छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या प्राध्यापक भरती घोटाळ्याची बातमी 'दिव्य मराठी'ने पुराव्यासह प्रसिद्ध करताच शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, 'या प्रकरणाची शासकीय पातळीवर चौकशी करावी. हा फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे निवड समिती आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या डीनवर कारवाई करावी, सरकार आणि न्यायालयाने 'सुमोटो' दखल घ्यावी,' अशी मागणी विद्यार्थी आणि प्राध्यापक संघटनांनी केली आहे. 'प्राध्यापक भरतीमध्ये अर्ज न केलेल्या उमेदवाराची थेट निवड करून निवड समितीने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासली आहे. हा विद्यार्थी आणि रुग्णांच्या जीवाशीही खेळ असून, तो इथेच थांबवावा. हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अन्यथा आंदोलन छेडू,' असा इशाराही बामुक्टो, एसएफआय, भाविसे या संघटनांनी दिलाय. नेमके प्रकरण काय? छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले गेले. त्यात 4 उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र, तर 3 उमेदवारांना अपात्र ठरवले. त्यानुसार मुलाखतीसाठी चार पात्र डॉक्टरांनाच बोलावणे अपेक्षित होते. मात्र, 13 नोव्हेंबर रोजी या पात्र डॉक्टरांसोबतच या पूर्ण प्रक्रियेत साधा अर्जही न केलेल्या डॉ. मेहुल शहा यांना सुद्धा बोलावले. विशेष म्हणजे त्यांना या मुलाखतीत सर्वाधिक 68 गुण देत थेट सहाय्यक प्राध्यापकपदी निवडही केली. त्यामुळे या साऱ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दिव्य मराठीने हे प्रकरण समोर आणताच शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालीयन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टो) या प्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. बामुक्टो प्राध्यापक संघटनेचे महासचिव प्रा. मारोती तेगमपुरे म्हणाले की, 'छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापकाची भरती ही सर्व नियम पायदळी तुडवून केलेली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांचा नैसर्गिक हक्क हिरावण्यात आला आहे. या उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी या भरती प्रक्रियेत जे-जे दोषी आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा बामक्टो प्राध्यापक संघटना या प्रकरणी आंदोलन छेडेल. सेवेत गुणवान प्राध्यापक आले पाहिजेत. रुग्णांना सुद्धा चांगले डॉक्टर मिळाले पाहिजेत. कसलीही प्रक्रिया न पाळता प्राध्यापकपदी निवड करणे ही विद्यार्थी आणि रुग्ण दोघांचीही फसवणूक आहे.' 'सुमोटो' दखल घ्यावी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ म्हणाले की, 'वैद्यकीय क्षेत्रात सर्वांनी अगदी कटाक्षाने नैतिकता जपली पाहिजे. कारण येथे शिकवणारा प्राध्यापक, त्याच्या हाताखाली घडणारे विद्यार्थी यांचा हजारो, लाखो रुग्णांशी संपर्क येतो. ही भरती अशी चुकीची होत असेल, तर या रुग्णांच्या जीवाशी हा खेळ आहे. सर्वोच्च न्यायालयाने उमादेवी प्रकरणात अशा प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशा सूचना केल्यात. त्याचे या प्रकरणात पालन व्हावे. शासनाने स्वतः सुमोटो ॲक्शन घेत कारवाई करावी. न्यायालयानेही या अतिशय भंयकर प्रकरणाची सुमोटो दखल घेत पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.' फौजदारी दाखल करा बामुक्टो प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य उमाकांत राठोड म्हणाले की, 'शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील प्राध्यापक भरतीत प्रंचड मोठा घोटाळा झाल्याचे 'दिव्य मराठी'ने उघडकीस आणले. या प्रकरणाची शासकीय पातळीवर चौकशी झाली पाहिजे. प्राध्यापक भरती करणारी निवड समिती आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे डीन या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे. हा फौजदारी गुन्हा आहे. ज्या उमेदवाराने अर्जच केला नाही, त्याची तुम्ही निवड करता. हे विद्यार्थी आणि रुग्ण दोघांशीही खेळ आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करण्यात यावी.' वशिला आणि पैसा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अरुण मते म्हणाले की, 'कुठलिही भरती प्रक्रिया ही पारदर्शक आणि मेरीटनुसार व्हावी. अर्ज मागवणे, त्यांची छाननी आणि त्यानंतर मुलाखत. इथे तर पात्र उमेदवार स्वतः जाहीर करून अर्जही न केलेल्या विद्यार्थ्याची निवड करण्याचा प्रकार घडला. वशिला आणि पैसा याच्या जोरावर ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. ही सारी प्रक्रिया पुन्हा नव्याने कराी. पात्र उमेदवाराची त्या जागी निवड करावी. आणि या प्रकरणातले दोषी निवड समिती आणि डीन या दोघांवरही तातडीने कारवाई करावी, अन्यथा विद्यार्थी संघटना गप्प राहणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने हे प्रकरण तडीस लावू,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. पूर्ण घोटाळा 7 मुद्यांमध्ये... 1) शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठीची जाहिरात 27 ऑक्टोबर 2025 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली. मुखशल्य चिकित्सशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापकपदाची एक जागा, तर सामाजिक दंतशास्त्र पदाच्या दोन जागा होत्या. सर्व जागा कंत्राटी पद्धतीने 364 दिवसांसाठी भरणार असल्याचे जाहीर केले होते. 2) अर्ज करायची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2025 होती. याची 12 नोव्हेंबर 2025 रोजी सात उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार डॉ. श्रुती पुंडकर, डॉ. कुणाल देशमुख, डॉ. पल्लवी दिवेकर, डॉ. नेहा शेंडे यांना पात्र ठरवत मुलाखतीला बोलावले, तर डॉ. मनीषा राठोड, डॉ. नम्रता राठोड, डॉ. आनंद गायकवाड यांना अपात्र ठरवले. 3) विशेष म्हणजे या साऱ्या प्रक्रियेची यादी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या पदभरती निवड समितीने संकेतस्थळावर टाकली. त्यात 4 उमेदवारांसमोर मुलाखतीसाठी पात्र, तर 3 उमेदवारांच्या समोर मुलाखतीसाठी अपात्र असे स्पष्ट लिहिण्यात आले. या यादीवर निवड समितीचे अध्यक्ष, सचिव आणि डीनच्या सह्या आहेत. 4) चार पात्र उमेदवारांमध्ये डॉ. श्रुती राजेंद्र पुंडकर, डॉ. कुणाल शंकरराव देशमुख, डॉ. पल्लवी गोरखनाथ दिवेकर आणि डॉ. नेहा अशोक शेंडे यांची नावे होती. तर तीन अपात्र उमेदवारांमध्ये डॉ. मनीषा दिगंबरराव राठोड, डॉ. नम्रता पंडित राठोड आणि डॉ. आनंद पंडित गायकवाड यांचे नाव होते. 5) मुलाखतीसाठी पात्र 4 डॉक्टरांनाच बोलावणे अपेक्षित होते. मात्र, 13 नोव्हेंबर रोजी या पात्र डॉक्टरांसोबतच या पूर्ण प्रक्रियेत साधा अर्जही न केलेल्या डॉ. मेहुल शहा यांना सुद्धा बोलावण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना या मुलाखतीत सर्वाधिक 68 गुण देत थेट सहाय्यक प्राध्यापकपदी निवडही केली. त्याची अंतिम निवड यादी 20 नोव्हेंबर रोजी जाहीर केली. 6) अंतिम निवड यादीत डॉ. मेहुल शहांना दुसऱ्या स्थानी ठेवले, तर पहिल्या स्थानी कमी 64 गुण मिळवणाऱ्या डॉ. श्रुती पुंडकर यांचे नाव टाकले. रितसर अर्ज करून मुलाखत देणाऱ्या डॉ. पल्लवी दिवेकर यांना 60 आणि डॉ. नेहा शेंडे यांना 50 गुण देत वेटिंग लिस्टवर ठेवले. विशेष म्हणजे ही यादी सुद्धा संकेतस्थळावर टाकली. 7) अंतिम निवड यादीवर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या डीन डॉ. एम. एस. इंदूरकर यांची सही व शिक्का आहे. या निवड समितीच्या अध्यक्ष डॉ. प्रज्ञा बनसोडे होत्या. तर सचिव डॉ. अशोककुमार बन्साळी होते. इतर सदस्यांत डॉ. एम. एस. इंदूरकर, डॉ. जगदीशचंद्र वठार, डॉ. कांचन शहा, डॉ. स्मिता खालीकर, डॉ. राकेश मोहोडे आहेत. संबंधित वृत्त दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह, संभाजीनगरच्या 'डेंटल' कॉलेजमध्ये घोटाळा:डेंटिस्टच्या प्राध्यापकपदी अर्ज न केलेल्या डॉक्टरची निवड; थेट मुलाखतीतच घुसवले, पाहा पुरावे!
भाजपच्या सत्ताकाळात काय होऊ शकत नाही? होत्याचे नव्हते होऊ शकते, जे आपण अनुभवतो आहोत. भाजपने मनात आणले तर इकडची दुनिया तिकडे होऊ शकते. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ते जवळपास झालेच होते. परंतु ऐनवेळी ट्रम्प नामक माशी शिंकली. इतिहास घडता घडता राहिला. भाजप सरकारने एक नामी संधी वाया घातली. ‘मोदी है तो मुमकीन है, नामुमकीन भी मुमकीन […] The post नकाशा बदलू शकतो! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाणी, रस्ते, अस्वच्छतेच्या प्रश्नांबद्दल संताप
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणूक प्रचाररास वेग आला असून कॉंग्रेस-भाजपामध्ये सरळ लढत होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवारही आपले नशीब आजमावत आहे, त्यांनीही आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे परंतु सेनेच्या ११ उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने सर्वानाच धक्का दिला आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. नागरिकांत मात्र मूलभूत प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त केला जात […] The post पाणी, रस्ते, अस्वच्छतेच्या प्रश्नांबद्दल संताप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बँक कॉलनी येथे पाण्यात होत असलेल्या डांबरीकरणाचा पर्दाफाश
निलंगा : लक्ष्मण पाटील निलंगा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू असताना सत्ताधा-यांच्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी लाईव्ह करीत शहरातील सुरू असलेल्या बँक कॉलनी रोडवरील अक्षरश: चिखलात व पाण्यात सुरू असलेल्या डांबरीकरण कामाचा पर्दाफास करत काम बंद केल्याने शहरातील झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी उलट सुलट चर्चेस उधाण आले आहे. निलंगा […] The post बँक कॉलनी येथे पाण्यात होत असलेल्या डांबरीकरणाचा पर्दाफाश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला मिळतोय प्रतिसाद
लातूर : प्रतिनिधी लातूर केंद्रावर आठवडाभरापासून सुरु असलेली ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ऐन मध्यावर आली असून रंगकर्मींच्या जल्लोषाने आणि नाट्य रसिकांच्या भरघोस प्रतिसादाने स्पर्धा उत्तरोत्तर रंगत आहे. यानिमित्ताने विविध विषय, आशय, शैलीच्या नाटकांतून रंगकर्मी आपला नाट्याविष्कार घडवित प्रेक्षकांची मने जिंकुन घेत आहेत. येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृति सभागृहात दि. […] The post राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला मिळतोय प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी औसा तालुका काँग्रेस पदाधिका-यांना दिल्या शुभेच्छा
लातूर : प्रतिनिधी औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी किरण बाबळसुरे यांची निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवारी सकाळी बाभळगाव निवासस्थानी त्यांचा यथोचित सन्मान व अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संजय सुग्रीव लोंढे यांची औसा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्या संदर्भात त्यांना नियुक्तीपत्र […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी औसा तालुका काँग्रेस पदाधिका-यांना दिल्या शुभेच्छा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाने इतिहासाची पाने उलगडली
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आहे. दि. २५ नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थी संघ, जयक्रांती अध्यापक महाविद्यालय लातूरद्वारा प्रस्तूत स्व. प्रा. वसंत कानेटकर लिखीत व प्रा. ज्योतिबा बडे दिग्दर्शित ‘इथे ओशाळला मृत्यू’ […] The post ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटकाने इतिहासाची पाने उलगडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेतक-यांचे मानसिक सशक्तीकरण काळाची गरज
लातूर : प्रतिनिधी मानसीकदृष्ट्या कणखर असलेला शेतकरी आज नैसर्गीक संकट आणि लालफितीच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे खचत चालला आहे. त्यातूनच आत्महत्येसारख्या घटना वाढत चालल्या आहेत. अशा परस्थितीत शेतक-यांचे मानसीक सशक्तीकरण काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले. येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका राज योगिनी ब्रह्माकुमारी नंदादीदी यांनी […] The post शेतक-यांचे मानसिक सशक्तीकरण काळाची गरज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अवैध मद्याची वाहतूक करताना १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य मध विक्री करणा-या विरोधात व अवैध मद्याची वाहतूरक करणा-या विरोधात कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ही लातूर ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीमध्ये बाभळगाव रोड वरती वाहनाचा पाठलाग करून करण्यात आली. सदर कारवाई ही मध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) अन्वये कारवाई […] The post अवैध मद्याची वाहतूक करताना १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२० कोटींची थकबाकी वसूल करणार कशी?
लातूर : प्रतिनिधी महावितरणने नोव्हेंबर महिन्याची व थकीत वीजबिलांची वसुली मोहीम हाती घेतली असून गेल्या २५ दिवसांत केवळ ६५ टक्केच वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. उर्वरीत ५ दिवसांत महावितरणला २० कोटी २ लाख रूपयांची थकबाकी वसुली करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी आपल्या थकीत बीजबीलांचा भरणा करून सहकार्य करावे अन्यथा नाईलाजास्तव […] The post २० कोटींची थकबाकी वसूल करणार कशी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही
नवी दिल्ली : चीनने पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशचीनचा भाग असल्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शांघाय विमानतळावर अरुणाचल प्रदेशातील पेमा वांगजॉम नावाच्या महिलेला चीनी अधिका-यांनी थांबवल्याप्रकरणी भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. याशिवाय, चीनने अरुणाचल प्रदेशाबाबत केलेल्या दाव्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिले. पेमा वांगजॉम वैध भारतीय पासपोर्टवर लंडनहून जपानला जात होत्या. चीनच्या शांघायमध्ये त्यांचा 3 […] The post खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट?
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या कार ब्लास्टच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचा मुख्य आरोपी डॉ. उमर याबद्दल मोठा खुलासा झाला आहे. तो एकीकडे इसिस ‘दाएश’ मॉड्यूलने प्रभावित होता, तर त्याचे इतर साथीदार अल-कायदा मॉड्यूल फॉलो करायचे. यामुळे त्यांच्यात वारंवार संघर्ष होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तपासातील माहितीनुसार, हवाला […] The post बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आयसीसीने आगामी टी-20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, या वेळापत्रकातील अंतिम सामन्याच्या ठिकाणावरून आता नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. वर्ल्डकपची फायनल पुन्हा एकदा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचे स्पष्ट होताच, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रत्येक मोठी फायनल अहमदाबादलाच खेचून नेण्याचा अट्टाहास का? मुंबई, कोलकाता किंवा चेन्नईवर हा अन्याय कशासाठी? असा थेट सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आयसीसीच्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची मुंबईत घोषणा करण्यात आली. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत या विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 8 मार्चला अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. अंतित सामना अहमदाबादला ठेवण्यात आल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आयसीसीला काही प्रश्न विचारले आहेत. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक आले आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फायनल पुन्हा अहमदाबादलाच ठेवण्यात आली आहे. प्रत्येक अंतिम सामना तिथेच नेण्याचे हे काय नवीन फॅड आहे? अहमदाबाद हे काय क्रिकेटचे पारंपरिक केंद्र आहे का? मग मुंबईला का डावलले? मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी 20११ च्या विश्वचषकाची आठवण करून दिली. टी-20 वर्ल्डकपच्या फायनलसाठी वानखेडे स्टेडियम हे सर्वोत्तम ठिकाण ठरले असते. 20११ ची ती ऐतिहासिक फायनल कोणी विसरू शकेल का? असे असतानाही पुन्हा अहमदाबादलाच पसंती देणे चुकीचे आहे, असे मत त्यांनी मांडले. कोलकाता, चेन्नई, मोहालीवर अन्याय केवळ मुंबईच नाही, तर देशातील इतर ऐतिहासिक मैदानांकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. ईडन गार्डन्स (कोलकाता), एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई) आणि आय. एस. बिंद्रा स्टेडियम (मोहाली) ही मैदानेही फायनलसाठी उत्तम आहेत. पण अचानक सुरू झालेल्या या 'वशिलेबाजीच्या राजकारणामुळे' या शहरांवर अन्याय होत आहे, अशा शब्दांत त्यांनी आयसीसी आणि बीसीसीआयच्या कारभारावर ताशेरे ओढले. आयसीसीकडून अपेक्षाभंग आम्ही आयसीसीकडून अपेक्षा करतो की त्यांनी अशा राजकारणात आणि वशिलेबाजीत पडू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. यापूर्वीचा वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामनाही अहमदाबादमध्येच झाला होता, याकडे लक्ष वेधत, क्रिकेटमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे पारंपरिक क्रिकेट केंद्रांचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक अंतिम सामना अहमदाबादलाच का?
