SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
... ...View News by News Source

नाशिकमध्ये 'महायुती'तील मित्रपक्षांत ठिणगी:पराभूत भाजप उमेदवाराचे घर जाळण्याचा प्रयत्न, शिंदे गटाच्या नगरसेविकेवर गुन्हा

महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राजकीय वादाच्या घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष करताना एका भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनी भव्य रॅली काढत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रभागातील भाजपच्या पराभूत उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुष्पा ताजनपुरे यांच्या दाव्यानुसार, विजयाची रॅली काढत असताना नवले यांच्या कार्यकर्त्यांनी ताजनपुरे यांच्या घरात शिरून अश्लील कृत्य केले आणि घरावर ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले, त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह १५ ते २० संशयित समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. एकटी लढली अन् जिंकली, आभा पांडेंचे शक्तीप्रदर्शन नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी, प्रभाग २१ मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी पक्षाची अब्रू राखली आहे. आज त्यांनी शांती नगर परिसरातून भव्य 'आभार रॅली' काढून मतदारांचे आभार मानले. रॅली दरम्यान बोलताना आभा पांडे म्हणाल्या की, माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषक कार्ड आणि पैशांचा वारेमाप वापर केला होता. मात्र, जनतेने माझ्या कामावर विश्वास दाखवला. अजित पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता, तो मी सार्थ ठरवला आहे. आता यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध राहीन. निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग लावल्याची घटना समोर आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवल्याचा आरोप आकाश बारणे यांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 12:07 pm

मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसांच्या दावोस दौऱ्यावर:वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये होणार सहभागी, यंदा 16 लाख कोटींहून अधिकचे उद्दिष्ट

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोसकडे (स्वित्झर्लंड) रवाना झाले आहेत. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (WEF) वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असून, राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक खेचून आणणे हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत दावोसमध्ये असतील. त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहे. मागील वर्षी राज्य सरकारने दावोसमध्ये १६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले होते. त्यापैकी जवळपास ७२ टक्के करार प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला होता. यंदा हा आकडा पार करून १६ लाख कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीवर राज्य सरकारचा भर असणार आहे. मुंबईच्या महापौर निवडीसाठी प्रतिक्षा राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री पुढचे पाच दिवस विदेश दौऱ्यावर असल्याने आणि शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये असल्याने, महापौर निवडीची प्रक्रिया आता मुख्यमंत्र्यांच्या पुनरागमनानंतरच म्हणजेच २३ जानेवारीनंतरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर राऊतांची टीका दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री दावोसमधून गुंतवणूक आणतात असे म्हणतात. ते अनेक वर्षांपासून दावोसला जात आहेत, पण महाराष्ट्र गुंतवणूक काही दिसत नाही. त्यांची सगळी गुंतवणूक नगरपालिकांपासून बीएमसीपर्यंतच्या निवडणुकीत असते. त्यामुळे परदेशातून जी गुंतवणूक यायला पाहिजे, ती आम्हाला कधीच दिसली नाही. दावोसमध्ये बसून देखील ते महानगरपालिकेचेच राजकारण करणार आहेत. त्यापेक्षा इथे बसून दावोसमधील गुंतवणूक इकडे आणा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. हे ही वाचा… आमदारांना पळवणारे आता नगरसेवकांसाठी का घाबरले?:शिंदेंना फडणवीसांच्या राजवटीचीही भीती वाटतेय, राऊतांचा बोचरा प्रहार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोणाचा होणार? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी 'हास्यजत्रा' आहे, अशा शब्दांत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 11:31 am

महापौर कोण?:सोलापूर मनपासाठी कोंड्याल, कोठे, देशमुख, काळे स्पर्धेत, आमदार कोठे की, विजयकुमार देशमुख गटाला संधी

महापालिका निवडणुकीत 87 जागा घेऊन भाजपने सोलापुरात इतिहास रचला. आता महापौर कोण याची उत्सुकता लागून राहिली. त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटातील विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे यांच्या नावांची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे किरण देशमुख, अनंत जाधव, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे. पक्षीय पातळीवरच त्याचा निर्णय होईल. परंतु भाजपमध्ये आता दोन गट कायम असतील. एक कोठे गट आणि दुसरा देशमुख गट. त्यामुळे महापौर कोठे गटाचा की देशमुख गटाचा याची उत्सुकता लागली आहे. कोठे गटाच्या सर्वाधिक जागा आल्याने त्यांच्याच गटाला महापौर पदाची संधी मिळेल, असे सांगण्यात येते. तसे झाल्यास कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल अथवा त्यांचे चुलत बंधू प्रथमेश कोठे यांची वर्णी शक्य आहे. नाराज देशमुखांना जवळ करण्याच्या हेतूने काही हालचाली झाल्यास डॉ. किरण देशमुख, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील आणि अनंत जाधव यांच्या नावांचा विचार होऊ शकेल. पालकमंत्री घेणार उद्या बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे सोमवारी (ता. 19) सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक होईल. सर्वांचा सत्कार, संवाद असा कार्यक्रम आयोजित केला आहे. नरेंद्र काळे : पक्षात उत्तम संघटक, हिंदुत्वाचा चेहरा. विरोधी पक्षनेत्याचा अनुभव, अभ्यासपूर्ण मुद्दे आणि प्रभावी चेहरा. प्रथमेश कोठे : माजी महापौर स्व. महेश कोठे यांचे चिरंजीव. आमदार कोठे यांच्या शब्दावरून भाजपमध्ये आले. किरण देशमुख : उच्च शिक्षित, भाजप युवा मोर्चाचे पद सांभाळले होते. गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी. विनायक कोंड्याल : सर्वाधिक मतांनी विजयी. तीनवेळा सलग निवडून आले. आमदार देवेंद्र कोठे यांचे समर्थक. विरोध झाला तर...डॉ. देशमुख यांना आमदार कोठे गटाकडून तर काळेंना आमदार सुभाष देशमुखांकडून विरोध. देशमुख आणि कोठे यांच्या गटातच असणार मोठी रस्सीखेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचे पेढा भरवून अभिनंदन करताना फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही शुभेच्छा दिल्या. विमानसेवा, आयटी पार्क यामुळे सर्वाधिक जागा मिळाल्याचे गोरेंनी सांगितले. आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या सहकार्याने जिंकल्याचे म्हणाले. आठ दिवसांत पदाधिकाऱ्यांच्या निवडी 39 व्या महापौर निवडीसाठी आता आठ दिवस राहिले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कौन्सिल हॉलमधील सभागृह सजले आहे. महापौरांच्या खुर्चीसह सदस्यांच्या बाकांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे सभागृहाचे रूपडेच पालटून गेले. सभागृहासह महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभागृह, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, महिला व बालकल्याण समिती सभापती आदींच्या कक्षांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यावर 70 लाख रुपयांचा खर्च होत आहे. पुढील आठ दिवसांत सुशोभीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 1964 मध्ये पहिले महापौर होण्याचा मान स्व. पारसमल जोशी यांना मिळाला होता. 1997 मध्ये शेवंता पवार या पहिल्या महापौर ठरल्या होत्या. 1964 ते 2022 पर्यंत 38 महापौर होऊन गेले. पुढील आठ दिवसांत 39 वे महापौर विराजमान होतील. महापौर निवासही तयारीत रेल्वेलाइन्स परिसरातील महापौर बंगल्यातही काही कामे करण्यात आली. प्रशासकीय कारकिर्दीत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे काही काळासाठी या बंगल्यात वास्तव्यास होते. नव्या महापौरांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार काही कामे होणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 11:11 am

मतदान न करणाऱ्यांवर ‘रामबाण उपाय’ची भाषा:आमदार अब्दुल सत्तारांसह निवडणूक अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस

सिल्लोड–सोयगाव 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत तालुक्यातील मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्या मतदारांनी आपल्याला मतदान करणार नाही, त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत अशा मतदारांवर “रामबाण उपाय” केला जाईल, अशी भाषा वापरण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यामध्ये गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा उल्लेख केल्याचा आरोप आहे. या कथित धमकीपूर्ण भाषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी सी-विजिल ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचा बचाव करत तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रार फेटाळल्याचा शंकरपेल्लींचा आरोप या कथित धमकीपूर्ण वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी दुसऱ्याच दिवशी सी-विजिल ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी श्री. लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचा बचाव करत तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. सुमारे एक वर्ष पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात पार्टी इन पर्सन म्हणून खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली. काय म्हणाले गणेश शंकरपेल्ली यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. मात्र, सुमारे एक वर्ष पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई अथवा निर्णय घेण्यात न आल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात पार्टी इन पर्सन म्हणून खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. अब्दुल सत्तारांचे वक्तव्य काय? या प्रकरणी सिल्लोड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आमदार अब्दुल सत्तार, तत्कालीन आचारसंहिता पथक प्रमुख दादराव श्रीपत अहिरे, सिल्लोड निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याबाबत नोटीस बजावली आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 10:55 am

शिंदे गटाकडून अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणी:29 नगरसेवक ताज हॉटेलमध्ये पाठवले, राऊतांचा आरोप- शिंदेंनाच नको BMC मध्ये भाजपचा महापौर

