अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी
प्रयागराज : महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर टीका करणा-या अभिनेत्री ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) हिची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी एका व्हीडीओ संदेशाद्वारे या निर्णयाची अधिकृत पुष्टी केली. त्रिपाठी म्हणाल्या की आखाड्याच्या सर्व पदाधिका-यांसोबत […] The post अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बुधवार दि. २८ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेला संयुक्तपणे संबोधित करतील. या अभिभाषणातून केंद्र सरकारच्या आजवरच्या कार्यकाळाचा आढावा तसेच आगामी काळातील धोरणात्मक दिशा स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांमध्ये त्यावरील धन्यवाद प्रस्ताव मांडण्यात येईल. पुढील […] The post अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर: एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात अदानी कंपनीच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने एका ५६ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी घडली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला, तर कंडक्टरने आपण झोपलो असल्याचे सांगितले. मृत मधुकर नामदेव गोतमारे (५६) हे गेल्या आठ वर्षांपासून दैनिक भास्कर प्रेसमध्ये काम करत होते. ते त्यांच्या हिरो एचएफ डिलक्स (एमएच-४९-बीसी-०५९४) दुचाकीवरून कामावर जात असताना, जयताडा रोडवरील गुडलक सोसायटीजवळ वळण घेत असताना मागून आलेल्या अदानी कंपनीच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने (एमएच-४९-बीझेड-७१९९) त्यांना चिरडले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रकचे पुढचे चाक आणि संपूर्ण वाहन त्यांच्या शरीरावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, अपघातग्रस्त ट्रक वाडी येथील अदानी प्लांटमधून काँक्रीट घेऊन जात होता. हे काँक्रीट सरकारी वसतिगृहाच्या बांधकामासाठी नेले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या वसतिगृहाची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. घटनेवेळी ट्रकमध्ये उपस्थित असलेल्या कंडक्टर राजेश उईके याने पोलिसांना सांगितले की, तो झोपला होता आणि जागा झाल्यावर चालक ट्रकमध्ये नव्हता. त्याने फरार चालकाचे नाव 'आशु' असल्याचे सांगितले असले तरी, त्याची माहिती अस्पष्ट आणि परस्परविरोधी असल्याने संशय निर्माण झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी खाजगी बाउन्सर उपस्थित असल्याचे दिसले. मृताचा जागीच मृत्यू झाल्याने मोठी गर्दी जमली होती, त्यानंतर बांधकाम स्थळाचे गेट बंद करून बाउन्सर तैनात करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पीआय गोकुळ महाजन, डब्ल्यूपीएसआय वैशाली सोळंके, कॉन्स्टेबल श्रेयस फलकाडे, रवींद्र नेतानराव, राजू खडतकर आणि ट्रॅफिक पीआय सारंग मिराशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मात्र, एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही चालक फरार झाल्याने पोलिसांच्या कारवाईच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अरिजीत सिंगची प्लेबॅक सिंगिंगमधून जाहीर केली निवृत्ती
मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील अनभिषिक्त सम्राट आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला गायक अरिजीत सिंग याने एक अत्यंत धक्कादायक आणि चाहत्यांना भावूक करणारा निर्णय घेतला आहे. अरिजीतने चित्रपटांसाठी गाणे सोडण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने ही शॉकिंग बातमी दिल्याने संगीत विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. अरिजीतने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक संदेश […] The post अरिजीत सिंगची प्लेबॅक सिंगिंगमधून जाहीर केली निवृत्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा परिषद निवडणुकीचा मंत्रिमंडळ बैठकीवर परिणाम
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीचा परिणाम मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर दिसला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला तब्बल १३ कॅबिनेट मंत्री गैरहजर होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सलग २ मंत्रिमंडळ बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. २९ महापालिकांच्या निवडणुका होऊन निकाल घोषित झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली […] The post जिल्हा परिषद निवडणुकीचा मंत्रिमंडळ बैठकीवर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? -कॉ. उत्तम होळीकर
लातूर : प्रतिनिधी इंडियन बँक्स असोसिएशन आणि बँक कर्मचारी, अधिकारी संघटना यांच्यामध्ये करारानुसार पाच दिवसांचा आठवडा मान्य होऊन दोन वर्षे उलटली तरीही मोदी सरकारने अद्याप याला मान्यता दिलेली नाही. संसदेतील पाशवी बहुमताची घमेंड जर या सरकारला येऊन भाजपच्या नेहमीचा जुमला करू अशी मस्ती या सरकारला आली असेल, तर ती मस्ती जिरवण्याची ताकद बँक कर्मचारी, अधिकारी […] The post केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? -कॉ. उत्तम होळीकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चंद्रपूर महापालिका सत्तासंघर्ष, विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला
मुंबई (प्रतिनिधी) : चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी मातोश्रीवर शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महापौर निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती ठाकरे यांना केली. या वेळी ठाकरे यांच्या पक्षाकडून अडीच वर्ष महापौर पद आणि स्थायी समिती सभापती पदाची मागणी करण्यात आली. चंद्रपूर […] The post चंद्रपूर महापालिका सत्तासंघर्ष, विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरेंच्या भेटीला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशभक्तीपर गीतांतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केली देशप्रेमाची भावना
लातूर : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दयानंद वाणिज्य महाविद्यालयात आंतर महाविद्यालय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून देशप्रेमाची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्राध्यापिकाद्वारे राज्यगीताने करण्यात आली. स्पर्धेत विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुमधुर गायनाने उपस्थितांची मने जिंकली. परीक्षकांनी सूर, ताल, शब्दोच्चार व सादरीकरण […] The post देशभक्तीपर गीतांतून विद्यार्थ्यांनी व्यक्त केली देशप्रेमाची भावना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करा
मुंबई (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विरोधी पक्षावर दबाव टाकणारे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. या शिवाय निवडणूक प्रक्रिया प्रभावित होऊ नये यासाठी पाटील यांना निवडणूक प्रचारसभा घेण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली […] The post मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईतील २ विमानतळे मेट्रोने जोडणार
मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानच्या ३५ किलो मीटरच्या मेट्रो मार्गिकेला आज मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या सोबतच ६६ किलो मीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या […] The post मुंबईतील २ विमानतळे मेट्रोने जोडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता भरडली
लातूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून काम केले असून जनतेने दाखवलेला विश्वास कधीही तडा जाऊ दिला नाही. या उलट भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता भरडली जात असून त्यांना धडा शिकवण्याची हिच ती वेळ आहे, असे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […] The post भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता भरडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापौर पदाचा निर्णय एकत्र बसून समन्वयाने घेऊ
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आणि भाजपा आम्ही एकत्रित बसून निर्णय घेणारे पक्ष आहोत. पदांचा विचार करून गट नोंदणी एकत्र करायची की वेगळी याचा निर्णय घेतला जाईल. मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय आम्ही एकत्र बसूनच घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. शिवसेनेच्या गट नोंदणीत भाजपचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक महापालिका त्यांचा-त्यांचा महापौर […] The post महापौर पदाचा निर्णय एकत्र बसून समन्वयाने घेऊ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हाधिकारी कार्यालयाचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये समावेश
लातूर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) मार्फत करण्यात आले. या अंतर्गत राज्यातील सर्वोत्कृष्ट पाच जिल्हाधिकारी कार्यालयांची नावे राज्य शासनामार्फत प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचाही समावेश असून यानिमित्ताने लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी […] The post जिल्हाधिकारी कार्यालयाचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये समावेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केवायसी करूनही २६ लाख लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता थकला
मुंबई (प्रतिनिधी) : ईकेवायसी करूनही राज्यातल्या तब्बल २६ लाख लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा दीड हजार रुपयांचा हप्ता बँक खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये महायुती सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. जळगावमध्ये या संतापाचा विस्फोट झाला आणि असंख्य लाडक्या बहिणी जळगावातील महिला व बाल विकास केंद्रात घुसल्या आणि त्यांनी जाब विचारला. मुख्यमंत्री माझी लाडकी […] The post केवायसी करूनही २६ लाख लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता थकला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराणा प्रतापनगरला सहा महिन्यांत घरणीहून पाणी आणू -आमदार अमित देशमुख
लातूर : प्रतिनिधी महाराणा प्रतापनगरसाठी पिण्याचे पाणी आवश्यक आहे. ही बाब आम्ही लक्षात घेवून या भागासाठी पाणी आणण्याचे आम्ही प्रयत्न करीत असताना नतद्रष्ट भाजपने आमच्यावर पाणी पळविले जात असल्याचा आरोप केला. आता याना धडा शिकवण्याची वेळ आली असून यांनी कितीही प्रयत्न केले असले तरी येणा-या ६ महिन्यात घरणीहुन महाराणा प्रतापनगरसाठी पाणी आणण्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न केले […] The post महाराणा प्रतापनगरला सहा महिन्यांत घरणीहून पाणी आणू -आमदार अमित देशमुख appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी वाढवला
मुंबई (प्रतिनिधी) : शासकीय आणि खासगी संस्थांना दिल्या जाणा-या सरकारी जमिनीच्या भाडेपट्टीचा कालावधी वाढविण्यास मंगळवार दि. २७ जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार विविध कारणांसाठी ज्या जमिनी ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्याने दिल्या आहेत. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवला जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची […] The post शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी वाढवला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्ह्यात ले-आऊट मंजुरीच्या प्रक्रियेतील अनियमितता टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता हे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. राज्य शासनाच्या बीपीएमएस (बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम) प्रणालीद्वारे ले-आऊटला मंजुरी दिली जाते. मात्र, या प्रणालीमध्ये सध्या अद्ययावत बदल सुरू असल्याने जिल्ह्यातील ३० हून अधिक ले-आऊट प्रस्ताव प्रलंबित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःकडे अधिकार घेतल्याने बीपीएमएस प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी आणखी किमान १० दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत संबंधित ले-आऊटधारकांना मंजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सध्या हे सर्व प्रस्ताव नगररचना विभागाच्या सहायक संचालक (एडीटीपी) यांच्या स्तरावर थांबले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेतील बीपीएमएस लॉगिनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे सर्व प्रस्ताव त्यांच्याकडे येतील आणि त्यानंतर संबंधितांना प्रमाणपत्रे मिळतील. विशेष म्हणजे, यातील सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने होतात, त्यामुळे प्रकरण नेमके कोठे थांबले आहे, हे ले-आऊटधारकांना कळते. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार, चाळीस आरपेक्षा अधिक जमिनीच्या ले-आऊट मंजुरीचे अधिकार मूळतः जिल्हाधिकाऱ्यांकडेच आहेत. पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांवरील कामाचा ताण लक्षात घेता, त्यांनी हे अधिकार जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना (एसडीओ) तात्पुरते दिले होते. त्यामुळे आतापर्यंत ले-आऊट मंजुरीचे प्रकरणे एसडीओ स्तरावर निकाली निघत होती. मात्र, जिल्ह्यातील काही प्रकरणांमध्ये विसंगती आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा मुद्दा यापुढे स्वतःच हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. एडीटीपीमार्फत प्रस्ताव एसडीओंकडे पाठवला जातो. परंतु, समान कृती असतानाही वेगवेगळ्या उपविभागाचे एसडीओ आणि तहसीलदार यांच्या कामकाजात फरक दिसून आला. काही प्रकरणांच्या मान्यतेवर एक शिक्का, तर तशाच प्रकारच्या मान्यतेसाठी काही अधिकाऱ्यांकडून दोन शिक्के देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे भविष्यात अशी विसंगती टाळण्यासाठी आणि प्रत्येक प्रकरणाच्या मंजुरीमध्ये एकसमानता आणण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
रूपाली चाकणकर यांनी मगर कुटुंबीयांची भेट घेतली:दीप्ती मगरला न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाचा विश्वास
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी येथे आत्महत्या केलेल्या दीप्ती मगरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला, तसेच पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला. पुण्याच्या हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील विवाहिता दीप्ती मगर चौधरी हिने सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. माहेरून पैसे आणण्यासाठी तिला वारंवार त्रास दिला जात होता. गर्भधारणा झालेली असताना, मुलीचा गर्भ असल्याने जबरदस्तीने गर्भपात करून स्त्री भ्रूण हत्या केल्याचा आरोप आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी स्वतः पोलिस उपअधीक्षक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विशेष पथक तयार करण्याचे, आरोपींना अटक करण्याचे आणि सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दीप्ती मगरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. कुटुंबीयांनी दीप्तीला झालेल्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली. दीप्तीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आयोग पूर्णपणे सोबत असल्याचे चाकणकर यांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी आत्तापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला. आयोगाच्या निर्देशानुसार, विशेष पथकाने आरोपी पती रोहन चौधरी आणि सासू सुनिता चौधरी यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरार असलेले सासरे आणि दीर यांचा शोध पथकाकडून सुरू आहे. दीप्तीच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये अजून काही बाबी समाविष्ट करावयाच्या असल्यास त्यादृष्टीने कार्यवाही करावी, तसेच आवश्यकतेनुसार अधिकची कलमे जोडावीत, अशा सूचना यावेळी पोलिसांना देण्यात आल्या. यावेळी यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर पत्की, आरोग्य विभागाच्या जिल्हा विधी सल्लागार ॲड मेघा सोनसळे, पुणे जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, पुणे उपविभागीय पोलीस अधिकारी दडस, उरळीकांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सामाजिक कार्यकर्ता निलेश मगर आदी उपस्थित होते.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता ढासळत चालल्याने मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हवेच्या गुणवत्तेची नेमकी माहिती मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे अधोरेखित करत, प्रदूषणाशी संबंधित सर्व आकडेवारी सार्वजनिक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या 'सुमोटो' याचिकेवरील सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर ताशेरे ओढत ही माहिती जनतेसाठी खुली करणे अनिवार्य केले आहे, जेणेकरून वाढत्या प्रदूषणाबाबत अधिक पारदर्शकता आणि जागरूकता निर्माण होईल. या प्रकरणात न्यायालयाला मदत करण्यासाठी नेमलेल्या 'अॅमिकस क्युरी' यांनी सादर केलेली आकडेवारी मुंबईतील प्रदूषणाची भीषणता स्पष्ट करणारी आहे. जानेवारी महिन्यातील पहिल्या 25 दिवसांपैकी तब्बल 18 दिवस मुंबईची हवा 'खराब' श्रेणीत होती, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. भारतात होणाऱ्या दर पाच मृत्यूंपैकी एका मृत्यूला प्रदूषित हवा कारणीभूत असल्याचे भीषण वास्तव मांडतानाच, प्रदूषणाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा टॅरिफमुळे होणाऱ्या परिणामापेक्षाही मोठा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विदारक परिस्थितीवर भाष्य करताना, आता केवळ चर्चा नको तर या समस्येविरोधात कठोर पावले उचलण्याची म्हणजेच 'शॉक ट्रीटमेंट' देण्याची वेळ आली असल्याचे परखड मत त्यांनी न्यायालयासमोर व्यक्त केले. तसेच आपण आणि आपली मुले सध्या मिनी भोपाळमध्ये राहत आहोत असे चित्र असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. पुढील सुनावणी आता 29 जानेवारीला मुंबई महापालिकेने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही प्रयत्न केले असले, तरी शहरातील प्रचंड बांधकामे, वाढती वाहनसंख्या आणि प्रदूषक कारखान्यांमुळे हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी केवळ तात्पुरते उपाय न करता एक कायमस्वरूपी आणि अधिक प्रभावी यंत्रणा उभी करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या संदर्भात अधिक सखोल अभ्यास आणि अंमलबजावणीसाठी गरज पडल्यास नवीन तज्ज्ञ समित्या स्थापन करण्याचे संकेतही न्यायालयाने दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 29 जानेवारी रोजी होणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना प्रतिवाद करण्याची मागणी फेटाळली दरम्यान, न्यायालयाने नमूद केले की, या प्रकरणाची सुनावणी गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात 3.80 लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रत्येक सुनावणीला दोन तास खर्च करणे योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर या याचिकेत राज्याच्या मुख्य सचिवांना प्रतिवाद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
एक लाख आदिवासी महिलांना जीवन विमा कवच:मानकर ट्रस्टतर्फे सेवा नीती कार्डद्वारे अपघात विमाही
