SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

33    C
... ...View News by News Source

मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ:मुंबई पोलिसांनी बजावले चौकशीचे समन्स,10 नोव्हेंबरला हजर राहण्याचे निर्देश; नेमके प्रकरण काय?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढल्या असून, मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे. जरांगे पाटील यांना येत्या 10 तारखेला (नोव्हेंबर) चौकशीसाठी आझाद मैदान पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी ही नोटीस जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी विरेंद्र पवार यांना देखील पाठवली आहे. नेमके प्रकरण काय? काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे सध्या जरांगे पाटील अडचणीत आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे समन्स जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात केलेल्या उपोषणादरम्यान झालेल्या कथित उल्लंघनांशी संबंधित आहेत. मनोज जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या नियम आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 10 नोव्हेंबरला चौकशीला बोलावले या आंदोलनासाठी कोणतेही अधिकृत परवानगी न घेतल्याचा आरोप करत पोलिसांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि इतर सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी समन्समध्ये मनोज जरांगे-पाटील आणि इतर पाच जणांना 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आझाद मैदान पोलिस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. मनोज जरांगेंचे 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान उपोषण मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 27 ऑगस्टपासून आझाद मैदानात साखळी उपोषण केले होते. या उपोषणाची मागणी आरक्षणासोबतच, आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांवरील गुन्हे मागे घ्यावेत ही होती. 2 सप्टेंबर रोजी सरकारच्या शिष्टमंडळाकडून गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता याच प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना हजर राहण्यास सांगितले आहे. पोलिसांच्या समन्सनंतर जरांगेंची भूमिका काय? दरम्यान, पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे आणि जरांगे-पाटील यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे कायदेशीर आव्हान वाढले आहे. या समन्सवर मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी पुढील भूमिका काय घेतात? हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. हे ही वाचा... धनंजय मुंडेंना जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले-:मी तुझ्यासारखा नाही, जातवान; नार्को, ब्रेन मॅपिंग, CBI चौकशीला तयार, ऑडिओ क्लिपही ऐकवली मराठा आरक्षणाच्या नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वादाने पुन्हा वाढला आहे. जरांगे पाटील यांनी मुंडेंवर घातपाताचे आणि अन्य गंभीर आरोप केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ते आरोप खंडित केले आणि स्वतःची बाजू मांडली. मुंडे म्हणाले की, त्यांचा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करावी आणि तरीही सत्य बाहेर येत नसेल तर तपास सीबीआयकडे द्यावा. या वक्तव्यांनंतर जरांगे पाटीलही थेट माध्यमांसमोर येऊन पलटवार केला; त्यांनी धनंजय मुंडे यांना धन्या, म्हणून संबोधत ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यातले पुरावे दाखवले. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 5:53 pm

ती नोटीस नव्हे तर खुलासा पत्र : रुपाली ठोंबरे

पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे हा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात शिस्तभंगाची नोटीस जारी केल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील यांनी तात्काळ शनिवारी […] The post ती नोटीस नव्हे तर खुलासा पत्र : रुपाली ठोंबरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 5:41 pm

शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट

राळेगणसिद्धी : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौ-यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची त्यांच्या राळेगणसिद्धी या गावी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अण्णांनी राळेगणसिद्धी येथे केलेले जलसंधारणाचे उत्कृष्ट काम संपूर्ण देशवासियांसाठी दिशादर्शक आहे. याच ठिकाणी आता बांबू लागवड अभियान हाती घेण्यात येणार असून, […] The post शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 5:37 pm

कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची

मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेल्याने राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने शेतक-यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी अद्याप बाकी आहे. अशातच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद पेटला आहे. सोसायटी काढायची, पुन्हा कर्ज काढायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी […] The post कर्ज घ्यायचे, कर्जबाजारी व्हायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 5:31 pm

लाडक्या बहिणींना केवायसीसाठी मुदतवाढ?

मुंबई : प्रतिनिधी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे ८० लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र जर सर्वांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही, तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल. त्यांच्या […] The post लाडक्या बहिणींना केवायसीसाठी मुदतवाढ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 5:20 pm

आधी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले:अंगाशी आल्यानंतर विखेंचे स्पष्टीकरण, विधानाचा विपर्यास केला म्हणत विरोधकांवर फोडले खापर

राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आणि विरोधकांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली. या वाढत्या वादानंतर आता स्वतः विखे पाटलांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असे म्हणत, मी ते विधान ग्रामपंचायत आणि सोसायटींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केल्याचे राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. आधी सोसायटी काढायची, मग कर्ज घ्यायचं, नंतर ते माफ करून घ्यायचं आणि पुन्हा नवीन कर्ज मागायचं, हे वर्षानुवर्षं सुरू आहे, असे विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते. विखे पाटलांच्या या विधानावर शेतकरी संघटना आणि विरोधकांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी हे वक्तव्य शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे म्हटले असून, सोशल मीडियावरही त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. चोहोबाजुंनी टीकेची झोड उठल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नेमके काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? आपल्या विधानाचा संदर्भ स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, “एखाद्या वक्तव्याचा किती विपर्यास होऊ शकतो याचं मला खरंच आश्चर्य वाटतं. मी हे वक्तव्य ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलं होतं. अनेकदा या निवडणुकांदरम्यान लोक केवळ निवडणुकीसाठी कर्ज घेतात, पण त्यातून कोणतीही उत्पादकता होत नाही. मग पुन्हा तेच कर्जबाजारी होतात आणि नंतर कर्जमाफीची मागणी केली जाते, असे मी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोललो होतो. स्पष्टीकरण देताना विरोधकांवर फोडले खापर विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, “मी अनेक वर्ष सामाजिक जीवनात काम करतोय, आणि बेताल वक्तव्य करणे माझ्या स्वभावात नाही. माझं मूळ विधान जर संपूर्ण दाखवले असते, तर गैरसमज निर्माण झाला नसता. विरोधकांनी माझ्या विधानाचा फक्त एक भाग उचलून प्रचार केला आणि त्यातून वाद निर्माण झाला.” पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणावर भाष्य दरम्यान, पार्थ पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणावरही विखे पाटील यांनी भाष्य केले. हे खरेदीच प्रकरण माझ्याकडेही आले होते. शेवटी ज्या महार वतनाच्या जमिनी सरकारी जमिनी आहेत त्याबाबत आपण निर्णय करूच शकत नाही. त्या त्या मंत्र्यांनी प्रस्ताव नाकारलेच होते. हा पूर्ण व्यवहारच नियमबाह्य आहे. ज्या वादाच्या जमिनी, वतनाच्या जमिनी याबाबत जिल्हापातळीवर काय झालं याची मला माहिती नाही. वर्ग 2 मधून वर्ग एक करून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून व्यवहार झाल्याचे काही प्रकरणे समोर आली आहेत. तो व्यवहार रद्द झाला, मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीची घोषणा केली आहे, एकदा चौकशी होऊन जाऊ द्या, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले३

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 5:17 pm

पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे; रवींद्र धंगेकर आक्रमक

पुणे : प्रतिनिधी सामान्य माणसांना साधे रेशन कार्ड मिळत नाही. ही संपूर्ण यंत्रणा बोगस आहे, माती खात आहे. पार्थ पवारांकडे अजित पवारांचा मुलगा म्हणूनच पाहिले जाते. शेवटी वडिलांची पॉवर मुलगा वापरतच असतो. अजित पवारांनी व्यवहार रद्द करतो असे सांगितले. पण आता असे जमणार नाही. कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी […] The post पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे; रवींद्र धंगेकर आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 5:14 pm

रुपाली ठोंबरे यांना पक्षाची नोटीस; चाकणकरांवर आरोप करणे भोवले

पुणे : प्रतिनिधी फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याने त्यांच्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करत आवाज उठवला. मात्र रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप करणं रुपाली ठोंबरे यांना चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी त्यांना नोटीस […] The post रुपाली ठोंबरे यांना पक्षाची नोटीस; चाकणकरांवर आरोप करणे भोवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 5:12 pm

राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमधील वाद थांबेना:रुपाली पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; रुपाली चाकणकर यांच्यावर केले गंभीर आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली पाटील ठोंबरे व रुपाली चाकणकर या दोन महिला नेत्यांमधील संघर्ष दिवसागणिक बिकट होत चालला आहे. पक्षाने या प्रकरणी रुपाली ठोंबरे यांना नोटीस बजावली. त्यानंतर त्यांनी आज तातडीने पक्षाध्यक्ष अजित पवार यांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट् केली. या भेटीत त्यांनी रुपाली चाकणकर यांची तक्रार केल्याची माहिती आहे. गत आठवड्यात माधवी खंडाळकर नामक महिलेने रुपाली पाटील ठोंबरे यांच्याविषयी एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यात त्यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांच्या भगिनी प्रिया सूर्यवंशी, वैशाली पाटील, पूनम गुंजाळ व अमित सूर्यवंशी या चौघांवर आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी या घटनेमागे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर असल्याचा आरोप केला होता. यामुळे राष्ट्रवादीने त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. त्यानुसार त्यांनी आज अजित पवारांची भेट घेऊन आपली बाजू स्पष्ट् केली. पक्षाची नोटीस नव्हे खुलासा पत्र मिळाले भेटीनंतर त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, मला पक्षाची नोटीस नव्हे तर पक्षाचे खुलासा पत्र मिळाले. मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व महिला प्रदेशाध्यक्षांविषयी जे काही बोलले त्याविषयी पक्षाने माझ्याकडे खुलासा मागितला आहे. त्यासाठी 7 दिवसांचा कालावधी दिला आहे. मी त्याला कायदेशीर खुलासा देईल. वादाचा मुद्दा पोलिस ठाण्यात गेल्यानंतर संपला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माधवी खंडाळकर यांनी सीपींकडे तक्रार केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तद्नंतर मी ही पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी माधवी खंडाळकर व त्यांच्या भावावर गुन्हा दाखल केला. चाकणकरांनी महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन केले त्या पुढे म्हणाल्या, माधवी खंडाळकरांनी दाखल केलेला गुन्हा कुणाच्या सूचनेनुसार दाखल करण्यात आला याचा तपास करण्याची मागणी मी पोलिस आयुक्तांकडे केली आहे. हे कुणी प्लॅन केले? कारण माधवी यांच्याशी माझा मागील 6 वर्षांपासून कोणताही संबंध नाही. पण अचानक त्यांनी माझे नाव घेतले. फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी मृत महिलेचे चारित्र्यहनन केले. त्यामुळे मीडियामध्ये त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तेव्हा मी सांगितले होते की, पक्षाचे व महिला आयोगाचे काम वेगवेगळे आहे. पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. त्याच 28 तारखेला माधवी खंडाळकर यांनी मारहाणीची पोस्ट केली. त्यात त्यांनी रुपाली पाटील यांना तुम्ही पद का दिले? तुम्ही पक्षात का घेतले? असे नमूद करण्यात आले होते. रुपाली चाकरणकर यांच्याशी आपला संबंध नसल्याचे सांगणारी महिला अचानक त्यांना फोन करा असे का म्हणते? आता आमच्यातील दोन्ही वाद पोलिसांत आहेत. पोलिस त्याचा तपास करतील. अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून सांगितले की, यात कोण चुकले? रुपाली पाटील चुकल्या की, माधवी खंडाळकर चुकल्या की त्यांना चालवणाऱ्या चाकणकर चुकल्या. राज्य महिला आयोग हे घटनात्मक पद आहे. ते पक्षाचे खाते नाही. त्यामुळे राज्य महिला आयोगावर मी जे काही बोलले ते कायदेशीररित्या पक्षाला लागू होत नाही. त्यामुळे त्यांनी मला जो खुलासा मागितला आहे तो मी देणार आहे, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 4:53 pm

आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार?:उद्धव ठाकरेंनी फेटाळली चर्चा, संघातून अफवा आली म्हणत भाजपवरही साधला निशाणा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापल असताना, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या चर्चेत आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या माध्यमांतील चर्चेवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देत हे वृत्त फेटाळून लावले. त्यांनी केवळ वृत्त फेटाळले नाही, तर या अफवेच्या उगमावरून भाजप आणि राष्ट्रीस स्वयंसेवक संघाला जोरदार टोलाही लगावला. आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार का? या चर्चांवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, या बातमीचा उगम कुठून झाला हे मला कळून घ्यायचे आहे आणि मला ते कळले देखील आहे. या अफवेचा उगम संघातून झाला. यावर खोचक टिप्पणी करताना, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. त्यांनी सांगितले की, अहमदाबादचे नाव बदलायचे असल्याने पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री शाह यांना अहमदाबादचा महापौर बनवावे लागेल, अशी चर्चा संघात सुरू आहे. त्यामुळे, आता मला बघायचं आहे, अहमदाबादचा महापौर अमित शहा होणार की नरेंद्र मोदी? असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 'भ्रष्टाचारी जनता पार्टी' म्हणत भाजपवर टीका उद्धव ठाकरे यांनी पुढे भाजपवर भ्रष्टाचाराच्या मुद्यावरूनही हल्ला चढवला. त्यांनी सरकारवर शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत प्रश्न उपस्थित करत “शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या, कर्जमाफी करा, पीकविमा रकमेचे पैसे द्या” अशी मागणी केली. “सरकारने जाहीर केलेली मदत आधी द्यावी,” असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. पार्थ पवार, मुरलीधर मोहोळ आणि प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणांचा उल्लेख करत “भ्रष्टाचारी जनता पार्टी भ्रष्टाचार केलेल्यांना स्वतःकडे घेत आहे,” असा टोला त्यांनी भाजपला लगावला. मनसेला सोबत घेऊन मुंबई जिंकायची रणनीती दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून रणनीती आखली जात असून मनसेलाही सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. याचदरम्यान, मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता आल्यास आदित्य ठाकरे यांना महापौर बनवण्यात येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या चर्चेला स्वतः उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आणि हे वृत्त फेटाळून लावले आहे. हे ही वाचा... महायुतीला व्होटबंदी करा:उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन; कर्जमुक्ती मिळेपर्यंत गावोगावी असे फलक लावण्याचा दिला सल्ला अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत सत्ताधारी महायुतीला व्होटबंदी करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केले. कर्जमुक्त होईपर्यंत महायुतीला व्होटबंदी करा. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. जोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत महायुतीला मत नाही, असा निर्णय या प्रकरणी गावागावांनी मिळून घ्यावा. तसे फलकही आपापल्या गावांत लावावेत, असे त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 4:29 pm

राज्यातील सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा:हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी

भाजप महायुतीचे सरकार गेंड्याचे कातडीचे असून या सरकारचा कारभार पाहता त्यांनी बेशरमपणाचा कळस गाठला आहे. दररोज एक मोठे प्रकरण उघड होत असून कारवाई मात्र शून्य आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी राज्य लुटण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई, पुणेसह राज्यात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात आहेत. या सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढा आणि येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर एक संपूर्ण दिवसभर चर्चा करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप महायुती सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी पुण्यातील ४० एकर महार वतनाची जमीन ३०० कोटी रुपयांना खरेदी केली, त्यासाठी केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क रुपये भरले, त्या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रस्तावही तातडीने मान्य करण्यात आला, दस्तावेजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आले. हा भ्रष्ट कारभार उघड झाल्यानंतर आता जमीन खरेदी व्यवहार रद्द केला असे सांगितले जात आहे, म्हणजे चोरी केल्याची कबुली देत आहेत, मग कारवाई का करत नाहीत? एफआयआर मध्ये पार्थ पवारांचे नाव का नाही? पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने याआधी पुण्याच्या बोपोडीतील ॲग्रीकल्चर डेअरीची सरकारी जमिन बोगस कागदपत्रे तयार करून हडपली. या सर्व व्यवहारासाठी पैसे कुठून आले तर ते एका साखर कारखान्यातून आले. हे पैसे कोणी दिले? कसे दिले? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. चौकशी समिती नेमून सरकार फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात जैन बोर्डिंगची जमीन लाटली होती, तो प्रकार उघड होताच व्यवहार रद्द करण्यात आला हे जाहीर करण्यात आले पण हे प्रकरण संपलेले नाही. या प्रकरणातील धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर काय कारवाई झाली? मुंबईत अदानीला शेकडो एकर जमीन फुकटात दिली. भाजपच्या मुंबईतील कार्यालयासाठी सरकारी जमिनीचा केलेला व्यवहार, देवेंद्र फडणवीस यांनी उभा केलेला नवा शेठ मोहित कंभोजला एसआरएच्या जमिनी दिल्या आहेत. पुण्यात रिंगरोडच्या जमीन अधिग्रहणात मोठा घोटाळा करण्यात आला. समृद्धी महामार्गात कोणाची समृद्धी झाली हेही जनतेला कळाले पाहिजे, यासाठी सर्व जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले. ‘वंदे मातरम्’ जातीय/धार्मिक दंगे करण्यासाठी नाही राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्ष झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्ष देशभरात विविध कार्यक्रम घेत आहे, पण भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘वंदे मातरम्’ला नेहमीच विरोध केला आहे, संघाच्या शाखेत हे गीत कधीच गायले नाही, ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्य संग्रामात गायले जात, याला मोठा त्याग व बलिदानाचा इतिहास आहे. भाजपने आता इतक्या वर्षांनंतर ते स्वीकारले याचा आम्हाला आनंदच आहे. पण आता भाजप या गीताचा वापर राजकीय हेतूने करत आहे. हे पवित्र गीत धार्मिक वा जातीय दंगे घडवण्यासाठी तसेच सामाजिक शांतता भंग करण्यासाठी नाही असे बजावून ‘वंदे मातरम्’ गीतावरचे भाजपचे प्रेम हे पुतणा मावशीचे आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 3:54 pm

अधिकारी पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात:नितीन गडकरी यांचे विधान; विकासकामांच्या फायली रोखणाऱ्यांना दिल्या कानपिचक्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी शासकीय फायली रोखून धरणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. अधिकारी पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात, त्यामुळे अनेक वर्षांपासून विकासकामांच्या फायली अडवून ठेवल्या जातात, असे ते म्हणालेत. नागपूर येथे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या स्थापनादिन कार्यक्रमात ते बोलत होते. नितीन गडकरींनी या प्रकरणी एका प्रसंगाची आठवण सांगितली. ते म्हणाले, मी एका अधिकाऱ्याला थेट विचारले होते की, तुम्ही पत्नीवर प्रेम करता हे ठीक आहे, पण फायलींवर पत्नीहून अधिक प्रेम का करता? एकदा फाईल आली की तुम्ही ती दाबून ठेवता. फायलींना विनाकारण दाबून का ठेवता? फायली मंजूर करायच्या असतील तर मंजूर करा, नामंजूर करायच्या असतील तर नामंजूर करा. पण, काहीतरी निर्णय घ्या आणि त्यावर लिहा. ते म्हणाले की, उगीचच काम रखडवण्यात काय फायदा आहे? निर्णय होत नसल्याने अनेकांचे नुकसान होते. १ तारखेला पगार मिळणाऱ्याला विलंबाचा अर्थ कळत नाही, असा सल्लाही गडकरींनी दिला. कर वसूल करा, धाडी मारा, पण निर्णय घ्या. संशोधन आणि प्रशिक्षण संस्थांना सरकारमध्ये जितके महत्त्व मिळते, त्यापेक्षा जास्त देण्याची गरज आहे, असेही गडकरींनी नमूद केले. एखाद्या कार्यालयात अडचणीचा ठरणाऱ्या अधिकारी वा कर्मचाऱ्याला प्रशिक्षण संस्थेत पाठवले जाते. कधीकधी प्रशिक्षण संस्थेत लायक अधिकारी देण्याऐवजी कुठेच नको असलेल्या अधिकाऱ्याला पाठवले जाते. म्हणून, चांगले काम केलेल्या हुशार आणि प्रज्ञावंत निवृत्त अधिकाऱ्यांच्या ज्ञानाचा उपयोग अशा ठिकाणी करावा, असे गडकरींनी सुचवले. ज्ञानाचा अहंकारही मोठा असतो. राजकीय भाषेत याला 'चहापेक्षा केटली गरम' असे म्हणतात, असे सांगत आमचे पीएसच आमच्यापेक्षा जास्त 'टाईट' असतात, असे ते म्हणाले. या देशात पैशांची अजिबात कमतरता नाही. इमानदारीने काम करणाऱ्या चांगल्या लोकांची गरज आहे. माझ्याकडे १५ लाख कोटी रुपये पडून आहेत, पण ते पैसेच खर्च होत नाहीत, असेही गडकरींनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 3:51 pm

स्थानिक स्वराज्य निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा मुद्दा न्यायालयात:आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस; 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आता न्यायालयीन निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईव्हीएम यंत्रणेसोबत व्हीव्हीपॅट बसविण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने आयोगाला 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच मतदान प्रक्रियेबाबतचा हा वाद तापण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने नुकताच निर्णय घेतला होता की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्रणांचा वापर केला जाणार नाही. या निर्णयाला आव्हान देत प्रफुल्ल गुडधे यांनी याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, मतदाराला स्वतःचं मत कोणत्या उमेदवाराला दिलं गेलं हे व्हीव्हीपॅटद्वारे स्पष्ट दिसतं, त्यामुळे ही यंत्रणा पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे. जर व्हीव्हीपॅट वापरणं शक्य नसेल, तर आयोगाने मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याचा पर्याय स्वीकारावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या खंडपीठाने आयोगाकडून स्पष्टीकरण मागवले आहे. दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास अबाधित ठेवणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या निर्णयामागील कारणे न्यायालयासमोर मांडावी लागतील. याचिकाकर्त्यांनी सांगितले आहे की, व्हीव्हीपॅट यंत्रणेमुळे मतदारांचा विश्वास वाढतो, कारण त्यांना त्यांच्या मताची नोंद योग्य उमेदवाराकडे गेल्याचं प्रत्यक्ष दिसून येतं. देशातील संसदीय आणि विधानसभा निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर होत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र तो वापरला जात नाही, हे योग्य नाही, असेही गुडधे यांनी न्यायालयासमोर मांडले आहे. 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी निवडणुका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी निवडणुका पार पडणार आहेत. 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होईल. दरम्यान, उमेदवारांच्या अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने दिलेल्या नोटिशीमुळे निवडणूक आयोगावर दडपण वाढलं आहे. आयोग आता व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचा सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा या प्रकरणामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या मुद्द्यावर सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे, तर आयोगाकडून तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कारणे देत व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, न्यायालयात 18 नोव्हेंबरपर्यंत आयोगाने दिलेलं उत्तरच या प्रश्नावर अंतिम दिशानिर्देश देईल. व्हीव्हीपॅटचा वापर होणार का किंवा मतदान मतपत्रिकांद्वारेच घ्यावं लागेल का, याचा निर्णय आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल आणि त्यावरच राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा पुढील मार्ग अवलंबून असेल.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 3:39 pm

