SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
... ...View News by News Source

विठ्ठलाच्या 16 फूट मूर्तीची वेरूळमध्ये स्थापना

ओम जगद्गुरु जन शांती धर्म सोहळ्याला मंगळवारपासून वेरूळमध्ये सुरुवात झाली. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या भगवान विठ्ठलाच्या १६ फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मूर्तीचे उद्घाटन उत्तराखंड येथील आव्हान पीठाधीश्वर श्री श्री १००८ महामंडलेश्वर अरुणगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. या वेळी जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज प्रमुख उपस्थित होते. बुधवारी सोहळ्याचा दुसरा दिवस होता. ७५१ कुंडी महायज्ञाचा शुभारंभ हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. अरुणगिरी महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. (छाया ः समीर शेख ). बाबाजींच्या आवडत्या मूर्तीची झाली स्थापना जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज म्हणाले, परमपूज्य बाबाजींच्या ३६ व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या आवडत्या विठ्ठल दैवताची मूर्ती त्यांच्या कर्मभूमीत स्थापन केली आहे. ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भाविकांनी भगवान पांडुरंग व भगवान शंकर यांच्या भव्य मूर्तीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 7:23 am

अपक्षांना चिन्ह वाटप:उमेदवारांचा कपबशीवर डोळा, पण मिळाले नारळ, आइस्क्रीम, बैलगाडी, मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता केवळ चार दिवसांचा वेळ‎

जिल्ह्यातील सात पालिकांच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांना बुधवारी (२६ नोव्हेंबर) निवडणूक चिन्हांचे वाटप झाले. यात अनेकांना मागणीप्रमाणे चिन्ह मिळाले नसल्याने त्यांच्यात नाराजी दिसून आली. आता मिळालेले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांना केवळ चार दिवसांचा वेळ असल्याने अपक्ष उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पैठण नगर परिषदेसाठी एकूण ११५ उमेदवार रिंगणात असून त्यापैकी १४ अपक्ष आहेत. सर्व अपक्ष उमेदवारांनी कपबशीसाठी मागणी केली होती. मात्र, एक प्रभागात एकच चिन्ह देता येते. त्यामुळे कपबशी मिळाली नाही. त्याऐवजी नारळ, आइस्क्रीम, बैलगाडी, पतंग, गॅस सिलिंडर, पुस्तक अशी मजेशीर चिन्हे देण्यात आली. निवडणूक विभागाकडून एकूण १९२ चिन्हे उपलब्ध आहेत. त्यातून अपक्षांना चिन्हे वाटण्यात आली. काही उमेदवारांच्या हातात नारळ, काहींच्या हातात आइस्क्रीम दिसत आहे. एखादा छत्री घेऊन उभा आहे, तर दुसरा वाजंत्री दाखवत आहे. कुणाचा कंदील, कुणाचा पतंग. त्यामुळे पैठण शहरासर सर्वत्र सध्या चिन्हांचीच रांगोळी पाहायला मिळते. प्रत्येक गल्लीत कुणाला काय चिन्ह मिळाले यावर चर्चा सुरू आहे. प्रचाराला वेग आला असून चिन्हांमुळे निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे. कपबशी मिळाली नाही याची खंत उमेदवारांना असली तरी मजेशीर चिन्हांमुळे मतदारांचे लक्ष वेधले. कन्नड : अपक्ष आता प्रचारात उतरण्यासाठी मोकळे कन्नड नगरपालिका निवडणुकीत एक अपक्ष नगराध्यक्षपदाचा उमेदवार व चौदा नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे यांच्या उपस्थितीत निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. कन्नड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी शेख सलमाबी चाँद या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांना बॅट हे चिन्ह मिळाले आहे. आता नगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेसच्या फरीन बेगम अब्दुल जावेद या पंजा, राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप युतीच्या स्वाती संतोष कोल्हे या घड्याळ चिन्हावर तर एकनाथ शिंदे गटाच्या अनिता काकासाहेब कवडे या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. इतरही नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या अपक्षांना वेगवेगळे चिन्ह मिळाले असल्याने प्रचारात उतरण्यासाठी ते मोकळे झाले असल्याचे बोलले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 7:23 am

गावठी कट्ट्यासह दहशत माजवणाऱ्यास गंगापूरमधून अटक:पोलिसांत गुन्हा नोंद, स्टीलचा कट्टा, मॅगझिनसह एक जिवंत काडतूस, मोबाईल जप्त‎

गावठी कट्टा घेऊन दहशत माजवणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत केली. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगापूर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त माहिती मिळाली की गंगापूर-अंबेवाडी रोडवर एक जण गावठी कट्टा घेऊन उभा आहे. पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर पंचांसह रात्री छापा टाकून संशयित आरोपी गौरव मच्छिंद्र बोरुडे (२४, रा. रामडोह, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून स्टीलचा गावठी कट्टा, मॅगझिनसह एक जिवंत काडतूस, पिवळ्या रंगाचे काडतूस आणि मोबाईल जप्त केला. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पथकात उपनिरीक्षक महेश घुगे, पोह. कासीम शेख, पोह. सचिन राठोड, पोह. सुनिल गोरे, पोह. अनिल चव्हाण, बलबीरसिंह बहुरे सहभागी होते.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 7:22 am

ज्ञानेश्वरीतून आपण शिकत नाही हीच आजची शोकांतिका- दिव्याताई मोरे:पिशोर येथील अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी प्रेरणादायी कीर्तन‎

येथील श्री गणेश मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ह.भ.प. दिव्याताई गणेश मोरे यांच्या प्रभावी अमृततुल्य वाणीतून भाविक मंत्रमुग्ध झाले. गळ्यात तुळशीची पवित्र माळ आणि हृदयात वैष्णवांचा कळवळा ज्याच्याकडे असतो, तोच खरा वैष्णव, असे सांगत त्यांनी वैष्णवांच्या जीवनातील शुद्धता, भक्ती आणि प्रेम यांचे महत्त्व अत्यंत प्रभावी शब्दांत उलगडून दाखवले. यानंतर बोलताना त्यांनी संत नामदेव महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली. वारकरी संप्रदाय पंजाबपर्यंत पोहोचवण्याचे कार्य नामदेव महाराजांनी करून दाखवले. आजही अनेक शीख कुटुंबांत नामदेव महाराजांचा एक अभंग गायल्याशिवाय जेवण न करण्याची परंपरा सुरू आहे, ही संतांच्या भक्तीशक्तीची जिवंत साक्ष आहे. असे त्यांनी नमूद केले. आपल्या कीर्तनात दिव्याताई मोरे यांनी सामाजिक क्षेत्रातील प्रेरणादायी महिलांचा उल्लेख करताना सिंधुताई सपकाळ यांच्या विलक्षण संघर्षमय जीवनाचा अनुकरणीय प्रसंग भाविकांसमोर मांडला. सोशल मीडियाच्या अतिरेकाविषयी टीका करताना त्यांनी ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेचा अभ्यास करून संगणक तंत्रज्ञान विकसित करणारे मराठी शास्त्रज्ञ डॉ. विजय भाटकर यांचे उदाहरण दिले. “आपण ज्ञानेश्वरी घरात ठेवतो पण त्यातून शिकत नाही, हीच आजची शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात नंदाबाई येडोबा जाधव यांनी दिव्याताई मोरे यांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जयश्री प्रवीण शिंदे, सुनीताबाई ढगे, लिलाबाई जाधव, कडूबाई जाधव, मंगलबाई जाधव, मृदंगाचार्य महेश महाराज कावले, प्रदीप महाराज शेलार, गौरव मोकासे, मंगेश मोकासे व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखा महिलांच्या शिक्षणाबाबतही त्यांनी सखोल भाष्य केले. “महिलांना शिक्षणाचा हक्क नव्हता; परंतु क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षवून पहिली मुलींची शाळा काढली. याच शिक्षणाच्या बळावर प्रतिभाताई पाटील सारख्या महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचल्या.” असे सांगत त्यांनी महिलांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखण्याची गरज व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 7:21 am

विधानसभेसारखीच लक्ष्मीएक डिसेंबरला पुन्हा येणार:भगूरच्या प्रचारसभेत मंत्री गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य

पहिले बायका नवऱ्यांकडे पैसे मागायच्या, पण आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. हा बदल लक्षात घ्या. विधानसभा निवडणुकीआधी जशी ‘लक्ष्मी’ आली होती. तशी आताही येणार आहे. फक्त तुम्ही १ डिसेंबरच्या रात्री घराबाहेर झोपा, असे मतदारांना थेट पैशांचे आमिष दाखवणारे वक्तव्य पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी भगूर येथील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत केले. राज्यात २ डिसेंबर रोजी नगर परिषद, नगरपंचायतींसाठी मतदान आहे. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे १ डिसेंबरला लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाऊ शकतो. मात्र, तो उल्लेख टाळत पाटील यांनी हे आमिष दाखवले. ते असेही म्हणाले की, भगूरची पाणी योजना आम्ही आणली. अजित पवारांनी मला विचारले विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूरला जाऊ का? मी सांगितले जा आणि त्यांनी पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. शहाण्यासारखे वागावे. दुसऱ्याचे पोर आपले सांगू नये. आता नगरविकास ‌खाते आपल्याकडे आहे. ‘इस खाते में माल है’. आता ते मटण देतील. मटण त्यांचे खा अन॰ बटण आपले दाबा. मतदारांना आमिष दाखवणाऱ्या वक्तव्यावर माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, निवडणूक आयोग झोपला आहे का? माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले की, अशा मंत्र्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. लंकादहनावरून एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीसांत वाद पेटला डहाणूत भाजप विरुद्ध शिंदेसेना लढत आहे. तेथील प्रचारसभेत तीन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी भाजपचे नाव न घेता ‘रावणाची लंका जळून खाक झाली होती. आपल्याला आता अहंकार जाळायचा आहे’ असे म्हटले होते. त्याला बुधवारी डहाणूतीलच सभेत प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘आम्ही रामाच्या पक्षाचे आहोत. आमचे उमेदवार श्रीरामवाले.. आम्ही लंका जाळणारे आहोत.’ अजित पवार यांच्याकडून दिलगिरी अकाेला | बीड, नांदेडच्या सभांमध्ये अजित पवारांनी ‘बाकीचे नेते व त्यांची शहरे भिकारचोट आहेत, असे म्हटले होते. त्याबद्दल अकोला येथे जाहीर सभेत ते म्हणाले, की त्या दिवशी भिकार हा चुकीचा शब्द वापरला. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करताे. ताे शब्द वापरायला नकाे हाेता.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 7:19 am

बायकाेचा बैल म्हणून हिणवले, पित्याची 2 लेकरांसह आत्महत्या:चांदवड व नाशिकमधील दोन सुन्न करणाऱ्या घटना

दिघवद शिवारात ३४ वर्षीय पित्याने आपली ९ वर्षीय मुलगी व ५ वर्षीय मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ‘तू माजला आहे, आमचे ऐकत नाही, बायकोचा बैल झाला आहे’ असे वेळोवेळी सासू- सासऱ्यांनी हिणवल्यानेच पती असे पाऊल उचलण्यास प्रवृत्त झाल्याचा आरोप पत्नीने केला आहे. याप्रकरणी विवाहितेच्या सासू-सासऱ्‍यांसह तिच्या पतीविरुद्धही दोन मुलांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दौलत रामभाऊ हिरे (३४) , प्रज्ञा (९) व प्रज्ज्वल (५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. बुधवारी (दि. २६) सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्कुबा जवानांच्या मदतीने विहिरीतील पाण्यात शोधकार्य करुन तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. हे दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मृताच्या पत्नीने चांदवड पोलिसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, सासरे रामभाऊ भाऊराव हिरे व सासू मीना रामभाऊ हिरे यांनी पती दौलत यांना नेहमी घरातील कामांवरुन टोमणे मारत हिणवून मानसिक छळ करत पतीस आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे पती दौलत यांनी कंटाळून स्वत:च्या विहिरीत आत्महत्या केली. दौलत यांनी दोन्ही लहान मुलांसह आत्महत्या केल्याने त्यांच्यासह मुलांचाही बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी सासू-सासऱ्यांसह मयत पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह उपनिरीक्षक नऱ्हे करत आहेत. चारित्र्यावर संशय, नवविवाहितेने सहाव्या महिन्यातच संपवले जीवन पतीसह सासू, नणंदेकडून चारित्र्यावर संशय घेत वारंवार हाेणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या सहाव्या महिन्यातच विषप्राशन करून जीवन संपवले. पंचवटीतील हिरावाडीत हा प्रकार घडला. मृत विवाहितेने मुंबईत कर्तव्यावर असलेल्या पाेलिस भावाला लिहून पाठवलेल्या सुसाईड नाेटवरून पंचवटी पाेलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. विवाहितेच्या वडिलांचा १० वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने त्यांचे मित्र व विवाहितेच्या भावांनी तिचे माेठ्या थाटात लग्न लावून दिले. साेने, चांदी आणि दागिने, भांडीही दिली. मात्र, वारंवार हाेणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने टाेकाचे पाऊल उचलले. सुसाईडमधील नेहाचे अखेरचे शब्द वरिष्ठ पाेलिस अधिकारी व माझे भाऊ..विषय : मानसिक त्रास, लैंगिक अत्याचार व हुंडाबळीबाबत..मा.‘माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संताेष पवार. माझे लग्न ४/६/२०२५ राेजी संताेष पंडित पवार यांच्यासाेबत झाला आहेे. माझे सासरचे लाेक लग्न झाल्यापासून मला छळत आहेत. सासूने व ननंद माझ्या चारित्र्यावर संशय घेतला, भाऊ, मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर हे लाेक गायब करून टाकतील..म्हणून मी या चिठ्ठीचे फाेटाे काढून तुम्हा सर्वांना पाठवत आहे. तुम्ही मला खूप प्रेमाने वाढवलं, पण माझ्या नशिबी मला चांगला नवरा व सासर नाही भेटलं, म्हणून मी आत्महत्या करत आहे. राेज थाेडं थाेडं मरण्यापेक्षा मी विष खाऊन झाेपत आहे.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 7:17 am

ज्या 4.5कोटींच्या पाइपमधून थेंबभरही पाणी गेले नाही,ते काढून नवे टाकले:मजीप्रा, छत्रपती संभाजीनगर मनपाच्या अधिकाऱ्यांची मोठी उधळपट्टी

प्रशासन कोट्यवधींची उधळपट्टी कसे करते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीमनगरमधील पिण्याच्या पाइपलाइनचे काम. पेठेनगरजवळ नव्याने झालेल्या ७ वसाहतींना पाणी देण्याचे हे नियोजन आहे. ४.५ कोटी खर्चून ४ वर्षांपूर्वी १०० ते २५० मिमी व्यासाची लोखंडी पाइपलाइन टाकली होती. या पाइपमधून एक थेंबही पाण्याचा पुरवठा झाला नाही. तरीही ते काढून नवे टाकले. तिथे पुन्हा जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनी नव्याने ३ कोटींची पाइपलाइन टाकत आहे. आधीच्याच पाइपला जोडले असते तर शासनाचे कोट्यवधी रुपये वाचले असते. पण जुन्या अन् नव्या पाइपलाइनमधून एकत्रित ७.५ कोटींची उधळपट्टी केली जात आहे. विशेष म्हणजे, जुने पाइप मनपाकडे जमा करण्याऐवजी नवे काम करणाऱ्या कंत्राटदाराने पाइप विकल्याची धक्कादायक माहिती ‘दिव्य मराठी’कडे आहे. गोगा बाबा टेकडीजवळील ७ कॉलन्यांना पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये निसर्ग कॉलनी शाक्यनगर लालमाती सम्राट अशोकनगर आ णि कमल गृहनिर्माण सोसायटी ग्रीन सिटीतील २ हजार कुटुंबीयांसाठीची पाइपलाइन होती. त्यांना आता पुन्हा नवे नळ कनेक्शन दिले जाईल. माजी नगरसेवक तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चेतन कांबळेंनी जुनी लाइन मंजूर करून आणली होती. त्यांनीच येथे एक मोठी पाण्याची टाकीदेखील मंजूर करून घेतली होती. आता नव्याने पाइप अन् घरोघरी नळ कनेक्शन देण्याचा खर्च अवास्तव खर्च केला जात आहे. थेट सवाल किरण धांडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा येथे आधीची पाइपलाइन होती का..?- होय, हे खरे आहे की आधी येथे ४.५० कोटींची लोखंडी पाइपलाइन होती. त्यातून पाणीपुरवठा झालाही नव्हता. तरीही जुनी पाइपलाइन काढण्यात आली.नव्या पाइपलाइनची आवश्यकता काय होती?-‘मजीप्रा’ला त्यांच्या डिझाइनची नवी लाइन टाकायची होती. म्हणून त्यांनी नवी पाइपलाइन टाकली असावी.जुन्या लाइनमधून पुरवठा होऊ शकला नसता का?- झाला असता, त्यांना तशा सूचनाही दिल्या होत्या. तरीही त्यांनी नवी लाइन टाकली. नोटीस दिली आहे.जुनी पाइपलाइन कुठे गेलीय?- जुनी गेली कुठे याचा शोध घेऊ. पैन‌्पै वसूल करू. रस्तेही खराब केलेत आता पुन्हा रस्ते उखडून नवी पाइपलाइन टाकली आहे. माजी नगरसेवक चेतन कांबळेंनी मंजूर करून आणली होती. पाणीपुरवठा झालेला नसताना पैशांचा अपव्यय होतोय. आमच्या डोळ्यासमोरून मोठ्या ट्रकमध्ये टाकून जुने पाइप नेले आहेत. गुन्हा दाखल झाला पाहिजे.-सतीश शेगावकर, नागरिक पाइप काढू नका, मनपाने कळवले, तरी काढले जुने पाइप न काढण्याच्या सूचना मनपाने एमजेपीच्या उपअभियंता पूजा जाधव यांना दिल्या होत्या. तरीही काढले. त्यांनाच जबाबदार धरल्याचा उल्लेख धांडेंच्या पत्रात आहे. ‘दिव्य मराठी’ने पूजा यांच्याशी वारंवार संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 7:09 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:तीन मुख्यमंत्र्यांनी भेट देऊनही चिखलदरा, धारणीमध्ये कुपोषण कायम

अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांत कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून पूरक पोषण आहार, टेक होम रेशन, कुपोषित मुलांसाठी एनर्जी डेन्स न्यूट्रिशियस फूड आणि आदिवासी भागात अमृत आहार योजना अशा विविध योजना आहेत. योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे विधिमंडळात सांगितले जाते. प्रत्यक्षात पालथ्या घड्यावर पाणी अशी स्थिती आहे. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सचिवांना मेळघाटचा दौरा करून अहवाल सादर करायला सांगितला आहे. २२ ऑगस्ट १९९६ रोजी मनोहर जोशी, २९ नोव्हेंबर २०१४ देवेंद्र फडणवीस आणि त्यापूर्वी १९९० ते १९९१ च्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार या तीन मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत भेट दिली. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावात बालकांचा कुपोषणामुळे झालेला मृत्यू हा विषय हमखास ठरलेला असे. एवढे करूनही कुपोषणाचा प्रश्न सुटलेला नाही. “अध्यक्ष महोदय, हे अधिवेशन महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये होत आहे...” असे म्हणत दर हिवाळी अधिवेशनात कुपोषणावर चर्चा होते. डिसेंबर २०२२ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष वेधले होते. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा अधिवेशनात मांडला होता. या माध्यमातून समजून घ्या कुपोषणाची तीव्रता ही आहेत कुपोषण कमी न होण्याची मुख्य कारणे मूलभूत मुद्दा हा फक्त अन्नाची उपलब्धता नसून योग्य पोषण, ज्ञान, आर्थिक स्थैर्य व आरोग्यसेवेपर्यंत पोहोचणे यांचा आहे. गर्भधारणेतील पोषणाचा अभाव, नवजात बाळांना वेळेवर स्तनपान न मिळणे, पूरक आहार (६ महिन्यानंतर सुरू करायला पाहिजे) उशिरा सुरू करणे, सततचे संसर्गजन्य रोग, व्हीएचएसएनसीचे प्रशिक्षण व त्यांच्या सक्रिय सहभागाची कमी, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा अभाव, सॅम बाळांना एनआरसीमध्ये रेफर करण्याचे अपुरे प्रयत्न, आयसीडीएस विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयाचा अभाव (आकडेवारी संबंधित), तालुका पातळीवर आयसीडीएस प्रकल्पाच्या प्रमुखाच्या जागा रिकाम्या व अंगणवाडी सुपरवायझरच्या रिक्त जागा यामुळे नियमित अंगणवाडीच्या कामावर देखरेखीची कमी. कमी वजनाच्या बाळांच्या जन्माचे प्रमाण ३ वर्षात ५०% पेक्षा कमी झाले व कुपोषणाचे (३ वर्षाच्या बाळामधील) सॅम, मॉम, एसयूडब्ल्यू, एमयूएमचे प्रमाण ५०% ते ६०% कमी करता आले. तीन वर्षात १०६ एसएएम व एसयूडब्ल्यू मुले कुटुंबाचे व व्हीएचएसएनसीची मदत घेऊन एनआरसीला रेफर केल्याचे डॉ. सतीश गोगुलवार यांनी सांगितले. अजितदादांनी केली चर्चा २१ डिसेंबर २०१७ च्या अधिवेशनात तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि सुभाष पाटील यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अहवालानुसार राज्यात गेल्या दोन महिन्यांत १२३६ बालकांचा कुपोषणामुळे झालेला मृत्यू या विषयावर स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. ही सूचना स्थगन प्रस्तावाच्या निकषात बसणारी नाही तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने निवेदन करावे, असे निर्देश अध्यक्षांनी दिले होते. १८ जुलै २०१८ चे पावसाळी अधिवेशन, २९ डिसेंबर २०२२ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही चर्चा केली होती. “आम्ही आमच्या आरोग्यासाठी” या संस्थेचे संयोजक तथा संस्थापक ट्रस्टी डॉ. सतीश गोगुलवार यांनी सध्या आदिवासी भागात सुरू असलेल्या माता व बालकांसाठीच्या योजना, आयसीडीएस व आरोग्य विभागातील समन्वय असणे, खरी आकडेवारी जाहीर करणे व गावपातळीवरील लोकांचे (लोकप्रतिनिधी, महिला बचत गट) कुपोषणासंबंधित नियमित प्रशिक्षण त्यांच्यातर्फे देखरेख ठेवणे, आरोग्य विभाग व आयसीडीएस विभागातील जागा पूर्णपणे भरणे, सॅम बाळांना एनआरसी व सीटीसीमध्ये रेफर करण्याच्या विनामूल्य सोय असणे गरजेचे आहे, असे उपाय सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 6:59 am