बीएमसीच्या निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पेच निर्माण झाला आहे. भाजप मुंबईत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. पहिल्यांदाच भाजपचा महापौर होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 नवीन नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हलवले आहे. बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिंदे गटाचे म्हणणे आहे की 2026 हे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर असावा. यावरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, रविवारी उद्धव गटाचे संजय राऊत यांनी दावा केला आहे की एकनाथ शिंदे यांना स्वतःला बीएमसीमध्ये भाजपचा महापौर नको आहे. त्यामुळेच त्यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर, मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) पक्षाने असे सांगून अटकळांना आणखी खतपाणी घातले की, जर ‘देवाची’ इच्छा असेल तर त्यांच्या पक्षाचा महापौर होऊ शकतो. हॉटेलमधूनच निवडणार नेता, 2022 च्या बंडखोरीच्या आठवणी ताज्या मुंबईतील 227 प्रभागांपैकी भाजपने 89 प्रभाग जिंकले आहेत. शिंदे गटाने 29 प्रभाग जिंकले आहेत. बहुमताचा आकडा 114 गाठण्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. उद्धव यांनी ‘मराठी कार्ड’ खेळल्यामुळे शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या मर्यादित राहिली. आता शिंदे गटाने महापौरपदाचा डाव टाकला आहे. भाजपने ही मागणी मान्य न केल्यास सत्तेचे समीकरण बिघडू शकते. यामुळे शिंदे यांनी हॉटेलमध्येच बैठक घेऊन पक्षनेत्याची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाने नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवणे, 2022 च्या त्या बंडखोरीची आठवण करून देत आहे, ज्यामुळे शिवसेना फुटली होती. खरं तर, मे 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारमधील नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड केले होते. शिंदे यांनी मणिपूरमधील नबाम रेबिया प्रकरणाचा फायदा घेतला होता, ज्यात सर्वोच्च न्यायालयाने सत्तेतून बंड केलेल्या आमदारांचे सरकार स्थापन केले होते. त्याचबरोबर शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती, जेणेकरून उपसभापती शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेऊ शकणार नाहीत. या संपूर्ण घडामोडींदरम्यान शिवसेनेचे 15 आमदार, 10 अपक्ष आमदारांसह 20 जून 2022 रोजी आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. 23 जून रोजी शिंदे यांनी दावा केला की त्यांना 35 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यानंतर फ्लोअर टेस्ट, उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर 30 जून 2022 रोजी शिंदे मुख्यमंत्री झाले. मुंबई काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’ बीएमसी निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह रस्त्यावर आला आहे. पराभवाचे खापर मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यावर फोडणाऱ्या नेते जगताप यांना काँग्रेस हायकमांडने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 10:49 am

महाराष्ट्राने पतंग मनावर घेतला; ‎मुंबईतही दिसली आमची ताकद‎:एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत एमआयएमने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज‎ जलील कमालीचे उत्साहात आहेत. मुंबईत मनसे आणि राष्ट्रवादीपेक्षा‎जास्त जागा जिंकणे असो वा संभाजीनगरमध्ये 33जागांचा टप्पा गाठणे,‎ इम्तियाज यांनी या यशाचे विश्लेषण करताना विरोधकांवर सडकून टीका केली. या विजयानंतर त्यांच्याशी साधलेला हा संवाद... प्रश्न: भविष्यातील मजलीस'' ची‎वाटचाल कशी असेल?‎ इम्तियाज जलील: आम्ही एक मोठी‎शक्ती म्हणून उदयास आलो आहोत.‎सोलापूर, मुंब्रा, अमरावती अशा सर्वच ठिकाणी आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे.‎आम्ही केवळ 7-8 जागा अतिशय कमी‎ फरकाने हरलो, नाही तर हा आकडा‎ आणखी मोठा असता. एमआयएम हा‎ आता केवळ एक पक्ष नसून महाराष्ट्राच्या ‎राजकारणातील एक महत्त्वाचा किरदार''‎बनला आहे.‎ प्रश्न: आता महापालिकेत तुमची भूमिका‎ काय असेल? भाजपला साथ देणार का?‎ इम्तियाज जलील : आमची भूमिका‎ स्पष्ट आहे. शहराच्या विकासासाठी चांगले‎ निर्णय असतील, तर आम्ही भाजपला नक्कीच साथ देऊ. पण, जर कुणी ‎स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिडन‎ अजेंडा घेऊन येत असेल, तर आम्ही ‎खंबीर विरोध करू. जसा आम्ही समांतर ‎पाणी योजनेला केला होता. मी सर्वपक्षीय ‎नेत्यांना आवाहन करतो की, आता ‎निवडणुका संपल्या आहेत, एकमेकांवरची‎ चिखलफेक थांबवून शहराच्या प्रगतीसाठी ‎एका प्लॅटफॉर्मवर या. प्रश्न: महाराष्ट्रात एमआयएमने मोठी मुसंडी मारली आहे, या निकालाकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण कसा अर्थ लावता?‎‎इम्तियाज जलील : हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ‎आहे. बेटर लेट दॅन नेव्हर'' महाराष्ट्राच्या जनतेने आता ‎एमआयएमला मनापासून स्वीकारले आहे. लोकांना जाणीव झाली‎‎आहे की केवळ एमआयएमच त्यांच्यासाठी लढू शकते. आज संपूर्ण‎‎महाराष्ट्रात आमचे 125 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत‎‎ आमचे 8 नगरसेवक आहेत, ही संख्या राज ठाकरेंची मनसे आणि‎‎ दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाही जास्त आहे.‎‎ प्रश्न: एमआयएम पक्षावर नेहमीच जातीयवादी ‎असल्याचा शिक्का मारला जातो, यावर तुमचे ‎काय म्हणणे आहे?‎ इम्तियाज जलील : गेल्या 70 वर्षांपासून हेच‎ आरोप ऐकतोय. हे आरोप करणारे कोण आहेत? ‎तेच लोक जे मुस्लिम समाजाला आपली जहागीर‎ समजायचे. निवडणुका आल्या की भाजप आणि‎ शिवसेनेची भीती दाखवून मते लाटायची, हा यांचा ‎धंदा होता. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे नेते‎ आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.‎आम्ही काहीही झाले तरी भाजपसोबत जाणार‎ नाही, हे आता जनतेला उमजले आहे. म्हणूनच ‎एमआयएम आज मालेगाव (21), धुळे (10),‎नांदेड (14) अशा सर्वच ठिकाणी निर्णायक ‎भूमिकेत आहे.‎ प्रश्न: संभाजीनगरमध्ये पक्षांतर्गत बंडाळी आणि‎आरोप झाले, तरीही यश कसे मिळाले?‎ इम्तियाज जलील: शहराच्या जनतेचे मी‎ आभार मानतो. गेल्या वेळी 25 जागा होत्या,‎या वेळी 33 जागा जिंकून आम्ही ताकदीने‎ मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आलो‎ आहोत. माझ्यावर भ्रष्टाचाराचे, पक्ष‎विकल्याचे आरोप झाले. पण गंमत पाहा,‎जोपर्यंत या लोकांना उमेदवारीची आशा होती,‎तोपर्यंत इम्तियाज जलील जगातील सर्वात‎ चांगला माणूस होता. तिकीट कापले गेल्यावर ‎मी लगेच भ्रष्ट झालो? बॅरिस्टर असदुद्दीन‎ ओवेसींचा माझ्यावर विश्वास आहे आणि‎ त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिलेला‎ नाही, हे निकालांनी सिद्ध केले.‎ ‎

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 10:32 am

भाजपच्या मतांमध्ये 1.07 लाख, दोन्ही शिवसेनेच्या मतांत 2.50 लाखांनी वाढ:भाजपने 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत सहा जागा अधिक प्राप्त करत एकहाती सत्ता मिळवली

नाशिक महापालिकेवर 2017 च्या तुलनेत सहा अधिक जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवताना मतांमध्येही 1,07,155 ने वाढ नोंदवली आहे. 2017 नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटींनंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. दोन्ही शिवसेनेला नाशिकमध्ये पडलेल्या एकत्रित मतांची बेरीज गेल्या वेळच्या तुलनेत अडीच लाखांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची एकत्रित मते गत निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या 6 हजार 687 ने वाढली आहे. दुसरीकडे मनसेच्या मतांमध्ये तब्बल 1 लाख 61 हजार 278 मतांची तर काँग्रेसच्या 56 हजार 500 मतांची घट झाली आहे. मागील निवडणुकीनंतर भाजपचा जनाधार वाढल्याचे दिसत असून मूळच्या शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर त्यांच्या मतांमध्येही वाढ झाली आहे. दोन्ही सेनेच्या एकूण जागा वाढल्या मागील मनपा निवडणुकीत शिवसेनेला 35 जागा मिळाल्या होत्या. पक्ष फुटीनंतर यंदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेने एकत्रित 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीला मागील निवडणुकीत 6 जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा त्यात दोन जागांची घट झाली आहे. पंचवटी विभागात भाजपला सर्वाधिक मतदान पंचवटी विभागातील प्रभाग एक ते सहामध्ये भाजपला मतदारांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. या सहाही प्रभागांमध्ये 2 लाख 95 हजार 242 मतदारांनी भाजपला मतदान करत त्यांचे उमेदवार विजयी केले. मनसे, काँग्रेसला सर्वाधिक फटका या निवडणुकीत मतदार राजाने मनसे व काँग्रेसला नाकारले. मनसेच्या 4 तर काँग्रेसच्या 3 जागा घटल्या आहेत. (संदर्भ : राज्य निवडणूक आयोग)

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 10:15 am

भाजपचा अभ्यासू चेहरा हरपला:मुंबईतील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राज के. पुरोहित यांचे निधन, 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि दक्षिण मुंबईतील प्रभावशाली नेते राज के. पुरोहित (७१) यांचे आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, अनुभवी आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राज के. पुरोहित यांचे पार्थिव उद्या, रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दक्षिण मुंबईतील अजेय नेतृत्व राज के. पुरोहित हे मुंबई भाजपमधील एक सामर्थ्यशाली नाव होते. विशेषतः दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा राजकीय दबदबा होता. मुंबईतील उत्तर भारतीय समुदायाचे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विधिमंडळातील त्यांचा अभ्यास आणि प्रशासनावरील पकड यामुळे त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषविले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत केली होती. राजकीय वारसा आणि प्रवास नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांनी वॉर्ड क्रमांक २२१ मधून विजय मिळवून आपला राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला आहे. आपल्या मुलाच्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच राज पुरोहित यांचे जाणे हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांच्या वाढत्या प्रभावामुळे राज पुरोहित राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर झाले होते. मात्र, तरीही पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि मार्गदर्शनासाठी ते नेहमीच सक्रिय राहिले. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि मुंबईतील जनतेने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:42 am

