छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराजांची यांची सर्व धर्मांना, सर्व जातींना बरोबर घेऊन जायची परंपरा मोडकळीस आणणे हे मनूवाद्यांचे पहिले टार्गेट आहे. पण छत्रपतींची परंपरा जपणं पहिले टार्गेट विद्रोहीसह आपल्या सर्वांचे आहे. आपण प्राणापलीकडे जाऊन छत्रपतींची परंपरा जपूया, असे विचार ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक निरंजन टकले यांनी मांडले. शेतकऱ्यांची दुःख, स्त्रियांचे प्रश्नांवर सत्याची बाजू घेऊन लिहिताना अभिजन वर्गातील साहित्यिक दिसत नाहीत, असा हल्लाबोल निरंजन टकले यांनी चढवला. निरंजन टकले सातारा येथे होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे घालमोडे दादांचे साहित्य संमेलन व आमची भूमिका या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. याचं आयोजन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या संघटना, सातारा जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी पुणे येथे झालेल्या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री उपराकार लक्ष्मण माने, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ.धनाजी गुरव, ॲड. सुभाष पाटील, ह.भ.प. डॉ सुहास महाराज फडतरे, तसेच ॲड .वर्षा देशपांडे, आयु. गणेश भिसे, प्राचार्य डॉ. अरुण गाडे, ॲड. राजेंद्र गलांडे, ॲड. दयानंद माने, डॉ. प्रशांत पन्हाळकर, नारायण जावळीकर यांची उपस्थिती होती. निरंजन टकले यांनी यावेळी बोलताना सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांच्या लेखनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अश्लाघ्य भाषेत लिहून त्यांची बदनामी केल्याचा दाखला दिला. छत्रपतींच्या वारसदारांनी खरे तर छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या विश्वास पाटील यांना याचा जाब विचारायला हवा होता तर तेच स्वागताध्यक्ष झाले आहेत, असेही टकले यांनी म्हटले. निरंजन टकले यांनी आपल्या भाषणात अनेक दाखले देत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या हजारो शाळा बंद करून ग्रामीण भागातल्या भावी पिढीचे शिक्षण सरकारने बंद केले आहे. याबद्दल या तथाकथित साहित्यिकांनी लेखन केले आहे काय, असा सवाल केला आहे. आजच्या साहित्यिकांनी संविधानिक कर्तव्य बजावली पाहिजेत, वैज्ञानिक दृष्टिकोन जपला पाहिजे ते होताना दिसत नाही असे निरंजन टकले म्हणाले. मराठी शाळा आणि भाषांच्या लढ्यात साहित्यिक, कलावंत उतरत नाहीत. मुलं मराठी शिकलीच नाहीत तर तुमची पुस्तकं कोण वाचणार, चित्रपट कोण पाहिलं, असा परखड सवाल देखील निरंजन टकले यांनी केला. महात्मा फुले यांचं घालमोड्या दादांना लिहिलेलं पत्र आजही लागू महात्मा फुले यांनी मराठी ग्रंथकार सभेस उद्देशून लिहिलेल्या पत्रात साहित्यिकांना घालमोड्या दादा असे म्हटले आहे. त्यांच्याकडून मानवी कल्याणाचे काही होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आजच्या ही साहित्यिकांकडून मानवी कल्याणाचे काहीही होणार नाही व ते काहीही करणार नाही त्यामुळे आजही त्या साहित्यिकांना लिहिलेले पत्र तंतोतंत लागू होते, असे परखड विचार जेष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले. विवेकाला पुढे नेण्याचे काम विद्रोहीने यापुढे करावे सर्व समाज ताकदीने विद्रोही बरोबर येईल, असा विश्वास निरंजन टकले यांनी व्यक्त केला. विद्रोही परंपरा ही बुद्ध, चार्वाक, संत नामदेव, संत तुकाराम, महात्मा फुले संत गाडगेबाबा कबीर यांची आहे. या महामानवांची विद्रोही परंपरा विद्रोही सांस्कृतिक चळवळ पुढे चालवत असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. प्रास्ताविकात कॉ. धनाजी गुरव यांनी सातारा येथे होणाऱ्या नियोजित 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची मूळ संकल्पना ही प्रतिसरकार आणि लोकशाही मजबूत करण्यासाठीची आहे असे सांगून विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा इतिहास सांगितला. सातारचे आगामी विद्रोही साहित्य संमेलन क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिप्रेत असेच होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी विचार मंचावरील सर्व मान्यवरांनी हात उंचावून आगामी विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन निर्धाराने व उत्साहाने यशस्वी करण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला. मिनाज सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा येथील कार्यकर्त्यांनी क्रांतीगीते सादर केली. याशिवाय सभागृहात विद्रोहीच्या उपक्रमांबाबत माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.
दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
पुणे/नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसून येत असून हवा प्रचंड प्रदूषित असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला असून हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. कोर्टाने देखील फटकारे आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून राज्यात शीत लहरी येत आहेत. संपूर्ण डिसेंबर महिना थंडी राहणार असल्याचा […] The post दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे भाजपचे नेते व मंत्री गणेश नाईक यांच्यातही मनोमिलन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात जवळपास 15 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील इतर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात दोघांत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक हे दोघेही नेते एकमेकांना मंत्रालयात भेटले. येथे दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शीतयुद्ध सुरू होते. परंतु, आजच्या भेटीने एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचे मतभेद दूर झाले असल्याचे बोलले जात आहे. तसेच महापलिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोघांचे मनोमिलन होणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी नवी मुंबईत आपले वर्चस्व निर्माण करत गणेश नाईक यांच्या प्रस्थापित राजकारणाला मोठे आव्हान दिले होते. मात्र, राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थानिक समीकरणे बदलली. फडणवीसांनी गणेश नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांचे राजकीय वजन वाढवले, ज्यातून शिंदे आणि नाईक यांच्यातील सुप्त संघर्षाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले. मंत्रिपद मिळाल्यानंतर गणेश नाईक यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्यावर तीव्र टीका झाली. या संघर्षाची धार अधिक तीव्र झाली जेव्हा नाईकांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे लढावे, असे संकेत दिले. या अंतर्गत वादामुळे महायुतीमधील अस्वस्थता सातत्याने समोर येत होती. मात्र, सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पट्ट्यात ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ही बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन महायुतीने आता सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या आव्हानाला रोखण्यासाठी अंतर्गत मतभेद बाजूला सारणे आवश्यक असल्यानेच, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील या ताज्या भेटीकडे एक महत्त्वाची राजकीय तडजोड म्हणून पाहिले जात आहे.
मुंबई : राज्यातील २९ महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत ठाकरे बंधुंनी आघाडीची घोषणा केली आहे. तसेच महायुतीतील पक्षांनीही आगामी निवडणूक एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे. मात्र अद्याप जागावाटपाची घोषणा झालेली नाही. अशातच आता काँग्रेसनेही मोठी खेळी करत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला […] The post काँग्रेसची रासपसोबत आघाडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिबट्याचा सीआरपीएफ कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
अनंतनाग : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात बिबट्याच्या दहशतीमुळे खळबळ उडाली आहे. अनंतनागच्या कप्रान परिसरात जंगलातून भरकटत आलेला एक बिबट्या थेट केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पमध्ये शिरला आणि सीआरपीएफ जवानावरदेखील हल्ला केला. या घटनेत संबंधित जवान जखमी झाला आहे. आज सकाळी कप्रान परिसरात जंगलातून वाट चुकलेला बिबट्या अचानक वस्तीमध्ये दाखल झाला. बिबट्या दिसताच गावक-यांमध्ये घबराट पसरली. […] The post बिबट्याचा सीआरपीएफ कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांचे नेतृत्व आपण करणार असल्याचे जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या भूमिकेवरही भाष्य केले. सुळे म्हणाल्या की, त्यांनी प्रशांत जगताप यांच्याशी सहा तास चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे. जगताप यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाही आणि ते टोकाची भूमिका का घेत आहेत, हे माहिती नसल्याचे सुळे यांनी सांगितले. केवळ प्रशांत जगतापच वेगळी भूमिका मांडत असून, पक्षातील इतर कोणीही काही बोलत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात नाराजी नसते, हा शब्द घरी वापरण्याचा असतो, असे सांगत त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे म्हटले. शरद पवार हे पक्षाचे केंद्रबिंदू असून, ते सांगतील तीच पूर्व दिशा असते, असेही त्यांनी नमूद केले. आज त्यांनी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या चर्चा केली. या बैठकीत त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेण्याचे आवाहन केले असून, पुणे शहराच्या हितासाठी पाण्याचा प्रश्न, वाहतूक समस्या, पर्यावरण आणि वायू प्रदूषण यांसारख्या मुद्द्यांवर अनेक इच्छुक उमेदवारांनी भूमिका मांडल्याचे सुळे यांनी सांगितले. राजकारण हे लोकांची सेवा करण्याचे साधन आहे. आपण पक्षाच्या कार्यकर्त्या असून, शरद पवार जे सांगतील ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी नदीत उडी मारण्यास सांगितले आणि ती भूमिका योग्य असेल तर तेही करेन, असे त्यांनी म्हटले. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निवडणुकीसाठी एकत्र आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच, माजी महापौर दत्ता धनकावडे यांनी 'घड्याळ' चिन्हावर दोन्ही पक्षातील उमेदवार लढतील असे म्हटले असले तरी ते महत्त्वाचे नसल्याचे सुळे यांनी नमूद केले. लोकसभा निवडणुकीत अनेकांनी आपल्या विरोधात काम केले असले तरी, मैत्री आणि राजकारण आपण वेगळे समजतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीनंतर होत असलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष सज्ज असून नगरपालिका निवडणुकाप्रमाणेच या निवडणुकीतही समविचारी पक्षांना सोबत घेण्याची काँग्रेसची भूमिका आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष एकत्र लढणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. टिळक भवन येथे आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यात आज आघाडीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा केली. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय यावेळी पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महादेव जानकर हे बहुजन समाजाचा आश्वासक आवाज आहेत. देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे अशा प्रसंगी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय झाला आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत आघाडीची औपचारिक घोषणा केलेली नव्हती पण सातारा, सांगली तसेच मराठवाडा व विदर्भात एकत्र निवडणुका लढलो आहोत आणि तीच भूमिका आज पुढे घेऊन जात आगामी काळात सोबत राहण्याचा निर्णय झाला आहे. संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यावेळी म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊन काम करत असताना समविचारी पक्षांनी एकत्र असावे या भावनेतून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. काँग्रेसबरोबर रासपची आघाडी ३१ मे रोजीच झाली आहे. राहुल गांधी हे देशातील तरुण, महिला, आदिवासी, गोरगरीब, मागासवर्गीय यांचा आवाज बनून काम करत आहेत. जागा किती मिळणार यापेक्षा आजघडीला संविधान व लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे तसेच सामान्य लोकांना मान सन्मान मिळाला पाहिजे, असे जानकर म्हणाले. शिवसेना-मनसे युतीला शुभेच्छा राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीबद्दल विचारले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, त्यांच्या युतीला आमच्या सदिच्छा व शुभेच्छा आहेत, आम्ही जोडणारे आहोत तोडणारे नाही. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मविआ एकत्र लढली पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यानुसार पक्षाने निर्णय घेतला आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही पक्षाची भूमिका जाहीर केलेली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश मोठं आहे. महायुतीने साम, दाम, दंड, भेद नितीचा खुलेआम वापर केला, सोबतीला प्रशासन व निवडणूक आयोग होता, तरीही काँग्रेस कार्यकर्ता निर्धाराने व निष्ठेने लढला. अनेक ठिकाणी स्वबळावर लढलो त्याचा फायदा काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत झाला, असेही सपकाळ म्हणाले. नगरपालिका निवडणुकीतील यशाचा जल्लोष नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 41 नगराध्यक्ष निवडून आल्याबद्दल प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 41 आकड्याच्या आकाराचा पुष्पगुच्छ काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरुपसिंग हिऱ्या नाईक यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. गांधी कुटुंबीयांचा सच्चा सेवक म्हणून त्यांची ओळख होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचा आदिवासींचा सच्चा सेवक म्हणून गौरव केला होता. त्यांच्या पार्थीवावर गुरुवारी सकाळी 11 वा. त्यांच्या नवागाव या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुरुपसिंग नाईक यांची गत अनेक दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. त्यांच्यावर नवापूर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी तिथेच उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सुरुपसिंग नाईक हे काँग्रेस आमदार शिरीषकुमार नाईक यांचे वडील आहेत. नाईक कुटुंबीयांचे दिवंगत इंदिरा गांधीपासून राहुल गांधींपर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांना काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाते. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचा काँग्रेसमध्ये चांगलाच दबदबा होता. सरपंच ते मंत्रिपदापर्यंत माजली मजल माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचा जन्म 10 सप्टेंबर 1938 रोजी नंदूरबारच्या नवापूर तालुक्यातील नवागाव या लहानशा आदिवासी वस्तीत झाला. त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यानंतर 1962 साली ते गावचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर पंचायत समितीत ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर कधीही त्यांनी मागे वळून पाहिले नाही. काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते स्वतःच्या कर्तबगारीच्या जोरावर काँग्रेस सरचिटणीस पदापर्यंत पोहोचले. 1962 ते 1972 या काळात त्यांनी जे काही कार्य केले त्याने त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीची पायाभरणी केली. सुरुपसिंग नाईक 1972 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले. मार्च 1977 मध्ये त्यांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांचा मोठा विजय झाला. 1980 साली त्यांनी पुन्हा आमदारकी लढवली. ते राज्यात कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर ते नवापूर मतदारसंघात सातत्याने निवडून आले. काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवले. 2009 साली विधानसभेत डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू माजी आ. शरद गावित यांचा त्यांनी पराभव केला. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षात नंदूरबार जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यात ‘ठाकरे पर्व’ पाहायला मिळेल
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेनेची (यूबीटी) आज अधिकृतपणे युती जाहीर केल्यानंतर राज्यभरात दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही शिवसेनेचे (यूबीटी) कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी जल्लोष करत ऐतिहासिक क्षण साजरा केला. शहरातील शिवसेना भवन येथे शिवसेनेचे (यूबीटी) ज्येष्ठ नेते तथा माजी […] The post राज्यात ‘ठाकरे पर्व’ पाहायला मिळेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उद्धव-राज ठाकरे एकत्र; कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना बुधवारी २४ डिसेंबर रोजी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येत अधिकृतरीत्या युतीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर पुण्यात बुधवारी शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांनी एकत्र येत […] The post उद्धव-राज ठाकरे एकत्र; कार्यकर्त्यांचा जल्लोष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे माजी मंत्री सुरूपसिंग हि-या नाईक यांचे निधन
नंदुरबार : काँग्रेसचे भीष्म पितामह माजी मंत्री सुरूपसिंग हि-या नाईक यांचे ८८ व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे. गांधी परिवाराचा सच्चा सेवक म्हणून त्यांची ओळख होती. इंदिरा गांधींपासून तर राहुल गांधींपर्यंत नाईक कुटुंबांचे घरोब्याचे संबंध आहेत. इंदिरा गांधी यांनी सुरूपसिंग नाईक यांना आदिवासींचा सच्चा सेवक म्हणून गौरवले होते. ते काँग्रेसचे आमदार शिरीषकुमार नाईक यांचे वडील […] The post काँग्रेसचे माजी मंत्री सुरूपसिंग हि-या नाईक यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. आता झालेली युती ही सत्तेसाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्यांना आपली पोरं सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार? असा तिखट सवालही शिंदेंनी उपस्थित केला. एकनाथ शिंदे म्हणाले, काही युत्या या जनतेच्या विकासासाठी होतात, महायुती ही जनतेच्या विकासासाठी, मुंबईच्या विकासासाठी आहे. पण आता झालेली युती ही सत्तेसाठी आहे. निवडणुका आल्यावरच यांना मराठी माणूस आठवतो, असा टोला शिंदेंनी लगावला आहे. तसेच युती कोणाची कोणाशीही झाली तरी आमची महायुती ही महाराष्ट्रामध्ये मजबुतीने उभी आहे. लोकसभा विधानसभा, नगरपालिकांमध्ये महायुती जिंकली. त्यामुळे अशा सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे काही फरक पडत नाही, असेही शिंदे म्हणाले. ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महापालिकेकडे यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिली. आता ही कोंबडीच कापून खायचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची झालेली युती ही स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. परंतु, जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार. ठाकरे बंधूंची युती झाली तरीही विठ्ठल आमच्याकडे आहे, असे शिंदे म्हणाले. यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विकासावर एकही शब्द बोलले नाहीत. यांचा अजेंडा हा फक्त सत्तेसाठी आहे. बाळसाहेबांचा विचार ज्यांनी सोडला त्यांना राज्यातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. असली काय आणि नकली काय हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी मुंबईसाठी काय केले? तसेच आम्ही विचारधारेला पुढे घेऊन जाणारे आहोत. मुंबईचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यांनी मुंबईसाठी काय केले हे सांगावे. मुंबईकर हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तो यांच्यामुळे. या मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्यांच्या पुनर्विकासाचे काम आम्ही करत आहोत. रमाबाई आंबेडकरमधील 17 हजार घरांचे काम आम्ही मार्गी लावले आहे. त्यांच्याकडे काय अजेंडा आहे? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार? एकनाथ शिंदे म्हणाले, जेव्हा निवडणुका येतात त्यावेळी हे 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार' असा बोर्ड लावतात. मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास पाहिजे आहे. आम्ही घेतलेले निर्णय हे मुंबईकरांच्या हितासाठीचे आहेत. पुढच्या सहा महिन्यात मुंबई खड्डेमुक्त होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ठाकरेंनी कोरोना काळात फक्त पैसाच खाल्ला. जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार? असा सवालही शिंदेंनी उपस्थित केला.
दोन्ही बंधू एकत्र; मनसैनिकांना अश्रू अनावर
मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची मुंबईत पार पडलेली पत्रकार परिषद नाशिकमधील मनसे कार्यालयात उत्साहात पाहिली गेली. मनसे आणि ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते एकत्रितपणे हा ऐतिहासिक क्षण अनुभवत होते. अनेक वर्षांपासून दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावे अशी शिवसैनिक आणि मनसैनिक यांची इच्छा होती, जी आज पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर […] The post दोन्ही बंधू एकत्र; मनसैनिकांना अश्रू अनावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय : विजय वडेट्टीवार
मुंबई : प्रतिनिधी मुंबई बळकावण्याचा केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू असून यासाठी राज्यातले महायुती सरकार केंद्र सरकारला सहकार्य करत आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना महायुती सरकारच्या धोरणावर केली. आमच्या आपसातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. […] The post गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय : विजय वडेट्टीवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत एकीकडे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली असतानाच, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मोठे खिंडार पडले आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. सुमित खांबेकर यांच्यासोबत मराठवाड्यातील मनसेच्या अन्य तीन जिल्हाध्यक्षांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने मराठवाड्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. सुमित खांबेकर हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखे उभे होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत (मनविसे) तळमळीने काम केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन राज ठाकरेंनी त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत खांबेकर यांनी तत्कालीन औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) पूर्व मतदारसंघातून मनसेच्या तिकीटावर निवडणूकही लढवली होती. शिंदे गटाची ताकद वाढली सुमित खांबेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगर आणि जालना परिसरात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः आक्रमक कार्यकर्त्यांची फळी सोबत असल्याने आगामी निवडणुकीत याचा फायदा शिंदे गटाला मिळू शकतो. महापालिका निवडणुकीपूर्वी मनसेची पिछेहाट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने शहरात मोठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र, मुख्य जिल्हाप्रमुखानेच ऐनवेळी साथ सोडल्याने शहरात मनसेची संघटनात्मक बांधणी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मनसेचे अनेक जुने आणि जाणते चेहरे पक्ष सोडून गेल्याने आता राज ठाकरे यावर काय भूमिका घेतात आणि संभाजीनगरमध्ये नवीन नेतृत्व कोणाकडे सोपवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती होण्याची शक्यता आहे. पण शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी त्याला कडाडून विरोध केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. नाराजी घरी चालते, समाजात काम करताना नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर जगपात काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने नुकतेच तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार असल्याचे सूतोवाच केले होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांनी हे वृत्त जोरकसपणे फेटाळून लावले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा झाली तर माझा राजीनामा तयार आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी त्यांना वरील खडेबोल सुनावलेत. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, प्रशांत जगताप यांनी उपस्थित केलेले प्रश्न रास्त आहेत. पण सगळ्या कार्यकर्त्यांचे मत महत्त्वाचे आहे. ही निवडणूक आहे. अशी नाराजी घरी चालते. नाराजी लोकशाहीत मान्य नाही. अशी नाराजी पक्षात चालत नाही. समाजात काम करताना नाराजी चालत नाही. ममी येथे पक्षाच्या बैठकीला आले आहे. गत अनेक दिवस संसदेचे अधिवेशन सुरू होते. त्यात अनेक विधेयके सादर करण्यात आली. मी अतिशय महत्त्वाच्या वेळी दिल्लीत होते. आज महापालिका निवडणुकीविषयी काय निर्णय घ्यायचा याचा आढावा घेतला जाईल. महाविकास आघाडी पुण्याच्या विकासासाठी लढणार आहे. त्यात समविचारी पक्ष आले तर त्यांचे स्वागतच आहे. निवडणुका येतील व जातील. पण प्रदुषणाचे काय? सत्ताधाऱ्यांनी 24 तास पाणी पुरवठा करण्याची ग्वाही दिली होती. पण आज आमच्या बिल्डिंगमध्ये टँकर येतो. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. मी तूतू, मी मी करत बसणार नाही. पुण्यात चांगला बदल हवा असेल तर सर्वांना एकत्र यावे लागेल. या प्रकरणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा सुरू आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. हे ही वाचा... ठाकरे बंधूंची युती ही निवडणूक फंडा:मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे ही घिसीपिटी कॅसेट झाल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ निवडणुकीचा फंडा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही हे 4 वर्षांच्या पोरालाही कळते. उद्धव ठाकरे यांची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. या घिसीपिटी कॅसेटला आता कुणीही विचारत नाही, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तब्बल 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने इच्छुकांसह मतदारांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. पुण्यात 'पुणेरी पाट्या' हा केवळ विनोदाचा विषय नसून ते एक प्रभावी संवाद माध्यम आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कर्वेनगरमधील एका घरमालकाने आपल्या घराबाहेर लावलेल्या पाटीची सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, या पाटीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची चांगलीच गोची केली आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून 'भावी नगरसेवकां'ची मांदियाळी पाहायला मिळत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी देवदर्शन, कोणी महिलांसाठी 'होम मिनिस्टर', तर कोणी सहलींचे आयोजन करत आहे. मात्र, कर्वेनगरमधील या पाटीने थेट आर्थिक मदतीची विचारणा करून, नेत्यांच्या 'प्रलोभन' संस्कृतीवर उपरोधिक टीका केल्याचे बोलले जात आहे. ही पाटी म्हणजे राजकीय पक्षांच्या दिखाऊ रणनीतीला पुणेरी शैलीत दाखवलेला आरसा असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे. पाटीवरील मजकूर काय? कर्वेनगर येथील प्रभाग क्रमांक ३० मधील एका घराबाहेर ही अनोखी पाटी झळकली आहे. या घरात २२ मतदार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तरी कोणी इच्छुक उमेदवार मदत करणार असेल तरच त्यांनी बेल अथवा दरवाजा वाजवावा. हुकुमावरून : घरमालक. असा मजकूर या पाटीवर लिहिण्यात आला असून, या पाटीची सर्वत्र चर्चा होत आहे. नेमकी चर्चा कशासाठी? पुणे तिथे काय उणे, हे वाक्य सार्थ ठरवत कर्वेनगरच्या या मतदाराने आपल्या घरातील मतांचे महत्त्व आणि उमेदवारांच्या आश्वासनांची खोचकपणे दखल घेतली आहे. ही पाटी निव्वळ विनोदी आहे की उमेदवारांच्या 'भेट' देण्याच्या वृत्तीवर केलेली टीका, यावर आता ठिकठिकाणच्या कट्ट्यांवर चर्चा होऊ लागल्या आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान, १६ ला निकाल पुणे महानगरपालिकेची मुदत संपून अनेक वर्षे उलटली आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. २२ डिसेंबरपासून उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे यावेळी इच्छुकांनी मोठी तयारी केली आहे. प्रत्येक प्रभागात इच्छुकांचे फ्लेक्स, भेटीगाठी आणि मेळाव्यांना ऊत आला आहे. अशातच या पुणेरी पाटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, संबंधित उमेदवारांनी त्या घराची बेल वाजवावी की नाही? असा प्रश्न आता राजकीय कार्यकर्त्यांना पडला आहे.