राजकीय वाद:आयआयटी बॉम्बे’ चांगले- डॉ. सिंग, मुंबईवर ताबा मिळवण्याचा डाव- राज, मुंबई निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप आमने-सामने

मनपा निवडणुकीची घोषणा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच ‘बॉम्बे’ विरुद्ध ‘मुंबई’ या भावनिक मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ‘आयआयटीच्या नावातील बॉम्बे तसेच ठेवणे चांगले झाले’ असे वक्तव्य केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केले. या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत केंद्र सरकारवर आणि भाजपच्या नेतृत्वावर थेट निशाणा साधला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजप आमने-सामने आले आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी २४ नोव्हेंबरला आयआयटी मुंबई येथील क्वांटम संशोधन प्रयोगशाळांना भेट दिली आणि संस्थेतील नवीन लिक्विड हेलियम सुविधेचे उद्घाटन केले. राज ठाकरे म्हणाले, “मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि राहणारच आहे. तिला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव मराठी जनतेने उधळून लावला होता. पण गेली अनेक दशके ज्यांच्या पोटात मुंबईबद्दल मळमळ साचून राहिली ती आता पुन्हा बाहेर पडायला लागली आहे. केंद्र सरकारने चंदीगड शहर पंजाबच्या हातून काढून घेण्याचा अलीकडचा प्रयत्न सर्वांनी पाहिलाच. तसा डाव आता मुंबईसाठी शिजतोय. ‘मुंबई’ नको ‘बॉम्बे’ हवंय यातून शहरावर हळूच ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी टीका ठाकरे यांनी केली. “जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी, महाराष्ट्राशी दूरदूरचा संबंध नाही. ते जम्मूचे. पण शीर्ष नेतृत्वाचे मन वळवण्यासाठी, शाबासकी मिळवण्यासाठी असे वक्तव्य केले जात आहे. हे विधान सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकवले : अमित साटम राज ठाकरेंच्या या वक्तव्याला भाजप आमदार अमित साटम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकवले, ११ वीला मराठीऐवजी जर्मन भाषा शिकवली, हेच का तुमचे मराठी प्रेम? आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या अशा शब्दांत अमित साटम यांनी राज ठाकरेंना सवाल केले आहेत. दरम्यान, यावरून मोठा वाद होण्याची शक्यता असून मनसे देखील येणाऱ्या काही दिवसात हा मुद्दा उचलून धरुन राजकारण पेटवण्याची दाट शक्यता आहे. राजकीय चक्कर : मुंबई विकासासाठी केंद्राकडून मोठे प्रकल्प, भाजपचा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, केंद्र सरकार मुंबई–एमएमआरला जागतिक दर्जाचे कनेक्टिव्हिटी नेटवर्क देत असताना काहींना राजकीय चक्कर येते म्हणून गुजरातचा मुद्दा पुढे आणला जातो. खरे तर केंद्र सरकार मुंबई–एमएमआरच्या विकासासाठी मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड कनेक्टिव्हिटी, मल्टीमोडल कॉरिडॉर्स या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीला जागतिक स्तरावर नेण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. वादंग : केंद्र सरकार व भाजप यांची पुढील भूमिका काय याकडे लक्ष आयआयटीप्रमाणेच अनेक राष्ट्रीय संस्थांच्या नावात बॉम्बे, मद्रास अशी जुनी नावे कायम आहेत. मात्र, मुंबईच्या नावाचा संदर्भ आल्यानंतर नेहमीच राजकीय वादंग निर्माण होतो. मराठी ओळख, भाषा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा संघर्ष कायम आहे. त्यामुळे या विधानाने महाराष्ट्रातील मराठी जनतेला जणू पुन्हा एकदा सज्जतेचा इशारा मिळाला आहे. मुंबई आपलीच आहे आणि राहील हे संदेश अनेकांनी दिले आहेत. आता केंद्र सरकार व भाजप यांची पुढील भूमिका काय असते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार : मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. बॉम्बेचे मुंबई करण्यास सर्वात मोठा वाटा भाजपचे नेते रामभाऊ नाईक यांचा आहे. आमच्याकरता ते बॉम्बे नाही, मुंबईच आहे. काही लोक आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेचे नावही बदलले पाहिजे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 6:53 am

ताेतया आयएएस महिलेवर पाकसाठी हेरगिरीचा संशय:बॉम्बस्फोट काळात दिल्ली, उदयपूर, मणिपूरचा प्रवास; संभाजीनगर पाेलिसांचा तपास

आयएएस अधिकारी असल्याचे भासवून ६ महिने शहरातील पंचतारांकित हॉटेलात राहिलेल्या कल्पना त्र्यंबकराव भागवत या महिलेचे प्रकरण आता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणारे ठरत आहे. कारण पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले. तिच्या घराच्या झडतीत १९ कोटींचा धनादेश, संशयास्पद प्रमाणपत्रे तसेच परदेशी नंबरशी नियमित संपर्क अशा अनेक गोष्टी समोर आल्या. त्यामुळे या प्रकरणाला हेरगिरीची छटा असल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान,२६ नोव्हेंबर रोजी तिला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.डी. जवळगेकर यांनी १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाकडून ॲड. जरिना दुर्राणी यांनी बाजू मांडली. पुढील तपास सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश गायकवाड करीत आहेत. या प्रकरणातील काही महत्त्वाच्या घटना अशा १. आयएएस असल्याचा आव आणून ६ महिने पंचतारांकित हॉटेलात राहिली. संभाजीनगरात राजदूत येण्याच्या काळात हॉटेल तपासादरम्यान २२ नोव्हेंबर रोजी प्रकार उघड.२. पडेगाव परिसरातील घर असल्याचे तसेच तिचा अफगाणिस्तानचा प्रियकर असल्याचेही निदर्शनास आले.३. पाकिस्तान पेशावर आर्मी, अफगाण ॲम्बेसी व ११ आंतरराष्ट्रीय नंबर आढळले एका चॅटमध्ये मजकूर-‘अपना डीलर पाकिस्तान में है, मालूम है ना?’ असा उल्लेख.४. अफगाणी प्रियकर अशरफ व त्याचा पाकिस्तानी भाऊ गालिब यमाशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर संपर्क.५. घरझडतीतून १९ कोटींचा धनादेश, त्यावर चेतन सुंदरजी भानुशाली या व्यक्तीचे नाव दिले असून त्यावर निखिल भाकरे आणि कल्पना भागवत अशी नावे असल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. ६ लाखांचा दुसरा चेक; खात्यात ३२.६८ लाखांची नोंद६. नागपूर विद्यापीठाच्या लेटरहेडवर बेस्ट आयएएस अधिकारी असे संशयास्पद प्रमाणपत्र; दिल्ली, मणिपूर, उदयपूर, जोधपूरकडे वारंवार विमानप्रवास. सरकारी पक्षाने न्यायालयात मांडलेले मुद्दे अमित शाह यांचा ओएसडी अशा नावानेही एक मोबाइल क्रमांक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ओएसडी अभिषेक चौधरी अशा नावानेही एक नंबर कल्पनाच्या मोबाइलमध्ये आहे. त्यात ओएसडी टू होम मिनिस्टर ऑफ इंडिया असे नाव येत आहे. मात्र, हा नंबर बंद येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे ही व्यक्ती कोण आहे, याचाही तपास होणार आहे. बचाव पक्षाची बाजू... आरोप अतिशयोक्तिपूर्ण आणि चुकीच्या अर्थाने लावलेले पाकिस्तान किंवा अफगाणी नंबर असणे गुन्हा नाही १९ कोटींचा चेक व्यवहार नसल्यास गुन्हा सिद्ध होत नाही संशयास्पद प्रमाणपत्र तिने बनवले असा पुरावा नाही

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 6:48 am

सोलापूरच्या छाप्यात 200 काेटींवर बेहिशेबी मालमत्ता:9 कोटी दंड शक्य, सहा किलाे साेने, 80 किलाे चांदीच्या स्टाॅकमध्ये तफावत

सोलापूर शहरातील दोन प्रमुख सराफी पेढ्या, बांधकाम व्यावसायिक व त्यांच्याशी संबंधित वकील अशा आठ व्यावसायिकांची घरे व कार्यालये अशा १६ ठिकाणी गेल्या आठवड्यात आयकर विभागाने ५ दिवस झाडाझडती घेतली. मात्र या कारवाईचा तपशील अद्याप जाहीर केलेला नाही. सूत्रांच्या माहितीनसुार, या छाप्यांत ६ किलो सोने, ८० किलो चांदीच्या स्टॉकमध्ये तफावत आढळून आली. २ कोटींची रोकड व २०० कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली. या व्यावसायिकांना ९ कोटींचा दंड होऊ शकतो, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. सराफातील भागीदारांच्या पुण्याच्या दालनावर छापे शहरातील काही सराफांची रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक आहे. त्यामुळे त्यांच्या भागीदारींचीही तपासणी करण्यात आली. त्यांच्या पुण्यातील दालनांवरही आयकर विभागाने छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. एकूण नऊ जिल्ह्यांतील ४५ अधिकारी व १३० कर्मचाऱ्यांनी पाच दिवस ही मोहिम राबवली. कागदावर दाखवले दागिने, प्रत्यक्षात स्टॉक मात्र कमी आयकर पथकाच्या तपासाचा भर सराफा पेढ्यांवर होता. एका सराफाने कागदावर २२०० किलाे चांदी दाखवली. पण विक्री आणि प्रत्यक्ष स्टाॅकमध्ये ८० किलाेची तफावत आढळली. दुसऱ्या पेढीत ६ किलाेवर साेने दागिन्यांत तफावत आढळली. कर चुकवण्यासाठी त्यांनी सुमारे ९ काेटींचे दागिने परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले. कर्मचाऱ्यांच्या घरातील माळ्यावरील गोणीत कोट्यवधी संपत्तीची कागदपत्रे पेढीतील मागील सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता छाप्यापूर्वी दाेन दिवस आधीच व्यावसायिकाने काही कागदपत्रे फाडल्याचे दिसले. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरातील माळ्यावर भंगारच्या वस्तूंमध्ये गाेणी सापडली. तशीच गाेणी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्याही मिळाली. यात सुमारे साेलापूर, पुणे, मुंबईतील प्लाॅट,फ्लॅट, शेतीसह कोट्यवधींच्या मालमत्तेचे दस्तावेज सापडले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 6:46 am

वरिष्ठांच्या त्रासामुळे गळफास, माढ्यातील ग्रामसेवकाचा मृत्यू:नातलग व संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे बार्शीत गुन्हा

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आर्थिक मागणीला व सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्या केल्याप्रकरणी बार्शी पोलिसांत बुधवारी (दि.२६) गुन्हा दाखल करण्यात आला. अंबड (ता.माढा) येथे मागील सहा महिन्यापासून ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेल्या प्रकाश बाविस्कर (वय ४९, रा.संबरत नगर, गाडेगाव रोड, बार्शी) यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी मुलगी दिव्या (रा.गाडेगाव रोड बार्शी) हिने फिर्याद दिली आहे. कुटुंबीय व ग्रामसेवक संघटनेने अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या केल्याने गुन्हा नोंदवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. ग्रामसेवक संघटनेने बार्शी ग्रामीण रुग्णालय व बार्शी शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. अधिक माहिती अशी, प्रकाश बाविस्कर यांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पैसे देऊनही अतिरिक्त पैशाची मागणी होत होती. तसेच पैसे न दिल्यास अफरातफरीच्या गुन्ह्यात अडकवून नोकरीतून काढून टाकण्याची वारंवार धमकी येत होती. यामुळे मानसिक त्रासातून खचलेल्या बाविस्कर यांनी बुधवारी (दि.१९) दुपारी २.३० वा. बार्शीतील राहत्या घरातील किचनमधील सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मागील सात दिवसांपासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि.२५) रात्री ११.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. विस्तार अधिकारी शेंडगे, भुजबळ यांच्यावर आरोप पिंपळगाव धस आणि आंबड येथील जुन्या दप्तर तपासणीच्या नावाखाली कुर्डूवाडी येथील विस्तार अधिकारी शेंडगे आणि डेप्युटी सीईओ सूर्यकांत भुजबळ हे वारंवार आर्थिक मागणी करून बाविस्कर यांना सतत मानसिक त्रास देत होते, असा गंभीर आरोप मृत बाविस्कर यांच्या सहकारी ग्रामसेवक व ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डी.बी. भुजबळ यांनी देखील केला आहे. शवविच्छेदनाच्या प्रक्रियेवरही घेतला आक्षेप कुटुंबीयांची परवानगी न घेता हॉस्पिटलचे बिल भरलेले नसताना मृतदेह विच्छेदनासाठी पोलिसांनी शवगृहाकडे सोपवला. कसलीही विचारणा न करता ही घाई का केली असा सवाल फिर्यादी दिव्या बाविस्कर हिने केला. तसेच मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कुटुंबातील सदस्याची सही आवश्यक असलेला फॉर्म भरून न घेताच शवविच्छेदन तातडीने करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी दिव्याचा पोलिसांशी वाद बाविस्कर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विस्तार अधिकारी शेंडगे आणि जिल्हा परिषद डेप्युटी सीईओ भुजबळ यांच्यावर बार्शी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्या शिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत मुलगी दिव्या व नातलगांनी बार्शी ग्रामीण रुग्णालयात घेतला. मात्र पोलिसांनी संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करता येत नसल्याचे सांगितल्याने ग्रामसेवक संघटनेने बार्शी ग्रामीण रुग्णालय, शहर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर नातलग व संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी मृत बाविस्कर यांची मुलगी दिव्या हिचा जबाब नोंदवत आत्महत्येस प्रवृत्त केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जनार्दन जाधव करत आहेत. आजारी असताना ऑफिसला बाेलावल्याने नैराश्य, तणाव दरम्यान दिव्या बाविस्कर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की घटनेच्या दिवशी १९ नोव्हेंबर रोजी बाविस्कर यांनी आजारी असल्याचे कारण दिले असतानाही कुर्डूवाडी येथील विस्तार अधिकारी अक्षय शेंडगे यांनी फोन करत बाविस्कर यांना डेप्युटी सीईओ भुजबळ यांनी तत्काळ भेटायला ऑफिसला बोलावल्याचा निरोप दिल्याने बाविस्कर हे मानसिक तणावात होते असे म्हटले आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना आणि बाविस्कर यांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 6:44 am

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमिट जागीच कायमस्वरूपी रद्द होणार:महसूल विभागाचा मोठा निर्णय, 3 टप्प्यांत कारवाईचा उगारणार बडगा

राज्यात वाळू व इतर गौण खनिजांच्या चोरीला लगाम घालण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी अत्यंत कठोर निर्णय जाहीर केला आहे. अवैध उत्खनन आणि वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचे परवाने (परमिट) आता जागेवरच निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश महसूल विभागाने जारी केले आहेत. हे पाऊल वाळू माफियांसाठी थेट प्रहार मानले जात आहे. महसूल, पर्यावरण आणि गुन्हेगारीवर नियंत्रण अवैध वाहतुकीमुळे केवळ शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी होत नाही, तर यातून गुन्हेगारी वाढत असून कारवाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांनी परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार हे नवीन धोरण तातडीने लागू केले आहे. मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, “शासनाचा महसूल चूकविणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा लोकांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला. अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी, मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत तीन टप्प्यांत शिक्षेची तरतूदपहिला गुन्हा : ३० दिवसांसाठी परवाना निलंबित करणे आणि वाहन अडकवून ठेवणे.दुसरा गुन्हा: ६० दिवसांसाठी परवाना निलंबित करणे आणि वाहन अडकवून ठेवणे.तिसरा गुन्हा: वाहन परवाना कायमस्वरूपी रद्द करणे आणि आरटीओमार्फत पुढील कारवाईसाठी वाहन जप्त करणे.

दिव्यमराठी भास्कर 27 Nov 2025 6:43 am

नगर पंचायत काँग्रेसच्या ताब्यात द्या

रेणापूर/लातूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायतीमध्ये मागील आठ वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या भाजपकडून अतिशय भ्रष्ट कारभार झाला. त्याला जनता कंटाळली असून रेणापूर नगरपंचायतीत आता बदल हवा आहे, अशी भावना मतदारांची झाली आहे. आजतागायत काँग्रेस पक्षाने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे सुरक्षित, सुशिक्षीत आणि सुंदर शहरासाठी रेणापूरकरांनी काँग्रेस पक्षाला भरभरून साथ द्यावी व येत्या २ डिसेंबर रोजी […] The post नगर पंचायत काँग्रेसच्या ताब्यात द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 11:58 pm

संविधान दिनाच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

लातूर : प्रतिनिधी भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘घर घर संविधान’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत समाज कल्याण विभागामार्फत आयोजित संविधान रॅलीला विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संविधान स्तंभ येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या […] The post संविधान दिनाच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 11:54 pm

नाफेडकडून संथगतीने सोयाबीन खरेदी

लातूर : प्रतिनिधी जिल्हयातील पिकांना अतिवृष्टीच्या पावसाने झोडपून काढल्यानंतर शेतक-यांच्या उरल्या सुरल्या अशा आडत बाजारात सोयाबीन विक्रीसाठी गेल्यानंतर निराशेत बदलत आहेत. शासनाने सोयाबीनला ५ हजार ३२८ रूपये हमीभाव जाहिर केला असता आडत बाजारात ४ हजार ७०० रूपयांच्या आसपास सोयाबीनला दर मिळत आसून सोयाबीनला क्विंटल मागे ७०० ते ८०० रूपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी शासनाच्या […] The post नाफेडकडून संथगतीने सोयाबीन खरेदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 11:52 pm

निवडणुकांच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय:शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती, जिल्हा बँकांना सक्ती न करण्याचे आदेश

परतीच्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या राज्यातील बळीराजासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून पुढील एक वर्ष कर्जाची वसुली न करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत. कर्जाच्या वसुलीला एक वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना कर्जाचा हप्ता भरावा लागणार नाही. सरकारने दिलेले आदेश काय? राज्यामध्ये जून ते सप्टेंबर, २०२५ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे शेती पिक आणि शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, घरांची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरीत करणे या करीता आपदग्रस्तांना दृष्काळ सदृष्य परिस्थितीत लागू असणान्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक १०.१०.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. त्यामध्ये सहकार विभागाशी संबंधित खालील सवलतींचा समावेश आहे. (१) सहकारी कर्जाचे पुनर्गठन(२) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती (एक वर्षासाठी) महसूल आणि वन विभाग शासन निर्णय दिनांक १०.१०.२०२५ मध्ये नमूद अतिवृष्टी आणि पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू असणार आहे. बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधीत शेतक-यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण आणि शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती बाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. स्थानिक निवडणुकीपूर्वी 'मास्टरस्ट्रोक'? राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच पिचलेला शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दबला गेला होता. आता वसुली थांबल्यामुळे लाखो शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 11:20 pm

गुंगीचे औषध पाजून महिलेकडून अत्याचाराचा प्रयत्न:खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी, विवाहित तरुणाचा आरोप

पुणे शहरातील कोथरूड भागात एका महिलेने गुंगीचे औषध पाजून एका विवाहित तरुणावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेने तरुणाची खासगी छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेली महिला ४२ वर्षांची असून, ती कोथरूड भागात राहते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्वतःला वकील असल्याचे सांगत होती आणि उच्च न्यायालयात कार्यरत असल्याचे भासवत होती. तक्रारदार तरुण विवाहित असून, तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचा रहिवासी आहे. तक्रारदार तरुण कुटुंबीयांसोबत देवदर्शनासाठी गेला असताना त्याची आरोपी महिलेशी ओळख झाली होती. महिलेने ओळख वाढवून तरुणाला आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिने गुंगीचे औषध पाजून तरुणावर अत्याचाराचा प्रयत्न केला, असा आरोप तरुणाने केला आहे. तसेच, महिलेने तरुणाची खासगी छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर सातत्याने महिला तक्रारदार यांच्याकडे पैशांची मागणी करत त्रास देत होती.अखेर महिलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने अखेर कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या महिलेविरुद्ध यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का, तसेच तिने अशाच पद्धतीने आणखी काही जणांची फसवणूक केली आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:37 pm

निवडणूक काळात सोशल मीडियावर पोलिसांची नजर:आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास थेट गुन्हा; ठाणेदारांचे नागरिकांना दक्षता पाळण्याचे आवाहन

दर्यापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोशल मीडियावर कडक नजर ठेवली आहे. समाजात तणाव निर्माण होऊ नये आणि निवडणुकीचे वातावरण दूषित होऊ नये यासाठी आक्षेपार्ह, भडकावू किंवा अफवा पसरवणाऱ्या पोस्टवर तातडीने कारवाई केली जाईल, असे दर्यापूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शहर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा वापर करताना विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तोंडी इशारे किंवा नोटीस देण्याऐवजी थेट गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जातीय तेढ वाढवणाऱ्या, शांतता भंग करणाऱ्या किंवा निवडणूक प्रक्रियेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही पोस्टला सवलत दिली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, अशा गुन्ह्यांना दंड आणि कारावासाची तरतूद आहे. अफवा किंवा उत्तेजित करणारी माहिती पसरवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संदेश 'फॉरवर्ड' करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून घ्यावी. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, दिशाभूल करणारी किंवा जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवला जाईल. नागरिकांनी कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता तपासावी आणि ती शहर व परिसराची शांतता भंग करणारी नसावी याची खात्री करावी. निवडणुकीच्या काळात अफवा मोठ्या प्रमाणात पसरतात. काही नागरिक जाणीवपूर्वक इतरांचे हनन करण्याचा प्रयत्न करतात. असे वर्तन टाळावे आणि सर्वांना मदत होईल अशीच कृती करावी, असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:33 pm

दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पाच क्षेत्रीय अधिकारी नियुक्त:मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केल्या नियुक्त्या, दोन अधिकारी राखीव

