अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी 15 हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर थेट निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खाणमालकांकडून प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी करत त्यांना धमकावल्याचा आरोप होता. खाण व क्रशर मालकांनी या प्रकरणी 2 आठवड्यांपूर्वी त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, गायकवाड यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे अकोल्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी या प्रकरणी प्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर सरकारने प्रमोद गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले होते. त्यानंतर आता सरकारने थेट प्रमोद गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. निलंबन काळात गायकवाड यांचे मुख्यालय अकोला जिल्हाधिकारी कार्यालय असेल. त्यांना पूर्वसूचनेशिवाय अकोला मुख्यालय सोडता येणार नाही. नेमके प्रकरण आहे तरी काय? अकोला जिल्ह्यात गौण खनिजाच्या असंख्य खाणी आहेत. या खाणींमधून दगड, गिट्टी, मुरूम काढला जातो. त्यापोटी गौण खनिज विभागाला स्वामित्वधन शुल्क प्राप्त होते. महसूल विभागाकडून गौण खनिज विभागाला वसुलीचे लक्ष्य दिल्या जाते. मार्च महिन्यात स्वामित्व शुल्क वसुलीची लगबग सुरू असताना खाण मालक संघटनेने अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. खाणी बंद पाडण्याची धमकी दिल्याचाही आरोप प्रमोद गायकवाड यांनी वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. संघटनेच्या सदस्यांना कार्यालयात बोलावून अपमानित केले. पैशांची मागणी केली. काही ठिकाणी स्वत: जाऊन वसुली देखील केली. सर्व खाणी बंद पाडण्याची धमकी सुद्धा दिली. अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळून या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे ही वाचा… भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. वाचा सविस्तर अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर
हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे . यंदा मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन […] The post हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती व्यक्त केली होती की, अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. या घटनेमुळे ही शक्यता अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. […] The post जितेंद्र शेळके यांचा घातपात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी मुंबई : प्रतिनिधी युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेल्या महागाईला मिरचीने तडका दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाळवलेल्या लाल मिरचीचे भाव किलोमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत. कर्नाटक बेडगी, काश्मिरी मिरची २०० ते ३०० रुपये किलोमागे महागली असून, आंध्र प्रदेशातील तेजा जातीच्या मिरचीचे दर १०० ते १२० रुपयांनी वाढले आहेत. मुंबईकरांची तेजा, बेडगी आणि काश्मिरी जातीच्या […] The post लाल मिरचीला महागाईचा तडका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेते, असा आरोप विद्यार्थ्यांनी या प्रकरणी केला आहे. विद्यार्थ्यांचा सरकारच्या निर्णयावर संताप सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करू नये. कारण विद्यार्थी मागील 5 वर्षांपासून या पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. आता सरकारने अचानक हे पद रद्द केल्याने त्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने हे पद मृत घोषित न करता त्यावर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात बुडण्याची भीती आहे. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी स्टेनोग्राफर पदाची तयारी करतात. आता शासनाने ही भरतीच बंद केली, तर त्यांनी जायचे कुठे? विद्यार्थी गत अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत हरोते. आता लगेच दुसरी फिल्ड निवडताही येत नाही, अशी खंतही काही विद्यार्थ्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. रोजगाराच्या संधी हिरावून घेऊ नका - सुप्रिया सुळे दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारचे कान टोचलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीत सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांनी कलगीतुऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर असंख्य कार्यक्रम करून लोककलेला एक वेगळे स्थान मिळवून दिले. त्यांच्या निधनावर मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे गाव अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील काताळवेढे आहे. त्यांचा पुणे जिल्ह्यातील गावागावात मोठा संपर्क होता. ते गावोगावी फिरून महागाई, दरवाढ, आरक्षण, बैलगाडा बंदी, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, जागतिक युद्ध, कोरोना महामारी, व्यसनमुक्ती आदी विविध सामाजिक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकार घडवले. त्यातून शाहिरी परंपरेला नवे बळ मिळाले. ते आपल्या कलगीतुरा फडासाठी ओळखले जायचे. चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणांचा भेद मांडणारा दुर्मिळ प्रकार त्यांनी आपल्या कलेतून जिवंत ठेवला. पण आता शाहिरी क्षेत्रातील हा तरबेज 'गुंड' कायमचा शांत झाल्याने डफ पोरका झाला. डफावरच्या थापीने समाजमन जागृत करणारा कलावंत हरपला - भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांनी शाहीर गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीतील बुलंद आवाज आणि सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत प्रबोधनकार शाहीर रामनाथ नाथाजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने डफावरच्या थापीने समाजमनाला जागृत ठेवणाऱ्या एका महान कलावंताचा अंत झाला आहे. शाहिरी ही केवळ मनोरंजन नसून ते समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या रचनांमधून व्यक्त होणारा शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाचा हुंकार कायमच प्रेरणादायी राहील. शाहीर रामनाथजींनी केवळ कलाच जोपासली नाही, तर नव्या पिढीला लोककलेचा वारसा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक प्रबोधनाचा झंझावात शांत झाला असला तरी, त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आपण सदैव पुढे नेऊया. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ते म्हणालेत. गुंड यांचे निधन मन सुन्न करणारे - वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, डफावरची थाप आणि पहाडी आवाजाच्या जोरावर समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामनाथजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त मन सुन्न करणारे आहे. लोककलेच्या माध्यमातून समाजजागृतीचा एक धगधगता वारसा आज शांत झाला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. शाहिरी ही केवळ कला नसून ते परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे, हे रामनाथजींनी आपल्या पहाडी आवाजातून आणि धारदार शब्दांतून वारंवार सिद्ध केले. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी खेड्यापाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला वैचारिक लढा सदैव स्मरणात राहील. रामनाथजींचे जाणे ही कला क्षेत्रातील एक न भरून निघणारी पोकळी आहे. त्यांच्या जाण्याने प्रबोधनाचा एक तेजस्वी झंझावात थांबला असला, तरी त्यांनी रचलेल्या पोवाड्यांतून आणि गीतांतून त्यांचा विचार महाराष्ट्राच्या मातीत कायम जिवंत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व आयटी धर्मांतर प्रकरणासह परतवाडा व गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रस्तुत प्रकरणांत आरोपी कोण आहेत? हे न पाहता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक सूत्रांच्या मते, मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेवर प्राधान्यक्रमाने भर दिला. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील पीडित महिलांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणी कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, हे निश्चित करण्यासाठी भक्कम पुरावे शोधा. तपासात अपराधसिद्धी हाच एकमेव महत्त्वाचा घटक असला पाहिजे. नाशिक धर्मांतराची घेतली गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या घटनेचीही गंभीर दखल घेतली. राज्यात धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले. त्यांचे अभिनंदन. पण आता तेवढाच दमदार तपासही झाला पाहिजे. या प्रकरणातील सर्वच पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासून सूटू देऊ नका, असे ते म्हणाले. गोरेगाव ड्रग्ज व परतवाडा प्रकरणावरही भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गोरेगाव ड्रग्ज प्रकरण व परतवाडा प्रकरणावरही भाष्य करत पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करावी. तरुणाच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे. त्यामुळे अशी प्रकरणे गांभिर्याने घेतली पाहिजे. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांना विश्वास दिले पाहिजे. या प्रकरणी संबंधित समाजसेवकांची मदत घेतली पाहिजे, असे ते पोलिसांना योग्य ते निर्देश देताना म्हणाले. हे ही वाचा… अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे. या प्रकरणाची सुरुवात एका राजकीय वक्तव्यापासून झाली होती. 7 मे रोजी नितेश राणे यांनी केलेल्या विधानात त्यांनी असा दावा केला होता की, संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांनी 10 जूनपर्यंत हा प्रवेश होईल, असेही स्पष्टपणे सांगितले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, संजय राऊत यांनी हे वक्तव्य आपली सार्वजनिक बदनामी करणारे असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. याचिकेत राऊत यांनी म्हटले होते की, त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी जाणूनबुजून असे विधान करण्यात आले. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. हे प्रकरण माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू होते. दरम्यान, या खटल्याची सुनावणी दुसऱ्या न्यायालयात व्हावी, अशी मागणी करत नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. यानंतर न्यायालयाने दिलेल्या पुढील तारखांना नितेश राणे अनुपस्थित राहिल्याचे नोंदवण्यात आले. सलग दोन वेळा हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेत त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या प्रकरणात नवा वळण आले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी पाहता, संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. यापूर्वीही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक वेळा जोरदार टीका केली आहे. मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख अपमानास्पद शब्दांत केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्या घटनेनंतरच या मानहानी प्रकरणाची बीजे रोवली गेली होती. दोन्ही नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष दरम्यान, सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना या प्रकारच्या वक्तव्यांमुळे वातावरण अधिक तापले आहे. राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा, त्यावरून निर्माण झालेला वाद आणि आता न्यायालयीन कारवाई यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर स्वरूप आले आहे. पुढील सुनावणीमध्ये काय घडते, तसेच दोन्ही नेते या प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हिंगोली जिल्हा भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना पदे देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे कोणीही बोलण्यास तयार नसल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी वेळ आल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हयात भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भाजपात प्रवेश घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढत असल्याचे बोलले जात असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून मात्र चांगलीच अस्वस्थता दिसून येऊ लागली आहे. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून हिंगोली जिल्हयाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे इतर पक्षातून येणाऱ्यांची स्वागत केले जात आहे. काही दिवसांपुर्वीच कळमनुरीच्या एका नेत्याला भाजपात प्रवेश देण्यात आला. मात्र पक्ष प्रवेश होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत याची कानोकान खबरही स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाली नाही. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच इतर पक्षातून प्रवेश केलेल्या एका नेत्याला देशाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविले. राज्य पातळीवरील या घडामोडी घडल्या. त्यानंतर मागील दोन दिवसांत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये भाजपाच्या सहसंपर्क प्रमुख रेखा कुलकर्णी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या ते पदाधिकारी इतर पक्षांतून भाजपात नुकतेच आले होते. त्यांचे पक्षात कोणतेही काम नसतांनाही त्यांना पदे बहाल करण्यात आली तसेच नगर पालिका निवडणुकीतही स्विकृत सदस्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची शहर, जिल्हा कार्यकारीणीवर वर्णी लावली जात असतांना निष्ठावंतांना मात्र डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजापच्या निष्ठावंतांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच अमेरिकन मार्केटमध्ये मोठी तेजी; भारतासाठीही आनंदाची बातमी!
वॉशिंग्टन/नवी दिल्ली: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनीचा (Strait of Hormuz) मार्ग पुन्हा एकदा खुला झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात दिसून आला, जिथे गुंतवणूकदारांनी उत्साहात खरेदी केल्यामुळे बाजारात मोठी रॅली पाहायला मिळाली. अमेरिकन मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावानंतर बंद करण्यात […] The post होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच अमेरिकन मार्केटमध्ये मोठी तेजी; भारतासाठीही आनंदाची बातमी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली तालुक्यातील हळदवाडी साठवण तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून कामाला गती आली आहे. या तलावात 1.646 दशलक्ष घनमीटर पाणीसठा होणार असून त्यातून दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या शिवाय 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तलावाच्या कामाची शनिवारी ता. 18 आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. हिंगोली तालुक्यातील हळदवाडी शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीने सुमारे 39 कोटी रुपये खर्चुन तलावाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. य तलावासाठी नर्सी नामदेव व वैजापूर शिवारातील 39 हेक्टर जमीनीवर तलावाचे बांधकाम केले जात आहे. सदर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावामध्ये 1.646 दशलक्ष घनमिटर पाणीसाठी होणार आहे. त्यातून नर्सी नामदेव व पुसेगाव या दोन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या शिवाय 298 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेती सिंचनासाठी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे काम युध्दपातळीवर सुरु असून मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता प्राजक्त भुजाडले यांनी सांगितले. या तलावाच्या बांधकामाची आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक अभियंता भुजाडले, ॲड. के. के. शिंदे, संतोष टेकाळे, विलास गोरे, माणिक लोडे, आसाराम घुगे, सरपंच शंकर सिंदे, प्रल्हाद शिंदे, रुस्तुम शिंदे, प्रद्युम्न गिरीकर, शिवाजी मेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार मुटकुळे यांनी तलावाच्या कामाबाबत आवश्यक सूचनाही दिल्या आहेत
धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, संजीवनी राहुल वराडे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती धुळ्यातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाली. गत काही दिवसांपासून धुळ्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या अनेक घटना घडल्यात. या सर्व घटना आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याच्या आहेत. पण संजीवनी वराडेची घटना काही औरच आहे. ती अक्षरशः एखाद्या अदृश्य शक्तीने हात धरून ओढत न्यावे, अशा पद्धतीने हवेत हात वर करून कुठेतरी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पालकवर्गांत एकच दहशत पसरली आहे. घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात संजीवनी घराबाहेर उभी असल्याचे दिसते. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती तिच्यासमोरून जातो. हा व्यक्ती गेल्यानंतर दुसऱ्याच क्षणी संजीवनी शुद्ध हरपल्यासारखी चालू लागते. चालताना तिचा हात कुणीतरी खेचल्यासारखे वाटत आहे. कारण, संजीवनी पुढे जात असताना आपला हात कुणाच्या तरी हातात देऊन चालताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीत तो व्यक्ती दिसत नाही. पण संजीवनीचा हात हवेत अधांतरी तरंगत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ती गुंगीत किवा झोपेत असल्याचे भासते. नेमके काय घडले? सर्वचजण चक्रावले दुसरीकडे, संजीवनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. पण ती अद्याप सापडली नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या विचित्र घटनेमुळे सर्वचजण चक्रावेल आहेत. अखेरीस संजीवनी गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही प्रत्यक्षदर्शी व व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते, संजीवनीचे संमोहनाच्या मदतीने अपहरण केले जाण्याची शक्यता आहे. संजीवनी शुद्धीत नसून, तिला कुणीतरी अशा पद्धतीने नेल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे. संजीवनी एखाद्या खोल विचारात असताना घराबाहेर पडली असावी व त्याच स्थितीत ती कुठेतरी गेली असावी, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. हे ही वाचा… एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यम आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययनाची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणा-या शाळांवर कारवाई देखील केले जाणार आहे. नियम मोडणा-या शाळांवर १ […] The post राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मीठाला जागायला शिकले पाहिजे. पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून 2029 च्या निवडणुकीपासून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठायी भूमिकेमुळे या प्रयत्नांत अडसर आणला गेला, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचा चव्हाणांना पाठीचा कणा मजबूत ठेवण्याचा सल्ला काँग्रेसने अशोक चव्हाणांचे ट्विट रिट्विट करत म्हटले की, अशोकराव, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम - 2023”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठींब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागू ही झाले आहे. आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं व नंतर 50% आरक्षण ही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असे काँग्रेसने म्हटले आहे. खाली वाचा काय म्हणाले होते अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले होते, नारीशक्ती वंदन अधिनियमाशी निगडीत घटना दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून येत्या 2029 च्या निवडणुकीपासून लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक चांगला प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला. मात्र, राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठाय़ी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व शंका-कुशंकांना केंद्र सरकारने ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांना हवे असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट 50 टक्के लोकसभा मतदारसंघ वाढीबाबत सुधारणा आणण्याची तयारी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत व्यक्त केली. परंतु, विरोधी पक्षांची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार महत्वाचा वाटला. त्यामुळेच सदर घटना दुरुस्ती विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळू शकली नाही. विरोधी पक्ष ज्याला आपला विजय समजत आहेत, तो दुर्दैवाने देशातील नारीशक्तीच्या हितांचा पराभव आहे. लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण हा कोणताही राजकीय अजेंडा नाही. तर ते एक स्वप्न आहे, एक निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज नाही तर उद्या ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असे चव्हाण म्हणाले होते.
पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह पोत्यात भरला हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी पूनम यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो कार्यालयातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी संधी पाहून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन आरोपींचे होते. मात्र, तत्पूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. पोत्यात सापडला मृतदेह पूनम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश मुन यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांनी संजय सावंत याला फोन केला असता, त्याने पूनम नातेवाइकांकडे गेली असावी, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेत असताना दिनेश मुन संशयावरून सावंत यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना एक रक्ताने माखलेले पोते दिसले. ते उघडताच त्यांना पत्नीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ॲड. संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले. पूर्वी जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा कोणता संबंधही नव्हता. त्याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. त्याला इंग्रजही तेवढेच जबाबदार आहेत. काँग्रेसने हिंदुत्वाची वज्रमूठ फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असे सांगत आहेत. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहोचले. हिंदुत्व कोणत्याही एका ग्रंथाशी बांधले गेले नाही. आमचा धर्मग्रंथ एक असून, 'हे विश्वची माझे घर' हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. मोदींनी तुम्हाला जवळ का धरायचे? ते पुढे म्हणाले, धर्माच्या नावावर काही वेगळे मिळत नाही. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? याविरोधात हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे? स्वतःला सेक्युलर म्हणता, मग सरकारी पैसा हिंदू मंदिरांतून का जातो? 4 लाख हिदू मंदिरांतून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे व चर्चमधून का जात नाही? या पैशांतून मुस्लिम, ख्रिश्नच लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के या गोष्टीसाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? चर्च व मशिदीच्या पैशांवर सरकारचे का नियंत्रण नाही? असा सवालही शरद पोंक्षे यांनी यावेळी उपस्थित केला. सम्राट अकबराची भोंदू खरातशी तुलना शरद पोंक्षे यांनी यावेळी भोंदू अशोक खरातची तुलना मुगल सम्राट अकबराशीही केली. मुगल ए आझम चित्रपटातील अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठीच इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधाचे पात्र त्यात घुसवण्यात आले. अकबर कसा चांगला असेल? तो बायकांचे आयुष्य बरबाद करणारा होता. 1 लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल, असे ते म्हणाले. टीपू सुलतानवरही साधला निशाणा काँग्रेसने ब्राह्मणांची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची सीरियल दूरदर्शनवर दाखवली. त्यातून टिपू सुलतान किती चांगला होता हे आमच्यावर बोडक्यावर लादण्यात आले. अटकपासून कटकपर्यंत ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, त्याचे साम्राज्य पूर्ण केले तो बाजीराव पेशवा आपल्याला माहिती नाही. त्याची सीरियलही टीव्हीवर येत नाही. त्याचा चुकीचा इतिहास आणला. 41 लढाई कसे लढला, हे सुद्धा दाखवले जात नाही. मस्तानी फक्त 17 महिने त्यांच्या आयुष्यात आली. तेवढ्यावरच त्यांनी तिला आपल्या पत्नीचा दर्जा दिला, असेही शरद पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.
अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मातरांचा प्रकार झाला होता असे सांगितले नाही तर लैंगिक छळाचे प्रकरण झाले होते आणि या प्रकरणी रितसर चौकशी केल्याचे सांगितले. लैंगिक छळाबद्दलच बोलायचे झाले तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची टीसीएस प्रकरणी काय भूमिका आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाचे प्रकरण सुरू आहे, त्यावर उद्धव ठाकरे मुक गिळून गप्प आहेत, त्यावर काहीच बोलत नाही. संजय राऊत उद्धव ठाकरेंना त्यावर बोलायला सांगा. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही. मोदी-शहा यांच्यात संघर्षाचा राऊतांचा दावा हास्यास्पद नवनाथ बन म्हणाले की, आम्ही भाजपमध्ये काम करतो. आमच्या पक्षात उबाठासारखे भांडणं नसतात. आम्ही देश प्रथम, मी पक्ष अशा भूमिकेतून काम करत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्यात संघर्ष आहे असा हास्यास्पद आरोप राऊत करत आहे. तुमच्या पक्षात एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभे राहतात. आमच्याकडे जनतेचे हित पाहिले जाते. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष निर्माण करण्याचा डाव नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला निर्माण करायचा आहे. विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यावर अन्याय होणार नव्हता तर खासदारांची संख्या वाढणार होती. तुम्हाला देशाचे हित नको होते म्हणून तुम्ही या विधेयकाला विरोध केला आहे. दक्षिणेचे हित तुम्हाला नको असल्याचे काल दिसून आले. नारी शक्ती आणि दक्षिणेतील राज्य तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही महिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
भोंदू अशोक खरातच्या जमीन घोटाळ्यातील साक्षीदार, खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि शिर्डीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक डॉ.जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात नाही, घातपातच झाला आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाहन चालक काहीही जबाब देऊ द्या, हा घातपातच आहे. नेमके त्याला का मारले? आणखी कोणावर गुन्हे का दाखल करण्यात आले नाही,असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी जे कोणी अधिकारी, राजकीय नेते सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले गेले नाहीत? काय लपवले जात आहे? भाजपचे बाहेर ठेवलेले प्रवक्ते यांच्याकडे सीडीआर जातो आणि सरकारला काही माहिती नाही. याचा अर्थ हा अशोक खरात राज्यातील भाजप आणि महायुती सरकारचा प्यादा आहे. त्यांच्या माध्यमातून धर्म भ्रष्ट केला जात आहे. अशोक खरातकडून सर्व माहिती घेऊन त्याला जेलमध्येच मारले जाईल असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. व्यापम घोटाळ्यातील अनेकांचे अपघात नाना पटोले म्हणाले की, डॉ.जितेंद्र शेळके यांचा काल अपघात झाला नाही तर घातपात झाला आहे. त्याच्याकडे सर्व माहिती होती. हे कोणी केले? त्यालाच टार्गेट का केले गेले. मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकार असताना एक परीक्षा घोटाळा झाला होता त्यावेळी सर्वांना मारुण टाकले, सर्वांचे असे वेगवेगळे अपघात झाले. व्यापम घोटाळ्यात हे सर्व आपण पाहिले आहे. सर्व नष्ट करायचे आणि आमच्याकडे पुरावाच नाही असे मांडायचे आणि काही तरी गायब करायचे काम होऊ शकते. अशोक खरातला कसेही मारू शकतात. यांचा काही भरोसा नाही. फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव दुसरीकडे सोशल मिडीयावर पोस्ट करत नाना पटोले यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावर सरकारवर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले की,महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोणताही विरोध केलेला नाही. उलट, 2024 च्या निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण तत्काळ लागू करण्याचा आग्रह काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सातत्याने केला होता.परंतु भाजपने महिला आरक्षणाच्या नावाखाली आपल्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव आखला होता. ही मनुवादी रणनीती लोकसभेत यशस्वी झाली नाही. भाजपने ढोंगीपणा थांबवावा नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मी 20/09/2023 रोजी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी केलेल्या अभिनंदनाच्या ट्विटची आठवण करून देतो आणि त्यांना सल्ला देतो की हा ढोंगीपणा थांबवावा. लाडक्या बहिणी आणि शेतकरीविरोधी मनुवादी अजेंडा राबवणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल करणे बंद करावे. फडणवीस हे संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. संघ आणि भाजपची मनुवादी व महिलांविरोधी विचारसरणी महिलांना किती न्याय आणि अधिकार देते, हे त्यांना अधिक चांगले माहिती आहे. तसेच, संस्कृतीच्या नावाखाली विरोधकांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या वागणुकीकडेही पाहणे गरजेचे आहे. बँड लावून डान्स करण्याची संस्कृती विरोधकांची नाही. इस्राईलला जाऊन World War Criminal समोर कोणी डान्स केला होता हे sixteen या नंबरच्या माध्यमातून सर्व जगासमोर उघड झाले आहे.
मुंबई महापालिकेत झालेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांवर अखेर पूर्णविराम देण्यात आला आहे. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’चे आरोप पुढे आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनेक तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे हे प्रकरण सतत चर्चेत राहिले होते. या संपूर्ण वादानंतर महापौर रितू तावडे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि चौकशीची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे सोपवण्यात आले. तपास आणि प्रशासनिक पडताळणीनंतर अखेर सर्व 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या अंतर्गत कामकाजावर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींनंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत बदल्यांना स्थगिती दिली होती. त्यावेळीच या प्रकरणाची गंभीरता स्पष्ट झाली होती आणि पुढील कारवाईची दिशा ठरली होती. आता या बदल्या अधिकृतपणे रद्द केल्यामुळे महापालिकेतील बदली प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे हा निर्णय भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाई म्हणून पाहिला जात आहे, तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या रद्द होणे म्हणजे प्रशासनातील अनियमिततेची कबुली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पारदर्शकतेबाबत प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे महापालिकेत चालणाऱ्या कथित ‘बदल्यांच्या बाजाराला’ मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अनेक स्तरांवरून या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे. यामुळे प्रशासनातील विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बदली प्रक्रिया स्वतंत्र समितीमार्फत राबवण्याची मागणी दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या वादांना आळा घालण्यासाठी बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्वतंत्र समितीमार्फत राबवण्याची मागणी जोर धरत आहे. नियमबद्ध आणि स्पष्ट निकषांवर आधारित बदली प्रणाली लागू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासन कोणती नवी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महिलांना एक तृतीयांश आरक्षण देणारी 131 वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या मुद्यावरून विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणा ठरला. महिला सक्षमीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. यावरून विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली, असे त्या म्हणाल्यात. महिला आरक्षण व लोकसभेच्या जागा वाढवण्याशी (परिसीमन) संबंधित अत्यंत महत्त्वाचे असणारे संविधान दुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरकारला हे विधेयक पारित करण्यासाठी आवश्यक असणारे दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयश आले. परिणामी, बहुमताअभावी हे विधेयक फेटाळले गेले. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही - सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार म्हणाल्या, कालचा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीय. महिलांना 1/3 आरक्षण देणारं 131 वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही तथापि जाणीवपूर्वक होऊ दिल नाही आणि विरोधकांची महिला-विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला सशक्तीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला नकार हा अहंकार नव्हे तर देशातील महिलांवर केलेला अन्यायचं आहे. पण महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही… नारीशक्ती उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या. डीलिमिटेशन विधेयक अत्यंत घातक - रोहित पवार दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लोकसभेने हे विधेयक फेटाळून लावण्याचे स्वागत केले आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महिला आरक्षण विधेयकाच्या अडून केंद्र सरकारने चालवलेले घातक डिलिमिटेशन बिल हाणून पाडण्यात आले. या डिलिमिटेशन मुळे दक्षिणेतील राज्यांवर होणारा अन्याय ओळखण्याचे काम दक्षिणेतील जागृत पक्षांनी केलं. TDP पक्षाने मात्र केवळ आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांसाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका करण्याचं काम केलं. दक्षिणेवर अन्यायकारक असलेल्या डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करण्याचं काम TDP कडून झालं हे दुःखद आहे. TDP पक्षाने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांच्यासाठी प्रादेशिक अस्मिता नव्हे तर सत्ता आणि आर्थिक हितसंबंध महत्वाचे आहेत. सोबतच अजित दादांच्या अपघातास कारणीभूत असलेल्या VSR कंपनीसोबत TDP चे आर्थिक हितसंबंध असल्याने केंद्राच्या दबावाखाली TDP पक्षाकडून डिलिमिटेशन बिलाला समर्थन दिलं गेलं असावं. असो, ज्या प्रादेशिक अस्मितेसाठी सत्ता मिळवली तीच अस्मिता दिल्लीच्या पायावर ठेवण्याचं पाप TDP पक्षाकडून झालं हे मात्र नक्की, असे रोहित पवार म्हणाले.
ज्या खासदारांनी काल महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्या खासदारांना कधीच निवडणूक जिंकता येणार नाही, त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. बहिणींना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून हा विरोध करण्यात आला, काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर महिलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रातील आणि देशाची जनता उद्ध्वस् करेल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमरावती अत्याचार प्रकरणी मी आज पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा करणार आहे. माझे त्या प्रकरणाकडे लक्ष आहे. या प्ररकणी सखोल तपास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पोलिसांना तपास करण्यासाठी काही गोष्टींची गरज लागणार आहे का? या चर्चा करणार आहे. चौकशी भरकटेल असे विधान कोणीही करू नये, या प्रकरणर 7 मोबाईल पकडले गेले आहेत. महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून विरोधात मतदान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयकाला प्रचंड विरोध केला. त्या विधेयकाच्या विरोधात मतदान केले, काँग्रेसचे महिलाविरोधी धोरण आहे. काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही हे दिसून आले. ज्या खासदारांनी विरोधात मतदान केले त्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघासह देशभरातील महिला बहिणी त्यांची वाट लावतील. महिलांना 33 टक्के आरक्षण देत विकसित भारतामध्ये महिलांचे स्थान असावे यासाठी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध केला. यापूर्वी देखील त्यांनी तेच केले आहे. आमच्या 70 कोटी महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी मतदान केले आणि विधेयक मंजूर झाले नाही म्हणून आनंद उत्सव केला. हा महिलांचा अपमान आहे. यामुळे जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जनता विरोधकांना धडा शिकवेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात 72 खासदार झाले असते तर 33 टक्के महिला खासदार झाल्या असत्या. आणि जवळपास साडेतीनशे आमदार झाले असते तर 150 पर्यंत महिला आमदार झाल्या असत्या, त्यांना प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही. यांना जनता आणि महिला धडा शिकवेल. जर लोकसभेच्या सीट वाढल्या असत्या तर आमच्या बहिणींच्या सीट वाढल्या असत्या. एससी, एसटीच्या जागा वाढल्या असत्या. देशातील अनेक मोठ्या मतदारसंघात जनतेला न्याय देण्यासाठी खासदार वाढले असते. कारण काही मतदारसंघात 40 लाख मतदार आहे, त्यांना मतदारांपर्यंत जाता येत नाही. छोटे मतदारसंघ झाले तर लोकांना भेटता आले असते. खासदारांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही, हे दोन्हीही विषय महत्त्वाचे होते.
मोदी है तो मुमकीन है ही आता दंतकथा झाली आहे. फार तर आता मोदी है तो नमकीन है असे म्हणू शकतात. कारण ते नमकीन भाषणे करतात आणि त्यांचे लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी काल विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणले काय? आम्ही दोन-तृतीयांश मते जमा करू शकत नाही, भाजपकडे स्वत:चे बहुमत नसताना हे भोंदू बिल लोकसभेत आणले, त्यांचा मुळ उद्देश 543 जागा वाढवून 850 करायच्या आणि सत्तेचा अमर पट्टा बांधत सतत विजय मिळवण्यासाठी हे बिल होते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भविष्यात बेकायदेशीरपणे विजय मिळवता यावे यासाठी 850 जागा महिलांच्या नावाने वाढवायचा हा हेतू होता. सत्ताधाऱ्यांना देशात वाद पेटवायचा होता. 2023 मध्ये मंजूर केलेल्या बिलाला 543 मध्येच 33 टक्के आरक्षण देण्यास आम्ही पाठिंबा दिला होता. पण केवळ सत्तेतील खासदारांच्या सीट वाचवण्यासाठी हे बिल आणले होते ते आम्ही उधळून लावले. या विधेयकानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी VS अमित शहा संघर्ष पाहायला मिळाला. पहिले ही चर्चा दबक्या आवजात सुरू होती. पण आता लोकसभेच्या पटलावर दिसून आले. महिला आरक्षण विधेयक पडलेले नाही ते 2023 मध्ये मंजूर झालेले आहे. 16 महिन्यामध्ये 16 नंबर मोदींना घरी बसवेल असा दावाही राऊतांनी केला आहे. भाजप हा भोंदू पक्ष संजय राऊत म्हणाले की, आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, कुणीच केला नाही. कारण 2023 मध्ये हे महिला आरक्षणाचे बिल पास झाले आहे. भाजप हा पक्ष भोंदू आहे, त्यांनी देशात आणि राज्यात अनेक भोंदू तयार केले आहेत, ते भोंदू प्रकारचे विचार आणतात. भविष्यातील राजकारणात 16 आकडा धोक्याचा आहे. तेव्हा अमृता फडणवीस गप्प का बसल्या? संजय राऊत म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बॅकेत जर असे प्रकरण घडले असेल तर तेव्हा शांत का बसल्या? त्यांनी तक्रार दाखल का केली नाही. त्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या पत्नी आहेत, त्या शांत का बसल्या असा प्रश्न जनता विचारू शकते, असे राऊतांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना म्हटले आहे. हे जनतेचे यश संजय राऊत म्हणाले की, काल विधेयक मंजूर झाले नाही हे काही विरोधी पक्षाचे यश नाही हे जनतेचे यश आहे. हा देशातील महिलांचा विजय आहे. महिलेच्या नावाने जी फसवणूक सुरू होती आम्ही त्या विरोधात मतदान केले. आम्ही काही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, पण हे बिल 2023 मध्येच मंजूर झाले, आता जे खासदार आहेत. त्यापैकी 33 टक्के जागा राखीव कराव्या. देशातील महिला आमच्यासोबत आहे. महिलांना पैसे देऊन त्यांचे मत विकत घेतात. ते पैसे देणं बंद करा मग महिला कोणासोबत आहे ते तुम्हाला समजेल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून, दत्तधाम सरकार नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संगमनेर पोलिसांनी ही कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गजाआड केले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडगावपान परिसरात राजेंद्र बापू गडगे हा स्वतःला दैवी शक्ती लाभलेला असल्याचे भासवत होता. त्याने दत्तधाम सरकार या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोच निर्माण केली होती. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवर मंत्रशक्तीने उपचार करतो, निःसंतान महिलांना मूलप्राप्ती करून देतो आणि घरातील अडचणी दूर करतो, असे भ्रामक दावे करून तो लोकांना आकर्षित करत होता. या आमिषाला भुलून अनेक नागरिक त्याच्या दरबारात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, गडगे हा आपल्या तथाकथित उपचारांसाठी मोठ्या रकमेची मागणी करत असे. 15 हजार, 21 हजार ते अगदी 51 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतल्याचे समोर आले आहे. उपचाराच्या नावाखाली तो रुग्णांना साधे वनस्पतीजन्य पदार्थ देत असे, ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होत होता. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्याने शेकडो लोकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीमुळे झाला. समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी कारवाई करत राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकून राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आरोपींवर विविध कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट व्हिडिओ तयार करून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींच्या जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे याचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती लोक फसले आहेत, याचाही तपास सुरू आहे. या कारवाईमुळे भोंदूगिरीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला असून, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवे आणि धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या गंभीर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः तपासाचा रोज आढावा घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अधिक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही अनेक महिला बदनामीच्या भीतीने पुढे येण्यास तयार नव्हत्या. मात्र, पोलिसांनी महिलांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. आता महिलांनी धैर्याने पुढे येत तक्रारी नोंदवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष हेल्पलाईनवर दररोज 5 ते 6 कॉल येत असून, मागील 23 दिवसांत शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचेही समोर आले आहे. या तक्रारींमध्ये केवळ फसवणूक किंवा विश्वासघातच नाही, तर दबाव टाकून गैरप्रकार केल्याचेही आरोप आहेत. त्यामुळे पोलिसांचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. आतापर्यंत अशोक खरातविरोधात विविध कलमांखाली 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 8 गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 40 जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत, ज्यामुळे या प्रकरणात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीही आक्रमक झाली आहे. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे बुवाबाजी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच राज्यभर अशाच प्रकारच्या जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. अंधश्रद्धेविरोधात कठोर कारवाई व्हावी आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अंनिसचे महासचिव हरीश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. आज न्यायालयात हजर केले जाणार अशोक खरातविरोधातील महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलिस कोठडी आज संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांकडून आता पाचव्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत आणखी महत्त्वाचे टप्पे गाठले जाणार आहेत. सरकारी पक्षाकडून नवे मुद्दे मांडले जाण्याची शक्यता दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि एसआयटीने संयुक्त कारवाई करत खरातच्या कार्यालयावर छापा टाकला असून, महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या पुराव्यांच्या आधारे आजच्या सुनावणीत सरकारी पक्षाकडून नवे मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उमेदवारीबाबत रणनीती आखली जात असून, पहिला उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील विश्वासू आणि अनुभवी चेहरा म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे पहिल्या जागेवर शिंदे गटाकडून स्थैर्य राखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र, दुसऱ्या जागेवरून चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. दुसऱ्या जागेसाठी पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांसारखी अनेक नावे चर्चेत आहेत. या सर्वांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली असून, शिंदे कोणावर विश्वास दाखवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयोग केल्यानंतर, विधानपरिषदेतही अशाच प्रकारचा धक्कातंत्र वापरला जाईल का, याची चर्चा सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेना शिंदे गटाकडे विधानसभेत 57 आमदारांचे संख्याबळ असल्याने दोन जागा जिंकण्यात कोणतीही अडचण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांतर्गत समीकरणे, निष्ठा आणि भविष्यातील राजकीय रणनीती या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाणार आहे. याचदरम्यान, शिंदे गटात भाकरी फिरणार, असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत असून, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक आमदारांनी आपल्या भागातील कामे होत नसल्याची तक्रार केली असून, मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धाराशिव आणि सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीचे स्वरही उघडपणे समोर आले होते. अंतर्गत बदलांची सुरुवात या पार्श्वभूमीवर, येत्या काही दिवसांत शिंदे कोणत्या मंत्र्यांना डच्चू देतात आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषद निवडणूक केवळ सदस्य निवडण्यापुरती मर्यादित न राहता, शिंदे गटातील अंतर्गत बदलांची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे या निवडणुकीत घेतले जाणारे निर्णय आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले असून त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही पुढे जाऊ शकले नाही. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. या घडामोडींमुळे संसदेतच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही वातावरण चांगलेच तापले आहे. विधेयक फेटाळल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा या अतिशय भावूक झाल्या. प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. विरोधकांनी हे विधेयक जाणीवपूर्वक रोखले, असा आरोप त्यांनी केला. हा दिवस काळा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. महिलांना न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण आम्ही त्यांना पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही, यासाठी आम्ही त्यांची माफी मागतो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच विरोधकांना महिलांकडून कधीच माफी मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारचा डाव उधळून लावला - हर्षवर्धन सपकाळ दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या निकालाचे वेगळेच विश्लेषण केले. त्यांच्या मते, हा लोकशाहीचा विजय आहे. इंडिया आघाडीने सरकारचा डाव उधळून लावला असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, अशी टीका त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत. प्रक्रियेचा राजकीय वापर होण्याची शक्यता - रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या विषयावर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडीचा महिला आरक्षणाला विरोध नव्हता, मात्र मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेला विरोध होता. जनगणना न करता हा निर्णय घेतला असता, तर अनेकांवर अन्याय झाला असता, असे त्यांनी नमूद केले. काही राज्यांमध्ये या प्रक्रियेचा राजकीय वापर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय षडयंत्र होते - संजय राऊत याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते, महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते आणि ते आता कोसळले आहे. सत्ताधाऱ्यांनी मतदारसंघांची फेररचना करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणातून सरकारचे खरे स्वरूप समोर आले असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार अल्प बहुमतावर, कधीही कोसळू शकते संजय राऊत यांनी पुढे पंतप्रधानांवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, सध्याचे सरकार अल्प बहुमतावर टिकले आहे आणि ते कधीही कोसळू शकते. फक्त काही खासदारांच्या आधारावर सत्ता टिकली आहे. परिस्थिती बदलली, तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. या सर्व घडामोडींमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा आता केवळ विधेयकापुरता मर्यादित न राहता मोठ्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
शालार्थ घोटाळा:चव्हाणची ‘माया’ डोळे दिपवणारी, नाशिकचा निलंबित शिक्षण उपसंचालक संभाजीनगरचा रहिवासी
नाशिक विभागात उघडकीस आलेल्या शालार्थ घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर (ता. खुलताबाद) येथील रहिवासी आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या चव्हाण याने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. चव्हाण आणि त्याच्या पत्नीने विविध व्यावसायिक फर्म तयार केल्या. यात दोन कंपन्या देखील आहेत. केवळ नोकरी करत असताना मिळालेल्या वेतनाच्या आधारे हे डोळे दिपवणारे साम्राज्य उभे करणे निव्वळ अशक्य आहे. बी. बी. चव्हाण याच्या नोकरीचा बहुतांश कार्यकाळ छत्रपती संभाजीनगर विभागातच गेला. शिक्षक, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, सहायक शिक्षण संचालक आणि उपसंचालक असा त्याचा नोकरीतील प्रवास आहे. तो नाशिक येथे उपसंचालक पदावर कार्यरत होता. शालार्थ घोटाळ्यातील सहभागामुळे सध्या तो निलंबित असून फरार आहे. कबीर कोर्ट हॉटेल, तिसगाव सिडको महानगरात रेशीमबंध मंगल कार्यालयाजवळच कबीर कोर्ट हॉटेल आहे. इथे फूड कोर्ट, भव्य असा बँक्वेट हॉल आहे. लग्न, स्वागत समारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी येथील बँक्वेट हॉल भाड्याने दिला जातो. तारखेनुसार आणि सीझननुसार त्याचे भाडे आकारले जाते. काय आहे चव्हाणचे नाशिक प्रकरण? चव्हाणने शालार्थ आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा चुना लावल्याचा आरोप आहे. नाशिक विभागातील साडेआठशे शिक्षकांच्या मान्यता बोगस असल्याचे एसआयटीने उघड केल्यानंतर चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून चव्हाण पसार आहे. नाशिक पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या मालमत्तांचीही चौकशी केली जात आहे. मकोका कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव शालार्थ आयडी प्रकरणात निवृत्त शिक्षण उपसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कट रचून केलेली संघटित गुन्हेगारी असल्यामुळे नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बी. बी. चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर मकोका कायद्यानुसार कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. रेशीमबंध मंगल कार्यालय, वाळूज सिडको महानगरजवळ अत्यंत प्रशस्त असे हे रेशीमबंध मंगल कार्यालय आहे. एका कार्यासाठी प्रतिदिन सुमारे ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जाते. जवळपास १० हजार चौरस फूट जागेत हे मंगल कार्यालय आहे. भद्रा ब्रीडिंग फार्मसाठी घेतले २ कोटी अनुदान सुलतानपूर येथे अत्याधुनिक भद्रा ब्रीडिंग फार्म आहे. येथे गीर, जर्सी आणि होल्स्टिन फ्रिजिएन, गिरलँडो जातीच्या तब्बल ७०० गायी आहेत. या फार्मसाठी केंद्र सरकारच्या गोकुळ मिशनमधून २ कोटींचे अनुदान घेतले आहे. येथे परदेशी गोवंशाच्या सिमेनद्वारे ॲम्ब्रियो ट्रान्सफर केले जाते. या आयव्हीएफ तंत्राद्वारे तयार झालेल्या कालवडी एक ते सव्वा लाखांपर्यंत विक्री केल्या जातात. इथॉस मिल्क फूड प्रायव्हेट लिमिटेड इथॉस मिल्क फूड प्रा.लि. कंपनी बी. बी. चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण व मुलगी फाल्गुनी चव्हाण यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. बीड बायपासलगत मुस्तफाबाद या पत्त्यावर ही कंपनी दाखवलेली आहे. गतवर्षीच या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. दूध आणि दुधापासून तयार केलेले उपपदार्थ या कंपनीद्वारे उत्पादित आणि विक्री केले जातात. बी. बी. चव्हाण मिलिटरी स्कूल अँड अकॅडमी खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथे ही अकॅडमी आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पॅरा मिलिटरी सर्व्हिसेसची पूर्वतयारी करवून घेणारी शैक्षणिक संस्था आहे. निवासी स्वरूपाची ही अकॅडमी असून इथे सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षणदेखील दिले जाते. एका विद्यार्थ्याकडून तब्बल २ लाख रुपयांपर्यंत फीस घेतली जाते. मालोजीराजे कृषी उत्पादक कंपनी २०१८ मध्ये ही कंपनी स्थापन केलेली आहे. यामध्ये भाऊसाहेब चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण, मेहुणा उमेश निकम व अन्य नातलगांचा समावेश आहे. वैशाली चव्हाण या शिक्षिका असतानाही त्या या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक म्हणून काम पाहतात, हे विशेष.