सोने-चांदीच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड
जळगाव : जळगाव सराफा बाजारात एकाच दिवशी चांदीमध्ये १२,००० रुपयांची सुसाट वाढ दिसून आली. ग्राहकांनी सकाळी सकाळी गर्दी केली. पण भाव पाहताच अनेकांची बोबडी वळाली. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड चांदीने मोडले आहेत. जळगावातील सराफा बाजारात चांदीच्या दरात पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत चांदीच्या दरात तब्बल १२ हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर […] The post सोने-चांदीच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व देण्यासह मताचाही अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमताचा प्रश्न उद्धवला तर नगराध्यक्षांना आपले मत योग्य त्या पक्षाच्या पारड्यात टाकून प्रकरण निकाली काढता येणार आहे. हा बदल सत्ताधाऱ्यांना अनुकूल असल्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सामान्य प्रशासन विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महसूल व नगरविकास विभागाशी संबधित प्रत्येकी 1 निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षास सदस्यत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच त्याला मताचाही अधिकार मिळेल. नगर विकास विभागाचा हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. या सुधारणेमुळे थेट जनतेने निवडून दिलेल्या अध्यक्षांना परिषदेचे पूर्ण सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार मिळेल. या निर्णयामुळे भविष्यात अध्यक्षांचे अधिकार अधिक मजबूत होतील. त्यांना थेट सभेत मत नोंदवून निर्णय प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेता येईल. यामुळे स्थानिक विकास कामे, बजेट मंजुरी आणि धोरणात्मक निर्णय जलद आणि प्रभावीपणे घेता येतील. या सुधारणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक लोकशाही स्वरूप मिळेल, असे सांगितले जात आहे. पण सध्याचे पक्षीय राजकारण पाहता नगराध्यक्षांच्या मतामुळे गटबाजी वाढून त्याचा फटका विकासकामांना बसण्याची शक्यता आहे. खाली वाचा राज्य मंत्रिमंडळाचे संक्षिप्त निर्णय
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ न्यायालयाने भाजपचे आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना मोठा कायदेशीर दणका दिला आहे. 'संविधान बचाव' आणि ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने या तिन्ही नेत्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. वारंवार न्यायालयाच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे. हे प्रकरण २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाशी संबंधित आहे. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने 'संविधान बचाव' आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात माजी आमदार राजन तेली, आमदार नीतेश राणे, नीलेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यासह एकूण ४२ जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजेरी या प्रकरणाची सुनावणी कुडाळ न्यायालयात सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीला नीलेश राणे, राजन तेली आणि इतर काही आरोपी न्यायालयात हजर होते. मात्र, आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य पाच जण गैरहजर राहिले. नीतेश राणे यांच्या वकिलांनी त्यांच्या गैरहजेरीबाबत न्यायालयात सवलतीचा अर्ज दिला होता. मात्र, न्यायालयाने हा विनंती अर्ज फेटाळून लावला. यापूर्वीही सुनावणीच्या अनेक तारखांना हे नेते गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्यावर, न्यायालयाने कडक पवित्रा घेत थेट अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. आता पुढे काय होणार? अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्यांना न्यायालयात स्वतः हजर होऊन हे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा, तांत्रिकदृष्ट्या पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गट, मनसेची युती 130 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी आपणही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे किशोरी पेडणेकर या शिवसेना - मनसे युतीच्या पहिल्या उमेदवार ठरू शकतात. उद्धव व राज ठाकरे यांनी आज आपल्या बहुप्रतिक्षित युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबई किंवा महापालिकेच्या निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्यावर कोणतेही भाष्य केले नाही. पण हे जागावाटप दोन्ही पक्षांसाठी सन्मानजनक राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावेळी बोलताना मुंबईच्या माजी महापौर तथा ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे बंधूंची युती मुंबईत 130 किंवा त्याहून अधिक जागा जिंकेल असा दावा केला. काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर? किशोरी पेडणेकर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, शिवसेना व मनसेची युती मुंबईत 130 किंवा त्याहून अधिक जागा जिंकेल. मला स्वतःलाही या निवडणुकीत उमेदवारी मिळेल. त्यामुळे मी माझ्या वॉर्डातून 100 टक्के निवडणूक लढवेन. भाजपवाले आमच्यावर आरोप करत आहेत. पण त्यांनी आमच्यावर केव्हा आरोप केले नाहीत. ते नेहमीच करतात. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही काय काम केले हे मुंबईकरांना माहिती आहे. मी स्वतः रणांगणात असेल. उल्लेखनीय बाब म्हणजे पेडणेकर यांनी 2017 च्या मुंबई निवडणुकीत दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाली. आता त्यांनी पुन्हा एकदा आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काय असेल ठाकरे बंधूंचा जागावाटपाचा फॉर्म्युला? सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे बंधू जागावाटपाच्या मुद्यावर सन्मानकारक तोडगा काढतील. त्यात ठाकरे गट 140 ते 150 जागांवर निवडणूक लढवेल. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 60 ते 70 जागांवर निवडणूक लढवण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ठाकरे बंधूंसोबत येण्याचा निर्णय घेतला तर या जागांमध्ये काहीसा बदल होईल. त्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष आपल्या वाट्याच्या 15 ते 20 जागा शरद पवार गटाला सोडेल. यामुळे मनसेच्या कोट्यातील एकही जागा कमी होणार नाही. महापालिकेची 15 जानेवाला निवडणूक उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रात येत्या 15 जानेवारीला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
मुंढवा - मांजरी रस्त्यावर डंपरची धडक:दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंढवा-मांजरी रस्त्यावर भरधाव डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नुकतीच घडली. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव भूषण कैलास अहिरराव (वय ३५, रा. अर्थव कॉॅम्प्लेक्स, मांजरी बुद्रुक) असे आहे. भूषण यांचे भाऊ पंकज कैलास अहिरराव (वय ३२) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण आणि पंकज हे दोघेही खासगी ठिकाणी नोकरी करतात. मुंढवा-मांजरी रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात भूषण गंभीर जखमी झाले, तर पंकज यांनाही दुखापत झाली. अपघातानंतर डंपरचालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या भूषण आणि पंकज यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान भूषण यांचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू दुसऱ्या घटनेत हडपसर-सासवड रस्त्यावरही भरधाव टेम्पोच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मनोहर वामनराव धर्माधिकारी (वय ५७, रा. धर्माधिकारी चाळ, नेहरूनगर, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. धर्माधिकारी यांच्या पत्नी उषा (वय ४७) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्माधिकारी हे हडपसर-सासवड रस्त्याने जात असताना भेकराईनगर परिसरात भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या धर्माधिकारी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक खंदारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
देशातील सर्वात मोठी समस्या पाणी संवर्धन आहे, असे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने आयोजित 'जलमित्र' पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. पाणी आणि शेतीशिवाय लोक जगू शकणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. या वर्षीचा 'जलमित्र' पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशातील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित पटनाईक यांना प्रदान करण्यात आला. यशदा, पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटिअर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक डॉ. अरुणचंद्र पाठक, सुनील जोशी, अनिल पाटील आणि राजेंद्र शेलार याप्रसंगी उपस्थित होते. डॉ. प्रभू म्हणाले की, जगात पाण्याची भीषण परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर पाणी प्रश्नाची गंभीरता समजून घेणे आवश्यक आहे. पाण्याचा प्रश्न सोडवताना ओलिताखाली येणाऱ्या जमिनीचा प्रश्नही सोडवणे महत्त्वाचे आहे. भविष्यातील पिढीसाठी पाणी संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी चिलिका तलावाचे उदाहरण देत सांगितले की, आशियातील हा खाऱ्या पाण्याचा मोठा प्रकल्प स्थलांतरित पक्ष्यांना आकर्षित करतो, ज्यामुळे जैवविविधता समृद्ध होते. पुरस्कार स्वीकारताना डॉ. पटनाईक म्हणाले की, हा पुरस्कार जलाशय संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येक पर्यावरणप्रेमीचा सन्मान आहे. महाराष्ट्र विकास केंद्र पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. चिलिका सरोवराच्या संवर्धनासाठी अनेक वर्षे केलेल्या कामाची दखल जगानेही घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सुनील जोशी यांनी लोणार सरोवराचा उल्लेख केला. ते म्हणाले की, लोणार सरोवर आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे असूनही ते केवळ शाळकरी मुलांच्या सहलींपुरते मर्यादित राहिले आहे. त्याचे झपाट्याने संवर्धन करणे आवश्यक आहे. वनराईचे मोहन धारिया यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांचे पर्यावरणीय काम सर्वांनी पुढे नेले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
आधुनिक जीवनशैली आणि कामाच्या बदलत्या वातावरणामुळे शहरांमध्ये सायनसायटिसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः २० ते ५० वयोगटातील नोकरदार लोकांमध्ये हे प्रमाण अधिक दिसून येते. पुण्यातील ईएनटी तज्ज्ञांच्या मते, सायनसायटिसच्या वाढत्या प्रकरणांपैकी सुमारे ५० टक्के रुग्णांसाठी कामाची जागा हे प्रमुख कारण आहे. ईएनटी तज्ज्ञ डॉ. सुश्रुत देशमुख यांनी सांगितले की, बंद एअर कंडिशनड कार्यालयांपासून ते धूळ आणि प्रदूषणाने भरलेल्या बांधकाम साइट्सपर्यंत, विविध कामाच्या ठिकाणी हवेतील बदल आणि दूषित घटक सायनसच्या संसर्गाला आमंत्रण देतात. डॉ. देशमुख यांच्या मते, सायनसायटिस म्हणजे नाकाच्या आजूबाजूच्या पोकळ्या (सायनसेस) सुजणे आणि त्यात कफ साचणे. वारंवार होणारी सर्दी-खोकला, ॲलर्जी, धूळ-धूर, प्रदूषण, रसायने, अचानक तापमानातील बदल किंवा नाकाच्या रचनेतील दोष ही याची मुख्य कारणे आहेत. नाक बंद होणे, चेहऱ्यावर दाब किंवा वेदना, डोकेदुखी, दाट नाकातील स्त्राव, वास कमी होणे, खोकला आणि थकवा ही याची प्रमुख लक्षणे आहेत. एअर कंडिशनरमधील थंड आणि कोरडी हवा नाकातील मार्ग कोरडे करते, ज्यामुळे ते संसर्गासाठी अधिक संवेदनशील होतात. नीट स्वच्छ न केलेल्या एसी व्हेंट्समधून धूळ, बुरशीचे बीजाणू आणि सूक्ष्मजीव पसरतात. बाहेरील उष्णता आणि आतल्या थंड वातावरणातील सततचा बदल सायनसेसना चिडचिड्या बनवतो आणि वारंवार सूज निर्माण करतो. दुसरीकडे, बांधकाम, उत्पादन क्षेत्र, वेअरहाऊस किंवा रस्त्यालगत काम करणाऱ्यांना धूळ, सिमेंट पावडर, रसायने आणि प्रदूषित हवेचा सतत संपर्क येतो. योग्य संरक्षण नसल्यास हे घटक थेट सायनसच्या आवरणाला सूज आणतात आणि दीर्घकालीन त्रास निर्माण करतात. डॉ. देशमुख यांनी पुढे सांगितले की, दर महिन्याला २०-५० वयोगटातील १० पैकी ५ पुरुष रुग्ण चेहऱ्यावरील वेदना, डोकेदुखी, दाट स्त्राव, वास कमी होणे आणि खोकला अशा लक्षणांसह येतात. सुमारे ५० टक्के प्रकरणे कामाच्या ठिकाणामुळे उद्भवत आहेत. उपचारासाठी रुग्णांची तपासणी करून गरज पडल्यास नाकाची एंडोस्कोपी किंवा सीटी स्कॅन केले जाते. सायनसायटिस टाळण्यासाठी काही उपाययोजना करता येतात. यामध्ये भरपूर पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने नाक धुणे, वाफ घेणे, गरम पाण्याचा शेक करणे, धूम्रपान-मद्यपान टाळणे, ॲलर्जी नियंत्रणात ठेवणे आणि पुरेशी विश्रांती घेणे यांचा समावेश आहे. एसी ऑफिसमध्ये थेट थंड हवेच्या खाली बसू नका आणि एसीची नियमित साफसफाई करा. धुळीच्या ठिकाणी मास्क वापरा आणि कामानंतर चेहरा-नाक स्वच्छ धुवा. १० दिवसांपेक्षा जास्त त्रास असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. शहरातील बदलत्या कामाच्या वातावरणामुळे सायनसायटिस हा आता एक सामान्य आजार बनला आहे. वेळीच काळजी घेतल्यास हा त्रास सहज नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज-उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली. ठाकरे बंधू एकत्र आले याचा मला आनंदच आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने राजकीयदृष्ट्या फार मोठे फेरबदल होतील, असा समज बाळगणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कुठल्याही एका पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावे लागते, त्या दृष्टीने दोन अस्तित्वहीन पक्षांनी केलेली ही युती आहे. या पलीकडे याचा कोणताही अन्वयार्थ काढण्याचे कारण नाही. या युतीने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे फडणवीस म्हणालेत. मराठी आणि अमराठी लोकांचा विश्वासघात ठाकरे बंधुंच्या युतीने फार काही परिणाम होईल, असे देखील मला वाटत नाही. ज्याप्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींना सातत्याने केलाय. मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचे काम आणि पाप यांनी केलेल आहे. त्यामुळे मराठी माणुसही यांच्यासोबत नाही. ज्याप्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केलेत, ते देखील त्यांच्यासोबत नाहीत. मुंबईमध्ये कोणीही ठाकरे बंधुंच्या सोबत येणार नाहीत. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचाराचा, स्वहिताचा आहे. निवडणुका आल्यावर भाविनक बोलायचे, पण आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही. मुंबईकरांचा महायुतीच्या विकासावर विश्वास ठाकरे बंधूंनी अजून दोन-चार पक्ष सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईकरांनी महायुतीचा विकास पाहिलेला आहे. विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम महायुतीने हाती घेतला आहे. त्यामुळे मुंबईची जनता विकासाच्या मुद्द्यावर महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न:पोलिसांत तक्रार दिल्याने हडपसरमध्ये घडली घटना
हडपसरमधील महंमदवाडी परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून पतीने हे कृत्य केले. याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव अनिल पंढरीनाथ माने (वय ४२, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) आहे. पीडित पत्नी जया माने (वय ३५) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल आणि जया यांच्यात कौटुंबिक कारणांवरून नेहमी वाद होत असत. पत्नीने यापूर्वी पोलिसांत तक्रार दिली होती. २२ डिसेंबर रोजी सायंकाळी त्यांच्यात पुन्हा वाद झाले. याच वादातून अनिलने पत्नीचा दोरीने गळा आवळला आणि तिच्या डोक्यात गज मारून तिला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पती अनिल माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, आणखी एका धक्कादायक घटनेत, लोणीकंद परिसरात अकरा वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. 'आपण दोघे झाडीत खेळूया' असे सांगून मुलाला झाडीत नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. याप्रकरणी छोट बद्रिप्रसाद प्रजापती (वय १९, रा. सावतामाळी नगर, लोणीकंद, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलाच्या ३२ वर्षीय आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील आंबेगाव परिसरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. जावेद ख्वाजामियाँ पठाण (वय ३४, रा. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संदीप रंगराव भुरके (वय २५) आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रौफ उस्मान शेख (वय ३५, रा. नऱ्हे, मूळ रा. नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी रौफ शेख यांचा जावेद पठाण हा भाऊ होता. जावेद पुण्यात एका ठिकाणी काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेदची आरोपी संदीप भुरके याच्या नात्यातील एका तरुणीशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. आरोपी संदीपचा या प्रेमप्रकरणाला तीव्र विरोध होता. पठाण आंबेगाव परिसरातील गायमुख येथे थांबला असताना, आरोपी संदीप आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठले. त्यांनी जावेदला तरुणीसोबतचे प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपी संदीप आणि त्याच्या मित्राने जावेदवर धारदार शस्त्राने अनेक वार केले. गंभीर जखमी झालेल्या जावेदला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप आणि त्याचा साथीदार पसार झाले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अहिल्यानगरमध्ये एमआयएम २० जागा लढविणार
अहिल्यानगर : प्रतिनिधी महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच एमआयएमची एन्ट्री होणार आहे. शहरातील पाच प्रभागांतील २० जागा लढविण्याचा निर्णय एमआयएमने घेतला असून, लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एमआयएमने महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ४, ५, १०, […] The post अहिल्यानगरमध्ये एमआयएम २० जागा लढविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रावर,मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे,मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे.त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार.मुंबईत उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे.मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती,मनसे बाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती अस वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. इंडिया आघाडी, मविआला धक्का नाही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मित्रपक्ष वेगवेगळे लढत असले तरी त्यामुळे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला कोणताही धक्का बसणार नसल्याचाही दावा केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती,विधान सभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही, आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात. यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला अस मानण्याचे कारण नाही. काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेने उभे रहावे असे आवाहन यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. हे ही वाचा... अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा:'चुकाल तर संपाल' म्हणत मुंबईला महाराष्ट्र, मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झाली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील एका हॉटेलात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करून BMC निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त करत मुंबईतील मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन केले. दरम्यान, मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या चाहत्यांची राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. आज ही त्यांची इच्छा राजकीयदृष्ट्या पूर्ण झाली. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहा ठाकरे बंधूंच्या युतीशी संबंधित संक्षिप्त राजकीय घडामोडी...
इंग्लंड संघाचे खेळाडू दारूच्या नशेत ; व्हीडीओमुळे क्रिकेट विश्वात खळबळ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अॅशेस मालिकेत मैदानावर सातत्याने पराभव पत्करत असलेली इंग्लंडची टीम आता मैदानाबाहेरील वादांमुळेही अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियातून समोर आलेल्या एका व्हीडीओमध्ये इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट नशेत असल्याचे दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ११ दिवसांत अॅशेस मालिका गमावल्यानंतर इंग्लिश कॅम्पमध्ये आधीच निराशेचे वातावरण होते. त्यातच आता खेळाडूंशी संबंधित व्हायरल व्हीडीओमुळे संघ व्यवस्थापनाच्या […] The post इंग्लंड संघाचे खेळाडू दारूच्या नशेत ; व्हीडीओमुळे क्रिकेट विश्वात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, या अमिषाला बळी पडून ६५ वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याची ६० लाख रुपयांची फसवणूक झाली. पत्नीचे २५ तोळे सोन्याचे दागिने, बँकेतील स्वत:ची ठेव मोडून त्यांनी ५९ लाख ९० हजार रुपये गुंतवले होते. ६ महिन्यांत आभासी बँक खात्यावर दोन कोटी जमा झाल्याचे दाखवत होते. त्यापैकी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर आयकर भरावा लागेल. त्यापोटी २० लाख रुपये भरा, असे म्हणत तक्रारदारास टाळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिसांत ऑनलाईन तक्रारी अर्ज दिला. विजापूर रोड परिसरात हे अधिकारी राहावयास आहेत. घरात पती-पत्नीच असतात. बँकेच्या सेवेतून २०१८ साली निवृत्त झाले. निवृत्तीनंतर देयरकमा मिळाल्या. जुलै महिन्यात समाज माध्यमावर एक लिंक आली होती. त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल, असा संदेश होता. त्याला प्रतिसाद दिला. लगेच व्हॉट्सअॅपवर संदेश मिळाला. त्यावरून संशयित शांतीलाल शहा व्हॉटसअॅपद्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली. शेअर मार्केटचा एजंट असल्याचे ओळखपत्र ऑनलाइद्वारे पाठवून दिले. त्यानंतर प्रकाश पटेल नावाच्या व्यक्तीकरवी पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला ३० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावर २० ते २५ टक्के परतावा आभासी खात्यावर दिला. जुलै ते १७ डिसेंबर २०२५ पर्यंत तक्रारदारांनी २०० वेळा संशयित व्यक्तीच्या विविध प्रकारच्या आठ खात्यांवर पैसे पाठवले. सहा महिन्यांत एकूण ५९ लाख ९० हजार रुपयांची रक्कम भरली. प्रत्येक भरणाअंती त्यांना आभासी रुपाने खात्यावर अधिक रक्कम दिसायची. त्यामुळे त्यांचा विश्वास दुणावला आणि प्रत्येक वेळी पैसे भरत गेले. शेवटी काढावयास गेल्यानंतर फसले. सुरुवातीचा नफा पाहून प्रत्येक वेळी भरणा सुरुवातीला तांत्रिक नफा झाल्याचे भासवून आरोपींनी तक्रारदाराला अधिक गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले. घरात असलेली रोख रक्कम संपल्यानंतर, जादा नफ्याच्या आशेने या अधिकाऱ्याने पत्नीचे २५ तोळे सोन्याचे दागिने विकले आणि ते पैसेही शेअर मार्केटच्या नावाखाली आरोपींना दिले. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्याने केवळ स्वतःची जमापुंजीच नव्हे, तर पत्नीचे २५ तोळे सोन्याचे दागिने ही पणाला लावले. बातमीतून धडाशेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अधिकृत ब्रोकर किंवा सेबी (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड) या संस्थेकडे संबंधित कंपनीची नोंदणी आहे का, याची खातरजमा करावी. अज्ञात व्यक्तीशी बोलून अथवा अनधिकृत ॲप्स डाऊनलोड करून त्यावर चॅटिंग करू नये, त्यांच्या आमिषाला बळी पडू नये. तज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. सोशल मीडियावरील लिंकवरून कोणताही व्यवहार करू नका- श्रीशैल गजा, पोलिस निरीक्षक, सायबर क्राइमतक्रारदाराकडील प्रमाणपत्र आणि गुंतवणुकीचे व्यवहार मी पाहिले. ते पूर्णपणे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सोशल मीडियावरील लिंकवरून कुठल्याही अमिषाला बळी पडू नका. अन्यथा सारी काही गमावून बसाल. पुन्हा मिळणे कठीणच.
