SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

23    C
... ...View News by News Source

बिबट्याची दहशत !:शाळा बंद, ठार करण्यासाठी दिला प्रस्ताव

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन आठवड्यात बिबट्याकडून झालेल्या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनांमुळे जिल्हाभरात बिबट्याची दहशत पसरली आहे. शेती करणे अवघड झाले आहे. आता विद्यार्थ्यांनाही पालक शाळेत पाठवत नाहीत. त्यामुळे अहिल्यानगर तालुक्यात इसळक, निंबळक, कर्जुने-खारे या भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या भागातील नरभक्षक बिबट्याला ठार करावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी निंबळक येथे अहिल्यानगर बायपास मार्गावर शनिवारी रास्ता रोको आंदोलन केले. वनविभागाने लेखी आदेश घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील टाकळी खातगाव, यसगाव या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात दोन मृत्यू झाले. त्यानंतर कर्जुने खारे येथे एका चिमुरडीचा हल्ल्यात मृत्यू झाला. या घटना दिवसेंदिवस वाढत असून, शुक्रवारी सायंकाळी इसळक शिवारात नऊ वर्षीय मुलावर हल्ला केला. रात्रीचा वीजपुरवठा असलेल्या ठिकाणी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. तर घटना घडलेल्या पंचक्रोशीत शाळा तीन दिवसांपासून बंद आहेत. संतप्त नागरिकांकडून बिबट्याला मारून टाका, अशी मागणी होत आहे. अहिल्यानगर शहर बायपास महामार्ग ग्रामस्थांनी अडवून धरत, जोरदार घोषणाबाजी केली. बिबट्याला ठार करण्याचे लेखी द्या, अशी मागणी लावून धरली. त्यावर उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी मुख्य वनरंसक्षक नाशिक यांना पत्र पाठवून, जेरबंद अथवा बेशुद्ध करून पकडणे अथवा ठार करणे, अथवा त्याला ठार करण्याची परवानगी मागितली. ही परवानगी सायंकाळी पाच पर्यंत येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. परंतू, उशिरापर्यंत वनविभागाकडून खुलासा न आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतीला पाणी कसे द्यायचे ? बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळावी यासाठी आम्ही बायपासवर सकाळी ११ वाजेपासून आंदोलन केले. या परिसरात सात ते आठ बिबटे असू शकतात. कर्जुने-खारे, इसळक, निंबळक, हिंगणगाव, हमीदपूर भागात दहशत आहे. रात्रीची वीज असून गव्हाला पाणी द्यावे लागते. पण बिबट्याचा उपद्रव वाढल्याने पाणी कसे द्यायचे असा प्रश्न आहे. तसेच शाळाही बंद ठेवल्या आहेत. -अंकूश शेळके, माजी उपसरपंच, कर्जुने-खारे. कर्जुने खारे व इसळक शिवारातील नरभक्षक बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी दोन तासांहून अधिकवेळ बाह्यवळण रस्ता अडवला. वनविभागाने त्या बिबट्याला ठार करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यावर बिबट्याला ठार करण्याचा प्रस्ताव नाशिक येथील मुख्य वनसंरक्षकांना पाठवल्याचे सांगण्यात आले. कैलास लांडे म्हणाले, आंदोलन सोडवण्यापुरतेच वनविभागाने आश्वासन दिले. नंतर फोनही उचलत नाहीत. रविवारी ग्रामस्थ चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:22 am

शफेपूरमध्ये 19 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर, वडिलांचे काही महिन्यांपूर्वी झाले निधन, मोठ्या भावानेही केली होती आत्महत्या‎

कन्नड तालुक्यातील पिशोर येथील शफेपूर येथे राहत्या घरात १९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उशिरा रात्री उघडकीस आली. मनोज तुकाराम मोकासे (१९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पिशोर पोलिस ठाण्याचे बीट जमादार वसंत पाटील, दत्तू लोखंडे व विजय भोटकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत्यूची खात्री केल्यानंतर डॉक्टर बनसोडे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. शनिवार सकाळी शफेपूर येथील स्थानिक स्मशानभूमीत मनोजच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत मनोजच्या कुटुंबावर गेल्या काही काळापासून दुःखांचे सावट होते. सुमारे वर्षभरापूर्वी मनोजचे वडील हरिभाऊ मोकासे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मोठ्या भावानेही गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली होती. आता एकुलता एक आधारस्तंभ असलेल्या मनोजनेही आत्महत्या केल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पिशोर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सपोनि शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्तू लोखंडे व वसंत पाटील पुढील तपास करीत आहेत. दरम्यान आईला एकमेव असणाऱ्या मुलाचा आधारही गेल्या पिशोर परिसरातील ग्रामस्थांत, नातवाईकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:20 am

25 वर्षीय विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:पाचोडमधील कल्याणनगर येथील घटना, पोलिसांत नाेंद‎

पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याणनगर भागात राहणाऱ्या आकाश सोमनाथ शेळके या २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. आकाशचे आई-वडील मागील महिन्यात ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले होते. पत्नी काही दिवसांपासून माहेरी होती. त्यामुळे तो मानसिक तणावात होता. शुक्रवारी रात्री उशिरा जेवण करून तो झोपला. शनिवारी सकाळी त्याचे घर उघडले गेले नाही. त्यामुळे त्याच्या मावसभावाने घर उघडून पाहिले. त्या वेळी आकाशने पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने आरडाओरड केली. नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ ११२ वर फोन करून माहिती दिली. बीट जमादार अण्णासाहेब गव्हाणे यांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने आकाशला खाली उतरवले. त्याला पाचोड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. संदिपान काळे यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:19 am

खंडाळा परिसरात बिबट्याच्या दहशतीने 170 विद्यार्थ्यांची दांडी:पुन्हा दिसल्यावर पिंजरा लावू असे म्हणत वन विभागाची टोलवाटोलवी‎

खंडाळा खंडाळ्यात बिबट्याच्या दहशतीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली असून शेतकऱ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात काम करणेदेखील टाळले जात असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. किरण सोनवणे यांच्या मक्याच्या शेतात १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २:०० वाजेच्या दरम्यान बिबट्या दिसून आला होता. येथील दाट झाडीत कालपासून लपून बसला असताना यावर वन विभागाने उपाययोजना करणे अपेक्षित होते. परंतु वन विभागाचे कर्मचारी पहिल्या दिवशी पाहणी करून गेले. त्यानंतर सध्या काय परिस्थिती आहे याचा खुलासादेखील घेतला नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतरच वन विभाग कारवाई करेल की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या खंडाळा परिसरात बहुतांश ठिकाणच्या शेतामध्ये मका काढणे, तसेच रब्बी पिकासाठी शेतीची मशागत व लागवड सुरू असताना बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे करणे थांबले जात आहे. काल बिबट्या दिसल्यापासून घरातील सर्वच सदस्य भयभीत झाले आहेत. वस्तीपासून असलेल्या हाकेच्या अंतरावरील झुडपामध्ये कालपासून बिबट्या लपून बसला आहे. कारण या परिसरात डुकरांचा संचारदेखील मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून तो ही जागा सोडणार नाही. वन विभागाने त्याला हाकलून तरी द्यावे, नसता पकडून घेऊन जावे, अशी मागणी शेतकरी किरण सोनवणे यांनी दिली आहे. या झुडपात बिबट्या लपला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. ^एका जागेवर बिबट जास्त वेळ थांबत नाही. परिसरात बिबट्या आढळल्यास त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावू. बिबट जर ती जागा सोडत नसेल व वारंवार नागरिकांना त्या परिसरात दिसत असेल तर वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेतात जातना सावधानतेने जावे. -आस्मा सय्यद, वनरक्षक जंगल परिसरात संचार करणारे बिबटे मानवी वस्तीत येऊन धुमाकूळ घालत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेला वन विभाग यावर उपाययोजना करण्यास अपयशी ठरत आहे मात्र शेतकरी व ग्रामस्थांची बिबट्याच्या दहशतीने मात्र झोप उडाली आहे. मागील महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी खंडाळ्यातील ७११ गट नंबर क्षेत्रामधील कचरू जेजुरकर यांच्या शेतातील गोठ्याजवळ बिबट्याने हरिणीची शिकार करून तुरीच्या शेतात ओढत घेऊन गेला असल्याचे बघावयास मिळाले. या वेळी वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी येऊन अर्धवट शिकार सोडलेल्या हरणाची विल्हेवाट लावली. त्यानंतर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. { खंडाळा येथील जिल्हा परिषद प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीची एकूण ४३५ विद्यार्थी संख्या असून बिबट्याच्या दहशतीने शनिवारी शेतवस्तीसह गावातील १७० पेक्षा अधिक विद्यार्थी शाळेत आलेच नाही. अशी माहिती जि. प. शाळेचे मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख यांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:18 am

माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा:शासन निर्णयानुसार झाली माजी विद्यार्थी संघाची स्थापना‎

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शुक्रवारी उत्साहात पार पडला. गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे आणि केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. शासन निर्णयानुसार माजी विद्यार्थी संघाची स्थापना यावेळी करण्यात आली. अनेकांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपयुक्त वस्तू भेट दिल्या. अॅड. राजेश गिरी यांनी संगणक दिला. अनिल मानकर, रवींद्र काळे आणि मापारी यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी आर्थिक मदत दिली. कृषिभूषण अरुण सोहनी यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस जाहीर केले. तिरुपती पतसंस्थेने आर्थिक मदत दिली. व्यापारी प्रमोद रावणे यांनी दहा डस्टबिन दिले. गणेश आगे यांनी एक मोठा डस्टबिन दिला. भास्कर चौधरी यांनी शैक्षणिक साहित्य जाहीर केले. शासन निर्णयाची अंमलबजावणी शिक्षिका मंगला बोरसे, मुख्याध्यापक किरण पाटील आणि शिक्षक रामचंद्र महाकाळ यांनी केली. कार्यक्रमास गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड, केंद्रप्रमुख फिरोज तडवी, ॲड. राजेश गिरी, प्रा. अनिल मानकर, बाळूभाऊ बोरसे, नगरसेवक राजेंद्र दुतोडे, अण्णा वाघ, मंगेश सोहनी, योगेश पाटील, विजय कदम, बाबू शहा, दत्तू काटोले, दिलीप चौधरी, भास्कर कोरडे, विवेक महाजन, अंकुश पगारे, रामेश्वर शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल सादिक तडवी यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशासाठी मुख्याध्यापक किरणकुमार पाटील, सुरेखा चौधरी, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, गणेश बाविस्कर, प्रतिभा कोळी, अंकुश काळे, विकार शेख, बी. वाय. बागवान आणि शुभम देसले यांनी मेहनत घेतली. माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी अध्यक्षपदी रवींद्र पंडित काळे, उपाध्यक्ष मंगेशभाऊ सोहनी, कार्याध्यक्ष अनिल मानकर, सहकार्याध्यक्ष बाबूशहा तुराबशहा यांची निवड झाली. सदस्य म्हणून अॅड. राजेश गिरी, अॅड. योगेश पाटील, कृषिभूषण अरुण सोहनी, बाळू बोरसे, दत्तू काटोले, रवी काटोले, अंकुश पगारे, विजय कदम, भास्कर कोरडे, दिलीप चौधरी आणि योगेश नागपुरे यांची निवड झाली.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:18 am

पालकांची सेवा हेच आपल्या संस्कारांचे प्रतिबिंब- परळीकर

पालकांची सेवा ही केवळ जबाबदारी नाही, ती आपल्या संस्कारांची खरी ओळख आहे. ज्यांच्या घरी आई-वडिलांना मान दिला जातो, ते घर नेहमी सुखी राहते, असे प्रतिपादन तुकाराम महाराज मुंढे शास्त्री परळीकर यांनी केले. तलवाडा येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार प्रा. रमेश बोरणारे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय पाटील निकम, बाबासाहेब जगताप, साबेरभाई, रामहारी जाधव, ज्ञानेश्वर जगताप, भागीनाथ मगर, ज्ञानेश्वर महाराज मधाने, चन्ने महाराज, राहुल खरे, गणेश महाराज, माऊली महाराज, दत्तु पाटील, राजेंद्र मगर, मधुकर पवार, विशाल शेळके, बाळासाहेब भोसले यांची उपस्थिती होती. महाराज म्हणाले, आई-वडिलांविषयी आदर, कृतज्ञता आणि समर्पण ही भारतीय संस्कृतीची मुळे आहेत. पालकांची सेवा म्हणजे देवाची सेवा. आईच्या पोटातील कष्ट, वडिलांचा त्याग कोणत्याही मुलाने विसरू नये. वृद्धावस्थेत त्यांना आधार, प्रेम आणि सन्मान देणे हीच खरी पूजा आहे. आजच्या पिढीतील बदलते वातावरण, वेगवान जीवनशैली आणि दुरावलेली नाती यावरही त्यांनी भाष्य केले. संस्कारांची सुरुवात घरापासून होते. घरात पालकांना मान देणे, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, बोलण्यात गोडवा ठेवणे हीच खरी परंपरा आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात नागरिकांनी शास्त्री महाराजांचे विचार मनोपूर्वक ऐकले. समारोपप्रसंगी ‘पालक सेवेचा संकल्प’ घेण्यात आला. कुटुंबसंस्कृती मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. सांगितली संतपरंपरेची शिकवण संतांनी समाजासाठी असंख्य ग्रंथ लिहिले. पण कधीही त्यावर मालकी सांगितली नाही. ज्ञान सर्वांसाठी खुले असावे, हीच संतपरंपरेची शिकवण आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांनी रचलेले अभंग, ओव्या, गाथा हे समाजाचे सार्वजनिक धन आहे. त्यांनी ‘हे माझे आहे’ असे कधीच म्हटले नाही. ‘हे जग सुधारण्यासाठी आहे’ असा संदेश दिला.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:17 am

जळगाव‎ मनपा निवडणूक:भाजपकडून संभाव्य धाेका;‎शिंदेसेनेची स्वबळाची तयारी‎, विधानसभेतील मदतीचे काय? बंडखोरांचा प्रश्न‎

साडेचार वर्षांपूर्वी भाजपची‎साथ साेडून शिवसेना ठाकरे ‎‎गटाला मदत करणाऱ्या २७ ‎‎बंडखाेरांविषयी भाजपचे धाेरण ‎‎कठाेरच राहणार आहे. त्यामुळे ‎‎भविष्यात भाजपकडील संभाव्य ‎‎धाेका लक्षात घेता शिवसेना‎शिंदे गटाकडून सतर्कता‎बाळगली जाणार आहे.‎आमच्या विरोधात बंडखोर उभे ‎‎केले तर जशास तसे उत्तर‎देण्याची तयारी असल्याचे ‎‎शिवसेनेच्या सूत्रांचे म्हणणे‎आहे. यासाठी आता ७५ ‎‎उमेदवारांची तयारी करीत ‎‎असल्याचे पक्षाच्या बड्या ‎‎पदाधिकाऱ्याने सांगितले.‎ महापालिका निवडणूक‎केव्हा जाहीर हाेणार हे स्पष्ट‎नाही; परंतु जळगाव शहरात‎राजकीय हालचालींना गती‎आली आहे. त्यादृष्टीने प्रत्येक‎राजकीय पक्षातर्फे नियाेजन‎देखील केले जात आहे.‎महायुती झाल्यास सुमारे २५०‎अन् महायुती न झाल्यास ४००‎उमेदवार रिंगणात उतरतील‎असा अंदाज आहे. दरम्यान,‎शिवसेना शिंदे गटाला भारतीय‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जनता पक्षासाेबत युती हाेईल‎अशी आशा आहे; परंतु‎भारतीय जनता पक्ष नेत्यांकडून‎एकीकडे महायुतीचा दावा केला‎जात आहे अन् दुसरीकडे शिंदे‎गटाच्या विरोधात उमेदवार‎तयार केले जात असल्याची‎माहिती समाेर येत आहे.‎यासंदर्भात आम्ही देखील‎भाजपच्या या रणनीतीबाबत‎अवगत असून, सतर्क‎असल्याचे शिंदे गटातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎इच्छुकांकडून सांगितले जात‎आहे. सन २०१८ च्या‎निवडणुकीत शिवसेनेसाेबत‎युती करणार अशी घाेषणा‎असताना ऐनवेळी शिवसेनेचे‎उमेदवार पळवून भाजपने युती‎न करण्याची घाेषणा केली हाेती.‎त्यामुळे यंदा देखील भाजप‎काहीही निर्णय घेऊ शकताे‎याची जाणीव असल्याचे मत‎शिवसैनिकांनी नाव न‎छापण्याच्या अटीवर मांडले.‎ तर आमचीही एकूण ७५ जागांची तयारी‎ शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी संपर्क साधला असता‎त्यांनी महायुतीला प्राधान्य दिले आहे. सन्मानजनक जागा दिल्या तर‎साेबत राहू; परंतु भाजपकडून आमच्या उमेदवारांविषयी अटी, शर्ती‎घालणे याेग्य हाेणार नाही. जर आमच्या उमेदवारांना विराेध हाेणार‎असेल तर आमचीही ७५ जागांची तयारी राहील, असे ‘दिव्य‎मराठी’शी बाेलताना सांगितले.‎ बंडखोर चालत नाही मग मदत का घेतली‎ शिवसेनेतील १४ बंडखोर‎उमेदवारांना साेबत घेणार‎नसल्याचे भाजप सूत्रांकडून‎सांगितले जाते. जर बंडखोर‎निवडणुकीत साेबत चालणार‎नाही मग लोकसभा व‎विधानसभा निवडणुकीत‎आमची मदत कशी काय‎चालली. शिवसेनेचे पदाधिकारी‎व कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने‎निवडणुकीत राबले. भाजपला‎मिळालेल्या मताधिक्यामध्ये‎शिवसेनेचाही वाटा आहे, असा‎युक्तिवाद आता शिवसेनेच्या‎पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून‎केला जात आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:07 am

चिमुकल्या राशीचा मृत्यू पाण्यात बुडून; शवविच्छेदन अहवालातून निष्कर्ष समोर:पिसादेवीतील साडेपाच वर्षांच्या चिमुकलीचे मृत्यू प्रकरण; घातपाताच्या संशयाला तूर्तास पूर्णविराम

पिसादेवी येथील ओंकार सिटी बांधकाम साइटवरून बेपत्ता झालेल्या साडेपाच वर्षांच्या राशी सिनू चव्हाण हिचा मृतदेह चौथ्या दिवशी शेतातील विहिरीत तरंगताना आढळला. तब्बल चार दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी तिचा मृतदेह सापडला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली. मुलीच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमेचे किंवा दुखापतीचे चिन्ह आढळले नाही. मध्य प्रदेशातील दांपत्य ओंकार सिटी बांधकाम साइटवर मजुरी करते. त्यांची मुलगी राशी ही ११ नोव्हेंबरला बेपत्ता झाली होती. त्यानंतर चिकलठाणा पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा आणि ग्रामीण पथकांनी परिसरातील सर्व विहिरी, तलाव, झाडेझुडपे, ओसरी, शेतमळ्यात शोध घेतला. अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास बांधकाम साइटपासून ३०० मीटर अंतरावर एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला. अग्निशमन दलाने मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पेरूसाठी गेली असावी, पोलिसांचा प्राथमिक संशय : राशीला पेरू खाण्याची आवड होती, ती नेहमी शेतातून पेरू तोडून फ्रॉकमध्ये भरून आणत असे, असे नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पेरू आणण्यासाठी शेताकडे गेली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. विहीर संशय वाढवणारी मृतदेह सापडलेली विहीर रस्त्यापासून ३० फूट आत, झाडाझुडपांच्या आड दडलेली असून तिच्याभोवती अंदाजे ३ फूट उंच कठडे आहेत. त्यामुळे एवढ्या उंच कठड्यावरून चिमुकली विहिरीत पडली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याशिवाय विहिरीवर सुरक्षा जाळी नव्हती. मुलीच्या अंगातील फ्रॉक आणि शूज व्यवस्थित अवस्थेत आढळले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:00 am