पुणे विमानतळाची धावपट्टी (रनवे) शुक्रवारी रात्री उशिरा एका IAF विमानाने केलेल्या हार्ड लँडिंगनंतर तात्पुरती बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे विमानतळावरील विमान वाहतूक (फ्लाइट ऑपरेशन) 8 तास प्रभावित झाली. भारतीय वायुसेनेने स्वतः ही माहिती दिली. IAF नुसार, विमानाने लँडिंग करताना झालेल्या घटनेनंतर, सुरक्षा कारणांमुळे धावपट्टी (रनवे) तात्काळ बंद करावी लागली. विमानातील कर्मचारी (क्रू) सुरक्षित आहेत. कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. तथापि, विमानतळावरील विमान वाहतूक सकाळी 7.30 वाजल्यानंतर सामान्य होऊ शकली. विमानतळ संचालकांच्या मते, 5 एअरलाईन्सची 91 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. रद्द झालेल्या विमानांमध्ये इंडिगोची 65, एअर इंडियाची 6, स्पाइसजेटची 5, अकासा एअरची 5 आणि एअर इंडिया एक्सप्रेसची 10 विमाने समाविष्ट होती. विमानतळ संचालकांच्या मते, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर सकाळी 7:30 वाजल्यापासून उड्डाणे सुरू झाली आहेत. दिवसभरात कामकाज (ऑपरेशन) सामान्य होईल. खरं तर, पुणे विमानतळ दुहेरी वापर मॉडेलवर काम करते, ज्यात नागरी व्यावसायिक उड्डाणांसोबतच एक सक्रिय वायुसेना स्टेशन ऑपरेशन देखील समाविष्ट आहे. वायुसेनेच्या विमानाचे लँडिंग गियर खराब न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सुमारे २२:२५ वाजता लढाऊ विमान लँडिंग करणार होते. यावेळी त्याचे 'अंडरकॅरेज' (लँडिंग गियर) खराब झाले होते, ज्यामुळे ते धावपट्टीवर आदळले. मात्र, हे कोणते फायटर जेट होते, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. ना त्याचे व्हिज्युअल उपलब्ध आहेत. काय असते हार्ड लँडिंग सामान्यतः धावपट्टीवर लँडिंग करताना विमान हळू हळू आणि सहजपणे उतरते. पण जर ते धावपट्टीवर जोरात आदळले किंवा वेगाने खाली आले तर त्याला हार्ड लँडिंग म्हणतात. हार्ड लँडिंगची अनेक कारणे असू शकतात, यात खराब हवामान (वेगाने वाहणारे वारे, वादळ), पायलटच्या गणनेत चूक किंवा अचानक हवेचा दाब बदलणे यांचा समावेश आहे. हार्ड लँडिंगच्या वेळी कधीकधी फक्त धक्काच लागतो, पण तीव्रता जास्त असल्यामुळे विमानाला नुकसान होऊ शकते. त्यात बसलेल्या प्रवाशांना आणि क्रूला दुखापती होऊ शकतात.
दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ज्या शाळेने दिले 7 पोलिस, 1 सैनिक, ती आज भरतेय फक्त एका विद्यार्थ्यासाठी
१९६७ सालची गोष्ट... लामकाना तांड्यावर एक जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. जवळपास २५० घरांचा हा गजबजलेला तांडा. या शाळेत शिकलेली मुलं पुढे मोठी झाली. याच मातीत घडलेले ७ तरुण पोलिस झाले, एक जण आर्मीत गेला, तर दोघे रेल्वेत रुजू झाले. शाळेचा नावलौकिक वाढत होता. पण काळ बदलला, विकासाची गंगा शहरात आली, मात्र लामकाना तांड्यापर्यंत पोहोचलीच नाही. आज ५९ वर्षांनंतर या शाळेची अवस्था अशी आहे की, पूर्ण तांड्यातून फक्त आर्यन नावाचा एकुलता एक विद्यार्थी पहिल्या वर्गात बसतो आणि शिक्षक केवळ त्यालाच शिकवण्यासाठी रोज डोंगर-दऱ्या पार करून येतात. ही कथा फक्त एका शाळेची नाही, तर व्यवस्थेने वाऱ्यावर सोडलेल्या एका गावाची आहे. शहरापासून लामकाना तांडा केवळ ३२ ते ३५ किमीवर आहे. मुख्य रस्ता संपल्यावर दोन किलोमीटरची नुसती खडबडीत पायवाट सुरू झाली. पुढे गेल्यावर एक सुकलेलं तळं लागलं. सुदैवाने पाणी कमी असल्याने तळ्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचलो. आजूबाजूला घनदाट डोंगर आणि एका उंच टेकडीवर ही शाळा. वर्गात डोकावून पाहिलं तर एका रिकाम्या बाकावर चिमुकला आर्यन एकटाच बसला होता आणि शिक्षक त्याला धडे गिरवायला लावत होते. हे दृश्य मनाला चटका लावून जाणारं होतं. विचारपूस केल्यावर समजलं की रस्ता आणि पाण्याअभावी २५० घरांचा हा तांडा आता जेमतेम ५० घरांवर येऊन ठेपला आहे. या स्थलांतराचा शाळेच्या पटसंखेवर परिणाम झाला आहे. ‘मी पहिलीत शिकतो, वर्गात मित्रच नाहीत!’ “मी पहिल्या वर्गात शिकतोय. वर्गात शिकताना मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतं, खेळायला जावंसं वाटतं, पण माझ्या वर्गात कुणीच मित्र नाही” - आर्यन राठोड, विद्यार्थी. आधी रस्ता तर द्या, मुलं शाळेत येतील “इथूनच शिकून मुलं पोलिस, आर्मीत लागली. आम्ही मजुरी करून मुलांना शिकवू, पण गावात रस्ता आणि सुविधा तर मिळाली पाहिजे. - रामसिंग राठोड, माजी विद्यार्थी. मुलांना आणण्याचा प्रयत्न करणार ग्रामस्थांशी संवाद साधून पटसंख्या वाढवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. गरज पडल्यास स्वतःचे वाहन लावून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. - ज्ञानेश्वर पठाडे, शिक्षक स्थलांतराचा फटका शिक्षणाला या बातमीचा सर्वात मोठा पैलू हा आहे की, ही शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अनास्थेमुळे ओस पडलेली नाही तर ‘प्रशासकीय सुस्ती’मुळे पडली आहे. राज्यभरात कमी पटाच्या ८०० शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लामकाना तांड्याची शाळाही त्याच उंबरठ्यावर आहे. डोंगराळ भाग, पिण्याचे पाणी नाही, वीज नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाण्यासाठी साधा रस्ता नाही. त्यामुळे येथील ऊसतोड कामगार आणि मजुरांनी दुसऱ्या गावात स्थलांतर केले आहे. परिणामी, गेल्या वर्षी ६ असलेली विद्यार्थी संख्या या वर्षी थेट एकवर आली आहे. अधिकाऱ्यांच्या वाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील उणिवा इथे स्पष्ट दिसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. कोणत्याही ठोस सुविधा दिल्या जात नाहीत. गावात साधा दवाखाना नाही. जर ही शाळा बंद पडली तर तांड्यावरील उरल्यासुरल्या लेकरांना शिक्षणासाठी तब्बल ४ किलोमीटर पायपीट करावी लागेल, जी लहान मुलांसाठी शक्य नाही.
भारतीय सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सवा'त यंदा एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या महोत्सवात तब्बल ५०० भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात येणार असून, हा उपक्रम समाजात वाचन संस्कृती व संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अकोला येथे २९ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अशोक पर्व’ महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील भवनसुंदर वानखडे यांचा हा उपक्रम असून त्यांनी ५०० संविधान प्रतींचे दान देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेले भवनसुंदर वानखडे हे वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने नेहमीच पुस्तक दानाचे कार्य करीत असतात. महोत्सवाच्या निमित्ताने भगवान बुद्ध, महापुरुषांची चरित्रे आणि भारतीय संविधान यांचे वितरण करण्यात येणार असून, हा कार्यक्रम अकोला येथे पार पडणार आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, या उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक पर्व आयोजन समितीकडून भवन सुंदर वानखडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. संविधानाच्या ५०० प्रतींचे दान स्वीकारताना अशोक पर्व महोत्सव समितीने भवनसुंदर वानखडे यांचे आभार व्यक्त करून सन्मानही करण्यात आला. याप्रसंगी प्रा. विजय आठवले, डॉ. प्रा. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, सुमेध घनबहादूर, संदेश गवई, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव आदी उपस्थित होते. निबंध स्पर्धेसाठी दोन गट ठेवण्यात आले आहेत. पहिला गट १० ते १८ वर्षाचा असून यात सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या विचारांवर आधारित विषय आहेत. १८ वर्षांवरील खुला गटात संविधान, लोकशाही, सामाजिक परिवर्तन, मानवता व धम्मविजय यांवरील विषय आहेत. सम्राट अशोक यांचा संविधानिक मूल्यांवर प्रभाव' हा यंदाचा प्रमुख विषय असून अहिंसा, समता, न्याय, करुणा व लोककल्याणकारी राज्यकारभार या मूल्यांचा अभ्यास करण्याची संधी सहभागींस मिळणार आहे. निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण : उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार असून निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण होणार आहे. नोंदणी व माहितीसाठी फुले आंबेडकर शिक्षक संघटना पॅक्टो जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. विजय आठवले, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, विद्याधर मोहोड, प्रा. शैलेश इंगळे, प्रा. सज्जन जाधव, प्रा. विवेक पांडे, संदेश गवई, सुमेध घनबहादूर आदींनी केले आहे. महोत्सव ठरेल परिवर्तनाची नांदी : भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांच्या समता, बंधुता, लोकशाही, लोककल्याण, अहिंसेच्या विचारांचा व धोरणांचा प्रसार करून समाजात नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव हा परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केल आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी घराघरात अशोक' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचे म्हणणे आहे. असा होणार महोत्सव : महोत्सवात व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती रॅली तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सम्राट अशोक यांच्या स्वर्णीम इतिहासाचा उजाळा देत समाजात सकारात्मक व परिवर्तनवादी विचारांची रुजवात करण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक व धार्मिक प्रबोधनासाठी भवन सुंदर वानखेडे यांनी पाचशे धम्मग्रंथांचे दान जाहीर केले असून हे ग्रंथ उपासक-उपासिका संघटनांना वितरित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे अशोक विचारांचा प्रसार अधिक व्यापक होणार आहे. अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत होणार निबंध स्पर्धा राज्यस्तरीय ‘अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांना चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून प्रभाग क्रमांक १४ मलकापूर, शिवनी भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीज पंप नादुरुस्त झाल्यामुळे या भागात पाणीपुरवठा न झाल्याने ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पराग गवई, नगरसेविका उज्वला पातोडे, नगरसेविका जयश्री बहादुरकर, नगरसेवक शेख समशू शेख कमर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण पातोडे, सौरभ बहादुरकर यांनी मनपा आयुक्त यांना शुक्रवारी दिले. तसेच पाणीपुरवठा विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांच्यासोबत बैठक घेतली व तत्काळ पाणी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बूस्टर वीजपंप काही दिवसांपूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. परंतु ग्रामपंचायत अस्तित्वात असतानापासूचा १४ वर्षे जुना बुस्टर पंप असल्याने वारंवार तो जळून नादुरुस्त होत आहे. परिणामी मलकापूर, शिवणी परिसरासह वाढीव वस्तीतील नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की वाढत्या तापमानामुळे हा बुस्टर पंप नादुरुस्त होतो. या पंपाची कार्यक्षमता संपल्याने मलकापूर शिवनी करता नवीन बूस्टर पंप उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पराग गवई यांनी केली आहे. मलकापूर, शिवनी भागात तसेच प्रभागातील अनेक भागांमध्ये पाण्याची जलवाहिनी नसून, तसेच अनेक भागांमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतची पाण्याची जुनी जलवाहिनी आहे. त्यामध्ये पाणी येत नाही. त्यामुळे त्या भागात पाण्याची कुठली व्यवस्था नाही. अकोला शहरातील उन्हाळा बघता नागरिकांना पाण्यासाठी कुठले त्रास होऊ नये. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये करता टँकरची व्यवस्था करण्यात यावी तसेच प्रभागातील बंद पडलेले हॅन्ड पंप दुरुस्त करून देण्यात यावे. तसेच खडकी ते मलकापूर या भागात नवीन मोठी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात यावी.’ अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडूनवारंवार करण्यात येत आहे.
बुवाबाजी विरोधी परिषद आज; भोंदूगिरीवर प्रहार:प्रा. मानवांचे बुवा तिथे बाया'' विषयावर व्याख्यान
नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी अकोला शहरात शनिवारी, १८ एप्रिल रोजी मराठा मंडळ मंगल कार्यालय, रामदापेठ येथे बुवाबाजी विरोधी परिषदेचे आयोजन केले आहे. दुपारी १ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही परिषद चालणार असून समारोप प्रा.श्याम मानव यांच्या बुवा तिथे बाया' (खरात फाईल्स बळी स्त्रियांचा) या विषयावरील जाहीर सभेने होणार आहे. आयोजन अकोल्यातील सर्व सुजाण नागरिक व विविध सामाजिक संघटना मिळून आम्ही सारे अकोलेकर या नावाने केले आहे. परिषदेचे अध्यक्ष शेतकरी नेते प्रकाश पोहरे असतील तर उद्घाटन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आ. नितीन देशमुख, आ. अमोल मिटकरी, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, डॉ. गजानन नारे, प्रा. संतोष हुसे, डॉ. दीपक मोरे, विजय कौसल, चंद्रकांत तराळ, डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्रा. मुकुंद भारसाकळे, डॉ. रणजीत कोरडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, डॉ. मिलिंद चौखंडे, डॉ. सीमा तायडे, डॉ. झिशान हुसैन, पराग गवई, प्रकाश दाते, राधाताई बिडकर, सौरभ वाघोडे, अॅड. रुपाली राऊत व अॅड. अनिल लव्हाळे उपस्थित असतील. बुवाबाजी विरोधी परिषद व जाहीर सभा निःशुल्क असून परिषदेत नोंदणी साठी 9881597237 क्रमांकावर नोंदणी करण्याचे आवाहन अयोजकांनी केले परिषदेत तीन सत्र राहणार आहेत. यात बुवाबाजी व महिलांची मानसिकता, भूतप्रेत, तंत्रमंत्र, देवी अंगात येणे जादूटोणा (चमत्कार प्रत्यक्षिकांसह), ज्योतिषशास्त्र नशीब खरे की खोटे? असे तीन सत्र होणार असून या सत्रांना अनुक्रमे डॉ. आशा मिरगे, शरद वानखडे, अशोक घाटे व पुरुषोत्तम आवारे मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्नांची उत्तरे मिळणार परिषदेचा समारोप प्रा. श्याम मानव यांच्या जाहीर व्याख्यानाने होणार असून त्यात कॅप्टन खरात सारख्या ढोंगी बुवा-बाबांना महिला का बळी पडतात? ते महिलांना कोणती प्रलोभने देतात? महिलांचे कशाप्रकारे शारीरिक-आर्थिक शोषण करतात? अशा बुवाबाजीपासून आपले व कुटुंबातील महिलांचे कसे रक्षण करावे? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देणार आहेत. तथा आजपर्यंत शेकडो बुवाबाबांचे केलेले भांडाफोड मांडणार आहेत.
