नववर्षात नासाचे अंतराळवीर दोन वेळा करणार स्पेस वॉक
वॉशिंग्टन : नववर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे माईक फिंक आणि जेना कार्डमन हे दोन अंतराळवीर ८ व १५ जानेवारी रोजी स्पेस वॉक करणार आहेत. अंतराळ स्थानकासाठी दोन नवे सोलर पॉवर(सौरऊर्जा) चॅनल तयार करण्याची जबाबदारी या दोघांवर सोपविण्यात आली असून या स्थानकाला अखंड ऊर्जापुरवठा उपलब्ध करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. यातील पहिला स्पेस […] The post नववर्षात नासाचे अंतराळवीर दोन वेळा करणार स्पेस वॉक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रस्ते भटक्या कुत्र्यापासून मुक्त करा
नवी दिल्ली : भटकी कुत्री केवळ चावतात असे नाही, तर ते गंभीर अपघातांनाही कारणीभूत ठरतात. रस्ते भटक्या कुत्र्यापासून मुक्त आणि मोकळे ठेवावे लागतील अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी आज (दि. ७ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने केली. यावेळी न्यायालयाने पीडित, प्राणीप्रेमी आणि विरोधक अशा सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे स्पष्ट केले. आज याचिकाकर्ते, प्राणी कल्याण संस्था, आणि हस्तक्षेपकर्त्यांच्या […] The post रस्ते भटक्या कुत्र्यापासून मुक्त करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकला त्यांचेच नागरिक मारण्याचा हक्क
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराचे मीडिया विंगचे अधिकारी डीजी आयएसपीआर नेहमी त्यांच्या विदुषकी वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी ते महिला रिपोर्टरला डोळा मारतात तर कधी असा दावा करतात की सर्वजण डोक्याला हात लावलात. पाकिस्तानचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी लोकांना तुम्हाला मजा आली नाही तर […] The post पाकला त्यांचेच नागरिक मारण्याचा हक्क appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरोपींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
नवी दिल्ली : देशभरात चर्चेचा विषय ठरलेला पुणे पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी, व्यावसायिक आशिष मित्तल आणि आदित्य सूद या दोघांच्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दि. ७ जानेवारी रोजी नोटीस बजावली. मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन मुलाने चालवलेल्या पोर्श कारने दोघांना चिरडल्याच्या या घटनेत, पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप या दोघांवर आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल […] The post आरोपींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात
मॉस्को : जगावर महायुद्धाचे सावट गडद होताना दिसत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाने आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असलेली युद्धनौका आणि अण्वस्त्रवाहू पाणबुड्या थेट व्हेनेझुएलाच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. यामुळे अमेरिकेच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर रशिया आणि अमेरिका यांच्यात थेट लष्करी संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली […] The post व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नौदलात तब्बल १९ युद्धनौका सामील करणार
चेन्नई : भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वार्षिक वाढीसाठी भारतीय नौदल सज्ज आहे. २०२६ पर्यंत, नौदल १९ युद्धनौका कमिशन करणार आहे, बी एका वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या वर्षी, २०२५ मध्ये, नौदलाने १४ जहाजे कमिशन केली. २०२६ हे नौदलाचे सर्वोच्च विस्तार वर्ष असेल. या काळात निलगिरी-क्लास मल्टी-रोल स्टेल्थ फ्रिगेट्सची संख्या देखील वाढेल. या वर्गाचे […] The post नौदलात तब्बल १९ युद्धनौका सामील करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विमानात ‘पॉवर बँक’ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी
मुंबई : काही महिन्यांपूर्वी विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे मोबाइल चार्जिंग करताना आग लागल्याची घटना घडल्या होत्या. याची दखल आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे फोन चार्जिंगवर बंदी घातल्याचे आदेश जारी केले आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये डीजीसीएने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, विमानाच्या आत नेऊ शकणा-या हँडबॅगमध्ये पॉवर बँक नेण्यास अनुमती दिली […] The post विमानात ‘पॉवर बँक’ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रायपूर : छत्तीसगडमधील नक्षलवादाचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या कंबरडे मोडणारी कामगिरी केली आहे. पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे आणि नक्षली विचारधारेतील पोकळपणाला कंटाळून ७ जानेवारी रोजी सकाळी २६ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. विशेष म्हणजे, यात ६५ लाखांचे इनाम असलेल्या १३ जहाल नक्षलवाद्यांचा समावेश असून, या मोठ्या यशामुळे बस्तर विभागात नक्षली चळवळीला मोठा […] The post २६ जहाल माओवादी शरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, असा टोला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी खरमरीत टीका लांडगे यांनी केली आहे. अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लांडगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले, आधी स्वतःच्या लोकांचे पराक्रम पाहा आणि ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. ते मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत, मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आले पुढे बोलताना महेश लांडगे म्हणाले, सध्या अजित पवारांचा अहंकार बोलत आहे, ते नैराश्यात आहेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत. तसेच आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील तर मी, पालिका प्रशासन आणि अजितदादांनी सामोरासमोर बसावे, मग सर्व उत्तर मिळतील, असे आवाहन लांडगे यांनी केले आहे. जे स्वतःच्या काकाचे झाले नाहीत ते पिंपरी चिंचवडचे होतील का? आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला तसेच आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असा सवाल उपस्थित करत लांडगे यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सालीन कुरेशी हे बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात आपल्या समर्थकांसह घरोघरी जाऊन प्रचार करत होते. यावेळी मतदारांच्या भेटीगाठी घेत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला आणि तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुरेशी यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक, पोलिस तपास सुरू सध्या हाजी सालीन कुरेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की यामागे काही वैयक्तिक कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. 'मुंबईत महायुतीचाच विजय होईल' असा चंग बांधून प्रचारात उतरलेल्या शिंदे गटाच्या उमेदवारावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कोण आहे हाजी सलीम कुरेशी? हाजी सलीम कुरेशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून, पूर्वी ते एमआयएम या पक्षात कार्यरत होते. मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उमेदवारी दिली असून, मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधून ते निवडणूक लढवत आहेत. राज्यातील इतरही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना महानगरपालिका निवडणुकीच्या या कालखंडात केवळ मुंबईच नाही, तर राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर माहोळ गावात असाच भीषण हल्ला झाला होता. राजकीय वादातून झालेल्या या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा करण्यात आल्या होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय सांगलीमध्ये एका उमेदवाराच्या आईने दडपशाहीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणातील कटुता चव्हाट्यावर आली आहे. सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. बिनविरोध निवडीसाठी या उमेदवाराची हत्या करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता. या घटनांवरून नव्या जमान्याच्या राजकारणाला 'रक्ताचा डाग' लागल्याचे म्हणावे लागेल.
मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत, आमची त्यांना सहानुभूती असल्याचे विधान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले याची माहिती घ्यावी, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मराठीवरील प्रेम दिसून येईल, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला आहे. धाराशिव येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे प्रचार सुरू झाले आहेत. तसेच राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कॉंग्रेसला पाठिंबा दिला असला तरी मुंबईत मात्र त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत, असे राजू शेट्टी म्हणाले. मुंबईवर, मराठी माणसावर प्रेम आहे, त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पाठवले त्याची माहिती घ्या म्हणजे त्यावरून मराठीवर मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल, असा टोला शेट्टी यांनी लगावला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला असून त्यांनी आज धाराशिव-सोलापूर सीमावर्ती भागात शेतकऱ्यांचे अधिवेशन घेतले. यात त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. शक्तिपीठ विरोधात हिंगोलीत शेतकऱ्यांचा मोर्चा दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा महामार्ग हिंगोलीच्या वसमत यमी कळमनुरी तालुक्यातून जात असल्याने यासाठी शेतकऱ्यांची शेकडो एकर सुपीक जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, असा दावा करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती 'तत्वशून्य' असल्याचे सांगत कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील भाजप-एमआयएम युती तुटली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप नेतृत्व आता स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावणार आहे. अकोटमध्ये एमआयएमला सोबत घेऊन 'अकोट विकास मंच' स्थापन करण्याच्या निर्णयात आघाडीवर असलेले भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आता पक्षाच्या रडारवर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमदार प्रकाश भारसाकळे, भाजपचे अकोट शहराध्यक्ष, निवडणूक प्रभारी, गटनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून 'कारण दाखवा' नोटीस पाठवली जाणार आहे. राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेतृत्वाने या स्थानिक प्रयोगाबद्दल अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. MIM आता विरोधी बाकावर भाजपच्या दबावानंतर आणि राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर एमआयएमच्या ५ नगरसेवकांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. एमआयएमचे नगरसेवक आपला पाठिंबा काढण्याचे पत्र देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता एमआयएम अकोट नगरपालिकेत सत्ताधारी बाकावरून थेट विरोधी बाकावर बसणार आहे. कसे होते अकोटमधील सत्तेचे 'अजब' गणित? अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांचे निकाल जाहीर झाले होते. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या होत्या, मात्र बहुमतासाठी त्यांना ७ जागांची गरज होती. यासाठी भाजपने 'अकोट विकास मंच' स्थापन केला, ज्यात चक्क एमआयएम (५ जागा) आणि इतर पक्षांना (शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार) एकत्र घेण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे या विचित्र युतीची नोंदणीही झाली होती, ज्यामुळे भाजपवर मोठी टीका झाली होती. अंबरनाथ मध्येही काँग्रेससोबत हातमिळवणी अकोटमधील घडामोडींप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपने वेगळेच राजकीय समीकरण तयार केले होते. येथे भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेचा मार्ग निवडला. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपकडून काँग्रेससोबत युती होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, या युतीनंतर काँग्रेसकडून भाजपसोबत युती करणाऱ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक नेत्यांवर देवेंद्र फडणवीस संतापले दरम्यान, अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत, असे फडणवीस म्हणालेत. भाजपकडून 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या भूमिकेमुळे 'काँग्रेसमुक्त भारत' आणि 'हिंदुत्व' या मुद्द्यांवरून विरोधकांनी भाजपला घेरले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हस्तक्षेप करत ही युती तोडण्याचे आदेश दिल्याने भाजपने आता 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिनविरोध नगरसेवक निवडीबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. बिनविरोध निवडीप्रकरणी न्यायालयात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. काही जणांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, आयोग माहिती घेत आहे. त्यांच्या चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल, असे पवार म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की आपल्यावर वेगवेगळे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न होतो, असेही पवार यांनी नमूद केले. ज्यांना आरोप करायचे आहेत, त्यांनी न्यायालयात जावे. कोणत्या आरोपावर उत्तर द्यायचे, हा आपला निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि प्रदीप देशमुख उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक अलार्म, पाच काम हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. यामध्ये नळाद्वारे दररोज पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीमुक्त शहर, खड्डेमुक्त रस्ते, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा आणि प्रदूषणमुक्ती या मुद्द्यांचा समावेश आहे. निवडणुकीत घड्याळासोबत तुतारीचा आवाजही ऐकू येईल, असा टोला त्यांनी लगावला. दोन्ही शहरांतील गंभीर समस्या नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी पक्षाने एक विशेष गाणेही प्रसिद्ध केले आहे. पवार यांनी दोन्ही शहरांतील प्रशासन आणि मागील सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप केला. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, असे ते म्हणाले. वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, खराब रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई हे प्रश्न गंभीर झाले आहेत. पाणीटंचाईचा फायदा घेऊन टँकर माफिया नागरिकांची लूट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात प्रतिमाणसी ३०० लिटर पाणी दिले जाते आणि वर्षाला २२ टीएमसी पाण्याचा वापर होतो असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात चुकीचे पाणीवाटप होत असल्याचे पवार यांनी म्हटले. शहरात १२ हजार ३५० स्वच्छता कर्मचारी असतानाही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. प्रदूषण वाढले असून, २० हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पिंपरी-चिंचवडमध्ये २५ वर्षे काम करताना सर्व गोष्टी व्यवस्थित करून दाखवल्याचा दावा अजित पवार यांनी केला. पुण्यात पैसा असूनही योग्य नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचार आणि ठराविक लोकांनाच टेंडर देण्याची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी आणि महापालिकेचे बजेट योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मयूर सोनवणे यांच्या पक्ष कार्यालयाला आग लावण्याच्या प्रयत्नाबाबत माहिती घेतल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. सत्तेसाठी सत्ताधारी नेत्यांची भूमिका दुटप्पी असून, सत्तेचा लाभ घ्यायचा असेल तेव्हा हे नेते एकत्र येतात आणि सत्ता हातातून गेल्यावर पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत ‘कपडे उतरवण्याचे’ राजकारण सुरू करतात, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत […] The post सत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा झटका; प्रचार गीत नाकारले
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात रंग भरू लागला आहे. विविध पक्षांनी मतदारांना साकडे घालण्यासाठी मोहीम आखली आहे. विकास कामे आणि आपले चिन्ह मतदारांपर्यंत कसे पोहोचेल याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आहे. प्रचाराच्या या धामधुमीत राज्य निवडणूक आयोगाने भाजपला मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी भाजपने तयार केलेले प्रचार गीत आयोगाने नाकारले आहे. मुंबई […] The post भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा झटका; प्रचार गीत नाकारले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महानगरपालिका निवडणुकीत चार वेळा ईव्हीएमचे बटण दाबावे लागणार
मुंबई : प्रतिनिधी यावेळी महानगरपालिका निवडणुकीत मतदान करताना थोडा बदल दिसणार आहे. कारण यंदाच्या निवडणुका बहुसदस्य पद्धतीने होणार आहेत. म्हणजे नेमकं काय तर या पद्धतीत एकाच प्रभागात एकाऐवजी चार जागा असतील. म्हणजेच, त्या एका प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित २८ महानगरपालिकांचा समावेश आहे. या पद्धतीत एकाच प्रभागात एकाऐवजी चार […] The post आगामी महानगरपालिका निवडणुकीत चार वेळा ईव्हीएमचे बटण दाबावे लागणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भांडुप बस अपघात चालकाच्या चुकीमुळे
मुंबई : प्रतिनिधी भांडुप रेल्वे स्टेशनबाहेर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण बस अपघाताबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातामागे बसमध्ये तांत्रिक बिघाड होता, असा दावा चालकाकडून करण्यात आला होता. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या सखोल तपासणीत बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाल्याचे आता समोर आले आहे. […] The post भांडुप बस अपघात चालकाच्या चुकीमुळे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुलाबा वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेल्या वादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित 'फेक नॅरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्या महिलेने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, तिला आपण कधी पाहिले नाही किंवा भेटलोही नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोलिसांवर दबाव टाकर उमेदवारांवर दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. यासंदर्भात कुलाबा मतदारसंघातील काही इच्छुक उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या सर्व प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. नेमके काय म्हणाले राहुल नार्वेकर? उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारीला संपली असताना ७ जानेवारीला हे आरोप का केले जात आहेत, असा सवाल नार्वेकरांनी विचारला. उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटून ५ दिवस झाले आहेत. या पाच दिवसांत हे लोक झोपले होते का? की काही विशेष प्लॅनिंग सुरू होते? हे सर्व राजकारण डोळ्यासमोर ठेवून रचलेले नाटक आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. दीपक पवारांवर गंभीर आरोप नार्वेकर यांनी आरोप करणाऱ्या दीपक पवार यांच्यावरच उलटतपासणी केली. मी या व्यक्तीची माहिती घेतली आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून नंतर पैसे उकळण्यासाठी उमेदवारांना धमकावणे, हाच यांचा धंदा आहे. लोकसभेतही त्यांच्यावर असेच आरोप होते. ५-५ कोटी रुपये मागण्याचे प्रकार या लोकांकडून झाले असून, त्याबाबत आम्ही लेखी तक्रार आणि खुलासा करणार आहोत, असा इशारा नार्वेकरांनी दिला. मला धमकावण्याची गरजच काय? राहुल नार्वेकरांनी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. विधानसभा निवडणुकीत मला ५० हजार मतांचे मताधिक्य आहे. वॉर्ड २२५, २२६ आणि २२७ मधूनही मला हजारो मतांची आघाडी मिळाली आहे. ज्याच्या पाठीशी एवढे जनबळ आहे, त्याला कोणाला धमकावण्याची गरज काय? विरोधकांकडे उमेदवार उभे करायला माणसे नाहीत, म्हणून ते असले घाणेरडे प्रकार करत आहेत, असे स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिले. कोर्टात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य हर्षिता शिवलकर (मेहुणी), मकरंद नार्वेकर (भाऊ) आणि गौरी नार्वेकर (बहीण) हे कुलाब्यातील तीन वेगवेगळ्या वॉर्डांतून निवडणूक लढवत आहेत. राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेवर दबाव आणला आणि इतर उमेदवारांना निवडणूक कार्यालयातून बाहेर काढले, असा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण कोर्टाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. मी कायद्याचा अभ्यासक आहे आणि संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी सभागृहात व बाहेरही करत आलो आहे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरेंची निलंबनाची मागणी दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राहुल नार्वेकर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर तोफ डागली होती. एका बाजूला विरोधकांचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे राहुल नार्वेकरांचा आक्रमक बचाव, यामुळे कुलाब्यातील निवडणुकीला आता कायदेशीर आणि राजकीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बिर्याणी, समोसे व वडा-पावच्या मागणीत वाढ
मुंबई : प्रतिनिधी २०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक प्रचाराचा थेट परिणाम मुंबईच्या खाद्यव्यवसायावरही दिसून येत आहे. प्रचाराच्या धामधुमीमुळे वडा-ााव, समोसे, पुलाव आणि बिर्याणीच्या विक्रीत तब्बल २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या […] The post बिर्याणी, समोसे व वडा-पावच्या मागणीत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासराव देशमुख यांचे मोलाचे योगदान
