SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

महाराष्ट्र फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर:खोपकर, चित्रे, व्यास, नारकर, चितळे, पाशा, देसाई, चौधरी यांचा होणार गौरव

यंदाचे सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्यासाठी देण्यात येणारे पुरस्कार आज पुण्यात जाहीर झाले. साहित्य क्षेत्रात चार, सामाजिक क्षेत्रात तीन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार एक अशा एकूण आठ पुरस्कारांची घोषणा आज पुण्यात करण्यात आली. या पुरस्कारांनी लीलाताई चितळे, अरुण खोपकर, निखिलेश चित्रे, ऋत्विक व्यास, विनय नारकर, जावेद पाशा, दत्ता देसाई, मनिष राय चौधरी यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्काराच्या मासूमचे संयोजक डॉ. मनीषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी, साहित्य पुरस्कार निवड समितीचे समन्वयक मुकुंद टाकसाळे आणि साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ या चौघांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) आणि साधना ट्रस्ट या दोन संस्थांच्या वतीने या पुरस्कारांचे संयोजन केले जाते. यावर्षीचा दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना, ग्रंथ पुरस्कार (ललित( निखिलेश चित्रे यांच्या गॉगल लावलेला घोडा या कथासंग्रहाला, ग्रंथ पुरस्कार (वैचारिक /अपारंपरिक) विनय नारकर यांच्या वस्त्रगाथाला तर रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार ऋत्विक व्यास यांच्या पाच मजली हॉस्पिटल या नाट्यसंहिताला देण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह अशा स्वरूपात असून , दोन ग्रंथ पुरस्कार आणि नाट्यलेखन पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात दिले जाणार आहेत. यावर्षीचा समाजकार्याचा जीवनगौरव पुरस्कार लीलाताई चितळे यांना दिला जात आहे. दोन कार्यकर्ता पुरस्कार आहेत. त्यामध्ये जावेद पाशा यांना कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार, तर दत्ता देसाई यांना कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार दिला जाणार आहे. समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार दोन लक्ष रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात असून, दोन्ही कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपात आहेत. याशिवाय, एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह या स्वरूपातील डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार या वर्षी मनिष राय चौधरी ( पं. बंगाल) यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचे हे सर्व आठ पुरस्कार १७ जानेवारी २०२६ रोजी शनिवार, सायंकाळी ५ वाजता पुणे येथील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या समारंभात प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे गणेश देवी असतील आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मागील ३२ वर्षांपासून साहित्य पुरस्कार, तर मागील ३० वर्षांपासून समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात . या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचे तीन वर्षापूर्वी निधन झाले, त्यामुळे त्यावर्षी पासून या सर्व पुरस्कारांचे नाव सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार असे करण्यात आले आहे. या पुरस्कारांच्या निवडीसाठी भारतात व अमेरिकेत स्वतंत्र निवड समित्या होत्या. पुरस्कारांच्या निवड समितीचे सदस्य व अध्यक्ष आणि अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन चे काही सदस्य या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती, या पुरस्कारांच्या निमंत्रक व मासूमच्या सहसमन्वयक मनीषा गुप्ते यांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 5:05 pm

कलांगण वाटिका उपक्रमाचे 19 व 20 डिसेंबर रोजी आयोजन:‘साउंडस ऑफ बीट्स’ संस्थेकडून भारतीय शास्त्रीय संगीतासाठी पुढाकार

भारतीय शास्त्रीय संगीत घराघरापर्यंत पोहोचावे या उद्देशाने पुण्यातील प्रतीक राजकुमार यांच्या ‘साउंडस ऑफ बीट्स’ या संस्थेच्या वतीने ‘कलांगण वाटिका’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले असून या अंतर्गत येत्या शुक्रवार १९ व शनिवार २० डिसेंबर या दोन दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिला कार्यक्रम शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी हिंजवडी येथील यशवन मान या ठिकाणी सायं ६ वाजता संपन्न होईल तर दुसरा कार्यक्रम शनिवार दि. २० डिसेंबर रोजी खराडी येथील यशविनमधील ओरीझोन्टे या ठिकाणी सायं. ६ वाजता संपन्न होईल. या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना प्रतीक राजकुमार म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जीवनात संगीत सभांना जाणे नागरिकांना तितकेसे शक्य नसताना कलाकारांना आणि पर्यायाने शास्त्रीय संगीताला घरा घरांत पोहोचविण्याच्या दृष्टीने सोसायटी पातळीवर ‘साउंडस ऑफ बीट्स’ या संस्थेच्या माध्यमातून आम्ही कलांगण वाटिका हा उपक्रम राबवीत आहोत, यामध्ये आश्वासक कलाकारांचे सादरीकरण पाहण्याची संधी श्रोत्यांना त्यांच्या राहत्या सोसायटी मिळू शकणार आहे. सदर उपक्रमासाठी आम्हाला विलास जावडेकर डेव्हलपर्स यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी हिंजवडी येथील यशवन मान या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात तेजस्विनी फडके यांचे कथक नृत्य आणि मालविका दीक्षित यांचे गायन रसिकांना अनुभविता येईल तर शनिवार दि. २० डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रतीक राजकुमार यांचे शास्त्रीय गिटार वादन व सतीश कुमार यांचा ‘सुफियाना कबीर’ हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 5:02 pm

पुणे पोर्शे अपघात प्रकरण:विशाल अगरवालला दिलासा नाहीच, उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला; डॉ. तावरेंच्याही कोठडीत वाढ

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या विशाल अगरवालचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे गेल्या 17 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अगरवालचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. याच प्रकरणातील सहआरोपी आणि ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. 19 मे 2024 रोजी कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्याने अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोन तरुण अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातावेळी कार चालवणारा विशाल अगरवालचा मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. मात्र, हे लपवण्यासाठी आणि त्याला वाचवण्यासाठी विशाल अगरवालने कट रचून मुलाचे रक्ताचे नमुने बदलले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी 21 मे 2024 रोजी त्याला छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. तेव्हापासून तो कारागृहात आहे. पोलिसांवरही बडतर्फीची कारवाई या संवेदनशील प्रकरणात पोलिसांकडूनही सुरुवातीच्या टप्प्यात हलगर्जीपणा आणि आरोपीला पाठीशी घालण्याचे प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत, येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. निबंधाच्या शिक्षेवरून झाला होता गदारोळ अपघातानंतर अवघ्या 14 तासांत बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिणे, समाजसेवा करणे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे यांसारख्या किरकोळ अटींवर जामीन मंजूर केला होता. दोन निष्पाप जिवांचा बळी गेल्यानंतरही आरोपीला मिळालेल्या या 'व्हीआयपी' वागणुकीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर जनक्षोभामुळे आणि तपासातील नवीन पुराव्यांमुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 5:01 pm

'बिल्डर्स डे'निमित्त 'विकसित भारत 2047' वर ज्ञानसत्र:विकसित भारतासाठी बांधकाम क्षेत्र महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. भिरूड

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी म्हटले आहे की, विकसित भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान, बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचे मोलाचे योगदान राहणार आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी आयुष्याच्या मूलभूत गरजा असून, निवाऱ्याची गरज समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्यास विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असे त्यांनी नमूद केले. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पुणे सेंटरतर्फे 'बिल्डर्स डे'निमित्त 'विकसित भारत २०४७: बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे योगदान' या विषयावरील ज्ञानसत्रात डॉ. भिरूड बोलत होते. या कार्यक्रमाला संवर्धन मदरसन ग्रुपचे महासल्लागार व वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव कपूर, बीएआय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव, बीएआय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष महेश मायदेव, उपाध्यक्ष राजाराम हजारे, सचिव सी. एच. रतलानी, कोषाध्यक्ष डॉ. महेश राठी आणि कार्यक्रमाचे संयोजक शिवकुमार भल्ला आदी उपस्थित होते. डॉ. सुनील भिरूड यांनी पुढे सांगितले की, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड आहे. २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना, अंतराळप्रवास आणि मंगळ, चंद्र येथील मानवी वसाहतींचा विचार केला जाईल. अधिकाधिक स्मार्ट साधने आणि स्मार्ट सामग्री उपलब्ध होईल, ज्यामुळे बांधकामासाठी लागणारा वेळ कमी होईल. त्यामुळे बांधकाम क्षेत्राची भूमिका अनन्यसाधारण महत्त्वाची राहील, हे निश्चित आहे. बांधकाम क्षेत्राने सर्वोच्च दर्जाची गुणवत्ता जपावी, असे आवाहन त्यांनी केले. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या हितासाठी 'बीएआय' करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. अनुभव कपूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी दरडोई उत्पन्न, सामाजिक सुधारणा, शाश्वत पर्यावरणीय उपाययोजना आणि प्रभावी शासकीय यंत्रणा हे चार घटक महत्त्वाचे आहेत. त्यांची अंमलबजावणी जेवढी कार्यक्षमतेने होईल, तितका विकासाचा आलेख उंचावत जाईल. शहरीकरणाचा वेग वाढल्याने स्मार्ट शहरे वाढतील आणि सर्व क्षेत्रांत गतिमानता येईल. सातत्याने नव्या आणि कार्यक्षम नागरी सुविधांची गरज वाढेल, ज्यात बांधकाम क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असेल. यावेळी 'बीएआय'च्या वतीने बांधकाम क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक केडगे, लक्ष्मण थिटे, एस. बी. थोरवे आणि युसुफ इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच संजय बोरकर, गीता नगरकर, अधीरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, एसकेएफजी रिअलिटी लिमिटेड, विंडसर इन्फ्राकॉन व जयंत इनामदार यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले. या कार्यक्रमात 'बीएआय'च्या नवीन डायरीचे प्रकाशनही करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 4:58 pm

पुणेकरांसाठी पर्वणी!:19 डिसेंबरपासून 'कॉईनेक्स 2025' प्रदर्शन; शिवकालीन 'होन'सह दुर्मिळ नाणी, नोटा पाहण्याची संधी

पुण्यात इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स (आयसीएसआरआय पुणे) तर्फे ‘कॉईनेक्स पुणे २०२५’ या दुर्मिळ नाण्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ ते २१ डिसेंबर या तीन दिवसांसाठी सोनल हॉल, कर्वे रस्ता येथे भरवण्यात येणार आहे. यंदा या प्रदर्शनाचे ३० वे वर्ष आहे. या प्रदर्शनात रसिकांना दुर्मिळ नाणी, नोटा आणि शिवाजी महाराजांच्या काळातील होनसारख्या विविध दुर्मिळ वस्तूंचा खजिना विनामूल्य पाहता येणार आहे. प्रदर्शन सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत खुले राहील. आयसीएसआरआय पुणेचे उपसचिव श्याम मोटे, उपाध्यक्ष कमलेश मोतीवाला आणि राजेंद्र शहा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सचिव शरद बोरा आणि खजिनदार नितीन शहा उपस्थित होते. प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध नाणकशास्त्र तज्ज्ञ डॉ. के.के. माहेश्वरी यांच्या हस्ते होणार आहे. डॉ. माहेश्वरी हे नाशिकमधील अंजनेरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन न्यूमिस्मॅटीक स्टडीजचे संस्थापक आहेत. यानिमित्ताने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिवंगत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मुंबईचे फारूख एस. तोडीवाला (तोडीवाला ऑक्शन), मुंबईचे डॉ. दिलीप राजगोर (राजगोर ऑक्शन) आणि जामखेडचे पोपटशेठ हलपावत यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. यानिमित्त संस्थेच्या स्मरणिकेचे आणि डॉ. दिलीप राजगोर, आशुतोष पाटील आणि मनीष मोरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. पहिल्यांदा भारतात पुणे येथे ३ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी ४ वाजता 'श्री छत्रपती संभाजी महाराज' या मराठा संकल्पनेवर आधारित विशेष अश्वारूढ चित्राच्या कव्हरचे आणि ताम्राच्या शंभू नाण्याच्या प्रतिकृतीसह विशेष पोस्ट कव्हरचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी पांडुरंग बलकवडे, विक्रमसिंह बाजी मोहिते, सत्यशील दाभाडे, कैलाश मेहेंदळे, सिद्धार्थ कंक, किल्ल्यांचे अभ्यासक सुनील पवार आदी संस्थानिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर संध्याकाळी डॉ. शैलेंद्र भंडारे यांचे रूपयाची कथा या विषयावर प्रत्यक्ष व्याख्यान होणार असून या व्याख्यानाचा ऑनलाईन स्वरूपात देखील रसिकांना लाभ घेता येणार आहे. या प्रदर्शनानिमित्त शनिवार दिनांक २० रोजी सकाळी ११ वाजता मुंबईचे डॉ. दिलीप राजगोर, पुण्याच्या डॉ. मंजिरी भालेराव, ठाण्याचे प्रशांत ठोसर, पुण्याचे अमोल बनकर आणि संभाजीनगर येथील आशुतोष पाटील यांचे नाणकशास्त्राविषयी अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे. यानंतर दुपारी ४ वाजता ओसवाल ऑक्शनतर्फे सोने, चांदी आणि इतर नाण्यांचे लिलाव होणार आहे. रविवार दिनांक २१ डिसेंबरला सकाळी ११.३० वाजता तोडीवाला ऑक्शनतर्फे देखील लिलाव होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 4:55 pm

शिलाई मशिनचे आमिष दाखवून ४२४ महिलांची फसवणूक

मुंबई : प्रतिनिधी सरकारी योजनेतून शिलाई मशिन देण्यात येणार असल्याचे सांगून तालुक्यातील ४२४ महिलांकडून प्रत्येकी ६०० ते १७०० रुपये प्रमाणे एकूण ३ लाख ६५ हजार ९७० रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेऊनही अनेक महिने उलटून गेले तरी शिलाई मशिन न मिळाल्याने संतप्त महिलांनी सोमवारी चिपळूण पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल […] The post शिलाई मशिनचे आमिष दाखवून ४२४ महिलांची फसवणूक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 4:53 pm

पिंपरीत भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय 'महा'आघाडी?:काँग्रेस-मनसे एकत्र, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युतीची शक्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वेगवेगळे लढणार असल्याची घोषणा करताच शहरात भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबईत काँग्रेस आणि मनसेचे विळ्या-भोपळ्याचे नाते असले, तरी पिंपरीत मात्र काँग्रेस आणि मनसेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत मिळत असून, दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पिंपरीत भाजपला एकाकी पाडण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटत असल्याचे चित्र आहे. राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर, सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे या बैठकीला मनसे आणि महादेव जानकर यांच्या 'रासप'चे नेतेही उपस्थित होते. भाजपचा पराभव करण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या आघाडीत आली तरी आमची हरकत नाही, अशी उघड भूमिका घेत या नेत्यांनी अजित पवार गटालाही मविआत येण्याचे आमंत्रण धाडले आहे. पवार काका-पुतणे एकत्र येणार? एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्याचे संकेत दिले असतानाच, दुसरीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये गुप्त खलबते सुरू झाली आहेत. अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटल्यानंतर स्थानिक पातळीवर दोन्ही गटातील नेत्यांची चर्चेसाठी एकत्रित येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुप्रिया सुळेंचा फोन आणि मतविभाजन या भेटीबाबत माहिती देताना नाना काटे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करा, असा सल्ला त्यांनी दिला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसारच ही बैठक झाल्याचे काटे आणि गव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे. चिन्हाचा तिढा आणि रणनीती या बैठकीत भाजपविरोधी लढण्यासाठी कोणते समीकरण जुळवायचे, यावर चर्चा झाली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार 'तुतारी'वर लढणार की 'घड्याळ' चिन्हावर? तसेच केवळ दोन्ही राष्ट्रवादींची युती करायची की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही सोबत घ्यायचे? भाजप विरोधी लढण्यासाठी यातील कोणते समीकरण अंतिम करायचे? या मुद्द्यांवर खल झाला. हे ही वाचा.. पुणे-पिंपरीत सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार:फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांनीही भाजपविरोधात ठोकला शड्डू आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 'एकला चलो रे'ची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शड्डू ठोकलाअसून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे, असा एल्गार पुकारला आहे. सविस्तर वाचा.. 25 वर्षे मुंबई लुटली म्हणता, तेव्हा तुम्ही कुठे होता?:महापौर आमचा असताना उपमहापौर तुमचा होता, अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. आम्ही मुंबई लुटली असा आरोप करणाऱ्या भाजपने 25 वर्षे उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे चेअरमनपद भोगले. तेव्हा लुटताना तुम्ही कुठे होतात? असा तिखट सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा..

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 4:48 pm

एकात्मता भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू:बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे पुणे लिट फेस्टमध्ये प्रतिपादन

भारतीय संस्कृतीचा आधार ज्ञान असल्याने ती निरंतर आहे. एकात्मता ही भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू आहे. विविधतेचा सन्मान करून स्वीकारणे महत्त्वाचे असून, ज्ञान दृष्टी प्राप्त करण्यासाठी साहित्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत आयोजित पुणे लिट फेस्टचे उद्घाटन खान यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर या वेळी उपस्थित होते. अनेक संस्कृत श्लोक उद्धृत करत राज्यपाल खान यांनी साहित्य आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, साहित्याचा आस्वाद आणि सज्जनांचे सान्निध्य हा अमृतानुभव असतो, असे आपल्या परंपरेत मानले जाते. ब्रह्मज्ञानाच्या जवळ नेते ती कला आणि साहित्य असते. लहानपणापासूनच पुस्तकांची आवड होती आणि पुस्तक वाचनामुळे ज्ञान संपादन सुलभ झाले, असे खान यांनी सांगितले. एकेकाळी लेखनाला जगात विरोध झाला होता, मात्र भारतात ज्ञानाची संस्कृती होती. संगणकासारख्या तंत्रज्ञानाला घाबरण्याचे कारण नाही, उलट त्याने ज्ञानाचा प्रसार होण्यास मदत होते. जितका ज्ञानाचा प्रसार होईल, तितका देश प्रगती करतो. ऋग्वेदाला युनेस्कोने सर्वांत प्राचीन मानले आहे, यापेक्षा भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अन्य पुराव्याची गरज नाही. अरबांनी भारतीय साहित्याचा पहिल्यांदा अनुवाद केला. युरोपच्या अवकाश अभ्यासाचा आधार असलेला सूर्य सिद्धांत हा ग्रंथ अरबीतून युरोपात गेला, असेही त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृती ज्ञान आणि प्रज्ञेच्या संवर्धनाची संस्कृती आहे. पुणे हे सांस्कृतिक आणि साहित्यिक चेतनेचे महत्त्वाचे केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक (त्यांचा गीतारहस्य ग्रंथ), गोपाळ कृष्ण गोखले आणि महात्मा फुले यांची आठवण या शहरामुळे आहे, असेही खान यांनी नमूद केले. प्रा. मिलिंद मराठे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुन्हा पुन्हा वाचले जाते ते अभिजात साहित्य असते. ज्ञान, मनोरंजन आणि समाजाला दिशा देण्याची ताकद साहित्यामध्ये असते. पुणे लिट फेस्टमध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग आहे. महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे म्हणाले की, आरिफ मोहम्मद खान यांच्यासारखे विद्वान लिट फेस्टच्या उद्घाटनाला येणे ही भाग्याची गोष्ट आहे. गेल्या वर्षी पुस्तकांच्या २५ लाख प्रती विकल्या गेल्या, यावरून तरुण वाचतात हे या महोत्सवाने सिद्ध केले आहे. महोत्सवात लहान मुलांसह प्रत्येकासाठी काहीतरी आहे आणि पुणे लिट फेस्टही सर्वांत मोठा महोत्सव होईल.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 4:46 pm

मराठी माणसांनी विरोधकांच्या पराभवाचा मुहूर्त ठरवला:महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांचा दावा; राष्ट्रवादीसोबत जाण्यास नकार

सर्वसामान्य मुंबईकरांनी व मराठी माणसांनी ठाकरे गट व त्यांच्यासोबत जाणाऱ्या सर्वांचाच पराभव करण्यासाठी 15 जानेवारीचा शुभमुहूर्त काढला आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी आज केला. यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या नेतृत्वात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्यासही ठाम नकार दिला. तसेच शिवसेना व भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचेही स्पष्ट् केले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना व भाजपची महत्त्वाची बैठक झाली. त्यात आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेना व भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, होय आमचे ठरले. आमचा फॉर्म्युलाही ठरला. आमचा आकडाही ठरला. महायुतीच्या मुंबईत 150 प्लस जागा निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आहे. शिवसेना, भाजप व रिपाइंसह कुणी कुठे लढल्यावर 150 प्लस जागा निवडून येतील तो आकडा ठरवण्याच्या अभ्यासासाठी आज बैठक झाली. या प्रकरणी 1-2 दिवसांत पुन्हा एकत्र बसून दोन्ही पक्ष किती जागा लढवतील हे ठरवले जाईल. ठाकरे गटाचा कोणत्या मोहल्ल्यातून येणार? आशिष शेलार यांनी यावेळी ठाकरे गट व ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही निशाणा साधला. ते म्हणाले, आमचा आकडा 150 प्लस आहे. मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल व तो मराठीच असेल यात शंका नाही. पण आमचा सवाल उद्धव ठाकरेंना आहे, तुम्ही घोषित करा. तुमचा महापौर कोणत्या गल्लीतून येईल व कोणत्या मोहल्ल्याचा असेल, त्या मोहल्ल्याचे नाव सांगा. आज कोण कुणाला भेटले यावर आम्ही बोलणार नाही. एकदा त्यांना एकत्र येऊ द्या. त्यानंतर 100 प्रश्नांचा वर्षावर केला जाईल. आशिष शेलार ठाकरेंवरील हल्ला अधिक धारदार करताना म्हणाले, काही पक्ष व काही पक्षांचे नेते आता केवळ पोस्टरवरच उरलेत. पोस्टर लावून मतदान मिळते असा त्यांचा भ्रम आहे. मुंबईकरांनी मराठी माणसांनी मुंबईसाठी एक शुभमुहूर्त काढला आहे. त्यांनी 25 वर्षे महापालिकेत भ्रष्टाचार केला, असा ठाकरे गट व त्यांच्यासोबत जाणाऱ्या सर्वांचाच पराभव करण्याचा शुभमुहूर्त 15 तारखेला निश्चित केला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही भाजपने मराठी माणसांची मुंबई गिळंकृत करण्याचा डाव रचल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावर ते म्हणाले, मला असे वाटते की ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत, तसे असे असत्य, खोटे व भ्रम पसरवण्याचे काम करत आहेत. मुंबई मराठी माणसांची आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे की, जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत मुंबई कुणीही हिंमत केली तरी भाजप व महायुती त्याचा विरोध करेल. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याची भूमिका जो कुणी घेईल त्याच्याविरोधात आम्ही उभे राहू, संघर्ष करू, तसेच ती भूमिका मांडणाऱ्याला ती भूमिका मांडूही देणार नाही. आता याविषयी काहीजण असत्य बोलत आहेत. खोटे बोलत आहेत. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीशी युती नाही आशिष शेलार यांनी नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीशी मुंबईत युती करणार नसल्याचेही स्पष्ट केले. भाजपने आपली भूमिका आपल्या वरिष्ठांना सांगितली आहे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आले आहेत. त्यामुळे आम्ही अशा राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही. शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष आम्हाला भेटले. त्यांनाही आम्ही हेच सांगितले आहे, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 4:28 pm

संतोष देशमुख हत्या प्रकरण:हत्तीवर मिरवणुकीच्या अफवांवर धनंजय देशमुखांचा इशारा; म्हणाले- अशा अफवांवर कायद्याचा अंकुश हवा

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज पार पडणार आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले असून, पीडित कुटुंबीयांसह सर्वसामान्य नागरिक न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे स्वतः न्यायालयात हजर झाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, न्यायव्यवस्थेवर आणि न्यायदेवतेवर त्यांचा संपूर्ण विश्वास आहे आणि संतोष देशमुख यांना नक्कीच न्याय मिळेल, अशी त्यांची ठाम भावना आहे. अनेक अडचणी, दबाव आणि भीतीचं वातावरण असतानाही आम्ही कायद्याच्या मार्गावर ठाम आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणात काही आरोपी समर्थकांकडून पसरवण्यात येणाऱ्या अफवांबाबत धनंजय देशमुख यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. आरोपी जामिनावर सुटणार असून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल, अशा प्रकारच्या वल्गना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या अफवा केवळ कुटुंबाला आणि साक्षीदारांना भयभीत करण्यासाठी पसरवल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. मात्र, अशा प्रकारच्या वक्तव्यांची योग्य ती दखल न्यायालय आणि संबंधित यंत्रणा घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कायदा सर्वांसाठी समान आहे आणि आरोपी कितीही प्रभावशाली असले तरी त्यांना शिक्षा व्हायलाच हवी, हीच आमची भूमिका आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. धनंजय देशमुख यांनी सुनावणीची सविस्तर माहिती दिली. आरोपी क्रमांक एकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर यापूर्वी 12 डिसेंबर रोजी सुनावणी झाली होती, मात्र ती अर्धवट राहिली होती. आज त्या सुनावणीचा उर्वरित भाग पूर्ण होणार असून, यावेळी फिर्यादी पक्षाचे वकील तसेच आरोपींचे वकील आपले युक्तिवाद मांडणार आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप नको, तर केवळ कायद्यानुसार आणि पुराव्यांच्या आधारे न्याय मिळावा, या भूमिकेतून न्यायालयात आलो आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. न्यायालयाकडून निष्पक्ष निर्णय अपेक्षित असून, आम्हाला न्याय मिळावा इतकीच आमची मागणी आहे, असंही त्यांनी सांगितलं. गुन्ह्याला कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये धनंजय देशमुख यांनी राज्याच्या यंत्रणांवरही विश्वास व्यक्त केला. या प्रकरणात एसआयटीसारख्या समित्या, तपास यंत्रणा, तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि न्यायालय या सर्वांकडून आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी नमूद केलं. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. एका निष्पाप सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, या गुन्ह्याला कोणत्याही परिस्थितीत माफी मिळता कामा नये, असं त्यांनी ठाम शब्दांत सांगितलं. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, हाच या लढ्याचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 18 पगड जातीतील समाजाचा मोठा वर्ग देशमुख कुटुंबाच्या पाठीशी दरम्यान, आरोपींच्या समर्थनार्थ बोलणाऱ्या लोकांवरही धनंजय देशमुख यांनी टीका केली. आरोपी अटक झाल्यापासून आजपर्यंत काही लोक सातत्याने आरोपी सुटणार, जल्लोष होणार, मिरवणूक काढली जाणार अशा वल्गना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अशा प्रकारचे प्रकार होऊ देणार नाहीत आणि कायदा किती कडक आहे हे दाखवून देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. राज्यातील 18 पगड जातीतील समाजाचा मोठा वर्ग देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे, कारण एका निष्पाप व्यक्तीवर अन्याय झाला आहे, असं त्यांनी नमूद केलं. आज खंडपीठात वाल्मीक कराड यांच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी या प्रकरणात निर्णायक ठरण्याची शक्यता असून, या सुनावणीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 4:09 pm

तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही?:मतदान केंद्र कोणते? आता 'मताधिकार' ॲपवर घरबसल्या मिळवा माहिती; जाणून घ्या प्रक्रिया

