SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
...

सुनील तटकरेंकडून रुपाली चाकणकरांच्या बचावासाठी प्रयत्न!:विखे पाटलांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चाकणकरांचे महिला प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात

अशोक खरात या स्वयंघोषित भोंदूबाबाशी असलेल्या वादग्रस्त संबंधांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत आता मोठी वाढ होताना दिसत आहे. या प्रकरणामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली असून, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही त्यांची उचलबांगडी व्हावी, अशी मागणी खुद्द पक्षांतर्गत स्तरावरूनच जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चाकणकरांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता चव्हाट्यावर आली असून, पक्षातील नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून दोन गट पडल्याचे दिसत आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांनी चाकणकरांविरुद्ध उघड बंड पुकारत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे, तर दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आमदारांमध्येही या विषयावर मतमतांतरे असून, चाकणकरांना पदावर कायम ठेवावे की हटवावे, यावरून पक्षात सध्या तीव्र संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टीची मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात दोन गट पडल्याची चर्चा आहे. तसेच या दोन्ही गटात अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे उघड होताना दिसत आहे. रुपाली चाकणकर यांनी पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात काम केले असून त्यांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरुन देखील हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी नाशिक तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच ओबीसी विभागाच्या अध्यक्षांनी केली आहे. त्यामुळे आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यावर कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली असून ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुपाली ठोंबरे घेणार सुनेत्रा पवारांची भेट दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आज सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत. चाकणकर आणि अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात तसेच पक्षात नाराजीचे वातावरण असून या संदर्भात रुपाली ठोंबरे पाटील या सुनेत्रा पवारांशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी पक्षात महिला सुरक्षित नाही, त्यामुळे नाशिकच्या अनेक महिलांनी राजीनामा देखील दिल्याची माहिती आहे. पक्षात महिलांची गरज आहे आणि त्या सुरक्षित असल्या पाहिजे. त्यात आपले म्हणणे मांडण्यासाठी रुपाली ठोंबरे पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 11:26 am

झिरो FIR मध्ये कटकारस्थानाचे गंभीर आरोप:पुरावे नष्ट, बनावट कागदपत्रांचा संशय; अजित पवार प्रकरणात धक्कादायक खुलासे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी घडामोड घडली असून कर्नाटकातील बंगळुरू येथे ‘झिरो FIR’ दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून हा केवळ अपघात नसून गंभीर गुन्हेगारी कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तक्रार नोंदवली जात नसल्यामुळे रोहित पवार यांनी कर्नाटकात धाव घेतली होती. आता हा FIR पुढील तपासासाठी बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या FIR मध्ये अनेक गंभीर आरोपांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे आणि बनावट कागदपत्र तयार करणे यांसारख्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक बिघाडापेक्षा अधिक गंभीर बाबी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल आणि व्यापक तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत विमान सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. उड्डाणाच्या वेळी आवश्यक असलेल्या दृश्यता मर्यादेपेक्षा कमी परिस्थितीत लँडिंगला परवानगी देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच विमानाच्या वापराच्या तासांमध्ये अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यामध्ये विसंगती असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय पायलटची शेवटच्या क्षणी झालेली बदल आणि संबंधित पायलटच्या शिस्तभंगाच्या इतिहासाबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटक पोलिसांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रात FIR नोंदवला गेला नव्हता, मात्र 23 मार्च रोजी कर्नाटकात झिरो FIR दाखल झाला आणि तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा, यासाठी आपण बारकाईने लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गुन्हा घडला त्या हद्दीतच FIR नोंदवणे बंधनकारक नाही झिरो FIR ही कायदेशीर संकल्पना देखील या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या हद्दीतच FIR नोंदवणे बंधनकारक नसून, कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवता येते, यालाच झिरो FIR म्हणतात. याला सुरुवातीला ‘0’ क्रमांक दिला जातो आणि नंतर संबंधित अधिकारक्षेत्रातील पोलिस ठाण्याकडे वर्ग केला जातो. या यंत्रणेच्या माध्यमातून तक्रारीचा विलंब न होता तात्काळ तपास सुरू करता येतो. आता या FIR नंतर तपासाची दिशा काय राहते आणि सत्य काय उघड होते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 11:18 am

2018मध्ये खरातच्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 1 कोटी 5 लाखांचा निधी मंजूर:25 लाख तातडीने दिले, विजय कुंभारांचा खळबळजनक दावा

ज्या ठिकाणी महिला आणि अल्पवयीन मुलींच्या शोषणासारखे विकृत प्रकार घडले, त्या ईशान्येश्वर मंदिराचा विकास चक्क सरकारी तिजोरीतून झाला असल्याचा धक्कादायक आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याला तत्कालीन सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. विजय कुंभार यांच्या दाव्यानुसार, नाशिकच्या मिरगाव (ता. सिन्नर) येथील 'श्री सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थान' साठी पर्यटन विभागाने तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला होता. 31 मार्च 2018 रोजी तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या कार्यकाळात हा शासन निर्णय (जीआर) निर्गमित करण्यात आला होता. प्रसिद्ध झालेल्या पुराव्यांनुसार, 1 कोटी 5 लाखाच्या आराखड्यातून पहिल्या टप्प्यात 25 लाख रुपयांचा निधी तत्काळ वितरितही करण्यात आला होता. या निधीतून खालील कामे प्रस्तावित होती. सभामंडपाचे बांधकाम: 36.20 लाख (अंदाजित) भक्त निवास आणि चेंजिंग रूम: 12.53 लाख आणि 13.36 लाख प्रसाधनगृह (महिला व पुरुष): 7.52 लाख इतर सोयी: पेव्हर ब्लॉक बसवणे, पार्किंग, विद्युतीकरण (11%) आणि लँडस्केपिंग. विशेष म्हणजे, हे सर्व काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्याचे आदेश देण्यात आले होते. खरात सरकार पुरस्कृत बाबा विजय कुंभार एका पोस्टमध्ये म्हणाले, भोंदूबाबा अशोक खरात हा सरकार पुरस्कृत बाबा होता की काय याची खात्री पटावी अशी परिस्थिती सध्या आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खरातने मंदिरासाठी रस्त्याची मागणी केली आणि ती पूर्ण देखील झाली.मंत्रिमंडळ उप समितीने पाणी दिले, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पदावर असताना आणि त्याचे गुण माहीत असूनही त्याचे उदात्तीकरण केलं, त्याची दुष्कृत्ये माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले,त्याच्याकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतील याची काळजी घेतली.महसूल विभागाने जमीन विषयक कायद्याकडे दुर्लक्ष केले. राज्यातील शासन - प्रशासन रसातळाला विजय कुंभार यांनी राज्यातील शासन - प्रशासन रसातळाला गेल्याचाही दावा केला आहे. या प्रकरणी त्यांनी 3 ताजी उदाहरणे दिली आहेत. त्यांच्या मते, मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी पोलिसांकडून गैरवर्तन झाले, मग सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल?, आमदार संजय गायकवाड यांनी 35 कोटी “कमिशन” वाटल्याची उघड कबुली दिली, त्यावरून भ्रष्टाचाराचे सार्वत्रिकरण झाल्याचे संकेत मिळतात, तसेच भोंदू बाबा अशोक खरात यांच्या चरणी लीन झालेले मंत्री, आमदार, पदाधिकारी, आयएएस, आयपीएस अधिकारी पाहता राज्यात अंधश्रद्धेला आश्रय असल्याचे सिद्ध होते. यावरून राज्यातील शासन व प्रशासन रसातळाला गेल्याचे स्पष्ट होते. भोंदू खरातने 10-12 वर्षांतच जमवली 1500 कोटींची संपत्ती सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रीड ॲप्लिकेशनच्या साहाय्याने अशोक खरातच्या बँक खात्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ती माहिती फास्टट्रॅक स्वरूपात प्राप्त करून घेतली आहे. त्या आधारे तपास सुरू आहे. खरातकडे केलेल्या चौकशीत तसेच इतर प्राप्त माहितीवरून आरोपीची प्रॉपर्टी कोठे कोठे आहे याची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा ते बारा वर्षांत खरातने चांगलेच बस्तान बसवले. बडे अधिकारी आणि राजकारण्यांच्या मदतीने त्याने सुमारे 1500 कोटी रुपयांची मालमत्ता जमवली. त्याच्या संपत्तीचा अंदाज त्याची विलासी राहणी आणि विशाल फार्महाऊस पाहूनच येतो. खरातची मिरगाव, ता. सिन्नर येथे 33 एकर जमीन मिरगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःच्या नावे मिरगाव, ता. सिन्नर येथे फार्महाऊस पाथर्डी गाव, गौळाणे गाव, ता. जि. नाशिक येथे 10 एकर जमीन सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे 6 एकर जमीन शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे काकडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर (शिर्डी विमानतळ) येथे 5.5 एकर जमीन. पाथर्डी फाटा नाशिक येथे 800 स्क्वेअर फुटांचा 1 प्लॉट ओझर, जि. नाशिक येथे 4 गुंठ्यांचे 3 प्लॉट, आडगाव, ता. जि. नाशिक येथे 5 गुंठ्यांचा प्लॉट. पनवेल, नवी मुंबई येथे 40 गुठ्यांचा प्लॉट. कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे मुलगी श्रृष्टीच्या नावावर 11 गुंठ्यांचा प्लॉट. पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट. कर्मयोगीनगर, नाशिक येथे बंगला. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय. सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन.स्वतःकडे 12 तोळे सोने पत्नीकडे 20 तोळे सोने पत्नीच्या नावे डिमॅट अकाउंट. 1 ते 2 लाख गुंतवणूक एकूण बँक खाते 5- ICICI, Union, Sarswat, Vishwas co.op., SBI अशा प्रकारे अंदाजे एकूण 40 कोटी 87 लाख रुपयांचे बाजारमूल्य.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 11:18 am

अशोक खरात भाजपचा प्रचारक होता:भोंदूबाबा प्रकरणावर संजय राऊतांचा थेट हल्ला; महिलांचे फोटो लीक प्रकरणावरही संताप

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण अधिकच तापले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सगळ्या प्रकरणाला सरकारही तितकेच जबाबदार आहे, असे स्पष्ट म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. इंटेलिजन्स यंत्रणा विरोधकांवर लक्ष ठेवू शकते, मग अशा अघोरी आणि क्रूर कृत्यांची माहिती असूनही कारवाई का झाली नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. अनेक वर्षे सत्तेत असतानाही सरकार एका महिलेच्या तक्रारीची वाट पाहत बसले, हे चुकीचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. राऊत यांनी नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करत तीव्र शब्दांत टीका केली. नाशिक खरोखर कायद्याचा बालेकिल्ला असता, तर अशोक खरातसारखी प्रकरणे निर्माणच झाली नसती, असे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी बीडमधील काही घडामोडींवर भाष्य करत हे सगळे भाजपचे हस्तक आहेत, असा आरोप केला. अशोक खरात हा भाजपचा प्रचारक असल्याचा गंभीर आरोप करत, निवडणुकांमध्ये त्याचा वापर केला गेला असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्या भेटीचा संदर्भ देत आणखी आरोप मांडले. खरात बच्चू कडूंना आशीर्वाद देताना भाजपच्या मंत्रिमंडळात मंत्री बनून या, असे सांगत होता. त्याने इतर पक्षांचा उल्लेख केला नाही, असे सांगत त्यांनी खरातला भाजपची सहानुभूती असल्याचा दावा केला. याचा अर्थ भाजप त्याला सहकार्य करत होता, असा थेट आरोपही त्यांनी केला. मोबाईल पोलिसांकडे असताना फोटो बाहेर कसे? दरम्यान, या प्रकरणात महिलांचे फोटो बाहेर येत असल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी संताप व्यक्त केला. यापूर्वी अशा प्रकारे पीडित महिलांची ओळख उघड होत नव्हती. पण आता प्रथमच असे घडत आहे, असे ते म्हणाले. जप्त केलेले मोबाईल पोलिसांकडे असताना हे फोटो बाहेर कसे आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहखाते भाजपकडे असल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर जबाबदारी ढकलली. प्रकरणाची सखोल चौकशी करावी तपास प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या तेजस्वी सातपुते यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करत राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. महिलांचे फोटो लीक होणे ही गंभीर बाब आहे, याची सरकारला लाज वाटली पाहिजे, असे म्हणत त्यांनी निष्पक्ष आणि कडक कारवाईची मागणी केली. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचा जोर वाढत असून पुढील काही दिवसांत आणखी वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मोदी विरोधकांशी चर्चा करणार पश्चिम आशियातील संकटावर चर्चा करण्यासाठी केंद्राने आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर, खासदार संजय राऊत म्हणाले की, 25 दिवस उलटून गेले आहेत आणि आज मोदी विरोधकांशी चर्चा करणार आहेत. ट्रम्प यांनी भारताला आधीच गुलाम बनवले आहे. भारत आता इस्रायलचाही गुलाम झाला आहे. जर मोदींनी विरोधकांशी आधीच चर्चा केली असती, तर ते देशाच्या हिताचे ठरले असते.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 10:57 am

पंकजा मुंडेंचा नदी प्रदूषण रोखण्याचा निर्धार:स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती लवकरच; पहिल्या टप्प्यात इरई, झरपट नदीचा समावेश

राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व ठोस उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र नदी पुनरुजीवन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. या प्राधिकरणामार्फत केवळ नदी प्रदूषण आणि पुनरुजीवनावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी माहिती पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. चंद्रपूरमधील इरई व झरपट या दोन्ही नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन या नद्यांवर प्राधान्याने काम केले जाईल. प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात या नद्यांचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदुषण रोखण्यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर पर्यावरण व वातावरणीय मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले. 96 टक्के सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नद्यांत पंकजा मुंडे म्हणाल्या की, विदर्भ- मराठवाड्यासारख्या भागातील नद्यांचे प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. औद्योगिक सांडपाणी, शहरांमधील असंशोधित (अनट्रीटेड) सांडपाणी, तसेच शेतीतील रासायनिक वापर यामुळे नद्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. सध्या राज्यातील सुमारे 96 टक्के सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, पालघर आदी भागांतील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आढळत आहे. औद्योगिक सांडपाणी, शहरी घाण, तसेच शेतीतील रसायने पावसाच्या पाण्यासोबत नद्यांमध्ये मिसळत असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. नद्यांच्या प्रश्नावर विविध विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने प्रभावी काम होत नाही. यासाठी स्वतंत्र ‘नदी पुनर्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याचा प्रस्तावाची मान्यता अंतिम टप्प्यावर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नदी स्वच्छतेसाठी कृती आराखडा राबवणार औद्योगिक व सांडपाण्याच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करून ठराविक कालमर्यादेत नदी स्वच्छतेसाठी कृती आराखडा राबविण्यात येईल. नद्यांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज असून सरकार सकारात्मक पावले उचलत आहे. या कामात सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले. नागपूरमधील नाग नदी पुनरुजीवनासाठी सुमारे 1926.99 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला 2023 मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत सर्वेक्षण, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. सध्या 13 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) कार्यरत असून आणखी 3 प्रस्तावित असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाययोजना वातावरणीय बदल हा गंभीर विषय असल्याचे सांगत पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करत असल्याचे सांगितले. वाढते तापमान, पूर व दुष्काळ यांचा सामना करण्यासाठी वृक्षारोपण, प्रदूषण नियंत्रण आणि नदी पुनरुज्जीवनावर भर दिला जात आहे. नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापन करण्याचा प्रस्ताव असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. २०७० पर्यंत देश कार्बनमुक्त करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने राज्य शासन काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 10:56 am

विधिमंडळ कामकाज:अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज वाजणार सूप; दोन्ही सभागृहात आज विविध महत्त्वाचे कामकाज

आज राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहांत कामकाजाचा तुफान धडाका पाहायला मिळणार आहे. सभागृहात विविध शासकीय व अशासकीय विषयांवर चर्चा रंगणार असून, सदस्यांकडून लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस राजकीय घडामोडींनी गाजण्याची शक्यता आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचा विधिमंडळ कामकाजाशी संबंधित घडामोडी, पण संक्षिप्त स्वरुपात…

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 10:47 am

अजितदादांच्या अपघातप्रकरणी मोठी घडामोड; कर्नाटकातून झिरो FIR महाराष्ट्रात वर्ग:तपासाची दिशा बदलणार? रोहित पवारांचा इशारा

अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली असून कर्नाटकात झिरो नंबरने दाखल झालेला FIR आता महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अद्याप FIR नोंदवला गेला नव्हता, त्यामुळे कर्नाटकात नोंद झालेल्या या गुन्ह्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे. या प्रक्रियेबद्दल कर्नाटक पोलिसांचे आभार व्यक्त करत, आता संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर आल्याचे रोहित पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, हा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने व्हायला हवा. अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना, ते कितीही प्रभावशाली असले तरी, शिक्षा झालीच पाहिजे. महाराष्ट्र धर्माने आम्हाला लढायला शिकवलं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहू, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी महाराष्ट्र पोलिसांसमोरची जबाबदारी अधोरेखित केली आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, या ब्रीदवाक्याला साजेसा सखोल तपास अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राज्य सरकारनेही या तपासात पूर्ण सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आता या प्रकरणातील तपास कसा पुढे जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रोहित पवार यांची पोस्ट देखील वाचा…. अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणी कर्नाटकमध्ये दाखल केलेला गुन्हा कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला आहे. आता परीक्षा आहे महाराष्ट्र पोलीस दलाची... या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याला साजेसा सखोल तपास महाराष्ट्र पोलीस या गुन्ह्याचा करतील आणि राज्य सरकारही त्यासाठी सहकार्य करेल, ही अपेक्षा!

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 10:36 am

दिव्य मराठी एक्सपोझ:सोलापूर आरटीओत सर्व कामकाज ऑनलाइन; त्याचा ‘पासवर्ड’ मात्र एजंटच्या हातीच

सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सर्व कामे ऑनलाइनच आहेत. फक्त त्याचा ‘पासवर्ड’ मात्र एजंटच्या हाती असल्याचे दिसून येते. कारण ऑनलाइन प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येतात. एजंटकडे गेल्यानंतर त्यावर तोडगा सापडतो. त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. त्यांच्याकडून ऑनलाइन प्रक्रिया झाली, की अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यासाठी ऑफलाइनची कागदपत्रे मिळतात. त्यावर एजंटचा ‘कोड’ असतो. तो पाहिल्याशिवाय कागदपत्रे पुढे सरकत नाहीत. विजापूर रस्त्यावरील आरटीओ कार्यालयातील कामकाज कसे चालते याबाबत दिव्य मराठीने उघड केलेला हा कारभार... आश्चर्याची गोष्ट म्हणजे डॉक्टरांचे प्रमाणपत्र या परिसरात जागेवरच मिळते. कोणती तपासणी नाही, काही ठिकाणी डॉक्टरही नाही. मिळालेल्या प्रमाणपत्राची पडताळणीही होत नाही. एवढेच पाहिले जाते, की कोणाकडून आले? नागरिक स्वत:हून आले, प्रलंबित आणि एजंटमार्फत आले, की लगेच. असा हा एकूण कारभार असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनीही याबाबत अनुभव कथन केले. कार्यालयात... पारदर्शकतेचा हा फलक कार्यालयाबाहेर...एजंटांचा कायम ठिय्या कार्यालयाच्या दर्शनी भागात मोठा फलक. त्यावर लिहिले, ‘सर्व कामे पारदर्शकपणे होतात, कोणत्याही एजंटची मदत घेऊ नका, स्वत: आपली कामे ऑनलाईनद्वारे करा.’ आत गेल्यानंतर मात्र नेमके उलट चित्र पाहायला मिळते. संपूर्ण कार्यालय परिसर एजंटाच्या विळख्यात सापडलेला. ऑनलाइन प्रणाली केवळ नावालाच उरलेली, एजंटचा कोड' असल्याशिवाय कामेच होणार नाहीत. नागरिकच एजंटकडे जात असतील तर काय करणार? कार्यालयातील प्रत्येक कामासाठी ऑनलाइनची सोय आहे. नागरिकांना माहिती देण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्तीही केली. तरीही लोक एजंटकडे जात असतील तर त्यास कार्यालय काय करणार? पण, एजंट अन् कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली तर कायदेशीर कारवाई करणार. गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाबाहेर एजंटनी टेबल-खुर्च्या मांडून स्वत:ची दुकाने थाटलेली. काही महाभागांनी तर चारचाकी गाड्यांमध्ये लॅपटॉप घेऊन ऑनलाइन कामांचे मोबाइल ऑफिस' सुरू केले. नागरिकांनी स्वतःहून ऑनलाइन स्लॉट बुक करण्याचा प्रयत्न केल्यास स्लॉट उपलब्ध नाही' असा संदेश मिळतो, एजंटमार्फत जाताच तात्काळ कामे मार्गी लागतात. अशी त्याची लिंकिंग सिस्टिम घट्ट झालेली दिसून येते. निरीक्षणे....​वाहन नीट चालवताही येत नाही, काळजी करू नका, एजंटच देणार लायसन 1 दुचाकी आणि चारचाकी वाहन परवान्यासाठी घेण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये तर अनागोंदीचा कळस झाला आहे. दुचाकी टेस्टमध्ये अनेक चालकांना इंडिकेटरचा वापरही करता येत नाही. उजवा इंडिकेटर सुरू ठेवून डावीकडे वळणाऱ्यांनाही एजंटच्या मेहेरबानीने पक्के लायसन्स' दिले. 2 शिकाऊचा परवाना काढण्यासाठी एखादी व्यक्ती गेल्यास एजंटच्या मदतीशिवाय कामच होत नाही. त्यासाठी कमीत कमी ३०० रुपये मोजावे लागतात. एजंट आरटीओच्या परिसरात बसून ऑनलाइन अर्ज व टेस्टसाठी बुकिंग, डॉक्टर प्रमाणपत्र आदींची प्रक्रिया बसूनच करून देतो. त्यानंतर त्याची प्रिंटही मिळते. 3 एजंटमार्फत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नावालाच टेस्ट ड्राईव्ह दिले जाते. मात्र त्या अर्जावर एजंट विशिष्ट चिन्ह किंवा सहीचा वापर करतो. त्यातून त्या व्यक्तीचे लर्निंगचे काम होते. ही सगळी प्रक्रिया साखळी पद्धतीने चालते. त्यामुळे दाद मागायची कोठे? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतो. 4 एका युवतीला कार नीट चालवता येत नाही. वारंवार गाडी रेस करत होती. तपासणी अधिकाऱ्याने चक्क स्वतः गाडीत बसून तिला मदत केली. नियमानुसार उमेदवाराने स्वतःचे कसब दाखवणे अपेक्षित असताना, अधिकाऱ्यानेच वाहन ऑपरेट करून त्या युवतीला पास केले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 10:32 am