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेतर्फे एक लाख आदिवासी महिलांना जीवन विमा कवच आणि सेवा नीती कार्डद्वारे प्रत्येकी एक लाखाचा वैयक्तिक अपघात विमा जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नागपूर येथे बोलताना गडकरी यांनी सांगितले की, आदिवासी व ग्रामीण समाजाच्या शिक्षण आणि आरोग्य सुरक्षिततेला बळ देण्यासाठी संस्थेने सेवा टेक लिमिटेडच्या सहकार्याने एकल विद्यालयाच्या शिक्षक-पर्यवेक्षकांना 'सेवा नीती कार्ड' देण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदिवासी क्षेत्रातील आर्थिक परिवर्तनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेअंतर्गत '२०२६ परिवर्तन रोडमॅप' नुकताच संस्थेच्या विशेष बैठकीत अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी सादर केला. या रोडमॅपमध्ये आरोग्य, शिक्षण, मनोरंजन आणि आर्थिक कल्याण यांचा समन्वय साधत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट दिशा मांडण्यात आली आहे. या वेळी डॉ. उपेंद्र कोठेकर, राजीव हडप, डॉ. राजीव पोतदार, आमदार संजय पुराम, सुधीर दिवे, मिलिंद कानडे, अनिल जोशी, बाळ अंजनकर, रेखा मावसकर, संस्थेचे सचिव प्रशांत बोपर्डीकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि पर्यवेक्षक उपस्थित होते. संस्थेच्या भविष्यातील योजनांमध्ये एक लाख आदिवासी महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली जीवन विमा योजना हा एक महत्त्वाचा सामाजिक घटक आहे. आदिवासी कुटुंबांमध्ये महिलांची भूमिका केंद्रस्थानी असल्याने, त्यांच्या सुरक्षिततेमुळे संपूर्ण कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत होईल. आजारपण किंवा अकाली मृत्यूच्या प्रसंगी कुटुंबावर येणाऱ्या आर्थिक संकटातून सावरण्यास ही योजना मोठा आधार देईल. पहिल्या टप्प्यात संस्थेतील ३३ हजार विद्यार्थ्यांच्या मातांना विमा सुरक्षा देण्यात येणार आहे. आरोग्य उपक्रमांचा कणा ठरणारा 'मेडिसर्व्ह डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म' खास आदिवासी लाभार्थ्यांसाठी संस्थेकडून विकसित करण्यात आला आहे. या ॲपद्वारे कुटुंबांच्या इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी, गावपातळीवरील आरोग्य माहिती, आजारांचे लवकर निदान आणि योग्य रुग्णालयात रेफरल सुविधा उपलब्ध होणार आहेत. कमी इंटरनेट उपलब्धतेच्या दुर्गम भागातही हा ॲप प्रभावीपणे कार्य करेल, असे संस्थेने म्हटले आहे. शिक्षण, मनोरंजन आणि आर्थिक सुरक्षिततेचा समन्वय राखण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रम मानकीकरण, शिक्षकांसाठी संरचित देखरेख प्रणाली तसेच टाटा स्टीलच्या सहकार्याने व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नागपूर येथे 'किस' संस्थेच्या सहकार्याने आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याच्या दिशेनेही पावले उचलण्यात येत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे झालेल्या भीम मेळाव्यात अंजली भारती यांनी अमृता फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीची वैयक्तिक टीका केली आहे. या वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, विविध स्तरातून याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी कारवाईची मागणीही जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) सायंकाळी नागपूर पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. अंजली भारती आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही या टीकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर स्त्रियांचा सन्मान, स्वाभिमान आणि समानतेचा पुरस्कार केला. त्यांच्या विचारांच्या नावाखाली कोणत्याही स्त्रीवर वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे हे त्यांच्या मूल्यांना धरून नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण स्त्रियांच्या सन्मानावर आघात करणारी भाषा आम्ही कधीही स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी या घटनेला 'बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देणारा प्रकार' असे संबोधले. अंजली भारती नावाच्या महिलेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू असलेल्या भीम मेळाव्याच्या नावाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल अनर्गल आणि खालच्या शब्दांत वक्तव्य केले, जे माणुसकीला काळिमा फासणारे आणि महिलांना लज्जा आणणारे आहे, असे मेश्राम म्हणाले. ॲड. मेश्राम यांनी स्थानिक पोलिसांनी या महिलेवर आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पातळी सोडून बोलणे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयी विखारी वक्तव्य करणे हे नीच मनोवृत्तीचे दर्शन आहे. अशा थिल्लर कार्यक्रमांना यापुढे परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली.
ब्राह्मण समाजाने समाजकारणासोबतच सक्रिय राजकारणात उतरावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ब्राह्मण नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. सकल ब्राह्मण समाज, पुणे शहर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस राजेश पांडे, कर्हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर आणि समन्वयक भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजीत देशपांडे यांनी केले. पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक पुनित जोशी, कुणाल टिळक, स्वरदा बापट, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, ज्योत्स्ना कुलकर्णी, निवेदिता एकबोटे आणि पिंपरी-चिंचवडमधील मंदार देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. धीरज घाटे आणि मानसी देशपांडे काही कारणास्तव अनुपस्थित होते. भांडारी पुढे म्हणाले की, समाजातून पुढे आलेल्या नेतृत्वाचा गौरव करणे म्हणजे समाजाच्या संघटनशक्तीचा गौरव आहे. राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. सुसंस्कृत आणि सक्षम नेते तयार होण्यासाठी ब्राह्मण समाजाने सक्रियपणे राजकारणात यावे. आपल्या संघटनकौशल्यासोबतच बुद्धी, चिकाटी आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय समाजाने द्यावा. सामाजिक कार्यात सक्रियपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते राजकारणात येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. यावेळी भालचंद्र कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. यामध्ये पुण्यात भव्य परशुराम भवन निर्माण करणे, पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देणे, दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करणे तसेच शनिवारवाडा आणि पर्वती देवस्थानचे नूतनीकरण करणे यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सकल ब्राह्मण समाजाच्या व्यासपीठाखाली पुणे शहरातील ३० ब्राह्मण संस्था आणि संघटना एकत्रितपणे विविध कार्यक्रम राबवतात, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. सकल ब्राह्मण समाज समितीमध्ये आम्ही सारे ब्राह्मण, अ. भा. ब्राह्मण महासंघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र, परशुराम हिंदू सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, महाराष्ट्र चित्पावन संघ, चित्पावन अस्तित्व संस्था, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था, याज्ञवल्क्य आश्रम, कर्हाडे ब्राह्मण संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती ब्राह्मण मंडळ, पुणे, विप्र फौंडेशन, सर्वशाखीय ब्राह्मण महासंघ, पौरोहित्य पुरोहित फौंडेशन, गौड सारस्वत ब्राह्मण संघ अशा सुमारे ३० ब्राह्मण संस्था, संघटना सदस्य आहेत.
शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद आता चांगलेच वाढत जात असल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते व मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद वाढत जात आहे. भाजपच्या वरिष्ठांनी जर परवानगी दिली तर यांचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे नाईक यांनी म्हटले आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांना आवरा अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आम्हीही उत्तर द्यायला सज्ज आहोत, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के यांनी रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले, पत्रास कारण की, नवी मुंबईतील आपले ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब यांनी आपले मित्र पक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या गणेश नाईक साहेब यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करण्याचे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीर रित्या मांडले आहेत. आता तर त्यांनी जाहीरपणे, पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे बेताल वक्तव्य केले आहे. पुढे नरेश म्हस्के म्हणतात, मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की त्यांच्या ह्या त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे. खरे म्हणजे, महाराष्ट्रात महा बिघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात, भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय शिंदे साहेब या दोघांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यानंतरच युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले आणि आज कल्याण डोंबिवली ठाणे, मुंबई या ठिकाणी युती म्हणून लढत देऊन महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकात आपण मोठे यश मिळवले आहे. या सर्व निर्णयांमध्ये आपली ही सक्रिय भूमिका राहिली आहे. सगळीकडे युती असताना युतीतल्या मोठ्या घटक पक्षाबद्दल असे विधान करणे म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु, त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक साहेब आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत, असे नरेश म्हस्के म्हणाले. पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, आदरणीय मोदीजींच्या आणि आदरणीय अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दिवस रात्र काम करीत आहेत. काही बाबतीत विचार वेगळे असले तरी एक हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांचे स्थिर सरकार आपण त्यामुळेच देऊ शकलो आहोत. परंतु, त्यांना हे बघवत नसल्यानेच कदाचित ते अशी मागणी करत असावेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना गणेश नाईक साहेबांना शिवसेनेने कशी धोबीपछाड दिली होती ते त्यांनी एकदा आठवावे. किंबहुना आपण त्यांना त्याचे स्मरण करून द्यावे बाकी शिवसेना त्यांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज आहे आज नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत अशा वल्गना करणाऱ्या गणेश नाईक साहेबांना आम्ही 42 जागा निवडून आणून दाखवले आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते. दिवस रात्र लोकांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिंदे साहेबांवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. तेव्हा त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करून आपण त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत ही नम्र विनंती. महा बिघाडीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब आणि अन्यही काही नेत्यांवर गंडांतर आणून त्यांच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांच्या उठावानंतर युतीचे सरकार आले आणि त्यामुळेच त्यांना चोख प्रत्युत्तर देता आले. दिल्लीत सत्ता स्थापन करतेवेळी जेव्हा शिवसेनेने घटक पक्षाची भूमिका सत्तेत स्वीकारली. त्यावेळी, आजही सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर शिवसेनेकडून त्याला धडाकेबाज उत्तर दिले जाते, सरकारच्या बाजूने विरोधी पक्षाने केलेल्या विरोधाचा फडशा पाडला जातो. दिल्लीत NDA घटक पक्ष म्हणून आणि महाराष्ट्रात युतीचे भागीदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तेत मोठ्या निर्णयात मोठ्या प्रकल्पांमध्ये खारीचा वाटा तरी उचलला आहे असे तुम्हाला वाटते का हो? आपल्या पक्षात पक्षश्रेष्ठीचा भंग करणारे नेते पक्षाची रचना आणि अध्यक्षांचे निर्णय याला न जुमानता मनमानी करत आहेत असे तुम्हाला वाटते का हो? असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. कधीकधी तर आम्हाला असे वाटते की शिंदे साहेबांपेक्षा गणेश नाईक साहेबांचा पक्ष नेतृत्वावरच अविश्वास आहे आणि त्यामुळेच ते असे बेताल वर्तन बेछुटपणे करू शकतात. त्यांच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून तुम्ही त्यांना पुढील जबाबदारी सोपवाल अशी अपेक्षा आहे. सदैव महायुतीचे हित जपणारा, पक्षादेश शिरसावंद्य मानून युती धर्मासाठी लढणारा एक सच्चा शिवसैनिक - नरेश म्हस्के, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
कर्तव्य पथवर प्रजासत्ताकदिनाची परेड उत्साहात
नवी दिल्ली/अमृतसर : आज देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. कर्तव्य पथावर संचलन झाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या इंटिग्रेटेड कमांडने प्रात्यक्षिक सादर केले. सुखोई-राफेलसह २९ विमाने सहभागी झाली. पॅराट्रूपर्स उतरले. सूर्यास्त्र, एमआय-१७ हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी राष्ट्रगीत झाले. २१ तोफांची सलामी देण्यात आली. यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला […] The post कर्तव्य पथवर प्रजासत्ताकदिनाची परेड उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिलेबीसाठी गावात लाठ्या-काठ्या घेऊन राडा
जहानाबाद : बिहारच्या जहानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर जिलेबीवरून मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, थेट लाठ्या-काठ्या चालल्या आणि ४ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. इतकेच नाही तर ज्या पंचायत भवनात हा कार्यक्रम सुरू होता, तिथल्या सरपंचाला पळून जाऊन आपला जीव वाचवावा लागला. काही लोकांनी जिलेबी चोरून नेण्याचा […] The post जिलेबीसाठी गावात लाठ्या-काठ्या घेऊन राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघातात सीआरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला. उधमपूर जिल्ह्यात एक बस आणि पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीआरपीएफच्या १३७ व्या बटालियनचे सेकंड-इन-कमांड करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५२ व्या बटालियनच्या […] The post भीषण अपघातात जवानासह ४ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सामान्य भाविकांनाही देवाच्या सेवेची संधी द्यावी
नागपूर : उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरातील गर्भगृहात ‘व्हीआयपी दर्शन’ देण्याच्या प्रथेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. आर. महादेवन आणि न्या. जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर दर्पण अवस्थी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळल्याच्या निर्णयाला अवस्थी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. […] The post सामान्य भाविकांनाही देवाच्या सेवेची संधी द्यावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चंद्रपूर महापालिकेत अडीच वर्षांचा फॉर्म्युला:विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
चंद्रपूर महापालिकेतील महापौरपदाचा तिढा कायम असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर भाजपचाच होईल, असा दावा केला आहे, तर वडेट्टीवार यांनी भेटीनंतर महापौर काँग्रेसचा होईल, असे म्हटले. सूत्रांनुसार, वडेट्टीवार यांनी पहिले अडीच वर्षे काँग्रेसचा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष असावा, तर पुढील अडीच वर्षे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा महापौर असावा, अशी विनंती केली. तसेच, उबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्याशी समन्वय साधून कारभार करण्याची ग्वाही दिली. चंद्रपूर महापालिकेत एकूण ६६ जागा आहेत. बहुमतासाठी ३४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. सध्या भाजपचे २३ आणि शिंदे गटाचा १ असे २४ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे २७ नगरसेवक आहेत. शिवसेना (उबाठा) ६, वंचित बहुजन आघाडी २ आणि २ अपक्ष असे एकूण १० नगरसेवक आहेत. भाजपला १० तर काँग्रेसला ७ नगरसेवकांची गरज आहे. यामुळे शिवसेना (उबाठा) गटाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. काँग्रेसला २७ जागा मिळाल्यानंतरही महापौरपदासाठी अंतर्गत कलह सुरू झाला होता. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हस्तक्षेप करावा लागला. महापौर निवडण्याचे अधिकार धानोरकर यांना, तर स्थायी समिती सदस्य निवडण्याचे अधिकार वडेट्टीवार यांना देण्यात आले होते. गटनेता निवडण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांकडे आहे. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपचा दावा फेटाळून लावला. पहिली अडीच वर्षे आम्हाला मिळावीत, अशी आम्ही विनंती केली आहे. उद्धव ठाकरे स्थानिक जिल्हाप्रमुखांशी बोलून निर्णय देतील, असे वडेट्टीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, महापौरपद कोणाला द्यायचे, याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. महाविकास आघाडीकडे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती ही पदे राहिली पाहिजेत, यातून तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्या वतीने आयोजित १९ व्या ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ (एसआयएटी २०२६) चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील वाहन उद्योगासाठी प्रमाणन, संशोधन व विकास क्षेत्रात एआरएआय अग्रगण्य भूमिका बजावते. हा आंतरराष्ट्रीय तांत्रिक परिसंवाद शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पर्यंत मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभास टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा, फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व एआरएआय गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रसन फिरोदिया, एआरएआयचे संचालक व एसआयएटी २०२६ सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व एसआयएटी २०२६ चे निमंत्रक डॉ. एन. एच. वाळके यांच्यासह अनेक मान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एआरएआयच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या १९ व्या एसआयएटीची मध्यवर्ती संकल्पना ‘इनोव्हेटिव्ह पाथवेज फॉर सेफ अँड सस्टेनेबल मोबिलिटी’ अशी आहे. सुरक्षित व शाश्वत गतिशीलतेसाठी नाविन्यपूर्ण उपायांवर जागतिक नेते, तंत्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि नवोन्मेषक यांना एकत्र आणणे हा या परिसंवादाचा उद्देश आहे. यावेळी एआरएआयच्या वतीने ‘ग्लोबल ऑटोमोटिव्ह सेफ्टी रेग्युलेशन्स बुक’, ‘एसआयएटी २०२६ प्रोसिडिंग्ज’ आणि ‘टेक्निकल रेफरन्स बुलेटीन’ यांचे प्रकाशनही करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात एच. डी. कुमारस्वामी यांनी भारताच्या ऑटोमोटिव्ह परिसंस्थेमध्ये एआरएआयने दिलेल्या ६० वर्षांच्या योगदानाचे कौतुक केले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, उत्पादन, निर्यात, संशोधन-विकास आणि सॉफ्टवेअर-आधारित गतिशीलता उपायांमध्ये वाहन उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. युरोपियन युनियनसोबत झालेल्या करारांमुळे भारतीय वाहन उद्योगाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॅपिटल गुड्स स्कीम, फेम योजना, पीएलआय योजना, पीएम ई-ड्राइव्ह योजना आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन यांद्वारे केंद्र सरकार शाश्वत व स्वच्छ गतिशीलतेला प्रोत्साहन देत असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. सार्वजनिक वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे व चार्जिंग पायाभूत सुविधा विस्तारण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शैलेश चंद्रा यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगात होत असलेल्या जागतिक बदलांवर प्रकाश टाकत, भारताच्या वाढत्या जागतिक स्थानाची माहिती दिली. शाश्वत विकास, ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या माध्यमातून एसआयएटीने गेल्या अनेक दशकांपासून ज्ञानविनिमयाची प्रभावी भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
‘न्यू नॉर्मल’ला भारताचा ठाम नकार
नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तानने नेहमीच विनाकारण कुरापती काढल्या असून, भारत आणि भारतीय जनतेला नुकसान पोहोचवणे हाच त्याचा एकमेव अजेंडा राहिला आहे अशी जोरदार टीका भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केली. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानचा […] The post ‘न्यू नॉर्मल’ला भारताचा ठाम नकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशभरात ‘यूजीसी’ नवीन नियमांचा विरोध
नवी दिल्ली : देशभरात जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी आणि सवर्ण जातीच्या लोकांचा विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या नवीन नियमांना घेऊन विरोध तीव्र झाला आहे. नवी दिल्लीत यूजीसी मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, रायबरेली, वाराणसी, मेरठ, प्रयागराज आणि सीतापूरमध्ये विद्यार्थी, तरुण आणि विविध संघटनांनी जागोजागी निदर्शनांमध्ये भाग घेतला. रायबरेलीमध्ये भाजप किसान नेते रमेश बहादूर […] The post देशभरात ‘यूजीसी’ नवीन नियमांचा विरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात राजस्थानच्या तरुणीची आत्महत्या:बालेवाडीत गळफास घेऊन जीवन संपवले, अकस्मात मृत्यूची नोंद
पुण्यात एका २० वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली आहे. दुर्गा घीसाराम चौधरी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बालेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गा मूळची राजस्थानमधील पाली येथील रहिवासी होती. ती गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पुण्यात तिच्या मामाकडे राहत होती. तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मामाच्या ओळखीने एका मेडिकलमध्ये काम करण्यासाठी पुण्यात आली होती. आज सकाळी ती राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच बालेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली नाही. मात्र, मामा आणि मामी घरगुती कामावरून त्रास देत असल्याने दुर्गाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या आरोपांची खातरजमा करत आहेत. मामाकडे याबाबत अधिक चौकशी केली जाणार आहे. चार वर्षांपूर्वी याच पद्धतीने बहिणीची आत्महत्या दुर्गा चौधरी ही तिच्या १९ वर्षीय भावासोबत बालेवाडी येथील मामाच्या टू बीएचके फ्लॅटमध्ये राहत होती. चार वर्षांपूर्वी तिची बहीण देखील मामाकडे राहण्यास आली होती. मात्र कोणत्यातरी कारणावरून तिने देखील याच पद्धतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा दुर्गा हिने आत्महत्या केल्याने तिच्या कुटुंबीयांनी मामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. बालेवाडी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहे.