किडनी रॅकेट प्रकरणी मास्टरमाईंड अटकेत
चंद्रपूर : प्रतिनिधीकिडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला चंद्रपूर पोलिसांनी रविवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर येथून अटक केली. कृष्णा, असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी मंगळवारी आयोजित पत्र परिषदेत दिली. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील ३६ वर्षीय शेतकरी रोशन […] The post किडनी रॅकेट प्रकरणीमास्टरमाईंड अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनसे-उबाठाच्या युतीची घोषणा; समर्थकांचा जल्लोष
मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची आज बुधवारी (ता. २४ डिसेंबर) घोषणा झाली आहे. दुपारी १२.३० वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे वरळीतील ‘हॉटेल ब्लू सी’ या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुरुवात केली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे […] The post मनसे-उबाठाच्या युतीची घोषणा; समर्थकांचा जल्लोष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंची युती ही केवळ निवडणुकीचा फंडा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येणार नाही हे 4 वर्षांच्या पोरालाही कळते. उद्धव ठाकरे यांची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. या घिसीपिटी कॅसेटला आता कुणीही विचारत नाही, असे ते म्हणालेत. उद्धव व राज ठाकरे यांनी आज आपल्या राजकीय युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी मुंबईला महाराष्ट्र, मराठी माणसांपासून तोडणाऱ्यांच्या राजकीय खात्म्याचा निर्धार व्यक्त केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा आहे हे जनतेला माहिती झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाच्या 4 वर्षाच्या पोराला सुद्धा कळते व महाराष्ट्राच्या जनतेलाही कळते की, मुंबई ही महाराष्ट्रापासून कधीच वेगळी होऊ शकत नाही. हे कुणीही करू शकत नाही. उद्धव ठाकरेंची ही कॅसेट आता जुनी झाली आहे. त्या घिसीपिटी कॅसेटला आता कुणी विचारत नाही. व्होटचोरी व मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे या दोन गोष्टी आता लोकांना पटत नाही. त्यांनी कितीही निवडणुकीचा मुद्दा बनवला, तरी उपयोग होणार नाही. उद्धव ठाकरे प्रत्येक निवडणुकीत असे बोलतात त्याला काही अर्थ नाही. ठाकरेंना स्वतःची माणसे सांभाळता येत नाही ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना स्वतःची माणसे सांभाळता येत नाहीत. त्यांना त्यांची लोकं सांभाळता येत नाहीत. म्हणून ते या पद्धतीने बोलत आहेत. जनतेचा व कार्यकर्त्यांचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी स्वतःच संपवला आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते व नेते त्यांना सोडून गेलेत. त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे. आपल्याला लोकांनी का सोडले. आपल्याला आमदारांनी का सोडले, आपल्याला गावोगावचे लोकं का सोडत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. आज एवढी परिस्थिती वाईट आहे की, नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठीही त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे मुंबई तोडण्याचा मुद्दा गौण ठरणार आहे. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात भावनिक राजकारण चालणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात भावनिक आवाहन चालणार नाही. जनता भावनेच्या आधारावर मतदान करत नाही. महाराष्ट्रातील जनता सुजान आहे. विकसित मुंबईलाच मतदान करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हेच विकसित महाराष्ट्र व विकसित मुंबई करू शकतात. हे मराठी माणसांना व मतदारांना माहिती आहे. आम्ही सर्वजण मराठी माणसे आहोत. आम्ही इंग्रजी लोकं आहोत का? आम्ही लंडनहून इकडे राहण्यासाठी आलोत का? आम्ही महाराष्ट्राचे मराठी माणसे आहोत. महायुतीमधील सर्वच लोकं मराठी माणसे आहेत. त्यामुळे मराठी- मराठी करून तुम्ही मराठी भाषेचाही अपमान केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान तुम्ही केला. त्यामुळे काहीही होणार नाही. मतदान भावनेच्या मुद्यावर होणार नाही. खरे तर हे मतदान विकसित मुंबईसाठी होणार आहे. त्यामुळे काहीही सांगितले तरी, फार वाट लागणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात किंचित बहुमत मिळणार आहे एवढीच मते मिळणार आहेत. संजय राऊतांचाही घेतला समाचार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी परप्रांतीयांना मुंबईकर म्हणण्यासंबंधी विधान केले आहे. त्याचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले, त्यांनी आतापर्यंत केवळ डिवचण्याचे काम केले. पण आता निवडणुकीसाठी त्यांनी भूमिका बदलली. आतापर्यंत उत्तर भारतीय कसे खराब आहेत, मुंबई कशी खराब झाली, मुंबईचा कसा सत्यानाश झाला हे ते उत्तर भारतीयांना जोडून म्हणाले. पण आता मतदानासाठी असे बोलत आहेत. ते रंग बदलणाऱ्या सरड्यांसारखे बोलत आहेत, असे ते म्हणाले.
सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या
पालघर : प्रतिनिधी पालघरमध्ये व्यावसायिकाने आत्महत्या केली. डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे ही घटना घडली. डहाणू तालुक्यात वाढत चाललेल्या अवैध खासगी सावकारीने या व्यावसायिकाचा बळी घेतला. अमानुष व्याजदर, सततचा मानसिक छळ, शिवीगाळ आणि धमक्यांना कंटाळून एका डायमेकिंग व्यावसायिकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने सुसाईड नोट लिहिली. यामध्ये त्यांनी ५ खासगी सावकारांची नावं लिहिली. या प्रकरणी वानगाव पोलिस […] The post सावकारांच्या जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारातील शेतात आढळून आलेल्या मगरीची ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील तलावात बुधवारी ता. २४ पहाटे सुटका करण्यात आली आहे. मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर वन विभागाच्या पथकाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारात आनंदराव फटींग यांचे शेत आहे. त्यांच्या शेतापासून काही अंतरावरच इसापूर धरण असून एक छोटा कालवा देखील आहे. या पाण्याचा ऊसासाठी वापर केला जातो. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. आज सकाळी कामगार ऊस तोडणी करीत असतांना त्यांना ऊसाच्या फडात मोठी हालचाल जाणवली. कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे जिवंत मगर आढळून आली. गावकरी व वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन मगर ताब्यात घेतली. सदर मगरीला ईसापूर धरणात सोडू नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्यानंतर विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले होते. त्यावरून मगरीची तपासणी करून तिला ताडोबाच्या बफर क्षेत्रात नैसर्गिक अधिवासात साेडण्यास परवानगी दिली होती. त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवरामकृष्ण चव्हाण, वनपाल सारंग शिंदे, शिवाजी काळे, सुधाकर कऱ्हाळे, संग्राम भालेराव, शेख सिद्दीक यांच्या पथकाने रातोरात ताडोबा प्रकल्प गाठला. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास मगरीची पाण्यामध्ये सुटका केली. मगरीचा पिंजरा उघडताच पाण्याचा प्रवाह पासून मगर सुखरुपपणे पाण्यात गेली. त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असेल, अशा शब्दांत ठाकरे बंधूंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ऐतिहासिक युती आज अधिकृतरित्या जाहीर करत, आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आज झालेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे देत, भाजपसह महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही सूचक टोले लगावले. या पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरे वाचा जशास तशी... पत्रकार: उद्धव सर, ही युती संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे का? कारण अनेक ठिकाणी असं होऊ शकतं स्थानिक पातळीवरती... उद्धव ठाकरे: अजून बाकीच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा, कालपर्यंत युती झालेली नसेल, नाशिकमध्ये झालेली आहे. बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यासुद्धा तिथल्या युतीवर आज उद्या शिक्कामोर्तब होईल. पत्रकार: सर मराठवाडामध्ये काय असणार आहे? रावसाहेब दानवे असं म्हणतात की ही उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, या इलेक्शननंतर त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहणार नाहीत... उद्धव ठाकरे: त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते? त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा कोणी विचारत नाही. पत्रकार: उद्धवजी, उद्धवजी... राज ठाकरे: मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत, दानवांना नाही. पत्रकार: उद्धवजी मराठवाडामध्ये, उद्धवजी उद्धवजी सर... राज ठाकरे: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच. पत्रकार: पण भाजप म्हणतेय की यामुळे मुस्लिम मतांचे राजकारण... राज ठाकरे: मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ‘अल्ला हू अकबर’ असं बोललेले आहेत ते, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत. माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत ना... पत्रकार: लावणार का? पुन्हा व्हिडिओ लावणार का? व्हिडिओ पुन्हा लावणार का? राज ठाकरे: ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार आहेत. पत्रकार: उद्धवजी, ‘बटेंगे तो कटेंगे’ उत्तर भारतीयांसाठी, यावर काय म्हणाल? राज ठाकरे: काय म्हणायचं? सगळ्यावर कसं बोलायचं? पत्रकार: उद्धवजी महाविकास आघाडीच काय? महाविकास आघाडीबाबत काय? राज ठाकरे: मला असं वाटतं आज मुंबईचं आम्ही तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जश्या जश्या होतील तश्या तुम्हाला सांगू. पत्रकार: साहेब मुंबईच्या युतीत राष्ट्रवादी पवार साहेब आहेत का? पक्ष सोडून गेलेल्यांना परत प्रवेश देणार का? मनसे किंवा शिवसेनेमधून जे पदाधिकारी कार्यकर्ते बाहेर गेलेत त्यांना आता युती झाल्यानंतर परत... राज ठाकरे: येऊ तर देत पहिलं. पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? हा एकनाथ शिंदे... उद्धवजी पवार साहेबांसोबत तुमचं काही बोलणं झालंय का मुंबई किंवा इतर... राज ठाकरे: उद्धववरती खूप असतं सगळं. पत्रकार: साहेब या युतीत पवार साहेब आहेत का? उद्धवजी ठाकरे बंधूंची युती होत असताना महाविकास आघाडी विस्कटलेली आहे. काँग्रेस स्वबळावर लढतेय आणि जे भाजपला हवंय तेच होताना दिसतंय, कारण परप्रांतीय आणि मुस्लिम मतं कदाचित तुमच्यापासून... उद्धव ठाकरे: भाजपला काय हवंय ते भाजपने पाहावं, मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो. चर्चा सुरू आहे, बघू त्यांच्याशी पण चर्चा चालू आहे. आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पत्रकार: या युतीमध्ये आणखीन कुठला एखादा पक्ष येणार आहे का? उद्धव ठाकरे: जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्याच्यात भाजपातले सुद्धा अस्सल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे, त्याच्यात काही जण भाजपात सुद्धा आहेत ज्यांना हे जे काही चाललंय ते पाहावत नाहीये किंवा सहन होत नाहीये, ते सुद्धा येऊ शकतात. पत्रकार: उद्धवजी तुम्ही महाविकास आघाडी सोबत आहात का? उद्धव ठाकरे: काँग्रेसने तर जाहीर केलं ना? मग आता आणखीन काय बोलायचं? जोडलं का तोडलं? पत्रकार: पण उद्धवजी त्यांनी बाहेर पडण्याचं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोबत आल्यामुळे त्यांचे विचार... उद्धव ठाकरे: बघा मला बाकी कोण काय म्हणतय त्याच्याशी काही कर्तव्य नाही, मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघू. पत्रकार: तुमचं जागा वाटप... महाविकास आघाडी अबाधित आहे का अजून सुद्धा? उद्धव ठाकरे: सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी अबाधित आहे. पत्रकार: उद्धवजी, २०१८ साली याच जिमखान्यात एक जागा वाटप झालं होतं... युतीची घोषणा करताना ५०-५० जागा वाटपाचं समीकरण ठरलं होतं. तर आज ठाकरे बंधूंची युती जाहीर होत असताना महानगरपालिकेत सत्ता आली, तर सत्ता वाटपाचं काही सूत्र आहे का? उद्धव ठाकरे: त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहितीये, तर आता आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही आहोत. आता आमचं दोघांचं घर आहे ना, दार बंद कशाला करता? पत्रकार: जागा वाटप केव्हा जाहीर होईल? उद्धव ठाकरे: निवडणुकीपूर्वी. अरे झालेलं आहे जागा वाटप. निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचा मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा. धन्यवाद.
कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या भावनेतून शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात ऐतिहासिक युती झाल्याची अधिकृत घोषणा आज राज ठाकरे यांनी केली. मुंबई महापालिकेच्या महासंग्रामासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले असून, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच असणार, असा बुलंद विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच त्यांनी फडणवीसांविरुद्ध 'लाव रे तो व्हिडिओ' 2.0 चे संकेत दिलेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वकांक्षी युतीची घोषणा राज ठाकरे यांनी केली. मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या चाहत्यांची राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. आज ही त्यांची इच्छा राजकीयदृष्ट्या पूर्ण झाली आहे. या युतीच्या घोषणेसोबतच ठाकरे बंधुंकडून मुंबइ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आम्ही आमची भूमिका जाहीर सभांतून मांडणार असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले. नेमके काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे म्हणाले, . पण माझी एक मुलाखत झाली होती. त्यात मी असे म्हटले होते की, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे नाही सांगणार. महाराष्ट्रात सध्या लहान मुले पळण्याच्या टोळ्या फिरत आहेत. त्यात दोन टोळ्या आणखी ॲड झाल्यात. ते राजकीय पक्षांमधील मुले पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईत. ती कधी आणि केव्हा भरायची ते कळवले जाईल. बरेच दिवसा ज्याची प्रतिक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना आणि मनसेची युती झाल्याचे आज जाहीर करत आहोत, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला. रावसाहेब दानवेंना 'दानव' टोला उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असेल, असे विधान करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा राज ठाकरेंनी समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बॅटिंग करताना राज ठाकरे म्हणाले, त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. मुळात उत्तरे ही देवांना द्यायची असतात, दानवांना नाही. या विधानाने पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. 'लाव रे तो व्हिडिओ' 2.0 चे संकेत मनसे-शिवसेना युतीला मत म्हणजे मुस्लीमधार्जिण्या राजकारणाला मत अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ फिरतोय, ज्यात ते अल्लाह हाफिज बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वावरून काही बोलू नये, असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. माझ्याकडे मुख्यमंत्र्यांचे खूप व्हिडिओज आहेत. ते काय बोलतात, त्यावर माझे व्हिडिओ तयार असतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न पाहायला मिळणार का, अशी चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजप व महायुतीवर कोणताही परिणाम पडणार नाही. मुंबईत भाजपचाच महापौर बसेल, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय युतीची घोषणा करणार आहेत. यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. विशेषतः ठाकरे बंधूंच्या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलेल असाही दावा केला जात आहे. पण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र हेटाळणीच्या सूरात कुणीही एकत्र आले तरी त्याचा भाजपला काहीही फरक पडणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. 51 टक्के मुंबईकर भाजपला कौल देतील चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे विकासाचे मॉडेल लोकांपुढे मांडले आहे, त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नगरपालिका निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसले. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवण्याचे काम फडणवीसांनी केले. त्यांनी 2047 पर्यंत मुंबई कशी असेल? या आधारावर मुंबईचा विकास प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे मुंबईकर आपली 51 टक्के मते महायुतीच्या बाजूने देतील. त्यातून पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून भाजपचा महापौर मुंबईच्या गादीवर बसेल. फडणवीसांनी मुंबईचा खरा विकास केला ते पुढे म्हणाले, मुंबईकर कोण कुणाशी युती करतो याकडे लक्ष देत नाही. मुंबईकर विकासाच्या बाजूने आहेत. जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे दुसरीकडे, भकास आहे आणि आमच्याकडे विकास आहे. त्यामुळे कुणीही एकत्रित आले तरी त्यांना मते मिळणार नाही. तुमच्याकडे विकासाची भावना नाही. त्यांचा या शहरावर 25 वर्ष महापौर होता. तेव्हा त्यांनी या शहराच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. पण 2014 मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मुंबईचा विकास झाला. जगातील कोणताही व्यक्ती इथे आला तर त्याला बदललेल्या मुंबईचा चेहरा दिसत आहे. जनतेला ठाकरेंची नौटंकी कळली बावनकुळे यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुंबई शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. कितीही नेते एकत्र आले, गळाभेट घेतली तरी काहीही होणार नाही. जनता त्यांच्यापासून फार दूर गेली आहे. जनतेला त्यांची नौटंकी कळली आहे. त्यांनी कितीही भाषणातून नौटंकी केली, तर जनता विश्वास ठेवणार नाही. त्यांना फक्त विकासाचे व्हिजन मांडावे लागेल. दरम्यान, महायुतीत बैठक सुरू आहे. आमच्यात कुठेही वाद नाही. महाराष्ट्रात सगळीकडे युती होणार आहे. बंडखोरी करणारा भाजपा-शिवसेनेचा कार्यकर्ता नाही. कुठल्याही परिस्थिती बंडखोरी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. आमचा कार्यकर्ता समजूतदार आहे त्यामुळं बंडखोरी होणार नाही असंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
देवळाली गावात मंगळवारी (दि. २३) पहाटे तीन चोरट्यांनी आधी मस्जिद परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांच्या डिक्कीची तोडफोड करून त्यातील हत्यारे काढली. त्याच हत्यारांचा वापर करून दोन मंदिरांमध्ये चोरी करत दानपेट्या फोडल्या. तसेच सार्वजनिक पारावर असलेल्या सूर्यमुखी गणपती मंदिरातील एक किलो चांदीच्या मुकुटाची चोरी केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस या तीन्ही चोरट्याच्या मागावर आहेत. देवळाली गावातील मुख्य चौकातील पंच कमिटीच्या श्री गणपती मंदिराला लावलेल्या कुलुपाला दगडाने तोडून, जाळीचे दार तोडून चोरट्याने मुकूट चोरला. मंदिरातील दानपेटी फोडून त्याने रक्कम लांबवली. यानंतर चोरट्यांनी दंड्या मारुती मंदिरातील दानपेटी फोडली. चोरीनंतर परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड केली. रिक्षांची तोडफोड केल्याचेही समोर आले आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान परिसरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे तीन चोरटे कैद झाले आहे. हॉस्पिटलमधून बोलतो सांगत महिलेला गंडा ऑनलाईन नंबर घेणे एका महिलेला महागात पडले. जस्ट डायलवर एका हॉस्पिटलचा नंबर शोधला काही वेळात हॅकरने महिलेला फोन करत टोकन करीता एपीके लिंक पाठवत माहिती भरण्यास सांगून १ लाख ३९ हजारांना आणि अन्य एका रुग्णाला ८८ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हनुमान नगरच्या ज्योती गिते यांनी तक्रार दिली की गुरुवारी (दि. १८) त्यांनी एका मोठ्या हॉस्पिटलचा नंबर ऑनलाइन शोधला. काही वेळाने हॉस्पिटलमधून बोलत असल्याचे सांगत टोकन करीता व्हॉट्सअपवर एपीके लिंक आली. गितेंना त्यात माहिती भरण्यास सांगितले. रविवारी (दि. २१) त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ३९ हजारांची रक्कम आयएमपीएस ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन रक्कम काढून घेतली. अशाच प्रकारे महेंद्र कापसे रा. श्रीराम नगर यांनाही लिंक पाठवत ८८ हजारांची फसवणूक केली. महिलेने पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधीत व्यक्तीने फोन बंद केल्याचे तपासात समोर आले.
मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज आपली युती जाहीर करत असतानाच, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे बंधू आम्हाला न्याय देत नसतील, तर आम्हाला काँग्रेससोबत वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी 'अल्टिमेटम' दिला आहे. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीला केवळ 15 जागांची ऑफर दिली जात असल्याने रोहित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमच्या पक्षाच्या नेत्यांनी कालच ठाकरे बंधूंची भेट घेऊन आम्हाला कोणत्या जागा हव्या आहेत, याची कल्पना दिली आहे. मात्र, ठाकरे बंधू आम्हाला केवळ 15 जागा देण्यास इच्छुक असून त्यातील बहुतांश जागा निवडून येण्यासारख्या नाहीत. त्यांनी हट्ट न धरता जिंकणाऱ्या उमेदवारांना संधी द्यावी. महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल. ठाकरे बंधुंनी एकत्र लढायचे आणि कुणाला घ्यायच नाही असे ठरवले तर आम्ही आणि काँग्रेस एकत्र लढू. जर पुढच्या दोन दिवसांत आम्हाला समाधानकारक निर्णय मिळाला नाही, तर आम्ही स्वबळावर किंवा काँग्रेससोबत एकत्र लढण्याबाबत विचार करू. प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नाराजीवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असते. केवळ भावनिक होऊन चालत नाही. प्रशांत जगताप हे अनुभवी नेते असून ते पक्षाचे हित लक्षात घेऊनच योग्य निर्णय घेतील, अशी आम्हाला खात्री आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी 'दोन्ही राष्ट्रवादी' एकत्र? पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या राजकारणाबाबत रोहित पवारांनी एक मोठी शक्यता वर्तवली आहे. ते म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा मोठा भ्रष्टाचार सुरू असून केवळ काही कंत्राटदारांच्या हितासाठी काम केले जात आहे. तिथे भाजपला रोखण्यासाठी जर आम्ही आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आलो, तर नक्कीच यश मिळू शकते. यावर आम्ही येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेऊ. भाजपकडून शिंदेंचा बुरुज ढासळण्याचे काम सुरू महायुतीवर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 110 जागांची अपेक्षा आहे, पण भाजप त्यांना इतक्या जागा कधीच देणार नाही. केवळ मराठी मतांसाठी त्यांचा वापर केला जात आहे. दुसरीकडे, भाजपचे रवींद्र चव्हाण हे शिंदेंचा बुरुज फोडण्याचे काम करत आहेत. तसेच, ज्यांच्यावर साधू हत्याकांडाचे आरोप भाजपने केले होते, त्याच मयूर शिंदे यांना पक्षात घेतल्यावरून त्यांनी भाजपच्या दुटप्पीपणावरही टीका केली. राम शिंदे आपल्या मतदारसंघात हेच करत आहे. सर्व गुंडांना तिकिटे देत आहे. शेवटी वरिष्ठ पातळीवर जे घडत आहे तेच खालच्या पातळीवर आपल्याला दिसत असल्याचे रोहित पवार म्हणालेत.