उद्या संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा:संत ज्ञानेश्वरांच्या जन्मभूमीमध्ये नवे तीर्थक्षेत्र, 53 कोटींचा प्रकल्प

संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थान असलेल्या आपेगावला विशेष महत्त्व आहे. या क्षेत्राला आज तीर्थक्षेत्र म्हणून नवी ओळख मिळाली आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या लगतच्या परिसराचा आता कायापालट केला जाणार आहे. ५३ कोटींच्या निधीतून येणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर गोदाकाठावर लेझर शो, कीर्तिस्तंभ, घाटाच्या विकासासह १०० केव्हीचे सोलार बसवण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. येथे संत ज्ञानेश्वरांचे मंदिर संपूर्ण दगडी बांधकामात केलेले आहे. हे वास्तुशिल्प आणि नक्षीकाम मंदिराच्या कामातून बघायला मिळते. आता भक्तनिवास, हॉल, कीर्तिस्तंभ, २१ फुटी विठ्ठलमूर्ती आपेगावच्या संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावरचा संपूर्ण परिसर विकसित केला जात आहे. आर्किटेक्ट महेश साळुंके यांच्या कल्पनेतून आराखडा तयार केला आहे. मंदिरालगतच १६ खोल्यांचे भक्तनिवास, क्लिनिक, दुकाने तसेच १० हजार स्क्वेअर फुटांचे संतांना राहण्यासाठीचे निवास, एवढेच नाही तर १ हजार स्क्वेअर फुटांचे विविध कार्यक्रमांसाठीचे २ हॉल उभारण्यात येत आहेत. २ कमानी बांधणार, मंदिराचे वॉटरप्रूफिंग या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येण्यासाठी शहागड-आपेगाव आणि पाचोड-आपेगाव या दोन रस्त्यांवर परंपरेचा वारसा दर्शवणाऱ्या दोन भव्य कमानी उभारल्या जाणार आहेत. त्यावर आकर्षक नक्षीकामही केले जाईल. तसेच मंदिराच्या बाहेरून डेव्हलपमेंटचे काम आणि वॉटरप्रूफिंग केले जाणार आहे ४ हजार भाविकांसाठी घाट विकसित करणार मंदिरालगत गोदावरी नदीकाठावर ६० हजार स्क्वेअर फुटांचा घाट असून या ठिकाणी एकाच वेळी ४ हजार भाविक बसू शकतील, अशी सुविधा केली जात आहे. एवढेच नाही तर नदीवर हॅलोग्रामवर लेझर वॉलवर माउलींचा इतिहास आणि संतांचा वारसा दाखवण्याची सुविधा केली जाणार आहे. आपेगाव डॅम ते पैठण-आपेगाव रस्ता रुंदीकरण प्रस्तावित आहे. बांधकामात साडेतीन ओव्यांचे अधोरेखन नातरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा, कां अवयवचि नभा निवडला तो.. या ओवीचे महत्त्व बांधकामात बघायला मिळते. येथे ३ लाख ८० हजार स्क्वेअर फुटांचा विकास होत आहे. दररोज १० हजार भाविक येतील, यानुसार सुविधांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. - महेश साळुंके, वास्तुविशारद.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:54 am

चार वर्षांच्या चिमुकल्याला मारहाण; डेंटिस्टसह कंपाउंडरवर गुन्हा दाखल:सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकार उघड झाल्याचा दांपत्याचा दावा

दाताच्या दुखण्यामुळे उपचारावेळी रडत असलेल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टर व कंपाउंडरने मारहाण केल्याचा आराेप प्रतापनगरातील एका दांपत्याने केला आहे. पाेलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना २७ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान ज्योतीनगर भागातील साई दातांचा दवाखाना येथे घडली. डॉ. राहुल बिराजदार (रा. रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, ज्योतीनगर) आणि कंपाउंडर किरण अशी आरोपींची नावे आहेत. प्रतापनगर भागातील रहिवासी ३१ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांच्या ४ वर्षांच्या मुलाचा दात दुखत असल्याने २७ ऑक्टोबरला संंध्याकाळी साडेआठच्या सुमारास साई दातांचा दवाखाना येथे गेल्या. दात तपासून डाॅ. बिराजदार यांनी औषध गोळ्या लिहून दिल्या. त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता डॉ. बिराजदार यांनी फाेन करून २८ रोजी मुलाला तपासणीसाठी घेऊन येण्यास सांगितले. २८ राेजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास महिला तिची सासू व मुलाला घेऊन दवाखान्यात गेली. त्यांचे पती थोड्या वेळात आले. डॉ. बिराजदारांनी मुलाची तपासणी करून चार दात किडलेले असल्याने तीन दातांत सिमेंट भरून एका दाताला छिद्र पाडले. घरी गेल्यानंतर मुलाला रात्री खूप ताप आल्याने तीन दिवस ते दवाखान्यात गेले नाही. १ नोव्हेंबरला डॉ. राहुल बिराजदार यांनी कॉल करून मुलाला रूट कॅनॉलसाठी घेऊन येण्यास सांगितले. दांपत्य मुलाला घेऊन बिराजदार यांच्या दवाखान्यात गेले. मात्र मुलगा रडत असल्याने डॉक्टरांनी दांपत्याला बाहेर जाण्यास सांगितले. थोड्या वेळानंतर दांपत्य मुलाकडे गेले तेव्हा तो ओक्साबोक्सी रडत होता. महिलेने त्याला जवळ घेतले तेव्हा त्याच्या गालावर मारल्याचे निशाण दिसले. रात्री डॉक्टरला फोन करून मारहाणीचा जाब विचारला असता त्यांनी मारहाण केली नसल्याचे सांगितले. सीसीटीव्ही फुटेजमुळे प्रकार उघडकीस ३ नोव्हेंबरला रात्री दांपत्य सीसीटीव्ही फुटेज बघण्यासाठी साई दातांचा दवाखान्यात गेले. मात्र फुटेज ओपन होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना स्वतः डीव्हीआर घेऊन जा, तो दुरुस्त करून तपासा असे बोलले. त्यामुळे दांपत्य डीव्हीआर घेऊन गेले. त्यांनी तो दुरुस्त करून तपासणी केली तेव्हा १ नोव्हेंबरच्या फुटेजमध्ये डॉक्टर आणि कंपाउंडर मुलाला मारहाण करताना दिसून आले. याचा डॉक्टरला जाब विचारला तेव्हा ट्रीटमेंटचा भाग असल्याचे सांगून शिवीगाळ करून दांपत्यालाच धमकावले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तर ब्लॅकमेलिंग, मीसुद्धा तक्रार दिली मी २१ वर्षांपासून प्रॅक्टिस करतो. माझ्याविरुद्ध एकही तक्रार नाही. मुलाच्या कुटुंबीयांकडून मला ब्लॅकमेल केले जात आहे. या संदर्भात मी उस्मानपुरा पोलिस ठाणे तसेच पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. -डॉ. राहुल बिराजदार, दंतराेगतज्ज्ञ

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:51 am

शिस्त की हत्या:10 मिनिटे उशीर, 100 उठाबशांच्या शिक्षेने वसईत विद्यार्थिनीचा मृत्यू, काजलच्या मृत्यूनंतर पालकांत संताप!

शिस्तीच्या नावाखाली वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूलच्या शिक्षिकेने क्रौर्याचा कळस गाठला. शाळेत येण्यास उशीर झाला म्हणून शिक्षिकेने १२ वर्षीय विद्यार्थिनीला पाठीवरील दप्तरासह १०० उठाबशा काढण्याची शिक्षा सुनावली. त्यामुळे ही शिक्षा भोगत असतानाच विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली व तिला रुग्णालयात हलवावे लागले. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणावरील ‘कॉपोरल पनिशमेंट’चे ग्रहण संपले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बालदिन साजरा होत असतानाच १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ही हृदयद्रावक घटना घडल्याने पालकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली असून मनसेने प्रशासकीय यंत्रणेवर आक्रमक सवाल उपस्थित केला आहे. वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर हायस्कूलची इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी काजल गोंड (१२) ही ८ नोव्हेंबर रोजी शाळेत केवळ १० मिनिटे उशिरा पोहोचली होती. याच किरकोळ कारणास्तव एका शिक्षिकेने तिला चक्क पाठीवर दप्तर ठेवून १०० उठाबशा काढण्याची अमानुष शिक्षा दिली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, ही शिक्षा पूर्ण होताच काजलच्या कंबर आणि पायांमध्ये तीव्र वेदना सुरू झाल्या. तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने नालासोपारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारांदरम्यान १४ नोव्हेंबर रोजी, म्हणजे बालदिनीच काजलची प्राणज्योत मालवली. शाळा प्रशासनावर खुनाचा गुन्हा नोंदवा : पालक संबंधित शिक्षिका व शाळा व्यवस्थापनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांसह मनसेने केली आहे. शिवाय विविध राजकीय संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने दोषींवर एफआयआर दाखल होईपर्यंत शाळा पुन्हा सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:48 am

राज्यात बिबटे किती, वन खात्याला माहीतच नाही:नेमका आकडा नोंद नसल्याने त्यावर आळा घालणारी ठोस योजनाही नाही

बिबट्यांच्या हल्ल्यांत दगावणाऱ्यांची संख्या मोजली जातेय, मात्र राज्यात नेमके बिबटे किती ही संख्या ना वन खाते सांगू शकते ना राज्य शासन. संरक्षित वन क्षेत्रातील व्याघ्र गणनेत कॅमेराबद्ध होणाऱ्या बिबट्यांची वन खाते नोंद ठेवते, पण जंगलाबाहेर मानवी वस्त्या, शेत, शिवारात गणनेची कोणतीही वैज्ञानिक पद्धत सध्या तरी अस्तित्वात नाही. वन खात्याच्या अंदाजानुसार २०१४ मध्ये राज्यातील बिबट्यांची अंदाजे संख्या ७०० वरून २०२२ पर्यंत २ हजारांच्या घरात गेली आहे. राज्यात २०१९ पासून आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात १२५ जण मृत्युमुखी पडले. बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या सरकार सांगू शकते, मात्र राज्यात नेमके बिबटे किती याची संख्या मात्र सांगू शकत नाही. कारण, बिबटे मोजण्यांची कोणतीही शास्त्रशुद्ध पद्धत किंवा यंत्रणा सरकारकडे नाही. परिणामी व्याघ्र गणनेत संरक्षित वनक्षेत्रात निदर्शनास येणारी बिबट्यांची संख्या प्रत्यक्षातील बिबट्यांच्या संख्येच्या तुलनेत फारच तोकडी असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. संख्या नियंत्रणासाठी हार्मोनल इंजेक्शन्स हवे पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये झालेली वाढ त्यांच्या मानवी वस्तीजवळील अनुकूल वातावरणामुळे आहे. ऊस शेती आणि भटक्या जनावरांच्या मुबलकतेमुळे जुन्नर-शिरूर संघर्ष स्थळे झाली आहेत, नैसर्गिक शिकारीचा ऱ्हास आणि अवैज्ञानिक स्थलांतरण समस्या वाढवते. उपाय म्हणून, त्वरित वैज्ञानिक सर्वेक्षण, एआय पाळत आणि भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन आवश्यक आहे. दीर्घकालीन समाधानासाठी, बिबट्यांच्या संख्या नियंत्रणासाठी हार्मोनल इंजेक्शन्स आणि शास्त्रीय पद्धतीने ठरवलेले स्थलांतरण धोरण उपायकारक ठरू शकते.’ - मंदार पिंगळे, उपसंचालक, सातपुडा फाउंडेशन

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:43 am

विरोधकांनी पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण करावे:‘जो जिंकला तोच सिकंदर...’, बिहार निकालावरून फडणवीसांचा टोला

बिहारच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधकांनी आत्मपरीक्षण न करता उलटसुलट आरोप सुरू केले आहेत. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह सर्व विरोधक पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जोपर्यंत विरोधक आत्मपरीक्षण करत नाहीत, तोपर्यंत त्यांची दुर्दशा होत राहील, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी निवडणूक निःपक्ष नव्हती, असे सांगून पराभवाचे खापर फोडले. तर शरद पवार यांनी पैसे वाटून निवडणूक जिंकली, असा आरोप केला. त्यावर फडणवीसांनी टोला लगावला की, निवडणुकीत जो जिंकतो तोच सिकंदर असतो. पराभव स्वीकारण्याची तयारी हवी. चुका मान्य करून आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. पण विरोधक हे करत नाहीत. फडणवीस म्हणाले की, सर्व पक्षांना योजना राबवण्याची संधी होती. आम्ही लोकांसाठी योजना आणल्या. त्या लोकांना आवडल्या. त्यामुळेच लोकांनी आम्हाला निवडून दिले. आमच्यावर प्रेम केले. तसेच अजित पवार यांनी अमित शाह यांची घेतलेली भेट राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत विरोधक एकत्र लढतात की स्वतंत्र, यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या जनतेचा महायुतीवर असलेला विश्वास आहे. कोण कसे लढते, हा त्यांचा प्रश्न आहे, असे फडणवीस म्हणाले. योजनेतील निधीवरून शरद पवारांचा सवाल बिहार निवडणुकीदरम्यान महिलांच्या खात्यात १०,००० रुपये जमा करण्याच्या सरकारी योजनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, निकालांवरून दिसते की महिलांनी निवडणुकीत उत्साहाने भाग घेतला. निवडणूक आयोगाने अशा निधी वाटपाला परवानगी का दिली?, सरकारी निधी मतदानावर प्रभाव पाडण्यासाठी वापरला गेला तर लोकशाहीवरील विश्वासाला तडा जाण्याचा धोका आहे. हा एक भ्रष्टाचारच आहे, असेही पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:36 am

पुरात खरडलेल्या जमिनीसाठी माती, मुरुम मोफत मिळणार

जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूलमंत्र्यांचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने पूरग्रस्त शेतक-यांसाठी आज महत्त्वाचा निर्णय घेतला. यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांच्या खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरूम आणि कंकर दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला. पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिजे इत्यादींवर रॉयल्टी माफ करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या […] The post पुरात खरडलेल्या जमिनीसाठी माती, मुरुम मोफत मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:57 am

बिहार निवडणुकीत हेराफेरी!

पराभवाच्या कारणांचा आढावा, २ आठवड्यांत पुरावे मांडणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहार निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षाने आज दिल्लीत पहिली आढावा बैठक घेतली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, ज्यामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी निवडणूक निकालाचा आढावा घेतला. संघटनात्मक त्रुटींवर चर्चा केली […] The post बिहार निवडणुकीत हेराफेरी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:53 am

जम्मू-काश्मीरमध्ये भीषण स्फोट, ९ ठार

स्फोटकाचे नमुने गोळा करीत असताना स्फोट श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधील नौगाम पोलिस स्टेशनमध्ये काल भयावह स्फोट झाला. यात ९ ठार तर ३२ जण जखमी झाले. त्यांच्यावर ९२ आर्मी बेस आणि एसकेआयएमएस सौरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिका-यांच्या मते, व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल प्रकरणासंदर्भात जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने पोलिस गोळा करत असताना हा […] The post जम्मू-काश्मीरमध्ये भीषण स्फोट, ९ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:51 am

महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार

तापमानात लक्षणीय घसरण, आणखी घसरण वाढणार मुंबई : प्रतिनिधी नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात थंडीची सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रभाव आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. हवेत चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. किमान तापमानाच्या पा-यात बदल होत आहे. राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांपासून मराठवाड्यापर्यंत पुढील काही दिवसांत तापमानात लक्षणीय घसरण होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. ईशान्येकडून सतत येणा-या गार हवेमुळे […] The post महाराष्ट्रात थंडी आणखी वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:46 am

एआय तंत्रज्ञानामुळे देशात २ कोटी नोक-या धोक्यात

मुंबई : प्रतिनिधी भारतातील मध्यमवर्गीय रोजगाराला मोठा फटका बसू शकतो, असा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय आर्थिक तज्ज्ञांनी दिला आहे. देशातील रोजगार बाजारात सध्या ज्या प्रकारचे बदल होत आहेत, त्यातून सुमारे २ कोटी नोक-या पुढील काही वर्षांत गमावल्या जाऊ शकतात, असे विश्लेषकांचे मत आहे. हा धक्का आर्थिक मंदीमुळे नव्हे तर जागतिक व्यापारातील अस्थिरता, एआय तंत्रज्ञानाचा वेगाने वाढणारा […] The post एआय तंत्रज्ञानामुळे देशात २ कोटी नोक-या धोक्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:41 am

शुभमन गिल स्ट्रेचरवरून रुग्णालयात

कोलकाता : वृत्तसंस्था शुभमन गिलवर आता थेट हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली. शुभमल गिलला स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यामुळे आता शुभमन गिल इडन गार्डन्सवर सुरु असलेला पहिला कसोटी सामना खेळणार की नाही, याबाबतची माहिती समोर येत आहे. शुभमन गिल शनिवारी फलंदाजीला आला खरा, पण तो फक्त चारच धावा करू शकला. कारण चार धावा केल्यावर त्याच्या […] The post शुभमन गिल स्ट्रेचरवरून रुग्णालयात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 12:38 am

मुलीचे लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार!:इंदुरीकर महाराजांचे टीकाकारांना उत्तर, म्हणाले - त्रास देण्यालाही मर्यादा असतात

मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले.'बोलण्याप्रमाणे वागले नाहीत' अशी टीका त्यांच्यावर होत असताना, संतप्त इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. साखरपुड्यापेक्षा मुलीच्या लग्नाचा 'बार' मोठ्या धुमधडाक्यात उडवणार असल्याचे त्यांनी टीकाकारांना ठणकावून सांगितले. गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ चर्चेत होते. आपल्या कीर्तनातून साधेपणाचे रामबाण धडे देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात लाखो रुपये खर्च करण्यावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराज ‘दुटप्पीपणा’ करत असल्याचा आरोप केला. या टीकेमुळे त्रस्त झालेल्या इंदुरीकरांनी कीर्तनसेवा सोडण्याचे संकेतही दिले होते. आता या टीकेला इंदुरीकरांनी एका कीर्तनातून दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. नेमके काय म्हणाले इंदुरीकर महाराज? या टीकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराज प्रचंड संतापलेले दिसले. अनेक जण माझ्या मुळावर उठणार, हे मला माहिती होते. त्या औलादींना मी सांगतो. मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त करत टीकाकारांना ठणकावून सांगितले. यावेळी इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवरही टीका केली. तीस मिनिटांच्या सभेसाठी राजकारणी तीन कोटी खर्च करतात, तेव्हा कुणी काही बोलत नाही. ते पैसे कुठून आणले? हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारीत नाही, असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या काळात आता पैशाचा तमाशा सुरूच होईल, असे सांगितले. टीकाकारांना मर्यादा पाळण्याचा इशारा हे लोक विकले गेलेले आहेत. केवळ दुसऱ्यांना त्रास देणे हेच यांचे काम राहिले आहे. दुसऱ्याला त्रास देण्यालाही मर्यादा असतात. माझ्यापर्यंत ठीक होते, परंतु लोक माझ्या कुटुंबावर बोलत आहेत. माझ्या मुलीच्या अंगावरील ड्रेसपर्यंत काही लोक गेले आहेत. आता डोक्यावरचा फेटा खाली ठेवायची वेळ आली आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणालेत. दरम्यान, कीर्तनातून 'साधी लग्न करा, कर्ज काढू नका' असा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात केलेल्या खर्चावरून त्यांना 'बोले तैसा चाले' या उक्तीवर न वागल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता इंदुरीकर महाराजांनी टीकाकारांना दिलेल्या उत्तरामुळे टीकाकाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 11:29 pm