पुणे येथील सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (एसआययू) येथे रोटरी पीस सेंटरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. हे केंद्र शांतता आणि विकास क्षेत्रातील नेतृत्वासाठी एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा कार्यक्रम 'ब्लेंडेड लर्निंग' स्वरूपात राबवणार आहे. या कार्यक्रमासाठी अर्ज 1 फेब्रुवारी ते 15 मे 2026 दरम्यान खुले असतील. रोटरीच्या एसआययू येथील पीस सेंटरच्या सेंटर हेड डॉ. सुलक्षणा सेन यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, 'एसआययू येथील रोटरी पीस सेंटर व्यापक आशिया क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन स्थापन करण्यात आले आहे. येथे इंटर-डिसिप्लिनरी दृष्टिकोन आणि अनुभवाधारित शिक्षण यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.' हा कार्यक्रम शांतता आणि विकासाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मिड-लेव्हल व्यावसायिकांना शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा समतोल साधण्यास मदत करेल. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आशियातील सामाजिक परिवर्तनासाठी शाश्वत, परिणामकारक आणि कृतीयोग्य उपाययोजना विकसित करणे हा आहे. विशेषतः संघर्ष निवारण, शांतता प्रस्थापना, विकास धोरणे आणि नेतृत्व कौशल्ये या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. सध्या रोटरी इंटरनॅशनल आपल्या आठ पीस सेंटर कार्यक्रमांद्वारे जगभरातील शांतता आणि विकास क्षेत्रातील उदयोन्मुख नेत्यांना दरवर्षी सुमारे 170 पूर्णतः वित्तपुरवठा केलेल्या फेलोशिप्स प्रदान करते. या फेलोशिप्समुळे निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षण शुल्क, निवास, प्रवास आणि इतर आवश्यक खर्चासाठी आर्थिक सहाय्य मिळते. 2002 पासून आजपर्यंत रोटरी पीस सेंटर्सने 1,800 हून अधिक व्यक्तींना शांतता-निर्मिती क्षेत्रातील करिअरसाठी प्रशिक्षण दिले आहे. हे माजी विद्यार्थी आज शासकीय व अशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेतृत्वाच्या भूमिका बजावत असून, जागतिक शांतता आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अधिक माहितीसाठी, rotary.org/peace-fellowships या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पक्षाला पुण्यात उपमहापौर पद मिळावे:रामदास आठवले यांची मागणी; जानराव यांच्यावर कारवाई नाही
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. तसेच, पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जानराव यांच्याबाबत काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचे आठवले म्हणाले. मुंबई येथे रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले आणि माजी नगरसेवक जयदेव रंधवे आदी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. एक उमेदवार केवळ १३८ मतांनी पराभूत झाला, तर दोन उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ही पक्षासाठी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी असल्याचे आठवले यांनी नमूद केले. मागील कार्यकाळाप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे, यासाठी आपण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे दोन्ही नेत्यांनी मत व्यक्त केल्याचे आठवले यांनी सांगितले. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब जानराव यांच्याविरोधात खोटे आरोप करत वर्तमानपत्रांत बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब जानराव हे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची शिस्त सर्वांनी पाळावी आणि कोणीही कार्यकर्त्यांची बदनामी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. रामदास आठवले यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच निष्ठेने काम करून पुणे महानगरपालिकेत पक्षाचे नगरसेवक निवडून आणता आले, असे बाळासाहेब जानराव यांनी सांगितले. पक्षाला उपमहापौर पदासह इतरही जबाबदाऱ्या मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शहराध्यक्ष संजय सोनावणे यांनी इशारा दिला की, शहरातील कोणत्याही ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप करून वर्तमानपत्रे व समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
पुणे ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई केली आहे. शिरूर शहरातील एका गॅरेज चालकाच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या साखळीचे धागेदोरे थेट अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. या कारवाईत एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १० किलो ७०७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेले हे अंमली पदार्थ श्रीरामपूर येथील मे २०२५ मध्ये जप्त केलेल्या गुन्ह्यातील पोलिस मुद्देमालातून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिली. भारत सरकारच्या 'नशामुक्त भारत' अभियानाच्या पार्श्वभूमीवर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी अंमली पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले होते. दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरूर शहरातील गॅरेज चालक शादाब रियाज शेख हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे, १८ जानेवारी रोजी मध्यरात्री बाबुरावनगर परिसरात सापळा रचून छापा टाकण्यात आला. या कारवाईत आरोपी शादाब रियाज शेख (वय ४१) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो ५२ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात शादाब शेख याने हा अंमली पदार्थ ज्ञानदेव ऊर्फ माउली शिंदे, ऋषीकेश चित्तर आणि महेश गायकवाड (सर्व रा. अहमदनगर जिल्हा) यांच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या तिघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून आणखी ९ किलो ६५५ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी व एक चारचाकी वाहनही हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणातील हा अंमली पदार्थ आरोपी ऋषीकेश चित्तर यास शामसुंदर विश्वनाथ गुजर (वय ३९) याने पुरविल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, आरोपी शामसुंदर गुजर हा अहमदनगर जिल्हा पोलिस दलात पोलिस हवालदार पदावर कार्यरत असून, त्याने मुद्देमाल कक्षातील अंमली पदार्थाचीच विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव. पण छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर गावाने लोकशाहीचा असा एक चेहरा पाहिला, जो काळजावर कायमचा कोरला जाईल. दरवर्षी ध्वजारोहणासाठी कोणीतरी 'मोठा' किंवा 'प्रतिष्ठित' माणूस शोधला जातो. पण यंदा सरपंच नीता सुनील गिऱ्हे यांनी काळजाला हात घालणारा एक असा निर्णय घेतला की, अख्ख्या गावाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांची छाती अभिमानाने भरून आली. सरपंच नीता सुनील गिऱ्हे यांनी ध्वजारोहणाचा सर्वोच्च मान कुणा नेत्याला किंवा धनदांडग्याला नाही, तर गेल्या दोन दशकांपासून उन्हातान्हात गावचा कचरा आणि नाले उपसणाऱ्या शाहू महाराज आदमाने (ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर आदमाने यांचे वडील) यांना दिला. ज्या हातांना समाजाने नेहमी 'स्वच्छते'च्या कामासाठी वापरले, त्याच हातांना आज गावाने कृतज्ञतेने 'सलामी' दिली! ती अस्वस्थ रात्र... आणि तो पांढरा शुभ्र वेश रविवारी रात्री जेव्हा शाहू आदमाने यांच्या कानावर हा निरोप गेला की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुमच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तेव्हा क्षणभर त्यांचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. कदाचित कोणीतरी आपली थट्टा करतंय, असं त्यांना वाटलं. पण जेव्हा खात्री पटली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. ज्या हातांना समाजाने नेहमी लांबून पाहिलं, ज्या हातांशी हस्तांदोलन करताना अनेकांनी संकोच केला, ते हात थेट देशाच्या अस्मितेचा प्रतीक असलेल्या तिरंग्याला स्पर्श करणार होते! 20 वर्षांच्या कष्टाचा मिळालेला पांढरा शुभ्र सन्मान एका बाजूला कृतज्ञतेचा भार आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यातल्या सर्वात मोठ्या सोहळ्याची ओढ... आनंदाच्या भरात रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दुकान गाठलं आणि आयुष्यभर मळक्या कपड्यात राबलेल्या त्या देहासाठी त्यांनी आयुष्यातला पहिला कोरा करकरीत, पांढरा शुभ्र पोशाख खरेदी केला. तो पोशाख केवळ कापड नव्हता, तर त्यांच्या 20 वर्षांच्या कष्टाचा मिळालेला पांढरा शुभ्र सन्मान होता. थरथरणारे हात आणि दाटलेला कंठ! सोमवारी सकाळी शाहू आदमाने सर्वात आधी ग्रामपंचायतीच्या अंगणात हजर झाले. जेव्हा त्यांच्या हातात तिरंग्याची दोरी देण्यात आली, तेव्हा त्यांचे हात स्पष्टपणे थरथरत होते. ती थरथर भीतीची नव्हती, तर ती 20 वर्षांच्या उपेक्षेचा अंत होऊन मिळालेल्या सन्मानाची होती. दोरी ओढताना त्यांचा कंठ दाटून आला. ज्या खडबडीत आणि रापलेल्या हातांनी आयुष्यभर गावची घाण उपसून गाव रोगमुक्त ठेवलं, तेच प्रामाणिक हात आज राष्ट्रध्वजाची दोरी ओढून माणुसकीचा झेंडा आकाशात उंच करत होते. आकाशातून फुलांचा वर्षाव झालाच, पण त्याहून मोठा वर्षाव गावकऱ्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंचा झाला. भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचाही सन्मान गावातील ज्येष्ठ अधिक कष्टाळू नागरिक आसाराम सांगळे यांनाही जिल्हा परिषद शाळेसमोरील ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. हा सन्मान मिळाल्याने तेही भारावून गेले होते. यावेळी त्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बाळापूरच्या सरपंच नीता गिऱ्हे, उपसरपंच अर्जुन जौक, ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई पवार, सुनीताबाई अवताडे, वंदनाबाई वाघ, आकाश बांगर, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अवताडे, गणेश वाघ, शरद पवार, जनार्दन वाघ, सुनील वाघ, आसाराम सांगळे, शाळेचे मुख्याध्यापक विवेक पिटेकर, शिक्षिका प्रतिभा सुरासे, अंगणवाडी शिक्षिका मीरा जौक, रुखमन जौक, अर्चना जौक, सोनाबाई गिऱ्हे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
‘वंदे भारत’च्या सेवेक-यांचे हाल
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची सर्वांत प्रिमियम असलेली ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस. वंदे भारत ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर […] The post ‘वंदे भारत’च्या सेवेक-यांचे हाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताचा ‘ईयू’सोबत मुक्त व्यापार करार
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमध्ये भारताने युरोपियन युनियनसोबत आपली मैत्री आणखी मजबूत केली आहे. भारताने एव सोबत मुक्त व्यापार करार केला आहे. ज्याला मदर ऑफ ऑल डिल्स असे म्हटले जाते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे कॅनडाही भारतासोबत संबंध मजबूत करण्याचा विचार करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान […] The post भारताचा ‘ईयू’सोबत मुक्त व्यापार करार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने उत्तर आणि पश्चिमेकडील सीमांच्या आसपास शत्रूच्या ड्रोनवर नजर ठेवून त्याला तातडीने पाडण्याची जबाबदारी सांभाळली आहे. सीमेच्या ३५ किलोमीटर परिसरात ३ किमीपर्यंत उंचीवर जर एखाद्या शत्रूचे ड्रोन घुसखोरी करत असेल तर त्याच्यावर सैन्याकडून कारवाई केली जाते. भारतीय सैन्याने हे पाऊल देशाच्या पश्चिम आणि उत्तरेकडील सीमांवर घुसखोरी आणि हेरगिरी करणा-या शत्रू ड्रोनच्या […] The post पाकचे ड्रोन दिसताच पाडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट!