२०२५ ला निरोप देताना आणि २०२६ चे स्वागत करताना यंदा मटण चिकनचा बेत आखणाऱ्यांची दांडी गुल होणार आहे. कारण यंदाच्या थर्टी फर्स्टला भागवत एकादशी आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री १ वाजून मिनिटांपर्यंत एकादशीचा काळ असल्याने तळीराम आणि मांसाहारप्रेमींना यंदा नववर्षाचे स्वागत सात्त्विक पदार्थांनीच करावे लागणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात मोठ्या प्रमाणात मांसाहार आणि पार्थ्यांचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा ३० डिसेंबर आणि ३१ डिसेंबर असे सलग दोन दिवस एकादशी आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातही अनेक कुटुंबांमध्ये एकादशीला मांसाहार वर्ज्य असतो. त्यामुळे ज्यांनी पार्थ्यांचे बेत आखले, त्यांच्यासाठी हॉटेलचालकांनी उपवासाच्या पदार्थांची व्यवस्था केली. २०१९ नंतरचा दुर्मिळ योग एकादशी आणि ३१ डिसेंबरचा असा योग तब्बल ६ वर्षांनंतर आला आहे. २०१९ पासून ३१ डिसेंबरला कधीही एकादशी आली नव्हती. यंदा मात्र सलग दोन दिवस एकादशी आल्याने शैव आणि वैष्णव अशा दोन्ही संप्रदायांचे पालन करणाऱ्यांना उपवास धरावा लागणार आहे. ३० तारखेला शैव संप्रदायाची तर ३१ तारखेला वैष्णव संप्रदायाची एकादशी असल्याने सेलिब्रेशनच्या उत्साहावर धार्मिकतेचा ब्रेक लागला आहे. हॉटेल्समध्ये उपवास थाळीची तयारी शहरातील हॉटेलचालकांनी ही परिस्थिती ओळखून आपले मेनू कार्ड बदलले आहे. हॉटेलचालक शिवाजी पाटील यांनी सांगितले की, 'यंदा नॉनव्हेजची मागणी कमी राहण्याची शक्यता असल्याने आम्ही साबुदाणा खिचडी, वेफर्स, फिंगर चिप्स आणि थंडगार लस्सीची विशेष सोय केली आहे. थर्टी फर्स्टला हॉटेलमध्ये 'उपवास स्पेशल' काउंटर असेल. सात्त्विक आहारामुळे ऊर्जा टिकून राहते- अनंत पांडव (गुरुजी) उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे, तर ती एक उपासना आहे. शास्त्रानुसार एकादशीला सात्त्विक आहार घेतल्यास शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि आळस दूर होतो. त्यामुळे नववर्षाची सुरुवात ऊर्जेने करण्यासाठी उपवास लाभदायकच आहे.’ दिव्य मराठी नॉलेज: एकादशीची कथा वर्षात एकूण २४ एकादशी येतात (अधिक मास असल्यास २६). पद्मपुराणानुसार, 'मूर' नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी भगवान विष्णूंच्या तेजातून एक देवी प्रगट झाली, तीच एकादशी होय. या देवीने मूर राक्षसाचा पराभव केला. प्रसन्न होऊन विष्णूंनी आशीर्वाद दिला की, जो कुणी एकादशीचे व्रत करील तो पापांपासून मुक्त होईल अन् त्याला आरोग्य आणि समृद्धी लाभेल.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले गेले असून, या पार्श्वभूमीवर महायुतीने आपली पूर्ण ताकद मैदानात उतरवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात सोमवारी रात्री उशिरापासून ते मंगळवारी पहाटे 4 वाजेपर्यंत जागावाटपाबाबत मॅरेथॉन बैठक रंगली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिकांच्या जागावाटपाचा पेच सुटल्याची चिन्हे असून, लवकरच महायुतीकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होतील. या अल्प कालावधीत प्रभावी मोर्चेबांधणी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी रात्रीचा दिवस केला आहे. एकीकडे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची आज घोषणा होणार आहे. तर दुसरीकडे महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातही युतीबाबत चर्चा सुरू आहे. ठाण्यातील बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 5 तास चर्चा करून अनेक जागांवर एकमत घडवून आणल्याचे समजते. जागावाटपाची अधिकृत घोषणा कधी? मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच युतीची अधिकृत घोषणा केली जाईल. मुंबई महापालिकेत कोणता पक्ष किती जागा लढवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही तासांत उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. आमदारांना आणि नगरसेवकांना सक्त सूचना सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार आणि माजी नगरसेवकांची विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत सूचना दिल्या आहेत. सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून राहावे. नगरसेवकांनी निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आपला वॉर्ड सोडू नये. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर कोणताही वाद होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि नगरसेवकांना दिले आहेत. शिंदे, सामंत यांची फडणवीसांसोबत चर्चा या राजकीय घडामोडींमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने रत्नागिरीहून मुंबईला बोलावून घेतले. मुंबईत दाखल होताच सामंत यांनी आधी एकनाथ शिंदे यांची आणि त्यानंतर 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या त्रिपक्षीय चर्चेत जागावाटपाचे अंतिम सूत्र निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते.
राज व उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे बंधू मुंबईसह राज्यभरातील महापालिकांच्या निवडणुकीत प्रथमच एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत. पण या युतीला शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पाठिंबा देणार किंवा नाही? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम काँग्रेस व त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे ते बीएमसी निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईसह उपनगरांत उद्धव ठाकरे यांची शिवसेना व राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मानणारा एक वर्ग मुंबईत आहे. गत निवडमुकीत राष्ट्रवादीचे 9 नगरसेवक निवडून आले होते. पण राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर यातील काही नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी यंदाच्या बीएमसी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी शरद पवारांच्या उपस्थितीत काही बैठकाही झाल्या होत्या. पण शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांनी मंगळवारी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार गट ठाकरेंसोबत जाणार की नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शरद पवार गट स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी या मुद्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव व आमच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी रात्री उशिरा मातोश्रीवर बैठक झाली. त्यांच्याकडून काही प्रस्ताव आलेत. त्यावर चर्चाही झाली आहे. त्यांनी विक्रोळी, चारकोप, दिंडोशी सारख्या भागातील जागांची मागणी केली आहे. पण त्याठिकाणी पूर्वीपासूनच स्थानिक नेतृत्व प्रयत्नशील आहे. त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव दिला नाही. आता त्यांना स्वतःच निर्णय घ्यायचा आहे. ते काँग्रेससोबत बोलत असतील तर त्यात काहीही अयोग्य वाटत नाही. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना न्याय द्यावा असे प्रत्येक पक्षाला वाटत असते. त्यामुळे त्यांना तिकडे न्याय मिळत असेल तर त्यांना आपला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंनाही हाणला टोला सचिन अहिर यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला दिलेल्या भेटीचाही समाचार घेतला. काही लोक सोयीनुसार बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतात. आज आम्ही जाणार. त्यामुळे काहीजण काल जाऊन आले. महायुतीत काही आलबेल नाही. मित्रपक्षातील उमेदवार फोडण्याचे काम भाजपा व शिंदेगट करत आहेत. त्यामुळे महायुतीत काय सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा... थोड्याच वेळात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा:शिवसैनिक, मनसैनिकांत उल्हास; महाराष्ट्रात आज एक ऐतिहासिक पर्व सुरू - राऊत मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वकांक्षी युतीची घोषणा होणार आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करून BMC निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या चाहत्यांची राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. आज ही त्यांची इच्छा राजकीयदृष्ट्या पूर्ण होणार आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया ठाकरे बंधूंच्या युतीशी संबंधित संक्षिप्त राजकीय घडामोडी...
आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आणि प्रेरणादायी आहे. ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश राज्यात आला आणि मराठी माणसाने आनंदोत्सव साजरा केला, अगदी तसाच मराठी ऐक्याचा मंगल कलश आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला अर्पण केला आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीबाबत म्हणालेत. उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे हे भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे गटाचे काम आहे. उत्तर भारतीयाना, हिंदी भाषिकांना अस्वस्थ करण्याचे काम त्यांचेच आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला. संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना उबाठा आणि मनसेच्या युतीवर भाष्य करत,विरोधकांवर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले की, सकाळी ११:३० वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू 'शिवतीर्था'वर एकत्र येतील. तिथे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतील. ही केवळ राजकीय युती नसून महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक पर्वाची सुरुवात आहे, असे राऊत म्हणाले. त्यानंतर दुपारी १२:०० वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली जाईल. सात महापालिकांमध्ये 'मशाल-इंजिन' एकत्र राऊत यांनी स्पष्ट केले की, केवळ मुंबईच नाही तर राज्यातील प्रमुख सात महानगरपालिकांमध्ये जागावाटपाची चर्चा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. इतर ठिकाणीही जिथे जिथे शक्य आहे, तिथे आम्ही एकत्र लढण्याबाबत सकारात्मक आहोत, असे त्यांनी नमूद केले. दिल्लीच्या बुटचाट्यांनी मार्गदर्शन करू नये ठाकरे बंधुंच्या युतीवर टीका करणाऱ्यांवर संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, कोण काय 'भडबंजे' बोलतायत त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. हे सगळे लाचार आणि दिल्लीचे बुटचाटे लोक आहेत. त्यांना ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे पोटात भीतीचा गोळा आला आहे आणि तीच भीती त्यांच्या तोंडातून बाहेर पडतेय. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. मराठी माणूस आता एकच! मराठी माणूस एक आहे आणि तो एकच राहील. त्याचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच करतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने मुंबईसह संपूर्ण राज्याचे राजकारण आता पूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. 'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचे काम भाजप आमदार पराग शहा यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याच्या घटनेवरून राऊतांनी भाजपला धारेवर धरले. ते म्हणाले, मुंबईच्या भररस्त्यात एका गरीब मराठी रिक्षावाल्याला मारहाण करण्याची हिंमत भाजप आमदारांमध्ये येते कुठून? ही दादागिरी करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? गरीब मराठी माणसाला मारहाण करणे हेच भाजपचे धोरण आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, उत्तर भारतीयांना घाबरवणे आणि 'बटोगे तो पिटोगे' सारखे पोस्टर लावून समाजात तेढ निर्माण करणे, हे भाजप आणि शिंदे गटाचेच पाप आहे, असा आरोपही त्यांनी केला. शिवसेनेने कोणाला इथे विनाकारण मारले, हल्ला केला हे दाखवून द्यावे, असेही ते म्हणालेत. जागावाटपाचे सूत्र ठरले: 'जिंकेल त्याची जागा' आगामी निवडणुकांसाठीच्या रणनीतीवर बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, जागावाटपासाठी आमचे धोरण स्पष्ट आहे - 'मेरीट'वर, म्हणजेच गुणवत्तेवर जागांचे वाटप होईल. जिंकेल त्याची जागा, हेच सूत्र आम्ही शिवसेना आणि मनसे युतीसाठीही राबवले आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या महापालिकांच्या जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून लवकरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वकांक्षी युतीची घोषणा होणार आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा करून BMC निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. मुंबईसह राज्यभरातील ठाकरे घराण्याच्या चाहत्यांची राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याची इच्छा होती. आज ही त्यांची इच्छा राजकीयदृष्ट्या पूर्ण होणार आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया ठाकरे बंधूंच्या युतीशी संबंधित संक्षिप्त राजकीय घडामोडी...
पौष महिना म्हणजे भाकड मास याजुन्या समजुतीमुळे अनेकदा शुभकार्ये आणि महत्त्वाची बोलणी पुढे ढकलली जातात. मात्र, हा समजपूर्णतः चुकीचा असून धर्मशास्त्रआणि ज्योतिषशास्त्रानुसार पौषमहिना हा उपासना, दानधर्म आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचाआहे. सूर्य धनु राशीत असेपर्यंतविवाहाचे मुहूर्त नसले, तरी याकाळात विवाहाची बोलणी करण्यास हरकत नाही. उलट शिवलिंगावरतुपाचा अभिषेक, शाकंभरी नवरात्रोत्सवामुळे या महिन्यालाविशेष आध्यात्मिक वलय प्राप्त झाले आहे. गैरसमज दूर करत धर्मशास्त्राचा खरा आधार घेण्याचे आवाहनधर्मशास्त्र अभ्यासकांनी केले आहे. ‘रुढी बलियेसी’चा चुकीचा अर्थ: पौष महिन्यात शुभकार्य टाळण्यामागे ‘रुढी बलियेसी’ यावचनाचा दाखला दिला जातो. मात्र धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते,शास्त्रातून निर्माण झालेली रुढीच मान्य आहे. पौष महिन्याविषयी असलेले गैरसमज दूर करा पौष महिन्यात थंडीमुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पूर्वी लोकमहत्त्वाची कामे टाळत असत. कालांतराने याच कारणावरून पौष महिनाअशुभ असल्याची धारणा तयार झाली. मात्र याला धर्मशास्त्रीय किंवाज्योतिषीय आधार नसल्याचे पांडव यांनी सांगितले. दिव्य मराठी नॉलेज: या गोष्टी करणे ठरेल शुभ १. पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरूहोतो. या दिवसापासून माघस्नानालाप्रारंभ करावा. २. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हाशाकंभरी देवीचा महोत्सव शारदीयनवरात्रोत्सवासारखा असतो. ३. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेलतर शिवप्रीत्यर्थ स्नान, जप, होम तर्पण वब्राह्मण भोजन करावे. ४. पौष अमावास्येला अधोंदय पर्व आलेअसता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत. ५. शिवलिंगावर महिनाभर तुपाचाअभिषेक करावा. दीपाराधना करावी. ६. पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीलाउपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजाकरावी. ७. दुर्गेची मूर्ती पिठाची करावी. व्रतानिमित्तआठ कुमारिकांना भोजन घालावं. ८. महिनाभर एकवेळ उपवास करून जेशक्य असेल ते दान करावं. लग्नाची बोलणी करा- अनंत पांडव गुरुजी, धर्मशास्त्र अभ्यासकअर्धा मास सूर्य मकर राशीमध्येअसतो. मकर संक्रांती उत्सवसाधारण जानेवारी १४ तारखेलायेतो. मकर संक्रांतीच्या काळातअयन बदलतो. सूर्याचा मकर राशीतप्रवेश करणारा सूर्याचा रथघोड्याऐवजी गाढवामध्ये बदलतो.ह्या गाढवाला खर संबोधले आहे.म्हणून या महिन्याला खरमासदेखील म्हणतात. त्यासाठी विवाहनिषिद्ध मानतात, परंतु विवाहाची बोलणी करता येते. विवाह व गृहप्रवेशाबाबतत ज्ज्ञांकडून स्पष्टता या महिन्यात विवाह निषिद्ध नाही.फक्त सूर्य धनु राशीत असतानाविवाह मुहूर्त टाळावेत, असे शास्त्रसांगते. उर्वरित काळात योग्यग्रह-नक्षत्र असल्यास विवाह करतायेतो. विशेष म्हणजे श्री खंडोबाआणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाहपौष महिन्यातच शुक्ल त्रयोदशीलापाली येथे होता, असा उल्लेखपरंपरेत आढळतो. गृहप्रवेश,वास्तुशांती करू नये. केवळ नवीनघराचे मुख्य बांधकाम सुरू करता येते.
कृषी विद्यापीठांतर्गत संरक्षित शेतीत वातावरण नियंत्रणाच्या दिशेने एक महत्त्वाची प्रगती झाली आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत निर्मित वातावरण नियंत्रण उपकरणासाठी नव्या तंत्रज्ञानाला पेटंट मंजूर झाले आहे. या उपकरणामुळे हवेतील वायू, सूर्यप्रकाश, आर्द्रता, प्रकाशाच्या तीव्रतेवर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. हे उपकरण स्मार्ट सेन्सर प्रणाली आणि स्वयंचलित नियंत्रण तंत्रज्ञानावर आधारित असून संरक्षित शेतीमध्ये वापरण्यास उपयुक्त ठरणार आहे. यामुळे संरक्षित शेतीमध्ये योग्य पोषक वातावरण निर्मिती होऊन पिकांची चांगली वाढ व गुणवत्ता सुधारण्यास तसेच पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होईल. वातावरण नियंत्रण उपकरण पेटंटची नोंदणी झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुचिता गुप्ता, डॉ. राजेश मुरूमकर, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. मृदुलता देशमुख, प्रा. अजय तळोकार यांचे अभिनंदन केले. यापूर्वी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी अंतर्गत सौर प्रकाश कीटक सापळा, बहुउद्देशीय फेरो लाइट व फेरोसिटी लाइट कीटक सापळा, सौर उर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र, कृषी अवशेषांपासून उच्च मूल्याचे बायोचार करण्याचे यंत्र, बायोमास डिस्टिलेशन प्रणाली, सौर उर्जेवर चालणारे खत पसरवणारे यंत्र, सीताफळ गर विलगीकरण यंत्र आदी सात पेटंटची नोंदणी झाली आहे. हे आठव्या क्रमांकाचे पेटंट आहे. कृषी अभियांत्रिकी अंतर्गत विकसित यंत्र व उपकरणांमार्फत विद्यापीठाला रॉयल्टी मिळते, असे कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी सांगितले. हरित तंत्रज्ञान क्षेत्राला चालना संबंधित संशोधकांनी सांगितले की, हे तंत्रज्ञान कमी खर्चिक, दीर्घकालीन वापरासाठी उपयुक्त आहे. या शोधाला भारतीय पेटंट कार्यालयाकडून पेटंट संरक्षण मिळाले आहे. यामुळे ‘मेक इन इंडिया’ व हरित तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणार आहे. एकूणच, हे पेटंट भविष्यातील उपयोगी पाऊल मानले जात आहे.
दिवसेंदिवस घटत जाणारी शेती, उपजाऊ जमीन व ग्रामीण युवा पिढीचे शहरांकडे होत असलेले स्थलांतर गंभीर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फायदेशीर शेती आता कृतीत आली आहे, असे प्रतिपादन येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. ते बार्शी टाकळी तालुक्यातील चेलका येथे राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ परिसंवादात बोलत होते. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आदर्श ग्राम संकल्पनेंतर्गत चेलका येथील प्रयोगशील शेतकरी रामेश्वर पाटील उंडाळ यांचे शेतात हा परिसंवाद घेण्यात आला. शिवार फेरीही काढण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण संचालक डॉ. देवानंद पंचभाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कोष्टी, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, तालुका कृषी अधिकारी संध्या करवा, विद्यापीठ मॉडेल व्हिलेज उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रा. प्रकाश घाटोळ, विद्यापीठ विषय-तज्ञ डॉ. विकास गौड, डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, डॉ. सुहास लांडे, डॉ. प्रदीप ठाकरे, डॉ. गजानन लांडे, डॉ. पंकज भोपळे आदी उपस्थित होते. चेलका येथील सरपंच अरविंद जाधव, रामेश्वर उंडाळ, विजय उंडाळ, पोलिस पाटील वैशाली उंडाळ, ग्रामस्थ उपस्थित होते. शिवार फेरीचे सूत्रसंचालन विस्तार कृषी विद्यापीठ प्रा. प्रकाश घाटोळ यांनी केले तर विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी चिलका ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. मॉडेल व्हिलेज संकल्पना कृतीत आणा : भारत हा कृषी संशोधकांच्या परिश्रमातून देश दूध, कडधान्य, ज्यूटचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. तांदूळ, गहू, कापूस, फळे व भाजीपाला उत्पादनात जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आपण अन्नधान्य निर्यात करत परकीय चलन मिळवू शकतो. समर्थ, आदर्श ग्रामनिर्मितीसाठी मॉडेल व्हिलेज संकल्पना कृतीत आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे, असे आवाहन डॉ. गडाख यांनी केले. सेंद्रिय शेती, शेतमालावर गावातच प्रक्रिया कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी जगाचा पोशिंदा सुखी, शाश्वत व संपन्न होण्यासाठी कार्य करण्याची गरज सांगितली. व्यावसायिक दृष्टिकोनातून शाश्वत, विषमुक्त शेती, काळसुसंगत सेंद्रिय व नैसर्गिक शेती, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, तंत्रज्ञान आता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी उत्पादन खर्च निम्म्याने कमी करणे, तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीची उत्पादकता वाढवणे, शेतमालावर गावातच प्रक्रिया करत प्रक्रियायुक्त शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करण्यावर भर देण्याची गरज प्रतिपादित केली.
लळित कीर्तन म्हणजे काल्याच्या कीर्तनासारखे समारोपीय कीर्तन होय. हे कीर्तन समर्पणाचे किर्तन आहे. काल्याच्या कीर्तनासारखे हे कीर्तन प्रामुख्याने कोकण परिसरात होत असते. अशा या कीर्तनाची फलश्रुती म्हणजे या कीर्तनाच्या श्रवणाने भगवंताचा अनुग्रह विविध माध्यमातून होत असल्याचा हितोपदेश डॉ. अभय कुलकर्णी यांनी केला. लळीत कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताचे नामस्मरण होत असते. जेथे असे नामस्मरण होते, तेथे साक्षात भगवंत तेथे वास्तव्यास असतात, असेही ते म्हणाले. ते आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवात बोलत होते. किर्तन सेवेकरी स्व. शालिनी वामनराव नाईकवाडे यांच्या स्मृतीत स्थानीय प्रमिलाताई सभागृहात आयोजित तीन दिवसीय कीर्तन महोत्सवात डॉ. अभय कुलकर्णी यांनी आपल्या तृतीय कीर्तनाने या उत्सवाचा समारोप केला. समारोपीय कीर्तनात डॉ. कुलकर्णी यांनी ललीतांचे कीर्तन’ या विषयावर आपले कीर्तन सादर केले. ते म्हणाले, वास्तविक लळीत कीर्तन हा कीर्तनाचाच भाग आहे. लळीत कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताचे नामस्मरण होत असते. जिथे जिथे असे नामस्मरण होते, तिथे तिथे साक्षात भगवंत तेथे वास्तव्यास असतात. आपण म्हणतो भगवंतापासून मला काही मिळाले पाहिजे. अशीच आशा प्रत्येक भक्ताची असते, असे कुळकर्णी म्हणाले. कीर्तन प्रारंभी कुलकर्णी, प्रवीण नाईकवाडे व अंधारे कुटुंबाच्या सदस्यांनी दीप प्रजवलन करून पू. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रतिमा पूजन केले. कीर्तन उत्सवाच्या सफलतेसाठी नाईकवाडे परिवार, प्राचार्य वामनराव उर्फ भाऊसाहेब नाईकवाडे, प्रा. विजयराव अंधारे, प्रा. शैलजा अंधारे, प्रवीण नाईकवाडे, प्रा. विवेक बिडवई समवेत आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाच्या समस्त संचालक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. भगवंताजवळ मागण्याची लाज बाळगू नका डॉ. अभय कुलकर्णी यांनी भक्तीवर विवेचन केले. भक्तांची मागणी जे जे चांगले ते ते मला मिळावे, अशा पद्धतीची असते. हे. जो नव नव मागतो तो मानव, व जो देत राहतो तो देव असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भगवंताजवळ मागणी मागण्याची लाज बाळगू नये; कारण तो सर्व शक्तिमान व सर्व ज्ञाता आहे. अशा या दात्याने आपण सदा विसरत असतो. हा विसरभोळेपणा प्रभू प्राप्तीच्या मार्गात निश्चितच अडथळा असल्याचे डॉ. अभय कुलकर्णी म्हणाले.
जिल्ह्यातील भूमिहीन शेतमजुरांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविली जात आहे. या योजनेत आतापर्यंत ३८५ जणांना लाभ मिळाला असून, त्यांच्या नावे १,३८१ एकर शेती करण्यात आली आहे. मात्र, या आकडेवारीवरून ही योजना संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. लाभार्थ्यांना तत्काळ लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत पात्र भूमिहीन व्यक्तींना शेतजमीन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये चार एकर जिरायत किंवा दोन एकर बागायत जमिनीचा समावेश आहे. पण, सध्या जमिनीचे दर वाढल्याने संबंधित अनुदानात जमीन मिळणे अवघड आहे. तसेच, शेतकरीही जमीन विक्रीस तयार नसतात हे वास्तवही आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन लोकांना शेतजमीन देण्यात येते. यामधून संबंधितांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होईल, असा हेतू असतो. भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असावा. त्याचबरोबर तो भूमिहीन असणे गरजेचे आहे. १००% अनुदानावर शेती कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत पात्र भूमिहीन व्यक्तींना शेतजमीन खरेदीसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा ^कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३८५ जणांना लाभ मिळाला असून, १,३८१ एकर जमीन त्यांच्या नावे झाली आहे. -राजेंद्र जाधवर, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग अर्ज कसा करावा संबंधित लाभार्थी हा भूमिहीन असावा. लाभार्थ्यांचे किमान वय १८ आणि कमाल ६० वर्षे असावे. त्याने शासनाने निश्चित केलेल्या अटीत बसणे गरजेचे आहे. या योजनेत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो.