मुंबई : आगामी टी २० विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. अंतिम सामना ८ मार्च रोजी, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादलाच का? मुंबईला ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना तिथे का अंतिम […] The post प्रत्येक अंतिम सामना अहमदाबादलाच का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा राजकारणातील सद्यस्थितीवर बोट ठेवत राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. सध्या देशात सुरू असलेले जातीपातीचे राजकारण पाहून जीव गुदमरतोय. जातीच्या नावावर समाजात फूट पाडणाऱ्यांना तुम्ही तुमच्या मतांमधून जागा दाखवा, असे रोखठोक आवाहन नाना पाटेकर यांनी तरुणांना केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठात आयोजित 'असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज'च्या ३९ व्या आंतर-विद्यापीठीय युवा महोत्सवात ते बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि सैनिकांची स्थिती यावर मनमोकळे भाष्य केले. तरुणांनो, केवळ गर्दीचा भाग होऊ नका! सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना नाना म्हणाले की, आजूबाजूचे वातावरण पाहून खूप अस्वस्थ व्हायला होते, अक्षरशः दम गुदमरल्यासारखे वाटते. काही राजकारणी केवळ जातीपातीचे राजकारण करत आहेत. 'तू अमुक जातीचा, तू तमुक जातीचा' असे सांगून लोकांमध्ये भेद निर्माण केले जात आहेत. मी स्वतः कधीही जात मानली नाही, पण आज दुर्दैवाने जातीचेच राजकारण जोरात सुरू आहे. यावेळी नाना पाटेकर यांनी तरुणाईला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. जातीपातीचे राजकारण कोण करतंय आणि कसं करतंय, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ कोणाच्या तरी सभेतील गर्दीचा भाग होऊ नका, असे ते म्हणाले. देशात बदल घडवण्याची ताकद तुमच्यात आहे. जातीचे राजकारण करणाऱ्यांना तुमच्या मतदानातून चोख उत्तर द्या, असे आवाहन नाना पाटेकर यांनी मतदारांना केले. सैनिकांच्या सन्मानाची खंत आपल्या भाषणात नाना पाटेकर यांनी सैनिकांच्या सन्मानाचा मुद्दा अतिशय भावुक होऊन मांडला. 'प्रहार' चित्रपटाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, मी 'प्रहार'च्या वेळी 3 वर्षे सैनिकांसोबत सीमेवर राहिलो आहे. तिथे ऊन-पावसाचा विचार न करता तरुण मुले हातात रायफल घेऊन निधड्या छातीने उभी असतात. ते आपल्यासाठी तिथे मरायला तयार असतात, पण आपल्या देशात त्यांना हवा तसा सन्मान मिळत नाही, याची मला प्रचंड खंत वाटते. नाना पाटेकर म्हणाले, बाहेरच्या देशात एखादा सैनिक समोर आला तर स्वतः राष्ट्राध्यक्षही उभे राहून त्यांना सॅल्युट करतात. आपल्याकडे मात्र तशी संस्कृती दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. हे ही वाचा... अजित पवार जबाबदार नेते, पण बोलताना तारतम्य ठेवणे गरजेचे:प्रचारावेळी कोण काय बोलतो ते फारसे महत्त्वाचे नाही- चित्रा वाघ अजित पवार हे जबाबदार नेते आहेत, पण प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, माझ्या सारखी कार्यकर्ता अजित पवारांना काय सांगणार, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मी त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यामुळे सर्वच कार्यकर्ते अन् नेत्यांनी तारतम्य ठेवून बोलले तर ते जास्त बरे राहील. सविस्तर वाचा...
महाराष्ट्रातील रेल्वेप्रश्नी मराठी खासदार एकवटले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील रेल्वेच्या प्रश्नांबाबत ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदाराची अनोखी युती पाहायला मिळाली. दिल्लीत आज रेल्वे कन्सल्टेटिव्ह कमिटीच्या बैठकीत राज्यातील खासदारांनी आवाज उठवला आणि यासंबंधी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. खासदार संजय दीना पाटील, खा. नरेश म्हस्के आणि बाळ््यामामा म्हात्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना संयुक्तपणे निवेदन देत […] The post महाराष्ट्रातील रेल्वेप्रश्नी मराठी खासदार एकवटले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लग्नानंतर अर्ध्या तासात नवरदेवाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नाच्या दिवशीच अमोल गोड या तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने आनंदी उत्सव सुरू असलेल्या लग्नमांडवात काही क्षणातच शोककळा पसरली. वरुड तालुक्यातील पुसला गावाचे कोतवाल अमोल गोड यांचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील […] The post लग्नानंतर अर्ध्या तासात नवरदेवाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-श्रीलंकेत रंगणार टी-२० विश्वचषकाचा थरार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने गत २०२४ चा टी-२० विश्वचषक उंचावत जगभरातील क्रिकेट विश्वात आपला दबदबा कायम केला. क्रिकेट चाहत्यांची पंढरी असलेल्या भारतात निवडणुकांप्रमाणेच क्रिकेट स्पर्धांची उत्सुकता पाहायला मिळते. त्यामुळे गतवर्षी चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर आता भारतीय संघाला आणि क्रिकेट चाहत्यांना आगामी टी-२० विश्वचषकाची उत्कंठा लागून राहिली आहे. आता […] The post भारत-श्रीलंकेत रंगणार टी-२० विश्वचषकाचा थरार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता सर्वोच्च न्यायालय समजून घेईल की, निवडणुका सुरू झालेल्या आहेत, सगळी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या २ तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्याकरिता जी काही विनंती आहे, ती सर्वोच्च न्यायालय मान्य करेल. आजही सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत सकारात्मक […] The post निवडणुका निर्विघ्नपणे पार पडतील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरपालिका निवडणुकीसाठीचे निरीक्षक प्रमोद गायकवाड यानी आज, मंगळवार, २५ नोव्हेंबरला येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निवडणूकविषयक कामकाजांची पाहणी केली. मतदान केंद्र, मतमोजणी स्थळ, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर तसेच सध्या सुरु असलेल्या निवडणूकविषयक कामकाजाचा त्यांनी आढावासुद्धा घेतला. आगामी २ डिसेंबर रोजी चांदूरबाजार नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चांदूर बाजारचे निवडणूक निरीक्षक प्रमोद गायकवाड यांनी आज, मंगळवारी येथे भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आयोजित दुसऱ्या प्रशिक्षण शिबिरालाही उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी टाऊन हॉलला मतदान यत्रांची तपासणी केली. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन त्यांना योग्य त्या सूचनाही दिल्या. यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रिया अचूक पार पाडण्याचे निर्देशही दिले. निवडणूक निरीक्षकांनी आचारसंहिता भंग, कायदा व सुव्यवस्था याबाबत ठाणेदार अशोक जाधव यांच्याकडूनही माहिती घेतली. त्यानंतर निवडणूक निरीक्षकांनी चांदुर बाजार नगर परिषद येथे भेट देऊन प्रचार कार्यालय परवानगी, वाहन परवानगी, बॅनर-पोस्टर परवानगी याबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेऊन चर्चा केली. तेथे उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आगामी होणारी निवडणूक भयमुक्त, निष्पक्ष व पारदर्शक पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सोनल सूर्यवंशी व सहायक निवडणूक अधिकारी गीता ठाकरेसुद्धा उपस्थित होत्या.
मतदारसंघांचे आरक्षण निश्चित करताना एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असू नये, असा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तसेच निर्देश दिले आहेत. परंतु तरीही प्रभागांचे आरक्षण निश्चित करताना काटेकोर काळजी न बाळगल्याने जिल्ह्यातील चिखलदरा व दर्यापुर या दोन नगरपालिका आणि धारणी या नगरपंचायतीमध्ये एकूण आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे तेथील निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट ओढवले आहे. यासंदर्भात आज, मंगळवार, २५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार होती. परंतु ही सुनावणी पुन्हा एकदा दोन दिवस पुढे ढकलण्यात आली असून २७ नोव्हेंबर ही नवी तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य टांगणीला लागले असून मतदानापूर्वीच तेथील निवडणूक रद्द होणार की निकाल रोखून धरायला लावले जाणार, याबद्दल विधीतज्ज्ञांद्वारे वेगवेगळे तर्क व्यक्त केले जात आहेत. काहींच्या मते सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या निकालाच्या अधीन राहून या तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अभय मिळू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कोणते प्रभाग कोणत्या संवर्गासाठी आरक्षित केले जावे, यासाठी प्रत्येक नगरपालिका व नगरपंचायतींसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या देखरेखीत आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी सोडत काढण्यात आली. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायती अशा डझनभर ठिकाणी एकाच दिवशी ही सोडत काढण्यात आली. परंतु तरीही चिखलदरा येथील एकूण आरक्षण ७५ टक्क्यांवर पोहोचले असून दर्यापुर नगरपालिकेचे एकूण आरक्षण ५२ टक्क्यांवर थांबले आहे. त्याचवेळी धारणी नगरपंचायतीचे आरक्षण ६५ टक्के झाले असून तिन्ही ठिकाणची संख्या ही ५० टक्क्यांहून अधिक असल्याने तेथील निवडणूक साशंक बनली आहे. जिल्हा परिषदेबाबतही अडचण जिल्ह्यातील १२ पैकी दोन नगरपालिका आणि एका नगरपंचायतीबद्दल ही अडचण असतानाच जिल्हा परिषदेतही तसेच झाले आहे. जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या संवर्गांचे आरक्षण ६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. ही संख्या ५० टक्क्यांहून अधिक असल्याने ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असू नये, या कायद्याचा तेथेही भंग झाला आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबतही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या २७ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय काय सांगते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दर्यापूर येथील नगरपालिकेची निवडणूक लढवू इच्छिणारे देविदास काळे यांना जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मंगळवारी न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, काळे यांना आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येणार आहे. छाननी प्रक्रियेत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला होता, ज्याविरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. काळे यांनी भवानी वेस परिसरातील प्रभाग क्रमांक २ मधून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, काँग्रेसने याच जागेसाठी आणखी एका उमेदवाराला 'एबी' फॉर्म दिला होता आणि त्या उमेदवाराने काळे यांच्या आधी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी देविदास काळे यांचा अर्ज अवैध ठरवला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला आव्हान देत काळे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपीलावर आज, मंगळवारी निकाल लागला. न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश रद्दबातल ठरवत देविदास काळे यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. या सुनावणीदरम्यान, ॲड. निशिकांत पाखरे, ॲड. वैभव इंगळे आणि ॲड. सचिन आठवले यांनी देविदास काळे यांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली.
खासदार क्रीडा महोत्सवाचा गुरुवारी समारोप:सुपरस्टार अक्षयकुमारच्या उपस्थितीत विजेत्यांचा होणार गौरव
खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप गुरुवारी (२७ नोव्हेंबर) होणार आहे. गणेश कला क्रीडामंच येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या समारोप सोहळ्याला प्रसिद्ध कलाकार अक्षय कुमार विशेष उपस्थिती लावणार आहेत. दोन आठवडे चाललेल्या या महोत्सवात बालगटापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, तसेच महिला आणि दिव्यांगांपर्यंत अशा सर्व वयोगटातील खेळाडूंनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. पुणे शहरातील २९ मैदाने आणि क्रीडा संकुलांमध्ये ३७ खेळांच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यात तब्बल ४० हजारांहून अधिक खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले. या समारोप सोहळ्यात विजेत्या खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. यावेळी खेलरत्न पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, ऑलिम्पियन रेखा भिडे, माजी कबड्डीपटू शांताराम जाधव, ऑलिम्पियन बॉक्सर मनोज पिंगळे, तेनसिंग नोर्गे पुरस्कार विजेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे, ध्यानचंद पुरस्कार विजेते टेनिसपटू नितीन कीर्तने यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित राहणार आहेत. तसेच, प्रकाश जावडेकर, धीरज घाटे, खा. मेधा कुलकर्णी, आ. भीमराव तापकीर, आ. सुनील कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. हेमंत रासने, राजेश पांडे यांसारखे नेतेही उपस्थित राहतील. या महोत्सवात क्रिकेट, फुटबॉल, खोखो, कबड्डी यांसारख्या ३७ खेळांचा समावेश होता. गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध मैदानांवर या स्पर्धा सुरू होत्या. विजेत्या प्रत्येक खेळाडूला रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. खासदार मोहोळ म्हणाले या कौतुक सोहळ्यामुळे विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि इतरांनाही खेळाची प्रेरणा मिळेल. या महोत्सवामुळे खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ मिळाले, तर नवोदित खेळाडूंना अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन लाभले. अनेक स्पर्धा चुरशीच्या झाल्या असून, या महोत्सवाचे नियोजन अतिशय नेटके होते. या वर्षी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातील विजेते उद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील, तर आश्चर्य वाटायला नको. या स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा अंजली भागवत यांनी व्यक्त केली.
…तर अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या
पिंपळनेर : डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यात सध्या खळबळ उडालेली आहे. डॉ. गौरी पालवे यांचा पती अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए होता. गौरी गर्जे यांना अनंत गर्जे मारझोड करायचा, असा दावा केला जात आहे. सोबतच आमच्या मुलीने आत्महत्या केलेली नाही. तिची हत्या करण्यात आली आहे, असा दावा गौरी गर्जे यांच्या […] The post …तर अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'मते दिली नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आहेत,' अशी धमकी अजित पवार खुलेआम देत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. महाराष्ट्राची तिजोरी त्यांची खासगी मालमत्ता आहे काय, असा संतप्त सवाल त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना उपस्थित केला. जनतेला धमकावणे ही सरळ गुंडगिरी असून, निवडणूक आयोग अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष का करतो, असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी विचारला. निवडणूक काळात निधी न देण्याची भाषा करणे ही दादागिरी असून, निवडणूक आयोगाने याची दखल न घेणे चिंताजनक असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्यातील शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत असताना, कुंभमेळ्यासाठी तब्बल २५ हजार कोटी रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मग कुंभमेळ्यासाठी पैसे कुठून येतात, असा सवाल त्यांनी केला. पर्यावरणाचा ऱ्हास करत कुंभमेळ्यासाठी हजारो झाडे तोडण्यात येत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. अमेडिया कंपनीने ४२ कोटी रुपये भरण्यासंदर्भात पुन्हा मुदतवाढ मागितली आहे. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी 'सगळे चोर भरलेले आहेत, या लोकांकडून काय अपेक्षा करणार,' असे म्हटले. घोटाळे करणे, एकमेकांना पाठीशी घालणे, चौकशीच्या नावाखाली प्रकरणे लांबवणे आणि विस्मृतीत गेल्यावर जमीन बळकावणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोपींना पाठिशी घातले जात असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत जिंकण्यासाठी राज ठाकरे यांना सोबत घ्यावे, असे मत काही जणांचे आहे. याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. स्थानिक आमदार आणि संघटना मिळून घेतलेला निर्णय सर्वांना मान्य राहील, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. नागपूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे सुनील केदार यांच्या कट्टर समर्थकांना भाजपने प्रवेश दिला होता. मात्र, आमदार आशिष देशमुख यांच्या विरोधानंतर लगेच तो प्रवेश रद्द करण्यात आला. हे समर्थक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. महसूलमंत्र्यांच्या आजूबाजूला महसूल बुडवणारे बसतील हे सहन करणार नाही, असे देशमुख म्हणाले होते. यावरून महायुतीत अंतर्गत वाद सुरू झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात राजकारण गढूळ करण्याचे काम सुरू असून, एकमेकांची जिरवली जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
ज्येष्ठ पत्रकार आणि 'क्वेश्चन ऑफ सिटीज'च्या संस्थापक संपादक स्मृती कोप्पीकर यांनी म्हटले आहे की, भारतातील ७० टक्के नागरिक बातम्यांसाठी सोशल मीडियावर अवलंबून आहेत. तसेच, दर चारपैकी तीनजण माहिती मिळवण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करतात. या बदलामुळे पत्रकारितेचे प्रशिक्षण नसलेल्या 'इन्फ्लुएन्सर्स' आणि व्यक्ति-केंद्रित मजकुराचे वर्चस्व निर्माण झाले असून, अशा व्यक्ती जनमत घडवत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वे दिलीप पाडगावकर स्मृती व्याख्यान सिंबायोसिस विश्वभवन सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी स्मृती कोप्पीकर यांना प्रमुख व्याख्यात्या म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आणि सिंबायोसिसचे संस्थापक व कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आणि लतिका पाडगावकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. कोप्पीकर यांनी सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पत्रकारितेत निर्माण झालेल्या संकटावर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, आज यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर विषयातील तज्ज्ञ आणि माहितीची सत्यता न पडताळणारे ऑनलाइन क्रिएटर्स अनेकदा सारखेच विश्वसनीय वाटतात. यामुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आणि माध्यमांवरील विश्वास कमी होतो. पारंपारिक न्यूजरूम्स प्रक्रिया, नैतिक तपासणी आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाला बांधील असतात, असे कोप्पीकर म्हणाल्या. याउलट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स चुकीच्या माहितीच्या जबाबदारीपासून स्वतःला दूर ठेवतात. अमेरिकन सिनेटच्या सुनावणीत फेसबुकने घेतलेल्या भूमिकेचा दाखला देत त्यांनी सांगितले की, कंपनीने स्वतःला एक टेक प्लॅटफॉर्म, न्यूज ऑर्गनायझेशन नाही असे संबोधून फेक न्यूजच्या जबाबदारीतून सुटका करून घेतली होती. वाचकांचा आणि प्रेक्षकांचा माध्यमांवरील विश्वास कमी होत असल्याचे अधोरेखित करत, कोप्पीकर यांनी पत्रकारिता पुन्हा उभारण्याचे आवाहन केले. यासाठी सामूहिक प्रयत्न, जनसंपर्क आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित केलेल्या आवाजांना व्यासपीठ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
अंग भाजल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाने मानसिक तणाव वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अखिल मरसकोल्हे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मध्यप्रदेशातील तीरोडीचा रहिवासी आहे. अखिल मरसकोल्हे या तरुणाला भाजल्यामुळे त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वेदना असह्य झाल्याने तरुण मानसिक तणावाखाली गेला. त्याची मानसिक अवस्था ढासळत चालली होती. मंगळवारी सकाळी मरसकोल्हे रुग्ण अचानक वॉर्डमधून बाहेर पडला आणि थेट जिल्हा रुग्णालयाच्या छतावर गेला. अंदाजे ४० ते ५० फूट उंचीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र, प्रचंड रक्तस्राव आणि गंभीर मेंदूच्या जखमेमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रुग्णाच्या उडी मारण्याचा थरार दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याने खळबळ उडाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुण इमारतीच्या कठड्याला लटकलेला दिसतो. खाली त्याचे नातेवाईक व आजूबाजूचे लोक थांबलेले होते. तरुण उडी मारण्याच्या बेतात असल्याचे लक्षात येताच इमारतीखाली अनेक लोक जमले. मोठी खळबळ उडाली. पण त्याच क्षणी रुग्णाने आपला हात सोडून दिला. क्षणार्धात खाली कोसळल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला खाली जमलेल्या लोकांनी रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला आयसीयूमध्ये ठेवले. मात्र, जखम इतकी गंभीर होती की रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संपूर्ण थरार व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात अलीकडेच बिबट्या दिसल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. विद्यार्थी, रहिवासी, तसेच अध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालय येथील सभागृहात बिबट्या संदर्भात एक जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत वन विभागाचे अधिकारी कृष्णा हाके आणि रेस्क्यू टीमचे किरण राहीलकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बिबट्यांच्या हालचाली, त्यांच्या वर्तनातील वैशिष्ट्ये, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी आणि परिसरात फिरताना घ्यावयाच्या सुरक्षा उपाययोजनांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या कार्यशाळेला जयकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. देसले यांच्यासह २०० पेक्षा अधिक विद्यार्थी, विद्यार्थिनी, तसेच सुरक्षा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच अनुषंगाने, बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना अनावश्यक फिरणे टाळण्याचे, नेहमी समूहाने हालचाल करण्याचे आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी वन विभाग आणि सुरक्षा विभागाचे दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने सोशल मीडियावर अप्रमाणित व्हिडिओ, फोटो किंवा अफवा पसरवू नयेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अनावश्यक दहशत निर्माण होऊ नये आणि परिसरातील सुरक्षितता, सुव्यवस्था व जैवविविधतेचे रक्षण व्हावे यासाठी सर्व हितधारकांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची १५ लाख ७५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला मे महिन्यात सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संदेश पाठवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. सुरुवातीला त्यांनी काही रक्कम चोरट्यांच्या खात्यात जमा केली. गुंतवणूक केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचा संदेश पाठवला, मात्र प्रत्यक्षात कोणतीही रक्कम मिळाली नाही. यामुळे त्यांचा विश्वास बसला आणि चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले. गेल्या चार ते पाच महिन्यांत त्यांनी वेळोवेळी १५ लाख ७५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतरही परतावा न मिळाल्याने आणि चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पेन्शन कार्ड देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतल्याची दुसरी घटनाही समोर आली आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर राहणाऱ्या ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने समाज माध्यमांवर पेन्शन कार्ड देण्याबाबतची जाहिरात पाहिली होती. त्यांनी जाहिरातीतील क्रमांकावर संपर्क साधला असता, चोरट्यांनी त्यांच्याकडून बँक खाते, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि डेबिट कार्डची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ५० हजार रुपयांची रोकड काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
…तर भाजपचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जींचा इशारा
कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने एसआयआर विरोधात मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बोनगाव येथे एसआयआरचा निषेध करण्यासाठी एक रॅली काढली. त्यानंतर जमावाला संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी भाजपला आव्हान दिले. जर भाजपने बंगालमध्ये आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर ते संपूर्ण भारतात भाजपचा पाया […] The post … तर भाजपचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जींचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रोहित शर्मा टी २० वर्ल्ड कप ब्रँड अॅम्बेसेडर
मुंबई : टीम इंडिया टी २० वर्ल्ड कप गतविजेता आहे. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात २०२४ साली दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत टी २० वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले होते. रोहितने या ऐतिहासिक कामगिरीनंतर टी २० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याला टी २० संघाच्या नेतृत्वाची धुरा देण्यात आली. सूर्यानेही रोहितचा वारसा यशस्वीपणे […] The post रोहित शर्मा टी २० वर्ल्ड कप ब्रँड अॅम्बेसेडर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘मच्छर’ ठरणार गेमचेंजर; अमेरिका, चीनला झपाटले
वॉशिंग्टन/बिजींग : वृत्तसंस्था जगभरातील संरक्षण सामुग्री बनवणा-या डिझायनर्सनी अशा घातक ड्रोन्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. मायक्रो ड्रोनचे वजन एका छोट्या पक्षाइतके किंवा एका मच्छर इतके असू शकते. हे ड्रोन सामान्य डोळ्याला दिसणे कठीण, त्याचा आवाज ऐकू येणे अशक्य आणि रोखणे तर जवळपास अशक्य आहे. सध्या बॅटरी मायक्रो ड्रोनचा वीक पॉइंट आहे. बॅटरी कमजोर आहे. पण […] The post ‘मच्छर’ ठरणार गेमचेंजर; अमेरिका, चीनला झपाटले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणमध्ये १० महिन्यांत १,००० लोक फासावर!