लातूर : प्रतिनिधी रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्याने लातूरमध्ये गदारोळ झाला. तीव्र प्रतिक्रियेनंतर चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील सभेत विलासराव देशमुखांचा गौरव करत, चव्हाण यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांनी लातूरसाठी २२९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह अनेक विकासकामांची घोषणा केली, ज्यामुळे […] The post लातूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासराव देशमुख यांचे मोलाचे योगदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच वरळीतील मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. मनसेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले संतोष धुरी अखेर भाजपच्या गोटात दाखल झाले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशानंतर धुरी यांनी थेट मनसेच्या अंतर्गत कारभारावर आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेशानंतर संतोष धुरी यांनी स्पष्ट केलं की, राज ठाकरे यांच्यावर त्यांची कोणतीही नाराजी नाही. मात्र मनसेच्या आतमध्ये काही “कटकारस्थानी” सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केल. आमच्या साहेबांनी एकदा सांगितलं होतं की, विठ्ठलाच्या बाजूला बडवे असतात. राग विठ्ठलावर नसतो, बडव्यांवर असतो. मनसेतही असेच काही बडवे आहेत, अशा शब्दांत त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं. बाळा नांदगावकर यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी, हेच बडवे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना झाकण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. धुरी यांनी सांगितलं की, पक्षात जास्त बोलणारे, पुढे येणारे चेहरे मुद्दाम बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातो. आमच्यामुळे पक्ष चर्चेत राहत होता. त्यामुळेच आम्हाला झाकण्याचा प्रयत्न झाला, असा दावा त्यांनी केला. बाळा नांदगावकर नेहमी युतीची गरज असल्याचं सांगायचे, पण त्या युतीत आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही, असा गंभीर आरोपही धुरी यांनी केला. जागावाटपात मनसेच्या निष्ठावंतांवर अन्याय झाल्यामुळेच नाराजी वाढत गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मनसेमध्ये केवळ आपणच नाही तर आणखी अनेक नेते नाराज असल्याचा दावा करत संतोष धुरी यांनी मोठं विधान केलं. संदीप देशपांडे नाराज आहेत, अशी चर्चा मुद्दाम पसरवली जाते. म्हणजे त्यांनाही पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न आहे, असं धुरी म्हणाले. निवडणूक होण्याआधी दोन-तीन मोठे आणि महत्त्वाचे चेहरे मनसेला सोडचिठ्ठी देतील, असा दावा त्यांनी केला. कोण कोण नाराज आहे यांची नावे आपण सध्या सांगणार नाही, पण पक्षातून कोण जाणार होते याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचंही त्यांनी सूचकपणे सांगितलं. संतोष धुरी यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ते मनसेचे जुने आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय सहभाग घेत असत. मागील मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही वरळी परिसरात त्यांचा प्रभाव कायम होता. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती आणि यावेळीही त्यांच्या उमेदवारीसाठी देशपांडे यांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. अखेर धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीमुळे जागावाटपाची गणितं बदलली. संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटल्याने धुरी यांची संधी हुकली. याच मुद्द्यावरून मनसेतील नाराजी वाढली आणि अखेर धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 6 जानेवारी रोजी त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. वरळी आणि आसपासच्या भागात मनसेला हा मोठा धक्का संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः वरळी आणि आसपासच्या भागात मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. धुरींच्या आरोपांमुळे मनसेच्या अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून, निवडणुकीआधी आणखी कोणते नेते पक्ष सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे भाजपसाठी हा प्रवेश आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, मनसेतील असंतोषाचा फायदा भाजप कसा उचलतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अंबरनाथ नगरपालिकेतील घडामोडींवर कठोर भूमिका घेत पक्षशिस्तीचा मोठा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उमेदवार लढवून निवडून आले असतानाही भाजपच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसने थेट कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देत काँग्रेस पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय कळवण्यात आला आहे. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत पत्रानुसार, अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले बारा नगरसेवक निवडून आले. मात्र, पक्षाच्या प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता या नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांतून समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर, चुकीची आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे. काँग्रेसच्या पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, स्थानिक पातळीवर कोणतेही आघाडी किंवा गटबंधन करताना प्रदेश किंवा वरिष्ठ नेतृत्वाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेच्या बाबतीत ही प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली. परिणामी, पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत अशी राजकीय भूमिका घेतल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षासाठी ही बाब केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नसून, पक्षाच्या धोरणात्मक आणि वैचारिक भूमिकेवर आघात करणारी असल्याचेही पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घेत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना तात्काळ काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. यासोबतच, त्यांची ब्लॉक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या नेतृत्वावर कारवाई करून काँग्रेसने खालीपर्यंत कडक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर नगरसेवकांनाही पक्षाने गंभीर इशारा दिला आहे. भाजपसोबत गटबंधन करून पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांवरही काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथमधील काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदीप पाटील 12 नगरसेवकांसह भाजप प्रवेश करणार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अंबरनाथमधील काँग्रेसची ताकद यामुळे लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवरील युतीची माहिती दिली होती या निर्णयामागील कारणे स्पष्ट करताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ब्लॉक अध्यक्ष पदासाठी माझ्याकडे थेट एक कोटी रुपयांची मागणी केली, असा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला. तसेच, स्थानिक पातळीवरील युती आणि राजकीय परिस्थितीबाबत आपण आधीच प्रदेश नेतृत्वाला माहिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून आपल्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा करत पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसने एकदाही आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असा ठाम दावा त्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 'विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र' हा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहर देशातील महत्त्वाचे शहर असून, ते सर्वाधिक विकसित आणि स्वच्छ बनवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या प्रकाशन सोहळ्याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे आणि माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. मोहोळ यांनी नमूद केले की, पुणेकर नेहमीच विकासाला साथ देतात आणि भाजपने दिलेला शब्द पाळल्यामुळे पुणेकरांचा पक्षावर सातत्याने विश्वास राहिला आहे. मोहोळ पुढे म्हणाले की, पुणे निवृत्तीनंतर राहण्यासाठी योग्य शहर असल्याने अनेकजण येथे स्थायिक होत आहेत. स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहरातील बाणेर आणि बालेवाडी भाग निवडला जाऊन तो विकसित करण्यात आला आहे. मनपामध्ये पाच वर्षे काम करण्याची संधी जनतेने भाजपला दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या ११ वर्षांपासून देशात कार्यरत आहेत, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कार्यरत आहे. भाजपने प्रत्येक निवडणुकीत पुणेकरांना सादर केलेला जाहीरनामा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुणेकर पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवतील आणि सत्ता देतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पुण्यात ३२ किलोमीटर मेट्रो सुरू झाली असून, आगामी काळात ती १५० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. तसेच, एक हजार ई-बसेस मंजूर असून, शहरात लवकरच साडेचार हजार ई-बसेस सुरू करण्यात येतील, ज्यामुळे सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल. गेल्या तीन वर्षांत मर्यादित मेट्रो मार्गांवर साडेदहा कोटी पुणेकरांनी प्रवास केला आहे. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्याने करण्यात येत आहे. ४४ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून शहरात अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली असून, शहराचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपण्याचे कामही करण्यात आले आहे. ज्या पुणेकरांनी आमच्यावर विश्वास टाकला, तो सार्थ ठरवण्याचे काम भाजपने केले आहे, असे मोहोळ यांनी शेवटी सांगितले.
बाणेर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेसाठी पैसे वाटप करून गर्दी जमवण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांच्यावरही त्यांनी अनेक बिनबुडाचे आरोप केले. भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत लहू बालवडकर आणि गणेश कळमकर यांनी हे मत व्यक्त केले. प्रभाग क्र. ९ चे भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर यांच्यासह पदाधिकारी प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर आणि राहुल कोकाटे यावेळी उपस्थित होते. अमोल बालवडकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या आरोपांची पोलखोल करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी हवी होती. २०१७ मध्ये भाजपने त्यांना मनपा नगरसेवक पदाची संधी दिली, मात्र त्यानंतर त्यांची महत्त्वाकांक्षा वाढली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात ते पदाच्या लोभापोटी होते, असा दावा बालवडकर यांनी केला. बाणेरमध्ये स्मार्ट सिटीचे २१ प्रकल्प पूर्ण झाले आहेत, असेही बालवडकर यांनी नमूद केले. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून, चौकटीत राहून काम करावे लागते. भाजपचे मालक होण्याचा प्रयत्न करून हुकूमशाही पद्धत अवलंबल्याचा आरोप त्यांनी अमोल बालवडकर यांच्यावर केला. पद मिळाल्यावर काय काम केले, हे जनतेला सांगणे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले. प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपकडून एकूण ४७ जण उमेदवारीसाठी इच्छुक होते. अमोल बालवडकर यांची उमेदवारी दीड तास आधी रद्द झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांची उमेदवारी मुदतपूर्व अर्धा तास आधीच रद्द झाली, तो अन्याय नव्हता का, असा प्रतिप्रश्न बालवडकर यांनी केला. पक्षाने उमेदवारीसाठी अर्ज मागवून घेतले होते आणि ४७ पैकी चार जणांना उमेदवारी दिली गेली. अमोल बालवडकर हे प्रभागात इतर तीन उमेदवार मीच ठरवणार आणि भाजप सत्तेत आल्यावर मलाच महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद दिले पाहिजे, असे सांगत होते. त्यामुळे पक्षाने ऐनवेळी निर्णय घेतला, असे बालवडकर यांनी स्पष्ट केले. पक्षाची शिस्त न पाळल्याने पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय दिला आहे, असे लहू बालवडकर म्हणाले. भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे, तर अमोल बालवडकर सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक निवडणूक लढवत आहेत. मागील दीड वर्षांपासून ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलाय. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमध्ये मारहाण झाली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची कार रोखली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कारवर धडाधड बुक्या आणि पायांनी मारहाण केली. त्याशिवाय जलील यांनाही मारहाण केली. या प्रकारानंतर संभाजनगरमधील वातावारण चांगलेच तापले. छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपु-यात जलील यांना मारहाण झाली. एमआयएमचे कार्यकर्ते […] The post माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तमन्नाने गोव्यातील ६ मिनिटांच्या डान्ससाठी घेतले ६ कोटी?
गोवा : दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत ‘आयटम साँग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा डान्स परफॉर्मन्समुळेच जास्त चर्चेत असते. ‘जेलर’मधील कावाला, ‘स्त्री २’ मधील आज की रात आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मधील ‘गफूर’ सारख्या गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता तिच्या गोव्यातील एका परफॉर्मन्सची चर्चा सुरू आहे. नुकताच तमन्नाने गोव्यातील […] The post तमन्नाने गोव्यातील ६ मिनिटांच्या डान्ससाठी घेतले ६ कोटी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागताच महाराष्ट्राला एक वेगळेच चित्र पाहायला मिळेल. निवडणूक संपल्यानंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, तर रोहित पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील. पवार कुटुंब कधीच वेगळे नव्हते आणि नाहीत, हे माझे भविष्य लवकरच खरे ठरेल, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ' अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना लक्ष्मण हाके यांनी पुण्याच्या राजकारणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, एकीकडे मुखी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे तिकीट वाटताना बोडके, आंदेकर, नायर यांसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना जवळ करायचे, हेच अजित पवारांचे राजकारण आहे. पुण्यात सत्ता आल्यावर अजित पवार पुन्हा पहाटे बाहेर पडतील, मोकळे भूखंड शोधतील आणि ते ५०० रुपयांत हडप करतील. पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू असून ते जनतेचे सेवक नसून अदानींसारखे केवळ एक 'उद्योजक' असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शरद पवारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे शरद पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना हाके म्हणाले, शरद पवार वरवर भाजपसोबत जाणार नाही असे सांगत असले, तरी त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. ते राज्यातील भाजप नेत्यांना किंमत देत नाहीत, त्यांचे थेट 'कनेक्शन' पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहे. भाजपच्या 'गंगे'त भ्रष्टाचाराची 'गटारगंगा' भाजपवर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा मांडला. भाजप स्वतःला कितीही पवित्र गंगा मानत असली, तरी त्यांनी अजित पवारांसारखी 'भ्रष्ट गटारगंगा' पक्षात मिसळून घेतली आहे. ज्या पवारांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिले, त्याच पवारांना भाजपने सत्तेत भागीदार केले. यामुळे भाजपचा सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आणि नाराज आहे, असे लक्ष्मण हाके म्हणालेत. राज्यात सोयीच्या युत्यांचा खेळखंडोबा सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लक्ष्मण हाके यांनी सर्वच पक्षांच्या सोयीच्या राजकारणाचा समाचार घेतला. सध्या भाजपची शिंदे गटाशी आणि अजित पवारांशी युती आहे. अजित पवारांचे शरद पवारांशी आतून साटेलोटे आहे. शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंसोबत आहेत. ठाकरे आणि मनसेची जवळीक आहे, तर काँग्रेस वंचितसोबत बोलणी करतेय. थोडक्यात काय, तर सर्वच पक्ष एकमेकांसोबत निवडणूक लढवत आहेत. यात सामान्य कार्यकर्ता मात्र बाजूला फेकला गेला असून, आगामी निवडणुका केवळ पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर लढल्या जातील, अशी भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.
नागपूर : प्रतिनिधी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. विदर्भासह नागपुरात आजही थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे. तर गोंदिया जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसाही थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तरेकडील शीत वा-यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर या थंडीचा परिणाम उत्तर व […] The post विदर्भात थंडीची लाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती
ठाणे : प्रतिनिधी नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. या आघाडीत भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ४ आणि १ अपक्ष असा एकूण ३१ नगरसेवकांचा समावेश आहे. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ वर जाते. अंबरनाथ नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. महापालिका […] The post अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलील यांच्या वाहनावर संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही वेळातच मोठा जमाव जमा झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वाहनाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर इम्तियाज जलील हे थेट जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे. या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीचा आणि संबंधित व्यक्तींचा तपास सुरू आहे. पक्षांतर्गत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद रस्त्यावर उमटल्याने, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मतमोजणी प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईसारख्या देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने जाहीर होणे अत्यंत महत्त्वाचे असताना, यंदा अवलंबण्यात येणाऱ्या मतमोजणीच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सुरेश काकणी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेतील सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. काँग्रेसने आपल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी यंदा 23 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात साधारणतः 8 प्रभागांचा समावेश आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात किमान 40 किंवा त्याहून अधिक मतदान केंद्रे असून, उपनगरांमध्ये ही संख्या आणखी जास्त आहे. अशा परिस्थितीत मतमोजणी ही वेळखाऊ प्रक्रिया ठरणे स्वाभाविक आहे. मात्र, योग्य नियोजन केल्यास सर्व निकाल काही तासांत जाहीर करता येऊ शकतात, असा काँग्रेसचा दावा आहे. पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून, प्रत्येक प्रभागासाठी साधारणतः दोन टेबल उपलब्ध असतील. यामुळे एका प्रभागासाठी अंदाजे 20 ते 25 मतमोजणी फेऱ्या होतील. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी लागेल, असा अंदाज काँग्रेसने व्यक्त केला आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होत असल्याने अवघ्या तीन ते चार तासांत बहुतांश निकाल जाहीर होत असत. त्यामुळे उमेदवार, पक्षकार्यकर्ते आणि मतदारांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होत नसे. मात्र, यंदा अवलंबण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीबाबत काँग्रेसने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. पत्रानुसार, एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील प्रभागांची मतमोजणी एकामागोमाग एक अशा पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच, एखाद्या निर्णय अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील पहिल्या प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाईल. ही माहिती खरी असल्यास, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या पद्धतीमुळे एका निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात 8 प्रभाग असतील, तर प्रत्येक प्रभागासाठी सरासरी तीन तास धरले तरी आठव्या प्रभागाचा निकाल येण्यासाठी 24 तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. परिणामी, संपूर्ण मुंबईचे निकाल जाहीर होण्यासाठी दुसरा दिवस उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी उमेदवार आणि मतदारांना ताटकळत ठेवावे लागेल, जे लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने योग्य नाही, असा ठाम सूर काँग्रेसने लावला आहे. सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात यावी काँग्रेसच्या मते, मुंबईसारख्या महानगरात निवडणूक निकाल लांबणीवर पडल्यास विविध प्रकारच्या अफवा, गैरसमज आणि तणाव निर्माण होण्याचा धोका असतो. याशिवाय, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकतेच्या दृष्टीनेही प्रश्नांकित ठरू शकते. म्हणूनच, पूर्वीप्रमाणे सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात यावी, जेणेकरून सर्व प्रभागांचे निकाल साधारणतः एकाच वेळेत किंवा काही तासांच्या फरकाने जाहीर होतील, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे. निवडणूक निकालांबाबत मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता एकंदरीत, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील मतमोजणीची कार्यपद्धती हा आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, राज्य निवडणूक आयोग या मागणीवर काय निर्णय घेतो, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. जर काँग्रेसने व्यक्त केलेल्या शंकांना दुजोरा मिळाला, तर निवडणूक निकालांबाबत मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाने वेळेत हस्तक्षेप करून स्पष्ट आणि एकसमान कार्यपद्धती जाहीर करावी, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सभेत काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कारभारावर टीका केली. मात्र, या टीकेवरून आता काँग्रेसने माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांना लक्ष्य केले आहे. फडणवीस तुमच्या वडिलांच्या कामावर टीका करत असताना तुम्ही गप्प कसे बसलात? मनातली लाज फडणवीसांच्या चरणी गहाण ठेवलीय का? अशा अत्यंत तिखट शब्दांत काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला आहे. सोमवारी नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. गेल्या ७० वर्षांत राज्यकर्त्यांना शहरांच्या विकासाचा विसर पडला होता. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना आणि अमृत योजनेच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी शहरांना दिला, असे फडणवीस म्हणाले होते. आता या टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर देत थेट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या टीकेनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. अशोक चव्हाणांच्या मनात जरा तरी लाज राहिलीय का की तीही देवेंद्र फडणवीस चरणी गहाण ठेवलीय? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज ७० वर्षात कॉंग्रेसच्या काळात नांदेडचा विकास झाला नाही, नांदेडच्या राज्यकर्त्यांकडे नियोजन नव्हते, असे वक्तव्य केले. यावेळी तिथेच बसलेल्या अशोकरावांना हा स्वतःचा अपमान वाटला नाही का? स्वतःचा जाऊद्या पण आपल्या वडिलांबद्दल कोणी बोललं तर कोणताही मुलगा हे कसं ऐकून घेईल? अशोकरावांना हा स्व. शंकरराव चव्हाण साहेबांचा अपमान वाटला नाही का? की आपण एवढी लाचारी पत्करलीय की वडीलांचा अपमानही तुम्हाला क्षुल्लक वाटतोय, अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. आम्हाला शंकररावांच्या कामाचा गर्व अशोक चव्हाण आज भाजपमध्ये असले तरी स्व. शंकरराव चव्हाण हे काँग्रेसचेच नेते होते, याची आठवण सपकाळ यांनी करून दिली. आम्ही आजही गर्वाने सांगू शकतो की, स्व. शंकरराव चव्हाण साहेब काँग्रेसचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती दिली आणि जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, असे सपकाळ म्हणालेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील भीषण पाणी टंचाईच्या प्रश्नाने आता राजकीय तापमान कमालीचं वाढवलं असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, दानवेंनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली. पाण्यासंदर्भात सातत्याने दिशाभूल करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. शहरातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचं वास्तव दानवेंनी अधोरेखित केलं. विशेषतः राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचा उल्लेख करत दानवेंनी अत्यंत बोचरी टीका केली. एकेकाळी स्वतःला जलसाम्राट, म्हणवून घेणारे आणि शहरभर बॅनरबाजी करणारे मंत्री आता पाण्याच्या प्रश्नावर ‘मौनी बाबा’ झाले असल्याचा सणसणीत टोला त्यांनी लगावला. शहरात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, जबाबदार मंत्र्यांचे मौन नागरिकांच्या संतापात भर घालणारे आहे, असे दानवेंनी म्हटले. पाणीपुरवठा योजनांच्या उद्घाटनावेळी मोठमोठी आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचलाच नाही, असा आरोपही त्यांनी केला. अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाणीपुरवठा योजनेतील अपयश झाकण्यासाठी आता प्रशासनातील अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे खापर अधिकाऱ्यांवर फोडण्याचा हा प्रकार म्हणजेच महायुतीने अप्रत्यक्षपणे आपला पराभव मान्य केल्याचा पुरावा आहे, असे दानवेंनी स्पष्ट शब्दांत नमूद केले. प्रशासनावर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत, तर ठोस निर्णय आणि राजकीय इच्छाशक्ती लागते, असा इशाराही त्यांनी दिला. या मुद्द्यावर बोलताना दानवेंनी मंत्री संजय शिरसाट यांनी पूर्वी केलेल्या एका महत्त्वाच्या वक्तव्याची आठवण करून दिली. जयसिंगपुरा येथील एका कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना शिरसाट यांनी डिसेंबर 2025 पर्यंत शहराला वाढीव पाणी मिळालं नाही, तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी येणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्या वक्तव्याचा संदर्भ देत दानवेंनी सांगितले की, आता डिसेंबर महिना उलटून गेला आहे, तरीही शहराचा पाणी प्रश्न जसाच्या तसा आहे. त्यामुळे शिरसाट यांनी आपल्या शब्दाला जागून आता प्रचारासाठी शहरात पाऊलही टाकू नये, अशी थेट मागणी त्यांनी केली. दानवेंनी पुढे म्हटले की, पाण्याच्या प्रश्नावर नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित झाला असून, टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी केवळ आरोप-प्रत्यारोप न करता जबाबदारी स्वीकारून उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात सत्ताधारी नेते एकमेकांवर दोष ढकलण्यात आणि प्रशासनाला लक्ष्य करण्यात गुंतलेले दिसत आहेत, असा आरोप दानवेंनी केला. एकेकाळी ‘जलसाम्राट’ म्हणून मिरवणाऱ्या मंत्र्यांनी आता या गंभीर प्रश्नावर मौन पाळल्याने जनतेत प्रचंड असंतोष आहे, असेही दानवेंनी नमूद केले. पाणी हा मूलभूत हक्क असून, तो पुरवण्यात अपयशी ठरणे म्हणजे शासनाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहणे आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांमध्ये मोठमोठी आश्वासने दिली जात असली, तरी पाण्यासारख्या मूलभूत समस्येवर सरकारने अजूनही ठोस तोडगा काढलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाणी प्रश्न मोठा राजकीय मुद्दा बनला एकंदरीत, छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नाने आता केवळ नागरी समस्या न राहता तो मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता असून, मंत्री संजय शिरसाट आणि सत्ताधाऱ्यांना या आरोपांना कसे उत्तर द्यावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील नागरिकांना दिलासा देणारे निर्णय लवकरच जाहीर होतील की हा मुद्दा निवडणुकीपुरताच मर्यादित राहील, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्लाह पटेल चाकुहल्ल्यात ठार