राष्ट्रवादीत बंडाची ठिणगी:रुपाली चाकणकरांची हकालपट्टीची मागणी; रुपाली ठोंबरेंची थेट एन्ट्री; सुनेत्रा पवारांसमोर मांडणार नाराजी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्याचे पडसाद आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उमटताना दिसत आहेत. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. आता पक्षाच्या महिला संघटनेतूनच त्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मात्र, नाशिकमधील अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्र लिहून त्यांना या पदावरून तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. नाशिक जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी ही मागणी पुढे नेत, चाकणकर यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाच्या पुरोगामी चेहऱ्यावर डाग लागल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. रुपाली पाटील सुनेत्रा पवार यांची भेट घेणार दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या आज मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी आणि संताप त्या या भेटीत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. चाकणकर यांच्या वादामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी ठोंबरे करणार असल्याचे समजते. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील चर्चेत या प्रकरणामुळे पक्षातील महिलांमध्ये अस्वस्थता वाढली असून काही ठिकाणी महिलांनी राजीनामे दिल्याचीही माहिती पुढे येत आहे. राष्ट्रवादीत महिला सुरक्षित नाहीत, असा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पक्षात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे. पक्षात महिलांची संख्या आणि सहभाग महत्त्वाचा असताना त्यांना सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे, अशी भूमिका महिला पदाधिकाऱ्यांकडून मांडली जात आहे. पक्षांतर्गत विरोधही उघडपणे समोर अशोक खरात प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रुपाली चाकणकर यांच्यासाठी ही परिस्थिती आणखी कठीण बनत आहे. एका बाजूला विरोधकांकडून टीका होत असताना आता पक्षांतर्गत विरोधही उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पक्ष नेतृत्व या प्रकरणात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 10:09 am

अशोक खरातला अघोरी वस्तूंचा पुरवठा कोण करत होतं?:SIT तपासात धक्कादायक साखळी उघड; गंडेदोरे, अंगठ्या आणि अघोरी विधी

नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत असून तपास अधिक खोलवर जात आहे. अघोरी विधींसाठी लागणारे साहित्य खरात इगतपुरी तालुक्यातून मागवत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने इगतपुरी तालुक्यात धडक देत विविध ठिकाणी चौकशी केली. नांदगाव बुद्रुक येथे झाडाझडती घेऊन स्थानिक व्यक्तीची चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे या प्रकरणाचे धागेदोरे आता ग्रामीण भागातही पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. स्थानिक भोंदूबाबामार्फत खरातला गंडे-दोरे, अंगठ्या आणि विविध अघोरी विधीसाठी लागणाऱ्या वस्तू पुरवल्या जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या व्यक्तीशी खरातचे वारंवार संपर्क असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या नेटवर्कचा तपास करण्यासाठी SIT ने संबंधित गावात सखोल चौकशी केली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचाही मागोवा घेतला जात असून काही मालमत्ता व्यवहार संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मालमत्ता खरेदीचे व्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे. हे व्यवहार खरातच्या नावावर न करता स्थानिक व्यक्तींच्या नावावर केल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे. या आर्थिक साखळीमुळे खरातच्या कारवायांचा व्याप अधिक मोठा असल्याचे संकेत मिळत आहेत. तपास यंत्रणा आता या सर्व व्यवहारांचे दस्तऐवज तपासत असून संबंधित सर्व व्यक्तींना चौकशीसाठी पाचारण केले जाऊ शकते. दरम्यान, न्यायालयात हजर असताना अशोक खरातने अत्यंत मर्यादित प्रतिक्रिया दिली. त्याने साप, वाघ किंवा अशा अघोरी गोष्टींबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मी हे पहिल्यांदाच ऐकतो आहे, मंदिरात अधूनमधून जायचो, असे त्याचे म्हणणे होते. मात्र तपास यंत्रणा त्याच्या या दाव्यांकडे संशयाने पाहत असून त्याच्या वक्तव्यांची पडताळणी केली जात आहे. पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले. गणित विषयात नापास झाल्याचे उघड याचदरम्यान खरातच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेत तो गणित विषयात नापास झाल्याचे उघड झाले आहे. एकूण 251 गुणांसह केवळ 35 टक्क्यांच्या आसपास गुण मिळाल्याची नोंद आहे. शाळेच्या नोंदीनुसार त्याचे मूळ नाव ‘लक्ष्मण एकनाथ खरात’ असे होते. पुढे नाव बदलून ‘अशोककुमार’ करण्यात आले आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण केली. अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख मिळवणाऱ्या या व्यक्तीचे शैक्षणिक वास्तव समोर आल्यानंतर या प्रकरणात आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 9:56 am

कोर्टात 20 फुटी नागाचा उल्लेख होताच खरात घाबरला:नाग, वाघ आणि नरबळीचा संशय; कोर्टात अशोक खरातची बोलती बंद

भोंदूबाबा अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता सुनावणीदरम्यान नाट्यमय घडामोडी घडल्या. न्यायालयाने त्याला आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, तपासात उघड झालेल्या माहितीप्रमाणे खरात हा आपल्या भक्तांना चकित करण्यासाठी 20 फुटी सापाचा वापर करत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, हा साप प्रत्यक्षात रिमोट कंट्रोलवर चालणारा बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी याच 20 फुटी सर्पाचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला. हा मुद्दा मांडताच अशोक खरातच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तणाव दिसून आला. संपूर्ण सुनावणीदरम्यान तो मान खाली घालून बसला होता आणि सतत आपल्या हाताच्या बोटाकडे एकटक पाहत असल्याचे दिसले. नाग आणि वाघ यांचा उल्लेख होताच तो काहीसा गोंधळल्याचे न्यायालयात उपस्थितांना जाणवले. न्यायाधीशांनी खरातला काही सांगायचे आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने सर्व आरोप फेटाळले. 20 फुटी सापाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे तो म्हणाला. मी हे प्रथमच ऐकत आहे. मी मंदिरात कधीकधी जायचो, तेथे 100 च्या आसपास लोक असायचे. शिवरात्री किंवा श्रावण सोमवारीच मी जात होतो, असे त्याने सांगितले. तसेच गेल्या काही दिवसांच्या चौकशीत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याचा दावा त्याने केला. पिस्तुलातील गोळ्या गायब असल्याने नरबळीचा संशय सरकारी बाजूने सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. यावेळी सरकारी वकिलांनी अनेक गंभीर मुद्दे मांडले. खरातकडून मोठ्या प्रमाणात रोकड, लॅपटॉप आणि शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याकडे आढळलेल्या पिस्तुलातील काही गोळ्या गायब असल्याने नरबळीचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच साप, वाघ यांचा वापर करून लोकांना फसवले का, याचाही तपास आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणात वन्यजीव कायद्याचाही भंग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अखेर अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू असून, अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 9:18 am

‘त्या’नगरसेवकांनी बदलला गटनेता‎:सागर भारुका यांची नवे गटनेतेपदी निवड; दाेन्ही शिवसेनेत कायदेशीर लढाई रंगणार‎

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून नगरसेवक म्हणून विजयी झालेल्या सहापैकी चौघांनी गत आठवड्यात शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या चौघांची मंगळवारी सभा घेत पूर्वीच्या गट नेत्याला पदावरून हटवले आणि आपल्यापैकी एक असलेले सागर भारुका यांची महापालिकेतील पक्षाच्या गट नेतेपदी निवडही केली. एकीकडे ही अजब खेळी झाली असतानाच दुसरीकडे शिंदे सेनेत प्रवेश केलेल्या या चार नगरसेवकांना अपात्र ठरवा, अशी याचिका शिवसेना ‘उबाठा’चे मूळ गटनेते विजय इंगळे यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केली. त्यामुळे गट नेते पदावरून दोन्ही शिवसेनेने कायदेशीर लढाई रंगणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. मनपा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मनोज पाटील, सोनाली सरोदे, सागर सुभाषचंद्र भारुका, सुरेखा मंगेश काळे, अभय खुमकर व विजय इंगळे हे नगरसेवक म्हणून िवजयी झाले होते; तगडा विरोधी पक्ष तयार झाला असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोज पाटील, सोनाली सरोदे, सागर भारुका, सुरेखा काळे यांच्यासह दुसरे जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी गत आठवड्यात शिंदेसेनेत प्रवेश केला. याच चौघांनी उर्वरित नगरसेवक अभय खुमकर व गट नेते विजय इंगळे यांना सभेची नोटीस पाठवली. त्यानुसार मंगळवारी हे चौघे व मंगेश काळे यांच्या उपस्थितीत सभा झाली. यात नवीन गट नेते सागर भारुका यांची निवड झाली. राज्यात जून २०२२मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षावरच दावा केला. त्यांना पक्षाचे निवडणूक धनुष्यबाणही मिळवला. अर्थात यासाठी सत्ताधारी भाजपने सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याचा आरोप मूळ शिवसेनेकडून झाला. या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारपैकी एकमेव बाळापूर मतदार संघातून शिंदे गट लढला. मात्र हा उमेदवारही भाजपमधून आयात करावा लागला. परंतु शिंदे गटाचा हा उमेदवार तिसऱ्या क्रमांकांवर फेकला गेला. येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला. मनपा निवडणुकीतही शिंदे गटाला अकोलेकरांनी नाकारत केवळ एका जागा पदरात टाकली. मात्र, हा विजयदेखील संबंधित नगरसेविकाच्या वैयक्तिक कामगिरीमुळे झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेवर मतदारांनी विश्वास दाखवत मशाल चिन्हावर उभ्या असलेल्या सहा जणांना विजयी केले. परंतु असे असतानाही ठाकरेंचे चार नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. आता स्वत:च सभा घेऊन मनपातील पक्षच हायजॅक करण्याचा घाट घालण्यात आल्याचे किंवा पक्ष सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न होत असल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांकडून नोंदवण्यात येत आहे. ^मनपात आघाडी असो वा राजकीय पक्षांनी गट स्थापन करण्याची प्रक्रिया विभागीय आयुक्त कार्यालयात केली जाते. त्यासाठी आयुक्तांकडून संबंधित नगरसेवकांची ओळख परेड घेतली जाते. त्यामुळे शिंदेंसेनेच्या गटनेता निवडीच्या प्रक्रियेला कायदेशीर आधारच नाही. शिंदे गटात प्रवेश केलेले जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांची तात्काळ तेव्हाच शिवसेनेचे (उबाठा) उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. - आशिष गावंडे, शहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ^शिवसेना पक्षाच्या महापालिकेतील सहापैकी चार नगरसेवकांकडून मंगळवारी सभा बोलावण्यात आली. या सभेत नोटीसमध्ये नमूद केलेल्या विषयावर चर्चा झाली. मात्र या सभेला दोन नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे सभेत उपस्थित असलेल्या सागर भारुका यांची महापालिका गट नेते पदी निवड करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मी सध्याही शिवसेनेत (उबाठा) आहे. - मंगेश काळे, जिल्हाप्रमुख अकोला. महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गट नेते निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. यासाठी अकोला पूर्व-पश्चिमसह अन्य जबाबदारी असलेले जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी व्हीप बजावत नगरसेवकांची सभा बोलावली होती. त्यानंतर गट नेता निवडण्यात आला होता. या गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र आता मंगळवारी झालेल्या सभेची नोटीस २० मार्च रोजी शिंदे गटात गेलेल्या चार नगरसेवकांनी शिवसेना उबाठाच्या दोन नगरसेवकांना बजावली होती. यात विषय म्हणून पूर्वीचे ‘गट नेते विजय इंगळे यांना पदावरून पायउतार करण्या’बाबत, असे नमूद केले होते.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 9:10 am

282 ग्रा. पं. क्षयरोगमुक्त; सर्वांची होणार तपासणी:‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’ अभियानात सर्वेक्षण; टीबीमुक्तीसाठी 100 दिवसांची मोहिम‎

क्षयरोगमुक्त भारत अभियान- १०० मोहिम, तसेच निक्षयमित्रांचा गौरव सोहळा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. जिल्ह्यात २८२ ग्रा. पं. क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. आता संपूर्ण जिल्हा १०० टक्के क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रयत्न व्हावेत. त्यासाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच लोकसहभाग मिळवण्याचीही गरज आहे. त्यादृष्टीने निक्षयमित्रांचे कार्य महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मंगळवारी केले. लक्षणे नसलेल्या व्यक्तींचीही सक्रिय तपासणी होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. क्षयरोगमुक्त भारत अभियान-१०० मोहिम, तसेच निक्षयमित्रांचा गौरव सोहळ्यात जिल्हा उर्वरित पान ४ निक्षय मित्र योजनेद्वारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांद्वारे रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्या पोषण, निदान आणि उपचारांसाठी साह्य केले जाते. जिल्ह्यातील निक्षयमित्रांचा गौरव जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अकोली जहाँगीर येथील श्री गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष नारायण इंगळे, नीळकंठ लांडे, गजानन धर्मे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष माहेश्वरी देशमुख, हर्षवर्धन पाटील, प्रज्ञा पाटील, मुंडगाव येथील श्री गजानन महाराज पादुका संस्थानचे विजय ढोरे, विलास बहादुरे, गुजरात अंबुजा एक्स्पो. चे अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, कालुराम फूड प्रॉडक्टचे सिद्धार्थ रूहाटिया, श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे अरूण शर्मा, राहूल राठी, सुमित शर्मा, राजू मंजुळकर, पूर्वा अर्बनचे नीलेश चतरकर, दिलीप सांगळे, श्री. चौधरी, अनिल शर्मा आदींचा गौरव झाला. रुग्णांना दत्तक घेऊन उपचारासाठी साह्य करणाऱ्या निक्षयमित्रांचा गौरव

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 9:08 am

हक्काचे घर घेण्यासाठी सुवर्णसंधी:म्हाडाकडून परवडणाऱ्या 2500 घरांची लॉटरी लवकरच; घरांच्या किमतीपासून पात्रतेपर्यंत सगळं स्पष्ट

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) कडून मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील सुमारे 2500 घरांच्या विक्रीसाठी लवकरच लॉटरी काढली जाणार असून, पुढील 10 ते 15 दिवसांत ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. या लॉटरीमध्ये शहरातील विविध भागांतील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. म्हाडाच्या नियमानुसार या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची चार उत्पन्न गटांमध्ये विभागणी केली जाते. अत्यल्प उत्पन्न गट (EWS), अल्प उत्पन्न गट (LIG), मध्यम उत्पन्न गट (MIG) आणि उच्च उत्पन्न गट (HIG) या चार गटांनुसार घरांचे वाटप होणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. 6 ते 9 लाख उत्पन्न असलेले अर्जदार LIG गटात येतात, तर 9 ते 12 लाख उत्पन्न असलेले MIG गटात मोडतात. 12 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांसाठी HIG गटातील घरे उपलब्ध असतील. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाची लॉटरी विशेष ठरण्याची शक्यता आहे. 2025 मध्ये म्हाडाने मुंबईत घरांची लॉटरी जाहीर केली नव्हती. त्याआधी 2024 मध्ये सुमारे 2000 घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. त्या वेळी घरांच्या किमती सुमारे 29 लाख रुपयांपासून ते 6.82 कोटी रुपयांपर्यंत होत्या. त्यामुळे यंदाही घरांच्या किमती विविध गटांनुसार वेगवेगळ्या असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने दरम्यान, लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने पार पाडली जाते. अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात येते. अर्जदारासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी कागदपत्रे अनिवार्य आहेत. याशिवाय अर्जदाराने मागील 20 वर्षांपैकी किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य केल्याचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. 1977 साली स्थापन झालेल्या म्हाडाने आतापर्यंत सुमारे 5.27 लाख घरे उभारली असून, मुंबईसह पुणे, कोकण, नाशिक आणि संभाजीनगर या भागांमध्येही लॉटरी काढल्या जातात.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 9:05 am

‘श्री पिंगळा देवी’च्या दर्शनासह धार्मिक कार्यक्रमांसाठी गडावर भाविकांची गर्दी:प्राचीन, जागृत देवस्थानात सकाळचा सप्तशती पाठ‎

लाखो भाविकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान असलेल्या नांदुरा पिंगळाई येथील श्री क्षेत्र पिंगळा देवी गडावर सध्या सकाळचा सप्तशती पाठ व सायंकाळच्या महायज्ञाने पवित्र व चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त आदिमायेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येत भाविकांची गडावर गर्दी होत आहे. जिल्ह्यातील प्राचीन व जागृत देवस्थान असलेल्या पिंगळा देवीचा नुकताच अंगुराची आरास करून शृंगार करण्यात आला. माहुरगडची रेणुका माता व पिंगळा देवी या दोघी भगिणी असल्याची भाविकांची धारणा आहे. भक्तिमय तसेच धार्मिक वातावरणात १९ मार्च रोजी गुढी पाडव्यापासून नवरात्राला येथे सुरुवात झाले. यानिमित्त आई पिंगळा देवीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर दररोज अभिषेक, शृंगार, महाआरती, भजन, सप्तशती पाठ, महायज्ञात आहुती असे कार्यक्रम सुरू आहेत. आदिमायेचा जयघोष, संबळ, टाळ, मृदंगाच्या गजरात घटस्थापना करण्यात आली. २६ मार्च रामनवमीपर्यंत हा नवरात्रोत्सव चालणार आहे. शारदीय नवरात्रोत्सव असो किंवा चैत्र नवरात्रोत्सव ही आई पिंगळा देवीचा आशीर्वाद घेण्याची भाविकांसाठी पर्वणी असते. सध्या मंदिराचा जिर्णोद्धार सुरू आहे. तरीही देवीची पूजा, धार्मिक विधीत कोणताही खंड पडू दिला जात नाही. पुजारी संदीप मारुडकर हे स्वत: धार्मिक विधी पार पाडत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी ध्वजारोहण व गुढी उभारण्यात आली. पहिली माळ अर्पण केल्यानंतर मंदिरात आदिमायेचा महिमा असलेल्या सप्तशतीच्या पाठाचे सामूहिक पठण सुरू झाले. पवित्र सप्तशती पाठामुळे मंदिर परिसरात पवित्र वातावरण तयार झाले आहे. दररोज दुपारी १२.३० वाजता महापूजा व महाआरती केली जात आहे. सप्तमी व अष्टमीच्या मुहूर्तावर बुधवार २५ रोजी होणारा सप्तशती महायज्ञ हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. गडावर येणाऱ्या भाविकांना श्री पिंगळा देवीचे सुलभ दर्शन, शुद्ध पिण्याचे पाणी व इतर सुविधांची उणीव भासू नये यासाठी विश्वस्त मंडळ, पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. २६ मार्च श्री रामनवमीला नवरात्रोत्सवाचा समारोप होणार आहे. तत्पुर्वी भाविकांनी श्री पिंगळादेवीचे दर्शन व आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे. हाकेला धावणारी माता अशी मातेच्या भाविकांची धारणा नांदुरा पिंगळाई येथील पिंगळा देवीच देवस्थान हे प्राचीन व जागृत आहे. मातेची स्वयंभू तेजस्वी देखणी हसरी मूर्ती बघितली की, भाविकांच्या मनातील अज्ञानाचा अंध:कार नाहीसा होऊन ज्ञानाची प्रकाशज्योत तेवत राहते. म्हणूनच हाकेला धावणारी माता अशी भाविकांची धारणा आहे. यंदा नवरात्रोत्सवाचे नियोजन शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विनीत पाखोडे, सचिव आशिष मारुडकर यांनी दिली. भाविकांसाठी येथे शक्य त्या सोयी केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:55 am

जगात साम्राज्यवाद, भांडवलशाही गाडल्याशिवाय सुख नांदणार नाही:शहीद दिन कार्यक्रमात भाकपचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांचे प्रतिपादन‎

साम्राज्यशाही आणि भांडवलशाही गाडल्याशिवाय जगात सुख आणि शांती नांदू शकत नाही, हे सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीवरून आणि भारतातील धर्मांध राजकारणावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यासाठी सामुहिक संघर्ष व्हावा, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड ॲड. सुभाष लांडे यांनी केले. नजिकच्या मंगरुळ चव्हाळा येथे जाहीर सभा व शाहीर धम्मा खडसे यांचा शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. शहीद दिनानिमित आयोजित या कार्यक्रमाच्या मंचावर भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य विनोद जोशी, आयटकचे राज्य सचिव श्याम काळे, बांधकाम कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय मंडवधरे, भाकपचे जिल्हा सहसचिव सागर दुर्योधन, चांदुर रेल्वे तालुका सचिव सतीश चौधरी, एआयएसएफचे माजी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गणेश अवझाडे, अ.भा. नौजवान सभेचे माजी जिल्हाध्यक्ष सतिश शिंदे, माजी सरपंच विकास आगाशे, मधुकर बनकर, प्रदीप तांबटकर, सुरेश बिसने, पंजाब वैद्य, अरुण शिंदे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ॲड. लांडे पुढे म्हणाले, साम्राज्यशाहीची भूक जगातील छोट्या आणि कमकुवत देशांना गिळंकृत करण्याची आहे. त्यांच्यामते देशात २०१४ पासून सत्तेमध्ये बसलेले नरेंद्र मोदी सरकार हे भांडवलदारांच्या हातचे कळसुत्री बाहुले बनले आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे जगातील सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून त्याची झळ भारतालाही प्रचंड प्रमाणात बसत आहे. गॅस व पेट्रोलचा तुटवडा आणि वाढत्या किमती हे त्याचे उदाहरण आहे. परंतु केंद्र सरकारच्या अमेरिकेसमोर नांग्या टाकण्याच्या धोरणामुळे व लोटांगण घालण्याच्या प्रवृत्तीमुळे देशातील जनता संकटात सापडली आहे. विदेशी धोरण पूर्णपणे अयशस्वी झाले आहे. भारताचा परंपरागत मित्र इराण व रशिया दुरावला जात आहे. त्याचवेळी अमेरिकेची दादागिरी वाढत आहे. शाहीर धम्मा खडसे यांना जीवनगौरव कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिकारी शाहीर धम्मा खडसे यांचा शाहीरी जलसा झाला. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने क्रांतिकारी गीत गाऊन त्यांनी या आयोजनात प्राण ओतला. यानिमित्ताने आयोजकांतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. एवढेच नव्हे तर चळवळीतील त्यांचे योगदान लक्षात गेता त्यांना यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार जागर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. संचालन व आभार शाखा सचिव मनोज गावनेर यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:54 am

शेगाव येथे दोन दिवसीय ‘मातृसंस्कार समागम’ संमेलन:विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये सक्रिय असून, सुमारे 1500 सदस्य प्रत्यक्ष कार्यात सहभागी