मुंबई : मुंबईतील मालवणी परिसरातून एक दुर्घटना समोर आली आहे. एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चाळीला आग लागल्याचे समोर आले आहे. या स्फोटात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मालवणी गेट क्रमांक ८ जवळ भारतमाता शाळेजवळील एसी मशिदीनजीकच्या चाळीत सकाळी घडली. या घटनेची माहिती सकाळी ९:२५ वाजता बीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. […] The post मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणेच्या घटनेची पुनरावृत्ती
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे दीप्ती चौधरी या विवाहितीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, तिची सासू सरपंच, तिचे सासरे मुख्याध्यापक असताना त्यांच्याकडून वारंवार तिला माहेरावरून लाखो रुपये आणण्यास सांगितले जात होते. गेल्या वर्षभरात हुंडा मागणीच्या त्रासाला किंवा सासरच्या जाचाला कंटाळून अनेक महिलांनी आत्महत्या केल्याच्या […] The post पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणेच्या घटनेची पुनरावृत्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : प्रतिनिधी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारकडून भरपाई स्वरूपात दिले जाते. मात्र, गेल्या दशकभरात ही रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे राज्य सरकारवर आता सुमारे २,४०० कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात आरटीई प्रतिपूर्तीसाठी केवळ १७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र ४५ ते […] The post खासगी शाळांचे २,४०० कोटी थकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथे घरातील लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून भावजयीचा खून केल्याच्या आरोपावरून दिरास जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एन. माने गाडेकर यांनी मंगळवारी ता. २७ दिला आहे. याबाबत जिल्हा सहायक सरकारी वकील एस. एन मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील जोडतळा येथील सविता जाधव ह्या तारीख 22 जुलै २०२० रोजी शेतात जेवण करीत बसल्या होत्या. यावेळी त्यांचा दीर रामेश्वर जाधव हा शेतामध्ये आला त्यांनी मागचा पुढचा विचार न करता सविता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. यामध्येच सविता यांचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी रामकिशन काळबांडे यांनी बासंबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी रामेश्वर जाधव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बासंबा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या पथकाने अधिक तपास करून हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एस.एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. या प्रकारात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी रामेश्वर समाधान जाधव, वय २७ यास दोषी ठरवत जन्मठेप तसेच रू.५०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.दिली. दंडाची पूर्ण रक्कम मयत सविताचे तिन्ही मुलांना देण्यात यावी असा देखील आदेश न्यायालयाने दिला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना सहायक सरकारी वकील सविता एस. देशमुख (जाधव), ॲड एस.डी. कुटे यांनीही सहकार्य केले. सदर प्रकरणी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक ए.डी. डोईजड यांनी काम पाहिले
घातक निपाह व्हायरसचा देशात शिरकाव!
नवी दिल्ली : भारतावर आणखी एक नवे संकट ओढवले आहे. खतरनाक निपाह व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने या घटनेची दखल घेत राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक बंगालमध्ये पाठवले आहे. बंगालमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आता इतर राज्यांमध्येही […] The post घातक निपाह व्हायरसचा देशात शिरकाव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हीच योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचे बोलले जाते. परंतु, लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली असतानाच आता जळगावतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. 1 लाख लाडक्या बहीणींचे पैसे रखडल्याने महिलांनी थेट महिला व बाल विकास कल्याण केंद्रावर धाड टाकल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर कार्यालयात घुसून या महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. जळगाव जिल्ह्यात जवळपास 10 लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीच्या आधी मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जळगावमधील सुमारे 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आम्ही सर्व कागदपत्रे दिली, केवायसी केली, तरीही आमचे पैसे का कापले? असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला आहे. केवायसी करूनही तांत्रिक कारणास्तव लाभ मिळत नसल्याने अखेर महिलांनी थेट महिला व बाल विकास कार्यालाय गाठले. केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पात्र महिलांना काही अडचणी असल्यास 181 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. मात्र, या हेल्पलाइनवर फोन लागतच नाही. सरकार फक्त घोषणा करत आहे, पण जमिनीवर आम्हाला मदत ऐवजी मनस्ताप मिळत असल्याचा आरोप या आंदोलक महिलांनी केला आहे. दरम्यान, शेकडो महिला अचानक कार्यालयात घुसल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच लवकरात लवकर तांत्रिक त्रुटी दूर करून रखडलेले पैसे खात्यात जमा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे. आता 1 लाख महिलांचे रखडलेले पैसे कधी मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ई-केवायसीची मुदत वाढणार अनेक पत्र महिलांना ई-केवायसीमध्ये अडचणी येत असल्याने त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यात आता केवायसी करण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी देण्यात आले आहे. परंतु, महिलांना येत असलेल्या अडचणींचा विचार सरकारकडून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. याबाबतीत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माहिती दिली आहे. हिंगोलीत बोलत असताना नरहरी झिरवाळ यांनी राज्य सरकारकडून ई-केवायसीची मुदत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ज्या महिलांचे केवायसीमुळे 1500 रुपयांचा हप्ता बंद झाला आहे, आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ज्यांना ओटीपीची अडचण येत आहे, त्यासाठी आता फिजिकल व्हेरीफिकेशन देखील करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा लाडक्या बहीणींचे 2100 रुपये करणार:'एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता', DCM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देण्याचा शब्द पाळणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत 'एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता', असा डायलॉगही शिंदेनी मारला. वाचा सविस्तर
डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद:चालकच सूत्रधार, छत्रपती संभाजीनगरचे चार आरोपी अटक
ऊरूळी कांचन परिसरात एका डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार आणि खंडणीची रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. याप्रकरणी ऊरूळी कांचन पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १४०(२), १४०(३), १२६(२), १२७(२) सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, व्यवसाय डॉक्टर, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) हे १० जानेवारी रोजी रात्री सोलापूर–पुणे महामार्गाने आपल्या कारने घरी जात होते. इनामदार वस्ती परिसरात पांढऱ्या रंगाच्या इरटीगा कारने त्यांच्या वाहनाला अडवण्यात आले. त्यानंतर चार आरोपी डॉक्टरांच्या कारमध्ये जबरदस्तीने बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांचे अपहरण केले आणि त्यांना मारहाण केली. आरोपींनी डॉक्टरांना शिंदवणे परिसरात नेऊन ४ लाख रुपयांची खंडणी घेतली आणि त्यांना चौफुला येथे सोडून दिले. त्यानंतर आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी १२ जानेवारी रोजी १५ लाख रुपये दिले. अशा प्रकारे एकूण १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलीस ठाण्याची दोन पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान डॉक्टरांचा ड्रायव्हर राजेंद्र छगन राजगुरु याच्यावर संशय बळावला. चौकशीत त्यानेच साथीदारांच्या मदतीने अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानुसार संतोष बनकर (वय ३६, रा. अनंतपूर, पैठण, संभाजीनगर), दत्ता ऊर्फ गोटू आहेर (वय ३४, रा. अनंतपूर, पैठण, संभाजीनगर) आणि सुनील ऊर्फ सोनू मगर (वय ३०, रा. गारखेडा, संभाजीनगर) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पांढऱ्या रंगाची इरटीगा कार (किंमत ८ लाख रुपये) आणि ७ लाख ८० हजार रुपयांची खंडणीची रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी एकतर्फी प्रेमातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी येथे एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाच्या तपासातून हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी पाच खुनांचा आरोप असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा आणि सुपा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी खैरेपडळ परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. घटनास्थळी सापडलेल्या एका लहान डायरीच्या आधारे साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. फुटेजमधील संशयित व्यक्ती जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे खुर्द, ता. खेड) असल्याची ओळख पटली. त्याला खेड परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी जैतू बोरकर याचे मृत रंजना अरुण वाघमारे (वय २५, रा. खांडपे, ता. कर्जत, जि. रायगड) हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. रंजनाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने, १७ जानेवारी रोजी जैतूने तिच्या साथीदार सुरज अंकुश वाघ (वय ३०, रा. वांगणी, ता. बदलापूर, जि. ठाणे) याचा कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर त्याने रंजनाला जबरदस्तीने सुपा परिसरात आणले. १८ जानेवारी रोजी रंजनाने पुन्हा नकार दिल्याने आणि पोलीस तक्रारीची भीती वाटल्याने आरोपीने दगडाने मारून तिचाही खून केला. आरोपी जैतू बोरकरला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आले आहे की, आरोपीवर यापूर्वीही खुनाचे गुन्हे दाखल आहेत आणि तो एक सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करत आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या मुद्यावर ठाकरेंशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवारांनी ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगितल्यामुळे चंद्रपुरात सत्ता स्थापन करण्याचा तिढा जवळपास सुटल्याचे मानले जात आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येते सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही बड्या पक्षांनी इतर पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रयत्नांतर्गत मंगळवारी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची मदत मागितली. त्यावर ठाकरेंनी महापौर पद व स्थायी समितीचे अध्यक्षपद प्रत्येकी अडीच वर्ष वाटून घेण्याच्या अटीवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले. काय म्हणाले विजय वडेट्टीवार? उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासंदर्भात मी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आमच्या प्रस्तावाला ठाकरेंनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी त्यांची 100 टक्के इच्छा आहे. त्यांनी आमच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला आहे. महापौर पद हे अडीच-अडीच वर्षांसाठी होत असेल तर तशी तयारी केली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय स्थायी समिती सुद्धा अडीच-अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांना मिळायला हवी असे ते म्हणालेत. या प्रकरणी आमच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून आमचा निर्णय मी त्यांच्या कानावर घालेन. या प्रकरणी काही अडचण येईल असे मला वाटत नाही. कारण, राज्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे चंद्रपूरमध्येही एकत्र आलो तर आम्हाला अधिक मजबुतीने काम करता येईल. त्यातून चांगलेच घडेल असे मला वाटते. ठाकरेंच्या प्रस्तावाला आमची काहीही अडचण नाही. माझ्या मते, संख्याबळ अगदी काठावर असूनच चालत नाही. मजबूत संख्याबळ असेल तर महापालिकेत 5 वर्षे काम करता येते. चांगले निर्णय घेता येतात. खुर्चीवर बसणाऱ्यांनाही चांगल्या पद्धतीने काम करता येते, असे वडेट्टीवार म्हणाले. पहिली अडीच वर्षे काँग्रेसला संधी देण्याची विनंती ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी महापौर कुणाचा असावा? यासंबंधीही एक अट ठेवली आहे. महापौर ठरवताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिडे यांच्याशी चर्चा करून समन्वयाने एक नाव निवडावे असे त्यांनी सूचवले. त्यांची ही भूमिकाही आम्हाला मान्य आहे. शेवटी महापौर पदावर बसणाऱ्या व्यक्तीने सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे गरजेचे असते. आम्ही त्यांच्यापुढे पहिली अडीच वर्षे काँग्रेसला संधी देण्याची विनंती केली. त्यावर ते त्यांच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधून आपला निर्णय कळवणार आहेत. आम्हीही या प्रकरणी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. भाजप आमदारांनीही घेतली फडणवीसांची भेट दरम्यान, भाजप आमदार किशोर जोरगेवार व आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चंद्रपूर महापालिकेतील राजकीय समीकरणांवर चर्चा केली. ही भेट ही चंद्रपुरात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. याचा परिणाम म्हणून आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. उपोषण सुरू असताना हैदराबादसह सातारा गॅझेट देखील लागू करण्याचे मान्य करण्यात आले होते. परंतु, अद्याप सातारा गॅझेट लागू झाले नसल्याने मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता. याच संदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आजच्या बैठकीत सातारा गॅझेटियरवर प्रामुख्याने चर्चा झाली आहे. तसेच हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणी आणि मराठा आरक्षण विषयावर आढावा घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेटियर लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सातारा गॅझेट लागू करण्यास अडचणी येत असल्याचे म्हटले जात आहे. आजच्या झालेल्या बैठकीनंतर, फक्त इंटरप्रिटेशनचा भाग असल्याने या संदर्भात देखील लवकरच निर्णय होणार असून समज-गैरसमज दूर करत मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. सुरुवातीला नगरपालिका, मग महापालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारला मोठे निर्णय घेता आले नसल्याचे समजते. आता जिल्हा परिषदेच्या तसेच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर सातारा गॅझेटियर लागू केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आणखी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी देखील या निमित्ताने पूर्ण होणार असल्याचे दिसते.
गिरीश महाजनांकडून दिलगिरी व्यक्त
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हेच संकटात सापडले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तिथे उपस्थित असलेल्या महिला वन अधिका-याने त्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. वन कर्मचारी माधवी जाधव यांनी, संविधान निर्मात्यांचे नाव […] The post गिरीश महाजनांकडून दिलगिरी व्यक्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या अहिल्यानगरच्या एका पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. हा कर्मचारी जप्त केलेल्या अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्या या कृत्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. सध्या या प्रकरणात आणखी काही पोलिसांचा हात आहे का? याचा तपास केला जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, श्यामसुंदर गुजर असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो अहिल्यानगर पोलिस दलात कार्यरत आहे. त्याच्यावर जप्त केलेल्या अमली पदार्थांची मुद्देमाल कक्षातून चोरी करून विक्री केल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांना गत 17 जानेवारीला शिरूर तालुक्यातील शादाब शेख नामक गॅरेज चालक अमली पदार्थांच्या विक्रीसाठी शहरात येणार असल्याची खबर मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले होते. तसेच त्याच्याकडून 1 किलो अमली पदार्थ जप्त केले होते. कसा झाला गुन्ह्याचा उलगडा? शादाब शेखच्या चौकशीत त्याने हे अमली पदार्थ अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या असता त्यांच्याकडे उर्वरित 9 किलो 655 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ आढळले. या आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कसे मिळवले? असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानुसार, त्यांनी पुढील तपास केला. त्यात पोलिस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुजर याने या आरोपींना हे अमली पदार्थ दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पुणे पोलिसांनी आज श्यामसुंदर गुजर यालाही अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत 10 किलो 707 ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पोलिस कर्मचारी मुद्देमाल कक्षात ठेवलेल्या अमली पदार्थांची चोरी करून त्याची विक्री करत होता. यासाठी त्याने वरील आरोपींची मदत घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणी अमली पदार्थांसह गुन्ह्यात वापरलेली वाहनेही जप्त केली आहेत. अहिल्यानगर पोलिसांनी मे 2025 मध्ये श्रीरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त केलेला हा मुद्देमाल होता. श्यामसुंदर गुजरने गत डिसेंबर महिन्यात तो मुद्देमाल कक्षातून चोरला होता. आरोपी पोलिस नेमकी कशी करत होता चोरी? पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ कोर्टाच्या आदेशानुसार सील केले जातात. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ते मुद्देमाल कक्षात ठेवले जातात. श्यामसुंदर गुजर जप्त केलेला मुद्देमाल काढून त्या जागी तशाच दिसणाऱ्या वस्तू ठेवत होता. पोलिसांच्या मते, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश आहे का? याचा तपास सुरू केला आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथून बेपत्ता झालेल्या १८ वर्षांच्या तरूणाने महाबळेश्वरच्या केटस् पॉइंटवरून ४०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (वय १८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण), असं त्याचं नाव आहे. त्याने सीईटी परीक्षेचा फॉर्म भरला नव्हता. त्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा ढेबेवाडी पोलिसांना संशय आहे. भगवतसिंह सोळंकी हा १८ वर्षांचा तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याने सीईटीचा फॉर्म भरला नव्हता. त्यामुळे काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. फॉर्म न भरण्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. मूळचे राजस्थानचे असलेले सोळंकी कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या २० वर्षांपासून ढेबेवाडीमध्ये स्थायिक आहे. ढेबेवाडी बाजारपेठेत त्यांचा बेकरी आणि स्वीटस्चा व्यवसाय आहे. याच कुटुंबातील तो धाकटा मुलगा होता. २३ जानेवारीपासून होता बेपत्ता भगवतसिंह सोळंकी हा शुक्रवारी (२३ जानेवारी) कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. मिसिंगचा मेसेज सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना गेला होता. त्याच्या मोबाईलचे लोकेशन महाबळेश्वरच्या केटस् पॉइंट परिसरात दाखवत होते. त्यामुळे पाचगणी पोलिसांनी सह्याद्री ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण केले. ४०० फूट खोल दरीतून काढला मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, सुनील केळगणे, जयवंत बिरामने, पृथ्वी बिरामने, सौरभ गोळे, सौरव सालेकर, अक्षय नाविलकर, विशू सपकाळ, आतेश धनावडे, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, आशिष बिरामने यांनी केटस् पॉइंटवरील ४०० फूट खोल दरीत उतरल्या. त्यावेळी त्यांना १८ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेह दरीतून वर आणल्यानंतर पाचगणी पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. रुग्णालयात मृत तरुणाचे कुटुंबीय, पाचगणी आणि ढेबेवाडी पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. मुलाचा मृतदेह पाहून सोळंकी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एस. डाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धीरज मुळे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मंत्र्यांनी नाक घासलेय, आता विषय फार ताणू नका
मुंबई : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन वादात सापडले आहेत. वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेत अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे […] The post मंत्र्यांनी नाक घासलेय, आता विषय फार ताणू नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाजनांविरोधात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार : प्रकाश आंबेडकर
नाशिक : प्रतिनिधी देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) देशभर साजरा करण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील पोलिस संचलन मैदान येथे ध्वजारोहण केले. मात्र त्यानंतर गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळला. त्यावरून आता वाद होताना दिसत आहे. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठावर […] The post महाजनांविरोधात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार : प्रकाश आंबेडकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते का? : वडेट्टीवारांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी ‘हे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालले आहे की लोकशाहीने, याचे उत्तर जनताच मागेल. संविधानावर विश्वास नसणा-यांनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटत असणा-यांचे सत्तेत राहणे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी […] The post डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते का? : वडेट्टीवारांचा सवाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; अंजली भारती बरळल्या
भंडारा : प्रतिनिधी गायिका अंजली भारती यांच्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत निषेध केला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. हे वक्तव्य […] The post अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य;अंजली भारती बरळल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी महायुती सरकारला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांच्या असंतोषाला कारणीभूत ठरत आहे. भंडारा, बुलडाणा आणि वाशिमनंतर जळगाव, पुणे, नागपूर, लातूर आणि धाराशिव जिल्यातील लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळत नसल्याने हजारो महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक […] The post योजनेचे पैसे लवकरात लवकर द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केल्याची घटना आज सकाळी घडली. नगर परिषदेच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्याने आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले होते. नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करण्याची अपेक्षा असताना, त्यांनी ती केल्याने संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नगर परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेत ध्वजवंदनाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांची प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र, ज्या संविधानामुळे प्रजासत्ताक दिन साजरा होतो, त्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमात कोठेही दिसली नाही. प्रशासनाच्या या कृतीला 'अवमान' मानत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन आणि शाईफेक या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी आज सकाळी मोठ्या संख्येने विविध संघटना आणि विविध पक्षांनी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी अपेक्षा आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केली. मात्र, नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिलगरिी व्यक्त न केल्याने आंदोलकांचा संताप अनावर झाला आणि काही कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अंगावर शाई फेकत, जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल शाईफेकीच्या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांनी प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने २७ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेला देशव्यापी बँक संप यशस्वी झाला. पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण व्हावी, यासाठी हा संप करण्यात आला होता. या संपात सर्व राष्ट्रीयकृत बँकांतील कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यात स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेसमोर सर्व बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. मार्च २०२४ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची मागणी मान्य करण्यात आली होती. मात्र, या कराराला जवळपास दोन वर्षे पूर्ण होत असतानाही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळेच बँक कर्मचाऱ्यांना संपाचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी माहिती स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस राजेश मुळे यांनी दिली. सध्या बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौटुंबिक व वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ देता येईल, असे मुळे यांनी नमूद केले. बँक कर्मचारी यांच्या कामकाजात सातत्याने ताणतणाव असतो त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळणे देखील गरजेचे आहे. इन्शुरन्स, रिझर्व्ह बँक, तसेच शेअर मार्केटसह अनेक वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसीय कामकाजाची अंमलबजावणी होत असताना, बँकिंग क्षेत्रात मात्र याबाबत होत असलेल्या दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. केंद्र सरकारने लवकरात लवकर पाच दिवसीय बँकिंग आठवड्याची अंमलबजावणी न केल्यास, भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाची आंदोलने व संप करण्यात येतील, असा इशाराही राजेश मुळे यांनी दिला.
महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता सर्वोच्च न्यायालयाने आता 18 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरच सुनावणी होईल हे स्पष्ट झाले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने शिवसेनेची सुनावणी 21 व 22 जानेवारी रोजी सलग 2 दिवस घेण्याचे निश्चित केले होते. पण 21 तारखेला सुप्रीम कोर्टाने ऐनवेळी अरावली पर्वताचे प्रकरण हातावर घेतल्यामुळे या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. त्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारी रोजी होईल असे सांगण्यात येत होते. पण त्या दिवशीही हे प्रकरण बोर्डावर आले नाही. अखेर आज सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 18 फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हाती घेतले जाईल हे स्पष्ट केले आहे. सु्प्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर ही तारीख नमूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणाची सुनावणी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर घेण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष करत ही सुनावणी या निवडणुकांचा निकाल घोषित झाल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी घेण्याचे निश्चित केले आहे. काय आहे वादाचे नेमके प्रकरण? शिवसेना पक्षात 2022 च्या मध्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उभी फूट पडली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगने शिंदे यांच्या नेतृत्वातीलच आमदारांच्या बंडखोर गटाला शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका याचिकेद्वारे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनीही एका स्वतंत्र याचिकेद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका निर्णयाला कोर्टात आव्हान दिले आहे. त्यावरही अद्याप ठोस सुनावणी झाली नाही. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाशी संबंधित सर्वच मुद्यांवर एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मागील 3 वर्षांपासून या प्रकरणी कोणतीही ठोस सुनावणी झाली नसल्यामुळे ठाकरे गटाने वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सध्या केवळ 'तारीख पे तारीख' सुरू आहे. संजय राऊत यांनी केली होती टीका उल्लेखनीय बाब म्हणजे सरन्यायाधीश सूर्य कांत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारही उपस्थित होते. या दोघांनीही सरन्यायाधीशांचे स्वागत केले होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कार्यक्रमावर निशाणा साधत शिवसेना प्रकरणाचा निकाल लागल्याची उपरोधिक टीका केली होती. धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला! न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम, असे ते म्हणाले होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या उत्तर प्रदेशातील काशी येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर बुलडोझर चालविण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार, 27 जानेवारी रोजी शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मूक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या काळात देशाचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा संकटात सापडल्याचा आरोप करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 1771 मध्ये वाराणसी स्थित मणिकर्णिका घाटाचे निर्माण केले होते. त्यानंतर 1791 मध्ये या घाटाचे नुतनीकरण करून त्याला नवसंजीवनी दिली होती. हिंदू धर्मात येथे अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो व जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. त्यानंतर आता पुनर्विकासाच्या नावाखाली या घाटाचा काही भाग पाडण्यात आला आहे. यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने मंगळवारी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथे सरकारच्या या कृतीचा निषेध केला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा अधिकार असो, अशा घोषणा देत अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात हे मुक धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारचे कृत्य अत्यंत निषेधार्ह - दानवे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एका राज्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या आदर्श प्रशासक होत्या. त्यांच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक घाट आणि पुतळ्यावर बुलडोझर चालविणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून, भाजप सरकारचा बेगडी हिंदुत्वाचा चेहरा समोर आल्याची भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावेळी मांडली. संविधान आणि महापुरुषांचा सन्मान करण्याचे नाटक करणाऱ्या भाजप सरकारकडून प्रत्यक्षात मात्र वारंवार ऐतिहासिक वारशावर घाव घातला जात आहे. अशा कारवायांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष भारताचा संपूर्ण ऐतिहासिक वारसा संपुष्टात आणण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी करत निषेध व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सामाजिक कार्य आणि सुशासनाचे प्रतीक आहे. त्यांच्या स्मृतीस्थळांवर कारवाई करणे म्हणजे देशाच्या अस्मितेवरच घाव घातल्यासारखे असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील म्हणाले. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख युसूफ, वंचित बहुजन आघाडी नेते योगेश बन,रामेश्वर तायडे, प्रकाश मुगदिया, महेंद्र रमंडवाल, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खेडके, किशोर कच्छवाह, अरविंद धिवर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, विष्णू जाधव, प्रमोद ठेंगडे, गिरीश चपळगावकर, अंजन साळवे,सचिन खैरे,गणेश लोखंडे,सुरेश गायके, संदेश कवडे, गौरव पुरंदरे,राजेंद्र दानवे सचिन वाघ, जयसिंग होलिये, रामेश्वर कोरडे, अजय चोपडे, बापू कवळे, शिवकुमार देशमुख, सुदर्शन छापोले, सिताराम सुरे, दीपक तांबे,सलीम खामगावकर, नितीन पवार, संजय हरणे, कल्याण चक्रनारायण, प्रितेश जैस्वाल, मनोज बोरा, डॉ. नाना पळवदे, विशाल खंडागळे, सुदाम पवार, हिरालाल वाणी, सोमीनाथ नवपुते, वसंत भाई शर्मा, मिलिंद बोरडे, गणेश खोतकर, कोमल हिवाळे, साधना पठारे, मुंजाभाऊ तूपसुंदरे, सुनील जोगदंड, संतोष दळे, पंकज बनसोडे, सचिन तांबे, कृष्णा नजन, किरण तांबे, संतोष रिठे, गणेश रोडगे, विनोद सोनवणे, संतोष तांबे, सागर तांबे,लखन तांबे, सागर तांबे, लक्ष्मण जोशी, दिनेश रिठे, विनोद लोखंडे,कुणाल राऊत, भागीनाथ रिठे, राजू रोठे, शेख कैसर बाबा, उमाकांत खोतकर, शिरीष चव्हाण,कुणाल पाठक, विनोद लोखंडे,अनिल काळे, राहुल पवार, संजय पेरकर सतीश लोखंडे,अभिषेक शिंदे पाटील, राहुल संत, रवी लोखंडे, सुनील साळवे, मुदस्सिर अन्सारी, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार, अरुणा भाटी, मीरा देशपांडे, राजश्री पोकळे, वैशाली कोरडे, दिपाली पाटील बोरसे, रूपाली मुंदडा,जयाबाई तांबे, अर्चना तांबे, सखुबाई नजन, शोभाबाई तांबे, ज्योती जगधने, इंदुबाई तांबे, कविता सोरमारे, योगिता सरोदे, माधुरी सोरमारे, लंका सोलाट, योगिता रीठे, संगीता रिठे, रंजना कोरडे, छाया सोरमारे, मंजू लोखंडे व अरुणा लांडगे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
एका माथेफिरू तरुणाने खासगी शिकवणीला जाणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींना विहिरीत फेकून दिल्याची भयंकर घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. सदर तरुणाने या मुलींना विहिरीत का फेकले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकरी गावात ही घटना घडली आहे. रोहन चौधरी असे आरोपी माथेफिरू तरुणाचे नाव आहे. पीडित मुली इयत्ता 9 वीच्या विद्यार्थिनी आहेत. त्या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे गावातून खासगी शिकवणीसाठी जात होत्या. त्या गावाजवळील एका शेतालगत पोहोचल्या असता तिथे दबा धरून बसलेल्या आरोपीने या दोघींवर हल्ला केला. त्याने त्यांना पकडून एका विहिरीजवळ नेले. त्यानंतर त्यांना पकडून विहिरीत फेकून दिले. हा प्रकार घडत असताना मुलींनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकूण दुसऱ्या एका शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यानी हातातील काम सोडून त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी गावातही ही गोष्ट कळवली. त्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मुलींना दोरखंड व शिडीच्या मदतीने विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हे वृत्त लिहीपर्यंतही त्यांचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला घेतले ताब्यात दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेतले आहे. ते त्याची कसून चौकशी करत आहेत. सदर तरुणाने मुलींना विहिरीत फेकण्याचे विकृत पाऊल का उचलले? हे अद्याप समजले नाही. पण हे प्रकरण जुन्या वादातून घडले का की एकतर्फी प्रेम किंवा इतर कारणांतून घडली? आदी सर्वच अंगाने या प्रकरणाचा तपास केला जात आहे. हे ही वाचा… पुण्यात आईने पोटच्या मुलाचा गळा चिरला:मुलीवरही चाकूने सपासप वार, मुलगा ठार, मुलगी गंभीर; कौटुंबीक वादातून घटना घडल्याचा संशय पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा ठार झाला असून, त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबीक वादातून महिलेने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वाचा सविस्तर
'एका मताने काय फरक पडतो?' याचे उत्तम उदाहरण ठरलेल्या परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील निकालाला आता कायदेशीर वळण लागले आहे. या प्रभागात अवघ्या एका मताने पराभूत झालेले भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांनी निकालाला आव्हान देत थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बोगस मतदान आणि पोस्टल बॅलेटमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रसाद नागरे यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे धाव घेत प्रभाग क्रमांक १ ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. परभणी महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे आणि भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. मतमोजणीअंती डहाळे हे अवघ्या १ मताने विजयी झाले होते. निकालाच्या दिवशीही या एका मतावरून सुमारे ३ तास गोंधळ चालला होता. अखेर निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी डहाळे यांना विजयी घोषित केले होते. मात्र, भाजप उमेदवाराला हा निकाल मान्य नसून त्यांनी आता प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले आहे. याचिकेत करण्यात आलेले खळबळजनक दावे प्रसाद नागरे यांनी उच्च न्यायालयात आणि आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. ज्या पोस्टल मतांच्या जोरावर उबाठा गटाचे उमेदवार विजयी झाले, त्यातील ७ मतदारांची कोणतीही अधिकृत कागदपत्रे निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विजयी उमेदवाराच्या नातेवाईकांनी प्रभागात दोन वेळा मतदान केल्याचा आरोपही प्रसाद नागरे यांनी केला आहे. तसेच काही नातेवाईकांनी इतर शहरांतील नगर परिषदेत मतदान करून पुन्हा परभणी महापालिकेतही मतदान केल्याचे पुरावे याचिकेत दिल्याचा दावा नागरे यांनी केला आहे. एका सामान्य मतदाराला पोस्टल मतदानाचा अधिकार कसा दिला गेला? यावरही प्रसाद नागरे यांनी आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे फेरनिवडणुकीची मागणी आमच्याकडे या गैरप्रकारांचे 'सर्टिफाईड' पुरावे असल्याचा दावा करत भाजप उमेदवारांनी प्रभाग क्रमांक १ ची निवडणूक रद्द करून ती नव्याने पारदर्शकपणे घ्यावी. तसेच या प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे पराभूत उमेदवार प्रसाद नागरे यांनी केली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच परभणीतील या जुन्या वादाने पुन्हा डोके वर काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एका मताने भवितव्य ठरवणाऱ्या या निकालावर आता हाय कोर्ट काय शिक्कामोर्तब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने ही याचिका ग्राह्य धरली, तर परभणीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.
बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने नाराजीचा सूर आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. स्वतः खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रचारात उतरून प्रतिष्ठा पणाला लावली होती, तरीही पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट पक्षातील कारभारावर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. देवराव लुगडे यांनी राजीनामा देताना पक्षात दलालांचा कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. पक्ष संघटनाऐवजी निवडणुकीच्या काळात सुपारीबाज आणि संधीसाधू लोकांना महत्त्व दिले जात असल्यामुळे आपण कंटाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांऐवजी दलाल प्रवृत्तीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. अशा वातावरणात काम करणे शक्य नाही, असे सांगत त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या मते, खासदारांच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे परळी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. लुगडे यांनी या आधीही पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. विकासपुरुष म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असलेला मोठा वर्ग आजही पक्षासोबत असताना, स्थानिक पातळीवर चुकीची धोरणे राबवली जात असल्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण खासदार बजरंग सोनवणे यांना व्हिडिओ कॉल करून तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोपही लुगडे यांनी केला आहे. या दुर्लक्षामुळेच आपल्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले. शरद पवार गटातील धुसफूस वाढली दरम्यान, परळी नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाने शरद पवार गटातील धुसफूस अधिकच वाढली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असून, पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. परळी हा मतदारसंघ पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात असताना, अशा ठिकाणी पराभव होणे ही गंभीर बाब असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच देवराव लुगडे यांच्या राजीनाम्याने केवळ जिल्हा पातळीवर नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर उघड टीका देवराव लुगडे यांनी याआधीही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर उघड टीका केली होती. पक्ष संघटन, उमेदवार निवड आणि भांडवलदारांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याबाबत त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले होते. या भागात पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका, असे सांगत त्यांनी सोनवणे यांना थेट इशारा दिला होता. येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. निवडणुकीच्या वेळी दलाल आणि श्रीमंत लोकांना पुढे केलं जात लुगडे यांनी आपल्या वक्तव्यात कार्यकर्त्यांच्या भावना ठळकपणे मांडल्या होत्या. अडचणीच्या काळात आम्ही पक्ष वाढवायचा, लोकांमध्ये जायचं, आंदोलन करायची, अंगावर खोटे गुन्हे घ्यायचे, हेच आमचं काम. मात्र निवडणुकीच्या वेळी दलाल आणि श्रीमंत लोकांना पुढे केलं जात असेल, तर कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होतो, असे ते म्हणाले होते. पक्षावर हा भांडवलदारांचा आणि श्रीमंतांचा पक्ष आहे, अशी छाप पडू नये, अशी त्यांची ठाम भूमिका होती. हा पक्ष पवार साहेबांच्या विचारांचा असून, चाटुगिरी आणि पुढे-पुढे करणाऱ्यांना प्राधान्य देऊ नये, असे खडेबोल त्यांनी सुनावले होते. संघटनात्मक बांधणीवरही प्रश्नचिन्ह आता देवराव लुगडे यांच्या राजीनाम्यानंतर आणि आरोपांनंतर खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळी नगरपरिषद पराभवाने सुरू झालेला हा वाद केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित न राहता, शरद पवार गटातील संघटनात्मक बांधणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. येणाऱ्या काळात पक्ष नेतृत्व या अंतर्गत नाराजीवर कसा तोडगा काढते आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कसा पुन्हा मिळवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पीछेहाटीवरून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पवार काका-पुतण्यांवर जोरदार प्रहार केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे माध्यमांशी बोलताना हाके यांनी केवळ पवारांनाच नव्हे, तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही 'नतदृष्ट' म्हणत लक्ष्य केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला साधा नारळही फोडता आला नाही आणि अजित पवारांनाही तुटपुंजे यश मिळाले. ओबीसींना डावलून जरांगे पाटलांना साथ देणाऱ्यांना ओबीसी बांधवांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशा जळजळीत शब्दांत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. भुजबळ-मुंडेंना दूर ठेवणे भोवले अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कामगिरीवर बोलताना हाके म्हणाले की, छगन भुजबळ यांना प्रचारापासून दूर ठेवणे आणि धनंजय मुंडे यांना बाजूला करून बजरंग सोनवणे व क्षीरसागर यांना जवळ करणे अजितदादांना महागात पडले आहे. ओबीसी बांधवांनी हे सर्व जवळून पाहिले असून त्याचेच प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात उमटले आहे. माने या न माने, पण ओबीसींनी आता पवारांना नाकारले आहे, असा दावा त्यांनी केला. आरक्षण संपलंय, आता तरी जागं व्हा! पुणे महानगरपालिकेतील आकडेवारीचा दाखला देत हाके यांनी खळबळजनक दावा केला. पुण्यामध्ये ४१ ओबीसी जागांपैकी ३० ते ३२ जागांवर मराठा-कुणबी उमेदवारांनी निवडणुका लढवून विजय मिळवला आहे. याचाच अर्थ ओबीसींचे आरक्षण आता केवळ कागदावर उरले असून प्रत्यक्षात ते संपले आहे, असे ते म्हणाले. तिकीट देताना केवळ 'निवडून येण्याची क्षमता' पाहून गुंड आणि धनदांडग्यांना प्राधान्य दिले जाते, अशी टीकाही त्यांनी अजित पवारांवर केली. गिरीश महाजन नतदृष्ट आहेत प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याबद्दल लक्ष्मण हाके यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा कडक शब्दांत निषेध केला. ज्या महामानवाने देशाला संविधान दिले, त्या बाबासाहेबांचे नाव घेण्याची जर तुम्हाला लाज वाटत असेल, तर महाजन तुम्ही 'नतदृष्ट' आहात. तुम्ही पालकमंत्री म्हणून मिरवायच्या आणि मंत्रिमंडळात काम करायच्या लायकीचे नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. भाजपने संविधानाची पायमल्ली सुरू केली असून, पक्ष फोडणे लोकांना विकत घेणे हे असे करत आहेत. जे पोटामध्ये आहे ते तुमच्या ओठावर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ते दाखवून दिले, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
नाशिकपासून सुरू झालेल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चने राज्यातील प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहेत. वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, अनुसूचित क्षेत्रांमध्ये पंचायतींना अधिक अधिकार देणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरणे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी निघाले असून, रस्त्यात मिळेल तिथे मुक्काम करत पुन्हा मार्गक्रमण करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न अखिल भारतीय किसान सभा करत आहे. लाल झेंडे हातात घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या लॉन्ग मार्चमुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना पुन्हा एकदा व्यापक लक्ष मिळाले आहे. मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या याआधीही सरकारकडे मांडण्यात आल्या, आश्वासनेही मिळाली, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तहसील कार्यालयाबाहेर आधी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्या आंदोलनातून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने थेट राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याचा निर्णय शेतकरी आणि आदिवासी संघटनांनी घेतला. त्यानुसार रविवारी नाशिकहून मुंबईच्या दिशेने पायी कूच करण्यात आले. आंदोलनादरम्यान अन्नधान्य, पाणी, सरपण आणि इतर आवश्यक साहित्याची स्वतः व्यवस्था करण्यात आली आहे, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांत मोर्चेकऱ्यांनी सुमारे 60 किलोमीटरचे अंतर पार केले असून, मंगळवारी सकाळी कसारा घाट उतरून ते ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी आणि आदिवासी या मोर्चात सहभागी झाले असून, संपूर्ण मार्गावर शांततापूर्ण पण ठाम भूमिका घेत सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने प्रतिनिधिमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले या सततच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि माध्यमांमध्ये मोर्चाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अखेर राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधिमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रतिनिधिमंडळात माजी आमदार जे. पी. गावित, माकपाचे पोलित ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक धवले, किसान सभेचे राष्ट्रीय संयुक्त सचिव अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांचा समावेश आहे. ठोस निर्णय होणे अत्यावश्यक याआधी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबतही बैठक झाली होती. त्या बैठकीत स्थानिक पातळीवरील प्रश्न जिल्हा स्तरावर सोडवले जातील, तर राज्यस्तरीय मागण्या मुंबईत मांडण्यात येतील, अशी सहमती झाल्याचे गावित यांनी सांगितले. मात्र, अनेक वेळा आश्वासनांपुरतेच प्रश्न थांबल्याचा अनुभव असल्याने, यावेळी ठोस निर्णय होणे अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष दरम्यान, या लॉन्ग मार्चच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. लाल झेंड्यांच्या साक्षीने सुरू असलेला हा पायी मोर्चा केवळ मागण्यांची यादी नसून, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आता मंत्रालयातील चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या संवादातून काय निष्पन्न होते यावर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
‘बॉर्डर-२’ने पार केला २५० कोटींचा टप्पा
मुंबई : प्रतिनिधी ‘बॉर्डर २’ चे जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन २५१ कोटींच्या पार झाले आहे. सनी देओलच्या चित्रपटाला विकेंडचा आणि प्रजासत्ताक दिनाचा खूप फायदा झालेला दिसला. चित्रपटाने सिकंदर आणि ‘रेड २’ च्या एकूण कमाईला देखील मागे टाकले आहे. सनी देओल स्टारर बॉर्डर-२ बॉक्स ऑफिसवर उतरताच धुमाकूळ घातला आहे. निर्मात्यांनी या आठवड्यातच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट […] The post ‘बॉर्डर-२’ने पार केला २५० कोटींचा टप्पा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३१ जानेवारी पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे जमा करा
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हजारो लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचा हफ्ता मिळालेला नाही. अशा अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना आता पुन्हा ‘ई-केवायसी’मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ई-केवायसीतील चुकीच्या माहितीमुळे ज्या लाभार्थी महिलांना पैसे मिळत नाहीत त्यांच्याकडून पुन्हा अर्ज मागवण्यात आले आहेत. आज (दि. २७) पासून ३१ जानेवारीपर्यंत अंगणवाडी […] The post ३१ जानेवारी पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे जमा करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाडकीच्या खात्यात २१०० येणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना १५०० रूपयांचे मानधन जमा केले जातो. या योजनेअंतर्गत लाडकीच्या खात्यावर २१०० रूपये देऊयात, असे अश्वासन सरकारकडून देण्यात आलेय. आता यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे वक्तव्य केले. लाडक्या बहिणींचे २१०० रुपये करणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. मी जे बोलतो ते करुन दाखवतो असंही ते […] The post लाडकीच्या खात्यात २१०० येणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच!
चंद्रपूर : प्रतिनिधी चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचा तिढा सुटता सुटत नसून काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच काँग्रेसला बाजूला करत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्याने २४ तासांत अशक्य ते शक्य होईल, अशी चिन्हे आहेत. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महापालिकेत भाजप सत्ता स्थापन करेल, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची […] The post काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी भाजप नेते तथा मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. गणेश नाईक यांचे अस्तित्व फक्त नवी मुंबईपुरते मर्यादित आहे. ते तिथे स्वतः तीनवेळा हरले. त्यांची मुलेही दोनवेळा हरली. त्यानंतर आता स्वतःचे नामोनिशाण मिटू नये म्हणून ते भाजपच्या वळचणीला गेलेलत, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी गणेश नाईकांचा उल्लेख नवी मुंबईचे 'मिस्टर फाईव्ह पर्सेंट' म्हणूनही केला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. आज पुन्हा मी हे बोलत आहे, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शितल म्हात्रे यांनी त्यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. शितल म्हात्रे म्हणाल्या, गणेश नाईक यांचे अस्तित्व फक्त नवी मुंबईपुरते मर्यादित आहे. तिथे ते स्वतः तीनवेळा हरले. त्यांची मुलेही दोनवेळा हरली. त्यामुळे स्वतःचे नामोनिशाण मिटू नये म्हणून आता ते भाजपच्या वळचणीला गेलेत. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये. आपल्या हाताखाली असलेला एक सर्वसाधारण कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व त्यानंतर उपमुख्यमंत्री होऊन प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाला हे त्यांना बघवत नाही. त्यामुळे त्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु त्यांनी हे विसरू नये की, ही थुंकी त्यांच्याच तोंडावर पडणार आहे. गणेश नाईक नवी मुंबईतील मिस्टर फाईव्ह परसेंटशितल म्हात्रे पुढे म्हणाल्या, गणेश नाईक यांना नवी मुंबईत मिस्टर फाईव्ह परसेंट म्हणून ओळखले जाते. या भागात जे कोणते प्रोजेक्ट सुरू होतात, त्यातील 5 टक्के जोपर्यंत नाईकांना दिले जात नाहीत, तोपर्यंत तो प्रोजेक्ट सुरू होत नाही. असे मी नव्हे तर नवी मुंबईकर म्हणतात. याऊलट एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातील ताईत झालेत. ते जिथे जातात तिथे महिलांची त्यांना भेटण्यासाठी गर्दी होते. परंतु गणेश नाईक जिथे जातात तेथून महिला पळून जातात. महिला त्यांच्यापासून दूर जातात. याचे कारण म्हणजे त्यांच्यावर असणारे गंभीर गुन्हे. गणेश नाईकांवर असणाऱ्या गुन्ह्यांची विशेषतः महिलांसंदर्भात असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती माध्यमांनीच द्यावी. त्यानंतरच ही व्यक्ती काय आहे हे समजेल. आज तुम्ही जे काही बोलत आहात, त्याला आम्हाला अनेक पद्धतीने उत्तर देता येते. पण तुम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते असल्यामुळे जास्त बोलत नाही. पण तुम्ही आम्हाला जास्त बोलायला लावू नका. अन्यथा शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. त्यामुळे तुम्ही यापुढे एकनाथ शिंदेंविरोधात गरळ ओकली तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू द्या, असे शितल म्हात्रे यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयाात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. महापालिकेचे अधिकारी आदित्य कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वाचनालयाचे कोषाध्यक्ष अजिंक्य उजळंबकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रमाकंत जगत यांनी कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयातर्फे आदित्य कदम साहेब यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. आदित्य कदम यांनी समयोचित भाषण केले. अध्यक्षीय भाषणात रमाकांत जगत यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जोग यांनी केले. कार्यक्रमाला शिवाजी रामरूले, शाहूराज कांबळे, अनंत पवार, भरत चौधरी, डॉ. एस. एल. कुडे, आनंद काळे, गणेश महाजन, ज.म. भोयरेकर, डॉ. सपकाळ, सुखदेव घोडके, एस. आर. जाधव, मनोज शिंदे, संदीप शेलार, म्हस्के, संजय पंडित, प्रेम साळवे यांची उपस्थिती होती. उदय सुरंगलीकर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.
पंढरपूरहून परतणा-या भाविकांवर काळाचा घाला; ३ महिलांसह १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सोमवारी २६ जानेवारी रोजी सोलापुरातील पंढरपूरच्या मंगळवेढाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतताना काळाने भाविकांवर घाला घातला. या अपघातात मृत पावलेले भाविक मुंबईचे असल्याची माहिती समोर येत आहे. चौघांच्या मृत्यूने मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देव दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या […] The post पंढरपूरहून परतणा-या भाविकांवर काळाचा घाला; ३ महिलांसह १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बँकांचा संप:पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारले आंदोलन
बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा असावा, या मागणीसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (AIBEA) मंगळवारी देशव्यापी संप पुकारला. सरकारकडून या मागणीची पूर्तता होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजी नगरमधील पंजाब नॅशनल बँकेसमोर सर्व बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले, ज्यात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (AIBEA) नेते देविदास तुळजापूरकर यांनी माहिती दिली की, गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांकडून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात करारावर सह्या झाल्यानंतर लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. तत्कालीन वित्त सचिवांनीही ही मागणी मान्य केली होती. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे देशभरातील बँकांनी संप पुकारला आहे. तुळजापूरकर यांनी पुढे सांगितले की, आजचा संप किती तीव्र करायचा, वाढवायचा की बेमुदत करायचा, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. तसेच, आगामी अर्थसंकल्पात बँकांच्या विरोधात काही धोरणे आल्यास, त्याविरोधातही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. या आंदोलनात बँक कर्मचारी संघटनांचे अनेक नेते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देविदास तुळजापूरकर, राजेंद्र देवळे यांच्यासह विविध नेत्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत भाषणे दिली.