अरे रे माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली:संजय शिरसाट यांचा रोहित पवारांना खोचक टोला; पार्थ पवार प्रकरणात मौन बाळगल्याचा आरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या भूखंड घोटाळ्यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांची पाठराखण केली आहे. पण विविध विषयांवर सातत्याने परखड भूमिका घेणाऱ्या आमदार रोहित पवारांनी मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्यावर उपरोधिक निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी रोहित पवारांचा उल्लेख माझा लाडका पोपट असा करत त्याची वाचा गेल्याचे म्हटले आहे. पार्थ पवार हे पुण्यातील 1800 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणी वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची गरज व्यक्त केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही उघडपणे पार्थ पवारांची बाजू घेत त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याची शंका व्यक्त केली आहे. पण रोहित पवारांनी मात्र या प्रकरणी अद्याप एक अवाक्षरही काढले नाही. माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली मंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी या प्रकरणी रोहित पवारांवर निशाणा साधला होता. अरे रे... माझ्या लाडक्या पोपटाची (रोहित पवार) वाचा गेली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना आज पुन्हा त्यांनी यासंबंधी रोहित पवारांना धारेवर धरले. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राजकारणातील काही लोकांना थोडासा किडा असतो. ते काही विषयांवर विद्वान असल्यासारखे बोलतात. जसे काही तेच न्यायाधीश आहेत आणि त्यांचाच कायदा चालतो. हे लोक चालू घडामोडींवर बोलताना दिसले नाहीत. मागे एकदा माझी दाढ दुखत असताना त्यांनी (रोहित पवार) पोस्ट टाकली होती की, माझी दातखिळी बसली. त्यामुळे मला आता आता असे वाटत आहे की, याची वाचा गेली की काय? आता तोंड बंद का ठेवले हा माझा प्रश्न नेहमीच नित्तिमत्तेच्या गप्पा मारणाऱ्या व स्वतःला विद्वान समजणाऱ्या या लोकांनी आत्ताही बोलले पाहिजे. भले तु्म्ही बाजूने बोला किंवा विरोधात बोला, पण बोलले पाहिजे. त्यामुळे मी ट्विट केले होते की, माझ्या लाडक्या पोपटाची वाचा गेली. त्यांनी सध्याच्या घडामोडींवर स्पष्टपणे बोलले पाहिजे. नको त्या वेळी बोलणाऱ्यांनी आता बोलले पाहिजे. निगेटिव्ह की पॉझिटिव्ह हा त्यांचा प्रश्न आहे. मला त्यावर भाष्य करायचे नाही. पण कुणीही न विचारता मत व्यक्त करणाऱ्यांची जी गर्दी असते ना, त्या गर्दीत आघाडीवर असणाऱ्यांनी आता तोंड बंद का ठेवले हा माझा प्रश्न आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. राजकारण्यांची मुले आपल्या वडिलांना विचारतात का? अजित पवारांनी आपल्या पार्थ पवार यांच्या व्यवहाराची कल्पना नसल्याचे स्पष्ट केले होते. संजय शिरसाट यांनी त्यांच्या या भूमिकेवरही भाष्य केले. प्रत्येकाचे एक वेगवेगळे कौटुंबिक वातावरण असते. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण कसे आहे किंवा मुले स्वतंत्रपणे निर्णय घेतात का याची कल्पना त्यांनाच आहे. त्यामुळे त्यांनी केलेले भाष्य हे त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांना राजकारण्यांची मुले आपल्या वडिलांना विचारतात का? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर शिरसाट म्हणाले, आपण हा क्रायटेरिया सर्वांविषयी लावू शकत नाही. काही मुले विचारत असतील, काही मुले विचारत नसतील. प्रत्येकाविषयी एकमत असेल व सगळेच काही विचारतात असेही काही नाही. हे ही वाचा... व्यवहार झालाच नाही, तर मग तो रद्द का झाला?:अजित पवारांचे विधान 'जोक ऑफ द डे'; पार्थवर गुन्हा का नाही? 7 अनुत्तरीत प्रश्न मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचे नमूद करत हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने या प्रकरणी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असे असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली? त्यामुळे अजित दादांनी या प्रकरणी केलेले विधान हे 'जोक ऑफ द डे' आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 3:39 pm

पार्थ पवार यांचा जमीन ‘गैर’व्यवहार रद्द करण्यास लागणार ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचे जमीन खरेदीचे दोन कारनामे उघड झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर चौफेर टीका झाली. यानंतर बॅकफूटवर गेलेल्या अजित पवार यांनी मुंढवा येथील जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. मात्र, कायदेशीरदृष्ट्या खरेदीखत रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांना ४२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी सोमवारनंतर […] The post पार्थ पवार यांचा जमीन ‘गैर’व्यवहार रद्द करण्यास लागणार ४२ कोटींचे मुद्रांक शुल्क appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 2:55 pm

पार्थ पवारांच्या अडचणींत होणार वाढ:कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही, वाचवण्याचे काही कारणही नाही, मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित भूखंड घोटाळ्यात नियमानुसार कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत प्रकरणात अनेकांवर गुन्हा दाखल झाला आहे. भविष्यातही या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यात कुणाचा सहभाग आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल. या प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे पार्थ यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल महिन्याभरात आल्यानंतर सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही हे मुख्यमंत्र्यांनाच विचारा असे विधान करत सरकारला कोंडीत पकडले आहे. आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त स्पष्टोक्ती दिली आहे. ते म्हणाले, मी या प्रकरणी यापूर्वीच अगदी स्पष्टपणे कारण सांगितले आहे. हा एफआयआर आहे. एफआयआरचा अर्थ असतो फर्स्ट इन्फोर्मेशन रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये जे सिग्नेटरीज असतील, जे व्हेंडर्स असतील व ज्यांनी मान्यता दिल्या असतील, त्यांच्यावरच गुन्हा दाखल होतो. त्यामुळे जे काही त्या कंपनीचे ऑथराइज्ड सिग्नेटरीज होते, ज्यांनी हा सर्व व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय सरकारच्याही ज्या लोकांनी यामध्ये मदत केली, त्यांच्यावरही या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही. काही वाचवण्याचे कारणही नाही. जे झाले ते नियमानुसार झाले आहे. मी यापूर्वीही सांगितले की, या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यात कुणाचा सहभाग आढळला तर आपल्याला कारवाई करावीच लागते. त्यामुळे अतिशय नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले. काय म्हणाले होते शरद पवार? शरद पवार अकोल्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, सरकारने कालच या प्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय होते ते पाहू. पण राज्यात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. ते पुढे कोणते पाऊल उचलतात हे पाहावे लागेल. पत्रकारांनी यावेळी त्यांना या प्रकरणी अजित पवारांना जाणिवपूर्वक घेरण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न केला. त्यावर शरद पवारांनी आपल्याला हे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले. हे मला सांगता येणार नाही. पण हा एक गंभीर विषय आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे. हे काम त्यांनी करावे अशी अपेक्षा आहे. प्रशासन व राजकारण आणि कुटुंब व कुटुंबप्रमुख या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुटुंबात आम्ही एकमेकांविरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. कुटुंब वेगळे व विचारधारा वेगळी. आमचे आमच्या विचारधारेला प्राधान्य आहे, असे शरद पवार म्हणाले. अजित पवारांची व्यवहार रद्द करण्याची घोषणा दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हा जमीन खरेदी व्यवहारच रद्दबातल करण्यात आल्याची घोषणा केली. पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही. आता हा संपूर्ण व्यवहारच रद्दबातल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या प्रकरणी त्यांचा खरपूस समाचार घेत त्यांचे विधान एक मोठा विनोद असल्याचे स्पष्ट् केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 2:54 pm

जमीन खरेदी हा विषय गंभीर

अकोला : प्रतिनिधी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या अमेडिया एलएलपी कंपनीचे भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यासह आठ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तब्बल दोन दिवसांनी शरद पवार यांची याप्रकरणी प्रतिक्रिया समोर आली आहे. अकोल्याच्या दौ-यावर असताना शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद […] The post जमीन खरेदी हा विषय गंभीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 2:53 pm

दोन्ही शिवसैनिक आमने-सामने

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर विक्रोळीत श्रेयवादावरून ठाकरे आणि शिंदे यांची शिवसेना आमने-सामने आल्या. उद्धव सेना आणि शिंदे सेना यांची ताकद प्रामुख्याने मुंबई-ठाणे पट्ट्यात असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सेनेत वाद रंगल्याच्या घटना घडणार असल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत ८ नोव्हेंबर रोजी विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयावरून आमदार सुनील राऊत आणि एकनाथ शिंदे […] The post दोन्ही शिवसैनिक आमने-सामने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 2:50 pm

सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटींत घेतली , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थवरील पुण्यातील जमीन घोटाळ्याचे आरोप ताजे असतानाच, आता काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. सनाईक यांनी मीरा भाईंदरमध्ये २०० कोटींची जागा ३ कोटींमध्ये लाटल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते चंद्रपूर येथे पत्रकारांसोबत बोलत होते. माझ्याकडे एक प्रकरण […] The post सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटींत घेतली , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 2:48 pm

शीतल तेजवानी ३०० कोटी घेऊन फरार?

पुणे : प्रतिनिधी पुण्यातील कोरेगाव पार्क आणि बोपोडी या दोन्ही भूखंड घोटळ्याची मास्टरमाईंड शीतल तेजवानी असल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीवर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांना तिचा मोबाईल फोन बंद मिळत असून दोन दिवसांपासून पोलिस तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नाही. बावधन […] The post शीतल तेजवानी ३०० कोटी घेऊन फरार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 2:44 pm

लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी महत्त्वाची बातमी:केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर, परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय-आदिती तटकरे

राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रक्रियेची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर निश्चित केली आहे. परंतु आतापर्यंत केवळ 80 लाख महिलांनीच केवायसी पूर्ण केली, अशी माहिती मिळाली आहे. अजून लाखो महिला या प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत, त्यामुळे अनेकांकडून केवायसीची मुदतवाढ मागणी होत आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे 80 लाख महिलांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत आणखी लाभार्थ्यांचे केवायसी पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र जर सर्वांनी प्रक्रियेत भाग घेतला नाही, तर परिस्थिती पाहून सरकार योग्य निर्णय घेईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर केवायसीची मुदतवाढ होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. महिलांच्या सुविधेसाठी सरकारने केवायसी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे. लाभार्थ्यांना https://ladakibahin.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून केवायसी करावी लागते. मात्र, अनेक महिलांना या प्रक्रियेत अडचणी येत आहेत. काहीवेळा वेबसाइट लोड होत नाही, तर काही वेळा ओटीपी मिळत नाही. त्यामुळे महिलांकडून तक्रारी वाढल्या होत्या. या समस्या लक्षात घेऊन सरकारने आता प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. आधी दररोज 5 लाख महिला केवायसी करू शकत होत्या, पण आता ती क्षमता वाढवून 10 लाख महिलांपर्यंत करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत उत्सुकता दुसरीकडे, महिलांमध्ये आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबतही उत्सुकता आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे उशिरा जमा झाला होता. त्यामुळे अनेकांना नोव्हेंबरचा हप्ता वेळेवर मिळेल का, याबाबत शंका व्यक्त होत आहे. शासनाच्या सूत्रांनुसार, केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेल्या महिलांनाच पुढचा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांना शक्य तितक्या लवकर केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय एकूणच, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारा हा टप्पा असला तरी, केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने काही लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, सरकार परिस्थिती पाहून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता आदिती तटकरे यांच्या विधानातून व्यक्त झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या संदर्भात सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 2:42 pm

उद्या कोण कुठे हे सांगता येत नाही:मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाने खळबळ; बदल हा निसर्गाचा नियम असल्याचे सूतोवाच

राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी 'उद्या कोण कुठे असेल हे सांगता येत नाही' असे विधान करत महायुतीत एकच खळबळ उडवून दिली आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे उद्या कोण कुठे असेल हे काहीही सांगता येत नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाजप आमदार डॉक्टर विजयकुमार गावित व राजेश पाडवी हे ही उपस्थित होते. यावेळी बोलताना कोकाटे म्हणाले, मी कोणत्याही स्थितीत या कार्यक्रमाला येणार हे यापूर्वीच सांगितले होते. राज्यात आता निवडणुका सुरू झाल्यात. आज आम्ही एका व्यासपीठावर आहोत, पण उद्या आमचे काय होते हे माहिती नाही. म्हणजे कोण कुठे असेल हे काही सांगता येत नाही. यश आणि अपयश हे माणसाच्या जीवनात येतच असते. त्याचा फार विचार करायचा नसतो. बदल निसर्गनियम, तो मान्य केला पाहिजे राजकारण फार दिवस टिकत नाही. राजकारण 5 वर्षांसाठी असते. 5 वर्षांनंतर माणसे बदलतात. पक्ष बदलतात. विचार बदलतात. परिस्थिती बदलते. अनेक गोष्टी बदलत असतात. कारण, बदल हा निसर्गाचा नियम आहे. या गोष्टींचा स्वीकार करणे आपण शिकले पाहिजे, असे कोकाटे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष वेगवेगळ्या वाटांनी जाणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषतः माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज आहेत काय? असा प्रश्नही या प्रकरणी चर्चिला जात आहे. ऑनलाइन रमी खेळल्यामुळे गेले कृषिखाते उल्लेखनीय बाब म्हणजे माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषीमंत्री होते. पण सभागृहात ऑनलाइन रमी खेळताना त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे ते अडचणीत सापडले होते. विरोधकांनी या प्रकरणी टीकेची झोड उठवल्यानंतर सरकारने त्यांची कृषिमंत्रीपदावरून उचलबांगडी करत त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले होते. त्यानंतर त्यांच्याकडे क्रीडा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे कृषिखाते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. ते नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघातून 5 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर पोहोचले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसपासून झाली. पण पक्षांतर्गत मतभेदांमुळे ते शिवसेनेत गेले. नंतर ते पुन्हा स्वगृही परतले. पण 2023 मध्ये ते अजित पवारांसोबत गेले. डिसेंबर 2024 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये त्यांच्याकडे कृषिमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पण तेव्हापासून ते सातत्याने वादात अडकत गेले. हे ही वाचा... पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय:कुटुंब व राजकारण वेगवेगळ्या गोष्टी, सरकारने चौकशी करून वास्तव समाजापुढे ठेवावे - शरद पवार अकोला - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा हा एक गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर असल्याचे सांगत असतील, तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 2:27 pm

उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये सत्तेवर येण्याची क्षमता नाही:नारायण राणेंची खोचक टीका; संजय राऊत यांच्या आजारपणाचा उल्लेख

भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दोघं भाऊ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र बोलत आहेत. पण सत्तेवर येण्याची ताकद त्यांच्यात नाही, असा टोला राणेंनी लगावला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यासाठी काहीच केलं नाही, त्यांचं अस्तित्व संपत चाललंय आणि आता त्यांच्या हाती फक्त भाषणे उरली आहेत, अशी टीका करत राणेंनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याच्या मार्गावर दिसत आहेत. कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन्ही गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट, एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहर विकास आघाडी या नावाने दोन्ही गट मिळून ही निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा रंगत आहे. नुकतीच कणकवलीत झालेल्या गुप्त बैठकीमुळे या चर्चांना अधिक जोर आला आहे. या बैठकीत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत उपस्थित होते. नगरपंचायतीसाठी संभाव्य आघाडी आणि उमेदवार निवड यावर प्राथमिक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले की, जर शिंदे गटाने ठाकरे गटाशी हातमिळवणी केली, तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाशी सर्व संबंध तोडू. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विशाल परब आणि राजन तेली मला मनापासून मान्य नाहीत. मी त्यांचा नेहमी विरोध करीन. राणेंनी यावेळी एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले आणि ज्यांना सगळ्यांनी टाकून दिलं, त्यांना शिंदे का गोळा करतोय? असा थेट प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांनी पुढे इशारा देत म्हटलं की, विशाल परब मला भेटला तर ब्रेकिंग न्यूज मिळेल, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्ष धमकीच दिली. राणे यांनी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सांगितले की, मी स्वतः युती व्हावी, हेच इच्छितो. मात्र, ती युती कोणासोबत व्हावी, याचाही विचार करावा लागतो. ते म्हणाले की, जिल्ह्यात जागावाटपावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानुसार महायुती उमेदवार निश्चित केले जातील. या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्या सुरू असलेली मतभिन्नता अधिक स्पष्ट झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. राणे यांनी पूर्वीपासूनच आपल्या जिल्ह्यातील राजकीय नियंत्रण कायम ठेवले आहे आणि शिंदे गटाचे स्थानिक नेते त्यांच्या विरोधात उभे राहत असल्याने त्यांचा संताप ओसंडून वाहत असल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्या आजारपणाचा उल्लेख याच पत्रकार परिषदेत राणे यांनी ठाकरे बंधूंवरही जोरदार टीका केली. त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अलीकडील भेटींचा उल्लेख करत, दोघं बंधू सत्तेसाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सत्तेवर येण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असे म्हणत हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं अस्तित्व संपत चाललंय. आता फक्त अस्त्रं आणि भाषणं शिल्लक राहिली आहेत, असे म्हणत राणेंनी टोला लगावला. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या आजारपणाचा उल्लेख करत, त्यांचं अस्त्र पण संपतंय, असे म्हणत राणेंनी अप्रत्यक्षपणे त्यांनाही टार्गेट केले. शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास तो भाजपसाठी आव्हान सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप आणि राणे गट यांच्यातील आगामी राजकीय घडामोडींना आता अधिकच वेग येणार आहे. कणकवली नगरपंचायतीची निवडणूक ही स्थानिक असली तरी तिचे राज्यस्तरीय परिणाम होण्याची शक्यता आहे. शिंदे आणि ठाकरे गट एकत्र आल्यास तो भाजपसाठी आव्हान ठरू शकतो, तर राणेंनी अशा निर्णयाला उघड विरोध दर्शवून नवीन संघर्षाची बीजं पेरली आहेत. आता शिंदे गट काय भूमिका घेतो, राणे आपला दबाव किती वाढवतात आणि ठाकरे गट या समीकरणात किती पुढे जातो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कणकवलीचं रण आता अधिक तापणार, एवढं मात्र नक्की.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 1:57 pm

पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय:कुटुंब व राजकारण वेगवेगळ्या गोष्टी, सरकारने चौकशी करून वास्तव समाजापुढे ठेवावे - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा कथित भूखंड घोटाळा हा एक गंभीर विषय असल्याचे म्हटले आहे. पार्थ पवारांचे प्रकरण एक गंभीर विषय आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर असल्याचे सांगत असतील, तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे, असे ते म्हणालेत. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. विरोधकांनी या प्रकरणी अजित पवारांवर टीकेची झोड उठवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एक चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल महिन्याभरात आल्यानंतर सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई करेल. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शनिवारी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर काय होते ते पाहू शरद पवार म्हणाले, सरकारने कालच या प्रकरणी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती एका महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काय होते ते पाहू. पण राज्यात भाजप व त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. ते पुढे कोणते पाऊल उचलतात हे पाहावे लागेल. हा एक गंभीर विषय पत्रकारांनी यावेळी पवारांना या प्रकरणी अजित पवारांना जाणिवपूर्वक घेरण्याचा प्रयत्न होत आहे का? असा प्रश्न केला. त्यावर शरद पवारांनी आपल्याला हे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले. हे मला सांगता येणार नाही. पण हा एक गंभीर विषय आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव स्थिती समाजापुढे ठेवली पाहिजे. हे काम त्यांनी करावे अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. सुप्रिया सुळेंचे मत हे वैयक्तिक शरद पवारांनी यावेळी सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार प्रकरणात व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक असल्याचेही नमूद केले. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांचा बचाव केला होता. या प्रकरणी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही. मीडिया ट्रायलही होता कामा नये. पार्थ माझ्या मुलासारखा आहे. तो कधीच गैरव्यवहार करणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे. या प्रकरणी कागदपत्र व्यवस्थित तपासले पाहिजेत, असे त्या म्हणाल्या होत्या. पण पवारांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे स्पष्ट करत हा विषय टोलवला. प्रशासन व राजकारण आणि कुटुंब व कुटुंबप्रमुख या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कुटुंबात आम्ही एकमेकांविरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही, तर आमची विचारधारा आणतो. कुटुंब वेगळे व विचारधारा वेगळी, असे शरद पवार म्हणाले. पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही? पार्थ पवारांची अमेडिया कंपनीत 99 टक्के मालकी आहे, तर दिग्विजय पाटील यांची फक्त 1 टक्के मालकी आहे. पण त्यानंतरही या प्रकरणी केवळ दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या प्रकरणी पार्थ पवार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर पवारांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे टोलवत आपले अंग काढून घेतले. महाराष्ट्राचे गृहमंत्री याचे उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही, असे ते म्हणाले. मुंढव्यातील जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्याकडे मजबूत पुरावे गोष्टी असतील. त्या आधारावर त्यांनी निर्णय घेतला असेल. मला या प्रकरणातील शीतल तेजवानी व इतर कुणाचीही मला नावे माहिती नाहीत. ज्या लोकांनी हे आरोप केलेत, त्यांनीच हे सर्व शोधून काढावेत, असेही शरद पवार या प्रकरणी बोलताना म्हणाले. काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, या प्रकरणी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही. मीडिया ट्रायलही होता कामा नये. पार्थ माझ्या मुलासारखा आहे. तो कधीच गैरव्यवहार करणार नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे. या प्रकरणातील कागदपत्र व्यवस्थित तपासायला हवीत. ही सरकारची जमीन असेल तर असे कसे चालेल? जमिनीचा व्यवहार कसा होईल? पार्थला कुणी फसवले आहे का? हा वेगळा प्रश्न आहे. मी काही कागदपत्र पाहिली नाहीत. मला त्या व्यवहाराची माहितीही नाही. पण यावर घाईघाईने बोलण्यापेक्षा अगोदर पार्थशी बोलेन. मला रेवती, विजय आहेत तसे रोहित, पार्थ ही सर्व मुले आमचीच आहेत. लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण पार्थचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. हा देश कुणाच्याही मनमर्जीने चालत नाही. न्याय सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. कदाचित हा व्यवहार झालाही नसेल. या प्रकरणी सर्वकाही पारदर्शक पद्धतीने झाले पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 1:16 pm

स्कूल बसचा भीषण अपघात, २२ विद्यार्थी जखमी

भंडारा: प्रतिनिधी भंडारा मधून मोठी बातमी समोर आली आहे. २२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या स्कुल बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसचालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडा-यात विद्यार्थ्यांना घेऊन […] The post स्कूल बसचा भीषण अपघात, २२ विद्यार्थी जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 1:05 pm

3 कोटीत घेतलेली जमीन कुठे आहे ते मला माहिती नाही:विजय वडेट्टीवारांच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपावर मंत्री सरनाईक यांचे प्रत्युत्तर