दर्यापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि इतर प्रशासकीय विभागातील उपविभागीय अभियंत्यांचा यात समावेश आहे. याशिवाय, दोन अतिरिक्त क्षेत्रीय अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. मतदानाच्या संचालनासाठी या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या १२ प्रभागांसाठी ५ झोन तयार करण्यात आले असून, या पाच झोनची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रांचा कारभार त्यांच्या अधिपत्याखाली चालणार आहे. या पाच क्षेत्रीय अभियंत्यांच्या निवडीमुळे प्रभागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच, त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रांचीही जबाबदारी देण्यात आली आहे, ज्यामुळे मतदान केंद्रांवरील नियंत्रणासाठी ते जबाबदार असतील. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खंडारे आणि रवींद्रकुमार कानडजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये उपविभागीय अभियंता रवींद्र शेगोकार यांच्याकडे प्रभाग क्रमांक १, २, ३ ची जबाबदारी आहे. उपविभागीय अभियंता रोहित बादगुडे यांच्याकडे प्रभाग ४, ५, ६, तर उपविभागीय अभियंता पंकज घाडगे यांच्याकडे प्रभाग ७ व १० ची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपविभागीय अभियंता सुनील पैठणकर यांच्याकडे प्रभाग ८, ९ आणि सहायक निबंधक किशोर बलिंगे यांच्याकडे प्रभाग ११, १२ ची जबाबदारी आहे. कनिष्ठ अभियंता पी.ए. तंबाखे व दर्शन खंदारकर हे दोन अधिकारी राखीव आहेत. निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची नियमावली जाहीर केली आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान, सर्व उमेदवारांसह लोकप्रतिनिधींनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रचार सभा आणि बॅनर लावण्याबाबत पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करताना आढळल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:31 pm

शिक्षक पात्रता परीक्षा वाद:5 डिसेंबर रोजी शिक्षकांचे 'शाळा बंद' आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात शिक्षकांना संरक्षण मिळावे आणि संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी ५ डिसेंबर रोजी 'शाळा बंद' आंदोलनाची हाक दिली आहे. या दिवशी शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. शिक्षकांनी यापूर्वी अनेकदा शासनाकडे पत्रव्यवहार केला आणि संबंधित मंत्र्यांसोबत बैठकाही घेतल्या. मात्र, शासनाकडून अनुकूल प्रतिसाद न मिळाल्याने हे आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोर्चाद्वारे या दोन प्रमुख मागण्यांसह इतर मुद्द्यांवरही शासनाचे लक्ष वेधले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने नव्याने नोकरीत लागणाऱ्या शिक्षकांसह सध्या नोकरीत असलेल्या ५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांसाठी नवीन पात्रता चाचणी (टीईटी) लागू केली आहे. नोकरीत असलेल्या शिक्षकांचा या चाचणीला तीव्र विरोध आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील सहापेक्षा अधिक राज्यांनी शिक्षकांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने आश्वासन देऊनही अशी कोणतीही कृती केली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी ५ डिसेंबरच्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचा निर्णय घेण्यासाठी विविध शिक्षक संघटनांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षक समितीचे नेते गोकुळदास राऊत होते. जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहातोंडे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:29 pm

नव्या श्रम संहितेविरोधात सरकारी कर्मचारी आक्रमक:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, कायदे रद्द करण्याची पंतप्रधानांकडे निवेदनातून मागणी

अमरावती येथे विविध कर्मचारी संघटनांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या नवीन श्रम संहितेविरोधात निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठवण्यात आले. या निवेदनाद्वारे नवीन श्रम कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. संयुक्त कामगार कर्मचारी संघटना कृती समितीचे पदाधिकारी कॉ. सुभाष पांडे, कॉ. रमेश सोनुले, कॉ. महेंद्र बूब, कॉ. वंदना बुरांडे आणि कॉ. मिरा कैथवास यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अमरावती जिल्ह्यातील विविध कामगार-कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. केंद्र सरकारने ४४ कामगार कायदे एकत्रित करून चार नवीन श्रम संहिता लागू केल्या आहेत. या प्रक्रियेत कामगारांच्या हिताच्या अनेक तरतुदींवर गदा आणल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संविधान दिनी देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून अमरावतीतही ही निदर्शने करण्यात आली. आंदोलकांच्या मते, नवीन श्रम संहितांमुळे अनेक महत्त्वाचे कायदे रद्द झाले आहेत. यामध्ये कामगारांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्ष करून मिळवलेला ८ तासांच्या कामाचा अधिकार, तसेच १९२६ च्या औद्योगिक विवाद अधिनियमाद्वारे मिळालेला संघटना स्थापन करण्याचा आणि संप करण्याचा अधिकार यांचा समावेश आहे. याशिवाय, पेन्शन, सामाजिक सुरक्षा, ईएसआयसी कायदा, किमान वेतन, कंत्राटी पद्धत निर्मूलन आणि कामगार वर्गाला राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार बदलून भांडवलदार आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या हिताचे कायदे केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. आंदोलनात अंकुश वाघ, पद्माताई गजभिये, वंदना बुरांडे, गणेश मुंधरे, दीपक विधळे, ॲड. एस. डी. कपाळे आदी सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:21 pm

सामाजिक विषमता लोकशाहीसाठी धोक्याची घंटा:प्रा. गौतमपुत्र कांबळे यांचे संविधान दिनी प्रतिपादन, म्हणाले - लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य

राजकीय लोकशाही टिकवण्यासाठी सामाजिक लोकशाही आणि बंधुता महत्त्वाची आहे, कारण लोकशाहीत बंधुत्व अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमपुत्र कांबळे यांनी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आयोजित संविधान दिनानिमित्त एस.एम. जोशी फाउंडेशन सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. कांबळे म्हणाले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचे नाते एकमेकांशी सुसंगत आहे. आपल्या समाजात गरीब-श्रीमंत अशी विषमता दिसून येते, जी आपल्या अज्ञान आणि उच्च सहनशीलतेमुळे आपण सहन करतो. भौतिक गोष्टी बाजूला ठेवून मनुष्य समान आहे हे तत्व स्वीकारून समाजात समानता आणणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांनी 'संविधानाच्या परिप्रेक्षात भारतीय लोकशाहीची वाटचाल - नेहरू ते मोदी' या विषयावर, तर माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी 'बी.एन. रावना संविधानाचे शिल्पकारत्व देण्याचा प्रयत्न' या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अन्वर राजन यांच्यासह उद्घाटक ॲड. अभय छाजेड उपस्थित होते. प्रा. कांबळे यांनी पुढे सांगितले की, आपल्या आजूबाजूला वाईट गोष्टी घडत असताना आपण नेमके काय करतो, असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. भय, श्रद्धा, स्वार्थ आणि अज्ञान ही वाईटाची चार प्रमुख अंगे आहेत. केवळ बौद्धिक चर्चा करून कृती न केल्यास त्या चर्चांना अर्थ नाही, त्यामुळे प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे. देशात मोठ्या प्रमाणात असलेली सामाजिक विषमता बदलण्याची गरज आहे. ठराविक जात आणि धर्म आधारित प्राबल्य हे समूह हुकूमशाहीकडे वाटचाल करणारे आहे. ज्यांनी जात आणि धर्म विचारांची चौकट मोडून वाटचाल केली, ते महापुरुष झाले. जाती नष्ट करण्यासाठी जातीची बंधने मोडली पाहिजेत आणि यासाठी जातिनिर्मूलन कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. प्रचलित निवडणूक पद्धत बदलण्याची गरज असून, मताला महत्त्व नसल्याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीचे चार खांब आज जाती, धर्म आणि भ्रष्टाचार यांनी पोखरले आहेत, त्यामुळे पाचवा खांब म्हणून 'सेक्युलरिझम' (धर्मनिरपेक्षता) निर्माण झाला पाहिजे, कारण तोच समाजाचा डोलारा पेलू शकतो. अनुदानित शाळांमध्ये कोणतेही धर्म आधारित शिक्षण दिले जाऊ नये, कारण ते सर्व समाजाच्या विरोधात आहे. राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मसुदा समितीचे सहा सदस्य होते आणि त्याचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.डॉ.आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार असून सल्लागार बी.एन.राव यांचे नाव त्याकाळी निर्माते म्हणून कोणी घेतले नसल्याचे दिसून येते आणि ते प्रशासकीय सेवक होते. १३ विविध कमिट्यांचे अहवाल एकत्र करून त्यांनी संविधानाचा कच्चा मसुदा तयार केला. त्यात चार महिने आवश्यक ते बदल डॉ.आंबेडकर यांनी अभ्यासपूर्ण केले आणि त्यानंतर पुढे आवश्यक ते मोठे २० बदल करून अंतिम ड्राफ्ट काम केले. सहा महिने काम केल्यावर राव यांची संयुक्त राष्ट्रसंघात बदली झाली पुढे संविधान निर्मितीचे काम दीड ते दोन वर्ष सुरू होते त्यामुळे राव यांना संविधान शिल्पकार म्हणणे चुकीचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:17 pm

नगर परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट:राज्यातील 3 ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती, उमेदवारांच्या निधनामुळे आयोगाचा मोठा निर्णय

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत असतानाच निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील तीन वेगवेगळ्या प्रभागांतील निवडणुका तूर्तास स्थगित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 46 नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या पक्षांचे स्टार प्रचारक मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, या उत्साहाच्या वातावरणात काही ठिकाणी उमेदवारांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली असून, निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठल्या निवडणुका स्थगित? निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, रद्द करण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये नाशिक, धुळे आणि बीड जिल्ह्यातील प्रत्येकी एका प्रभागाचा यात समावेश आहे. शंभरहून अधिक जागा बिनविरोध दरम्यान, एकीकडे काही ठिकाणी निवडणूक स्थगित झाली असतानाच, दुसरीकडे राज्यात 100 हून अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, या प्रभागांमध्ये आता मतदान होणार नाही. उर्वरित सर्व जागांसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. उमेदवारांचा प्रचार शिगेला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे 5 दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने वेग घेतला आहे. गावागावात राजकीय सभा, रॅली आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा किंवा लोकसभेप्रमाणे येथे सरळ युती किंवा आघाडी दिसत नसून, अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष 'स्वबळावर' नशीब आजमावताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात लढताना दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:11 pm

भारताला २० वर्षांनंतर राष्ट्रकुलचे यजमानपद

ग्लासगो : वृत्तसंस्था भारताला २०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे (कॉमनवेल्थ गेम्स) यजमानपद मिळाले आहे. बुधवारी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे कॉमनवेल्थ स्पोर्टस एक्झिक्युटिव्ह बोर्डाच्या बैठकीनंतर अहमदाबादला यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आले. २०३० ला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हा शताब्दी सोहळा भारतात आयोजित करण्याची इच्छा कॉमनवेल्थ स्पोर्टने व्यक्त केली होती. पहिली राष्ट्रकुल स्पर्धा १९३० […] The post भारताला २० वर्षांनंतर राष्ट्रकुलचे यजमानपद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 10:00 pm

विदेशात पळालेल्या आरोपींना आणण्याचा अधिकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कायद्यापासून वाचण्यासाठी परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याचा देशाला पूर्ण अधिकार आहे. न्यायालयाने दुबईत राहणा-या विजय मुरलीधर उधवानीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. यामध्ये उधवानीने भारताने यूएईला केलेली प्रत्यार्पणाची विनंती रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु याबाबत सुप्रीम कोर्टाने सुनावणीस नकार देत विदेशात पळून गेलेल्या आरोपींना भारतात आणण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे […] The post विदेशात पळालेल्या आरोपींना आणण्याचा अधिकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 9:58 pm

हाँगकाँगमध्ये एकाचवेळी इमारतींना आग; १३ ठार

हाँगकाँग : हाँगकाँगच्या एका मोठ्या निवासी संकुलातील उंच अपार्टमेंट इमारतींना लागलेल्या भीषण आगीत १३ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर किमान १५ हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, एकाचवेळी सर्व टॉवरना आग लागल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याची चौकशी सुरू आहे. ही आग बुधवार दुपारच्या सुमारास लागली आणि रात्रीपर्यंत आग मोठ्या […] The post हाँगकाँगमध्ये एकाचवेळी इमारतींना आग; १३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 9:55 pm

5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर:आता 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार, 'सीटीईटी' परीक्षेमुळे राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (CBSE) 'केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा' (CTET) आणि राज्याची शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी, म्हणजेच ८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली होती. राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक स्वतः 'सीटीईटी' प्रविष्ट होत असतात. एकाच दिवशी दोन महत्त्वाच्या परीक्षा आल्याने शिक्षकांची गैरसोय होणार होती. त्यामुळे शिक्षक व विविध संघटनांकडून शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत परीक्षा परिषदेने परीक्षेचा दिनांक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी याबबतचे आवाहन केले असून सर्व विद्यार्थी, पालक, शाळा आणि परीक्षा केंद्रांनी या बदलाची नोंद घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. पालकांसाठी सूचना शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत (शिष्यवृत्ती) दिली जाते. परीक्षेच्या तारखेत बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त दोन आठवड्यांचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे पालकांनी आता २२ फेब्रुवारी या नव्या तारखेनुसार मुलांच्या अभ्यासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा काय असते? महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांमधील प्रज्ञा शोधण्यासाठी 'शिष्यवृत्ती परीक्षा' घेतली जाते. ही विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत मिळवण्याची एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. या परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर विद्यार्थ्यांची विचारक्षमता वाढवणे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांची (MPSC/UPSC) शालेय स्तरावरच पायाभरणी करणे, हा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 9:46 pm

छत्रपती संभाजीनगरात एसएफआयचा संविधान जागर:डॉ. आंबेडकर विद्यापीठासह विविध महाविद्यालयांत उद्देशिकेचे सामूहिक वाचन

भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करण्यासाठी आजच्या युवा पिढीला सक्रिय योगदान द्यावे लागणार आहे, तेव्हाच संविधानाचा खरा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (SFI) जिल्हा सचिव अरुण मते यांनी केले. एसएफआयच्या वतीने शहरात मंगळवारी (२६ नोव्हेंबर) संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये एसएफआयच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिवर्तनवादी गाणी आणि संविधानावर चर्चा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसोबत सामाजिक चळवळीतील परिवर्तनवादी गाणी गाऊन वातावरणनिर्मिती करण्यात आली. तसेच, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधानातील मूलभूत मूल्ये, लोकशाही, समानता आणि न्याय या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करून ही मूल्ये दृढ करण्याचा संकल्प उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यकर्त्यांनी केला. संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी सज्ज राहा एसएफआय छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष मनिषा बल्लाळ यांनी आज संविधानानिक मुल्यांवर हल्ले होत असून त्याविरोधात आपण भारतीय म्हणून ठामपणे उभे राहिले पाहिजे असे सांगितले. या प्रसंगी जिल्हा कमिटी सदस्य शितल चोपडे, विजय उमाळे, अशितोष ठोंबरे, प्रदीप तेलंग, संकेत चव्हाण,सुरज देवकर, गितीका आवटे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन एसएफआय जिल्हा कमिटीने केले.संविधान दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 9:12 pm

नगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण करून मारहाण

मुंबई : प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आलेली घटना अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे. संविधान दिनाच्या दिवशी भाजपने सकाळी सकाळी लोकशाहीची हत्या केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बगलबच्यांनी लोकशाहीचा खून पाडला आहे. ऐन निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला अपहरण करून मारहाण होते, हे काँग्रेस पक्ष कदापि […] The post नगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण करून मारहाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 9:10 pm

दानवेंचा बंगला संजय शिरसाटांकडे

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निवृत्त झाल्यामुळे रिकामा झालेला मंत्रालयासमोरील अजिंक्यतारा हा शासकीय बंगला आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना देण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे शिरसाट यांचा मुक्काम मंत्रालयामोरील बंगल्यात असणार आहे. अंबादास दानवे यांनी मागील अडीच वर्षे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज केले. विरोधी पक्षनेते असल्याने मंत्रिपदाच्या दर्जानुसार […] The post दानवेंचा बंगला संजय शिरसाटांकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 8:57 pm

पुणे पुस्तक महोत्सव 13 ते 21 डिसेंबरला:दिल्लीतही चर्चा, यंदा नवा विक्रम प्रस्थापित करेल - मुरलीधर मोहोळ

पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सांगितले की, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात होणाऱ्या या महोत्सवाची ख्याती आता दिल्लीतही पोहोचली आहे. पुणेकरांच्या उत्साहामुळे महोत्सवाची व्यापकता वाढत असून, यंदाही तो नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित या महोत्सवाच्या तिसऱ्या कार्यालयाचे उद्घाटन संविधान दिनाचे औचित्य साधत केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ संपादक व लेखक अरुण खोरे, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महोत्सव संयोजक प्रसेनजित फडणवीस आणि आनंद काटीकर, तसेच बागेश्री मंठाळकर व डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री मोहोळ यांनी नमूद केले की, मोबाइल आणि समाजमाध्यमांच्या काळात पुणे पुस्तक महोत्सवातून पुस्तक वाचनाबाबतची जागृती होत आहे. 'पुणेकर वाचत आहेत' या उपक्रमामुळे वाचन चळवळीला नवे बळ मिळत आहे. या महोत्सवाचा प्रतिसाद वर्षागणिक वाढत असल्याने तो राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पावला असून, संसदेच्या अधिवेशनातही त्याची चर्चा होत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुस्तकांची जादू वेगळी असून, ती सर्वसामान्यांच्या जीवनाला प्रेरणा व दिशा देतात. पुस्तकांची ही ताकद पुणे पुस्तक महोत्सव अधोरेखित करतो. युनेस्कोच्या 'जागतिक पुस्तक राजधानी' दर्जासाठी पुणे शहराला नामांकन मिळाले असून, त्यासाठी यंदाचा महोत्सव अतिशय महत्त्वाचा आहे. संविधान दिनी महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याचा आनंद व्यक्त करत डॉ. अरुण खोरे यांनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि थोर साहित्यिक-संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या पुस्तक प्रेमाच्या आठवणी सांगितल्या. हा महोत्सव 'वाचणारा माणूस' घडवेल, अशी अपेक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली. पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख संयोजक राजेश पांडे यांनी महोत्सवाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. 'डॉ. आंबेडकर यांना पुस्तक वाचनाची प्रचंड आवड होती. संविधान हे आपल्या सर्वांचे आदर्श आहे. त्यामुळे संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे पूजन करून पुस्तक महोत्सवाच्या कार्यालयाचे उदघाटन करत आहोत. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गत वर्षीच्या पुणे पुस्तक महोत्सवात ९७ हजार पुस्तकांच्या साह्याने संविधानाचे मुखपृष्ठ साकारण्याचा विश्वविक्रम करण्यात आला. यंदाच्या पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, एक हजार पुस्तकांचे स्टॉल आरक्षित झाले आहेत. पुणेकरांनी या वाचन चळवळीला अधिक बळकट करावे,' असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 8:52 pm

साक्षीभावाने जगण्याची कला शिकावी:स्वामी कृष्ण चैतन्य यांचे 30 व्या व्याख्यानमालेत प्रतिपादन

आधुनिकीकरणाच्या युगात अध्यात्माची चुकीची धारणा वाढत आहे, जिथे केवळ भीतीपोटी मनुष्य अध्यात्माचा आधार घेतो. यावर उपाय म्हणून पूर्णत्व आणि समत्वाने जगावे, असे मत किमया आश्रमचे संस्थापक स्वामी कृष्ण चैतन्य यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ते 'आधुनिक जीवन पद्धती आणि अध्यात्म' या विषयावर बोलत होते. स्वामी कृष्ण चैतन्य म्हणाले की, मनुष्य वर्तमान काळात जगण्याऐवजी भूतकाळ आणि भविष्यात अधिक रमतो, जे दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. साक्षीभावाने जगण्याची कला शिकल्यास व्यक्ती शांती आणि सुखात राहू शकते. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत गुंफण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, प्रा. गायकवाड आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते. स्वामी कृष्ण चैतन्य यांनी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी भिन्न स्वरूपाच्या असल्याचे स्पष्ट केले. स्वतःला मिटविण्यासाठी अध्यात्म असून त्यातून आनंद व शांती मिळते, तर मौन आणि शांतीचा मार्गच परमेश्वराकडे जाणारा आहे. विज्ञान हे नवीन संशोधनासाठी असून त्यातूनच मनुष्य जिवंत राहू शकतो, असेही ते म्हणाले. तत्पूर्वीच्या सत्रात प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये आणि किंकर विठ्ठल रामानूज व किंकर विश्वेशरैय्या आनंदा यांची व्याख्याने झाली. डॉ. संजय उपाध्ये यांनी 'मी, माझे हट्ट आणि मनःशांती' या विषयावर विचार मांडले. डॉ. उपाध्ये यांनी सांगितले की, त्रेतायुगापासून कलियुगापर्यंतचे जग हट्टावर चालले आहे. हट्ट ऐकणे आणि न ऐकणे दोन्ही विनाशाकडे जाते. त्रेतायुगात कैकयीने जो हट्ट केला, त्यातून दशरथाला हो म्हणावे लागले. हट्ट जेव्हा हक्काच्या वर येतो, तेव्हा तो धर्म म्हणून उदयास येतो. आनंद आणि शांतीच्या प्राप्तीसाठी 'मी' ला घट्ट चिकटलेला हट्ट बाजूला सारावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 8:51 pm

कसबा पेठेत वाड्यात मणी-मल्ल वधाचा देखावा:चंपाषष्ठी निमित्त स्वरूपा फाऊंडेशनतर्फे आयोजन; अभिनेते देवदत्त नागे यांनी दिली भेट

मणि-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून श्री खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले. त्याचे स्मरण करीत साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी निमित्त कसबा पेठेतील वाड्यात मणी-मल्ल वधाचा देखावा साकारण्यात आला आहे. फडके हौद चौकाजवळील स्वरूपा फाउंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष तुषार शिंदे यांनी वाड्यातील त्यांच्या घरामध्ये हा देखावा साकारला आहे. तब्बल ६ फूट उंच आणि १० फूट रुंद असा हा देखावा साकारण्यात आला आहे. यामध्ये जागरण गोंधळ, तळी भंडारा, कुळधर्म, कुळाचार असे सर्व साकारण्यात आले असून याचे कामे मागील ३० दिवसांपासून सुरु होते. याकरिता तुषार शिंदे, अभी निजामपूरकर, प्रसाद कारंजकर, श्रीनिवास टेमगिरे, ओमकार कवळे, शिवेन शिंदे, रवींद्र शिंदे, ज्ञानेश्वर पवार, संभाजी मोरे यांनी अखंडितपणे मेहनत घेतली आहे. खंडोबाची भूमिका साकारणारे कलाकार देवदत्त नागे, सुरभी हांडे, प्राजक्ता गायकवाड यांनी देखील या देखाव्याला भेट देत याचे कौतुक केले आहे. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषार शिंदे म्हणाले, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून हा उत्सव सुरु होतो. याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात. खंडोबा हे ज्यांचे कुलदैवत असते. अशांच्या घरी हे नवरात्र असते. त्याप्रमाणे आमच्या वाड्यात देखील हा उत्सव दरवर्षी साजरा होतो. आम्ही दरवर्षी विविध प्रकारचे देखावे साकारत असतो, यंदा हा मणी-मल्ल वधाचा साकारण्यात आला. तरी पुणेकरांनी हा देखावा नक्की पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 8:49 pm