नगरपालिका निवडणुकीसाठी कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही:संकेतस्थळावर केवळ माहिती भरावी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची माहिती

जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना संकेतस्थळावर केवळ नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही, अशी माहिती जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेऊन त्यावर सही करून, आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि सदस्यपदासाठी नामनिर्देशपत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर परिपूर्ण माहिती भरल्यानंतर, त्याची मुद्रित प्रत (प्रिंट आऊट) काढून त्यावर उमेदवाराची स्वतःची व सूचकांची स्वाक्षरी घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर ही प्रिंट पुरक कागदपत्रांच्या मूळ प्रतींसह (उदा. नगरपरिषद/नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बँक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र-१’ किंवा ‘जोडपत्र-२’ इत्यादी) संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांसाठी नोंदणीसाठी सुरू केलेले संकेतस्थळ १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २४ तास सुरू राहील. उमेदवारांनी नोंदणी करताना तयार केलेला लॉगिन आयडी व पासवर्ड जपून ठेवावा, कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी तो आवश्यक असतो. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत, म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:34 pm

संतोष काकडे अमरावतीचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी:अनिल भटकर मूळ पदावर परतणार, पाच तहसीलदारांच्याही बदल्या

चिखली (जि. बुलडाणा) येथील तहसीलदार संतोष काकडे यांची पदोन्नतीनंतर अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे अनिल भटकर आता पूर्णवेळ अमरावतीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून काम पाहतील. यासोबतच भातकुली, अचलपूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील सामान्य प्रशासनातील अशा पाच तहसीलदारांच्याही बदल्या झाल्या आहेत. संतोष काकडे लवकरच आरडीसी पदाची सूत्रे हाती घेतील. त्यांनी यापूर्वी अमरावतीचे तहसीलदार म्हणूनही कामकाज सांभाळले आहे. अनिल भटकर गेल्या वर्षभरापासून अमरावतीचे एसडीओ असतानाच निवासी उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. त्यांनी प्रभारी असतानाही आरडीसी पदाला पूर्ण न्याय दिला, अशी प्रतिक्रिया महसूल विभागातून व्यक्त होत आहे. बदली झालेल्या तहसीलदारांमध्ये भातकुलीचे तहसीलदार अजीतकुमार येळे यांचा समावेश आहे, ज्यांना यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले आहे. चांदूर रेल्वेचे रुपेश खंडारे यांची अकोला येथे भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रज्ञा काकडे यांची संतनगरी शेगाव येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. नायब तहसीलदार संवर्गातून पदोन्नती मिळालेले अक्षय मंडवे हे भातकुलीचे नवे तहसीलदार असतील. वरुड येथील पदोन्नतीप्राप्त नायब तहसीलदार सुदर्शन सहारे हे अचलपूरचे नवे तहसीलदार म्हणून जबाबदारी स्वीकारतील. चांदूर रेल्वेचे सुधाकर अनासने यांचीही बदली झाली असून, त्याठिकाणी नवीन अधिकारी कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गेल्या दोन दिवसांत महसूल विभागातील सुमारे १५० तहसीलदारांना पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्त केले आहे. यामध्ये अमरावती विभागातील ११ अधिकारी आणि जिल्ह्यातील पाच तहसीलदारांचा समावेश आहे. याशिवाय, इतर मागास बहुजन विकास विभागात सहायक संचालक असलेले तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांना पदोन्नतीने अकोला येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. अचलपूरचे तहसीलदार डॉ. संजय गरकल यांच्याकडे अकोला येथील महाबीजच्या कार्यालयात महाव्यवस्थापक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:27 pm

नाला खोलीकरण करून सुपीक गाळ शेतांना द्या:अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जमिनींसाठी तातडीने उपाययोजना हवी; शेतकऱ्यांची मागणी

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतांसाठी नाला खोलीकरण करून त्यातील सुपीक गाळ मोफत देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटले असून पिकांसोबतच जमिनीचा महत्त्वाचा सुपीक थरही वाहून गेला आहे. या नैसर्गिक धक्क्यामुळे शेतकऱ्यांची जमीन कडक, निर्जीव आणि उत्पादनक्षमतेपासून वंचित झाली आहे. बांध फुटल्याने शेतातील मुरूम, वाळू आणि दगड बाहेर आले आहेत, तर काळी भुसभुशीत माती पूर्णपणे वाहून गेली आहे. यामुळे आगामी हंगामात पेरणी करणे कठीण होणार असून लागवडीचा खर्चही वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मते, नाल्यात वर्षानुवर्षे साचलेला गाळ सेंद्रिय अन्नद्रव्यांनी परिपूर्ण असून जमिनीची सुपीकता पुन्हा वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा गाळ मिळाल्यास जमीन पुन्हा भुसभुशीत होईल, पाण्याची धारण क्षमता वाढेल आणि अतिवृष्टीमुळे बिघडलेला जमिनीचा पोत नैसर्गिकरीत्या सुधारेल. त्यामुळे नाला खोलीकरणाची कामे तातडीने हाती घेऊन त्यातून निघणारा सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात मोफत देण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, गाळ वाहतुकीसाठी विशेष सरकारी यंत्रणा आणि वाहने उपलब्ध करून द्यावीत. अतिवृष्टीग्रस्त आणि बांध फुटलेल्या शेतकऱ्यांना गाळ वितरणात प्राधान्य मिळावे, असेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे. या उपाययोजना न झाल्यास हजारो एकर जमीन पुढील काही हंगामांसाठी उत्पादनक्षम राहणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. करिता, महसूल विभाग, कृषी विभाग आणि जलसंधारण विभागाने नाला खोलीकरणाची कामे सुरू करून शेतकऱ्यांना सुपीक गाळ पुरवावा, असा आग्रह संबंधितांकडे धरण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:21 pm

वर्ध्यात सुरु होता बनावट चलनी नोटा छापखाना:बिंग फुटले मालेगावात, 5 लाखांची रोकड जप्त; एक जण ताब्यात, मुख्य आरोपी फरार

बाहेर जिल्ह्यातील आरोपी हा वर्ध्यातील केजाजी चौक, गौंड प्लॉट परिसरात भाडेतत्त्वावर राहून, त्याने तिघांची मदत घेऊन चक्क बनावट चलनी नोटांचा छापखाना सुरु केले होता. त्या नोटा चलनात आल्या आणि त्यांचे बिंग नाशिक व मालेगावात फुटले आणि दोन आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एलसीबी व शहर पोलिसांनी केली. मालेगावात फुटले बिंग वर्ध्यातील केजाजी चौक, गौंड प्लॉट परिसरात मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव हा सहा महिन्यांपासून भाड्याने राहात होता. त्याने धनराज धोटे, राहुल आंबटकर आणि एका अल्पवयीन बालकाच्या मदतीने चलनात बनावट नोटा छापण्याचा धंदा सुरू केला होता. ऑनलाईन कागद खरेदी करून लहान मुद्रण यंत्राच्या मदतीने या नोटा तयार केल्या जात होत्या. या बनावट नोटा बाहेरच्या जिल्ह्यातील आठवडी बाजारात चलनात आणण्यासाठी आरोपी धनराज धोटे आणि राहुल आंबटकर यांना नाशिक व मालेगाव येथे पाठवण्यात आले. तेथेच त्यांचे बिंग फुटले आणि मालेगाव पोलिसांनी त्या दोघांना पकडले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींनी वर्ध्यात बनावट नोटांचा छापखाना सुरू असल्याची माहिती दिली. वर्ध्यात पोलिसांची कारवाई मालेगाव पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांना दिली. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष ताले यांनी तीन पथके तयार करून गोंड प्लॉट परिसरात रात्री उशिरा (१२:३० वाजता) छापा टाकला. छाप्यादरम्यान घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका भाडेकरूंच्या खोलीतून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये १४४ बनावट ५०० रुपयांच्या नोटा (एकूण ७२,००० रुपये), प्रिंटर, विविध आकारांच्या लाकडी व काचेच्या फ्रेम, ए-४ साईज पेपर, इंक बॉटल आणि छपाईसाठी लागणारे इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार, तपास सुरू दरम्यान, साथीदार अटकेत गेल्याची माहिती मिळताच मुख्य आरोपी ईश्वर लालसिंग यादव काही महत्त्वाचे पुरावे घेऊन फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. १६५५/२०२५) दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम १७८(३)(४), १७९, १८०, ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य आरोपी जेरबंद झाल्यावर आणखी किती नोटा चलनात आल्या, याची माहिती मिळणार असल्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:07 pm

हिंगोलीत शेतकऱ्याच्या घराला भीषण आग:ट्रॅक्टरच्या हप्तासाठीची 5 लाखांची रोकड जळून खाक, संसारोपयोगी साहित्यही भस्मसात

औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथे एका शेतकऱ्याच्या घराला आग लागून ५ लाख रुपयांची रोकड, शेतीमाल व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. शनिवारी ता. १५ दुपारी हि घटना घडली आहे. औंढा नागनाथ तहसील कार्यालयाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. शॉर्ट सर्किटमुळे हि घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडातांडा येथे शेतकरी वसंत राठोड यांचे घर आहे. घरी शेती कामासाठी घेतलेले ट्रॅक्टर व हळद शिजविण्यासाठी घेतलेल्या कुकरचा हप्ता भरण्यासाठी त्यांनी बँकेतून ५ लाख रुपयांची रोकड काढली होती. सदर रक्कम त्यांनी घरात कपाटामध्ये व एका डब्यात ठेवली होती. दरम्यान, आज सकाळीच राठोड कुटुंबिय शेतात कामासाठी गेले होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांच्या घरातून अचानक धुर निघत होता. पाहता पहता घरातून आगीच्या ज्वाला निघू लागल्या होत्या. घराला आग लागल्याचे लक्षात येताच गावकरी गोपी राठोड, प्रदीप जाधव, विष्णू जाधव, सुभाष राठोड, अनिल राठोड, पृथ्वीराज राठोड, मुरलीधर राठोड, सुंदर राठोड यांच्यासह गावकरी घटनास्थळी धावले. गावकऱ्यांनी मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरवात केली. तर वसंत राठोड व त्यांचे कुटुंबिय घरी आले. आग नियंत्रणात येई पर्यंत घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. यामध्ये पाच लाख रुपयांची रोकड, सोयाबीन सह इतर शेतीमाल, संसारोपयोगी साहित्याचा समावेश आहे. या घटनेमुळे राठोड कुटुंबीय उघड्यावर आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार हरिष गाडे यांनी तातडीने महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना केले. या पथकाने नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:48 pm

नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या:हल्लेखोरांकडून धारदार शस्त्रांनी सपासप वार, मुलाच्या वाढदिवशीच दुर्दैवी अंत

उत्तर नागपुरातील भाजपच्या एका वॉर्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यशोधरा नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कांजी हाऊस परिसरात धारदार शस्त्रांनी सपासप वार करून ही क्रूर हत्या करण्यात आली. सचिन साहू असे हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याचे नाव असून, ते उत्तर नागपुरातील वॉर्डचे अध्यक्ष होते.जुन्या पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) मृतक सचिन साहू यांच्या मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या तयारीसाठी आवश्यक असलेले साहित्य आणण्यासाठी सचिन घराबाहेर पडले होते, मात्र, वाटेतच कांजी हाऊस परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी मिळून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चौघेही फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर यशोधरा नगर पोलिस ठाण्यात साहू यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. हत्येमागचे कारण काय? सचिन साहू यांची हत्या करणारे मारेकरी नेमके कोण होते आणि हत्येमागे नेमके कारण काय होते, याचा तपास सध्या यशोधरा नगर पोलिस करत आहेत. जुन्या पैशांच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, कुटुंबीयांकडून वेगळाच संशय व्यक्त करण्यात आला आहे. साहू यांचा गणेशोत्सात काही लोकांशी वाद कुटुंबीयांनी सचिन साहू यांच्या हत्येमागे पूर्ववैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गणपती उत्सवादरम्यान सचिन साहू यांचा काही लोकांशी वाद झाला होता, त्या लोकांचा या हत्येत समावेश असू शकतो, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलिस या दिशेनेही तपास करत आहेत. पोलिसांकडून तपास सुरू सध्या पोलिसांनी कांजी हाऊस परिसर आणि आजूबाजूच्या भागांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, मारेकऱ्यांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. या भरदिवसा झालेल्या हत्येमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या एका सक्रिय कार्यकर्त्याची भरदिवसा हत्या झाल्याने शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मारेकऱ्यांच्या अटकेनंतर उलगडा होईल - पोलिस दरम्यान, सचिन साहूचे काही दिवसांपूर्वी गौर आणि प्रतिक नावाच्या दोन व्यक्तींशी भांडण झाले होते. त्यामुळे पोलीस दोन्ही बाजू तपासून पहात आहे. मारेकरी पळाले असल्याने त्यांच्या अटकेनंतरच खुनाच्या कारणांचा उलगडा होईल, असे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सांगितले. राजकीय वाद अथवा वैमनस्याचा विषय नाही साहू हे भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष असले तरी त्यांच्या खुनामागे राजकीय वैमनस्य कारण नाही. हा त्यांचा आर्थिक वाद होता. साहू यांनी घेतलेल्या कर्जापैकी कर्जाच्या रकमेवरून त्यांचा काही जणांशी वाद होता, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे हा राजकीय वाद अथवा वैमनस्याचा विषय नाही, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:38 pm

जि. प. निवडणुकीतील नोडल अधिका-यांनी जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी

लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हास्तरावर नियुक्त सर्व नोडल अधिका-यांनी आपली कर्तव्ये आणि जबाबदा-या काळजीपूर्वक पार पाडाव्यात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या बैठकीत त्या बोलत […] The post जि. प. निवडणुकीतील नोडल अधिका-यांनी जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:15 pm

दिवसात २२५ ई चलान केसेस करून १,७८,८५० रु पये दंड

लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील नियम बा वाहनावर बेशिस्त पार्क करणारे चार-चाकी, दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्तपणे रिंग रोडचे सर्व्हिस रोडवर वाहन पार्कीग करणारे वाहनावर वाहतुक नियंत्रण शाखा, लातूर यांचेकडून ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कार्यवाहीची १५ दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. एका दिवसात २२५ ई चलान केसेस करुन १ लाख ७८ हजार ८५० रुपयांचा दंड आकारण्यात […] The post दिवसात २२५ ई चलान केसेस करून १,७८,८५० रु पये दंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:13 pm

९३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान

लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक १७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-या ९३ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद […] The post ९३ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:11 pm

सोयाबीन हमीभाव खरेदीला पोर्टलचा खोडा

लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग ३० ऑक्टोबरपर्यंत करुन घेतली. प्रत्येक्ष खरेदी दि. १५ नोव्हेंबर रोजी सुरु होणार होती. परंतू, पोर्टलने खोडा घातल्याने पहिल्या दिवशी सोयाबीनची हमीभावाने खरेदी झाली नाही. जिल्हा मार्केटींग फेडरेशनच्या सोयाबीन खरेदी केंद्रांवरील पोर्टल दुपारी १२.३० वाजता सुरु झाले. त्यामुळे केंद्र संचालकांनी शेड्युलिंग सुरु केली. परिणामी आज […] The post सोयाबीन हमीभाव खरेदीला पोर्टलचा खोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 9:08 pm

पुण्यात क्वीन्स गार्डनमध्ये पावणेपाच लाखांची घरफोडी:चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास केले; गुन्हा दाखल

सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाखांची रोकड, सोने-चांदीचे दागिने असा चार लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. ते सोपानबाग परिसरात राहायला आहेत. त्यांची आई क्वीन्स गार्डन परिसरातील आगरकरनगर भागात राहायला आहेत. सदर सदनिका बंद होती. मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील तीन लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चार लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. सदनिकेत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश वानखेडे पुढील तपास करत आहेत. सदनिकेतून ऐवज चोरी धनकवडी भागातील एका सदनिकेतून चोरट्यांनी दोन लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका व्यक्तीने सहकारनगर पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील एका सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातून ऐवज लांबविला.सहकारनगर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नीलेश शिवतारे पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:09 pm

नवले पूल अपघात:वाहतूक सुधारणा, वेगमर्यादा निश्चित; मुरलीधर मोहोळांचे विविध यंत्रणांना महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश

पुणे शहरातील नवले पूल अपघात प्रकरणानंतर अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात. त्याअनुषंगाने विविध यंत्रणांवरची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. वाहतूक विषयक सुधारणा, वेगमर्यादा, तसेच सेवा रस्त्यांच्या कामातील भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावून महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत. नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर नऊ ते दहा जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुरलीधर मोहोळ यांनी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसराला भेट दिली. त्यानंतर शनिवारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी विविध यंत्रणांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डाॅ. योगेश म्हसे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, राज्य महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले की, नवले पूल अपघात प्रकरणानंतर दीर्घकालीन उपाययोजनांसह अनेक पावले उचलली जातील. नऱ्हे ते रावेत दरम्यान उन्नत मार्ग बांधण्याचा आराखडा मंजूर झाला असून, याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. जांभुळवाडी ते वारजे परिसरापर्यंत वर्तुळाकार मार्ग निश्चित करण्यात आला आहे, ज्यावरून वाहतूक वळवली जाऊ शकते. हे काम सुरू करण्यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे. दरी पूल ते वडगाव बुद्रुक दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी तीन स्पीड गन आहेत, त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. स्वामी नारायण मंदिर ते नवले पूल दरम्यानच्या तीव्र उतारावर गतिरोधक पट्ट्या (रम्बलिंग स्ट्रिप) बसवण्यात आल्या आहेत. तीव्र उतारावर वेग कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जड वाहनांसाठी वेगमर्यादा प्रतितास ६० किलोमीटरवरून ३० किलोमीटर करण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विविध यंत्रणांनी याबाबत केलेल्या कामाचा अहवाल महिनाभरात सादर करावा. डिसेंबर महिन्यात कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक निश्चित करण्यात आली आहे, असे मोहोळ यांनी नमूद केले. बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका येथे ट्रक आणि कंटेनर चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल आढळल्यास तो जागेवरच उतरवण्यात येणार आहे. जड वाहनांची तांत्रिक, तसेच ब्रेक तपासणी करण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात येते. दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांविरुद्ध जागेवरच कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, असे मोहोळ यांनी सांगितले.‘भूसंपादनामुळे बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यांचे काम रखडले आहे. पाषाण भागात संरक्षण विभागाची जागा आहे. सेवा रस्त्यासाठी संरक्षण विभागाची जागा मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. सेवा रस्त्यावर पीएमपी बस, तसेच खासगी वाहतूकदारांचे थांबे आहेत. हे थांबे बेकायदा आहेत. प्रवाशांची सुरक्षा विचारात घेऊन थांबे बांधले पाहिजेत. बाह्यवळण मार्गावरुन दररोज साडेतीनशे पीएमपी बसच्या फेऱ्या जातात. सेवा रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करावी’, असे आदेश मोहोळ यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:05 pm

सायबर चोरट्यांकडून 33 लाखांची फसवणूक:पुणे शहरात ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाने प्रकार