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 15 जानेवारी 2016 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी आपला नंबर कोणत्या केंद्रावर आहे किंवा मतदार यादीत नाव आहे की नाही, यासाठी मतदारांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंदा हायटेक पाऊल उचलले आहे. आयोगाने ‘मताधिकार’ हे खास मोबाईल ॲप लाँच केले असून, याद्वारे मतदारांना घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे. मतदाराने नाव कसे शोधावे? मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘मताधिकार’ हे ॲप डाऊनलोड करा. ॲप ओपन केल्यानंतर Voter List Search असे ऑप्शन येईल. Voter List Search या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपले नाव शोधण्यासाठी दोन सोपे पर्याय देण्यात आले आहेत. नावावरून (Name Wise) आणि ओळखपत्र क्रमांक (Epic Wise) शोधता येईल. 1. नावावरून शोध (Name Wise) : तुमचा जिल्हा आणि महानगरपालिका निवडल्यानंतर तुमचे 'संपूर्ण नाव' टाकून यादीतील नाव शोधता येईल. 2. ओळखपत्र क्रमांक (Epic Wise) : तुमचा जिल्हा आणि महानगरपालिका निवडल्यानंतर मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक टाकूनही थेट माहिती मिळवता येईल. या ॲपवर केवळ नावच नाही, तर तुमचे मतदान केंद्र (Polling Station) नेमके कुठे आहे आणि तुमच्या प्रभागातील उमेदवार कोण आहेत, याचीही इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. वेबसाइटवर अशा प्रकारे शोधा नाव दरम्यान, ज्यांना मताधिकार हे ॲप वापरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी आयोगाने https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. या वेबसाइटवर गेल्यानंतर Search Name In VoterList या ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला Name Wise आणि EPIC Number Wise असे दोन ऑप्शन दिसतील. Name Wise ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तेथे तुमचा जिल्हा आणि महानगरपालिका निवडल्यानंतर तुमचे 'संपूर्ण नाव' टाकून यादीतील नाव शोधता येईल. तर EPIC Number Wise ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जिल्हा आणि महानगरपालिका निवडल्यानंतर मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक टाकूनही थेट माहिती मिळवता येईल. पावणेचार कोटी मतदार बजावणार हक्क दरम्यान, राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 कोटी 48 लाख 78 हजार मतदार असून, त्यांच्यासाठी 39,147 मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. मुंबईसाठी सुमारे 10 हजार केंद्रे असतील. मतदानासाठी पुरेशा प्रमाणात ईव्हीएम मशीन्स (कंट्रोल आणि बॅलेट युनिट) उपलब्ध असल्याची माहिती आयोगाने दिली. येत्या 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 4:05 pm

भारताचा पाकविरोधात पहिल्याच दिवशी पराभव:पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा; पाकसोबतचे युद्ध थांबवणे मोदींची घोडचूक ठरल्याचा आरोप

पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताचा पहिल्याच दिवशी पराभव झाल्याचा धक्कादायक दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पाकसोबत युद्ध करणे सरकारची घोडचूक ठरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध थांबवण्याचा का निर्णय घेतला? त्याने युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला, असे ते म्हणालेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पुणे पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करत वरील दावा केला. आपली अर्थव्यवस्था पाकच्या अर्थव्यवस्थेहून 10 पट मोठी आहे. पण त्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकसोबतचे युद्ध थांबवण्याचा निर्णय का घेतला? हे कळत नाही. यामुळे युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला. मोदींवर कसला दबाव आहे त्याचे उत्तर आपण शोधले पाहिजे. मोदींवर अमेरिकेचा दबाव आहे. परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवरही आपण मागे आहोत, असे ते म्हणाले. अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसचा पराभव पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेत्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे पक्षाचा पराभव झाल्याचा दावाही केला. मागील वर्षभरात राज्याच्या राजकारणात बरेच काही घडले. विधानसभा निवडणुकीत आम्हाला अतिआत्मविश्वासाचा फटका बसला. आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधले होते, असे ते काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे कान टोचताना म्हणाले. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता घटली ते पुढे म्हणाले, सध्या राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा मोठा मुद्दा हाती घेतला आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. भाजपने ओबीसी विरुद्ध मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जिथे करता येईल तिथे ध्रुवीकरण केले. आम्ही आमच्या पराभूत उमेदवारांना याचिका दाखल करण्याचे निर्देश दिलेत. मी स्वतःही याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. माझ्याही मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाली. मला मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते पडली. तरीही माझा पराभव झाला. काँग्रेसने या प्रकरणी 288 मतदारसंघातील डेटा गोळा केला आहे. राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान कसे होऊ शकते? निवडणूक आयोगाला यावर उपाय करणे शक्य आहे, पण तो करत नाही. त्याला केवळ सत्ताधारी पक्षाला लाभ मिळवून द्यायचा आहे. चव्हाण म्हणाले, सध्या जे काही सुरू आहे त्याला भाजपचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याला जबाबदार आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पण तो बाहेर काढण्यास विरोधक कमी पडत आहेत. भाजपला पाशवी बहुमत मिळाले. आमचा संघर्षच सुरू आहे. महाराष्ट्रात एकही मोठा प्रकल्प येत नाही, त्याची सरकाला लाज वाटली पाहिजे. हे सरकार कमीशनचे आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण संख्याबळाअभावी आमची ताकद कमी पडत आहे. 19 डिसेंबरच्या दाव्यावर काय म्हणाले? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी 19 डिसेंबर रोजी मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला. मी तो दावा का केला हे ही सांगितले. तोपर्यंत काय घडते हे पाहू. सरकारने अणुभट्ट्या बाहेरून मागवण्याचा निर्णय घेतला आहे. 2008 पासून परदेशी कंपन्या भारतात आल्या नव्हत्या. पण अदानीला या क्षेत्रात प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गत महिन्यातच अमेरिका अणुचाचण्या सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यांच्यानंतर साहजिकच रशियाही करणार. भारतही करणार. पण आम्ही त्याला विरोध करणार.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 3:46 pm

संभाजीनगरमध्ये भाजप-शिवसेना युतीच्या चर्चांना वेग:उमेदवारांच्या मुलाखतींनी राजकारण तापले; जागावाटपावर 23 पर्यंत तोडगा

छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने उमेदवार निवड प्रक्रियेला वेग दिला असून, शहरात सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात होत असलेल्या या मुलाखतींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, युतीची चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे आणि येत्या 23 तारखेपर्यंत जागावाटपाचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत युतीच्या राजकीय समीकरणांचे चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात सुरू असलेल्या मुलाखतींना मोठा प्रतिसाद मिळत असून, या प्रक्रियेला जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि ज्येष्ठ नेते अशोक पटवर्धन उपस्थित आहेत. या टप्प्यात प्रामुख्याने नव्या इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. पहिल्याच दिवशी 350 इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्या असून, दुसऱ्या दिवशीही ही प्रक्रिया सुरूच आहे. महापालिका निवडणुकीत संधी मिळावी यासाठी मोठ्या संख्येने नव्या चेहऱ्यांनी अर्ज केल्यामुळे मुलाखतींना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राजकीय ताकदीचा आणि पूर्वीच्या कामगिरीचा आढावा दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दुपारी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत शिवसेनेच्या वतीने आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि ऋषिकेश जैस्वाल सहभागी झाले. तर भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, समीर राजूरकर, माजी महापौर भगवान घडामोडे आणि माजी उपमहापौर प्रशांत देसरडा हे चर्चेत सहभागी झाले. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीतील जागावाटप करताना ज्या पक्षाकडे पूर्वी ज्या जागा होत्या, त्याच आधारावर शिवसेना आपला प्रस्ताव मांडणार आहे. त्यामुळे युतीतील दोन्ही पक्ष आपापल्या राजकीय ताकदीचा आणि पूर्वीच्या कामगिरीचा आढावा घेत तोडगा काढण्याच्या तयारीत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण अधिकच चुरशीचे बनले नवीन इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने माजी नगरसेवक तसेच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती ठरलेल्या दिवशी होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पुढील टप्प्यात, म्हणजे नवीन इच्छुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेतल्या जाणार आहेत. पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या आणि युतीतील जागावाटप या दोन्ही आघाड्यांवर सुरू असलेल्या हालचालींमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण अधिकच चुरशीचे बनले आहे. 23 तारखेपर्यंत युतीबाबत निर्णय झाल्यास उमेदवारांची अंतिम यादी आणि प्रचाराची दिशा निश्चित होणार असून, त्यानंतर निवडणूक रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, असे चित्र सध्या दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 3:43 pm

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; १३ ठार

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुरा येथे आज १६ डिसेंबर रोजी पहाटे यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, आग्रा ते नोएडा दिशेने जाणा-या ८ बस आणि ३ कार एकमेकांवर आदळल्या. धडक इतकी जोरदार होती की, काही […] The post यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; १३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 3:23 pm

लातूरमध्ये कारचा भीषण अपघात; ३ ठार, ४ जण जखमी

लातूर : प्रतिनिधी अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट डिझायर आणि स्कॉर्पिओ या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य […] The post लातूरमध्ये कारचा भीषण अपघात; ३ ठार, ४ जण जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 3:17 pm

फडणवीसच PM पदासाठी योग्य व्यक्ती:शरद पवारांच्या निकटवर्तीय नेत्याचे विधान; फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का?

सद्यस्थितीत देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील एकमेव योग्य व्यक्ती आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामु्ळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी येत्या 19 तारखेला देशाच्या राजकारणात उलथापालथ होऊन मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला आहे. त्यांच्या विधानावर राज्यासह संपूर्ण देशात वेगवेगळी चर्चा सुरू असताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील एका कार्यक्रमात बोलताना वरील विधान केले आहे. ते म्हणाले, मी शरद पवार पंतप्रधान व्हावेत असे स्वप्न पाहिलेला कार्यकर्ता आहे. पण माझेही म्हणणे आहे की, सद्यस्थितीत पंतप्रधान म्हणून दिल्लीत शोभणारा महाराष्ट्रातील कार्यकर्ता फक्त देवेंद्र फडणवीस हेच आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना आपण 2029 पर्यंत महाराष्ट्रातच असल्याचे विधान केले होते. पण गत काही दिवसांत त्यांचे नाव थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आले आहे. पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदावरून पाय उतार झाल्याच्या स्थितीत फडणवीस हेच त्यांची जागा घेण्यासाठी योग्य उमेदवार आहेत असा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेतले जात होते. पण आता स्थिती बदलली आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण अमेरिकेतील एपस्टीन फाईल्सचा दाखला देत म्हणाले होते, 19 डिसेंबर रोजी देशात मोठा राजकीय भूकंप होईल. त्या दिवशी भारताचा पंतप्रधान बदलेल. एक मराठी माणूस पंतप्रधान होईल. ती व्यक्ती भाजपचीच असू शकते. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता, त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यांत कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्याच्याकडे जगातील अनेक बड्या व्यक्तींचे फोटो व व्हिडिओ आहेत. ही एपस्टीन फाईल्स सार्वजनिक करण्यास अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोध होता. पण जनरेट्यामुळे त्यांना या फाईल्स उघड कराव्या लागणार आहेत. 19 डिसेंबर रोजी त्यापैकी काही फोटो व ईमेल सार्वजनिक केले जातील. त्यात भारतातील काही व्यक्तींचा समावेश असू शकतो. त्यामुळे भारतात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. असे घडले तर महाविकास आघाडी किंवा इंडिया आधघाडीतील कुणालाही पंतप्रधानपदाची संधी मिळण्याची शक्यता नाही. कारण, आची तेवढी संख्या नाही. पण नागपुरातील भाजपच्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, असे चव्हाण म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 2:55 pm

जिथे शक्य असेल, तिथे युती करा:अमित शहांचा अजित पवार गटाला सल्ला, शरद पवारांच्या पक्षासोबत जुळवून घेण्यासही 'हिरवा कंदील'

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शाहांशी केलेल्या 15 मिनिटांच्या चर्चेत महापालिका निवडणुकांचे रणनीती ठरवण्यात आली असून, अमित शाह यांनी स्थानिक पातळ्यांवर लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याचे समजते. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, यामुळे राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. अमित शहा पटेल अन् तटकरेंना काय म्हणाले? अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत अमित शाह यांनी अजित पवार गटाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेल, तिथे युती करून निवडणुका लढा, असा सल्ला शाहांनी दिला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर द्यावा, अशी रणनीती आखण्यात आली आहे. शरद पवारांच्या पक्षासोबत गेल्यास हरकत नाही स्थानिक राजकीय गणिते जुळवण्यासाठी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जावे लागले किंवा काही ठिकाणी जुळवून घ्यावे लागले, तर त्याला अमित शाह यांची काहीही हरकत नसल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. उद्या फडणवीसांसोबत बैठक? अमित शाह यांनी लवकरच महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाशी बोलण्याचे आश्वासन पटेल आणि तटकरे यांना दिले आहे. या भेटीनंतर आता वेगाने सूत्रे हलली असून, उद्याच (बुधवारी) अजित पवार गटाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला आणि स्थानिक युतींबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा.. पुणे-पिंपरीत सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार:फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांनीही भाजपविरोधात ठोकला शड्डू आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 'एकला चलो रे'ची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शड्डू ठोकलाअसून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे, असा एल्गार पुकारला आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 2:50 pm

आदित्य ठाकरेच शिवसेनेच्या प्रचाराचे सेनापती:मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत सूत्रं हाती; राज्यातील प्रमुख महापालिकांवरही फोकस

ठाकरे गटाच्या शिवसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. मुंबईतील प्रचाराची सूत्रं, विविध मेळावे, युवकांशी संवाद आणि निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी आदित्य ठाकरे पार पाडणार आहेत. विशेषतः युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. रोजगार, शिक्षण, शहरी सुविधा, पर्यावरण, वाहतूक, घरबांधणी अशा मुद्द्यांवर आधारित प्रचार रणनीती आखण्यात येत आहे. युवकांना भावणारी भाषा आणि थेट संवाद यावर आदित्य ठाकरे यांचा भर असणार आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. विशेषतः देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी महायुती मुंबईत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्रितपणे लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे, मुंबई महापालिकेवर आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं चित्र आहे. पुढील आठवडाभरात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असल्याने राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. बैठका, रणनीती, आढावे आणि जबाबदाऱ्या निश्चित केल्या जात असून, मुंबईच्या लढाईला विशेष महत्त्व दिलं जात आहे. शिवसेनेत फूट पडण्यापूर्वीपासूनच आदित्य ठाकरे यांचा मुंबई महापालिकेतील कामकाजावर बारकाईने लक्ष राहिलं आहे. महापालिकेतील विविध प्रकल्प, विकासकामं, प्रशासक नेमल्यानंतर निर्माण झालेला गोंधळ, तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मुंबईकरांच्या रोजच्या अडचणी, नागरी समस्या आणि प्रशासनातील त्रुटी यांची त्यांना सखोल जाण असल्यामुळे प्रचारात कोणते मुद्दे अग्रक्रमाने मांडायचे, हे ठरवताना त्यांचा अनुभव उपयोगी ठरणार आहे. मेळाव्यांमधून जनतेशी थेट संवाद साधत, स्थानिक प्रश्नांना वाचा फोडण्याची भूमिका आदित्य ठाकरे घेताना दिसत आहेत. नाशिक, पुणे आणि संभाजीनगरमध्येही प्रचार मेळावे मुंबईव्यतिरिक्त आदित्य ठाकरे यांचं लक्ष राज्यातील आणखी तीन ते चार महत्त्वाच्या महापालिकांकडे असणार आहे. नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या शहरांमध्येही ते प्रचार मेळावे घेणार असल्याची माहिती आहे. राज्य निवडणूक आयोगाचा कारभार, मतदार याद्यांमधील कथित घोटाळे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा यावरही आदित्य ठाकरे आक्रमक भूमिका मांडत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवताना, पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे राज्यभर लक्ष ठेवत असताना, आदित्य ठाकरे शहरी महापालिकांमध्ये थेट मैदानात उतरलेले दिसत आहेत. ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई दरम्यान, येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे गटासाठी केवळ एक निवडणूक नसून, अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असा निर्धार पक्षाने केला आहे. आदित्य ठाकरे आपल्या वडिलांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची धुरा सांभाळत, पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असून, मुंबईसह राज्यातील शहरी राजकारणाची दिशा या निवडणुकांमधून ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 2:30 pm

एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर:सावकाराने पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार

एकीकडे देश ‘विश्वगुरू’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे सावकाराने एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागल्याची मन सुन्न करणारी घटना चंद्रपुरातून समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून थेट कंबोडिया गाठत आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. रोशन सदाशिव कुडे असे या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रोशन कुडे या शेतकऱ्याकडे चार एकर शेती आहे. मात्र, शेतीत सततचे नुकसान होत असल्याने त्यांनी दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. गाई खरेदी करण्यासाठी त्यांनी गावातील दोन सावकारांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये, असे एकूण १ लाख रुपये कर्ज घेतले. मात्र, नियतीने इथेही घाला घातला आणि खरेदी केलेल्या गाईंचा मृत्यू झाला. इकडे पिकेही हातची गेली. त्यामुळे कर्ज फेडणे अशक्य झाले. सावकाराचा तगादा, किडनी विकण्याचा सल्ला सावकारांनी वसुलीसाठी पाशवी पद्धतीचा वापर केला. 1 लाख रुपयांच्या मुद्दलावर दिवसाला 10 हजार रुपये व्याज आकारण्यात आले. बघता बघता 1 लाखाचे कर्ज तब्बल 74 लाखांवर पोहोचले. सावकारांच्या जाचाला कंटाळून रोशन यांनी आपली दोन एकर जमीन, ट्रॅक्टर आणि घरातील चीजवस्तू विकल्या. तरीही सावकाराचे समाधान झाले नाही. कर्ज फिटत नसल्याचे पाहून सावकाराने रोशनला किडनी विकण्याचा अमानुष सल्ला दिला. त्यानंतर एका एजंटमार्फत त्यांना आधी कोलकाता येथे नेण्यात आले. तिथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना थेट 'कंबोडिया' देशात नेण्यात आले. तिथे शस्त्रक्रिया करून त्यांची किडनी काढण्यात आली आणि ती 8 लाख रुपयांना विकली गेली. जीव धोक्यात घालून मिळवलेले हे पैसेही सावकाराच्या घश्यात गेले. पोलिस प्रशासन निद्रिस्त एवढा भयानक प्रकार घडूनही पोलिस प्रशासन मात्र सुस्त आहे. रोशन कुडे यांनी सांगितले की, मी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली, पण त्यांनी काहीच दखल घेतली नाही. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर माझ्यावर किडनी विकण्याची वेळ आली नसती. मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा जमीन गेली, ट्रॅक्टर गेला आणि आता शरीरातील किडनीही गेली, तरीही सावकाराचा तगादा थांबलेला नाही. आता माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच उरले नाही. त्यामुळे सरकारने मला न्याय दिला नाही, तर मी कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहन करेन, असा हतबल इशारा रोशन कुडे यांनी दिला आहे. या घटनेने सावकारी पाशाची क्रूरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. विजय वडेट्टीवारांचे पोलिसांना पत्र दरम्यान, याप्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण समजल्यावर त्या शेतकऱ्याला मदत केली असून, त्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 2:25 pm

राज्यात गारठा कायम; नाशिक, नगर गारठले

मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून राज्यात थंडीची लाट होती. ही लाट काहीशी ओसरली असली तरी राज्यात गारठा कायम आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या आजच्या तापमानानुसार, नाशिक ८.८ अंश सेल्सिअस तर पुण्याचे तापमान ९.४ अंशांवर होते. पुण्यात दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्याने पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. अहिल्यानगरमध्येही ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यभरात […] The post राज्यात गारठा कायम; नाशिक, नगर गारठले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 2:09 pm

कोंढूरमध्ये 65 वर्षीय गावकऱ्याचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून:हिंगोलीच्या कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथे एका 65 वर्षीय गावकऱ्याचा डोक्यात शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मंगळवारी ता. 16 कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या खूनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथे शेषराव पतंगे (65) त्यांचा मुलगा सखाराम पतंगे हे दोघे राहतात. सोमवारी ता. 15 रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सखाराम हे गावात आले होते. यावेळी शेषराव हे घरी एकटेच होते. रात्रीच्या सुमारास सखाराम हे घरी गेल्यानंतर त्यांना त्यांचे वडिल शेषराव हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राचा वार झाल्याचे दिसून आले. त्यांनी वडिलांना उठविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक संतोष इंगळे, जमादार गजानन होळकर, सतीष शेळके, गुलाब जाधव यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी श्‍वान पथकालाही पाचारण केले आहे. मात्र घटनास्थळी कोणतीही वस्तू आढळून आली नसल्याने श्‍वान पथकाला आरोपाचा माग काढता आला नाही. दरम्यान, गावकरी व पोलिसांनी मयत शेषराव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी सखाराम पतंगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक माकोडे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 2:04 pm

येरवडा कारागृहात कैद्यावर फरशीने हल्ला:खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन कैद्यांवर गुन्हा दाखल

येरवडा कारागृहात एका कैद्यावर फरशीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोन कैद्यांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. विशाल नागनाथ कांबळे (वय 28, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्या कैद्याचे नाव असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आकाश सतीश चंडालिया (वय 30, रा. जयजवाननगर, येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय 27, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारागृह अधिकारी सचिन गुरव यांनी येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडालिया, रेड्डी आणि कांबळे हे तिघेही सराईत गुन्हेगार आहेत. चंडालियाला येरवडा भागातील एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे तिघेही येरवडा कारागृहातील सी.जे. विभागातील बराक क्रमांक एकमध्ये एकत्र होते. सोमवारी (15 डिसेंबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. या वादातून चंडालिया आणि रेड्डी यांनी कांबळे याच्या डोक्यात फरशीचा तुकडा घालून हल्ला केला. या मारहाणीत कांबळे गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून कारागृहातील रक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी चंडालिया व रेड्डी यांना रोखले. जखमी अवस्थेतील कांबळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक जराड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. येरवडा कारागृहात यापूर्वीही किरकोळ वादातून कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या आहेत. तसेच, कैद्यांकडून मोबाईल संच आणि अमली पदार्थ आणण्याचे गैरप्रकारही समोर आले होते. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कारागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्यामुळे अशा घटनांमध्ये घट झाली होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 1:59 pm

1-2 दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊ:संजय राऊत - राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब, बाळा नांदगावकर यांची माहिती

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज व उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीची पुढील 1-2 दिवसांत बातमी देऊ अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर व शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दिली आहे. मनसे व ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केव्हा करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवतील. त्याची तारीख लवकरच कळवली जाईल, असे ते म्हणालेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष झपाटून कामाला लागलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत व आमदार अनिल परब यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी युती करण्याच्या मुद्यावर चर्चा केली. यावेळी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब यांनी युतीची घोषणा कधी करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवणार असल्याचे स्पष्ट केले. युतीच्या घोषणेची तारीख लवकरच कळवली जाईल अनिल परब म्हणाले, युतीची अधिकृत घोषणा केव्हा करायची याचा निर्णय दोन्ही पक्षांचे नेते मिळून ठरवतील. त्याची तारीख लवकरच कळवली जाईल. सद्यस्थितीत सर्व गोष्टी चर्चेत आहेत. चर्चेअंती शेवटचा निर्णय होईल. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल. कोणता पक्ष आमच्यासोबत असेल किंवा आमची कुणासोबत चर्चा सुरू आहे याविषयी मी आत्ताच काही सांगू शकत नाही. एकदा यासंबंधीच्या चर्चेला अंतिम स्वरुप मिळाले की आम्ही त्याविषयी कळवू. त्यावर आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही. आता निवडणुका लागल्या आहेत. 15 तारखेला त्याचा फैसला होणार आहे. त्यात मुंबईची जनता कुणावर प्रेम करते किंवा कुणावर करत नाही हे ठरेल. त्यावर आताच चर्चा करण्याची गरज नाही. आमच्यावर आरोप करणारे आरोप करतील. पण मुंबई 25 वर्षे शिवसेनेला मिळाली. त्यामुळे आमचे मुंबईवर प्रेम आहे व मुंबईकरांचेही आमच्यावर प्रेम आहे हे स्पष्ट आहे. त्याचा लवकरच निर्णय लागेल, असे परब या प्रकरणी भाजपची टीका फेटाळताना म्हणाले. तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य अनिल परब यांनी यावेळी तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केले. तेजस्वी घोसाळकर यांचा वॉर्ड राखीव झाला होता. तेथून त्या निवडणूक लढवू शकत नव्हत्या. त्यांनी निर्णय का घेतला? हे आम्ही सांगू शकत नाही. पण त्यांच्यावर दबाव होता असे मला वाटत नाही. पण त्यांचे सासरे विनोद घोसाळकर आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांना ओळखतो. ते आमचे मूळ कार्यकर्ते आहेत, असे ते म्हणाले. मनसेचे बाळा नांदगावकर काय म्हणाले? दुसरीकडे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी युतीची घोषणा 1-2 दिवसांत होणार असल्याचा दावा केला. तसेच हिंदुत्त्वावरून भाजपवरही निशाणा साधला. हिंदुत्त्व हा विषय ठाकरे कुटुंबाला कुणीही शिकवू नये. बाळासाहेब ठाकरे असो किंवा इतर कुणी असू असो. बाळासाहेबांचे हिंदुत्त्वासाठी 6 वर्षे निलंबन झाले होते. बाळासाहेबांनी हिंदुत्त्वावर निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिले. त्यांनी हिंदुत्त्व शिकवले. मशीद पडली तेव्हा त्यांनी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कुणीही हिंदुत्त्व शिकवू नये, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 1:28 pm

काँग्रेसच्या मतांचे विभाजन करण्यासाठीच अजित पवारांचे 'एकला चलो':विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा; ओबीसींच्या 27% आरक्षणावरुनही सरकारला घेरले

राज्यात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिंदे यांची युती असणार पण अजित पवारांचा पक्ष नसणार, हा महायुतीचा डाव आहे. सत्तेचा मलिदा खाताना अजित पवारांचा पक्ष चालतो पण निवडणुकीत काँग्रेसच्या सेक्युलर मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांचा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार महायुतीची ही रणनीती आहे. हे जनतेला समजते अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मुंबई माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी महायुतीवर सडकून टीका केली. हसन मुश्रीफ यांना कॅबिनेट मंत्री करायचे त्यांच्याबरोबर चहा नाश्ता करायचा आणि निवडणूक आली की नवाब मलिक यांचा मुद्दा पुढे करून युतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला दूर ठेवायचे हा दुटप्पीपणा आहे. निवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला जवळ करायचे आणि मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार यांना स्वतंत्र निवडणूक लढवायला लावायची, महायुतीचे हे राजकारण लपून राहिलेले नाही. हिंदू विरुद्ध मुस्लिम केल्याशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकत नाही म्हणून निवडणुका आल्या की हा वाद निर्माण केला जातो अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले अस भाजप सांगत होती. आता महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. पण उद्या कोर्टात जाऊन पुन्हा ओबीसींच्या जागांवरील निवडणुका रद्द झाल्या, त्यांचे प्रतिनिधित्व कमी झाले तर ही जबाबदारी कुणाची? निवडणुका झाल्या तरी ओबीसींवर टांगती तलवार आहे त्यांच्या जागांवर वरवंटा फिरणार आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाविकास आघाडी एकत्र राहणार का? राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतविभाजन होऊ नये आणि भाजपला त्याचा फायदा होऊ नये अशी भूमिका सर्वांची आहे. महाविकास आघाडी एकत्र राहणार का? याबाबत स्थानिक नेते आणि पदाधिकारी निर्णय घेतील. स्थानिक नेते तिथली समीकरण पाहून निर्णय घेतील अस वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. किडनी विकल्याप्रकरणी पोलिसाना पत्र ब्रह्मपुरी येथील शेतकरी शिवदास कुडे याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याप्रकरणी पोलिसाना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केल्याचे विजय वडेट्टीवर यांनी स्पष्ट केले. हे प्रकरण समजल्यावर त्या शेतकऱ्याला मदत केली असून त्याला न्याय मिळावा म्हणून पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 1:17 pm

मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती

मुंबई : प्रतिनिधी १५ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे कधी युतीची घोषणा करणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. […] The post मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 1:13 pm

पुणे-पिंपरीत सत्ता आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार:फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांनीही भाजपविरोधात ठोकला शड्डू

आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 'एकला चलो रे'ची घोषणा केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शड्डू ठोकलाअसून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे, असा एल्गार पुकारला आहे. निवडणूक आयोगाची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गट एकत्र लढू शकणार नाहीत, यावर आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोन्ही या भागातील मोठे पक्ष आहोत. जर आम्ही एकत्र लढलो, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल, एवढे राजकारण आम्हाला दोघांनाही समजते. त्यामुळे तिसऱ्यासाठी जागा न सोडता आम्हीच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहोत. ही लढत मैत्रीपूर्ण असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. आता त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमके काय म्हणाले अजित पवार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरीमध्ये भाजप-राष्ट्रवादी वेगळे लढतील, असे जाहीर केल्यानंतर अजित पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी जे सांगितले, ते नक्कीच विचार करून सांगितले असेल. आमची रणनीती ही निवडणुका जिंकण्याचीच आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावणार आहे, असा निर्धार अजित पवारांनी बोलून दाखवला. शरद पवारांसोबतच्या युतीबाबत 'सस्पेन्स' कायम दरम्यान, या स्वतंत्र लढतीत शरद पवार यांच्या गटासोबत काही छुपी युती होणार का? किंवा त्यांच्याशी जुळवून घेणार का? या प्रश्नावर अजितदादांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया दिली. आत्ताच निवडणुका जाहीर झाल्या आहेत, थोडी कळ काढा, असे उत्तर देत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. नेमके काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? राज्य निवडणूक आयोग निवडणूक जाहीर केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, “काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी अशी युती होईल. पुण्यात मात्र माझी आणि अजित पवार यांची चर्चा झाली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केलेला आहे. कदाचित पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप आमने-सामने लढताना दिसतील. ही लढत मैत्रीपूर्ण असणार आहे. कुठेही कटुता नसेल.”अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. यामुळे पुण्यामध्ये महायुतीचा काडीमोड झाला असल्याचे दिसून आले. शिवसेना शक्यतो सर्वच ठिकाणी आमच्यासोबत असेल. मात्र पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही आणि अजित पवार एकत्र लढू शकणार नाही. आम्हालाही एवढं राजकारण समजतं. आम्ही दोघं एकत्र लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही तिसऱ्यासाठी जागा बाकी ठेवणार नाही. आम्हीच एकमेकांसमोर लढू आणि ही मैत्रिपूर्ण लढत असेल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 12:50 pm

मनोज जरांगे दिल्ली दौऱ्यावर:शौर्य पाटीलच्या कुटुंबीयांची घेतली भेट; न्यायासाठी दिल्ली सरकार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना दिला इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. ते तिथे शौर्य पाटील या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांची भेट घेतली. या प्रकरणी त्यांनी शौर्य हे मराठ्यांचे लेकरू आहे म्हणून कारवाई करत नाही का? असा सवाल करत दिल्लीच्या भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरले. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या शौर्य पाटीलने दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या व शिक्षिकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याने मेट्रोच्या स्टेशनवरून खाली रस्त्यावर उडी मारली होती. शौर्य नवी दिल्लीतील राजीवनगर भागात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. मनोज जरांगे आज त्याच्या पालकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकरणी केंद्र सरकारकडे तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. आम्ही लेकराचा बळी वाया जाऊ देणार नाही - जरांगे इथे असे काय आहे? इथे मराठ्याच्या लेकराचा एक व्यर्थ बळी गेला. त्याला सरकारकडून आधार दिला जात नाही. त्याला बळ दिले जात नाही. हे आम्हाला अपेक्षित नाही. त्यामुळे आम्ही केवळ सांगण्यासाठी आलोत. अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत. दिल्लीच्या गृहमंत्र्यांनीही संबंधित आरोपींना अटक करायलाच पाहिजे. अन्यथा नंतर हे आंदोलन केले आणि ते हाताबाहेर गेले असे म्हणू नका. आमचे लेकरू आम्ही वाया जाऊ देणार नाही, असे जरांगे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही दिल्लीत आंदोलन करणार का? असा प्रश्न केला असता त्यांनी वेळ पडली तर दिल्लीही सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणात न्याय द्यावाच लागेल. अन्यथा महागात पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना आम्ही सांगतो. मराठ्यांचे लेकरू आहे म्हणून सरकार कारवाई करत नाही का? महाराष्ट्रात चिठ्ठीत नाव असले की मुख्यमंत्री कारवाई करतात. मग इथे केंद्रीय गृहमंत्री का कारवाई करत नाहीत? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. शौर्य सेंट कोलंबस शाळेचा होता विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटील हा दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेचा विद्यार्थी होता. त्याने शाळेतील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून मंगळवारी दिल्लीच्या राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटेनंतर त्याला तातडीने लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शौर्य याचे वडील प्रदीप सोने - चांदी गलाई व्यवसायाच्या निमित्ताने दिल्लीत स्थायिक झालेत. ते राजीव नगर भागात राहतात. हे कुटुंब मूळचे सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील आहे. तिथेच त्याच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 4 शिक्षिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शौर्य सुसाईड नोटमध्ये काय म्हणाला? दिल्ली पोलिसांना शौर्य पाटीलच्या स्कूल बॅगमध्ये दीड पानाची एक सुसाइड नोट आढळली आहे. या नोटमध्ये त्याने शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून हे कृत्य करत असल्याचे नमूद केले आहे. ही सुसाइड नोट हिंदीत आहे. शौर्य त्यात म्हणतो, मेरा नाम शौर्य पाटील हैं. आय अॅम व्हेरी सॉसी. आय डीड धीस. पर स्कूलवालोंने इतना बोला की, मुझे यह करना पडा. यदी किसी को जरूरत हो तो मेरे अंग दान कर देना. मेरे पॅरेंट्सने बहुत कुछ किया. आय अॅम सॉरी. मै उनको कुछ नहीं दे पाया. सॉरी मम्मी. आपका आखरी बार दिल तोड रहां हूँ. स्कूल की टीचर है ही ऐसी की क्या बोलू.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 12:50 pm

छत्रपती संभाजीनगरात उबाठाला धक्का:माजी नगरसेविका सुमित्रा गिरजाराम हाळनोर यांचा पक्षाला जय महाराष्ट्र'

छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका सुमित्रा गिरजाराम हाळनोर यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दिव्य मराठी ॲपशी बोलताना त्यांनी सांगितले की प्रभागातील जनतेने मला सांगितले की तुम्ही चांगले काम करतात पण पक्ष चुकीचा आहे, तुम्ही हिंदुत्ववादी पक्षात प्रवेश करा आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून मी हा निर्णय घेतला आहे, असे म्हणताना त्यांनी महायुतीच्या वाटेवर असल्याचे संकेत दिले आहे. गिरजाराम हाळनोर यांनी यापूर्वी शिवसेनेचे गटनेते पद भूषवले आहे. तर 2015 च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी ज्योतीनगर या वॉर्डातून बिनविरोध निवडून आल्या होत्या. चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये ओळख होती. निवडणूक जाहीर होताच त्यांनी राजीनामा दिल्याने उबाठाला धक्का बसला आहे. नेमके सुमित्रा हाळनोर काय म्हणाल्या? सुमित्रा हाळनोर यांनी अंबादास दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटलंय की, माझ्या वैयक्तिक कारणांमुळे, मी आज मंगळवार दिनांक 16 डिसेंम्बर 2025 रोजी शिवसेना उद्याच बाळासाहेब ठाकरे पक्षाचा माझ्या वैयक्तिक कारणामुळे माझा प्राथमिक सदस्यत्वाचा त्याचप्रमाणे उपशहर संघटक पदाचा राजीनामा देत आहे कृपया त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती.पक्षातील सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मला जो सन्मान दिला वेळोवेळी सहकार्य केले त्या सर्वांचा व शिवसैनिकांचे मी सदैव ऋणी आहे. गेल्या काही दिवसात अनेकांनी सोडली साथ काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पक्षप्रवेशावरुन वाद झाल्याचे दिसून आले. काही महिन्यांपूर्वी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख, माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उबाठला जय महाराष्ट्र करत संजय शिरसाट यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यापूर्वी उबाठाने विधानसभेची उमेदवारी मिळालेले किशनचंद तनवाणी यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 12:43 pm

राज्यात मनपा निवडणुकांचा बिगुल; दिल्लीत सुप्रिया सुळे-अमित शहा यांची भेट:पुण्यात पवार काका-पुतण्या जवळ येण्याचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे शिष्टमंडळ अमित शहा यांची भेट घेणार आहे. या भेटीत राज्याशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः शौर्य पाटील आत्महत्या प्रकरण, विमा कंपन्या आणि बँकांकडून होणारी कथित मनमानी यासंदर्भात केंद्र सरकारची भूमिका काय असेल, यावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. महापालिका निवडणुकांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, यामुळे राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल घोषित केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. याआधी 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता त्यानंतर राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पक्षांच्या तयारीला वेग आला आहे. उमेदवारांची चाचपणी, युती-आघाडीच्या चर्चा आणि रणनिती ठरवण्याचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणांमध्येही हालचाली दिसून येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिल्यानंतर काही तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू झाल्याचं चित्र आहे. अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांच्यात बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्रितपणे झालेली ही पहिलीच चर्चा असल्याची माहिती आहे. या बैठकीत पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्याच्या दृष्टीने पर्यायांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. पवार काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याबाबत तर्क या बैठकीबाबत बोलताना नाना काटे यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांचा फोन आल्याचं सांगत, त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मतांचे विभाजन होऊ नये यासाठी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला दिल्याचं काटे यांनी म्हटलं आहे. ही बैठक वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच पार पडल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. या चर्चेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पवार काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. राजकीय समीकरणांमध्ये आणखी किती बदल महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. एका बाजूला दिल्लीत सुप्रिया सुळे आणि अमित शहा यांची भेट होत असताना, दुसऱ्या बाजूला पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये संवाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कोणती युती आकार घेणार, कोण कोणाच्या विरोधात उतरणार आणि मतदार कोणत्या बाजूने कौल देतील, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 15 जानेवारीच्या मतदानापर्यंत राजकीय समीकरणांमध्ये आणखी किती बदल होतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 12:24 pm

25 वर्षे मुंबई लुटली म्हणता, तेव्हा तुम्ही कुठे होता?:महापौर आमचा असताना उपमहापौर तुमचा होता, अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार

राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. आम्ही मुंबई लुटली असा आरोप करणाऱ्या भाजपने 25 वर्षे उपमहापौरपद आणि स्थायी समितीचे चेअरमनपद भोगले. तेव्हा लुटताना तुम्ही कुठे होतात? असा तिखट सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या टीकेचा समाचार घेताना दानवे म्हणाले, महापालिका निवडणुका जशा घोषित झाल्या, तशा चोरांनीच उलट्या बोंबा सुरू केल्या आहेत. मुंबई, महाराष्ट्राविषयी उलट्या बोंबा महाराष्ट्रात विशेषत: भाजपच्या चोरांनी त्या सुरू केलेल्या आहेत. ज्या लोकांनी नगरपालिका निवडणुकांमध्ये पैशांचा पाऊस पाडला आणि भाजपच्या संघटन मंत्र्यांना विदर्भाच्या बैठकीत सांगावे लागले की, निवडणुकीत पैसा आणि संपत्तीचे ओंगाळवाणे प्रदर्शन करू नका. ते लोक उद्धव ठाकरेंची शिवसेना मोठ्या प्रमाणात लाखो कोट्यवधी रुपये निवडणुकीत टाकणार, 25 वर्षांत मुंबई लुटली असे म्हणत आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. आरोप करताना स्वतःकडेही पाहा मुंबई लुटत असताना तुम्ही कुठे होतात? शिवसेनेचा महापौर असताना, भाजप उपमहापौरही सतत होता. स्थायी समितीमध्येही भाजपचे लोक होते. वेगवेगळ्या समितीचे चेअरमन देखील भाजपचेच लोक होतै. त्यामुळे हा आरोप करताना, तुम्ही त्यावेळेस कुठे होते? हा देखील महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीच्या निमित्ताने आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. निवडणुकीआधीच महायुतीची 'तंतरली' महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा दावाही अंबादास दानवे यांनी केला. एकीकडे महायुती म्हणायचे आणि दुसरीकडे बैठकीला अजित पवारांच्या पक्षाला बोलावायचे नाही, हा प्रकार सुरू आहे. मुंबईत नवाब मलिक पक्ष चालवतात म्हणून, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक समीकरणांमुळे भाजप अजित पवारांना सोबत घ्यायला तयार नाही. निवडणुका जाहीर होऊन 12-15 तास उलटले नाहीत तोच महायुतीची 'तंतरली' आहे. त्यांना पराभवाची भीती सतावू लागली आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, ठाकरे बंधूंची युती होणार, अशापद्धतीने पूर्णपणे निर्णय झालेला आहे. खासदार संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेत आहेत. आता या युतीसाठी फार वाट पाहावी लागणार नाही. अगदी थोड्याच दिवसांत ठाकरे गट आणि मनसेची युती घोषित होऊ शकते. 15 जानेवारीला भाजपवर 'कर' निघणार संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला ग्रामीण भागात 'कर' किंवा 'कंक्रांत' म्हणतात. यंदा 15 जानेवारीला महाराष्ट्राची जनता भाजपवर ही 'कर' काढणार आहे. आता मराठी माणसाने जागे होणे आवश्यक आहे, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 12:03 pm

भाजपने अखेर NCP ला अलगद वेगळे पाडले:2029 मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसणार, रोहित पवार यांचा मोठा दावा

भाजपच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे 2029 च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या आपल्या मित्रपक्षांची साथ सोडणार काय? अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यानंतर सर्वच राजकीय पक्ष झपाटून कामाला लागलेत. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी दोस्तीत कुस्ती करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजप एकेक करून आपल्या मित्रपक्षांना दूर लोटत असल्याचा आरोप केला आहे. भाजपला सत्तेची राक्षसी महत्त्वकांक्षा रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीतील नेत्यांनीच भाजपबद्दल केलेली वक्तव्य बघितल्यानंतर आपला स्वार्थ साधला गेला की भाजप आपले खरे रंग दाखवायला सुरवात करते यावर त्यांच्याच मित्र पक्षांनी शिक्कामोर्तब केलं. काल निवडणुका जाहीर झाल्या झाल्या आम्ही पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये महायुती मध्ये लढणार नसल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला. आधी कुबड्या म्हणून हिणवले आणि आता भाजपने अलगदपणे आपल्याच एका मित्रपक्षाला वेगळे पाडले ही राक्षसी महत्त्वाकांक्षा नाही तर काय आहे? असो! याच राक्षसी महत्त्वाकांक्षी वृत्तीमुळे २०२९ मध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष हे चित्र दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही. निवडणूक आयोगावरही टीकास्त्र रोहित पवार यांनी यावेळी राज्य निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. खरंतर निवडणूक आयोग कुणासाठी थांबत नसतो ती एक स्वायत्त संस्था आहे. मात्र काल दिवसभराचा घटनाक्रम पाहता निवडणूक आयोग कशाची तरी वाट पाहत असल्याचे जाणवले. काल सत्ताधारी नेत्यांनी अनेक उद्घाटने केली मतदारांना प्रभावित करण्यासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आणि हे सर्व झाल्या नंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर केल्या, असे म्हणायचे का? हा सर्व घटनाक्रम पहिल्यानंतर नेमकं कोण कोणासाठी काम करतंय आणि कोण कोणाचं ऐकतंय हे स्पष्टं होतं. लोकशाहीची अशी गळचेपी होताना मात्र आम्ही अनेक कारवाया होऊन देखील लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत, मात्र अशा एकाधिकारशाहीमुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे, असे ते म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही साधला निशाणा रोहित पवार यांनी मेघा इंजीनिअरिंगच्या मुद्यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेघा इंजीनियरिंग संदर्भात हिवाळी अधिवेशनात सविस्तर बोलेल असा जाहीरपणे शब्द दिला होता, परंतु ‘तब्बल’ आठवडाभर चाललेल्या संपूर्ण अधिवेशनात आपण त्यासंदर्भात एक शब्द देखील उच्चारला नाही. महसूल विभागातील अवैध उत्खनन यासंदर्भात आम्ही लावलेले प्रश्न आपल्या विभागाने ना घेतले, ना दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण उलवे टेकडी उत्खनन तसेच मेघा इंजिरिनियरिंग अवैध उत्खनन संदर्भात बोललात. दिलेला शब्द आपण परत मोडला. मेघा इंजीनियरिंग संदर्भात एवढा पळ कशासाठी? असा सवाल त्यांनी या संदर्भात उपस्थित केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 12:01 pm

मनपा निवडणूक एकत्र लढणार, जनता महायुतीच्या बाजूने- बावनकुळे:राऊत टीका करतात पण विकसित मुंबईचा अजेंडा नाही; पिंपरीबद्दल जनता ठरवेल

संजय राऊत यांच्याकडे मुंबईबद्दल बोलण्यासाठी काही मुद्दे नाहीत. त्यांना विकसित मुंबईचा प्लॅन काय आहे माहिती नाही. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही म्हणून ते केवळ टीका करतात असे असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात. पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व जण एकत्र बसून मनपा निवडणूक महायुतीत लढण्याचे ठरले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यस्तरावर मनपा निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मनात किंतू परंतु ठेवण्यात काही अर्थ नाही. अजित पवार यांचा पक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची निवडणुकीमध्ये यश-अपयश जे येईल ते येईल पण निवडणूक तत्त्वावर लढावी लागते. त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा संपूर्ण अधिकार आहे, त्यांनी कशी निवडणूक लढवायची हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. त्यांच्यावर मी बोलणे योग्य नाही. महायुतीला जनतेची पसंती चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनपाच्या निवडणुकीत आम्हाला 51 टक्के मते घेऊन जिंकायचे आहे. आम्ही महायुती म्हणून महाराष्ट्रात निवडून येऊ जनतेची पसंती ही महायुतीला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होईल असे वाटते आहे तर आम्हाला भाजपचा महापौर होईल असे वाटते आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडची जनता ठरवेल की कोणाचा झेंडा मनपावर असणार. आदित्य ठाकरेंनी संधीचे सोनं करावे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच वेळी त्यांनी आपल्या मुलाला पुढे आणले होते. वडील मुख्यमंत्री असताना मुलाला मंत्री केले म्हणजे तुम्ही त्याला प्रमोटच केले होते. ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे काम करत आहेत त्यांना संधी आहे त्यांनी संधीचे सोनं करावे हेच आमचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांना बॅनर-पोस्टर काढण्याची गर पडू नये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लावली त्यावेळी आम्ही सर्वांनी पोस्टर काढले. ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल. आम्हाला तेवढी शिस्त आहे. निवडणूक आयोग- जिल्हाधिकाऱ्यांना बॅनर-पोस्टर काढण्याची गर पडू नये ही खबरदारी पक्षाच्या नेतृत्वाने घेतली पाहिजे. आचारसंहिता लागताच आम्ही आमचे सर्व बॅनर काढून घेतल्याने आमच्यावर कारवाई झाली नाही ज्यांनी बॅनर ठेवले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असेल.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 11:26 am

वडील रागावल्याने 16 वर्षांच्या मुलाने संभाजीनगरहून गाठले पुणे:2 दिवसांत पैसा-धाडस संपलं; वडिलांना म्हणाला, मला घरी घेऊन जा

“मी श्रवण (नाव बदलले). मी ११ वी सायन्सचा विद्यार्थी. १३ डिसेंबरच्या सायंकाळी ७ वाजेची ती वेळ, जेव्हा सततच्या मोबाइल वापरावरून आणि अभ्यासावरून वडील मला रागावले. त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचे बोलणे मला अजिबात सहन झाले नाही. त्या क्षणी माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, ‘मी आता या घरात एक क्षणही राहणार नाही.’रात्री बाराच्या सुमारास मी हळूच घराबाहेर पडलो आणि थेट पुणे गाठायचे ठरवले. माझ्या मनात प्रचंड धाडस होते. मला वाटले, एकटा माणूस म्हणून मला कुणीतरी नक्कीच काम देईल आणि मी माझ्या पायावर उभा राहीन. पुण्यात पोहोचताच दुसऱ्याच दिवशी नोकरीच्या शोधात मी एका कंपनीत गेलो. मी व्यवस्थापकांना आत्मविश्वासाने सांगितले, ‘मी काम करायला तयार आहे, मला नोकरी द्या.’ नोकरीसाठी नकार, आत्मविश्वासाला तडा : पण त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि शांतपणे विचारले, ‘तुझे वय किती?’ मी सांगितले, ‘१६ वर्षे.’ माझा आत्मविश्वास क्षणात गळून पडला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘अल्पवयीन मुलाला आणि योग्य कागदपत्रे नसताना आम्ही नोकरी देऊ शकत नाही.’‘स्वतःच्या पायावर उभा राहीन’ हे माझे स्वप्न त्या क्षणी तुटले. कंपनीचा नकार, पुढच्या आयुष्याची चिंता आणि खिशात पैशांची चणचण होती. वडिलांचा राग नाही, फक्त प्रेम आठवले : रात्री जेव्हा मी एकटा बसलो तेव्हा मला माझ्या चुकांची जाणीव झाली. मला वडिलांचा राग आठवला, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांचे प्रेम आणि आधार आठवला. पुण्यात असूनही मी खूप एकटा पडलो होतो. दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी अखेरीस वडिलांना फोन केला. मी फक्त ‘पप्पा मी पुण्यात आहे. काम मिळालं नाही. मला इथे राहणं शक्य नाहीये,’एवढेच बोलू शकलो. त्यांनी कोणताही राग न दाखवता फक्त काळजीने विचारले, ‘तू कुठे आहेस? काळजी करू नकोस. मी लगेच निघतोय.’या दोन दिवसांत मला कळले की, वडिलांचा राग हा माझ्या अभ्यासासाठी होता, पण त्यांचे प्रेम माझ्या एकट्याच्या धैर्यापेक्षाही खूप मोठे आहे. वडिलांनी सिडको पोलिसांना माहिती दिली असून मी आता घरी परत जाण्यासाठी त्यांची वाट पाहतोय. दिव्य मराठी एक्स्पर्ट- गजानन सूर्यवंशी, समुपदेशक तथा माजी बालकल्याण समिती सदस्य. पालकांनो, संवाद वाढवा, नाती जपा पालकांनी पाल्यांशी तातडीने संवाद वाढवण्याची गरज आहे. दिवसभरात एक वेळ एकत्र जेवण करून मुलांसोबत गप्पागोष्टी करा. यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजेल. घरात मैत्रीपूर्ण आणि व्यक्त होण्यासाठी मोकळे वातावरण तयार करणे महत्त्वाचे आहे. मुले संवादाची भुकेली असतात. त्यांना केवळ ऐका आणि त्यांना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित जागा द्या. यामुळे टोकाचे पाऊल उचलणे टळेल.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 11:24 am

निवडणुकीची घोषणा होताच अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक:काँग्रेस-शरद पवार गटासह BJP ला मोठा धक्का; रात्री पुण्यातील भेटीने रंगली चर्चा

राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांची चाचपणी, मुलाखती, केलेल्या कामांचा आढावा आणि जनसंपर्काची पडताळणी अशा प्रक्रिया सर्वच पक्षांमध्ये सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. येथील माजी महापौरांसह पंधरा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व नेत्यांनी सोमवारी रात्री पुण्यात जाऊन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली असून, या भेटीने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. या भेटीदरम्यान पक्षप्रवेशाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच मिरज येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत या सर्व माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या संभाव्य पक्षप्रवेशात भाजप, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी संबंधित माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे हा केवळ पक्षप्रवेश नसून, आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वीचा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. सांगली–मिरज–कुपवाड महापालिकेच्या राजकारणात प्रभाव असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांचा हा कल पाहता, निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता बळावली आहे. पुण्यात झालेल्या या महत्त्वपूर्ण भेटीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे उपस्थित होते. मिरजचे माजी महापौर किशोर जामदार, काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार, भाजपचे शिवाजी दुर्वे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह आरिफ चौधरी, चंद्रकांत हुलवान, नर्गिस सय्यद, आजम काझी, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर, जनसुराज्यचे आनंदा देवमाने आणि संतोष कोळी या माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. विविध पक्षांतील अनुभवी आणि निवडणुकीत प्रभाव टाकू शकणाऱ्या नेत्यांचा हा समूह असल्याने, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठे पडसाद उमटणार असल्याचे स्पष्ट आहे. स्थानिक पातळीवर सक्रिय नेते एका पक्षात एकत्र या घडामोडींमुळे सांगली–मिरज–कुपवाड शहरातील विद्यमान राजकीय नेतृत्वावर दबाव वाढला आहे. विशेषतः मिरज शहरात 27 प्रभाग असल्याने, या माजी नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यास भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. खासदार विशाल पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपलाही या संभाव्य राजकीय हालचालीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवर अनेक वर्षे सक्रिय असलेले हे नेते एका पक्षात एकत्र आल्यास, निवडणूक लढतीत त्याचा थेट परिणाम मतांच्या गणितावर होणार आहे. राज्यस्तरीय राजकीय ताकद दाखवणारी लढत दरम्यान, सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एका बाजूला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीही एकसंघपणे निवडणूक लढवेल, असा दावा केला आहे. मात्र, अशा परिस्थितीत विविध पक्षांतील माजी नगरसेवकांचा अजित पवार गटाकडे वाढणारा कल हा निवडणुकीआधीच राजकीय समीकरणे बदलणारा ठरू शकतो. त्यामुळे येत्या काळात सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक केवळ स्थानिक विकासापुरती न राहता, राज्यस्तरीय राजकीय ताकद दाखवणारी लढत ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 11:17 am

तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश ऐनवेळी फसला:संजय राऊतांना दिली होती धमकी, जनतेच्या नाराजीनंतर वरिष्ठ नेत्यांची कार्यक्रमाकडे पाठ