यापूढे अवैध वाळू वाहतूक वाहन परवाना रद्द करणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली आहेत. आता राज्य परिवहन प्राधीकरणाने वाळू तस्करीत वापरण्यात येणा-या वाहनांविरोधात कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता वाळू तस्करी करणारे वाहन पहिल्यांदा पकडले गेल्यास, परवाना ३० दिवस निलंबित ठेवून वाहन अटकावून ठेवण्यात येणार आहे. दुसरा गुन्हा झाल्यास ६० दिवस परवाना निलंबित व वाहन […] The post यापूढे अवैध वाळू वाहतूक वाहन परवाना रद्द करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 8:48 pm

महापालिकेच्या मतदारयादीवरील आक्षेपासाठी एक आठवड्याची मुदतवाढ

मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी आणखी सहा दिवसांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी मतदार यादीशी संबंधित सुधारित कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना ३ डिसेंबर २०२५ पर्यंत दाखल करता येतील. आधीच्या कार्यक्रमानुसार ही मुदत २७ […] The post महापालिकेच्या मतदारयादीवरील आक्षेपासाठी एक आठवड्याची मुदतवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 8:46 pm

नीलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ‘धाड’:पैशांची बॅग पकडल्याचा दावा, मालवणमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटात जुंपली

राज्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकणात महायुतीमध्येच ठिणगी पडल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाटल्याच्या संशयावरून थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकून ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याने खळबळ उडाली आहे. राणे यांनी संबंधित कार्यकर्त्याच्या घरात पैशांची बॅग पकडल्याचा दावा करत व्हिडिओ व्हायरल केला आहे. या घटनेमुळे ऐन मतदानाच्या तोंडावर सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप आमनेसामने आले आहेत. येत्या २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. प्रचाराची लगबग सुरू असतानाच मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून पैसे वाटले जात असल्याची कुणकुण नीलेश राणे यांना लागली. त्यानंतर राणे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट भाजप कार्यकर्ता विजय केनवडेकर यांचे घर गाठले. यावेळी घरात पैशांची बॅग आढळून आल्याचा दावा राणे यांनी केला आहे. येथे केवळ एकच बॅग नाही, तर पैशांच्या अशा आणखी ३ ते ४ बॅगा आहेत, असा गंभीर आरोप करत नीलेश राणे यांनी या सर्व प्रकाराचे चित्रीकरण केले. हा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिस अन् निवडणूक अधिकाऱ्यांची धाव घटनेची माहिती मिळताच सदरील प्रकाराचे गांभीर्य ओळखून निवडणूक अधिकारी आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सापडलेली रोकड आणि नीलेश राणे यांनी केलेले चित्रीकरण याच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. चव्हाणांच्या माध्यमातून पैशांचे वाटप सुरू 'मी निवडणूक अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आहे. पोलिस इथे उपस्थित आहेत. कालपासूनच यांच्या हालचाली सुरु आहेत. त्यांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हे एकच घर नाही. अशी आणखी ८ ते १० घरं आहेत. हे पैसे किती आहेत ते मी मोजलेले नाहीत. आम्ही या पैशांना हात लावलेला नाही. चव्हाण साहेबांच्या माध्यमातून पैशांचे वाटप सुरु आहे. पोलिसांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी पैसे ताब्यात घ्यावेत. या प्रकरणाचा तपास करुन सोक्षमोक्ष लावावा,' अशी मागणी आमदार राणे यांनी केली आहे. भाजपने नीलेश राणेंचे आरोप फेटाळले एकीकडे नीलेश राणे यांनी पैसे वाटपाचा आरोप केला असला तरी, संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी नसून माझ्या व्यवसायाचे आहेत, असे स्पष्टीकरण संबंधित पदाधिकाऱ्याने दिले आहे. दुसरीकडे, भाजप नेते आशिष शेलार यांनीही नीलेश राणे यांचे आरोप खोडून काढले आहेत. ही माहिती चुकीची असून भाजप कार्यकर्त्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. महायुतीत वितुष्ट? राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष आमनेसामने लढत आहेत. त्यातच नीलेश राणे यांच्या या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे मालवणमध्ये युतीधर्माला तडा गेल्याचे बोलले जात आहे. या राड्याचा मतदानावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 8:45 pm

वाळू माफियांवर महसूलमंत्र्यांचा 'सर्जिकल स्ट्राईक':अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परमीट आता जागेवरच रद्द, बावनकुळेंचे आदेश

गौण खनिजांची वाहतूक करताना सापडलेल्या वाहनांचा परवाना (परमिट) थेट निलंबित किंवा रद्द करण्याची धडक कारवाई आता करण्यात येणार आहे. राज्यातील वाळू व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार अत्यंत कठोर निर्णय घेतला. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक आज (दि २६ ) जारी केले. राज्यात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाळू आणि इतर गौण खनिजांच्या चोरीमुळे शासनाच्या महसुलाची आणि पर्यावरणाची मोठी हानी तर होतेच, सोबतच या अवैध व्यवसायातून गुन्हेगारी वाढत असून, कारवाईसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाच्या मदतीने आता कडक धोरण अवलंबण्यात आले आहे. अशी होणार कारवाई (तीन टप्प्यांत शिक्षा) राज्य परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या नवीन निर्देशानुसार, अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत: या वाहनांवर करडी नजर अवैध उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरले जाणारे ड्रील मशीन, जेसीबी व पोकलैंड, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कॉम्प्रेसर, ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज्ड बोट, एक्सकॅवेटर, मॅकेनाईज्ड लोडर यासारख्या सर्व प्रकारच्या वाहनांवर व साहित्यावरही कारवाई लागू असणार आहे. अवैध वाहतुकीला आळा बसेल - बावनकुळे शासनाचा महसूल चूकविणे हा गंभीर गुन्हा असून, काही लोक जाणीवपूर्वक असा प्रयत्न करतात. त्यांना वचक बसावा यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती तात्काळ परिवहन विभागाला कळवावी, जेणेकरून संबंधित वाहनांवर जागेवरच कारवाई करणे शक्य होईल. तसेच अवैध वाहतुकीला आळा बसेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 8:21 pm

निवडणूक अधिका-यांना धोका

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर दरम्यान, निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिका-यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिस आयुक्तांना पत्र लिहून एसआयआर ड्युटीवर तैनात असलेल्या निवडणूक अधिकारी आणि कर्मचा-यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. २४ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाच्या सुरक्षेत भंग झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय, […] The post निवडणूक अधिका-यांना धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 8:00 pm

पाक माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या?

इस्लामाबाद : पाकिस्तान हा असा देश आहे, जिथे नेहमी काहीतरी घडत असते. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना रसद पुरवली जाते. परंतु याच पाकिस्तानमध्ये सध्या अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या सरकारमध्ये तेथील लष्कराचा हस्तक्षेप आणि यातून समोर होणारा विध्वंस यामुळे पाकिस्तानात नेहमीच हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येतात असे असतानाच आता संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी माहिती […] The post पाक माजी पंतप्रधान इम्रान खान यांची हत्या? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 7:57 pm

भारताचा गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून ४०८ धावांनी पराभव

गुवाहाटी : गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव केला. कोलकाता कसोटीत संघाने भारताचा ३० धावांनी पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेने २५ वर्षांनी भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप केले आहे. २००० च्या सुरुवातीला त्यांनी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा २-० असा पराभव केला होता. पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला […] The post भारताचा गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून ४०८ धावांनी पराभव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 7:54 pm

उरी हायड्रो प्रकल्प होता पाकच्या निशाण्यावर

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत एक मोठी माहिती समोर आली असून सैन्याच्या कारवाईदरम्यान, पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. मात्र, सीआयएसएफच्या जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जबरदस्त शौर्य दाखवत हा हल्ला परतवून लावला. जवानांनी ड्रोन निष्क्रिय केले, महत्त्वाच्या उपकरणांचे संरक्षण केले आणि गोळीबाराच्या मा-यातून सुमारे २५० […] The post उरी हायड्रो प्रकल्प होता पाकच्या निशाण्यावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 7:53 pm

बीएलओंच्या मृत्यूप्रकरणी १ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करा

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगांशी संबंधित विविध याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. मतदार यादी पुनरीक्षण(एसआयआर), पश्चिम बंगालमधील बीएलओंचा मृत्यू, तसेच केरळ आणि तामिळनाडूतील प्रकरणांवर न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद मांडला, तर निवडणूक आयोगाने सर्व आरोप राजकीय असल्याचा दावा केला. […] The post बीएलओंच्या मृत्यूप्रकरणी १ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 7:50 pm

इथिओपियाच्या ज्वालामुखीमुळे दिल्लीत अलर्ट

नवी दिल्ली : इथिओपियाच्या हेले गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठी राख बाहेर आली. ही राख समुद्री मार्गे थेट भारतात मध्यरात्री दाखल झाली. ज्वालामुखीच्या राखेचे ढग भारतात मोठ्या संख्येने सरकताना दिसले. राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये हवेमध्ये राखेचे कण जाणवत होते. भारतातील अनेक शहरांमध्ये हवा खराब झाली. अनेक जिल्ह्यांनी ४४७ प्रदूषण मर्यादा […] The post इथिओपियाच्या ज्वालामुखीमुळे दिल्लीत अलर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 7:48 pm

विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल

नवी दिल्ली : आज देशभरात राष्ट्रीय संविधान दिन साजरा केला जात आहे. संविधान दिन २०२५ निमित्त जुन्या संसद भवनात एक राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम संविधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री […] The post विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 7:46 pm

आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती

नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या सैनिक भरती योजनेत काही बदल केले जाऊ शकतात. सध्या सैन्यात अंदाजे १.८ लाख सैनिकांची कमतरता असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, ४५,००० ते ५०,००० सैनिकांची वार्षिक भरती १,००,००० पर्यंत वाढवली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, २०२०-२१ मध्ये जेव्हा कोविड-१९ साथीचा आजार आला […] The post आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 7:44 pm

महापालिकांच्या मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर:हरकतींसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत, अंतिम यादी 10 डिसेंबरला होणार प्रसिद्ध

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि जनतेचे लक्ष लागले असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (2025) मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला असून, सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार आता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी ३ डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. काय आहे सुधारित कार्यक्रम? राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून मतदार यादीचा नवीन कार्यक्रम कळवला आहे. यापूर्वी 27 नोव्हेंबर ही हरकती घेण्याची अंतिम तारीख होती, ती आता वाढवण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल: हरकती व सूचना : प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता 3 डिसेंबर 2025 पर्यंत असेल. (पूर्वीची तारीख: 27 नोव्हेंबर). अंतिम मतदार यादी : हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची तारीख आता १० डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. (पूर्वीची तारीख: 5 डिसेंबर). मतदान केंद्रे : मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. (पूर्वीची तारीख: 8 डिसेंबर). केंद्रनिहाय यादी : मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख 22 डिसेंबर 2025 असेल. (पूर्वीची तारीख: 12 डिसेंबर). तांत्रिक अडचणींसाठी हेल्पलाईन मतदार यादी तयार करताना प्रशासकीय पातळीवर कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी आयोगाने खबरदारी घेतली आहे. काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठी आयोगाच्या संगणकीकरण कक्षाचे अधिकारी समीर गंदपवार यांच्याशी (022-22886950 / 22012290 ) संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकीची तयारी वेगवान गेल्या काही वर्षांपासून राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या mahasec.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा संपूर्ण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना आपली नावे तपासण्यासाठी आणि काही दुरुस्ती असल्यास ती करण्यासाठी ही वाढीव मुदत महत्त्वाची ठरणार आहे. 10 डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे मानले जात आहे. या सुधारित कार्यक्रमामुळे प्रशासकीय यंत्रणेवरील ताण काहीसा हलका झाला असला तरी, कामाचा वेग वाढवण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर असणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 7:12 pm

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू; प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरातील लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फे-या उपलब्ध करून देत असते. राज्य शासनातर्फे एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा-ये करण्यासाठी मासिक पासमध्ये ६६.६६ टक्के सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. तथापि, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे […] The post शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू; प्रताप सरनाईक यांची घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 6:51 pm

चुकीचा शब्द वापरला; अजित पवारांची दिलगिरी

पुणे : प्रतिनिधी ‘मी चुकीचा शब्द वापरला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंबाजोगाई येथील प्रचारसभेत केलेले वक्तव्य मागे घेतले आहे. अकोल्यातील प्रचारसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, काही नेत्यांची शहरे बकाल आहेत. ते सांगत असताना मी एक चुकीचा शब्द वापरला. मी तो शब्द वापरायला नको होता. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त […] The post चुकीचा शब्द वापरला; अजित पवारांची दिलगिरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 6:50 pm

‘बॉम्बे’वरून केंद्रीय मंत्री अडचणीत

मुंबई : प्रतिनिधी आयआयटी मुंबईच्या पी. सी. सक्सेना सभागृहात काल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र सिंह यांनी आयआयटीच्या नावाचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केले. ‘‘आयआयटीच्या नावात तुम्ही बॉम्बे कायम ठेवले आणि त्याचे मुंबई केले नाही, याबद्दल मी खुश आहे. आयआयटी मद्रासबद्दलही माझ्या याच भावना आहेत,’’ त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ […] The post ‘बॉम्बे’वरून केंद्रीय मंत्री अडचणीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 6:44 pm

पुणे विद्यापीठात संविधान दिन साजरा:डॉ. आंबेडकर संविधानाचे शिल्पकार, राष्ट्रप्रथम भाव महत्त्वाचा; ॲड. गायकवाड यांचे प्रतिपादन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात ॲड. क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, भारतीय संविधान रचनेचे मुख्य श्रेय निर्विवादपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. अर्धवट ज्ञान घेऊन दिशाभूल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. राष्ट्रप्रथम हा भाव आपल्या प्रत्येक कृतीत दिसला पाहिजे. हे व्याख्यान संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभाजवळ झाली. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रमुख पाहुणे ॲड. क्षितीज टेक्सास गायकवाड, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, डॉ. संजय तांबट, सुप्रिया पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे यांसह अन्य मान्यवरांनी उद्देशिकेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यानंतर कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. ॲड. क्षितीज टेक्सास गायकवाड यांनी संविधान निर्मितीची ऐतिहासिक प्रक्रिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम संविधान सभा भाषण आणि आधुनिक भारताने स्वीकारायची जबाबदार नागरिकत्वाची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. ॲड. गायकवाड यांनी स्पष्ट केले की, काही व्यक्ती डॉ. आंबेडकरांच्या विधानांचा अर्धवट आधार घेऊन संविधान निर्मितीचे श्रेय इतरांना देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, संविधानाच्या मूळ आराखड्यातील अडीच हजारांहून अधिक सुधारणा, मूलभूत अधिकारांची मांडणी आणि अंतिम दृष्टिकोन हे सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच योगदान आहे. त्यांनी समाजातील अस्पृश्यता निवारणाच्या अनुच्छेदाला भारतीय समाजावरील काळा डाग संबोधले. ही समस्या पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी सामाजिक चेतना वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. असा अनुच्छेद अस्तित्वात ठेवण्याची वेळच येऊ नये, अशी स्थिती समाजाने निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले. कर्तव्यांविषयी बोलताना, त्यांनी ४२ व्या घटनादुरुस्तीतील ११ मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला. ही मूल्ये केवळ कायदेशीर दबाव म्हणून नव्हे, तर नागरिकधर्म म्हणून पाळली जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्याग, सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यबुद्धीचे सर्वोच्च उदाहरण होते. त्यांनी वैयक्तिक सुखाचा त्याग करून भारताला आधुनिक राष्ट्राची चौकट दिली, असे गायकवाड यांनी नमूद केले. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाच्या अर्पण दिनाचे महत्त्व विशद केले. संविधान निर्मितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे स्मरण करत, त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी आयुष्यातील अपमान आणि छळ सहन करूनही बदला घेण्याऐवजी समाजपरिवर्तनाचा मार्ग स्वीकारला. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अनमोल पैलू होता. त्यांनी तयार केलेल्या संविधानाची अंमलबजावणी योग्य लोकांच्या हाती असली तरच राष्ट्राची प्रगती होते, हा त्यांचा संदेश आजही तितकाच लागू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नागरिकांनी माहितीचा योग्य अर्थ समजून घेणे, दिशाभूल टाळणे आणि देश प्रथम ही भावना जोपासणे आवश्यक असल्याचेही सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 6:35 pm

सहकाऱ्याला धमकी देणारा पोलिस कर्मचारी निलंबित:पुण्यात कैद्यांच्या बंदोबस्तादरम्यान घडला प्रकार, आयुक्तांना घाबरत नसल्याची दिली होती धमकी

पुणे येथे कैद्यांच्या बंदोबस्तादरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याने सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. 'मी पोलिस आयुक्तांना घाबरत नाही' असे म्हणत त्याने सहकाऱ्यावर दगड फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव केशव महादू इरतकर आहे. तो शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. ११ नोव्हेंबर रोजी इरतकर आणि पोलिस कर्मचारी संदीप नाळे हे येरवडा कारागृहातून कैद्यांना शिवाजीनगर न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वादादरम्यान, इरतकरने नाळे यांना 'तुम्ही निवृत्त सैनिक काही कामाचे नाहीत. माझ्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. मी पोलिस आयुक्तांना घाबरत नाही,' अशी धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक धायगुडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, इरतकरने नाळे यांना शिवीगाळ केली आणि रस्त्यावरील दगड उचलून जीवे मारण्याची धमकी दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी इरतकरच्या वर्तणुकीबाबतचा अहवाल पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे पाठवला. या अहवालाच्या आधारे त्याची चौकशी करण्यात आली. पोलिस कर्मचारी असूनही कायद्याची आणि सहकाऱ्यांशी कसे वागावे याची माहिती असताना, सार्वजनिक ठिकाणी इरतकरने केलेले वर्तन पोलिस दलाची प्रतिमा मलिन करणारे आणि अशोभनीय असल्याचे उपायुक्त शिवणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्याला पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 6:33 pm

मुंबई 26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांना पुणे पोलिसांची मानवंदना:सारसबागेत 4 हजार 300 चिमुकल्यांनी चित्रकलेतून वाहिली आदरांजली

मुंबईतील २६/११ हल्ल्यातील हुतात्मा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुणे शहर पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली. सारसबागेत आयोजित विशेष कार्यक्रमात हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या स्तंभाला बँडच्या साथीने मानवंदना देण्यात आली. यावेळी ४ हजार ३०० शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे सारसबागेत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे शहर पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पंकज देशमुख, संजय पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवनकर, कृषीकेश रावले, मिलिंद मोहिते, संभाजी कदम, संदीप भाजीभाकरे, हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे उपस्थित होते. त्यांच्यासोबत राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, राजाभाऊ कदम, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप आणि पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारीही उपस्थित होते. सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, अध्यक्ष नितीन होले, अमर लांडे, सचिन ससाने, उमेश कांबळे, विक्रांत मोहिते, परग शिंदे, विशाल भोसले, दत्ता मिसाळ, जगदीश शेटे, सुनील जाधव, राजाभाऊ महाडिक यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमादरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि खुल्या गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विवेक खटावकर, गिरीश चरवड, संदीप गायकवाड, समीर धर्माधिकारी, नितीन पासलकर, सुधीर लिंगायत, नितीन होले आणि मनोहर देसाई यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राहुल आवारे, रामराज्य सहकारी बँकेचे बाळासाहेब रायकर, हरिदास चव्हाण आणि पराग ठाकूर यांच्या हस्ते पार पडला.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 6:30 pm

सुनीताबाई देशपांडे स्मृती साहित्य संमेलन:डॉ. अरुणा ढेरे अध्यक्ष; पुण्यात 6 डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन

ज्येष्ठ लेखिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक दिवसीय स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन शनिवार, ६ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात होणार असून, ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉ. अरुणा ढेरे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी आणि समन्वयक नितीन जळूकर यांनी ही माहिती दिली. संमेलन सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत वि.का. राजवाडे सभागृह, भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिव पेठ, पुणे येथे पार पडेल. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ सकाळी ९.३० वाजता पं. सत्यशील देशपांडे यांच्या 'स्वरांजली' या कार्यक्रमाने होईल. यामध्ये सुनीताबाईंना आवडणाऱ्या बंदिशींचे सादरीकरण पं. सत्यशील देशपांडे करणार आहेत. सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दुपारी १२.३० वाजता 'साहित्यिक सुनीताबाई' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ लेखिका रेखा इनामदार-साने या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि त्या सुनीताबाई देशपांडे यांच्या 'आहे मनोहर तरी' या पुस्तकावर भाष्य करतील. प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर 'मण्यांची माळ' या पुस्तकावर, तर प्रसिद्ध लेखक डॉ. आशुतोष जावडेकर 'सोयरे सकळ' या पुस्तकावर बोलतील. दुपारी २.३० वाजता 'कवितांजली' या कार्यक्रमाद्वारे रसिकांना पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे यांनी अभिवाचन केलेल्या कवितांचा पुन्हा अनुभव घेता येईल. याचे संहितालेखन डॉ. अरुणा ढेरे यांनी केले असून, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी आणि विराज सवाई अभिवाचन करतील.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 6:29 pm

विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न : शिंदे

सातारा : प्रतिनिधी सातारा ही क्रांतिकारकांची आणि संघर्ष करणारी भूमी आहे. सत्ताधा-यांनी विकासाची मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात काहीच केले नाही. येथे विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. त्यामुळे भविष्यात लोकशाही जिवंत राहील की नाही याची भीती असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, हद्द सोडायची नाही […] The post विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न : शिंदे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 6:19 pm

रामायण केवळ कथा नाही, आदर्शाचा मार्ग:डॉ. धनश्री लेले यांचे रामरक्षा पठण वर्षपूर्ती कार्यक्रमात प्रतिपादन

