SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गमध्ये युती होऊ शकली नाही

मुंबई : रायगडमध्ये शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिस्कटल्यानंतर सिंधुदुर्गमध्येही भाजप-शिवसेना एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचे नाव घेत त्यांच्यामुळे युती होऊ शकली नाही असे म्हटले आहे. राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गमध्ये […] The post नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गमध्ये युती होऊ शकली नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 10:21 pm

दोघे निलंबित, तिघांना केले कार्यमुक्त

लातूर : योगीराज पिसाळ यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुलाचा लाभ देताना मंजूर यादीत नावे नसलेले ६६ बोगस प्रस्ताव तयार करून त्या खात्यावर ७५ लाख १५ हजार रूपये वर्ग केले होते. सदर बाब समजताच अहमदपूर व जळकोट तालुक्यातील गट विकास अधिका-यांनी वर्ग झालेल्या पैशाची वसूली करून या प्रकरणी दोषी कर्मचा-यांचा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर […] The post दोघे निलंबित, तिघांना केले कार्यमुक्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 10:01 pm

चुकीचा अहवाल देऊन प्रशासनाची दिशाभूल करणा-यांना बडतर्फ करा

लातूर : प्रतिनिधी नळेगावच्या घरकुलाचा चुकीचा अहवाल देवून प्रशासनाची दिशाभूल करणा-या अधिका-यांना बडतर्फ करावे, या मागणीसाठी भारतीय दलित कोब्रा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. नळेगाव ता. चाकूर जि.लातूर ग्रा.प.अंतर्गत २०१६-१७ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत बालाजी गंगाराम कांबळे यांना घरकुल मंजूर झाले होते. तेंव्हा सदरील व्यक्ती […] The post चुकीचा अहवाल देऊन प्रशासनाची दिशाभूल करणा-यांना बडतर्फ करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 9:54 pm

लातूर जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्ज अंतर्गत शेतक-यांच्या ५ मुलांना ४८ लाख रुपये मंजूर

लातूर : प्रतिनिधी राज्यात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शैक्षणिक कर्ज योजना अंतर्गत जिल्ह्यातील ५ शेतकरी सभासदांना उच्च शिक्षणासाठी ४८.३३ लाख रुपये गुरुवारी झालेल्या बँकेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी दिली आहे आजतागायत जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्ज अंतर्गत ४६४ शेतक-यांच्या मुलांना २१.६६ कोटी रुपये कर्ज वाटप […] The post लातूर जिल्हा बँकेकडून शैक्षणिक कर्ज अंतर्गत शेतक-यांच्या ५ मुलांना ४८ लाख रुपये मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 9:53 pm

सोयाबीनच्या दराची ५ हजारांकडे वाटचाल

लातूर : प्रतिनिधी लातूरच्या आडत बाजारात दिवाळीपासून सोयाबीनची आवक दोन पटीने घटली आहे. असे असले तरी सोयाबीनच्या दरात मात्र वाढ होताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसात सोयाबीनच्या दरात ५० रूपयांची वाढ झाली असून आडत बाजारात गुरूवारी सोयाबीनला ४ हजार ७५१ रूपये सर्वाधिक दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दराची ५ हजार रूपयांकडे वाटचाल सुरू असून शेतक-यांचेही […] The post सोयाबीनच्या दराची ५ हजारांकडे वाटचाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 9:51 pm

उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचे दुस-यांदा समन्स

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात कारवाई करत तब्बल कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. तसेच त्यांच्या संबंधित काही ठिकाणी छापेमारी देखील केली होती. त्यानंतर आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीचा भाग म्हणून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अंबानींना दुस-यांदा समन्स बजावले आहेत. अनिल अंबानी यांना मनी […] The post उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचे दुस-यांदा समन्स appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:52 pm

गोल्डक्र्रेस्ट हायच्या दोंतुलवारची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

लातूर : प्रतिनिधी लातूर विभागीय कनिष्ठ ऍथलेटिक्स स्पर्धा २०२५ मध्ये गोल्डक्र्रेस्ट हाय, लातूर शाळेच्या आयान दोंतुलवार या विद्यार्थ्याने चमकदार कामगिरी करत शाळेचा आणि संस्थेचा गौरव वाढवला आहे. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे दि. ५ नोव्हेंबर रोजी आयोजित या स्पर्धेत आयान दोंतुलवार याने १०० मीटर आणि २०० मीटर धावस्पर्धेत […] The post गोल्डक्र्रेस्ट हायच्या दोंतुलवारची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:41 pm

उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरु; ९ नोव्हेंबर अंतिम मुदत

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा नगरपरिषद तसेच रेणापुर नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीने युध्दपातळीवर तयारी सुरू केली आहे. जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी पक्षाचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत इच्छुक उमेदवारांच्या अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आणि उमेदवारी अंतिम करण्याच्या […] The post उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरु; ९ नोव्हेंबर अंतिम मुदत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:40 pm

लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धा १७ नोव्हेंबरपासून 

लातूर : प्रतिनिधी हौशी नाट्य कलावंत आणि नाट्य रसिकांची उत्कंठा वाढवणा-या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूर केंद्रावर दि. १७ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील १३ नामवंत नाट्य संघांचा समावेश आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत रंगणारी ही नाट्य स्पर्धा दर्दीनाट्य रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानी असणार आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित […] The post लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धा १७ नोव्हेंबरपासून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:39 pm

अल्पवयीन मुलीचे छेडछाड प्रकरण:येडशी तांडा येथील 'त्या' वसतिगृहावर प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून कारवाई होईना

कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील वसतिगृहातील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणांमध्ये इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात संस्था प्रशासनाला पाठीशी घालण्याची प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही पालकांतून केला जात आहे. कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथील एका वसतिगृहामध्ये अल्पवयीन मुलीची शिक्षकानेच छेड काढण्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे वसतीगृहाच्या अधीक्षकाने या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतरही सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणात घाबरलेल्या मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर तिने तिच्या कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला होता. त्यानंतर या प्रकरणांमध्ये आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शिक्षक महालिंग पटवे व अधीक्षक मोहन राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सदरील प्रकरण गंभीर असतानाही हिंगोलीच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयाने केवळ संस्थेला नोटीस बजावून खुलासा मागवला. कार्यालयाच्या नोटीसला उत्तर देताना संस्थेने संबंधित शिक्षकाला बडतर्फ केल्याचे सांगितले तर मुख्याध्यापक व वसतीगृह अधीक्षकावर निलंबनाची कारवाई केल्याची स्पष्ट केले. मात्र अद्यापही सदरील प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेतली नसल्याचे चित्र आहे. या प्रकरणांमध्ये सहाय्यक संचालक कार्यालयाने संबंधित संस्थेचा खुलासा प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवला आहे. मात्र प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून अद्याप पर्यंत संबंधित संस्थेवर कुठल्याही प्रकारची कारवाईही करण्यात आली नाही. या प्रकारामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सदर प्रकरणाची वरिष्ठ कार्यालयाला गांभीर्य नाही का असा सवाल उपस्थित केला जात असून आता संस्थेवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तर दुसरीकडे संस्था प्रशासनाला वरिष्ठ कार्यालयाकडून अभय दिले जात असल्याचा आरोपही केला जाऊ लागला आहे. या प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाकडून काय भूमिका घेतली जाणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:37 pm

आत्या सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

मुंबई : प्रतिनिधी पुणे जमीन प्रकरणामुळे पार्थ पवार यांच्यावर आरोप व टीकेचा भडीमार होत असताना, आत्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी मात्र त्यांची पाठराखण केली. पार्थशी आपले सकाळीच बोलणे झाले आहे. मीच त्याला फोन केला होता. त्याने मला आत्या मी काहीच चूक केली नाही असे सांगितल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. […] The post आत्या सुप्रिया सुळेंकडून पार्थ पवारांची पाठराखण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:20 pm

मुंबईत लोकलने 4 प्रवाशांना उडवले:तिघांचा मृत्यू तर एकजण गंभीर, सँडहर्स्ट रोड स्टेशनवरवरील दुर्घटना

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली असताना, मुंबईत एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ रुळांवरून पायी चालणाऱ्या चार प्रवाशांना अंबरनाथ फास्ट लोकलने धडक दिली. या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर एक प्रवासी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कर्मचारी आंदोलनाचा प्रवाशांना फटका रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे लोकल सेवा बंद होती आणि त्यामुळे सर्वच स्थानकांवर प्रचंड गर्दी वाढली होती. लोकलसेवा बंद असल्याने हे चार प्रवासी सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ रुळांवरून चालत होते, त्याच वेळी अचानक आलेल्या लोकलने त्यांना उडवले. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी काय म्हणाले? घटनेबाबत बोलताना मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, सँडहर्स्ट रोड स्टेशनवर काही प्रवासी चालले होते. त्यांना अंबरनाथ फास्ट ट्रेनने धडक दिली. आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार तिघांना धडक लागली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत सीएसएमटीवरून लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनाही बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सध्या 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत असून, अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनाचे कारण काय? मुंब्रा येथे झालेल्या एका अपघाताप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात एनआरयूएम संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मोर्चा काढला. तसेच, मोटरमन देखील आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली. लोकल थांबल्याने सीएसएमटी स्थानकावर अनेक लोकल उभ्या होत्या आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. संध्याकाळच्या 'पीक आवर'मध्ये झालेल्या या आंदोलनामुळे लोकल वाहतूक पावणेसहा वाजेपर्यंत थांबली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे युनियनसोबत बोलणी सुरू केली. लोकल सेवा त्वरित पूर्ववत व्हावी, यासाठी डीआरएम आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांसोबत यशस्वी बोलणी झाल्यानंतर सुमारे पावणेसात वाजता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. जीआरपीने अभियंत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन होते. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन थांबवण्यात आले आहे. तथापि, पावणेसहा ते पावणेसात या वेळेत लोकल सेवा ठप्प असल्याने, सध्या मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू राहील, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:17 pm

दिल्लीतील २२ लाख मुलांचे फुफ्फुस खराब!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका ल्यूक क्रिस्टोफर कौटिन्हो यांनी दाखल केली आहे. क्रिस्टोफर म्हणतात की, देशातील वायू प्रदूषणाची पातळी सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या पातळीवर पोहोचली आहे, ज्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. […] The post दिल्लीतील २२ लाख मुलांचे फुफ्फुस खराब! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:13 pm

कुत्रा चावला…महिलेने केली २० लाखाच्या भरपाईची मागणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी कुत्र्याने चावा घेतल्याप्रकरणी आपल्याला २० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रियांका राय यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने २०२३ मध्ये तयार केलेल्या सूत्राच्या आधारे भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला (एमसीडी) म्हणणे सादर करावे, असे निर्देश दिले आहेत. […] The post कुत्रा चावला… महिलेने केली २० लाखाच्या भरपाईची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:11 pm

सरकारी नोकर भरती केवळ पुस्तकी ज्ञानावर! उच्च न्यायालयाचे निरीक्षण

चंदीगड : वृत्तसंस्था सरकारी नोक-यांमध्ये भरती करण्याचा सामान्य कल अजूनही पुस्तकी ज्ञानावर अवलंबून आहे. अशा परीक्षा व्यावहारिक समस्या सोडवण्याच्या क्षमतांचे मूल्यांकन करण्याऐवजी रटाळ शिक्षण आणि तथ्यांच्या यांत्रिक पुनरावृत्तीवर भर देतात. सरकारी भरतीसाठीच्या अशा दृष्टिकोनातून अनेकदा सर्जनशीलता, भावनिक बुद्धिमत्ता आणि प्रभावी प्रशासनासाठी आवश्यक असलेल्या इतर कौशल्यांचा विचार केला जात नाही, असे निरीक्षण पंजाब आणि हरियाणा […] The post सरकारी नोकर भरती केवळ पुस्तकी ज्ञानावर! उच्च न्यायालयाचे निरीक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:07 pm

‘टीव्हीके’चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार विजय

चेन्नई : वृत्तसंस्था तमिळ सुपरस्टार अभिनेता थलपती विजय यांना त्यांच्या तमिळगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे २०२६ मधील तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. महाबलीपूरम मधील हॉटेलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत विजय यांना निवडणुकीसाठीचे पूर्ण अधिकारही दिले गेले. करूर येथील चेंगराचेंगरीनंतर कार्यकर्त्यांना संबोधित करण्याची विजय यांची ही पहिली सार्वजनिक सभा होती. विजय म्हणाले की, […] The post ‘टीव्हीके’चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:04 pm

अजित पवारांना जमिनी लाटण्याचा भस्म्या रोग

मुंबई : प्रतिनिधी पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ कवडीमोल भावाने हडप केली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा सवाल करताना भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. शेतक-यांना मोफत नको म्हणणा-या अजित […] The post अजित पवारांना जमिनी लाटण्याचा भस्म्या रोग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:01 pm

पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहार संशयाच्या भोव-यात

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार भागीदार असलेल्या कंपनीने पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागातील सरकारच्या कब्जात असलेली १८०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ४० एकर जमीन अवघ्या ३०० कोटींना खरेदी केल्याचे व केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरून या व्यवहाराची नोंदणी केल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या […] The post पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहार संशयाच्या भोव-यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 8:00 pm

सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचा-यांचे आंदोलन

मुंबई : सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचा-यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्मचा-यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत. सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये मोटरमॅनचे आंदोलन सुरू आहे. ५० ते ६० मोटरमॅन अचानक सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये येऊन बसले आणि त्यांनी […] The post सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचा-यांचे आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 7:51 pm

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन:ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा पाऊण तास ठप्प, चाकरमान्यांना फटका

मुंबई येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर केलेल्या आंदोलनामुळे सायंकाळच्या वेळी रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. जीआरपीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी 5:50 वाजल्यापासून लोकल सोडण्यात आलेल्या नव्हत्या, ज्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियनने पुकारलेल्या या संपामुळे लोकलसेवा सुमारे 50 मिनिटे ठप्प झाली होती. संध्याकाळच्या 'पीक आवर'मध्ये लोकलसेवा थांबल्याने हजारो प्रवासी स्थानकांवर खोळंबले होते. सायंकाळी 6:40 मिनिटांनी लोकलची वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी, या आंदोलनामुळे लोकल सध्या 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत आहेत. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आंदोलनाचे कारण काय? मुंब्रा येथे झालेल्या एका अपघाताप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात एनआरयूएम संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मोर्चा काढला. तसेच, मोटरमन देखील आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली. लोकल थांबल्याने सीएसएमटी स्थानकावर अनेक लोकल उभ्या होत्या आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. संध्याकाळच्या 'पीक आवर'मध्ये झालेल्या या आंदोलनामुळे लोकल वाहतूक पावणेसहा वाजेपर्यंत थांबली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे युनियनसोबत बोलणी सुरू केली. लोकल सेवा त्वरित पूर्ववत व्हावी, यासाठी डीआरएम आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांसोबत यशस्वी बोलणी झाल्यानंतर सुमारे पावणेसात वाजता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. जीआरपीने अभियंत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन होते. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन थांबवण्यात आले आहे. तथापि, पावणेसहा ते पावणेसात या वेळेत लोकल सेवा ठप्प असल्याने, सध्या मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू राहील, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिली आहे. मुंब्रा अपघात प्रकरण काय होते? 9 जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. लोहमार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, या लोकल अपघाताचे मुख्य कारण हे रेल्वे अभियंत्यांचे दुर्लक्ष होते. अपघाताच्या ठिकाणी पावसाळ्यामुळे जमीन खचली होती, परंतु रेल्वे अभियंत्यांनी या भागाचे दुरुस्तीचे काम वेळेत केले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षामुळेच अपघात घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी रेल्वेचे सीनिअर सेक्शन इंजिनिअर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअर विशाल डोळस या दोन अभियंत्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 7:47 pm

'आत्या मी काही चूक केलेली नाही':पार्थ पवारांचा या जमिनीच्या व्यवहारात संबंध नाही, सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडीया होल्डिंग्स एलएलपी' कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यातील जमिनीचे प्रकरण नेमके काय आहे, हे राज्याच्या सरकारने स्पष्ट केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट करायला पाहिजे. कारण सर्व संभ्रम आहे, या प्रकरणात माझे तीन प्रश्न आहेत. माझा पहिला प्रश्न आहे की ही जमीन सरकारी होती का? तर मग ती विकता येते का? जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झाला का? दूसरा महत्त्वाचा मुद्दा तहसीलदार म्हणतात की मी त्यावर स्वाक्षरी केली नाही, मग स्वाक्षरी केली नसेल तर व्यवहार कसा झाला? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. 'आत्या मी काहीही चूक केलेली नाही' सुप्रिया सुळे यांचे पार्थ पवार यांच्याशी काही बोलणे झाले का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या, हो सकाळीच पार्थ पवारांना फोन केला आणि विचारले की नेमका विषय काय आहे, जरा समजून तरी सांगा. त्यावर पार्थ पवार म्हणाले की आत्या मी काहीही चूक केलेली नाही आणि माझ्या वकिलांशी माझे बोलणे झाले आहे. मग जर पार्थ पवार यांचे वकिलांशी बोलणे झाले असेल तर वकील याबाबत स्पष्टीकरण देतील, असे सुळे म्हणाले. मुख्यमंत्री पार्थ पवार यांना अडचणीत आणत आहेत का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला, यावर त्या म्हणाल्या, शक्यता नाकारता येत नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी यात उत्तर दिले पाहिजे. शासनाचे विभाग कोणाला उत्तरदायी असतात? तर मुख्यमंत्र्यांना. पार्थ पवारांचा यात संबंध नाही पार्थ पवारांचा या प्रकरणात काही संबंधच येत नाही. महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा सांगितलं की, या जमिनीचा व्यवहार होऊ शकत नाही. जर व्यवहारच होऊ शकत नसेल तर मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस कशी काय आली? मुद्रांक शुल्क किती असावे? यावरही एकमत नाही. या प्रकरणात गोलमाल दिसत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 7:20 pm