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सतत बदलत्या हवामानात शेतकरी, शेतमजूर, कामगार, मजूर, आशा सेविका यांचे उन्हापासून संरक्षण व त्यांची शारीरिक क्षमता मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ‘इंटिग्रेटेड क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट इन इंडिया' (इन क्रिस) हा प्रकल्प जिल्ह्यात राबवला जात आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्वात असुरक्षित घटक, म्हणजेच शेतकरी आणि कृषी कामगारांचे उर्वरित. पान ४ ^शहरासह जिल्ह्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. शुक्रवारी १७ रोजी कमाल तापमान ४४.४ तर किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. २० एप्रिलपर्यंत सतत तापमान वाढणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतर काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. - प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ. सकाळी ११ नंतर सायंकाळी ५.३० पर्यंत काम करू नये ^जिल्ह्यात तापमान ४४ अंशावर पोहोचल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार, घरकामगार, मजूर, आशा सेविका, कटल्यावर साहित्याची वाहतूक करणाऱ्यांनी वाढत्या तापमानात स.११ वाजतानंतर तसेच सायंकाळी ५.३० वाजताच्या आधी काम करू नये. कारण, त्यांना उष्माघाताचा धोका होऊ शकतो. तसेच सतत घाम येत असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन डीहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. कारण, सध्या वाढते तापमान अपायकारक ठरू शकते. त्यामुळे धोका कोणीही पत्करू नये. - डॉ. वसंत लुंगे, राष्ट्रीय सहसचिव, आयएमए.
जिल्ह्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नगदी, रोखीचे व्यवहार रखडले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण, शहरात बहुतांश लोक हे युपीआय, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पैशाचे व्यवहार करतात. परंतु, ग्रामीण भागात अजुनही रोख रकमेशिवाय भागत नाही. शेतमजूर, कामगारांना रोख रक्कमच द्यावी लागते. ती थकली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५० लाखाची मागणी केल्यास फारतर २० ते २५ लाख रुपये रोख पाठवली जात असून त्यातच भागवावे लागत असल्याचे बँक व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती निवळण्यास किमान एक आठवडा लागेल, असे बँक व्यवस्थापकांनी सांगितले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरी देण्यासह शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात अडथळे येत असून आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही रोख रकमेअभावी व्यवहार करणे कठीण जात आहे. जिल्ह्यात अमरावतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उर्वरित. पान ४ ^रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा करणे कठीण होत आहे. त्यामुळे आमचे व्यवहार अडचणीत आले आहेत.बँकांनी बाजाराच्या दिवशी पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध करून द्यावी, मेळघाटातील बहुतांश गावामध्ये ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना नगदीच चुकारा लागतो. मात्र, बँकेत नगदी मिळत नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. - सतीश व्यास, संचालक, कृउबास अचलपूर सुटीचे दिवस, सण-उत्सव, पर्यटन तसेच लग्न सराई असल्याने सर्वांनाच रोख रकमेची आवश्यकता आहे. अशात एटीएममधील रोख लवकर संपत आहे. कारण, बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे मागितलेल्या रोख रकमेच्या तुलनेत त्यांच्याकडे निम्मी रोख रक्कम येत असल्याने त्यांनाही एटीएममध्ये सध्या विचारपूर्वक रोख रक्कम टाकावी लागत आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने एटीएम रिकामे होत आहेत. नरेश हेडाऊ, शिखर बँक व्यवस्थापक एटीएममधील रोखही लवकर संपत आहे आमचे सध्याचे व्यवहार अडचणीत आलेत रोज २० लाखाची मागणी, पण रोखच नाही आम्ही दररोज २० लाखाची मागणी करतो. परंतु, जिल्ह्यात सर्वच बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे. कारण बँकेत रोखच येत नाही. क्षेत्रिय कार्यालयालाकडून पुढच्या आठवड्यात रोख येईल असे सांगण्यात आले आहे. तोवर आम्हालाकाही करता येणार नाही. - मंगेश भुरे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, घाटलाडकी
तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत एचटीबीटी बियाण्यांमुळे अतिरिक्त खर्चावर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावा संघटनेने केला आहे. सोबतच शासनाने या बियाण्यांवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकार परदेशातून एचटीबीटी संबंधित सोयाबीन, सोयाबीन तेल आणि पेंड आयात करत असताना देशातील शेतकऱ्यांना त्याच बियाण्यांची लागवड करण्यास बंदी घालणे हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनेने जाहीरपणे एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सरकारने शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, अंजनगाव तालुका अध्यक्ष संजय हाडोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन दुधाट, जिल्हा समन्वयक मनोहर रेचे, सुनील साबळे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास ढोक, अशोक गीते, मोहन ठाकरे, संजय हिंगे, बाबूराव साबळे, अरुण गोंडचोर, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, प्रभाकर डोंबाळे, विनोद चिंचोळकर, विलास धुमाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य परिसर असलेल्या बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर, मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या जागेवर साकारण्यात यावे, असा मानस तेथील नागरिकांनी आ. यावलकर यांच्याकडे व्यक्त केला. आता निवडणुकीदरम्यान सत्ता स्थापन झाल्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने हे नमो उद्यान बालाजी नगरऐवजी शहरातील मालवीय गार्डन येथे स्थानांतरित करण्याचा घाट घातला आहे. याला नागरिकांचा विरोध आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या मालवीय नगरातील उद्यानाची पूर्णपणे दुरुस्ती करण्यासाठी नगरपरिषदेने ठराव घेऊन १ कोटीच्या निधीचे इस्टिमेट तयार केले. बालाजी नगर येथे होणाऱ्या नमो उद्यानाचा निधी मालवीय गार्डन येथे तयार असलेल्या उद्यानावर खर्च केला जात असल्याची माहिती बालाजी नगर येथील नागरिकांना मिळाली. त्यांनी संबंधित नगरसेवकांकडे धाव घेऊन नमो उद्यानाची निर्मिती शिवपार्वती मंदिरासमोरील खुल्या जागेवरच व्हावी, अशी मागणी रेटून धरली. या प्रकल्पासाठी सुमारे ९९ लाख ९९ हजार ८९९ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र मालवीय गार्डन येथील उद्यानात जॉगिंग ट्रॅक, गार्डन, बेंचेस, वृक्षारोपण, लाईट व सोलर लाईट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तरीदेखील याच कामांसाठी पुन्हा खर्च दाखविण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त केला आहे. बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेल्या ओपन प्लेसमध्येच नमो उद्यानाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका प्रीती देशमुख यांनी केली आहे. नमो उद्यान हे नवीन जागेवरच विकसित करण्यात यावे, असा शासनाचा जीआर आहे. त्या अनुषंगाने बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेला खुला परिसर निश्चित करण्यात आला होता, अशी माहिती आ. चंदू यावलकर यांनी दिली.
शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर नगर येथील झोन क्रमांक ३ मधील कचरा संकलन केंद्राची पाहणी करून संपूर्ण केंद्र स्वच्छ, सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कचरा संकलन केंद्रे सुस्थितीत ठेवण्याला महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून नाल्यांची नियमित साफसफाई करण्यावर महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस नगर परिसरातील नाल्यांच्या पाहणीदरम्यान नाल्यात हॉकर्स व काही नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावर कठोर भूमिका घेत नाल्यात कचरा टाकला जाणार नाही. नाल्याची नियमित साफसफाई केली जावी. असे निर्देश देण्यात आले. यावेळी नाल्यांमध्ये गाळ साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ऑक्सिजन पार्क परिसरात पाहणीवेळी रस्त्याच्या कडेला असलेले बांधकाम साहित्य हटवण्याबाबत नागरिकांना व व्यावसायिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले. विशेषत: ऑक्सिजन पार्कसारख्या सार्वजनिक ठिकाणी साहित्याची साठवणूक टाळावी. शहराच्या सौंदर्यीकरणात सर्वांनी हातभार लावावा. अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. शहराचा विकास हा केवळ प्रशासकीय प्रयत्नांनी नव्हे. तो लोकसहभागातून अधिक प्रभावी होतो. असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. नागरिकांनी आपला घरगुती कचरा घंटागाडीतच द्यावा. सार्वजनिक स्वच्छता राखावी. महानगरपालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले. अमरावतीला एक आदर्श शहर बनवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सकारात्मक पाऊल ऐतिहासिक छत्रीतलाव परिसराला भेट देऊन त्याचा विकास करून त्याला पर्यटनस्थळाचे स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वडाळी उद्यानाला भेट देऊन त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. असे आयुक्त म्हणाल्या. या प्रकल्पांना गती देऊन शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. तसेच उद्यानांची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ सद्गुरु बेलानाथ महाराजांच्या राजेराय मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४८ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पंधरा दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल होती. विशेष म्हणजे, हे वर्ष मठातील पादुका स्थापनेचे १५० वे वर्ष असल्याने या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी, १५ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता काकड आरती व महापूजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ या वेळेत स्थानिक व बाहेरगावच्या भक्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांवर सामुदायिक अभिषेक पार पडला. दुपारी महाआरती व महानैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच भरतनाट्यम आणि कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. १६ एप्रिल रोजी बेला समर्थ महिला मंडळाच्या उपस्थितीत गोपाळकाल्याने या पंधरा दिवसांच्या उत्सवाची सांगता झाली. या महोत्सवासाठी मठाचे अध्यक्ष ॲड. शरद फुटाणे, उपाध्यक्ष विकास दोडके, पुण्यतिथीनिमित्त पनवेलचे अनुराग घरत, कोल्हापूरचे विराज धोंगडे आणि पुण्याचे विशाल धुमाळ यांनी मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास केली होती. सोलापूरच्या वज्रेश्वरीताई गाजूल यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम महिला मंडळाने महाप्रसाद वितरण व स्वच्छतेची सेवा बजावली. तसेच ज्योती झिप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ९५ महिलांनी गुरुलीलामृत पोथीचे पारायण केले. या महिला मंडळाने मठाला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या ७५ प्रति आणि एक हार्मोनियम भेट स्वरूपात दिले. सायंकाळी ६ वाजता राजेराय मठातून भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या पालखीमध्ये नाशिककर महाराज दिंडी, हसापूरचे जय हनुमान भजनी मंडळ, चाकणचे मोरया ढोल पथक, अक्कलकोटचे दावल व दरबार बँड, हालहळीचे सनई-हलगी पथक आणि तुतारीच्या निनादाने वातावरण भारावून गेले होते. मुंबईचे नाट्यकर्मी मयूर मुरलीधर यांनी सादर केलेला श्रींचा जिवंत देखावा आकर्षणाचे केंद्र ठरला. पालखी मार्गावर महिलांनी पंचारतीने ओवाळून व प्रसाद वाटप करून दर्शन घेतले. दोडके, सचिव प्रा. किसन झिपरे, विश्वस्त ॲड. अनिल मंगरूळे, दत्तात्रय मोरे, विजयकुमार गाजूल, पद्माकर डीगे, सुरेश डिगे, शिवानंद फुलारी, महेश कलशेट्टी, वैशाख डिगे, ओंकार दोडके, ॲड. श्रद्धांक झिपरे यांच्यासह मठाचे सेवेकरी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. वाद्यांच्या गजरात निघाली भव्य पालखी
मिरवणुकीचा खर्च टाळत बुद्ध विहाराचे सुशोभीकरण:भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याकडून अभिवादन
करमाळा तालुक्यातील मांगी गाव नेहमीच सामाजिक आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेत दि. १४ एप्रिल रोजी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नाचून नाही, तर वाचून’ या संदेशानुसार अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महामानवांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि भीमगीतांचा आनंद घेत जन्मोत्सव साजरा केला. पंचशील बुद्ध विहार परिसरात सडा-रांगोळी काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावर्षी मिरवणूक व इतर खर्चाला फाटा देत बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक या आदर्श जयंती उपक्रमाबद्दल सुजित बागल यांनी आपल्या भाषणात कमिटीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मांगी गावातील या उपक्रमाचे करमाळा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. यावेळी मांगी गावातील नागरिकांसह घूमट वस्ती व राजवाडा परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला नवदिशा दिली आणि समतेचा मार्ग दाखवला, असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथील माळी गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामाजिक जाणीव वाढते विद्यार्थ्यांनी भाषण व मनोगत सादर करत महात्मा फुले यांना अभिवादन केले. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढून त्यांना योग्य दिशा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम प्रेरणादायी झााला.
वेळापूर (ता. माळशिरस) येथील श्री बृहन्मठ या वीरशैव लिंगायत धर्मातील मोठ्या मठांपैकी एक असलेल्या मठाचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांचा अमृत महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकीने साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त मठाचे शिवाचार्य सदाशिव यांनी ३ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी ध्वजारोहणाने शुभारंभ झाला. गुरुगादीस रुद्राभिषेक, गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार, भजन-कीर्तन, संगीत आणि नवचंडी याग पार पडले. सायंकाळी मुक्तेश्वर शिवाचार्य यांची नाणे, श्रीफळ, पेढा, दूध, गहू, गूळ व तांदूळतुला झाली. मिरवणूक आणि सुवर्ण पट्टाभिषेक सायंकाळी ७ वाजता पालखी मैदान, काळा मारुती मंदिर, व्यापारी पेठ ते श्री बृहन्मठ या मार्गावरून पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य अड्डापालखी व शिवाचार्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला. कलशधारी महिला, भजन, ढोल-ताशा आणि पारंपारिक नृत्याने मिरवणुकीची शोभा वाढवली. विद्युत बग्गी व छत्री आकर्षणाचे केंद्र ठरली.
33 केव्ही लाईन हटवण्यासाठी महावितरणवर महिलांचा ठिय्या
मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठिय्या आंदोलन मांडले. अखेर प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत ही धोकादायक लाईन अन्य मार्गाने वळवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत होत्या. यावेळी वरून गेलेल्या ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीने त्यांना ओढून घेतले. विजेचा तीव्र झटका बसल्याने त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, नगरसेवक चैतन्य देशमुख, सरफराज सय्यद, नाना मांडवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत लाईन बदलली जात नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली. अखेर उपकार्यकारी अभियंता जी. जी. पटवेगार आणि शहर अभियंता नागेश खडतरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ३० एप्रिलपर्यंत लाईन शिफ्ट करण्याचे लेखी पत्र दिले. या आंदोलनात पद्माकर देशमुख, नाना मांडवे, सरफराज सय्यद, लखन ठोंबरे, बिलाल मोमीन, सचिन बनसोडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकवस्ती परिसरातील धोकादायक ३३ केव्ही लाईन ३० एप्रिलपर्यंत अन्य मार्गाने शिफ्ट केली जाईल, असे लेखी आश्वासन वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. महावितरणचे आश्वासन
वाशिंबे उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायडींग तारा तसेच विद्युत पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंदरगाव व सोगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंपाच्या आतील वायडींग तारा तसेच संपूर्ण पंप चोरीच्या घटनासमोर आल्या आहेत. या घटनांमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उंदरगाव (ता. करमाळा) येथे रविवार (दि. १२) रोजी अमोल महादेव बोबडे (रा. वाशिंबे) यांच्या १२ एचपी क्षमतेच्या विद्युत पंपातील वायडींग चोरीला गेले. तसेच मगर या शेतकऱ्याच्या ७ एचपी पंपातील वायडींगही चोरट्यांनी लंपास केले. यापूर्वी सोगाव पश्चिम येथे शनिवार (दि. ११) रोजी रामहरी दत्तात्रय गोडगे यांचा १२ एचपी विद्युत पंप तसेच त्याच दिवशी गोरख पाखरे यांचा १० एचपी पंप चोरीला गेला होता. या सलग घटनांमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे, खातगाव, केतूर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे. ^विद्युत पंप चोरीच्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस प्रशासना कडून तपास सुरू आहे. नागरिकांनी संशयित व्यक्तींबाबत माहिती देऊन सहकार्य करावे,माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. तसेच या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे संदीप बनकर, पोलिस उपनिरीक्षक, करमाळा ग्रामीण पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करावी ^मागील अनेक दिवसांपासून उजनी जलाशय परिसरातील खातगाव, केतूर, पारेवाडी, वाशिंबे, सोगाव पश्चिम व पूर्व आणि उंदरगाव येथे विद्युत पंप तसेच त्यातील वायंरिंग, मोटार स्टार्टरं इत्यादी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या शेतीवर गंभीर परिणाम होत आहे. या संदर्भात अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही अद्यापपर्यंत कोणत्याही घटनेत ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी. अँड. मनोज घनवट, शेतकरी, सोगाव उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंप व त्यातील वायंडिंग चोरीच्या घटनांनी मोठा उच्छाद मांडला आहे. वारंवार घडणाऱ्या या चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याची टीका होत आहे. चोरीची पद्धत सारखीच असल्याने एकाच टोळीचे कारस्थान असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या घटनांमुळे चोरट्यांचा वाढलेला आत्मविश्वास स्पष्ट दिसून येत आहे.आत्मविश्वास दूणावलेले चोरटे पोलिसांना खुलेआम आव्हान देत आहे.अनेक दिवसांपासून विद्युत पंप व वायंडींग चोरीच्या घटना सुरू असूनही पोलिसांना चोरटे सापडत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, हातातोंडाशी आलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेल्या द्राक्ष बागेवर एका क्षणात पाणी फेरले गेल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. मुंगशी येथील शेतकरी अर्जुन श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वीच जालिंदर राऊत यांच्या शेडवर आपला द्राक्षाचा माल बेदाणा करण्यासाठी टाकला होता. मात्र, अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट आणि कागद फाडून टाकले. जोराच्या पावसामुळे शेडवर असलेला अंदाजे ७ ते ८ टन बेदाणा भिजल्याने त्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. द्राक्ष बागेसाठी महागडी औषधे, खते आणि मजुरीवर केलेला अमाप खर्च आता वाया गेला आहे. काही शेतकऱ्यांचे पीक अजूनही झाडावरच आहे, तर काहींनी माल शेडवर वाळत घातला होता. या अस्मानी संकटामुळे उत्पादनाऐवजी कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अवकाळीच्या फटक्याने केवळ पिकांचेच नव्हे, तर शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. आता प्रशासन कधी धावून येणार, याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. ^वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने त्वरित मदत करणे आवश्यक आहे. अजय क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मुंगशी ^अफाट झालेला खर्च आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच या वादळी पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान केले आहे. अर्जुन क्षीरसागर, नुकसानग्रस्त शेतकरी, मुंगशी त्वरित मदत करावे
अमळनेर तालुक्यातील मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचाभोंगळ कारभार समोर आला आहे.गुरुवारी रात्री उपचारासाठीआलेल्या एका बालिकेला आरोग्यकेंद्राला कुलूप असल्यानेउपचाराविना परतावे लागले. याप्रकारामुळे खेडी येथील ग्रामस्थांनीतीव्र संताप व्यक्त केला असून हेआरोग्य केंद्र नक्की कुणाच्याभरवशावर सुरू आहे, असा प्रश्नउपस्थित केला जात आहे. तालुक्यातील खेडी येथील प्रवीणजगन्नाथ पाटील यांची मुलगीगुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारासघरात चक्कर येऊन पडली.त्यामध्ये ती जखमी झाली. गावातवैद्यकीय सुविधा नसल्यामुळे तिचेवडील तिला तातडीने मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातघेऊन गेले. मात्र, कोट्यवधी रुपयेखर्च करून उभारलेल्या या सुसज्ज आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप होते. रात्रपाळीत एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. अखेर उपचार न मिळाल्याने वडिलांना आपल्या जखमी मुलीला घेऊन माघारी फिरावे लागले. मारवड हे पंचक्रोशीतील मुख्य आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत चार उपकेंद्रे येतात. मात्र, मुख्य केंद्रातच सेवा कोलमडली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेबाबत खेडी येथील ग्रामस्थ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली. दोन दिवसांत कर्मचारी रात्री उपस्थित राहणार सध्यास्थितीत दवाखान्यासहकर्मचारी निवासाचे बांधकाम सुरु आहे. विजेची सुविधा नसल्यानेकर्मचाऱ्यांना रात्रपाळीस अडचणीयेतात. त्यामुळे ते उपस्थित राहूशकले नाहीत. दोन ते तीन दिवसातकर्मचारी उपस्थित राहतील. असेवैद्यकीय अधिकारी डॉ. साहिलचौधरी यांनी सांगितले.
