकडे आयोगाचे लक्ष वेधले. पण आयोगाने आम्हाला कोणतेही उत्तर दिले नाही. त्यामुळे ती निवडणूक चुकांसह झाली. काही आमदार सांगतात की, आम्ही बाहेरून 20 हजार मते आणली. काहींची नावे वगळली गेली, तर काहींची तीच तीच नावे दिसून येत आहेत. वसतिगृहात राहणारे परराज्यातील विद्यार्थीही महाराष्ट्राचे मतदार म्हणून दाखवले जात आहेत. अशा अनेक घोटाळ्यांनी भरलेल्या मतदार यादीवर राज्याची विधानसभा निवडणूक झाली. निकोप निवडणूक हाच लोकशाहीचा पाया ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणूक होऊन आता बराच कालावधी झाला आहे. पण त्यानंतरही मतदार याद्यांचे पुनर्विलोकन करण्यात आले नाही. त्यात दुरुस्ती करण्यात आली नाही. ही केंद्राची जबाबदारी होती. पण त्यांनी ते केले नाही. राज्य निवडणूक आयोग या प्रकरणी आमचा संबंध नसल्याचा दावा करते. त्यामुळे याच चुकीच्या याद्यांवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असतील तर ते पूर्णतः अयोग्य आहे. हे निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा देशपातळीवर मांडला आहे. निकोप निवडणूक हा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. हा पायाच उद्ध्वस्त करण्याचे काम सध्या केले जात आहे. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आमचा आरोप आहे, असेही थोरात यावेळी म्हणाले. हे ही वाचा... एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क:जयंत पाटील यांचा दावा; निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा आरोप मुंबई - महाराष्ट्रात एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. वाचा सविस्तर
आमच्यावर लोकशाहीच्या नावाने जर हुकूमशाही गाजवणार असतील तर ती आम्ही काही गाजवू देणार नाही.आम्ही दोन्ही आयुक्तांची काल भेट घेतली राज्य निवडणूक आयुक्त केंद्राकडे बोट दाखवतात तर केंद्राचे राज्य निवडणूक आयोगाकडे नेमकी याची जबाबदारी कुणाची आहे, यांचा बाप कोण आहे? का केवळ निवडणूक घ्यायची म्हणून घ्यायची,असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करत असताना निवडणुका जाहीर करुण टाकल्या.आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले आहे की मतदार यादीमधील घोळ सुधारत नाही तो पर्यत निवडणुका होता कामा नये. सर्वोच्च न्यायालय कधीच म्हणणार नाही की काही दोष असेल तरीही निवडणूक घ्या म्हणून. सत्ताधाऱ्यांच्या चोर वाटा आम्ही आता अडवल्या आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ..तर आम्ही तसे होऊ देणार नाही उद्धव ठाकरे म्हणाले की, जे मतदार आहेत पण त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला त्यांच्यावर सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. मुंबई मनपाच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट ठेवणार नाही म्हणजे काहीच पुरावे हे ठेवणार नाही. तिथले जर सीसीटीव्ही फुटेज मागितले तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचे नाही. मतदार याद्यांमध्ये घोळ घालून ठेवायचा. लोकशाही जर हुकूमशाहीच्या पद्धतीने चालवणार असाल तर आम्ही तसे होऊ देणार नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र लोकशाहीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही सर्व जण एकत्र येत असताना भाजपला देखील पत्र दिले होते पण निवडणूक आयुक्तांच्या भेटीसाठी भाजपकडून कोणीही आले नाही, हा विषय गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून सर्वांच्या लक्षात आला आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मतदार याद्यांसोबत खेळ सुरू उद्धव ठाकरे म्हणाले की, 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या 1 महिन्यापूर्वी आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र लिहले होते. भाजपचे लोकं मतदार यादीशी खेळत आहेत त्यांना हवे त्यांची नावे ॲड करत आहेत आणि नको असलेली नावे काढून टाकत आहेत. हा सर्व खेळ भाजपचा सुरू आहे. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहे, ही यादी आम्ही काही घरी तयार केली नाही. ..सिलेक्शन करत मोकळे व्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, एकाच व्यक्तीचे नाव 4 ठिकाणच्या मतदार यादीमध्ये आहे. एकाच ठिकाणी 200 मतदार दाखवण्यात आले आहेत. निवडणूक ही निःपक्षपाती घ्यायची असेल तरी घ्या नाही तर निवडणुकीपेक्षा सिलेक्शन करत मोकळे व्हा..निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलताना लक्षात आले की यांच्याकडे आयुक्त म्हणूनकाही अधिकार आहेत का आम्ही केवळ नामधारी लोकांशी बोलत आहोत. ..तर सुमोटो दाखल करा उद्धव ठाकरे म्हणाले की, 1 जुलै नंतर ज्यांना 18 वर्षे पूर्ण झाली असतील त्यांना मतदानाचा हक्क नाह हा कुठला अधिकार आहे.हे सर्व पाहिले की वाटतं ज्या प्रमाणे काही पक्षी, प्राण्याच्या केसेस सुमोटो घेतल्या होत्या, त्यांनी देशातील मनुष्य प्राण्याच्या केस घेतल्या पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचे कर्तव्य करत आहोत, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जात आहोत पण आम्हाला काही दाद दिली जात नाही.
महाराष्ट्रात एकेका मतदाराला 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरेच कुणीतरी ऑपरेट करत असल्याचा संशय आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी वरील आरोप केला. ते म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना आम्ही एक निवेदन दिले. त्याद्वारे त्यांना महाराष्ट्रातील मतदारयाद्यांमधील अनेक चुका दाखवल्या. त्यावर त्यांनी सीओ यांनी आम्हाला हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे मांडण्याची ग्वाही दिली. तसेच या याद्या दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकरक सुरू करण्याचे आश्वासनही दिले. आम्ही निवडणूक आयोगाला काही महत्त्वाचे पुरावे दाखवले. त्या पुराव्याच्या सहीत आम्ही त्यांना काही माहिती दिली. याशिवाय आम्ही एक पत्रही त्यांना दिले आहे. त्यात मतदार यादीमधील मतदारांचे पत्ते अपूर्ण, घर क्रमांक चुकीचे आहेत. तसेच संबंधित व्यक्तीचा मतदार यादीत पत्ता व प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात फरक असल्याचेही आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले आहे. एका घरात शेकडो मतदार राहत असल्याचे पुरावे दिले जयंत पाटील म्हणाले, मी मतदार यादीतील घोटाळ्याची निवडणूक आयोगाला काही उदाहरणे दिली. मुरबाड मतदारसंघातील बुथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचे एक घर आहे. यांच्या घरापुढे घर नंबर 400 नमूद करण्यात आला आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघातील बुथ नंबर 218 येथील 0 क्रमांकाच्या घरामध्ये 450 मतदार राहतात. कामठी विधानसभेतही 867 मतदारांचे घर निरंक आहे. म्हणजे त्यांच्या घराला क्रमांकच नाही. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेत. म्हणजे एका व्यक्तीला 2-2, 4-4, 5-5 व 8-8 वेळा मतदानाचा हक्क देण्यात आलेला आहे. इपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपली खात्री होती. पण मतदार याद्यांत अनेक इपिक नंबरचे मतदार असल्याचे निष्पन्न झाले. आम्ही ही बाब आयोगाच्या निदर्शनास आणून दिली. निवडणूक आयोगाचे सर्व्हर दुसरेच कुणीतरी वापरत असल्याचा संशय ते पुढे म्हणाले, नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव 6 वेळा नोंदवण्यात आले आहे. तिचे 6 इपिक क्रमांक आहेत. माध्यमांनी पुराव्यासह हे दाखवले आहे. त्यानंतर काही तासांतच हे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. आमचा प्रश्न हा आहे की, दुपारी 3 वाजता एक बातमी येते आणि सायंकाळी 6 वा. या महिलेचे नाव वगळले जाते. ही नावे कुणी वगळली? त्याची तक्रार कुणी केली? तक्रार कधी करण्यात आली व कुणी स्थळ पाहणी केली, हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचे व्हेरिफिकेशन करण्याच्या आत तिचे नाव कुणी वगळले? आमचा दावा असा आहे की, राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्व्हर महाराष्ट्रात दुसरे कुणीतरीच चालवत असल्याचा आमचा समज आहे. दुसरा कुणीतरीच परस्पर या मतदार याद्यांत नाव घालतो. मतदार याद्या उघड झाल्या की नावे काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक असो, त्यांच्या हातात काहीच नाही. कुणीतरी बाहेरूनच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे, असे जयंत पाटील म्हणाले. विधानसभेच्या मतदारयाद्या वापरल्या तर घोळ असाच पुढे जाईल ते पुढे म्हणाले, मतदार याद्यांमध्ये एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी करण्यात आल्या आहेत. आत्ता मध्य विधानसभा नाशिक मतदारसंघात घर क्रमांक 3,829 या घरात 813 मतदारांची नोंद आहे. पुढे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बुथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर तासाला मतदानाची टक्केवारी जाहीर होते. किती पुरुषांनी व महिलांनी मतदान केले हे दर तासांनी जाहीर होते. विधानसभेला ही व्यवस्था पूर्णपणे फोडण्यात आली. सायंकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केले हे केव्हाच जाहीर करण्यात आली. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली. हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. आम्ही विधानसभेला ज्या मतदारयाद्या पाहिल्या त्याच मतदारयाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरल्या तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे राहण्याची भीती आहे. त्यामुळे आम्ही आयोगाला या मतदारयाद्या तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली, असे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
भूपतीसह ६० नक्षलवाद्यांची शरणागती
गडचिरोली : प्रतिनिधी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा कणा मोडण्यात मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठे यश आले आहे. कारण, बुधवारी (१५ऑक्टोबर) नक्षली इतिहासातील सर्वात मोठे आत्मसमर्पण झाले आहे. कारण, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपतीने त्याच्या तब्बल ५० हुन अधिक सहका-यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. हे गडचिरोली पोलिस आणि महाराष्ट्राच्या […] The post भूपतीसह ६० नक्षलवाद्यांची शरणागती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘कार्तिकी’महापूजेचे मंदिर समितीकडून शिंदेंना निमंत्रण
पंढरपूर : प्रतिनिधी कार्तिकी एकादशीला विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याच्या मान राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना देण्यात येत असतो. मात्र राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री असल्याने यंदाची महापूजा नेमकी कोणाच्या हस्ते करायची याचा पेच निर्माण झाला होता. मात्र यावर निर्णय घेत यंदाच्या महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आषाढी एकादशी नंतर येत असलेल्या […] The post ‘कार्तिकी’महापूजेचे मंदिर समितीकडून शिंदेंना निमंत्रण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
के-वायसीमुळे ११ लाख शेतक-यांची दिवाळी कडू
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थितीमुळे अनेक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. घरात पाणी घुसले, गोठ्यांत पाणी घुसले, शेतीचे खूप जास्त नुकसान झाले आहे. या शेतक-यांसाठी सरकारने मदत जाहीर केली आहे. दरम्यान, यासाठी आधी पाहणी केली जाणार आहे. शेतीची केवायसी केली जाणार त्यानंतरच आर्थिक मदत […] The post के-वायसीमुळे ११ लाख शेतक-यांची दिवाळी कडू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘तू बोल ना’ या नव्या नावासह प्रदर्शित होणार ‘मना’चे श्लोक’
मुंबई : वृत्तसंस्था ‘तू बोल ना’ नव्या नावासह मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटावरून मोठा वाद सुरू झाला. अनेक ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्याचे शो बंद पाडण्यात आले. यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन नावासह चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. वादानंतर आता या चित्रपटाचे नाव बदलून ‘तू बोल ना’ […] The post ‘तू बोल ना’ या नव्या नावासह प्रदर्शित होणार ‘मना’चे श्लोक’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), शेकापसह इतर पक्षांच्या नेत्यांनी आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बैठकीत ठाकरे बंधुंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची कोंडी केली. विशेषतः मतदार यादीतील गोंधळावरून आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळासमोर बोलती बंद झाल्याचे दिसून आले. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला सुनावले की, 'सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका. तुम्ही सत्तेतील तीन पक्षांसाठी काम करत नाही,' असे ते म्हणाले. 'आमचं-तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच आहे. राजकीय पक्षांचे समाधान झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नका,' अशी मागणी करत त्यांनी निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. सत्य स्वीकारा अन् निवडणुका रद्द करा यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला 'सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा,' असे सांगितले. VVPAT वापरले नाही, तर सर्व पुरावे नष्ट होतील, असा गंभीर आरोप त्यांनी केला. 'निवडणूक आयोग काही हरिश्चंद्र नाही. VVPAT नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या,' अशी मागणी त्यांनी केली. जास्त दिवस लागतील तर लागू दे, बॅलेटवर निवडणूक घ्या यानंतर राज ठाकरे म्हणाले की, 'बॅलेटवर निवडणूक घेतल्यास जास्त दिवस लागत असतील तर लागू देत. निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याव्यतिरिक्त काय काम आहे?' असा थेट सवाल त्यांनी केला. 'पाच वर्षे निवडणूक घेतली नाही, अजून सहा महिने निवडणूक घेऊ नका. तुम्ही राजकीय पक्षांसाठी, सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचे दिसते,' असा गंभीर आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे यांनी यावेळी बाळासाहेब थोरात यांचे उदाहरण दिले की, थोरात आठ वेळा 80 ते 90 हजार मतांनी निवडून येतात, पण यावेळी लाखाने कसे पडले? हे कसे शक्य आहे, असा सवाल केला. या प्रश्नावर निवडणूक आयोगाचे अधिकारी निरुत्तर झाले. 'मतदार यादीत घोळ असेल तर सुप्रीम कोर्टाला तयारी नसल्याचे सांगा आणि निवडणूक पुढे ढकला,' असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे काय म्हणाले? यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच झापले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणतात की काही जबाबदारी आमच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतं आमच्याकडे नाही. आम्ही कुणाशी बोलू? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. इलेक्शन फॉर सिलेक्शन करून टाका - उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला झापताना म्हटले की, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणतात की काही जबाबदारी त्यांच्याकडे नाही, राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमच्याकडे नाही. 'आम्ही कुणाशी बोलू?' असा संताप त्यांनी व्यक्त केला. 'जर त्रुटींसह निवडणुका घ्यायच्या असतील, तर कशाला घेता? त्यापेक्षा थेट 'ठराविक लोकांसाठी घेतलेली निवडणूक' असे जाहीर करून टाका,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले. आव्हाड-थोरातांचीही आयोगाकडे तक्रार या बैठकीत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मतदार यादीतील गोंधळावर अनेक मुद्दे मांडले. बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणुकीदरम्यान सांगितलेल्या त्रुटींवर काम झाले नाही, आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबतही अनेक तक्रारी आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी दुबार मतदारांवर बोट ठेवत, 'तुमची यंत्रणा सज्ज नाही,' अशी तक्रार केली.
मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट EVM मशीन देणं जर निवडणूक आयोगाला शक्य नसेल तर काल आम्ही सर्वांनी जी मागणी केली बॅलेट पेपरवर निवडणूका घ्या त्याला का घाबरत आहात तुम्ही असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईमध्ये तरी बॅलेटवर निवडणुका घेतल्या पाहिजे. मी तर म्हणेल की संपूर्ण महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत. संजय राऊत म्हणाले की,यापूर्वी महाराष्ट्रात एकास एक निवडणूक झाली आहे. कशाला पाहिजे पॅनल सिस्टिम हे भाजप वाल्यांनी निवडणुकीत घोळ करण्याचे फॅड आणले आहे. एकाच भागात 4 नगरसेवक लोकांनी जायचे कुणाकडे. नाशिक, ठाण्यात एकाच भागाला 4 नगरसेवक हा बकवास पणा आहे. निवडणूक ही एकास एक असते. मुंबईमध्ये जशी एकास एक निवडणूक आहे तशी जर संपूर्ण महाराष्ट्रात झाली तर यांचा पराभव होईल. पॅनल सिस्टिम? हा बकवास आहे. पैठणमध्ये 56 बोगस मतदार संजय राऊत म्हणाले की, 20 हजार मतदार मी बाहेरुन आणले असे मिंधे गटाचा निवडून आलेला आमदार सांगतो आहे.याची दखल घ्यायला नको का? आमची लढाई तिथे सुरू आहे. पैठण मतदारसंघात 56 हजार मतदान बोगस आणि बाहेरुन आणण्यात आले आहे. आमदारांनी 20 हजारांचा आकडा दिला आहे. शिंदे, फडणवीसांकडे दुर्लक्ष करा संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी काहीही केलेले नाही. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. फडणवीसांना महाराष्ट्रातील 25 वर्षे खासदार असलेला माणूस माहिती नसेल तर त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री जर ही बकवास-गिरी करत असेल तर त्यांची मानसिकता काय हे समजूनघ्या. उद्या आम्हीही म्हणू मोदी कोण? आम्ही तुमच्या छाताडावर बसणार हे लक्षात ठेवा. बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीत 51 टक्के मते मिळणार हे सांगितले आहे. याचा अर्थ त्यांनी तितका घोटाळा केला आहे. नाही तर हा आकडा आणला कुठून असा सवाल राऊत यांनी केला आहे. अजून निवडणूक घोषित व्हायच्या आहेत आम्ही बोललो की मग आमच्यावर टीका करतात. निवडणूक आयोग भाजपचे बटीक संजय राऊत म्हणाले की, आम्ही मुंबईतील वार्डावार्डातील आकडे दाखवत आहोत. आम्ही दिवसभर मतदारयाद्यांवर काम करत आहोत राजकीय कार्यकर्ते तुम्हाला काय मुर्ख वाटत आहे का? निवडणूक आयोगाकडे काय यंत्रणा आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. तर निवडणूक आयोग भाजपची यंत्रणा वापरत आहे. ते भाजपचे बटीक झाले आहे.
महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेल्या दंडकारण्याच्या घनदाट जंगलात दशकानुदशके सुरु असलेल्या नक्षलवादाच्या लढ्याला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. या चळवळीचा प्रमुख चेहरा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) संघटनेचा पोलिट ब्युरो सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने अखेर शांततेचा मार्ग स्वीकारत आत्मसमर्पण केले आहे. त्याच्यासोबत 60 सशस्त्र नक्षलवाद्यांनीही शस्त्र खाली ठेवली आहेत. गडचिरोली येथे आयोजित एका समारंभात भूपतीने आपली एके-47 रायफल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली. त्याच्यासोबत जवळपास 60 नक्षलवाद्यांनी आपली शस्त्रे टाकली आहेत. त्यामुळे हा माओवादी चळवळीला बसलेला एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना देशात समता ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच अस्तित्वात येणे शक्य असल्याचे ठणकावून सांगितले. मात्र, आत्मसमर्पण करणारा हा भूमती नेमका कोण होता? त्याच्या आत्मसमर्पणाला इतके महत्त्व का आहे? त्याचा नक्षलवाद्यांवर काय परिणाम होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या वृत्तात पाहणार आहोत... नक्षलवादाच्या रक्तरंजित इतिहासातील अखेरचा अध्याय भूपती कोण? मल्लोजुला वेणुगोपाल हा मूळचा आंध्र प्रदेशातील करिमनगर जिल्ह्याचा रहिवासी. शिक्षणाने बीकॉम पदवीधर असलेला भूपती विद्यार्थीदशेतच डाव्या विचारसरणीकडे आकर्षित झाला. सामाजिक विषमता, जमीनवाटपातील अन्याय, आदिवासींचे शोषण या मुद्द्यांवर तो तीव्रपणे बोलू लागला. याच काळात त्याचा संपर्क नक्षल चळवळीशी आला आणि त्याने शहरी जीवनाचा निरोप घेत जंगलाकडे वळले. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला तो पीपल्स वॉर ग्रुप (PWG) या संघटनेत सामील झाला. नंतर ही संघटना ‘माओवादी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. भूपतीने आपल्या तीक्ष्ण बुद्धी, संघटन कौशल्य आणि रणनितीमुळे लवकरच वरिष्ठ नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. काही वर्षांतच तो मध्य भारतातील नक्षलवाद्यांच्या ‘माड डिव्हिजन’चा मार्गदर्शक बनला. रणनितीचा मास्टरमाइंड भूपती हा नक्षलवादी संघटनेतील रणनितीकार आणि विचारवंत नेता म्हणून प्रसिद्ध होता. तो थेट हल्ल्यांपेक्षा दीर्घकालीन मोहीम, ग्रामीण भागात संघटन उभारणी आणि आदिवासी समाजात माओवादाचे बीज रोवण्यावर भर देत असे. गडचिरोली, छत्तीसगड, ओडिशा आणि तेलंगणामध्ये नक्षलवादी हालचाली अधिक प्रभावी करण्यासाठी त्याने अनेक गुप्त मोहीमा आखल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, 2019 मधील जमबिया घात, 2013 चा दरभा हल्ला, तसेच महाराष्ट्रातील एट्टापल्ली आणि भामरागड परिसरातील अनेक चकमकी या भूपतीच्या देखरेखीखाली झाल्या होत्या. या कारवायांमध्ये अनेक जवानांनी शौर्य दाखवत प्राण गमावले होते. भूपतीवर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा अशा पाच राज्यांत मिळून दहा कोटींपेक्षा जास्त बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो केंद्र समितीचा सदस्य आणि पॉलिट ब्युरोमधील वरिष्ठ नेता होता. संघटनेत त्याला सेंट्रल मिलिटरी कमिशनचा सल्लागार म्हणूनही ओळखले जात असे. आतला संघर्ष आणि विचारांचा बदल गेल्या काही वर्षांपासून भूपती आणि इतर वरिष्ठ नेते यांच्यात मतभेद वाढले होते. माओवादी संघटनेच्या जुन्या पद्धती, म्हणजेच सशस्त्र संघर्ष, जंगलात टिकून राहणे, हल्ल्यांद्वारे भय निर्माण करणे, या मार्गावर त्याचा आता विश्वास उरला नव्हता. भूपतीचा दावा होता की, लोकांचा पाठिंबा आता कमी होत आहे. शेकडो सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हत्यारांच्या जोरावर क्रांती शक्य नाही. त्याने शांतता आणि संवादाच्या माध्यमातून संघर्ष सोडवण्याची भूमिका घेतली होती. त्याची पत्नी तारका या, दंडकारण्य विशेष क्षेत्रीय समितीची सदस्य होती. तिने या वर्षाच्या सुरुवातीला आत्मसमर्पण करून नवा मार्ग स्वीकारला. तिच्या या निर्णयानंतर भूपतीवरही अंतर्मनातून परिणाम झाला, असे सूत्र सांगतात. संघटनेतली फूट आणि दबाव भूपतीच्या शांततेच्या भूमिकेला संघटनेतील महासचिव थिप्पारी तिरुपती उर्फ देवजी आणि इतर नेत्यांनी तीव्र विरोध केला. देवजी गटाने लढा सुरूच राहील, असा आदेश दिला. मात्र, भूपतीच्या बाजूने काही स्थानिक कमांडर उभे राहिले. या वादातून संघटनेत अंतर्गत संघर्ष वाढला आणि अखेर केंद्रीय समितीने भूपतीला बाजूला केले. या अंतर्गत संघर्षानंतर त्याने स्वतःहून संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यांपूर्वी त्याने आपल्या सहकाऱ्यांसमोर एक पत्रक वाचून दाखवले. जनतेला आता संघर्ष नकोय, त्यांना विकास हवा आहे. शेकडो सहकाऱ्यांनी जीव दिला, पण लक्ष्य साध्य झाले नाही. म्हणून शस्त्र नव्हे, संवाद हाच पुढचा मार्ग असल्याचे त्याने म्हटले होते. गडचिरोलीत आत्मसमर्पणाचा क्षण 15 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूपतीने आणि त्याच्या 60 सहकाऱ्यांनी शस्त्र खाली ठेवली. पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह गृह विभागाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. भूपतीच्या आत्मसमर्पणाने केवळ महाराष्ट्र नव्हे, तर संपूर्ण मध्य भारतातील नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. भूपतीच्या आत्मसमर्पणाचे महत्त्व गेल्या 20 वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात तब्बल 700 हून अधिक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. परंतु भूपतीचे आत्मसमर्पण हे सर्वांत महत्त्वाचे मानले जाते, कारण तो संघटनेच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळाचा सदस्य होता. भूपतीच्या शरणागतीनंतर नक्षल चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संघटनेचा पुरवठा मार्ग, भरती व्यवस्था आणि जनसंपर्क मोहीम यांवर त्याचे नियंत्रण होते. त्याच्या गैरहजेरीत माओवादी संघटना विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहरी माओवादावर लक्ष भूपतीसारखे सशस्त्र नेते शरण येत असले तरी, शहरी भागात कार्यरत असलेल्या तथाकथित बुद्धिजीवी माओवादी गटांवर सरकारचे लक्ष केंद्रीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट इशारा दिला आहे की, शस्त्रधारी माओवादी संपतायत, पण शहरी माओवादी अजून सक्रिय आहेत. त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. एक अध्याय संपला, नवा प्रारंभ? दंडकारण्याच्या जंगलात चार दशके टिकून राहिलेला नक्षलवाद आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे भूपतीच्या आत्मसमर्पणाने स्पष्ट झाले आहे. आदिवासींच्या नावाखाली हिंसाचाराचे जे राजकारण उभारले गेले, त्यावर अखेर शांततेचा शिक्का बसला आहे. भूपतीचा प्रवास हा एका विचारसरणीचा पराभव नसून, बदलत्या काळाचा स्वीकार आहे. त्याने उचललेले शस्त्र आता खाली ठेवलेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करत यामुळे लोकशाहीचा मूळ पायाच हादरल्याचा दावा केला आहे. काही ठिकाणी मतदारांची संशयास्पद वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी हजारो मतदारांची नावेच गायब करण्यात आली आहेत, असे ते आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ म्हणालेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले, मतदार यादीतील घोटाळे आणि “National Electoral Roll Purification 2026” चे खरे वास्तव. लोकशाहीचा पाया म्हणजे - शुद्ध, अचूक आणि पारदर्शक मतदार यादी. पण आज हा पाया हादरला आहे. मागील काही निवडणुकांच्या मतदार याद्यांकडे नीट पाहिल्यास एक धक्कादायक वास्तव समोर येते. ते म्हणजे, काही ठिकाणी मतदारसंख्या संशयास्पदरीत्या वाढली, तर काही ठिकाणी हजारो मतदारांची नावे गायब झाली. “National Electoral Roll Purification 2026” - नाव मोठं, पण काम शून्य. मुख्य निवडणूक आयोगाकडे आधुनिक Data-Matching Systems, AI आधारित Tools, आणि Digital Apps उपलब्ध आहेत. तरीही 2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये अपूर्ण तपासणी, मनमानी वगळणी आणि राजकीय हस्तक्षेपाचे स्पष्ट पुरावे दिसले, असे ते म्हणाले. मतदार याद्यांत फार दूषित झाल्या आव्हाड पुढे म्हणाले, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये तर ARO अधिकाऱ्यांना आयोगाने दिलेलं अधिकृत Application वापरण्याची परवानगीच दिली नाही. म्हणजेच “Purification” च्या नावाखाली फक्त कागदोपत्री स्वच्छता झाली. वास्तवात मतदारयादी आणखीनच दूषित झाली आहे. याचा खरा उद्देश काय असावा? ‘National Electoral Roll Purification 2026’ चं मूळ उद्दिष्ट असावं - मृत, स्थलांतरित व दुहेरी नावे वगळणे, घरोघरी पडताळणी करणे, BLO / ARO यांना डिजिटल पद्धतीने जबाबदार धरणे. पण आज वास्तव उलट आहे. तंत्रज्ञान असूनही डेटा पारदर्शक नाही. नागरिकांचा सहभाग शून्य आणि आयोगाची जबाबदारी कागदावरच सीमित आहेत. त्यामुळे आम्ही 2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा मतदारयादीतील वाढ व घट याची अधिकृत आकडेवारी तात्काळ जाहीर करा, प्रत्येक जिल्ह्याचा “Additions / Deletions” अहवाल सार्वजनिकपणे उपलब्ध करा, सर्व ARO/BLO यांना वापरलेले Apps आणि त्यांचा डेटा तपासणीसाठी सार्वजनिक करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी संपूर्ण यादी नागरिक पडताळणीसाठी खुली करा, अशा मागण्या केल्या आहेत. पारदर्शक मतदार यादी हीच लोकशाहीची हमी ही लढाई राजकीय नाही. ही लढाई लोकशाहीच्या आत्म्याची आहे. मतदार यादी शुद्ध नसेल, तर कोणतीही निवडणूक शुद्ध राहू शकत नाही. आज पारदर्शक मतदार यादी हीच खरी लोकशाहीची हमी आहे, असेही जितेंद्र आव्हाड आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत.
अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया नामक पीकविमा कंपनीने सदोष वजन काटे वापरून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या कंपनीने पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पीकविमा मिळू नये म्हणून हा प्रकार केला. या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी रात्रभर पालम तहसील कार्यालयात रात्रभर ठिय्या आंदोलन केले होते. यासंबंधीच्या माहितीनुसार, ग्रामस्तरीय विमा समितीने पालम तालुक्यातील खरब धानोरा येथील 44/2 शिवारात खरीप हंगामातील सोयाबीन पीक कापणी प्रयोग केला. यावेळी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे प्रतिनिधी अनिकेत शेरे (31) व रत्नदीप भालेराव (34), खराब धानोरा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी अच्युत भालेराव व ग्रामस्तरीय विमा समितीचे सदस्य भास्कर कऱ्हाळे उपस्थित होते. 5 किलो सोयाबीन भरले 3 किलो या प्रयोगानंतर ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत शेरे, रत्नदीप भालेराव यांनी सोयाबीनचे वजन केले. ते 5 किलो भरले. या वजनावर ग्रामसदस्यीय विमा समितीचे सदस्य भास्कर बालासाहेब कऱ्हाळे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी अच्युत भालेराव यांनी गावातील किराणा दुकानातून वजन काटा आणून पुन्हा हे सोयाबीन मोजले. त्यानंतर हे सोयाबीन केवळ 3 किलोच भरले. त्यामुळे संबंधित वीमा कंपनीच्या प्रतिनिधींचा वजन काटा व गावातील किराणा दुकानातील वजनकाटा यात मोठी तफावत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे भास्कर कऱ्हाळे यांनी तालुस्तरीय वीमा समितीकडे सदर वीमा कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. वजनी मापे निरीक्षकांच्या अहवालानुसार कारवाई त्यानंतर तालुकास्तरीय वीमा समितीचे अध्यक्ष तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, गटविकास अधिकारी उदयसिंह सिसोदे व समितीचे सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी संतोष भालेरावर यांनी या तक्रारीची शहानिशा केली. त्यातही मापात पाप झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वजनीन मापे निरीक्षक संजय धुमाळ यांनीही वीमा कंपनीच्या काट्यांची तांत्रिक तपासणी केली. त्यातही त्यात 1 किलो 977 ग्रॅम एवढी तफावत असल्याचे समोर आले. तसा अहवाल वजनी मापे निरीक्षक संजय धुमाळ यांनी तालुकास्तरीय विमा समितीला सादर केला. या अहवालाच्या आधारावर ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीने सदोष वजनी मापाच्या आधारे ग्रामस्तरीय विमा समितीची दिशाभूल केली. शेतकऱ्यांना पीकविमा मिळू नये यासाठी बेकायदेशीर प्रयत्न केला आणि सदोष वजनी मापांच्या आधारे सोयाबीन कापणी प्रयोगातील वजनात वाढ घडवून आणल्या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांच्या फिर्यादीवरून पालम पोलिसांत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा तहसीलमध्ये रात्रभर ठिय्या सरासरी उत्पन्न ठरवण्याच्या पीक कापणी प्रयोगाची प्रक्रिया सुरू असताना वजनमापात खोट केल्याचे उघड झाले. कंपनीच्या प्रतिनिधींना घेऊन शेतकऱ्यांनी पालम पोलिस ठाणे गाठले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. नंतर शेतकऱ्यांनी त्यांचा मुक्काम तहसील कार्यालयात हलवला. रात्रभर शेतकरी तहसीलमध्येच होते. पीक विमा प्रश्नावर संघर्ष करणारे सुभाष कदम, गोविंद लांडगे, भगवानराव करंजे, मोतीराम शिंदे, दिनाजीराव कराळे आदीसह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.
मतपत्रिका, मतदार यादी आणि प्रभाग रचना यासारख्या निवडणूक आयोगाच्या अधिकाराच्या बाहेरच्या मागण्या करून मविआने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केवळ गोंधळ घातला. इतकेच नव्हे, तर या नेत्यांना निवडणूक प्रक्रियेचेही नीट ज्ञान नाही, कायदेशीर कुवत नाही, आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही, असे म्हणत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मविआने निवडणूक आयुक्तांच्या घेतलेल्या भेटीवर निशाणा साधला आहे. मविआच्या शिष्टमंडळाने काल निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे देखील मविआच्या नेत्यांसोबत दिसून आले. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली जात आहे.यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका केली आहे. मविआकडे विषय समजून घेण्याची कुवत नाही भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, आपण नेमकं कशासाठी जातोय…त्यासाठी नेमकं कुणाकडे जायला हवं, याचं साधं आकलन नाही…विषय समजून घेण्याची कुवत नाही…कोणता विषय कोणाकडे न्यावा याचे भान नाही…कायदेशीर बाबींचे ज्ञान नाही…‘झगामगा मला बघा’ यापलीकडे पोच नाही …आणि म्हणूनच जनतेचा विश्वास नाही… मविआने गोंधळ घातला केशव उपाध्ये म्हणाले की,बहु सदस्यीय प्रभाग रद्द करा, मतपत्रिकेवर मतदान घ्या आणि मतदार याद्यांमध्ये बदल करा, अशा राज्य निवडणूक आयोगाला, निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकारच नसलेल्या मागण्या करून शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गोंधळ घातला त्याचे वर्णन नेमके याच शब्दात करावे लागते!! ही राजकीय अपरिहार्यता उपाध्ये म्हणाले की, राज ठाकरे यांचं ठीक आहे.उद्धव ठाकरेंना तर प्रशासन कशाशी खातात तेही माहीत नाही, पण शरद पवार, बाळासाहेब थोरांतासारखे ज्येष्ठ व प्रशासनाची माहिती असलेली अनुभवी नेतेमंडळी अशा शिष्टमंडळात फरफटत जातात, ही राजकीय अपरिहार्यता की अपयशामुळे येणारी अगतिकता?… भाजपच्या बॉसला 11 वर्षात एकही प्रेस घेता अली नाही! का? केशव उपाध्ये यांच्या Xवरील पोस्टवर उत्तर देताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, विरोधकांनी तुमची निवडणुकांतील शस्त्र जनतेपुढे उघड केली याचा जळफळाट व्यक्त करण्यासाठी एवढा मोठा निबंध? वा..!आपली आग क्षमवण्यास एवढं लिहायची गरज ती काय? थोडं बरनॉल वापरलं असतं तरी झालं असतं. प्रश्न आमचे आहेत, उत्तरे कुठून घ्यायची हे पण आम्ही पाहू. पण अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री हिंदुस्थानात येऊन आठवड्यात दोन-दोन पत्रकार परिषद घेतात. भाजपच्या बॉसला 11 वर्षात एकही प्रेस घेता अली नाही! का? प्रवक्ते म्हणून याचे उत्तर द्या! असे दानवे यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्याच्या मागणीवरून राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. स्वीकृत सदस्यत्वाच्या 'गाजरा'मुळे महायुतीत हाणामारी होऊन तडे जाऊ नयेत, असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. स्वीकृत सदस्य नेमणुकीच्या निर्णयामागे त्यांनी महायुतीचे अंतर्गत राजकारण आणि निवडणुकीतील भीती असल्याचे पवारांनी पोस्ट करत म्हटलं आहे. रोहित पवारांची पोस्ट काय? आमदार रोहित पवार म्हणाले की, निवडणुकीत जास्त यश मिळणार नाही याचा अंदाज आल्यानेच, तसेच महायुतीत सुरु असलेल्या शीतयुद्धामुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज होऊन बंडखोरी करू नयेत म्हणून स्वीकृत सदस्यत्वाचे गाजर दाखवता यावे यासाठी जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्य घेण्याचा निर्णय सरकार घेत असावे. तिन्ही पक्षात हाणामाऱ्या नको! स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, असो, लोकशाहीला तडे देण्याचा प्रयत्न करतच आहात तर मग स्वीकृत सदस्य नेमणुकीवरून तिन्ही पक्षातच हाणामाऱ्या होऊन महायुतीला तडे जाऊ नयेत म्हणजे झाले, असा टोला पवारांनी लगावला आहे. बावनकुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या या निर्णयाची मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करून जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीमध्ये 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्याची विनंती त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला पुढील कार्यवाहीसाठी सूचना दिल्या आहेत. यापूर्वी नगरपालिका आणि महापालिकांमध्ये संख्याबळाच्या आधारे स्वीकृत सदस्य घेतले जात होते. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत हा नियम लागू झाल्यास अनेक नाराज कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते, परंतु यामुळे महायुतीच्या जागावाटपाचा आणि अंतर्गत राजकारणाचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
माओवादी संघटनेच्या पॉलिट ब्यूरोचा सदस्य असणाऱ्या मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने बुधवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. गडचिरोली येथे आयोजित एका समारंभात त्याने आपली एके-47 रायफल मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केली. त्याच्यासोबत जवळपास 60 नक्षलवाद्यांनी आपली शस्त्रे टाकली आहेत. त्यामुळे हा माओवादी चळवळीला बसलेला एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना देशात समता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच अस्तित्वात येणे शक्य असल्याचे ठणकावून सांगितले. मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने सोमवारी रात्री उशिरा गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याच्यासोबत जवळपास 60 नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे शस्त्र टाकली होती. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना भारतीय संविधानाची भेट देत त्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात स्वागत केले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या गडचिरोली जिल्ह्याने मागील 40 वर्षांहून अधिक काळापर्यंत माओवादाचा सामना केला. सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली हा भाग माओवादाने ग्रसित होता. त्यात विशेषतः गडचिरोली हा सीमावर्ती भाग फारच पिडलेला होता. भूपतीचे आत्मसमर्पण एक मोठे यश या जिल्ह्याला तेलंगणा, छत्तीसगड आणि ओडिशा आदी इतर माओवादी भाग जोडलेला होता. हा भाग विकासापासून वंचित राहिला. ज्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्या पीपल्स वॉर ग्रुप तयार केला. त्यानंतर तेव्हाचा आंध्रप्रदेश व गडचिरोलीचा भाग यात मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले. त्यातून इथल्या तरुणांच्या डोक्यात व्यवस्थेविरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला. भारतीय संविधानाच्या चौकटीत आपल्याला न्याय मिळू शकणार नाही. त्यामुळे या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उलथवून टाकली पाहिजे. जंगलातून राज्य चालवून एक नवी व्यवस्था आपण तयार करू, अशा प्रकारचे स्वप्न त्यावेळी दाखवण्यात आले. अनेक तरुण या स्वप्नाला भुलले. या व्यवस्थेतून समता प्रस्थापित होईल असे त्यांना वाटले होते. पण ही समता केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातूनच येऊ शकते याची कल्पना त्यांना नव्हती. आमचे अनेक तरुण व आदिवासी समाजाच्या युवक व युवती या माओवादी चळवळीच्या नादी लागले. हाती बंदुका आल्या. मोठी स्वप्ने होती. पण हळूहळू सगळ्या स्वप्नांचा खरा चेहरा हा समोर यायला लागला, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, आज आपण सोनू उर्फ भूपती यांचे आत्मसमर्पण आपण घेतले आहे. हे आत्मसमर्पण यासाठी महत्त्वाचे आहे की, ते पॉलिट ब्यूरो सेंट्रल समितीचे सदस्य आहेत. पण 40 वर्षांपूर्वी ज्यावेळी याठिकाणी अहेरी, सिरोंचा या भागात नवीन दलम सुरू झाले, त्यावेळी त्या दलमची सुरुवात करणारे, त्याला बौद्धिक व सर्व प्रकारचे लॉजिस्टिक देणारे हे भूपती होते. त्यांचे बंधू हे देखील त्याच्यात होते. मग हळूहळू तेरीमेली दलम असेल, चामुर्शी दलम असेल, टिपागड दलम असेल, असा विस्तार होत गेला. त्यांच्या नेतृत्वात एक फार मोठी सेना त्यांच्या नेतृत्वात उभी राहिली. माओवादाच्या उच्चाटनासाठी ट्विन्स स्ट्रॅटेजी ते पुढे म्हणाले, आताच्या तेलंगणाचा काही भाग, आपल्या गडचिरोलीचा काही भाग, बाजूच्या छत्तीसगडच्या भागात एकप्रकारे या माओवादीचे म्होरके म्हणून भूपती यांनी जबाबदारी स्वीकारली. एक प्रचंड मोठा लढा सुरू केला. पण मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक ट्विन्स स्ट्रॅटेजी तयार झाली. या रणनीती अंतर्गत प्रशासन व विकास हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. आणि दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करत आहेत, त्यांच्यापुढे दोनच पर्याय राहिले पाहिजे. एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात यायचे अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जायचे अशा प्रकारची रणनीती सरकारने तयार केली. गेल्या काही वर्षांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या देशातून माओवाद हद्दपार करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वात एक बृहद स्ट्रॅटेजी तयार केली. या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात देशातून माओवादाचे उच्चाटन होत आहे. गडचिरोली पोलिस, सी-16 चे विशेष अभिनंदन पण विशेष अभिनंदन हे गडचिरोली व सी -16 पथकाचे करेल. यांनी या मोहिमेचे सातत्याने यशस्वी नेतृत्व केले. मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स केले. तेलतुंबडे सारखे अतिशय जहाल व अतिशय वरिष्ठ केडर यांना नेस्तनाबुत केले. सातत्याने एकीकडे विकास कामांच्या माध्यमातून आपण नवीन भरती बंद केली आणि दुसरीकडे जंगलात सातत्याने मोहिमा करून नक्षलवाद्यांना जेरबंद करण्याचे काम केले गेले. त्याचाच परिणाम म्हणून हळूहळू भरती बंद झाली आणि त्यातून माओवादाला ओहोटी लागली, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतः याची पुष्टी केली आहे. त्यांच्या जागी आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची धूरा सोपवण्यात आल्याची माहिती आहे. पण तूर्त तरी त्याची अधिकृत पुष्टी झाली नाही. दरम्यान, बाबासाहेब पाटलांच्या राजीनाम्यामागे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नाराजीचे कारण असल्याचा दावा केला जात आहे. बाबासाहेब पाटील यांनी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीचा हवाला देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सततचा लांबचा प्रवास आणि शारीरिक त्रास यामुळे कामकाजात अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, विरोधक आणि पक्षांतर्गत वर्तुळात यामागे राजकीय दडपण असल्याची कुजबूज आहे. डॉक्टरांनी प्रवास टाळायला सांगितला- पाटील माध्यमांशी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले की, गोंदिया खूप लांब आहे आणि डॉक्टरांनी मला थोडा प्रवास टाळायला सांगितला आहे. मी रागात राजीनामा दिला नाही. गैरसोय होत होती म्हणून राजीनामा दिला, असे बाबासाहेब पाटील म्हणाले. पटेलांनी केली होती टीका नुकत्याच नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांनी विदर्भातील पालक मंत्र्यांवर सडकून टीका केली होती. विदर्भातील मंत्री फक्त 15 ऑगस्ट व 26 जानेवारीलाच जिल्ह्यात दिसतात, असे त्यांनी म्हणत, लोकप्रतिनिधींना वेळ न देणाऱ्या पालकमंत्र्यांची कार्यशैलीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. जबाबदारी विदर्भातील नेत्याकडे या पार्श्वभूमीवर, गोंदियाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आता विदर्भातील मंत्री असलेल्या इंद्रनील नाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे, असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. विदर्भातील मंत्री असल्यामुळे नाईक यांना जिल्ह्याशी अधिक चांगला संपर्क ठेवता येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. हा बदल केवळ वैयक्तिक कारणासाठी होता की पक्षातील अंतर्गत नाराजी शांत करण्यासाठी, यावर सध्या चर्चा सुरू आहेत. यापूर्वीही काही मंत्र्यांनी विदर्भातील पालक मंत्रीपद सोडले होते, ज्यामुळे राष्ट्रवादी राजकीय अस्वस्थता पुन्हा समोर आली आहे.