माझी जमीन कुठे आहे बाबा… मी 3 कोटीत घेतली आणि मलाच माहिती नाही? 200 कोटी त्याची किंमत आहे मी सुद्धा खुश झालो एवढ्या कमी किमंतीमध्ये मिळाली असेल तर पाहणी करणे गरजेचे आहे, असे मिश्किल विधान मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी राज्यामध्ये काम केलेले आहे त्यांची जबाबदारी आहे. परंतु ठीक आहे हा विषय जरी वेगळा असेल तरी शेवटी मी राज्याच्या मंत्री आहे, अशा प्रकाराचे गंभीर आरोप जर माझ्यावर होत असेल तर त्याला उत्तर देणे मी कर्तव्य समजतो सध्या तरी माझी कुठेही जमीन नाही. नेमके सरनाईक काय म्हणाले? मी 3 कोटी रुपयांत घेतलेली जमीन कुठे आहे, हे पाहण्यासाठी मी सकाळी लवकर आलो आहे. मलाच माहिती नाही की, मी कुठे जमीन घेतली आहे. जमिनीची किंमत 200 कोटी रुपये आहे. त्यामुळे मी सुद्धा आनंदी झालो आहे. कारण इतक्या स्वस्तात जमीन मिळाली म्हटल्यावर त्याची पाहणी करणे गरजेचे आहे, असे म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिले आहे. प्रताप सरनाईक म्हणाले की, ठीक आहे, मी राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे इतके गंभीर आरोप झाल्यानंतर जनतेला स्पष्टीकरण देणे माझे काम आहे. विजय वडेट्टीवार आज याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहेत. त्यानंतर मी प्रत्युत्तर देईन. पण सध्या तरी अशा प्रकारची कुठली जमीन माझ्याकडे आहे हे मला माहित नाही. त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. त्यामुळे पुरावे देणे त्यांचे काम आहे. त्यानंतर मी यावर खुलासा करेन. वडेट्टीवार यांचा आरोप काय? मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी मोक्याच्या ठिकाणी 4 एकर जमीन, ज्याचे बाजारमूल्य 200 कोटी रुपये आहे, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. तुम्ही महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ..तर वडेट्टीवारांनी तक्रार करावी- बावनकुळे विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणातील सविस्तर माहिती लवकरच उघड करणार आहे. मंत्र्यांना स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावावर इतक्या कमी किमतीत अशी जागा घेता येते का? असा सवाल त्यांनी केला आहे. या आरोपांवर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केवळ माध्यमांमध्ये बोलण्याऐवजी वडेट्टीवार यांनी तक्रार दाखल केल्यास सरकार नक्कीच चौकशी करेल. तक्रारीशिवाय कारवाई करणे शक्य होत नाही.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 1:04 pm

रुग्णांना निकृष्ट जेवण पुरविल्यास कंत्राटदाराला पाचपट दंड

मुंबई : मुंबई महापालिका आपल्या रुग्णालयांत दाखल १६०० रुग्णांना दररोज अन्न पुरवठा करते. याबाबत प्रशासनाने कंत्राटदारांना आता नवीन अटी घातल्या आहेत. यात निकृष्ट अन्न पुरवठा केल्यास पाचपट दंडासह दंडासह अन्न तीनपेक्षा जास्त वेळा असुरक्षित आढळल्यास अनामत रक्कम जप्त करण्याबरोबर करार रद्द केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. महापालिके निविदापूर्व प्रशासनाने कंत्राटदारांशी चर्चा केली. यात अटीशर्ती […] The post रुग्णांना निकृष्ट जेवण पुरविल्यास कंत्राटदाराला पाचपट दंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 1:01 pm

व्हिडिओ खोटा, भीती खरी:वाघ हल्ल्याच्या व्हायरल क्लिपवर वनविभागाचे स्पष्टीकरण; सायबर पोलिसांकडे तक्रार, कायदेशीर कारवाईचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी भागात वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर झालेल्या या व्हिडिओने जनतेत भीतीचं वातावरण निर्माण झालं. अनेकांनी हा व्हिडिओ खरा समजून तो पुढे पाठवला, तर काहींनी वनविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, आता वनविभागाने या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी करत हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असल्याचं स्पष्ट केलं आहे. वनविभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, 31 ऑक्टोबर 2025 रोजी ब्रम्हपुरी वनविश्रामगृह परिसरात वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, तो पूर्णपणे खोटा आणि बनावट आहे. चंद्रपूर वनवृत्तातील कोणत्याही भागात अशी घटना घडलेली नाही. विभागाने सांगितलं आहे की, या व्हिडिओमागचा उद्देश लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करणे आणि अफवा पसरवणे हा आहे. वनविभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. वनविभागाच्या प्राथमिक चौकशीत असेही उघड झाले आहे की हा व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. वेगवेगळ्या ऑनलाइन फुटेजचे मिश्रण करून हा व्हिडिओ बनवण्यात आला असून त्यात दृश्य बदलून खोटं दृश्य तयार करण्यात आलं आहे. यासंदर्भात विभागाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करणारे आणि प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. बनावट व्हिडिओ शेअर करणे हे कायद्याने गुन्हा दरम्यान, वनविभागाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणताही व्हिडिओ, फोटो किंवा माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करावी. अफवा किंवा बनावट व्हिडिओ शेअर करणे हे कायद्याने गुन्हा ठरू शकतं. जर अशा प्रकारच्या पोस्ट्स किंवा पेजेस आढळले, तर तात्काळ वनविभाग किंवा जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती द्यावी. विभागाने स्पष्ट केलं आहे की, चुकीच्या माहितीमुळे जनतेत निर्माण होणारी भीती आणि अस्वस्थता रोखणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. संबंधितांवर कठोर कारवाई होणार चंद्रपूर जिल्हा हा वाघांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश मानला जातो आणि येथे मानव–वन्यजीव संघर्षाच्या घटना अधूनमधून घडत असतात. या पार्श्वभूमीवर अशा बनावट व्हिडिओंमुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते, असं विभागाचं मत आहे. काही महिन्यांपूर्वीही पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरात एआयच्या मदतीने बनवलेला आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात वाघासोबत माणूस गैरवर्तन करताना दाखवण्यात आला होता. त्या प्रकरणातही व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे या वेळेस देखील संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचं वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये चंद्रपूरमधील वाघाच्या हल्ल्याचा व्हिडिओ खोटा असल्याचं वनविभागानं स्पष्ट केलं असून, तो एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आल्याचं निष्पन्न झालं आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अशा व्हिडिओंचा प्रसार थांबवावा, असं आवाहन विभागानं केलं आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 12:56 pm

'पदवीधर'ची लगबग सुरू:शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी पात्रता-अपात्रतेचा निर्णय घेतील. त्यानुसार 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, 6 नोव्हेंबरनंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र 18 व 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल. 10 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून 30 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती या संकेतस्थळावरील “Manual” या विभागात पाहता येईल. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 12:10 pm

कोरेगाव पार्कची जमीन बनावट कागदपत्रांवर खरेदी:ती पेशव्यांची असून सरकारी मालकीची, एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

कोरेगाव पार्क परिसरातील जमीन ही बनावट कागदपत्रे तयार करत खरेदी केली होती. ही जमीन पेशव्यांची होती. विध्वंस-भट नावाच्या कुटुंबीयांना ही जमीन उदरनिर्वाहासाठी दिली होती. त्यामध्ये एक अट दिली होती की कुटुंबामध्ये मुलगा जोपर्यंत जन्माला येईल तो पर्यंत ही जमीन तुमची राहील. त्यांना मुलगी झाल्यावर तो अधिकार संपला. मग ही जमीन सरकार जमा झाली. 1883 साल पासून ही जमीन सरकारी जमीन झाली. 1920 साली ही जमीन कृषी महाविद्यालयांसाठी ही जमीन देण्यात आली. तेव्हापासून ही जमीन कृषी विभागाकडे आहे, असे असे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, काही जमीन मोकळी आहे, काही जमीनीवर इंग्रजांच्या कालखंडात बांधकाम झाले आहे. ही जमीन अत्यंत महत्त्वाच्या अशा शिवाजीनगर परिसरात आहे. तिचे बाजारमूल्य हे 1500 कोटी रुपयांच्या आसपास आहे. विध्वंस कुटुंबातील लोकांना हाताशी धरत तेजवानी यांनी कागदपत्रे तयार केली. कृषी महाविद्यालयाकडे जमीन असताना 2009 पासून प्रकार सुरू झाला. पुणे मनपा टीडीआर देणार होती एकनाथ खडसे म्हणाले की, यातील काही जागा PMT साठी राखीव दाखवण्यात आली. म्हणून ती पडून होती. मग यांनी ती जागा आमची आहे असे सांगत कलेक्टर कडे आमची जमीन परत द्यावे अशी मागणी केली पण त्यांनी ती नाकारली. ही लोकं मग आयुक्तांकडे गेली त्यांनीही सरकारी जमीन असल्याचे सांगत जमीन देण्यास नकार दिला. त्या निर्णयाविरोधात ते मंत्र्यांकडे गेले, त्यांनी सरकारी जमीन आहे सांगत त्यांना जमीन देण्यास नकार दिला. मग ही लोक कोर्टात गेली. पुणे मनपा यानंतर त्यांना टीडीआरचा पैसा देण्यापर्यंत आली. तेव्हा माझ्या लक्षात हा विषय आणून देण्यात आला. मी प्रशासनाला पत्र लिहून ही जमीन सरकारी आहे त्यासाठी टीडीआर मंजूर करू नये अशी मागणी केली होती. देवेंद्र फडणवीस आणि मी हा विषय विधान सभेत मांडला होता. 2015 मध्येच गुन्हे दाखल एकनाथ खडसे म्हणाले की, 2015 मध्ये ही जमीन त्यांनी मिळवली. 2015 मध्ये मी मंत्री असताना आपली सरकारी जमीन हडप करण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून हेमंत गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यावेळी संशयित आरोपी म्हणून एकबोटे, वाघमारे, इधाटे, विध्वंस, हेमंत गावंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यांच्यावरच काल गुन्हा दाखल झाला.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 12:08 pm

महायुतीला व्होटबंदी करा:उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन; कर्जमुक्ती मिळेपर्यंत गावोगावी असे फलक लावण्याचा दिला सल्ला

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत सत्ताधारी महायुतीला व्होटबंदी करा, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केले. कर्जमुक्त होईपर्यंत महायुतीला व्होटबंदी करा. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. जोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत महायुतीला मत नाही, असा निर्णय या प्रकरणी गावागावांनी मिळून घ्यावा. तसे फलकही आपापल्या गावांत लावावेत, असे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी आज परभणी जिल्ह्यातील मानवतच्या ताडबोर गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली होती. तशी तुम्हाला महायुती सरकारसाठी व्होटबंदी करावी लागेल. तुम्हाला गावागावांनी निर्णय घ्यावा लागेल की, जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत महायुतीला मत नाही. जोपर्यंत विम्याचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत महायुतीला मत नाही. अरे असे लेचेपेचे बोलून काय होणार आहे? नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत महायुतीला मत नाही. या प्रकरणी गावागावात बोर्ड लागले पाहिजेत. सरकारला तोंडावर ठणकावून सांगा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात भाजपचे सरकार आले तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण आता ते हा निर्णय योग्यवेळी करण्याची ग्वाही देऊन वेळ मारून नेत आहेत. पण त्यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळेची संधी दिली होती का? त्यामुळे त्यांना आम्हाला कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत देणार नाही हे तोंडावर ठणकावून सांगा. यामुळेच हे सरकार गुडघ्यावर येईल, अन्यथा येणार नाही. तुमच्या हातात आसुड, सरकारवर कोरडे ओढा उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, प्रत्येक ठिकाणी मला नांगर दिला जात आहे. आसुड दिला जात आहे. पण तुम्ही स्वतः शेतकरी आहात. तुमच्या हातात आसुड आहे. हे कोरडे तुम्ही सरकारवर ओढले पाहिजेत. मग पाहू कोण तुमच्या केसाला धक्का लावतो ते. शिवसेना कायम तुमच्यासोबत आहे. सरकारला जाब विचारावा लागेल. तुम्ही तुमच्या व्यथा माझ्याकडे मांडल्या. पण आता केवळ व्यथा मांडून काही होणार नाही. अश्रू ढाळून काही होणार नाही. डोक्यात तिडीक जाऊन उभी राहिली पाहिजे आणि हे सरकार घाबरले पाहिजेत. कुणीही आत्महत्या करायच्या नाहीत. घर दार उघडे पडते. आज शेतकरी संकटात आहे. त्याच्यापुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. पण आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न वाढतात. मर्दासारखे उभे राहा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे ही वाचा... व्यवहार झालाच नाही, तर मग तो रद्द का झाला?:अजित पवारांचे विधान 'जोक ऑफ द डे'; पार्थवर गुन्हा का नाही? 7 अनुत्तरीत प्रश्न मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचे नमूद करत हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने या प्रकरणी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असे असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली? त्यामुळे अजित दादांनी या प्रकरणी केलेले विधान हे 'जोक ऑफ द डे' आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 11:57 am

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ:जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटींचं मुद्रांक शुल्क भरावे लागणार; दोन्ही बाजूंनी कोंडी

पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या प्रकरणातील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी आता पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे, अशी अट सहदुय्यम निबंधक कार्यालयाने घातली आहे. अजित पवार यांनी या वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज सादर केला होता. मात्र, या व्यवहारासाठी पूर्वी आयटी पार्क उभारण्याच्या कारणावरून जी मुद्रांक शुल्क सवलत मिळाली होती, ती आता लागू होणार नाही, असं निबंधक कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. निबंधक कार्यालयानुसार या रकमेनुसार 5 टक्के मुद्रांक शुल्क, 1 टक्का स्थानिक संस्था कर आणि 1 टक्का मेट्रो कर अशा एकूण 7 टक्के दराने शुल्क भरावं लागणार आहे. म्हणजेच या व्यवहाराच्या रद्द प्रक्रियेसाठी अमेडिया कंपनीला एकूण 21 कोटी रुपये भरावे लागतील. त्यानंतरच व्यवहार रद्द मान्य करण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पार्थ पवार यांच्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत आता मोठी वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे. सदर जमीन व्यवहारावरून आधीच राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी हा व्यवहार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर गंभीर टीका केली होती. अजित पवार यांनी जनतेच्या दबावानंतर आणि वाढत्या वादानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयाकडे रद्द अर्ज सादर करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आयटी पार्कच्या नावाखाली घेतलेली सवलत रद्द झाल्यामुळे आता कंपनीला पूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे. त्यामुळे रद्द करण्याची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक खर्चिक आणि गुंतागुंतीची ठरत आहे. व्यवहार रद्द करायचा असेल तरी नव्याने व्यवहार करावा लागेल निबंधक कार्यालयाने दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केलं आहे की, पूर्वी अमेडिया कंपनीने व्यवहार करताना सांगितलं होतं की त्या ठिकाणी आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. या कारणावरूनच कंपनीला मुद्रांक शुल्क सवलत देण्यात आली होती. मात्र आता तिथे आयटी पार्क होणार नाही, त्यामुळे सवलत लागू राहणार नाही. परिणामी, अमेडिया कंपनीने जमीन पुन्हा मूळ मालक शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवायची असल्यास, पूर्ण मुद्रांक शुल्क भरणं बंधनकारक आहे. म्हणजेच, व्यवहार रद्द करायचा असेल तरी नव्याने व्यवहार करावा लागेल आणि त्यासाठी 21 कोटी रुपयांचा खर्च उचलावा लागेल. व्यवहार रद्द करण्यासाठी मोठ्या आर्थिक भाराचा सामना या प्रकरणामुळे पार्थ पवार यांची दोन्ही बाजूंनी कोंडी झाली आहे. एकीकडे व्यवहारावरून विरोधकांनी निर्माण केलेला राजकीय दबाव आहे, तर दुसरीकडे व्यवहार रद्द करण्यासाठी मोठ्या आर्थिक भाराचा सामना करावा लागणार आहे. अजित पवारांनी हा विषय शांत करण्यासाठी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला असला, तरी आता नवा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, पुढे अमेडिया कंपनी ही रक्कम भरून व्यवहार रद्द करते का, किंवा इतर कोणता मार्ग शोधते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. एकूणच पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणाने राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर नवीन वाद निर्माण केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 11:51 am

मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन फक्त 3 कोटींना घेतली:विजय वडेट्टीवारांचा आरोप; बावनकुळे म्हणाले, तक्रार द्या चौकशी होईल

मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी मोक्याच्या ठिकाणी 4 एकर जमीन, ज्याचे बाजारमूल्य 200 कोटी रुपये आहे, ती अवघ्या तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. तुम्ही महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रकरणातील सविस्तर माहिती लवकरच उघड करणार आहे. मंत्र्यांना स्वतःच्या चॅरिटेबल संस्थेच्या नावावर इतक्या कमी किमतीत अशी जागा घेता येते का? असा सवाल त्यांनी केला आहे. या आरोपांवर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केवळ माध्यमांमध्ये बोलण्याऐवजी वडेट्टीवार यांनी तक्रार दाखल केल्यास सरकार नक्कीच चौकशी करेल. तक्रारीशिवाय कारवाई करणे शक्य होत नाही. महाराष्ट्र लुटून खाताय विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात घोटाळ्यांची मालिका प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत:च्या शैक्षणिक संस्थेला मीरा-भाईंदर-मधील चार एकर प्राइम लँड जिची किंमत 200 कोटी रुपये आहे ही 3 कोटी रुपयांमध्ये घेतली. मंत्र्यांना स्वत:च्या संस्थेच्या नावाने अशी जमीन घेता येते का? हे जर होऊ शकत असेल तर तुम्ही महाराष्ट्र लुटून खा आम्ही डोळे बंद करत बसतो. लुटा आओ लुटो महाराष्ट्र बेचो अशी म्हणायची परिस्थिती या सरकारच्या माध्यमातून आली आहे. हे घोटाळे थांबवण्यासाठी कारवाई करण्यात यावे. पुण्यात मोठे जमीन घोटाळे विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात जमीन लुटली जात आहे. मी सांगितले की एक लाख कोटीपेक्षा जास्त स्कॅम पुण्यामध्ये आहे. कोणी बिल्डर, डेव्हलपर, नेते यांनी जमिनी बळकावण्याचा सपाटा लावला आहे. कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीचा व्यवहार रद्द केला. या करारामध्ये समावेश असलेल्या लोकांवर गुन्हे दाखल झाले. पण मूळ प्रश्न असा आहे की कंपनीचा जो मालक आहे, तो सुद्धा यामध्ये दोषी आहे. त्याच्यावरही कारवाई व्हावी. ज्या पद्धतीने दिग्विजय पाटील आणि सब-रजिस्ट्रार वर कारवाई झाली, उद्या उद्योग संचालनालयावर होईल. या व्यवहारात महसूल विभागाने मुद्रांक शुल्कात सूट दिली, ते सुद्धा दोषी आहेत. अजित पवारांनी पूत्र प्रेम कमी करत हा व्यवहार रद्द केला आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 11:40 am

भाजपकडून अजित पवारांची पाठराखण:अजित पवार यांचा राजीनामा घेणे योग्य नाही -विखे पाटील; महार वतनाच्या जमिनी म्हणजे काय?

मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचे नाव आल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार संकटात सापडलेत. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. पण भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांची पाठराखण करत प्रस्तुत प्रकरणात त्यांचा राजीनामा घेणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यातील मुंढवा - कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीच्या विक्रीवरून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार वादाच्या भोवऱ्यात अडकेलत. या परिसरातील बाजारभावानुसार, जवळपास 1800 कोटींची ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली. ही जमीन सरकारच्या मालकीची असलेली महार वतनाची असल्याचे सांगण्यात येते. पार्थ पवार यांची भागिदारी असलेल्या अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला. आता या प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यात पार्थ यांचे नाव नाही. विरोधकांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही पुणे भूखंड घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांचा राजीनामा मागणे योग्य नाही. अजित पवारांनी त्याचवेळी हे प्रकरण थांबवले असते तर प्रकरण इथपर्यंत आली नसती. मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळा प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिलेत. वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच त्यावर भाष्य करता येईल. पण विरोधकांकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे ते राजीनाम्याचा मुद्दा पुढे करत आहेत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी महसूल, मुद्रांक, नोंदणी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली आहे. ही 5 सदस्यीय समिती प्रस्तुत भूखंड घोटाळ्याची चौकशी करून एका महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करेल. उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा राधाकृष्ण विखे पाटलांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे कोविड काळात जनतेला गरज असताना घरात बसून राहिले. कोरोना लसीसाठी ठेवलेले 6 हजार कोटी रुपये कुठे गेले? शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे हे उद्धव ठाकरे यांचे बेगडी रूप आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्यांची व त्यांच्या कंपनीची सध्या केवळ नौटंकी सुरू आहे, असे ते म्हणालेत. महार वतनाच्या जमिनी म्हणजे काय? वतनदारी पद्धती ही महाराष्ट्र व लगतच्या प्रदेशात ब्रिटिशपूर्वकाळापासून अस्तित्वात होती. राजेही त्यांच्या अखत्यारित वतनाची इनाम देत. या वतनाच्या बदल्यात काही सामाजिक कामे सांगितली जात. ती संबंधितांना करावी लागत. वतनाची ही जमीन कसून त्यातून उत्पन्न मिळवता येत असे. ही जमीन महार समाजाला वतन म्हणून दिली जात होती. या मोबदल्यात या समाजाला सुरक्षा, संदेशवहन व इतर सरकारी कामे करावी लागत. ब्रिटिश काळात वंशपरंपरागत पद्धतीने या वतनाच्या जागा देण्याची पद्धत सुरू राहिली. त्यानंतर संबंधित ह्या जमिनी कसणे सुरू केले. पण स्वातंत्र्यानंतर या जमिनींशी संबंधित सरकारचे धोरण बदलले. सरकारने वतनाची पद्धत आणि वतनं बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याला वेगवेगळी सामाजिक कारणे होती. 1958 मध्ये महाराष्ट्र सरकारने 'वतन निर्मूलन कायदा' आणला. त्या अंतर्गत ही वतने रद्द करण्यात आली. तसेच त्यात येणाऱ्या जमिनीही सरकारी अखत्यारित घेण्यात आल्या. त्या ताब्यात घेताना सरकारने ही इनामं मिळालेल्या कुटुंबांना मोबदलाही दिला होता. सरकारने 1963 च्या आसपास या वतनांच्या जमिनींविषयी अजून एक नियम तयार केला. त्याच्या अटीशर्ती निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार या वतनाच्या जमिनी मूळ मालकांना पुन्हा प्रदान करण्यात आल्या. पण त्यासाठी त्या जमिनींच्या मूल्याकनांच्या 50 टक्के रक्कम ही त्यांच्याकडून नजराणा म्हणून भरुन घेतली गेली. आजही त्या जमिनी बिगर कृषी कामासाठी वापरायच्या असतील सरकारकडे 50 टक्के नजराणा भरून परवानगी मिळवावी लागते. सरकारने वतनाच्या जमिनी कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार आहेत हे ठरवले. सातबाऱ्यावर मालकांची नाव नोंदली गेली. पण मालकी एका प्रकारे सरकारचीच राहिली. प्रशासकीय भाषेत याला 'भोगवटादार वर्ग 2' प्रकारातल्या जमिनी असे म्हटले जाते. महार वतनाच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारावर कडक निर्बंध आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित या जमिनी येतात. त्यांची कोणत्या प्रकारची खरेदी-विक्री करायची असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. अशा परवानगीशिवाय कोणताही व्यवहार झाला तर ही जमीन सरकारजमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो. महाराष्ट्राच्या विविध भागात अशा प्रकारे इनामांचे वतन म्हणून दिलेल्या जमिनी आहेत. पुण्याच्या ज्या जमिनीवरुन वाद सुरु आहे तीही अशाच प्रकारे महार वतनाची जमीन आहे. तिचा जो व्यवहार झाला त्याची जिल्हाधिकारी वा सरकार यांना कोणतीही माहिती नव्हती. दरम्यान, 1988 मध्ये ही जमीन राज्य सरकारने 'बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया' या केंद्र सरकारच्या संस्थेला 50 वर्षांच्या भाडेकराराने दिल्याचेही या प्रकरणी सांगितले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 11:25 am

अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीवरुन खडसे-महाजन आमने-सामने:खडसेंची पक्षातून हकालपट्टी झाली असती; महाजनांचा टोला

