साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताबदल झाला. सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलला पराभवाची धूळ चारत साहित्य संवर्धन आघाडीने साहित्य परिषदेच्या प्रमुख पदांवर विजय मिळवला. एकूण 31 जागांपैकी 24 जागा विद्यमान सदस्यांना मिळाल्या, तर 7 जागा विरोधी पॅनेलला मिळाल्या. अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण विजयी झाले. प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक तर कोषाध्यक्ष पदी प्रदीप निफाडकर विजयी झाले. टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या कार्यालयात मतमोजणीला रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरूवात झाली. रात्री 9.30 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह अकरा जिल्ह्यांत 'मसाप'चे 16 हजार 607 मतदार होते. यापैकी 10 हजार 901 इतक्या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण वैध मते 10 हजार 713 तर 188 मते अवैध ठरले. मतमोजणीत उत्कर्ष परिवर्तन आणि साहित्य संवर्धन या दोन पॅनेमध्ये अखेरपर्यंत चुरस पहायला मिळाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 2021 मध्ये करोनाचे कारण देऊन सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती. मतमोजणीला सकाळपासूनच 7 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात विश्रामबाग पोलिस ठाण्याचे 3 पोलिस आणि 4 होमगार्ड यांचा समावेश होता. प्रत्येक फेरीदरम्यान कुणाला किती मते पडली हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्यात ठेवण्यात आले होते. सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधी पदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. जिल्हा व शहर कार्यवाह पदासाठी 1 हजार 506 सदस्यांनी मतदान केले. सुरुवातीपासून साहित्य संवर्धन आघडीचे वर्चस्व मतमोजणीत दिसून आले. 8 फेऱ्यापर्यंत हेच पॅनल 1300/1400 मतांनी आघाडी होते. शेवटच्या काही फेऱ्यात मताधिक्य कमी झाल्याने उमेदवारांची धडधड वाढली. निवडून आलेले उमेदवार अध्यक्ष : योगेश सोमणप्रमुख कार्यवाह : स्वाती महाळंककोषाध्यक्ष : प्रदीप निफाडकर जिल्हा प्रतिनिधी सातारा : नंदकुमार सावंतअलका बेडकीहाळअमर सिह पाटणकरसोलापूर : पद्माकर कुलकर्णीकल्याण शिंदेडॉ. श्रुती वडगबाळकरसांगली : दीपक स्वामीकोल्हापूर : राजन मुठाणेकोकण : अरुण इंगवलेनशिक : उन्मेश गायधनीप्रकाश होळकरअहिल्यानगर : जयंत येलूलकरडॉ. गणेश भगतजळगाव : डॉ. वासुदेव वलेगणेश आढावठाणे : सुरेश देशपांडेभिकू बारस्करपुणे : राजन लाखेपुरूषोत्तम काळेप्रभाकर ओव्हाळधुळे-नंदुरबार : प्राचार्य संजीव गिरासे स्थानिक कार्यवाहसुनील महाजनअंजली कुलकर्णीसुनेत्रा मंकणीप्रसाद मिरासदारमाधव राजगुरूनितीन संगमनेरकरआशुतोष जावडेकर प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते अध्यक्ष : योगेश सोमण- 5 हजार 365प्रा. मिलिंद जोशी- 5 हजार 320मताधिक्य- 45 प्रमुख कार्यवाह स्वाती महाळक : 5 हजार 414सुनीताराजे पवार : 5 हजार 285मताधिक्य : 129 कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर : 5 हजार 536विनोद कुलकर्णी : 5 हजार 168मताधिक्य : 368 साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, साहित्य परिषदेची निवडणूक अतिशय चूरशीची झाली. सर्व आजीव सभासदांनी यावेळी भरभरून मतदान केले. साहित्यप्रेमीचा चांगला पाठिंबा मिळाला. निवडणुकीत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे आभार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जणांवर वीजचोरीचा गुन्हा:थकबाकीपोटी खंडित वीजपुरवठा परस्पर जोडल्याने कारवाई
छत्रपती संभाजीनगर येथे वीजबिलाच्या थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा बेकायदेशीरपणे परस्पर जोडल्याप्रकरणी महावितरणने आठ जणांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. महावितरणने वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच, कारवाई केलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी महावितरणने पथके नेमली आहेत. या कारवाईत छावणी परिसरातील दिलीप सुदाम सुतार यांच्यासह एकूण आठ जणांचा समावेश आहे. पैठणगेट, खोकडपुरा येथील शेख मजहर शेख मुनीर बागवान, बशीर फतेह एम.डी. व मोहंमद उस्मान खान तसेच समतानगरातील सुभाष किसन झोंबाडे यांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित करण्यात आला होता. त्यांनी अनधिकृतपणे वीज जोडून महावितरणचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिकलठाणा परिसरातील अमिना पार्क येथील सैदाबी शेख मुनाफ, नारेगाव येथील सुरय्याबी शेख महेबूब आणि सिडको एन-२ परिसरातील भरत काशिनाथ दुगम यांच्यावरही थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर परस्पर जोडणी केल्याप्रकरणी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. छावणी परिसरातील दिलीप सुदाम सुतार यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महावितरणने अशा परस्पर जोडणी करणाऱ्या ग्राहकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अनधिकृत वीजपुरवठ्यामुळे प्राणांतिक अपघाताचा धोकाही असतो. त्यामुळे ग्राहकांनी अनधिकृतरीत्या वीजपुरवठा जोडू नये. तसेच, वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना शेजाऱ्यांनीही अनधिकृतरीत्या वीजपुरवठा देऊ नये, अन्यथा त्यांचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी सांगितले.
हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी बळीराजा अधिक सक्षम व्हावा आणि शेती व्यवसाय किफायतशीर व शाश्वत व्हावा, या उद्देशाने शासनाच्या कृषी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक अभिनव कार्यक्रम राबवण्यात आला. 'कवी संमेलनातून शेताच्या बांधावर कृषी योजनांचा जागर' असे या कार्यक्रमाचे नाव होते. परतवाडा जवळील हनवतखेडा येथील शेतकरी देवानंद आमले यांच्या शेतात कृषी विभागाच्या सहभागातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना राहुल सातपुते म्हणाले की, शासनाचे धोरण शेतकरी हिताला बळ देणारे आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत शासनाद्वारे विविध कृषी योजना राबविण्यात येत आहेत. महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून, शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यमांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कृषी प्रशिक्षण व व्यवस्थापन प्राधिकारिणीच्या (आत्मा) प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, वऱ्हाडी कवी प्रा. विठ्ठल कुलट, विजय सोसे, राजा धर्माधिकारी, गौतम गुळधे, गजानन मते, जितेंद्र रोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अतुल वाठ, अचलपूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रभुदास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनाच्या माध्यमातून कृषी योजनांचा जागर करण्यात आला. प्रा. विठ्ठल कुलट यांनी कवितेतून कृषी विभागाच्या यांत्रिकीकरणामुळे गावात क्रांती झाल्याचे सांगितले. ट्रॅक्टर, पाणी, बियाणे अनुदानाची पहाट उगवली असून, कृषीदूतांनी अन्नदात्यांचा सन्मान करत सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले. राजा धर्माधिकारी यांनी भारूडातून 'आता शेती विकायची नाही, गोंधळून जायचे नाही, महाविस्तार एआय सांगतो, शेतीतून मार्ग काढायचा आहे' असा संदेश दिला. विजय सोसे यांनी 'कृषी यंत्राला मिळे अनुदान, कास्तकाराला पहिलाच मान, थांबू पाण्याची नासाडी, ठिबक-तुषाराची लागली नाडी. कृषी खात्याची गोठच न्यारी' अशी कविता सादर केली. तर गजानन मते यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा संदेश देत 'जुन्याबरोबर नवे तंत्रज्ञान, मातीतून उगवेल सोनं, कृषी खात्याच्या आधाराने, शेतकरी होईल सक्षम' असे म्हटले. गौतम गुळधे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत 'शासनाकडे योजनांचा साठा, घ्या त्याचा योग्य फायदा, उत्पन्न वाढवा बळीराजा, कमी होईल तुमचा त्रास मोठा' अशी कविता सादर केली. प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांनी शेताच्या बांधावर थेट संवाद साधत कवितेतून दिलेली माहिती अधिक प्रभावी ठरते, असे नमूद केले. 'मातीशी नाते आणि शेती विकासाची गती' हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामगीताचार्य रेचे यांचे उपोषण संपले:आमदारांच्या मध्यस्थीने दहीगाव रेचा रस्त्याचा प्रश्न सुटणार
अंजनगाव सुर्जी ते दहीगाव रेचा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामगीताचार्य मनोहर रेचे यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर यशस्वी झाले आहे. आमदार गजानन लवटे आणि आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर रेचे यांना शरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. अंजनगाव सुर्जी ते दहीगाव रेचा हा राष्ट्रीय महामार्गालगतचा महत्त्वाचा रस्ता असून, त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. हा मार्ग दहीगाव रेचा, शेलगाव, वढाली, धाडी, जनोना, गरजधरी, पळसखेड, खिरपाणी तसेच मेळघाट परिसरातील अनेक गावांना जोडतो. रस्त्याच्या दुर्दशेमुळे या मार्गावर वाहन चालवणे तर दूर, पायी चालणेही कठीण झाले होते. अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने, नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी, बाजारपेठेसाठी आणि शासकीय कामांसाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. खराब रस्त्यामुळे विद्यार्थी, वृद्ध, गर्भवती महिला तसेच गंभीर रुग्णांना रुग्णालयात ने-आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात नेण्याचा वाहतूक खर्चही वाढला होता. प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप वाढला होता. या सर्व समस्या लक्षात घेऊन ग्रामगीताचार्य मनोहर रेचे यांनी गेल्या १२ मार्चपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाला दहीगाव रेचा ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठा पाठिंबा दिला. आमदार गजानन लवटे, आमदार ज. मो. अभ्यंकर आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मध्यस्थीने या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला. प्रशासनाने ठराविक कालावधीत निधीची तरतूद करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली.
राजुरा येथील साहिल धारणे बनला रेल्वे लोकोपायलट:गरिबीवर मात करत मिळवले मोठे यश, गावात आनंदाचे वातावरण
चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा गावातील साहिल सुधाकरराव धारणे या युवकाने गरिबीवर मात करत इंडियन रेल्वेमध्ये लोकोपायलट पदावर यश मिळवले आहे. त्याच्या या यशाने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. साहिलचे वडील सुधाकरराव धारणे गावात पानटपरीचा छोटासा व्यवसाय करतात. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही साहिलने जिद्द आणि मेहनतीच्या बळावर शिक्षण पूर्ण केले. त्याने आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून शिक्षणासोबत वडिलांच्या व्यवसायातही मदत केली. साहिलचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजुरा येथील स्व. खंडेराव देशमुख कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने अमरावती येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. पुढील शिक्षणासाठी त्याने मुंबईतील सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. या काळात तो समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहिला. शिक्षण पूर्ण झाल्यावर साहिल काही काळ गावात परतला. त्याने गावातील शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिका येथे स्पर्धा परीक्षांची तयारी केली. या काळातही त्याने वडिलांना व्यवसायात मदत करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. अखेर त्याच्या अथक परिश्रमांना यश आले आणि त्याची इंडियन रेल्वेमध्ये लोकोपायलट पदासाठी निवड झाली. या यशानंतर राजुरा गावात त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. शाहू-फुले-आंबेडकर अभ्यासिका येथील विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य भूषण शिवदासराव काळे आणि मित्रपरिवाराच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जल्लोषाच्या वातावरणात साहिलचे स्वागत करण्यात आले. नांदगाव खंडेश्वरचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेहनत, शिस्त आणि ध्येयवेड्या वृत्तीने यश मिळवता येते, असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी सांगितले की, गावातील युवकांनी शिक्षणाच्या बळावर उच्च पदांवर पोहोचून गावाचे नाव उज्ज्वल करावे. साहिलच्या यशातून इतर मुलांना प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजुरा गावातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे यश आज अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी म्हसला हे छोटेसे गाव आता राष्ट्रीय स्तरावर चमकले आहे. या गावातील सरपंच हेमंत ढेपे आणि पाणीपुरवठा कर्मचारी साहेबराव राठोड यांचा दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'हर घर नल से जल' अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. सध्या मांजरी म्हसला गावातील ६३० घरांना दररोज पाणी मिळते. येत्या आठवडाभरात सुमारे ४२०० नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची तयारी गावाने केली आहे. नागरीकरणामुळे अनेक शहरांना रोज पाणी मिळणे कठीण असताना, या छोट्याशा गावाने पाणी व्यवस्थापनात आदर्श निर्माण केला आहे. केंद्र शासनाच्या 'हर घर नल से जल' अभियानांतर्गत राष्ट्रीय जल जीवन मिशनतर्फे देशभरात 'जल महोत्सव पंधरवडा' साजरा करण्यात येत आहे. याच निमित्ताने दिल्लीच्या विज्ञान भवनात राष्ट्रीय जल महोत्सवाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ढेपे आणि राठोड यांना उत्कृष्ट कार्यासाठी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या प्रमाणपत्रामुळे मांजरी म्हसला ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे. जल महोत्सवासाठी महाराष्ट्रातून निवड झालेल्या केवळ दहा जिल्ह्यांपैकी अमरावती जिल्ह्याची निवड झाली होती, ज्यात मांजरी म्हसला ग्रामपंचायतीची नल जल मित्र या विशेष वर्गवारीतून निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील शाश्वत व कार्यक्षम पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन ही निवड झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींशिवाय केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, राज्यमंत्री वी. सोमन्ना, राजभूषण चौधरी यांच्यासह केंद्र सरकारचे विविध मान्यवर मंत्री व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणीपुरवठा कर्मचारी साहेबराव राठोड यांनी गावातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, पाइपलाइनची नियमित तपासणी करणे आणि पाणी व्यवस्थापनाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणे अशा कामांमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केली आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याचा मान मिळाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक बाळासाहेब रायबोले, पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे, गट विकास अधिकारी स्नेहल शेलार, ग्रामपंचायत अधिकारी रोहित तायडे तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अमेरिकेचे सर्वांत घातक बी-५२ बॉम्बर सक्रीय
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था इराण आणि इस्राईल, अमेरिकेचे युद्ध सुरू होऊन पंधरवडा उलटला आहे. या युद्धामुळे इराणचे प्रचंड नुकसान झाले असले तर आर्थिकदृष्ट्या अमेरिका आणि इस्राईलला हे युद्ध भारी पडले आहे. आता अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत इराणवर आपले सर्वात जुने परंतु सर्वांत घातक स्ट्रॅटेजिक बॉम्बर बी-५२ स्ट्रॅटोफोर्टेसला सक्रीय रुपाने तैनात केले. हे बॉम्बर विमान १९५० […] The post अमेरिकेचे सर्वांत घातक बी-५२ बॉम्बर सक्रीय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती, राहुरीमध्ये होणार पोटनिवडणूक
मुंबई : प्रतिनिधी देशातील ५ राज्य विधानसभांसोबत ८ रिक्त जागांसाठी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. राहुरी आणि बारामतीसाठी २३ एप्रिलला मतदान होईल तर मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली तर दिवंगत उपमुख्यमंत्री […] The post बारामती, राहुरीमध्ये होणार पोटनिवडणूक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दर्यापूर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर करणाऱ्या हॉटेलवर महसूल प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान ९ हॉटेलची तपासणी करून १५ सिलिंडर जप्त करण्यात आले. मात्र, एका हॉटेलमध्ये कारवाई सुरू असताना नायब तहसीलदार प्रमोद काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनाम्याची कागदपत्रे फाडण्यात आली आणि जप्त केलेले काही सिलिंडरही पळवून नेण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावामुळे तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम झाल्याने सिलिंडरच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. रविवार, २१ एप्रिल रोजी दुपारी तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार प्रमोद काळे, सहाय्यक महसूल अधिकारी विनोद जाधव, मंडळ अधिकारी राजेश मिरगे, तलाठी प्रदीप गिते आणि नांगरे यांच्या पथकाने दर्यापूर शहरातील ९ आस्थापनांची तपासणी केली. यावेळी अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर होत असल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे १५ सिलिंडर जप्त करण्यात आले. दर्यापूर शहरातील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील बाभळी टी-पॉईंटसमोरील हॉटेल जम-जम येथे कारवाई सुरू असताना, हॉटेलच्या संचालकांनी काही लोकांना जमा करून नायब तहसीलदार प्रमोद काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली. त्यांनी पंचनाम्याची कागदपत्रे फाडून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी हॉटेलचे संचालक आणि इतर काही व्यक्तींनी जप्त करून वाहनात ठेवलेले काही सिलिंडरही काढून पळवून नेले. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरात हॉटेलची तपासणी:घरगुती गॅस वापरल्याप्रकरणी बुढीलेनमधील हॉटेलवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाने शहरातील 12 हॉटेल्सची तपासणी केली. या तपासणीदरम्यान, बुढीलेन परिसरातील आदिल टी हाऊसमध्ये तीन घरगुती गॅस सिलिंडर आढळून आले. याप्रकरणी हॉटेलवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. पुरवठा विभागाच्या 11 पथकांनी ही तपासणी मोहीम राबवली. दुपारी 12 वाजता आदिल टी हाऊसची तपासणी केली असता, तिथे तीन सिलिंडर सापडले. यापैकी दोन रिकामे होते, तर एका सिलिंडरचा वापर भजी आणि वडे तळण्यासाठी केला जात असल्याचे पथकाने पाहिले. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यामुळे अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1995 च्या कलम 3 आणि 7 नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान, अनेक हॉटेल चालकांनी गॅसऐवजी शेगडी आणि चुलीवर स्वयंपाक करत असल्याचे दिसून आले. शहरात सध्या 40 हजार गॅस सिलिंडरचा साठा उपलब्ध असून, दररोज नवीन साठा येत आहे, असे प्रवीण फुलारी यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी गॅस एजन्सींवर गर्दी करू नये, कारण घरपोच डिलिव्हरी दिली जात आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही फुलारी यांनी केले. उद्योगांसाठी गॅसचा पुरवठा 5 मार्चपासून बंद करण्यात आला आहे, तर इतर व्यावसायिक वापरासाठी 10 मार्चपासून पुरवठा थांबवण्यात आला आहे. मात्र, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना गॅसचा पुरवठा सुरू आहे. तसेच, शिवभोजन केंद्रांकडून मागणी आल्यास त्यांनाही गॅस पुरवला जाईल, असे फुलारी यांनी सांगितले.
आता वार्षिक टोल पास १ एप्रिलपासून महागणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २०२६-२७ या आर्थिक वर्षात फास्टॅगच्या पासची किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खासगी वाहनचालकांना १ एप्रिल २०२६ पासून पाससाठी आधीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वार्षिक टोल पासची किंमत वाढविली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून वाहनचालकांना या पाससाठी ३ हजार रुपयांऐवजी ३०७५ रुपये द्यावे लागणार […] The post आता वार्षिक टोल पास १ एप्रिलपासून महागणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला असून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ आणि बुकिंग कालावधी थेट 45 दिवसांवर गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा आणि वाढता काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महसूल विभागामार्फत धाडसत्र राबवले जात असले, तरी या कारवाई दरम्यान आता अधिकारी आणि ग्राहकांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यात तर एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, महसूल विभागाने जप्त केलेले गॅस सिलिंडर संतप्त ग्राहकांनीच पळवून नेल्याची घटना घडली आहे, ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमरावतीच्या दर्यापूर परिसरात महसूल विभागाच्या कारवाईदरम्यान एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर रोखण्यासाठी महसूल विभागाने अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील हॉटेल्सवर धडक कारवाई सुरू केली होती. या मोहिमेत अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणांहून घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. मात्र, ही कारवाई सुरू असतानाच तिथे स्थानिक नागरिकांचा मोठा जमाव जमला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. जमावाने केवळ कारवाईला विरोधच केला नाही, तर कर्तव्यावर असलेल्या महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणला. विशेष म्हणजे, संतप्त जमावाने कारवाईचे अधिकृत पंचनामे फाडून टाकले आणि सरकारी वाहनात जप्त करून ठेवलेले सिलिंडर बळजबरीने काढून पळवून नेले. भररस्त्यात सरकारी मुद्देमाल पळवल्याच्या या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या गोंधळामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी आता संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र सुमारे तासभर उलटूनही जप्त केलेले सिलिंडर पळवून नेणाऱ्यांपैकी कोणीही ते परत करण्यासाठी पुढे आले नाही. या बेजबाबदार कृत्याची गंभीर दखल घेत, नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध रितसर तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणून जप्त केलेला मुद्देमाल पळवणाऱ्या या व्यक्तींविरुद्ध आता पोलिस प्रशासनाकडून कठोर कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.
बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी परिसरातून मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीला काही नराधमांनी घरातून उचलून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक अत्याचार केल्यानंतर पीडितेला रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवण्यात आले होते. या अमानवीय घटनेमुळे जिल्ह्यात सुरक्षेचा आणि वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेतली असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतः तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे. पीडिता अल्पवयीन असूनही तिचा विवाह झाल्याची माहिती समोर आल्याने, चाकणकर यांनी या बालविवाहाप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या क्रूर कृत्यातील दोषींवर लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशा सूचना चाकणकर यांनी तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून दिल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी वैभव पटेकर याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांन्वये अटक करण्यात आली असून, तपासादरम्यान पीडितेचा गेल्या वर्षी बालविवाह झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केवळ मुख्य आरोपीवरच नव्हे, तर तो बालविवाह लावून देणारे, लग्नाला उपस्थित असलेले लोक, तसेच कर्तव्यात कसूर करणारे स्थानिक पोलिस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले असून, या निमित्ताने बालविवाहाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांवरच आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती आहे. नेमकी घटना काय? 10 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरात झोपलेली असताना, आरोपीने घरात घुसून तिचे तोंड दाबले आणि तिला बळजबरीने नदीपात्रात नेले. तिथे तिच्यावर निर्घृण अत्याचार केल्यानंतर, नराधम आरोपीने तिला गावातील चावडीवर आणून दोरीने आणि कापडाने निर्दयपणे बांधून ठेवले आणि स्वतः तिथून पसार झाला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी टाहो फोडला, परंतु सुरुवातीला तिला कोणाचेही सहकार्य लाभले नाही. अखेर तिच्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी चावडीवर धाव घेत तिची सुटका केली आणि तिला घरी नेले. या भयावह प्रसंगामुळे आणि आरोपीच्या दहशतीमुळे पीडितेने सुरुवातीचे दोन दिवस ही घटना कोणालाही सांगितली नाही. मात्र, अखेर मानसिक धक्का पचवून तिने धाडस एकवटले आणि आपल्या आई व मामासह पिंपळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्रे हलवली आणि आरोपी वैभव पटेकर याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
मुंबईच्या धारावी परिसरातून एका 58 वर्षीय भंगार विक्रेत्याने जादूटोण्याच्या संशयातून स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आपल्यावर करणी किंवा जादूटोणा करत असल्याच्या संशयाने ग्रासलेल्या या पतीने हे टोकाचे पाऊल उचलले असून, या कृत्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या हत्याकांडानंतर आरोपीने पळून न जाता आपल्या मुलाला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला आणि आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली, ज्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपी अमृत मेघा सोलंकी (58) हा धारावी कोळीवाडा येथील जांबा पास्कल चाळीत आपली पत्नी सूरजबेन सोलंकी (52) हिच्यासह वास्तव्यास होता. 13 मार्च रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यावसान भीषण हत्याकांडात झाले. रागाच्या भरात अमृतने पत्नीच्या डोक्यात पाण्याची बाटली मारून तिला जखमी केले आणि त्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचा मुलगा शिवराम सोलंकी याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे वडील गेल्या तीन वर्षांपासून आईचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. आपली पत्नी आणि मुले मिळून आपल्यावर जादूटोणा करतात, असा अमृतचा ठाम समज झाला होता आणि मुले नेहमी आईचीच पाठराखण करतात, असा त्याचा राग होता. या अंधश्रद्धेतून त्याने मुलांना घरात येण्यासही मज्जाव केला होता. विशेष म्हणजे, 11 मार्च रोजी झालेल्या वादात त्याने पत्नीला मारून टाकण्याची धमकी दिली होती. 'एके दिवशी मी तुझ्या आईला मारून टाकीन' अशी धमकी आरोपीने दिली होती. 11 मार्च रोजी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी शिवराम जेव्हा आपल्या वडिलांना घेण्यासाठी घरी पोहोचला, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने वडिलांना फोन केला, तेव्हा अमृतने त्याला व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. व्हिडिओ कॉल सुरू होताच शिवरामच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर त्याचे वडील रक्ताने माखलेल्या अवस्थेत होते. सगळ्यांना बोलाव, मी तुझ्या आईला बाटलीने मारून आणि गळा दाबून संपवले आहे, असे ओरडून सांगत अमृतने कॅमेरा फिरवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पत्नीचा मृतदेह मुलाला दाखवला. शिवरामचा आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक तातडीने जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर अवस्थेतील सूरजबेन यांना सायन रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या भीषण हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अमृत सोलंकीला अटक केली आहे. एका संशयी पतीने अंधश्रद्धेपोटी पोटच्या मुलासमोर आपल्या क्रूर कृत्याची कबुली दिल्याने संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण, पारंपारिक वाद्याचा गजर, आश्वांचे नृत्य आणि 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' चा जयघोष करत भक्त भंडाऱ्यात अक्षरशः सोनेरी झालेला परिसर अशा उत्साही वातावरणात श्रीक्षेत्र आदमापुर तालुका भुदरगड येथे सद्गुरु बाळूमामा यांच्या रथोत्सव मिरवणूकीने भंडारा उत्सव सुरू झाला. निढोरी ते आदमापूर हा राज्य मार्ग भंडाऱ्याच्या उधळणीमुळे सोनेरी झाला होता. बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते रथाची विधीवत पूजा करण्यात आली. रथाची मिरवणूक तब्बल पाच तास चालली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर तालुका भुदरगड येथे सद्गुरु बाळूमामा यांच्या भंडारा यात्रेस आज प्रारंभ झाला. भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांचे दुध महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे. राज्य आणि परराज्यातील अनेक भागात राहत असलेल्या बाळू मामांनी जतन केलेली बकऱ्या १९ ठिकाणी बग्गी (दीड ते दोन हजार बकऱ्यांचा कळप) च्या रूपात असतात. प्रथेप्रमाणे भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व कळपातील दुधाचे कलश निढोरीत एकत्र येतात. या दुधाने भरलेल्या कलशाचे पूजन करून स्वागत केले जाते. आदमापूरातून बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीत आगमण झाले. यावेळी बाळूमामाच्या रथावर जेसीबी मधून २५ टन भंडाऱ्याची उधळण केली. द्वादशी दिवशी सकाळी मानाच्या घागरीतून बाळूमामां च्या समाधीला दुग्धाभिषेक घालण्यात येणार आहे. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादा मध्ये वापरले जाणार आहे. कर्नाटक ,औरनाळ,देवगड ,मिरज, मुंबई,गोवा, पंढरपूर व अन्य ठिकाणाहून मधून आलेले भक्तांनी भंडाऱ्याची उधळण केली. रथामध्ये १३८ किलो चांदीची बाळूमामांची मूर्ती धनगर बांधवांनी एक कोटी रुपये खर्च करून मंदीरास प्रदान केलेल्या रथामध्ये १३८ किलो वजनाची बाळुमामांची चांदीची मुर्ती विराजमान होती. या रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बाळूमामाच्या रथाच्या मिरवणुकीवर तसेच बाळूमामाच्या मंदिराच्या कळसावर, भक्तनिवास च्या समोर व राधानगरी निपाणी मार्गावर असणाऱ्या रथावर हेलिकॉप्टर मधून पुष्पष्टी करण्यात आली. भाविकांनी बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष केला.
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल
बीड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत असलेल्या आणि गुन्हेगारी प्रकरणांनी गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन महिलेस घरातून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी, महिला आयोगाने दखल घेतली आहे. बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील महिला रात्री घरी झोपलेली असताना घरातून उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून […] The post बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फार्महाऊसवरील ड्रग्ज पार्टीत पोलिसांवर गोळीबार
रंगारेड्डी : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील एका फार्महाऊसवर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. छापा टाकताना पोलिस पथकावर गोळीबारही करण्यात आला. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांना ताब्यात घेतले. या पार्टीत टीडीपीचे एक खासदारही उपस्थित होते. त्यांच्यासह एका माजी आमदारासह अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना घटनास्थळी अंमली पदार्थांची पावडरही आढळली. […] The post फार्महाऊसवरील ड्रग्ज पार्टीत पोलिसांवर गोळीबार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोलीत गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथके तैनात:हॉटेल आणि ढाब्यांवर होणार धडक तपासणी
हिंगोली जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा ग्राहकांना सुरळीत पुरवठा व्हावा तसेच काळा बाजार रोखण्यासाठी सात भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले आहेत. या पथकाकडून जिल्हाभरातील हॉटेल, ढाबा, खानावळींची तपासणी करून घरगुती गॅसचा वापर होत असल्याचे दिसल्यास तातडीने कारवाई करण्याचे आदेश गुप्ता यांनी दिले आहेत. आखाती देशातील निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरगुती गॅसचा अवैध व्यावसायिक वापर किंवा साठेबाजी झाल्यास सर्वसामान्य ग्राहकांना सिलिंडर मिळण्यास गॅसची टंचाई भासू शकते, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सात भरारी पथकाची स्थापना केली आहे. यामध्ये हिंगोली शहरासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, महसूल सहाय्यक प्रदीप काळबांडे यांचा समावेश आहे. हिंगोली ग्रामीणसाठी निरीक्षक अधिकारी अनिल घुगे, उपनिरीक्षक श्रीदेवी वग्गे, लिपीक गोपाल शेळके. वसमत शहरासाठी निरीक्षण अधिकारी पांडुरंग हांडे, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, लिपीक गणेश जाधव. वसमत ग्रामीणसाठी नायब तहसीलदार विनोद डोणगावकर, उपनिरीक्षक एकनाथ डक, लिपीक राहुल कांबळे यांचा समावेश आहे. कळमनुरी तालुक्यासाठी निरीक्षण अधिकारी अमोल घुगे, उपनिरीक्षक संतोष इंगळे, गोदाम व्यवस्थापक पंकज चौधरी, सेनगाव तालुक्यासाठी निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे, उपनिरीक्षक नागनाथ पाटील, पुरवठा निरीक्षक अभिजीत बोबडे तर औंढा तालुक्यासाठी नायब तहसीलदार प्रविण ऋषी, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, पुरवठा निरीक्षक कल्याणी हटवार यांचा समावेश आहे. आपल्या तालुक्यातील सर्व गॅस एजन्सीच्या साठ्याची तपासणी करून ग्राहकांना वेळेत सिलेंडर मिळत असल्याची खात्री करणे. घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिक खानावळी, कॅफे, खाद्यपदार्थ विक्रीचे हातगाडे, धाबे, टपऱ्यांवर किंवा वाहनामध्ये होणारा अवैध वापर रोखण्यासाठी अचानक तपासणी व छापे टाकणे. युध्दजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोणीही गॅसचा काळाबाजार किंवा साठेबाजी करणार नाही यावर बारकाकाईने लक्ष ठेवणे, घरगुती गॅस सिलिंडरची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या गॅस एजन्सींवर कारवाई करणे. अवैध गैस रिफिलिंग किंवा घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी या पथकांवर सोपविण्यात आली आहे.
लोणीकंद येथील बकोरी रोडवरील गोकुळ पार्क परिसरात एका 22 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी लाटे असे मृत तरुणीचे नाव असून, सासरी होणाऱ्या सततच्या छळामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ऐन उमेदीच्या काळात एका तरुणीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वैष्णवीच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस सुखात गेल्यानंतर पती यशवंत लाटे आणि सासरच्या इतर मंडळींनी पैशांच्या मागणीसाठी तिचा छळ सुरू केला होता. पतीकडून तिला वारंवार होणारी शिवीगाळ, शारीरिक मारहाण आणि माहेरून पैसे आणण्यासाठी टाकला जाणारा सततचा दबाव, या जाचाला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. वैष्णवीचे सासू, सासरा आणि दीर यांनी सुद्धा पैशांसाठी तगादा लावला होता. यामुळे वैष्णवी मानसिक तणावात होती. तसेच सासरच्या लोकांकडून मारहाण देखील करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सततच्या या त्रासाला कंटाळून वैष्णवीने टोकाचे पाऊल उचलले, असा दावा करण्यात येत आहे. अखेर सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून 14 मार्च रोजी सकाळी वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच लोणीकंद परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी मृत वैष्णवीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून लोणीकंद पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि दीर अशा चौघांविरुद्ध छळाचा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे विवाहित महिलांवरील छळाचा आणि हुंडाबळीचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लग्नानंतर अवघ्या काही काळातच एका 22 वर्षीय तरुणीला कौटुंबिक छळामुळे आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सासरच्या जाचाला कंटाळून अजून किती 'वैष्णवी' अशा प्रकारे मृत्यूला कवटाळणार? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या देशातील 12 ऐतिहासिक मराठा किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी केंद्र सरकारने तीन टप्प्यांचा सर्वसमावेशक ‘साईट मॅनेजमेंट प्लॅन’ तयार केल्याची माहिती केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी राज्यसभेत दिली आहे. राज्यसभा सदस्य तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ‘विशेष उल्लेख’ व प्रश्नाच्या माध्यमातून संसदेत हा विषय उपस्थित केला होता. त्यास लेखी उत्तर देताना केंद्र सरकारने सांगितले की, या 12 मराठा किल्ल्यांचे जतन, पुनर्संचयितीकरण, पर्यटन सुविधा विकसित करणे आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात 6 महिने ते 2 वर्षांचा अल्पकालीन टप्पा, 2 ते 5 वर्षांचा मध्यम कालावधीचा टप्पा आणि 5 ते 10 वर्षांचा दीर्घकालीन टप्पा असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. या तीन टप्प्यांत प्रशासकीय संरचना मजबूत करणे, किल्ल्यांवरील मूलभूत पायाभूत सुविधा उभारणे, पर्यटक मार्गदर्शन व माहिती प्रणाली विकसित करणे, पर्यटन सुविधा वाढविणे, उत्खनन व संवर्धनाची कामे करणे, आपत्ती व जोखीम व्यवस्थापन तसेच किल्ल्यांचे दीर्घकालीन संवर्धन, परिसर व पर्यावरण व्यवस्थापन अशी विविध कामे केली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठा किल्ल्यांच्या जतनाबरोबरच स्थानिक समुदायाच्या सहभागातून पर्यटनाला चालना मिळण्याची आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून जुलै 2025 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मराठाकालीन किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, तामिळनाडू, आसाम, केरळ व पुदूचेरीमध्ये एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांसोबतच देशातील विविध राज्यांमधील 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, या दोन्ही जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे आणि बारामतीचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींच्या अकाली एक्झिटमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या, ज्यावर आता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना 30 मार्च 2026 रोजी जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 6 एप्रिल 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिल ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 23 एप्रिल 2026 रोजी पार पडणार असून, 4 मे रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. तसेच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बारामतीत सुनेत्रा पवार लढणार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित केली असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या निवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात उतरवणार नसल्याची माहिती समोर येत असल्याने, बारामतीची ही जागा बिनविरोध होणार की अन्य कोणी अपक्ष किंवा इतर पक्षाचा उमेदवार आव्हान देणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राहुरीत महाविकास आघाडी ताकदीने लढणार भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आता पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे चिन्हे आहेत. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपला उमेदवार देण्याची दाट शक्यता असून, माजी आमदार पराजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपकडून कोणाला संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, कारण दिवंगत आमदारांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
गॅसटंचाईची झळ पार्ले-जी बिस्किटला
बुलडाणा : प्रतिनिधी आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ कंपनी ही प्रसिद्ध ‘पार्ले-जी’ बिस्किटांचे उत्पादन करते. अशातच या कंपनीला गॅसच्या तीव्र टंचाईला सामोरो जावे लागले आहे. त्यामुळे गेल्या गुरुवारपासून ही कंपनी बंद पडली आहे. परिणामी, कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय […] The post गॅसटंचाईची झळ पार्ले-जी बिस्किटला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज हे गेल्या मागील दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत. त्यांच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून असंख्य भाविक येत आहेत. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील महाराजांची भेट घेतली आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज यांची भेट घेतल्यानंतर अंबादास दानवे म्हणाले, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आज चौका, ता. छत्रपती संभाजीनगर येथे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. जगद्गुरू रामानंदाचार्याजी दक्षिण पीठ नाणीजधाम यांच्या वतीने आयोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरु आहे. गुरुकृपेने समाजात सद्भावना, संस्कार आणि सेवा वृत्ती अधिक दृढ होवो, हीच प्रार्थना. याप्रसंगी माझ्यासमवेत शिवसेना तालूकाप्रमुख शंकर ठोंबरे, गजानन वाघलव्हाळे, रामेश्वर काळे, आकाश लेंभे, अभिजीत पगारे व ज्ञानेश्वर गिरी उपस्थित होते, अशी माहिती दानवे यांनी दिली. दरम्यान, जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी सुरू झालेल्या ‘समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळ्या’मध्ये भाविकांसाठी भव्य महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा असूनही, आयोजकांनी पर्यायी व्यवस्था उभी केली आणि 15 मोठ्या पारंपरिक चुलींवर सुमारे 10 टन खिचडी व 4 टन मिश्र भाजी शिजवून, हजारो अनुयायांना महाप्रसादाचे वाटप केले. चौका घाट परिसरातील म्हसोबा महाराज मंदिरासमोरील मैदानावर शनिवारी सुरू झालेल्या या सोहळ्यासाठी, मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित राहिले आहेत. 10 टन खिचडी आणि 4 टन मिश्र भाजी तयार करण्यासाठी, दोन दिवसांच्या कालावधीत सुमारे ७० व्यावसायिक गॅस सिलिंडर्सची आवश्यकता भासली असती. तथापि, गॅसच्या पुरवठ्यातील कमतरतेमुळे, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करताना आयोजकांना एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. गॅसची कमतरता असूनही 'महाप्रसादा'मध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये, याची खात्री करण्यासाठी 15 मोठ्या, पारंपरिक चुली उभारण्यात आल्या. या उद्देशाने सुमारे 13 टन सरपण मागवण्यात आले. या चुलींवर ठेवलेल्या प्रचंड मोठ्या भांड्यांमध्ये खिचडी आणि मिश्र भाजी तयार करण्यात आली. ज्यामुळे गॅस सिलिंडर्सच्या तुटवड्यावर मात करणे शक्य झाले.
साईभक्तांना मिळणार एकच लाडू पाकीट
शिर्डी : प्रतिनिधी अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढत आहे. शिर्डी साईबाबा संस्थानकडे सध्या साधारणत: दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच एलपीजी गॅसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शिर्डी साईबाबा संस्थान प्रसादाच्या पदार्थांमध्ये आणि लाडू वाटपामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सध्या एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम काही ठिकाणी दिसू […] The post साईभक्तांना मिळणार एकच लाडू पाकीट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘सत्यमेव जयते’ ही केवळ घोषणा नाही
नवी दिल्ली : लडाखमधील पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची शनिवारी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रियाही दिली आहे. त्या म्हणाल्या की सत्यमेव जयते ही केवळ एक घोषणा नसून ते वास्तव आहे आणि अखेर सत्याचा विजय झाला आहे. शनिवारी प्रथमच आम्हाला वेळेचे […] The post ‘सत्यमेव जयते’ ही केवळ घोषणा नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हॉटेल व खानावळी बंद; भाजी खरेदीलाही ‘ब्रेक’
मार्केटयार्डात पालेभाज्या शिल्लक पुणे : प्रतिनिधी गॅस सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम शहरातील हॉटेल आणि खानावळी व्यवसायावर होत असून त्याचा फटका मार्केटयार्डातील पालेभाज्यांनाही बसला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक हॉटेल व खानावळी बंद राहिल्याने मार्केटयार्डातून होणारी भाज्यांची खरेदी सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घसरली आहे. परिणामी गाळ्यांवर भाज्या शिल्लक राहू लागल्या असून व्यापा-यांना नुकसान सहन करावे लागत […] The post हॉटेल व खानावळी बंद; भाजी खरेदीलाही ‘ब्रेक’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले!
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम, आसाम या चार राज्यांसह पुद्दुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा रविवार दि. १५ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केली. आसाम, केरळम, पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर पश्िचम बंगाल विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार असून येथे २३ एप्रिल […] The post पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ विचारवंत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुणे येथे ‘झेन कथा’ आणि ‘कात्रजचा घाट’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना त्यांनी ‘झेन कथा’तून सत्याचे, तर ‘कात्रजचा घाट’मधून सत्तेचे दर्शन घडते, असे प्रतिपादन केले. बहुधार्मिक समाजात संवादाशिवाय मानवाचे अस्तित्व शक्य नाही, असेही ते म्हणाले. झेन मास्टर सुदस्सन लिखित ‘झेन कथा’ आणि प्रा. सुधीर भालेराव लिखित ‘कात्रजचा घाट’ या पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सिने कला दिग्दर्शक संतोष संखद आणि मैत्री प्रकाशनच्या मोहिनी कारंडे मंचावर उपस्थित होत्या. जीएसटी अधिकारी प्रज्ञा बनसोडे-शिंदे आणि रमाई स्मारक समितीचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड यांचीही यावेळी उपस्थिती होती. डॉ. सबनीस यांनी पुढे सांगितले की, संत आणि महापुरुषांनी जगाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी दाखविलेल्या मार्गाने गेल्यास जगात शांतता नांदेल. सिने कला दिग्दर्शक संतोष संखद म्हणाले, ‘झेन कथा’ हे पुस्तक आयुष्याचे सार सांगते, तर ‘कात्रजचा घाट’मधील कथांमधून खरीखुरी पात्रे आपल्यासमोर उभी राहतात. लेखनाविषयी बोलताना प्रा. सुधीर भालेराव यांनी सांगितले की, समाजात चांगली-वाईट माणसे असली तरी त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून लेखन केले आहे. झेन मास्टर सुदस्सन यांनी नमूद केले की, ‘झेन कथा’ या पुस्तकात बोधकथांची सूत्रबद्ध मांडणी केली आहे. या कथा प्रेरणादायक असून, अंतर्गामी मन विकासासाठी आवश्यक आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी कारंडे यांनी केले.
श्रेया बुगडे यांना राम नगरकर कलागौरव पुरस्कार प्रदान:ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी केले कौतुक
प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी गुप्ते यांनी श्रेया बुगडे यांच्या अभिनयातील वैविध्य आणि त्यांच्या प्रतिभेचे कौतुक केले. गुप्ते म्हणाल्या की, अनेकदा कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिका मिळत राहतात, ज्यामुळे त्यांचा साचा तयार होऊ शकतो. मात्र, श्रेया बुगडे यांनी आपल्या कारकिर्दीत कमालीचे वैविध्य राखले आहे आणि त्या एक अतिशय गुणी अभिनेत्री आहेत. राम नगरकर कला अकादमी आणि बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी ख्यातनाम विनोदी अभिनेते राम नगरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून, यात ११ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे स्वरूप आहे. टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राम नगरकर यांच्या स्नुषा डॉ. वैजयंती वंदन नगरकर, उदय नगरकर आणि बेलवलकर सांस्कृतिक मंचचे संस्थापक समीर बेलवलकर आदी उपस्थित होते. वंदना गुप्ते यांनी यावेळी राम नगरकर यांच्या अभिनयाचे स्मरण केले आणि स्वतःच्या कारकिर्दीतील काही प्रसंगही सांगितले. त्या म्हणाल्या, श्रेयाच्या भात्यात अभिनयाचे असंख्य बाण आहेत. तिने उत्कृष्ट अभिनयाचे विविध रंग प्रेक्षकांना दाखवले आहेत. तिने भूमिकांमध्ये जपलेल्या वैविध्याची असूया वाटावी, असे तिचे काम आहे. पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले यांनी श्रेया बुगडे यांच्याशी संवाद साधला. शाळकरी वयापासून अभिनयाची आवड जोपासल्याचे सांगून श्रेया म्हणाली, रत्नाकर मतकरी यांच्या 'चमत्कार झालाच पाहिजे' या बालनाट्यातून मला खरा ब्रेक मिळाला. माझा कल मला समजला आणि कुटुंबियांनीही सतत पाठिंबा दिला. 'वाटेवरती काचा गं' या नाटकातून अभिनयाचा वेगळा रंग मिळाला. कॉलेजपासून मी सातत्याने रंगभूमीवर स्पर्धांतून वावरले आणि सलग १४ वर्षे मी उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळवले होते. श्रेयाने तिच्या दूरचित्रवाणीवरील प्रवासाविषयी सांगितले. 'फू बाई फू' मुळे तिला छोट्या पडद्यावर यश मिळाले, तर 'चला हवा येऊ द्या' या सलग १० वर्षे गाजत राहिलेल्या शोमुळे तिला खूप काही शिकता आले. ती म्हणाली, आमची टीम, आमच्यातली मैत्री, जुळलेली केमिस्ट्री हे सारे विलक्षण होते. प्रमोशनल हेतूने सुरू केलेला हा शो यशाच्या शिखरावर पोहोचला, हे आमच्यासाठी आनंदाचे होतेच, पण हा काळ प्रत्येकाला खूप काही देणारा ठरला. याच शोला दुसऱ्या वेळी प्रतिसाद कमी मिळाल्याचे कारण प्रेक्षकांची सवय मोडली हे असावे, असेही तिने नमूद केले.
आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) यांच्या वतीने, महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर आर काबेल यांच्या सहकार्याने गौ टेक २०२६ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २० ते २३ मार्च २०२६ दरम्यान कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा १५ मार्च रोजी पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यास राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, जीसीसीआयचे संस्थापक तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया आणि महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष व गौ टेक २०२६ चे आयोजन अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पुणे हे विद्येचे माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. आता पुण्याला गोसेवा व गौ-आधारित उपक्रमांचे केंद्र म्हणूनही ओळख मिळायला हवी. गोमातेच्या संकल्पनेमागे व्यापक दृष्टिकोन असून त्याचे अनेक आयाम आहेत. या सर्व बाबी व गौ-आधारित उत्पादने सामान्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि ते गौ टेक २०२६ मधून साध्य होईल, असे त्यांनी नमूद केले. डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी सांगितले की, गौ-आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या आयोजनामागील उद्देश आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून गौ-आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर व संस्कारित बनविण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभियान आहे. गौ टेक २०२६ मध्ये धोरणकर्ते, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापीठे, संत समाज, महिला व युवक देश-विदेशातून मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शेखर मुंदडा यांनी माहिती दिली की, गौ टेक २०२६ मध्ये ३०० पेक्षा अधिक स्टॉल्स, १० पेक्षा अधिक विषयाधारित परिसंवाद, विशेष सत्रे आणि B2B बैठका तसेच परदेशी प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. या चार दिवसीय कार्यक्रमाला ५ लाखांहून अधिक अभ्यागत येण्याची अपेक्षा आहे. या प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खत व बायो-फर्टिलायझर्स, दूध व मूल्यवर्धित दुग्ध उत्पादने, गौमूत्र व गोबरावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, पशुवैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे, सीमेन प्रयोगशाळा, सेक्स-सॉर्टेड सीमेन व एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान, सौर व बायो-एनर्जी, चारा व बियाणे उद्योग, चारागाह विकास यंत्रसामग्री, शासकीय व खासगी बँका, सहकारी संस्था, दुग्ध संघ व फेडरेशन संबंधित स्टॉल्स सहभागी होणार आहेत.
कोंढवा, पर्वतीत पिस्तूल बाळगणारे सराईत जेरबंद:दहशत माजवण्यासाठी बाळगलेली दोन पिस्तूल व काडतुसे जप्त
पुणे शहरात कोंढवा आणि पर्वती परिसरात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांसह एकूण चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तुलांसह दोन काडतुसे जप्त केली. हे आरोपी दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगत असल्याची माहिती समोर आली आहे. पर्वती परिसरातून अजित सागर कसबे (वय २१, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) याला अटक करण्यात आली. कसबे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगत असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, सूर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख आणि अमोल दबडे यांनी ही कारवाई केली. दुसऱ्या एका कारवाईत, कोंढवा परिसरातून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने प्रकाश तुळशीराम पवार (वय २४, रा. हडपसर), मुस्ताक इक्राइम शेख (वय २२, रा. कोंढवा) आणि ओंकार दयानंद पवार (वय २४, रा. बिबवेवाडी) यांना अटक केली. त्यांच्याकडूनही एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. या आरोपींसोबत असलेले तीन साथीदार मात्र पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. खंडणी विरोधी पथक दोनमधील पोलीस कर्मचारी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना, आरोपींकडे पिस्तूल असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गौरव देव करत आहेत.
पालयम : तामिळनाडूमध्ये एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बसला मालगाडीने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २० हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी वीरराक्कीयाम आणि पालयम दरम्यान असलेल्या मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली. या अपघातामुळे रेल्वे मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी इंजिनिअरिंग कॉलेजची बस शनिवारी सायंकाळी विद्यार्थ्यांना घेऊन […] The post बसला मालगाडीची धडक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (आयएसडब्ल्युएआय) ने केली आहे. पारंपरिक भारतीय कुस्ती आणि तिच्या ऐतिहासिक किताबांचे संरक्षण करण्यासाठी हे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. या संदर्भात कायदेशीर पावले उचलण्यात आली आहेत. ‘हिंद केसरी’, ‘भारत केसरी’, ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ यांसारख्या प्रतिष्ठित किताबांच्या परंपरेचे जतन करण्यासाठी आयएसडब्ल्युएआय कटिबद्ध आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांनी पुणे न्यायालयात स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेला इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस गौरव रोशन लाल सचदेवा, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे, पै. ज्ञानसिंह शेरावत (ऑलिम्पियन, तांत्रिक समिती अध्यक्ष), पै. नितीन बारणे (महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ अध्यक्ष), पै. पोपट नलावडे (राष्ट्रीय खेळाडू) आणि कार्याध्यक्ष प्रा. नितीन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आयएसडब्ल्युएआय १९५८ पासून कार्यरत असून, देशभरातील कुस्तीपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत पारंपरिक भारतीय कुस्तीचा वारसा जपण्याचे काम करत आहे. या ऐतिहासिक किताबांचे नाव आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी त्यांची ट्रेडमार्क नोंदणीही करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतीय पारंपरिक कुस्तीच्या प्रसारासाठी त्यांच्या कार्याला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडूनही मान्यता मिळाली आहे. या संस्थेने आयएसडब्ल्युएआयला भारतातील पारंपरिक कुस्तीचे प्रतिनिधित्व करणारी अधिकृत राष्ट्रीय संघटना म्हणून घोषित केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र कुस्ती संघटनेने आयएसडब्ल्युएआय आयोजित स्पर्धा व किताबांना “बोगस” म्हटले असल्याचा आरोप संघटनेने फेटाळून लावला आहे. अशा विधानांमुळे कुस्ती समुदायात संभ्रम निर्माण होत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. गौरव सचदेवा आणि मोहन खोपडे यांनी प्रस्तावित ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेविरोधात पुणे जिल्हा न्यायालयात स्थगिती व मनाई आदेशासाठी अर्ज दाखल केला आहे. ही स्पर्धा १८ ते २२ मार्च २०२६ दरम्यान वाघोली येथे आयोजित करण्यात आली आहे. ॲड. अभिषेक येंडे, ॲड. संजुक्ता डे, ॲड. राजसाहेब पंडितराव पाटील आणि ॲड. यश दिंडे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ मार्च रोजी होणार आहे. आयएसडब्ल्युएआयने कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमींना अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पारंपरिक भारतीय कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संघटना यापुढेही कार्यरत राहील, असे पुनरुच्चार पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
आचारसंहिता लागण्यापूर्वीच ममतांच्या मोठ्या घोषणा
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणांचा पाऊस पाडत मोठी राजकीय खेळी खेळली आहे. रविवारी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून राज्यातील धार्मिक नेते, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. या निर्णयांकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी पुरोहित (पुजारी) आणि […] The post आचारसंहिता लागण्यापूर्वीच ममतांच्या मोठ्या घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाने आणखी तीव्र रूप धारण केले असून आता इराणने ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-४’ सुरू केले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स(आयआरजीसी) ने जड क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने संयुक्त अरब अमिरात, बहरीन आणि कुवैतमधील तीन अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणच्या […] The post मध्यपूर्वेत तणाव टोकाला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प चर्चेतून गायब
नवी दिल्ली : इराणमधील चाबहार बंदर प्रकल्पाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी या प्रकल्पासाठी २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणताही निधी ठेवण्यात आला नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, प्रकल्पाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच या निर्णयाचा भारताच्या मध्य आशियातील कूटनीतीवर परिणाम होऊ शकतो असेही म्हटले. जयराम रमेश यांनी सोशल […] The post इराणमधील चाबहार बंदर प्रकल्प चर्चेतून गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धाराशिव- लातूर- तुळजापूर महामार्गावर विचित्र अपघात; ३ ठार
धाराशिव : प्रतिनिधी धाराशिव-लातूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर आज ( १५ मार्च ) रोजी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात झाला. बोलेरो, वॅगनार आणि होंडा सिटी या तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने झालेल्या या विचित्र अपघातात तीन जणांचा जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. करजखेडा पाटीजवळ झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली […] The post धाराशिव- लातूर- तुळजापूर महामार्गावर विचित्र अपघात; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टीव्हीकेला उपमुख्यमंत्री पदासह ८० जागा
चेन्नई : देशात पुन्हा एकदा निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे. भारतीय निवडणूक आयोग पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी यांचा समावेश आहे. या निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून आघाड्यांचे गणित जुळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विजय यांच्या […] The post टीव्हीकेला उपमुख्यमंत्री पदासह ८० जागा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात एका तरुणाची सैराट स्टाईल करण्यात आली आहे. सदर तरुण मैत्रिणीने फोन करून बोलावल्यामुळे तिला भेटण्यासाठी गेला होता. पण तिकडे गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी त्याची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नागेश जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या आईसह पुण्यातील राहतो. तो शिवाजीनगर परिसरात ऑफिस बॉय म्हणून नोकरी करत होता. तर त्याची आई घरकाम करते. नागेशचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. या प्रेमसंबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळाली होती. यामुळे ते संतापले होते. त्यांनी शनिवारी सायंकाळी मुलीच्या मोबाईलवरून नागेशला फोन करून त्याला एकेठिकाणी बोलावले. मैत्रिणीने फोन करून बोलावल्यामुळे तो तत्काळ आपल्या आईला सांगून घराबाहेर पडला. पण तिथे पोहोचताच मुलीच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्याला घेरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत नागेश गंभीर जखमी झाला. या स्थितीत मुलीच्या कुटुंबीयांनी रात्री 8 च्या सुमारास मुलीच्या कुटुंबीयांनी नागेशच्या आईला फोन करून आम्ही तुमच्या मारले असून, तुम्ही त्याला घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर नागेशच्या कुटुंबीयांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळी पोहोचले तेव्हाही नागेशला मारहाण सुरू होती. कुटुंबीयांनी कसे तरी त्याची सुटका करून तत्काळ त्याला लगतच्या रुग्णालयात नेले. पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केलेत. पीडित कुटुंबीयांच्या मते, मुलीच्या वडिलांनी तिच्या मोबाईलवरून नागेशला मेसेज करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याला मारहाण करून त्याचा जीव घेतला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या दुसरीकडे, आपल्या नात्यातील मुलीला होणारा त्रास थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे धायरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल प्रशांत हबीब (28) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने टेलर होता. संशयित आरोपी आदित्य उमाप हा त्याच्या नात्यातील एका मुलीला त्रास देत होता. विशालने या प्रकरणी आदित्यला समज देऊन मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. यामुळे आदित्यने मनात राग ठेवून 11 मार्च रोजी रात्री विशालला धायरी परिसरातील डीएसके रस्त्यावरून जाताना दळवीवाडी फाट्याजवळ अडवले. त्यानंतर आरोपीने आपल्याजवळील लाकडी बॅटने विशालवर जोरदार प्रहार केले. त्यात विशाल हबीब गंभीर जखमी झाला. रक्त्याच्या थारोळ्यातच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी आदित्य घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात वादळी वा-यासह पावसाचा इशारा
मुंबई : मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढताना पाहायला मिळत आहे. मार्च महिना अद्यापही सुरू असतानाही राज्यातील अनेक जिल्ह्यांत उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यातील उन्हाळा याहीपेक्षा अधिक तीव्र असणार, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, तत्पूर्वी आता हवामान विभागाकडून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज […] The post राज्यात वादळी वा-यासह पावसाचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेणाच्या गोव-यांना सोन्याचा भाव
मुंबई : इराण-अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका भारतावर बसताना पाहायला मिळत आहे. भारतात गॅसचा तुटवडा आणि इंधनाची टंचाई निर्माण झाली आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये युद्धाचा परिणाम झाला असून, महाराष्ट्राही गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. या तुटवड्यामुळे नागरिकांनी पारंपरिक मार्ग निवडत चुली पेटवल्या आहेत. शिवाय शेणाच्या गोव-याही वापरल्या जात आहेत. महत्त्वाचे म्हणजे शेणाच्या गोव-यांची मागणी वाढल्यानं या […] The post शेणाच्या गोव-यांना सोन्याचा भाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गॅस तुटवड्याने वीजबिलही वाढणार
मुंबई : प्रतिनिधी ऊन वाढल्याने पंखे, एसी, कुलर सुरू झाले असून, पुढील ३ महिने नेहमीच्या बिलापेक्षा अधिकचे वीजबिल दरवर्षीच येते. तर दुसरीकडे गॅस सिलिंडरचा तुटवडा झाल्याने घरोघरी एअर फ्रायर, ओव्हन, इंडक्शन, इलेक्ट्रिक शेगडी या पर्यायी साधनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा वीज दरवाढीचा शॉक देणार असल्याची शक्यता आहे. दुसरीकडे शहरात गॅसचा जसा तुटवडा निर्माण […] The post गॅस तुटवड्याने वीजबिलही वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१५ एप्रिल पर्यंत मिळणार ‘लाडकी’चा रखडलेला हप्ता
मुंबई : प्रतिनिधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेतील पात्र महिलांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाचवेळी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार, हा हप्ता पुढील महिन्याच्या १५ तारखेच्या आत मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती. या […] The post १५ एप्रिल पर्यंत मिळणार ‘लाडकी’चा रखडलेला हप्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गणिताचे उत्तर चुकल्याच्या कारणावरून शिक्षकाने एका चिमुरडीला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील देवडी कला येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाइल्ड हेल्पलाईनने (1098) तत्परता दाखवत संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनोहर वाडीभस्मे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. चाइल्ड हेल्पलाइनच्या मीनाक्षी धडाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, 10 मार्च 2026 रोजी देवडी कला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात गणिताचा तास सुरू होता. यावेळी एका विद्यार्थिनीने प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्याने संतापलेल्या शिक्षकाने तिला मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थिनीच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चाइल्ड हेल्पलाईनच्या चमूने पीडित मुलीच्या घरी जाऊन चौकशी केली. शिक्षकांनी आम्हाला शाळेत बोलावून एका कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला. तसेच ही बाब बाहेर सांगितल्यास मुलीला शाळेतून काढून टाकण्याची धमकी दिली, असे मुलीच्या वडीलांनी चाइल्ड हेल्पलाईनच्या टिमला सांगितले. संबंधित शिक्षकाने पालकांवर दबाव टाकल्याचे मुलीच्या वडीलांनी सांगितले. वाडीभस्मे यांनी मुलीला मारहाण करून प्रकरण दडपण्यासाठी दबाव टाकल्याचे विद्यार्थिनीच्या वडिलांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर धडाडे यांनी वेलतूर पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यातच पालकांना धमकी दिल्याची बाब चौकशीत समोर आली. ‘दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी सांगितले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, चाइल्ड हेल्पलाईन पर्यवेक्षक अनिकेत भिवगडे आणि केस वर्कर मीनाक्षी धडाडे यांनी ही कारवाई पूर्ण केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रधानमंत्री सुर्यघर मोफज वीज योजनेमध्ये महाराष्ट्रात मागील एक वर्षात १.०८ लाख घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले असून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावल्याची माहिती वीज कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे. देशात महिना तीनशे युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य व्हावे व अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नही मिळावे यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना हाती घेतली आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या थेट उपयोगाच्या या योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना राज्य शासनाने सर्व जिल्हयातील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात या योजनेला मोठा प्रतिसादही मिळू लागला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या पाच महिन्यांतील योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत किती ग्राहकांच्या घरी सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले याची माहिती घेतली. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त १.०८ लाख ग्राहकांच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात ९५ हजार, गुजरात ९४ हजार, राजस्थान ३९ हजार तर केरळ राज्यात ३६ हजार ग्राहकांच्या घरावर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला आहे. देशामध्ये या कालावधीत एकूण ५ लाख ५७ हजार २२४ घरगुती ग्राहकांकडे सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले. त्यापैकी १९ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात बसविण्यात आले आहेत. त्याबद्दल केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाने अभिनंदन केले आहे. किती किलोवॅटसाठी किती सबसिडी प्रस्तुत योजनेत सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट दिले जाते. ऊर्वरित रक्कम लाभार्थी वीजग्राहकाने भरायची असते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज निर्माण होते. छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यामुळे त्याचे बिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज विकून त्याला उत्पन्नही मिळते. एकदा सौरऊर्जा प्रकल्प बसविला की त्यातून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याचे वीज कंपनीच्या सुत्रांनी सांगितले.
गत अडीच महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी बंद असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी खुले करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. निशिकांत दुबे हे सातत्याने महाराष्ट्रावर गरळ ओकतात. त्यातच ही घटना घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरत, निशिकांत दुबे तुमचा जावई आहे काय? असा तिखट प्रश्न उपस्थित केला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गत 9 जानेवारीपासून 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत या मंदिराच्या सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे. सध्या येथे सर्वसामान्यांना प्रवेश नाही. प्रशासनाने सुरुवातीला हे मंदिर महाशिवरात्रीला उघडण्याचा निर्णय घतेला होता. पण नंतर तो रद्द केला. भाविकांनी हा निर्णय मोठ्या मनाने मान्य केला. पण भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी हे मंदिर खास उघडण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मंदिर प्रशासन व जिल्हा प्रशासनाकडून सर्वसामान्यांना कठोर नियम लागू केले जात आहेत. मग राजकीय नेत्यांसाठी वेगळे नियम लागू केले जातात का? महादेवाच्या मंदिरात असा दुजाभाव का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सामान्यांना अन् दुबेंना वेगवेगळा न्याय का? दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले आपल्या महाराष्ट्रातील भीमाशंकर मंदिर पुरातत्त्व विभागाच्या कामासाठी गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे पण भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी हे मंदिर खुले करण्यात आले. हे निशिकांत दुबे कोण आहेत माहिती आहे का ? जे नेहमी मराठी माणसाला कमी लेखतात, जे नेहमी मराठी माणसांबद्दल चुकीचे विधान करून मराठी माणसांचा स्वाभिमान दुखवतात. एकदा ते म्हणाले की मराठी लोगो को हम पटक पटक के मारेंगे”. आज त्याच निशिकांत दुबे साठी महाराष्ट्रातील प्रशासन पायघड्या घालत आहे. सामान्य माणसांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे यांना वेगळा न्याय का ? दुबे काय तुमचा जावई आहे का? असे त्यांनी म्हटले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे हात वर उल्लेखनीय बाब म्हणजे निशिकांत दुबे यांच्यासाठी भीमाशंकराचे दरवाजे उघडल्याची वार्ता अवघ्या महाराष्ट्रात पसरली असली तरी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचा दावा केला आहे. भीमाशंकर मंदिर सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकामामुळे 9 जानेवारीपासून 3 महिन्यांसाठी बंद आहे. या कालावधीत कुणालाही दर्शनासाठी परवानगी देण्यात आली नाही. खासदारांनी दर्शन घेतल्याची मला कोणतीही माहिती नाही. जिल्हा प्रशासनाने अशी परवानगी दिली नाही. याविषयी चौकशी करून माहिती देतो, असे त्यांनी म्हटले आहे.
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच आमची इच्छा आहे, त्यासाठी सर्वांनी एकमताने निर्णय घ्यावा. पण जर ही निवडणूक आमच्यावर लादली गेली, तर आम्ही ती पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दुसरीकडे मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरील लाल-निळ्या दिव्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली. गाडीवर लाल दिवा नव्हता, तर बोनेटच्या ठिकाणी तो लावलेला होता. यात महापौरांचा कोणताही दोष नाही. नियम सर्वांना माहित आहेत, पण त्यांना विनाकारण टार्गेट करणे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अजून बरेच काम करायचे बाकी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39 व्या पदवीदान समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'डॉक्टर ऑफ सायन्स' (मानद पदवी) प्रदान करण्यात आली. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा मला या पदवीबाबत विचारणा झाली, तेव्हा मनात संभ्रम होता. कारण कृषी क्षेत्रात अजून बरेच काम करायचे बाकी आहे. मात्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठासारख्या नामांकित संस्थेचा आदर राखण्यासाठी मी ही पदवी स्वीकारली. 14 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट राज्यातील कृषी स्थितीवर बोलताना फडणवीस यांनी 'जलयुक्त शिवार' आणि 'सोलर योजना' यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. या वर्षाअखेरपर्यंत 14 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. तसेच, हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी 10 हजार गावांमध्ये 'क्लायमेट प्रूफ' शेती सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गणित चुकले म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण
नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील नागपूरमध्ये शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. गणिताचं उत्तर चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे ती गंभीर जखमी झाली. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात देवळी कला येथे ही घटना घडली. पीडित मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाचवीच्या वर्गात […] The post गणित चुकले म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांच्या कॅशबुकची तपासणीच झाली नसल्याचे पाहणीमध्ये स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. पुढील पंधरा दिवसांत सर्व विभागाच्या कॅशबुकची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्हयात सेनगाव, औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेचा गैरव्यवहार उघडकीस आला. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने दोषींवर कारवाई केली आहे. एकीकडे सेनगाव येथे दोषींवर गुन्हे दाखल झाल्यानंतर औंढा नागनाथ येथे मात्र कोणावरही गुन्हे दाखल झाले नाही. या प्रकरणात माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे यांनी गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, जिल्हयात गैरव्यवहारचे वाढते प्रकार लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. बी. राठोड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गायकवाड यांनी लेखा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी लेखा विभागाचेच कॅशबुक अपूर्ण असल्याचे दिसून आले. या शिवाय कॅशबुकनुसार महिला अखेरची शिल्लक व बॅक विवरण पत्रानुसार महिना अखेरची शिल्लक यामध्ये तफावत येत असल्याचे दिसून आले. बँक विवरण पत्रावरून कॅशबुक पूर्ण करणे अपेक्षित असतांना लेखी विभागाकडून त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यानंतर गायकवाड यांनी इतर काही विभागांचे कॅशबुक मागवून पाहणी केली असता सदर कॅशबुकची नियमित तपासणी करण्यात आली नसल्याचे दिसून आले. तसेच काही विभागाचे कॅशबुकच अपूर्ण असल्याचेही दिसून आले. महिना अखेरची शिल्लक नोंदवून त्यात विभाग प्रमुखांची स्वाक्षरी नसल्याचे दिसताच गायकवाड यांनी तिव्र संताप व्यक्त केला. जिल्हा परिषद अंतर्गत विभागांचेच लेखा विभागाकडून तपासणी होत नसतांना पंचायत समिती व इतर विभागाची तपासणी कधी करणार असा सवाल उपस्थित केला. अपूर्ण कॅशबुकवरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. पुढील पंधरा दिवसांत जिल्हा परिषदेमधील सर्व विभागांचे कॅशबुक तपासून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना लेखा विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे आता लेखा विभागाने सर्व विभागांचे कॅशबुक तपासण्यासाठी धावपळ सुरु केली आहे.