बिहारमधील १२१ जागांवर मतदान संपले

पाटना : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. बेगुसरायमध्ये सर्वाधिक ६७.३२% मतदान झाले, तर शेखपुरा येथे सर्वात कमी ५२.३६% मतदान झाले. राजधानी पाटणा येथे ५५.०२% मतदान झाले. ५६ अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहिले. बिहारमधील शहरी मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव होता. १२१ जागांपैकी […] The post बिहारमधील १२१ जागांवर मतदान संपले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 7:17 pm

आता पाकिस्तानात ‘जेन झी’ आंदोलन पेटले

इस्लामाबाद : बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात ‘जेन झी’ तरुणाईने आंदोलन पुकारले आहे. मोठ्या प्रमाणात युवक सरकारविरोधात आक्रोश करत रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये काही आठवड्यांपूर्वी हिंसक आंदोलन झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला आहे. शिक्षण प्रणालीत सुधारणा करण्याची मागणी करत जेनरेशन तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. सुरुवातीला हा विरोध फी वाढ आणि मूल्यांकन […] The post आता पाकिस्तानात ‘जेन झी’ आंदोलन पेटले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 6:47 pm

मनोज जरांगे पाटलांविरोधात हत्येचा कट:हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचलाय, जरांगेंच्या गौप्यस्फोटाने महाराष्ट्रात खळबळ

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप बीड येथील एका कार्यकर्त्याकडून करण्यात आला आहे. त्यानेच यासंदर्भात जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बीडमधूनच हा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या तक्रारीमुळे जालना पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, हे सत्य आहे. कट शिजला गेला आहे, हत्या घडवून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा कट आहे, हे आता उघड होईलच. जालना जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी स्वत: या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचला आहे. या सर्व बाबी तपासातून स्पष्ट होतीलच. मी उद्या आकरा वाजता यावर पत्रकारांशी सविस्तर बोलणार आहे, सध्या मी ते सर्व पुरावे पहात असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास- मनोज जरांगे पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी ज्याने कट रचला त्याला इशारा देताना म्हणाले, बाळ तुला सांगतो तू खूप चुकीच्या ठिकाणी हात घातलास, असे आम्ही खूप बघितले आहेत. तू खूप चुकीचे पाऊल उचलले आहे. ज्यांनी कट रचला त्यांना मी इशारा देत आहे. आम्ही मराठे आहोत एवढे लक्षात ठेवावे, मी खंबीर आहे, मराठा बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही शांत राहा, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे. काय आहे प्रकरण? मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत. यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचे समोर आले असून, या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:30 pm

'ॲमेनिटी स्पेस'च्या नावाखाली डॉक्टराची 24 लाखांची फसवणूक:माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड (ॲमेनिटी स्पेस) मिळवून देण्याचे आमिष दाखवून हडपसर येथील एका डॉक्टरची २४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेविका प्राची आल्हाट, त्यांचे पती अशिष आल्हाट, चिंतामणी कुरणे (रा. महंमदवाडी) आणि आसिफ शेख (रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. महेंद्र धोंडीराम सुरवसे (वय ३९, रा. महंमदवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. सुरवसे यांचे महंमदवाडी परिसरात रुग्णालय आहे. आरोपींनी त्यांना 'ॲमेनिटी स्पेस' मिळवून देण्याचे आणि महानगरपालिकेची परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी आरोपींनी डॉ. सुरवसे यांच्याकडे २५ लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपींवर विश्वास ठेवून डॉ. सुरवसे यांनी त्यांच्या पत्नीच्या आणि मित्राच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने २४ लाख २० हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र, ठरलेली जागा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे डॉ. सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तुळशीबागेत मंगळसूत्र चोरी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेचे ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना नुकतीच घडली आहे. तुळशीबागेत महिलांचे दागिने आणि रोकड चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणी ठाण्यातील एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आपल्या नातेवाईकांसोबत तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. पोलीस हवालदार एस. नाकाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:30 pm

अपूर्णांकांचे पाढे आता राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर:'लोकमान्य टिळक अंकनाद' स्पर्धेतून गणिताची भीती कमी होणार

भारतीय गणिताचे वैशिष्ट्य असलेले अपूर्णांकांचे पाढे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहेत. यासाठी राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशनस् यांनी एकत्रितपणे 'लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धा' हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ही स्पर्धा आगामी शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहे. या उपक्रमाची माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निर्मिती नामजोशी आणि गणित संशोधक लक्ष्मण गोगावले उपस्थित होते. गणित हा सर्व शास्त्रांचा पाया मानला जातो, तरीही आजही शालेय स्तरावर सुमारे ९० टक्के विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी भीती आढळते. विद्यार्थ्यांची ही भीती कमी करून गणिताशी त्यांची मैत्री व्हावी, या उद्देशाने मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेला या संदर्भात प्रस्ताव सादर केला होता. संस्थेने या उपक्रमाची दखल घेत, राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत गणित सुलभतेने पोहोचावे यासाठी मॅप एपिक कम्युनिकेशन्ससोबत सहकार्य केले. अपूर्णांकांची उदाहरणे शालेय अभ्यासक्रमात असली तरी, अपूर्णांकांचे पाढे शिकवले जात नाहीत. या स्पर्धेचे गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांत यशस्वी आयोजन करण्यात आले असून, आजवर दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला आहे. अपूर्णांकांचे पाढे म्हणजे पूर्णांक नसलेल्या अपूर्णांकांच्या गुणाकारांचे पाढे होय. यात 'पाव', 'निम्मे', 'पाऊण', 'सव्वा', 'दिड' आणि 'अडीच' अशा अपूर्णांकांचा समावेश असतो. हे पाढे गणित सोपे करण्यासाठी तयार केले असून, ते पाठ करण्याऐवजी ऐकून लक्षात ठेवता येतात, ज्यामुळे गणितातील क्रिया जलद होतात.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:15 pm

पार्थ पवारांच्या कंपनीचे जमीन व्यवहार प्रकरण:माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडीया होल्डिंग्स एलएलपी' कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणी आता माध्यमांसमोर येत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवार म्हणाले, मला याबाबतीत माहिती नाही. माझा अजित पवार म्हणून त्या गोष्टीशी संबंध नाही. त्या जमीन व्यवहार प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. उलट मी या निमित्ताने अधिकारी वर्गांना सांगेल की जर माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करत असेल किंवा नियमात न बसणारे कृत्य करत असेल तर त्याला माझा कुठलाही पाठिंबा नसेल. मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा व्यक्ती आहे, हे तुम्हाला माहीत आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून पुढे काय होणार ते बघूया. मी कधीही चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, या प्रकरणाशी संपूर्ण माहिती घेऊन मी उद्या तुमच्याशी संवाद साधेल. स्टॅम्प ड्यूटी असेल किंवा आणखी काही त्याची संपूर्ण माहिती मी घेईल. राज्याच्या अर्थमंत्री या नात्याने मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालेल. हा माझ्या घरचा प्रश्न नाही. तिथल्या बंगल्यावर पार्थ अजित पवारचे नाव आहे. मी कधीही चुकीच्या कामाचे समर्थन करत नाही. माझा यात दुरान्वये संबंध नाही. मी तुमच्याशी संवाद साधला नसता तर तुम्हाला वाटले असते की इथे कुठेतरी पाणी मुरत आहे. त्यामुळे मी स्वतःहून तुमच्यासमोर आलो आहे. मी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने सुमारे 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. आरोपांनुसार, हा खरेदी व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवून जमिनीची खरेदी झाली असून महसूल विभागाने विशेष सवलत दिली का, असा सवाल विरोधक विचारत आक्रमक झाले आहेत. नेमके प्रकरण काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे कागदोपत्री दाखवले गेले, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचे आरोपात नमूद करण्यात आले आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयाने त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचे समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचे आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:03 pm

सोनई घटनेतील आरोपींवर मोक्का लावा:पुणे शहर मातंग समाजाची मागणी; राज्यभर आंदोलनाचा इशारा

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील युवकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाने कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेतील आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजाच्या वतीने सोनई पोलिस ठाण्यात करण्यात आली. मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने सोनई पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युवकावरील हल्ल्यानंतर निघालेल्या मोर्चात महिला, संपूर्ण मातंग समाज आणि समाजातील नेत्यांविषयी अत्यंत अपमानास्पद आणि अर्वाच्च भाषा वापरण्यात आली. तसेच, जीवे मारण्याच्या धमक्या देऊन समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सोनई येथील आरोपींवर सामाजिक द्वेष पसरवल्याप्रकरणी आणि मोक्का अंतर्गत कठोर कारवाई झाली नाही, तर मातंग समाज राज्यभर आंदोलन करेल. शिष्टमंडळाने घटनेविषयीचा लेखी पुरवणी जबाब सादर केला. त्यांनी शेवगाव विभागाचे डीवायएसपी नीरज राजगुरू आणि तपास अधिकारी विजय माळी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. डीवायएसपी राजगुरू यांनी या प्रकरणातील सर्व पुरावे, तक्रारीतील व्हिडिओ आणि माहिती पाहून लवकरच हा पुरवणी जबाब न्यायालयात सादर करून संबंधित कलमे वाढवण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणात केवळ जातीय अपमान नसून, समाजात भीती, द्वेष आणि अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे शिष्टमंडळाने नमूद केले. यात जीवे मारण्याच्या धमक्या आणि संघटित गुन्हेगारीचे स्वरूप असल्याने मोक्का कलमे लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळाने घटनेचे सर्व व्हिडिओ, छायाचित्रे आणि पुरावे सुरक्षित ठेवल्याचे सांगितले. तसेच, राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये या प्रकारची एफआयआर दाखल करण्यासाठी सामाजिक आवाहन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व रमेश बागवे यांनी केले. यावेळी अनिल हातागळे, दीपक कसबे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, दलित युवक आंदोलनाचे संस्थापक सचिन बगाडे, दलित महासंघाच्या लक्ष्मी पवार, ॲड. राजश्री अडसूळ, शंकर तडाखे, मनोजआप्पा शिरसागर, रवी पाटोळे, ॲड. महेश सकट, निलेश वाघमारे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:00 pm

भारताने ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी लोळवले

गोल्ड कोस्ट : येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी लोळवले. भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे आव्हान ठेवले असता धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १८.२ षटकांत सर्वबाद ११९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ३० धावा केल्या. तर मॅथ्यू शॉर्टने २५ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने केवळ ३ धावांत ३ विकेट घेतल्या. तर […] The post भारताने ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी लोळवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 5:50 pm

राहुल यांनी मतदार यादीचा अभ्यास करावा:कामठीत काँग्रेसचे सुरेश भोयर यांचेच नाव दुबार, चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला समाचार

राहुल गांधींचे हे 'वेडेपण' आहे. त्यांनी आधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांचा अभ्यास करावा. दुबार नावे असणे हा काही नवीन प्रकार नाही, तो संपूर्ण राज्यात आहे. कामठीत माझ्याविरुद्ध लढलेल्या काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश भोयर यांचेच नाव दुबार आहे, हे राहुल गांधींना दिसत नाही का? असा टोला लगावत बावनकुळे यांनी राहूल गांधींच्या आरोपाचा समाचार घेतला. बावनकुळे म्हणाले दुबार नाव असले तरी मतदान एकच व्यक्ती करते, कारण शाई लावली जाते. जी मतदारयादी वापरून महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तीच यादी आता विधानसभेत पराभव झाल्यावर चुकीची कशी ठरू शकते? नगरपालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने हा 'फेक नरेटिव्ह' पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे 'विना पेनाचे' मुख्यमंत्री मंत्री बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. मी माझ्या २२ वर्षांच्या कारकीर्दीत अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण उद्धव ठाकरे हे 'विना पेनाचे' मुख्यमंत्री होते. त्यांच्या खिशाला कधीच पेन नसायचा. ते आमदारांच्या पत्रांवर तीन-तीन महिने सह्या करत नव्हते, म्हणूनच त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले. अडीच वर्षांच्या काळात ते अडीच दिवस मंत्रालयात आले, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. हे ही वाचा... 'मतचोरी'च्या कायदेशीर लढाईत सहभाग का नाही?:आंबेडकरांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले - हायड्रोजन बॉम्बची क्षमता वाढली असती हरियाणा निवडणुकीतील मतदार यादीतील कथित हेराफेरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या 'प्रझेंटेशन'चे कौतुक करतानाच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना थेट आणि कठोर शब्दांत जाब विचारला आहे. निवडणुकीच्या निकालांना आव्हान देण्यासाठी 'निवडणूक याचिका' हाच एकमेव कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील '76 लाख मतांच्या' वाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यात काँग्रेसने सहभाग का घेतला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 5:41 pm

नितेश राणेंमुळेच युती नाही:दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितले, सिंधुदुर्गात महायुती एकत्र निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती करण्यास पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नाहीत, त्यामुळे युती होऊ शकली नाही, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावरून आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र निवडणूक लढणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वीच मंत्री नितेश राणे यांनी स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे संकेत दिले होते. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली असून, सर्व राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे, पुढील केवळ 10 दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना अर्ज भरावे लागणार असल्याने, जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली आहे. पक्षाचे नेते उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त असताना, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील युतीचा घोळ मात्र अजूनही कायम आहे. विशेषतः, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, बीड आणि जळगाव यांसारख्या काही जिल्ह्यांमध्ये महायुतीमध्ये फूट पडल्याचे दिसून येत आहे, जिथे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांनी भाजप स्वबळावर लढेल असे स्पष्ट केल्यानंतर, आता शिवसेना शिंदे गटाने दंड थोपटल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती झाली नाही, याचे कारण पालकमंत्री नितेश राणे युतीसाठी इच्छुक नव्हते, असा खळबळजनक खुलासा आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. केसरकर म्हणाले की, युतीसाठी मी आणि उदय सामंत यांनी मुख्यमंत्र्यांची तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. मात्र, पालकमंत्री नितेश राणे बहुधा इच्छुक नसल्यामुळे युती होऊ शकली नाही, असे स्पष्टीकरण देत केसरकर यांनी महायुतीतील मतभेदांवर थेट बोट ठेवले आहे. नेमके काय म्हणाले होते नितेश राणे? भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तशा भावना आहेत, आपला झेंडा फडकला पाहिजे. संपूर्ण कोकणात एकही विधानसभेची जागा दाखवा जी भाजपच्या ताकदीशिवाय कोणी आमदार होऊ शकला का? असा प्रश्नही राणेंनी उपस्थित केला होता.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 5:38 pm

राष्ट्रपती मुर्मूंकडून महिला क्रिकेट संघाचा गौरव

नवी दिल्ली : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांनी गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं राष्ट्रपतींसोबत ट्रॉफीसह फोटो काढला. राष्ट्रपतींनी संघातील खेळाडूंशी खास गप्पा गोष्टीही केल्या. भारतीय महिला संघाची उप कर्णधार स्मृती मानधनासोबतसह अन्य खेळाडूंचा राष्ट्रपती भवनातील रुबाब एकदम […] The post राष्ट्रपती मुर्मूंकडून महिला क्रिकेट संघाचा गौरव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 5:29 pm

तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले असून या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला […] The post तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 5:16 pm

पार्थ पवार कंपनी जमीन व्यवहार प्रकरण:अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका; हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा - अंजली दमानिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारवर आणि थेट अजित पवार यांच्यावर गंभीर हल्लाबोल केला आहे. फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा, असे थेट आव्हान अंजली दमानिया यांनी सरकारला दिले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचा बाजारभाव 1804 कोटी रुपये असताना, पार्थ पवार यांच्या कंपनीने ती केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आणि त्यासाठी केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी आकारल्याचा आरोप आहे. विरोधकांच्या तीव्र टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि याच चौकशीनंतर तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले. नेमके काय म्हणाल्या अंजली दमानिया? या कारवाईनंतर अंजली दमानिया यांनी अधिकाऱ्यांना 'बळीचा बकरा' बनवल्याबद्दल संताप व्यक्त केला. पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन पहिली कारवाई, फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ...तर ती माफी फुकट नव्हती का? अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या प्रकरणासंदर्भात काही पोस्ट केल्या आहेत. “शेतकऱ्यांना सारखे फुकट, सारखे माफ लागते म्हणणारे अजित पवार...पण पोराच्या 1804 कोटींचे डील. त्यावर 126 कोटींची स्टँप ड्युटी होते. पण हे डील 300 कोटीचे दाखवून त्यावरचे 21 कोटी देखील माफ! ही माफी फुकट नव्हती का?” असा सवाल दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. नेमके प्रकरण काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचं आरोपात नमूद करण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयानं त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचं आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महार वतनाची जमीन सदर जमीन ही महार वतनाची असल्यामुळे कायद्यानुसार तिचा व्यवहार करता येत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वतनधारक जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचं भासवलं असलं, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमिनमालकांसोबत खरेदी खत नोंदवलं असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे, हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हे ही वाचा... पार्थ पवारांच्या कंपनीचे जमीन व्यवहार प्रकरण:पुणे तहसीलदारांसह उपनिबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वेगवान कारवाई या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत गैरव्यवहाराचे संकेत मिळाल्यानंतर पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा उलगडा होताच केवळ तहसीलदारच नव्हे, तर दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 5:02 pm