रामायण ही केवळ कथा नसून सदाचार, कर्तव्यभावना आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश देणारा जीवनमार्ग आहे, असे मत प्रख्यात निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांनी व्यक्त केले. आजच्या पिढीला रामायण फक्त प्रभू श्रीरामाची गोष्ट वाटते, मात्र ते श्रीरामाने आचरणात आणलेला आदर्श मार्ग आहे, असेही त्या म्हणाल्या. ग्रंथ पारायण दिंडी पुणे यांच्यावतीने अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठणाच्या संकल्पपूर्तीनिमित्त सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, रा.स्व.संघ कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, डॉ. संजीव डोळे, संस्थेचे विरेंद्र कुंटे आणि नंदकुमार देव आदी उपस्थित होते. डॉ. धनश्री लेले यांनी जीवनात वेळेचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, जर आपण ठराविक वेळेनुसार आहार घेतला, तर शरीरात जैविक घड्याळे तयार होतात आणि त्या विशिष्ट वेळीच आपल्याला भूक लागते. त्याचप्रमाणे, उपासना ठराविक वेळेला केल्यास मनालाही त्या वेळेची सवय लागते आणि उपासनेची भूक निर्माण होते. नियमित उपासना केल्यास परमेश्वरही भक्तीची वाट पाहतो आणि उपासना न केल्यास परमेश्वरच आपल्या नावाने हाक मारतो, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत यादव म्हणाले की, आपल्या ग्रंथांमध्ये कर्तव्याचा स्पष्ट उपदेश दिला आहे. देव, देश आणि धर्म ही जीवनशैली प्रत्येकाने मनापासून स्वीकारली पाहिजे आणि ती दैनंदिन व्यवहाराचा भाग झाली पाहिजे. जर प्रत्येकाने या मूल्यांचे पालन केले, तर भारताला महासत्ता होण्यापासून जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी अशा संस्थांच्या कार्याची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलून काम केले पाहिजे, असे आवाहन केले. पुणे शहरासाठी काम करताना तुमच्याकडून येणाऱ्या सूचनांचा स्वीकार करून काम करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले. विरेंद्र कुंटे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. अयोध्या येथे झालेल्या रामरक्षा पठण वर्षपूर्ती, चातुर्मासातील व्रताची सांगता आणि घरोघरी रामरक्षा स्तोत्र पठणाच्या संकल्पपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक घरात रामरक्षा पठण झाले पाहिजे या संकल्पाची पूर्ती झाली असली तरी, हे कार्य पुढेही असेच सुरू राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 6:18 pm

गणेश विसर्जनावेळी ध्वनीमर्यादेचे उल्लंघन:पुणे पोलिसांनी 200 हून अधिक मंडळांना बजावली नोटीस, 7 दिवसांत स्पष्टीकरण मागवले

गणेश विसर्जन सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील २०० हून आधिक मंडळांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ध्वनी प्रदुषणाबाबतचा अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मंडळांना नोटीसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता निर्बंध मुक्त गणेश उत्सव पोलिसांच्या कचाट्यात अडकल्याची चर्चा आहे. विसर्जन सोहळ्यात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांना पोलिसांनी नोटीसा बजाविल्या आहेत. ‘ध्वनीप्रदूषण मर्यादा भंग केल्याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंड अशी तरतूद आहे. त्यामुळे या शिक्षेस पात्र ठरणारा गुन्हा का दाखल करू नये, याबाबत मंडळांनी कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे“, असे नोटिशीत सांगितले आहे. ‘मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे लेखी म्हणणे, परवानगी पत्र, तसेच विसर्जन सोहळ्यात ध्वनीवर्धक यंत्रणा उपलब्ध करुन देणाऱ्या व्यावसायिकाचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, मिरवणूक परवाना अशा कागदपत्रांसह संबंधित परिमंडळाच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात उपस्थित रहावे. मंडळाचे पदाधिकारी हजर न राहिल्यास संबंधित मंडळाचे म्हणणे नसल्याचे समजून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ नुसार थेट गुन्हा दाखल केला जाईल’, असे पोलिसांकडून नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. ऐतिहासिक वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन सोहळा ६ सप्टेंबर रोजी यंदा मोठ्या उत्साहात पार पडला. विसर्जन मिरवणुकीची सांगता ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी झाली. विसर्जन मिरवणूक सोहळ्यात मंडळांनी उच्चक्षमतेचे ध्वनीवर्धक आणि प्रखर प्रकाशझोत वापरू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले होते. याबाबत मंडळांना सूचना दिल्या होत्या. विसर्जन सोहळ्यात अनेक मंडळांनी उच्च क्षमतेची ध्वनीवर्धक यंत्रणा आणि प्रकाशझोतांचा वापर केला होता. पोलिसांनी आवाहन केल्यानंतर मंडळांनी ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केले होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 6:16 pm

निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचे महाराष्ट्राला ‘डबल’ गिफ्ट:पुणे मेट्रोच्या दोन नव्या मार्गांना मंजुरी, मुंबईकरांचाही प्रवास होणार सुसाट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी डबल गिफ्ट दिले आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रोच्या दोन नव्या मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे, तर मुंबई उपनगरातील प्रवाशांसाठी बदलापूर-कर्जत रेल्वे मार्गाच्या विस्ताराला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणेकरांसाठी ‘मेट्रो’ गिफ्ट, खडकवासला ते खराडी सुसाट पुण्यातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मेट्रोच्या दोन नवीन टप्प्यांना मंजुरी दिली आहे. यासाठी तब्बल 9 हजार 858 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, येत्या पाच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 1. खराडी ते खडकवासला (लाईन 4) : हा मार्ग 25.5 किलोमीटर लांबीचा असून, यात एकूण 22 स्थानके असतील. यामुळे पूर्व आणि पश्चिम पुणे थेट जोडले जाणार आहे. 2. नळ स्टॉप ते माणिक बाग (लाईन 4-अ) : हा मार्ग 6.1 किलोमीटर असून, यात 6 स्थानके असतील. अशा प्रकारे पुण्यात एकूण 32 किमीचे जाळे आणि 28 नवीन मेट्रो स्थानके उभारली जाणार आहेत. सध्या पुण्यात सुरू असलेल्या मेट्रो लाईन 3, 1, 2-अ आणि 2-बी च्या कामांना यामुळे मोठी जोड मिळणार आहे. मुंबईकरांना दिलासा, बदलापूर-कर्जत मार्गावर 3 री आणि 4 थी लाईन दुसऱ्या एका महत्त्वाच्या निर्णयात, केंद्र सरकारने मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी बदलापूर ते कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 1 हजार 324 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या नव्या मार्गिकांमुळे लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे शक्य होणार असून, मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बदलापूर – कर्जत विभाग मुंबई उपनगरीय कॉरिडॉरचा एक महत्वाचा भाग आहे. येथे जलद मार्गिका नसल्याने प्रवाशांची वाहतूक करताना अडचणी येतात. तिसरा आणि चौथा मार्गाच्या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे आणि प्रवाशांच्या भविष्यातील गरजा पूर्ण होणार आहेत. तसेच दक्षिण भारताला कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास मदत होणार आहे. स्थानिक निवडणुकांपूर्वी विकासाचा मास्टरस्ट्रोक? राज्यात लवकरच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अपेक्षित आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे आणि मुंबई महानगर क्षेत्रासाठी घेतलेले हे निर्णय राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. या प्रकल्पांमुळे लाखो प्रवाशांना थेट फायदा होणार असल्याने सत्ताधाऱ्यांसाठी हा एक ‘मास्टरस्ट्रोक’ ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 6:10 pm

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का:कल्याणमध्ये पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, राजकीय वर्तुळात खळबळ

आगामी नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशातच कल्याणमध्ये काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. गेली 11 वर्षे पक्षाची धुरा सांभाळणारे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, पोटे यांच्या पाठोपाठ अनेक ब्लॉक अध्यक्षांनीही आपापल्या पदांचे राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवल्याने कल्याण काँग्रेसमध्ये मोठे भगदाड पडले आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त असताना कल्याणमध्ये मात्र काँग्रेसंतर्गत नाराजीचा स्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन पोटे हे गेल्या 11 वर्षांपासून जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून अचानक त्यांना राजीनामा देण्याचे आदेश आल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. पोटे यांनी राजीनामा देताच, त्यांच्या समर्थनात इतर प्रमुख पदाधिकारी आणि ब्लॉक अध्यक्षांनीही सामूहिक राजीनामे दिले आहेत. हे सर्व राजीनामे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात आले असून, ते स्वीकारले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेससाठी धोक्याची घंटा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच तळागाळात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आणि अनुभवी जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद खिळखिळी झाली आहे. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत हे डॅमेज कंट्रोल करणे पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. सचिन पोटे 'कमळा'च्या वाटेवर? सचिन पोटे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. यापूर्वी काँग्रेसमधील अनेक नाराज नेत्यांनी भाजप किंवा इतर सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे पोटे आणि त्यांचे समर्थक आता 'घड्याळ' हातात बांधणार की 'कमळ' हातात घेणार, याकडे कल्याणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. हे ही वाचा... मुंबई महानगरपालिकेची मतदार यादी जाहीर:यादीत तब्बल 11 लाख दुबार नावे; एस वॉर्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदारांची संख्या मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या वॉर्डनिहाय आकडेवारीनुसार, मुंबईत तब्बल 11 लाख 1 हजार 505 दुबार मतदार असल्याचे समोर आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून,मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा विरोधकांचा आरोप अखेर सत्य ठरला असल्याचे म्हटले जात आहे. यावरून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 5:40 pm

‘आयआयटी बॉम्बे’च्या नावावरून जुंपली:नातवाला 'बॉम्बे स्कॉटिश'ऐवजी 'बालमोहन'मध्ये टाका, भाजपचा राज ठाकरेंवर बोचरा वार

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 'आयआयटी बॉम्बे'च्या नावासंदर्भात केलेल्या विधानावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानाचा समाचार घेत सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर टीकेची झोड उठवली होती. आता या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने राज ठाकरेंवर वैयक्तिक पातळीवर हल्लाबोल केला आहे. मराठीच्या गप्पा मारण्याआधी आपल्या नातवाला 'बॉम्बे स्कॉटिश'ऐवजी 'बालमोहन विद्यामंदिरात' प्रवेश द्या, असा खोचक सल्ला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरेंना दिला आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी, आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून 'आयआयटी मुंबई' केले नाही, याचा मला आनंद आहे, असे वक्तव्य केले होते. यावर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. हे विधान सरकारच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. मुंबई महाराष्ट्रातच राहिली, याची मळमळ यांच्या पोटात आहे ती आता बाहेर येत आहे, अशी खरमरीत टीका राज यांनी सोशल मीडियावरून केली होती. आता या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नेमके काय म्हणाले अमित साटम? राज ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी राज ठाकरेंच्या 'मराठी प्रेमा'वरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईचे नामांतर होताना भाजपच्याच नेत्याच्या पुढाकाराने बॉम्बेचे मुंबई झाले होते. हे विसरू नका. आम्हाला मुंबईबद्दल शिकवू नका, अशा शब्दांत साटम यांनी राज ठाकरेंना ठणकावले. तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या 'बॉम्बे स्कॉटिश' शाळेत शिकवले, 11 वीला मराठीऐवजी जर्मन भाषा निवडली. हेच का तुमचे मराठी प्रेम? असा सवाल करत, आता निदान नातवाला तरी बालमोहनमध्ये (मराठी शाळेत) दाखला द्या, असा सल्लाही साटम यांनी राज ठाकरेंना दिला. राज ठाकरेंची पोस्ट कल्पनाविस्ताराचा उत्तम नमुना दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही राज ठाकरेंना लक्ष्य केले. राज ठाकरेंची पोस्ट म्हणजे 'कल्पनाविस्ताराचा' उत्तम नमुना आहे. जितेंद्र सिंह यांच्या विधानाचा विपर्यास करून 'मुंबई तोडणार', 'मुंबई गुजरातला जोडणार' अशा अफवा पसरवू नका. मुंबईची जनता याला भुलणार नाही. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार का झाला? आणि मुंबईचे वाटोळे कोणी केले? यावर बोला, असे आव्हान भातखळकर यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. हे ही वाचा... मराठी माणसा जागा हो:मुंबई नको बाँबेच हवे, यातून शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांची हाक; केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकारण तापले महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंबईच्या ओळखीचा मुद्दा पेटला आहे. आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे हे नाव तसेच राहिले, त्याचे मुंबई झाले नाही हे चांगले झाले, असा उल्लेख केला. या एका वाक्याने मराठी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मुंबईचे नाव मराठी इतिहास, मराठी संस्कृती आणि या भूमीच्या मूळ देवी मुंबाशी जोडलेले आहे. त्यामुळे मुंबईऐवजी बॉम्बेचा आग्रह व्यक्त करणे ही महाराष्ट्राच्या अभिमानावर घाला असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 5:15 pm

सरकारच्या योजना एका पक्षाच्या नसून तीनही पक्षांच्या:शिंदेंच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, प्रचारावरून मविआच्या नेत्यांनाही लगावला टोला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीचे नेते प्रचारात सक्रिय दिसत नसल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला आपोआप मतदान करतील, हा भ्रम चुकीचा आहे. जनतेत जाऊन मतांचा जोगवा मागावाच लागतो, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले आहे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरही भाष्य केले. तसेच अंजली दमानिया यांच्या आरोपांवर बोलणे टाळले. प्रचारावरून मविआच्या नेत्यांना टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते प्रचारात का नाही? याची मला कल्पना नाही. निवडणुकांमध्ये जनतेमध्ये मतांचा जोगवा मागणे, यालाच लोकशाही म्हणतात. लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आम्हाला मतदान करतीलच असे कोणला वाटत असेल, तर ते अयोग्य आहे. जनतेमध्ये गेले पाहिजे. आमच्या परीने आम्ही जेवढे जनतेमध्ये जाऊ शकतो, तेवढे चाललो आहोत. ज्याला वाटते जनतेत गेले पाहिजे, ते जात आहेत. ज्यांना वाटत नाही, ते जात नाहीत. त्यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचे नाही. सरकारी योजनांवर तिन्ही पक्षांचा हक्क 'लाडकी बहीण' योजनेचे श्रेय केवळ एका पक्षाचे नसून ते संपूर्ण महायुतीचे असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. लाडक्या बहिणींच्या नावाने महायुतीतील तिन्ही पक्ष मते मागत आहेत. मी मुख्यमंत्री असताना योजना सुरू झाल्याचे शिंदे म्हणाले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित आहोत. स्थानिक पातळीवर काही नगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या युती असू शकतात, पण सरकारच्या योजना या कोणत्याही एका पक्षाच्या नसून त्या तिन्ही पक्षांच्या आहेत. दमानियांच्या आरोपांवर एका वाक्यात प्रतिक्रिया पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अन्यथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, फडणवीस यांनी अवघ्या एका वाक्यात विषय संपवला. अंजली दमानिया नक्की काय म्हणाल्या, हे मला माहीत नाही, असे सांगत त्यांनी यावर अधिक प्रतिक्रिया देणे टाळले. आपले संविधान जगात सर्वोत्कृष्ट संविधानाचा गौरव यावेळी बोलताना फडणवीस यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विषद केले. आपले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला आवाज दिला असून, प्रत्येकाला आपले अस्तित्व टिकवण्याचा आणि स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार दिला आहे, असे गौरवौद्गार त्यांनी काढले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 4:54 pm

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जाच; बार्शीत ग्रामसेवकाची आत्महत्या:दोषींवर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी, मृतदेह स्वीकारण्यास नकार

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या छळाला आणि पैशांच्या मागणीला कंटाळून बार्शीतील एका ग्रामसेवकाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रकाश बाविस्कर असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे. दरम्यान, जोपर्यंत संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका बाविस्कर यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे बार्शी ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बाविस्कर हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि काही कर्मचारी त्यांना नाहक त्रास देत होते. दप्तर तपासणीच्या कारणावरून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती, असा गंभीर आरोप बाविस्कर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सततच्या मानसिक त्रासाला वैतागून 19 नोव्हेंबर रोजी बाविस्कर यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी घरातील खुर्ची पडल्याचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने धाव घेतली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. गेल्या आठवडाभरापासून बाविस्कर मृत्यूशी झुंज देत होते. अखेर उपचार सुरू असतानाच मंगळवारी (26 नोव्हेंबर) त्यांचे निधन झाले. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रुग्णालयात तणाव आणि पोलिसांची भूमिका बाविस्कर यांच्या निधनानंतर संतप्त नातेवाईकांनी बार्शी ग्रामीण रुग्णालयात ठिय्या मांडला. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. शवविच्छेदनापूर्वी आम्हाला विश्वासात घेतले नाही आणि आता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला. यावेळी पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आधी रितसर जबाब नोंदवा, त्यानंतर पुढील कार्यवाही करू, आता लगेच गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, कुटुंबीय आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही काळ पोलिसांशी त्यांची बाचाबाची झाली आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 4:32 pm

राज्यातील ६०० मराठी शाळा होणार बंद?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सरकारी, अनुदानित अशा २० आणि त्याहून कमी पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने येत्या काळात विविध जिल्ह्यांमध्ये तब्बल ६०० हून अधिक शाळांना टाळे लागण्याची शक्यता आहे. यातून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढल्यास राज्यात सध्या सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रियाही रखडण्याची भीती शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात […] The post राज्यातील ६०० मराठी शाळा होणार बंद? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 4:10 pm

सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाचे उकलले गूढ

ठाणे : प्रतिनिधी कल्याण-शीळ महामार्गावरील देसाई खाडीच्या उड्डाणपुलाखाली सुटकेसमध्ये एका २२ वर्षीय महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. त्या महिलेच्या मारेक-याचा पोलिसांनी सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या साह्याने २४ तासांत छडा लागून विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (५०) या आरोपीला बेड्या ठोकल्या. भीक मागणा-या मृत तरुणीला पाच वर्षांपूर्वी आरोपीने मुंब्रा स्थानकातून आपल्या घरी आणले होते. तेव्हापासून ते दोघे […] The post सुटकेसमधील तरुणीच्या मृतदेहाचे उकलले गूढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 4:08 pm

अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाही तर दिल्ली गाठणार:अंजली दमानिया यांचा सरकारला अल्टिमेटम; अमित शहांना भेटण्याचा दमानियांचा इशारा

पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन या व्यवहारातील तथाकथित गैरव्यवहार उघड केला. दमानिया यांनी सांगितलेल्या तपशीलानुसार, पुण्यातील 40 एकर सरकारी जमिनीसंदर्भात अमेडिया कंपनीने डेटा सेंटर सुरू करणार असल्याचे खोटे दाखवून फक्त 500 रुपयांत स्टॅम्प ड्युटी माफी मिळवली, असा आरोप त्यांनी केला. त्यावरून त्यांनी अजित पवार यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. अंजली दमानिया यांनी ठामपणे सांगितले की, अमेडिया कंपनीकडून सबमिट केलेल्या लीज डीड आणि कागदपत्रांमध्ये डेटा मायनिंग, आयटी सेवा व सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचा उल्लेख आहे. यामध्ये 98 लाखांची गुंतवणूक असल्याचेही नमूद करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात हा व्यवहार जमीन विकत घेण्यासाठीचा असल्याचा संशय आहे. बाजारमूल्य शेकडो कोटी असलेल्या जमिनीवर फक्त 500 रुपयांत व्यवहार करण्याचे कट कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढे मोठे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना न सांगता झाले, हे कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दमानिया यांनी यानुसार, केंद्र सरकारने या प्रकरणात 16 जूनलाच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्वरित हस्तक्षेप करण्याचे आदेश दिले होते. मात्र स्थानिक प्रशासनाने या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात राजकीय दबाव आणि संरक्षण मिळाले, असा त्यांचा दावा आहे. जमीन व्यवहाराची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एवढ्या मोठ्या गैरव्यवहारात संबंधित मंत्र्यांची अनभिज्ञता पटत नाही, असेही दमानिया म्हणाल्या. राजीनामा घेतला नाही, तर अमित शहा यांची भेट घेणार या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांनी राज्य सरकारला चव्हाट्यावर आणले आहे. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी आणि अजित पवारांचा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री पदाचा राजीनामा त्वरित घ्यावा. राजीनामा घेतला नाही तर मी सर्व पुरावे घेऊन अमित शहा यांची भेट घेईन, असा थेट इशारा दमानिया यांनी दिला. तसेच या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीवरही अविश्वास व्यक्त करून, त्या समितीला बरखास्त करण्याची मागणी त्यांनी पुढे केली. तपास पथकात जिल्ह्याचे अधिकारी मोठ्या प्रमाणात असणे हा तपासावर परिणाम करू शकतो, असे त्या म्हणाल्या. गुजरात ते दिल्लीपर्यंत पोहोचणारे प्रकरण राजकीय क्षेत्रात या आरोपांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्यात निवडणुका तोंडावर असताना विरोधकांना हत्यार मिळाले आहे. अजित पवार हे कामकाजावर आधारित नेतृत्त्व मानले जाते. मात्र वारंवार त्यांचे नाव जमीन, सिंचन वा आर्थिक गैरव्यवहारांत येत राहणे त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. या आरोपांवर अजित पवार नेमकी काय प्रतिक्रिया देतात आठवडाभर राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. गुजरात ते दिल्लीपर्यंत पोहोचणारे हे प्रकरण महायुती सरकारच्या प्रतिमेलाही मोठी तडा देऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 3:52 pm

पहिलीपासून हिंदी सक्ती आत्मघातकी:त्रिभाषा धोरण निश्चिती समितीसमोर 'मसाप'चे कौतिकराव ठाले-पाटील यांचे खणखणीत निवेदन