विश्व मांगल्य सभा विदर्भ प्रांताच्या वतीने “मातृसंस्कार समागम” हा दोन दिवसीय कार्यक्रम २८ व २९ मार्च रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील ऑडिटोरियम हॉलमध्ये होत असल्याची माहिती विदर्भ प्रांत जनसंपर्क संयोजिका डॉ.अपर्णा कुटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्व मांगल्य संघटनेची सुरुवात विदर्भातून झाली असून, आज ही संघटना देशातील तब्बल २२ राज्यांमध्ये कार्यरत आहे. सुमारे ८ लाख महिलांचे मजबूत जाळे असलेल्या या संघटनेचे मुख्य ध्येय संस्कृती टिकवून ठेवणे, संस्कार रुजवणे आणि समाजात सदाचार, सामर्थ्य व मूल्यांची जपणूक करणे हे आहे. गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेली ही संघटना विदर्भातील ५ जिल्ह्यांमध्ये सक्रिय असून, सुमारे १५०० सदस्य प्रत्यक्ष कार्यात सहभागी आहेत. या समागमाचे हे ९ वे एकत्रीकरण असून ११ व्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानावरील श्रद्धा व विश्वासामुळे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी जितेंद्रनाथ महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या भव्य समागमासाठी शेगाव नगरी सज्ज झाली असून, विदर्भासह विविध राज्यांतील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित आहे. पत्र परिषदेत विदर्भ प्रांत जनसंपर्क संयोजिका डॉ अपर्णा कुटे,विदर्भ प्रांत अध्यक्ष मधुरा लेंधे, विदर्भ प्रांत उपाध्यक्ष रश्मी जाजोदिया विदर्भ प्रांत सचिव सचिव निशा टावरी विदर्भ प्रांत सहसंयोजिका वर्षा उफाळे, अकोला शहर संयोजिका अश्विनी जकाते अकोला शहर कार्यालय प्रमुख सुषमा ठोकळ विश्व मांगल्य सभा शेगाव शहर अध्यक्ष अंजली जोशी शेगाव शहर संयोजिका आरती वैद्य, सविता पाटील आदी सदस्य उपस्थित होते. विविध लक्षवेधी उपक्रम समागमात महिलांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रभातफेरी, आकर्षक झाकी यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देव, देश आणि धर्म या तत्त्वांवर आधारित हा उपक्रम शेगावसारख्या अध्यात्मिक भूमीत होत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:53 am

गाव - खेड्यातील शेतकऱ्यांना त्रास; कृषी कार्यालय तहसीलजवळ आणा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिले एसडीओंना मागण्यांचे निवेदन‎

तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या सेवा अधिक सुलभ व्हाव्यात, या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाचे स्थलांतर नूतन तहसील कार्यालयाजवळील मजीप्राच्या जुन्या इमारतीत करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांना आज, सोमवारी निवेदन देण्यात आले. सद्यस्थितीत तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे भाडेतत्त्वावर असून शहराच्या एका टोकाला स्थित आहे. त्यामुळे गाव-खेड्यातून येणाऱ्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागतो. तालुक्यातील बहुतेक शासकीय कार्यालये दर्यापूर-अमरावती मार्गावरील तहसील कार्यालयाजवळ असल्याने नागरिकांची वर्दळ त्या ठिकाणी अधिक असते. तहसील कार्यालयाजवळच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची सध्या रिक्त असलेली इमारत आहे. (पूर्वी तेथे न्यायालय होते) येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर केल्यास सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल आणि प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख होईल, असे राकाँचे म्हणणे आहे. निवेदन देतेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी, शहराध्यक्ष अमोल गहरवार, रायुकाँ अध्यक्ष नितिन पाटील गावंडे, नगरसेवक राहुल बैताडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. कृषी कार्यालयाच्या स्थानांतराची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. या भागातील नागरिकांच्या उत्पन्नाचे मूळ साधन हे शेती आहे. त्यामुळे बहुतेक नागरिकांना शेतीविषयक कामानिमित्त या कार्यालयात ये-जा करावी लागते. त्यामुळे सदर मागणीमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत असून प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:51 am

टाकरखेडा संभू येथे श्री हनुमान सवारी शोभायात्रा रंगली:26 मार्च रोजी हजारो भाविकांची राहणार उपस्थिती, सामूहिक सहभागाचा अद्वितीय संगम‎

विदर्भातील धार्मिक परंपरांचा अद्वितीय वारसा जपणाऱ्या टाकरखेडा संभू येथील श्रीराम मठात यंदाही रामनवमीच्या निमित्ताने मध्यरात्री निघणारी हनुमान सवारी शोभायात्रा भाविकांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. गुरुवार २६ रोजी मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास ही पारंपरिक सवारी निघणार असून, हजारो भाविक रात्रभर जागून या दैवी सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. रामनवमीच्या दिवशी दु. १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर ‘विडा’ विधी पूर्ण होतो आणि त्यानंतर मध्यरात्री रामभक्त श्री हनुमान सवारीची तयारी सुरू होते. पहाटे ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शोभायात्रेत भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचे विलक्षण दर्शन घडते. विशेष म्हणजे देशभरात रामनवमीचा उत्सव दिवसा साजरा होत असताना टाकरखेडा संभूमध्ये मात्र हा सोहळा मध्यरात्री साजरा होतो, हीच या उत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. टाकरखेडा संभू येथील हा मध्यरात्री साजरा होणारा रामनवमी उत्सव केवळ धार्मिक नाही, तर परंपरा, निष्ठा आणि सामूहिक सहभागाचा अद्वितीय संगम आहे. विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातही अशा प्रकारे मध्यरात्री पारंपरिक सवारी निघणारा हा विरळा सोहळा मानला जातो. त्यामुळे यंदाही हजारो भाविक या दैवी उत्सवासाठी येथे दाखल होणार असून, श्रद्धा आणि भक्तीचा महासागर उसळणार आहे. २३ रोजी स.११ वाजता तीर्थस्थापना झाली. पौराणिक परंपरेचा जिवंत वारसा अजूनही सुरुच या सवारीची परंपरा अत्यंत प्राचीन असून, तिची नेमकी सुरुवात कधी झाली याची नोंद उपलब्ध नसली तरी मागील अनेक वर्षांपासून हा उत्सव अखंडितपणे सुरू असल्याचे सांगितले जाते. गोसावी समाजातील भारती कुटुंब या परंपरेचे प्रमुख वाहक आहेत. सध्या वयोवृद्ध विठ्ठल भारती यांच्या परंपरेतून त्यांचे नातू विवेक भारती हे सवारीचे नेतृत्व करत आहेत. यापूर्वी त्र्यंबक भारती व त्यांचे पूर्वज ही परंपरा सांभाळत होते. काठ्या परिधान करून ‘सवारी’ साकारली जाते. श्रीराम मठाचा पौराणिक इतिहासाला महत्व श्रीराम मठाची स्थापना शंभू माळी या महंतांनी केल्याची आख्यायिका आहे. त्यांच्या स्वप्नात प्रभू श्रीराम व लक्ष्मण प्रकट होऊन ‘आम्हाला बाहेर काढून प्रसाद द्या’ अशी आज्ञा दिल्यानंतर त्यांनी मठाची स्थापना केली. तेव्हापासून येथे श्रीराम नवमी महोत्सवाची परंपरा सुरू झाली असून ती आजही अखंड सुरू, असल्याचीही अख्यायिका आहे. मठातील ‘गादी’ला विशेष महत्त्व आहे. तसेच, या मठात आजपर्यंत १४ महंतांची समाधी असून, ब्रह्मचर्य व्रत ही महंतपदाची प्रमुख अट आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:50 am

खरात कनेक्शन उघड होताच प्रशासनात खळबळ:पहिल्या अधिकाऱ्यावर कारवाई; चौकशीचा वेग वाढला, थेट मंत्रालयात बदली

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय नेत्यांनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार दिसू लागली आहे. या प्रकरणात मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांची प्रतिनियुक्ती संपवून त्यांची बदली थेट मंत्रालयात करण्यात आली असून, या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातवर शेकडो महिलांचे शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणामुळे आधीच अनेक राजकीय व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागला असून, त्यात रुपाली चाकणकर यांनाही महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे संकेत दिले असून, कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. तपासादरम्यान अभिजीत भांडे पाटील यांचे अशोक खरातशी संबंध असल्याचे समोर आले आहेत. विशेषतः खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावावर असलेल्या जमिनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्याचे आरोप समोर आले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, खरातशी संबंधित इतर काही व्यवहारांमध्येही त्यांचा सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. या कारवाईनंतर महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरातशी संबंधित अनेक व्यवहारांमध्ये काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची चर्चा सुरू असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार वाढत चालल्याचे स्पष्ट होत आहे. काळा पैसा पांढरा केल्याचाही संशय दरम्यान, अशोक खरातच्या फसवणुकीच्या नव्या प्रकारांचाही उलगडा होत आहे. विविध अंधश्रद्धा पसरवत त्याने अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ‘एल्विश हनी’ नावाने विकले जाणारे मध तो चक्क 9 लाख रुपये किलो दराने विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे मध विशेष शक्तिवर्धक असल्याचे सांगत लोकांची फसवणूक केली जात होती. या माध्यमातून मिळालेला पैसा ट्रस्टच्या नावाने वळवून काळा पैसा पांढरा केल्याचाही संशय तपासात व्यक्त केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:49 am

भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा; वित्तीय अट शिथिलचा प्रयत्न करु:28 एप्रिलला सकाळी निघणार‎ शाेभायात्रा, दुपारी महाप्रसाद वाटप‎

सांस्कृतिक कला उत्सवाची उत्सुकता लागलेल्या भगवंत महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते झाले. दि. २१ ते २८ एप्रिल दरम्यान धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी भाविक-कला रसिकांसाठी असणार आहे. दरम्यान भगवंत मंदिर तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्गाचा दर्जा असून २८६ कोटींच्या तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी मंदिर समिती व नगरपालिकेचा ५० टक्के वाट्याच्या वित्तीय आकृतिबंधाची अट शिथिल करुन शासनाने शंभर टक्के रक्कम मंजूर करावी, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे राजेंद्र राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बार्शी नगरपरिषद, श्री भगवंत देवस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी पंचायत समिती व श्री भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत प्रकट दिना निमित्ताने होत असलेल्या महोत्सवाच्या तयारीचा आढावा श्रींच्या मंदिरात घेण्यात आला. महोत्सव कार्यक्रम पत्रिका प्रकाशन सोहळ्यास जि.प.अध्यक्ष दिपक वैदय, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पं.स.सभापती मीनाक्षी रोंगे, बाजार समितीचे सभापती विजय गरड, असिफ तांबोळी, समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, ट्रस्टचे दिलीप बुडूख, डॉ.बी.वाय.यादव, विलास रेणके, रणवीर राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले. .दि. २० व २१ एप्रिल रोजी सोंग भारूड स्पर्धा .दि. २१ रोजी सायंकाळी ६.३० वाजता खेळ पैठणीचा. .दि. २२ एप्रिल सायं.६.३० दि फोक आख्यान .दि. २३ एप्रिल विनोदी नाटक ऑल दि बेस्ट .दि. २४ एप्रिल शिवलिला पाटील यांचे कीर्तन सायंकाळी आनंद शिंदे आणि पार्टी यांची मैफल .दि. २५ एप्रिल सुरीला सिलसिला २६ एप्रिल स्थानिकांची नृत्य, गायन, संगीत मैफल .दि. २७ एप्रिल शिवायन ऐतिहासिक महानाट्य .दि. २८ रोजी पहाटे कीर्तनकार डॉ.जयंवत बोधले महाराज यांचे कीर्तन .सकाळी दिंडी शोभायात्रा, दुपारी महाप्रसाद सायं. ७ वाजता शिवशक्ती बँकेतर्फे दारूकाम यावेळी बोलताना माजी आमदार राजेंद्र राऊत पुढे म्हणाले, नियोजन समितीने तीर्थक्षेत्र आराखड्याला मान्यता देऊन प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. आपल्याला ब वर्ग दर्जा प्राप्त होतोय, पण तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने वित्तीय आकृतिबंधाची अट शिथिल करुन शंभर टक्के २८६ कोटींचा निधी द्यावा यासाठी प्रयत्न आहे. त्यामुळे नगरपालिका व देवस्थान वरील आर्थिक वाट्याचा भार हलका होइल.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:42 am

माढ्यातील नूतन झेडपी, पंचायत सदस्यांचा गौरव:तालुक्याच्या विकासासाठी भरपूर निधी देण्याचे जिल्हाध्यक्ष केदार यांचे आश्वासन‎

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी कोट्यवधीचा विकासनिधी देण्याचा जाहीर सभांमधून दिलेल्या शब्दाची पूर्तता मोठ्या प्रमाणात निधी देऊन करणार असल्याचे वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी वाकाव (ता. माढा) येथे केले. भाजपचे प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आयोजित केलेल्या माढा तालुक्यातील विजयी जि.प. व पं. स. सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून केदार बोलत होते. केदार म्हणाले, माढा तालुक्यात पहिल्यांदाच भाजपला यश मिळाले आहे. माढ्यातील जनता यापुढे शिंदे,सावंत आणि साठे या राजकीय ताकदीला घेऊन भाजपाच्या पाठीशी राहणार आहे. प्रा. शिवाजीराव सावंत यांनी प्रास्ताविकात पूर्व भागातील जनतेने पृथ्वीराज सावंत यांना मोठ्या मतांनी विजयी केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी दादासाहेब साठे यांना पृथ्वीराज सावंतांना जि.प.मध्ये मोठी जबाबदारी देण्याची मागणी चेतनसिंह केदार यांच्याकडे केली. यावेळी प्रकाश कुलकर्णी, नगराध्यक्षा अॅड.मीनल साठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे, गिंताजली देशमुख, कालिदास सावंत, पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, पोपट गायकवाड आदी उपस्थित होत.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:37 am

लव्हे, कंदर पाणीपुरवठा योजनेव्दारे कुर्डुवाडी शहराचा पाणीप्रश्न मिटेल:कुर्डुवाडीतील पाणीटंचाईवर नगरपालिकेत चर्चा, मान्यवरांचा सहभाग‎

कुर्डुवाडी शहराच्या पाणीप्रश्नी कुर्डुवाडी व्यासपीठ आणि नगराध्यक्षा जयश्री भिसे यांची संयुक्त बैठक सोमवारी नगरपालिकेच्या कै. काशीनाथ भिसे सभागृहात झाली. या बैठकीत पूर्वी प्रमाणे लव्हे पाणीपुरवठा आणि कंदर पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा सुरु केल्यास हा पाणीप्रश्न कायमचा मिटवता येणे शक्य असल्याचे कुर्डुवाडी व्यासपीठच्यावतीने सांगण्यात आले. कुर्डुवाडी व्यासपीठाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. विलास मेहता, अध्यक्ष फुलचंद धोका व इतर पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे यांचा सत्कार केला. अध्यक्ष फुलचंद धोका यांनी प्रस्ताविकमध्ये लव्हे व कंदर योजनांमधून पाणीपुरवठा सुधारेल, असा विश्वास व्यक्त करत नगरपालिकेच्या पाठपुराव्यावर भर दिला. डॉ. विलास मेहता यांनी या योजनांचा इतिहास सविस्तर सांगून तीन महिन्यांत समाधान न झाल्यास जनआंदोलनाची हाक दिली, ज्याचे नेतृत्व नगराध्यक्षांनी करावे. प्रा. प्रमोद शहा, अर्जुन गाडे, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब क्षीरसागर यांनी जयश्रीताईंच्या कार्याचे कौतुक करून पाणीप्रश्न लवकर मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्याध्यक्ष संजय डिकोळे, पत्रकार राहुल धोका, सचिव संजय टोणपे, उपाध्यक्ष मधुकर भोसले, किरण गोडसे, शंकर सुतार, राजाभाऊ व्यवहारे, सहसचिव उज्वल पालिया तसेच महिला आघाडी अध्यक्ष जयश्रीताई कारंजकर, उपाध्यक्ष सुवर्णा गवळी, सचिव दीपाताई मदने व शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते. मला मिळालेल्या संधीचे सोने करून कुर्डुवाडीचा ज्वलंत पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. लवकरच ''नगराध्यक्षा आपल्या दारी'' मोहिमेद्वारे नागरिकांचे उर्वरित प्रश्न सोडवीन, असे ठाम आश्वासन नगराध्यक्षा भिसे यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:33 am

अशोक खरातचे कारनामे:माझ्यात दैवी शक्ती आहे म्हणायचा, लघवी पाजून लैंगिक अत्याचार, वाचा 5 एफआयआर

नाशिक येथील भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर 5 रिकाम्या पुंगळ्या, वाघाचे कातडे आणि कस्तुरी सापडल्याने त्याने 5 नरबळी दिल्याचा व शिकार केल्याचा दाट संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. खरातला मंगळवारी न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. खरात महिलांना माझ्यात दैवी शक्ती आहे म्हणायचा, लघवी पाजून तो त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, त्याच्याविरोधात महिलांनी 5 एफआयआर केल्या आहेत. नेमके काय म्हटलंय FIR मध्ये पाहूयात… तांब्याच्या बाटलीतील पाणी देऊन केले अत्याचार नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल एफआयआरमध्ये म्हटले आहे की, अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते 18 मार्च 2026 रोजीचे दरम्यान ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलावून ती एकांतात कार्यालयात असताना तिस तांब्याचे बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांचेशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरातने गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला तसेच जर फिर्यादीने अशोक खरात याचे सांगणेप्रमाणे धार्मिक विधीस नकार दिल्यास तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझे मुलांचे बरेवाईट होईल असा दम दिला. अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिलेले होते. धार्मिक विधीच्या नावाखाली बलात्कार, लघवीही पाजली सरकारवाडा पोलिस ठाण्यात बीएनएस 64(1), 74, 351 (2) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधाचा अधिनियम 2013 चे कलम 3 (1) (2) नुसार दुसरा गुन्हा दाखल झाला. त्यानुसार माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे खरातने फिर्यादीच्या पत्नीस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलावून तिचे पोटावर, छातीवर हात फिरवून तिच्या XXत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला तसेच तिचे कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली, त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराचे अकाउंटवर पैसे घेतले. मिरगाव, ता. सिन्नर येथील मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केला. ‘माझ्यामध्ये दैवी शक्ती’ असे म्हणत शरीराला स्पर्श केला तिसरा गुन्हाही सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे त्यानुसार 7 ऑक्टोबर 2024 ते 12 ऑक्टोबर 2024 या दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरातला भेटण्यासाठी गेले असताना त्या वेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून, फिर्यादीला एकटीला थांबवून, तिच्या हातावर एक काळा दगड फिरवून, तिच्या कानात मंत्र पुटपुटून, तिच्या डोक्यावर-पाठीवर हात फिरवून, तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तू घाबरू नको, तू माझ्या आवारामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे. मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे. मी तुझी शुध्दी केली आहे. तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल, असा दम दिला आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. ‘मी देवाचा अवतार’ अशी थाप ठोकत होता नराधम खरात बीएनएस 64(1), 74, 75 351(2) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोण्याला प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 3(1) (2) नुसार दाखल गुन्ह्याचा तपशील असा : एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलावून, तिला तांब्याचे भांड्यातील पाणी पिण्यास देऊन, पेढा खाण्यास देऊन, तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन, तिच्याशी शारीरिक लगट करून, तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून, मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुध्द झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही, असा दम दिला. मला नकार दिला तर तुझे वाईट होईल, अशा धमक्या नराधम खरातविरुद्ध नाशिक येथे दाखल करण्यात आलेल्या त्यातील पाचव्या तक्रारीचा तपशील असा : जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हीस बोलावून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुध्दी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांचे जिवाचे बरेवाईटदेखील होईल अशी भीती दाखवून, ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात बोलावून, तिला मिठाई खाण्यास देऊन, तिच्या पाठीवर-शरीरावर हात फिरवून, कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने बलात्कार केला वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. खरातविरुद्ध बीएनएस 64(1), 75 351(2) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 चे कलम 3 (1) (2) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:25 am

अन्नछत्र मंडळात लाखभर भाविकांनी घेतला महाप्रसाद:स्वामी समर्थ प्रकट दिनासह सलग सुटी आल्याने अक्कलकोटमध्ये दर्शनासाठी होती गर्दी‎‎

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात गुढी पाडवा, प्रकट दिन आणि शनिवार व रविवारची सलग सुटी आल्याने स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. चार दिवसात अन्नछत्र मंडळात सुमारे लाखभर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामी प्रकट दिन दोन सुटीला लागून आल्याने नोकरदार भाविकांना स्वामी मंदिरात दर्शनासाठी येता आले नाही. शनिवार, रविवार सलग प्रशासकीय कामकाजाला सुटी मिळाल्याने शनिवार व रविवारी भाविकांनी गर्दी केली. शुक्रवारी रात्री अक्कलकोट मुक्कामी येऊन भाविक सकाळी स्वामींच्या दर्शन करून शनिवारी गाणगापुर, तुळजापूरला दर्शनासाठी जात असल्याचे दिसले. अक्कलकोट तीर्थक्षेत्र भाविकांनी फुलुन गेले. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविक अन्नछत्र मंडळात महा प्रसादासाठी गर्दी करत होते. येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंह भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळ परिसरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांच्या गजराने नगरी दुमदुमली सकाळ पासूनच दर्शनरांग लांब पर्यंत गेली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषाने वटवृक्ष मंदिर परिसर व अन्नछत्र मंडळ परिसर व अक्कलकोट नगरी दुमदुमली होती. मंदिर प्रशासन व नगरपालिका व पोलिस प्रशासनाचे गर्दी नियोजनासाठी सतत प्रयत्न सुरु होते. मंदिर परिसरात अडथळे उभे केल्याने वाहनांची कोंडी झाली नाही. समाधी मठ, राजेराय मठ, शिवपुरी आदीसह सर्व ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मैंदर्गी रोडवरून अन्नछत्र मंडळ प्रांगण, कमलाराजे चौक परिसर, मल्लिकार्जुन मंदिर बस स्थानक, समाधी मठ, हत्ती तलाव परिसर, विरक्त मठ परिसर आदी ठिकाणी पार्किंग होते. सर्व पाचही पार्किंगवर व्यवस्था केली. अन्नछत्र मंडळात व श्री स्वामी मंदिरात दिव्यांग भाविकांसाठी व्हील चेअरची सोय केली होती. त्यामुळे दिव्यांग भाविकांची सोय झाली.याशिवाय पार्कींगसाठी शहरात चोख व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुक कोंडी यंदा जाणवली नाही. ^श्री स्वामी मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच वाढती गर्दी लक्षात घेऊन स्त्री व पुरूषांच्या स्वतंत्र अशा दोन रांगा करुन दर्शनासाठी सोडले. दर्शन वेळ २२ तास करण्यात आल्याने गर्दी नियंत्रण शक्य झाले. महेश इंगळे, अध्यक्ष, वटवृक्ष देवस्थान.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:18 am

पालखीसह शिर्डी येथे जाणाऱ्या साई भक्तांची 26वर्षांपासून 8दिवस सेवा:कोऱ्हाळे येथील श्री. साई मंदिरच्या सेवकांचा साई सेवेचा समाजासाठी आदर्श‎

