SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
...

डिजिटल फसवणूक झाल्यास २५ हजारांची मदत!

मुंबई : प्रतिनिधी भारतीय रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांमध्ये होणा-या फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी डिजिटल व्यवहारांमध्ये ग्राहकांची जबाबदारी (कस्टमर लायबिलिटी इन डिजिटल ट्रांजेक्शन्स) नावाचा एक नवीन मसुदा आराखडा जारी केला आहे. यानुसार जर एखाद्या ग्राहकासोबत डिजिटल फसवणूक झाली आणि त्याने त्वरित त्याची तक्रार केली तर त्याला २५ हजार रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकते. नवीन नियमांचा उद्देश बँक तक्रारींच्या […] The post डिजिटल फसवणूक झाल्यास २५ हजारांची मदत! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 1:22 am

शांततेसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा

युद्धविराम आवश्यक, अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र अहिल्यानगर : प्रतिनिधी जगाचे लक्ष सध्या अमिरेका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाकडे लागले असून युद्धाविराम कधी होईल, याचीच वाट सर्वजण पाहात आहेत. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर होत असून हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. भारतानेही युद्ध थांबवण्याची गरज व्यक्त केली. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र […] The post शांततेसाठी मोदींनी पुढाकार घ्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 1:20 am

युद्धामुळे जग गॅसवर

भारतात एलपीजी, सीएनजीचा तुटवडा, गॅस सिलिंडरचाही भडका व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद, हॉटेल, रेस्टॉरंट ठप्प होणार? नवी दिल्ली : वृत्तसंस्था इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्याने युद्धाचा भडका उडाला असून, गेल्या ७ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. युद्धामुळे एलपीजी गॅस आणि सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडर तुटवड्याच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता असतानाच केंद्राने […] The post युद्धामुळे जग गॅसवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 1:18 am

अंतिम लढतीत भारत न्यूझीलंडशी भिडणार

अहमदाबाद येथे अंतिम महामुकाबला अहमदाबाद : वृत्तसंस्था टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी धडक मारल्याने आता ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. हा महामुकाबला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरलेला अभिषेक शर्मा पुन्हा एकदा प्लेइंग-११ मध्ये दिसण्याची […] The post अंतिम लढतीत भारत न्यूझीलंडशी भिडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 1:17 am

१३० माओवाद्यांचे आत्मसमर्पण

शस्त्रास्त्रेही जप्त, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत हैदराबाद : प्रतिनिधी माओवाद्यांची सर्वात घातक तुकडी मानल्या जाणा-या पीएलजीए बटालियन क्रमांक १ सह तेलंगणा स्टेट कमिटी आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या तब्बल १३० माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या माओवाद्यांनी एके-४७, एलएमजी, एसएलआर, इंसाससारख्या १२४ घातक शस्त्रांसह तब्बल ५२०५ जिवंत गोळ््या तसेच अनेक ग्रेनेड आणि यूबीजीएल हे रॉकेट […] The post १३० माओवाद्यांचे आत्मसमर्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 1:15 am

महिला सबला आहेत हेच सरपंच वैष्णवी सावंत यांनी दिले दाखवून

चाकूर : प्रतिनिधी माझ्यात जिद्द, चिकाटी, प्रमाणीकपणा असुन मी प्रत्येक काम मन लावून करते, मग ते काम घरातील मुलाकडे लक्ष देणे, पतीची काळजी घेणे असो किंवा इतर कोणतेही काम मग ते धुणी-भांडी करणे किंवा स्वयंपाक करणे असो, यामुळे मला कामात आनंद मिळतो. तसेच यश ही मिळते. मी नेहमी सकारात्मक विचार करते, त्यामुळे सकारात्मक उर्जा मिळत […] The post महिला सबला आहेत हेच सरपंच वैष्णवी सावंत यांनी दिले दाखवून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 12:14 am

प्रसंगी मृदू तर काही प्रसंगी कठोर गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे-निकम

चाकूर : प्रतिनिधी मंदोदरी आप्पासाहेब वाकडे-निकम या सध्या चाकूर पंचायत समीतीत गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या येथे आल्यापासून शिक्षण विभागाला चांगलीच शिस्त लागली आहे. प्रसंगी मृदु तर कांही प्रसंगी कठोर होऊन त्या प्रशासनावर पकड ठेवतात. त्यांची चाकूर येथे दिंनाक ३१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने चाकूर पंचायत समीतीला गटशिक्षणाधिकारी म्हणुन धारणी […] The post प्रसंगी मृदू तर काही प्रसंगी कठोर गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे-निकम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 12:12 am

सामाजिक भान, सेवाभाव आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी धडपडणारे आश्वासक नेतृत्व

औसा : संजय सगरे लातूर जिल्हा व विशेषत: औसा तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणा-या सौ. सईताई पृथ्वीराज गोरे या नव्या पिढीतील एक प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून पुढे येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील दिव्यतेज प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांद्वारे त्या महिलांचे सक्षमीकरण, गरीब व वंचितांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य, पर्यावरण आणि समाजप्रबोधन […] The post सामाजिक भान, सेवाभाव आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी धडपडणारे आश्वासक नेतृत्व appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Mar 2026 12:11 am

VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला गेला होतात का?:रोहित पवारांचा प्रफुल पटेलांना सवाल, म्हणाले - तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी?

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचे पडसाद अद्याप उमटत असून, आमदार रोहित पवार यांनी आता या प्रकरणात माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांना लक्ष्य केले आहे. अजितदादांच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला आपण गेला होतात का? असा थेट आणि खळबळजनक सवाल रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रफुल पटेलांना विचारला आहे. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर रोहित पवार यांनी VSR कंपनीच्या विमानांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सीआयडीने कंपनीचे मालक आर. के. सिंग यांची चौकशी केली. याच संदर्भाचा धागा पकडत रोहित पवार यांनी प्रफुल पटेल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राजस्थानमधील 'त्या' लग्नाचे कनेक्शन? रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मिस्टर प्रफुल पटेल जी, आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला/घातपाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? जर गेला असाल, तर त्या लग्नात इतर कोणकोणते नेते आणि कोणत्या पक्षाचे लोक होते, हे महाराष्ट्राला सांगावे. स्वार्थी की अजितदादा प्रेमी, हे स्पष्ट करा रोहित पवार यांनी पटेलांच्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे आता महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपण स्पष्टीकरण द्याल, अशी अपेक्षा आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. प्रफुल पटेलांच्या उत्तराकडे लक्ष प्रफुल पटेल हे देशाचे माजी नागरी उड्डाण मंत्री राहिले आहेत, त्यामुळे विमान कंपन्यांशी संबंधित तांत्रिक बाबी आणि संबंधांवरून रोहित पवारांनी केलेला हा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. जय पवार यांनी आर. के. सिंग यांचा एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर रोहित पवारांनी थेट पटेलांनाच घेरल्याने आता या वादाला नवे वळण मिळाले आहे. यावर प्रफुल पटेल काय प्रत्युत्तर देतात, ते पाहावे लागणार आहे. रोहित पवारांनी घेतली केजरीवालांची भेट दरम्यान, रोहित पवार यांनी ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपचे नेते संजय सिंह, अरविंद केजरीवाल यांची भेट घेत अजित पवार अपघात प्रकरणी संसदेमध्ये आवाज उठवण्याची मागणी केली आहे. रोहित पवा म्हणाले, महाराष्ट्रात इतक्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल तर संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांच्याविरोधात आवाज उठवणाऱ्या पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आम्ही हा मुद्दा संसदेत उचलला जावा यासाठी विनंती केली. अजित पवार यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही जे काम करत आहात त्याला आम्ही साथ देऊ असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:57 pm

राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा उद्यापासून प्रारंभ:14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयमुख प्रतिबंधासाठी देणार लस

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ८ मार्च रोजी महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संरक्षणासाठी राज्यभरात गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी राज्यव्यापी एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेंतर्गत तीन महिन्यात राज्यातील ९ लाख ८४ हजार मुलींना एचपीव्ही लस देण्याचे लक्ष्य आरोग्य विभागाने ठेवले आहे. या दिवशी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे राज्यात आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी शुभारंभ होत असून, १४ वर्षे पूर्ण झालेल्या परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या वयोगटातील मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण ९ लाख ८४ हजार ४१४ मुलींना या मोहिमेचा लाभ मिळणार असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे. भारतामध्ये महिलांमधील कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून दरवर्षी सुमारे ८० हजार नवीन रुग्ण आढळतात व ४२ हजारांहून अधिक मृत्यू होतात सदर लसीकरण मोहीम सलग तीन महिने विशेष अभियान म्हणून राबविण्यात येणार असून त्यानंतर ती नियमित लसीकरण कार्यक्रमाचा भाग होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जाईल. सर्व लाभार्थ्यांची नोंदणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र शासनाच्या U-WIN या डिजिटल पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचे महत्त्व विशद करताना आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गर्भाशयमुख कर्करोग हा वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्यास टाळता येणारा आजार आहे. जागतिक स्तरावर या कर्करोगाचे निदान उशिरा झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते, मात्र किशोरवयातच दिलेली ही लस शरीरात आयुष्यभरासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यास मदत करते. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या स्तरावर देखील जनजागृती करण्यात येत असून, ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन केले जात आहे ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काहीवेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी २-३ दिवसांत आपोआप बरी होत असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:15 pm

सांगळूदकर महाविद्यालयाला विद्यापीठाचा पर्यावरण पुरस्कार:5 वर्षांतील वृक्षारोपण, संवर्धन, स्वच्छतेची दखल

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने येथील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयाला पर्यावरण पुरस्कार प्रदान केला आहे. गेल्या पाच वर्षांतील वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि जनजागृती अशा विविध उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे महाविद्यालयाची पालक संस्था असलेल्या श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे नावही उत्कृष्टतेच्या यादीत समाविष्ट झाले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पर्यावरण पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्याच हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महाविद्यालय विकास व शाळा समितीचे सदस्य डॉ. वसंत टाले, शेषराव काळे, शिवाजी देशमुख, प्रा. प्रभाकर कोलखेडे, नरेशचंद्र लढ्ढा तथा प्रभाकर कोरपे उपस्थित होते. २०१९ ते २०२३ या पाच वर्षांत महाविद्यालयाने पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन, समाज जनजागृती आणि स्वच्छ भारत अभियान यांसारखे उपक्रम सातत्याने राबवले. या कालावधीत सुमारे ४०७० वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्यात आले. तसेच, रोपवाटिका स्थापन करून विद्यार्थ्यांना बीज निवड व रोप संगोपनाचे प्रशिक्षण देण्यात आले. महाविद्यालयाने दरवर्षी मातीचे गणपती बनविणे, स्वच्छता मोहिम, हागणदारी मुक्त अभियान, कोविड जनजागृती, “वृक्ष दिंडी” आणि “चंद्रभागा आपल्या दारी” यांसारखे जनजागृतीपर उपक्रम राबवले. प्लास्टिकमुक्त परिसर, कागदी पिशव्यांचे वितरण, नैसर्गिक रंग निर्मिती आणि जनजागृती रॅली यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रचार केला. गांडूळ खत निर्मिती व घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणीही करण्यात आली. महाविद्यालयात १० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यरत असून दरवर्षी सुमारे १४,४०० युनिट वीज निर्मिती होते. ऊर्जा व हरित अंकेक्षण, ई-कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि “वृक्ष दत्तक” योजना सातत्याने राबविण्यात येते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तथा संपूर्ण कार्यकारणी, आजीवन सभासद यांनी महाविद्यालयाचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या १३ एकराच्या निसर्गरम्य परिसरात चार उद्याने विकसित करण्यात आली आहेत, ज्यात औषधी वनस्पती उद्यान विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त ठरत आहे. महाविद्यालयातील कोळी संशोधन केंद्राच्या माध्यमातून २२ नव्या कोळ्यांच्या प्रजातींचा शोध घेण्यात आला आहे. “बोलके झाड” या अभिनव उपक्रमांतर्गत अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून झाडांविषयी माहिती देण्याची संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली. वन्यजीव सप्ताह, व्याघ्र दिन, चिमणी दिन, ग्रीन रक्षाबंधन आणि पृथ्वी तास यानिमित्त जनजागृती कार्यक्रमही येथे आयोजित केले जातात.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:10 pm

धुळघाटमध्ये 'शासन आपल्या दारी' अभियान:तहसीलदारांच्या पुढाकाराने विविध महसुली सेवा थेट गावात, आदिवासींना मिळाला लाभ

मेळघाटातील दुर्गम आदिवासीबहुल भागातील नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळावा या उद्देशाने धुळघाट रेल्वे येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात आले. धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या पुढाकाराने हे शिबीर राबवण्यात आले, ज्यातून आदिवासींना विविध महसुली सेवांचा लाभ मिळाला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू करण्यात आले आहे. मेळघाटातील शेवटचे टोक असलेल्या धुळघाट रेल्वे येथे हे शिबीर घेण्यात आले, ज्यामुळे 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. या शिबिरात महसूल विभागासोबतच पंचायत, आरोग्य, कृषी, पुरवठा, महिला व बालविकास विभाग, विद्युत वितरण कंपनी आणि इतर शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. नागरिकांच्या विविध समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मेळघाटातील शेवटच्या टोकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे म्हणजे 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होणे होय. ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सोडवणे, विविध योजनांचा लाभ देणे आणि तक्रारींचे त्वरित निवारण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान होण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिबिरात लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि इतर आवश्यक शासकीय दाखले वितरित करण्यात आले. दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या न मारता थेट शिबिरातून सेवा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीपाल पाल होते, तर माजी उपसरपंच सुजीत मालवीय आणि रोहित पाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रशासनाकडून सहाय्यक जिल्हाधिकारी सिद्धार्थ शुक्ला, तहसीलदार प्रदीप शेवाळे, नायब तहसीलदार राजेश माळी, गटविकास अधिकारी शिडाम, तालुका कृषी अधिकारी जाधव, मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामुळे दुर्गम मेळघाटातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:09 pm

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे खासदार वानखडे यांना मागण्यांचे निवेदन:पोषण ट्रॅकर, ग्रॅज्युइटीसह अनेक प्रलंबित प्रश्न मांडले

अंजनगावसुर्जी प्रतिनिधी: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) ने खासदार बळवंत वानखडे यांना निवेदन दिले. दर्यापूर येथील जनसंपर्क कार्यालयात खासदारांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या भेटीत अंगणवाडी सेविकांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, पोषण ट्रॅकर ॲप अंतर्गत फेस रिकग्निशन सिस्टीम (एफआरएस) अनिवार्य केल्यामुळे देशभरातील अंगणवाडी सेविकांना लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) अंतर्गत गर्भवती महिला, स्तनदा माता तसेच ६ महिने ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना टेक होम रेशन (टीएचआर) आणि पोषण साहाय्य दिले जाते. मात्र, एफआरएस प्रणालीच्या कठोर अंमलबजावणीमुळे अनेक पात्र लाभार्थी त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचा टेक होम रेशन (टीएचआर) पुरवठा तात्काळ बंद करण्याची मागणी केली. त्याऐवजी ताजे शिजवलेले अन्न किंवा दर्जेदार धान्याचे पॅकेट्स पुरवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२२ च्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीचा हक्क देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. कर्नाटक राज्य वगळता इतर राज्यांमध्ये हा आदेश अद्याप लागू झालेला नाही. अंगणवाडी कर्मचारी केवळ मानधनावर काम करणारे नसून पूर्णवेळ व कायमस्वरूपी कर्मचारी असल्याने त्यांना वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी, महागाई भत्ता, ग्रॅज्युइटी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि पेन्शनचे लाभ मिळावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर दरमहा १० हजार रुपयांची पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली. तसेच, डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांतील केंद्राचे प्रलंबित मानधन तात्काळ देण्याची मागणीही निवेदनात होती. यावेळी आयटकचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, रविकांत गवई, शुभम बाळापूरे, ललिता पखान, संगीता कुले, वैशाली टिपरे, शर्मिला खलोकर, सुमन कळसकर, अनिता गजबे, प्रतिभा घोगरे, सुनीता गुहे, पोहोकर, मंदा हुमे, आयशा बानो, रेश्मा बानो, मालिका बी, शिल्पा राजगुरे, रुपा गोळे, लिना शेवणे, सुशीला कडू, शमशादा बानो, शायनाज बी आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:02 pm

मेळघाटात ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान बालकाचा मृत्यू:एडीएचओ डॉ. मालखेडे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन

मेळघाटातील चुर्णी (ता. धारणी) येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाला. घरीच प्रसूती झालेल्या महिलेला व बाळाला काही वेळाने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. प्रवीण पारिसे यांनी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी (एडीएचओ) डॉ. स्वप्नील मालखेडे यांच्या नेतृत्वात एक सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आगामी सोमवारपर्यंत प्राप्त होईल, असे डीएचओ डॉ. पारिसे यांनी सांगितले. चुर्णीपासून काही अंतरावर असलेल्या भंडोरा गावातील २२ वर्षीय रेशमा नरेश भुसूम यांची दोन दिवसांपूर्वी घरीच प्रसूती झाली होती. घरगुती दाईच्या मदतीने ही प्रसूती करण्यात आली. मात्र, प्रसूतीनंतर बाळाची नाळ योग्य प्रकारे न कापल्याने व जन्मानंतर लगेच आंघोळ घातल्याने बाळाला संसर्ग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे बाळाची प्रकृती खालावली. अखेर गावातील आशा कार्यकर्तीच्या माध्यमातून रेशमा भुसूम यांना चुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मेळघाटातील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डीएचओ डॉ. पारिसे यांनी तेथील डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरील कारणांव्यतिरिक्त बाळाच्या अन्ननलिकेत दूध गेल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे बाळाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला आणि यासाठी कोण जबाबदार आहे, याचा उलगडा आता एडीएचओ डॉ. स्वप्नील मालखेडे यांच्या अहवालानंतरच होईल, असे डॉ. पारिसे यांनी सांगितले. मेळघाटातील गरोदर आणि स्तनदा मातांची काळजी घेण्यासाठी 'मिशन २८' हा कार्यक्रम राबवला जातो. या अंतर्गत प्रसूतीपूर्वी आणि नंतरच्या काळात आरोग्य यंत्रणा अशा महिलांना आरोग्य सेवा पुरवते. यासाठी आशा कार्यकर्तीमार्फत एक दिवसाआड त्यांची भेट घेणेही सुरू असते. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेची प्रसूती १४ मार्च रोजी अपेक्षित होती. परंतु, त्यापूर्वी आठवडाभर आधीच तिची घरी प्रसूती झाली. रुग्णालयात प्रसूती टाळण्यासाठी आशा कार्यकर्तीलाही याबाबत माहिती देण्यात आली नाही. बाळाची प्रकृती गंभीर झाल्यानंतरच धावपळ करण्यात आली. या सर्व बाबींमधील सत्य एडीएचओ डॉ. मालखेडे यांच्या चौकशी अहवालातूनच स्पष्ट होईल.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:58 pm

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते 'सावित्री जत्रा' उद्घाटन:महिला बचत गटांना 40 कोटींचे कर्ज वाटप, स्वावलंबनाचा संदेश

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे 'मिनी सरस सावित्री जत्रा' जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी 'सावित्री जत्रा' ही महिलांना स्वावलंबी बनवणारी चळवळ असल्याचे प्रतिपादन केले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना जागतिक स्तरावर मिळणारी मागणी अभिमानास्पद असल्याचेही त्या म्हणाल्या. पुणे जिल्हा परिषद आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार आणि महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपायुक्त नितीन माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या सदिच्छादूत शिवाली परब यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, 'सावित्री जत्रा' हे नाव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि सक्षमीकरणाच्या कार्याला समर्पित आहे. सावित्रीबाईंनी शिक्षण व स्वावलंबनातून महिलांना सक्षम करण्याचा जो मार्ग दाखवला, तोच विचार आज ग्रामीण भागातील शेकडो महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरत आहे. या प्रदर्शनात सुमारे १५० महिला स्वयंसहायता समूह सहभागी झाले आहेत. ग्रामीण कला, परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणारी विविध उत्पादने येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. प्रत्येक उत्पादनात ग्रामीण महिलांची मेहनत, स्वप्ने आणि जिद्द दिसून येते. पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन अधिकाधिक वस्तूंची खरेदी करावी आणि महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात महिला बचत गटांना एकाच दिवशी ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी 'मिनी सरस सावित्री जत्रा'मध्ये १९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले होते. यावर्षीच्या वाटपासह, गेल्या एका वर्षात सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामुळे 'सरस सावित्री जत्रा' कार्यक्रमाचा दर्जा सातत्याने उंचावत असल्याचे दिसून येते. अर्थसंकल्पातही महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने पाऊल राज्याचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात ' मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण, 'लखपती दीदी' उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात येत आहेत. येत्या आर्थिक वर्षात २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १३ जिल्ह्यांमध्ये 'उमेद मॉल' उभारण्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे महिला बचत गटाच्या आमच्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ तयार करण्यात आली आहे. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे, ही महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:54 pm

अमरावतीतील 1500 महिला बचतगटांना प्रत्येकी 1 लाखाचे अनुदान:व्यवसायासाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जही उपलब्ध होणार