तेहरान : वृत्तसंस्था इराणमध्ये गेल्या १० महिन्यात तब्बल १ हजार पेक्षा जास्त जणांना फासावर लटकवल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. इराणमध्ये फाशीची शिक्षा सामान्य आहे. पण २०२५ मध्ये इराणमधली परिस्थिती अधिक भयंकर बनली. मानवाधिकार संघटनांच्या एका आकडेवारीनुसार, या वर्षात इराणमध्ये तब्बल एक हजार पेक्षा जास्त जणांना फासावर लटकवण्यात आले आहे. इस्रायलविरुद्धच्या संघर्षानंतर इराणमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा […] The post इराणमध्ये १० महिन्यांत १,००० लोक फासावर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लग्नसराई : देशात ४६ लाख विवाह; साडेसहा लाख कोटी खर्च!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदा १ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत साडेसहा लाख कोटी रुपये विवाह वेदीवर खर्च होतील, असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने वर्तविला आहे. येत्या १४ डिसेंबरपर्यंत देशात ४६ लाख विवाह संपन्न होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे साडी ते सॅलॉन अशा सर्वच क्षेत्रांत मागणी दिसून येईल. प्रसिद्ध कपडे ब्रँडचे अध्यक्ष […] The post लग्नसराई : देशात ४६ लाख विवाह; साडेसहा लाख कोटी खर्च! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इथियोपियाच्या ज्वालामुखीची राख दिल्लीत; विमान सेवा रद्द
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली विमानतळावारील सर्व उड्डाणे आज प्रभावित झाली. अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. ही उड्डाणे दिल्लीतील स्मॉग किंवा प्रदुषणामुळे नाही तर इथियोपियातील ज्वालामुखी स्फोटामुळे रद्द करण्यात आली. दिल्लीपासून ४ हजार कि.मी. अंतरावरील हायली गुब्बी येथे ज्वालामुखीचा उद्रेक १२,००० वर्षानंतर झाला. त्याची राख १४ कि.मी. उंचीपर्यंत उसळत राहिली आणि धुरासह राखेचे महाकाय […] The post इथियोपियाच्या ज्वालामुखीची राख दिल्लीत; विमान सेवा रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख नोक-या!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार सुधारणा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गेमचेंजर ठरू शकतात. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या नवीन कामगार संहितांमुळे देशात ७७ लाख नवीन नोक-यांची निर्मिती होईल आणि बेरोजगारीचा दर १.३ टक्क्यांपर्यंत कमी होईल. नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर मध्यम कालावधीत बेरोजगारी १.३ टक्क्यांनी कमी होईल, ज्यामुळे ७७ लाख अतिरिक्त लोकांना रोजगार […] The post नवीन कामगार कायद्यांमुळे ७७ लाख नोक-या! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतासमोर कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचे लक्ष्य
गुवाहाटी : भारतीय कसोटी क्रिकेटला गेल्या काही मालिकांपासून ग्रहण लागले आहे. देशात खेळलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये भारताची दैना झाली आहे. न्यूझीलंडने क्लिन स्विप दिल्यानंतर आता दक्षिण अफ्रिका देखील त्याच मार्गावर आहे. दक्षिण अफ्रिका घरच्या मैदानावर ९३ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणून इतिहास रचला आहे. एखाद्या संघाने भारतासमोर ५४८ धावांचे लक्ष्य ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ९३ वर्षांच्या […] The post भारतासमोर कसोटी इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचे लक्ष्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या वॉर्डनिहाय आकडेवारीनुसार, मुंबईत तब्बल 11 लाख 1 हजार 505 दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून,मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप अखेर सत्य ठरला असल्याचे म्हटले जात आहे. यावरून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबर रोजी मुंबईची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. मात्र, ही यादी जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि इतर विरोधी पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेतले होते. याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दुबार नावे असून बोगस मतदारांचा भरणा असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. मुंबई महापालिकेकडून मतदार यादी जाहीर विरोधकांच्या तक्रारींनंतर आता खुद्द मुंबई महानगरपालिकेनेच संशयित दुबार मतदारांची वॉर्डनिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार तब्बल 11 लाखांहून अधिक नावे दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दुबार मतदार असल्याने निवडणुकीच्या निकालावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कुठे किती दुबार मतदार? मुंबई महापालिकेने जारी केलेल्या मतदार यादीनुसार, 'एस' (S) वॉर्डमध्ये दुबार मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. येथे तब्बल 69 हजार 500 दुबार मतदार आढळले आहेत. तर दक्षिण मुंबईतील 'बी' (B) वॉर्डमध्ये ही संख्या सर्वात कमी असून तिथे 8 हजार 398 दुबार मतदार आहेत. विरोधकांच्या आरोपांवर शिक्कामोर्तब? ठाकरे गट आणि मनसेने या मुद्द्यावरून आधीपासूनच निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. मतदार यादीतील घोळ हा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. आता पालिकेच्याच अधिकृत आकडेवारीमुळे विरोधकांच्या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता हे 11 लाख मतदार वगळले जाणार का आणि सुधारित यादी वेळेत येणार का? याकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
नगरपालिका निवडणुकीत काही ठिकाणी इनकमिंग वाढलंय. काही ठिकाणी कमी झालंय. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची टॅगलाईन असलेली साम, दाम, दंड, भेद नीती वापरली गेलीय, असा थेट आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच इलेक्शन हे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच झालं पाहिजे. साम, दाम, दंड, भेद ही आमची विचारधारा नाही, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावलाय. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी खासदार सुप्रिया सुळेंनी आदरांजली वाहिली. स्थानिक नेत्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अनेक ठिकाणी खिंडार पडल्याचे सुप्रिया सुळेंनी नाकारलं. त्या म्हणाल्या की, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गटात गेले असले, तरी पुणे जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर बाहेर पडले आहेत. असं अनेक ठिकाणी झालंय. त्यामुळे या निवडणुकीत सगळ्याच पक्षांमध्ये असा विस्कळीतपणा आलेला आहे. सत्ता केंद्रीत होता कामा नये, हे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न होते. मात्र, आज दुर्दैवाने सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत होताना दिसत असल्याचे सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आल्याबद्दलच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका मोठ्या असतात. स्थानिक निवडणुका या पदधिकारी, कार्यकर्त्यांच्या असतात. अशा निवडणुका सगळ्यांनी मिळून एकत्र लढाव्या, असं काहींचं मत असतं. शरद पवारांनी दिलेल्या अधिकारामुळे निर्णय घेतले असतील. तसेच ही परिस्थिती दोन्ही बाजूला आहे आणि हे पहिल्यांदा नाही तर यापूर्वीही झालं आहे. लोकशाहीत सर्वांना टीका करण्याचा अधिकार साताऱ्यात महाविकास आघाडीला उमेदवार न मिळाल्याने बाहेरून उमेदवार आयात करावा लागल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी 'लोकशाहीत टीका करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचे सांगत ते आधी कुठल्या पक्षात होते?' मला त्याचा विसर पडला असल्याचा सणसणीत प्रति टोला लगावला. धनंजय मुंडेंवरही साधला निशाणा भर कार्यक्रमात वाल्मीक कराडची आठवण काढणाऱ्या आमदार धनंजय मुंडे यांचाही सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या करणाऱ्याची जर आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेध केला पाहिजे. अशा प्रवृत्तीला नेत्याने पक्षातून काढून टाकलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण देशाचे नेते होते मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री दौऱ्यावर नसल्याने एकही प्रशासकीय अधिकारी समाधीस्थळी उपस्थित नव्हता . ही बाब सुप्रिया सुळेंच्या नजरेतून सुटली नाही. यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तिमत्त्व हिमालयाएवढं उत्तुंग होतं. त्यांच्या जयंती आणि स्मृतिदिनी आम्ही त्यांचे स्मरण करतो. समाधीस्थळी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो. यशवंतराव चव्हाण हे फक्त महाराष्ट्राचे नव्हते तर देशाचे नेते होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्या कामात व्यस्त असतील. त्यामुळे त्यांना येता आले नसेल. परंतु, आजच्या दिवशी प्रशासन कुठेच दिसत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्ती कपूर सुपूत्र सिद्धांतला मुंबई पोलिसांचे समन्स
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एक ड्रग सिंडिकेट प्रकरण बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स धाडण्यात आले आहे. अशातच आता या प्रकरणी शक्ती कपूर यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. सिद्धांत कपूरलाही या प्रकरणी चौकशीसाठी समन्स धाडण्यात आलेले. सिद्धांत कपूर आज चौकशीसाठी घाटकोपरच्या […] The post शक्ती कपूर सुपूत्र सिद्धांतला मुंबई पोलिसांचे समन्स appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले
नाशिक : माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाला असून घराजवळ नातवासोबत फेरफटका मारत असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे. पाठीमागून येणा-या चारचाकी कारने निर्मला गावित यांना उडविले. या अपघातात माजी आमदार निर्मला गावित गंभीर जखमी झाल्या आहेत. इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ साली आमदारकी मिळवली होती. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत त्यांनी एकनाथ […] The post माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता
अयोध्या : आज रामनगरी अयोध्येत श्रीराम मंदिराचा धर्मध्वजारोहण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा ‘मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता’ हा मुद्दा उपस्थित केला. लक्ष्य राम मंदिर उभारण्यापेक्षा कठीण असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय समाजाच्या मनात इंग्रजी राजसत्तेकडून आलेली हीनभावना आजही जिवंत असल्याची टीका त्यांनी केली. मोदी यांनी पुढील […] The post श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इगतपुरीच्या माजी आमदार आणि शिंदे गटाच्या नेत्या निर्मला गावित यांचा नाशिकमध्ये अत्यंत भीषण अपघात झाला आहे. घराबाहेर नातवाला घेऊन फेरफटका मारत असतानाच पाठीमागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भयानक होता की, कारने त्यांना काही फुटांपर्यंत फरफटत नेले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या असून, सध्या नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला गावित यांचा हा अपघात काल सोमवारी घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आज समोर आले असून ते पाहून अंगावर काटा येतो. निर्मला गावित आपल्या नातवासोबत घराबाहेर चालत होत्या. त्यावेळी अचानक मागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली. धडक बसताच गावित कारच्या बोनेटवर आदळल्या, तरीही चालकाने गाडी न थांबवता त्यांना पुढे फरफटत नेले. सुदैवाने त्यांचा नातू थोडा बाजूला असल्याने तो या अपघातातून बालंबाल बचावला. अपघातानंतर निर्मला गावितांची प्रतिक्रिया अपघातानंतर निर्मला गावित यांनी रुग्णालयातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते, म्हणूनच मी वाचले. मी नातवासोबत वॉक करत होते. नातवाचा हात धरलेला नव्हता, त्यामुळे तो बाजूला होता. अचानक मागून 'धड' असा आवाज आला आणि मी थेट बोनेटवरच पडले. त्यानंतर मला काही आठवत नाही, थेट रुग्णालयातच मला समजले. काल खूप त्रास होत होता, पण आज डॉक्टरांच्या उपचारामुळे मी रिलॅक्स आहे, असे निर्मला गावित यांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर अपघातामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भरधाव कार चालकावर पोलिस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण आहेत निर्मला गावित? निर्मला गावित यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, शिवसेनेतील बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असं निर्मला गावित पक्षप्रवेशावेळी म्हटलं होतं.
लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-५ – नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मनपाचा निष्काळजीपणा
रस्ते, पाणी, पथदिव्यांची व्यवस्था नव्याने विकसीत करण्याची गरज, गटारीतील घाण उचलणार नसाल तर गटारीच काढू नका! लातूर (प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये गेल्या सात वर्षांत लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने या प्रभागाकडे लक्षच दिले नाही़ त्यामुळे रस्ते, गटारी, पथदिवे, पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सुविधा या सर्वच गोष्टी पुन्हा नव्याने विकसीत करण्याची गरज आहे़ महत्वाचे […] The post लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-५ – नागरिकांचे आरोग्य धोक्यात, मनपाचा निष्काळजीपणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक डॉक्टर शिवाजी गणपत बंगाळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी राजस बंगाळ यांच्यासह दौलत बंगाळ, डॉ. राजेंद्र बंगाळ ही दोन मुले, थोरले बंधू डॉ. बाळकृष्ण बंगाळ, चार पुतणे व नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांचे ते वडील होत. डॉ. शिवाजी बंगाळ यांच्या निधनाबद्दल विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. डॉ. बंगाळ हे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये स्थायिक झाले होते. अहिल्यानगर जिह्यातील अकोले तालुक्यातील डॉ. शिवाजी बंगाळ हे पहिले एम.बी.बी.एस डॉक्टर होते. प्रवरा नदीचा तीरावर वसलेल्या मेहेंदुरी त्यांचे मूळ गाव. डॉ. बंगाळ यांचा जन्म 18 मार्च 1937 मध्ये झाला. प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करण्याची अनेकदा संधी मिळाली मात्र ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा हेच आपले ध्येय मानून त्यांनी आदिवासीबहुल भागात सेवाभावी वृत्तीने चार दशकांपेक्षा अधिक काळ आरोग्यसेवा क्षेत्रात अविरतपणे काम केले. वैद्यकीय सेवेतील सेवाभावीवृती, सामाजिक बांधीलकी व नैतिक मूल्य कायम जपले. रुग्णांशी कसे बोलावे, वागावे याचा आदर्श मापदंडच त्यांनी पाळला. डॉ. शिवाजी बंगाळ पुण्याचे बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये सन 1963 च्या एम.बी.बी.एस. बॅचचे विद्यार्थी होते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते परदेशातील एज्युकेशन कौन्सिल फोर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांनी देशात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चोवीस वर्षे अधिकृत मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी सेवा दिली. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मानद मेडिकल ऑफिसर सेवा दिली. एल.आय.सी. चे अधिकृत मेडिकल ऑफिसर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य होते तसेच सन 2011 मध्ये रोटरी क्लबच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. डॉ. बंगाळ यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वक्तशीरपणा, कामातील शिस्त व सुसंस्कृता तसेच लोकांशी बांधिलकी हे त्यांचे उल्लेखनीय गुण अधोरेखित करणे गरजेचे आहे. त्यांनी 'प्रवरेचे पाणी' हे आत्मकथनपर पुस्तक लिहले असून जीवनातील स्वअनुभव आधारित करणारे व ग्रामीण आदिवासीबहुल भागात राहून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टराची आत्मकथा वाचनीय आहे.
अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने उडवलेल्या महिलेच मृत्यू
बीड : प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील औसा येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव-धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे एक मोठी दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुसुम विष्णू सुदे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या […] The post अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने उडवलेल्या महिलेच मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अपघाताचा बहाणा करून ट्रक चालकाला लुटले:हडपसर येथील घटना, पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली
पुणे शहरातील हडपसर येथील मगरपट्टा परिसरात अपघात झाल्याचा बहाणा करून एका ट्रक चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी साधुराम दिगंबर मुळे (वय ३३, रा. सलगरा दिवटी, ता. तुळजापूर, जि. सोलापूर) या ट्रक चालकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुळे हे २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मगरपट्टा रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. आरोपींनी अपघात झाल्याची बतावणी करत मुळे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मामेभावाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मुळे यांच्या खिशातून ५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. या घटनेनंतर घाबरलेल्या मुळे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू करत इरफान इस्माईल सय्यद (वय ३३), शाहरुख आसिफ मणीयार (वय ३३) आणि शुभम विजयशंकर तिवारी (वय २७) या तिन्ही आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस. शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महाविद्यालयीन युवकाला धमकावून लुटमार प्रयत्न पुणे शहरातील लष्कर भागात महाविद्यालयीन युवकाला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका महाविद्यालयीन युवकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवक सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात राहायला आहे. तो लष्कर भागातील डेक्कन लायब्ररी परिसरातून निघाला होता. त्यावेळी अनोळखी दोघांनी त्याला अडवून धमकाविले. त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. युवकाने त्यांना विरोध केल्यानंतर दोघे जण पसार झाले. घटनास्थळी नागरिक जमा झाल्याचे पाहताच दोघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे पुढील तपास करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण:उत्तर प्रदेशातून मुलीची सुखरूप सुटका, आरोपींना अटक
पुण्यातून विवाहाचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची उत्तर प्रदेशातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरुणासह त्याच्या सावत्र आईला अटक केली आहे. गेल्या महिनाभरापासून पोलिस या मुलीचा शोध घेत होते. रमेश मसनाजी पिट्टलवाड (वय २५, रा. धनगर वस्ती, ऊरळी देवाची, मूळ रा. नांदेड) आणि मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड (वय ३५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश हा पुण्यात कामाच्या शोधात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेशची १३ वर्षीय मुलीशी ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. या कृत्यात त्याची सावत्र आई मुक्ताबाई हिने त्याला मदत केली. मुक्ताबाईने त्यांना हैद्राबादला जाण्यासाठी पैसे दिले होते. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी रमेश मुलीला घेऊन हैद्राबादला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुक्ताबाईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक हैद्राबादला पोहोचले. मात्र, पोलिस मागावर असल्याची माहिती मिळताच रमेश मुलीला घेऊन तेथून पसार झाला. तांत्रिक तपासाच्या आधारे रमेश मुलीला घेऊन उत्तर प्रदेशातील बामणौली परिसरात एका नातेवाईकांकडे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि त्यांनी रमेशला ताब्यात घेतले. तसेच, अल्पवयीन मुलीची सुटका केली. मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे, सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांना यंदाचा 'महात्मा फुले समता' पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यात होणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता, समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा सोहळा पार पडेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात खासदार उपेंद्र कुशवाहा आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. थोरात यांना पुरस्कार प्रदान केला जाईल. यावेळी हेमंत रासने, रूपाली चाकणकर, बाळासाहेब शिवरकर, कमल ढोले-पाटील, दिप्ती चवधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने 'महात्मा फुले समता पुरस्कार' दिला जातो. सामाजिक, राजकीय, साहित्य आणि पत्रकारिता यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. डॉ. सुखदेव थोरात यांची भारतीय सामाजिक-आर्थिक विचारविश्वात एक अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक, अभ्यासक आणि धोरणनिर्माते म्हणून विशेष ओळख आहे. सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि सर्वांसाठी शिक्षण या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याची देशव्यापी दखल घेतली गेली आहे. डॉ. थोरात यांनी २००६ ते २०११ या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणावर भर देत त्यांनी प्रवेश, शिष्यवृत्ती आणि मागास समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक धोरणे राबवली आहेत.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी अनुपस्थित राहिल्याने भाजपने टीका केली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ही टीका तथ्यहीन आणि हास्यास्पद असल्याचे सांगत ती जोरकसपणे फेटाळून लावली आहे. तिवारी म्हणाले की, राहुल गांधी यांनी यापूर्वी अनेक मुख्य न्यायमूर्तींच्या शपथविधीला हजेरी लावली आहे. यावेळी काही वैयक्तिक कारणांमुळे ते उपस्थित राहू शकले नसतील आणि त्यांच्या अनुपस्थितीचे राजकारण करणे योग्य नाही. सत्ताधारी भाजपला विरोधी पक्षनेत्यावर बोट ठेवण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. तिवारी यांनी सत्ताधारी पक्षावर पलटवार करत म्हटले की, निवडणूक आयोगाची नियुक्ती करणाऱ्या त्रिसदस्यीय निवड समितीतून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना का बाहेर काढले आणि त्यांच्या जागी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना का बसवले, याचे उत्तर भाजपने द्यावे. पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश अशी स्वायत्त समिती बदलून पंतप्रधान आणि त्यांचेच मंत्री अशी बहुमताची समिती करणे, म्हणजे निवडणूक आयोगावर सत्ताधारी पक्षाचा कब्जा मिळवण्याचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला. २०२३ मध्ये मंजूर झालेल्या ‘मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती) कायद्या’वरही तिवारी यांनी टीका केली. संसदेत शेकडो विरोधी खासदारांना मनमानी पद्धतीने निलंबित करून, कोणतीही चर्चा न करता हा कायदा हुकूमशाहीने संमत करण्यात आला. याच कायद्याच्या आधारे अमित शहा यांच्या हाताखाली सचिव असलेले ज्ञानेश कुमार यांना मुख्य निवडणूक आयुक्त नेमले गेले, असे तिवारी म्हणाले. ही निवडणूक यंत्रणेवर थेट सत्ताधारी पक्षाचा कब्जा आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. लोकशाहीचा गाभा आणि संवैधानिक संस्थांची स्वायत्तता धोक्यात आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता राहुल गांधींच्या एका कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्यावरून न्यायसंस्थेचा अपमान झाल्याचे ढोंग करण्याचा अधिकार नाही, असे तिवारी यांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाली असून यावर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. ब-याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती १५ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र […] The post काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. दीपक शिकारपूर लिखित 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स 2025++' या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक राज्यातील अंधशाळांमध्ये वितरित केले जाणार आहे, जेणेकरून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळेल. यावेळी बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अंधारातही भविष्य घडवता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास जीवनातील अंधार ही अडचण न राहता शारीरिक अक्षमतांना क्षमतांमध्ये रूपांतरित करता येऊ शकते. डॉ. शिकारपूर यांचे हे कार्य सामाजिक बांधिलकीचे असून स्पृहणीय आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि डिजिटल साक्षरता कार्यकर्ते डॉ. दीपक शिकारपूर अनेक वर्षांपासून दृष्टिहीन व्यक्तींच्या साक्षरतेसाठी काम करत आहेत. त्यांचे तंत्रज्ञानविषयक साहित्य ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित करून ते राज्यातील अंधशाळांमध्ये वितरित करतात. दृष्टिहीन व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारखे आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यातील मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी या पुस्तकाची ब्रेल आवृत्ती विकसित केली आहे. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स 2025++' हे डॉ. शिकारपूर यांचे 63वे पुस्तक दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. पुस्तकाविषयी बोलताना डॉ. शिकारपूर यांनी सांगितले की, यात एआयचे प्रवाह आणि व्यवसायासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होऊ शकतो, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ॲडम्स् कोर्ट, बाणेर येथे करण्यात आले होते. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडच्या प्रवक्त्या सकिना बेदी, फिडेल सॉफ्टच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, जागृती स्कूल फॉर ब्लाईंडच्या व्यवस्थापक सविता गायकवाड, कौशल्य विकास मार्गदर्शक ऋजुता भागवत आणि शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. थकीत वेतन मिळवून देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. याप्रकरणी अनमोल शिवाजी शिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका वसतिगृह अधीक्षकाने यासंदर्भात तक्रार दिली होती. अधीक्षकाचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन थकीत होते. हे वेतन मंजूर करून देण्यासाठी लिपिक शिंगे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले. यानंतर एसीबी पथकाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना शिंगे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. टोळक्याकडून वाहनांची तोडफोड पुणे शहरात हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.फरहान ऊर्फ फऱ्या सोहेबलाल शेख, आझाद ऊर्फ अज्जू तालिब खान, कदीर शेख, रेहान जमील खान, यश ऊर्फ चॉकलेट जावळे (सर्व रा. भारत कॉलनी, आदर्श नगर, उरुळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत नवाज शरीफ शेख (वय ३६, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी फरहान शेख याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. धनंजय मुंडे हे थर्ड क्लास व्यक्ती आहेत. त्यांना अजूनही वाल्मीक कराडची आठवण येत असेल तर माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची नुकतीच परळीत एक जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला वाल्मीक कराडची आठवण येत असल्याचे विधान केले होते. आज 9-10 महिने झाले. जगमित्र कार्यालय सुरू आहे. कामही सुरू आहे. पण एक व्यक्ती नाही याची मला प्रकर्षाने जाणीव होते, असे ते म्हणाले. अंजली दमानिया यांनी मंगळवारी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, मला धनंजय मुंडे यांचे विधान ऐकून राग आला. संताप आला. ही व्यक्ती थर्ड क्लास आहे. एबसुल्युटली थर्ड क्लास. एवढे सगळे होऊनही त्यांना आठवण येत असेल तर माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. परळीच्या जनतेनेच आता त्यांना पुन्हा निवडून देऊ नये. उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे. सध्या तो मकोका अंतर्गत बीड जिल्हा कारागृहात खडी फोडत आहे. त्याच्यावर संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पार्थ पवारावर अजून गुन्हा का नाही? अंजली दमानिया यांनी यावेळी मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यात दिरंगाई होत असल्यावरही आगपाखड केली. त्या म्हणाल्या, पुणे भूखंड घोटाळ्यात यंत्रणा पार्थ पवार यांना पाठिशी घालत आहेत. त्यांना वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. इथे आपल्यापैकी कुणी असते तर त्याच्यावर आतापर्यंत एफआयआरही दाखल झाला असता. पण इथे पार्त अजित पवार हे नाव आहे. या नावामुळेच अद्याप त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. एफआयआरमध्ये नावही घेतले जात नाही. मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अॅमेडिया कंपनीला 10 दिवसांची वाढीव मुदत देण्याचे काम सुरू आहे. या असंख्य प्रश्नांनी त्रास होत आहे. मी खर्गे समितीला अनेक पुरावे पाठवलेत. सदर कंपनीचे वीज बीलही पार्थ पवारांच्या नावाने आहे. दिग्विजय पाटील कुठेच नाही. या प्रकरणात त्याच्यावर नाहक अन्याय करण्यात आला आहे. इओडब्ल्यूचे मिसाळ यांच्याकडे शितल तेजवानीचे सर्व पुरावे दिलेत. या सर्वांची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणी खरा भागीदार कोण आहे? खरा सुत्रधार कोण आहे? हे स्पष्ट झाले पाहिजे. पार्थ पवार यांनी दिग्विजयला सहीचे अधिकार दिले होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजित पवारांना बोलताना भान राखण्याचा सल्ला अंजली दमानिया यांनी यावेळी मतदारांना मतांच्या मोबदल्यात निधी देण्याच्या विधानाचाही समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, अजित पवार व रुपाली चाकणकर यांना सांगायचे आहे की, ते पैसे तुमच्या काकांचे नाहीत. ते पैसे जनतेचे आहेत. हा निधी जनतेच्या करांमधून आला आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना भान राखावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांची पाठराखण करतात.
शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मोठे विधान केले आहे. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, आज झालेल्या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या लढाऊ वृत्तीवर मोहोर मारली. ठाकरे यांच्या या विधानामुळे शिवसेना-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील राजकारणात नेहमीच ठाम भूमिका घेणारे आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्यांमुळे घराबाहेर निघू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीत त्यांना गंभीर प्रकारचा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगिले आहेत. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे दुपारी भांडूपमधील मैत्री नावाच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा राऊत यांचे बंधू, आमदार सुनील राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. संजय राऊत यांना थेट भेटून त्यांच्याशी काही काळ चर्चा केली. गेल्या काही आठवड्यांपासून प्रकृती ढासळल्यामुळे राऊत यांनी संपूर्ण राजकीय कामकाज थांबवले होते. त्यांनी सोशल मीडियावरून स्वतःच माहिती देत सांगितले होते की, अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना गर्दीपासून आणि ताणतणावापासून दूर राहणे आवश्यक आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट राऊत कुटुंबासाठी धीर देणारी ठरली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या लवकर बरे होण्याबद्दल पूर्ण खात्री व्यक्त केली. ते म्हणाले, अनेक दिवसांपासून त्यांना भेटण्याचं मनात होतं. आज भेट झाली आणि खूप समाधान वाटलं. संजय आता आधीपेक्षा बरे दिसत आहेत. ते लवकरच राजकीय मैदानात परत येतील आणि नेहमीप्रमाणे आपल्या शब्दांनी आणि भूमिकेने वातावरण तापवताना दिसतील. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर पसरल्याचे दिसून आले. जरी डॉक्टरांनी संजय राऊत यांना बाहेर न पडण्याचे आदेश दिले असले, तरी 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी डॉक्टरांचा सल्ला बाजूला ठेवत शिवाजी पार्कवर जाऊन अभिवादन केले होते. मास्क लावून आणि सुनील राऊत यांच्या आधाराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यामुळे संकटात असतानाही त्यांचा शिवसैनिक जागा असल्याचे कार्यकर्त्यांना पुन्हा जाणवले. पक्षातील सर्वात प्रभावी आवाजांपैकी एक यापूर्वी पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला होता. आता पुन्हा एकदा आजारपणाच्या काळात ठाकरे यांनी दाखवलेली ही जवळीक पक्षातील नात्यांची घट्ट बांधणी अधिक स्पष्ट करते. संजय राऊत हे ठाकरे गटाचे प्रमुख रणनीतीकार आणि पक्षातील सर्वात प्रभावी आवाजांपैकी एक असल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारल्याची माहिती पक्षासाठी आश्वासक मानली जात आहे.
नाशकात भाजप नेत्यांचे सामूहिक राजीनामे
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये खळबळ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, निवडणुकापूर्वी राज्यात पक्षांतराला वेग आला आहे. अनेक उमेदवार एका पक्षातून दुस-या पक्षात जाताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर […] The post नाशकात भाजप नेत्यांचे सामूहिक राजीनामे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाण्यातील रुग्णालयात आढळला साप
ठाणे : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची वर्दळ असते. या वातावरणात रुग्णालयातील कक्षात साप आढळल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकाराने रुग्णांसह डॉक्टर आणि नर्स तसेच कर्मचा-यांची एकच पळापळ झाली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण या घटनेनंतर रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे काम गेल्या दोन […] The post ठाण्यातील रुग्णालयात आढळला साप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरपालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पक्षातील पदाधिकाऱ्यांना अपेक्षित तिकिटे न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून अनेकांनी राजीनाम्याची धमकीदेखील दिली आहे. स्थानिक पातळीवर चालू असलेली अस्वस्थता आणि आंतरिक पडसाद यामुळे भाजपसमोरील निवडणूक लढत आणखी कठीण होणार की काय, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आबिद सिद्दिकी यांच्या घरी अचानक भेट देत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, पण या भेटीमागचे राजकारण आता वेगाने रंगू लागले आहे. आबिद सिद्दिकी यांनी काही दिवसांपासून पक्षीय निर्णयांवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. तिकिटावरून वंचित राहिल्यानंतर त्यांचा पक्षाशी दुरावा वाढत असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात होते. दरम्यान, पटोले यांनी घेतलेली भेट ही केवळ औपचारिक की त्यामागे गंभीर राजकीय हेतू, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. काँग्रेसकडून अल्पसंख्याक मतदारांना साधण्यासाठी नव्या रणनीतीचा हा भाग तर नाही? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे विरोधकांना संधी मिळत असून, त्याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे जाणवते. याचवेळी दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मुल नगरपरिषद निवडणुकाही मोठ्या चर्चेत आहेत. या निवडणुकीत भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार प्रतिष्ठेची लढत लढत आहेत. प्रचारसभेत त्यांनी केलेल्या एका विधानाने सध्या तापलेल्या राजकीय वातावरणात आणखी रंग भरला आहे. ज्या वॉर्डात काँग्रेसचा नगरसेवक निवडून येईल, तिथे भाजपकडून बोर्ड लावून नागरिकांना विकास काँग्रेसकडून मागा, असा संदेश लिहिला जाणार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या वक्तव्याने वातावरण ढवळून निघाले असून, विरोधकांनी त्यांच्या विधानावर जोरदार टीका सुरू केली आहे. मुनगंटीवार यांच्या विधानाला कडक उत्तर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांनी मुनगंटीवार यांच्या विधानाला कडक उत्तर दिले आहे. जनतेला अशा प्रकारे धमकावल्यामुळेच आमचा विजय निश्चित आहे, असे समर्थ यांनी सांगितले. त्यांच्या मते विकास हा सर्वांचा हक्क आहे आणि कुणीही नेते किंवा पक्ष लोकशाही मूल्यांवर बंधने आणू शकत नाही. निवडणूक प्रचारात निर्माण झालेला आक्रमक स्वर दोन्ही पक्षांतील स्पर्धेची तीव्रता दर्शवतो. समर्थ यांच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेसची भूमिका अधिक धारदार झाली असून, स्थानिक मतदारही या वातावरणात अधिक जागरूक झाले आहेत. भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि काँग्रेसची आक्रमक रणनीती दुसरीकडे, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रा. किरण कापगते यांनी याला विरोध करत मुनगंटीवारांच्या विकासकामांमुळेच मूल शहर उभारी घेत असल्याचा दावा केला आहे. जनता भाजपला साथ देईल आणि विकासाचा मार्ग पुढे सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, भेटीगाठी, नाराजी आणि राजकीय समीकरणे या निवडणुकीला अधिक चुरशीची बनवत आहेत. भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि काँग्रेसची आक्रमक रणनीती या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक नक्कीच वेगळे चित्र घेऊन येणार आहे, असा संकेत सध्या मिळत आहे.
मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए असलेल्या अनंत गर्जे यांना त्यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. गौरी यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. परंतु या घटनेला गौरीच्या कुटुंबाकडून आत्महत्येऐवजी घातपाताचा आरोप होत आहे. दहा महिन्यांपूर्वीच अनंत आणि गौरी यांचा विवाह झाला होता आणि दोघेही मुंबईतील वरळीत राहात होते. घटनेच्या रात्री गौरी घरी एकट्या असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. गौरीच्या मृत्यूनंतर तिचे वडील अशोक पालवे यांनी वरळी पोलिस ठाण्यात अर्ज देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गौरीच्या मृत्यूस जबाबदार फक्त अनंत नव्हे, तर त्याचे भाऊ अजय गर्जे आणि बहिण शितल आंधळे देखील आहेत. त्यांनी आपल्या पत्रात या तिघांची नावे स्पष्टपणे आरोपी म्हणून नमूद केली असून, सध्या फक्त अनंतला अटक होऊन इतर दोघे मोकाट फिरत असल्याचा आरोप पालवे यांनी केला आहे. तसेच घटनेच्या दिवशी बिल्डिंगमधील लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वाराचे CCTV फुटेज तातडीने जप्त करावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. या घटनेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, अनंत गर्जेचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा लग्नापूर्वीच गौरीच्या कुटुंबीयांना झाली होती. हे दस्तऐवज लातूरमधील रुग्णालयात असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे या कागदपत्रांची तपासणी करणे आणि पालवे कुटुंबाने केलेल्या आरोपांची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे सरकारी बाजूने सांगण्यात आले. आरोपी अनंत गर्जे तसेच त्याचे नातेवाईक यांच्यावर लागलेले आरोप तपासण्यासाठी त्यांचा शोध घेणे, चौकशी करणे आणि पुरावे मिळवणे आवश्यक असल्याने पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. अनंतने लग्नापूर्वीच प्रेमसंबंधांबाबत माहिती दिली होती अनंत गर्जेच्या वकिलांकडून मात्र पूर्णपणे वेगळी बाजू मांडण्यात आली. त्यांचा दावा असा की, घटनेच्या वेळी गौरी घरी एकट्या होत्या आणि घर आतून बंद होते. त्यामुळे अनंत किंवा त्याच्या कुटुंबीयांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पुरावा तपासात आढळत नाही. तसेच अनंतने लग्नापूर्वीच गौरीच्या कुटुंबाला आपल्या प्रेमसंबंधांबाबत माहिती दिली होती, असेही वकिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात अनंतला कोठडीची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. मात्र न्यायालयाने सरकारी बाजू मान्य करत अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दहा महिन्यांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट या घटनेने दोन कुटुंबांमध्ये मोठा ताण निर्माण झाला आहे. दहा महिन्यांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट अशा प्रकारे व्हावा, हे पालवे कुटुंब पचवू शकत नाही. गौरी अत्यंत हुशार आणि व्यावसायिक डॉक्टर होती, असे तिच्या परिचितांचे म्हणणे आहे. तिच्या मृत्यूनंतर उपस्थित झालेले प्रश्न आणखी गंभीर झाले आहेत. तिच्या कुटुंबाचा ठाम आरोप आहे की हा प्रकार आत्महत्या नसून यातून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून प्रत्यक्ष पुरावे सुरक्षित ठेवावेत. दुसरीकडे अनंत गर्जेच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. पुढील तपासात आणखी कोणते तपशील समोर येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे वैयक्तिक सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या निधनाने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हदरला आहे. शनिवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती समोर आली आणि काही क्षणातच हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय ठरला. घटनेनंतर तातडीने पोलिसांनी गौरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पती अनंत गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल केला. रविवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. मूळ गाव मोहोज देवढे येथे नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गौरी पालवे यांचे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या वडिलांचा हंबरडा सर्वांना हादरवून गेला. निधनानंतर अनेक ठिकाणी संतापाची लाट पाहायला मिळत आहे. कुटुंबीयांनी गौरी यांच्या मृत्यूला कारणीभूत घटकांवर गंभीर आरोप केले आहेत. पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांवरून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होती. या वादाची तीव्रता वाढत जाऊन अखेरीस गौरी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गर्जे यांच्या कुटुंबातील आणखी काही जणांवरही कारवाई केली असून त्यांच्यावर मानसिक छळाचा आरोप नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे एका सुशिक्षित, व्यावसायिक महिलेला घरगुती कलहाच्या जाळ्यातून बाहेर पडता आले नाही, याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरून अतिशय कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः जिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे, तिला देखील आरोपी करण्यात यावे, असे त्यांनी स्पष्टपणे लिहिले. ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एखाद्या घराचा पाया महिला असते. पण तीच महिला एखाद्याचे कुटुंब उद्ध्वस्त करणारी ठरली, तर तिच्यावरही कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. त्यांनी गौरी यांच्या वडिलांच्या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या वेदनादायी आक्रोशाचा उल्लेख करत समाजाने अशा घटना थांबवण्यासाठी कुटुंबांत संवाद, समजूतदारपणा आणि मानसिक बळ वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले. राज्यात महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न तसेच त्यांनी असेही नमूद केले की, नैराश्याच्या क्षणी आत्महत्या हा कधीही पर्याय नसतो. कौटुंबिक समस्या कितीही मोठ्या असल्या तरी संवादाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढता येतो. पण पतीचे कथित संबंध, घरातील तणाव, आणि सततची मानसिक यातना यामुळे गौरी यांच्या आयुष्याचा अंत झाला, ही समाजासाठीही जागृतीची आणि वेदनेची बाब आहे. आजही अनेक महिला अशाच परिस्थितीतून जातात पण कुटुंब, समाज किंवा प्रशासनाकडून पुरेशी मदत न मिळाल्याने त्यांची समस्या दडपून राहते. अशा वेळी या घटनेने राज्यात महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. अनैतिक संबंधांचा संपूर्ण तपास करण्याचे संकेत या घटनेची चौकशी वेगाने सुरू असून, अनैतिक संबंधांचा संपूर्ण तपास करण्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रकरणात विविध पातळीवरून कठोर कारवाईची मागणी वाढत आहे. महिला सुरक्षितता, मानसिक आरोग्य, आणि कौटुंबिक संवाद या मुद्द्यांवर समाजभर चर्चा रंगू लागली आहे. डॉ. गौरी पालवे यांचे अकाली निधन हा केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचा धक्का मानला जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात नवे तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि सर्वांचे लक्ष पोलिस तपासावर केंद्रीत झाले आहे.
पुणे मार्केट यार्डातील शेवग्याची आवक तब्बल 90 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे शेवग्याने चिकनला मागे टाकत बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सध्या पुण्यात चिकन 220 ते 250 रुपये किलोने मिळतंय, तर शेवगा मात्र 400 ते 500 रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे शेवगा सर्वसामान्यांना सोन्याच्या पिंजऱ्यातून VIP दर्शन देत असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे सोलापूरसह अनेक भागांतील शेवग्यांचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेवग्याचा यंदाचा हंगाम विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज 4 ते 5 हजार किलो शेवग्याची आवक होत असते. पण सोमवारी केवळ 400 ते 500 किलो शेवगा आला. ही अल्पशी आवक केवळ आंध्र प्रदेशातून आली. यामुळे गत आठवड्यात जो शेवगा 140 ते 150 किलो दराने मिळत होता. तो आता थेट 500 रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात 10 किलो शेवग्याला 3000 चा भाव मिळत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडत संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ आणि ज्येष्ठ व्यापारी रामदास काटकर यांनी ही माहिती दिली. मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्यामुळे ही दरवाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईसह राज्यभरातील दाक्षिणात्य उपहारगृह चालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत सापडले आहेत. शेवगा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत गृहिणींकडून शेवग्याला मोठी मागणी असते. मधुमेह व इतर आजारांसाठीही शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर वाढला आहे. त्यातच आता शेवग्याला सोन्याचा भाव आल्यामुळे ही आरोग्यदायी भाजी आता सर्वसामान्यांच्या ताटातून हद्दपार होण्याची भीती वाढली आहे. संभाजीनगरमध्येही आवक घटली छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडीच्या मंडीमध्येही शेवग्याची आवक घठली आहे. जाधववाडीत गत 9 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वी 14 क्विंटल शेवग्याची आवक होऊन 3000 ते 6200 रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली होती, तर गुरुवारी 9 क्विंटल आवक होऊन 7000 ते 11000 रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली. त्याचाच परिणाम म्हणून शेवग्याची 60 रुपये पाव या दराने किरकोळ विक्री झाल्याचे दिसून आले.
वानवडी येथील 129 व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना मोबाइलचा गरजेपुरता वापर करून कौशल्ये, बुद्धी आणि कलागुणांचा विकास करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. राज्यभरातील नामांकित साहित्यिक, कवी, संशोधक, कलाकार आणि साहित्यप्रेमींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला 'महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षण संस्था' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सारस्वत साहित्यिकांच्या उपस्थितीत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रा. डॉ. चोरडिया यांनी हा सन्मान स्वीकारला. सामाजिक बांधिलकी, शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम, मूल्य आधारित शिक्षणपद्धती आणि राष्ट्र निर्मितीच्या ध्येयाने केलेल्या कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले की, मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याचे संवाहक आहे. या परंपरेचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी सांगितले की, सूर्यदत्त संस्थेतही विद्यार्थी संमेलने आयोजित केली जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करता येते. आतापर्यंत एक लाख 27 हजारहून अधिक विद्यार्थी सूर्यदत्त मधून शिक्षण घेऊन बाहेर पडले असून, त्यापैकी ६ हजारहून अधिक विद्यार्थी परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. या संमेलनाचे विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध कलावंत किशोर टिळेकर उपस्थित होते. डॉ. शरद गोरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रबोधनपर आणि प्रखर विचारांची प्रभावी मांडणी केली. तसेच, नंदकिशोर राऊत यांनी आपल्या पत्नीचे लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून त्यांना उच्चशिक्षित बनवल्याचे प्रेरणादायी उदाहरण सादर केले, ज्या आज सरकारी उच्च पदावर कार्यरत आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली आहे. हरकती नोंदवण्याची मदत अत्यंत क्लिष्ट व वेळकाढू आहे. त्यामुळे मतदार याद्या तपासण्यासाठी वाढीव वेळ लागण्याची शक्यता असल्यामुळे ही मुदत वाढवून द्यावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाली आहे. या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती १५ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या संयुक्त पत्रात असे म्हटले आहे की, बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत, बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या भागांतून इतर भागांमध्ये गेलेली आहेत, ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हरकती घेण्याची पद्धत देखील अत्यंत किचकट असून प्रत्येक व्यक्तीने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असून सोबत आधारकार्ड जोडायचे आहे, ही पद्धत किचकट व वेळकाढू आहे. कोणत्याही व्यक्ती वा राजकीय पक्षाने निवडणुकीच्या सक्षम अधिकाऱ्याच्या निदर्शनास योग्य ती हरकत व सूचना आणून दिल्यास अनेक व्यक्तींबद्दलीची तक्रार स्विकारली पाहिजे, आज तसे होताना दिसत नाही. मतदार याद्यांबाबत स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या व प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदार याद्या तपासण्यास वेळ लागणार आहे म्हणून वेळ वाढवून द्यावी.
ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा ऐन प्रचारात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मनमाडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नितीन वाघमारे यांचे आज मध्यरात्री हार्ट अटॅकचा झटका आल्याने निधन झाले आहे. वाघमारे यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते, पण त्याआधीच […] The post ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सनदी अधिकारीचा बनाव करणा-या महिलेस अटक
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी आधार कार्डवर खाडाखोड करून गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळ पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणा-या संशयास्पद महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडे विदेशी नागरिकांचे काही मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत. काही पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटोही तिच्याकडे आढळून आल्याची माहिती समोर आलीय. महिलेला न्यायालयात हजर केलं असता २६ नोहेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सिडको […] The post सनदी अधिकारीचा बनाव करणा-या महिलेस अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून नारळपाण्याच्या दरात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. आठवडाभरापूर्वी ८० रुपये प्रतिनारळाने मिळणारे नारळपाणी आता ५० ते ६० रुपयांच्या दरम्यान ग्राहकांना उपलब्ध होत असल्याने सामान्य ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या बाजारात म्हैसूर येथून मोठ्या प्रमाणात नारळाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे पुरवठा वाढून नारळपाण्याच्या दरात घट झाली […] The post नारळपाणी झाले स्वस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडावा, याचं दुःख वाटतंय अशी X वर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर केली आहे. रोहित पवारांनी पुढे बोलताना म्हटलंय की, हे सरकार सामान्य माणसाला आणि त्याच्या अडचणींना तर कधीच विसरलं पण ज्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी केली, राज्याला पुरोगामी विचारांनी दिशा दिली आणि आज ज्यांच्या सुसंस्कृत विचारांची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या समाधी स्थळावर अभिवादन करण्यासाठी सत्तेतील कुणीही फिरकत नसेल तर हे आश्चर्यजनक आहे. पवारांची X वरील पोस्ट काय? आमदार रोहित पवारांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडावा, याचं दुःख वाटतं. हे सरकार सामान्य माणसाला आणि त्याच्या अडचणींना तर कधीच विसरलं पण ज्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी केली, राज्याला पुरोगामी विचारांनी दिशा दिली आणि आज ज्यांच्या सुसंस्कृत विचारांची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या समाधी स्थळावर अभिवादन करण्यासाठी सत्तेतील कुणीही फिरकत नसेल तर हे आश्चर्यजनक आहे. रोहित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. #यशवंतराव_चव्हाण_साहेब यशवंतराव चव्हाणांचा सन्मान झालाच पाहिजे- सुळे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रशासनाकडून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी काही हालचाली दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहणार आहे. चीनशी जेव्हा आपले सुद्ध झाले त्यावेळी ज्या पद्धतीने पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांचा जेव्हाही उल्लेख केला जातो तेव्हा अभिमानानेच केला जातो. ते केवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नाहीतर देशाचे नेते होते. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्याकडील सर्वच पदावर अतिशय चांगले काम केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज समाधिस्थळी काहीच व्यवस्था करण्यात आली नाही याची मला खंत वाटते. प्रशासन इथे कुठेही दिसत नाही.या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे की चव्हाण यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. तो पैसा जनतेचा- सुळे सुप्रिया सुळे यांनी यावेळी राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे असल्याच्या अजित पवारांच्या विधानाचा व त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या चावीचा मालक आमच्याकडे असल्याच्या दाव्याचाही समाचार घेतला. निवडणुकीमुळे अशी विधान केली जातात. पण माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की, राज्याची तिजोरी ही राज्यातील जनतेकडे असते. तो पैसा जनतेचा आहे. जनता हीच मालक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो हक्क जनतेला दिला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड येथे समाधिस्थळी खासदार सुळे यांनी आज अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीच्या जाहीर सभेत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडची आठवण काढली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी केली आहे. कुणाच्या तरी वडिलांची, महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे. तसेच अशा लोकांची आठवण काढणाऱ्यांचाही जाहीर निषेध केला पाहिजे, असे त्या म्हणाल्यात. धनंजय मुंडे यांची नुकतीच परळीत एक जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी वाल्मीक कराडचीही आठवण काढली. आज 9-10 महिने झाले. जगमित्र कार्यालय सुरू आहे. कामही सुरू आहे. पण एक व्यक्ती नाही याची मला प्रकर्षाने जाणीव होते, असे ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड येथईल समाधीस्थळी अभिवादन करताना धनंजय मुंडे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या लेकाची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी धनंजय मुंडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करते. ज्या लोकांनी कुणाच्या तरी वडिलांची, महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या केली, त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. पण अशा लोकांची राज्यातील कोणत्याही नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. अशा प्रवृत्तीला एखाद्या पक्षातून मदत करण्याची भूमिका घेतली जात असेल तर संबंधितांना पक्षातून काढून टाकले पाहिजे. माझी त्या पक्षाच्या नेत्यांना तशी विनंती आहे. या लोकांना क्रूर हत्याकांडातील लोकांची आठवण येत असेल तर त्यांची विचारधारा काय आहे? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. हत्येतील आरोपींना मदत करण्याची भाषा महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी घातक आहे. राज्याती तिजोरी जनतेच्या मालकीची सु्प्रिया सुळे यांनी यावेळी राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे असल्याच्या अजित पवारांच्या विधानाचा व त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या चावीचा मालक आमच्याकडे असल्याच्या दाव्याचाही समाचार घेतला. निवडणुकीमुळे अशी विधान केली जातात. पण माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की, राज्याची तिजोरी ही राज्यातील जनतेकडे असते. तो पैसा जनतेचा आहे. जनता हीच मालक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो हक्क जनतेला दिला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आत्ता पाहू काय म्हणाले होते धनंजय मुंडे? आज 9-10 महिने झाले. आमचे जगमित्र कार्यालय चालू आहे. तिथे कामकाजही सुरू आहे. पण हे बोलताना एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीवही होते. काय चुकले, काय नाही हे कोर्ट बघेल. पण ती जाणीव नक्कीच आहे, असे धनंजय मुंडे परळीच्या सभेत वाल्मीक कराडची आठवण काढताना म्हणाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराड परळीच्या जगमित्र कार्यालयात बसूनच धनंजय मुंडे यांचे कामकाज पाहायचा. तो सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात बीडच्या तुरुंगात बंदिस्त आहे. त्याच्यावर संतोष देशमुखांच्या हत्येसह एका पवनचक्की कंपनीकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे.