शिर्डी येथील श्रीराम नवमी उत्सवानिमित्त मुंबईहून येणाऱ्या पायी श्री साई पालखीत चालणाऱ्या साई भक्तांची सलग आठ दिवस पायाची मालिश करून तसेच प्राथमिक औषधोपचाराची सेवा देणाऱ्या कोऱ्हाळे येथील श्री. साई मंदिरच्या सेवकांनी साई सेवेचा समाजासाठी आदर्श निर्माण केला आहे. श्री साई मंदिर,कोऱ्हाळेचे साई सेवक सदाभाऊ घोडे हे आपल्या आईच्या इच्छेनुसार हा उपक्रम गेल्या २६ वर्षांपासून राबवत आहेत. राहाता तालुक्यातील श्री.साई मंदिर,कोऱ्हाळेचे सेवक सदाभाऊ घोडे म्हणाले, माझ्या मातोश्री यांनी १९९९ वर्षी रस्त्यावर साई पालखीतील साईभक्त पायाला जखम झाल्याने शिर्डीला साई दर्शनासाठी पुढे जाऊ शकत नव्हते . यावेळी आईने मला त्या साईभक्तांवर उपचार करण्यास सांगितले. उपचारानंतर साईभक्त शिर्डीला मार्गस्थ झाले. ही प्रेरणा घेऊन सन २००० पासून मी व माझे कुटुंबीय, कोऱ्हाळे गावातील तरुण दरवर्षी रामनवमी व गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डी येथे श्री साई दर्शनासाठी मुंबई, ठाणे आदी ठिकाणावरून येणाऱ्या पालखीतील साई भक्तांची ठाण्यापासून ते शिर्डी जवळील पाथरे गावापर्यंत आठ दिवस रोज ठिकठिकाणी थांबून दिवसरात्र साईभक्तांच्या पायाची मालिश, प्राथमिक औषधोपचार करून आईच्या इच्छेचा आदर व साईच्या सेवेचा आनंद घेत आहोत. श्री साईबाबांनी दिलेला दीनदुबळ्यांची सेवा करा हा संदेश स्वीकारून आम्ही अगदी मनापासून हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाची सांगता पाथरे गावात करण्यात आली. यावेळी साई मंदिर कोऱ्हाळे यांच्या वतीने राहाता तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, पत्रकार विकास अंत्रे व उपस्थित बांधवांच्या हस्ते साई सेवकांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सचिन भारस्कर, सोमनाथ गोधडे, अंकुश दरंदले, नवनाथ दरंदले, संतोष भांबरे, सोमनाथ तासकर,बाबुराव वैद्य,सोमनाथ डांगे,राहुल गोधडे ,भीमराज वैद्य,संकल्प वैद्य आदी उपस्थित होते. श्री साई मंदिराचे सचिव वसंत खरात म्हणाले, आम्ही सर्वजण एकजुटीने एक मताने हा सेवेचा उपक्रम राबवतो. यासाठी गावातील तसेच परिसरातील साई भक्तांचा मदतीचा हात नेहमी असतो. हा उपक्रम सातत्याने चालू ठेवण्याचा आमचा सर्वांचा निर्धार आहे. साईभक्त उपक्रमाचे कौतुक करीत आशीर्वाद देतात कोऱ्हाळे गावातील ४० ते ५० तरुण आपला नित्य व्यवहार आठ दिवस बंद ठेवून या सेवेत सहभागी होतात. मालिश केल्यानंतर थकवा रहित झालेले साईभक्त आमच्या या उपक्रमाचे कौतुक करीत आम्हाला आशीर्वाद देतात हा आशीर्वाद त्यांच्या रूपाने श्री साईबाबाच आम्हाला देत आहेत याची प्रचिती आम्हाला येते, असे सदाभाऊ घोडे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:03 am

धार्मिक गीते, मंत्रोच्चारात रंगला गणगौर, शिव पार्वती विवाह सोहळा:आपल्या रूढी परंपरा नव्या पिढीकडे जाण्यासाठी असे सोहळे ठरतात उपयुक्त :पेमराज बोथरा‎

राजस्थानी समाजात मोठे महत्त्व असलेली गणगौर पूजा व शिव पार्वती विवाह पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात नगरच्या बडीसाजन ओसवाल श्री संघाच्या वतीने पार पडला. अहिल्यानगरच्या श्री बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रोच्चारात, धार्मिक गीतांच्या तालातील नृत्याने भक्तिपूर्ण वातावरणात गणगौर पूजन व भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा साजरा करण्यात झाला. राजस्थानच्या पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या सोहळ्यात महिलांनी परिधान केलेले पारंपरिक पोशाख व पारंपरिक गाण्यांवरील गरबा नृत्याने बडीसाजन मंगल कार्यालयात जणू राजस्थानच अवतरल्याचे चित्र निर्माण झाले. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात समजतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी होत इसर-गौरा (शिव पार्वती) मुर्त्यांचे पूजन करून सुखी संसारासाठी प्रार्थना केली. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी खास विविध उपक्रम व पारंपरिक गेमचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठलदास बाफना यांच्या निवासस्थानापासून उंची वस्त्रांनी व अलंकारांनी सजवलेल्या इसर व गौरा यांच्या मुर्त्यांची वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुका मोठ्या संख्येने समजतील नागरिक व महिला सहभागी झाल्या. बडीसाजन मंगल कार्यालयात ही मिरवूक आल्यावर येथे विधिवत मंत्रोच्चारात इसर-गौरा (शिव पार्वती) मुर्त्यांचे पूजन करून मंगलाष्टक, फेरे, वरमाला आदी विधींनी पारंपरिक पद्धतीने विवाह संपन्न करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनीसह बडीसाजनच्या पदाधिकाऱ्यांनी राजस्थानी गीतांवर ताल धरत विवाह सोहळ्याचा आनंद लुटला. पूजेचे यजमानपद मनीषा बोथरा व पेमराज बोथरा यांच्यासह ५ नव दाम्पत्यांनी भूषवले. श्रुती बाफना यांनी मुर्त्यांच्या वस्त्रांनी व अलंकारांनी सजावट केली. पेमराज बोथरा म्हणाले, राजस्थानी समाजात गणगौर उत्साहावास मोठे महत्त्व आहे. दरवर्षी बडीसाजन ओसवाल श्री संघातर्फे हा सोहळा मोठ्या उत्सहात व भक्तिभावाने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा करून परंपरा व संस्कृतीचे जतन केले जात आहे. आपल्या रूढी परंपरा नव्या पिढीकडे जाण्यासाठी असे सोहळे उपयुक्त आहेत.या सोहळ्यास श्री बडीसाजन ओसवाल श्री संघाचे उपाध्यक्ष अजित कर्नावट, सेक्रेटरी विशाल शेटिया, सहसेक्रेटरी अनिल लुंकड, खजिनदार मिलिंद जांगडा व सहखजिनदार दीपक बोथरा, कार्यकारणी सदस्य धरमचंद कोठारी, राजेंद्र ताथेड, सुमतीलाल कोठारी, राजेंद्र बोथरा, नरेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:02 am

अफवांचे पेव:ग्राहक गॅस'वरच, पेट्रोल संपण्याच्या भीतीने पंपांवर लागल्या रांगा, घरगुती गॅसची जिल्ह्यात मागणी तेवढाच पुरवठा

शहरात घरगुती गॅस टंचाई नसल्याचा दावा केला जात असताना अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी गॅस भरण्यासाठी ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. त्यातच सायंकाळ नंतर शहरासह जिल्ह्यातील बहुतांशी पेट्रोल पंपावरदेखील पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी देखील ग्राहक रांगेत होते. दरम्यान सध्या ग्राहकांच्या मागणीनुसारच गॅस सिलेंडर मिळत आहेत. दोन आठवड्यापूर्वी मागणीच्या तुलनेत ३० टक्के अधिक गॅस मिळत होता. गेल्या काही दिवसापासून घरगुती गॅस भरण्यासाठी ग्राहक गॅस एजन्सीसमोर रांगा लावत आहेत. मंगळवारी तपोवन रोड येथील एका एजन्सीसमोर गॅस घेण्यासाठी लांबलचक रांग लागली होती. तीच परिस्थिती सोमवारी नव नागापूर परिसरातील बोल्हेगाव येथील पेट्रोल पंप समोर गॅस भरण्यासाठी रिक्षाचालकांची लागली होती. प्रशासनाकडून एकीकडे घरगुती गॅस टंचाई नसल्याचा दावा केला जात असताना शहरात मात्र गॅस घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा कायम आहेत. गेले पंधरा दिवसांपूर्वी ४० हजार सिलेंडरची मागणी होती. त्या कालावधीत ७० हजार सिलेंडर मिळत होते. सध्या जी मागणी आहे. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडर मिळत आहे. अहिल्यानगर शहरात घरगुती गॅसची टंचाई नाही ^ सध्या शहरात कुठलीही घरगुती गॅसची टंचाई नाही. उद्योगांना पीएनजी गॅस पुरवठा करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहे. अहिल्यानगरला चाकण, शिक्रापूर, मनमाड येथून गॅस पुरवठा होतो. डॉलरच्या किमती वाढल्याने पेट्रोल पंप चालकांचे क्रेडिट कंपन्यांनी बंद केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पंपावर रांगा लागलेल्या असू शकतात. -हेमा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी. जिल्ह्यातील ४०० पैकी १५० पंपांवर इंधनसाठा नाही ^ डिझेल व पेट्रोलबाबत अफवा निर्माण झाल्याने पंपांवर गर्दी उसळली आहे. इंधन पुरवठा कंपन्यांकडून सुरळीत आहे. पण पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. सहकार्य मिळाले तर १२ तासांत पुरवठा सुरळीत होऊ शकते. जिल्ह्यातील ४०० पैकी जवळपास १५० पंपांवर इंधनसाठा शिल्लक नाही. पेट्रोल व डिझेलसाठा पुरेसा आहे की नाही, याबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण दिले जात नसल्यामुळे पेट्रोल पंप चालक व नागरिक देखील संभ्रमात आहे. नागरिकांनी संयम ठेवून पेट्रोल पंप चालकांना सहकार्य करावे. - डॉ. स्वाधीन गाडेकर, अध्यक्ष पेट्रोल असोसिएशन, अहिल्यानगर.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 8:01 am

अपघातग्रस्तांनी साईभक्तांत पाहिला देव, तिघांना जीवदान:दोन दुचाकींच्या धडकेत जखमी झालेल्या युवकांच्या मदतीला धावले पालखीतील भक्त‎

शिर्डी ईश्वराच्या भेटीसाठी निघालेली पावले जेव्हा संकटात सापडलेल्या माणसांच्या मदतीसाठी धाव घेतात, तेव्हा खऱ्या अर्थाने ‘माणुसकी’चे दर्शन घडते. रविवारी रात्री धामणगाव-कवडदरा ( सिन्नर) मार्गावर घडलेल्या भीषण अपघातात भटवाडी साईदर्शन सेवा संस्थाच्या पदयात्रींनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तीन जखमी तरुणांना अक्षरशः जीवदान मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव-कवडदरा मार्गावर दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की तीन तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अंधाराची वेळ, निर्जन परिसर आणि मदतीचा अभाव यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. याच वेळी धामणगाव मार्गावरून साईदर्शनासाठी निघालेल्या पदयात्रींची दिंडी तेथे पोहोचली. टाळ-मृदुंगाच्या गजरात चालणारी ही दिंडी क्षणात थांबली आणि भक्तांनी कोणताही विलंब न करता मदतकार्याला सुरुवात केली. दिंडीत सहभागी असलेले डॉ. जयेश सरमळकर यांनी तत्काळ जखमींची पाहणी करून प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर साईपालखीसोबत असलेल्या रुग्णवाहिकेतून मोहन वामन व जितेंद्र हरमळकर यांनी जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवले. विभागप्रमुख दिपकबाबा हांडे, गुरुनाथ सामंत, सिद्धू मांजरेकर, प्रतिक जाधव, सागर गायकवाड, करन पायमोडे, शेखर नाईक आदींनी रुग्णालयात पोहोचून पुढील उपचारासाठी आवश्यक ती मदत केली. जखमींना वेळेत उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. एसएमबीटी रुग्णालय प्रशासनानेही या कार्याचे कौतुक करत सांगितले की, रुग्णवाहिका योग्य वेळी पोहोचल्यामुळे जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाले. या तत्परतेमुळेच त्यांचे प्राण वाचू शकले.' या प्रसंगामुळे भटवाडी साईदर्शन सेवा संस्थेच्या पदयात्रींचे सर्वत्र कौतुक होत असून, मुंबईहून शिर्डीकडे येणाऱ्या विविध पालख्यांमध्येही या कार्याचा अभिमान व्यक्त केला जात आहे. वेग नियंत्रणात न आल्याने दुचाकींची जोरदार धडक रात्रीचे ८ वाजता घोटी–सिन्नर रोडवर अंधार पडलेला आणि रस्त्यावर खडी होती. आम्ही पालखीसोबत शिर्डीकडे जात होतो. दोन मोटरसायकली समोरासमोर आल्या. वेग नियंत्रणात न आल्याने जोरदार धडक झाली. एकाच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली, तर दुसऱ्या बाईकवरील दोघांच्या पायाला जबर मार लागून फ्रॅक्चर झाले. आम्ही जखमींवर पालखीतील अॅम्बुलन्स आणि डॉक्टरांना बोलावून प्राथमिक उपचार केले. वीस मिनिटांत त्यांना एसएमबीटी रुग्णालयात दाखल केले. - प्रतीक जाधव , ( घाटकोपर) मुंबई, साईपालखीतील भाविक.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:58 am

पारनेरमधील अत्याचार प्रकरणातील चार आरोपी अटकेत:राज्यस्तरीय पाठपुराव्यानंतर तपासाला वेग

पारनेर तालुक्यातील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींवरील अत्याचार प्रकरणात पारनेर पोलिसांनी कारवाई करत चार आरोपींना अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या सहावर पोहोचली. उर्वरित आरोपी अद्याप फरार असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ओमिनी कारही पोलिसांनी जप्त केली. वैभव पोपट लोंढे, प्रथमेश शंकर लोंढे, रोहित संजय चत्तर व विशाल अनिल हुलावळे या चार आरोपींना पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. यापूर्वी ११ मार्च रोजी प्रसाद संदीप साळवे व अनिल ऊर्फ गुंड्या किशोर साळवे या दोघांना अटक केली होती. या सर्व आरोपींनी अल्पवयीन मुलींना धमकावून, फसवून तसेच जबरदस्तीने विविध ठिकाणी नेऊन गैरवर्तन केल्याचे आरोप आहेत.गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन आरोपींना अटक झाली असली तरी त्यानंतर तपासात दिरंगाई होत असल्याने परिसरात संतापाची भावना होती. इतर आरोपी मोकाट फिरत असल्याने नागरिकांत अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा संघटनेच्या राष्ट्रीय निरीक्षक जयश्री घावटे ठुबे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला. त्यांनी स्थानिक पोलिसांपासून ते जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत संपर्क साधत कारवाईची मागणी केली. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाची दखल घेतल्यानंतर प्रशासन हालचालीत आले. प्रकरणातील नव्या घडामोडी समोर आल्या आणि आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत वेगवान कारवाई सुरू केली. या कारवाईत चार आरोपींना जेरबंद करण्यात आले.तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती ओमिनी कार जप्त करण्यात आली. ही कार अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. वाहन जप्त झाल्याने तपासासाठी महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फोटो हस्तगत करण्यासाठी आरोपींना तीन दिवस कोठडी अटकेतील आरोपींना पारनेर पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले. तपासी अधिकारी उपनिरीक्षक रंजित मारग यांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून त्यात फोटो नाहीत, त्यामुळे फोटो इतरत्र कोठे आहेत, ते शोधण्यासाठी तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपींच्या वतीने ॲड. महेश तवले व ॲड. संजय दुुशिंग यांनी कोठडीला विरोध दर्शवला. न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलिस कोठडी सुनावली.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:58 am

अफवांचा बाजार ! पेट्रोल, डिझेलसाठी पंपावर रांगा:पंपचालक म्हणतात, पेट्रोल, डिझेलची टंचाई नाही‎

राहुरी तालुक्यात पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांचे पेव फुटले आणि पंपावर एकच गर्दी दिसू लागली. पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या. तर काही पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल हातोहात विकले गेल्याने पेट्रोल पंप सायंकाळी बंद करावे लागले. दुचाकीसाठी प्रत्येक दुचाकी धारक कमीत कमी ५०० रुपये, तर टाकी ओव्हर लोड करतांना दिसून आले तर डिझेल साठी मोठ्या साधनांनी तर काही मोठे ड्रम घेऊन डिझेलचा शोध घेत होते. श्रीरामपुर तालुक्यात पेट्रोल पंपावरील पेट्रोल डिझेल संपल्याची अफवा पसरल्याने तालुक्यातील विविध गावातील पंपावर दुपारी ३ नंतर एकच गर्दी दिसून आली. भल्या मोठ्या रांगेत दुचाकी आणि चारचाकी वाहने पेट्रोल पंपावर गर्दी करताना दिसून आले मात्र त्यानंतर ही गर्दी वाढत जाऊन पंपवरील असणारा साठा संपुष्टात आल्याचे दिसून आले. याबाबत काही पंपाच्या व्यवस्थापनाकडे माहिती घेतली असता पेट्रोल अथवा डिझेल याबाबत टंचाई नाही मात्र काही लोकांनी अफवा केल्याने तालुक्यात हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:56 am

अवैध मद्यासह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त:राज्य उत्पादन शुल्क विभागाची येवला-इगतपुरी तालुक्यात धडक कारवाई‎

येवला राज्य उत्पादन शुल्काच्या येवला विभागाने अवैध मद्य वाहतूक व विक्री विरोधात मोठी कारवाई करत सुमारे २७ लाख ८० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत वैभव संतोष आहेर, सदू सावजी पारधी, बाबू सोबन चोथा या तिघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दि. १७ मार्च रोजी पथकाने य तालुक्यातील रेंडाळे येथे संशयित वाहनाची तपासणी केली असता वाहनातून बनावट विदेशी मद्याच्या १८० मि.ली. क्षमतेच्या सुमारे ४८० बाटल्यांचा साठा जप्त केला होता. त्यातील संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील चौकशीनंतर पथकाने रविवारी (दि. २२) नाशिक व पालघर जिल्ह्याच्या सीमेवरील इगतपुरी तालुक्यातील वैतरणा जलविद्युत प्रकल्प परिसरात वैतरणा अळवंडी धारणक्षेत्रात सापळा रचला. या ठिकाणी ३७ बॉक्स मद्य व पिक अप वाहन असा असा एकूण १९ लाख ५० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. येवला विभागाचे दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिनिधी | नामपूर बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर व सालोटा किल्ल्यांवर लागलेल्या आगीत सुमारे दहा हेक्टरहून अधिक जंगल जळून खाक झाले असून, वन विभागाने दोन अल्पवयीन संशयित मुलांना ताब्यात घेतले आहे. सालोटा किल्ल्यावर आग लागल्यानंतर ती शेजारील साल्हेर किल्ल्याकडे वाघंबा बाजूने पसरली. प्राथमिक माहितीनुसार, किल्ल्यावर फिरायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडून विडी ओढल्यानंतर जळती काडी निष्काळजीपणे फेकण्यात आल्याने आग लागल्याचा संशय आहे. वन विभागाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना वन कोठडीत ठेवण्यात आले आहे. मालेगावचे सहाय्यक उपवनसंरक्षक शेखर तनपुरे आणि ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक पंचांसमक्ष पंचनामा केला. किल्ला परिसरात निष्काळजीपणा टाळण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. ^वनविभागाने संबंधित संशयितांना तातडीने ताब्यात घेऊन वनकोठडी दाखवली आहे. जंगल परिसरात अशा पद्धतीने कोणी गैरप्रकार केल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात येईल. - शेखर तनपुरे, उपवनसंरक्षक वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर महसूल विभागाने जप्त केला आहे. चर्चगेट परिसरात सोमवारी सकाळी केलेल्या कारवाईत ५२ हजार ५०० रुपये किमतीची साडेसात ब्रास वाळू व ३५ लाखाचा डंपर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कजवाडे येथील डंपर मालक सुदर्शन भिला कापडणीस व एकनाथ रतन मोहिते हे दोघे स्वत:च्या आर्थक फायद्यासाठी डंपरमध्ये अवैधरित्या वाळू भरुन चोरट्या पद्धतीने वाहतूक करत होते. महसूल विभागाने छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी तलाठी आरती गोपाळे यांच्या फिर्यादीवरुन कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:52 am

अध्यात्माची जोड विद्यार्थ्यांना यशापर्यंत नेईल:मानूर येथे भारुडकार गायकवाड यांचा उपदेश

आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जेदार शिक्षणाची गरज निर्माण झाली असून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर अध्यात्माची, ध्यानधारणेची जोड मिळाली तर विद्यार्थी यशस्वी होतील, असा उपदेश गोविंद महाराज गायकवाड यांनी केला. तालुक्यातील मानूर येथे डॉ जे. डी. पवार यांनी स्वखर्चाने बांधलेल्या नागरी शैलीतील गुरुदेव दत्त मंदिराच्या कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त झालेल्या भारूडात गोविंद महाराज गायकवाड बोलत होते. व्यासपीठावर डॉ. जे. डी. पवार, मीनाक्षी पवार, शैलेश पवार, अनुप पवार, चैताली पवार आदी उपस्थित होते. आजचे निसर्गचित्र वाचवण्यासाठी वृक्षारोपणाची आणि वृक्ष संवर्धनाची गरज आहे. तरुणांकडून देशाला महासत्तेपर्यंत नेण्यासाठी तरुणांमधील वाढलेली व्यसनाधीनता कमी करून त्यांना आपल्या संस्कृतीची शिकवण देण्याची गरज आहे. त्याशिवाय घरातील आई-बापाचे महत्व कमी करून स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्यांना सुसंस्कृत बनवण्याची आणि आई वडिलांनाच प्रथम गुरुस्थानी ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी गायकवाड यांनी विविध वेशभूषा करून विविध विषयांना हात घालत आजचे सामाजिक चित्र उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभे केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक जे. एल. पटेल, सूत्रसंचालन अजिंक्य पाटील यांनी केले तर आभार अस्तित्व पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ३ हजार भाविक, संस्थेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:51 am

नांदूरशिंगोटेसह मानोरी, कणकोरी, नळवाडीत उद्या पालखी मिरवणूक:श्रीरामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; मंदिरांवर रोषणाई‎

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेसह मानोरी, कणकोरी, नळवाडी परिसरात श्रीरामनवमीनिमित्त गुरुवारी (दि. २६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम मंदिरात कीर्तन, पालखी मिरवणूक आणि महाप्रसाद यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, गाभाऱ्याची सुंदर सजावट करण्यात आली आहे. मुंबईस्थित हमाल मंडळ व ग्रामस्थ गेल्या ३८ वर्षांपासून साईनाथ महाराज यात्रा उत्सव साजरा करत आहेत. यानिमित्त मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, श्रीराम व साईनाथ महाराज मंदिरात गुलाबपुष्पांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता साईबाबा मंदिरात अभिषेक, महापूजा व सत्यनारायण पूजा होणार आहे. सकाळी आठ वाजता साईबाबा पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येणार असून, सकाळी दहा वाजता रेणुका मातेच्या पटांगणात बंडोपंत महाराज ढाकणे (परळी वैजनाथ) यांचे कीर्तन होईल. त्यानंतर आरती होणार असून, दुपारी बारा वाजता विठ्ठल मंदिरात रामजन्मावर भजनी मंडळ विविध कार्यक्रम सादर करणार आहे. तसेच मंदिर परिसरात भाविकांना साई भंडाऱ्याचा (महाप्रसाद) लाभ दिला जाणार आहे. मानोरी येथे श्रीरामनवमीनिमित्त तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिरात गेल्या १६ वर्षांपासून रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते. गुरुवारी सकाळी दहा वाजता अकुंश महाराज वडनेरकर यांचे, तर सायंकाळी सात वाजता भागवताचार्य पूनमताई वारुंगसे यांचे कीर्तन होणार आहे. शुक्रवारी (दि.२७) सकाळी दहा वाजता वैष्णव महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. सायंकाळी सात वाजता साईपालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, शनिवारी (दि.२८) सकाळी सात वाजता शिर्डीकडे पायी दिंडी प्रस्थान होणार आहे. कणकोरी येथेही श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता योगेश महाराज आव्हाड, तर रात्री नऊ वाजता सोमनाथ महाराज तांदळे यांचे कीर्तन होणार आहे. नांदूरशिंगोटे येथे श्री रेणुकामाता, विठ्ठल रुक्मिणी, साईनाथ महाराज, श्रीराम, दत्तात्रय महाराज व खंडेराव महाराज अशी सहा मंदिरांचे एकत्र संकुल असून, परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री ही रोषणाई संपूर्ण परिसराला भक्तिमय व उत्सवी वातावरण प्रदान करत असून, भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. मंदिरांच्या गाभाऱ्यांमध्येही फुलांनी व विविध सजावटींच्या माध्यमातून देखणे रूप देण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:50 am