पुणे शहरात सायबर चोरट्यांनी ऑनलाइन गुंतवणूक आणि घरातून काम करण्याच्या आमिषाने नागरिकांची ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये ही फसवणूक झाली असून, याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडी येथील एका नागरिकाला ऑनलाइन टास्कद्वारे घरातून काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना अधिक पैसे गुंतवण्यास सांगितले. यातून त्यांची १९ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे अधिक तपास करत आहेत. याशिवाय, शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका महिलेची सायबर चोरट्यांनी ६ लाख ३६ हजार रुपयांची फसवणूक केली. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील तपास करत आहेत. पर्वती भागातही अशाच प्रकारे शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका नागरिकाची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. कोपनर या प्रकरणाचा तपास करत आहेत. खासगी कंपनीतील कामगाराकडून रोकड चोरी खासगी कंपनीतील कामगारने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून एक लाख ४४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कामगाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात खासगी कंपनी आहे. कंपनीतील कामगाराने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली. गल्ल्यात ठेवलेली एक लाख ४४ हजारांची रोकड चोरून नेली. रोकड चोरल्यानंतर कामगार कंपनीत आला नाही. मालकाने कामगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कामगाराने रोकड चोरल्याचा संशय कंपनी मालकाने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी पाटील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:01 pm

मुंबईत मुलांच्या नेतृत्वाखालील स्वच्छता मोहीम:90 मिनिटांत 350 पिशव्या कचरा जमा, प्रभादेवी-जुहू किनाऱ्यावर शाळकरी 'ग्रीन चॅम्प्स'ची कमाल

मुंबई क्लायमेट वीक 2025 च्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा एक भाग म्हणून प्रोजेक्ट मुंबईच्या वतीने जल्लोष क्लीन कोस्ट्स यांनी 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते 9.00 वाजेपर्यंत प्रभादेवी आणि जुहू कोळीवाडा किनारपट्टीवर मुलांसाठी खास बीच क्लीन-अप मोहीम राबवली. सकाळी लवकरच शहराच्या किनाऱ्यांवर पोहोचलेल्या शाळकरी मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण किनारपट्टीत नवा जोश निर्माण झाला. हातमोजे घालून, अमर्याद ऊर्जा आणि जबाबदारीची भावना बाळगून या छोट्या ‘ग्रीन चॅम्प्स’नी स्वच्छतेचे काम हाती घेतले. शिक्षक, स्वयंसेवक आणि स्थानिक समुदायाच्या साथीत या मुलांनी एकत्रित प्रयत्नांनी शहरासाठी काय बदल घडवता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण घालून दिले. केवळ 90 मिनिटांत मुलांनी 350 हून अधिक पिशव्यांमध्ये प्लास्टिक कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले—मुंबईच्या सागरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांची असलेली निष्ठा यावरून स्पष्ट होते. गोळा केलेला सर्व प्लास्टिक कचरा आता प्रोजेक्ट मुंबईच्या माध्यमातून पुनर्वापरासाठी पाठवण्यात येणार असून त्यापासून टी-शर्ट, बाक, कंपास बॉक्स आणि इतर उपयुक्त वस्तू तयार केल्या जातील. यामुळे कचऱ्याचे ‘किमती वस्तूंमध्ये’ रूपांतर कसे होते, याचा थेट अनुभव मुलांना मिळणार आहे. मुंबई क्लायमेट वीकचा एक भाग म्हणून आयोजित केलेला जल्लोषचा हा विशेष उपक्रम म्हणजे मुलांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या हवामान कृतीचा उत्सवच ठरला. यामुळे मुंबई क्लायमेट वीकचे उद्दिष्ट—विशेषतः मुलांमध्ये जागरूकता वाढवून, अधिक स्वच्छ, दयाळू आणि हवामान-तयार मुंबई घडवण्यासाठी नागरिकांना सक्षम करणे—याला अधिक बळ मिळाले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 7:44 pm

लालू यादवांच्या कुटुंबात दुफळी; अखेर लेकीने तोडले संबंध

पाटणा : वृत्तसंस्था बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या दारुण पराभवानंतर यादव कुटुंबात दुफळी निर्माण झाली आहे. लालू यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट करत कुटुंबाशी संबंध तोडण्याचा निर्णय जाहीर केला. एका पोस्टमध्ये त्यांनी राज्यसभा खासदार संजय यादव यांचा उल्लेख करत म्हटले आहे की, ‘मी सर्व दोष स्वत:वर घेत आहे. आचार्य यांनी लिहिले आहे की, मी […] The post लालू यादवांच्या कुटुंबात दुफळी; अखेर लेकीने तोडले संबंध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:41 pm

बांगलादेशात तिस-या दिवशी हिंसाचार; कडेकोट सुरक्षा

ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशची राजधानी ढाका येथे सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जाळपोळ आणि हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे समर्थक ढाकासह पाच जिल्ह्यांमध्ये निदर्शने करीत असून महामार्ग रोखले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने शहरात बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या १२ अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत, ज्या सतत गस्त घालत […] The post बांगलादेशात तिस-या दिवशी हिंसाचार; कडेकोट सुरक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:39 pm

विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत अधिकार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जयपूर : वृत्तसंस्था राजस्थान उच्च न्यायालयाने निकालपत्रात कौटुंबिक मालमत्ता आणि विवाहित मुलांचे अधिकार यावर मोठे स्पष्टीकरण दिले आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणताही प्रौढ आणि विवाहित मुलगा किंवा मुलगी त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत त्यांची परवानगी असल्याशिवाय राहण्याचा कायदेशीर हक्क सांगू शकत नाही. न्यायालयाने कठोर भूमिका घेत, जर वडिलांनी दिलेली राहण्याची परवानगी परत घेतली तर मुलाला किंवा […] The post विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत अधिकार नाही! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:38 pm

सिग्नल फ्रिक्वेन्सी युद्धासाठी भारतीय सेनादलाची तयारी?

मुंबई : वृत्तसंस्था चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात रहस्यमयपणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्धाची तयारी करत आहेत का? अशी शंका निर्माण झाली आहे. भारताने मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजनमध्ये जीपीएस हस्तक्षेपाबाबत एक ‘नोटाम’ जारी केला. जो अरबी समुद्रापर्यंत पसरला आहे. हे क्षेत्र भारतातील सर्वात व्यस्त हवाई मार्गात येते. त्यामुळे या नोटामला इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध सुरू होण्याचे संकेत मानले जात आहेत. नवी […] The post सिग्नल फ्रिक्वेन्सी युद्धासाठी भारतीय सेनादलाची तयारी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:37 pm

अमेरिकेत महागाईमुळे हाहाकार! किराणापासून सर्वच वस्तूंच्या दरवाढीमुळे असंतोष

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेत किराणा मालापासून रोजच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंपर्यंत, सर्वच किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, अनेक खाद्यपदार्थांवर लावलेले टॅरिफ मागे घेतले. हा निर्णय केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी मोठी आशा निर्माण करतो. ट्रम्प प्रशासनाने घोषणा केली की टोमॅटो, केळी […] The post अमेरिकेत महागाईमुळे हाहाकार! किराणापासून सर्वच वस्तूंच्या दरवाढीमुळे असंतोष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:33 pm

आशियातील सर्वात मोठे मेट्रो कार शेड मंडाळेत! ७२ मेट्रोची क्षमता, २९ कि.मी.चा ट्रॅक

मुंबई : प्रतिनिधी मंडाळे येथे एकाच वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करण्याच्या क्षमतेचे आणि २९ किमी लांबीचा अंतर्गत ट्रॅक असलेले कारशेड मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारले आहे. हे कारशेड आशियातील सर्वात मोठे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. लवकरच या कारशेडमधून मेट्रोचे संचलन सुरू होणार आहे. मेट्रो २ बी मार्गिका २३.६ किलोमीटर लांबीची असून, […] The post आशियातील सर्वात मोठे मेट्रो कार शेड मंडाळेत! ७२ मेट्रोची क्षमता, २९ कि.मी.चा ट्रॅक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 7:31 pm

पळसगाव येथे शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या त्या:कर्जाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद

वसमत तालुक्यातील पळसगाव येथे कर्जाला कंटाळून तसेच नापिकीमुळे शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १५ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी बाबुराव मिरकुटे (६०) यांना ३० गंुठे शेत आहे. या शेतातील उत्पन्नावर तसेच इतर मजूरीवर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. या शेतावर त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. खरीप हंगाम हाती आल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. दरम्यान, यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीन व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र पिक हाती आल्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिक वाहून गेले. हाती आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून गेल्यामुळे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. खरीपाचे पिक हातचे गेले आता उदरनिर्वाह कसा करावा तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे याची चिंता लागल्याचे ते बोलून दाखवत होते. दरम्यान, बुधवारी ता. १२ शेतात जाऊन येतो असे सांगून ते घरून निघाले होते. शेतात गेल्यानंतर त्यांनी झाडाला गळफास घेतला. काही वेळानंतर त्यांचा नातू शेतात गेल्यानंतर त्याचे आजोबा बाबुराव यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतल्ेल्या स्थितीत आढळून आला. त्याने आरडा अोरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी व गावकरी घटनास्थळी दाखल झाले. तसेच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक एकनाथ डक, पी. व्ही. शेळके, जमादार भगवान आडे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी विठ्ठल मिरकुटे यांच्या माहितीवरून आज वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक एकनाथ डक पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 7:16 pm

भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का?:काँग्रेसच्या 'स्वबळा'च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल, बिहारचा धडा विसरल्याची टीका

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या 'स्वबळा'च्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या निर्णयाचा थेट आणि उघड फायदा भाजपला मुंबईसारख्या अत्यंत स्पर्धात्मक निवडणुकीतमतांचे विभाजन म्हणजे विरोधकांची तुकडेबाजी म्हणजे आणि अवाजवी अहंकारामुळे घेतलेल्या एकतर्फी भूमिकेमुळे भाजपला सोन्याची संधी मिळणार, हे वास्तव कोणत्याही राजकीय विश्लेषकाला स्पष्ट आहे, असे मातेले म्हणाले. महाविकास आघाडी एकत्र राहिल्यासच मजबूत पर्याय उभा राहतो, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशावेळी काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय म्हणजे विरोधी मतांची विभागणी भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा मुंबईकरांच्या हिताचे प्रचंड नुकसान होईल, असे शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी म्हटले आहे. बिहारचा धडा विसरलेली काँग्रेस बिहारमध्ये विरोधक विखुरले आणि सत्ताधाऱ्यांना सरळ बहुमत मिळाले. महाविकास आघाडी तुटली की परिणाम किती घातक होऊ शकतात, याचे ताजे उदाहरण बिहार आहे. मुंबईतही तेच चित्र निर्माण करण्याची भीषण चूक काँग्रेसच्या नेतृत्वाकडून होताना दिसते. आघाडीतील विश्वास, संवाद आणि सन्मान या तीनही गोष्टींना काँग्रेसच्या निर्णयाने धक्का बसला आहे. काँग्रेसमधील काही नेते गेल्या काही दिवसांत असमंजस भूमिका, आघाडीविरोधी वक्तव्ये आणि भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल असे निर्णय घेताना दिसत आहेत. म्हणूनच हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो. काँग्रेसच्या ठराविक गटांनी पक्षाला कमकुवत करण्याची, आघाडी तोडण्याची आणि भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली आहे का? हा प्रश्न फक्त राजकीय नाही. हा मुंबईकरांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहे, असा घणाघात अमोल मातेले यांनी काँग्रेस नेत्यांवर केला. शरद पवार पक्षाची भूमिका अधिक स्पष्ट आमची भूमिका ठाम आणि पारदर्शक आहे. मतांचे विभाजन कोणत्याही परिस्थितीत टाळणे, महाविकास आघाडीची एकता टिकवणे, तीनही पक्षांमध्ये संवाद आणि समन्वय वाढवणे आणि भाजपच्या विभाजनकारी कारभाराला रोखणे, यासह मुंबईकरांचा हितसंबंध हा आमचा केंद्रबिंदू आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्ण बांधिलकीने उभे आहोत, असेही अमोल मातेले यांनी म्हटले. काँग्रेसने निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा काँग्रेसचा घेतलेला निर्णय घाईघाईत, भावनिक प्रतिक्रिया म्हणून, राजकीय वास्तवापासून पूर्णपणे दूर असा वाटतो. मुंबईकरांच्या हितासाठी, विरोधी मतसंघटन मजबूत ठेवण्यासाठी आणि भाजपच्या वाढत्या राजकीय आक्रमणाला रोखण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय तात्काळ पुनर्विचार करणे अत्यावश्यक आहे. मुंबईच्या हितासाठी महाविकास आघाडीची मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या एकतेला धक्का बसला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संवाद, समन्वय आणि आघाडी टिकवण्याच्या प्रयत्नात शेवटपर्यंत सक्षम आणि बांधिल आहे, असे अमोल मातेले यांनी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 7:03 pm

दोन्ही भाऊ एकत्र आले तरच मुंबई ताब्यात येईल:ठाकरे गटाच्या नेत्याचे मोठे विधान, बिहार निवडणुकीचा दाखला देत काँग्रेसलाही फटकारले

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि प्रचाराला वेग येत असतानाच, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र आले, तर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, असे खैरे म्हणालेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसला फटकारत, आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्रिभाषा सूत्राचा अध्यादेश रद्द झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रथमच एकाच व्यासपीठावर आले. या घटनेमुळेच आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अनेकवेळा दोन्ही बंधु एकत्र येणार असल्याचे सुतोवाच केले. मात्र, याबाबत अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात या युतीच्या चर्चेवर आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. नेमके काय म्हणाले चंद्रकांत खैरे? चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या युतीबाबत अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आले, तर त्यामुळे मोठा फरक पडेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर विजय मिळू शकेल, हे कोणीही नाकारू शकत नाही, असे खैरे म्हणाले. त्यांनी मुंबईच्या राजकारणाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना, ही मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्यामुळेच मुंबई वाचलेली आहे, नाही तर या लोकांनी मुंबई कधीच तोडली असती, असेही नमूद केले. तेव्हाचे काँग्रेसचे सरकार असेल किंवा आताचे केंद्र सरकार असेल मुबई कशी काबीज करायची? असा त्यांचा प्रयत्न असतो. पण मराठी माणूस हा मराठी नेतृत्वाकडे पहात आहे, त्यामुळे दाव्याने सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते, असा आत्मविश्वास खैरे यांनी व्यक्त केला. तडजोड न केल्यास भाजप डोक्यावर बसेल चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केवळ ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे आवाहन केले नाही, तर सध्याच्या राजकीय परिस्थितीत तडजोड करण्याची गरजही व्यक्त केली. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळे लढायला लागले आहेत, पण कुठेतरी ऍडजस्टमेंट करावी लागेल, कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी आपल्याला निवडून येण्यासाठी तडजोड करावी लागेल, नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल, असे ते म्हणाले. काँग्रेसला आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसलाही फटकारले. काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे. काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तर कसा मजबूत होणार? असा सवाल त्यांनी केला. बिहारमध्ये किती जागा लढल्या पण एकच जागा आली. राहुल गांधी यांनी जी मतचोरी दाखवली त्याचा काहीच परिणाम बिहारमध्ये झाला नाही, असेही खैरे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 6:40 pm

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका:ऑफलाईन नामनिर्देशनपत्र रविवारीही स्वीकारणार, राज्य निवडणूक आयोगाची माहिती

राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघम वाजताच संभाव्य उमेदवारांची धावपळ वाढली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छूक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असून, प्रक्रिया अधिक सोयीस्कर व्हावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनेही रविवारी (ता. १६ नोव्हेंबर) नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार,नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेसुद्धा नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. ई-फायलिंगची सुविधा उपलब्ध असली तरी, मोठ्या प्रमाणावर उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑफलाईन नामनिर्देशन दाखल करणे पसंत करतात. यामुळे निवडणूक कार्यालयांमध्ये शेवटच्या दिवशी गर्दी होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी आणि प्रक्रिया विनाअडथळा पार पडावी म्हणून रविवारची अतिरिक्त सोय करण्यात आली आहे. रविवारी सरकारी सुट्टी असली तरीही सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे. याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी उपलब्ध केलेली ही सोय उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. अनेक उमेदवारांना अखेरच्या दिवशी कागदपत्रे तपासणे, दुरुस्ती करणे, शपथपत्र तयार करणे, तसेच इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी वेळ अपुरा पडतो. त्यामुळे रविवारी उपलब्ध असलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही आयोगाने केले आहे. अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या नंतर कोणतेही नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्रे, शपथपत्रातील सर्व माहिती, निवडणूक खर्चाशी संबंधित दस्तऐवज, तसेच आवश्यक सर्व परिशिष्टे योग्यरित्या तपासूनच दाखल करावीत, असे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्रक्रिया सुलभ करण्यासाठी निर्णय गेल्या काही निवडणुकांमध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी होत असल्याचे दिसले होते. यामुळे निवडणूक कार्यालयांमध्ये ताणतणावाची परिस्थिती निर्माण होत होती. तसेच कागदपत्रांची आरपार तपासणी करणे, त्रुटी दुरुस्त करणे या प्रक्रियेस विलंब होऊन काही उमेदवारांचे नामनिर्देशन तांत्रिक कारणांमुळे बाद होण्याच्या घटना घडल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आयोगाने यंदा विशेष दक्षता घेतली असून, प्रक्रिया सुलभ करण्यासाठी रविवारीही कार्यालये उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाचा निर्णय उमेदवारांसाठी सोयीचा राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये स्थानिक राजकीय वातावरण तापले आहे. विविध पक्षांकडून उमेदवार निवड प्रक्रिया सुरू असून, इच्छूक उमेदवार प्रत्यक्ष नामनिर्देशन दाखल करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय उमेदवारांना सोयीस्कर ठरणार आहे. विशेषतः सप्ताहांताचा वापर करून हजारो उमेदवार वेळेवर नामनिर्देशन दाखल करतील, अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 5:52 pm

एकीकडे कुटुंब जळत असताना मृतांच्या दागिन्यांची लुटालूट:अपघातानंतर मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर; VIDEO

पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने राज्यभरात हळहळ व्यक्त होत असताना, या दुर्घटनेनंतर घडलेला प्रकार समाजाला चक्रावून सोडणारा ठरला आहे. अपघातानंतर मदतकार्य करण्याऐवजी काही असंवेदनशील नागरिकांनी मृत आणि जखमींच्या सामानाची लुटालूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. एक टुरिस्ट कार दोन कंटेनरमध्ये चेंगरली गेली आणि त्यानंतर कारने तात्काळ पेट घेतला. या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 9 ते 10 जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अपघातातील मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. कुटुंब आगीत जळत होते, काहीजण निर्लज्जपणे सोने लुटत होते अपघातानंतर काही कुटुंबीय मदतीची अपेक्षा करत असताना, दुसरीकडे काही स्वार्थी व्यक्तींनी सोन्याचे दागिने आणि रोकड गोळा करण्यासाठी धावाधाव केली. दोन ट्रकच्या भीषण धडकेनंतर परिसरात पडलेली रोकड, मौल्यवान वस्तू हडप करण्यासाठी लोकांनी स्पर्धाच लावली होती. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये एकीकडे कुटुंब जळत असताना, काही लोक निर्लज्जपणे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटत होते. या अपघातात एका लहान मुलीसह कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला होता. समाजभरातून सहवेदनेचा सूर उमटत असताना, काहींच्या निर्ढावलेल्या वागणुकीने संतापाची लाट उठली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या लुटमारीचे दृश्य दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका बाजूला अपघातातील मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे लुटालूट होण्याची घटना ही समाजाच्या नैतिक पतनाचे सूचक मानली जात आहे. ट्रकचालकासह तिघांवर गुन्हा दाखल दरम्यान, या अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालक, मालकासह तीन जणांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरचाही होरपळून मृत्यू झाला. ट्रक चालक रुस्तम रूदार खान (वय 35, रा. किरवारी, किसनगड, राजस्थान) आणि मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (वय 31, रा. मनापुरी, रासगड, राजस्थान) यांचा होरपळून मृत्यू झाला. ताहीर नासीर खान (वय 45, रा. किसनगड, राजस्थान) याच्यावरही भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 (अ), (ब), 324 (4) आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 119, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ताहीर नासीर खान गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 5:25 pm

