पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघाताने राज्यभरात हळहळ व्यक्त होत असताना, या दुर्घटनेनंतर घडलेला प्रकार समाजाला चक्रावून सोडणारा ठरला आहे. अपघातानंतर मदतकार्य करण्याऐवजी काही असंवेदनशील नागरिकांनी मृत आणि जखमींच्या सामानाची लुटालूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांची संवेदनशीलता हरवत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. एक टुरिस्ट कार दोन कंटेनरमध्ये चेंगरली गेली आणि त्यानंतर कारने तात्काळ पेट घेतला. या भीषण अपघातात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 9 ते 10 जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर अपघातातील मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. कुटुंब आगीत जळत होते, काहीजण निर्लज्जपणे सोने लुटत होते अपघातानंतर काही कुटुंबीय मदतीची अपेक्षा करत असताना, दुसरीकडे काही स्वार्थी व्यक्तींनी सोन्याचे दागिने आणि रोकड गोळा करण्यासाठी धावाधाव केली. दोन ट्रकच्या भीषण धडकेनंतर परिसरात पडलेली रोकड, मौल्यवान वस्तू हडप करण्यासाठी लोकांनी स्पर्धाच लावली होती. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये एकीकडे कुटुंब जळत असताना, काही लोक निर्लज्जपणे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटत होते. या अपघातात एका लहान मुलीसह कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला होता. समाजभरातून सहवेदनेचा सूर उमटत असताना, काहींच्या निर्ढावलेल्या वागणुकीने संतापाची लाट उठली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या लुटमारीचे दृश्य दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका बाजूला अपघातातील मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, दुसऱ्या बाजूला अशाप्रकारे लुटालूट होण्याची घटना ही समाजाच्या नैतिक पतनाचे सूचक मानली जात आहे. ट्रकचालकासह तिघांवर गुन्हा दाखल दरम्यान, या अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालक, मालकासह तीन जणांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातात ट्रक चालक आणि क्लिनरचाही होरपळून मृत्यू झाला. ट्रक चालक रुस्तम रूदार खान (वय 35, रा. किरवारी, किसनगड, राजस्थान) आणि मदतनीस (क्लिनर) मुस्ताक हनीफ खान (वय 31, रा. मनापुरी, रासगड, राजस्थान) यांचा होरपळून मृत्यू झाला. ताहीर नासीर खान (वय 45, रा. किसनगड, राजस्थान) याच्यावरही भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 (अ), (ब), 324 (4) आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 119, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ताहीर नासीर खान गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिस उपनिरीक्षक मधुकर तुुपसौंदर यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसला बिहारमधील आपला ऱ्हास पाहूनही मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणे योग्य वाटत असेल तर त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच ठरेल, असे पेडणेकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली. त्या म्हणाल्या, बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला ऱ्हास पाहून त्यांच्या नेत्यांनी बोध घ्यायला हवा. हा ऱ्हास पाहूनही त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर लढवावी. त्यांना कुणीही थांबवू शकत नाही. पण त्यांचे वरिष्ठ निश्चितपणे थांबवू शकतील. जे लोक स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत आहेत, त्यांना ते कदाचित योग्य वाटत असेल. पण पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्या वरिष्ठांनाही हा निर्णय योग्य वाटतो का मोठा प्रश्न आहे. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य हे पुढील काही दिवसांतच कळेल. काय म्हणाले होते रमेश चेन्नीथला? काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय हा पूर्णतः स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार घेण्यात आल्याचे म्हटले होते. काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला. ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले. वर्षा गायकवाड यांनी साधला होता मनसेवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी ठाकरे गटाच्या मनसेला सोबत घेण्याच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली होती. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही. काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही. एखाद्या छोट्या टपरीवाल्याला किंवा एखादा दुकानदाराला अथवा एखाद्या समोसेवाल्याला मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसमध्ये केव्हाही खपली जाणार नाही. गरिबांवर आपली ताकद दाखवणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शिवसेनेने (ठाकरे गट) त्यांना कुणासोबत जायचे त्याचा निर्णय घ्यावा. पण काँग्रेस पक्ष म्हणून आमचे म्हणणे आहे की, मुंबईत आलेली सर्व मंडळी ही मुंबईकर आहेत. सर्वांनी मुंबईच्या विकासात हातभार लावला आहे, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे सर्व पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे मात्र पक्षांमधील अंतर्गत नाराजी नाट्य समोर येत आहे. यातच आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. करमाळ्यातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राज्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, निवडणूक आयोगाने राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार जयवंतराव जगताप यांची करमाळा नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीनंतर तत्काळ पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. नेमका वाद काय? आगामी निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. या नियुक्तीमुळे स्थानिक राजकारणातील महत्त्वपूर्ण असलेले दिग्विजय बागल यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले. या नाराजीतूनच आक्रमक भूमिका घेत बागल गटातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले. याशिवाय, या नाराज पदाधिकाऱ्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या गटाने नोंदणी केलेले जवळपास 20 हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार आहेत. हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाद्वारे पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बागल गटाला डावलत असल्याची भावना यापूर्वी दिग्विजय बागल यांनी शिंदे गटाकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत. मात्र, जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीनंतर आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलले जात असल्याची भावना समर्थकांमध्ये निर्माण झाली. या नाराजीतूनच बागल गटातील 55 शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आपले सामूहिक राजीनामे दिले. स्थानिक राजकारणावर परिणाम होणार या सामूहिक राजीनाम्यामुळे करमाळ्यातील शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षांतर्गत कुरघोडी आणि नेत्यांमधील वादामुळे शिंदे गटासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या घटनेचा थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.
१० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा असे शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात […] The post १० हजार वाटल्याने एनडीएचा विजय: शरद पवार यांचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवारांच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान
मुंबई : प्रतिनिधी बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांपैकी २०० पेक्षा अधिक जागांवर एनडीएने बाजी मारली. यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश राज येणार हे जवळपास निश्चित आहे. भाजप तब्बल ८९ जागांवर आघाडी मिळवित अव्वल पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये प्रथमच भाजपला इतके मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीत असलेल्या अजित पवारांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उमेदवार उभे […] The post अजित पवारांच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप अवकाश आहे. पण आत्तापासूनच सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत मुंबईच्या महापौरपदावरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावेळी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असा दावा केला आहे. त्यानंतर आता सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी आम्ही रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला कोणतेही महत्त्व देत नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच यावेळी मुंबईचा महापौर भाजपचा होणार असल्याचा दावा केला होता. मुंबईत महापालिकेत महायुतीची सत्ता येणार आणि महापौर भाजपचा होणार, असे ते म्हणाले होते. यामुळे भाजपने 2017 मध्ये थोडक्यात हुकलेले महापौरपद यावेळी कोणत्याही स्थितीत मिळवण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या लेखी रवींद्र चव्हाण यांच्या विधानाला कोणतेही महत्त्व नसल्याचे स्पष्ट केले आहे. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या संदर्भात रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानाला आम्ही फारसे महत्त्व देत नाही. या प्रकरणी अंतिम निर्णय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. विशेषतः या प्रकरणी युती होत नाही तोपर्यंत भाष्य करणे योग्य नाही. वरिष्ठांच्या सूचनेनुसार शक्य तिथे महायुती म्हणूनच निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे युती होत नाही तोपर्यंत आम्ही याला गांभीर्याने घेणार नाही. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे आहेत. शिवसेना छत्रपती संभाजीनगरमध्येही जोर लावणार दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चांगलाच जोर लावण्याचा निर्धार केला आहे. या प्रकरणी शुक्रवारी रात्री संजय शिरसाट यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपपुढे युतीचा औपचारिक प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. विशेषतः भाजपने शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचा दावा केला जात आहे. याबैठकीला मंत्री संजय शिरसाट यांच्यासह खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, माजी आमदार किशनचंद तनवाणी, कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील, भाऊसाहेब चिकटगावकर, माजी महापौर विकास जैन, नंदकुमार घोडेले, त्रिंबक तुपे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख विजय वाघचौरे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढेल. आम्ही सर्व 227 जागा लढवू. आमची जिल्हा काँग्रेस कमिटी, ब्लॉक काँग्रेस कमिटी व सर्व पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा होती. त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही हा निर्णय घेतला. ही काही लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक नाही. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते जे म्हणतील तेच होईल. भविष्यात काँग्रेसला मजबूत बनवणे हे आमचे काम आहे. काँग्रेस मजबूत व्हावी अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भावनांचा मान राखत हा निर्णय घेतला आहे, असे चेन्नीथला म्हणाले.
केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली
जळगाव : प्रतिनिधी पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे केळीचे बाजारभाव कोसळले असून सध्या केळी उत्पादक शेतक-यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पादन खर्च वाढला. झाडांवर केळी पिकत असून सडून जात आहे. माल बाहेर काढण्यासाठी शेतक-यांना अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी १८०० ते २००० रुपये प्रति क्विंटल दर असलेल्या केळीला सध्या फक्त ३०० रुपये […] The post केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छ. संभाजीनगरमध्ये भाजप नेत्याचा खून
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छपत्रपती संभाजीनगरमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. छ. संभाजीनगरमध्ये भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाचा मृतदेह आढळला. गंगापूर तालुक्यातील एका पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. भाजप नेत्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातील भालगाव […] The post छ. संभाजीनगरमध्ये भाजप नेत्याचा खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अहिल्यानगर-पुणे बायपास मार्गावर ‘रास्ता रोको’
अहिल्यानगर : प्रतिनिधी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांनंतर नागरिक हैराण झाले असून अहिल्यानगरमध्ये लोकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील इसळक, निंबळक आणि खारेखर या तीन गावांतील नागरिकांनी पुणे बायपास मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले आहे. बिबट्याला मारण्याची परवानगी द्या. तसेच बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळेपर्यंत आंदोलन करणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटच्या […] The post अहिल्यानगर-पुणे बायपास मार्गावर ‘रास्ता रोको’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमसी स्वबळावर लढवण्याची भूमिका पोकळ असल्याचेही ते म्हणालेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. यामुळे विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या प्रकरणी मनसेला सोबत घेण्यावर तीव्र आगपाखड केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस व मनसेला वरील टोला हाणला आहे. काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची नीतेश राणे म्हणाले, काँग्रेसमध्ये खरेच हिंमत असेल तर त्यांनी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावे. ते नुसत्या सुक्या धमक्या देतात. विजय वडेट्टीवार एक बोलणार, वर्षा गायकवाड दुसरे बोलणार आणि तिकडे अस्लम शेख वेगळेच बोलणार. हा सर्व मुंबईवर हिरव्यांचे राज्य आणण्याचा कार्यक्रम आहे. काँग्रेसची भाषा ही जिहाद्यांची भाषा आहे. त्यामुळे तिच्यावर मुंबई व महाराष्ट्रच नव्हे तर देशातही कुणाचा विश्वास राहिला नाही. राहुल गांधी हे पूर्णवेळ नव्हे तर अर्धवेळ राजकारणी नीतेश राणे यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी अर्धवेळ राजकारणी असल्याचीही टीका केली. राहुल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांची जनतेशी नाळ नाही. ते देशासाठी पर्यटक आहेत. ते देशाची बदनामी करतात आणि पुन्हा परदेशात जातात. त्यामुळे त्यांना 100 टक्के भारतीय म्हणायचे का? हा प्रश्न उपस्थित होतो. अशा लोकांना बिहारच्या जनतेने नाकारले आहे. एकीकडे मतचोरीची बोंब करायची व दुसरीकडे लोकशाहीची थट्टा उडवायची ही राहुल गांधींना सवय झाली आहे. यामुळेच बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या एनडीएला बिहारचे नेतृत्व करण्याची पुन्हा संधी दिली, असे ते म्हणाले. काय म्हणाल्या होत्या वर्षा गायकवाड? उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे सूतोवाच करताना मनसेवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या, आम्ही देशाचे संविधान मानणारी मंडळी आहोत. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणारे लोक आहोत. मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाले तर आम्ही सातत्याने मुंबईच्या विकासावर बोलतो. आम्ही रोज मुंबईकरांचा त्रास पाहत आहोत. या प्रकरणी सर्वांनी एकत्र येऊन बोलण्याची गरज होती. कारण, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जी मारहाण केली जाते किंवा कायदा सुव्यवस्था हातात घेतली जाते. विशेषतः त्यांच्याकडून जी भाषा वापरली जाते, ती भाषा आमच्या सुसंस्कृतपणाला शोभणारी भाषा नाही. महाविकास आघाडीमध्ये आम्ही किमान समान कार्यक्रमावर चालण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम सर्वांसाठी असला पाहिजे. संविधानाच्या धाग्यातून असला पाहिजे. परंतु काही पक्षांची भूमिका ही मारहाणीची राहिली आहे. लोकांना त्रास देण्याची राहिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी त्यांचा योग्य तो निर्णय घ्यावा. पण सध्या ते ज्या लोकांशी चर्चा करत आहेत, त्यांच्याशी आमचे कितपत जमेल हे आम्हाला माहिती नाही.
वसईतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका सहावीतल्या विद्यार्थिनीला चक्क शंभर उठाबशा काढायची शिक्षा दिली. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शुक्रवारी बालदिनी 14 नोव्हेंबर रोजी हा संतापजनक प्रकार घडला. काजल उर्फ अंशिका गौड असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, सातीवली येथील श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये हा प्रकार घडल्याचे समजते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याविरोधात आक्रमक भूमिका घेत शाळेला टाळे ठोकले आहे. शिक्षिकेवर गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा इशाराही दिलाय. पालकांमध्ये या घटनेमुळे प्रचंड संतापाची लाट आहे. नेमके प्रकरण काय? वसई येथील सातीवली येथे श्री हनुमंत विद्या हायस्कूल आहे. या शाळेत तेरा वर्षांची काजल उर्फ अंशिका गौड इयत्ता सहावीमध्ये शिकते. शुक्रवार 8 नोव्हेंबर रोजी तिच्यासह अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जायला दहा मिनिटांचा उशीर झाला. तेव्हा तिच्या वर्गशिक्षिकेने सर्वांना शिक्षा सुनावली. प्रत्येकाला शंभर उठाबशा काढायला सांगितल्या. अनेक विद्यार्थ्यांनी पंधरा-वीस उठाबशा काढल्या आणि ते आपापल्या जागेवर जाऊन बसले. मात्र, अंशिका घाबरली होती. तिने शंभर उठाबशा काढल्या. उपचार ठरले व्यर्थ शाळा सुटल्यानंतर अंशिका घरी गेली. या घटनेमुळे तिची तब्येत बिघडली. दुसऱ्या दिवशी तर तिची अवस्था भलतीच वाईट झाली. त्यामुळे तिला वसईतल्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथेही तिची प्रकृती ढासाळली. शेवटी अंशिकाला पुढच्या उपचारासाठी मुंबईला जे. जे. रुग्णालयात हलवले. मात्र, तिथेही यश आले नाही. अखेर बालदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत असून, पालकांमध्ये प्रचंड संताप आहे. शाळेला मान्यता नाही वसई येथील श्री हनुमंत विद्या हायस्कूलच्या या कारभाराविरोधाता आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालीय. त्यांनी या शाळेवर जात प्रशासनाला जाब विचारला. शाळेच्या प्रवेशद्वारालाही टाळे ठोकले. तसेच शिक्षेकवर गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतलीय. दुसरीकडे या शाळेला कसलिही मान्यता नसल्याचेही समोर येत आहे. आता या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी दिली भेट वसई येथील हा प्रकार समोर येताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री हनुमंत विद्या हायस्कूलला भेट दिल्याचे समजते. गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले. गलांगे म्हणाले की, आरटीई 2009 च्या शिक्षण कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक शिक्षा करणे गुन्हा आहे. शिक्षण विभागाकडूनही तशा सूचना दिल्या जातात. मात्र, त्यानंतरही हा प्रकार घडला आहे. याची चौकशी सुरू आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने 56 नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 1300 हून अधिक एबी फॉर्म वाटून महायुतीमधील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. शिवसेनेच्या या कृतीमुळे नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भात महायुतीत सर्वकाही ठिकठाक नसल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील सर्वच घटकपक्ष या निवडणुकीसाठी आपापली रणनीती ठरवत आहेत. अनेक ठिकाणी या दोन्ही आघाड्यांतील मित्रपक्षांनी एकमेकांविरोधात लढण्याचे संकेत दिलेत. त्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने पूर्व विदर्भातील 56 नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी तब्बल 1300 एबी फॉर्म वाटून सर्वांना धक्का दिला आहे. शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी याची पुष्टी केली आहे. शिवसेनेने यापूर्वीच दिला होता स्वबळाचा इशारा महायुतीच्या घटकपक्षांसोबत आघाडी करण्याचा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असणार आहे. पण युती झाली नाही तर शिवसेना सर्वच जागी आपले उमेदवार देईल, असे तुमाने याविषयी म्हणाले होते. विशेष म्हणजे शिवसेनेने यापूर्वीच भाजपला नागपूर जिल्ह्यातील सर्व 15 नगरपरिषदा व 12 नगरपंचायती स्वबळावर लढवण्याचा इशारा दिला होता. आमची आगामी ही निवडणूक महायुती म्हणून लढवण्याची इच्छा आहे. पण भाजपने वेळीच आपले पत्ते खुले केले नाही, तर आमचीही तयारी झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व 15 नगरपरिषदा व 12 नगपंचायतींवरील आमचे उमदेवार व त्यांचे एबी फॉर्म आमच्याकडे तयार आहेत, असे शिवसेनेने या प्रकरणी म्हटले होते. शिवसेनेचा महायुतीतील छोट्या पक्षांना हाताशी धरण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या या रणनीतीमुळे यापुढे शिंदे गट भाजपची वाट न पाहता पूर्व विदर्भात स्वबळ आजमावेल असा दावा केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे शिवसेनेच्या नेतृत्वात नुकतीच नागपुरात भाजप वगळता इतर पक्षांची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले), बहुजन रिपब्लिकन एकता मंच, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदींची बैठक झाली होती. यामुळेही शिवसेनेने महायुतीतील भाजप वगळता इतर छोट्या पक्षांना हाताशी धरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत ाआहे. भाजपचे भंडाऱ्यात 'एकला चलो रे'दुसरीकडे, भाजपने भंडारा नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेत. भाजपने भंडारा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मधुरा मदनकर यांच्या नावाचीही घोषणा केली आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीपैकी इतर कोणत्याही पक्षाने या निवडणुकीतील आपले पत्ते उघड केले नाहीत. पण भाजपने मात्र आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात येथील आपला प्रचारही सुरू केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची अधिकृत घोषणा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या शिबिरात चेन्निथला यांनी ही घोषणा केली. काँग्रेसच्या या निर्णयामुळे […] The post मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अभिनेता राजकुमार राव झाला बाबा
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय जोड्या आई-बाबा झाल्या आहेत. आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपे म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा हे देखील आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झाले आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून सर्वांसोबत ही गुड न्यूज शेअर केली आहे. अभिनेता […] The post अभिनेता राजकुमार राव झाला बाबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी ४० एकर जमीन फक्त ३०० कोटी रुपयांमध्ये विकत घेत सरकारची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर काहींवर गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशी समिती गठित करण्यात आली आहे, तर अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाला आहे असे सांगितले. मात्र या प्रकरणात या गैरव्यवहारात […] The post हायकोर्ट जजच्या अध्यक्षतेखाली चौकशी करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णीजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकाला त्याच्या चुकीमुळे हॉटेल मालकाने नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. टेंभुर्णी येथील 'हॉटेल 7777' चे मालक लखन माने यांनीच ही मारहाण केली असल्याचा आरोप आहे. ही मारहाण हॉटेलच्या इतर कर्मचाऱ्यांच्या समोरच घडली, ही बाब अधिक धक्कादायक आहे. या गंभीर घटनेनंतरही, पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. हॉटेल मालकाने दिले स्पष्टीकरण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण देताना हॉटेल मालक लखन माने यांनी सांगितले की, व्हिडीओ वेगळ्या पद्धतीने सादर केला गेला आहे आणि त्याद्वारे त्यांचे, हॉटेलचे तसेच व्यवस्थापकाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेमागील सत्यता आणि व्हिडीओ कोणी काढला, याची माहिती घेणे गरजेचे आहे. म्हणून दादांनी शिक्षा केली दुसरीकडे, मारहाण झालेल्या व्यवस्थापकानेही आपली बाजू मांडली आहे. मॅनेजरने सांगितले की, वैयक्तिक तणावामुळे मी मद्यपान केले होते आणि हॉटेलवर आल्यावर दादांनी मला शिक्षा केली. मी दादांसोबतच काम करत राहील. दादा हे माझे फॅमिली मेंबर आहेत. त्यांनी मला लागेल तेव्हा मदत केलेली आहे. हवे तेव्हा पैसे दिलेले आहेत. हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केला आहे त्यांनी असं करू नये. आज आमच्या हॉटेलचे नाव आणि दादांचे नाव बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, बदनामी करण्याचा प्रयत्न लखन माने म्हणाले की, 'हॉटेल 7777' हे एक कुटुंबासारखे आहे. काही घटना घडल्या असल्या तरी त्यांची सत्यता समजून घेतल्याशिवाय व्हिडीओ पसरवू नका. व्यवस्थापकाशी आपले नाते भावासारखे आहे आणि कोणत्याही प्रकारचा गालबोट किंवा हिंसाचार अपेक्षित नाही. व्हायरल होत असलेले व्हिडीओ आपले नाव बदनाम करण्याच्या हेतूने पसरवले जात आहेत, मात्र लवकरच सत्य समोर येईल, असे त्यांनी नमूद केले.