लासलगावमध्ये रेबीज लसीचा तुटवडा‎:त्वरित लस उपलब्ध न झाल्यास ग्रामीण रुग्णालयामध्ये मोकाट कुत्रे सोडण्याचा इशारा‎

येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून रेबीज लस उपलब्ध नसल्याने कुत्रे चावलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात मोठा खर्च सोसावा लागत आहे. या गंभीर प्रश्नावर विंचूर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, विंचूर उपकेंद्रात रेबीज लस आणि डॉक्टरांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. रेबीज लस तातडीने उपलब्ध न झाल्यास ग्रामीण रुग्णालयात मोकाट कुत्रे सोडणार असल्याचा इशारा देण्यात आला . नगरपालिकांच्या वतीने मोकाट कुत्रे पकडून ते बेवारसपणे अनेक गावांच्या हद्दीत सोडले जातात. त्याचाच परिणाम लासलगाव व विंचूर शहरात दिसून येत असून, मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. अनेक नागरिकांना मोकाट कुत्रे चावा घेत आहेत. परिणामी, त्यांना ग्रामीण रुग्णालयात जाऊन औषधोपचार करावा लागत आहे. मात्र, सध्या रेबीज औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात रुग्णांना पाठविले जात असल्याचा आरोप त्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. विंचूरची वाढती लोकसंख्या पाहता येथील उपकेंद्रात तसेच लासलगाव ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असावी. विंचूर उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर आणि परिचारिका २४ तास उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विंचूर ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोरे यांनी केली आहे. ^लासलगाव ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नाही. रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जाते. त्वरित लस या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा ग्रामीण रुग्णालयात मोकाट कुत्रे सोडून आंदोलन केले जाईल. - राजेंद्र मोरे, ग्रामपालिका सदस्य विंचूर ^लासलगाव ग्रामीण रुग्णालयात मध्यंतरी तीन दिवस रेबीज लस उपलब्ध नव्हती. नाशिक जिल्हा रुग्णालयातून रेबीज लस उपलब्ध झाली आहे. ज्या प्रमाणात पुरवठा होईल, त्या प्रमाणे रुग्णांना लस दिली जाणार आहे. - डॉ. बाळकृष्ण अहिरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, लासलगाव

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:49 am

सोलर यंत्रणेमुळे कोथळेत पाणीटंचाई दूर‎:जेएसडब्ल्यू फाऊंडेशनतर्फे सोलर वॉटर पाईपलाईन; ग्रामस्थांना दिलासा‎

शहापूर तालुक्यातील कोथळे गावातील दीर्घकालीन पाणीटंचाई आता दूर झाली आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने गावाजवळील विहिरीत सोलर यंत्रणेच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू केला. या उपक्रमामुळे महिलांचा त्रास कमी झाला असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून कोथळे गावातील महिलांना पाणी आणण्यासाठी दररोज सुमारे दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. याचा फटका शाळकरी मुलींनाही बसत होता, तर वृद्ध महिलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून जेएसडब्ल्यू फाऊंडेशनने पुढाकार घेत सोलर वॉटर पाईपलाईनचा अभिनव उपक्रम राबवला. गावापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील विहिरीतील पाणी सोलर यंत्रणेद्वारे गावाजवळील विहिरीत आणण्यात आले. या उपक्रमामुळे कोथळे गावातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात दूर झाली असून, विशेषतः महिलांचा त्रास लक्षणीयरित्या कमी झाला आहे. या विकासकामाचे उद्घाटन शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्लांट हेड सातपाल सिंग, महाजन, शिवाजी ढसाळ, सरपंच देवराम वीर, सोमनाथ वाख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कालभोंडे ग्रामपंचायत अंतर्गत लादेवाडी येथे सामाजिक सभागृह आणि अंगणवाडीची दुरुस्ती देखील जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यामुळे गावकऱ्यांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सुविधा उपलब्ध झाल्या असून, लहान मुलांना अंगणवाडी सेवांचा लाभ घेणे अधिक सोयीचे झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:45 am

आत्महत्या करून जीवन वाया घालवू नका- शास्त्री महाराज:बोरगाव अर्ज येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम

येथे श्रीराम नवमी व हनुमान महाराज जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीतप्रधान हनुमान चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कथा प्रवक्ते ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेवगावकर हे आपल्या अमृतमय वाणीतून हनुमान चरित्राचे निरूपण करणार आहेत. येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात मागील १९ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंडपणे सुरू असून, याही वर्षी गुरुवार (२६ मार्च) पासून सप्ताहास प्रारंभ होणार आहे. गुरुवार (२ एप्रिल) रोजी ह.भ.प. रामेश्वर महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे. सप्ताहादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दररोज पहाटे ५ ते ७ काकडा भजन, सकाळी ११ ते सायंकाळी ५ संगीतप्रधान हनुमान चरित्र कथा, सायंकाळी नित्यनेम हरिपाठ तसेच रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकीर्तन होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आहे. प्रतिनिधी | फुलंब्री परमेश्वराने आपल्याला अनमोल असे जीवन दिले आहे. मात्र, काही लोक नैराशात गेले की आत्महत्या करून अनमोल जीवन वाया घालवतात. तुम्हाला जर कधी नैराश्य आले असेल तर फक्त एक तास शांत बसून हरिनामाचा गजर करावा. हरी नामामध्ये खूप मोठी शक्ती आहे, असे प्रतिपादन एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांनी येथे केले. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे गुढीपाडव्यापासून भव्य कीर्तन सोहळ्यास सुरुवात झाली असून, शुक्रवार (२० मार्च) रोजी आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करा, तीच खरी भक्ती असून, प्रामाणिकपणे जर तुम्ही तुमचे काम करत राहिले तर तुम्हाला कधीच कमी पडणार नाही. सध्याचे तरुण व्यसनाधीन झाले असून, त्यांना आई-वडिलांचा विसर पडला आहे. जो आई-वडिलांची सेवा करेल त्याला परमेश्वर कधीच कमी पडू देणार नाही. तरुणांनी आई- वडीलांची सेवा करावी, जीवनात कितीही अपयश आले तरी खचून जाऊ नये.अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे पुन्हा नव्या ताकदीने आणि जिद्दीने यशासाठी प्रयत्न करावेत. नैराश्य आले तरी आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये. जीवन एकदाच मिळते.त्यामुळे नैराश्य आले तर हरी नामाचा जप करावा, त्यामुळे नैराश्य दुर होण्यास मदत होते, असेही एकनाथ महाराज यांनी सांगितले. यावेळी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होेती. सप्ताहानिमित्ताने बोरगालव अर्ज येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:30 am

पैठणमध्ये गॅसच्या झळा; हॉटेलचे मेन्यू कार्ड पाच टक्क्यांनी महागले:हाॅटेल मालकांकडून लाकडाचा वापर सुरू, व्यवसायात मोठी घट‎

पैठण तालुक्यात हॉटेलमध्ये अन्नपदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाल्याने तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांनी आता लाकडाचा वापर सुरू केला आहे. मात्र, लाकडाच्या वाढत्या किमतीमुळे हॉटेलमधील पदार्थ ५ टक्के महागले आहेत. याचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसत आहे. हॉटेलमधील व्यावसायिक गॅस सध्या उपलब्ध नसल्याने सध्या ८० टक्के हॉटेलचालकांनी चुलीचा वापर सुरू केला आहे. यात लाकडाचे भाव वाढले आहेत. शिवाय खाद्यपदार्थांची मागणी बघता गॅसअभावी हॉटेलचालकांना पर्यायी मार्ग अवलंबावा लागत आहे. अनेक हॉटेल्समध्ये सध्या लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक केला जात असून त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, बिर्याणी आणि इतर चमचमीत पदार्थांच्या दरात ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध नसून इतर सिलिंडरदेखील सहज उपलब्ध होत नसल्याने ७० ते ९० टक्के हॉटेल्सना तोटा सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी व्यवसायात सुमारे १५ ते २० टक्क्यांची घट झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यातच लाकडाचे दरही वाढल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दरम्यान, लाकडाच्या आगीवर बनवलेले पदार्थ चविष्ट लागतात, अशी ग्राहकांची धारणा असली तरी वाढलेला खर्च हा मोठा अडसर ठरत आहे. पारंपरिक स्वयंपाकघर’ पद्धत अवलंब सुरु काही हॉटेल्सनी खर्च नियंत्रणासाठी ‘पारंपरिक स्वयंपाकघर’ पद्धत अवलंबण्यास सुरुवात केली आहे. तसेच काही ठिकाणी इंडक्शन स्टोव्हचाही वापर वाढत, असल्याचे दिसून आले. पैठण येथे एका गॅस एजन्सीसमोर गॅस घेण्यासाठी मंगळवारी महिलांसह पुरुषांची अशी गर्दी झाल्याचे दिसून आले. छाया : रमेश शेळके काय आहे गॅस सिलिंडरची परिस्थिती ग्रामीण भागातील गॅस एजन्सीमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा नसला तरीही पैठण शहरात मात्र घरगुती गॅससाठी रांगा लागत आहेत. यात गॅसची बुकिंग करण्यासाठीदेखील तासन््तास वेटिंगवर असल्याने सामान्य नागरिकांना गॅससाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. ^पैठण तालुक्यात व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेलमधील पदार्थ चुलीवर तयार करावे लागत आहे. यात लाकडाचे दर वाढले आहे. शिवाय इतर पदार्थांच्या भावातदेखील वाढ झाली आहे. यामुळे ५ टक्के वाढ करावी लागत आहे. - कचरू पंडुरे, हॉटेलचालक.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:29 am

तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी गैरहजर राहिल्याने महाराजस्व अभियानाचा फज्जा:राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांनीही भाषणातून व्यक्त केली तीव्र नाराजी‎

येथे मंगळवारी (२४ मार्च) शासनाच्या महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आले. परंतु अभियानास वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहता तिसऱ्या फळीतील अधिकारी उपस्थित झाल्याने या अभियानाचा फज्जा उडाला. यामुळे येथे उपस्थित राजकीय पुढारी तसेच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या मध्यांतरात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड उपस्थित झाल्याने बंद पडण्याच्या स्थितीत असलेला कार्यक्रम उरकण्यात आला. शासनाच्या महसूल विभागाने महाराजस्व अभियान सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून करमाड येथे कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, पंचायत, तहसील या दोन्ही विभागांचे प्रमुख अधिकारी या शिबिरास अनुपस्थित दिसून आले. त्यामुळे जि.प. माजी अध्यक्ष रामूकाका शेळके, बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ उकर्डे यांनी अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे नाराजी व्यक्त केली. या शिबिरात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी मार्गदर्शन केले. मात्र, इतर अधिकारी गैरहजर होते. पुढील कार्यक्रम कसाबसा उरकण्यात आला तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वनाधिकारी यासारखे अनेक अधिकारी उपस्थित नसल्याने उपस्थित राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, कार्यक्रमाच्या मध्यात उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड उपस्थित झाल्याने बंद पडण्याच्या स्थितीत असलेला कार्यक्रम कसाबसा उरकण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:27 am

सौर स्वप्नांचा ‘फ्यूज’ उडाला; महावितरणच्या नियमांचा ‘शॉक’:बचतीच्या अपेक्षेने सौर प्रकल्प बसवणारे नागरिकच अडकले वाढीव बिलांच्या फेऱ्यात

वैजापूर शहरात सौरऊर्जेच्या नावाखाली ‘बचत’ नव्हे तर बिलांचा स्फोट होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. ‘पीएम सूर्यघर’ योजनेतून हरित ऊर्जेत महावितरणच्या नव्या नियमांनी ग्राहकांच्या खिशालाच झळ बसत आहे. बचतीच्या अपेक्षेने सौर प्रकल्प बसवणारे नागरिकच आता प्रचंड बिलांच्या फेऱ्यात अडकले असून, नेमके नियम काय आणि फायदा कुणाचा, असा सवाल शहरभर उपस्थित होत आहे. सौरऊर्जेमुळे वीज बिलात दिलासा मिळेल या अपेक्षेने प्रकल्प बसवणाऱ्या नागरिकांना आता उलट धक्का बसू लागला आहे. शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त व्यवस्थापक सलीम पटेल यांचे पूर्वी दोन ते अडीच हजार रुपये येणारे वीज बिल सौर यंत्रणा बसवल्यानंतर थेट लाखाच्या घरात गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहरातील इतर सौर ग्राहकांनीही वाढीव बिले, दंड आणि नियमांतील गोंधळाबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे सौरऊर्जेच्या नावाखाली आर्थिक फटका बसत असल्याची भावना तीव्र झाली आहे. सौरऊर्जा प्रकल्पातून आवश्यकतेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्याचा ठपका ठेवत महावितरणकडून संबंधित ग्राहकावर दंड आकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत वैजापूर उपविभागीय कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कोणताही नियमभंग न केल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. पूर्वसूचना किंवा स्पष्ट मार्गदर्शन न देता थेट दंड आकारल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वीज बचतीसाठी लाखो रुपये खर्चून सौर संच बसवलेल्या ग्राहकांना आता ४० ते ६० हजार तर काहींना लाखापर्यंत वीज बिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ^ वाढीव वीज बिलांबाबत माहिती मिळाली असून हा विषय बिलिंग विभागाशी संबंधित आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. - चेतन लिहे , सहायक कार्यकारी अभियंता, महावितरण सौर वीज बि लांवरील गोंधळ... Q सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना मोठे वाढीव बिल आले? – काही सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांकडून वाढीव वीज बिलांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. Q याविषयी नेमका प्रकार काय? – बिलावर ३ चे युनिट दाखवले असताना प्रत्यक्षात छतावर ५ चे युनिट बसवून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. Q कशामुळे वाढीव बिलांचा गोंधळ आहे? – आयटी विभागाकडून दंड आकारण्यात आला असून या प्रक्रियेत बिलिंग विभागाची थेट भूमिका नाही.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:27 am

शासकीय जमिनीतून सर्रास मुरूम उपसा‎:नामधारी पंचनामे होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, सरकारचा लाखोंचा महसूल बुडाला‎

वैजापूर तालुक्यातील खंडाळा परिसरात शासकीय गायरान जमिनीतून रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरूम उपसा केला जात आहे. याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काही वेळा नामधारी पंचनामा करून ग्रामस्थांची मनधरणी केली जाते का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. अवैधरीत्या मुरूम उपसा केला जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. खंडाळ्यातील फुलेवाडी रस्त्यालगत असलेल्या गट क्रमांक ५८९ मधील जमिनीत सरसकट टेकडी सपाट करण्यात येत आहे, तर रस्त्याच्या कडेलादेखील ठिकठिकाणी मोठे खड्डे करून ठेवले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांबरोबर दुचाकीस्वार, जनावरांसह माणसांनाही धोका निर्माण झाला असून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील मुरूम उपशासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. शासनाला रॉयल्टीही भरली जात नाही. मुरूम विक्रेते आणि खरेदीदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा आरोप येथील ग्रामस्थ करीत आहेत. दररोज हायवा वाहनांद्वारे मुरुमाची चोरी सुरू आहे. जेसीबीच्या साहाय्याने येथे मुरूम उपशाचे काम सुरू आहे. २० मार्च रोजी शासकीय जमिनीतून मुरूम होत असल्याची नागरिकांनी तक्रार केल्यानंतर ग्राम महसूल अधिकारी सुखदेव राठोड यांच्या वतीने पाहणी केली असता या परिसरातून ४० ते ५० ब्रास मुरूम उपसा अज्ञात व्यक्तीने केला असल्याचा पंचनामा केला होता. मात्र, तरीही उपसा थांबला नाही. त्यामुळे पंचनामा नावालाच केला होता का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. खंडाळा येथील नागरिकांच्या तक्रारीनुसार फुलेवारी रोडलगत गट नंबर ५८९ मध्ये २० मार्च शुक्रवार रोजी पाहणी केली असता शासकीय जमिनीतून ४० ते ५० ब्रास मुरूम उपसा केल्याचे निदर्शनास आले. पंचांसमक्ष पंचनामा करून अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे माहिती दिली आहे, अशी माहिती खंडाळा येतील ग्राम महसूल अधिकारी सुखदेव राठोड यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:26 am

खरात नरराक्षस, 5 नरबळी दिले:नाशिक कोर्टासमोर पोलिसांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे खळबळ

नाशिक येथील भोंदू अशोक खरातच्या फार्महाऊसवर ५ रिकाम्या पुंगळ्या, वाघाचे कातडे आणि कस्तुरी सापडल्याने त्याने ५ नरबळी दिल्याचा व शिकार केल्याचा दाट संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. खरातला मंगळवारी न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. खरातवर सातवा गुन्हा दाखल झाला. अहिल्यानगरच्या एका २१ वर्षीय तरुणीने अत्याचाराची तक्रार दिली आहे. चार वर्षांपूर्वी ती अल्पवयीन असताना, शैक्षणिक अडचणींवर सल्ल्यासाठी गेली असता खरातने तिच्यावर अत्याचार केला. आता पोक्सोअंतर्गत कलम वाढवले जाणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पीडित कुटुंबाला विश्वास दिल्यानंतर ही तक्रार दाखल झाली. सरकारी पक्षाचे वकील महाराष्ट्र नरबळी कायदा लागू असताना खरातने अघोरी कृत्याची भीती दाखवत महिलांचे शोषण केले. आरोपी खरातचे वकील अघोरी कृत्य नसून हा पूजेचा भाग आहे. महिला स्वत:हून तेथे येत होत्या. शोषण झाले की नाही याचे पुरावे नाहीत. खरातची रिॲक्शन तो मी नव्हेच... मी महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी श्रावण, महाशिवरात्रीला पूजा करायचो. त्यांचे वैवाहिक आयुष्य सुरळीत होण्यासाठी ही पूजा होती. बाहेर काय सुरू आहे याची मला कल्पना नाही. १३ हून अधिक देशांचे दौरे खरातने आतापर्यंत १३ पेक्षा जास्त देशांचे दौरे केल्याचे एसआयटीच्या तपासात पुढे आले. तरी याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. साप, वाघाची कातडी व कोल्ह्याचे कान फार्महाऊसमध्ये आढळले पोलिसांना खरातच्या फार्महाऊसमध्ये अगदी खरा भासावा असा एक प्लास्टिकचा साप व वाघाची कातडी, कोल्ह्याचे कान सापडले. अघोरी पूजांसाठी वापराचा संशय. राजमुद्रा व बंदूक जप्तपाच पीडित महिला पुढे आल्या आहेत. अजूनही येण्याची शक्यता आहे. त्यांचे जबाब बाकी आहेत. शंभरावर व्हिडिओ जप्तफिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ बघून गुन्हे दाखल केले जात आहेत. १५०० कोटींची संपत्तीहरणाची पांढरी व काळी कस्तुरी तसेच खडे कुठून आणले, हरणाची शिकार केली का, याचा तपास बाकी आहे. एकूण आठ गुन्हे दाखलपोलिसांनी या वस्तू जप्त केल्या आहेत. पोलिस कोठडीत त्यांना काहीच मिळाले नाही याबाबत आश्चर्य वाटते. बड्या अधिकाऱ्यांसह राजकारणीही दरबारात सलाम ठोकत असल्याने लोकांत होती भारी दहशतखरातची जंगम मालमत्ता किती आहे, त्याचे कुणाशी संबंध आहेत याचा सीडीआरमध्ये तपास घेणे बाकी आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:17 am

72 तासांत गुगलवर सर्वाधिक सर्च; खरातची कुंडली शोधली:नेटिझन्स सक्रिय राजकारणी, अधिकाऱ्यांवर टीकास्त्र