कल्याण पूर्वेकडील हाय-प्रोफाइल 'रितेश अंपायर सोसायटी' मध्ये काल रात्री (मंगळवारी) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दारूच्या नशेत असलेल्या तीन तरुणांनी किरकोळ कारणावरून वाद घालत एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण केली. मारहाणीची ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीतील हे तीन तरुण डिलिव्हरी घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी मुद्दामहून वाद घालून त्यांना त्रास देत असतात. काल रात्री डॉमिनोजमधून पिझ्झाची ऑर्डर घेऊन एक डिलिव्हरी बॉय सोसायटीत आला असता, दारूच्या नशेत असलेल्या या तिघा तरुणांनी त्याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिघांनी मिळून डिलिव्हरी बॉयला अचानक बेदम मारहाण केली. या हल्ल्यात डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. पोलिसांत गुन्हा दाखल या घटनेनंतर जखमी डिलिव्हरी बॉयने तातडीने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून, आरोपींविरुद्ध पुढील कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, वारंवार डिलिव्हरी बॉयसोबत होणाऱ्या या हिंसक वागणुकीमुळे परिसरातील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोसायटीत दहशत पसरवणाऱ्या या तरुणांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाजीनगरात तरुणाचा गळा चिरून खून दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना रोडवरील सेंट फ्रान्सिस शाळेच्या मैदानावर (14 ऑक्टोबर) रात्री तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. सुरेश भगवान उंबरकर असे मृत तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, सेंट फ्रान्सिस स्कूलच्या समोरील बाजूस दुकाने आहेत. त्यामागील मैदानावर एका तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांना समजली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मैदानावर एका तरुणाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत होता. पोलिसांपाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. रात्री सव्वा नंतरही मृतदेह घटनास्थळी होता. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, संभाजी पवार, कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
आपल्या बोलण्यामुळे कुठलाही समाज नाराज होणार नाही, ही खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतो, तेव्हा त्या विचारांना साजेसे आचरणही आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली. ते आज पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले की, आपण जेव्हा कुठल्या समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगतो, तेव्हा कोणताही समाज नाराज होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक समाजात आपले कार्यकर्ते आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाणे हीच खरी प्रगती आहे. आमदार संग्राम जगताप यांच्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी त्या नोटीसीला उत्तर द्यावे, ते आले की पुढे पाहू. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती देताना अजित पवार म्हणाले, दर मंगळवारी आम्ही आमदार, नेते आणि मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावतो. मात्र आता दर महिन्याला एकदा सर्व जिल्ह्याध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पद्धतीने आज बैठक झाली. पुढील निवडणुकांसाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडच्या काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी सोडवणे, हा आमचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. पूरग्रस्त भागासाठी मदतीवर लक्ष ठेवा अजित पवार यांनी पूरग्रस्त भागातील मदतीचा उल्लेख करताना सांगितले, सरकारने मदत जाहीर केली आहे. मात्र ती मदत प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. ते म्हणाले की, आज सुनील तटकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांना लवकर जायचे होते, पण इतर सर्व नेत्यांनी विविध प्रश्न मांडले. त्यावर आम्ही उत्तरे दिली. मंत्रिमंडळ बैठकीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, ज्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन खात्याकडे आले आहेत, त्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आहे. आर्थिक तरतूद करून ठेवली असून ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे निधी पोहोचवण्यात येईल. तसेच त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बोनस संदर्भात सांगितले, बोनस द्यायचा होता तो निर्णयही सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील निवडणुका पारदर्शक असतात विरोधकांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांबाबत अजित पवार म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात नेहमीच निवडणुका पारदर्शकपणे झाल्या आहेत. आरोप करणे आणि प्रत्यक्षात असणे यात फरक आहे. आरोपांमध्ये तथ्य असावे, तेव्हा त्यावर चौकशी होते. आयोग त्या संदर्भात शहानिशा करेल. ते म्हणाले की, एका मतदाराचे नाव एका ठिकाणी असेल तर तो दुसरीकडे मतदान करू शकत नाही. पूर्वी काही ठिकाणी शहरात आणि गावी दोन्ही ठिकाणी मतदान करण्याची प्रथा होती, पण तो काळ गेला. आता यंत्रणा अत्यंत पारदर्शक आहे. पवार यांनी सर्वांना सल्ला दिला की, या निवडणूक प्रक्रियेचा वापर प्रामाणिकपणे केला पाहिजे. जर कुणाकडे ठोस पुरावे असतील, तर ते आयोगाकडे द्यावेत. आरोप फक्त बोलण्यापुरते राहू नयेत. विरोधकांना त्यांचे म्हणणे मांडण्याचा अधिकार विरोधकांनी अलीकडे निवडणूक आयोगाशी घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. विरोधकांनी आपले मुद्दे मांडले आहेत, निवडणूक आयोग त्यांना योग्य उत्तर देईल. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला कोणाच्या बरोबर जायचे, हे ठरवण्याचा अधिकार आहे. तुम्ही हे प्रश्न राज ठाकरे यांनाच विचारा; ते त्याचं समर्पक उत्तर देतील. अजित पवार यांनी आजच्या विधानांमधून स्थानिक स्वराज्य निवडणुका, समाजात सौहार्द राखणे, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासनातील कार्यक्षमतेचा संदेश दिला.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणुकांची घोषणा लांबवली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांनी एकत्रितपणे राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात वज्रमूठ उगारली आहे. काल वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांचे हे संयुक्त शिष्टमंडळ आज सकाळी ११ वाजता पुन्हा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात भेट देणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आजच्या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत. पवार यांचा पुण्यात पूर्वनियोजित दौरा असल्याने ते शिष्टमंडळासोबत येणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या बैठकीसाठी स्वतः हजर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कालच्या बैठकीत कोण होते उपस्थित? मंगळवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रथमच एकत्र बसलेले काही मोठे चेहरे दिसले.यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे जयंत पाटील, अजित नवले आणि प्रकाश रेड्डी हे प्रमुख नेते सहभागी झाले होते. या बैठकीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, विरोधकांच्या मते, आयोगाने दिलेल्या उत्तरांमध्ये स्पष्टता आणि ठोस आश्वासनाचा अभाव असल्याने आज पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विरोधकांची भूमिका- निवडणुका लांबवण्याचा डाव महाविकास आघाडी आणि मनसेचे नेते निवडणूक आयोगावर आरोप करत आहेत की, राज्य सरकारच्या दबावाखाली आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील अनेक महानगरपालिका आणि नगरपालिका मुदत संपूनही नवीन निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. विरोधकांचा आरोप आहे की, सत्ताधारी पक्षाला अनुकूल वातावरण तयार होईपर्यंत निवडणुका लांबवून लोकशाही प्रक्रियेला बगल दिली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक बसवून जनतेच्या प्रतिनिधींना बाजूला ठेवले जात आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्र भूमिका या बैठकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आले. राजकीय दृष्ट्या ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. दोघांनीही निवडणूक आयोगाने तत्काळ महापालिका आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, सरकार कितीही वेळ खेळ करत राहो, पण निवडणुका लांबवणे म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे. तर उद्धव ठाकरे म्हणाले की, आयोगाने निवडणुका न घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास भाग पडू.
चंद्रकांत पाटील यांच्या आज़ू-बाजूला असलेले गुन्हेगार जर इंग्रजीमध्ये नोटीस पाठवण्याइतके हुशार असतील तर मला चंद्रकांत पाटील यांचा सल्ला घ्यावा लागेल. समीर पाटील यांनी पाठवलेल्या नोटीसला काय उत्तर द्यावे, हा सल्ला मी त्यांच्याकडून घेणार आहे, असा टोला शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी लगावला आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता आहे. भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे तिकीट मिळावे म्हणून लाईन लावत असतात, हे सर्व मला भाजपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, असे शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. मी भूमिका ठाम आहे, पुणेकरांसाठी मी काम करत राहणार आहे. या नोटीससाठी मी चंद्रकांत पाटील यांचा सल्ला घेणार आहे. अनेक वकिलांशी चर्चा रवींद्र धंगेकर म्हणाले की,नीलेश घायवळ प्रकरणी मी बोलल्यामुळे त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुणेकर म्हणून मी हे सर्व बोलत आहे. समीर पाटील यांनी मला काल रात्री नोटीस पाठवली आहे. नोटीस इंग्रजीमध्ये आहे, माझी इंग्रजी कच्ची आहे, त्यामुळे मी वकिलांशी चर्चा करणार आहे. असीम सरोदे हे मला मदत करत आहेत. ते पुणेकर म्हणून मला मदत करत आहेत. मी केवळ 10 टक्के बोललो रवींद्र धंगेकर म्हणाले की, अनेक वकील मला भेटले आहे, त्यांनी मला सांगितले की तुम्ही एक रुपया खर्च करु नका आम्ही पुणेकर म्हणून तुमची बाजू मांडणार आहे. मी केवळ 10 टक्के बोललो आहे, अजून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर मी गोष्ट टाकलेली नाही. पण पुढे काय करायचे याचा सल्ला मला चंद्रकांत पाटील देतील, मी पुढे काय केले पाहिजे हे चंद्रकांत पाटील यांनी सांगावे. पुणे शहरातील गुन्हेगारांना जर राज प्रतिष्ठा आली असेल तुमच्या मतदारसंघातील गुन्हेगार मला नोटीस पाठवत असेल तर मला चंद्रकांत पाटील यांचा सल्ला घ्यावा लागेल. आरोपी लोकप्रतिनिधींवर मकोका लावा म्हणतो रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी काही चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नाही. मी एक साधा प्रश्न विचारला की समीर पाटील कोण आहे. गुन्हेगारी करणारी लोकं तुमच्या ऑफीसमध्ये कसे कोण तुमच्या ऑफीसचा शिपाई आहे. पोलिसामार्फत कोण गुन्हेगारांना सुरक्षा देतो असा सवाल मी केला होता. हा पुणेकरांचा प्रश्न विचारला. समीर पाटील कोण हेच मला माहिती नव्हते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माझ्यावर गुन्हा दाखल करेल, दंड लावेन, असे म्हटल्यावर समीर पाटील समोर आला. त्यानंतर मी अभ्यास केला तर मला समजले की हा मकोकाचा आरोपी आहे. याच्यावर 420 चा गुन्हा आहे. पोलिस स्टेशनला याची चालती आहे, गुन्हेगारांना हा सुरक्षा देतो अशी माहिती समोर येत गेली. त्यानंतर मकोकातील आरोपी लोकप्रतिनिधींवर मकोका लावा म्हणतो.