अमरावती जिल्ह्यातील दीड हजार महिला बचतगटांना प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे दीड कोटी रुपयांचे अनुदान दिले जाईल. यासोबतच, व्यवसायवाढीसाठी बँकांतर्फे ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून दिले जाईल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत (डीआरडीए) येथील सायंस्कोर मैदानात गेल्या चार दिवसांपासून महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. या प्रदर्शनी-विक्रीचा शुभारंभ शनिवार, ७ मार्च रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, सुलभाताई खोडके, रवी राणा, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, गजानन लवटे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजिता महापात्र, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, माविमचे संचालक रंजन वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, सूर्यघर योजनेमार्फत सौर ऊर्जेचा वापर केल्यास महिलांना पुढील १५ वर्षे वीज बिल भरण्याची गरज भासणार नाही. तसेच, तुकडेबंदी कायद्यांतर्गत जिल्ह्यात १ लाख घरांचे पट्टेवाटप करण्यात येणार आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्रीमुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होऊन महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील, असेही त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात सध्या २ लाख २० हजार महिला बचतगटांमध्ये सहभागी आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण, एकल महिलांसाठी उपयुक्त पुस्तकांचे विमोचन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या पोर्टलचे लॉन्चिंग करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले. दिंडी युवा वारकरी मंडळींनी टाळ-मृदुंगाच्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. अमरावतीत लवकरच टाटा ट्रस्टचे रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या चिखलदरा महोत्सवात महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री केंद्र उभारले जाईल. चिखलदऱ्याच्या कॉफीचे ब्रँडिंग करून येथील आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावरही भर दिला जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:50 pm

विविध प्रकारचे रंग आणि साहित्यांची मोठी विक्री 

लातूर : प्रतिनिधी होळीनंतर पाचव्या दिवशी लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानूसार रंगपंचमी उत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. रंगपंचमीला जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. यानिमित्ताने विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठ आणि चौकांमध्ये रंग, गुलालासह पिचकारी, मुखवटे, टोप्या, टिमक्या आदी वस्तूंची दुकाने थाटली […] The post विविध प्रकारचे रंग आणि साहित्यांची मोठी विक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 9:47 pm

गंजगोलाई परिसरातील अतिक्रमण हटविले

लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील गंजगोलाई भागातील व परिसरामध्ये वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गंजगोलाई परिसरातमध्ये झालेले भाजीपाला, हात गाडेवाले यांचे रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण काढण्यात आले. हातगाडे गंजगोलाईतील रस्त्यावर आल्यास महानगरपालिकेतर्फ जप्तीची कार्यवाही करण्यात येईल. मनपाच्या वतीने ही मोहीम अशीच राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सर्वच अतिक्रमणे काढली जाणार […] The post गंजगोलाई परिसरातील अतिक्रमण हटविले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 9:46 pm

आज रंगपंचमी; लातूर पोलिसांचा कडक बंदोबस्त

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रंगपंचमीचा सण आज दि. ८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करत असल्याने शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार […] The post आज रंगपंचमी; लातूर पोलिसांचा कडक बंदोबस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 9:44 pm

लातूर वुमन्स प्रीमियर लीग-२०२६ रंगला

लातूर : प्रतिनिधी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘लातूर वुमन्स प्रीमियर लीग २०२६’ या महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन राजर्षी शाहू महाविद्यालय व अस्तित्व सेवाभावी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी हरंगुळ येथील राजर्षी शाहू महाविद्यालय क्रीडा संकुलात करण्यात आले. या निमित्त महिला शक्तीचा जल्लोष अभूतपुर्व होता. स्पर्धेत लातूर शहरातील […] The post लातूर वुमन्स प्रीमियर लीग-२०२६ रंगला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 9:42 pm

भाजीपाल्यांचे दर कडाडले; लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले 

लातूर : प्रतिनिधी वाढत्या तापमानाचा फटका सर्वत्र बसत आहे. यावर्षी उन्हाळयाच्या सुरुवातीलाच तापमानात प्रचंड वाढ झाली असून वाढलेल्या तापमानामुळे घरातून बाहेर निघणे अत्यंत कठीण झााले आहे. उन्हाची झळ मनुष्य आणि प्राणींच नव्हे तर आता भाज्यांवरही बसू लागली आहे. तापमानात होणा-या चढ-उताराचा भाज्यांचे उत्पादनावर होत असलेल्या परिणामामुळे सामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागत आहे. उत्पादनावर होणा-या परिणामामुळे […] The post भाजीपाल्यांचे दर कडाडले; लाडक्या बहिणींचे बजेट कोलमडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 9:41 pm

थकित मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेची जप्ती मोहीम तीव्र

लातूर : प्रतिनिधी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कर वसुलीसाठी लातूर महानगरपालिकेने अनेक कर सवलतीची योजना राबवली मात्र ब-याच मालमत्ताधारकांनी याकडे कानाडोळाच केला. यामुळे महानगरपालिकेमार्फत जप्ती मोहिम राबविण्यात येत आहे. त्याकरिता चार मुख्य कार्यालयातील पथक व चार क्षेत्रीय कार्यालय पथक असे एकूण आठ पथके नेमण्यात आले आहेत. महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रलंबित मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम […] The post थकित मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेची जप्ती मोहीम तीव्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 9:40 pm

शासनाकडून अचूक काटे असल्याचे प्रमाणपत्र

लातूर : प्रतिनिधी राज्यातील खाजगी साखर कारखानदारीत एफ. आर. पी. पेक्षा अधिक भाव ऊस पुरवठा शेतक-यांना देणा-या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजला साईटवर वजन काटे यांची शासकीय अधिकारी यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींनी संयुक्त पथकाद्वारे पाहणी केली तपासणी केल्यानंतर कारखान्यावर काटा योग्य व अचूक असल्याचा निष्कर्ष समितीने दिला आहे. त्यामुळे जागृति शुगरला अचूक […] The post शासनाकडून अचूक काटे असल्याचे प्रमाणपत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 9:38 pm

गुलटेकडीतील वर्चस्वाच्या वादातून थरार:दोन टोळ्यांच्या संघर्षात तरुणावर गोळीबार, गंभीर जखमी; पुण्यातील मार्केटयार्डातील घटना

पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात शुक्रवारी रात्री पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत मोझेस शेकापुरे उर्फ मोझ्या (वय २२) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहत परिसरातील दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून हा गोळीबार झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी बालाजी उमाप, राम उमाप यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आठवड्यापूर्वी गुलटेकडीत अल्पवयीनांनी पिस्तुलातून गोळीबार करून दहशत माजविल्याची घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलटेकडीतील मीनाताई ठाकरे वसाहतीत उमाप टोळी आणि अमित शेकापुरे यांच्यात वर्चस्वातून जुना वाद आहे. गोळीबाराच्या दिवशी, शुक्रवारी दुपारी बालाजी उमाप आणि अमित शेकापुरे यांच्यात वाद झाला होता. शुक्रवारी (६ मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास अमित शेकापुरे याचा भाऊ मोझेस आणि त्याचा मित्र दुचाकीवरून मार्केट यार्डातील वखार महामंडळाकडून गंगाधाम चौकाकडे जात होते. त्याचवेळी त्यांच्या मागावर असलेले आरोपी बालाजी उमाप, राम उमाप आणि त्यांचे चार ते पाच साथीदार दुचाकीवरून आले. त्यांनी मोझेस आणि त्याच्या मित्राला अडवले. हल्लेखोरांपैकी उमाप याने पिस्तुलातून गोळीबार केला. ही गोळी शेकापुरे याच्या पाठीत लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी शेकापुरेला रुग्णालयात दाखल केले. तपासात असे समोर आले आहे की, हल्लेखोरांना शेकापुरे याच्याबरोबर असलेल्या मित्रावर गोळीबार करायचा होता, मात्र गोळी शेकापुरेला लागली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:36 pm

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था साखरेभोवती केंद्रित - अविनाश धर्माधिकारी:डॉ. अनिल गांधींच्या 'साखर गोड पण जीवघेणी' पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्राची अर्थ आणि राजकीय व्यवस्था साखरेभोवती संघटित आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. सर्जन डॉ. अनिल गांधी लिखित ‘साखर गोड पण जीवघेणी’ या आरोग्यविषयक पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. धर्माधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राचे ८० टक्के पाणी ऊस या एका पिकाला जाते, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे सर्वाधिक टँकर महाराष्ट्रातच लागतात. पुणे जिल्ह्यात टँकरची सर्वाधिक मागणी असते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील महाराष्ट्रातच आहे. सर्वाधिक सिंचन प्रकल्प पुणे जिल्ह्यात असून, ऊस या एका पिकाभोवती अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. एक साखर कारखाना म्हणजे दोन आमदार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर, लेखक सर्जन डॉ. अनिल गांधी, पुस्तकाच्या संपादिका डॉ. हेमलता पिसाळ आणि सॅम पब्लिकेशन कोल्हापूरचे अनिल मेहता उपस्थित होते. अविनाश धर्माधिकारी यांनी पुढे सांगितले की, जीडीपी मोजताना माणूस आनंदी झाला का, हे मोजले पाहिजे. ग्रंथव्यवहार हे समाजाच्या प्रगल्भतेचे मूळ लक्षण आहे. जीडीपी महत्त्वाचा असला तरी बौद्धिक आणि वैचारिकदृष्ट्या समाज किती श्रीमंत आणि आरोग्यपूर्ण आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. डॉ. शैलेश गुजर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पूर्वी गोड खाण्याचा बेत असायचा, पण आता गोड खाणे जीवावर बेतत आहे. शरीराला साखर आवश्यक असली तरी तिचा अतिवापर घातकच आहे. साखर किती प्रमाणात आवश्यक आहे, हे समजून घेतले पाहिजे. पहिली ते दहावीच्या पुस्तकात साखर व तिच्या वापराबाबत कुठेही उल्लेख नाही. साखरेचे प्रमाणीकरण कोणत्याही पाकीटवर दिसत नाही आणि त्याचे घातक परिणाम देखील दिले पाहिजेत. देशात ९० टक्के लोक मधुमेहग्रस्त असून, जगात भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. लेखक सर्जन डॉ. अनिल गांधी यांनी सांगितले की, समाजात व्यक्तीला रोगमुक्तीपेक्षा रोग होणार नाही याचे प्रशिक्षण देण्यासाठी मी पुस्तके लिहिली आहेत. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी साखर कमी प्रमाणात वापरली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:28 pm

मराठी भाषा अन् सांस्कृतिक धोरणाबाबत सरकारकडून दुर्लक्ष:अभिजात मराठीसाठी 500 कोटींचा निधी प्रलंबित, काँग्रेसचा आरोप

काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरही तिच्या संवर्धनासाठी अपेक्षित असलेले ५०० कोटी रुपयांचे अनुदान अद्यापही दिले गेले नसल्याचे त्यांनी म्हटले. मराठी भाषा आणि सांस्कृतिक धोरणाबाबत केंद्र तसेच राज्य सरकारकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा दावाही तिवारी यांनी केला. तिवारी यांनी सांगितले की, २०१४ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारच्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला. मात्र, सुमारे दीड वर्ष उलटूनही मराठी भाषेच्या विकासासाठी आवश्यक असलेले ५०० कोटी रुपये अद्याप उपलब्ध झालेले नाहीत, ही बाब दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना केंद्र सरकारने ती स्वतंत्र आणि प्राचीन भाषा असल्याचे मान्य केले आहे. असे असतानाही, दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषा संस्कृतमधून निर्माण झाल्याचे विधान केले होते. या विधानातून मराठीच्या अभिजाततेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला काय, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या अभ्यासासाठी स्वतंत्र 'सेंटर ऑफ एक्सलन्स' स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राच्या शिक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. मात्र, हा प्रस्ताव अद्यापही मंत्रालयात प्रलंबित असल्याचे तिवारी यांनी निदर्शनास आणले. दरम्यान, राज्यातील महायुती सरकारने २०२४ मध्ये निवडणुकीपूर्वी सांस्कृतिक धोरण जाहीर केले होते. यात ऐतिहासिक वारसा जतन करणे, संग्रहालये, नाट्यगृहे आणि ग्रंथालयांचा विकास करणे अशी १७ उद्दिष्टे निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक ग्रंथालये बंद पडत असून नाट्यगृहांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचा आरोप गोपाळ तिवारी यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:26 pm

वाघोलीत 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा लवकरच:कुस्तीला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

वाघोली येथे लवकरच ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, या पारंपरिक स्पर्धेचा उद्देश कुस्तीला राज्यात लोकप्रियता मिळवून देणे आणि तिला गतवैभव प्राप्त करून देणे हा आहे. यासाठी स्पर्धा दर्जेदार असणे आवश्यक आहे. दरवर्षी मोहोळ कुटुंबातर्फे महाराष्ट्र केसरी विजेत्यांना मानाची गदा प्रदान केली जाते. यंदा वाघोली ग्रामस्थांना स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ ही गदा प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार बापूसाहेब पठारे, ऑलिंपिकवीर माऊली आडकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष प्रमोद गावडे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, ही मानाची कुस्ती स्पर्धा राज्यात गेल्या ६७ वर्षांपासून आयोजित केली जात आहे, ज्यामागे मामासाहेब मोहोळ यांची दूरदृष्टी होती. महाराष्ट्राची कुस्तीची परंपरा वैभवशाली असून, अनेक पैलवान या गदेचे मानकरी ठरले आहेत. राज्यात निवड चाचणीनंतर जिल्ह्यांचे अधिकृत संघ तयार होतात. ही स्पर्धा माती गटात नऊ आणि गादी गटात नऊ अशा एकूण १८ गटांमध्ये पार पडते. यंदा दिवंगत अजित पवार यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ स्पर्धास्थळाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आमदार बापूसाहेब पठारे यांनी मोहोळ कुटुंबाच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या भव्य महाराष्ट्र केसरी स्पर्धांमुळे इतर जिल्ह्यांमध्ये स्पर्धांचे आयोजन कमी झाले आहे, कारण आयोजकांना खर्च परवडत नाही. त्यामुळे राज्यात एकच प्रमुख स्पर्धा आयोजित केली जावी, अशी सूचना त्यांनी केली. माजी खासदार अशोक मोहोळ यांनी स्पर्धेच्या पारंपरिक महत्त्वावर भर दिला. १९५२ मध्ये मामासाहेब मोहोळ यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेऊन पैलवान संघटनांची स्थापना केली होती. त्यानंतर १९५७ साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरू झाली. ऑलिंपिकसाठी कुस्ती खेळाडूंना तयार करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. आज लहान मुलांनाही ऑलिंपिक स्पर्धेचे नियम समजतात, हे या स्पर्धेच्या यशाचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांनी मोहोळ कुटुंबाच्या कुस्ती क्षेत्रातील वारशाचे कौतुक केले. गेल्या ६८ वर्षांपासून विजेत्यांना चांदीची गदा दिली जात आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणुकीतही पैलवानांचा प्रचार महत्त्वाचा ठरला होता आणि मुरली अण्णा कुस्तीची परंपरा जपण्यासाठी कार्यरत आहेत, असे कंद यांनी नमूद केले. स्पर्धा आयोजक रामकृष्ण सातव यांनी सांगितले की, स्पर्धक वर्षभर कष्ट करून गदा जिंकण्यासाठी तयारी करतात. यंदा मानाची गदा सात ते आठ दिवस आधीच दिली गेली असून, वाघोली पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये तिची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:24 pm

नीरा-कऱ्हा प्रकल्पाची केवळ घोषणाच, निधी कुठे?:अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन गंभीर आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाचा उल्लेख केवळ घोषणेपुरता मर्यादित राहिल्याचा घणाघाती आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. इतर सिंचन प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करणाऱ्या सरकारने बारामती आणि पुरंदरच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत निव्वळ घोषणाबाजी केली आहे, अशी टीका करत त्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन गंभीर आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, बारामती- पुरंदर तालुक्यातील अवर्षणग्रस्त गावांतील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नीरा व कऱ्हा नदीच्या पाण्याची महत्वाकांक्षी उपसा सिंचन योजना स्व. अजितदादा पवार यांचे स्वप्न होते. या योजनेच्या माध्यमातून या भागातील गावांवरील जिरायत हा शिक्का कायमस्वरुपी पुसून टाकला जाणे शक्य आहे. हा प्रकल्प कधी व कसा पूर्ण करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली असली, तरी त्यासाठी आवश्यक निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही, ही बाब सुप्रिया सुळे यांनी निदर्शनास आणून दिली. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली खरी, परंतु ही केवळ घोषणाच असून या योजेनेसाठी निधीची तरतूद केलेली दिसत नाही. त्यामुळे हा प्रकल्प कधी व कसा पूर्ण करणार? याची स्पष्टता येत नाही. प्रकल्पाबाबत शासनाची नेमकी काय भूमिका? वास्तविक अजितदादांनी दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी कण्हेरी, ता. बारामती याठिकाणी झालेल्या सभेत सदर योजनेचा उल्लेख केला होता. या योजनेसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करीत असून त्या माध्यमातून सुमारे अडीच टीएमसी पाणी साठविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी विविध प्रकल्पांची घोषणा करीत असताना नीरा-कऱ्हा नदीजोड प्रकल्पासाठीच्या निधीच्या तरतुदींचा उल्लेख केला नाही. उलट राज्यातील इतर सर्व प्रकल्पांच्या मात्र निधीसहीत घोषणा केल्या आहेत . यामुळे या अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाबाबत शासनाची नेमकी काय भूमिका आहे, याबाबत जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद करावी हा प्रकल्प या भागातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असून या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच पिण्याचे पाणी देखील उपलब्ध होणार आहे. या भागातील नागरीकांची होणारी सोय आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता सदर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाने भरीव तरतूद करावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:12 pm

वाढत्या ‘स्क्रीन टाईम’चा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम

मुंबई : प्रतिनिधी मोबाईल, टॅब आणि टीव्हीसमोर जास्त वेळ घालवणा-या मुलांमध्ये दिवसेंदिवस स्वभावातील आक्रमकपणा, चिडचिड, नैराश्य, एकाग्रतेचा अभाव दिसून येतो आणि वर्तणुकीतील समस्यांमध्येही वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. शारीरिक हालचालींचा अभाव आणि डिजिटल साधनांचा वाढता वापर हे यामागील प्रमुख घटक आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वाढता स्क्रीन टाईम थेट मुलांच्या मेंदूवर परिणाम करतो. डिजिटल कंटेंट मेंदूतील […] The post वाढत्या ‘स्क्रीन टाईम’चा होतोय मुलांच्या वर्तणुकीवर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 6:21 pm

मुकेश अंबानी पुन्हा आशियाचे ‘सम्राट’!