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात:चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर आदळली, अक्कलकोटला निघालेल्या 5 मित्रांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल (जि. रायगड) येथून सहा मित्र एर्टिगा कारने (क्रमांक MH-46 Z 4536) अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. शनिवारी (१७ जानेवारी २०२६) रात्री ११:३० च्या सुमारास ही कार मोहोळ जवळील देवडी पाटी परिसरात आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. भरधाव वेगातील ही कार महामार्गापासून सुमारे १० ते १५ फूट दूर झुडपांमध्ये जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. पाच जणांचा जागीच मृत्यू हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये ३ पुरुष आणि ३ महिला असे एकूण ६ प्रवासी होते. यापैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह वाहनामध्ये पूर्णतः अडकलेल्या अवस्थेत होते. या अपघातातून ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला सुदैवाने बचावल्या आहेत. पोलिस मदत आणि बचावकार्य घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. जखमी ज्योती टाकले यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्रीची वेळ आणि वेगाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तींची सविस्तर नावे आणि पत्ते शोधण्याचे काम सध्या पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व जण पनवेल परिसरातील रहिवासी असून ते एकमेकांचे मित्र होते, असे समजते. महामार्गावर झुडपांमध्ये ही कार अडकल्याने रात्रीच्या वेळी मदतकार्यात काही अडचणी आल्या होत्या.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:35 am

जवळा बाजार शिवारातून कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह चार दिवसानंतर सापडला:पोलिस अन महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

औंढा नागनाथ तालु्क्यातील जवळाबाजार शिवारात कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल चार दिवसानंतर रविवारी ता. 18 घटनास्थळापासून चार किलो मिटर अंतरावर वडद शिवारात सापडला आहे. औंढा पोलिस व महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या मृतदेह शोधण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी तीन ते चार वेळा रास्ता रोको केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील तरुण दीपक काळे (28) हा बुधवारी ता. 14 सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास जवळाबाजार शिवारातील कालव्यात पडला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कालव्यात दीपक याचा शोध सुरु केला होता. मात्र कालव्यात पाणी जास्त असल्यामुळे तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, दीपक यांचा मृतदेह शोधावा या मागणीसाठी त्याच्या कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी जवळा बाजार येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिस विभागाने पाटबंधारे विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करून दीपकचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कालव्याचे पाणी कमी झाले नसल्याने अडचणी कायम होत्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी ता. 17 थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. यावेळी पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत यांनी आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस, गावकऱ्यांनी कालव्यात शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, आज सकाळी घटनास्थळापासून चार किलो मिटर अंतरावर वडद शिवारातील कालव्यात दीपक याचा मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिस निरीक्षक राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, जमादार राजू ठाकूर, आंबादास बेले, रामा गडदे, शेख इम्रान, माजी सरपंच राजू पवार, हनुमान काळे, गोविंद काळे, बालाजी काळे यांची वडद शिवारातील कालव्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत दीपक यांचा घातपात केल्याचा आरोप मयत दीपक यांना बुधवारी कोणीतरी बोलावून नेले त्यानंतर त्याता घातपात करून मृतदेह कालव्यात फेकल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असून काही जणांची चौकशी केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:35 am

पालकमंत्र्यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यासह समर्थकांचे शस्त्रांसह तांडव:शिंदेसेनेच्या नगरसेविकांनी विजयी मिरवणुकीमध्ये नाचवल्या तलवारी

महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाचा गुलाल उधळताना सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचे धिंडवडे काढल्याचा प्रकार घडला, शिंदेसेनेकडून विजयी झालेल्या उमेदवार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यासह राजू राजपूत आणि अभिजित जीवनवाल यांनी भररस्त्यात तलवारी नाचवली. याप्रकरणी अभिजित जीवनलाल यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. तलवारी भिरकावत कायद्याला चॅलेंज मिळालेल्या माहितीनुसार, विजयानंतर हर्षदा शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात मोठी विजयी मिरवणूक काढली. या वेळी वाहनावर उभे राहून नवनिर्वाचित नगरसेविका हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजित जीवनवाल यांनी हातात तलवारी घेऊन त्या हवेत भिरकावल्या. कायदा हातात घेणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांवर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे भाजप उमेदवाराच्या घरासमोर दोन तास थरार भाजपचे उमेदवार संजय बारवाल यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. बारवाल कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, अभिजित जीवनवाल आणि त्यांच्या समर्थकांनी बारवाल यांच्या दारासमोर दोन तास धुमाकूळ घातला. तलवारी नाचवून दहशत निर्माण केली. इतकेच नव्हे तर आमच्या मुलालाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप चारवाल कुटुंबाने केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:29 am

संभाजीनगरात 10 स्वीकृत नगरसेवकपदांसाठी 50 बंडखोरांना दिलेला शब्द येणार अंगलट:5 जागांवर भाजप, 3 जागा एमआयएमला तर शिंदेसेनेला 1 स्वीकृत नगरसेवक निवडता येणार

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून आली होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अनेक इच्छुकांना निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून तुमची वर्णी लावू, असा शब्द दिला होता. यामध्ये प्रामुख्याने भाजपने 15 ते 20, शिवसेनेकडून 12 ते 15, एमआयएमकडून 8 ते 10, उबाठाकडून 8 ते 10 तर काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित यांनीदेखील आपल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदी घेण्याचा शब्द दिलेला आहे. स्वीकृत सदस्यांची संख्या 5 वरून 10 झाली असली तरी इच्छुकांची गर्दी पाहता नेत्यांचा मोठा कस लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के किंवा 10 सदस्य (यापैकी जी संख्या कमी असेल) इतके स्वीकृत नगरसेवक निवडले जाऊ शकतात, असे राजपत्र 23 मार्च 2023 रोजी काढलेले आहे. यामुळे काहीशा प्रमाणात नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार 5 जागांवर भाजप, 3 जागा एमआयएमला तर शिंदेसेनेला एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे. उद्धवसेना, वंचित यांच्याकडे त्या तुलनेत संख्याबळ नाही. स्वीकृत नगरसेवक पदावर संधी मिळावी यासाठी पराभूत उमेदवारांकडूनही फील्डिंग लावली जात आहे. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसतो ज्या अनुभवी कार्यकर्त्यांना किंवा ज्येष्ठ नेत्यांना काही कारणास्तव प्रत्यक्ष निवडणुकीत उतरता आले नाही, त्यांच्यासाठी हे पद राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रमुख साधन आहे. स्वीकृत नगरसेवक निवडण्यासाठी महापालिका प्रशासनाचा अनुभव, सामाजिक कार्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव किंवा डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसारख्या क्षेत्रातील विशेष पदवी असणे आवश्यक आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रत्येक राजकीय पक्षाला स्वीकृत नगरसेवक पदे दिली जातात. स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या सभांमध्ये चर्चेत सहभागी होता येते. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो आणि ते महापौर पदासाठी उभे राहू शकत नाहीत. शब्द पूर्ण करताना पत्करावा लागणार रोष या निवडणुकीत भाजपकडे 1400 पेक्षा अधिक उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. शिवसेनेकडे देखील 900 पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले. एमआयएमकडे 700 पेक्षा अधिक, उद्धवसेनेकडे 600 पेक्षा अधिक उमेदवारांनी तिकिटाची मागणी केली होती. यातील उमेदवारी न मिळालेल्या शेकडो लोकांनी बंडखोरी केली. भाजपच्या विरोधात तर मोर्चे, निदर्शने आणि आंदोलन झाले. या सर्वांना पक्षांतील नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ, असा शब्द दिला आहे. यामुळे आता हा शब्द पूर्ण करताना नेत्यांना पुन्हा एकदा रोष पत्करावा लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:22 am

अकोला मनपा सत्तेचं गणित ‘एक'वर अडकलं...:भाजपला काठावर बहुमत; काँग्रेसतर्फे सत्तेसाठी समिकरणांची जुळवाजुळव‎

महानगरपालिका निवडणुकीचा निकाल‎शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर लागलीच‎दुसऱ्या दिवसांपासून सत्ता स्थापनेसाठी‎रस्सीखेच सुरू झाली आहे. सत्तेसाठी‎समिकरणांची जुळवाजुळव करण्याच्या‎कामास भाजप, काँग्रेसह विविध राजकीय‎पक्षांतर्फे वेग आला आहे. महापालिकेत‎सत्ता स्थापन करण्याकरिता भाजप आणि‎काँग्रेसला स्पष्ट बहुमत नसल्याने ते‎मिळवण्यासाठी निर्णायक असलेले अपक्ष‎उमेदवार आशिष पवित्रकार, शिंदे सेनेच्या‎उषाराणी विरक या दोघांपैकी कोण साथ‎देणार त्यावर सत्ता स्थापनेचे गणित‎अवलंबून दिसत आहे. दरम्यान पवित्रकार‎यांची भाजपात सन्मानजनक ‘घरवापसी’‎ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.‎दुसरीकडे भाजपसह मित्रपक्ष वगळता‎ काँग्रेस आणि इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजप‎विरोधात सत्ता स्थापनेसाठी मोट‎बांधण्याची तयारी चालवली आहे. त्यात‎स्वतंत्र निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्या‎एकमेव सदस्य उषाराणी विरक आणि‎अपक्ष आशिष पवित्रकार काय भूमिका‎घेतात, याकडे लक्ष लागले आहे.‎ महापालिकेच्या निवडणुकीनंतर‎आता सत्ता कुणाची बसणार यावरून चर्चा‎सुरू झाली आहे. मतदारांनी कुठल्याही‎एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. ८०‎पैकी ३८ जागा जिंकत भाजप सर्वांत मोठा‎पक्ष ठरला. भाजपसोबत युती केलेले‎राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर‎विकास समितीचे प्रत्येकी एक नगरसेवक‎धरून भाजप ४० पर्यंत पोहोचू शकेल.‎ बहुमतासाठी आणखी एका नगरसेवकाची गरज आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार‎गट आणि महानगर विकास समिती युतीचे‎८० पैकी ४० जागा निवडून आल्या आहेत.‎काँग्रेसच्या २१ नगरसेवकांसहसर्व विरोधी‎पक्ष व अपक्ष मिळून विरोधकांचे ४० चे‎संख्याबळ होते. काँग्रेस, शिवसेना ठाकरे‎गट, वंचित बहुजन आघाडी,‎‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी शरद पवार‎गट, शिवसेना शिंदे गट व अपक्ष यांचे‎मिळून एकूण ४० संख्याबळ होते. भाजपला‎सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी‎विरोधकांकडूनही मोट बांधली जात‎असून, राजकीय हालचालींना वेग आला‎ आहे. महापालिकेचे सत्ता समीकरण‎जुळवण्यासाठी ८० पैकी ४१ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपचे‎ ३८, राष्ट्रवादी अजित पवार गट व महानगर‎विकास समिती एक असे एकूण भाजप‎युतीचे ४० नगरसेवक निवडून आले आहेत.‎सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला केवळ‎एका नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरज‎राहील. बंडखोर अपक्ष नगरसेवक‎पवित्रकार हे देखील पूर्वाश्रमीचे भाजपचेच‎आहेत. शिवाय इतर काही नगरसेवकांना‎सोबत घेण्याचा प्रयत्न देखील भाजप करू‎शकतो. महापालिकेची निवडणुकीत‎अटीतटीची झाली असून, मतदारांनी‎कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले‎नाही.‎‎