वसमत तालुक्यातील सातेफळ येथील तरुणाने प्रेम संबंधातून मुली सोबत विवाह केला मात्र प्रसूतीनंतर पत्नी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी निगडी (पुणे) पोलिसांनी तक्रार घेऊन हट्टा पोलिसांकडे पाठवल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी ता. 14 पतीसह तिघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील सातेफळ येथील देवानंद कांबळे हा पुणे जिल्ह्यात रोजमजूरीचे काम करतो. काही दिवस पुणे जिल्ह्यात काम केल्यानंतर तो परत गावी येत होता. यावेळी त्याचे पुणे जिल्हयातील एका मुलीवर प्रेम जडले होते. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी दोघांनीही लग्न केल्यानंतर ते पुणे येथे काम करून त्यांचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, पुणे येथे देवानंद याची पत्नी गर्भवती झाली. तिच्यावर औषधोपचार केल्यानंतर पुणे येथे एका शासकिय रुग्णालयात त्याच्या पत्नीची प्रसूती झाली. यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी देवानंद याच्या पत्नीची जन्मतारीख, कुठली राहणार आहे याची सर्व माहिती घेतली असता तिच्या जन्मतारखेवरून ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सदर बाब निगडी (पुणे) पोलिसांना कळवली. पोलिसांनी तातडीने रुग्णालयात येऊन चौकशी केली. यामध्ये त्या मुलीची तक्रार नोंदवली. दरम्यान, सदर घटना वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत येत असल्यामुळे पोलिसांनी सदर तक्रार हट्टा पोलिसांकडे वर्ग केली. यावरून पोलिसांनी देवानंद कांबळे, कचरू कांबळे व अन्य एकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक युवराज गवळी पुढील तपास करीत आहेत.
मुंबईत कबुतरखान्यांवरील प्रशासनाची कारवाई आणि कबुतरांना खाऊ देण्यावर घातलेली बंदी यावरून वाद अधिक चिघळला आहे. नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्याचे कारण देत मुंबई महानगरपालिकेने अनेक कबुतरखाने बंद केले, तसेच कबुतरांना अन्न देऊ नये, असे आवाहन केले. मात्र, पेटा इंडिया या प्राणीसंवर्धन संस्थेने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून, या विरोधासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ शेअर करत आंदोलनाचा नवा मार्ग निवडला आहे. पेटा इंडियाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही लोक कबुतरांचे मुखवटे घालून मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील कामे करताना दिसतात. ट्रेनने प्रवास, फुले आणि वडापाव खरेदी, टॅक्सी चालवणे, बाजारात फिरणे इत्यादी दृश्यांमधून कबुतर सुद्धा मुंबईकरांसारखेच आहेत, हा भावनिक संदेश दिला गेला आहे. या व्हिडिओचा उद्देश म्हणजे, कबुतरांबद्दल सहानुभूती निर्माण करणे आणि मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील कबुतरखान्यांवरील खाद्यबंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मांडण आहे. खाद्यबंदी म्हणजे अन्याय पेटा इंडियाचे म्हणणे आहे की, कबुतरांना अन्न न दिल्याने ते उपासमारीचा सामना करत आहेत. खाद्यबंदी हा अन्यायकारक निर्णय असून, या सौम्य पक्ष्यांच्या जिवावर बेतणारा ठरू शकतो. कबुतरांना खायला घालणे हे केवळ दयाळूपणाचे कृत्य नाही; अनेक मुंबईकरांसाठी ही एक आध्यात्मिक परंपरा आहे. शतकानुशतके जुने कबुतरखाने हे शहराच्या संस्कृतीचा भाग आहेत. दररोज अनेक नागरिक, विशेषतः ज्येष्ठ व्यक्ती, या पक्ष्यांना धान्य देऊन आध्यात्मिक समाधान घेतात. संस्थेने मागणी केली आहे की, खाद्यबंदीऐवजी कबुतरांसाठी ठरावीक वेळेत, नियोजित ठिकाणी आहार आणि साफसफाईची व्यवस्था केली जावी. कबुतरांमुळे आरोग्याला खरा धोका किती? मुंबईतील काही वैद्यकीय संस्थांच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये श्वसन आजारांपैकी फक्त 0.3% प्रकरणे कबुतरांच्या संपर्काशी संबंधित होती. आंतरराष्ट्रीय संशोधनानुसारही कबुतरांपासून मानवांना रोग पसरण्याचा धोका अत्यल्प आहे. जर्नल ऑफ इन्फेक्शन मध्ये प्रकाशित झालेल्या 60 वर्षांहून अधिक संशोधनाचा आढावा घेतल्यावर असे निष्पन्न झाले की, कबुतरांच्या संपर्कामुळे होणारा रोगप्रसार अत्यंत कमी आहे, अगदी त्यांच्याशी जवळून काम करणाऱ्या लोकांसाठीही. तसेच एडिनबर्ग विद्यापीठाच्या संशोधनानुसार, कबुतरांमध्ये बर्ड फ्लूविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार असतो, त्यामुळे या आजाराच्या प्रसारासाठी त्यांना जबाबदार ठरवणे योग्य नाही. पेटाचा दावा- कायदा आणि करुणा कबुतरांच्या बाजूनेच पेटाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 नुसार कोणत्याही प्राण्याला अनावश्यक त्रास देणे हे बेकायदेशीर आहे. तसेच भारतीय संविधानातील कलम 51अ(ग) नुसार प्रत्येक नागरिकाने प्राण्यांबद्दल करुणा आणि सहानुभूती दाखवणे हे नैतिक आणि कायदेशीर कर्तव्य आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेल्या कबुतरखाना बंदीच्या निर्णयाला मानवी मूल्यांच्या विरोधात ठरवले पाहिजे, असे पेटाचे म्हणणे आहे. फडणवीस सरकारला पत्र, युरोपीय मॉडेलचा विचार करा या पार्श्वभूमीवर पेटा इंडियाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून युरोपातील कबुतरसंख्या नियंत्रणाचे मॉडेल स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. फ्रान्स, जर्मनी, आणि स्पेनसारख्या देशांत कबुतरांसाठी नियंत्रित खाद्यस्थानं, लसीकरण आणि जननक्षमता नियंत्रण यांसारखे उपाय यशस्वी ठरले आहेत. पेटाचे म्हणणे आहे की, मुंबईतही अशाच प्रकारचा वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोन स्वीकारल्यास, कबुतरांची संख्या नियंत्रणात ठेवता येईल आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षणही करता येईल. मुंबईतील परंपरा की आरोग्याचा धोका? मुंबईतील कबुतरखाने हे केवळ पक्ष्यांना अन्न देण्याचे ठिकाण नाहीत, तर शहराच्या सामाजिक आणि धार्मिक संस्कृतीचा भाग आहेत. अनेक नागरिकांना हे दान आणि पुण्याचे कार्य वाटते. मात्र, प्रशासन आणि आरोग्य विभागाचा यावर ठाम आग्रह आहे की कबुतरांची विष्ठा आणि धूळ यामुळे श्वसनाचा त्रास वाढू शकतो. कबुतरखान्यांवरील बंदीचा मुद्दा आता केवळ पक्षीसंवर्धनापुरता न राहता, संस्कृती, श्रद्धा आणि विज्ञान यांच्या सीमारेषेवर उभा आहे. एका बाजूला शहराचे आरोग्य, तर दुसऱ्या बाजूला जीवसृष्टीबद्दलची दया, या दोन्ही गोष्टींचे संतुलन राखत सरकारने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
प्रतिनिधी | येवदा जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आयुष्यातील सर्व अडथळ्यांवर मात करत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी येवदा येथील दिव्यांग (मूकबधीर) नर्तकी सृष्टी सविता प्रकाश तायडेने नृत्यकलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिव्यांग असूनही सृष्टीने आतापर्यंत ५० हून अधिक स्पर्धा व राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून भरारी घेत कलेचे वर्चस्व सिद्ध केले आहे. अमरावती येथील सेंट थॉमस प्रशासकीय महाविद्यालयातील एम. ए. (योगशास्त्र) अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी असलेली सृष्टी तायडे नुकत्याच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक येथे झालेल्या ‘इंद्रधनुष्य-निवड फेरी २०२५-२०२६’ स्पर्धेत कथ्थक नृत्य (सोलो) या प्रकारात प्रथम क्रमांकाची विजेती ठरली आहे. तिची निवड आता राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी (जळगाव) झाली आहे. कथ्थकमध्ये तिला गायनसाथ विवेक गावंडे यांनी केली. सृष्टीला बालवयापासूनच नृत्याची आवड होती. तिने कथ्थक या शास्त्रीय नृत्यप्रकाराचे शिक्षण घेतले. इतरही नृत्यात ती पारंगत आहे. मुंबईच्या अंधेरी (पश्चिम) येथील प्रसिद्ध किंग्स अकॅडमीत तिने वेस्टर्न नृत्याचे प्रशिक्षण घेतले. शास्त्रीय नृत्याबरोबरच सृष्टीने बॉलिवूड, फोक, फ्युजन, चित्रपट गीते, रंगोली, मेहंदी, क्राफ्ट वर्क आणि डेकोरेशन यासारख्या विविध कलांमध्येही प्रावीण्य मिळवले आहे. सृष्टी तायडे ही कलासंस्कार अकादमी, दर्यापूर येथील कथ्थक गुरु अर्चना जितेश रापर्तीवर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण घेत आहे. तिने यशाचे श्रेय कुटुंबीयांसह गुरु अर्चना व जितेश रापर्तीवर यांना दिले आहे. सेंट थॉमस कॉलेज अमरावतीचे अध्यक्ष डॉ. सिकंदर मनवरे, प्राचार्या संजीवनी मनवरे, प्रा. प्रणय मनवरे, प्रा.स्वप्निल ईखार, प्रा. शांता गाडगे, प्रा. सुमेध गावंडे, प्रा. शिल्पा गजभिये, प्रा. कल्पना राऊत तसेच कर्मचारी पंकज गजभिये व आकाश मेश्राम यांनी तिचा सत्कार केला. गोव्यातील आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेतही प्रथम गोव्यात आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेतही तिने पहिला क्रमांक पटकावला. डान्स इंडिया डान्स फेम वैभव घुगे यांनी तिला सन्मानचिन्ह प्रदान केले. लावणी किंग आशिष पाटील, नृत्यदिग्दर्शक देवेश मिरचंदानी यांच्या कार्यशाळेतून सृष्टीला नृत्याचे धडे मिळाले. नागपूरच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये तिला अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते बेस्ट डान्सर पुरस्काराने गौरवले. सध्या सृष्टीचा योगासनातील आर्टिस्टिक आणि ऱ्हीदमिक प्रकाराच्या एकत्रीकरणातून नवा नृत्य प्रकार निर्माण करण्याचा मानस आहे.
प्रतिनिधी |खामगाव अखिल भारतीय किसान सभा जिल्हा कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी त्यांच्यामार्फत शेतकरी शेतमजुरांच्या ज्वलंत प्रश्नाबाबत १३ ऑक्टोबर रोजी निवेदन सादर करण्यात आले. संपूर्ण राज्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे कधी नव्हे ते शेती, शेतकरी, शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीची जाणीव आपणास आहे. शेतकरी, शेतमजुरांची शेती हेच उपजीविकेचे साधन आहे शेतीच खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अभूतपूर्व संकट उभे असून सरकारने खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. नैसर्गिक संकट सामोरे असताना सरकारच्या शेती, शेतकरी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून कर्जबाजारी झाला आहे. कर्जबाजारीपणामुळे आजही शेतकरी शेतमजुरांची आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. शेती साधनांची झाडलेली भाव वाढ आणि दुसरीकडे शेतमालाला हमीभाव नाही यामुळे शेती करणे ही जिकरीचे झाले आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे या कर्जात पीक व शेती कर्जा बरोबर बचत गट सावकारी व मायक्रो फायनान्स कर्जाचा समावेश करावा. शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून तीस हजार रुपये द्यावे. पिक विम्याचे काढून टाकलेले ट्रिगर पुन्हा लागू करावे. या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास अखिल भारतीय किसान सभा तीव्र आंदोलन करेल. अशा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर रामचंद्र भारसाकळे, कॉ.प्रकाश पताळे, कॉ. विप्लव कवीश्वर यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लाखनी-भंडारा महामार्गावर भीषण दुर्घटना:टिप्परखाली चिरडून दुचाकीस्वार ठार, चालक घटनास्थळावरून फरार
भंडारा जिल्ह्यातील लाखनी-भंडारा राष्ट्रीय महामार्गावर सिंगोरी गावाजवळ आज एक भीषण अपघात घडला आहे. वाळूने भरलेल्या एका भरधाव टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव राजू भोयर असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर घडली. टिप्पर हा चुकीच्या लेनने साकोलीच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या राजू भोयर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टिप्पर रस्त्याच्या कडेला उलटला आणि वेगात असल्याने राजू भोयर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. कारधा पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोकुल सूर्यवंशी यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. टिप्पर हटवण्यासाठी दोन क्रेन आणि एका जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. टिप्परमधील वाळू रिकामी करून अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. दरम्यान, अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून कारधा पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेचा सविस्तर तपास सुरु आहे. हा अपघात नागरिकांमध्ये मोठ्या चिंतेचा विषय ठरत असून महामार्गावरील वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कात्रज घाट वळणावर अपघात दोघे ठार कात्रज घाट वळणावर मंगळवारी दुचाकी व पीएमपीएमएलचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. या अपघाताबाबत सदर माहिती अशी की, कात्रज आगाराची कात्रज सारोळा कात्रज ही बस ससेवाडी वरून पुण्याकडे येत असताना दुचाकी देखील त्याच बाजूने जात होती. पीएमटीने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात आकाश रामदास गोगावले (वय 29 वर्षे रा. ससेवाडी ता. भोर) व अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27) यांचा मृत्यू झाला असून असून नेहा कैलास गोगावले (वय 20 वर्ष रा.ससेवाडी ता. भोर) या जखमी असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार चालू आहेत.
संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक:चोरट्यांना दिले अकोट येथील पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी | खामगाव शहर पोलिसांच्या दक्षतेमुळे शहरात संशयितरित्या विकणाऱ्या दोन सराईत चोरटे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. खामगाव शहर पोलिसांनी ही कारवाई केली असून या दोन्ही अट्टल गुन्हेगारांना अकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर दुपारी ४ वाजताच्या सुमारास खामगाव शहर पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकाने एसबीआय बँकेसमोर दोन संशयित व्यक्तींना फिरताना पाहिले. चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांचा सखोल तपास केला असता दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यांचे यापूर्वीचे पोलिस रेकॉर्ड तपासले असता त्याचे नाव सोनू उमाशंकर सिंग (वय ३२), रा. राजगड, ता. मडीहान, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश व जिब्राल सनोद गुद्रावल (वय ३०), रा. महात्मा फुले नगर, टॉवर बिल्डिंग, ठाणे वेस्ट अशी आहेत. तपासात सोनू सिंग याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल पोलिस स्टेशनला आणि उस्मानपुरा पोलिस स्टेशनला भादंवी अन्वये गुन्हे नोंद असल्याचे आढळले. तर जिब्राल गुद्रावल याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी खामगावात येण्याचे आणि बँकेजवळ फिरण्याचे समर्पक कारण दिले नाही. अधिक चौकशीत त्यांनी १३ ऑक्टोबर रोजी अकोट जि. अकोला येथे ५० हजार रुपये रोख असलेली बॅग चोरी केल्याची कबुली दिली. अकोट पोलिस स्टेशनकडून खात्री केली असता सदर गुन्ह्याची नोंद असल्याचे आढळले. त्यामुळे या दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी अकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार, सपोनि भागवत मुळीक, पोहेकॉ अरुण हेलोडे, पोहेकॉ प्रदीप मोठे, पो.ना. सागर भगत, पो.कॉ. राहुल थारकर, गणेश कोल्हे,अमर ठाकूर, रवींद्र कन्नर, अंकुश गुरुदेव, राम धामोडे यांनी केली.
प्रतिनिधी | अकोला झोपडपट्टीधारकांना हक्काचे घरकुल मिळायलाच हवे, अशी मागणी करत मंगळवारी अकोला विकास संघर्ष मंचातर्फे मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चात महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले. झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलांना मालकीचे पट्टे मिळत नसल्याने त्यांचे हक्काच्या निवाऱ्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. झोपडपट्टी धारकांना हक्काचे घरकुल मिळायलाच हवे, अशी मागणी करीत अकोला विकास संघर्ष मंचातर्फे काढण्यात आला. मोर्चा गांधी जवाहर बागेतून निघालेला हा मोर्चा उर्वरित पान ४ झोपडपट्टीतील कुटुंबांना केवळ तात्पुरते छप्पर नव्हे, तर मालकीहक्क मिळावा. निवारा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. योजनांचे फक्त कागदी अंमलबजावणीवर समाधान न मानता प्रत्यक्षात तो गरजूंपर्यंत पोहोचला पाहिजे. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देऊन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
शहरात ७ भागात १९६ फटाक्याचे स्टॉल:पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांना मागणी
प्रतिनिधी | सोलापूर दिवाळी काही दिवसावर येवून ठेपली आहे. फटाक्याचे स्टॉलची उभारणी करण्यास सुरुवात झाली आहे. शहरात प्रामुख्याने पार्क मैदान, असार मैदान, पुंजाल मैदान, संभाजी तलाव परिसर, कर्णिक नगर बस स्थानक, शिंदे शाळा विडी घरकुल, क्रांती मैदान बार्शी रोड बाळे या ठिकाणी फटाक्याचे स्टॉल थाटले आहेत. काही ठिकाणी विक्री करण्यासही सुरुवात झाली आहे. कमी कचरा करणारे व पर्यावरण पूरक, ध्वनी प्रदुषण न होणाऱ्या फटक्यांची चलती आहे. शहरात एकुण १९६ स्टॉलधारकांनी फटके विक्रीचे स्टॉलची उभारणी केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून पोलिस प्रशासनाकडून पोलिस प्रशासन १५ दिवसासाठी तात्पुरता परवाना घेतला आहे. शहरात साधारण १९६ फटाके स्टॉलधारक असून आतापर्यंत ८० पोलिस प्रशासन विभागाने परवाने दिले आहेत. उर्वरीत अर्ज पोलिस ठाणे स्तरावर आहेत, फटाके स्टॉल धारकांना अर्ज करण्यासाठी पोलिस ठाणे स्तरावर १ ते १० ऑक्टोबर पर्यंत मुदत दिली होती,त्यानुसार स्टॉल धारकांनी अर्ज घेवून रितसर फायर ब्रिगेड, आरोग्य व भूमी मालमत्ता यांची ना हरकत प्रमाणपत्र घेवून ते अर्ज पोलिस ठाणे स्तरावरावरून तपासणी क रून पोलिस आयुक्तालयातील परवाना विभागास देण्यात येतो.दोन दिवसात पहिल्या टप्यात ८० अर्ज आलेले आहेत तरी त्यानुसार पाहणी व तपासणी होवून एक खिडकी योजनेच्या माध्यमातून फटाके स्टॉल धारकांना १५ दिवसासाठी परवाना दिलेले आहेत. त्यासाठी परवाना घेण्यासाठी साधारणपणे साडेचार हजार रुपये खर्च येतो. सर्व प्रक्रीया पूर्ण केलेल्यांना स्टॉल टाकण्यासाठी परवानगी शहरात एकुण १९६ जणांना फटाके स्टॉल टाकण्यासाठी एनओसी घेवून गेले आहेत. पालिकेने सात ठिकाणी फटाके स्टॉल टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. अशी माहिती प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी अच्युत दुधाळ यांनी दिली. या फटाक्यांमुळे कागदाचा कचरा कमी होतो आंध्र व तेलंगणच्या बॉर्डर वरून फटाके सोलापुरात आलेला आहे. सर्व फटाक्यांवरील आवरण ग्रीन कलेमध्ये आहे. हे फटाके कचरा कमी करतात. ध्वनी व वायू प्रदुषण कमी करणारे आहेत. यंदाच्या वर्षीही १० ते २० टक्के वाढ आहे.- महेश जाधव, फटाके स्टॉल
प्रतिनिधी| शेवगाव शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, साखर कारखाना सुरू होण्यापूर्वी उसाचा दर निश्चित करावा, कापसाला हमीभाव मिळावा, पोट खराब्याच्या दुरुस्त करून नोंदी लावण्यात याव्यात, भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवावा, अन्यथा चटणी भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेल्या मोर्चाद्वारे दिला. वंचित बहुजन आघाडीचे राज्य सचिव प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला . यावेळी कार्यकर्त्यांनी भाजप सरकार तसेच आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा मुद्दा मांडला. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी व अधिकाऱ्यांची बैठक तहसीलदारांनी आयोजित केली नाही तर आमदार मोनिका राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील घरासमोर चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी साजरी करू असा इशारा किसन चव्हाण यांनी यावेळी दिला. शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, ऑगस्टीन गजभिव, कल्याण भागवत, शाहूराव खंडागळे, पप्पू बोर्डे, सागर गरुड, रवींद्र नीळ, रमेश खरात, रुबीना शेख, रोहिणी ठोंबे, अरुण खर्चन, लक्ष्मण मोरे, अरुण झांबरे, दिगंबर बल्लाळ, आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, तहसीलदार आकाश दहाडदे यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून शेतकऱ्यांना देण्यात येईल असे सांगितले. आमदार मोनिका राजळे यांच्या शेवगाव येथील संपर्क कार्यालयावर वंचित'ने मोर्चा काढला.
प्रतिनिधी | राहुरी तालुका वर्षभरापूर्वी अपहरण केलेल्या १६ वर्षीय मुलीचा राहुरी पोलिसांनी शोध लावत आरोपीच्या ताब्यातून सुटका केली. याप्रकरणी रोहित अनिल अमोलिक,वय २१, रा. भोकर ता. श्रीरामपूर यास पोलिसांनी अटके केली. या आरोपीने अपहरणानंतर तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती असल्याने पोस्को कलम वाढवले. श्रीरामपूर तालुक्यातील १६ वर्षीय मुलगी राहुरी तालुक्यात १७ ऑक्टोबर २०२४ रोजी मामाच्या गावी आलेली असताना तिचे अज्ञात इसमाने अपहरण केले होते. याबाबत तिच्या मामाने राहुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. दाखल गुन्ह्याचा मागील वर्षभरापासून शोध घेऊनही ती मिळून येत नसल्याने परत नव्याने या गुन्ह्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ व लेखनिक सतीश आवारे यांनी गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषण करत. या मुलीचा १४ ऑक्टोबर २०२५ रोजी नेवासे तालुक्यातील देवगड फाटा येथे शोध घेऊन तिचे अपहरण करणारा रोहित अनिल अमोलिक याच्या ताब्यातून सुटका केली. तपासादरम्यान या अपहरणासाठी मदत करणाऱ्या सर्व आरोपींची माहिती काढून ज्यांनी अपहरणास मदत केलेली आहे त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करून अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत आता पर्यंत राहुरी पोलिसांनी ९१ अपहरित मुलींचा शोध घेतला आहे.
सीएसआरडी'त झालेल्या महिला परिषदेतून स्त्रीमुक्तीचा गजर:स्त्रीपुरुष समतेचा संदेश
प्रतिनिधी | अहिल्यानगर महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद व सीएसआरडी संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या घोषणेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महिला परिषद झाली. या परिषदेत स्त्रीपुरुष समतेचा, धर्मनिरपेक्षतेचा आणि संविधानिक मूल्यांचा संदेश दिला. परिषदेच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या डॉ. मनिषा गुप्ते यांनी गेल्या पाच दशकांतील स्त्रीचळवळीचा आढावा घेत सांगितले की, स्त्रियांच्या चळवळीमुळे स्त्रीजीवनात मोठे परिवर्तन झाले आहे. हा वारसा पुढे न्यायचा असेल, तर स्त्री-पुरुष समतेच्या मूल्यांवर विश्वास ठेवून संविधानाच्या आधारावर काम करणे अत्यावश्यक आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते झाले. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा स्त्रीमुक्ती चळवळीने पुढे नेल्याचे सांगून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगर पोलिस विभागातील भरोसा सेलच्या प्रमुख प्रियंका आठरे यांनी विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर यांनी 'सर्व धर्मीय समाजाच्या एकात्मतेतूनच स्त्री चळवळीला सामर्थ्य मिळते. धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यावर विश्वास ठेवत स्त्रियांमधील भगिनीभाव वाढवणे ही काळाची गरज आहे,' असे सांगितले. नीलिमा बंडेलू यांनी प्रास्ताविक केले. परिषदेच्या यशस्वितेसाठी संध्या मेढे, ॲड. निर्मला चौधरी, विजया जाधव, सॅम्युअल वाघमारे, भैरवनाथ वाकळे, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे, सुरेखा आडम, बेबीताई जाधव आदींनी प्रयत्न केले.
रेणावीकर शाळेचा ‘बालघर’साठी उपक्रम:‘एक मुठ्ठी धान्य’मधून वंचितांना मदतीचा हात
प्रतिनिधी | अहिल्यानगर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रेणावीकर विद्यालयात ‘एक मुठ्ठी धान्य’ उपक्रम राबवण्यात आला. त्यानुसार तपोवन रस्ता येथील ‘बालघर प्रकल्पातील मुलांसाठी धान्य व नित्योपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका ललिता कारंडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. अहिल्यानगर शहरात उपेक्षित समाजातील वंचित, अनाथ मुले व वृद्ध यांचा सांभाळ करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड हे रूद्रपूजा फाउंडेशनच्या माध्यमातून बालघर प्रकल्प व शांताई वृद्धाश्रम चालवतात. या प्रकल्पासाठी रेणावीकर शाळेनेही मदतीचा वाटा उचलला. दीपावलीनिमित्त वंचितांना मदतीचा हात देण्यासाठी ‘एक मुठ्ठी धान्य’ उपक्रम राबवण्याचे ठरलले. त्यानुसार मुलांनी धान्य, साबण, टूथपेस्ट आदी वस्तू एकत्र केल्या. त्याचे वाटप बालघरचे संस्थापक युवराज गुंड, रूक्मिणी ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या शितल दळवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापिका कारंडे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. गुंड आणि शितल दळवी यांनी या मदतीबद्दल रेणावीकर शाळेचे आभार मानले.
राष्ट्रीय जाहिरात दिन:‘फेम' व जिल्हा जाहिरातदार संघटनेच्या वतीने साजरा
प्रतिनिधी | अहिल्यानगर राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त राज्यस्तरावरील सर्व जाहिरात वितरण संस्थांची शिखर संस्था असलेल्या फेडरेशन ऑफ ॲडव्हर्टायझिंग ॲन्ड मार्केटिंग अंत्रप्रन्युअर्स (फेम) व अहिल्यानगर जिल्हा जाहिरातदार संघटना यांच्या वतीने वृत्तपत्रांचे जाहिरात व्यवस्थापक व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. यानिमित्त जाहिरात व्यवस्थापक व प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. जाहिरात एजन्सीज, वृत्तपत्रे व जाहिरात प्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जाहिरात व्यवसाय वृद्धींगत व्हावा या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला होता. नियमित संवाद ठेवल्यास नवनवीन संकल्पना व विचारांना चालना मिळून सर्वांच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरेल, असे सांगितले. वृत्तपत्रांत सत्यता पडताळूनच बातम्या किंवा जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. इतर माध्यमांप्रमाणे वृत्तपत्रांचे काम चालत नाही. त्यामुळेच आजच्या स्पर्धेच्या व डिजिटल युगात वाचकांचा विश्वास कायम टिकवून ठेवण्यात वृत्तपत्रे यशस्वी झाली आहेत. कोरोनानंतर वृत्तपत्रांतील जाहिरातींचा व्यवसाय वृद्धींगत झाला आहे. वाचकांची संख्या वाढती आहे. वृत्तपत्रे खपाचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहेत. जाहिरातीचे महत्त्व जाहिरातदारांना पटवून दिले जात आहे. दैनंदिन विविध बदलांचा स्वीकार करीत असताना वृत्तपत्रांचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमास जाहिरातदार संघटनेचे अध्यक्ष गुलशन अरोरा, ‘फेम'चे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र म्याना, संघटनेचे सचिव प्रसाद मांढरे, उपाध्यक्ष जयंत देशपांडे, सदस्य प्रमोद गांधी, किशोर मरकड, सुरेंद्र मुथा, नितीन देशमुख, प्रफुल्ल मुथा, दीपक देशमुख, रवींद्र जरे, राहुल भिंगारदिवे, अविनाश कराळे, उमाकांत भुसारे, विनोद नेवासकर, अभिषेक वाव्हळ, प्रभंजन कनिंगध्वज, अभिजीत निकम, विजय नवले, संतोष लोहारकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन देशमुख यांनी, तर आभार गुलशन अरोरा यांनी मानले.