काँग्रेसने बिहारमधील ऱ्हासातून बोध घ्यावा:काँग्रेसचा BMC स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य की अयोग्य लवकरच कळेल - किशोरी पेडणेकर

काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला बिहारमधील आपला ऱ्हास पाहूनही मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणे योग्य वाटत असेल तर त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच ठरेल, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली. त्या म्हणाल्या, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला ऱ्हास पाहून त्यांच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. हा ऱ्हास पाहूनही त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर लढवावी. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. पण त्यांचे वरिष्ठ निश्चितपणे थांबवू शकतील. जे लोक स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहेत, त्यांना ते कदाचित योग्य वाटत असेल. पण पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्या वरिष्ठांनाही हा निर्णय योग्य वाटतो का मोठा प्रश्न आहे. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच कळेल. काय म्हणाले होते रमेश चेन्नीथला? काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय हा पूर्णतः स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार घेण्यात आल्याचे म्हटले होते. काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला. ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले. वर्षा गायकवाड यांनी साधला होता मनसेवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी ठाकरे गटाच्या मनसेला सोबत घेण्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली होती. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही. काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या छोट्या टपरीवाल्याला किंवा एखादा दुकानदाराला अथवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसमध्ये केव्हाही खपली जाणार नाही. गरिबांवर आपली ताकद दाखवणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांना कुणासोबत जायचे त्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमचे म्हणणे आहे की, मुंबईत आलेली सर्व मंडळी ही मुंबईकर आहेत. सर्वांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 5:19 pm

१० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा असे शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात […] The post १० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:21 pm

अजित पवारांच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान

मुंबई : प्रतिनिधी बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या अजित पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे […] The post अजित पवारांच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:20 pm

शिवसेना भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानाला महत्त्व देत नाही:BMC च्या महापौर पदावर संजय शिरसाट यांचे विधान; महायुतीत वादाची ठिणगी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. पण आत्तापासूनच सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत मुंबईच्या महापौरपदावरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असा दावा केला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी आम्ही रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला कोणतेही महत्त्व देत नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच यावेळी मुंबईचा महापौर भाजपचा होणार असल्याचा दावा केला होता. मुंबईत महापालिकेत महायुतीची सत्ता येणार आणि महापौर भाजपचा होणार, असे ते म्हणाले होते. यामुळे भाजपने 2017 मध्ये थोडक्यात हुकलेले महापौरपद यावेळी कोणत्याही स्थितीत मिळवण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या लेखी रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला कोणतेही महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले आहे. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या संदर्भात रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. या प्रकरणी अंतिम निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. विशेषतः या प्रकरणी युती होत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शक्य तिथे महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे युती होत नाही तोपर्यंत आम्ही याला गांभीर्याने घेणार नाही. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्येही जोर लावणार दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चांगलाच जोर लावण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपपुढे युतीचा औपचारिक प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेषतः भाजपने शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. याबैठकीला मंत्री संजय शिरसाट यांच्यासह खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर, माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विजय वाघचौरे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला. ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 4:18 pm

पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग

पुणे : आंबिल ओढा कॉलनीतील साने गुरुजी नगर येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागली. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या वसाहतीतील मीटर रूमला ही आग लागल्याची माहिती सध्या दिली जात आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, या घटनेने वसाहतीतील असुरक्षित आणि जर्जर स्थिती पुन्हा एकदा उघड केली आहे. गेल्या काही वर्षांत अशा तीन आग लागल्यानंतरही महानगरपालिका प्रशासन […] The post पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:17 pm

केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली

जळगाव : प्रतिनिधी पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे केळीचे बाजारभाव कोसळले असून सध्या केळी उत्पादक शेतक-यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पादन खर्च वाढला. झाडांवर केळी पिकत असून सडून जात आहे. माल बाहेर काढण्यासाठी शेतक-यांना अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल दर असलेल्या केळीला सध्या फक्त ३०० रुपये […] The post केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:11 pm

छ. संभाजीनगरमध्ये भाजप नेत्याचा खून

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छपत्रपती संभाजीनगरमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. छ. संभाजीनगरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळला. गंगापूर तालुक्यातील एका पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. भाजप नेत्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील भालगाव […] The post छ. संभाजीनगरमध्ये भाजप नेत्याचा खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:10 pm

अहिल्यानगर-पुणे बायपास मार्गावर ‘रास्ता रोको’

अहिल्यानगर : प्रतिनिधी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनंतर नागरिक हैराण झाले असून अहिल्यानगरमध्ये लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील इसळक, निंबळक आणि खारेखर या तीन गावांतील नागरिकांनी पुणे बायपास मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. बिबट्याला मारण्याची परवानगी द्या. तसेच बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटच्या […] The post अहिल्यानगर-पुणे बायपास मार्गावर ‘रास्ता रोको’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 4:08 pm

नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला खोचक टोला:म्हणाले - काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे

भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमसी स्वबळावर लढवण्याची भूमिका पोकळ असल्याचेही ते म्हणालेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. यामुळे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या प्रकरणी मनसेला सोबत घेण्यावर तीव्र आगपाखड केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस व मनसेला वरील टोला हाणला आहे. काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची नीतेश राणे म्हणाले, काँग्रेसमध्ये खरेच हिंमत असेल तर त्यांनी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावे. ते नुसत्या सुक्या धमक्या देतात. विजय वडेट्टीवार एक बोलणार, वर्षा गायकवाड दुसरे बोलणार आणि तिकडे अस्लम शेख वेगळेच बोलणार. हा सर्व मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्याचा कार्यक्रम आहे. काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे. त्यामुळे तिच्यावर मुंबई व महाराष्ट्रच नव्हे तर देशातही कुणाचा विश्वास राहिला नाही. राहुल गांधी हे पूर्णवेळ नव्हे तर अर्धवेळ राजकारणी नीतेश राणे यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी अर्धवेळ राजकारणी असल्याचीही टीका केली. राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांची जनतेशी नाळ नाही. ते देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करतात आणि पुन्हा परदेशात जातात. त्यामुळे त्यांना 100 टक्के भारतीय म्हणायचे का? हा प्रश्न उपस्थित होतो. अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले आहे. एकीकडे मतचोरीची बोंब करायची व दुसरीकडे लोकशाहीची थट्टा उडवायची ही राहुल गांधींना सवय झाली आहे. यामुळेच बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या एनडीएला बिहारचे नेतृत्व करण्याची पुन्हा संधी दिली, असे ते म्हणाले. काय म्हणाल्या होत्या वर्षा गायकवाड? उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे सूतोवाच करताना मनसेवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. आम्ही रोज मुंबईकरांचा त्रास पाहत आहोत. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. कारण, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जी मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही. महाविकास आघाडीमध्ये आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी असला पाहिजे. संविधानाच्या धाग्यातून असला पाहिजे. परंतु काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 3:57 pm

एकनाथ शिंदेंचा भाजपला झटका:पूर्व विदर्भातील 56 नगरपंचायती, नगरपरिषदांसाठी वाटले 1300 एबी फॉर्म; भाजपच्या प्रतिसादाकडेही लक्ष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने 56 नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 1300 हून अधिक एबी फॉर्म वाटून महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. शिवसेनेच्या या कृतीमुळे नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भात महायुतीत सर्वकाही ठिकठाक नसल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्ष या निवडणुकीसाठी आपापली रणनीती ठरवत आहेत. अनेक ठिकाणी या दोन्ही आघाड्यांतील मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात लढण्याचे संकेत दिलेत. त्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने पूर्व विदर्भातील 56 नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी तब्बल 1300 एबी फॉर्म वाटून सर्वांना धक्का दिला आहे. शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी याची पुष्टी केली आहे. शिवसेनेने यापूर्वीच दिला होता स्वबळाचा इशारा महायुतीच्या घटकपक्षांसोबत आघाडी करण्याचा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असणार आहे. पण युती झाली नाही तर शिवसेना सर्वच जागी आपले उमेदवार देईल, असे तुमाने याविषयी म्हणाले होते. विशेष म्हणजे शिवसेनेने यापूर्वीच भाजपला नागपूर जिल्ह्यातील सर्व 15 नगरपरिषदा व 12 नगरपंचायती स्वबळावर लढवण्याचा इशारा दिला होता. आमची आगामी ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याची इच्छा आहे. पण भाजपने वेळीच आपले पत्ते खुले केले नाही, तर आमचीही तयारी झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व 15 नगरपरिषदा व 12 नगपंचायतींवरील आमचे उमदेवार व त्यांचे एबी फॉर्म आमच्याकडे तयार आहेत, असे शिवसेनेने या प्रकरणी म्हटले होते. शिवसेनेचा महायुतीतील छोट्या पक्षांना हाताशी धरण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या या रणनीतीमुळे यापुढे शिंदे गट भाजपची वाट न पाहता पूर्व विदर्भात स्वबळ आजमावेल असा दावा केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वात नुकतीच नागपुरात भाजप वगळता इतर पक्षांची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदींची बैठक झाली होती. यामुळेही शिवसेनेने महायुतीतील भाजप वगळता इतर छोट्या पक्षांना हाताशी धरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत ाआहे. भाजपचे भंडाऱ्यात 'एकला चलो रे'दुसरीकडे, भाजपने भंडारा नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. भाजपने भंडारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मधुरा मदनकर यांच्या नावाचीही घोषणा केली आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीपैकी इतर कोणत्याही पक्षाने या निवडणुकीतील आपले पत्ते उघड केले नाहीत. पण भाजपने मात्र आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात येथील आपला प्रचारही सुरू केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 3:11 pm

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या शिबिरात चेन्निथला यांनी ही घोषणा केली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे […] The post मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 2:46 pm

अभिनेता राजकुमार राव झाला बाबा

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय जोड्या आई-बाबा झाल्या आहेत. आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपे म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा हे देखील आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. अभिनेता […] The post अभिनेता राजकुमार राव झाला बाबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 2:43 pm

बिहारमध्ये मोदी, नितीश नव्हे लाडकी बहीण जिंकली:एकेका घरात 40-50 हजार पोहोचले, खडसेंनी NDA च्या बिहार विजयाची केली चिरफाड

बिहार विधानसभा निवडणुकीतील एनडीएचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा नव्हे तर लाडक्या बहिणींचा विजय असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सरकारने महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये दिले. यामुळे एकेका घरात 40-50 हजारांहून अधिकची रक्कम जमा झाली. या पैशांना जागून लाडक्या बहिणींनी मतदान केले, असे ते म्हणालेत. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयु महायुतीचा दैदिप्यमान विजय झाला आहे. तर राजद-काँग्रेस महाआघाडीचा पुरता धुव्वा उडाला आहे. आता या निवडणुकीतील एनडीएच्या विजयाचे वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केले जात आहे. अनेकांनी हा विजय भाजपच्या सूक्ष्म पातळीवरील नियोजनामुळे झाल्याचा दावा केला आहे. तर काहींनी निवडणुकीच्या तोंडावर महिलांना वाटलेल्या पैशांमुळे भाजपचा हा विजय झाल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही असाच दावा केला आहे. त्यानंतर आता त्यांच्या पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांचीही त्यात भर पडली आहे. लाडकी बहीण महाराष्ट्रातून बिहारमध्ये पोहोचली एकनाथ खडसे म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल राजकीयदृष्ट्या एक वेगळाच संदेश देणारा आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार विजयी झाले नाहीत. या निवडणुकीत लाडकी बहीण निवडून आली आहे. त्याच दृष्टिकोनातून तेथील मतदानावर प्रबाव व परिणाम झालेला दिसतो. लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रातून ती बिहारमध्ये पोहोचली. एकेका महिलेला 10 हजार रुपये देण्यात आले. त्याचा मोठा परिणाम निकालावर झाला. एकेका घरात 50 हजारांहून अधिकची रक्कम पोहोचली निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सरकारने महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले. यामुळे एकेका घरात 40 ते 50 रुपयांहून अधिकची रक्कम जमा झाली. त्याचा परिणाम मतदारांवर होणारच. लाडक्या बहिणींनी याच पैशांना जागून मतदान केले. त्यामुळे बिहारमध्ये पंतप्रधान मोदी किंवा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या गुणवत्तेवर अथवा कामावर मतदान झाले नाही. या निवडणुकीत लाडक्या बहिणीचा विजय झाला आहे. त्यातून काळजी करावा असा संदेश देशभरातील मतदार व कार्यकर्त्यांना गेला आहे, असे खडसे म्हणाले. शरद पवारांनीही एनडीएच्या विजयाचे श्रेय दिले 10 हजार रुपयांना दुसरीकडे, शरद पवारांनीही बिहारमधील एनडीएच्या विजयाचे श्रेय महिलांना मिळालेल्या 10 हजार रुपयांना दिले आहे. ते शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते. तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 2:36 pm

हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ४० एकर जमीन फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशी समिती गठित करण्यात आली आहे, तर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला आहे असे सांगितले. मात्र या प्रकरणात या गैरव्यवहारात […] The post हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 2:26 pm

सोलापूर महामार्गावरील हॉटेलमध्ये व्यवस्थापकाला नग्न करून मारहाण:व्हायरल व्हिडीओवर मालक लखन माने यांचे स्पष्टीकरण

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णीजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकाला त्याच्या चुकीमुळे हॉटेल मालकाने नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. टेंभुर्णी येथील 'हॉटेल 7777' चे मालक लखन माने यांनीच ही मारहाण केली असल्याचा आरोप आहे. ही मारहाण हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांच्या समोरच घडली, ही बाब अधिक धक्कादायक आहे. या गंभीर घटनेनंतरही, पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. हॉटेल मालकाने दिले स्पष्टीकरण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण देताना हॉटेल मालक लखन माने यांनी सांगितले की, व्हिडीओ वेगळ्या पद्धतीने सादर केला गेला आहे आणि त्याद्वारे त्यांचे, हॉटेलचे तसेच व्यवस्थापकाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमागील सत्यता आणि व्हिडीओ कोणी काढला, याची माहिती घेणे गरजेचे आहे. म्हणून दादांनी शिक्षा केली दुसरीकडे, मारहाण झालेल्या व्यवस्थापकानेही आपली बाजू मांडली आहे. मॅनेजरने सांगितले की, वैयक्तिक तणावामुळे मी मद्यपान केले होते आणि हॉटेलवर आल्यावर दादांनी मला शिक्षा केली. मी दादांसोबतच काम करत राहील. दादा हे माझे फॅमिली मेंबर आहेत. त्यांनी मला लागेल तेव्हा मदत केलेली आहे. हवे तेव्हा पैसे दिलेले आहेत. हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केला आहे त्यांनी असं करू नये. आज आमच्या हॉटेलचे नाव आणि दादांचे नाव बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, बदनामी करण्याचा प्रयत्न लखन माने म्हणाले की, 'हॉटेल 7777' हे एक कुटुंबासारखे आहे. काही घटना घडल्या असल्या तरी त्यांची सत्यता समजून घेतल्याशिवाय व्हिडीओ पसरवू नका. व्यवस्थापकाशी आपले नाते भावासारखे आहे आणि कोणत्याही प्रकारचा गालबोट किंवा हिंसाचार अपेक्षित नाही. व्हायरल होत असलेले व्हिडीओ आपले नाव बदनाम करण्याच्या हेतूने पसरवले जात आहेत, मात्र लवकरच सत्य समोर येईल, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 2:08 pm

मुंबईत वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता

मुंबई : प्रतिनिधी पावसाळा संपताच मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांना आपली विशेष पथके पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत. या पथकांमध्ये विभाग कार्यालयातील दोन अभियंते आणि एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. यंदापासून या सर्व पथकांमध्ये पर्यावरण विभागातील एका अधिका-याचा समावेश बंधनकारक आहे. प्रदूषण ट्रॅकिंग […] The post मुंबईत वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 2:03 pm

अजित पवारांनी घेतली अमित शहांची भेट:महाराष्ट्रात सळो की पळो झाल्याने दिल्लीला पळाले - दमानिया; ताथवडे प्रकरणात गुन्हा दाखल

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी जवळपास अर्धा तास बंद दरवाज्याआड चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. पण पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांत हा संवाद झाल्यामुळे त्यांच्या भेटीला महत्त्व आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सळो की पळो झाल्यामुळे अजित पवार पाया पडण्यासाठी दिल्लीला गेल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला. त्याचा मोठा विजय भाजपने शुक्रवारी दिल्लीत साजरा केला. या विजयोत्सवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण सूत्रांनी ही चर्चा बिहार निवडणुकीतील भाजपचा विजय व महाराष्ट्रातील घटनाक्रमाशी निगडित होती असा दावा केला आहे. त्यामुळे या भेटीविषयी राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. मुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवार अडचणीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुण्यातील मुंढवा येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. या प्रकरणी दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नियुक्त केल्लया समितीचा अहवाल सोमवारी येणार आहे. या अहवालानुसार या प्रकरणी पुढील कारवाई केली जाणार आहे. विशेषतः या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यामुळे अजित पवार यांनी तातडीने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचाही दावा केला जात आहे. अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सळो की पळो झाले की दिल्लीला पळा, पाया पडा, असे त्यांनी म्हटले आहे. .याद्वारे त्यांनी पुण्यातील भूखंड घोटाळ्यामुळे अडचणीत सापडल्यामुळेच अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याचे सूचित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी राज्यातील काही मुद्यांवर अमित शहांची भेट घेतली असेल, असे म्हणत याविषयावर भाष्य करणे टाळले आहे. ताथवडे भूखंड घोटाळ्यात अखेर गुन्हा दाखल दुसरीकडे, ताथवडे प्रकरणात शासनाची मालमत्ता लाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे. ते म्हणाले, ताथवडे शासनाची मालमत्ता लाटणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल. ताथवडे, सर्व्हे नं. 20 मधील 6.32 हेक्टर (अंदाजे 16 एकर) पशुपैदास प्रक्षेत्राच्या ताब्यातील सरकारी जमीन बेकायदेशीरपणे हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर दापोडी पोलिस ठाण्यात शेवटी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात कालबाह्य 7/12 उतारे वापरणे, ई-म्युटेशन स्किप करणे, खोटा दस्ताऐवज क्रमांक 685/2025 नोंदवणे आदी माध्यमातून संपूर्ण सरकारी जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानुसार या प्रकरणी मयत हेरंभ गुपचूप यांचे 23 वारस, खरेदीदार कफील फकीर, सैयद फैयाज मीर अजिमोद्दीन, तसेच सह दुय्यम निबंधक विद्या बडे, सांगळे व इतरांवर दाखल करण्यात आला आहे. कफील फकीर हा काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये आजी किंवा माजी संचालक असल्याचे समोर आले आहे, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 1:57 pm

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण

मुंबई : प्रतिनिधी महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान केला. महाराष्ट्रातील कलाक्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. सध्या राम सुतार यांचे वय १०० वर्षे आहे. त्यांनी साकारलेली शिल्प आजही इतिहासाची साक्ष […] The post प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 1:20 pm