घराघरात आलेल्या मोबाइलने बालकांचे बालपण हिरावून घेतले आहे. आजच्या काळातील उपलब्ध सुख साधनांचा कसा आणि किती प्रमाणात वापर करायचा हे कळले पाहिजे. बालमनावर सुसंस्कार करण्यासाठी मातापित्यांनी वेळ दिलाच पाहिजे. करिअरच्या मागे धावताना उत्तम जगण्याचा आनंद घेणे राहून गेले, असे व्हायला नको. ज्या घरात महिला आनंदी असतात त्याच घरात धनाचा वर्षाव होतो. घरातील सर्वांनी एक-दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला तर संपूर्ण परिवार सुखी होतो. इतरांचे दोष पहाण्यापेक्षा आपण आपलेच दोष शोधून ते घालवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राधाकृष्ण महाराज यांनी केले. रामनिवास सतीशचंद्र इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित केलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे सातवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. भाविकांना मार्गदर्शन करताना राधाकृष्ण महाराज म्हणाले, गोवर्धन पूजा उत्सव हा श्रीकृष्ण दर्शनाचा उत्सव आहे. सुदामाने श्रीकृष्णासाठी स्वतःकडे दारिद्र्य ओढवून घेतले. सकाळी उठल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाचे नाव घ्यावे. दररोज श्रीकृष्णांचे चरणामृत घ्यावे. गंगाजल घ्यावे. आपल्या कल्याणाचा मार्ग सोपा होतो. देवघरात मूर्ती, फोटोतील चित्र पाहू नका तर प्रत्यक्ष देवच बसले आहेत, असा भाव ठेवा. भगवंताच्या नामस्मरणाचे, त्यांच्या दर्शनाचे सुख अनुभवा. आपण मंदिराची पायरी चढलो तरी आपले अमंगल नष्ट होण्यास सुरुवात होते. संसारातील विषय सतावू लागले की, भगवान श्रीकृष्णांचे दर्शन करा. सांदिपनी आश्रमात ६४ कलांचे ज्ञान संपादन केलेल्या श्रीकृष्णांच्या सद्गुणांना समजून घेण्याचा प्रयत्न करत स्वतःलाच श्रीकृष्ण चरणी समर्पित करा. भागवत कथा श्रवण करण्यासाठी शहर आणि उपनगरासह जिल्ह्यामधून आणि जिल्ह्याबाहेरूनही भाविक आल्याने गर्दीचा उच्चांक होत राहिला. उपस्थित सर्वांसाठी उत्तम, सात्विक आणि दर्जेदार महाप्रसादाची व्यवस्था इंदाणी परिवारातर्फे करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तिपूर्ण वातावरणात कथा सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील कुंभार गल्ली येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच विविध कीर्तन, भजन व धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले. यावेळी आमदार संग्राम जगताप, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे उपस्थित होते. मान्यवरांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते, असे मत व्यक्त केले. आ. जगताप म्हणाले, संत गोरोबा काका यांची शिकवण ही समाजाला एकत्र आणणारी आणि माणुसकीची जाणीव करून देणारी आहे. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तरुण पिढीला संस्कारांची दिशा मिळते. पुढील काळातही अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. कुंभार गल्ली समितीचे अध्यक्ष जयकुमार सुसरे, उपाध्यक्ष राहुल देवतरसे तसेच संत गोरोबा काका मंडळ व शिरोमणी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
नेवाशामध्ये 7 महिन्यांत पाइपलाइनवर 40 लाख खर्च, तरीही 7 दिवसांनी पाणी!
नेवासे नगरपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव, मुख्याधिकाऱ्यांची मनमानी आणि पाइपलाइन दुरुस्तीच्या नावाखाली झालेला लाखांचा कथित खर्च यावरून नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी धाव घेतली आहे. नगरपंचायतीत नक्की चाललंय काय? असा सवाल करत संतप्त नगरसेवकांनी जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) हराळ यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. विरोधी नगरसेवकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ नुसार प्रत्येक सभेचे इतिवृत्त व ठराव नागरिकांसाठी खुले ठेवणे तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. मात्र नेवासे नगरपंचायतीत सर्वसाधारण सभा, विशेष सभा तसेच प्रशासकीय काळातील सभांचे इतिवृत्त मागणी करूनही उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या प्रशासकीय सभेतील ठरावांच्या प्रती मिळाव्यात म्हणून लेखी अर्ज केले. तसेच जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन यांनीही संबंधित कागदपत्रे देण्याचे निर्देश दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्याधिकारी निखिल फराटे नियमित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे रखडत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. प्रशासनाने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे नगरसेवकांनी दिला आहे. हे निवेदन उपनगराध्यक्ष शालिनी सुखधान, गटनेते जितेंद्र कुऱ्हे, जयश्री शिंदे, संभाजी धोत्रे, स्वप्निल मापारी, शहीदाबी पठाण, सोनल चव्हाण, नसरीन शेख, शोभा व्यवहारे व राजेंद्र काळे यांनी दिले आहे.
‘दाक्षायणी’च्या यात्रेची उद्या सांगता:2 दिवस शिल्लक राहिल्याने लासूरगावकडे ओघ
लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या यात्रेला आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. १९ एप्रिलला अक्षय तृतीया, रविवारी दाक्षायणी देवीच्या यात्रेची सांगता होणार आहे. शुक्रवार देवीचा शेवटचा वार असल्याने १७ एप्रिल रोजी मंदिरात आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक गर्दी झाली होती. दिवसा उन्हामुळे सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. कात्रड (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील देवीचे भक्त पोपटराव लांडगे यांनी समर्थ अर्थमूव्हर्स मित्र मंडळाकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिराच्या वतीने पोपटराव लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. ५ एप्रिल रोजी श्री देवी दाक्षायणी मातेच्या वस्त्रालंकाराने यात्रेला सुरुवात झाली होती. आतापर्यंत तीन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे. उष्णतेमुळे दिवसा कमी. रात्री गर्दी वाढत आहे. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून दर्शन रांगेतील भाविकांना पूजा व आरतीचा मान देण्याची परंपरा सुरू आहे. तेरा दिवसांत दररोज तीन वेळा होणाऱ्या आरतीचा मान ३९ सपत्नीक भाविकांना मिळाला. यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने मंदिरातील संपूर्ण व्यवस्थापन. भाविकांच्या सुविधांचा आढावा दररोज दोन वेळा घेतला जातो, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी दिली. शुक्रवारी गारज येथील रांगोळी चित्रकार भगवान सरोवर यांनी देवीच्या दर्शनी भागासमोर अप्रतिम रांगोळी रेखाटली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ती आकर्षक ठरली.
उष्णतेचा कहर:सोयगावचा पारा 42 अंशांवर, खबरदारी म्हणून ग्रामीण रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका झपाट्याने वाढू लागला आहे. शुक्रवारी (१७ एप्रिल) तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणारा आरोग्याचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने सोयगाव उपजिल्हा रुग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने उष्माघात उपचार कक्ष कार्यान्वित केले आहेत. मार्च महिन्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. जरंडी, बनोटी व सावळदबारा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण ८ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरातील आपला दवाखाना' येथेही लवकरच असा कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी दिली. उन्हाचा पारा वाढल्याने सोयगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी होत असल्याची स्थिती आहे. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, थकवा, श्वासोच्छ्वास वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे. शरीराचे तापमान १०५ अंश फॅरेनहाइटपर्यंत पोहोचणे. ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णांसाठी एसी, कूलर आणि पंख्यांची स्वतंत्र व्यवस्था. ओआरएस, आयव्ही फ्लुइड्स, तातडीची औषधे आणि डिजिटल थर्मामीटर, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी कोल्ड पॅक्स, थंड पाणी आणि बर्फाची उपलब्धता करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांसाठी पाण्याची सोय उन्हाचा तडाखा वाढल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वखर्चातून ग्रीन नेट'(हिरवे कापड) लावून कृत्रिम सावली केली आहे. तसेच ग्राहकांसाठी पिण्याच्या शुद्ध व थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. उष्माघात रुग्ण आढळल्यास काळजी घ्या ^तापमान वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. उष्माघाताचा रुग्ण आढळल्यास त्याला त्वरित सावलीत बसवून शरीरावर थंड पाणी टाकावे. प्रकृती गंभीर वाटल्यास विलंब न करता रुग्णालयात दाखल करावे. याठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. -डॉ. दिनाजी खंदारे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव
घाटनांद्रा राज्य महामार्ग क्रमांक ४०वरील घाटनांद्रा-सिल्लोड मार्गालगत वाहणाऱ्या चारणा नदीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून सांडपाणी व कचऱ्याच्या विळख्यात सापडलेल्या नदीचे अक्षरशः गटारात रूपांतर झाले आहे. नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर तातडीने नदीची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. गावातील सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने तसेच काही नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात असल्याने नदी प्रदूषणाच्या गर्तेत अडकली आहे. प्लास्टिक, प्राण्यांचे अवशेष, अंड्यांची टरफले यामुळे नदीचे स्वरूप कचराकुंडीप्रमाणे झाले आहे. परिणामी, कचऱ्यात साचलेल्या पाण्यातून कुबट वास येत असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या नदीवर उभारण्यात आलेल्या चारनेर लघु प्रकल्पामुळे चारनेर, आमठाणा, पेंडगाव, घाटनांद्रा वाडी या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होत असला तरी सध्या वाढलेल्या प्रदूषणामुळे भविष्यात जलसाठा दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास हेच दूषित पाणी तलावात मिसळून परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी नदीपात्राची स्वच्छता करावी, अशी मागणी दामोदर मोरे, संतोष गुळवे, संजय गुळवे, योगेश ज्ञाने, सुनील मोटे, कृष्णा मोरे यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. ग्रामस्थांनीही स्वच्छतेबाबत सहकार्य करावे ^चारणा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष आहे. लवकरच नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. ग्रामस्थांनीही स्वच्छतेबाबत सहकार्य करावे. - प्रभाकर धुड, ग्रामविकास अधिकारी
नाट्यपरंपरा जपण्यासाठी कटिबद्ध- राजेंद्र पाथ्रीकर:76 वर्षांची नाट्य, कुस्तीची परंपरा पाथ्रीत कायम
फुलंब्री तालुक्यातील पाथ्री गावाच्या इतिहासात कुस्ती आणि नाट्यकला यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही ७६ वर्षांची गौरवशाली परंपरा बदलत्या काळात आजही कायम आहे. यासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ पुरवण्यात येईल. धावपळीच्या युगात माणसे जोडणाऱ्या या कला जिवंत राहणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राजेंद्र पाथ्रीकर यांनी केले. पाथ्री गावातील यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित नाट्यकलावंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वर्षी यात्रा उत्सवात सावकार' हे नाटक यशस्वीरीत्या सादर करण्यात आले. या नाटकातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. गावातील जुनी नाट्यपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचाही शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कलेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दामूअण्णा पाथ्रीकर, भानुदास पाथ्रीकर, अंकुश मोहनराव बनसोड, कचरू तात्या, रशीद शेठ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विजय ढेपले यांनी केले. योगेश बनसोड यांनी सूत्रसंचालन केले.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन सिरेसायगाव (ता. गंगापूर) येथील शेतकरी शिवसिंग बेडवाल यांच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी बिबट्या आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण रेस्क्यू पथकाने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. घटनेची माहिती शेतकरी रवी वाघ यांनी पंचायत समिती सदस्य शुभम बोऱ्हाडे यांना दिली. बोऱ्हाडे यांनी तातडीने वन विभाग प्रशासनाला कळवले. सहकारी सुनील जाधव, गणेश गव्हादे, कल्याण जाधव, पंकज आमराव यांच्यासह ते घटनास्थळी पोहोचले. वन विभागाचे परिमंडळ अधिकारी अनिल पाटील, वनरक्षक के. व्ही. ब्रह्मनावत, शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांचे रेस्क्यू पथक दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याला गौताळा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घोसल्यात कुत्र्याची शिकार सोयगाव | घोसला शिवारातील ज्ञानेश्वर युवरे यांच्या शेताजवळ (गट क्र. ८०) बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांसह मजुरांची मोठी पळापळ झाली. या बिबट्याने रात्री एका कुत्र्याची शिकार केल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले. महावितरणने शेतातील सिंगल फ्यूज वीज बंद केल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
लोकसभा-विधानसभेत 33% आरक्षण समर्थनार्थ करमाडमध्ये महिलांची रॅली
लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ करमाडला शुक्रवारी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिलांची रॅली काढण्यात आली. महिलांच्या भजनी मंडळाचा गजर झाला, घोषणांनी करमाड गाव दणाणून गेले होते. नारीशक्ती वंदना अधिनियमाला पाठिंबा देण्यासाठी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली. रॅलीत आणि नंतरच्या कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, जि. प. सदस्य पुष्पा काळे, साधना कुलकर्णी, जयश्री पवार, पंचायत समिती सदस्य गीता कोरडे, चारुशीला गावंडे, भाजप प्रदेश सचिव रेखा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून रॅलीला सुरुवात झाली. सुरुवातीला जय हनुमान महिला भजनी मंडळ होते. त्यामागे विविध वेशभूषांतील केंद्रीय प्राथमिक शाळा, न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर महिलांच्या घोळक्यात आमदार अनुराधा चव्हाण स्वतः घोषणा देत सहभागी झाल्या. रॅली महात्मा जोतिबा फुले चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, महादेव मंदिर मार्गे श्रीराम मंदिर चौकात पोहोचली. तेथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. अंगणवाडी सेवेत उत्कृष्ट काम करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेल्या सुपरवायझर सुनीता परदेशी, अंगणवाडी सेविका अनिता तारो, जय हनुमान मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती काळे यांचा सन्मान करण्यात आला. आमदार अनुराधा चव्हाण, जितेंद्र जयस्वाल, रेखा कुलकर्णी, डॉ. जिजा कोरडे, पुष्पा काळे, दत्ता उकर्डे यांनी सभेला संबोधित केले. कार्यक्रमासाठी सय्यद कदीर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल उकर्डे, दादाराव कुलकर्णी, रवी कुलकर्णी, रामेश्वर सोळुंके यांनी पुढाकार घेतला.
शेतकऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी- तहसीलदार वगवाड:सिद्धनाथ वाडगावात महाराजस्व अभियान शिबिर
सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी महसूल मंडळ विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर झाले. याला शेतकरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी शिल्लेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता संतोष पाटील जाधव होत्या. आयोजक तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार श्री. वाघमारे, गंगापूर भूमीअभिलेखचे उपअधीक्षक श्री. इंपाळे उपस्थित होते. तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी शेतकऱ्यांना वहिवाट, बांध, शीवरस्ते यासारख्या वादाचे प्रसंग सोडवावेत. शेतकऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. वजनापूरचे सरपंच शिवम जाधव यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सदस्या मोहिनी जगदीश साळुंके, वजनापूर-शेकटा गावचे युवा सरपंच शिवम अंकुश जाधव, मालुंजाचे सरपंच जगदीश साळुंके, तांदुळवाडीचे सरपंच अनिल राजगिरे, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष जब्बार पटेल, शिल्लेगावचे महसूल अधिकारी सुनील सरगर, लासुरचे शंकर जाधव आदी उपस्थित होते. शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांना वारस कारवाई, सातबारा, संजय गांधी, श्रावण बाळ मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
हनुमाननगर चौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दिवेकर आणि रांजणे गँगच्या ८ गुंडांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री झालेल्या या राड्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील जुन्या वादातून या दोन्ही गँगमध्ये धुसफूस सुरू होती. गुरुवारी दुपारी न्यायनगर भागात त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर रात्री दोन्ही गट हनुमाननगर चौकात आमने-सामने आले. या वेळी पवन दिवेकर याने हवेत गोळीबार केल्याने परिसरात खळबळ माजली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेत घटनास्थळावरून एक काडतूस जप्त केले होते. अटकेतील आरोपींची नावे पवन अनिल दिवेकर (३०, रा. एमएसईबी क्वार्टर, मिल कॉर्नर), कुणाल किशोर साळवे (२६, रा. न्यायनगर, गारखेडा), महेश गौतम साळवे (३०, रा. संसारनगर, क्रांती चौक), रोहन अनिल दिवेकर (२४, रा. एमएसईबी क्वार्टर, मिल कॉर्नर), सतीश अण्णाराव हिवराळे (२३, रा. समतानगर, क्रांती चौक), सिद्धार्थ शाहू चाबुकस्वार (२१, रा. न्यायनगर, गारखेडा), नीलेश ऊर्फ सूर्या नारायण रांजणे (रा. न्यायनगर), आकाश साळुंखे (रा. हनुमाननगर) दुसऱ्या गुंडाकडून पैसे घेऊन चहा पीत असताना पोलिसांच्या बेड्या दिवेकर रात्रभर शहरातील कुख्यात गुंडच्या संपर्कात होता. तो शहराच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या ठिकाणावर तो असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. मात्र तो सातत्यने आपले लोकेशन बदलत होता. त्याने बाबा पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीकडून पुढे पळून जाण्यासाठी पैसे घेतले. त्यानंतर पहाटे पैठण गेट भागातील एका टपरीवर तो चहा पिताना पोलिसांना दिसला. साध्या वेशातील पोलिस ओळखून दिवेकर याने लागलीच पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा पाठलाग करून अखेर अर्जून राऊत यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या.
सुमारे १८ लाख लोकसंख्येच्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १८ पोलिस ठाणी, ३५०० पोलिस कार्यरत आहेत. असे असताना मात्र मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पोलिसांचे नव्हे तर गुंडांचे राज्य असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील सात दिवसांत एका खुनासह १४ चाकूहल्ल्यांची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली. त्याशिवाय मंगळसूत्र चोरीचे ६, विनयभंगाचे ५ गुन्हे दाखल झाले. २ ठिकाणी गोळीबाराच्या घटना तर सरकारी कामात अडथळा आणल्याचे २ गुन्हे नोंदवले आहेत. रस्त्यावर समोरून येणारा चाकूने मारेल, गळ्यातील सोने हिसकावून पळेल अथवा त्याचा विश्वास संपादन करून लुटेल याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांची पेट्रोलिंग पूर्ण अपयशी ठरली असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्याने प्रचंड दहशतीचे व पोलिसांवरील अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात भररस्त्यात रक्ताचे सडे पडत आहेत, गोळीबाराच्या फैरी झडत आहेत. तर आडोशाला उभ्या व्यक्तीला लुटण्याच्या उद्देशाने थेट चाकूचे वार झेलावेद लागत आहेत. पोलिसांच्या वतीने ऑल आऊट ऑपरेशन आणि कोम्बिंग ऑपरेशन अनेक दिवसांपासून बंद दप्तरात गेले आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. माध्यमावर ‘रील्स’मधून गुंडांची दहशत एकीकडे रस्त्यावर गुंडांचा नाच सुरू असताना, दुसरीकडे सराईत गुन्हेगार सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत. हातात धारदार शस्त्रे घेऊन, तलवारी नाचवत आणि पोलिसांना खुलेआम आव्हान देणाऱ्या रील्स बनवून समाज माध्यमावर टाकल्या जात आहेत. हर्सूल जेल परिसरातील, कोर्टात सादर करतानाचे तसेच हातकडी घातलेले भाईगिरीचे हे व्हिडिओ आहेत. या डिजिटल गुंडांवर ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांचे सायबर मॉनिटरिंग केवळ देखावाच ठरत आहे. खबऱ्यांचे नेटवर्क; सराईतांवर लक्ष देण्यात अपयश कुठलाही सराईत गुन्हेगार तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच्यावर नजर ठेवण्याची गरज असते. मात्र पोलिस यात अपयशी ठरत आहेत. तसेच पूर्वी असणारे खबऱ्यांचे नेटवर्क आता अस्तित्वात नसल्याचे दिसून येत आहे. सराईत गुंड बाहेर येताच त्यांचा जेलच्या बाहेरच सत्कार केला जातो. फटाके फोडले जातात, त्यांची रॅली काढली जाते, तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. ‘चार्ली’ प्रयोगाची पुन्हा एकदा गरज शहरात अमितेश कुमार पोलिस आयुक्त असताना त्यांनी २०१५-२०१७ या काळात दलातील काही कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र चार्ली पथक स्थापन केले होते. त्यांच्यामार्फत २४ तास शहरात दुचाकीवरून गस्त घातली जायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण होऊन गुन्हेगारी घटली होती. त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा अशा प्रयोगाची मागणी करत आहेत.