पुण्यातील मुंढवा भागातील 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार सध्या राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण करीत आहे. या जमिनीचा व्यवहार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केवळ 300 कोटी रुपयांमध्ये केल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त 500 रुपयेच भरल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे हा जमीन घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून, राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी या प्रकरणात चौकशीची मागणी केली असून, काही नेत्यांनी तर थेट अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली ती शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी. त्यांनी अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. खडसे म्हणाले की, मी माझ्या कार्यकाळात आरोप झाल्यानंतर पक्षाची प्रतिमा टिकवण्यासाठी आणि नैतिक जबाबदारी मान्य करून 12 खात्यांचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून अजित पवारांनीही तसंच करायला हवं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण आले. विरोधकांनीही खडसेंच्या मागणीला समर्थन देत अजित पवारांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. गिरीश महाजन यांचा खडसेंवर पलटवार मात्र या वक्तव्यावर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर पलटवार केला. महाजन म्हणाले की, खडसे यांनी स्वखुशीने नव्हे, तर पक्षानेच त्यांना राजीनामा द्यायला सांगितलं होतं. पक्षाने त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की, राजीनामा द्या अन्यथा पक्षातून हकालपट्टी केली जाईल. त्यानंतरच त्यांनी पद सोडलं. महाजनांच्या या विधानामुळे भाजपच्या गोटातच नवे वाद निर्माण झाले. कारण खडसे हे पूर्वी भाजपमध्ये होते, पण नंतर त्यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता दोन्ही नेत्यांमधील जुना संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. महाजन हे त्या काळात लहान होते - खडसे गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंनी तत्काळ प्रतिक्रिया देत त्यांना टोला लगावला. खडसे म्हणाले, गिरीश महाजन हे त्या काळात लहान होते, त्यांना सगळं माहिती नाही. मी कोणाच्या दबावाखाली नव्हे, तर पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी अर्ध्या तासात माझा राजीनामा दिला होता. त्यांनी पुढे म्हटले, गिरीश महाजनांवरही अनेक गंभीर आरोप झाले, पण त्यांनी कधी राजीनामा दिला का? हीच खरी नैतिक जबाबदारी असते का? खडसेंच्या या प्रतिक्रियेने वाद अधिक तीव्र झाला असून, दोन्ही नेत्यांमध्ये शब्दयुद्ध सुरू झालं आहे. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करावी या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पार्थ पवारांच्या जमीन व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित जमीन व्यवहार कायदेशीर प्रक्रियेने झाल्याचं त्यांच्या जवळच्या सूत्रांचं म्हणणं आहे. परंतु विरोधकांना त्यावर विश्वास नाही. त्यांनी या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या वादामुळे महाविकास आघाडी आणि सत्ताधारी गटात तणाव वाढला आहे. येत्या काही दिवसांत पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणाची चौकशी आणि त्यावर अजित पवारांची भूमिका काय असेल, हे पाहणं आता सगळ्यांच्या उत्सुकतेचं कारण ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 11:13 am

चुकीला माफी नाही, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे:अजित पवारांचे पक्षातही ऐकत नाही, मुलगाही ऐकत नाही- रवींद्र धंगेकर

सामान्य माणसांना साधे रेशन कार्ड मिळत नाही. ही संपूर्ण यंत्रणा बोगस आहे माती खात आहे. पार्थ पवारांकडे अजित पवारांचा मुलगा म्हणूनच पाहिले जाते. शेवटी वडिलांची पॉवर मुलगा वापरतच असतो. काल अजित पवारांनी व्यवहार रद्द करतो असे सांगितले. पण आता असे जमणार नाही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, अजित पवार यांचे कोणी ऐकत नाही हे मी या प्रकरणाच्या दोन दिवसांपूर्वीच बोललो. पक्षांमध्येही त्यांचे कुणी ऐकत नाही आणि काल ते बोलले की मुले मोठी झाली ते ऐकत नाही. अजित पवार यांची प्रतिमा खराब होत आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात गोखलेंकडे ऐवढे पैसै नाहीत हे पैसे नेमके कुणाचे हे शोधले पाहिजे. दोन्ही व्यवहारामध्ये दोषींवर कारवाई झाली पाहिजे. दोन्ही कांड सारखे रवींद्र धंगेकर म्हणाले की, कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचा विषयामध्ये दोन दिवसांमध्ये इतक्या घडामोडी झाल्या की मला बोलण्याची संधीच मिळाली नाही.मी या प्रकरणी माहिती घेतली तेव्हा मला समजले की शीतल तेजवानी यांना देण्यात आलेले कुलमुक्तार पत्र हेच बोगस होते. जी जीन त्यांच्या नावावरच नाही त्यांना परस्पर कुलमुक्तार पत्र देता येत नाही, कारण सातबाराच नाही. मूळ कागदपत्रावर नाव नाही. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन जणांवर गुन्हे दाखल केले यात पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही हे माहिती नाही. यावर अजित पवारांनी आम्ही व्यवहार रद्द करू असे काल सांगितले. जैन बोर्डिंग आणि हा कोरेगाव पार्क जमिनीचा दोन्ही कांड सारखे आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि जैन बोर्डिंग प्रकरणी ती कारवाई झाली नाही. पार्थवर गुन्हा दाखल व्हावा रवींद्र धंगेकर म्हणाले की, या प्रकरणी जर दादांचा मुलगा आहे तर जैन बोर्डिंग प्रकरणी खासदार होते हे सर्व लपवा छपवीचा प्रकार आहे. मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा हे नाही होऊ शकत. अजित पवार यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण त्यांने चुकीचे केले आहे. चुकीला माफी नाही पण ही महार वतनाची जमीन ती शासनाने ताब्यात घेतली, मग ज्यांच्या नावावर होती त्यांनी कुलमुक्तार पत्र दिले. पहिले कुलमुक्तार पत्र दिले यामध्ये सरकारी यंत्रणेने माती खाली आहे. एवढे पैसे आले कूठून? रवींद्र धंगेकर म्हणाले की, चोरी करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणायचे की धरा पैसै असे जमत नाही. कोरेगाव प्रकरणी अजित पवार यांनी व्यवहार रद्द होईल या वक्तव्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. तर चूकीला माफी नाही, कारवाई झाली पाहिजे. याच प्रकरणी जैन बोर्डिग प्रकरणी सुद्धा कारवाई झाली पाहिजे. 300 कोटी, 500 कोटी हे पैसै येतात कुठून? याची ईडी मार्फत चौकशी केली गेली पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 11:09 am

मोठी बातमी:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन महिला नेत्यांमधील वाद पेटला; रूपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाची नोटीस, 7 दिवसांत खुलासा मागवला, कारवाई होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन महिला नेत्यांमधील वाद आता उघडपणे समोर आला आहे. महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि प्रदेश प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून दोघींमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्याने आता पक्षशिस्तीच्या पातळीपर्यंत रूप घेतले आहे. ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर सार्वजनिकरित्या टीका करत तीव्र शब्दांत आरोप केले, त्यानंतर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटीसमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवे वादळ निर्माण झाले आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी ही नोटीस जारी केली असून, ठोंबरे यांनी केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे असल्याचे नमूद केले आहे. नोटीसीत म्हटले आहे की, आपण पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या पदावर कार्यरत आहात. अशा जबाबदार पदावर असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व पक्षाच्या महिला विभागाच्या प्रमुखांविषयी प्रसारमाध्यमांमध्ये दिलेली विधाने अनुचित असून, पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी आहेत. त्यामुळे आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा सात दिवसांच्या आत करावा. या नोटीसीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनाही पाठवण्यात आली आहे. या नोटीसीनंतर रूपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांनी लिहिले, माझ्याकडून केलेल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे, पण मला मिळालेला वेळ अत्यंत कमी आहे. मी पक्षाशी निष्ठावान आहे, पण महिलांविरुद्ध अन्याय झाल्यावर मी गप्प बसू शकत नाही. आमच्या भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यहननाच्या प्रकरणात अन्याय झाल्याचं मला वाटतं, त्यामुळे मी आवाज उठवला. ठोंबरे यांनी पुढे लिहिलं की, ज्यांनी एका मृत भगिनीचं चारित्र्यहनन केलं, त्यांच्या बचावासाठी खुलासा का द्यावा? याचा मी विचार करीत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा पक्षात चर्चा रंगल्या आहेत. ठोंबरे यांच्यावर कारवाईचा निर्णय दरम्यान, रूपाली ठोंबरे पाटील केवळ सोशल मीडियावरच नव्हे तर आंदोलनातही सक्रिय दिसल्या. पुण्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात काही महिला संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात ठोंबरे स्वतः उपस्थित होत्या. आंदोलन करणाऱ्या महिलांच्या हातातील पोस्टर आणि घोषणाबाजीमुळे हा विषय अधिकच गाजला. पक्षाच्या वरिष्ठांनी या आंदोलनाकडे गंभीरतेने पाहिले असून, त्यामुळेच ठोंबरे यांच्यावर कारवाईचा निर्णय घेण्यात आला, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विरोधात कारवाई होते की तो वाद मिटतो या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अजित पवार गटाने एकीकडे शिस्तभंग सहन न करण्याची भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे पक्षातील महिला नेत्या सार्वजनिकरीत्या एकमेकींवर टीका करत असल्याने पक्षाची प्रतिमा धोक्यात येत आहे. येत्या काही दिवसांत रूपाली ठोंबरे यांचा खुलासा पक्ष नेतृत्वासमोर सादर होणार आहे. त्यानंतर त्यांच्या विरोधात कारवाई होते की तो वाद मिटतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, या दोन रूपालींच्या संघर्षामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागात सध्या गोंधळ माजल्याचं चित्र आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 10:56 am

व्यवहार झालाच नाही, तर मग तो रद्द का झाला?:अजित पवारांचे विधान 'जोक ऑफ द डे'; पार्थवर गुन्हा का नाही? 7 अनुत्तरीत प्रश्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचे नमूद करत हा संपूर्ण व्यवहारच रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने या प्रकरणी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असे असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली? त्यामुळे अजित दादांनी या प्रकरणी केलेले विधान हे 'जोक ऑफ द डे' आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याप्रकरणी अडचणीत सापडलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना याविषयावरील आपली भूमिका स्पष्ट केली. पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झाला नाही. आता हा संपूर्ण व्यवहारच रद्दबातल करण्यात आला आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या प्रकरणी त्यांचा खरपूस समाचार घेत त्यांचे विधान एक मोठा विनोद असल्याचे स्पष्ट् केले आहे. डबल इंजिन की सरकार.. भ्रष्टाचार करेंगे धुवांधार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या प्रकरणी अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हणाले की, अजित पवार म्हणतात की व्यवहार झालाच नाही. असं असेल तर मग तो रद्द करण्याची वेळ कशी आली.. अजित दादांचे या विषयाचे वक्तव्य म्हणजे'जोक ऑफ द डे' आहे. इतर वेळी मुद्देसूद विषय मांडणारे, नियमांवर बोट ठेवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही 'बेसंबंध' वाक्य सहनही होतात. एका अर्थाने संघाच्या मुशीत तयार झालेल्या नेत्याने भ्रष्टाचाराला दिलेला हा राजश्रय म्हणावा लागेल. डबल इंजिन की सरकार.. भ्रष्टाचार करेंगे धुवांधार, असे दानवे म्हणाले. काय म्हणाले अजित पवार? जमीन खरेदी प्रकरणात एक पैशाचा व्यवहार झालेला नाही, तो का झाला नाही, तरीही नोंदणी कशी झाली हा चौकशीचा भाग आहे. यासाठीच्या समितीने दबावाला बळी न पडता चौकशी करावी, यातून वस्तुस्थिती समोर येईल. मी किंवा माझ्या नातेवाईकांशी संबंधित कुठलीही प्रकरणे असली तरी संबंधित अधिकाऱ्यांनी रीतसर चौकशी करावी, असे अजित पवार मुंबईत बोलताना म्हणाले. पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा का नाही? पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? असा प्रश्न यावेळी अजित पवारांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी जे नोंदणी कार्यालयात आले होते, ज्यांनी कार्यालयात येऊन सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थापन केली चौकशी समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी नेमली आहे. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात जमिनीचा करार केला होता, पण पैशांची देवाणघेवाण बाकी होती. रजिस्ट्री पूर्ण झाली होती. पण आता दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी असा अर्ज केला आहे. त्यासाठीचे पैसे भरण्याची नोटीस त्यांना पाठवली आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अंतर्गत समितीच्या समांतर चौकशीचा अहवाल एक महिन्यात घेऊ. 'अमेडिया'चा आणखी एक गैरव्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या कंपनीवर कृषी खात्याची बोपोडी येथील 5 हेक्टर जमीन तहसीलदारांना हाताशी धरून बळकावल्याचा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बेकायदा आदेश व पत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याच्यासह खडक पोलिस ठाण्यात 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 7 अनुत्तरीत प्रश्न

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 10:48 am

पार्थ पवार प्रकरणाचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही:फडणवीस भ्रष्टाचार सहन करत नाहीत- चंद्रकांत पाटील

पार्थ पवार प्रकरणाचा आणि आगामी निवडणुकीचा काहीही संबंध नाही. हे प्रकरण पूर्णपणे रुटीन चौकशीचा भाग आहे. पत्रकारांना अनेक वेळा जे सूर्यालाही दिसत नाही ते दिसते. पण या प्रकरणाचा राजकीय हेतू नाही, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही भ्रष्टाचाराला कधीही पाठिंबा दिला नाही. त्यांनी या प्रकरणातील संबंधित तहसीलदाराला निलंबित केले असून चौकशी वेगाने सुरू आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे. मनपाशी काही संबंध नाही चंद्रकांत पाटील म्हणाले की,फौजदारी दावा कोणा कोणावर करायचा त्याबाबत यादी झाली आहे, त्या वेगाने तपास पुढे चालला आहे. त्यामुळे आपण आत्ताच पार्थ पवारांची जबाबदारी आहे की, त्यांच्या कंपनीची आहे. हे सगळे चौकशीअंती बाहेर येईल, त्या सगळ्याचा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काहीही कसलाही संबंध नाही. जागावाटपात राष्ट्रवादी येणार बॅकफूटवर फडणवीसांनी दबाव टाकून, सल्ला देऊन भूखंड व्यवहार रद्द करून टाकला. अजित पवारांचे उपमुख्यमंत्रिपद वाचवले. याचा मोबदला भाजप वसूल करेल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुण्यासह राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात अजित पवारांना जागावाटपात बॅकफूटवर ठेवेल, असे राजकीय अभ्यासक सांगत आहेत. फडणवीसांच्या हस्तक्षेपाने वाचले उपमुख्यमंत्रिपद सूत्रांनी सांगितले की, पार्थने हा व्यवहार मला न सांगता केला या अजित पवारांच्या दाव्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी गुरुवारी दुपारी संपर्क साधला. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फटका पडू नये, यासाठी तातडीने डॅमेज कंट्रोल करा, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना बजावले. शिंदे सेनेतील नेते, मंत्रीही अजित पवार गटाविषयी नाराजी व्यक्त करू लागले. त्यामुळे शुक्रवारी फडणवीसांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत बैठक घेऊन उपमुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी भूखंड व्यवहार रद्द करा, असा दबाव टाकला. तो मान्य करण्याशिवाय अजित पवारांपुढे अन्य पर्याय नव्हताच. नेमके प्रकरण काय? अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी नियम धाब्यावर बसवून स्वत:च्या कंपनीसाठी केलेला 1800 कोटींचा भूखंड व्यवहार उघडकीस आल्यावर 32 तासांतच रद्द करण्यात आला. पार्थ यांनी त्यांच्या अमेडिया कंपनीसाठी कोरेगाव पार्क येथे महार हडोळता वतनाची 40 एकर जमीन खरेदी केली. बाजारात 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटी रुपयांत खरेदी करताना त्यांना 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. या प्रकरणी विरोधकांनी 6 नोव्हेंबर रोजी एकच गदारोळ केला. रस्त्यावर आंदोलने सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नियुक्त केली. पहिल्या टप्प्यात तहसीलदार, सहायक दुय्यम निबंधकाला निलंबित करण्यात आले. पार्थ पवार यांना वगळून अमेडिया कंपनीतील पार्थ यांचे भागीदार तसेच जमीन व्यवहारात सहभागी 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 10:34 am

दिव्य मराठी अपडेट्स:उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस; परभणी-जालना-संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांशी साधणार संवाद

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 10:31 am

हिंगोली जिल्ह्यात रंधा मशीनच्या नावाखाली सागवानाच्या झाडांची अवैधरीत्या कत्तल:वन खात्याची डोळेझाक नागरिकांच्या चर्चेचा विषय

हिंगोली जिल्ह्यात रंधा मशीनच्या नावाखाली सागवानाच्या झाडांची अवैधरीत्या कत्तल केली जात असून दुसरीकडे वन विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत . त्यामुळे जिल्हयातील जंगल नावालाच शिल्लक राहात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. वन विभागाची डोळेझाक नागरिकांच्या चर्चेचा विषय बनली आहेत. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगलाचा भाग आहे. या ठिकाणी सागवान सह इतर झाडे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मात्र मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातून रंधामशीन सुरु झाल्या आहेत. जंगलाच्या भागातच ग्रामीण भागाला लागूनच रंधा मशीन सुरु करून सागवान तस्करांनी डोके वर काढले आहे. हिंगोली जिल्हयातील जंगलाचा भाग असलेल्या परिसरातील सागवानाची सर्रास कत्तल करून माळरान बोडखे केले जात आहेत. रात्रीच्या वेळी सागवानाच्या झाडांची कत्तल करून त्याची रातोरात वाहतूक केली जात आहे. त्यानंतर रंधा मशीनवर त्यांची कटाई करून सागवानाची विल्हेवाट लावली जात आहे. या सर्व प्रकाराकडे वन विभागाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून आश्‍चर्य व्यक्त होऊ लागले आहे. जिल्हयातील सागवान तस्करावर अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकाराची कारवाई केली जात नसल्याने त्यांना वन विभागाचे पाठबळ असल्याचा आरोपही केला जाऊ लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात वन विभागाकडून एकीकडे वृक्षलागवडीचा फार्स केला जात असून दुसरीकडे अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पुढील काळात जिल्हयातील जंगल नामशेष होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कळमनुरी तालुक्यातील जांब, निमटोक, बोथी, पावनमारी, उमरदरा, डोंगरकडा या भागात सुरु असलेल्या रंधामशीनच्या नावाखाली झाडांची अवैध कत्तल सुरु असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 10:13 am

कोल्हापुरात महाविकास आघाडीचा एकत्र लढा देण्याचा निर्णय:स्थानिक निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे बदलणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही सोबत घेण्याची तयारी

कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीने या निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी रात्री कोल्हापुरात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार सुनील प्रभू उपस्थित होते. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या संयुक्त बॅनरखाली लढविण्याचे ठरले. मात्र जागा वाटपाचा निर्णय अद्याप झाला नसून, तो स्थानिक स्तरावर पक्षांमध्ये चर्चा करून ठरवला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे तीन घटक पक्ष एकत्र येऊन रणनीती आखणार असल्याने कोल्हापुरात सत्ताधारी महायुतीसाठी अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. आघाडीच्या नेत्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही सहभागी करून घेण्याची तयारी दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याची तयारी सुरू आहे. पुढील दोन दिवसांत छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत या संदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जर स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीत सामील झाली, तर ग्रामीण भागात आघाडीची पकड आणखी मजबूत होईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच शेतकरी आणि सहकार राजकारणासाठी ओळखला जातो. त्यामुळे या नव्या राजकीय एकीचा परिणाम थेट नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या निकालावर दिसून येऊ शकतो. तिरंगी लढत होण्याची शक्यता राज्य निवडणूक आयोगाने नुकताच 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा आणि चंदगड या दोन नगरपंचायतींसह गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि पेठवडगाव या 11 नगरपरिषदांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर आघाडी आणि महायुतीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. 10 नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवार ठरविणे, प्रचार नियोजन आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा यांना वेग आला आहे. मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाल्याने पक्षांनी तयारी अधिक गतीमान केली आहे. महाविकास आघाडीच्या एकत्र लढण्याच्या निर्णयामुळे कोल्हापुरातील निवडणुकीचा रंग पालटण्याची शक्यता आहे. 10 नोव्हेंबरपासून प्रचाराला सुरुवात होणार असून, मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार मोहीम उभारली जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूरचा राजकीय रंगमंच पुन्हा एकदा तापणार असून, या निवडणुकांमधून भविष्यातील जिल्हा राजकारणाचा दिशादर्शक ठरणारा निकाल लागेल, असे म्हटले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 9:29 am

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याचे कारण ठरलेला गावंडे आता पार्थ पवारांच्या प्रकरणात:आता हिशेब चुकता करणार?