बोटचेप्या नेत्यांमुळे महाराष्ट्रावर हिंदी लादली गेलीय. महाराष्ट्र राज्याने देशाचा ठेका घेतलाय का? तसे नसेल तर मग महाराष्ट्राच्या माथी त्रिभाषा सूत्र कशासाठी, असा खणखणीत सवाल मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी त्रिभाषा धोरण निश्चिती समितीला केलाय. समितीसमोर त्यांनी हिंदीभाषा शिक्षणसक्तीविरोधात मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सविस्तर निवेदन मांडले. याच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनाही पाठवल्यात. महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शाळेत तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश केला. या निर्णयाला तीव्र विरोध झाला. त्यामुळे हे धोरण सुरू ठेवायचे की नाही, यासाठी सरकारने डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यतेखाली त्रिभाषा धोरण निश्चिती समितीची स्थापना केली. समितीने आज छत्रपती संभाजीनगरमधील एमआयटी महाविद्यालयाच्या आनंद सभागृहात भाषातज्ज्ञ, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, बालमानसतज्ज्ञ, शिक्षण संस्थाचालक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक-पालक संघ यांची मते जाणून घेतली. समितीसमोर मराठवाडा साहित्य परिषदचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी त्रिभाषा धोरणाला तीव्र विरोध केला तसेच मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे निवेदन ठेवले. हे निवेदन जसेच्या तसे... प्रति, मा. अध्यक्ष त्रिभाषा धोरण निश्चिती समितीमहाराष्ट्र शासन मुक्काम : छत्रपती संभाजीनगर - ४३१ ००५ महोदय, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या वतीने आपले व आपल्या समितीतील सर्व सदस्यांचे मन:पूर्वक स्वागत करतो. मराठवाडा साहित्य परिषद ही राजकीय पक्षविरहित सर्व मराठी समाजाची व मराठी भाषा बोलणारांची प्रातिनिक संस्था आहे. या संस्थेला मराठी भाषेविरोधी सत्तेशी लढण्याचा इतिहास आहे. ही संस्था आपल्या भाषेसाठी राजकीय सत्तेच्या विरोधात केल्या गेलेल्या क्रांतीलढ्याला बळ देणारी जगभरातील एकमेव संस्था आहे. निजामाच्या सत्तेत इथल्या मराठी भाषेने जे भोगले तेच भोग आता स्वकीयांच्या सत्तेनेही मराठी भाषेच्या नशिबी आणले आहेत, हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे असे मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीला व इथल्या मराठी भाषिकांना वाटते. मराठवाडा साहित्य परिषदेने अनुक्रमे दिनांक 27 एप्रिल 2025 व दिनांक 26 जून 2025 रोजी बोलाविलेल्या बैठकांमध्ये अनुभवास आलेले असून, त्यानुसार त्या बैठकांमध्ये जे निर्णय झाले होते, ते निर्णय मुद्दाम आपल्या समितीच्या संदर्भासाठी या निवेदनात क्रमश: खाली नमूद करीत आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषा बोलणाऱ्यांचे राज्य आहे. या भाषेला 2000 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेच्या या राज्यात केवळ राजकीय हेतूने शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय केवळ दुर्दैवीच नव्हे तर आत्मघातकीही आहे. महाराष्ट्र राज्याने भाषेसंबंधीचा सल्ला घेण्यासाठी श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या भाषा सल्लागार समितीने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला एकमुखी विरोध केलेला आहे, हेही या समितीने लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने जबरदस्तीने हा हिंदीभाषा शिक्षणाचा निर्णय राबविला व ‘हिंदीवादी’ धोरण कायम ठेवले तर मराठी भाषेवर गेल्या कांही वर्षांपासून, हिंदी भाषिक राज्यकर्ते, हिंदी भाषेचे पुरस्कर्ते व हिंदी भाषिक सनदी अधिकारी करीत असलेल्या आक्रमाणाचा जोर वाढणार असून आता महाराष्ट्र सरकार हिंदीभाषा शिकण्याची / शिकविण्याची सक्ती करणार असेल तर कालांतराने ते मराठी भाषेच्या अस्तित्वालाच नख लावणारे ठरेल! मी इथे प्रथमच स्पष्ट करतो की, आमचा विरोध हिंदीला नाही; जशा आमच्यासाठी इतर भारतीय भाषा तशीच हिंदीही आहे. आमचा विरोध हिंदीच्या सक्तीला किंवा आडमार्गाने हिंदी लादण्याला व महाराष्ट्राचा पैसा हिंदीच्या शिक्षणावर खर्च करण्याला आहे, याकडे मी समितीचे लक्ष वेधू इच्छितो. मराठवाडा साहित्य परिषद, पुढे समितीच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की, देशातील कोणत्याही अहिंदीभाषिक राज्याने त्या राज्याच्या शिक्षणात पहिलीपासून तर सोडाच पण कोणत्याही पातळीवर हिंदीला आपल्या शिक्षणात स्थान दिलेले नाही. मग महाराष्ट्र सरकारलाच तशी निकड का भासावी हेही या समितीने लक्षात घेणे गरजेचे आहे. राजकीय स्वार्थापलीकडे किंवा पक्षीय ‘अजेंड्या’पलीकडे यामागे दुसरे कोणतेही कारण मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीला दिसत नाही. देशात एकूण पाच ते सहा हिंदीभाषिक राज्ये आहेत. त्यांपैकी एकानेही दुसरी कोणतीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून स्वीकारलेली नाही. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश ह्या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक समाज वास्तव्य करून आहे. त्या त्या राज्यांत असलेली त्यांची मोठी लोकसंख्या लक्षात घेऊन त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी एकाही राज्याने, राज्याच्या शिक्षणात त्रिभाषा सूत्री स्वीकारलेली नाही व तेथील मराठी मुलांच्या मराठी भाषेच्या शिक्षणाची सोय केलेली नाही. याकडे महाराष्ट्र सरकार सोयीस्करपणे डोळेझाक करते, असे कोणी म्हटले तर त्यात चूक काय? याचाही विचार या समितीने केला पाहिजे. याउलट महाराष्ट्र सरकारने आपली जबाबदारी नसताना 1960 पासून हिंदी भाषेच्या शिक्षणासाठी आपली तिजोरी रिकामी केली असून महाराष्ट्राची दारे हिंदी भाषेसाठी सताड उघडी करून ठेवली आहेत. मराठी भाषेच्या शिक्षणापेक्षा हिंदी भाषेच्या शिक्षणावर अमाप पैसा उधळला आहे. हिंदी भाषिकांची पाच पाच राज्ये असताना महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेच्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या व वाङ्‌मयाच्या तथाकथित अभ्यासासाठी व संशोधनासाठी आपल्या एकूण एक विद्यापीठांमध्ये आणि त्या विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये स्वतंत्रपणे हिंदी विभाग स्थापन करून / निर्माण करून त्यासाठी हिंदी प्रदेशांतून प्राध्यापक व संशोधक आणून त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा भार महाराष्ट्राच्या माथी मारलेला आहे आणि त्यांच्यामार्फत मराठी भाषेच्या विरोधाची रोपे लावून मराठीला दुय्यमस्थानी आणून बसवण्यासाठी भूमी निर्माण करण्याचे काम केलेले आहे. महाराष्ट्र सरकारला मराठवाडा साहित्य परिषदेची या समितीमार्फत विनंती आहे की, महाराष्‍ट्र सरकारने पहिलीपासून हिंदीच्या शिक्षणाचा स्थगित केलेला निर्णय पूर्णपणे रद्द करावा आणि हळूहळू, क्रमाक्रमाने सध्या महाराष्ट्रात हिंदीच्या शिक्षणासाठी विद्यापीठांच्या माध्यमातून व महाराष्ट्र सरकारच्या माध्यमिक शिक्षणमंडळामार्फत जी पीठे निर्माण करण्यात आलेली आहेत, ती पीठे हळूहळू समूळ बंद करण्यात यावीत. सध्या अस्तित्वात असलेले हिंदीचे शिक्षक, प्राध्यापक व संशोधक सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांना सेवानिवृत्तीच्या लाभांसह प्रचलित नियमांप्रमाणे संरक्षण देऊन हिंदी शिक्षणावर महाराष्ट्र सरकारचा होणारा अवाढव्य खर्च, महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणारा मोठा आर्थिक भार कायमचा बंद करण्यात / संपवण्यात यावा आणि तो पैसा महाराष्ट्राची भाषा जी मराठी, तिच्या शिक्षणासाठी व विकासासाठी वळता करून वापरण्यात यावा अशी शिफारस या समितीने महाराष्ट्र सरकारला करावी, अशी या समितीकडून मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची अपेक्षा व विनंती आहे. व्यक्तिहित व पक्षहित, व्यक्तीची भूमिका व पक्षाची भूमिका बाजूला ठेऊन ज्या महाराष्ट्राचे नागरिक व भूमिपुत्र म्हणून राज्यकर्ते / राजकारणी जन्माला आलेले आहेत, त्याच भूमीवर जन्माला आलेली व वाढलेली मराठी संस्कृती व या संस्कृतीची वाहक असलेली जी भाषा, मराठी, तिचे मराठी म्हणवणाऱ्या सरकारने रक्षण व जतन करावे, अशी मराठवाडा साहित्य परिषदेची या समितीसह महाराष्ट्र सरकारमधल्या प्रत्येक घटकाला विनंती आहे. मराठवाडा साहित्य परिषदेची कार्यकारिणी या समितीमार्फत महाराष्ट्र सरकारच्या हे निदर्शनास आणून देते की, भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातही एखाद्या अहिंदी भाषिक प्रांतावर पहिलीपासून हिंदीभाषा शिक्षणाची सक्ती करावी असे कुठेही म्हटलेले नाही. मग महाराष्ट्र शासनाला, आपणच नेमलेल्या भाषा सल्लागार समितीचा सल्ला धुडकावून हिंदीभाषा सक्तीच्या शिक्षणाचा एवढा पुळका का व कशामुळे आला, हे मराठी समाजाला समजणे मराठी भाषेच्या व महाराष्ट्राच्या भाषिक हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. याबद्दल या समितीचेही वेगळे मत असण्याची शक्यता नाही असे मराठवाडा साहित्य परिषदेला वाटते. हिंदी भाषिक राजकारण्यांनी व अधिकाऱ्यांनी आजपर्यंत महाराष्ट्र, महाराष्ट्राची संपत्ती, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची भाषा, मराठी समाज यांचा जसजसा, जमेल तसा व जमेल तितका वापर केलेला आहे. त्यातलाच तर हा नवा प्रयत्न नाही ना, हे या समितीने तपासून घेतले पाहिजे आणि आजवर झालेल्या मराठी भाषेवरील हिंदी भाषिक आक्रमणाचा व मराठी भाषेच्या झालेल्या पिछेहाटीचा विचार नि:पक्षपातीपणे या समितीने, समितीच्या सदस्यांनी आपला अहवाल देण्यापूर्वी / देताना करावा, अशीही मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची आणि मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील जाणत्या मराठी भाषिक समाजाची रास्त अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषिक जनतेच्या भूमिकेचा व भावनांचा विचार न करता महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादली तर आणखी दहा वीस वर्षांनी महाराष्ट्र राज्य हे देशातील हिंदी भाषिक राज्यांच्या मालिकेत जाऊन बसेल आणि हिंदी भाषिक राज्यांत आणखी एका राज्याची भर पडेल. महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेचे रूपांतर हळू हळू हिंदी भाषिकांत होईल व त्याचे 2000 वर्षांपूर्वीपासून घडत गेलेले ‘मराठीपण’ कायमचे पुसले / मिटवले जाईल. महाराष्ट्र सरकारने आपल्या स्थगितीत जरी इतर भारतीय भाषांचा पर्याय दिला असला, तरी तो जनतेला फसवण्याचा व दिशाभूल करण्याचा धूर्त डाव आहे, हे जाणत्या व्यक्तींच्या लक्षात आल्याशिवाय राहात नाही. त्यात सरकारचा पूर्णपणे धूर्तपणा दिसून येतो. मराठी समाजाची एकूण परिस्थिती लक्षात घेता हिंदी भाषेव्यतिरिक्त, भाषिक अज्ञानामुळे, शासनाने सुचविलेल्या इतर‍ भारतीय भाषांची निवड कोणताही पालक करणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. खेड्यापाड्यांतील व वाड्यावस्त्यांवरील पालकांना तर ‘इतर भाषा ही काय भानगड आहे’ हेच कळणार नाही. त्यामुळे त्यांच्यापुढे आपोआपच फक्त हिंदी भाषेचाच पर्याय शिल्लक राहील, तो सरकारचा फक्त हिंदी भाषा लादण्याचा कावा आहे हे मराठी भाषिक पालकांच्या लक्षातच येणार नाही. म्हणून सरकारने हिंदी भाषासक्तीच्या शिक्षणाचा व सुचवलेल्या पर्यायांचा आपला आग्रह सोडून द्यावा, घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मरा‍ठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची सरकारला व नियुक्त समितीला कळकळीची विनंती आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने बोलावलेल्या दोन्ही बैठकांमध्ये हिंदी भाषेचा हरिद्वारच्या गुरूकुलमध्ये शिक्षण घेतलेला एक प्राध्यापक वगळता मराठी भाषेशी संबंधित तज्ज्ञ शिक्षक, साहित्यिक, पत्रकार, वाचक आणि पालक यांनी तीव्रपणे हिंदी शिक्षणाच्या सक्तीविरोधात मते नोंदवलेली आहेत. ती मते मराठवाडा साहित्य परिषद या समितीपर्यंत पोहचती करीत आहे. निजामाच्या राजवटीत मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रात म्हणजे मराठवाड्यात मराठी भाषेविरुद्ध व मराठी संस्कृतीविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध / सक्तीविरुद्ध मराठवाडा साहित्य परिषदेने स्पष्ट भूमिका घेऊन वेळोवेळी तीव्र विरोध प्रकट केला होता. आताचे स्वकीयांचे महाराष्ट्र सरकार स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी निजाम सरकारच्याही पुढे गेले असून ते मराठी भाषा नष्ट करण्याच्या कामाला लागलेले आहे, असाही मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही सदस्यांनी सूर लावला होता, हेही या समितीच्या निदर्शनास मराठवाडा साहित्य परिषदेची कार्यकारिणीचा प्रमुख म्हणून मी आणून देत आहे. ही बाबही समितीने आपल्या अहवालात नमूद करावी अशी मराठवाडा साहित्य परिषदेची अपेक्षा व विनंती आहे. शेवटी, वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने जाणकार मराठी जनतेच्या इच्छेविरुद्ध हिंदी भाषासक्तीच्या शिक्षणाचा घेतलेला एकतर्फी निर्णय संपूर्णपणे रद्द करावा आणि महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचे धन्यवाद घ्यावेत, अशी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीची या समितीकडे आणि महाराष्ट्र सरकारकडे नम्रपणे आग्रहाची मागणी असून मराठवाडा साहित्य परिषदेची कार्यकारिणी तशी विनंती या समितीला व महाराष्ट्र सरकारला करीत आहे. या समितीकडून व सरकारकडून अनुक्रमे सकारात्मक शिफारशीची व निर्णयाची अपेक्षा आहे. कौतिकराव ठाले-पाटीलअध्यक्ष,मराठवाडा साहित्य परिषद

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 3:43 pm

मी चुकलो, त्यामुळे माफी मागतो:अजित पवारांची खुली दिलगिरी, अंबाजोगाई वक्तव्यावर डॅमेज कंट्रोल; म्हणाले- जीभ घसरली, पण काम थांबणार नाही

राज्यातील राजकीय वातावरण सध्या जोरदार तापलेले आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसभांमध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत मोठे विधान केले. अंबाजोगाई येथील सभेत जीभ घसरल्याने झालेल्या वादावर त्यांनी अखेर सार्वजनिक प्रतिक्रिया देत माफी मागितली. सभेत बोलताना एखादा शब्द चुकीचा निघू शकतो, पण त्या शब्दाने लोकांची भावना दुखावली असेल तर त्याबद्दल क्षमा मागणे माझे कर्तव्य आहे, असे म्हणत अजित पवारांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांनी स्पष्ट केले की, अंबाजोगाई येथे मी जे बोललो ते शहरातील अस्वच्छतेविरोधात होते. मात्र, वापरलेला शब्द योग्य नव्हता, हे मला जाणवले. माध्यमांनी त्या शब्दाचा मुद्दा मोठा केला, पण ती चूक माझीच होती, अशी कबुलीही त्यांनी दिली. मी चुकीचा शब्द वापरला, भिकारपणा. तो शब्द माझ्याकडून निघायला नको होता. त्याबद्दल मी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत त्यांनी आत्मपरीक्षण केल्याची कबुली दिली. त्यांच्या या कबुलीमुळे सभेत उपस्थित लोकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. मला टीआरपीमध्ये नव्हे, तर जनतेच्या विकासात रस सभेमध्ये अजित पवारांनी आपल्या काम करण्याच्या शैलीवरही भाष्य केले. लोक म्हणतात मी कडक बोलतो. पण मी कडक नाही, कामसू आहे. सकाळी सहा वाजता मी कामात झोकून देतो. कामाचा माणूस असल्यामुळेच जनता मला पुन्हा पुन्हा प्रचंड मताधिक्याने निवडून देते, असे म्हणत त्यांनी स्वतःची कार्यशैलीही ठळकपणे मांडली. विरोधक टीव्हीवर काय दाखवतात यावर लक्ष देतात; पण मला टीआरपीमध्ये नव्हे, तर जनतेच्या विकासात रस आहे, असा स्पष्ट टोला त्यांनी लगावला. कामगिरी हीच माझी भाषा आणि त्यावरच जनतेचा विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले. जनतेच्या पैशात डल्ला मारून राजकारण करणाऱ्यांना आम्ही उघडे पाडू यानंतर अजित पवारांनी भ्रष्टाचार आणि गुत्तेदारी यावर घणाघाती विधान केले. राजकारण करायचे तर पारदर्शकपणे करा. आणि गुत्तेदारी करायची असेल तर राजकारणात पाऊल टाकू नका, अशी चेतावणी त्यांनी दिली. नगराध्यक्ष पदावर असलेल्यांच्या घरातील व्यक्तीच ठेके घेत असल्याची प्रथा वाढली आहे, त्यामुळे विकासकामांचा दर्जा खाली येतो आणि नागरिकांची फसवणूक होते, अशी टीका त्यांनी नाव न घेता अनेकांवर केली. जनतेच्या पैशात डल्ला मारून राजकारण करणाऱ्यांना आम्ही उघडे पाडू, असा इशाराही त्यांनी दिला. आपली प्रतिमा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न अकोटमधील सभेत अजित पवारांना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा आणि सामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राजकीय व्यासपीठावर विरोधक हल्ले चढवत असताना, पवार यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने आपली प्रतिमा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे टीका, तर दुसरीकडे विकासाचे दावे असा समतोल राखत ते सार्वजनिक विश्वास टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसले. आगामी नगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेची कोणावर मोहर लागणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 3:05 pm

राज्यात १८ हजार शिक्षकांची कंत्राटी भरती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास १८ हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये मुलांचा पट २० पेक्षा कमी आहे. त्यामुळे आता लवकरच १८,६०८ शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. संचमान्यतेच्या १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाने मान्यता दिल्याने राज्यात कंत्राटी शिक्षक भरती केली जाणार आहे. आता दहापेक्षा कमी पट असलेल्या […] The post राज्यात १८ हजार शिक्षकांची कंत्राटी भरती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 2:50 pm

काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण, मारहाण; राज्यात खळबळ

अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. श्रीरामपूरमध्ये जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले. त्यांना मारहाणही झाल्याची माहिती मिळाली आहे. या धक्कादायक घटनेनंतर अहिल्यानगर आणि श्रीरामपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्यामुळे राज्यात चर्चेला उधाण […] The post काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे अपहरण, मारहाण; राज्यात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 2:48 pm

लग्नमांडवातच नवरदेवाचे निधन

अमरावती : प्रतिनिधी थाटामाटात लग्न पार पडताच फक्त अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अमरावतीमधील वरुडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मृत झालेल्या नवरदेवाचे नाव अमोल गोड असे आहे. नवरदेवाचा मृत्यू झाल्याने आनंदी उत्सव सुरू असलेल्या लग्नमांडवात काही क्षणांतच शोककळा पसरली. अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते. अमरावतीमधील वरुड तालुक्यातील पुसला गावात अमोल […] The post लग्नमांडवातच नवरदेवाचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 2:46 pm

दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. हा हल्ला परतवून लावताना या हल्ल्यात मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील अधिकारी शहीद झाले. या हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली. मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणातील त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहीद स्मारक […] The post दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 2:38 pm

शेवग्याला विक्रमी दर;  प्रतिकिलो ४०० रुपयांवर

पुणे : प्रतिनिधी राज्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेवग्याचे पीक अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेवग्याचा यंदाचा हंगाम विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज ४ ते ५ हजार किलो शेवग्याची आवक होत असते. पण अल्पशी आवक आल्याने शेवग्याला ५०० रुपये किलो उच्चांकी दर […] The post शेवग्याला विक्रमी दर; प्रतिकिलो ४०० रुपयांवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 2:34 pm

लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाचे?:मतांवर डोळा ठेवणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; महिला मतदार पुन्हा गेमचेंजर ठरणार

नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेवर आपला हक्क सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना माझ्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा निर्णय होता. अनेक अडथळे आले, विरोधही झाला, पण आम्ही ठाम होतो. कितीही टीका झाली, कितीही अडथळे आले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. महायुतीतील पक्षच काही ठिकाणी एकमेकांविरोधात लढत असल्याने लाडक्या बहिणींचे मत कोणाकडे वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे यांनी केलेले हे विधान म्हणजे लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाचे? या राजकीय वादात भर टाकणारे ठरत आहे. राज्यातील महिला मतदार हेच पुढील निवडणुकांचे गेमचेंजर ठरणार असल्याचे सर्व पक्षांना ठाऊक असल्याने, या योजनेभोवती प्रचंड राजकीय धुमाकूळ सुरू आहे. राज्यात निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. 2 डिसेंबर रोजी अनेक नगरपालिकांच्या निवडणुका होणार असून त्यासाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी जोरात सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. परिणामी सत्ता मिळवण्यात महिलांच्या मतांची मोठी भूमिका ठरली. त्यामुळे आता होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही लाडक्या बहिणी कोणत्या पक्षाच्या बाजूने मतदान करणार, याकडे राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे. त्यातच स्थानिक राजकीय समीकरणांमुळे महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे राहत असल्याने महिलांचे मत नेमके कुठे जाईल? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाचे उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना ही मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केली. महायुती सरकार म्हणून आम्ही टीममध्ये मिळून हा निर्णय घेतला होता. या योजनेला राजकारणात किती विरोध, अडथळे आले, किती टीका झाली, हे सर्वज्ञात आहे. परंतु जनतेला, विशेषतः महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ही योजना बंद होणारच नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या विधानातून शिंदे यांनी महिलांच्या मतांची दिशा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विदर्भातील प्रचारसभांमध्ये मोठा उत्साह असल्याची माहितीही एकनाथ शिंदेंनी दिली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक सभेत महिलांची प्रचंड उपस्थिती दिसत आहे. लाडक्या बहिणींचा उत्साह आणि विश्वास पाहून शिवसेनेच्या उमेदवारांना निश्चितच फायदा होईल, असा त्यांचा दावा आहे. तरुणांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत विविध वयोगटातील मतदार प्रचारात सक्रियपणे सहभाग घेत आहेत. यावरून स्थानिक नागरिकांचा विकासावर आधारित मतदानाचा कल अधिक जाणवतो, असे शिंदेंचे म्हणणे आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष नव्हते, तिथेही विकासकामांसाठी निधी दिलाशिंदे पुढे म्हणाले की, विकास हा आमचा मुख्य अजेंडा आहे. मी मुख्यमंत्री असताना ज्या नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष नव्हते, तिथेही विकासकामांसाठी निधी दिला. पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, रस्ते, मैदानं, उद्यानं, आरोग्य सुविधा अशा सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकारने निधीची कमतरता भासू दिली नाही. राजकारणापेक्षा जनतेचा प्रश्न महत्वाचा, अशी भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. त्यामुळे आता लोक कोणत्या पक्षावर विश्वास ठेवतात आणि विकासाच्या मुद्द्यावर कोण विजयी ठरणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल. सरकारने दिलेला लाभ अशा गोष्टींचा महिलांच्या मतांवर परिणाम नगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांचे मतांचे गणित नेहमीच निर्णायक ठरते. पण या वेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण महायुतीतच असलेले वेगवेगळे पक्ष स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढत असल्याने महिलांना कोणाला मतदान करायचे? हा प्रश्न पडला आहे. पण सरकारने दिलेला लाभ, आर्थिक मदत आणि भविष्याच्या आशा या गोष्टी महिलांच्या मतांवर परिणाम करणार हे निश्चित. त्यामुळे आता 2 डिसेंबर रोजी महिलांचा कल कोणत्या दिशेला झुकतो, यावर अनेक नगरपालिकांचे भविष्य ठरणार आहे आणि त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 2:32 pm