अकोला : अकोट तालुक्यातील मोहाळा येथे जुन्या वादातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी (६ जानेवारी) चाकूहल्ला करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी सुमारे १.३० त्यांचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अकोट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी (७ जानेवारी) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला […] The post काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्लाह पटेल चाकुहल्ल्यात ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंबरनाथ, अकोटमधील युतीवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधी आणि वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन सत्तेसाठी आघाडी केल्याचे समोर आले. भाजपने एकीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत युती केली. तर, दुसरीकडे अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपने एमआयएमसोबत हातमिळवणी केली. या दोन्ही आघाड्यांमुळे भाजपला विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान […] The post अंबरनाथ, अकोटमधील युतीवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारी कर्मचा-यांकडून पैसे वसूल
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहे. या निकषाअंतर्गत येणा-या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचा-यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, अनेक सरकारी कर्मचा-यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.या सरकारी कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार आहे. योजनेचा निकषाबाहेर जाऊन लाभ घेणे हे सरकारी कर्मचा-यांना चांगलेच भोवले […] The post सरकारी कर्मचा-यांकडून पैसे वसूल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोटमध्ये भाजपची ओवेसींच्या एमआयएमसोबत युती
मुंबई : प्रतिनिधी भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकते, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या टीकेत तथ्य असल्याचा प्रत्यत अकोला जिल्ह्यात आहे. नुकताच नगपपंचायत आणि नगपालिका निवडणूक झाली. अकोट नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले नाही. मात्र, सत्तेत येण्यासाठी त्यांनी चक्क असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती केली आहे. भाजपच्या नेतृत्वात अकोट विकास मंच स्थापन करण्यात […] The post अकोटमध्ये भाजपची ओवेसींच्या एमआयएमसोबत युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा भरणा वाढल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आणि इतर काही पक्षांनी आंदेकर, मारणे, बापू नायर आणि टिपू पठाण यांसारख्या कुख्यात टोळ्यांशी संबंधित उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. मात्र, 'गुंडगिरी खपवून घेणार नाही,' असा इशारा देत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना 'सर्जिकल स्ट्राईक'चे आदेश दिले आहेत. पोलिसांनी अशा 20 उमेदवारांची आणि समर्थकांची 'लिस्ट' तयार केली असून, त्यांच्यावर 24 तास पाळत ठेवली जाणार आहे. पुण्यातील उमेदवारी वाटपात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची यादी धडकी भरवणारी आहे. पुणे पोलिसांनी तयार केलेल्या यादीत आंदेकर टोळीचे नाव आघाडीवर आहे. प्रभाग 23 मधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या 'आयुष्य कोमकर' हत्या प्रकरणात येरवडा कारागृहात आहेत. विशेष म्हणजे, टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने हातात बेड्या असतानाच उमेदवारी अर्ज दाखल केला. या सर्वांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मारणे आणि कोमकर: कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे आणि गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर यांनाही उमेदवारी मिळाल्याने पुण्याचे राजकारण गुन्हेगारांच्या हाती जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीने प्रभाग 39 मधून बापू नायर (हत्या आणि खंडणीचे गुन्हे) यालाही मैदानात उतरवले आहे. फडणवीसांच्या टेबलावर 20 जणांची यादी गुन्हेगारांच्या या राजकीय घुसखोरीची गंभीर दखल घेत पुणे शहर पोलिसांनी 20 जणांची एक गोपनीय यादी तयार करून ती थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. या उमेदवारांकडून मतदारांना धमकावणे, पैशांचा वापर करणे किंवा दहशत निर्माण करणे असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी एक विशेष 'निरीक्षण समिती' स्थापन केली आहे. २० उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचारादरम्यान काय करतात, यावर पोलिसांची 'घारीसारखी नजर' असणार आहे. पिंपरीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 34 उमेदवार रिंगणात केवळ पुणेच नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा सुळसुळाट झाला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची आकडेवारी धक्कादायक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये भाजपचे 17, राष्ट्रवादी काँग्रेसचे 13, शिवसेनेचे 4 जण आहेत. यात दोन महिला उमेदवारही आहेत.पोलिसांच्या दप्तरी राजकीय गुंड म्हणून नोंद असणारे भाजपचे 8, राष्ट्रवादीचे 7 आणि शिवसेनेच्या 2 जणांचा समावेश आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 8 पती राजांच्या पत्नी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
महागाव शिवारातील गोदावरी नदीत मजुराचा बुडून मृत्यू
परभणी : प्रतिनिधी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कळगाव परिसरातील महागाव शिवारातील गोदावरी नदीकाठी दुर्दैवी घटना घडली आहे. दुस-या शेतक-याच्या मदतीसाठी नदीत उतरलेल्या मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव नामदेव विठ्ठलराव कोमटवार (रा. कळगाव) असे असून ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कळगाव येथील एका शेतक-याची मोटार पंप गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाल्याने ती […] The post महागाव शिवारातील गोदावरी नदीत मजुराचा बुडून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरातील जंगली महाराज रस्त्यावर एका पादचाऱ्याचा ७० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या चोरट्याला गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून महागडा मोबाईल आणि दुचाकीसह १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राकेश गोवर्धन वाघिरे (वय २५, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. तक्रारदार ४ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जंगली महाराज रस्त्यावर ॲप-आधारित प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारचालकाची वाट पाहत थांबले होते. जंगली महाराज मंदिरासमोर दुचाकीस्वार आरोपी वाघिरे याने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकने समांतर तपास सुरू केला. पोलीस कर्मचारी सुहास डोंगरे आणि युवराज कांबळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासात आरोपी मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली. आरोपी वाघिरे शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडून हिसकावलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, उपनिरीक्षक राहुल मखरे, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, हेमंत पेरणे, निलेश साबळे आणि संदेश काकडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अदखलपात्र गुन्ह्यात (एनसी) कारवाई न करण्यासाठी एका भाजीविक्रेत्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. विकास लक्ष्मण ओंबासे (वय ३९) असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सासवड येथील एका भाजीविक्रेत्याने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी हवालदार ओंबासे याने सुरुवातीला दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना पोलीस हवालदरास लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाखलुपत विरोधी पथकाकडे पोलीस कर्मचारी विरोधात तक्रार दाखल केली . तक्रारदाराने तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार आल्यावर सासवड पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. भाजीपाला विक्रेता हवालदाराला पैसे देण्यासाठी गेला असता, हवालदाराने त्याला पोलीस ठाण्यातील एका खोलीत नेले. तेथे त्याने तक्रारदाराची तपासणी केली. लाच प्रकरणात कारवाई होणार असल्याचा संशय आल्याने ओंबासे याने लाच स्वीकारण्यास नकार दिला. लाच स्वीकारली नसली तरी, हवालदाराने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ओंबासे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपने अनुक्रमे एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या 'विचित्र' समीकरणांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही युती चालणार नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे. ही युती तोडावीच लागेल. ही युती करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, अकोट आणि अंबरनाथमध्ये भाजपने सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अकोटमध्ये 'एमआयएम' आणि अंबरनाथमध्ये 'काँग्रेस'सोबत भाजपने संसार थाटल्याने विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी नेटवर्क'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत. अकोटमध्ये 'अजब' विकास मंच! अकोट नगरपरिषदेत सत्तेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने 'अकोट विकास मंच' स्थापन केला आहे. या आघाडीचे स्वरूप पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. या मंचमध्ये भारतीय जनता पक्ष, एमआयएम (MIM), शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार जनशक्ती (बच्चू कडू) पक्ष एकत्र आले आहेत. या सर्व पक्षांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे या नव्या गटाची अधिकृत नोंदणीही केली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेतही काँग्रेससोबत हातमिळवणी अकोटमधील घडामोडींप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपने वेगळेच राजकीय समीकरण तयार केले आहे. येथे भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेचा मार्ग निवडला आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपकडून काँग्रेससोबत युती होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, या युतीत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आल्याने शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमत स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांच्या हाती कोलीत भाजपच्या या स्थानिक प्रयोगांमुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, हे यातून सिद्ध झाले आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यामुळे आता अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बाणेर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याबद्दल भाजपला पश्चाताप झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार अमोल बालवडकर यांनी केला आहे. ते म्हणाले की, मी आधीच घराघरात पोहोचलो होतो. भाजपने ४० हून अधिक नगरसेवकांची तिकिटे कापली, पण त्यांना नंतर कोणी भेटले नाही किंवा सांत्वनही केले नाही. काम करणाऱ्या नेत्यांना जनता निवडून देते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमोल बालवडकर यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ९ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ बनला आहे. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या प्रभागातील निवडणुकीकडे लागले आहे. बालवडकर यांनी सांगितले की, कोथरूड विधानसभा मतदारसंघात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना 'जीवनात मोठे करू' असे आश्वासन दिले होते. मात्र, मनपा निवडणुकीत त्यांनी आपला घात केल्याचा आरोप बालवडकर यांनी केला. पुणे मनपात महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद दिले नसले तरी चालले असते, पण कोणतेही कारण न देता उमेदवारी नाकारणे चुकीचे होते, असे ते म्हणाले. मोठ्या नेत्यांनी आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर शक्तीचा दुरुपयोग केल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. भाजपने उमेदवारी नाकारताच पाचव्या मिनिटाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला आणि त्यांनीच तिकीट दिले, असे बालवडकर यांनी सांगितले. राजकारणात टिकून राहण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतात, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य आठवून आपण तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांनीही आपली उमेदवारी कापल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत आपण इच्छुक उमेदवार असल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील आणि आपल्यातील वाद मिटवला असतानाही पुन्हा असे का घडले, असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारल्याचे बालवडकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून आपले काम चांगले असल्याचे अजित पवार यांनी मान्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाशिकमध्ये प्रचारातून राडा:पैसे न मिळाल्याने महिलांत तुफान मारामारी, रोजंदारी बुडाल्याचा आरोप
प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन विविध भागांत रॅली तसेच दौऱ्यात सहभागी करुन घेतले जात आहे. सिडकोतील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या ६५ महिलांना दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने जास्त हजेरी देण्याचे आश्वासन दिले. या महिलाही दोन पैसे अधिक मिळतील या अपेक्षेने आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या. मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसून ठेवण्यात आले. दुपारनंतर जाण्यास सांगितले. कोणतीही रोजंदारीही त्यांना न मिळाल्याने त्यांच्यात आणि प्रतिनिधी महिलेत आधी झटापट नंतर मारामारीच झाली. ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला दिवसभर ताटकळत बसून राहिल्या त्या उमेदवाराने चक्क सायंकाळी फोन बंद केला होता. यातील काही महिलांना अश्रू अनावर झाले. तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला. हाताशी आलेले काम सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या मागे गेलेल्या महिलांना मात्र यातून चांगला धडा मिळाला. अशीही चर्चा दिवसभर रंगली होती. एका उमेदवाराचा प्रचाराला बोलविले. असता दुसराच उमेदवार घेवून गेला. मात्र तिथे हजेरी न मिळाल्याने त्या महिलांचे ३० हजारांचे नुकसान झाले. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला. मात्र, महिलांनी संबंधितांविरेधात तक्रार न दिल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता. मतदारांनाच वाटण्यासाठी मागविण्यात आलेला मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापगाव शिवार त्र्यंबकेश्वर येथे जप्त केला. कारसह १७ लाख ६ हजारांचा हा मुद्देमाल असून हे मद्य दादरानगर हवेली निर्मित आहे. कारचालक हार्दीक प्रवीणभाई दप्तरी, भावेश अरुणभाई रणपुरा (दोघे रा. अहमदाबाद) असे तस्करांचे नाव आहे. अधीक्षक संतोष झगडे यांनी माहिती दिली.मनपा निवडणूकीत मतदारांना वाटप करण्याकरीता दादरा नगर हवेली निर्मित मद्याची मागणी होत आहे. इच्छुकांकडून मतदारांना वाटप करण्याकरीता मद्य मागवले जात आहे. मद्य तस्करांकडून खासगी कारमधून मद्य पुरवठा केला जात असल्याचे समजले. पथकाने सिमेवर गस्त वाढवली. सापगाव पोस्टवर विभागाचे ड पथक गस्त करत असतांना जीजे ०५ आरक्यू ७०१८ कार थांबवण्यात आली. कारची झडती घेतली असता सीट खाली ६६ बिअर बॉक्स मिळून आले. एन. एच. गोसावी, आर. एन. सोनार, एस. आर.इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. फार्म हाऊसमध्ये येणार होते मद्य त्र्यंबकेश्वरमधील एका फार्म हाऊसमध्ये हा साठा उतरवला जाणार होता. मात्र कुणाकडे याबाबत माहिती नसल्याचे दोघा तस्करांनी पथकाच्या चौकशीत सांगीतले. विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेस या अजित पवार यांच्या पक्षाला धक्का देणारी गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक 16 मधील कैलास नगर परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी 7 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, निवडणूक प्रचाराच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर उभारलेल्या मंडपाला अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी परिसरात काही कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत आग वाढण्यापूर्वीच ती आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर आग भडकली असती, तर कार्यालयातील साहित्य, प्रचार सामग्री तसेच आजूबाजूच्या वस्त्यांनाही धोका निर्माण झाला असता, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी, प्रचार कार्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, त्यांच्या प्रचार यंत्रणेवर थेट हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतसे विरोधकांकडून दबाव वाढत असल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे. घटनेनंतर तातडीने जिंसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, संपूर्ण परिसरातील तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध झाले असून, त्याच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आग लावण्यामागचा नेमका उद्देश काय होता, ही घटना राजकीय वैरातून घडली की इतर कोणता हेतू होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे निवडणूक काळातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रचार कार्यालये, मंडप, बॅनर आणि प्रचार साहित्य यावर यापूर्वीही विविध ठिकाणी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, थेट आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारांबाबत चिंता व्यक्त करत, निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. हा लोकशाहीवरच हल्ला दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. लोकशाही मार्गाने लढवायच्या निवडणुकीत हिंसक प्रकारांना कोणताही स्थान नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रचार कार्यालय जाळण्याचा किंवा कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवरच हल्ला असल्याचं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं पोलिस तपास सुरू असताना, संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा रंगली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशा घटना घडल्यास वातावरण अधिकच तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात प्रचारादरम्यान सर्वच पक्षांनी संयम राखावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि दोषी कोण ठरतात, याकडे आता संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचे लक्ष लागले आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद केला. यावेळी त्यांनी अंबरनाथ आणि अकोटमधील भाजपच्या 'अजब' युतीवर आपली भूमिका स्पष्ट करत भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. अकोटमध्ये एमआयएम आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत भाजपने युती का केली? याचे उत्तर भाजपचे नेतेच अधिक विस्तृतपणे देऊ शकतील. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा काँग्रेसला विरोध होता, आहे आणि पुढेही तीव्र राहील, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. एका बाजूला भाजप देशभर काँग्रेसविरोधी आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी विरोधी विचारधारांच्या पक्षांशी थेट हातमिळवणी केली जात असल्याचे समोर आले. अंबरनामध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणे अपेक्षित होते. पण भाजपने शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवून काँग्रेससोबत हातमिळवणी केली. तर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एमआयएमशी आघाडी केली आहे. या घडामोडींमुळे पार्टी विथ डिफरन्स, अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी आपल्या राजकीय तत्त्वांनाच मुरड घातली आहे का? असा सवाल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमके काय म्हणाले श्रीकांत शिंदे? अंबरनाथमध्ये भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) बाजूला ठेवून काँग्रेसशी युती केली, तर अकोटमध्ये 'एमआयएम'शी जुळवून घेतले. या प्रश्नावर श्रीकांत शिंदे यांनी भाजपला आरसा दाखवला. अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली असेल, तर हा प्रश्न भारतीय जनता पार्टीचा आहे. यासंदर्भात भाजपच्या नेत्यांना विचारणा केल्यास, ते चांगल्याप्रकारे विस्तृत स्वरुपात उत्तर देऊ शकतील. आम्ही नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे. या सगळ्या वृत्तींच्या विरोधातच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता. बाळासाहेबांनी देखील काँग्रेसविरोधात नेहमीच बंड पुकारले होते. आज असे होत असेल, तर त्याचे उत्तर आमच्यापेक्षा भाजप चांगल्या प्रकारे देऊ शकते. पण आमचा काँग्रेसला विरोध होता आणि पुढेही तीव्र विरोध राहील, असे श्रीकांत शिंदे म्हणालेत. ज्या विचारांविरुद्ध लढलो, त्यांच्याशी हातमिळवणी? श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांची आठवण करून देत भाजपला टोला लगावला. ते म्हणाले. केंद्रामध्ये महायुती आहे. राज्यातही महायुती आहे. नगरपालिका निवडणुकीतही महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आहेत. महानगरपालिकेतही बहुतांश ठिकाणी महायुतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कोणाबरोबर सत्ता स्थापन करत आहेत? ज्या विचारांच्या विरोधात आपण लढलो, अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कुणी करत असेल, तर हा त्यांचा प्रश्न आहे. याबद्दल त्यांनाच विचारले पाहिजे. कारण मी कुणाबरोबर तशी युती किंवा आघाडी केली नाही. मनपा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेला राहिलेला आहे. नगरपालिका निवडणुकांत पूर्ण महाराष्ट्रात ६४ जागांवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसलेला आहे. शिवसेना ६४ ठिकाणी नगराध्यक्ष बसवले, अशी कुणीही अपेक्षा केली नव्हती. पण लोकांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदेंवरील लोकांच्या प्रेमापोटी हे शक्य झाले. जिथे शिवसेनेची ताकद नव्हती, तिथेही शिवसेनेचा नगराध्यक्ष बसलेला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्येही त्यापेक्षा मोठे यश मिळेल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्याकेल्याची धक्कादायक घटना नांदेडजिल्ह्यातील दहेली (ता. किनवट)परिसरात उघडकीस आली आहे.विक्रम सुरेश मारशेटवार (३०)आणि शिवाजी विक्रम मारशेटवार(२) असे मृत बापलेकांची नावेआहेत. ही घटना ५ जानेवारी रोजीसायंकाळी ६ ते ६ रोजी सकाळी ६वाजेदरम्यान घडली. घटनेमागीलकारण स्पष्ट झाले नाही. दहेली येथील रहिवासी विक्रममारशेटवार यांनी आपल्या मुलासहपरिसरातील राजेश दिसलवार यांच्याशेतातील विहिरीत उडी घेऊनजीवनयात्रा संपवली. सकाळीघटनेची माहिती समोर येताचपरिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी सिंदखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन दहेलीतांडा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात मंळवारी दुपारी करण्यातआले. हे शवविच्छेदन उमरी बाजारयेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पुरुषोत्तम आईटवार यांनी केले.शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिवनातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.त्यानंतर शोकाकुल वातावरणातअंत्यसंस्कार झाले. मृत विक्रममारशेटवार यांच्या पश्चात आई,पत्नी, व दोन भाऊ असा परिवार आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या अकस्मातमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपासात या घटनेचे कारण स्पष्टहोईल, असे सहायक पोलिसनिरीक्षक रमेश जाधवर म्हणाले. इनसाइड स्टोरी: पत्नी गेली होती माहेरी विक्रम मारशेटवार हे गावातच शेतीकरत होते. काही दिवसांपासून विक्रम यांची पत्नी माहेरी राहत होती,अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.त्यांची पत्नी माहेरी का गेली होती हेस्पष्ट झालेले नाही.