जनतेच्या नाराजीमुळे एका तडीपार गुंडाचा सत्ताधारी भाजपत होणारा प्रवेश फसल्याची घटना ठाण्यात घडली आहे. या आरोपीचा सोमवारी भाजपमध्ये प्रवेश होता. पण जनतेची नाराजी पाहून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्वच नेत्यांनी खबरदारी म्हणून या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यामुळे या गुंडाचा भाजपमधील प्रवेश तूर्त टळल्याची चर्चा आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मयूर शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मकोकाचा आरोप आहे. याशिवायही अनेक गंभीर गुन्ह्यांत तो आरोपी आहे. त्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी भाजपमध्ये प्रवेश होणार होता. याची जोरदार बॅनरबाजी शिंदेने ठाण्यात केली होती. त्यावर सर्वसामान्य नागरिकांमधून नाराजीचे सूर उमटले होते. यावरून टीका होत असल्याचे लक्षात येताच रवींद्र चव्हाण व इतर नेत्यांनी त्याच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मयूरी शिंदेचा भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न फसला. मयूर शिंदेचा पक्षप्रवेश का स्थगित झाला? दुसरीकडे, भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी कार्यकर्त्याला काम करण्यासाठी पक्षाच्या प्रवेशाची गरज नसल्याचे सांगितले. याद्वारे त्यांनी एकप्रकारे मयूर शिंदेला भाजपचे दरवाजे खुले असल्याचेच संकेत दिले. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडमुकीत मयूर शिंदे आपली सर्व ताकद भाजपच्या मागे उभी करतील असा दावा केला जात आहे. यावेळी लेले यांना मयूर शिंदेंचा पक्षप्रवेश ऐनवेळी का स्थगित झाला? असा प्रश्न केला असता त्यांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेचे कारण सांगितले. संदीप लेले म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होऊन आज आचारसंहिता लागली. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या अचानक बैठका लागल्याने त्यांना पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला येता आले नाही. पण येथील इतर सांस्कृतिक कार्यक्रम नियोजित पद्धतीने पार पडला. मयूर शिंदेचा आज पक्षप्रवेश होणार होता. त्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलणेही झाले होते. पण आता हा पक्षप्रवेश तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. पण कार्यकर्त्याला पक्षाचे काम करण्यासाठी पक्षात प्रवेश करण्याची गरज नसते. त्यामुळे आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मयूर शिंदे भाजपसाठी काम करताना दिसेल अशी चर्चा ाहे. आत्ता पाहू कोण आहे मयूर शिंदे? मयूर शिंदेवर मुंबई व ठाणे परिसरात हत्या व खंडणीसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो पूर्वी भांडूपमध्ये राहत होता. पोलिसांनी तडीपार केल्यानंतर तो ठाण्यात राहण्यासाठी आला. सध्या तो ठाण्यातील सावरकर नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधून लढण्याची तयारी करत आहे. भाजपमधून तिकीट मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी तो गत काही दिवसांपासून सातत्याने भाजपच्या व्यासपीठावर दिसत होता. त्याच्या पक्षप्रवेशाचा सोहळा आर जे ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता. त्याची जोरदार तयारी व प्रचार झाला होता. मयूर शिंदे हा 2023 साली खासदार संजय राऊत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता. त्यावेळी त्याला अटकही झाली होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 11:01 am

शिक्षण विभागाची नवी कठोर नियमावली लागू:विद्यार्थी सुरक्षेत चूक केल्यास शाळा व्यवस्थापन, शिक्षक, मुख्याध्यापकांवर कारवाई

शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शनिवारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या “गाइडलाइन्स ऑन स्कूल सेफ्टी अँड सिक्युरिटी- २०२१’ नुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वातावरण सुनिश्चित करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या शासन निर्णयामुळे आता शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी स्पष्टपणे निश्चित करण्यात आली आहे. शाळेत आता विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा (मारहाण, कान ओढणे, शिक्षा म्हणून उन्हात उभे करणे इ.) तसेच शाब्दिक, मानसिक, भावनिक छळ किंवा भेदभावाला पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित कोणत्याही अनुचित घटनेची नोंद मुख्याध्यापकांनी त्वरित घेणे आणि दोन दिवसांच्या आत शिक्षण विभागाला अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच घटनेसंबंधित सर्व माहिती, अर्ज, उपस्थितीबाबतचे पुरावे, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे जपून ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असेल. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो अ‍ॅक्ट) आणि बाल न्याय अ‍ॅक्टनुसार येणाऱ्या गंभीर गुन्ह्यांची माहिती मिळाल्यास २४ तासांच्या आत संबंधित व्यक्ती/कर्मचारी यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करणे बंधनकारक आहे. अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांवरही जबाबदारीघटनेची माहिती दडवणे, पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देण्याचे आढळल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी/मुख्याध्यापक तसेच कर्मचाऱ्यांवर विभागीय आणि शिस्तभंगाची कठोर कारवाई केली जाईल. वृत्तपत्र, दूरदर्शन किंवा इतर माध्यमातून गंभीर घटनेची माहिती मिळाल्यास शिक्षणाधिकारी स्वतःहून (Suo-moto) चौकशी सुरू करू शकतील, असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्व शाळांना या कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असून या निर्णयाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:59 am

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात:खासदार संजय राऊत यांची माहिती; आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेऊन करणार चर्चा

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरी भागात होणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये उत्साह संचारला असला, तरी या घोषणेनंतर लगेचच वादालाही तोंड फुटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर थेट पक्षपातीपणाचा आरोप करत आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. माध्यमांशी बोलताना राऊत यांनी केवळ निवडणूक प्रक्रियेवरच नव्हे, तर मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाशी संबंधित मुद्द्यांवरही आक्रमक भूमिका मांडली. आपल्या प्रकृतीविषयी विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी निवडणुकीच्या घोषणेमुळे उत्साह वाढल्याचं सांगितलं. महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे तब्येतही सुधारली पाहिजे. मी उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन आज तुमच्यासमोर उभा आहे, असं म्हणत त्यांनी या लढ्याचं स्वरूप स्पष्ट केलं. ही लढाई केवळ निवडणुकीची नसून, मुंबईची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई, असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देत, कोणत्याही पदावर असलेला मराठी माणूस या लढ्यात उतरला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाने निवडणुकांना अस्मितेचा रंग दिल्याचं स्पष्ट झालं आहे. तारखा जाहीर होण्याच्या आधीपर्यंत शासनाकडून निधीवाटपाचे आदेश निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर टीका करताना राऊत यांनी आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर आरोप केले. गेल्या काही दिवसांत मुंबईत मराठी माणसाला जागं करण्यासाठी आणि मुंबई वाचवण्याच्या आशयाचे पोस्टर्स लागले होते. मात्र, सरकारच्या दबावामुळे ते हटवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आचारसंहिता मराठी माणसावर आणि विरोधकांवरच लागू होते का? असा सवाल उपस्थित करत, निवडणूक तारखा जाहीर होण्याच्या अवघ्या काही मिनिटांआधीपर्यंत शासनाकडून निधीवाटपाचे आणि विकासकामांचे आदेश निघत होते, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर चार वाजता अचानक निवडणूक जाहीर करून आयोग जागं झालं का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. सरकारला मोकळं रान देऊन विरोधकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप करत, ही प्रक्रिया लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सत्ताधारी पक्षांचे उमेदवार कोट्यवधी रुपये खर्च करतात या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा गंभीर इशाराही संजय राऊत यांनी दिला. निवडणूक खर्चाची मर्यादा 15 लाख रुपये असताना, प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षांचे उमेदवार कोट्यवधी रुपये खर्च करतात, असा आरोप त्यांनी केला. महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये नगरसेवक विकत घेण्यासाठी दोन ते पाच कोटी रुपये खर्च केल्याची उदाहरणं देत, अशा परिस्थितीत खर्चमर्यादा कशी पाळली जाणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाकडे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती ठोस यंत्रणा आहे, हे स्पष्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. मुंबई हिसकावून घेण्यासाठी सुरू असलेला खेळ आयोग पाहणार की नाही, असा सवाल करत त्यांनी थेट आयोगाच्या निष्पक्षतेवर शंका व्यक्त केली. येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा; आज राज ठाकरेंची भेट दरम्यान, निवडणूक घोषणेनंतर मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील संभाव्य युतीबाबत संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढण्याची शक्यता असून, इतर ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. ही लढाई केवळ 29 महापालिकांची नसून, मुंबईसाठीची निर्णायक लढाई असल्याचं सांगत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बलिदानांची आठवण त्यांनी करून दिली. मुंबई अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये मराठी अस्मिता, सत्ता संघर्ष आणि युती-आघाड्यांचं राजकारण अधिक तीव्र होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. येत्या आठवड्यात युतीची घोषणा होण्याची शक्यता असून, राज ठाकरे यांची भेट आज होणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली. काँग्रेसने भाजपला अप्रत्यक्ष मदत करू नये संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढत असून मनसे-ठाकरे गटाच्या युतीची औपचारिक घोषणा लवकरच होऊ शकते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, तर इतर ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. राऊत यांनी या लढाईला केवळ 29 महापालिकांची नव्हे, तर मुंबईच्या अस्मितेची लढाई असल्याचं म्हटलं. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी मुंबईवर कोणाचाही ताबा जाऊ देणार नसल्याचा इशारा दिला. काँग्रेसबाबत बोलताना त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, मुंबईच्या लढाईत वेगळी भूमिका घेऊन भाजपला अप्रत्यक्ष मदत करू नये, असा इशारा दिला.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:59 am

पेरजाबादमध्ये मतदार यादीतून नाव वगळल्याने मुख्याध्यापिकेला धमकी:औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथे बुथ लेव्हल अधिकारी असलेल्या मुख्याध्यापिकेस नांव वगळल्याच्या कारणावरून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 15 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरजाबाद येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका मंजूश्री चौधरी यांच्याकडे बुथ लेव्हल अधिकारी म्हणून कम देण्यात आले होते. गावातील मतदार यादी पडताळणी व नांव वगळणी तसेच नांवे समाविष्ट करण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. दरम्यान, जवळाबाजार येथील विजय प्रकाश पवार या व्यक्तीचे नांव पेरजाबाद येथील मतदार यादीत समाविष्ट झाले होते. या प्रकरणी काही गावकऱ्यांनी औंढा नागनाथ तहसील कार्यालयाकडे तक्रारीही दाखल केली होती. त्यावर सदर व्यक्ती जवळाबाजार येथील रहिवासी असल्याने त्याचे नांव पेरजाबाद येथील मतदान यादीतून कमी करण्याच्या सूचना तहसीलस्तरावरून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार चौधरी यांनी मतदान यादीतून विजय पवार यांचे नांव वगळले होते. या प्रकरणात राजेश जाधव याने मागील दोन दिवसांपासून शाळेसमोर येऊन धमकी देऊ लागला होता. शनिवारी ता. 13 त्याने शाळेच्या समोर येऊन विजय पवार याचे नांव डिलीट का केले या कारणावरून जोरजोरात बोलून तुमची नोकरी घालतो, उपोषण करतो अशी धमकी दिली. या प्रकरणी मुख्याध्यापिका चौधरी यांनी तहसील कार्यालय व गटशिक्षणाधिकारी कार्यालयास देखील माहिती दिली. त्यानंतर सोमवारी ता. 15 त्यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी राजेश जाधव याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार गजानन गिरी पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:51 am

निवडणूक बिगुलनंतर मुंबईत बॅनरबाजी; ठाकरे गटावर अप्रत्यक्ष निशाणा?:मुंबईतील अनामिक बॅनरमुळे राजकारण तापलं

राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल अधिकृतपणे वाजल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वेग पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष सक्रिय झाले असून, चाचपणी, उमेदवारांच्या मुलाखती, संभाव्य उमेदवारी, आघाड्या आणि युती यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक पक्षांनी अंतर्गत पातळीवर रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. महापालिका निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा राजकारणाची नांदी मानल्या जात असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राजकीय हालचाली वेग घेत असतानाच, मुंबईत लावण्यात आलेल्या काही बॅनरमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. मुंबईच्या विविध भागांमध्ये अचानक झळकलेले हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर कोणत्याही पक्षाचे नाव, चिन्ह किंवा अधिकृत ओळख नसल्यामुळे त्यामागे नेमका कोण आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणूक वातावरण तापत असताना अशा प्रकारचे बॅनर शहरात झळकणे हे राजकीय संकेत मानले जात असून, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. या बॅनरवरील मजकूर थेट आणि आक्रमक स्वरूपाचा असल्याचे दिसून येत आहे. जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसाचे काय होणार?, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, अशा आशयाच्या ओळींमधून विशिष्ट राजकीय दिशेने बोट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मजकुरातून अप्रत्यक्षपणे शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा स्वरूपाची बॅनरबाजी केल्याने राजकीय वातावरण अधिक तापले असून, चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरमागील नेमका उद्देश काय, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काहींच्या मते ही बॅनरबाजी एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा गटाच्या रणनीतीचा भाग असू शकते, तर काहीजण याकडे जनमत चाचपण्याचा प्रयत्न म्हणून पाहत आहेत. मात्र, बॅनरवर कोणतीही अधिकृत ओळख नसल्यामुळे त्यामागील सूत्रधार अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले असून, हे बॅनर कोणाच्या फायद्यासाठी आणि कोणाच्या विरोधात आहेत, यावर चर्चा रंगत आहे. आगामी राजकीय संघर्षाची झलक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे संदेश देणारे बॅनर झळकणे हे आगामी राजकीय संघर्षाची झलक मानली जात आहे. मुंबईसारख्या महानगरात राजकीय संदेश थेट रस्त्यावर उतरवून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उमेदवारी, युती आणि प्रचाराच्या जोडीने अशा बॅनरबाजीमुळे निवडणूक राजकारणात नवा रंग भरला असून, पुढील दिवसांत राजकीय घडामोडी आणखी वेगाने घडताना दिसतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:41 am

मनपात मतविभाजन टाळण्यासाठी अजित आणि शरद पवार एकत्र:निवडणुका जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार दोन्ही पक्षात चर्चा

महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजताच राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच शहरात राजकीय समीकरणे बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये, अजित पवार आणि शरद पवार समर्थकांमध्ये, एकत्र येण्याच्या दृष्टीने पहिल्यांदाच थेट चर्चा झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही चर्चा केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून, तिचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. या बैठकीबाबत माहिती देताना नाना काटे यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचा त्यांना फोन आला होता. त्या संवादात सुप्रिया सुळे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळावे आणि शरद पवार गटाच्या स्थानिक नेतृत्वाशी संवाद साधावा, असा सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे काटे यांनी स्पष्ट केले. तसेच, ही चर्चा वरिष्ठ नेत्यांच्या अजित पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या इतर वरिष्ठांच्या, मार्गदर्शनानुसारच झाली असल्याचे दोन्ही बाजूंनी सांगण्यात आले. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये एकत्र बसून निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. आगामी महापालिका निवडणुकीत शरद पवार गटाने तुतारी या चिन्हावर उमेदवार उभे करावेत की केवळ अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावरच लढत द्यावी, यावर सखोल चर्चा झाली. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी गटांनी स्वतंत्रपणे न लढता एकत्र आघाडी करावी का, की या समीकरणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही सामील करून घ्यावे, याचाही विचार झाला. भाजपविरोधात प्रभावी लढा देण्यासाठी कोणते समीकरण अधिक फायदेशीर ठरेल, याबाबत दोन्ही बाजूंनी आपापली मते मांडली. या चर्चांमधून स्पष्ट झाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न गांभीर्याने सुरू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट एकत्र लढणार असले तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढणेच योग्य ठरेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एकत्र लढल्यास त्याचा फायदा थेट विरोधकांना होईल, हे राजकीय गणित दोन्ही बाजूंना समजते, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, ही लढत मैत्रीपूर्ण असेल, असेही त्यांनी नमूद केले. मतदार याद्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर नेल्यास अडचणी कायमस्वरूपी दूर मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठामपणे उभी राहील. ज्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात होते, त्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांमध्ये मात्र दोन्ही पक्षांची युती कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर, मतदार याद्यांमधील घोळ या मुद्द्यावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. काही प्रमाणात मतदार यादीत त्रुटी असतात, हे आम्हीही मान्य करतो, मात्र त्यावरून निवडणुका घेऊ नयेत, ही भूमिका चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात एसआयआर प्रक्रियेमुळे मतदार यादीतील घोळ कमी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भविष्यात मतदार याद्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर नेल्यास अशा प्रकारच्या अडचणी कायमस्वरूपी दूर होतील, असे सूचक विधानही फडणवीस यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:39 am

हसता प्रवास, काळाचा घाला; समृद्धी महामार्गावरील अपघाताने राज्य हादरले:टायर फुटून कार पलटी, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

राज्यातील सर्वात वेगवान आणि आधुनिक दळणवळणाचा मार्ग म्हणून ओळख निर्माण केलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची नोंद झाली आहे. कमी वेळात प्रवास शक्य करून देणारा हा महामार्ग अनेकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे चित्र सातत्याने समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पाटोळे शिवारात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले असून, कल्याण पूर्व येथील एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वेगात धावणाऱ्या कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ लहान मुलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कारमध्ये एकाच कुटुंबातील 11 जण प्रवास करत होते. हे सर्वजण ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा परिसरात वास्तव्यास होते आणि एका लग्नसमारंभासाठी निघाले होते. मात्र आनंदाच्या या प्रवासावर काळाने घाला घातला. पाटोळे शिवाराजवळ अचानक टायर फुटल्याने कार वेगात पलटी झाली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या भीषण अपघातात नीलेश बुकाणे यांचा उपचारासाठी नेत असतानाच मृत्यू झाला, तर त्यांची बहीण वैशाली सचिन घुसळे (वय 35) आणि पत्नी छाया नीलेश बुकाणे (वय 30) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर चिंचपाडा परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत सचिन घुसळे (वय 40), अर्णव नीलेश बुकाणे (वय 14), गोल्डी नीलेश बुकाणे (वय 10), सुयश घुसळे (वय 3), निरव गायकवाड (वय 10), मनस्वी गायकवाड (वय 5) आणि साची सचिन घुसळे (वय 9) हे गंभीर जखमी झाले आहेत. वाहनचालक प्रशांत शिरसाट (वय 32) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींपैकी काहींवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने लहान मुलांचे प्राण वाचले असले तरी त्यांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात या अपघातप्रकरणी गुन्हा दाखलअपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस, स्थानिक पोलिस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, क्यूआरव्ही पथक तसेच महामार्गावरील आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना 108 रुग्णवाहिका तसेच समृद्धी महामार्गाच्या रुग्णवाहिकेद्वारे सिन्नर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने महामार्गावरून हटवून सिन्नर पोलिस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आले आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात टायर फुटल्याने अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर दरम्यान, या अपघातापूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून तो पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. या व्हिडीओमध्ये घुसळे आणि बुकाणे कुटुंबीय आनंदात गाडीतून प्रवास करताना दिसत आहेत. लहान मुले खिदळत असून कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. काही क्षणांतच हा आनंद दु:खात रूपांतरित होईल, याची कोणालाही कल्पना नव्हती. हसत-खेळत प्रवास करणाऱ्या या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वेगमर्यादा, वाहनांची तपासणी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:37 am

कृत्रिम वाळू निर्मितीची मर्यादा वाढवली; आता मिळणार स्वस्त दरात:मुबलक प्रमाणात वाळू, मान्यतेचे अधिकार सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे

सोलापूर जिल्ह्यातील वाळूची मागणी पाहता आता जिल्हास्तरीय कृत्रिम वाळू निर्मितीच्या युनिटची मर्यादा 50 वरून 100 पर्यंत वाढवण्यात आली. त्याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत. त्यानंतर ‘एम सॅण्ड’ युनिट सुरू करू इच्छिणाऱ्यांना ऑनलाइनसह ऑफलाईनही प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. त्यासाठी 75 प्रस्ताव नव्याने आल्याचे गौण खनिज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात हे युनिट सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध होणार आहे.नदीतील वाळू उपशातून होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी रॉयल्टी शुल्कातही सवलत देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यात कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी 75 जणांचे ऑनलाईन प्रस्ताव दाखल झाले आहेत. या सर्वांना कागदपत्रांसह ऑफलाईन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाने दिल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी मान्यता देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात 50 ठिकाणी कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी एम सॅन्ड युनिट उभारले जाणार आहेत. गुजरात, मुंबई वाळूचार दर 1 लाख सोलापुरात गुजरात, मुंबईतून वाळू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. या वाळूचा दर प्रती ब्रास 10 ते 12 हजार रुपये आहे. 1 ट्रक वाळूला तब्बल 1 लाख रुपयांचा दर असल्याचे बांधकाम व्यावसायिक राहुल लेंगरे यांनी सांगितले. एका ब्रासला 200 रुपये शुल्क सध्या 600 रुपये प्रती ब्रास रॉयल्टी आकारली जात आहे. एम सॅण्डसाठी रॉयल्टी शुल्कात सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी प्रती ब्रासला 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. खाणपट्टे निश्चित केल्यानंतर त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र घेतले जाणार आहे. एम सँड म्हणजे काय? एम-सँड म्हणजे मशीनने तयार केलेली वाळू जी नैसर्गिक नदीच्या वाळूला एक उत्कृष्ट आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. खडी फोडून आणि बारीक करून वाळू बनवली जाते. तिच्या कोनीय आकारामुळे काँक्रीटमध्ये चांगले इंटरलॉकिंग होते. त्यामुळे बांधकाम अधिक मजबूत होते. बांधकामांना कृत्रिम वाळू हाच पर्याय भीमा, सीना, माण नदीसह ओढे नाल्यांच्या पात्रातील नैसर्गिक वाळूचा अतिरिक्त उपसा झाल्याने पाणी प्रदूषित होण्यासह पर्यावरणाची हानी होऊ लागली. त्यामुळे कृत्रिम वाळू निर्मितीचा पर्याय पुढे आला.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:37 am

सोलापूर मनपात महायुतीवर प्रश्नचिन्ह, तिन्ही आमदार सक्षम:बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही, पालकमंत्र्यांनी मांडली भूमिका

महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे तिन्ही आमदार आणि शहराध्यक्षा सक्षम आहेत. त्यामुळे आम्हाला बाहेरच्या नेतृत्वाची गरज नाही. तरीही स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून महायुतीचा निर्णय घेऊ. महायुती नाही झाल्यास भाजप ‘एकला चलो रे’ची भूमिका घेईल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सांगितले. ‘अबकी बार 75 पार’ असा नारा देत महापालिकेवर यंदाही भाजपचाच झेंडा फडकेल, असेही ठामपणे म्हणाले. सोमवारी विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गोरे पुढे म्हणाले, “भाजपच्या सत्ताकाळात शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. बहुतांश प्रश्न सुटले. काही मोजकेच प्रश्न राहिले. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढला. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 1200 इच्छुकांचे अर्ज आले. भाजपवरील जनतेच्या विश्वासाची हीच प्रचिती आहे. सर्वसंमतीने उमेदवारांची निवड करण्यात येईल. भाजप वगळता अन्य पक्षांना 102 उमेदवार मिळणे अवघड आहे” विमानसेवा बंद होण्याची गॅरंटी देणाऱ्यांनी पाहावे, सेवा सुरूच... विमान सेवा, आयटी पार्क, समांतर जलवाहिनी तसेच सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी 892 कोटी रुपयांची योजना मार्गी लावली. सोलापूरच्या विमानसेवेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. विमानसेवा बंद होण्याची काही लोकांनी ‘गॅरंटी’ दिली होती. मात्र विमानसेवा आजही चांगली सुरू आहे, असे गोरे म्हणाले. त्यांचा रोख खासदार प्रणिती शिंदे यांच्या विधानाकडे होता. लवकरच बंगळुरू आणि तिरुपतीची विमानसेवा सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. भूसंपादनामुळे शहरातील दोन उड्डाणपुलांचे काम होऊ शकले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केला. या वेळी आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते. तुम्ही उभे का..? पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार झाला. त्या वेळी पालकमंत्री उठले होते. त्यांच्याकडे पाहात देशमुख म्हणाले, ‘तुम्ही बसा ना...’ महायुती होणार नसल्याचे संकेत महापालिका निवडणुकीविषयी पालकमंत्री गोरे यांनी मांडलेली एकूण भूमिका पाहता, भाजप स्वबळावरच ही निवडणूक लढवणार असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मित्र पक्षांविषयीही त्यांनी टिपण्णी केली. महायुती झाली तर योग्यतेप्रमाणे जागा मिळतील, असे सूतोवाच केले. शिंदेसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रविवारी माध्यमांसमोर भूमिका मांडली होती. विधानसभा निवडणुकीतच भाजपने सांगितले होते की, महापालिका निवडणुकीत 25 जागा देणार. तेवढ्या मिळाल्या तरी समाधान असल्याचे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले होते. परंतु पालकमंत्री गोरे यांनी योग्यतेप्रमाणे म्हटल्याने शिंदेसेनेला किती जागा मिळणार? असा प्रश्न आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ‘अब की बार 75 पार’चा नारा देत स्वबळाची तयारी सुरू केली. त्यामुळे महायुती होणार नाही, असे संकेत आहेत.‎‎‎

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:30 am

अहिल्यानगरात चोरीसाठी चौघी बुरखा घालून घुसल्या ‎घरात:विरोध केल्याने महिलेचा खून, एका सीसीटीव्हीत पळताना ‎दिसल्याने संशय बळावला

बोल्हेगाव येथील दिव्यांग महिलेच्या खुनाचे ‎‎रहस्य तीन दिवसांनी उलगडले. दागिने ‎‎चोरण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या ‎चौघींनी चोरीला विरोध करणाऱ्या महिलेचा ‎‎गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे. ‎‎स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा ‎‎अल्पवयीन मुलींसह चार युवतींना अटक‎ केली आहे. 12 डिसेंबर रोजी ही घटना ही‎ घटना घडली होती.‎ दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे‎(वय 20, रा. भारत बेकरीमागे, बोल्हेगाव),‎अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (वय 22, रा.‎मोरया पार्क, बोल्हेगाव, मूळ रा. चांद बाग,‎करावल नगर, नॉर्थ इस्ट दिल्ली) व 16 वर्षीय‎ दोन अल्पवयीन मुली अशा चार जणींना अटक‎ करण्यात आली. मयत मनिषा बाळासाहेब शिंदे‎ (वय 40, बोल्हेगाव) या घरात एकट्या‎ असताना त्यांची गळा चिरून हत्या करण्यात ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास‎ करत असताना त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही‎ फुटेज तपासून व गोपनीय माहिती मिळवून‎ आरोपींची ओळख पटवली व त्यांना ताब्यात ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎घेतले. आरोपी दिव्या हिचे माहेर मयत महिलेचे‎ शेजारी आहे. मयत महिलेकडे असलेल्या ‎दागिन्यांची तिला माहिती होती. तिने इतर तिघींना‎ बरोबर घेऊन दागिने चोरण्याचा कट रचला होता.‎ चोरलेले दागिने बँकेत‎ ठेवून 92 हजारांचे कर्ज चौघांनी महिलेचे चोरलेले दागिने त्यांनी ‎एका व्यक्तीच्या नावे एका बँकेत तारण‎ ठेवून त्यावर 92 हजार रुपये कर्ज काढले.‎ज्या व्यक्तीच्या नावावर कर्ज काढले ‎त्याला 12 हजार दिले व उर्वरित 80 हजार‎ रुपये दोघींनी निम्मे निम्मे वाटून घेतल्याचे‎ समोर आले आहे. हे दागिने हस्तगत‎ करण्यासाठी व ज्याच्या नावावर दागिने‎ ठेवण्यात आले, त्याचा गुन्ह्यात सहभाग ‎आहे की नाही, याचा शोध पोलिस घेत‎ आहेत.‎ इनसाइड‎ आरोपी व खुनाचे कारण शोधण्यासाठी‎ पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात‎ होत्या. मयत महिलेच्या घरासमोरील‎ सीसीटीव्हीमध्ये एका बाजूने काही महिला ‎चालत जाताना दिसल्या होत्या. मात्र,‎परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एका‎ ठिकाणी चौघी पळताना आढळल्याने ‎त्यांच्यावर संशय बळावला. त्या जात‎ असलेल्या रस्त्यावरील इतर सीसीटीव्ही‎ तपासल्यावर त्यांची ओळख पटली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:22 am

सातव्या महिन्यात गीर गायीचा डोहाळे जेवण सोहळा;40 महिलांनी भरली ओटी:नाम संस्कृती शिंपी समाज फाउंडेशन-मुक्ती फाउंडेशनचा अभिनव उपक्रम