नगराध्यक्षपदासाठी शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर:जयंत पाटलांनी केली आनंदराव मलगुंडेंची निवड, नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करून स्थानिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्यावतीने माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, आष्टा नगरपरिषदेसाठी आष्टा शहर विकास आघाडीकडून विशाल विलासराव शिंदे यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दोन्ही नगरपरिषदांमध्ये जयंत पाटील यांच्या पक्षासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. उरुण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात विकास आघाडी किंवा महायुती म्हणून लढण्याची शक्यता असून, विरोधी गटाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. तसेच, आष्टा नगरपरिषदेतही आष्टा शहर विकास आघाडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप मित्र पक्ष हे सर्व एकत्र येऊन आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार लवकरच घोषित करणार आहेत. जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रात पहिले उमेदवार ठरले आहेत. शरद पवार गटाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आनंदराव मलगुंडे हे जयंतराव पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि त्यांना उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही जागा ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाली असून, मलगुंडे हे धनगर समाजातील आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळल्याचा अनुभव असल्याने, आरक्षित जागेवर एका निष्ठावान आणि अनुभवी ओबीसी नेत्याला संधी देऊन जयंतराव पाटील यांनी योग्य निर्णय घेतल्याचे दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मागील काही महिन्यांपासून सत्ताधारी पक्षाकडून विविध वादग्रस्त वक्तव्ये करून जयंतराव पाटील यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू असताना, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर न देता, नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करून आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे आणि निवडणुकीच्या तयारीतील त्यांच्या अग्रक्रमाने दर्शन घडवले आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 4:58 pm

वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली, सहन करतोय

संगमनेर : कीर्तनातून लग्नातील अनावश्यक खर्चावर टीका करणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला. या सगळ्या वादावर इंदुरीकर महाराज स्पष्टीकरण देत म्हणाले, मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला असून वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली तेच सहन करत […] The post वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली, सहन करतोय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 4:52 pm

जळगावचे राजकारण तापले

जळगाव : राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच ठिकाणी वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. जागावाटपाबाबत महायुतीमध्ये संघर्ष अटळ आहे. अशी सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती आहे. या सा-यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन ज्या जिल्ह्यातून येतात, तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील […] The post जळगावचे राजकारण तापले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 4:50 pm

माझा पार्थवर विश्वास : सुप्रिया सुळे

मुंबई : प्रतिनिधी फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी केली आहे. या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नुसते आरोप-प्रत्यारोप करून चालणार नाही. मीडिया ट्रायल करू नये. पार्थ माझ्या मुलासारखा आहे. तो कधीच गैरव्यवहार […] The post माझा पार्थवर विश्वास : सुप्रिया सुळे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 4:39 pm

राज ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांवर संतापले:निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पद सोडण्याचा इशारा; म्हणाले- आकडे नकोत, काम दाखवा

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत संताप व्यक्त केला. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांकडून अपेक्षित काम होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट इशारा दिला की, काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय केलं ते दाखवा. पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाचे काम मनापासून करणाऱ्यांनाच आता संघटनेत स्थान मिळेल. निष्क्रिय कार्यकर्त्यांमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी मांडली. ही बैठक प्रत्यक्षात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आणि संघटनात्मक तयारीवर केंद्रित होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तोफ डागली. त्यांनी काही नेत्यांना थेट नाव घेऊन प्रश्न विचारले, मतदार याद्या पूर्ण का नाहीत? शाखांमध्ये बैठक का होत नाहीत? शहरातील लोकांशी संवाद कुठे आहे? त्यांच्या या प्रश्नांना बहुतेक पदाधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे सभागृहात काही काळ पूर्ण शांतता पसरली होती. राज ठाकरे यांनी सांगितले की, मनसेचा कार्यकर्ता जर लोकांमध्ये दिसत नसेल, तर पक्षाचे नाव टिकणार नाही. तुम्हाला जर पक्षासाठी वेळ नाही, तर ते स्पष्ट सांगा आणि पद सोडा, असा इशाराही त्यांनी दिला. रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनाही फटकारले या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम अभिनेता आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनाही राज ठाकरे यांनी फटकारले. काही दिवसांपूर्वी परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो पाहून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत विचारले, तुम्ही छाती ठोकून सांगत होतात की मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग मनसेत का आहात? एकाच ठिकाणी राहा. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मनसेची ओळख आणि विचारधारा वेगळी आहे, आणि कार्यकर्त्यांनी ती जपली पाहिजे. आकडे नकोत, काम दाखवा राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या शाखा हे मनसेचे बळ आहे. जर शाखाच निष्क्रिय राहिल्या तर पक्षाची ताकद कमी होते. त्यामुळे प्रत्येक शाखाध्यक्षाने आपल्या भागातील लोकांशी संपर्क ठेऊन स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवावा. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले, मला आकडे नकोत, काम दाखवा. शाखांमध्ये लोकांची उपस्थिती वाढली पाहिजे, यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. त्यांनी मतदार याद्यांबाबतही नाराजी व्यक्त केली. मतदार यादी पूर्ण का नाहीत? हे तुमचं मूलभूत काम आहे. निवडणूक आली की शेवटच्या क्षणी धावाधाव सुरू होते, हे बंद झालं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना दूर करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी बैठकीचा मुख्य उद्देश पुण्यातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणे आणि आगामी निवडणुकांसाठी धोरण निश्चित करणे हा होता. परंतु अपेक्षेप्रमाणे चर्चा पुढे न सरकल्याने राज ठाकरे नाराज झाले आणि त्यांनी बैठक अल्पावधीतच संपवली. बैठकीनंतर अनेक शाखाध्यक्ष गप्पच राहिले, तर काहींनी माना खाली घातल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होऊ शकतात. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना दूर करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांच्या या कठोर भूमिकेमुळे आता मनसेच्या संघटनात्मक कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:54 pm

हिंगोली पालिका निवडणूक:कायदा व सुव्यवस्थेसाठी एसपी उतरले मैदानात, शहरातील विविध प्रभागांमध्ये भेटी, नागरिकांशी संवाद

हिंगोली शहरासह वसमत व कळमनुरी नगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेसाठी खुद्द पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे मैदानात उतरले असून बुधवारी ता. ५ त्यांनी हिंगोली शहरातील विविध प्रभागातील नागरीकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. निवडणुकीच्या कालावधीत अनुचित प्रकार घडत असल्याचे दिसून येताच तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हिंगोली शहरासह वसमत व कळमनुरी पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार घडू नयेत यासाठीही पोलिस विभागाकडून गस्त घातली जात आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, गंधकवाड, श्रीधर वाघमारे, नागरे यांचे सह ८ पोलिस पेट्रोलींग वाहने व क्युआरटी पथक हिंगोली शहरात तैनात करण्यात आले आहे. त्यानंतर खुद्द पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली शहरातील बियानी नगर, रिसाला बाजार, रिसाला नाका, मेहराजुलुम चौक, सिध्दार्थ नगर, खुशाल नगर, जिजामाता नगर, निरंजन बाबा चौक, वंजारवाडा, एनटीसी, शिवराजनगर, नगर परिषद वसाहत, आजम कॉलनी, हनुमान नगर, गारमाळ, पोस्ट ऑफिस चौक, अंबिका टॉकीज परिसर, महात्मा गांधी चौक या भागात भेटी देऊन नागरीकांशी संवाद साधला. निवडणुका खुल्या व निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी योग्यत्या सुचना दिल्या व कोणत्याही मदतीसाठी हिंगोली पोलिस दल २४ तास सतर्क असल्याचे सांगितले. नागरीकांनीही यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. दरम्यान यावेळी नागरीकांनी मांडलेल्या अडचणींची माहिती घेऊन त्यानुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना हिंगोली शहर पोलिसांना दिल्या आहेत. या सोबतच शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:39 pm

मुंबईत रूपाली चाकरणकरांविरोधात वंचितचा मोर्चा:आंदोलक महिलांची पोलिसांसोबत झटापट, महिला आघाडीच्या अध्यक्षा जखमी

फलटण महिला आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. रूपाली चाकणकरांच्या विधानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीने मुंबईत आंदोलन केले. यावेळी मोर्चादरम्यान पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनकर्त्या महिला कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. या घटनेत मुंबई प्रदेश अध्यक्षांसह इतर नेत्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. यावरून वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर लोकशाहीवरील आघाताचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेले विधान स्त्रीविरोधी आणि अत्यंत लज्जास्पद असल्याचा आरोप करत वंचित बहुजन महिला आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केले. महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि लैंगिक असमानतेविरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी झालेल्या संघर्षात वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत. तसेच, राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रुपवते यांच्यासोबतही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे. वंचित बहुजन आघाडी आक्रमक या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी बळाचा वापर करणे, हा लोकशाहीवरील आघात आहे, अशी तीव्र टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे होते की, महिला आयोगाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनेच असे स्त्रीविरोधी वक्तव्य करणे अत्यंत लाजिरवाणे आहे. या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचली असून, आयोगाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या मोर्चादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारकडे तीव्र निषेध नोंदवला आहे आणि काही कठोर मागण्या केल्या आहेत. आंदोलक महिला कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. शिवाय रूपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाबद्दल त्यांना त्वरित महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे, अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीन करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून झालेल्या या मारहाणीवरून वंचित बहुजन आघाडीने अत्यंत आक्रमक भूमिका घेत, रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. हे ही वाचा... 'मतचोरी'च्या कायदेशीर लढाईत सहभाग का नाही?:आंबेडकरांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले - हायड्रोजन बॉम्बची क्षमता वाढली असती हरियाणा निवडणुकीतील मतदार यादीतील कथित हेराफेरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या 'प्रझेंटेशन'चे कौतुक करतानाच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना थेट आणि कठोर शब्दांत जाब विचारला आहे. निवडणुकीच्या निकालांना आव्हान देण्यासाठी 'निवडणूक याचिका' हाच एकमेव कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील '76 लाख मतांच्या' वाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यात काँग्रेसने सहभाग का घेतला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:31 pm

पोराच्या डीलमधील स्टॅम्प ड्युटीचे काय?

पुणे : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतक-यांना सुनावले होते. ज्यानंतर आता पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहाराचा घोटाळा समोर येताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पवारांना कर्जमाफीच्या मुद्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अ‍ेंीिं ऌङ्म’्िरल्लॅ२ छछढ नावाच्या कंपनीने, १८०४ कोटींची महार […] The post पोराच्या डीलमधील स्टॅम्प ड्युटीचे काय? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 3:22 pm

पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या ,जमीन व्यवहाराची होणार चौकशी

नागपूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पार्थ पवारांशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणातील मुद्दे अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि भूमी अभिलेख विभाग (लँड रेकॉर्डस्) यांच्याकडून सर्व माहिती मागवली असून, योग्य चौकशीचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी १८०० कोटींची जमीन केवळ ३०० […] The post पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या ,जमीन व्यवहाराची होणार चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 3:17 pm

मनोज जरांगेंच्या हत्येचा कट

बीड : प्रतिनिधी बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे. बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात […] The post मनोज जरांगेंच्या हत्येचा कट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 3:15 pm

बंदुकीच्या धाकावर अपहरण करून बलात्काराचा आरोप:सबळ पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष सुटका, नागपूर न्यायालयाचा निकाल

नागपूर: बंदुकीच्या धाकावर अपहरण करून बलात्कार केल्याच्या आरोपांमधून जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला. नानक लालताप्रसाद यादव असे निर्दोष सुटका झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २०१७ मध्ये ही घटना घडली होती, जेव्हा तक्रारदार महिला आपल्या मुलीला डबा देण्यासाठी इटर्निटी मॉलमध्ये गेली होती. मॉलबाहेर पडत असताना एका कारने तिचा पाठलाग केला आणि बंदुकीच्या धाकावर तिचे अपहरण केले, असा आरोप होता. अपहरणांनंतर अज्ञातस्थळी नेऊन कारमध्ये बलात्कार करण्यात आला आणि घटनेची व्हिडिओ चित्रफीत तयार करून समाजात बदनामी करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी कपीलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी न्या. श्रीमती एस. पी. पोंक्षे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाने तक्रारदार महिला, तिची मुलगी, मुलगा, पंच साक्षीदार आणि तपास अधिकारी यांची साक्ष नोंदवली. आरोपीच्या वतीने ॲड. मंगेश डी. राऊत यांनी साक्षीदारांचा उलटतपास घेतला. ॲड. नाझिया पठाण यांनी त्यांना सहकार्य केले. सर्व साक्षपुरावे आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष सुटका केली.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:05 pm

'मतचोरी'च्या कायदेशीर लढाईत सहभाग का नाही?:आंबेडकरांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले - हायड्रोजन बॉम्बची क्षमता वाढली असती

हरियाणा निवडणुकीतील मतदार यादीतील कथित हेराफेरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या 'प्रझेंटेशन'चे कौतुक करतानाच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना थेट आणि कठोर शब्दांत जाब विचारला आहे. निवडणुकीच्या निकालांना आव्हान देण्यासाठी 'निवडणूक याचिका' हाच एकमेव कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील '76 लाख मतांच्या' वाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यात काँग्रेसने सहभाग का घेतला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींनी सादर केलेले 'प्रझेंटेशन' केवळ सादरीकरण आहे, त्यामुळे निवडणूक आयोग कायदेशीररित्या जबाबदार ठरत नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले. तसेच जेव्हा गरज होती, तेव्हा तुम्ही का लढला नाहीत? असा रोखठोक सवाल राहुल गांधी यांना केला. गांधी-खर्गेंना पत्रे लिहिली, उत्तर मिळाले नाही प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर अचानक 76 लाख मतांची वाढ झाली होती, या गंभीर गैरप्रकाराला वंचित बहुजन आघाडीचे चेतन अहिरे यांनी आव्हान दिले होते. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तसेच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंतही नेले, असे आंबेडकरांनी सांगितले. मी तुम्हाला आणि काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांना अनेकवेळा पत्र लिहून, आमच्या याचिकेत सह-याचिकाकर्ते म्हणून सामील होण्याची विनंती केली होती. मात्र, मला कधीही उत्तर मिळाले नाही. तुम्ही (राहुल गांधी) तेव्हा का लढला नाहीत? असा थेट आणि धारदार सवाल आंबेडकरांनी राहुल गांधींना केला आहे. 'हायड्रोजन बॉम्ब'ची क्षमता वाढली असती प्रकाश आंबेडकर म्हणाले, जर तुम्ही वंचित बहुजन आघाडीसोबत या कायदेशीर लढाईत सामील झाला असता, तर निवडणूक आयोगावर टाकलेला तुमचा 'हायड्रोजन बॉम्ब' अधिक घातक ठरला असता, या 76 लाख मतांच्या वाढीशी संबंधित कोणताही डेटा, नोंदी किंवा कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे नाहीत. पीठासीन अधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे घोर उल्लंघन केले आहे. डेटा/नोंदी नसताना निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाऊ शकत नाहीत! हा महत्त्वाचा मुद्दा आम्ही उपस्थित केला असताना, राहुल गांधी हेच मुद्दे उपस्थित करण्यास का कचरत आहेत? अशी विचारणाही त्यांनी केली. ...तर निवडणुकीचे निकाल रद्द झाले असते राहुल गांधी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी केली असती, तर निवडणूक आयोगाला न्यायालयात आपल्या कृतींवर उत्तर देण्यास भाग पाडले गेले असते आणि महाराष्ट्रातील (कथितरित्या गैरप्रकार झालेल्या) निवडणुकीचे निकाल रद्द झाले असते, असे ठाम मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 2:55 pm

निवडणूक आयोग अपंग ; यशोमती ठाकूर यांची टीका

अमरावती : प्रतिनिधी यशोमती ठाकूर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाईट म्हणून तो काम करतो. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असूनही, ती व्यवस्थित काम करत नाही, हे आता सिद्ध झाले आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले […] The post निवडणूक आयोग अपंग ; यशोमती ठाकूर यांची टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:47 pm

ईडी, सीबीआय झोपले आहे का?

नागपूर : प्रतिनिधी मुंढव्यातील जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणावरून काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा अजित पवार, पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, आता ईडी, सीबीआय झोपले आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी गावाच्या कंपनीने, १८०४ कोटीची महार वतनाची जमीन ३०० […] The post ईडी, सीबीआय झोपले आहे का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:45 pm

मोठी बातमी:मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड; अडीच कोटींची सुपारी, दोन जण ताब्यात,  मोठ्या राजकीय नेत्याचे नाव

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत. यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचे समोर आले असून, या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही. आरोपींची कसून चौकशी सुरू या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या जीवावर बेतला तरी आम्ही समाजासाठी लढत राहू. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून, या कटामागे कोण, कशासाठी आणि किती लोक सहभागी आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता राज्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या चळवळीचे प्रमुख चेहरे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठं आंदोलन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. पोलिस तपासातून यामागे कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे का? हा प्रश्न आता पुढे आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जर वेळेवर कारवाई झाली नसती, तर गंभीर घटना घडली असती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांना अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. राज्यातील राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी यावर सरकारकडे सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर सरकारने या कटामागील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 2:39 pm

पार्थ पवारांवर १८०० कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप; अजित पवार अडचणीत?

पुणे : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतक-यांना नेहमीच फुकट लागतं असे म्हणतात. पण त्यांच्या मुलाला देताना १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत कशी दिली जाते. या ३०० कोटी रुपयांवरील स्टँप ड्युटी ४८ तासांत माफ होते. तुम्हाला का सर्व फुकट लागते, असा सवाल करत शिवसेना (ठाकरे) नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी […] The post पार्थ पवारांवर १८०० कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप; अजित पवार अडचणीत? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:37 pm

खरवड शिवारातील तलावात आईसह मुलाचा मृतदेह सापडता:चार दिवसांपासून होते बेपत्ता; कळमनुरी पोलिस घटनास्थळी दाखल

कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पाच वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचा मृतदेह गुरुवारी ता. ६ सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद येथील ज्योती सागर सावळे (३०) व त्यांचा मुलगा राज सावळे (५) हे दोघे जण खरवड येथे दीपावली निमित्त आई वडिलांकडे आले होते. मागील काही दिवसांपासून दोघेही खरवड येथेच राहात होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच ज्योती ह्या त्यांचा मुलगा राज याला सोबत घेऊन बाहेर जाऊन येते असे सांगून आई, वडिलांच्या घरून निघाल्या होत्या. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चार दिवसांपासून शोध सुरु केला होता. दरम्यान, आज सकाळी खरवड गावाजवळील असलेल्या तलावामध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक इंगळे, जमादार देविदास सूर्यवंशी, गुलाब जाधव, अंकुश शेळके यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह ज्योती व त्यांचा मुलगा राज यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने या प्रकाराची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. या दोघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 2:36 pm

नागपुरात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपूर : प्रतिनिधी नागपूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांत चौघांनी जीव गमावला आहे. जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून मामा-भाचीचा मृत्यू झाला. तर भागीमहारी तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून […] The post नागपुरात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:35 pm

आम्ही लिपस्टीक लावून पद मागत नाही; रुपाली ठोंबरेंचे आंदोलन

पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे-पाटील या एकमेकींच्या विरोधात उभ्या असल्याचे दिसून येत आहे. त्या दोघींमध्ये वाद नेमका काय आहे, रोष काय आहे, कुठून सुरुवात झाली, याबद्दल रुपाली ठोंबरे पाटील यांनी आम्ही लाली लिपस्टिक लावून पद मागत नाही, मागे फिरून पद मागत नाही. असे सविस्तर भाष्य केले […] The post आम्ही लिपस्टीक लावून पद मागत नाही; रुपाली ठोंबरेंचे आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:32 pm

राहुल गांधींचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुसका:फडणवीस यांची टीका; म्हणाले- लोकशाही संस्थांवर शंका निर्माण करणे हा परदेशी अजेंडा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतचोरीच्या आरोपांवर हायड्रोजन बॉम्ब फुटेल असं जाहीर केलं होतं. पण आता त्या सर्व खुलाशांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब शेवटी छोटा फटाका ठरला. त्यांनी म्हटलं की, राहुल गांधी यांचे वक्तव्य केवळ राजकीय स्टंट आहेत आणि त्यांचा उद्देश देशातील लोकशाही संस्थांवर शंका निर्माण करणे हा आहे. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींची वक्तव्यं आणि त्यांचा अजेंडा हा अशा काही परदेशी शक्तींशी जुळतो, ज्यांना भारताची लोकशाही व्यवस्थित चालू राहू नये असं वाटतं. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन एच-फाईल्स या नावाने सादरीकरण करत हरियाणा विधानसभा निवडणुका भाजपने चोरल्याचा आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, मतदार यादीतील 25 लाख नोंदी फसव्या होत्या आणि निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून निकाल त्यांच्या बाजूने वळवला. या दाव्यांवर फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी यांनी मोठमोठे दावे केले, पण प्रत्यक्ष पुरावे काहीच दाखवू शकले नाहीत. मतचोरीचा हायड्रोजन बॉम्ब फुटेल असं त्यांनी सांगितलं होतं, पण तो फक्त आवाज करून शांत झाला. लोक आता त्यांच्या अशा आरोपांना गांभीर्याने घेत नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी देशातील लोकशाहीवर जनतेचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण भारतीय जनतेचा विश्वास लोकशाही संस्थांवर कायम आहे आणि तो कोणीही डळमळीत करू शकत नाही. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष सध्या कोणताही ठोस मुद्दा घेऊन जनता समोर येत नाही. त्यामुळे ते केवळ नकारात्मक प्रचारावर भर देत आहेत. जेव्हा देश प्रगतीच्या मार्गावर जातो, तेव्हा काही शक्ती त्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधींची वक्तव्यं तशा शक्तींना बळ देतात. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, आमचं सरकार लोकशाहीच्या सर्व संस्थांवर विश्वास ठेवतं. निवडणूक आयोगासारख्या संस्थेवर आरोप करणे हे केवळ लोकशाहीला कमजोर करण्याचं काम आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाही दरम्यान, फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरूनही टीका केली. त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे आता मराठवाड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत, हे चांगलं आहे. पण जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि शेतकरी संकटात होते, तेव्हा ते घराबाहेर पडले नाहीत. आता निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून त्यांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली असून, अनेकांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत मिळेल. जनतेचा विश्वास मिळवणं उद्धव ठाकरेंसाठी सोपं नाही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा दौरा राजकीय दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. पण फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. जनता आता खूप जागरूक झाली आहे. ती कोण काम करतंय आणि कोण फक्त भाषण करतंय हे चांगलंच ओळखते. त्यामुळे कितीही दौरे झाले तरी जनतेचा विश्वास मिळवणं उद्धव ठाकरेंसाठी सोपं नाही.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 2:21 pm

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण:देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले- प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळली, तर कडक कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली असून, प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे योग्य ती चौकशी होईल आणि जर कुठे अनियमितता आढळली, तर अतिशय कडक कारवाई केली जाईल. तसेच, उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवारांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतली आणि या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. एवढेच नव्हे तर ही जमीन कोरेगाव पार्क परिसरात असून, तिथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांच्या मते, या व्यवहारात अनेक शंका निर्माण करणारे मुद्दे आहेत. उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आणि फक्त 27 दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणात सरकारमधील प्रभावी व्यक्तींचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. विरोधकांनी पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांवरही जोरदार टीका सुरू केली आहे. या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी या व्यवहाराबाबत सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, लँड रेकॉर्ड आणि आयजीआर या विभागांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. अजून संपूर्ण माहिती मिळालेली नाही, पण प्राथमिक अहवालानुसार काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी सांगितले की, आज पूर्ण माहिती आल्यानंतर शासन पुढील निर्णय घेईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल. अनियमितता आढळली, तर दोषींवर कडक कारवाई मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा कोणत्याही अनियमित व्यवहाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही. आमच्या सरकारचे या विषयावर स्पष्ट मत आहे, कुठेही गैरप्रकार झाला असेल, तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात जर अनियमितता आढळली, तर दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांच्या आरोपांना महत्त्व मिळाले असून, सरकार आता दबावाखाली आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही - पार्थ पवार दरम्यान, पार्थ पवार यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. एका वृत्तवाहिणीशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही, किंवा कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. मात्र, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. या भूमिकेमुळे प्रकरण अधिक गूढ झाले असून, राज्यात यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील काही दिवसांत सरकारकडून मिळणारा अहवाल आणि त्यानंतर होणारी कारवाई यावर या वादाचे भवितव्य ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 1:50 pm

वाघाच्या हल्ल्यात 297 ग्रामस्थांचा मृत्यू:राज्यात साडेपाच वर्षांत 74.25 कोटी रुपयांची भरपाई

राज्यात गेल्या साडेपाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात 297 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. 2020 पासून ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या कालावधीत झालेल्या या मृत्यूंसाठी वनविभागाने मृतांच्या वारसांना एकूण 74 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसह संपूर्ण पूर्व विदर्भ सध्या वाघांच्या दहशतीखाली आहे. शेतात कामाला जाणे, मुलांना अंगणात खेळू देणे किंवा जनावरे चरायला नेणे हे दैनंदिन व्यवहारही ग्रामस्थांसाठी धोकादायक बनले आहेत. वाघ थेट शेतशिवार आणि शेतांपर्यंत पोहोचल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या सततच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 27 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको करून वाहतूक थांबवल्याची घटना घडली होती. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये 39 मृत्यूंसाठी 9 कोटी 75 लाख रुपये, 2021 मध्ये 54 मृत्यूंसाठी 13 कोटी 50 लाख रुपये, 2022 मध्ये 80 मृत्यूंसाठी 20 कोटी रुपये, 2023 मध्ये 37 मृत्यूंसाठी 9 कोटी 25 लाख रुपये, 2024 मध्ये 41 मृत्यूंसाठी 10 कोटी 25 लाख रुपये आणि 2025 मध्ये 46 मृत्यूंसाठी 11 कोटी 50 लाख रुपये अशी एकूण 74 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. राज्यातील रेस्क्यू सेंटर्समध्येही वाघांची संख्या वाढली आहे. वाघांना बेशुद्ध करून चंद्रपूर किंवा नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणले जाते. एकदा एखादा वाघ रेस्क्यू सेंटरमध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे कठीण होते. त्यामुळे असे अतिरिक्त वाघ इतर राज्यातील प्राणी संग्रहालयांना दिले जातात. सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 24 वाघ आणि 30 बिबट आहेत. यापैकी 8 वाघ आणि 6 बिबट इतर प्राणी संग्रहालयांना पाठवण्यात येणार आहेत. गुजरातमधील सुरत प्राणी संग्रहालयात 2 वाघ, हिमाचल प्रदेशातील सिरमौर प्राणी संग्रहालयात 1, जमशेदपूर येथील टाटा प्राणी संग्रहालयात 2, मध्य प्रदेशातील इंदूर प्राणी संग्रहालयात 2 आणि नागालँडमधील दिमापूर प्राणी संग्रहालयात 1 वाघ पाठवला जाईल. तसेच, गुजरातमधील सुरत प्राणी संग्रहालयात 4 बिबट आणि संभाजीनगर प्राणी संग्रहालयात 2 बिबट पाठवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 1:49 pm

महार वतनाच्या जमिनी प्रकरणी अजून तक्रार नाही:पार्थ पवार जमीन प्रकरणात तक्रार आल्यावरच कारवाई- चंद्रशेखर बावनकुळे

महार वतनाच्या जमिनी प्रकरणी माझ्याकडे आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही.मला सकाळी अंजली दमानिय यांचा फोन आला, त्यांनी मला मंगळवारी तक्रार देणार असल्याचे सांगितले आहे. महार वतनासंदर्भात विशेष कायदा आहे, त्या मार्फत हे झाले आहे का नाही हे पाहावे लागेल. मुद्रांक शुल्क कसे माफ करावे यासाठी कायदा आहे, त्या प्रमाणे जमिनीचा व्यवहार झाला का हे पाहावे लागेल, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्थ पवार यांच्या प्रकरणात बोलताना म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आयटी पार्कचे धोरणानुसार दिले का हे उद्योग विभाग चेक करेल. अंजली दमानिया यांनी कागदपत्रे दिल्यावर मी त्यात चौकशी करेल. पण मीडियाच्या मार्फत आलेल्या आरोपावर डायरेक्ट काही बोलता येणार नाही, तक्रार आल्यानंतर त्यावर तपास करता येईल. नियमात जमीन दिल्या आहे का हे पहावे लागेल. माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई करतो. ..तर तपास करावा लागेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपास करावा लागेल. मुद्रांक का माफ केले. आणि महार वतन जमीनी कायद्याने दिल्या का या दोन्ही गोष्टी चेक करावे लागेल असे पार्थ पवारांच्या प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांच्या जमिनीबाबत तक्रार आली आल्यावर कारवाई सुरू करणार आहे. अंजली दमानिया यांनी मला सांगितले की मंगळवारी येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी या प्रकरणाबद्दल माहिती समजेल. कामठीमध्ये 65 बुथवर दुबार मतदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीवर बोलण्यापूर्वी राहुल गांधी यांनी विचार केला पाहिजे. त्यांनी नुसते झोपेचे सोंग स्वीकारले असेल तर मला माहिती नाही. सर्वात आधी त्यांनी कामठीवर दुबार मतदार असल्याचा आरोप लावला, ते संपूर्ण राज्यात आहे. आशिष शेलार बोलले त्यात काही चूक नाही. कामठीमध्ये 65 बुथ असे आहेत की जिथे मला 2 मते आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 600 मते आहेत. त्या बुथवर 10-10 लोकं दुबार मतदार आहेत. इतकं त्या ठिकाणी वाईट परिस्थिती आहे. राहुल गांधीचे वेडेपण आहे, त्यांनी तपास केला पाहिजे. दुबार मतदारांवर आम्ही आक्षेप घेतला चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दुबार मतदारांचे नाव काढण्यासाठी सर्व प्रथम प्रयत्न केला तो देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी हायकोर्टात केस केली. मी निवडणूक आयोगाला भेटलो लोकसभेच्या याद्यांमध्ये दुबार,तिबार मतदार आहेत म्हणून. आता एक सत्यता कळली की माझ्या-विरोधात लढलेले सुरेश भोयर ज्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येणार होते पण वेळेवर त्यांची सभा रद्द झाली त्यांचे मतदार यादीत दुबार नाव आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 1:44 pm

विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानच लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे. या प्रकरणी नायलॉन मांजाची विक्री करणा-या विक्रेत्यावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणा-या मुलांना सुरक्षा रक्षकांनी चांगलाच समज दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर गुरुवारी सकाळच्या […] The post विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 1:15 pm

अकोल्यात जेजे मॉलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

अकोला : प्रतिनिधी अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील कपडा बाजारातील ‘जेजे मॉल’ मध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला आहे. आगीचं रौद्ररुप पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होत. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर […] The post अकोल्यात जेजे मॉलला भीषण आग; लाखोंचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 1:11 pm

आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींची के-वायसी पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, यात बोगस लाभार्थी असल्यचे कळल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले. लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप निम्म्यादेखील लाभार्थी महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. तांत्रिक अडचणींमुळे २.४० कोटी महिलांपैकी फक्त ८० लाख […] The post आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींची के-वायसी पूर्ण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 1:08 pm

मविआ संपली! उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे शेवटचा प्रयत्न:जनता हुशार आहे, ढोंगी नव्हे काम करणाऱ्यांनाच निवडते, भागवत कराडांचा टोला

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले का? किती वेळा दौरा केला. बांधावर जात बियाणे देऊ म्हणाले पण बांधावर गेलेच नाही. आता त्यांना लक्षात आले की महा विकास आघाडी संपत आलेली आहे जसे दिवा विजताना फडफड करतो, तसे त्यांनी आता दौरे करण्यास सुरवात केली आहे, हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे, असे भाजप नेते भागवत कराड यांनी म्हटले आहे. भागवत कराड म्हणाले की, आम्ही महायुतीमधील घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहोत. जर योग्य रित्या जागा वाटप झाले तर ठीक नाही तर स्वबळावर निवडणूक लढवणार पण त्यामध्ये आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत. महायुतीची सत्तेत येईल भागवत कराड म्हणाले की, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीसाठी पक्षाचे पदाधिकारी कामाला लागतात.केडर बेस पार्टी असल्यामुळे आमचा विजय होतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ याची आम्हाला खात्री आहे.विरोधकांना काम करायचे नाही केवळ ढोंग सुरू आहे. जनता हुशार आहे जो काम करतो त्यांनाच जनता निवडून देते. उबाठाची सत्ता होती तेव्हा त्यांनी काहीच काम केले नाही. आगामी निवडणुकीत मविआ दिसणार नाही महायुतीची सत्तेत येईल. ठाकरे जनतेमध्ये अविश्वास निर्माण करताय भागवत कराड म्हणाले की, उद्धव ठाकरे जनतेमध्ये जाऊन अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मतदारांनी मतदान केलेच पाहिजे. कुणाला मतदान करायचे हे जनता ठरवेल. ज्यांच्या माध्यमातून चांगली कामे झाली आहेत जनता त्यांना मतदान करेल. उद्धव ठाकरेंनी जनतेला मतदान करु नका हे सांगणे योग्य नाही. महायुती का मविआ हे जनता ठरवेल. काँग्रेसला मेवा कमावण्यासाठी सत्ता हवी भागवत कराड म्हणाले की, जनतेची सेवा कशी करावी हे विरोधकांना माहिती नाही. सत्तेसाठी पक्ष आणि त्या सत्तेतून मेवा कमवणे हे काँग्रेसचे धोरण आहे, अशा परिस्थिती काम करत असताना निवडणूक आयोगाला काम करू न देण हा प्रकार काँग्रेसकडून सुरू आहे. विरोधकांचा एसआयआरला विरोध भागवत कराड म्हणाले की, राहुल गांधी यांनी मतचोरीवर मोठा आरोप केला आहे. हा आरोप खोटा आहे. पावसाळी अधिवेशनावेळी एसआयआर सुरू होते तेव्हा विरोधकांनी त्याचा विरोध केला. आता सुद्धा आयोगाकडून एसआयआर करत आहे,हे निवडणूक आयोगाचे काम आहे, पण या गोष्टीला विरोधकांचा विरोध आहे. विरोधकांचे असे झाले आहे की नाचता येईना अंगण वाकडे. महायुतीचे चांगले काम सुरू भागवत कराड म्हणाले की, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या काँग्रेस उमेदवाराचे मतदार यादीत दुबार नाव आहे. आता हे नाव काढायचे का नाही काढायचे. कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असो दुबार नाव असले तर ते काढले पाहिजे. हे सर्व निवडणूक आयोग करत असताना विरोधी पक्षाचे लोक त्याला विरोध करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात चांगले काम सुरू आहे. जनतेचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 12:20 pm

विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळच्या सुमारास थंड वाऱ्यांचा अनुभव:दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 4 अंशांची घसरण

राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस अखेर ओसरत असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर पावसाचं वातावरण तयार झालं होतं. मुंबई, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र आता या प्रणालीचा प्रभाव कमी होत असून, पुढील काही दिवसांत तापमानात घट होणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, 6 ते 7 नोव्हेंबरपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये तापमान 4 ते 5 अंशांनी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिवाळ्याची चाहूल लागेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र त्यानंतर राज्यभर हवामान कोरडे होण्यास सुरुवात होईल. पुढील दोन दिवसांत किमान तापमान दोन ते चार अंशांनी घसरण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सकाळच्या सुमारास थंड वाऱ्यांचा अनुभव येऊ शकतो. दिवसा वातावरण कोरडे आणि हलकं गरम राहणार असलं तरी, पहाटे आणि रात्री गारवा जाणवेल. गेल्या काही दिवसांत मुंबईसह कोकण, नाशिक, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यात जोरदार वारे आणि सरींचा अनुभव नागरिकांनी घेतला. अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना, झाडं उन्मळून पडणं आणि शेतीचे नुकसान झालं. हवेत आर्द्रता जास्त असल्याने उकाडाही जाणवत होता. मात्र आता हवामानात बदल होत असून, 7 नोव्हेंबरपासून आकाश स्वच्छ आणि अंशतः ढगाळ राहील असं अंदाज वर्तवण्यात आलं आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळी थंडावा आणि दुपारी थोडा उकाडा असं मिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे. ओलावा टिकून राहील आणि रब्बी पिकांसाठी योग्य वातावरण शेतकऱ्यांसाठी ही हवामानातील बदलाची वेळ महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्या थांबल्या होत्या. काही ठिकाणी बियाणं कुजल्याची आणि नांगरणी थांबल्याची स्थिती होती. पण आता पावसाचा जोर कमी होऊन तापमानात घट होण्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहील आणि रब्बी पिकांसाठी योग्य वातावरण निर्माण होईल. हवामान खात्याने सांगितलं आहे की, पुढील आठवड्यापासून शेतकरी पेरणीच्या तयारीला सुरुवात करू शकतात. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता कायम सध्या राज्यात हवामान स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांची स्थितीही आता कमकुवत होत असल्याने पावसाचा धोका कमी झाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुतेक भागांत हवामान कोरडे राहील. मात्र काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता कायम आहे. हिवाळ्याची सुरुवात होत असल्याने नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ उबदार कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे आता राज्यभरात अवकाळी पावसानंतरचा गारवा अनुभवायला मिळणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 12:19 pm

‘छत्रपतींसारखे दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करा’:30 कोटींच्या खोट्या कामांवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 30 कोटी रुपयांच्या खोट्या कामांचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांचा आदर व्यक्त करत दोषींवर छत्रपतींसारखे लोकशाही पद्धतीने कडक शासन करण्याची विनंती केली आहे. दक्षता व गुण नियंत्रक विभागाचा अहवालही त्यांनी यासंदर्भात जोडला आहे. रोहित पवारांची पोस्ट काय? रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपला आदर आहे आणि या सरकारमध्ये बोटावर मोजण्याएवढेच चांगले मंत्री आहेत त्यापैकी एक म्हणून नेहमीच आपल्याकडे बघितलं जातं. मी गेल्या सरकारच्या काळातील मंत्र्यांच्या बंगल्यांवरील 30 कोटींची खोटी कामं दाखवून पैसे लाटल्याचा मुद्दा समोर आणला होता. सरकारच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाने देखील या संदर्भातला अहवाल तीन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात दिला आहे. हा अहवाल आपणास पाठवत आहे, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील या प्रकरणात दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करावे, ही विनंती! बंगल्याना ग्रॅनाइटचे कंपाऊंड कसे? रोहित पवारांनी म्हटले आहे की, सरकारकडे पैसे नसताना बंगल्यांच्या भिंतींना ग्रॅनाइटचे कंपाऊंड कसे लावले जात आहे. दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा खर्च घोटाळा असल्याचे सिद्ध झाले आहे. बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना, ती घेतली नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकारात दोषी असलेल्या कार्यकारी अभियंत्यासह इतर अभियंत्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. गुलाबराव पाटील स्पष्टीकरण देणार का? रोहित पवार म्हणाले, केवळ कागदोपत्री काम दाखवून मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटी रुपये खर्च केल्याचा घोटाळा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणला असता हा मुद्दा मी गेल्यावर्षीच विधानसभेत मांडला होता. आता दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशाची कशी उधळपट्टी केली, याची विस्तृत चिरफाड या अहवालात केलेली आहे. एकीकडं सरकारकडे पैसे नाही आणि दुसरीकडं भिंतीना ग्रेनाइट चे कंपाऊंड? विशेष म्हणजे बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, परंतु बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही परवानगी घेतली नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे. गतवर्षी मी हा मुद्दा मांडला असता मध्येच उभं राहून मोठ्या तावातावाने आरोप खोटे असल्याच्या पोकळ डरकाळ्या फोडणारे मंत्री गुलाबराव पाटील आता यावर स्पष्टीकरण देतील का? दोषी कार्यकारी अभियांत्यासह इतर अभियंत्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. तत्काळ कारवाई करा अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारची धींड काढल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणालेत. आपण पुराव्यांशिवाय बोलत नाही, अशी पुस्तीही रोहित पवारांनी या प्रकरणी जोडली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:33 am

जमीन घोटाळ्याच्या आरोपावर पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया:एका ओळीत विषय संपवला, म्हणाले - कोणतही चुकीचे काम केले नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडीया होल्डिंग्स एलएलपी' कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांच्या आरोपांवर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी केवळ एका वाक्यात विषय संपवला आहे. पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने सुमारे 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. आरोपांनुसार, हा खरेदी व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवून जमिनीची खरेदी झाली असून महसूल विभागाने विशेष सवलत दिली का, असा सवाल विरोधक विचारत आक्रमक झाले आहेत. यावर आता पार्थ पवार यांन प्रतिक्रिया दिली आहे. नेमके काय म्हणाले पार्थ पवार? या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, पार्थ पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत, पार्थ पवार यांनी एकाच ओळीत आपले उत्तर दिले आहे. आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले. मात्र, या व्यवहाराबद्दल अधिक बोलण्यास टाळले. नेमके प्रकरण काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचं आरोपात नमूद करण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयानं त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचं आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महार वतनाची जमीन सदर जमीन ही महार वतनाची असल्यामुळे कायद्यानुसार तिचा व्यवहार करता येत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वतनधारक जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचं भासवलं असलं, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमिनमालकांसोबत खरेदी खत नोंदवलं असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे, हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:29 am

ज्या चिरंजीवांनी व्यवहार केला, त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी लढू:सुषमा अंधारे यांचा अजित पवारांवर निशाणा; जमीन खरेदीमुळे राजकीय वातावरण तापले

कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी नियम वाकवून ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे. या जमिनीची कागदोपत्री किंमत सुमारे 300 कोटी रुपये असली तरी प्रत्यक्ष बाजारभाव हजारो कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी अमेडिया कंपनी नावाची संस्था पुढे आली होती. ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या मालकीची असल्याचं वृत्त आहे. ही बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ही बातमी उघडकीस आणल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी असलेली सरकारी जमीन इतक्या प्रभावशाली लोकांकडून कशी विकत घेतली गेली, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. ही जमीन महार वतनाची असल्याने तिची विक्री करणे कायद्याने शक्य नाही, असं भूमी विषयक तज्ज्ञांचे म्हणणं आहे. पण तरीही ही जमीन अमेडिया कंपनीच्या ताब्यात गेल्याचं समोर आल्याने या प्रकरणावर शंका व्यक्त केली जात आहे. या जमिनीचा खरा व्यवहार कसा झाला, कागदपत्रांमध्ये नेमकं काय नमूद आहे आणि सरकारी महसूल विभागाने हे सर्व कसे मंजूर केले, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, या बातम्या पाहून मी अक्षरशः चक्रावून गेले आहे. जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडूनच असे प्रकार होत असतील, तर सामान्य माणसाने सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? ही बातमी वृत्त संस्थांनी देखील धैर्याने मांडली, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असेही अंधारे म्हणाल्या आहेत. अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली जमीन जर मोठ्या लोकांनी हडप केली असेल, तर हा गंभीर आणि निषेधार्ह प्रकार आहे. ज्या चिरंजीवांनी व्यवहार केला, त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी लढू सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, 21 कोटींचा महसूल बुडवणे म्हणजे सरकारची फसवणूक आहे. गोरगरिबांनी प्रामाणिकपणे कर भरायचा आणि मोठ्या लोकांना मोकळं सोडायचं, हे अन्यायकारक आहे. आमचा पक्ष या प्रकरणात भूमिका घेईल आणि योग्य तो न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हा व्यवहार केला आहे, त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी आम्ही लढू. त्यांनी पुण्यातील जनतेलाही या प्रकरणाविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं. राजकीय वातावरण तापले या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अजित पवारांच्या कुटुंबावर आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सरकारी महसूल विभाग आणि उद्योग विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी केली जात आहे. या आरोपांमागे किती तथ्य आहे हे तपासातूनच स्पष्ट होणार असलं तरी या वृत्तानंतर महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:29 am

निवासी वसतिगृहाच्या आड धर्मांतराचे धडे:गडचिरोलीच्या नागेपल्ली येथील धक्कादायक प्रकार; अधिकाऱ्यांनी केली 91 विद्यार्थ्यांची सुटका

गडचिरोली जिल्ह्यातील एका अनधिकृत निवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना धर्मांतराचे धडे दिले जात असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. जिल्हा महिला व बालकल्याम विभागाने कारवाई करत येथील तब्बल 91 विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या अहेरी शहरालगत असणाऱ्या नागेपल्ली येथे मागील 11 वर्षांपासून फ्रेंड मिशनरी प्रेयर बँड चेन्नई नामक संस्थेमार्फत आशीर्वाद हे मुला-मुलींचे वसतिगृह चालवले जात होते. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने बुधवारी या वसतिगृहावर धाड टाकून 49 मुली व 42 मुले अशा एकूण 91 विद्यार्थ्यांची सुटका केली. या तपासणीत या वसतिगृहाला राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाची मान्यता नसल्याचे निष्पन्न झाले आहे. येथील विद्यार्थी प्रामुख्याने अनुसूचित जाती व जमातीचे आहेत. पण ते सर्रासपणे आपला धर्म ख्रिश्चन असल्याचे सांगत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची शासनमान्य वसतिगृहात तात्पुरती सोय करण्यात आली आहे. काय म्हणाले अधिकारी? प्रस्तुत वसतिगृहात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 600, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 1 हजार, तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 1200 रुपये आकारले जात होते. त्यानंतरही गडचिरोलीसह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील 91 विद्यार्थी तिथे राहून शिक्षण घेत होते. अधिकाऱ्यांनी या घटनेविषयी बोलताना सांगितले की, तपासणी पथकाच्या चौकशीत विद्यार्थ्यानी सांगितले की, वसतिगृहात सकाळी व सायंकाळी ख्रिश्चन धर्माची प्रार्थना होत होती. तपासणीत सर्वच विद्यार्थ्यांकडे बायबल हा ख्रिश्चन धर्मग्रंथ आढळून आला. वसतिगृहातील भिंतींवरही केवळ ख्रिश्चन धर्माशी संबंधित पत्रके लावण्यात आली होती. प्रस्तुत संस्थेचे राज्यात विविध ठिकाणी असे निवासी शाळा वसतिगृह सुरू आहेत. 2015 मध्ये नाशिक जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला होता. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सांगितले आहे. दरम्यान, मागील 11 वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना तो प्रशासनाच्या कसा काय निदर्शनास आला नाही? जिल्ह्यात आणखी काही असे वसतिगृह आहेत काय? असे विविध प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. असरअल्लीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तिघांवर गुन्हा वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली पोलिस ठाण्यात 4 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुक्यातील असरअल्ली गावात करण्यात आली आहे. तब्बल 4 वर्षांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु होता, अशी माहिती चौकशीत समोर आली. शरद बाबू वेग्ग्लम (60), चंद्रया भौथू (39) व गौरीशंकर बैरी (50, सर्व रा. असरअल्ली ता. सिरोंचा) अशी तोतया डॉक्टरांची नावे आहेत. स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे त्यांच्यावर कारवाई केली.--

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:28 am

सरकारी जागा विकली कशी?:पार्थ पवारांवर 420 चा गुन्हा दाखल करा, सेल डीड रद्द करा, विजय वडेट्टीवारांची मागणी

पार्थ पवार म्हणतात मी घोटाळा केला नाही. सरकारी जमीन खरेदी करण्याचा कोणता नियम आहे. ही जमीन महार वतानाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करुण देण्याची त्यांची मागणी आहे. या जमिनीचे मुळ मालक 300 आहेत त्यांच्या नावे ही जमीन केली गेली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या घोटाळेबाजावर गुन्हे दाखल करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणी जी सेल डीड झाली ते रद्द करण्यात यावे, महार वतनाची जमीन मूळ मालकाच्या नावाने जमीन करायला हवी. 3 दिवसांमध्ये पुण्यात जात सर्व माहिती घेत आम्ही निर्णय घेणार आहे. सरकारी जागा विकत घेतली कशी, 300 कोटी रुपये देण्यात आले का? की केवळ कागदावर व्यवहार आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. ही जागा विकली कशी? विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुळ मालकाला विश्वासात न घेता टायटल क्लीअर नसताना या तेजवानीने पॉवर ऑफ ॲटर्नीच्या भरवशावर ही जमीन विकली कशी. सातबारा केंद्रीय ऑफिसच्या नावाने असताना याची सेल डीड झाली कशी. सातबारा नावाने नसताना त्यावर सरकारचे नाव असताना ही जागा विकली कशी? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दोघांवर 420 चा गुन्हा दाखल व्हावा विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा व्यवहार रद्द होण्याची गरज आहे. कारण या जमिनीची मालकी ही सरकारकडे आहे, जमिनीची विक्रीच होऊ शकत नाही. हा 420 चा गुन्हा आहे, यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणे ही सरकारची फसवणूक आहे. ईडी, सीबीआय काय झोपले आहे का? त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. 300 कोटी रुपयांच्या व्यवहारामध्ये आयटी कंपनीच्या नावावर मुद्रांक शुल्क माफ केले जाते ही खूप मोठी गोष्ट आहे. केवळ 500 रुपयांच्या बॉन्डवर हा सर्व व्यवहार केला जातो. फक्त आयटी पार्क टाकतो हा ठराव कंपनीने केला त्या भरवशावर त्याला 21 कोटी रुपयाची सूट दिली जाते. म्हणजेच यामध्ये खूप मोठा गैरव्यवहार सरकारकडून होत आहे. या प्रकरणी उद्योग संचालनालय जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठलीही फाईल नसताना परवानगी दिली कशी असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. ..तर 1 लाख कोटी रुपयांचा घोटाळा समोर येईल विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यातील असे 50 प्रकरणे माझ्याकडे आले आहेत. यामध्ये मुद्रांक शुल्कांची चोरी झाल्याची साक्ष आमच्याकडे येत आहे. मुद्रांक शुल्क न भरता शासनाचा महसूल न भरता करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे. 1800 कोटी रुपयांची सरकारी मालमत्ता घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील लोकांच्या आशीर्वादाने सुरू आहे. देवेंद्र फडणवीस या प्रकरणाकडे सत्ता वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार का? का यावर कारवाई करणार असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. पुण्यातील या प्रकरणांसाठी एक टीम तयार करण्यात आली तर 1 लाख कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही. इतकं करुण पार्थ पवार म्हणतात मी घोटाळा केला नाही. सरकारी जमीन खरेदी करण्याचा कोणता नियम आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:12 am

गुलाबराव पाटील यांची तुफान फटकेबाजी:म्हणाले- ज्यावर केस नाही, तो शिवसैनिक नाही; पुत्र हो असा, ज्याच्या हातात भगवा झेंडा

राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी थेट अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले. बताओ कलेक्टर बडा है, या गुलाबराव पाटील बडा है? असं म्हणत त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. सरकार दोन गोष्टींवर चालते, जीआरवर आणि सीआरवर, आणि आम्ही जीआरही काढतो आणि तुमचा सीआरही काढतो, असं म्हणत त्यांनी आपली ताकद दाखवली. या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी बारावीपर्यंत शिकलो, कॉलेजला गेलो नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेचे तिकीट दिलं. आज मी मंत्री आहे. त्यामुळे शिक्षणापेक्षा माणसातली जिद्द आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, आमच्यावर केस झाली नाही तर आम्ही शिवसैनिक नाही, अशी आमची संकल्पना होती. एका प्रकरणात मी, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि माझा वडील, सगळे एकाच बॅरेकमध्ये होतो. त्यांच्या या आठवणींवर उपस्थितांमध्ये हशा पिकला. राऊत ॲडमिट आहेत, ते वाचले पाहिजेत यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलही भाष्य केले. संजय राऊत ॲडमिट आहेत. ते वाचले पाहिजेत. मी देवाला प्रार्थना केली आहे की त्यांना सद्‍बुद्धी देवो, असं म्हणत त्यांनी राऊत यांच्याविषयी मिश्र भावना व्यक्त केल्या. वो मेरा माल है भाई, माल है, असं म्हणत त्यांनी आपली शैली कायम ठेवली. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. देवाने उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या 20 लोकांना बुद्धी दिली, तर ते तिथे टिकतील, असही ते म्हणाले. पुत्र हो असा, ज्याच्या हातात भगवा झेंडा त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं. आमचे संजय गायकवाड कसे आहेत डॉन! आम्हाला गुंड म्हणतात. पण अरे शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा. पुत्र हो असा, ज्याच्या हातात भगवा झेंडा असेल आणि जो भ्रष्टाचाराविरोधात लढेल, असं म्हणत त्यांनी जमावात उत्साह निर्माण केला. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. जनतेचा आवाज मांडला या संपूर्ण भाषणामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली असून, अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र समर्थकांच्या मते, पाटील यांनी फक्त जनतेचा आवाज मांडला आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणाप्रमाणे यावेळीही त्यांनी थेट आणि साध्या भाषेत आपली भूमिका मांडली आणि नेहमीप्रमाणेच ती थेट चर्चेचा विषय ठरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:03 am

मुंबईत मोनोरेल ट्रेन रुळावरून घसरली आणि हवेत लटकली:3 कर्मचारी जखमी; चाचणीदरम्यान एका बीममधून दुसऱ्या बीमवर शिफ्ट करताना अपघात

बुधवारी सकाळी मुंबईतील वडाळा डेपोमध्ये चाचणी दरम्यान एक मोनोरेल ट्रेन रुळावरून घसरली. ट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले आणि हवेत लटकले. या अपघातात ट्रेनच्या कॅप्टनसह तीन कर्मचारी जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की ट्रेनच्या अंडरकॅरेजचेही मोठे नुकसान झाले. मोनोरेल चालवणाऱ्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने सांगितले की, ट्रेन रिकामी होती, त्यात एकही प्रवासी नव्हता. सूत्रांनी सांगितले की, सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना घडली जेव्हा ट्रेन एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर हलवली जात होती. बीम बदलण्याच्या कामादरम्यान, ट्रेन घसरली आणि तिचे इंजिन दोन बीममध्ये हवेतच थांबले. सोशल मीडियावरील अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये ट्रेन थोडीशी झुकलेली दिसत होती. संध्याकाळी जड क्रेनच्या मदतीने ट्रेन रुळावरून काढण्यात आली. अपघाताचे फोटो... ३ महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता, ज्यामध्ये ८०० प्रवासी एलिव्हेटेड ट्रॅकवर अडकले होतेतीन महिन्यांपूर्वी मुंबईत मोनोरेलचा अपघात झाला होता, ज्यामध्ये रस्त्यापासून काही फूट उंचीवर असलेल्या मोनोरेल ट्रॅकवर सुमारे ८०० प्रवासी दोन तास अडकून पडले होते. दोन्ही गाड्या ७८२ प्रवाशांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवास करत होत्या. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि गाड्या थांबल्या. एअर कंडिशनर बंद पडल्याने पंधरा प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला आणि काही जण बेशुद्धही झाले. पहिल्या ट्रेनमध्ये सुमारे ५८२ प्रवासी अडकले होते आणि त्यांना स्नॉर्कल शिडी वापरून वाचवण्यात आले. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी खिडक्यांचे काच तोडावे लागले. दुसरी मोनोरेल जवळच्या स्टेशनवर नेण्यात आली आणि २०० प्रवाशांना वाचवण्यात आले. प्रवासी अडीच तास अडकले होते.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 10:26 am

फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या:हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र; अंबादास दानवे संतप्त

फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीवर त्यांनी आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले आहेत. वास्तविक या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरुन अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. कोणत्याही अनुभवाशिवाय या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? 27 दिवसात हा सर्व व्यवहार कसा झाला? 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी फक्त रुपये 500 रुपये कशी? असे अनेक प्रश्न दानवे यांनी उपस्थित केले आहे. अंबादास दानवे यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... १८०० कोटींची जमीन३०० कोटींत खरेदी,स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 10:20 am

1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी:अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर आरोप; वाचा नेमके प्रकरण काय?

पुण्यातील प्रतिष्ठित आणि महागड्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून मोठं वादळ उठलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचं आरोपात नमूद करण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयानं त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचं आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महार वतनाची जमीन सदर जमीन ही महार वतनाची असल्यामुळे कायद्यानुसार तिचा व्यवहार करता येत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वतनधारक जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचं भासवलं असलं, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमिनमालकांसोबत खरेदी खत नोंदवलं असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे, हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशासनाच्या जलद गतीने काम करण्यावर प्रश्नचिन्ह दरम्यान, या प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या उपसमितीमार्फत घेतला जातो आणि त्या समितीचे प्रमुख स्वतः मुख्यमंत्री असतात. त्यामुळे यात अनियमिततेची सुतराम शक्यता नाही. तरीदेखील, या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक तपास केला जाईल, असा त्यांनी खुलासा केला. दुसरीकडे, विरोधकांनी मात्र प्रशासनाच्या जलद गतीने काम करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारी ताब्यातील एवढ्या मोक्याच्या जागेचा व्यवहार काही दिवसांत पूर्ण होतो, हेच अनाकलनीय आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. राजकीय दबाव वाढण्याची शक्यता या प्रकरणामुळे पुणे आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या दोघांचं नाते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या मूल्याच्या व्यवहारात फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरली गेली हे पाहता, शासनानेच काही विशिष्ट कंपन्यांना लाभ मिळावा, अशी योजना आखली का? असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, कागदपत्रांची तपासणी, मूल्यांकन अहवाल आणि धोरणाच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेचा तपास करण्याचे संकेत प्रशासनाकडून दिले गेले आहेत. या वादामुळे आगामी निवडणुकांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:59 am

दिव्य मराठी अपडेट्स:उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन संवाद साधणार

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:54 am

मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर ठेवली आता दोन लाखांची मर्यादा:दोन लाखांत विहीर कशी होणार?, शेतकऱ्यांमध्ये नाराजी‎

अल्पभुधारक शेतकरी व गरिबांच्या उपजीविकेचा आधार बळकट करण्यासाठी मनरेगा योजना सुरू केली. या अंतर्गत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभार्थी कामांवर केंद्र सरकारने नवीन आर्थिक बंधने लागू केली आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या गाईडलाईननुसार आता वैयक्तिक कामांसाठी प्रति लाभार्थी कमाल खर्चाची मर्यादा दोन लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दोन लाखांत विहीर, फळबाग लागडीचे कामे कशी होणार, असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मनरेगा अंतर्गत सध्या २६६ प्रकारच्या कामांना परवानगी आहे. त्यापैकी ६८ कामे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी राखीव आहेत. या कामांमध्ये जमीन विकास, सिंचन, वृक्षारोपण, जलसंधारण, बायोगॅस निर्मिती, स्वच्छता आणि उपजीविकेच्या साधनांची निर्मिती अशा उपक्रमांचा समावेश आहे. परंतु, आता वैयक्तिक कामांसह मनरेगाअंतर्गत खालीलपैकी कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या कामासाठी अर्ज करू शकता सार्वजनिक कामांवर देखील आर्थिक बंधन लादले आहे. वैयक्तिकरिता २ लाख तर सार्वजनिक कामांवर २० लाखांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. परंतु, वैयक्तिकमध्ये ग्रामीण भागात अनेक कामांसाठी विशेषत: विहिरींच्या बांधकामासाठी पाच लाखांहून अधिक खर्च येत आहे. असे असताना केवळ दोन लाखांच्या मर्यादेमुळे शेतकरी आणि कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाच्या निर्णयामुळे अनेक अपूर्ण कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यस्तरावर या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे. विभागीय आयक्तांनी याबाबत शासनाकडे मर्यादा वाढवण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली आहे. खर्चातील पारदर्शकता रोखण्यासाठी निर्णय? शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन लाखांत ना विहीर होते, ना पाण्याची व्यवस्था उभी राहते. शासनाने प्रत्यक्ष वास्तव पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने मात्र या मर्यादेचे कारण खर्चातील पारदर्शकता आणि अनियमितता रोखण्यासाठी आवश्यक आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:51 am

कार्तिक पौर्णिमा उत्सवात विविध कार्यक्रम:भाविकांना महाप्रसाद अन् पालखीधारकांना भोजन

परमहंस श्री समर्थ आडकुजी महाराज यांचा १०४ वा पुण्यतिथि महोत्सव सप्ताह श्री क्षेत्र वरखेड नगरीमध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात चालू आहे. गुरुवर्यांच्या दरबारात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत लहानुजी महाराज , श्री संत सत्यदेव महाराज, मंजुळा माता पालखीचे वरखेड नगरीत पदार्पण झाले. यावेळी पालख्यांचे गुरुदेव भाविकभक्तांनी तथा गावकऱ्यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. समर्थ आडकुजी महाराज यांचे पुण्यतिथि निमित्याने महाराष्ट्रातील साधुसंत, राष्ट्र संतांचे प्रचारक त्यांचे अभ्यासक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, भाविक भक्तगण संत परंपरेतील मंडळी या पर्वाचे निमित्ताने हजेरी लावत असतात. गुरुदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रमातून सकाळी ९ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पालखी निघाली. त्यानंतर पालखीचे तिवसा शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तर वरखेड येथे मोहन विठ्ठल बोके यांचे उद्यानात पालखीचे स्वागत करून सोबतचे पालखीधारांना भोजन दान करण्यात आले. तेथून वरखेड येथे सायंकाळी पालखीचे आगमन झाले. संत लहानुजी महाराज, संत सत्यदेव महाराज इत्यादी पालखीचे एकाच वेळी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. तसेच इतर गावावरून आलेल्या पालख्यांचे स्वागतही करण्यात आले. या वेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीचे सद्गुरू चरणी स्थान देण्यात आले. या पालख्यांचे स्वागतासाठी वरखेड नगरीतील महिला नागरिक,सेवाभावी मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कमानी, देखावे, रोडवर रांगोळी थोर संत महात्म्यांच्या फोटो तर रोषणाईने सर्वत्र लखलखाट होता, तर वरखेड नगरी दीप व रोषणाईने सजली होती. गावकरी महिला भगिनी यांचे हाती सर्वत्र दीप आरती घेऊन महाराजांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी एक किलोमीटर अंतरापर्यंत दीप प्रजलीत असलेल्या आरत्या होत्या. एक दिमाखदार सोहळा जणू दीपावलीच्या स्वरूप पाहायला मिळाले. या पालख्यांचे सोहळ्याचे निमित्याने लेझिम, पताका, दिंडी, महीला वारकरी भक्ताच्या रिंगण सोहळा पार पडला. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. वारकरी मंडळीचे, भारुड, दिंड्यानी वरखेडनगर भक्तिमय झाले होते. दरम्यान सायंकाळी ६ वाजता श्री समर्थ आडकुजी महाराजांच्या महाद्वाराजवळ पालख्यांचे आगमन होताच पालखीचे पूजन संस्थानचे अध्यक्ष अभिजित बोके, सचिव मनोहर बोके, विश्वस्त अशोक अहेर, विक्रम बोके, दिवाकर दळवी, राजू देशमुख, जीवन देशमुख, योगेश देशमुख, अनुराधा बोके, किशोर विटाळकर इत्यादींनी स्वागत केले. सकाळी ४ ते ५.३० प्रभाती आद्यपूजन, श्रीच्या महासमाधीची महापूजा अभिजित बोके अध्यक्ष आडकुजी महाराज संस्थान वरखेड यांच्या हस्ते झाली. तसेच महाद्वारावर ध्वजारोहण, त्यानंतर ८.३० ते ९.३० प्रवचन सीमा बोके यांच्या वाणीतून, १० ते १२ काला अभंगवाणी मयूर महाराज, प्रासंगिक उद्बोधन जनार्दन बोथे सरचिटणीस अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज संत सचिन देव महाराज, दुपारी १ ते ४.३० पर्यंत काला व महाप्रसाद श्रीचे काला पूजन झाले. या वेळी श्री संत सयाजी महाराज, श्री संत गणेश महाराज, श्री संत शंकर महाराज, तसेच निमंत्रित संत महात्मे व प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार अभिजित बोके यांनी मानले. तसेच सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीता वाचन ग्रामगीताचार्य विजय बोके, श्रीची पालखीची शोभायात्रा दहीहंडी व राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:50 am

कपाशीची बोंडे सडून शेतातच फुटले कोंब; केळीला दराचा फटका‎:पावसामुळे 20 हजार हेक्टर कपाशी अन् दीडशे हेक्टर क्षेत्रावरील केळी धोक्यात

तालुक्यातील वळती गावाजवळील नदीवर गत मे महिन्यात बांधलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून पुलाच्या दोन्ही बाजुला बनवलेला रोड जमिनीत धसल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एक कोटी सत्तर लक्ष रुपये किमतीच्या पुलाची वाट लागली आहे. आमदार श्वेता महाले यांच्या विशेष प्रयत्नातून वळती गावाजवळील नदीवर पुलाच्या बांधकामाचे विकासकाम हाती घेण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम रा. म. म. ७५३ ए ते वळती–सवना– चांदई–धोडप प्र. क्र. १०९, कि.मी. २/७०० वर करण्यात आले असून, या कामासाठी तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. जून महिन्यात या पुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांतच या पुलाचे निकृष्ट काम समोर आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी शासनाने मोठी रक्कम मंजूर केली असतानाही काही महिन्यांतच त्याची अशी अवस्था झाली आहे. नाना हिवराळे | खामगाव गेल्या काही दिवसांपासून पडत असलेला सततचा पाऊस खरीप हंगामातील पिकासाठी नुकसानदायक ठरत आहे. सततच्या पावसामुळे खामगाव तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी तर दीडशे हेक्टर क्षेत्रावरील केळी पिके धोक्यात आली आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचा जोर कायम राहिला आहे हंगाम संपल्यानंतरही परतीचा पाऊस मुसळधार सुरूच असून या पावसामुळे कपाशीच्या बोंडातील सरकीला कोंब फुटले लागले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने कापसाच्या वाती होत आहेत. सततच्या पावसामुळे कापसाचे पीक शेतात कुजून खराब होतो असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन पिकानंतर कपाशीवरच शेतकऱ्यांचा जोर आहे .कपाशी हे शेतकऱ्यांचे हमी पीक समजले जाते मात्र पांढरे सोने सततच्या पावसामुळे काळवंडले आहे. खामगाव तालुक्यात यावर्षी २० हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत कापसाचा हंगाम असून कापूस भिजल्याने बाजारातही पडलेला भाव मिळत आहे. यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकरी हतबल झाले आहेत. अवकाळीमुळे पेरणीसाठी निघालेला खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तर दुसरीकडे खामगाव तालुक्यातील सिंचनाची पुरेशी सोय असणाऱ्या भागात केळी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यात दीडशे हेक्टर च्या जवळपास केळी लागवड करण्यात आली आहे. श्रावण महिन्यापासून केळी निघायला सुरुवात होत असते. एरवी केळीला एक हजार रुपयांपासून ते दीड हजारा दरम्यान भाव मिळत असतो. मात्र यावर्षी केळीचे भाव सुरुवात पासूनच पडलेले आहेत ४०० ते ४५० रुपये चा भाव सद्यःस्थितीत केळीला मिळत आहे. सततच्या पावसामुळे केळीत पाणी साचून राहिल्याने धोका निर्माण झाला आहे.परिणामी केळीवर करप्या तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे. केळी लागवडीत गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सततच्या पावसामुळे निर्माण होणारे दमट आणि ओले वातावरण कीटक आणि रोगाचा प्रसार वाढवत असल्याने यामधून केळीला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालली आहे. ठेकेदाराकडून पुनर्बांधणी करण्यात येणार ^पुलाच्या दोन्ही बाजूला दबलेला रस्ता खोदून तो ठेकेदाराकडून पुनर्बांधणी करून घेण्यात येत आहे. या उपर प्रत्यक्ष पॉइंटवर आमचे अभियंता जावून तेथे काय करता येईल ते पाहून ठेकेदाराकडून तेथील काम करून घेण्यात येईल. - गणेश भंगुरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिखली लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण ^यावर्षी समाधानकारक पाऊस असल्यामुळे कपाशीचे चांगले पीक येईल ही आशा होती. सुरुवातीला ते कपाशीला एक पाऊस होत होता मात्र सततचा पाऊस झाल्याने शेतात पाणी थांबले व कपाशीची बोंडे काळे पडली, बोंडी सडून सरकीला कोंब फुटले आहेत. अशा कापसाला बाजारातही पडेल भाव मिळत असल्यामुळे कपाशी लागवड साठी केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे. - सुरेश गाढवे, कापूस उत्पादक शेतकरी पाळा ता.खामगाव

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:49 am

पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद केल्यास तीव्र आंदोलन:शिक्षण बचाव समन्वय समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्षण बचाव समन्वय समितीने दिला असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. शासन सामाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भौतिक सुविधा, पोषण आहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या काही शाळांमधील शैक्षणिक दर्जा काँन्व्हेंटच्या तुलनेने अगदी सुमार आहे. परिणामी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे या शाळा बंद करण्याची चर्चाही शिक्षण वर्तुळात रंगली होती. काही दिवसांपूर्वी १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळांचा आढावा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. दरम्यान शिक्षण विभागाच्या आदेशामुळे शिक्षण तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद करण्याचा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी शिक्षण बचाव समन्वय समितीने केली. कुठलीही शाळा बंद करण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालक अथवा कुठल्याही अधिकाऱ्यास व मंत्रिमंडळाला नाही. शाळा बंद करण्याबाबतची शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये कुठलीही तरतूद नाही. याउलट शाळांचा दर्जा सुधारावा व शाळांची संख्या वाढवावी असे स्पष्ट नमूद आहे. सामाजिक न्यायाचा विचार बाजूला सारून असंवेदनशील शिक्षणहीत विरोधी भूमिका प्रशासनाची आहे. त्यामुळे याचा तीव्र निषेध करण्यात आला. निवेदन देताना शिक्षण बचाव समन्वय समितीचे सूरज मेश्राम, राजेंद्र वानखडे, महेंद्र भोजने, विजय कौसल, अॅड. विलास वखरे, राजेंद्र कवठे, मो. मुजमिल पांडे, नामदेव फाले, बाळू ढोले पाटील, जान्हवी ढोले उपस्थित होते. जिल्हा प्रशासनामार्फत शिक्षण उपसंचालकांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या. पटसंख्येच्या आधारावर कोणतीही शाळा बंद करू नये. क्लस्टर निर्मितीची प्रक्रिया ताबडतोब थांबवण्यात यावी. शिक्षण हक्क कायद्याच्या निकषाप्रमाणे सर्व शाळांना भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू न करण्याचा निर्णय घ्यावा. शिक्षणावर सकल उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च करावा. काय आहे आदेशात? पटसंख्येबाबतच्या आदेशावर ९ ऑक्टोबर तारीख असून, यात पुढील बाबींचा उहापोह करण्यात आला आहे. एकाच कॅम्पसमध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्याचे रूपांतरण एकाच शाळेत करण्यात यावे. समावेशन झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास वाहतूक भत्ता दरमाह ६०० रुपये मिळण्याबाबत मिळण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांचा यु-डाईज क्रमांक बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:46 am

पोलिसांनी दिले 18 गोवंशांना जीवदान:रामदास पेठ पाेलिसांची ताजनापेठेत कारवाई; 4 लाखांचा ऐवज हस्तगत‎

कत्तलीकरिता बांधून ठेवलेल्या १८ गोवंशांना रामदासपेठ पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले. या कारवाईत ४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑपरेशन प्रहार अंतर्गत बुधवारी सकाळी ६:१५ च्या सुमारास रामदास पेठ पोलिसांनी ही कारवाई केली. अकोला येथील रामदासपेठ ठाण्यात पोलिस अंमलदारांना गुप्त बातमीदारांमार्फत गुप्त माहिती मिळाली की, ताजनापेठ परिसरात मच्छी मार्केटसमोर कुरेशी कार्यालयाजवळ गोवंश जातीची काही जनावरे अमानुषपणे कत्तलीकरिता अवैधरीत्या निर्दयतेने बांधुन ठेवली आहेत. तेथे जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी गोवंश जातीचे लहान मोठे १८ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी शेख मोबीन कुरेशी, मोहम्मद अर्शद कुरेशी, शेख जाफर (रा. अकोट फैल, अकोला) यांनी हे गोवंश कत्तलीसाठी आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रामदास पेठ पोलिस करत आहेत. रामदासपेठचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात अंमलदार सुरेश लांडे, संदीप वानखडे, किरण गवई, अनिल धनबर, रोशन पटले, अभिजीत इंगळे, कांचन उईके यांनी ही कारवाई केली.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:45 am

एसटी चालक-वाहकांना समान काम मिळणार:‘टी-9’ रोटेशन बंधनकारक; गैरव्यवस्थापनाला एसटी महामंडळाचा लगाम‎

राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) चालक-वाहकांना ड्युटी वाटप समान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘टी-९’ रोटेशन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मनमानी व गैरव्यवस्थापनावर लगाम बसेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कामाचे समान वाटप व्हावे आणि कार्यक्षमता वाढावी, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. मागील काही महिन्यांपासून विविध आगारांमध्ये काम वाटपात गैरप्रकार, पक्षपात आणि अनियमितता झाल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. काही चालक-वाहकांना ठराविक फेऱ्या, विश्रांती वेळा आणि सोयीच्या मार्गांवर प्राधान्य दिले जात असल्याचेही निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनाने सर्व आगारांसाठी ‘टी-९’ रोटेशन पद्धत सक्तीची केली आहे. ‘टी-९’ प्रणालीमार्फत प्रत्येक कर्मचाऱ्याची कामगिरी, उपस्थिती व अनुभव यांचा विचार करून स्वयंचलित नियोजन केले जाईल. आधी काही आगारांमध्ये ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली होती आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आता संपूर्ण राज्यात ही रचना लागू केल्याने एसटीच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता येण्यास मदत होईल. या निर्णयाचे कर्मचारी संघटनांनी स्वागत केले असून ‘योग्य वापर केल्यास ही प्रणाली कर्मचारी आणि प्रवासी दोघांच्याही हिताची ठरेल,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ‘टी-९' पद्धत आहे तरी काय? चालक-वाहकांच्या कामाचे वाटप समान, न्याय आणि पारदर्शक असावे, यासाठी महामंडळाने जुन्या टी-९' मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार चालक वाहकांना कामे देताना आळीपाळी पद्धत आणि नियमावलीचा अवलंब करणे बंधनकारक आहे एका कर्मचाऱ्याला सोपे कर्तव्य मिळाल्यास, दुसऱ्या दिवशी त्याला त्यानुसार आळीपाळीने कठीण लांबपल्ल्त्याचे कर्तव्य देण्यात येईल. आगाऊ पाळीवर पॉकेट ड्युटी वाटताना फक्त सोयीनुसार निवड न करता, उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये नियमानुसार समन्यायी पद्धतीने वाटप केले जाईल, अशा सूचना विभागीय नियंत्रकांना दिल्या आहेत. समान नियम लागू करणारी प्रणाली ^‘टी-९’ ही एक जुनी मार्गदर्शक तत्त्वे आहेत, ज्यांचे आता काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश आहेत.यात प्रत्येक चालक-वाहकाला सॉफ्टवेअर प्रणालीच्या आधारे क्रमवार ड्युटी दिली जाईल. त्यामुळे कोणालाही विशेष वागणूक मिळणार नाही. यामुळे पारदर्शकता वाढेल. ड्युटीबाबतचे वाद, नाराजी आणि तक्रारी कमी होतील.- विलास पाटील, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:45 am

संत नामदेवांच्या पालखीची 50 दिंड्या, 3 हजार भाविकांसह आळंदी वारी:प‌ंढरी नगरीचा निरोप घेत पालखी‎सोहळा वारकऱ्यांसह मार्गस्थ‎

चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू॥ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी तिर्थक्षेत्र पंढरी नगरीतून श्रीसंत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याने पौर्णिमे दिवशी बुधवारी तिर्थक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केले.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित या पालखी सोहळ्यामध्ये सुमारे ५० दिंड्यांसह ३ हजार वारकरी, भाविक सहभागी झाले आहेत. सकाळी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथे होणार्‍या गोपाळ काल्यासाठी संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपूर येथे गेला, त्याठिकाणी ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. भाविकांनी एकमेकांना काल्याचा प्रसाद देवून गोपाळकाला साजरा केला. त्यानंतर पालखी सोहळा श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिरात गेला आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची भेट घेतली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने पादुकांचे दर्शन घेवून ह.भ.प. नामदास महाराज यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा मंदिरात आला. दुपारचे भोजन व विश्रांती घेतल्यानंतर पालखी सोहळ्याने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. पंढरपूरहून निघालेला हा पालखी सोहळा भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, जेजुरी, सासवड, पुणेमार्गे सुमारे ८ दिवसांचा पायी प्रवास करून आळंदी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या यात्रेत हा पालखी सोहळा सहभागी होणार आहे. यावेळी श्री केशवराज संस्थेच्यावतीने पालखी सोहळ्यासाठी ११ हजार रुपयांची देणगी विश्वस्त राजेश धोकटे, जयवंत कांबळे यांच्या हस्ते नामदास महाराजांकडे देण्यात आली. बुधवारी पालखी सोहळा मंदिरातून निघून संत नामदेव पायरी येथे पालखी आल्यानंतर मानाचे अभंग व आरती म्हणण्यात आली. महाद्वार, पश्चिमद्वार,शिवाजी चौक, अर्बन बँक, सरगम चौक, केबीपी कॉलेज मार्गे हा सोहळा विसावा मंदिर इसबावी येथे आला. यावेळी सेवक राजाभाऊ जवंजाळ, किशोर काकडे यांच्यासह वारकरी व शिंपी समाज बांधव उपस्थित होते. सोहळ्यात सर्वात प्रथम नगारखाना त्यानंतर पताका घेतलेले वारकरी, टाळकरी, अश्व, घोडेस्वार, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असा लवाजमा होता. या पालखी सोहळ्यासमवेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी पाण्याचा टँकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे जिल्हा व स्व. तात्या बापट स्मृती समिती चिंचवड यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत फिरत्या दवाखान्याची (रुग्णवाहिका) सोय करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून त्यांची ही सेवा सुरू आहे. पालखीसोबत नगरखाना, वारकरी, घोडेस्वार, तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला पंढरपूर ते आळंदी ८ दिवसांचा प्रवास

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:35 am

आसमानीनंतर आता शेतकऱ्यांवर सुलतानी संकट‎:उद्धव ठाकरे यांनी बार्शी तालुक्यात भरपाई न मिळाल्यामुळे सरकारवर साधला निशाणा‎

आपल्या आपापसातील भांडणे, मतभेद बंद खोलीत ठेवा. जनतेसमोर व्यासपीठावर ते आणू नका, झपाटून कामास लागा. विद्यमान सरकारच्या विरोधात लढा देऊन कार्य करणाऱ्या सर्वसामान्य व नवीन कार्यकर्त्यास नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संधी देण्याचे शरद पवार यांनी धोरण ठरविले आहे. प्रामाणिकपणे लढा देत विजयाचा झेंडा आपणच रोवू, असा विश्वास खासदार धैर्यशील यांनी मोहोळ येथे दिला. गेल्या पंधरवड्यात जयसिंह मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते यांच्या पाठीशी मोहिते कुटुंब उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते यांनी भाजपला दिलेली ललकारी महत्वाची मानली जात आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद,पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक मोहोळ येथे बुधवारी झाली. या बैठकीत खासदार मोहिते-पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, मोहोळ तालुकाध्यक्ष विनय पाटील, संजय क्षीरसागर, पवन गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शरद पवार गटाची महत्वाची सभा असतानाही गटाचे विद्यमान आमदार राजू खरे मात्र या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात येवून गेले. त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अवाक्षर काढले नाही. पंतप्रधान राज्याचा प्रस्ताव आला नसल्याचे सांगतात. मग हे काय करतात असा प्रश्न त्यांनी विचारला. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे देण्याबाबत विमा कंपन्यांना तंबी दिली. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. शिवसेना त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. नंदकुमार काशीद म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ठेवल्या आहेत. तुरीची पेंडी भाजपा सरकारला पोहोच करा. कांदा उत्पादक शेतकरी विजय कागदे, पद्माकर काटमोरे आदींनी शेतमालाला भाव नाही. उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. नुकसान भरपाईची अत्यल्प रक्कम खात्यावर आली आहे, आदी व्यथा मांडल्या. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात असल्याची टीका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. अतिवृष्टीनंतर सरकारने ३१,८०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. परंतु अद्यापही ७० टक्के शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. व्यापाऱ्यांचे १५ लाख कोटींचे कर्ज माफ करणारे केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. एवढया पैशात शेतकऱ्यांची २२ वेळा कर्ज माफी झाली असती. आमदार दिलीप सोपल म्हणाले, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत शेतकऱ्यांना पोहोचली नाही. मला तर हे खरे वाटेना झाले. यावेळी बोलताना माजी आ.रमेश कदम म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या असतात, त्यांना यात संधी मिळाली पाहिजे, त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलण्याचेच काम करायचे का? या निवडणुकीत आम्ही त्यांच्यामागे उभे राहत त्यांचा विजय होण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे. या निवडणुकीत ओरिजनल दाखले असलेल्यांनाच संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. पुढे बोलताना मोहिते-पाटील म्हणाले, मोहोळ तालुक्याची राजकीय परिस्थिती फार विचित्र झाली आहे. मुंबईतील बैठकीत माझ्यावर शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली असून प्रत्येक तालुकानिहाय प्रत्यक्ष भेटी देऊन मी काम करणार आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदे घेऊ नयेत. सामान्य कार्यकर्त्यास पाठबळ देण्याचे पक्षाचे धोरण आहे. निवडून येण्याचा निकष चालणार नाही कार्यकर्ता व नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर भर आहे. इच्छुकांनी विहित नमुन्यात आपापले अर्ज तालुकाध्यक्षांकडे सुपूर्द करावेत. प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांची कोअर कमिटी नेमलेली आहे. Share with facebook पवार यांनी माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली पीक विम्यासाठी, कंपन्यांना तंबी उपमुख्यमंत्री पवारांवर शेलक्या शब्दात टीका कोणतेही सरकार आले तरी अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतात. अखंड उपमुख्यमंत्री भव असा आशिर्वाद लाभलेले उप असा टोमणा त्यांनी अजित पवार यांना लगावला. सामान्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या? शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:35 am

बचत गटातून बावीस महिला बनल्या व्यावसायिक:महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण, व्यवसाय उभारणीसाठी रागिणी संस्थेकडून केली जाते मदत‎

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, शेटफळ व्यवस्थापक नितीन साठेसह सहकारी स्टाफच्या माध्यमातून रागिणी महिला बचत गटाची स्थापना केली. रोहिणी पवार यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा धवल पापड उद्योग सुरु केला आहे. या व्यवसायातून आर्थिक फायदा निर्माण करून आष्टी गावातील महिलांना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन करत आतापर्यंत २२ महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन प्रति दिवस प्रति महिला ५०० रुपये रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत तालुका बँक कक्ष मोहोळ यांच्या माध्यमातून बचत गटाची स्थापना करण्यात येत आहे. याबरोबरच महिलांची शाश्वत उपजीविका निर्माण होण्यासाठी महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण अर्थसहाय्य, व व्यवसाय उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. याच माध्यमातून सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, शेटफळ बचत गटाची स्थापना करण्यात आली. तसेच आपला ग्रामीण भाग त्यामुळे शेतीमधील रोजगार सोडून इतर कुठेही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी बचत महत्वाची आहे. नुसतं बचतच नाही तर विविध व्यवसायासाठी ही चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर यासारख्या अनेक व्यवसाय महिलांनी करण्यास सुरू केले. स्वतःच व्यवसाय चालू झाल्यामुळे महिलांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढू लागले. महिला दूध व्यवसाय, शेळीपालन कुक्कुटपालन याचबरोबरच लोणच्याचे पापड, शेवया, चिप्स, शिलाई मशीन अशा प्रकारची व्यवसाय करू लागला. महिन्यातून एकदा महिला ग्राम संघाची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत महिन्याभरातील सर्व खर्चाची व ग्रामसंघाच्या कामकाजाची माहिती मंडळी जाते. तसेच हा बचत गट तांदूळ, नाचणी, ज्वारी, उडीद यासारखी विविध धान्याच्या माध्यमातून पापड बनविण्याचे काम केले जाते. ही उत्पादने स्थानिक बाजारपेठे बरोबरच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर यासारख्या शहरात या पापडाची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. उत्कृष्ट चव, उत्पादनाची सातत्यता यामुळे त्यांच्या उत्पादनाला चांगली मागणी आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, मोहोळ अंतर्गत बचत गटातील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी प्रशिक्षण,अर्थसहाय्य केले जात आहे. ^महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत तालुका बँक कक्ष मोहोळ यांच्या माध्यमातून बचत गटाची स्थापना करण्यात येत आहे. याबरोबरच महिलांची शाश्वत उपजीविका निर्माण होण्यासाठी महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण अर्थसहाय्य,व व्यवसाय उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. योगेश बोडके, विकास सल्लागार ^महिला आर्थिक विकास महामंडळ, मोहोळ अंतर्गत बचत गटातील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी प्रशिक्षण, अर्थसाहाय्य मिळाले. पापड बनवण्यासाठी उद्योग उभा केला. आज गावातील अनेक महिलांना ५०० रुपयाप्रमाणे रोजगार मिळवून देण्याचे काम केले. महिलांनी शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसाय केल्यास नक्कीच आपल्यासह इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्यास संधी मिळते. रोहिणी पवार, बचतगट आष्टी महिलांना विविध व्यवसायांचे दिले जातात प्रशिक्षण

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:31 am

वैकुंठ चतुर्दशी दिवशी बार्शीत रंगला हरिहर भेटीचा सोहळा:हरिहर भेट सोहळा हा उत्सव शैव आणि वैष्णव भक्तांच्या परस्पर ऐक्याचे प्रतिक

बार्शी परंपरेनुसार वैकुंठ चतुर्दशी दिवशी सोमवारी (दि.३) रात्री १२ वा. हरि-हर भेटीचा अनोखा पौराणिक सोहळा शहरातील मंगळवार पेठेतील प्राचीन श्री. उत्तरेश्वर मंदिरात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीतील धार्मिक वातावरणात पार पडला. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. बार्शीत होणारा हरिहर भेट सोहळा हा उत्सव शैव आणि वैष्णव भक्तांच्या परस्पर ऐक्याचे प्रतिक आहे. या दिवशी भगवान शिव सृष्टीची जबाबदारी भगवान विष्णूंकडे सोपवतात अशी आख्यायिका आहे. वैकुंठ चतुर्दशी दिवशी सोमवारी रात्री १० वा. श्री उत्तरेश्वर मंदिरांमधून बेलांचा हार व आहेर घेऊन शिवभक्त वाजत- गाजत बार्शीचे ग्रामदैवत श्री. भगवंत मंदिर येथे आले व भगवान विष्णूच्या नाम गजरामध्ये बेलांचा हार भगवान विष्णूंना अर्पण केला. तसेच भगवंत मंदिरांमधून विष्णू भक्त तुळशीचा हार व आहेर घेऊन उत्तरेश्वर मंदिर येथे येऊन भगवान शिवाच्या नाम गजरामध्ये तुळशीचा हार भगवान शिवांना अर्पण करून रात्री १२ वा भगवान शिवाची आरती केली. यावेळी हजारो शिव व वैष्णव भक्त उपस्थित होते. विशेषत महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ‘उत्रेश्वर भगवान की जय’चा जयघोष बार्शी येथील संपूर्ण विश्वातील एकमेव प्रसिध्द श्री भगवंत- लक्ष्मी मंदिरात येथील प्रसिध्द श्री उत्रेश्वर महादेव मंदिरातील गुरव पुजारी यांच्या तर्फे श्री भगवंत- लक्ष्मीस वस्त्र, श्रीफळ बेलांचा हार अर्पण केल्यानंतर भगवंताचे पुजारी बडवे मंडळी तर्फे श्री. उत्रेश्वरास वस्त्र, श्रीफळ, तुळस, अर्पण करुन श्री हरी-हर भेटीचा सोहळा, अंबरीष वरद श्री भगवान, ‘उत्रेश्वर भगवान की जय...’, अशा जयघोषात भक्त गणांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडतो. हरिहरांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात ^आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीविष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरिहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे. महेश गुरव, पुजारी श्री.उत्तरेश्वर मंदिर बार्शी.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:30 am

अकोल्यात कपडा बाजारातील जेजे मॉलला पहाटे भीषण आग:सुदैवाने जीवितहानी टळली, 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान; व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

अकोला शहरातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कपडा बाजारात आज पहाटे भीषण आगीची घटना घडली. सकाळी अंदाजे तीनच्या सुमारास जेजे मॉल मध्ये लागलेल्या या आगीने काही मिनिटांतच विक्राळ रूप धारण केले. पहाटेच्या शांत वातावरणात अचानक उठलेल्या आगीच्या लोटांनी परिसरात गोंधळ उडाला. आग इतकी प्रचंड होती की काही क्षणांतच संपूर्ण इमारतीतून धुराचे लोट उठले आणि आकाश काळवंडून गेलं. या घटनेने व्यापाऱ्यांत भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेकांनी आपली दुकाने वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, मात्र ते व्यर्थ ठरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी पाच अग्निशमन गाड्यांचा वापर करण्यात आला. जवळपास दोन तासांच्या कठोर प्रयत्नानंतर दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अग्निशमन विभागाच्या मते, आग मॉलच्या वरच्या मजल्यावरून सुरू झाली आणि काही क्षणांतच ती संपूर्ण इमारतीत पसरली. मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा, फर्निचर आणि इतर साहित्य असल्याने आगीने जोर पकडला. दरम्यान, परिसरातील काही व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांतील माल सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या तीव्रतेमुळे आत प्रवेश करणे अशक्य झाले. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जेजे मॉलमधील अनेक दुकाने संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. काही ठिकाणी धातूंची चौकट आणि फर्निचरचे अवशेषच उरले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागली तेव्हा मॉलमधील सर्व दुकाने बंद होती आणि परिसरात फार कमी लोकांची वर्दळ होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी जीवितहानी टळल्याने व्यापाऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे. अनेकांनी मात्र आपले संपूर्ण भांडवल आणि साठा आगीत गमावल्याची खंत व्यक्त केली आहे. शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून तांत्रिक तपासणी सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी मॉलमधील वीजजोडणी, वायरिंग व्यवस्था आणि सर्किट पॉईंट्स तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही मागवण्यात आले आहेत, ज्यातून आगीच्या मूळ कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा पुन्हा समोर दरम्यान, या दुर्घटनेने पुन्हा एकदा अकोला शहरातील अग्निसुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील व्यापारी संकुलांमध्ये फायर सेफ्टी उपकरणे कार्यरत आहेत का? याचा सखोल तपास करावा अशी मागणी होत आहे. अलीकडच्या काळात शहरातील व्यापारी संकुलांमध्ये वाढत्या शॉर्टसर्किटच्या घटना पाहता, विद्युत यंत्रणांचे नियमित ऑडिट आणि फायर सेफ्टी प्रशिक्षण अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. जेजे मॉलच्या घटनेनंतर प्रशासनाकडून परिसरातील इतर मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समध्ये अग्निशमन नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. सुदैवाने ही आग जीवितहानीविना आटोक्यात आली, परंतु तिच्या ज्वाळांनी शहराच्या सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा पुन्हा समोर आणल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:30 am

27 वर्षांनी एकत्र माजी विद्यार्थी रमले आठवणीत:शिवचलेश्वर प्रशालेतील 1997- 98 च्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता व्यक्त

अक्कलकोट मैंदर्गी येथील श्री शिवचलेश्वर प्रशालेतील सन १९९७-९८ च्या कन्नड माध्यमातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गुरुवंदना कार्यक्रम अक्कलकोट येथील अजिंक्यतारा हॉटेलमधील सभागृहात उत्साहात पार पडला. प्रारंभी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सांगणप्पा होळीकट्टी व शिवशंकर आलमेल यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर नवनगर (हुबळी) मठाचे मठाधिपती श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुने दिवस आठवत २७ वर्षांनी पुन्हा एकदा वर्ग भरवला. सर्व गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिद्धारुढ धूतरगी, रामचंद्र हिरस्कार सर व जयदेवी उकली यांच्या छडीमाराचा अनुभवही पुन्हा स्मरणात आणण्यात आला. सकाळी ११ वाजता झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उषा गोब्बूर, दीपा धूतरगी, महादेवी हुववे, पार्वती कोरचगाव आदींनी स्वागतगीत सादर केले. शिवचल कुमार सालीमठ व मल्लिनाथ मठपती यांनी प्रास्ताविक करताना शिक्षकांनी दिलेल्या शिक्षण व संस्कारांनी आमचे जीवन उज्ज्वल केले, असे मत व्यक्त केले. यावेळी एस. एम. जाधव, एस.एस.अळोळी, गु.गु. मठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक सिद्धाराम मोरे व किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीराजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री शिवचलेश्वर प्रशालेतील एकूण २२ गुरुजनांचा मैसूर फेटा, मोत्यांचा हार, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सविता धनळी, महानंदा सरसंबी, नागाम्मा अळगुंडगी, महादेवी जुळजुळे, सविता निंगदळी या माजी विद्यार्थ्यांनी आयोजन केले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी, व सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. या माजी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग या कार्यक्रमास मधुमती सालीमठ, प्रेमा सिंदगी, सुषमा मुलगे, कमला शिवणगी, लक्ष्मी देगाव, जगदेवी पाटील, धानाम्म हसरमानी, सोनाबाई सुतार, शिला गोब्बुर, नीलम्मा सिंदगी, शिवम्मा कोळी, राजश्री जमणे, बसम्मा गोब्बुर, सुष्मा मुलगे, शिवचलप्पा नडगेरी, मल्लय्या नंदीकोल, संतोष वच्चे , संतोष गोब्बूर, अशोक हिरतोट, गिरीश साबा, गुरुनाथ म्हेत्रे, मळप्पा बुरुड, मलकण्णा हडलगी, महादेव हावळगी , भीमलिंग यळसंगी, आदी मित्रवर्ग शाळेतील जुन्या आठवणीत रमले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:30 am

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी:संवाद न साधल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप,जिल्हाधिकारी यांनी शेती, रस्ते, वीज वितरण व नुकसानीची दिली माहिती‎

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या शेती, पायाभूत सुविधा व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाने आज बुधवारी सकाळी पाहणी केली. मात्र या पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीच्या नुकसानी साधी विचारपूस केली नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या या पथकात केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता. या पथकाने तालुक्यातील वडकबाळ व हत्तूर येथे सकाळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे व शिवणी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. वडकबाळ येथील सीना नदीवरील बंधाऱ्याची स्थिती, शेतीचे झालेले नुकसान व वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या नुकसानीची माहिती घेतली. हत्तूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर हत्तूर- आनंदनगर या वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी केली. रस्त्यावर उभारूनच शेतीच्या नुकसानीची कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेती, रस्ते, वीज वितरण, शाळा व स्मशानभूमीच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने व सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित उपस्थित होते. सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच अतिवृष्टीची भर पडल्याने सर्वच भागातील शेतीला फटका बसला. पूर ओसरल्यानंतर एक महिन्यांनी केंद्रीय पथकाने आज पाहणी केली. मात्र यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली नाही. एकाही शेतकऱ्याकडून माहिती घेतली नाही. या दौऱ्याची अनेकांना माहितीच नव्हती. अधिकाऱ्याकडूनच माहिती घ्यायची होती तर पाहणीचे नाटकच कशाला करता असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला. ^हत्तूर येथे केंद्रीय पथक नेमके कशासाठी आले होते हेच कळलं नाही. कारण त्यांनी एकाही पूरग्रस्त शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली नाही. फक्त पाहणी करून प्रशासनाचेच ऐकायचे होते तर मग आलातच कशाला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. प्रशांत सलगरे, ग्रामस्थ हत्तूर ^केंद्रीय पथकाने पूरग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती का घेतली नाही. अधिकाऱ्यांकडून माहिती घेत कागदावरची पाहणी योग्य आहे का? कारण माझी एक दीड एकर नदीकाठची शेती वाहून गेली. आठ एकर ऊस सपाट झाला. सात एकर शेतातील माती खरडून गेली. पण अजून नुकसानीचा एक रुपया खात्यात जमा नाही. परमेश्वर पुजारी, शेतकरी वडकबाळ पूरग्रस्त शेतकऱ्यांशी का बोलला नाहीत

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:29 am

खतांच्या गोणीमागे 200 रुपयांची दरवाढ:खताच्या मात्रांचे नियोजन बिघडले, आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांसमोर आणखी संकट‎

पापरी दिवाळीपूर्वी केंद्र व राज्य शासनाने जीएसटी कमी करत नागरिकांना जीएसटी उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. याचा कार खरेदीपासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीतही नागरिकांनी फायदा घेत उत्सव साजरा केला. मात्र, गत अडीच तीन महिन्यांपासून वाढत चाललेल्या रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. शेती उपयोगी रासायनिक खतांच्या ५० किलोच्या गोणीमागे टप्प्याटप्प्याने १५० ते २५० रुपयांची दरवाढ झाली आहे. रासायनिक खतांना जीएसटी कमी झाल्याचा फायदा झाला नाही. केंद्र शासनाने ज्या वस्तूंना २८ टक्के जीएसटी होता तो १८ टक्क्यांपर्यंत आणला तसेच ज्या वस्तूंवर १२ टक्के जीएसटी होता तो पाच टक्के केला. परंतु रासायनिक खतांवर सुरुवातीपासून पाच टक्के जीएसटी होता तर फवारणीसाठी लागणाऱ्या कीटकनाशकांवर १८ टक्के जीएसटी आहे. या दरवाडीने मात्र फळबाग, इतर शेती उत्पादकांचे धाबे दणाणले आहे रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या खत कंपन्यांनी प्रत्येक रासायनिक खते व औषधांची लिकिंग सुरु केल्याने विक्रतेसह जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे जीएसटी कमी केल्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा माल महागल्याने खतांच्या किंमतीत वाढ होत असून अजूनही भविष्यातही वाढीच शक्यता खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून वर्तवली जात असल्याचे खत विक्रेते सुलतान मुलाणी यांनी सांगितले. सध्या खत दरवाढीने शेतकऱ्यांचा खर्च वाढला ^ शेतकऱ्याचे खरिपात अतिवृष्टीने नुकसान झाले. त्यात रब्बी हंगामात खतांच्या किंमतीत दरवाढीची भर पडली. रासायनिक खतांना पाच टक्के जीएसटी आहे. त्यामुळे केंद्र शासनाने कमी केलेल्या जीएसटीचा शेतकऱ्यांना फायदा झाल नाही. खतांच्या किंमती वाढत चालल्या आहेत. खत कंपन्यांनी प्रत्येक रासायनिक खते व औषधांची लिकिंग सुरु केल्याने विक्रतेसह जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. समाधान भोसले, पापरी, प्रयोगशील शेतकरी. खत - पूर्वीचा दर - आताच दर (रु) इफ्को १०:२६:२६ -१४७० - १८५० सुफला १५:१५:१५ - १४७० - १६५० २०:२०:१३ - १३५० - १५०० २४:२४:२४ - १७०० - १९०० ८: २१ : २१ - १९०० - २१०० ९:२४:२४ - १९०० - २१००

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:28 am

जिद्द, चिकाटीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश:क्लास वन अधिकारी झालेल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थिनी चाकूरकर, टोम्पे यांचा सत्कार‎

शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणे गरजेचे आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी कमी वयात अधिकारी पदावर पोहोचायचे असल्यास जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून क्लास वन अधिकारी होण्याचा मार्ग अधिक सुकर होतो, असे प्रतिपादन गणेश हाके पाटील बोलत होते. अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गणेश हाके पाटील बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या रेखाताई तरडे हाके, प्राचार्य शोभाताई टोम्पे, संचालक सुरेंद्र चाकूरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. एस. बी. कुलकर्णी, मुख्याध्यापक सौ. आशा रोडगे, सौ. मीना तोवर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शाळेच्या दोन माजी विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला.सौ. साक्षी चाकूरकर यांची राज्य सरकारच्या सेवेत क्लास वन (राजपत्रित अधिकारी वर्ग अ) पदावर निवड झाल्याबद्दल, तसेच,डॉ. अपर्णा शोभा पांडुरंग टोम्पे यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून रेडिओलॉजी विषयात फेलोशिप प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार, मानाचा फेटा आणि ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सौ. आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. शारदा तिरुके यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. मीना तोवर यांनी मानले. या कार्यक्रमाला सुजाता चाकूरकर, डॉ. अश्विनी टोम्पे तसेच इतर मान्यवर, शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील संस्कारांमुळे आजचे यश मिळवता आले या वेळी साक्षी चाकूरकर व डॉ. अपर्णा टोम्पे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी शिक्षणात परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करत, “शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही या उंचीवर पोहोचलो,” असे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:22 am

उदगीरमध्ये नो पार्किंग रिक्षा, 3 चालकांवर गुन्हे दाखल:रेल्वे पोलिसांची स्थानक परिसरात कारवाई‎

उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार समोर परळी रेल्वे पोलीसांनी ३ नोव्हेंबर रोजी ठरवून दिलेल्या ऑटोरिक्षा स्टँडवर न थांबता नो पार्किंगमध्ये थांबविण्यात आलेल्या तीन ऑटोरिक्षा चालकाविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मंगळवारी (४ नोव्हेंबर) परळी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार समोर ऑटोरिक्षा चालकांनी बेशिस्तीपणे आपली ऑटोरिक्षा थांबवून रेल्वे प्रवाशांच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करुन त्रास देत असल्या कारणाने परळी रेल्वे पोलीस व रेल्वे अभियंता बिदर यांनी उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात ३ नोव्हेंबर रोजी भेट देऊन उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात ऑटोरिक्षा स्टँडची जागा दाखवून दिली होती. रेल्वे स्टेशनकडे येणारी ऑटोरिक्षा प्रवासी सोडून स्टँडवर थांबावे अशी सक्त ताकीद करण्यात आली होती. व अन्य ठिकाणी थांबल्यास कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट सूचना देण्यात आली होती. मात्र ४ नोव्हेंबर रोजी रेल्वे पोलीसांचे नियमांचे दुर्लक्ष करून नो पार्किंग मध्ये ऑटोरिक्षा क्र.एम एच २४ ए टी ७८०४, एम एच २४ ए टी ३७९८, एम एच २४ ए टी ५८४४ या ऑटोरिक्षा विरोधात परळी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दररोज नियमित कारवाई उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात परळी रेल्वे पोलीस स्टेशन मधील रेल्वे सुरक्षा बलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय लांडगे यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांसह, उदगीर रेल्वे स्थानकावरील ''नो पार्किंग'' क्षेत्रात वाहने पार्क करणाऱ्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर अडथळा आणणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध नेहमी विशेष मोहीम राबवून अशा उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध दररोज नियमित कारवाई केली जाणार आहे. संतोष कांबले, पोलीस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल परळी

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:20 am

यशवंतवाडी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना सायकल:आमदार रमेश कराड यांच्या हस्ते 10 सायकल वाटप, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य‎

गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते प्रवासाची कसलीही सुविधा नसल्याची अडचण लक्षात घेऊन रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दहा शालेय विद्यार्थ्यांना आ. रमेश कराड यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल यशवंतवाडी ग्रामपंचायतचे अनेकांनी कौतुक केले आहे. रेणापूर तालुक्यातील मौजे यशवंतवाडी येथे शिक्षणाची सोय नसल्याने गावातील मुला मुलींना कारेपूर येथे शाळेकरीता जावे लागत असे मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची कुठलीच नियमित सोय नसल्याने पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. शालेय विद्यार्थ्यांची ही मोठी गैरसोय लक्षात घेऊन यशवंतवाडी ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकली खरेदी करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या १० सायकलीचे वाटप लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते बुधवारी सकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात करण्यात आले. यावेळी अनुष्का चव्हाण, राधा सूर्यवंशी, जागृती सूर्यवंशी, भक्ती चव्हाण, मोहिनी सूर्यवंशी, सार्थक मोरे, माऊली जाधव, गजानन चव्हाण, जानवी चव्हाण, नक्ष चव्हाण या शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. पालकांमधून समाधान सायकल वाटप प्रसंगी यशवंतवाडीचे सरपंच ओम चव्हाण यांच्यासह महेंद्र गोडभरले, अभिषेक आकनगिरे, दशरथ सरवदे, वसंत करमुडे, विजय काळे यांच्यासह पालक व इतर अनेक जण होते. यावेळी आ. रमेश कराड यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यशवंतवाडी ग्रामपंचायतीने सायकली वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:20 am

एकाच झाडाला गळफास घेऊन पाथर्डीत दांपत्याने संपवले जीवन:पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी चार जणांच्या आत्महत्या‎

तालुक्यात बुधवारी चार आत्महत्यांच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. तालुक्यातील घाटशिरस येथे नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात एका २८ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेतला, तर साकेगाव येथील ३० वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केल्यानंतर बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घाटशिरस येथील भाऊसाहेब शिवराम माळी (२५) आणि त्यांची पत्नी प्रियंका भाऊसाहेब माळी (१९) या नवविवाहित दांपत्याने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता. बुधवारी सकाळी गावच्या शिवारात दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे तपास करत आहेत. दरम्यान,पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात संजना सुनिल खुडे (२८, रा. नाथनगर) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजनाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. पुढील तपास सुरू आहे. विष घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू साकेगाव येथील अंबादास पाराजी वाघ (३०) या युवकाने दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १.१० वाजता विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते. पाच दिवस उपचार सुरू होते. बुधवारी (५ नोव्हेंबर ) पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे हे करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:19 am