संत्र्यांच्या दरात वाढ; बाजारपेठेत आवक घटली

मुंबई : प्रतिनिधी एपीएमसीतील फळ बाजारात नोव्हेंबर महिन्यात संत्र्यांची आवक वाढते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागपूरसह विदर्भातील संत्री उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, मुंबईच्या बाजारात संर्त्याची आवक घटल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दरदिवशी ४० ते ५० […] The post संत्र्यांच्या दरात वाढ; बाजारपेठेत आवक घटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Nov 2025 1:17 pm

मुख्यमंत्र्यांनी फेटाळली शरद पवारांची टीका:म्हणाले - जो जीता वही सिकंदर! लोकांनी आम्हाला मतदान केले, त्यांना दोष देण्याचे कारण काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकारने महिलांना वाटलेल्या प्रत्येकी 10 हजार रुपयांमुळेच एनडीचे बिहारमध्ये विजय झाल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आत्मपरीक्षण करत नाहीत तोपर्यंत विरोधकांची मातीच होईल मुख्यमंत्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणे हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सर्वांनाच होती. त्यांची सरकारे होती तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाही. आम्ही योजना केल्या. त्या लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय आहे? विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत त्यांची मातीच होत राहील, असे ते म्हणाले. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, विरोधी पक्ष एकत्रित लढतो की स्वतंत्र लढत आहे यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण कसे लढत आहे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र तिथे महायुती निवडून येईल यात शंका नाही. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य वेधले असता त्यांनी अजित पवारांनी राज्यातील काही मुद्यांवर अमित शहांची भेट घेतली असेल, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते शरद पवार? शरद पवार बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते. तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 1:12 pm

राज्यात कुष्ठ रोग निर्मुलनासाठी सोमवारपासून आरोग्य तपासणी मोहिम:8.66 कोटी जनतेच्या घरोघरी जाऊन घेतली जाणार माहिती- आरोग्यमंत्री मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यात कुष्ठ रुग्णांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना त्वरीत औषधोपचार सुरु करून पूर्ण मात्रा देत कुष्ठरोग निर्मूलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सोमवारपासून ता. 17 राज्यातील 8.66 लाख जनतेची आरोग्य विषयक तपासणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. राज्यात कुष्ठरोग निर्मुलन मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून त्यांच्या मार्फत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यातून संशयित कुष्ठ रुग्णांची माहिती घेतली जाईल. त्यांच्या निदान निश्‍चितीनंतर तत्काळ औषधोपचार सुरु करणे अत्यंत महत्वाचे आहे. कुष्ठ रुग्ण निदान व औषधोपचारांपासून वंचित राहिल्यास अथवा विलंब झाल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना तर करावा लागतोच आणि त्याच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना रोगाची लागण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सर्व कुष्ठ रुग्ण शोधण्यासाठी सोमवारपासून ता. 17 ते ता. 2 डिसेंबर या कालावधीत विशेष अभियान राबवले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य व इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये कुष्ठ रुग्णांचे संशयित शोधून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निदान निश्चिती नंतर तात्काळ उपचार सुरु करण्यात येणार आहेत. या कालावधीत राज्यातील सुमारे 8.66 कोटी लोकसंख्येची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात 1135 पथके हिंगोली जिल्ह्यांमध्ये 1135 पथकामार्फत 11.23 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणांमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा व पुरुष स्वयंसेवक हे घरोघरी जावून संशयित कुष्ठ रुग्ण शोधणार आहेत. संशयित कुष्ठ रुग्णांना निदान निश्चितीसाठी आरोग्य संस्थेमध्ये पाठवणार आहेत. कुष्ठरोगाचे निदान झालेल्या कुष्ठ रुग्णांवर तातडीने मोफत औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 12:58 pm

ओबीसींना कमी आरक्षण मिळाले:OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांचा इलेक्शन कमिशनवर आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसंना कमी आरक्षण मिळाले आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. या प्रकरणी फेरविचार करावा अन्यथा कोर्टात जावू, असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. या निवडणुकापूर्वीच ओबीसी महासंघाने हा आरोप केलाय. नेमके प्रकरण काय? निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात महापालिका क्षेत्रास ओबीसींसाठी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी जागांची मोजणी करताना अपूर्णांक दुर्लक्षित करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे एका ओबीसी जागांचे नुकसान होते. हाच धागा पकडत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालेला दिसतो आहे. मुख्यमत्र्यांची भेट घेणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे ओबीसींचे नुकसान होते आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा कोर्टात जाणार असल्याचा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. सोबतच या मुद्यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत. एससी, एसटी आरक्षणानुसार अपूर्णांक आल्यास 0.50 व त्यापेक्षा जास्त असलेला अपूर्णांक पुढील संख्येस पूर्णांकित करावे, अशी मागणीही त्यांनी केलीय. आता यावर राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल. अशी होतेय निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी होईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल. असे आहे आरक्षण नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी कोकणात 17, नाशिक 49, पुणे 60, संभाजीनगर 52, अमरावती 45, नागपूर 55 ठिकाणी निवडणूक होतेय. त्यात एकूण 246 नगरपरिषद असून, 4 नगरपंचायती आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 3,820 प्रभाग आहेत, तर 6,859 जागा आहेत. यातील 3,492 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी जागा 895, अनुसूचित जमातींसाठी जागा 338, तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,821 जागा राखीव आहेत. मतदारांचे नाव शोधणे सोपे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधणे सोपे झाले आहे. त्यासाठी https://mahasecvoterlist.in हे संकेत स्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच येथे नाव शोधता येईल. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 12:48 pm

राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे 100 पराभव ठरलेले:बच्चू कडू तुमचा पराभव आयोगामुळे नाही; तुमच्या वागण्यामुळे- नवनाथ बन

अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा पराभव भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याने केला आहे.कारण भाजपचे कार्यकर्ते हे जनतेमध्ये असतात. बच्चू कडू यांनी आपला पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे त्यानंतर बोलले पाहिजे, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी भाजपच्या कार्यालयात मतदान घ्या असे म्हणणाऱ्या बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसचे निवडणूक प्रभारी पराभवाचा दोष निवडणूक आयोगाला देत आहे.आयोगाला दोष देण्यापेक्षा राहुल गांधी यांचे काय चुकते याचा विचार करावा. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या 95 निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. राहुल गांधी यांची थोड्याच दिवसांमध्ये शतकवीर म्हणून घोषणा होणार आहे. काँग्रेसने आत्मचिंतन करावा की आपला पराभव का होतो आणि मग निवडणूक आयोगाला दोष द्यावा. महाराष्ट्रात मतदारांचा अपमान केल्याने तुमचा पराभव झाला आणि जनतेने तुम्हाला घरी बसवले. बिहार मध्येही तसेच घडले. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे 100 पराभव होतील. मविआचे 12 वाजणार नवनाथ बन म्हणाले की, मुंबई मनपात काँग्रेसने कसेही लढावे. बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांची जी अवस्था झाली आहे अगदी तशीच अवस्था मुंबई मनपामध्ये होणार आहे. काँग्रेस बिहारमध्ये दोन आकडी आकडा सुद्धा गाठू शकली नाही तसेच मुंबईत सुद्धा होईल.भाजपच्या आणि युतीच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. बिहारमध्ये जसे आघाडीमध्ये वाद होते तिथे जसे 12 वाजले तसेच मुंबई मनपामध्येही वाजतील. मुंबईचा सेवकच होणार नगरसेवक नवनाथ बन म्हणाले की, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक म्हणणाऱ्यांना मला इतकेच सांगायचे आहे की जो मुंबईचा सेवक आहे तोच मुंबईचा नगरसेवक होणार आहे हे मुंबईकर आणि मराठी माणसांनी ठरवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठाकरे ब्रँड होता कारण ते हिंदुत्ववादी होते. तुमचा ब्रँड पलटी आहे म्हणून जनता तुम्हाला घरी बसवेल. आता मुंबईकरांनी सेवकांना निवडून द्यायचे ठरवले आहे. बिहार तो झांकी है… मुंबई अभी बाकी है नवनाथ बन म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचे नगाडे वाजले आणि त्यांच्या कानठळ्या मात्र मुंबईत बसल्या सामानामध्ये अग्रलेख लिहिण्यापूर्वी 2010 मध्ये काँग्रेसच्या राजवटीतल्या बिहार निकालात गप्प बसलेले आज ‘आयोग द्रोही’ कसा झाला? त्यावेळी केंद्र सरकार दोषी वाटले नाही पण आता जंगलराज दूर झाल्यावर तुम्हाला त्रास होत आहे. संजय राऊत यांना आरामाची गरज आहे, आराम करा मग अग्रलेख लिहा.बिहार तो झाकी है मुंबई अभी बाकी है असे म्हणत मुंबई मनपा निवडणुकीचा निकाल देखील असाच लागणार असे बन यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 12:42 pm

काँग्रेस BMC निवडणूक स्वबळावर लढणार:काँग्रेसची मोठी घोषणा; मनसेशी आघाडी करण्याचा प्रयत्नांत असणाऱ्या उद्धव ठाकरेंना झटका

काँग्रेसने मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाने या माध्यमातून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जबर धक्का दिला आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 12:28 pm

बिहारची निवडणूक महिलांनी हातात घेतली होती:NDA चा महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटल्याने विजय झाला, शरद पवार यांचा दावा

केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले. या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप - जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील दावा केला आहे. ते शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बिहार निवडणुकीपूर्वी सरकारने तिथे मोठ्या प्रमाणात पैसै वाटले. त्यामुळे तिथे वेगळा निकाल लागण्याची शक्यता शक्यता नव्हती. सरकारने मतांसाठी अधिकृतपणे पैसे वाटले शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते. तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे. 10 हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही निवडणुका स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात. यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण 10-10 हजार रुपये देणे, ही काही लहान रक्कम नाही. महिलांना एवढी मोठी रक्कम द्यायची आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जायाचे, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक व स्वच्छ होत्या का? याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. स्थानिकच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना सर्वाधिकार पत्रकारांनी यावेळी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली, अशी युती पुण्यातही होईल का? असा प्रश्न केला. त्यावर शरद पवार यांनी आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 12:19 pm

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण:हायकोर्ट जजच्या अध्यक्षेताखील चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची CM देवेंद्र फडणवीसांकडे मागणी

पार्थ पवार यांच्या पुणे येथील मुंढवा जमीन घोटाळ्याचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपासून ते खालच्या अधिकाऱ्यांचा संगनमताने झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराची निष्पक्ष चौकशी न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी शनिवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की,पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराप्रकरणी सरकार दिशाभूल करत आहे. तहसीलदारांवर झालेली कारवाई दुसऱ्या प्रकरणातली आहे. वतनाची जमीन खरेदी झाली त्या व्यवहारात जे जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जिल्हाधिकारी, एसडीओ हात झटकू शकत नाहीत. जिल्हाधिकारी समितीत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे ही समिती रद्द करून न्यायिक चौकशी करावी. व्यवहार असा रद्द करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कुणालाही वाचवू नये. सरकार इमानदार असेल तर उच्च न्यालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे २४ ऑक्टोबर १९७३ रोजी ही जमीन 'वनस्पती सर्वेक्षण विभाग' यांना वार्षिक रु. १/- भाड्याने १५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. नंतर ३१ मार्च २०३८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ३० डिसेंबर २०२४ रोजी शीतल तेजवानी यांनी कोणताही अधिकृत शासन निर्णय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही, व्याजासह फक्त रु. ११ हजार ही रक्कम 'जमीन धारकत्व मूल्य' म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. अधिकाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही रक्कम स्वीकारली. २० मे २०२५ रोजी विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यात जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला बाजार मूल्य, स्टॅम्प ड्युटी याचा कोणताही उल्लेख नाही. सिटीसर्वे मिळकत पत्रिका उपलब्ध असतानाही, केवळ जुन्या ७/१२ उताऱ्यावर आधारित दस्त नोंदविण्यात आला. नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने शासकीय जमीन खाजगी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याचे गैरकृत्य केले. ०९ जून २०२५ रोजी तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी कोणताही तपास न करता अमेडिया कंपनीच्या मागणीनुसार BSI ला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. याच अधिकाऱ्यावर याआधी बोपोडी येथील प्रकरणात गुन्हा दाखल आहे, अस वडेट्टीवर यांनी पत्रात नमूद केले आहे. शासकीय जमिनीवर बेकायदा ताबा घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनुकूल अशी भूमिका तहसीलदाराने घेतली. वतनाच्या जमिनी हस्तांतरित करण्यासंबंधीच्या २०२१ च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून, शासनाची पूर्वपरवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमीन धारकत्व मूल्य स्वीकारले. इलीजिबीलिटी प्रमाणपत्र न घेता, स्टॅम्प ड्युटी व मूल्यांकन नियम मोडून आणि केवळ लेटर ऑफ इन्टेन्टवर सवलत देऊन बेकायदा दस्त नोंदणी करण्यात आली. लाभार्थी शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीने खोटे कागदपत्रे आणि चुकीची ओळख वापरून शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला आहे. सगळ्यात महत्वाची बाब, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली,त्यातील काही अधिकारी हेच आधीच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत. यामुळे नेमलेली चौकशी निष्पक्ष चौकशी करणार नाही, समिती रद्द करणे आवश्यक आहे. हा केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून, शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचा नियोजनबद्ध अपहार आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणमधील सर्व बेकायदेशीर व्यवहार, आदेश व विक्रीपत्रे तात्काळ रद्द करावीत. सर्व संबंधित अधिकारी आणि लाभार्थी, अमेडिया कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रात केली. या प्रकरणी वडेट्टीवर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्य सचिवाना देखील पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी सुरु करावी. गैरव्यवहार झालेली जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी. याच अधिकाऱ्यांनी आणखी कोणत्या सरकारी व खाजगी जमिनी बळकावल्या आहेत, याची स्वतंत्र सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारा यांनी केली आहे. (हे वृत्त अपडेट होत आहे.)

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 12:02 pm

व्होट चोरी करूनही काँग्रेस संपवू शकला नाहीत:काँग्रेस ही जनचळवळ; समुद्रात काठी मारून समुद्र तुटत नाही- सचिन सावंत

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'काँग्रेस मुक्त भारत'चे स्वप्न पाहणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि संवैधानिक संस्था वापरून 'व्होट चोरी' करूनही काँग्रेसला संपवण्यात अयशस्वी ठरले, अशी टीका सावंत यांनी केली. सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करून टिकून राहिला आहे. आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही, तर तुम्ही कोण आलात? असा थेट प्रश्न त्यांनी भाजपला विचारला. काँग्रेसला विभाजित करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत, कारण काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही, असे म्हटले आहे. नेमके सावंत काय म्हणाले? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न बघणारे नरेंद्र मोदी गेले 11 वर्षे सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा लावून आणि संवैधानिक संस्था वापरून व्होट चोरी करून अयशस्वी ठरले. काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करुन टिकून राहिला आहे. इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही तर तुम्ही कोण आलात? काँग्रेस विभाजित करण्याचा कितीही प्रयत्न करा. काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही. बरं, इतिहासात डोकवा मुस्लीम लीग विरोधात काँग्रेस लढली तुमच्या पूर्वजांनी त्यांच्यासमवेत सरकारे स्थापन केली होती इतके तुमचे मुस्लिम लीगवर प्रेम होते. तुम्ही संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत रहा, आम्ही राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या व लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावत राहू.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 11:39 am

बिहार विजय हा जनतेचा नाही, मशीनचा कौल:भाजप स्थानिक पक्ष संपवणार; अजित पवार–शिंदे यांची गरज संपली, बच्चू कडूंचे विधान चर्चेत

बिहार निवडणुकीत राहुल गांधी यांची जी भूमिका होती आणि तिथले वातावरण पाहिले तर इतक्या फरकारने एनडीएचे सरकार येण्यासारखे चित्र नव्हते. मुळातच मतदानात पारदर्शकता नसल्यामुळे हा जनतेचा कौल नाही तर मशीनची कामगिरी आहे असे दिसून येत आहे, असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. असे होत राहिले तर लोकशाहीचे पतन झाल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडू म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना विरोधक संपवायचे आहेत. तुम्ही अचलपूर विधानसभेचे उदाहरण पाहिले पाहिजे. तर तिथे माहोल आमचा होता आणि तिथे विजय दुसऱ्याच्या हाती गेला आहे. एकंदरीत हेच चित्र सर्व ठिकाणी आहे. भाजपला आता स्थानिक पक्ष संपवायचे आहे. त्यांना आता महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची गरज नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यात भाजप एकटे कसे पुढे जाईल हा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे. भाजपच्या कार्यालयात मतदान ठेवा बच्चू कडू म्हणाले की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मशीन काम दाखवणार आहे. मतदारांच्या मताचा विषय संपलेला आहे. आता नगरपालिकेला व्हीव्हीपॅट दिसणार नाही मग तर विषयच संपला. आता मतदान केंद्रावर मतदान ठेवण्यापेक्षा ते भाजपच्या कार्यालयात ठेवले पाहिजे, असा टोलाही कडू यांनी लगावला आहे. हा सर्व मशीनचा चमत्कार बच्चू कडू म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर 10 हजार रुपये महिलांच्या खात्यावर देण्याची योजनेत निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करायला हवा होता. सत्तेचा वापर करत पैसा हाती देत निवडणूक लढवणे यावर आक्षेप घेतला पाहिजे. केवळ लाडक्या बहिणींमुळे हा चमत्कार झालेला नाही हा सर्व मशीनचा चमत्कार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही पण ती आली की चित्र बदललेल दिसेल. लोकशाहीची थट्टा बच्चू कडू म्हणाले की, काँग्रेसने EVM आणले तेव्हा भाजपवाले बोलत होते आणि आता भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेस बोलत आहे म्हणजे दोघांकडून ही लोकशाहीची थट्टा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EVM ला विरोध केला होता. त्यांचे जुने भाषण समोर आणले तर त्यांच्या आरोपात किती सत्य आहे. सुरवात काँग्रेसने केली असली तरी लोकशाही संपूर्ण संपवायची हा विडा भाजपने उचलला आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 11:15 am

मी कट्टर भाजप समर्थक असल्याचा आनंद:अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता यांचे विधान; बिहारमधील NDAच्या विजयावर आनंद व्यक्त

