SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
... ...View News by News Source

ठाकरे बंधूंची युती, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

जागावाटप अंतिम टप्प्यात, १० जागांवर घोडे अडले! मुंबई : प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गट व मनसेने एकत्र येण्याचे आणि एकत्र राहायचे ठरवले असले तरी चर्चेच्या अनेक फे-या होऊनही अजून जागावाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. मराठीबहुल व मागच्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या १० प्रभागांसाठी दोन्ही सेना आग्रही असल्याने तिढा सुटत नसल्याचे समजते. हा तिढा सोडवण्यासाठी मनसे नेते बाळा […] The post ठाकरे बंधूंची युती, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 1:14 am

अरवली पर्वत रांगांमधील जैवविविधता धोक्यात!

जयपूर : वृत्तसंस्था अरवली वाचवा मोहिमेची चर्चा आता केवळ राजस्थानमध्येच नाही तर देशभरात होत आहे. रस्त्यावरील निदर्शनांपासून ते सोशल मीडियापर्यंत या मुद्याला जोर आला आहे. आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार अजय रावत यांनी वाळू कलाकृतीद्वारे अरवली पर्वतरांगांचे जतन करण्याचा संदेश दिला. त्यांनी १०० टनाहून अधिक वाळू वापरून एक कलात्मक निर्मिती केली. या भव्य शिल्पात अरवलीला राजस्थानची जीवनरेखा […] The post अरवली पर्वत रांगांमधील जैवविविधता धोक्यात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 12:58 am

आजपासून महापालिका निवडणूक रणधुमाळी

हालचाली वेगात, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील मुदत संपलेल्या २७ आणि नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी मनपासाठी उद्यापासून (२३ डिसेंबर) रणधुमाळी सुरू होत आहे. कारण मंगळवारपासूनच मनपासाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होत आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्व मनपांसाठी १५ जानेवारी रोजी एकत्रित मतदान होणार आहे […] The post आजपासून महापालिका निवडणूक रणधुमाळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 12:54 am

ईव्हीएमवर सर्वांत आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार

जि. प. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल मुंबई : प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या नियमांत राज्याच्या ग्रामविकास खात्याने एक महत्त्वपूर्ण बदल केला. यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीनवर पहिला राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे. या क्रमानेच उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्याने त्यासंबंधी जीआर प्रसिद्ध केला आहे. या […] The post ईव्हीएमवर सर्वांत आधी राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 12:51 am

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे नवे नियम:EVM वरील उमेदवारांच्या नावांचा क्रम बदलला, कशी असणार क्रमवारी?

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत उमेदवारांच्या नावांच्या अद्याक्षराप्रमाणे असणारा निवडणूक रिंगणातील क्रम बदलण्यात आला असून, आता राजकीय पक्षांच्या मान्यतेनुसार उमेदवारांची वर्गवारी केली जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, हे नियम तातडीने लागू करण्यात आले आहेत. पूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या आडनावाच्या अद्याक्षरानुसार यादी तयार केली जात असे. यामुळे अनेकदा राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची नावे यादीत खाली जात असत. मात्र, नव्या सुधारणेनुसार आता पक्षाच्या दर्जानुसार उमेदवारांचा क्रम निश्चित केला जाणार आहे. उमेदवारांची चार गटांत होणार विभागणी नव्या नियमानुसार, ईव्हीएम मशीन आणि मतपत्रिकेवरील उमेदवारांची यादी खालील चार प्रवर्गांमध्ये विभागली जाईल: गट 1: मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार. गट 2: इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार. गट 3: राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेले पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार. गट 4: अपक्ष उमेदवार. मतदारांसाठी प्रक्रिया होणार सोपी ग्रामविकास विभागाने पंचायत समिती निवडणूक नियमांमध्ये केलेल्या या सुधारणेमुळे निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त येणार आहे. प्रत्येक गटातील उमेदवारांची नावे त्यांच्या त्या-त्या प्रवर्गात अद्याक्षरानुसार लावली जातील, मात्र राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना यादीत पहिले प्राधान्य मिळेल. यामुळे मतदारांना आपल्या आवडीच्या पक्षाचा उमेदवार शोधणे अधिक सोपे होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 11:33 pm

मतांसाठी काहीही!:अमित साटम यांनी स्वतः 'बूट पॉलिश' करत वेधले लक्ष; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज

निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना जनतेच्या चरणी लीन होताना आपण पाहतोच, पण मुंबईत भाजप आमदार अमित साटम यांनी तर थेट 'पायालाच' हात घातला आहे. सोमवारी साटम यांनी चक्क बूट पॉलिश करणाऱ्या कामगारांच्या जागी बसून त्यांचे बूट पॉलिश केले. नेत्याचा हा 'बूट पॉलिश' अवतार सध्या मुंबईत चांगलाच चर्चेचा आणि तितकाच उपरोधाचा विषय ठरत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या प्रचाराची रणनीती आक्रमक केली असून, तळागाळातील कष्टकरी वर्गाला साद घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी आज दादर येथे आयोजित रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी साटम यांनी केवळ भाषण न करता, स्वतः बूट पॉलिश करून कामगारांच्या श्रमांप्रती आदर व्यक्त केला. या अनोख्या कृतीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. रेल्वे स्थानकांवर रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या बूट पॉलिश कामगारांच्या मेळाव्यात अमित साटम यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या या कष्टकरी वर्गाच्या आरोग्याच्या समस्या, हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा या विषयांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. कामगारांच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने न पाहता ठोस कृतीतून ते सोडवण्याचा विश्वास साटम यांनी दिला. तिकिटाची वाट पाहू नका, कामाला लागा मेळाव्यानंतर भाजपच्या निवडणूक संचलन समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अमित साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. कोणाला तिकीट मिळेल किंवा उमेदवार कोण असेल याची वाट बघत बसू नका, आता थेट कामाला लागा, असे आदेश त्यांनी दिले आहेत. मुंबईत पक्षाचा 'घरोघरी प्रचार' सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. 27 समित्यांकडे प्रचाराची धुरा निवडणुकीचे नियोजन अत्यंत सूक्ष्म स्तरावर करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. प्रचाराचे नियोजन, सभांचे आयोजन आणि रणनीती ठरवण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या 27 वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक प्रभागात पोहोचण्याचा भाजपचा मानस आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 11:24 pm

उदगीरचे सायकलस्वार निघाले सोमनाथ, व्दारकेकडे

उदगीर : प्रतिनिधी उदगीर सायकलिंग क्लबच्या २९ उत्साही सायकलस्वांरानी मृदा संवर्धनाचा संदेश घेऊन ते उदगीरहून सोमनाथ, व्दारका या प्रमाणे २ राज्यांतून (महाराष्ट्र आणि गुजरात) १५०० किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत. या सायकल प्रवासाची सुरुवात उदगीर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून होणार आहे. ते प्रत्येक शहरात रॅलीच्या माध्यमातून उदगीर ते परळी वैजनाथ, […] The post उदगीरचे सायकलस्वार निघाले सोमनाथ, व्दारकेकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 11:09 pm

क्यूआर कोडद्वारे १ लाख २५ हजार रुपयांची वसुली

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जोगाळा ग्रामपंचायतीच्या वतीने डिजिटल प्रशासनाला चालना देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. ग्रामस्थांच्या सोयीसाठी क्यूआर कोडद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या उपक्रमातून १ लाख २५ हजार रुपयांची कर वसुली यशस्वीपणे करण्यात आली आहे. परंपरागत पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने कर भरण्याची […] The post क्यूआर कोडद्वारे १ लाख २५ हजार रुपयांची वसुली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 11:08 pm

भारतीय संस्कृतीने ध्यानाचे महत्त्व अधोरेखीत केले

लातूर : प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत महादेव शंकर, महावीर जैन, गौतम बुद्ध, हजरत मोहंमद पैगंबर यांनी ध्यानाबद्दल संगीतलेले तत्वज्ञ सांगून स्वत: चे अनुभव नमूद केले. भारतीय संस्कृतीने ध्यानाचे महत्व अधोरेखीत केले. आमची शाळा दररोज १५ मिनिटाचे ध्यान व वसतिगृहात दररोज ४ वेळा ध्यान घेत असल्यामुळे विध्यार्थीच्या अभ्यसात व आचरणात आमुलाग्र बदल पाहावयास मिळाल्याचे ग्लोबल नॉलेज इंग्लिश […] The post भारतीय संस्कृतीने ध्यानाचे महत्त्व अधोरेखीत केले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 11:06 pm

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दि. १५ डिसेंबर रोजी जाहीर केला. त्यानंतर लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. आज दि. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. दि. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणुक अधिकारी श्रीमती मानसी […] The post उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 11:05 pm

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांच्या भेटी घेत साधला संवाद

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नागरिक यांच्या भेटी घेत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी समस्या समजून घेऊन त्यांच्या […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी नागरिकांच्या भेटी घेत साधला संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 11:04 pm

लोकशाही आज एका निर्णायक वळणावर उभी

लातूर : प्रतिनिधी भारतीय लोकशाही आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. आणीबाणीच्या काळात सुध्दा तिच्यावर इतकी काळी छाया नव्हती, जितकी आज आहे. घटनात्मक संस्था, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली जात आहे. प्रश्न विचारणेच गुन्हा ठरत असेल तर लोकशाही उरलीच कुठे? ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे ठाम मत सर्वोच्च न्यायालयीन वकील अ‍ॅड. […] The post लोकशाही आज एका निर्णायक वळणावर उभी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 11:01 pm

डॉ. कैलास कदम यांचा पिंपरी-चिंचवड काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा:वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले, पण प्राथमिक सदस्य म्हणून काम करणार

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि. २२) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ. कदम यांची पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी ७ ऑक्टोबर २०२१ रोजी निवड झाली होती. तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने के. सी. वेणुगोपाल यांनी त्यांची नियुक्ती केली होती. वेणुगोपाल यांना दिलेल्या राजीनामा पत्रात डॉ. कदम यांनी म्हटले आहे की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. मला कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती. मी पुढे काँग्रेसचा प्राथमिक सदस्य म्हणून काम करत राहीन. डॉ. कदम यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी, ते काँग्रेसचे प्राथमिक सदस्य म्हणून कार्यरत राहतील, असे पत्रात स्पष्ट केले आहे. डॉ. कदम यांनी आपल्या राजकीय प्रवासाची माहिती देताना सांगितले की, त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच पिंपरी-चिंचवड शहर आणि औद्योगिक पट्ट्यात काँग्रेससाठी काम केले आहे. १९९७ मध्ये राज्यात आणि केंद्रात युतीचे सरकार असताना, त्यांनी गांधीनगर पिंपरी वॉर्डमधून काँग्रेसच्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००७ मध्ये त्यांनी खराळवाडी वॉर्डमधून निर्मला कदम यांना निवडून आणले. २०१२ मध्ये गांधीनगर प्रभागातून स्वतःसह दोन्ही उमेदवार आणि खराळवाडी प्रभागातून सद्गुरु कदम यांना निवडून आणण्यात यश मिळवले. याच काळात त्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गटनेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची संधी काँग्रेसने दिली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना चिंचवडमधून उमेदवारी मिळाली होती. डॉ. कदम यांच्या मते, पक्ष अडचणीत असतानाही त्यांच्या संघटन कौशल्याचा विचार करून काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी या काळात पक्ष वाढीसाठी १०० टक्के योगदान दिल्याचेही नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:32 pm

अमरावतीच्या 5 नगरपालिकांमध्ये राजकीय विरोधाभास:नगराध्यक्ष एका पक्षाचा, नगरसेवक दुसऱ्याचे; विकास कामांची वाट खडतर

अमरावती जिल्ह्यातील पाच नगरपालिकांमध्ये राजकीय विरोधाभास निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष एका पक्षाचा, तर नगरसेवकांचे बहुमत दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती असल्याने आगामी काळात विकासकामांचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या पहिल्याच बैठकीत या संघर्षाची ठिणगी पडेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, मोर्शी, चांदूर रेल्वे आणि धारणी या पाच नगरपालिकांमध्ये ही परिस्थिती आहे. नगराध्यक्षपदावर एका पक्षाचा उमेदवार विजयी झाला असला तरी, त्या पक्षाला नगरसेवकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. यामुळे उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणे संबंधित पक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये सहा ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले, तर काँग्रेसला दोन, शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडी, प्रहार आणि शिवसेना (उबाठा) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपने जिंकलेल्या सहा जागांपैकी अचलपूर, अंजनगाव सुर्जी आणि धारणी येथे त्यांना नगरसेवकांमध्ये बहुमत मिळालेले नाही. सर्वात मोठ्या ४१ सदस्यीय अचलपूर नगरपालिकेत भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. २८ सदस्यीय अंजनगाव सुर्जीमध्ये ६, तर १७ सदस्यीय धारणीमध्ये केवळ ४ जागा जिंकता आल्या. यामुळे या तीनही ठिकाणी भाजपला स्वतःचा उपाध्यक्ष निवडून आणणे कठीण होणार आहे. चांदूर रेल्वे नगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपद जिंकले असले तरी, २० पैकी केवळ दोनच नगरसेवक त्यांच्या पक्षाचे आहेत. येथे भाजपने ११ जागा जिंकल्याने वंचित बहुजन आघाडीला भाजपशी राजकीय सामना करावा लागेल. मोर्शी नगरपालिकेतही अशीच स्थिती आहे. शिवसेनेने (शिंदे गट) नगराध्यक्षपद जिंकले, परंतु २४ सदस्यीय सभागृहात त्यांना फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी प्रत्येकी ६ जागा जिंकल्या आहेत, तर प्रहार आणि रोडे गटाने प्रत्येकी एक जागा मिळवली आहे. त्यामुळे येथेही राजकीय संघर्ष अटळ मानला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:31 pm

कन्हाळगाव येथे मध्यरात्री घरात घुसखोरी:लाईट बंद करून घरात केला प्रवेश, महिला व मुलीला धमकावले; गुन्हा दाखल

लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव येथे एका महिलेच्या घरात मध्यरात्री बेकायदेशीर प्रवेश करून तिला व तिच्या अल्पवयीन मुलीला धमकावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लाखांदूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ अंतर्गत कलम ३३२ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, कन्हाळगाव येथील रहिवासी श्रीमती सपना संदिप ढोरे (वय ३२) या आपल्या मोठ्या मुलीसह घरी झोपलेल्या असताना २१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास ही घटना घडली. घरात लाईट सुरू असताना त्या झोपेतून जाग्या झाल्या असता अचानक लाईट बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाईलचा टॉर्च सुरू करताच घराशेजारी राहणारा श्रीहरी देविदास ढोरे (वय ३८) हा त्यांच्या खोलीत उभा असल्याचे दिसून आले. महिला व तिच्या मुलीने आरडाओरड करताच आरोपीने त्यांच्या तोंडावर हात ठेवून ओरडू नका, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. मात्र पुन्हा जोरात आरडाओरड झाल्यानंतर आरोपीने पळ काढला. घटनेनंतर आरडाओरडीमुळे शेजारील नागरिक घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोणत्यातरी गुन्हेगारी उद्देशाने घरात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून तिसऱ्यांदा घडली घटना घटनेतील आरोपी याने यापुर्वी अन्य दोन महिलांचा देखील विनयभंग केला असून, त्या विरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. अशातच आता आरोपीकडून तिसरी घटना घडली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:29 pm

नांदेड हादरले!:अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचे अपहरण करून बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असतानाच, आज नांदेडमध्ये एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे भरदिवसा अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास नांदेडच्या सिडको भागात घडली. जीवन घोगरे पाटील हे परिसरात असताना अचानक एका चारचाकी वाहनातून आलेल्या काही अज्ञात इसमांनी त्यांना गाठले आणि बळजबरीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये अपहरणकर्त्यांची गाडी सुसाट वेगाने निघून जाताना स्पष्टपणे दिसत आहे. अपहरणकर्त्यांनी घोगरे पाटील यांना अज्ञात स्थळी नेऊन तिथे त्यांना लाकडी दांडके आणि इतर वस्तूंनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या शरीराला मोठ्या दुखापती झाल्या आहेत. मारहाणीनंतर हल्लेखोरांनी त्यांना सोडून दिले. त्यानंतर घोगरे पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, हे अपहरण नेमके कोणत्या कारणातून झाले? वैयक्तिक वैमनस्य की राजकीय वाद? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या संशयास्पद वाहनाचा आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:22 pm

मनरेगाऐवजी प्रस्तावित व्हीबीजीरामजी विधेयक रद्द करा:शेतमजूर युनियनची निदर्शने; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेबाबतचा (मनरेगा) कायदा रद्द करून त्याऐवजी नव्याने आणण्यात आलेले प्रस्तावित व्हीबीजीरामजी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी, २२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र लाल बावटा शेतमजूर युनियनच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले. युनियनचे पुढारी तथा भाकपचे माजी राज्य सचिव तुकाराम भस्मे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनकर्त्यांनुसार, मनरेगाचा कायदा हा कामाची किमान हमी देणारा कायदा आहे. परंतु शासनाने तो आता बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न चालवला असून त्याऐवजी व्हीबीजीरामजी विधेयक आणले आहे. हे विधेयक येत्या काळात मंजूर केले जाऊन त्याचा पुढे कायदा केला जाणार आहे. त्यामुळे त्याला आतापासूनच विरोध करणे आवश्यक आहे, असे युनियनचे म्हणणे आहे. शेतमजूर युनियनने त्यासाठीची आघाडी उघडली असून आज देशव्यापी आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदनही पाठविण्यात आले. नव्या विधेयकाच्या माध्यमातून येऊ घातलेल्या कायद्यात केवळ महात्मा गांधी यांचे नाव कमी करणे एवढाच प्रशासकीय बदल केला जाणार नसून गोरगरीब मजुरांच्या हक्कांवर गदा आणली जाणार आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मनरेगा हा आपल्या प्रजासत्ताकाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो ‘काम करण्याचा अधिकार’ याचे समर्थन करतो. नव्या कायद्यामुळे ग्रामीण भारतात लागू असलेले किमान वेतन हे संस्थात्मक (बाह्यस्रोत) होणार असून त्यातील तरतुदींमुळे मजुरांची पिळवणूक होणार आहे. त्यामुळे प्रस्तावित विधेयक रद्द करून जुनाच मनरेगा कायदा सुरू ठेवण्यात यावा, यावर अधिक भर देण्यात आला. या प्रमुख मागणीसह मनरेगाचा कायदा कायम ठेवा, त्या कायद्यातील राष्ट्रपित्यांचे नाव गहाळ करू नका, मनरेगा कायद्यातील भ्रष्टाचार निखंदून काढत त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा, मनरेगाच्या माध्यमातून वर्षभरात किमान २०० दिवस काम पुरवा, मनरेगाचा प्रतिदिन दर किमान ७०० रुपये करा, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा वाढतील अशी कामे निवडा आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात तुकाराम भस्मे यांच्याशिवाय युनियनचे राज्य चिटणीस संजय मंडवधरे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वडस्कार, कार्याध्यक्ष सुनील घटाळे, भाकपचे जिल्हा सचिव सुनील मेटकर, इतर पदाधिकारी प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, प्रा. विजय रोडगे, प्रा. प्रसेनजीत तेलंग, आयटकचे पुढारी जे. एम. कोठारी, उमेश बनसोड, ज्ञानेश्वर मेश्राम, प्रज्ञा बनसोड, विजय मंडवधरे, शाहीर धम्मा खडसे आदी सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 9:52 pm

राज्यातील 3 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या:डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे नाशिकची, तर अरुण एम. यांच्यावर गडचिरोलीची जबाबदारी

राज्यात नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर, राज्य प्रशासनाने आज तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्याची कन्या डॉ. कश्मीरा संखे यांच्यासह शैला ए. आणि अरुण एम. या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आज जाहीर झालेल्या आदेशानुसार, वित्त मंत्रालयातील सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकारी शैला ए. यांची आता मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सचिव आणि विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मूळच्या ठाणे जिल्ह्याच्या असलेल्या डॉ. कश्मीरा संखे यांची नाशिक जिल्ह्यातील 'आयटीडीपी' प्रकल्पावर सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे नाशिकमधील आदिवासी विकास प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे. 2023 च्या बॅचचे अधिकारी अरुण एम. यांची गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त भागात प्रशासकीय घडी बसवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. बदल्यांचे सत्र सुरूच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण असताना गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरू आहे. यापूर्वी 18 नोव्हेंबर रोजी 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्रिगुण कुलकर्णी यांची 'यशदा' (पुणे) येथून 10 वी आणि 12 वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय राहुल रंजन महिवाल, प्रकाश खपले, डॉ. मंजिरी मानोलकर आणि अंजली रमेश या अधिकाऱ्यांचाही समावेश होता.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 9:44 pm