प्रतिनिधी | अहिल्यानगर शहरातील वाडियापार्क बॅडमिंटन हॉलमध्ये माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या बॅटल डोअर स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित महाराष्ट्र सब-ज्युनियर राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटनच्या सांघिक स्पर्धेत सोमवारी उपांत्य व अंतिम सामन्यांचा रोमहर्षक थरार पहावयास मिळाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम सामन्यांमध्ये मुलींमध्ये रायगड तर मुलांमध्ये पुणे जिल्हा संघ अजिंक्य ठरला. विजेत्या संघांना ट्रॉफी, मेडल व प्रशस्तीपत्रके देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अशोक कोठारी, जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, मिलिंद कुलकर्णी, खजिनदार राहुल मोटे, काका ट्रस्टचे पदाधिकारी राजेश भंडारी, गणेश गोंडाळ, विकास जगताप, आशिष पोखरणा आदी उपस्थित होते. सोमवारी सायंकाळी झालेल्या उपांत्यपूर्व व अंतिम सामने अत्यंत चुरशीचे झाले. मुलींच्या रायगड संघाच्या गाथा सूर्यवंशी व अनुष्का आपटे यांनी अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळवून देत रायगड संघाने पुणे संघावर दोन विरोधात शून्य गुणांनी मात केली. तर मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे जिल्ह्याने ठाणे जिल्ह्यावर मात करत अजिंक्यपद पटकावले. पुणे जिल्ह्याचे ओजस जोशी व अवधूत कदम यांनी अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळ करत विजेतेपद मिळवून दिले. अॅड.अशोक कोठारी म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्ध्वच्या यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. या स्पर्धेचे होत असलेल्या उत्कृष्ट नियोजनाचीच ही पावती आहे. त्यामुळे आता भविष्यात आम्ही राष्ट्रीय स्पर्धा नगरमध्ये व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील आहोत. आ.संग्राम जगताप यांच्या सहकार्याने या बॅडमिंटन हॉलमध्ये लवकरच सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नगरमधून चांगले खेळाडू निर्माण होतील. प्रास्ताविक स्पर्धा संयोजन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. निलेश मदने यांनी आभार मानले. १७ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत मंगळवार पासून वैयक्तिक स्पर्धांना सुरवात झाली आहे.
प्रतिनिधी | अहिल्यानगर दिवाळीच्या तोंडावर पोस्ट मॅपिंगच्या तांत्रिक अडचणीमुळे शालार्थ प्रणालीत वेतन थांबण्याचा धोका निर्माण झाला होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर समन्वय समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सर्व कामकाज एका दिवसांत पूर्ण करून दिवाळीपूर्वी शिक्षकांचे वेतन खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले. शालार्थ प्रणालीतील संच मान्यता, मॅपिंग स्टेटस आणि ऑथरायझेशन संदर्भात अनेक शाळांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे ऑक्टोबर २०२५ मधील वेदन पाठवण्यात अडथळे आले. शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, उपशिक्षणाधिकारी संध्या भोर यांच्या मार्गदर्शनाखाली वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के आणि कार्यालय अधीक्षक दोधाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. दोघांनीही दिवाळीपूर्वी सर्व कामकाज पूर्ण करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, विठ्ठल उरमुडे आदींनी केले.
पुण्याला वैद्यकीय तपासणीसाठी जाणाऱ्या सासरा, सुनेचा ओमिनी कार अपघातात मृत्यू:दोन मुली गंभीर जमखी
प्रतिनिधी | पाथर्डी शहर पुण्याला वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना आेमिनी कारच्या अपघातात सासरा व सुनेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या. ही दुर्घटना तालुक्यातील निवडुंगे शिवारात मंगळवारी पहाटे घडली. या अपघातात आसाराम लक्ष्मण निकाळजे (वय ७०) आणि त्यांची सून किरण बाळासाहेब निकाळजे (वय ३८,रा. ठाकूर पिंपळगाव, ता.शेवगाव) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर स्वानंदा बाळासाहेब निकाळजे (वय १२) आणि स्नेहल बाळासाहेब निकाळजे (वय ६) या दोन्ही नाती गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. काही दिवसांपूर्वी एका अपघातात बाळासाहेब आसाराम निकाळजे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या एका पायावर शस्त्रक्रिया केली होती. त्याची पुन्हा तपासणी करण्यासाठी हे कुटुंब मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ओमिनी कार (एमएच १६ एबी २११६) घेऊन पुण्याकडे निघाले होते. मात्र निवडुंगे गाव सोडल्यानंतर अवघ्या एक किमी अंतरावर असताना त्यांच्या ओमिनी कारला समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. धडकेचा जोर इतका प्रचंड होता की कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडली. यात कारमधील आसाराम निकाळजे आणि किरण निकाळजे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. कारचालक व बाळासाहेब निकाळजे यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. अपघातानंतर तिसगाव येथील १०८ रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. निवडुंगे शिवारात दोन वाहनांच्या झालेल्या अपघातात कार शेतात जाऊन पलटी झाली.
प्रतिनिधी | नाशिक रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ यांच्या सहकार्याने आणि ‘दिव्य मराठी’च्या पुढाकाराने यंदाच्या दीपोत्सवाचा प्रारंभ वसुबारसच्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता गोदा महाआरतीने होणार आहे. गोदाकाठी रामकुंड परिसरात ही महाआरती होईल. आतापर्यंत ८५ संस्थांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांच्या सौजन्याने ही महाआरती होणार आहे. विशेष म्हणजे समितीतर्फे शहरातील इच्छुक महिलांना आरतीचे विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. दुपारच्या सत्रासह आता महिलांना एकमुखी दत्त मंदिराजवळील चित्पावन मंगल कार्यालयामध्येही सकाळचे प्रशिक्षण सत्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे दीपोत्सवाचा प्रारंभ एका भव्यदिव्य सोहळ्याद्वारे अनुभवण्याची संधी शहरवासीयांना मिळणार आहे. शहरातील नागरिकही महाआरतीत सहभागी होऊ शकतात. प्रमुख धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, युवक मंडळ, गणपती मंडळ, मित्रमंडळ, हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळ, भजनी मंडळ, आस्थापना यांनी गोदा महाआरतीत सहभागी होण्यासाठी ८३९०९०५७२५ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप मेसेज करून संस्थेचे नाव, अध्यक्षांचे नाव, किती सदस्य सहभागी होणार आहेत, याची माहिती कळवावी. दीपोत्सवाचा प्रारंभ करू गोदा आरतीने ^पहिल्यांदाच हजारो नाशिककर एकत्र येऊन गोदामातेबद्दलची कृतज्ञता महाआरतीच्या माध्यमातून व्यक्त करणार आहेत. आपणही उपस्थित राहून दीपोत्सवाचा प्रारंभ या भव्यदिव्य सोहळ्याचे साक्षीदार बनून करूया. चला, गोदा महाआरतीत सहभागी होऊया. - ललित बूब, अध्यक्ष, आयमा
प्रतिनिधी | देवळाली कॅम्प दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प येथील सदर बाजार भागात मिठाई दुकानांची स्टेशन हेल्थ ऑफिसर व कॅन्टोन्मेंट बोर्डाने तपासणी मोहिम राबविली. मात्र, ही तपासणी केवळ दिखावा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. दुकानदारांकडून भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरणाकडून देण्यात येणा-या निर्देशांचे पालन केले जात नाही. या तपासणी मोहिमेत शहरातील विविध मिठाई दुकानांना भेटी देत तपासणी करण्यात आली. दिवाळी आल्यावरच मिठाई दुकानांची तपासणी करण्याचा देखावा प्रशासन करते. मिठाई कुठे व कशी तयार होते ते तपासले जात नाही. रस्त्यांच्या कडेला खाद्यपदार्थ विकणाऱ्यांच्या गाड्यांची तपासणी कधीच होत नाही. तपासणी मोहीम कठोरपणे राबवून नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष सागर गोडसे यांनी केली.
प्रतिनिधी | श्रीक्षेत्र राजूर नियमित वीज खंडित होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चार वर्षे उलटूनही गावठाण फीडरचे काम झालेले नाही. त्यामुळे भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को गावातील ग्रामस्थ नारायण पवार यांनी रोहित्रावर चढून आंदोलन केले. दिवाळी सणानिमित्त तरी गावातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी या आंदोलकाने केली आहे. चांदई एक्को गावाची लोकसंख्या सहा हजारांवर आहे. या गावाला वीजपुरवठा करण्यासाठी २० रोहित्रांची गरज आहे. परंतु सध्या दहा रोहित्रांवर वीजपुरवठ्याचा लोड आहे. यामुळे हे रोहित्र वारंवार खराब होत आहे. यातून वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. रात्रीच्या वेळी वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे रोहित्रावर बसूनच आंदोलन सुरू केल्याने वीज वितरण कंपनीचे अधिकारी गावात पोहोचले होते. गावठाण फीडरचे काम तत्काळ सुरू करून दिवाळी सणाला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
प्रतिनिधी |पिंपळदरी ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसाठी सणासुदीचा काळ म्हणजे आनंदाचा आशेचा क्षण असतो. पण, या आनंदात रंग भरायचे काम करणारा शासकीय रेशन दुकानातील ‘आनंदाचा शिधा’ गेल्या दीड वर्षापासून गायब झाला आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा हे सण पार पडले तरी गरिबांच्या घरात शिध्याचे एकही पॅकेट पोहोचलेले नाही. त्यामुळे गोरगरिबांची यंदाची दिवाळी ही गोडऐवजी फिकी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोरगरीब पात्र लाभार्थींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. पूर्वी सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत सणासुदीच्या काळात गोरगरिबांना अत्यल्प दरात साखर, डाळ, तेल, रवा, मैदा, हरभरा डाळ आदी वस्तूंचा आनंदाचा शिधा रेशन दुकानातून मिळायचा. शंभर रुपयांत मिळणाऱ्या या पॅकेजमुळे गोरगरिबांचा सण गोड व्हायचा. घरात चूल पेटायची आणि आनंद साजरा व्हायचा. परंतु गेल्या दीड वर्षापासून शासनाकडूनच आनंदाचा शिधा बंद करण्यात आला आहे. सध्या रेशन दुकानातून केवळ गहू, तांदूळ आणि काही ठिकाणी ज्वारी इतकाच पुरवठा होत आहे. सामान्य माणसाच्या हाता बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे सणासुदीचा काळात गोडधोडऐवजी गरिबांच्या ताटात फक्त गहू, तांदूळच राहिले आहेत. वरिष्ठ पातळीवरून पुरवठा नाही शिधा मिळणार हे अनिश्चित आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात गोरगरीब शिध्यावरच अवलंबून होती. गेल्या पाच महिन्यांपासून दुकानदारांचे राशन वाटप कमीशन सुध्दा मिळालेले नाही. - रफीक पठाण, राशन दुकानदार (सिल्लोड तालुका अध्यक्ष)
बिलोणी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शाळेला वॉटर फिल्टर:विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
प्रतिनिधी | बोर दहेगाव ग्रामपंचायत बिलोणी कार्यालयातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिलोणी शाळेस वॉटर कुलर व R O फिल्टर देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बिलोणी गावच्या सरपंच सौ. गायत्रीताई कदम यांच्या हस्ते पार पडले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिलोणीकडून शाळेतील विद्यार्थ्यांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडे वॉटर फिल्टरची मागणी करण्यात आली होती. ग्रामपंचायत बिलोणी कार्यालयातर्फे शाळेस वॉटर फिल्टर देण्यात आले. त्याचे उद्घाटन आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी झाले. शाळेत फिल्टरचे पाणी पिण्यास मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज पासून विद्यार्थ्यांना शुद्ध व आरोग्यदायी पाणी पिण्यास मिळेल. शाळेस फिल्टर प्राप्त झाल्यामुळे शाळेतर्फे ग्रामपंचायत कार्यालयाचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी सुनिलकाका कदम, अशोक कदम (उपसरपंच), मच्छिंद्र कदम (पोलीस पाटील), श्यामसिंग खंदाडे (अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती), विजय हाडोळे (उपाध्यक्ष), खजुरे सर (मुख्याध्यापक रामेश्वर विद्यालय), सामृत सर (मुख्याध्यापक जि. प. शाळा बिलोणी), देवरे सर, कवार सर, आसणे सर, पालवे सर, सोमासे सर, गीते मॅडम, काकडे मॅडम तसेच सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी यांची देखील उपस्थिती होती.
प्रतिनिधी |पिंपळदरी जिल्हात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सून समाधानकारक पडल्याने पाणीच पाणी झाले आहे. ओढे-नाले, बंधारे व तलाव भरले आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने झेंडूची लागवड करण्यात आली होती. परंतु मुसळधार पाऊस आणि पुराच्या तडाख्यात फुलशेती वाहून गेली आहे. यात झेंडूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नवरात्रीच्या तोंडावरच झेंडूचे नुकसान झाल्याने फुलांची प्रत खराब झाली असून, भावातही मोठी घसरण झाली आहे. एक तर झेंडूच्या फूल उत्पादनात मोठी घट आणि त्यात भावात घसरण झाल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शेतकरी अभूतपूर्व संकटात सापडला आहे. मात्र, दसरा सणानंतर दिवाळीत झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीतही झेंडूला चांगला बाजारभाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हात यंदा झेंडूची लागवड कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. दसऱ्याच्या वेळी झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो 80 ते 100 रुपये भाव मिळाला होता. रब्बीसाठी झेंडू काढल्यामुळे बाजारात पुरवठा कमी राहिला आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. यंदा झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले असून, फुलांचा आकार लहान आहे. काही ठिकाणी फुलांवर जास्त पावसाचा फटका बसला, पण तुलनेने बाजारभाव चांगला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दसऱ्याच्या वेळी देखिल झेंडूच्या फुलांना भाव चांगला होता. त्यामुळे आता दिवाळीतही फुलांना चांगला बाजार मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. अशी प्रतक्रिीया शेतकरी गणेश नप्ते यांनी दिली आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांमुळे यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अधिक आनंददायी होण्याची दाट शक्यता सर्वत्र दिसुन येत आहे.