पुण्यातील बोपोडी भागातील वादग्रस्त जमीन प्रकरण आता अधिक गंभीर स्वरूप घेत आहे. या प्रकरणात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींमध्ये तहसीलदार सूर्यकांत येवले, दिग्वीजय पाटील आणि बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांचा समावेश आहे. हेमंत गावंडे हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी काही वर्षांपूर्वी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी गावंडे यांच्या खुलाशांमुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांच्यावरच राज्य सरकारच्या कृषी विभागाची साडेपाच हेक्टर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच हेमंत गावंडेंविरोधात आता खडसे प्रतिशोध घेण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची तयारी करत आहेत. या वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात पार्थ पवार यांच्या अरेडिया कंपनीचा थेट संबंध आहे. कंपनीने बोपोडी भागातील जमीन खरेदी करण्याच्या प्रक्रियेत शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आता हीच कंपनी व्यवहार रद्द करण्यासाठी पुढे सरसावली असली तरी त्यासाठी तिला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अरेडिया कंपनीने व्यवहार रद्द करण्यासाठी पुण्यातील बावधन येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज केला आहे. मात्र, कार्यालयाकडून या अर्जावर स्पष्ट अट घालण्यात आली आहे. कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागेल, अन्यथा व्यवहार रद्द मानला जाणार नाही. म्हणजेच पार्थ पवारांच्या कंपनीला आता या वादातून बाहेर पडण्यासाठी 21 कोटींचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. सह दुय्यम निबंधक कार्यालयाने आपल्या उत्तरात म्हटले आहे की, अरेडिया कंपनीने जमीन खरेदी करताना ती आयटी पार्क उभारण्यासाठी घेत असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे कंपनीला त्या वेळी मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आली होती. परंतु आता तीच जमीन पुन्हा मूळ मालक शीतल तेजवाणी यांच्या नावे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सवलतीचा उद्देश पूर्ण झाला नसल्याने नवीन व्यवहारासाठी पूर्ण शुल्क भरावे लागेल. या शुल्कात 5% मुद्रांक शुल्क, 1% मेट्रो सेस आणि 1% स्थानिक स्वराज्य संस्था सेस समाविष्ट आहे. 300 कोटींच्या या व्यवहाराच्या एकूण सात टक्के रक्कम म्हणजे 21 कोटी रुपये एवढा हा खर्च ठरणार आहे. या निर्णयामुळे अरेडिया कंपनीसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नियमाच्या बाहेर मला चालणार नाही - अजित पवार दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या माहितीनुसार हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. शासनाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ही समिती पुढील एका महिन्यात आपला अहवाल सादर करेल. कोणी मदत केली, कुणाचे फोन गेले, कोण सहभागी होते, हे सगळं समोर येईल, असे पवार म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, मी माझ्या राजकीय आयुष्यात कधीही नियम मोडले नाहीत. माझ्यावर यापूर्वीही अनेक आरोप झाले पण ते सिद्ध झाले नाहीत. माझ्या स्वकीयांनाही मी नेहमी सांगतो, नियमाच्या बाहेर जाऊन काही केलेलं मला चालणार नाही. पार्थ पवारांची अडचण वाढली या संपूर्ण प्रकरणात अजित पवार यांचे नाव थेट नसले तरी राजकीयदृष्ट्या या घोटाळ्याचे पडसाद मोठे उमटण्याची शक्यता आहे. विरोधकांनी पार्थ पवारांच्या कंपनीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे आणि चौकशी लवकर व्हावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, शासनाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीकडून या व्यवहारातील प्रत्येक टप्प्याची तपासणी केली जाणार आहे. बोपोडीतील जमिनीप्रमाणेच मुंढवा प्रकरणातही नियमबाह्यरीत्या दिलेल्या सवलतींवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात पार्थ पवारांची अडचण वाढली असून, अजित पवारांना राजकीयदृष्ट्या या वादाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा चौकशी अहवाल समोर आल्यानंतर खरी परिस्थिती स्पष्ट होईल, अशी सर्वांची नजर या तपासाकडे लागली आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 9:13 am

रुपाली ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस:रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलनामुळे पक्षाची कारवाई

राज्य महिला आयोगाचा अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी नुकतेच पुण्यात इतर पक्षाच्या महिलांसोबत निषेध आंदोलन करत चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते नाराज झाले आहे. पक्षाच्या वतीने रुपाली ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात आला आहे. पक्षाचे प्रदेश संघटन सरचिटणीस संजीव खोडके यांनी रुपाली ठोंबरे यांना दिलेल्या पत्रात सांगितले की, आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना, आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. म्हणून आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे ७ दिवसांच्या आत करावा. अन्यथा, आपल्या विरुद्ध योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे लेखी पत्र पक्षाचे वतीने देण्यात आले आहे. खुलासासाठी सात दिवसाची वेळ कमी याबाबत रुपाली ठोंबरे म्हणल्या, पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मला मागण्यात आलेला आहे.खरं तर खुलासा देण्याची वेळ 7 दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे.मी वैयक्तिक हितसंबध ते हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवासी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देईल.ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरतर काय खुलासा द्यावा? |

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 9:11 am

सीएसएमटी येथील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता:रेल्वे प्रशासन आणि पोलिसांचा आंदोलनाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय

मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंबई आणि उपनगरांतील प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या आंदोलनाचा फटका ठाणे आणि मुलुंड परिसरातील रेल्वे प्रवाशांना बसला. दादर ते ठाणे मार्गावरील अनेक गाड्या काही काळ थांबल्या होत्या. त्यामुळे सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी शेकडो प्रवासी स्थानकांवर अडकले. काही प्रवासी लोकल वेळेवर न मिळाल्याने ट्रॅक ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी दुर्दैवाने लोकलची धडक बसून पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी या आंदोलनाची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंब्रा अपघातानंतर अभियंत्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी येथे मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाला परवानगी होती का? आंदोलन अचानक उग्र का झालं? आणि मोटरमननी गाड्या थांबवण्याचा निर्णय का घेतला? याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश रेल्वे पोलिसांना देण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे कर्मचारी संघटनांनी केवळ निषेध नोंदवण्यासाठी पत्रव्यवहार करण्याची योजना आखली होती. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन सुरू केल्याने परिस्थिती बिघडली. या संपूर्ण घटनेचा अहवाल रेल्वे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार असून, त्यानंतर आंदोलनकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. रेल्वे कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यानुसार, दोन अभियंत्यांवर दाखल करण्यात आलेला गुन्हा अन्याय्य आहे. त्यांच्या मते, मुंब्रा अपघातात अभियंत्यांची चूक नसून, ही दुर्घटना नैसर्गिक कारणांनी घडली. या निषेधार्थ नॅशनल रेल्वे युनियन ऑफ मॅन्युअल वर्कर्स (NRUM) ने सीएसएमटी येथे मोर्चा काढला. या आंदोलनात मोटरमन, अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या काही काळ थांबल्या होत्या. प्रवाशांच्या वाढत्या नाराजीनंतर रेल्वे प्रशासनाने युनियन नेत्यांशी चर्चा सुरू केली आणि अखेर सायंकाळी साडेसहा वाजता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. सुमारे दीड तास लोकल सेवा ठप्प रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलनामुळे सुमारे दीड तास लोकल सेवा ठप्प होती. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन डीआरएम आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चर्चेची बैठक घेतली. युनियन नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर गाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. ज्या अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांचा दोष निश्चित होईपर्यंत त्यांना शिक्षा देणे योग्य नाही, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. मात्र, पोलिसांचा दावा आहे की, या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यामुळे सखोल चौकशी अपरिहार्य आहे. नुकसानीची दुरुस्ती वेळेवर न केल्याने हा अपघात मुंब्रा अपघाताची पार्श्वभूमी पाहिली तर 9 जून रोजी मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गाजवळील मातीचा तुकडा खचल्याने अपघात झाला होता. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊजण जखमी झाले होते. चौकशीत असे निष्पन्न झाले की, पावसामुळे झालेल्या नुकसानीची दुरुस्ती वेळेवर न केल्याने हा अपघात झाला. त्यामुळे रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांवर, सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस, यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा निषेध म्हणूनच रेल्वे कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी येथे आंदोलन छेडले. आता रेल्वे पोलिस या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कारवाई करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:55 am

शहर स्वच्छतेची कामे नियमित, प्रभावीपणे करा- मनपा आयुक्त:आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा‎

शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत शुक्रवारी सकाळी आयुक्‍त सौम्‍या शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांत स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. सोबतच स्वच्छता कंत्राटदार व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची कामे नियमित अन् प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिले. आयुक्‍तांनी वेलकम पॉइंट, रहाटगाव रोड, नागपूर रोड आणि विभागीय आयुक्‍त कार्यालय रोड परिसरातील स्वच्छतेची स्थिती तपासली. या पाहणीदरम्यान त्यांनी परिसरातील रस्ते, नाले, कचरापेट्या आणि सार्वजनिक ठिकाणांची पाहणी करून संबंधित अधिकारी व सफाई निरीक्षकांना आवश्यक सूचना दिल्या. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने त्यात सक्रिय सहभाग घ्यावा. नागरिकांनी कचरा नियोजित ठिकाणी टाकावा, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे त्यांनी आवाहन केले. शहरातील सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न केल्यास ‘स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती’ हे स्वप्न साकार होऊ शकते. या वेळी त्यांनी सफाई कामगारांशी संवाद साधून त्यांच्याही समस्या ऐकून घेतल्या व आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. महापालिकेच्या स्वच्छता विभागाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि वसाहतींमध्ये विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत कचरा संकलन, रस्ते धुणे, झाडांची छाटणी, नाल्यांची स्वच्छता तसेच जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. तसेच, आयुक्‍त सौम्‍या शर्मा यांनी सदर परिसरात आवश्यक तेथे सफाई कामगारांची तत्काळ नियुक्ती करून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवण्याचे निर्देशही दिले. आयुक्‍तांच्या या पाहणीदरम्यान संबंधित विभाग प्रमुख, स्वच्छता निरीक्षक आणि स्थानिक अधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:52 am

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीचा स्वच्छता विभाग अजूनही उदासीन:शहरातील नाल्यांच्या सफाईकडे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट‎

नांदगाव खंडेश्वर शहरात डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंग्यूसारखे विविध आजार बळावले असून रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. नगर पंचायतच्या हिवताप विभागाचे नियंत्रण नसल्याने डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत चालली आहे. शहरातील नाल्यांची साफसफाई नियमित होत नाही. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे घाणीत डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. वाढलेल्या डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना आजवर केलेली नाही. धुवारणी, फवारणी केली जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नागरिकांना किटकांनी घेतलेल्या चाव्यामुळे डेंग्यू, हिवताप, स्क्रब टायफस, हत्तीपाय यासारखे आजार बळावले आहेत. शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाढलेल्या डासांवर प्रतिबंधात्मक उपाय न झाल्यामुळे रुग्णसंखेत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. डासांचे प्रमाण असेच कायम राहिल्यास हळूहळू इतर जीवघेणे आजारही शहरवासीयांना जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नगर पंचायतीने मोठ्या प्रमाणावर ठोस प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. शहरातील नाल्यांची साफसफाई नियमित करणे,तसेच फॉगिंग मशीनने प्रतिबंधक औषधांचे फवारे मारण्याचे काम नियमितपणे सुरू ठेवण्याची नितांत गरज आहे. डासांच्या चाव्यामुळे नांदगावात शहरामध्ये किटकजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. शहरातील काही परिसरातील नाल्या तुंबल्या आहेत. त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने त्यात डास, किटकांची पैदास होत आहे. हेच डास आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. मात्र, नगर पंचायत प्रशासन प्रचंड उदासीन आहे. नगर पंचायतीने शहरातील किमान नाल्यांची नियमित साफसफाई करण्यासाठी तरी पावले उचलावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता झाली नाही तर साथरोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गंभीर बाबीकडे नगर पंचायतीच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. शहरात जागोजागी घाण साचून आहे. त्यामुळे रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नगर पंचायत प्रशासनाने नियमित नाल्याची साफसफाई करून फॉगिंग मशीनने धूर फवारणी करून सामान्य जनतेला रोगमुक्त करावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:50 am

भागवत कथेची सांगता, भाविकांना 38 क्विंटलचा महाप्रसाद वाटप:विठ्ठल नामाच्या जयजयकाराने प्रति पंढरी भालेगाव बाजारनगरी दुमदुमली

प्रति पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालेगाव बाजार येथील श्री पांडुरंग संस्थानतर्फे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्त २८ ऑक्टोबरपासून आयोजित भागवत कथा, विविध कीर्तनकारांची श्रीहरी कीर्तने, काकड आरती आदी धार्मिक कार्यक्रमांची सांगता ६ नोव्हेंबर रोजी महाप्रसादाने करण्यात आली. श्री पांडुरंग संस्थानतर्फे कार्तिक पौर्णिमेला ५ नोव्हेंबर रोजी विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाची महापूजा पहाटे ५ वाजता भालेगाव बाजार येथील भानुदास एडके यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. नंतर सायंकाळी ५ वाजता हरिपाठ होऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २० क्विंटल गव्हाच्या पोळ्या, १२ क्विंटल काशीफळाची भाजी व ६ क्विंटल रव्याचा शिरा असा एकूण ३८ क्विंटलचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. यावेळी सेवाधाऱ्यांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन गव्हाचे पीठ नेऊन दिले. महिलांनी स्वत: घरी पोळ्या तयार करून त्या पोळ्या संस्थांमध्ये आणून दिल्या. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ६ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता गावातून पालखी काढण्यात आली. सजवलेल्या पालखीत राधा, रुख्मिणी व विठ्ठलाची मूर्ती ठेवण्यात आली होती. पालखीत श्री पांडुरंग संस्थान व वारकरी शिक्षण संस्थानचे टाळकरी, वारकरी व ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी झालेले ग्रामस्थ विठ्ठल नामाचा जयजयकार करीत होते. या जयजयकाराने प्रति पंढरी म्हणून ओळखल्या भालेगाव बाजार नगरी दुमदुमुन गेली होती. ही पालखी गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत विठ्ठल मंदिरात आली. त्या ठिकाणी पालखी सोहळ्याचा समारोप पार पडला. हभप शालिग्राम महाराज सुरळकर, हभप प्रकाश महाराज मोरखडे यांचे कृष्ण लिलेचे कीर्तन पार पडले. भारूडाने सोहळ्याने सांगता रात्री ९ वाजता सिल्लोडकर महाराज यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री पांडुरंग संस्थानचे गोपाल भगत, महादेव ऐकडे, संजय तिजारे, प्रमोद कवडे, जितेश सपकाळ, विनोद बेलोकार, रामेश्वर गायगोळ, गजानन बाळ, एकनाथ हुडसाड, बाळकृष्ण कळस्कर, नामदेव हुरसाट, सुपडासिंग राठोड, अजय बेलोकार, रामेश्वर खडपे, श्रीकृष्ण कळमकार, सुशांत भुजाडे, संदीप एकडे, पांडुरंग बेलोकार यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:47 am

मनसे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार:सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन मनसे आता मैदानात उतरणार‎

आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक ६ नोव्हेंबर रोजी चिखली येथील जिल्हा संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न घेऊन मनसे आता मैदानात उतरणार असून, निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मनसेचे इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या वेळी उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, जिल्हा सचिव डॉ. योगेश काळे, मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनसे चिखली तालुकाध्यक्ष विनोद खरपास, मनसे बुलडाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, मोताळा तालुकाध्यक्ष अमोल गोरे, चिखली शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, उप तालुकाध्यक्ष संजय दळवी, उप तालुकाध्यक्ष अविनाश सुरडकर, संदीप म्हस्के, सागर इंगळे, अंकुश बरंडवाल, निशांत गायकवाड, अमोल वानखेडे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:46 am

बांधकाम वाटपाच्या प्रक्रियेतील मनमानी न थांबल्यास अभियंत्यांना काळे फासणार:जि.प.बांधकाम विभागातच घेतली पत्रकार परिषद‎

जिल्हा परिषदेच्या काम वाटप प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी करीत शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. ही मनमानी पद्धत बंद न झाल्यास बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना काळे फासण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. ही पत्रकार परिषदेत थेट बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षातच घेण्यात आली. कार्यकारी अभियंता मात्र कक्षात नव्हते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम िवभागातर्फे विविध िवकास कामे करण्यात येतात. यात रस्ते, रस्ते दुरुस्ती, आरोग्य िवभागातील इमारती, शाळा दुरुस्तीसह अन्य कामांचा समावेश असतो. बांधकाम िवभाग नियोजन समिती, थेट शासन व िज.प.च्या स्व उत्पन्नातून िमळालेल्या िनधीतून काम करते. काम विहित मुदतीत होत नाही. यापूर्वीतर संबंधित कंत्राटारांना दंडही आकारण्यात आला. त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारभाराचे स्वतंत्र ऑडिटच करण्याची मागणी अनेकदा सदस्यांनी केली होती. दरम्यान आता काम वाटपाची प्रक्रिया वादात सापडली आहे. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यांनी जि.प.च्या बांधकाम विभागावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ४ नोव्हेंबर रोजी संविधान भवन येथे कामवाटप समितीची सभा घेण्यात आली. या सभेत २२ कामांची किंमत ३३ लाख रुपये दाखवून जवळपास ७ कोटी ७० लाख रुपयेची कामे छुप्या पद्धतीने वाटप करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, माजी जि.प. सदस्य गोपाल कोल्हे, सचिन शिराळे, जय रामा तायडे, नागेश उमाळे, वैभव खडसे, सुगत डोंगरे, श्रीकृष्ण देवकुणबी, राजदर खान, अमोल डोंगरे, महेंद्र सिरसाट, अमोल वानखडे, अभी वानखडे, मयूर सपकाळ, रवी वानखडे, आकाश शेगोकार, विश्वजीत खंडारे, विजय पातोडे, विकी दांदळे, आकाश जंजाळ, सुरज दामोदर, आकाश गवई, रवि वानखडे आदी उपस्थित होते. रामापूर (धारूळ) या गावातील दोन प्रस्तावित कामापैकी एक कामाची टेंडर बुक ठेकेदार घेऊन जातो. तर त्याच गावातील दुसऱ्या कामासाठी सरपंचाला टाळाटाळ केली जात आहे, अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाच्या बेताल कारभाराचा पाढाच वाचला. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा भेट घेण्यात येणार आहे. मात्र त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर युवा आघाडी तीव्र आंदेलन करेल, असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. यापूर्वी ५४४ कामे प्रलंबित राहिल्याने अटी व शर्तीनुसार संबंिधत कंत्राटदाराकडून नियमानुसार दंड वसूल करण्याचा िनर्णय बांधकाम िवभागाने घेतला होता. त्यानुसार दंडाची अंदाजे रक्कम ७० लाखाच्या घरात गेली होती. मात्र नंतर नेमके िकती रुपये वसूल झाले (अर्थात कंत्राटदाराच्या देयकातून रक्कम वजा केली) ही बाब समोर आली नाही. त्यामुळे बांधकाम िवभागाच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे. टेंडर बुक देण्यास टाळाटाळ अकोट तालुक्यातील रामापूर (धारूळ ), अकोली जहाँ, तेल्हारा तालुक्यातील झरी बाजार, भिली, अडगाव बु. या ग्रामपंचायतमधील विविध विकास कामे करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सहीत प्रस्ताव दिले. तसेच टेंडर बुक देण्यासाठी आमदाराचे नाव सांगुन कार्यकारी अभियंता व कर्मचारी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. सार्वजनिक बांधकाम िवभागाचे लेखापरीक्षण होणे आवश्यक सर्व प्रक्रिया नियमानुसारच बांधकाम विभागाकडून उपलब्ध कामे बैठकीत ठेवण्यात आली होती. सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाली व होत आहे. अन्य कामांची ई-निविदा प्रक्रिया होत आहे. कुठे काय बोलावे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. - प्रकाश इंगळे , कार्यकारी अभियंता, बांधकाम, जि.प. अकोला.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:45 am

चोहोट्टा बाजारच्या रुग्णवाहिकेचा प्रस्ताव आरोग्य आयुक्तालयांकडे:जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, नागरिकांना लागली मंजुरीची प्रतिक्षा‎

चोहोट्टा बाजार व परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी असलेली रुग्णवाहिका सेवा सुरू होण्यासाठीचा प्रस्ताव अखेर जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत आरोग्य आयुक्तालय मुंबईकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त आहे. चोहोट्टा बाजार हा अकोट- अकोला महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण व तसेच परिसरातील अनेक गावे या बाजारपेठेवर अवलंबून आहेत. अकोट-अकोला मार्गावर अपघातांच्या घटना, आकस्मिक आजार आणि गर्भवती महिलांच्या आणीबाणीच्या प्रसंगात रुग्णवाहिकेच्या अभावामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळण्यात अडचणी येतात. अशा परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास अनेक जीव वाचू शकतात, असा नागरिकांचा ठाम विश्वास आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेत चोहोट्टा बाजारसाठी रुग्णवाहिकेचा प्रस्ताव तयार करून आरोग्य विभागाकडून आरोग्य आयुक्तालय, मुंबईकडे पाठवला आहे.आरोग्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णवाहिका केंद्र सुरू करण्याची पुढील टप्पा राबवण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनाचे या कामाबद्दल कौतुक केले असले तरी आता त्यांच्या नजरा आरोग्य आयुक्तालयाकडे लागल्या आहेत. रुग्णवाहिकेचा प्रश्न :जीवाशी संबंधित सेवा या भागातील रुग्णवाहिकेचा प्रश्न केवळ सोयीचा नसून तो जीवाशी संबंधित अत्यावश्यक सेवा आहे. अपघात, आकस्मिक आजार किंवा प्रसूतीच्या वेळी काही वेळा रुग्णांना ३० ते ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयांपर्यंत स्वतःच्या वाहनाने नेण्याची वेळ येते.अशा अनेक घटनांमध्ये वेळेअभावी रुग्णांचे प्राण धोक्यात येतात. त्यामुळे शासनाने या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:44 am

जिल्ह्यामध्ये लागली गुलाबी थंडीची चाहूल..:कमाल तापमानाचा पारा 32 तर किमान तापमान 15 अंशापर्यंत घसरले‎

अवकाळी पावसाने उघडीप घेतल्यानंतर अखेर अकोल्यात ‘गुलाबी थंडी’ची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे आणि वाढलेल्या हवेच्या दाबामुळे उत्तर-पूर्वेकडून थंड वारे आता महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागले आहेत. यामुळे तापमानात घट होत असून थंड वारे पुन्हा सक्रिय झाल्याने अकोलेकरांना पहाटेपासूनच गारवा जाणवू लागला आहे. गुरुवारी अकोल्याचे कमाल तापमान ३२.७ अंश तर किमान तापमान १५.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले. शुक्रवारी कमाल तापमानात एक अंशाने घसरण झाली तर किमान तापमान स्थिर राहिले आणि पहाटेच्या वेळी थंडीची जाणीव स्पष्ट झाली. दिवाळीनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील हवामान ढगाळ होते. त्यामुळे दिवसाच्यावेळी उकाडा जाणवत होता, तर रात्री तापमानात स्थिरता नव्हती. मात्र आता आकाश स्वच्छ झाल्याने वातावरण कोरडे झाले आहे. आता थंडी पडण्यास सुरवात झाल्याने सकाळी फिरायला जाणारे वयोवृद्ध, व्यायामप्रेमी आणि शाळेतील चिमुरडे आता स्वेटर, मफलर, हातमोजे, कानटोपी अशा उबदार कपड्यांमध्ये दिसू लागले आहेत. शहरातील बाजारपेठेत थंडीच्या आगमनाने उबदार कपड्यांची खरेदी सुरू झाली आहे. स्वेटर, शाल, ब्लँकेट, थर्मल वेअर यांची मागणी वाढली आहे. व्यापाऱ्यांनाही हंगामी उलाढालीची आशा निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील पाच ते सहा दिवसांत तापमानात आणखी २ ते ३ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे येत्या दिवसांत अकोल्यात खरी ‘गुलाबी थंडी’ अनुभवायला मिळेल, असा उत्साह नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. हिवाळ्यात तापमान घटल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे आणि त्वचेचा कोरडेपणा अशा तक्रारी वाढतात. या काळात गरम पाणी पिणे, सूप किंवा हर्बल चहा घेणे फायदेशीर ठरते. सकाळच्या थंड वाऱ्यापासून बचावासाठी उबदार कपडे, मफलर, हातमोजे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे थंडीत लहान मुले व ज्येष्ठांच्या आरोग्यास जपा, असा सल्ला अकोला येथील ‘जीएमसी’चे डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:43 am

डॉ. रेवती कामत-आरती कुडलकर यांच्या शास्त्रीय संगीत मैफलीने रसिक मंत्रमुग्ध:नादब्रह्म कला फाउंडेशन, आरती मंडप मनमाडकर परिवार यांच्या वतीने आयोजन‎

पंढरपूर अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसारासाठी नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब आणि आरती मंडप मनमाडकर परिवार यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. रेवती कामत आणि आरती कुंडलकर यांच्या सुश्राव्य अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफलीला पंढरपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला आरती कुंडलकर, डॉ. रेवती कामत, सुयोग कुंडलकर, संजय देशपांडे, डॉ. अनिल जोशी, शुभांगी जोशी, डॉ.विनय भोपटकर, भगवान भाऊ मनमाडकर, शुभांगी मनमाडकर, ज्ञानेश्वर दुधाणे, रामदास रोंगे, डॉ. प्रसाद कुलकर्णी यांचे शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाने यांनी करत त्रैमासिक संगीत मैफलीचा उद्देश सांगत पं. शौनक अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांचे वतीने मार्च २०२६ मध्ये पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रथम सत्रात डॉ. रेवती कामत यांच्या गायनाने मैफलीला सुरूवात केली. त्यांनी राग बिहागडा विलंबित तीनतालात सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. नंतर बंदिश, तराणा आणि तुकाराम महाराजांचा अभंग सादर केला. द्वितीय सत्रामध्ये आरती ठाकूर -कुंडलकर यांच्या गायनाला सुरुवात झाली. सुरुवातीला राग मधुकंस विलंबित एकतालामध्ये ‘आए री शाम सुंदरवा' सादर करत राग जनसंमोहिनी मधील मत्त तालातील बंदिश आणि डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या अजरामर कलावती मधील बंदिशी तन मन धन तोपे वारु, सादर करत सुखा लागी करीशी तळमळ अभंग सादर केला. विठूरायाच्या गजराने भैरवी सादर केली.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:40 am