पीक पाहणी ऑफलाईन नोंदणीला केवळ दोन दिवस:मुदतीत नोंद न झालेल्या पिकांसाठी अर्ज सादर करा

खरीप हंगाम २०२५ मध्ये ई-पीक पाहणीची नोंदणी मुदतीत न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन पाहणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पाहणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे, संबंधित शेतकऱ्यांकडे अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. या संदर्भात जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना २४ डिसेंबरपूर्वी ऑफलाईन पाहणीचे अर्ज ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी १४ डिसेंबर रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार सर्व जिल्ह्यांना या सूचना पाठवल्या आहेत. ऑफलाईन पाहणीसाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी सदस्य म्हणून असतील. ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम २०२५ मध्ये पिकांची नोंद करता आली नाही, त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांनुसार, ग्रामस्तरीय समिती २५ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळपाहणी करेल. पाहणीची वेळ निश्चित करून संबंधित शेतकऱ्याला तसेच शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान चार ते पाच शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात पूर्वकल्पना देणे बंधनकारक आहे. पाहणीदरम्यान, स्थानिक चौकशी करून पीक नोंदणीसाठी वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केला जाईल. शेताच्या बांधाला लागून असलेल्या इतर शेतकऱ्यांचे जबाब नोंदवले जातील. लागवडीसाठी खरेदी केलेले बियाणे, खते आदींच्या खरेदी पावत्या तपासून नोंद घेतली जाईल आणि गतवर्षीच्या पीक पाहणीची नोंदही नमूद केली जाईल. चौकशीअंती पिकाचे नाव आणि क्षेत्र पंचनाम्यात नमूद केले जाईल. मंडळ अधिकाऱ्यांनी सर्व अहवाल गावनिहाय एकत्र करून १२ जानेवारीपूर्वी उपविभागीय अधिकारी (SDO) यांच्या अध्यक्षतेखालील समितीला सादर करणे अपेक्षित आहे. या अहवालात खाते क्रमांक, नाव, गट क्रमांक, एकूण क्षेत्र, पिकांची नावे आणि क्षेत्र यासारख्या बाबींचा समावेश असावा. त्यानंतर, उपविभागीय अधिकारी सर्व बाबी तपासून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून हा अहवाल शासनाकडे पाठवला जाईल.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 9:34 pm

तुर्की संसदेत खासदारांमध्ये हाणामारीमुळे प्रचंड गोंधळ

अंकारा : वृत्तसंस्था २०२६च्या अर्थसंकल्पावरील मतदानाच्या काही मिनिटांपूर्वी, तुर्की संसदेची महासभा युद्धभूमीत रूपांतरित झाली. ‘सीएचपी’चे मुरत अमीर आणि ‘एके’ पक्षाचे मुस्तफा वरांक यांच्यातील वादविवादाला हाणामारीचे स्वरूप प्राप्त झाले. ‘एके’ पक्ष आणि ‘सीएचपी’ दोन्ही खासदारांमध्ये हाणामारी झाली. सुमारे १० मिनिटे चाललेल्या तुंबळ हाणामारीमुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. परिस्थितीमुळे अध्यक्ष नुमान कुर्तुलमुस यांना कामकाज थांबवावे लागले. परिस्थिती […] The post तुर्की संसदेत खासदारांमध्ये हाणामारीमुळे प्रचंड गोंधळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 9:25 pm

रागाच्या भरात उद्ध्वस्त केला संसार!:घरगुती वादातून स्वतःचेच घर पेटवले, लाखांदूरच्या माडेघाट येथील धक्कादायक घटना

लाखांदूर तालुक्यातील माडेघाट येथे एका इसमाने घरगुती वादातून स्वतःच्याच घराला आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घराचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माडेघाट येथील रहिवासी दिगांबर दुरबुळे याचे गेल्या काही दिवसांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होते. सोमवारी सायंकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून दिगांबरने घरातील तणसाच्या (काडीकचऱ्याच्या) ढिगाऱ्याला आग लावली. क्षणार्धात या आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. घराला आग लागल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने आजूबाजूच्या घरांना लागणारा धोका टळला. या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, महत्त्वाची कागदपत्रे आणि संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. घराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून दुरबुळे कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली असून, आरोपी तरुणाने हे कृत्य नेमक्या कोणत्या रागातून केले याचा तपास सुरू आहे. पोलिस सध्या नुकसानाचा पंचनामा करत असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 9:20 pm

पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय?:सुनील तटकरेंचा भरत गोगवलेंना टोला, महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर

रायगड जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. अलिबाग, महाड आणि विशेषतः तटकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मदतीने शेकापने राष्ट्रवादीवर 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे. या निकालानंतर आता महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय? असे म्हणत तटकरे यांनी गोगवले यांना टोला लगावला आहे. सर्वात मोठा उलटफेर श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळाला, जो मंत्री आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवलेले अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातनाक यांचा पराभव करत नगराध्यक्षपदावर कब्जा केला. दुसरीकडे, महाडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपला गड राखला असून, शिवसेनेच्या सुनील कविसकर यांनी राष्ट्रवादीच्या सुदेश कळमकर यांचा पराभव केला आहे. श्रीवर्धनमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आल्यानंतर त्यांच्या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी मंत्री भरत गोगावले स्वतः पोहोचले होते. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या पराभवानंतर गोगावलेंनी विरोधी गटाच्या उमेदवाराचे स्वागत केल्याने सुनील तटकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाचवी कोणाकडे अन् घुगऱ्या कोण करतंय? - सुनील तटकरेंचा टोला भरत गोगावले यांच्या भूमिकेवर टीका करताना सुनील तटकरे यांनी ग्रामीण म्हणीचा आधार घेत जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, गेल्या अडीच-तीन वर्षांपासून जे लोक उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होते, तेच आज त्यांच्या विजयाचे स्वागत करायला उभे आहेत. आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे, 'पाचवी कोणाकडे चालते आणि घुगऱ्या कोण करते'. ज्यांच्याकडे मयती आहे, तेच घुगऱ्या करत आहेत आणि ज्यांची पाचवी आहे त्यांचं वेगळंच काही सुरू आहे. सुनील तटकरे पुढे म्हणाले की, जे उमेदवार मशालीवर निवडून आले आहेत, त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी महाडवरून लोक श्रीवर्धनला जात आहेत, हे अनाकलनीय आहे. या विधानामुळे रायगडच्या राजकारणात महायुतीमधील विसंवाद आता उघड झाला असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 9:13 pm

भगवद्गीता धार्मिक ग्रंथ नाही, एक ‘नीतिशास्त्र’ : हायकोर्ट

चेन्नई : वृत्तसंस्था भगवद्गीता हे धार्मिक ग्रंथ नाही. ते एक नैतिक शास्त्र आहे. भारतीय संस्कृतीचा हा एक अविभाज्य भाग असून त्याला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत मर्यादित ठेवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मद्रास उच्च न्यायालयाने गीता आणि योग शिक्षण देणा-या ट्रस्टची ‘फॉरेन कॉन्ट्रिब्युशन (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट’ अंतर्गत नोंदणी नाकारण्याचा निर्णय रद्द केला. कोईमतूर येथील ‘आर्ष […] The post भगवद्गीता धार्मिक ग्रंथ नाही, एक ‘नीतिशास्त्र’ : हायकोर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:56 pm

बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार- शेख हसीना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सध्याच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. बांगलादेशातील हिंसाचार, अल्पसंख्याकांवरील हल्ले आणि भारतासोबत बिघडलेले संबंध याला युनूस सरकारच जबाबदार असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकांवर भाष्य करताना हसीना यांनी इशारा दिला की, अवामी लीगला डावलून होणारी निवडणूक ही मुक्त […] The post बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार- शेख हसीना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:55 pm

ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे होणार उड्डाण! एएसटी स्पेस मोबाइल सोबत इस्रोचा करार

चेन्नई : वृत्तसंस्था इस्रो आगामी एलव्हीएम ३ एम ६ मोहिमेच्या अंतर्गत ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा दूरसंचार क्षेत्रासाठीचा उपग्रह अंतराळात २४ डिसेंबरला प्रक्षेपित करणार आहे. त्यासंदर्भात अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोने करार केला आहे. हा अत्याधुनिक उपग्रह जगभरातील स्मार्टफोनना हाय-स्पीड सेल्युलर ब्रॉडबँड पुरवण्यासाठी बनविण्यात आला आहे. एएसटी स्पेस मोबाइल ही स्मार्टफोन सेवा देणारी, स्पेस-बेस्ड ब्रॉडबँड नेटवर्क उभारणारी […] The post ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे होणार उड्डाण! एएसटी स्पेस मोबाइल सोबत इस्रोचा करार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:54 pm

एक बॅक्टेरिया कमी करु शकेल वाढलेलं वजन!

न्यू यॉर्क : वृत्तसंस्था वजन वाढणं आता फारच गंभीर आणि मोठी समस्या बनली आहे. पण वजन कमी करणं आणि कमी केलेलं वजन नियंत्रित ठेवणं तसं फारच अवघड काम आहे. वजन कमी करण्यासाठी लोक डाएट करतात, व्यायाम करतात. पण फायदा मिळतोच असं नाही. अमेरिकेतील संशोधकांनी एका अशा बॅक्टेरियाचा शोध लावलाय, जो वजन कमी करू शकतो. हा […] The post एक बॅक्टेरिया कमी करु शकेल वाढलेलं वजन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:52 pm

रशिया-युक्रेन युद्धाचा चक्रव्यूह; २६ भारतीय ठार, ५० अडकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दुस-या महायुद्धानंतरचे सर्वात भीषण आणि प्रदीर्घ चाललेले रशिया-युक्रेन युद्ध आता भारतीय कुटुंबांसाठी चिंतेचा विषय बनले आहे. रशियन सैन्यात भरती झालेल्या २०२ भारतीयांपैकी तब्बल २६ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, अजूनही ५० भारतीय तरुण रशियाच्या युद्धभूमीवर मृत्यूशी झुंज देत असून त्यांना मायदेशी परत […] The post रशिया-युक्रेन युद्धाचा चक्रव्यूह; २६ भारतीय ठार, ५० अडकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:50 pm

मॉस्कोत बॉम्बस्फोट रशियन जनरल ठार; पुतीनला धक्का

मॉस्को : वृत्तसंस्था युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा धक्का बसला आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या संशयित कार बॉम्ब स्फोटात रशियन लष्कराचे वरिष्ठ लेफ्टनंट जनरल फानिल सरवारोव यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार(२२ डिसेंबर) रोजी घडली. या हल्ल्यामागे युक्रेनच्या गुप्तचर संस्थेचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लेफ्टनंट जनरल फानिल सरवारोव हे […] The post मॉस्कोत बॉम्बस्फोट रशियन जनरल ठार; पुतीनला धक्का appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:49 pm

आयटी ते शेती : भारत-न्यूझिलंड यांच्यात अखेर मुक्त व्यापार करार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताने आता इतर देशांसोबत हात मिळवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांनी ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करारा’वर वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. मे महिन्यात सुरू झालेली ही चर्चा अवघ्या ७ महिन्यांत यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, यामुळे दोन्ही देशांतील वस्तू आणि सेवांच्या […] The post आयटी ते शेती : भारत-न्यूझिलंड यांच्यात अखेर मुक्त व्यापार करार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:48 pm

२९ देशांतील अमेरिकन  राजदूत तातडीने माघारी 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच आपल्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाची अंमलबजावणी आक्रमकपणे सुरू केली आहे. ट्रम्प प्रशासनाने एक मोठा निर्णय घेत जगभरातील २९ देशांमध्ये तैनात असलेल्या आपल्या राजदूतांना आणि वरिष्ठ मुत्सद्द्यांना तडकाफडकी माघारी बोलावले आहे. ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या राजदूतांची नियुक्ती बायडेन प्रशासनाच्या काळात झाली होती, त्यांची सेवा जानेवारीमध्ये […] The post २९ देशांतील अमेरिकन राजदूत तातडीने माघारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 8:46 pm

लतादीदी मंगेशकर कुटुंबाच्या आई होत्या:आदिनाथ मंगेशकर यांनी पुरस्कार सोहळ्यात आठवणी जागवल्या

माय होम इंडिया आणि एमआयटी डब्ल्यूपीयु स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लता मंगेशकर पुरस्कार सोहळा २०२५ नुकताच पुण्यात पार पडला. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयु कॅम्पसच्या स्वामी विवेकानंद सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे सुपुत्र आदिनाथ मंगेशकर यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. आदिनाथ मंगेशकर म्हणाले, लता दीदी या मंगेशकर कुटुंबाच्या आई होत्या. त्यांच्याबद्दल बोलणे अशक्य आहे, कारण आमचे कुटुंब एकत्र असल्याने त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. आजही आमचा दिवस त्यांच्या गाण्याने सुरू होतो आणि त्यांच्या गाण्यानेच संपतो. या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून 'गप्पाष्टक'कार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते. एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, डॉ. विशाल घुले, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा, माय होम इंडियाच्या उपाध्यक्षा पौर्णिमा मेहता, विश्वस्त आनंद देवधर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभय थिटे यांची विशेष उपस्थिती होती. लता मंगेशकर पुरस्कार २०२५ अंतर्गत डॉ. मृदुला दाढे, डॉ. शंतनु गोखले, विजय केळकर (अण्णा), जीवन धर्माधिकारी आणि श्रीकांत शिर्के यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि शाल असे होते. हा पुरस्कार सोहळ्याचे चौथे वर्ष होते. या प्रसंगी लता मंगेशकर यांच्या अजरामर संगीताला अभिवादन करणारी ‘सुनो सजना’ ही विशेष स्वरमैफलही आयोजित करण्यात आली होती. डॉ. संजय उपाध्ये यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माणसाची चांगली सवय ही परंपरा होते आणि ती संपूर्ण देशाला लागली की संस्कृती होते. संगीताच्या समृद्ध परंपरेची मंगेशकर कुटुंबाची संस्कृती आपल्या देशाला लाभली आहे. विविध कार्यक्रमांचे निवेदन करताना मंगेशकर कुटुंबाशी निगडीत अनेक आठवणी आपल्याकडेही असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. मृदुला दाढे आणि विजय केळकर यांनी गीतांच्या सादरीकरणाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 8:02 pm

केडीएमसीमध्ये महायुतीला तडा?:एकनाथ शिंदे म्हणतात ‘एकत्र’, तर रवींद्र चव्हाणांचा ‘स्वबळा’चा नारा; राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असली, तरी कल्याण-डोंबिवलीत मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी निवडणूक स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर बोलताना रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना आक्रमक पवित्रा घेण्याचे निर्देश दिले. ज्याप्रमाणे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, तसेच सरकार आपल्याला महापालिकेतही आणायचे आहे. त्यामुळे यावेळेस जो उमेदवार 'कमळ' चिन्हावर उभा राहील, त्यालाच मतदान करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. विशेष म्हणजे, त्यांनी हे विधान विचारपूर्वक केल्याचे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही स्पष्ट केले. 122 जागांवर भाजपचा डोळा? कल्याण-डोंबिवलीत भाजपच्या 10-10 हजार कार्यकर्त्यांमधून केवळ 122 निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. या विधानाचा अर्थ भाजप सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार, असाच काढला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड वगळता सर्वत्र महायुती एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र चव्हाणांच्या या भूमिकेमुळे 'केडीएमसी'मध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ग्रामीण भागात चांगली कामगिरी केली असली, तरी त्यांच्या बालेकिल्ल्याला लागून असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. बदलापूर आणि अंबरनाथमधील शिवसेनेचा हा पराभव खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. याच यशाच्या जोरावर आता भाजपने कल्याण-डोंबिवलीतही शिंदेंच्या शिवसेनेला बाजूला सारून स्वबळाची तयारी सुरू केली आहे. खासदार श्रीकांत शिंदेंची अडचण वाढणार? कल्याण-डोंबिवली हा भाग खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असल्याने या ठिकाणच्या महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळाची भूमिका त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. केंद्रात आणि राज्यात 'डबल इंजिन' सरकार असताना स्थानिक स्वराज्य संस्थेतही 100 टक्के भाजपचाच विचार हवा, असा आग्रह रवींद्र चव्हाण धरत असल्याने महायुतीमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:54 pm

बांगलादेशात हिंदू व्यक्तीची अमानुष हत्या:संयुक्त राष्ट्रसंघाने लक्ष घालावे: मानवाधिकार परिषदेची मागणी

बांगलादेशातील मयमनसिंह येथे एका हिंदू व्यक्तीच्या अमानुष हत्येचा भारतीय मानवाधिकार परिषद, पुणेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. परिषदेने संयुक्त राष्ट्रसंघासह मानवाधिकार आयोगाने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांवरील अन्यायाकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि परिषदेचे सल्लागार ॲड. आशिष सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष अविनाश मोकाशी, मानवाधिकार समन्वयक चिंतन मोकाशी आणि मनोज भालेराव उपस्थित होते. ॲड. सोनवणे म्हणाले की, बांगलादेशातील हिंदू व्यक्तीच्या या अमानुष हत्येमुळे देशातील अस्थिर राजकीय संक्रमणाच्या काळात हिंदू अल्पसंख्याकांची सततची असुरक्षा आणि वंशनाश अधोरेखित होतो. अंतरिम प्रशासनाने या क्रूर गुन्ह्यात सहभागी असलेल्या कोणालाही सूट दिली जाणार नाही असे सार्वजनिकरीत्या घोषित केले असले तरी, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच दिसत आहे. दोषींना त्वरित न्यायाच्या कठड्यावर उभे करण्याऐवजी, शासनयंत्रणा दंगेखोर आणि द्वेष पसरवणाऱ्या घटकांना अप्रत्यक्ष पाठबळ देत असल्याचे दिसून येते. कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि पोलिस प्रशासन निर्णायक कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत. तपास प्रक्रिया अस्पष्ट राहते आणि खटले व शिक्षा दुर्मीळ आहेत. काही लोकांना अटक करून कालांतराने सोडून दिले जाते, ज्यामुळे हल्लेखोरांचे धैर्य वाढले असून त्यांना कायद्याचे कोणतेच भय उरलेले नाही, असे सोनवणे यांनी नमूद केले. मनोज भालेराव यांनी सांगितले की, भारतीय मानवाधिकार परिषदेचे असे निरीक्षण आहे की ही हत्या त्या देशातील व्यापक मानवाधिकार उल्लंघनांच्या पॅटर्नचा भाग आहे. या संदर्भात, संयुक्त राष्ट्रसंघाने बांगलादेशात स्थायी मानवाधिकार कार्यालय स्थापन करावे आणि मयमनसिंह हत्याकांड व इतर व्यापक उल्लंघनांबाबत निष्पक्ष तथ्य-शोधन मिशन सुरू करावे, अशी परिषदेची मागणी आहे. तसेच, भारत सरकारने मानवाधिकार उल्लंघनांस जबाबदार व्यक्ती व संस्थांवर लक्ष्यित निर्बंध (प्रवासबंदी आणि मालमत्ता गोठवणे) लागू करावेत. कायदा व नियमांनुसार सूचित केलेल्या चौकटीत सीएए (CAA) यंत्रणा प्रभावीपणे राबवाव्यात, जेणेकरून भारतात आश्रय घेतलेल्या/संरक्षणासाठी अर्ज करणाऱ्या छळग्रस्त अल्पसंख्याकांना दिलासा मिळेल. नागरिकत्व पडताळणी आणि सीमा व्यवस्थापन यंत्रणा कायदेशीर चौकटीत अधिक सक्षम कराव्यात. बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीवर कायद्यानुसार त्वरित आणि कठोर कारवाई करावी; बनावट कागदपत्र रॅकेट ओळखून त्यांच्यावर खटले दाखल करावेत; आणि बेकायदेशीररीत्या राहणाऱ्यांचे विधिसम्मत प्रत्यावर्तन/हद्दपारी करताना, सीएए चौकटीत पात्र छळग्रस्तांचे संरक्षण सुनिश्चित करावे, अशीही मागणी परिषदेने केली. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येऊन या अत्याचारांचा निषेध करावा, उल्लंघनांचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या नागरिक समाज संस्थांना पाठबळ द्यावे आणि पीडितांसाठी मानवीय मदत व कायदेशीर सहाय्य सुनिश्चित करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:46 pm