नेटिझन्सने खरातची कुंडली शोधण्यावर जोर लावला आहे. गुगल ट्रेंड्सच्या आकडेवारीनुसार, त्याचे नाव गेल्या ७२ तासांत महाराष्ट्रात ‘मोस्ट सर्चड’ ठरले आहे. ज्या नावाचा १७ मार्चपर्यंत गुगलवर मागमूस नव्हता, त्या नावाने तीन दिवसांत सर्चचा उच्चांक गाठला आहे. १८ मार्चला सकाळी ८ पासून गुगलवर खरातला सर्च करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्च स्कोअर २४ वर पोहोचला. २० मार्च रोजी दुपारी ४ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत खरातचा सर्च स्कोअर १०० वर होता. २३ मार्चला तो कायम राहिला. महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून या नावाचा शोध घेतला जात होता. सर्वाधिक सर्च नाशिक जिल्ह्यातून झाला असून त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि पुणे आहे. गुगलने या सर्चला ‘ब्रेकआऊट’ श्रेणीत टाकले, जे एखाद्या मोठ्या गुन्ह्याच्या बातमीनंतरच घडते. पहिले स्वारस्य ५८ व्हिडिओचे खरातबाबत नागरिक हे शोधत आहेत १. त्याने केलेल्या शोषणाचे ५८ व्हिडिओ: हा सर्वात जास्त सर्च होणारा विषय आहे. २. कॅप्टन खरात नाशिक न्यूज: स्थानिक घडामोडी जाणून घेण्यासाठी याचा वापर होत आहे. ३. खरात बॅकग्राउंड: खरातची पार्श्वभूमी आणि त्याची श्री शिवनिका संस्था याबद्दलही लोक माहिती काढत आहेत. अमेरिकेसह १३ देशांमध्ये केली होती खरातने मनमुराद भटकंती खरातने अमेरिकेसह १३ देशांमध्ये मनमुराद भटकंती केली होती, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे.अधिकाऱ्यांनी सांगितले की, खरातने अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, यूएई, साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया आदी देशांचा दौरा केला होता. हा दौरा त्याने कशासाठी केला होता, त्या वेळी त्याच्यासोबत कोण कोण होते, त्याच्या तिकिटाचा खर्च कोणत्या संस्थेने केला की त्याने स्वत: केला किंवा त्याला या दौऱ्यासाठी राजकीय मंडळींनी पैसा पुरवला होता का याची माहिती तपासातून उघड होऊ शकते. अर्थात, त्यासाठी एसआयटीकडून सखोल तपासाची आवश्यकता आहे. दौऱ्याची कारणे शोधणे महत्त्वाचे सूत्रांनी सांगितले की, लोकांकडून लुबाडलेल्या पैशाचा वापर करून खरातने या सगळ्या परदेश वाऱ्या केल्या असाव्यात. मात्र, त्याने हे दौरे नेमके कशासाठी केले, तो त्या देशातील कोणकोणत्या महत्त्वाच्या शहरांमध्ये गेला होता, सोबत कोणा कोणाला नेले होते, त्यांनी त्या शहरांमध्ये काय मौज लुटली याचाही तपास एसआयटीकडून अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दौऱ्यामागची कारणे समोर आली पाहिजेत. दहावीला गणितात ‘नापास’ खरातनेअंकशास्त्रावर कमावले कोट्यवधी अंकशास्त्राचा आधार घेऊन लोकांचे भविष्य सांगणारा हा भोंदू स्वतः दहावीच्या परीक्षेत गणितात नापास होता. ज्या अंकांच्या जोरावर तो भक्तांना भुलवत होता, त्याच विषयात त्याला केवळ २८ गुण मिळाले होते. खरातचे मूळ गाव सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) आहे. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत त्याने शिक्षण घेतले. शाळेच्या रेकॉर्डनुसार, त्याचे नाव लक्ष्मण एकनाथ खरात असे होते. १ जून १९६५ अशी जन्मतारीख असलेल्या लक्ष्मणने मार्च १९८३ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती (बैठक क्र. सी-५२३४१). त्यानंतर १९९५ मध्ये त्याने शाळेतून दाखला काढला आणि गॅझेटद्वारे स्वतःचे नाव अशोक करून घेतले असावे अशी शक्यता आहे. सवंगड्यांशी बोलल्यावर त्याच्या खऱ्या नावाचा उलगडा झाला. कॅप्टन अशोक हाच पूर्वाश्रमीचा लक्ष्मण असल्याचे काही जणांनी सांगितले. ३५.८६ टक्के गुण मिळाले होते ​दहावीच्या परीक्षेत खरातला जेमतेम ३५.८६ टक्के गुण मिळाले होते. सहापैकी दोन विषयांत तो अनुत्तीर्ण झाला होता. ​गणित: २८ (नापास), ​इंग्रजी: ३७, मराठी: ३९, ​विज्ञान: ६२, ​समाजशास्त्र: ३८, ​हिंदी: ४७ एकूण गुण: २५१/७०० असे त्याचे दहावीचे गुणपत्रक राहिले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:12 am

राजाश्रय मिळत गेल्याने हाव वाढत गेली:भोंदू खरातने 10-12 वर्षांतच जमवली 1500 कोटींची संपत्ती

सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रीड ॲप्लिकेशनच्या साहाय्याने अशोक खरातच्या बँक खात्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. ती माहिती फास्टट्रॅक स्वरूपात प्राप्त करून घेतली आहे. त्या आधारे तपास सुरू आहे. खरातकडे केलेल्या चौकशीत तसेच इतर प्राप्त माहितीवरून आरोपीची प्रॉपर्टी कोठे कोठे आहे याची माहिती संकलित करण्यात आलेली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार गेल्या दहा ते बारा वर्षांत खरातने चांगलेच बस्तान बसवले. बडे अधिकारी आणि राजकारण्यांच्या मदतीने त्याने सुमारे १५०० कोटी रुपयांची मालमत्ता जमवली. त्याच्या संपत्तीचा अंदाज त्याची विलासी राहणी आणि विशाल फार्महाऊस पाहूनच येतो. खरातची मिरगाव, ता. सिन्नर येथे ३३ एकर जमीन मिरगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे ३३ एकर जमीन स्वतःच्या नावे मिरगाव, ता. सिन्नर येथे फार्महाऊस पाथर्डी गाव, गौळाणे गाव, ता. जि. नाशिक येथे १० एकर जमीन सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे ६ एकर जमीन शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे ४.५ एकर जमीन स्वतःच्या नावे काकडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर (शिर्डी विमानतळ) येथे ५.५ एकर जमीन. पाथर्डी फाटा नाशिक येथे ८०० स्क्वेअर फुटांचा १ प्लॉट ओझर, जि. नाशिक येथे ४ गुंठ्यांचे ३ प्लॉट, आडगाव, ता. जि. नाशिक येथे ५ गुंठ्यांचा प्लॉट. पनवेल, नवी मुंबई येथे ४० गुठ्यांचा प्लॉट. कॅनडा कॉर्नर नाशिक येथे ऑफिस १८० स्क्वेअर फूट. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे मुलगी श्रृष्टीच्या नावावर ११ गुंठ्यांचा प्लॉट. पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट. कर्मयोगीनगर, नाशिक येथे बंगला. शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्व्हर ओक मंगल कार्यालय. सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक येथे ५ जणांमध्ये मिळून ६ एकर जमीन.स्वतःकडे १२ तोळे सोने पत्नीकडे २० तोळे सोने पत्नीच्या नावे डिमॅट अकाउंट. १ ते २ लाख गुंतवणूक एकूण बँक खाते ५- ICICI, Union, Sarswat, Vishwas co.op., SBI अशा प्रकारे अंदाजे एकूण ४० कोटी ८७ लाख रुपयांचे बाजारमूल्य. ‘माझ्यात दैवी शक्ती’ असे म्हणत खरात महिलांना ओढत होता जाळ्यात मला नकार दिला तर तुझे वाईट होईल, अशा धमक्यानराधम खरातविरुद्ध नाशिक येथे दाखल करण्यात आलेल्या त्यातील पाचव्या तक्रारीचा तपशील असा : जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हीस बोलावून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुध्दी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांचे जिवाचे बरेवाईटदेखील होईल अशी भीती दाखवून, ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात बोलावून, तिला मिठाई खाण्यास देऊन, तिच्या पाठीवर-शरीरावर हात फिरवून, कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने बलात्कार केला वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. खरातविरुद्ध बीएनएस ६४(१), ७५ ३५१(२) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ (१) (२) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ‘मी देवाचा अवतार’ अशी थाप ठोकत होता नराधम खरातबीएनएस ६४(१), ७४, ७५ ३५१(२) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोण्याला प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम २०१३ चे कलम ३(१) (२) नुसार दाखल गुन्ह्याचा तपशील असा : एप्रिल २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलावून, तिला तांब्याचे भांड्यातील पाणी पिण्यास देऊन, पेढा खाण्यास देऊन, तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन, तिच्याशी शारीरिक लगट करून, तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून, मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुध्द झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही, असा दम दिला. ‘माझ्यामध्ये दैवी शक्ती’ असे म्हणत शरीराला स्पर्श केलातिसरा गुन्हाही सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे त्यानुसार ७ ऑक्टोबर २०२४ ते १२ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान सकाळी ११ वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरातला भेटण्यासाठी गेले असताना त्या वेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून, फिर्यादीला एकटीला थांबवून, तिच्या हातावर एक काळा दगड फिरवून, तिच्या कानात मंत्र पुटपुटून, तिच्या डोक्यावर-पाठीवर हात फिरवून, तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तू घाबरू नको, तू माझ्या आवारामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे. मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे. मी तुझी शुध्दी केली आहे. तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल, असा दम दिला आहे वगैरे मजकुराचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली बलात्कार, लघवीही पाजलीसरकारवाडा पोलिस ठाण्यात बीएनएस ६४(१), ७४, ३५१ (२) सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधाचा अधिनियम २०१३ चे कलम ३ (१) (२) नुसार दुसरा गुन्हा दाखल झाला. त्यानुसार माहे नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे खरातने फिर्यादीच्या पत्नीस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलावून तिचे पोटावर, छातीवर हात फिरवून तिच्या XXत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला तसेच तिचे कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली, त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराचे अकाउंटवर पैसे घेतले. मिरगाव, ता. सिन्नर येथील मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केला. तांब्याच्या बाटलीतील पाणी देऊन केले अत्याचारनाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल एफआयआरमध्ये म्हटले आहे की, अशोक खरात याने माहे फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२६ रोजीचे दरम्यान ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलावून ती एकांतात कार्यालयात असताना तिस तांब्याचे बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांचेशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरातने गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला तसेच जर फिर्यादीने अशोक खरात याचे सांगणेप्रमाणे धार्मिक विधीस नकार दिल्यास तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझे मुलांचे बरेवाईट होईल असा दम दिला. अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिलेले होते.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:08 am

भोंदू अशोक खरात प्रकरण:आयएएस, आयपीएस लावत खरातच्या दरबारामध्ये हजेरी, अधिकाऱ्यांचे कुटुंबीय संपत्तीत वाटेकरी

नाशिक, अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये कार्यात असणारे विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी या पदांवर कार्यरत असताना अनेक शासकीय अधिकारीदेखील त्याच्या दरबारात हजेरी लावत असल्याचे वेगवेगळ्या फोटोंवरून उजेडात आले आहे. विशेष म्हणजे अनेक अधिकाऱ्यांनी तर नाशिकच्या त्याच्या कॅनडा कॉर्नरवरील ऑफिसमध्ये तर काहींनी मिरगाव सिन्नर येथील त्याच्या मंदिरात, फार्महाऊसला देखील हजेरी लावल्याचे सांगितले जात आहे. तसेच अनेक उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची नावेदेखील त्याच्या कुटुंबीयांसोबत जमीन खरेदी-विक्री व्यवहारात आढळून आली आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांचे लागेबांधे व संबंधांबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनीदेखील विधिमंडळात पुष्टी देत चौकशीचे आश्वासन दिले. मुलीच्या विवाहाला हजेरी जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत नाशिकच्या रायगडनगर भागात एका आलिशान रिसॉर्टमध्ये भोंदू खरातच्या मुलीचा विवाह थाटामाटात पार पडला. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासोबत माजी विभागीय तथा महसूल आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील राजकीय नेते दीपक केसरकर यांच्यासोबत हजेरी लावल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी खरातने राजकारणी लोकांचा वापर केला आणि राजकारण्यांमार्फत अधिकाऱ्यांना प्रभावित केले होते. जमीन खरेदीत खरातने भावाचा जीवघेतल्याचा जाधव कुटुंबीयांचा आरोप गौळाणे गावातील जमीन खरेदीत खरातने शेतकरी कैलास जाधव यांची ४७ लाखांची फसवणूक केली. जाधव यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, निकाल लागण्यापूर्वीच १७ डिसेंबर २०२२ ला कैलास जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला असला तरी तो अपघात नसून घातपात आहे. खरातने भावाचा जीव घेतल्याचा आरोप जाधव कुटुंबीयांनी केला आहे. मोक्याच्या जमिनीसाठी अधिकारी देत होते टिप्स सूत्रांनी सांगितले की, नाशिक जिल्हा किंवा इतर कुठे मोक्याच्या जमिनी उपलब्ध आहेत, याची माहिती वरिष्ठ अधिकारी भोंदू खरातला देत असत. केवळ माहिती देण्यावरच ते थांबत नव्हते तर ही जमिन किंवा कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी खरेदी करायची. त्याचा व्यवहार कसा करायचा यासाठीही ते खरातला पूर्ण मदत करत. त्यामुळे काही वर्षांतच त्याला प्रचंड मालमत्ता जमा करणे शक्य झाले.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 7:04 am

सासऱ्याच्या शाळेत रसायनशास्त्र पदवीधर सुनेला गणित शिक्षकाची नोकरी:संभाजीनगरच्या आश्रमशाळेतील प्रकार; भीतीपोटी 70 लाखांचे वेतनच घेतले नाही

माजी नगरसेविका असलेल्या कविता जाधव या सुनेला स्वत:च्या शाळेत शिक्षिका करण्यासाठी संस्थाचालक सासऱ्याने सर्व नियम मोडले. धक्कादायक बाब म्हणजे ओबीसी विभागाचे प्रादेशिक संचालक जलील शेख यांनी नाकारलेला प्रस्ताव संस्थेने शासनाकडून मंजूर करून आणल्याचे ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले.मराठवाडा बंजारा सेवा संघाच्या शिवगड तांडा येथील माध्यमिक आश्रमशाळेतील या घोटाळ्याचा १५० विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. प्रस्ताव नाकारला होता शिक्षिकेच्या नेमणुकीचा प्रस्ताव आम्ही नाकारला होता. त्यांनी नंतर तो मंत्र्यांकडे सुनावणी घेऊन मंजूर करून आणला. या प्रक्रियेत आमचा काहीच हस्तक्षेप नव्हता. -शेख जलील, प्रादेशिक संचालक, ओबीसी कल्याण विभाग, संभाजीनगर बोगस नियुक्ती रद्द करा दोषींना बडतर्फ करून पगार थांबवा. बनावट कागदपत्रे तयार केल्याबद्दल पंडित यांच्यावर कारवाई करावी. -राजेंद्र जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष आता वेतनासाठी केला अर्ज १ जानेवारी २०१६ ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान शाळेवर नियमित नोकरीत असतानाही कविता यांनी वेतनाची मागणी केली नाही. मात्र, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी शिक्षण विभागाला पत्र पाठवून २१,७१,२२६ रुपयांचे वेतन मागितले. पण त्यांचे ७० लाखांच्या घरात वेतन आहे. दरम्यान, कविता यांनी सासरे पंडित यांची प्रतिक्रियाच माझे अधिकृत म्हणणे असल्याचे सांगून बोलण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. सर्व नियमांचे पालन करूनच सुनेला नोकरी बोगस सही केली नाही. मान्यतेची गरज नसते. सर्व नियमांचे पालन करूनच सुनेला नोकरी दिली. आश्रमशाळेला विशिष्ट विषयाचे बंधन नसते. २०१२ ची जाहिरात दाखवून नाही तर २०१६ च्या जाहिरातीनुसार नियुक्ती दिली आहे. तक्रार करणाऱ्यांनीही भरपूर बोगस नियुक्त्या केल्या आहेत. हजेरीपटाविषयी मुख्याध्यपकांना विचारा. -पंडित जाधव, सासरे तथा संस्थाचालक 1. विषयानुसार नियुक्ती नाहीजाहिरातीत बीएस्सी बीएड, गणित अर्हता होती. कविता यांनी केमिस्ट्री, बॉटनी आणि कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली तरी त्यांना गणित शिक्षकाची नियुक्ती दिली. 2. सचिवांची बोगस स्वाक्षरीभरतीचा ठराव शासनाला पाठवला. त्यावर संस्था सचिव म्हणून सुंदरसिंग जाधवांची सही आहे. मात्र, ही सही आपली नसल्याचे त्यांनी लेखी पत्र दिले आहे. 3. जुनी जाहिरात वापरलीभरतीची २९ ऑगस्ट २०१२ ला वृत्तपत्रात संस्थेने जाहिरात दिली. पदेही भरली. जाधव यांनी सुनेला २०१६ च्या नियुक्तीसाठी चक्क २०१२ ची जाहिरात दाखवली आहे. 4. एकटीचा बोगस हजेरीपटशाळेत १४ शिक्षक असताना केवळ कविता जाधवसाठी स्वतंत्र मस्टर बनवले होते. त्या कधीच शाळेत गेल्या नसल्याचा दावा संस्थेच्या उपाध्यक्षांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 6:47 am

निर्देश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ नव्हे- मुख्यमंत्री फडणवीस:एसपी तुषार दोशी निलंबनप्रकरणी केले भाष्य

विधान परिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी हे परिस्थितीनुसार मंत्र्यांना निर्देश देऊ शकतात. मात्र, हे निर्देश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ असू शकत नाही किंवा त्यातून जबाबदारीतून सुटकाही होत नाही. वस्तुस्थिती तपासूनच योग्य ती कारवाई केली जाते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिले. सातारा येथील प्रकरणावरून सोमवारी विधान परिषदेच्या विशेष सत्रात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. यावरून सभागृहात मोठा गदारोळ झाला होता. परिणामी सभापती प्रा. राम शिंदे यांनी हे निलंबन रोखून धरले. या पार्श्वभूमीवर आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना आहेत का, असा प्रश्न आमदार अनिल परब आणि शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी अधिकारांची स्पष्ट विभागणी मांडताना सांगितले की, सभागृहाच्या परिसरात जर एखादा अधिकारी ब्रीफिंगला आला नाही किंवा सभागृहाच्या कक्षेत काही घडले तर तिथे निर्देश देण्याचा पूर्ण अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना आहे. सभागृहाबाहेर घडलेल्या घटनांवर निलंबन किंवा बडतर्फीची कारवाई करण्याचा अधिकार केवळ मंत्रिमंडळाकडेच असतो. पीठासीन अधिकारी मंत्र्यांना निर्देश देऊ शकतात, पण त्यावर वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याचा अधिकार मंत्र्यांचाच आहे. दिलेले आश्वासन पाळणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसेल तर तशी माहिती सभागृहाला द्यावी लागते, असेही फडणवीस यांनी नमूद केले. या महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणामुळे सभागृहातील पीठासीन अधिकारी आणि प्रशासकीय अधिकार यांमधील कायदेशीर पेच सुटण्यास मदत होणार आहे. संविधान आणि अधिकारांची विभागणी यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी संवैधानिक चौकटीची आठवण करून दिली. ते म्हणाले, संविधानाने मंत्रिमंडळ, न्यायपालिका आणि विधिमंडळ यांचे अधिकार स्पष्ट केले आहेत. मंत्रिमंडळ हे विधिमंडळाला उत्तरदायी आहे. त्यामुळे सभागृहाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. पीठासीन अधिकाऱ्यांचा सन्मान राखणे हे सर्वांचे कर्तव्य असले तरी ते मंत्रिमंडळाच्या अधिकारक्षेत्रात थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 6:40 am

राज्यामध्ये नवे सर्वसमावेशक सहकार धोरण- सहकारमंत्री:2.33 लाख संस्थांचे जाळे होणार अधिक पारदर्शक व गतिमान

सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहार नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे एक प्रभावी मॉडेल आहे. राज्यातील हे क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सरकार लवकरच एक सर्वसमावेशक नवे सहकार धोरण अमलात आणणार असल्याची घोषणा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत केली. आमदार प्रवीण दरेकर यांनी नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सहकारमंत्री म्हणाले की, नव्या धोरणाच्या निर्मितीसाठी १५ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मुंबई, नागपूरसह राज्याच्या विविध विभागांत बैठका घेऊन तज्ज्ञ, अनुभवी कार्यकर्ते आणि नव्या पिढीच्या सूचनांचा यात समावेश केला जाईल. या धोरणात प्रामुख्याने पारदर्शकता, कार्यक्षमता आणि शाश्वत विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांना आणि बँकांना बळ राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला ताकद देत आहे, असे सांगत त्यांनी विविध अनुदानांची माहिती दिली. जिल्हा बँकांना २.२५% व्याज अनुदान, प्राथमिक संस्थांना २% पर्यंत अनुदान आणि पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ३% व्याज परतावा दिला जात आहे. तसेच, साखर उद्योगाला आधुनिक करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून थेट शेतात मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 25 Mar 2026 6:39 am

यशवंतवाडीच्या शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी येथील शेतकरी ज्योतीराम साहेबराव चव्हाण यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीला जाणारा रस्ता खुला करण्यास सत्ताधारी भाजपाचे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड हे विरोध करीत असल्याने व या बाबतीत ते तहसीलदार यांच्यावर दबाव आणत असल्याने संबंधित संतप्त शेतक-याने मंगळवार दि. २४ मार्च रोजी मुंबई येथील विधानभवनासमोर अंगावर पेट्रोल […] The post यशवंतवाडीच्या शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Mar 2026 1:21 am

उद्धव ठाकरे कोट्याधीश

विधान परिषदेत निरोप समारंभात मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात राजकारणाची कमी आहे, त्यांचा स्वभाव राजकारणी नाही. कोणताही निर्णय घेताना ते परिणामांची चिंता करत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुल देशपांडे यांच्यानंतर जर कुणी कोट्याधीश म्हणावे तर मी ते उद्धव ठाकरे यांना म्हणेन, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली. विधान […] The post उद्धव ठाकरे कोट्याधीश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Mar 2026 1:18 am

होर्मुझमध्ये अडकलेली भारतीय जहाजे सुटणार?