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:16 am

विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जनजागृती; आरटीओंकडून मार्गदर्शन:यशवंतराव चव्हाण विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त कार्यशाळेचे आयोजन‎

मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या वतीने संचालित यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरूळपीर येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ओ. एस. गोरे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मोटार वाहन निरीक्षक, वाशीम येथील विनोद घनवट उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे. व्ही. इंगोले, चोपडे यांनीही उपस्थिती लावली. मार्गदर्शन करताना विनोद घनवट यांनी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. पॉवर पॉईंट सादरीकरण व अपघातांचे चित्रीकरण दाखवून वाहतूक नियमांचे पालन न केले. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांची तीव्रता त्यांनी प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. हेल्मेट वापर, सीट बेल्ट, वेगमर्यादा, चुकीची ओव्हरटेकिंग व मोबाईल वापर यासारख्या बाबींमुळे जीविताला निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी केले तर आभार पोहाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:10 am

सवडद येथे 20 जानेवारी पासून त्रिदिवसीय गणेश जयंती महोत्सव:महाराष्ट्रातील पहिले तृतीय पंथी कीर्तनकार समा माय यांची हजेरी‎

येथून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे सवडद गंगाभारती जन्मभूमी येथील सिध्दविनायक मंदिरावर २० जानेवारी पासून गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात कथाकार अशोक महाराज घायाळ यांच्या त्रिदिवसीय गणेश पुराण कथेसह सकाळी साडेदहा मोफत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित आरसोडे, डॉ. उमेश गुंजकर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, नारायणा नेत्रालय शाखा मेहकरच्या वतीने मोफत चष्मा वाटप व नेत्र तपासणी, रक्त तपासणी, दुपारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे व्याख्यान, सायंकाळी संत दुनियादास बाबा भजनी मंडळाचा सांगीतिक कार्यक्रम, २१ रोजी दुपारी तीन वाजता शाळा आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य यावर दिलीपराव खंडारे यांचे व्याख्यान, सायंकाळी महाराष्ट्रातील पहिले तृतीय पंथी कीर्तनकार समा महाराज दौंडकर उर्फ (समा माय) अहिल्यानगर यांचे कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता कीर्तन केसरी भरत महाराज जाधव दुधा ब्रम्हपुरी यांचे काल्याचे कीर्तन तद्नंतर श्रीमज्जगद्गुरु पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे, आमदार श्वेता महाले, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार सिद्धार्थ खरात, ठाणेदार गजानन करेवाड, मुकूंद दंडे, रावसाहेब देशपांडे, रवी पाटील, बाबुराव मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराज वितरण रात्री शिवशाहीर देवानंद वानखेडे मेहकर यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त संतोष गाडेकर यांनी दिली आहे कालांतराने येथे वटवृक्ष असल्याने येथे एक चौथरा उभारण्यात आला. दरम्यान, गावात गणेशोत्सवाची प्रचंड अहमहमिका असल्याने येथेही छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने गणेश स्थापना केली जायची. पाच वर्षे या ठिकाणी गणेश स्थापना होत असल्याने शेवटच्या दिवशी मिरवणुकी दरम्यान वादाची ठिणगी पडायची. त्यामुळे येथे भाविकांनी थेट मंदिर उभे केले आहे.. अशी आहे परंपरा सवडद गावात उकिरडा आणि त्यातच दारूचे बॉक्स पुरून ठेवले जायचे. गावातला हा दारूचा अड्डाच होता. मात्र ग्रामस्थांनी वाढते तंटे बघता या ठिकाणी १२ डिसेंबर २०१२ रोजी गणरायाचे प्रशस्त मंदिर उभे केले. आता ते परिसरातील गणेश भाविकांचे हे जागृत देवस्थान झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 9:05 am

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान:सीईओ संजीता महापात्रा यांची सांगवा बुद्रूक ग्रामपंचायतीला भेट‎

दर्यापूर पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सांगवा बुद्रुक ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी भेट दिली. भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम, मकर संक्रांति निमित्त महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, स्वयंरोजगारा बाबत महिलांचे विशेष प्रशिक्षण शिबीर, प्रधानमंत्री आवास अंतर्गत घरकुलाचे उद्घाटन, अनेक उपक्रमांस भेटी दिल्या व केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. दरम्यान गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये लोकसहभाग वाढवणे लोकवर्गणी तसेच अभियानातील निकषांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उमेद अंतर्गत ग्राम संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी दर्यापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सी.जे.ढवक, विस्तार अधिकारी पंचायत संदीप देशमुख,विस्तार अधिकारी राजकुमार चांदुरकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, तसेच दर्यापूर पंचायत समीतीमधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सांगवा बुद्रुक सरपंच श्रीकृष्ण कराळे, उपसरपंच विजय सगणे, ग्रामपंचायत अधिकारी सुरज भोपसे गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनशी संवाद साधताना सीईओ संगिता महापात्रा व उपस्थित ग्रामस्थ व महिला.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:54 am

ज्येष्ठ इतिहासकार प्रा. डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचीकर यांचे निधन:मराठवाड्यातील शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा, वयाच्या 88 व्या वर्षी निधन

इतिहासकार प्रा. डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचीकर (८८) यांचे शनिवारी (१७ जानेवारी) अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख, तसेच पर्यटन प्रशासन विभागाचे माजी संचालक म्हणून कार्य केलेले डॉ. मोरवंचीकर यांनी सुमारे ४० वर्षे अध्यापन केले. राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल २०० संशोधनात्मक निबंध, तर इतिहास व इतर विषयांतील १६ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन केले. पैठण येथील उत्खननात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारतीय जल संस्कृती मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले. काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:52 am

अंजनगाव बारीतून जाणारा राजमार्ग झाला अपघात मार्ग:एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नाही एकही गतिरोधक‎

नजिकच्या अंजनगाव बारी गावातून जाणाऱ्या नागपुर-मुंबई राजमार्गावर १ किलोमीटर अंतरापर्यंत सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु या अंतरामध्ये कोठेही गतिरोधक नसल्याने सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे. सध्या या मार्गाचे सौंदर्यींकरण होत आहे. त्यादरम्यान या बाबीकडे लक्ष पुरवले जावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आजतागायत या मार्गावर अनेक किरकोळ अपघाताबरोबरच गंभीर अपघातही झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या रबरी गतिरोधकाचे नियोजन केले होते. परंतु या गतिरोधकांनी अवघ्या ३ महिन्यातच मार्गासोबतचा आपला संबंध तोडला. यामुळे दोन्ही बाजुंनी येणारी वाहने सुसाटपणे धावतात. या मार्गावर बस स्टॉप, शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर, आठवडी बाजार, स्मशान भूमी, भिवापूर तलाव, अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे मार्ग ओलांडताना पायी चालणाऱ्यांची, तसेच वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना अतिशय दक्षता बाळगावी लागते. मार्गावर दुतर्फा झाडाझुडपांचे प्रमाण वाढत असून, या झुडपांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. या फांद्या बसच्या खिडक्यांवर आघात करित असल्याने प्रवाशांची शारीरीक हानी होण्याची शक्यता आहे. शिवाय यापासुन इतर वाहनचालकांचीही गैरसोय होत आहे. सौंदर्यीकरणाचा एक प्रमुख भाग म्हणून १ हजार मीटरपर्यंत या मार्गाचे मधोमध रस्ता दुभाजक बांधून त्यावर पथदिव्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पूर्वीच्या अर्ध्या खांबावरिल पथदिवे गेल्या ४ महिन्यांपासुन बंद करण्यात आले आहे. तालुका क्रीडा संकुलचा परिसर वगळता या राजमार्गाच्या दुतर्फा नागरीकांनी अतिक्रमण केल्याने, रोडवरील पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. वरिल सर्व बाबी लक्षात घेता अपघातावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने या मार्गावर मजबूत व टिकाऊ गतिरोधक, झाडा- झुडपांची छाटणी, पथदिव्यांची दुरुस्ती आवश्यक झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार दिली असून सदर विभागाने या सर्व बाबींची दखल घ्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मार्गात दुतर्फा झाडा-झुडपांचे वाढते प्रमाण, गतीरोधकांचा अभाव, पथदिवे असूनही सध्या अंधार, आदी अडचणी आहेत. रस्त्याच्या बाजूने नागरी अतिक्रमणही वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग अपघात प्रवर्ण मार्ग बनला आहे. हा राजमार्ग अमरावतीवरून अंजनगावबारी मार्गे वर्धा- नागपूर, यवतमाळ- हिंगणघाटला जोडला आहे. त्यानुसार या मार्गावरुन परिवहन महामंडळाच्या बससेही सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष पुरवणे गरजेचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:43 am