अटल दौड हाफ मॅरेथॉनसाठी 2115 धावकांची नोंदणी:25 डिसेंबरला नेहरू मैदान, राजकमल चौकातून होणार सुरुवात,
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुउद्देशीय संस्थेद्वारे तसेच अमरावती जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने २५ डिसेंबरला शहरात राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरातील २,११५ धावकांनी नोंदणी केली असून, राज्यस्तरीय अटल दौडला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना आमंत्रण देण्यात आल्याची माहिती मुख्य आयोजक गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तुषार भारतीय यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवार २३ डिसेंबर हा नावे नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता. या स्पर्धेतील विजेत्या धावकांवर ५ लाखांच्या पुरस्कारांची उधळण होणार असून, २१ कि.मी.अर्ध मॅरेथॉन शर्यतीत पुरुष गटात पहिल्या क्रमांकावरील धावकाला बाईक व महिला गटातील पहिल्या क्रमांकावरील धावकाला मोपेड दिली जाणार आहे. सोबतच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट दिले जाईल. पत्रकार परिषदेला माजी महापौर चेतन गावंडे, प्रशांत शेगोकर, अमरावती जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रा. अतुल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ. प्रताप अडसड, निवेदिता चौधरी, शहराध्यक्ष नितीन धांडे, किरण महल्ले, भाजप मनपा निवडणूक प्रभारी जयंत डेहनकर, भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, प्रा. रवी खांडेकर या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. असे राहतील वयोगट या स्पर्धेतील वयोगट पुढीलप्रमाणे आहेत : १४ वर्षांखालील (मुले-मुली - ३ किमी), १६ वर्षांखालील (मुलांकरिता ५ कि.मी., मुलींकरिता ३ कि.मी.), २० वर्षांखालील (मुलांकरिता ८ कि.मी., मुलींकरिता ५ कि.मी.), ४० वर्षांखालील (महिलांकरिता ५ कि.मी.), ४५ वर्षांखालील (पुरुषांकरिता ८ कि.मी.), खुला वयोगट, पुरुष व महिला १० किलोमीटर, खुला वयोगट पुरुष व महिला २१ किलोमीटर याप्रमाणे राहील. पाच ठिकाणी मेडिकल टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णवाहिकाही स्पर्धास्थळी राहणार आहे. याकरिता डॉ. श्याम राठी, डॉ. जयंत पांढरीकर, डॉ. मिलींद पाठक हे उपस्थित राहतील. पालकमंत्र्यांसह पदाधिकाऱ्यांची राहणार उपस्थिती
खरिपाची पीके अतिवृष्टीने वाहून गेले. अद्याप नुकसान भरपाई, रब्बीच्या पेरणीसाठी अनुदान सुद्धा सरकारकडून मिळाले नाही. अशा परिस्थितीत हिरवेगार बोंड असलेले कपाशीचे पीक काढून दहेगाव धरणाच्या पाण्यावर गव्हाचे पीक घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे. ८ ते १५ डिसेंबर दरम्यान धरणातून पाणी सोडण्यात येते. याच दरम्यान शेतकऱ्यांची गव्हाला पाणी देण्यासाठीची धडपड सुरू असते. मात्र, यावेळी २३ डिसेंबर येऊनही कॅनलचे बांधच दुरुस्त झाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी लांबली आहे. त्यामुळे कॅनलचे तत्काळ पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दहेगाव धरणावरून तब्बल १५ गेटने पाणी सोडून सुमारे ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन दरवर्षी ओलीताखाली येते. याच पाण्यावर शेतकरी रब्बीच्या हंगामात गव्हाचे उत्पन्न घेतात. यावेळी मृदाजलसंधारण विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कॅनलचे बांध सुद्धा फुटले आहे. गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकठिकाणी गेट फुटून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेले होते. त्यामुळे यावेळी कॅनल दुरुस्तीचे काम यावेळी रब्बी पिक पेरणीच्या आधी होणे गरजेचे होते. मात्र दुरुस्तीची कामे उशिरा लागल्याने आता, गव्हाच्या पेरणीसाठी शेत तयार करून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी विवंचनेत सापडला आहे. शिरजगाव मोझरीतील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला असून, दहेगाव धरणाच्या बांधावर जाऊन संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराला यासंबंधीत सामाजिक कार्यकर्ते यांनी जाब विचारला असून, बुधवारी संध्याकाळ पर्यंत दुरुस्तीचे कामे पूर्ण करून गुरुवारी सकाळ पासून पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी मृद जलसंधारणाच्या कार्यकारी अभियंता निकिता देशमुख यांच्याकडे केली आहे. त्यावरून गुरुवारी पाणी सोडण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून, तातडीने दहेगाव धरणाची पाहणी दौरा करण्यार असेही देशमुख म्हणाल्या आहे. यावेळी उशिरा रब्बीच्या पिक पेरणीमुळे शेतकऱ्यांच्या गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होतो. एकरी उत्पादन जास्त होण्या येवजी उत्पन्न घटते. त्यामुळे शेतीत गव्हासाठी लागलेली लागत सुद्धा हाती येत नसल्याचे शेतकरी प्रमोद मेश्राम,रमेश लडके यांच्याकडून सांगण्यात आले. रब्बीसाठी तातडीने धरणाचे पाणी सोडावे धरणाच्या बांधांने असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नाल्या केल्या नाही. त्याचे पाणी धरणाच्या बांधांमध्ये उतरते त्यामुळे माझ्या शेतात पाणी घुसते, सलग दोन वर्ष माझ्या शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे यावर्षी धरणाचे पाणी सोडतांना आधी प्रशासनाने बांध फुटून माझ्या शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई देण्याचे कबूल करावे. किंवा चांगले काम करून तातडीने धरणाचे पाणी रब्बी पिकांसाठी सोडण्यात यावे अशी आमची मागणी आहे. - ललित हगवणे,शेतकरी
एक दिवस सैनिकांसाठी अभियान राबवणार- जिल्हाधिकारी येरेकर:शुभारंभ व माजी सैनिक मेळावा साजरा
भारतमातेच्या संरक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत देश सेवा करणारे सैनिक, शहिदांचे कुटुंबीय, वीरमाता, वीरपत्नी व त्यांचे पाल्यांना जिल्हा प्रशासनाची मदत व्हावी, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी, एक दिवस सैनिकांसाठी हे अभियान राबवण्यात येणार असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित विभाग त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी सहकार्य करतील,असे आश्वासन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवार २३ रोजी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मंगळवारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गजरे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. प्रकाश ठाकरे, जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर यांची यावेळी उपस्थिती होती. आपले सैनिक सीमेवर देशाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सिमेवर लढत असतात. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती प्रत्येक नागरीकास अभिमान असायलाच हवा, देशाची अखंडता, प्रगती, देशाचे अस्तित्व यांचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचे ऋण व्यक्त करणे गरजेचे आहे. देशसेवा करताना ते आपल्या कुटुंबियांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. महसूल, मोजणी, कृषी, पोलिस विभाग अशा विविध शासकीय कार्यालयांकडे त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण व्हावीत, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘एक दिवस सैनिकांसाठी’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. सैनिक बांधव देशाच्या सीमेवर लढतात. त्यामुळेच आपण स्वातंत्र्याची अनुभूती घेत आहोत. आजवरच्या इतिहासात भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा आपण ऐकत आलो आहोत. त्यांच्या शौर्यगाथेतून आपल्याला आणि येणाऱ्या पिढीला निरंतर प्रेरणा मिळत राहील. सैनिक बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन राबविण्यात येतो. यातून सैनिकांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्यासाठी हा निधी खर्च करण्यात येतो. मागील वर्षी अमरावती जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त ध्वजनिधी संकलित केला. यावर्षी देखील दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक ध्वजनिधी जमा करण्यासाठी आपण सर्व एकत्रितरित्या प्रयत्न करूया. यावर्षी ३ कोटी रुपये ध्वजनिधी जमा करण्याचे उद्दिष्ट ठेऊया, असा विश्वास जिल्हाधिकारी येरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद पाथरकर यांनी केले. संचलन वैभव निमकर तर आभार सुरेखा पथोड यांनी मानले. ध्वजदिन निधीसाठी २५ लाखांचा धनादेश: शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, शौर्यपदकधारक, त्यांचे कुटुंबीयांना अर्थिक मदत देता यावी यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत २५ लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी येरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. सैनिकांच्या कुटुबियांचे प्रश्न सोडवण्यासाठी निधीचा वापर सैनिक बांधवांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडवण्यात येणार आहेत. सैनिक बांधव तसेच त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या तक्रारी जिल्हा सैनिक अधिकारी आनंद पाथरकर यांच्याकडे नोंदवाव्यात. एक दिवस सैनिकांसाठी या अभियानांतर्गत या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येणार.
मीरा इंडस्ट्रीजला लागली आग, चांदूर रेल्वे येथील घटना:चणाडाळ, कुटार, यंत्रसामग्री भक्ष्यस्थानी
येथील कुऱ्हा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या मीरा इंडस्ट्रीज या चणाडाळ प्रक्रिया मिलमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. मध्यरात्रीनंतर २ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीत चणाडाळ, चणा, कुटार तसेच मिलमधील महागडी यंत्रसामग्री जळून खाक झाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी येथील अग्निशमन विभाग पुरेसा नसल्याने जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावतीसह धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व तिवसा येथूनही अग्निशमनचे बंब मागवण्यात आले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास मिलमधून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर काहींनी मालक पियुष गंगन आणि सचिन गंगन यांना फोनद्वारे माहिती दिली. तत्काळ मिलचे शटर उघडताच आत आगीचे रौद्र रूप व भीषण तांडव दिसून आले. आगीने पेट घेतल्यानंतर त्यातील डाळीचे पोते असे निखारा बनले होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याचे पुढे केले जात आहे. मीरा इंडस्ट्रीमध्ये दररोज ७० टन चण्यावर प्रक्रिया करून चणाडाळ तयार केली जाते. जवळपास दोन ते अडीच एकर परिसरात पसरलेल्या या इंडस्ट्रीमध्ये तीन मजली इमारत असून, त्यामुळे आगीचे स्वरूप अधिक भीषण झाले.
तालुक्यातील काटगाव पाटी ते खानापूर या चार किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पंधरा दिवसांतच उखडला आहे. सर्वत्र खडी विखूरलेली दिसत आहे. खड्यावरून जाताना दुचाकीस्वारांची त्रेधातिरपीट होत आहे. या रस्त्यावरून चालणेही अडचणीचे ठरत आहे. नागरिकांनी या रस्तेकामावर प्रश्न उपस्थित केला आहे. तुळजापूर तालुक्यातील काटगाव पाटी ते खानापूर या चार किलोमीटर स्त्याची दुरवस्था झाली होती. तर साइडपट्ट्या पूर्णपणे खचल्याने रस्त्यावरून जाताना प्रवासी वाहन चालक व शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तसेच वाहन चालकांना रस्त्यावरचे खड्डे चुकवताना अनेक वेळा लहान-मोठे अपघात घडवण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या पाच किमी रस्ते कामाचे संपूर्ण नव्याने डांबरीकरण व साइडपट्ट्याचे रूंदीकरण करणे यासह अन्य कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तेव्हा रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर वाहन चालक व शेतकऱ्यांना आनंद झाला. मात्र निकृष्ट पद्धतीच्या कामामुळे त्या आनंदावर विरजण पडले आहे. कंत्राटदाराने ऑनलाइन निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्ते कामाला सुरुवात केली. मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी मात्र याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप वाहन चालक, शेतकरी व काटगाव ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. डांबर कमी, कचखडीचा वापर अधिक : मात्र रस्त्याचे व साइडपट्ट्याचे काम करताना कंत्राटदाराने नियम व अटी चक्क धाब्यावर बसवत व चांगल्या पद्धतीचे मजबूत व पूर्वीचा खराब रस्ता उखडून कचखडीचे व डांबराचे प्रमाण समसमान न टाकता डांबराचे प्रमाण कमी व कचखडीचे प्रमाण अधिक वापरून रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने कोट्यवधीचा खर्च पाण्यात गेला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत पूर्णपणे उखडून ठिकठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. काम अपूर्ण, चांगल्या पद्धतीने करण्यात येईल काटगाव पाटी ते खानापूर या रस्त्याच्या ४.३०० मीटर कामासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर आहे. त्यातून सदरील रस्त्याचे काम करण्यात येत आहे. मध्यंतरी तुळजापूर नगरपालिका निवडणुकीत संबंधित कंत्राटदार व्यस्त होता. शिवाय सदरील रस्त्याचे काम फक्त ५० टक्के पूर्ण झाले असून, या प्रकरणी मी स्वतः जाऊन पाहाणी करणार आहे. - विशाल काळे, उपविभागीय अभियंता, जि.प.बाधकाम विभाग तुळजापूर. शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकेना ^काटगाव पाटी ते खानापूर या रस्त्यालगत काटगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात शेतजमिनी असून, या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसह शेतकऱ्यांची सतत वर्दळ असते. मात्र याच चार किमी रस्त्याची गेल्या कि.मी रस्त्यावर सर्वत्र लहान मोठे खडे पडल्याने पुर्णपणे चाळण झाली होती त्यामुळे या रस्त्यावरून पायी चालत जाणं देखील अवघड झालं होतं आता कुठं रस्त्याच काम मार्गी लागलं होतं ते अधिकारी कंत्राटदाराने व्यवस्थित न केल्याने अवघ्या पंधरा दिवसातच केलेला रस्ता पूर्णपणे उखडला. शेतकऱ्यांची व्यथा कोणीच ऐकेना. - महादेव माळी, शेतकरी
ब्रिटिशकाळात चर्चच्या माध्यमातून येथे नाताळ साजरा केला जातो. कुर्डुवाडीत ब्रिटिशकालीन तीन तर स्वातंत्र्योत्तर काळातील एक असे चार चर्च आहेत. हे चारही चर्च रेल्वे वसाहतीच्या आवारातच आहेत. या चर्चमध्ये नाताळ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. चर्चेमध्ये विद्युत रोषणाईने सजावटीची तयारी सुरु आहे. शहरामध्ये सुमारे पाचशे ते सहाशे ख्रिश्चन बांधव आनंदाने राहतात. रेल्वे वसाहत व परिसरात राहतात. त्यांच्यासाठी या चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सेंट मेरीज चर्चच्या स्थापनेस १०७ वर्षे पूर्ण झाली आहेत. बिडारी वस्ती, कुर्डुवाडी येथे गेल्या सहा वर्षांपासून इमॅन्युएल प्रार्थना भवन सुरू करण्यात आले आहे. इमॅन्युएल प्रार्थना भवनचे धर्मगुरू रेव्ह. याकोब नवगिरे आहेत. कुर्डुवाडी येथे रेव्ह फिलिप काळे, रेव्ह शरद भालशंकर या सर्व धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित केले जातात. या चर्चची स्थापना १५ जुलै १९१८ रोजी ब्रिटीश काळात झाली. या चर्चचे १६५ कुटुंबातील सुमारे साडेतीनशे लोक सदस्य आहेत. चर्चचा परिसर सुमारे एक एकर आहे. धर्मगुरु, सेवकांसाठी निवास व्यवस्था आहे. हॉल विविध कार्यक्रमांसाठी मोफत दिला जातो. चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. या चर्चची स्थापना जुलै १९४७ मध्ये इंग्रज अधिकारी व स्व. रतन काळे यांनी केली. येथे सुमारे १५ कुटुंबातील सुमारे ४० सदस्य आहेत. येथेही प्रार्थना यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहान कळप चर्च चे धर्मगुरू रेव्ह डेव्हिड बागुल आहेत. प्रार्थना भवन सुरू करण्यात आले आहे. या चर्चची स्थापना १९७५ मध्ये झाली. साधारणपणे ३५ कुटुंबातील सुमारे ८५ सदस्य आहेत. या चर्चचा परिसर सुमारे २ एकर असून येथे एक पूर्व प्राथमिक कॉन्व्हेंट स्कुल आहे. धार्मिक कार्यक्रमांबरोबर येथे आरोग्य शिबिरेही घेतली जातात. या चर्चचे धर्मगुरु रेव्ह. परम ज्योती सादे हे यांच्यावर जबाबदारी आहे. या चर्चची स्थापना सुमारे ८४ वर्षांपूर्वी झाली. चर्चचा परिसर सुमारे सुमारे एक एकर आहे. या चर्चचे सुमारे २२ कुंटुंबातील सुमारे ५० सदस्य आहेत. येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम चालतात. दर शनिवारी मुलांसाठी इंग्रजी स्पिकींगचा तास घेतला जातो. सेंट अँथनी चर्चचे धर्मगुरू फादर रेव्ह विक्टर बोर्डे हे आहेत. सेंट मेरीज चर्च- १९१८ डब्ल्यू एमइ चर्च- १९७५ आरके कळप चर्च- १९४७
डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्हेगारीचे प्रकारही चिंताजनक वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागृती निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सीएससी विजा प्रकल्पाचे समन्वयक स्वप्निल करंडे यांनी केले. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज ग्रामपंचायतच्या सहयोगाने आयोजित सायबर सुरक्षा आणि जनजागृती या शिबिराचा उद्घाटन सोहळा दादा अंधारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी सीएससी या प्रकल्पाचे ज्ञानेश्वर चव्हाण स्वप्निल करंडे, बालाजी सुरवसे यांच्यासह ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. वाढती सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी केवळ तांत्रिक साधने पुरेशी नसून, नागरिकांची सायबर साक्षरता वाढवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर सोलापूर तालुक्यात सीएससी विजा सायबर सुरक्षा जनजागृती या विषयांतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना स्वप्निल करंडे म्हणाले की, सध्याचे युग हे पूर्णपणे डिजिटल झाले असून ग्राहकांची विविध पद्धतीने ऑनलाइन फसवणूक केली जात आहे. बनावट कॉल, खोटे मेसेज, फसव्या लिंक, ओटीपी मागून होणारी आर्थिक फसवणूक अशा प्रकारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अज्ञानामुळे अनेक ग्राहक निष्कारण या गुन्हेगारी प्रवृत्तींचे बळी ठरत आहेत. पूर्वी सायबर फसवणुकीचे प्रकार प्रामुख्याने शहरी भागापुरते मर्यादित होते, मात्र आता त्यांचे लोण ग्रामीण ग्रामीण भागातही पोहोचले असल्याने ग्रामीण नागरिकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक बनले आहे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर चव्हाण यांनीही सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. आपण डिजिटल आणि मोबाइलच्या तंत्रयुगात वावरत असलो तरी आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही, तर वैयक्तिक तसेच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांनी अनोळखी कॉल, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि संशयास्पद बाबी आढळल्यास त्वरित अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. सुरक्षेबाबत सजगता वाढण्यास मदत या सायबर सुरक्षा जनजागृती शिबिरांचे आयोजन उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा, नान्नज, बीबीदारफळ तसेच पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शेतकरी, तरुण बांधव, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित प्रश्न विचारत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात सायबर सुरक्षेबाबत सजगता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. वैयक्तिक माहिती शेअर करू नये ^आपण डिजिटल आणि मोबाइलच्या तंत्रयुगात वावरत असलो तरी आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही, तर वैयक्तिक तसेच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. नागरिकांनी अनोळखी कॉल, संदेश किंवा लिंक यांना प्रतिसाद देऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि संशयास्पद बाबी आढळल्यास त्वरित अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधावा. ज्ञानेश्वर चव्हाण, समन्वयक
अक्कलकोट स्टेशन सोलापूर जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव हे गाव धार्मिक आणि ग्रामीण परंपरेचा अनोखा संगम असलेले गाव म्हणून पुढे येत आहे. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेला पर्यटन विकास उपक्रमात गौडगावचा समावेश धार्मिक व ग्रामीण पर्यटनाचे गाव म्हणून करण्यात आला. गौडगाव हे जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिरासाठी राज्यभर प्रसिद्ध असून समर्थ रामदास स्वामींच्चा पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी भाविकांसाठी श्रध्दास्थान आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार चैत्रपौर्णिामा हनुमान जयंती, रामनवमी तसेच श्रावण अमावास्पेला महाराष्ट्रतूनच नाहीतर तेलंगना आणि कर्नाटक या राज्यातून देखील येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. याचबरोबर ग्रामदैवत महालक्षी (सीमालक्षी) देवीची ३ वर्षातून एकदा होणारी यात्रा ही गावाची वैशिष्ष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाते. तसेच धार्मिक आणि अध्यात्मिक ओळखी सोबतच गौडगावची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीवर आधारित आहे. लिंबू बागायत शेती, ज्वारी-बाजरी उत्पादन, दुग्ध व्यवसाय, पारंपरिक शेती पद्धती आणि ग्रामीण खाद्य संस्कृती हे गावाचे प्रमख आधारस्तंभ आहेत. या सर्व घटकांच्या आधारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न उपलब्ध करून देणे आणि स्थानिक दूध उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देणे हा पर्यटन विकासामागील मुख्य उद्देश आहे. पर्यटन विकास उपक्रमामुळे आगामी काळात पर्यटकांसाठी धार्मिक दर्शन, अशोक वाटिका, शिवारफेरी, ग्रामीण खाद्य अनुभव, स्थानिक उत्पादनांची खरेदी, माहिती दालन तसेच लोककला व संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे गौडगाव सोलापूर जिल्ह्यातील एक आदर्श धार्मिक व ग्रामीण पर्यटन गाव म्हणून विकसित होईल, असा विश्वास प्रशासनाने व गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. उद्योगासाठी होणार मदत ^गौडगाव बु हे गांव धार्मिक व ग्रामीण पर्यटन विकास उपक्रमांतर्गत निवड झाल्यामुळे या गावची जिल्ह्यात नव्याने ओळख निर्माण होऊन गावात रोजगार उपलब्ध होणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना येथे राहण्याची थांबण्याची सोय होणार आहे. येथील ग्रामस्थांना दुकानदारांना रोजगार मिळून उद्योग व्यवसाय वाढीसाठी मदत मिळणार आहे. याचबरोबर गावचा चौफेर विकास होऊन गांव समृद्ध आणि सुंदर बनणार आहे. श्रीकांत खानापूरे, अध्यक्ष (जागृत हनुमान मंदिर)
टेंभुर्णी (ता.माढा) येथील औद्योगिक वसाहतीत जिंदाल कास्टिंग कंपनीत काम करत असताना लोखंडाचा उकळता रस अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि. २०) रोजी घडली होती. या प्रकरणी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क असला त्यांनी अशी घटना घडलीच नसल्याचे सांगत हात वर केले. सिव्हील रुग्णालय पोलिसांत कंपनीतील दुर्घटनेची नोंद असली तरी टेंभुर्णी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केलेली आहे. यामुळे हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे चित्र आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश राम हर्ष (वय ४७, मूळ रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) या परप्रांतीय कामगार शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास जिंदाल कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक उकळता लोखंडी द्रव त्यांच्या अंगावर पडला. यात त्यांचे हात, छाती, पोट व पाय गंभीररीत्या भाजले होते. त्याचा सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी मृत्यू झाला माहिती कंपनी प्रशासनाला दिली जिंदाल कंपनीमध्ये कामगाराच्या आकस्मित मृत्यूची नोंद घेऊन त्याचा तपास सुरू केला आहे. कामगारांनी सोमवारी जिंदाल कंपनीच्या मुख्य गेटसमोर आंदोलन केले. याबाबतची माहिती कंपनी प्रशासनाला दिली असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. Share with facebook कंपनीत कर्मचारी, मजुराचा मृत्यू झाल्यास औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या निरीक्षकांनी तातडीने भेट देऊन अहवाल द्यायला हवा असतो. सिव्हिल हॉस्पिटलच्या एमएलसीमध्ये घटना कंपनीत अपघातामुळे घडल्याचे स्पष्ट म्हंटले आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर असताना पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद घेऊन गुन्हा नोंद केल्याचे दिसत नाही. पोलिसांकडे विचारणा केली असता तपास चालू असल्याचे सांगितले. होता. त्यास योग्य व लवकर उपचार मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याने सर्व कामगारांनी कामबंद आंदोलन केले होते. यावेळी सर्व कामगार आक्रमक झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती. यावेळी कामगार सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी असल्याची तीव्र प्रतिक्रिया कामगारांमधून उमटत आहे. या घटनेनंतर हजारो कामगारांनी एकत्र येत कंपनीचे सोमवारी सकाळी काम पूर्णतः ठप्प होते. मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन छेडले होते. अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा. याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस संपर्क करू नये असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
मोहोळ नगरपरिषदेसह राज्यातील नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी रविवार दि.२१ डिसेंबर रोजी पार पडली. मोहोळ नगरपरिषदेच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच अखेरच्या फेरीपर्यंत आघाडीवर असणाऱ्या शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी जनतेतून नगराध्यक्षा पदाच्या लढतीमध्ये २२ व्या वर्षी बाजी मारली आहे. कोरोना महामारीसह ओबीसी आरक्षणाच्या कारणास्तव मोहोळ नगर परिषदेसह राज्यातील नगरपंचायत नगरपरिषदेवर प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. या निवडणुका केव्हा लागतील यासाठी इच्छुकांसह नागरिकांना उत्सुकता लागून राहिली होती. भारतीय जनता पार्टी,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना,शिंदे शिवसेना या प्रमुख तीन पक्षांमध्ये अटीतटीचा सामना झाला. मोहोळ शहरांमध्ये शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. तो वर्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला साथ देणार, की शिंदे शिवसेनेला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र मोहोळ शहरातील शिवसेनेकांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे पाठ फिरवत शिंदे सेनेला साथ दिली.अवघ्या २२ व्या वर्षी जनतेतून नगराध्यक्षा होण्याचा मान सिद्धी वस्त्रे यांना मिळाला. त्यांचे आजोबा विश्वनाथ वस्त्रे हे मोहोळ ग्रामपंचायतीचे सलग सहा टर्म ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पद संपादित केले होते. मोहोळ शहरांमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठा होता.त्यांच्या तीस वर्षाच्या कारकिर्दी नंतर राजकीय वारसा नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे यांनी मिळवला आहे. वस्त्रे कुटुंबासह शहरातील शिवसैनिकांनी मोहोळ करांच्या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त करण्यात आले. जनतेने दिलेला हा कौल माझ्यावरील विश्वास दर्शवतो. निवडणुकीच्या काळात अनेक टीका झाल्या, पण आजचा निकाल हेच त्या टीकेला उत्तर आहे. लोकांच्या समस्या सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास करणे हीच माझी प्राथमिकता असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेने दिलेला हा कौल माझ्यावरील विश्वास दर्शवतो. निवडणुकीच्या काळात अनेक टीका झाल्या, पण आजचा निकाल हेच त्या टीकेला उत्तर आहे. या निकालामुळे मोहोळमधील भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, आगामी काळात येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. राजकारणात चर्चेचा विषय या नगरपरिषदेच्या एकूण 20 जागांपैकी 9 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. महायुतीमध्ये एकत्र असूनही स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना आमनेसामने ठाकले होते. भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने मारलेली ही मुसंडी जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. सिद्धी वस्त्रे यांच्या रूपाने एका तरुण चेहऱ्याला संधी देऊन मतदारांना आकर्षित करण्यात शिवसेनेला यश आले आहे.