राज्यात महापालिका निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. या निमित्ताने बडे बडे नेते आपलाच पक्ष सत्तेसाठी योग्य कसा हे मतदारांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. काही नेत्यांच्या आठवणी मनात ठसलेल्या असतात, त्या पुसता पुसल्या जात नाहीत. मग ते मन समर्थकाचे असो की विरोधकाचे. ‘याद ना जाये, बीते दिनों की’ […] The post आठवणी जागवायच्या असतात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
रेणापूर : प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवार दि. ५ रोजी लातूर येथे लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा रेणापूर शहर कॉग्रेसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. लोकनेते विलासराव देशमुख हे सर्वसमावेशक विकास, सामाजिक सलोखा व जनतेशी नाळ […] The post चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चव्हाण यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन
लातूर : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण यांनी लातूर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. लातूर तालुका काँग्रेसच्या वतीने मुरुड अकोला येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. मुरूड अकोला येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारून आपल्या […] The post चव्हाण यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दुसरीकडे प्रचाराच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट संघर्ष दिसून येत आहे. भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी केलेल्या आरोपांची आठवण करून दिली जात असून, त्यामुळे सत्तेत असूनही मित्र पक्षांमधील तणाव उघडपणे समोर येत आहे. विशेषतः पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ‘मिशन 125’ चा नारा दिला असताना अजित पवार यांची भूमिका भाजपसाठी मोठं आव्हान ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपकडून पुणे महापालिकेत 125 जागा जिंकण्याचं लक्ष्य जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढवत युतीची दिशा बदलल्यामुळे भाजपच्या या महत्त्वाकांक्षी लक्ष्याला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तेत एकत्र असतानाही प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आल्याचं चित्र दिसत असून, याचा थेट परिणाम मतदारांवर होण्याची भीती भाजपच्या गोटात व्यक्त केली जात आहे. खासगी तसेच शासकीय सर्व्हेंमध्येही भाजपला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे पक्षातील अस्वस्थता वाढली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 2500 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी जाहीर करताना पक्षाने अनेक जुने, निष्ठावंत कार्यकर्ते डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. याच निर्णयामुळे पक्षात नाराजीचा सूर उमटला. नाराज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिथून उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. परिणामी भाजपसमोरच भाजपचे माजी नेते उभे ठाकल्याने ‘मिशन 125’ धोक्यात येण्याची शक्यता सर्व्हेंमध्ये व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ नेत्यांना चांगलेच फटकारल्याची चर्चा या घडामोडींची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. प्रचारासाठी पुण्यात आले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना चांगलेच फटकारल्याची चर्चा आहे. सोमवारी रात्री कात्रज येथे झालेल्या जाहीर सभेत फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. सत्तेत असूनही राष्ट्रवादीकडून होत असलेल्या हालचालींमुळे भाजपला होणाऱ्या नुकसानीचा सूर या भाषणांतून स्पष्ट दिसून आला. बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा मात्र, खरी राजकीय खलबतं सभा संपल्यानंतर रंगली. मुख्यमंत्री फडणवीस विमानतळाकडे रवाना होत असताना त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे एकाच वाहनातून प्रवास करत होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री गाडीत बसल्यानंतर चंद्रकांत पाटील तेथे पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोहोळ यांना बोलावून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर तिघेही नेते विमानतळावर पोहोचले आणि बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. तातडीने राजकीय व्यूहरचना बदलण्याचे आदेश या बंद दाराआड झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिकेतील 165 जागांचा सविस्तर आढावा घेतल्याचं सांगितलं जात आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत आहे किंवा जिथे खासगी व शासकीय सर्व्हेंमध्ये विरोधकांचा कौल दिसून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने राजकीय व्यूहरचना बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक पातळीवर समन्वय वाढवणे, नाराज नेत्यांना पुन्हा सक्रिय करणे आणि बंडखोरी रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याची चर्चा आहे. पुण्यातील काही बड्या नेत्यांची शाळा दरम्यान, भाजपने महापालिका निवडणुकीत किमान 120 नगरसेवक निवडून आणण्याचं उद्दिष्ट ठेवले असले, तरी निष्ठावंतांना डावलून ‘आयात’ उमेदवारांना संधी दिल्यामुळे काही प्रभागांतील जागा धोक्यात आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील काही बड्या नेत्यांची ‘शाळा’ घेतल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. धोकादायक जागांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत, प्रचार आणि संघटन या दोन्ही आघाड्यांवर कसून काम करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुण्यात भाजपची रणनिती अधिक आक्रमक आणि बदललेली पाहायला मिळणार, अशीच चिन्हं सध्या दिसून येत आहेत.
महाराष्ट्रात अर्धी काँग्रेस भाजपात सहभागी करुन घेतली. उर्वरित ठिकाणी एमआयएम बरोबर युती केली. भाजपला कोणीही चालते. महाराष्ट्रभर भाजप-एमआयएमची छुपी युती आहे. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे. अशी टीका राऊत यांनी केली. तसेच एमआयएमशी युती करताना ते आता हिरवे झाले नाहीत का? असा बोचरा सवालही राऊत यांनी भाजपला केला आहे. मिराभाईंदर आणि अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली आहे. तर अंबरनाथ नगरपरिषदमध्ये काँग्रससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. यावरून संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जिव्हारी लागणाऱ्या शब्दांत टीका केली आहे. तसेच अजित पवार सावरकरांना मानत नाहीत, तर मग त्यांना सरकारमध्ये कशाला ठेवता? त्यांना सरकारमधून दूर करा, असे आव्हानही संजय राऊत यांनी भाजपला दिले. आता भाजप 'हिरवी' झाली नाही का? - युतीवरून निशाणा अंबरनाथ आणि मिरा-भाईंदरमधील राजकीय घडामोडींचा दाखला देत राऊत यांनी भाजपच्या 'हिंदुत्वा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मिरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला (MIM) पाठिंबा दिला आहे, तर अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. आता हे हिरवे झाले नाहीत का? अकोटपासून मिरा-भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत उघड-गुप्त युती सुरू आहे. हा निर्लज्जपणाचा कळस असून भाजप हे 'दुतोंडी गांडूळ' आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. मराठी माणसाचे 'डेथ वॉरंट' मराठी माणसाच्याच हाती? संजय राऊत यांनी भाजपच्या रणनीतीवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, भाजपने निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रशासनात जे अधिकारी नेमले आहेत, ते मराठीच आहेत. विशेष म्हणजे, मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे 'डेथ वॉरंट' काढले जात आहे, ही भाजपची मोठी कसब आहे. प्रशासनाचा खेळखंडोबा राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या राज्याचा कारभार वाऱ्यावर सोडून प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. दुसरीकडे अजित पवार भाजपला शिव्या घालत आहेत आणि तरीही सत्तेत एकत्र आहेत, हा प्रकार संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखत महाराष्ट्राची शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या संयुक्त मुलाखतीचा टीझर समोर आला. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसतीये ते आपण काल पाहिले. प्रथम संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवले होते. मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे दोन धुरंदर एकत्र आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने तिला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटले आहे. महाराष्ट्राला जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्रासंदर्भात ज्या समस्या आहेत, त्या सर्व विषयांवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली मते व्यक्त केली. मुंबई आपल्या हातची गेली, तर आपल्या पुढील पिढ्या बरबाद होतील. आता नाही, तर कधीच नाही, असे ठाकरे बंधुंनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणालेत.
सातारा येथे झालेल्या शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चार दिवसात साताऱ्यासह अन्य राज्यातून १० लाख साहित्यप्रेमींनी उपस्थिती दाखविली. परिसंवाद, चर्चा आदी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून १५० साहित्यीकांना तर कवी कट्टा व मुख्य व्यासपीठावर ५५० कवींना व्यासपीठ मिळाले. मोठे आकर्षण असलेल्या पुरस्तक प्रदर्शनासाठी पहिल्यांदाच ४० कोटीचा विमा उतरविला गेला. आठ कोटी ७२ लाखांची पुस्तकविक्री झाल्याची माहिती महामंडळाने दिली. पुस्तक खरेदासाठी येणाऱ्या साहित्यरसिकांचा २५ कोटींचा तर फर्निचर आणि इतर साहित्याचा चार कोटी ३० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग ग्रंथ दालनातूनच ठेवण्यात आल्यामुळे संमेलनास येणारा प्रत्येकजण ग्रंथ दालनातूनच जात-येत होता. त्यामुळे पुस्तक विक्रिला प्रतिसाद मिळाल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. आठ कोटी ७२ लाखांची पुस्तक विक्री झाल्याची माहिती महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी दिली. मुख्य मंडपासह परिसंवाद-परिचर्चेसाठी उभारलेला दुसरा मंडप तसेच बाल-कुमार वाचककट्टा, गझल-कवी कट्टा, पुस्तक प्रकाशन मंच येथे चारही दिवस उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. १५० साहित्यिक व्यासपीठावरून भूमिका मांडू शकले. विविध विषयांच्या ३ लाख पुस्तकांचा समावेश पुस्तक प्रदर्शनात समिक्षा, ऐतिहासिक, वैचारिक, धार्मिक, बालसाहित्य अशा सर्वच प्रकारच्या पुस्तकांची विक्री या पुस्तक प्रदर्शनात झाली. यावर्षी साधारण ३ लाख पुस्तकांची विक्री झाली असून किमान ५०० रुपयेपासून ते ५० रुपये किंमतीची पुस्तकांची सरासरी किंमत काढली तरी जवळपास ९ कोटींची पुस्तक विक्री झाली आहे, अशी माहिती महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी दिली. विद्यार्थी, साहित्य रसिकांचा मोठा प्रतिसाद- विनोद कुलकर्णी, (कार्याध्यक्ष, साहित्य महामंडळ) सातारा नगरीला जशी ऐतिहासिक परंपरा आहे, त्याप्रमाणे सातारा शहर आणि जिल्ह्यात साहित्यप्रेमी, वाचक मोठ्या संख्येने आहेत. शतकपूर्व संमेलन साहित्य प्रेमींच्या सहभागातून व्हावे यासाठी जे सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते ते विद्यार्थी, साहित्य रसिकांचा मिळालेला प्रतिसाद बघता यशस्वी ठरले आहेत. सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात पुस्तक खरेदीसाठी अशी गर्दी झाली होती.
आखाडा बाळापूर ते बोल्डा मार्गावर पेठवडगाव शिवारात अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. ७ तक्रार देण्यात आली आहे. सदर ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात उभे करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयात अवैधरित्या गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांनी महसूल व पोलिस विभागाची पथके सक्रिय केली असून या पथकाकडून दररोज रात्रीच्या वेळी व पहाटे वाळू घाटांवर जाऊन तपासणी केली जात आहे. मंगळवारी ता. ६ सेनगाव पोलिसांनी पूर्णा नदीच्या पात्रातून एका पोकलॅनसह, २०० ब्रास रेती, १५० ब्रास मुरुम असा सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव शिवारातून मुरुम उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावरून उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले. यापथकातील मंडळ अधिकारी आनंद काकडे, ग्राम महसूल अधिकारी विशाल पतंगे, एकनाथ कदम, पोलिस कर्मचारी पिराजी बेले यांच्या पथकाने मंगळवारी ता. ६ मध्यरात्री वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी पेठवडगाव शिवारात एक ट्रॅक्टर थांबविले असता त्यात मुरुम आढळून आला. पथकाने ट्रॅक्टर चालक अक्षय चन्ने याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या पथकाने ट्रॅक्टर व मुरुम असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालक अक्षय याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रतिनिधी | अमरावती महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस रंगत चढत आहे. आपआपल्या पक्षाचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी पक्षाचे मोठे नेते मेहनत घेत आहेत. दरम्यान बुधवारी (दि. ७) शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, भाजपाचे महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शहरात येणार आहेत. या नेत्यांचे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील नेहरु मैदानात दुपारी १२ वाजता जाहीर सभा होणार आहे. त्या सभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी साडेचार वाजता हॉटेल ग्रॅन्ड महफिल येथे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांची साडेचार वाजता प्रबुध्द सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आशियाड चौक, विलासनगर, श्री संत कंवरनगर चौक, रविनगर आणि बडनेरा नवीवस्ती आठवडी बाजार मैदानात जाहीर सभा होणार आहे. बुधवारी सकाळी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शहरात येणार आहे. ते मनपा निवडणुकीसंदर्भात कॉँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत, तसेच सकाळी अकरा वाजता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिंधीसोबत संवाद साधणार आहेत. या नेत्यांचे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये जाहीर सभा अन् बैठकाही घेतल्या जाणार आहेत.
लोकशाही व्यवस्थेत निवडणुका म्हणजे उत्सव असतो. चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यम क्षेत्रातील पत्रकारांची भूमिका निवडणुकीच्या काळात अत्यंत महत्त्वपूर्ण व समाजासाठी दिशादर्शक असते, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सुनील लहाने यांनी मंगळवारी केले. लोकशाहीमध्ये अधिकारासोबतच कर्तव्य देखील असतात. मतदान करणे ही मतदारांची मुख्य जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केले. ते महानगर पालिका, श्री शिवाजी महाविद्यालय आणि अकोला श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनानिमित्त मतदार जनजागृती व पत्रकार कार्यशाळेत बोलत होते. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष राऊत, प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी डॉ. हर्षवर्धन पवार, मनपा शिक्षणाधिकारी हरिश्चंद्र इटकर, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे उपस्थित होते. उपाध्यक्ष शरद पाचपोर, सचिव विशाल बोरे, प्रमोद गावंडे, डॉ. श्रीकांत उखळकर, गोपाल हागे, दीपक अवताडे, प्रवीण खेते, शिवम पाथरकर आदींनी अतिथींचे स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत उखळकर यांनी तर आभार प्रा. शिल्पा शिंदे यांनी मानले. जिल्हा माहिती अधिकारी पवार यांनी लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांच्या भूमिकेवर मांडणी केली. निवडणुकांमध्ये पत्रकारांनी निष्पक्ष पत्रकारिता करावी. पत्रकारांच्या लेखनीमधूनच शासन, प्रशासनाचे लक्ष वेधून शाश्वत विकास घडतो, असे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभावी जनजागृती केली जात असून मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास हरिश्चंद्र इटकर यांनी व्यक्त केला. शहराचे भवितव्य घडवण्याच्या दृष्टीने निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले. विद्यार्थिनींनी केली जनजागृती नवमतदार विद्यार्थ्यांनी निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व जाणून घेतले. मतदार जनजागृती अभियानाचे नोडल अधिकारी हरिश्चंद्र इटकर, प्रा. डॉ. श्रीकांत उखळकर यांनी विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देऊन त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित केले. त्यांनी विद्यार्थिनींनी हात फलक घेत मतदानाबाबत जनजागृती केली. यावर ‘तुमचे मत महत्त्वाचे आहे; मतदान करा’, ‘सोडा सर्व काम चला करुया मतदान’, ‘आपले अमूल्य मत करेल लोकशाही मजबूत’, ‘माझे मतदान माझा आवाज आहे’ असे फलकांवर नमूद होते.