माणुसकी आणि निसर्गाच्या अतूट‎ नात्याचा एक अनोखा सोहळा रविवारी ‎महाबळ कॉलनीत पाहायला मिळाला.‎ निमित्त होते ‘राधा'' नावाच्या गीर गायीच्या‎ डोहाळे जेवणाचे! नाम संस्कृती शिंपी‎‎ समाज फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशन तर्फे‎आयोजित कार्यक्रमात चक्क एका गायीचा‎ सातव्या महिन्याचा डोहाळे जेवण सोहळा ‎अत्यंत जल्लोषात आणि मांगल्यात साजरा‎ करण्यात आला. तब्बल 40 महिलांनी एकत्र‎येत सजविलेल्या राधा गायीची नारळ,‎तांदूळ, हळद, कुंकू, साडी-खणाने ओटी‎भरली आणि तिला छप्पन भोगचा नैवेद्य‎ अर्पण केला. गोमाते प्रती असलेल्या या ‎श्रद्धेने आणि प्रेमाने उपस्थित असलेल्या‎ नागरिकांचे मने जिंकली. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा‎ दिला जातो आणि तिची पूजा केली जाते.‎याच श्रद्धेतून प्रेरित होऊन नाम संस्कृती शिंपी‎ समाज फाउंडेशन व मुक्ती फाउंडेशनतर्फे ‎परिसरातील 40 सुवासिनी गायीच्या सातव्या‎ महिन्यात गायीचा ओटी भरण सोहळा‎ मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात ‎आला. रंगीबेरंगी वस्त्र, मोत्यांच्या माळा,‎फुलांचे हार, आकर्षक आभूषणे घालत‎ गायीला सजविण्यात आले होते. गायीला ‎पांघरलेल्या झुल्यावर मोठ मोठे खिसे तयार‎ करून त्यात महिलांनी ओटी भरली. नाम‎ संस्कृतीचे अध्यक्ष किशोर निकुंभ, महिला ‎अध्यक्षा भारती निकुंभ यांच्या पुढाकाराने हा ‎कार्यक्रम घेण्यात आला.‎ छप्पन भोगमध्ये गूळ, हरभऱ्याची ‎डाळ, ढेपसह मिठाईचा समावेश‎ गो सेवेने सत्त्वगुण वाढतो, जो‎ आपल्याला नैतिक, आध्यात्मिकदृष्ट्या ‎मजबूत बनवतो. गो सेवेमुळे पुण्य मिळून‎ सर्व दु:खांपासून मुक्ती मिळते. जीवनात ‎सकारात्मकता वाढते. श्रीकृष्णांनी स्वत:‎गो सेवेला महत्त्वाचे स्थान दिले आहे.‎त्यामुळे गो पूजनाचे खूप महत्व आहे.‎‎‎ गायीला दाखविण्यात आलेल्या छप्पन‎ भोगमध्ये श्रीफळ, गूळ, हरभऱ्याची डाळ,‎सरकी, ढेप, गायीचे प्रोटीन, मिठाई, फळे,‎भाज्या व पारंपरिक पदार्थांचा समावेश होता.‎हा महाप्रसाद गायीला दाखवून तिचे पूजन‎ करण्यात आले आणि उपस्थित महिलांनी ‎आरती केली. यानिमित्त सत्संग, भजनाचा ‎कार्यक्रम झाला.‎

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:15 am

नाशिक मनपा निवडणूक:माजी महापौरांच्या प्रभागातून भाजपच्या मुलाखतीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी, एका प्रभागातून 32 अर्ज

भाजपकडून महापालिका निवडणूक इच्छुकांच्या मुलाखती सुरू असून माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभागातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. प्रभाग क्र. 23 मधून तब्बल 32 जणांनी मुलाखती दिल्या आहेत. भाजपकडून दुसऱ्या दिवशी सोमवारी ( दि. 16) प्रभाग 15, 16, 23, 30 मधील इच्छुकांच्या मुलाखती भाजप आमदार व निवडणूक सम्यनवयक राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, विजय साने, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मुलाखती घेतल्या. मंत्री गिरीश महाजन हे सोमवारी (दि. 15) सकाळी नाशिकमध्ये होते. त्यामुळे दुपारी 12 नंतर मुलाखती सुरू झाल्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत मुलाखती सुरू होत्या. दिवसभरात 93 इच्छूकांनी मुलाखती दिल्या. दरम्यान दुसऱ्या दिवशीही अनेक इच्छूकांनी मुलाखतीस हजर राहणे टाळले. दरम्यान सर्व पक्षांमध्ये भाजपकडून उमदेवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यात एकाच घरातील दोन-तीन जण मुलाखती देत आहेत. तर काही जण चौघांचे पॅनल घेऊनच हजर रहात असून आपल्याला कसा लोकाश्रय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. बाहेरुन आलेल्यांबद्दल नाराजी भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी पक्षप्रवेश केले. त्यापैकी सर्वजण मुलाखतीसाठी हजर होते. यावेळी आम्हा निष्ठावंताना डावलून यांना उमेदवारी नको अशी कुजबुज निष्ठावंतांत या ठिकाणी सुरू होती. बाहेरुन आलेल्या या इच्छुकांमुळे पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:08 am

संस्थानच्या कामगिरीचा मी साक्षीदार- तुकाराम महाराज सखारामपूरकर:टाळमृदंगाच्या गजरात श्री दुर्गादेवी संस्थानचा वर्धापन दिन उत्साहात साजरा‎

येथून जवळच असलेल्या शिवर येथील श्री दुर्गादेवी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा ३४ वा तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा २० वा वर्धापन दिन उत्सव आयोजित करण्यात आला. यानिमित्त शरद नगर, शिवर येथे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. उत्सव कालावधीत अमरावती येथील भागवताचार्य कैलासचंद्र महाजन चांदूरकर यांच्या वाणीतून श्रीमद संगीत भागवत कथा प्रवचन सोहळा पार पडला. यासोबतच महाराष्ट्रातील नामवंत हरी कीर्तनकारांच्या हरीकीर्तनांसह विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय झाला होता. सप्ताहाचा समारोप गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला. यावेळी कीर्तनातून बोलताना महाराजांनी श्री दुर्गादेवी संस्थानच्या सामाजिक व धार्मिक कार्याची तसेच नेत्रदीपक प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार असल्याचे गौरवोद्गार काढले. संस्थानचे अध्यक्ष जगदीश मुरूमकार व विश्वस्त मंडळ यांच्या कार्याचे कौतुक करत संस्थानच्या विकासासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. उत्सवाच्या निमित्ताने आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या सोहळ्यात जिल्ह्यातील विविध हरिपाठ मंडळे, व्यायामशाळांची पथके, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजन समिती व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. शिवर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रतिकात्मक चित्राचे अनावरण तसेच श्री दत्तात्रय अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या कॅलेंडरचे प्रकाशन तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कैलासचंद्र महाराज चांदुरकर, धनंजय महाराज, अशोक पटोकार, बळीराम महाराज दोड, धनंजय महाराज मोरखडे, नंदकिशोर वैराळे, शुभम तायडे यांचा आणि पात्रदान सेवेबद्दल संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. उत्सवानिमित्त माऊली हरिपाठ मंडळ, शिवर यांच्या नेतृत्वाखाली गावातून श्रीमद् भागवत ग्रंथ व भागवताचार्य कैलासचंद्र महाजन चांदुरकर यांची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. प्रत्येक चौकात ग्रंथ व महाराजांचे पूजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण शिवर दुमदुमून गेले होते. भाविकांच्या स्वागतासाठी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. नगरप्रदक्षिणेत सहभागी हरिपाठ मंडळांसाठी गावकऱ्यांनी चहा, फराळ, पाण्याची व्यवस्था केली होती. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष जगदीश मुरूमकार यांनी उत्सवात योगदान देणाऱ्या सर्व महाराजांचे व आयोजन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. संस्थानमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारकाची सविस्तर माहिती दिली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:36 am

अमेरिकन लेकीचा आई सोबत दिंडीत सहभाग:क्षमा गचके यांनी आईच्या इच्छेसाठी केली खामगाव ते शेगाव 17 किलोमीटरची पायी वारी‎

दरवर्षी ठाणे, मुंबईतील भाविकांनी सलग ९ वर्षे जोपासलेली ही वारी आज श्रद्धेचा नवा इतिहास घडवत आहे. ही वारी चालते पायांवर, पण तिचा ठसा उमटतो मनावर. कारण इथे चाल फक्त रस्त्यावर नसते तर ती चालते संस्कृतीच्या दिशेने. अमेरिकेहून आलेली लेक आणि भारतीय संस्कारांचा जागता दाखला या वर्षीच्या वारीतला सर्वात बोलका, अंतर्मुख करणारा प्रसंग म्हणजे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या क्षमा गचके यांचा सहभाग. केवळ दर्शनासाठी किंवा पर्यटनासाठीही नव्हे तर आईच्या इच्छेचा मान राखण्यासाठी लेकीने हजारो मैलांचे अंतर पार केले. आपल्या ७५ वर्षीय मातेला खामगाव ते शेगाव पायी वारी करण्याची इच्छा होती. त्या इच्छेची किंमत डॉलर्समध्ये मोजता येणार नाही, हे जाणून क्षमा गचके थेट अमेरिकेतून भारतात आल्या. आईचा हात हातात घेऊन त्यांनी १७ किलोमीटर वारीचा प्रवास पूर्ण केला. आज जेव्हा वृद्ध आई-वडील ओल्ड एज होममध्ये ढकलले जातात, त्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग भारतीय कुटुंब व्यवस्थेचा जिवंत पुरावा ठरला आहे. हा केवळ एक भावनिक क्षण नव्हे, तर समाजाला दिलेला मौन पण ठळक संदेश आहे. ९ वर्षांपूर्वी अवघ्या ११ भाविकांनी सुरू केलेली ही पायी दिंडी आज ३०० ते ४०० भाविकांपर्यंत पोहोचली आहे. ना फलक, ना जाहिरात, तरीही दरवर्षी वाढणारा सहभाग सांगतो की, खरी श्रद्धा स्वत:च मार्ग शोधते. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी निघणारी ही वारी आता दिनदर्शिकेतील तारीख नसून, भाविकांच्या आयुष्यातील आध्यात्मिक सोहळा बनली आहे. येथील राणा लकी सानंदा शाळेच्या प्रांगणात १३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता आरती करण्यात आली. नामजप, अभंग, हरिनामाचा गजर करण्यात आला. त्यानंतर ११वाजता दिंडी शेगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिरात दाखल झाली. ठाणे जिल्ह्यातील ५० उपासना केंद्रांमधून महिला भाविक मोठ्या संख्येने आले होते. जिथे भक्तीचा गजर माणुसकी जागवतो तिथेच संस्कृती असते धर्म म्हणजे भिंती उभारणे नव्हे ही वारी शिकवते. १७ किलोमीटरचा हा प्रवास जिथे मुलगी अमेरिकेतून आईसाठी येते. तिथे हजारो पावले एकाच नामात चालतात, जिथे भक्तीचा गजर माणुसकी जागवतो तिथेच खरी संस्कृती जिवंत असते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:31 am

दिव्य मराठी अपडेट्स:निवडणूक आयोग कुणासाठी थांबले होते? रोहित पवारांचा गंभीर सवाल; लोकशाहीच्या गळचेपीचा आरोप

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:30 am

‘तक्रार पेटी’ची प्रभावी अंमलबजावणी करा:शिक्षक-पालक संघाची सभा घ्या, भाजप ओबीसी आघाडीने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले निवेदन‎

गीतानगरातील विद्यार्थिनी आत्महत्येचे प्रकरण विधिमंडळापर्यंत पोहोचल्यानंतर आता कारवाईसाठी सत्ताधारी भाजप ओबीसी आघाडीनेही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळेतील ‘तक्रार पेटी’ या उपक्रमाची प्रभावी अंमबलजावणीसह अन्य मागण्या ओबीसी आघाडीने केल्या असून, याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ५ डिसेंबर दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यास करण्यास जाते, असे सांगून संबंधित विद्यार्थिनी खोलीत गेली होती. सायंकाळपर्यंत तिने दरवाजा न उघडल्याने तिच्या कुटुंबियांनी दरवाजा तोडला. मात्र ती घरातील छताच्या पंख्याला आेढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल केले असता, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीच्या वडिलांनी संबंधित अल्पवयीन मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे जुने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. बुधवारी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मुद्दा उपस्थित केला केला. याप्रकरणी कारवाईची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनीष गावंडे, अल्केश खंडेकर, अविनाश मते यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात धाव घेत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या केल्या मागण्या : शाळांमध्ये पुढील उपाय योजना करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने करण्यात आली. यात मुलगा-मुलगी यांना एकाच बेंचवर न बसवता मुलांची व मुलींची बसण्यासाठी स्वतंत्र रांग असावी. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये मुलांचा व मुलींचा वर्ग वेगळा असावा. शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन व इतर शालेय उपक्रमात मुली-मुलींचे एकत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. विधिमंडळातील चर्चेनंतर येणार कारवाईला गती : सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सततच्या छेडखानीला कंटाळून केलेल्या आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा गत आठवड्यात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजला होता. भाजप आमदारांनी घटनाक्रम सांगत शिक्षक, शाळेवर कारवाईची मागणी केली. यावर सभागृहाकडूनही शासन गंभीर नोंद घेईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील विद्यार्थिनींच्या छेडखानीचा मुद्दा राज्यस्तरावर पोहोचला असून आता तरी मुलींच्या सुरक्षिततेबाबत कठोर उपाय योजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बजरंग दलानेही घेतला होता आक्रमक पवित्रा : शाळा व संबंधितांवर कार्यवाहीसाठी बजरंग दलाने गत आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. फ्री कल्चरला पालकांचा विरोध असल्यानंतरही त्याकडे शाळेच्या प्रशासनाने दुर्लक्ष केले असून, कर्मचाऱ्यांनी पोस्कोच्या विविध कलमांचे उल्लंघन केले. शिक्षकांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी याबाबतची तात्काळ माहिती पोलिस किंवा चाइल्ड लाइनला देणे बंधनकारक होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी छेडखानी करणाऱ्या संबंधित मुलाला न रोखले नाही. त्याला प्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन दिल्याचा आरोप निवेदनात केला होता. फ्री संस्कृतीला आळा घाला सेंट ॲन्स शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीने केलेल्या आत्महत्येचा गंभीरपणे लक्ष देऊन शालेय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या फ्री संस्कृतीला आळा घालण्यास निर्देश देण्याची मागणी भारतीय जनता पक्ष ओबीसी आघाडीच्या वतीने करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:29 am

संपन्न ग्रामीण भारतासाठी प्रयत्न करू- डॉ. काळबांडे:कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय संमेलनाचा उत्साहात समारोप‎

कृषी प्रधान देशातील कष्टकरी शेतकरी आर्थिक, सामाजिक संपन्न होण्यासाठी शेती क्षेत्रात नावीन्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाचा व कृषिपूरक व्यवसायाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषी अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर म्हणून या समाजाचे आपले काही देणे लागते. याच भावनेने आपण सर्व एकात्मिक प्रयत्नांची मोट बांधत सुजलाम सुफलाम देश निर्मितीत हातभार लावू, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले. ते आजी -माजी विद्यार्थ्यांचे संमेलनाच्या (अँल्यूम्नी मिट) समारोपीय सत्रात बोलत होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत ३ ऑक्टोबर १९७० रोजी स्थापन झालेल्या कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात दोन दिवसीय आजी-माजी विद्यार्थ्यांचे संमेलन पार पडले. समारोप प्रसंगी अधिष्ठाता प्रा. डॉ. काळबांडे यांनी आजी-माजी विद्यार्थ्यांना संबोधित केले. कृषी विद्यापीठाने शाश्वत शेती समृद्ध शेतकरी संकल्पना कृतीत आणण्यासाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात वाटचाल सुरू केली आहे. देशांतर्गत शेती व्यवसायाची सद्यस्थिती व भविष्यातील आव्हाने अतिशय पोटतिडकीने मांडत कृषिच्या उर्जितावस्थेसाठी सर्वांचा सहयोग कसा घेता येईल यावर भाष्य केले. समारोपीय सत्राचे अध्यक्षस्थानी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे होते. प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी युगंधर मांडवकर, फ्रीलान्स कंसल्टंट सुनील सरदार, अवर सचिव अनिल रामटेके उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर, विभाग प्रमुख डॉ. महेंद्र देशमुख, डॉ. सुचिता गुप्ता, डॉ. राजेश पातोडे, डॉ. प्रमोद बकाने आदी उपस्थित होते. समारोपादरम्यान माजी विद्यार्थी सुजित गुप्ता, सचिन शिंदे, गोपाल भैया, धीरज देशमुख, नरेंद्र दांद्रे यांनी संमेलनाबद्दल मनोगत व्यक्त केले. संमेलन दर दोन ते तीन वर्षातून झाल्यास नवीन व जुन्या विद्यार्थ्यांसाठी संवादाचे माध्यम उपलब्ध होईल. तसेच कृषी अभियंत्यांचे सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व वाढण्यास मदत होईल, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन ओम टाकळकर यांनी केले. आभार डॉ. वसुदेव मते यांनी मानले. नव्या-जुन्या विद्यार्थ्यांमध्ये घडणार संवाद प्रमुख अतिथींनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला व विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत जुन्या विद्यार्थ्यांकडून नवीन कृषी अभियंत्यांना संधी निर्माण करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले. महाविद्यालयाने नवीन व जुन्या विद्यार्थ्यांमध्ये दुवा बनून संवाद घडवून आणल्याचे व याचे भविष्यात चांगले परिणाम दिसून येण्याची आशा व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:29 am

उत्तमसरा येथे सिकलसेल आजाराबाबत जनजागृती:आयुष्यमान आरोग्य मंदिर उत्तमसरामध्ये आयोजन‎

पंचायत समिती भातकुली मधील उत्तमसरा येथे सोमवारी आयुष्यमान आरोग्य मंदिर उत्तमसरा अंतर्गत सिकलसेल जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. यामध्ये डॉ. सोनाली देशमुख यांनी सिकलसेल विषयी विस्तृत माहिती दिली. सप्ताहाचे उद्घाटन उत्तमसराचे सरपंच धर्मेंद्र मेहरे यांच्या हस्ते झाले. ज्या ॲनिमियामध्ये रक्त पेशींचा आकार विळ्यासारखा अर्धचंद्राकृती होतो, त्याला सिकलसेल म्हणतात. सिकलसेलचे दोन प्रकार असतात: सिकलसेल ग्रस्त आणि सिकलसेल वाहक. सिकलसेल हा आनुवंशिक आजार आहे. सिकलसेलमध्ये रक्त पेशींचा आकार विळ्यासारखा झाल्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अंग दुखणे, पोट दुखणे, सतत थकवा जाणवणे, वारंवार जंतूचा संसर्ग होणे अशी लक्षणे दिसतात. उपकेंद्र स्तरावर सिकलसेलसाठी सोलबलिटी टेस्ट केली जाते. यामध्ये सकारात्मक परिणाम आल्यास त्या लाभार्थींना एच बी इलेक्ट्रोफोरेसिससाठी जिल्हा रुग्णालयात संदर्भित केले जाते. वाहक लोकांना पिवळे कार्ड दिले जाते आणि ग्रस्त लोकांना लाल कार्ड दिले जाते. तसेच औषधोपचार मोफत केला जातो. सिकलसेल जनजागृती सप्ताह यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता सालफळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण खराटे, उपकेंद्र उत्तमसराच्या डॉ. सोनाली देशमुख, आरोग्य सहाय्यक आकाश हिंगलासपुरे, आरोग्य सेविका मंगला वानखेडे, आरोग्य सेवक चेतन राठोड, सिकलसेल समुपदेशक मेघा चर्जन, सुरेखा सवयी, संगीता निंभोरकर, अंगणवाडी सेविका जयश्री पेढेकर, अनुराधा भिंगारे, वर्षा मानकर, रूपाली बेलसरे, जिल्हा परिषद शाळेच्या मीनाक्षी इंगळे, शिक्षक राजेश सावरकर, गजानन येलोने, प्रमोद कांबळे, ग्रामपंचायतचे नितीन आंबेडकर, शुभम अवचार, व ग्रामपंचायतचे इतर सदस्य तसेच गावातील ग्रामस्थ आणि जिल्हा उत्तमसरा शाळेचे विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:24 am

निधी अभावी फुलसावंगीतील जलजीवन मिशनचे काम ठप्प:गावकऱ्यांची तेलही गेले अन् तूपही गेले'' अशी अवस्था‎

ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जलजीवन मिशन (हर घर जल योजना) अंतर्गत फुलसावंगी गावातील काम गेल्या आठ महिन्यांपासून पूर्णपणे बंद पडले आहे. कंत्राटदारांच्या बिलांचे प्रलंबित थकबाकीमुळे हे काम ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. योजनेच्या कामासाठी गावातील नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते फोडण्यात आले असून, पाइपलाइन टाकण्यात आली आहे. मात्र, नळांपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने रस्तेही खराब झाले आहेत. परिणामी, गावकऱ्यांची तेलही गेले अन् तूपही गेले' अशी दयनीय अवस्था झाली आहे. जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत फुलसावंगी गावासाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या योजनेमुळे गावातील पाणीटंचाईचा कायमस्वरूपी नायनाट होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली होती. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाण्याच्या टाकीच्या ठिकाणी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र, दोन वर्ष उलटूनही काम अर्धेही पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला संथगतीने सुरू असलेले काम आता निधी अभावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. यामुळे काम कधी पूर्ण होईल, याबाबत गावकऱ्यांमध्ये शंका निर्माण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तीवर्षानिमित्त फुलसावंगी गावात सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी खर्चून गावाच्या कानाकोपऱ्यात सिमेंटचे रस्ते बांधण्यात आले होते. मात्र, जलजीवन मिशनच्या पाइपलाइन टाकण्यासाठी हे रस्ते जेसीबीने फोडण्यात आले. परिणामी, गावातील अर्ध्याहून अधिक रस्ते पायदळ चालण्या लायकही राहिले नाहीत. घरोघरी नळ येण्याची अपेक्षा असताना ती स्वप्नच राहिली आहे. शिवाय, पूर्वीचे चांगले रस्तेही खराब झाल्याने गावकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे.ही योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन गावातील पाणीटंचाई दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. डिसेंबर महिन्यात निधी येईल, त्यानंतर काम करू संपूर्ण महाराष्टरात कोट्यवधी रुपये देयके शिल्लक आहेत. एकट्या फुलसावंगीमध्ये जवळपास चार कोटी रुपये शिल्लक आहेत. सद्या निधी नाही, त्यामुळे डिसेंबर महिन्यात निधी मिळाल्यास सदरचे काम सुरू होईल. - संतोष मुरकुटे , शासकीय कंत्राटदार. मंत्री, आमदारांचे कामाकडे होतेय अक्षम्य दुर्लक्ष महागाव तालुका आढावा बैठकीत मंत्री इंद्रणिल नाईक यांच्या फुलसावंगीच्या जल जीवन मिशनच्या थांबलेल्या कामाबद्दल माहिती दिली. मात्र मंत्री महोदयांनी किंवा आमदार साहेबांनी कामाबद्दल पूर्णतः दुर्लक्ष केले आहेत. या अपुऱ्या कामामुळे गावातील सर्व पूर्णपणे रस्ते खराब झाले आहेत. - कुणाल नाईक , उपसरपंच फुलसावंगी.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:24 am

पंच्याहत्तर वर्षाच्या हौसाबाईने फुलवली परसबाग:दररोजच्या आहारात आवश्यक असलेल्या जीवनसत्वाच्या भाजीचे घेतात उत्पादन‎

रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय, ताज्या भाज्या मिळतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते कुटुंबाला रोजच्या आहारात आवश्यक असलेले जीवनसत्त्वे आणि पोषण मिळते. हाच धागा पकडुन साखरखेर्ड्यातल्या शिक्षक कॉलनीमध्ये पंचाहत्तर वर्षीय हौसाबाई विठोबा आखरे या आजीबाईने दारातील अंगणात परसबाग फुलवली आहे. आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या ताज्या आणि पौष्टिक भाज्या पिकवण्यासाठी तयार केलेली हिरवा भाजीपाला बाग प्रगतशील कास्तकाराला लाजवणारी अशी आहे. त्यांनी ज्यात कमी जागेत जास्त प्रकारच्या भाज्या उत्पादनावर भर दिला आहे. आणि यातून सेंद्रिय, ताजी भाजी मिळते, जी आरोग्यासाठी उत्तम असते. हौसाबाई आजीबाईंसारख्या अनुभवी व्यक्तींनी लावलेली परसबाग म्हणजे त्यांच्या अनुभवाचा आणि कौशल्याचा उत्तम नमुना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सर्व प्रकारच्या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर, लाल व हिरवा मठ, अंबाडी, चवळी इत्यादींची लागवड यामध्ये करण्यात आली आहे. विशेषतः सभोवतालची लोक या परसबागेतील भाजीपाला मागतात तेव्हा हौसाबाई मज्जाव करीत नाही तर त्यांना मोठ्या मनाने मोफत देतात. शेजारच्यांनाही भाजीपाला दिवसभर सवड असल्याने हौसाबाई या अपुऱ्या जागेत फुलवलेल्या परसबागेत काबाडकष्ट करून आपला दिवस घालवतात. कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक भाजीपाला तर मिळतोच पण शेजारच्या लोकांनाही भेट म्हणून वाणवळा देण्याचे समाधान हौसाबाईच्या चेहऱ्यावर विरळाच आनंद देऊन जाते. हौसाबाई परसबागेची विशेष काळजी घेत असल्याने बारोमास बाजारातही न मिळणारा भाजीपाला हौसाबाईच्या परसबागेत मोफत मिळतो हे विशेष. हौसाबाईने खडकाळ अंगणात फुललेल्या परसबागेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:23 am

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार:मनसेच्या सहभागाबाबत प्रस्ताव नाही; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची माहिती‎

आगामी महापालिका व जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी संयुक्तपणे लढणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडीत मनसेच्या समावेशा बाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आल्यावर त्याबाबत तिनही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी अमरावती येथे आलेल्या आ. शशिकांत शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शहराध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, माजी आ. रमेश बंग आदी उपस्थित होते. आ. शशिकांत शिंदे म्हणाले की, हिवाळी अधिवेशन विदर्भात झाल्याने येथील प्रश्न व समस्यांवर धोरणात्मक निर्णय अपेक्षित होते. विदर्भासाठी भरीव निधीची आशा होती. मात्र, पुरवणी मागण्या मंजूर करून अधिवेशन गुंडाळण्यात आले. नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला असून महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही तसा प्रकार घडण्याची शक्यता मतदार यादीतील घोळ बघता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लोकशाही पद्धतीने व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने कठोर भूमिका व धोरण आखण्याची आमची अपेक्षा आहे. मनसेचा अद्याप प्रस्ताव नाही आघाडीनेच निवडणुका लढण्यास आम्ही सहमत आहे. मनसेच्या समावेशाबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही. तो आला की त्यावरही चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत. मनसेचा प्रश्न राज्यभर नसून मुंबई, पुणे, ठाणे व नाशिकसंदर्भात अधिक आहे, असेही त्यांनी सांगितले. अमरावती महापालिकेत शहरातील पक्षाची संघटनात्मक शक्ती बघून उमेदवारांचा निर्णय घेण्यात येणार असून त्यानुसार जागा वाटप करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:20 am

आवक वाढल्याने बाजारात हिरव्या पालेभाज्या स्वस्त:पालक, मेथी, कोथिंबिर, शेपू, चवळी, लाल माठ या भाज्या खाण्याची सध्या चंगळ, विविध खाद्यपदार्थावर भर‎