मनमाड शहरात नगरपरिषद निवडणुकीची धुगधुगी वाढत असतानाच एक मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 10-अ मधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असलेले नितीन वाघमारे यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचाली, सभा आणि प्रचारादरम्यान घडलेल्या या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी वाघमारे हे सक्रिय मार्गदर्शक आणि समर्पित समाजसेवक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःखाची भावना पसरली आहे. नितीन वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 10-अ मध्ये लोकसंपर्क, सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठविणे आणि स्थानिक पातळीवरील कामांमध्ये अग्रेसर होते. त्यामुळे या प्रभागाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे स्वागत केले होते. मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या आयुष्याचा अंत झाल्याने ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर असा अनुभवी आणि लोकप्रिय उमेदवार गमावणे हा पक्षासाठीही मोठा धक्का असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले असून सोशल मीडियावरही श्रद्धांजलींचा ओघ पाहायला मिळत आहे. दरम्यान, या घटनेचा निवडणूक व्यवस्थापनावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभागातील प्रचार मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली असून भावनिक वातावरणात पुढील रणनीतीबाबत चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराच्या निधनानंतर त्या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया नव्याने जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10-अ मधील मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये पुढील घडामोडींविषयी उत्सुकता आहे. वाघमारे यांनी सुरू केलेल्या विकासकामांबाबत लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून त्यांचे आयुष्य अकाली निघून गेल्याची खंत लोकांमध्ये जाणवते आहे. प्रचाराची गती मंदावली दरम्यान, मनमाड नगर परिषदेच्या 33 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठीची लढत अत्यंत रंगतदार बनली आहे. माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदांसाठी 215 उमेदवार उभे आहेत. शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीसोबत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष उमेदवार अशी बहुरंगी लढत मनमाडमध्ये पाहायला मिळत आहे. शहरात वातावरण तापले असले तरी वाघमारे यांच्या निधनानंतर काही ठिकाणी प्रचाराची गती मंदावली आहे. मनापासून काम करणारा कार्यकर्ता गमावला नऊ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मैदानात उतरला आहे. मतदारांच्या भेटीगाठी, घराघरांतील संवाद, स्थानिक प्रश्नांना महत्त्व देत उमेदवार प्रचार करत आहेत. काही माजी नगरसेवकांना मतदारांचा रोष सहन करावा लागत असला तरी एकूण वातावरण रंगतदार आहे. मात्र नितीन वाघमारे यांच्या निधनामुळे प्रभाग 10-अ मध्ये दुःखाची भावना दाटून आली असून निवडणूक ऊर्मीपेक्षा शोककळा अधिक जाणवत आहे. त्यांची ओळख, कार्यशैली आणि सौम्य वर्तणूक यामुळे ते नागरिकांत लोकप्रिय होते. त्यामुळे मनमाड शहराने एक मनापासून काम करणारा कार्यकर्ता गमावला आहे, अशी भावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
राज्य सरकार गर्भवती महिला आणि बाल संगोपनासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवत असले तरी, राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशील कारभाराचे संतापजनक उदाहरण वारंवार समोर येत आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात नुकताच एक हादरवून टाकणारा प्रकार घडला आहे. एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने गावाच्या दोन किलोमीटर अलीकडे, घनदाट जंगलाच्या ठिकाणी अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. रुग्णवाहिका चालकाच्या या मुजोरपणामुळे त्या प्रसूत महिलेला अवघ्या दोन दिवसांच्या बाळाला हातात घेऊन, तिच्या सासू आणि आईसोबत, निर्जन स्थळातून दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे. नेमकी घटना काय घडली? मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आमला गावातील सविता बारात (सासरचे नाव: सविता बांबरे) या महिलेला बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही कारणास्तव त्यांना नंतर जव्हार कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तिची प्रसूती सुखरूप झाली. रविवार, 24 नोव्हेंबर रोजी प्रसूतीनंतर त्यांना रुग्णवाहिकेने घरी पाठवण्यात आले. मात्र, संबंधित रुग्णवाहिका चालकाने माणुसकी आणि नियमांना तिलांजली देत, महिलेच्या घरापासून दोन किलोमीटर दूर, घनदाट जंगलाच्या ठिकाणी त्यांना उतरवून दिले आणि तातडीने रुग्णवाहिका घेऊन निघून गेला. जीवावर बेतण्याची शक्यता! या धक्कादायक प्रकारानंतर प्रसूत महिला सविता बारात, तिची आई आणि सासूबाई यांना नवजात बाळाला घेऊन तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. या संपूर्ण घटनेमुळे कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेषतः, जव्हार-मोखाडा परिसरात सध्या बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढत असताना, एका प्रसूती झालेल्या मातेला आणि तिच्या नवजात बालकाला अशा निर्जन स्थळी सोडून देणे हा प्रकार अत्यंत बेजबाबदार आणि जीवावर बेतणारा होता. जर या प्रसूत महिलेच्या जीवाला काही धोका झाला असता, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर रुग्णवाहिका चालकाने आम्हाला अर्ध्या रस्त्यातच सोडून दिले. यामुळे आम्हाला नवजात बाळासह दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली, असे प्रसूत महिलेचे पती मनोज बांबरे यांनी म्हटले आहे. स्थानिकांकडून कारवाईची मागणी राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी सरकार योजना राबवत असतानाही, ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमध्ये गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी आणि परत येण्यासाठी आजही जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. ही घटना आरोग्य यंत्रणेतील असंवेदनशीलतेचे टोक दाखवते. या अत्यंत चीड आणणाऱ्या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांकडून या मुजोर रुग्णवाहिका चालकावर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
लोकं ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश देणं होते नाही हे चंद्रशेखर बावनकुळे यांना काय ठरलंय हे त्यांनाही माहिती आहे. आम्ही तुमच्याकडून जो संयम शिकलो आहे तो पाळतो आहोत, जर असा पक्ष वाढवायचा असेल तर तो त्यांना लखलाभ,असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, महायुतीमध्ये फोडाफोडी करायची नाही मित्रपक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही हे ठरलेले असताना काही लोकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांना पैशाची मस्ती आली आहे त्यांच्या जोरावर त्यांनी फोडाफोडी केली आहे. आम्ही याची गांभीर्याने दखल घेतली असून याचा अहवाल आम्ही एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. महायुतीच्या अंतर्गत जर हे सुरू राहिले तर त्यांचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागेल हे मी स्पष्टपणे सांगत आहे. पदाधिकारी फोडणे हे कितपत योग्य? संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे, त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत त्यांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश देत नाही. पण भाजपने आमचे उमेदवार आणि पदाधिकारी फोडणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. आम्ही जर तालुका लेव्हल वरील कार्यकर्ता घेतला तर त्यांना वाइट वाटू देऊ नये. हे मुद्दाम होत आहे की स्थानिक लेव्हलची मस्ती आहे हे एकदा पाहावे लागेल. ही नीती बरोबर नाही मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्ही जर एखादे पाऊल उचलले तर त्यांचे वाईट वाटून घेऊ नका. सुरवात त्यांनी केली असली तरी आम्ही अजूनही संयम राखला आहे, पण तो जास्त काळ टिकणार नाही. याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील. प्रत्येकवेळी चुकी करायची आणि त्यावर पांघरुन घालायचे मला वाटते ही नीती बरोबर नाही. यामुळे नाराजी वाढते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या खुशीने भाजपसोबत गेला त्यांच्यावर काय दबाव होता. गंगापूर, वैजापूर, रत्नपूरमध्येही जर हेच सुरू असेल तर महायुती म्हणून रोल काय? म्हणून हे थांबले पाहिजे. या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर होऊ शकतो असा इशाराही शिरसाट यांनी दिला आहे. ..तर निवडणूक लढवता येणार नाही संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येक पक्ष जर पूर्वतयारी म्हणून हे लोक फोडायचे त्या पक्षाचे लोक फोडायचे असे करत असेल तर महायुती म्हणून निवडणूक लढवता येणार नाही. यावर काय व्यक्त व्हायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे. रोज जर फोडाफोडी वर बोलायचे की प्रचार करायचा यावर काही ठरले पाहिजे. आम्हाला निधी कमी पडत नाही संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार अर्थमंत्री असल्याने निधीबाबत त्यांना अधिकार असतात. पण मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. त्यांच्याकडे सर्व अधिकार असतात हे निर्विवाद आहे ते नाकारता येत नाही. तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असो मालक कुणीही असे पण खर्च कसा करायचा हे सर्वांना सोबत घेत ठरवले जाते. तिजोरीतून आम्हाला जे हवे आहे ते आम्ही घेत असतो निधी कमी पडला तर यावर आम्ही भाष्य करु.
ठाणे शहरातील पोखरण रोड नं. 2 परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या किरकोळ वादाने अखेर गंभीर रूप धारण केले. गांधीनगर येथील अनिल वाईन्ससमोर रिक्षा लावण्यावरून सुरु झालेला वाद काही क्षणांतच राजकीय रंग घेत गेला. या वादादरम्यान उत्तर प्रदेशातील शैलेंद्र संतोष यादव या रिक्षाचालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळे ठाण्यात संतापाची लाट उसळली आणि मनसे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी धावले. परप्रांतीय रिक्षाचालकाने केलेल्या वक्तव्यामुळे तणाव वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेकडून तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनीही तत्परता दाखवत शैलेंद्र यादवला ताब्यात घेतले. मात्र त्याला ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. पोलिस स्टेशनमध्येच त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती पुढे आली. स्वतः अविनाश जाधव यांनीही हा प्रकार सार्वजनिकपणे मान्य केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जो कोणी राज ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत करेल, तो कोणत्याही ठिकाणी लपला तरी मनसे त्याला योग्य धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण घटनेमुळे ठाण्यातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रिक्षाचालकाची भूमिका पूर्णपणे बदलली. व्हिडिओमधील कृत्य चुकीचे असल्याची कबुली देत तो पोलिस स्टेशनमध्येच हात जोडून माफी मागताना दिसला. एवढेच नव्हे तर त्याने कान धरून उठाबशा काढत केलेल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. त्याने सांगितले की, तो दारूच्या नशेत होता आणि त्यावेळी नशेमुळे त्याच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडले. मी रिक्षा चालवणारा साधा माणूस आहे. घर चालवण्यासाठी मेहनत करतो. अशा प्रकारची चूक पुन्हा कधीच होणार नाही, असेही तो व्हिडिओ संदेशात म्हणाला आहे. त्याच्या या भूमिकेमुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात शमला. कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली घटनेचा उलगडा करताना पोलिसांनी सांगितले की, शैलेंद्र यादव आणि स्थानिक मराठी युवकामध्ये रिक्षा लावण्यावरून आधी किरकोळ वाद झाला होता. त्या वादातूनच यादवने चिडून मनसे नेतृत्वावर शिवीगाळ केल्याचे दिसून आले. त्यानंतर काही परप्रांतीय तरुणांनीही त्याला पाठिंबा देत मराठी युवकाला धमकावल्याचे आरोप आहेत. याचदरम्यान रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि तो मोठ्या चर्चेचा विषय ठरला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित सर्वांना चौकशीसाठी बोलावले. पुढील काळात अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे. माफी मागत आणि उठाबशा काढत चूक मान्य केली संपूर्ण घटनेमुळे ठाणे शहरात पुन्हा एकदा मराठी-परप्रांतीय वादाचे सावट दिसले. मात्र पोलिसांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे वातावरण बिघडण्यापासून रोखले गेले. माफी मागत आणि उठाबशा काढत शैलेंद्र यादवने आपली चूक मान्य केली असली तरी मनसेने दिलेला इशारा मात्र गंभीरच मानला जात आहे. राजकीय वक्तव्यांच्या नावाखाली अभद्र भाषा वापरल्यास त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली. ठाणे शहरात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अजित पवार हे जबाबदार नेते आहेत, पण प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, माझ्या सारखी कार्यकर्ता अजित पवारांना काय सांगणार, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मी त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यामुळे सर्वच कार्यकर्ते अन् नेत्यांनी तारतम्य ठेवून बोलले तर ते जास्त बरे राहील. आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, प्रचारसभांमध्ये कोण काय म्हणतंय हे काही महत्त्वाचे नाही. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रगती करतो आहे, त्यामुळे कोण काय बोलतो याला फारसे महत्त्व नाही. निधीच्या चाव्या आमच्या हातात या राष्ट्रवादीच्या प्रचार मुद्द्यावर बोलताना त्यांनी असे म्हटले आहे. लोकांचा विश्वासावर निवडणूक आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये प्रत्येकाने आपले काम सांगावे आणि यापुढे काय काम करणार आहे हे सांगावे त्यांचा जास्त फायदा होईल. काही ठिकाणी आम्ही युतीमध्ये तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. लोकांसाठी आपण काम केले तर लोकं ती कामे विसरत नाहीत. जनता सुज्ञ असल्याने आपण केलेले काम आणि लोकांचा विश्वास यावर या निवडणूका आहेत. आम्ही मविआसारखे रडलो नाही चित्रा वाघ म्हणाल्या की, निवडणुकीच्या निकाल ज्या वेळी मविआच्या बाजूने लागला तेव्हा त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी सर्व संस्था चांगल्या होत्या. निवडणुकीचा निकाल त्यांच्याविरोधात लागला की त्यांनी निवडणूक आयोग आणि आमच्यावर टीका करायला सुरवात केली. लोकसभेला आम्ही कमी पडलो तेव्हा आमच्या कोणत्या नेत्याने असे वक्तव्य केले. आम्ही आत्मचिंतन करत कुठे कमी पडलो हे शोधत चूका सुधारल्या आणि विधानसभेला निवडून आलो. ज्या मतदार याद्यांवर विरोधक आक्षेप घेत आहे त्याच मतदार याद्यांनुसार लोकसभेची निवडून झाली आणि हे निवडून आले आहेत. मग हे सर्व जण बोगस आहेत का? असा सवाल वाघ यांनी केला आहे. यांच्या आरोपावर निवडणूक आयोग बघून घेईल. तरुणाचा भाषा वादामुळे बळी गेला चित्रा वाघ म्हणाल्या की, खैरे आत्महत्या प्रकरणी माझ्यावर कारवाई करा ही मागणी करणाऱ्यांनी मी काय केले, माझ्यावर का कारवाई व्हावी, फौजदारी गुन्हा दाखल करण्यासारखे मी काय केले आहे? याचे उत्तर दिले पाहिजे. खैरे नावाच्या तरुणाचा भाषा वादामुळे बळी गेला, मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रश्न विचारले त्यावर काय बोलावे हेच समजले नाही. तुमच्या भाषेच्या राजकारणापायी आज एका मुलाचा जीव गेला आहे. माझ्यावर कारवाई करा म्हणणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे.
परळीतील प्रचारसभेत केलेल्या विधानामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजकीय वादंग निर्माण झाले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची त्यांनी सभेत आठवण काढल्याचे वक्तव्य समोर आले आणि त्यावर विरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या. आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही, याची जाणीव होते, असे मुंडे म्हणाल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा अर्थ, त्यामागील संकेत आणि ते कोणाच्या संदर्भात बोलत होते, याबाबत चर्चा रंगली आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात संताप, संभ्रम आणि टीकेचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः कराडसारख्या व्यक्तीचा संदर्भ सभेत आणणे योग्य होते का? हा प्रश्न विविध ठिकाणी उपस्थित होत आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रचारसभेपेक्षा या वक्तव्याचीच जास्त चर्चा होत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत कठोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी थेट शब्दांत मुंडेंवर हल्ला चढवत म्हटले की, असा माणूस जर कुणाला आठवत असेल तर त्याच्याइतका नीच माणूस नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या गंभीर प्रकरणाशी संबंधित व्यक्तीची कमतरता भासते असे सांगणारे नेते जनतेसमोर कोणते मूल्य ठेवत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जरांगे म्हणाले की, गुंडगिरी, जमिनी बळकावणे, लोकांना त्रास देणे, टोळ्या वाढवणे अशी कामे करणाऱ्या व्यक्तीचे समर्थन कुणी करीत असेल तर त्यांच्यावर जनतेचा विश्वास कसा ठेवायचा? त्यांच्या मते, राजकारणात येणारे लोक जनतेसाठी आदर्श असावेत, पण काही नेत्यांच्या वागणुकीमुळे हा आदर्श कोसळतो आहे. मनोज जरांगे यांनी यापूर्वीही राज्य सरकारवर, विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर, अपराध्यांना संरक्षण दिल्याचा आरोप केला होता. या घटन्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या नेत्यांना उद्देशून, तुम्ही आता तरी डोळे उघडा, असे आवाहन केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, समाजात गुन्हेगारी वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे राजकीय पाठींबा. जर अशा व्यक्तींना संरक्षण मिळत राहिले तर सामान्य लोकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले की, गोरगरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांनी सावध झाले नाही तर त्यांचीही राजकीय ओळख या पापात जळून जाईल. त्यांच्या या वक्तव्याने वातावरण अधिक तापले आहे. राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता यावर राजकीय पातळीवर दोन्ही गटांचे समर्थक भिन्न भूमिका घेत असल्याचे दिसते. काहींना धनंजय मुंडे यांचे विधान वैयक्तिक आठवणींच्या स्वरूपात मांडलेले जाणवत असले तरी, बहुसंख्य जनतेला हे वक्तव्य अयोग्य वेळ आणि अयोग्य संदर्भ असे वाटत आहे. विशेषतः एका गंभीर गुन्ह्याशी संबंधित व्यक्तीबद्दल सार्वजनिक सभेत सहानुभूती दर्शवणे राजकीय नैतिकतेला धरून नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले. दुसरीकडे, जरांगे यांच्या टीकेचा सूर अत्यंत आक्रमक आहे. मराठवाड्यातील राजकारण आधीच तंग आहे आणि या घटनेमुळे राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा वाद आता चर्चेचे प्रमुख केंद्र या सर्व घडामोडींमध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. ते नार्को टेस्टचे आव्हान. जरांगे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत धनंजय मुंडेंना विचारले की, माझ्या प्रकरणात तुम्ही तयार असाल तर चला, दोघांनीही नर्को टेस्ट करू. या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, आता या वादाची दिशा कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय संघर्ष, आरोप-प्रत्यारोप, नैतिक प्रश्न आणि जनतेतील अस्वस्थता यांनी या प्रकरणाचा धुरळा अजूनच दाट केला आहे. परळीतील एका विधानाने सुरुवात झालेला हा वाद आता राज्य राजकारणातील चर्चेचे प्रमुख केंद्र बनला आहे.