मोबाइल व पैसे घेतल्याच्या संशयातून मित्रांनीच एका मित्राला डोंगरावर नेत गळा चिरून हत्या केली. त्याआधी त्यांनी त्याच्या पायाला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांना पट्टी बांधून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी ६ वाजेच्या सुमारास जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरात घडला. प्रकरणी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज यास अटक केली, तर छावणी ठाण्यात त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर व अन्य एक अशा एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला. शकील आरेफ शेख (३०, रा. फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. मृताचा भाऊ सलमान आरेफ शेख याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आरोपी सिराजने शकील धमकी दिली होती. दिवसभर चालला पोलिस हद्दीचा वाद हत्या झालेले ठिकाण हे दौलताबाद व छावणी पोलिस या दोघांच्या परिसरात आहे. दौलताबाद पोलिसांच्या पथकाने प्राथमिक बाबींची पूर्तता करून मृतदेह घाटीत नेला. मात्र त्यानंतर गुन्हा दाखलसाठी पोलिसांतील हद्दीचा वाद सुरू झाला. दिवसभर रंगलेल्या या वादानंतर वरिष्ठांच्या आदेशाने छावणी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हद्दीचा वाद आणि तपासाचे निकष मृतदेहाचे डोके ज्या हद्दीत, त्या ठाण्याकडे तपास जातो. शरीराचा जास्त भाग, नाभी, रक्ताचे डाग आणि संघर्षाच्या खुणा ज्या हद्दीत जास्त, तेथेच गुन्हा नोंदवून तपासाचा अंतिम निर्णय घेतात. इनसाइड स्टोरी: आठवडाभर प्लॅन करून केली हत्या आठवडाभरापूर्वी आरोपी सिराजने आरेफच्या आईला फोन केल्यापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडलेली होती. तेव्हापासून उर्वरित आरोपींनी त्यास मारण्याची तयारी सुरू केली . ४ जानेवारी रोजी आरोपीने त्यास पार्टीसाठी जटवाडा परिसरात नेले. तेथे नशा केली. त्यानंतर वाद होत त्यांनी आरेफला चटके देत अखेर त्याची गळा चिरून हत्या केली.
ईव्हीएम प्रशिक्षणात मशीनबाबत दिल्या महत्त्वपूर्ण सूचना:निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यावर भर
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व कार्यक्षमरित्या राबवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी ६ जानेवारी रोजी क्षेत्रीय अधिकारी (झेडओ) यांच्यासाठी ईव्हीएम(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संदर्भात सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले. या प्रशिक्षण कार्यक्रमात ईव्हीएमची रचना, कार्यपद्धती, मतदान प्रक्रियेपूर्वीची तयारी, मतदानाच्या दिवशी करावयाची कारवाई तसेच मतदानानंतरची सुरक्षित साठवणूक व मतमोजणी प्रक्रियेबाबत सखोल माहिती देण्यात आली. यासोबतच ईव्हीएम संदर्भातील नियम, मार्गदर्शक सूचना, आपातकालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी तसेच तक्रार निवारण प्रक्रियेवरही प्रकाश टाकण्यात आला. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून ती कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. सदर प्रशिक्षणात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त दादाराव डोलारकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रद्धा बबन उदावंत, यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी तथा वन जमाबंदी अधिकारी विवेकानंद काळकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी वेळेचे नियोजन करावे मशीनची सुरक्षितता, सीलिंग व साठवणूक करताना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मतदानाच्या दिवशी वेळेचे काटेकोर नियोजन करावे व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी.
14.43 लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त:सहा जणांविरुध्द गुन्हे, दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
राज्यात प्रतिबंधित असलेला मात्र शहरात सर्रास मिळणारा गुटखा गुन्हे शाखेने मंगळवारी (दि. ६) जप्त केला आहे. हा गुटख्याचा साठा इंदौरवरुन शहरासह इतरत्र विक्रीसाठी आला असल्याची माहीती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली असून गुटखा मागवणाऱ्या तिघांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर भगवानसिंग सुर्यवंशी (४०, रा. आहेरखेडी, इंदौर, मध्यप्रदेश), ट्रान्सपोर्टचा मालक अ. सलीम अ. कादर ३५, रा. ट्रान्सपोर्टनगर, अमरावती या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याचवेळी अवध किशोर पांडे (रा. इंदौर), दानिश (रा. माहुली), साजीद (रा. नेर जि. यवतमाळ) आणि साईराम (रा. यवतमाळ) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुटख्याचा साठा दानिश, साजीद व साईराम यांनी बोलवल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण, एपीआय मनिष वाकोडे व त्यांचे पथक गोपनिय माहीतीच्या आधारे ट्रान्सपोर्टनगर भागात पोहचले. त्यांनी एका संशयित मालवाहू वाहनाची पाहणी केली, त्यावेळी वाहनात चालक ईश्वर सूर्यवंशी होता. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने वाहनात गुटखा, सुंगधीत तंबाखू असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीती दिली. ते अधिकारी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी पोलिसांसह वाहनाची झडती घेतली, त्यावेळी वाहनातून सुमारे १४ लाख ४३ हजार ६२० रुपयांचा महागडा गुटखा व सुंगधित तंबाखु तसेच १५ लाख रुपयांचा मिनीट्रक असा एकूण २९लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी चालकासह सहा जणांविरुध्द नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मनरेगा’चे नाव बदलल्याने संताप:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तिवसा तहसीलदारांना दिले निवेदन
मनरेगाचे नाव बदलवून जी रामजी केल्याच्या निषेधार्थ तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाईचे पैसे राहलेल्या किसानांना त्वरीत मिळावे, घरासाठी जागा मिळावी गावठाणाचा विस्तार करावा. तिवसा तालुक्यातील सर्व अतिक्रमित घरांची नमुना ८ अ ला नोंद करा, सर्वांना स्वस्त धान्य, गरजुंना राशन कार्डचे वाटप करा, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार लोकांचे मानधन ३ हजार रुपये करा, घरकुल योजनेचे अनुदान ५ लाख रुपये द्या अशा अनेक मागण्यांचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तर्फे तहसीलदार आशिष नागरे यांना देण्यात आले. या आश्वासनांची पुर्तता झाली नाही तर १९ जानेवारी रोजी तहसील कचेरीवर प्रचंड मोर्चा धडकणार असल्याचा इशारा माकपच्या प्रतिनिधी मंडळाने निवेदनातून दिला आहे. या प्रतिनिधी मंडळात माकप तालुका सचिव दिलीप शापामोहन, महादेव गारपवार, तिवसा शहर सचिव अजय गारपवार, मोहिनी शापामोहन, अशोक राऊत, पुंडलिक पापणकर, लता पापणकर, सुरेश भारती, रामगोपाल निमावत यांचा सहभाग होता.
वेगवेगळी माध्यमे उदयास आली आहे. पण, मुद्रित माध्यमांचे महत्त्व अबाधित आहे. बरेचदा आम्हाला आमच्या गोपनीय यंत्रणेच्याही आधी पत्रकारांकडून माहिती मिळते. पत्रकारांचे हे जाळे फार महत्त्वाचे आहे. या शब्दात पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे मंगळवारी (दि. ६) पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, ज्येष्ठ पत्रकार अॅड. दिलीप एडतकर, विलास मराठे, प्रवीण आहुजा, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, श्रमिक पत्रकारांच्या पुरस्कार निवड समितीचे समन्वयक डॉ. विलास नांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोहन अटाळकर, संचालन शैलेश धुंदी यांनी केले. मांडणी संघाचे कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर आणि आभार सचिव रवींद्र लाखोडे यांनी मानले. स्वागत संघाचे उपाध्यक्ष अमोल इंगोले, कुष्णा लोखंडे, संतोष ताकपिरे, महेश कथलकर, भैय्या आवारे, वैभव बाबरेकर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपली मते मांडत पत्रकारीतेवर प्रकाश टाकला. या पत्रकारांचा झाला सन्मान जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार मनोहर परिमल यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. प्रभावी पत्रकारिता पत्रकार स्वप्नील उमप, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रवीण कपिले, शोध पत्रकारिता पुरस्कार प्रदीप भाकरे तर लक्षवेधी पत्रकारिता पुरस्कार योगिनी अर्डक यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याचवेळी सुनील धर्माळे व त्यांच्या पत्नी विनिता धर्माळे नुकतेच ‘केबीसी’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या दोघांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय राज्य शासनातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या लोकनायक बापूजी अणे पुरस्कारासाठी दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अनुप गाडगे, पत्रकार गजानन मोहोड यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या विरोधात ज्यांनी काम केलं, जे खुल्या मंचावर ‘यावेळी 400 पार’च्या घोषणा देत होते, ते चेहरे आठवणीत ठेवा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. माझ्या पराभवामागे विरोधकांपेक्षा आपल्या गोटातीलच काही लोक कारणीभूत आहेत. आमच्यातच घात करणारे लोक होते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवलं. माझा पराभव म्हणजे केवळ नवनीत राणांचा पराभव नाही, तर तो संपूर्ण शहराचा पराभव आहे, असा दावा करत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर बोलताना नवनीत राणा यांनी भावनिक पण तितक्याच आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली. लोकसभेत नुकसान कुणाचं झालं, तर आमच्या मुलांचं झालं, असं म्हणत त्यांनी हा पराभव वैयक्तिक वेदनेशी जोडला. मात्र, ही वेदना गिळून गप्प बसणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय नवनीत राणा शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. याच भाषणात त्यांनी अमरावती शहराच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. भाजपचा महापौर निवडून आला, तर शहरात सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं. आपण खासदार असताना अवघ्या पाच वर्षांत अमरावतीसाठी मेडिकल कॉलेज आणि पायलट ट्रेनिंग सेंटर आणलं, याची आठवण करून देत त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सत्ता असो वा नसो, शहराच्या विकासासाठी मी लढत राहणार, असा संदेश त्यांनी दिला. भाषणादरम्यान एक प्रसंग विशेष चर्चेचा ठरला. मंचाच्या टोकावर उभ्या असताना भाजपच्या काही उमेदवारांनी ‘भाभी, खाली बघा, पडाल’ असं सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर ‘आता मी पडणार नाही’ असं प्रत्युत्तर देत त्यांनी आपल्या राजकीय संघर्षाचा संदर्भ दिला. आतापर्यंत खूप काही सहन केलं, पण आता परिस्थिती बदलली आहे. ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, त्यांच्याशी मी आता सौम्य वागणार नाही, असा इशाराच त्यांनी या विधानातून दिला. नवनीत राणा यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि त्यांच्या पत्नीवरही जोरदार टीका केली. मी कोणाची चमचेगिरी करण्यासाठी उभी नाही, असं ठणकावून सांगत त्यांनी थेट खोडके दाम्पत्यावर निशाणा साधला. कोणी घड्याळ घेऊन उभं आहे आणि उलटे काटे फिरवायचा प्रयत्न करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी ते तर त्यांचं नशीब होतं की मी विधानसभेत फिरले नाही, नाहीतर दोन हजारांनी निवडून आले असते ना, दहा हजारांनी पडले असते, इतकी ताकद या भगव्यामध्ये आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. आपल्या राजकीय ताकदीचा उल्लेख करताना नवनीत राणा म्हणाल्या की, 2019 मध्ये याच लोकांनी मला निवडून दिलं होतं. माझी ताकद लोकांमध्ये आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी उभी आहे, कोणाच्या दावणीला बांधून चमचेगिरी करण्यासाठी नाही. ‘आता पुढे कशी खासदार होते ते आम्ही बघतो’ असं म्हणणाऱ्यांना उद्देशून त्यांनी, ‘तुमच्यात दम असेल तर दाखवा’ असा खुला आव्हान दिलं. या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढल्याचं चित्र आहे. ओवैसींवरही थेट निशाणा भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात नवनीत राणा यांनी ओवैसींवरही थेट निशाणा साधला. काल अमरावतीत ओवैसी येऊन गेले, बाहेर पाकिस्तान आणि हैदराबादमध्येही पाकिस्तानच असल्याची टीका करत त्यांनी वादग्रस्त विधान केलं. तुम्ही किती मुलं जन्माला घालायची हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही, आधी तुम्ही देशात किती घुसखोर घुसवले ते सांगा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवटी, ज्यांनी माझ्याकडून पैसे घेऊन माझ्यासोबत बेईमानी केली, अशा लोकांना यावेळी धडा शिकवा, असं आवाहन करत त्यांनी आपल्या तीन भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. चौथा उमेदवार कोण असेल, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवत राजकीय उत्सुकता आणखी वाढवली आहे.
सांगोल्यात कारखान्यावर दुसऱ्या दिवशीही उपोषण:सांगोला तालुक्यात शेतकऱ्यांच्याउसात साखर निघत नाही का
सांगोला तालुक्यातील वाकी(शिवणे) येथील धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक चार या कारखान्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाचा पहिला हप्ता ३ हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊस बिलाचा पहिला हप्ता ३ हजार रुपये दिला असताना सांगोला तालुक्यातील वाकी(शिवणे) येथील धाराशिव कारखाना युनिट क्रमांक चार हा कारखाना तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता २ हजार ८०० रुपये देत आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर होऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पहिला हप्ता ३ हजार रुपये मिळावा, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने कारखाना आमरण उपोषण सुरू केले. विठ्ठल सहकारी कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वाहने वाकी येथील धाराशिव युनिट क्रमांक चारला गाळप होतात. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र ३ हजार १ रुपयांनी पहिली उचल दिली जाते. त्याचवेळी सांगोला तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना मात्र २ हजार ८०० रुपये पहिली उचल दिली जाते आहे. हा कारखाना सांगोला तालुक्यातच असूनही सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. वाकी येथील कारखान्यात तयार होणारी कच्ची साखर, बग्यास, मोलासेस इत्यादी सर्व गोष्टी वाहतूक करून विठ्ठल कारखाना येथे घेऊन जातात. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. दरम्यान आज कारखान्याच्या वतीने सुरेश सावंत, काझी, पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आता २ हजार ८०० रुपये जमा केले आहेत. दिवाळीत २०० रुपये प्रति टन जमा केले जाईल, असे सांगितले. मात्र गतवर्षी ठरल्याप्रमाणे राहिलेले १०० रुपये अद्यापही दिले नाहीत. सांगोला तालुक्यात शेतकऱ्यांच्या उसात साखर निघत नाही का
कष्ट आणि प्रामाणिकतेच्या जोरावर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती बदल होऊ शकतो, हे अर्णव शैक्षणिक संकुलाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. एखाद्या चित्रपटांची स्टोरी निर्माण होईल, असा हा इतिहास असून आम्हाला कलाकार म्हणून संधी मिळाल्यास आम्ही या शाश्वत सत्याचे रूपांतर सुंदर कथेमध्ये करू, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी (कै) बाबूरावजी डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे उपस्थित होते. अर्णव शैक्षणिक संकुल सासुरे फाटा वैराग (ता. बार्शी) येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि कै. बाबूरावजी डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सचिव प्रताप दराडे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सिनेअभिनेता सुमित तनपुरे, सभापती अनिल डिसले, अरुण बारबोले (अध्यक्ष, यशोदा शि.प्र.मं. बार्शी), संस्था सचिव रवींद्र कापसे, मुख्याध्यापिका अर्चना डिसले, अर्णव कापसे, उद्योगपती सचिन डिसले आदी मान्यवर उपस्थित होते. माजी शिक्षक आमदार सावंत बोलताना म्हणाले की, सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारी ही संस्था असून क्वांटिटी सोबत क्वॉलिटी देखील जपण्यात यशस्वी झाली आहे. सूर्यकांत क्षीरसागर (कृषी भूषण पुरस्कार), राणुबाई जगताप महिला भूषण पुरस्कार), प्रदीप कापसे (डिजीटल पत्रकारिता), विजय निलाखे (वर्तमान पत्रकारिता पुरस्कार), भीष्माचार्य चांदणे (साहित्य पुरस्कार), गणेश शालगर (युवा उद्योजक पुरस्कार), नझीर अब्दुल शेख (शैक्षणिक पुरस्कार), प्रा. किरण देशमुख (क्रिडा पुरस्कार), भगवंत साळवे (आदर्श शिक्षक पुरस्कार), तुकाराम मस्के (आध्यात्मिक पुरस्कार), शशिकांत लांडगे (कला पुरस्कार), प्रसाद मोहिते (सामाजिक पुरस्कार) यांना सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
ब्रिटिश कालीन पोलिस आणि आत्ताचे पोलिस यामध्ये अमुलाग्र बदल असून तत्कालीन पोलिस हे ब्रिटिशांसाठी होते, आताचे पोलीस हे आपल्या रक्षणासाठी आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर कमी करावा. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर यांचा परिणाम होतो, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी केले. ते पोलिस स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर प्राचार्य पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक लातूरकर, पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बोरीगिड्डे म्हणाले की, २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज दिला. पोलिस दलात येण्यासाठी तुम्ही शारीरिक तंदुरुस्त पाहिजे, त्यासाठी व्यायामाची सवय लावा, निर्णय क्षमता असली पाहिजे. समाजात चांगल्या ऐवजी जे काही वाईट घडत असेल, तर त्याची माहिती तुम्ही पहिल्यांदा माहिती आई- वडिलांना द्या, त्यानंतर गुरुजी आणि शेवटी पोलिसांना द्या असे त्यांनी सांगितले. यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थ्यांना दैनंदिन कामकाजाची माहिती व शस्त्रांची माहिती देण्यात आली. मोबाइलच्या चुकीच्या वापरामुळे मुली पळून जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून अल्पवयीन मुलींना आई- वडिलांच्या कष्टाची जाण असली पाहिजे. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कोणताही निर्णय घेत असताना सज्ञान झाल्यावर घ्या.मोबाईलचा वापर करून करिअर करणारे देखील विद्यार्थी आहेत, आणि याचा गैरवापर करून आयुष्याची राख रांगोळी करणारी देखील विद्यार्थी आहेत. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा पाया आताच घातला पाहिजे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीभोवती सुरू असलेल्या वादाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या निवडणुकीला तातडीने स्थगिती देत निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार होणारी निवडणूक तूर्तास थांबली असून, संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एमसीएच्या सत्तासंघर्षात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणाला सुरुवात झाली ती भारताचा माजी क्रिकेटपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असलेल्या केदार जाधव यांच्या गंभीर आरोपांमुळे. केदार जाधव हे सध्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही आहेत. त्यांनी थेट आरोप करत सांगितले की, एमसीएची सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी रोहित पवार यांनी संघटनेत मनमानी पद्धतीने सदस्यसंख्या वाढवली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एमसीएची सदस्यसंख्या अवघ्या काही काळात 154 वरून थेट 571 पर्यंत नेण्यात आली, आणि ही वाढ निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली, जेणेकरून मतदानात आपल्याला अनुकूल निकाल मिळावा. केदार जाधव यांनी केलेले आरोप अधिक गंभीर ठरतात कारण नव्याने सदस्य केलेल्यांमध्ये रोहित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या यादीत रोहित पवार यांची पत्नी कुंती, सासरे सतीश मगर, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सदानंद सुळे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर रोहित पवार यांच्या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारीदेखील एमसीएचे सदस्य करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय अनेक राजकीय नेते आणि काही शैक्षणिक संस्थांनाही ऐन निवडणुकीपूर्वी सदस्यत्व देण्यात आल्याचेही केदार जाधव यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रक्रियेची गंभीर दखल घेत निवडणुकीला स्थगिती दिली आहे. न्यायालयाने आदेश देताना स्पष्टपणे नमूद केले की, निवडणुकीदरम्यान घडलेले प्रकार आणि सदस्यसंख्येतील अचानक वाढ पाहता या प्रकरणात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी रोजी होणार असून, तोपर्यंत एमसीएची निवडणूक प्रक्रिया गोठवण्यात आली आहे. या संपूर्ण वादामागची पार्श्वभूमी पाहता, एमसीए निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले होते. मात्र, 24 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर संघटनेचे जुने सदस्य श्रीपाद हळबे आणि इतर काही सदस्यांनी आक्षेप घेतले होते. त्यांच्या मते, काही उमेदवारांना नियमबाह्य पद्धतीने संधी देण्यात आली असून, अंतिम यादी जाहीर करताना पारदर्शकता पाळली गेली नाही. श्रीपाद हळबे आणि इतरांनी या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकती दाखल केल्या होत्या. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस कारण न देता या हरकती फेटाळून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 24 ऑक्टोबरलाच थेट अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली, ज्यामुळे हरकतींचा विचारच करण्यात आला नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याच कारणामुळे श्रीपाद हळबे आणि अन्य सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. 4 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत केवळ क्रिकेट प्रशासनच नव्हे, तर राजकारणही केंद्रस्थानी आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता एमसीएची निवडणूक कधी आणि कशा पद्धतीने होणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 4 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्या निर्णयावर एमसीएच्या सत्तासंघर्षाचे भवितव्य ठरणार आहे. क्रिकेटच्या प्रशासनात पारदर्शकता राखली जाणार की राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
स उत्तर सोलापूर शेतीतील वाढते खर्च, मातीची घटती सुपीकता आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली असताना, उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायतीने महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा ठोस आदर्श उभा केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत ग्रामपंचायत गुळवंचीच्या वतीने गावातील नऊ महिला शेतकऱ्यांना ‘आदर्श सेंद्रिय शेती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक पूनम दुध्याळ यांनी मार्गदर्शन या कार्यक्रमास सरपंच सुनील बापू जाधव, उपसरपंच जयश्री तांबे, सदस्य विष्णू भोसले, ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी सरवदे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक पूनम दुध्याळ, कणके, सीआरपी रंजना कोरके, अश्विनी कोरके, विजया बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गुळवंची ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे महिला सबलीकरण, शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही बाबींना एकाच वेळी चालना मिळाली असून, इतर गावांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे. या महिलांचा पुरस्काराने झाला सन्मान उमा गायकवाड, उल्पा बोराडे, वाला पवार, वैशाली चव्हाण, मंगल कोरके, अपर्णा भोसले, मीनाक्षी तांबे, विजया बोराडे आणि अश्विनी कोरके यांचा समावेश आहे.