द्राक्ष बागांच्या छाटणीच्या कामांना वेग; किल्लारीतील मजुरांमुळे वेळेत कामे:एका हंगामासाठी एक जोडपे 90 हजार ते एक लाख रुपयांचा रोजगार कमावते‎

मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात द्राक्ष बागांच्या छाटणीसह इतर कामांना वेग आला आहे. किल्लारी भागातील ७० पेक्षा अधिक मजूर बागेच्या छाटणीसह विविध कामे करत आहेत. या मजुरांमुळे बागांची कामे वेळेत पूर्ण होत असल्याचे परिसरातील द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. दहा वर्षांपासून पापरी, खंडाळी, पेनूर भागात द्राक्ष बागांचे क्षेत्र वाढले आहे. या भागात २५० हून अधिक एकरांवर द्राक्ष शेती आहे. या द्राक्ष बागांच्या छाटणीपासून पेस्ट लावणे, विरळणी, थिनिंग आदींची कामे लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरातील मजूर करतात. किल्लारी भागातील ४० पेक्षा अधिक जोडपी पापरी येथे वास्तव्याला आहेत. ते वर्षांमधील दहा महिने द्राक्ष बागांची कामे करतात. दीड-दोन महिनेच ते आपल्या गावी जातात. द्राक्ष बागेच्या कामात सदर मजूर कुशल आहेत. त्यांच्याकडून कामे वेळेत होतात. आपल्याकडील मजुरांना बागेच्या कामात उरक व कुशलता नाही. त्यामुळे वेळ पैसा अधिक खर्च होतो, तो परवडत नाही. पापरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाबुराव भोसले यांनी गत १० वर्षांपासून या मजुरांच्या राहणीमानासाठी एक एकर जमीन बागायती न करता त्यांना उपलब्ध करून दिली आहे. त्यांना वीज पाण्याची आणि शौचालयाचीही व्यवस्था मोफत करून दिली आहे. त्यातून आत्मिक समाधान मिळत असल्याचे त्यांचे म्हणने आहे. किल्लारी भागातील मजुरांमुळे पापरी भागातील द्राक्ष बागांची कामे वेळेत होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना उत्तम साथ मिळत आहे. हंगामात जोडप्याला मिळतो एका लाखाचा रोजगार पापरी येथे गत सात-आठ वर्षांपासून द्राक्ष बागेचे काम करणारे किल्लारी (ता. औसा. जि. लातूर) येथील मजूर शहाजी मस्के यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, गावाकडे पूर्वी द्राक्ष बागांचे क्षेत्र भरपूर होते, ते आता कमी झाले आहे. आम्ही बागेच्या कामात तरबेज आहोत. उरक व अनुभव असल्याने बागायतदारांची कामे वेळेत होते व हंगाम व्यवस्थित पार पडतो. आम्ही दहा महिने येथेच रोहतो. द्राक्ष उतरणी वेळी गावी जातो. येथे आम्ही जोडीने ३५ हून अधिक कुटुंबे वास्तव्याला आहोत. आमच्या सोबत लहान मुले सुद्धा असतात. मोठी मुले आई-वडिलांसोबत गावी राहतात. द्राक्षाच्या एका हंगामासाठी एक जोडपे ९० हजार ते एक लाख रुपयांचा रोजगार कमावते. गावाकडे थोडी शेती आहे परंतु ती पावसाच्या पाण्यावर आधारित आहे, त्यामुळे ही कामे करतो. मजुरांच्या राहण्याची सोय ^द्राक्ष बागेच्या छाटणीपासून घड बाहेर पडण्यापर्यंतची कामे वेळेत होणे आवश्यक असते. स्थानिक मजुरांना बागेच्या कामाचा अनुभव व उरक नसल्याने वेळ व पैसे अधिक खर्च होतात. किल्लारी भागातील मजुरांमुळे ही कामे वेळेत होण्यास मदत होते. त्यांना राहण्यासह, वीज व पाण्याची सोय मी एक एकर जमिमीवर करुन दिली आहे. बाबुराव भोसले, पापरी. पापरी ता मोहोळ येथे द्राक्षबागेत पेस्ट लावण्याचे काम करताना किल्लारी भागातील मजूर.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:40 am

अक्कलकोट तालुक्यात 19 % ज्वारीची पेरणी:26 हजार 741हेक्टरवर पेरणी बाकी, विलंबामुळे उत्पन्न घटणार‎

यंदा अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अजुन नुकसान भरपाई पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळाले नाही. काही ठिकाणी शेतात पाणी साचलेले असून ओलावा असल्यामुळे रब्बीच्या पेरण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात रब्बीच्या पेरण्या अल्प प्रमाणात झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३३ हजार १९३ हेक्टर असून यात केवळ पेरणी झालेली क्षेत्र ६ हजार ४५२ हेक्टर क्षेत्रात ज्वारी पेरणी पूर्ण झाली आहे. यामुळे आतापर्यंत तालुक्यात १९.४४ टक्के ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. या हंगामात मका सरासरी १६८६ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी फक्त ३९ हेक्टर मका पेरणी पूर्ण झाली असून केवळ २. ३१ टक्के मका पेरणी पूर्ण झाली. या रब्बी हंगामात गहु पिकाचे सरासरी क्षेत्र ९६८५ हेक्टर असून त्यापैकी ३४९ हेक्टर पेरणी पूर्ण झाली असून केवळ ३.६० टक्के गहु पेरणी पूर्ण झाली असली, तरी अजून गहु पेरणीसाठी पोषक वातावरण आहे, यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १६९५० असून यापैकी ७१४२ हेक्टर पेरणी पूर्ण झाली. यात हरभरा ४२.१४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यात अजून हरभरा पेरणीत वाढ होण्याचे संकेत आहे. अशा प्रकारे अल्प प्रमाणात पेरण्या झाल्यामुळे शेतकरी शेतकरी अजुनही अडचणीतच असल्याचे दिसत आहे. तसेच महापूर, अतिवृष्टी भागात अजुनही शेतात पाणी साचलेले दिसून येत आहे. काही भागात अजूनही ओलावा असल्यामुळे शेतकरी ज्वारी पेरणी करू शकलेले नाहीत. ज्वारी पेरणीत घट झाली ^या वर्षीच्या अतिवृष्टी, महापूर यांमुळे शेतात पेरणीयुक्त वाफसा आले नसल्यामुळे ज्वारी पेरणीत घट झाली आहे. सध्या ज्वारी पेरणी हंगाम संपला असून हरभरा, गहु पेरणी वाढण्याची शक्यता आहे. चंद्रकांत मंगरुळे, तालुका कृषी अधिकारी

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:38 am

शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर मानेगाव, उपळाई, मोडनिंबतून उमेदवारीचे आव्हान:मानेगाव गटातून कृषीनिष्ठ नितीन कापसे, रामचंद्र मस्के यांची नावे चर्चेत‎

माढा तालुक्याच्या राजकारणात कायम हाय व्होल्टेज राहिलेल्या मानेगाव जिल्हा परिषद गटात कृषिभूषण कै. गणेशकाका कुलकर्णी यांच्या पत्नी ज्योतीताई कुलकर्णी यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत साखर पेरणीस सुरुवात केल्याने माढ्याचे आमदार अभिजीत पाटील गटात ट्विस्ट निर्माण झाला आहे. मानेगाव जिल्हा परिषद गटातून ज्योतीताई कुलकर्णी यांची उमेदवारी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्व अधोरेखीत करणाऱ्या माढा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे दोन्ही मुले रणजितसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला असून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत हेही भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे माढा तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. मानेगाव जिल्हा परिषद गटातून प्रा. शिवाजीराव सावंत यांचा मुलगा पृथ्वीराज सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे सावंत व शिंदे हे दोन्ही गट एकत्रितपणे मानेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता बळावली आहे. आ. अभिजीत पाटील गटातून सावंतांविरोधात तुल्यबळ उमेदवाराचे नाव अद्याप समोर आले नसले तरी कृषिनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे व रामचंद्र मस्के यांची नावे चर्चेत आहेत. परंतू त्यांच्या उमेदवारीला पक्ष श्रेष्ठींकडून दुजोरा दुजोरा मिळालेला नाही. गत १५ ते २० वर्षांपासून कुलकर्णी गटाची राजकीय धुरा पेलणाऱ्या ज्योतीताई कुलकर्णी यांची होमपीच असलेला ऊपळाई जिल्हा परिषद गट ओबीसी महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे आता त्यांना दुसरा गट शोधावा लागणार आहे. त्यानुसार त्यांनी विश्वशांती परिवाराचे अध्यक्ष तथा आ. अभिजीत पाटील यांचे खंदे समर्थक निलेश पाटील यांच्यासह मानेगाव जिल्हा परिषद गटाचा दौरा करण्यास सुरुवात केली असून त्या मानेगाव गटातून इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. मानेगाव जिल्हा परिषद गटासह ऊपळाई जिल्हा परिषद गटातून त्या तनुजा अनिस तांबोळी व मोडनिंब जिल्हा परिषद गटातून निलेश पाटील यांच्या पत्नीच्या उमेदवारीसाठीही आग्रही असल्याचे समजते. स्व. गणेश काका कुलकर्णी यांच्या निधनानंतर त्यांची राजकीय भूमिका शिंदे विरोधी राहिली आहे. याचा फायदा आमदार अभिजीत पाटील गटाला झाला आहे. नुकत्याच झालेल्या माढा विधानसभा निवडणुकीत आमदार अभिजीत पाटील यांच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मानेगाव, ऊपळाई, मोडनिंब या तीनही जिल्हा परिषद गटात कुलकर्णी कुटुंबाला मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच त्यामुळे या गटातून उमेदवार निवडताना राष्ट्रवादीने (शरदचंद्र पवार) ज्योतीताई कुलकर्णी गटाला विचारात घेतले नाही तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला (शरदचंद्र पवार) त्याचा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीने विचार न केल्यास इतर पक्षांकडून लढण्याची तयारी ^आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने (शरद) आमचा विचार केला नाही तर इच्छुक घटक पक्षांना सोबत घेत मानेगाव, ऊपळाई, मोडनिंब व बेंबळे हे चार जिल्हा परिषद गट व त्या अंतर्गत येणारे सर्व पंचायत समिती गणांची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहोत. तसेच इतर पक्षाने उमेदवारी दिल्यास त्यांच्या चिन्हावरही निवडणूक लढवण्याचा मार्ग खुला आहे.- निलेश पाटील, अध्यक्ष, विश्वशांती परिवार, बावी. चुकीचे उमेदवार दिल्यास, राजकीय समीकरणे बघून लोकहिताचा निर्णय घेऊ ^मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काम करत आहे. मानेगाव, ऊपळाई व मोडनिंब हे जिल्हा परिषदेचे तीनही गट आमच्या हक्काचे मतदारसंघ आहेत. या ठिकाणचा उमेदवार आमच्या विचाराचा असणे गरजेचे आहे. पक्षाने उमेदवारी देताना याचा विचार न करता चुकीचे उमेदवार दिल्यास राजकीय समीकरणे बघून लोकहिताचा निर्णय घेण्याचा मार्ग आपणासाठी खुला आहे. परिस्थिती बघून त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. ज्योतीताई कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:37 am

सहकारी, इच्छुक उमेदवारांशी चर्चेनंतरच ठरवणार दिशा:माजी आ. दिपकआबा यांचे स्पष्टीकरण, पालिका‎निवडणुकीमध्ये आबांच्या भूमिकेकडे लक्ष‎

शहर आणि परिसरातील अनेक वर्षे सोबत काम करणारे ज्येष्ठ सहकारी, नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून नगरपालिका निवडणुकीबाबत पुढील दिशा ठरवणार. तसेच युती व आघाडीबाबतचा निर्णय घेणार, असे प्रतिपादन माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले. सांगोला शहरात पूर्वीपासूनच दिपकआबा गटाचे वर्चस्व असल्याने दिपकआबांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. गतवेळी सांगोला नगरपरिषद निवडणुकीत सांगोला शहरातील सर्वात मोठा पक्ष किंवा गट म्हणून दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाला यश मिळाले होते. त्यांच्या विचारांचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे दिपकआबा आघाडीबाबत कोणती भूमिका घेतात, यावर नगरपालिका निवडणुकीची समीकरणे अवलंबून असणार आहेत. यावेळी बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले की, गेली ३५ वर्षे राजकारण करताना नेहमीच जिवाभावाचे सहकारी आणि कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून काम केले आहे. प्रत्येकवेळी ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सल्ला घेऊन कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आपण आपली भूमिका घेतली आहे. सांगोला शहरात पूर्वीपासूनच दिपकआबा गटाचे वर्चस्व असल्याने दिपकआबांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे शहरातील सर्वात मोठा पक्ष किंवा गट म्हणून दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाला यश मिळाले होते. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीतही सांगोला शहर परिसरातील प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांच्याशी चर्चा करू, कार्यकर्ते ज्या पद्धतीने निर्णय घेतील, त्याप्रमाणे त्यांच्या भावनेचा आदर करुनच नगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षासोबत किंवा नेत्यांसोबत युती- आघाडी करायची, याचा निर्णय घेऊ, असे दिपकआबा यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:36 am

विठ्ठल परिवार एकत्र होत असेल तर आम्हाला आनंदच:भालके गटाच्या बैठकीत कार्यकर्त्यांची एकत्रिकरणास संमती‎

विधानसभेला व कारखान्याच्या निवडणुकीत काय करायचे, कारखान्याच्या निवडणुकीत काय करायचे ते तुम्ही ठरवा, मात्र विठ्ठल परिवार एक होत असेल तर आम्हाला आनंद आहे, डॉ. प्रणितीताई नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असाव्यात,असे शहरातील जनतेने ठरवले आहे. त्यांच्या तुलनेचा उमेदवार विरोधकांकडे नाही, त्यामुळे विजय आपलाच होईल, विश्वास व्यक्त करत भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल परिवाराच्या एकीकरणास हिरवा कंदील दाखवला आहे. पंढरपूर पालिका, पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी विठ्ठल परिवार एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू असून कार्यकर्त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी भगीरथ भालके यांनी शुक्रवारी विचारविनिमय बैठक घेतली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील २२ व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील १७ गावातील कार्यकर्त्यांना बोलावले होते. कार्यकर्त्यांनी विठ्ठल परिवाराच्या सर्व नेत्यांनी एकत्र येण्याला संमती दर्शवली. याप्रसंगी तपकिरी शेटफळचे माजी सरपंच मासाळ, ॲड तानाजी सरदार, समाधान फाटे, माजी संचालक राजू बाबर, योगेश ताड, दत्ता कांबळे, सुभाष बागल आदींनी मनोगत व्यक्त केले. भगीरथ भालके कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, या अटीवरच एकत्रीकरणाची ग्वाही दिली.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:35 am

रात्रीचे तापमान 5 दिवसांत 4 अंशांनी घटणार:11 दिवसांत कमाल तापमान 3 अंशांनी घटले, सहा महिन्यानंतर पावसाचा ब्रेक‎

सहा महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. पाऊस थांबताच तापमानात चढ-उतार होऊ लागला आहे. गेल्या ११ दिवसांच्या तुलनेत कमाल तापमान २ ते ३ अंशांनी घटले आहे. तर रात्रीचे किमान तापमान ७ अंशांनी घटले आहे. पुढच्या ५ दिवसांत रात्रीचे तापमान आणखी ३ अंशांनी घटणार आहे. त्यामुळे वातावरणात गारठा वाढणार आहे. यंदा हवामानात मोठे बदल होताना दिसले असून, तीव्र उष्णतेच्या मे महिन्यात यंदा जिल्ह्यात २२० मिमी अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर मान्सूनच्या जून-जूलै महिन्यात मात्र जिल्ह्यात मध्यम-हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊन ५ लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पेरण्या झाल्या होत्या,मात्र सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. यंदा जिल्ह्यात मान्सून पुर्व, मान्सून व परतीच्या पावसाचा सहा महिने मुक्काम होता. ६ नोव्हेंबर पासून पाऊस थांबला आहे. आता उत्तरेकडून वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे रात्रीच्या तापमानात ३ अंशांनी घसरण होऊन ते तापमान १६ अंशावर गेले आहे. जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरला कमाल तापमान ३१ तर किमान तापमान १९ अंशावर गेले होते.मात्र गेल्या ४ दिवसांपासून तापमान कमी -अधिक प्रमाणात कमी होत आहे. नोव्हेंबर २३ मध्ये पहिल्या आठवड्यात शहराचे कमाल तापमान ३१ ते ३२ तर किमान तापमान १८ ते २० अंशावर होते. तर नोव्हेंबर २०२४ मध्ये पहिल्या आठवड्यात कमाल ३३ तर किमान १९ अंशावर गेले होते. तर यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमान २८ ते ३० अंशावर गेले आहे. दरम्यान ८ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत कमाल तापामान २८ ते २९ अंशावर तर कमाल तापमान १६ ते १३ अंशावर राहणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:25 am

‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत अडीच लाख विद्यार्थ्यांनी लिहिले निबंध:वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, मुलींचे अपहरण रोखण्यासाठी उपक्रम‎

बालक आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान भाग दोन या जनजागृती मोहिमेला जिल्ह्यातील विविध तालुक्यांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १ नोव्हेंबर २०२५ पासून जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील कोणत्याही मुलीचे अपहरण होऊ नये, यासाठी व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सुमारे अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या मोहिमेअंतर्गत पोलिस विभाग व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेळ सोशल मीडियाचा... प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा’ या विषयावर निबंध, वक्तृत्व व भित्तीपत्रक (चित्रकला) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वी तसेच पदवीधर स्तरावरील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेला राहुरी तालुक्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या माध्यमातून मुलांमध्ये सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, कौटुंबिक मूल्ये आणि सुरक्षिततेचे भान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, एपीआय सुदाम शिरसाठ, पीएसआय समाधान फडोळ, गणेश वाघमारे, राजेंद्र जाधव, नितीन सप्तर्षी, विष्णू आहेर, तसेच सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते व इतर पोलिस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच तालुका गट शिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे, विषयतज्ज्ञ संतोष गुलदगड, ७० शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व पोलिस पाटील यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. या जनजागृती मोहिमेस पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले. राहुरीत सर्वाधिक प्रतिसाद एकट्या राहुरी तालुक्यातील सुमारे ७० शाळांमधील तब्बल १७ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. अनेक शाळांमध्ये शालेय समिती सदस्य, विद्यार्थ्यांचे पालक व गावातील पोलिस पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:25 am

अहिल्यानगर शहरात एकसुरात घुमला ‘वंदे मातरम्’चा जयघोष:अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी केले वंदे मातरम् गीताचे गायन, विद्यार्थ्यांची गर्दी‎

‘वंदे मातरम्’ या गीताच्या सार्धशताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे सांस्कृतिक कार्य विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच अहिल्यानगर जिल्हा व तालुकास्तरीय ‘वंदे मातरम्’ सार्धशताब्दी महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सामूहिक गीतगायनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे संपूर्ण ‘वंदे मातरम्’ या गीताचे उत्साहात गायन केले. ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला. कार्यक्रमास महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. आनंद गांधी यांनी आपल्या भाषणातून ‘वंदे मातरम्’ गीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी याबद्दल उपस्थितांना अधिक सविस्तर माहिती दिली. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थिनींनी सादर केलेल्या लघुनाटिकेतून देशभक्तीचा प्रभावी संदेश दिला. कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुल देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यामुळे येथील वातावरण देशप्रेमाने भारावून गेले होते. प्रास्ताविक भाषणात संस्थेचे प्राचार्य जहागीरदार यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या इतिहासावर प्रकाश टाकला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माणिकराव नरसिंगराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थिनींनी एक लघुनाटिका सादर केली. या लघुनाटिकेच्या माध्यमातून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. या सादरीकरणाचे उपस्थितांना टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. दरम्यान, वंदे मातरम् गीताच्या सार्धशताब्दीनिमित्त शहरात ठिकठिकाणी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळांमधूनही खास उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राजकीय पक्षांनीही कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहर भाजपाच्यावतीने शहरातील गांधी मैदानातील मार्कंडेय विद्यालय आणि प्रगत विद्यालय येथे शाळेच्या विद्यार्थ्यांसह वंदे मातरम् देशभक्ती गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. यांसह शहरात विविध ठिकाणी वंदे मातरम् गीत गायनाचा उपक्रम घेण्यात आला. वंदे मातरममधून दिला राष्ट्रभक्तीचा संदेश या उपक्रमासाठी सरकारी अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी एका सुरात वंदे मातरम् गीताचे गायन केले. यावेळी येथील वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते. उपस्थित सर्वांनी देशभक्तीच्या घोषणा दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:24 am

कर्मचाऱ्यांनीही क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे':भिंगार येथे कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन‎

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या धकाधकीच्या कामकाजातून थोडा वेळ काढून शारीरिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी केले. त्या अहिल्यानगर तालुकास्तरीय शासकीय अधिकारी-कर्मचारी क्रीडा स्पर्धा उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने करण्यात आली. याप्रसंगी छावणी परिषदेचे सदस्य वसंत राठोड, विस्तार अधिकारी रविंद्र कापरे, शिक्षिका मंदा माने, निर्मला साठे, बाबा गोसावी, अंबादास गारूडकर, भगवान बोरूडे, मुख्याध्यापक संजय शिंदे आदी उपस्थित होते. विजयवंशी म्हणाल्या, शासकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या ताणतणावामुळे अनेकदा शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्यासाठी नियमित शारीरिक व्यायाम, खेळ आणि क्रीडा उपक्रमात सहभाग घेणे अत्यावश्यक आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अधिकारी-कर्मचाऱ्यांच ा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. विविध विभागांतील संघांनी उस्फुर्त सहभाग घेतला. स्पर्धांमध्ये गोळाफेक, भालाफेक, लांबउडी, धावणे, व्हॉलीबॉल, खो-खो, थाळी फेक, बॅडमिंटन, रिले स्पर्धा अशा विविध क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:23 am

पुनतगाव घरफोडी प्रकरण उघडकीस:एका आरोपीस अटक, दोघे जण फरार

तालुक्यातील पुनतगाव येथे घडलेल्या घरफोडीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली. दोघे साथीदार फरार आहेत. चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पुनतगाव येथील नंदराज दगडू शिंदे (वय ६३) यांच्या घराच्या मागील दरवाजातून अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कपाटातील सुमारे ३ लाख ८८ हजार रुपयांचा सोन्याचा आणि रोख मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेबाबत नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना विशेष सूचना दिल्या. त्यानुसार सपोनि हरिष भोये यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार फुरकान शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाद, बाळासाहेब खेडकर, प्रशांत जाधव तसेच महिला अंमलदार भाग्यश्री भिडे आणि ज्योती शिदे यांचे पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाला माहिती मिळाली की, हा गुन्हा सचिन उर्फ काळ्या भाऊसाहेब काळे (वय २२, रा. लखमापुरी, ता. शेवगाव) या इसमाने त्याच्या साथीदारासह केला आहे. पथकाने तातडीने शेवगाव येथे छापा टाकून सचिन काळे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबुली दिली की हा गुन्हा त्याने आणि त्याचा साथीदार राहुल शिरसाठ भोसले (रा. पिंपळवाडी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर -फरार) यांनी मिळून केला. सचिन काळे याने चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीसाठी लखन विजय काळे (रा. शेवगाव - फरार) याचेकडे दिल्याचे उघड केले. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी सचिन काळे यास नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:22 am