शेकाप- भाजप आघाडीचा शिंदे सेनाला लाभ:सांगोल्यात 23 पैकी आघाडीला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना एकटे पाडण्याच्या राजकारणाचा उलट परिणाम होत शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. भाजपने शेकाप पक्षात फूट पाडत शेकापमधील उमेदवारांना भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी दिली. तसेच भाजप- शेकाप- दीपकआबा साळुंखे पाटील गट अशी आघाडी केल्याने शेकाप पक्षातील कार्यकर्ते व पारंपरिक मतदार नाराज झाले. या नाराजीचा थेट फटका आघाडीला बसला. स्वतःला शेकापचे मतदार म्हणवणाऱ्या अनेकांनी विरोधात शिवसेनेला मतदान केल्याचे चित्र दिसून आले. परिणामी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनी तब्बल ५,०३५ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत सांगोल्यात शिवसेनेचा भगवा फडकवला. दुसरीकडे, आघाडीतील भाजपकडून कमळ चिन्हावर लढलेले उमेदवार मारुतीआबा बनकर यांचा पराभव झाला. एकूण २३ जागांपैकी आघाडीला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे आघाडी करण्याचा सर्वाधिक तोटा शेकाप आणि दीपकआबा साळुंखे–पाटील गटाला झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवसेनेकडील कायम चर्चेत असलेला चेहरा म्हणून ओळखले जाणारे आनंदा माने यांना उमेदवारी देण्याचा निर्णय योग्य ठरला असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. मोठ्या मताधिक्याने मिळालेला हा विजय आ. शहाजीबापू पाटील यांच्या राजकीय भूमिकेला जनतेची मिळालेली स्पष्ट पावती मानली जात असून सांगोल्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याची चर्चा आहे. सांगोला नगरपरिषद निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना एकटे पाडण्याच्या प्रयत्न होता. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंद माने यांनी भाजपच्या उमेदवाराचा तब्बल ५,१४० मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. राज्यातील दोन मित्र पक्ष सांगोल्यात परस्परविरोधात उभे ठाकल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र शिवसेनेने बाजी मारल्याने हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. दोन मित्र पक्ष सांगोल्यात परस्परविरोधात उभे होते
प्रतिनिधी | अहिल्यानगर गेल्या ८ वर्षांपासून चर्चेत असलेल्या नाशिक-पुणे ‘हायस्पीड’ रेल्वेचा मार्ग बदलल्याने संगमनेर,अकोले तालुक्यात जनआंदोलन सुरु झाले. त्यानंतर जुन्या मार्गावरूनच रेल्वे जावी, अशी सर्वपक्षीय मागणी जोर धरत आहे. सोमवारी संगमनेर तालुक्यात सहविचार सभेच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेते व सामाजिक कार्यकर्ते एकवटले. त्यानंतर मंगळवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हायस्पीड रेल्वे जुन्या मार्गानेच म्हणजेच नाशिक-सिन्नर-संगमनेर -अकोले-नारायणगाव या मार्गानेच व्हावी, अशी मागणी केली. रेल्वे मंत्रालयाकडे याचा पाठपुरावा करण्याबाबतही म्हटले. प्रत्यक्षात कागदावर असलेल्या या रेल्वेने आता राजकीय श्रेयवादासाठी वेग पकडला आहे. ४ डिसेंबरला सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ ने ‘नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे आता अहिल्यानगगरमार्गे पुण्याला जाणार, ८,९७० कोटींचा नवा मार्ग’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सर्व स्तरातून आंदोलन सुरू झाले. गेल्या १७ वर्षापासून सुरु असलेल्या या हायस्पीड रेल्वेचा अचानक ट्रॅकच बदलून तो शिर्डी मार्गे पुण्याला टाकण्यात आल्यामुळे संगमनेर,अकोले तालुक्यात ट्रॅक बदल्याच्या विरोधात जनआंदोलन सुरु झाले. ’दिव्य मराठी’च्या बातमीनंतर लगेचच आमदार सत्यजीत तांबे यांनी बैठक घेऊन जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला,त्यानंतर संगमनेरचे आमदार अमोल खताळ, अकोलेचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी देखील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता. पहिला प्रकल्प होता १६ हजार कोटींचा नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी नाशिकहून थेट पुण्यापर्यंत नव्याने रेल्वेमार्ग तयार करावा लागणार होता. हा पहिला प्रकल्प १६ हजार कोटींचा होता. त्यावर अधिक खर्च होणार असल्यामुळे कमी खर्चात रेल्वे नाशिक रोडहून शिर्डी व तेथून काही प्रमाणात तयार झालेल्या व काही प्रमाणात काम शिल्लक असलेल्या नव्या रेल्वे दुहेरी मार्गावरुन पुण्याला नेणे शक्य असल्यामुळे या रेल्वेचा रुट बदलला. नव्या आराखड्याप्रमाणे नाशिकरोड ते शिर्डी व अहिल्यानगर ते चाकण हे दोनच नवे रेल्वेमार्गे तयार करावे लागणार आहे. पुणतांबा ते निंबळक या ८० किमी दुहेरीमार्गाचे काम पूर्ण झाले आहे. निंबळक ते अहिल्यानगर ६ किमीच्या दुहेरीकरणाचे काम सध्या सुरु आहे. अहिल्यानगर ते पुणे १३३ किमीसाठी नव्याने प्रकल्प आराखडा तयार केला आहे. ^नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचा जो जुना मार्ग तोच कायम ठेवावा, हा मार्गे अकोले,संगमनेरमार्गे गेला पाहिजे. आमचा शिर्डी, अहिल्यानगरहून ही रेल्वे घेऊन जाण्यास विरोध नाही. त्यासाठी वेगळी तरतूद करावी. आमची अनेक वर्षांपासूनची या रेल्वेची मागणी आहे. अजित नवले, शेतकरी नेते.
ख्रिसमस नाताळनिमित्त अहिल्यानगर शहरातील विविध चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून मंगळवारी सायंकाळी ख्रिसमस रॅली काढण्यात आली. या रॅलीत ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून यानिमित्त अहिल्यानगर शहरातील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल चर्चची दिव्य मराठीने माहिती घेतली. ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी ख्रिसमस रॅली काढण्यात आली. शुक्रवारी (२६ डिसेंबर) आजारी व्यक्तींना फळ वाटप, शनिवारी (२७ डिसेंबर) डॉ. विकास कांबळे यांची अध्यात्मिक सभा, २८ डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, ३० डिसेंबर क्रिकेट स्पर्धा व १ जानेवारीला मंडळीसाठी मेळा या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एसपीजी मिशनच्या स्थापनेला २५० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ब्रिटेनहून १९५१ मिशनरी जहाजाने भारतात आले. त्या जहाजाचे मिनिएचर (लहान प्रतिकृती) त्यांनी बरोबर आणून चर्चमध्ये ठेवली. आजही ही जहाजाची प्रतिकृती चर्चमध्ये दर्शनी भागात आहे. १९०८ मध्ये कामगारांनी वर्गणी गोळा करून चर्चमध्ये संगमरवरी फरशी व सुबक नक्षीकाम केलेला लाकडी पडदा उभारला. आज उपासना संगीत महाविधी नाताळनिमित्त २४ डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजता ख्रिस्तजन्मदिन मध्यरात्रीची उपासना संगीत महाविधी उपदेश व प्रभू भोजन विधी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विधीचालक रेव्हरंट जे. आर. वाघमारे आहेत. २५ डिसेंबरला पहिला प्रभूभोजन विधी सकाळी साडेसहा वजता तर संगीत महाविधी प्रदक्षिणा, उपदेश सकाळी साडेआठ वाजता होईल. ३१ डिसेंबरला नूतन वर्षाची उपासना व १ जानेवारी २०२०६ रोजी प्रभूभोजन विधी होणार आहे.
आजच्या युगात जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला न घाबरता आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरावे. यश-अपयशाला फारसे महत्त्व न देता स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे अधिक महत्त्वाचे आहे. शिस्त, जिद्द व ध्येय स्पष्ट ठेवून वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते, असे वक्तव्य अहिल्यानगर छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी केले. भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालय तथा प्राथमिक पाठशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील विविधतेतून अखंड भारताचे सुंदर दर्शन घडविले. हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या पारंपरिक लेझीम पथकाच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर स्वागतगीत व विविध नृत्यप्रकारांनी संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षक व पालकांची मने जिंकली. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय संस्थेचे सचिव किशोर मुनोत, संचालक धनेश गांधी, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजली स्वामी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कमल भोसले यांनी केले. मुख्याध्यापक सुहास धीवर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्यावतीने शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. डिजीटल शिक्षण व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शाळा प्रयत्नशील आहे. संस्थेचे सचिव किशोर मुनोत म्हणाले, मनाचा निश्चय पक्का असेल तर जीवनात कोणतेही ध्येय साध्य करता येते. पालकांनी मुलांना वेळ दिल्यास ते आपोआप मोबाइलपासून दूर राहतील. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शारीरिक विकासही गरजेचा आहे. यावेळी शाळांतर्गत विविध परीक्षांमध्ये व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक, परीक्षित सुने, ठाकूर परदेशी, गोपीचंद परदेशी आदींनी परिश्रम घेतले.
जिद्द, चिकाटी, आवड, संयम व एकाग्रता हे गुण विद्यार्थ्यांनी अंगी स्वीकारले पाहिजेत, तरच यश प्राप्त होईल, असे मत अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनीव व्यक्त केले. सांगळे गल्लीतील समर्थ विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. शाळेने गणित-विज्ञान कला प्रदर्शन, हस्तलेखन, मासिक तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी गौरी कुलकर्णी यांनी आपल्या जीवन प्रवासाविषयी तसेच अभिनय क्षेत्रातील अनुभव सांगितले. या ठिकाणी आल्यानंतर स्वतःला शालेय जीवनातील आठवणी जाग्या झाल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदर्शन, हस्तलिखित मासिक तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाबाबत विद्यार्थ्यांचे, शाळेचे व संस्थेच्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व गुणवत्ता वाढीसाठी संस्था व शाळेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्याबाबत मनोगत व्यक्त केले. गेल्या ५० वर्षांत संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा, शाळांची गुणवत्ता, भौतिक सुविधा व उपक्रम याबाबतचा वार्षिक अहवाल संस्थेचे सचिव सुरेश क्षीरसागर यांनी मांडला. शाळेने वर्षभरात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले यश व विविध उपक्रम अजय महाजन यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अजय महाजन यांनी केले तर आभार भगवान जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना बंगाळ व शीतल जऱ्हाड यांनी केले. अतिथींचा परिचय शिक्षक प्रतिनिधी सविता येवले यांनी करून दिला. कला प्रदर्शनाचे नियोजन संदीप गायकवाड यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, चेअरमन विकास सोनटक्के, कार्यकारिणी सदस्य संध्या कुलकर्णी, सदस्य स्वप्निल कुलकर्णी, मुख्याध्यापक किशोर कानडे आदी उपस्थित होते. गौरी कुलकर्णी यांच्या हस्ते शाळेचे आदर्श मुख्याध्यापक अजय महाजन तसेच आदर्श शिक्षक वैशाली मगर व शंकर निंबाळकर यांना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन केला गौरव शाळेने गणित-विज्ञान कला प्रदर्शन, हस्तलेखन, मासिक तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील राष्ट्रीय कृषि विकास योजना व पोळ अॅग्रो सर्विसेस, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथे नाचणी लागवड शेतकरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद चवई होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी, डॉ. सुनील अडांगळे, डॉ. योगेश बन व पोळ अॅग्रो सर्व्हिसेसचे राहुल पोळ उपस्थित होते. डॉ. चवई म्हणाले, भरडधान्याचे महत्व व पोषणमूल्य लक्षात घेता शेतकरी बचतगटांनी प्रयोगशील बनणे गरजेचे आहे. हरितक्रांती झाली परंतु रासायनिक खते व किटकनाशकांचा भरमसाठ वापर यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आहे. यासाठी मानवी आरोग्याला पोषक असणारे भरडधान्य म्हणजे नाचणी, राळा अशा पिकांची गरज आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह असे घटक मोठ्या प्रमाणात असतात. कृषी विद्यापीठ नाचणीच्या मूल्यवर्धनासाठी बेकरी उत्पादन प्रशिक्षण देणार आहे म्हणून महिला बचतगटांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. क्रांती चौधरी म्हणाल्या, फार्मर ग्रुपवर आवश्यक असणारी माहिती उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती वाढवावी. सध्या नाचणीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विक्रीसाठी बाजारपेठ सहज उपलब्ध होईल. डॉ. अडांगळे म्हणाले, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत भरडधान्यांचे प्रात्यक्षिक राबविण्यात येणार असून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी डॉ. योगेश बन यांनी नाचणी व पौष्टिक तृणधान्य पिके, ओळख, लागवडीचे महत्व, शाश्वत शेती पर्याय यांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील अडांगळे यांनी तर आभार राहुल पोळ यांनी मानले.
सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. या दृष्टीने विकसित व आत्मनिर्भर भारत २०४७ यासाठी संपूर्ण देश पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या अनुशंगाने शासकीय स्तरावरून विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून विज्ञान प्रदर्शन हे अत्यंत आवश्यक असून यातूनच आजची मुले भविष्यातील शास्त्रज्ञ घडतील व तंत्रज्ञानात मोठी प्रगती घडवतील असा विश्वास पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड यांनी व्यक्त केला. पंचायत समिती शिक्षण विभाग, विज्ञान-गणित अध्यापक संघटना व संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय विज्ञान गणित प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ कराड, महेंद्र शिरसाट, अजय भंडारी, सुनील कटारिया, राजू पवार आदी उपस्थित होते. तीन दिवस या ठिकाणी विज्ञान यात्रेचे स्वरूप प्राप्त होणार असून तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक मिळून ४०४ शाळांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. परीक्षणासाठी नेवासा, शेवगाव व नगर तालुक्यातील विज्ञान व गणिताचे तज्ञ शिक्षक परीक्षक आहेत. यावेळी जिल्हा विज्ञान अध्यापक संघटनेच्यावतीने तालुक्यातील इयत्ता सहावी व नववी या वर्गासाठी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील जिल्हा विज्ञान गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पाथर्डी महिला सक्षमीकरण व महिला तक्रार निवारण कक्षाच्यावतीने आदिनाथनगर येथील लोकनेते आप्पासाहेब राजळे महाविद्यालयात मुलींसाठी एक दिवसीय सेल्फ डिफेन्स व कराटे प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, सुरक्षिततेची जाणीव व आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरली. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. खणगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींना अचानक उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे, योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यावा, तसेच मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम कसे राहावे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेदरम्यान विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे आत्मरक्षणाच्या विविध तंत्रांचे सादरीकरण केले. विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग व सकारात्मक प्रतिसाद यामुळे कार्यशाळेचे वातावरण प्रेरणादायी झाले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा.सरिता पवार यांनी जबाबदारी पार पाडली. या प्रशिक्षणासाठी गोरक्षनाथ गालम, सागर सनप व त्यांच्या टीमने कराटे व सेल्फ डिफेन्सचे मार्गदर्शन केले. यावेळी खणगे म्हणाले, या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढीस लागून वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. अपेक्षा फुंदे, प्रा. सोनल सहरवाल, प्रा.सरिता पवार, प्रा.प्रज्ञा शिंदे व प्रा.दिपाली चितळे आदींनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनींना अचानक उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण कसे करावे,योग्य वेळी योग्य निर्णय कसा घ्यावा,तसेच मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम कसे राहावे याबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण वर्गात तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत कराटेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कराटे प्रशिक्षण उपक्रम आगामी काळातही आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा, ही लोकप्रतिनिधी आणि जनतेची भावना राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. २०१९ साली संगमनेर अकोलेमार्गे तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालावरच कार्यवाही करण्याचा आग्रही त्यांनी केला. पालकमंत्र्यांनी याबाबतची वस्तुस्थितीही त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. केंद्रीय रेल्वे विभागाने पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव २०१९ साली नारायणगाव, संगमनेर, अकोले, सिन्नर असा तयार केलेला आहे. याबाबत जमिनींचे अधिग्रहणही करण्यात आले होते. मात्र या प्रस्तावात बदल करून, हा मार्ग आता अकोले तालुक्याला वगळून नारायणगाव, संगमनेर, नाशिक अशा पद्धतीने प्रस्तावित करण्याची बाब समोर आल्यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. प्रकल्पामध्ये बदल करताना कोणत्याही प्रकारे लोकप्रनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. याकडेही मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. सद्यस्थितीत रेल्वे मार्गाच्या प्रकल्प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. प्रशासकीय स्तरावर रेल्वे प्रकल्पाबाबतची कोणती कार्यवाही सुरु आहे याबाबतही माहीती उपलब्ध होत नाही. तसेच पुण्याहून नाशिककडे जाणा-या रेल्वे मार्गात नारायणगाव येथील जेएमआरटी या रेडीओ टेलिस्कोप सेंटरची अडचण असल्याचे कारणही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेमध्ये आपल्या निवेदनातून सांगितले आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर कटुता न ठेवता शहर हिताला दिले प्राधान्य:ओमप्रकाश नीला यांनी साधला संवाद
पाळधी धरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी तसेच त्यांच्या सोबत निवडून आलेल्या आठ नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा शाल- श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करत अभिनंदन केले. विशेष म्हणजे, नगर परिषदेवर शिवसेना– भाजप युतीचे स्पष्ट बहुमत असतानाही नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर कोणतीही राजकीय कटुता न ठेवता शहर हिताला अग्रक्रम देत ही भेट झाली, पालिकेत २३ पैकी १५ नगरसेवक निवडून येत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा लिलाबाई चौधरी यांचे पती सुरेश चौधरी उर्फ नाना व सुपुत्र निलेश चौधरी हे पूर्वी शिवसेनेत सक्रिय होते. सुरेश चौधरी हे पालकमंत्र्यांचे जुने मित्र असून दोघांमध्ये जिव्हाळ्याचे पारिवारिक संबंध आहेत. यापूर्वी निलेश चौधरी यांना शिवसेनेत नगराध्यक्षपदाची संधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच दिली होती. निवडणुकी दरम्यान सर्वच गटांनी आपापल्या विचारांनुसार काम केले. मात्र निकालानंतर विजय-पराभव नव्हे, तर शहराचा विकास महत्त्वाचा व शहराची एकजूट या भूमिकेवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी एकत्र असले पाहिजे. शहराचा विकास व एकजूट महत्त्वाची असल्याचे यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी सांगितले.