पुणे वाहतूक पोलिसांनी शनिवार पेठेतील मोतीबाग परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहने लावण्यास मनाई केली आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. शनिवार पेठेतील मोतीबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आहे. या कार्यालयात अतिमहत्त्वाच्या व्यक्ती (VIP) भेट देतात, तसेच त्यांचे वास्तव्यही असते. परिसरातील अरुंद गल्लीत वाहने लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. याच परिसरात अहिल्यादेवी प्रशाला देखील आहे. रखवालदाराला धमकावून चंदनाचे झाड कापून नेले पुणे शहरात खडकीतील एका खासगी कंपनीत शिरलेल्या चोरट्यांनी रखवालदाराला धमकावून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत रखवालदाराने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रखवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत किर्लोस्कर इंडस्ट्रीज कंपनी आहे. कंपनीच्या आवराात मध्यरात्री तीन ते चार चोरटे शिरले. गस्त घालणाऱ्या रखवालदाराने चोरट्यांना पाहिले. त्यांनी चोरट्यांना हटकले. तेव्हा चोरट्यंनी त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन चंदनाचे झाड कापून नेले. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर, मोतीबागेतील नाट्यछटाकार दिवाकर रस्त्यावरील हॉटेल रामकृष्ण ते मोतीबाग दरम्यान दहा मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, विश्वलिला इमारत ते मोतीबागपर्यंत दहा मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाबाबत नागरिकांना काही हरकती किंवा सूचना असल्यास, त्यांनी ९ फेब्रुवारीपर्यंत वाहतूक शाखा कार्यालय, गोल्फ क्लब रस्ता (लोहगाव विमानतळ रस्ता), बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कार्यालय येथे लेखी स्वरूपात कळवाव्यात, असे पोलीस उपायुक्त जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात ताडीवाला रस्त्यावर दोन गटांत हाणामारी:बंडगार्डन पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला
पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्त्यावर किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मारामारीची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात पाच महिलांचा समावेश असून, पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत. ही घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी प्रायव्हेट रोड येथे आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. आरोपींनी जेवणासाठी ठेवलेल्या खुर्च्या आणि ताटे फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सोनू काळे, दस्तूर नदाफ, गणेश काळे, रफीक नदाफ, इस्माइल नदाफ, साहिल नदाफ आणि भूषण भंडारी यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घरातील महिलांना मारहाण केली आणि अजय यांचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केल्याचे भालशंकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, आम्रपाली अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, दीपाली आणि रुपाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाप्रसादाच्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्यांचा मित्र भूषण भंडारी यांना मारहाण केली, तसेच गीता घाटे यांनाही मारहाण झाल्याचे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करत आहेत.
औंढा तालुक्यातील सोनवाडी शिवारामध्ये अर्धा एकर क्षेत्रावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच घरचे धार्मिक कार्यक्रम कसे करावे या चिंतेमुळे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील सोनवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रीरंग मुकाडे (४५) यांना सोनवाडी शिवारामध्ये अर्धा एकर शेत आहे. घरी पत्नी एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंब असून एका मुलीचा विवाह झालेला आहे. अर्ध्या एकर शेतीमध्ये आलेल्या उत्पन्नावर तसेच रोज मजुरी करून मिळालेल्या उत्पन्नावर ज्ञानेश्वर हे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान यावर्षी खरीप हंगामामध्ये अर्ध्या एकर क्षेत्रामधून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न हाती आले नाही. अतिवृष्टीमुळे हाती आलेला सोयाबीनचा घास हिरावल्या गेला त्यामुळे लागवडीच्या खर्चही निघाला नाही. यामुळे ते मागील काही दिवसापासून अस्वस्थ झाले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच घरातील धार्मिक कार्यक्रम कसे करावे याची चिंता त्यांना लागली होती. दरम्यान त्यांचा मृतदेह एका शेतात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दुस शेख लाल यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सत्वशीला मुकाडे यांनी दिलेल्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस शेखलाल पुढील तपास करीत आहेत.
पुणे महानगरपालिकेतर्फे मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यान सुमारे ५ किलोमीटर लांबीचे नदीकाठ सुधार काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहराच्या पर्यावरणीय आणि नागरी विकासाला नवी दिशा मिळेल, अशी माहिती मनपाने दिली आहे. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीची एकूण लांबी सुमारे ४४ किलोमीटर आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यान ३.७ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान ५.५ किलोमीटर आणि औंध ते बालेवाडी दरम्यान ८.१ किलोमीटर लांबीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या लगतच्या उपलब्ध जागेत नागरिकांसाठी विविध नागरी सुविधा आणि थीम पार्क विकसित केले जात आहेत. यामुळे चालणे, सायकलिंग, विरंगुळा आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. सध्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामधील संगमवाडी येथील सुमारे १.५० किलोमीटर लांबीचा भाग पूर्णतः विकसित करण्यात आला आहे. नुकतीच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पवणीत कौर, ओमप्रकाश दिवटे आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. पूर्ण झालेल्या १.५० किलोमीटर ट्रॅकचे लोकार्पण पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. हा ट्रॅक नागरिकांसाठी सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत खुला राहणार आहे. लवकरच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही मनपाने नमूद केले आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या एका महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याची घटना उजेडात आली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यातच ही घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेसने या प्रकरणी सत्ताधारी भाजपला जबाबदार धरले आहे. लातूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रकरणी राजकीय चिखलफेकीला जोर चढला असतानाच काँग्रेसच्या लातूर जिल्ह्यातील एका महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. अंजना सुनील चौधरी असे अपहरण झालेल्या काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे नाव आहे. त्या निलंगा तालुक्यातील व औसा व विधानसभा मतदारसंघातील तांबाळा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यांचे 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास उदगीर येथून अपहरण झाले. हळदी - कुंकवाला गेल्यानंतर झाले अपहरण यासंबंधीच्या माहितीनुसार, अंजना चौधरी या उदगीर येथील बिदर रोड परिसरातील आपल्या मैत्रिणीकडे हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या थेट प्रचाराला जाणार होत्या. त्यानुसार त्यांना घेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते रणजीत कोकणे तिथे पोहोचले होते. पण रणजीत कोकणे काही कारणास्तव बाहेर गेले असता, काही गुंडांनी अंजना यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत घालून पळवून नेले. या घटनेनंतर काँग्रेसने भाजपविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले आहे. पोलिस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन अभय साळुंके या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सत्ताधारी भाजप आमदाराच्या गुंडांनी हे अपहरण केले. निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचले. या प्रकरणी काँग्रेसने जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. अंजना चौधरी याचा शोध घेऊन त्यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी काँग्रेसने या निवेदनामार्फत केली आहे. बंडखोर उमेदवारांची मनधरणी सुरू दुसरीकडे, लातूर जिल्हा काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासह ठाकरे गट व राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेशी आघाडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आमदार अमित देशमुख यासंबंधी बोलताना म्हणाले, जिल्ह्यात आता भाजपविरोधात मत तयार झाले आहे. महापालिका निवडणुकीत ते स्पष्टपणे दिसून आले. सध्या काँग्रेस आपल्या बंडखोर उमेदवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे.
पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा ठार झाला असून, त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबीक वादातून महिलेने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. तर साईराज संतोष जायभाय (11) हे मृत मुलाचे नाव असून, धनश्री संतोष जायभाय (13) असे जखमी मुलीचे नाव आहे. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जायभाय कुटुंब मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आहे. ते सध्या नोकरी निमित्त वाघोलीतील बाईफ रोड परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी महिलेचा पती मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी तिने संधी साधून आपल्या मुलांवर चाकूने हल्ला चढवला. मुलाचा चाकूने गळा चिरला महिलेने प्रथम आपला मुलगा साईराज याचा गळा चाकूने कापला. त्यानंतर तिने धनश्रीवरही चाकूने सपासप वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. घरातील आरडाओरडा ऐकूण शेजाऱ्यांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी हा प्रकार पाहून तत्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी आईला अटक केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील फरशीवर रक्ताचा सडा पडला होता. कौटुंबीक वादातून ही घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दोन्ही मुलांना ठार मारून आरोपी महिला स्वतःही आत्महत्या करण्याच्या विचारात होती, असेही सांगितले जात आहे. महिलेने हे कृत्य का केले? या घटनेमुळे वाघोली परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या महिलेने हे कृत्य का केले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस तिची कसून चौकशी करत आहेत. कौटुंबिक वाद की मानसिक तणाव? यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या घटनेनंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये घरात असलेल्या पांढऱ्या फरशीवरती सर्वत्र रक्ताचे लाल डाग पडल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान, वाघोलीत सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा 'फोडाफोडी'च्या चर्चेने ढवळून निघाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते अंबादास दानवे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दानवे यांची आमच्याकडे येण्याची 'प्रोसेस' सुरू झाली आहे, असे सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना सांगितले. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संजय राऊत यांनी यावर जोरदार पलटवार केलाय. अंबादास दानवे हे सातत्याने महायुती सरकार आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करत असतात. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, दानवे यांच्या टीकेला मीडियाने फारसे गांभीर्य देऊ नये. आपल्या नेत्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ते अशी विधाने करत असतात. मात्र, पडद्यामागे त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच ते आमच्यासोबत दिसतील. सामंत यांनी पुढे टोला लगावला की, उबाठा'चे नेतृत्व सक्षम नसल्यामुळेच निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत. दानवे देखील याच वाटेवर आहेत. सामंतच भाजपच्या वाटेवर; राऊतांचा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना शिंदे सेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. यावर संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. उलट, उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली, हे तुम्हाला माहिती आहे का? असा पलटवारही राऊतांनी केला. यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणि संभाव्य घडामोडींच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. राजकीय अस्वस्थतेचे संकेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक आणि नेत्यांच्या पक्षंतराची ही चर्चा चांगलीच रंगणार असल्याचे दिसत आहे. एका बाजूला शिंदे गट 'उबाठा'चे मोहरे आपल्याकडे खेचत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट आपल्या नेत्यांच्या निष्ठेची ढाल पुढे करत प्रतिआक्रमण करत आहे. अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा मोठा विश्वास आहे. मात्र विरोधक त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना सातत्याने हवा देत आहेत. सामंत आणि राऊत यांच्यातील या वाकयुद्धामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांमधील संघर्ष अधिकच टोकदार झाला असून, येणाऱ्या काळात अंबादास दानवे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. या अंतर्गत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या उमेदवारांना आपला वेळ व पैसा वाया न घालवता निवडणुकीतून माघार घेण्याचे वादग्रस्त आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपरोक्त विधान केले आहे. नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. विरोधकांनी या निवडणुकांचे विश्लेषण करून आत्मपरीक्षण करावे. त्यांना या निवडणुकांच्या निकालावरून जमिनीवरील वस्तुस्थिती लक्षात आली असेल. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नाही. त्यामुळे त्यांनी आपला वेळ व पैसा वाया घालवू नये. त्यांनी सरळ आपले अर्ज मागे घ्यावेत. त्यातच त्यांचा शहाणपणा आहे, असे ते म्हणालेत. विरोधकांचा विकासापुढे टिकाव लागणार नाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राजकीय गट, यंत्रणेला टोला आदी राजकारणातील ग्रामीण भागातील गुळगुळीत शब्द काय असतात यावरही भाष्य केले. मला ग्रामीण भागातील राजकारणाची चांगलीच माहिती आहे. गट टिकवणे असो वा यंत्रणा कामाला लावणे किंवा बळ देणे असो, हे सर्वच शब्द मी जवळून अनुभवलेत. विरोधक आपली संपूर्ण यंत्रणा व आर्थिकि ताकद लावून थकतील. पण जनतेचा कौल त्यांना बदलता येणार नाही. शेवटी विकासाचाच विजय होईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य जनता कल्याणकारी योजनांवर खुश लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजनेसारख्या सर्वच योजनांवर सर्वसामान्य लोक खुश आहेत. जनतेचा हा आनंद व पाठिंबा आगामी निवडणुकीच्या निकालातून स्पष्टपणे दिसेल. या निवडणुकीत विरोधकांचा निभाव लागणे अवघड आहे. त्यामुळे त्यांनी पैसा व वेळ वाया घालू नये, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. दरम्यान, विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर या विधानाद्वारे दबावाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. हे ही वाचा... शिंदे गटाने भाजपचा संयुक्त गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला:आज कोकण आयुक्तांकडे करणार स्वतंत्र गटनोंदणी; काय आहे रणनीती? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने यासंबंधी भाजपसोबत संयुक्त गट नोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पुढील 5 वर्षे भाजपच्या दबावात राहण्यापेक्षा आपल्या वाट्याला येईल ते स्वीकारून स्वतःचे अस्तित्व जपायचे, ही या मागची शिंदे गटाची रणनीती असल्याचा दावा केला जात आहे. वाचा सविस्तर
भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कार विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, विरोध पक्षाच्या नेत्यांनीही अंजली भारतींच्या या विधानाचे समर्थन करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भंडाऱ्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात अंजली भारती यांचे गायन सुरू होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यभरात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर संताप व्यक्त केला. बलात्कार या गंभीर विषयावर मत मांडताना त्यांचा मात्र असे करताना त्यांनी थेट अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केले. या विधानानंतर तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि पैसेही उधळले, ज्यामुळे या प्रकरणाची तीव्रता अधिकच वाढली आहे. चित्रा वाघ यांचा संताप भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत अंजली भारती आणि आयोजकांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, श्रद्धेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभे राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी देणे आणि त्यावर टाळ्या पडणे, हे समाजाच्या अधःपतनाचे भयावह चित्र आहे. मात्र, आमच्याकडे बाबासाहेबांनी दिलेले संविधानाचे शस्त्र आहे. कायदेशीर प्रहार कसा करायचा, ते आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. संजय राऊतांकडूनही विधानाचा निषेध ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून अंजली भारती यांच्या विधानाचे समर्थन करण्यास नकार दिला आहे. राऊत म्हणाले, मी ते वक्तव्य ऐकले नाही, पण जर कुणी एखाद्या महिलेविषयी, विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयी असे बोलले असेल, तर त्याचे समर्थन करता येणार नाही. अमृता फडणवीस या स्वतः एक कलाकार आहेत, संगीत क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्यावर अशाप्रकारे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. कायदेशीर कारवाईची शक्यता गायिका अंजली भारती यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे भाजप कार्यकर्ते राज्यभर आक्रमक झाले असून विविध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. एका महिला कलाकाराने दुसऱ्या महिलेबद्दल इतकी विखारी भाषा वापरणे हे संस्कृतीला काळिमा फासणारे आहे, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