वैराग भविष्य काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठमोठे कोल्ड स्टोरेज, टमाट्याचा प्रकल्प आणायचा आहे कांद्याचा प्रकल्प आणायचा आहे आणि फक्त परवानगीची मी प्रशासनाची वाट बघतोय काही अधिकाऱ्यांवरून व शासनाने परवानगी दिली तर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांकरिता मोफत हॉस्पिटल सुद्धा उभा करण्याचा या ठिकाणी माझा मानस आहे, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना कुठेही दवाखान्यामध्ये खर्च होऊ नये, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. रुई (ता .बार्शी ) येथे खंडोबा मंदिर सभामंडप चे लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. यावेळी रुई येथे भाजपा युवा मोर्चा आयोजित सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड संचालक नेताजी घायतिडक, संचालक सुरेश उर्फ सूर्यकांत गुंड, अभिजीत कापसे यांचा देखील सन्मान करण्यात आला.. तसेच मा.आ.राजाभाऊ राऊत यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या श्री खंडोबा मंदिर सभामंडप चे लोकार्पण करण्यात आले. गाव भेटीदरम्यान बार्शी तालुक्याचे विकासरत्न माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी गावकऱ्यांसोबत गावातील अडीअडचणी,प्रश्न याबाबत माहिती घेऊन चर्चा करताना म्हणले की, अपक्ष आमदार असताना देखील बार्शी तालुक्यात झपाट्याने कामे केली कुठेही कमी पडलो नाही. कारण मला माहित होतं फडणवीस साहेबांचा आपल्यावरती हात आहे .भविष्यातही फडणवीस साहेबांमुळे तालुक्याचे कल्याण होणार आहे. यावेळी कार्यक्रमास मा जि प सदस्य संतोष निंबाळकर, अरूण कापसे ,माजी सभापती अनिल डिसले,बाबासाहेब कापसे,माजी सभापती लक्ष्मण संकपाळ , सरपंच सुशील दळवे , केशव घोगरे, अरूण सावंत, विभाग प्रमुख सुरेश घोडके सोसायटी संचालक उपस्थित होते. वैरागसाठी एमआयडीसी उद्योग आणण्यासाठी मी शेळगाव, धामणगाव, रातंजन ,सुर्डी वैराग या ठिकाणी ३०० ते ५०० एकर माळरान जमीन आहे ती आपण शासनाकडून ताब्यात घेऊन त्या ठिकाणी उद्योजक अंबानी, टाटा, किंवा मित्तल या उद्योगांपैकी आपण एक, दोन उद्योग बार्शी तालुक्यात आणून प्रकल्प उभारण्यास प्रयत्नशील असल्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत बोलताना म्हणाले.
सीना नदीपात्रामध्ये चांदणी, खासापुरी, सीना कोळेगाव,भोगावती नदी पात्रातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे पूर स्थिती निर्माण झाली होती.अतिवृष्टीसह पूर स्थितीमुळे ट्रांसफार्म १०५, लघुदाब, उच्च दाब २३३२ पोलच नुकसान झाले होते. तब्बल तीन महिने ओलांडले तरीदेखील नदीकाठच्या वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पुरामध्येच तारले महावितरण कंपनीने जाळले म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात सीना नदीपात्रामध्ये चांदणी, खासापुरी, सीना कोळेगाव, भोगावती नदी पात्रातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. महावितरण कंपनीच्या ट्रांसफार्मरसह विद्युत पोल जमीनदोस्त झाले होते.तीन महिने ओलांडून गेले तरी बहुतांश ठिकाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास महावितरण कंपनीला अद्याप यश आले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरीसह नदीवरून घागर खांद्यावर घेऊन पाणी पिण्यासह पशुसंवर्धनासाठी पाणी आणण्याची वेळ आली आहे. तरटगाव, घाटणे, मलिकपेठ, एकुरके, बोपले, भोयरे, आष्टे,पासलेवाडीसह नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली होती. सदर जमीन वापसा स्थितीमध्ये आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीवर खर्च करून जमिनीकडे बघण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा,ज्वारी पिक पेरणीस शेतकऱ्यांना मुकावे लागले आहे. अक्षरशः शेतकऱ्याने जगावे की मारावे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणी वाली आहे, की नाही. कागदावरील घोडे किती दिवस नाचवणार. अक्षरशा शेतकऱ्याचे आर्थिक ताळेबंद घसरले आहे. तरी देखील प्रशासनासह महावितरण कंपनीला जाग येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता जी.जी.पटवेगर यांना विचारणा केली असता त्यांनी, ‘मी मिटींगमध्ये आहे, मिटींग संपल्यानंतर बोलतो असे म्हणून बोलणे टाळले. सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांत सप्टेंबर महिन्यात सीना नदीला पुर आल्याने शेतकऱ्यांचा अंतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेतजमीन पाण्याखाली गेली होती. सदर जमीन वापसा स्थितीमध्ये आल्याने शेतकऱ्यांनी मशागतीवर खर्च करून जमिनीकडे बघण्याची वेळ येऊन ठेपली. तीन महिन्यापासून प्रतिक्षा सीना नदीला आलेल्या महा पुरामुळे पडझड झालेले विद्युत खांब आणि डी पी. जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे गेली तीन महिने वीज पुरवठा खंडित झाला होता तरी अजून ही हजारो शेतकरी पाण्यावाचून वंचित राहिले आहेत. सध्या पीक पाणी पाण्यावाचून जळत आहेत.शेतकरी बांधवांनी मशागत करून गहू लागवडी साठी रान तयार करून गेली 3 महिने वीज पुरवठा सुरळीत होण्याची आजतागायत वाटच पाहत आहे. -महासिद्ध कोरे, शेतकरी, जगणे मुश्किल झाले पशुधन पाण्या अभावी खाटकला विकायची वेळ आली आहे..तरी एक ते दीड हजार शेतकरी आता वर्ष भराचे अन्न पिकवू शकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता जगणे मुश्किल झाले आहे. - पांडुरंग रासेराव, उपसरपंच.
खांडवी येथील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली विधानभवन कामकाजाची प्रणाली
खांडवी (ता.बार्शी) येथील यशवंत विद्यालयाने वार्षिक शैक्षणिक अभ्यास सहल आयोजित करून मुंबई येथील राज्याच्या कायदेमंडळाचे केंद्र असलेल्या विधानभवनाच्या कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या निमित्ताने विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या प्रत्यक्ष कार्यप्रणालीचे जवळून निरीक्षण करण्याची संधी देखील मिळाली. इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी या अभ्यास भेटीत सहभाग घेतला होता. विधानभवनाच्या वास्तूची माहिती देताना मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना विधानसभा आणि विधानपरिषद यांमधील फरक, लोकप्रतिनिधींची निवड प्रक्रिया आणि कायदे तयार करण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सभागृहात जाऊन आसनव्यवस्था, अध्यक्षांचे दालन आणि ऐतिहासिक गॅलरीचे दर्शन घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शक शिक्षकांनी उत्तरे दिली. प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धेश्वर शिंदे, राजेंद्र शिंदे, मांजरे, संतोष खोगरे, प्रमोद जाधव, राम घाडगे या शिक्षक वृंदांनी या भेटीचे नियोजन केले होते. विधानभवन भेटीसोबतच विद्यार्थ्यांनी मुंबईतील इतर ऐतिहासिक स्थळे आणि संग्रहालयांनाही भेट दिली. केवळ पुस्तकातून नागरिकशास्त्र शिकण्यापेक्षा, प्रत्यक्ष विधानभवनात जाऊन तिथे होणारे कामकाज पाहिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे आणि लोकशाहीवरची निष्ठा अधिक दृढ झाली आल्याची भावना यानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. तसेच या अभ्यास सहलीच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्था अध्यक्ष, ग्रामस्थ आणि पालकांनी कौतुक केले आहे.
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना प्रचारालाही कमालीचा वेग आला आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये आता अवघे सात दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष ताकदीनिशी मैदानात उतरले असून, सभा, रोड शो, पदयात्रा, कार्नर सभा आणि घरोघरी संपर्क मोहिमा यामुळे शहरांचा कानाकोपरा राजकारणाने व्यापलेला दिसतोय. अशा निर्णायक टप्प्यावर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तयार करण्यात आलेले प्रचार गीत राज्य निवडणूक आयोगाने नाकारल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने विशेष प्रचार गीत तयार केले होते. मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आणि भावनिक अपील निर्माण करण्यासाठी संगीत, शब्द आणि प्रसिद्ध कलाकारांचा वापर करण्याची रणनीती भाजपने आखली होती. त्यानुसार हे गीत तयार करण्यात आले होते आणि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ते मोठ्या प्रमाणावर वापरण्याचा पक्षाचा मानस होता. मात्र, प्रचाराला गती मिळण्याआधीच या गीतावर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आणि प्रचारासाठी वापरण्यास नकार दिला. या प्रचार गीतामध्ये ‘भगवा’ हा शब्द वापरण्यात आल्याने निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक आचारसंहितेच्या निकषांनुसार धार्मिक किंवा भावनिक स्वरूपाचे शब्दप्रयोग प्रचारात आक्षेपार्ह ठरू शकतात, असा ठपका ठेवत आयोगाने हे गीत नाकारले असल्याची माहिती आहे. आयोगाच्या मते, अशा शब्दप्रयोगामुळे मतदारांवर विशिष्ट भावनिक किंवा धार्मिक प्रभाव पडू शकतो, जो निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला बाधा आणणारा ठरू शकतो. त्यामुळे भाजपला हे गीत प्रचारात वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. या प्रचार गीताला आणखी एक विशेष महत्त्व होते, कारण हे गीत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते आणि सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी गायले होते. मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय कलाकारांचा आवाज असल्यामुळे हे गीत मतदारांमध्ये सहज पोहोचेल, असा भाजपचा अंदाज होता. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात, जिथे प्रचारासाठी नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर केला जातो, तिथे या गीताच्या माध्यमातून वेगळा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आयोगाच्या निर्णयामुळे भाजपच्या या प्रचारात्मक रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक राहिले आहेत. अंतिम टप्प्यात प्रचाराचा जोर अधिक वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. स्टार प्रचारकांच्या सभांची संख्या वाढणार असून, प्रमुख नेत्यांचे रोड शो, पदयात्रा आणि मोठ्या सभा शहरभर आयोजित केल्या जाणार आहेत. याचबरोबर, आरोप-प्रत्यारोपांची धारही अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला जात असताना, दुसरीकडे विरोधकांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. भाजपकडून गेल्या कार्यकाळातील महापालिकेतील विकासकामांचा दाखला देत प्रचार अधिक आक्रमक करण्यात आला आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, जलवाहिन्या, आरोग्य सेवा, शिक्षण आणि स्वच्छता या मुद्द्यांवर भाजप आपली कामगिरी मांडत आहे. मतदारांच्या घराघरात पोहोचण्यासाठी व्यापक संपर्क मोहीम सुरू असून, विशेषतः कर्मचारी, उद्योजक, व्यापारी आणि मध्यमवर्गीय मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रचार गीत नाकारले गेले असले तरी भाजपकडून डिजिटल माध्यमे, सामाजिक नेटवर्क आणि थेट संवादाच्या माध्यमातून प्रचाराची धार कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रचार गीतावर बंदी भाजपसाठी अडथळा की नवी रणनीती निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे प्रचारातील नियम, मर्यादा आणि आचारसंहितेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक शब्द, प्रत्येक घोषणा आणि प्रत्येक माध्यमावर बारकाईने नजर ठेवली जात असल्याचे हे उदाहरण मानले जात आहे. अवघ्या सात दिवसांत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, प्रचार गीतावर घातलेली बंदी भाजपसाठी अडथळा ठरते की नव्या रणनीतींना चालना देते, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शालेय वयातच दातांची निगा राखणे आवश्यक:कन्या शाळेत डॉ. गोपाळ जाजू यांचे मार्गदर्शन
ज्याप्रमाणे आपण शरीराच्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे दंत आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. लहान वयातच दातांच्या स्वच्छतेच्या योग्य सवयी लावल्यास भविष्यातील गंभीर दंतविकार टाळता येतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध दंततज्ज्ञ डॉ. गोपाळ जाजू यांनी केले. रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ लातूर अस्पिरेशनच्या वतीने जिल्हा परिषद कन्या प्रशालेत आयोजित 'दंत जनजागृती शिबिरा'त ते बोलत होते. मुख्याध्यापक भगवान माळी, डॉ. नम्रता जाजू, अध्यक्षा कौशल्यादेवी सोनकवडे व सचिव वनिता लाचुरिया यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. वाढत्या दंत समस्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींमध्ये जागृती करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात विद्यार्थिनींना टूथपेस्टचे वाटप करण्यात आले. मिकी माऊसच्या उपस्थितीने विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित नृत्ये सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मैनावती कावळे, माधुरी वलसे व शाळा प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. मुलांच्या 'डेंटल हायजीन'कडे लक्ष द्या लहान मुलांमध्ये चॉकलेट, जंक फूड आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे दातांचे विकार वाढत आहेत. पालकांनी मुलांना गोड पदार्थांपासून दूर ठेवून जेवणानंतर दात घासण्याची सवय लावावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. दातांमध्ये थोडाही त्रास जाणवल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तातडीने दंत शल्यचिकित्सकांचा सल्ला घ्यावा. मुलांच्या सुंदर हास्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी पालकांची भूमिका या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची आहे, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