मुंबईत वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता
मुंबई : प्रतिनिधी पावसाळा संपताच मुंबईतील वायुप्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने वायुप्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांना आपली विशेष पथके पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत. या पथकांमध्ये विभाग कार्यालयातील दोन अभियंते आणि एक पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. यंदापासून या सर्व पथकांमध्ये पर्यावरण विभागातील एका अधिका-याचा समावेश बंधनकारक आहे. प्रदूषण ट्रॅकिंग […] The post मुंबईत वाढत्या वायुप्रदूषणाची चिंता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी जवळपास अर्धा तास बंद दरवाज्याआड चर्चा केली. त्यांच्यातील चर्चेचा तपशील बाहेर आला नाही. पण पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांत हा संवाद झाल्यामुळे त्यांच्या भेटीला महत्त्व आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सळो की पळो झाल्यामुळे अजित पवार पाया पडण्यासाठी दिल्लीला गेल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा मोठा विजय झाला. त्याचा मोठा विजय भाजपने शुक्रवारी दिल्लीत साजरा केला. या विजयोत्सवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील समजला नाही. पण सूत्रांनी ही चर्चा बिहार निवडणुकीतील भाजपचा विजय व महाराष्ट्रातील घटनाक्रमाशी निगडित होती असा दावा केला आहे. त्यामुळे या भेटीविषयी राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. मुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवार अडचणीत अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पुण्यातील मुंढवा येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. या प्रकरणी दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नियुक्त केल्लया समितीचा अहवाल सोमवारी येणार आहे. या अहवालानुसार या प्रकरणी पुढील कारवाई केली जाणार आहे. विशेषतः या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. यामुळे अजित पवार यांनी तातडीने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याचाही दावा केला जात आहे. अंजली दमानियांचा अजित पवारांवर निशाणा दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सळो की पळो झाले की दिल्लीला पळा, पाया पडा, असे त्यांनी म्हटले आहे. .याद्वारे त्यांनी पुण्यातील भूखंड घोटाळ्यामुळे अडचणीत सापडल्यामुळेच अजित पवारांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतल्याचे सूचित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांनी राज्यातील काही मुद्यांवर अमित शहांची भेट घेतली असेल, असे म्हणत याविषयावर भाष्य करणे टाळले आहे. ताथवडे भूखंड घोटाळ्यात अखेर गुन्हा दाखल दुसरीकडे, ताथवडे प्रकरणात शासनाची मालमत्ता लाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे. ते म्हणाले, ताथवडे शासनाची मालमत्ता लाटणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल. ताथवडे, सर्व्हे नं. 20 मधील 6.32 हेक्टर (अंदाजे 16 एकर) पशुपैदास प्रक्षेत्राच्या ताब्यातील सरकारी जमीन बेकायदेशीरपणे हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीवर दापोडी पोलिस ठाण्यात शेवटी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात कालबाह्य 7/12 उतारे वापरणे, ई-म्युटेशन स्किप करणे, खोटा दस्ताऐवज क्रमांक 685/2025 नोंदवणे आदी माध्यमातून संपूर्ण सरकारी जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानुसार या प्रकरणी मयत हेरंभ गुपचूप यांचे 23 वारस, खरेदीदार कफील फकीर, सैयद फैयाज मीर अजिमोद्दीन, तसेच सह दुय्यम निबंधक विद्या बडे, सांगळे व इतरांवर दाखल करण्यात आला आहे. कफील फकीर हा काही प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमध्ये आजी किंवा माजी संचालक असल्याचे समोर आले आहे, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी असलेल्या पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथे माऊलीचा संजीवन समाधी सोहळा सुरु झाला आहे. या सोहळ्यादरम्यान तीन दिवसांच्या सुर्य दर्शन प्रसंगी माऊलीच्या मुर्तीवर किरणोत्सव पाहायला मिळाल्यामुळे वारकरी व भाविकांनी माऊली गजर केला. पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात गेल्या चार वर्षांपासून माऊलीच्या मुर्तीवर समाधी सोहळ्यात सूर्यकिरणे मंदिरात प्रवेश करतात. हा किरणोत्सव तीन दिवस दुपारी 12:45 ते 12:52 या वेळेत सुरु होतो, जेव्हा किरणे संत ज्ञानेश्वरांच्या मूर्तीला उजवीकडून डावीकडे जात मुखकमलाला स्पर्श करतात. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. यंदा हा किरणोत्सव पहिल्या दिवशीच पाहायला मिळाला आहे. ज्ञानेश्वर मंदिर संस्थानाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर विष्णु महाराज कोल्हापूरकर आपेगाव यांनी सांगितले की पहिल्या दिवशी सूर्यकिरणे मुर्तीवर मुखकमलावर पडल्या आहेत. हा सोहळा अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी व भाविक जमले आहेत. संस्थानाकडून गर्दीचे योग्य नियोजन केले असल्यामुळे किरणोत्सवाचा सोहळा सर्व भाविकांना पाहता येत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज जन्मभूमी असलेल्या मंदिरातील माऊलीच्या मुर्तीवर ढगाळ वातावरण असूनही ठरलेल्या वेळेत सूर्य दर्शन झाले होते आणि महाराष्ट्रातील असंख्य वारकरी भाविकांनी किरणोत्सवाचा अद्भुत अनुभव घेतला होता. याही वर्षी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव होईल की नाही ही शंका भाविकांच्या मनात होती, परंतु माऊली भक्तांना सुर्य दर्शन झाले आहे. हा किरणोत्सव पाहण्यासाठी आपेगाव येथे मोठी गर्दी एकवटली आहे.
प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण
मुंबई : प्रतिनिधी महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण २०२४’ पुरस्कार प्रदान केला. महाराष्ट्रातील कलाक्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. सध्या राम सुतार यांचे वय १०० वर्षे आहे. त्यांनी साकारलेली शिल्प आजही इतिहासाची साक्ष […] The post प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्रभूषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संत्र्यांच्या दरात वाढ; बाजारपेठेत आवक घटली
मुंबई : प्रतिनिधी एपीएमसीतील फळ बाजारात नोव्हेंबर महिन्यात संत्र्यांची आवक वाढते. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका नागपूरसह विदर्भातील संत्री उत्पादकांना बसला आहे. पावसामुळे झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतक-यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, मुंबईच्या बाजारात संर्त्याची आवक घटल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दरदिवशी ४० ते ५० […] The post संत्र्यांच्या दरात वाढ; बाजारपेठेत आवक घटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही नव्या योजना आणल्या नाही. आता आमच्या योजना लोकांना आवडत आहेत. ते आम्हाला मतदान करत आहेत. त्यामुळे लोकांना दोष देण्याची काहीच कारण नाही. जो जीता वही सिकंदर, असे ते म्हणालेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकारने महिलांना वाटलेल्या प्रत्येकी 10 हजार रुपयांमुळेच एनडीचे बिहारमध्ये विजय झाल्याचा दावा केला. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात भाजपच्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयावर उलटसूलट चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आत्मपरीक्षण करत नाहीत तोपर्यंत विरोधकांची मातीच होईल मुख्यमंत्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जो जीता वही सिकंदर. हरल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणे हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत, या योजना करण्याची संधी सर्वांनाच होती. त्यांची सरकारे होती तेव्हा त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाही. आम्ही योजना केल्या. त्या लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय आहे? विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाहीत, तोपर्यंत त्यांची मातीच होत राहील, असे ते म्हणाले. मुंबईत महायुतीचाच महापौर होईल काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावरही भाष्य केले. ते म्हणाले, विरोधी पक्ष एकत्रित लढतो की स्वतंत्र लढत आहे यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण कसे लढत आहे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र तिथे महायुती निवडून येईल यात शंका नाही. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्र्यांचे लक्ष्य वेधले असता त्यांनी अजित पवारांनी राज्यातील काही मुद्यांवर अमित शहांची भेट घेतली असेल, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते शरद पवार? शरद पवार बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते. तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसंना कमी आरक्षण मिळाले आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. या प्रकरणी फेरविचार करावा अन्यथा कोर्टात जावू, असा इशारा त्यांनी दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. या निवडणुकापूर्वीच ओबीसी महासंघाने हा आरोप केलाय. नेमके प्रकरण काय? निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात महापालिका क्षेत्रास ओबीसींसाठी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मिळते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी जागांची मोजणी करताना अपूर्णांक दुर्लक्षित करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे एका ओबीसी जागांचे नुकसान होते. हाच धागा पकडत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालेला दिसतो आहे. मुख्यमत्र्यांची भेट घेणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे ओबीसींचे नुकसान होते आहे. या निर्णयाचा फेरविचार करावा. अन्यथा कोर्टात जाणार असल्याचा इशारा बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. सोबतच या मुद्यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत. एससी, एसटी आरक्षणानुसार अपूर्णांक आल्यास 0.50 व त्यापेक्षा जास्त असलेला अपूर्णांक पुढील संख्येस पूर्णांकित करावे, अशी मागणीही त्यांनी केलीय. आता यावर राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतो, हे पाहावे लागेल. अशी होतेय निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. 17 नोव्हेंबर पर्यंत हे अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची पडताळणी होईल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 21 नोव्हेंबर अशी असेल. अपिल नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर ही असेल. 26 नोव्हेंबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. याच दिवशी त्यांना निवडणूक चिन्हांचे वाटपही केले जाईल. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. शासन राजपत्रात निकाल घोषित करण्याचा दिवस 10 डिसेंबर असेल. असे आहे आरक्षण नगर परिषद आणि नगर पंचायतीसाठी कोकणात 17, नाशिक 49, पुणे 60, संभाजीनगर 52, अमरावती 45, नागपूर 55 ठिकाणी निवडणूक होतेय. त्यात एकूण 246 नगरपरिषद असून, 4 नगरपंचायती आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 3,820 प्रभाग आहेत, तर 6,859 जागा आहेत. यातील 3,492 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी जागा 895, अनुसूचित जमातींसाठी जागा 338, तर नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी 1,821 जागा राखीव आहेत. मतदारांचे नाव शोधणे सोपे नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदाराला मतदार यादीतील आपले नाव शोधणे सोपे झाले आहे. त्यासाठी https://mahasecvoterlist.in हे संकेत स्थळ विकसित केले आहे. प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरच येथे नाव शोधता येईल. संकेतस्थळावरील Search Name in Voter List यावर क्लिक करून नाव किंवा EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक नमूद करुन मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर मतदार यादीतील आपल्या नावासोबतच आपले मतदान केंद्रदेखील शोधता येईल.
अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू यांचा पराभव भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याने केला आहे.कारण भाजपचे कार्यकर्ते हे जनतेमध्ये असतात. बच्चू कडू यांनी आपला पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे त्यानंतर बोलले पाहिजे, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी भाजपच्या कार्यालयात मतदान घ्या असे म्हणणाऱ्या बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसचे निवडणूक प्रभारी पराभवाचा दोष निवडणूक आयोगाला देत आहे.आयोगाला दोष देण्यापेक्षा राहुल गांधी यांचे काय चुकते याचा विचार करावा. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या 95 निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. राहुल गांधी यांची थोड्याच दिवसांमध्ये शतकवीर म्हणून घोषणा होणार आहे. काँग्रेसने आत्मचिंतन करावा की आपला पराभव का होतो आणि मग निवडणूक आयोगाला दोष द्यावा. महाराष्ट्रात मतदारांचा अपमान केल्याने तुमचा पराभव झाला आणि जनतेने तुम्हाला घरी बसवले. बिहार मध्येही तसेच घडले. आता राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे 100 पराभव होतील. मविआचे 12 वाजणार नवनाथ बन म्हणाले की, मुंबई मनपात काँग्रेसने कसेही लढावे. बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांची जी अवस्था झाली आहे अगदी तशीच अवस्था मुंबई मनपामध्ये होणार आहे. काँग्रेस बिहारमध्ये दोन आकडी आकडा सुद्धा गाठू शकली नाही तसेच मुंबईत सुद्धा होईल.भाजपच्या आणि युतीच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे. बिहारमध्ये जसे आघाडीमध्ये वाद होते तिथे जसे 12 वाजले तसेच मुंबई मनपामध्येही वाजतील. मुंबईचा सेवकच होणार नगरसेवक नवनाथ बन म्हणाले की, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक म्हणणाऱ्यांना मला इतकेच सांगायचे आहे की जो मुंबईचा सेवक आहे तोच मुंबईचा नगरसेवक होणार आहे हे मुंबईकर आणि मराठी माणसांनी ठरवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ठाकरे ब्रँड होता कारण ते हिंदुत्ववादी होते. तुमचा ब्रँड पलटी आहे म्हणून जनता तुम्हाला घरी बसवेल. आता मुंबईकरांनी सेवकांना निवडून द्यायचे ठरवले आहे. बिहार तो झांकी है… मुंबई अभी बाकी है नवनाथ बन म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीत विजयाचे नगाडे वाजले आणि त्यांच्या कानठळ्या मात्र मुंबईत बसल्या सामानामध्ये अग्रलेख लिहिण्यापूर्वी 2010 मध्ये काँग्रेसच्या राजवटीतल्या बिहार निकालात गप्प बसलेले आज ‘आयोग द्रोही’ कसा झाला? त्यावेळी केंद्र सरकार दोषी वाटले नाही पण आता जंगलराज दूर झाल्यावर तुम्हाला त्रास होत आहे. संजय राऊत यांना आरामाची गरज आहे, आराम करा मग अग्रलेख लिहा.बिहार तो झाकी है मुंबई अभी बाकी है असे म्हणत मुंबई मनपा निवडणुकीचा निकाल देखील असाच लागणार असे बन यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पक्षाने या माध्यमातून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील मनसेशी युती करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना जबर धक्का दिला आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...
केंद्र सरकारने बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले. या पैशांमुळेच तिथे भाजप प्रणित एनडीएचा विजय झाला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला. सरकारने निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे पैसे वाटल्यामुळे बिहारमध्ये याहून वेगळा निकाल लागण्याची अपेक्षा नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप - जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वरील दावा केला आहे. ते शनिवारी बारामतीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, बिहार निवडणुकीपूर्वी सरकारने तिथे मोठ्या प्रमाणात पैसै वाटले. त्यामुळे तिथे वेगळा निकाल लागण्याची शक्यता शक्यता नव्हती. सरकारने मतांसाठी अधिकृतपणे पैसे वाटले शरद पवार म्हणाले, बिहार विधानसभेचे मतदान झाल्यानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. त्यांच्याकडून मला असा फिडबॅक मिळाला की, ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. हा प्रकार एखादा व्यक्ती मतांसाठी पैसे वाटतो तसा नव्हता, तर सरकारने स्वतः लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे मतांसाठी पैसे वाटले होते. तसाच प्रकार बिहारमध्ये घडला. आत्ता प्रश्न असा आहे की, येथून पुढील निवडणुकांत ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली, तर एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे. 10 हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही निवडणुका स्वच्छ, पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात. यावर कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण 10-10 हजार रुपये देणे, ही काही लहान रक्कम नाही. महिलांना एवढी मोठी रक्कम द्यायची आणि त्यानंतर निवडणुकीला सामोरे जायाचे, याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक व स्वच्छ होत्या का? याविषयी लोकांच्या मनात शंका आहे. याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. स्थानिकच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना सर्वाधिकार पत्रकारांनी यावेळी चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली, अशी युती पुण्यातही होईल का? असा प्रश्न केला. त्यावर शरद पवार यांनी आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे सांगितले.
बिहारमध्ये भाजपपेक्षा जास्त मतदान हे तेजस्वी यादव यांच्या पक्षाला पडलेले आहे. तेजस्वी यादवांच्या पक्षाला भाजपपेक्षा जवळपास 3 टक्के जास्त मतदान झाले आहे. यात जागेचा फरक बघितला तर 25 कुठे आणि 95 कुठे? असा सवाल उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अंबादास दानवे म्हणाले की, केवळ दोन टक्के मतांमुळे हे होऊ शकते का? याचाच अर्थ हे दोन टक्के मते जर पुढे गेले असते तर 25 भाजप आणि 95 तेजस्वी यादव असू शकले असते. हाच विचार मविआ करताना झाला पाहिजे असे मत मी व्यक्त केले त्यावर मी ठाम आहे. मतमोजणी, मतदान या प्रक्रियेत निश्चितच गोंधळ आणि प्रशासनाचा दबाव आहे. परंतू कार्यकर्ता आणि जनतेला आत्मविश्वास देण्याची जबाबदारी ही नेतृत्वाची असते. नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. यात सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र इच्छा असतात. मविआतील सर्वच पक्षाच्या जागा वाढल्या असत्या अंबादास दानवे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त ठिकाणी महा विकास आघाडी झाली आहे. स्थानिक राजकारण पाहिले तर भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात सर्व ठिकाणी मविआ होत आहे. घोटाळेबाज महायुतीविरोधात लढण्यासाठी मविआ सज्ज झाली आहे. मी मांडलेली भूमिका की जागा वाटपात दिरंगाई किंवा वेळ दुसरी गोष्ट म्हणजे नेतृत्वाची घोषणा. जसे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या विषयी जनतेच्या मनात एक आदर होता. कारण त्यांनी कोरोनाच्या काळात केलेले कार्य आणि त्यांनी खुर्चीवर लाथ मारल्याने त्यांची एक प्रतिमा होती त्यांचा चेहरा जर पुढे असता तर मला वाटते सर्वच पक्षाच्या चार जागा जास्त वाढल्या असत्या. ..तर परिस्थिती वेगळी असती अंबादास दानवे म्हणाले की, बिहारमध्ये राहुल गांधी यांचा 16 दिवसांचा प्रचंड मोठा दौरा झाला. या दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात जनता त्यांच्यासोबत दिसून आली. त्यावेळी तेजस्वी यादव यांचा चेहरा पुढे केला असता तर आणखी चांगले झाले असते. अंबादास दानवे काय म्हणाले? अंबादास दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता. हा घोळ नसला पाहिजे. आत्ता आम्ही नगरपालिका व नगर परिषदांचे काम करत आहोत. त्यात कित्येक ठिकाणी काँग्रेससोबत वाद आहे. काँग्रेसचे नेते इच्छा नसतानाही ही जागा द्या, ती जागा द्या, ती तुम्ही लढा, ही आम्ही लढतो, असे करत आहेत. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन करून आमच्या पंजावर लढण्याचा प्रस्ताव देत आहेत. असे थोडेच चालते. हे काही योग्य नाही.