बार्शी येथील चांदणी नदीवर परकीय माशांचे होते आक्रमण:‘सकर माउथ कॅटफिश’चा शिरकाव जैवविविधतेवर गंभीर संकट‎

​बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील चांदणी नदीमध्ये दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचा मूळ रहिवासी असलेला परकीय ‘सकर माउथ कॅटफिश’ आढळून आला आहे. या माशाच्या शिरकावामुळे नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेवर मोठे संकट ओढावले असून, स्थानिक माशांच्या अस्तित्वासाठी तो घातक ठरत आहे. वेगाने वाढणारा आणि अत्यंत सहनशील असलेल्या या माशामुळे चांदणी नदीची जैवविविधता कायमची नष्ट होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘सकर माउथ कॅटफिश' हा मासा आपल्या तोंडाच्या सक्शन कपसारख्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे नदीच्या तळाशी आणि खडकांना घट्ट चिकटून राहतो. हा मासा मोठ्या प्रमाणात शेवाळ, सूक्ष्म जलचर आणि प्रामुख्याने स्थानिक माशांची अंडी खातो. यामुळे रोहू, कटला, मृगल यांसारख्या देशी प्रजातींच्या प्रजननावर विपरीत परिणाम होऊन त्या नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नदीतील संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होत आहे. चांदणी नदी ही परिसरातील शेती, पशुधन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. मात्र, या परकीय माशाच्या वाढत्या संख्येमुळे नदीतील नैसर्गिक समतोल ढासळत आहे. याचा फटका केवळ माशांपुरता मर्यादित नसून, जलचर वनस्पती, पक्षी आणि संपूर्ण जलपरिसंस्थेवर याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लोकांच्या अज्ञानातून ओढावलेले संकट पर्यावरण अभ्यासकांच्या मते, हा मासा अनेकदा घरगुती अ‍ॅक्वेरियममध्ये शोभेसाठी पाळला जातो. मात्र, माशाचा आकार मोठा झाल्यानंतर अनेक नागरिक तो नदी, ओढा किंवा तलावात सोडून देतात. नागरिकांच्या अशा निष्काळजी कृतीमुळेच हे परकीय मासे भारतीय नद्यांमध्ये पसरत असून, आता चांदणी नदीलाही त्याचा फटका बसला आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:31 am

वर्षभरानंतर उजळले मुरूडमधील खड्ड्यांचे भाग्य:दुरूस्ती सुरू, खड्डा बुजवल्याने ‎गैरसोय दूर होणार‎

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते अंबेजोगाईला जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास प्रारंभ झाल्याने तब्बल वर्षभरानंतर खड्ड्यांचे भाग्य उजळले आहे. शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी ही सुरुवात झाली. अर्धा फुट ते एक फूट खोल तसेच लांबी रुंदीला दोन ते तीन फूट असणाऱ्या व मोजदाद सुद्धा होऊ शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत.या खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत होते. सतत गजबजलेल्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खड्ड्यामुळे वाहनधारक हैराण झाले होते . लातूर टेंभुर्णी महामार्ग तसेच या महामार्गावरून आंबेजोगाई ला जाणाऱ्या वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते. आंबेजोगाईला जाणाऱ्या या चौकापासून अहिल्यादेवी होळकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती ते नायगावला वळण घेणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना, दुचाकीस्वारांना तसेच चारचाकी असणाऱ्या वाहनधारकांनाही कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते. खड्डे चुकवत असताना कधी कधी विरुद्ध बाजूनेही जावे लागत होते.त्यामुळे वाहन चालवण्याची कसरत करता करता अपघाताला निमंत्रण मिळत होते. नुकताच या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या चार चाकी वाहनावर पडून नुकसान झाले होते. या अपघातात दोघेजण प्रसंगावधान राखल्यामुळे वाचले होते. ही समस्या सोडवण्यासाठी अनेकदा वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.या प्रश्न संदर्भात संबंधित विभागाला निवेदनही दिले गेले होते. या रस्त्यावरील हे खड्डे बुजवण्यास प्रारंभ झाल्यामुळे हैराण झालेल्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. रस्त्याची दूरास्था झाल्याने नागरिकांना येता जाता त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांची कसरत होत होती. आता दुरुस्ती सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. चौकात असणाऱ्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिक ही हैराण झाले होते. हे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्यामुळे रस्ता प्रवास करण्यायोग्य होईल व वाहनधारकांची गैरसोय दूर होईल.. संतोष लाड, नागरिक

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:27 am

पद्मश्री विखे पाटील वादविवाद स्पर्धेत वारजे माळवाडीतील कॉलेज अजिंक्य:कनिष्ठ गटात पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी‎

लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात झालेल्या सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय रौप्य करंडक वादविवादचा यावर्षीच्या पद्मश्री विखे पाटील रौप्य करंडकावर पुणे येथील कला, वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी येथील विद्यार्थ्यांनी नाव कोरले. कनिष्ठ गटामध्ये पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील ३४ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. यंदा संयोजन समितीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासास पूरक ठरेल’ हा विषय वादविवादासाठी ठेवला होता. या प्रस्तावाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मते मांडली. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटात झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, सहसचिव भारत घोगरे, डॉ.भास्कर शेळके, डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे,उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. जितेंद्र पाटील, राजेंद्र जोरवर, साहित्यिक प्रा. शशिकांत शिंदे यांनी केले. या स्पर्धेमध्ये सांघिकमध्ये अनिकेत वनारे आणि नितीन गागरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी पुणे यांनी करंडक मिळवला. वरिष्ठ गटामध्ये आरडीआयके महाविद्यालय बडनेरा येथील आदित्य डोळे यांनी प्रथम, वारजे माळवाडी पुणे येथील अनिकेत वनारे यांनी द्वितीय तर याच महाविद्यालयाचा नितीन गागरे यांनी तृतीय क्रमांक तर अळकुटी येथील महाविद्यालयातील मुस्कान शेख यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. कनिष्ठ गटात प्रथम- पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, लोणी येथील अंकिता जगताप, प्रियंका सिनारे द्वितीय, अगस्ती विद्यालय अकोले येथील दर्शन चौधरी तृृृृतीय तर उत्तेजनार्थ प्रवरा पब्लिक स्कूल येथील स्वरुप भोसले यांनी यश मिळविले. यावेळी भारत घोगरे, प्रा.जितेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. ए. पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. एस. एम. वाकोळे, प्रा. डी. के.खेमनर यांनी आभार डॉ. शांताराम चौधरी यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:23 am

पंचवीस वर्षांच्या भरतनाट्यम्‎ साधनेचा रौप्यमहोत्सव उत्साहात:शिर्डीच्या ऋतुजा धनेश्वरला समाजभूषण रत्न पुरस्कार

येथील ऋतुजा संजय धनेश्वर हीने अखंड साधना, शिस्त आणि श्रद्धेच्या बळावर इतिहास घडवला आहे. तिच्या भरतनाट्यम साधनेचा २५ वर्षांचा रौप्यमहोत्सव शहरातील साई गोल्ड इन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ऋतुजा हीने वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. सन २००८ मध्ये सह्याद्री वाहिनीवरील दम दमा दम या कार्यक्रमात तिला कारकिर्दीतील पहिले पारितोषिक मिळाले होते. तिने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर भरतनाट्यमच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि भरतनाट्यमच्या सर्व परीक्षा ती डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाली. या तपश्चर्येचे फलित म्हणजे ‘मास्टर्स इन भरतनाट्यम’ ही पदवी आणि भारत सरकारची प्रतिष्ठित ‘सीसीआरटी स्कॉलरशीप’ या सोहळ्याप्रसंगी लेखक रवींद्र जोशी यांनी ऋतुजाच्या नृत्यकलेचे कौतुक केले. ऋतुजाचा समावेश भारतातील पहिल्या ३० दिग्गज भरतनाट्यम नृत्यकांमध्ये झाला आहे. या यशामागे ऋतुजाबरोबरच तिच्या कुटुंबाचा त्याग आणि समर्पण तितकेच महत्त्वाचे आहे. तिचे वडील संजय धनेश्वर यांनी आपले संपूर्ण आयुष्य साईचरणी अर्पण केले आहे. आई सुनिता धनेश्वर आणि बहीण पल्लवी यांनी २५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज साकारताना पाहून संपूर्ण सभागृह भावूक झाले होते. ब्राह्मण एकता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय पाटील यांनी ऋतुजाला ‘समाजभूषण रत्न’ पुरस्कार देऊन गौरविले. या कार्यक्रमासाठी ऋतुजाचे गुरु मुठाळ, खेडकर मॅडम, डुबल, चौरे आणि आरती भणगे यांचे देखील यावेळी अनेकांनी कौतुक केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:22 am

एसटीबस खिळखिळ्या, धावत्या गाडीमागे काळ्याकुट्ट धुराचे लोट:नगर विभागात 19 शिवाई रस्त्यावर पण, लालपरीची दुरावस्था‎

प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटी महामंडळाची मुहूर्तमेढ अहिल्यानगरमध्ये रोवली गेली होती. पहिल्या बसपासून ते आताच्या इलेक्ट्रिक वातानुकुलीत बसगाडीपर्यंतचा प्रवास राज्याने पाहिला आहे. टप्प्याटप्प्याने जुन्या बसची जागा आता, नव्या गाड्या घेत आहेत. परंतु, दहा ते बारा वर्षे जुन्या खिळखिळ्या गाड्यांची दुरावस्था झाली आहे. अहिल्यानगर विभागांतर्गत ११ आगार आहेत. कोरोनापूर्वी जिल्ह्यात सुमारे ७३० बसमार्फत सेवा दिली जात होती. परंतु टप्प्याटप्प्याने कालबाह्य झालेल्या गाड्यांचे निर्लेखन करण्यात आले. त्यामुळे ही संख्या कमी होऊन ६५० पर्यंत घसरली. रस्त्यावर ज्या जुन्या गाड्या धावत आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे. दिव्य मराठीने मागील काही दिवसांत केलेल्या पाहणीत प्रवासी घेऊन निघालेल्या बस रस्त्यात बंद पडलेल्या आढळून आल्या. तर काही बसमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याने प्रदूषण निर्माण होत आहे. दरम्यान, राज्यातली पहिली इलेक्ट्रिक बस १ जून २०२२ रोजी अहिल्यानगर ते पुणे मार्गावर धावली होती. आता या बसची संख्या वाढत आहे. त्यासाठी तारकपूर स्थानकांत स्वतंत्र चार्जिंग स्टेशनची उभाण्यात आले आहे. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत अहिल्यानगर विभागाकडे १९ शिवाई बसमार्फत सेवा दिली जात आहे. परंतु, वारंवार बंद पडणाऱ्या बसच्या जागेवर नव्या लालपरी द्याव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 8:18 am