दीपक कांबळे | अहिल्यानगर बिबट्यांचे मानवावर वाढलेल्या हल्ल्यांमुळे शेती उध्वस्त होण्याची धास्ती वाढली आहे. वनविभागाने, उपद्रवी हल्लेखोर बिबटे जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. पकडलेल्या बिबट्यांना ठेवण्यासाठी ८० बिबट क्षमतेचे निवारा केंद्र उभारण्याचे नियोजन होते. परंतू, मागील ३ महिन्यांत वाढलेला उपद्रव पाहता, वनविभागाने २०० बिबटे ठेवण्यास सक्षम असलेले केंद्र उभारणीसाठी मंगळवारी ४७ कोटींचा प्रस्ताव पाठवला. जिल्ह्यात ९७० गावांत बिबट्यांचा वावर आहे, हे बिबटे जंगल क्षेत्रात नव्हे, तर लोकवस्तीवर तसेच शेतात वास्तव्यास आहेत. वस्तीवर कोंबड्या, कुत्रे, शेळ्या आदी पाळीव प्राणी सोपे शिकार असल्याने, बिबट्यांचा मुक्काम शेतात लोकवस्तीवरच आहे. मागील काही वर्षांत लहान मुले, महिला व शेतकऱ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. वर्षभरात सुमारे ११ मृत्यू झाले असून २३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापार्श्वभूमीवर वनविभागाने जेरबंद केलेल्या बिबट्याला निसर्गात मुक्त करण्याऐवजी वनतारा अथवा इतर कोणत्याही निवारा केंद्रात जेरबंद बिबट्यांना स्थलांतरीत करण्याची परवानगी मागितली आहे. वनविभागाने बिबटे सांभाळण्यासाठी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर शिवारा उपचार केंद्राजवळच ८० बिबट क्षमतेचे निवारा केंद्र उभारणीचे नियोजन आखले होते. परंतू, जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या पाहता, २०० बिबट क्षमतेचे केंद्र उभारणीसाठी ४७ कोटींचा आराखडा तयार केला. बिबट निवारा केंद्रात कसे काम होईल नव्याने २०० क्षमेतेचे बिबट निवारा केंद्र प्रस्तावित करणारा, जिल्ह्यातील बिबट्यांचा वाढलेला उपद्रव, मृत्यू आदी गंभीर स्थितीबाबत अवगत केले आहे. केंद्र उभारणीसाठी सुमारे ४७ कोटी खर्च अपेक्षीत आहे. पिंजऱ्याचा आकार मोठा असल्याने, त्यात बिबट्या मुक्तपणे फिरू शकतो. रात्री व दिवसासाठी बिबटे ठेवण्यासाठी वेगळे कप्पे असतील. या केंद्राचा प्रस्ताव अहिल्यानगरहून नाशिकला पाठवला आहे. त्यास सेंट्रल झू ऑथोरिटीच्या परवानगीसाठी दिल्लीला पाठवले जाईल. १५ जानेवारीला दिल्लीत मिटिंग होऊन त्यावर निर्णय अपेक्षीत आहे. जेरबंद केलेले बिबटे ठेवण्यासाठी निवारा केंद्र नाही ^या बिबट्यांना वनतारा अथवा जुन्नरमध्ये स्थलांतरीत करण्याची परवानगी आवश्यक आहे. बिबट्यांच्या प्रश्नाबाबत मुंबईला मुख्यमंत्र्यांसमवेतही बैठकी झाल्या आहेत. आता आम्ही नव्याने २०० बिबट क्षमतेचे निवारा केंद्र उभारणीसाठी प्रस्ताव दिला. धर्मवीर सालविठ्ठल, उपवनसंरक्षक, वनविभाग. टाकळी शिवारात बिबट्या जेरबंद कोपरगाव तालुक्यातील टाकळी, येसगाव शिवारात मंगळवारी पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. यापूर्वी हल्लेखोर बिबट्या ठार केल्यानंतरही बिबट्याचा सुळसुळाट पहायला मिळाला. माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या शेतात हा बिबट्या जेरबंद झाला. वनाधिकारी एम. वाय. शेख, बी. एच. जाधव, वनरक्षक किंकर यांनी बिबट्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित केला.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीवर पाथर्डी तालुक्यातील बळीराजाने मात करत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर उभारलेल्या संत्रा, मोसंबीच्या फळबागातून यावर्षी देखील चांगले उत्पन्न घेतले आहे. दररोज सुमारे पाचशे टन संत्री,मोसंबी यांची निर्यात होत आहे. फळबागांचा परिसर म्हणून ओळख असलेल्या करंजी येथील संत्रीला काश्मीरमध्ये मोठी पसंती मिळाली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात जम्मू काश्मीर राज्यात संत्रीची निर्यात झाली. करंजी गावाची ऑरेंज व्हिलेज म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. तालुक्यातील करंजी,भोसे, दगडवाडी, सातवड,घाटशिरस, जोडमोहोज, लोहसर,खांडगाव, कौडगाव,जोहारवाडी,देव राई, निंबोडी, वैजुबाभळगाव, शिराळ चिचोंडी,कोल्हार, तिसगाव,मिरी या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केलेली आहे. टँकरने पाणी देऊन फळबागा जगवण्याचे काम येथील शेतकऱ्यांनी केले आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली असली तरी शेतकऱ्यांनी मोठे कष्ट करून फळबागा जगवल्या आणि राष्ट्रीय पातळीवर संत्रा मोसंबीला मिळालेले मार्केट महत्त्वाचे ठरल्याने करंजीसह परिसरातील संत्रा जम्मू-काश्मीर, केरळ या राज्यात पोहचवला. सध्या ५५ ते ६० रुपये किलो प्रमाणे संत्र्याला भाव मिळत आहे. दररोज सुमारे पाचशे टन संत्रा करंजी येथून बाहेर राज्यात जात आहे. करंजी, देवराई, निंबोडीफाटा, तिसगाव पर्यंत बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनी गोडाऊन उभारून त्या ठिकाणी संत्रा मोसंबीची प्रतवारी करून तो संत्रा परराज्यात पाठवला जात आहे. सध्या संत्र्याची दररोज पाचशे टन आवक होत असून त्याची प्रतवारी करून तो परराज्यात पाठवला जात असल्याचे रफिक शेख, सुनील अकोलकर, बद्रीनाथ अकोलकर, बाळासाहेब अकोलकर, शाकीत अचलपूर, निसारभाई वरुड या शेतकऱ्यांनी सांगितले. करंजी परिसरात संत्रा बागांचे मोठे क्षेत्र करंजीसह परिसरातील दहा किलोमीटर परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. परराज्यातील व्यापारी या परिसरातील संत्रा बाग विकत घेऊन त्यांची परराज्यात निर्यात करतात. फळ तोडणीला मजूर कमी पडत असल्याने व्यापाऱ्यांनीच बाहेरून मजूर आणून त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे.
येथील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या परिसरात महाराष्ट्रातील पहिले ट्युलीप गार्डन साकारले आहे. या अभिनव उपक्रमामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे वेधले गेले आहे. माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा प्रयोग प्रत्यक्षात आला आहे. ट्युलीप ही फुले प्रामुख्याने थंड हवामानात फुलतात. देशात काश्मीर खोऱ्यातील ट्युलीप गार्डन हे याचे प्रमुख उदाहरण मानले जाते. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान लाखो पर्यटक काश्मीरला भेट देतात. हीच संकल्पना तुलनेने उष्ण हवामान असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात प्रत्यक्षात आणणे मोठे आव्हान होते. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी, चिकाटी आणि कृषीविषयक अनुभवामुळे हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले गेले. कृषी महाविद्यालये ही केवळ शिक्षण देणारी केंद्रे न राहता संशोधन व नवनवीन प्रयोगांची प्रयोगशाळा बनली पाहिजेत, ही भूमिका थोरात यांनी कायम मांडली आहे. त्याच विचारातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या फुलशेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि संगमनेरच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा प्रभावी वापर व्हावा, या उद्देशाने ट्युलीप गार्डनची संकल्पना साकारण्यात आली. या गार्डनसाठी हॉलंड येथून उच्च प्रतीचे ट्युलीप कंद आयात करण्यात आले. हे ट्युलीप गार्डन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन आणि प्रात्यक्षिकांचे प्रभावी माध्यम ठरणार असून, संगमनेर तालुक्याला कृषी पर्यटनाचा नवा चेहरा मिळून देणारे ठरणार आहे. माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे ट्युलीप गार्डन म्हणजे कृषी, संशोधन, शिक्षण आणि पर्यटन यांचा सुंदर संगम असून, महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील हा प्रयोग मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. आठ विविध जातींचे ट्युलीप्स पूर्ण बहरात तज्ज्ञ कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तापमान नियंत्रण, मातीची निवड, पाणी व्यवस्थापन आणि खतांचे योग्य नियोजन करण्यात आले. दीर्घकालीन मेहनतीनंतर गुलाबी, पांढरे, पिवळे, लाल, जांभळे आणि नारंगी रंगांच्या आठ विविध जातींचे ट्युलीप्स सध्या पूर्ण बहरात आले आहेत. गार्डनमध्ये प्रवेश करताच रंगीबेरंगी फुलांच्या रांगा, आल्हाददायक वातावरण आणि दरवळणारा सुगंध पाहून ‘आपण काश्मीरमध्येच आलो की काय?’ असा अनुभव पर्यटक व्यक्त करत आहेत.
राज्याचे कुलदैवत खंडेराय म्हणजे शौर्य,भक्ती आणि सेवेचा अद्वितीय संगम असून अशा धार्मिक सोहळ्यांमुळे शहराच्या आध्यात्मिक व धार्मिक वैभवात मोलाची भर पडते. सत्कर्म व धर्माचरणातून जीवनातील संकटे दूर होतात, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. कसबा विभागातील खंडोबा भक्त व सेवानिवृत्त शिक्षक अशोक साठे यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून खंडेरायाचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साठे परिवाराने सामूहिक स्वरूपात सुरू केलेल्या या परंपरेला भाविकांचा प्रतिसाद लाभत आहे. नाशिक,पैठण, अहिल्यानगर, शेवगाव व बीड परिसरातूनही भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नगराध्यक्ष अभय आव्हाड, बाळासाहेब सोनटक्के,रामेश्वर लाहोटी,नगरसेवक सुभाष बोरुडे,मंगल कोकाटे,अमोल गर्जे, मुकुंद लोहिया, नाशिकचे नंदकुमार भुतडा, कालभैरवनाथ देवस्थानचे पुजारी दादा मर्दाने, मोहन सुडके महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम पार पडला. यात कसबा विभागातील महिला भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विवाहाचे धार्मिक विधी सामूहिकरीत्या पार पाडले. शनिवारी सायंकाळी लाहोटी वाडा येथील खंडोबा मंदिरातून देवाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी,पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि जयघोषात काळभैरवनाथ देवांनाही सोबत घेत मिरवणूक विवाहस्थळी पोहोचली.विवाहस्थळी म्हाळसादेवीची नववधू रूपातील आकर्षक सजावट करण्यात आली होती.फुलांची सजावट,रांगोळ्या व सुशोभित मंडपाने परिसर नटला होता.वेदमंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या घोषात खंडेरायाचा विवाह सोहळा झाला.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.आमदार राजळे म्हणाल्या, साठे कुटुंब धार्मिक व सेवाभावी म्हणून परिचित आहे. कसबा विभाग प्राचीन मंदिरांसाठी ओळखला जातो. खंडोबा देवाची उपासना राज्यभर होत असून अशा सार्वजनिक धार्मिक सोहळ्यांमुळे शहरात अध्यात्मिक ऊर्जा वाढते आणि सकारात्मक चळवळ उभी राहते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक साठे,सिंधू साठे,अजय साठे,अनिल साठे,परिमल बाबर,अर्चना साठे,अनुराधा साठे,कृष्णा साठे आदींनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सर्व क्षेत्रात आपले योगदान द्यावे. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक काम करावे. आजच्या तरुणांनी प्रत्येक कामात वेळेचे नियोजन, अचुकता व सचोटी यांचा अंतर्भाव केल्यास निश्चित यश मिळू शकते. तरुणाईत समाज परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे. , अशा श्रमसंस्कार शिबिरातून त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. सर्जेराव मते यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,सात्रळ (ता. राहुरी) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन श्रीक्षेत्र तांभेरे येथे राष्ट्रपती प्रा. मते यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी श्रीराम जन्मोत्सव समितीचे माजी सचिव चंद्रकांत पवार होते. प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. मते उपस्थित होते. सरपंच डॉ. उमेश मुसमाडे, लक्ष्मणराव गागरे, काकासाहेब ढगे, नंदकिशोर मुसमाडे आदी यावेळी उपस्थित होते. प्रा. मते म्हणाले, आईवडिलांच्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी मनापासून प्रयत्न करावेत. अपयशाने खचून न जाता ती एक संधी म्हणून त्याकडे पहावे. शिक्षणातूनच विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने सर्वांगिण विकास साधावा. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन सुप्त गुणांचा परिपूर्ण विकास साधावा. व्यक्तीमत्त्व विकासातून अपेक्षित असे यश मिळविता येते. याप्रसंगी लक्ष्मणराव आग्रे व दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाचा पुरस्कार प्राप्त ब्लॉगर आदित्य डेरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मेजर ताराचंद गागरे, बाळासाहेब बेलकर, सुनिल गागरे, पंढरीनाथ शेलार, उत्तम मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, जालिंदर बेलकर, रामदास गागरे, विनोद महाराज मुसमाडे, सोपान शेलार, ग्रामस्थ, प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रा. आर. डी. बोरसे, डॉ. बी.एन.नवले, प्रा. डी. एन. घाणे , महेंद्र तांबे व ॲड. अनिल गागरे, प्रा.संदीप राजभोज, डॉ. प्रतिभा विखे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांनी, सूत्रसंचालन डॉ. दीप्ती आगरकर व डॉ. प्रतिभा विखे यांनी, तर आभार प्रा. संदीप राजभोज यांनी मानले.
गावातील अडचणी सोडवण्यास सहकार्य करू- तहसीलदार
तालुक्यातील प्रत्येक गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती घेतली ज्या गावात अडचणी निर्माण होतील त्याला आम्ही सहकार्य करू, असे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी सांगितले. शेवगाव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये अद्याप स्मशानभूमी उपलब्ध नाही किंवा स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न प्रलंबित आहे, त्या सर्व प्रकरणांचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती शेवगाव येथे तहसीलस्तरीय विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती शेवगाव, ग्रामपंचायत शाखेच्या वतीने सदर बैठक मंगळवारी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली. यात स्मशानभूमी नसलेल्या ग्रामपंचायतींची माहिती, उपलब्ध शासकीय अथवा खाजगी जागा, जागा संपादनातील अडचणी तसेच आवश्यक कार्यवाहीबाबत चर्चा झाली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोस निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याप्रसंगी नायप तहसीलदार निलेश वाघमारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र धस, विस्तार अधिकारी सुजित भोंग, आदी उपस्थित होते.
खडसे महाविद्यालय बॉल बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी:आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत मुलींनी मारली बाजी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई महाविद्यालयात नुकतेच आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या. त्यात जी. जी. खडसे महाविद्यालयातील मुलींच्या संघाने एकतर्फी विजयाची नोंद करून लक्ष वेधून घेतले. विजयी संघात भाग्यश्री सोनी, योगिता पाटील, डिंपल मालचे, दीक्षा चौधरी, हर्षिता वरके, पूनम भोई, काजल पाटील, चैताली बेलदार यांचा सहभाग होता. आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर अंतिम सामन्यात देखील या संघाने सरळ दोन सेटमध्ये समोरील संघास पराभूत करून विजय संपादन केला. स्पर्धेत विजयी झालेल्या संघातील भाग्यश्री सोनी, योगिता पाटील , पूनम भोई , डिंपल मालचे यांची जळगाव विभाग बॉल बॅडमिंटन महिला संघात निवड करण्यात आलेली आहे. दरम्यान, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, प्रा.विनोद महाजन, क्रीडा संचालक प्रा. प्रतिभा ढाके उपस्थित होते. खेळाडूंच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, प्राचार्य प्रो. डॉ. हेमंत महाजन यांनी कौतुक केले.
पर्यावरणाचा ढासळत असलेला समतोल आणि पाण्याचे दुर्भिक्ष पाहता पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवता आला पाहिजे. यासाठी विद्यार्थी, रासेयो स्वयंसेवकांनी पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घ्यावे. पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि भूपृष्ठावरून वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून जमिनीची धूप थांबवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन कृषिभूषण नारायण चौधरी यांनी केले. रासेयोच्या शिबिरात ‘पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व आणि भविष्याची स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो एककाचे सात दिवसीय विशेष हिवाळी शिबिर दत्तक गाव हिंगोणे येथे सुरू झाले. ‘शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकासावर विशेष भर' अशी संकल्पना आहे. उद्घाटन ज्ञानप्रकाश मंडळ संस्थेचे सचिव अशोक महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर कोल्हे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी या सात दिवसीय शिबिरात आपले वर्तन व आचरण आदर्श ठेवले पाहिजे. जेणेकरून इतरांना सुद्धा आपल्यामुळे प्रेरणा मिळेल. तसेच शिबिरात राबवले जाणारे विविध उपक्रम, श्रमदानात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. प्रत्येक स्वयंसेवकांनी स्वयंशिस्त पाळण्यावर भर द्यावा. शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी उद्घाटक अशोक फालक यांनी विद्यार्थ्यांना श्रम संस्काराचे महत्त्व पटवून दिले. समाजात वावरत असताना आपण कोणत्या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. रासेयो शिबिरातून व्यक्तिमत्व विकास, समाजसेवेची जाणीव होते. येथील शिस्त पुढील आयुष्यात उपयोगी पडते असे सांगितले. फालक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषिभूषण तथा भालोद येथील सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे व्हाइस चेअरमन नारायण चौधरी होते. संस्थेचे सचिव भास्कर पिंपळे, रावेरच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी सराफ, यावल येथील भाजप गट नेत्या नंदा महाजन आणि सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक, हिंगोणे येथील प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर गाजरे, प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे उपस्थित होते. कृषिभूषण नारायण चौधरींनी पाणलोट व्यवस्थापनाचे महत्त्व आणि भविष्याची स्थिती यावर मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. सूत्रसंचालन कोमल तायडे या विद्यार्थिनीने केले. प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दिनेश महाजन तर आभार शैलेश फालक या विद्यार्थ्याने मानले. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. काशिनाथ पाटील व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. मोहिनी तायडे यांनी सहकार्य केले.