अमरावती शहरातील ठोक व चिल्लर बाजारात पालक, मेथी, कोथिंबिर, शेपू, चवळी, लाल माठ, चाकवत, पातीचा कांदा या पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे त्या आता स्वस्त झाल्या असून अगदी दर्जेदार मिळत असल्याने गृहिणीही सुखावल्या आहेत. कारण, दररोज विविध खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी त्यांना स्वस्त पर्याय उपलब्ध झाले आहेत. पालक सध्या ४० रु., मेथी ६० रु., चवळी ६० रु., लाल माठ, ५० रु., कोथिंबिर, ४० रु., शेपू ६० रु., चाकवत ६० रु., पातीचा कांदा ४० रु. किलो दराने बाजारात मिळत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन होत असून त्यामुळे भाडी मंडीत दररोज मोठ्या प्रमाणात ताज्या पालेभाज्या येत असल्याने साहजिकच त्यांचे दर घसरले आहे. तरी मागणी मात्र वाढल्याची माहिती पालेभाज्यांचे ठोक विक्रेते अमीन अहमद यांनी दिली. सध्या पालक व मेथीसह चावकत या तिन्ही भाज्यांचे विविध पदार्थ बनवण्याकडे गृहिणींचा कल दिसून येत असून पालक पराटे, पालक वडे, पनीर-पालक, पालक भजे, पदार्थ बनवण्यासोबतच पालकाची सुकी भाजी बनवण्याचे बेत आखले जात आहेत. त्याचवेळी मेथीचा घोळणा हा जिल्हयातील आवडता खाद्य पदार्थ आहे. ^पालेभाज्या या फायबरसह जीवनसत्त्वांची खाण आहेत. रक्तवाढीसही त्यामुळे मदत होते. कारण, पालेभाज्या या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात. पचनास हलक्या असून त्यांच्या नियमित सेवनाने पोटही साफ होते. त्यामुळे आहारात पालेभाज्यांचा नियमित वापर हा सर्वांसाठीच चांगला आहे. डॉ. उज्वला ढेवळे, आरोग्यतज्ज्ञ, पीडीएमसी. बाजारात पालेभाज्या विकताना महिला विक्रेती मेथीचे पराठे, कोथिंबर वड्या, सांबारवडी होतात तयार मेथीचे पराटे, मेथीचे वरण, मेथीचे पकोडे तयार करण्यासोबतच फुलगोबी, पत्ताकोबीत मेथी घालून या भाजीची चव वाढवली जात आहे. मेथी-मटर-मलाई तयार करण्यावरही गृहिणींचा चांगलाच जोर आहे. तुरीच्या ओल्या दाण्यांचे कढी गोळी तयार करताना त्यात चाकवत घालून, सुकी चाकवत, चाकवतचे वरण सर्वांच्याच पसंतीस उतरत आहे. कोथिंबिर तर सर्वच पदार्थांमध्ये अनिवार्य घटक असली तरी कोथिंबर वड्या, सांबारवडी मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. तसेच चवळी, लाल माठ, शेपूची सुकी भाजी, घोळणा, विविध पदार्थात घालून त्यांची चव वाढवली जात आहे. हिवाळ्यात पालेभाज्या खाण्याची चंगळ पालेभाज्या स्वस्त झाल्यामुळे तसेच अगदी ताज्या व दर्जेदार मिळत असल्यामुळे विविध खाद्य पदार्थ बनवणे सोयीचे झाले आहे. पालेभाज्या पचण्यास हलक्या व सर्वच आवडीने खात असल्याने विविध पदार्थ बनवण्यात आनंद वाटत आहे, अशी प्रतिक्रीया गृहिणी वर्षा लोंदे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:19 am

सफला एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखांवर भाविकांचे दर्शन:मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठल गोपाळपुरात विष्णूपदावर असल्याची भक्तांची भावना

मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशी एकादशीला एक लाखाहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. गोपाळपूर येथील विष्णूपदावर भाविकांनी दर्शन आणि वन भोजनासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवार, दि.१५ डिसेंबर रोजी सफला एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता राज्यभरातून आलेल्या एक लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठल मंदिरात नाही तर गोपाळपूर येथील विष्णुपदावर असतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने एकादशीला आलेल्या भाविकांनी विष्णुपद येथेही दर्शनासाठी गर्दी केली होती. वन भोजनाची प्रथा असल्याने स्वच्छतेसाठी जादा कर्मचारी काम पाहत आहेत. तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. या ठिकाणी विविध सामाजिक संघटना, दानशूर अन्नदात्यांनी उपवासाचे पदार्थ वाटप केले. गोपाळपूर येथे दि. १९ डिसेंबर पर्यंत विष्णुपद उत्सव संपन्न होत आहे. विष्णुपद मंदिर येथे मंदिर समिती मार्फत भाविकांना पुरेसा सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी दर्शनरांगेसाठी बॅरीकेटींग, सुरक्षा व्यवस्थेकामी कमांडोज, पिण्याच्या पाण्याची सोय, चांगली स्वच्छता व्यवस्था, अभिषेक पुजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:52 am

लोकमंगल'च्या गव्हाणीतील ठिय्या कायम, ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र:कडाक्याच्या थंडीत दोन दिवसांपासून आंदोलन सुरू; टनाला साडेतीन हजार रुपये दराची मागणी‎

उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्यासमोर ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. बीबी दारफळ आणि पंचक्रोशीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारखान्याच्या गव्हाणीत उतरून ठिय्या आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात सुमारे अडीचशेहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाला किमान साडेतीन हजार रुपये प्रति टन दर जाहीर करावा, या ठाम मागणीवर शेतकरी ठाम असून, कारखाना व्यवस्थापन मंडळाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. सोलापूर जिल्ह्यातील छावा संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जनहित शेतकरी संघटना या आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्या आहेत. “जोपर्यंत लोकमंगल साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला साडेतीन हजार रुपये भाव जाहीर करत नाही, तोपर्यंत गव्हाणी सोडणार नाही,” असा इशारा तमाम ऊस उत्पादक शेतकरी व संघटनांनी दिला आहे. कडाक्याच्या थंडीत, स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता हे आंदोलन सुरू असून, जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख, छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख अमोल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख विजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकवटले आहेत. आज शेती करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. बाजारात खतांचे दर गगनाला भिडले आहेत. डीएपी, युरिया, कीटकनाशके यांचे भाव वाढले असून, डिझेल, मजुरी, वीज यांचा खर्चही प्रचंड वाढला आहे. त्यातच घरातील लग्नकार्य, शिक्षण, आरोग्य खर्च यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे. अशा परिस्थितीत ऊस हा शेतकऱ्यांच्या हातातील एकमेव आधार मानला जातो. मात्र कारखानदार शेतकऱ्यांचे सातत्याने पिळवणूक होत असल्याची भावना शेतक-यांमध्ये असल्याचे प्रभाकर देशमुख म्हणाले. कारखान्याने तात्काळ निर्णय न घेतल्यास “उग्र आणि छावा स्टाईलने आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवस्थापनाच्या वेळकाढू भूमिकेमुळे आंदोलन मागणीवर चर्चा करणे अपेक्षित ऊस गाळप सुरू असतानाही वेळेवर दर जाहीर न करणे, पॉलिसी नुसार अपेक्षित दर न देणे, हप्त्याने आणि उशिरा बिले देणे, या समस्या शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहेत. परिणामी ‘शेतकरी राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वर्गाच्या चेहऱ्यावर आज निराशा आणि असहायता स्पष्टपणे दिसून येत आहे. व्यवस्थापनाने आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सामंजस्याने चर्चा करून निर्णय देणे अपेक्षित होते; मात्र वेळकाढूपणा करणाऱ्या कारखाना प्रशासनामुळे असंतोष अधिक तीव्र झाल्याचे स्वाभिमानीचे विजय रणदिवे म्हणाले. “ऊस दरवाढीच्या निर्णयासंदर्भात विचार करण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याचे शेतकरी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सुचवले होते. भूमिका जाहीर करण्याचे लेखी आश्वासन देण्यास आम्ही तयार होतो. मात्र लेखी आश्वासनाला न मानता आंदोलन केले. - मोहन पिसे, व्य. संचालक, लोकमंगल छावा स्टाईलने आंदोलन करु, प्रशासन जबाबदार

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:51 am

भरतीच्या नव्या निकषाला प्राध्यापकांचा विरोध:आता आचारसंहितेमुळे पुन्हा रखडणार प्रक्रिया

सोलापूर प्राध्यापक भरतीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) नियम डावलून सरकार पात्र उमेदवारांच्या आयुष्याशी खेळत आहे. राजकीय हस्तक्षेप वाढल्याने भरती प्रक्रियेचा निकष (फॉर्म्युला) वारंवार बदलला जात आहे. अधिवेशनामध्ये आता पुन्हा ६०:४० या नव्या सूत्रास मंजुरी मिळाल्याचे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तेही ‘यूजीसी’च्या नियमांच्या विरुद्धच आहे. तांत्रिक मुद्दे अन् आचारसंहितेच्या कारणामुळे आता पुन्हा भरती प्रक्रीयाचे घोंगडे भिजत पडणार असल्याची संतप्त प्रतिक्रीया प्राध्यापकांनी व्यक्त केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठासह राज्यभरातील ५ हजार ११२ प्राध्यापकांच्या जागांना वित्त विभागाची परवानगी मिळाली आहे. राज्यपालांनी यापूर्वीच्या ८० -२०, ७५- २५ या सूत्राऐवजी ६०-४० या नव्या सूत्राला मान्यता दिली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी अधिवेशनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झाल्याची शक्यताही व्यक्त होत आहे. सुरवातीला केलेल्या निकषातील बदलास ‘अभाविप’ या विद्यार्थी संघटनेने कडाडून विरोध केला. त्यानंतर प्राध्यापकांसह, इतर संघटनांनी जोरदार विरोध केला होता. त्यानंतर निकषांमध्ये बदल करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाने सादर करीत ६०:४० या नवीन सुत्रास मान्यता मिळाल्याचे, मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. पण, त्या नवीन निकषास देखील प्राध्यापकांचा विरोध आहे. प्रा. डॉ. भगवान आदटराव, सचिव, सुटा संघटना राज्यात सहाय्यक प्राध्यापकांची तब्बल १३,००० पदे रिक्त आहेत. या पदांच्या ४० टक्के नुसार ५०१२ पदे भरण्यासाठी सरकारने पाऊल उचलले आहे. पण गेल्या २ वर्षांपासून जो गोंधळ सुरू आहे, तो संतापजनक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार ५०-५० हाच फार्म्यूला असला पाहिजे. मागील अनेक वर्षांपासून भरती प्रक्रियाच राबवली गेली नसल्याने राज्यातील सर्वच विद्यापीठांत आणि महाविद्यालयांत प्राध्यापक संख्या अपुरी आहे. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर संस्थांचा दर्जा घसरत चालला आहे. पात्रतेसाठीचे निकष जाचक आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:51 am

शिक्षक आईच्या मृत्यूप्रकरणी मुलीस 1 कोटींची भरपाई:लोकअदालतीमध्ये 214 प्रकरणे निकाली, 8 कोटी 37 लाख रुपयांचे तडजोड शुल्क वसूल‎

लोक अदालतमध्ये निकाली निघालेल्या महत्वाच्या प्रकरणात शिक्षिकेच्या अपघाती मृत्यू प्रकरणी विमा कंपन्यांसोबत तडजोड करून दावेदार मुलीस १ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची तडजोड करण्यात आली. या प्रकरणातील बाळासाहेब सोपान पवार व वर्षा बाळासाहेब पवार (रा. पुजारी सिटी, इसबावी) हे दोघेही शिक्षक असून दि. १५ जून २०१६ रोजी सकाळी नोकरीसाठी दुचाकीवरून निघाले होते. वाखरी येथील गोसावी पेट्रोल पंपाजवळ समोरून दुकीच्या दिशेने आलेल्या बोलेरो जीपने (एम.एच. १३/ए.झेड. ७७८१) दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलेल्या वर्षा पवार (वय ३५) यांचा मृत्यू झाला. बाळासाहेब पवार यांच्याही पायाला, डोकीस जबर मार लागला होता. आईच्या अपघाती मृत्यूच्या अनुषंगाने मुलगी श्रावणी बाळासाहेब पवार हिने अपघातातील जीप चालक सीताराम हरिदास भुईटे (रा. पळशी) आणि जीपचा विमा असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी'कडून नुकसान भरपाईसाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यात सव्वा कोटी रूपये भरपाईची मागणी करण्यात आली होती. अखेर तडजोड होऊन हे प्रकरण लोक न्यायालयात मिटले. त्यानुसार ‘आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी' ने अर्जदार श्रावणी हिस १ कोटी रूपये भरपाई अदा करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. तालुका विधी सेवा समितीच्या वतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये २१४ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये ८ कोटी ३६ लाख ८६ हजार ६४९ रुपयांची तडजोड झाली. तसेच यामध्ये मोटार अपघात दावा एक कोटी रुपयांच्या तडजोडीने मिटवला. या लोक अदालतीसाठी ५ पॅनल व एक नियमित न्यायालयाचे व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश ए.एस. सलगर, न्यायाधीश श्री. एन. एस. बुद्रुक, न्यायाधीश एस. एस. राऊळ, न्यायाधीश श्रीमती के. जे. खोमणे न्यायाधीश पी. आर. पाटील, न्यायाधीश ए. एस. सोनवलकर यांनी काम पाहिले. लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश ए.एस. सलगर, न्यायाधीश एस. एस पाखले व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग के. जे. खोमणे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा करुन लोकअदालत पार पाडली. लोकअदालतीसाठी ५ पॅनल

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:50 am

ऊस वाहतूक ट्रॅक्टरमध्ये कर्कश गाणी,‎पोलिसांचे दुर्लक्ष:कारवाईची मागणी‎, हाॅर्नचा आवाजही ऐकू येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता‎

साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टरच्याद्वारे उसाची वाहतूक केली जाते. दिवसा व रात्री अपरात्रीही ट्रॅक्टर चालक कर्ण कर्कश आवाजामध्ये गाणी लावून वाहतूक करीत असल्याने माढा शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने पोलिस प्रशासनाने अशा ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. बहुतांश उसाची वाहतुक ट्रॅक्टरद्वारे केली जाते. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक मोठ्या आवाजात गाणी लावून माढा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात असून रात्रीच्या वेळीही गाण्यांचा आवाज मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या रूग्णांसह, नवजात शिशुंना यांचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून हॉर्नचा आवाजही ऐकु येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. ट्रॅक्टरवरील मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे होणारा गोंधळ आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर‌ कारवाई करणे गरजेचे असताना माढा पोलिस ठाण्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ट्रॅक्टर चालकांची मुजोरी वाढत असल्याने पोलिस प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलिसांनी चालकांवर कडक कारवाई करावी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिवसा आणि रात्रीच्या वेळीही मोठ्या आवाजात गाणी लावत असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोलिस प्रशासनाने अशा ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करावी. -अनिल दोशी ,व्यापारी,माढा.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:49 am

बार्शी बाजार समिती सभापतीपदावर यंदाच्या वर्षी ग्रामीणला मिळणार संधी:बार्शीकरांनी सर्वाधिक काळ भूषवले होते सभापतीपद‎

शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून काम करणारी संस्था अशी ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद हे सहकारी संस्था मधील एक महत्वाचे पद आहे. सोलापूर जिल्हयातील सोलापूर पाठोपाठ दुसरी मोठी बाजार समिती म्हणून नावलौकिक असलेल्या या बाजार समितीचे सभापती पद बार्शी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भूषविले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीने बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. बार्शी तालुक्यातील जनतेला आता २० वा सभापती कोण होणार ? याची उत्सुकता लागून राहिली आहे. दि ९ जुलै १९४७ रोजी शेकापचे नेते नरसिंग तात्या देशमुख यांच्या पुढाकारातून बाजार समितीची स्थापना झाली. त्यानंतर ३ मार्च ४८ रोजी ग.रा. झाडबुके हे बाजार समितीचे पहिले सभापती म्हणून विराजमान झाले. त्यानंतर बार्शी शहरासह तालुक्यातील विविध गावांतील मान्यवरांनी हे पद भूषविले आहे. एकेकाळी बार्शीतील ऐनापूर मारूती मंदिर परिसरात असलेली ही बाजार समिती नंतरच्या कालावधीत शहरातील तुळजापूर रस्त्याशेजारी विस्तीर्ण परिसरात विस्तारली. बार्शी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार ४२ एकराचा असून शहरालगत जामगाव रस्त्याशेजारी ३० एकर व उपबाजार असलेल्या वैराग येथे २५ एकर क्षेत्रात बाजार समितीचा कार्य विस्तार आहे. गणपतराव रा. झाडबुके, बार्शी (३/३/४८ ते २२/४/५२) दिगंबर वा.नारकर, पांगरी (१५/७/५२ ते २३/९/५५) कृष्णात डंबरे, आगळगाव (२४/९/५५ ते १८/१०/५६) ज.अ.पवार (१९/१०/५६ ते २७/१०/५७) म.आ. कानडे (२८/१०/५७ ते २४/४/५९) दिगंबर रा. मोहिते, वैराग (२५/४/५९ ते १०/८/६०) नरसिंग ता.देशमुख, बार्शी (११/८/६० ते २०/९/६१) लक्ष्मण बं.काशीद, पिंपरी सा (२१/९/६१ ते २७/९/६२) रामकिसन खंडेलवाल, बार्शी (२८/९/६२ ते २७/११/६३) कल्याणराव पाटील, उपळाई (२८/११/६३ ते २६/८/७१) शंकरराव म.झाडबुके, बार्शी (२७/८/७१ ते २/१/७५) दिनकर रा.करंडे, सासुरे (३/१/७५ ते १८/२/७७) गणपत भ.करडे, कांदलगाव (१९/२/७७ ते २/८/८२) भीमराव ल.मुंढे, चुंब (३/८/८२ ते १८/५/८४) शरद वा.हवेली, कारी (५/५/८६ ते १९/ ३/९०) प्रकाश कृ.गुंड, लाडोळे (२०/३/९० ते २९/८/९४) भागवतराव रा.गिराम, ममदापूर (३०/८/९४ ते १०/११/०३) आ.दिलीप गं.सोपल, बार्शी (११/११/०३ ते ११/९/१६) रणवीर रा.राऊत, बार्शी (२४/७/१८ ते २३/७/२४) Share with facebook बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात २४९ आडत गाळे, १५३ शॉपिंग सेंटर गाळे, २२० प्लॉट, फळे व भाजीपाला शॉपीग सेंटरचे ८२ गाळे, जामगाव रस्त्याशेजारी शॉपींग सेंटर ३० गाळे, उपबाजार वैराग येथे ६० आडत गाळे, शॉपिंग सेंटरचे ७२ गाळे, १०३ प्लॉट आहेत. भव्य गोडावून, क्लिनिंग मशीन, कोल्ड स्टोअरेज अशा विविध सोयीसुविधा येथे आहेत. बाजार समितीची वार्षिक १२०० ते १५०० कोटी उलाढाल आहे. जिल्ह्यातील दुसरी मोठी बाजार पेठ म्हणून या बाजार समितीची ओळख आहे. १२ ते १५ कोटी रूपये बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न आहे. अशी मोठी उलाढाल असलेल्या या बाजार समितीचे आगामी सभापती कोण याची चर्चा सुरू आहे. राऊत गटातून निवडून आलेले विजय गरड, प्रभाकर डमरे, सुरेश गुंड, अजित बारंगुळे यांची नावे चर्चेत असली तरी पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय गरड हेच सभापती पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. स्थापनेपासूनच आजपर्यंतचे सभापती

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:48 am

विद्यार्थ्यांनी पालक अन् शिक्षकांचा नेहमी आदर राखणे अत्यंत आवश्यक

आजच्या सोशल मीडियाच्या काळात नवनवीन येणाऱ्या विविध ॲप्सचा वापर विद्यार्थ्यांनी जपून व समजून करावा. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे खरे आधारस्तंभ म्हणजे त्यांचे आईवडील असून, विद्यार्थ्यांनी नेहमीच त्यांचा आदर करावा. तसेच शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असल्याने त्यांचाही आदर राखणे तितकेच आवश्‍यक आहे.', असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक गिरीश वमने यांनी केले. अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन “नात्यातील गोडवा” या संकल्पनेवर उत्साहात पार पडले. आयुष्यात नात्यांचे महत्त्व आणि ज्येष्ठांचा आदर, सन्मान आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे उलगडून दाखवले. मैत्रीचे नाते, बहिण-भावाचे अतूट बंध, आई-वडिलांचे प्रेम तसेच आजी-आजोबांचे मोल विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य व भावनिक सादरीकरणातून मांडले. या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षक व पालकांची मने जिंकली. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक गिरीश वमने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, गौरव फिरोदिया, विश्‍वस्त ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाच्या सदस्या पुष्पा फिरोदिया, सुनीता मुथा, मीना बोरा आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वतःसमोर असणाऱ्या आव्हानांबाबत वमने म्हणाले, पोलीस सेवेतील कर्तव्याला कोणताही ठराविक वेळ नसतो. पोलीस अधिकारी हे चोवीस तास कर्तव्यावर असतात. समाजाच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सेवा देताना येणाऱ्या जबाबदाऱ्या व त्याग याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. कमी वयात विद्यार्थ्यांवर अधिक जबाबदारी टाकू नका, असा सल्ला पालकांना देऊन, व्यवहार ज्ञान, सायबर क्रार्इम व डिजीटल अरेस्ट बद्दल सावधानता बाळगण्याची माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाची यादी वाचन केदारी आनंदी व पोटे ध्रुवी या विद्यार्थिनींनी केले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन नमन समृद्धी व शहा साची यांनी केले, तर आभार वरद लोखंडे व श्रावणी देशमुख या विद्यार्थ्यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:42 am

हजारो भाविकांनी घेतले माऊलींच्या पैस' खांबाचे दर्शन:नेवासे शहरात भाविक वारकऱ्यांची मोठी गर्दी, भाविकांना महाप्रसादाचे वाटप‎

सफला एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांब मंदिरामध्ये सोमवारी हजारो भाविकांनी पैस खांबाचे दर्शन घेतले. यावेळी शेकडो दिंड्यांनी येथे ज्ञानोबा माऊली तुकारामअसा गजर करत हजेरी लावली. सफला एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक हभप देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवेकरी एकनाथ लष्करे व रुख्मिनी लष्करे या यजमानांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबाला अभिषेक करण्यात आला. यावेळी झालेल्या पहाटेच्या पूजेप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सफला एकादशीला दूरवरून दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदिराच्या विश्वस्त मंडळींनी स्वागत केले. यावेळी खेड्यापाड्यातून पायी आलेल्या व दिंडीतील चालकांचा देविदास महाराज म्हस्के, विश्वस्त कृष्णा पिसोटे, कैलास जाधव यांच्या हस्ते श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. एकादशीचे औचित्य साधून माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिरातील विठ्ठल रुख्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली पैस खांब, भगवान दत्तात्रय, करविरेश्वर, बन्सी महाराज तांबे समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सफला एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर गर्दीने गजबजून गेला होता. विविध स्टॉल मंदिर परिसरात उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते. रात्री अंमळनेर येथील हभप दत्तात्रय महाराज आयनर यांचे हरिकीर्तन झाले. कीर्तनाला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. सेवेकरी एकनाथ लष्करे यांच्यावतीने उपस्थित भाविकांना शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात आले. नेवासे शहरातील भाविकांनीही मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी येथे घेण्यात येत होती. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी सफला एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर परिसर गर्दीने गजबजून गेला होता. विविध स्टॉल मंदिर परिसरात उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते. नेवासे शहरासह तालुक्यातील अनेक गावांतील भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. नेवासे शहरातील भाविकांनीही मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:41 am

नरभक्षक बिबटे ठार मारण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना बंदूक परवाने द्या:बिबट्यांपेक्षा माणसांचे प्राण मौल्यवान, कायद्यात बदल करण्याची मागणी‎

संगमनेर तालुक्यात बिबट्यांमुळे अनेकांचे बळी गेले, तरीही शासनाला याची गंभीरता नाही. बिबट्यांची नसबंदी करावी, अशी मागणी आम्ही सातत्याने केली. केंद्रीय वनमंत्र्यांशीही चर्चा केली; मात्र ‘बिबट्या दुर्मिळ आहे’ असे सांगत नसबंदीला नकार देण्यात आला. माणसांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली. तालुक्यातील जवळे कडलग येथील सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने संगमनेर तालुका हादरला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आमदार तांबे यांच्या नेतृत्वाखाली बसस्थानकापासून प्रांत कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते. शहरासह ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलनात मयत सिद्धेशचे वडील सूरज कडलग व त्याचे लहानगे मित्रही सहभागी झाले होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. आमदार तांबे म्हणाले, बिबट्यांपेक्षा माणसांचे प्राण अधिक मौल्यवान आहेत. यासाठी कायद्यात बदल करा ही भूमिका आम्ही ठामपणे मांडत आहोत. सरकार असंवेदनशील असून कायद्यात तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसाय आहे. चारा काढणे, शेतात पाणी भरणे यासाठी शेतकऱ्यांना रोज शेतात जावे लागते. बिबट्यांच्या दहशतीतही उपजीविकेसाठी ही कामे करावी लागत असल्याचे वास्तव तांबे यांनी मांडले. डॉ जयश्री थोरात म्हणाल्या, मी राजकीय पक्षाची कार्यकर्ती म्हणून नाही तर एक आई म्हणून आलेली आहे. ज्यांचे मुले मृत झाले त्यांची काय अवस्था आहे. हे प्रशासनाने समजून घ्यावे. थोडी तरी संवेदनशीलता दाखवा, असे आवाहन केले. आंदोलकांचा रोष पाहून प्रांतांनी स्वीकारले निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे निवेदन स्वीकारण्यासाठी समोर न आल्याने सकाळी साडेअकरापासून दीड वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. अधिकाऱ्यांच्या मुजोर भूमिके मुळे आंदोलनकर्त्यांचा संताप वाढला होता. आमदार तांबे यांनी जोपर्यंत प्रांत अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी येणार नाही तोपर्यंत आम्ही येथे बसून राहणार. तसेच सर्व कार्यकर्ते प्रांताधिकारी कार्यालयात प्रवेश करतील, असा इशारा दिला. आमदार तांबे व आंदोलकांचा रोष पाहून प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी कार्यालयातून खाली येऊन निवेदन स्वीकारले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:41 am

छत्रपतींच्या जय जयकाराच्या घोषणांनी दणाणला चौक:शहरातील प्रोफेसर चौकात दिमाखदार सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण,