पुण्यात परदेशी चलन (फोरेक्स) व्यवहारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 40 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात वानवडी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार वानवडी परिसरात राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून परदेशी चलन व्यवहारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी 39 लाख 95 हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतरही चोरट्यांनी कोणताही परतावा दिला नाही. तसेच कोणतेही उत्तर देण्यासारखी टाळाटाळ करू लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलिसठाण्याचे वरिष्ठ पोलिसनिरीक्षक भाऊसाहेब जाधव करत आहेत. 51 वर्षीय महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका 51 वर्षीय महिलेची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याची दुसरी घटनाही समोर आली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिसठाण्यात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या महिला विधी महाविद्यालय रस्त्यावर राहतात. सायबर चोरट्यांनी त्यांना मोबाइलवर संदेश पाठवून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. यावर विश्वास ठेवून महिलेने चोरट्यांच्या खात्यात 9 लाख 91 हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतरही चोरट्यांनी महिलेला कोणताही परतावा दिला नाही. या घटनेचा तपास डेक्कन पोलिसठाण्याच्या वरिष्ठ पोलिसनिरीक्षक गिरीषा निंबाळकर करत आहेत.
पुणे स्टेशन परिसरातील राजा बहाद्दुर मिल रस्त्यावर एका 21 वर्षीय तरुणाला धमकावून लुटण्यात आले. मोटारीतून आलेल्या तीन चोरट्यांनी त्याला मारहाण करून त्याच्याकडील सुमारे दोन लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरुण बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे गावचा रहिवासी आहे. शनिवारी मध्यरात्री तो मित्रासोबत राजा बहाद्दुर मिल परिसरातून जात असताना ही घटना घडली. एका महागड्या मोटारीतून आलेल्या तिघांनी त्यांना अडवले. आरोपींनी तरुण आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर तक्रारदार तरुणाच्या गळ्यातील 1लाख 95 हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून ते मोटारीतून पसार झाले. बंडगार्डन पोलिसांनी मोटारीतून पसार झालेल्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, सायबर चोरट्यांनी वाहतूक नियमभंगाची एपीके फाईल पाठवून एका नागरिकाची पावणेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे टिळक रस्त्यावर राहणारे आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर वाहतूक नियमभंगासंदर्भात एक एपीके फाईल पाठवली होती. तक्रारदाराने ती एपीके फाईल उघडताच, त्यांचा मोबाइल हॅक झाला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 75 हजार रुपयांची रोकड काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केली. खात्यातून पैसे काढल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण घोडके या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विवाहितेवर घरातून उचलून बलात्कार करण्याची आणि त्यानंतर तिला तसेच चावडीवर बांधल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात आज कुठेच महिला व मुली सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची आपली जबाबदारी मान्य आहे की नाही? असे या पक्षाने म्हटले आहे. बीड जिल्ह्यातील हिवरापाडी गावातील एका अल्पवयीन विवाहितेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. ही विवाहिता 11 मार्च रोजी आपल्या घरी झोपली होती. त्यावेळी गावातीलच वैभव पाटेकर नामक तरुणाने तिला घरातून उचलून नेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गावातील चावडीवर असलेल्या खांबाला बांधून तो पळून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रामस्थांनी या पीडितेला खांबाला बांधल्याचे पाहिल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर पीडितेचे कुटुंबीय आल्यानंतर तिची तेथून सुटका करण्यात आली. या घटनेमुळे विवाहिता प्रचंड घाबरल्यामुळे तिने पोलिसांत तक्राद दिली नाही. पण तिने आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण आपबिती सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच वेगाने कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवलल्या. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता तिथे त्याला 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी राहिलाय का? दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, राज्यात सातत्याने काही ना काही घटना घडत आहेत. बीड जिल्ह्याचा क्राईम रेट कदाचित संपूर्ण देशात सर्वात जास्त आहे. महाराष्ट्राही गुन्हेगारीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. काल बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेला घरातून उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर तिला गावच्या चावडीवर दोरीने बांधून ठेवण्यात आले. हा महाराष्ट्र खरेच शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे का? की आम्ही जंगली बनलो आहोत. ते पुढे म्हणाले, आज महाराष्ट्रात मुली व महिला सुरक्षित नाहीत. सरकार एका बाजूला लाडकी बहीण म्हणते आणि दुसऱ्या बाजूला कोणत्याही महिला व मुली सुरक्षित नाहीत. हजारो महिला व मुली गायब असल्याचे सरकारनेच सांगितले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे काही ठेकेदार ज्यांनी धर्माचा ठेका घेतल्यासारखे बोलत असतात. तसेच भाजपचे सरकार पुरस्कृत काही आमदारही हिंदू जनाक्रोश मोर्चा काढतात. हे लोक तेव्हाच मोर्चा काढतात जेव्हा घटनेतील आरोपी बिगर हिंदू् असतो. पण जेव्हा आरोपी आपल्या स्वधर्माचा असतो तेव्हा हे मूग गिळून बसतात. पडळकर, संग्राम जगताप, राणे, लांडगे हे 4 आमदार कुठेत? प्रत्येक पोलिस स्टेशनचा क्राईम रेट पाहिला व अत्याचाराच्या घटना पाहिल्या तर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढणाऱ्या गोपीचंद पडळकर असतील, संग्राम जगताप, नीतेश राणे व महेश लांडगे असतील या 4 आमदारांना भाजपने सोडले आहेत. संभाजी भिडे यांचे धारकरी व बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील हे सर्व धर्मांध लोक आरोपी बिगरहिंदू असतो तेव्हा चवताळून उठतात. सोशल मीडियावर पोस्ट टाकतात. पण आता बीडच्या या महिलेला न्याय मिळेल का? चित्रा वाघ असतील किंवा महिला आयोग असेल. महाराष्ट्रात आज कुठेही मुली व महिला सुरक्षित नाहीत. रोज कुठे ना कुठे तरी अत्याचाराच्या घटना घडत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण याची सर्वस्वी जबाबदारी घ्यावी, अन्यथा त्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी परिस्थिती महाराष्ट्रात बनली आहे, असेही विकास लवांडे यावेळी बोलताना म्हणाले.
नागपूर लोक अदालतीत 30,991 प्रकरणे निकाली:87.78 कोटींची तडजोड, 28 वैवाहिक प्रकरणे मिटली
नागपूर येथील राष्ट्रीय लोक अदालतीत 30,991 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये 87 कोटी 78 लाख रुपयांची तडजोड होऊन अनेक वाद मिटले. या अदालतीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः, घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या 28 वैवाहिक प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये समझोता घडवून आणण्यात आला, ज्यामुळे त्यांनी पुन्हा एकत्र संसारास सुरुवात केली. तसेच, 224 मोटार अपघात दाव्यांमध्ये 15 कोटी 74 लाख 84 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी दावे, भूसंपादन प्रकरणे, तडजोडीयोग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियम प्रकरणे, पराक्रम्य संलेख अधिनियम कलम 138 ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे, ग्राहक तक्रारी आणि सहकार न्यायालयातील प्रकरणे निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांपैकी 5,243 प्रकरणे तर दाखलपूर्व 25,748 प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील सर्व फौजदारी न्यायालयांमध्ये 9 ते 13 मार्च या कालावधीत विशेष अभियान राबवून 4,218 निरस्त फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. एका लवाद प्रकरण क्रमांक 161/2024 (सुशिला रूशी वागडे व इतर विरूध्द सोल आरबीट्रेटर व इतर) मध्ये 16 कोटी रुपयांपर्यंतची तडजोड होऊन ते प्रकरण लोकअदालतीत मिटले. मोटार अपघात दावा प्राधिकरणाअंतर्गत जेरोम फ्रासींस व 1 विरूध्द रॉयल सुंदरम जनरल इंन्शुरस या प्रकरणात मयताच्या वारसांना प्रत्येकी 45 लाख 25 हजार असे एकूण 90 लाख 50 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. याव्यतिरिक्त, मोटार अपघात दावा प्राधिकरणातील आणखी दोन प्रकरणांमध्ये 90 लाख आणि 60 लाखांची तडजोड झाली.
कुभंमेळा हा हिंदूचा पवित्र मेळा आहे यामध्ये इतरांनी नाक खुपसण्याचे काही कारण नाही.परंतु संजय राऊत यांना औरंगजेब फन क्लब आणि अफजल खानाच्या वंशावळीचा चिंता आहे, नीतेश राणे यांनी केलेले वक्तव्य अतिशय योग्य आहे, असे भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, कुंभमेळ्याकडे हिंदूचा सन म्हणून बघितले जाते, यामध्ये हिंदूच आले पाहिजे इतरांनी यात नाक खुपसण्याचे काही कारण नाही.कारण हिंदूच्रूा पवित्र सणांमध्ये हिंदू धर्मीयांनी सहभाग घ्यावा या नीतेश राणेच्या वक्तव्यात काही चुकीचे नाही. यामुळे राऊतांना पोटदुखी झाली आहे कारण तुम्हाला तुमच्या हिरव्या मतांची चिंता आहे, त्यांची गुलामी तुम्ही करत आहात, हिरव्या दाढ्या कुरवाळल्या तरी त्यांचा काहीच फायदा होणार नाही. संकटाच्या काळात देशासोबत उभे राहायचे असते नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देश सुरक्षित आहे. परंतू जनाब संजस राऊत राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सांगण्यावर देशाची बदनामी करत अपमान करत आहे. देशाचा अपामन करणारे राहुल गांधी, संजय राऊत यांना देशातील जनता कधी माफ करणार नाही. संकटाच्या काळात देशासोबत उभे राहायचे असते, नागरिकांना साथ द्यायची असते परंतु काँग्रेस अन् राऊत देशामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांच्याकडून अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. कुणाच्या परवानगीची गरज नाही नवनाथ बन म्हणाले की, भारताला रशियाकडून तेल आयात करण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. हे काँग्रेस आणि संजय राऊत यांना माहिती आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात जो व्यापारी करार झाला आहे यामध्ये 50 टक्के शुल्क लावला होता. पण तो मोदींमुळे 18 टक्क्यावर आला. रशियाकडून आपण तेल विकत घेत आहोत यात कुठलीही अडचण नाही आणि परवानगी घेण्याची गरज नाही. उलट राऊत हे राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहात. म्हणूनच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची बदनामी करत आहोत. देशाची सुरक्षितता आणि हीत बघत पंतप्रधान मोदी काम करत आहेत. तुम्ही सुरू केलेली देशाची बदनामी थांबवा. देश सुरक्षित हातात आहे राऊतांनी राहुल गांधी यांची काळजी केली पाहिजे. घरगुती गॅसचा तुटवडा नाही नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्र किंवा देशात कुठेही घरगुती गॅसचा तुटवडा नाही, वितरण प्रणाली अतिशय व्यवस्थित सुरू आहे. पण जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचे काम काँग्रेस आणि राऊतांकडून सुरू आहे. अखाती देशातून आपल्याकडे सीएनजीचा आयात सुरू आहे. भारतीय झेंडा बघून जहाजांना देशात येण्यास परवानगी मिळालेली आहे. इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सुद्धा आपल्याकडील इंधन पुरवठा अगदी योग्य पद्धतीने सुरू आहे. लोकांमध्ये अराजकता निर्माण करण्याचे काम राऊत करत आहे. प्रत्येक राज्यातील लोकांना गॅस पुरवठा होणार आहे. काही ठिकाणी हॉटेल आणि इतर ठिकाणी खबरदारी म्हणून गॅस पुरवठा थांबवण्यात आला आहे. परंतु घरगुती गॅसमध्ये खंड पडलेला नाही. काँग्रेस काळात युद्ध सुरू नसताना 1200 रुपयांना सिलिंडर मिळत होते ते आता युद्ध सुरू असताना 950 रुपयांमध्ये मिळते यावर राऊतांनी राहुल गांधींना जाब विचारला पाहिजे. तुम्ही देवस्थानांची चिंता करू नका नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी देवस्थानांची चिंता करू नये. देवास्थानांची चिंता करण्यासाठी महायुती आणि भाजप अतिशय सक्षम आहे.तुम्ही फक्त औरंगजेब आणि अफजन खान यांच्या कबरीची चिंता करत आहात.शिर्डी साई संस्थानमध्ये किती लाडू मिळणार यावर बोलण्याचा अधिकार नाही.कारण तुम्ही हिंदूत्त्व सोडले आहे. देव, देश आणि धर्म सोडून पाकिस्तानची गुलामी करण्यात धन्यता मानतात. सर्व संस्थाने देशासोबत उभे आहेत. युद्धजन्य परिस्थितीमध्ये ते देशाला सहकार्य करत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पारंपरिक गुढीपाडवा मेळावा यंदा विशेष चर्चेत आला आहे. मुंबईतील ऐतिहासिक शिवतीर्थावर होणाऱ्या या सभेचा अधिकृत टीझर मनसेकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मनसेने शेअर केलेला हा टीझर अत्यंत आक्रमक आणि थेट आहे. यात सर्वसामान्य महाराष्ट्राच्या मनातील खदखद मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. टीझरमध्ये जनतेला काही बोचरे प्रश्न विचारले आहेत: या प्रश्नांच्या माध्यमातून मनसेने सर्वसामान्य जनतेच्या मनातील संताप ओळखून त्यांना तुम्ही एकटे नाही आहात, साऱ्या महाराष्ट्राला असेच वाटतेय अशी साद घातली आहे. उज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवतीर्थावर भेटूया असे आवाहन या व्हिडीओद्वारे करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच रायगडावर झालेल्या मनसेच्या 20 व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. त्यावेळी जे काही बोलायचे आहे, ते गुढीपाडव्याच्या सभेतच बोलेन असे सूचक विधान राज ठाकरेंनी तेव्हा केले होते. त्यामुळे या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यातून मनसेचा बदलेला राजकीय रंग आणि हिंदुत्वाची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांचा विमान अपघात आणि रोहित पवारांची भेट यंदाच्या सभेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर रोहित पवारांनी सूचक विधान केले होते की, अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी राज ठाकरे प्रयत्न करणार आहेत. या संवेदनशील विषयावर राज ठाकरे शिवतीर्थावरून काय अधिकृत भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेले लाल व निळ्या रंगाचे फ्लॅश लाईट्स सध्या चर्चेचा विषय ठरलेत. सरकारी वाहनांवर कोणत्याही प्रकारचे विशेष दिवे किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास मनाई असताना, त्यांच्या गाडीवर असे दिवे लावल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हेच फ्लॅश लाईट्स आता महापौरांसाठी वादाचे व डोकेदुखीचे कारण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृतीला आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर देशभरातील बहुतांश सरकारी वाहनांवरील लाल दिव्यांचा वापर बंद करण्यात आला. मात्र आता मुंबईच्या महापौरांच्या नव्या गाडीवर समोर लाल-निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या वाहनांप्रमाणे हे दिवे दिवसा देखील लावले जात असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईचा शिवसैनिक नामक एका एक्स पेजवरून रितू तावडे यांच्या गाडीचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यात त्यांच्या कारच्या दर्शनी भागात फ्रंट गिललगत लाल व निळे फ्लॅश लाईट्स लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापौर यांच्या वाहनाला पोलिसांसारखे लाल-निळे दिवे लावण्याचा परवाना आहे काय? असा तिखट सवालही या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी महापौरांनी शहरात व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू केल्याची टीका केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही या प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांहून मोठ्या झाल्या का? - पेडणेकर मुंबई महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी महापौरांवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआर ला दिलेल्या सूचनेला हरताळ फसला. आता तर केंद्र सरकार यांनी दिलेला निर्णयाला हरताळ फसला आहे. व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी केंद्र सरकार यांनी संपवली होती, पण मुंबईच्या महापौरा यांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय ….. महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांची दिवे काढून टाकल्याची पुष्टी दुसरीकडे, या प्रकरणी टीकेची झोड उठताच पालिका अधिकाऱ्यांनी हे दिवे दोन दिवसांपूर्वीच काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. महापौरांच्या गाडीवर लाल-निळे दिवे लावण्यात आले होते. पण नियमांचे पालन करत हे दिवे दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आलेत. सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. आता पाहू काय आहे सरकारचा नियम? केंद्र सरकारच्या 1 मे 2027 च्या अधिसूचनेनुसार, फक्त अग्निशमन, पोलिस, संरक्षण दल व अर्धसैनिक दल व आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे लावण्याची परवानगी आहे. सामान्य सरकारी वाहनांवर असे दिवे, नामफलक किंवा ध्वज लावणे बेकायदा आहे. त्यामुळे अधिकृत काम नसताना असे दिवे लावणे नियमांचे उल्लंघन मानले जाते. या नियमाद्वारे व्हीआयपी संस्कृतीला आळा घातल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक झाले होते. पण आता मुंबईच्या महापौरांच्या गाडीवरच लाल-निळे दिवे आढळल्यामुळे भाजपवर आपल्याच सरकारच्या नियमांना हरताळ फासल्याचा आरोप होत आहे. रितू तावडे यापूर्वी घड्याळाने चर्चेत उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांच्या घड्याळामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांचे रोलेक्स डेटोना हे घड्याळ तब्बल 60 ते 70 लाख रुपये किंमतीचे असून, त्याची भारतातील किंमत 1 कोटींहून अधिकची असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला होता. या दाव्यानंतर सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पण त्यानंतर त्यांनी हे घड्याळ रोलेक्स डेटोनाचे नसल्याचे स्पष्ट करत आपल्यावरील टीका फेटाळून लावली होती. सोशल मीडियावरील माझ्या घड्याळाविषयी करण्यात येणारे दावे पूर्णतः खोटे व दिशाभूल करणारे आहेत. माझ्या हातातील घड्याळ मायकल कोर्स कंपनीचे आहे. ते रोलेक्स डेटोनाचे नाही. त्यामुळे लाखो कोट्यवधींचा प्रश्नच उद्धभवत नाही. या प्रकरणी काहीजण अफवा पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अशा खोट्या आरोपांना भीक घालत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
नरेंद्र मोदी हे देशाचे नाही तर भाजपचे पंतप्रधान आहेत. ते देशासमोर असलेल्या प्रश्नांवर बोलत नाही केवळ निवडणुकीच्या वेळी भाषणे करतात, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. गॅस घेऊन निघालेली जहाजं पहिले गुजरातला जाणार आहेत असे मी वाचले, तिथे माल उतरवला जाणार, तिथे माल देत उरलेला माल देशाला देण्यात येणार आहे, हे माझे मत नाही मी वाचले. संजय राऊत म्हणाले की, देशाच्या बदनामीबद्दल सत्ताबदल होताच नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले जाईल. देशाची जी लुट झाली आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्यांना जबाबदार धरले जाईल. निवडणूक आली की अशी भाषणे करणे मोदींचा छंद आहे. ते देशातील समस्यावर काहीच बोलत नाहीत. ते तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम निवडणुकीवर लक्ष देत आहेत. ट्रम्प मोदींचे मालक संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची बदनामी करण्याचे थांबवले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी अशा बदनामी करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचे समर्थन करू नये. गेल्या काही काळात हिंदूस्थानला जी मानहानी पत्कारावी लागली आहे त्याला सर्वस्वी जबाबदार नरेंद्र मोदी आहेत हे फडणवीस यांनाही कळत आहे. युद्ध थांबवण्याची क्षमता जर मोदींमध्ये असती तर इराण-इस्रायल युद्धामध्ये जे हजारो लोकांचे प्राण गेले ते गेले नसते. या दोन देशातील युद्धाला जबाबदार मोदी यांचे मालक ट्रम्प हे आहेत. याला सन्मान म्हणायचा का? संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्दही काढलेला नाही. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना ते ट्रम्प यांच्या दबावामुळे अचानक मागे घेण्यात आले. जर ते दबावाखाली ऑपरेशन सिंदूर थांबवू शकतात तर त्यांनी हे युद्ध थांबवायला हवे होते. भारत मोठा देश आहे. इतर राष्ट्र या युद्धावर मत व्यक्त करते पण मोदी यावर काहीच बोलत नाही. अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार हीच आपली बदनामी आहे. ट्रम्प आम्हाला सांगतो की तेल कुणाकडून घ्यायचे.याला सन्मान म्हणायचा का?, असा सवाल राऊतांनी केला आहे. गॅस नसल्याने मंदिरातील प्रसाद बंद संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्याबाबतीत सुद्धा वेगळे असे काही घडते असे नाही, पण राज्याच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही काही बोलत नाही. मोदींनी प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काय केले? साई संस्थानने प्रसाद कमी केला आहे. कारण त्यांच्याकडे गॅस नाही. त्यांनी जेवन सुद्धा कमी केले आहे. किमान देवासमोर तरी खरे बोला. काही ठीक चाललेले नाही. अनेक हॉटेल्स बंद झाले, लोकं बेरोजगार झालेत ही आपली बदनामीच आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेतील पात्र महिलांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाचवेळी देण्याचे संकेत दिलेत. त्यानुसार, हा हप्ता पुढील महिन्याच्या 15 तारखेच्या आत मिळण्याची शक्यता आहे. पण याचवेळी ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना या योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यातील लक्षावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच ही योजना आहे तशीच अव्याहत सुरू राहण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्त्याचा लाभ पात्र महिलांच्या खात्यावर लवकरच वर्ग होण्याची माहिती समोर आली आहे. 15 एप्रिलपूर्वी लाभ मिळण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी व मार्च या 2 महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हे पैसे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अथवा 15 एप्रिलपूर्वी बँक खात्यांत वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. महिलांना या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता. तेव्हापासून लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. पण महिना संपला तरी त्यांना तो लाभ मिळाला नव्हता. पण आता त्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाचवेळी मिळणार आहेत. 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी काही महिलांचा या योजनेंतर्गत मिळणारा लाभही बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ दिली होती. त्यात अनेक महिलांनी ई-केवायसी केली. पण त्यातही चुका झाल्या. त्यामुळे या महिलांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्याची अखेरची संधी दिली आहे. त्यानुसार या महिलांना 31 मार्चपर्यंत आपली ई-केवायसी करावी लागणार आहे. यावेळी चूक होणाऱ्या महिलांचा या योजनेचा लाभ कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा… सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत:इतरांनी लावले तर उखडून टाकले जातील, कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांचे प्रक्षोभक विधान नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत. इतरांनी लावले तर ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर
गेल्या अडीच वर्षांपासून जळगावकर अंधाराचा सामना करत असताना मनपा प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. राज्य शासनाने पाच महिन्यांपूर्वी ‘ड'' वर्ग महापालिकांसाठी पथदिव्यांबाबत स्पष्ट आदेश दिले होते. तरीही जळगाव मनपाने अद्याप धोरण ठरवलेले नाही. परिणामी शहरात 21703 पैकी 5 हजारांवर पथदिवे बंद आहेत. शहरात ईईएसएल कंपनीचा करार संपला आहे. त्यानंतर मनपाने तात्पुरत्या स्वरूपात छत्रपती संभाजीनगरच्या एजन्सीकडे पथदिव्यांचे काम सोपवले. मात्र ही एजन्सी केवळ दुरुस्तीचे काम करते. सध्या या एजन्सीकडून दुरुस्ती केली जाते. त्यांना प्रति दिव्यासाठी 21 रुपये देण्यात येतात. साडेतीन महिन्यांत त्यांनी पाच हजार दिवे दुरुस्ती केले. दुरुस्तीच्या कामासाठीच पुढील दहा वर्षांत मनपाला 5 कोटी 46 लाख 91 हजार 560 रुपये खर्च करावे लागणार आहेत. याशिवाय जर मनपाने स्वतः नवीन एलईडी दिवे बसवले तर त्यासाठी आणखी 27 कोटी 32 लाख रुपये खर्च अपेक्षित आहेत. सीसीएमएस प्रणाली दुरुस्तीसाठी 1 कोटी 97 लाख रुपये खर्च येणार आहे. अर्थात, दहा वर्षांच्या कालावधीत पथदिव्यांवर 34 कोटी 76 लाख 69 हजार रुपये खर्च होणार आहेत. राजकीय साठमारीत जनता भरडली जाते प्रशासक राजवटीत अधिकाऱ्यांनी इच्छाशक्ती दाखवली नाही, आता लोकप्रतिनिधींची राजवट आली आहे. आगामी महासभेत तरी भाजप आणि शिवसेनेने मर्जीतील एजन्सीचा हट्ट न धरता जळगावकरांच्या सुरक्षिततेचा विचार करावा. पॉलिटिकल इंटरेस्टच्या नादात जर हा प्रस्ताव पुन्हा लांबणीवर पडला, तर शहर अंधारात बुडालेच समजा. जुन्या पद्धतीने काम रेटून नेण्याचा प्रयत्न शासनाने ‘ बॅक इन्फ्रा आणिविन्सी ग्लोबल'' या कंपनीची नियुक्ती करून प्रति एलईडी 119 रुपये दर निश्चित केला आहे.यात दुरुस्तीसह नवीन दिवे बसवण्याची सर्व जबाबदारी कंपनीची असेल. याउलट, मनपा स्वतःच्या जुन्या पद्धतीने काम रेटून नेण्याच्या प्रयत्नात आहे. योजनेंतर्गत मनपाला 30 कोटी 99 लाख रुपये खर्च करावे लागतील. ज्यामुळे 10 वर्षांत मनपाच्या तिजोरीवर 4 कोटी 50 लाखांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून शासन एजन्सीसाठी महासभेत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. पुढे काय? महापालिकेची पहिली महासभा लवकरच महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पथदिव्यांसाठी प्रशासनाकडून प्रस्ताव मागवून भूमिका घेणे गरजेचे आहे. तातडीने निर्णय झाल्यास शहरात नवीन एलईडी दिवे बसवण्याचे काम सुरू होऊ शकते. मात्र,महासभेने निर्णय घेतला नाही तर काम रेंगाळेल. आजच्या परिस्थितीत पाच हजारांपेक्षा जास्त पथदिवे बंद आहेत. महिनाभरात आणखी हजार ते दोन हजाराने वाढ होऊन अंधार आणखी वाढण्याची शक्यता आहे. शासनाच्या एजन्सीला काम दिल्यास महिनाभरात पथदिव्यांचे काम सुरू होईल. अन्यथा पुन्हा नवीन एजन्सी नियुक्तीसाठी निविदा प्रक्रियेत तीन ते चार महिने लोटतील. त्यामुळे शहरातील लोकभावना अधिक तीव्र होतील. किंबहुना, त्याचा उद्रेक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दिव्य मराठी थेट प्रश्न संदीप मोरे, विद्युत विभाग प्रमुख, महापालिका आता पथदिवे नव्याने बसवावे लागतील Q : पथदिव्यांचा प्रश्न न सुटण्यास जबाबदार कोण?A : ईईएसएलने काम बंद केलेआहे. 7 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण नझाल्याने मनपाची अडचण होती. Q : शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी का नाही?A : ऑक्टोबरात शासनाचे पत्रआले होते. त्या संदर्भात मार्गदर्शन मागवले होते. त्याचे उत्तर डिसेंबरमध्ये आले; परंतु आचारसंहिता लागल्याने निर्णय घेता आला नाही. Q : शहरात पथदिवे बंद आहेत ते केव्हा बदलणार?A : पथदिवे ईईएसएल कंपनीने लावले होते. त्यांचा कालावधी पूर्ण झाला असून, ते दुरुस्त होत नाही. नव्याने बसवावे लागतील. नवीन एजन्सीमार्फत काम होईल. Q : शहराची अंधारापासून सुटका कधी करणार?A : लवकरच महासभेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार प्रस्ताव दिला असून, त्यात धोरणात्मक निर्णय होऊन प्रश्न सुटणार.
कुटुंब विभक्त होण्याचे प्रमाण वाढले आणि सर्वच शासकीय कामांसाठी रेशनकार्ड अनिवार्य झाले. त्यामुळे नवीन रेशनकार्ड घेण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवाकेंद्रात लोक गर्दी करू लागल्या. या स्थितीचा फायदा घेत दलालही सक्रिय झाले. 50 रुपयांत मिळणाऱ्या रेशनकार्डसाठी दलाल मंडळी मागतात तब्बल 2700 रुपये. नियमानुसार केसरी रेशनकार्डसाठी फक्त 50 रुपये आणि पांढऱ्या कार्डसाठी 100 रुपये शुल्क आहे. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेच्या किचकट प्रणालीमुळे नागरिक दलालांच्या जाळ्यात अडकत आहेत. पुरवठा विभागाकडे थेट गेल्यास हेलपाटे मारण्याची वेळ येते. किमान महिन्याचा कालावधी लागतो. दलालांमार्फत केवळ 8 दिवसांतच रेशनकार्ड मिळते. याचाच अर्थ यंत्रणा आणि दलालांच्या संगनमतातून लूट सुरू झाल्याचे दिसते. दिव्य मराठीने केलेले स्टिंग... ऑनलाईन प्रक्रिया अशी... अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे स्कॅन करून तयार ठेवा. rcms.mahafood.gov.in या पोर्टलवर जा. न्यू यूजरवर क्लिक करून स्वतःचे खाते तयार करा. लॉगीन झाल्यानंतर फूड आणि सिव्हील सप्लायिस डिपार्टमेन्ट या पर्यायावर क्लिक करा आणि इश्युअन्स ऑफ न्यू रेशन कार्ड निवडा अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा. कागदपत्रे अपलोड करा, सरकारी शुल्क ऑनलाइन भरा. त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर मिळेल. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कार्यालयात जावे लागते. प्रतिनिधी : नवीन रेशनकार्डसाठी काय कागदपत्रे लागतील?दलाल : कुटुंब सदस्यांचे फोटो आणि आधार कार्ड.प्रतिनिधी : मला किती दिवसांत नवीन कार्ड मिळू शकेल?दलाल : कागदपत्रे दिल्यानंतर 4 ते 8 दिवसांत मिळेल ना.प्रतिनिधी : किती पैसे लागतील? ऑनलाइन अन् तुमचे?दलाल : सर्व मिळून 2700 रुपये लागतील. पूर्ण रक्कम द्या.प्रतिनिधी : खूप होतात काही कमी करा ना...दलाल : अहो, साहेबांना द्यावे लागतात. ऑफिसमध्ये दोन-चार वेळा जावे लागते. पैसे तर तेवढेच होतील. काही कमी होणार नाहीत. लगेच या, ऑनलाइन सुरू आहे. ऑनलाइन किचकट वाटते? कर्मचाऱ्यांची मदत घ्या, पैसे देऊ नका नवीन रेशनकार्ड मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. ती किचकट वाटत असेल तर पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घ्या. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास केवळ आठ दिवसांत नवीन रेशनकार्ड मिळेल. ओंकार पडोळे, पुरवठा अधिकारी, सोलापूर या कामांसाठी शिधापत्रिका महत्वाचीरहिवासी पुरावा, बँकिंग कामे, शैक्षणिक सवलती, आरोग्य आणि विमा योजना, कायदेशीर बाबी. प्रतिनिधी : नवीन रेशनकार्ड काढायचे आहे, काय काय लागेल?दलाल : कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड व फोटो घेऊन या.प्रतिनिधी : पूर्वीच्या रेशनकार्डवरील नावे कमी करून पाहिजे.दलाल : हो करून देईन. कागदपत्रे घेऊन या, ऑनलाइन करू.प्रतिनिधी : किती पैसे लागतील? आणि किती दिवसांत मिळेल?दलाल : 1800 रुपये लागतील. आठ दिवसांत मिळवून देईन.प्रतिनिधी : खूप झाले. काही कमी होणार नाही?दलाल : अहो खर्च आहे. पैसे कसे कमी होतील? तुम्ही कागदपत्रे घेऊन या, ते पाहून सांगतो.प्रतिनिधी : ठीक आहे. लवकर होईल ना...?दलाल : लवकर म्हणजे जादा पैसे लागतील.
हडको एन-12 भागातील सत्यविष्णू हॉस्पिटलचे संचालक डॉ. इफ्तेखार गफ्फार पटेल यांना 5 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा सिटी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. “तुझ्यासाठी कबर खोदून ठेवली आहे,’ अशा शब्दांत धमकावून डॉक्टरांना दहशतीत ठेवणाऱ्या या टोळीला पोलिसांनी सिनेस्टाइल अटक केली. अटक केलेल्यांमध्ये धुळ्याची माजी नगरसेविका रुबीना कुरेशी हिचाही समावेश आहे. डॉ. पटेल यांच्या फिर्यादीनुसार, मार्च 2023 मध्ये धुळे येथील हमजा अन्सारी या कर्करोग रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेचे भांडवल करून नातेवाईक समीर मोहंमद व त्याचे साथीदार गेल्या दोन वर्षांपासून खंडणीसाठी तगादा लावत होते. “पैसे दिले नाहीत तर हॉस्पिटल फोडू. बदनामी करू,’ अशी धमकी दिली जात होती. सततच्या त्रासाला कंटाळून डॉ. पटेल यांनी सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांच्याकडे धाव घेतली. खेळण्यातील नोटांनी केला घात आरोपी अत्यंत सराईत असल्याने त्यांनी पोलिसांना तीन वेळा हुलकावणी दिली. अखेर सपोनि मनोज शिंदे यांनी प्लॅन बी आखला. 13 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता आरोपी पैसे घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले. पोलिसांनी डॉक्टरांना आधीच भारतीय बच्चों का बँक लिहिलेल्या खेळण्यातील नोटांचे बंडल तयार करून दिले होते. जफर नूर खाटीक याने डॉक्टरांच्या हातातून 5 लाखांची बॅग स्वीकारताच, रुग्ण बनून दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून टोळीला पकडले. धुळ्यातील या आरोपींना अटक या कारवाईत जफर नूर खाटीक, मोहंमद समीर मोहंमद जाकीर, सय्यद मुशाहिद अली, शाईन बानो अबू हमजा, रुबीना हबीब कुरेशी (माजी नगरसेविका) आणि सिद्धार्थ कैलास रायमाळे (सर्व रा. धुळे) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आलिशान कार आणि 6 मोबाइल जप्त केले आहेत. या टोळीचा नेमका मास्टरमाइंड कोण आहे आणि यापूर्वी त्यांनी अशा प्रकारचे किती गुन्हे केले आहेत, याचा तपास आता पोलिस करत आहेत. एका लोकप्रतिनिधीचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला आहे. पोलिसांसमोर माफी मागूनही पुन्हा ससेमिरा धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी यापूर्वी पोलिसांसमोर “आम्ही पुन्हा त्रास देणार नाही,’ अशी लेखी माफी मागितली होती. डॉक्टरांनी माणुसकी दाखवत त्यांना माफही केले होते. मात्र, काही दिवस शांत राहिल्यानंतर या टोळीने पुन्हा खंडणीसाठी डॉक्टरांना मानसिक छळणे सुरू केले. अखेर पोलिसांच्या चातुर्यामुळे या टोळीचा कायमचा बंदोबस्त झाला आहे.
अनुसूचित जमातीच्या जात पडताळणी प्रमाणपत्राची फाईल क्लिअर करून देण्यासाठी तब्बल अडीच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या एका उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतेच रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे प्रशासकीय विभागात एकच खळबळ माजली आहे. यासंबधीच्या माहितीनुसार, कोकण विभाग अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय ठाण्यातील चरई येथील एमटीएमएन इमारतीत आहे. या कार्यालयात मिनाक्षी नारायण उन्हाळे (46) या उपसंचालक (संशोधन), वर्ग-1 या पदावर कार्यरत आहेत. त्यांना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी तब्बल अडीच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणातील तक्रारदार यांनी पत्नी व मुलीच्या एसटी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. या अर्जाच्या पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी उन्हाळे यांनी त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांची ही लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी 12 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रायगड-अलिबाग कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानंतर ही वर्गात ठाण्यात वर्ग झाली. ही तक्रार मिळताच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 13 फेब्रुवारी रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गत 13 तारखेला पथकाने चरई येथील जात पडताळणी समितीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यात मिनाक्षी उन्हाळे यांना पंचासमक्ष आपल्या कार्यालयात सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलिस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वातील ही कारवाई करण्यात आली. बीडमध्येही 2 पोलिसांवर एसीबीची कारवाई दुसरीकडे, बीडच्या चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील व पोलिस कर्मचारी विनोद सुरवसे यांना एसीबीने वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी हप्ता घेताना रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाळूची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी या अधिकाऱ्याने दरमहा 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 50 हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे हे पैसे स्वीकारण्यासाठी विनोद सुरवसे उमापूर पोलिस चौकीत हजर होता. त्यावेळी बीडच्या एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.
“भाजपमध्ये आल्यावर मला फार तर विधान परिषद मिळेल असे वाटले होते, राज्यसभेचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र, माझी पक्षनिष्ठा आणि कार्यप्रणाली पाहून पक्षाने मला ही संधी दिली. खासदारकी मिळाली असली तरी, धनगर आरक्षणाच्या प्रश्नापासून मी कदापि दूर जाणार नाही,’ असा विश्वास नवनियुक्त राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी व्यक्त केला. ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला दिलेल्या भेटीत त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास संवाद साधला. दिग्गजांच्या स्पर्धेत संधी कशी मिळाली? राज्यसभेसाठी डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे यांच्यासह 29 दिग्गज स्पर्धेत असताना तुमची निवड कशी झाली? यावर वडकुते म्हणाले की, “मी कोणतीही जादू केली नाही. भाजपचे धोरण ‘देश प्रथम’ असे आहे. मी माझी मागणी नसतानाही निकषात बसल्यामुळे संधी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी मला हेरले. यापूर्वी विकास महात्मे वगळता समाजाला असे प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. मराठवाडा आणि हिंगोलीचा विकास व्हायला हवा हिंगोलीचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगत वडकुते म्हणाले की, “शेतीला पाणी, वीज आणि शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याचा माझा प्रयत्न आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मराठवाड्याचे प्रश्न मी राज्यसभेत ताकदीने मांडणार आहे.” आरक्षणासाठी येत्या 16 मार्च रोजी विराट मोर्चा धनगर आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आरक्षण मिळवून देण्याची ताकद केवळ भाजपमध्येच आहे. या प्रश्नावर 16 तारखेला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत बसवून सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. तांत्रिक अडचणींमुळे वेळ लागत असला तरी, अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल. जसे समाजाने 2014 मध्ये सरकारला सत्तेत बसवले, तसे सत्तेतून काढूही शकतो, याची जाणीव सरकारला आहे.”
भाजप आणि शिवसेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी युती करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासंदर्भात ओबीसी विकासमंत्री अतुल सावे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिंदे यांनी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला दिला होता. मात्र, फडणवीसांनी अडीच वर्षांचा निर्णय घेतला आहे. आता पहिली अडीच वर्षे कोणत्या पक्षाला याचा निर्णय येत्या सोमवारी (16 मार्च) होणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक 18 मार्च रोजी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरात पंचायत समितीच्या निवडणुकीत युतीची मते फुटली होती. त्यामुळे वेगवेगळी समिकरणे संभाजीनगरसह मराठवाड्यात पहायला मिळाली. अनेक ठिकाणी उद्धवसेनेच्या उमेदवारांना शिंदेसेनेच्या मतदारांनी मतदान केले होते. त्यामुळे आता कुठलीही गडबड होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षांसाठी अध्यक्ष निवडावा, अशा सूचना दिल्या. जास्त जागांमुळे आमचा दावा आमच्या जागा जास्त असल्यामुळे आम्हाला सुरुवातीचे अध्यक्षपद मिळावे, असा आमचा दावा आहे. मात्र, आता हा निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यावर सोडला असून, तेच याबाबत निर्णय घेतील. जिल्हा परिषदेत महायुतीचेच अध्यक्ष उपाध्यक्ष होतील. - अतुल सावे, ओबीसी विकास मंत्री घोडेबाजार होऊ देणार नाही जिल्हा परिषद निवडणुकीत कोणताही घोडेबाजार आम्ही होऊ देणार नाही. युतीतच अध्यक्षपदाची निवडणूक लढवली जाणार आहेत.सोमवारी याचा निर्णय घेतला जाणार आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा निर्णय घेतील. - संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री पूर्वीच्या अपयशामुळे भाजपची खबरदारी गेल्या जिल्हा परिषदेत भाजपसर्वात मोठा पक्ष होता, तरीही पक्षाला जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे यावेळी अध्यक्षपदासासाठी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून पक्ष सावधपणे पावले उचलले जात आहे. यामध्ये अध्यक्षपद ठरल्यानंतर उर्वरित सभापतिपदांवर निर्णय होणार आहे. सुरुवातीला कोण,याचा निर्णय बाकी सावे म्हणाले की, आम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेतली आहे. अडीच वर्षांच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय झाला आहे.सोमवारी आम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार आहोत. यामध्ये सुरुवातीला अध्यक्षपद कोणी घ्यायचे हा निर्णय घेणे बाकी आहे. आमची संख्या जास्त असल्यामुळे आमचा दावा आहे. मात्र, आता हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर सोडला असल्याचे सावे यांनी सांगितले.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनीच स्टॉल लावावेत. इतरांनी लावले तर ते उखडून टाका, असे प्रक्षोभक विधान राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. नाशिक येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी उपरोक्त विधान केले आहे. त्यांच्या हस्ते नाशिक येथे हिंदू हित रक्षाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या हिंदू व्यावसायिक कामगारांच्या सूचीचे प्रकाशन झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी कुंभमेळ्यात हिंदू वगळता इतर कुणी स्टॉल लावले तर ते उखडून टाकण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, हिंदूंनी हिंदूंकडून खरेदी केली पाहिजे, ही संकल्पना ज्यांनी मांडली त्यांचे मी स्वागत करतो. मी घारघरला अशीच भूमिका मांडली. आजूबाजूला जिहादी लोकांची दुकाने होती. तेव्हा मी बोललो. त्यानंतर माध्यमांनी मला झोड-झोड झोडले. पण मला तेव्हाही काही वाटले नाही. मला आताही काही वाटत नाही. हिंदू राष्ट्रात हिंदूंबाबतच बोलायचे नाही, तर मग पाकिस्तान, इस्लामाबादवर बोलायचे का? ते आम्ही धर्माधर्मात भांडणे लावतो असे म्हणतात. ते जे बोलतात ते त्यांनी येऊन सांगावे. कुंभमेळ्यात एकही जिहादी येता कामा नये नीतेश राणे म्हणाले, कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुणीही हिंदूंशिवाय दुकाने लावणार नाही. सध्या रमजान सुरू आहे. त्यांच्या अन्नपदार्थांची दुकाने लागतील. तिथे एकतरी हिंदू माणूस शोधून दाखवा. एकही सापडणार नाही. त्यांच्या कुराणमध्ये असे लिहिले आहे की, काफिरांकडून काहीही घ्यायचे नाही. त्यामुळे ते तसे वागतात. मग आम्ही जे काही करतो ते त्याहून वेगळे आहे का? मी कुराम 2 वेळा वाचले. 10 टक्के जास्त जकात द्या असे त्यात नमूद आहे. तो पैसा जिहादसाठी वापरतात. इतरांचा धर्म कमी करून स्वतःचा धर्म वाढवावा असेही त्यात नमूद आहे. आपला पैसा लव्ह जिहादसाठी वापरला जात असेल तर ते आपण घ्यायचे का? त्यामुळे कुंभमेळ्यात एकही जिहादी येता कामा नये. बाहेर दुकानाचे नाव वेगळे अन् आत अब्दुल नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना पुढे म्हणाले, सध्या कुंभमेळ्याची कामे जोरात सुरू आहेत. मी तुमच्या मागण्या सरकारकडे देतो. पण सिंहस्थ कुंभमेळ्यात एकही जिहादी आला नाही पाहिजे. त्याला धाक, भीती वाटली पाहिजे. मी मागे त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. तिथे दुकानावर नाव वेगळे होते, पण आतमध्ये अब्दुल बसला होता. त्यांना आता विषय कळला आहे. आम्ही आता देशभरात हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू विकत घेण्याचा कार्यक्रम राबवणार आहोत. मी इथे आमदार किंवा मंत्री म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून आलो आहे. कुंभमेळ्यावर लक्ष ठेवा. इथे कुणी स्टॉल लावण्यासाठी आले तर तो उखडून टाका. आम्ही वर मंत्रालयात बसलो आहोत. धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. आपल्या राज्यात लव्ह जिहाद विरोधात सर्वात कडक कायदा असेल, असेही नीतेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने शुक्रवारी (दि.१३) काढलेल्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक एलपीजी गॅस वापराचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या आदेशानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात खाद्य व्यावसायिक, हॉटेल चालक व कॅटरिंग व्यावसायिकांची शनिवारी (दि.१३) आढावा बैठक झाली. हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, मंत्रीमहोदय देशात गॅसचा पुरेसा साठा असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे हॉटेल व्यवसायावर गॅस पुरवठ्याचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे व्यवसायिकांना अडचणी येत आहेत. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करत हॉटेल व खाद्य व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. या निर्णयाचा राज्य सरकारने विचार केला नाही तर आगामी दिवसात अकोल्यातील ५०% हॉटेल व्यवसाय बंद होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या संदर्भात सोमवारी (दि.१६) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटरर्स संचालकांची गॅसबाबतची समस्या सोडवण्याची विनंती करण्यात येणार आहे, असे हॉटेल व्यावसायिकांच्या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, ओमप्रकाश गोयंका, कृष्णकुमार राठी, भावेश खिलोसिया, श्रीराम पांडे, जसपाल सिंग नागरा, प्रशांत देशमुख, बार असोसिएशनचे श्रीकांत देशमुख, विवेक मंत्री, डॉ. मनोज अग्रवाल, बोनी भाई शहा, पिंट्टु सेठ गोसावी, संजय सिसोदिया, गुड्डू ठाकूर, दिपक वोरा, भूषण मेहता, ईश्वर जैन, आनंद अग्रवाल, सागर अमानकर, हर्षल भांबेरे, रविभाऊ घाटे, गजानन खंडेलवाल, धनूभाई खिलौसिया, अश्विन भाई खिलौसिया, यश मेहता आदींसह हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटरर्स संचालक उपस्थित होते. बैठकीला उपस्थित हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्च, कॅटरर्स व्यावसायिक. काही प्रमाणात प्राधान्य यादीत समावेश करा ^शासनाच्या परिपत्रकानुसार व्यावसायिक सिलिंडर वितरणात हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, कॅटरर्सना प्राधान्य क्षेत्रातून वगळण्यात आले आहे. यामुळे खाद्य व्यवसाय संकटात आला आहे. शासनाने टक्केवारीनुसार काही प्रमाणात प्राधान्य यादीत समावेश करुन न्याय द्यावा. - योगेश अग्रवाल, अध्यक्ष, अकोला हॉटेल असोसिएशन.