112 कोटी गैरव्यवहार प्रकरणी यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेवर ईडीचे छापे:सातारा, फलटण, कराडमध्ये कारवाई
यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील 112 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सातारा , फलटण आणि कराड येथील शाखांवर मंगळवारी सकाळी छापे टाकले आहेत. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने झाली. या कारवाईने भाजपा नेते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीच्या पथकाने त्यांचा धाकटा भाऊ मुकुंद चरेगावकर याला ताब्यात घेतले आहे. जो आरबीआयच्या मान्यतेने बॅंकेचा स्वीकृत संचालक झाला होता. आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल असलेल्या सर्व संशयितांना एमपीआयडी (ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम) लागू करावा, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. फलटणचे माजी आमदार दिवंगत कृष्णचंद्र भोईटे यांनी स्थापन केलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत 112 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची बाब लेखापरीक्षणात समोर आली. या संदर्भात सनदी लेखापालांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात भाजपा नेते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. सर्व संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नाही. फलटणच्या मुख्य शाखेसह सातारा आणि कराड या शाखांवरी मंगळवारी सकाळी ईडीच्या पथकांनी छापे टाकले. या कारवाईने पश्चिम महाराष्ट्रातील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेत्याच्या भावाला ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी बँकेतील गैरव्यवहाराबद्दल आरबीआयकडे तक्रार केली होती. तसेच अमित शाहांची भेट घेऊन बॅंकेतील गैरव्यवहाराच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. भाजपा नेते शेखर चरेगावकर यांचे धाकटे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांच्या कराड येथील निवासस्थानी ईडीच्या पथकाने मंगळवारी पहाटे छापा टाकला. त्यांना ताब्यात घेऊन यशवंत बँकेच्या कराड शाखेत आणण्यात आले. ईडीच्या अन्य दोन पथकांनी फलटण येथील बॅंकेची मुख्य शाखा आणि साताऱ्यातील शाखेवर देखील छापे टाकले. तिन्ही ठिकाणी सकाळपासून झाडाझडती सुरू होती. ईडीची कारवाई अद्याप संपलेली नाही. कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी मुकुंद चरेगावकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु, पोलिसांनी एकाही संशयीताला अटक केलेली नाही. आता ईडीने छापा टाकल्याने आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला आता गती येणार आहे. आरबीआय नियुक्त संचालक ईडीच्या ताब्यात यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत 112 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर आरबीआयने बँकेवर प्रशासकीय नियंत्रण आणले. मुकुंद चरेगावकर याला बँकेच्या शिफारसीनुसार संचालक म्हणून घेण्यास आरबीआयने मान्यता दिलेली होती. त्यालाच ईडीने ताब्यात घेतल्याने सर्व संशितांचे धाबे दणाणले आहेत. आता भाजपा नेता शेखर चरेगावकर याला ईडीचे पथक ताब्यात घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ईडीच्या पथकाने मुकुंद चरेगावकर याच्या निवासस्थानी पहाटेपासून कारवाई सुरू केली होती. मात्र, बँकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याची कसलीच कल्पना नव्हती. ईडीचे पथक सकाळी बँकेत दाखल झाल्यानंतर सगळ्यांचेच धाबे दणाणले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितले. त्यामुळे सर्व कर्मचारी दिवसभर नॉट रिचेबल होते. यासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आम्ही माहिती देऊ शकत नसल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला. ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशवंत बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सर्व संशयितांना एमपीआयडी (ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम) लागू झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सर्व संशयितांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांची देणी दिली पाहिजेत. बचत गटातील महिलांपासून ते सर्वसामान्य नागरीकांपर्यंत अनेकांच्या नावावर कर्जे काढली आहेत. त्याची सखोल चौकशी करून संबंधितांना त्रासातून मुक्त केलं पाहिजे. ईडीची कारवाई ही चांगली सुरुवात आहे. गुन्हा दाखल असलेल्या सर्वांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या २००२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २३ वर्षांनंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला. कार्यक्रम सॉल्ट रेस्टॉरंट, एमजीएम कॅम्पस येथे झाला. सुमारे ७५ माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मैत्रीच्या गप्पांनी वातावरण भावनिक झाले. महेंद्र ढाके, दिलीप खंडेराय, तांबोळी, पठाण, दराडे यांच्यासह इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी भविष्यातही असे स्नेहमेळावे घेण्याचा संकल्प करण्यात आला. आयोजनासाठी परवीन शेख, सुकेशनी बन्सोडे, रामेश्वर क्षीरसागर, कल्याण करडे, मोईन खान, धनंजय मिटकरी, सचिन वाडेकर, गणेश शिकारे, कलीम शेख, गजानन सोनवणे, अमर लाहोत आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. हा स्नेहमेळावा मैत्री, ऋणानुबंध आणि आठवणी अधिक घट्ट करणारा ठरला.
सांडवा फुटण्याची शक्यता; ठिकठिकाणी गळती वाढली सांडव्याच्या भिंतीला मोठमोठे छिद्रे पडले आहेत. अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. दरवर्षी ही गळती वाढत आहे. त्यामुळे भिंत कमकुवत होत आहे. भविष्यात मोठा पूर आल्यास सांडवा फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरवर्षी दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला जातो. मंजुरी मिळताच काम सुरू करू, असे सिंचन विभाग सांगतो. मात्र पाच वर्षांपासून मंजुरी मिळालेली नाही. गळती लवकर बंद करू, अन्य दुरुस्ती करू प्रकल्पास लागलेली गळती बंद करू सन २०२३-२४ मध्ये प्रकल्पांतर्गत दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. धरणाच्या भिंतीला लागलेली गळती बंद करू. जेथे तडे गेले आहे तेही बंद करू. दुरुस्तीची कामे करू. -एस. टी. कुमावत, उपअभियंता, पूर्णा-नेवपूर प्रकल्प पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पाला गळती लागली आहे. छाया : पोपट भुसारे पोपट भुसारे | शेलगाव पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पात भरपूर पाणी असूनही सिंचन विभागाच्या हलगर्जीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मागील पाच वर्षांपासून हीच स्थिती कायम आहे. प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीला व डावा-उजवा कालव्यांना तडे गेले आहेत. भिंतीखालून व भिंतीतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. सन २०२३-२४ मध्ये दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च झाले. तरीही सांडवा व कालव्यांची अवस्था सुधारलेली नाही. प्रकल्प १९९७ मध्ये पूर्ण झाला. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले. या प्रकल्पातून दीड हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते. ७ किलोमीटरचा उजवा व ११ किलोमीटरचा डावा कालवा तयार करण्यात आला. मात्र, दोन्ही कालव्यांची चाऱ्या व पोटचाऱ्या अपूर्ण आहेत. कालव्यांना समांतर रस्ते तयार करण्यात आले. पण अनेक ठिकाणी हे रस्ते व पाट गायब झाले आहेत. यंदा चिंचोली महसूल मंडळात व धरण क्षेत्रात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला. त्यामुळे तीन महिन्यांपासून प्रकल्प ओसंडून वाहत आहे. तरीही सांडवा व कालव्यांचे काम निकृष्ट असल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास भिलदरी येथील लघु सिंचन प्रकल्प फुटल्यासारखी घटना घडू शकते. त्यामुळे लवकर दुरुस्ती करावी.
वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद परसोडा शाळेचे १९७५-७६ सालचे दहावीचे माजी विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम परसोडा येथील माजी विद्यार्थी अब्बंरसिंग मरमट यांच्या फार्महाऊसवर पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १९७५-७६ च्या बॅचमधील दिवंगत वर्गमित्रांनाही सर्वांनी मिळून श्रद्धांजली वाहिली. जुन्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले. वयाच्या ६८व्या वर्षी पुन्हा भेटलेल्या या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील अनुभव, खेळ, भांडणं, शिक्षकांचे मार्गदर्शन अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. एकमेकांना प्रेमाने मिठी मारत, मित्रभेट घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेप्रती आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपापले मनोगत मांडले. सर्वजण पुन्हा शाळेत गेले. वर्गात जाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशाच प्रकारचे स्नेहसंमेलन भविष्यातही घेण्याचा संकल्प केला. या स्नेहसंमेलनात सेवानिवृत्त तहसीलदार अशोक म्हस्के, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक जयराम हौसर, शेतकरी शंकर पोळ, शांतीराम फिके, वसंतराव पठारे, रमन पाटणी, रशिद शेख, अशोक पाटणी, इस्माईल शेख, शिवाजी कवडे, रामकृष्ण कवडे, बाबुराव कजबे, बजरंग भक्कंड, हरसिंग राजपूत, एन. डी. उगले, मानिकलाल छानवाल, गिताराम उगले, नारायण उगले, भाऊसाहेब लेकुरवाळे, उज्ज्वल लोहाडे, किसनराव चिकणे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धरमसिंग मरमट, उपसरपंच राजू छानवाल, पत्रकार सुभाष कावडे यांची उपस्थिती होती. मित्रांनी केला पुन्हा भेटण्याचा संकल्प या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील अनुभव, खेळ, भांडणं, शिक्षकांचे मार्गदर्शन अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. एकमेकांना प्रेमाने मिठी मारत, मित्रभेट घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी शाळेप्रती आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी पुन्हा भेटण्याचा संकल्प करण्यात आला. एकमेकांना मदत करण्याचा निर्धार करण्यात आला.
लासूर स्टेशन येथे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काढलेला अरुंद सर्व्हिस रोड आणि दररोज वारंवार बंद होणारे रेल्वे गेट यामुळे येथे दररोज २५ ते ३० मिनिटे वाहतूक ठप्प होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी तर ही परिस्थिती अधिकच बिकट होत असून वाहनधारक कमालीचे वैतागले आहेत. दिवाळीपासून उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून सध्या रस्त्याच्या मधोमध काँक्रीट पिल्लर उभारणीचे काम सुरू आहे. वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून लोखंडी ब्रॅकेट उभारण्यात आले आहेत. मात्र, वाहनांची संख्या लक्षणीय असल्याने हा अरुंद रस्ता अपुरा पडत आहे. रेल्वे गेट उघडताच पुढे जाण्यासाठी वाहनचालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागते. यात दुचाकीस्वारांच्या चढाओढीमुळे अनेकदा किरकोळ अपघात आणि वादावादी होऊन भांडणे हाणामारीपर्यंत जात आहेत. येथे लगतच बाजार समिती आणि मोठी व्यापार पेठ असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांना या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. लासूर स्टेशनसह पंचक्रोशीतील ५० ते ६० गावांतील जनतेसाठी हा मुख्य रस्ता आहे. जुलै २०२५ पासून सुरू झालेले हे काम पूर्ण होण्यासाठी अजून दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत ही जीवघेणी कोंडी आणि खड्डेमय सर्व्हिस रोडचा त्रास लासूरकरांच्या नशिबी राहणार असल्याचे चित्र आहे. घरातून बाहेर पडण्यापूर्वीच रेल्वे गेटचा ‘धाक' लासूरकरांना आता घरातून बाहेर पडण्यापूर्वी रेल्वे गेटचा धाक वाटू लागला आहे. संभाजीनगर आणि मनमाडकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या मोठी आहे. यात वंदे भारत, जनशताब्दी यांसारख्या एक्स्प्रेस गाड्यांच्या क्रॉसिंगमुळे गेट बराच वेळ बंद राहते. अशावेळी अर्धा ते पाऊण तास वाहतूक सुरळीत होण्यात जातो. डॉक्टर, बँक अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजकांना वेळेवर कामावर पोहोचणे कठीण झाले आहे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग पूर्ण झाल्यावरच हा त्रास संपणार आहे.
तालुक्यातील लाख खंडाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या शेतवस्तीवरील तीन कुत्र्यांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. १८ डिसेंबर आणि २० डिसेंबरच्या दरम्यान या घटना घडल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत बिबट्या दिसला नसला तरी, दाट झाडीचा फायदा घेऊन तो परिसरातच लपून बसला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देणे सुरू आहे. कांदा लागवडीसाठी शेतात महिला मजुरांची मोठी उपस्थिती असते. मात्र, बिबट्याच्या भीतीने मजूर आणि शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. वनविभागाने यावर त्वरित उपाययोजना करावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी बिबट्या अचानक केव्हाही हल्ला करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर लाईट्स सुरू ठेवावेत. शक्यतो समूहाने फिरावे आणि अंधारात दाट झाडीत जाणे टाळावे. वनविभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केल्यास मानवी हानी टाळता येईल. बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
खुलताबाद नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना बाजूला सारत नव्या नेतृत्वाला स्पष्ट संधी दिली आहे. नगराध्यक्ष पदासह तब्बल १४ नवखे नगरसेवक निवडून आल्याने संपूर्ण खुलताबाद नगरपालिका नवख्या नगराध्यक्ष व नव्या नगरसेवकांच्या ताब्यात गेली आहे. या निकालामुळे शहराच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खुलताबाद नगरपालिकेत १ नगराध्यक्ष पद व २० नगरसेवक पदे आहेत. सन २०२५ मध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत शहरातील मतदारांनी अनुभवापेक्षा नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले. एकूण २० नगरसेवकांपैकी १४ नगरसेवक प्रथमच निवडून आले असून मतदारांनी बदलाचा कौल दिल्याचे यावरून स्पष्ट होते. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये महिलांचाही समावेश आहे. मात्र, दोन महिला नगरसेविका जरी प्रथमच निवडून आल्या असल्या तरी त्यांचे पती याआधी नगरसेवक होते. हे आहेत १४ नवे नगरसेवक गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खुलताबाद शहरातील विकासकामांना आता गती देण्यात येणार असून, सर्वप्रथम प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा निर्धार नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमेर पटेल यांनी व्यक्त केला आहे. शहरातील रखडलेली तसेच अर्धवट राहिलेली सर्व विकासकामे लवकरच पूर्ण केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आमेर पटेल यांच्या विजयानंतर मंगळवारी सायंकाळी खुलताबाद शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली. ते म्हणाले की, खुलताबाद शहरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मंजूर असलेल्या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. शहरवासीयांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटवणे हे माझे पहिले प्राधान्य राहील. मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देऊन ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल,” असे आश्वासन नगराध्यक्ष आमेर पटेल यांनी दिले. पाणीप्रश्न सुटल्यानंतर रस्ते, गटारे, स्वच्छता, वीज, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांशी संबंधित रखडलेली विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोहन तुपे, मीना बारगळ, सरुबाई बारगळ, अर्चना पवार, कैलास बारगळ, समरीन बानो, शेख सलीमोद्दीन, गजाला परवीन, शेख अमिनाबी, गजानन फुलारे, उमेश आवारे, अजमत जहाँन वाजेद, शेख तोसीब, नसीम बानो तर अनिता बावस्कर, कांताबाई मरकड या नगरसेविकांचे पती आधी नगरसेवक होते. अनिस जागीरदार याआधी एकदा नगरसेवक राहिले आहे.
फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीनदिवसीय पंचकुंडी महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले. या यज्ञाची सांगता बुधवारी विविध साधू-संतांच्या उपस्थितीत महाप्रसादाने झाली. या यज्ञाचे नेतृत्व ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी प. पू. प्रभातगिरी महाराज यांनी केले. मार्गदर्शन परमपूज्य अवदेशानंद गिरी महाराज व प. पू. भास्करानंदगिरी महाराज यांचे लाभले. रविवारी सकाळी ९ वाजता श्रीगणेश पूजन करून यज्ञास प्रारंभ झाला. यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित करण्यात आला. तीन दिवस सकाळी ४.३० ते ५.३० नित्य नेम विधी व आरती, ५.३० ते ६.३० प्रभातगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. संध्याकाळी नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन झाले. रात्री ७.३० ते ८.३० पुन्हा आरती व विधी पार पडले. मंगळवारी दुपारी ३ वाजता ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज यांच्या पादुका व पालखीची गावात मिरवणूक काढण्यात आली. शेकडो महिला-पुरुष सहभागी झाले. महिलांनी रस्त्यावर सडा-रांगोळ्या काढल्या. टाळ-मृदंगाच्या गजरात पावल्या व फुगड्यांनी वातावरण भक्तिमय झाले. बुधवारी सकाळी ८ वाजता महारुद्राभिषेक झाला. ११ वाजता यज्ञाची पूर्णाहुती देण्यात आली. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. एक क्विंटल उकडलेल्या मिरच्या, पोळी, वरण, भात असा महाप्रसाद दिला गेला. गावातील प्रत्येक महिलांनी तीन किलो पोळ्या केल्या. पंचक्रोशीतील महिलांनीही पोळ्या आणल्या. महिलांनी पाणी वाटप केले. ग्रामस्थांनी वाहन पार्किंग, पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था केली. यज्ञाच्या शेवटच्या दिवशी मोठी यात्रा भरली. या वेळी परिसरातील शेकडो भाविक, ग्रामस्थ, महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशभरातून आले संत-महंत महामंडलेश्वर शिवगिरी महाराज निफाड, सिद्धेश्वर महाराज लखनौ, शालीकगिरी महाराज कोटा, भोलेगिरी महाराज जळकी घाट यांनी मार्गदर्शन केले. शिवगिरी महाराज म्हणाले, ब्रह्मलीन पूर्णगिरी महाराज हे साक्षात देवाचा अवतार होते. त्यांनी दगडात शिवमंदिर उभारले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भक्तीचा मळा फुलवला आहे.
विनायकराव पाटील महाविद्यालयात तालुकास्तरीय वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धा मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडली. वक्तृत्व स्पर्धेत स्नेहा पाटील प्रथम आली. काव्यवाचनात कावेरी खरातने पहिला क्रमांक पटकावला. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महाविद्यालयाच्या मराठी व सांस्कृतिक विभागाने कै. विनायकराव पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन केले होते. वैजापूर तालुक्यातील विविध कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेसाठी “मोबाइल वरदान की शाप?”, “नव्या पिढीची नवी ओळख : डिजिटल संस्कृती”, “Gen Z : नव्या पिढीचे सामाजिक भान” आणि हवामान बदल नैसर्गिक आपत्तीची भीषण घंटा’ हे विषय देण्यात आले. काव्यवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वलिखित कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. संभाजी जाधव व डॉ. परमेश्वर सवडे यांनी केले. त्यांनी आशय, विषय, मांडणी, सादरीकरण आणि भाषेवरील प्रभुत्व या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन केले. २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या समारंभात विजेत्यांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्राचार्य डॉ. एस. डी. परदेशी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विचारस्वातंत्र्याला व्यासपीठ देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व सांगितले. प्रास्ताविक संयोजक डॉ. ललित आधाने यांनी केले. आयोजनासाठी प्रा. बाबासाहेब निमसे, ऋषिकेश कुकर, चंदू त्रिभुवन, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन डॉ. राजेश कोळेकर यांनी केले. तुपे यांनी मानले.
पाणीपट्टी भरून नळाला पाणी येत नाही. टँकरने पाणी येते, मात्र त्यासाठी वारंवार फोन करावे लागतात. त्यातही २ ड्रम भरून पाणी मिळते. अंतर्गत रस्त्यावर पथदिवे नसल्याने अंधार असतो. चोरट्यांची भीती आहे. प्रभागात एक कत्तलखाना आणि हाडे उकळण्याचा कारखाना आहे. त्यामुळे सायंकाळी प्रचंड दुर्गंधी सुटते. त्यामुळे नागरिकांना मळमळ, उलटीसारखे त्रास होतात. त्याचबरोबर कचरा डोपोच्या दुर्गंधीचा त्रास आहेच. वाहनांच्या गर्दीमुळे या भागात रस्ता ओलांडणेही नागरिकांना कठीण होते. अशा विविध समस्यांनी प्रभाग क्रमांक चारमधील रहिवाशांना ग्रासले आहे. नागरिकांना फिरण्यासाठी उद्यान नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जावे लागते. पडेगाव व मिटमिटा भागातून दौलताबादकडे जाणारा रस्ता अरूंद आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नसल्याने वारंवार अपघात होता. त्यात आजवर अनेकांचा मृत्यू झालेला आहे. क्र. ४ पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी २०१५ : पक्ष, नगरसेवक, मतदानवॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान१४ सुभाष शेजवळ, शिंदेसेना १९९३१५ रावसाहेब आमले,शिंदेसेना १७१११६ मनीषा लोखंडे, शिंदेसेना २७२८१७ प्रेमलता दाभाडे, बसपा १८०२ प्रभाग आरक्षण : अ - एससी, ब - एसटी महिला, क - ओबीसी महिला, ड - सर्वसाधारण जाणून घ्या आपला प्रभाग पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा, नंदनवन कॉलनी परिसरात गेल्या १० वर्षांत ९० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्चून विकासकामे केली आहेत. सर्वाधिक कामे भावसिंगपुरा वॉर्डात झाली आहेत. २५० पेक्षा छोटे मोठे रस्ते झाले आहेत. प्रभागाची व्याप्ती : पडेगाव, मिटमिटा, कासलीवाल तारांगण, भावसिंगपुराचा काही भाग, भीमनगरचा काही भाग, नंदनवन कॉलनी, मिलिंद कॉलेज परिसर, पोलिस कॉलनी, रावरसपुरा, लक्ष्मी कॉलनी, अमितनगर, शांतीपुरा, माजी सैनिक कॉलनी. 1. कचरा संकलन : घंटागाडीचे वेळापत्रक बिघडल्याने वैतागबहुतांश भागात घंटागाडी वेळेचे नियम पाळत नाही. त्यामुळे नागरिकांपुढे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आहे. घंटागाडी केव्हाही येते आणि निघून जाते. 2. रस्ते : महामार्गावर कायम वर्दळीमुळे अपघातांचा धोकामिटमिटा, पडेगावातून खुलताबादकडे रस्ता जातो. या रस्त्यावर अपघात होतात. त्यामुळे दोन्ही गावांसाठी पर्यायी रस्त्याची गरज आहे. नंदनवन कॉलनीतही रस्त्यांची समस्या आहे. 3. पाणीपुरवठा : उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न होतो भीषणपडेगाव, मिटमिटा भागातही टँकरद्वारे पाणी येते. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न भीषण होतो. टँकर वेळेवर येत नाही. वारंवार कॉल केल्यानंतर टँकर येतो, पण २ ड्रमच भेटतात.
छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेनंतर सर्वाधिक नगरसेवक एमआयएमचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून एमआयएमने शांततेत तयारी सुरू केली होती. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागवले होते. आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची हैदराबादेत भेट घेतली आहे. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगरात आता बिहारचे ५ आणि हैदराबादमधील ७ आमदार प्रचारासाठी येणार आहेत. एमआयएमने गेल्या काही दिवसांपासून अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. इम्तियाज जलील यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, बिहारचे पाच आणि हैदराबादमधील सात आमदार या मनपाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहेत. तसेच खासदार असदुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसीदेखील येणार आहेत. इथे सभा आणि रॅलीदेखील केल्या जाणार आहेत. तसेच मुंबईसह इतर ठिकाणीदेखील हे आमदार प्रचारासाठी जाणार आहेत. ५० पेक्षा अधिक जागा लढू आम्ही ५० जागांवर लढण्याची तयारी केली आहे. आणखी काही ठिकाणी पॅनल तयार करत आहोत. येत्या दोन दिवसांत आम्ही जागावाटप करणार आहोत. आम्ही ताकदीने ही निवडणूक लढवणार आहोत. - इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष, एमआयएम. पूर्व मतदारसंघात ९१ हजार मते नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना एकूण ९१,११३ तर अतुल सावे यांना ९३,२७४ मते मिळाली होती. सावे केवळ २,१६१ मतांनी विजयी झाले होते. मध्य मतदारसंघात नासेर सिद्दिकी यांना ७७,३४० मते मिळाली होती. शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना ८५,४५९ मते मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत एमआयएमला मोठे मतदान झाले होते. त्यामुळे गेल्या मनपा निवडणुकीत २५ जागा मिळालेल्या एमआयएमचे जागा वाढवण्याचे प्रयत्न आहेत. किराडपुऱ्यातून ५२ जण इच्छुक छत्रपती संभाजीनगरातून ४०० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक ६ मधून किराडपुरा या भागातून सर्वाधिक ५२ उमेदवार इच्छुक आहेत. प्रभाग क्रमांक १३ बायजीपुऱ्यामधून ४६ तर, प्रभाग ५ मधून ५१ उमेदवार इच्छुक आहेत. सर्व जाती-धर्माच्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये मराठा, ब्राह्मण, आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी उमेदवारी मागितली असल्याचे एमआयएमच्या नेत्यांनी खासगीत सांगितले.