सिने अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी बिहारमधील भाजप-जदयु महायुतीच्या दैदिप्यमान विजयावर आनंद व्यक्त केला आहे. मी कट्टर भाजप समर्थक असल्यामुळे मला बिहारमधील एनडीएच्या विजयाचा फारच आनंद झाला, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय, सामाजिक व कला क्षेत्रात खमंग चर्चा रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाल्यामुळे विरोधकांच्या तिळपापड झाला आहे. त्यांनी या प्रकरणी ईव्हीएम व कथित मतचोरीला दोष दिला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांनी भाजपच्या बिहारमधील विजयावर आनंद व्यक्त केला आहे. 'व्यासपीठावर उपस्थित सगळे मान्यवर, आमदार संजय केळकर तुम्हा सर्वांचे बिहार विधानसभा निवडणुकीत विजय झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मी जरा कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे', असे त्या म्हणाल्या. गंधार गौरव पुरस्कार प्रदान ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात निवेदिता सराफ यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना त्यांचे पती व ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी वरील विधान केले. निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या, आज मी जे काही आहे ते माझे गुरू, माझे पती अशोक सराफ यांच्यामुळे आहे. त्यामुळे त्यांच्याच हस्ते मला हा पुरस्कार दिला गेला याचा मला मनस्वी आनंद आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही बालनाट्यापासून झोाली. सुधा करमरकर या माझ्या पहिल्या गुरू होत्या. त्यांच्या संस्थेतर्फे मी अनेक बालनाट्यांमध्ये काम केले. त्यानंतर अमृतवेल व बंध रेशमाचे या खूप मोठ्या नाटकांम्ध्येही मी काम केले. सुधा ताईंनी मला खऱ्या अर्थाने रंगमंचावर उभे राहायला शिकवले. त्या काळात रत्नाकर मतकरी व सुधाताई सातत्याने बालनाट्य रंगमंचावर आणत होत्या. त्यांचे महाराष्ट्रभर दौरे असायचे. बालनाट्यामुळे उद्याचे प्रेक्षक घडतात. त्यामुळे बालनाट्यांची शिबिरे आयोजित करणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी माझी मदत करण्याची तयारी आहे, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. महेश कोठारेंनीही केले होते भाजपचे समर्थन उल्लेखनीय बाब म्हणजे मराठी कलाकारांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनीही पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक केले होते. भाजपा म्हणजे आपले घर आहे. कारण, मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना खोचक टोला हाणला होता. महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल, असे संजय राऊत म्हणाले होते. ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनीही या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधला होता. महेश कोठारे यांनी आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा दावा त्यांनी केला होता.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 11:14 am

अजित पवारांचे राष्ट्रवादीवर वर्चस्व नाही का?:बिहारमध्ये उमेदवार देऊ नका असे सांगूनही प्रफुल्ल पटेलांनी उमेदवार दिले; स्वतःच दिली कबुली

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सर्व उमेदवारांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. सर्व उमेदवारांना 1,000 हून कमी मते मिळाली, ज्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. या पराभवानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करु नका असे मी सांगितले होते. परंतू त्यानंतर आमच्याकडे वरीष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी महाराष्ट्रात लक्ष दिल्याने या बद्दल मला काही माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, मी पक्षाला बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका, असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केल्यामुळे याबद्दल मला कोणतीही माहिती नाही, असे सांगत त्यांनी या निर्णयाचे खापर थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर फोडले. अजित पवार यांच्या स्पष्ट व ताठर भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेद उघड झाले आहेत. अजित पवारांनी 'ना' सांगितल्यावरही प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले, या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी एक गंभीर आरोप केला होता. रोहित पवार म्हणाले होते की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही अजितदादांचे महत्त्व आणि राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमधील या अपयशानंतर आणि अजित पवारांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे, खरोखरच पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील निर्णयांमधून अजित पवारांना बाजूला केले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत नेतृत्वाच्या संघर्षाची ही नवी झलक आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:46 am

काँग्रेस बिग ब्रदर नव्हे केवळ 'ब्रदर':वंचितचा काँग्रेसपुढे मैत्रीचा हात अन् टोला; बिहारमध्ये EVM, भाजप, EC चा विजय झाल्याचा दावा

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर येण्याचाही सल्ला दिला आहे. काँग्रेसने मोठ्या भावाच्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला भाऊ मानू, तुमच्याशी युतीही करू. पण तुम्ही मोठे राहिला नाहीत, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असे वंचितने म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप - जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या सूरात आता वंचित बहुजन आघाडीनेही सूर मिळवला आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, मतदान यंत्र व निवडणूक आयोग या तिघांच्या महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस - राजदला का फटका बसला? सुजात आंबेडकर म्हणाले, आज बिहार निवडणुकीचा निकाल आला. त्यात भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या महागठबंधनने विजय मिळवला. या बिहार निवडणुकीत काँग्रेसने एक घोडचूक केली ती म्हणजे, काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसतांना, त्यांचे तिथे नेतृत्व नसतांना आरजेडीशी वाद घालून त्यांनी जास्तीच्या जागा घेतल्या आणि त्या जागांवर काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेसला फटका बसला. प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसपुढे मैत्रीचा हात पुढे करत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या पक्षाला आपण मोठा भाऊ राहिलो नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्याचा टोलाही हाणला. काँग्रेसने 'बिग ब्रदर'च्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला 'ब्रदर' मानू, तुमच्याशी युती सुद्धा करू पण, तुम्ही 'बिग' राहिलेले नाहीत, हे काँग्रेसने समजून घ्यावे. जिथे वंचित बहुज आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे सन्मानपूर्वक कार्यकर्त्यांना जागा मिळतील. तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल. ..तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता प्रस्थापित नेत्यांना आमचं एक सांगणे आहे की, तुम्ही कधी शहाणे होणार? काँग्रेसच्या स्थानिक लीडरशिपने शहाणपण दाखवत स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हाच शहाणपणा 2019, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांनी दाखवला असता, तर त्यांचा सुपडा साफ झाला नसता, असे ते म्हणाले. खालच्या व्हिडिओत पाहा काय म्हणाले सुजात आंबेडकर? 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान दिन उल्लेखनीय बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीने येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधानाच्या सन्मानार्थ संविधान सन्मान महासभेचे आयोजन केले आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे शेवटचे भाषण दिले. या अत्यंत महत्त्वाच्या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याचे धोके आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांसह सामाजिक लोकशाहीची आवश्यकता यावर भर दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी येत्या 25 तारखेला संविधानाच्या सन्मानार्थ “संविधान सम्मान महासभा” आयोजित करत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:37 am

मंत्रिमंडळातील काही मंत्री मराठा समाजाच्या विरोधात:महामंडळाचे एलवाय अचानक बंद, सरकारच्या सूचना आहेत का? जनतेला प्रश्न पडलाय- नरेंद्र पाटील

राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री जे वेगवेगळ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, निझामांचे गॅझेट, मराठा आंदोलन, सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ यांच्याविरोधात बोलताना दिसून येत आहे. हेच मंत्री षड्यंत्र करत महामंडळाचे एलवाय देऊ देत नाही त्यांच्याच सूचनेप्रमाणे हे सर्व होत आहे असे मला वाटायला लागले आहे, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. नरेंद्र पाटील म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ हे राज्यात वेगवेगळ्या मेळाव्याना जात अण्णासाहेब पाटी महामंडळाचा चुकीचा प्रचार करत होते. महामंडळाने आणि सरकारने 22 आणि 25 हजार कोटीचे कर्ज कधी दिले नाही. केवळ 1300 कोटी रुपयाचा व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात आला आहे. त्यांना सरकारच्या धोरणाबद्दल बोलायचे असेल तर त्यांनी बोलावे पण एक लक्षात ठेवले पाहिजे की 80 पासून लढत असताना आता फडणवीसांच्या रुपाने चांगला मुख्यमंत्री आम्हाला भेटला आहे. जे मराठा समाजाला न्याय देत आहे, यामुळे भुजबळांचे पोटदुखी आहे असा टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे. सरकारने सूचना दिल्या का? नरेंद्र पाटील म्हणाले की, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी दोन्ही गोष्टी पद्धतशीर टप्प्या टप्प्यांमध्ये कमजोर किंवा बंद करण्याचा जो कार्यक्रम आखलेला आहे याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नक्कीच असणार. मला महामंडळाची जबाबदारी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देण्यात आली आहे. एमडी मराठा असूनही त्यांना याबद्दल काही वाटले नाही. आता सरकार हे मुद्दाम करत आहे का असा सवाल जनतेला पडला आहे. सरकारने त्यांना काही सूचना दिल्या आहेत का? करी योजना बंद करायची असा प्रश्न जनतेला पडला आहे. एलवाय बंद का झाले? नरेंद्र पाटील म्हणाले की, कराडमधील मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी 9 ऑक्टोबरपासून महामंडळाच्या लाभार्थ्यांना देण्यात येणारे एलवाय आहे ते बंद करण्यात आले आहेत असे सांगितले. हे खरं म्हणजे अपेक्षित नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावर महाराष्ट्रामध्ये दीड लाख उद्योजक करण्याचे यश या महामंडळाला मिळाले आहे आणि आता हा आकडा 5 लाखांपर्यंत गेला पाहिजे असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले आहे. कारण न देता एलवाय बंद नरेंद्र पाटील म्हणाले की, महामंडळाच्या माध्यमातून 5 लाख उद्योजक तयार व्हावे असे मुख्यमंत्री बोलत असताना एमडीच्या माध्यमातून 9 ऑक्टोबरपासून एलवाय बंद करण्यात आले आहेत. या साठी मी एमडींना दोन-चार पत्र लिहले आहे. यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेडेशन त्यांच्यानंतर कारणं काय आहेत तर काहीच सांगितले गेले नाही.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 10:19 am

दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनिअरला अल-कायदा लिंकप्रकरणी न्यायालयीन कोठडी; 28 नोव्हेंबरपर्यंत तुरुंगात पाठवले

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:58 am

जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘प्रभारी’राज; कायमचे वैद्यकीय अधीक्षक मिळेना:प्रभार घेण्यास कुणी धजावेना; तीन महिन्यांत चार प्रभारी‎

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कामाचा डोल्हारा मोठा असला तरी कार्यालयीन कामकाजाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने दिवसेंदिवस हा डोल्हारा कोसळत चालला आहे. विदर्भात नव्हे राज्यातील एक नामांकीत रुग्णालय म्हणून गौरव झालेल्या ‘लेडी हार्डिंग’ अर्थात जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमधील निविदा प्रक्रियेत घोटाळाप्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत पाटील व प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांना १ ऑगस्ट २०२५ रोजी निलंबित केले. तेव्हापासून वैद्यकीय अधीक्षकपदी कुणाचीही कायमस्वरुपी नियुक्ती झाली नाही. ज्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली अशा तिघांनी उणेपुरा एक महिना पदभार सांभाळला आणि महिना, दोन महिन्यांची वैद्यकीय रजा टाकून मोकळे झाले. त्यामुळे या पदांवर ‘प्रभारींवर प्रभारी’ अशी चौघांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे एकुणच प्रशासकीय कामकाज, व्यवस्थापन आणि रुग्णसेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. गेल्या ४ महिन्यांपासून या रुग्णालयात प्रभारी अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांची एवढ्या लवकर होत आहे की, रुग्ण आणि कर्मचारी दोघेही गोंधळात पडले आहेत. कोणी प्रभारी अधीक्षक येतो, आठ दिवस राहतो आणि लागलीच दीर्घ वैद्यकीय रजा टाकून निघून जातो, अशी स्थिती निर्माण झाली असून, या सततच्या बदल्यांमुळे रुग्णसेवा आणि प्रशासन यांचा कारभार डामडौल झाला आहे. . वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनाही नेमक्या कुणाच्या आदेशाचे पालन करायचे हा प्रश्न पडला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना, नवजात बालकांना आणि त्यांच्या नातेवाइकांना या गोंधळाचा अनपेक्षित फटका बसत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमधील निविदा प्रक्रियेत घोटाळाप्रकरणी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे, तर रुग्णालयातील भंगार विक्रीप्रकरणी भांडारपाल प्रमोद ढेंगे तीन महिन्यांपूर्वी निलंबित झाले. मात्र ही दोन्ही रुग्णालयाच्या आैषधी व इतर साहित्य खरेदी विक्रीशी व्यवहार करणारे अधिकारी असल्याने त्यांच्या जागी अजून कुणाची कायमस्वरुपी नियुक्ती झालेली नाही. प्रशासकीय अधिकारी पदाचा प्रभार डॉ.वाडेकर यांच्याकडेच दिला. वैद्यकीय अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी दोन्हींचा पदभार त्यांना दिला. भांडारपालचा प्रभार एका कर्मचाऱ्याकडे तात्पुरता दिला. त्यामुळे एकूणच जिल्हा रुग्णालयात ‘प्रभारी राज’ सुरु असल्याने कोणताही ठोस िनर्णय घेण्यास किंवा महत्वाच्या फाईलवर सही करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. पदे भरण्याासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला ^अकोला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी व भांडारपाल ही पदे कायमस्वरुपी भरण्याासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सध्या तिन्ही पदांवर प्रभारी अधिकारी आहेत. - डॉ. वाकचोरे, आरोग्य उपसंचालक, अकोला परिमंडळ. प्रशासकीय अधिकारी, भांडारपालही प्रभारी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज जिल्हा आरोग्य विभागाकडून या बदल्यांमागील कारणांबाबत कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सततच्या प्रभारी बदल्यांमुळे प्रशासनातील समन्वय कोलमडला असून, कर्मचारीवर्गामध्ये नाराजी पसरली आहे. आरोग्यसेवा ही सातत्याने आणि जबाबदारीने देणे अपेक्षित असते, पण अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात स्थैर्यच नसल्याने ‘प्रभारी' हा शब्दच कायमस्वरूपी ठरल्यासारखा वाटतो.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:15 am

ओबीसी, सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत:मनपा निवडणूक; 17 नोव्हेंबरला सोडतीची प्रक्रिया‎

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. आरक्षण सोडतीचा निकाल निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. दरम्यान, आयोगाने ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश दिल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलणार आहेत. येत्या १७ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात ही सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने एससी, एसटी व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित केलेले आरक्षण यथास्थित ठेवले असले तरी नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग या दोन प्रवर्गांसाठीचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. शासनाच्या २० मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तरतुदीतील नियम ६(३) आणि ६(४) नुसार आरक्षणाची पुनर्नियुक्ती बंधनकारक असल्याने महापालिकेला नवी सोडत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण थेट सोडतीद्वारे निश्चित करण्यासाठी सोमवारी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेऊन अकोला महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आता पुढील निर्णय काय होणार याकडे लक्ष लागले आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, इतर मागास वर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:14 am

‘ते’ जन्म प्रमाणपत्र जमा न करणाऱ्या 304जणांवर गुन्हे दाखल करणार:भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची माहिती, बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाचा आढावा‎

‘जिल्ह्यात नायब तहसीलदार यांच्या आदेशाने नोंदवण्यात आलेल्या ३,०४५ जन्म प्रमाणपत्रांचे आदेश रद्द करण्यात आले होते. रद्द झाल्यानंतर ही प्रमाणपत्रे परत मागवण्यात आली होती. यापैकी २,७४१ प्रमाणपत्रे नागरिकांनी जमा केली आहेत. मात्र उर्वरित ३०४ जणांनी नोटीस बजावूनही प्रमाणपत्रे परत केली नाहीत, अशा नागरिकांवर येत्या ४८ तासांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे दिली. शहरातील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या शुक्रवारी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतला. या प्रकरणात प्रशासनाने सोमय्या यांना महत्त्वाची माहिती दिली असून अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. ही प्रमाणपत्रे अतिरेकी वापरतात की बांग्लादेशी याचा शोध लावण्याचे काम सध्या पोलिस यंत्रणा करत आहे. संबंधित व्यक्ती, त्यांचे पत्ते किंवा त्यांच्याकडील नोंदी यांचा कसलाच ठावठिकाणा नसल्याने ही प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. प्रशासन या २०० प्रमाणपत्रांचा शोध घेण्यासाठी तपास पथक नेमणार असल्याचीही माहिती आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:13 am

कर्मापेक्षा उपासना अन् उपासनेनपेक्षा भक्ती श्रेष्ठ:देवी भागवत कथा श्रवणाने शाश्वत सुखाची प्राप्ती, देवी भागवत कथेस उत्स्फूर्त प्रतिसाद

कर्मापेक्षा उपासना श्रेष्ठ असून उपासना पेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे भक्ती पेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. सर्व देवता व सृष्टी तलावरील प्राणी मात्राच्या कल्याणासाठी अवतरीत देवी जगदंबेची महती ही या युगात सर्वोच्च व पावन असून केवळ मनुष्यच नसून अगदी भगवान कृष्णाने पण देवीची उपासना केली आहे. मनुष्य प्राणीमात्रात एकही असे कुळ नाही ज्यात कुलदेवी नाही. अगदी एका परधर्मीय लेखकानेही आपल्या पुस्तकात आपल्या समाजात पूर्वी देवीची उपासना केल्या जात असल्याचे सांगितले आहे. भगवान कृष्णाचा जन्म साक्षात विंध्यवासिनीच्या कृपेने झाला असून अशा या पावन जगदंबेचे गुणगाण व अवतार कार्याचे श्रवण व सत्संग ही शाश्वत सुखाची साक्षात प्राप्ती असल्याचा हितोपदेश देवी भागवत कथाकार पुणे येथील पू. मकरंद बुवा सुमंत रामदासी यांनी केला. ते देवी भागवत कथा आयोजन समितीच्यावतीने मुंगीलाल बाजोरीया प्रांगणात आयोजित कथेत मार्गदर्शन करीत होते. योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज यांच्या कृपेने व आपल्या जीवनात सातशे कोटींचा सप्तशतीचा पाठ करणारे स्व. डॉ.टी.व्ही. कुलकर्णी यांच्या स्मृतीत गुरुवारी सुरु झालेल्या देवी भागवत कथेत पू. मकरंद बुवा यांनी कथेचे प्रथम पुष्प गुंफले. या कथेत पू. मकरंद बुवा यांनी देवी भागवतची महिमा विशद केली. ते म्हणाले देवी भागवतची रचना ही सकल जगत कल्याणासाठी करण्यात आली आहे. कर्मापेक्षा उपासना श्रेष्ठ असून उपासना पेक्षा भक्ती ही श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे भक्ती पेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. अशा ज्ञानचक्षुसाठी सद्गुरूची जीवनात आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वप्रथम कथा प्रारंभी कथा यजमान आर्कि संजय महाशब्दे, मंजुषा महाशब्दे, नाथ संस्थान इंदोरचे विश्वस्त संजय नामजोशी, डॉ. हरी शंकर महाशब्दे, सुरेश महाशब्दे आदींनी दीप प्रज्वलन, पादुका पूजन केले. ग्रंथ पूजन पू. मकरंद बुवा व श्रीराम शास्त्री गदाधर यांनी केले. यावेळी वेदमूर्ती श्री नागेश मूर्तीकर यांचा ही सत्कार करण्यात आला. तसेच साथसंगत करणारे रुपेश खरे, विश्वास जोशी, गणेश मिस्त्री आदींचा सत्कार करण्यात आला. कथेत वेदमूर्ती श्री नागेश मूर्तीकर यांनी संहिता वाचन केले. संचालन व कथा उत्सवाची पूर्व पीठिका प्रा. महेश मोडक यांनी सादर करीत पूज्य सद्गुरु माधवनाथ महाराज यांच्या अवतार कार्याची व स्व. डॉ. टी. व्ही. कुळकर्णी यांच्या आध्यत्मिक भक्ती सेवेची माहिती दिली. १९ नोव्हेंबर पर्यंत रोज ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित या कथा उत्सवाचा सर्व महिला पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन देवी भागवत कथा आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पू. मकरंद बुवा रामदासी यांनी सदगुरु महिमा सांगितला. ज्याच्या जीवनात येतात त्यांचे अंतरबाह्य जीवन संपूर्णपणे बदलून व ढवळून जाते, असे त्याची दृष्टीही बदलून जाते. सद्गुरूच्या मार्गदर्शनानेच भगवंताची प्राप्ती होते. सदगुरु हे अंतकरणातला दोषपूर्ण डाग नष्ट करतात. दंभाच्या विरोधातच मुळी सर्व संत असतात. तथापी प्रापंचिक सुखापेक्षा परमार्थ चांगला असल्याचे संत सांगतात. मात्र काहींना वाटते प्रपंच पण नेटका व्हावा, परमार्थ पण नेटका व्हावा. शुद्ध परमार्थात मनुष्य जायला लागला कि त्याला भोगाचे डोहाळे लागतात. मात्र जबाबदारी व भक्तीत रममाण होऊन परमार्थ जो करतो त्याला विषयाचे भोग विषासमान वाटतात. तथापी जगदंबेची ज्याच्या जीवनात कृपा झाली तर परमार्थ व भोगाचे संतुलन होऊन प्रपंच ही नेटका व परमार्थ ही नेटका होऊ शकतो. जगदंबे पासूनच भोगाचे निर्दालन व भक्ताच्या परमार्थाचे रक्षण खऱ्या अर्थाने होऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:12 am