गुरुनानक देवजींनी जगाला शांतता व एकतेची शिकवण दिली- प्रा. देशमुख

शीख धर्माचे संस्थापक व पहिले शीख गुरू गुरुनानक आहेत. गुरुनानक जयंतीस दिवसाला गुरु पर्व आणि प्रकाश उत्सव म्हणूनही ओळखतात. त्यांनी सर्व समाजातील लोकांमध्ये समानता, प्रेम, शांतता, एकता व आदराची शिकवण दिली. जात, धर्म व लिंग यावर आधारित भेदभावाला विरोध करत गुरुनानक देवजींनी जगाला शांतता व एकतेची शिकवण दिली, असे प्रतिपादन वसुंधरा अकॅडेमीच्या प्राचार्य डॉ.जयश्री देशमुख यांनी केले. वसुंधरा अकॅडेमीत गुरुनानक देव यांचा जन्मदिवस साजरी करण्यात आला. यानिमित्त शाळेत रुबी द रेड हाऊस ने विशेष परिपाठाचे आयोजन केले. प्राचार्या डॉ.जयश्री देशमुख, उपप्रचार्या राधिका नवले, प्राजक्ता नेटके, वृषाली शेटे, सुनिल खताळ, शकुंतला भांगरे व सुरेखा शेटे यांच्या हस्ते गुरुनानक यांचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिशा ढगे, आयांती मालुंजकर, आर्वी वाकचौरे, लावण्या लोहोटे, सिद्धी देशमुख, समीक्षा भारंबे, आर्यन आभाळे, तनिष्का तोरमल या विद्यार्थिनींनी मनोगतातून गुरुनानक यांच्या विषयीची माहिती दिली व त्यांची शिकवण आचरणात आणण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांसाठी गुरुनानक यांच्यावर आधारित प्रश्नमंजूषा घेण्यात आली. बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजूषेत सहभाग घेतला. कार्यक्रमास वसुंधरा अकॅडेमीच्या उपप्रचार्य राधिका नवले, प्राजक्ता नेटके, वृषाली शेटे, सुनिल खताळ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुबी द रेड हाऊसच्या हाऊस मास्टर शकुंतला भांगरे व सुरेखा शेटे यांच्यासह कॅप्टन, प्री-फेक्टस व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन दिशा ढगे विद्यार्थिनीने केले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:20 am

शिर्डीतील गुन्हेगारी केवळ भाषणांमधून संपणार नाही, प्रत्यक्ष कृती हवी- पिपाडा:पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी‎

लुट झालेले भाविकांनी डॉ. राजेंद्र पिपाडा यांना घटनाक्रम सांगताना प्रतिनिधी | शिर्डी साईभक्तांना शिर्डीतून शिंगणापुरकडे घेऊन जाणाऱ्या काही मिनी ट्रॅव्हल्सच्या चालकांचा लुट करणाऱ्या टोळीशी संगनमत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणात पोलिस यंत्रणा आणि गुन्हेगारांमध्ये संगनमत असल्याचा आरोप होत आहे. फिर्यादींच्या तक्रारी पोलिसांकडून उशिरा घेण्यात येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हस्तक्षेप केल्यानंतरच फिर्याद दाखल करण्यात आली. जोपर्यंत गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत राहील, तोपर्यंत शिर्डीतील गुन्हेगारी कमी होणार नाही. केवळ भाषणांमधून गुन्हेगारी संपणार नाही, प्रत्यक्ष कृती हवी, असे डॉ. पिपाडा यांनी सांगितले. त्यांनी साईभक्तांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालावे व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पिपाडा म्हणाले, २९ ऑक्टोबर रोजी साईभक्त आपल्या आई व भावासह शिर्डीहून शनिशिंगणापुरला जाऊन परत येत असताना, अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील गुहा गावाजवळील हॉटेल मैथीली पार्क येथे गाडी थांबवण्यात आली. तेथे तिघा इसमांनी त्याच्यावर हल्ला करून त्याच्या खिशातील २५ हजार रुपये लुटले. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरच्या मदतीने त्याच्या ‘गूगल पे’ अकाउंटमधून ३९ हजार ८०० रुपये ट्रान्सफर करून रोख रक्कम घेतली. इतक्यावर न थांबता, आरोपींनी त्या साईभक्ताला जवळच्या झोपडीत नेऊन जबरदस्तीने “लाल-पिवळा पत्त्याचा खेळ” खेळायला लावला. खेळायला नकार दिल्यावर त्याला धमक्या देऊन पैसे काढून घेतले. घटनेनंतर साईभक्ताने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. घटनेदरम्यान आरोपी पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित होते, अशी माहिती फिर्यादीने दिली. फिर्याद देऊ नका, पैसे परत देतो, असे आरोपींनी फोनवर सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर अखेर तक्रार नोंदवली गेली. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रात भाविकांच्या लुटीच्या घटना घडत असल्याने साईभक्तांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. “साईभक्त शिर्डीत सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भविष्यात या घटनांमुळे भाविकांच्या आगमनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिर्डीच्या नावावर कलंक लागावा इतकी गंभीर बाब शिर्डीच्या नावावर कलंक लागावा इतकी ही बाब गंभीर आहे. साईभक्त सुरक्षित असतील, तरच शिर्डीचा लौकिक टिकेल. शासनाने तातडीने गुन्हेगार व त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:19 am

पाळधीत जीपीएसतर्फे 900 ‎जणांची केली नेत्र तपासणी:पनवेलच्या रुग्णालयात 230 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया‎

जळगाव, धरणगाव तालुक्यातील मोतीबिंदू तथा डोळ्यांचा त्रास असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी देण्याचे कार्य जीपीएसतर्फे सुरु आहे. हे कार्य नियमित सुरू राहणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले. शिबिरात डॉ. राहूल चौधरी, डॉ. ऋषिकेश झवर, डॉ.अतुल नन्नवरे, शंकरा आय हॉस्पिटलची टीम भूपेंद्र वाघ, अक्षय पारधी, समृद्धी साळवी, श्रुती शर्मा, साक्षी चिनके, रामदास पवार, विजय बामणे यांनी नागरिकांची तपासणी केली. प्रतिनिधी | पाळधी जीपीएस अर्थात भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील फाउंडेशनतर्फे प्रत्येक महिन्याला नेत्र तपासणी शिबिर घेण्यात येते. त्यानुसार बुधवारी शिबिर घेण्यात आले. यात सुमारे ९०० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यात २३० रुग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले असून त्यांना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी तीन वाहनानी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल येथे रवाना केले. पाळधी येथून पनवेल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र रुग्णांसाठी नाष्टा, जेवण व पनवेलसाठी मोफत व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात येत आहे. नेत्र तपासणी शिबिरासाठी जीपीएसचे सर्व सदस्य, पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:15 am

प्रभाग सात सर्वाधिक तर दोनमध्ये कमी मतदार:प्रभाग सात सर्वाधिक तर दोनमध्ये कमी मतदार‎

जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठीची मतदार निहाय प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यात प्रभाग क्रमांक ७ हा सर्वाधिक तर प्रभाग क्रमांक २ सर्वात कमी मतदार संख्या असलेला प्रभाग आहे. २०१८ साली झालेल्या नगर परिषद निवडणुकीच्या तुलनेत ७९१० मतांची वाढ झाली आहे. तब्बल अडीच वर्षांच्या कालावधीनंतर होत असलेल्या जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. हरकती व सूचनांच्या अंतिम प्रभाग रचना व मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. मतदार फेरफार प्रकरणी पाच हजारांवर तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यातील विहित नमुन्यात असलेल्या सर्व तक्रारी मान्य करून केलेला बदल पाहता प्रभाग क्रमांक सात ची मतदार संख्या ४९५९ एवढी झाली आहे. तर प्रभाग क्रमांक दोन ची मतदार संख्या २४४५ एवढी राहिली आहे. २०१८ साली झालेल्या निवडणुकीत ३० हजार १८५ मतदार होते, ते ७९१० मतांनी वाढून या निवडणुकीत ४७ हजार ९५ मतदार झाले आहेत. इच्छुकांमध्ये नाराजी जामनेर शहरात एकूण १३ प्रभाग आहेत. यापैकी सर्वात कमी मतांचा प्रभाग २ तर सर्वाधिक मतांचा प्रभाग क्रमांक ७ आहे. प्रत्येक प्रभागात सरासरी १० टक्के मते कमी अधिक असणे अपेक्षित होते. मात्र मतदार संख्येत दुपटीने फरक असल्याने इच्छुकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:05 am

कजगाव येथे जि प. शाळा घाणीच्या विळख्यात:विद्यार्थ्यांचे होताय हाल, ग्रामपंचायत व शालेय समितीने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी‎

कजगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा ही घाणीच्या विळख्यात सापडली आहे. कजगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या अवतीभवती व परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शाळेभोवती मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने या गवतात साप, विंचू तसेच इतर कीटक असू शकतात. त्याचा शाळेतील विद्यार्थ्यांना अपाय होऊ शकतो. शाळेभोवती असलेले घाणीचे ढिगारे तसेच शाळेत समोरील बसस्थानक ते जुने गाव रस्त्याला पडलेल्या मोठमोठे खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी, नादुरुस्त गटारी याच्यात पाणी साचून डास व मच्छरांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. तरी शाळेत समोरील व शाळे भोवती असलेली घाण साफ करून रस्त्याचे खड्डे बुजवण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. ग्रामपंचायतीने तसेच शालेय समितीने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:04 am

आई-वडिलांची अभिमानाने मान उंचावेल असे कार्य करा:रामायणाचार्य कन्हैयाजी ब्रह्मपूरकर यांचे निरुपन‎

आई घराचे मांगल्य आहे तर बाप घराचे अस्तित्व. ‘आ’ म्हणजे आत्मा तर ‘ई’ म्हणजे ईश्वर. आत्म्यापासून ईश्वरापर्यंत जिचे अस्तित्व असते तिला आई म्हणतात. आई-वडिलांचे ऋण आणि त्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव प्रत्येक मुलाने ठेवली पाहिजे. आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेले कष्ट, प्रेम आणि त्याग यांची परतफेड करणे तसेच आपल्या आई-वडिलांची मान अभिमानाने उंचावेल असे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडल्यास खऱ्या अर्थाने त्यांच्या ऋणातून मुक्त होता येईल, असे निरूपण श्री वृंदावन धाम येथील रामायणाचार्य हभप कन्हैयाजी महाराज ब्रह्मपूरकर यांनी केले. यशोदाआई पांडुरंग चुंभळे यांच्या ३२व्या पुण्यस्मरणानिमित्त सिडकोतील महाराणा प्रताप चौक परिसरातील महाले फार्म येथे ८ नोव्हेंबरपर्यंत मातृ-पितृ ऋण सोहळ्यानिमित्त श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे, सभापती कल्पना चुंभळे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मातृ-पितृ ऋण सोहळ्यात राहुल महाराज साळुंखे यांच्यासह प्रताप चुंभळे, अजिंक्य चुंभळे आदी संयोजन करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 8:00 am

सटाण्यातील राष्ट्रवादीच्या संभाव्य इच्छुकांची यादी पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द:जिल्हाध्यक्षासह तालुका पदाधिकाऱ्यांनी घेतली अजित पवार यांची भेट‎

सटाणा नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासह १२ प्रभागातील २४ नगरसेवकांच्या संभाव्य उमेदवारासह बागलाण तालुक्यातील ७ जि.प. गट व १४ गणांच्या संभाव्य उमेदवांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नाशिक येथे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी दिली. बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात २५ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ घराघरात पोहोचले असून महायुती झाल्यास योग्य तो सन्मान मिळावा. तसे न झाल्यास सर्व जागांवर पक्षाकडे एकेका जागेसाठी अंतर्गत चुरस असुन निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारास पक्ष संधी देईल तसेच सर्व जातीधर्मांना न्याय दिला जाईल यासह विविध विषयांची चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खेमराज कोर, फहिम शेख, संदीप वाघ, संदीप भामरे, गायत्री कापडणीस, सुरेखा बच्छाव, दिगंबर सोनवणे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बागलाण तालुक्यातील इच्छुक उमेदवारांची यादी सुपूर्द करताना तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे व पक्षाचे पदाधिकारी.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:57 am

‘वंदे मातरम'ची सार्ध शताब्दी; गीताचे सामूहिक गायन

वंदे मातरम् गीतरचनेच्या सार्ध शताब्दीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला. ‘वंदे मातरम' रचनेच्या सार्ध शताब्दीनिमीत्त राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन झाले. या वेळी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे आदी उपस्थित होते. हजारो विद्यार्थ्यांच्या मुखातून वंदे मातरमचे सूर निनादले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:44 am

जिल्हा बॅँकेच्या बोरगाव अर्ज शाखेच्या पाच हजार खातेदारांची धुरा एकावरच:11 शाखांमधील 70950 ग्राहकांसाठी केवळ 38 कर्मचारी कार्यरत‎

तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ११ शाखेत कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता असून नागरिकांना बचत केलेले पैसे वेळेवर मिळत नसल्याने दररोज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध गावांतील शाखेमध्ये गर्दी होत असून कर्मचाऱ्यांसोबत वाद निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे बोरगाव अर्ज शाखेमध्ये केवळ एकच जण कार्यरत असून, येथे जवळपास ५ हजार खातेदार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक असून या बँकेमध्ये हजारो शेतकऱ्यांचे खाते आहेत. यामुळे अनुदान असो किंवा लाडक्या बहिणींचे मानधन असो सर्वात जास्त पैसे याच बँकेमध्ये जमा होतात. तर या बँकेमध्ये बचत खाते मोठे असून यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. बचत केलेले पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी या बँकेसंदर्भात रोष व्यक्त करत आहेत. तालुक्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण ११ शाखा असून या शाखेमध्ये ७० हजार ९५० ग्राहक आहेत. या ग्राहकांसाठी फक्त ४४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर यापैकी तीन कर्मचारी गंभीर आजाराने त्रस्त असून ते बँकेत येऊ शकत नाहीत, तर ६ सेवानिवृत्त कर्मचारी हे अल्प मानधनावर काम करत आहेत. ४४ कर्मचाऱ्यांपैकी फक्त ३८ कर्मचारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान कर्मचारी आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये एका कर्मचाऱ्याला शाखा व्यवस्थापक, लिपिक, कॅशियर अशा भूमिका निभवाव्या लागतात. तालुक्यातील ११ शाखांमधून २१,१९० शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले आहे. यात ९३% पीक कर्ज वसुली या बँकेने केली आहे. हक्काचे पैसे वेळेवर मिळेना, शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांना शासनाने पाठवलेले अनुदान असो किंवा त्यांच्या बचत खात्यातील पैसे असो, वेळेवर मिळत नाहीत. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून तालुक्यात सर्व शाखेत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, नसता शेतकरी संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ बेडके यांनी दिला. तत्काळ कर्मचारी भरा, अन्यथा आंदोलन करू बोरगाव येथील शाखेत दहा गावांतील पाच हजारांच्यावर शेतकऱ्यांचे बँक खाते आहे, परंतु एकच कर्मचारी असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. येथे लवकरच कर्मचारी भरावे नसता, ग्रामस्थांना सोबत घेऊन जिल्हा मध्यवर्ती मुख्य शाखा (फुलंब्री) येथे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बोरगाव अर्जचे सरपंच शिवाजी खरात यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:38 am

सिल्लोडला 19 लाखांचे खत जप्त; एकावर गुन्हा:विनापरवाना खताची निर्मिती, गोडाऊनवर छापा‎

सिल्लोड- कन्नड रस्त्यावरील मोढा फाट्याजवळ एका खासगी गोदामावर गुरुवारी सायंकाळी कृषी विभागाच्या गुण नियंत्रक पथकाने छापा टाकला. येथे विनापरवाना खताची निर्मिती, साठवणूक आणि विक्री सुरू असल्याचे आढळले. लीप फर्टिलायझर्स अँड केमिकल कंपनीकडून खताचे पॅकिंग सुरू होते. छाप्यावेळी गोडाऊनमध्ये १९७३ गोण्या आढळल्या. त्यांची किंमत १९ लाख ५ हजार ६४० रुपये इतकी आहे. हे सर्व खत जप्त करण्यात आले. गोडाऊन भाड्याने दिल्याचा कोणताही करारनामा सापडला नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या गजानन गोविंदराव चापे यांच्याकडे अधिकाऱ्यांनी विचारणा केली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी प्रमोद डापके यांच्या तक्रारीवरून (स्नेहनगर, सिल्लोड) येथील मोहन वसंतराव हिरे याच्याविरोधात सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा विविध कलमान्वये नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार जाधव करत असून सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांचे मार्गदर्शन आहे. ही कारवाई जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हरिभाऊ कातोरे, मनोजकुमार सैंदाणे, एस. डी. हिवराळे, गोविंद पोळ आणि सिल्लोड तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांच्या पथकाने केली.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:37 am

आळंदच्या आसरा माता संस्थानला ‘ब’ दर्जा प्राप्त‎:अगोदर वर्षाला 40 लाखांचा होता निधी, आता मिळेल दोन कोटी रुपये‎

फुलंब्री तालुक्यातील आळंद येथील पुरातन आणि श्रद्धास्थान असलेल्या आसरा माता संस्थानला अखेर शासनाकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग)’ अंतर्गत ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला आहे. याआधी संस्थान ‘क’ वर्गात होते. २०१२ मध्ये संस्थानचे विश्वस्त मंडळ स्थापन झाले. त्यानंतर ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर २८ ऑगस्ट २०२५ रोजी राज्य निकष समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्यात आला. आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय झाला. या निर्णयामुळे मंदिर परिसरातील विकासकामांना वेग मिळणार आहे. याआधी संस्थानने पाणी, निवास, शौचालय आणि परिसर सुशोभीकरणाची कामे केली आहेत. आता नव्या योजनांनुसार आणखी कामे हाती घेतली जाणार आहेत. यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. ‘क’ वर्गात असताना संस्थानला वर्षाला ४० लाख रुपयांपर्यंत निधी मिळत होता. आता ‘ब’ वर्गात २ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी मंदिर परिसराच्या एक किलोमीटरच्या आत भक्त निवास, अंतर्गत रस्ते, पाणी व्यवस्था, सुशोभीकरण आणि इतर पायाभूत सुविधांसाठी वापरला जाणार आहे. नव्या पर्वाची सुरुवात या निर्णयामुळे फुलंब्री तालुक्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. स्थानिक रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. या निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. हा विजय सर्व भाविक आणि ग्रामस्थांच्या एकजुटीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:37 am

संतांनी दाखवलेल्या मार्गाने भक्ती करावी- अनिकेत महाराज इंगळे:वरूड पिंप्री येथील अखंड हरिनाम सप्ताहात चौथ्या दिवशीची सेवा‎

सिल्लोड तालुक्यातील वरूड पिंप्री येथे संत बलदेवदास महाराज यांच्या ८६व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. चौथ्या दिवशी कीर्तनसेवा अनिकेत महाराज इंगळे यांनी केली. त्यांनी संत निळोबाराय यांच्या अभंगावर विवेचन करत भक्तीचा मार्ग स्पष्ट केला. अनिकेत महाराज म्हणाले की, ‘भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला सुंदर नरदेह मिळालेला आहे. हा देह मिळाल्यानंतर भगवंताची प्राप्ती करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे. संतांनी दाखवलेल्या मार्गाने भक्ती केली तर परमात्म्याची प्राप्ती लवकर होते. योगाच्या मार्गाने गेल्यास दुःखच पदरी पडते, असे ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात सांगितले आहे. म्हणून कर्ममार्ग, योगमार्ग सोडून संतांच्या मार्गाने चालल्यास परमात्म्याची प्राप्ती निश्चित होते.’ कीर्तनात अनिकेत महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या परोपकाराची आठवण करून दिली. ते म्हणाले, छत्रपती नसते तर मंदिरे, अंगणातील तुळस, गडकोटांवरील भगवा ध्वज दिसला नसता. अनेक प्रसंग त्यांनी श्रोत्यांसमोर मांडले. या कीर्तन सेवेवेळी वारकरी भूषण गणेश महाराज परिहार, गणेश महाराज जाधव, युवा कीर्तनकार पवन महाराज मिरगे, गणेश महाराज मिरगे, निखिल महाराज थोरात, ज्ञानेश्वर महाराज कुकुलारे, भागवताचार्य रवींद्र महाराज राजहंस, मृदंगाचार्य कृष्णा महाराज शिंदे, कृष्णा महाराज कदम आदी उपस्थित होते. मंगळवारी (दि. ११) सप्ताहाची सांगता होणार आहे. श्रीमद भागवत कथेने व्यथा दूर होतात ः सप्ताहात श्रीमद भागवत कथा प्रवचन श्री रवींद्रजी महाराज राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कथेमध्ये महाराजांनी सांगितले की, गोकर्ण हा महापंडित होता. धुंदुकारी चांडाळ होता तरीही त्याने फक्त भागवत कथा ऐकली आणि त्याचा उद्धार झाला. त्यामुळे प्रत्येकाने कथा श्रवण करावी. श्रीमद भागवत कथेने माणसाच्या जीवनातील सर्व व्यथा दूर होतात असेही त्यांनी सांगितले. कथेच्या समारोपानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत वारकरी पावल्यांसह रंगीत संगीत हरिपाठ पार पडला.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:35 am

शिऊर उपबाजार केंद्रात मक्याला हमीभाव नाही:शेतकरी आक्रमक,व्यापाऱ्यांविरोधात कारवाई करा, मागणी‎

वैजापूर तालुक्यातील शिऊर उपबाजार केंद्रात व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. गुरुवारी मक्याच्या लिलावात एका शेतकऱ्याचा मका केवळ १,१८५ रुपयांना खरेदी करण्यात आला. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा हा दर खूपच कमी होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला होता. बाजार समितीवर नाराजी व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांनी शेतकऱ्यांसह बाजार समितीला जाब विचारला. शेतकरी संतोष गोरे यांनी सांगितले की, शिऊरमध्ये १,२०० रुपये दर मिळालेल्या मक्याला बोलठाण बाजारात १,५०० रुपये दर मिळाला. त्यामुळे शिऊरमधील व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिऊर परिसरातील शेतकरी मका विक्रीसाठी बोलठाण, लासूर स्टेशन, भारम या २० ते २२ किलोमीटर अंतरावरील बाजारात जात आहेत. तेथे मक्याला १,५०० ते १,७०० रुपये दर मिळतो. त्यामुळे शिऊरमधील व्यापाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासकीय खरेदी त्वरित सुरू करून हमीभावाची अंमलबजावणी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर साळुंखे पाटील यांनी व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करून बाहेरील व्यापाऱ्यांना बोलवण्याची मागणी केली. अन्यथा दंडुका मोर्चा काढून आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी सांगितले. काही विपरीत घडल्यास जबाबदारी बाजार समितीवर राहील, असा इशाराही त्यांनी दिला. वेळीच मागण्यांची दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पारदर्शकपणे मका खरेदी नाही ः बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव यांनी व्यापारी उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे बाहेरील व्यापाऱ्यांना बोलवावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र या उत्तरामुळे शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला. उपबाजार समितीत सहा व्यापारी असूनही ते पारदर्शकपणे मका खरेदी करत नाहीत, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:35 am