पुणे पुस्तक महोत्सवात 30 लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री:50 कोटींची उलाढाल, साडेबारा लाख नागरिकांची उपस्थिती

पुणे पुस्तक महोत्सवाला यंदा साडेबारा लाख नागरिकांनी भेट दिली. या महोत्सवात सुमारे ३० लाखांहून अधिक पुस्तकांची खरेदी झाली असून, त्यातून ५० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि खरेदीदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित पुणे पुस्तक महोत्सव २०२५ ची रविवारी सांगता झाली. या महोत्सवाच्या माहितीसाठी पुणे पुस्तक महोत्सव संयोजन समितीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी राजेश पांडे यांच्यासह समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस आणि डॉ. आनंद काटीकर उपस्थित होते. पांडे यांनी सांगितले की, महोत्सवाला भेट दिलेल्या साडेबारा लाख नागरिकांमध्ये तरुण-तरुणी आणि शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा महोत्सव यशस्वी ठरला आहे. मोबाईल आणि गॅजेट्सच्या दुनियेतून बाहेर पडून नागरिक आणि तरुण पुस्तकांमध्ये रमल्याचे सकारात्मक चित्र येथे दिसले. लेखकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या स्वाक्षरीसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा हे पुण्याच्या जागृत वाचन संस्कृतीचे द्योतक आहे. गेल्या वर्षी सुमारे २५ लाख पुस्तकांची खरेदी झाली होती, ज्यामुळे ४४ कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. यंदा हे प्रमाण वाढले असून, नागरिकांनी ३० लाखांहून अधिक पुस्तके खरेदी केली आहेत, ज्यामुळे ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली आहे. पुस्तक खरेदी करणाऱ्यांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा समावेश होता. या महोत्सवात एकूण तीन विश्वविक्रम नोंदवले गेले, ज्यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पांडे यांनी नमूद केले की, पुणे आता पुस्तकांच्या खरेदीसाठी एक मोठी बाजारपेठ बनले आहे. राज्यभरातून अनेक नागरिक पुस्तक खरेदीसाठी आले होते. हा महोत्सव केवळ संयोजकांचा नसून, नागरिकांचा महोत्सव बनला आहे. महोत्सवात सर्व भाषिक पुस्तकांची दालने असल्याने, विविध भाषिक नागरिकांचा सहभाग होता. यंदा अनेक कुटुंबे एकत्र महोत्सवाला भेट देण्यासाठी आली, ही एक सकारात्मक बाब आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, पुणे लिट फेस्टिव्हल आणि चिल्ड्रेन कॉर्नर या तिन्ही ठिकाणी मोठा उत्साह दिसून आला. पुढील वर्षी पुणे पुस्तक महोत्सव १२ ते २० डिसेंबर २०२६ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:45 pm

मुंबईत भाजपला रोखण्यासाठी 'मविआ'ची मोर्चेबांधणी:संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन; ठाकरे-राज युतीही अंतिम टप्प्यात

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुंबईत भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष कमालीचा आग्रही असल्याचे दिसत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी विरोधी पक्षांच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ नये, ही ठाकरे गटाची मुख्य भूमिका आहे. काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिला असला, तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्यास भाजपचा पराभव करणे सोपे जाईल, असे मत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याकडे मांडले आहे. भाजपला रोखण्यासाठी आपण एकत्र लढूया, असे आवाहन राऊत यांनी या संवादादरम्यान केल्याचे माहिती आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार? एकीकडे काँग्रेसला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुंबईच्या राजकारणात 'ठाकरे बंधू' एकत्र येण्याचे संकेत मिळत असून, आज किंवा उद्या या दोन पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही पाठिंबा या नव्या राजकीय समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे. शरद पवार यांचा पक्ष ठाकरे बंधूंसोबत महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. जर काँग्रेसनेही या आघाडीला साथ दिली, तर मुंबईत भाजपविरुद्ध 'महाविकास आघाडी' अधिक प्रबळ होण्याची चिन्हे आहेत. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्वसमावेशक आघाडीचा पवित्रा घेतला आहे. आता राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष या प्रस्तावावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:33 pm

लॅपटॉप भाड्याने देण्याच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक:दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल, 534 लॅपटॉप परत केले नाहीत

पुण्यात एका दाम्पत्याने खासगी कंपनीसाठी लॅपटॉप भाड्याने घेण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची १ कोटी २४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर शिवाजी पाटेकर आणि नूतन ज्ञानेश्वर पाटेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. त्यांनी व्यावसायिकाकडून ५३४ लॅपटॉप भाड्याने घेतले होते, परंतु ते परत केले नाहीत किंवा त्याचे भाडेही दिले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात आरोपी दाम्पत्याशी ओळख झाली होती. आरोपींनी त्यांना सांगितले की, एका खासगी कंपनीला मोठ्या संख्येने लॅपटॉप भाड्याने हवे आहेत आणि प्रत्येक लॅपटॉपसाठी दरमहा १५ ते २५ हजार रुपये भाडे मिळेल. या आमिषाला बळी पडून व्यावसायिकाने आपले ५३४ लॅपटॉप दाम्पत्याला दिले. वर्षभरात दाम्पत्याने ना लॅपटॉपचे भाडे दिले, ना लॅपटॉप परत केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक एस. वाघमारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दागिने पॉलिशच्या बतावणीने ज्येष्ठ महिलेची फसवणूक दागिने पॉलिश करून देण्याच्या बतावणीने चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेकडील एक लाख ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना दांडेकर पूल परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला दांडेकर पूल परिसरात राहायला आहेत. त्या दांडेकर पूल परिसरातून निघाल्या होत्या. जय महाराष्ट्र मंडळाजवळ तीन चोरट्यांनी त्यांना अडवले आणि दागिने पॉलिश करुन देण्याची बतावणी केली. चोरट्यांनी त्यांच्याकडील एक पितळ्याच्या वस्तूवर द्रवपदार्थ ओतला. पितळ्याची वस्तू चमकायला लागली. ज्येष्ठ महिलेकडील सोन्याच्या दोन बांगड्या चोरट्यांनी मागितल्या. पॉलिश करण्याचा बहाणा करुन चोरटे एक लाख ८० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लांबवून पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक एन महाले तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:19 pm

हिंगोलीचे पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली:दहशतवाद विरोधी पथकाचे निलभ रोहन सांभाळणार जिल्ह्याची धुरा

हिंगोलीचे पोलिस अधिक्षक डॉ. श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली झाली असून त्याच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे अधिक्षक निलभ रोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी ता. २२ काढण्यात आले आहेत. हिंगोली येथे ता. १४ ऑगस्ट २०२४ रोजी रुजू झालेल्या पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच गुुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळेच जिल्हयात गु्न्हयाचे प्रमाण कमी झाले. या शिवाय दाखल झालेले गुन्हे निकाली काढण्यासाठी त्यांनी वेळोवेळी तपास अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शनही केले. गंभीर गुन्हयाच्या प्रसंगी स्वतः भेट देऊन त्यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे खून, चोरी सारखे गुन्हे तातडीने उघड करण्यात यश आले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा मोलाचा वाटा आहे. या शिवाय कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याचा त्यांचा हातखंडा होता. जिल्हयात सर्वच सण, उत्सव शांततेत पार पाडण्याचे त्यांचे नियोजन वाखणण्या जोगे होते. त्यामुळेच जिल्हयात कायदा व सुव्यवस्था टिकून राहिली. या शिवाय अवैध व्यवसायावरही त्यांनी अंकुश लावला होता. जिल्हयातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी त्यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले. त्यामध्ये त्यांना मोठे यशही मिळाले आहे. हिंगोली नगर पालिका निवडणुकीच्या काळातच त्यांची बदली होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र निवडणुकीमुळे त्यांच्या बदलीला ब्रेक लागला होता. मात्र मतमोजणीच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी ता. २२ त्यांच्या बदलीचे आदेश धडकले आहेत. दरम्यान, नव्याने रुजू होणारे पोलिस अधिक्षक निलभ रोहन हे छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असून एक महिन्यापुर्वीच त्यांनी तेथील पदभार घेतला होता. त्यानंतर त्यांची हिंगोलीत बदली झाली आहे. पोलिस अधिक्षक पदावर त्यांची पहिलीच नियुक्ती असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 7:12 pm

सिंधुदुर्गात बाहेरचे, घरचे सगळे फॅक्टर होते:युती का झाली नाही याचे उत्तर नीलेशजींकडेच, कणकवलीच्या पराभवावर नितेश राणे स्पष्टच बोलले

नगरपालिकेच्या निवडणुकांचा रविवारी निकाल लागला आणि महायुतीने विशेषतः भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळाली. परंतु, महाविकास आघाडीला या निवडणुकीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान, भाजपला देखील अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. मंत्री राणेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे कणकवली येथे सुद्धा भाजपचा पराभव झाला आहे. याविषयी मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात ज्या काही चार नगरपालिका होत्या, त्यात प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढला. एक चांगली बाब अशी आहे की भाजप म्हणून आज सिंधुदुर्गमध्ये आमचे 41 नगरसेवक निवडून गेले आहेत आणि 2 नगराध्यक्ष आहेत. जे काही कणकवलीमध्ये झाले त्याचे विचार आम्ही करत आहोत. तिथे सगळे फॅक्टर होते, घरचे, बाहेरचे, या सगळ्या विषयांवर आम्ही चर्चा करत आहोत. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, कणकवली हा नारायण राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे. त्यांचे जन्मस्थान सुद्धा हेच आहे आणि त्याच कणकवलीमध्ये सन्माननीय राणे साहेबांच्या अवतीभवती ज्या काही निवडणुका झाल्या आणि त्यावर जे काही झाले, प्रचार, अपप्रचार झाला, गैरसमज पसरवण्यात आला. आज कणकवलीमध्ये राणे साहेबांचाच खंदा कार्यकर्ता समीर नलावडे यालाच पाडले गेले आणि ते सुद्धा राणे साहेबांच्याच कुटुंबाच्या मदतीने. या सगळ्यावर निश्चितपणे बोलले जाईल आणि विस्तृतपणे माहिती दिली जाईल. युती का झाली नाही याचे उत्तर नीलेश राणेंकडेच आहेत शिवसेना शिंदे गटाचे नेते नीलेश राणे यांनी असे म्हटले होते की सिंधुदुर्गात राणे साहेबांचा शब्द पाळला गेला नाही. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, मुळात महायुती का झाली नाही, याचा विचार आदरणीय नीलेशजींनी करायला पाहिजे. त्यांच्याकडेच उत्तर देखील आहेत. नीलेश राणे यांना आमदार बनवण्यात भाजपच्या तसेच शिवसेनेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता. मग 11 महिन्यात, आमदार झाल्यापासून आत्तापर्यंत ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना वागवले गेले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटले की आम्हाला धमक्या शिव्या-शापच दिल्या जात असतील तर त्यांचे म्हणणे झाले की आम्ही आमचा अपमान सहन करत आलो आहोत, मग आम्ही त्यांच्यासोबत युती का करावी? त्यामुळे स्वबळाचा निर्णय घेण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 5:51 pm

सांगलीत भीषण स्फोट

सांगली : प्रतिनिधी सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे फटाके कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. शोभेच्या दारूचा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की भाळवणीसह आसपासच्या पाच किलोमीटर परिसरात जमीन संपूर्णत: हादरली आहे. तसेच आसपासच्या वाहनांना आणि घराच्या काचांना तडे गेले आहेत. या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात दोन लोक गंभीर […] The post सांगलीत भीषण स्फोट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 5:33 pm

संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडला हायकोर्टाचा दणका!

बीड : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर समोर आलेले फोटो, व्हीडीओ आणि धक्कादायक खुलाशांमुळे बीड जिल्हा सातत्याने चर्चेत राहिला. या प्रकरणात अनेक गंभीर आरोप समोर आले असून, राजकीय वर्तुळातही मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले […] The post संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराडला हायकोर्टाचा दणका! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 5:24 pm

युपीत काँग्रेसचा 'आरपार'चा लढा:403 जागांवर शड्डू ठोकून योगींच्या किल्ल्याला सुरुंग लावणार; अजय राय यांचा 'दिव्य मराठी'शी संवाद

उत्तर प्रदेशात गेल्या अनेक दशकांपासून प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांच्या आधारे राजकीय अस्तित्व टिकवून असलेली काँग्रेस आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. 2027 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 403 जागांवर स्वबळावर लढण्याचा आक्रमक प्लॅन काँग्रेसने आखला असून, याद्वारे भाजपच्या वर्चस्वाला थेट सुरुंग लावण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईत उत्तर भारतीय सेलच्या कार्यक्रमासाठी आलेले यूपी प्रभारी अविनाश पांडे आणि प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी 'दिव्य मराठी'शी संवाद साधताना भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. पांडे म्हणाले की, जानेवारीपासून यूपीत पुढच्या दोन महिन्यांत 17 पेक्षा जास्त भव्य सभा घेतल्या जातील. मोदी-योगींच्या जोडीचा मिथक लोकसभेतच मोडला आहे, आता विधानसभेत भाजपला धूळ चारण्याची वेळ आली आहे. तगडी मोर्चेबांधणी आणि बुथ मॅनेजमेंट काँग्रेसने केवळ घोषणाच केल्या नाहीत, तर जमिनीवरही काम सुरू केले आहे. आतापर्यंत 1.69 लाख बीएलए (बूथ लेव्हल एजंट) नियुक्त करण्यात आले असून, ते मतदार पडताळणीच्या कामात गुंतले आहेत. याशिवाय, 2 लाख कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरवले आहे. युतीचा अंतिम निर्णय हायस्कूल घेणार असला तरी, काँग्रेसने सर्व 403 जागांवर आपली संघटनात्मक बांधणी पूर्ण केली आहे. प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी थेट शब्दांत भाजपमधील अंतर्गत वादावर बोट ठेवले. योगी आणि मोदींचे सध्या पटत नाहीये. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर उघडा पडला असून, लोक आता पैशांच्या जोरावरही भाजपला मतदान करणार नाहीत. राज्यातील ड्रग्ज आणि कफ सिरप माफियांना भाजपचेच संरक्षण आहे, असा खळबळजनक आरोप राय यांनी केला. मुंबईत 'उत्तर भारतीय' फॅक्टरवर जोर मुंबईतील 40 लाख उत्तर भारतीयांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने विशेष रणनिती आखली आहे. भाजप आणि इतर पक्षांनी या समाजाचा केवळ अपमानच केला, मात्र काँग्रेसनेच उत्तर भारतीयांना महापौर आणि मंत्रीपद देऊन सन्मान दिला, असा दावा पांडे यांनी केला. विशेष म्हणजे, राज ठाकरे आणि मनसेच्या फॅक्टरमुळेच काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत सावध भूमिका घेतल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले. अजय राय यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील प्रमुख मुद्दे: 1) स्थानिक निवडणुकांबाबत भूमिका: उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय राय यांनी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना महाविकास आघाडीच्या मजबुतीवर भर दिला. भाजपच्या विलंबाच्या धोरणावर टीका करत, लोकशाहीत स्थानिक निवडणुका वेळेवर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. 2) कोडीनयुक्त कफ सिरप घोटाळ्याचा पर्दाफाश: कफ सिरपमधील अंमली पदार्थांच्या तस्करीचा आणि त्यातील कथित घोटाळ्याचा मुद्दा राय यांनी आक्रमकपणे मांडला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली, तसेच याचा तरुणांच्या आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. 3) भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर प्रहार: भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षावर आणि सत्तासंघर्षावर त्यांनी निशाणा साधला. भाजपमधील गटबाजीमुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होत असून, जनतेचे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचा दावा त्यांनी केला. 4) संघटनात्मक मजबुतीवर भर: आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधण्यावर आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर चर्चा केली.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 5:22 pm

आत्मचिंतनाची गरज;बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील नगरपालिका, नगर परिषदेचा निकाल समोर आला आहे. या निकालात भाजपा नंबर वनचा पक्ष म्हणून पुढे आली आहे. परंतु ज्याठिकाणी भाजपाचा गड मानला जातो त्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला. त्यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट भाष्य करत आम्हाला […] The post आत्मचिंतनाची गरज;बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 5:21 pm

ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही : मुनगंटीवार यांचा भाजपला घरचा आहेर

चंद्रपूर : प्रतिनिधी राज्यात भाजपने नगर परिषद निवडणुकीत मोठे यश मिळवले असले तरी, चंद्रपूरमधील निकालाने पक्षांतर्गत वादाला तोंड फोडले आहे. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारल्याने मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झाले आहेत. दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम असल्याचे म्हणत भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्रिपद असो वा मंत्रिपद, […] The post ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही : मुनगंटीवार यांचा भाजपला घरचा आहेर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 5:19 pm

रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून संभाजीनगरात उद्धव सेनेत वाद:चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध, म्हणाले- 'तिकीट मिळू देणार नाही'

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात माजी महापौर रशीद मामू यांच्या प्रवेशावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. रशीद मामूंना कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळू देणार नाही, अशी ठाम भूमिका खैरे यांनी घेतली आहे. खैरे यांच्या मते, रशीद मामूंनी यापूर्वी शिवसेनेवर दगडफेक केली होती आणि दंगली घडवून शिवसैनिकांना मारहाण केली होती. त्यामुळे अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश देणे आणि तिकीट देणे हे त्यांना मान्य नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर रशीद मामू यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. मात्र, या प्रवेशानंतर शिंदे गट आणि भाजपने 'उबाठा मामू' असे म्हणत उद्धव ठाकरे गटावर टीका करण्यास सुरुवात केली. यामुळे चंद्रकांत खैरे अधिक आक्रमक झाले आहेत. खैरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर रशीद मामू त्यांना भेटण्यासाठी शिवसेना भवनात आले होते. परंतु, चंद्रकांत खैरे यांनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. माझा तुला विरोध आहे, त्यामुळे मला भेटायचे नाही, असे म्हणत खैरे यांनी मामूंना परत पाठवले. शिवसेनाविरोधात दंगल करणाऱ्या व्यक्तीला तिकीट मिळू देणार नाही, या भूमिकेवर खैरे ठाम आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. खैरे यांच्या मते, मामूंच्या प्रवेशामुळे हिंदू मतांचे नुकसान होईल. त्यांनी दावा केला आहे की, यामुळे सुमारे पन्नास हजार मतांचे नुकसान होऊ शकते.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 5:18 pm

काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर:काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष व १००६ नगरसेवक विजयी, हे यश कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारे - सपकाळ

राज्यातील २८८ नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत अत्यंत विपरित परिस्थितीत काँग्रेस पक्षाने विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून सत्ताधाऱ्यांच्या धनशक्तीविरोधात संघर्ष केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक राज्यातील मतदारांनी निवडून दिले. या निकालावरून पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो आणि सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा असतो, हे पुन्हा दिसून आले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, निवडणुकीत विजय पराजय होत असतात. काँग्रेस पक्षाने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत. पराभवाने खचून न जाता मोठ्या उत्साहाने लढण्याची ताकद, ऊर्जा व दृढ निश्चिय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांचा हा विश्वासच पक्ष संघटनेसाठी महत्वाचा असतो. याचा प्रत्यय या निवडणुकीत आला. काँग्रेस पक्षाचे नागपूर विभागात १४ नगराध्यक्ष व ३४० नगरसेवक, अमरावती विभागात ९ नगराध्यक्ष व २३६ नगरसेवक, मराठवाड्यात ५ नगराध्यक्ष व १५६ नगरसेवक, पश्चिम महाराष्ट्रात ३ नगराध्यक्ष आणि ४७ नगरसेवक, उत्तर महाराष्ट्रात २ नगराध्यक्ष व ४७ नगरसेवक आणि कोकण विभागात १ नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवक निवडणूक आले आहेत. यासोबत काँग्रेस समर्थक स्थानिक आघाड्यांचे ७ नगराध्यक्ष व १५४ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसची विचारधाराच देशाला तारणार सपकाळ पुढे म्हणाले, काँग्रेस संपली म्हणणाऱ्यांना या निकालाने चोख उत्तर दिले आहे. काँग्रेसची विचारधारा हीच देशाला तारणारी आहे, जाती धर्माच्या नावावर सामाजिक सलोखा बिघडवून राजकीय पोळी भाजणाऱ्या व पैशाच्या जोरावर सर्व निवडणूका जिंकता येऊ शकतात असा समज जनतेने खोडून काढला आहे. भाजपा व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने पैशाचा प्रचंड वापर करून, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला असला तरी जनतेच्या मनात आजही काँग्रेस आहे व पुढेही ती कायम राहिल. ही विचाराची लढाई आहे आणि काँग्रेस विचारधारेपासून तसूभरही दूर गेलेला नाही. या संघर्षात साथ देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे, प्रत्येक कार्यकर्त्याचे मनापासून अभिनंदन आणि काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो. नगरपालिका निवडणुकीत मिळालेला विजय हा महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ऊर्जा देणारा आहे. महाभ्रष्ट भाजपा महायुतीपासून महाराष्ट्र वाचविण्याचा काँग्रेसचा हा लढा अखंडपणे सुरूच राहील, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 5:13 pm

मी हिटलर नाही, लोकांचा सेवेकरी:आम्ही कधी अहंकार नाही दाखवला; हसन मुश्रीफ यांचा संजय मंडलिक यांच्यावर निशाणा

शिवसेनेचे नेते व माजी खासदार संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 'हिटलर' म्हणत टीका केली होती. यावर हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मी हिटलर नसून सेवक आहे. गेली 21 वर्षे मंत्री असूनही कधी अहंकार दाखवला नाही आणि इतकी मस्ती कधी दाखवली नाही, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच मी आणि समरजित घाटगे एकत्र आल्यानेच आपल्या राजकारणाचे काय होईल या भीतीनेच अशी भाषा येत असावी, अशीही टीका मुश्रीफ यांनी केली आहे. तसेच वीरेंद्र मंडलिक यांच्या गोकुळमध्ये झालेल्या पराभवावर बोलताना देखील हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिले आहे. जसे तुम्ही प्रत्येक निवडणुकीत करता तशी शिकवण आमच्या वडीलधाऱ्यांनी दिलेली नाही. राजकारणात प्रामाणिक आणि विश्वासार्हतेचे दुसरे नाव म्हणजे हसन मुश्रीफ असे म्हणत मुश्रीफ यांनी संजय मंडलिक यांना टोला लगावला आहे. मी हिटलर नाही, लोकांचा सेवेकरी संजय मंडलिक यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले, मी हिटलर नाही, लोकांचा सेवेकरी आहे. राजकारणात समाजकारणात असताना आम्हाला कधी मस्ती आली नाही. आमच्या मागे बापजाद्यांची पुण्याई नाही. आमचे वडील ना खासदार, ना आमदार होते. मी जनतेच्या विश्वासावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर मोठा झालेला आहे आणि हे मी कधीच विसरत नाही. मी 21 वर्षे मंत्री आहे, मात्र कधी अहंकार दाखवला नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले. माझी आणि समरजित घाटगे यांची युती त्यांना आवडलेली नाही पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, माझी आणि समरजित घाटगे यांची युती त्यांना आवडलेली नाही, रुचलेली नाही. भविष्यात आपल्या राजकारणाचे काय होईल याची भीती त्यांना वाटत असेल. विधानसभा निवडणुकीदरम्यान मी म्हणालो होतो गोकुळची मतपेटी आपण आज देखील खोलूया. त्या ठिकाणी कळेल कोणी कोणाला किती मते दिली आहेत. जसे ते निवडणुकीमध्ये अनेकवेळा करतात तशी शिकवण आमच्या वडीलधाऱ्यांनी दिली नाही. राजकारणात प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता याचे दुसरे नाव हसन मुश्रीफ आहे, असे मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, कागल नगपालिकेच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी एकहाती सत्ता मिळवली. कागलमध्ये शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव झाला असून 23 पैकी 23 जागा जिंकत शिंदे गटाचा सफायाच करून टाकला आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदी सविता प्रताप माने विजयी झाल्या आहेत. मात्र, मुरगुड नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाने यश मिळवत सत्ता खेचली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 5:06 pm

अजित पवारांची NCP नाशिकमध्ये पूर्णतः हतबल:मंत्री गिरीश महाजनांनी युतीच्या चर्चेसाठी 5 मिनिटांचाही वेळ दिला नाही

भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी युतीची चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 5 मिनिटांचीही वेळ दिली नाही. त्यामुळे अजित पवारांचा पक्ष नाशिक जिल्ह्यात भाजपपुढे अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र आहे. राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनीती ठरवण्यात व्यस्त आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला भाजप आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यात महापालिका निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही युतीची चर्चा करण्यासाठी बैठकस्थळी पोहोचले. पण गिरीश महाजनांनी मंत्री नरहरी झिरवळ, आमदार हिरामण खोसकर, माजी खासादर समीर भुजबळ या सर्वांना भेटीसाठी वेटिंगवर ठेवले. बराच वेळ बाहेर बसूनही त्यांनी या नेत्यांना भेटीची वेळ दिली नाही. त्यामुळे हिरामण खोसकर व नरहरी झिरवळ यांच्याकडून महाजनांना चर्चेसाठी किमान 5 मिनिटांची वेळ द्या अशी विनंती करण्यात आली. पण गिरीश महाजन युतीची चर्चा न करताच मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तत्पू्र्वी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कारबाहेर उभे राहूनही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण महाजन थांबले नाही. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्यात भाजपपुढे अक्षरशः हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. नाशिकमध्ये ठाकरे - मनसेची युती दुसरीकडे, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीची औपचारिक घोषणा लवकरच लवकरच केली जाणार आहे. नाशिकचे मनसेचे स्थानिक पदाधिकारी व ठाकरे गटाची आज येथे बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाच्या मुद्यावर अंतिम हात फिरवण्यात आला. त्यानंतर उद्या किंवा परवा येथे ठाकरे गटाची युती होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा... अजित पवार पुण्यात करणार काँग्रेसशी आघाडी?:सतेज पाटलांशी फोनवरून साधला संवाद; भाजपला कोंडीत पकडण्याचा टाकणार डाव सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यात उभय नेत्यांत संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 5:05 pm

मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद काहीच शाश्वत नाही:सुधीर मुनगंटीवार यांचा फडणवीस अन् बावनकुळेंवर निशाणा; चंद्रपूरचा पराभव जिव्हारी

काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड मुसंडी मारल्यामुळे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार प्रचंड आक्रमक झालेत. त्यांनी या प्रकरणी 'मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद काहीही शाश्वत नसते' असे तिखट मत व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेषतः त्यांनी बावनकुळेंना त्यांच्या पडत्या काळाचीही आठवण करून दिली आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दैदिप्यमान यश मिळाले. पण चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. येथे काँग्रेसचे 11 पैकी 8 जागांवर नगराध्यक्ष निवडून आले. यामुळे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मुनगंटीवार यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मी कधीच नाराज असत नाही. माझ्या आयुष्यात महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली आहे. पण भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी माझी आहे. कार्यकर्ते जे भूमिका माझ्यापर्यंत पोहोचवतात ते सांगण्याची जबाबदारी माझी आहे. ती जबाबदारी व्यवस्थितपणे मी पार पाडतो. मला मंत्रिपद नाकारण्यात आले. त्याची नाराजी माझ्यात नव्हे तर येथील जनतेत आहे. मंत्रिपद येते आणि जाते. मुख्यमंत्रीपदही ज्यांचे आहे त्यांचे येणार आहे जाणारही आहे. पर्मनन्ट कुणीही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नाही. बावनकुळेंना करून दिली पडत्या काळाची आठवण सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रिपद नसण्याचा व पराभवाचा थेट संबंध नसतो या विधानाचाही समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आता असे वाटणे साहजिक आहे. पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती करण्यात आली होती, तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते, असे ते बावनकुळेंना त्यांच्या पडत्या काळाची आठवण करून देताना म्हणाले. आत्ता पाहू पराभवानंतर काय म्हणाले होते मुनगंटीवार? उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने विदर्भातील 100 पैकी 55 जागा जिंकल्या. पण चंद्रपूरमध्ये अगदी उलट झाले. जिल्ह्यातील 11 पैकी तब्बल 8 जागांवर काँग्रेसचा झेंडा फडकला. येथे भाजपला अवघ्या 2 नगराध्यक्षांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवर यांनी या पराभवाचे खापर पक्षाच्या धोरणांवर फोडले होते. पक्षाने माझी शक्ती कमी केली. मी हा पराजय नम्रपणे स्वीकारतो. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. पण माझ्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. या जिल्ह्यात गटबाजीला पोषक वातावरण तयार होईल हे आमच्या पक्षाच्या धोरणात दिसले, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका सुधीर मुनगंटीवारांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले, पक्षाला दारच असू नये. पक्षाची दारे कोणत्याही समाजासाठी, कोणत्याही व्यक्तीसाठी बंद असू नये. पक्ष हा बिनदाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देताना व्यक्ती योग्य आहे की अयोग्य, पक्षाला त्याचा काही फायदा होईल की नाही हे आपण पाहिले पाहिजे. पक्षाने काही लोकांना प्रवेश दिला असेल तर त्याचा फायदाच झाला आहे. समजा सुधीरभाऊना काही ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई आम्ही महापालिका निवडणुकीत करू. पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महापालिका निवडून आणू, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 4:30 pm

महायुतीत भागीदार वाढवू नका : आठवले

पुणे : प्रतिनिधी रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षाचा सच्चा सहकारी आणि महायुतीतील भागीदार आहे. महायुती परिपूर्ण झाली असून यापुढे त्यात भागीदार वाढवू नका,असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन […] The post महायुतीत भागीदार वाढवू नका : आठवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 4:06 pm

‘लवासा’प्रकरणी पवार कुटुंबाला क्लीन चिट

पुणे : प्रतिनिधी जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्पाच्या निर्मितीत भ्रष्टाचार आणि अधिकारांचा गैरवापर झाल्याच्या आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाने आज अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची लवासाप्रकरणी सीबीआय […] The post ‘लवासा’प्रकरणी पवार कुटुंबाला क्लीन चिट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 4:04 pm

कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजुन निर्णय नाही:संजय राऊतांचा सुप्रीम कोर्टावर संताप, मनसे-ठाकरे गटातील जागा वाटपही अंतिम टप्प्यात

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता 'ठाकरे' बंधूंच्या युतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. सोमवारी 'मातोश्री' निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मॅरेथॉन बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील जागावाटपाचा मोठा तिढा काही प्रमाणात सुटला आहे. विशेषतः शिवडी विधानसभा मतदारसंघातील जागावाटपावर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून, उर्वरित मुंबईतील प्रभागांसाठीही वेगाने चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीवर टीका करत, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आता फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. महापालिकेतील जागावाटपासाठी 'मातोश्री'वर झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, ठाकरे गटाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. शिवडी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 203, 204 आणि 205 या तीन जागांवरून सुरू असलेली ओढाताण आता थांबली आहे. ठरलेल्या सूत्रानुसार, शिवडीतील दोन प्रभाग ठाकरे गटासाठी तर एक प्रभाग मनसेसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर-माहीममधील वॉर्डवर दोन्ही पक्षांचा दावा शिवडीचा पेच सुटल्यानंतर आता सर्वांचे लक्ष दादर, माहीम, भांडूप आणि विक्रोळी या मराठीबहुल पट्ट्याकडे लागले आहे. विक्रोळी आणि भांडुपमधील वॉर्ड क्रमांक 109, 110, 114 आणि 115 या चार जागांवर, तसेच दादर-माहीममधील 192, 193 आणि 194 या तीन वॉर्डांवर दोन्ही पक्षांनी आपला दावा सांगितला आहे. या संदर्भात विशाखा राऊत, आमदार सुनील राऊत, खासदार संजय दिना पाटील हे मनसेच्या नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर यांच्याशी सविस्तर चर्चा करत आहेत. युतीच्या घोषणेसाठी नियोजन सुरू मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या अधिकृत घोषणा करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून एका भव्य मेळाव्याचे किंवा ऐतिहासिक पत्रकार परिषदेचे नियोजन सुरू आहे. यासाठी गोरेगावमधील नेस्को सेंटर, बांगुर नगर मैदान किंवा वरळीतील डोम या तीन ठिकाणांची चाचपणी केली जात आहे. आज दिवसभरात उर्वरित जागांचे वाटप अंतिम करून युतीचा 'धडाका' उडवून देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतर महानगरपालिकांच्या जागावाटपाची चर्चाही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजुन निर्णय नाही दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या विजयावर सडकून टीका केली आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये भाजपला मिळालेला अभूतपूर्व विजय हा केवळ अभूतपूर्व पैशांच्या उधळपट्टीचा परिणाम आहे, असा आरोप त्यांनी केला. शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही धारेवर धरले. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय सहा तासांत निर्णय देते, मात्र 40 आमदारांच्या अपात्रतेवर अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. कारण सर्वोच्च न्यायालयावर दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळेच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालासाठी 21 जानेवारी ही निवडणुकीनंतरची तारीख दिलेली आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 3:34 pm

पुण्यात तुतारीचे उमेदवार घड्याळीवर लढणार:अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा; शरद पवार गटाच्या नेत्याचे कानावर हात

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत तुतारी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढतील, असा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नेत्याने हा दावा फेटाळला आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीनंतर आता राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आलेत. त्याची लवकरच घोषणा होईल. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे बोलणे झाले आहे. ताई व दादांचीही याविषयी चर्चा झाली आहे. तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढतील. येत्या 2 दिवसांत यासंबंधीचा निर्णय होईल. शरद पवार गटाच्या नेत्याने फेटाळला दावा दत्तात्रय धनकवडे यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, माझा पक्ष हा शरद पवारांचा आहे. आमचा पक्ष जिथे कुठे लढेल व आमचे उमेदवार जिथे कुठे उभे राहतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचे चिन्ह घेऊनच लढतील. त्यामुळे कोण कुठे काय बोलत आहे त्यावर मला काहीही भाष्य करायचे नाही. पण एक नक्की आहे की, अजित पवारांविषयी माझ्या मनात कुठेही राग, द्वेष किंवा आकस नाही. फक्त माझे एक युनिट आहे. ते खूप छान पद्धतीने बांधले आहे. तिथे ताकदीचे उमेदवार आहेत. पुण्यात महायुतीविरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एक चांगला पर्याय म्हणून पाहिला जातो. हा पर्याय पुणेकरांना हवाहवासा वाटतो. त्यामुळे त्याच पर्यायाने जावे असे माझे मत होते. पण यासंदर्भात अंतिम निर्णय हे शरद पवारच घेतील, असे ते म्हणाले. अजित पवार - सतेज पाटलांतील चर्चेवरही भाष्य प्रशांत जगताप यांनी यावेळी अजित पवार व काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यातील फोनवरील संभाषणावरही भाष्य केले. ते म्हणाले, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते राज्यातील कोणत्याही नेत्याशी सहजपणे चर्चा करू शकतात. त्यामुळे त्यांचे सतेज पाटलांशी बोलणे झाले असेल. मला त्याची कोणतीही माहिती नाही. पण महाविकास आघाडी पार्ट वेगळा व आपसातील संवाद वेगळा. पण तूर्ततरी महाविकास आघाडी म्हणूनच आमच्यात चर्चा सुरू आहे, असे ते म्हणाले. अजित पवारांना MVA शी आघाडी करण्याचा प्रस्ताव दुसरीकडे, शरद पवार गटाच्या नेत्यांची आज शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवावी असा प्रस्ताव अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार खरेच घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार का? याविषयी साशंकता आहेत

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 3:27 pm

महायुतीत आणखी भागीदार वाढवू नका:रामदास आठवले यांचे आवाहन; पुणे महानगरपालिका निवडणुकीत 12 जागांची मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीत आणखी भागीदार वाढवू नयेत, असे आवाहन केले आहे. रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने 'संकल्प मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले होते. नाना पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या आश्रम मैदानावर हा मेळावा पार पडला, त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री आठवले बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेन्द्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक गायकवाड, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे, शाम सदाफुले, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विशाल शेवाळे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आठवले यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या साथीने रिपब्लिकन पक्ष आपला विस्तार करत आहे. पक्षाने देशभरात, विशेषतः ईशान्य भारतामध्येही स्थान मिळवले आहे. आंबेडकरी विचारांच्या पक्षांमध्ये महाराष्ट्रात मतभेद असले तरी देशात इतरत्र ते दिसत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. राहुल गांधींकडून सातत्याने निवडणूक आयोग व सत्ताधाऱ्यांवर 'मतचोरी'चा आरोप केला जातो. मात्र, हा आरोप निरर्थक असल्याचा दावा आठवले यांनी केला. मतदान केंद्रावर प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी असतात आणि मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असतो. अशा परिस्थितीत मतचोरी कशी शक्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसला आता लोक मतदान करत नाहीत, कारण त्यांना मत देऊन त्याचा उपयोग नाही, हे लोकांना उमगले आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षांबद्दल मतदाराला आत्मीयता राहिलेली नसल्यामुळे ते सातत्याने पराभूत होत आहेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले की, आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल. नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत जे यश मिळाले, तसेच यश १६ जानेवारी रोजीही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजची पहिली सभा प्रचंड मोठी असून, यातून आपल्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे, असेही ते म्हणाले. मोदी आणि फडणवीस आठवले यांना जो सन्मान देतात, तोच सन्मान आणि सत्तेत योग्य वाटा रिपब्लिकन पक्षाला मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. पुणेकरांच्या विश्वासाला आपण पुरे ठरलो असून, वाहतूक कोंडीमुक्त पुणे करण्यासाठी मोठे प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या इतर नेत्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 2:56 pm

संत तुकाराम महाराजांची तपोभूमी अतिक्रमणाच्या विळख्यात:वारकरी संप्रदाय आक्रमक, 10 मार्चपासून मुंबईत 'धरणे' आंदोलनाचा इशारा

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखला जाणारा देहूजवळील भामचंद्र-भंडारा-घोराडा डोंगर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. २०११ मध्ये महाराष्ट्र शासनाने या डोंगरांना राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते. असे असतानाही भूमाफिया, बिल्डर आणि एमआयडीसीच्या प्रभावामुळे येथे बेकायदा उत्खनन आणि अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप वारकरी संप्रदायाने केला आहे. संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांनी या गंभीर परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संत तुकाराम महाराजांनी या डोंगरावर दीर्घकाळ तपश्चर्या केली होती आणि येथेच त्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्याची श्रद्धा आहे. प्राचीन काळापासून अनेक साधकांनी या ठिकाणी साधना केली आहे. महाराज म्हणाले की, शासनाच्या नाकर्तेपणामुळे या तपोभूमीची अवस्था दयनीय झाली आहे. जर हे विध्वंसक काम थांबले नाही, तर भविष्यात हा डोंगर नामशेष होईल. या अन्यायाविरुद्ध समितीने मोठे आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून, १० मार्च २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानात वारकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू होणार आहे. लाखो वारकरी या आंदोलनात सहभागी होऊन शासनाला या गंभीर प्रश्नावर जाब विचारणार आहेत. मधुसूदन महाराजांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार आणि प्रबोधनकारांना आवाहन केले आहे की, कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून तळागाळातील भाविकांपर्यंत हा अन्याय पोहोचवावा आणि जनजागृती करावी. हा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ संघटित करावी, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संत तुकोबारायांचा हा वारसा पुढच्या पिढीला अखंडपणे देण्यासाठी 'देह जावो किंवा राहो' अशी भूमिका त्यांनी मांडली. संतभूमी संरक्षक संघर्ष समिती २००७ पासून संविधानिक मार्गाने हा लढा देत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघानेही या समितीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. महासंघाचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील महाराष्ट्रभर प्रबोधन यात्रा काढून जनजागृती करत आहेत. वारकरी संप्रदाय या तपोभूमीवर होणारा अन्याय सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे. हा डोंगर संरक्षित करण्यासाठी सर्व वारकऱ्यांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन मधुसूदन महाराज यांनी केले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यात्मिक आघाडी प्रमुख बबनराव शेंडगे पाटील, अध्यक्ष दिलीप जगताप, उपाध्यक्ष संतोष नानवटे, सरचिटणीस संभाजी राजे दहातोंडे, चिटणीस दशरथ पिसाळ, माजी पुणे शहराध्यक्ष मयूर गुजर आणि माजी सरचिटणीस दुष्यंत राजे जगताप उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 2:49 pm

अजित पवार पुण्यात करणार काँग्रेसशी आघाडी?:सतेज पाटलांशी फोनवरून साधला संवाद; भाजपला कोंडीत पकडण्याचा टाकणार डाव

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यात उभय नेत्यांत संभाव्य आघाडीविषयी प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिका राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आता काँग्रेसपुढे मैत्रिचा हात पुढे करून भाजपशी दोनहात करण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. अजित पवारांचा सतेज पाटलांना फोन एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन केला आहे. त्यात दोन्ही नेत्यांत पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांची युती झाली तर या दोन्ही महापालिकांतील राजकीय समीकरण बदलून भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार व सतेज पाटलांतील चर्चा अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपचा विजयी वारू रोखण्याचा प्रयत्न उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला कोणत्याही कुबड्यांची गरज नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे भाजप आगामी काळात शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत सोबत ठेवेल याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. हाच धोका ओळखून अजित पवारांनी काँग्रेसला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस जुने मित्र आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर भाजपचा विजयी वारू रोखता येईल, असे अजित पवारांनी सतेज पाटील यांना सांगितल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अजित पवारांनी पुण्यात शरद पवाराला सोबत घेण्याचीही चाचपणी सुरू केली आहे. त्यातच आता त्यांना आपला जुना मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसची साथ मिळाली तर या तिन्ही पक्षांची ताकद भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. राष्ट्रवादी महायुतीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला समाधानकारक यश मिळाले आहे. या निवडणुकीत भाजपचे राज्यभरात 117 नगराध्यक्ष निवडून आले. तर शिंदे गटाचे 53, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 37 नगराध्यक्ष निवडून आले. अजित पवारांकडे राज्याचे अर्थखाते आहे. त्यामुळे तेच शहरी नगरपालिकांमध्ये विविध योजनांसाठी पैसे उपलब्ध करून देऊ शकतात असा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. पण त्यानंतरही राष्ट्रवादीला महायुतीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 2:30 pm

महाराष्ट्राचा ‘धुरंधर’ जनता ठरवेल

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला गेल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये आता युती आणि महाआघाडीची वेगवेगळीच गणितं पाहायला मिळणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी धुरंधर कोण आहे ते जनता ठरवेल. भाजपाने ते सांगण्याची गरज नाही, असा टोला लगावत राऊतांनी भाजपाला खडे बोल सुनावले. ठाकरे बंधूंची झालेली युती आणि मनोमीलन यामुळे […] The post महाराष्ट्राचा ‘धुरंधर’ जनता ठरवेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 2:14 pm

जेजुरीत भंडा-याने भडका

पुणे : प्रतिनिधी जेजुरी येथे मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीवर राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते भंडारा अर्पण करताना भंडा-याचा भडका झाला. यावेळी लागलेल्या आगीत भाजून १६ जण जखमी झाले. यात नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे, त्यांचे पती राहुल घाडगे, तसेच प्रभाग क्र. ५ मधील नगरसेविका स्वरूपा खोमणे यांचा समावेश आहे. […] The post जेजुरीत भंडा-याने भडका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 2:11 pm

पार्थ पवार दोषी, गुन्हा दाखल झालाच पाहिजे

पुणे : प्रतिनिधी पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल […] The post पार्थ पवार दोषी, गुन्हा दाखल झालाच पाहिजे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 2:08 pm

भाजपने सुधीर मुनगंटीवारांना नेहमीच ताकद दिली:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधान; चंद्रपूरच्या पराभवावर करणार आत्मचिंतन

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पराभवानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे भाजपने आता त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चंद्रपुरात जे काही घडले त्यावर नक्कीच आम्हाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. सुधीर मुनगंटीवार तेथील पराभवाचा संबंध मंत्रिपदाशी जोडत आहेत. त्यांची भावना योग्य आहे. पण मंत्रिपद नसणे व पराभव होणे यात कोणताही थेट संबंध नाही. या प्रकरणी मुनगंटीवारांशी सवाद साधला जाईल, असे भाजप नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दैदिप्यमान यश मिळाले. पण चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. येथे काँग्रेसचे 11 पैकी 8 जागांवर नगराध्यक्ष निवडून आले. यामुळे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींवर सडकून टीका केली. काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यातील त्यांच्या नेत्यांना ताकद दिली. पण आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी मुनगंटीवारांशी संवाद साधण्याचे सूतोवाच केले आहे. काय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे? बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री व पक्ष नेतृत्वाने सुधीर मुनगंटीवार यांना नेहमीच ताकद दिली आहे. ते पुढेही देतील. चंद्रपूर जिल्ह्यात जे काही घडले त्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुनगंटीवार तेथील पराभवाचा संबंध मंत्रिपदाशी जोडत आहेत. त्यांची भावना योग्य आहे. पण मंत्रिपद नसणे व पराभव होणे यात कोणताही थेट संबंध नाही. भाजप चंद्रपूर विषयी निश्चितच आत्मचिंतन करेल. प्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला जाईल. एकनाथ शिंदेंची कामगिरी ठाकरेंहून सरस ते पुढे म्हणाले, प्रस्तुत निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स उद्धव ठाकरे यांच्याहून 10 पट जास्त चांगला आहे. मी मागील 30 वर्षांपासून निवडणूक लढवत आहे. शिंदे जशी कामगिरी करत आहेत, तशी कामगिरी उद्धव ठाकरे यांना आमच्यासोबत असताना कधीच करता आली नाही. आगामी काळात अजित पवारांच्या पक्षासोबत काही ठिकाणी युती होईल व काही ठिकाणी होणार नाही. पण त्यांच्याशी युती न होण्याचे कारण मुस्लिम मतांचे विभाजन करणे हे अजिबात नाही. कार्यकर्त्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सर्व 29 महापालिकांत युती करण्याची चर्चा सुरू आहे. शिवसेनेशी सर्वच ठिकाणी युती होईल. त्याची घोषणा लवकरच केली जाईल. संजय राऊतांचाही घेतला समाचार चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण सोडून निवडणूक लढवण्याच्या संजय राऊत यांच्या आव्हानावरही भाष्य केले. या प्रकरणी त्यांनी राऊतांचा चांगलाच समाचार गेतला. संजय राऊत एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण सोडण्यासंदर्भात कसे काय बोलू शकतात? त्यांना काय अधिकार आहे? धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना संविधानाने दिला आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा... मुंढवा भूखंड घोटाळ्यात मोठा ट्विस्ट:पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 1:51 pm

अकोल्यात शिंदेसेनेत अंतर्गत वाद

अकोला : प्रतिनिधी राज्यात काल नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल लागले. सर्वाधिक निकाल महायुतीच्या बाजूने पाहायला मिळाला. अकोल्यात मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन गटांत वाद झाला. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. हा वाद महापालिकेच्या जागा वाटपावरून झाला असल्याचे म्हटले जात आहे. […] The post अकोल्यात शिंदेसेनेत अंतर्गत वाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 1:49 pm

माणिकराव कोकाटे यांना ‘सुप्रीम’ दिलासा;कोर्टात शिक्षेला स्थिगिती

मुंबई : प्रतिनिधी अजित पवार गटाचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका लाटल्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे . मुंबई हायकोर्टाने कायम ठेवलेल्या कोकाटेंच्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने त्यांची आमदारकी वाचली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च […] The post माणिकराव कोकाटे यांना ‘सुप्रीम’ दिलासा;कोर्टात शिक्षेला स्थिगिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Dec 2025 1:45 pm

ठाकरे बंधुंची युती 'प्रीतीसंगम' नाही तर 'भीतीसंगम':नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघात, पैसे वाटले असल्यास पुरावे देण्याचे आव्हान

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीला 'प्रीतीसंगम' असे गोंडस नाव दिले असले, तरी प्रत्यक्षात हा 'प्रीतीसंगम' नसून मुंबई महापालिका गमावण्याच्या धास्तीने झालेला 'भीतीसंगम' आहे, अशी बोचरी टीका भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी आज केली. ज्यांनी आपल्या सख्या भावाला घराबाहेर काढण्याचे पाप केले, त्यांना आता अस्तित्वाच्या लढाईत पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच भावाची आठवण झाली आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केल्यानंतर भाजपने त्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. नवनाथ बन म्हणाले की, दोन भाऊ भीतीपोटी एकत्र येत आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईचा जो विकास झाला, तो पाहून मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे आहेत. मुंबई महापालिकेत आपला पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यामुळेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याला प्रीतीसंगम म्हणून नावाची बदनामी करू नका. राज ठाकरेंची ६० जागांवर बोळवण करण्याचा उबाठाचा प्रयत्न या युतीमधील जागावाटपाच्या तिढ्यावरही नवनाथ बन यांनी भाष्य केले. राज ठाकरे यांना फक्त ६० जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न 'उबाठा' गटाकडून सुरू आहे. मात्र, राज ठाकरे ६० जागांवर समाधानी होतील असे वाटत नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार, मनसे किमान १०० जागांची मागणी करत आहे. त्यामुळे ही युती उद्याच होईल की नाही, याची खात्री नाही. मुळात ही युती झाली तरी १६ जानेवारीला मुंबई महापालिकेवर भाजप आणि महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरावे देण्याचे संजय राऊतांना आव्हान नगरपालिका निवडणुकीत महायुतीने पैशांची उधळपट्टी केल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपांचा नवनाथ बन यांनी समाचार घेतला. फुकटची बडबड करणे ही संजय राऊतांची जुनी सवय आहे. जर खरोखरच कोट्यवधी रुपये उधळले गेले असतील, तर राऊतांनी एखादा कच्चा चिठ्ठा, व्हिडिओ क्लिप किंवा ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर सादर करावी. केवळ हवेत आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावेत.संजय राऊत देखील निवडणुकीत कशापद्धतीने पैशांची उधळपट्टी करत आहेत? कशाप्रकारे भ्रष्टचारा महाराष्ट्रात केला? हे जनतेला ठाऊक आहे, असे आव्हान त्यांनी दिले. जनता 'देवाभाऊ' आणि शिंदेंच्या पाठीशी कालच्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे. महायुतीला मिळालेले हे यश म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांची नांदी असून, मुंबईतही भाजपचाच विजय होईल, असा दावा नवनाथ बन यांनी यावेळी केला.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 1:04 pm

मुंढवा भूखंड घोटाळ्यात मोठा ट्विस्ट:पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवार, तेजवानीच्या सह्या; अंजली दमानिया, कुंभारांनी समोर आणले दस्तऐवज

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी या प्रकरणी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्यात झालेल्या पॉवर ऑफ अटॉर्नी (मुखत्यारपत्र) व्यवहाराशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज समोर आणले आहेत. या दस्तऐवजांवर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया व विजय कुंभार यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी पार्थ पवार व शितल तेजवानी यांच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचे दस्तऐवज उघड केले. प्रस्तुत दस्तऐवज या प्रकणातील एक संशयित दिग्विजय पाटील व शितल तेजवानी यांचे वकील तृप्ता ठाकूर यांनीच मिळवले आहेत. त्यांनी ती दमानिया यांना दिले आहेत. प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव वारंवार समोर येत आहे. पण त्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई होत नाही. उलट दिग्विजय पाटील व शितल तेजवानी यांनाच सातत्याने चौकशी व त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे तृप्ता ठाकूर यांनी पार्थ पवारांविरोधातील दस्तऐवज समोर आणली आहेत, असे अंजली दमानिया यांनी सांगितले आहे. सर्व माहिती व दस्तऐवज पोलिसांकडे, पण कारवाई नाही - कुंभार विजय कुंभार यांनी यावेळी हे सर्व दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध असल्याचाही दावा केला. शितल तेजवानी यांनी 2021 मध्ये पॉवर ऑफ अटॉर्नीद्वारे सर्व व्यवहारांचे अधिकार दिले होते. या संदर्भातील सर्व माहिती व दस्तऐवज पूर्वीपासूनच पोलिसांकडे उपलब्ध आहेत. पण त्यानंतरही या प्रकरणी पार्थ पवारांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे संशय बळावत आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री, महसूल मंत्र्याचे पवारांना अभय अंजली दमानिया म्हणाल्या, प्रस्तुत प्रकरणात पार्थ पवारांच्या स्वाक्षरीचे पत्र आहे. पण पार्थ पवारांनी तेव्हा हे पत्र आपल्या स्वाक्षरीचे नसल्याचा दावा केला होता. 25 मे 2021 रोजी हा व्यवहार करून देण्यात आला. हे सर्व दस्तऐवज सरकार दरबारी जमा आहेत. मागील 5-6 वर्षांपासून हा घोटाळा सुरू आहे. अजित पवारांना हे सर्वकाही माहिती होते. मुख्यमंत्री व महसूल मंत्री या प्रकरणात त्यांना प्रोटेक्ट करत आहेत. प्रत्येक पानावर पार्थ पवारांची स्वाक्षरी मुंढवा भूखंड घोटाळ्यात पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल व्हावा. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही. या पॉवर ऑफ अटॉर्नीवर पार्थ पवारांची प्रत्येक पानावर स्वाक्षरी आहे. त्यांचा फोटोही त्यावर आहे. यात उभयंतांत झालेले व्हॉट्सएप चॅटही आहे. संतोष हिंगणे व तृप्ता ठाकूर यांच्याही चॅटचा यात समावेश आहे. अजित पवारांचे पीए संतोष हिंगणे राम चौबे व वकील तृप्ता ठाकूर यांचेही यात चॅटिंग आहे. त्यानंतरही पार्थ पवारांना प्रोटेक्ट केले जात आहे. अजित पवारांचाही या प्रकरणी राजीनामा घेतला गेला पाहिजे. हा शितल तेजवानी व पार्थ पवार यांच्यात झालेला व्यवहार आहे. त्यात तीन-तीन ओएसडींचा समावेश आहे, असेही दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 1:02 pm

'आयुष्मान भारत' योजनेंतर्गत 1356 गंभीर आजारांवर मोफत उपचार:पात्रता, कागदपत्रे आणि कार्ड कसे काढायचे? जाणून घ्या सर्वकाही

आयुष्मान भारत योजनेचे महाराष्ट्रातील स्वरूप अतिशय व्यापक आहे. महाराष्ट्रात ही योजना ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY)’ आणि राज्य सरकारची ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या एकत्रीकरणातून राबवली जाते. राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांसाठी मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून उपचारांचा आर्थिक भार सामान्य कुटुंबावर पडणार नाही. या एकत्रित योजनेअंतर्गत आता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. उपचारांची संख्या यात साधारणपणे १३५६ हून अधिक उपचारांचा/शस्त्रक्रियांचा समावेश आहे. महत्त्वाची गोष्ट : कोणाला लाभ मिळतो? (पात्रता) महाराष्ट्र सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून ती ‘सार्वत्रिक’ केली आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक. पांढरे रेशन कार्ड असलेले नागरिक (उत्पन्नाची मर्यादा आता शिथिल करण्यात आली आहे). नोंदणीकृत बांधकाम कामगार, सरकारी कर्मचारी आणि पत्रकार. योजनेचा लाभ घेण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आयुष्मान कार्ड हे सर्वात महत्त्वाचे आहे. आधार कार्ड. रेशन कार्ड असावे लागते. सर्व सरकारी रुग्णालये. योजनेच्या पॅनेलवर असलेली खासगी मोठी रुग्णालये. “महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना” किंवा “आयुष्मान भारत” असा बोर्ड लावलेल्या रुग्णालयात उपचार. असे तयार करा आपले स्वत:चे आयुष्मान कार्ड जर तुमच्याकडे ‘आयुष्मान कार्ड’ नसेल, तर तुम्ही खालील मार्गांनी ते काढू शकता प्ले स्टोअरवरून आयुष्मान ॲप डाऊनलोड करून नोंदणी आणि ई-केवायसी करू शकता. जवळपासचे ‘आपले सरकार’ सेवा केंद्र येथे जाऊन रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवून तुम्ही नोंदणी करू शकता. स्रोत : अधिकृत संकेतस्थळाद्वारे

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 12:36 pm

आर्य समाज अंधश्रद्धेविरुद्धची राष्ट्रवादी चळवळ:स्वामी सच्चिदानंद यांचे पिंपरीतील अमृत महोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन

आर्य समाज म्हणजे तत्कालीन अंधश्रद्धेविरुद्ध सुरू झालेली एक राष्ट्रवादी चळवळ आहे, असे प्रतिपादन जयपूर, राजस्थान येथील स्वामी सच्चिदानंद यांनी केले. पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामी सच्चिदानंद यांनी सांगितले की, महर्षी दयानंद सरस्वती यांनी १५० वर्षांपूर्वी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी देशातील पहिली गोशाळा हरियाणामध्ये सुरू केली. तसेच, ब्रिटिश सरकारने मीठ करमुक्त करावे यासाठी सर्वप्रथम महर्षी दयानंद सरस्वती यांनी सह्यांची मोहीम राबविली होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आर्य समाजाचे उल्लेखनीय योगदान आहे. पिंपरी येथील आर्य समाज संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, स्वामी सच्चिदानंद यांचे प्रवचन, अमृतसर पंजाब येथील पंडित दिनेश आर्य यांचे भजन, यज्ञ हवन, पुरस्कार वितरण आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी स्वामी सच्चिदानंद यांनी राष्ट्र निर्माण मे हमारे कर्तव्य या विषयावर प्रवचन दिले. पंडित दिनेश आर्य यांनी सुश्राव्य वाणीमध्ये भजन सादर केले. स्वामी सच्चिदानंद यांनी सध्या तरुण पिढीमध्ये वाढत असलेल्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'च्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. ही पद्धत आपल्या संस्कृतीवर आक्रमण करणारी असून, यातून जन्मणारी मुले बेवारस म्हणून ओळखली जातील, हे थांबवले पाहिजे, असे ते म्हणाले. आर्य समाज अंधश्रद्धेचा तिरस्कार करणारी, महिला व दलितांचा सन्मान करणारी आणि स्वदेशीचा पुरस्कार करणारी एक राष्ट्रवादी चळवळ आहे. महर्षी दयानंद सरस्वती यांनी विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. बेवारस मुलांसाठी देशातील पहिले अनाथालय फिरोजपुर येथे त्यांनी स्थापन केले. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना आर्य समाजाने केली, तसेच या चळवळीतील बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड यांनी बडोदा बँकेची स्थापना केली. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले ८५ टक्के क्रांतिकारी महर्षी दयानंद यांचे मानसपुत्र होते. नीरा आर्या ही आर्य समाज चळवळीतील देशातील पहिली गुप्तहेर महिला होती, जिने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रक्षणासाठी ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी असलेला तिचा पती प्रियरंजन दास याला गोळ्या घालून ठार केले होते, अशी माहिती स्वामी सच्चिदानंद यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त अधिकारी डॉ. दि. मा. मोरे, पिंपरी संस्थेचे मार्गदर्शक मुरलीधर सुंदरानी, संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सचिव हरेश तिलोकचंदानी, अतुल आचार्य, दिनेश यादव, उत्तम दंडीमे, जयराम धर्मदासानी, दिगंबर रिद्धीवाडे आणि संजय वासवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 12:30 pm

सराईत गुन्हेगाराचा पोलिसांवर गोळीबार:पोलिसांच्या प्रत्युत्तरात आरोपी जखमी; वाघोली पोलिसांनी नगर रस्त्यावर केली कारवाई

पुणे शहर पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नगर रस्ता परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी जखमी झाला. ओंकार दिलीप भंडारी (वय २६, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध वाहन तोडफोडीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तो फरार होता आणि चंदननगर पोलीस त्याचा शोध घेत होते. शनिवारी सायंकाळी भंडारी आव्हाळवाडी भागात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी सापळा रचला असता, भंडारी एका झुडपात लपलेला आढळला. त्याने त्याच्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून पोलिसांवर गोळीबार केला. स्वसंरक्षणार्थ पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांनीही गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेली गोळी भंडारीच्या मांडीत लागल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भंडारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कुलतारसिंग नानकसिंग बावरी (वय २३, रा. पोते वस्ती, अशोकनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. ही कारवाई आंबेडकर चौक रस्त्यावर करण्यात आली असून, लक्ष्मीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच, बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याजवळून गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. धायरी येथील मते प्लॉटजवळ अल्पवयीन मुलगा पिस्तुलासह येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 12:29 pm

लवासा प्रकरणात पवार कुटुंबाला दिलासा:हायकोर्टाने पवार कुटुंबाविरोधातील PIL फेटाळली; वाचा काय होता लवासा प्रकल्प?

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी लवासा प्रकरणातील कथित गैरव्यवहाराविषयी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळेंविरोधात दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे या बहुचर्चित प्रकरणात पवार कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात लवासा हे देशातल पहिले खासगी हिल स्टेशन उभारण्याची महत्त्वकांक्षी योजना तत्कालीन सरकारने आखली होती. पण हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. याचिकाकर्ते नानासाहेब जाधव यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करून या प्रकल्पासाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या हितांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला होता. प्रस्तुत प्रकल्प एका खासगी कंपनीचा असतानाही त्याला सरकारी प्रकल्पासारख्या सवलती देण्यात आल्या. तत्कालीन सरकार व त्यांच्या पूर्ववर्ती सरकारमध्ये असताना शरद पवार व अजित पवारांनी आपल्या पदांचा गैरवापर केला. लवासाला हिल स्टेशनचा दर्जा मिळवून देण्यासाठी नियमांत बदल केला. त्याद्वारे लेक सिटी कॉर्पोरेशनला अवाजवी फायदा करून देण्यात आला. या कंपनीत सुप्रिया सुळे यांचाही वाटा असल्याची माहिती आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पवार कुटुंबाने आर्थिक लाभ मिळवला, असा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला होता. ठोस पुराव्यांअभावी याचिका फेटाळली या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अखंडा यांच्या खंडपीठापुढे प्रदिर्घ सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने प्रकरणाचा सर्व अंगाने तपास करून आपला निर्णय दिला. याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे ठोस पुरावे समोर आले नाहीत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी लवासा प्रकल्पांतर्गत पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवल्याचाही आरोप केला होता. लवासा प्रकल्पासाठी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून डोंगररांगांचे उत्खनन करण्यात आले आहे. एवढेच नाही तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकारातील पाणीही लवासाला वळवण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणीही याचिकाकर्त्यांनी केला होता. पण कोर्टाने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. पाश्चिमात्य देशांप्रमाणे मानवनिर्मित शहर लवासा प्रकल्प हा पुण्यातील वरसगाव धरणाच्या किनाऱ्यावर उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प विविध टप्प्यांत उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यात पहिल्या टप्प्यात 1000 विला व 500 अपार्टमेंट यांचा समावेश होता. पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर मानवनिर्मित हिलस्टेशन उभारण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला होता. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने उभारलेल्या या प्रकल्पावर अवैध परवानग्या मिळवणे, शेतकऱ्यांच्या जमिनी तुटपुंज्या मोबदल्यात विकत घेणे आदी अनेक आरोप करण्यात आले. हे हिल स्टेशन किंवा शहर 15 डोंगर आणि घाटामध्ये तयार करण्यात आले. त्याचे क्षेत्रफळ जवळपास 25 हजार एकर किंवा 100 चौरस किलोमीटर एवढे आहे. या क्षेत्रफळाचा विचार करता हे शहर पॅरिस शहराएवढे आहे. याठिकाणी तयार करण्यात आलेला मानवनिर्मित तलाव हा 90 लहान मोठ्या झऱ्यांपासून तयार केलेला आहे. त्याची खोली जवळपास 100 फूट आहे. या शहरात जवळपास 2 लाख लोक राहू शकतील अशा पद्धतीने त्याची रचना तयार करण्यात आली होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तिथे वार्षिक 20 लाख पर्यटक येतील असा अंदाज होता. पंचतारांकित हॉटेल्स, रुग्णालय, फाईव्ह स्टार हॉटेल, शाळा, पोस्ट ऑफिस अशा सुविधाही या ठिकाणी होत्या. पण वादामुळे 2010-2011 मध्ये हा प्रकल्प थंड बस्त्यात टाकण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 12:22 pm

संभाजीनगरमध्ये भरदिवसा घरफोडीचा धक्कादायक प्रकार:कांचनवाडीत पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

शहरातील कांचनवाडी परिसरातील गिरिकुंज सोसायटीमध्ये चोरट्यांनी भरदिवसा एका फ्लॅटचे कुलूप तोडून २ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी गजानन रमेशराव कुरपतवार (५२) हे खासगी नोकरी करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गजानन आणि त्यांची मोठी मुलगी कामावर गेले होते. दुपारी गजानन यांच्या पत्नी आणि लहान मुलगी त्यांच्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी लोखंडी टॉमीने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील दागिने गायब: चोरट्यांनी घरातील कपाटाची उचकापाचक करून १३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, ३ ग्रॅमचे फॅन्सी टॉप्स, चांदीचे पायल, मंगळसूत्र, आर्टिफिशियल दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी गजानन ड्यूटीवरून घरी परतले असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा आणि कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसला. सीसीटीव्हीचा अभाव, तपासाचे आव्हान धक्कादायक बाब म्हणजे या ८ सदस्यांच्या सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, याचाच फायदा चोरट्यांनी घेतल्याचे दिसत आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे कांचनवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी आपल्या सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 12:22 pm

माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा:दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीवरील टांगती तलवार टळली

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा तुरुंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून, माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांना आणि शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार नसून, हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे. तीन दशकांपूर्वीच्या एका सदनिका वाटप प्रकरणातील अनियमिततेचा ठपका ठेवत नाशिक जिल्हा न्यायालयाने 3-4 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधीची आमदारकी किंवा खासदारकी तत्काळ रद्द केली जाते. या निर्णयामुळे कोकाटे यांचे विधीमंडळ सदस्यत्व धोक्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली असली, तरी दोषसिद्धीला स्थगिती दिली नव्हती, ज्यामुळे त्यांच्या आमदारकीवर अपात्रतेचे संकट कायम होते. अखेर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आज यावर झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत कोकाटे यांना दिलासा दिला. राजकीय भवितव्य तुर्तास सुरक्षित गेल्या काही दिवसांपासून राजकीय अडचणीत सापडलेल्या आणि मंत्रिपदही गेलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यासाठी हा निकाल संजीवनी देणारा ठरला आहे. याचिकाकर्त्यांनी कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे हा दावा तूर्तास फेटाळला गेला आहे असून, त्यांचे राजकीय भवितव्य सध्या सुरक्षित झाले आहे. नेमके प्रकरण काय? नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील 'निर्माण व्ह्यू' अपार्टमेंटमध्ये 30 वर्षांपूर्वी स्वतःचे उत्पन्न कमी दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्याप्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. स्वतःसह भाऊ विजय कोकाटे आणि अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीरपणे या सदनिका लाटल्याचा ठपका ठेवत फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात दाद मागितली होती, मात्र सत्र न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळत जिल्हा न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 11:58 am

काँग्रेस मुंबईत VBA ला सोबत घेण्याच्या तयारीत:प्रकाश आंबेडकरांशी चर्चा झाल्याची माहिती; मतांचे ध्रुवीकरण होऊन ठाकरेंना बसणार झटका

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या प्रयत्नांत असल्याची माहिती पुढे आली आहे. काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने यासंबंधी आंबेडकरांशी चर्चाही केली आहे. यामुळे ठाकरे बंधूंच्या पोटात गोळा उठण्याची शक्यता आहे. मुंबईत वंचित व काँग्रेस एकत्र आल्यास सत्ताधारी महायुतीचे काही मते कमी होतील, पण त्याचा जोरदार फटका ठाकरे बंधूंच्या युतीला बसेल, असा दावा करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला दैदिप्यमान यश मिळाले आहे. विरोधी बाकावरील काँग्रेसला समाधानकारक जागा मिळाल्यात. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची प्रचंड हाराकिरी झाली आहे. यामुळे काँग्रेस मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चांगलाच जोर लावेल असा अंदाज बांधला जात आहे. त्यानुसार, देशातील या सर्वात जुन्या पक्षाची पाऊलेही पडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसने महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करण्याचा प्रयत्न चालवल्याची माहिती पुढे आली आहे. काँग्रेसने ठेवला आंबेडकरांपुढे युतीचा प्रस्ताव सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीमध्ये सध्या आघाडीची चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने यासंबंधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेत त्यांच्यापुढे आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याला आंबेडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा झाली आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील अनेक भागांत आंबेडकरवाद्यांचे प्राबल्य ठाकरे व मनसेने मुंबईत एकत्र येण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेस वंचितशी आघाडी करून धर्मनिरपेक्ष मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी काँग्रेसने दलित व वंचितांच्या मतांवर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रकाश आंबेडकरांच्या मागे वैचारिक संघटना व त्यांच्या समर्थकांची मोठी ताकद आहे. मुंबईच्या काही भागांत त्यांचे प्राबल्यही आहे. त्यामु्ळे पक्षाला त्याचा फायदा होईल, असा काँग्रेसचा अंदाज आहे. विशेषतः या आघाडीद्वारे महायुती व ठाकरे बंधूंच्या युतीला तगडे आव्हान देता येईल, असा व्होराही काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत रंगणात तिरंगी सामना काँग्रेस व आंबेडकरांच्या भेटीत केवळ जागावाटपच नव्हे तर मुंबईतील प्रदूषण, नागरी सुविधा व महापालिकेतील कथित भ्रष्टाचारासह स्थानिक प्रश्नांना हात घालण्याच्या मुद्यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईतील मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने मुंबईतील आपला पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यासाठी वंचितला सोबत घेण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती विरुद्ध काँग्रेस आघाडी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 11:25 am

नाशिकमध्ये नगरपालिकांत शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष ठरला:11 नगरपालिकांवर महायुतीचा दबदबा, महाविकास आघाडीचा सुफडा साफ

जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल रविवारी (दि. २१) जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यात शिंदे सेनेने पाच नगराध्यक्षपदांसह ८० नगरसेवकपदांवर विजय मिळत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्या खलोखाल भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्येकी तीन नगराध्यक्षपदांवर विजय मिळविला तर भाजपने नगरसेवकपदाच्या ६२ तर राष्ट्रवादीने ६० जागांवर विजय मिळविला तर उबाठाला केवळ २६ जागा मिळवता आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ चार जागा मिळाल्या तर काँग्रेसला १ जागा मिळाली. या निवडणुकीत भाजपकडून मु‌ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे सेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतल्याने त्याचा फायदा झाला. मात्र, विरोधी पक्षाचे नेते सक्रीय नसल्याने त्याचा फटका त्यांना बसला. दिव्य मराठी विश्लेषण: ही आहेत जय-पराजयाची कारणे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पक्षांसाठी घेतलेल्या सभांचा परिणाम; विरोधी नेत्यांची उदासीन भूमिका कारणीभूत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीतच लढतराज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता असताना या निवडणुकीत अनेक ठिकाणी हे तिन्ही पक्ष स्वतंत्ररित्या लढले. त्यात ५ ठिकाणी शिवसेना, भाजपला व राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन ठिकाणी यश मिळाले. विरोधकांनी लढण्यापूर्वीच हार पत्कारल्याचा परिणाम राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोजक्याच जागांवर निवडणूक लढविली. त्या ४ जागांवर मिळाल्या उबाठाने केवळ सिन्नरला पूर्ण पॅनल दिले, तिथे त्यांना १४ तर इतर ठिकाणी ११ जागांवर यश मिळाले. काँग्रेसला १ जागा मिळाली. निधीची कमतरता भासू न देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभांमध्ये नगरविकास खाते माझ्याकडेच आहे, त्यामुळे निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे मतदारांनी विश्वास ठेवत मतदान दिले. ‘महाविकास’चे नेते दिसलेच नाहीत काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते या निवडणुकीत सक्रीय नसल्याचे दिसून आले. त्यांनी कोणत्याही ठिकाणी प्रचार सभा घेतली नाही त्याचा फटकाही त्यांच्या उमेदवारांना सहन करावा लागल्याचे दिसून आले. आघाडीच्या पराभव व विजयाची कारणे : पूर्ण पॅनल देण्यात ठरले अपयशी पॅनल देण्यात अपयश : ११ नगरपालिकांच्या निवडणुकांत विरोधकांना पूर्ण पॅनल देण्यात अपयश आले. तर काही ठिकाणी त्यांनी आघाडी करत निवडणूक लढली मात्र त्यांची तयारी कमी पडली. नेते दूरच : विरोधक या निवडणुकीत पूर्णपणे सक्रीय नसल्याने त्यांनी उमेदवारांसाठी सभा घेतल्या नाहीत. त्यामुळे उमेदवारांची निराशा झाल्याने त्यांचा पराभव झाला.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 11:09 am

भोसीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या:65 हजारांच्या कर्जामुळे घेतला टोकाचा निर्णय, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद

कळमनुरी तालुक्यातील भोसी येथे तरुण शेतकऱ्याने ६५ हजार रुपयांच्या कर्जापोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात रविवारी ता. २१ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील भोसी येथील शेतकरी सुदर्शन काशीनाथ अवचार (३५) यांना त्यांच्या वडिलांच्या नावे अडीच एकर जमीन आहे. या जमीनीवर त्यांच्या वडिलांना महाराष्ट्र ग्रामीण बँक वारंगाफाटा शाखेकडून ६५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. खरीप हंगामातील पिक आल्यनंतर कर्ज फेडले जाईल असे त्यांनी कुटुंबियांना सांगितले होते. त्यानुसार खरीप हंगामात त्यांनी सोयाबीन, तुर व इतर पिकांची पेरणी केली होती. मात्र हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. जमीन खरडून गेल्याने पिकेही वाहून केली. ्त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. खरीपाचे पिक हातचे गेल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच पिककर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. दरम्यान, बुधवारी ता. १७ त्यांचे कुटुंबिय शेतात गेले होते. घरी सुदर्शन हे एकटेच होते. त्यावेळी त्यांना नापिकी तसेच कर्ज फेडण्याच्या चिंतेमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी घरी आला असतांना सुदर्शन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, जमादार शेख यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी रुखमा अवचार यांनी दिलेल्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार शेख पुढील तपास करीत आहेत. मयत सुदर्शन यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:51 am

मोहित कंबोज भाजपचे BMC महापौरपदाचे उमेदवार?:ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दावा; म्हणाले - उपरा मुंबईवर राज्य करणार काय?

भाजपने मुंबई महापालिकेच्या महापौरपदाचे उमेदवार म्हणून मोहित कंबोज यांचे नाव निश्चित केल्याचा सनसनाटी दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप नेत्यांच्या सूचक विधानांचा दाखला दिला आहे. फडणवीस म्हणतात महापौर महायुतीचाच होणार, मंत्री आशिष शेलारही महापौर हिंदूच होणार असे म्हणतात. पण कुणीही महापौर मराठीच होणार असे म्हणत नाहीत. याचा अर्थ त्यांनी मोहित कंबोजला मुंबईचा महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे, असे या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे. राज्यातील नगरपरिषदा व नगरपालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर महायुतीला हे यश मिळाल्यामुळे सत्ताधारी भाजप, शिंदे गट, व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आत्मविश्वास उंचावला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी यांनी वरील दावा केला आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, भाजपाने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असले अमराठी उपमहापौर दिले... त्यामुळे आज जेव्हा पत्रकार भाजपा नेत्यांना विचारतात कि, मुंबईचा महापौर मराठी असेल का? त्यावर फडणवीस म्हणतात, महापौर महायुतीचाच होणार... शेलार म्हणतात, महापौर हिंदू होणार... पण कुणीही छातीठोकपणे सांगत नाही कि, महापौर मराठीच होणार! ह्याचाच अर्थ त्यांचा मुंबई 'महापौर'पदाचा अमराठी उमेदवार ठरलाय. मोहित कंबोज ठरलाय ! मराठी माणसा, आपल्या मुंबईवर अशा उपऱ्याला राज्य करू द्यायचं का? धनाढ्य आहे म्हणून महायुती हुजरी असेल पण स्वाभिमानी मराठी माणसाने अशांना हिसका दाखवावा, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाच्या या दाव्यावर भाजपकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे. ठाकरे गटाची मनसेसोबत लवकरच युती दुसरीकडे, मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट व मनसेच्या युतीची घोषणा 1-2 दिवसांत होण्याची शक्यता आहे. सध्या या दोन्ही पक्षांत काही जागांवर रस्सीखेच सुरू आहे. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना जागावाटपाचा मुद्दा फार ताणून न धरण्याची सूचना केली आहे. यामुळे हे जागावाटप लवकरच निकाली निघण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही तसे संकेत दिलेत. मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदर यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये जागावाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या असून, आज दिवसभरात या यादीवर शेवटचा हात फिरवला जाईल. फक्त मुंबईच नाही, तर राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. या प्रितीसंगमात महाराष्ट्रातील जनता नक्कीच सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:47 am

ठाकरे बंधुंच्या युतीची लवकरच होणार घोषणा:संजय राऊतांचे विधान, धनुष्यबाण बाजुला ठेवून निवडणुका लढण्याचे शिंदेंना आव्हान

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती आणि मनोमिलन झालेले आहे. आता राजकीय युतीविषयी म्हणाल, तर मुंबईस, नाशिक, कल्याण, डोंबिवली, ठाणे याठिकाणच्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या संपलेल्या आहेत. शेवटपर्यंत या मोठ्या महानगरपालिकांच्या यादीवर हात फिरवला जातो. त्यादृष्टीने काम चालू आहे. २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्याआधी १०० टक्के शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे, धुमधुडाक्यात, वाजतगाजत केली जाईल, अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदर यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये जागावाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या असून, आज दिवसभरात या यादीवर शेवटचा हात फिरवला जाईल. फक्त मुंबईच नाही, तर राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहेत. या प्रितीसंगमात महाराष्ट्रातील जनता नक्कीच सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगरपालिका निकाल म्हणजे नाटक नुकत्याच लागलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालांवर भाष्य करताना राऊत यांनी महायुतीवर कडाडून टीका केली. या निकालांना त्यांनी 'एक नाटक' संबोधले. ज्या पद्धतीने एखाद्या नाटकाची तिकिटे विकली जात नाहीत, तेव्हा मालक स्वतःच तिकिटे विकत घेतो आणि रिकाम्या थिएटरसमोर नाटक करून 'शो हाऊसफुल्ल' असल्याचे दाखवतो, तसेच कालच्या निकालांचे आहे. सत्तेचा वापर करून आणि प्रचंड पैसे खर्च करून कालचा विजय मिळवला गेला आहे. हा जनतेचा कौल नसून विकत घेतलेला निकाल आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली. निवडणूक आयोगावर ताशेरे नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी केलेल्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी कोट्यवधी रुपये कोणी खर्च केले होते? हेलिकॉप्टर, चार्टर्ड प्लेन घेऊन नगरपालिकांच्या प्रचाराला कोण गेले? आम्ही तरी असे पाहिले नाही. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, पण या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या तीन गटांतच जुंपली होती. या तिघांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड पैशांची उधळपट्टी केली. कोट्यवधी रुपये आले कुठून? कसे आले? वाटले गेले, पकडले गेले. निवडणूक आयोगाने काय केले? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचे समर्थन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात ते १०० टक्के खरे आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधारी पक्षास जिंकण्यास मदत केली. याच चुकीचे काही नाही. आमचे कार्यकर्ते लढले. आमचे नेते गेले नाही. कारण आम्ही वर्षानुवर्षे ही निवडणूक कार्यकर्त्यांवर सोडली. असली-नकलीचा फैसला चिन्हाशिवाय करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'असली शिवसेना' कोण, यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी थेट आव्हान दिले. नगरपालिका निवडणुका जिंकल्या म्हणून असली कोण? नकली कोण? असे शिंदे म्हणत असतील, तर आमचे चोरलेले चिन्ह बाजुला ठेवा. अमित शहांनी दरोडा टाकून आमचे चोरलेले चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा. मग असली कोण? नकली कोण‌? याचा फैसला होईल. चोरलेला पक्ष आणि चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहात, हे लक्षात घ्या. बाळासाहेब ठाकरेंनी घराघरात पोहोचवलेला धनुष्यबाण चोरून तुम्ही निवडणूक लढत आहात. तो एका निवडणुकीसाठी बाजूला ठेवा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना सुनावले. ...म्हणून ईव्हीएमवर संशय येतो तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या. या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आणि चौथ्या क्रमांकावर गेला. त्यामुळे ईव्हीएमवर संशय येणारच. महाराष्ट्रातील आकडे बघा. जे विधानसभेत आले, तेच नगरपालिका निवडणुकीत आले. भाजपला १२०-१२५, शिंदे गटाला ५४ आणि अजित पवार गटाला ४०-४२ हेच आकडे विधानसभेत आले होते. म्हणजे सेटिंग केलेल्या त्याच मशीन्स वापरल्यात का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. जिथे सर्वाधित मतांनी महायुतीचे नेते निवडून आलेत, तिथे उद्या लोकांना सर्व्हे करा, तिथे १०० पैकी ८० लोक सांगतील की, आम्ही यांना मत दिले नाही, असेही संजय राऊत म्हणालेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:33 am