प्रतिनिधी | लोणीखुर्द वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द येथील तलावात नागरिकांमध्ये पोहण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सर्वच वयोगटातील लोक सकाळ-संध्याकाळ पोहण्यासाठी तलावात गर्दी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, पोहणे हे संपूर्ण शरीरासाठी लाभदायक असून श्वसन क्षमता वाढवते, स्थूलता कमी करते आणि मानसिक तणाव घटवते. नागरिकांच्या मते, नियमित पोहल्यामुळे शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न राहते. म्हणूनच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी हा भाग कायमच दुष्काळी पट्ट्याने ओळखला जायचा. अनेक वर्षे शेतकऱ्यांनी पाण्यासाठी झगडत घालवली. उन्हाळा आला की विहिरी तळ गाठायच्या आणि शेती कोरडी पडायची. पण या वर्षी निसर्गाने जणू काहीतरी वेगळं ठरवलं. कधी नव्हे तो पाऊस इतका झाला की लोणी खुर्द गावातील सर्व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. या नैसर्गिक बदलातून काही तरुणांनी एक वेगळीच प्रेरणा घेतली. सुरुवातीला पोहण्यासाठी २-३ जण होते, पण आता २५ ते ३० सदस्य जोडले गेले आहेत. शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, शेतकरी, बँक कर्मचारी, विद्यार्थी सर्वांचा या टीममध्ये समावेश आहे. ग्रुपमधील सदस्यांनी पोहण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. त्या व्हिडिओंना भरपूर प्रतिसाद मिळाला. ‘शहरात आम्हाला विहिरी नाहीत, जागा नाही आणि वेळही नाही, पण तुमचं पोहणं पाहून मन प्रसन्न होतं,’ अशा प्रतिक्रिया शहरी नागरिकांकडून येऊ लागल्या आहेत. ही विहीर निसर्गाची मोफत व्यायामशाळा ठरते आहे. सर्वात प्रभावी व्यायाम पोहणोे हा मानवी शरीरासाठी सर्वात सुरक्षित व प्रभावी व्यायाम आहे. पाण्याचा प्रतिकार स्नायूंना बळकटी देतो आणि सांध्यांवरील ताण कमी करतो. त्यामुळे पाठदुखी, गुडघेदुखी किंवा स्थूलतेने त्रस्त लोकांसाठी पोहणे सर्वोत्तम आहे.यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारते.वजन नियंत्रित करून तुम्ही रक्तदाब व डायबिटीस सारखे आजार टाळू शकता. - डॉ. सुरेश दारवंटे.
प्रतिनिधी | सोयगाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव येथे विद्यार्थ्यांनी आपल्या कुशल हातांनी मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची सुंदर निर्मिती करून इतिहासाला जिवंत केले. मातीतील किल्ला या स्पर्धेचे आयोजन केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान, ऐतिहासिक जागरूकता आणि सृजनशीलतेचा विकास झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तातेराव माळी (सहायक गटविकास अधिकारी, पं. स. सोयगाव), महेंद्रसिंग पाटील (कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पं. स. सोयगाव), समाजसेवक व शिक्षणप्रेमी नगरसेवक राजेंद्र दुतोंडे, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, मुख्याध्यापक रामदास फुसे, प्रशांत पाटील, तसेच शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सहशिक्षिका सुरेखा चौधरी, मंगला बोरसे, प्रतिभा कोळी, रामचंद्र महाकाळ, अनिल देसाई, तानाजी चव्हाण, बागवान, भास्कर चौधरी, शुभम देसले, पूनम कल्याणकर, अंकुश काळे व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक किरण पाटील सर यांनी मानले. मातीचे किल्ले लक्षवेधी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि मेहनतीचा उत्कृष्ट संगम घडवत राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड, सिंहगड यांसारख्या ऐतिहासिक किल्ल्यांचे सुंदर नमुने साकारले. या उपक्रमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रम व जनतेशी असलेल्या नात्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
प्रतिनिधी | सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने दिव्यांगाना पाच टक्के निधीतून गावातील ५५ दिव्यांगाना दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा किट वाटप करण्यात आला. मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील,मधुकर सोनवणे, मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान दिव्यांगाची दिवाळी साजरी व्हावी या हेतूने ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी गावातील दिव्यांगाना आनंदाच्या शिधा मध्ये किराणा,एक किलो साखर,एक किलो गुळ, तेल,व इतर वस्तूचा समावेश आहे. यावेळी कृषिभूषण रवींद्र पाटील,दिलीप पाटील,प्रकाश पवार,बनेखा तडवी,अमृत राठोड,कैलास माताडे,दिलीप गाडेकर,विजय चौधरी,बाबू रामदास, आदींची उपस्थिती होती. संतोष कुमार पाटील,सतीश बाविस्कर, अंबु राठोड, आदींनी पुढाकार घेतला.
दिवाळी:घाटनांद्रा बाजारपेठेत फॅन्सी पणत्यांची भुरळ; १०० ते ४०० रुपये डझन विक्री
प्रतिनिधी | घाटनांद्रा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारपेठेत सणाची लगबग दिसू लागली आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबरच यंदा रंगीबेरंगी फॅन्सी पणत्यांची ग्राहकांना भुरळ पडत आहे. आकर्षक रंगसंगती, नवनवीन डिझाईन्स, आणि कलात्मक नमुन्यांनी सजलेल्या या पणत्या घाटनांद्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. फुलांच्या पाकळ्यांच्या आकारातील, मोराच्या पंखांच्या नक्षीतील तसेच मराठी पारंपरिक आकर्षक रंगसंगतीने नक्षीकाम करून सजवलेल्या मनमोहक रंगीत पणत्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. केवळ घरी वापरण्यासाठी नाही तर भेट देण्यासाठी देखील या पणत्यांची खरेदी केली जात आहे. अंगणातच नाही तर दिवाणखाण्याची शोभा वाढवत असल्याने वेगवेगळ्या आकारातील पणत्या, दिवे, पणत्यांचे स्टॅन्ड, लामण दिवे, काचेचे विविध आकारातील आकर्षक फॅन्सी दिवे उपलब्ध आहेत. खरेदीसाठी ग्राहकांना भुरळ घालत आहेत. आकर्षक डिझाईन्समध्ये तयार झालेल्या या पणत्यांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे येथील शुभम जोशी यांनी सांगितले. दिवाळीच्या सजावटीत चारचाँद लावणाऱ्या या पणत्या घरगुती तसेच व्यापारी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत. टिकाऊ व सुरेख पणत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवनवीन प्रकारच्या पणत्या बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत. फॅन्सी पणत्या ग्राहकांना विशेष पसंतीस उतरत आहेत. त्या टिकाऊ आणि सुरेख दिसत असल्याने ग्राहकांच्या नजरेत भरत आहेत. ही पणती पंधरा रुपये पासून ते ३० रुपयांपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे,अशी माहिती विक्रेते शुभम जोशी यांनी दिली. डिझाइन ठरतेय लक्षवेधी बाजारात नवीन विक्रीसाठी आलेल्या या पणत्यांची डिझाईन्स रंगीबेरंगी आणि आकर्षक आहेत. या पणत्या लक्षवेधून घेत आहेत. त्यांना पाहिले की या पणत्या खरेदी कराव्याच असे वाटते. प्रत्येकाची पसंती वेगळी आहे. बाजारात अशी विविधता मिळवणे कठीण आहे, अशी माहिती ग्राहक शारदा सोनवणे यांनी दिली.
कायगाव ग्रामपंचायतीतर्फे स्मशानभूमीत वृक्षारोपण:पर्यावरण संवर्धनाची जागृती
प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील स्मशानभूमीच्या परिसरात सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष मानवाशिवाय जगू शकतात; मात्र वृक्षांशिवाय मानवी जीवन अशक्य आहे, या उक्तीस अनुसरून पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी, मोकळ्या स्मशानभूमी परिसरात वृक्ष वाढ व्हावी, या उद्देशाने विविध प्रकारचे या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. या मोहिमेत सरपंच राजेंद्र खरात, ग्रामसेवक प्रभाकर भादवे, ग्रामपंचायत सदस्य बबनराव दाभाडे, गजानन जैवळ, सामाजिक कार्यकर्ते पंडित श्रीखंडे, भाऊसाहेब जैवळ, विष्णू जैवळ उपस्थित होते.
प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर दिवाळी म्हणजे घरात लखलखणारे दिवे, आकाशकंदील आणि गोडधोड फराळाचा सुगंध. पण, शहरातील बीड बायपास, क्रांती चौक किंवा मुकुंदवाडीच्या झोपडपट्ट्यांमध्ये अजूनही हजारो कुटुंबे दिवाळीच्या या आनंदापासून वंचित आहेत. जिथे दोन वेळेच्या जेवणाचीही भ्रांत असते. अशा गरजवंत आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या बांधवांची दिवाळी यंदा सार्थक करण्यासाठी शहरातील पाच सामाजिक संस्थांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. औरंगाबाद प्लॉगर्स ग्रुप, सक्षम फाउंडेशन, श्रयम फाउंडेशन, हॅपी मूव्हमेंट्स, आणि अन्न वाचवा समिती या संस्था मिळून या वंचितांच्या आयुष्यात कपडे, फराळ, मिठाई, आणि आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात दिवाळीचा गोडवा आणि आनंद घेऊन येत आहेत. या उपक्रमामुळे अनेक गरीब कुटुंबांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी ठरणार आहे. प्लॉगर्स ग्रुपच्या वतीने वाटप करण्यासाठी आणलेले कपडे. अन्न वाचवा समितीतर्फे मिठाईचे वाटप अन्न वाचवा समितीच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी एपीआय कॉर्नर, घाटी परिसरात ३०० जणांना मिठाईचे वाटप केले जाणार असल्याचे अन्न वाचवा समितीचे अनंत मोताळे यांनी सांगितले. सक्षम फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे क्रांती चौक भागातील तसेच उड्डाणपुलाखाली राहणारे, रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या गरजवंतांना फराळ व कपड्यांचे वाटप २१ ऑक्टोबरला केले जाणार आहे. यासाठी सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. मयूरी कांबळे काम करत आहेत. हॅपी मूव्हमेंट्सतर्फे कपडे, फराळ : हॅपी मूव्हमेंट्सच्या अध्यक्षा बेरिल सांचिस यांच्या वतीने बीड बायपास परिसरातील रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या कुटुंबीयांना फराळ, कपडे वाटप केले जाणार आहे. १९ तारखेला ५० मुलांनाही कपडे वाटप होईल.
दिवाळीच्या लक्ष्मी पूजनसाठी आवश्यक असलेल्या केरसुणीचे महत्त्व आजच्या आधुनिक काळातदेखील कमी झालेले नाही. पैठण तालुक्यातील जायकवाडी राहुलनगर येथील हरिभाऊ घोरपडे यांचे कुटुंब मागील तीस वर्षांपासून केरसुणी तयार करते. यासाठी कच्चा माल थेट मध्यप्रदेशमधून येतो. दिवाळी आठ दिवसांवर आली आहे. या दिवाळीत लक्ष्मी पूजनाला देवासमोर पूजेचा मान ‘केरसुणी’लाच आहे. त्यामुळे बाजारात केरसुणी मानाचा भाव खात आहे. मागील वर्षी जो भाव केरसुणीला होता तोच भाव सध्या ५० रु. चा असल्याचे तयार करणारे हरिभाऊ घोरपडे यांनी सांगितले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात व शहरात तयार केलेल्या केरसुणीची मागणी वाढली. कशी तयार होते केरसुणी घोरपडे यांनी सांगितले की, एक केरसुणी बनवण्यासाठी साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे लागतात. यासाठी आमचे सर्व कुटुंब या दिवाळी काळात केरसुणी तयार करण्यासाठी मेहनत करतात. दिवाळीच्या काळात पहाटे उठून सर्व घरातील माणसेही कामे करीत असतात. केरसुणी बनवताना हाताला काटेही लागतात, परंतु ते सहन करण्यापलीकडे पर्याय नसतो. ^पैठण शहरात व ग्रामीण भागातील आठवडी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. बाजारपेठेत सध्या विविध दिवाळीची साहित्य खरेदी वाढली आहे. आणखी चार दिवसांत वाढ होईल. - पवन लोहिया, माजी अध्यक्ष व्यापारी महासंघ दिवाळीत ‘लक्ष्मी’ म्हणून केरसुणीची खरेदी करतात. या आधुनिक काळातदेखील प्रत्येक घरांत केरसुणीचा वापर होतो, तर लक्ष्मी पूजनाला श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत तीच खरेदी करतात, तिला ते विसरत नाहीत ही आपल्या संस्कृतीचे लक्षण आहे, असे हरिभाऊ घोरपडे यांनी सांगितले.
गायरानधारकांच्या शेतीचे पंचनामे करून भरपाई द्यावी:फुलंब्री तहसील कार्यालयासमोर गायरानधारकांचे उपोषण
प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री तालुक्यात अनेक वर्षांपासून गायरानधारक शेती करत असून ही शेती त्यांच्या नावावर होत नाही. परिणामी, इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांच्या शेतीला शासकीय मदत मिळत नाही. तालुक्यात गायरानधारकांच्या वतीने रोष व्यक्त करण्यात येत असून सोमवारपासून गायरान जमीन अधिकार आंदोलन समितीच्या वतीने तालुका अध्यक्ष संजय इंगळे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला विविध जाती-धर्माचे गायरानधारक उपोषणाला बसले असून वयोवृद्ध लोकही या उपोषणाला बसले आहेत. गायरानधारकांनी यापूर्वी विविध आंदोलन केले आहे व महसूल प्रशासनाला निवेदन दिले आहे. परंतु त्यांच्या कुठल्याही निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने गायरानधारक संतप्त झाले असून त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या दुष्काळाच त्वरित पंचनामे करण्यात यावे, शेतकऱ्यांप्रमाणे गायरानधारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी.