पश्चिम बंगालमधील बर्धमान रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी
बर्धमान : पश्चिम बंगालच्या बर्धमान रेल्वे स्टेशनवर रविवारी सायंकाळी प्रवाशांच्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या घटनेत १०-१२ प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बर्धमान रेल्वे स्टेशनच्या ४, ६ आणि ७ क्रमांकांच्या प्लॅटफॉर्मवर तीन ट्रेन होत्या. ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांनी ४ आणि ६ […] The post पश्चिम बंगालमधील बर्धमान रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संगनमताने कट करून बोगस कर्जांच्या माध्यमातून यशवंत को-ऑपरेटीव्ह बॅंकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते तथा सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर आणि फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांचा मुलगा नरेंद्र भोईटे यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, पाच वरिष्ठ अधिकारी आणि चरेगावकरांच्या नातेवाईकांसह 50 जणांवर शनिवारी रात्री उशीरा कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कराड येथील यशवंत को-ऑपरेटीव्ह बॅंकेच्या लेखापरिक्षणात बोगस कर्ज प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर सनदी लेखापाल मंदार शशिकांत देशपांडे यांनी यशवंत बॅंकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, कराड शाखेतील कर्ज विभागाचे शाखा व्यवस्थापक आणि शेखर चरेगावकरांच्या नातेवाईकांविरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्याची थोडक्यात हकिकत अशी, यशवंत को-ऑप. बँक लि.कराड या बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, 5 अधिकारी, संचालक मंडळ आणि तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे 9 नातेवाईक, अशा 50 जणांनी स्वत:च्या आर्थिक लाभासाठी बँकेचे आर्थिक नुकसान करुन संगनमताने 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रूपयांचा अपहार केला आहे. बोगस कर्ज प्रकरणासाठी बनावट कागदपत्रे तयार करून तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वितरण केले. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडून निधीचा उद्देशबाह्य विनियोग करून अन्यत्र निधी वळवला. तसेच दस्ताऐवजात फेरफार व खोट्या नोंदी केल्या. पदाचा गैर वापर करून बँकेच्या ठेवीदार व सभासदांच्या हितास बाधा निर्माण केली आहे. लेखापाल मंदार देशपांडे यांच्या फिर्यादीवरून कराड शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 61, 316 (2),316 (4), 318 (4), 336 (3), 338, 339,340 (2),3(5) प्रमाणे बॅंकेच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्षांसह एकूण 50 जणांवर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. 9 ऑगस्ट 2014 ते 31 मार्च 2025 या दरम्यान यशवंत को-ऑप बँक लि. कराड याठिकाणी हा गुन्हा घडला असल्याचंही फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तात्पुरता तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा ‘जुगाड’
ठाणे : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणामध्ये (मॅट) आपल्या मुदतपूर्व बदलीला आव्हान देण्यासाठी बनावट कागदपत्रे जोडणा-या पोलिस अमलदार विवेक जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी दिली. कर्तव्यात कसुरी केल्याने जाधव यांची नौपाडा पोलिस ठाणे ते मुख्यालय अशी मुदतपूर्व बदली झाली. याच बदलीला आव्हान देण्यासाठी त्यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला. याच दाव्यासाठी त्यांनी बनावट […] The post बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा ‘जुगाड’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खारघरच्या 'ट्रायसिटी' इमारतीत भीषण आग:चार जणांना श्वासोच्छ्वासाचा त्रास, जीवितहानी टळली
मुंबईच्या खारघर उपनगरातील सेक्टर 34 मधील 'ट्रायसिटी' इमारतीमध्ये रविवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ माजली. शॉर्टसर्किटमुळे लागलेली ही आग इमारतीच्या 10 व्या मजल्यापासून 14 व्या मजल्यापर्यंत पसरली होती. अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र धुरामुळे त्रास झालेल्या चार जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे तातडीने बचावकार्य आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह आणि खारघर पोलीस काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधून धुराचे मोठे लोट येत असल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तत्परतेने मदतकार्य हाती घेत, काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशामक विभाग आणि पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे इमारतीचे मोठे नुकसान टळले, तसेच रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. चार जणांना रुग्णालयात दाखल सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धुरामुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने चार जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये सुमन कुमारी नीरज भारद्वाज (31), वाणीच नीरज भारद्वाज (9), तेजस्वी राजेश कुमार सिंग (19) आणि यशस्वी राजेश कुमार सिंग (16) यांचा समावेश आहे. या सर्वांना तातडीने खारघर येथील मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्राथमिक अंदाजानुसार, ही आग वीजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर परिसरातील रहिवाशांना तात्पुरते बाहेर काढण्यात आले होते. याप्रकरणी खारघर पोलीस पुढील तपास करत आहेत.
बोलायचे स्वदेशीचे आणि वापरायचे विदेशी
लखनौ : असे नाही झाले पाहिजे की स्वदेशी बद्दल बोलायचे आणि घड्याळ घालायचे विदेशी असे म्हणत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे खासदार रवि किशन यांचे कान टोचले. स्वदेशी वस्तू विक्री प्रदर्शन कार्यक्रमाचे गोरखपूमधील चंपा पार्क मैदानात आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वदेशी वस्तूंबद्दल भाषण […] The post बोलायचे स्वदेशीचे आणि वापरायचे विदेशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनसेप्रमुख राज ठाकरे आज सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी स्नेहभोजन केले. मागील भेटीत उद्धव ठाकरे 'शिवतीर्था'वर राज ठाकरे यांना भेटायला गेले होते. आज राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. या कौटुंबिक भेटीमुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या संभाव्य युती संदर्भातही जोरदार तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीवर प्रतिक्रिया देताना मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकीय टीका टिप्पणीवर भाष्य करण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की, ठाकरे परिवारावर संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे, तसेच इतर भाषिक लोकांचेही प्रेम आहे. त्याचप्रमाणे, ठाकरे परिवाराचेही लोकांवर प्रेम आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात निर्माण झालेल्या चर्चांवरही नांदगावकर यांनी सूचक विधान केले आहे, ज्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांबद्दल उत्सुकता वाढली आहे. पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, युती होणार की नाही याला अर्थ काही अर्थ नसतो, जोपर्यंत त्या दोन भावांचे ऑफिशियल होत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य होणार नाही. पण असे दिसते आहे की त्या दिशेने वाटचाल सुरु झालेली असावी असे मला दिसते, दोघांची मन जोडलेली असावी, असे नांदगावकर म्हणाले. एकमेकात विश्वास निर्माण होणे गरजेचे पुढे बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, मला मनापासून आनंद झाला आहे ठाकरे परिवारातले दोन बंधू एकमेकांना भेटले. गेल्या दोन-तीन महिन्यात ते सतत भेटत आहेत. माननीय प्रबोधनकार आणि माननीय बाळासाहेब ठाकरे परिवातील दोन ठाकरे बंधू यांची आज भेट झाली आहे. काही लोक ठाकरे परिवारावर प्रेम करत नसले जे इतर भाष्य करतील. जे बाळासाहेबांच्या कुटुंबावर प्रेम करतात अशा सर्वांना आनंद झाला आहे. गेल्या 19 ते 20 वर्षात दोन भावंडात संवाद नव्हता आता जो संवाद होत आहे. एकमेकात विश्वास निर्माण होणे गरजेचे आहे. एकमेकांची मन जुळली तर पुढे चांगले होते, म्हणूनच उद्धव ठाकरे जेवायला जातात राज ठाकरे त्यांच्या घरी जेवायला जातात. आम्हाला याचा निश्चित आनंद आहे. सगळ्या गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का? सगळ्या गोष्टीला राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहणार का? राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात आपण पाहतो की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण नातीगोती पाहत असतो. राजकारणात मी एकमेकावर टीकाटिप्पणी करतो सभागृहात करतो रस्त्यावर लढाई लढतो आम्ही आमचा सुसंवाद सोडलेला नाही. आज दोघे भाऊ भेटले म्हणजे दोन पक्षाचे नेते भेटले म्हणजे चर्चा तर होणारच राजकारणावरही चर्चा झाली असेल, अशी बाळा नांदगावकर यांनी म्हटले. बाळा नांदगावकर म्हणाले, आपण राजकीय पक्ष जे निर्माण केले आहेत ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी. उद्या ठाण्यात मोर्चा निघणार आहे. तिकडे कार्यकर्ते असतील. उद्याच्या ठाण्याच्या मोर्चात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सामील होऊ शकतो. मनसेच्या वतीने दीपोत्सव होतो. या दृष्टीने कदाचित चर्चा झाली असेल, असे नांदगावकर म्हणाले.
पशुधन गमावलेल्या शेतक-यांना गोरे, कालवाडींचे वाटप
उदगीर : प्रतिनिधी मागच्या दोन – तीन महिन्याच्या काळात आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यामुळे पशुधनासह शेती पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानग्रस्त शेतर्कयांना आधार मिळावा यासाठी रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल, श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, संघर्ष मित्रमंडळ व नारायणा अॅग्रो प्रा. लि. शेल्हाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिवृष्टीमुळे पशुधन गमावलेल्या शेतक-यांना […] The post पशुधन गमावलेल्या शेतक-यांना गोरे, कालवाडींचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ऑटो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी
जळकोट : प्रतिनिधी जळकोट ते जांब बु बुद्रुक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर दि १२ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान ऑटो आणि दुचाकीदरम्यान झालेल्या जोरदार धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे . मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील शिवाजी बाबुराव गायकवाड व अशोक गवाले हे दुचाकीवरुन […] The post ऑटो-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बोरसुरी, ताडमुगळी येथे अज्ञाताकडून सोयाबीनच्या गंजीस आग
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील बोरसुरी येथील शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी व ताडमुगळी येथील गुंडेराव माधवराव गवंडगावे यांनी सोयाबीनची गंज करुन ठेवली असता अज्ञात व्यक्तीने सदरील गंजीस आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील महिला शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी व येथील ताडमुगळी येथील गुंडेराव बाबुराव गवंडगावे या शेतक-याने सोयाबीनची काढणी करून शेतात […] The post बोरसुरी, ताडमुगळी येथे अज्ञाताकडून सोयाबीनच्या गंजीस आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर येथे मतदारयादीत सावळा गोंधळ
रेणापूर : प्रतिनिधी आगामी होऊ घातलेल्या रेणापूर नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषांगाने जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप यादीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करून मतदारात संभ्रम निर्माण केला गेला असून सदर यादी रद्द करण्यात यावी किंवा आक्षेप घेण्याची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी रेणापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर व राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात […] The post रेणापूर येथे मतदारयादीत सावळा गोंधळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हाच योग्य पर्याय
लातूर : प्रतिनिधी काळाच्या ओघात पोलिसांच्या कामाचे स्वरुपही बदलत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस हा शारीरिक व मानसिकदृष्ट्या मजबूत व कणखर असणे आवश्यक आहे. तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हाच योग्य पर्याय असल्याचे मत श्री. संजयजी भारुका (प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, लातूर) यांनी व्यक्त केले आहे. तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रंसगी ते […] The post तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हाच योग्य पर्याय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस तोडणीसाठी अडचणी
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमानात अतिवृष्ठी झाल्याने शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शेतक-यांना अडचणींना सामोरे जात असताना जिल्ह्यातील नगदी पीक असलेले उस गाळप लवकर सुरू होणार आहे. आगामी गळीत हंगामात उस तोडणीसाठी मोठी कसरत करावी लागणार असून अनेक ठिकाणी उस आडवे पडलेले आहेत तर अनेक ठिकाणी जायलाच रस्ता राहिलेला नाही. तसेच अतीवृष्ठी […] The post अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस तोडणीसाठी अडचणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१९ लाख २९ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटक्याची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणा-यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात ७ लाख ७९ हजार २७० रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली ११ लाख ५० हजार रुपयाची दोन चारचाकी वाहन असा एकूण १९ लाख २९ हजार २७० […] The post १९ लाख २९ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गुजरातच्या शिष्टमंडळाने दयानंद विज्ञान महाविद्यालयास दिली भेट
लातूर : प्रतिनिधी गुजरात राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने राज्यातील महाविद्यालयाच्या गुणवत्तेत अधिकाधिक सुधार व्हावी, या उद्देशाने देशातील उच्च गुणवत्ताधारक महाविद्यालयांना भेटी देण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. त्या परिपञकानुसार शैक्षणिक गुणवत्तेचा लौकिक प्राप्त दयानंद विज्ञान महाविद्यालयाची यामध्ये निवड करण्यात आलेली आहे. गुजरातमधील भेसन येथील शासकीय कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद मयेत्रा, नॅक समन्वयक डॉ. पंकज सोलंकी, डॉ. […] The post गुजरातच्या शिष्टमंडळाने दयानंद विज्ञान महाविद्यालयास दिली भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारमधील परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी हे भारत दौर्यावर आले आहेत. शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर अफगाणिस्तान दूतावासात झालेल्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले, तालिबान अफगाणिस्तानात काय करतो, हे आमच्या दृष्टीने महत्वाचे नाही. पण, ज्या भारताने स्री-पुरूष समानतेबाबत 200 वर्षांपूर्वीच निर्णय घेतले आहेत अन् संविधानाने महिलांना समान अधिकार दिले आहेत. त्या भारतात तालिबानी प्रवृत्ती मजबूत होत आहेत, हेच दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली आहे. आपण थेट तालिबानच्या रांगेत जाऊन बसलो पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपण आपल्या नवीन संसद इमारतीच्या उद्घाटनालाही राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना साधे निमंत्रणही दिले नव्हते. किंबहुना, संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटनच त्यांच्या हस्ते व्हायला हवे होते. पण, आपण त्यांना कुठेही स्थान दिले नाही. आज आपण थेट तालिबानच्या रांगेत जाऊन बसलो आहोत. अफगाणिस्तानच्या पब्लिक कम्यूनिकेशनचे डायरेक्टर हाफिज जिया अहमद यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत महिलांना मज्जाव केल्याने या पत्रकार परिषदेस आपण परवानगीच द्यायला नको होती. भारत सरकारने तालिबान प्रतिनिधीला भारतीय भूमीवर पूर्ण प्रोटोकॉलसह, महिला पत्रकारांना बाजूला ठेवून पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देऊन पुन्हा एकदा मनुवादी विचारांचा पगडा आणि तालिबानी विचारसरणी एकच आहे, हे सिद्ध करून दाखविले. त्याचा जाहीर निषेध व्हायलाच हवा, अशी संतप्त टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
आरएसएस प्रणित भाजपने देश वाळवीसारखा पोखरून काढला:काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बी.एम संदीप यांची टीका
सातारा येथील काँग्रेस भवनातील महात्मा गांधी सभागृहात आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बी.एम संदीप संदीप यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी राजन कामत, यासिन शेख, उमेश खंदारे, नंदकुमार शेळके, सचिन आडेकर आणि मनेश राऊत हे प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक - पदाधिकारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची संघटना कठीण काळातून जात असतानाही आपण पक्षासाठी संघर्षाची भूमिका घेऊन पुढे निघाला आहात. जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वास सुरुवातीलाच व्यक्त करून ते म्हणाले, भाजप आणि आरएसएस हे सुरुवातीपासूनच मनुवादी विचार प्रवृत्तीचे आहेत. या प्रवृत्तींना रोखण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात प्रयत्न सुरू आहेत. ज्यांनी वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून गुजरात प्रदेश स्टेडियमला स्वतःचे नाव दिले परंतु नवी मुंबई येथील विमानतळाला दि.बा .पाटील यांचे नाव देण्याचे उमदेपण त्यांच्याकडे नाही, अशी खंत व्यक्त करीत बी.एम संदीप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. देशाचा इतिहास आणि संविधानाच्या संरक्षणाची काँग्रेस पक्षाने नेहमीच काळजी वाहिली; परंतु आरएसएस प्रणित भाजप सरकारने भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवत देश वाळवीसारखा पोखरला, असे सांगून ते म्हणाले 'चार सौ पार'चा नारा देणाऱ्या मोदींना मेटाकोटीने 240 जागा मिळाल्या. इतर पक्षाच्या सहाय्याने सरकार बनवावे लागले. भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार नोंदणीत हेराफेरी केली नसती तर एवढ्या जागाही त्यांना मिळाल्या नसत्या. पक्षाचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष खर्गे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुढील काळातही संघर्ष करून भाजपचे खरे रूप उघडे करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी गेल्या दोन महिन्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची मोट बांधली जाईल, असे सांगितले. पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयराव कणसे, बाबासाहेब कदम ,रफिक बागवान, झाकीर पठाण, प्रतापसिंह देशमुख, रजनी पवार आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. दरम्यान, सकाळी शाहूपुरी येथे 'व्होट चोर,गद्दी छोड' या मोहिमेअंतर्गत स्वाक्षरी अभियानाला श्री संदीप यांनी भेट दिली. याप्रसंगी सातारा तालुका अध्यक्ष अजित कदम, शहराध्यक्ष रजनी पवार, युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन खराडे आदि उपस्थित होते. काँग्रेस भवनातील मेळाव्यानंतर बी.एम संदीप यांनी तालुकानिहाय बैठक घेऊन तालुकाध्यक्षांमार्फत राजकीय परिस्थिती आणि संघटनेचे कामकाज जाणून घेत उपयुक्त सूचना केल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांना बी.एम संदीप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली. याप्रसंगी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास महिला काँग्रेस काँग्रेसच्या पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष ,विविध सेलचे जिल्हाध्यक्ष - पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अचलपूर तालुक्यात राज्य शासनाची 'गुलाबी ई-रिक्षा' (पिंक ॲटो) योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारणाऱ्या राजकन्या खंडारे या तालुक्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. कविठा येथील रहिवासी असलेल्या राजकन्या खंडारे आता ई-रिक्षा चालवून आत्मनिर्भर बनल्या आहेत. राजकन्या प्रशांत खंडारे (वय २८) यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अथक प्रयत्न केले. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राजकन्या यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी आली. या परिस्थितीत हतबल न होता, स्वतःच्या आणि मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी गुलाबी ॲटो चालवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी अचलपूर पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत प्रस्ताव सादर केला. या योजनेअंतर्गत ७० टक्के कर्ज बँकेकडून आणि उर्वरित ३० टक्के रक्कम शासनाकडून मंजूर करण्यात आली. यामुळे त्यांना ई-रिक्षा खरेदी करणे शक्य झाले. सध्या राजकन्या दररोज जुळ्या शहरांमध्ये ई-रिक्षा चालवतात. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या बँकेच्या कर्जाची नियमित परतफेड करतात आणि कुटुंबाचा गाडा प्रामाणिकपणे चालवतात. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या या व्यवसायातही त्यांना सहकारी ॲटो चालकांकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कुठलाही व्यवसाय लहान नसतो. प्रामाणिकपणे काम केल्यास अडचणी दूर होतात, असा विश्वास राजकन्या खंडारे यांनी व्यक्त केला. त्यांच्या या धाडसी पावलामुळे अचलपूर तालुक्यातील अनेक महिलांना स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भरतेची प्रेरणा मिळत आहे. राजकन्या खंडारे यांच्या मते, पूर्वी त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित होते. मात्र, पिंक रिक्षा मिळाल्यापासून उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली असून कुटुंबाला मोठी आर्थिक मदत झाली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याची गरज पूर्ण करण्याइतपत त्या आता सक्षम झाल्या आहेत. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अमरावती जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांसाठीच्या आरक्षण सोडती आज (सोमवारी) काढण्यात येणार आहेत. अमरावती जिल्हा परिषदेच्या ५९ मतदारसंघांपैकी कोणता मतदारसंघ कोणासाठी राखीव असेल, याचा निर्णय या सोडतीद्वारे होईल. ही सोडत नियोजन भवनात सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठीचे आरक्षणही जिल्हा नियोजन भवनात दुपारी १ वाजता निश्चित केले जाईल. तसेच, पंचायत समित्यांमधील मतदारसंघांचे आरक्षण त्या-त्या तालुका मुख्यालयी सोडतीद्वारे काढले जाणार आहे.जिल्हा परिषद मतदारसंघांच्या आरक्षण सोडती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होतील. पंचायत समित्यांमधील मतदारसंघांच्या आरक्षण सोडतींसाठी संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) साठीच्या जागा निश्चितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ६ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केले होते. दोन दिवसांच्या पडताळणीनंतर विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावांना मान्यता दिली आहे. त्यामुळे या आरक्षित मतदारसंघांची माहिती आजच्या सोडतीदरम्यान स्पष्ट होईल.सोडत झाल्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी मतदारसंघांची नावे घोषित केली जातील. त्यानंतर १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे सूचना आणि हरकती दाखल करता येतील. जिल्हाधिकारी या हरकतींवर अभिप्राय देऊन २७ ऑक्टोबर रोजी आपली यादी विभागीय आयुक्तांना सादर करतील. विभागीय आयुक्त ३१ ऑक्टोबर रोजी आरक्षित मतदारसंघांची अंतिम यादी जाहीर करतील, तर ३ नोव्हेंबर रोजी ही यादी शासन राजपत्रात (गॅझेट नोटिफिकेशन) प्रसिद्ध केली जाईल. अमरावती जिल्हा परिषदेत एकूण ५९ मतदारसंघ आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ११ जागा, अनुसूचित जमातीसाठी १२ जागा आरक्षित होण्याची शक्यता आहे. २०१७ च्या लोकसंख्येनुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) साठी १६ जागा आरक्षित केल्या जाऊ शकतात. उर्वरित २० मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिट युवा फॉर विकसित भारत' या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पहिल्या 'खासदार क्रीडा महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव येत्या २ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पुण्यात पार पडणार आहे. या १५ दिवसीय महोत्सवात शहरभरातील विविध मैदानांवर एकूण ३५ प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्या विविध खेळांच्या असोसिएशनच्या मदतीने घेतल्या जातील. महोत्सवाचे प्रमुख समन्वयक आणि छत्रपती पुरस्कार विजेते मनोज एरंडे यांनी माहिती दिली की, या क्रीडा महोत्सवात केवळ खेळाडूच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि सर्वसामान्य नागरिकांनाही आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. यात भारतीय पारंपरिक खेळांसह आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांचा समावेश आहे. या महोत्सवात आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, स्विमिंग, बास्केटबॉल, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, ज्युदो, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, पिकलबॉल, रोलबॉल, शूटिंग, स्केटिंग, सॉफ्टबॉल, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, व्हॉलीबॉल, वॉल क्लायम्बिंग, वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योग, स्क्वॅश अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी विशेष स्विमिंग आणि व्हीलचेअर बास्केटबॉल स्पर्धा, तर ज्येष्ठांसाठी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.या स्पर्धा सणस मैदान, टिळक तलाव मैदान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बालेवाडी क्रीडा संकुल, स. प. महाविद्यालय, महाराष्ट्र मंडळ, डेक्कन जिमखाना, खराडी यांसारख्या विविध ठिकाणी होणार आहेत. या सर्व स्पर्धांमध्ये २० ते २५ हजार खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. खेळाडूंनी आपल्या संबंधित खेळाच्या असोसिएशनकडे नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक मनोज एरंडे (९८२२०४५१०१) यांच्याशी संपर्क साधता येईल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, राष्ट्रीय क्रीडा दिनी खासदार क्रीडा महोत्सवाची घोषणा केल्यापासून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दीपोत्सवानंतर खेलोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. खासदार क्रीडा महोत्सव हा देशातील प्रतिभावान युवा खेळाडूंचा शोध घेणारा उपक्रम असून, यातूनच ऑलिंपिकसारख्या सर्वोच्च जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कात्रजमध्ये तरुणाच्या खुनीला पोलिसांकडून अटक:पैशांवरून झालेल्या वादातून निर्घुण खून
कात्रजमधील निंबाळकरवाडी परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या तरुणाच्या खुनाचा उलगडा भारती विद्यापीठ पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव सद्दाम उर्फ सलमान शेख (वय ३५, रा. निंबाळकरवाडी, कात्रज) असे आहे. या प्रकरणी विक्रम चैठा रोतिया (वय ३२, रा. निंबाळकरवाडी, कात्रज) याला अटक करण्यात आली आहे. सद्दाम आणि विक्रम हे दोघेही मजूर असून, निंबाळकरवाडीत भाड्याने खोली घेऊन एकत्र राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये हातउसने दिलेल्या पैशांवरून वाद झाला होता. या वादातून सद्दामने विक्रमला मारहाण केली होती. याच रागातून विक्रमने सद्दामला बेदम मारहाण करून त्याचा खून केला. खुनानंतर त्याने मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिला होता. शनिवारी दुपारी निंबाळकरवाडीतील मोकळ्या जागेत एका तरुणाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. तपासादरम्यान, हा मृतदेह सद्दाम शेख याचा असल्याचे निष्पन्न झाले. सद्दामचा खून त्याचा सहकारी विक्रमनेच पैशांच्या वादातून केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी विक्रम रोतियाला अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहायक निरीक्षक समीर शेंडे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी आणि तपास पथकाने केली. प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य करणारा रिक्षाचालक गजाआड हडपसर भागात प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. आराेपी रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) २४ तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. शैलेश गुंडराव पाटील (वय २९, रा. मांजरी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार पीडित युवती अल्पवयीन आहे. ती गुरुवारी (९ ऑक्टोबर) हडपसरमधील माळवाडी भागातून रिक्षाने निघाली होती. रिक्षा प्रवासात आरोपी रिक्षा चालक पाटील याने युवतीशी अश्लील कृत्य केले. या घटनेनंतर घाबरलेल्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्वरीत ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. हडपसर भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले.त्याआधारे पोलिसांनी तपास करुन पसार झालेला रिक्षाचालक पाटील याचा माग काढला. पाटील याला अटक करण्यात आली. साक्षीदारांचे जबाब, तसेच पुरावे संकलित करुन पोलिसांनी रिक्षा चालक पाटील याच्याविरुद्ध २४ तासाच्या आत आरोपपत्र दाखल केले.
महिला विश्वचषकात भारताचा सलग दुसरा पराभव
विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषकात यजमान भारताचा सलग दुसरा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर, भारतीय महिला संघाचा गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून तीन विकेट्सने पराभव झाला. रविवारी विशाखापट्टणम येथे भारताने ३३० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांत सात गडी गमावत ३३१ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने १४२ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. एलिस पेरीने अखेर ४७ धावांची […] The post महिला विश्वचषकात भारताचा सलग दुसरा पराभव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती | यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अतिवृष्टीचा फटका संत्रा बागायतदारांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. या पार्श्वभूमीवर, कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय किसान सभेने अमरावती येथे संत्रा उत्पादक परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सुरू होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून संत्रा उत्पादकांसाठी ठोस प्रस्ताव पारित केले जाण्याची शक्यता आहे. तसेच, शासनाला काही उपाययोजना देखील सुचविल्या जाणार आहेत. किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉम्रेड अशोक सोनारकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली. त्यांनी संत्रा उत्पादकांवर वेळोवेळी येणाऱ्या अडचणी कथन केल्या आणि त्यांच्या हितासाठी ठराव पारित केले जातील असे सांगितले. या परिषदेला किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, झारखंडचे पदाधिकारी के. डी. सिंग, आंध्रप्रदेशचे के.व्ही. व्ही. प्रसाद, खासदार बळवंतराव वानखडे, वर्धेचे खासदार अमर काळे, माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे, संत्रा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष ॲड. धनंजय तोटे, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तुकाराम भस्मे आणि महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी उपस्थित राहणार आहेत. सोनारकर यांच्या मते, दिल्लीत शेतकऱ्यांनी ३८६ दिवस आंदोलन करून सरकारला झुकवले होते. त्याच धर्तीवर संत्रा उत्पादकांमध्येही अशीच संघटन क्षमता निर्माण करायची आहे, यासाठी किसान सभा काम करत आहे. परिषदेत 'जिथे संत्रा, तेथे संत्रा प्रक्रिया उद्योग' उभे करावेत, साखर कारखान्यांप्रमाणे संत्रा प्रक्रिया उद्योगांनाही पूरक उत्पादनांमुळे (बायप्रॉडक्ट) पुढे जाण्याची पद्धत लागू करावी, शेतमालाला संरक्षण द्यावे, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आणि उत्पादन खर्चानुसार शेतीमालाचे भाव निश्चित करावेत, अशा विविध मागण्या केल्या जाणार आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही परिषदेत चर्चा होईल. यावेळी परिषदेचे स्वागताध्यक्ष तथा प्रकल्पग्रस्तांचे पुढारी प्रा. साहेबराव विधळे, किसान सभेचे नेते प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे आणि अखिल भारतीय नौजवान सभेचे नेते सागर दुर्योधन उपस्थित होते.
भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वॉर्ड परिसरात बाल उत्सव शारदा मंडळाच्या वतीने महाप्रसाद तयार करत असताना एक मोठी दुर्घटना घडली. सुमारे 40 लिटर क्षमतेच्या प्रेशर कुकरमध्ये महाप्रसाद बनवला जात असताना, तो उघडताना अचानक जोरदार स्फोट झाला. या भीषण स्फोटात एकूण 14 लोक जखमी झाले असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांमध्ये परवेज शेख, आशिष गणवीर, भावेश खंगार, रितेश साठवणे, विकी गणवीर, साधना गणवीर, गीता अंबुलकर, ज्योती नन्हे, माया मारवाडे, चिव मारवाडे आणि सविता साठवणे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय आहे, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
शेअर बाजार आणि आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची ४८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत, हडपसरमधील मांजरी भागात राहणाऱ्या एका तरुणाची सायबर चोरट्यांनी ३४ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली. जून महिन्यात चोरट्यांनी तरुणाशी संपर्क साधून शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला काही परतावा दिल्यानंतर, चोरट्यांनी पुढील परतावा देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची १२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून आभासी चलनात चांगला परतावा मिळेल असे सांगितले. उड्डाणपुलावर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठाचा मृत्यू गुलटेकडीतील उड्डाणपुलावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पसार झालेल्या वाहन चालका विरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला.नरसिंगमल उत्तमचंद तातेड (वय ७६, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत तातेड यांच्या मुलाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आाहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार नरसिंगमल तातेड हे गुलटेकडीतील उड्डाण पुलावरुन निघाले होते. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने दुचाकीस्वार तातेड यांना धडक दिली. अपघातात तातेड हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झालेल्या वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलातक्रारदाराने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर, सायबर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, संबंधित व्यक्तीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप या प्रकरणाचा तपास करत आहेत.
निलंगा तालुक्यात अज्ञातांनी दोन शेतक-यांच्या सोयाबीन बनमी जाळल्या
निलंगा : मागच्या अनेक दिवसांपासून अस्मानी संकटाने परेशान झालेल्या शेतक-याचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यातच मजुरांचाही बेभाव मजुरी देऊन जमा केलेले निलंगा तालुक्यातील मौजे बोरसुरी व ताडमुगळी येथील दोन शेतक-यांच्या सोयाबीन बनमी जाळून शेतक-यांना देशोधडीला लावण्याचे काम अज्ञातानी केले आहे. निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील सूमनबाई व सिद्धार्थ बाबुराव सूर्यवंशी यांच्या नावे असलेल्या सहा एकर […] The post निलंगा तालुक्यात अज्ञातांनी दोन शेतक-यांच्या सोयाबीन बनमी जाळल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपने मला पाडण्यासाठी पाच कोटी देऊन पुतण्याला उभे केले
गडचिरोली : मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मला पाडण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये देऊन माझ्या विरोधात पुतण्याला उभे केले, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते, माजी मंत्री, आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी आज चामोर्शी येथील सभेत करुन महायुतीला घरचा आहेर दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज चामोर्शी येथे जनकल्याण यात्रा […] The post भाजपने मला पाडण्यासाठी पाच कोटी देऊन पुतण्याला उभे केले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टॅरिफमुळे शेअर, क्रिप्टो मार्केट कोसळले, $२ ट्रिलियन बुडाले
न्यू यॉर्क : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १००% टॅरिफ (आयात शुल्क) लावण्याची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अमेरिका आणि चीनच्या शेअर मार्केटपासून ते क्रिप्टोकरन्सी बाजारापर्यंत सर्वत्र हाहाकार माजला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर क्रिप्टो मार्केटने एका दिवसातच सुमारे ५६० अब्ज डॉलर (४६.८ लाख कोटी रुपये) गमावले. बिटकॉइन, एथेरियम, डॉजकॉइन यांसारख्या […] The post टॅरिफमुळे शेअर, क्रिप्टो मार्केट कोसळले, $२ ट्रिलियन बुडाले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
…प्रसंगी लढण्यास तयार; ट्रम्प यांना चीनचे प्रत्युत्तर
बिजींग : वृत्तसंस्था डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कृतींमुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील हितसंबंधांना गंभीर नुकसान होत आहे. द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार चर्चेसाठीचे वातावरण बिघडत आहे. चीन लढू इच्छित नाही, परंतु लढण्यास घाबरत नाही आणि गरज पडल्यास तो प्रत्युत्तर देईल, या शब्दांत चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने १०० टक्के टॅरिफ लादण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प […] The post …प्रसंगी लढण्यास तयार; ट्रम्प यांना चीनचे प्रत्युत्तर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंटार्क्टिकाने अखेर ‘टिपिंग पॉइंट’ ओलांडला!
लंडन : वृत्तसंस्था अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्याच्या प्रमाणाने आता (टिपिंग पॉइंट) संतुलन बिघडण्याचा बिंदू ओलांडला आहे. यामुळे संभाव्य विनाशकारी परिणामांसह कायमस्वरूपी बदल होऊ जात आहेत, असे नवीन संशोधनात नमूद करण्यात आले आहे. अंटार्क्टिका कदाचित परत न येण्याच्या हवामानातील टप्प्यावर पोहोचला असावा, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.२०१८ पासून समुद्रातील बर्फाची निर्मिती अचानक मोठ्या प्रमाणात घटली आहे. ‘न्यू […] The post अंटार्क्टिकाने अखेर ‘टिपिंग पॉइंट’ ओलांडला! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फ्रान्समध्ये उलथापालथ : लेकोर्नु आठवड्यात दुस-यांदा पंतप्रधान
पॅरिस : वृत्तसंस्था फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. एका आठवड्यापूर्वी राजीनामा देणारे सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी पुन्हा फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. प्रचंड राजकीय गोंधळ आणि अराजकतेच्या काळात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लेकोर्नू यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. यामुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. लेकोर्नू यांनी एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानपदाचा […] The post फ्रान्समध्ये उलथापालथ : लेकोर्नु आठवड्यात दुस-यांदा पंतप्रधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप-शिवसेनेचे ‘पैसा फेक तमाशा देख’ घोषवाक्य
उल्हासनगर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते उल्हासनगर कॅम्प ३ येथील नव्याने बांधलेल्या गांधी भवन कार्यालय व सभागृहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी सपकाळ यांनी भाजपा-शिवसेना महायुतीवर तीव्र निशाणा साधत ‘पैसा फेक तमाशा देख’ हेच त्यांचे आगामी निवडणुकीचे घोषवाक्य असल्याचे सांगितले. तसेच दिवाळी नंतर भ्रष्टाचा-यांच्या विरोधात बोंबा मार आंदोलन करणार […] The post भाजप-शिवसेनेचे ‘पैसा फेक तमाशा देख’ घोषवाक्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वयाने लहान मुलाला बोलावून बनवले संबंध, नंतर केली हत्या
अलिगड : अलीगड जिल्ह्यात पोलिसांनी स्थानिक व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी हिंदू महासभेच्या एका पदाधिका-याला अटक केली आहे. पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिका-याने शनिवारी ही माहिती दिली असून पोलिसांच्या मते, जिल्ह्यातील रोरावर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व्यावसायिक अभिषेक गुप्ता याच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड असलेल्या हिंदू महासभेच्या राष्ट्रीय महासचिव पूजा शकुन पांडे उर्फ महामंडलेश्वर अन्नपूर्णा भारती यांना शुक्रवारी रात्री उशिरा राजस्थानच्या भरतपुर […] The post वयाने लहान मुलाला बोलावून बनवले संबंध, नंतर केली हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले आहे. त्या म्हणाल्या, तुमच्यात जर हिंमत असेल तर आधी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुवादी विचारांना कडाडून विरोध केला, त्या विचारांवर चालणारे आरएसएस हेडक्वार्टर उद्ध्वस्त करा, असे आव्हान अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, निवडणुकींच्या आधी हा हिंदू, तो मुस्लिम, हा मराठा, तो ओबीसी अशी तोडफोड करणं ही देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील आजच्या राजकारणाची गरज आहे. कारण आज आणखी महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. पूरग्रस्त भागातील प्रश्न असतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, वाढती महागाई, पुण्यातील मुंबईतील वाढती गुन्हेगारी या सगळ्या विषयावर सपशेल अपयशी ठरलेल्या फडणवीसांना नॉन इशूवर चर्चा करणे ही त्यांच्या करीअरची गरज आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या ब्रिगेडला आता बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरायला सांगितले आहे. बाबासाहेब यांच्याबद्दल तुमचा आदर नक्की व्यक्त करा पण फडणवीस जरा सावधान. जरा सावधानतीने तुम्ही व्यक्त व्हा, असे अंधारे म्हणाल्या. मनुवादी विचारांचे केंद्र असलेल्या आरएसएसला उद्धस्त करा पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, बाबासाहेब यांच्याबद्दल खऱच प्रमे आदर असेल तर त्यांचे अनेक संदर्भ आणि दाखले द्यायचे असतील तर बाबासाहेब तुम्हाला इतके सहजासहजी पेलणारे झेपवणारे नाहीत. बाबासाहेब पचवायचे असतील तर त्यांनी मनुवादी विचारांना त्यांनी विरोध केला होता. फडणवीस तुम्हाला बाबासाहेबांचे तुम्हाला अनुयायी व्हायचे असतील तर तुम्ही मनुवादी विचारांचे केंद्र असलेल्या आरएसएसला उद्धस्त करा. त्यानंतर मग खाकी चड्डीवाले काळे टोपीवाले सगळे ओळीने दीक्षाभूमीवर उभे करा. तरच तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार मिळेल. अन्यथा बाबासाहेबांचे नाव तुमच्या राजकारणासाठी वापरू नका. पुण्यातील घायवळ प्रकरणी काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील गुन्हेगारीवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे यासह सुरक्षित पुणे सुद्धा असले पाहिजे. त्यासाठी पक्षीय विचार बाजूला ठेऊन रवींद्र धंगेकर लढत आहेत. परंतु, धंगेकर यांचा विचार आणि आवाज दाबण्यासाठी ज्या पद्धतीने सत्ताधारी त्यांना धमकावत आहेत, हे किती अनाकलनीय आहे. एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणत आहेत की धंगेकर यांनी लक्षात ठेवावे की ते आता सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत. याचा अर्थ काय दादा? असा सवाल अंधारे यांनी विचारला आहे. सत्तेतला तो कोण बडा नेता ज्याच्या आदेशाने सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला? पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, याचा अर्थ असा की सत्ताधाऱ्यांच्या चुका अजिबात कोणीही दाखवू नयेत. धंगेकरांनी इतर अंधभक्तांच्या सारखे डोळे झाकून सत्ताधाऱ्यांनी काहीही चुका केल्या आणि गुन्हेगारी कितीही वाढली तरी काहीच बोलू नये. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी धंगेकरांच्या बॉसशी बोलेल. अहो देवेंद्रजी धंगेकरांच्या बॉसशी काय बोलताय, धंगेकर बोलण्याआधी रामदास कदम यांनी जे बोलले त्यांच्याशी बोला. की सत्तेतला तो कोण बडा नेता आहे, ज्या बड्या नेत्याच्या आदेशाने योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला. देवेंद्रजी हे अशा पद्धतीने धमकावणे, तुम्ही तर सत्ताधारी आमदारांना सुद्धा धमकावता आणि त्यांनी सुद्धा काय बोलावे आणि काय बोलू नये याचा रिमोट तुमच्याकडे असेल तर तुम्ही सामान्य लोकांना काय बोलू द्याल? असा सवाल सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल्ल
नागपूर : दिवाळीचा सण पुढ्यात असल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. पुढे दोन आठवडे ही गर्दी वाढतच जाणार असल्याचे ध्यानात घेऊन रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांनी स्थानकावर मोठा बंदोबस्त वाढविला आहे. दिवाळीचा सण अवघ्या पाच दिवसांवर आला आहे. १७ ऑक्टोबरला वसूबारसपासून दिवाळी पर्व सुरू होत आहे. परिणामी आपापल्या गावी, कुटुंबात जाऊन दिवाळी साजरी […] The post दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल्ल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरात घुसलेल्या ८० किलोंच्या मगरीला एकट्यानेच नेले उचलून
कोटा : आठ फूट लांब आणि ८० किलो वजन असलेली मगर थेट घरात घुसली. ज्यावेळी मगर घरात आली, त्यावेळी घरातील सगळेच गप्पा मारत, हसत होते. पण, घरात आलेली मगर बघून सगळ्यानाच घाम फुटला. कसेतरी ते घरातून बाहेर पळाले. संपूर्ण गावातच गोंधळ उडाला. त्यानंतर याची माहिती वन विभागाला देण्यात आली. कोटा जिल्ह्यातील बंजारी गावात १० ऑक्टोबर […] The post घरात घुसलेल्या ८० किलोंच्या मगरीला एकट्यानेच नेले उचलून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे: मेफेड्रॉनसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त:फरासखाना पोलिसांनी एकाला अटक, दोघांवर गुन्हा दाखल
बेकायदेशिररित्या मेफेड्रॉन बाळगल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. त्यांच्याकडून 7 लाख 7 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शोएब शकील शेख (23, रविवार पेठ, मिरा दातार दर्गा जवळ) याला अटक करण्यात आली आहे. आफाक अन्सार खान (28, रा. रविवार पेठ) आणि मोईननईम खान (27, रा. नानापेठ) या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गणेश पेठेतील सासवडे सायकल मार्ट जवळ करण्यात आले. दरम्यान 34 ग्रॅम 384 मिलीग्रॅम एमडी यावेळी जप्त करण्यात आला आहे. तडीपारीत पुणे शहरात वावरणारा ताब्यात पुण पोलसांनी दोन वर्षासाठी तडीपार केले असताना देखील शहरात बेकादेशिरिरत्या वावरणार्या सराईताला हडपसर पोिलसांनी ताब्यात घेतले. उमेश भरत ननवरे (27, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसर येथील ब्रीज खालून ननवरेला ताब्यात घेण्यात आले. याबाबत पोलिस शिपाई तुकाराम झुंजार यांनी तक्रार दिली आहे. तर विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच पध्दतीने दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला सराईत वावरत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वप्नील शंकर चिंचोले (28, रा. गनराज चौक, कलवडवस्ती, लोहगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत खंडणी विराेधी पथक 2 चे पोलिस शिपाई गणेश खरात खरात यांनी तक्रार दिली आहे. कलवड पीएमटी बस स्टॉप येथे ही कारवाई करण्यात आली.
पुणे महानगरपालिका आणि भारतीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या सहकार्याने मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ उभारण्यात आलेल्या शिवकालीन समूह शिल्पाचे आज लोकार्पण करण्यात आले. राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते हा समारंभ पार पडला. यावेळी बोलताना मिसाळ यांनी, नव्या पिढीला इतिहास शिकवण्यासाठी विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. हे शिवकालीन समूह शिल्प १५ फूट लांब, १५ फूट रुंद आणि २५ फूट उंच आहे. या शिल्पाद्वारे सतराव्या शतकातील युद्धभूमीचे जिवंत चित्रण साकारण्यात आले आहे. यात पायथ्याशी घोडदळ, माथ्यावर झेंडा रोवणारा मावळा, हातात तलवार, ढाल, भाला घेतलेले योद्धे दाखवण्यात आले आहेत. शिल्पकार दीपक थोपटे यांनी हे शिल्प साकारले असून, गारवे समूहाचे किशोर गारवे आणि विनायक गारवे यांनी यासाठी आर्थिक सहाय्य केले आहे. लोकार्पण समारंभात थोपटे आणि किशोर गारवे यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री मिसाळ यांनी नमूद केले की, सध्या एआय (AI) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी (Virtual Reality) सारख्या तंत्रज्ञानात मोठे बदल होत आहेत. तरुण पिढीचा या तंत्रज्ञानाकडे ओढा असल्याने, त्याचा योग्य वापर करून नव्या पिढीला प्रभावीपणे इतिहास शिकवता येईल. आंबेगाव बुद्रुक येथील निर्माणाधीन शिवसृष्टीमध्ये अशा अत्याधुनिक पद्धतीने इतिहास पाहणे पुणे आणि परिसरातील नागरिकांना सहज शक्य होत असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, गारवे ग्रुपचे संचालक किशोर गारवे, शिवसृष्टीचे अध्यक्ष जगदीश कदम, विश्वस्त विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे, सल्लागार मनोज पोचट, प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी उपस्थित होते. राज्य सरकार इतिहासाच्या रक्षणासोबतच संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. किल्ल्यांवर पुनर्बांधणी, प्रकाश योजना, माहिती फलक आणि पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यात स्थानिक लोकसहभाग महत्त्वाचा असेल. युनेस्कोच्या मानांकनातून छत्रपती शिवाजी महाराजांना जागतिक नकाशावर अधिक ठळक स्थान मिळण्यास मदत होईल, असेही मिसाळ यांनी सांगितले.
उपभोगवादाने मूलभूत समस्या दुर्लक्षित:प्रा. अरुणकुमार यांचे स्वातंत्र्योत्तर आर्थिक आव्हानांवर विवेचन
स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि अर्थशास्त्रज्ञ प्रा. सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने एका विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. या प्रसंगी ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा. डॉ. अरुणकुमार यांनी ‘पूंजीवाद के चरण और भारत में आज़ादी के बाद बढ़ती चुनौतियां’ या विषयावर सखोल विवेचन केले. डॉ. अरुणकुमार यांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील आर्थिक विकासाचे टप्पे, वाढता भांडवलशाही प्रभाव आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक विषमतेचा आढावा घेतला. उपभोगवादामुळे मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, लोककल्याणावरून लक्ष हटवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. समताधिष्ठित विकासासाठी नवे विचार आणि चळवळ आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, भारत स्वातंत्र्यपूर्व काळातील शोषणाची अर्थव्यवस्था, स्वातंत्र्योत्तर काळातील सार्वजनिक क्षेत्राला प्राधान्य देणारी अर्थव्यवस्था आणि नंतर उदारीकरणाची अर्थव्यवस्था अशा टप्प्यातून गेला आहे. या काळात नफेखोरी, लालसा आणि विषमता वाढली असून, बाजारकेंद्री दृष्टिकोन बळावला आहे. प्रा. अरुणकुमार यांच्या मते, मूलभूत विषय बाजूला पडत आहेत. वैयक्तिक आयुष्यात असंतुष्ट असणारा व्यक्ती ग्राहक बनून अधिकाधिक खरेदीकडे वळत आहे. जुन्या वस्तू फेकून नव्या आणण्याचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे कर्ज, प्रदूषण आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम वाढले आहेत. त्यांनी काळा पैसा आणि विषमतेत वाढ झाल्याचे सांगितले. असंघटित क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. जीडीपी आणि अर्थव्यवस्थेचा आकार ४८ टक्क्यांनी फुगवून सांगितला जात असून, भारत चौथी नव्हे तर सातवी मोठी अर्थव्यवस्था असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संशोधन आणि कृषी क्षेत्र मागे पडत असून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. मोफत वस्तू किंवा पैसे देण्याने प्रगती होईल की रोजगार निर्मितीमध्ये गुंतवणूक केल्याने, हे सध्याचे सरकार लक्षात घेत नाही, असेही ते म्हणाले. ट्रम्प काळात, टेरिफ युद्धात भांडवलशाहीचा चेहरा बदलत आहे. एआयसारख्या वेगवान तंत्रज्ञान बदलाने दीर्घ नियोजन करणे अवघड झाले आहे. विश्वासार्हता झपाट्याने कमी होत असून समस्या वाढत जाणार आहेत. व्यक्तीचे प्रश्न शासनाने न सोडवता ज्याचे त्याने सोडवावेत, अशी मांडणी पुढे येत आहे. सार्वजनिक संपत्ती कमी न करता वाढत गेली पाहिजे. चीन, अमेरिका, रशिया या त्रिकोणात आपण अडकलो आहोत. ही परिस्थिती बिकट होत असून देशाचे स्वतःचे धोरण पुढे आणणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ समाजवादी नेते गजानन खातू, झेलम परांजपे, विनोद शिरसाठ, प्रा. सुभाष वारे आणि उपेंद्र टण्णू आदी उपस्थित होते.
पुणे: सध्याच्या काळात जाती-धर्मापासून तंत्रज्ञानापर्यंत अनेक प्रकारच्या वर्चस्ववादी व्यवस्था निर्माण होत आहेत. या व्यवस्थांना 'माणूस' म्हणून सजगपणे सामोरे गेले पाहिजे, असे मत प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अन्यथा, प्रस्थापितांच्या चौकटीत अनेकांच्या वाट्याला उपेक्षितांचे जगणे येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हनुमंत अजिनाथ लोखंडे लिखित आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित ‘फँड्री: भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश कुलकर्णी बोलत होते. हा कार्यक्रम बाल शिक्षण विद्या मंदिरच्या एमईएस ऑडिटोरियममध्ये पार पडला.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध कवी आणि अभिनेते किशोर कदम, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध कवी, दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक आणि निर्माते नागराज मंजुळे, लेखक हनुमंत अजिनाथ लोखंडे आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणेचे संचालक शरद तांदळे उपस्थित होते.'फँड्री' चित्रपटाबद्दल बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले की, हा चित्रपट प्रत्येक माणसातील छुप्या पशुत्वाबद्दल भाष्य करतो. लहानपणी आईचे निधन झाल्याने आत्याकडे राहत असताना, तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या वागणुकीमुळे आपणही उपेक्षितांच्या अनुभवातून गेलो आहोत. समाजाने निर्माण केलेल्या प्रस्थापित चौकटीतील लोक अनेक कारणांनी कोणाला तरी उपेक्षित ठरवतात, हे अत्यंत घातक आहे, असे त्यांनी सांगितले.औपचारिकता आणि ठासून भरलेल्या आत्मविश्वासापेक्षा जीवनातील सहजता अधिक महत्त्वाची वाटते. प्रस्थापित होऊ नये, कारण त्यामुळे कलेची उर्मी आणि अस्वस्थता कमी होते. तंत्रज्ञानाने आपल्यावर एवढे आक्रमण केले आहे की, वैचारिक कष्ट घेण्याची आपली तयारी नाही, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले. यावेळी किशोर कदम म्हणाले की, मुंबईत राहिल्यामुळे ग्रामीण भागातील जात व्यवस्था त्यांना थेटपणे जाणवली नाही. मात्र, अनेक पुस्तके आणि जवळच्या मित्रांच्या अनुभवातून जातीचे वास्तव तीव्रतेने जाणवले. वंचित आणि बहिष्कृत असणे हे आपल्यासह अनेकांच्या आयुष्यात सहज आणि अपरिहार्यपणे आले आहे, असे त्यांनी सांगितले.प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले की, आज प्रकाशित झालेले पुस्तक एक नवे पर्व आहे. 'फँड्री' चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना अस्वस्थता जाणवली, जसा अनुभव दलित आत्मकथनांनी दिला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दलित साहित्यातून पुढे आले आणि या साहित्य प्रवाहाने मराठी साहित्य विश्वाला समृद्ध केले. वेदना, विद्रोह आणि नकार हा दलित साहित्याचा केंद्रबिंदू होता, मात्र 'फँड्री'ने 'प्रतिकार' हे नवीन मूल्य दिले आहे, असे जोशी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनीती आखत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता महायुतीमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मला पाडण्यासाठी भाजपने 5 कोटी देऊन पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गडचिरोली येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणुकीच्या तोंडावरच भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आगामी निवडणुकीत भाजपला एकही जागा देणार नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे गडचिरोली येथे महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मतभेद असल्याचे उघड झाले आहे. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या मतदारसंघात कोणी किती जागा लढवायच्या आणि कोणाला किती जागा द्यायचे हे मी ठरवणार आहे. येत्या निवडणुकीत अहिरेत फक्त घड्याळच चालेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. नेमके काय म्हणाले धर्मराव बाबा आत्राम? धर्मराव बाबा आत्राम म्हणाले, माझ्या मतदारसंघात कोण किती जागा लढल्या पाहिजते आणि कोणाला किती जागा दिल्या पाहिजेत हे मी ठरवणार. माझ्या विरोधात जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी उमेदवार म्हणून उभे केले. मला हरवायला भाजपने 5 कोटी रुपये माझ्या पुतण्याला दिले. परंतु, मला त्यांना सांगायचे आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत माझ्या क्षेत्रात फक्त घड्याळच चालेल. एकही जागा आम्ही दुसऱ्या पक्षाला देणार नाही. विधानसभा निवडणुकीत कौटुंबिक लढत यावर्षी झालेल्या अहेरी विधानसभा निवडणुकीत एक महत्त्वपूर्ण कौटुंबिक लढत पाहायला मिळाली, ज्यात प्रमुख राजकीय पक्षांऐवजी एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांसमोर उभे होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) आणि पुतणे राजे अंबरीशराव आत्राम (अपक्ष उमेदवार) यांचे थेट आव्हान होते, ज्यामुळे हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता. या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम यांनी विजय मिळवला. त्यांना एकूण 54,206 मते (प्रदान केलेल्या माहितीनुसार 53,978 + पोस्टल मते 228) मिळाली. त्यांचे पुतणे आणि अपक्ष उमेदवार राजे अंबरीशराव आत्राम यांना 37,392 मते मिळाली, तर धर्मरावबाबा यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम (शरद पवार गट) यांना 35,765 मते मिळाली. अशाप्रकारे, कुटुंबातील अंतर्गत स्पर्धेत धर्मरावबाबा आत्राम यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. यापूर्वी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील धर्मरावबाबा आत्राम यांनीच या जागेवर विजय मिळवला होता. त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांना 60,013 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार अंबरीशराव राजे आत्राम (जे या निवडणुकीत अपक्ष होते) यांचा पराभव केला होता, ज्यामुळे अहेरी मतदारसंघातील आत्राम कुटुंबाचे राजकीय महत्त्व आणि सत्ता सातत्याने कायम राहिली आहे.
ऑफिसमध्ये खोटे कारण देऊन सुटी घेणे पाप?
वृंदावन : वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांची ख्याती संपूर्ण जगभरात पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हीडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. याच कारणामुळे त्यांच्या प्रवचनाला देशाच्या कानाकोप-यातून भक्त येतात. सामान्य व्यक्तीं व्यतिरिक्त ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांपुढे नतमस्तक होतात. अशा वेळी अनेकजण महाराजांना काही प्रश्न विचारतात. काही प्रश्न ऐकून तर खुद्द प्रेमानंद महाराजांनाच हसू येते. […] The post ऑफिसमध्ये खोटे कारण देऊन सुटी घेणे पाप? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘ती रात्री १२:३० वाजता कशी बाहेर गेली?’
दुर्गापूर : पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे एमबीबीएसचे शिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या घटनेवर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मौन सोडले आहे. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. मुलींना रात्री बाहेर पडण्याची परवानगी नसली पाहिजे असे ममता बॅनर्जी म्हणाल्या […] The post ‘ती रात्री १२:३० वाजता कशी बाहेर गेली?’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डीजीसीएचा इंडिगोला ४० लाखांचा दंड
नवी दिल्ली : पायलट प्रशिक्षणासाठी अयोग्य फ्लाइट सिम्युलेटर वापरल्याबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाइन्सला ४० लाखांचा दंड ठोठावला आहे. कालिकत, लेह आणि काठमांडू सारख्या श्रेणी क विमानतळांवर नियमांनुसार विहित केलेल्या सिम्युलेटरवर सुमारे १,७०० वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले नसल्याचे तपासात आढळून आले. डीजीसीएने ११ ऑगस्ट २०२५ रोजी प्रशिक्षण संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. […] The post डीजीसीएचा इंडिगोला ४० लाखांचा दंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
'शिका आणि कमवा' सामाजिक चळवळ व्हावी:चंद्रकांत पाटील यांचे कौशल्ययुक्त तरुणांसाठी आवाहन
केवळ पदव्यांच्या आधारावर सुशिक्षित बेरोजगारांची फौज तयार न करता, शिक्षणाद्वारे कौशल्ययुक्त तरुणांची फळी उभी राहिली पाहिजे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 'शिका आणि कमवा' योजनेस सामाजिक चळवळीचे स्वरूप द्यावे लागेल, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. यशस्वी ग्रुपतर्फे आयोजित 'अप्रेंटिसशिप सुधारणा अधिनियम परिणाम आणि भविष्यातील वाटचाल' या विषयावरील वैचारिक मंथन परिषदेत ते बोलत होते. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांची कौशल्ये विकसित करण्यासाठी यशस्वी ग्रुप विशेष प्रयत्न करत आहे. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या परिषदेत यशस्वी ग्रुपच्या 'शिका आणि कमवा' या योजनेचे ब्रँड एम्बासीडर म्हणून प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आल्यापासून शिक्षणाचा चेहरामोहरा बदलला असून व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर दिला जात आहे. २०२० मध्ये आलेले नवीन शैक्षणिक धोरण हा त्याचाच परिपाक आहे. शिक्षणात प्रचंड लवचिकता आणून त्याद्वारे विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास कसा साधता येईल यावर भर देण्यात आला आहे. पारंपारिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती आणि दृष्टी कशी विकसित होईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्टार्टअपमध्ये आज महिला प्रथम, तर पुरुष द्वितीय स्थानावर आहेत. संरक्षण क्षेत्रात एक स्क्रू देखील बनवू न शकणाऱ्या भारताने आज ब्रह्मोससारखे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. प्रवीण तरडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, 'शिका आणि कमवा' ही योजना ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत पोहोचवणार आहे. ग्रामीण भागातील तरुणांना या योजनेद्वारे कौशल्याचे धडे देऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे माझे ध्येय आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करीत कौशल्याधारित युवकांची फौज निर्माण करण्यासाठी आपल्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.
हुंडा घेणारे नामर्द असल्याचे परखड मत मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले आहे. स्त्री जर टिकली नाही, तर समाज कसा टिकेल? असा सवाल अनासपुरे यांनी यावेळी केला आहे. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे कुणबी स्नेहमिलन सोहळ्याच्या सभेत बोलताना मकरंद अनासपुरे यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील भाष्य केले. ते म्हणाले, देशात शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. तसेच कापूस आणि सोन्याच्या भावातील तफावतीवर बोलताना अनासपुरे म्हणाले, जर सोन्याचे भाव लाखाच्या वर गेले असतील, तर कापसाला भाव आणखीनही कमी कसा? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे बोलताना मकरंद अनासपुरे म्हणाले, शेतकऱ्यांना उद्योजकांचा दर्जा का नाही? शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कर वसूल करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी मराठी अभिनेत्री गिरिजा ओके देखील उपस्थित होत्या. त्यांनी देखील सध्याच्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील एक संवेदनशील अभिनेता आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व म्हणून मकरंद अनासपुरे यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या चित्रपटांतून अनेक महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर प्रभावीपणे भाष्य केले आहे. विशेषतः, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अभिनेता नाना पाटेकर यांच्यासह एकत्रितपणे 'नाम फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. निंबा फाटा येथील कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मुद्द्यांवर परखड मत मांडले, जे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते.
थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या
मुंबई : एसटी कर्मचा-यांच्या प्रलंबित थकीत ४००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी यासाठी वेगवेगळया १८ संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारपासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होणार असून आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिका-यांनी दिला […] The post थकीत ४ हजार कोटींची रक्कम द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रिपब्लिकन ऐक्यासाठी आंबेडकरांसोबत आम्ही सकारात्मक
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला भेट दिली आहे, तीन महिन्यांमधील ही ठाकरे बंधूंची सातवी भेट आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या […] The post रिपब्लिकन ऐक्यासाठी आंबेडकरांसोबत आम्ही सकारात्मक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळगावच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला ट्रॅक्टरवरून खाली खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदी पात्रात महसूल विभागाचे पथक गेले होते. यावेळी तिथे काही ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. पथक आल्याचे कळताच इतर वाहने अंधाराचा फायदा घेत तिथून पसार झाले. मात्र, एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला. यावेळी तलाठी ट्रॅक्टरवर बसले असता त्यांना चालक आणि मालकाने खाली खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला. यात तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. या कारवाईबाबत माहिती देताना चोपडाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर पाच कर्मचारी त्या ठिकाणी गेले. घटनास्थळी काही वाहने होती, मात्र अंधाराचा फायदा घेऊन ती पसार झाली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या हाती यावेळी एक ट्रॅक्टर लागला. तो तहसीलदार कार्यालयाकडे घेऊन येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी वाळू उपशाला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. या आधीही एका नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे अवैध पद्धतीने वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई करणार असल्याचं तहसीलदार म्हणाले.
दहावी पास अर्थमंत्र्यांच्या भरवशावर राज्याचा कारभार
पुणे : राज्याचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. त्यांना अर्थकारण खरंच कळतं का? क्षुल्लक गोष्टीवरून आपण राजकारण करत असतो; मात्र महाराष्ट्रावर सध्या नऊ लाख कोटींचे कर्ज आहे, हे पैसे आपण कुठून आणणार? त्याच्यावर कोणीच बोलत नाही. कारण आपले अर्थमंत्री दहावी पास आहे, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया अजित पवार यांच्यावर टीका केली. सत्ताधारी पक्षाकडे राजकारणी […] The post दहावी पास अर्थमंत्र्यांच्या भरवशावर राज्याचा कारभार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोटगीसाठी २२४ ज्येष्ठांकडून अर्ज
पिंपरी : आई-वडिलांचा सांभाळ म्हणजे संस्कृती, ममता आणि जबाबदारी यांचे प्रतीक असते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वर्तमान दृश्य काहीसे धक्कादायक दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील २२४ ज्येष्ठ नागरिकांनी मुले आमचा सांभाळ करत नाहीत, अशा स्वरूपाच्या तक्रारी हवेली प्रांताधिकारी कार्यालयात दाखल केल्या आहेत. ‘मुलं आम्हाला विचारत नाहीत, घरात आमचं स्थान उरलं […] The post पोटगीसाठी २२४ ज्येष्ठांकडून अर्ज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मशीनमध्ये अडकून शेतक-याचा मृत्यू
अमरावती : सततच्या पावसानानंतर मागील आठ- दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी पीक काढणीचे काम करत आहे. अशात मशीनद्वारे शेतातील सोयाबीन काढणीचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत तरुण शेतक-याचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीय हादरले आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड शेत […] The post मशीनमध्ये अडकून शेतक-याचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; ५ महिला जखमी
बीड : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक खळबळजक प्रकार उघडकीस आला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने हा प्राणघातक हल्ला केला आहे. अज्ञात टोळक्यांनी केलेल्या भीषण अपघातात चार महिला गंभीर जखमी झाले आहेत. तर, एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. सध्या खोक्या भोसलेच्या […] The post खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; ५ महिला जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भूमिहीनांना जमीन देण्यासाठी राज्यात आणि देशात विनोबा भावे यांनी राबवलेली 'भूदान चळवळ' पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. देशभरात २० कोटी एकर जमीन रिक्त असून, ती भूमिहीनांना देण्यात यावी, असे आठवले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे गायरान हक्क परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, पप्पू कागदे, जिल्हाध्यक्ष विजय मगरे, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, किशोर थोरात, अरविंद अवसरमल, बाळकृष्ण इंगळे आणि दिलीप पाडमुक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आठवले यांनी संविधान आणि देशाच्या एकतेवरही भाष्य केले. सरन्यायाधीशांवर बुट फेकल्याच्या घटनेला त्यांनी दुर्दैवी म्हटले. या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. हा देश संविधानावर चालतो. ज्यांना संविधान मान्य नाही, त्यांनी देशाबाहेर जावे, असे आठवले म्हणाले. त्यांनी राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेवरही टीका केली. राहुल गांधींनी 'भारत तोडो'चा नारा दिला होता, असे ते म्हणाले. सगळ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. जात-धर्म वेगळे असले तरी देश एक आहे. आम्हाला देशाचा अभिमान आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आपला देश नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान किंवा बांगलादेशसारखा होऊ शकत नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी होत असल्याबद्दल विचारले असता, आठवले म्हणाले की, त्यांच्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही अशाच भेटी व्हाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय आंबेडकरी ऐक्य शक्य नाही. रिडालोसच्या वेळीही आंबेडकरी ऐक्याचा प्रयोग केला होता, पण आम्ही दोघे एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही. प्रकाश आंबेडकर यांनी याचे नेतृत्व करावे, अशी मागणीही आठवले यांनी केली.
लोणी-काळभोर : प्रतिनिधी एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च येथील विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य दिनानिमित्त सेंट तेरेसा स्कूल, लोणी-काळभोर येथे ‘मानसिक आरोग्याची संवेदनशीलता’ या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. शालेय विद्यार्थ्यांना भेडसावणारा मानसिक ताण, पालकांच्या अपेक्षा, अभ्यासाचा अतिरिक्त तणाव आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवरील उपाय तसेच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले […] The post ‘एमआयटी’त मानसिक आरोग्य दिन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिबानी फतवा भारतात काढणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. भाजपाला भारताचा तालिबान करायचा आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत महिलांना सन्मानाने आमंत्रित केले जाते अशी मिश्किल टिप्पणीही सपकाळ यांनी यावेळी केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस सरकारने आणलेल्या माहिती अधिकार कायद्याला आज २० वर्षे झाली आहेत, जनतेला दिलेल्या या महत्वाच्या कायदेशीर अधिकाराची धार मात्र भाजपा सरकार बोथट करत आहे. विचारलेली माहिती न देणे, माहिती अधिकार आयुक्तांची पदे रिक्त ठेवणे, वैयक्तीक माहिती आहे अशी सबब देऊन माहिती न देणे हे प्रकार सुरु आहेत. आता तर आरटीआयच्या कक्षेतून रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोगालाही वगळले आहे. मतदानाचे सीसीटीव्ही फुटेज न देणे, मतचोरीचा भांडोफोड होऊ नये वा नोटबंदी चा फज्जा उडाला अशा प्रकारची माहिती जनतेला मिळू नये यासाठी यात बदल केले आहेत. एकूणच सरकारी पातळीवर सुरु असलेली अनागोंदी, भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून माहिती अधिकार कायदा कमजोर केला आहे पण काँग्रेस पक्ष याविरोधात आवाज उठवून हा कायदा अधिक मजबूत असावा यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सपकाळ म्हणाले. आरटीआयच्या सक्षमीकरणासाठी आवाज उठवू लोकशाही शासन व्यवस्थेत जनतेला मुलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत. त्याचाच पुढचा विचार करुन काँग्रेसच्या डॉ. मनमोहनसिंह सरकारने जनतेला माहितीचा अधिकार कायदा दिला. या कायद्याने सरकारवर अंकुश ठेवण्यास मदत झाली, भ्रष्टाचार उघड झाले. परंतु २०१४ पासून केंद्रात आलेल्या भाजपाच्या मोदी सरकारने या कायद्यात बदल करून तो कमकुवत केला आहे. आता पुन्हा एकदा माहिती अधिकार कायदा सक्षम करण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. नथुराम व देवेंद्र फडणवीस आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समाजा-समाजात भांडणे लावत आहेत. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या नितीचा ते अत्यंत थंड डोक्याने वापर करून समाजात भांडणे लावत आहेत. नथुरामने जसे अत्यंत थंड डोक्याने महात्मा गांधी यांचा खून केला. गांधींवर गोळ्या झाडण्यापूर्वी नथुराम त्यांच्या पाया पडला होता. देवेंद्र फडणवीसही थंड डोक्याने कृती करतात. यात फडणवीस व नथुराम यांची तुलना केलेली नाही तर दोघांची मोडस ऑपरेंडी एकच आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. राज व उद्धव ठाकरे भेट राज व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, आम्ही भारत जोडोवाले आहेत, दोन भावाने एकत्र यावे किंवा किती वेळा भेटावे यावर काँग्रेसची काही आक्षेप व हरकत नाही. इंडिया आघाडीत कोणाला सहभागी करायचे याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. राज्यात दंगली घडवण्याचे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, जातीय सलोखा बिघडवणारी विधाने करणाऱ्या टॉप १० लोकांमध्ये त्यांचाही सहभाग आहे, त्यांच्या पक्षाने त्यांना सज्जड दम दिलेला आहे पण मागील काही दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणीवपूर्वक काही घटना घडवल्या जात आहेत. राज्यातील शांतता भंग करून दंगली घडवण्याचे षडयंत्र यामागे आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी करा सोयाबिनला ५४०० रुपये हमीभाव असताना बाजारात मात्र ३२०० ते ३७०० रुपये दराने खरेदी केले जात आहे, ही शेतकऱ्यांची फसवणूकच असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी नाहीतर सरकारनेच हमीभावाने शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. सरकारने जर हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केले तर एकाही मंत्र्याला राज्यात फिरु देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील
नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर तोडगा निघताना दिसलेला नाही. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद नेमके कोणाला मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून अनेकविध दावेही केले जात आहेत. यातच दादा भुसे यांनी लगावलेल्या टोल्याला गिरीश महाजन यांनी मिश्किल प्रतिक्रियेने उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अहिल्यानगर दौ-यावर होते. या दौ-यावेळी […] The post दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अहिल्यानगर येथील शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चात बोलताना त्यांनी मुस्लीम समाजावर थेट निशाणा साधला. मुस्लीम राष्ट्र प्रथम नाही, तर इस्लाम प्रथम मानतात आणि भारत हा देश मुस्लिमांसाठी 'युद्धाचे घर' आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकात लिहिले आहे, असा खळबळजनक दावा पडळकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, “जी मुस्लीम राष्ट्रे आहेत, ते मुस्लिमांना 'इस्लामचे घर' वाटते. जे देश मुस्लीम राष्ट्र नाहीत, ते मुस्लिमांना 'युद्धाचे घर' वाटते. म्हणजेच मुस्लिमांसाठी भारत हा देश युद्धाचे घर आहे, असे मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहून ठेवले आहे, त्यात तसे लिहिण्यात आले आहे.” जगातले मुस्लीम जी भूमिका घेतात, त्याच भूमिकेला भारतातील मुस्लीम प्राधान्य देतात, असे विधानही पडळकर यांनी केले. अहिल्यानगर न म्हणणाऱ्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करा अहिल्यानगर येथे झालेल्या एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेतील भाषणावरून पडळकर यांनी त्यांच्यावर अत्यंत कठोर टीका केली. ओवैसी यांनी शहराचा उल्लेख 'अहमदनगर' असा केल्याबद्दल पडळकर संतापले. अहिल्यानगरमध्ये येऊन अहिल्यानगर न म्हणता अहमदनगर म्हणतात... जिल्हाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर न म्हणणाऱ्यांच्या दुकानांचे परवाने रद्द करायला हवेत, असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी त्यांच्या नाही खुXXX ठोकला तर पाहा, अशा आक्षेपार्ह भाषेत ओवैसींवर टीका केली. औरंगजेब काय तुमचा आजोबा आहे का? औरंगाबादच्या नामांतराच्या वादावरून पडळकर यांनी पुन्हा एकदा 'औरंगजेब'चा मुद्दा उपस्थित केला. हे कायद्याचे राज्य आहे, इथे तुम्हाला कायदा पाळावाच लागेल. ते म्हणतात आम्हाला औरंगाबाद नाव हवे आहे, औरंगजेब काय तुमचा आजोबा आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. यापुढे महामानवाचा अवमान केल्यास हिंदू समाज सहन करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात लावत असेल, तर त्याचे हात तोडून टाकले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. 'लव्ह जिहाद आणि लँड जिहाद'वरून आक्रमक अहिल्यानगरमध्ये 'लव्ह जिहाद' आणि 'लँड जिहाद' मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. कोठला आणि मुकुंदनगर परिसरातील झोपडपट्ट्या केंद्र सरकारच्या जागेवर असून, त्या काय तुमच्या बापाच्या जागा आहेत का? असा प्रश्न विचारत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली या अतिक्रमणधारकांना तेथून हाकलून लावण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. 'नामांतर बदलणार नाही, विरोध करणारे देशद्रोही' या देशात धर्मांतर विरोधात लवकरच कडक कायदा येणार असून, अहिल्यानगर, धाराशिव आणि संभाजीनगर या शहरांचे नाव कधीही बदलणार नाही, यावर पडळकर यांनी ठाम भूमिका घेतली. ज्यांना या शहरांची बदललेली नावे नको आहेत, ते देशविरोधी आहेत, हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदुत्ववादी विचारांना पुढे नेण्यासाठी संग्राम जगताप यांच्या पाठीमागे सर्वजण खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशांचे सोंग जमत नाही. पैशांचे सोंग जमात नसेल तर खुर्ची सोडा, असे म्हणत प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे आज शेतकरी कर्जमुक्ती एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बच्चू कडू यांनी अजित पवार तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली आहे. बच्चू कडू म्हणाले, सकाळी 7 वाजता उठून तुम्ही शपथ घेतली. एवढे सोंग कोणाला जमले का दादा, कुठे गेली तुमची दादागिरी? वित्त खाते तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशांचे सोंग जमत नाही. जमत नसेल तर आम्हाला सांगा! मी सांगतो कसे सोंग करायचे. शक्तिपीठ महामार्गासाठी 85 हजार कोटी तुमच्या निधीतून दिले. आम्ही रस्त्यातील खड्ड्याने मरतोय. दादा हे सोंग कसे जमले तुम्हाला? कोणाच्या खिशातून पैसा काढला तुम्ही? किती लुटले ते आम्हाला सांगा. माझा शेतकरी पाय घासून मरतोय त्यासाठी पैसा नाही. तिथे तुम्हाला पैशांचे सोंग जमत नसेल तर खुर्ची सोडा, अशी टीका कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना अजित पवारांचे मागील काही वादग्रस्त वक्तव्यांचा दाखला देत टीका केली. मागे एकदा अजित पवार म्हणाले होते पाणी नाही तर, धरणात xxx का? या विधानावर भाष्य करत टीका करताना बच्चू कडू म्हणाले, खरोखरच xxx तर वाहत जाईल दादा, सापडणार ही नाहीत कोणत्या नदीत गेले, समुद्रात गेले, डोहात गेले तर, असे म्हणत कडू यांनी पवारांवर जहरी टीका केली. कृषिमंत्री शेपूट हलवणारा नकोय पुढे बोलताना बच्चू कडू यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, कृषिमंत्री शेतकऱ्यांसाठी भांडताना दिसला पाहिजे. नुसता शेपूट हलवणारा नकोय आम्हाला. मागे माणिकराव कोकाटे कृषिमंत्री होते. ते ओबडधोबड बोलत होते. ते घरी गेले. भरणे थोडे बरे बोलतात, कमीत कमी ते चुका तरी करत नाहीत. मात्र, शेपूट हलवणे बंद केले पाहिजे, अशी खोचक टीका कडू यांनी केली आहे. तुम्ही कृषिमंत्री आहात.. सबसे ज्यादा 'भार तुम्हारी तरफ' है... सर्वात जास्त संख्या शेतकऱ्यांची आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधीत्व करणाऱ्या काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा शिंदे सेनेत प्रवेश निश्चित झाला असून मंगळवारी ता. १४ मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे. हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधीत्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळले होते. कुठल्याही कार्यक्रमाबाबत पक्षाकडून स्पष्ट भुमीका घेतली जात नव्हती. तर हिंगोली विधानसभेची जागा काँग्रेसची असतानाही ऐनवेळी हि जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. त्यामुळे माजी आमदार गोरेगावकर यांनी उघड नाराजी व्यक्त करून अपक्ष म्हणून निवडणुक लढविली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. त्यामुळे गोरेगावकर हे शिंदे सेनेत प्रवेश करतील हे स्पष्ट होऊ लागले होते. मात्र आपण कार्यकर्त्यांशी चर्चा केल्या शिवाय कुठलीही भुमीका घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आज रविवारी ता. १२ त्यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, माजी सभापती संजय उर्फ भैय्या देशमुख, द्वारकादास सारडा, रुपाजी पाटील, बालाजी गावंडे. रणजीत भैय्या गोरेगावकर, मदन शेळके, वरुण गोरेगावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी माजी आमदार गोरेगावकर यांनी शिंदेसेनेच प्रवेशाचा मुद्दा मांडला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या भुमीकेशी सहमत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार गोरेगावकर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी ता. १४ सायंकाळी पाच वाजता मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच प्रवेश घेणार असल्याचे जाहिर केले. दरम्यान, माजी आमदार गोरेगावकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे हिंगोली विधानसभेत शिंदेसेनेला बळ मिळणार असून काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली ते कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरु नसतांनाही त्या ठिकाणी सुचना फलकाचे साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले असून त्यामुळे मोठा अपघातात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वाशीम ते वारंगाफाटा या सुमारे १०० किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे बांधकाम केले आहे. काही ठिकाणी सिमेंट तर काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून मागील दोन वर्षापासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र रस्ता खुला झाल्यानंतर काही दिवसांत रस्त्यांवर भेगा पडू लागल्या असून काही ठिकाणी पुलाच्या रस्त्याचा जोड वरखाली झाल्यामुळे वाहने आदळत आहेत. दरम्यान, याबाबत वारंवार झालेल्या तक्रारीनंतर राष्ट्रीय महामार्ग पथकाने संबंधित कंत्राटदाराकडे पाठपुरावा करून रस्त्याच्या भेगा भरून घेतल्या तर पुलाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या जोड डांबरीकरणाने भरून घेतला आहे. मात्र त्यानंतरही या रस्त्याची दुरावस्था कायम आहे. दरम्यान, संबंधित कंत्राटदारांकडून या मार्गावर दुरुस्तीचे काम केले जात नसतानाही खानापूरचित्ता ते उमराफाटा या मार्गावर रस्त्याच्या मधोमध सुचना फलकाचे साहित्य अस्ताव्यस्त टाकून दिले आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या साहित्यामुळे किरकोळ अपघात होत असतांना त्याकडे राष्ट्रीय महामार्ग पथक व कंत्राटदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्ता बांधकाम नाही अन दुरुस्तीची नसतांना साहित्य रस्त्यावर टाकले कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे ही वाचा... हिंगोली जिल्ह्याची सरासरी नजरी पैसेवारी 45.88 पैसे:सर्वात कमी कळमनुरी तालुक्यात 43.96 पैसे, अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसल्याचे स्पष्ट हिंगोली जिल्ह्याची नजरी पैसेवारी सरासरी 45.88 पैसे जाहिर झाली आहे. यामध्ये सर्वात कमी पैसेवारी कळमनुरी तालुक्यात 43.96 पैसे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अंतिम पैसे वारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा...
नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भंडारा, साकोली, पवनी व तुमसर नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी विरोधकांच्या विरोधात रणनीती तयार करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्ष आपसातच राजकारण खेळताना दिसून येत आहेत. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते देखील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपल्याच मित्र पक्षातील नेत्यांवर निशाणा साधत आहेत. अशातच भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडला असून आपआपसातच कुरघोड्यांच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाचे लोकसभा युवा प्रमुख जॅकी रावलानी व दादांच्या राष्ट्रवादीचे भगवान बावणकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हुकूमशाहीला कंटाळून व त्यांच्या अहंकाराला त्रस्त होऊन मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश घेतला असल्याचे दावा रावलानी यांनी केला आहे. तर महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी कधीकाळी स्वतः वाळू माफियापासून दूर राहण्याचा सल्ला मला दिला होता. मग आता भाजपमध्ये वाळू माफियाला प्रवेश दिल्याने वॉशिंग मशीन मध्ये रावलानी स्वछ झाला काय असा सवाल शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बावनकुळे यांना केला आहे. जॅकी रावलानी यांची प्रतिक्रिया दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलचाना आ. भोंडेकर म्हणाले की, जॅकी रावलानी हे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी मी पक्ष सोडतो असे सांगत होते. आम्हाला वाटले की या वेळी देखील ते असेच करत आहे. पण ते भाजप मध्ये गेले असल्याने त्यांना शुभेच्छा आहेत. पण सहा महिन्यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जॅकी रावलाणी हा वाळू माफिया आहे. असा फालतू लोकांना माझ्याकडे आणायचा नाही व स्वतः दूर राहायचा सल्ला मला दिला होता. पण आता बावनकुळे साहेबांनी स्वतःच्या पक्षात जॅकी रावलानी यांना प्रवेश दिल्याने भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये रावलानी स्वच्छ झाले का? असा सवाल भोंडेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत भंडारा जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. आमदार भोंडेकर यांच प्रतिक्रिया माजी आमदार भाजपच्या वाटेवर? साकोलीचे माजी आमदार राजेश (बाळा) काशीवार यांची भाजपमध्ये घरवापसी होत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत. दरम्यान, भाजपचे माजी आ. काशीवार हे उद्या नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवार, 13 ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर माजी आ. काशीवार यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये म्हणून माजी जिल्हाध्यक्ष वरिष्ठांकडे फिल्डिंग लावत असल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काशीवार हे विधान परिषद सदस्य परिणय फुके यांचे कट्टक विरोधक समजले जातात. मात्र, आगामी साकोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर दोघांमध्ये मुंबईत दिलजमाई झाली असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी एक धक्कादायक घटना कोल्हापुरात समोर आली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना 'हनी ट्रॅप'मध्ये फसवून त्यांची बदनामी करण्याची आणि पैसे उकळण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका महिलेने अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून झालेल्या संभाषणाच्या आधारावर आमदारांकडे दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना वर्षभरापासून अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून आमदार पाटील यांनी अखेर 8 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर कोल्हापूर आणि ठाणे पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि या प्रकरणात चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग गावातील बहीण-भावाला अटक केली आहे. बहीण-भावाचा प्रताप, पोलिसांकडून अटक अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मांडेदुर्ग येथील मोहन जोतिबा पवार आणि त्याची बहीण शामल पवार यांचा समावेश आहे. या दोघांनी मिळून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील चॅट, फोटो आणि धमकीचे मेसेज पाठवले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मैत्रीच्या मागणीपासून सुरुवात तक्रारीनुसार, बहीण-भावाने सुरुवातीला आमदारांसोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली आणि चॅटिंग सुरू केले. यानंतर त्यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याची धमकी देत दोन-तीन वेळा मिळून एकूण 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. आमदारांनी सुरुवातीला हे त्रासदायक मेसेज आणि नंबर ब्लॉक केले, तरीही आरोपींनी नवनवीन नंबर वापरून आपला त्रास देणे सुरूच ठेवले. या प्रकारानंतर आमदार पाटील यांनी हा 'हनी ट्रॅप' नसून, राजकीय दडपशाहीचा प्रयत्न असल्याचा दावा पत्रकारांशी बोलताना केला होता. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केल्याने या प्रकरणातील आरोपींना अटक करणे शक्य झाले. पोलिस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत.
बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दिवाळीत सार्वजनिकरित्या फटाके फोडण्याचे जोरदार समर्थन केले आहे. आम्ही बकरीद (Bakrid) किंवा ताझिया (Tazia) यांसारख्या सणांवर भाष्य करत नाही. हे आमचे (हिंदूंचे) परंपरा आहे आणि आम्ही ती सुरूच ठेवू, असे वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे. शनिवारी काल मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात बोलताना त्यांनी फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि चित्रपट कलाकारांनी फटाके टाळण्याबद्दल केलेल्या आवाहनांना उत्तर देताना आपली भूमिका मांडली. हिंदू सणांमध्येच मुद्दा का उपस्थित केला जातो? धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, प्रदूषण हा एक गंभीर मुद्दा आहे, पण हा मुद्दा फक्त हिंदू सणांमध्येच का उपस्थित केला जातो? कलाकारांना आवाहन आहे की, त्यांनी सर्व धर्मांच्या सणांकडे समान आदराने पहावे आणि उपदेश करू नये. सणांचा उद्देश आनंद, शांती आणि परस्पर बंधुता वाढवणे हा असला पाहिजे. धर्म कोणताही असो, प्रत्येकाने एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे, असेही शास्त्री म्हणाले. 'I Love Mohammad चुकीचे नाही' 'आय लव्ह मुहम्मद' बद्दल धीरेंद्र शास्त्री म्हणाले, जर कोणी 'I Love Mohammad' म्हटले तर ते चुकीचे नाही. त्याचप्रमाणे, जर कोणी 'I Love Mahadev' म्हटले तर ते देखील वाईट नाही. प्रत्येकाला आपल्या धर्मावर प्रेम करण्याचा अधिकार आहे आणि त्याचा आदर केला पाहिजे, परंतु 'सर तन से जुदा' (शीर कापून टाकणे) सारख्या घोषणा आणि कल्पना हिंदू समाज किंवा भारतीय कायद्याद्वारे सहन केल्या जाणार नाहीत. जर कोणी चिथावणी दिली तर त्यांना सोडले जाणार नाही.
महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाची लोकप्रियता शिखरावर
ठाणे : प्रतिनिधी दिवाळी म्हटली की फराळ आलाच. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरी फराळ तयार करणे सर्वांना शक्य होत नाही. परिणामी, तयार (रेडिमेड) फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. यंदा मात्र दुकानांमधील फराळाच्या पदार्थांवर १२ टक्के जीएसटी आकारला जात असल्यामुळे प्रतिकिलो सुमारे ४० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. याउलट बचत गटांमार्फत बनवलेल्या घरगुती फराळावर जीएसटी लागू न […] The post महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाची लोकप्रियता शिखरावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना(ठाकरे गट)चे स्थानिक नेते संजय कदम यांनी रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मागील १५-२० वर्षांपासून आम्ही विभागाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. २०१६ ते २०१९ दरम्यान झोपडीधारकांना भाडे दिले होते. त्यानंतर डीएचएफएलने या प्रकल्पाला लोन दिले, मात्र कंपनीच्या अडचणींमुळे प्रक्रिया अडकली. हायकोर्टाने आम्हाला थकित भाडे देण्याचे आदेश दिले असून […] The post रामदास कदम अडचणीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गर्लफ्रेंडचा रक्तरंजित बर्थडे!
पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी संशयाचे भूत डोक्यात शिरले की माणूस कोणत्या स्तराला जाऊ शकतो, हे सांगता येत नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये संशयामुळे सहा वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट झाला. धक्कादायक म्हणजे, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचा बर्थडेच्या दिवशीच जीव घेतला. लॉजवर दोघांनी बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केले. त्यानंतर त्याने ब्लेडने सपासप वार करत जीव घेतला. इन्स्टाग्रामवरून दोघांची ओळख झाली होती, त्यातून प्रेम फुललं. […] The post गर्लफ्रेंडचा रक्तरंजित बर्थडे! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘मना’चे श्लोक’ला राज्यात विरोध
मुंबई : वृत्तसंस्था अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक’ या नव्या मराठी चित्रपटावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या नावावरून काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पुण्यासह राज्यातील विविध भागात हा चित्रपट बंद पाडला आहे. त्यामुळे मृण्मयी आणि ‘मना’चे श्लोक’च्या टीमने सध्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय […] The post ‘मना’चे श्लोक’ला राज्यात विरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कडधान्यांचे उत्पादन घटले; अतिवृष्टीचा दणका
मुंबई : प्रतिनिधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतक-यांची शेती अक्षरश: खरडून टाकली आहे. खरीप हंगामातील कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन घटले असून, आगामी काही दिवसांत मूग, उडीद, हरभरा आणि मटकीच्या दरांचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत सप्टेंबरअखेर झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाहून गेली. विशेषत: मूग, उडीद आणि तूर […] The post कडधान्यांचे उत्पादन घटले; अतिवृष्टीचा दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पहिली-दहावीपर्यंतच्या पटसंख्येत घसरण
मुंबई : प्रतिनिधी मागील दोन वर्षांत मुंबईतील पहिली ते दहावीपर्यंतच्या उपसंचालका अंतर्गत ७४ हजार ९६६ आणि पालिकेतील ४१ हजार ४१० विद्यार्थी असे एकूण १ लाख १६ हजार विद्यार्थ्यांची संख्या घटल्याची माहिती यू-डायसच्या आकडेवारीतून समोर आली. यामुळे शिक्षक व तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. यू-डायस आकडेवारीनुसार, उपसंचालक अंतर्गत २०२३-२४ मध्ये १,७३१ शाळांमध्ये एकूण ११,२८,१६२ विद्यार्थी होते. २०२४-२५ […] The post पहिली-दहावीपर्यंतच्या पटसंख्येत घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंमधील भेटी गाठींचे प्रमाण वाढले असतानाच, मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज पुन्हा 'मातोश्री' येथे दाखल झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कालच जैन मुनी नीलेशचंद्र यांनी पक्ष काढून मुंबई मनपाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे ठाकरे बंधू यांच्या आजच्या भेटीला महत्त्व आले आहे. राज ठाकरे यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही बंधूंमध्ये केवळ कौटुंबिक नव्हे, तर राजकीय मुद्द्यांवरही चर्चा होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकत्र येऊन महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार का, याबद्दल अटकळ बांधली जात आहे. आई'सोबत मातोश्रीवर आलोय राज ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी त्यांच्या आईसोबत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मी माझ्या कुटुंबासोबत आलो आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. ही कौटुंबिक भेट आहे. राज ठाकरे यांच्या 'मातोश्री'वरील वाढलेल्या फेऱ्यांमुळे मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा होणार? या भेटीत मुंबई मनपा आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. काल जैन मुनी यांनी केलेल्या पक्षाच्या घोषणेनंतर आज ठाकरे बंधूंमध्ये काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 14 ऑक्टोबर रोजी मविआचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. अजून राज ठाकरे मविआत नसले तरीसुद्धा ते मविआच्या शिष्ट मंडळासोबत निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याने आता ठाकरे बंधूंच्या युतीवर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला आहे.पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देवाभाऊ यांनी मदत केल्याने त्यांनी मोर्चा कडे पाठ फिरवली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. त्यामुळे हंबरडा मोर्चाची भाषा राऊतांनी करू नये. नवनाथ बन म्हणाले की, पगारी नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांवर किंवा मतचोरीवर बोलू नये. मत चोरी नाही तर तुमची मती चोरीला गेली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआचे 30 खासदार निवडून आले तेव्हा तुम्ही मतचोरी केली का? की निवडणुकीत घोटाळा करत निवडून आले का? याचे उत्तर तुम्ही आधी द्या. राऊत राहुल गांधी आणि नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. लोकसभेला सर्वात जास्त जागा उबाठाने जिंकल्या तेव्हा मतचोरी नव्हती, निवडणूक आयोग चूक नव्हते. आणि विधानसभेला देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लोकांनी निवडून दिले हे तुमच्या पोटात दुखत आहे. खरंतर राहुल गांधी मतचोरी म्हणून ओरडत आहेत पण मतीचोरीला गेली आहे. तुमचा भाऊ निवडून आला तिथे मतचोरी झाली नाही का? असा सवाल बन यांनी केला आहे. लोकसभेला किती मतचोरी केली हे राऊतांनी सांगावे. ..म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगाकडे जाऊ नये तर जनतेमध्ये जावे. जनतेला विचारावे की आम्हाला का पराभूत करावे. सातत्याने घरात बसून राहायचे, आणि जनतेला लुटायचे आणि जनतेने तुम्हाला नाकारले की मग निवडणूक आयोगाच्या नावाने ओरडायचे हे तुमचे जुने धंदे झाले आहेत. अडीच वर्ष जनतेला लुटले, घरात बसले म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले आहे. जनतेमध्ये गेलात तर ते तुम्हाला का नाकारले सांगतील. जनता तुमचा पराभव करणार नवनाथ बन म्हणाले की, पगारी नेते संजय राऊत म्हणत आहेत की नोव्हेंबर महिन्यात भूकंप होईल. तो भूकंप हा मविआच्या पराभवाचा असेल. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उबाठाच्या पराभवाचा असेल. संजय राऊत यांच्या सर्व सहकाऱ्यांचा पराभव सर्व नागरिक करणार आहेत. उबाठा हा सोनिया गांधी यांची बेनामी कंपनी आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. जनता तुम्हाला जागा दाखवून देतील.
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज जोरदार टीका केली. महाराष्ट्रात सध्या इंग्रज आणि निजामापेक्षाही पुढे गेलेले सरकार चालत आहे. जनसुरक्षा कायद्याचा वापर करून लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना नक्षलवादी ठरवण्याचा संकल्प या सरकारने केला आहे. तसेच ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचा केलेला विश्वासघात महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धोरणाबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते जे निर्णय घेतील ते प्रदेशाला मान्य राहणार आहे. स्थानिक पातळीवर नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून परिस्थितीनुसार निर्णय आम्ही घेणार आहोत. ते पक्षाचे धोरणच आहे. ओबीसी मोर्चात अनुपस्थितीवर स्पष्टीकरण नागपूरला ओबीसी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चात नाना पटोले उपस्थित नव्हते. या मोर्चा अनुपस्थित राहण्याचे कारण नाना पटोले यांनी सांगितले. माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचे निधन झाले होते. त्याच्या अंत्यसंस्काराला गेल्यामुळे मला उशिर झाला. त्यामुळे नागपूर येथील ओबीसी मोर्चाला मला जाता आले नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले. जरांगे नाही, भाजपने केलेला विश्वासघात हा मूळ मुद्दा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत विचारले असता पटोले म्हणाले, मनोज जरांगे हा आमचा विषय नाही. तो राजकीय नेता नसून, एका समाजाचे नेतृत्व करतो. त्यामुळे मनोज जरांगेबद्दल कोणतेही वक्तव्य मी करणार नाही. कारण ते राजकीय नाही. मूळ मुद्दा म्हणजे भाजपने आदिवासी, ओबीसी समाजाचा, मराठा समाजचा जो विश्वास घात केलाय, त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करू. कोणाचे काय वक्तव्य आहे, याच्याशी आमचा संबंध नाही. राजकीय व्यवस्थेच्या आधारावर ज्याप्रकारे बहुजनांचे नुकसान झालंय, त्याचे चित्र आम्ही जनतेसमोर मांडू. आम्हाला भाजपने फसवल्याचे लोकांना कळायला लागले आहे. कुणाच्या बोलण्याचे सर्टिफिकेट मिळत नाही. वास्तविकता आपण पाहतोच आहे, असे नाना पटोले म्हणाले. महायुती सरकार 'निजाम-इंग्रजांपेक्षाही पुढे' महाराष्ट्रात इंग्रज आणि निजामापेक्षाही पलिकडे जाऊन महायुती सरकार वागत आहे. जनसुरक्षा कायदा आणून आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून सरकारच्या, प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलणे सुद्धा आता शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा संकल्प महायुती सरकारने केलेा आहे. असा प्रकार इंग्रजांनी पण कधी केला नव्हता. त्यांनी कधी असे म्हटले नव्हते की, तुम्ही आतंकवादी किंवा नक्षलवाद आहात. त्यांच्या काळातही तुमचे मत मांडता येत होते. पण भाजपने ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात आणि देशात एक प्रकारची अघोषित आणीबाणी सुरू केलेली आहे, ते निजाम आणि इंग्रजांपेक्षाही पुढची आहे. त्यामुळे लोकशाहीचा घात करण्याचे पाप ज्या लोकांनी केले, त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली. भाजपला धोकाधडीचे परिणाम भोगावे लागतील देवेंद्र फडणवीसांनी 2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी मराठा समाजाला आश्वासन दिले होते की, ओबीसीचे आरक्षण न देता, मराठा समाजाला वेगळे आरक्षण आमचे सरकार आले तर देऊ, अशी भूमिका मांडली. मराठा समाजाने त्यावेळेस सांगितले की, आम्हाला 16 टक्के आरक्षण पाहिजे. ते फडणवीसांनी मान्य केले. मग आता जे या पद्धतीने भाजपने जी धोकाधडी मराठा समाज आणि ओबीसी समाजासोबत केली, त्याचे परिणाम भाजप भोगावे लागतील, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. फडणवीसांना विधानसभेत 'वस्त्रहरणा'चा इशारा विषयाला वेगळ्या वळणावर नेण्याचा आम्हाला रस नाही. ज्या पद्धतीने भाजपला पाहिजे की, मराठा आणि ओबीसी भांडत राहावे आणि मग महाराष्ट्र अदानीला विकायची व्यवस्था या लोकांनी केलेली आहे. ती चालत राहावी, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. त्या भूमिकेला आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. जे वास्तव्य आहे ते मी विधानसभेत मांडणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री फडणवीसांना द्यावी लागणार आहेत. नाहीतर त्यांनी ओबीसी समाजाचा कसा विश्वासघात केला, त्याचे सर्व वस्त्रहरण आम्ही विधानसभेत करू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला. काँग्रेसला राज्यात मोठा 'स्कोप' महाराष्ट्रात काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मोठा स्कोप आहे. महाराष्ट्रातील आताचे सरकार जनतेच्या आशीर्वादाने नाही, तर बेईमानीने निवडून आलेले आहे. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. पैशाच्या आणि बेईमानीच्या भरवश्यावर पुन्हा निवडणुका जिंकू असा आशावाद यांच्या मनात आहे. पण महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासर्व प्रश्नांमध्ये हे सरकार पूर्ण नापास झालेले आहे. जनतेमध्ये भाजप शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल मोठा राग आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला सगळ्यात जास्त पसंती जनतेमध्ये आहे. काँग्रेसच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात निवडणुकीत जिंकताना आपण पाहणार आहोत, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
भाजपमध्ये किती लोक मुळ भाजपचे राहिले आहेत. तुम्ही जर विधानसभेत गेलात ना तर आमदारांवर एक नजर टाका त्यांचे काँग्रेसी करण झाले आहे. भाजप विरोधी पक्षात असताना ज्यांनी आंदोलन केले लाठ्या खाल्या, सतरंज्या उचलल्या, ज्यांनी भाजपचा विचारांशी निष्ठावान राहिले ती लोक आज कुठे आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी मी गुरू मानते. जरी आमचे वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी संसदेत अतिशय चांगले काम केले म्हणून मी त्यांना गुरू मानते. मी अनेक वेळा सांगितले की त्यांच्याकडून आम्ही कसे वागायचे हे शिकलो आहोत. जुना भाजपा आणि आजचा भाजप यामध्ये खूप मोठा फरक असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. फडणवीस यांनी उत्तर द्यावे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढत आहे हे माध्यमांचा आणि सरकारचा डाटा सांगत आहे. पुणे जिल्ह्यात तर गुन्हेगारी घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होत आहे. यात कोयता गँग, खून प्रकरण, चोरीच्या घटना वाढताना दिसून येत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात रिपोर्ट येतच असतील मग नेमके या घटना का वाढत आहेत हा सवाल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना विचारावा लागेल,असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती ही अतिशय अडचणीत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्याची आर्थिक परिस्थिती ही अतिशय अडचणीत आहे. भारत सर्वाधिक कर्ज घेणारा देश आहे. राज्यातील मंत्री वारंवार आपल्या खात्याचा निधी वळवला असे सांगतात, कारण सरकारकडे पैसा नाही. ही परिस्थिती चिंताजनक आहे. FRBM ॲक्ट नुसार फिस्कल मॅनेजमेंट 3 ते 4 टक्क्याच्या वर जाऊ नये. पण राज्य सरकारकडून फिस्कल मॅनेजमेंट चुकल्याचे दिसून येत आहे. आमदार जगताप यांना पक्षातून काढावे अजित पवारांनी संग्राम जगतापांना पक्षातून काढून टाकावे नुसती नोटीस देऊन फायदा नाही. जर कोणी समाजात तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. देश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालावा, असे सुळे यांनी म्हटले आहे. सरकारने शेतकऱ्यांकडून पैसे वसुल करू नये हीर काही पैसे वसूल करण्याची वेळ नाही. राज्याचे हित केंद्र स्थानी ठेवा सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकार त्यांच्या संपत्ती विकत आहे कारण ते आर्थिक संकटात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण बाजूला ठेवत काम करायला हवे अशी मी त्यांना विनंती करते. महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची गरज आहे. राज्याचे हित केंद्र स्थानी ठेवत काम करणे गरजेचे आहे. इतर राज्य आपल्यापुढे जात आहे, असे झाले तर आपल्याला पुढे येण्यासाठी खूप वेळ लागेल. घायवळ बाहेर देशात गेलाच कसा? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते की उशिरा का होईना त्यांनी नीलेश घायवळ यांच्या प्रकरणी एक स्टेटमेंट दिले आणि चौकशी होईल हे सांगितले. हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे. खोटा पासपोर्टच्या सहाय्याने नीलेश घायवळ सारखा माणूस परदेशात जातोच कसा? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. हे सर्व काही चिंताजनक आहे. अमित शहा आणि जयशंकर यांच्यापर्यंत मी हा विषय घेऊन जाणार आहे. दिल्लीमधून याची चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्रात काय झाले हे केंद्र सरकारला समजले पाहिजे. यामागे कुणीही असले तरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. शिव भोजन थाळीचे पैसे द्या सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नागपूर शिव भोजन संचालक संघटनेच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली आहे. गेली 8 महिने त्यांना शिव भोजन थाळीचे पैसे आलेले नाही. तर काही महिलांनी हे चालवायचे कसे पैसा कुठून आणायचा आता आत्महत्या करावी का अशी चर्चा करायला सुरवात केली आहे. हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. गरीब कष्टकरी लोकांसाठी ही थाळी सुरू करण्यात आली आहे. या महिलांना शासनाने मदत केली पाहिजे. 8 महिने पैसे मिळत नसेल तर त्यांनी जगायचे कसे असा सवाल सुळे यांनी केला आहे.
नाशिक शहरात पाेलिसांकडून सुरू असलेल्या गुन्हेगारीतून ‘क्लिन सिटी’ माेहिमेत चाैथ्या दिवशी शनिवारी (दि.11) रात्री उशिरा पोलिसांनी एमपीमधून भाजपच्या सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल, सचिन कुमावत, पप्पू जाधव यांना ताब्यात घेतले तर माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचीही दिवसभरात चौकशी करून सोडून देण्यात आले. तसेच बागूल आणि लाेंढे या टाेळ्यांशी संपर्कात असलेल्या बंटी उर्फ अक्की शेख, इरफान शेख उर्फ चिपड्या, सागर कोकणे, प्रशांत जाधव यांची चौकशी करून साेडून देण्यात आले. पोलिस आयुक्तांनी रिपाईंचे प्रकाश लोंढे, आणि भाजपच्या बागूल टोळीवर धडक कारवाई करत गुन्हेगारीविरोधात झिराे टाॅलरन्स पद्धतीने काम सुरू केल्याने राजकीय नेते, गुन्हेगारीतील त्यांचे समर्थक हादरले आहेत. अनेकांनी जिल्ह्यातूनच पलायन केले आहे. विसेचौक हाॅटेल गोळीबारात लोंढे टोळीचे नाव निष्पन्न झाले. दोन्ही गुन्हे संघटीतपणे केल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने अजय बागुल टोळीचे गौरव बागुल, सागर बागुल, संदेश शेळके, प्रेमकुमार काळे, वैभव काळे, मामा राजवाडे, अमोल पाटील या 7 संशयितांना अटक केली. लोंढे टोळीच्या माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दिपक लोंढे,अमोल पगारे,संतोष पवार या संशयितांसह टोळी मधील 9 संशयितांना अटककेली आहे. दरम्यान तपासात पाेलिसांना बागुल यांच्याशी मुकेश शहाणे यांचा संबंध अढळून आल्याने पाेलिसांनी त्यांचीही कसून चाैकशी केली आहे. क्लिन सिटी कारवाईचे फलित शहर गुन्हेगारीपासून मुक्त करण्याकरीता विशेष मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आयुक्तांच्या कामाची प्रशंसा केली. शहरवासीयांनीही कारवाईचे समर्थन करत जागोजागी फलक आहेत. राजकीय छत्र असलेले गुन्हेगार धास्तावले राजकीय छत्र असलेले कालपरवा पर्यंत मंत्र्याच्या दौऱ्यातसोबत असलेले गुन्हेगारांनी शहरातून पलायन केले आहे.कायदा सर्वांवर एकसारखाच असल्याचे पोलिस आयुक्तांनी दाखवून दिल्याने गुन्हेगारांचे राजकीय संरक्षण फसल्याने रेकाॅर्डवरील, सक्रीय आणि पुर्वीगंभीर गुन्हे दाखल असलेले सध्या जामीनावर बाहेर असलेले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेतेही शहरातून पळून गेले आहे. लाेंढेचे कार्यालय सील गोळीबार,खंडणी, अपहरणाच्या गुन्हे असलेले माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे कार्यालय पाेलिसांनी शनिवारी सील केले. या कार्यालयात बसून पीएलग्रुपचा म्हाेरक्या भूषण लोंढे, दिपक लोंढे अनेक कारनामे करत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. नाईस परिसरातील हाॅटेल ऑरा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, दिपक लोंढेसह संतोष पवार, अमोल पगारे आणि अन्य 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे. भूषण लोंढेआणि त्याते साथीदार घटनेच्या दिवसापासून फरार आहे. पोलिसा संशयितांच्या मागावर आहे. मात्र अद्याप संशयित मिळून आलेले नाही. शुक्रवारी लोंढे यांच निवासस्थान पाडण्याची नोटीस महापालिकेने दिली होती. कोणताही गुन्हेगार सुटणार नाही- कर्णिक काेणताही गुन्हेगार आता सुटणार नाही. बॅनर, रिल्स व्हायरल करणाऱ्या भाईंविराेधात कठोर कारवाई हाेत आहेच. नागरिकांनीही गुन्हेगारांची माहिती द्यावी, त्यांची नावे गाेपनीय ठेवण्यात येतील, प्रसंगी संरक्षणही दिले जाईल. सध्या क्लिन सिटी माेहीम सुरू आहे. राजकीय वरदहस्त देणाऱ्या आणि घेणाऱ्यांनाही साेडणार नाही. - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये घोटाळे होण्याची शक्यता आणि निवडणूक प्रक्रियेतील आक्षेपांवर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे (मविआ) सर्वपक्षीय शिष्टमंडळ लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. आमच्यासोबत महायुती सरकारमधील नेत्यांनी देखील निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी यावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले. तसेच अजित पवार यांनी बारामतीत जिंकण्यासाठी घोटाळे केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सगळ्यांचेच काही आक्षेप आहेत. काही मतदारसंघात भाजपचे सुद्धा आक्षेप आहेत. स्वत: नितीन गडकरी यांचे काही आक्षेप होते. कामठी, राजुरा यांसारख्या भाजपच्या मतदारसंघामध्ये कसले घोटाळे झालेत, यासंदर्भात काही संशय आणि आरोप झालेले आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्या सरकारमधील दोन इतर सहकाऱ्यांसोबत या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा आणि निवडणूक आयोगाकडे आम्ही करणाऱ्या चर्चेमध्ये सहभागी व्हा. ही आमची स्पष्ट भूमिका आणि कर्तव्य आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणालेत. अजित पवारांनी निवडणूक जिंकण्यासाठी घोटाळे केले मी निवडणूक आयोगाच्या भेटीला जाईल, असे वाटते का? असे अजित पवार म्हणतात, कारण त्यांनी बारामतीत निवडणुका जिंकण्यासाठी घोटाळेच केलेले आहेत. तो मुद्दा समोर येऊ शकतो. रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले. त्यांच्या लोकांनी रात्री अपरात्री बँका कशा उघड्या ठेवल्या? किंवा मतदारयाद्यांमधून संशयास्पदरित्या मतदारांना काढणे आणि वगळणे, लोकसभा आणि विधानसभेत साठ लाख मतदार जे वाढले हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे आणि या चर्चेत अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली. आता सुद्धा काही मतदारयाद्यांसंदर्भात महानगरपालिकेचे आक्षेप आहेत. वॉर्ड रचनेसंदर्भात आक्षेप आहेत. त्या चर्चेत महायुती सरकारमधील नेते सहभागी झाले, तर लोकशाही आणि संविधान अधिक बळकट होईल. पण अजित पवार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फक्त नाव घेतात. त्यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही जे प्रयत्न करत आहोत, त्यात ते सहभागी होत नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. महायुती घोटाळ्याशिवाय जिंकूच शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोटाळा होऊ शकतो म्हणून मविआचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेत आहे, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, घोटाळा होईल की नाही, हा पुढला प्रश्न राहिला. पण राहुल गांधींनी व्होट अधिकार यात्रा आणि व्होट चोरी हा विषय देशभरातील घराघरांत आणि प्रत्येक माणसापर्यंत नेला हे सत्य आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांचे सत्तेतील सहकारी पक्ष हे वेगळ्या मार्गाने काही घोटाळे करू शकतील का? यासंदर्भात आमचाही अभ्यास सुरू आहे. कारण हे घोटाळ्याशिवाय आणि सरळ मार्गाने जिंकूच शकत नाही. लोकशाही मार्गाने पारदर्शक आणि निःपक्ष पद्धतीने निवडणुका घेतल्यास हे जिंकणार नाहीत. निवडणुका निःपक्ष आणि पारदर्शी व्हाव्यात ही लोकशाहीतील महत्त्वाची सगळ्यांची भूमिका असते. आम्ही त्यासाठी भेटत आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. हंबरडा मोर्चाचा परिणाम दिसून येतोय शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभर स्थगिती देण्यात आली, हा आमच्या हंबरडा मोर्चाचाच परिणाम आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनाचा जो उकिरडा करून ठेवला, त्याविरोधात हंबरडा मोर्चा होता. त्यामुळे सरकारला आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांची काळजी घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंनी काल हंबरडा मोर्चातून सरकारला इशारा दिल्यानंतर आता सरकारची पावले पडत आहेत, असे संजय राऊत म्हणालेत. नोव्हेंबरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होईल देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या दिल्ली दौऱ्यानंतर कोणतीही राजकीय उलथापालथ होणार नाही. आता नोव्हेंबर महिन्यात खरी उलथापालथ होईल. सर्वोच्च न्यायालत सुरू असलेला खटल्यातून आम्ही अजूनही अपेक्षा करत आहोत, की न्यायदेवता आम्हाला न्याय देईल. जर आम्हाला न्याय मिळाला, तर नक्कीच राजकीय उलथापालथ होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच आता दिल्लीमध्ये उलथापालथ करण्याइतकी क्षमता आताच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वात नाही, अशी टीका महायुती सरकारवर केली.
हिंगोली जिल्ह्याची नजरी पैसेवारी सरासरी 45.88 पैसे जाहिर झाली आहे. यामध्ये सर्वात कमी पैसेवारी कळमनुरी तालुक्यात 43.96 पैसे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अंतिम पैसे वारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी 3.70 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तुर, हळद या प्रमुख पिकांचा समावेश आहे. जून महिन्यात पिकांची लागवड झाल्यानंतर हंगाम चांगला येईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यानंतर सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांना चांगलाच फटका बसला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे नदी, नाल्या काठची पिके वाहून गेली तर सोयाबीनचे हाती आलेले पिक अतिवृष्टीने हिरावून घेतले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नजरी पैसेवारी किती येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पाचही तालुक्यांची नजरी पैसेवारी जाहिर केली आहे. यामधे जिल्ह्याची सरासरी पैसेवारी 45.88 पैसे आली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्याची पैसेवारी 45 पैसे, सेनगाव 45.47 पैसे, कळमनुरी 43.96 पैसे, वसमत 48 पैसे तर औंढा नागनाथ तालुक्याची पैसेवारी 47 पैसे एवढी आली आहे. सदर पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी आल्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर आता सुधारित व अंतिम पैसे वारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून अंतिम पैसेवारी ता. 15 डिसेंबर रोजी जाहिर केली जाणार आहे.
‘संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात येणार आहे. समितीने उपकेंद्रासाठी योग्य जागेची पाहणी करून सविस्तर आराखडा सादर करावा,’ असे निर्देश वजा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उप केंद्र अकोला येथे सुरू करण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. श्री. पाटील यांनी आराखडा व अन्य कार्यवाहीच्या अनुषंगाने तीन अधिकाऱ्यांच्या समितीकडून अहवाल मागितला आहे. पश्चिम विदर्भात अकोल्यात विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणे सोयीचे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही केंद्रासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र उपकेंद्र सुरु झाले नाही. दरम्यान भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी उपकेंद्र सुरू करण्याच्या निर्णयासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार बैठक झाली. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे क्षेत्र व प्रशासनाचा व्याप लक्षात घेता या विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरु होणे आवश्यक सांगण्यात आले. श्री. पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांना हा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशी सूचना केली. बैठकीत विद्यापीठाअतंर्गत उपकेंद्र येथे का हवे, आमदार सावरकरांनी सांगितले. विद्यापीठा अंतर्गत ४४१ पैकी २२१ ( ५० टक्के ) महाविद्यालये ४५% विद्यार्थी संख्या या ३ जिल्ह्यांत आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील महाविद्यालयाचे अमरावती पर्यंतचे अंतर २०० की.मी. पेक्षा जास्त आहे. ३ जिल्ह्यातील महाविद्यालयाची संख्या, ते अंतर लक्षात घेता वेळ खाऊ ठरत असल्याने महाविद्यालय, विद्यार्थी, पालकांना गैरसोयीचे आहे. हे लक्षात घेता श्री. पाटील यांनी येथे उपकेंद्रसाठी जागा शोधण्याचे निर्देश दिले. हे उपकेंद्र सुरू करण्यासाठी महाविद्यालयाचा शोध घेण्यासाठी सांगितले.
‘अतिवृष्टीमुले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दीड लाखाची मदत देण्यासह अन्य त्यांच्या हक्कांचे लाभ द्यावेत ; अन्यथा १६ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॅकेजच्या शासन निर्णयांची होळी करण्यात येईल,’ असा इशारा शरद जोशी स्थापित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. मुळात शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी ३ ते ४ हजार कोटींचीच तरतूद असल्याचा उर्वरित. पान ४ मुळात ३१, ६२८ कोटींच्या पॅकेजमध्ये एनडीआरए (केंद्र सरकार) ६,१७५ कोटी, ग्रामीण मूलभूत सुविधांसाठी (पूल, इमारतींसह) १० हजार कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे हे पॅकेज शेतकऱ्यांसाठी अल्प असल्याचे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. कोरडवाहू पिकांसाठी गतवर्षी प्रती हेक्टरी १३,६०० तर यंदा मात्र ८५०० रुपये प्रति हेक्टरी देणार आहे. बागायती पिकांसाठी मागील वर्षी ३६ हजार तर यंदा ३२,५०० रुपये देणार आहेत. विहिरी दुरुस्तीची मदत २०१८ मध्ये १ लाख आता मात्र केवळ ३० हजार मिळेल. जमिनी खरवडल्या वरची माती टाकण्याची मदत, रोजगार हमी योजनेच्या आधी पासूनच अस्तित्वातील तरतूदीप्रमाणे असून, काही नवीन नाही, असा दावाही बहाळे यांनी केला. अस्मितेचा मुद्दा पहिल्या शासन निर्णयात नुकसान झालेले अकोला, मूर्तिजापूर तालुके वगळले होते. शेतकरी संघटनेने मूर्तिजापूरला आंदोलन केले. हा मुद्दा लोकप्रतिनिधींचा मदतीचा नव्हे तर अस्मितेचा बनवला, अशी टीका बहाळे यांनी केली. अकोला पूर्व, मूर्तिजापूर हे दोन्ही मतदारसंघ गत दीड पेक्षा जास्त दशकापासून भाजपच्या ताब्यात आहेत.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकात विना परवानगी थाटण्यात आलेल्या मिठाई व फरसाणच्या दुकानांनी अक्षरशः ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाकडून परवानगी न घेता सुरू असलेल्या या अवैध विक्रीकडे प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असून, या दुकानातील मिठाई आणि फराळाच्या पदार्थांच्या नमुन्याची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे डास-माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, रस्त्यावरची धूळ, अस्वच्छता, सांडपाणी याचा थेट परिणाम विक्रीसाठी मांडण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थावर होत आहे. या पदार्थांची निर्मिती नेमक्या कुठल्या प्रतीच्या साहित्यामध्ये होते, तेल व साखरेची गुणवत्ता काय आहे? स्वच्छतेचे नियम पाळले जातात का, याबाबत कुणीही शहानिशा करत नाही. उलट देशी घी व शुद्धतेचे ढोल बडवत विक्रेत्यांकडून ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, परंपरागत घरगुती करंजी, चकल्या, शंकरपाळे, अनारसे यांची परंपरा लोप पावत असल्याने नागरिक बाहेरून मिठाई-फरसाण खरेदीकडे वळले आहेत. या सवयीचा गैरफायदा घेत काही भेसळखोर व कॅटरिंग व्यावसायिकांनी दर्शनीय भागात दुकाने थाटून मोठ्या प्रमाणावर कमाई सुरू केली आहे. शहरात या भागात उभारली तात्पुरती दुकाने शहरातील प्रमुख चौकांमध्ये दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फरसाण व मिठाईची तात्पुरती दुकाने थाटण्यात आली असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. शहरातील रतनलाल प्लॉट, जठारपेठ चौक, जनता भाजी बाजार परिसर, सिंधी कॅम्प, कौलखेड चौक, तुकाराम चौक, इन्कम टॅक्स चौक, दुर्गा चौक, गांधी रोड, टिळक रोड, जय हिंद चौक, खारीबावडीसह अनेक ठिकाणी दुकाने उभारण्यात आली आहेत. तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई परवानगीशिवाय खाद्यपेय व्यवसाय करणे बेकायदेशीर असून, अशा व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. वार्षिक शंभर रुपये भरून कायदेशीर परवाना घेता येतो. मात्र, नियमांना फाटा देणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच मिठाई,खवा वा तत्सम फराळाच्या खाद्य पदार्थाबाबत भेसळीची तक्रार आल्यास संबंधित दुकानांवर कारवाई केली जाणार आहे, अशी प्रतिक्रीया अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी दिली.
कौलखेड चौकातून व व्याळा येथून गायींना कारमध्ये कोंबून चोरून नेण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला असता पोलिसांनी मुक्ताईनगर येथून सात आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून पोलिसांनी ती कार सह १६ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २८ सप्टेंबरला पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान कौलखेड चौकातील गजानन महाराज मंदिर परिसरातून अज्ञात व्यक्तींनी कारचा वापर करून गायीची चोरी केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याच रात्री बाळापूर ठाणे हद्दीत व्याळा परिसरात पांढरी गाय दोरीने बांधलेली असताना चोरी केली. या दोन्ही घटनांची नोंद अनुक्रमे खदान, बाळापूर पोलिस ठाण्यात केली होती. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी विशेष पथक गठीत केले. सपोनि. गोपाल ढोले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला.तपासादरम्यान आरोपी राजस्थान राज्यातील अजमेर येथे लपल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत सापळा रचला. तपास पथकाने मुक्ताईनगर बसस्थानक येथे सापळा लावून चार मुख्य आरोपींना पकडले. शेख रेहान शेख रशीद (२२, पिंजारी गल्ली), मिर्झा शोएब बेग उर्फ मिर्झा अझहर बेग (२८, अकोट फैल), शेख समीर शब्बीर उर्फ मलंग (२४, अकोट फैल), अरबाज खान फिरोज (२३, हैदरपुरा, सिंधी कॅम्प, अकोला.) या चौघांनी चौकशीत दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या नुरेश खान बहाद्दर खान (३४, मोहम्मद अली रोड, मोमीनपुरा), शेख याकुब शेख इल्यास (२३, पिंजारी गल्ली), शोएब खान शब्बीर खान (२१, इंदिरा नगर, अकोट फैल यांना अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलिस अधीक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, स.पो.नि. गोपाल ढोले, पीएसआय गोपाल जाधव, माजीद पठाण, विजय चव्हाण, विष्णु बोडखे, आणि अंमलदार शेख हसन, अब्दुल माजीद, किशोर सोनोने, एजाज अहमद, महेंद्र गलिये, रवी खंडारे, उमेश पराये, श्रीकांत पातोंड, राज चंदेल, सतीश पवार, अशोक सोनवणे, धीरज वानखडे, अभिषेक पाठक, अमोल दीपके, स्वप्नील खेडकर, राहूल गायकवाड आदींनी केली. पंकज गावंडेंकडून पोलिसांचे अभिनंदन : कौलखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी नगरसेवक पंकज गावंडे यांनी पोलिसांनी गायी चोरांना पकडल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेत जावून पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन कौलखेडवासीयांतर्फे सत्कार केला. ज्या पद्धतीने पोलिसांनी गोवंश चोरांना पकडले त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गोवंश चोरणाऱ्या आरोपींना अटक करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी १५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळकेंना यापूर्वीही अनेकदा तपासा साठी बक्षीस जाहीर झाले आहेत. ११ गुन्ह्यांचा उलगडा चौकशीतून समोर आले की आरोपींचा गोवंश चोरी संबंधित अनेक जिल्ह्यांत सहभाग होता. त्यांच्यावर खदान, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, अकोट फैल, बाळापूरसह ११ गुन्हे दाखल आहेत.
राष्ट्रीय कृषी विज्ञान परिसर नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री धन-धान्य कृषि योजना व कडधान्य आत्मनिर्भरता मिशनसह कृषि पायाभूत सुविधा निधीसह विविध प्रकल्पांचे उदघाटन, पायाभरणी झाली. कार्यक्रमाचे प्रक्षेपण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात शनिवारी झाले. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हास्तरीय उमेद अभियान व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त सहकार्याने रब्बी-उन्हाळी हंगाम नियोजनाबाबत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम झाला. व्यावसायिक शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा अवलंबच देशाला आत्मनिर्भरतेकडे अग्रेसीत करणारा आहे, असे विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, आमदार अमोल मिटकरी म्हणाले. शेती विषयक समस्यांचे समाधान करण्यासाठी कृषि विद्यापीठ तत्पर असल्याचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा, जिल्हास्तरीय उमेद अभियान व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्यातून मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. मिटकरी यांनी कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित पिकवाण उत्पादन तंत्रज्ञान, यंत्र अवजारांचा काटेकोर वापर काळाची गरज आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाला विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ.सुरेंद्र काळबांडे, वनविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश हरणे, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ. मुरली इंगळे,पाणी फाउंडेशनचे संघपाल वाघहूरवाघ आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती दिली. कीड, रोग व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन तांत्रिक सत्रात रब्बी, उन्हाळी हंगामातील पिकांचे लागवड तंत्रज्ञान विषयावर शास्त्रज्ञांनी सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले त्यात रब्बीतील कीड, रोग व्यवस्थापन या वर सहयोगी संशोधन संचालक डॉ.अजय सदावर्ते, तेलवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान यावर तेलबिया संशोधन विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.संतोष गहूकर, डाळवर्गीय पिकांचे लागवड तंत्रज्ञान यावर कडधान्य संशोधन विभागाच्या शास्त्रज्ञ डॉ. अर्चना थोरात, गहू लागवड तंत्रज्ञान या वर गहू संशोधन विभागाचे डॉ. संदीप पाटील, रब्बी हंगामातील पिकांमधील रोग नियंत्रण यावर वनस्पती रोग शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर यांनी मार्गदर्शन केले.
आपल्या शहरांमध्ये असलेल्या शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये माहिती अधिकाराची कोणत्या प्रकारे अंमलबजावणी होते. याचे प्रकल्प लेखन आपण केले पाहिजे व माहिती अधिकाराची स्थिती आपण तपासली पाहिजे, असे आवाहन प्रा. संगीता वायचाळ यांनी केले. विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय , खामगाव येथे राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजित माहिती अधिकार सप्ताह निमित्ताने महाविद्यालयातील संस्कृत विषयाच्या प्रा. संगीता वायचाळ यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर, व्याख्याते प्रा. उमेश खंदारे, प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, उर्दू विभाग प्रमुख तथा अध्यक्ष उर्दू अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख , त्याचबरोबर माहिती अधिकार सप्ताहाचे संयोजक प्रा. बी. एम टकले उपस्थित होते. यावेळी प्रा. खंदारे यांनी माहिती अधिकार अधिनियम २००५ पार्श्वभूमी व सद्यस्थिती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून कायद्याच्या संदर्भातील व त्यामधील विविध कलमावर भाष्य करून सद्यस्थितीला कायदा कोणत्या स्वरूपामध्ये वापरला जातो या बाबीवर प्रामुख्याने प्रकाश टाकला. मराठी विभागाचे प्रा. विक्रम मोरे, प्रा. दत्तात्रेय भुतेकर, इतिहास विभागाचे प्रा. रवी ढाकणे, प्रा. बाणाईत, प्रा. वाघमारे, तत्त्वज्ञान विभागाच्या प्रा. पुनम तिवारी मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी वैष्णवी जवळकार हिने केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी शारदा आखरे हिने आभार मानले. अनुदान आयोगासंदर्भात माहिती यावेळी प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना माहिती अधिकार संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने होते व त्या संदर्भातील तक्रार कोठे करतात याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ यांनी देखील मार्गदर्शन केले या सप्ताहामध्ये घेतल्या गेलेल्या स्पर्धेचा निकाल प्रा घोराळे मॅडम यांनी घोषित केला. स्पर्धेतील बक्षीस विजेते ज्यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा दि ६ ऑक्टोंबर रोजी घेण्यात आली होती त्यात अनुक्रमे, प्रथम - सय्यद सैफ सय्यद मुजीब ( एम ए प्रथम वर्षं अर्थशास्त्र), द्वितीय - प्रतीक राजेश तायडे ( बीए ३), तृतीय - यशकुमार विश्वनाथ फुलकर (बीए ३) या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. त्याच बरोबर दि ७ ऑक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या सक्षम लोकशाहीसाठी माहिती अधिकाराची उपयुक्तता या विषयावरील निबंधासाठी अनुक्रमे,प्रथम - खुशी सुनील हिवराळे (बीए १ ), द्वितीय - प्रतीक राजेश तायडे ( बीए ३), तृतीय - शारदा राजेश आखरे (बीए १) या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
तिवसा जगाला मानव धर्माची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त देश-विदेशातून आलेल्या लाखो अनुयायांनी शनिवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी नि:शब्द होत त्यांना मौन श्रद्धांजली वाहिली. या वेळी गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंतांच्या प्रतिमेभोवती चहूबाजूंनी भाविकांची मांदियाळी दिसून आली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. शिवाय गुरुदेव विचार प्रणालीचे परदेशातील अभ्यासकही हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झाले होते. कार्यक्रमाला खा. डॉ अनिल बोंडे, खा. बळवंत वानखडे, आ. राजेश वानखडे, गजानन लेवटे व प्रताप अडसड, माजी खासदार नवनीत राणा, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष जनार्दन बोथे गुरुजी, पुष्पाताई बोंडे, प्रा. दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी गडकरी यांनी स्वत: सामुदायिक प्रार्थनेत सहभाग घेऊन ध्यान तसेच आरती केली. गेल्या ५६ वर्षांपासून अविरतपणे राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केल्या जाते. ‘मज वेडची गुरुकुंजाचे। आवडतो मज कण कण तिथला।’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे राज्याच्या विविध भागातून पालख्या, दिंड्या पताकासह लाखो विचारप्रवाहक ‘श्रीगुरुदेव की जय, श्रीगुरुदेव की जय’ असा जयघोष करत होते. त्याचवेळी खंजिरी भजन व टाळ मृदंगासह हरिनामाचा गजर करत सर्वधर्म समभावाचे प्रतिकही निर्माण झाले होते. ‘गुरुदेव ऐसी हो दया, जगका अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभासे, दंभ सारे चूर हो, अध्यात्म और विज्ञान के संयोगसे सब हो सुखी। संयोग समतासे यही सृष्टी करे हम स्वर्ग की।’ अशी भजनेही यावेळी म्हटल्या गेली. मौन श्रद्धांजलीच्या मुख्य कार्यक्रमाला दुपारी ३ वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा’ या अर्चनागीताने सुरुवात करण्यात आली. या वेळी राष्ट्रसंतांच्या भव्यदिव्य विश्वव्यापक कार्याची माहिती शब्द सुरांच्या माध्यमातून लाखो जनसमुदायाला करून दिल्या गेली. यात ‘लढ जायेंगे बढ जायेंगे हम हिम्मत के साथ’, ‘तुझे पाय साक्ष आहे, लाखो अनुयायांनी उपस्थित राहून शिस्तबद्धरीत्या एकाचवेळी मौन श्रद्धांजली अर्पण करण्याचा देशभरातील कदाचित हा पहिलाच कार्यक्रम आहे. दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाची यापूर्वीही अनेक थोर व्यक्तींनी प्रशंसा केली असू, यंदाच्या मौन श्रद्धांजलीबद्दलही तशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. नारायण जरा भेटीविन शांती नाही’, इत्यादी भजने म्हटली गेली. दरम्यान महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद होताच ठिक ४ वाजून ५८ मिनिटांनी शिस्तबद्धरितीने लाखो गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधी स्थळाच्या दिशेने हात जोडून श्रद्धांजली अर्पण केली. तत्पूर्वी काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबवून यात्रेतील दुकाने, भोंगे काही वेळाकरिता बंद करण्यात आले होते. त्यामुळे मौन श्रद्धांजलीच्या वेळी सर्वत्र निरव शांतता पसरली होती. मौन श्रद्धांजली स्थळी तबला, पेटी, शंख नाद या पारंपारिक वाद्यांसह सर्वधर्मीयांच्या प्रार्थना सामूहिकरीत्या म्हणण्यात आल्या. डॉ. तिवारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनपट यावेळी कथन केला. तारखेचा योग पुन्हा जुळून आला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण मराठी पंचांगानुसार आश्विन वद्य पंचमीला (इंग्रजी दिनदर्शिकेनुसार शुक्रवार, ११ ऑक्टोबर १९६८ रोजी) सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे आजही तीच तारीख आहे. हा योगायोगाकडेही गुरुदेवभक्तांनी लक्ष वेधले.
वेध दिवाळीचे:राजस्थानी पणत्या उजळवणार अंगण, शहरात 5 लाख पणत्या विक्रीसाठी; 20% दरवाढ
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून अमरावती शहरात पणत्या विक्रेते दाखल झाले आहे. तब्बल ५ लाख पणत्या विक्रीसाठी आल्या आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पणत्यांच्या दरात २० टक्के वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दिवाळी व पणत्या हे समीकरण घट्ट आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात पणत्या विक्रेते दाखल झाले आहेत. शहरातील अंबादेवी रोड, रेल्वे स्टेशन रोड, राजकमल, इतवारा आणि प्रमुख भागात विक्रेत्यांनी पणत्यांची दुकाने थाटली आहेत. बाजारात ३० ते ६० रुपये डझन दराने पणत्या विक्री होत आहे. दरवर्षीपेक्षा यंदा सुमारे २० टक्के दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मातीचे वाढलेले दर आणि वाहतूक खर्च वाढल्याने दरवाढ झाली. बाजारात मेण भरलेल्या पणत्या आणि तुळशी वृंदावनाच्या आकारातील दिवे ग्राहकांना आकर्षित करता आहे. लहान दिवे १० रुपयांपासून तर मोठे दिवे २० ते ३० रुपये दराने विक्रीस आहे. रेडिमेड मेणाच्या पणत्या १०० रुपये डझन असून, या पणत्यांकडे ग्राहकांचा ओढा वाढला आहे. तसेच कंदिलाच्या आकारातील दिवेही विक्रीस आले आहेत. ते २०० रुपयांपासून पुढे विक्रीसाठी आहे. यंदा बाजारपेठेत ५० लाखांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. मोची गल्ली परिसरात विक्रीकरिता आलेल्या पणत्या खरेदी करताना ग्राहक. शहरातील विविध भागात २५० पेक्षा अधिक विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून, ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांची खरेदीसाठी त्यांच्याकडे गर्दी होते आहे. अंबादेवी रोडवरील दुकाने आणि फुटपाथवरील विक्रेत्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. विशेष करून सायंकाळच्या वेळेस पणत्यांसह दिवाळीकरिता वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. शहरात २५० हून अधिक विक्रेते; खरेदीला वेग
दर्यापुरात श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सव थाटात
ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ सेवा संस्थान, दर्यापूरच्या वतीने श्री साईबाबांची १०७ वा पुण्यतिथी महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गायगोले यांच्या मार्गदर्शनात विश्वस्त मंडळ, परिसरातील साईभक्त तथा दानदाते यांच्या सहकार्याने साईबाबा सप्ताह पार पडला. या महोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक रोशनाई करण्यात आली होती. दरम्यान, साईबाबा पुण्यतिथी महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी साईबाबांची महाआरती पार पडली. या वेळी आ. गजानन लवटे, बाजार समिती सभापती सुनील गावंडे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश कावडकर, बबनराव व्हिल्हेकर, गोपाल अग्रवाल, नीलेश पारडे आदी उपस्थित होते. महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. एक हजारापेक्षा जास्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रांगोळी कलाकार सतीश वानखडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुंदर महारांगोळीचे रेखाटन केले होते. पुण्यतिथी महोत्सव आयोजनासाठी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ सेवा संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्यगण व साईबाबाप्रेमींनी अथक परिश्रम घेतले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग साईबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवा दरम्यान साई मंदिरात सामाजिक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा स्वयंपाक ते पंगती वाढण्यासाठी महिला भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला आहे. एकंदरीतच भक्तिमय वातावरण असल्याचे चित्र होते. तसेच नगर पालिका प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.
प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांनी विस्तृत साहित्य विवेचन केलेले आहे. त्यांनी १३० पुस्तकाच्या माध्यमातून समाजाच्या विविध भागावर सूक्ष्म पद्धतीने प्रकाश टाकला आहे. त्यांचे ज्ञान हे नवीन पिढीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांचे जतन करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथे समदृष्टी, क्षमता विकास आणि संशोधन मंडळ आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थान तर्फे दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. संत गुलाबराव महाराज यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख, सक्षमचे अध्यक्ष विजयसिंह मोहता, संत गुलाबराव महाराज संस्थानचे अध्यक्ष अरविंद मोहोड, सचिव साहेबराव मोहोड, जयप्रकाश गिल्डा उपस्थित होते. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की बालपणापासून अंध असलेल्या संत गुलाबराव महाराजांनी जगाला आश्चर्यचकित करेल अशी साहित्य निर्मिती केली आहे. जन्माने अंध असले तरी, त्यांच्या साहित्य निर्मितीमुळे माधान ही संदेश देणारी भूमी झाली आहे. त्यांच्या जीवनातून अडचणींवर मात करून समाजासाठी ज्ञानाचे भांडार निर्माण होते, हे सिद्ध केले आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. आज ज्ञानेश्वरीने ज्ञानाचे भांडार आणि अभ्यासक निर्माण केले आहे. त्याच प्रकारचे अभ्यासक निर्माण करण्याची क्षमता प्रज्ञाचक्षूंच्या ज्ञानात निर्माण झाली आहे. यासाठी संतांनी दिलेले ज्ञान जतन करणे आवश्यक आहे. चांदूर बाजार आणि परिसरात संत्र्याच्या उत्पन्नातही स्पेन आणि इस्रायलच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. ज्ञानाचा उपयोग परिवर्तनामुळे कशा पद्धतीने शक्य आहे, याचे उदाहरण यातून दिसून आलेले आहे. त्यामुळे प्रज्ञाचक्षूंच्या १३० पुस्तकांचे जतन संस्थानकडून व्हावे. यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करावा, त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री नितीन गडकरी यांनी चांदूर बाजार येथील संत श्री गुलाबराव महाराज संस्थानाला भेट देऊन दर्शन घेतले. संस्थानच्या वतीने गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते पहिला ज्ञानेशकन्या पुरस्कार अमरावती येथील दृष्टीबाधित संघाला प्रदान करण्यात आला. सक्षमच्या वतीने दिव्यांग बांधवांना दृष्टीकाठीचे वाटप करण्यात आले. सक्षमच्या दुसऱ्या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. प्रथम ज्ञानेशकन्या पुरस्कार पटकावला अंबानगरीने
पोहरा पूर्णा येथे रोगनिदान:उपचार शिबिरास प्रतिसाद
भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा ग्रामपंचायततर्फे मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी योजनेच्या उद्दिष्टांनुसार आरोग्यदायी गाव घडवण्याच्या हेतूने ग्रामपंचायत सभागृहात रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे आयोजन युवा सरपंच गजानन लांजेवार यांच्या पुढाकाराने व डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेद रुग्णालय व अनुसंधान केंद्र, अमरावती यांच्या सहकार्याने केले होते. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या शिबिरात गावातील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वैद्यकीय चमूतील डॉ. भूषण रघुवंशी, डॉ. सचिन इंगळे, डॉ. समृद्धी लाडे, डॉ. मुसाफ शेख, डॉ. गुंजन नागदेवते, पूनम वाकोडे, पायल खैरकार, सचिन धामणकर, देवानंद खारोकर आणि गुड्डू यांनी ग्रामस्थांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार दिले. तसेच काही दुर्धर आजारांच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्याची जबाबदारीही रुग्णालयाने स्वीकारली. शिबिरासाठी टाकरखेडा संभूचे उपसरपंच प्रदीप शेंडे, ग्रा.पं. सदस्य, अंगणवाडी सेविका अस्मिता नेतनराव, नंदकिशोर राऊत, स्वप्निल बोबडे, सुनील कांबळे आदींनी प्रयत्न केले. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांना आरोग्यविषयक सेवा गावातच उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची दाहकता इतकी भीषण आहे की शेतकऱ्यांना आपले अश्रू अनावर झाले असून काहींनी या संकटाला कंटाळून आपले जीवन संपविले. अशातच राज्य सरकारने मदत घोषित केली. परंतु ही मदत म्हणजे एकप्रकारची थट्टा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात मदत दिली जावी, यासाठी येथील शेतकऱ्यांनी तिवस्याच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनाच्या शेवटी तहसीलदारांना साकडे घातले आहे. त्यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख दिलीपराव केने, पंचायत समितीचे माजी सभापती विलास माहुरे, शहरप्रमुख देविदास निकाळजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्रातील नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच या आपत्तीने हिसकावून घेतला. मुख्य चौकातून तहसील कार्यालया पर्यन्त काढलेल्या मोर्चानंतर माहूरे यांच्या नेतृत्वातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. मयुर खडसे यांना देण्यात आले. मोर्चात अनिल कायंदे, सुभाष केवलकर, सागर रावणकर, किसनराव इंगोले, राहुल केनेकर, राजू सुलताने, देवीदास राऊत, नीलेश बोके, मनोज बोके, जानराव अवघड, गजानन बळकस, महादेव भुसाटे, विनोद गुल्हाने, आशिष माहोरे, देविदास ढोणे, वसंत चौधरी, आकाश माहूरे, विनोद ढोणे, रामदास निवल, देवराव माहूरे, जयकांत माहोरे, अंकुश खारकर, भूषण हरणे, राजेंद्र कांडलकर, गिरिधर राठोड यांच्यासह अनेक शेतकरी, शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, कुठल्याच जाचक अटी न लावता विमा कंपन्यांनी विम्याचे पैेसे द्यावे अतिवृष्टीमुळे घरांचे सोबतच जनावरांचे प्रचंड नुकसान झाले त्याचे कठीण निकष न लावता तात्काळ पंचनामे करून नागरिकांना मदत द्यावी इ. मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. जाहिरातीतून शेतकऱ्यांची दिशाभूल अनेकांच्या शेत जमिनी अक्षरशः खरडून गेल्या.एकीकडे शेत जमिनीचे हे विदारक चित्र असताना सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत नुसती जाहिरातबाजी करून फक्त शेतकऱ्यांनी दिशाभूल करीत असल्याची भावना या सर्वांनी व्यक्त केल्या. दरम्यान शेतकऱ्यांना भरघोस मदत न दिल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारेल आणि सरकार विरूद्ध मोठे आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला.
यादीत भातकुली तालुका समावेशाची मागणी:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निवेदन
अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे भातकुली तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहेत. अशाच जिल्ह्यातील मदतीच्या यादीतून शासनाने भातकुली तालुका वगळला आहे. त्यामुळे तालुका समाविष्ट करण्यात यावा. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे भातकुली तालुक्यातील तूर, सोयाबीन, कपानी, व फळ पीक या सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. व जमिनी पूर्णतः खरडून निघाल्या आहेत. प्रशासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनाना पाठवले. परंतु, शासनाच्या जीआर मधून भातकुली तालुका वगळला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झालीने. कधीही या शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो. यावेळी कायदा व सुव्यवस्थेची परीस्थीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रकरणाची तत्काळ दखल घेवून सदर भातकुली तालुका मदतीच्या यादी मध्ये समाविष्ट करून नवीन जीआर काढावा. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, जिल्हाध्यक्ष अमित अढावू, स्वप्नील कोठे आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेकडो आंबेडकरी महिलांनी जिल्हा कचेरीवर धडक:अमरावती येथील आंबेडकरी महिलांची जिल्हा कचेरीवर धडक
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याबद्दल वकील राकेश किशोर यांच्यावर प्रतिबंधात्मक फौजदारी कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या लद्दाख या केंद्रशासित प्रदेशातील सोनम वांगचुक यांची सुटका करण्यात यावी. या मागणीला घेऊन शुक्रवारी आंबेडकरी महिला संघटनेच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी दोन्ही घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच केंद्र शासन विरोधात तीव्र नारेबाजी ही करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर बूट फेकला. हे अत्यंत दुर्दैवी, दुर्दैवी, अहंकारी कृत्य आहे. जे सर्वोच्च न्यायालयाचे वकील राकेश किशोर यांनी कोणतेही ठोस कारण नसताना जाणूनबुजून केले आहे. तसेच हे संवैधानिक मूल्यांवर आणि न्यायिक स्वातंत्र्यावर, न्याय व्यवस्थेच्या पावित्र्यावर थेट हल्ला आहे. ज्यामुळे न्याय वितरण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होतो. तसेच हा लोकशाही मूल्यावरही हल्ला आहे. तसेच बी.आर. गवई, सी.जे.आय. यांच्या या हल्ल्यामागे खोलवर रुजलेले कट असून आणि काही लपलेले विकृत मन असू शकते. असा आरोपही यावेळी आंबेडकरी महिलांनी केला आहे. हा जाणूनबुजून हल्ल्याचा हा प्रयत्न केला आहे. या निंदनीय आणि घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. राकेश किशोरवर कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच शिक्षण सुधारक, हवामान कार्यकर्त्या आणि तंत्रज्ञान संशोधक सोनम वांगचुक यांची सुटका करण्याची मागणीही केली आहे.