मंजुरी मिळूनही 800 मीटर खैरेवाडी रस्ता 8 महिन्यांपासून रखडलेलाच:रस्त्याअभावी 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू होवूनही प्रशासनाचे दुर्लक्ष‎

इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावाकडे जाणारा चिंचलेखैरे - खैरेवाडी या तीन किमी रस्त्याच्या कामासाठी प्रस्थाव पाठवण्यात आला होता. त्यापैकी प्रशासनाकडून ८०० मीटर रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. मात्र आठ महिने उलटूनही अद्याप रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या आदीवासी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाचा कालावधी १२ महिने असताना अद्यापही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. यामुळे येथील आदिवासी बांधवांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्याअभावी आठवडाभरापूर्वी ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष कायम आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम न केल्यास बेमूदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या रस्त्याची पाहणी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली होती. मात्र त्यानंतरही रस्त्याच्या कामाला कोणतीही गती आठ महिने उलटूनही केवळ ७०० मीटर रस्त्यावर फक्त मातीचा भराव टाकण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी या रस्त्याचे उद्घाटन केले होते. मात्र प्रत्यक्षात काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात या मार्गावरून महिला, विद्यार्थी व रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या प्रश्नामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांकडे शासनाचे लक्ष नाही. खैरेवाडीकडे जंगलातून जावे लागते. जाताना ३ ओहळ लागतात. पावसाळ्यात तर फारच अडचण आहे. रस्त्याची समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. - पांडूरंग पारधी, अध्यक्ष, आदिवासी राया ठाकर संघटना. चिंचलेखैरे ते खैरेवाडी हा ८०० मीटरचा रस्ता आदिवासी उपाययोजनेतून मंजूर करण्यात आला आहे. १ मार्च २५ ते १ मार्च २६ पर्यंत १ वर्ष कामाची मुदत आहे. वन विभागाच्या विविध परवानग्यांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. अजून ४ महिने शिल्लक आहेत. मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. साधारणत: १ महिन्यात काम करण्याचे उद्दिष्ट असून, संबंधित ठेकेदाराला काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - अनिल बैसाने, उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:57 am

सटाणा नगरपरिषदेर्फे कागदी, कापडी पिशव्या निर्मिती केंद्र:प्लास्टिकला आळा घालण्यासाठी उपक्रम, बाजारात नाममात्र दरात उपलब्ध‎‎

प्लास्टिकच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी सटाणा नगरपरिषदेतर्फे कागदी व कापडी पिशव्या निर्मिती केंद्र सुरु करण्यात आले असून स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी नगरपरिषदेने कागदी व कापडी पिशव्यांचे निर्मिती केंद्राचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सहभागावर भर देण्यात आला असून, घराघरांतून उपलब्ध असलेले पुनर्वापरयोग्य कागद, कापड आदी साहित्य उपयोगात आणले जाणार आहे. नागरिकांनी त्यांच्या घरी असलेले वापरात नसलेले स्वच्छ कपडे व कागद संकलन करण्यासाठी नगरपरिषदेने संकलन केंद्र सुरु केले असुन नागरिकांनी आपल्याकडे असलेले कागद व कपडे येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे साहित्य नागरिकांनी विनामूल्य स्वरूपात सटाणा नगरपरिषद कार्यालयात किंवा नेमलेल्या संकलन केंद्रात जमा करावेत. जमा झालेल्या साहित्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक पिशव्या नगरपरिषद कार्यालयाजवळील केंद्रावर, तसेच शहरातील बाजारपेठा व विविध दुकानांमध्ये नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:55 am

महाप्रबंधकानी घेतला तांत्रिक कामकाजाचा आढावा‎:नांदगाव रेल्वे स्थानकात अमृत भारत योजनेअंतर्गत झालेल्या कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना

मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी नांदगाव रेल्वे स्थानकाला भेट देत रेल संचलना संबंधित महत्वाच्या असणाऱ्या सर्व तांत्रिक प्रणालींचा आढावा घेतला. स्थानकावर अमृत भारत योजने अंतर्गत झालेल्या कामांना आणि निर्माणाधिन कामांना भेट देत स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शनिवारी (दि.१७) पथकाने येथील ऑटोमेटेड संचलित कृ लॉबी, सिग्नल यंत्रणा, तिसरी मार्गिका, बुकिंग ऑफिस या नियमित रेल संचलनाच्या दृष्टीने महत्वाच्या विभागांना भेटी दिली. तसेच येथील कामकाज सुरक्षित मापदंडांच्या निकषानुसार होत आहे का ? हे सुनिश्चित केले. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. ऐनवेळी प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नांदगाव रेल्वे स्थानक महत्वाचे असल्याने येथील प्रवासी सुविधांचाही अधिकारी वर्गाने आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या. दरम्यान, महाप्रबंधकांनी कामकाजाची पाहणी केल्याने प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोविड काळात तात्पुरत्या स्वरुपात येथील प्रवासी गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. हे थांबे पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी शिवसेना व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली. युवा फाउंडेशनने महाप्रबंधक गुप्ता यांचे जनसंपर्क अधिकारी यांची भेट घेऊन येथील मोकळ्या भूखंडाचा विकास, अंडरपासमध्ये कायम पाणी तुंबत असल्याने फुट ओव्हर ब्रीज बांधून देण्याची मागणी केली.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:54 am

कर्करोग संशोधन आणि उपचार प्रगतीवर मार्गदर्शन:आबड होमिओपॅथिक महाविद्यालयात चर्चासत्र‎

अलिकडच्या वर्षांत कर्करोगाच्या अभ्यासात आणि उपचारांमध्ये प्रगती झाली आहे. याबाबत येथील के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयामार्फत विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर ‘कर्करोग संशोधन आणि उपचारातील अलीकडील प्रगती' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्करोग तज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे यांनी या चर्चसत्रात कर्करोगाचे निदान, उपचार तसेच आहारासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समिती अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, अरविंदकुमार भन्साळी, सचिव जवाहरलाल आबड, महाविद्यालयाचे समन्वयक नंदकुमार ब्रम्हेचा, डॉ. सुनीलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा, डॉ. विवेक जैन, डॉ. आकाश जैन, पंकज चोपड़ा यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय दहाड, उपप्राचार्य डॉ. संगीता दोषी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मुकेश पारेवाल, डॉ. अर्पणा पारिक, डॉ. मृगेश शाह यांनी सूत्रसंचालन केले. चर्चसत्रास शिक्षक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:52 am

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली माणुसकीची ऊब:इगतपुरीत लखोटिया फाउंडेशनकडून शाळांत ब्लँकेट वाटप‎

तालुक्यातील अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल परिसरात वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगडवाडी व कारावाडी येथे ऊषा आणि परमेश्वर स्नेहलता लखोटिया फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्नेहिल सहाय्य उपक्रम राबविण्यात आला. हिवाळ्यातील तीव्र थंडीचा विचार करून फाउंडेशनकडून दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक उबच मिळाली नाही, तर त्यांच्या मनात आपुलकी, सुरक्षितता व आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली. दुर्गम डोंगराळ भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ही मदत मायेचा आधार ठरली. हा सामाजिक उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षक प्रमोद परदेशी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ही मदत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पोहोचू शकली. कार्यक्रमाचे नियोजन गांगडवाडी शाळेचे मुख्याध्यापक कैलास चित्ते, कारावाडी शाळेच्या मुख्याध्यापिका जिजा खाडे यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी दोन्ही गावांतील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी लखोटिया फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही अशा समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे जीवन अधिक सशक्त व उज्ज्वल व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:52 am

अर्ज भरताना बाँड, नोटरीची गरज नाही:स्वयंघोषित शपथपत्र चालेल, गट, गणांच्या निवडणुकीसंदर्भात दिली माहिती‎

तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून पंचायत समिती निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. तर, जिल्हा परिषदेसाठी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. प्रतिनिधी | फुलंब्री सध्या जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांसाठी निवडणूक लागली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्जासोबत देण्यात येणाऱ्या शपथपत्रासाठी नोटरी किंवा बाँडची गरज नसून, स्वयंघोषित शपथपत्र पुरेसे आहे, अशी माहिती फुलंब्री निवडणूक अधिकारी नीलम बाफना यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात तहसील कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी उपनिवडणूक अधिकारी तहसीलदार योगिता खटावकर प्रमुख उपस्थित होत्या. नीलम बाफना यांनी निवडणुकीसंबंधी महत्त्वाची माहिती दिली. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारावर कडक कारवाई होईल, असाही इशारा या वेळी देण्यात आला. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना जिल्हा परिषदेसाठी १ हजार रुपये, पंचायत समितीसाठी ७५० रुपये डिपॉझिट भरावे लागेल. इतर मागासवर्गीय उमेदवारांना जिल्हा परिषदेसाठी ७५० रुपये, पंचायत समितीसाठी ३५० रुपये डिपॉझिट लागेल. महिला उमेदवारांना सर्व प्रवर्गात ५० टक्के सवलत मिळणार आहे. पक्षाकडून अर्ज भरलेला असून बी फॉर्म दिला नसेल, तर तो अर्ज अपक्ष मानला जाईल. ज्या गटातून उमेदवार उभा राहणार आहे, त्या गटातील एक सूचक आवश्यक आहे. उमेदवाराचा पती किंवा पत्नी सूचक होऊ शकतात. मात्र तेही त्याच गटातील असणे आवश्यक आहे. दुसऱ्या गटातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला त्या गटातीलच सूचक लागेल. उमेदवारी अर्जासाठी स्वतंत्र खिडकी योजना राबवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:37 am