पार्थ पवार यांच्या पुणे येथील मुंढवा जमीन घोटाळ्याचे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपासून ते खालच्या अधिकाऱ्यांचा संगनमताने झाले आहे. त्यामुळे या प्रकरणी सर्व शासकीय अधिकाऱ्यांसह लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराची निष्पक्ष चौकशी न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी शनिवारी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्रही लिहले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की,पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराप्रकरणी सरकार दिशाभूल करत आहे. तहसीलदारांवर झालेली कारवाई दुसऱ्या प्रकरणातली आहे. वतनाची जमीन खरेदी झाली त्या व्यवहारात जे जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जिल्हाधिकारी, एसडीओ हात झटकू शकत नाहीत. जिल्हाधिकारी समितीत असतील तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे ही समिती रद्द करून न्यायिक चौकशी करावी. व्यवहार असा रद्द करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी कुणालाही वाचवू नये. सरकार इमानदार असेल तर उच्च न्यालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे २४ ऑक्टोबर १९७३ रोजी ही जमीन 'वनस्पती सर्वेक्षण विभाग' यांना वार्षिक रु. १/- भाड्याने १५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात आली होती. नंतर ३१ मार्च २०३८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ३० डिसेंबर २०२४ रोजी शीतल तेजवानी यांनी कोणताही अधिकृत शासन निर्णय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नसतानाही, व्याजासह फक्त रु. ११ हजार ही रक्कम 'जमीन धारकत्व मूल्य' म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली. अधिकाऱ्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता ही रक्कम स्वीकारली. २० मे २०२५ रोजी विक्रीपत्र नोंदविण्यात आले. त्यात जमिनीच्या मालकीचा पुरावा, मोबदला बाजार मूल्य, स्टॅम्प ड्युटी याचा कोणताही उल्लेख नाही. सिटीसर्वे मिळकत पत्रिका उपलब्ध असतानाही, केवळ जुन्या ७/१२ उताऱ्यावर आधारित दस्त नोंदविण्यात आला. नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार यांनी संगनमताने शासकीय जमीन खाजगी व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याचे गैरकृत्य केले. ०९ जून २०२५ रोजी तहसीलदार सुर्यकांत येवले यांनी कोणताही तपास न करता अमेडिया कंपनीच्या मागणीनुसार BSI ला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले. याच अधिकाऱ्यावर याआधी बोपोडी येथील प्रकरणात गुन्हा दाखल आहे, अस वडेट्टीवर यांनी पत्रात नमूद केले आहे. शासकीय जमिनीवर बेकायदा ताबा घेण्यासाठी लाभार्थ्यांना अनुकूल अशी भूमिका तहसीलदाराने घेतली. वतनाच्या जमिनी हस्तांतरित करण्यासंबंधीच्या २०२१ च्या शासन आदेशाचे उल्लंघन करून, शासनाची पूर्वपरवानगी नसतानाही बेकायदेशीरपणे जमीन धारकत्व मूल्य स्वीकारले. इलीजिबीलिटी प्रमाणपत्र न घेता, स्टॅम्प ड्युटी व मूल्यांकन नियम मोडून आणि केवळ लेटर ऑफ इन्टेन्टवर सवलत देऊन बेकायदा दस्त नोंदणी करण्यात आली. लाभार्थी शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीने खोटे कागदपत्रे आणि चुकीची ओळख वापरून शासकीय जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केला आहे. सगळ्यात महत्वाची बाब, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती नेमली,त्यातील काही अधिकारी हेच आधीच्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेले आहेत. यामुळे नेमलेली चौकशी निष्पक्ष चौकशी करणार नाही, समिती रद्द करणे आवश्यक आहे. हा केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून, शासनाच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मालमत्तेचा नियोजनबद्ध अपहार आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणमधील सर्व बेकायदेशीर व्यवहार, आदेश व विक्रीपत्रे तात्काळ रद्द करावीत. सर्व संबंधित अधिकारी आणि लाभार्थी, अमेडिया कंपनी यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रात केली. या प्रकरणी वडेट्टीवर यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि मुख्य सचिवाना देखील पत्र लिहिले आहे. या प्रकरणातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी सुरु करावी. गैरव्यवहार झालेली जमीन शासनाच्या ताब्यात घ्यावी. याच अधिकाऱ्यांनी आणखी कोणत्या सरकारी व खाजगी जमिनी बळकावल्या आहेत, याची स्वतंत्र सखोल चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवारा यांनी केली आहे. (हे वृत्त अपडेट होत आहे.)
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी 'काँग्रेस मुक्त भारत'चे स्वप्न पाहणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे गेल्या 11 वर्षांपासून सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि संवैधानिक संस्था वापरून 'व्होट चोरी' करूनही काँग्रेसला संपवण्यात अयशस्वी ठरले, अशी टीका सावंत यांनी केली. सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करून टिकून राहिला आहे. आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही, तर तुम्ही कोण आलात? असा थेट प्रश्न त्यांनी भाजपला विचारला. काँग्रेसला विभाजित करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते यशस्वी होणार नाहीत, कारण काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही, असे म्हटले आहे. नेमके सावंत काय म्हणाले? काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, काँग्रेस मुक्त भारताचे स्वप्न बघणारे नरेंद्र मोदी गेले 11 वर्षे सगळ्या राष्ट्रीय तपास यंत्रणा लावून आणि संवैधानिक संस्था वापरून व्होट चोरी करून अयशस्वी ठरले. काँग्रेस पक्ष 140 वर्षे सगळी वादळे सहन करुन टिकून राहिला आहे. इंग्रजांच्या विरुद्ध घाबरलो नाही तर तुम्ही कोण आलात? काँग्रेस विभाजित करण्याचा कितीही प्रयत्न करा. काँग्रेस ही जनचळवळ आहे. समुद्रात काठी मारल्याने समुद्र विभाजित होत नाही. बरं, इतिहासात डोकवा मुस्लीम लीग विरोधात काँग्रेस लढली तुमच्या पूर्वजांनी त्यांच्यासमवेत सरकारे स्थापन केली होती इतके तुमचे मुस्लिम लीगवर प्रेम होते. तुम्ही संविधान व लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत रहा, आम्ही राहुल गांधीजींच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या व लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावत राहू.
बिहार निवडणुकीत राहुल गांधी यांची जी भूमिका होती आणि तिथले वातावरण पाहिले तर इतक्या फरकारने एनडीएचे सरकार येण्यासारखे चित्र नव्हते. मुळातच मतदानात पारदर्शकता नसल्यामुळे हा जनतेचा कौल नाही तर मशीनची कामगिरी आहे असे दिसून येत आहे, असे माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. असे होत राहिले तर लोकशाहीचे पतन झाल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडू म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना विरोधक संपवायचे आहेत. तुम्ही अचलपूर विधानसभेचे उदाहरण पाहिले पाहिजे. तर तिथे माहोल आमचा होता आणि तिथे विजय दुसऱ्याच्या हाती गेला आहे. एकंदरीत हेच चित्र सर्व ठिकाणी आहे. भाजपला आता स्थानिक पक्ष संपवायचे आहे. त्यांना आता महाराष्ट्रात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची गरज नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यात भाजप एकटे कसे पुढे जाईल हा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे. भाजपच्या कार्यालयात मतदान ठेवा बच्चू कडू म्हणाले की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मशीन काम दाखवणार आहे. मतदारांच्या मताचा विषय संपलेला आहे. आता नगरपालिकेला व्हीव्हीपॅट दिसणार नाही मग तर विषयच संपला. आता मतदान केंद्रावर मतदान ठेवण्यापेक्षा ते भाजपच्या कार्यालयात ठेवले पाहिजे, असा टोलाही कडू यांनी लगावला आहे. हा सर्व मशीनचा चमत्कार बच्चू कडू म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर 10 हजार रुपये महिलांच्या खात्यावर देण्याची योजनेत निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करायला हवा होता. सत्तेचा वापर करत पैसा हाती देत निवडणूक लढवणे यावर आक्षेप घेतला पाहिजे. केवळ लाडक्या बहिणींमुळे हा चमत्कार झालेला नाही हा सर्व मशीनचा चमत्कार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नाही पण ती आली की चित्र बदललेल दिसेल. लोकशाहीची थट्टा बच्चू कडू म्हणाले की, काँग्रेसने EVM आणले तेव्हा भाजपवाले बोलत होते आणि आता भाजप सत्तेत आल्यावर काँग्रेस बोलत आहे म्हणजे दोघांकडून ही लोकशाहीची थट्टा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EVM ला विरोध केला होता. त्यांचे जुने भाषण समोर आणले तर त्यांच्या आरोपात किती सत्य आहे. सुरवात काँग्रेसने केली असली तरी लोकशाही संपूर्ण संपवायची हा विडा भाजपने उचलला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या सर्व उमेदवारांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला. सर्व उमेदवारांना 1,000 हून कमी मते मिळाली, ज्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. या पराभवानंतर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करु नका असे मी सांगितले होते. परंतू त्यानंतर आमच्याकडे वरीष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी महाराष्ट्रात लक्ष दिल्याने या बद्दल मला काही माहिती नाही, असे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, मी पक्षाला बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका, असे स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पातळीवर प्रफुल्ल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी महाराष्ट्रात लक्ष केंद्रित केल्यामुळे याबद्दल मला कोणतीही माहिती नाही, असे सांगत त्यांनी या निर्णयाचे खापर थेट प्रफुल्ल पटेल यांच्यावर फोडले. अजित पवार यांच्या स्पष्ट व ताठर भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेद उघड झाले आहेत. अजित पवारांनी 'ना' सांगितल्यावरही प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले, या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी एक गंभीर आरोप केला होता. रोहित पवार म्हणाले होते की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही अजितदादांचे महत्त्व आणि राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमधील या अपयशानंतर आणि अजित पवारांनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे, खरोखरच पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील निर्णयांमधून अजित पवारांना बाजूला केले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. पक्षांतर्गत नेतृत्वाच्या संघर्षाची ही नवी झलक आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर येण्याचाही सल्ला दिला आहे. काँग्रेसने मोठ्या भावाच्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला भाऊ मानू, तुमच्याशी युतीही करू. पण तुम्ही मोठे राहिला नाहीत, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असे वंचितने म्हटले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप - जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या सूरात आता वंचित बहुजन आघाडीनेही सूर मिळवला आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, मतदान यंत्र व निवडणूक आयोग या तिघांच्या महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस - राजदला का फटका बसला? सुजात आंबेडकर म्हणाले, आज बिहार निवडणुकीचा निकाल आला. त्यात भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या महागठबंधनने विजय मिळवला. या बिहार निवडणुकीत काँग्रेसने एक घोडचूक केली ती म्हणजे, काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसतांना, त्यांचे तिथे नेतृत्व नसतांना आरजेडीशी वाद घालून त्यांनी जास्तीच्या जागा घेतल्या आणि त्या जागांवर काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेसला फटका बसला. प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसपुढे मैत्रीचा हात पुढे करत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या पक्षाला आपण मोठा भाऊ राहिलो नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्याचा टोलाही हाणला. काँग्रेसने 'बिग ब्रदर'च्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला 'ब्रदर' मानू, तुमच्याशी युती सुद्धा करू पण, तुम्ही 'बिग' राहिलेले नाहीत, हे काँग्रेसने समजून घ्यावे. जिथे वंचित बहुज आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे सन्मानपूर्वक कार्यकर्त्यांना जागा मिळतील. तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल. ..तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता प्रस्थापित नेत्यांना आमचं एक सांगणे आहे की, तुम्ही कधी शहाणे होणार? काँग्रेसच्या स्थानिक लीडरशिपने शहाणपण दाखवत स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हाच शहाणपणा 2019, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांनी दाखवला असता, तर त्यांचा सुपडा साफ झाला नसता, असे ते म्हणाले. खालच्या व्हिडिओत पाहा काय म्हणाले सुजात आंबेडकर? 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान दिन उल्लेखनीय बाब म्हणजे वंचित बहुजन आघाडीने येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधानाच्या सन्मानार्थ संविधान सन्मान महासभेचे आयोजन केले आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे शेवटचे भाषण दिले. या अत्यंत महत्त्वाच्या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याचे धोके आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांसह सामाजिक लोकशाहीची आवश्यकता यावर भर दिला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी येत्या 25 तारखेला संविधानाच्या सन्मानार्थ “संविधान सम्मान महासभा” आयोजित करत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री जे वेगवेगळ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, निझामांचे गॅझेट, मराठा आंदोलन, सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ यांच्याविरोधात बोलताना दिसून येत आहे. हेच मंत्री षड्यंत्र करत महामंडळाचे एलवाय देऊ देत नाही त्यांच्याच सूचनेप्रमाणे हे सर्व होत आहे असे मला वाटायला लागले आहे, असे नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. नरेंद्र पाटील म्हणाले की, सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ हे राज्यात वेगवेगळ्या मेळाव्याना जात अण्णासाहेब पाटी महामंडळाचा चुकीचा प्रचार करत होते. महामंडळाने आणि सरकारने 22 आणि 25 हजार कोटीचे कर्ज कधी दिले नाही. केवळ 1300 कोटी रुपयाचा व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात आला आहे. त्यांना सरकारच्या धोरणाबद्दल बोलायचे असेल तर त्यांनी बोलावे पण एक लक्षात ठेवले पाहिजे की 80 पासून लढत असताना आता फडणवीसांच्या रुपाने चांगला मुख्यमंत्री आम्हाला भेटला आहे. जे मराठा समाजाला न्याय देत आहे, यामुळे भुजबळांचे पोटदुखी आहे असा टोला नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे. सरकारने सूचना दिल्या का? नरेंद्र पाटील म्हणाले की, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी दोन्ही गोष्टी पद्धतशीर टप्प्या टप्प्यांमध्ये कमजोर किंवा बंद करण्याचा जो कार्यक्रम आखलेला आहे याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नक्कीच असणार. मला महामंडळाची जबाबदारी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देण्यात आली आहे. एमडी मराठा असूनही त्यांना याबद्दल काही वाटले नाही. आता सरकार हे मुद्दाम करत आहे का असा सवाल जनतेला पडला आहे. सरकारने त्यांना काही सूचना दिल्या आहेत का? करी योजना बंद करायची असा प्रश्न जनतेला पडला आहे. एलवाय बंद का झाले? नरेंद्र पाटील म्हणाले की, कराडमधील मराठा क्रांती मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी 9 ऑक्टोबरपासून महामंडळाच्या लाभार्थ्यांना देण्यात येणारे एलवाय आहे ते बंद करण्यात आले आहेत असे सांगितले. हे खरं म्हणजे अपेक्षित नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या व्यासपीठावर महाराष्ट्रामध्ये दीड लाख उद्योजक करण्याचे यश या महामंडळाला मिळाले आहे आणि आता हा आकडा 5 लाखांपर्यंत गेला पाहिजे असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले आहे. कारण न देता एलवाय बंद नरेंद्र पाटील म्हणाले की, महामंडळाच्या माध्यमातून 5 लाख उद्योजक तयार व्हावे असे मुख्यमंत्री बोलत असताना एमडीच्या माध्यमातून 9 ऑक्टोबरपासून एलवाय बंद करण्यात आले आहेत. या साठी मी एमडींना दोन-चार पत्र लिहले आहे. यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेडेशन त्यांच्यानंतर कारणं काय आहेत तर काहीच सांगितले गेले नाही.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
वसमत शहरात बॅनर प्रकरण:आदर्श आचारसंहिता भंग प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
वसमत येथे सभा असल्याचे बॅनर लाऊन आदर्श आचारसंहितेचा भ्ंग केल्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 14 गुन्हा दाखल झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत कळमनुरी नगर पालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरु असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकिय पक्षांच्या उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांची धावपळ सुरु आहे. निवडणूक विभागाने रविवारी देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उमेदवारांची मोठी सोय झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने, प्रतीक्षा भुते, समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून तीनही पालिकांमध्ये कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, वसमत येथील ग्रामीण पोलिस ठाणे व गवळी मारोती मंदिर ते आसेगाव टी पॉईंट रोडवरील दुभाजकावर 22 ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सभेचे बॅनर लावण्यात आल्याचे दिसून आले. यावरून वसमत पालिकेचे कर्मचारी अरविंद शिकारी यांनी वमसत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये शहरात बॅनर लाऊन शहराचे विद्रूपीकरण करून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे नमुद केले. यावरून वसमत शहर पोलिसांनी वंचित बहुजन कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकुंद करवंदे, कामगार आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष शेख रफी सुलेमान, विश्वनाथ बोखारे यांच्या विरुध्द आदर्श आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत.
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाचा कामाचा डोल्हारा मोठा असला तरी कार्यालयीन कामकाजाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने दिवसेंदिवस हा डोल्हारा कोसळत चालला आहे. विदर्भात नव्हे राज्यातील एक नामांकीत रुग्णालय म्हणून गौरव झालेल्या ‘लेडी हार्डिंग’ अर्थात जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमधील निविदा प्रक्रियेत घोटाळाप्रकरणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत पाटील व प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे यांना १ ऑगस्ट २०२५ रोजी निलंबित केले. तेव्हापासून वैद्यकीय अधीक्षकपदी कुणाचीही कायमस्वरुपी नियुक्ती झाली नाही. ज्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती झाली अशा तिघांनी उणेपुरा एक महिना पदभार सांभाळला आणि महिना, दोन महिन्यांची वैद्यकीय रजा टाकून मोकळे झाले. त्यामुळे या पदांवर ‘प्रभारींवर प्रभारी’ अशी चौघांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे एकुणच प्रशासकीय कामकाज, व्यवस्थापन आणि रुग्णसेवेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र आहे. गेल्या ४ महिन्यांपासून या रुग्णालयात प्रभारी अधिकाऱ्यांवर अधिकाऱ्यांची एवढ्या लवकर होत आहे की, रुग्ण आणि कर्मचारी दोघेही गोंधळात पडले आहेत. कोणी प्रभारी अधीक्षक येतो, आठ दिवस राहतो आणि लागलीच दीर्घ वैद्यकीय रजा टाकून निघून जातो, अशी स्थिती निर्माण झाली असून, या सततच्या बदल्यांमुळे रुग्णसेवा आणि प्रशासन यांचा कारभार डामडौल झाला आहे. . वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि इतर कर्मचारी यांनाही नेमक्या कुणाच्या आदेशाचे पालन करायचे हा प्रश्न पडला आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना, नवजात बालकांना आणि त्यांच्या नातेवाइकांना या गोंधळाचा अनपेक्षित फटका बसत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयूमधील निविदा प्रक्रियेत घोटाळाप्रकरणी रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी ए. एन. डांबरे, तर रुग्णालयातील भंगार विक्रीप्रकरणी भांडारपाल प्रमोद ढेंगे तीन महिन्यांपूर्वी निलंबित झाले. मात्र ही दोन्ही रुग्णालयाच्या आैषधी व इतर साहित्य खरेदी विक्रीशी व्यवहार करणारे अधिकारी असल्याने त्यांच्या जागी अजून कुणाची कायमस्वरुपी नियुक्ती झालेली नाही. प्रशासकीय अधिकारी पदाचा प्रभार डॉ.वाडेकर यांच्याकडेच दिला. वैद्यकीय अधीक्षक आणि प्रशासकीय अधिकारी दोन्हींचा पदभार त्यांना दिला. भांडारपालचा प्रभार एका कर्मचाऱ्याकडे तात्पुरता दिला. त्यामुळे एकूणच जिल्हा रुग्णालयात ‘प्रभारी राज’ सुरु असल्याने कोणताही ठोस िनर्णय घेण्यास किंवा महत्वाच्या फाईलवर सही करण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. पदे भरण्याासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला ^अकोला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय अधिकारी व भांडारपाल ही पदे कायमस्वरुपी भरण्याासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सध्या तिन्ही पदांवर प्रभारी अधिकारी आहेत. - डॉ. वाकचोरे, आरोग्य उपसंचालक, अकोला परिमंडळ. प्रशासकीय अधिकारी, भांडारपालही प्रभारी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज जिल्हा आरोग्य विभागाकडून या बदल्यांमागील कारणांबाबत कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सततच्या प्रभारी बदल्यांमुळे प्रशासनातील समन्वय कोलमडला असून, कर्मचारीवर्गामध्ये नाराजी पसरली आहे. आरोग्यसेवा ही सातत्याने आणि जबाबदारीने देणे अपेक्षित असते, पण अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात स्थैर्यच नसल्याने ‘प्रभारी' हा शब्दच कायमस्वरूपी ठरल्यासारखा वाटतो.
ओबीसी, सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत:मनपा निवडणूक; 17 नोव्हेंबरला सोडतीची प्रक्रिया
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी प्रमिलाताई ओक हॉल येथे आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. आरक्षण सोडतीचा निकाल निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. दरम्यान, आयोगाने ओबीसी महिला व सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश दिल्याने राजकीय समिकरणे पुन्हा बदलणार आहेत. येत्या १७ नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात ही सोडतीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने एससी, एसटी व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित केलेले आरक्षण यथास्थित ठेवले असले तरी नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्ग या दोन प्रवर्गांसाठीचे आरक्षण पुन्हा सोडतीद्वारे निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. शासनाच्या २० मे २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तरतुदीतील नियम ६(३) आणि ६(४) नुसार आरक्षणाची पुनर्नियुक्ती बंधनकारक असल्याने महापालिकेला नवी सोडत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण थेट सोडतीद्वारे निश्चित करण्यासाठी सोमवारी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेऊन अकोला महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आता पुढील निर्णय काय होणार याकडे लक्ष लागले आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, इतर मागास वर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते.
‘जिल्ह्यात नायब तहसीलदार यांच्या आदेशाने नोंदवण्यात आलेल्या ३,०४५ जन्म प्रमाणपत्रांचे आदेश रद्द करण्यात आले होते. रद्द झाल्यानंतर ही प्रमाणपत्रे परत मागवण्यात आली होती. यापैकी २,७४१ प्रमाणपत्रे नागरिकांनी जमा केली आहेत. मात्र उर्वरित ३०४ जणांनी नोटीस बजावूनही प्रमाणपत्रे परत केली नाहीत, अशा नागरिकांवर येत्या ४८ तासांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे दिली. शहरातील बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या शुक्रवारी अकोल्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा मीना, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन प्रकरणाचा त्यांनी आढावा घेतला. या प्रकरणात प्रशासनाने सोमय्या यांना महत्त्वाची माहिती दिली असून अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. ही प्रमाणपत्रे अतिरेकी वापरतात की बांग्लादेशी याचा शोध लावण्याचे काम सध्या पोलिस यंत्रणा करत आहे. संबंधित व्यक्ती, त्यांचे पत्ते किंवा त्यांच्याकडील नोंदी यांचा कसलाच ठावठिकाणा नसल्याने ही प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. प्रशासन या २०० प्रमाणपत्रांचा शोध घेण्यासाठी तपास पथक नेमणार असल्याचीही माहिती आहे.
मुलींनी शिक्षण घेत स्वतःच्या पायावर उभे रहावे:उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमात साधला संवाद
मलकापूर स्थित गायत्री बालिकाश्रम तसेच उत्कर्ष शिशुगृह येथे राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यांनी भेट दिली. मुलींची उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले. शालेय शिक्षणा सोबत राष्ट कार्यासाठी मुलींनी प्रचारीका म्हणून देशसेवा करावी. बालगृहातील मुली प्रचारीका निघाल्यास त्या उत्तम प्रकारे देश कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शांताक्का यांचे स्वागत गायत्री बालिकाश्रमाच्या अध्यक्षा मिरा जोशी तसेच उत्कर्ष शिशुगृहाचे कोषाध्यक्ष मंगेश दिक्षीत यांनी केले. त्यानंतर शांताक्का यांनी बालिकाश्रमाची पाहणी करुन बालिकांसोबत संवाद साधला. बालिकांसोबत चर्चा केल्यानंतर उत्कर्ष शिशुगृहातील नवजात शिशुंची भेट घेतली. त्या भावुक झाल्या गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृह दोन्ही संस्था करीत असलेले कार्य हे उल्लेखनीय आहे असे मत त्यांनी व्यक्त केले तसेच त्यांच्या सहसंयोगी यांना बालिकाश्रम येथे मुलींच्या आठवडयातुन एकदा शाखा घेण्यास सांगितले. संस्था भेटीच्या वेळी समितीच्या विदर्भ प्रमुख डॉ. राथा पुरी, जिल्हा कार्यवाहीका वैशाली देशपांडे, जिल्हा कार्यवाहिका वैशाली फडणीस, गायत्री बालकाश्रम संचालक गणेश काळकर, विजय कुमार जानी, सुधाकर गिते, सुनिल नंद, उत्कर्ष शिशुगृहाचे हेमंत चौधरी, रोहीत खोवाल. गायत्री बालिकाश्रम तसेच उत्कर्ष शिशुगृहाचे कर्मचारी तसेच बालगृहातील मुली उपस्थिती होत्या.
घरबसल्या रक्तदान सुविधा; व्हॅन द्वारी:डॉ. हेडगेवार रक्तकेंद्राचा उपक्रम, नाेंदणीची प्रक्रिया सुरू
सध्या रक्त केंद्रामध्ये रक्तपिशव्यांचा तुडवटा निर्माण आहे. मात्र थॅलेसिमीया, शरीरात रक्ताची कमतरता, प्रसुतीकरिता दाखल असलेल्या महिला, अपघात यासह विविध आजारांवर उपचारासाठी रक्त केंद्रात रक्त साठ्याची गरज असते. एकीकडे रक्त पिशव्यांची गरज तर दुसरीकडे रक्त पिशव्यांचा तुडवटा ही अडचण दूर व्हावी यासाठी शुक्रवारी १४ नोव्हेंबर ते शुक्रवारी २८ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. हेडगेवार रक्त केंद्राद्वारे ‘घरबसल्या रक्तदान’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नोंदणी करून सहभागी होण्याचे आवाहन रक्त केंद्राने केले आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सुट्ट्या, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या पृष्ठभूमीवर नियमित होणाऱ्या रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. त्यामुळे रक्त केंद्रात रक्तसाठा अत्यल्प आहे. तर दुसरीकडे थॅलेसिमीया, शरीरात रक्ताची कमतरता, प्रसुतीकरिता दाखल असलेल्या महिला, अपघात, कर्करोग व इतर आजारांत रक्त पिशवींची गरज असणारे रुग्ण रक्तासाठी रक्त केंद्रात संपर्क करतात. गरजू रुग्णांची अडचण होऊ नये, रक्त केंद्रातील रक्तसाठा रुग्णांना दिलासा मिळेल. सुसज्ज वाहन या उपक्रमात आपले घर, ऑफीस, कॉलनी, अपार्टमेंट आदी ठिकाणी रक्त केंद्राची रक्त संकलन करणारे सुसज्ज वाहन आपणापर्यंत येईल. यासाठी ९४२२८६२४८९, ९४२२८६२४९१ या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. हेडगेवार रक्त केंद्राद्वारे करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे तसेच वारंवार बदलले जाणारे वेळापत्रक, परीक्षेसह पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेवर लावला जात नाही, अशा अनेक उणिवांमुळे पाचही जिल्ह्यातील संतप्त १ हजारावर विद्यार्थ्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वातील मोर्चा शुक्रवारी दु. २.१५ वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठावर धडकला. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसंदर्भा त असलेल्या उदासीनतेसह एकूणच गलथान कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश दिसून आला. त्यांच्या हाती विविध मागण्यांचे फलक झळकत होते. त्याचवेळी विद्यापीठाविरोधात घोषणा दिल्या जात होत्या. गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिरापासून एबीव्हीपीच्या नेतृत्वातील मोर्चाला दु. १ वाजता सुरुवात झाली. विद्यापीठातील प्रवेश, निकाल, अभ्यासक्रम, पदभरती व छात्रसंघ निवडणुका यासारख्या विविध समस्या सोडवण्यासाठी एबीव्हीपीच्या विदर्भ प्रदेश मंत्री पायल किनाके यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. विविध मागण्यांचे निवेदन कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना सादर करण्यात आले. विद्यापीठाचे अकॅडमिक कॅलेंडर सर्व बाबींचा सारासार विचार करून तयार करावे, तसेच वर्षभर त्याचे तंतोतंत पालन केले जावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरेल, अशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवावी. प्रवेशासंदर्भात सर्व सूचना विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर देण्यात यावी. प्रवेश परीक्षा अधिक पारदर्शक व सहज व्हावी, यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर करावा. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या छात्रसंघ निवडणुका तातडीने घेण्यात याव्या, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता. यासोबतच प्रवेश प्रक्रियेत एजंट्स, ब्रोकर आणि तत्सम गैरप्रकारांविरोधात विद्यापीठ प्रशासनाद्वारे कोणतीही कारवाई केली जात नाही. मात्र, यापुढे प्रवेशादरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात ठोस कारवाई करण्यात यावी. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवताना निकषांमध्ये पारदर्शकता असावी. मिळालेली माहिती विद्यापीठाने संकेत स्थळावर उपलब्ध करून द्यावी, परीक्षांचे निकाल व पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर लागत नाही. पुनर्मूल्यांकन तसेच मूळ तपासणीच्या निकालात तफावत दिसून येते. यासंबंधी दोषींवर कठोर कारवाई करावी. निकाल परीक्षेपासून ४५ दिवसांच्या आत लावावे. प्राध्यापक दोन ते तीन महिने परीक्षेत गुंतलेले असतात. त्यामुळे ते शिकवण्यासाठी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांना परीक्षा केंद्रांवर केवळ १५ दिवसांकरिता नियुक्त करावे. दर १५ दिवसांनी ही जबाबदारी नव्या प्राध्यापकांकडे सोपवावी, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होतील, अशा एकूण ३४ मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मोर्चाचे सूत्रसंचालन अमरावती महानगर मंत्री रिद्देश देशमुख यांनी केले. या वेळी विभाग संयोजक ऋषभ गोहणे, महानगर सहमंत्री गौरी भारती, अचलपूर जिल्हा संयोजक ओम धोटे, अॅग्रीव्हिजन प्रांत संयोजक चंद्रकांत बोबडे, मलकापूर नगर मंत्री प्रगती वानखेडे, वाशीम नगर मंत्री ऋषिकेश मानवटकर, मोहदा नगर मंत्री अंशित वर्मा यांच्यासह विद्यापीठातील अमरावती शहर व ग्रामीण, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातून १ हजारावर विद्यार्थी सहभागी झाले होते. अ.भा. विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा विद्यापीठावर विद्यार्थ्यांचा मोर्चा धडकला. छायाचित्र : अक्षय नागापुरे पूरग्रस्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी तातडीने परत करावी महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात येणाऱ्या परीक्षांमुळे शैक्षणिक गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे सर्व परीक्षा विद्यापीठ स्तरावर घेण्यात याव्यात, परीक्षेचे प्रवेश पत्र वेळेवर किमान १० दिवस आधी उपलब्ध करून देण्यात यावे, पूरग्रस्त जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा शुल्क माफ केले आहे. ती रक्कम विद्यापीठाने तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्याची खातरजमा विद्यापीठाने करावी. त्याची माहिती संकेतस्थळावर प्रत्येक सत्राच्या शेवटी प्रसिद्ध करावी, मातृभाषेतील अभ्यासक्रम लवकर सुरू करावे, यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश होता. विविध समस्या दूर करण्यासाठी मोर्चा ^विद्यापीठ तसेच विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या दूर करण्याचा विद्यापीठ प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे. शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाला छात्र शक्तीची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. छात्र शक्ती एक झाली तर राष्ट्रशक्ती कशी बनवू शकते, हे सिद्ध करायचे आहे. त्यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला. -पायल किनाके, प्रदेश मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
संत गाडगे बाबांनी आयुष्यभर स्वच्छता, सेवा, दयाळूपणा आणि मानवतेचे मूल्य लोकांच्या मनात रुजवले. त्यांच्या याच सेवाभावी परंपरेचा वारसा जपत अमरावती विद्यापीठाने पुन्हा एकदा समाजहिताचा संदेश देणारा उपक्रम राबवला. वलगाव येथील संत गाडगे महाराज वृद्धाश्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या हस्ते वृद्ध महिला-पुरुषांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. गाडगे बाबांच्या दशसूत्री या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या या वस्त्रदानामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वृद्धाश्रमातील वातावरणात एक प्रकारची उत्सुकता जाणवत होती. अनेक वृद्धांना आपल्यासाठी काही विशेष घडणार आहे, अशी चाहूल लागली होती. कुलगुरू डॉ. बारहाते वृद्धांशी संवाद साधत प्रत्येकाची तब्येत, त्यांच्या गरजा आणि दैनंदिन जीवनाविषयी विचारपूस करत होते. त्यांच्या या स्नेहपूर्ण संवादामुळे वृद्धांच्या डोळ्यांत कौतुक आणि आत्मियतेची चमक दाटून येत होती. या प्रसंगी वृद्धाश्रमाचे संचालक कैलास बोरसे यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांची संख्या, सुविधा तसेच चालणाऱ्या विविध सेवाप्रकल्पांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अनेक संस्था वेळोवेळी मदत करतात. पण ज्या संतांच्या नावाने विद्यापीठ कार्यरत आहे, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यय देत कुलगुरूंनी प्रत्यक्ष वृद्धाश्रमात येऊन वस्त्रदान करणे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले. वृद्धांनीही ब्लँकेट मिळताच मनापासून आनंद व्यक्त केला आणि विद्यापीठाबद्दल कृतज्ञता दर्शवली. कार्यक्रमादरम्यान एका वृद्ध महिलेचे ब्लँकेट हातात घेताच डोळे पाणावले. गाडगे बाबा आम्हाला विसरत नाहीत, असे भावुक शब्द तिच्या तोंडून निघाले. एका वृद्ध पुरुषाने तर, तुम्ही आम्हाला कुटुंबासारखे वागवता, असे म्हणून कुलगुरूंचे आभार मानले. या उपक्रमाला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, प्रल्हाद खांडेकर, मीडिया सेलचे अनिकेत ठाकरे, राजू तायडे, अर्जून गुंजकर तसेच वृद्धाश्रमातील महिला-पुरुष कर्मचारी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत वस्त्रदान सोहळा भावनिक वातावरणात पार पडला. गाडगे बाबांच्या तत्त्वज्ञानातील ‘सेवा हीच पूजा’ हा संदेश या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला. वृद्धांना दिलेले प्रेम, आत्मियता आणि ऊब हेच खरे तर गाडगे बाबांच्या सेवाभावाला योग्य अभिवादन ठरले. वस्त्रदान सोहळ्यात बोलताना कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले, संत गाडगे बाबा हे केवळ एक समाजसुधारक नव्हते तर ते मानवतेच्या शिकवणीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. त्यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेचा प्रमुख म्हणून समाजाप्रती जबाबदारी अधिक आहे. आज येथे येऊन गाडगे बाबांच्या दशसूत्रीची आठवण करून देत वृद्धांना वस्त्रदान करणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आयुष्याच्या संध्याकाळी माणसाला सर्वाधिक गरज असते ती मायेच्या स्पर्शाची. वस्त्रदान ही फक्त एक कृती आहे, पण त्यातून व्यक्त होणारी ओल आणि आपुलकी हीच खरी सेवा आहे. अमरावती विद्यापीठ पुढेही समाजधर्म पाळत अशा उपक्रमांत सहभागी राहील. गाडगेबाबा मानवतेच्या शिकवणीचे चालते-बोलते विद्यापीठ
महापालिकेतर्फे २ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धा २०२५ चा निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवार, १४ नोव्हेंबरला महापालिका कॉन्फरन्स हॉल येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी भूषवले. स्पर्धेतील छायाचित्रांचे परीक्षण सुप्रसिद्ध परीक्षक मंडळी उदय खोत (बीएफए), विकास केमदेव (एमए) आणि अद्वेत केवले (बीएससी एन्व्हायरमेंट सायन्स) यांनी संयुक्तपणे केले. त्यांच्या परीक्षणानंतर स्पर्धेचा अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात आयुक्त सौम्या शर्मा यांच्या हस्ते खालील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रथम क्रमांक शंतनू पाटील प्रमाणपत्र व रु. ११ हजार, द्वितीय क्रमांक भूषण अळसपुरे प्रमाणपत्र व रु. ७ हजार रोख, तृतीय क्रमांक संदीप चौधरी प्रमाणपत्र व रु. ५ हजार, प्रोत्साहन पुरस्कार सुशांत पांडे प्रमाणपत्र व रु. ३ हजार, मनीष मुऱ्हेकर प्रमाणपत्र व रु. २ हजार यांना प्रदान करण्यात आले. या स्पर्धेला शहरातील छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, प्रतिभावंत छायाचित्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेचा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमास मनपाचे अधिकारी, स्पर्धक तसेच नागरिक उपस्थित होते. या समारंभात अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ:300 खेळाडू सहभागी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित १४ वर्षे वयोगटातील मुले व मुलींची राज्यस्तरीय शालेय फुटबॉल क्रीडा स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. ही स्पर्धा १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठही विभागातील १६ मुले व मुलीचे संघ असे एकूण ३०० मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेतील मुलांचे सर्व सामने सायन्सकोर मैदान अमरावती व मुलींचे सर्व सामने पोलिस फुटबॉल क्रीडांगण येथे सकाळ व दुपारच्या सत्रात घेण्यात आले. राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन सायन्सकोर क्रीडांगण येथे करण्यात आले. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी नितीन चव्हाळ, जिल्हा फुटबॉल संघटना अध्यक्ष अरुण जयस्वाल, उपाध्यक्ष रवी कर्वे, फुटबॉल संघटनेचे सचिव सुशील सुर्वे, हरिहर मिश्रा उपस्थित होते. या वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू दीपाली आरोळे यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. जोएल बांगर या राष्ट्रीय खेळाडूने आणलेल्या क्रीडा ज्योतीने मशालचे प्रज्वलन करण्यात आले. जिल्हा नियोजन अधिकारी भाकरे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप इंगोले यांनी केले, तर आभार सेवानिवृत्त तालुका क्रीडा अधिकारी संजय कथळकर यांनी मानले.
महावितरणच्या चार दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये अत्यंत चुरशींच्या लढतींमुळे शुक्रवारी (दि. १४) सायंकाळपर्यंत आठ पैकी तब्बल पाच संघांनी विजेतेपदासाठी दावेदारी कायम ठेवली आहे. शनिवारी (दि. १५) या स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी क्रिकेट, व्हॉलिबॉल तसेच महिला व पुरुष गटातील कबड्डी व खो-खो, अॅथेलॅटिक्स खेळांचे अंतिम सामने होत आहेत. या लढतीनंतरच अजिंक्यपदाचा विजेता निश्चित होणार आहे. यासह कुस्तींच्या लढती देखील अजिंक्यपदाच्या दावेदारीसाठी निर्णायक ठरणार आहेत. महावितरण अंतर्गत १६ परिमंडलांच्या संयुक्त आठ संघांनी राज्यस्तरीय स्पर्धेत अत्यंत चुरस निर्माण केली आहे. यात प्रामुख्याने स्पर्धेचे अजिंक्यपदासाठी पुणे-बारामती, कोल्हापूर, नागपूर-चंद्रपूर- गोदिया, कल्याण-रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर-लातूर- नांदेड तसेच अमरावती-अकोला या संघांनी आगेकूच केली आहे. क्रिकेटच्या अंतिम सामना नागपूर-चंद्रपूर-गोंद िया विरुद्ध कोल्हापूर असा होणार आहे. यातील विजेतेपद देखील अजिंक्यपदासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात नागपूर-चंद्रपूर-गोंद िया संघाने पुणे-बारामती संघाचा सहा धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. नागपूरच्या १४६ धावांचे लक्ष्य गाठताना पुणे-बारामती संघ १५ षटकांमध्ये १३९ धावांपर्यंत मजल मारू शकला. तर कोल्हापूर संघाने नाशिक-जळगाव संघाचे १०८ धावांचे लक्ष्य १४.३ षटकांमध्ये गाठत अंतिम फेरी प्रवेश केला. कबड्डीच्या अंतिम सामन्यात महिला गटात मुख्यालय-भांडूप विरुद्ध पुणे-बारामती संघात लढत होणार आहे. तर पुरूष गटात खो-खोमध्ये पुणे-बारामती विरुद्ध कोल्हापूर संघात अंतिम लढत होईल. सांघिक खेळांमध्ये बॅडमिंटनमध्ये महिला व पुरूष गटामध्ये पुणे-बारामती संघाने, ब्रिजमध्ये अमरावती-अकोला संघाने, टेनिक्वाईटमध्ये नागपूर-चंद्रपूर-गोंद िया संघाने याचवेळी कॅरम खेळात पुरुष गटामध्ये छत्रपती संभाजीनगर - लातूर - नांदेड तर महिला गटात मुख्यालय-भांडूप संघाने विजेतेपद पटकावले. टेबल टेनिसमध्ये महिला गटात अमरावती-अकोला संघाने विजेतेपद पटकावले आहे . स्पर्धा सुरू असून लवकरच विजेत्या संघाचे बलाबल दिसून येईल.
नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारांचा तसेच सूचक आणि अनुमोदकांकडे कोणताही कर थकीत नसावा, ही अट असल्यामुळे नगर पंचायत कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच इच्छुकांनी स्वतःकडील कर थकबाकी फेडण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मागील तीन ते चार वर्षांची थकबाकीदेखील भरली असल्याने यंदा नगर पंचायतच्या महसूल वसुलीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. उमेदवारी प्रक्रियेत राजकीय पक्षाकडून नामांकन देताना एक सूचक लागतो, तर अपक्ष उमेदवारांना पाच सूचक आवश्यक असतात. निवडणूक नियमांनुसार हे सर्व सूचक व अनुमोदक थकबाकीदार नसावेत. यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्या सूचकांच्या आणि अनुमोदकांच्या थकबाकीची रक्कम स्वतः भरल्याचे दिसून येते. त्यामुळे उमेदवारांकडून सध्या थकबाकी भरण्याची मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे. महसूल वसुली वाढल्याने कामाचा ताण वाढू नये, म्हणून संबंधित नगर पंचायतीने कर भरण्याकरिता विशेष व्यवस्था केली आहे. कर भरण्यासाठी स्वतंत्र काउंटर, वाढीव वेळ आणि ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उमेदवार व नागरिक यांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्याअगोदर कर निरंक असणे आवश्यक असल्याने नगर पंचायत कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिक आणि उमेदवारांकडून कर भरण्याची लगबग सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या या प्रक्रियेमुळे न. पं.च्या महसुलात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
चळवळीतून वंचितने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवलेत- सुजात आंबेडकर
आरक्षणाचा विषय असो की अन्याय, वंचितने नेहमीच यशस्वी आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. समाजातील सर्वच घटकांच्या पाठीशी सतत उभे राहत वंचितने समस्या मार्गी लागल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत सक्षम उमेदवार उभे करत या चळवळीला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दर्यापुरात सांगितले. वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन युवा आघाडी, दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विजय संकल्प महासभा’ गुरुवारी दर्यापुरात झाली. या सभेला सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी वंचित आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर, नीलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातडे, विजय चोरपगार, साहेबराव वाकपांजर, संजय चोरपगार, अंकुश वाकपांजर, माधुरी चोरपगार, आम्रपाली आठवले, भीमराव कुऱ्हाडे, शीतल चोरपगार, अशोक दुधांडे, सदानंद नागे, अशोक नवलकर, राहुल मेश्राम उपस्थित होते. या सभेला उपस्थित परिसरातील नागरिकांच्या घोषणांनी मैदान दुमदुमून गेले. सुजात आंबेडकर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून युवकांना ‘परिवर्तनाचा ध्यास घेऊन नव्या भारताच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारा’ असे आवाहन केले. वंचित समाजातील तरुणांनी संघटित होऊन सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढा देणे हीच खरी देशसेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.
बाल गुन्हेगारीचे अनेक दुष्परिणाम असून बालकांच्या आयुष्यात शिक्षण नसल्याने खूप मोठी हानी होते. परिणामी भारताची अधोगती होण्यास सुरुवात होते. शिक्षणामुळेच माणसाची प्रगती होऊ शकते. विज्ञानाने सिद्ध केले आहे. बालविवाहनंतर नवविवाहित मुलीस मानसिक, शारीरिक वाढ न झाल्यामुळे स्वतःसह पोटामधील अर्भकाला शोषणासह इतर आजार होऊन धोका बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे बालविवाह करू नये, या करता मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन निर्भया पथकाचे पोलिस अंमलदार विशाल सावंत यांनी व्यक्त केले. बालविवाह, बाल गुन्हेगारी, मोटारवाहन कायदा, सायबर गुन्हे, पोक्सो कायदा, डायल ११२ सह शिक्षणाचे महत्त्व इत्यादी सर्व विषयावर निर्भया पथक सोलापूर उपविभाग सोलापूर यांच्या वतीने दि. ११ रोजी लोकनेते बाबुराव पाटील विद्यालय, गोटेवाडी येथे घेण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन निर्भया पथकाचे पोलिस अंमलदार विशाल सावंत यांनी केले. हा उपक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या अधिपत्याखाली, तर महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक अंजना फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले आहे. मार्गदर्शनपर भाषणात पुढे बोलताना सावंत म्हणाले की, मोटार वाहन कायद्याचे विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर रितसर परवाना काढल्यानंतरच वाहन चालवावे. मोटार वाहन चालवत असताना आवश्यक कायदेशीर बाबीच्या अनुषंगाने कागदपत्र जवळ बाळगावीत. परवाना जवळ बाळगावे. वाहतुकीचे दिशादर्शक फलकांवर दर्शविल्याप्रमाणे वाहन हकावे. मोटरसायकल चालवीत असताना हेल्मेट असणं गरजेचं आहे. तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांकडे वाहन देण्याअगोदर त्याच्याकडे परवाना आहे, याची शहानिशा करून द्यावे. या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून जर वाहन पाल्याने आपल्या मर्जीने चालवल्यास त्यांच्या पालकास त्या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे यावेळी सांगितली. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आताच्या काळात खूप वाढले आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसह पालकांना या गोष्टीची जाणीव करून देण्याकरिता, मोबाइलवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, गोपनीय पासवर्ड अथवा इतर कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तीस फोनद्वारे देऊ नये. बँकेची प्रत्येक व्यवहार हे स्वतः बँकेत जाऊन शहानिशा करूनच करावे.
करकंब जिल्हा परिषद सोलापूर विद्यार्थी गुणवत्ता चाचणी शोध लोककला नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात पटवर्धन कुरोली केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते यांनी प्रथम तर बाभुळगाव केंद्रातील रोपळे येथील जिल्हा परिषद शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. या तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवार (दि. ११) चळे (ता. पंढरपूर) येथे पार पडल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ खरे यांच्या पत्नी तृप्तीताई खरे, माजी उपसरपंच भास्कराव मोरे, सरपंच ज्ञानेश्वर शिखरे, उपसरपंच दीपक मोरे, आप्पासाहेब कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख प्रभाकर घाडगे, आरपीआयचे अध्यक्ष विजय वाघमारे, माजी मुख्याध्यापिका कल्पना भुसे, बाबासाहेब दराडे, सज्जन मोरे, नेताजी गायकवाड, चांदणी, पंडीत इत्यादीसह इतर मान्यवर उपस्थित होते. मोठ्या गटात ८ संघांनी तर लहान गटात १८ संघांनी सहभाग घेतला होता. मोठ्या गटात उंबरे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोली यांनी द्वितीय तर तपकिरी शेटफळ शाळेतील विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला. लहान गटात गुरसाळे केंद्रातील अजोती येथील शाळेने द्वितीय तर भंडीगाव प्राथमिक शाळेने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धांमध्ये कोळी गीते, देवीचा जागर, शेतकरी गीत, आदिवासी गीत, जागरण गोंधळ इत्यादी प्रकारची गीते सादर करण्यात आली. या स्पर्धेत दोन्ही गटात प्रथम क्रमांक चांगले विद्यार्थी घडवावेत ^शैक्षणिक क्षेत्रात ज्या गोष्टींची गरज व अत्यावक्षकता आहे. त्याची पूर्तता केली जाईल. शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून चांगले विद्यार्थी घडवावेत. या स्पर्धेत सहभागी सर्वांना शुभेच्छा. तृप्तीताई खरे, आमदार प्रतिनिधी क्रमांक आलेल्या संघांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. परीक्षक म्हणून गोरी अंमळनेरकर, अनिता शिंदे, एल. एम. जाधव, सोमनाथ फडतरे, वनिता बंगाळे, स्वानंदी काणे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संभाजी माने, आप्पासाहेब रायजादे यांनी केले.
येथील नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे. ग्रामपंचायतीनंतर २०२१ मध्ये नगरपरिषद घोषित झाली होती. तेव्हापासून निवडणुका झाल्या नाहीत. शहरात मुलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागण्याची मागणी होत असून हा प्रश्न निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. येथील नगरपरिषद २०२१ मध्ये स्थापन झाली असून त्या अगोदर असणाऱ्या ग्रामपंचायतीत १९४० सालापासून मोहिते पाटील घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. ही ग्रामपंचायत ब्रिटिश कालखंडात १९२२ मध्ये स्थापन झालेली असून रामचंद्र व्होरा या ग्रामपंचायतीचे सरपंच होते. सन १९४० ते ४५ दरम्यान सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील तर १९६९ ते ७२ दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला. शेवटचे सरपंच हे शिवतेजसिंह मोहिते पाटील होते. २०१० चा अपवाद वगळता या ग्रामपंचायतीत अटीतटीची निवडणूक झाली नाही. त्या काळात मोहिते पाटील यांचे स्थानिक राजकीय विरोधक तितकेसे सक्षम नव्हते. तसेच तालुका पातळीवरील विरोधक या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हते. मात्र २०१० च्या ग्रामपंचायत निवडणुकीत तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख स्व. दत्ता वाघमारे यांनी या निवडणुकीत गत विधानसभा निवडणुकीतही राजकीय विरोधक माजी आमदार राम सातपुते, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, फत्तेसिंह माने पाटील व कुटुंबीय एकत्र असताना शहरातील ४५ टक्के मतदान मोहिते पाटील यांच्या विरोधात गेले होते. या पार्श्वभूमीवर या नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांचे विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. शहरातील व्यापारी असो की कामगारांचे मोहिते पाटील यांच्याशी एक नाते जुळलेले आत्तापर्यंत दिसत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत फार मोठ्या प्रमाणात विरोधात मतदान गेल्याने विरोधकांचा आत्मविश्वास वाढलेला दिसत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात निवासी प्लॉटिंग वाढले आहे. मात्र ते नग परिषदेने ताब्यात घेतले नसल्याने या नवीन भागातील जनतेला मूलभूत सुविधा मिळणे अडचणीचे ठरत आहे. शिवाय या नवीन वसाहतीतील रस्ते ही अद्याप कच्चे असल्याने या लोकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरात दोन दिवसांआड एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्या लगतच्या उपनगरात जात नसल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कचरा अकलाई मंदिर परिसरात डेपो केला आहे. त्याची वेळेत विल्हेवाट लावली जात नाही. नवीन घरपट्टी वाढीचाही प्रश्न आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे खोदले असून, सिग्नल व्यवस्था गेली कित्येक वर्षे बंद आहे. विरोधी पॅनल उभे केल्याने ती एकमेव निवडणूक गाजली होती. सन २०२१ मध्ये अकलूज ग्रामस्थांनी ४३ दिवसांचे साखळी उपोषण करत येथे नगरपरिषदेची मागणी लावून धरली होती. अखेर ३ ऑगस्ट २०२१ रोजी ही नगरपरिषद घोषित करण्यात आली. मात्र, तेव्हापासून नगरपरिषदांच्या निवडणुका न झाल्याने प्रशासकीय कारभार होता. आता या नूतन नगरपरिषदेची पहिली निवडणूक लागली आहे. आत्तापर्यंत ग्रामपंचायतीचा ताबा मोहिते पाटील यांच्याकडेच राहिला असला तरी या निवडणुकीत मात्र मोहिते पाटील यांच्या राजकीय विरोधकांनी लक्ष घातले आहे. या पूर्वीच्या दोन निवडणुकीत डॉ. धवलसिंह मोहिते पाटील व फत्तेसिंह माने पाटील यांनी संयुक्तिक पॅनल उभारून निवडणूक लावली होती. त्यात त्यांना एक वेळ दोन तर एक वेळ तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्यामुळे शहरातील मोहिते पाटील यांच्या विरोधकात वाढ झाली. मोहिते पाटील व भाजपचे माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यात आता जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही आता अकलूज नगरपरिषदेत चांगलेच लक्ष घातले आहे. शिवाय नुकतेच पोलिस प्रशासनाने १० जणांना हद्दपार केले.
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी निरोप
अक्कलकोटचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांना शुक्रवारी (दि.१४) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुमठे या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी १० वाजेपासून तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी (दि.१३) सायंकाळी अल्पशा आजाराने सोलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले होते. महाराष्ट्रासह कर्नाटकातून हजारो कार्यकर्ते अंत्यविधीला आले होते ते तडफदार नेता, शेतकरी व जनसामान्यांचे आधारवड, अशी भावना व्यक्त करत होते. कुमठे गावाला लोकांचा वेढा पडला होता. सर्वसामान्यांचा कैवारी, शेतकऱ्यांचा आवाज हरपल्याची हळहळ व्यक्त होत होती. यावेळी जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, शिवानंद शिवाचार्य मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य करजगीचे, शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह कर्नाटकचे कृषी व पणनमंत्री शिवानंद पाटील, इंडीचे आमदार यशवंतराव गौडा पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, धर्मराज काडादी, स्वामी समर्थ सूतमिलचे चेअरमन राजशेखर शिवदारे, माजी आमदार शिवशरण पाटील, विश्वनाथ चाकोते, सुरेश हसापुरे, काडादी महादेव, बहिरगोड रामचंद्र, एम. के. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, कुमार करजगी, बाबुराव पाटील, हनुमंत कुलकर्णी, मल्लिकार्जुन काटगावे, डॉ. अशोक हिप्परगी, प्रकाश हिप्परगी, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील विवेकानंद उंबरजे दयानंद उंबरजे माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ कोडते, जिल्हा परिषद माजी सदस्य अण्णाराव बाराचारे आनंद तानवडे नवी मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, कर्नाटकचे पंचपा कलबुर्गी, माजी सभापती चनगोंडा हवीनाळे, मेहबूब मुल्ला अमर पाटील, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पू परमशेट्टी, अतुल मेळकुंदे, शंकर मेत्रे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड, सिद्धेश्वर कल्याण शेट्टी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंदोळे, माजी सभापती आप्पाराव कोरे परमानंद आलगोंडा, माजी नगराध्यक्ष बसलीगप्पा खेडगी अशोक देवकते, वकील बागवान रमेश बाके माजी सभापती केदार उंबरजे कुंभारी चे शिरीष पाटील उदय शंकर पाटील अमर पाटील शंकर म्हेत्रे सिद्धेश्वर कल्याण शेट्टी, यांच्यासह विविध गावचे सरपंच, अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.
प्रथम सूर्योदय ते सूर्यास्त भरतनाट्यम, ६६ तास भरतनाट्यम, गिनीज बुकमध्ये नोंद झालेला नृत्य संस्कार, २१०० कलाकार सहभागी, ५७४ नृत्यांगना घेऊन लावणीचा विक्रम, गतवर्षी अन्नपूर्णा बेस कॅम्प येथे भरतनाट्यम करून इंडिया आणि एशिया बुकमध्ये विक्रम करत भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्य प्रकारात नवनवीन विक्रम प्रस्थापित केलेल्या तपस्यासिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या नृत्यांगनांनी थेट एव्हरेस्ट बेस कॅम्पवरही कला सादर केली. कोल्हापूरची नृत्य चंद्रिका संयोगिता पाटील, शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजल दळवी या चौघींनी थेंगबोचे मॉनेस्ट्री (१३,००० फूट), एव्हरेस्ट बेस कॅम्प (१७,६५० फूट) आणि काला पत्थर (१८,२०० फूट) या ठिकाणी भरतनाट्यम या नृत्यकलेतून सादर करून एव्हरेस्टला मानवंदना दिल्याचे नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील हिने सांगितले. भज गोविंदम कृष्ण वंदना व मंगलम सादर थेंगबोचे येथे गणपती स्तुती, काला पठार येथे शिव श्लोक, एव्हरेस्ट बेस कॅम्प येथे संयोगिता पाटील यांनी ६ मिनिटांचा श्रीराम स्तुती श्लोक सादर केला. नंतर चौघींनी भज गोविंदम ही कृष्ण वंदना व मंगलम् सादर केले. एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प सर करताना वाटेत तापमानामध्ये चढ-उतार आणि गोठवणारी थंडी होती. सलग पाच दिवस बर्फवृष्टी होत होती. अशा वातावरणात त्यांनी नृत्य सादर केले. पहिले सादरीकरण हे १२ हजार ६८७ फुटांवर दुसरे सादरीकरण १७ हजार ६५० फूट उंचीवरती झाले. यानंतरचा प्रवास अजूनच अवघड व शर्थीचा झाला. उणे ८ अंश तापमानामध्ये सर्व मनोबल एकवटून त्यांनी १८ हजार २०० फूट उंचीवर नृत्य सादरीकरण केले. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर नृत्य करण्यामागचा आमचा उद्देश शास्त्रीय नृत्याचे जतन व जगामध्ये सुरू असलेल्या सर्व गोष्टींमध्ये शांतता निर्माण होऊन सर्वांचे मंगल व्हावे कल्याण व्हावे असा होता. हा अनुभव आमच्या सर्वांसाठीच अविस्मरणीय होता असे तपस्यसिद्धीच्या नृत्यांगनांनी सांगितले. यांनी केली माेहीम यशस्वी गिर्यारोहिका खुशी कांबोज, विनोद कांबोज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम तसेच डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. प्रदीप पाटील, सई पाटील, डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. अनिता कदम, न्यायाधीश (निवृत्त) वंदना तेंडुलकर, अश्वता विधाते आणि उद्योगपती अभय देशपांडे, संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील यांनी मोहीम यशस्वी केली. त्यांच्या या मोहिमेचे कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.
बिबट्याची दहशत वाढली:आठवडाभरात तिसरा हल्ला, इसळक शिवारातमुलगा जखमी
अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. कोपरगावसह अहिल्यानगर तालुक्यात आठवडाभरात बिबट्याने हल्ला केल्याची तिसरी घटना समोर आली. इसळक शिवारात राजवीर कोतकर या आठ वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घातली, ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेत राजवीर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर शहरात खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बिबट हल्ल्याच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तिव्र संताप असून, बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील बिबट्यांकडून मानवी वस्तीत हल्ले वाढले आहेत. आठवडाभरापूर्वी कोपरगाव तालुक्यातील टाकळी फाटा शिवारात ऊसतोड मजुराच्या मुलीवर हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर सोमवारी (१० नोव्हेंबर) याच तालुक्यात येसगाव येथे घास कापणाऱ्या शांताबाई निकोले या ६० वर्षीय महिलेवर झडप घातली होती, त्यात या वृद्धेचा मृत्यू झाला. अहिल्यानगरमध्ये खारे कर्जुने शिवारात बुधवारी (१२ नोव्हेंबरला) एका चिमुरडीला ओढून नेत ठार केले. एकापाठोपाठ एक घटना घडत असल्याने वनविभागाचे पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे. परंतू, बिबट्या जेरबंद करण्यात अद्याप यश आले नाही. शुक्रवारी (१४ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इसळक येथे आठवर्षीय राजवीरवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात राजवीर गंभीर जखमी झाला. बिबटे तुम्ही मारा, नाहीतर आम्ही मारू ^ राजवीर रामकिसन कोतकर हा मुलगा लघुशंकेसाठी गेला असताना त्याच्यावर अचानक हल्ला केला. सरकारने या बिबट्यांना मारावे, किंवा आम्हाला मारण्याचे अधिकार द्यावेत. अन्यथा आम्ही धरून, सर्व वरिष्ठ अधिकारी अन् मंत्र्यांच्या बंगल्यात नेऊन सोडू. घरापुढे येऊन बिबट्या हल्ला करतो. कैलास लांडे, ग्रामस्थ.
बालपण हे जीवनातील सोनेरी क्षण असतात. जीवनात मागे पाहताना बालपण आठवते. मात्र सध्या बालपणातच विवाह होत असल्याने त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागत आहे. बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी १३२७ गावांच्या ग्रामसभेत या विषयावर जागृती करण्यात आली. तसेच बाल अत्याचार मुक्त जिल्हा होण्यासाठी प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे. बालकांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलांसह पालकांमध्ये जागृती आवश्यक आहे. मुलांना स्वसंरक्षणाचे धडे दिल्यास ते आपले संरक्षण अधिक चांगल्या पध्दतीने करु शकतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले. स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, मराठी पत्रकार परिषद, जिल्हा परिषद जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्त लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी लहान मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बाल अत्याचार मुक्त अभियानाला सुरुवात प्रारंभ करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा महिला बालविकास अधिकारी संजय कदम, पोलिस उपाधीक्षक दिलीप टिपरसे, भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी प्रशांत गायकवाड, नागोरी मुस्लिम मिसगर जमात स्टचे अध्यक्ष रेहान काझी, उडान प्रकल्पाच्या मानद सचिव ॲड. बागेश्री जरंडीकर, स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख, चाइल्ड लाइनचे महेश सूर्यवंशी, डॉ. अंशु मुळे व एम्स इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात हनीफ शेख म्हणाले, बालकांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी व बालकांच्या हक्कांची जपणूक करण्याचे कार्य उडान प्रकल्प करीत आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रियंका आठरे यांनी विश्वास संपादन केलेले जवळच्या व्यक्तींनी बालकांवर अत्याचार केल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. यासाठी मुलांना चांगला व वाईट स्पर्श याची माहिती देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन रुपेश पासपुल यांनी, तर आभार ॲड. बागेश्री जरंडीकर यांनी मानले. आकाशात फुगे सोडून बालदिन साजरा करण्यात आला. देश की ताकत हम सब बच्चे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. परिसरात तिरंगे ध्वज, रांगोळी व फुग्यांची सजावट करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय...., देश की ताकत हम सब बच्चे..., जोडो जोडो भारत जोडो... च्या घोषणा देत पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे व पांढरे कबुतरे सोडण्यात आली. तर जिल्हा बाल अत्याचार मुक्त करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.
नवीन पिढीला गणिताकडे आकर्षित करणे आवश्यक- प्रा. सुधीर घोरपडे
भारतीयांमध्ये गणिताचे जीन्स आहेत, परंतु आज पदवी स्तरावर गणित विषय घेणाऱ्यांची संख्या घटत आहे. तरुण पिढीला गणिताकडे आकर्षित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदा अत्यावश्यक आहेत, असे मत आयआयटी मुंबईचे प्रा. सुधीर घोरपडे यांनी व्यक्त केले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गणितीय विश्लेषण व अनुप्रयोग परिषद उत्साहात पार पडली. ही परिषद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व ज्येष्ठ गणितज्ञ प्रा. सर्जेराव निमसे यांच्या ७५व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. घोरपडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी ॲड. विश्वास आठरे होते. देश-विदेशातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रा. घोरपडे यांनी प्रा. निमसे यांचे शिक्षणक्षेत्रातील योगदान आणि गणितावरील तळमळ अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात ॲड. आठरे पाटील यांनी गणिताच्या प्रात्यक्षिकतेवर भर देत नवनवीन संशोधन कल्पनांना प्रोत्साहन देण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली. परिषदेच्या आयोजनाची भूमिका प्रा. एस. बी. गायकवाड व प्रा. एम. एम. शिकारे यांनी स्पष्ट केली. याप्रसंगी सहभागींच्या संशोधन सारांश पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन दीपाली जगदाळे व आफिया खान यांनी, तर आभार डॉ. एल. के. गीते यांनी केले.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक- विखे
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहील, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. कोल्हार येथील बसस्थानका समोरील पटांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन व कोनशील अनावरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी खर्डे हे होते. यावेळी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे, प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, ज्येष्ठ नेते पांडुरंग खर्डे, अशोक असावा, ॲड. उदय खर्डे, प्रवरा कारखान्याचे चेअरमन सोपानराव शिरसाट, उद्योजक नितीन कुंकूलोळ, श्रीकांत खर्डे,गोरख खर्डे आदी उपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून कोल्हारकरांची छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा, अशी मागणी होती ती आज पूर्णत्वास जाताना मला देखील तुमच्या आनंदात सामील होता आले. केवळ पुतळा उभारून उपयोग नाही, छत्रपतींनी केलेल्या कार्याची ऊर्जा तरुणांना मिळावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हे महायुतीचे सरकार कटिबद्ध राहील. प्रवरा बँकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे यांनी विखे यांच्या पाठीशी ॲड. सुरेंद्र खर्डें सह सर्व कार्यकर्त्यांनी उभे राहावे. ॲड सुरेंद्र खर्डे म्हणाले, आम्ही चांगल्या कामाला सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू. कोल्हार येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे.
डोंगरगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण शाळा परिसर रंगीत फुग्यांनी सजवण्यात आला होता. आकर्षक फलक लेखन, स्वच्छता आणि सुंदर व्यवस्थेमुळे शाळेचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. बालदिनानिमित्त मुलांनी सादर केलेल्या निवेदनांमधून देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा, त्यांची राष्ट्राला दिलेली महत्त्वाची शिकवण आणि सामाजिक बांधिलकी यांचे सुंदर दर्शन झाले. उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर चेडे यांनी बालदिनाचे महत्त्व, पंडित नेहरूंचे बालप्रेम आणि त्यांच्या विचारांचा भावार्थ मांडत कार्यक्रमाला सुरुवात करून दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध ऐतिहासिक व समाजसेवी व्यक्तिमत्त्वांच्या वेशभूषाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंडित जवाहरलाल नेहरू झालेला अथर्व चांदणे, सरदार वल्लभभाई पटेल झालेला संग्राम चांदणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर झालेला समर्थ कदम, नेताजी सुभाषचंद्र बोस झालेला चैतन्य चांदणे, पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झालेली अनुष्का हिलगुडे, सावित्रीबाई फुले झालेली रुचिता कदम, पंतप्रधान नरेंद्र मोदी झालेला सम्राट चांदणे तसेच ट्रॅफिक सिग्नल झालेला समर्थ चांदणे यांनी या राष्ट्रीय नेत्यांच्या हुबेहूब वेशभूषा करून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या मनोगत सत्रात अनेक विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कार्याची माहिती सोप्या व प्रभावी शब्दांत सादर केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारताची प्रगती, आधुनिक भारताची उभारणी आणि बालकांप्रती असलेले प्रेम याबद्दल मुलांनी आत्मियतेने भाष्य केले. या प्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत बालदिनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत शिक्षणासोबतच संस्कार, स्वच्छता, शिस्त आणि राष्ट्रभावनेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमानंतर शाळेत विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली होती. यावेळी मनोरंजक खेळांच्या स्पर्धांतही मुलांनी उत्साहाने भाग घेतला. संगीत खुर्ची, फुगा फुगवणे, धावण्याच्या स्पर्धा अशा खेळांनी बालदिनाचा कार्यक्रम अधिक रंगतदार बनवला.
शिर्डी औद्योगिकी करणाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. कौशल्य प्रशिक्षणाची मोठी संधी निर्माण करण्यात येत आहे. टाटा उद्योग समुहाच्या सहकार्याने महिला बचत गटांनाही स्वंय रोजगाराचे मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याची ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. जळगाव येथे सुमारे १ कोटी १३ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभांरभ तसेच रोकडोबा महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन मंत्री विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मंत्री विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करती आहे. आर्थिकदृष्ट्या देशाची वाटचाल पाहाता येणारे सर्व उद्योग आणि यातून निर्माण होणारे रोजगार मोठ्य संधी निर्माण करुन देणाऱ्या आहेत. विकास प्रक्रियेचा निर्णय करताना केंद्र आणि राज्य सरकारने महिलांना अधिक प्राधान्य दिले असून, ड्रोणदिदी निर्माण करण्यात प्रोत्साहन दिले आहे. कृषि क्षेत्रामध्ये सर्वाधिक वापर ड्रोण तंत्रज्ञानाचा केला जात असून, या माध्यमातून बचत गटांना रोजगार निर्मितीमध्ये मोठा फायदा होत आहे. आपल्या तालुक्यातील महिला बचत गटांच्या चळवळीचे काम प्रभावीपणे सुरु असून, या महिलांना अधिक पाठबळ दिल्यास बचत गटांच्या माध्यमातून चांगल्या पध्दतीचे उद्योग तयार होवू शकतात. यासाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. विरोधकांनी यासाठी आटापिटा केला. आता आरोग्य सुविधांच्या बाबतीत सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम राज्य सरकारने केले असून, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत २४०० आजारांचा समावेश करुन, ५ लाख रुपयांचे सुरक्षा कवच या योजनेतून देवू केले असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. बंद पडलेली सर्व कामे आम्हीच सुरू करणार जलसंपदा विभागाच्या माध्यमातून गोदावरी कालव्यांची कामे सुरुच आहेत, मात्र ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्याभागात चाऱ्यांची कामे पूर्ण करुन, पाण्याची वहन क्षमता अधिक चांगल्या पध्दतीने करण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी बंद पडलेला गणेश कारखाना सहकारी तत्त्वानेच चालवून तो शेतकऱ्यांच्या मालकीचा कसा राहील यासाठी यशस्वी प्रयत्न केला. बंद पडलेले निळवंडे कालव्यांचे काम पुर्णत्वास नेवून जिरायती भागाला पाणी आणून दाखवले. त्यामुळे बंद पडलेली सर्व कामे सुरु करण्याचे काम आम्हीच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने शहरातील राजकारण तापले आहे. प्रत्येक पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. यंदा नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. दुसरीकडे भाजप व शिवसेना शिंदे गटात युती झाली आहे. नगराध्यक्षपद भाजपला देण्यात आले असून डॉ. नरेंद्र धुडकू ठाकूर यांची उमेदवारी घोषित झाली आहे. मात्र, नगरसेवक पदाच्या जागा वाटपावर दोन्ही पक्षात अद्याप एकमत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. शिंदे गटाला १३ आणि भाजपला १० जागा देण्याचा प्रस्ताव चर्चेत असला तरी अंतिम निर्णय प्रतीक्षेत आहे. येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी वेगात तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्षांतर्फे तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी करण्यास प्राधान्य देण्यात आले. दुसरीकडे इच्छुक उमेदवार सुरक्षित प्रभागांचा शोध घेऊन आतापासूनच मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करता आहे. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट समन्वय साधत असून नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येता आहे. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी कोणाला द्यावी याबाबत घडामोडी घडता आहे. स्थानिक उमेदवार, जातीपातीचे गणित लक्षात घेऊन उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. राष्ट्रवादीची वेगळी चूल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असून पक्षातर्फे स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू झाली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक २, ४, ६, ८ मध्ये राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान असेल. नव्या चेहऱ्यांना संधी एरंडोलमध्ये जुन्या चेहऱ्यांसोबत नवे चेहरेही राजकारणात जोरदारपणे पुढे येत आहे. त्यामुळे युतीची वाटचाल कशी होते, स्वतंत्र उमेदवार किती प्रभाव टाकतात, प्रभाग निहाय समीकरणे काय बदलतात याकडे शहराील मतदारांचे आता लक्ष लागले आहे. अपक्ष लढण्याची तयारी विविध राजकीय पक्षातील काही इच्छुक उमेदवार सुरुवातीपासून कामाला लागले होते. त्यांचे प्रचार दौरे सुरू होते. काहींनी तर राजकीय पक्षाची धुरा फक्त उमेदवारीसाठीच घेतली होती. पण अशा इच्छुक उमेदवारांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अपक्ष रिंगणात येतील. नवे ४००० मतदार यंदा ठरणार निर्णायक या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ४ हजार मतदार प्रथमच मतदानाचा अधिकार वापरणार आहे. शहरात ३१ हजार ३८५ मतदार असून त्यात १५ हजार ३६५ पुरुष तर १५ हजार ७५० महिला आहे. तसेच २ इतर मतदार आहे. ३८ मतदान केंद्रांत मतदान होणार आहे. युवा मतदार कोणत्या पक्षाकडे झुकणार यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल. अनेक ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देण्याची मागणी होत असून गट-तटामुळे काही उमेदवार शेवटच्या क्षणी बदलण्याची शक्यता आहे.
मोबाईल बँकिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगार हे समोरील व्यक्तीची माहिती घेऊन त्यांना जास्त मोबदल्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे कोणीही अशा गोष्टींना बळी पडू नये. तसेच कोणी जर अशा गुन्ह्याला बळी पडलेच तर त्यांनी तत्काळ विनाविलंब सायबर क्राइमकडे तशी तक्रार करावी. जेणेकरून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्यात येऊन आर्थिक नुकसान होण्यापासून वाचता येईल. त्यामुळे सायबर गुन्हे टाळण्यासाठी सावधानता व जागरुकता बाळगण्याचे आवाहन चांदवड तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश एस. एस. छल्लाणी यांनी केले. चांदवड तालुका विधिसेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. १३) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्या. छल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली ‘सायबर क्राइम’ या विषयावर कायदेविषयक प्रबोधन शिबिर पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती व्ही. डी. सुंगारे उपस्थित होत्या. यावेळी न्या. छल्लाणी यांनी विधी सेवा दिनाचे महत्त्व अधोरेखित करताना ९ नोव्हेंबर हा दिवस विधिसेवा म्हणून साजरा करण्यात येतो व ज्या नागरिकांना न्यायालयात मोफत विधिसेवेची गरज असते, त्यांना विधिसेवा प्राधिकरणातर्फे मोफत विधिज्ञ सेवा व मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दि. १३ डिसेंबर रोजी चांदवड न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सामोपचाराने व तडजोडीने प्रकरणे मिटविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. चांदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिनकर ठाकरे यांनी शिबिराच्या आयोजनामागील उद्देश सांगून तालुका विधिसेवा समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. तालुका विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अॅड. संग्राम थोरात यांनी सायबर काइम याविषयी माहिती देताना सायबर क्राइमची व्याख्या स्पष्ट केली. सायबर क्राइममध्ये मोबाइल व संगणकाच्या माध्यमातून दूर परदेशातून एखादी व्यक्ती हा गुन्हा करते. सायबर क्राइममध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक बळी पडतात. गुन्हेगार हा मोबाइलवर एखाद्या व्यक्तीला खोटे बोलून बँक ओटीपी मागतो व त्या व्यक्तीची फसवणूक केली जाते. यावेळी त्यांनी सायबर क्राइमचे प्रकार सांगून त्यावर प्रकाश टाकला. फिशिंग म्हणजेच एखाद्या व्यक्तीची माहिती घेऊन त्याला मोबाइलद्वारे कॉल करण्यात येऊन त्या व्यक्तीस फसविण्यात येते. दुसऱ्या प्रकारात लहान मुलांना मोबाइलवर वेगवेगळे गेम खेळताना त्यांना आर्थिक फसवणुकीमध्ये गुंतविण्यात येते असे थोरात म्हणाले.
कौशल्य प्रशिक्षणाचा या समाजाला उपयोग झाला पाहिजे. यासाठी जनजातीय आदिवासी कौशल्य विकास उपकेंद्रात विविध व्यासायिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. आदिवासी भागातील महिलांनी विविध कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर केले. उंबरठाण येथे जनजातीय आदिवासी कौशल्य विकास उपकेंद्राच्या उद्घाटन व प्रशिक्षण किट वाटपप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक राहुल ठाकरे यांनी केले. ते म्हणाले कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, नवी दिल्लीकडून महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली, नंदुरबार, नाशिक या तीनच जिल्ह्यांत प्रथमच जनजातीय आदिवासी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली. या सर्व जिल्ह्यांच्या केंद्रातून शिवणकाम प्रशिक्षणाची नोंदणी उंबरठाण येथील आदिवासी प्रशिक्षणार्थी यांनी केल्यामुळे त्यांचे कौतुक ठाकरे यांनी केले. यावेळी महिला व नागरिकांची उपस्थिती होती.
पिंपळवाडी येथील शेतकरी दिलीप शिंदे यांनी डीपी स्थलांतराच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. शिंदे हे पिंपळवाडीचे माजी सरपंच आहेत. आठ दिवसांपूर्वी त्यांनी काही शेतकऱ्यांसह महावितरण ग्रामीण शाखा क्र. १ चे अधिकारी ईश्वर तावरे यांना भेटून डीपी स्थलांतरासाठी अर्ज दिला होता. मात्र, आठ दिवस उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही. शुक्रवारी शिंदे यांनी कार्यालय गाठून अधिकाऱ्याला जाब विचारला. मात्र, उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी संतापून अंगावर पेट्रोल ओतले. हे पाहताच कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले. हातातील बाटली हिसकावून आत्मदहन थांबवले. यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्याला पुन्हा जाब विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी अर्ज वरिष्ठांकडे पाठवला असल्याचे सांगितले.
खंडाळा परिसरात महिनाभरानंतर पुन्हा बिबट्या दिसल्याने शेतकरी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास गट नंबर ५१५ आणि ५१६ मधील किरण सोनवणे यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते. हार्वेस्टर मालक योगराज भाऊसाहेब गवारे स्वतः मका काढत असताना हार्वेस्टरच्या चाकासमोर अचानक बिबट्या दिसला. त्यांनी तत्काळ ब्रेक दाबून हार्वेस्टर थांबवले. बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना सावध राहण्यास सांगितले. ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. शेतकऱ्यांनी फटाके वाजवून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दाट झुडपात लपून बसला. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
भावाचे निधन झाल्याचे कळताच बहिणीचा मृत्यू:राऊत यांना दीड वर्षांपासून होता पोटाचा विकार
येथील न्यू हायस्कूलमध्ये तब्बल ३८ वर्षे सेवेत राहून विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी जपणारे निवृत्त शिक्षक दत्तात्रय अंबादासराव राऊत (७५) यांचे अल्प आजाराने गुरुवारी (१३ नोव्हेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मोठी बहीण प्रयागबाई राधाकृष्ण जाधव (८२, रा. आनंदस्वामी मंदिरामागे, जालना) यांना कळताच त्यांचाही मृत्यू झाला. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. दत्तात्रय राऊत यांनी न्यू हायस्कूल, करमाड येथे सलग ३८ वर्षे सेवा बजावली. विद्यार्थिप्रिय, शिस्तप्रिय आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा परिसरात मोठा सन्मान होता. गेल्या दीड वर्षापासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. विविध ठिकाणी उपचार करूनही तब्येत सुधारली नाही. गुरुवारी करमाड येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दत्तात्रय राऊत यांच्या निधनाची माहिती एकाच दिवशी भाऊ-बहिणीचे अशा वेदनादायी परिस्थितीत निधन झाल्याने करमाड आणि जालना येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. करमाडला दत्तात्रय राऊत तर जालना येथे प्रयागबाई जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांत हळहळ
घाटनांद्रा येथे बालदिन उत्साहात साजरा:विद्यार्थ्यांचा केला पुष्पगुच्छ देऊन गौरव
घाटनांद्रा परिसरातील जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक शाळा, एकता उर्दू प्राथमिक शाळा, जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नॅशनल मराठी व उर्दू शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापक भरत सुपेकर, कय्युम शहा, कृष्णा दहेतकर, जितेंद्र गायकवाड, पर्यवेक्षक बी. एस. मेटे, संदीप सपकाळ, पवन मंडळकर आणि शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहरू यांचे कार्य आणि बालकदिनाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही नेहरू यांच्या जीवनावर भाष्य करत त्यांचे विचार मांडले. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन गौरविले. जोगेश्वरी माध्यमिक विद्यालयात सुंदर हस्ताक्षर स्पर्धा झाली. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटण्यात आले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
थंडीची चाहूल लागताच परिसरातील आठवडी बाजारात सुकामेवा खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. सुकामेव्याची मागणी वाढल्याने खोबऱ्याचे भाव चारशे पार गेले आहेत. बदाम ८००, गोडंबी १४०० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. सिल्लोड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुकामेवा खरेदीस सुरुवात केली आहे. वाढत्या मागणीमुळे सुकामेव्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांना आखडता हात घेत सुकामेव्याची खरेदी करावी लागत आहे. आठवडी बाजारात नागरिक खोबरा, बदाम, काजू आदी सुकामेव्याची दुकाने थाटत आहेत. थंडी वाढल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ होत आहे. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, हवामानात गारवा वाढताच पुन्हा ग्राहकांची खरेदीसाठी वर्दळ दिसत आहे. दरम्यान, थंडीच्या दिवसांत सुकामेव्याला नेहमीच मागणी वाढते. यंदा दरवाढ जास्त वाटत असल्याने ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. भारत-पाकिस्तान, अफगाणिस्तानातील सुकामेव्याच्या तणावामुळे आयातीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी दिवाळी आणि थंडीच्या दिवसांत सुकामेव्याच्या मागणीत वाढ होते. आठवड्यात थंडी वाढल्यावर खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. सुकामेव्याचे भाव मागील वर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे गोरगरिबांना पौष्टिक लाडू बनवताना खिशाला महागाईची चांगलीच कात्री बसणार आहे. यावर्षी दुकानांमध्ये सुकामेवा खरेदीसाठी जास्त गर्दी नाही दर वाढीमुळे अनेक ग्राहक आवश्यक तेवढाच सुकामेवा खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याने दुकानात अपेक्षित गर्दी दिसून येत नाही. मात्र, पुढील आठवड्यात खरेदी वाढेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. खोबरा ४००, खारीक २००, बदाम ८००, काजू ९००, मेथी ७० ते ८०, गोंडबी १४०० किलो या भावाने विक्री होत आहे.
फार्मर आयडी मंजुरीसाठी अनधिकृत वसुली:आमदार बंब यांनी घेतली शेतकरी कृती समितीच्या मागणीची दखल
दि. १० नोव्हेंबर रोजी शेतकरी कृती समितीच्या वतीने आण्णासाहेब जाधव, राहुल ढोले, इंजी.महेशभाई गुजर यांनी गंगापूर तहसीलदार यांना जुन्या तहसिल कार्यालयात फार्मर आयडी मंजुरी प्रक्रियेसंदर्भात गंभीर अनियमितता निदर्शनास आली आहे. प्राप्त माहितीनुसार,काही नेमणूक केलेले कर्मचारी अप्रुव्हल पेंडींग असलेल्या शेतकऱ्यांकडून फार्मर आयडी मंजुरीसाठी प्रति शेतकरी १५० रुपये इतके अनधिकृत शुल्क घेत आहेत, असे निवेदन दिले होते. परंतु कारवाई न झाल्याने त्याची प्रत व पुरावे आमदार प्रशांत बंब यांना दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता ईमेलद्वारे देण्यात आली. संबंधित बाब अत्यंत गंभीर असल्याने आमदार प्रशांत बंब यांनी लगेच दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता गंगापूर तहसीलदार यांना पत्र दिले. पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या अतिवृष्टी अनुदानास विलंब झाला आहे. अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी मंजूर न झाल्यामुळे त्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागले आहे. असे असल्यास सदर कृत्य प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी. आमदार प्रशांत बंब यांच्या पत्राची दखल घेत गंगापूर तहसीलदार यांनी फार्मर आयडी अप्रुव्हल करुन घेण्यासाठी कोणत्याही शेतकऱ्यांनी गंगापूरला येऊ नये. सर्व प्रलंबित फार्मर आयडी अप्रुव्ह केल्या जातील. ज्यांच्या त्रुटी आढळून येतील त्यांना वेळ देऊन बोलवण्यात येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. असे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयातील दत्तु कर्हाळे यांना कळविले आहे. अशी माहीती त्यांनी फोन वरुन शेतकरी कृती समितीला दिली आहे. पत्रात काय म्हटले आहे? शेतकऱ्यांकडून घेतलेले अनधिकृत शुल्क परत करण्यात यावे, फार्मर आयडी मंजुरी प्रक्रिया पारदर्शक व विनाशुल्क करण्यात यावी, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी.
नाचनवेल येथे रस्त्यावर झाडांची खोडे:वाहतूक ठप्प, अपघात वाढले
नाचनवेल येथे बसस्थानक ते चौफुली या एक किलोमीटर रस्त्यावर फुलंब्री-पाचोरा मार्गाचे काम सुरू आहे. रस्त्यालगत असलेली मोठी झाडे एका ठेकेदाराने घेतली आहेत. सध्या झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. झाडे तोडल्यानंतर त्यांची मोठी खोडे रस्त्यालगत टाकण्यात आली आहेत. या खोडांमुळे वाहनांना ये-जा करताना अडचण येत आहे. वाहतुकीचा खोळंबा असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. संभाजीनगरकडे जाणारा हा जवळचा मार्ग असून येथे रहदारी जास्त आहे. ठेकेदार गेल्या आठ दिवसांपासून ही खोडे उचलण्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेली खोडे तातडीने हटवावीत, वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
पंढरीनाथ काळे| फुलंब्री सण २०१५ मध्ये फुलंब्री ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. नगरपंचायत होऊन १० वर्षे झाले. मात्र, अद्यापही शहरातील नागरिकांना पाणी, रस्ते आणि कचऱ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याच तीन प्रश्नांवर ही निवडणूक होणार आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीपुरती नुसतीच आश्वासने देतात. निवडणूक झाली की त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. फुलंब्री नगरपंचायतीची पहिली निवडणूक २०१७ मध्ये झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी ११ जागांवर भाजप पक्षाने विजय मिळवला होता. तेव्हापासून अनेक पक्ष सत्तेवर येऊन गेले, परंतु कोणीही नागरिकांच्या समस्येकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यातच गेल्या २ वर्षांपासून नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. त्यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. २०२३ मध्ये फुलंब्री शहरासाठी २८ कोटी १९ लाख रुपयांची समांत्तर पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. तिचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांची होतेय गैरसोय फुलंब्रीमध्ये १७,६३० मतदार आहेत. त्यात माळी समाजाचे ५०००, मुस्लिम समाजाचे ६०००, तर उर्वरित ७ हजार दलित आणि इतर घटकांचे मतदार आहेत. पानवाडी गावाचा पुन्हा नगरपंचायतीमध्ये समावेश झाला आहे. या गावात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राहतो. येथील मते कोणाच्या बाजूने राहतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खा. कल्याण काळे व आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या दोन्ही नेत्यांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे नगरपंचायत कोणाच्या ताब्यात जाते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच निवडणुकीवर जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गणित अवलंबून असल्याचे सांगण्यात आले आहे. राजकीय पक्षांमध्ये हालचाल सुरू आहे. तिकीट वाटपाच्या चर्चांना वेग आला असून, काही ठिकाणी पक्षांतर्गत नाराजी, तर काही ठिकाणी बंडखोरीचे सूर उमटू लागले. कारण भाजप, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आदी पक्षांकडून उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरी करणार असल्याचे इच्छुक उमेदवार सांगतात. २०१७ मध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी ११ जागांवर भाजप पक्षाने विजय मिळवला होता. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या शहर विकास आघाडीला ५ जागा तर एमआयएमला एक जागा मिळाली होती. ^फुलंब्री शहरात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या आहेत. शहरातील कचरा फुल मस्ता नदीत वाहून येतो. तर याच नदीवरून ईदगाहावर जाण्यासाठी पूल आहे. कठाडे नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. काजी मुक्तीज जरीफ, नागरिक शहराच्या आजूबाजूला असलेल्या वस्त्यांकडे जाण्यासाठी चांगले रस्ते नाही. पावसाळ्यात चिखलातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी कचऱ्याची ढिगारे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होणार असल्याचे मतदार सांगतात. १७,६३० मतदार निवडणार नगराध्यक्ष आणि नगरसेवक तिकीट न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर
मध्यवस्तीतील वनविहार काॅलनी व कामगारनगर भागात शुक्रवारी (दि. १४) बिबट्याने पाच तास धुमाकूळ घातला. बिबट्याच्या हल्ल्यात दाेन वनकर्मचाऱ्यांसह ७ जण जखमी झाले. तीन तासांच्या परिश्रमानंतर दाेन वर्षीय बिबट्याला डाॅट मारून ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी १२ वाजता संत कबीरनगर झाेपडपट्टीतील पाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. दुपारी अडीचला पारिजातनगरच्या जेम्स स्कूल परिसरात शारदा साबळे (३८) यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हाताला जखम झाली. दुपारी ३ वाजता वनविहार काॅलनीतील प्लाॅट नं. १ मधील शाेभा निकम (६०) यांच्या घरात बिबट्या शिरला. हे पाहताच निकम यांची स्नुषा गितिशा (३२) यांनी त्वरित घराजवळील त्यांच्या दुकानात सासूबाई शाेभा व दाेन लहान मुलांना ओढून दरवाजा बंद केला. बिबट्याने त्यांच्या घरात अर्धा तास मुक्काम केला. दुपारी ३.३० वाजता वनकर्मचारी संताेष बाेडके व पंचवटीतील राहुल देवरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यानंतर ताे गुलमाेहर साेसायटीतील तारामंगल अपार्टमेंटमध्ये आला. तेथे गनद्वारे डाॅट मारल्यानंतर बिबट्याने तेथे लावलेल्या जाळीला भेदून इमारतीच्या पाठीमागे उडी घेतली. तेथे ताे बेशुद्ध स्थितीत पडला. नेमके काय घडले?बिबट्याचा प्रवेश : कामगारनगरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.पकडण्यासाठी कसरत : बिबट्या एका घरात लपून बसला होता, पण गोंगाटामुळे तो दुसरीकडे पळाला. बिबट्याला पकडण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी मोठी कसरत केली.कर्मचारी जखमी : बिबट्याला जाळीच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याने वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात दाेन कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बघ्यांची गर्दी : बिबट्या पकडण्याचा हा थरार पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. ‘दिसला-दिसला’, ‘पकडा-पकडा’ अशा आवाजांमुळे बिबट्या अधिकच बिथरला होता.यशस्वी जेरबंद : वनविभागाच्या पथकाने बिबट्याला भूल देऊन बेशुद्ध केले. बिबट्याचे निमित्त साधत इच्छुकांनी केली गर्दी वनविहार काॅलनी परिसरात बिबट्या आल्यानंतर प्रभाग क्र. ८ मधील अनेक इच्छुक उमेदवारांनी नागरिकांना दिलासा देण्याच्या बहाण्याने गर्दी केली. यात भाजपचे इच्छुक अधिक हाेते. त्यातच मंत्री महाजनांचे आगमन झाल्याने गर्दी वाढतच गेली. अखेरीस पाेलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवावे लागले. तारामंगल अपार्टमेंटदुपारी १२ वाजता बिबट्याचे संत कबीरनगर परिसरातील पाटाच्या भागात दर्शन झाले. यानंतर सुमारे अडीच तास बिबट्या लपून बसला हाेता. अडीचच्या सुमारास पारिजातनगरला, त्यानंतर वनविहार काॅलनी, कामगारनगर शाळा व शेवटी तारामंगल साेसायटी परिसरात ताे गेला. बिबट्या भरवस्तीत शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम १० मिनिटांत घटनास्थळी पाेहाेचली. परिसरातील गर्दी पाहून बिबट्या इकडून तिकडे पळू लागला. यावेळी बघ्यांची गर्दी झाल्याने बिबट्या अधिकच बिथरला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ७ जण जखमी झाले. दाेन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. - कुशार पावरा, वनपरिमंडळ अधिकारी, सातपूर बिबट्याला घरात येताना बघताच धाव घेत दाेन्ही मुलांसह सासूबाईंना दुकानात ओढून घेत दरवाजे बंद केले. अर्ध्या तासानंतर बिबट्या आमच्या घरातून पळाला. त्यानंतर आम्ही शेजारीच राहणाऱ्या नातलगांकडे आसरा घेतला. अजूनही सासूबाईंचा थरकाप उडताे. - गितिशा निकम, प्रत्यक्षदर्शी दुकानापासून काही फुटांच्या अंतरावर बिबट्या बघून अंगाचा थरकाप उडाला. त्वरित दाेन्ही मुलांना दुकानाच्या आत ओढून काचेचा दरवाजा लावला. अजूनही ताे प्रसंग डाेळ्यासमाेर येत आहे. डाॅट मारल्याच्या आवाजानंतर आम्ही दुकानाबाहेर आलाे. - मीनाक्षी पाटील, प्रत्यक्षदर्शी घरात शिरत अर्धा तास मुक्काम, गनने भूल दिल्यानंतर झुडपात पडला बेशुद्ध घराच्या बाहेर उन्हात बसले होती. अचानक बिबट्या दिसला. ओरडल्याने त्याने माझ्या अंगावर झेप घेतली. मी पाठमोरी होते. हाताला बिबट्याचे नख लागले. मात्र सुदैवाने वाचले. - शारदा साबळे, प्रत्यक्षदर्शीबिबट्या पाहण्यासाठी गर्दी गर्दी झाली हाेती. मी आणि मित्र एकनाथ तेथे बिबट्याला पहायला गेलो. गर्दीत उभा असताना अचानक बिबट्याने पाठीवर हल्ला केला. मित्रही जखमी झाला. - बबन शिंदे, रहिवासी, गंगासागर काॅलनी घरात झोपलेलो होताे. अचानक बिबट्याने झडप घातली. प्रतिकार केल्याने त्याने आक्रमक होत माझ्यावर हल्ला केला. मी खाली पडलो. त्याने पाठीला चावा घेतला नशिबाने वाचलो. - किशन लोहार, जखमी
मुंबई महापालिकेसह आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील (भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) जागावाटपाचे सूत्र गुंतागुंतीचे झाले आहे. मुंबईच्या राजकारणात आता आपली ताकद निर्णायकपणे वाढवण्याची तयारी भाजपने सुरू केली असून पक्षाने १०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. भाजपच्या या आक्रमक भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये स्पष्टपणे अस्वस्थता पसरली असून यामुळे जागावाटपाचे गणित बिघडण्याची चिन्हे आहेत. मंत्रालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सत्ता समीकरण बदलण्यासाठी भाजपने नियोजनबद्धरीत्या कंबर कसली आहे. भाजप श्रेष्ठींनी १०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून पक्ष आता एकूण जागांपैकी सुमारे १५० हून अधिक जागांवर आपले उमेदवार उभे करण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार करत आहे. भाजपच्या वाढलेल्या आवाक्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून जागांसाठी जोरदार मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) मुंबईत १२५ जागांसाठी आग्रही भूमिका घेतल्याची माहिती आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या या परस्परविरोधी भूमिकेमुळे जागावाटपाचा तिढा वाढत असून अंतिम निर्णय घेताना नेतृत्वाला मोठा राजकीय कस लागणार आहे. मागाठाणे मतदारसंघातील सातही जागा जिंकणार ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. आगामी निवडणुकीसाठी शिंदे गटाची १०० जागांच्या वर लढवण्याची तयारी असून महायुतीतर्फे महापालिकेवर महापौर बसणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुर्वे म्हणाले, “मागाठाणे मतदारसंघातील सातही जागा आम्ही मागणार आणि त्या जिंकणार. सध्या आमच्याकडे १०० नगरसेवक असल्याने आम्हाला १०० जागांची अपेक्षा आहे. महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आमदार प्रवीण दरेकर हे त्यांचा भाऊ प्रकाश दरेकर यांना प्रभाग क्रमांक ५ मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. हा प्रभाग या वेळी सर्वसामान्य गटासाठी आरक्षित आहे. २०१७ मध्ये या प्रभागातून संजय घाडी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वीच घाडी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. भाजप, शिंदसेनेचा १७८ जागांवर दावा काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले रवी राजा यांचा प्रभाग क्रमांक १७६ या वेळी सर्वसामान्यमधून ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे रवी राजा आता प्रभाग क्रमांक १७८ आणि प्रभाग क्रमांक १८१ मधून निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत, कारण हे प्रभाग सर्वसामान्य गटासाठी आरक्षित आहेत. प्रभाग १७८ मधून २०१७ मध्ये निवडून आलेले शिवसेनेचे (उद्धव गट) नगरसेवक अमेय घोले आता शिंदे गटात आहेत. भाजप नियोजनाचे असे आहेत आकडे विजयाचे लक्ष्य: मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट.उमेदवार संख्या: १५० हून अधिक जागांवर उमेदवार उभे करण्यावर विचार असून त्याची अंमलबजावणी.राजकीय संदेश: मुंबईच्या राजकारणात आता भाजपची भूमिका “मोठा भाऊ’असण्याचे संकेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला मुंबईतील फुटपाथ विकल्याची घटना समोर आली आहे. हा ३ लाख रुपयांचा व्यवहार २ वर्षांपूर्वी पार पडला. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तो उजेडात आला. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड येथे फुटपाथवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष गुप्ता यांना मनपाचा फुटपाथ विकत घेतला आहे. त्यांनी आपण हा फुटपाथ शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी अविनाश बागूल यांच्याकडून विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अविनाश बागूल यांनी २०२३ मध्ये फुटपाथचा एक भाग आपल्याला ३ लाखांत विकला. ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून बागूल यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ही रक्कम त्यांनी कर्ज व आपल्या आईचे दागिने गहाण ठेवून जमवली. या जागेमुळे आपले नशीब पालटेल अशी त्यांना आशा होती. पण झाले ते भलतेच. संतोष गुप्ता मागील २ वर्षांपासून या व्यवहाराचे दस्तऐवज तयार करण्यासाठी अविनाश बागूल यांच्या मागे लागला होता. पण ते टाळाटाळ करत होते. अखेर कंटाळून गुप्ता यांनी आपले पैसे परत मागितले. पण त्यांना ना ही जागा मिळाली ना दिलेले पैसे मिळाले. त्यानंतर आता त्यांना ज्या जागेसाठी आपण हा व्यवहार केला ती मुंबई महापालिकेची संपत्ती असल्याचे समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि हा घोटाळा उजेडात आला. याप्रकरणी अजून तरी शिंदेसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. ३ चेक दिले, पण सर्व बाउन्स झाले संतोष गुप्ता यांनी अविनाश बागूल यांच्याकडे आपल्या पैशांची विचारणा केली, तेव्हा त्यांनी एक जुना चेक दिला. पण तो बाउन्स झाला. त्यानंतर त्यांनी आणखी २ चेक दिले. पण तेही बाउन्स झाले. संतोष गुप्ता यांनी बागूल यांच्यावर एका डोसेवाल्याकडून दरमहा १७ हजार रुपयांची वसुली करण्याचाही आरोप केला आहे. गुप्ता यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बागूल यांनी त्यांना दीड लाखांचा चेक दिला. पण त्यांनी ज्या बँकेचा चेक दिला त्यात तेवढी रक्कमच शिल्लक नव्हती. त्यामुळे तो चेक वटला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी गुप्ता यांना कोर्टातून आदेश आणण्यास सांगितले आहे. बागुलांनी फेटाळले गुप्ता यांचे आरोप अविनाश बागूल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. संतोष गुप्ता व माझ्यात कोणताही करार झाला नव्हता. त्याने माझ्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. ते मी त्याला परत केले. माझ्यावरील आरोप राजकीय कटाचा भाग आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून वाद पेटला आहे. फुटपाथवर ठिकठिकाणी अतिक्रमण मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या सुधारित पदपथ धोरणाचा मुख्य उद्देश पादचाऱ्यांसाठी फुटपाथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करणे हा आहे. या धोरणांतर्गत, फेरीवाले आणि इतर अडथळे दूर करून, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना रस्त्यावर न उतरता चालण्यासाठी सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध केला जातो. पदपथांवरील सुविधा आणि पायाभूत संरचना) सुधारून, हे धोरण मुंबईतील पादचारी वाहतूक सुरक्षित आणि सुलभ बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. मात्र, मुंबई आणि अनेक उपनगरात फुटपाथवर अतिक्रमणे झाल्याचे दिसून येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शिपायांना चक्क संचालक करत 647 कोटींचा जीएसटी घोटाळा:बनावट बिलांच्या रॅकेटचा पर्दाफाश
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाने केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४७.०५ कोटी जीएसटी फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या फसवणुकीप्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मे. नरवाल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका रचना प्रभातकुमार माहेश्वरी आणि मे. अभय ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक विपुल प्रभातकुमार माहेश्वरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जीएसटी विभागाने बनावट बिले जारी करणाऱ्यांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील ही ३८ वी आणि ३९ वी अटक आहे. या आरोपींनी आठ कंपन्यांचे जाळे उभे करून कार्यालयातील शिपाई-चपराशांना कागदोपत्री संचालक बनवले होते. या कंपन्यांमार्फत ३२८.८९ कोटींची बनावट बिले जारी करण्यात आली, तर ३१८.१५ कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेण्यात आले. अशा प्रकारे राज्याच्या महसुलाला तब्बल ६४७.०५ कोटी रुपयांचा फटका देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दोघांना मिळाली १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी रचना आणि विपुल माहेश्वरी यांना कोर्टात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्य कर सहआयुक्त प्रेरणा देशभ्रतार (IAS) आणि उपायुक्त रमेश शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राज्य कर विभागाच्या या धडक कारवाईमुळे कोट्यवधींच्या बनावट बिल रॅकेटचे आतापर्यंतचे सर्वात मोठे जाळे उघड झाले आहे.