जुने शहरातील भारती प्लॉट परिसरातील शिवनगर वस्तीचे हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. पंचपरिवर्तन सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे, असे संमेलनात प्रमुख वक्ते विद्या भारतीचे विदर्भ प्रांत सहमंत्री विद्यावाचस्पती प्रा. दिलीप जोशी म्हणले. महिला वक्त्या म्हणून राष्ट्र सेविका समितीच्या अकोला विभाग शारीरिक प्रमुख श्रद्धा मिश्रा होत्या. आशिर्वचन देण्यासाठी ह.भ.प.श्री. डिगोळे महाराज हे होते कार्यक्रमासाठी विद्या भारतीचे क्षेत्रिय संघटनमंत्री शैलेश जोशी, विद्या भारती विदर्भ प्रांत सहमंत्री समीर थोडगे होते. शंभर वर्ष संघ स्वयंसेवकांनी नि:स्वार्थ आणि निरपेक्ष कष्ट करुन पोषक वातावरण निर्माण केले आहे. सामाजिक समरसता समाजात बहुअंशी निर्माण झाली आहे. एक देवालय, एक पानवठा, एक स्मशान, एक पंगत आता अपवाद वगळता बहुतेक गावात रुजले समरस समाज हे रामराज्याचे प्रथम लक्षण आहे. पंचपरिवर्तनात दुसरे स्थान कुटुंब प्रबोधनाला दिले आहे. कुटुंबव्यवस्था भारताचा प्राण आहे. एकत्रित कुटुंब पद्धत असल्यामुळे घर हे संस्कार केंद्र होते. सध्या घर भारतात असले तरी घरात भारत नाही हे कटू सत्य आहे. घरात देवघर, एकत्रित जेवण, सामुहीक प्रार्थना, विविध सणउत्सव, कुळकुलाचार या बाबी संस्काराच्या आहेत. त्या प्रत्येक कुटुंबात झाल्या पाहिजेत म्हणूनच त्यांनी कुटुंबासाठी पंचोपचार सांगितले. भाषा, भूषा, भजन, भोजन आणि भ्रमण. कुटुंबात बोलताना मातृभाषेचा वापर झाला तर बुद्धीचा विकास चटकन होतो, संस्कृतीचे संस्कार सहज संक्रमित होतात, असेही ते म्हणाले. संम्मेलन आयोजक समिती शिवनगर, भारती प्लॉट व परिसरातील सर्व गणेश मंडळ व दुर्गा मंडळ, भजनी मंडळ यांच्या सहकार्याने आणि नितीन भाकरे, अनिल वानखडे, निलेश वानखडे, दादाराव खडसने, मुकुंदा परळीकर, कुणाल उन्हाळे, शुभम बेदरकर, संतोष नवथळे, ऋषिकेश डहाळे, संकेत जगातप, अमित भुसारी, ओम ढवळे, रोहन देवदन्य, कुणाल उमाळे, अभिषेक धोत्रे, अनुराग भाकरे, अनिकेत कचरे, जहागीरदार, ज्ञानेश्वर जोशी इत्यादींचा सहभाग पार पडले. महिला वक्त्या श्रद्धा मिश्रा यांनी आपले मत व्यक्त केले. स्त्री शक्तिने सक्षम होऊन देशकार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. ह.भ.प. डिगोळे महाराजांनी आशिर्वचन देवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आभार किशोर फुलकर यांनी मानले. प्रास्तविक नवल कवडे यांनी केले. आनंद जहागीरदार यांनी वंदेमातरम गायन करुन कार्यक्रमाची सांगता केली. असे आहे पंचपरिवर्तन; पाच सुत्रांनी विकास संघाला आजपर्यंत व्यवस्था परिवर्तन त्यानंतर समाजपरिवर्तन करण्यात यश प्राप्त झाले असून आला पंचपरिवर्तनावर संघ काम करतोय. यातूनच रामराज्याचीही मुहूर्तमेढ ठरणार म्हणून पंचपरिवर्तन महत्वाचे आहे. यात सामाजिक समरसता , कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व चा बोध अर्थात स्वदेशी, नागरी कर्तव्यांचा समावेश असल्याचे संम्मेलनात सांगण्यात आले. ही ती पाच सुत्रे आहेत. बारकाईने विचार केल्यास हा रामराज्याचा जाहीरनामा आहे.
येथील श्रीराम मंदिर संस्थानद्वारा अकोट येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त १९ मार्च ते २ एप्रिलदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी (दि.१९) गुढीरोहण, अभिषेक होणार आहे. दुपारी ३ ते ५ दरम्यान श्री गणेश महिला भजनी मंडळ, रात्री ८ ते १० दरम्यान गुरुदेव सेवा मंडळाची भजन संथ्या हभप प्रवीण कुलट, पवन पातुरकर, किशोर बहादुरे यांची होणार आहे. त्यांना तबल्याची साथ मयूर नाथ तर संवादिनीची साथ अजय लोणकर देणार आहेत. शुक्रवारी (दि.२०) दुपारी ३ ते ५ दरम्यान श्री. प्रगती महिला भजनी मंडळ,(आकोला ), रात्री ८ ते १० भक्तिसंगीत (नादब्रह्म संगीत अकॅडमी, अमरावती) सोनाली चाटी आकाशवाणी गायिका, २१ मार्चला दुपारी ३ ते ५ दरम्यान श्री केशवराज महिला भजनी मंडळ तर रात्री ८ ते १० भक्तिसंगीत भाग्यश्री सुनील टिकले (मुंबई) याची होणार आहे. त्यांना तबल्याची साथ संजय कोरटकर पुसद तर हार्मोनियमची साथ अमोल कुरवाडे नागपूर देणार आहेत. २२ मार्चला दुपारी ३ ते ५ दरम्यान श्री समर्थ महिला भजनी मंडळ, रात्री ८ ते १० भक्तिसंगीत प्रा. संजय भालचंद्र पत्की स्वरस्वामी गुरुकुल (जळगाव). यांचे होणार आहे. यादरम्यान भाविकांना सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. आयोजकांच्या वतीने निरुपणादरम्यान विशेष सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मार्चला दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रल्हाद महाराज महिला भजनी मंडळ, रात्री ८ ते १० भजन संथ्या डॉ. सुशील देशपांडे, तबलाचार्य प्राध्यापक धीरेंद्र गावंडे (कारंजा लाड) यांचा कार्यक्रम होणार आहे. २४ मार्चला दुपारी ३ ते ५ प्रवचन प्रा. डॉ. वसुधा विनोद देव यांचे (रामरक्षा कवच) अकोला रात्री ८ ते १० भक्तिसंगीत गायक अमर कतोरे, मंजिरी किशोर बहादुरे, गजानन पळसकर, सारंग गजानन केतकर (अमरावती), संजीवनी जीवन ढगेकर (अमरावती विद्यापीठातील प्राविण्यप्राप्त ) यांचे होणार आहे. २५ मार्चला दुपारी ३ ते ५ जगदंबा महिला भजनी मंडळ, रात्री ७ ते ९ भारुड- नृत्य -कलाग्रुप कविता सुधीर लंके (चिखली), २६ मार्चला सकाळी १० ते १२ दरम्यान मधुरा मिलिंद वेळूकर (यवतमाळ) यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन होणार आहे. २७ मार्चला सकाळी ७.३० वाजता तीर्थस्थापना, दुपारी ३ ते ५ दरम्यान नवजागृती महिला भजनी मंडळ (अकोला) यांचे तर सायंकाळी ८ ते १० दरम्यान भजनसंध्या संगीत गायिका शर्वरी महाजन, डॉ प्रिया माई, ऋतुजा रानडे यांना तबल्याची साथ आनंद जहागीरदार तर संवादिनीची श्रीकृष्ण अडसुले (अकोला) हे देणार आहेत. २८ मार्चला दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान उज्वला महिला भजनी मंडळ तर रात्री ७ ते ८ गदाधर शास्त्री (आकोला) यांचे प्रवचन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम मंदिर संस्थानने केले आहे. दरवर्षी प्रमाणेच यंदाही हा सोहळा भव्य स्वरुपात आयोजन करण्यासाठी आयोजकांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. होणार काकडा, हरिपाठ, महाआरती १ एप्रिलला रात्री ८ ते १० मरिमाता भजनी मंडळ तर २ एप्रिलला पहाटे हनुमान जयंती अभिषेक होणार आहे. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात काकड आरती, अभिषेक, महाआरती, हरिपाठ (श्रीनरसिंग महाराज हरिपाठ मंडळ) उपासना प्रल्हाद महाराज उपासना मंडळ यांची सेवा असणार आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान यांनी केले आहे.
शहरातील सिटी कोतवाली पोलिस स्टेशन शेजारी असलेल्या सहा दुकानांना शनिवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सहाही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडून, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. पहाटे सव्वादोनला लागलेली आग बारा तासानंतर शनिवारी दुपारी अडीच वाजता अग्निशमन दलाच्या बंबांना पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली. या आगीच्या रौद्र रूपात दुकानातील विक्रीसाठी आणलेले कापड व इतर साहित्यासह फर्निचरची राखरांगोळी झाली होती.आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. आग लागली की लावली गेली, अशी चर्चा दुकानदारांमध्ये असून, या आगीच्या घटनेमागे कुणाचा हात आहे, हे शोधून काढावे, अशी मागणी त्यांनी सिटी कोतवाली पोलिसांकडे केली आहे. सिटी कोतवाली पोलिस ठाण्याशेजारील महापालिकेच्या जागेवरील सहा दुकानांना अचानकपणे आग लागून शुक्रवारच्या मध्य रात्रीनंतर शनिवारी पहाटे सव्वादोन वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी सिटी कोतवाली पोलिस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यावरून जवानांनी पाण्याचा मारा सुरू करुन नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यांवर वाहतूक व वर्दळ नव्हती. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास तातडीने सुरुवात झाली. मात्र, घटनास्थळी तातडीने पोहोचलेला महापालिकेचा अग्निशमन बंब अर्धाच भरला असल्याने शिवाय आग मोठी असल्याने ती विझवण्यासाठी पाणी अपुरे पडले. दुसरे बंब भरण्यासाठी सिटी कोतवाली जवळील विहिरीवर गेलेल्या अग्नीशनमच्या वाहनांना तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी उपलब्ध झाले नाही. उर्वरित. पान ४ ^आगीत नुकसान झालेल्या सहा दुकानदारांनी दुकानाला आग लावण्यात आल्याचा संशय सिटी कोतवाली पोलिसांना दिलेल्या निवेदन वजा तक्रार अर्जात केला आहे. या तक्रार अर्जाची चौकशी केली जाईल. विद्युत निरीक्षकांच्या अहवालानंतर हा घातपाताचा प्रकार आहे, की शॉर्ट सर्किटचा आहे, ह बाब स्पष्ट होईल. त्यानंतर आमचा त्यादिशेने पोलिस तपास केला जाईल. - संजय गवई, पोलिस निरीक्षक, सिटी कोतवाली, अकोला. ^ही आग दुकानांच्या मागील बाजूस लागल्याने लक्षात आले नाही. सव्वादोनला आग लागली त्यानंतर पंधरा मिनिटांनी अग्नीशमनची गाडी घटनास्थळी पोहोचली मात्र ती पूर्ण भरलेली नसल्याने त्यातील पाणी लगेच संपले. पुन्हा पाणी भरण्यासाठी गाडी गेली ती ४५ मिनिटांनी आली. तोपर्यंत आग भडकून सहाही दुकानांना कवेत घेतले होेते. अग्निशमन गाडी पाणी भरुन विलंबाने आल्याने दुकाने खाक झालेत. - विजय आनंदानी, आगग्रस्त दुकानदार, साई फ्रेमिंग मोहमंद मुसद्दी, कापड दुकान व्यापारी, गांधी रोड मध्यरात्री दोनची वेळ असेल. माझे कापडाचे दुकान बंद करून मी लघुशंकेसाठी नेहमीप्रमाणे या दुकानांंमागील मनपाच्या उर्दू शाळेच्या आवारात आलो. पाहतो तर काय, बाबा कलेक्शनच्या शेजारील दत्त फ्रेमिंगच्या दुकानाच्या मागील बाजूस ठेवलेला एक टेबल जळताना दिसला. तर दत्त फ्रेमिंग या दुकानात आग लागल्याने जळण्याचा आणि धुराचा वास आला. मी क्षणात रस्त्यांवर पळत आलो. माझ्यासह अन्य दोघांनी या दुकानापासून हाकेच्या अंतरावर शेजारीच असलेले सिटी कोतवाली पोलिस ठाणे गाठले आणि मनपाच्या अग्निशमन दलाला फोन केला. काही वेळात सिटी कोतवाली पोलिस आणि मनपाचे अग्निशमन दलाचे वाहन आले त्यांनी आग विझवण्याचे काम सुरु केले. तोपर्यंत आम्ही या दुकानांना लागून असलेले कोपऱ्यावरील ‘चुन्नु मुन्नु’ हे लेडीज रेडिमेड कपड्यांच्या दुकानातील माल तातडीने बाहेर फेकला. त्यामुळे या दुकानातील तयार कपडयांचा माल वाचवता आला. या दुकानाशेजारील बाबा कलेक्शनचे मालक आगाची बातमी समजताच घटनास्थळी आले मात्र ते घाईघाईत दुकानाची चाबी आणणे विसरल्याने त्यांचे दुकान उघडता आले नाही. अन्यथा त्यांचे दुकानातील तयार कपड्यांचा माल आगीपासून वाचवता आला असता. इतर पाच दुकाने मात्र झपाट्याने आगीच्या ज्वालांनी लपेटली गेली आणि ती जळाली. घातपाताचा संशय, चौकशी करू अग्निशमनाची गाडी विलंबाने; आग पसरली
महिलांनी शिक्षण, समाजसेवा व पर्यावरण संवर्धन यांसारख्या क्षेत्रांत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी जपत महिलांनी समाजाच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावावी, असे आवाहन निसर्ग संस्थेचे अध्यक्ष नीता बोबडे यांनी केले. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष च्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय महिला दिन मंगळवार, १० मार्च रोजी साजरा करण्यात आला. विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयातील पुरुष प्राध्यापकांकडून महिला सन्मानार्थ आयोजित करण्यात आला. ही बाब कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या स्व. शंकररावजी बोबडे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पोस्टेचे पोलिस उप निरीक्षक राधा इनकर, नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे, सायकल एक्सपीडिशनर, पुणे ते दिल्ली साक्षी अहिरकर, माजी विद्यार्थी संघ सदस्या ॲड. उज्वला घुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निसर्ग संस्था, खामगाव अध्यक्षा नीता बोबडे विराजमान होत्या. कार्यक्रमाचे आयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर व्यासपीठावर उपस्थित होते. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व प्रमुख अतिथी व अध्यक्षांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. ध्येयपुर्तीच्या बळावर महिला कोणतीही मर्यादा आेलांडू शकते: साक्षी अहिरकर विशेष अतिथी साक्षी अहिरकर यांनी पुणे ते दिल्ली असा सायकल प्रवास पूर्ण करताना आलेले अनुभव विद्यार्थिनींशी शेअर केले. जिद्द, साहस आणि ध्येयपूर्तीच्या बळावर महिलांनी कोणतीही मर्यादा ओलांडू शकते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. ॲड.उज्वला घुले यांनी कायदा क्षेत्रातील अनुभव सांगत महिलांनी आपल्या अधिकारांबाबत जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली. समाजात महिलांना न्याय आणि सन्मान मिळवण्यासाठी शिक्षण व कायद्याचे ज्ञान अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पृथ्वीराज सिंग ठाकूर यांनी तर आभार प्रदर्शन आयक्यू एसी कॉर्डिनेटर प्रा. डॉ. डी. एन. व्यास यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, डॉ. महेश गायकवाड आणि आयक्यू एसी कॉर्डिनेटर प्रा. डॉ. डी. एन. व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. राधा इनकर यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत जागरूकता आवश्यक असल्याचे सांगितले. स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षण बरोबरच धैर्य आणि आत्मविश्वास वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले. नायब तहसीलदार सोनाली भाजीभाकरे यांनी प्रशासकीय सेवेत महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करत विद्यार्थिनींनी स्पर्धा परीक्षा व प्रशासन क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले. कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयवेडी वृत्तीमुळे कोणतेही क्षेत्र गाठणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात उन्हाचा कहर सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून तापमान सलग ४२ अंशावर आहे. देशात सर्वोच्च तापमानाची नोंद अमरावतीत झाली आहे. दुपारी १२ ते ४ पर्यंत सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. यातच शहरातील विविध वाहतूक सिग्नल दुपारच्या तीव्र उन्हातही कार्यान्वित असतात. त्यामुळे दुचाकीस्वारांना सलग एक ते दीड मिनिटे उन्हाचे चटके खात उभे रहावे लागत आहे. मात्र सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करुन मनपा प्रशासनाने अजूनही वाहतूक सिग्नलवर थांबणाऱ्या दुचाकीस्वारांच्या सोईने ना ग्रीननेट बांधली ना वाहतूक सिग्नलच्या वेळेत अद्याप काही बदल केले. दर उन्हाळ्यातच अमरावतीत पारा तप्त असतो. दरवर्षीच्या तुलनेत मात्र यंदा फार लवकर तापमान ४२ अंशावर पोहोचले आहे. दरम्यान मागील वर्षी तत्कालीन मनपा आयुक्तांनी सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने वाहतूक सिग्नलवर थांबणे सोयीचे व्हावे म्हणून शहरातील प्रमुख वाहतूक सिग्नलवर हिरवी जाळी बांधण्याचे आदेश दिले होते तसेच तप्त उन्हाच्या वेळेत दुपारी एक ते चार या दरम्यान वाहतूक सिग्नलसुद्धा कार्यान्वित करणे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उन्हाच्या चटक्यांपासून दुचाकीस्वारांची काही प्रमाणात सुटका झाली होती. यंदा मात्र मनपा प्रशासनाकडून वाहतूक सिग्नलवर सर्वसामान्यांना उन्हापासून दिलासा देणारा तसा कोणताही निर्णय अद्याप झाला नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांना दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत उन्हाचे चटके सहन करत वाहतूक सिग्नलवर थांबावे लागत आहे. या महत्वाच्या बाबीकडे मनपा आयुक्त, महापौर तसेच नगरसवेकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शाळकरी मुलांच्या परीक्षा सुरू यातही सध्या शाळकरी मुलांच्या परीक्षा सुरू आहे. अनेकदा पेपर संपल्यानंतर दुपारच्या वेळी शाळकरी विद्यार्थी पालकांच्या दुचाकीवर तसेच सायकल घेऊन वाहतूक सिग्नलवर उन्हाचे चटके खात उभे असतात. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे मनपा प्रशासनाने सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून वाहतूक सिग्नलच्या दुपारच्या वेळेत बदल करणे तसेच महत्त्वाच्या वाहतूक सिग्नलवर हिरवी जाळी बांधणे गरजेचे झाले आहे.
शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. लोकवस्ती वाढत आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्यादृष्टीने शहरात तपोवन, साईनगर व एमआयडीसी असे तीन नवीन पोलीस स्टेशन निर्मिंतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र वर्षांनुवर्षांपासून हा प्रस्ताव पडून आहे, सोबतच शहरात सीसीटीव्हीचा प्रस्तावसुध्दा रखडला आहे, तो कधी मंजूर करणार ? असा प्रश्न आमदार सुलभा खोडके यांनी अधिवेशनादरम्यान उपस्थित केला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या गाडगेनगर व नांदगांव पेठ पोलीस स्टेशनचे विभाजन करून तपोवन पोलीस स्टेशन तसेच राजापेठ व बडनेरा स्टेशनचे विभाजन करून साईनगर पोलीस स्टेशन आणि फ्रेजरपुरा व राजापेठचे विभागजन करुन एमआयडीसी पोलीस स्टेशन निर्माण करण्यात यावे. अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी शासनाकडे वारंवार लावून धरली आहे. मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये गृह विभागाशी संबंधित विषयावर चर्चा करतांना आमदार खोडके यांनी या मागणीचा पुनरोच्चार करून तीन नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव मान्य करण्याबाबत शासनाला विनंती केली. त्याचबरोबर शहरातील गुन्हे विषयक घडामोडींवर सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सुद्धा प्रस्ताव देण्यात आला असून त्याला सुद्धा याच अधिवेशनात मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार खोडके यांच्यावतीने करण्यात आली आहे. भुयारी गटार योजनेसाठी २ हजार ५०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी द्यावी शहरात मल निस्सारण व स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था उभी करण्यासाठी भुयारी गटार योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. शहरी भुयारी गटार योजना गेल्या २८ वर्षांपासून निधी अभावी अर्धवट आहे. अमरावती महापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता मनपा आपला स्वहिस्सा देऊ शकत नसल्याने निधी अभावी भुयारी योजनेची कामे हाती घेणे शक्य नाही. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता व पुढील तीन वर्षाचे भुयारी गटार योजनेचे नियोजन करायचे असल्याने अमरावती शहरात भुयारी गटार योजनाचे सुधारित प्रारूप कृती आराखडा हा २ हजार ५०० कोटींवर गेला आहे. अमरावती शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने हि योजना अत्यंत महत्वाकांक्षी असल्याने शासनाने याबाबत बैठक घेऊन योजनेच्या २ हजार ५०० कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्याची मागणी आमदार सुलभा संजय खोडके यांनी केली आहे. शहरात वाढत्या एम.डी ड्रग्स तस्करीवर अनेक कारवाया गुन्हे शाखेने केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पोलिस स्टेशनच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याबाबत अशी माहिती मिळाली आहे की, एमडी ड्रग्सवर कारवाई करण्याचे अधिकार गुन्हे शाखेला दिले आहेत. वास्तविकता गुन्हे शाखेसोबतच संबंधित स्थानिक पोलिस ठाण्यांनाही कारवाई करण्याची गरज असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी यावेळी सांगितले.
सांगळूदकर महाविद्यालय येथे संगीत, कला कार्यशाळेचे दोन सत्रात मार्गदर्शन
स्थानिक जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग, अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत, कला व सांस्कृतिक कक्ष या विषयावर एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजीव बोरकर, प्रमुख मार्गदर्शक अधिसभा सदस्य डॉ. सावन देशमुख, संगीत विभागाचे डॉ.अंकुश गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत आणि भाऊसाहेबांच्या गौरव गीताने करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी विकास विभागात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती दिली. विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. अतुल बोडखे यांनी संगीत, कला व सांस्कृतिक कक्ष विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा. डॉ. ज्योत्स्ना पुसाटे यांनी केले. तर डॉ. राजेश उमाळे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. संचालन प्रा. डॉ. वैशाली चौरपगार यांनी तर आभार संगीत विभागाचे प्रमुख डॉ.सुरेंद्र शेजे यांनी मानले. प्रथम सत्राचे मार्गदर्शक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.सावन देशमुख यांनी कला संस्कृती व समाज या विषयावर मनोगत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमात संगीत विभागाच्या डॉ. नेत्रा तेल्हारकर यांनी संचालन केले. तसेच डॉ.सुरेंद्र शेजे यांनी दोन्ही सत्राचा थोडक्यात आढावा घेतला. या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून ज्यामध्ये चिखलदरा, नांदगाव खंडेश्वर, अमरावती, टेंभुरसोंडा अशा विविध महाविद्यालयातून प्राध्यापक समन्वयक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. संगीत विभागाच्या प्रा. डॉ. वृषाली देशमुख यांनी आभार मानून या कार्यशाळेची सांगता केली. संस्कृती लोप पावत चालल्या मनोगत व्यक्त करताना एखादी कला जर अंगी असली तर मानवाचं जगणं सुलभ होते. पण समाजातील काही संस्कृती लोप पावत चाललेल्या आहे. असे मत व्यक्त केले. तसेच दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक संगीत विभागाचे प्रा.डॉ.अंकुश गिरी यांनी आपल्या मनोगतात युवा महोत्सवा विषयी, त्यामधील कला प्रकाराविषयी विस्तृत माहिती दिली. विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कला प्रकारात भाग घेऊन आपली कला सादर करावी. असे आवाहनही त्यांनी व्यक्त केले.
धारणी येथील जिल्हा परिषदेच्या पीएम श्री सेमी इंग्रजी पूर्व माध्यमिक मुलांची शाळेतील विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालयात पोहोचून तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी शेवाळे यांनी मला साहेब नव्हे केवळ तहसीलदारच म्हणा, असे सांगत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य जागवले. शालेय उपक्रमांतर्गत शिक्षकांनी या क्षेत्रीय भेटीचे आयोजन केले होते. या क्षेत्रीय भेटीअंतर्गत तालुक्यातील तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पोलिस ठाणे आदी स्थळांनाही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्यात. भेटीदरम्यान धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे व तालुका कृषी अधिकारी उमेश यादव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत तालुक्याची भौगोलिक माहिती सामायिक केली. ही बाब सर्वांना आश्चर्य करणारी होती, तालुक्याचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्यातील विद्यार्थी जीवन जिवंत होत ते विद्यार्थ्यांमध्ये अगदी मिसळून गेले होते. कार्यालयातील सर्व विभाग व इतर तालुक्यातील ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली, यावेळी नायब तहसीलदार राजेश माळी व वरिष्ठ लिपिक निलेश सपकाळसुद्धा उपस्थित होते. कृषी विभाग हा मानवी जीवनातील महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे. भारत देश हा कृषिप्रधान देश असून देशात कृषी विभाग नाही राहिला तर माणसाचे जगणे अशक्य होईल अशा शब्दात कृषी विभागाची माहित दिली. पोलिस ठाणे येथे विद्यार्थ्यांनी आरोपींना जेलबंद कसे करतात ते ठिकाण दाखवा असे विद्यार्थ्यानी विचारले. त्यानंतर त्यांना कोठडी दाखवण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभुदास बिसंदरे, सहाय्यक शिक्षिका नूतन गैलवार, सीमा भुजाडे, बंशीलाल कासदेकर आणि ऋतिका आदींनी सहकार्य केले. विविध कृषी विषयक आवश्यक माहिती पुरवली संवादादरम्यान एका विद्यार्थ्याने तहसीलदारांना आपले वेतन किती?, असाही सवाल केला, तहसील कार्यालयातील क्षेत्रीय भेट ही विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाने आनंद निर्माण करणारी होती. तालुका कृषी अधिकारी उमेश जाधव यांनीसुद्धा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. कृषी विभागाच्या परिसरातील फळझाडे, पिकांविषयी व विविध कृषी विषयक आवश्यक माहिती पुरवली.
अवैध दारू बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांचा मोर्चा:कारवाई न केल्यास आत्मदहनाचा दिला इशारा
शहरातील फ्रेजरपुरा परिसरात खुलेआम सुरू असलेले अवैध दारूचे व्यवसाय तात्काळ बंद करण्यात यावेत. या मागणीसाठी फ्रेजरपुरा परिसरातील शेकडो महिला व काही तरुणांनी शुक्रवारी (दि. १३) उशिरा रात्री फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यावर धडक दिली. यावेळी महिलांनी ठाणेदारांसोबत चर्चा केली. अवैध दारू विक्री परिसरातून तात्काळ बंद करावी. अशी मागणी त्यांनी रेटून धरली. महिलांनी दिलेल्या निवेदनात पोलिसांना सांगितले की, फ्रेजरपुरा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. या दारूमुळे अनेक नागरिकांना व मुलांना आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. दारू पिणाऱ्यांमुळे त्यांच्या कुटुंबाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. पहाटे चार वाजतापासून रात्री बारा वाजेपर्यंत अवैध दारू विक्री सुसाट सुरू असते. मात्र त्याकडे पोलिसांचे लक्ष नाही. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील महिला त्रस्त झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणी त्वरित कारवाई करून अवैध दारू विक्रेत्यांचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी मागणी महिलांनी केली आहे. पोलिसांकडून तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही पेट्रोल घेऊन आत्मदहन करू. त्यानंतर होणाऱ्या परिणामाची जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील. अशी नोंद घ्यावी. असा गंभीर इशारा ठाण्यावर धडकलेल्या महिलांनी फ्रेजरपुरा पोलिसांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी असंख्य महिला शुक्रवारी उशिरा रात्री फ्रेजरपुरा ठाण्यावर धडकल्या होत्या. शुक्रवारी उशिरा रात्री महिलांनी फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक दिली होती. महिलांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी शनिवारी तात्काळ गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई मोहीम राबवली. शनिवारी दिवसभरात फ्रेजरपुरा पोलिसांनी फ्रेजरपुरा परिसरातील गवळीपुरा व वडाळी परिसरात एकूण चार गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. २२ हजार रुपयांचा गावठी दारूसाठा जप्त केला. दारू काढण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त केले. ही कारवाई फ्रेजरपुराचे ठाणेदार रोशन शिरसाठ, पीएसआय राहुल महाजन व फ्रेजरपुरा पोलिस पथकाने केली आहे. दारूबंदीच्या मागणीसाठी संतप्त महिला शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या परिसरात पोहोचल्या. यावेळी फ्रेजरपुराचे ठाणेदार रोशन शिरसाठ यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. तात्काळ अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले. त्यानंतर महिला निघून गेल्या. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी पोलिसांना देऊन गेला.पुढे काय कारवाई होईल ते पाहू. ठाणेदारांनी केली महिलांसोबत चर्चा; तोडगा काढण्याचे आश्वासन
आकाशवाणी अमरावती केंद्रात कायद्याचा जागर:महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायद्याविषयी जागरूकता
महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील आकाशवाणी केंद्राच्या सभागृहात कायदे -जागर या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कार्यक्रम प्रमुख भैयालाल टेकाम होते, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयीच्या प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, कार्यक्रम अधिकार आशिष गावंडे व अभियंता सुनील किनीकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांनी कार्यस्थळी महिलांचे अधिकार, त्यासंबंधीचे कायदे, महिला तक्रार निवारण समितीची स्थापना, तिची कार्यपद्धती तसेच तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यामागील उद्देश आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, याविषयीही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे यांनी कार्यालयीन वातावरणात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या परस्पर वर्तनातील मर्यादा, जबाबदाऱ्या आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्याची गरज यावर विचार मांडले. कार्यालयात परस्पर सन्मान, संवेदनशीलता आणि नियमांचे योग्य पालन केल्यास कार्यक्षमता वाढते तसेच कार्यालयाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्यालाल टेकाम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हा कार्यक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच महिलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारर्पण करून व पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथींना झाडांचे रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सपकाळे यांनी तर आभार स्नेहल ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला उद्घोषिका अवंती मोरे, प्रज्ञा इंगोले, संध्या वाडेकर, सरिता देशमुख, मंगला देशमुख, श्यामली देशमुख, प्रणाली देशमुख तसेच नितीन भट, श्रीहरी दिघडे, आकाश अटाळकर, जीवन माहुरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
इराण-इस्त्रायल संघर्षामुळे जगभरात इंधनाच्या पुरवठ्यावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. अशा वेळी शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टची सौर स्वयंपाक प्रणाली (सोलर कुकिंग सिस्टम) एक आदर्श बनली आहे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या प्रणालीमुळे दररोज हजारो भाविकांसाठी भोजन शिजवले जात आहे. या सौर प्रणालीमुळे दररोज सुमारे 2,000 किलो अन्न शिजवले जाते, जे अंदाजे 40 हजार भाविकांसाठी पुरेसे असते. यामुळे दररोज सुमारे 200 किलो गॅसची बचतही होत आहे. या अनोख्या उपक्रमाची दखल घेऊन, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (Ministry of New and Renewable Energy) या प्रकल्पाला देशातील एक अद्वितीय आदर्श (युनिक मॉडेल) म्हणून सन्मानित केले आहे. शिर्डीत दररोज सरासरी 75 ते 80 हजार भाविक दर्शनासाठी येतात. साईं संस्थानच्या प्रसादालयात भाविकांना मोफत भोजन दिले जाते आणि दररोज सुमारे 40 हजार लोक याचा लाभ घेतात. पूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी सुमारे 1,700 किलो गॅस खर्च होत असे, ज्यामुळे संस्थानवर मोठा आर्थिक भार पडत होता. 2009 मध्ये सौर स्वयंपाक प्रणाली सुरू झाली ऊर्जेची बचत आणि वाढता खर्च लक्षात घेता संस्थानच्या विश्वस्त मंडळाने जुलै 2009 मध्ये सौर स्वयंपाक प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पावर सुमारे 1 कोटी 37 लाख रुपये खर्च झाले. प्रसादालय परिसरात 73 सौर डिश बसवण्यात आल्या, ज्यांच्या मदतीने सौर कुकरमध्ये भोजन तयार केले जाते. या व्यवस्थेमुळे केवळ ऊर्जेची बचत होत नाही, तर पर्यावरणालाही फायदा होत आहे. याशिवाय साईं संस्थानाने सौर ऊर्जेवर आधारित भाविकांसाठी गरम पाण्याची सोयही सुरू केली आहे, ज्यामुळे नवीन भक्त निवास, द्वारकावती आणि साई आश्रम यांसारख्या ठिकाणी रोज 10 हजारांहून अधिक भाविकांना 24 तास मोफत गरम पाणी मिळत आहे. 10 क्विंटल डाळ-भाजी, 15 क्विंटल तांदूळ रोज शिजवला जात आहे प्रसादालयात 150 लिटर क्षमतेचे 10 मोठे कुकर बसवण्यात आले आहेत. या प्रणालीद्वारे एका वेळी 15 क्विंटल तांदूळ, 5 क्विंटल डाळ आणि 5 क्विंटल भाजी शिजवता येते. 2009 ते 2026 या कालावधीत या प्रणालीमुळे दोन लाख किलोहून अधिक गॅसची बचत झाली आहे. संस्थेची दोन कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बचत झाली आहे.
शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर' (टप्पा-१) शनिवारी (दि. १४) पार पडले. नांदगाव पेठ येथील संत काशिनाथ बाबा सभागृहात आयोजित या शिबिरामध्ये विवीध विभागाशी संबधित २१९ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, प्रमाणपत्रे आणि धनादेशांचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर तर प्रमुख उपस्थितीमध्ये तहसीलदार विजय लोखंडे होते. यावेळी एसडीओ अनिल भटकर यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती देत नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. याचवेळी कार्यक्रमाला नांदगावपेठच्या माजी सरपंच तथा प्रशासक कविता डांगे, कठोरा गांधीच्या लता जवंजाळ, जळका शहापूरचे सरपंच ज्ञानदीप मुंद्रे, नांदगाव पेठ तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोरेश्वर इंगळे, माजी जि.प. सदस्य नितीन हटवार आणि तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले, तर उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी विजय वाघमारे यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी ग्राम महसूल अधिकारी मनोज धर्माळे, आदेश गजभिये, अतुल पाटील, राजेश दंदे, अर्चना कराळे आणि पूनम साखरे यांनी परिश्रम घेतले. नऊ विभागाकडून देण्यात आले लाभ या शिबिरात एकूण २१९ लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पुरवठा विभागामार्फत ४४ नागरिकांना ई-शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ५५ लाभार्थ्यांना विधवा, अपंग व श्रावणबाळ योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. आरोग्य विभागाकडून २० लाभार्थ्यांना आयुष्मान गोल्डन कार्ड, तर बालविकास योजनेअंतर्गत ५ मुलींना ‘लेक लाडकी' योजनेचा लाभ देण्यात आला. यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ ११ शेतकऱ्यांना दिला.