अहिल्यानगर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा राहिल्याने प्रत्येकाला मनापासून आनंद झाला आहे. नगर शहरात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम झाले आहे. पुतळे हे प्रेरणा देणारे व शहराची ओळख निर्माण करणारे स्मारके आहेत. या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भरच पडली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात मनपातर्फे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्राथमिक अनावरण सोमवारी आ. जगताप यांनी पूजा करून केले. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, माजी उपमहापौर गणेश भोसले, पुतळा कृती समितीचे अजिंक्य बोरकर, सतीश बारस्कर, मराठा महासंघाचे सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या स्वाती जाधव आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपतींच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा दिल्या. आ. जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्यावर आक्रमण करणारे हे त्यावेळचे दहशतवादीच होते. आता असे अनेक दहशतवादी आजही देशावर हल्ला करत आहेत. दोन्ही छत्रपतींनी जिहाद्यांच्या विरोधात केलेला संघर्ष कायम लक्षात ठेवा. आपण छत्रपतींच्या विचाराचे मावळे आहोत. हिंदुत्वाची व स्वराज्याची कास धरून आपणही ही दहशतवादी जिहादी वळवळ बंद व्हावी यासाठी त्यांच्या विरोधात संघर्ष करू. छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर काम करून त्यांचे स्वराज्याचे कार्य आपण सर्वांनी पुढे नेऊ. त्या जिहादी दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चार ओळी जरी वाचल्या तरी त्यांच्या परिवर्तन होईल. अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी व अनावरण होणे हा सर्वात आनंदाचा क्षण व सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. हा सोहळा प्राथमिक अनावरण सोहळा आहे. स्वागत सुरेश इथापे यांनी केले. अनिल मोहिते, गणेश कवडे, ज्योती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी, तर आभार अजिंक्य बोरकर यांनी मानले. शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरण प्रसंगी आ.संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, संपत बारस्कर, अनिल मोहिते,अजिंक्य बोरकर व सुरेश इथापे. आज दिमाखदार सोहळ्याने पुतळ्याचे लोकार्पण मंगळवारी, १६ डिसेंबरला सकल मराठा व सकल शिवप्रेमींच्या वतीने दिमाखदार सोहळ्याने या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. धर्मरक्षक संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला आंदोलन केले राजू ससे यांनी उपोषण केले. तत्कालीन नगरसेवक कैलास गिरवले यांनी मनपात ठराव केला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनेही मागणी केली गेली. आता सर्वांची इच्छा व स्वप्न पूर्ण झाले आहे, असे आ. जगताप म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:40 am

छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात:धनगरवाडी शिवारात खड्डे बुजवण्याची मोहीम, एकेरी रस्त्यामुळे कोंडी‎

अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या महत्त्वाच्या महामार्गावरील रखडलेल्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पुन्हा प्रारंभ झाला आहे. जेऊर टोलनाका ते डोंगरगण फाटा या टप्प्यातील खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. शेंडी बायपास ते वडाळा या सुमारे ३४ किलोमीटर अंतराच्या टप्प्यात अवजड वाहनांच्या सातत्यपूर्ण वाहतुकीमुळे महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या मार्गावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघातांचाही धोका वाढला होता. या पार्श्वभूमीवर मध्यंतरी मुख्यमंत्री यांनी महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र, जेऊर टोलनाका ते धनगरवाडी शिवार या परिसरात महामार्गाची स्थिती अत्यंत बिकटच राहिली. रस्त्यावरील खड्डे, उखडलेला डांबराचा थर आणि धुळीचे साम्राज्य यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अखेर या परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर संबंधित यंत्रणांना जाग येऊन दुरुस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. वडाळा ते शेंडी बायपास या टप्प्यातील खड्डे बुजवण्याचे काम ऐन दिवाळीत सुरू करण्यात आले होते. मात्र, कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वारंवार केल्या. काही ठिकाणी खड्डे बुजवल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा तेथे खड्डे पडले. परिणामी नागरिकांचा रोष वाढला आणि अखेर काही काळासाठी दुरुस्तीचे काम बंद ठेवण्यात आले होते. सध्या या टप्प्यात पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम यावेळी दर्जेदार व्हावे, तसेच भविष्यात पुन्हा खड्डे पडू नयेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. संबंधित यंत्रणांनी कामावर काटेकोर देखरेख ठेवावी, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या टप्प्यात काम सुरु जेऊर गावाजवळ बंद पडलेल्या टोलनाक्यापासून धनगरवाडी शिवारातील डोंगरगण फाट्यापर्यंत नगरकडे येताना महामार्गाची अवस्था अतिशय खराब होती. या अडीच किलोमीटर अंतराच्या टप्प्यात मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:39 am

ईव्हीएमच्या स्ट्राँग रुम परिसरात जामरला नकार:मनमाड नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांचे उपोषण स्थगित मात्र उच्च न्यायालयात जाणार‎

मनमाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या आहेत त्या परिसरात जामर लावावे, या मागणीसाठी उमेदवारांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण सोमवारी स्थगित करण्यात आले. सोमवारी दुपारी मनमाड पालिका प्रशासनाने याबाबत उपोषणकर्त्यांना लेखी पत्र दिले. तेथे सीसीटिव्हीसह आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना केल्या आहेत. उमेदवारांना पहारा देण्यासाठी तेथे २४ तास बसण्याचीही व्यवस्था केलेली असल्याची माहिती या पत्रात दिली आहे. मात्र स्ट्राँग रूम परिसरात जामर बसवण्याबाबत सूचना नाहीत. त्यामुळे आपण केलेल्या मागणीनुसार अशी कारवाई करता येणार नाही अशी, भूमिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लेखी कळवली. मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी हे पत्र उपोषणकर्त्यांना दिले. यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. परंतु पालिकेच्या या निर्णयामुळे समाधान न झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी या निर्णया विरोधात मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. २ डिसेंबरला मनमाड पालिकेची पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन पालिकेच्या आययुडीपी विभागातील वाचनालय इमारतीतील स्ट्राँग रूममध्ये ठेवले आहेत. या परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्याने येथे जामर बसवण्याची उमेदवारांनी लेखी पत्राद्वारे पालिकेकडे केली होती. तीन दिवसांपूर्वी हे निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने सर्वपक्षीय उमेदवारांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पालिका प्रवेशद्वारासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले होते. सोमवारी दुपारी पालिका मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पत्र उबाठाचे नाईक यांना दिले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:51 am

कोर्ट वाटपाचे हुकूमनामे सुलेहनाम्यांची नोंदणी करू नका:वकील संघ आक्रमक, कोर्टाचे आदेश थांबवण्याचे तहसीलदारांना अधिकारच नाही‎

दुय्यम निबंधक यांना कोर्ट वाटपाचे हुकुमनामे व सुलेह नामे नोंदणी न करण्याबाबत पत्र तहसीलदार सुनील सैंदाने यांनी दिले आहे. हे पत्र कोर्टाच्या आदेशाचा अवमान करणारे आहे. पत्राद्वारे तहसीलदार न्यायालयाच्या कामकाजाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित करत असून कामकाजावर आक्षेप नोंदविण्याचा कोणताही अधिकार नसताना नांदगाव येथे हा प्रकार झाल्याने नांदगाव वकील संघाने प्रशासनाला निवेदन देत या आदेशाचे पत्र मागे घेण्याची मागणी केली. यावेळी वकील संघामार्फत दिलेल्या निवेदनात दुय्यम निबंधकांना दिलेल्या पत्रात वकील वर्गाचे कामकाजाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर बाब वकिलांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कोर्ट वाटप व हुकुमनामे व सुलेह नामे नोंदविण्याच्या कार्य पद्धतीबाबत तहसीलदारांनी अधिकार क्षेत्राच्या कक्षा वाढविल्याचे दिसून येते. असा आक्षेप घेण्यात आला आहे. कोर्टात वाटप दावे पक्षकारांचे संमतीने सुलेहनामे दाखल करून त्याची योग्य ती सुनावणी घेवून व पक्षकारांचे जबाब घेवून व ते पडताळून त्यावर कोर्ट हुकूमनामा पारित करीत असते. कायदेशीर प्रक्रिया राबवून निर्णय होत असल्याने तहसीलदारांनी आपले पत्र मागे घ्यावे. तसेच पत्र मागे घेतले जात नाही तोपर्यंत तहसीलदारांकडे दाखल न्यायिक अर्धन्यायिक प्रकरणांत, ज्या प्रकरणांत वकीलपत्र दाखल आहेत त्या सुनावण्या घेऊ नयेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण बिन्नर, सौरभ कासलीवाल, युनूस शेख, विजय रिंढे, बी आर चौधरी आणि वकील संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:46 am

घरगुती इलाजांत आजारांवर मात करण्याची क्षमता:आयुर्वेदचार्य स्वागत तोडकर यांनी वडनेर भैरव युथ फेस्टिव्हल समारोपप्रसंगी व्यक्त केले मत‎

घरगुती इलाजांमध्ये मोठ्या आजारांवर मात करण्याची क्षमता आहे. भारतीय ऋषींमुनींनी आयुर्वेदाच्या माध्यमातून दिलेल्या ज्ञानाचा आपण वापर करायला हवा, असे मत आयुर्वेदचार्य स्वागत तोडकर यांनी व्यक्त केले. येथील मंजुळा मंगल कार्यालयात वडनेर भैरव युथ फेस्टिव्हल समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी ‘आयुर्वेद व आरोग्य’ याविषयी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे फक्त शरीर असते. पैसा नाही. यासाठी शरीराकडे लक्ष देऊन नैसर्गिक जीवनशैलीचा आपण अंगीकार करायला हवा. आज माणूस हसणं विसरला आहे. व्यायाम करत नाही. त्यामुळे अनेक रोग वाढत आहे. यासाठी साधे साधे घरगुती इलाज आहे. ते करून बघावेत. यावेळी आपल्या आसपास, शेती मातीत येणाऱ्या अनेक वनस्पती चा शरीरासाठी व विविध आजारासाठी काय उपयोग आहे, हे सांगितले. आयोजन सलादे बाबा प्रतिष्ठान वडनेर भैरव व ग्रामपालिका यांच्या वतीने करण्यात आले होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते नाथ उपदेशी सलादे बाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरपंच रावसाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक वडनेर भैरव फेस्टिवल प्रमुख सुरेश सलादे यांनी केले. सूत्रसंचालन कवी सुभाष पवार यांनी केले. वडनेर भैरव भूषण विजय शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला. फेस्टिवलसाठी योगदान देणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर एन. डी. माळी, मनोहर पाटोळे, अॅड. पोपटराव पवार, राजाभाऊ भालेराव, धोडंबे येथील सुरेश उशीर, नंदू मोहिते,रामकृष्ण जमधडे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:46 am

रामनगर पळशीचे पुनर्वसन रखडले; ग्रामस्थांकडून जलसमाधी आंदोलन:उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तूर्तास माघार‎

रामनगर पळशी गाव अंजना पळशी प्रकल्पामुळे विस्थापित झाले. १९९६ पासून पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक आंदोलने झाली. प्रशासनाने आश्वासने दिली, पण अंमलबजावणी नसल्यामुळे सोमवारी (दि. १५) ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी आंदोलन केले. सोमवारी सकाळी सरपंच कारभारी खुर्दे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ अंजना पळशी प्रकल्पावर पोहोचले. पारंपरिक वाद्य वाजवत आंदोलन सुरू झाले. सरपंचांसह कैलास कान्हू खुर्दे, आकाश शेळके, विष्णू तायडे, रामहरी सोनवणे, बाळू निकम, रमेश गायकवाड, रघुनाथ खुर्दे पाण्यात उतरले होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ पाठवले. प्रभारी तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, मंडळ अधिकारी ए.के. पटरे, सिंचन विभागाचे सहायक अभियंता आर.आर. डोंगरे, पंचायत समितीचे एच.एस. कोलमवाड, तलाठी एस.जी. मोरे, ग्रामसेवक डी.एस. गुंजाळ शिष्टमंडळात होते. स्मशानभूमी, दफनभूमी, गावांतर्गत रस्ते, नाल्या, पथदिवे नाहीत. दोन वेळा उपोषण, रस्ता रोको आंदोलन केले. विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व विभागांची एकत्रित बैठक घेतली, तरी प्रश्न सुटला नाही. दफनभूमी नसल्याने खासगी जमिनीवर अंत्यविधी केल्या जातो. ^चार वेळा भुमि अभिलेख विभागाच्या वतीने जमीन मोजणी झाली. प्रत्येक मोजणीत वेगवेगळी जमिन दाखवण्यात येते. पक्के घरे, रस्ते, कसत असलेली शेतजमीन अतिक्रमण म्हणून दर्शविण्यात येते. त्यामुळे ग्रामस्थांत भितीचे वातावरण आहे. -ज्ञानेश्वर गायकवाड, ग्रामस्थ २२०० लोकवस्तीचे हे गाव आहे. १९९६ ला अंजना पळशी प्रकल्पात गेल्याने गावाचे कागदोपत्री ६५ एकरवर पुनवर्सन करण्यात आले. शासनाने प्रत्यक्षात ५२ एकर जमीन दिली. डोंगराळ व खड्डे असलेल्या जमिन आहे. जमिन कमी मिळाल्याने विवाद निर्माण झाला आहे. भुमि अभिलेख विभागाने चार वेळेस मोजणी केली. मोजणीसाठी सरपंच खुर्दे यांनी स्वतः सहा लाख रुपये खर्च केले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या जागेवर सिमा व मार्कींग झाले आहे. ग्रामस्थांत भीतीचे वातावरण बुधवारी सबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक होणार आहे. यात प्रश्नावर चर्चा होईल. सर्वांना मान्य होईल, असा तोडगा काढला जाईल. यानंतर रितसर गावाचे पुनर्वसन होईल. गावाचे कागदोपत्री ६५ एकरवर पुनवर्सन

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:33 am

खुलताबाद तालुक्यात गहू-मक्याचे क्षेत्र वाढले:उशिरा झालेल्या पावसाचा परिणाम; रब्बी पेरणीचा 70 टक्के टप्पा पार‎

खुलताबाद तालुक्यात यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त आणि दीर्घकाळ पाऊस झाला. त्यामुळे जमिनीत भरपूर ओलावा टिकून आहे. याच पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातील पेरण्या काहीशा उशिरा सुरू झाल्या. तरी आतापर्यंत ७० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४९,६३६ हेक्टर आहे. त्यापैकी २०,३०८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. यंदा गहू आणि मका या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ज्वारी आणि करडीच्या लागवडीत घट झाली आहे. पावसामुळे विहिरी, नद्या, नाले आणि तलाव भरले आहेत. त्यामुळे जमिनीत अजूनही ओलावा आहे. परिणामी, पेरणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. उर्वरित क्षेत्रावर पेरणी जमिनीचा ओलावा कमी झाल्यावर होणार आहे. काही भागांत अजूनही कापसाचे पीक शेतात उभे आहे. त्यामुळे पेरणीस उशीर होत आहे. कापूस काढल्यानंतर गहू आणि मका पेरले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी यंदा पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. २०२४ मध्ये रब्बी हंगामात १७,२९८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यात गहू ५,६८६, मका २,९५६, हरभरा ३,०६८, ज्वारी २,७२६, कांदा १,१९९, बटाटा ४४५.९०, टोमॅटो ५०४ आणि करडी ६ हेक्टरवर होती. उशिरा पेरणी झाल्यास गहू उत्पादन घटण्याची शक्यता खरीप हंगामातील मका काढणी पूर्ण झाली आहे. मात्र, सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांचा कापूस अजूनही शेतात आहे. त्यामुळे उर्वरित रब्बी पेरणी कापूस काढल्यानंतरच होणार आहे. ती काहीशी उशिरा पूर्ण होण्याची शक्यता आहे, पण गव्हाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करणे योग्य असते. उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात घट येते आणि तांबेरा रोगाचा धोका असतो. २०२५ मध्ये आतापर्यंत १३,३९२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात गहू ५,२६९, मका २,९५७, हरभरा २,३९०, ज्वारी १,४६१, कांदा ५०८, बटाटा १३१, टोमॅटो ३०२ आणि करडी ३ हेक्टरवर आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:32 am

ज्ञानेश्वरीतून विज्ञान, इतिहासाबरोबर भूगोलाचाही उलगडा- शर्मा महाराज:शफेपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहात महाराजांनी दिला हितोपदेश‎

शफेपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रारंभी धर्म मंडपात हभप समाधान महाराज शर्मा यांनी कीर्तनातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. रंगदेवतेसोबत माऊली विराजमान झाल्याचे दृश्य पाहून हृदय भरून आल्याचे त्यांनी सांगितले. शर्मा महाराज म्हणाले, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने समाजासाठी जलसमाधी घेतली. त्यातूनच वारकरी संप्रदायाचा पाया घातला गेला. निवृत्ती, सोपान, मुक्ताई यांना समाजाने स्वीकारले. माऊलींनी ज्ञानेश्वरीतून भाषेचा उद्धार केला. ज्ञानेश्वरीत भूगोल, इतिहास, विज्ञान, रसायनशास्त्र सर्व काही आहे. मनापासून वाचन केल्यास ज्ञानेश्वरी समजते. शफेपूरला रविवारपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी शर्मा महाराजांचे कीर्तन झाले. यावेळी ते म्हणाले, मराठी ही जगातील सर्वात श्रीमंत भाषा आहे. अ पासून ज्ञ पर्यंत नेणारी ही मायबोली आहे. इंग्रजी ए फॉर ॲपल पासून झेड फॉर झेब्रा म्हणजे गाढवपर्यंत जाते, अशी मार्मिक टिप्पणी त्यांनी केली. ज्ञानेश्वरांनी रस्त्यावर भीक मागण्यापासून विश्वात्मके देवे येणे वाघे द्यावे इथपर्यंतचा प्रवास केला. हे सांगताना श्रोत्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. काहींनी हुंदके देत भावना व्यक्त केल्या. महाराजही भावनाविवश झाले. पंक्तीत गरीब मुलगा बसला तर त्याला पोटभर जेऊ द्या, हाकलू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. माऊलींनी सामान्यांसाठी हरिपाठ सोपा व सरळ केला. यावेळी गायनाचार्य हभप एकनाथ महाराज शेलार, हभप राजू महाराज मोकासे, हभप सोपान महाराज सुरडकर, हभप रामदास महाराज मोकासे, भानुदास महाराज सुरडकर, हभप ज्ञानेश्वर दवंगे, नंदू महाराज सुरडकर, हभप गोविंद सुरडकर, हभप चंद्रभान नवले, हभप रामू आप्पा नवले, कृष्णा महाराज मोकासे, तुकाराम महाराज मोकासे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनाचे प्रायोजक संजय निकम व उमेश मोकासे यांनी महाराजांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. शफेपूर येथील सप्ताहामध्ये शर्मा महाराजांचे कीर्तन झाले. यावेळी उपस्थित भाविक. आज व्याख्यान, कीर्तन आज, मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत हर्षदाताई ठाकूर यांचे व्याख्यान होईल. रात्री साडेआठ ते अकरा या वेळेत हभप विशाल महाराज खोले यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:31 am

अजिंठा वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड; जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर:वाळलेल्या झाडाच्या नावाखाली हाेते हिरवीगार झाडांची कत्तल‎

अवैध वृक्षतोडीमुळे सिल्लोड तालुक्यातील विस्तीर्ण अजिंठा वनपरिक्षेत्रातील जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने इलेक्ट्रॉनिक कटर मशीनचा वापर करून अवैध वृक्षतोडीचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. वाळलेल्या झाडांच्या नावाखाली हिरवीगार झाडांची कत्तल वातावरण बदलासाठी कारणीभूत ठरत आहे. परिणामी वनसंपदेसह वन्यजीवांचाही ऱ्हास होत असल्याची चिंता वन्यप्रेमींकडून व्यक्त होत आहे. अतिशय संवेदनशील अजिंठा वनपरिक्षेत्र तब्बल ऐंशी किमी व्यासाने वेढलेले आहे. या जंगलात चंदन, साग, लिंब, जांभूळ, वड, सिसम, पळस, मोह आदी वनसंपदा लाभली आहे. वाघ, बिबटे, रानडुक्कर, मोर, नीलगाय, हरीण या वन्यजीवांचा वास येथे आहे. परिसरातील अंभई, उंडणगाव, अजिंठा, फर्दापूर, नाटवी, आमसरी, वडाली, टाका यांच्या जंगलातून सर्वाधिक वृक्षतोड होत आहे. अत्याधुनिक धारदार इलेक्ट्रॉनिक शस्त्राचा वापर करून पाच मिनिटांत एक महाकाय झाड जमीनदोस्त करून पुरावा नष्ट केला जात आहे. वृक्षतोड अशीच सुरू राहिली तर या चार वर्षांच्या काळात वनसंपदा पूर्णपणे नष्ट होण्याचा अंदाज वन्यप्रेमींनी बांधला आहे. संतोष दोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजिंठा Q.अजिंठा वनपरिक्षेत्रात वृक्षतोड सुरू आहे का? A. आमचे पथक गस्तीवर आहे, तसा काही प्रकार नाही. Q. झाडांची गणना केली आहे का? A. नाही. Q. अवैध वृक्षतोड सुरू नाही, मग जंगले ओसाड का झालीत? A. काहीच नाही. Q. वैध वृक्षतोडीवर कारवाई होणार का? A. नक्कीच, अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ^शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध वृक्षांची लागवड केली जाते. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा संदेश दिला जातो. त्यावर लाखो रुपये खर्च होतात. दुसरीकडे मात्र सर्रास हिरव्या डेरेदार झाडांची अवैध वृक्षतोड होताना दिसते. मग याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? जे सामान्य नागरिकांच्या नजरेस पडते ते प्रशासनाला दिसत नाही का? अजिंठा वनपरिक्षेत्रात इन कॅमेरा पाहणी करावी व लाकूडमाफियांना अभय देणाऱ्या वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी. तसे निवेदन वन विभाग व वनमंत्री यांना देण्यात आले आहे. - मंगेश सनान्से, जिल्हाध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती गेल्या सात वर्षांपूर्वी नाटवीच्या जंगलात दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोडीचा प्रकार ग्रामस्थांनी हाणून पाडला होता. त्या वेळी तब्बल पाच ते सहा ट्रॅक भरेल एवढा माल सोडून लाकूडतोड पसार झाली होती. त्यानंतरही वन विभागाकडून कुठलीच कारवाई झाली नाही.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:31 am

शेवग्याला तब्बल 500 रुपये प्रतिकिलोचा भाव:अतिवृष्टीने उत्पादन घटले, नागरिकांना फटका‎

मराठवाड्यात जेवणात काळ्या मसाल्याच्या आमटीसाठी शेवग्याला मोठी मागणी असते. पण सध्या शेवगा सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. किरकोळ बाजारात दर प्रतिकिलो ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. ठोक बाजारातही दर ४०० रुपये किलोवर गेले आहेत. मागील काही दिवसांपासून दर सातत्याने वाढत आहेत. अतिवृष्टी, थंडी आणि कीडरोगामुळे राज्यात शेवग्याचे उत्पादन घटले आहे. ग्रामीण भागातून शेवग्याचा पुरवठा थांबला आहे. सध्या तामिळनाडू आणि ओरिसामधून शेंगा येत आहेत. राज्यात स्थानिक उत्पादन सुरू होण्यासाठी अजून १५ दिवस लागतील. तोपर्यंत दर ५०० रुपयांवर राहण्याची शक्यता आहे. बाजारात मागणी कायम आहे. मात्र दर वाढल्याने विक्री कमी झाली आहे. विक्रेत्यांनी सांगितले की, आठवड्यात एखादाच कॅरेट मिळतो. त्यामुळे दर वाढत आहेत. ग्राहक मात्र अडचणीत सापडले आहेत. “शेवगा घ्यायला गेलं की सोनं विकत घेतोय असे वाटते,” अशी प्रतिक्रिया एका गृहिणीने दिली. फक्त शेवगाच नाही, तर वांग्याचे दरही वाढले आहेत. शेवगा हा पौष्टिक, औषधी आणि आरोग्यवर्धक भाजीपाला आहे. त्यामुळे त्याला कायम मागणी असते. मात्र यंदा अतिवृष्टी, कीडरोग आणि बागांचे नुकसान यामुळे उत्पादन कोसळले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:30 am

वीज गायबमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात:शेतकऱ्यांचा सिल्लोडमध्ये अभियंत्याला घेराव

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ परिसरात गेल्या आठ दिवसांपासून वीजपुरवठा अनियमित आहे. केऱ्हाळा सबस्टेशनअंतर्गत बोरगाव फिडरवरील भार वाढल्याने ही समस्या निर्माण झाली. रब्बी हंगामासाठी गहू पेरणी पूर्ण झाली. मात्र लाईट नसल्याने सिंचनासाठी मोटारी बंद पडत आहेत. काही शेतांमध्ये पाणी असूनही वीज नसल्याने गहू पीक कोमेजत आहे. रात्री अचानक लाईट जाणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, वारंवार लाईट ये–जा सुरू राहणे, यामुळे मोटारी, स्टार्टर आणि अन्य उपकरणांचे नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकरी आणि नागरिकांनी सिल्लोड येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. अभियंत्याला घेराव घालून संताप व्यक्त केला. फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त भार जोडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. नवीन कनेक्शन देताना नियोजन न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही महावितरणकडून उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी बोरगाव फिडरवरील भार तातडीने कमी करावा, पर्यायी फिडरवरून वीजपुरवठा सुरू करावा, तसेच शेतीसाठी ठरावीक वेळेत वीज द्यावी, अशी मागणी केली. महावितरणच्या अभियंत्यांनी भारवाढीमुळे तांत्रिक अडचणी असल्याचे मान्य केले. तातडीने दुरुस्ती, भारवाटप आणि पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. मात्र ठरावीक कालावधीत सुधारणा न झाल्यास तालुकास्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्रिंबक शेजूळ, मारोती भागवत, नारायण भोसले, संजय भोसले, कैलास भोसले, नारायण बडक यांनी दिला. मोठे, मुलतानी यांची आंदोलनस्थळी हजेरी ः शेतकरी व नागरिकांच्या या घेराव आंदोलनात अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इंद्रीस मुलतानी आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, मुलतानी यांनीही हजेरी लावली. वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून ही समस्या तातडीने सोडवावी, अशी ठाम मागणी त्यांनी महावितरणकडे केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण ठामपणे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:29 am

वांग्यावर फिलिप्स रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत:घाटनांद्र्यामध्ये कारभारी मोरे यांचे 30 गुंठ्यांतील वांग्याचे पीक गेले वाया‎

घाटनांद्रा परिसरात वांगे पिकावर फिलिप्स रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकरी कारभारी भिका मोरे यांनी यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मिरचीचे उत्पादन घेतले. त्यानंतर मिरची पिकावर नांगर फिरवून तीस गुंठे क्षेत्रावर वांगे लावले होते. पिक फुलोऱ्यात आले. फळधारणा सुरू होण्याच्या टप्प्यावर फिलिप्स रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे पिकाची वाढ खुंटली. पाने पिवळी पडू लागली. झाडे वाळू लागली. काही झाडे अचानक मरू लागली. झाडांना लागलेली फळे पिवळी पडून गळून जात आहेत. फळांमध्ये किडही निर्माण झाली आहे. त्यामुळे संपूर्ण वांग्याचे पीक मातीमोल झाले आहे. मोरे यांचे अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी वेळोवेळी कृषी दुकानातून सुचवलेली औषधी फवारली. मात्र अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. त्यामुळे पिकाची अवस्था दिवसेंदिवस खालावत आहे. काही ठिकाणी फळधारणा थांबली आहे. तयार झालेली फळे गळून पडत आहेत. वाढत्या खर्चामुळे आणि अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने मोरे हतबल झाले आहेत. घाटनांद्रा परिसरात वांगे पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे रोगाचा फैलाव इतर शेतकऱ्यांच्या पिकांवर होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, जमिनीतील ओलावा आणि कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे भाजीपाला पिके संकटात सापडली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्यांच्या शेतावर भेट द्यावी, रोगाचे नेमके कारण शोधावे, योग्य औषध फवारणी, खत व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतेय. कारभारी मोरे यांनी वांग्याचे पिक मिरची लागवड केलेल्या जमिनीत घेतले होते. मिरची पिकावर अगोदर मर रोगाचा प्रादुर्भाव होता. त्याच रोगाचा प्रादुर्भाव वांग्यावर झाल्याने मर रोगाची लागण झाली आहे. आपले नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड झालेल्या जमिनीत वांग्याची लागवड करताना काळजी घ्यावी. वांग्याची लागवड करताना काळजी घ्यावी ^लागवड करायची असल्यास अगोदरचे पूर्ण पीक व मल्चिंग काढून चांगले दर्जेदार व रोगमुक्त रोपे लागवड करावी. लागवडीपूर्वी रोपे ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लागवड करावी. - विष्णू बावस्कर , उप कृषी अधिकारी, सिल्लोड