अनाथ आरक्षण धोरणात रिक्त पदांच्या एक टक्का आरक्षण:संस्थात्मक प्रवर्गाची व्याख्या आता बदलली
राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अनाथांसाठी असलेल्या आरक्षण धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणारे एक पूरक पत्रक शासन निर्णय जारी केले आहे. या नव्या बदलांमुळे अनाथांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. अनाथ आरक्षण उपलब्ध पदांच्या १ टक्काऐवजी रिक्त पदांच्या १ टक्का यानुसार लागू होणार आहे. यामुळे अनाथांसाठी आरक्षित पदांची संख्या निश्चित करताना अधिक स्पष्टता येणार आहे. अनाथ आरक्षणाची अंमलबजावणी आता दिव्यांग आरक्षणाच्या धर्तीवर असलेल्या “कप्पीकृत समांतर आरक्षण धोरणाऐवजी” “एकूण समांतर आरक्षण” हे तत्त्व स्वीकारून केली जाईल. हे तत्त्व अधिक प्रभावी आणि न्याय्य अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे मानले जाते. पूर्वी “शासन मान्यता प्राप्त संस्था’ असा उल्लेख होता, तो बदलून आता केवळ “महिला व बालविकास विभागाअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ अन्वये कार्यरत बालकांच्या काळजी व संरक्षणाशी संबंधित संस्थामध्ये’ पालन-पोषण झालेल्या अनाथांचाच “संस्थात्मक’ प्रवर्गात समावेश केला जाईल. यामुळे आरक्षणाच्या लाभासाठी पात्र संस्थांची व्याप्ती अधिक निश्चित झाली आहे. तसेच, जिथे जिथे “आई-वडील” असा उल्लेख आहे, तिथे “जैविक आई-वडील” असे वाचण्याचे निर्देश दिले आहेत. संस्थाबाह्य प्रवर्गासाठी पदांचे चक्राकार वाटप जर शासकीय/निमशासकीय पदभरतीमध्ये अनाथ प्रवर्गासाठी फक्त एकच पद उपलब्ध असेल, तर ते पद आळीपाळीने (चक्राकार पद्धतीने) एका भरतीत “संस्थात्मक’ प्रवर्गास आणि पुढील भरतीत “संस्थाबाह्य’ प्रवर्गास उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी सर्व आस्थापनांना अनाथ पदांकरिता स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे एकूणच फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील भरतीत नव्याने पद उपलब्ध केले जाईल अनाथ आरक्षणासाठी सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास, ते पद केवळ त्या जाहिरातीपुरते मर्यादित राहील, म्हणजे पुढील भरतीत नव्याने पद उपलब्ध केले जाईल. सरकारच्या या धोरणामुळे राज्यातील हजारो अनाथांना फायदा होणार आहे. या निर्णयाचे राज्यातील अनेक अनाथ संघटनांनी स्वागत केले आहे. तसेच आगामी काळातही अशाच योजना राबव्यात, अशी मागणी केली आहे. प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना प्राधान्य अनाथ प्रवर्गातील निवडलेला उमेदवार रुजू न झाल्यास किंवा राजीनामा दिल्यास, प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवार त्याच सामाजिक प्रवर्गाचा असल्यास त्याला नियुक्ती दिली जाईल. जर प्रतीक्षा यादीतील उमेदवार इतर सामाजिक प्रवर्गाचा असेल आणि त्या प्रवर्गाचे सर्वसाधारण पद रिक्त झाले, तर सामाजिक प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवाराऐवजी अनाथ प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवारास प्राधान्याने नियुक्ती देण्यात येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी १३ उमेदवारांसाठी सभा, रोड शो घेतले. त्यातील १० जण विजयी झाले. त्यांचा स्ट्राइक रेट ७६.९२ टक्के आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यांचा स्ट्राइक रेट १०० टक्के आला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने १४ जागा लढवल्या. त्यातील एकाही उमेदवाराला १००० मते मिळू शकली नाहीत. दरम्यान, बिहारमधील पराभवाला काँग्रेस जबाबदार असल्याची टीका उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केली. त्यावर विजय वडेट्टीवारांनी त्यांना काहीही बोलू नका, असे फटकारले. राहुल गांधींचा विषारी प्रचार जनतेने नाकारला : देवेंद्र फडणवीस राहुल गांधींचा ‘विषारी प्रचार’ बिहारच्या जनतेने नाकारला. संवैधानिक संस्थांचा अपमान करण्याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागली. बिहारने महाराष्ट्राप्रमाणेच विकासासाठी एनडीएला प्रचंड बहुमत दिले. बिहारमध्येही लाडक्या बहिणींमुळे मोठे यश मिळाले : एकनाथ शिंदे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही लाडक्या बहिणींमुळे एनडीएला मोठे यश मिळाले आहे. बिहारी जनतेने जंगलराज नाकारून विकासराज स्वीकारले. या यशात पंतप्रधान मोदी आणि जदयूचे नितीशकुमार यांचा मोठा वाटा आहे. या विजयाने मोदी, अमित शाह, नितीशकुमार यांच्यावरील जनतेचा विश्वास सिद्ध झाला. लाडक्या बहिणींनी महाराष्ट्राप्रमाणे एनडीएला दणदणीत विजय मिळवून दिला, असे अजित पवार यांनी सांगितले.
हर्षदा शिरसाट यांना जि.प. निवडणूक लढणे अशक्य:निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 चीच यादी- प्रशासन
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनी ४ नोव्हेंबर रोजी गोलवाडीचा पत्ता टाकत मतदार नोंदणीसाठी अर्ज केला. मात्र, निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ रोजी मतदार यादी अंतिम केली आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव आले असले तरी जिल्हा परिषद किंवा ग्रामीण भागातील निवडणूक त्यांना लढणे अशक्य असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. १ जुलै २०२५ च्या यादीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट झाल्यास ते बेकायदा ठरून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत, मुदतीनंतर हर्षदा शिरसाट यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याचा आरोप केला होता. बीएलओंवर राजकीय दबाव टाकून हर्षदा यांचे नाव यादीत घालण्यात आल्याचे दानवे म्हणाले. यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, माझ्या मुलीचे नाव २ ठिकाणी येऊ नये म्हणून स्थलांतर अर्ज केला आहे. आयोगाकडून प्रक्रिया समजून घेत अर्ज केला असल्याचे ते दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे मौन, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार?
बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक, आता मुख्यमंत्रिपदावरून चर्चा भाजप सर्वांत मोठा पक्ष, जदयू दुस-या क्रमांकावर पाटणा : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने द्विशतक पार करीत दणदणीत विजय मिळविला. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी करीत २४३ पैकी २०२ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे महागठबंधनला ३५ जागांवरच समाधान मानावे लागले. आता निकाल स्पष्ट झाल्याने […] The post मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे मौन, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुरक्षा विभागाची धावपळ, बॉम्बशोधक पथकही दाखल मुंबई : प्रतिनिधी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. देशभरात सुरक्षा यंत्रणांकडून सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाची घटना ताजी असताना मुंबईत आज संशयित बॅग आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली. त्यामुळे एकच […] The post मुंबईत संशयित बॅग आढळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘त्या’ रुग्णालयात आणखी एका महिलेचा मृत्यू
लातूर : प्रतिनिधी शहरातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौकातील ‘त्या’ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आणखी एका ३८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येथील बु्-हाणनगरमधील ३८ वर्षीय महिला ‘त्या’ रुग्णालयात गर्भाशयाच्या आजारावर उपचारासाठी गेली होती. उपचारादरम्यान काही तासांतच त्या […] The post ‘त्या’ रुग्णालयात आणखी एका महिलेचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रारुप मतदार यादीला दुस-यांदा मुदतवाढ
लातूर : प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात येणा-या प्रारुप मतदार यादीसाठी राज्य निवडणुक आयोगाने दृस-यांदा मुदतवाढ दिली आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. परंतू, मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या नवीन कार्यक्रमानूसार दि. २० नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक एक […] The post प्रारुप मतदार यादीला दुस-यांदा मुदतवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विश्वनाथाच्या रुपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत
लातूर : प्रतिनिधी जगाला एका सूत्रात ठेवायचे असेल तर मानवता आवश्यक आहे. मानवते शिवाय कोणताही देश जीवंत राहू शकत नाही. देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण अत्यंत महत्वाचे आहे. आज रामेश्वर (रूई) येथे विश्वनाथाच्या रुपाने मानवतेची ज्योत पेटविण्यात आली आहे. जी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आहे.’ असे विचार भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र व माजी […] The post विश्वनाथाच्या रुपाने ‘मानवतेची ज्योत’ प्रज्वलीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर पंचायत समितीत अभिलेखांची पडताळणी
लातूर : प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण पंचायत राज जिल्हा अभियान २०२४-२५ (मुल्यांकन वर्ष २०२३-२४) अंतर्गत छत्रपती संभाजी नगर विभागातून पंचायत समिती, लातूर प्रथम आल्याने ग्रामविकास विभाग यांचे पत्र दि. ६ ऑक्टोबर २०२५ अन्वये राज्यस्तरीय पडताळणी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शुक्रवारी पंचायत समिती, लातूर येथे अभिलेख्यांची पडताळणी करण्यात आली. सदर पडताळणी समितीने, यशवंतराव चव्हाण पंचायत […] The post लातूर पंचायत समितीत अभिलेखांची पडताळणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन
लातूर : प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ३ मधील नागरी समस्या घेऊन नागरीक महापालिका अधिका-यांच्या दालनामध्ये पोहोचले असता अधिकारी निवेदन स्वीकारायला तयार नाहीत म्हणून महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन चालू केले. आंदोलन करूनही डोळे नाही उघडल्यामुळे झोपून आंदोलन केले. त्यानंतर तब्बल ३ तासानंतर महापालिकेला बँड वाजवुन महापालिका अधिका-यांना जाग करावे लागल्यानंतर त्यांनी महापालिकेचा अधिकारी पाठवून नागरीकांचे निवेदन स्वीकारले. […] The post महापालिकेच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपाचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
निलंगा : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे सध्या पक्ष प्रवेशाचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब सूर्यवंशी (हालकी तालुका शिरूर अनंतपाळ) यांनी शुक्रवारी शेकडो कार्यकर्त्यांसह आडीचशे चार चाकी वाहनांचा ताफा काढून भाजपातून काँग्रेसमध्ये निलंगा येथे जाहीर प्रवेश केल्याने भाजपाला मोठे भगदाड पडले आहे. निलंगा शहरातील […] The post भाजपाचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, सध्याच्या कलानुसार एनडीए आघाडीने भक्कम बहुमत मिळवले आहे, ज्यामुळे राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याच निकालावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. या निकालांचा धक्का बसलेला नाही, असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाचे अभिनंदन केले आणि उपरोधाने म्हटले की, हा निवडणूक आयोगाचा विजय आहे. भाजपने आता अमेरिकेतही निवडणूक लढवली, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, जसे तुम्ही पाहिले तसे आम्ही पाहिले आहे. जे काही निकाल आले त्याचा धक्का बसलेला नाही. मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो हा त्यांचा विजय आहे. मतदानाचा अधिकार काढून टाकल्यावर काय होत हे आज दिसले, असे ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच नितीश कुमार यांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू होती. तेजस्वी यादव यांचा अजेंडा नोकऱ्या देणे हा होता. राहुल गांधी यांनी वोट चोरी दाखवली. वोट चोरी झाली होती. लवकरच आम्ही सगळे मुद्दे बाहेर काढू अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा साधला. आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करतो आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला उत्तर देतात, असा टोला त्यांनी लगावला. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत त्यांनी 'चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही' असे स्पष्ट केले. तसेच, राज्यात 'व्होट चोरी' झाली असून, ती चोरी पकडण्याचे काम सुरू आहे. याची प्रारूप यादी अजूनही आलेली नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाकरे यांच्या मते, त्यांचा धसका घेऊन निवडणूक आयोग काम करत आहे. बिहारमध्ये गेलेले भाजप नेते आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची वाट पाहतील, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. त्यांनी आरोप केला की, भाजपचे कार्यकर्ते मतदानात सक्रिय आहेत. महिला मतदारांविषयी बोलताना ते म्हणाले की, महिलांचे मत मिळवण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे, केवळ टॅक्सपेयरचा पैसा वळवून किंवा ₹1,500 देऊन महिला मतदान करत नाहीत. अशा प्रकारे, त्यांनी मतांसाठी 'टॅक्स पेयर'च्या पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला आणि महिलांच्या राजकीय जाणिवांबद्दल भाष्य केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह शुक्रवारी संध्याकाळी नोएडा येथे पोहोचले. त्यांनी जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना सेक्टर 19 येथील त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र भूषण 2024 देऊन सन्मानित केले. राम सुतार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते मुंबईतील पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी वैयक्तिकरित्या भेट देऊन त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान केला. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बिहार निवडणुकीच्या निकालांवर आनंद व्यक्त केला. शिल्पकार राम सुतार यांना पद्मभूषण (2018), पद्मश्री (1999) आणि टागोर पुरस्कार (2018) यांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी असंख्य प्रसिद्ध शिल्पे तयार केली आहेत, ज्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार पटेल, 182 मीटर, गुजरात), महात्मा गांधींचा पुतळा (भारतीय संसदेसह 450 शहरांमध्ये) आणि इतर अनेक शिल्पे समाविष्ट आहेत. शिल्पकार राम सुतार हे धुळे, महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. यात स्मृतिचिन्ह आणि 25 लाख रोख रक्कम असते. हा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निवडला जातो. याआधी हा पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींमध्ये लता मंगेशकर (1997), सचिन तेंडुलकर (2001), रतन टाटा (2006) आणि अशोक सराफ (2023) यांचा समावेश आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड येथील गांधी भवन येथे विशेष व्याख्याने आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांनी, पंडित नेहरू यांच्याशिवाय देशाचा इतिहास अपूर्ण राहील, असे मत व्यक्त केले. प्रा. सुधाकर म्हणाले की, पंडित नेहरूंनी 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या पुस्तकात भारताला वगळून जगाचा इतिहास लिहिता येणार नाही, असे वेळोवेळी सांगितले आहे. कारागृहात खडतर जीवन जगत असताना त्यांनी वाचन आणि लिखाण केले. देशाचा अभिमान बाळगण्यासाठी भूतकाळातील घटनांचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते मानत होते. त्यामुळे अशोक आणि अकबर यांच्याप्रमाणेच पंडित नेहरू यांच्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. या कार्यक्रमात पंडित नेहरूंनी तुरुंगवासात असताना लिहिलेल्या 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' आणि 'द डिस्कवरी ऑफ इंडिया' या दोन पुस्तकांवर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच, ज्येष्ठ लेखक प्रा. शंकर निकम यांनी लिहिलेल्या 'गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू' या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. परिमल माया सुधाकर, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्रा. शंकर निकम, डॉ. शिवाजी कदम, ॲड. अभय छाजेड, डॉ. एम.एस. जाधव आणि अन्वर राजन उपस्थित होते. प्रा. परिमल माया सुधाकर यांनी 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या ग्रंथाबद्दल अधिक माहिती दिली. नेहरू यांनी हा ग्रंथ १९३१ ते १९३४ या काळात, वयाच्या ४१ ते ४४ व्या वर्षी लिहिला. जगाच्या इतिहासात पाच हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सभ्यता आणि संस्कृतींचे स्थान नगण्य होते, असे त्यांनी नमूद केले. तुरुंगात असताना त्यांनी आपली कन्या इंदिरा हिला जगाची माहिती देण्यासाठी तीन वर्षांत १६० हून अधिक पत्रे लिहिली, ज्याचे प्रारूप म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते. नेहरूंनी भारत आणि परदेशातील भेटींमधील ऐतिहासिक महत्त्वाच्या नोंदी पुस्तकात घेतल्या आहेत. त्यांनी ऐतिहासिक वस्तू ज्या दृष्टिकोनातून पाहिल्या, त्याचा उल्लेखही आढळतो. जगाच्या इतिहासात केवळ भारत आणि चीनमध्ये निरंतर संस्कृती टिकून राहिली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विविध साम्राज्यांचा उदय आणि अस्त तसेच धार्मिक प्रभावांबद्दल त्यांनी केवळ अभ्यासच केला नाही, तर विश्लेषणात्मक लिखाणही केले.
पालिका निवडणुकीतील पहिला गुन्हा:हिंगोलीत मतदारांना 'खिचडी'चे प्रलोभन, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली शहरात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तारीख 14 गुन्हा दाखल झाला आहे. पालिका निवडणुकीतील हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली सह कळमनुरी व वसमत नगरपालिकाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीमध्ये सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांसह अपक्षांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस शिल्लक असल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे पालिका निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने पथकांची स्थापना केली असून या पथकांद्वारे उमेदवारांच्या खर्चांवर लक्ष ठेवले जात आहे. तर पोलिस विभागाने स्थापन केलेल्या पथकाकडून शहरामध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान आज शहरातील एका जिनिंग जवळील मोकळ्या मैदानावर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय तोडेवाले, अशोक धामणे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, गणेश वाबळे यांच्या पथकाने आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. यावेळी तेथे जमलेल्या लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले. यावरून जमादार तोडेवाले यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेख अनवर शेख रहमान याच्यासह एका महिलेविरुद्ध निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणे तसेच लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. जमादार शेख, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत
शेयर मार्केटमध्ये ‘बुल्स रन’; आयटीत मात्र विक्रीचा दबाव
मुंबई : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात दिवसभर मोठी अस्थिरता दिसून आली. सकाळी गॅप-डाऊन ओपनिंग झाल्यानंतर बाजार जवळपास पूर्ण वेळ लाल निशाणीवर ट्रेड करत होता. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात एनडीए युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचे चित्र स्पष्ट होताच, बाजारात अचानक मोठी तेजी आली आणि प्रमुख निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. हा ट्रेंड […] The post शेयर मार्केटमध्ये ‘बुल्स रन’; आयटीत मात्र विक्रीचा दबाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
७ देशातील ३२ कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेने भारत आणि चीनसह सात देशांमधील ३२ कंपन्या आणि व्यक्तींवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. इराणच्या क्षेपणास्त्र विकास आणि इतर शस्त्रास्त्रांना रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, त्यांनी चीन, इराण, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि भारतासह इतर देशांमध्ये असलेल्या तब्बल ३२ संस्था […] The post ७ देशातील ३२ कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

32 C