शिंदे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करत थेट पुढाकार घेतला आहे. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरून सकाळीच खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेवर आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईचा महापौर भाजपचाच होईल आणि शिंदे सेना निमूटपणे त्याला पाठिंबा देईल, असा थेट दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे सेनेच्या स्वतंत्र गट नोंदणीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिंदे शिवसेनेवर कडवट शब्दांत हल्ला चढवला. शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच वंदनीय आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार? फारतर एखादी साडी-चोळी पदरात पाडून घेतील, असा जहरी टोला राऊतांनी लगावला. कोश्यारी यांच्याबाबतच्या वक्तव्यांवरूनही संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना विरोध करणे, महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणे हे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल, तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असताना फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतली, ही दिल्लीचीच जबाबदारी होती, असा आरोपही त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना शिंदे सेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. यावर संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. उलट, उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली, हे तुम्हाला माहिती आहे का? असा पलटवारही राऊतांनी केला. यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणि संभाव्य घडामोडींच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. महापौरपदाच्या तिढ्याबरोबरच भाजपवर सन्मान आणि पुरस्कारांवरूनही राऊतांनी निशाणा साधला. महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवणाऱ्यांना मोदी सरकारकडून पद्मभूषण देण्यात येतो. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला, त्यांचा भाजप सन्मान करतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अमृता फडणवीस यांच्यावरील वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह बोलणे चुकीचे असल्याचेही नमूद केले, मात्र गमछा घातला नाही म्हणून टीका करणे हा भाजपचा खेळ आहे, अशी टीका करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिलगिरी व्यक्त केली असेल, तर पडदा पडला पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी समतोल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संबंधित व्यक्ती कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल, तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. 26 जानेवारी रोजी भारताला संविधान मिळाले आणि देश प्रजासत्ताक झाला, त्यामुळे त्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच व्हायला हवी, हे सत्य आहे. निषेध नोंदवणाऱ्या महिलेचाही सन्मान व्हायला हवा, असे सांगत राऊत यांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले. मात्र मंत्र्यांनी माफी मागितली असून नाक घासले आहे, त्यामुळे हा विषय आता फार ताणू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने यासंबंधी भाजपसोबत संयुक्त गट नोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पुढील 5 वर्षे भाजपच्या दबावात राहण्यापेक्षा आपल्या वाट्याला येईल ते स्वीकारून स्वतःचे अस्तित्व जपायचे, ही या मागची शिंदे गटाची रणनीती असल्याचा दावा केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला 10 दिवस लोटलेत. पण अद्यापही सत्ताधारी भाजप व शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. हे दोन्ही पक्ष कोकण आयुक्तांकडे संयुक्त गटनोंदणी करतील अशी माहिती होती. पण आता शिंदे गट स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणी करणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेतील शिंदे गटाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण आयुक्तांकडे जाऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने या प्रकरणी भाजपसोबत मिळून एकच गट स्थापन करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. भाजपसोबत सुरू होत्या वाटाघाटी यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजप व शिंदे गटात सध्या बीएमसीच्या महापौरपद, उपमहापौरपद, विविध वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासह सदस्यसंख्येप्रकरणी चर्चा सुरू होती. विशेषतः या प्रकरणी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीमधील सदस्यसंख्येवरून गणिते मांडली जात होती. सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांची सदस्यसंख्या समसमान येत आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी व विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य स्थायी समितीवर जातील अशी स्थिती आहे. शिंदे गटाने भाजपचा कोणता धोका ओळखला? सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिंदे गटाची संयुक्त गट नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधाऱ्यांचा 1 सदस्य वाढू शकतो. पण संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप - शिंदे गटाचा एकच गटनेता असेल. सभागृहात तसेच सर्वच समित्यांत भाजप जी भूमिका घेईल, तिला शिंदे गटाला अनिवार्यपणे पाठिंबा द्यावा लागेल. याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळण्याऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता होती. एवढेच नाही तर समित्यांवर शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व द्यायचे याचा अंतिम निर्णयही भाजपच्याच गटनेत्याकडे राहण्याचा धोका होता. सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, स्वतंत्र गटनोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे 8 व शिंदे गटाचे 3 सदस्य जाण्याची शक्यता आहे. पण संयुक्त गट झाल्यास शिंदे गटाचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे याचे सर्वाधिकार भाजपकडे गेले असते. यामुळे शिंदे गटाने स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे महापालिकेत सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून काम करणार असले तरी सत्तेतील समतोल व समित्यांवरील वाटाघाटींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.खालील तक्त्यात पाहा मुंबई महापालिकेचे पक्षीय संख्याबळ
मालाड रेल्वे स्थानकावर एका प्राध्यापकाची हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना, किरकोळ वादातून ओंकार शिंदे या सुशिक्षित तरुणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नाने पोलिसांनाही चक्रावून सोडले होते. अखेर या प्रकरणातील संशयाचे धुके सरकले असून हत्येमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. विधानपरिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनेमागच्या मूळ कारणावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये गर्दीतून उतरताना झालेल्या वादात आलोक सिंह यांनी ओंकारला महिलांसमोर झापले होते. सर्वांसमोर, विशेषतः महिलांसमोर झालेल्या या अपमानामुळे ओंकारचा राग अनावर झाला. त्याच्याकडे कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, पण त्या क्षणी दुखावलेल्या स्वाभिमानाने त्याचे विवेकबुद्धीवरचे नियंत्रण सुटले. कपिल पाटील फेसबूक पोस्टमध्ये नक्की काय म्हणाले? कपिल पाटील फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले की, ट्रेनमध्ये धक्के कधी लागत नव्हते ? पण आता धक्काही सहन होत नाही. लोकांचे पेशन्स संपत चालले आहेत. किरकोळ कारणांवरून माणसं घायकुतीला येतात. 27 वर्षांच्या ओमकार शिंदेने धारदार शस्त्राने 32 वर्षांच्या प्रा. आलोक कुमार सिंह यांचा बळी घेतला. प्रतिष्ठित एन. एम. कॉलेजमध्ये तो गणित शिकवायचा. दोन वर्षांपूर्वी तो लेक्चरर म्हणून लागला होता. त्याचे प्राचार्य पराग आजगावकर सांगत होते, कोणत्याच भानगडीत न पडणारा, अत्यंत सालस पण तितकाच बुद्धिमान शिक्षक. ट्रेनमधून अनेकदा दारात लटकून सगळेच प्रवास करतात. मीही केलाय लटकत. लटकणार्यांना लोक हाताने आधार द्यायचे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात मारणार्याला शोधून काढलं. पोलिसांचं कौतुकच. ओमकार शिंदे असं का वागला ? कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती त्याची, तरीही जीवघेण्याचा गुन्हा त्याच्याकडून का घडला ? पोलीस शोधताहेत. दोन - अडीच महिन्यांपूर्वीची घटना आहे, 'भाई थोडा आगे हो जाओ, धक्का लग रहा है।' एवढंच 19 वर्षांचा अर्णव खैरे बोलला. हिंदीत का बोलतो, म्हणून त्याला मराठी मुलांनीच ट्रेनमध्ये मारहाण केली. अपमान आणि भीतीच्या धक्क्याने कोवळ्या अर्णवने राहत्या घरी गळफास घेतला. मालाडच्या घटनेला रंग देण्याची गरज नाही. पण माणसं घायकुतीला येतात. पेशन्स हरवतात. राग अनावर होतो. धारदार शस्त्राने थेट पोटात वार होतो. एका तरुण शिक्षकाचा बळी जातो. लोकही मध्ये पडत नाहीत. मारणार्याचे हात धरत नाहीत. माणसं प्रचंड भयाखाली जगताहेत. संशयाने पाहताहेत. एका बाजूला लोकलचा ताण, प्रचंड धावपळ, सुधारणांची शक्यता नाही. चिकटून एकमेकांचा घाम एकमेकात रिचवून प्रवास करणार्यांची मनं मात्र आता एकमेकांपासून कोसो दूर गेली आहेत. कशामुळे हे घडतंय? अशांततेचे सोपे फंडे शोधतात आमचे नेते. त्यांच्या राजकारणासाठी. पण अप्रत्यक्षपणे ते लोकमनावर खोल परिणाम करत जातात. प्रचंड स्ट्रेस, घरा- दारातले आणि प्रवासातले ताण - तणाव, संशय आणि द्वेष एकाबाजूला. तर दुसऱ्या बाजूला जगण्याची साधनं, उत्पन्न अत्यंत मर्यादित. अशा विलक्षण कोंडीत सापडलेल्या माणसांचा स्फोट होतो. गेले काही महीने भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावाने कंठाळी गदारोळ सुरू आहे. मी मराठी तो भैय्या, मी हिंदू तो मुसलमान. आपली सहनशिलता आणि सहिष्णुता पार हरवून गेली आहे. मनात साचलेल्या रागाला आपल्याच सारख्या दुसर्या कष्टकरी माणसाला शत्रू बनवलं आहे. मारणारा ओमकार दिवसभर कष्ट करून किती कमवत असेल ? 15 - 16 हजार. पण आलोक सिंहचा पगार तरी किती होता ? तोही ज्युनिअर कॉलेजला कंत्राटी शिक्षक. जेमतेम 20 हजार. ओमकार 12वी पास होता, कोकणी मुलगा. पण ओमकारला राग व्यवस्थेचा येत नाही, आलोकचा येतो. कुणीतरी त्याला तसं सांगितलेलं असतं आपल्या घरातलं कुणीतरी रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतं, त्याची काळजी आपणच व्हायला हवी. सहनशिलता आणि सहिष्णुता त्याला शिकवली नाही तर वार कुणावरही होऊ शकतो. व्यवस्थेवर मात्र कधीच होत नाही. आपला मुलगा कोणावर तरी राग काढतो. त्याच्या हातून काही अघटीत घडतं. मग आपला मुलगाही वाचत नाही. नेत्यांच्या मुलांवर साधी केसही होत नाही. आलोक सिंहच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेत होतो. त्याच्या वडिलांचा आणि गर्भार पत्नीचा टाहो काळजाला चीर पाडत होता. त्याच्या गर्भार पत्नीचं काय होईल? महिलांसमोर अपमान झाला या रागातून ओमकार सणकला. पुरुषी मानसिकता आणि दुसऱ्याचा द्वेष या दोघांचं कॉकटेल विषारी बनतं. आत्मघातकी बनतं. त्यातून टोकाची प्रतिक्रिया उमटते. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ओमकार सारख्या तरुणाकडून गुन्हा घडतो, हे अधिक गंभीर आहे. आलोक आपल्या शेजारच्याच घरातला आणि ओमकार आपल्या घरातलाच...
नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रणकंदन माजले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाजन यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. ज्यांना बाबासाहेबांचे नाव घेण्याची लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा आणि सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. नाशिकच्या या कार्यक्रमात गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, तिथे उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी उभे राहून थेट आक्षेप घेतला. संविधान निर्मात्यांचे नाव तुम्ही कसे काय विसरलात? असा रोखठोक सवाल त्यांनी भर कार्यक्रमात विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे सोहळ्यात काही काळ गोंधळ उडाला. या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवार यांचा सडेतोड प्रहार या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन आणि सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली. या मंडळींना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते. हे तेच लोक आहेत ज्यांनी संविधान निर्मितीच्या काळात त्याला विरोध केला होता. यांचा संविधानावर विश्वास आहे का? ज्यांना संविधान निर्मात्याचे नाव घेण्याची लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा आणि खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. हे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालले आहे की लोकशाहीने, याचे उत्तर जनताच मागेल. संविधानावर विश्वास नसणाऱ्यांनी सत्तेत राहणे लोकशाहीसाठी घातक आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. नेमके प्रकरण काय? नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात गिरीश महाजन यांचे भाषण सुरू होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हे लक्षात येताच वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे काही काळ कार्यक्रमात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेतले व सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले आणि त्यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी याप्रकरणी मंत्री महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रारही दाखल केली आहे. राजकीय वातावरण तापले संविधानाच्या उत्सवातच संविधान निर्मात्याचे नाव विसरल्याने गिरीश महाजन आणि भाजप सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे, कर्तव्यावर असताना मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुकही समाजमाध्यमांवर केले जात आहे. या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने निर्माण झालेला वाद शांत होण्याऐवजी अधिकच पेटताना दिसत आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंत्री गिरीश महाजन यांनी, मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षांत अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? असे वक्तव्य केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दिलगिरी व्यक्त करूनही अशा विधानांमुळे समाजात संभ्रम आणि संताप वाढत असून, महाजनांच्या या वक्तव्यावरून राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने उपस्थितांमध्ये असंतोष निर्माण झाला. विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने थेट जाहीरपणे आक्षेप घेत संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? असा सवाल केल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. या घटनेचे पडसाद आता नाशिकपुरते मर्यादित न राहता राज्यभर उमटू लागले असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबाबत जाहीरपणे आक्षेप नोंदवला. त्यांच्या या कृतीमुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईनंतर नागरिक आणि विविध संघटनांनी पोलिस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी या घटनेला गंभीर स्वरूप देत महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. अशा महामानवाचा उल्लेख टाळला जाणे हे अपमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. या मागणीनंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, महाजन यांची अडचण वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मला आज खूप वाईट वाटले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी नेहमीच पुढाकार घेतो. अनेक नेते हार घालून निघून जातात, पण मी आमच्या गावात आणि तालुक्यात जयंती कार्यक्रमात उपस्थित राहतो. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी कधीही बाबासाहेबांचा अपमान होईल असे वर्तन केलेले नाही. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, मातंग समाज, वाल्मिकी समाज यांच्यासाठी आपण सातत्याने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गिरीश महाजन यांनी हेही स्पष्ट केले की, मी संघाच्या संस्कारात वाढलेला आहे. गावात पंगत देतो, सर्व समाजातील लोकांसोबत जेवायला बसतो. मी बाबासाहेबांचे विचार जपणारा आहे. भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल, पण यावरून एवढा गदारोळ कशासाठी, हे मला समजत नाही. त्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करत दिलगिरी व्यक्त केली. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत, कशासाठी ॲट्रॉसिटी? असा सवालही केला. या प्रकरणानंतर वन विभागातील कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. शासकीय कार्यक्रमात एका महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांना जाब विचारण्याचे धाडस केल्याने ही घटना विशेष चर्चेत आहे. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचेही पाहायला मिळाले. सामाजिक आणि राजकीय वादाचे रूप एकीकडे गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्या वक्तव्यावर आणि भूमिकेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न होणे ही केवळ चूक नसून ती मानसिकतेचे प्रतीक असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, सामाजिक आणि राजकीय वादाचे रूप घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या काळात या प्रकरणात पोलिस आणि प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम असून, यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आज (२७ जानेवारी) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेसगचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. चंद्रपूरच्या राजकारणात मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम मानला जात असल्याने, त्यांच्या संमतीशिवाय महापौरपदाचा कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि 'वंचित'सोबत भाजपचा संवाद सुरू होता. भाजपने ठाकरे गटाला उपमहापौरपद आणि दोन वर्षांसाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ठाकरे गटाने अचानक महापौरपदाची मागणी केल्याने चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार हे ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद देण्यास अनुकूल नसल्याचे समजते. आजच्या चर्चेत मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्याशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुनगंटीवारांचा काँग्रेसबाबत खळबळजनक दावा मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेसचा एक मोठा गट आमच्या संपर्कात असून, त्यांच्यातील अनेक नगरसेवकांची भाजपसोबत येण्याची इच्छा आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर निश्चितपणे चंद्रपूरचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे चंद्रपूरच्या सत्तेत काँग्रेसच्या मदतीने भाजप नवीन चमत्कार घडवणार का? अशी चर्चा रंगली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपचा महापौर हवा मुनगंटीवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा मांडला. गेल्या १० वर्षांत आम्ही चंद्रपूरच्या प्रगतीसाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. सध्या जिल्ह्यात २३ ते २४ महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प सुरळीत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेत भाजपचाच महापौर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच त्यांनी अचानक महापौरपदाची मागणी केल्याने पेच निर्माण झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. चंद्रपुरातील पक्षीय बलाबल दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचे २४ नगरसेवक आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे ६ नगरसेवक आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी दोन आणि अपक्ष दोन असे १० नगरसेवक होतात. भाजपाचे २४ आणि ठाकरे गट, वंचित, अपक्ष असे १० नगरसेवक मिळून ३४ चा बहुमताचा आकडा गाठला जाऊ शकतो.
हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील रहिवासी असलेले पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशामुळे हिंगोली जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला असून त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी जल्लोष केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांचे प्राथमिक शिक्षण साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर तर माध्यमिक शिक्षण हिंगोली शहरात पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर पोलीस दलात वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्या कुबडे यांनी १९९३ मध्ये पोलिस दलात प्रवेश केला. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी नक्षलग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यांच्या कामाची दखल घेऊन सन २०१८ मध्ये त्यांना पहिल्यांदा गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. विशेषतः तडीपार, मोकोका व स्थानबध्दतेच्या कारवायांमध्ये त्यांची भुमीका महत्वाची ठरली आहे. पोलिस दलातील अतिशय कर्तव्यदक्ष व शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कुबडे यांना दुसऱ्यांचा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल हिंगोलीसह साखरा येथील गावकऱ्यांनी जल्लोष करून त्यांचे अभिनंदन केले आहे. कुबडे यांना मिळाले १२०० पेक्षा अधिक पारितोषीक पोलिस दलात गंभीर गुन्हयांची उकल करणे, गुन्हेगारांना अटक करणे यासह इतर कामगिरी बद्दल त्यांना आतापर्यंत तब्बल १२०० पेक्षा अधिक पारितोषिक मिळाले आहेत. या शिवाय साडेचारशे पेक्षा अधिक प्रशांसापत्र मिळाले आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी ता. २६ त्यांचा पिंपरी चिंचवड येथे सत्कार करण्यात आला.

24 C