अश्विनी पाटील पैठणीच्या मानकरी:संत दामाजीनगर होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचामोठा प्रतिसाद
मंगळवेढा शहराजवळ असणाऱ्या संत दामाजीनगर येथे या भागातील महिलांसाठी शीतल आण्णासाहेब आसबे यांच्या सौजन्याने होम मिनिस्टर पैठणीचा खेळ आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या कलागुणांना वाव देणारा हा उपक्रम अत्यंत रंगतदार आणि आनंदमयी झाला. या कार्यक्रमासाठी महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवला. प्रारंभी स्वराज्यमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्या हस्ते तर नगरसेविका सीमा बुरजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. सहभागी झालेल्या प्रत्येक महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटत कार्यक्रमाची शोभा वाढवली. महिलांना एकत्र येण्याचा, संवाद साधण्याचा आणि आनंद व्यक्त करण्याचा हा उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात यशस्वीपणे पार पडला. सदर कार्यक्रमांमध्ये विजेत्या ठरलेल्या महिला विजेत्यांना अनुक्रमे पहिले बक्षिस आश्विनी औदुंबर पाटील- मानाची पैठणी, दुसरे बक्षिस सुकेशनी सुकेशनी शिवाजी जगदाळे- मिक्सर, तिसरे बक्षिस पूजा मायाप्पा रेवे- कुकर, चौथे बक्षिस रेश्मा तानाजी नागणे- लेडीज मनगटी घड्याळ तसेच महिलांना दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून मनोरंजनाकडे घेऊन जाण्यासाठी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये उखाणे, जुन्या पिढीतील महिलांचे बऱ्याच वेळ चालणारे उखाणे तर आधुनिक पद्धतीचे वैचारिक व संस्कृतीचे दर्शन घडवणारे उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली होती. विशेष म्हणजे तळ्यात- मळ्यात हा खेळ तर खूप रंगल्याने महिला भगिनींनी मनसोक्त आनंद लुटला . पाचवे बक्षिस संगीता सुरेश मोरे-लेडीज पर्स अशा रूपातील बक्षिसे देण्यात आली. त्याचबरोबर सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सादरीकरण निवेदक संतोष मिसाळ यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रणाली आवताडे, सरपंच सुतार, ब्युटी आर्टिस्ट विद्या शिंदे, गायिका लक्ष्मी माने उपस्थित होते. आण्णासाहेब आसबे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. उखाणे स्पर्धा चांगलीच रंगली
येथील विजय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या बैलगाडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील मनोहर पाटील यांचा लखन व साईनाथ पाटील हिंगोली यांच्या सर्जाने डोळ्याचे पाते लवते न लवते तोच केवळ १८ सेकंदात १००० फुटाचे अंतर कापून जोडीने रोख रुपये १ लाख ५० हजारांचे रोख बक्षीसांसह सहकारमहर्षी केसरी चषक पटकावला. उपस्थित रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या गुणी बैलांना मानाच्या झुली, बाशिंग व शिंगांना आकर्षक शेंब्या व तुळशीहार तर मालकांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. येथील विजय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गत वर्षीपासून या बैलगाडा स्पर्धा घेण्यात येत आहेत. यावर्षी या स्पर्धा अकलूज आनंदनगर रोडवर ढेला याठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेत संपूर्ण राज्य भरासह कर्नाटकातून मिळून ३७१ बैलगाडे सहभागी झाले होते. या ठिकाणी स्पर्धेसाठी एकूण १० ट्रॅक करण्यात आले होते. मात्र प्रत्येकवेळी ७ गाड्या सोडण्यात येत होत्या. त्यासाठी ७ गाड्यांचे ५३ लॉट करण्यात आले होते. प्रेक्षकांना बसण्यासाठी कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी गॅलरी, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. शेवटच्या फेरीसाठी बैल थयथयाट करत असल्याने अखेर सायंकाळी ५.४८ वाजता शेवटचा ८ गाड्यांचा लॉट स्पर्धेसाठी सोडण्यात आला. आणि केवळ कुणी १८ तर कुणी २० सेकंदात शेवटची फाटी गाठली, आणि एकच जल्लोष सूरू झाला. . नवनाथ जगदाळे वळखड यांचा लक्ष्या व भारत वळकुंडे निमगाव यांचा सावकार . कार्तिक वावरे माळशिरस यांचा साई अवतार पवार अंबड जालना यांचा अर्जुन . रणजित निंबाळकर साखर वाडी यांचा सर्जा . आरोही घाडगे शिरसवाडी यांचा रायफल . मोहील धुमाळ सुसगाव यांचा बकासुर . अजित जगताप कारुं डे यांचा चिक्या . निखिल कोरडे खडकवासला यांचा बुलेट . योगेश भगत शिरसूफळ यांचा राजा राजा . विक्रम गोरे बागेहल्ली अक्कलकोट यांचा छावा . तस्मिय्या सय्यद यांचा बदाम . आशुतोष जाधव कलेढोण यांचा चिक्या . वाशीम एक्स्प्रेस कराड यांचा नाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण राज्य भरासह कर्नाटकातून मिळून ३७१ बैलगाडे सहभागी झाले होते. या ठिकाणी स्पर्धेसाठी एकूण १० ट्रॅक करण्यात आले होते. मात्र प्रत्येक वेळी ७ गाड्या सोडण्यात येत होत्या.त्यासाठी ७ गाड्यांचे ५३ लॉट करण्यात आले होते. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, हिंगोली, छत्रपती संभाजीराजेनगर अहिल्यानगर आदी जिल्हयातून ३७१ बैलगाडे आले होते. विठ्ठल अर्जुन, लखन चव्हाण, लक्ष्मण पवार, गणेश काळे, आप्पा रूपनवर, देविदास ढोपे, संतोष शिंदे, भैय्या मोरे, बाबुराव शेंडगे, सचिन साळुंखे, मनोज दडस, बाळासाहेब काळे व बाबा बोडरे. सुनील मोरे केडगाव प्रताप तात्या झांजुर्णे कोरेगाव विकास जगदाळे झेंडा पंच धनवडे बापू कोरेगाव यांनी समालोचन केले. प्रथम ११०००० रुपये व सन्मानचिन्ह द्वितीय ७१००० व स्मृतीचिन्ह तृतीय ६१००० व स्मृतीचिन्ह चतुर्थ ५१००० व स्मृतीचिन्ह पंचम ३१००० व स्मृतीचिन्ह सहावे २१००० व स्मृतीचिन्ह सातवे ११००० व स्मृतीचिन्ह Share with facebook मदनसिंह मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील. या स्पर्धेमध्ये इतर विजेते स्पर्धेत राज्यभरासह कर्नाटकातून ३७१ बैलगाड्यांनी घेतला सहभाग
मानेगाव माढा तालुक्यातील शेती पद्धतीत यंदा लक्षणीय बदल होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पारंपरिक पिकांपैकी ज्वारीच्या क्षेत्रात घट होत असताना शेतकरी अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. वीस-बावीस वर्षांमध्ये ज्वारी या पिकांचे क्षेत्र कमी होऊन डाळिंब, गहू व द्राक्ष या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. तर जलस्रोतांमध्ये वाढ झाल्याने गव्हाच्या क्षेत्रात तब्बल १ हजार १९० हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र, रब्बी ज्वारीचे क्षेत्र ६ हजार ४५४ हेक्टरने घटले आहे. त्यामुळे तालुक्यातील पीक पद्धतीत बदल स्पष्टपणे जाणवत आहे. तालुक्यातील अनेक भागात द्राक्ष व डाळिंब लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसत आहे. कसेत सिंचनाची उपलब्धता, बदलते हवामान तसेच बाजारपेठेत मिळणारा चांगला दर या कारणांमुळे शेतकरी फळपिकांना प्राधान्य देत असल्याचे सांगितले जाते. परिणामी पारंपरिक पिकांच्या तुलनेत फळपिकांच्या क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात गव्हाच्या लागवडीला देखील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर काही भागात ऊस लागवडीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. साखर कारखान्यांकडून मिळणारी दराची हमी तसेच सिंचनाची उपलब्धता यामुळे अनेक शेतकरी ऊस लागवडीकडेही वळत असल्याचे शेतकरी रोहित मोटे यांनी सांगितले. कृषी ^बदलते शेतीमध्ये ज्वारी क्षेत्रात घट, द्राक्ष लागवडीत वाढ, डाळिंब क्षेत्र वाढले, ऊस लागवडीत वाढ तर गव्हालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो. ज्वारी क्षेत्रात घट दिसत असली, तरी उत्पादनक्षमता वाढल्यामुळे भविष्यात तुटवडा भासण्याची शक्यता कमी आहे. संजय वाकडे, कृषी उपविभागीय अधिकारी कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील पीक क्षेत्रात यंदा घट- वाढ स्पष्टपणे दिसून येत आहे. पारंपरिक पिकांबरोबरच उत्पन्नाचा पर्याय म्हणून शेतकरी विविध पिकांकडे वळत असल्याने शेती पद्धतीत बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील बदलती शेती पद्धती कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
उजनी लाभ क्षेत्रातील निर्यातक्षम केळी उत्पादकता व निर्यातीसाठी उपलब्ध सुविधा आणि व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी आंध्रप्रदेशच्या सहा सदस्यीय उच्चस्तरीय पथकाने जिल्ह्यातील टेंभुर्णी, करकंब, अकलूज तसेच सोलापूर बाजार समितीला भेट दिली. यावेळी पथकाने कोल्ड स्टोरेज, पॅकिंग मटेरियल युनिट्स तसेच पॅक हाऊसची पाहणी करून निर्यात प्रक्रियेची माहिती घेतली. सोलापूर केळी निर्यातीसाठी राज्यातील महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. येथे सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन घेतले जाते. कंदर, वाशिंबे, टेंभुर्णी हे केळी उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित झाले आहे. आंध्र प्रदेशातही सुमारे ४० हजार हेक्टरांवर केळीची लागवड असून तेथील शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादन व संबंधित सुविधांची माहिती मिळावी, या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. तसेच यावेळी माढा उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील आदी उपस्थित होते. केळीसह मिरची, नाशवंत शेतीमाल निर्यातचा अभ्यास आंध्र प्रदेशचे कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री किंजरापू अचन्नायडू यांच्या सूचनेनुसार पथक महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांतील निर्यात केंद्रांचा अभ्यास करत आहे. केळी बरोबरच मिरची व इतर नाशवंत शेतीमालाच्या निर्यातीसाठी व्यवस्था व खर्च प्रक्रियेचा अभ्यासही या दौऱ्यात केला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रयोगाचे केले कौतुक ^आंध्र प्रदेशातील शिष्टमंडळाने सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करकंब आणि अकलूज परिसराला भेट देत येथील केळी उत्पादनाची पाहणी केली. या दौऱ्यात वाशिंबे, कंदर आणि टेंभुर्णी परिसरातील निर्यातक्षम केळी बागांचे लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचे व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेल्या केळी बागा आणि त्यांचे नियोजन पाहून शिष्टमंडळाने विशेष कौतुक केले. तसेच टेंभुर्णी येथील शीतगृह, पॅक हाऊस आणि केळी बॉक्स तयार करणाऱ्या कारखान्यांनाही भेट दिली. संजय वाकडे, उपविभागीय अधिकारी, कुर्डुवाडी
तीस वर्षीय विकास मागील ३ वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बालिकाश्रम रोड लगत रूमवर राहतो. सकाळी आवरल्यानंतर ९ च्या सुमारास रोज २० ते २५ रुपये खर्चून कधी पोहे तर कधी उपीटचा नाष्टा करतो. दुपारी अन् रात्री मेसवर गरमागरम जेवण मिळते. पण गेल्या चार ते पाच दिवसांपासून गॅस मिळत नसल्याने या भागातील नाष्ट्याचे लहान हॉटेल आणि मेस बंद झाले. परिणामी विकाससारख्या पोलिस भरती, एमपीएससी आणि महाविद्यालयीन उर्वरित पान ४ प्रतिनिधी | अहिल्यानगर मागणीच्या तुलनेत ३० टक्के घरगुती गॅस दैंनदिन उपलब्ध होत असताना देखील ग्राहक गॅससाठी अजून रांगेत कायम आहेत. शनिवारी बहुतेक गॅस एजन्सींसमोर गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावलेल्या होत्या. दरम्यान, गेल्या ७ दिवसांत प्रशासनाने शहरासह जिल्ह्यातील २६९ एजन्सी, हॉटेलच्या तपासण्या करून घरगुती सिलिंडरचा वापर व्यवसायासाठी केल्याने ४५ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर देखील झाला आहे. जिल्ह्याला दैंनदिन ४० हजार गॅस सिलिंडरची आवश्यकता असताना ७० हजार सिलिंडर मिळत आहेत. मागणीच्या ३० टक्के अधिक गॅस सिलिंडर मिळत असतानादेखील ग्राहक सकाळपासून गॅस सिलिंडर घेण्यासाठी रांगेत उभे असताना दिसत आहे. प्रामुख्याने प्रशासनाने घरगुती गॅस तुटवडा नसल्याचा दावा केला. परंतु रांगा मात्र कायम आहेत. घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी करत असलेल्यांवर प्रशासनाने कारवाया सुरु केल्या आहेत. शनिवारपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात २६९ गॅस एजन्सी, हॉटेलच्या तपासण्या केल्या. यात ४५ सिलिंडर जप्त करण्यात आले. दरम्यान, मागणीच्या तुलनेत जिल्ह्याला अतिरिक्त गॅस सिलिंडर मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठेच घरगुती गॅसची टंचाई नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी सांगितले. नितीन सोळंके, अध्यक्ष, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन अपुऱ्या बॉटलिंग प्रकल्पांमुळे टंचाई गॅस टंचाईसाठी युद्ध एक कारण असले तरी देशात गेल्या ७ वर्षांत एकही नवा गॅसचा बॉटलिंग प्रकल्प सुरु झालेला नाही. हे प्रकल्प सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरु होता, मात्र वितरक नवीन प्रकल्प तयार करण्यास विरोध करत आहे. जर नवीन प्रकल्प तयार झाले असते तर किमान ६ महिने पुरेल इतका गॅसचा साठा आपल्याकडे उपलब्ध असता. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ १९५५ अस्तित्वात आहे. या कायद्यान्वये प्रशासनाकडून गॅसचा काळाबाजार करत असलेल्यांवर कारवाई केली जाते, मात्र ती नाममात्र ठरतेय. दोन आठवड्यांत परिस्थिती बिकट गॅस टंचाई अशीच कायम राहिली, तर पुढील एक-दोन आठवड्यांत शहरातील निम्म्याहून अधिक मेस आणि नाश्ता सेंटर्स बंद पडू शकतात. ताजे जेवण मिळाले नाही तर पोषक घटक शरीराला मिळणार नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
ते' बिबट्या टप्प्याटप्प्याने मुक्त केले ^ अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा उपद्रव वाढल्यानंतर हल्लेखोर बिबट्यांना जेरबंद करण्यात आले. यापैकी दोन बिबटे यापूर्वीच निवारा केंद्रात पाठवले होते. त्यानंतर जुन्नर येथील २० बिबट्यांना वन तारामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्माण झाला. जुन्नर येथील रिक्त झालेल्या जागांवर अहिल्यानगर जिल्ह्यातील २० बिबटे पाठवण्यात आले. त्यानंतर उर्वरित काही बिबटे निसर्गात मुक्त करण्यात आले. -धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक, वनविभाग. सुरेश भुजबळ | आळेफाटा राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर जुन्नर वन विभागाने मोठा निर्णय घेत माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातील २० बिबटे गुजरातमधील जामनगर येथील ‘वनतारा’ प्रकल्पात स्थलांतरित केले. मात्र त्यानंतर लगेचच अहिल्यानगर जिल्ह्यात पकडलेले २० बिबटे माणिकडोह केंद्रात आणण्यात आल्याने येथील बिबट्यांची संख्या पुन्हा पूर्वीइतकीच झाली आहे. जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातून पकडण्यात आलेल्या बिबट्यांना सुरक्षित निवारा देण्यासाठी माणिकडोह येथे बिबट्या निवारा केंद्र उभारण्यात आले आहे. येथे क्षमतेपेक्षा जास्त बिबटे असल्याने प्रशासनाने उर्वरित पान ४ यापूर्वी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राची मूळ क्षमता ४० होती. त्यानंतर ती वाढवून सुमारे ८४ करण्यात आली असून भविष्यात आणखी ४० पिंजरे वाढवण्याची योजना आहे. सध्या येथे सुमारे १०८ बिबटे असल्याने केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त ताण निर्माण झाला आहे. आणखी २० बिबटे पाठवणार ^ बिबट्यांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रात वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये नर-मादींची व्यवस्था करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त बिबटे असले तरी एका पिंजऱ्यात नर, तर माद्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करून त्यांची सुरक्षितता राखली जात आहे. तर येत्या काही दिवसांत माणिकडोह केंद्रातून आणखी २० बिबटे ‘वनतारा’ प्रकल्पात पाठवण्याची तयारी सुरू आहे. - प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी.
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांनी तांत्रिक प्रयोग, संशोधन आणि नवकल्पना यावर भर दिला पाहिजे. अशा प्रकारचे तंत्रज्ञान महोत्सव विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देतात आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना व समस्या निराकरणाच्या क्षमता विकसित होतात. भविष्यातील तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत राहणे आणि नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे आवश्यक आहे, असे मत प्रा. सुनील कल्हापुरे यांनी व्यक्त केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाइन विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला तंत्रज्ञान महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. तीन दिवसीय महोत्सवात ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली तांत्रिक क्षमता, सर्जनशीलता आणि नवकल्पना सादर केल्या. दरवर्षी आयोजित करण्यात येणारा AURA हा तंत्रज्ञान महोत्सव विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील कौशल्य दाखविण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. या महोत्सवातून विद्यार्थ्यांना कोडींग, सॉफ्टवेअर निर्मिती, सर्जनशील डिझाइन, प्रकल्प सादरीकरण, तांत्रिक स्पर्धा तसेच विविध उपक्रमांद्वारे आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळाली. कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाइन स्टुडन्ट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, तांत्रिक विचारसरणी आणि नवनवीन तंत्रज्ञानाशी जोड निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरला. या महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बग ऑक्शन, टेक ट्रेझरर, प्रकल्प स्पर्धा, बॉक्स क्रिकेट स्पर्धा, मिस्टरी गेम, प्रॉम्प्ट शो डाऊन ट्रेझरर हंट अशा अनेक उपक्रमांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कोडींग कौशल्य, सर्जनशीलता, तांत्रिक विचारशक्ती आणि समूहकार्याची कसोटी लागली. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तंत्रज्ञान, नवकल्पना आणि सर्जनशीलतेचा संगम घडविणारा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांमधून तरुण पिढीला नवे तांत्रिक क्षितीज गाठण्याची प्रेरणा मिळत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात महिला नोकरी,घर सांभाळत असताना,घरातील सर्व सदस्यांची काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करतात आणि नंतर अनेक आजारांना सामोरे जावे लागते. तुम्ही निरोगी राहिलात तरच तुम्ही तुमच्या कुटूंबाची काळजी घेऊ शकता, असे प्रतिपादन परिक्रमा संकुलाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी केले. नगरपरिषद महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत पंतनगर येथील कम्युनिटी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष सुनीता खेतमाळीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यांनी महिलांसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध योजना राबवू व शहराचा विकास करण्यासाठी महिलांच्या आलेल्या सूचनांचा विचार करून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले. पाचपुते म्हणाल्या, महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापती मिरा शिंदे यांनी अनेक स्पर्धांचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविले. महिला सक्षमीकरण करण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे. उपनगराध्यक्ष अलका अनुभुले यांनी महिलांना मार्गदर्शन केले व आम्ही नगरपरिषद च्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहोत असे सांगितले. यावेळी महिलांचे आरोग्य तपासणी करण्यात आली सुमारे ८० महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. पाककला स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. महिलांनी विविध पदार्थ बनवून आणले होते. यातून उत्तम पदार्थ बनविलेल्या तीन विजेत्या महिलांची नावे पूनम मेहेर,दिशा सावंत व योगिता परदेशी. विविध गुणदर्शन यामधील विजेत्या अमृता मोरे,मीना गोरे व आर्या पाटील. नगर परिषद आदर्श होण्यासाठी काम करू माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार विक्रम पाचपुते यांनी जास्तीत जास्त महिलांना उमेदवारी दिली व मतदारांनी साथ दिली, म्हणून आम्हाला पालिकेत जाता आले. महिला व बालकल्याण सभापती या नात्याने महिलांना अपेक्षित असलेले काम आम्ही चिठ्ठीद्वारे त्यांचे मत जाणून घेतले व महिलांना निर्णय प्रकियेत सामावून घेतले. नगर परिषद जिल्ह्यात आदर्श कशी होईल यासाठी काम करू. - मिरा शिंदे, सभापती महिला व बालकल्याण.
शेतकऱ्यांचा शेतात जाण्यासाठीचा मार्ग बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. यापूर्वी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या म्हणूनच रेल्वे प्रकल्प मार्गी लागला. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता अन्याय करणे उचित नसल्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.त्यामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना विश्वासात घेवून निर्णय करावेत. शेतात जाण्याचे मार्ग बंद होणे योग्य नाही. शेतकऱ्यांचे सायपन अधिकृत करून देणे, अंडरपास मंजूर करण्या संदर्भात तसेच पुणतांबा शिर्डी मार्गावरील गाड्यांना पुणतांबा जंक्शनवर थांबा देण्याच्या मागणी संदर्भात बैठकीत चर्चा होवून याबबात रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय करण्याचे निर्देश देण्यात आले. नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वे मार्ग संगमनेर, अकोले तालुक्यातील मूळ मार्गाने नेण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने अन्य पर्यायी मार्गाचा सकारात्मकतेने विचार करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी दिल्या. पुणे नाशिक प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. मंत्री वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेनूसार मंत्रालयात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला आ. अमोल खताळ, रेल्वे विभागाचे राजेश कुमार शर्मा प्रशासकीय अधिकारी भुनेश्वर कुमार, मुख्य अधिकारी विजय कुमार राय, यांच्यासह विकास क्रांती सेना रेल्वे कृती समितीचे किशोर डोके, भगवान काळे, सतीश फापाळे, जालिंदर गागरे, संतोष शेळके उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वे विभागाने प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.प्रस्तावित मार्गामध्ये झालेल्या बदलानंतर संगमनेर अकोले तालुक्यातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्याची बाब मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. बदल करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याची बाब गांभिर्याने मांडण्यात आली. मूळ ज्या गावांचा समावेश होता त्या गावात आ.अमोल खताळ यांच्या समवेत प्रत्यक्ष जावून रेल्वे विभागाने पाहणी करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले. मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीला उपस्थित आमदार अमोल खताळ व रेल्वे विभागाचे अधिकारी. अंतिम निर्णयासाठी रेल्वे मंत्र्यांना भेटणार लोकांची मागणी लक्षात घेऊन जीएमआरटीला अडचण होणार नाही असा पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी रेल्वे विभागाने सकारात्मकतेने विचार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.याबाबत रेल्वे विभाग सकारात्मक भूमिका घेवून नव्याने पुन्हा संरेखन करण्याबाबत विचार करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संगमनेर अकोले तालुक्याला न्याय मिळेल, अशी भूमिका मांडण्यात आली. अंतिम निर्णय होण्याकरीता केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचे आ.अमोल खताळ यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्ती हीच यशाची गुरुकिल्ली आहे. अवांतर वाचनाची सवय जोपासणे, मोबाइलचा अनावश्यक वापर टाळणे आणि वडीलधाऱ्यांचा आदर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश नक्कीच प्राप्त होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणारे सुजित दरंदले यांनी केले. श्री शनैश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनई येथील माजी विद्यार्थी सुजित राजेंद्र दरंदले यांचा सन्मान सोहळा शनिवारी पार पडला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सन २०२४–२५ च्या नगर नियोजन अधिकारी (वर्ग १) परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अनिल पिसाळ म्हणाले, समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून व्यासपीठापर्यंतचा प्रवास प्रबळ इच्छाशक्ती, सातत्य, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर साध्य करता येतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मोठे यश मिळवण्याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सुजित दरंदले असून त्यांच्या यशामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास पर्यवेक्षक चिंधे, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सुजित दरंदले यांच्या यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख तसेच प्रशासकीय अधिकारी जालिंदर घुले यांनी शुभेच्छा दिल्या.विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे श्री शनैश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सोनई परिवारात आनंदाचे वातावरण आहे. या प्रसंगी संजय चिंधे, सुनंदा घाडगे, सुभाष कोलते, नानासाहेब कोरडे, बाबासाहेब गडाख, मोहन औटी, प्रदीप डांगे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन स्वाती जोशी यांनी केले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी कर्जमाफी करण्यात येईल, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने दिले होते. या अश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. महसूल प्रशासनाचे बहुतांश काम ऑनलाईन झाले असले तरी सातबारा नोंद, फेरफार आदी बाबतीत अनेक तक्रारी येतात. अशा तक्रारींवर या अभियानाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार काशिनाथ दाते यांनी केल्या. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व सरकारच्या विविध योजनांबाबतची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी खडकवाडी (पारनेर) येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उदघाटन आमदार दाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिबिरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी महसूल विभागासह कृषी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आरोग्य, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालविकास, महावितरण, अन्न व नागरी पुरवठा,परिवहन (एस.टी.), शिक्षण तसेच इतर विविध शासकीय विभागांची माहिती देणारे स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले होते.उपस्थित नागरिकांनी आपल्या शंकांचे निरसन करून विविध कामे मार्गी लावून घ्यावीत, असे आवाहन आमदार दाते यांनी केले. आमदार दाते म्हणाले, नागरिकांच्या दृष्टीने महसूल विभाग महत्त्वाचा आहे. तहसीलदारांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या महसूल विषयक योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करावे. माजी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महसूल प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यासाठी प्रभावी कामगिरी केली असून विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यात मोलाची भर घातल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना राबविण्यात आल्या असून नागरिकांनी या अभियानाच्या माध्यमातून त्या योजनांचा लाभ घ्यावा,असेही त्यांनी सांगितले. कृषी विभागाविषयी बोलताना ते म्हणाले, कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या कार्यकाळात विभागाच्या कामकाजाला मोठी गती मिळाली आहे. पारनेर तालुक्यात मागील दोन महिन्यांत तब्बल ७५० ट्रॅक्टरचे अनुदानावर वितरण करण्यात आले असून इतर कृषी अवजारांचेही मोठ्या प्रमाणावर वाटप झाले आहे. कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, शेतकऱ्यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करण्याची मागणी आपणासह बहुतेक विधानसभा सदस्यांनी केल्याचे आमदार दाते म्हणाले. राज्य परिवहन महामंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार दाते यांनी केले. पावसाच्या अनियमिततेचा शेतीवर मोठा परिणाम ^ जागतिक तापमानवाढीमुळे पावसाच्या अनियमिततेचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे.पाण्याचे व पीक नियोजन करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शेतकरी व शेती अधिक समृद्ध व्हावी यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून पीक विमा योजना, सूक्ष्म सिंचन योजना, कृषी यंत्रीकरण, मृदा आरोग्य पत्रिका, फलोत्पादन विकास, शेतकरी सानुग्रह अनुदान अशा विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. आमदार दाते यांच्या माध्यमातून मागील वर्षात शेतकरी सानुग्रह अनुदान योजनेतून तालुक्यातील शेतकऱ्यांना पावणे दोन कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली. -गजानन घुले,तालुका कृषी अधिकारी.
लाडकी बहीण योजनेलाअजित पवार यांचे नाव द्या:माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे नाव बदलून ‘अजितदादा पवार लाडकी बहीण योजना’ असे करण्यात यावे, अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात चव्हाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राज्यातील महिला भगिनींच्या भावना लक्षात घेऊन योजनेच्या नामांतराबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. या योजनेद्वारे राज्यातील लाखो महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली असून, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण तसेच लघुउद्योगांना हातभार लावण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे योजनेला अजितदादा पवार यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची आठवण जपावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

27 C