उबाठाचे मनपा निवडणुकीत मिशन ६१ ठरले आहे. महापालिकेत ६१ उमेदवार जिंकून सत्ता काबीज करण्याचे उबाठाचे नियोजन आहे. त्यासाठी २६ तारखेला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत क्रांती चौक ते गुलमंडी अशी रॅली काढणार आहे. त्यासाठी शहरातील ६१ प्रभागांतून उमेदवार मशाली घेऊन येणार आहेत. त्यामुळे जागांचे वाटप लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांना दिली. महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप ७५ टक्के पूर्ण झाले आहे. एकूण २९ प्रभागांपैकी अठरा प्रभागांमधील जागांबाबत एकमत झाले आहे. महाविकास आघाडीत उबाठा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन विकास आघाडी आणि मनसे यांचा समावेश आहे. काही ठिकाणी युतीचे उमेदवार फुटल्यास त्यांना महाविकास आघाडीत घेण्याचे देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. काही इच्छुकांनी आपल्याला फोन देखील केले असल्याची माहिती दानवे यांनी या वेळी दिली आहे. मुंबईच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरात मिशन-६१ उबाठाने सुरू केले आहे. त्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळच या निमित्ताने फोडला जाणार आहे. उबाठाचे मतदान पूर्वीच्या बाण चिन्हावर जात असल्यामुळे मशालीचा प्रचारही या निमित्ताने करण्याचे उबाठाचे नियोजन आहे. पहिल्यांदाच प्रभागनिहाय होणाऱ्या या निवडणुकीत उबाठाला मोठी कसरत करावी लागणार आहे. पक्षातून अनेकांनी भाजप व शिंदेसेनेला जवळ केल्याने उबाठाची कसोटी लागणर आहे. जातीय समीकरणामुळे महाविकास आघाडी एकत्र छत्रपती संभाजीनगर ६ पैकी ३ नगरपालिकेत उबाठा आणि काँग्रेस जिंकली आहे. आता मनपा निवडणुकीसाठी जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून ही महाविकास आघाडी एकत्र येत आहे. वंचित बहुजन आघाडीची हक्काची मते, काँग्रेसला मिळणारी अल्पसंख्याक मते, तसेच उबाठाची हिंदूची मते अशी मते एकत्र करून निवडणूक लढून सत्ताधारी युतीचा पराभव करण्याचे नियोजन आहे.
शिवसेनेच्या हाती तेव्हा धनुष्यबाण हे चिन्ह होतं. गेल्या काही वर्षांतील घडामोडींनंतर ‘धनुष्यबाणा’ची जागा ‘मशाली’नं घेतली. हा ताजा इतिहास. पण संभाजीनगरमध्ये ‘धनुष्यबाण’ आणि ‘मशाल’ यांच नातं जवळपास साडेतीन दशकांचं... मुंबईनंतर छत्रपती संभाजीनगरात अवतरलेल्या शिवसेनेने नंतर राज्यभर धनुष्यबाण हे चिन्ह त्यांच्या मतदारांच्या मनावर बिंबवलं, पण याच जिल्ह्यात शिवसेनेनं ‘मशाल’ या चिन्हाशीही त्यावेळी आपलं नातं जोडलं होतं. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेने ६० पैकी तब्बल २७ जागा जिंकल्या. समर्थनगर वॉर्डातून एक अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. ते मोरेश्वर सावे. पुढे त्यांनी शिवसेनेसोबत जाणं पसंत केलं. ते शहराचे दुसरे महापौरही झाले. नंतर लोकसभा निवडणुकीत मोरेश्वर सावे शिवसेना पुरस्कृत उमेदवार बनले. त्यावेळी त्यांची निशाणी होती ‘मशाल’. राज्यातील शिवसेनेचे इतर उमेदवार ‘धनुष्यबाण’ चिन्ह घेऊन लढत असताना सावे यांनी ‘मशाल’ हाती घेतली आणि ते निवडूनही आले. खरं तर याविषयी इतर गोष्टी सांगता येतील, पण इथं इतकंच सांगायचं. ते यासाठी की पुढचं जे सांगायचं ते खूप महत्त्वाचं आहे. शिवसेनेने महापालिकेत धनुष्यबाणावर विजय मिळवल्यानंतरही सावे यांची निशाणी ‘मशाल’ होती. तसं तर मोरेश्वर सावे शिवसेनेचे पहिले खासदार. म्हणजे पाहा, पहिल्या खासदाराचीच निशाणी ‘मशाल’ होती. नंतर पुढे शिवसेनेने महाराष्ट्रभर घोडदौड केली ती ‘धनुष्यबाण’ चिन्हावर. त्याआधी या शहरात सावेंच्या रुपाने मशाल आणि धनुष्यबाणाचं नातं जडलं होतं. आज तीच दोन चिन्हं समोरासमोर येऊन माझ्यापुढं उभी आहेत. धनुष्यबाणाचा मित्र असलेलं कमळ चिन्ह हे मोरेश्वर सावेंचे वारसदार अतुल सावे यांच्याकडे आहे. बरं आणखी काही सांगण्यासारखं आहे. ते म्हणजे मोरेश्वर सावे यांच्यानंतर महापौर झाले ते प्रदीप जैस्वाल. गंमत अशी की सावे यांच्यानंतरचे खासदारही प्रदीप जैस्वालच. दोन्ही वेळा सावेंच्या नंतर नंबर लागला तो प्रदीप जैस्वाल यांचाच. प्रदीप जैस्वाल आजही धनुष्यबाण हाती घेऊन आहेत. यापेक्षा वेगळे निघाले ते चंद्रकांत खैरे. महापालिकेत पहिले सभागृह नेते तर झालेच शिवाय शहरातील शिवसेनेचे पहिले आमदारही. त्यांचं आणि मोरेश्वर सावे यांचं मित्रत्व आणि राजकीय भांडणंही पुढं खूप गाजलं. म्हणजे ‘धनुष्यबाण’ आणि ‘मशाल’ यांच्या संघर्षाचं छोटंसं रूप म्हणा, पण काही झाले तरी तो एक पक्ष होता. पहिल्या महापालिकेत ‘कमळा’चा एकही नगरसेवक नसताना आज ‘कमळ’ त्यांच्यासमोर शक्तिशाली बनले आहे. कमळ, धनुष्यबाण आणि मशालीची ही लढाई त्याच त्या नेत्यांमध्ये किंवा त्यांच्या वारसदारांमध्येही सुरू आहे...
१५ जानेवारीला राज्यातील २९ मनपांची निवडणूक होत आहे. ६ महिन्यांपासून चर्चेत असलेली उद्धव व राज ठाकरेंची युती २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता घोषित होणार आहे. दुसरीकडे भाजपसोबत सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी युती करणार आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या चर्चेच्या ३ फेऱ्या झाल्या आहेत. २६ डिसेंबर रोजी पवार काका-पुतणे एकत्र आल्याची घोषणा होऊ शकते. ठाकरे बंधू मुंबईसह ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार येथे एकत्र लढतील. मुंबईत उद्धवसेना १५०, मनसे ७० जागा लढेल. शरद पवारांना ७ जागा दिल्या जातील असे म्हटले जात आहे. ठाकरे बंधूंचा विधानसभेत सपाटून पराभव झाला. फडणवीस सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा जीआर काढल्यावर ठाकरे एकत्रीकरणाला वेग आला. दोघांसाठी मुंबई मनपा महत्त्वाची आहे. दुसरीकडे पुण्यात एकत्र येऊन राष्ट्रवादीचे अस्तित्व टिकवावे, असा शरद पवार गटातील काही नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहे. शरद पवार गटाला जाता येईल राज्यात सत्तेत (भाजपसोबत जाण्याची पटकथा २०१७ पासून शरद पवार लिहून स्वत:च ती खोडून काढत आहेत.) शरद पवारांवर वाढता दबाव गेल्या चार-पाच महिन्यांपासून थांबलेली दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाची चर्चा अचानक का सुरू झाली, याविषयी सूत्रांनी सांगितले की, पुण्यात तरी आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम राहावे, असा शरद पवारांवर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे. पुण्यात एकत्रीकरणाचा प्रयोग करून राज्यातही सत्तेत जावे, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच अनुषंगाने दिव्य मराठी ॲपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये आयोजित टॉक शोमध्ये परिसरातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. टॉक शोमध्ये शहरातील वाढती गुन्हेगारी, पाणीटंचाई, खोदून ठेवलेले रस्ते, गुंठेवारीसारखे प्रश्न प्रामुख्याने पुढे आले. ठाकरे गटाचे पदाधिकारी पुरुषोत्तम पानपट यांनी प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे सांगत, कोणतेही सरकार असले तरी हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, अशी भूमिका मांडली. दरम्यान, या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली. शहराला पाणी कुणामुळे मिळाले नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे बोट दाखवत ठाकरे गटावर टीका केली. या आहेत प्रमुख समस्या... दिव्य मराठी ॲपचा टॉक शो आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये झाला. विद्यानगर, पुंडलिकनगर या भागातील इच्छुक उमेदवार आणि नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागामध्ये उच्चूभ्रू परिसरासर सर्वसामान्य लोकवस्ती असेलला परिसर सुद्धा आहे. या परिसरात रस्ते, ड्रेनेज, पाणी, गुंठेवारी, बॉन्डवरील घरे, वाढती गुन्हेगारी यासह अरुंद गल्ल्या या सारख्या समस्यांचा मोठा डोंगर असल्याचे दिसून आले आहे. सात दिवसांनी पाणी येते... तरुणांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात पोलिस चौकी असणे गरजेचे असल्याचा मुद्दाही नागरिकांनी मांडला. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीना गायके म्हणाल्या की, 'आमच्या प्रभागात पाण्याची समस्या सर्वात मोठी आहे. पाणी हे 6-7 दिवसांनी येते ते किमान दोन-3 दिवसांनी यायला हवे. बाकी काहीच समस्या आमच्या प्रभागात नाही.' उघड्या गटारीची समस्या... ठाकरे गटाच्या पदाधिकारी विजयमाला शेरखाने म्हणाल्या की, 'आमच्या समस्या 1990 पासून आहेत. त्या अजूनही जशाच्या तशा आहेत. आमच्या प्रभागात कधी 6 तर कधी 7 दिवसानंतर पाणी येते. आमच्याकडून टॅक्स घेऊन सुद्धा आम्हाला सुविधा दिल्या जात नाहीत. आमच्याकडे उघड्या गटारींचा सर्वांत मोठी समस्या आहे जी अजूनही सोडवली गेली नाही.' कार्यकर्ते घाण करत आहेत... ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा फलके म्हणाल्या की, 'आमच्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या ही पाण्याची आहे. पाणी येण्याचा काही ठराविक वेळ नाही. यामुळे महिला मोठ्या त्रस्त आहेत. गटारीच्या कामासाठी आमच्या परिसरातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे जनता त्रस्त आहे. आमच्या परिसरात गटारीच्या खोदलेल्या खड्यामध्ये एका जणांचा जीव जावू शकत होता, पण आम्ही त्याला ओढून बाहेर काढले. याकडे अतुल सावे यांनी लक्ष दिले पाहिजे त्यांचे कार्यकर्ते तिथे येऊन घाण करत आहेत.' स्वखर्चाने ड्रेनेज केले... ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता मठपती म्हणाल्या की, 'रस्त्यावर केलेल्या खोदकामांचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रोडच चांगले नसतील तर लोक चालणार कसे. गुरूदत्त नगरमध्ये तर आम्ही स्वखर्चाने ड्रेनेज केले आहे. सरकारला आमच्याकडे बघायला वेळ नाही गेली 25 वर्षे आमची हीच समस्या आहे. आमचा परिसर अनाथ असल्यासारखा आहे. आमच्या परिसराकडे कोणत्याही पक्षाचे लक्ष नाही. तिथे पाण्याची लाइनसुद्धा अजून आलेली नाही.' प्रभागात आरोग्य केंद्र नाही... ठाकरे गटाचे पदाधिकारी राज नीळ म्हणाले की, 'आमच्या प्रभागात एकही आरोग्य केंद्र नाही. या प्रभागात 80 टक्के लेाक हे मध्यमवर्गीय आहेत. आरोग्य केंद्र हे प्रभागाच्या बाहेर आहे. हे काम काही आमदार खासदारांचे काम नाही. आमच्याकडे गुंठेवारीचा रेट जो आहे तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही. आमच्या ज्या मालमत्ता आहेत त्या लिगल झाल्या पाहिजे.' गुंडामुळे घरातून निघणे अवघड... रामश्वर मानकापे म्हणाले की, 'आमच्या प्रभागात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. यामुळे जनतेला घरातून बाहेर निघणे अवघड झाले आहे. सर्व नागरिकांची मागणी आहे की या परिसरात एक पोलिस चौकी झाली पाहिजे. तरच इथली गुंडगिरी थांबेल आणि लोकांना सुद्धा दिलासा मिळेल. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.' तरुणांमध्ये नशेखोरी वाढली... ज्योतीराम धोगंडे पाटील म्हणाले की, 'आमच्या प्रभागातील काही तरुण हे नशेखोरीच्या आहारी गेले आहेत. आमच्या प्रभागातील युवकांना रोजगार मिळाला तर हे सर्व बंद होऊ शकेल त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनतेच्या माध्यमातून आम्ही सर्व जण हे काम करणार आहोत. संदीपान भुमरे पालकमंत्री असताना आम्ही परिसरात अनेक कामे केली आहेत.' प्रभागाची अशी आहे व्याप्ती... प्रभाग क्रमांक 22 मध्ये विद्यानगर गिरीजा देवी कॉलनी, परिमल हाउसिंग सोसायटी, अलंकार कॉलनी, नंदिग्राम कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, भूषणनगर, न्याय नगर भागशः, हुसेन कॉलनी, दुर्गामाता कॉलनी, पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, हनुमान नगर भागश, न्यू हनुमान नगर, गणेश नगर, गुरुदत्त नगर, छत्रपती नगर, मानक नगर, विशाल नगर, बाळकृष्ण नगर, मोरेश्वर सोसायटी भागशः, शिवनेरी कॉलनी, न्यायमूर्ती नगर, इसाक नगर (आदर्श नगर), कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, जयदुर्ग हाऊसिंग सोसायटी, विजयनगर भागश:, मेमन कॉलनी हा भाग येतो.
महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर दिव्य मराठी ॲपने सुरू केलेल्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या मालिकेला छत्रपती संभाजीनगरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांच्या जाणून घेऊन घेण्यासाठी गेलो असता येथे अनेक गोष्टींना तोंड फुटले. पाण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः आक्रोश केला. मात्र, भीतीने त्यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले. प्रभागात उच्चूभ्रू परिसरासह सर्वसामान्य लोकवस्ती असेलला परिसर सुद्धा आहे. त्यामुळे येथे विकासाचा असमतोल स्पष्ट दिसतो. दुसऱ्या भागात रस्ते, ड्रेनेज, पाणी, गुंठेवारी, बॉन्डवरील घरे, वाढती गुन्हेगारी यासह अरुंद गल्ल्या या सारख्या समस्यांचा मोठा डोंगर असल्याचे दिसून आले. काहीही करा, पाणीप्रश्न सोडवा छत्रपती संभाजीनगरचा सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे. जी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतेय. प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला असता, त्यांनी कळकळीची विनंती करत 'कृपया आमची पाण्याची समस्या सोडवा. बाकी आम्हाला काही एक त्रास नाही. आम्हाला सध्या जंजाळ साहेब पाणी देत असल्यामुळे आमच्या घरात पाणी येते,' असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले. तसेच प्रभागातील काही भागातील नागरिकांच्या घरी नळ नसल्यामुळे त्यांना पाण्याचे टँकर आणावे लागत आहे. नियोजन व्यवस्थित करा परिसरातील रहिवासी जनार्धन राठोड म्हणतात की, 'आमच्या प्रभागात राजू भाऊ वैद्य यांनी बरीच काम केली आहेत. त्यांच्यामुळे रस्ते वगैरे आम्हाला मिळाले आहेत. मात्र, आता तेच रस्ते थोडे फुटले आहेत. पाणी आम्हाला वेळेवर येत नाही. जर पाण्याचे नियोजन व्यवस्थित केले तर आमचा आहे तो त्रास निघून जाईल. सर्व काही आलबेल विशालनगर भागात राहणारे रहिवासी म्हणतात की, 'आमच्याकडे पाण्याची चांगली सोय आहे. एखाद्या दिवशी पाणी येत नाही, पण तेवढे आम्ही सावरून घेतो. घंटागाडी आमच्याकडे दररोज येते. त्यामुळे परिसर खूप चांगला आणि स्वच्छ आहे. आम्हाला कोणताच त्रास नाही,' असे मत त्यांनी व्यक्त केले. ...तर घरातील पाणी बंद होते प्रभाग २२ मध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी, रस्ते समस्या सुटली आहे. कचरा गाडीही वेळेवर येते. हे बऱ्याच नागरिकांनी सांगितले. मात्र, अनेकांनी येथील समस्या मांडू शकणार नाही, कारण भीती वाटते, असे स्पष्ट सांगितले. कारण म्हणजे साधारणपणे बघायला गेले, तर शहरात सर्वाधिक गुन्हे जर कोणत्या प्रभागात होत असतील तर तो हाच भाग आहे. येथे रोज काही ना काही घटना घडत असतात. त्यामुळे येथील नागरिक म्हणतात की, 'जर आम्ही समस्या मांडल्या तर आमच्या घरातील पाणी बंद केले जाते आणि आम्हाला आमचे कुटुंब प्रिय आहे. त्यामुळे आम्ही जसे आहोत तसेच चांगले आहोत.' प्रभागाची अशी आहे व्याप्ती विद्यानगर, गिरिजा देवी कॉलनी, परिमल हाउसिंग सोसायटी, अलंकार कॉलनी, नंदिग्राम कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, भूषण नगर, न्याय नगर भागशः, हुसेन कॉलनी, दुर्गामाता कॉलनी, पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, हनुमान नगर भागश:, न्यू हनुमान नगर, गणेश नगर, गुरुदत्त नगर, छत्रपती नगर, मानक नगर, विशाल नगर, बाळकृष्ण नगर, मोरेश्वर सोसायटी भागशः, शिवनेरी कॉलनी, न्यायमूर्ती नगर, इसाक नगर (आदर्श नगर), कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, जयदुर्ग हाऊसिंग सोसायटी, विजयनगर भागश:, मेमन कॉलनी.
कसाबशी लढणारे सदानंद दातेनवे पोलिस महासंचालक होणार:एनआयएमधून महाराष्ट्र केडरमध्ये घरवापसी
राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद वसंत दाते यांना केंद्र सरकारने तत्काळ प्रभावाने महाराष्ट्र केडरमध्ये पाठवले आहे. १९९० बॅचचे अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) २२ डिसेंबर २०२५ रोजी याबाबतचा आदेश जारी केला. गृह मंत्रालयाने पाठवलेला ‘मुदतपूर्व प्रत्यावर्तन’ प्रस्ताव समितीने मंजूर केल्याने दाते यांची केंद्रातील प्रतिनियुक्ती संपवून त्यांना पुन्हा मूळ केडरमध्ये पाठवण्यात आले आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी ‘कामा’ रुग्णालयात अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांशी प्रत्यक्ष दोन हात करणारे दाते हे शौर्य पदकाचे मानकरी आहेत. केंद्र राज्यावर पकड मिळवणार ‘आधार’ आणि ‘जनधन’ मोहिमेचे शिल्पकार राजेश अग्रवाल यांची डिसेंबरमध्ये राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. आता पोलिस महासंचालकपदी दाते यांच्या नियुक्तीची मंत्रालयात जोरदार चर्चा आहे. मुख्य सचिव, पोलिस महासंचालक या दोन सर्वोच्च पदांच्या माध्यमातून दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व राज्याच्या प्रशासनावर परोक्षपणे नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. रश्मी शुक्ला ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार फोन टॅपिंग प्रकरणातील वादांमुळे चर्चेत राहिलेल्या राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३१ डिसेंबर २०२५ रोजी निवृत्त होत आहेत. जानेवारी २०२४ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. विधानसभा निवडणुकीदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारींमुळे त्यांची बदली केली होती. मात्र, महायुती सरकारने सत्तास्थापनेनंतर त्यांना पुन्हा नियुक्त केले. वाढीव मुदतवाढीमुळे त्या डिसेंबरअखेर पदमुक्त होतील.
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले असून शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी गंभीर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने म्हटले की, अधिकारी नियमांचे पालन सुनिश्चित करण्यात अयशस्वी ठरले आहेत आणि बीएमसी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला शहरातील वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलावे लागतील. तातडीने आणि प्रभावी पावले उचलली नाहीत. सोमवारच्या न्यायालयाच्या निर्देशानंतर बीएमसी आयुक्त भूषण गगराणी आणि एमपीसीबीचे सचिव देवेंद्र सिंह मंगळवारी खंडपीठासमोर हजर झाले. अधिकारी असण्यासोबतच तुम्हीही नागरिक आहात आणि तुमचे एक मूलभूत कर्तव्य आहे,” असे न्यायालय म्हणाले. कशामुळे वाढते वायुप्रदूषण बांधकामे आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्प तसेच मुंबईत खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. ज्यामुळे नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड यांसारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन अधिक होते.
विधवा मुली आणि सुनांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेण्याबाबत छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या ब्राह्मण महाकुंभात ठराव मांडण्यात येईल. शहरात प्रथमच ब्राह्मण महाकुंभ होणार आहे. २७ व २८ डिसेंबरला निपट निरंजनसमोरील जनेश्वर महादेव मंदिरात महाकुंभ होईल. आठ राज्यांतील प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. सर्व ब्राह्मण शाखांचे एकत्रीकरण या ठिकाणी होणार असून ‘एक ब्राह्मण ना शाखा ना भेद’ या संकल्पनेवर आधारित तीन दिवसांचे संमेलन होईल. यामध्ये शंभर प्रतिनिधी सहभागी होतील. ब्राह्मण समाजातील शाखाभेद सोडून सकल ब्राह्मण एक होण्यावर यामध्ये प्रस्ताव मांडण्यात येईल. उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समिती आणि सकल ब्राह्मण समाज छत्रपती संभाजीनगरतर्फे हे आयोजन करण्यात आले आहे. उत्तरदेशीय ब्राह्मण सेवा समितीच्या विजया अवस्थी म्हणाल्या, मिटकॉनचे सीईओ राजेश मिश्रा मार्गदर्शन करतील.प्रमुख पाहुणे म्हणून सनातन सेवा न्यासचे अध्यक्ष शिवओम मिश्रा आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले उपस्थित राहणार आहेत. या विषयांवर होईल मंथन

30 C