गंगापूरला उपनगराध्यक्षपदी अमोल जगताप यांची निवड:स्विकृत सदस्यपदी जाधव, गंगवाल यांची निवड‎

गंगापूर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी अमोल सुभाषराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून सुवर्णा संजय जाधव आणि शीतल संदेश गंगवाल यांची निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्षपदासाठी अमोल जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सूचक फैसल चाउस आणि अनुमोदक संतोष अंबिलवादे यांनी अर्जावर सह्या केल्या. ठरलेल्या वेळेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने अमोल जगताप यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गटनेते सुवर्णा जाधव यांचे नाव सुचवले. भाजपकडून गटनेते विजय पानकडे यांनी शीतल गंगवाल यांचे नाव दिले. पीठासीन अधिकारी संजय जाधव यांनी दोन्ही नावांची घोषणा केली. मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:36 am

गॅस गळतीमुळे शिवन्यामध्ये गॅसचा‎भडका; संसार उपयोगी वस्तू खाक‎:मानकर कुटुंबीय आले उघड्यावर, मंडळ अधिकाऱ्यांनी केला घटनेचा पंचनामा

शिवना येथील अजिंठा-बुलढाणा महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे राहणाऱ्या मानकर कुटुंबाचे घर गॅसचा भडका उडाल्याने जळून खाक झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने घरात असलेल्या पाच जणांचे प्राण वाचले. मात्र संपूर्ण संसार उपयोगी वस्तू आगीत भस्मसात झाल्या. अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. मगन पुंडलिक मानकर हे गेल्या अनेक वर्षांपासून टिन पत्र्यांच्या घरात राहत होते. शुक्रवारी दुपारी चहा बनवताना गॅस पेटवण्यात आला. त्यावेळी गळतीमुळे बर्नरजवळ मोठा भडका उडाला. नळीने जोरात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली. त्याच वेळी मुलगा आकाश याने पत्नी, लहान मुलगी, आई संगीता आणि बहिणीला बाहेर काढले. शेजाऱ्यांनी मदतीचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही. या आगीत घरातील सोफासेट, फ्रिज, टीव्ही, कुलर, फॅन आणि अन्नधान्य जळून गेले. स्फोट होईल या भीतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी आल्या. कुटुंब उघड्यावर पडले आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. शनिवारी मंडळ अधिकारी विजय शेळके यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर केला.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:35 am

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती ढोरकीनमध्ये साजरी

ढोरकीन पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका दीपाली जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक होरकटे प्रामुख्याने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयी भाषणे केली. यावेळी शिक्षक शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयीचे विश्वबंधुत्वाचे विचार मांडले, तर औटी यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलींना जिजाऊंच्या ममत्व, शौर्य, दृढनिश्चयी रुपाचे दर्शन घडविले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र कोलते व उपक्रमशील तथा सांस्कृतिक विभागप्रमुख सिराज पठाण यांनी कार्यक्रमाच्या आयोजक विद्यार्थ्यांचे व वर्गशिक्षिकांचे कौतुक केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते. ढोरकीन येथील जिल्हा परिषद शाळेत प्रतिमांना पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवर.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:34 am

शुद्ध पाणी उपलब्ध असताना जारचे पाणी घेऊ नका- लांडे:कन्नड पालिकेचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची अफवा चुकीची‎

पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांनी जारचे पाणी घेऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी शनिवारी केले. पाणी पिण्यास अयोग्य असल्याची अफवा चुकीची आहे. नागरिकांनी अशा अंधश्रद्धेतून बाहेर यावे, असेही त्यांनी सांगितले. लांडे यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाणीपुरवठा, वितरण आणि शुद्धीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला. कन्नड शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे. शहराला अंबाडी प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. १९९२ आणि २००५ मध्ये दोन जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आल्या. जुन्या यंत्रणेची क्षमता साडेचार एमएलडी आणि नव्या यंत्रणेची साडेतीन एमएलडी आहे. एकूण क्षमता आठ एमएलडी आहे. सध्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. हे अंतर कमी करून दोन दिवसांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, पंपिंग यंत्रणा १५ ते २० वर्षे जुनी आहे. त्यामुळे पंपिंग क्षमता कमी झाली आहे. विद्युत पॅनल बोर्डही जुने असल्याने वारंवार बिघाड होतो. पंपही पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. कन्नड शहरात सध्या ६ हजार ४५४ नळ जोडण्या आहेत. शहराची रोजची पाण्याची गरज ६० लाख लिटर आहे. मात्र, चार जलकुंभांमध्ये एकूण ३२ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. इंदिरा नगर जलकुंभाची क्षमता साडेपाच लाख लिटर, गिरणी ग्राउंडची सात लाख लिटर, विश्रामगृहाची साडेतीन लाख लिटर आहे. विश्रामगृहातील जलकुंभ १९५६ चा असून दुसरा जलकुंभ १९७२ चा आहे. हे दोन्ही जलकुंभही जुने झाले आहेत. विज पुरवठ्याची डीपी क्षमता १०० केव्ही आहे. प्रत्यक्षात २०० केव्ही क्षमतेची गरज आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. या वेळी पाणीपुरवठा प्रमुख बाजीराव थोरात, शुभम मगर, रोहित कामतीकर, भैय्या साळवे उपस्थित होते. जलशुद्धीकरण केंद्रावर अशी होते प्रक्रिया अंबाडी धरण शहरापासून तीन किलोमीटरवर आहे. तेथून पाणी पंप करून जलशुद्धीकरण केंद्रावर आणले जाते. फाउंटनमध्ये पाणी ढवळले जाते. नंतर तुरटी आणि क्लोरीन टाकून शुद्धीकरण होते. तुरटीने माती आणि गाळ वेगळा होतो. क्लोरीनने निर्जंतुकीकरण होते. त्यानंतर ट्यूब सेटलरमधून पाणी स्थिर केले जाते. नंतर नर्मदा वाळूतून गाळून जलकुंभात साठवले जाते. तेथून नागरिकांना वितरित केले जाते.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:34 am

अनुदानासाठी गोदावरी पुलावर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

अतिवृष्टी नुकसानभरपाईत तफावत झाल्याने शेतकऱ्यांनी नागमठाण येथील गोदावरी नदीच्या पुलावर जलसमाधी आंदोलन सुरू केले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर १७ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. सध्या प्रशासनाने फक्त ६,५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणेच मदत दिली आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अजित काळे आणि तालुका अध्यक्ष गणेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गुरुवारी १५ जानेवारी रोजी सकाळपासून सुरू झाले. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आणि ई-केवायसीची अट रद्द करून तात्काळ अनुदान थेट खात्यात जमा करावे, अशीही मागणी केली. याआधी अनेक वेळा उपोषण करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. . या आंदोलनात साहेबराव चोरमळ, नामदेव अदिक, शरद असणे, सचिन वेताळ, पंडित अण्णा शिंदे, वैभव सावंत, वाल्मीक गिरी, महेश तांबे, किरण सावंत, देविदास शिरसाठ, सुरेश शिरसाठ, राजू खुर्द, गणेश वाडेकर, रोहित साबदे, दत्ता नरहरे, रमेश अण्णा सवाई, सुनील गायकवाड, कैलास सवाई, विकास तांबे, बाबुराव तांबे, गणेश गायके, शरद वाडे, मोहन दिवटे, बाबासाहेब सोनवणे यांचा सहभाग होता. पोलीसांनी मध्यस्थी केली. आमदार रमेश बोरणारे आणि माजी सभापती अविनाश गलांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन काही काळासाठी स्थगित केले. या आंदोलनाला आमदार रमेश पाटील बोरणारे, बाजार समितीचे अध्यक्ष रामहरी जाधव, भागिनाथ मगर, माजी सभापती अविनाश गलांडे, माजी जिप अध्यक्ष लताताई पगारे, संजय बोरणारे, शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ. प्रकाश शेळके, बाळासाहेब जानराव, आदींचा पाठिंबा मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:33 am

विकासात्मक:धरम तलावातून खुलताबादसाठी नवा मार्ग; वाहतूक होणार सुलभ, काही वेळ तलाव फुटल्याची अफवा, गाळ काढणे सुरू‎

खुलताबाद शहरालगत असलेल्या शेकडो वर्षे जुन्या धरम तलावाच्या सुशोभीकरणातून नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. या पुलामुळे बनी बेगम बाग व वेरूळ महामार्ग थेट शहराशी जोडले जाणार आहेत. तलावातील साचलेले पाणी बाहेर काढल्याने ‘धरम तलाव फुटला’ अशी अफवा पसरली होती. मात्र, ही केवळ सुशोभीकरणाची पूर्वतयारी असल्याचे स्पष्ट झाल्याने संभ्रम दूर झाला आहे. तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने ‘धरम तलाव फुटला’ अशी चर्चा वेरूळ परिसरात झाली होती. डमडम तलाव परिसरातील शेतकऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाच्या ५४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून बनी बेगम बागेचा विकास प्रकल्प सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून धरम तलावाचे सौंदर्यीकरण व उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तलावातील जुनी पाळ काही अंशी तोडून पाणी बाहेर काढण्यात आले. गाळ काढणे, पाळीची भिंत उंच करणे व जलसाठा क्षमतेत वाढ करणे ही कामे सुरू आहेत. पाळ उंच झाल्याने अधिक पाणी साठवता येणार आहे. तलावावर असलेला जुना अरुंद पूल पाडण्यात आला आहे. त्या जागी मोठा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पर्यटकांना थेट चारचाकी व दुचाकी वाहनांनी बनी बेगम बागेत जाता येणार आहे. खुलताबादेतील निम्म्याहून अधिक भागासाठी शहरात येण्याचा सोपा मार्ग तयार होणार आहे. वेरूळ महामार्ग व शहर यांची जोडणी अधिक सुलभ होणार आहे. यापूर्वी पर्यटकांना वेरूळ-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून बनी बेगम बागेत पायी जावे लागत होते. वाहनांसाठी शहरातील गर्दीतून फेरी मारावी लागत होती. हा अडथळा आता दूर होणार आहे. धरम तलावातून खुलताबाद शहरासाठी नवा मार्ग केला जात असून, सुरू असलेले काम. तलावाची साठवण क्षमता वाढेल नगर परिषदेचे नगर अभियंता ऋषिकेश जोशी यांनी सांगितले की, शहरालगत असलेल्या धरम तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी पाणी बाहेर काढण्यात आले आहे. वेरूळ महामार्ग ते खुलताबाद शहर जोडणारा नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून तलावातील गाळ काढून पाळची भिंत उंच करण्यात येईल. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढेल. अर्थकारणाला चालना पर्यटकांची संख्या वाढून शहराच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. धरम तलावाचा कायापालट आणि नव्या उड्डाणपुलामुळे खुलताबाद व बनी बेगम बागेला ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या नवे रूप मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:33 am