मारुळ (ता.यावल) येथे शासन आपल्या दारी तक्रार निवारण शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, यावल पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराकडे पाठ फिरवल्याने नाराजीचे सूरही उमटले. सर्वसामान्य जनतेच्या शासकीय कामांना गती देण्यासाठी व प्रलंबित तक्रारींचे एकाच छताखाली व जागेवर निवारण होण्यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार शासन आपल्या दारी तक्रार निवारण शिबिर राबवले जात आहे. मारूळ येथे सरपंच स.असद अहमद जावेद अहमद यांनी ग्रा.पं.च्या माध्यमातून मारूळ व चारमळी गावासाठी शिबिर घेतले. त्यात विविध विभागाच्या प्रशासकीय यंत्रणा थेट आपल्या गावात आल्याने नागरिकांमध्ये उत्साह दिसला. महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार बी. एम.पवार अध्यक्षस्थानी होते. शिबिरास फैजपूर मंडळ अधिकारी जी.एन.शेलकर, संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुन सकावत तडवी, पुरवठा लिपिक सागर तेली, पुरवठा विभागाचे शेख नासिर शेख हाफिस, तलाठी आर. एस. जोरवर, आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. साकीब फारुकी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. रेशनकार्ड, घरकुल योजना, संजय गांधी निराधार किंवा अन्य कोणत्याही योजनेसाठी दलालांना पैसे देऊ नका, असे आवाहन करण्यात आले. सय्यद जावेद अहमद, ग्रामपंचायत सदस्य मुख्तारुद्दीन फारुकी, मूर्तेजाअली सय्यद, एकनाथ पाटील, मतीउर रहेमान पिरजादे, हिरामण पाटील, रफत अली आदी उपस्थित होते. चारमळी व मारुळ येथील एनपीसी रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे यावर नागरिकांचा जास्त जोर दिसला. संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींकडे जन्म दाखला उपलब्ध नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकाऱ्यांकडील वयाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे, दिव्यांगांना तालुक्याच्या ठिकाणी दिव्यंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस शिबिर घेण्याची मागणी पुढे आली. रेशनकार्डवर धान्य देण्याची मागणी
भरधाव डंपरने घेतला एका युवकाचा जीव:जामनेर-फत्तेपूर रोडवर अपघात
फत्तेपूरहून येणाऱ्या भरधाव डंपरने शहापूर गावाजवळ मोटारसायकलला धडक दिल्याने तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक डंपरसह पसार झाला. काही महिन्यांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी डंपर चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही डंपर चालकांवर कारवाई झाली नाही. या आदेशाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केला. जामनेर-फत्तेपूर रस्त्यावरील शहापूर धरणाजवळ सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास फत्तेपूरकडून येणाऱ्या भरधाव डंपरने जामनेरकडून फत्तेपूरकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. ही दुचाकी कसबा पिंपरी येथील गणेश भारत माळी चालवत होता. गणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही नागरिकांनी डंपरचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण डंपर चालक सुसाट वेगात पसार झाला. विशेष म्हणजे या डंपरला नंबरप्लेट नव्हती. सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपर चालकांवर कारवाई करावी, असे आदेश मंत्री गिरीश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी महसूल व पोलिस प्रशासनाला दिले होते. पण कारवाईचा केवळ देखावा होत असल्याने तरुणाचा बळी गेल्याचे मत मृत गणेशच्या नातेवाइकांनी व्यक्त केले. जामेनर परिसरातून रोज शंभर डंपरमधून होतेय वाळू वाहतूक जामनेर तालुक्यात रोज शंभरावर डंपरमधून अवैध वाळू वाहतूक केली जाते. नेरीकडून जामनेरकडे व जामनेरमधून तालुक्यातील इतर गावाकडे सुसाट वेगाने धावणाऱ्या डंपर चालकांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
जामनेरला भाजप गट नेतेपदी पाटील, शनिवारी होणार उपनगराध्यक्ष निवड
येथील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यासाठी १३ जानेवारीला विशेष सभा होणार आहे. तसेच मंगळवारी भाजपच्या गट नेतेपदी संध्या जितेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. येथील नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच नगरसेवकांच्या २६ पैकी २२ जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी झाले आहे. त्यानंतर आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहे. नगरपालिकेत भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने सर्व स्वीकृत नगरसेवक भाजपचे होण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवकपद मिळावे यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. नियोजनानुसार १३ जानेवारीला विशेष सभेदरम्यान उपनगराध्यक्ष निवड झाल्यावर स्वीकृत नगरसेवकांची नाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी भाजपतर्फे गट नेतेपदी संध्या पाटील यांची निवड झाली. या विषयीचे पत्र जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आल्याची माहिती देण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदी लहान समाजातील प्रतिनिधींना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. आठ वर्षांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी याच पद्धतीने स्वीकृत नगरसेवकांची निवड केली होती. यंदाही तसाचा निर्णय होण्याची शक्यता भाजपच्या गोटातून वर्तवली जाते आहे.
चांदवड तालुक्यातील उर्धूळ येथील जिल्हा परिषद शाळेत पुरवठा होणाऱ्या पोषण आहार धान्याच्या वजनात तफावत आढळल्याने शालेय पोषण आहार योजनेत गंभीर अनियमितता होत असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उर्धूळच्या सरपंच कविता श्रीहरी ठाकरे यांनी आमदार डॉ. राहुल आहेर व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उर्धुळ येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराचे धान्य पोहोचल्यानंतर वजन करताना अपेक्षित प्रमाणापेक्षा धान्याचे कमी वजन असल्याचे निदर्शनास आले. याबाबत पुनर्वजनाची मागणी केली असता, संबंधित वाहनात व शाळेत वजन काटा उपलब्ध नसल्याचे आढळले. ही बाब गंभीर असून, याचा प्रतिकूल परिणाम विद्यार्थ्यांच्या पोषणावर होण्याची शक्यता आहे. या संदर्भात सरपंच कविता ठाकरे यांनी तत्काळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय खैरनार यांना शाळेत येऊन पंचनामा करण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तथापि, संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शालेय पोषण आहार योजनेच्या पारदर्शकतेबाबत साशंकता निर्माण झाली. याबाबत अर्जासोबत छायाचित्रांसह पुरावे सादर करण्यात आले आहे. तालुक्यातील पोषण आहार योजनेतील गैरप्रकारांची चौकशी जिल्हास्तरावरून करत पोषण आहारातील अनियमिततेची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पिंपळगाव डुकरा ठरले आदर्श महिला व बालस्नेही ग्रामपंचायत
इगतपुरी नाशिक जिल्ह्यातून इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा ही एकमेव ग्रामपंचायत आदर्श महिला स्नेही व बालिका स्नेही ग्रामपंचायत म्हणून निवडली गेली असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि ॲनिमिया मुक्त गाव मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे गावाची वाटचाल सर्वांगीण विकासाकडे सुरू आहे. महिला एकजुटीच्या बळावर पिंपळगाव डुकरा ग्रामपंचायत आज जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. ग्रामपंचायत अधिकारी हर्षिता पिळोदेकर, माजी सरपंच व बचत गट प्रमुख मालन वाकचौरे, आशा सेविका विजया जाधव, बचत गट सखी ज्योती भगत, समूह आरोग्य अधिकारी डॉ. मोरे, शिक्षिका रंजना महाजन, अंगणवाडी सेविका सुनीता शिंदे, कल्पना भगत, राजुबाई कुंदे, मदतनीस सुनीता कुंदे, सुजाता झनकर, ग्रामसंघ अध्यक्ष योगिता वाकचौरे आणि सचिव प्रिया झनकर यांच्या समन्वयातून विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. महिला सक्षमीकरणावर भर देत वित्त आयोगाच्या निधीतून बचत गटातील महिलांना कर्जवाटप करून गाय, शेळी पालन, कटलरी दुकान, चहा दुकान व मेस व्यवसाय सुरू करण्यात आले. यामुळे महिलांचे उत्पन्न वाढले आहे. ॲनिमिया मुक्त गाव संकल्पनेसाठी आरोग्य तपासणी, एचबी स्ट्रिप्स, औषधे आणि पोषण आहार उपक्रम राबवले जात आहेत. महिलांना परसबाग लागवडीसाठी बियाणे देऊन २०० परसबागा विकसित करण्यात आल्या आहेत. महिला व बालसुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, हेल्पलाईन पोस्टर, बालविवाह प्रतिबंध प्रशिक्षण आणि लिंग आधारित हिंसाचारविरोधी जनजागृती करण्यात आली. पर्यावरण रक्षणासाठी ५३ सौर पथदीप बसवून १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्यात आले असून, ग्रामसंघ इमारत व महिलांसाठी सार्वजनिक शौचालयाची सुविधाही उपलब्ध केली आहे. महिला एकजूट, नियोजन आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमुळे पिंपळगाव डुकरा हे गाव प्रगतीच्या वाटेवर आहे. इगतपुरी तालुक्यातील शासनाच्या विविध उपक्रमामुळे पिंपळगाव डुकरा गावाचा होतोय कायापालट
राजकीय पूर्ववैमनस्यातून अकोट तालुक्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी मोहाळा (ता. अकोट) येथे नमाज पठणानंतर मशिदीबाहेर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अकोला येथील ओझोन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल हे माहोळ गावात असताना काही हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी पळापळ झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पटेल यांना तातडीने अकोट येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अतिरक्तस्राव आणि जखमांचे गांभीर्य लक्षात घेता, प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने अकोला येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काकाच्या हत्येचा बदला 24 मे 2019 रोजी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोहाळा येथे भाजप अल्पसंख्याक सेलचे माजी पदाधिकारी मतीन शेरखाँ पटेल (58) यांची हत्या झाली होती. या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, त्याची सुनावणी सुरू आहे. त्यामुळे आपल्या काकाच्या हत्येचा बदला घेण्याच्या उद्देशातून हिदायत पटेल यांच्यावर मृत मतीन पटेल यांचा पुतण्या उबेद पटेल याने चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती गावातील काही प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली. आमचा त्या दिशेने तपास सुरू आहे, असे अकोट पोलिसांनी सांगितले. अकोल्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त हिदायत पटेल यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अकोला आणि अकोटमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी केली. कार्यकर्त्यांमधील संताप पाहता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी अकोला शहरासह माहोळ गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. हिदायत पटेलांनी लढवली लोकसभा हिदायत पटेल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते. त्यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचा एक आक्रमक आणि महत्त्वाचा चेहरा म्हणून हिदायत पटेल यांची ओळख आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी वैजापूर तालुक्यातील तब्बल १५० अधिकारी-कर्मचारी संभाजीनगर येथे पाठवण्यात आल्याने शहरातील शासकीय यंत्रणा अक्षरशः कोलमडली आहे. प्रतिनिधीने मंगळवारी (दि. ६) शहरातील विविध शासकीय कार्यालयांना भेट दिली असता बहुतांश ठिकाणी अधिकारी अनुपस्थित होते. अनेक ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांचे चित्र दिसले. परिणामी, जात प्रमाणपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्रे, रहिवासी दाखले, जमीन फेरफार प्रकरणे, सुनावण्या प्रलंबित राहत आहे. विविध योजनांच्या संचिकांवर काम थांबले आहे. वैजापूरला एकूण २८ शासकीय कार्यालये कार्यरत आहेत. मात्र निवडणूक ड्यूटीमुळे कार्यालयप्रमुखांसह कर्मचारी बाहेर गेल्याने अनेक कार्यालयांमध्ये केवळ नाममात्र उपस्थिती आहे. त्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहे. नागरिकांची फरफट पंचायत समितीही ओस वैजापूर पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट होता. ग्रामीण विकासाची मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या पंचायत समिती कार्यालयातही शुकशुकाट होता. विकासकामांच्या फायली, अनुदान प्रस्ताव, तक्रारी यावर निर्णय घेणारे अधिकारी अनुपस्थित असल्याने कामकाज ठप्प झाले आहे. कार्यालयात खुर्च्या दिसतात, मात्र त्यावर बसणारे अधिकारी दिसत नाहीत. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवडणूक ड्यूटीवर गेल्याने उर्वरित कार्यालयांचा कारभार बेभरवशाचा झाला आहे. काही कार्यालयांत वेळेवर हजेरी, कामकाजाचे नियोजन किंवा जबाबदारीची जाणीव दिसून येत नाही. याबाबत तहसीलदार सुनील सावंत यांनी सांगितले की, सध्या महानगरपालिका निवडणुकीचे काम सुरू असल्याने अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यस्त आहेत. तहसील व उपविभागीय कार्यालयात जात, उत्पन्न, रहिवासी दाखले, जमीन फेरफार, मोजणी, तक्रारी व सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. तहसील-उपविभागीय कार्यालयात जात प्रमाणपत्रे - ६० ते ७० अर्ज, ▪ उत्पन्न प्रमाणपत्रे -५० हून अधिक अर्ज, रहिवासी दाखले-४० ते ५० अर्ज, जमीन फेरफार प्रकरणे-२५ ते ३०, जमीन मोजणी प्रकरणे-१५ ते २०, तक्रारी व सुनावण्या-२० हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहे. तर पंचायत समितीमध्ये ग्रामविकास कामांच्या फाईली-३० ते ४०, घरकुल व वैयक्तिक लाभ योजनांचे प्रस्ताव-२० ते २५, अनुदान व देयक प्रस्ताव-१५ ते २० प्रलंबित आहे.
25 वर्षांनंतर भरली शाळा; आठवणींना दिला उजाळा:आळंदला न्यू हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील न्यू हायस्कूलमध्ये आयोजित सन २००१ च्या दहावीच्या बॅचच्या स्नेहमेळाव्याचे. तब्बल २५ वर्षांनंतर हे सर्व मित्र एकत्र आल्याने शाळेच्या आवारात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी कै. विनायकराव पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे एक तास शाळा’. २५ वर्षांनंतर भरलेल्या या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याने आपला जुना रोल नंबर आठवून हजेरी दिली. धकाधकीच्या जीवनात विविध क्षेत्रांत स्थिरावलेले हे मित्र पुन्हा एकदा शाळेच्या बाकावर विद्यार्थी होऊन बसले. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फेटे परिधान केल्यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. या बॅचमधील विद्यार्थी आज सरपंच, पीएसआय, पोलीस तसेच विविध नामांकित क्षेत्रांत कार्यरत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक जण भावुक झाले होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील, माजी मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनातून जुन्या काळातील शिस्त आणि विद्यार्थीदशेतील गमतीजमती सांगितल्या. कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष सुनील तायडे, कौतिक पायगव्हाण, प्रकाश पायगव्हाण, मधुकर तिसगे, आर. जी. भोसले, एस. बी. चव्हाण, एस. बी. बनसोड, जी. बी. दाभाडे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आत्माराम थोरात, अमित वाघमारे, वैभव तायडे आदींनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनानंतर या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली. प्रत्येकाला अडीअडचणीत मदत करण्याचा निर्धार शिक्षकांनी आपल्या मार्गदर्शनातून जुन्या काळातील शिस्त आणि विद्यार्थीदशेतील गमतीजमती सांगितल्या. तब्बल २५ वर्षांनंतर हे सर्व मित्र एकत्र आल्याने शाळेच्या आवारात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. येथून पुढे प्रत्येकाला अडीअडचणीत मदत करण्याचा निर्धार सर्व मित्रांनी केला आहे.
तालुक्यातील राजेराय टाकळी येथे दोन दिवसीय इज्तेमाची मंगळवारी सांगता झाली. या पवित्र इज्तेमात मौलाना मोहम्मद हुसेन पुनावाले यांच्या वतीने विशेष दुआ करण्यात येऊन भारत देशातील सर्व धर्म, समाज व नागरिकांसाठी सुख, शांती, सलोखा, ऐक्य व प्रगती यासाठी प्रार्थना करण्यात आली. हा पवित्र इज्तेमा सोमवारी सकाळी सुरू झाला होता. मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर मगरीब नमाज अदा करून सामूहिक दुआ करण्यात आली. दुआपूर्वी मौलाना मोहम्मद हुसेन पुनावाले यांनी मुस्लिम समाजातील धार्मिक आचार, कुरआनचे संदर्भ व जीवनमूल्यांवर मार्गदर्शनपर प्रवचन केले. या इज्तेमात कराड येथील मुफ्ती खालिद, मौलाना आमेर, लातूर येथील मौलाना जयनोद्दीन, पुणे येथील हाफिज नूर यांच्यासह अनेक मान्यवर धर्मगुरू उपस्थित होते,अशी माहिती राजेराय टाकळी येथील जामा मस्जिदचे इमाम मौलाना अब्दुल गणी यांनी दिली. अल्लाहच्या स्मरणाने, इबादत, तसबिह व धार्मिक उपदेशांनी भारलेले हे दोन दिवस इमान वृद्धिंगत करणारे, मन शांत करणारे व समाजात सद्भावना निर्माण करणारे ठरले. या दोन दिवसीय धार्मिक महासोहळ्यात किमान पाच लाखांहून अधिक मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवून इज्तेमाचा लाभ घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. खुलताबाद तालुक्यातील राजेराय टाकळी येथे य इज्तेमाला दोन दिवसांत ५ लाखांपेक्षा जास्त भाविक आले होते. जिल्ह्यामधून भाविकांची मांदियाळी खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, कसाबखेडा, बाजारसावंगी, कागजीपूरा, खुलताबाद, पळसवाडी, येजगाव, लोणी तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय जिल्ह्यातील फुलंब्री, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण, सिल्लोड व सोयगाव या तालुक्यांतूनही मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
फुलंब्री तालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगाव अर्ज येथील गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी हजारो भाविकांनी दर्शन घेतले. शेकडो महिलांनी सकाळी ७ वाजता सामुदायिक आरती केली. मंगळवारी सकाळी ४ वाजता काकडा भजन करण्यात आले. सकाळी ७.३० वाजता गणपतीची सामुदायिक महाआरती महिलांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. येणाऱ्या भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. येथे दिवसभर भजन कीर्तन, गणपती मूर्तीला अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गणपती मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. नारळ, पानफूल, प्रसाद आणि खेळण्यांची दुकाने आली होती. दिवसभर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांनी येथील वातावरण भक्तिमय झाले होते. गणपतीच्या आरतीसाठी कुणालाही प्राधान्य न देता गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना सामूहिक आरतीचे प्राधान्य देण्यात आले. जसे की बाकी मंदिरांवर राजकारणी, धनवान यांच्या हस्ते आरती करण्यात येते. येथे ही प्रथा पूर्वीपासून नसून महिलांच्या हस्ते सामूहिक आरती करण्यात येते. यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक महिला अंगारकी चतुर्थीनिमित्त सकाळी आरतीचे सामान घेऊन येतात. पूर्णगिरी महाराज यांनी बांधले महादेवाचे मंदिर येथे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज यांनी उमामहेश्वर महादेवाचे हेमाडपंती बांधले असून हे मंदिर गिरजा काठावर व गणपतीचे मंदिर गिरजा नदीच्या पात्रामध्ये असल्याने व येथे निसर्गरम्य वातावरण असल्याने हे पर्यटन स्थळदेखील आहे. येणाऱ्या भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. यामध्ये पिण्याचे पाणी, वाहन पार्किंग दर्शन रांग व फराळाची सोय ठेवण्यात आली होती.

27 C