मुंबई : प्रतिनिधी ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२६’ नुसार जगातील श्रीमंतांची नवीन यादी जाहीर झाली असून, यात भारताने भरारी घेतली आहे. देशातील अब्जाधीशांची संख्या आता ३०८ वर पोहोचली असून, चीन आणि अमेरिकेनंतर भारत जगात तिस-या स्थानावर आहे. जागतिक स्तरावर प्रथमच अब्जाधीशांची संख्या ४,००० च्या पार गेली असून, एकूण ४,०२० अब्जाधीशांची नोंद झाली आहे. रिपोर्टनुसार, यंदा […] The post मुकेश अंबानी पुन्हा आशियाचे ‘सम्राट’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 6:19 pm

शेजारील राष्ट्रांवरील हल्ले थांबवणार; इराणची घोषणा 

तेहरान : अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांनंतर संतापलेल्या इराणने शेजारील राष्ट्रांवरही हल्ले केले होते. परंतु आता शेजारील राष्ट्रांवर हल्ले करणार नाही असे इराणच्या राष्ट्रपतींनी म्हटले आहे; परंतु त्यासाठी एक अटही ठेवली आहे. जोवर शेजारील राष्ट्रांच्या भूमीचा वापर आमच्यावरील हल्ल्यासाठी केला जात नाही तोपर्यंत आम्हीही या राष्ट्रांवर हल्ला करणार नाही. इराणच्या अंतरिम लीडरशीप कॉन्सिलने याला मंजुरी दिली आहे. […] The post शेजारील राष्ट्रांवरील हल्ले थांबवणार; इराणची घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 6:16 pm

नाशिक NCP जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली:सोन्यासारखी माणसे सोडून जात आहेत, ही मोठी शोकांतिका - छगन भुजबळ

सोन्यासारखी माणसे अकाली निधनाने आपल्याला सोडून जात आहे. ही आपल्यासाठी अतिशय दु:खद घटना आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी कायम एकनिष्ठ राहिलेले ॲड. रवींद्रनाना पगार यांच्या निधनाने एक कुशल संघटक व अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज विशेष सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा राष्ट्रवादी भवन, मुंबई नाका, नाशिक येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, स्व. अजितदादा पवार यांच्यासारख्या तरुण तडफदार नेत्याचे निधन झाले. त्यांच्या दोन चार दिवसांनी जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्रनाना पगार यांचे निधन झाले. या घटना अतिशय सुखदायी आहे. सोन्यासारखी माणसे अशी अकाली निघून गेली ही आपल्यासाठी अतिशय दुःखद घटना.पक्षाचे एक निष्ठावान व सक्रिय पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे व 'नाना' म्हणून प्रसिद्ध असलेले ॲड. रवींद्रनाना पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून झटत आले आहेत. नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात, विविध निवडणुकांमध्ये त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी सदैव जनहितासाठी केला. जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहिले. ग्रामीण भागातील स्थानिक प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठोस भूमिका घेतली असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. १५ वर्षांहून अधिक काळ जिल्हाध्यक्ष पद ते पुढे म्हणाले की, ॲड. रवींद्रनाना पगार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी कायम एकनिष्ठ राहिले. त्यांचा बागलाण मतदारसंघ हा राखीव असल्याने प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी आपले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कामाला कधीही खंड पडू दिला नाही. १५ वर्षाहून अधिक काळ पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. पक्षाच्या वाढीसाठी संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान हे अतिशय महत्वाचे राहिले. त्यांच्या निधनाने एक कुशल संघटक व अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी हानी झाली असल्याचे प्रतिपादन मंत्री ना. भुजबळ यांनी यावेळी बोलतांना केले. पगार यांची एक्झीट धक्कादायक सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्रनाना पगार यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी घेतलेली ‘अकाली एक्झीट’ धक्कादायक असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांनी सांगितले. नानांच्या नेतृत्वात २०२४ मध्ये जिल्ह्यात ७ आमदार नानांच्या नेत्तृत्वात सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील आमदारांची संख्या २००९ च्या तुलनेत वाढून ४ झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत आमदारांची संख्या ६ झाली. तर नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नानांच्या नेतृत्वाने ७ आमदार जिल्ह्यात निवडून आल्याचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी सांगितले. येलो पॉलिटिक्सपासून दूर राहिलेली व्यक्ती केंद्रात व राज्यांत सत्तेत असणाऱ्या पक्षांचे प्रमुख पद भूषवित असतांना देखील 'येलो पॉलिटिक्स' पासून दूर राहिलेल्या रवी नानांचे निष्कलंक नेतृत्व, वागण्यातील साधेपणा, कार्यकर्त्यांना जीव लावण्याची हातोथी, थेट संपर्क व संघटन कौशल्यामुळे सर्वत्र हळहळ होत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी सांगितले. पक्षाच्या विद्यार्थी, युवक व जेष्ठ अशा तीनही संघटनांचे जिल्हाध्यक्ष” पद भूषविणारे नाना हे सर्वपक्षांमध्ये एकमेव अध्यक्ष होते असे माजी आमदार जयंत जाधव यांनी यावेळी बोलतांना सांगितले. 'सुविचार गौरव' पुरस्काराची संकल्पना सुविचार मंच’ या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे ते संस्थापक होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व सामान्यमधील असामान्य व्यक्तीचे काम समाजापुढे आणुन त्यांचा सन्मान करणारा 'सुविचार गौरव' पुरस्कार वितरण सोहळ्यांची संकल्पना रवींद्रनाना पगार यांनी पुढे आणली होती. आणि अल्पावधीतच नाशिकचा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणून या कार्यक्रमास राज्यात ओळख मिळाली असल्याचे सार्वजनिक वाचनालयाचे सांस्कृतिक सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी यावेळी बोलतांना म्हटले. वकृत्व, कतृत्व व नेतृत्वाचा संगम छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी आयुष्यभर वाटचाल केलेल्या रविनानांच्या व्यक्तिमत्वात वकृत्व, कतृत्व व नेतृत्वाचा संगम होता असे व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्रक यांनी बोलतांना सांगितले. कार्यकर्त्याशी कौटुंबिक संबंध स्पष्टवक्ते असलेला रवींद्रनानांचा सर्व वयोगटातील नागरिकांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्या सुख-दुखात सहभागी होऊन कार्यकर्त्याशी कौटुंबिक संबंध जोडले गेले होते. हेच त्यांच्या यशस्वी नेत्तृत्वाचे सिक्रेट होते, असे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळ यांनी म्हटले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे, माजी खासदार देविदास पिंगळे, व्हि.एन.नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्रक, माजी आमदार जयंत जाधव, जेष्ठ नेते दिलीप खैरे, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब आहेर, नाना महाले, बाळासाहेब कर्डक आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी अॅड. रवींद्रनाना पगार यांचे चिरंजीव आकाश पगार व कुटुंबीय देखील उपस्थित होते. या विशेष श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन डॉ.योगेश गोसावी यांनी केले तर आभार सागर बाविस्कर यांनी मानले. सामुहिक पसायदानाने शोकसभेची सांगता करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 5:58 pm

देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी पुरवठ्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा […] The post देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 5:14 pm

'उजास'चे उत्पादन नेटवर्क महाराष्ट्रात विस्तारले:महिलांसाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी वर्ध्यात नवे युनिट

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘उजास’ संस्थेने महाराष्ट्रातील महिलांसाठी उपजीविकेच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने आपल्या उत्पादन नेटवर्कचा विस्तार केला आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टअंतर्गत अद्वैतेशा बिर्ला यांनी स्थापन केलेल्या ‘उजास’ संस्थेने महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या सहकार्याने वर्धा येथे नवीन ‘उजास ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट’ सुरू केले आहे. या नव्या युनिटमुळे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या उत्पादन व्यवस्थेला बळ मिळणार असून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार आणि उद्यमशीलतेच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सध्या महाराष्ट्रात ‘उजास’ची दोन ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कार्यरत असून त्यामार्फत ४५ स्वयंसेवा गटांतील महिलांना रोजगार मिळत आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाडा भागातील सुमारे १,५०० महिलांसाठी अतिरिक्त उपजीविकेच्या संधी निर्माण होत आहेत. जालना येथे सुरू असलेल्या युनिटने गेल्या दोन वर्षांत १ लाख ११ हजार १२५ पुनर्वापरयोग्य कापडी पॅडचे उत्पादन करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर वर्धा येथील नवीन युनिटकडून दरवर्षी सुमारे ५५ हजारांहून अधिक कापडी पॅडचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. ‘उजास’च्या प्रमुख पूनम पाटकर यांनी सांगितले की, या उत्पादन युनिटची रचना पूर्णपणे महिलांच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या उत्पादन परिसंस्थेप्रमाणे करण्यात आली आहे. कटिंग, स्टिचिंग, गुणवत्ता नियंत्रण, पॅकेजिंग, मार्केटिंग आणि विक्री समन्वयापर्यंत सर्व प्रक्रिया महिलाच सांभाळतात. जालना येथील युनिटच्या अनुभवावरून प्रत्येक सहभागी महिलेला कौशल्य आणि उत्पादनाच्या आधारे दरवर्षी सुमारे ७५ हजार रुपयांचे स्थिर उत्पन्न मिळू शकते. यामुळे महिलांच्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळण्याबरोबरच बचत गटांनाही शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. उत्पादनासोबतच महिलांना आर्थिक साक्षरता, स्वच्छता मानके आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे त्या स्वतंत्रपणे युनिटचे संचालन व विस्तार करू शकतात. हा उपक्रम केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून महिलांमध्ये आत्मविश्वास, कौशल्य आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे संस्थेने स्पष्ट केले. या विस्तारामुळे तळागाळातील महिलांच्या नेतृत्वाखालील उद्यमांना चालना मिळून ग्रामीण भागातील समुदायाधारित विकासाला नवे बळ मिळणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 5:11 pm

एफआरएनडीकडून महिलांसाठी 'सुरक्षित कन्व्हर्झेशन्स' मोहीम:आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डिजिटल संवादासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणार

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, भारतातील अवतार-आधारित ऑडिओ सोशल डिस्कव्हरी प्लॅटफॉर्म एफआरएनडीने 'सुरक्षित कन्व्हर्झेशन्स' ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि आदरयुक्त डिजिटल संवादाचे वातावरण निर्माण करणे हा आहे. इंटरॅक्ट ग्रुपचे प्रमुख उत्पादन असलेल्या एफआरएनडी प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी डिझाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे त्या प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यात डिजिटल सुरक्षिततेची माहिती देणे, ऑनलाइन धोके ओळखणे आणि प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा सुविधांचा योग्य वापर करण्याबाबत महिलांना मार्गदर्शन केले जाईल. या मोहिमेअंतर्गत महिला वापरकर्त्यांसाठी नियमित इन-अॅप सत्रांचे आयोजन केले जाईल. यामध्ये सुरक्षित ऑनलाइन वर्तन, संभाव्य धोके ओळखणे आणि प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत माहिती दिली जाईल. तसेच, वापरकर्त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी कंपनीकडून २४x७ टोल-फ्री हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे, ज्यामुळे महिलांना रिअल-टाइम मार्गदर्शन आणि समर्थन उपलब्ध होईल. ही मोहीम भारत सरकारच्या अधिक सुरक्षित आणि समावेशक डिजिटल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. विशेषतः टियर-२ ते टियर-४ शहरांमधील महिलांना डिजिटल संवादाबाबत अधिक जागरूक व सक्षम बनवण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे, जेणेकरून प्रत्येक संवादामध्ये विश्वास आणि सुरक्षितता कायम राहील. सध्या एफआरएनडी प्लॅटफॉर्मवर दररोज जवळपास दहा लाख संभाषणे होतात. या संभाषणांसाठी व्हिडिओ, ऑडिओ आणि चॅट संवादांचे निरीक्षण करणारी १०० सदस्यांची मॉडरेशन टीम आणि रिअल-टाइम एआय प्रणाली कार्यरत आहे. इंटरॅक्ट ग्रुपचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भानू प्रताप सिंग तंवर म्हणाले की, भारतात सोशल नेटवर्किंगचा विस्तार वेगाने होत असताना सुरक्षितता ही केवळ सुविधा नसून विश्वासाचा पाया बनली आहे. एफआरएनडीमध्ये एआय, मॉडरेशन आणि उत्पादन डिझाईन यांचा वापर करून महिला-प्रथम सुरक्षा प्रणाली तयार करण्यात आली असून 'सुरक्षित कन्व्हर्झेशन्स' मोहीम ही त्याच कटिबद्धतेचा भाग आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 5:11 pm

दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन 15 मार्च रोजी:ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत शहासने भूषवणार अध्यक्षपद

काव्यमित्र संस्था पुणे आणि अपेक्षा मासिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन २०२६’ येत्या १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. नवी पेठ, गांजवे चौक येथील पत्रकार भवनात सकाळी ९.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत हे संमेलन पार पडेल. ज्येष्ठ साहित्यिक तथा देशभक्तकोषकार चंद्रकांत शहासने या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. अपेक्षा मासिक परिवारचे संस्थापक संपादक दत्तात्रय उभे आणि काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय जगताप असतील, तर प्रसिद्ध उद्योजक व साहित्यप्रेमी प्रमोदकुमार बेलसरे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. समाजसेवक नंदकुमार वाळंज उर्फ बाबुजी, पहिल्या काव्यविश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, स्वागताध्यक्ष सुरेश कोते, समाजसेवक सुरेशभाऊ लुणावत, संत तुकाराम सह. साखर कारखानाचे संचालक अंकुश उभे आणि पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात जीवन गौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार आणि विशेष कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, निमंत्रितांच्या हास्य कविसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी बंडा जोशी भूषवतील. या सत्रात बाळकृष्ण बाचल, अरविंद सगर, गणेश पुंडे, देवेंद्र गावंडे आणि तरुजा भोसले-वळसंगकर हे आपली हास्य कविता सादर करतील. संमेलनाच्या सुरुवातीला सकाळी १० ते ११.३० या वेळेत स्वागत, उद्घाटन, प्रास्ताविक, स्मरणिका प्रकाशन, तसेच स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्षांचे भाषण होईल. तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे, ज्याचे अध्यक्षस्थान साहित्यिक व व्याख्याते प्रा. विजय लोंढे भूषवतील. यामध्ये निमंत्रित कवी व कवयित्री वेगवेगळ्या विषयांवरील कवितांचे सादरीकरण करतील. त्यानंतरच्या सत्रात ‘मराठी काव्य विश्वातील संत साहित्याचे महत्त्व’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. लता पाडेकर-मुळे या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवतील, तर नामवंत वक्ते डॉ. पांडुरंग कंद आणि गझलकार व ज्येष्ठ विचारवंत संजय पठाडे हे आपले मनोगत व्यक्त करतील.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 5:10 pm

जुन्नरमधून 20 बिबट्यांचे 'वनतारा' केंद्रात स्थलांतर:मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागाचा पुढाकार, 50 बिबट्यांना मंजुरी

जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रातून २० बिबट्यांचे गुजरात राज्यातील जामनगर येथील 'वनतारा' केंद्रात स्थलांतर करण्यात आले आहे. मानव-बिबट संघर्ष कमी करण्याच्या आणि माणिकडोह निवारा केंद्रातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात १० नर आणि १० मादी बिबट्यांचा समावेश आहे. गेल्या दहा वर्षांपासून जुन्नर वनविभाग, विशेषतः जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील काही भागांत, मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या परिसरात बिबट्यांकडून पशुधन आणि मानवांवर हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. यामुळे वनविभागाने संघर्ष क्षेत्रातील बिबट्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची मोहीम हाती घेतली होती. पकडण्यात आलेल्या बिबट्यांना जुन्नर वनविभागातील माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. मात्र, या केंद्राची क्षमता केवळ ५० बिबट्यांपर्यंत मर्यादित असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे स्थलांतर करणे आवश्यक बनले. त्यानुसार, ५० बिबट्यांना जामनगर येथील ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन सेंटर (वनतारा) येथे हलवण्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला २० डिसेंबर २०२५ रोजी मंजुरी मिळाली. या मंजुरीनंतर आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ६ मार्च २०२६ रोजी जामनगर येथील वनतारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखालील २५ सदस्यीय पथक बिबट्यांच्या स्थलांतरासाठी जुन्नर येथे दाखल झाले. डॉ. जितेंद्र रामगावकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम प्रदेश आणि आशिष ठाकरे, वनसंरक्षक, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात २० बिबट्यांचे (१० नर आणि १० मादी) यशस्वी स्थलांतर करण्यात आले. हे बिबटे वनतारा केंद्राच्या वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे जामनगर येथे रवाना करण्यात आले. स्थलांतरणादरम्यान बिबट्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक पशुवैद्यकीय आणि तांत्रिक खबरदारी घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग; लोकेश पाटील, परिविक्षाधीन उपवनसंरक्षक; स्मिता राजहंस व अमृत शिंदे, सहायक वनसंरक्षक; प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर; चैतन्य कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर; तसेच वर्ल्डलाइफ एसओएसचे कर्मचारी उपस्थित होते. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी जुन्नर वनविभागामार्फत विविध उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 5:09 pm

राज्य सरकार बेकायदेशीर धर्मांतरविरोधी कायदा आणणार:नागरिक सोशल फाउंडेशनकडून या भूमिकेचे स्वागत, मुख्यमंत्र्यांचे आभार

राज्यात वाढत्या बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट' पारित करून लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेचे नागरिक सोशल फाउंडेशनने स्वागत केले आहे. यापूर्वी, नागरिक सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेने महाराष्ट्र सरकारकडे तातडीने हा कायदा लागू करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा कायदा आणण्याची तयारी दर्शवल्याने फाउंडेशनने समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा आणण्याचे सूतोवाच केल्याबद्दल त्यांचे आणि राज्य सरकारचे आभार मानण्यासाठी पुणे श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सीए सर्वेश मेहेंदळे, संचालक प्रीतम थोरवे आणि पुष्कर सप्रे उपस्थित होते. नागरिक सोशल फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले होते की, महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागांमध्ये, विशेषतः धुळे, नंदुरबार, पुणे आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे धर्मांतराच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. अशा प्रकारचे अवैध धर्मांतर व्यक्तीच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून सामाजिक सौहार्दालाही गंभीर धोका निर्माण करणारे आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की, धर्मांतर हे केवळ व्यक्तीच्या श्रद्धा, स्वेच्छा आणि जाणिवेवर आधारित असावे. दबाव, फसवणूक, आर्थिक लाभ किंवा इतर प्रलोभनाद्वारे केलेले धर्मांतर अवैध ठरले पाहिजे. अशा कायद्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा आदर राखत सर्व समुदायांचे संरक्षण, धार्मिक समरसता आणि सामाजिक शांतता दृढ होऊ शकते. या कायद्यामुळे परकीय निधी किंवा अनधिकृत धार्मिक बांधकामांचा गैरवापर थांबवता येईल आणि दोषी संस्था किंवा व्यक्तींवर कठोर कारवाई करता येईल, असेही फाउंडेशनने म्हटले आहे. नागरिक सोशल फाउंडेशनने सार्वजनिक जनजागृती, सामाजिक संशोधन, कायदेविषयक अभ्यास तसेच कायदा अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारे डेटा, दस्तऐवज आणि समुदाय संवादाच्या प्रक्रियेत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 5:07 pm

जागतिक शांततेसाठी भारताने पुढाकार घ्यावा:अण्णा हजारेंचे पंतप्रधान मोदींना पत्र, मध्यपूर्वेतील तणावावर व्यक्त केली चिंता

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जागतिक स्तरावर वाढत्या तणावामुळे मानवतेला धोका निर्माण झाला असून, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अण्णांनी या पत्राद्वारे केली आहे. गेल्या आठवडाभरात मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला असून, युद्धाचे ढग गडद झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून मध्यपूर्वेत तणाव कमालीचा वाढला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. आठवडा उलटूनही हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने जगभरातून चिंता व्यक्त होत आहे. आता या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत उपरोक्त आवाहन केले आहे. नेमके काय म्हणाले अण्णा हजारे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी जगातील सध्याच्या परिस्थितीवर सखोल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात, सध्या जग अत्यंत चिंताजनक परिस्थितीतून जात आहे. विविध देशांमधील संघर्षामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे. युद्धात निष्पाप महिला, मुले आणि कुटुंबांना सोसाव्या लागणाऱ्या यातना अत्यंत वेदनादायक आहेत. भारताची संस्कृती ही अहिंसा आणि शांततेची राहिली आहे. आपण नेहमीच जगाला संवादाचा मार्ग दाखवला आहे, त्यामुळे या कठीण काळात भारताने शांततेचा संदेश देणे गरजेचे आहे. शस्त्रे नव्हे, संवाद हवा अण्णा हजारे यांनी पत्रात संवादाच्या महत्त्वावर भर दिला आहे. आज जगाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची नाही, तर एकमेकांवरील विश्वासाची आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो, मात्र संवादातूनच कायमस्वरूपी समाधान आणि स्थिरतेचा मार्ग निघू शकतो. भारताने एक जबाबदार आणि मोठी लोकशाही म्हणून जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही माझी नम्र प्रार्थना आहे, असे त्यांनी नमूद केले. भारताच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. या संवेदनशील वेळी जर भारत माणुसकी आणि शांततेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिला, तर ते संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली आहे. हे ही वाचा… अमेरिका-इस्त्राईल आणि इराणचे युद्ध आठव्या दिवशीही सुरू:5000 हून अधिक बॉम्ब पडले, 1200 हून अधिक मृत्यू; 15 फोटोंमध्ये युद्धाची परिस्थिती इराणविरुद्ध अमेरिका-इस्त्रायल हल्ल्याचा आज आठवा दिवस आहे. इस्त्रायली आणि अमेरिकन सैन्याने शुक्रवारीही इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागली. इराणचे इस्त्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर तसेच इतर ठिकाणीही हल्ले सुरू आहेत. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामनेई यांचा मृत्यू झाला होता. अमेरिका-इस्त्रायलने तीन दिवसांत 5000 हून अधिक बॉम्ब टाकले आहेत. यामुळे इराणमध्ये 1200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 4:45 pm

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसचा एल्गार:हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वात 9 मार्चला कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा

केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापार करारामुळे देशातील शेतकरी व कृषी क्षेत्र देशोधडीला लागणार आहे. आधीच अस्मानी सुलतानी संकटात पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी व्यापारी करार हा मोठा आघात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर सपशेल शरणांगती पत्करली असून या करारामुळे भारतातील शेतमालाला भाव मिळणार नाही परिणामी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भिती आहे. ग्रामीण भागातील गरिब, कष्टकऱ्यांसाठी युपीए सरकारने आणलेली मनरेगा ही हक्काची रोजगार देणारी योजनाही भाजपा सरकारने मोडीत काढली आहे. केंद्रातील भाजपा सरकारबरोबरच राज्यातील भाजपा महायुतीचे सरकारही शेतकरी विरोधी असून गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प आणून शेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचा या शक्तीपीठाला तीव्र विरोध आहे पण सरकार मात्र या विरोधाकडे कानाडोळा करून त्यांच्या लाडक्या उद्योगपती मित्रासाठी शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहे. भाजपा सरकारच्या या जुलमी, अत्याचारी, शेतकरी विरोधी धोरणाविरोधात काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असून ९ मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात येणार आहे. अमेरिकेबरोबरचा व्यापार करार, मनरेगा, शक्तीपीठ महामार्ग या प्रमुख मागण्याबरोबरच आदिवासी विशेष पदभरती, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, घरकुल योजना या मागण्यासाठीही हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडे या यात्रेच्या समन्वयाची जबाबदारी असून प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांच्यासह हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 4:26 pm

इंधनाचे पैसे आगाऊ दिले तरच पेट्रोल मिळणार:आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कंपन्यांची डीलर्सना सूचना; 50% पंप बंद पडण्याची भीती

इराण विरुद्ध इस्त्रायल - अमेरिका युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रालाही बसत आहेत. या युद्धामुळे इंधनाचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन तेल कंपन्यांनी पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना इंधनासाठी आगाऊ पैसे देण्याची अट घातली आहे. यामुळे पुणे शहरातील 50 टक्के पेट्रोल पंप बंद पडून इंधनाची आणीबाणी उद्भवण्याची भीती निर्माण झाली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातच गॅस आणि इंधन पुरवठा यावर विपरीत परिणाम जाणवू लागला आहे. पुण्यात देखील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच आता इंधनाचा देखील तुटवडा जाणवू लागला आहे. पुणे शहरातील विविध पेट्रोल आणि डिझेल पुरवठा करणाऱ्या डीलर्सना पेट्रोल कंपनीने इंधनाचे पैसे आगाऊ दिले तरच पेट्रोल पंपाच्या गाड्यांमध्ये इंधन भरले जाईल अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील 50 टक्के पेट्रोल पंप आगामी काळात बंद राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काय म्हणाले ऑल इंडिया पेट्रोल डिझेल संघटनेचे प्रवक्ते? ऑल इंडिया पेट्रोल डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी याविषयी बोलताना सांगितले की, युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल पंप चालक आणि मालक यांना विविध पेट्रोल वितरित करणाऱ्या कंपनीने इंधन भरण्यासाठी आगाऊ रकमेची मागणी केली आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांनी संबंधित पेट्रोल पंप मालकांनी इंधनाची पैसे आगाऊ दिल्यानंतरच त्यांना गाड्यांमध्ये इंधन भरू दिले जाणार आहे असे सूचित केले आहे. मात्र, पेट्रोल पंप चालक आणि मालक यांची आर्थिक परिस्थिती आगाऊ पैसे देण्याची नाही ही वस्तुस्थिती आहे. पुणे शहरात साधारण 550 पेट्रोल पंप असून त्यातील 50 टक्के पेट्रोल पंप या नियमामुळे लवकरच बंद राहतील असे दिसत आहे. इंधनाचा साठा मुबलक उपलब्ध असताना अशाप्रकारे अचानक अगाऊ पैसे पेट्रोल पंप चालकांकडून घेणे योग्य नाही. याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी विनंती आम्ही केली आहे, असे ते म्हणाले. 7-8 दिवसांची क्रेडिट लाईनही बंद उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल पंप चालकांना 7-8 दिवसांचे क्रेडिट मिळत होते. पण आता पैसे भरल्याशिवाय पेट्रोल व डिझेल मिळणार नाही, असा स्पष्ट संदेश तेल कंपन्यांनी पाठवला आहे. यामुळे पेट्रोल पंप चालकांची मोठी अडचण झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 4:11 pm

रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे दादांचा अपघात?:भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने मांडली वेगळीच थेअरी; CM ना लिहिले पत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अवघ्या राज्याचे रान पेटवले आहे. त्यांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी वेगवेगळे पुरावे व तांत्रिक माहिती समोर आणली आहे. पण आता भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने अजित पवारांच्या विमान अपघातासाठी रोहित पवारांचाच साखर कारखाना जबाबदार असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. या पदाधिकाऱ्याने या प्रकरणाची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताचा संबंध आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याशी जोडला आहे. त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी रोहित पवारांच्या साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती परिसरातील दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोलनकर काय म्हणाले आपल्या पत्रात? सोलनकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील शेठफळ गडे येथे रोहित पवार यांच्याशी एक साखर कारखाना आहे. या कारखान्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ व त्वचेच्या तक्रारी भेडसावत आहेत. त्याचा शेतीवरही परिणाम होत आहे. अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी बारामती परिसरात या कारखान्याच्या धुरामुळे कमी दृश्यमानता होती का? औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके तयार झाले होते का? याची वैज्ञानिक तपासणी होणे आवश्यक आहे. विशेषतः रोहित पवार यांनी स्वतः कारखान्याचा धूर विमानतळासाठी अडथळा ठरतो की नाही याचे सादरीकरण करावे, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवारांनी घेतली अरविंद केजरीवालांची भेट दुसरीकडे, रोहित पवारांनी आज दिल्लीत आपचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. ते या भेटीची माहिती देताना म्हणाले, अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आज अजितदादांच्या विमान अपघातावर चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून याबाबत जमा केलेल्या संपूर्ण माहितीचं प्रेझेंटेशन त्यांना दिले. त्यांनीही याबाबतचे सगळे तपशील बारकाईने समजून घेतले. अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आणि देशात अशी दुर्घटना पुन्हा घडू नये आणि त्यात कुणाचाही बळी जाऊ नये यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, त्यासाठी या विषयावर ‘आप’च्या खासदारांनी संसदेत आवाज उठवावा अशी विनंतीही त्यांना केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या लढ्यात सोबत असल्याचा विश्वास दिला. दरम्यान ,रोहित पवारांनी आप खासदार संजय सिंह यांचीही आज भेट घेतली. त्यांनाही त्यांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेशी संबंधित तांत्रिक त्रुटी व इतर गोष्टींची माहिती दिली. यावेळी संजय सिंह यांनी त्यांना अजितदादांना न्याय मिळण्यासाठी या विषयावर राज्यसभेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 3:57 pm

पुढचे दोन दिवस राज्यात उष्णतेचा हाय अलर्ट

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आता प्रचंड उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस पार करून चाळीशी गाठतानाचे चित्र आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यभर उष्णतेचे अलर्ट दिले आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उष्ण व आर्द्र हवामानाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात कमाल तापमानात […] The post पुढचे दोन दिवस राज्यात उष्णतेचा हाय अलर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 3:44 pm

केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग

वाराणसी : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हेलिकॉप्टर अपघतातून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री मौर्य यांनी कौशाम्बीसाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे औमासीच्या विमानतळाव त्यांना हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. मिळालेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री लखनौच्या ला मार्टस् मैदानावरून कौशाम्बीसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या केबिनमध्ये अचानक […] The post केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 3:39 pm

सौदी अरेबियात अडकले हजारो उमराह यात्री

तेहरान : मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाने केवळ सीमांवरच तणाव वाढलेला नाही. तर यामुळे उमराह यात्रेसाठी निघालेल्या अनेक यात्रेकरूंच्या आनंदावर विरजण पडले आहे. सौदी अरेबियात उमराहसाठी गेलेले जगभरातील यात्रेकरू हवाई सेवा बंद पडल्याने सौदी अरेबियात अडकले आहेत. रमजानच्या काळात ही परिस्थिती उद्भवली असून घरी परतण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. भारतासह, इंडोनेशियापासून ते मलेशियापर्यंतचे यात्रेकरू सौदी […] The post सौदी अरेबियात अडकले हजारो उमराह यात्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 3:36 pm

इराणची युद्धनौका कोचीमध्ये डॉक; नौदलाच्या १८३ सैनिकांना भारताचा आसरा

नवी दिल्ली : अमेरिकेच्या पाणबुडीने दोन दिवसांपूर्वीच भारतीय समुद्र हद्दीच्या जवळ इराणची एक युद्धनौदा बुडवली होती. यानंतर भारताने इराणच्या एका युद्धनौकेला भारतातील कोची बंदरात त्यांची युद्धनौका डॉक करण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर या युद्धनौकेवरील १८३ सदस्यांना देखील नौदलाच्या एका फॅसिलिटीमध्ये आसरा दिला आहे. याबाबतची माहिती सरकारी अधिका-यांनी दिली. भारताने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव् ू […] The post इराणची युद्धनौका कोचीमध्ये डॉक; नौदलाच्या १८३ सैनिकांना भारताचा आसरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 3:27 pm

यूपीएससीमध्येही महाराष्ट्राचा डंका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष २०२५ च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषिकेश आलासे ६१, आकाश त्रिवेदी यांनी ७३, गौरव चोपडा यांनी ८३, सायली पगार यांनी ८७, वा तर दीक्षा पाटकर यांनी ८८ वा क्रमांक पटकावला आहे. […] The post यूपीएससीमध्येही महाराष्ट्राचा डंका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 3:17 pm

युद्धाचा भडका स्वयंपाकघरात ; गॅस सिलेंडर ६० रुपयांनी महाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाचे पडसाद आता जगासह भारताच्या बाजारपेठांत उमटताना दिसत आहेत. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी करताच कच्च्या तेलासह एलपीजीचे दर भडकले आहेत. याचा थेट परिणाम भारतात होताना दिसत असून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबविला आहे. […] The post युद्धाचा भडका स्वयंपाकघरात ; गॅस सिलेंडर ६० रुपयांनी महाग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 3:14 pm

तरुणाचा रेल्वेच्या हाय व्होल्टेज वायरजवळ धिंगाणा:खांडबारा रेल्वे स्थानकावरील घटना; रेल्वे वाहतूक विस्कळीत, पाहा VIDEO

नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानकावर एका माथेफिरू तरुणाने रेल्वेच्या डब्यावर चढून हायव्होल्टेज ओव्हरहेड वायरलगत धिंगाणा घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आणि काही काळ रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 10 ते 10.30 च्या सुमारास भुसावळ-सुरत रेल्वे मार्गावरील खांडबारा स्थानकात ही घटना घडली. एक माथेफिरू तरुण रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या एका प्रवाशी रेल्वेच्या डब्यावर चढला. डब्यावर चढल्यानंतर त्याने तिथे इकडून तिकडे पळण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, रेल्वेला वीजपुरवठा करणाऱ्या 25,000 ल्टच्या जिवंत तारांच्या अगदी जवळून तो तरुण जात होता. त्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. एका तासाच्या मनधरणीनंतर उतरला खाली हा प्रकार लक्षात येताच स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्यात आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी सदर तरुणाला खाली उतरवण्यासाठी अनेक विनंत्या केल्या, मात्र तो तरुण कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर अर्धा ते एक तासाच्या मनधरणीनंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले. पण तोपर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली होती. दुसरीकडे, रेल्वेच्या जिवंत वीजतारांच्या इतक्या जवळ जाणे अत्यंत धोकादायक असते. त्यामुळे अशा प्रकारांपासून नागरिकांनी दूर राहावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी त्या तरुणाची चौकशी सुरू केली आहे. तो नेमका कोण आहे, तसेच त्याने हा प्रकार का केला याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना रेल्वे परिसरात सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. हे ही वाचा... BMW कार ट्रक, कंटेनरला धडकली:कारमधील चौघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी; औसा - तुळजापूर महामार्गावरील भयंकर घटना भरधाव वेगातील कार लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रक व कंटेनरला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सांगलीच्या एका व्यापाऱ्यासह 4 जण ठार, तर 2 जण गंभीर झालेत. लातूर जिल्ह्यातील औसा - तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. सांगली येथील धनराज काशीनाथ जाधव (49) काही कामानिमित्त आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून (एमएच 04 ईजी 7500) लातूरला आले होते. शुक्रवारी रात्री काम आटोपून ते परत निघाले होते. रस्त्यात शिवली येथे जेवण केल्यानंतर ते सहकाऱ्याला सोडण्यासाठी औशाला आले होते. औशानजिक रात्री 10.15 च्या सुमारास त्यांची कार लाकडाने भरलेल्या ट्रक (एमएच 25 यू 0522) व एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) धडकली. त्यात धनराज जाधव यांच्यासह आबासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) व विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) हे 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 2:48 pm

BMW कार ट्रक, कंटेनरला धडकली:कारमधील चौघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी; औसा - तुळजापूर महामार्गावरील भयंकर घटना

भरधाव वेगातील कार लाकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रक व कंटेनरला धडकल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सांगलीच्या एका व्यापाऱ्यासह 4 जण ठार, तर 2 जण गंभीर झालेत. लातूर जिल्ह्यातील औसा - तुळजापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. सांगली येथील धनराज काशीनाथ जाधव (49) काही कामानिमित्त आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून (एमएच 04 ईजी 7500) लातूरला आले होते. शुक्रवारी रात्री काम आटोपून ते परत निघाले होते. रस्त्यात शिवली येथे जेवण केल्यानंतर ते सहकाऱ्याला सोडण्यासाठी औशाला आले होते. औशानजिक रात्री 10.15 च्या सुमारास त्यांची कार लाकडाने भरलेल्या ट्रक (एमएच 25 यू 0522) व एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) धडकली. त्यात धनराज जाधव यांच्यासह आबासाहेब साळुंके (36), शुभम शेषेराव पाटील (26), किसन रामलिंग साळुंके (49, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. तर जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) व विनायक श्रीकांत हालदर (28, रा. सांगली) हे 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. लाकडाने भरलेला ट्रकही 100 फूट अंतरावर जाऊन उलटला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना वाहनाबाहेर काढून तत्काळ रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था काहीकाळ विस्कळीत झाली होती. पण पोलिसांनी ती सुरुळीत केली. धनराज जाधव हे सांगली येथील व्यापारी होते. बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने ते औसा तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या व्यवसायाचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. समृद्धी महामार्गावरील अपघातात 3 ठार दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील नाथनगर (वडखा) शिवारात सुसाट कंटेनरने दिलेल्या धडकेत 3 कामगार ठार झालेत. हे कामगार दुभाजकाचे क्रॅश बॅरिअर प्लेट बदलण्याच्या कामावर होते. ते आपले साहित्य घेऊन उभ्या असलेल्या सर्विस ट्रकच्या आडोशाला जेवणासाठी बसले होते. त्याचवेळी कंटेनरने त्यांच्या ट्रकला धडक दिली आणि ते चिरडले गेले. सदर कंटेनर या कामगारांना चिरडल्यानंतर पुढे उभ्या असणाऱ्या एका जेसीबीवर आदळला. या घटनेत इतर 3 जण गंभीर जखमी झालेत. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 2:26 pm

वृक्षतोडीविरोधात छ. संभाजीनगरमध्ये संताप

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट रस्त्यासाठी वारसा वृक्षांसह (वडाची मोठी झाडे) अंदाजे १ हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. तर गरवारे स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या नावावर ७५ झाडांची कत्तल केली जाणार आहे, या वृक्षतोडीला वृक्षप्रेमींचा विरोध होत आहे. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी वृक्षतोड करण्याच्या मनपाच्या हालचालींना […] The post वृक्षतोडीविरोधात छ. संभाजीनगरमध्ये संताप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 2:11 pm

महिलांच्या तक्रारींसाठी 'महिला सन्मान पोर्टल'चे अनावरण:एका क्लिकवर नोंदवता येणार तक्रार- सुनेत्रा पवार, मुलीला सासरी पाठवताना हातात संविधान द्या- चाकणकर

जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी महिलांची सुरक्षा, हक्क आणि आत्मनिर्भरता या विषयांवर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या 'महिला सन्मान पोर्टल'चे अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या पोर्टलच्या माध्यमातून आता महिलांना घरबसल्या एका क्लिकवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे. हे पोर्टल थेट पोलिस यंत्रणेशी जोडलेले असल्याने तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल आणि संबंधित विभागामार्फत पीडित महिलांना त्वरित न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांना संविधानाची जाणीव करून देणे आवश्यक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या भाषणात समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज अधोरेखित केली. महिलांच्या अस्तित्वाच्या लढाईत जेव्हा पुरुष बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहतात, तेव्हा ही लढाई जिंकण्याचे बळ अधिक मिळते, असे त्या म्हणाल्या. तसेच, महिलांना केवळ धार्मिक पोथ्या-पुराणात न अडकवता त्यांना संविधानाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात 'संविधान' द्या, जेणेकरून तिला आपल्या हक्कांची प्रबळ जाणीव होईल, असे आवाहनही त्यांनी पालकांना केले. 72 महिलांची सुटका महिला सुरक्षेबाबत बोलताना चाकणकर यांनी आयोगाच्या कामगिरीचा आढावा मांडला. गेल्या वर्षभरात मानवी तस्करीच्या मोठ्या जाळ्यातून 72 महिलांची सुटका करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरण आणि ठाणे, जळगाव, नाशिक येथील अवैध वैद्यकीय केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांनी आपल्या कार्यस्थळी अंतर्गत तक्रार समिती आहे का याची खात्री करावी आणि मोबाईलमधील 'पॅनिक बटण'चा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 2:10 pm

नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी; अहिल्यानगरमध्ये खळबळ

अहिल्यानगर : प्रतिनिधी यात्रेतील टेंडर दुस-याला दिल्याच्या कारणावरून नगरसेवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरात घडला आहे. भाजपचे नगरसेवक तथा सुजय विखे यांचे निकटवर्तीय दहरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राहाता शहराचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला असून […] The post नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी; अहिल्यानगरमध्ये खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Mar 2026 2:07 pm

पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा:महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर भर द्या, उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

पुण्यातील औंध येथे पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या सभागृहात ‘ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र’च्या वतीने गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ पशुवैद्य, तज्ज्ञ आणि प्रगतशील पशुपालकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रमेश वझरकर यांनी माहिती दिली की, २०११ मध्ये डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वडील डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्यांनी संशोधक प्राध्यापकांसाठी स्वतंत्र पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. वडिलांच्या या इच्छेनुसार, डॉ. गोऱ्हे यांनी आर्थिक मदत केली आणि त्यातून ‘डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे पुरस्कृत उत्कृष्ट पशुवैज्ञानिक पुरस्कार’ सुरू झाला. यंदा हा पुरस्कार मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र जयवंत झेंडे यांना प्रदान करण्यात आला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी आपल्या वडिलांच्या कार्याची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांनी बीएआयएफ संस्थेत तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ग्रामीण विकासासाठी मोठे योगदान दिले. संकरित पैदास कार्यक्रम आणि पशुधनासाठी लस निर्मिती क्षेत्रात त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. फूट अँड माऊथ डिसीजवरील औषध शोधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. परदेशातील पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता, भारतातील पशुवैद्यकीय सेवेचे महत्त्व डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, परदेशात अपॉइंटमेंट मिळणे कठीण झाले आहे, तर भारतात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा चांगली उपलब्ध आहे, परंतु या व्यवसायाला अजून पुरेसे महत्त्व मिळालेले नाही. शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार, पशुसंवर्धन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, पुरवणी मागण्यांमध्ये पशुसंवर्धन विभागासाठी बजेटमध्ये काय तरतुदी आहेत, यावर माझे विशेष लक्ष असून विभागाच्या प्रस्तावाला चालना देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. त्यांनी पशुसंवर्धन विभागाने यशोगाथा आणि शासकीय योजनांची माहिती सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन केले. आगामी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने यंदाचे वर्ष ‘महिला शेतकरी वर्ष’ म्हणून साजरे होत असून, महिला पशुपालकांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी २ लाख ५१ हजार रुपयांचा निधी दिला आणि वडिलांनी लिहिलेले ‘माझ्या जीवन लहरी’ हे पुस्तक डॉ. प्रविणकुमार देवरे यांना भेट दिले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 2:03 pm

सायबर चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश:पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी केली सात जणांना अटक

पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी शेअर मार्केटमधील आयपीओमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र आणि राजस्थानमधून सात जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींच्या बँक खात्यांमधील सुमारे १ कोटी ८० लाख रुपये पोलिसांनी गोठवले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कोल्हापूर येथील अभय बाबासाहेब पाटील (३४), पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील शिवतेज राजेंद्र पोटे (३०), मुंबईतील दहिसर पूर्व येथील महेश करबसपा उडचणे (२८) आणि राहुल बहादुरप्रसाद मौर्य (२४), पुण्यातील लोहगाव येथील युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार (३५) तसेच राजस्थानमधील पंकज मंगु गिरीगोस्वामी (२४) आणि प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (२३) यांचा समावेश आहे. पोलीस उपायुक्‍त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदाराला शेअर आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी पैसे घेतले. मात्र, कोणताही परतावा न देता एकूण ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, आरोपींनी विविध बँक खात्यांद्वारे व्यवहार केल्याचे समोर आले. अॅक्सिस बँकेच्या एका खात्यात २१ लाख रुपये जमा झाल्याचे आढळून आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर येथे तपास करून अभय पाटील याला अटक केली. अभयने त्याचे बँक खाते शिवतेज पोटे याला वापरण्यासाठी दिले होते, त्यामुळे शिवतेज पोटे याला वाघोली येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात आरोपींनी सायबर गुन्ह्यांसाठी १५ ते २० बँक खाती वापरल्याचे उघड झाले. याच दरम्यान, कोटक बँकेतील आणखी एका खात्यात २५ लाख रुपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात मुंबईतील दहिसर येथून महेश उडचणे आणि राहुल मौर्य यांना अटक करण्यात आली. तसेच, तपासादरम्यान पुणे व राजस्थानमधून इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांमधील एकूण १ कोटी ८० लाख रुपये रक्कम पोलिसांनी गोठवली असून, सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात सहायक निरीक्षक प्रवीण स्‍वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोसले, विनायक म्हसकर, हेमंत खरात, सुभाष पाटील, सुरज शिंदे, किरण देवकर, श्रीकांत कबुले यांचा समावेश होता.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 2:00 pm

मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याच्या गैरसमजातून तरुणावर हल्ला:पुण्याच्या एनडीए रस्त्यावरील घटना, पाच जण अटकेत

मैत्रिणीकडे पाहून गाणे गायल्याच्या गैरसमजातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना पुण्यातील एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात घडली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. जखमी तरुणाचे नाव प्रिन्स शैलेंद्र सिंग (वय २६, रा. भैरवनाथनगर, कोंढवे धावडे) असे आहे. या घटनेबाबत सिंग याने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी करण गणपत वाशिलकर (वय ३४), रोहित उर्फ ओजी गणेश मौर्य (वय २४), गणेश सिद्धराम कालदीप (वय २०), आदित्य गणेश पवार आणि बबलू शिवाजी कांबळे (वय २२, सर्व रा. उत्तमनगर) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास प्रिन्स सिंग उत्तमनगर भागातील कोंढवा गेट परिसरात थांबला होता. त्यावेळी सिंग याने मैत्रिणीकडे पाहून गाणे गायले, असा गैरसमज आरोपी वाशिलकर याचा झाला. या गैरसमजातून वाशिलकर आणि त्याचे साथीदार मौर्य, कालदीप, पवार, कांबळे यांनी सिंग याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक कुरेवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिस भरतीनिमित्त सहकारनगर भागात वाहतूक बदल पोलिस भरतीसाठी सहकारनगर भागातील कै. सदू शिंदे स्टेडियम, तसेच परिसरातील रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ‘पुणे पोलिस दलातील पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत चालक पदासाठीची भरती प्रक्रिया सहकारनगरमधील कै. सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम येथे राबविण्यात येणार आहे. शनिवारी (७ मार्च) आणि रविवारी (८ मार्च) भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी मैदानावर राबविण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. कै. सदू शिंदे स्टेडियम ते ट्री पॉईंटपर्यंत असलेल्या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी तळजाई ते बिकानेर मिठाई चौक दरम्यान ये जा करण्यासाठी स्टेडियम शेजारील डांबरी रस्त्याचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 1:58 pm

तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू:पुणे शहरातील औंध, मुंढवा आणि खराडी बाह्यवळण मार्गावरील घटना

पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. औंध, मुंढवा आणि खराडी बाह्यवळण मार्गावर या घटना घडल्या. या प्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खराडी बाह्यवळण मार्गावर भरधाव मोटारीच्या धडकेत शकुंतला निकाळजे (वय ५५) या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. ५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मणिपाल हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या निकाळजे यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक गोडसे तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, औंध परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत विजयसिंग गोकुळसिंग राजपूत (वय ५४, रा. औंध) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ५ फेब्रुवारी रोजी रात्री आठच्या सुमारास औंधमधील गायकवाड पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील पुढील तपास करत आहेत. मुंढव्यातील केशवनगर भागात क्रेनच्या चाकाखाली सापडून साहेबराव विठोबा दंडारे (वय ७२) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साहेबराव हे मुंढवा-केशवनगर परिसरातील झेड कॉर्नरजवळ रस्त्याच्या कडेला झोपले असताना हा अपघात घडला. या प्रकरणी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 1:56 pm

महागाई वाढणारच, पण बांबूमुळे अर्थव्यवस्था सुधारणार:इंधन आयातीमुळे महागाई अटळ, बायो-इंधनावर भर देण्याची गरज- पाशा पटेल

पुणे, प्रतिनिधी: कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी महागाई वाढतच राहील, असे मत व्यक्त केले आहे. इंधनाच्या मोठ्या आयातीमुळे गॅस आणि पेट्रोलचे दर वाढतच राहणार असल्याने महागाईला समर्थन नसले तरी ती वाढणारच, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. युद्धामुळे हळद, द्राक्षे आणि कांद्याचे नुकसान होत असले तरी जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे पटेल यांनी नमूद केले. भारताला मोठ्या प्रमाणात इंधन आयात करावे लागते. यावर देशातच बायो-इंधनाचा पर्याय शोधणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. यावेळी युद्धजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक मदत दिली जाणार का, या प्रश्नावर पाशा पटेल भडकले आणि त्यांनी उत्तर देणे टाळले. पटेल हे पुण्यातील आयएमडीआर येथे आयोजित बांबू प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर बोलत होते. त्यांनी बांबू उद्योगाचे महत्त्व अधोरेखित केले. आगामी काळात प्लास्टिक बंदी होणार असल्याने बांबू हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच, ग्रीन आच्छादन वाढवण्यासाठी बांबू लागवड आवश्यक आहे. बांबूपासून विविध वस्तूंची निर्मिती होत असून, प्रदूषण रोखण्यासाठी जीवाश्म इंधनाऐवजी बायो-इंधनाचा वापर करावा लागेल, असे ते म्हणाले. देशात दरवर्षी 78 हजार कोटी रुपयांचे लाकूड आयात केले जाते. लाकडाची गरज भागवण्यासाठी 30 वर्षे लागतील, पण बांबू तीन वर्षांत ही गरज पूर्ण करू शकतो. मानवजातीला वाचवण्यासाठी बांबू लागवड महत्त्वाची आहे, असे पटेल यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या अर्थसंकल्पात बांबू लागवडीसाठी प्रथमच 4 हजार 300 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने विज्ञानाचा आधार घेऊन 33 टक्के वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे, जी देशात केवळ महाराष्ट्रातच दिसून येते. राज्य सरकारचे बांबू उद्योगात 50 हजार कोटींची गुंतवणूक करून आर्थिक उलाढाल करण्याचे लक्ष्य आहे. आता बांबू हे इंधन, कपडे आणि अन्नपदार्थांसाठीही उपयुक्त ठरणार आहे, असे पटेल यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 1:40 pm

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी धरणे आंदोलन:व्यवस्थापन बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्याची मागणी, 10 मार्चला पुण्यात आयोजन

गया (बिहार) येथील ऐतिहासिक 'महाबोधी महाविहाराचे' व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध धम्मियांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी पुणे परिसरातील भिक्खू संघातर्फे राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन 10 मार्च 2026 रोजी दुपारी 3:30 वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (जिल्हाधिकारी कार्यालयासमोर), पुणे येथे पार पडणार आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला या आंदोलनाचे समन्वयक भंते नागघोष महाथेरो, भंते धम्मानंद, भंते पंय्यारखित, भंते संचितबोधी, भंते मिलिंद उपस्थित होते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले, त्या गया येथील महाबोधी महाविहाराची निर्मिती चक्रवर्ती सम्राट अशोकाने केली होती. हजारो वर्षांचा बौद्ध वारसा असूनही, या विहाराचे व्यवस्थापन सध्या बौद्धेतर व्यक्तींच्या (विशेषतः ब्राह्मण धर्मपंडितांच्या) ताब्यात आहे. हे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली असावे, अशी जगभरातील बौद्ध बांधवांची आग्रही मागणी आहे.भगवान बुद्धांचा धम्म आणि वारसा जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, असे मानून देशभरातील बौद्ध समाज शहर, जिल्हा आणि तालुका स्तरावर संघटित होऊन हे आंदोलन करत आहे असे बौद्ध भिक्खू यांनी सांगितले. या आंदोलनास सर्व राजकीय पक्ष, राजकीय नेते, बौद्धेतर धर्म प्रतिनिधी आणि विद्वान व्यक्तींचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि व्यापक सहमती निर्माण करण्यासाठी 'महाबोधी महाविहार धरणे आंदोलन' आयोजित करण्यात येत आहे.पुणे परिसरातील सर्व धम्मप्रेमी आणि न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन 'पुणे परिसरातील भिक्खू संघ' या निमंत्रक संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 1:37 pm

विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता:वर्धा, अकोला, अमरावतीला हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा; कमाल तापमानात वाढ

विदर्भात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेबाबत चेतावणी जारी करण्यात आली आहे. या काळात उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील इतर भागांमध्येही कमाल तापमान सामान्यापेक्षा सुमारे तीन ते चार अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या या काळात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा येणे किंवा उष्माघाताचा धोका वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी दैनंदिन कामकाज करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. तहान नसली तरी नियमितपणे पाणी प्या उष्णतेच्या लाटेदरम्यान काही सोप्या उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. शक्य असल्यास दुपारी बारा ते तीन या वेळेत बाहेर जाणे टाळावे. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी तहान नसली तरी नियमितपणे पाणी आणि इतर द्रवपदार्थ घ्यावेत. तसेच हलके, सैल आणि फिकट रंगाचे सूती कपडे वापरावेत. बाहेर जाताना टोपी, छत्री किंवा ओले कापड वापरून डोके झाकल्यास उष्णतेपासून संरक्षण मिळू शकते. मद्यपान तसेच चहा, कॉफी आणि गॅसयुक्त पेयांचे सेवन कमी करावे, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता वाढू शकते. आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज याशिवाय लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. घरातील तसेच बाहेरील जनावरांना सावलीत ठेवावे आणि त्यांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्माघाताची लक्षणे जसे की डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ किंवा जास्त घाम येणे जाणवू लागल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी आणि गरज भासल्यास वैद्यकीय मदत घ्यावी. नागरिकांनी सतर्क राहून हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 1:33 pm

नाशिकमध्ये धक्कादायक घटना:प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. मनीषा जेजुरकर यांचे निधन; गंगापूर रोड परिसरात खळबळ, चौकशी सुरू

नाशिक शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शहरातील परिचित आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत असून वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शहरातील गंगापूर रोड परिसरात त्या वास्तव्यास होत्या. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह ओळखीच्या व्यक्तींना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. घरात त्यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर ही बाब समोर आली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि परिचितांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू करत घटनेबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे काम हाती घेतले आहे. डॉ. मनीषा जेजुरकर या आयुर्वेदिक वैद्यकीय क्षेत्रात परिचित नाव मानल्या जात होत्या. अनेक वर्षे त्यांनी रुग्णसेवा करत वैद्यकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या कुटुंबात अशी घटना घडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपासाच्या अनुषंगाने विविध बाबींची चौकशी केली जात आहे. कुटुंबीय, शेजारी तसेच परिचितांकडून माहिती घेण्याचे कामही सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण समजून घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात शोकाचे वातावरण या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, परिचित तसेच त्यांच्या रुग्णांकडून शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी त्यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि रुग्णांप्रती असलेल्या बांधिलकीची आठवण काढली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोकाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 1:21 pm

पीक कर्ज देणाऱ्या सर्वच बँकांचे कर्ज होणार माफ:मुख्यमंत्र्यांनी केले चित्र स्पष्ट; ही कर्जमाफी आतापर्यंतची सर्वात चांगली असल्याचा दावा

ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? याविषयीची संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. पण या कर्जमाफीचा लाभ कोणत्या बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जावर मिळेल याविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात होते. पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयीची स्थिती स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतो राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेचे होणार नाही, कुणी म्हणतो या सोसायटीची होणार नाही, कुणी म्हणतो त्या सोसायटीची होणार नाही. पण सरकारने पीक कर्ज देण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही बँकेने दिलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आमचा प्रयत्न हा आहे की, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे बँकेला नाही. त्यामुळे या निर्णयाचा फायदा शेतकऱ्याला व्हावा यासाठी काम सुरू आहे. आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की, 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता ही घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्यामुळे पुढच्या कारवाईला सुरुवात होईल. समिती यावर काम करत आहे. ही समिती यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी सांगेल. मी एवढेच सांगतो की, ही कर्जमाफी यापूर्वीच्या सर्वच कर्जमाफीच्या निर्णयांहून चांगली आहे. वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर मुख्यमंत्र्यांनी यावेळी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचाही दावा केला. कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे. जेव्हा महाराष्ट्राला भरभरून मिळते, तेव्हा विदर्भ कसा मागे राहील. विदर्भासाठी वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी गेम चेंजर ठरेल. हा प्रकल्प आतापर्यंतच्या आपल्या इतिहासातील सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्याचा आपण अर्थसंकल्पात समावेश केला आहे. त्यामुळे विदर्भाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असे ते म्हणाले. इराण युद्धावर भीतीचे वातावरण तयार करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांना इराण विरुद्ध इस्त्रायल - अमेरिका युद्धावर नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल असे चित्र निर्माण न करण्याचेही आवाहन केले. माझी माध्यमांना विनंती आहे की, नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण करू नये. जी काही परिस्थिती आहे, ती केंद्र सरकार हाताळत आहे. ती केंद्र सरकार सांगत आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार, ते घडणार असे सांगून नागरिकांच्या मनात भीती व संभ्रम तयार करणे हे देशाच्या व समाजाच्या नाही. केंद्र सरकारनेही काल हेच स्पष्टपणे सांगितले आहे, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 1:04 pm

घरात येशूची प्रतिमा असणे धर्मांतराचा पुरावा नाही:धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुराव्यांची गरज; HC चा निर्वाळा

घरात क्रॉस किंवा येशूची प्रतिमा ठेवणे हा धर्मांतराचा पुरावा नाही. धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुराव्यांची गरज असते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात सुनावणी करताना दिला. अकोला येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने अनुसूचित जातीच्या (एससी) प्रमाणपत्रासाठी केलेला अर्ज जात पडताळणी समितीने फेटाळला होता. यासाठी समितीने सदर विद्यार्थ्याच्या घरात क्रॉस व येशूच्या प्रतिमा असल्याचा व 1962 मधील शालेय नोंदीत कुटुंबाचा उल्लेख ख्रिश्चन म्हणून असल्याचा दाखला दिला होता. विद्यार्थ्याने जात पडताळणी समितीच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती मुकुलिका जावळकर व न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने उपरोक्त निर्वाळा दिला. कोर्ट म्हणाले, एखाद्या व्यक्तीच्या घरात क्रॉस किंवा येशू ख्रिस्त यांच्या प्रतिमा अथवा मूर्ती असणे हे त्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला याचा पुरावा ठरू शकत नाही. या प्रकरणी धर्मांतराचा दावा सिद्ध करण्यासाठी ठोस दस्तऐवजी पुरावे म्हणजे बाप्तिस्मा विधीचे दस्तऐवजीकरण किंवा बाप्तिस्मा प्रमाणपत्रासारखे ठोस पुरावे आवश्यक असतात. केवळ धार्मिक प्रतीके किंवा जुनी नोंद यावरून धर्मांतर झाल्याचा निष्कर्ष काढता येत नाही. औपचारिक धर्मांतर झाले नाही कोर्टाने असेही नमूद केले की, जात पडताळणी समितीने या प्रकरणी धर्मांतराची औपचारिक प्रक्रिया पार पाडली होती का? याची चौकशी करणे आवश्यक होते. याचिकाकर्त्याने सांगितले आहे की, त्याच्या कुटुंबाने केव्हाही औपाचारिक धर्मांतर केले नाही. त्याने पुढे असेही म्हटले की, जातीय भेदभाव टाळण्यासाठी त्याच्या आजोबांनी शाळेच्या नोंदीत स्वतःला ख्रिश्चन म्हणून नमूद केले होते. पण यासंबंधी कोणतेही धार्मिक धर्मांतर झाले नव्हते. याचिकाकर्त्याने आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ अनेक अधिकृत कागदपत्रांचा दाखला दिला होता. त्यात शाळेच्या व शासकीय नोंदी, तसेच एका नातेवाईकाला देण्यात आलेल्या जात प्रमाणपत्राचाही समावेश होता. या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालायने जिल्हा अधिकाऱ्यांनी मांडलेला युक्तिवाद निराधार असल्याचे नमूद केले. तसेच अकोला जात पडताळणी समितीचा निर्णय स्पष्टपणे त्रुटीपूर्ण व विकृत असल्याचे नमूद करत तो तत्काळ प्रभावाने रद्दबातलही केला. तसेच समितीला याचिकाकर्त्याला अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याचेही निर्देश दिले. हे ही वाचा… नांदेडमध्ये BHMS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या:खासगी वसतिगृहात आढळली मृत, NCP चे प्रदेश सचिव जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 12:32 pm

पीसीसीओईआरने राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला:आयआयटी कानपूर येथे 300 हून अधिक संघांचा सहभाग

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) च्या 'टीम तटरक्षक'ने आयआयटी कानपूर येथे आयोजित राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर आणि जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 'इनोवेशन इन रेझिलियनट इन्फ्रास्ट्रक्चर' हा प्रकल्प या संघाने सादर केला. देशभरातील 300 हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पीसीसीओईआरच्या विजेत्या संघात अभिषेक गिरी, वैशाख आनंद एम, माहेक फातन आणि सृष्टी सावळी यांचा समावेश होता. 'टीम तटरक्षक'ने सादर केलेला प्रकल्प मजबूत तांत्रिक पायाभूत रचना, नाविन्यपूर्ण डिझाईन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची क्षमता दर्शवणारा होता. 'किनारपट्टीवरील पूरपरिस्थिती आणि हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी पर्यावरणीय बुद्धिमत्ता आणि संरचनात्मक अभियांत्रिकी तत्त्वांचा समन्वय साधून शाश्वत पायाभूत सुविधा विकसित करणे' हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. या प्रकल्पांचे सखोल तांत्रिक परीक्षण, दस्तऐवजीकरण पडताळणी, व्यवहार्यता विश्लेषण, नूतन उपक्रम मूल्यांकन तसेच व्यावसायिक विस्तारक्षमतेचे परीक्षण अशा कठोर निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.विजेत्या संघाला पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सिव्हिल इंजीनियरिंग विभाग प्रमुख डॉ. समीर सावरकर आणि आरएनडी प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे यांनी मार्गदर्शन केले.पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या संघाचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 12:17 pm

दिगंबर जैन राष्ट्रसंतांचा दुर्मिळ समागम:भांडगाव येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव; 11 ते 15 मार्च 2026

पुणे, प्रतिनिधी: दौंड तालुक्यातील भांडगाव (यवत) येथील भक्तामर कलश तीर्थ येथे 11 ते 15 मार्च 2026 या कालावधीत ‘1008 आदिजिन पंचमेरू मानस्तंभ पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात दिगंबर जैन राष्ट्रसंतांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम होणार आहे. भक्तामर कलश तीर्थ परिसरात कलशाकार मंदिर, नवग्रह रत्नमय प्रतिमा, 108 आदिनाथ जिन प्रतिमा, भक्तामर ध्यान केंद्र, हीलिंग सेंटर, शास्त्र मानस्तंभ, महाद्वार, भोजनालय, संत निवास, विश्रामालय आणि आरोग्य धाम यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. महोत्सवादरम्यान 12 मार्च रोजी दुपारी 1 वाजता ‘भक्तामर ज्योतिष सम्मेलन’ आणि 14 मार्च रोजी दुपारी 1 वाजता ‘भक्तामर हीलर महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, 48000 मीटर हस्तलिखित भक्तामर वस्त्रांची विशेष झांकी सादर केली जाईल. याशिवाय, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी ‘जैन अल्पसंख्याक योजना – सरकारी योजना आणि संधी’ या विषयावर मार्गदर्शन करतील. अमेरिकेतून पूर्वा सारंग शहा यांनी निर्मित भक्तामरवरील चित्रफितीचे सादरीकरणही होणार आहे. या महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, राजू शेट्टी, आमदार राहुल कुल यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला किशोर जिनदत्त शहा (चंदूकाका सराफ), डॉ. सारंग शरद कुमार शहा, सुजाता निरंजन शहा, ॲड. डॉ. स्वप्निल महावीर शहा (पुणे), मिलिंद फडे, चेतन शहा (बारामती), वीरकुमार शहा आणि सुरेंद्र बडजात्या उपस्थित होते. आचार्य प्रणाम सागर हे गेल्या 29 वर्षांपासून अखंड भक्तामर साधनेत लीन आहेत. त्यांच्या सान्निध्यात अनेक कुटुंबांना आध्यात्मिक शांती आणि तीर्थानुभूती लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यात प्रथमच जगतगुरु अष्टांग निमित्त ज्ञानी गणधराचार्य कुंथु सागर, राष्ट्र संत आचार्य गुणधरनंदी जी, पूज्य आचार्य प्रसन्न ऋषि यांसह अनेक आचार्य, उपाध्याय, साधू-साध्वींचा दुर्मिळ संतसमागम होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 12:16 pm

नांदेडमध्ये BHMS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या:खासगी वसतिगृहात आढळली मृत, NCP चे प्रदेश सचिव जीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल

नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्यासह अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांशा मुंजाजी गायकवाड (रा. वाजेगाव) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हडको येथील पद्मश्री श्यामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात बीएचएमएस द्वितीय वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयालगत असणाऱ्या जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असणाऱ्या खासगी वसतिगृहात राहत होती. शुक्रवारी दुपारी तिने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब निदर्शनास आली. आकांक्षांचे वडील मुंजाजी गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकांक्षाची वसतिगृहाची गत 8-10 महिन्यांची फीस बाकी होती. ही फीस भरण्यासाठी जीवन घोगरे पाटील तिला वारंवार मानसिक त्रास देत होते. फी वसुलीचा सततचा तगादा व होणाऱ्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यानुसार सिडको ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी, वसतिगृह चालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आकांक्षाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका तिच्या नातलगांनी घेतली होती. यामुळे विष्णुपुरी स्थित शासकीय रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी पुराव्यांची तपासणी करून शवविच्छेदन अहवाल व तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर दोषींवर कडक कारवाई करण्याची ग्वाही दिल्यामुळे तणाव निवळला. 40-50 विद्यार्थिनींचे वास्तव्य असणारे वसतिगृह अनधिकृत उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या वसतिगृहात ही घटना घडली, ते वसतिगृहत अनधिकृत असल्याचाही दावा केला जात आहे. दिव्य मराठी त्याची पुष्टी करत नाही. सद्यस्थितीत या वसतिगृहात जवळपास 40-50 विद्यार्थीनी वास्तव्यास आहेत. पण या घटनेमुळे नियमांचे उल्लंघन, सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव व विद्यार्थिनींची सुरक्षितता यावरून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वसतिगृह चालकाने त्रास दिल्याचे ठोस पुरावे दुसरीकडे, मृत आकांक्षाच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, वसतिगृह चालक जीवन घोगरे पाटील यांनी आकांक्षाला त्रास दिल्याचे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. त्यात काही ऑडिओ क्लिप्सचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 12:04 pm

शरद पवारांपेक्षा पार्थ पवार अधिक श्रीमंत:संपत्तीच्या बाबतीत नातू पुढे; पवार घराण्यातील दोन पिढ्या संसदेत, दोघेही बिनविरोध विजयी

महाराष्ट्रातील आगामी राज्यसभेच्या निवडणुकीत राज्यातील सातही जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन पिढ्यांची एकाच वेळी राज्यसभेत एन्ट्री झाल्याने राजकीय वर्तुळात विशेष चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी निवडून आले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे महायुतीकडून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे आजोबा आणि नातू अशा दोन पिढ्या एकाच वेळी संसदेत पोहोचल्याने हा प्रसंग राज्याच्या राजकारणात विशेष ठरला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी 6 मार्च रोजी या दोन्ही नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले होते. उमेदवारी अर्जासोबत निवडणूक नियमांनुसार उमेदवारांना त्यांच्या मालमत्तेचा तपशील असलेले प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार दोघांनीही आपल्या संपत्तीचा तपशील निवडणूक आयोगाकडे दिला. या प्रतिज्ञापत्रांवर नजर टाकल्यास पार्थ पवार यांची एकूण मालमत्ता त्यांच्या आजोबा शरद पवार यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे राजकीय चर्चेसोबतच त्यांच्या संपत्तीच्या आकडेवारीचीही चर्चा सुरू झाली आहे. शरद व प्रतिभा पवारांकडे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावावर एकूण सुमारे 60 कोटी 71 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये 44 कोटी 72 लाख रुपयांची जंगम मालमत्ता समाविष्ट आहे. त्यांच्या नावावर सुमारे 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम आहे. बँका आणि वित्तसंस्थांमधील मुदत ठेवींची रक्कम 11 कोटी 66 लाख रुपयांच्या आसपास आहे. याशिवाय समभाग, म्युच्युअल फंड यांसारख्या गुंतवणुकीत सुमारे 27 कोटी रुपयांची रक्कम आहे. सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची किंमत जवळपास 3 कोटी 85 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये बारामतीतील शेती, घर आणि सदनिका यांचे सध्याचे अंदाजे मूल्य 15 कोटी 99 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. तसेच सुप्रिया एंटरप्रायजेसचे सुमारे 49 लाख 84 हजार रुपयांचे दायित्वही त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. पार्थ पवारांच्या नावावर 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता दुसरीकडे पार्थ पवार यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण मालमत्ता 88 कोटी 33 लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये 11 कोटी 35 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बँका, टपाल विभाग, विमा आणि इतर वित्तीय संस्थांमधील मुदत ठेवींची रक्कम 3 कोटी 68 लाख रुपये असल्याचे सांगितले आहे. समभाग आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुमारे 1 कोटी 17 लाख रुपये आहे. सोने-चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे 1 कोटी 31 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये बारामती तालुक्यातील शेतजमिनी आणि पुण्यातील घर यांचे एकत्रित अंदाजे मूल्य 76 कोटी 98 लाख रुपये आहे. तसेच बँका आणि वित्तीय संस्थांचे सुमारे 92 लाख 48 हजार रुपयांचे कर्ज असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. पवार कुटुंबातील दोन पिढ्या एकाच वेळी राज्यसभेत या निवडणुकीमुळे पवार कुटुंबातील दोन पिढ्या एकाच वेळी राज्यसभेत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे दीर्घ राजकीय अनुभव असलेले शरद पवार तर दुसरीकडे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे पार्थ पवार अशी ही राजकीय जोडी संसदेत जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात या दोघांची भूमिका कशी राहते, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 11:52 am

वृक्षतोडीविरोधात संभाजीनगरकर आक्रमक:रस्ता, स्टेडियमसाठी 1100 मोठी झाडे तोडणार, साश्रू नयनांनी प्रशासनाला सवाल, चिपको आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगरमध्ये नगर नाका ते दौलताबाद टी पॉइंट रस्त्यासाठी वारसा वृक्षांसह (वडाची मोठी झाडे) अंदाजे 1 हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. तर गरवारे स्टेडियम येथे आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या नावावर 75 झाडांची कत्तल केली जाणार आहे, या वृक्षतोडीला विरोध म्हणून शनिवारी छत्रपती संभाजीनगरकर आक्रमक झाले. त्यांनी आज गरवारे स्टेडियमवर प्रतिकात्मक आंदोलन केले. येणाऱ्या काळात वृक्षतोडीविरोधातला लढा तीव्र करण्याचा इशारा दिला. तुम्ही ही झाडे का तोडताय? जी झाडे आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देतात, त्यांना नष्ट करण्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का? हा केवळ चिमुकल्या आरोही बस्तेचा प्रश्न नाही, तर तो निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक छत्रपती संभाजीनगरकराचा टाहो आहे. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी वृक्षतोड करण्याच्या मनपाच्या हालचालींना आता विरोधाची धार लागली असून, विकासाच्या नावाखाली 30-40 वर्षे जुन्या वृक्षांचा बळी देण्यापेक्षा तुम्ही इतरत्र हे स्टेडियम करावे किंवा झाडे न तोडता विकास करावा, अन्यथा 'चिपको आंदोलन' करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने व्हावेत, यासाठी महापालिकेने 56 कोटी रुपयांच्या निधीतून गरवारे स्टेडियमचा कायापालट करण्याचे निश्चित केला जाणार आहे. चार टप्प्यांत होणाऱ्या या कामात 8 हजार प्रेक्षक क्षमतेचे अद्ययावत पॅव्हेलियन उभारले जाणार आहे. या भव्य नियोजनासाठी परिसरातील 30 ते 40 वर्षे जुन्या डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे, या वृक्षतोडीविरोधात वृक्षप्रेमी आक्रमक झाले आहेत. कमावता बाप मारून 10 मुले जन्माला घालण्यासारखा हा प्रकार वृक्षप्रेमी किशोर पाठक यांनी प्रशासकीय धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, शहराचे हरित क्षेत्र आधीच 4 टक्क्यांहून कमी झाले आहे. जुने झाड तोडून 10 नवीन झाडे लावण्याचे आश्वासन देणे म्हणजे एक कमावता बाप मारून 10 मुले होऊ देण्यासारखे आहे; ती कधी मोठी होतील आणि कधी फळ देतील याची शाश्वती नाही. नागरिकांमधील उदासिनतेचा प्रशासक आणि मंत्री फायदा घेत असतात. लोकांसाठी काही तरी भव्य दिव्य काही तरी करायचे आणि त्यामध्ये डल्ला मारायचा या व्यतिरिक्त दुसरा काही उद्देश यांचा नसतो. वाळवंटीकरणाकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. पडेगावची झाडे सुद्धा तुटणार आहेत. 30-40 वर्षांची झाडे तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमच्या डोक्यात काही तरी कल्पना येते आणि ती तुम्ही शहरावर थोपवता. लोकांचे अनेक प्रश्न आहे, ते सोडून गार्डन आणि स्टेडियम याकडे लक्ष दिले जात आहे. आमचा विकासाला विरोध नाही, लोकांचे मत विचारात घ्या. आपल्याकडे वृक्षाचे पुर्नरोपन काही शक्य नाही, ते यशस्वी होत नाही. आम्ही कोर्टात PIL दाखल केली आरती राळेगणकर म्हणाल्या की, ही झाडे तोडून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम करण्यात येणार आहे. आम्ही इथे झाडे लावली ती वाढवली. 30 वर्षे जुनी झाडे तोडत तुम्ही इथे स्टेडियम बनवत आहात. आमचा स्टेडियमला विरोध नाही, पण ही झाडे तोडू नये अशी आमची मागणी आहे. या संदर्भात आम्ही कोर्टात PIL (पिटिशन) दाखल केले आहे. यासंदर्भात सर्वांशी चर्चा केली पण तरीही मनपा प्रशासन झाडे तोडण्यावर ठाम आहे, तुम्ही झाडे तोडावीत म्हणून आम्ही ती वाढवली आहेत का? झाडे न तोडता विकास करा. ..तर आम्ही चिपको आंदोलन करू सुरेश तोडकर म्हणाले की, मी गेले 20 वर्षे सिडकोचा रहिवासी आहे. 20 वर्षांपासून आम्ही सर्व जण या झाडांच्या सावलीमध्ये ग्रीन ट्रॅकवर फिरायला येतो. तरुण मुले भरतीसाठी येतात. सिडकोतील ज्येष्ठ नागरिकांना वाहतुकीपासून सुरक्षित असलेले हे एकमेव ठिकाण आहे. हा आमचा ऑक्सिजन हब आहे, याला तोडण्याचा प्रशासनाने विचार करू नये. तु्म्हाला काय विकास करायचा आहे तो विकास झाडे न तोडता करा. पर्यायी जागेवर करा, इथे करायचा असेल तर झाडे मात्र तोडू नका. हवेची गुणवत्ता खराब झालेली असताना तुम्ही झाडे लावण्याची गरज असताना झाडे तोडू नका. पण तरीही झाडे तोडण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही चिपको आंदोलन करू. झाडे जगतीलच याची तुम्ही हमी घेऊ शकतात का? वृक्षप्रेमी आरती म्हणाल्या की, 30 वर्षे जुनी झाडे तुम्ही तोडून विकास करताल पण नवीन लावलेली झाडे जगतीलच याची तुम्ही हमी घेऊ शकतात का? झाडे वाचवून तुम्ही विकास केला पाहिजे. वृक्षप्रेमींची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्टेडियम हवे आहे, मात्र ते पर्यावरणाची हानी करून नको. जर स्टेडियम करायचेच असेल, तर ते शहराच्या बाहेर करा, जिथे पुरेशी जागा उपलब्ध आहे. शहरातील 'ऑक्सिजन हब' नष्ट करून प्रदूषणात भर घालू नका, असा सूर नागरिकांनी लावला आहे. झाडांची कत्तल थांबवण्यासाठी स्थानिकांनी घोषणाबाजी केली असून झाडे वाचवा, देश वाचवा अशा घोषणांनी गरवारे स्टेडियम परिसर दणाणून सोडला. नाशिकनंतर आता संभाजीनगर नाशिकमध्ये यावर्षी कुंभमेळा होतोय. त्यामुळे तपोवनात साधूग्रामसाठी 1825 झाडांची कत्तल करण्यात येणार होती. त्याविरोधात नाशिककर रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळाला. राजकीय पक्ष, नेते, अभिनेतेही नाशिकरांसोबत उभए राहिले. त्यानंतर प्रशासनाने मवाळ भूमिका घेतली. नाशिकचे आंदोलन थांबते न थांबते तोच आता छत्रपती संभाजीनगरमध्येही वृक्षतोडीविरोधात नागरिक आक्रमक झालेत. प्रशासनाने झाडे तोडण्याची भूमिका काय ठेवली, तर हे आंदोलन चिघळू शकते. तसा इशाराच आज नागरिकांनी दिला. त्यामुळे येणाऱ्या काळात ही झाडे तोडली जाणार, की प्रशासन काही मध्यम मार्ग काढणार हे पाहावे लागेल.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 11:50 am

भारताला परवानगी देणारी अमेरिका कोण?:पीएम मोदी अमेरिकेच्या तालावर का नाचताहेत? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा घणाघात

अमेरिकेने इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताला रशियाकडून पुढील 30 तेल खरेदी करण्याची मुभा दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमेरिकेच्या या निर्णयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भारताला परवानगी देणारी अमेरिका कोण? भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या तालावर का नाचत आहेत? असा संतप्त सवाल यांनी त्या प्रकरणी केला आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाने (ट्रेझरी डिपार्टमेंट) भारतीय रिफायनरींना रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची परवानगी दिली आहे. ही मुदत 4 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात येणार आहे. इराण विरुद्ध इस्त्रायल - अमेरिका युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकेने ही कथित सवलत दिली आहे. पण अमेरिकेची ही सवलत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे. विरोधी पक्षांनी या प्रकरणी मोदींवर शरसंधान साधत भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेकडे गहाण टाकल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनीही मोदींवर तोंडसूख घेतले आहे. काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? हर्षवर्धन सपकाळ शनिवारी सकाळी एका पोस्टद्वारे म्हणाले, भारताला परवानगी देणारा अमेरिका कोण? हा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान, आपल्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणातील फोलपणा नाही का? भारताचे पंतप्रधान अमेरिकेच्या तालावर का नाचताहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी एपस्टिन फाईल मुळे अमेरिकेसमोर कॉम्प्रमाईज्ड होऊन भारत देशाचा अपमान करत आहेत. शाब्बास... तुम्ही परंपरा जपली हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला होता. त्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर व पीएम मोदींचा एक फोटो पोस्ट करत सरकारवर उपरोधिक टीका केली होती. सपकाळ यांनी शेअर केलेल्या फोटोत मोदींच्या पाठीवर 'तडजोड करणारा' अशी पट्टी लावली आहे. त्यांच्या हातात अमेरिकेच्या परवानगीचा एक कागदही दिसत आहे. त्यावर 'शाब्बास... तुम्ही परंपरा जपली', असे सावरकर मोदींना म्हणताना छायाचित्रात दिसून येत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. सावरकरांवर छत्रपतींचा अवमान केल्याचा आरोप उल्लेखनीय बाब म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी यापूर्वीही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप केला होता. 'सहा सोनेरी पाने' या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचे लिहले आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकर यांनी केले आहे. 'स्वराज्य हे स्थापन होणारच होते. पण कावळा बसायला आणि डांग तुटायला, त्याप्रकारे शिवाजी महाराज आले', असे सावरकरांनी त्या पुस्तकात लिहले आहे. असे लिहणारे सावरकर भाजपला चालतात. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण आहे, असे हर्षवर्धन सपकाळ या प्रकरणी म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 11:02 am

ठेकेदारांसाठींचा अर्थसंकल्प:सर्वोत्कृष्ट विश्लेषण आदित्य ठाकरे यांनी केले, संजय राऊतांचा दावा; म्हणाले- कर्जमाफी खरोखरच होणार का? मग लाडक्या बहिणींचे काय?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आले. त्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची असल्याचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. फडणवीस सरकारची ही कर्जमाफी खरोखरच होणार आहे का? की केवळ घोषणा आहे? हे पहावे लागेल. मग लाडक्या बहिणींचे काय होणार? असा विषय असल्याचेही ते म्हणाले. या अर्थसंकल्पाचे एका वाक्यात सर्वोत्कृष्ट विश्लेषण आदित्य ठाकरे यांनी केले असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला. हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले आहेत. ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि योजना दिसत आहेत, त्यानुसार हा ठेकेदारांसाठी अर्थसंकल्प बनवला आहे हे स्पष्ट दिसत असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला. शेतकऱ्यांना जर खरोखरच कर्जमाफी मिळणार असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. राज्याचा शेतकरी संकटात आहे, विशेषता आता आखाती युद्धामुळे इराण मधील युद्धामुळे तिथून एग्रीकल्चरल प्रॉडक्टची जी निर्यात होते. ती दुबईच्या पोर्टवर किंवा इतर पोर्टवर आठ दिवस झाले तशीच पडून आहे. शेतकऱ्यांचा माल सडतोय. नुकसान होत आहे. अशा शेतकऱ्यांना शेवटी कर्ज काढावे लागते. अवकाळी पाऊस, गारपीट अशा अनेक गोष्टींमुळे शेतकरी मेताकुटीला आला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हमीभाव देण्याचे वचन नरेंद्र मोदी यांनी दिले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असली तरी हमीभावाबाबत सरकारचे धोरण काय आहे, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना हमीभाव मिळावा ही अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. जर शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसेल, तर ते शेती का करतील, असा सवालही त्यांनी केला. हमीभाव देण्याचे वचन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते, मात्र सत्तेत येऊन 11 वर्षे उलटूनही ते वचन पूर्ण झालेले नाही, असे राऊत म्हणाले. तसेच राज्यातही हीच परिस्थिती असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. राज्याच्या कृषी मंत्र्यांना परिस्थितीची जाणीव आहे का? राऊत पुढे म्हणाले की, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसून त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव, विमा संरक्षण आणि निर्यात व्यवस्थेबाबत ठोस धोरण हवे आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईसह काही बंदरांवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा निर्यात केलेला माल अडकून पडला आहे. त्यामुळे त्या मालाचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या मालाचा विमा काय होणार आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. युद्धामुळे फक्त गॅस आणि तेलाचे प्रश्न निर्माण होत नाहीत, तर निर्यातीसाठी पाठवलेला शेतमाल बंदरांवर अडकून सडत आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले. या परिस्थितीची राज्याच्या कृषी मंत्र्यांना जाणीव आहे का, असा सवाल करत त्यांनी सरकारने या विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:53 am

संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत इतिहासात उल्लेख नाही:संभाजी कादंबरीतील अनेक पात्रे काल्पनिक; लेखक विश्वास पाटील यांची कबुली

छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यसंस्काराबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख आढळत नसल्याचे लेखक विश्वास पाटील यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर कबूल केले आहे. त्यांच्या संभाजी या कादंबरीतील काही पात्रे आणि घटनांचे वर्णन हे ऐतिहासिक तथ्य नसून कल्पनेवर आधारित असल्याचेही त्यांनी उलटतपासणीत मान्य केले. विशेषतः जना परीटिण, गोविंद नाक, दामाजी पाटील आणि पाटलीण ही पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर या विधानाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगासमोर शुक्रवारी दिवसभर सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी लेखक विश्वास पाटील यांची सविस्तर उलटतपासणी घेतली. विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारताना कादंबरीतील संदर्भ, ऐतिहासिक आधार आणि त्या लिखाणाचा समाजावर होणारा परिणाम यावरही चर्चा झाली. या वेळी उत्तर देताना पाटील यांनी त्यांच्या कादंबरीतील काही उल्लेख काल्पनिक स्वरूपाचे असल्याचे मान्य केले, अशी माहिती अॅड. हिरे यांनी दिली. संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘संभाजी’ या कादंबरीत त्यांच्या अंत्यसंस्काराविषयी उल्लेख करण्यात आला होता. या कथनावरून महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी वाद निर्माण झाला होता. काही गटांनी कादंबरीतील कथनाचा आधार घेत संभाजी महाराजांचा अंत्यविधी विशिष्ट व्यक्तीने केल्याचा दावा केला होता. या दाव्यांमुळे दोन समाजांमध्ये मतभेद वाढल्याचेही सांगितले गेले. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव येथे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्या घटनेची चौकशी सध्या आयोगाकडून सुरू आहे. उलटतपासणीदरम्यान अॅड. शिशिर हिरे यांनी संभाजी महाराजांच्या अंत्यसंस्काराबाबत ऐतिहासिक पुरावे आहेत का, असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले की, संभाजी महाराजांच्या अंत्यविधीबाबत कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवजात स्पष्ट उल्लेख सापडत नाही. तसेच संभाजी, ही कादंबरी काही ऐतिहासिक तथ्ये आणि भौगोलिक संदर्भ यांच्या आधारे तयार केलेला कल्पनाविलास असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कादंबरीतील काही घटना आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरेगाव भीमा प्रकरणातील मुद्द्याला नव्याने महत्व याच सुनावणीदरम्यान इतिहासातील काही समकालीन स्रोतांचाही उल्लेख करण्यात आला. जेधे शकवली, मासीरे आलमगिर, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि खाफी खान या तत्कालीन इतिहासकारांच्या लिखाणाचा दाखला देत ‘संभाजी’ कादंबरीतील काही कथनांना ऐतिहासिक आधार नसल्याचे आयोगासमोर मांडण्यात आले. कादंबरीतील लिखाणाचा गैरवापर करून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो निषेधार्ह असल्याचेही विश्वास पाटील यांनी नमूद केले, अशी माहिती अॅड. शिशिर हिरे यांनी दिली. या सुनावणीनंतर कोरेगाव भीमा प्रकरणातील या मुद्द्याला नव्याने महत्व प्राप्त झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:21 am

शिखर बँक प्रकरणात रोहित पवारांचा दोषमुक्तीसाठी अर्ज:कन्नड साखर कारखाना लिलाव प्रकरण तापलं; ईडीला बाजू मांडण्याचे आदेश

कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मनी लाँडरिंगशी संबंधित या प्रकरणात स्वतःवरील आरोपातून मुक्त व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबई सत्र न्यायालयाने स्वीकारल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. रोहित पवार यांच्या अर्जाची दखल घेत न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी ईडीला 17 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरण गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि इतर काही नेत्यांची नावेही चर्चेत आली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानंतर न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. हा अहवाल न्यायालयाने स्वीकारल्यानंतर काही आरोपींना दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आता मनी लाँडरिंगशी संबंधित प्रकरणातूनही दोषमुक्त होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जामुळे पुन्हा एकदा शिखर बँक प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणाची सुरुवात ऑगस्ट 2019 मध्ये झाली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत एफआयआर नोंदवला होता. काही कारखाने अत्यंत कमी किमतीत विकले गेले आणि त्यामुळे बँकेचे नुकसान झाले, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुढे ईडीकडे गेला आणि त्यांनी मनी लाँडरिंगच्या दृष्टीनेही चौकशी सुरू केली. तपासादरम्यान ईडीने जुलै 2024 मध्ये तिसरे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात रोहित पवार यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले होते. ईडीच्या मते, शिखर बँकेकडे असलेल्या 80.56 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी 2009 मध्ये कन्नड सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेण्यात आला होता. त्यानंतर 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. मात्र हा लिलाव अत्यंत कमी किमतीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. लिलाव प्रक्रियेत रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडसह आणखी दोन पक्ष सहभागी झाले होते, असे ईडीने नमूद केले आहे. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला तांत्रिक कारणांवरून अपात्र ठरवण्यात आले आणि दुसरा बोलीदार बारामती अ‍ॅग्रोचा व्यावसायिक सहकारी असल्याचा आरोपही ईडीने केला होता. त्याचबरोबर त्या बोलीदाराला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता, असेही तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले होते. ईडीला 17 मार्चपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश दरम्यान, रोहित पवार यांनी त्यांच्या वकील कुशल मोर यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्या समोर दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जाची न्यायालयाने दखल घेत ईडीला 17 मार्चपर्यंत आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ईडी या अर्जाला विरोध करणार की त्यावर वेगळी भूमिका घेणार, याकडे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळाचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या पुढील सुनावणीत या प्रकरणाला कोणते वळण मिळते आणि रोहित पवार यांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 10:07 am

शिवटेकडी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात:शिवराय हे जाती, धर्मापलीकडचे राजे; आराध्या ठाकरे यांचे सोहळ्यात प्रतिपादन‎

प्रतिनिधी | टाकरखेडा शंभू सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती, अमरावती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जोक स्टेडियम ते काँग्रेस नगर रोड स्थित शिवविचारपीठ (खुले रंगमंच), शिवटेकडी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन व मानवंदना देऊन झाली. तसेच महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्त्या आराध्या ठाकरे यांनी शिवछत्रपतींचे आदर्श मूल्य, धार्मिक धोरण आणि शेतकरी धोरण यावर प्रभावी विवेचन केले. शिवराय हे जाती-धर्मापलीकडचे राजे होते. शासनाने शिवाजी महाराजांचे शेती विषयक धोरण अवलंबिले, तर शेतकरी पुन्हा समृद्ध होऊ शकतो. असे प्रतिपादन त्यांनी केले. पावनखिंडीचे वर्णन करताना त्यांनी अरे तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला असे उद्गार काढत उपस्थितांना भावूक केले. तसेच औरंगजेबाने आपल्या मुलाला दिलेल्या उपदेशाचे स्वगत ‘इसमे कोई शक नही शहजादे की हम खुश नसीब है कि हमे दुश्मन भी मिला तो शिवा जैसा मिला’ आपल्या शैलीत सादर करत त्यांनी सर्वांची मने जिंकली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज विषयावरील जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत आराध्या ठाकरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना ३ हजार रुपये रोख, शिल्ड व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रेमकुमार बोके व जिल्हाध्यक्ष सुरेंद्र आंडे, तर मुख्य अतिथी म्हणून आमदार संजय खोडके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर अभ्यंकर उपस्थित होते. तसेच विभागीय माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे, अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.जे. राऊत, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष अरविंद गावंडे, शिवश्री प्रदीप अंधारे, जिल्हा सचिव संजय ठाकरे, तालुकाध्यक्ष गजानन ठाकरे, अभिजीत पोहोकार, श्रीकांत लंगोटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन समन्वयक संजय ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हेमंत गावंडे, दीपक लोखंडे, राम बायस्कर, मयूर विघे, ऋषभ राऊत आदींनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:45 am

जातींमधील रक्तसंबंधांचे एकत्रीकरण अनिवार्य:बीजभाषक डॉ. जे.व्ही. पवार; विद्यापीठात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात मांडले आधुनिक डिजिटल इंडियाचे मुख्य उद्दिष्ट‎

प्रतिनिधी | अमरावती भारतातील जातीय विषमतेच्या भिंती तोडण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीयता निर्मूलनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ चर्चा नव्हे, तर कृतीची गरज आहे. समाजातील जातीभेद मुळापासून उखडून टाकण्यासाठी रक्तसंकर हाच एकमेव प्रभावी मार्ग असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनातून जाती भेदाच्या निर्मूलनासाठी आंतर जातीय विवाहांना दिलेले महत्त्व व केवळ प्रेमाच्या नावाखाली होणारे विवाह नव्हे, तर जातीची घट्ट विणलेली चौकट मोडण्यासाठी दोन भिन्न जातींमधील रक्तसंबंधांचे एकत्रीकरण होणे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध विचारवंत व चर्चासत्राचे बीजभाषक डॉ.जे.व्ही. पवार यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग आणि नारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आर्थिक दृष्टिकोन : आधुनिक भारताची निर्मिती आणि त्याची समकालीन प्रासंगिकता’ या विषयावर बीजभाषण करताना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, उद्घाटक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य विद्यापीठ, महूचे कुलगुरू डॉ. रामदास आत्राम, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर.डी. सिकची, श्री गजानन महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशिष मालू, प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे, आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते. चर्चासत्राचे उद्घाटन झाल्याची घोषणा करुन डॉ. रामदास आत्राम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक क्षेत्रातील विचार आणि त्यांनी मांडलेले विकासाचे दृष्टिकोन आजही आधुनिक भारतीय धोरणांचा पाया ठरत आहेत. केवळ रस्ते आणि कारखाने बांधणे म्हणजे विकास नसून, सामाजिक परिवर्तन हाच खरा विकास आहे, हे त्यांनी मांडलेले सूत्र आजच्या डिजिटल इंडियाच्या युगात अधिक महत्वाचे ठरत आहे. डॉ. आंबेडकरांचा ‘शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा' हा संदेश केवळ सामाजिक न्यायापुरता मर्यादित नव्हता, तर तो आर्थिक न्यायाचा एक सक्षम मार्ग होता. त्यांनी शिक्षणाला गरिबांसाठी केलेली सर्वात मोठी गुंतवणूक मानले होते. शिक्षणामुळे केवळ गतिशीलता वाढत नाही, तर पिढ्यानपीढ्या चालत आलेली विषमता मोडीत निघण्यासही मदत होते, असेही ते म्हणाले. आजच्या ‘नॉलेज इकॉनॉमी'मध्ये डॉ. आंबेडकरांचे हे विचार अधिक शक्तिशाली ठरतात. आधुनिक भारताचे ‘वित्तीय समावेशन', जन-धन बँक खाती, थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल पेमेंट्स ही पावले डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक लोकशाहीच्या स्वप्नाला पुढे नेणारी आहेत. डिजिटल तंत्रज्ञान हे केवळ प्रगत वर्गाचे साधन न राहता, ते आता आर्थिक सक्षमीकरणाचे एक प्रभावी शस्त्र बनले आहे. तळागाळातील लोकांपर्यंत थेट आर्थिक लाभ पोहोचवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हेच आधुनिक डिजिटल इंडियाचे मुख्य उद्दिष्ट आहे. डॉ. आंबेडकरांनी पाहिलेले आर्थिक न्यायाचे स्वप्न आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक वेगाने प्रत्यक्षात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच डॉ. आशिष मालू म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील त्यांची ही वाटचाल थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर आधारित आहे. आजचे स्टार्टअप्स, नाविन्यपूर्ण कल्पना आणि आत्मनिर्भरतेचे स्वप्न हे डॉ. आंबेडकरांनी दशकांपूर्वी मांडलेल्या विचारांचेच आधुनिक रूप आहे. ते म्हणाले, शिक्षण ही केवळ पदवी मिळवण्याची प्रक्रिया नसून, ती एक ‘थिंकर्स' आणि ‘जॉब क्रिएटर्स' घडवण्याची प्रक्रिया आहे. महाविद्यालयात केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता, कौशल्यावर आधारित शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि नैतिक मूल्यांची जोपासना व्हावी, जेणेकरून भविष्यातील आव्हानांना तोंड देणारे आंबेडकरवादी तरुण घडवता येतील. याप्रसंगी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. आर.डी. सिकची यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकेतून डॉ. संतोष बनसोड यांनी चर्चासत्र आयोजना मागील भूमिका मांडली. स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ. गोपाल वैराळे यांनी केले. याप्रसंगी १३८ शोध निबंधाच्या संपादकीय ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. संचालन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे समन्वयक डॉ. रत्नशिल खोब्रागडे यांनी, तर आभार प्राचार्य डॉ. मनिष सिरसाट यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, विचारवंत, अभ्यासक, साहित्यिक, विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक विचार प्रकर्षाने अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, बीजभाषक डॉ. जे.व्ही. पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक विचार प्रकर्षाने मांडले व मोठ्या वयातही डॉ. पवार यांनी आम्हा सर्वांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय अर्थव्यवस्थेमधील दृष्टीकोन देखील यामुळे समजला, असेही प्र-कुलगुरू म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:44 am

एसटीमध्ये सूटसाठी एनसीएम कार्डची आवश्यकता:८१९० महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांनी केली नोंदणी‎

प्रतिनिधी | अमरावती राज्य शासनाने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात ५० टक्के तसेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापुढे ही सवलत मिळवण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रवाशाकडे असणे गरजेचे आहे. यापुढे ज्या प्रवाशांकडे एनसीएमसी नसेल त्यांना एसटी प्रवासात सवलत मिळणार नाही. आजवर ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड दाखवून सवलत मिळवत होते. परंतु, यापुढे आधार कार्ड दाखवून चालणार नाही. आजवर बहुतेक सर्वच प्रवासी आधार कार्ड दाखवून ज्येष्ठ नागरिक असल्याची सवलत घेत होते. अनेकांच्या आधार कार्डवर जन्मतारखा चुकीच्या नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखाद्या प्रवाशाकडे पाहिल्यानंतर त्याचे वय कमी वाटत असले तरी आधार कार्डवरून तो ६० ते ६५ वर्षांवरील असल्याचे दिसून आल्यानंतर त्याला नाईलाजाने सवलत द्यावीच लागायची. परंतु, आता एनसीएमसी कार्डसाठी जिल्ह्यातील सर्वच बस स्थानकांवर प्रवाशांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अमरावतीत आजवर ९ हजार प्रवाशांनी नोंदणी केली आहे. त्यांना एनसीएमसी कार्ड एक महिन्यात तयार होऊन मिळेल. तोवर सध्या उर्वरित. पान ४ एनसीएमसी हे महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी जसे आवश्यक आहे तसेच सर्वसामान्य प्रवाशांनाही ते मिळवता येऊ शकते. यात दरमहा ५०० ते १ हजारापर्यंत, किंवा त्यापेक्षा जास्त, टॉपअपचीही सोय राहणार आहे. एखादवेळी कोणी घरी पैसे विसरले, किंवा चिल्लर नसेल, तर या कार्डच्या आधारे वाहकाला पैसे देता येतील. योग्य व्यक्तीला सवलत मिळावी एसटीचा प्रवास करताना कोणत्याही चुकीच्या व्यक्तीला, फसवणूक करून कमी तिकीटात प्रवास करणाऱ्याला लाभ मिळू नये. योग्य व्यक्तीला लाभ मिळावा. हाच एनसीएमसी देण्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. या कार्डमुळे भविष्यात कोणीही सवलतीचा गैरफायदा घेणार नाही. - नीलेश बेलसरे, एसटी, विभागीय नियंत्रक, अमरावती.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:43 am

महायुतीचे अविनाश मार्डीकर स्थायी समितीचे ३१ वे सभापती:१ वर्षाचा राहणार कार्यकाळ; मार्डीकर यांना मिळाली १६ पैकी ११ मते‎

प्रतिनिधी | अमरावती स्थायी समिती सभापतीपदासाठी महानगर पालिकेत शुक्रवारी ६ रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी अ.प.गट) अविनाश मार्डीकर यांना एकूण १६ पैकी ११ मते मिळाल्याने त्यांची सभापतीपदी निवड झाली. मार्डीकर हे मनपा स्थायी समितीचे ३१ वे सभापती असून त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा आहे. याआधी तीनदा ते स्थायी समिती सभापती राहिले असून ही त्यांची या पदावर विराजमान होण्याची चौथी वेळ आहे. निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कामकाज बघितले. मार्डीकर यांना भाजपाचे ५, युवा स्वाभिमान पार्टीचे ३, राष्ट्रवादी अ.प.गटाचे २ तर शिंदेसेनेचे एक मत मिळाले. विरोधक काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांना केवळ ३ मते मिळाली. तर एमआयएमचे दोन सदस्य तटस्थ राहिले. स्थायी समितीच्या १६ सदस्यांनी या निवडणुकीत उर्वरित. पान ४ महायुतीचे उमेदवार म्हणून उशिरा रात्री नाव निश्चित स्थायी समितीचे सभापतीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाचे अविनाश मार्डीकर यांना देण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आ. संजय खोडके, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात गुरुवारी उशिरा रात्री झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात आले. तोवर सभापतीपद भाजप, वायएसपी, राष्ट्रवादी यापैकी कोणाच्या वाट्याला जाणार याबाबत काहीच निश्चित नव्हते. सकाळी त्यांच्या सभापतीपदावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार महायुतीच्या स्थायी समितीमधील चारही घटक पक्षांनी त्यांना मतदान केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:41 am

औद्योगिक वसाहत विकास प्रस्तावाला मंजुरी द्या‎:आ. रणधीर सावरकरांची सभागृहात मागणी, विकासात यंत्रणांच्या अडथळ्यांची मांडणी‎

प्रतिनिधी | अकोला विरोधी पक्षांनी सभागृहात आणलेल्या २९३ च्या प्रस्तावावर आ. रणधीर सावरकर यांनी उत्तर दिले. तसेच औद्योगिक विकासाला चालना देण्याची व विस्ताराची मागणी शासनाकडे केली. अकोला येथील औद्योगिक वसाहतीचा विकास करण्याच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी देण्याची मागणी केली. तसेच शहराच्या विकासात प्रशासकीय यंत्रणांचा कसा अडथळा येत आहे, हेही त्यांनी सांगितले. आ. सावरकर म्हणाले की, महानगरपालिका, नगर परिषदांत प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्याने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहिलेले अधिकारी नागरिकांची कशी अडवणूक करतात, हे त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने नगरपालिका व महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या सुद्धा बदल्या करणे गरजेचे आहे, असे सांगितले. राज्याचा विकास साधताना विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांनी केलेला विकास लक्षात घ्यावा. अधिकाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून आपल्या खात्याचे मंत्री, अर्थमंत्र्यांना योग्य सल्ला द्यावा, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील खासगी महामंडळापैकी अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे मंडळ हे एकमेव नफ्यातील महामंडळ आहे. तेथील कर्मचाऱ्यांच्या मागणीप्रमाणे वेतन आयोगाची थकबाकी लागू करत जो निधी वितरित करायचा आहे, तो शासनाला द्यायचा नाही तर शासनाची केवळ परवानगी आवश्यक आहे, परंतु परवानगी सुद्धा दिली जात नाही, याबाबत त्यांनी सभागृहात अभ्यासपूर्ण विवेचन केले. विरोधी पक्षांकडून अभ्यासाअभावी ज्या पद्धतीने टीका केली जाते, त्याबाबत त्यांनी विरोधकांनी सरकारने केलेल्या विकासावर भाष्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. शासनाने जीएसटीच्या माध्यमातून देशात सर्वाधिक कर वसुली केली आहे. तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो, अशा विरोधी पक्षाच्या टीकेवर त्यांनी लक्ष वेधले. राज्यातील महानगरपालिकांमध्ये पिण्याचे पाणी, भूमिगत गटार योजना राबवण्याकरिता अमृत योजनेसाठी पालिकेचा ३० टक्के स्वहिस्सा ज्या महापालिकांना भरणे शक्य नाही, त्यांना बिनव्याजी मुदत कर्ज व रक्कम देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. यामुळे पालिकांना नागरिकांसाठी निर्माण करायच्या मूलभूत सुविधा सहज निर्माण करण्यात येतील. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनुदान द्यावे, सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांनी जबाबदारी पूर्ण नोंदी घेत शासनाला सल्ला देण्याचे आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:33 am

शॉर्टसर्किटमुळे घराला आग; संसारोपयोगी साहित्य जळाले:घरावरील विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्याने भडका

प्रतिनिधी | अकोला पातूर तालुक्यातील नवेगाव येथे शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका कुटुंबाचा संसार राख झाला. दुपारी घरावरील विद्युत तारांमध्ये स्पार्किंगनंतर आग लागली. यात सिलिंडरचा स्फोट झाला व काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. सुदैवाने घरातील सर्वजण शेतात असल्याने जीवितहानी टळली; मात्र रोकड, अन्नधान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्य जळाले. मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव येथील रामकृष्ण खुळे (४६) यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी शेजारील प्रल्हाद डाखोरे यांच्या मालकीचे घर तात्पुरते राहण्यासाठी घेतले होते. शुक्रवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास घरावरील विद्युत तारांमध्ये घर्षण झाल्याने घराला आग लागली. काही क्षणांतच घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. घरातील सर्व सदस्य शेतीच्या कामासाठी गेले होते, त्यामुळे जीवितहानी टळली. परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. तोपर्यंत घरातील ५० हजार रुपयांची रोकड, अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य जळाले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:32 am

ऐतिहासिक देखण्या पुरंदर किल्ल्याची लक्षवेधी प्रतिकृती:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा लक्षवेधी देखावा

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची ६ मार्च २०२६ रोजी (तिथीनुसार) जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यंदा शिवजयंतीचे ३२ वे वर्ष होते. हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.शिवजयंतीनिमित्त (तिथीनुसार) जुन्या शहरातील जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात साकारण्यात आलेला पुरंदर किल्ला आणि आणि त्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची लक्षवेधी प्रतिकृतीचा देखावा साकारला होता. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता डाबकी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या महिला, युवती, चिमुकल्या मावळ्यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी नगरस्थित भाजी बाजार येथील शिवरायांच्या प्रतिमेसमोर करण्यात आला. शनिवार ७ मार्च रोजी रात्री ८ वाजता शिवपूजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप हो णार आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:31 am

विद्यापीठ संघात अकोल्याचे ८ खेळाडू:स्पर्धा ८ ते १४ मार्चदरम्यान जालंधर येथे होणार

प्रतिनिधी | अकोला लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालंधर यांच्या विद्यमाने आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग (महिला) चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अकोल्याच्या आठ खेळाडूंची निवड झाली आहे. ही स्पर्धा ८ ते १४ मार्चदरम्यान जालंधर (पंजाब) येथे होणार आहे. स्पर्धेत ४८ किलो वजनगटातून ऋणाली डोंगरे, ५७ किलो गटातून पलक झांबरे, ६० किलो वजनगटातून रेवती उंबरकर, ६५ किलो वजनगटातून रितिका बोस, ७० किलो वजनगटातून गायत्री माटे, ७५ किलो वजनगटातून गौरी मुरूमकार, ८० किलो वजनगटातून कांचन सुरांसे, ८०+ गटातून पूर्वा गावंडे या खेळाडू ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू यापूर्वी वरिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत व आंतरराष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले आहेत. या संघासोबत संघ व्यवस्थापक डॉ. गणेश पोटे, क्रीडा मार्गदर्शन म्हणून बॉक्सिंग प्रशिक्षक गजानन कबीर काम पाहतील. अमरावती विद्यापीठाच्या निवड समितीचे अध्यक्ष गजानन बडे, यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठात संघाचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. खेळाडूंना अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:30 am

इनरव्हिल क्विनच्या आमसभेत अनेक उपक्रमांना मिळेल चालना:महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेत जल्लोष केला

प्रतिनिधी | अकोला सामजिक व सांस्कृतिक सेवेत सक्रिय असणाऱ्या इनरव्हील क्लबची उन्हाळी आमसभा स्थानीय ग्रीनलँड सभागृहात नुकतीच संपन्न झाली. क्लबच्या अध्यक्ष कविता पोहरे यांच्या अध्यक्षतेत या आमसभेची थीम ही ‘खजाना शोधा’ ठेवण्यात आली.प्रार्थनेने या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या आमसभेत समस्त क्लब पदाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला व तो सर्वसंमतीने पारित करण्यात आला. क्लबच्या अध्यक्ष कविता पोहरे यांनी आगामी उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यात महिला पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेत जल्लोष केला. संचालन क्लब सचिव स्वीटी राठी यांनी तर आभार क्लब सीसी अंकिता सोनी यांनी मानले. यावेळी क्लबच्या माजी अध्यक्ष रुची रुहाटिया, दिपाली वर्मा, उपाध्यक्ष पल्लवी दिवेकर, कोषाध्यक्ष दीपिका शाह, पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:21 am

संस्कृती संवर्धन समितीची नूतन कार्यकारिणी घोषित:नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संयोजक समीर थोडगे