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:28 am

फॉर्म्युला ठरला:सोलापूर मनपात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धवसेनाच मोठा भाऊ, काँग्रेस छाेटाच

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी सोमवारी दिली. सहभागी घटक पक्षांना २०१७ किती मते मिळाली त्यावर जागा देण्याचे ठरले, असेही सांगितले. त्यांच्या या निकषानुसार महाविकास आघाडीत मोठा भाऊ उद्धवसेनाच ठरणार आणि काँग्रेस दुसऱ्या स्थानी. कारण, गेल्या निवडणुकीत उद्धवसेनने २१ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने १४ जागा मिळवल्या. त्यानंतर राष्ट्रवादीने फक्त ४ जागा मिळवल्या. यंदा माकप महाविकास आघाडीत सहभागी झाला. गेल्या निवडणुकीत माकपला एक जागा मिळाली. तरीही माकपने २० जागांची मागणी ठेवली. माकपला हव्यात २० जागा महाविकास आघाडी कोणत्याही परिस्थितीत तुटणार नाही. त्याच्या माध्यमातून माकपसाठी २० जागांची मागणी करणार असल्याची माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. महाविकासची सत्ता आल्यास महापौरपदाचा कालावधी एक वर्षाचा करावा, अशी मागणी करू. त्याने प्रत्येक घटक पक्षाला संधी मिळेल. माकपचाही महापौर होऊ शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. महापालिका निवडणुकीविषयी त्यांनी दत्तनगर येथील कार्यालयात भूमिका मांडली. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास आघाडी होणे आवश्यकच होते. त्याची मोर्चेबांधणी झाली. २०१७ मध्ये ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली, त्याच्या उतरत्या क्रमानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. माकपची ताकद कमी असली तरी जिथे पक्षाचा प्रभाव आहे, तिथल्याच जागा मागणार आहोत. दत्तनगर, शास्त्रीनगर, भगवान नगर, बापूजीनगर, तालुका पोलिस ठाण या भागात पक्षाचे प्राबल्य आहेत. अशाच २० जागा मागणार, किमान १५ जागा मिळतील, अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. या वेळी पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य ॲड. एम. एच. शेख, माजी नगरसेविका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:23 am

मनपा निवडणूक मविआच्या अस्तित्वाची,भाजपसाठी नंबर वन होण्याची:27 मनपात भाजपने जिंकल्या हाेत्या 1099, शिवसेेनेने 489, काँग्रेसने 439, राष्ट्रवादीने 294 जागा

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत पडलेल्या मोठ्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-महाविकास आघाडीला, तर विधानसभेत भाजप-महायुतीचा मोठा विजय झाला. त्यानंतर आता या पक्षासमोर शहरी वर्चस्व दाखवण्याची संधी आली आहे. मतदार याद्यांतील घोळ, १ कोटी ६६ लाख ७९ हजार ७५५ लाडक्या बहिणींचा प्रभाव, मविआतील मित्रपक्षात अजूनही होत असलेली पडझड, तर दुसरीकडे महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेली धुसफूस आणि भाजपकडे अन्य पक्षातून आलेल्या इच्छुकांची संख्या वाढल्याने बंडखोरीची संख्याही तेवढीच वाढणार अशी चिन्हे असून या वातावरणात ही निवडणूक होत आहे. जालना, इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांसह मागील रखडलेल्या २७ अशा २९ महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असताना आता पुन्हा राज्यात शहरी वर्चस्वासाठी नंबर वन टिकवण्याचे आव्हान असलेल्या भाजपविरोधात अस्तित्व टिकवण्यासाठी महाविकास आघाडी अशी राजकीय लढाई सुरू झाली आहे. यात मोठ्या फुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना यांचा परफॉर्मन्स कसा राहील याची उत्सुकता लागून राहिली आहे. विशेषता मुंबईत उबाठा सेना किती मजल मारते यावर राज्याचे लक्ष आहे. गतवेळी भाजप १६, शिवसेना ५, काँग्रेस ५ ठिकाणी नंबर वन राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीत गतवेळच्या २७ महापालिकेत २७३६ जागा आहेत, त्यापैकी १०९९ भाजपकडे, ४८९ शिवसेनेकडे (एकत्र), २७४ काँग्रेस व २९४ राष्ट्रवादी (एकत्र) यांच्याकडे आहेत. गतवेळी भाजप १६, शिवसेना ५, काँग्रेस ५ ठिकाणी नंबर वन होते. त्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, जळगावसह १६ ठिकाणी भाजप क्रमांक एकचा पक्ष होता. गेल्या निवडणुकीत मुंबईत शिवसेनेने सर्वाधिक ८४ व ठाण्यात ६७ जागा मिळवून क्रमांक एक मिळवला होता, तर काँग्रेसने कोल्हापूर, परभणी व मालेगावात सत्ता मिळवली होती. एकत्रित असूनही पुणे गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ नवी मुंबईत क्रमांक एकमिळवता आला. त्यामुळे आता कुठला पक्ष मोठा होतो हे पहावे लागणार आहे. २८ महापालिकेत मतदाराला ३ ते ५ मते द्यावी लागणार मुंबई महापालिकेत एक सदस्य प्रभाग पध्दत असल्याने एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा आहे, त्यामुळे प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागणार आहे. उर्वरित २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत (पॅनेल) लागू आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असल्याने प्रत्येक मतदाराने किमान ३ ते ५ मते देणे अपेक्षित असणार आहे. मुंबईत २२७ पैकी निम्म्या जागांची शिंदेंची मागणी मुंबईत जवळपास २२७ पैकी निम्म्या जागांवर शिवसेना शिंदे गट मागणी करत आहे, ठाण्यात १३१ पैकी शिवसेनेच्या ६७ जागा आहेत. तेथे भाजपही ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नंबर वन असल्याने भाजप शिंदेसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवू शकतो. नाशिक, सोलापूर, जळगावसह अन्य महापालिकेत महायुती होण्याची चिन्हे आहेत. इच्छुक जास्त आणि जागा कमी अशी स्थिती आहे. त्यामुळे याबाबतचे गणितही सुटेल. मागील निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक वर्चस्व भाजप : मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मीरा-भाईंदर, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूरकाँग्रेस : भिवंडी, मालेगाव, कोल्हापूर, परभणी, नांदेड-वाघाळाशिवसेना : मुंबई, ठाणे, डोंबिवली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरराष्ट्रवादी : नवी मुंबईस्थानिक आघाडी : वसई-विरारकंट्रोल युनिट ४३ हजार ९५८निवडणूक निर्णय अधिकारी : २९०बॅलेट युनिट ८७ हजार ९१६सहा निवडणूक निर्णय अधिकारी : ८७०

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:00 am

महालक्ष्मी रेसकोर्सवर 295 एकरचे सेंट्रल पार्क:750 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सादरीकरण

मुंबई आणि ठाणे शहरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी महत्त्वाची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची १२५ एकर आणि कोस्टल रोडची १७० एकर अशी एकूण २९५ एकर जागा एकत्रित करून तिथे न्यूयॉर्कच्या धर्तीवर भव्य ‘सेंट्रल पार्क’ विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे ७५० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सादरीकरण प्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत केले. ​प्रशासकीय पारदर्शकतेवर भर देत शिंदेंनी स्पष्ट केले की, रेसकोर्सच्या ऐतिहासिक वारशाला धक्का न लावता हे “ऑक्सिजन पार्क’ सर्वसामान्यांसाठी खुले होईल. या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जमिनीखाली १० लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात विकसित होणारे मल्टी-स्पोर्टस कॉम्प्लेक्स. येथे खो-खो, कबड्डी यांसारख्या देशी खेळांसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक्वाटिक एरिना आणि बॉक्सिंग रिंग उभारले जातील. ​वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सेंट्रल पार्कला १२०० मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोड आणि मेट्रो-३ च्या “नेहरू विज्ञान केंद्र’ स्थानकाशी जोडले जाणार आहे. कोस्टल रोडवरील १२०० कार पार्किंगचा लाभही पर्यटकांना घेता येईल. दरम्यान, शिंदे यांनी ठाणे मनपावर ही पकड मजबूत ठेवण्यासाठी ही खेळी केल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे यावर ठाकरे गटासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यामुळे शिंदे यांनी केलेली ही घोषणा त्यांना निवडणुकीत किती तारणार हे १६ जानेवारी रोजी कळणार आहे. असा आहे दृष्टिक्षेपात प्रकल्प ​ठाणे टुरिझम हब होणार ​राजकीयदृष्ट्या हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारची मोठी खेळी मानली जात आहे. “आम्ही दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करतो,’ असे म्हणत शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईसोबतच ठाण्यालाही २६० मीटर उंच व्ह्यूइंग टॉवर, १८ किमीचा आनंदवन हरित पट्टा आणि स्नो पार्कच्या माध्यमातून जागतिक पर्यटन नकाशावर आणण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले असून आता ठाणे टुरिझम हब होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:53 am

राजस्थानातील ड्रग्ज कारखान्यावर छापा; 100 कोटींचे एमडी ड्रग्ज:रसायने जप्त, मुख्य सूत्रधारासह 11 जणांना बेड्या, महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी

महाराष्ट्र पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थानमध्ये धडक कारवाई करत एका आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. राजस्थानमधील झुंझुनू येथे सुरू असलेल्या एमडी (मॅफेड्रोन) ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे १०० कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात पोलिसांनी १० किलो ड्रग्ज, रसायने आणि निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त केले. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली असून याप्रकरणी आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या अवैध कारखान्यातून अनिल विजयपाल सिहाग नावाच्या व्यक्तीला रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. “हा कारखाना बेकायदेशीरपणे ड्रग्जचे उत्पादन करून ते महाराष्ट्रासह इतर राज्यांत पुरवत होता. या कारवाईत जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत १०० कोटींच्या घरात आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशी झाली कारवाई ४ ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्ह्यातील काशीगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ‘एएनसी’ने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला होता. त्या वेळी १ कोटींचे ५०१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करून ६ जणांना अटक केली होती. या तपासाचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत पोहोचले. गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना ४ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले.त्यांनी २० लाखांचे ड्रग्ज व वाहने जप्त केली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:46 am

एमबीबीएसला ॲडमिशन देण्याच्या बहाण्याने मुलीला सव्वा कोटीचा गंडा:फसवणूकप्रकरणी बाणेर ठाण्यात संशयिताविरोधात गुन्‍हा

जळगावातील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलसह महाराष्ट्रातील इतर महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका पालकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बाणेर ठाण्यात दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश गुप्ता आणि ब्रिजेश आर्या अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहे. याबाबत प्रवीण किशोर हलकरे (५२, रा. सिव्हिल वॉर्ड, रामनगर, चंद्रपूर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार हलकरे मूळचे चंद्रपूर येथील असून त्यांचा टीव्ही आणि संगणक विक्रीचा व्यवसाय आहे. १ नोव्हेंबर रोजी तक्रारदार हलकरे व पत्नीने फेसबुकवर एमबीबीएस प्रवेश मिळवून दिला जाईल, अशी जाहिरात पाहिली. मुलीला वैद्यकीय प्रवेश हवा असल्याने त्यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. संशयित गुप्ता याने पुण्यातील बाणेर येथील बालेवाडी फाट्याजवळील “तेजस इंटरनिटी’ येथे भेटण्यासाठी बोलावले. तिथे हलकरे यांनी राजेश गुप्ता आणि त्याचा साथीदार ब्रिजेश आर्या यांची भेट घेतली. संशयितांनी हलकरे यांना जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ‘डोनेशन’ म्हणून ३५ लाख लागतील आणि हे पेमेंट हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा दिली जाईल, असे आमिष दाखवले. टप्प्याटप्प्याने उकळले पैसे : तयार केलेले बनावट पत्र मुलीचा तक्रारदार हलकरे यांनी आरोपींच्या बाणेर येथील कार्यालयात ३ लाखांचा धनादेश दिला. नंतर आरोपींनी बनावट पत्र दिले. ६ डिसेंबर रोजी आरोपींनी हलकरे यांना जळगाव येथे बोलावून घेतले व सोबत ७ लाख आणण्यास सांगितले. संशयित हलकरे एका हॉटेलवर गेले आणि जळगावच्या मेडिकल कॉलेजचा अर्ज आणला. व मुलीची सही घेतली. दुसऱ्या दिवशी जळगाव येथील कॉलेजच्या ठिकाणी आरोपींनी हलकरे यांच्याकडून आणखी १० लाख घेतले. यानंतर वेळोवेळी पैस घेत १ कोटी २६ कोटींना गंडा घातला.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:45 am

मुंबई म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला मिळेल गती:20 एकरांवरील प्रकल्पांसाठी नवीन धोरण जाहीर

मुंबई आणि उपनगर क्षेत्रातील ५० ते ६० वर्षे जुन्या, मोडकळीस आलेल्या म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला दिलासा मिळाला आहे. रहिवाशांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधांनी युक्त आधुनिक इमारतींची निर्मिती करण्यासाठी शासनाने २० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळाच्या म्हाडा अभिन्यासांच्या एकत्रित/सामूहिक पुनर्विकासासाठी महत्त्वपूर्ण आणि ‘गेमचेंजर’ धोरण जाहीर केले आहे. यासंदर्भात सोमवारी गृहनिर्माण विभागाने शासन निर्णय जारी केला. प्रकल्पांना गती देण्यासाठी यापुढे वैयक्तिक संमतीपत्रे घेण्याची आवश्यकता नसेल. याऐवजी विकासकाला सहकारी संस्था अधिनियम, १९६० नुसार वैध गृहनिर्माण संस्थांचा सहमतीदर्शक ठराव सादर करणे बंधनकारक असेल. यामुळे रखडलेले प्रकल्प त्वरित मार्गी लागतील. अस्तित्वातील रहिवाशांना विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार कमाल/उच्चतम पुनर्वसन चटई क्षेत्रफळाच्या सदनिकांमध्ये पुनर्वसित केले जाईल. अडकलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळणार मुंबईतील म्हाडाच्या अनेक वसाहतींचे पुनर्विकास प्रकल्प वैयक्तिक संमतीपत्रांच्या अटीमुळे वर्षानुवर्षे रखडले होते. काही विरोधकांमुळे रहिवासी अडचणीत सापडले होते. ‘कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी’मार्फत पुनर्विकास करताना वैयक्तिक संमतीची अट रद्द झाली. संस्थेचा वैध ठराव पुरेसा ठरणार आहे. ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या इमारतींचाही समावेश ज्या इमारतींनी ३० वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही व जीर्ण झाल्या. किंवा प्रकल्प पूर्ण होण्याच्या वेळेस ३० वर्षे पूर्ण करेल. त्यांनाही सामूहिक पुनर्विकासात समावेशाची मंजुरी म्हाडा स्तरावर देण्यात येईल. निविदाद्वारे बांधकाम क्षेत्रफळ वितरणासाठी उच्चतम अधिमूल्य देणाऱ्या विकासकाची निवड करेल.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:44 am

20 लाख पर्यटकांची भेट:आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘महाअतिथी’ पोर्टल, आता एकाच क्लिकवर सर्व माहिती मिळणार

महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी अत्यंत दिलासादायक पाऊल पर्यटन विभागाने उचलले आहे. राज्यात दरवर्षी भेट देणाऱ्या २० लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांना एकाच क्लिकवर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी “महाअतिथी’ हे विशेष पोर्टल तयार करण्यात येत आहे. राज्य पर्यटन विभागाकडून लवकरच हे पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. पर्यटन विभाग या पोर्टलमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना हॉटेल, टुरिस्ट स्पॉट्स, ॲग्रो टुरिझम, स्थानिक खाद्यपदार्थ (लोकल फूड), होम स्टे अशा सर्व आवश्यक गोष्टींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच त्यांना घरबसल्या बुकिंगही करता येणार आहे. सध्या मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, तोरणमाळ याठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतात. ग्रामीण विकासाला चालना मिळाली ग्रामीण विकास आणि रोजगार निर्मिती राज्यातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. कृषी पर्यटनाचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीला पूरक असा व्यवसाय उपलब्ध करून देणे आहे. त्यामुळे गावातच महिला व तरुणांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. ग्रामीण विकासाला चालना मिळाली. ‘महाअतिथी’ पोर्टलमुळे माहितीचा अभाव दूर होईल आणि पर्यटन अनुभव अधिक सुखकर होईल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यास नक्कीच मदत होईल. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना घरबसल्या महाराष्ट्रातील पर्यटनाची माहिती मिळवता येणार आहे. बुकिंग करता येणार आहे. ॲग्रो टुरिझमकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा वाढतोय ओढा “कृषी पर्यटन’ ही संकल्पना राज्यात आकार घेत आहे. कृषी पर्यटन धोरणामुळे क्षेत्राला प्रतिसाद मिळत आहे. ॲग्रो टुरिझममध्ये २ हजार सेंटर नोंदणी झाली आहे. ॲग्रो टुरिझमकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओढा वाढला आहे. यातून विविध पिके, फळे, फुलझाडे यांची माहिती घेता येते. बैलगाडी सफर, ग्रामीण खेळ, लोककलांचे दर्शन. शेतात ताज्या भाज्या आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद मिळतो. शांत आणि प्रदूषणमुक्त वातावरणात होम स्टे किंवा फार्म स्टे सुविधा उपलब्ध होत आहेत. पंधरा टक्के वाटा नेण्याचे प्रयत्न महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सध्या राज्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये (जीडीपी) पर्यटन विभागाचा वाटा ७% आहे. हा वाटा वाढवून १५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या आणि त्यांचा मुक्काम वाढल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. त्या दृष्टिकोनातून पर्यटन विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. - भगवंतराव पाटील, संचालक राज्य पर्यटन विभाग मुक्काम वाढवून खर्च वाढवण्यावर अधिक भर पर्यटन विभागाने पर्यटनातून मिळणारा महसूल वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सध्या स्थानिक पर्यटक सरासरी सव्वा दिवस महाराष्ट्रात मुक्काम करतात आणि त्यांचा दररोजचा खर्च सुमारे ६,००० रुपये असतो. याउलट, आंतरराष्ट्रीय पर्यटक सरासरी दीड दिवस मुक्काम करतात आणि त्यांचा दररोजचा खर्च १०,००० रुपये इतका असतो. जास्त मुक्काम म्हणजे जास्त खर्च. त्यामुळे परदेशी पर्यटकांचा मुक्काम कालावधी कसा वाढेल, यासाठी पर्यटन विभाग खास योजना आखत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:43 am

दहावीच्या विद्यार्थ्याचा क्लासमध्ये वर्गमित्राने केला गळा चिरून खून:राजगुरूनगरातील घटना, आरोपी विद्यार्थी स्वत:हून पोलिस ठाण्यात

राजगुरूनगर येथील एका खासगी क्लासच्या दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने आपल्याच क्लासमधील मुलाचा गळा कापून खून केला. वाडा रस्त्यावरील नगर परिषदेच्या पाण्याच्या टाकीजवळ संस्कार कोचिंग क्लासेसचे वर्ग भरतात. सोमवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शिक्षिका गणिताचा क्लास घेत असताना बेंचवर मागे बसलेल्या आरोपी विद्यार्थ्याने वर्गमित्राच्या पोटावर, गळ्यावर धारदार चाकूने वार केले. गळा खोलवर चिरला गेल्याने खूप रक्तस्राव झाला. त्याच अवस्थेत शिक्षिका आणि शेजाऱ्याने विद्यार्थ्याला दवाखान्यात नेले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी विद्यार्थी स्वतःहून पोलिस चौकीत लगेचच हजर झाला. मृत आणि आरोपी यांच्यात यापूर्वी जुन्या भांडणाचा राग होता. त्यावरूनच त्याचा त्याने खून केला. मृत विद्यार्थी हा राजगुरूनगर येथे शिकत होता, तर आरोपी हा मांजरेवाडीतील शाळेत शिकतो. दरम्यान, क्लासच्या शिक्षिका जयश्री गणेश साबळे यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडील म्हणाले... मुलास४ दिवसांपूर्वीही मारहाण मृत विद्यार्थ्यास ३-४ दिवसांपूर्वी ४-५ मुलांनी मारहाण केली होती. भांडण कशावरून किंवा काय झाले होते याचे कारण माहिती नसल्याचे मृत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी सांगितले.तसेच ३ महिन्यांपूर्वी वाद झाल्याचे सांगितले जाते, परंतु मला कल्पना नाही. सकाळी सरकारी दवाखान्यात येण्याचा निरोप मिळाला. मी तिथे गेलो. त्याची अवस्था बघवत नव्हती, असे मृत विद्यार्थ्याचे वडील म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:41 am

कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या

मोहाली : पंजाबमधील मोहाली येथील सोहाना परिसरात सोमवारी रात्री एका खासगी कबड्डी स्पर्धेदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. कबड्डीपटू आणि प्रमोटर राणा बालचौरिया याच्या चेह-यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार ते पाच गोळ्या लागल्या. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण अखेर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मोहालीचे पोलिस अधीक्षक हरमनदीप हंस […] The post कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 12:02 am

जळकोट-बा-हाळी-देगलूर मार्गाच्या मंजुरीकडे दुर्लक्ष 

जळकोट : ओमकार सोनटक्के जळकोट तालुक्यात विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी शहरातून आणखीन एक दोन राज्य महामार्ग जाणे गरजेचे आहे. त्यामुळे दळणवळण वाढून विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेची आहे, जळकोट शहर तसेच अन्य काही गावांचा विकास व्हावा यासाठी शिरूर-जळकोट- बा-हाळी- देगलूर राज्य महामार्ग मंजूर व्हावा, अशी अपेक्षा जळकोट तालुक्यातील जनतेची आहे. गत अनेक वर्षांपासून शहरातील […] The post जळकोट-बा-हाळी-देगलूर मार्गाच्या मंजुरीकडे दुर्लक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Dec 2025 11:46 pm

नांदगावमधील 'आपले सरकार' सेवा केंद्रांवर प्रशासनाचा 'वॉच':नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नांदगाव तालुक्यातील 'आपले सरकार' सेवा केंद्र, सेतू कार्यालये आणि ई-सेवा केंद्रांमधील मनमानी कारभाराला आता चाप बसणार आहे. या केंद्रांविरोधात नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आता कठोर पवित्रा घेतला आहे. तालुक्यातील सर्व केंद्रांची तात्काळ तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, यात दोषी आढळणाऱ्या केंद्रधारकांवर जागेवरच निलंबनाची नोटीस बजावण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहेत. नांदगावचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची विशेष तपासणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके अचानक केंद्रांना भेटी देऊन एकूण 19 मुद्द्यांवर तपासणी करतील. यामध्ये प्रामुख्याने दुसऱ्याचा आयडी वापरणे, मंजूर जागेऐवजी दुसऱ्याच ठिकाणी केंद्र चालवणे, केंद्रात तक्रार पुस्तिका नसणे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था या बाबींचा समावेश आहे. या 19 नियमांचे पालन न करणाऱ्यांवर जागेवरच कारवाई होणार आहे. 'एक दिवसात दाखला' देणाऱ्यांची चौकशी सध्या अनेक खाजगी केंद्रांवरून नियमबाह्य कामे होत असल्याच्या तक्रारी आहेत. अधिकृत शासकीय प्रक्रियेतून एखादा दाखला मिळण्यासाठी साधारणतः 5 ते 7 दिवस लागतात. मात्र, काही खाजगी केंद्रांवरून जादा पैसे घेऊन तोच दाखला अवघ्या एका दिवसात उपलब्ध करून दिला जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. वाजवीपेक्षा अधिक शुल्क वसूल करून नागरिकांची लूट करणाऱ्या अशा केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. निलंबनाची टांगती तलवार जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत कारवाईचे आदेश दिल्याने तालुक्यातील सेतू चालकांमध्ये घबराट पसरली आहे. केवळ नोटीस देऊन न थांबता थेट परवाना निलंबनाची कारवाई होणार असल्याने, आगामी काळात नांदगाव तालुक्यातील किती केंद्रे बंद पडतात आणि किती सुधारतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Dec 2025 11:30 pm

पुण्यात पोलिस अधिका-याने थांबवले इंदुरीकर महाराजांचे कीर्तन

पुणे : मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमात केलेल्या खर्चावरून टीकेचे धनी बनलेले प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि त्याला कारणीभूत ठरले आहे ते त्यांचे पुण्यातील कीर्तन.. पुण्यातील हडपसर परिसरात महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होता. मात्र आयोजकांनी यासाठी रस्ताच अडवल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हडपसर परिसरात भली मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या […] The post पुण्यात पोलिस अधिका-याने थांबवले इंदुरीकर महाराजांचे कीर्तन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Dec 2025 11:09 pm

लातूरमध्ये 1 कोटींच्या विम्यासाठी 'दृश्यम' स्टाईल थरार:वृद्धाला जीवंत जाळले; स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचणारा आरोपी 24 तासांत जेरबंद

कर्जाच्या डोंगरातून सुटका करून घेण्यासाठी आणि 1 कोटी रुपयांचा विमा लाटण्यासाठी लातूरमध्ये एका तरुणाने माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी या नराधमाने रस्त्यावर लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध वृद्धाला गाडीत बसवून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लातूर पोलिसांनी या 'दृश्यम' स्टाईल गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत पर्दाफाश करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. औसा तालुक्यातील वानवडा शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास एका स्कोडा कारने अचानक पेट घेतला. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आणि आतमध्ये असलेल्या चालकाचाही होरपळून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. घटनास्थळी मृतदेहाजवळ एक कडे (ब्रेसलेट) आढळून आले, ज्यामुळे मृतदेह हा गाडीचा मालक गणेश चव्हाण याचाच असावा, असा समज निर्माण करण्यात आला. पोलिसांनी असा उलगडला कट पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांना आला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत 'मयत' समजल्या जाणाऱ्या गणेश चव्हाण याचे कॉल डिटेल्स तपासले. त्यातून काही संशयास्पद धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला असता, ज्याचा मृत्यू झाल्याचे समजले जात होते, तो गणेश चव्हाण जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला 24 तासांच्या आत ताब्यात घेतले. कर्जबाजारीपणातून सुचली भयानक कल्पना आरोपी गणेश चव्हाण (रा. औसा तांडा) हा एका खासगी फायनान्स कंपनीत काम करत होता. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले होते, फ्लॅटचे हप्ते थकले होते आणि आर्थिक व्यवहार कोलमडले होते. यातून बाहेर पडण्यासाठी त्याने 1 कोटी रुपयांचा विमा उतरवला आणि विम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. निरपराध वृद्धाचा बळी आपला मृत्यू झाल्याचे सिद्ध करण्यासाठी गणेशला एका मृतदेहाची गरज होती. तुळजापूर टी-पॉईंट परिसरात गोविंद यादव नावाच्या एका वृद्धाने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. गणेशने त्यांना गाडीत बसवले, पुढे नेऊन त्यांचा थंड डोक्याने खून केला. त्यानंतर मृतदेह ड्रायव्हर सीटवर ठेवून त्याने स्वतःची गाडी पेटवून दिली. ओळख पटवण्यासाठी त्याने स्वतःचे कडे मुद्दाम मृतदेहाजवळ टाकले होते, जेणेकरून पोलिस आणि नातेवाईक आपलीच ओळख पटवतील. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे या भयानक कटाचा पर्दाफाश झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Dec 2025 11:09 pm