मुलींनी शिक्षण घेत स्वतःच्या पायावर उभे रहावे:उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमात साधला संवाद‎

मलकापूर स्थित गायत्री बालिकाश्रम तसेच उत्कर्ष शिशुगृह येथे राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यांनी भेट दिली. मुलींची उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले. शालेय शिक्षणा सोबत राष्ट कार्यासाठी मुलींनी प्रचारीका म्हणून देशसेवा करावी. बालगृहातील मुली प्रचारीका निघाल्यास त्या उत्तम प्रकारे देश कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शांताक्का यांचे स्वागत गायत्री बालिकाश्रमाच्या अध्यक्षा मिरा जोशी तसेच उत्कर्ष शिशुगृहाचे कोषाध्यक्ष मंगेश दिक्षीत यांनी केले. त्यानंतर शांताक्का यांनी बालिकाश्रमाची पाहणी करुन बालिकांसोबत संवाद साधला. बालिकांसोबत चर्चा केल्यानंतर उत्कर्ष शिशुगृहातील नवजात शिशुंची भेट घेतली. त्या भावुक झाल्या गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृह दोन्ही संस्था करीत असलेले कार्य हे उल्लेखनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच त्यांच्या सहसंयोगी यांना बालिकाश्रम येथे मुलींच्या आठवडयातुन एकदा शाखा घेण्यास सांगितले. संस्था भेटीच्या वेळी समितीच्या विदर्भ प्रमुख डॉ. राथा पुरी, जिल्हा कार्यवाहीका वैशाली देशपांडे, जिल्हा कार्यवाहिका वैशाली फडणीस, गायत्री बालकाश्रम संचालक गणेश काळकर, विजय कुमार जानी, सुधाकर गिते, सुनिल नंद, उत्कर्ष शिशुगृहाचे हेमंत चौधरी, रोहीत खोवाल. गायत्री बालिकाश्रम तसेच उत्कर्ष शिशुगृहाचे कर्मचारी तसेच बालगृहातील मुली उपस्थिती होत्या.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:11 am

घरबसल्या रक्तदान सुविधा; व्हॅन द्वारी:डॉ. हेडगेवार रक्तकेंद्राचा उपक्रम, नाेंदणीची प्रक्रिया सुरू‎

सध्या रक्त केंद्रामध्ये रक्तपिशव्यांचा तुडवटा निर्माण आहे. मात्र थॅलेसिमीया, शरीरात रक्ताची कमतरता, प्रसुतीकरिता दाखल असलेल्या महिला, अपघात यासह विविध आजारांवर उपचारासाठी रक्त केंद्रात रक्त साठ्याची गरज असते. एकीकडे रक्त पिशव्यांची गरज तर दुसरीकडे रक्त पिशव्यांचा तुडवटा ही अडचण दूर व्हावी यासाठी शुक्रवारी १४ नोव्हेंबर ते शुक्रवारी २८ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. हेडगेवार रक्त केंद्राद्वारे ‘घरबसल्या रक्तदान’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन रक्त केंद्राने केले आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्ट्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पृष्ठभूमीवर नियमित होणाऱ्या रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. त्यामुळे रक्त केंद्रात रक्तसाठा अत्यल्प आहे. तर दुसरीकडे थॅलेसिमीया, शरीरात रक्ताची कमतरता, प्रसुतीकरिता दाखल असलेल्या महिला, अपघात, कर्करोग व इतर आजारांत रक्त पिशवींची गरज असणारे रुग्ण रक्तासाठी रक्त केंद्रात संपर्क करतात. गरजू रुग्णांची अडचण होऊ नये, रक्त केंद्रातील रक्तसाठा रुग्णांना दिलासा मिळेल. सुसज्ज वाहन या उपक्रमात आपले घर, ऑफीस, कॉलनी, अपार्टमेंट आदी ठिकाणी रक्त केंद्राची रक्त संकलन करणारे सुसज्ज वाहन आपणापर्यंत येईल. यासाठी ९४२२८६२४८९, ९४२२८६२४९१ या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. हेडगेवार रक्त केंद्राद्वारे करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 9:09 am

वारंवार बदलणारे वेळापत्रक, उशिराच्या निकालाविरोधात विद्यार्थी झाले संतप्त:विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आक्रोश

विद्यापीठाच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे तसेच वारंवार बदलले जाणारे वेळापत्रक, परीक्षेसह पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेवर लावला जात नाही, अशा अनेक उणिवांमुळे पाचही जिल्ह्यातील संतप्त १ हजारावर विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वातील मोर्चा शुक्रवारी दु. २.१५ वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर धडकला. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसंदर्भा त असलेल्या उदासीनतेसह एकूणच गलथान कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश दिसून आला. त्यांच्या हाती विविध मागण्यांचे फलक झळकत होते. त्याचवेळी विद्यापीठाविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिरापासून एबीव्हीपीच्या नेतृत्वातील मोर्चाला दु. १ वाजता सुरुवात झाली. विद्यापीठातील प्रवेश, निकाल, अभ्यासक्रम, पदभरती व छात्रसंघ निवडणुका यासारख्या विविध समस्या सोडवण्यासाठी एबीव्हीपीच्या विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना सादर करण्यात आले. विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडर सर्व बाबींचा सारासार विचार करून तयार करावे, तसेच वर्षभर त्याचे तंतोतंत पालन केले जावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल, अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी. प्रवेशासंदर्भात सर्व सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर देण्यात यावी. प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक व सहज व्हावी, यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करावा. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या छात्रसंघ निवडणुका तातडीने घेण्यात याव्या, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यासोबतच प्रवेश प्रक्रियेत एजंट्स, ब्रोकर आणि तत्सम गैरप्रकारांविरोधात विद्यापीठ प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र, यापुढे प्रवेशादरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात ठोस कारवाई करण्यात यावी. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवताना निकषांमध्ये पारदर्शकता असावी. मिळालेली माहिती विद्यापीठाने संकेत स्थळावर उपलब्ध करून द्यावी, परीक्षांचे निकाल व पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर लागत नाही. पुनर्मूल्यांकन तसेच मूळ तपासणीच्या निकालात तफावत दिसून येते. यासंबंधी दोषींवर कठोर कारवाई करावी. निकाल परीक्षेपासून ४५ दिवसांच्या आत लावावे. प्राध्यापक दोन ते तीन महिने परीक्षेत गुंतलेले असतात. त्यामुळे ते शिकवण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांना परीक्षा केंद्रांवर केवळ १५ दिवसांकरिता नियुक्त करावे. दर १५ दिवसांनी ही जबाबदारी नव्या प्राध्यापकांकडे सोपवावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होतील, अशा एकूण ३४ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चाचे सूत्रसंचालन अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख यांनी केले. या वेळी विभाग संयोजक ऋषभ गोहणे, महानगर सहमंत्री गौरी भारती, अचलपूर जिल्हा संयोजक ओम धोटे, अॅग्रीव्हिजन प्रांत संयोजक चंद्रकांत बोबडे, मलकापूर नगर मंत्री प्रगती वानखेडे, वाशीम नगर मंत्री ऋषिकेश मानवटकर, मोहदा नगर मंत्री अंशित वर्मा यांच्यासह विद्यापीठातील अमरावती शहर व ग्रामीण, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातून १ हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकला. छायाचित्र : अक्षय नागापुरे पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी तातडीने परत करावी महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे सर्व परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेण्यात याव्यात, परीक्षेचे प्रवेश पत्र वेळेवर किमान १० दिवस आधी उपलब्ध करून देण्यात यावे, पूरग्रस्त जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा शुल्क माफ केले आहे. ती रक्कम विद्यापीठाने तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची खातरजमा विद्यापीठाने करावी. त्याची माहिती संकेतस्थळावर प्रत्येक सत्राच्या शेवटी प्रसिद्ध करावी, मातृभाषेतील अभ्यासक्रम लवकर सुरू करावे, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. विविध समस्या दूर करण्यासाठी मोर्चा ^विद्यापीठ तसेच विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे. शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाला छात्र शक्तीची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. छात्र शक्ती एक झाली तर राष्ट्रशक्ती कशी बनवू शकते, हे सिद्ध करायचे आहे. त्यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला. -पायल किनाके, प्रदेश मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:51 am

कुलगुरू डॉ. बारहाते यांनी वृद्धाश्रमात वस्त्रदान करत ज्येष्ठांशी साधला संवाद:संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीची कृतीतून उजळणारी ज्योत‎

संत गाडगे बाबांनी आयुष्यभर स्वच्छता, सेवा, दयाळूपणा आणि मानवतेचे मूल्य लोकांच्या मनात रुजवले. त्यांच्या याच सेवाभावी परंपरेचा वारसा जपत अमरावती विद्यापीठाने पुन्हा एकदा समाजहिताचा संदेश देणारा उपक्रम राबवला. वलगाव येथील संत गाडगे महाराज वृद्धाश्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते वृद्ध महिला-पुरुषांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. गाडगे बाबांच्या दशसूत्री या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या या वस्त्रदानामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वृद्धाश्रमातील वातावरणात एक प्रकारची उत्सुकता जाणवत होती. अनेक वृद्धांना आपल्यासाठी काही विशेष घडणार आहे, अशी चाहूल लागली होती. कुलगुरू डॉ. बारहाते वृद्धांशी संवाद साधत प्रत्येकाची तब्येत, त्यांच्या गरजा आणि दैनंदिन जीवनाविषयी विचारपूस करत होते. त्यांच्या या स्नेहपूर्ण संवादामुळे वृद्धांच्या डोळ्यांत कौतुक आणि आत्मियतेची चमक दाटून येत होती. या प्रसंगी वृद्धाश्रमाचे संचालक कैलास बोरसे यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांची संख्या, सुविधा तसेच चालणाऱ्या विविध सेवाप्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अनेक संस्था वेळोवेळी मदत करतात. पण ज्या संतांच्या नावाने विद्यापीठ कार्यरत आहे, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यय देत कुलगुरूंनी प्रत्यक्ष वृद्धाश्रमात येऊन वस्त्रदान करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. वृद्धांनीही ब्लँकेट मिळताच मनापासून आनंद व्यक्त केला आणि विद्यापीठाबद्दल कृतज्ञता दर्शवली. कार्यक्रमादरम्यान एका वृद्ध महिलेचे ब्लँकेट हातात घेताच डोळे पाणावले. गाडगे बाबा आम्हाला विसरत नाहीत, असे भावुक शब्द तिच्या तोंडून निघाले. एका वृद्ध पुरुषाने तर, तुम्ही आम्हाला कुटुंबासारखे वागवता, असे म्हणून कुलगुरूंचे आभार मानले. या उपक्रमाला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, प्रल्हाद खांडेकर, मीडिया सेलचे अनिकेत ठाकरे, राजू तायडे, अर्जून गुंजकर तसेच वृद्धाश्रमातील महिला-पुरुष कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत वस्त्रदान सोहळा भावनिक वातावरणात पार पडला. गाडगे बाबांच्या तत्त्वज्ञानातील ‘सेवा हीच पूजा’ हा संदेश या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. वृद्धांना दिलेले प्रेम, आत्मियता आणि ऊब हेच खरे तर गाडगे बाबांच्या सेवाभावाला योग्य अभिवादन ठरले. वस्त्रदान सोहळ्यात बोलताना कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले, संत गाडगे बाबा हे केवळ एक समाजसुधारक नव्हते तर ते मानवतेच्या शिकवणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेचा प्रमुख म्हणून समाजाप्रती जबाबदारी अधिक आहे. आज येथे येऊन गाडगे बाबांच्या दशसूत्रीची आठवण करून देत वृद्धांना वस्त्रदान करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला सर्वाधिक गरज असते ती मायेच्या स्पर्शाची. वस्त्रदान ही फक्त एक कृती आहे, पण त्यातून व्यक्त होणारी ओल आणि आपुलकी हीच खरी सेवा आहे. अमरावती विद्यापीठ पुढेही समाजधर्म पाळत अशा उपक्रमांत सहभागी राहील. गाडगेबाबा मानवतेच्या शिकवणीचे चालते-बोलते विद्यापीठ

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:51 am

मनपाच्या छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण:आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते बक्षीस वाटप‎

महापालिकेतर्फे २ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवार, १४ नोव्हेंबरला महापालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी भूषवले. स्पर्धेतील छायाचित्रांचे परीक्षण सुप्रसिद्ध परीक्षक मंडळी उदय खोत (बीएफए), विकास केमदेव (एमए) आणि अद्वेत केवले (बीएससी एन्व्हायरमेंट सायन्स) यांनी संयुक्तपणे केले. त्यांच्या परीक्षणानंतर स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते खालील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक शंतनू पाटील प्रमाणपत्र व रु. ११ हजार, द्वितीय क्रमांक भूषण अळसपुरे प्रमाणपत्र व रु. ७ हजार रोख, तृतीय क्रमांक संदीप चौधरी प्रमाणपत्र व रु. ५ हजार, प्रोत्साहन पुरस्कार सुशांत पांडे प्रमाणपत्र व रु. ३ हजार, मनीष मुऱ्हेकर प्रमाणपत्र व रु. २ हजार यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेला शहरातील छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, प्रतिभावंत छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमास मनपाचे अधिकारी, स्पर्धक तसेच नागरिक उपस्थित होते. या समारंभात अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, मुख्‍य लेखापरीक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्‍के, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:50 am

राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ:300 खेळाडू सहभागी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित १४ वर्षे वयोगटातील मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. ही स्पर्धा १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागातील १६ मुले व मुलीचे संघ असे एकूण ३०० मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेतील मुलांचे सर्व सामने सायन्सकोर मैदान अमरावती व मुलींचे सर्व सामने पोलिस फुटबॉल क्रीडांगण येथे सकाळ व दुपारच्या सत्रात घेण्यात आले. राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सायन्सकोर क्रीडांगण येथे करण्यात आले. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी नितीन चव्हाळ, जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष अरुण जयस्वाल, उपाध्यक्ष रवी कर्वे, फुटबॉल संघटनेचे सचिव सुशील सुर्वे, हरिहर मिश्रा उपस्थित होते. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू दीपाली आरोळे यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. जोएल बांगर या राष्ट्रीय खेळाडूने आणलेल्या क्रीडा ज्योतीने मशालचे प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी भाकरे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप इंगोले यांनी केले, तर आभार सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:49 am

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा आज ठरणार अजिंक्यपदासाठीचा संघ:व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो, ॲथेलॅटिक्सचे होणार अंतिम सामने‎

महावितरणच्या चार दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अत्यंत चुरशींच्या लढतींमुळे शुक्रवारी (दि. १४) सायंकाळपर्यंत आठ पैकी तब्बल पाच संघांनी विजेतेपदासाठी दावेदारी कायम ठेवली आहे. शनिवारी (दि. १५) या स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी क्रिकेट, व्हॉलिबॉल तसेच महिला व पुरुष गटातील कबड्डी व खो-खो, अॅथेलॅटिक्स खेळांचे अंतिम सामने होत ‌आहेत. या लढतीनंतरच अजिंक्यपदाचा विजेता निश्चित होणार आहे. यासह कुस्तींच्या लढती देखील अजिंक्यपदाच्या दावेदारीसाठी निर्णायक ठरणार आहेत. महावितरण अंतर्गत १६ परिमंडलांच्या संयुक्त आठ संघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत अत्यंत चुरस निर्माण केली आहे. यात प्रामुख्याने स्पर्धेचे अजिंक्यपदासाठी पुणे-बारामती, कोल्हापूर, नागपूर-चंद्रपूर- गोदिया, कल्याण-रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर-लातूर- नांदेड तसेच अमरावती-अकोला या संघांनी आगेकूच केली आहे. क्रिकेटच्या अंतिम सामना नागपूर-चंद्रपूर-गोंद िया विरुद्ध कोल्हापूर असा होणार आहे. यातील विजेतेपद देखील अजिंक्यपदासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात नागपूर-चंद्रपूर-गोंद िया संघाने पुणे-बारामती संघाचा सहा धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. नागपूरच्या १४६ धावांचे लक्ष्य गाठताना पुणे-बारामती संघ १५ षटकांमध्ये १३९ धावांपर्यंत मजल मारू शकला. तर कोल्हापूर संघाने नाशिक-जळगाव संघाचे १०८ धावांचे लक्ष्य १४.३ षटकांमध्ये गाठत अंतिम फेरी प्रवेश केला. कबड्डीच्या अंतिम सामन्यात महिला गटात मुख्यालय-भांडूप विरुद्ध पुणे-बारामती संघात लढत होणार आहे. तर पुरूष गटात खो-खोमध्ये पुणे-बारामती विरुद्ध कोल्हापूर संघात अंतिम लढत होईल. सांघिक खेळांमध्ये बॅडमिंटनमध्ये महिला व पुरूष गटामध्ये पुणे-बारामती संघाने, ब्रिजमध्ये अमरावती-अकोला संघाने, टेनिक्वाईटमध्ये नागपूर-चंद्रपूर-गोंद िया संघाने याचवेळी कॅरम खेळात पुरुष गटामध्ये छत्रपती संभाजीनगर - लातूर - नांदेड तर महिला गटात मुख्यालय-भांडूप संघाने विजेतेपद पटकावले. टेबल टेनिसमध्ये महिला गटात अमरावती-अकोला संघाने विजेतेपद पटकावले आहे . स्पर्धा सुरू असून लवकरच विजेत्या संघाचे बलाबल दिसून येईल.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:49 am

थकित कर भरण्यासाठी इच्छुकांची धावपळ, न. पं.चा महसूल वाढणार:निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी कर भरणे गरजेचे‎

नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारांचा तसेच सूचक आणि अनुमोदकांकडे कोणताही कर थकीत नसावा, ही अट असल्यामुळे नगर पंचायत कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांनी स्वतःकडील कर थकबाकी फेडण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मागील तीन ते चार वर्षांची थकबाकीदेखील भरली असल्याने यंदा नगर पंचायतच्या महसूल वसुलीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवारी प्रक्रियेत राजकीय पक्षाकडून नामांकन देताना एक सूचक लागतो, तर अपक्ष उमेदवारांना पाच सूचक आवश्यक असतात. निवडणूक नियमांनुसार हे सर्व सूचक व अनुमोदक थकबाकीदार नसावेत. यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्या सूचकांच्या आणि अनुमोदकांच्या थकबाकीची रक्कम स्वतः भरल्याचे दिसून येते. त्यामुळे उमेदवारांकडून सध्या थकबाकी भरण्याची मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे. महसूल वसुली वाढल्याने कामाचा ताण वाढू नये, म्हणून संबंधित नगर पंचायतीने कर भरण्याकरिता विशेष व्यवस्था केली आहे. कर भरण्यासाठी स्वतंत्र काउंटर, वाढीव वेळ आणि ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवार व नागरिक यांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्याअगोदर कर निरंक असणे आवश्यक असल्याने नगर पंचायत कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिक आणि उमेदवारांकडून कर भरण्याची लगबग सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या या प्रक्रियेमुळे न. पं.च्या महसुलात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Nov 2025 8:48 am