संभाजीनगरातील 7 पालिकांमधील कारभाऱ्यांची निवड:सिल्लोड-पैठणला शिवसेनेचा झेंडा, फुलंब्रीत मविआचा विजय, गंगापूर-कन्नडमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसचा प्रभाव

जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकीचे‎ निकाल धक्कादायक लागले आहेत.‎गंगापूर, फुलंब्रीसह पैठणमध्ये भाजपच्या‎ हातातून सत्ता गेली आहे. तर, फुलंब्रीमध्ये‎ महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाचे‎ उमेदवाराची नगराध्यक्षपदी निवड झाली‎ आहे.‎ पैठणमध्ये शिवसेनेची (शिंदे गट)‎ एकहाती सत्ता आल्यासारखी आहे. येथे‎ शिवसेनेचे नगराध्यक्ष उमेदवारासह‎नगर सेवकपदी १७ उमेदवार निवडूण आले ‎आहेत. पण, खुलताबादला शिवसेनेचे‎ नगराध्यक्षपदासाठी एक व नगरसेवक‎पदासाठी उभ्या असलेल्या ‎५ जणांपैकी‎एकही उमेदवार विजयी झाला नाही.‎ मुस्लिम मतदारांचा कौल निर्णायक‎ कन्नड, खुलताबादसह सिल्लोडला मुस्लिम मतदारांचा‎कौल निर्णायक ठरला. कन्नडला शेख फरीन यांचा विजय‎झाला. त्यांनी प्रस्थापित स्वाती कोल्हे यांचा पराभव केला.‎तर, सिल्लोडमध्ये अब्दुल समिर यांनी पुन्हा एकदा‎मुस्लिम मतदारांमुळे आपले वर्चस्व कायम राखले आहे.‎येथे भाजपला केवळ चार जागांवर समाधान मानावे‎लागले. खुलताबाद नगरपालिकेमध्ये काँग्रेसचे आमेर‎पटेल हे विजयी झाले. त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार परसराम‎बारगळ यांच्यापेक्षा १ हजार २१३ मताधिक्य मिळाले.‎विजयी उमेदवारांची वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात‎आल्या. जिल्ह्यातील इतर पालिकांमध्येही कमी-अधिक‎प्रमाणामध्ये मुस्लिम मतदारांचा कल कमी- अधिक‎प्रमाणात निर्णायक ठरला आहे.‎ मतदारांशी जवळीकतेचा फायदा‎ फुलंब्रीमध्ये महाविकास आघाडी तर पैठणला‎शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी जवळीकता‎ठेवली होती. याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसून‎आले. तसेच अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी जी कामे केली‎नाहित, ती पूर्ण करण्याचेही आश्वासन दिलेले आहे.‎यामुळे नागरिकांनी सत्तापालट केल्याचे दिसून आले.‎फुलंब्री पालिकेची निवडणूक २ डिसेंबर ऐवजी २०‎डिसेंबरला झाली. दरम्यानच्या काळामध्ये महाविकास‎आघाडीने मतदारांशी जवळीकता वाढवली होती. तर,‎महायुतीमधील उमेदवारांनी आपलाच विजय आहे,‎असा अविर्भाव ठेवला होता. यामुळे महायुतीच्या‎उमेदवारांचा मतदारांशी असलेला संपर्क कमी‎झाल्याचा परिणाम दिसून आला.‎ स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, २ ठिकाणी सत्तापालट‎ फुलंब्रीसह पैठणमध्ये‎ सत्तापालट झाली. येथे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी‎नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांमधून होत‎होता. अखेर मतदारांनी ही खदखद मतदानामधून दाखवून दिली‎आहे. फुलंब्रीत गतवेळी भाजपची सत्ता होती. आता महाविकास‎आघाडीने दणदणीत यश मिळविले आहे. महायुतीला येथे केवळ ५‎जागांवर समाधान मानावे लागले. तसेच पैठणमध्येही काही‎प्रश्नांकडे भाजपकडून दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांनी शिवसेनेला‎प्राधान्य दिले आहे. येथे विद्या कावसनकर यांची निगराध्यक्षपदी‎निवड झाली आहे. तर, शिवसेनेच्या १७ उमेदवारांची नगरसेवक‎पदी निवड झाली आहे. तर, भाजपचे केवळ एक नगरसेवक‎निवडून आला आहे. भाजपने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष‎केल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. आता नव्या‎सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत.‎

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:31 am

दर्यापुरमध्ये सत्ताबदल:स्पष्ट बहुमत घेत काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे नगराध्यक्ष

प्रतिनिधी | दर्यापूर येथील नगरपालिकेत सत्ताबदल झाला असून सन २०१६ च्या पंचवार्षिकमध्ये भाजपने हिसकून घेतलेली सत्ता काँग्रेसने पुनर्स्थापीत केली आहे. काँग्रेसच्या मंदाकिनी सुधाकर भारसाकळे यांनी ८९२५ मते घेत नगराध्यक्षपदाचा गड सर केला. ६४३१ मते घेत शिवसेनेचे (शिंदे) प्रदीप मलीये दुसऱ्या स्थानी राहीले, तर गेल्यावेळच्या नगराध्यक्ष आणि अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलीनी भारसाकळे ४८४० मते घेत तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या. ‘ब’ वर्ग दर्जा असलेली ही नगरपालिका २५ सदस्यीय आहे. त्यासाठी १२ प्रभागात निवडणूक घेण्यात आली. २५ पैकी तब्बल १७ जागा काँग्रेसने बळकावल्या. राज्यात एक नंबरवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला केवळ ४ जागा जिंकत्या आल्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन तर अजीत पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. अशाप्रकारे या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून अनेक दिग्गजांच्या कुटुंबातील सदस्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.मंदाकिनी भारसाकळे यांच्या रुपाने नगरपालिकेला १९ वा नगराध्यक्ष मिळाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात होते. तर नगरसेवकाच्या २५ जागांसाठी १२९ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. ७ व्या फेरी अखेर निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे यांनी मंदाकिनी भारसाकळे यांना नगराध्यक्षपदी विजयी घोषित केले. त्यांच्यात हस्ते त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. मतमोजणेसाठी सहायक निवडणूक अधिकारी डॉ.विकास खंडारे, तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे यांनी चोख जबाबदारी पार पाडली. उपविभागीय पोलिस अधिकारी सतिश कुलकर्णी, ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात होता. स्थानिक आमदारालाही धक्का स्थानिक आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत त्यांचा पक्ष भुईसपाट झाला. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. भावना भुतडा यांना केवळ ४०२ मते मिळाली. याऊलट माजी आमदार अभीजित अडसूळ यांच्या नेतृत्वातील शिंदे सेनेचे प्रदीप मलीये प्रभाग क्रमांक ३ मधून तर अन्य एका प्रभागातून रमा सावळे विजयी झाल्या.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:26 am

वार्षिक स्नेन्हसंमेलनानिमित्त ‘नटरंग’ बहारदार कार्यक्रम:कोळी नृत्य, देशभक्तीपर, वेशभूषा, लावणी केली सादर‎

प्रतिनिधी | वरूड शेंदुरजनाघाट येथील जनता शिक्षण संस्थाद्वारा संचालित जनता हायस्कूल, श्री एन.जी. मोघे कनिष्ठ महाविद्यालय, जनता उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, जनता गर्ल्स हायस्कूल आणि जनता इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन होत आहे. संमेलनाच्या चौथ्या दिवशी जनता हायस्कूल व श्री एन.जी. मोघे कनिष्ठ महाविद्यालय आणि जनता उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमच्या विद्यार्थ्यांनी नटरंग हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये ग्रुप डान्स, सोलो डान्स, कोळी नृत्य, देशभक्तीपर नृत्य, वेशभूषा, लावणी नृत्य, फणी डान्स, गोंधळ नृत्य, शेतकरी आत्महत्या प्रतिबंध नाटिका, अफजल खानाचा वध, छावा, प्रबोधनपर नाटिका, अशी आमची हास्य शाळा नाटिका आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच यावेळी महापुरुषांच्या वेशभूषामध्ये प्रा. नंदकिशोर भडके यांनी महात्मा गांधी, प्रा. प्रफुल बनसोड यांनी महात्मा फुले, प्रा. प्रगती काळे यांनी सावित्रीबाई फुले, प्रा. अश्विन भोगे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, दिनेश जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा इत्यादी कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला प्राचार्य मनोहर गणोरकर, मुख्याध्यापिका डॉ. माया हिवसे, जयश्री मेंढे, पर्यवेक्षक उमेश काळे, प्रमोद येवले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गीतांजली बाविस्कर व प्रा. संजय अकर्ते यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:25 am

तक्षशीला महाविद्यालयात संविधान जागर:प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांशी निष्ठा व्यक्त केली

प्रतिनिधी | अमरावती संविधान बांधिलकी महोत्सवाच्या अनुषंगाने तक्षशीला महाविद्यालय येथे संविधान जागर कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान जागर अभियान, राज्यशास्त्र विभाग, रा. से. योजना, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन व समविचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका वाचनाने झाली. विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून लोकशाही मूल्यांशी निष्ठा व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. माधुरी फुले होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निश्चय साक्षात साधना उपस्थित होते. विशेष उपस्थितीमध्ये उपप्राचार्य प्रा. प्रितेश पाटील, विजय डवरे, दिलीप लाडे, मो. अफसर भाई यांचा समावेश होता. उप प्राचार्य प्रा. प्रितेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी विद्यार्थ्यांमार्फत उद्देशिकेचे वाचन करून संविधान मूल्यांचे सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर निश्चय साक्षात साधना यांनी संविधान बांधिलकी महोत्सवाचे महत्त्व, मूल्ये व नागरिकांची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्षीय भाषणात डॉ. माधुरी फुले म्हणाल्या, भारतीय संविधान हे सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे जिवंत प्रतीक आहे. युवकांनी संविधान अभ्यास वाढवून न्यायपूर्ण समाज निर्मितीत सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. प्रितेश पाटील, डॉ. नवल पाटील, प्रा. महेश हजारे, तसेच प्रा. डॉ. रवींद्र तायडे, डॉ. वर्षा गावंडे, डॉ. सनोबर कहेकशा, प्रा. मोनाली पाटील, प्रा. भोरे, प्रा. निलेश गंगणे, प्रा. समीर चौधरी, अनुराग मेश्राम, प्रा. सोनवणे, प्रा. विलास पवार, प्रा. अंकुश लवटे, प्रा. सायली कोटकोंडावार यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमाचे संयोजन व संचालन डॉ. नवल पाटील यांनी केले, तर आभार प्रा. महेश हजारे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:25 am

टवाळखोरांना पायी फिरवून सीनच केला ‘रिक्रिएट'; पोलिसांचा दरारा:जिथे धुडघूस घातला होता, त्याच भागात फिरवले‎

प्रतिनिधी | अमरावती नांदगाव पेठ हद्दीत मंथन पाळनकर या तरुणाची हत्या झाल्यानंतर त्या खुनाची प्रतिक्रिया म्हणून २० ते २५ जणांच्या टोळक्याने १९ डिसेंबरला रात्री शहरातील केडियानगर, शंकरनगर व परिसरात सशस्त्र धुडगुस घातला होता. त्यापैकी अकरा टवाळखोरांना पोलिसांनी अटक केली. त्याच टवाळखोरांना रविवारी (दि. २१) राजापेठ पोलिसांनी सीन ‘रिक्रिएट’ करण्यासाठी त्यांनी जिथे धुडघूस घातला होता, त्या भागातून पायी फिरवले. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून केलेल्या या सीन ‘रिक्रिएट’मुळे शहरात पोलिसांचा दरारा कायम आहे, हे आता समोर येत आहे. सर्वसामान्य नागरीकांना धमकी देत हातात काठ्या व शस्त्र घेवून कारच्या काचा फोडल्या. या प्रकाराने परिसरातील नागरीक चांगलेच भयभित झाले होते. दरम्यान या आरोपींनी नेमके कुठे काय केले, कसे केले, कुठली वाहनं फोडलीत, ते तपासात सुक्ष्मपणे नमुद करण्यासाठी राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट यांनी हा क्राईम सिन रिक्रिएट केला. दहशतखोरांनी वाहनांच्या तोडफोडीसह दगडफेकही केली होती. तर एका दुकानात जाऊन लुटपाट व एकावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान सोमवारी सायंकाळी राजापेठचे ठाणेदार कुलट, पीएसआय मिलिंद हिवरे, हेड कॉन्स्टेबल मनीष करपे यांच्यासह डीबी पथकाने अटकेतील आरोपींना रस्त्यांवरुन त्यांची ‘सैर’ घडवून आणली आहे. वाहनांच्या तोडफोडीसह केली होती दगडफेक

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:23 am

स्वच्छतेचा मूलमंत्र नेहमी तेवत‎ठेवल्यास आरोग्य सुदृढ होईल‎:प्रीतमसिंग राजपूत स्वच्छ घर सुंदर अंगण'' स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस‎

स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार प्रतिनिधी | खामगाव स्वच्छतेचा मूलमंत्र तेवत ठेवल्यास आपल्या परिवारातील लोकांचे व गावाचे आरोग्य सुदृढ होण्यास मदत होईल. यासोबतच आपला परिसर आणि गाव खऱ्या अर्थाने स्वच्छ व सुंदर दिसून येईल, असे प्रतिपादन विकास अधिकारी प्रीतमसिंग राजपूत यांनी केले. जलंब येथील सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायतीच्या वतीने दि. १८ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छ घर सुंदर अंगण'' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत ६० कुटुंबांनी सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी दि. १९ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रीतमसिंग राजपूत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली सुनील हेलोडे होत्या. ग्रामपंचायत अधिकारी व्ही. बी. राठोड, ग्रामपंचायत सदस्य महेश गव्हांदे, प्रकाश देवचे, संजय गव्हादे, गोपाल मोहे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजपूत यांनी यावेळी सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायतीने राबवलेली स्वच्छ घर सुंदर अंगण ही स्पर्धा अभिनंदनीय असल्याचे सांगितले. या स्वच्छ घर सुंदर अंगण' स्पर्धेदरम्यान देण्यात आलेला स्वच्छतेचा मंत्र तेवत ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुरेश गव्हांदे, राम धामणकर आणि महादेव सोनटक्के यांनीही संबोधित केले. गावात राबवलेल्या या उपक्रमाचे इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण केल्यास आपले गाव स्वच्छ व सुंदर होण्यास काही प्रमाणात का होईना हातभार लागेल. तसेच संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. मान्यवरांनी यावेळी संत गाडगेबाबांच्या कार्याचीही माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्धव नेरकर यांनी केले. महादेव सोनटक्के यांनी केले. महेश गव्हांदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विस्तार अधिकारी यू. के. फुटाणे, गणेश देवचे, राजू गव्हांदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:07 am

काँग्रेस-भाजपला धक्का; अपक्ष, एमआयएमलाही मिळाली नवीन संधी‎:नगराध्यक्ष ‘वंचित’कडे, मात्र नगरसेवकांच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कुणालाही नाही

भावेश पटेल | बार्शीटाकळी बार्शीटाकळी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीचे अख्तरखातून अलीमोद्दीन यांना मोठ्या मतांनी विजय मिळाला. अख्तर खातून अलीमोद्दीन यांना ९ हजार १९३ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या कोकिळा येळवणकर यांना २ हजार ९५० मते मिळाली. त्यांना ६ हजार २४३ मतांनी पराभव पत्करावा लागला. नगरसेवक पदासाठी १७ प्रभागांमध्ये झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. नगर पंचायत त्रिशंकू स्थितीत आली आहे. निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ३, काँग्रेस ३, भाजप ३, एमआयएम १, अपक्ष ५, २ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना शून्य जागा मिळाल्या. यामुळे वंचितला सत्ता चालवण्यासाठी अपक्ष, एमआयए किंवा काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेसने ३ जागा गमावल्याने बॅकफुटवर आले असून भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत एक जागा अधिक मिळाल्याने फायदा झाला आहे. एमआयएमनेही एक जागा मिळवून आपले अस्तित्व दाखवले. तर अपक्षांनी ५ जागा मिळवल्याने ते निर्णायक ठरतील. शिवसेना व राष्ट्रवादी पक्षांना एकही जागा मिळालेली नाही, त्यामुळे स्थानिक राजकारणात त्यांची ताकद कमी झाली आहे. बार्शीटाकळी नगर पंचायत त्रिशंकू झाल्याने पुढील पाच वर्षात ठराव मंजूर करण्यासाठी राजकीय वाटाघाटी कराव्या लागतील. सकाळी दहा वाजता सुरू झालेली मत मोजणी दुपारी २ वाजता आटोपली. विजयी उमेदवार मते पक्ष मो.जफर मो. हाशम २५० वंचित आरती केदारे ४३९ भाजप शुभम इंगळे ४७१ अपक्ष सविता वरगट ३९६ भाजप इफ्तेखारोद्दीन काझी ४८३ अपक्ष रुबीना परवीन ३४७ काँग्रेस नवेद अहेमद खान ३३५ अपक्ष शहाणा अंजुम सैय्यद ३२५ अपक्ष अजगरी अंजुम सैय्यद ५१३ काँग्रेस रमेश मनोहर वाटमारे ४३९ भाजप आम्रपाली इंगोले ४२१ अपक्ष सिद्दीक मो. मुमताजबी ३४५ काँग्रेस रफिया खातून अन्सार ३६३ काँग्रेस मोहंमद सफीया बेगम ५२४ काँग्रेस मो. फरहान शेख ३८१ एमआयएम साबीर शेख ५०१ वंचित सैय्यद अबरार ३७७ वंचित जसे जसे निकाल हाती येत होते तसे तसे कार्यकर्त्यांचा उत्साह जोर धरीत होता, या संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेश वझीरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कंकाळ, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विनोद पाचपोहे यांच्यासह नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी भूमिका निभावली. सत्ता चालवण्यासाठी संभाव्य फॉर्म्युला त्रिशंकू स्थितीत काही संभाव्य मार्ग आहेत वंचित, अपक्ष, एमआयएम, काँग्रेस यांची आघाडी, काँग्रेस-भाजप-अपक्ष यांचा ताळमेळ किंवा अपक्ष, एमआयएम, काँग्रेस, भाजप. कोणत्याही मार्गाने बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली जाऊ शकते. निकाल दर्शवतो की सत्ता स्थापनेसाठी राजकीय खेळ आता सुरू आहे आणि येत्या काही दिवसांत आघाडी व वाटाघाटी सुरू होणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:06 am

बहुमत:अकोटमध्ये भाजपचा नगराध्यक्ष; एमआयएम उमेदवार चांगली मते घेऊन दुसऱ्या स्थानी; भाजप सर्वाधिक ११ जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिला

प्रतिनिधी | अकोट अकोट नगरपरिषदेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजप सर्वाधिक ११ जागा जिंकून पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस ६, एमआयएम ५, राष्ट्रवादी अजित पवार गट २, राष्ट्रवादी (श.प)-१, शिवसेना उबाठा २, शिंदेंसेनेला १, प्रहारला ३ तर वंचितला २ जागांवर समाधान मानावे लागले. अकोट नगरपरिषदेत एमआयएमने पहिल्यांदाच खाते उघडले. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या माया विवेक धुळे पाचव्या फेरीपर्यंत मागे होत्या. सहाव्या फेरीत लीड घेत घेतल्याने त्यांना १५,९२८ मते मिळाली. एमआयएमच्या उमेदवार फिरोजा बी सय्यद शरीफ यांना १०,६५७ मते मिळवीत दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. माया धुळे या ५२७१ मतांनी विजयी झाल्या. विद्यमान आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या ११ जागा जिंकल्या. अलका संजय बोडखे या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. त्यांना ८ हजार ८५९ मते पडली; नगराध्यक्षपदासाठी ४६६ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. {युसूफ खान हादीक खान सर्वाधिक १४८७ मतांनी विजयी {निकिता सचिन जुनघरे सर्वात कमी ५५ मतांनी विजयी. {रेणुका पांडुरंग खवले ११२८ मतांनी विजयी. उमेदवार मते पक्ष रेश्मा परवीन २३०५ एमआयएम युसूफ खान २२८५ एमआयएम हन्नम शाह ९३३ एमआयएम दिलशाद बी खान ११४९ एमआयएम आफरीन शरीफोद्दीन १८७९ एमआयएम अब्दुल अकबर १०३७ प्रहार जनशक्ती मोहम्मद आरीफ १३९२ राष्ट्रवादी सलमा बेगम १४४२ राष्ट्रवादी स्नेहल दाभेराव १३०१ भाजप नैना इंगोले ९४१ शिवसेना अभिजित कराळे १३८६ भाजप गजानन चंदन ११३६ भाजप श्रद्धा मिसाळे १२४१ भाजप रेणुका खवले २३४२ काँग्रेस शेख ख्वाजा ११०१ वंचित खानम मुमताज १०५० वंचित दिलीप बोचे १३६८ उबाठा विजया बोचे ११५१ उबाठा रजनी अहिर १३४८ काँग्रेस अमोल पालेकर १०६१ भाजप शुभांगी टेमझरे ९१८ भाजप नीलेश नवग्रहे ९३९ भाजप शेख नगमा अंजुम १६८४ काँग्रेस अस्मा अंजुम १७७४ काँग्रेस निकिता जुनगरे ८९० श. प. प्रथमेश बोराडे ९६३ भाजप शीतल पटके १३२२ भाजप आंचल बेलसरे १००१ काँग्रेस सीताबाई मर्दने १००५ भाजप रवीकुमार ठाकूर ८८६ भाजप सुनीता महल्ले १०७० प्रहार जनशक्ती सुशील पुंडकर १२८१ प्रहार जनशक्ती

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:05 am

हिंगोलीत मुस्लीम वोटबँक शिंदेसेनेच्या पाठीशी:कळमनुरीत मतविभाजनाचा शिंदेसेनेलाच फायदा, वसमतमध्ये भाजपा निष्प्रभ ठरल्याने राष्ट्रवादीला यश

हिंगोली जिल्ह्यातील पालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आता गणिते मांडण्यास सुरवात झाली असून हिंगोलीत मुस्लीम वोटबँक तसेच लाडक्या बहिणी शिंदेसेनेच्या पाठीशी राहिल्या तर कळमनुरीत मत विभाजन शिंदेसेनेच्या पथ्यावर पडले आहे. तर वसमतमध्ये भाजपा निष्प्रभ ठरल्याने राष्ट्रवादीला अपेक्षीत यश मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रचारात दिलेली आश्‍वासने कधी पूर्ण केली जाणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत व कळमनुरी पालिका निवडणुकीत यावेळी चांगलीच चुरस पहावयास मिळाली. हिंगोलीत भाजपा, शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी आमने सामने होते. त्यातच स्थानिक नेते व कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांनी लक्ष दिले होते. हिंगोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर वसमतमध्ये महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा झाली. हिंगोलीत भाजपच्या निता बांगरांचा पराभव या निवडणुकीत हिंगोलीत शिंदेसेनेच्या रेखा श्रीराम बांगर यांनी विजय मिळविला. तर भाजपाच्या निता बांगर यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या अमीनाबी यांनी ७ हजार पेक्षा अधिक मते घेतली. या निवडणुकीत मुस्लीम वोटबँक शिंदेसेनेच्या पाठीशी राहिली तर लाडक्या बहिणींनी रेखा बांगर यांनाच पसंत दिली. त्यामुळे १० हजार पेक्षा अधिक मताधिक्याने विजय झाला. कळमनुरीत मुस्लीम मतांचे शिंदेसेनेच्या पथ्यावर कळमनुरी पालिका निवडणुकीत मतविभाजन शिंदेसेनेच्या पथ्यावर पडले. शिंदेसेनेच्या आश्‍लेषा चौधरी यांना ५६३५ मतदान झाले तर राष्ट्रवादीच्या नुरुन्नीसा म. नाजीम यांना ४२५२ मते मिळाली. चौधरी यांचा अवघ्या १३०० मतांनी विजय झाला. पालिकेत कौसर कुरेशी यांनी ३२८८ मते मिळविली. त्यामुळे मुस्लीम मतांचे झालेले विभाजन शिंदेसेनेच्या पथ्यावर पडले आहे. वसमतमध्ये भाजप निष्प्रभ, राष्ट्रवादीचा विजय सुकर वसमत पालिकेची निवडणुक अत्यंत चुरशीची व राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेली होती. आमदार राजेश नवघरे विरुध्द माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवदास बोड्डेवार हि मतब्बर मंडळी होती. त्यातच डॉ. मारोती क्यातमवार यांनी भाजपाला पाठबळ दिल्याने त्यांच्या हक्काचे असलेले सुमारे ८ हजार मतदान भाजपाच्या पाठीशी राहिल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्या सुनीता बाहेती यांनी साडेतीन हजारपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला. बाहेती यांना २३०८१ तर काँग्रेसच्या सीमा हाफीज यांना १६७१४ मते मिळाली. भाजपाच्या सुषमा बोड्डेवार यांना ५४०३ मते मिळाली. या ठिकाणी भाजपा निष्प्रभ ठरल्याने राष्ट्रवादीचा विजय सुकर झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेतील उपस्थिती मतदानात परिवर्तन नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोलीत सभा घेतली. या सभेला उपस्थित नागरीकांचे मतदानात परिवर्तन झालेच नाही.त्यामुळे त्यांच्या सभेनंतरही शहरात जादू झालीच नाही. तर दुसरीकडे वसमत येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभाही मतदारांवर प्रभाव पाडू शकली नाही. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता कधी होणार या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी मतदारांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी मतदारांनीही दिलखुलास पणे त्यांच्या अडचणी मांडल्या. आता विजया नंतर नेत्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची कधी पुर्तता होणार याची प्रतिक्षा मतदारांना लागली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:05 am

दुचाकी चोरट्यांची टोळी ताब्यात; सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त:अकोला शहरातील ६, वाशीममधील १ गुन्हा उघडकीस‎

प्रतिनिधी | अकोला शहरातील स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत दुचाकी चोरट्यांच्या टोळीस गजाआड केली आहे. २० डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये चोरट्यांच्या तिघांवर अटक करण्यात आली. त्यांच्या कडून एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिव्हिल लाइन येथील राहुल पुंडलिक ठाकरे (वय ३०, रा. दर्यापूर ता. अंजनगाव सूर्जी ह. मु. मच्छिंद्रनगर लहान उमरी अकोला) याने १९ डिसेंबरच्या रात्री घरासमोर उभी केलेली दुचाकी (एमएच २७ डीजी २२३५) चोरीला गेल्याची तक्रार केली होती. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक सक्रिय झाले आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारावर वाशीम जिल्ह्यातून तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक गोपाल जाधव, विष्णु बोडखे, माजीद पठाण, पोलिस अंमलदार शेख हसन, भास्कर धोत्रे, अब्दुल माजीद, वसीमो‌द्दीन, किशोर सोनोने, महेंद्र मलीये, रवींद्र खंडारे, एजाज अहमद, अमोल दिपके, श्रीकांत पातोंड, अशोक सोनोने, अन्सार अहमद, आकाश मानकर चालक प्रशांत कमलकार, देवानंद खरात यांनी केली आहे. यांच्याकडून दुचाकी जप्त ताब्यात घेतलेल्यांमध्ये राम विठ्ठलसिंह ठाकुर (वय २३), सूरज रवींद्र लांडेकर (वय १८, दोन्ही रा. पंचशीलनगर, रेल्वे स्टेशन वाशीम) आणि प्रकाश रवि जाधव (वय १८, रा. मोठा गवळीपुर, वाशीम) यांचा समावेश आहे. .

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:04 am

कुंभारी येथे संत गाडगे बाबांच्या कार्याचा जागर:६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी | अकोला कुंभारी येथील जय बजरंग विद्यालयात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य विलास इंगळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य श्रीकृष्ण वानखडे, अविनाश ढोरे, डॉ. सूर्यभान नागुलकर, धनंजय पुसेगावकर, बबलू तायडे, बजरंग गावंडे, मीना आमले, सध्या ताडे उपस्थित होत्या. प्रास्ताविकातून डॉ. नागुलकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनीही राष्ट्रसंत गाडगेबाबांचा इतिहास मांडला. स्काऊट मास्टर बबलू तायडे यांनी पोवाड्यातून गाडगेबाबांना अभिवादन केले. सूत्रसंचालन तेजस्विनी झोंबाडे, राधा ढोरे हिने केले. आभार मीना आमले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीताराम शिंगाडे, जानराव आगळे, सचिन देशमुख, वीर झिगुर्डे, शिवम बाकोडिया, प्रेम राऊत, दीपक जाधव, रेहान शहा, मनीष सरोदे, हर्षल आंबुसकर, मो.फरान यांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:03 am

आत्मा हाच परमात्मा आहे -मनोहर इंगळे:जागतिक ध्यान दिनानिमित्त शिबिराचे आयोजन; योग प्राणायमाचा करून घेतला सराव‎

प्रतिनिधी | अकोला आत्माच कसा परमात्मा आहे, असे म्हणत ज्येष्ठ योग शिक्षक मनोहर इंगळे यांनी ध्यान म्हणजे काय, ध्यानाचे प्रकार व त्याचे शारीरीक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक, फायदे कसे होतात, शक्तिपात ध्यान पद्धती, सुदर्शन क्रिया, कुंडलिनी जागरण व त्याच बरोबर झोपताना करावयाचे ध्यान, आदींबाबत सांगोपांग विवेचन केले. ते नेहरू पार्कमध्ये आयोजित जागतिक ध्यान दिनानिमित्त आयोजित शिबिरात बोलत होते. तसेच त्यांनी योग प्राणायामाचा सराव करून घेतला. जागतिक ध्यान दिवस संयुक्त राष्ट्रांनी २१ डिसेंबर रोजी साजरा करण्याचे घोषित केले. जो वर्षातील सर्वात लहान दिवस (अयन दिन) असतो. जो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे; या दिवसाचा उद्देश मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी ध्यानाचे महत्त्व पटवून देणे आणि जागतिक शांतता व सुसंवादाला प्रोत्साहन देणे हा आहे. दरम्यान जागतिक ध्यान दिनानिमित्त अकोल्यातही अनेक ठिकाणी सकाळी थंडीतही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान २१ डिसेंबर रोजी नेहरु पार्क येथे जागतिक ध्यान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित झाली. मोनिका बालचंदाणी, प्रा. विद्या ठाकरे, संजय मनातकर यांनी आपल्याला होत असलेला लाभ मनोगताद्वारे व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवतेज प्रतिष्ठानचे जसवंतसिंग मल्ली, वामन चौधरी, पुरुषोत्तम गुप्ता, विष्णू भड, शिवतेज इंगळे, अनुराधा इंगळे, वंदना तायडे, अरूणा धुमाळे यांनी मदत केली. आभार बाळासाहेब काळे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:02 am

रासेयो स्वयंसेवकांसाठी गाडगेबाबांचे आदर्श कार्य:प्रा. डाॅ. संजय तिडके; सांगळूद येथे अभिवादन‎

प्रतिनिधी | अकोला संत गाडगेबाबा हे एक महान समाजसुधारक आणि संत होते. त्यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी काम केले. त्यांच्या आदर्शांना स्मरण करून रासेयो स्वयंसेवकांनी समाजसेवा करण्याचे आवाहन रासेयोचे माजी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. संजय तिडके यांनी केले. ते सांगळूद येथील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कार्यक्रम अधिकारी डॉ. निशा वराडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कावळे, प्रा. राहुल माहुरे उपस्थित होते. प्रा. राजेंद्र रेवसकर, प्रा. आदिती मानकर, प्रा. रोहण सिरसाट उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना ही गाडगेबाबांचे आदर्शावर उभी असल्याने प्रत्येक स्वयंसेवकाने समाज सेवा करतांना हे आदर्श पाळणे हीच गाडगेबाबांना खरी आदरांजली ठरेल असे सांगत प्रा. तिडके त्यांनी गाडगेबाबांच्या जीवनातील प्रसंग कथन केले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:02 am

गाडगेबाबा अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छतेवर प्रहार करणारे संत:प्रा. भारसाकळेंचे मत; श्री शिवाजी महाविद्यालयात अभिवादन‎

प्रतिनिधी | अकोला शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण झालेले अज्ञान व यामुळे फोफावलेली अंधश्रद्धा, यावर त्याकाळी संत गाडगेबाबांनी प्रहार करत समाज प्रबोधन केले. गाडगेबाबा अज्ञान, अंधश्रद्धा व अस्वच्छतेविरुद्ध प्रहार करणारे संत होते, असे दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे केले. ते श्री शिवाजी महाविद्यालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त व्याख्यानात बोलत होते. श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तथा गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व प्रबोधनात्मक उपक्रम साजरे करण्यात आले. श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या या पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना प्रा. भारसाकळे यांनी गाडगेबाबांच्या बालपणापासून ते निर्वाणदिनापर्यंत महत्वपूर्ण कार्यप्रसंग विषद केले. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कार्यकारिणी सदस्य सुरेश खोटरे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे माजी उपाध्यक्ष महादेवराव भुईभार, महाविद्यालयाच्या स्थानिक विकास समितीचे सदस्य सुरेश राऊत तथा कार्यक्रमाचे संयोजक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे उपस्थित होते. संत गाडगेबाबांचे कार्य प्रेरणादायी : कार्यक्रमाचे अध्यक्ष खोटरे यांनी संत गाडगेबाबांचे कार्य हे केवळ विचारांचे नव्हे तर कृतीचे प्रेरणास्थान आहे असे भाष्य करून विद्यार्थ्यांनी ते आत्मसात करण्याचे आवाहन केले. महादेवराव भुईभार यांनी गाडगेबाबांची स्वच्छता, श्रम व अर्थपूर्ण समाजसेवा यावर मार्गदर्शनातून प्रकाश टाकला. सुरेश राऊत यांनी अशा उपक्रमांच्या साजरीकरणातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होते, असे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांनी महाविद्यालय सामाजिक उपक्रमांच्या आयोजनासाठी सातत्याने वर्षभर कार्यरत असते, अशी माहिती विषद करून महाविद्यालयाच्या सर्वांगीण वार्षिक यशाचा आवर्जून उल्लेख केला. खेळाडूंचा सत्कार महाविद्यालयातील प्रावीण्य प्राप्त खेळाडू व क्रीडा संघ यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा शुभारंभ पहाटे पर्यावरण जनजागृती मिरवणूक व वृक्षारोपणाने झाला. प्रास्ताविक डॉ. संजय तिडके यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना पोटे यांनी केले. आभार रोहन बुंदेले यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 10:01 am

मुंबईतील जागावाटाची चर्चा फार लांबवू नका:राज ठाकरेंनी राऊत, परबांना पाठवला संदेश; उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळाले नसून, आता दोन्ही पक्षांनी आपले संपूर्ण लक्ष आगामी 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे वळवले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांसाठी 'अस्तित्वाची लढाई' मानली जात आहे. मात्र, उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असतानाही या दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या विलंबामुळे प्रचारावर परिणाम होऊ शकतो, हा धोका ओळखून मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आता आक्रमक पवित्रा घेत ठाकरे गटाच्या नेत्यांना चर्चेचा घोळ जास्त न लांबवण्याचा स्पष्ट संदेश पाठवल्याची माहिती मिळत आहे. नगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांचे सर्वोच्च नेतृत्व प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने त्याचा फटका निकालात पाहायला मिळाला. मात्र, मुंबई महापालिकेत ही चूक सुधारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटात युतीच्या हालचालींना वेग आला आहे. जागावाटपासाठी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. प्रत्येक बैठकीचा अहवाल राज आणि उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. परंतु, मुंबईतील हक्काच्या 'मराठीबहुल' प्रभागांवरून दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले आहे. दादर, माहीम, शिवडी, भांडूप आणि विक्रोळी यांसारख्या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याच पक्षाला मिळाव्यात, असा आग्रह दोन्ही बाजूंकडून धरला जात आहे. 'सामना' कार्यालयात खलबते जागावाटपाची ही चर्चा लांबल्यास उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळेच राज ठाकरे यांनी जागावाटपाच्या चर्चेत सहभागी असलेले मनसेचे नेते आणि ठाकरे गटाचे संजय राऊत व अनिल परब यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ज्या जागांवरून पेच निर्माण झाला आहे, तिथे जास्त ताणून धरू नका, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. या सूचनेनंतर 'सामना' कार्यालयात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये संबंधित प्रभागांबाबत पुन्हा एकदा सविस्तर आणि थेट चर्चा झाली. या चर्चेचा तपशील आता दोन्ही ठाकरेंकडे सुपूर्द करण्यात आला आहे. युतीची घोषणा कधी होणार? मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची चावी मिळवण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणे ही राजकीय गरज असली, तरी प्रतिष्ठेच्या जागांवर कोण तडजोड करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत राज आणि उद्धव ठाकरे या वादावर काय तोडगा काढतात आणि युतीची अधिकृत घोषणा कधी होते? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 9:56 am

२०० महिलांच्या उपस्थितीत जलकुंभ मिरवणूक उत्साहात:दधिच समाजातर्फे भागवत कथा सप्ताहानिमित्त लक्ष्मीनारायण मंदिरापासून आयोजन

प्रतिनिधी | सोलापूर दाधिच दायमा समाजाकडून शनिवारपासून सात दिवस भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे. चाटी गल्लीतील लक्ष्मीनारायण मंदिरापासून २०० महिला भाविकांच्या उपस्थितीत जलकुंभ मिरवणूक काढण्यात आली. वाजत-गाजत ही मिरवणूक जुना तुळजापूर वेस येथील माहेश्वरी सांस्कृतिक भवनात आल्यानंतर स्वागत करण्यात आले. ता. २६ डिसेंबरपर्यंत दुपारी तीन ते सात यावेळेत निरूपण होणार आहे. वरंगल येथील आचार्य पवनकुमार मालोदिया हे निरूपण करतील. पहिल्या दिवशी भागवत कथा महात्म्य, भक्ती, ज्ञान, वैराग्य यावर निरूपण करण्यात आले. यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. देवाशी नाते जोडा, पुण्य सोहळ्यात सहभागी व्हा: आचार्य मालोदिया भागवत कथा वाचत राहा, ऐकत राहा. आयुष्याचे कल्याण होईल. अगोदर देवाशी नाते जोडा त्यानंतर अशा पुण्य सोहळ्यात सहभागी व्हा. कथा ऐकणं म्हणजे भक्तीच. सातत्याने देवाचे नामस्मरण करा. आतील भाव शुद्ध ठेवा. पांढरे कपडे घातले म्हणजे आपलं मन शुभ्र आहे असे नाही. अंतरंग शुद्ध पाहिजे. भाव शुद्ध असेल तरच देव आपल्या सोबत राहतो, कृपा करतो याची जाणीव ठेवा. मनात भक्ती ठेवा, देवाला प्रेमाने शरण जा. भागवत कथा, श्रीकृष्ण लीलांचे वाचन करा. आचारण करा. एकमेकांबद्दल प्रेम जपा. मदत करा, सुख-दु:खात सहभागी व्हा. हाच आनंद तुम्हाला देवाजवळ घेऊन जाईल. आचार्य पवनकुमार मालोदिया, निरूपणकार

दिव्यमराठी भास्कर 22 Dec 2025 9:54 am