कोंडी फुटणार?, ट्रम्प यांचा मोदींशी फोनवरून संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्था पश्चिम आशियात सुरू असलेल्या इस्रायल, अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम आता जगभरासह भारतावरही गंभीरपणे जाणवू लागला आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल आणि गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावर ताण वाढला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी अडविल्याने भारतीय जहाजे अडकली […] The post होर्मुझमध्ये अडकलेली भारतीय जहाजे सुटणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Mar 2026 1:16 am

महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा ८१६ वर?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुढील सार्वत्रिक निवडणुकांपासून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठई ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकार घटनादुरुस्तीसह किमान २ विधेयके आणण्याच्या तयारीत आहे. महिलांसाठी हे ३३ टक्के आरक्षणलागू करण्यासाठी २०११ च्या जनगणनेचा आधार घेण्याचा विचार केंद्र सरकारकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रस्तावामुळे नव्या जनगणना आणि मतदारसंघ फेररचना या दोन्ही […] The post महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागा ८१६ वर? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Mar 2026 1:14 am

शिक्षकांची निवड यादी नव्याने जाहीर करा

२०२२ च्या शिक्षक निवड यादी प्रकरणी सर्वोच्च आदेश नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यात २०२२ मध्ये झालेल्या शिक्षक भरतीच्या सर्व निवड याद्या नव्याने जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला दिला. या निर्णयामुळे शिक्षक पात्रता परीक्षेत ५५ टक्के गुण मिळवून पात्र ठरलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे सर्वसाधारण प्रवर्गातील जागांवर संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. […] The post शिक्षकांची निवड यादी नव्याने जाहीर करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 25 Mar 2026 1:11 am

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त लक्षवेधी रॅली 

लातूर : प्रतिनिधी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विशेष जनजागृती कार्यक्रम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ‘क्षयमुक्ती’चा निर्धार करत या कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यात १०० दिवसीय विशेष क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात महान शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात […] The post जागतिक क्षयरोग दिनानिमित्त लक्षवेधी रॅली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 11:51 pm

निर्माता दिग्दर्शक विशाल गिरीचा ‘डफी’ चित्रपट लवकरच पडद्यावर 

लातूर : प्रतिनिधी लातूरचे सुपुत्र आणि चित्रपट सृष्टीत अल्पावधीत स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणा-या विशाल गिरी यांचा ‘डफी’ हा मराठी चित्रपट लवकरच पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच बीड जिल्ह्यातील शिरूर कासार भागात पूर्ण झाले आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार असल्याचा विश्वास दिग्दर्शक गिरी यांनी व्यक्त केला आहे. सध्या सोशल मिडियावर या चित्रपटाची […] The post निर्माता दिग्दर्शक विशाल गिरीचा ‘डफी’ चित्रपट लवकरच पडद्यावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 11:49 pm

सराईत तोतया पोलिसाला केले जेरबंद 

लातूर : प्रतिनिधी सामान्य नागरिकांची दिशाभूल करून स्वत:ला पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक करणा-या एका सराईत आरोपीस लातूर पोलीसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत आरोपीकडून ४ लाख ३० हजार रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपीकडून इतर जिल्ह्यांतील अशाच प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. २३ मार्च […] The post सराईत तोतया पोलिसाला केले जेरबंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 11:47 pm

महापालिका नगर रचना विभागाकडे १५ वर्षांतील रेकॉर्डच उपलब्ध नाही

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाचा अजब-गजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहराच्या बा वळण मार्गांवरील कोट्यावधी रुपयांचे सर्व्हिस रोड चक्क गायब झाले आहेत. लातूर शहर महापालिका अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत गेल्या १५ वर्षांतील कसलेही रेकॉर्ड नगर विकास विभागाकडे उपलब्ध नाही. रेकॉर्डच नसेल तर हा विभाग कशाच्या आधारे काम करीत आहे, असा […] The post महापालिका नगर रचना विभागाकडे १५ वर्षांतील रेकॉर्डच उपलब्ध नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 11:46 pm

आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येक माणूस हा कलाकारच असतो

लातूर : प्रतिनिधी विज्ञान असो वा परफॉर्मिंग आर्ट कोणत्याही क्षेत्रात स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आपल्या सद्सदविवेकबुद्धीने शोधा. कला, विज्ञान, क्रीडा संगीत, नाट्य, नृत्य, सूर, ताल, लय अशा प्रत्येक क्षेत्रांत आपापल्या आवडीनुसार करिअर घडवा. आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येक माणूस हा कलाकारच असतो. म्हणून तरुणाईंच्या अवस्थेत मौजमस्ती धमाल करा. परंतु दिवसाच्या एकूण चोवीस तासांतले […] The post आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येक माणूस हा कलाकारच असतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 11:45 pm

शाहू महाविद्यालयात आज ‘स्वर-तालनिनाद’ समारोह

लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा. हरिसर्वोत्तम जोशी यांच्या सेवापूर्ति निमित्त प्रा. हरिसर्वोत्तम जोशी व परिवाराच्या वतीने आज दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘स्वर-तालनिनाद’ संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ‘स्वर-तालनिनाद’ संगीत समारोहामध्ये कोलकाता येथील जगविख्यात महिला तबलावादक विदुषी रिम्पा शिवा यांचे स्वतंत्र तबलावादन, […] The post शाहू महाविद्यालयात आज ‘स्वर-तालनिनाद’ समारोह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 11:44 pm

लातूर ग्रामीणमधील काँग्रेस  पदाधिका-यांच्या निवडी जाहीर

लातूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच स्थानिक पातळीवर पक्षकार्य अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने विविध पदांवर काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सुचनेनुसार नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नुतन पदाधिकारी यांना काँग्रेस भवन येथे नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. यामध्ये रेणापुर शहर काँग्रेस कमिटीच्या […] The post लातूर ग्रामीणमधील काँग्रेस पदाधिका-यांच्या निवडी जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 11:43 pm

मिरा-भाईंदरमध्ये आगीचे तांडव:प्लेझंट पार्कमधील 4 ते 5 इमारतींना लागली आग, सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याची शक्यता; VIDEO

मुंबईला लागून असलेल्या मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात सोमवारी रात्री आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांमुळे लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले असून, परिसरातील तब्बल ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात सापडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्लेझंट पार्क परिसरात रात्रीच्या शांततेत अचानक आगीचा भडका उडाला. काही वेळातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, बाजूला असलेल्या चार-पाच इमारतींना या आगीची झळ बसली. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याने रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली असून अनेकांनी जीवाच्या आकांताने इमारतीबाहेर धाव घेतली. सिलिंडर स्फोटाचा संशय; टेम्पो खाक आगीचे नेमके कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग पसरली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी केवळ इमारतीच नव्हे, तर परिसरात उभे असलेले २ ते ३ टेम्पो देखील आले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अरुंद रस्ते आणि धुराचे लोट यामुळे आग विझवताना जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नव्हती. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 11:42 pm

साताऱ्याचे एसपी तुषार दोशी 'मेडिकल लीव्ह'वर!:जिल्हा परिषद राड्याच्या गदारोळानंतर सक्तीची विश्रांती की आजारपण?

सातारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेला अभूतपूर्व गोंधळ, 'मतचोरी'चे आरोप आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना मतदानापासून रोखण्यासाठी झालेली पोलिस कारवाई राज्यभरात चर्चेत आहे. विधिमंडळात देखील हे प्रकरण चांगलेच गाजले. या संपूर्ण प्रकरणाचे केंद्रस्थानी असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी आता अचानक ४ दिवसांच्या 'वैद्यकीय रजे'वर गेल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सातारा जिल्हा परिषदेतील राड्यावेळी पोलिसांच्या भूमिकेवर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. या प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधान परिषद आणि विधानसभेतही उमटले. याच पार्श्वभूमीवर तुषार दोशी रजेवर गेल्याने, ही रजा खरोखरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आहे की सरकारने त्यांना निलंबनाऐवजी 'सक्तीच्या विश्रांती'वर पाठवले आहे, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. नीलम गोऱ्हे यांचे निलंबनाचे आदेश सोमवारी विधान परिषदेत विरोधकांनी सातारा प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. पोलिसांच्या मदतीने लोकशाहीचा गळा आवळला गेल्याचा आरोप झाला. यावेळी सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे थेट आदेश दिले होते. या निर्णयामुळे गृहविभागाची मोठी गोची झाली होती. कायदेशीर पेच आणि फडणवीसांचे संकेत मात्र, हे निलंबन आदेश रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी वकिली कौशल्याचा वापर करत कायदेशीर पेच उपस्थित केला आहे. फडणवीस यांच्या मते, एखाद्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याचे अधिकार केवळ 'कार्यकारी मंडळा'कडे (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ) असतात, ते कायदेमंडळाला (सभागृहाला) नाहीत. यापूर्वी आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या बाबतीतही असाच पेच निर्माण झाला होता आणि अखेर विधानसभेला तो आदेश मागे घ्यावा लागला होता. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या तुषार दोशी यांचे निलंबन टळण्याची चिन्हे आहेत. नेमका वाद काय? सातारा जिल्हा परिषद निवडीत राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना इमारतीतूनच अटक करून मतदानापासून वंचित ठेवल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. पोलिस कारवाईदरम्यान मंत्र्यांनाही धक्काबुक्की झाल्याने प्रकरण अधिक चिघळले. या 'मतचोरी'च्या प्रकाराला पोलिस प्रशासनाने खतपाणी घातल्याचा ठपका ठेवत शिवसेनेच्या नेत्यांकडून एसपींच्या निलंबनाची मागणी झाली होती. तुषार दोशी यांच्या रजेचा काळ संपल्यानंतर सरकार त्यांच्यावर कोणती प्रशासकीय कारवाई करते की त्यांना क्लिन चिट मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 11:27 pm

महापालिका स्थायी समिती सभापतीपदी बंडापल्ले 

लातूर : प्रतिनिधी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लातूर शहर महानगरपालिकेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समिती व परिवहन समितीची विशेष बैठक झाली. या बैठकीत स्थायी समितीच्या सभापतीपदी सचिन बंडापल्ले तर परिवहन समितीच्या सभापतीपदी फैसलखान कायमखानी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी […] The post महापालिका स्थायी समिती सभापतीपदी बंडापल्ले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 10:28 pm

घनसरगाव येथील ७ वर्षांपासूनचा जमिनीचा वाद मिटला

रेणापूर : प्रतिनिधी तालुक्यातील घनसरगाव येथे गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला शेतजमिनीच्या बांधाचा वाद अखेर मिटला असून रेणापूर पोलीसांनी राबविलेल्या ‘शेतक-यांच्या बांधावर’ या उपक्रमामुळे हा तोडगा शक्य झाला आहे. घनसरगाव येथील विलास शिवाजी आमनावर व परमेश्वर आमनावर यांच्यात शेतजमिनीच्या बांधावरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. या वादामुळे दोघांत अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. […] The post घनसरगाव येथील ७ वर्षांपासूनचा जमिनीचा वाद मिटला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 10:25 pm

पत्र्याच्या शेडमधून ३० शेळ्या लंपास

जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथे अज्ञाताने येथील शेळीपालन करणा-या शेतक-याच्या पत्र्याच्या शेडमधून तब्बल ३० शेळ्यांची चोरी केल्याची घटना दि २४ मार्चच्या मध्यरात्री घडली आहे. या शेळ्यांची किंमत तब्बल एक लाख ४० हजार रुपये एवढी आहे. जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथील शेती तसेच शेळीपालन करणारे किशोर रूकमाजी तेलंगे हे शेती तसेच शेळीपालन करून आपल्या कुटुंबाचे […] The post पत्र्याच्या शेडमधून ३० शेळ्या लंपास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 10:24 pm

अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत कर्नाटकात गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार याच्या लढ्याला अखेर यश आलं असून बारामतीमधील अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अखेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामती विमानतळाजवळ झालेल्या लियरजेट 45 विमान दुर्घटनेप्रकरणी कर्नाटकच्य बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्घटनेमागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला […] The post अखेर बारामती विमान दुर्घटनेबाबत कर्नाटकात गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 10:01 pm

सरकारमध्ये गँगवार, भोंदूूगिरी, भ्रष्टाचाराच्या विळख्यात महाराष्ट्र

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवरील वाढते अत्याचार, ड्रग्जचा विळखा आणि फोफावलेली भोंदूगिरी यावरून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राची मान आज या सरकारमुळे खाली गेली असून राज्यात लोकशाहीची हत्या होत आहे अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. छत्रपती […] The post सरकारमध्ये गँगवार, भोंदूूगिरी, भ्रष्टाचाराच्या विळख्यात महाराष्ट्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 9:52 pm

अमरावती झेडपीचा 40 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर:गतवर्षीच्या तुलनेत 2 कोटी 73 लाखांपेक्षा जास्त; कृषी, आरोग्य, पाणीपुरवठ्यासाठी तरतूद वाढवली

अमरावती जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. सीईओ तथा प्रशासक संजीता महापात्र यांनी २४ मार्च रोजी हा अर्थसंकल्प सादर केला. ग्रामीण जनतेच्या गरजा लक्षात घेऊन कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, आरोग्य आणि पाणीपुरवठ्यासाठी यात भरीव तरतूद करण्यात आली आहे. २०२५-२६ या वर्षासाठीचे सुधारित अंदाजपत्रक ३७ कोटी २५ लाख ३१ हजार ६० रुपये होते, तर २०२६-२७ साठीचे मूळ अंदाजपत्रक ३९ कोटी ९९ लाख २८ हजार ७६४ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा अर्थसंकल्प २ कोटी ७३ लाख ९७ हजार ७०४ रुपयांनी अधिक आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सीईओ महापात्र यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हा परिषदेच्या आर्थिक स्थितीचे भान ठेवून समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मुद्रांक शुल्क, स्थानिक उपकर, वाढीव उपकर, सापेक्ष अनुदान, पाणीपट्टी उपकर, वन अनुदान, बाजार आणि जत्रा यांसारख्या मर्यादित स्रोतांतून जिल्हा परिषदेच्या तिजोरीत निधी जमा होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रासाठीची तरतूद गतवर्षीच्या १.४७ कोटींवरून १.५४ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. सिंचनासाठीची तरतूद ३.८४ कोटींवरून ४.०२ कोटी रुपये, तर आरोग्य क्षेत्रासाठीची तरतूद २.२६ कोटींवरून २.८७ कोटी रुपये करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागासाठीचा खर्च ३.०२ कोटींवरून ४.६२ कोटी रुपयांपर्यंत, तर पशुसंवर्धन विभागासाठीचा खर्च १.३४ कोटींवरून १.४७ कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. या अंदाजपत्रकाला विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली. यावेळी अतिरिक्त सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ श्रीराम कुळकर्णी, बाळासाहेब रायबोले (महिला व बालविकास), कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड (बांधकाम), सुनील जाधव (पाणी पुरवठा), शिक्षणाधिकारी सतिश मुगल, कृषी अधिकारी मल्ला तोडकर यांच्यासह इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:35 pm

साम्राज्यशाही, भांडवलशाही गाडल्याशिवाय शांतता नाही:शहीद दिन कार्यक्रमात भाकपचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांचे प्रतिपादन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (भाकप) राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी मंगरुळ चव्हाळा येथे आयोजित शहीद दिन कार्यक्रमात प्रतिपादन केले की, साम्राज्यशाही आणि भांडवलशाही संपुष्टात आणल्याशिवाय जगात खरी शांतता व सुख नांदू शकत नाही. सध्याची जागतिक युद्धस्थिती आणि भारतातील धर्मांध राजकारण यातून हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. मंगरुळ चव्हाळा येथे शहीद दिनानिमित्त जाहीर सभा आणि शाहीर धम्मा खडसे यांचा शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाकपचे राज्य कौन्सिल सदस्य विनोद जोशी, आयटकचे राज्य सचिव श्याम काळे, बांधकाम कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस संजय मंडवधरे, भाकपचे जिल्हा सहसचिव सागर दुर्योधन, चांदुर रेल्वे तालुका सचिव सतीश चौधरी, एआयएसएफचे माजी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य गणेश अवझाडे, अ.भा. नौजवान सभेचे माजी जिल्हाध्यक्ष सतिश शिंदे, माजी सरपंच विकास आगाशे, मधुकर बनकर, प्रदीप तांबटकर, सुरेश बिसने, पंजाब वैद्य, अरुण शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. लांडे यांनी पुढे सांगितले की, साम्राज्यशाहीची भूक लहान आणि कमकुवत देशांना गिळंकृत करण्याची आहे. त्यांच्या मते, २०१४ पासून सत्तेत असलेले नरेंद्र मोदी सरकार भांडवलदारांचे कळसूत्री बाहुले बनले आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे जगभरातील सामान्य जनता त्रस्त आहे आणि भारतालाही त्याचा मोठा फटका बसत आहे. गॅस आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती हे याचेच उदाहरण आहे. केंद्र सरकारच्या अमेरिकेसमोर झुकण्याच्या धोरणामुळे देशातील जनता संकटात सापडली आहे. भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अयशस्वी ठरले असून, इराण आणि रशियासारखे पारंपरिक मित्र दुरावले जात आहेत, तर अमेरिकेची दादागिरी वाढत आहे. देशातील कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर आणि महिला हे सर्व घटक सध्या मोठ्या संकटात आहेत. अशा परिस्थितीत भगतसिंगांच्या विचारांचे अनुकरण करून कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिकारी शाहीर धम्मा खडसे यांचा शाहिरी जलसा झाला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत क्रांतिकारी गीते सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. यावेळी आयोजकांतर्फे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. चळवळीतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना 'साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार जागर जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:33 pm

दर्यापूर कृषी कार्यालय तहसीलजवळ स्थलांतरित करा:राष्ट्रवादी काँग्रेसची एसडीओंना मागणी, शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न

दर्यापूर तालुक्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ मिळाव्यात यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे स्थलांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDO) सोमवारी निवेदन देऊन हे कार्यालय नूतन तहसील कार्यालयाजवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) च्या जुन्या इमारतीत हलवण्याची मागणी केली आहे. सध्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय भाडेतत्त्वावर असून शहराच्या एका टोकाला आहे. यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. शेतीविषयक कामांसाठी त्यांना लांबचा प्रवास करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालये दर्यापूर-अमरावती मार्गावरील तहसील कार्यालयाजवळ आहेत. त्यामुळे नागरिकांची वर्दळ या परिसरात अधिक असते. तहसील कार्यालयाजवळच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची एक रिक्त इमारत आहे, जिथे पूर्वी न्यायालय होते. या इमारतीत कृषी कार्यालय स्थलांतरित केल्यास सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. या स्थलांतरामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. तसेच, प्रशासन अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील मोपारी, शहराध्यक्ष अमोल गहरवार, रायुकाँ अध्यक्ष नितिन पाटील गावंडे, नगरसेवक राहुल बैताडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. कृषी कार्यालयाच्या स्थलांतराची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. या भागातील नागरिकांचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती असल्याने, त्यांना शेतीविषयक कामांसाठी या कार्यालयात वारंवार यावे लागते. या मागणीला तालुक्यातील नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:31 pm

अमरावतीच्या जीएमसी, वसतिगृहासाठी जागेला अंतिम मंजुरी:वैद्यकीय शिक्षण विभागाला लवकरच मिळणार ताबा, आरोग्य सुविधांना चालना

अमरावती जिल्ह्यातील आलियाबाद येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी शासनाने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पासाठी जागेला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ११.२९ हेक्टर आर जमीन वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभागाच्या ताब्यात देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील तरतुदींनुसार, ही जमीन भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने मूल्यरहित व कब्जेहक्काने प्रदान केली जाईल. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यात आरोग्य सुविधा अधिक सक्षम होतील आणि वैद्यकीय शिक्षणालाही चालना मिळेल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होतील आणि संपूर्ण विदर्भासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे ते म्हणाले. त्यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:26 pm

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलसाठी मतदान:अमरावतीत मतदानासाठी वकिलांची गर्दी, 1201 जणांनी बजावला हक्क; निकाल दीड महिन्यात

अमरावती येथे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (२४ मार्च) मतदान पार पडले. यात १२०१ वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अमरावती वकील संघाची एकूण सदस्य संख्या २२०० हून अधिक असली तरी, सुमारे एक हजार सदस्यांनी मतदानापासून दूर राहणे पसंत केले. मतदानाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, निर्धारित वेळ संपल्यानंतरही अनेक मतदार शिल्लक असल्याने मतदान प्रक्रिया उशिरा सायंकाळपर्यंत सुरूच होती. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरील कक्ष क्रमांक १२६ मध्ये मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था काहीशी अपुरी पडल्याने काही वकिलांना मतदानासाठी तासभर रांगेत उभे राहावे लागले. अमरावती वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सुनील देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणेला मदत केली. २५ सदस्यीय महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलची निवडणूक दर पाच वर्षांनी घेतली जाते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या निर्देशामुळे यंदाची निवडणूक तब्बल आठ वर्षांनी होत आहे. मतदानानंतर मतपेट्या बुधवारी मुंबईसाठी रवाना केल्या जातील. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मतपेट्या एकत्रित झाल्यानंतर मतमोजणी सुरू केली जाईल. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:24 pm

ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक निर्णय घेण्यास मनाई:मुंबई उच्च न्यायालयाचा 14 हजार 500 ग्रामपंचायतींसाठी महत्त्वपूर्ण आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत प्रशासकांना मोठे आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई करणारा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशामुळे महाराष्ट्रातील सुमारे १४,५०० ग्रामपंचायतींवर परिणाम होणार आहे. न्यायमूर्ती रवींद्र व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. राज्य सरकारने जानेवारी २०२६ मध्ये सुमारे १४,५०० ग्रामपंचायतींचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी संपल्याने, तेथे माजी सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. माजी सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या या शासन निर्णयाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, हे प्रशासक मोठे आर्थिक निर्णय घेत आहेत, विकास कामांना मंजुरी देत आहेत, निविदा काढत आहेत आणि धोरणात्मक निर्णय घेत आहेत. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. अतुल दामले, ॲड. श्रीनिवास पटवर्धन, ॲड. हर्षवर्धन पवार आणि ॲड. चेतन नागरे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करणे हे लोकशाही तत्त्वांच्या आणि कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. अशा प्रशासकांना मोठे आर्थिक निर्णय घेण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने स्पष्ट केले की, प्रशासकांची नियुक्ती ही तात्पुरती व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांनी कोणतेही मोठे आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत. त्यांना केवळ दैनंदिन आणि नियमित प्रशासकीय कामकाज करण्याची परवानगी असेल. यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, पाणीपट्टी, स्वच्छता खर्च आणि इतर अत्यावश्यक खर्चांचा समावेश आहे. खंडपीठाने महाराष्ट्र राज्य सरकारला यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:22 pm

खरात आणि त्याला पाठिशी घालणा-यांना धडा शिकविणार

मुंबई : प्रतिनिधी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचाराची संताप आणणारी माहिती विधानसभेत देताना, या प्रकरणातल्या कोणालाही सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खरातच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. मुंबईतील फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याच्या मोबाईलमधील डिलिट केलेला डेटाही काढण्यात येणार आहे. या प्रकरणी कोणालाही पाठिशी घालणार नाही. ज्या-ज्या व्यक्तीच्या विरोधात पुरावा […] The post खरात आणि त्याला पाठिशी घालणा-यांना धडा शिकविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 9:21 pm

सुशीलकुमार शिंदे यांना सिंबायोसिस विद्यापीठाची डी.लिट. पदवी:शिक्षण आणि चिकाटी यशाचे मुख्य साधन, माजी मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लेटर्स' (डी.लिट्.) ही प्रतिष्ठित पदवी प्रदान केली. या विशेष दीक्षांत समारंभात बोलताना शिंदे यांनी शिक्षण आणि चिकाटी हे यशाचे मुख्य साधन असल्याचे प्रतिपादन केले. शिक्षण हे माणसाचे आयुष्य बदलू शकणारे सर्वात प्रभावी साधन असून, कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा समारंभ सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे येथील कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला होता. प्रख्यात शास्त्रज्ञ आणि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे माजी महासंचालक डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. शिंदे यांनी आपल्या सोलापूर येथील जन्मभूमीपासून सुरू झालेल्या प्रवासाचा उल्लेख केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांसारख्या महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचण्याचा अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. आपल्या सुरुवातीच्या संघर्षांची आठवण करून देत, त्यांनी श्रमाच्या प्रतिष्ठेचे आणि इच्छाशक्तीच्या महत्त्वाचे अधोरेखित केले. दीक्षांत भाषणात डॉ. माशेलकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनप्रवासाला चिकाटी आणि प्रामाणिकतेचे प्रतीक म्हटले. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे केलेली सेवा ही स्वतःमध्येच एक प्रकारची विद्वत्ता आहे, असे ते म्हणाले. 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर सिंबायोसिसची स्थापना झाली असून, आजच्या विभाजित जागतिक परिस्थितीत या विचाराची अधिक गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. माशेलकर यांनी सीमांच्या पलीकडे जाऊन सहकार्य करू शकणाऱ्या सीमाहीन विचारसरणीच्या नेतृत्वाची भविष्यातील गरज व्यक्त केली. त्यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले. सिंबायोसिस म्हणजे केवळ सहअस्तित्व नसून, ते सहनिर्मिती आहे; ते फक्त एकत्र राहणे नाही, तर एकत्र उन्नती साधणे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:21 pm

पुणे पोलिसांकडून अंमली पदार्थविरोधी ॲप विकसित:नागरिक आता एका क्लिकवर करू शकतील गोपनीय तक्रार