पुण्यातील तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढला:30 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये वाढ, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

पुण्यातील तरुण महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे एका सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे. पुणे पॉप्युलेशन-बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री (पीबीसीआर) आणि एमओसी कॅन्सर केअर सेंटरने केलेल्या या पाहणीनुसार, विशेषतः 30 ते 40 वयोगटातील महिलांमध्ये ही व्याधी वेगाने पसरत असल्याने आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पीबीसीआरच्या अहवालानुसार, पुण्यात प्रति एक लाख महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचा वय-समायोजित प्रादुर्भाव दर (एएआर) 83.0 इतका नोंदवला गेला आहे. या आकडेवारीनुसार, स्तनाचा कर्करोग हा पुण्यातील महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा कर्करोग असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एमओसी कॅन्सर केअर सेंटरमध्येही गेल्या काही वर्षांत 30 ते 40 वयोगटातील रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. रितु दवे यांनी या स्थितीवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, आम्ही आता 30 ते 40 वर्षांच्या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे मोठ्या प्रमाणात पाहत आहोत. पूर्वी ही व्याधी मुख्यत्वे 50 वर्षांवरील महिलांमध्ये आढळायची, पण आता तरुण वयोगटातही ती आक्रमक स्वरूपात दिसत आहे. या वाढीला अनेक घटक कारणीभूत ठरत आहेत. निष्क्रिय जीवनशैली, अनियमित व फास्टफूडयुक्त आहार, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, वाढती लठ्ठपणा आणि आनुवंशिक जोखीम हे त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत. याशिवाय, लवकर लग्न न करणे किंवा गर्भधारणा उशिरा करणे हे देखील घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जागरूकतेचा अभाव आणि लक्षणे दिसूनही वेळेवर तपासणी न केल्याने रोग उशिरा निदान होत असल्याचेही निरीक्षण आहे. डॉ. दवे यांच्या मते, नियमित स्व-तपासणी, 40 वर्षांनंतर दरवर्षी मॅमोग्राफी आणि निरोगी जीवनशैली अवलंबल्यास या धोक्याचे प्रमाण खूप कमी होऊ शकते. लवकर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. एमओसी आणि पीबीसीआरने पुण्यातील महिलांना आतापासूनच सतर्क राहण्याचे आणि नियमित स्तन तपासणी करण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागरूकता आणि सक्रिय प्रतिबंधात्मक उपायांमुळेच या चिंताजनक प्रवृत्तीला आळा घालता येईल.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 1:37 pm

संविधान दिनानिमित्त पुण्यात 'वॉक फॉर संविधान' रॅली:बार्टी-समाजकल्याण विभागाच्या वतीने हजारो विद्यार्थी-नागरिकांचा सहभाग

संविधान दिनानिमित्त पुणे येथे 'वॉक फॉर संविधान' रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सहायक आयुक्त समाजकल्याण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. यामध्ये हजारो विद्यार्थी, नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या रॅलीचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी मारोती बोरकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, उपायुक्त वृषाली शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी पाटील, सहायक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवढे आणि बार्टीचे विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रॅली सुरू करण्यापूर्वी डॉ. पुलकुंडवार आणि सुनील वारे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते, तर अनेक विद्यार्थ्यांनी संविधानाच्या जागृतीचे फलक घेऊन घोषणा दिल्या. ढोल-ताशांचा गजर आणि लेझीम पथकाच्या निनादात ही रॅली काढण्यात आली. 'वॉक फॉर संविधान' रॅलीची सुरुवात भिडेवाडा येथून झाली. ही रॅली लाल महाल, दारुवाला पूल, फडके हौद, १५ ऑगस्ट चौक आणि जुनी जिल्हा परिषद या मार्गांनी पुणे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. तेथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विशाल लोंढे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले आणि सामूहिक वाचनाने रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये पुणे शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, अधिकारी, बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 1:31 pm

विचित्र आघाड्यांमुळे नेत्यांसह मतदार संभ्रमात

नाशिक : प्रतिनिधी मनमाडमध्ये महायुतीच्या शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले असले तरी, जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदे सेना असा सामना असल्याने मतदारही संभ्रमात पडले आहेत, तर मी कोणाविरोधात जास्त बोलणार नाही; परंतु त्र्यंबकेश्वरच्या भवितव्यासाठी भाजपला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना करीत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न […] The post विचित्र आघाड्यांमुळे नेत्यांसह मतदार संभ्रमात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Nov 2025 1:28 pm

50टक्के आरक्षण लागू झाले तर ओबीसींचे राजकीय आरक्षण शून्यावर येईल:बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली भीती

सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दिला तर राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात येईल, असे मत ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केले. राज्यात आरक्षणाला 50 टक्केची अटक लागली तर एक दिवस ओबीसींचे आरक्षण शून्यावर येईल. बबनराव तायवाडे म्हणाले की, जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा अनुसूचित जातील 13 टक्के व अनुसूचित जमातीला 7 टक्के असे एकूण 20 टक्के आरक्षण दिले जात होते. 50 टक्क्यांची मर्यादा राखून ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू झाले होते. ओबीसींसाठी फक्त 22 टक्केच आरक्षण बबनराव तायवाडे म्हणाले की, सध्या राज्यात अनुसूचित जमाती व अनुसूची जमाती या दोन्ही समाजाची लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांच्या आरक्षणाची एकत्रित टक्केवारी 20 टक्क्यांवरून 28 टक्के (SC- 19.76% आणि ST- 7.86%) झाली आहे. तायवाडे यांच्या मते, जर न्यायालयाने 50 टक्क्यांची अट कायम ठेवली, तर आजच्या घडीला 50 टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसींसाठी फक्त 22 टक्केच आरक्षण शिल्लक राहील. .. तर ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येऊन बबनराव तायवाडे म्हणाले की, भविष्यात याच प्रमाणात अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या आणि त्यांचे आरक्षण वाढत गेल्यास, सध्या 28 टक्के असलेले हे आरक्षण 40 टक्के, नंतर 50 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, 50 टक्क्यांच्या मर्यादेमुळे ओबीसींना मिळणारे आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येऊन शून्य टक्के होईल, असे गंभीर मत तायवाडे यांनी मांडले. न्यायालयाच्या निर्णयावर राजकारणाचे भवितव्य 50 टक्के आरक्षणाची मर्यादा लागू करायची की नाही, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पार पडली. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात लवकरच 246 परिषद आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकाही बाकी आहेत.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत, ज्यामुळे न्यायालयीन निर्णयाचे महत्त्व अधोरेखित होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 12:45 pm

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादलाच का?:आदित्य ठाकरे यांचा सवाल; आयसीसीने राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला

आगामी टी-20 विश्वचषक 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून, या स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची अधिकृत माहिती जाहीर झाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असली तरी, या निर्णयावरून महाराष्ट्रात राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. कारण, भारतात मुंबईला क्रिकेटची ऐतिहासिक ओळख असूनही अंतिम सामन्यासाठी तिची निवड झाली नाही. याबाबत आदित्य ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याआधी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना देखील अहमदाबादमध्येच खेळवण्यात आला होता. त्यावेळीही अनेकांनी हा निर्णय राजकीय असल्याची टीका केली होती. आता पुन्हा एकदा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादलाच दिले गेल्याने, क्रिकेटच्या पायाभूत सुविधांबाबत आणि ऐतिहासिक योगदानाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण, मुंबईतील क्रिकेट संस्कृती, ऐतिहासिक मैदानं, विक्रमी सामने आणि प्रेक्षकांची मोठी उपस्थिती हे सर्व गुण मुंबईकडे असतानाही तिला अंतिम सामन्यापासून दूर ठेवले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून आयसीसीला थेट सवाल केला आहे. प्रत्येक मोठा सामना अहमदाबादलाच का? मुंबई, कोलकाता, चेन्नई, मोहाली अशी ऐतिहासिक, पारंपारिक आणि क्रिकेटसाठी ओळखली जाणारी मैदानं असताना अहमदाबादलाच विशेष महत्त्व का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. क्रिकेटचा इतिहास, दंतकथा आणि विक्रमांना साक्षी असलेल्या वानखेडे स्टेडियमला अंतिम सामना देण्यास काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला. मुंबईलाच कमी महत्त्व दिल्याची भावना मुंबईत एक उपांत्य सामना मिळाला असला, तरीही तो अंतिम सामन्यासारखा गौरवशाली नसतो. दुसरा उपांत्य सामना कोलकाता किंवा श्रीलंकेतील कोलंबो इथे होणार आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेटमधील राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईलाच कमी महत्त्व दिल्याची भावना महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. शिवाय, अनेक तज्ज्ञांचे मत आहे की मोठे सामने अशा ठिकाणीच खेळवावेत, जिथे क्रिकेटला परंपरा आहे आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती असते. पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारणाचा संबंध चर्चेत आदित्य ठाकरे यांनी पुढे अपेक्षा व्यक्त केली की, आयसीसीने राजकारणापासून दूर राहावे. क्रिकेट हा खेळ आहे आणि तो सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवर चालू नये. देशातील सर्व राज्यांना समान संधी मिळाली पाहिजे. विशेषत: ज्या मैदानांनी क्रिकेटला जागतिक मान्यता मिळवून देण्यात भूमिका बजावली आहे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारणाचा संबंध चर्चेत आला आहे. आता आयसीसी या टीकेवर काय प्रतिक्रिया देणार आणि अंतिम आयोजनाबाबत काही बदल केला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 12:35 pm

शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे लाच घेताना रंगेहाथ पकडले:शालार्थ आयडीसाठी एक लाख रुपये स्वीकारताना एसीबीची कारवाई

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब भगवान मिरगणे (वय 57) यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. शालार्थ आयडी मंजूर करून देण्यासाठी मिरगणे यांनी ही लाच मागितली होती. ही कारवाई त्यांच्या केबिनमध्ये करण्यात आली. या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दिलेल्या 56 वर्षीय व्यक्तीची पत्नी सोलापूर जिल्ह्यातील एका माध्यमिक शाळेत 2016 पासून विनावेतन सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शालार्थ आयडी नसल्यामुळे त्यांचे वेतन रखडले होते. हा आयडी मंजूर झाल्यावरच वेतन सुरू होणार होते. तक्रारदारांनी 16 जून 2025 रोजी सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव पुणे विभागीय कार्यालयाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव ई-ऑफिसवर विभागीय उपसंचालकांकडे सादर करून मंजुरी मिळवण्यासाठी शिक्षण उपनिरीक्षक मिरगणे यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली होती. 17 आणि 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या पडताळणीत ही मागणी सिद्ध झाली. अखेर, मिरगणे यांनी त्यांच्या केबिनमध्ये पंचांसमोर एक लाख रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले, तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीने केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश वाळके करत आहेत. शिक्षण विभागातील शालार्थ आयडी सारख्या मूलभूत कामांसाठीही लाच मागितली जाणे, ही घटना प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकते.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 12:01 pm

अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजरांचे अपहरण:देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही; भाजपला हुकूमशाही हवी- हर्षवर्धन सपकाळ

अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीने गाडीत घातले. हिंदूत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र आणि भारतामध्ये लोकशाही अस्तित्वात नाही. सरकारने आपले कारनामे दाखवण्यास सुरवात केली आहे. यांना लोकशाही मान्य नाही आम्ही ठोक-शाहीच स्वीकारणार आहोत असे चित्र आहे याचा मी निषेध करतो. 26/11 लाच एका मोठ्या राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण करणे म्हणजे काय तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 26/11 लाच मुंबईवर हल्ला करत संविधान मान्य नाही ते देशात ठेवणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता तोच संदेश आज भाजपकडून देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांना संविधान मान्य नाही. त्यांना संविधान मोडकळीस आणत हुकूमशाही आणायची आहे, हा त्यामागचा स्पष्ट संदेश आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे. आम्ही निवडणूक लढवायची का नाही? हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाच्या कारभाराशी केलेली तुलना तंतोतंत खरी होती हे आज सिद्ध झाले आहे. ते गोडसेसारखे काम करतात. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असे म्हणत आम्ही निवडणूक लढवायची का नाही असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. श्रीरामपूरच्या घटनेचा आम्ही निषेध करतो याविरोधात आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेणार आहोत. यापूर्वीही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करतो. अहिल्यानगरमध्ये झालेली घटना काही पहिल्यांदा झाली नाही, यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या दोन नगरसेवकपदाच्या उमेदवारांना रात्री अटक करत मारहाण केली जाते, आणि पोलिसच त्यांच्या गाडीत बसवून माजी खासदार सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे घेऊन जातात. तिथे त्यांना दमदाटी केली जाते. चित्रपटाप्रमाणे या घटना घडत आहेत. काँग्रेस हे सहन करणार नाही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अहिल्या नगर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध करतो. आज संविधान दिनाच्या दिवशी भाजप ने सकाळी सकाळी लोकशाहीची हत्या केली आहे. 26-11 च्याच दिवशी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला होता तोच मुहूर्त साधून अहिल्यानगर जिल्ह्यात देवेंद्र फडणवीसांच्या बगलबच्यांनी लोकशाहीचा खून पाडला आहे. ऐन निवडणुकीत एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहान होते हे काँग्रेस पक्ष कदापि सहन करणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 11:56 am

शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू:प्रताप सरनाईक यांची घोषणा; नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यभरातील लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटी महामंडळ शाळेत जाण्यासाठी व तेथून घरी येण्यासाठी बस फेऱ्या उपलब्ध करून देत असते. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना घरातून शाळेला जा - ये करण्यासाठी मासिक पास मध्ये ६६.६६ % सवलत दिली जाते. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत मासिक पास दिला जातो. तथापि, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिली असता, तेथे उपस्थित असणाऱ्या शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अनेक समस्या व तक्रारी मंत्री महोदयांसमोर मांडल्या. अनेक शालेय बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे, यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार त्यातील काही विद्यार्थ्यांनी केल्या. तसेच संध्याकाळच्या वेळी शाळा -महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले आपल्या घरी जाणे अपेक्षित असते. परंतु, बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकाचे ओरडे खावे लागतात. अनेक ठिकाणी तर गैरसमजातून पालकांनी विद्यार्थ्यांना उशिरा येण्याबद्दल शिक्षाही दिलेल्या आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणून काय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींना आपल्या घरातून शाळेत जात असताना अथवा शाळेतून घरी येत असताना बसेस उशिरा सुटणे, त्या अचानक रद्द होणे, तांत्रिक बिघाडामुळे बस नादूरूस्त झाल्याने घरी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी तातडीने एसटीच्या हेल्पलाइन क्रमांक वर संपर्क करून मदत घ्यावी, या हेतूने १८००२२१२५१ हा हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. तरी या क्रमांकावर विद्यार्थी - विद्यार्थ्यांनींनी संपर्क साधावा, जेणेकरून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देता येईल. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. तसेच ३१ विभागातील सर्व विभाग नियंत्रकांचे दुरध्वनी संपर्क क्रमांक संबंधित शाळा, महाविद्यालयांना देण्यात येत आहेत. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच थेट विद्यार्थी- विद्यार्थ्यांनी देखील या विभाग नियंत्रकांना संपर्क करून आपल्या समस्या मांडू शकतात. विद्यार्थ्यांच्या शालेय नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर एसटी बसेस उशिरा सुटणे, अचानक रद्द होणे अथवा अन्य कारणामुळे शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनींचे तास चुकतात किंवा परीक्षेला ते वेळेवर पोहोचू शकत नाहीत, काही वेळेला त्यांची महत्त्वाची परीक्षा देखील बुडते . विद्यार्थ्यांच्या अशा शालेय नुकसानीला संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल! या पुढे सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ५-६ या वेळेत मुख्य बसस्थानक व ज्या ठिकाणी विद्यार्थी चढ-उतार जास्त होतो अशा थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे. शाळेचा शेवटचा मुलगा अथवा मुलगी बस मधून सुखरूप घरी जाईपर्यंत संबंधित पर्यवेक्षकांनी तेथून हलू नये! अशा सक्त सूचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. पर्यवेक्षक अथवा अधिकार्‍यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे तसेच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामूळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार संबंधित विद्यार्थी अथवा विद्यार्थिनींनी तसेच संबंधित शाळा- महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी केल्यास जितक्या दिवसाचे शालेय नुकसान होईल, तितके दिवस यास जबाबदार असणारे पर्यवेक्षक अथवा अधिकार्‍यांना निलंबित अथवा सक्तीचे रजेवर पाठवण्यात यावे. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 11:30 am

औंढात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या 2वाहनांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त:दोघांवर गुन्हा दाखल, पोलिस-महसूल विभागाची कारवाई

औंढा नागनाथ तालुक्यात पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांसह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दोघांवर मंगळवारी ता.25 गुन्हा दाखल झाला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातील वाळुला मोठी मागणी आहे. त्यामुळे वाळू तस्कर याच भागातील वाळू वाहतूक करीत आहेत. या भागातील अवैधरीत्या होणारी वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. तर पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनीही पोलिस पथक स्थापन केले आहे. दरम्यान, औंढा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता कानगुले यांचे पथक गस्तीवर असतांना औंढा नागनाथ बसस्थानकासमोर एक टिप्पर दिसून आले. पोलिसांनी टिप्पर चालक संदीप फड (रा. केळी, ता. औंढा) याची चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू असा 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक कानगुले यांच्या तक्रारीवरून संदीप फड याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार वसीम पठाण पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अन्य एका कारवाईमध्ये मंडळ अधिकारी सुरेश बोबडे यांच्या पथकाने शिरडशहापूर बसस्थानकाजवळ एक ट्रॅक्टर पकडले. पथकाने चालक अर्जून ढेकळे (रा. सेंदूरसना, ता. औंढ) याची चौकशी केली असता त्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पथकाने ट्रॅक्टर व वाळू असा 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुरेश बोबडे यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अर्जुन ढेकळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार बी. जी. घुगे, रविकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 11:24 am

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न:भाजपकडून जातीय संघर्ष तयार करत सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- शशिकांत शिंदे

सातारा ही क्रांतिकारकांची आणि संघर्ष करणारी भूमी आहे .सत्ताधाऱ्यांनी विकासाची मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात काहीच केले नाही.येथे विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. त्यामुळे भविष्यात लोकशाही जिवंत राहील की नाही याची भीती आहे. सातारकरांनी परिवर्तनाची एक संधी द्यावी साताऱ्याचे सोने करून दाखवतो असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, हद्द सोडायची नाही ही साताऱ्याच्या राजकारणाची अनेक वर्षापासून ची पद्धत आहे. मी मात्र पक्ष वाढीसाठी ही चौकट ओलांडून त्याची राजकीय किंमत सुद्धा मोजली . नगरपालिकेची ही लढाई फक्त नगरपालिकेची नाही तर तत्त्वाची आहे .भारतीय जनता पार्टीने जातीय संघर्ष तयार करून सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला वाचा फोडण्याचे काम आम्ही करत असून लोकशाही जिवंत राहील यासाठी ही धडपड सुरू आहे परिवर्तनाची एक संधी द्या शशिकांत शिंदे म्हणाले की, महायुतीच्या घटक पक्षांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी आहे. सातारकरांनी महा विकास आघाडीच्या उमेदवारांना एक संधी देऊन त्यांना सत्तेत आणावे आम्ही निश्चित स्वप्नातले शहर घडवून दाखवू .ही भूमी क्रांतिकारकांची आणि परिवर्तनाची आहे हे परिवर्तन आपण घडवून संपूर्ण देशाला बदलाचा संदेश द्यायला पाहिजे. एकदा बदल घडवून मला परिवर्तनाची एक संधी द्या, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले. भाजपला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा संपवायचाय शशिकांत शिंदे म्हणाले की, सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून यशवंतरावांच्या विचारांचा वारसा भाजपला संपवायचा आहे असा आरोप त्यांनी केला तुम्ही बदलला नाहीत तर विरोधक म्हणून तुम्ही कधी आवाज उठवू शकणार नाही असे ते म्हणाले . समाजाला परिवर्तनाची गरज- सुवर्णा पाटील सुवर्णा पाटील म्हणाल्या की, गेली 16 वर्षे आम्ही निष्ठेने भारतीय जनता पार्टीचे काम केले. मात्र काम करतो म्हणून आम्हाला उमेदवारी नाकारण्यात आली. मात्र जनतेने मला नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आणले आहे. समाजाला परिवर्तनाची गरज आहे. त्यामुळे मी न थांबण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या माध्यमातून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे. सातारा ही माझी कर्मभूमी आहे आणि ती चांगल्या पद्धतीने मला घडवायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे .पाच वर्षात सातारकरांनी चांगल्या कामासाठी माझं नाव काढावे ही माझी इच्छा आहे. लोकहिताचे समाजकारण मी करणार आहे. फक्त तुमच्या साथीची गरज आहे. एक संधी द्याल तर सातारा निश्चित चांगल्या पद्धतीने घडवू. भारत-महाराष्ट्र भाजप मुक्त करावा लागेल- जानकर महादेव जानकर म्हणाले की, संविधान वाचवण्यासाठी भारत व महाराष्ट्र भाजप मुक्त करावा लागेल त्यासाठी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यायला हवे. कॅबिनेट मंत्री असताना भारतीय जनता पार्टीचे षड्यंत्र आम्हाला समजले नाही. पण लवकरच हे प्रकरण आपले नाही हे आमच्या लक्षात आले. जातीय भांडणे लावण्याचे उद्योग भारतीय जनता पार्टीने केले आहेत, असे जानकर यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 11:18 am