सराईत गुंड श्वेतांग भास्कर निकाळजे (वय 37) आणि त्याचा साथीदार ओम संजय गायकवाड (वय 26) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मोबाइल टॉवर उभारणीच्या ठेक्याच्या पैशांवरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल चालवतो आणि तो निकाळजेचा जुना ओळखीचा आहे. मोबाइल टॉवर उभारणीच्या ठेक्याचे काम आणि आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये वाद सुरू होता. 8 नोव्हेंबर रोजी निकाळजे आणि त्याच्या साथीदारांनी तरुणाच्या राहत्या घराजवळून त्याचे जबरदस्तीने अपहरण केले. अपहृत तरुणाला भोर तालुक्यातील एका निर्जन भागात नेण्यात आले. तिथे निकाळजेने त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे दे, नाहीतर जीव घेऊ अशी धमकी दिली. जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच, तरुणाने संधी साधून आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि थेट भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या गंभीर गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून निकाळजेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन देशी पिस्तुले आणि काही जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. पुढील चौकशीत निकाळजेने मध्य प्रदेशातील उमराटी येथून मध्यस्थांच्या मदतीने ही पिस्तुले खरेदी केल्याची कबुली दिली. निकाळजे हा पुण्यातील सराईत गुंड असून त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, नीलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे आदींनी पार पाडली.
सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घालून एका सुखी कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा-सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी व त्यांच्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक 6 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये सेलूकाटेतील भोयर कुटुंबाचा समावेश आहे. या दुर्घटनेत सोमनाथ भोयर (वय 38), निकिता सोमनाथ भोयर (वय 32) आणि मुलगा पूरब (वय 12) यांचा जागीच मृत्यू झाला. तर लहान मुलगा कान्हा (वय 6) गंभीर जखमी असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेशनगरातून परतताना मृत्यूचा सापळा प्राथमिक माहितीनुसार, भोयर कुटुंब वर्धा गणेशनगर येथील एका कार्यक्रमावरून रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या सेलूकाटे येथील घरी परतत होते. याचदरम्यान वायगाव येथील एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने येऊन त्यांच्या दुचाकीवर आदळले. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. चारचाकी चालकाने काढला पळ, परिसरात संताप धडक दिल्यानंतर चारचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती असून वाहन वायगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. जखमी मुलगा कान्हाला नागरिकांनी तातडीने सावंगी रुग्णालयात हलविले. मात्र उर्वरित कुटुंबीयांना वाचवण्याचे नागरिकांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. सेलू आणि काटे परिसरात या घटनेने शोककळा पसरली असून गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. अचानक एका कुटुंबाचा आवाज कायमचा थांबला अशी खंत व्यक्त होत आहे. वाढत्या अपघातांची मालिका आणि प्रशासनाची उदासीनता गेल्या काही महिन्यांत वर्धा-सेलूकाटे मार्गावर वेगामुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन आणि कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. हे रस्ते वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे होत आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने वेगमर्यादा आणि तपासणी सुरू करावी, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. सावंगी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
उमराटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून सखोल तपास सुरू:बेकायदा पिस्तूल विक्री करणाऱ्या सराईतांची झाडाझडती
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमराटी गावातील पिस्तूल विक्री प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. स्थानिक कारागिरांनी पुण्यातील गुंड टोळ्यांना मध्यस्थांमार्फत पिस्तुले विकल्याची माहिती समोर आल्यानंतर, यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या सराईत आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील उमराटी गावात पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पिस्तूल, मॅगझिन, पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी सनीभाई चावला, जसबिरसिंग प्रकाशसिंग चावला, प्रवीणसिंग उत्तमसिंग टकराना, राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा, अलोकसिंग जोहरसिंग बर्नाला, नानाकसिंग अजितसिंग बर्नाला आणि गुरुचरणसिंग बर्नाला (सर्व रा. उमराटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमराटीतील कारागिरांनी गेल्या सहा ते सात वर्षांत सराईत गुन्हेगारांना 700 ते 800 देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री केली आहे. ही आकडेवारी या बेकायदा शस्त्रास्त्र निर्मिती आणि विक्रीच्या मोठ्या प्रमाणावर प्रकाश टाकते. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी स्पष्ट केले की, पोलिस कोठडीत असलेल्या उमराटीतील कारागिरांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी मध्यस्थांमार्फत पुण्यातील गुंड टोळ्यांतील सराईतांना पिस्तुले विकली आहेत. शरद मोहोळ आणि वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींनी उमराटीतील कारागिरांनी तयार केलेल्या पिस्तुलाचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. शहरात यापूर्वी घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर झाल्याचे समोर आले आहे. या तपासाच्या अनुषंगाने, यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. उमराटी गावात शनिवारी पहाटे पुणे पोलिसांच्या 100 जणांच्या पथकाने, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला. यापूर्वी स्थानिक कारागिरांनी पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या असल्याने, पोलिसांनी ड्रोन कॅमेरे, गॅस गन, बिनतारी संदेश यंत्रणा आणि शीघ्र कृती दलासह (क्विक रिस्पॉन्स टीम) पूर्ण तयारीने ही कारवाई केली. तपासात असेही समोर आले आहे की, उमराटी गावातील कारागीर पिस्तूल विक्री करण्यापूर्वी खरेदीदारांची समाज माध्यमांद्वारे खात्री करत होते.
मुंबईत डिजिटल अरेस्ट करून सायबर फसवणूक करण्याच्या अनेक घटना उजेडात येत आहेत. आता मुंबईत फसवणुकीचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. त्यात एका व्यक्तीने आपण मोहम्मद पैगंबर यांचे वंशज असल्याचे सांगून 2 महिलांना तब्बल 11 लाख रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मोहसीन अली अब्दुल सत्तार कादरी नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. माहीम पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशी अंसार अहमद अब्दुल गनी यांच्या तक्रारीनुसार मोहसीन अली अब्दुल सत्तार कादरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, 2022 मध्ये तक्रारदार व त्याचा भाऊ इसरार फारूकी यांची दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यावर कादरशी भेट झाली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. काचेच्या बाटतील दाखवला केस त्यानंतर एकेदिवशी कादरी यांनी आपण प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे वंशज असून आपल्याडे त्यांचा केस असल्याचा दावा केला. पोलिसांच्या मते, त्यानंतर कादरीने दोन्ही भावांना माहीम येथील आपल्या घरी बोलावले. तिथे तो एका काचेच्या बाटलीत ठेवलेला केस घेऊन आला. त्यानंतर त्याने हे केस मोहम्मद पैगंबरांचा असल्याचा दावा केला. त्यावर दोन्ही भावांनी ही बाटली काही दिवस आपल्या घरी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी सांगितले की, त्यासाठी कादरीने तयारी दर्शवली. त्यानंतर तक्रारदार व त्याचा भाऊ फारूकी याच्या घरी कादरीने काही पूजाअर्चा केल्या. त्यानंतर त्याने ती काचेची बाटली त्यांच्या घरातील आलमारीत ठेवली. नंतर ती आलमारी बंद केली. त्याने दोन्ही भावांना आपण सांगेपर्यंत हे कपाट न उघडण्याची तंबी दिली. त्यानंतर हे दोन्ही बंधू घरी नसताना कादरी त्यांच्या घरी आला. त्याने दोन्ही भावांच्या पत्नींना त्यांच्या घरातील सर्व दागिने डब्ब्याजवळ ठेवल्यास ते दुप्पट होऊन घरात पैसाअडका येईल असे सांगितले. कशी समोर आली फसवणूक? कादरीच्या सूचनेनुसार दोन्ही महिलांनी आपले सर्व दागदागिने केस असलेल्या काचेच्या बाटलीजवळ ठेवले. त्यानंतर कादरीने त्या दोघींनाही घराबाहेर जाण्यास सांगितले. यासाठी त्याने आपल्याला येथे एक पूजा करायची असल्याचे सांगितले. त्याच्या सूचनेनुसार दोन्ही बायका घराबाहेर गेल्या. त्यानंतर कादरी अलमारीतून जवळपास 11 लाख रुपयांचे दागिने घेऊन लंपास झाला. काही दिवसांनी या महिलांनी झाला प्रकार आपल्या नवऱ्यांना सांगितला आणि फसवणुकीचा विचित्र प्रकार उजेडात आला.
सोलापूर एसटी स्थानकाला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी अचानक भेट देऊन पाहणी केली होती. अधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले होते. तरीदेखील मनमानी सुरूच असल्याचे सोमवारी दिसून आले. स्वच्छतागृह महिलांसाठी खुले असताना त्यांच्याकडून पैसे मागत हाेते. पुरुषांसाठी पैसे तर दुप्पट केले हाेते. मंत्र्यांनी शनिवारी (ता. 22) भेट दिली. त्यानंतरच्या तीन दिवसात काहीही सुधारणा दिसून आलेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता होती. तेथे फक्त पेंट मारले. अन्य ठिकाणी घाण तिसऱ्या दिवशीही तशीच आहे. ज्या स्वच्छतागृहात सरनाईक गेले, अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशाराही दिला. तिथे वसुली सुरू होती. स्वच्छतागृहात जादा पैशांची मागणी स्वच्छतागृहात पुरुषांसाठी पाच रुपये तर महिलांना मोफत असताना पुरुषांना दहा रुपये आणि महिलांना पाच रुपये आकारणी करण्यात येत असल्याने दिव्य मराठीच्या पाहणीत निदर्शनास आले. याबाबत एसटीचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना संपर्क करून विचारले असता, तेथे आगार व्यवस्थापकांना पाठवून खात्री करतो असे सांगितले. परंतु कोणीच आले नाहीत. स्वच्छतागृहात पुरुषांना पाच रुपये आकारणी आहे. महिलांना मोफत आहे. तरीही जादा पैसे घेत असतील तर दंडात्मक कारवाई करू. संबंधितांचा मक्ताही रद्द करण्याचा विचार होईल. उत्तर जुंदळे, आगार व्यवस्थापक
हाेटगी रस्त्यावरील नियाेजित आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर 190 फूट उंचीच्या (15 मजली)इमारती बांधू शकताे. विमानतळावरून उडणाऱ्या विमानांना त्याचा धाेका नाही. विमानसेवा प्राधिकरणाने त्याला काहीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय या पार्कवरील आयटी उद्याेगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्यासाठी एनटीपीसीचे अधिकारी येत्या शुक्रवारी (ता. 28) भेटीसाठी येत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वीजदराचा करार हाेऊ शकताे, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साेमवारी पत्रकारांना सांगितले. नियाेजित आयटी पार्कसाठी हाेटगी रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील 50 एकर जमीन निश्चित केली. विमानतळापासून पाच किलाेमीटर लांब असलेल्या या जमिनीवर बहुमजली इमारती बांधण्यात येतील. त्याला काेणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. पुढील महिन्यात हाेणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीतनंतर ही जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया हाेईल. त्यानंतर एमआयडीसीकडून पायाभूत सुविधा देण्याचे काम हाेणार आहे. 190 फूट उंच म्हणजे 15 मजली व्यावसायिक इमारती असतील 190 फूट उंच म्हणजे 12 ते 15 मजली इमारती बांधता येतील. त्या व्यावसायिक असल्याने त्यांची उंची अधिक असते. माेठी दालने असतात. पार्किंगची सुविधा असते. त्याला काॅर्पाेरेट लूक देण्यासाठी पुरेशी जागा साेडण्यात येते. तिथे पर्यावरणपूरक गाेष्टींचा समावेश असताे. आयटीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्याचे बाह्यरूप हे पूर्णत: वेगळे असते. इमारती काचेच्या असतात. त्यामुळे बाहेरून त्याचे मजले दिसणार नाहीत. परंतु आता लक्झरियस दालने, व्हीआयपी रूम्स, कँटीन, रेस्टाॅरंट, विरंगुळा केंद्र अशा सर्व बाबींचा समावेश इमारतीत असताे. जेणेकरून तिथल्या कर्मचाऱ्यांना काेणत्याही गाेष्टीसाठी बाहेर जायची आवश्यकता नसते. विमानतळ परिसरात मांस दुकाने पाहणार विमानतळ परिसरात खुल्या पद्धतीने मांस विक्री हाेत असल्याने पक्षी आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला. त्याचा थेट परिणाम विमानसेवेवर हाेऊ शकताे. त्याची पूर्वदक्षता म्हणून परिसरात मांस विक्रीच्या दुकानांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. 15 दिवसांत संबंधितांवर कारवाईच्या सूचनाही केलेल्या आहेत. शिवाय संपूर्ण परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे कामही सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. उड्डाणपुलाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन अशी शहरातील दोन प्रस्तावित उड्डाणपूल आहेत. त्यांच्यासाठी भूसंपादन प्रक्रियेत सरकारी इमारतींचा विषय आहे. राज्याच्या अखत्यारीतील कार्यालयांच्या इमारतींना शासनाची ‘ना-हरकत’ (एनओसी) मिळाली. केंद्रीय कार्यालयांचा प्रस्ताव दिल्लीला पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. दिल्लीहून ना-हरकत मिळण्यासाठी विलंब लागेल, असेही ते म्हणाले.
नाशिकची ओळख बनलेली गोदा आरती आता इतर शहरांतही सुरू होणार आहे. रामतीर्थ गोदा सेवा समितीने तयार केलेल्या आराखड्याच्या आधारे देशभरातील विविध शहरांनी या आरतीसाठी प्रस्ताव पाठविले असून, समितीने यासाठी विशेष प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे. नाशिकच्या गोदा आरतीला काश्मीर, विशाखापट्टणम, हैदराबाद,मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई, गुजरातमधील व्यारा व सुरत, तसेच मालेगाव-झोडगे येथून आमंत्रणे मिळाली आहेत. या आरतीत अध्यात्म, भक्ती, शिस्तबद्ध नियोजन,स्वच्छतेची कास आणि तरुणांना अध्यात्माकडे वळविण्याची दिशा असल्यामुळे ही आरती देशभरातील शहरांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. नाशिकच्या आरतीचे राष्ट्रव्यापी आकर्षण इतर शहरांनीही आदर्श घ्यावा अध्यात्म आणि नदीसेवा हे दोन वारस पुढे चालत रहावेत हा आमचा उद्देश आहे. नाशिकप्रमाणेच इतर शहरांनीही याचा आदर्श घ्यावा. जेथे हवी तेथे मदत करण्यास आम्ही सदैव तयार आहोत. आज देशभरातून येणारी आमंत्रणे पाहून हा अभिमानाचा क्षण आहे.- मुकुंद खोचे, रामतीर्थ गोदा सेवा समिती इतर शहरांमध्ये गोदा आरती सुरू करण्यासाठी समितीचा आराखडा समाज एकत्रीकरण : जाती-धर्मापलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे,धर्म-गुरू-संस्कार या विषयांवर मार्गदर्शन करणे आणि अध्यात्माकडे लोकांचा कल वाढवणे.नदी व परिसर स्वच्छता मोहीम : आध्यात्मिक उपक्रमाची पहिली अट म्हणजे स्वच्छता. ज्या शहरात आरती सुरू होणार आहे, त्या ठिकाणच्या नदीची आणि परिसराची मोठी स्वच्छता मोहीम राबवली जाते.समितीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक नदीतून तब्बल पाच ट्रॅक्टर कचरा बाहेर काढण्यात आला.आरतीचे प्रशिक्षण : रामतीर्थ गोदा सेवा समितीतील 10 प्रशिक्षित तरुण संबंधित शहरांत जाऊन 10 दिवसांचे प्रशिक्षण तेथील तरुणांना देतात. आरतीची शिस्त, मुद्रेचे महत्त्व, आरतीची रचना, स्वच्छतेचा प्रोटोकॉल, शिस्तबद्ध व्यवस्थापन हे सर्व प्रशिक्षणाचा भाग आहे. आरती सुरू करण्यासाठी प्रयत्नशील शहरे गंगाखेड (मराठवाडा)जानोरी आळंदीप्रकाशा (शहादा तालुका) -तापी नदीपैठण
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई महापालिकेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी आता दंड थोपटलेत. मनसेच्या मुद्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसमध्ये तणाव वाढल्यानंतर आता त्यांनी महाविकास आघाडीचे सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांनी भाजपला मुंबईपासून दूर ठेवण्याचे एकमेव टार्गेट ठेवले आहे. या प्रकरणी त्यांची काँग्रेस हायकमांडशी चर्चा करून मुंबई काँग्रेसची समजूत काढण्याचा निश्चय केला आहे. मनसे विरोधकांच्या तंबूत आली तर मराठी मतांची फाटाफूट टळून मुंबईत महाविकास आघाडीचा विजय सहजसोपा होईल, असा त्यांचा व्होरा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी त्यांनी मुंबई काँग्रेसची समजूत काढण्याचा व प्रसंगी काँग्रेस हायकमांडशी चर्चा करून मनसेला महाविकास आघाडीत घेण्याचा निश्चय घेतला आहे. मनसे विरोधकांच्या तंबूत आली तर मराठी मतांची फाटाफूट टळून मुंबईत महाविकास आघाडीचा विजय सहजसोपा होईल, असा त्यांचा व्होरा आहे. मुंबई काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाने मनसेला सोबत घेताना आपल्याला विश्वासात घेतले नाही असा त्यांचा आरोप आहे. विशेषतः गरीबांना मारझोड करणाऱ्या मनसेसोबत आम्ही जाणार नाही. काँग्रेसच्या विचारात असे प्रकार बसत नाहीत, असा त्यांचा आरोप आहे. या मुद्यावर ठाकरे गट व काँग्रेसमध्ये राजकीय अंतर वाढले आहे. परिणामी, मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर महाविकास आघाडीत फूट पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शरद पवारांनी या वादावर पडदा टाकून विरोधकांची वज्रमुठ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार नेमके काय करतील? यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईत भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला पराभवाची धूळ चारण्यासाठी व बीएमसीवरील शिवसेना ठाकरे गटाची सत्ता अबाधित राखण्यासाठी शरद पवार आपली पूर्ण ताकद लावतील. या प्रकरणी सर्वप्रथम ते महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेला प्रवेश देण्याचा मुद्दा निकाली काढतील. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना सोबत घेण्याच्या मुद्यावर शरद पवार लवकरच काँग्रेसच्या दिल्ली स्थित हायकमांडशी चर्चा करतील. यासाठी ते लवकरच दिल्लीच्या दौऱ्यावर जातील किंवा फोनवरूनच ते त्यांच्याशी संपर्क साधतील. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच तसे संकेत दिलेत. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, भाजपला पराभूत करणे हे त्यांचे एकमेव टार्गेट आहे. मुंबईत मनसेचा चांगला जनाधार आहे. ते सोबत राहिले तर मराठी मतांची फाटाफूट टळेल व चांगले यश मिळेल. केवळ मनसेच नाही तर समाजवादी पार्टी व डाव्या पक्षांनाही सोबत घेण्याचा आमचा आग्रह आहे. आव्हाड यांच्या या विधानामुळे शरद पवार लवकरच या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे. काय असू शकतो संभाव्य फॉर्म्युला? सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी हस्तक्षेप केल्यानंतर काँग्रेस हायकमांड शिवसेना ठाकरे गटाला आपल्या कोट्यातून मनसेशी आघाडी करण्याची परवानगी देईल. तसेही ठाकरे गटाने सध्या मुंबईच्या 227 जागांपैकी 70 जागा मनसेला देण्याचा कथित प्रस्ताव ठेवला आहे. उर्वरित जागांवर ठाकरे गट, काँग्रेस, शरद पवार गट व समाजवादी पार्टी आपले उमेदवार उभे करतील.