मित्रांमध्ये फुशारकी मिरवण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यानंतर त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करायचे आणि त्याचे व्हिडिओ काढायचे, अशा प्रकाराचा उलगडा परतवाड्यात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. अयानचा एक “लव्ह गुरू’ होता. त्याने त्याला मुलींना जाळ्यात ओढण्याच्या काही क्लृप्त्या शिकवल्या. “मुलींना पटवण्यासाठी “हाय-हॅलो’ असे जनरल मेसेज करायचे नाहीत. त्यांना असा प्रश्न विचार, ज्याचे उत्तर द्यायला त्या भाग पडतील,” उदाहरणादाखल, “आप वहीं हो ना जो वहां मिले थे?” अशा प्रकारचे प्रश्न विचारून अयान मुलींना आपल्यासोबत चॅटिंग करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात अयानने एकूण आठ मुलींसोबत गैरवर्तन केले असून त्यातील दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. लैंगिक अत्याचारासाठी त्याने अमरावती शहरातील एका मित्राच्या फ्लॅटचा वापर केला. गेल्या वर्षभरात तो सात ते आठ वेळा मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता. भाजप नेत्या नवनीत राणा यांना दंगली घडवायच्यात : प्यारे खान नागपूर |अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना दंगली घडवायच्या असून त्यांनी पसरवलेल्या अफवांमुळे त्यांच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत असल्याचे खान यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, नवनीत राणा यांनी या प्रकरणातील आरोपींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्याला प्यारे खान यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. परतवाड्यात 3 कॅफेमध्येही चाळे अयानने काही मुलींसोबत अमरावती शहरातील दोन कॅफे आणि परतवाडा येथील तीन कॅफेमध्येही अश्लील वर्तन केले होते. पोलिस आता या पाचही कॅफेंचा शोध घेत आहेत. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. पोलिस कोठडीत त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. तपासाअंती आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या अटक केलेल्या आठ आरोपींपैकी अयान हा मुख्य सूत्रधार आहे. मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करून देणारा आहे. उर्वरित सहा आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या पोलिसांनी समोर आणल्या आहेत. पहिल्या साखळीत अयानकडून सर्वप्रथम त्याचा जिवलग मित्र उजेर खान याने व्हिडिओ मिळवले. ते पुढे मो. साद याला पाठवले. मो. सादने ते तरबेज खानला पाठवले. दुसरी साखळी अशी आहे. उजेर खानने ऐफाज खानला पाठवले. ऐफाजने मोहंमद इम्रानला पाठवले. त्याने शेख नावेदला पाठवले. ही साखळी अद्याप संपलेली नाही. अमरावतीतील व्हिडिओ कांड अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता.
नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या ११ जणांना भरपाई देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी ४ मेपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. रक्कम न मिळाल्यास छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. तसेच, विलंबासाठी प्रतिदिन प्रति लाभार्थी १,००० रुपये दंड त्यांच्या स्वतःच्या खिशातून वसूल केला जाईल, असा कडक इशारा न्यायालयाने दिला आहे. धोरणासाठी २ महिन्यांचा वेळ हवा राज्य सरकारने नवीन सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी २ महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यावर धोरणात केवळ सरकारी तिजोरीवर भार न टाकता संबंधित दुकानांची तपासणी करणाऱ्या निरीक्षकांवरही जबाबदारी निश्चित करावी, असे कोर्टाने म्हटले.
खरातच्या अटकेला एक महिना; 9 गुन्हे, 58 क्लीप, 130 खाती:नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्हे दाखल
स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय पूर्णपणे खोलात गेला आहे. १७ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले असून, आतापर्यंत त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिकमधील सरकारवाडा, मुंबई नाका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. तपासातील धक्कादायक बाबी रिमोट कंट्रोल नाग : भक्तांना घाबरवण्यासाठी २० फुटांचा नाग रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फिरवत असे.कस्तुरीचा वापर : फसवणुकीसाठी तो दुर्मिळ जडीबुटी आणि हरिणाची कस्तुरी वापरून चमत्कारचा बनाव.राजकीय कनेक्शन : खरातच्या आश्रमात अनेक बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची उठबस असल्याचे फोटो समोर.पत्नीचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू.एसआयटी-आता या प्रकरणाचा मुळापासून तपास करत असून खरातच्या मालमत्तेचा आकडा ५०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर सक्तवसुली संचालनालयाने आपला फास अधिक घट्ट केला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर’ या कार्यालयावर शुक्रवारी ईडी आणि एसआयटीच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मॅरेथॉन झाडाझडतीनंतर पथकाने कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि बंद पाकिटांमधील पुरावे बॅगा भरून जप्त केले आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक अचानक कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात धडकले. यावेळी स्थानिक एसआयटीचे अधिकारीही सोबत होते. कार्यालयाचे दरवाजे आतून बंद करून प्रत्येक फाईल आणि संगणकीय डेटाची बारकाईने तपासणी करण्यात आली. खरातने फसवणुकीतून कमावलेली मालमत्ता आणि त्याचे आर्थिक धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास या कारवाईत करण्यात आल्याचे समजते.कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथकाने सर्व जप्त केलेले साहित्य सीलबंद करून सोबत नेले. तपास पूर्ण होताच ‘ओकस’च्या कार्यालयाला पुन्हा एकदा प्रशासनाकडून अधिकृत सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील बड्या संशयितांचे आणि खरातच्या निकटवर्तीयांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, खरात याने सामान्य नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. या पैशांची गुंतवणूक रिअल इस्टेट आणि हवाला नेटवर्कद्वारे परराज्यात व परदेशात केल्याचा संशय आहे. निकटवर्तीयांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया शक्य भोंदू कॅप्टन अशोक खरातने सर्वसामान्यांची फसवणूक करून जमवलेली मालमत्ता आता ईडीच्या कचाट्यात समोर आली आहे. आजच्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे खरातच्या बेनामी संपत्तीचे अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. ओकस प्रॉपर्टीजच्या माध्यमातून नाशिकसह जिल्ह्यात कुठे कुठे जमिनी खरेदी केल्या, याचा शोध आता ईडी घेत आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्यास खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांची बँक खाती तसेच मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
मुलींशी आक्षेपार्ह वर्तन आणि व्हिडिओ प्रकरणाच्या तपासासाठी १० अधिकाऱ्यांसह ४८ पोलिसांची ‘एसआयटी’ स्थापन केली असून त्यांची ५-६ पथके तयार केली आहेत. ही पथके शोषणाच्या जागांची झडती घेत आहेत. दुसरीकडे, मुख्य आरोपी अयान अहमद याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होणे परतवाडा पोलिस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपीसोबत केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी एपीआय समीर शेख, पोलिस अंमलदार शुभम वर्मा आणि मयूर गुरव या तिघांना शुक्रवारी (दि. १७) निलंबित केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण पोलिसांकडून तपासाचा सविस्तर आढावा घेतला. सोशल मीडियावरील ४१ खाती सायबर सेलकडून बंद या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता सायबर सेलच्या मदतीने सोशल मीडियासंदर्भातही कारवाई करण्यात आली. पीडितांसंदर्भातील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असलेले ४१ संशयास्पद सोशल मीडियाची खाती बंद करण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे केले असले तरी अनेक शाळा या नियमाची पायमल्ली करत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला. यापुढे मराठी भाषा अनिवार्यपणे न शिकवणाऱ्या शाळेला १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. तसेच, नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता किंवा ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ रद्द केले जाईल. ‘इंग्रजी’ माध्यमाच्या आणि सीबीएसई शाळांना बसणार चाप! इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये अजूनही ‘मराठी’ भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. या नवीन नियमावलीमुळे आणि थेट १ लाखाच्या दंडाच्या तरतुदीमुळे आता सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांना चाप बसेल. राज्यात एकूण खाजगी शाळांत मंडळाच्या १३,५३८, सीबीएसईच्या १,२६० आणि आयसीएसईसह इतर ३८९ शाळांचा समावेश आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली
अमेरिकेने मानले इराणचे आभार, संघर्ष निवळणार? तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल ३९ दिवस चालले. अखेर ४० व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, युद्धकाळात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज जहाजांसाठी बंद केल्याने जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले होते. मात्र, आता इराणने होर्मुझची […] The post होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर, मोदी सरकारला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्था नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर देशाच्या संसदेत काल जोरदार चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारीही सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी या विधेयकावर मते मांडली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी यावर मतदान पार पडले. यावेळी एकूण ५२८ सदस्यांनी मतदान केले. यापैकी २९८ […] The post मोदी सरकारची फजिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आता केवळ सक्तीचेच नाही, तर अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, थेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. राज्याच्या भाषा धोरणानुसार मराठी भाषेचे अध्यापन सर्व शाळांना बंधनकारक आहे. मात्र, काही आंतरराष्ट्रीय आणि खासगी शाळांमध्ये मराठी विषय शिकविला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शासनाने आज एक नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार, केवळ राज्य मंडळाच्याच (SSC) नव्हे, तर सीबीएससी (CBSE), आयसीएसई (ICSE), आयबी (IB) आणि आयजीसीएसई (IGCSE) यांसारख्या सर्व परकीय आणि इतर मंडळांच्या शाळांनाही मराठी विषयाचे अध्यापन करणे बंधनकारक असेल. पात्र शिक्षकांची नियुक्ती आणि विशेष तपासणी पथके नवीन आदेशानुसार, प्रत्येक शाळेत मराठी विषयासाठी स्वतंत्र आणि पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक राहणार आहे. या नियमाची अंमलबजावणी केवळ कागदावर राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि निरीक्षकांचे विशेष पथक तयार करण्यात येणार असून, यामध्ये मराठी विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचा समावेश असेल. हे पथक शाळांना आकस्मिक भेटी देऊन मराठी विषयाच्या तासांची आणि शिकविण्याच्या पद्धतीची तपासणी करेल. शाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर करणे आता बंधनकारक आहे. १ लाख रुपयांचा दंड आणि मान्यता रद्द शाळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास प्रशासन अत्यंत कठोर पावले उचलणार आहे. दोषी आढळलेल्या शाळा व्यवस्थापनाला प्रथम नोटीस देऊन १५ दिवसांत खुलासा मागविण्यात येईल. जर शाळेचे उत्तर समाधानकारक नसेल, तर महाराष्ट्र स्वंयअर्थसहाय्यित शाळा अधिनियमातील कलम १२(१) नुसार संबंधित शाळेला एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. दंडात्मक कारवाईनंतरही जर शाळेने मराठी विषय शिकविण्यास सुरुवात केली नाही, तर अंतिम कारवाई म्हणून त्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा डॉ. पंकज भोयर यांनी दिला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाला मिळणार बळ कोणतीही शिक्षण संस्था किंवा शाळा महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अवमान करू शकत नाही. ही आमची राजभाषा असून तिचे संवर्धन करणे हे प्रत्येक शाळेचे कर्तव्य आहे, असेही डॉ. भोयर यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या या धडाकेबाज निर्णयामुळे राज्यातील मराठी भाषेच्या सक्तीच्या अंमलबजावणीला मोठे बळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, पालकांमधूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे.
अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातीत चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली आहे’, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली. ॲड. सावंत यांचे पूनमशी प्रेमसंबंध होते, ॲड. सावंत यांचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ॲड. सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली. तिच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पूनमच्या पतीने माहिती दिल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, गु्न्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलिस निरीक्षक बडाख, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
छत्रपती संभाजीनगर शहरात महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. शुक्रवारी (१७ एप्रिल) शहरातील सुमारे २० टक्के भागात ४ ते ६ तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून सध्या मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या कामांमध्ये शहरातील ११ केव्ही आणि ३३ केव्ही वाहिन्यांच्या संपर्कात येणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे हे मुख्य काम होते. २ ते ३ किलोमीटर अंतरावरील फीडरमधील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. यासोबतच जंप काढणे आणि लूज कनेक्शन दुरुस्त करणे यांसारखी तांत्रिक कामेही करण्यात आली. कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख आणि प्रसाद महातोले यांनी ही माहिती दिली. शहरातील विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत भीमटेकडी फीडर आणि दिल्लीगेट फीडरवरील अंबर हिल, एव्हरेस्ट कॉलेज, सईदा कॉलनी, हर्सूल गाव, कोलथनवाडी रोड, जहांगीर कॉलनी, चेतनानगर आणि फातेमा कॉलनी येथे वीज नव्हती. याचप्रमाणे, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत पडेगाव उपकेंद्रावरील सर्व फीडर, निशांत पार्क फीडर आणि रेल्वे स्टेशन फीडरवरील उद्योग इंद्रकमल, स्काय सिटी, निशांत पार्क परिसर, मास्टर कुक हॉटेल, दिशानगरी, झेड गॅलेक्सी, शिवकला नेत्रालय, द्वारकादास नगर, शहानूरवाडी आणि समाधान कॉलनी येथील वीजपुरवठा बंद होता. रेल्वे स्टेशन उपकेंद्रावरील सर्व फीडर्सवरील ग्राहकांना सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत वीज खंडित झाल्याचा अनुभव आला. तर, सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत म्हाडा कॉलनी, चिकलठाणा गाव, सावित्रीनगर, विमानतळासमोरील भाग, प्रकाशनगर, रामनगर, नारेगाव, एन-११, एन-१२, एन-१, पॉवरलूम, ग्रीव्हज, सिंधी कॉलनी, उस्मानपुरा, एसबीएच कॉलनी आणि विकासनगर येथे वीज नव्हती.
पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सत्तू अमावस्येच्या दिवशी या उत्सवाला सुरुवात झाली. यावर्षी तब्बल २५ लाख विविध सुवासिक फुलांनी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही मनोहारी फुलांची आरास पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली. या पुष्पोत्सवासाठी जाई, जुई, मोगरा, लिली, शेवंती, सोनचाफा, तगर, निशिगंध यांसारख्या शोभिवंत फुलांची आरास करण्यात आली आहे. मोगऱ्याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या फुलांनी मंदिराला सुशोभित करण्यात आले. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही फुलांची भव्य आरास साकारली. उत्सवाच्या सुरुवातीला सकाळी उत्सव उपप्रमुख अक्षय हलवाई यांच्या हस्ते पारंपरिक लघुरूद्र करण्यात आला. त्यानंतर अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार आणि उत्सवप्रमुख महेंद्र पिसाळ यांच्या हस्ते श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व माजी विश्वस्त डॉ. विठ्ठल नेउरगांवकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कार्यकारी विश्वस्त अॅड. रजनी उकरंडे, खजिनदार युवराज गाडवे, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, सुनिल रुकारी, डॉ. पराग काळकर आणि राजेंद्र बलकवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाविकांना चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ आणि पन्हे वाटप करण्यात आले. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंबे स्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा तसेच कै. लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या आहेत. ही फुलांची आरास रविवार, २१ एप्रिलपर्यंत भाविकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत घडलेल्या कथित गैरप्रकारांनंतर राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असतानाच, आता या प्रकरणावर दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, सखोल चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सल्लागारांची नियुक्ती केली आहे. तसेच कंपनीच्या अंतर्गत पोर्टलवर या प्रकारच्या आरोपांची कोणतीही तक्रार यापूर्वी प्राप्त झालेली नव्हती. अशी माहिती टीसीएसचे सीईओ आणि एमडी के. कृतीवासन यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे. यावेळी कंपनीच्या वतीने निदा खानबाबतही मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीसाठी टीसीएसने मोठी पावले उचलली आहेत. टीसीएसच्या अध्यक्षा आणि सीइओ (COO) आरती सुब्रमण्यम यांच्या देखरेखीखाली ही अंतर्गत चौकशी सुरू आहे. कंपनीने 'डेलॉईट' (Deloitte) मधील तज्ज्ञांचे पथक आणि 'ट्रायलीगल' (Trilegal) या नामांकित विधी संस्थेची स्वतंत्र सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षण समिती स्थापन केली असून, टीसीएसचे स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री या समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. चौकशीचे निष्कर्ष या समितीसमोर सादर केले जातील. तथ्य तपासणी : निदा खान आणि नाशिक युनिट निदा खान या 'एचआर' नाहीत: प्रसारमाध्यमांमध्ये ज्यांचा वारंवार उल्लेख TCS च्या 'HR व्यवस्थापक' (HR Manager) म्हणून केला जात आहे, त्या श्रीमती निदा खान या ना HR व्यवस्थापक आहेत, ना त्या कर्मचारी भरती प्रक्रियेसाठी (Recruitment) जबाबदार आहेत. त्यांनी यापूर्वी 'प्रोसेस असोसिएट' (Process Associate) म्हणून काम केले होते आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नेतृत्वविषयक अधिकार किंवा जबाबदाऱ्या नव्हत्या, असा खुलासा कंपनीने केला आहे. नाशिक कार्यालय सुरूच आहे: नाशिक येथील आमचे युनिट (कार्यालय) आजही कार्यरत आहे आणि आमच्या ग्राहकांना सेवा देत आहे. हे युनिट बंद करण्यात आल्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे असत्य आहेत. अंतर्गत तक्रारींचा अभाव: सविस्तर पुनरावलोकन प्रक्रिया अद्याप सुरू असली, तरी नाशिक युनिटशी संबंधित प्रणाली आणि नोंदींच्या प्राथमिक तपासणीवरून असे दिसून येते की, आमच्या 'नैतिकता' (Ethics) किंवा 'POSH' (लैंगिक छळ प्रतिबंधक) विषयक तक्रार निवारण माध्यमांवर आम्हाला अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, ज्या प्रकारचे आरोप सध्या केले जात आहेत. 'झिरो टॉलरन्स' धोरणावर कंपनी ठाम कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि संस्थात्मक आचारसंहिता यांबाबत TCS सर्वोच्च मानकांचे पालन करते. प्रत्येक कर्मचाऱ्याची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि कल्याण यांसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. आम्ही यापूर्वीही स्पष्ट केल्याप्रमाणे, कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा गैरवर्तन यांबाबत आमचे 'शून्य-सहिष्णुता' (Zero-tolerance) धोरण आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना आधार देणे आणि आमच्या सर्व कार्यस्थळांवर सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण सुनिश्चित करणे, यावर आमचे लक्ष केंद्रित आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना (Law Enforcement Agencies) आम्ही आमचे पूर्ण सहकार्य देत आहोत; जेणेकरून या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होऊन, ते प्रकरण एका योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकेल.