बॉम्बे ते मुंबई नामांतराचा इतिहास भाजपचा; राज ठाकरेंना सोईस्कर विसर:यू-टर्नच्या राजकारणाला मुंबईकर साथ देणार नाहीत, नवनाथ बन यांची ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंचे अलीकडचे राजकारण ‘फॅक्ट्स’वर नाही, तर केवळ फ्री स्टाईल आरोपांवर आधारित आहे. खरंतर ‘बॉम्बे’चे अधिकृत नामांतर ‘मुंबई’ करण्याचा निर्णय राज्यातील शिवसेना–भाजप सरकारनेच घेतला. या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळवून तो पूर्ण देशभर वैधानिक पणे लागू करणारे व्यक्ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय रामभाऊ नाईक होते असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नवनाथ बन म्हणाले की,संसदेत पहिल्यांदा ‘बॉम्बे’ ऐवजी ‘मुंबई’ असा उल्लेख करून हा बदल राष्ट्रीय पातळीवर स्थिर करणारेही भाजपचे राम नाईकच होते. पण राज ठाकरे यांना त्यांचा सोईस्कर विसर पडलेला दिसतोय. कदाचित उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करायची असल्याने ते आपल्या मूळ भूमिका विसरण्याचा किंवा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे यू-टर्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला बन यांनी लगावला आहे. मुंबईच्या विकासासाठी केंद्राकडून मोठे प्रकल्प नवनाथ बन म्हणाले की,केंद्र सरकार मुंबई–एमएमआरला जागतिक दर्जाचे कनेक्टिव्हिटी नेटवर्क देत असताना, काहींना राजकीय चक्कर येते, म्हणून गुजरातचा मुद्दा पुढे आणला जातो. खरे तर केंद्र सरकार मुंबई–एमएमआरच्या विकासासाठी मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड कनेक्टिव्हिटी, मल्टीमोडल कॉरिडोर्स या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक राजधानीला जागतिक स्तरावर नेण्याची क्षमता आहे. मुंबईकर मराठी माणूस देवाभाऊंसोबत नवनाथ बन म्हणाले की, विकासाचे हे प्रकल्प पाहून काहींची ‘राजकीय मळमळ’ वाढते, म्हणूनच गुजरातचा बोगस बागुलबुवा पुढे करून भीतीचे राजकारण केले जात आहे. पण मराठी माणूस, मुंबईकर आशा राजकारणाला थारा देणार नाहीत ते यू-टर्न घेणाऱ्यांसोबत नाही तर महाराष्ट्राला क्रमांक एकवर घेऊन जाणाऱ्या आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंसोबत उभे राहतील, असे बन यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंची पोस्ट काय? राज ठाकरे यांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे ! राज ठाकरे यांनी पोस्ट करत म्हटलंय की, खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. राज ठाकरे यांनी म्हटलंय की, आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत 100% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच ! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं ! राज ठाकरे ।

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 11:07 am

मराठी माणसा जागा हो:मुंबई नको बाँबेच हवे, यातून शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांची हाक; केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकारण तापले

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंबईच्या ओळखीचा मुद्दा पेटला आहे. आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे हे नाव तसेच राहिले, त्याचे मुंबई झाले नाही हे चांगले झाले, असा उल्लेख केला. या एका वाक्याने मराठी जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मुंबईचे नाव मराठी इतिहास, मराठी संस्कृती आणि या भूमीच्या मूळ देवी मुंबाशी जोडलेले आहे. त्यामुळे मुंबईऐवजी बॉम्बेचा आग्रह व्यक्त करणे ही महाराष्ट्राच्या अभिमानावर घाला असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. या वादाला उत्तर देत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट प्रहार केला आहे. त्यांनी सोशल मीडियावरून भाजप नेतृत्वावर आणि केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, जितेंद्र सिंह यांचं विधान हे केंद्र सरकारच्या मानसिकतेचं दर्शन घडवतं. मुंबई जी मराठी माणसाची आहे, तिला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आजही शिजतोय. त्यांनी इशारा दिला की काही शक्ती मुंबई व आजूबाजूचा एमएमआर परिसर गुजरातमध्ये जोडण्याचे प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच चंदीगडचा मुद्दा उचलून धरण्याची आठवण देत राज ठाकरे यांनी मराठी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंह यांच्या मूळ प्रदेशाचा उल्लेख करत म्हणाले, त्यांचा मुंबईशी, महाराष्ट्राशी काहीही संबंध नाही. तरीही ते येऊन मुंबईच्या नावावर भाष्य करतात. फक्त दिल्लीतील नेतृत्वाची मर्जी ठेवण्यासाठी ही वक्तव्ये केली जातात. त्यांनी केंद्रावर आरोप केला की मुंबई नेहमीच डोळ्यात खुपते, कारण ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असून इथे मराठी ओळख दृढ आहे. सुरुवातीपासूनच काही जण मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. परंतु महाराष्ट्रातील जनतेने तो प्रत्येकवेळी हाणून पाडला आहे. मुंबई ही मराठी माणसाचीच आहे, आणि राहणार, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. केंद्र सरकार व भाजप यांची पुढील भूमिका काय? आयआयटीप्रमाणेच अनेक राष्ट्रीय संस्थांच्या नावात बॉम्बे, मद्रास अशी जुनी नावे कायम आहेत. मात्र, मुंबईच्या नावाचा संदर्भ आल्यानंतर नेहमीच राजकीय वादंग निर्माण होतो. मराठी ओळख, भाषा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा संघर्ष कायम आहे. त्यामुळे या विधानाने महाराष्ट्रातील मराठी जनतेला जणू पुन्हा एकदा सज्जतेचा इशारा मिळाला आहे. मुंबई आपलीच आहे आणि राहील, हे संदेश अनेकांनी दिला आहे. आता केंद्र सरकार व भाजप यांची पुढील भूमिका काय असते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. राज ठाकरे यांनी केलेले आवाहन देखील वाचा.... केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बाँबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे ? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे ! खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय. आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बाँबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे ! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच ! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं ! राज ठाकरे ।

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:59 am

नगरपालिकांच्या निवडणुकीत थेट मुद्द्यांवर बोट:लक्षवेधी फलक ठरला चर्चेचा विषय; मतदार नागरिकांची माफक अपेक्षा मांडली

सातारा येथील नगरपालिकेची निवडणूक प्रचाराची धामधूम जोरात सुरू आहे .कमानी हौद परिसरातील गुरुवार पेठेत सुप्रसिद्ध ॲड. राजगोपाल द्रविड व त्यांच चिरंजीव ॲड. अमित द्रविड यांच्या निवासस्थानासमोर लक्षवेधी फलक चर्चेचा विषय ठरला आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीत थेट मुद्द्यांवर बोट ठेवण्याचे काम या फलकाने केले आहे. संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात अशा प्रकारचा योग्य निवाडा आणि त्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेली कामे याचा पाढाच प्रश्नावलीतून द्रविड परिवाराने या फ्लेक्स रुपी भव्य फलकावर छापलेला आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवपालन, मध्यरात्री फटाके वाजविणे, सार्वजनिक उत्सवात डॉल्बी, लेझर लाईट, अडथळा निर्माण करणारे धोकादायक व विनापरवाना फ्लेक्स, सायलेन्सर काढून अपरात्री कर्कश आवाजात बाईक चालविणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भटकी कुत्री नियंत्रण नाही, अवजड वाहनांचे गैरसोईचे पार्किंग, जीवघेणे दुर्लक्ष, रोड सेपरेटर परिसरात फुटपाथ नाहीत. महिला/पुरूषांकरिता प्रभागात स्वच्छतागृहे पुरेशा प्रमाणात नाहीत, कोणतीही साफसफाई न करता एका दिवसात कोल्ड प्रोसेसने लगेच उखडणारा रस्ता, प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, शहरातील तलाव आणि इतर जलस्त्रोतांची नियमित स्वच्छता नाही, अनधिकृत नळजोडणी, प्रमुख रस्त्यावर वेग मर्यादा फलक नाहीत, अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणाचा वाढता वेढा, बांधकाम परवानगी देताना सार्वजनिक पार्किंगचे पालन केले जात नाही. अनधिकृत हातगाडे, नैसर्गिक प्रवाह, ओढेवरील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष, पालिकेचे राखीव जागेमध्ये बांधकाम परवानगी, रस्त्यावरच ई-अनधिकृत मांडव उभारणी, अनधिकृत फ्लेक्स, किमान गरजा, नियमित घंटागाडी नाही, कचरा वर्गीकरण होत नाही, कमी प्रकाशाचे पथदिवे. पाण्याचा अनियमित आणि असमान पुरवठा, रस्ता सफाई नियमित नाही, ट्रैफिक सिग्नल यंत्रणेचा पाठपुरावा नाही, नगरसेवक फिरकत नाहीत, कोणतीही मिटींग घेतली जात नाही, सार्वजनिक पार्किंग व्यवस्था नाही, अन्यमैदान/क्रिडांगण नाहीत, इंटरसिटी बस, रेल्वे स्टेशन बस पाठपुरावा नाही, वृद्ध् नागरिकाच्या समस्यांसाठी प्रभागात ऑनलाईन व्यवस्था करता आली नाही, रस्त्यावरील अयोग्य स्पीड ब्रेकर्स कडे सपशेल दुर्लक्ष, नगरसेवक, रूग्णालय फोन नंबर लावलेले नाहीत. शहर परिसरात वृक्ष रोपणाचा केवळ देखावा, नगरपालिकेकडे असलेली दुर्लक्षित स्मशानभूमी असे अनेक विषय आहेत. या समस्यांबाबत या कालावधीत काम न केल्यास नागरीक सेवेत त्रुटी म्हणून आम्ही जबाबदार राहू, असे इच्छुक उमेदवारांनी जाहीर बंधनपत्र लिहून द्यावे. अशी मतदार नागरिकांची माफक अपेक्षा सुद्धा द्रविड परिवाराने व्यक्त केली आहे. कोणाचीही भिडभाड न ठेवता अशा पद्धतीने सामान्य मतदाराने रिलोकप्रतिनिधींना विचारलेले प्रश्न हे खरोखरच लोकप्रतिनिधींना आपल्या कार्याची पोचपावती देणारे असून या प्रश्नांमुळे हे लोकप्रतिनिधी निरुत्तरच होतील, असेच मत अनेक सुजाण नागरिक या फलकाकडे पाहून व्यक्त करत आहेत. दरम्यान ,या फलकाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून हा फलक अक्षरशः सुजाण मतदार आणि सामान्य नागरिक प्रत्येक सोशल मीडियावरील ॲपवर पाठवून खऱ्या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आणि या सर्वांची तो प्रश्नांची उत्तरे देणार का? असाच प्रश्न एकमेकाला करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:45 am

हिंगोली निवडणूक:मटक्याचे अड्डे सुरु करायचे तर शिंदेसेनेला मतदान करा– मुटकुळे; तर जनतेने तळहाताच्या फोडा सारखे जपले असते – बांगर

हिंगोली पालिका निवडणुकीच्या प्रचारात जोर चढला असून शिंदे सेना व भाजपा आमदारांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. त्यामुळे प्रचारातून विकासाचे मुद्दे बाजूलाच पडल्याचे चित्र आहे. हिंगोली पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी 127 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. काही ठिकाणी बहुरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत आता प्रचाराला चांगलाच जोर चढला असून शिंदे सेना, भाजपा, ठाकरे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे मत मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणुकीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहे. शहरातील कॉर्नर बैठकांमधून शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर व भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. हिंगोलीत एका कॉर्नर बैठकीत बोलतांना आमदार बांगर यांनी भाजपा आमदार मुटकुळे यांच्यावर कडाडून टिका केली. आमदार मुटकुळे यांच्या सांगण्यावरून माझ्या घरी 100 पोलिसांचा ताफा झडतीसाठी पाठविण्यात आला. घराची झडती घेण्यात आली. मात्र पोलिसांना काहीही सापडले नाही. तुम्ही अड्ड्यावर सापडले नसता तर जनतेने तुम्हाला तळ हातावरील फोडा सारखे जपले असते असे सांगत आमदार मुटकुळे यांच्यावर टिका केली. तर दुसरीकडे आमदार मुटकुळे यांनी शिंदे सेनेचे आमदार बांगर यांच्यावरही कडाडून टिका केली. हिंगोलीत मटक्याचे अड्डे सुरु करायचे असतील तर आमदार बांगर यांच्या उमेदवाराला निवडून द्या अशा शब्दात टिका केली. यावेळी त्यांनी भाजपच्या कामांचा आढावाही मांडला. दरम्यान, या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी तून जनतेची मात्र चांगलीच करमणुक होत असून विकास कामांचे मुद्दे मात्र मागे पडल्याचे दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:30 am

हॅप्पी बर्थडे, म्हणत हल्ला; तरुणाला जाळण्याचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद:मित्रांनीच वाढदिवसाच्या बहाण्याने तरुणाला बोलावले आणि पेटवले

मुंबईतील विनोबा भावे पोलिस ठाण्याच्या हद्दीत 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्री एक हादरवून टाकणारी घटना घडली. वाढदिवसाचा आनंद दु:खद ठरला आणि एका तरुणाचे आयुष्य काही क्षणांत बदलले. 21 वर्षीय अब्दुल रहमान या विद्यार्थ्याला त्याच्याच परिचित पाच जणांनी वाढदिवसाच्या नावाखाली घराबाहेर बोलावले आणि त्यानंतर त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिक या घटनेमुळे भयभीत झाले असून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बरोबर बारा वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि केक कटिंगच्या बहाण्याने पाचही आरोपींनी अब्दुलला खाली बोलावून घेतात. सुरुवातीला केक कापताना मजा-मस्करीच्या नावाखाली त्याच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. ही गंमत फारच हिंसक वळण घेईल याची कुणालाच कल्पना नव्हती. काही क्षणातच स्कूटीतील पेट्रोलसारखा ज्वलनशील पदार्थ काढण्यात आला आणि तो थेट अब्दुलच्या अंगावर ओतण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. घडलेल्या घटनेच्या गंभीरतेची कल्पना तेव्हा आली, जेव्हा आरोपींनी पेट्रोल ओतल्यानंतर अब्दुलला आग लावली. काही सेकंदांतच त्याच्या अंगावर ज्वाळा भडकल्या आणि तो जिवाच्या आकांताने मदतीसाठी ओरडू लागला. दरम्यान, हे भयंकर दृश्य जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या व्हिडिओमध्ये अब्दुल धगधगत धावताना दिसतो आणि काही लोक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतानाही दिसतात. सुदैवाने, तातडीने मिळालेल्या मदतीमुळे त्याचे प्राण थोडक्यात वाचले. का आणि कोणत्या हेतूने असा हल्ला केला? याचा तपास सुरू जखमी अवस्थेत अब्दुलला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे शरीर गंभीर भाजले गेले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकाराबाबत अब्दुलच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी ओळखीचेच असल्याने पोलिस त्यांनी का आणि कोणत्या हेतूने असा हल्ला केला? याचा तपास करत आहेत. मजा-मस्करी किंवा वाढदिवसाच्या नावाखाली अशा स्वरूपांचे हिंसाचार कोणत्याही समाजात मान्य होऊ शकत नाहीत, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून जबाबदार नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. वाढदिवसासारखा आनंदाचा दिवस एका तरुणासाठी दुःस्वप्न ठरला आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून त्यावर आधारित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवते की सुरक्षिततेसाठी सजगता किती आवश्यक आहे. कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी अब्दुलच्या आरोग्यासाठी प्रार्थना व्यक्त केली असून न्याय मिळावा, अशी अपेक्षा सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:24 am

खड्डे मांडणार अधिवेशनात, वृक्षताेडीवर चुप्पी:नाशिक साधूग्राममधील वृक्षताेडीच्या विषयांतून लक्ष वळविण्याचा प्रयत्न, पर्यावरणप्रेमींचा आराेप

एमएनजीएलने खोदलेले रस्ते, पावसाळ्यात खड्डे व कॉलनी रस्त्यांची दुरवस्था यावरुन मंगळवारी (दि. 25) भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे, राहुल ढिकले वा सीमा हिरे यांनी आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. पुढील पंधरा दिवसांत शहर खड्डेमुक्त न झाल्यास हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडू असा इशारा दिला. याचवेळी खड्ड्यांवरून आक्रमक झालेल्या तिन्ही आमदारांना पत्रकारांनी आणि पर्यावरणप्रेमींनी वृक्षताेडीबाबत त्यांची भूमिका विचारताच तिघांनीही तिथून काढता पाय घेतला. शहरात साधूग्राममधील वृक्षताेडीविराेधात नागरिकांच्या मनात संताप असताना तिनही आमदार त्यावर काेणतीच भूमिका घेत नसल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप आहे. खड्डे काय आजच पडलेले नाहीत, गेल्या अनेक दिवसांपासूनच्या खड्ड्यांसाठी आमदारांना अचानक कसा कळवळा आला. त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे त्यांना वृक्षताेडीवरून विषय दुसरीकडे वळवायचा असल्याचा आराेप पर्यावरणप्रेमींनी यावेळी केला आहे. दरम्यान पर्यावरणप्रेमींनी साधूग्रामसाठी सुचविलेल्या जागांवर पार्किंग, आरोग्य वा इतर सुविधा याचे नियोजन आहे. प्रयागराज येथील गर्दी पाहता नाशिकलाही माेठी गर्दी हाेण्याच्या शक्यतेने नियाेजन केले आहे. गुजरातवरून वाहनाने येणाऱ्या भाविकांसाठी मेरीत पार्किंग व्यवस्था केली जाईल. नाशिकरोडला रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी गांधीनगर येथे सुविधा उभारली जाईल, असे आयुक्त खत्री यांनी वृक्षताेड आणि पर्यायी जागेसंदर्भात सांगितले. तर खड्ड्यांबाबत त्या म्हणाल्या की, नियमाप्रमाणे सर्व खड्डे बुजविले जातील. गॅस कंपनीने ज्या ठिकाणी लाइन टाकली असेल तेथे एक महिन्यात कनेक्शन देण्याचे सांगण्यात येईल. कॉलनी रस्ते बुजवण्यासाठी किती निधी लागेल याची माहिती घेऊन शासनाकडे तशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यांना जनताच धडा शिकवेल भाजप आमदार निवडणुकीला मते मागण्यासाठी जनतेत जातात. लोक त्यांना निवडून देतात. परंतु आता नाशिककर तपोवनसाठी लढत असताना हे तिन्ही आमदार भूमिका मांडणे टाळतात. खड्डे प्रश्नावर बोलू शकतात. पण तपोवनवर बोलणे टाळतात. जनता धडा शिकवेल. - भारती जाधव, वृक्षप्रेमी वृक्षताेड प्रकरणात यांचा सहभाग साधूग्रामच्या वृक्षताेडीबाबत मेळामंत्री गिरीश महाजनांसह तीनही आमदारांचा सहभाग असल्याची शंका यानिमित्ताने येते. खड्ड्यांबाबत प्रश्न विचारता तर मग साधूग्रामच्या वृक्षताेडीबाबत आमदार चुप्पी का बाळगतात. त्यांची ही कृती वृक्षताेडीचा विषय दुसरीकडे वळविण्याचीच आहे. - राजू देसले, वृक्षप्रेमी खोट्या माहितीने ढिकलेंचा संताप जयभवानीरोड खड्ड्यात गेला असून अधिकाऱ्यांनी मात्र या रोडवर फक्त अडीचशे खड्डे असल्याचा खोटा दावा केल्याने आ. राहुल ढिकले यांनी बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. या रोडवर 950 हून अधिक खड्डे आहेत. एमएनजीएलने 1690 किलोमीटर रस्ते खोदले. त्यापैकी 466 किलोमीटर खड्डे बुजवल्याच्या दाव्याची त्यांनी हवा काढली. फक्त 48 किलोमीटर रस्ते खड्डे बुजवले असून उर्वरित खड्डे खडीने भरले आहेत. खोटी माहिती सादर करू नका असा दम त्यांनी अधिकाऱ्यांना भरला. फरादेंनी वाचली नियमावली एमएनजीएलने वर्षभरापासून खाेदून ठेवले आहे. पावसाळा संपला तरी खड्डे तसेच आहेत. कॉलनी रस्त्यांची तर दयनीय अवस्था आहे. खड्ड्यांची डागडुजी वरच्यावर केली जात असल्याचा आराेप करत त्यांनी खड्डे कसे बुजवावे याबाबत शासनाची नियमावलीच वाचून दाखवली. यानुसार खड्डे बुजवले जातात का? गुणवत्ता नियंत्रण विभाग काय करतो असे त्यांनी खडसावले. निधी आम्ही आणू, दोष निवारण कालावधीतील रस्ते संबंधित ठेकेदाराकडूनच करून घ्या, अशी सूचना त्यांनी केली. जिथे झाडे आहेत त्या जागेचे डी-मार्किंग करणार रस्त्यांबाबत बैठक झाल्यावर आमदारांनी पत्रकार, उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी साधूग्राममधील वृक्षताेडीवर प्रश्न विचारताच तिन्ही आमदार तेथून निघून गेले. वृक्ष असलेल्या जागेवरच गेल्यावेळी तिन्ही आखाड्यांचे टेंट हाेते. त्यामुळे येथील जागेचे डी मार्किंग केले जाईल. त्यानंतर किती जागा आवश्यक आहे याची कल्पना मिळेल. त्यामुळे किती झाडे तोडावी लागतील व किती वाचवता येईल याचा अंदाज येईल. रस्त्याच्या कडेला, एकदम मागील बाजूस किंवा टेंटसाठी अडचण न ठरणारे वृक्ष वाचवले जातील. वृक्ष प्राधिकरण समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल. - मनीषा खत्री, महापालिका आयुक्त, नाशिक

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 10:04 am

नाशिकमधील बागूल टाेळीच्या किशोर बरूला अटक:मित्राकडेच 50 हजारांची मागितली खंडणी; वेशांतर करून सातपूरला वास्तव्य

नाशिकमध्ये मित्रावर पार्ट्यांमध्ये पैसे खर्च केल्याचे सांगत 50 हजारांची खंडणीची मागणी करत चाॅपरने हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार सराईत गुन्हेगार किशोर बरूला पाेलिसांनी सातपूर येथे अटक पंचवटी पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ हे त्याच्याकडून वदवून घेण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल यांच्या पथकाचे नितीन जगताप, आप्पा पानवळ यांना माहिती मिळाली. बरु सातपूर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी सापळा रचला. एका हाॅटेलजवळ ताे दिसताच त्याला पथकाने ताब्यात घेतले. चौकशीत गुन्हा केल्याची कबुली दिली. बरुवर गंभीर गुन्हे दाखल संशयित बरूने दाढी-मिशा वाढवत वेशांतर केल्याने त्याला ओळखणे कठीण झाले हाेते. रात्री फिरत असल्याने तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पाेलिसांच्या कायद्याचा बालेकिल्ला या कारवाईमुळे ताे लपून-छपून फिरत हाेता. ही कारवाई थंडावल्यानंतर तो सातपूला फिरत हाेता. त्याच्याविराेधात खून, दराेडा, खंडणी, प्राणघातक हल्ला असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ताे स्वत:ची टाेळी चालवित असल्याचे तपासात पुढे आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Nov 2025 9:59 am