पुणे शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शहरात वाढत्या अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक विशेष मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे नागरिक थेट तक्रार नोंदवू शकतील. या ॲपमध्ये माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. यामुळे भीतीमुक्त वातावरणात गुन्हेगारांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. पुणे शहर आणि परिसरात तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी केवळ पारंपरिक तपासावर अवलंबून न राहता लोकसहभागातून ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन ॲपच्या माध्यमातून अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा संशयास्पद हालचालींची माहिती फोटो किंवा व्हिडिओसह पाठवता येईल. अंमली पदार्थ माफियांच्या दहशतीमुळे अनेकदा नागरिक माहिती देण्यास पुढे येत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन पोलिसांनी ॲपमध्ये सुरक्षेचे कडक निकष लावले आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव, पत्ता किंवा मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यालाही दिसणार नाही, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. यामुळे सामान्य नागरिक 'डिजिटल खबऱ्या' म्हणून पोलिसांना मोठी मदत करू शकतील. शहरातील शैक्षणिक संस्था, आयटी पार्क आणि पब-हॉटेल्सच्या परिसरात अंमली पदार्थांचा वावर रोखण्यासाठी हे ॲप प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुणे पोलिसांनी 'ड्रग-फ्री पुणे' हा नारा दिला असून, नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून गुन्हेगारांना पकडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ड्रग बाबत काही माहिती असल्यास पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:19 pm

नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना

मुंबई : प्रतिनिधी पुण्याच्या नवले पुलावरील वाढत्या अपघातांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रोड प्रकल्प केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली. भीमराव तापकीर यांनी नवले पुलावर सातत्याने घडणा-या अपघातांबाबत तसेच ते रोखण्याबाबत सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत. याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. संबंधित राष्ट्रीय […] The post नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 9:19 pm

अफवांमुळे महाराष्ट्रात पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा:पुरवठा सुरळीत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे डिलर्सचे आवाहन

आखाती देशांमधील युद्धामुळे इंधन तुटवड्याच्या अफवांमुळे मंगळवारी (२५ मार्च) नागपूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नेहमी ५० किंवा १०० रुपयांचे पेट्रोल भरणारे नागरिक टाकी पूर्ण भरून घेत असल्याने अनेक पंपांवरील साठा लवकर संपला. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाने तसेच महाराष्ट्र आणि विदर्भ पेट्रो डिलर्स असोसिएशनने इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, सर्व पेट्रोल पंपांवर पुरवठा सुरू आहे. लोकांनी घाबरून जास्त इंधन भरू नये. काही ठिकाणी टँकर पोहोचायला उशीर झाला असेल, पण त्यामुळे पॅनिक निर्माण होऊ नये. त्यांनी पेट्रोलियम डीलर आणि डेपो सतत संपर्कात असल्याचेही नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कोरोनासारख्या परिस्थितीसाठी तयार राहण्याची गरज असल्याचे म्हटले होते. काही लोकांनी या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावून गर्दी केल्याचे दिसून आले. आखाती देशांमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने काही खासगी पेट्रोल पंपांवर मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले की, सरकारी पेट्रोल कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत आहे आणि अजिबात तुटवडा नाही. त्यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक तेवढीच खरेदी करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा साठा मुबलक प्रमाणात असून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोरपणे सनियंत्रण केले जात आहे, असेही डॉ. इटनकर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:18 pm

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत टास्क फोर्सच्या अहवालानंतर धोरण ठरवणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण आणण्याबाबत शासनाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या अहवालानंतरच ठोस धोरण किंवा कायदा तयार केला जाईल. १८ वर्षांखालील युवाशक्तीच्या सोशल मीडिया किंवा मोबाईल वापरावर सरसकट बंदी घालणे योग्य ठरणार नाही. कारण शिक्षण व्यवस्थेत इंटरनेटचा महत्त्वाचा उपयोग आहे अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. […] The post अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत टास्क फोर्सच्या अहवालानंतर धोरण ठरवणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 9:09 pm

भोंदूबाबा खरातची माहिती मिळाल्यानंतरही सरकारने सहा महिने झोपा काढल्या

मुंबई : प्रतिनिधी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होते, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अशोक […] The post भोंदूबाबा खरातची माहिती मिळाल्यानंतरही सरकारने सहा महिने झोपा काढल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 9:07 pm

बनकिन्होळाचा अभिमान!:‘आर्मी मेडिकल कोर्प्स’मध्ये लेफ्टनंट बनले अर्जुन फरकाडे; गावकऱ्यांकडून भव्य स्वागत

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुण काय करू शकतो, याचे ज्वलंत उदाहरण सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील अर्जुन प्रभाकर फरकाडे यांनी घालून दिले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातील अर्जुन यांनी भारतीय सैन्याच्या 'आर्मी मेडिकल कोर्प्स' (AMC) मध्ये 'लेफ्टनंट' पदाला गवसणी घातली आहे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते पहिल्यांदाच गणवेशात गावात परतल्यानंतर, संपूर्ण ग्रामस्थांनी त्यांचे अभूतपूर्व आणि शाही स्वागत केले. अर्जुन यांचा प्रवास अत्यंत खडतर पण प्रेरणादायी राहिला आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबात आणि वारकरी परंपरेत वाढलेल्या अर्जुन यांच्या घरात कोणतीही लष्करी पार्श्वभूमी नव्हती. मात्र, देशसेवेचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून त्यांनी कठोर परिश्रम घेतले. विठ्ठल-रुक्मिणीची भक्ती, घरातील शिस्त आणि आई-वडिलांच्या संस्कारांच्या शिदोरीवर त्यांनी हे यशाचे शिखर सर केले आहे. रथावरून मिरवणूक अन् ढोल-ताशांचा गजर लेफ्टनंट अर्जुन फरकाडे गावात दाखल होताच बनकिन्होळा ग्रामस्थांनी आनंदाश्रूंनी त्यांचे स्वागत केले. फुलांनी सजवलेल्या रथावरून त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि 'भारत माता की जय'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव या स्वागत सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अर्जुनने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर उज्ज्वल केले आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. ग्रामीण तरुणांसाठी यशाचा मंत्र संधीपेक्षा जिद्द महत्त्वाची असते; योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही आकाशाला गवसणी घालू शकतात, हा संदेश अर्जुन यांच्या यशाने अधोरेखित केला आहे. आज अर्जुन फरकाडे हे केवळ बनकिन्होळा गावासाठीच नव्हे, तर सैन्य दलात करिअर करू इच्छिणाऱ्या हजारो ग्रामीण तरुणांसाठी एक आदर्श ठरले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 9:04 pm

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण:शिवसेना महिला आघाडीचा मूकमोर्चा, एसपी तुषार दोशींना बडतर्फ करण्याची मागणी

सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला व समाजकारणाला वैचारिक परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान जे दबाव नाट्य, अटक सत्र आणि राज्याच्या मंत्री महोदयांना धक्काबुक्कीचे प्रकार झाला तो निंदनीय आहे. यात सत्ता स्थापन करण्यास मदत करणाऱ्या सातारा एसपीना बडतर्फ करावे या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते शिवतीर्थ पोवई नाका असा शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी मूक मोर्चा काढला. जिल्हा प्रशासनाला सादर निवेदनात नमूद केले आहे की, शिवसेना व राष्ट्रवादी यांनी निवडणूक पूर्व युती जाहीर करून बहुमतासाठी आवश्यक ते 37 संख्या बळ जुळवले होते. असे असताना विरोधकांनी बळाचा वापर करून प्रचंड दांडगाई केली. त्यादिवशी पोलिसांची भूमिका ही सत्ताधाऱ्यांना धार्जिणी किंबहुना घरगड्यासारखी होती. यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. खासदार नितीन पाटील व मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून जिल्ह्याच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासला गेला आहे. जिल्हा परिषदमधील गोंधळ नाट्याची न्यायालयीन चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी. सीसीटीव्ही फुटेज सर्वांसाठी खुले करून नक्की त्या दिवशी काय घडले हे जनतेसमोर आणावे. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड रद्द करून नव्याने फेर निवड घेण्यात यावी. संबंधित प्रकरणातील शासकीय स्तरावरील दोषी अधिकाऱ्यांच्या तत्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागेवर कर्तव्यनिष्ठ अधिकारी नेमावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सातारा जिल्हातील कविता ताई ओबळे (जिल्हा परिषद सदस्य) सुलोचना चंद्रकांत पवार उप जिल्हा अध्यक्ष सातारा ( शिवसेना सातारा ) तसेच इतर जिल्हातील शिवसैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 8:18 pm

हिंगोलीत चोरी करणारा अंतरराज्य टोळीतील गुन्हेगाराला अटक:पोलिसांची तेलंगणात जाऊन कारवाई, 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरात तिरुपतीनगर भागात घराला कुलुप लाऊन कुटुंबासह भोजनासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी अवघ्या १६ मिनीटांमध्ये १० लाखांचा मुद्देमाल पळविला होता. या प्रकरणात पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील एका गुन्हेगाराला मंगळवारी ता. २४ अटक करून दोन लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली शहरातील तिरुपतीनगर भागात विश्‍वजीत उगिले हे मंगळवारी ता. १० कुटूुंबियांसह काही अंतरावरच असलेल्या एका हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले होते. घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व १ लाख रुपये रोख असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल पळविला. या प्रकरणी बुधवारी ता. ११ रात्री हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचे गंभीरे लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, पापर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार शेख शकिल, मगरे, सुभाष घुगे, रवि स्वामी, विशाल खंडागळे, आझम प्यारेवाले, सायबर क्राईमचे जमादार दत्ता नागरे, प्रदिप झुंगरे यांनी चोरट्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली. यामध्ये आरोपी सयद सोहेले सयद सरवर (रा. बल्लागुडा, हैद्राबाद) याने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला तेलंगणा राज्यातून अटक केली. त्याच्याकडून दोन लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी सोहेल हा तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी करणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आता या टोळीतील इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 8:12 pm

हिंगोली जिल्ह्यातील 21 ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार:मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते सत्कार

हिंगोली जिल्ह्यातील मागील पाच वर्षात रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे अखेर मंगळवारी ता २४ वितरण झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त २१ ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. येथील जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात आयोजित कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, केशव गड्डापोड, विजय बोराटे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मधील पाच वर्षातील जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांमध्ये सविता श्रीखंडे, सपना कुलकर्णी, राजाभाऊ चव्हाण, कैलास देशमुख, सुरेश काळे, सुरेश झिंझाडे,,रामेश्वर घुगे, संजय खाडे, एल.डी. डुकरे, अरूण वाबळे, रामेश्वर हेलगंड, व्ही. एस. राठोड, विशाल बैस, दामोधर गोरे, संदिप काळे, निळकंठ ढोके सुधीर तांबडे, शोभा इंगोले, गजानन काकडे, मनिषा मारकड, मीना लोखंडे यांचा समावेश आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसेवकांनी शासकीय योजनांची गाव पातळीवर गावकऱ्यांना माहिती देऊन त्याचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. याशिवाय या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करावी. केवळ पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकच नव्हे तर सर्वच ग्रामसेवक आदर्श असून या ग्रामसेवकांनी गाव पातळीवर काम करताना जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामसेवकांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी गुंजन काळे, लक्ष्मीकांत क्षीरसागर, सुनील गुठ्ठे, विकास बुर्से यांच्यासह पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 8:01 pm

अजित पवार अपघात प्रकरणी कर्नाटकात FIR दाखल:रोहित पवार यांच्या लढ्याला यश, बंगळुरू पोलिसांत विमान कंपनीविरुद्ध गुन्हा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनावरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संशयाचे मोहोळ उठले आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या संघर्षाला मोठे यश आले असून, तब्बल दोन महिन्यांनंतर या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू येथील शेशाद्रीपुरम पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १७३(१) अंतर्गत ‘झिरो एफआयआर’ (Zero FIR) नोंदवण्यात आला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळाजवळ 'लियरजेट ४५' (VT-SSK) हे विमान कोसळले होते. यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. रोहित पवार यांनी आपल्या तक्रारीत हा केवळ अपघात नसून एका मोठ्या गुन्हेगारी कटाचा भाग असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. विमानाच्या देखभालीत (Maintenance) आणि संचालनात जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करण्यात आल्याचा दावा तक्रारीत आहे. विमानाचे तांत्रिक रेकॉर्ड्स आणि उड्डाण तासांच्या नोंदींमध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. तांत्रिक गौडबंगाल: उड्डाण तासांची लपवाछपवी? तक्रारीत नमूद केल्यानुसार, अपघातग्रस्त विमानाने अधिकृत नोंदींमध्ये ४९१५ तास पूर्ण केल्याचे दाखवले होते, जे ५००० तासांच्या अनिवार्य इंजिन 'ओव्हरहॉल' (TBO) मर्यादेच्या अगदी जवळ होते. मात्र, प्रत्यक्षात या विमानाने ८००० तासांहून अधिक उड्डाण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) २४ फेब्रुवारीच्या ऑडिट अहवालातही 'VSR व्हेंचर्स' कंपनीची काही विमाने उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे सांगत ती ग्राऊंड केली होती. तरीही हे विमान वापरासाठी का ठेवले? असा टोकदार प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रोहित पवारांकडून आज विधानसभेत मुद्दा उपस्थित रोहित पवार यांनी आजच विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभेत बोलताना रोहित पवारांनी आक्रमक सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी रोहित पवारांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले राज्यात बस स्टॉपवरून चार्जर चोरीला गेला किंवा चप्पल चोरीला गेली तरी गुन्हे दाखल होतात. झाडाच्या फांद्या शेजाऱ्याच्या अंगणात गेल्या तरी FIR होतो. मग राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघातात मृत्यू होतो, पण पोलीस गुन्हा का नोंदवत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्याचं जळतं त्यालाच कळतं, असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. पुढचा तपास आता केंद्राच्या रडारवर? मुंबई आणि बारामती पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर आता बंगळुरूमध्ये दाखल झालेला हा गुन्हा तपासासाठी महत्त्वाचा वळण बिंदू ठरणार आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या तांत्रिक तपासासोबतच आता स्वतंत्र गुन्हेगारी तपासाची मागणी जोर धरू लागली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 7:55 pm

सीएपीएफ विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली : राज्यसभेत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) संबंधित महत्त्वाचे विधेयक विरोधकांच्या तीव्र विरोधामुळे सादर होऊ शकले नाही. विधेयकाची प्रत वेळेत न मिळणे आणि कढर अधिका-यांच्या नियुक्तीबाबतच्या तरतुदींवर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने सरकारला हे विधेयक तुर्तास पुढे ढकलावे लागले. काल राज्यसभेत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सामान्य प्रशासन) विधेयक सादर होणार होते. मात्र विरोधी पक्षांनी या […] The post सीएपीएफ विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 7:07 pm

कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नाही

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज राज्यसभेत इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. भारताने नेहमीच संवादाचा मार्ग सुचवला असून सर्व संबंधित देशांशी भारत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नसते. या संघर्षाचे समाधान संवादातूनच होऊ शकते. भारत सातत्याने सर्व देशांना शांततापूर्ण तोडगा […] The post कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 7:05 pm

दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा अटकेत

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका अत्यंत खतरनाक आंतरराष्ट्रीय दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून देशाच्या सुरक्षेला असलेला एक मोठा धोका टळला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या एका तरुणाला अटक करण्यात आली असली, तरी त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेले पुरावे कोणत्याही दहशतवाद्यापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानमधून चालवल्या जाणा-या तहरीक-ए-तालिबान हिंदुस्थान या नव्या दहशतवादी संघटनेचा हा कट दिल्ली पोलिसांच्या […] The post दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Mar 2026 7:03 pm

ऐसी कौनसी बात थी की, और का हाथ पकडना पडा:उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना 'शायराना' सवाल

राजकारण हा माझा पिंड नाही, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचाच आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझे इतके उत्तम वर्णन केले, मला इतके जवळून ओळखले, मग 'ऐसी कौनसी बात थी, की और किसी का हाथ पकडना पडा', अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शायरीला 'शायरी'नेच उत्तर दिले. विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित निरोप समारंभात उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी आणि राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले, मी या विधीमंडळात मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की आपल्या ध्यानीमनी नसते आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणे हे मर्दाचे लक्षण नसते. त्यामुळे ती जबाबदारी स्वीकारली. मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. सर्व माझे त्यावेळचे आजी-माजी सहकारी, मंत्रिमंडळात होते. सगळे शासकीय अधिकारी, सर्व प्रशासन, सर्व अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक प्रशासनाचा गंधही नसणारा माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसतो आणि तो राज्य चालवतोय. हे या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. उद्धव ठाकरेंना आठवला 'तो' दिवस उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय आपण मला निरोप देण्यासाठी स्वत: अगत्याने हजर राहिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला तो ही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. पण काल विधिमंडळात जे काही घडले ते बघून मला तो दिवस का आठवला ते सांगतो. कारण आपण म्हणाला होतात ज्ञानेश्वरांचे भारूड. काट्याच्या आणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसई चिना, आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे आहे. आता ते आणीवरच्या तीन गावांमधील एक गाव आणीवर गेलेले आहे. बाकी गावांचे काय झाले? ते त्या गावकऱ्यांना माहिती आहे. आताच्या शतकात स्वार्थासाठी रेडे कापले जातात उद्धव ठाकरे म्हणाले, ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते की, ज्ञानेश्वर महाराज १२ व्या, १३ व्या शतकात होऊन गेलेले आहेत. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. त्या शतकापासून या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? आपले खालच्या सभागृहातील निवेदन मी काळजीपूर्वक ऐकले. नाशिकच्या प्रकरणाबाबत आपण जी भूमिका घेतली, त्यासाठी धन्यवाद देतो. देशात बुवा नाही, तर युवा चमत्कार करू शकतात उद्धव ठाकरे म्हणाले, सिनेकलावंत अतुल कुलकर्णी यांचे एक चांगले वक्तव्य आहे. पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचे काय करायचे? आपण सगळ्यांनी एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे. सगळ्या राजकारणींनी ठरवले, तर बुवा शक्ती पेक्ष युवाशक्तीला आपण जास्त ताकद दिली पाहिजे. या देशात बुवा चमत्कार करू शकत नाही, युवा चमत्कार करू शकतात. युवाशक्तीला नीट पाठिंबा दिला, तर या बुवांची दुकाने बंद झाल्याशिवाय राहणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 6:54 pm

उद्धवजी आमचे सहप्रवासी राहिलेत:त्यांच्या स्वभावात राजकारण नाही, फोटोग्राफीपासून नेतृत्वापर्यंत मुख्यमंत्र्यांकडून ठाकरेंचे कौतुक

राजकारणात मतभेद आणि संघर्षाच्या पलीकडेही एक नाते असते, ते म्हणजे सहप्रवासाचे. उद्धवजी आमचे अनेक वर्षांचे सहप्रवासी राहिले आहेत. त्यांचा स्वभाव मुळात राजकारणी नाही; एकदा ठरवले की निर्णय घेऊन टाकायचा, हा त्यांचा बाणा स्व. बाळासाहेब ठाकरेंसारखाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ आज संपल्याने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज आपल्या सभागृहातून या टर्ममध्ये निवृत्त आमचे सदस्य आहेत, त्यांच्या निरोप समारंभासाठी सगळे उपस्थित आहोत. मला नेहमी या गोष्टीचा आनंद वाटतो की, हे सभागृह असे आहे की ज्या सभागृहात आलेले सदस्य, निवृत्त होणारे सदस्य, सगळ्यांचे स्वागत होते. त्यांच्याबद्दल चार चांगले शब्द बोलण्याची संधी सगळ्यांना मिळते. म्हणून हा महत्त्वाचा सोहळा आहे, असे मी समजतो. आज सभागृहातील एक सदस्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्व. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असलेले उद्धवजी यांचा आपण निरोप समारंभ करत आहोत. उद्धवजी आमचे अनेक वर्षांचे सहप्रवासी राहिलेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात मतभेद असतात, अनेकवेळा वेगवेगळ्या भूमिका असतात. कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो. पण या पलिकडचे देखील एक नाते राजकारणामध्ये असते. ते नाते असते सहप्रवासाचे. आमचा उद्धवजींसोबतचा प्रवास हा अनेक वर्षांचा राहिलेला आहे. अनेक वर्षांचे आम्ही सहप्रवासी राहिलेलो आहोत. निश्चितपणे अनेक चांगल्या गोष्टी समाजाकरिता, राज्याकरिता एकत्रित करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. उद्धवजींचा स्वभाव, त्यांचे व्यक्तिमत्व यामध्ये राजकारण थोडे कमी आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकारणी नाही. एकदा ठरवले की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव उद्धव ठाकरेंचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा देखील असाच गुण होता. फोटोग्राफीतून आपल्या संस्कृतीची जपणूक देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे निश्नांत तज्ञ छायाचित्रकार आहेत. त्यांनी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध छटा अतिशय सुंदर कॅप्चर केल्या आहेत. गड, किल्ले, निसर्ग, वारकरी परंपरा हे सगळे त्यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले आहे. हे सगळे फोटोग्राफ पाहिल्यानंतर त्याच्या पाठीमागे उद्धव ठाकरेंचे संवेदनशील मन आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंची महाराष्ट्र देशा आणि पाहावा विठ्ठल ही कामे केवळ छायाचित्रण नाहीये, तर एकप्रकारे आपल्या संस्कृतीची जपणूक या माध्यमातून करण्याचे काम केले आहे. हे करण्याकरता खूप कष्ट देखील अनेकवेळा घेतलेत. जेव्हा वारीचे छायाचित्रण केले होते, त्यावेळी अतिशय रिस्क घेऊन हेलिकॉप्टरमधून उघड्या दरवाजातून फोटोग्राफी त्या काळात केली. अनेकवेळा जंगलात छायाचित्रण केले. आपला छंद जोपासायचे काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ठाकरेंनी निर्णयाच्या परिणामांची चिंता केली नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणामध्ये आल्यानंतर ते पक्षप्रमुख झाले, पक्षप्रमुख जी काही संकटे आली, संघर्ष होता. बराच काळ आम्ही सोबत त्या संघर्षातून आणि संकटातून पुढे गेलो. अर्थात माझी आणि त्यांची अधिक जवळीक २०१० नंतर आली. २०१४ नंतर अधिक आली. या सगळ्यात एक मैत्रीची भावना आमच्यात त्या काळात तयार झाली. आज ती मैत्रीची भावना नाही, असे मी म्हणणार नाही. पण शेवटी त्यांच्या राजकीय भूमिका आहेत. आमच्या राजकीय भूमिका आहेत. आता त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या. पण एक गोष्टी मला सांगायची आहे की, राजकारणात काम करत असताना, अनेकवेळा मी बघितले की, एखादा निर्णय घेत असताना, त्याच्या परिणामांची चिंता उद्धव ठाकरेंनी केली नाही. उद्धवजींचा तो गुण शिकण्यासारखा देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक जो गुण, त्यांची शिवसेना असो की आमच्या शिंदे साहेबांची शिवसेना असो. जो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी राजकारणात वेगळा पायंडा पाडला की, सामान्यातील सामान्य माणसाला देखील, ज्यांना राजकीय चेहरा नाही, अशा व्यक्तीला देखील राजकीय चेहरा देणे आणि त्यातून राजकीय नेतृत्व उभे करणे हा गुण शिकण्यासारखा आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Mar 2026 6:17 pm