डॉ. वळसंगकरांची सुसाइड नाेट मृत्यूपूर्व जबाब मानावा:मनीषा माने यांच्या दोषमुक्तीच्या अर्जाला सरकारी पक्षाचा जोरदार विरोध, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका

सोलापूरचे ख्यातनाम मेंदूविकार तज्ज्ञ डाॅ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यालाच मृत्यूपूर्व जबाब म्हणून गृहित धरण्याची मागणी सरकार पक्षाने शुक्रवारी न्यायालयात केली. संशयित मनीषा माने यांनीच त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे चिठ्ठीतून स्पष्ट हाेते. त्यामुळे त्यांचा दाेषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावण्यात यावा, असेही सरकार पक्षाने म्हटले आहे. संशयित आरोपी मनीषा माने यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्यापुढे ८ पानामधील २८ मुद्यांवर म्हणणे मांडले. दोषीमुक्तीसाठी दिलेले कारण खरे नाही. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक लकडे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केला. दरम्यान, मनीषा माने यांना न्यायालयाने जामीन दिला. या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. माने यांचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत दाेषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला. त्यावर शुक्रवारी न्यायालयाने म्हणणे घेतले. पुढील सुनावणी २१ नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले. सरकारी पक्षाचे म्हणणे

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:30 am

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर‎धुळीचा कहर:आरोग्य संकटात‎, कामगार, विद्यार्थी व वाहनचालक धुळीच्या त्रासाला कंटाळले‎

शहर व परिसरात सुरू असलेल्या महामार्ग दुरुस्तीच्या‎कामांमुळे नागरिक अक्षरशः धुळीत गाडले गेले आहेत.‎पोलिस अधीक्षक चौक ते तारकपूर बसस्थानक या‎भागात सिमेंट काँक्रीटीकरण सुरू असल्याने दिवसभर‎धुळीचे साम्राज्य असते. त्यातच छत्रपती संभाजीनगर‎महामार्गावर शेंडी बायपास ते वडाळा या टप्प्यात सुरू‎असलेले खड्डे दुरुस्तीचे काम नागरिकांसाठी त्रासदायक‎ठरत आहे.‎ अहिल्यानगर–संभाजीनगर महामार्गावर १२‎सप्टेंबरपासून मनमाड मार्गावरील अवजड वाहतूक‎वळवण्यात आली आहे. त्यामुळे रहदारी वाढून‎महामार्गाची दुरावस्था झाली आहे. शेंडी, बायजाबाईचे‎जेऊर, इमामपूर, पांढरी पूल, वांजोळी फाटा, शिंगवेतुकाई‎फाटा, घोडेगाव व वडाळा या गावांमध्ये धूळच धूळ‎उडत आहे. नागरिकांच्या आंदोलनानंतर बांधकाम‎विभागाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली असली तरी‎कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे नागरिक सांगत‎आहेत. काही ठिकाणी तर अद्यापही खड्डे बुजवलेले‎नाहीत. या महामार्गाने दररोज प्रवास करणारे कामगार,‎विद्यार्थी व वाहनचालक धुळीच्या त्रासाला कंटाळले‎आहेत.धुळीमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, श्वसनाचे‎विकार, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी यांसारखे त्रास‎वाढले आहेत. वाहनचालकांचे केस व कपडे धुळीने‎माखत आहेत. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.‎ आरोग्यासाठी सूचना‎ बाह्यरुग्ण दुपटीने वाढले‎ घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात‎सर्दी व श्वसनाच्या तक्रारी घेऊन‎येणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल‎दुपटीने वाढली आहे. एरवी ५५ ते‎६० रुग्ण तपासणीस येतात. सध्या‎ही संख्या १५५ ते १६० वर गेली‎आहे.‎ – डॉ. शिवराज गुंजाळ,‎वैद्यकीय अधिकारी, घोडेगाव ग्रामीण ‎‎रुग्णालय‎ श्वसन आजारांत वाढ‎ सध्या धुळीमुळे श्वसनाच्या‎संबधी रुग्णात काही अंशी वाढ‎झाली आहे. त्यामुळे धुळीतून‎वाहने चालवताना वाहनचालकांनी‎हेल्मेट किंवा ताेंडाला रुमाल बांधणे‎आवश्यक आहे. सध्या सर्वच‎रुग्णालयामध्ये अशा प्रकारचे रुग्ण‎उपचारासाठी येत आहेत.‎ -एस. एस. दीपक, श्वसनविकार‎तज्ज्ञ‎

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:28 am

रस्ता दुरुस्तीसाठी छत्रपती संभाजीनगरचा शिवाजीनगर भुयारी मार्ग 2 दिवस बंद:परिणामी शनिवार अन् रविवारी संग्रामनगर उड्डाणपुलावर वाढणार गर्दी

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार दोन दिवस वाहनधारकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरूनच ये-जा करावी लागणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत शिवाजीनगर भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या भुयारी मार्गाचे अर्धवट काम ठेऊन लोकार्पण उरकण्यात आले. पहिल्याच पावसाळ्यात भुयारी मार्गाला गळती लागली. पावसाचे पाणी साचल्याने हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. त्यानंतरही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने त्यातून मार्ग काढताना वाहने घसरून अनेक जण अपघातात जखमी झाल्याचे समोर आले. तरीदेखील या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजपासून या पर्यायी मार्गाचा करा वापर शिवाजीनगर भुयारी मार्गातून वाहनधारकांना देवळाई चौकाकडे जाता येणार नसल्याने त्यांना पर्यायी संग्रामनगर उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल, एमआयटी चौक महूनगर टी पाॅइंट मार्गे उस्मानपुरा या मार्गावरून ये-जा करावी लागणार आहे. शुक्रवारी बीड बायपासला पर्याय असलेला संग्रामनगर उड्डाणपूल वाहनांनी भरून गेला होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हे चित्र दिसून आले, जिथे वाहनांची अक्षरशः रांग लागली होती.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:15 am

परभणीतील टाकळवाडीला रस्ता नसल्याने गाव विक्रीस:ग्रामस्थांनी परिसरात लावले फलक, पंचक्रोशीत चर्चा

गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी गावाला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अनेकदा ग्रामस्थांनी आंदोलन केले. तरीही प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर संपूर्ण गावच विक्रीला काढल्याचे फलक लावून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. हे फलक राणीसावरगाव बसस्थानक आणि पांगरी फाट्यावर लावले आहेत. याची पंचक्राेशीत एकच चर्चा सुरू झाली आहे. टाकळवाडी गावाला जाण्यासाठी पांगरी फाटा ते टाकळवाडी असा सुमारे दीड किमीचा रस्ता अत्यंत खराब आहे. रस्ताच नसल्यामुळे ग्रामस्थांना येथून ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी चिखलात लोळून अर्धनग्न आंदोलन केले. तसेच “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक्स्प्रेस हायवे” असे नामकरण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता तरीही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासन व मुख्यमंत्री यांची प्रतीकात्मक तिरडी यात्रा काढून निषेध व्यक्त करत रस्त्यावरच भजन आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी सहायक गटविकास अधिकारी जयराम मोडके यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन १५ ऑक्टोबरपासून रस्त्याचे काम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर ५ नोव्हेंबरपर्यंत काम सुरू झाले नाही. अखेर ५ नोव्हेंबरला गावातच बैठक घेऊ ‘टाकळवाडी गाव विक्री आहे’ असे फलक लावले.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:10 am

निवडणूक प्रमुखांची नियुक्ती न केल्याने भाजप नेत्यांत नाराजी:75 प्रभारी आणि 74 निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ७५ निवडणूक प्रभारी आणि ७४ निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली. यात कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबईच्या निवडणूक प्रभारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती न केल्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सध्या नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष बदलून महिना उलटला तरी प्रदेश आणि मुंबईच्या दोन्ही कार्यकारिण्या अद्यापही जाहीर न झाल्याने पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी आमदार आशिष शेलार यांच्या जागी आमदार अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले. हे संघटनात्मक बदल होऊन एक महिन्याहून अधिक कालावधी उलटला असला तरी प्रदेश आणि मुंबई या दोन्ही कार्यकारिण्यांची घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. दरेकर, लाड, राणे वेटिंगवर मुंबईमध्ये संघटनात्मक स्तरावर भारतीय जनता पक्षाचे सहा जिल्हाध्यक्ष आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा महापौर बसवण्याचा निर्धार असल्याने किमान तीन निवडणूक प्रमुखांची नियुक्ती होण्याची शक्यता होती. परंतु, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार सुनील राणे, आमदार योगेश सागर, आमदार प्रसाद लाड, आमदार संजय उपाध्याय आणि आमदार राजहंस सिंह यांसारख्या अनुभवी आमदारांना पक्षात सध्या सुरू असलेल्या गटबाजीमुळे मुंबई मनपा निवडणुकीशी संबंधित कोणतीही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जात नाहीये. अंतर्गत संघर्षामुळे निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या थांबल्या इतर जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रमुखांची नियुक्ती झाली असताना मुंबईतच ही नियुक्ती का झाली नाही, यावर दोन परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. प्रदेश भाजपच्या सूत्रांनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसल्याने घाई केलेली नाही. मुंबई भाजपमध्ये असलेल्या प्रखर “अंतर्गत संघर्षामुळे’निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या थांबल्याचे सांगण्यात आले. शेलारांवरच विश्वास कायम मुंबईसाठी आशिष शेलार यांची प्रभारी म्हणून निवड करण्यामागे प्रदेश नेतृत्वाचा स्पष्ट उद्देश असल्याचे बोलले जाते. प्रदेशाध्यक्षांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की, भाजप मुंबई मनपा निवडणुकीबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. नवनियुक्त अध्यक्ष अमित साटम यांच्यापेक्षा मंत्री शेलार यांची पकड संपूर्ण मुंबईत मजबूत आहे. तसेच मंत्री असल्यामुळे त्यांचा प्रभाव पक्षसंघटनेवर अधिक पडतो, तर साटम यांना अजूनही संपूर्ण संघटना समजून घेण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे शेलार यांच्यावर अजूनही भाजपचा विश्वास कायम आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 7:09 am

उपमुख्यमंत्री अजित पवारांना ठरवून टार्गेट केल्याचे आरोप निराधार- आशिष शेलार:जमीन व्यवहारातील अनियमिततेच्या चौकशीसाठी समिती

पुण्यातील महार वतनाच्या जमीन व्यवहारात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली आहे. राज्य सरकार कुठल्याही स्वरूपाची अनियमितता खपवून घेणार नाही. विरोधक जे आरोप करताय ते त्यांचे काम आहे. चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल. या प्रकरणात अजित पवारांना टार्गेट केल्याचे आरोप निराधार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पुण्यात एका कार्यक्रमावेळी शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. याकडे लक्ष वेधले असता शेलार म्हणाले, राज्य सरकार कुठलीही अनियमितता खपवून घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याबाबत मला माहिती नाही. याबाबत सविस्तर माहिती घेतली जाईल. चौकशीतून हळूहळू गोष्टी बाहेर येतील. अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांना कोणीही टार्गेट करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा राजकीय लाभासाठी आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सरकार आवश्यकतेनुसार मदत करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणुकीच्या उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांसाठी तयार करण्यात आलेला अहवाल अंतिम टप्प्यात आहे. साधारणपणे महिनाभरात हा अहवाल सादर केला जाईल, असेही शेलार यांनी सांगितले. मनसेचे आक्रमक आंदाेलन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव काेरेगाव पार्क आणि बाेपाेडी येथील जमीन गैरव्यवहारात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक हाेऊन त्यांनी शुक्रवारी मामलेदार कचेरीसमाेर आंदाेलन केले. अजित पवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केली. राहुल गांधी हे कायम झूठ की दुकान चालवतात सरकारला असंवैधानिक ठरवणारे विरोधक वंदे मातरमसारख्या देशभक्तीच्या कार्यक्रमात सहभागी होत नाही व कार्यक्रम देखील घेत नाहीत यावरून विरोधकांचा दुजाभाव दिसून येतो. आपल्या संविधानावर गैरसमज पसरवण्याचे काम या विरोधकांनी केले आहे. राहुल गांधी आमच्यावर मतचोरीचे आरोप करत आहेत. पण राहुल गांधी हे मोहब्बत की दुकान नाही तर झूठ की दुकान चालवत असल्याची टीका शेलार यांनी केली.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 6:58 am

अंगलट येताच यू टर्न:पार्थ पवारांचा 1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदीचा सौदा 32 तासांतच रद्द, 40 एकरांवरील 21 कोटी मुद्रांक शुल्कही माफ केले होते

अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी नियम धाब्यावर बसवून स्वत:च्या कंपनीसाठी केलेला १८०० कोटींचा भूखंड व्यवहार उघडकीस आल्यावर ३२ तासांतच रद्द करण्यात आला. पार्थ यांनी त्यांच्या अमेडिया कंपनीसाठी कोरेगाव पार्क येथे महार हडोळता वतनाची ४० एकर जमीन खरेदी केली. बाजारात १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत खरेदी करताना त्यांना २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आले. या प्रकरणी विरोधकांनी ६ नोव्हेंबर रोजी एकच गदारोळ केला. रस्त्यावर आंदोलने सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती नियुक्त केली. पहिल्या टप्प्यात तहसीलदार, सहायक दुय्यम निबंधकाला निलंबित करण्यात आले. पार्थ पवार यांना वगळून अमेडिया कंपनीतील पार्थ यांचे भागीदार तसेच जमीन व्यवहारात सहभागी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. एकूणात भूखंड घोटाळा अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच हा खरेदी व्यवहार रद्द करण्याची घोषणा अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता केली. ते म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी न देताही जमिनीचा व्यवहार झालाच कसा. २००६ पासून पुढे या जमिनीविषयी काय झाले. कोणाचा हस्तक्षेप होता. याच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल महिनाभरात येईल. त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मात्र, विरोधकांनी अजित पवारांचे म्हणणे फेटाळले. भूखंड घोटाळ्याला पहिल्यांदा चव्हाट्यावर आणणारे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, केवळ चौकशी समितीने काम भागणार नाही. पार्थ यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पार्थ पवारचं नाव एफआयआरमध्ये का नाही? “या व्यवहारात पार्थ यांचा थेट सहभाग नव्हता. त्यांनी कोणत्याही कागदपत्रांवर सह्या केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांचं नाव एफआयआरमध्ये नाही,’ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही सांगितलं की, ज्यांनी प्रत्यक्ष सह्या केल्या, त्यांच्याविरोधातच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून चौकशी समिती नियुक्त या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली आहे. त्यात विभागीय आयुक्त पुणे, अप्पर मुख्य सचिव (महसूल, मुद्रांक व नोंदणी), जमाबंदी आयुक्त, संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव (मुद्रांक, महसूल व वनविभाग) यांचा समावेश आहे. ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली. राहुल गांधींची मोदींवर टीका राहुल गांधींनी सोशल मिडीयावर मोदींवर टीका करत म्हटले आहे की, ‘मोदीजी, तुम्ही यासाठीच शांत आहात की तुमचं सरकार त्या लुटारुंवर टिकलेलं आहे, जे दलित आणि वंचितांचे अधिकार हिसकावून घेतात. दलित समाजासाठी राखीव १८०० कोटींची जमीन अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्या कंपनीला फक्त ३०० कोटी रुपयांना विकण्यात आली. स्टॅम्प ड्युटीत सूट दिली. ज्यामुळे सरकारच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.’ फडणवीसांच्या हस्तक्षेपाने वाचले उपमुख्यमंत्रिपद सूत्रांनी सांगितले की, पार्थने हा व्यवहार मला न सांगता केला या अजित पवारांच्या दाव्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांशी गुरुवारी दुपारी संपर्क साधला. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फटका पडू नये, यासाठी तातडीने डॅमेज कंट्रोल करा, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना बजावले. शिंदेसेनेतील नेते, मंत्रीही अजित पवार गटाविषयी नाराजी व्यक्त करू लागले. त्यामुळे शुक्रवारी फडणवीसांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत बैठक घेऊन उपमुख्यमंत्रिपद वाचवण्यासाठी भूखंड व्यवहार रद्द करा, असा दबाव टाकला. तो मान्य करण्याशिवाय अजित पवारांपुढे अन्य पर्याय नव्हताच. फडणवीसांसोबत बैठकीनंतर अजित पवारांनीच केली घोषणा फडणवीसांनी दबाव टाकून, सल्ला देऊन भूखंड व्यवहार रद्द करून टाकला. अजित पवारांचे उपमुख्यमंत्रिपद वाचवले. याचा मोबदला भाजप वसूल करेल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुण्यासह राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यात अजित पवारांना जागावाटपात बॅकफूटवर ठेवेल, असे राजकीय अभ्यासक सांगत आहेत. अजित पवार म्हणाले की, मी स्वतः या प्रकरणाची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनाही स्पष्ट सांगितले की, हा विषय माझ्या घरच्यांशी संबंधित असला तरी तुम्ही राज्यप्रमुख म्हणून नियमांनुसार योग्य ते करा.‌ ही जमीन सरकारी व महार वतनाची आहे. तिचा व्यवहारच होऊ शकत नाही. तरीही रजिस्ट्रेशन कसे झाले? कोण जबाबदार आहे? याची चौकशी होणारच आहे. या व्यवहारात कोणतीही आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही. मोठे आकडे सांगितले गेले, पण वस्तुस्थिती जनतेसमोर येणे गरजेचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 6:56 am

दुबारवर ‘कोलंबिया पॅटर्न’ तोडगा; 18 वय हाेताच मतदार यादीत नाव:कोलंबिया देशातील पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

राज्यातील मतदार याद्यांतील घोळ, दुबार आणि बोगस नोंदणीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने ‘कोलंबिया पॅटर्न’चा अभ्यास सुरू केला आहे. या पद्धतीचा वापर करून मतदार याद्या अधिक सुसूत्र आणि अचूक करण्याचा प्रयत्न होणार असून, यात १८ वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव मतदार यादीत समाविष्ट होईल. या चाचपणीसाठी कोलंबियाचे एक उच्चस्तरीय पथक शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. हे पथक राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेऊन धारावीतील काही भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. राज्यातही ही पद्धत वापरता येईल का, याची प्राथमिक चाचणी सुरू आहे. ‘कोलंबिया पॅटर्न’ काय ? कोलंबियामध्ये जन्म आणि मृत्यूची नोंद थेट मतदार यादीशी संलग्न असते. त्यामुळे व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण होताच त्याचे नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होते आणि ओळखपत्र जारी केले जाते. तसेच, मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव यादीतून आपोआप वगळले जाते. यामुळे ना दुबार नोंदणी होते, ना मृत व्यक्तींची नावे यादीत राहतात.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 6:50 am

बांगलादेशात कांदा शंभरीपार; निर्यातीसाठी सरकारला साकडे:भारतीय उत्पादकांची केंद्राकडे पाठपुरावा करण्याची मागणी

कांद्याचे भाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भारताकडून प्रमुख आयात करणाऱ्या बांगलादेशमध्ये कांद्याचे घाऊक बाजारभाव तब्बल शंभर रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचले असून, तेथील ग्राहकांना महाग दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे लासलगाव येथील कांदा उत्पादक व निर्यातदारांनी केंद्र सरकारकडे बांगलादेशने आयातबंदी हटविण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. बांगलादेशने भारतातून आयात पुन्हा सुरू केली, तर शेतकऱ्यांना किमान दोन-पाच रुपये प्रति किलो दरवाढ मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि बाजारातील स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होईल. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला १३ ते १७ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. मात्र, याचवेळी बांगलादेशमध्ये दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचल्याने दोन्ही देशांतील भावांमध्ये तब्बल सहापट फरक निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने असंतोष व्यक्त होत आहे. लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापारी व लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम यांनी सांगितले की, बांगलादेशने कांद्यावरील आयातबंदी एक वर्षापासून कायम ठेवली आहे. त्यामुळे भारतीयांना निर्यातीची संधी मिळत नाही. दर स्थिर रहात नाहीत. केंद्राने तातडीने बांगलादेश सरकारशी समन्वय साधून आयातबंदी हटविण्यासाठी प्रयत्न करावेत. केंद्राच्या निर्णयाकडे लक्ष बांगलादेशातील कांद्याच्या वाढत्या किमती आणि भारतीय शेतकऱ्यांच्या अपेक्षा यामध्ये संतुलन साधण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गही केंद्र सरकारच्या निर्णयाकडे उत्सुकतेने पहात आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Nov 2025 6:48 am

शेतीच्या मशागती बरोबरच रब्बी हंगामाच्या पेरणीला आला वेग

लातूर : प्रतिनिधी नोव्हेंबर महिना सुरू होताच पावसाचा जोर ओसरला आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी खरीप हंगामातील पिके काढून शेती रब्बी हंगामासाठी तयार करत आहेत. जिल्हयात गेल्या आठ दिवसापासून पेरण्या सुरू झाल्या असून आजपर्यंत जवळपास ८२ हजार ३६४ हेक्टरवर रब्बीचा (२५.८४ टक्के) पेरा झाला आहे. पावसाच्या उघडीपनंतर शेतीच्या मशागती व पेरण्यांनी वेग झाला आहे. जिल्हयात मे, […] The post शेतीच्या मशागती बरोबरच रब्बी हंगामाच्या पेरणीला आला वेग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 12:41 am

मांजरा साखर कारखान्याचे ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

लातूर : प्रतिनिधी समाजकारण, राजकारणात वाटचाल करीत असताना सातत्याने आम्ही शेतकरी हीत डोळ्यासमोर ठेवून काम केल्याने मांजरा परिवाराच्या माध्यमातून जिल्हाभरात शेतक-यांच्या जिवनात आर्थिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आज पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. मांजरा परिवाराने नवनवीन प्रयोग करून उपपदार्थ प्रकल्प हाती घेवून तेही उत्तमप्रकारे चालत आहेत. यामुळें शेतक-यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न […] The post मांजरा साखर कारखान्याचे ९ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 12:40 am

७.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

रेणापूर : प्रतिनिधी रेणा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ मधील २० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवार दि . ७ नोव्हेबर रोजी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. तसेच कारखान्याने नवीन खरेदी केलेल्या १५ हार्वेस्टर […] The post ७.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 12:38 am

जमीन व्यवहाराची नोंदणी रद्द

व्यवहारात पैशाची देवाण-घेवाण नाही, सखोल चौकशी करा : अजित पवार मुंबई : प्रतिनिधी पुण्याच्या मुंढवा भागातील १८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीला विकल्याचे व त्यासाठी १८ कोटींचे मुद्रांक शुल्कही माफ केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने अजित पवार गोत्यात आले आहेत. या प्रकरणी तहसीलदार व दुय्यम […] The post जमीन व्यवहाराची नोंदणी रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 12:37 am

नामांकन अर्जात शिक्षेचा खुलासा हवा

अन्यथा निवड रद्द होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा नवी दिल्ली : वृत्तसंस्था एखाद्या उमेदवाराला एखाद्या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्याने सदर शिक्षेची माहिती निवडणुकीच्या नामांकन अर्जात दिली पाहिजे. उमेदवाराने निवडणुकीच्या नामांकन अर्जात शिक्षेचा खुलासा न केल्यास त्याची निवड रद्द ठरवली जाणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती ए. एस. […] The post नामांकन अर्जात शिक्षेचा खुलासा हवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Nov 2025 12:31 am