प्रतिनिधी | अकोला संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने सन २०२६-२०२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची घोषणा समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी केली. समाजात सांस्कृतिक परंपरांचे जतन व सामाजिक एकात्मता दृढ करण्यासाठी संस्कृती संवर्धन समिती सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. या प्रसंगी मंचावर यावर्षीचे स्वागताध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, उपाध्यक्ष हरिश अलिमचंदानी, मंगेश वानखडे तसेच नवनियुक्त संयोजक समीर थोडगे उपस्थित होते. संस्कृती संवर्धन समितीच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संयोजक समीर थोडगे, सहसंयोजक स्वानंद कोंडोलीकर, राम भिरड, कोषाध्यक्ष शरद वाघ, स्वागत समिती अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे, उपाध्यक्ष डॉ. पार्थसारथी शुक्ल, रामप्रकाश मिश्रा, मंगेश वानखडे, अरविंद देठे, मनिष चंदनानी, विनोद देव, अनिल गावंडे, महिला उपाध्यक्षा अर्चना शर्मा, पल्लवी रावणकर, डॉ. राधा पुरी, सोनल ठक्कर, रश्मी कायंदे, मीनाक्षी आपोतीकर, लता राठोड, महिला संयोजिका रेवती पांडे, सोनिया तऱ्हाळकर, मनीषा भुसारी, जयमाला खेडकर, विजया देशमुख, पुष्पा वानखडे, डॉ. स्नेहा गोखले, रुपाली धोत्रे, ऋतुजा पांडे, प्रचार व प्रसार प्रमुख अभयसिंग राजपूत, कार्यकारिणी सदस्य विनोद जकाते, प्रशांत पाटील, खेमराज भटकर, रुपेश वाखारकर, पंकज सादराणी, पंकज सहगल, तुषार गोतमारे, विनोद देव, जय राणे तर मार्गदर्शक सदस्य म्हणून नरेंद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, डॉ. राजकुमार हेडा, अॅड. मोतिसिंह मोहता, महेश जोशी, हेमेंद्र राजगुरू, चित्रा बापट, निलेश देव, निकेश गुप्ता, आनंद बांगड, पुरुषोत्तम मालाणी, डॉ. प्रविण चव्हाण आदी कामकाज बघणार आहेत. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समितीच्या वतीने समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा २०२६, अखंड भारत दिनानिमित्त जाहीर व्याख्यान - ९ ऑगस्ट २०२६, महालक्ष्मी आरास स्पर्धा २०२६, सामूहिक तुळशी विवाह २०२६, विविध प्रांतातून अकोल्यात स्थायिक झालेल्या नागरिकांना एकत्र आणणारे भारत भारती संमेलन आदी उपक्रम राबवण्यात येतील.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:20 am

मातृभाषेचे संवर्धन करणे आपली जबाबदारी -डॉ. पाटील:नाईक- खेतान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिना’निमित्त कार्यक्रम‎

प्रतिनिधी | अकोला सुधाकरराव नाईक- उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि तिचे संवर्धन आणि जतन करणे ही आपलीच जबाबदारी आहे, असे मराठी विभाग प्रमुख डॉ. भास्कर पाटील म्हणाले. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास पांडे होते. प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख, कवी, समीक्षक डॉ. भास्कर पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. अमोल मेश्राम उपस्थित होते. सांस्कृतिक समन्वयक प्रा. एन. एफ. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि तिचे संवर्धन आणि जतन करणे ही आपलीच जबाबदारी आहे. आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या बोलीभाषा मागे पडत आहेत. अशा वेळी आपण आपल्या मातृभाषेवर दृढ प्रेम करावे, तिचा दैनंदिन जीवनात वापर करावा आणि मराठी साहित्याचे वाचन, लेखन करून भाषा समृद्ध होण्यास किंवा अधिक विकसित होण्यास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भास्कर पाटील यांनी केले. डॉ. अमोल मेश्राम यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. एन. एफ. चव्हाण यांनी केले. त्यांनी विविध बोली भाषेची विविध उदाहरणे देऊन मराठी भाषेकडे आपण गांभीर्याने लक्ष केंद्रित केल्यास, भाषेस संदर्भात निर्माण झालेले प्रश्न निकाली निघतील असे ते म्हणाले. सूत्रसंचालन समाजशास्त्राचे प्रा. पद्माकर सदांशिव यांनी तर आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संगीता तिहिले यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. नितीन देऊळकर, प्रा. संदेश गवारगुरु, प्रा. अनंत राठोड, डॉ. राधा मुरूमकर, डॉ. राहुल वाधवाणी, डॉ. एकनाथ खेडकर, प्रा. विनोद इंगोले, प्रा. संदीप कुऱ्हाडे, प्रा. दीपक वाघमारे, प्रा. योगेश चव्हाण, डॉ. किरण शर्मा, डॉ. भारती चोखानी, प्रा. रश्मी पंजवाणी, प्रा ज्योती वानखडे, प्रा. हर्षदा जाधव यांनी सहकार्य केले. मातृभाषेवर पकड असल्यास अन्य भाषा सुलभ वाटतात प्राचार्य डॉ. अंबादास पांडे म्हणाले की, प्रत्येक माणूस हा पहिल्यांदा मातृभाषेतच विचार करत असतो. ज्याची मातृभाषेवर पकड असेल त्याला इतर भाषा अधिक सुलभ वाटत असतात. आपण इतर भाषांचाही सन्मान केलाच पाहिजे. इतर भाषा देखील आपल्या भाषा भगिनीच आहेत. परंतु आपली मातृभाषा आपल्या हातून निसटता कामा नये. आपल्या घरामध्ये आपल्या मुलाबाळांवर मातृभाषेचे संस्कार असले तर त्याची विचार करण्याची क्षमता, वाचन क्षमताही वाढणार, आणि त्यातूनच आपला मूल्य विचारदेखील त्यात रुजला जाईल, असेही यावेळी ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:19 am

शाश्वत सुख प्राप्तीसाठी परमार्थिक साधनेला महत्व द्या -संजय महाराज:कीर्तन महोत्सव- गायत्री नगरात आयोजन; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

प्रतिनिधी | अकोला प्रत्येक परमार्थिक साधनेला फळ असते. कोणतीही परमार्थिक साधना ही फळा शिवाय जन्मच घेऊ शकत नाही. अशा प्रकारच्या साधनेचा निश्चितच काही हेतू असतो. उलट परमार्थाच्या विपरीत प्रपंचाचे असते. परमार्थिक साधनेला कोणते फळ येत नाही, अशी साधना वांझोटी असते. म्हणून शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी परमार्थिक साधनेला महत्व देण्याचा हितोपदेश संजय महाराज पाचपोर यांनी केला. ते गायत्री नगर कौलखेड येथे आयोजित कीर्तन महोत्सवात मार्गदर्शन करत होते. महोत्सव श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव सेवा समितीतर्फे प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. कीर्तन महोत्सवात शिर्ला नेमाने येथील कीर्तनकार संजय महाराज पाचपोर यांनी कीर्तनाचे प्रथम पुष्प सादर केले. गाथेतील रामेश्वर भटांचा तुकाराम तुकाराम नाम घेता, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ' हा अभंग सादर करत रामेश्वर भट्टांच्या शिष्यत्वावर संगीतमय उहापोह केला. सर्वप्रथम श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बिजोत्सव सेवा समितीतर्फे पाचपोर महाराज यांचे स्वागत करण्यात आले. रोज रात्री ८ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवाचे समापन शुक्रवारी, १३ मार्च रोजी होणार आहे. या कीर्तन महोत्सवाचा समस्त महिला पुरूषांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समिती, गायत्री नगर कौलखेडच्या समस्त पदाधिकारी व सेवाधाऱ्यानी केले. वेळ अत्यंत महत्त्वाची संजय महाराज पाचपोर यांनी वेळेचे महत्त्व सांगितले. वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे बीजेला तुकोबारायांची गाथा सादर केल्या जाते; त्याचप्रमाणे अष्टमी तिथी आली की आपल्यासमोर ज्ञानोबा उभे राहतात. बीज म्हटल्यावर तुकोबा उभे राहतात. तुकोबा म्हणजे साक्षात वैराग्याचे प्रतिक असून अशा तुकोबांची थोरवी ही रामेश्वर भट्टांनी गायली असून या थोरवीचा गोडपणा अद्यापही या व्यवस्थेत कायम असल्याचे हभप संजय महाराज पाचपोर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:19 am

स्वीकृत सदस्य:भाजप, काँग्रेस, वंचित, शिवसेनेची नावे निश्चित; ‘उबाठा’चे शंकर लंगोटे, ‘वंचित’कडून सुनील इन्नानी यांना मिळाली उमेदवारी‎

प्रतिनिधी | अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठीच्या आठ जागांसाठी शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या १९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपप्रणीत शहर सुधारणा आघाडीच्या वतीने चंदाताई शर्मा, अॅड. देवाशिष काकड, अॅड. गिरीश गोखले आणि सुनील मेश्राम तर वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक सुनील माणिकलाल इन्नाणी, शिवसेना ठाकरे गटातर्फे शंकर भाऊराव लंगोटे, काँग्रेसतर्फे इलियास खान अलियार खान उर्फ गुड्डू पठाण आणि आकाश श्रीकृष्णा कवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. या आठ उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत गटनेत्याच्या शिफारस पत्रासह अर्ज दाखल केल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. येत्या ९ मार्च रोजी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत भाजपप्रणीत शहर सुधार समिती ४, काँग्रेसचे २ तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रत्येकी एक अशा ८ सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडीची घोषणा केली जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीने स्वीकृत सदस्यपदासाठी माहेश्वरी समाजाचे पदाधिकारी तथा बांधकाम व्यावसायिक सुनील इन्नानी यांना संधी देताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने हे नाव जाहीर झाल्याचे सांगण्यात येते. मात्र हे नाव ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामाजिक समतोल राखत राजकारणात व्यापक सहभाग वाढवण्याच्या धोरणातून पक्षाने अनेक वेळा सोशल इंजिनिअरिंगची प्रभावी उदाहरणे घडवली आहेत. अकोला पॅटर्न म्हणून ओळखले जाणारे हे सोशल इंजिनिअरिंग राज्यभर चर्चेत राहिले आहे. आता बांधकाम व्यावसायिकाला स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत एन्ट्री देण्याचा पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:18 am

विमानतळ विस्ताराला घोषणेमुळे येणार वेग:धावपट्टीचा विस्तार १४०० वरून १८०० मीटरवर‎

प्रतिनिधी | अकोला राज्यात अर्थसंकल्पात शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याचा उल्लेख झाल्याने हे काम आणखी गतिमान होणार आहे. धावपट्टी विस्तार १४०० वरुन १८०० मीटर होण्यासाठी गतवर्षीच २०८ कोटी ७६ लाख मंजूर झाले आहे. अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी विमानतळ विस्तारीकरणावर भाष्य केल्याने निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर हे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित प्रवासी वाहतूक शक्य होणार असून, हवाई प्रवासाचे अकोलेकरांचे स्वप्न पूर्ण होईल. २०८ कोटी ७६ लाखाच्या खर्चास वित्तीय मान्यता मिळाल्यानंतर आता सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. भूसंपादन, बांधकाम, झाडांचे मूल्य आदींसाठी १९५ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. उर्वरित पान ४ असा होणार खर्च जमीन : २२ हजार ४०४ चौ. मी. अर्थात २२.२४ हेक्टर जमीन, बांधकाम, त्यावरील फळझाडे व अन्य झाडांच्या मूल्यासाठी १९५ कोटी ११ लाखाची तरतूद शासन निर्णयात नमूद आहे. आस्थापना : विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रक्रियेसाठी सरकारी यंत्रणा काम होणार आहे. उपविभागीय अधिकारी आस्थापना खर्चासाठी ५ कोटी ८५ लाख ३३ हजार १७७ आणि महावितरणचा आस्थापना खर्च भागावा, यासाठी ७ कोटी ८० लाख ४४ हजारांची तरतूद करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:17 am

पंपांवर गर्दी; २ दिवसांत ३०% पेट्रोल, डिझेल विक्री वाढली:सोशल मीडियातील अफवांवर विश्वास ठेवू नका; इंधनाचा पुरेसा साठा: पेट्रोल पंप चालक, प्रशासनाचे आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला इराण- इस्त्रायल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचा साठा संपत असल्याच्या अफवेमुळे नियमितपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल, डिझेल खरेदी केल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी दिसून आली. शहरात दररोज ७० ते ७५ हजार लिटर पेट्रोल तर सरासरी ६० हजार लिटर डिझेलची मागणी असते. मात्र या अफवेमुळे पेट्रोल विक्री एक लाख लिटरवर तर डिझेलची विक्री ८५ हजार लिटरवर गेली आहे. ही वाढ दैनंदिन पेट्रोल विक्रीच्या तुलनेत २५ ते ३० टक्के जास्त नोंदली गेली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांवर दोन दिवसांपासून गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने या निव्वळ अफवा असून इंधनाचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिला आहे. आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा पसरत आहेत. अतिरिक्त इंधन भरण्यासाठी पंपावर वाहनांची गर्दी होत आहे. ^ अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि बुधवार व गुरुवारी शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनात इंधन भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षात इंधनामध्ये कोणताही तुटवडा नाही. शुक्रवारी सायंकाळी जवळपास ५० टक्के साठा शहरातील सर्वच पंपावर उपलब्ध आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. - राहुल पाटील, सचिव, पेट्रोल पंपचालक असोसिएशन. पेट्रोल डिझेल पुरवठा- गायगाव डेपो शहरातील पेट्रोल पंप हजार लिटर रोज डिझेल विक्री हजार लिटर रोज पेट्रोल विक्री दोन दिवसात विक्री सव्वापट झाली सामान्यतः शहरात दिवसाला दररोज ७० ते ७५ हजार लिटर पेट्रोल तर ६० ते ६५ हजार लिटर डिझेलची मागणी असते. प्रत्येक पेट्रोल पंपचालकांकडे किमान पुढील पाच दिवसांचा इंधनाचा साठा नेहमी शिल्लक असतो. आखाती देशांतील युद्धाच्या अफवांमुळे काही नागरिकांनी नेहमीपेक्षा जास्त पेट्रोल, डिझेलची खरेदी केली परिणामी, मागील दोन दिवसात विक्री सव्वापट झाली. - पंजाबराव मोडक, अध्यक्ष, भारत पेट्रोलियम डिलर असोसिएशन.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 9:16 am

छत्रपती ग्रुपने सामाजिक उपक्रमातून समाजापुढे चांगला आदर्श ठेवला:तहसीलदार एफ. आर.‎शेख यांचे प्रतिपादन‎

येथील छत्रपती ग्रुपने आजवरच्या आपल्या सामाजिक उपक्रमातून चांगला विचार व आदर्श समाजापुढे ठेवला आहे. इतर संस्था व मंडळासाठी हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन तहसीलदार एफ.आर.शेख यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती ग्रुपच्यावतीने यशवंतराव चव्हाण नगरपरिषद शाळा क्र. १५ येथे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा आर ओ प्लांट तसेच थंड पाण्यासाठी वॉटर कूलर बसविण्यात आला. या प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षीय मनोगतात तहसीलदार एफ. आर. शेख म्हणाले, समाजातील काही संस्था समाजातून देणगी गोळा करतात. परंतु, प्रत्यक्षात काम कमी व देखावा जास्त असे स्वरूप असते. छत्रपती ग्रुप मात्र याला अपवाद असून समाजातील गरजू घटकांसाठी काम करत आहे. प्रास्ताविकात छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ टिंकू पाटील म्हणाले, सन २०१० पासून छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेत आहोत. समाजातील गरीब, गरजू मुलींच्या नावे ५ हजार रुपयांची मुदत ठेव, गरजू महिलांना पिठाची चक्की, विविध शाळांना आरओ प्लांट, सायकल वाटप, पूर प्रसंगी मदत कार्य असे अनेक समाजोपयोगी उपक्रम आजवर राबवले आहेत. न. पा शाळांतील विद्यार्थ्यांना थंड व निर्जंतुक शुद्ध पाणी मिळावे. या हेतूने या शाळेत हा प्लांट बसवल्याचे सांगितले. यावेळी सचिन वायकुळे यांनी प्रेरणादायी विचार व्यक्त केले. न प शाळेच्या मुख्याध्यापिका घाडगे यांनी छत्रपती ग्रुपचे आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:56 am

आधुनिक अन् पर्यावरणपूरक शेती व कृषी क्षेत्रामधील अर्थसाहाय्य विषयांवर मंथन:सी.बी. खेडगी महाविद्यालयातील राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेची सांगता‎

अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचालित सी.बी. खेडगी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशीय राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. कृषी अर्थकारण, आधुनिक शेती पद्धती, सेंद्रिय शेती, मत्स्य शेती, शाश्वत विकास, जैविक शेती, पर्यावरणपूरक शेती आणि कृषी क्षेत्रातील अर्थसाहाय्य या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन करत उपस्थित संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मोलाचे विचार दिले. समारोप सत्रात संस्थेच्या संचालिका पवित्रा खेडगी हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले होते. पवित्रा खेडगी यांच्या हस्ते परिषदेत सहभागी संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयश्री बिराजदार, परिषदेचे समन्वयक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी उपस्थित होते. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील डॉ. राहुल मोहपारे यांनी ‘शेतीचे बजेट व शेती करण्याच्या आधुनिक पद्धती’ या विषयावर संशोधनपर विचार मांडले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अविनाश जम्मा उपस्थित होते. त्यानंतरच्या सत्रात संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंद्रूप येथील अर्थशास्त्र विभाग तिसऱ्या सत्रातील परिसंवादात आधुनिक व सेंद्रिय शेती करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच शासनाकडून मिळणारे विविध अनुदान व अर्थसाहाय्य योजना यावर सखोल चर्चा झाली. दयानंद महाविद्यालय, सोलापूरचे प्राचार्य डॉ. बद्रीनाथ दामजी यांनी शेतीतील विविध पिके, त्यांपासून मिळणारे आर्थिक लाभ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये कृषी क्षेत्राला दिलेले प्राधान्य या विषयांवर व्याख्यान दिले. विभाग प्रमुख डॉ. संतोष कदम यांनी कृषीविषयक आराखडा व आधुनिक शेतीकडे वाटचाल या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी पारंपरिक शेती व प्रात्यक्षिक (आधुनिक) शेतीतील फरक स्पष्ट करून शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. या सत्रांचे अध्यक्षस्थान इतिहास विभाग प्रमुख डॉ. किशोर थोरे यांनी भूषविले. यानंतर सेंद्रिय कृषी तज्ज्ञ व ओम शांती मार्गदर्शक डॉ. श्रीमंत रायगोंडे यांनी शाश्वत शेती संदर्भात मार्गदर्शन केले. आधुनिक व सेंद्रिय शेतीचा समन्वय साधताना आवश्यक दक्षता व नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षस्थानी डॉ. जगदेवी कुंटोजी हे होत्या. परिषदेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातील विविध विकासात्मक संकल्पना, शाश्वत शेतीचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन मिळाले. या परिषदेमुळे भारतीय शेतीला निश्चितच नवे दिशा व बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीराम चव्हाण यांनी केले. तिसऱ्या सत्रातील परिसंवादात सखोल चर्चा

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:55 am

मनोज पाटील 493 रँकनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण:सहाव्या प्रयत्नात जालिहाळच्या मनोज पाटील यांचे यश, वडील प्राथमिक शिक्षक, घरच्या वातावरणाचा फायदा‎

तालुक्यातील जालीहाळ गावचे मनोज रामचंद्र पाटील हे ४९३ रँक घेऊन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले असून निवृत्त शिक्षक रामचंद्र पाटील यांचे द्वितीय सुपुत्र आहेत. सध्या ते कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. तालुक्यातून पहिला आयपीएस अधिकारी होण्याचा त्यांना मान पटकावला. त्यांचे पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सोलंकरवाडी जालीहाळ, माध्यमिक शिक्षण श्री लक्ष्मी देवी विद्यामंदिर रड्डे येथे झाले आहे, तर महाविद्यालयीन शिक्षण संगमेश्वर कॉलेज सोलापूर या ठिकाणी झाले. अभियांत्रिकीचे शिक्षण हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संभाजीनगर या ठिकाणी पूर्ण केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील जालिहाळ गावचा पहिला यूपीएससी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.. शुक्रवारी केवळ दोन तासासाठी तो गावी आला होता, नंतर तो तात्काळ मुंबईला रवाना झाला. गेल्या चार वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. सहाव्या प्रयत्नात त्याला यश मिळाले असून पुणे व दिल्ली या ठिकाणी परीक्षेची तयारी केली. दिल्ली या ठिकाणी खाजगी क्लास लावून तयारी केली. ^बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याप्रमाणे माझा मुलगा चौथी व सातवीमध्ये शिष्यवृत्तीमध्ये आला. दहावीमध्ये तालुक्यामध्ये प्रथम आला होता. त्यामुळे त्याची शैक्षणिक गुणवत्ता पाहून अधिकारी व्हावं असं मनाला वाटत होतं, आज स्वप्न सत्यात उतरलं. ग्रामीण भागात गुणवंत मुले आहेत. मात्र त्यासाठी वातावरण पाहिजे. रामचंद पाटील, वडील

दिव्यमराठी भास्कर 7 Mar 2026 8:53 am