शिवसेना फुटल्यानंतर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ या निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराताही ते सक्रिय नाहीत. त्यामुळे पक्षात नाराज असलेले जंजाळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे महिला जिल्हाप्रमुखांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्हाप्रमुखही पक्ष सोडण्याच्या चर्चेमुुळे शिंदेसेनेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मला कुठल्याही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही.त्यामुळे माझा निर्णय मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणारअसल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. निवडणूक प्रक्रियेतून झाले गायब नगरपालिकांच्या निवडणुकीचे नियोजन सुरू असताना जंजाळ मात्र त्यामध्ये कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुखांनाच डावलले गेल्यामुळे त्यांना देखील पक्षापासून चार हात दूर ठेवले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्यातफिरायला हवे कोणालाही निवडणुकीपासून दूर ठेवलेले नाही. ते जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनीच स्वत: जिल्ह्यात फिरले पाहिजे.दौरे काढले पाहिजे.त्यांना सांगण्याची गरज नाही. ते कोअर कमिटीचे सदस्य आहेत. सर्व नेमणुका पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. -संजय शिरसाट, पालकमंत्री. नव्यांना जबाबदारी उद्धवसेनेतून नुकतेच आलेले नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, त्यानंतर किशनंचद तनवाणी या सर्व उमेदवारांना संधी दिली गेली आहे. हेच पदाधिकारी संजय शिरसाट यांच्यासोबत असतात. त्यामुळे जबाबदारी नसलेल्या लोकांना पुढे केले जात असल्यामुळे जंजाळ नाराज झाले असल्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दिव्य मराठी अपडेट्स:लाइटर न दिल्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, एक गंभीर जखमी; नागपुरातील घटना
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
शहरातील सेव्हन हिल्स परिसरातील रस्तारुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिका न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने निकाली काढल्या आहेत. महापालिकेच्या(मनपा) वतीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच रस्ता रुंदीकरण केले जाईल,अशी हमी न्यायालयात देण्यात आली आहे. या हमीच्या आधारावर याचिका निकाली काढताना, याचिकाकर्त्यांना भविष्यात कायदेशीर कार्यवाहीसाठी याचिका दाखल करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. याचिकाकर्त्यांची बाजू काय होती? मे. अबोली ॲडव्हायजर्स (इन्फीनिटी इन्फ्रा बिझनेस सेंटर),मे. एम. डब्ल्यु. मित्रीकोटकर (अरिहंत मोटर्स), मेघदूत रिजॉर्टस् (अतिथी हॉटेल) आणि जितेंद्र जैन (ज्योतीर्मय कॉम्पलेक्स) या याचिकाकर्त्यांकडे बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रे होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रारूप विकास आराखड्यामध्ये त्यांच्या मालमत्ता रस्तारुंदीकरणाने बाधित होत नव्हत्या. मात्र, शासनास सादरकेलेल्या आराखड्यामध्ये रस्त्याची आखणी बदललेली आढळली. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या कलम 31 प्रमाणे रस्त्याच्या आखणीत बदल करायचा असल्यास सूचना व हरकती मागवणे आवश्यक असते, पण तशी कोणतीही कार्यवाही झाली नाही. मनपाने काय भूमिका घेतली? सेव्हन हिल्स ते ॲम्बेसेडर हॉटेलपर्यंतचा जालना रोडविविध प्राधिकरणे (मनपा, सिडको, एमआयडीसी) 30,45 आणि 60 मीटर रुंद असल्याचा दावा करीत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यावर मनपाने शासनाचा सल्ला घेऊन रस्त्याचा हा भाग नेमका किती रुंदीचा आहे, याचानिश्चित निष्कर्ष काढल्यानंतर शपथपत्र दाखल करू. पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करणार नाही. त्यानंतर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनीस विस्तर शपथपत्र सादर केले होते.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आता अधिकच खोलवर रुजली असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट दिसून येत आहे. कोणताही पक्ष असो, उमेदवारीच्या वाटपात सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या घरातील सदस्यांना अधिक प्राधान्य दिल्याचे वास्तव लपलेले नाही. यामुळे कोणत्याही पक्षाचे नाव पुढे करीत असले तरी प्रत्यक्षात सत्ता आणि नेतृत्व हे काही विशिष्ट कुटुंबांच्या भोवतीच फिरत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही नगरपरिषदांमधील उमेदवारीने तर घराणेशाहीचा कळस गाठल्याची चर्चा सुरू झाली आहे. कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत तर हा प्रकार सर्वाधिक चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गट या पक्षाने शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या संपूर्ण कुटुंबालाच तिकीट देऊन सर्वांचेच लक्ष वेधले आहे. वामन म्हात्रे स्वतः, त्यांची पत्नी, भाऊ, भावजई, मुलगा आणि पुतण्या यांना एकाचवेळी उमेदवारी देण्यात आली आहे. एका कुटुंबातील सहा जण थेट मैदानात उतरल्याने बदलापूर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीपासून ते जनतेच्या चर्चांपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटत आहेत. 2015 मध्येही म्हात्रे कुटुंबातील चार जणांना तिकीट मिळाले होते, त्यामुळे घराणेशाहीचा हा पॅटर्न पुन्हा उघड झाला आहे. आता या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर नेते काय म्हणतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. फक्त शिवसेनाच नव्हे, तर भाजपमध्येही यावर्षी हा कल दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षानेही एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या नावासोबतच त्यांची पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांना नगरसेवकपदासाठी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने घराणेशाही विरोधातील आपली भूमिका स्वतःच गोंधळात टाकल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा विरोधकांच्या घराणेशाहीवर टीका केली असतानाच, स्थानिक पातळीवर मात्र अशा प्रकारे तिकीट वाटप होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता या दोन्ही उदाहरणांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचे राजकारणात नेमके स्थान काय? अनेक वर्षांची मेहनत, जनसंपर्क आणि संघटन बांधणी केल्यानंतरही पक्षातील मोठ्या पदांसाठी नेत्यांच्या आपल्या घरातील सदस्यांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये तिकीट वाटप ही कार्यकर्त्यांच्या अंतिम अपेक्षांपैकी एक असते. परंतु ही अपेक्षाच सतत नातेवाईकांनाच दिली जात असल्याने पक्षांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. घराणेशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये अशाच प्रकारचे चित्र दिसत असल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीचा केंद्रबिंदू बनला आहे. एकीकडे नेते सामान्य कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचे आवाहन करतात, तर दुसरीकडे निर्णय मात्र आपल्या परिवारापुरते मर्यादित ठेवतात. या परस्परविरोधी चित्रामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. येत्या काही दिवसांत हे उमेदवारी वाटप पक्षांना कितपत फायद्याचे किंवा तोट्याचे ठरणार, हे मतमोजणीच्या निकालांनंतर स्पष्ट होणार आहे. पण एकूणच, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांनी घराणेशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे, हे निश्चित.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या राजकीय चिखलफेक सुरू आहे. गिरीश महाजनांनी रोहित पवार हे आपल्या आजोबांच्या कडीखांद्यावर खेळून आमदार झाल्याची टीका केली. त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी महाजनांत विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची हिंमत नसल्याचा घणाघात केला. यामुळे या दोघांतील राजकीय चिखलफेक आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. जळगावच्या जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना जबरदस्तीने अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. रोहित पवारांनी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल केले होते. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर महाजनांनी त्यांच्यावर पोस्टल मतांवर जेमतेम विजय झालेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये अशी टीका केली होती. त्यानंतर आता रोहित पवारांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जळगावमध्ये एकतरी उद्योग आणला का? गिरीश महाजन साहेब, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवण्याची हिम्मत का दाखवली नाही? एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का? आपल्या कार्यकाळात भकास असलेला विकास गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोटारसायकलवरून जात असतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. आता मंत्रिपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या, असे ते म्हणाले. कर्जत - जामखेडचे राजकीय वजन वाढले बाबांच्या खांद्यावर कडेवर खेळायला नशीब लागतं आणि आम्ही नाशिबवान आहोत आम्हाला पवार साहेबांसारखे बाबा (आजोबा) लाभले. बाकी तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला 2019 मधे 40 हजारांनी लोळवलं होतं, यावेळी पण तोच डाव होता पण तुम्ही VoteChori केली. असो, तुम्हाला आणि मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या सभेत विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करावी लागते यातच कर्जत-जामखेडचं राजकीय वजन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसून येतं. बाकी, धार्मिक भावनांच्या नावाखाली आपण करत असलेलं पैसा आणि सत्तेचं राजकारण आणि नाशिक कुंभमेळ्यात आस्थेच्या नावाखाली टेंडर्स फुगवून करत असलेल्या करामती याचा आम्ही योग्य वेळी भांडाफोड करूच, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते गिरीश महाजन? मंत्री गिरीश महाजन भुसावळच्या सभेत रोहित पवारांना उद्देशून म्हणाले होते, भाजपचा एक साधा कार्यकर्ता इथपर्यंत सहजपणे पोहोचला नाही. आम्ही इतक्या वर्षांपासून जनतेची कामे करत आहोत. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. जनतेने उगाच नाही आम्हा पती-पत्नीला 7-8 वेळा निवडून दिले. लोकांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतो. जामनेरमध्ये माझ्या समाजाची मते फक्त 3 हजार आहेत. इतर समाजाचे लोक आम्हाला आमच्या कामांच्या जोरावर निवडून देतात. तुमच्यासारखे आम्ही आजोबांच्या व काकांच्या पुण्याईने राजकारणात आलो नाही.
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेसंबंधीची सुनावणी आज होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेविषयी निर्माण झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरांत आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आधी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला कोणत्याही स्थितीत आरक्षणाची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले होते. तसेच सध्याची निवडणूक प्रक्रिया रोखण्याचाही इशारा दिला होता. यामुळे नगरपंचायत व नगरपरिषदेच्या येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. पण कोर्टाने यासंबंधीची सुनावणी लांबणीवर टाकल्याने ही निवडणूक प्रक्रिया तूर्त जैसे थे सुरू आहे. गेल्या वेळी काय झाले सुप्रीम कोर्टात? मागील सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नोटिफिकेशन काढण्यासाठी काही काळ थांबण्याची विनंती केली. त्यामुळे या प्रकरणी सुनावणीपर्यंत नोटिफिकेशन निघणार नाही हे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल बॉडीजचे नोटिफिकेशन अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याची विनंती केली. त्यानुसार, निवडणुकीची सध्याची प्रक्रिया आहे तशीच सुरू राहील, पण त्याचे निकाल जाहीर होणार नाहीत. या निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही. पण ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, त्यावर मात्र निवडणुकीचे नोटिफिकेशन जाहीर होणार नाही. या सुनावणीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा उल्लेख झाला नाही. पण महापालिका निवडणुकीचे नोटिफिकेशन आले नसल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ असा होतो की, यापुढे जिल्हा परिषदेचे नोटिफिकेशनही निकालापर्यंत जाहीर होणार नाही. याचिकाकर्त्याने आरक्षणावर काय घेतले होते आक्षेप? या प्रकरणी यापूर्वी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याने मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीत संताप व्यक्त केला होता. त्यात कोर्ट म्हणाले होते की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशातच म्हटले होते की, बांठिया आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती, त्यानुसारच निवडणूक घ्याव्यात. म्हणजेच, ओबीसी आरक्षण नसतानाचा आराखडा वापरला पाहिजे. परंतु सरकारने या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवले, अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच थांबणार या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली. राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही मुदती वाढवता येणार नाहीत. मात्र, न्यायालयाने त्यांच्या या कारणांवर समाधान व्यक्त केले नाही. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, आमचा आदेश अगदी सरळ होता, पण तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच आम्ही रोखू शकतो. न्यायमूर्ती जॉयमला बागची यांनीही घटनेतील आरक्षण मर्यादेचा उल्लेख करून सरकारला खबरदारीचा इशारा दिला. राज्य सरकारने अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आज पुढील सुनावणी ठेवली असून त्यानंतर निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा सध्या न्यायालयीन सुनावणीचे पुढील टप्पे निर्णायक ठरणार आहेत. न्यायालयाने आरक्षण मर्यादा पाळण्याचे आदेश पुन्हा कडकपणे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेते, बांठिया आयोगाचा अहवाल कसा मांडते आणि न्यायालयाची प्रतिक्रिया काय असते, यावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेवर होतील की थांबवण्यात येतील, हे अवलंबून आहे. सर्वसामान्य नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा वाद आता राजकीय वातावरणात स्पष्ट जाणवू लागला आहे. जळगावसह चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर या ठिकाणी प्रमुख पक्षांचे नेते व आमदार आपल्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच गाजतो आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील मोठ्या नेत्यांनी पत्नी किंवा कन्यांना तिकीट देत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि नागरिक दोघंही आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घडामोडींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोले लगावले आहेत. चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण मैदानात उतरल्या आहेत. पाचोरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची पत्नी सुनीता पाटील उमेदवार आहेत. तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भुसावळमध्ये भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे उमेदवार बनल्या आहेत. मुक्ताईनगर येथे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची कन्या रंजना पाटील शिंदेसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उदाहरणांमुळे घराणेशाही हा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. सत्ताधारी पक्षातील अनेकांना स्वतःवर होत असलेल्या टीकेची धार आता उलट त्यांच्या दिशेने वळत असल्याचे चित्र दिसत आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुसावळ येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्या प्रचार सभेत बोलताना खडसे म्हणाले की, माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद झाली आहेत. खडसे यांच्या मते, जे लोक नेहमी त्यांच्यावरच घराणेशाहीचा ठपका ठेवत होते, त्यांचीच मंडळी आता आपल्या पत्नींना, नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना तिकीट देतायत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना आता काही आधार उरलेला नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सावकारेंपासून ते मंत्र्यांच्या पत्नींच्या उमेदवारीपर्यंत अनेक उदाहरणे समोर ठेवत भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला. त्यांची भूमिका ढोंगीपणाची ठरते यावेळी खडसे यांनी विशेषत: गिरीश महाजन यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले, महाजन साहेब नेहमी म्हणतात की नाथाभाऊ म्हणजे खडसे घराणेशाही करतात. मग आता तुम्ही कोणती शाई लावली? तुमच्या पत्नीला बिनविरोध जिंकवून आणलं. मंगेश चव्हाण, किशोर आप्पा यांनीही बायकोला तिकीट दिलं. मग आता माझ्यावर बोट दाखवणारे कुठे गेले? खडसे यांनी विचारलेल्या या प्रश्नामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यांनी पुढे सांगितले की, जे लोक घराणेशाहीचा मुद्दा वापरून त्यांच्यावर राजकीय वार करत होते, ते आता स्वतःच त्याच पद्धतीने राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ढोंगीपणाची ठरते, असा घणाघात त्यांनी केला. घराणेशाहीचा मुद्दा आणखी पेटला जळगाव जिल्ह्यातील या निवडणुका स्थानिक पातळीवर कितीही छोट्या असल्या, तरी त्या राजकीय प्रतिष्ठेबद्दल अधिक आहेत, असे अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते स्वतःची ताकद दाखवण्यासाठी कुटुंबीयांना उमेदवारी देत आहेत, तर विरोधक या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या विधानामुळे घराणेशाहीचा मुद्दा आणखी पेटला असून पुढील काही दिवसांत हा विषय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, जळगाव जिल्ह्यातील राजकारण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वाहतूक पोलिसांनी थांबण्याचा इशारा देऊनही थेट त्यांच्या अंगावर रिक्षा घालून सुमारे 20 फूट फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालक युसूफ मोहंमद अन्सारी (रा. मोमीनपुरा, दौलताबाद) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या गंभीर घटनेनंतर शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेत, ज्या ठिकाणी युसूफने पोलिसांवर हल्ला केला त्याच ठिकाणी सोमवारी (24 नोव्हेंबर) त्याची धिंड काढली. त्यामुळे पुन्हा एकदा शहर पोलिसांचा ‘धिंड पॅटर्न’ चर्चेत आला आहे. आरोपी युसूफ अन्सारी यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. पोलिसांवर हल्ला आणि कारवाई सत्र थेट पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर शहरात दिवसभर प्रत्येक चौकात शहर पोलिसांच्या पथकाने कठोर कारवाई सत्र राबवले. दिवसभरात एकूण 797 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 32 रिक्षा जप्त करण्यात आल्या, तर एकूण 9 लाख 66 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 3 लाख 67 हजार रुपयांचा दंड वसूलही करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात दिवसभर प्रत्येक चौकाला छावणीचे स्वरूप आले होते. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली. 3 महिन्यांपूर्वीही पोलिसांशी हुज्जत रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाले आहे. साडेतीन महिन्यांपूर्वीही त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याची माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. 11 ऑगस्ट 2025 रोजी त्याने कामगार उपायुक्त कार्यालयातील एका शासकीय नोकरदार महिलेशी तिकीट (भाड्याच्या) पैशांवरून हुज्जत घातली होती. रेल्वेस्टेशन चौकात हा प्रकार घडला होता. त्या वेळी तेथे गेलेल्या वाहतूक पोलिसाशी त्याने हुज्जत घालत धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी त्याच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. रिक्षा दोन महिने जप्त 11 ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकारानंतर वाहतूक पोलिसांनी त्याची रिक्षा (एमएच 20 ईके 4632) जप्त केली होती. ती सुमारे दोन महिने जप्त होती. अंदाजे दीड महिन्यापूर्वी त्याने दंड भरून ही रिक्षा सोडवून घेतली होती, मात्र 23 नोव्हेंबरला त्याने पुन्हा पोलिसांना नडण्याचा प्रयत्न केला.

27 C