देशाच्या संसदेत आज महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून अभूतपूर्व राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सादर केलेले 'संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६' (नारी शक्ती वंदन अधिनियम) लोकसभेत आवश्यक तांत्रिक बहुमताअभावी नामंजूर झाले. घटनादुरुस्तीसाठी उपस्थित सदस्यांच्या दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते, मात्र संख्याबळ न जुळल्याने हे ऐतिहासिक विधेयक रखडले आहे. या निकालावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला लोकशाहीतील 'काळा दिवस' संबोधले आहे. लोकसभेत या विधेयकावर मतविभाजनाद्वारे मतदान घेण्यात आले. ५२८ खासदारांनी या प्रक्रियेत भाग घेतला होता. हे विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत म्हणजेच ३५२ मतांची आवश्यकता होती. विधेयकाच्या बाजूने २९८ मते पडली, तर विरोधात २३० मते मिळाली. बहुमतासाठी ५४ मतांची कमतरता भासल्याने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयक नामंजूर झाल्याचे घोषित केले. यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सीमांकन आणि केंद्रशासित प्रदेश कायद्याशी संबंधित इतर दोन विधेयके तूर्तास पुढे न नेण्याचा निर्णय घेतला. विरोधकांनी नारीशक्तीचा अपमान केला: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधेयक नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, देशातील महिलांना आरक्षण मिळावे ही आमची बांधिलकी आहे, पण विरोधकांनी केवळ राजकीय अहंकारासाठी या ऐतिहासिक संधीचा बळी दिला. नारीशक्तीच्या बाजूने उभे राहण्याऐवजी विरोधकांनी 'नौटंकी'ला प्राधान्य दिले. भारताची नारीशक्ती हा अपमान विसरणार नाही. आम्ही केवळ भाषणांमध्ये महिला सक्षमीकरण मानत नाही, तर ती आमची श्रद्धा आहे. या अन्यायाविरोधात आम्ही उद्यापासून रस्त्यावर उतरून जनआंदोलन करू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. लाडक्या बहिणींचे रौद्र रूप दिसेल: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालावर ट्विट करत महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. आजचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. काँग्रेस आणि इंडी (I.N.D.I.A.) आघाडीने गरीब, दलित आणि आदिवासी माता-भगिनींना संसदेत जाण्यापासून रोखले आहे. पंतप्रधान मोदींनी महिलांना न्याय देण्याचा ऐतिहासिक प्रयत्न केला, पण विरोधकांचा महिलांप्रती असलेला आकस आज उघड झाला आहे. आता येणाऱ्या काळात विरोधकांना आमच्या लाडक्या बहिणींचे रौद्र रूप पाहायला मिळेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. सभागृहात रंगला 'कलगीतुरा' मतदानापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरकारकडून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी विधेयकाचे महत्त्व पटवून दिले. तर दुसरीकडे राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव, अमोल कोल्हे आणि वर्षा गायकवाड यांनी विधेयकातील तरतुदींवर प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे २०२९ च्या निवडणुकांपासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी प्रयत्न केंद्र सरकारने केला. मात्र, दुर्दैवाने राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या विधायक प्रयत्नात अडसर आल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. महिला आरक्षणासंदर्भातील घटना दुरुस्ती विधेयके दोन-तृतियांश बहुमताने मंजूर न झाल्याबाबत प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक शंकेला केंद्र सरकारने अत्यंत वस्तुनिष्ठ आणि ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांची मागणी असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट ५० टक्के याच प्रमाणात लोकसभा मतदारसंघ वाढवण्याबाबतची सकारात्मक तयारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात व्यक्त केली होती. मात्र, एकूणच विरोधी पक्षांची भूमिका पाहता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांच्या हितांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार अधिक महत्त्वाचे वाटल्याचे दिसून येते. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीत अडसर आणणे, हा विरोधी पक्ष कदाचित आपला विजय समजत असतील. प्रत्यक्षात तो नारीशक्तीच्या हितांचा आणि त्यांच्या हक्कांचा पराभव आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळवून देणे, हा आमच्यासाठी केवळ राजकीय अजेंडा नसून तो एक दृढ निर्धार आणि स्वप्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आज ना उद्या हे स्वप्न निश्चितपणे साकार होईल आणि भारतीय नारीशक्तीला तिचा हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. ५४ मतांच्या फरकाने हे विधेयक नामंजूर दरम्यान, महिला आरक्षण विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यात सरकारला अपयश आले. '१३१ वे घटनादुरुस्ती विधेयक, २०२६' मध्ये एकूण जागांची संख्या वाढवून ८५० करण्याच्या तरतुदींचा समावेश होता. २१ तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर या विधेयकावर मतदान झाले. विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली. लोकसभेत एकूण ५२८ संसद सदस्यांनी (खासदारांनी) आपला मतदानाचा हक्क बजावला. विधेयक मंजूर होण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. ५२८ च्या दोन-तृतीयांश म्हणजे ३५२ मते होय. परिणामी, ५४ मतांच्या फरकाने हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात, मोदी सरकारला सभागृहात एखादे विधेयक मंजूर करून घेण्यात अपयश येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वर्धा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले असले, तरी मंगळवार व बुधवारपासून तापमानात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी १६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १,४५४ शाळा व १,६२७ अंगणवाडी एकूण ३,०८१ शाळांना सुट्टी जाहीर केली होती. शुक्रवारी तापमान चक्क ४४.४ अंश सेल्सिअस वर पोहचले असताना, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी ४४ तापमानात सुट्टी देण्याच्या निर्णयामागे नेमका उद्देश काय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, शहरालगतच्या एका शाळेच्या ग्रुपमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे एक दिवसाची सुट्टी असा मजकूर व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर हा संदेश झपाट्याने पसरल्यानंतर शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, सुट्टी ही केवळ वाढत्या तापमानामुळे देण्यात आली आहे. तरीही नागरिकांच्या मनातील शंका मात्र कायम आहेत. ४४ तापमान असताना सुट्टी, पण ४४.४ असताना सुट्टी नाही वर्धा जिल्ह्यात इंग्रजी माध्यमासह प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये केजी-१ ते दहावीपर्यंतचे वर्ग नियमित भरविले जातात. सकाळीच १० वाजताच्या सुमारास उष्णतेची तीव्रता जाणवत असताना लहान मुलांना होणाऱ्या त्रासाकडे प्रशासनाने वेळेवर गांभीर्याने पाहिले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. १७ एप्रिल रोजी तापमान ४४.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना त्या दिवशी मात्र सुट्टी जाहीर करण्यात आली नाही, हेही विशेष ठरत आहे. मुलांच्या आरोग्यापेक्षा राष्ट्रपतींच्या ताफ्याच्या सोयीसाठी होता का? याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान मंत्र्यांचा ताफा शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींच्या हद्दीतून जाणार असल्याने कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीच शाळांना सुट्टी देण्यात आली का? अशी चर्चा रंगत आहे. प्रशासनाचा निर्णय मुलांच्या आरोग्यापेक्षा ताफ्याच्या सोयीसाठी होता का? हा मुद्दा आता केंद्रस्थानी आला आहे. राज्याचे शिक्षण राज्यमंत्रीही या दौऱ्यावर उपस्थित असल्याने, सुट्टीच्या आदेशामागे त्यांचे काही निर्देश होते का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. वाढत्या उष्णतेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रशासन जागे होईल की निद्रा अवस्थेत राहील याकडे लक्ष वेधले जात आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (ITI) शहीद हेमंत करकरे यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कौशल्य विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती व कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. येत्या रविवारी १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी दहा वाजता कामठी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, मुंबईतल्या २६/११च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले हेमंत करकरे हे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) प्रमुख होते. त्यांचे बलिदान भारतीय विसरू शकत नाहीत. शहीद करकरे यांचे धैर्य, नेतृत्वगुण आणि परमोच्च देशसेवेच्या सन्मानार्थ आयटीआयचे नामकरण करण्यात येत असल्याचे त्यांनी भावूक होत सांगितले. या नामकरणामुळे कामठी येथील आयटीआय संस्थेची ओळख अधिक प्रेरणादायी ठरणार असून, येथील विद्यार्थी करकरे यांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन कौशल्य विकासासोबतच राष्ट्रसेवेची भावना जोपासतील, असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला आहे. या समारंभात शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण ही करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताची संकल्पना मांडताना थोर भारतीय विचारवंत, समाजसेवक आणि शहीदांचा योग्य सन्मान करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे. या संकल्पनेला पुढे नेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात कौशल्य विभागाने राज्यातील आयटीआयचे महान विभूतींच्या नावाने नामकरण करण्याचा राज्यव्यापी कार्यक्रम घेतला असल्याची माहितीही यावेळी मंत्री लोढा यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून, या कार्यासाठी मेहनत घेणारे कौशल्य विभागाचे कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही मंत्री लोढा यांनी आभार मानले आहेत.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी प्रकरणे घडली होती, असा मोठा दावा त्यांनी यावेळी केला. अमृता फडणवीस यांना कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. नाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, कॉर्पोरेट क्षेत्रात अशा घटना घडत असल्याचे पाहून मला खूप खेद वाटतो. मी जेव्हा बँकेत होते, तेव्हा माझ्यासमोर अशी काही प्रकरणे आली होती. काही पुरुषांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन स्त्रियांना त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या प्रकरणांची तक्रार झाल्यानंतर वरिष्ठांनी तात्काळ संबंधितांवर कठोर कारवाई केली होती. अशा घटना घडल्यानंतर त्या लपवून न ठेवता वरिष्ठांना सांगणे गरजेचे आहे, तरच हे प्रकार थांबतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी संस्कृतीचे शिक्षण हवे धर्मांतरण आणि लव्ह जिहादच्या वाढत्या प्रकरणांवर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, ही प्रकरणे अतिशय भयानक आहेत. आपल्या मुलींनी या बाबतीत सतर्क राहणे आवश्यक आहे. जर आपण आपल्या संस्कृतीवर मनापासून प्रेम केले, तर अशा घटनांना आळा बसेल. आजचे तरुण सध्या संभ्रमात आहेत, कारण त्यांना आपल्या पुराण आणि वेदांची पुरेशी माहिती नाही. आपण त्यांना भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षण दिले पाहिजे, जेणेकरून ते भरकटणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली. भोंदू अशोक खरातला कडक शिक्षा व्हावी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी संताप व्यक्त केला. खरातने आपली बुद्धी आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी केला, हे अतिशय दुःखद आहे. या प्रकरणात सध्या कडक कारवाई सुरू आहे. प्रत्येक स्त्रीची हीच मागणी आहे की, अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असे अमृता फडणवीस यांनी ठामपणे सांगितले. 'नारीशक्ती वंदन' कायद्याचे स्वागत संसदेत चर्चेत असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर (नारीशक्ती वंदन कायदा) बोलताना त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. हा कायदा पारित व्हावा ही प्रत्येक महिला आणि पुरुषाची इच्छा आहे. राजकारणात महिलांची टक्केवारी वाढणे काळाची गरज आहे. स्त्रियांना समान संधी मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. पंतप्रधान महिलांचे भले करण्यासाठी जे पाऊल उचलत आहेत, त्यात कोणताही स्वार्थ नसून तो महिलांचा हक्क आहे, असे त्यांनी नमूद केले.
पुणे ग्रोथ हब आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिले. नीती आयोग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावा त्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. संबंधित विभागांनी वारंवार बैठका घेऊन अंतिम आराखडा सादर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि सल्लागार कंपन्यांचे प्रमुख उपस्थित होते. डॉ. नितीन करीर यांनी यावेळी सांगितले की, पुणे ग्रोथ हबमुळे स्टार्टअप, आयटी आणि उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे पुणे आर्थिक क्षेत्रासाठी दीर्घकालीन दृष्टीकोन लक्षात घेऊन सर्वसमावेशक नियोजन करावे. प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांशी सविस्तर बैठका घेऊन प्रत्येक विभागाचा भविष्यातील दृष्टीकोन, गरजा व प्राधान्यक्रम समजून या कामाला प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीत सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची एकूण प्रगती, पूर्ण झालेले टप्पे आणि आर्थिक व जीवनमान निर्देशांकांची निर्मिती यावर माहिती देण्यात आली. उत्पादन, पायाभूत सुविधा, संपर्क आणि नागरी विकास या क्षेत्रांवरील सखोल अभ्यास व अंमलबजावणीचा दृष्टीकोन स्पष्ट करण्यात आला. आर्थिक, जीवनमान, शाश्वतता व समावेशकता यांवर आधारित डेटा-आधारित नियोजन, ११ क्षेत्रांमध्ये ५० हून अधिक शासकीय बैठका व ८० हून अधिक खाजगी क्षेत्र संवादाद्वारे व्यापक सल्लामसलत, प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रकल्पांची ओळख, शासन-खाजगी भागीदारी व गुंतवणूक नियोजनावर भर आणि एकात्मिक प्रादेशिक नियोजनावर विशेष लक्ष यावरही प्रकाश टाकण्यात आला.
ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या वाढत्या विजेच्या गरजेनुसार महावितरण आणि महापारेषण कंपन्यांना वीज विकासाचा बृहत आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आराखडा तयार करताना महानगरपालिका आणि महावितरणने समन्वय साधावा, असेही त्यांनी सूचित केले. नवीन वीज उपकेंद्रांसाठी आवश्यक जागा मिळवण्यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्यावी, जेणेकरून जागेचे प्रश्न लवकर मार्गी लागून नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यमंत्री बोर्डीकर यांनी गणेशखिंड येथील प्रकाशभवन येथे पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीला महापौर मंजुषा नागपूरे, आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर जगताप, आमदार योगेश टिळेकर, आमदार अमित गोरखे यांच्यासह महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे (पुणे) व धर्मराज पेठकर (बारामती), महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्थानिक आमदारांनी भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रश्न प्राधान्याने मांडला. भूमिगत वाहिन्यांसाठी लागणाऱ्या खोदाई शुल्काचा मुद्दा यावेळी ऐरणीवर आला. भूमिगत वाहिन्यांच्या खर्चापेक्षा खोदाई शुल्काचा खर्च चौपट अधिक असल्याने नवीन कामांसाठी मिळालेला बहुतांश निधी खोदाई शुल्कातच खर्च होत आहे, ज्यामुळे कामे कमी प्रमाणात होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रति मीटर १०० रुपये शुल्क आकारून महावितरणला रस्ते पूर्ववत करण्याच्या अटीवर परवानगी मिळते. याच धर्तीवर पुणे महानगरातही खोदाई शुल्क आकारण्याची मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली. यावर राज्यमंत्री बोर्डीकर यांनी पुणे महानगरपालिकेनेही पिंपरी-चिंचवडप्रमाणे शुल्क आकारण्याची सूचना केली. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत ३० लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत. शहराच्या वाढीनुसार ग्राहकांची संख्या वाढत असल्याने वीज वाहिन्या अतिभारित होत आहेत आणि बिघाड वारंवार घडत आहेत. अशावेळी वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने स्वतंत्र 'भूमिगत मार्गिका' सोडावी, अशी मागणी महावितरणने केली. यामुळे बिघाड झाल्यास वाहिन्या बदलण्यासाठी तातडीने उपाययोजना करता येतील, असे महावितरणने म्हटले. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हे आवश्यक असल्याने आमदारांनीही या मागणीला संमती दिली. महावितरण आणि महापारेषणच्या विविध चालू योजनांचा आढावा घेताना राज्यमंत्री बोर्डीकर यांनी यंत्रणांना कामाची गती वाढवण्याचे निर्देश दिले. बांधकामांना परवानगी देतानाच विकसकांकडून उपकेंद्र आणि फिडर पिलरसाठी जागा आरक्षित करावी, यासाठी आवश्यक नियम तयार करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या. तसेच, स्थानिक प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी विषय समित्याही विनाविलंब स्थापन कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने 'हीट वेव्ह'चा इशारा दिल्याने, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हवामान विभागाने १८ एप्रिलसाठी नागपूर जिल्ह्याला 'यलो अलर्ट' जारी केला आहे. काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च महिन्यापासूनच तापमानात सातत्याने वाढ होत असून, पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका अधिक जाणवत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि कामगार वर्गाच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उष्णतेच्या तीव्रतेपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. पुढील काही दिवस हवामानाचा आढावा घेऊन गरज भासल्यास आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, उष्णतेच्या वाढत्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात 'हीट ॲक्शन प्लॅन' लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात एकूण ५६ शीतकक्ष (कूलिंग सेंटर्स) तयार करण्यात आले आहेत. यापैकी दोन उपजिल्हा रुग्णालये आणि ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शीतकक्षांमध्ये एसी किंवा हाय-स्पीड कूलर्स, मुबलक बर्फ, तसेच गंभीर रुग्णांसाठी थंड पाण्याने स्पंजिंग किंवा बाथची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवला आहे. तसेच, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शीघ्र कृती दल (रॅपिड ॲक्शन फोर्स) तैनात करण्यात आले आहे. शिक्षण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागालाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळांमध्ये सकाळच्या सत्रात वर्ग घेणे, विद्यार्थ्यांना डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी थंड पेय देणे आणि दिवसातून किमान दोन वेळा 'वॉटर बेल' देण्याच्या सूचनांचा समावेश आहे. नागपूरकरांनी उष्णतेपासून बचावासाठी सतर्क राहावे, भरपूर पाणी प्यावे, हलके आणि सैल कपडे वापरावेत आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वीज प्रश्नावरून महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
परभणी : मागील काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांमध्ये दिवसा व रात्री विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीच्या वेळी अनेकवेळा वीज गूल होत असल्याने प्रभाग १५मधील नागरिकांच्या झोपेचे खोबरे होत आहे. सध्या शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असून विजेअभावी विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नागरिकांच्या या प्रश्नाची दखल घेत भारतीय […] The post वीज प्रश्नावरून महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी सहकार क्षेत्राची ताकद वाढवण्यासाठी प्रशिक्षण हाच उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. नफा कमावणाऱ्या सहकारी संस्थांना नाममात्र शुल्क आकारून प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित, पुणे येथे हा उद्घाटन सोहळा पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविण दरेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आमदार सुनील कांबळे, सहकार आयुक्त दिपक तावरे, राज्य सहकारी संघाचे संचालक संजीव कुसाळकर आणि शिवाजीराव नलावडे उपस्थित होते. मंत्री पाटील यांनी प्रशिक्षणासाठी चांगली वास्तू आणि उत्तम वातावरण आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रशिक्षणाच्या खर्चासाठी निधीच्या काटेकोर नियोजनाचा आराखडा तयार करावा. शिक्षण निधी वजा करून येणारी तूट पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांमध्ये सादर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले. राज्यात सहकार विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. सध्या तरी राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सहकार विभाग सुरू करून त्या-त्या विद्यापीठांमध्ये सहकार विषयाचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रविण दरेकर म्हणाले की, संघाला १०० वर्षांची परंपरा आहे. सहकार क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी सहकारी संघ बळकट करणे आवश्यक आहे. राज्यातील सहकार चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी संस्थांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आणि सहकारी संस्थांनी सामाजिक दायित्व जपले पाहिजे. दरेकर यांनी शासनाकडे काही मागण्या केल्या. राज्यातील अडीच लाख सहकारी संस्थांना हक्काचे प्रशिक्षण केंद्र देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, सहकारी संघांचा बंद झालेला शिक्षण निधी पुन्हा सुरू करण्याची विनंतीही त्यांनी केली. सहकार चळवळीला सशक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या पाठबळाने निश्चित गती देण्यात येईल, असे दरेकर यांनी सांगितले. राज्यातील सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला ताकद देण्याचे काम करण्यात येईल. त्यासाठी शासनाने राज्यातील सहकाराचे पालकत्व घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आरोग्य सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयोजित केलेल्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या दोन दिवसीय राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील कुमार बर्नवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे राज्य मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण उपस्थित होते. देशातील विविध राज्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ व धोरणकर्ते, तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते. राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले की, प्रतिबंध हाच आजार टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे, त्यामुळे आरोग्य विभाग प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देत आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होत असून, त्याचा उपयोग नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी केला जात आहे. महाराष्ट्र हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. जानेवारीपासून सुरू झालेल्या या क्लिनिकचा १७ हजारांहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. या चिंतन शिबिराचा उपयोग पुढील दिशा ठरवण्यासाठी निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. बर्नवाल यांनी नमूद केले की, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे नागरिकांचा आरोग्य सेवेवरील स्वतःच्या खिशातून होणारा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला आहे. या योजनेतून आतापर्यंत ११ कोटींहून अधिक रुग्णांवर उपचार झाले आहेत. एआयसारखे उदयोन्मुख तंत्रज्ञान गंभीर आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करू शकते. आरोग्य क्षेत्रात एआयच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण विकसित केले जात असून, ते आरोग्य सेवेमध्ये सर्वसमावेशक वापरासाठी मार्गदर्शन करेल. शिबिराच्या पहिल्या दिवशी एबीपीएमजेएवाय व एबीडीएम अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे. की-परफॉर्मन्स इंडिकेटर्स (केपीआय), क्लेम्स डेटावर आधारित विश्लेषण, तसेच डिजिटल हेल्थ सुविधांची सादरीकरणे यामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रासह झारखंड, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांकडून त्यांच्या डिजिटल हेल्थ मिशनच्या अनुभवांवर सादरीकरण करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी आयटी अपडेट्स, एनएचसीएक्स सक्षम एचएमआयएस प्रणालीचे प्रात्यक्षिक, हेल्थ डेटा अॅनालिटिक्स युनिटचे निष्कर्ष सादर केले जाणार आहेत. यासोबतच एम्सद्वारे विकसित क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टीमच्या अंमलबजावणीवर विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. तसेच पीएमजेएवाय आयटी प्लॅटफॉर्मवरील विविध योजनांचे एकत्रीकरण, पीएम-राहत उपक्रम आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एबीडीएमची अंमलबजावणी यावरही सविस्तर चर्चा होणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या अत्यंत खालच्या पातळीवरील आरोप-प्रत्यारोपामुळे जिल्ह्याची सामाजिक आणि राजकीय प्रतिमा डागाळली जात आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे या दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या मागणीसाठी वंचितच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याने जिल्हा प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. मात्र, हा वाद आता राजकीय धोरणांवरून न राहता वैयक्तिक आणि अतिशय गंभीर आरोपांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे जिल्ह्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुलढाणा ही राजमाता जिजाऊंची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते, मात्र या नेत्यांच्या 'वैचारिक प्रदूषणामुळे' जिल्ह्याची बदनामी होत आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे. 'वंचित'चा एल्गार; प्रशासनाला साकडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सामान्य गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करणारे प्रशासन, जिल्ह्याची शांतता भंग करणाऱ्या या बड्या नेत्यांवर मेहेरबानी का करत आहे? असा सवाल यावेळी विचारण्यात आला. जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या दोन्ही नेत्यांना तातडीने जिल्ह्यातून बाहेर काढावे (तडीपार करावे), असे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नेमके प्रकरण काय? आमदार संजय गायकवाड आणि भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप हे केवळ राजकीय नसून ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. विजयराज शिंदे यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. इतकेच नव्हे तर एका अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपातही केल्याचा खळबळजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला असून, आपल्याकडे शासकीय अहवालासह सर्व पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संजय गायकवाड यांनी केलेले आरोप विजयराज शिंदे यांनी फेटाळून लावलेत. आमदारांनी माझाच नाही तर आदिवासी आणि मागासवर्गीय महिलांचा अवमान केला आहे, असे म्हटले आहे. याप्रकरणी गायकवाड यांनी माफी न मागितल्यास १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशाराही शिंदे यांनी दिला आहे. हे ही वाचा… प्रवीण दरेकर होणार पुढचे 'सहकार मंत्री':चंद्रकांत पाटलांच्या विधानाने चर्चांना उधाण, विरोधकांच्या कर्जबाजारीपणाच्या टीकेलाही प्रत्युत्तर राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता 'सहकार' खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ 'कॅबिनेट दर्जा' हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. सविस्तर वाचा…
परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट
परभणी : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार परभणी जिल्ह्यासाठी दि. १७ ते २० एप्रिल या चार दिवसांकरीता येलो अलर्ट जारी केला आहे. दि. १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून दि. १८ एप्रिल रोजीही उष्मालाट राहण्याची शक्यता आहे. दि. १९ व २० एप्रिल रोजी जिल्ह्यात ताशी ३० ते […] The post परभणी जिल्ह्यात चार दिवस येलो अलर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याच्या राजकारणात अर्थ खात्यानंतर आता 'सहकार' खात्यावरूनही मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, प्रवीण दरेकर यांच्या नावासमोरचा केवळ 'कॅबिनेट दर्जा' हा शब्द जाऊन ते लवकरच पूर्णवेळ सहकार मंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात सहकार खात्यावर भाजपचा डोळा असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपरोक्त विधान केले आहे. तसेच यावेळी त्यांनी स्वतःचा किस्सा सांगत सहकार क्षेत्रातील आगामी बदलांची माहिती दिली. नेमके काय म्हणाले चंद्रकांत पाटील? चंद्रकांत पाटील यांनी प्रवीण दरेकर यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले. ते म्हणाले, प्रवीणजींच्या नावासमोर सध्या कॅबिनेट दर्जा आहे, पण आमची प्रार्थना आहे की हा केवळ 'दर्जा' शब्द लवकरात लवकर जावा आणि त्यांना प्रत्यक्ष सहकार मंत्रिपद मिळावे. या विधानाने सभागृहात कुजबुज सुरू होताच, पाटील यांनी मिश्किलपणे सावरून धरले की, भाषणात ओघाओघाने असं बोलावं लागतं. अमित शाहांचा 'तो' किस्सा आणि सहकार खाते सहकार मंत्री म्हणून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अमित शाह यांच्यामुळेच मी आधी आमदार आणि नंतर मंत्री झालो. त्यांनीच मला पहिले सहकार खाते दिले. त्यावेळी माझी साधी सहकारी संस्थाही नव्हती. मी त्यांना विचारले की मलाच हे खाते का? तेव्हा शाह म्हणाले, तुमच्या स्वतःच्या संस्था नाहीत, म्हणूनच तुम्हाला हे खाते दिले आहे, जेणेकरून तुम्ही निष्पक्षपणे काम करू शकाल. स्वतंत्र सहकार विद्यापीठाची घोषणा सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात लवकरच एक स्वतंत्र 'सहकार विद्यापीठ' निर्माण करण्यात येईल. तसेच, राज्यातील इतर विविध विद्यापीठांमध्ये 'सहकार' नावाचे स्वतंत्र विभाग सुरू केले जातील, अशी महत्त्वाची घोषणाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला कामासाठी हवा तेवढा निधी दिला जाईल, त्यांनी फक्त ठोस प्रस्ताव पाठवावेत, अशी ग्वाही त्यांनी दिली. देवेंद्र फडणवीसांचे 'त्या' फाईलसाठी प्रयत्न आमदार सुनील कांबळे यांच्या सहकार सूत गिरणीचा संदर्भ देत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. कांबळे यांच्या गिरणीची फाईल मंजूर व्हावी यासाठी देवेंद्रजींनी संपत आलेली कॅबिनेट बैठक केवळ त्या कामासाठी लांबवली आणि फाईल मंजूर करून घेतली, असे सांगत त्यांनी सरकारमधील समन्वयाचे उदाहरण दिले. कर्जबाजारीपणाची टीका चुकीची, राज्याचा GDP भक्कम राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. विरोधक कितीही टीका करत असले तरी राज्य सरकार कर्जबाजारी नाही. राज्याचा जीडीपी (GDP) अत्यंत चांगला असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे ते म्हणाले.
सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशी, आयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते. मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण नवीन शैक्षणिक धोरणातून 'कौशल्यावर आधारित' शिक्षण देत आहोत. राज्यात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेतून राज्यात २ लाख उद्योजक घडविणार आहोत आणि ५० हजार स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे., निवडक स्टार्टअप्सना सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील ४१७ आयटीआयमध्ये मुख्यमंत्री महाफंड योजनेतून उद्योजक घडविण्यासाठी आयटीआयजवळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला सन्मान यामुळे मिळेल.आपण एक कुटुंब आहोत, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शासन पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहे असेही ते म्हणाले. मंत्री लोढा म्हणाले की, सिंगापूरच्या प्रगतीचे रहस्य त्यांच्या 'एज्युकेशनल रिफॉर्म्स' आणि 'स्किल डेव्हलपमेंट'मध्ये दडलेले आहे. तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा शिक्षण आणि तंत्रज्ञान आहे. सिंगापूरमध्ये जिथे केवळ २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारे प्रकल्प उभे राहतात. तिथे १०० टक्के रोजगाराची हमी दिली जाते. आपल्यालाही महाराष्ट्रात हेच 'सिंगापूर मॉडेल' कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणायचे आहे. यावेळी आयडिशेन कॉम्पिटिशन सहित विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. राजेश तलवारे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत, 'सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
यंदा मान्सूनच्या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची दाट शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाने सोमवारी आपला पहिला अधिकृत अंदाज जाहीर केला. त्यानुसार नैऋत्य मान्सून हंगामात देशभरात ९२ टक्के पाऊस पडू शकतो. मान्सूनमध्ये देशात साधारणतः ८७ सेमी पाऊस पडतो, मात्र यंदा ८० सेमी पावसाचा अंदाज आहे. यंदाचा मान्सून अंदाज हा २००१ पासूनच्या अंदाज प्रक्रियेनंतरचा सर्वात कमकुवत प्रारंभिक अंदाज आहे. त्यामुळे महागाईची टांगती तलवार कायम आहे. सोबतच अर्थवाढीवर परिणाम होण्याची शक्यता एसबीआय म्युचुअल फंडच्या ताजा अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. SBI Mutual Fund च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ नम्रता मित्तल यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, IMD केवळ ‘सरासरीपेक्षा कमी’, ‘सरासरी इतका’ आणि ‘सरासरीपेक्षा जास्त’ अशा श्रेणींमध्येच अंदाज व्यक्त करते. ९० ते ९५ टक्के पर्जन्यमान ‘सरासरीपेक्षा कमी’ मानले जाते, तर ९६ ते १०४ टक्के ‘सरासरी इतका’ श्रेणीत येते. अंदाज, प्रत्यक्षात फरक अहवालात नमूद केल्याप्रमाणे, काही वर्षांत IMD च्या अंदाज आणि प्रत्यक्ष पर्जन्यमानामध्ये फरक दिसून आला आहे. उदाहरणार्थ, २००६ आणि २००७ मध्ये अंदाज ‘सरासरीपेक्षा कमी’ असताना प्रत्यक्ष पर्जन्यमान अनुक्रमे ‘सरासरी इतका’ आणि ‘सरासरीपेक्षा जास्त’ राहिले. तर २०१४ आणि २०१५ मध्ये अंदाजानुसारच पर्जन्यमान कमी राहिले. एल निनोचा संभाव्य प्रभाव अहवालानुसार, जुलै २०२६ पर्यंत एल निनो स्थिती विकसित होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम मान्सूनच्या उत्तरार्धात दिसू शकतो. सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (IOD) परिस्थिती अनुकूल असली तरी एकूण परिणाम कमकुवत मान्सूनकडे झुकणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. “२००० नंतरच्या ५ पैकी ४ एल निनो वर्षांमध्ये पर्जन्यमान ‘सरासरीपेक्षा कमी’ किंवा ‘अपुरे’ राहिले आहे,” असे मित्तल यांनी नमूद केले. खरीप हंगामावर परिणाम मान्सूनमधील कमतरतेचा परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असला तरी तो पूर्णतः संरक्षण देऊ शकत नाही. “धरणांतील पाणीसाठा समाधानकारक असला तरी तो खरीप उत्पादनातील घसरण पूर्णपणे रोखू शकत नाही,” असे मित्तल यांनी स्पष्ट केले. इतिहासातही मान्सून कमकुवत राहिल्यास शेती उत्पादनात घट किंवा स्थिरता दिसून आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. महागाईवरील परिणाम अहवालानुसार, अन्नमहागाईचा मान्सूनशी थेट संबंध कमी असून ती विविध घटकांवर अवलंबून असते. “अन्नमहागाईचा मान्सूनशी थेट संबंध कमी असून ती इतर अनेक घटकांवर अवलंबून असते,” असे मित्तल यांनी नमूद केले. २०२६ मध्ये महागाई तुलनेने जास्त राहण्याची शक्यता असून, त्यामागे प्रतिकूल बेस इफेक्ट हा एक महत्त्वाचा घटक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार, हवामानाशी संबंधित अडथळे आणि पुरवठा साखळीतील समस्या यांसारख्या घटकांमुळे महागाई वाढण्याचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हे घटक अद्याप ग्राहक किंमत निर्देशांकात स्पष्टपणे दिसून आलेले नाहीत. निष्कर्ष एकूणच, मान्सूनचा प्रारंभिक अंदाज कमकुवत असला तरी त्याचा शेती, महागाई आणि आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम पुढील काळातील विविध घटकांच्या घडामोडींवर अवलंबून राहील, असे या अहवालातून स्पष्ट होते. संबंधित वृत्त जून ते सप्टेंबरदरम्यान केवळ 92% पाऊस:ऊन जास्त तापणार, पाऊस कमी पडणार
परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाची शाई अद्याप वाळली नसतानाच, अमरावती जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यावर एका महिलेचा विनयभंग आणि तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुपेश राऊत असे आरोपीचे नाव असून, तो विश्व हिंदू परिषदेत जिल्हा महामंत्री म्हणून काम पाहतो. आरोपी रुपेश राऊत हा गेल्या काही दिवसांपासून पीडित महिलेला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता. त्याने मोबाईलवर अश्लील संभाषण करत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने जेव्हा आरोपीला जाब विचारण्यासाठी त्याचे घर गाठले, तेव्हा आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन करून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीसोबत झालेल्या झटापटीत पीडितेचे मंगळसूत्रही तुटले. महिलेने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले आणि त्यांनी महिलेची सुटका केली. या गंभीर प्रकारानंतर पीडितेने तात्काळ तिवसा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह? पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी रुपेश राऊत विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊन २४ तासांहून अधिक काळ लोटला असला तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला बेड्या ठोकलेल्या नाहीत. आरोपी हा एका मोठ्या हिंदू संघटनेचा जिल्हास्तरावरील पदाधिकारी असल्यानेच पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. आरोपी फरार, नागरिकांमध्ये संताप सध्या आरोपी रुपेश राऊत हा आपल्या घरातून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. एका बाजूला महिलांच्या सन्मानासाठी लढण्याचे दावे करायचे आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारची कृत्य करणाऱ्या पदाधिकाऱ्याला संघटनेने अद्याप पदावरून दूर का केले नाही? असाही प्रश्न स्थानिक नागरिकांनी विचारला आहे. 180 तरुणींचे लैंगिक शोषण दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. आरोपीने 200 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर याच्यासह इतर आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. हे ही वाचा… पहिल्या ब्रेकअपनंतर बनला प्लेबॉय:अयान अहमदचे धक्कादायक कबुलीजबाब; एमआयएमचे सोशल मीडिया हँडल देखील सांभाळत होता अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात घडलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत आहेत. चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर मी प्लेबॉय बनलो, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार मानसिक आजारामुळे नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीतून आणि विकृत विचारसरणीतून घडलेला आहे. सविस्तर वाचा…
ठाणे महानगरपालिकेच्या 'एमआयएम' पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून 'नॉट रिचेबल' असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना करारा जवाब मिळेल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सहर शेख यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून महापालिका निवडणूक लढवल्याची तक्रार सिद्दिकी अहमद यांनी दाखल केली आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, युनूस शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे रहिवासी असून ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत. स्थलांतरित नागरिकांसाठी 'नमुना १०' लागू असताना, युनूस शेख यांनी 'नमुना ८' चा वापर करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याच कागदपत्रांच्या आधारे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र मिळवून सहर शेख यांनी ठाणे महापालिकेत विजय मिळवल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मुलगी मोठी होतेय म्हणून अनेकांना जळण मुंब्रा पोलिस ठाण्यात सुमारे २० मिनिटे पोलिसांशी चर्चा केल्यानंतर बाहेर पडलेले युनूस शेख पत्रकारांशी बोलताना प्रचंड संतापलेले दिसले. त्यांनी या प्रकरणाला निव्वळ 'राजकीय स्टंट' संबोधले आहे. दोन दिवसांत आम्ही आमची भूमिका कायदेशीररीत्या स्पष्ट करू. जे काही आरोप होत आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. माझी मुलगी राजकारणात मोठी होतेय, हे पाहून अनेकांना जळण होत आहे, त्यातूनच हा त्रास दिला जात आहे, असे शेख यांनी यावेळी स्पष्ट केले. नॉट रिचेबल सहर शेख 'वानखेडे'वर! हे प्रकरण समोर आल्यापासून सहर शेख या नॉट रिचेबल आहेत. मात्र, गुरुवारी त्या चक्क मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटचा आनंद घेताना दिसल्या. १६ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्याचा एक व्हिडिओ त्यांनी स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून, जर त्या 'नॉट रिचेबल' होत्या, तर मग स्टेडियमवर कशा दिसल्या? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर त्यांचे वडील युनूस शेख यांनी आपली भूमिका मांडली. तिने मॅच पाहायला जाण्यात काय चुकीचे आहे? ती काय पळून गेलेली नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या मुलीची पाठराखण केली. सहर शेख यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा दरम्यान, सहर शेख यांनी आयपीएल सामना पाहयला गेल्यानंतर स्टेडियमच्या गॅलरीतील व्हिडीओ पोस्ट केला आहे. या स्टोरीमध्ये त्यांनी सामन्याच्या व्हिडिओसह गेम ओव्हर असे देखील लिहिले. तसेच तूने ना जाना तेरे जाने से क्या क्या हुआ, कितनी कहानी बनी कितना तमाशा हुआ..जाने तू कैसी होगी..असे गाणेही स्टोरीला लावलेले आहे. स्टोरीला दिलेले कॅप्शन आणि लावलेले गाणे यावरून सहर शेख यांनी सगळ्या विरोधकांना पुन्हा डिवचल्याचे बोलले जात आहे.
आखाडा बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत शुक्रवारी तारीख 17 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. या शिबिरामुळे मंडळ स्तरावर विविध प्रमाणपत्र उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाच्या वतीने आखाडा बाळापूर येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते तहसीलदार जीवक कुमार कांबळे, नायब तहसीलदार बालाप्रसाद धूत, ग्रामपंचायतच्या प्रशासक भिमाबाई नरवाडे यांची उपस्थिती होती यावेळी उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांनी मार्गदर्शन केले. गाव पातळीवर लाभार्थ्यांची कामे गतिमान व्हावी तसेच प्रशासन लोकाभिमुख व कार्यक्षम व्हावे या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय मागील काही दिवसांपासून रखडलेले प्रलंबित फेरफार निकाली काढले जात आहे. सातबारा मधील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र दिले जात आहे. या अभियानामुळे नागरिकांची मोठी सोय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर केले जात असून सातबाराची कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील इतर महसूल मंडळामध्ये देखील अशा प्रकारचे शिबिर आगामी काळात घेतले जाणार असून या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केलेया शिबिरामध्ये लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय काही शेतकऱ्यांचे सातबाराचे प्रलंबित फेरफार निकाली काढण्यात आले असून सातबारा दुरुस्ती करून लाभार्थ्यांना त्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या अभियानामुळे लाभार्थ्यांची मोठी सोय झाली असून लाभार्थ्यांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

33 C