घाटनांद्रा परिसरात शाळांमध्ये प्लास्टिकमुक्तीसाठी मार्गदर्शन

प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्नेहल संतोष सोनवणे हिने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत तिने इंद्रगडी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्रशाला, जोगेश्वरी विद्यालय तसेच चिंचवण आणि शिंदेफळ येथील शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा कमी वापर, ओला-सुका कचरा वेगळा करणे आणि स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. फास्ट फूड, फास्ट फॅशन, वाहनांचा वापर आणि विजेच्या वाढत्या वापरामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वाढतो. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. त्यातून ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल घडतो, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. अलीकडच्या काळात महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि पिकांचे नुकसान ही बदलत्या हवामानाची ठळक उदाहरणे असल्याचे तिने सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेत गोळा केलेला प्लास्टिक कचरा ती स्वतः येऊन घेऊन जाणार असल्याचेही तिने सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत उत्साह निर्माण झाला. मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर, भरत सुपेकर आणि जितेंद्र गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. यावेळी कृष्णा दहेतकर, भरत सुपेकर, जितेंद्र गायकवाड, दामोधर मोरे, सोमनाथ घोडके, विनय ज्ञाने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:32 am

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत बाळापुरात तालुकास्तरीय कार्यशाळा

पिंपळदरी राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा मौजे बाळापुर, तालुका सिल्लोड येथे प्रगतशील शेतकरी अशोक सूर्यवंशी यांच्या शेतात पार पडली. कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी बहुपीक पद्धतीचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांनी तालुक्यातील विविध कृषी योजना, अनुदान, तांत्रिक सहाय्य आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी थेट शेतात जाऊन उत्तरे दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना बहुपीक पद्धत, केसर आंबा शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान याबाबत नवी दिशा मिळाली. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी परीक्षित पाटील, नंदू जटोटे, संभाजी पाटील, उमेश सरोदे, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या गावसखी, पिंपळदरीच्या मास्टर ट्रेनर पूजा गव्हाणे, कृषी विभागाचे कर्मचारी आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीआयएसएच, लखनऊ येथील शास्त्रज्ञ डॉ. राजीव जयस्वाल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. मुजफ्फर सय्यद यांनी वैज्ञानिक शेती पद्धतींची माहिती दिली. उत्पादन खर्च कसा कमी करावा आणि नफा कसा वाढवावा, यावर मार्गदर्शन केले. केशर आंबा शेतीवर सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत केशर आंबा शेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी केसर आंब्याच्या लागवडीपासून ते दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेण्यापर्यंतच्या यशस्वी तंत्राबाबत सखोल मार्गदर्शन केले. योग्य जातींची निवड, छाटणी, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच बाजारपेठेतील संधी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:32 am

संभाजीनगरात मारहाण झालेल्या विकास जैन यांच्यावरच पोलिसांकडून गुन्हा:पोलिसांना धक्काबुक्की, शासकीय कामात अडथळ्याचा आरोप

मतमोजणी केंद्रात शुक्रवारी (१६ जानेवारी) पोलिसांनी माजी महापौर विकास जैन यांच्यावर केलेल्या मारहाणी प्रकरणाने शनिवारी वेगळी कलाटणी मिळाली. याप्रकरणी शुक्रवारी सहायक पोलिस आयुक्तांच्या फिर्यादीनुसार, जैन यांच्यासह तिघांवर पोलिसांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र पाहूनच मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी सर्वांना आत सोडले जात होते. या वेळी विकास जैन यांनी ओळखपत्र न दाखवता पोलिसांशी हुज्जत घातली. मी कोण आहे हे माहीत नाही का, असे म्हणत त्यांनी गेट ढकलून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जैन यांनी निरीक्षक प्रमोद कठाणे आणि सहायक निरीक्षक मिरधे यांना धक्काबुक्की करून त्यांचा गळा धरला. हा वाद सोडवण्यासाठी सहायक आयुक्त सागर देशमुख पुढे आले असता जैन यांनी त्यांनाही मागे ढकलले. त्यांच्यासोबतच्या शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल यांनीही गेट ढकलून आत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला, असे या तक्रारीत नमूद केलेले आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, कोर्टात दाद मागू मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या प्रकरणात चर्चा केली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्त व अन्य पोलिस अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. -संजय शिरसाट, पालकमंत्री निलंबनाच्या धास्तीने माझ्याविरुद्ध तक्रार मी ६१ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे, पोलिसांनी मला ज्या पद्धतीने मारले, ती वागणूक सराईत गुंडासारखी होती. अधिकारी सागर देशमुख त्या वेळी माझ्यापासून बरेच दूर होते. निलंबनाच्या भीतीने त्यांनी तक्रार दिली आहे. मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद आहे. मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. -विकास जैन, माजी महापौर

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:22 am

जि. प.साठी भाजपने युतीचा निर्णय आताच घ्यावा:शिवसेनेची भूमिका, शेवटपर्यंत चर्चा चालणार नाही- शिरसाट

जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी युती करायची की नाही, याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने येत्या २ ते ३ दिवसांत घ्यावा. अन्यथा शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असे शिंदेसनेने सूचित केले आहे. मनपा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत युती करायची की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शेवटच्या दिवशी युती तुटली. त्याचा फटका शिवसेनेला बसला. या पार्श्वभूमीवर पक्षाने ही भूमिका घेतली आहे. पैठणमध्ये शिवसेनेचे आमदार विलास भुमरे आणि खासदार संदिपान भुमरे यांनी तयारी केली आहे. शनिवारी मेळावादेखील घेण्यात आला. याबाबत दिव्य मराठीशी बोलताना खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले की, स्वबळाच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी केली आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यासाठी बैठक होणार आहे. आमची तयारी सुरू जिल्हा परिषदमध्ये भाजपसोबत युती व्हावी यासाठी आम्ही अनुकूल आहोत. मात्र, मनपासारखी शेवटपर्यंत चर्चा करता येणार नाही. दोन ते तीन दिवसांत काही िनर्णय झाल्यास चर्चा होईल, अन्यथा आम्ही तयारी सुरू केली आहे. - संजय शिरसाट, पालकमंत्री

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:14 am

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक:26 जागी शिंदेसेना, 23 ठिकाणी उबाठा ‘रनर अप’, भाजप 18, काँग्रेस 11 तर एमआयएम 7 ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला असला, तरी २६ जागांवर शिवसेना तर २३ ठिकाणी उबाठा दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष ठरला आहे. यावरून शिवसेनेची ताकद कमी झालेली नसल्याचे स्पष्ट होते. पक्ष फुटला नसता तर महापालिका निकालाचे चित्र काहीसे वेगळेच दिसले असते. शिवसेना आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षांना विजयाने हुलकावणी दिली असली, तरी अनेक प्रभागांत या दोन्ही गटांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. दोन्ही शिवसेनेचा शहरावरील प्रभाव कायम शिवसेनेने २६ प्रभागांत दुसरा क्रमांक तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) २३ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. विजयाचे अंतर अल्प असलेल्या अनेक जागांवर या दोन्ही पक्षांनी प्रस्थापित उमेदवारांना घाम फोडला. या आकडेवारीवरून शहरात आजही शिवसेनेची वैचारिक पकड कायम असल्याचे चित्र स्पष्ट होते. शिंदेसेना महापालिकेत भाजपबरोबर सत्तेत सहभागी होऊ शकते. उद्धवसेनेला मात्र लोकसभा निवडणुकीपर्यंत कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावा लागेल. इतर पक्षांची स्थिती अशी... केवळ दोन्ही शिवसेनाच नव्हे, तर भाजप, काँग्रेस आणि एमआयएमनेही अनेक प्रभागांत चुरशीची लढत दिली. शहरात भाजपनंतर सर्वाधिक यश मिळालेल्या एमआयएम पक्ष ७ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर एमआयएमची बहुतांश प्रभागात थेट लढत असलेला काँग्रेस पक्ष ११ जागांवर तर वंचित बहुजन आघाडी ही १२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिली. विजयी गणित अन् चुरशीची लढत भाजप ५७ जागांसह बहुमताजवळ पोहोचला, एमआयएम ३३ जागांसह दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. प्रभागामुळे क्रॉस व्होटिंग झाली, तरी त्याचा फायदा काही पक्षांना झाला. मात्र एमआयएमच्या प्रभागांमध्ये केवळ पतंगाला लक्षात ठेऊनच मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. क्लोज फाइट ठरलेल्या पक्षांचे प्रभाग आणि मतांची आकडेवारी ही भविष्यातील राजकारणातील वेगळे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिमबहुल भागात एमआयएम, काँग्रेस आणि वंचित, तर हिंदूबहुल भागात भाजप आणि शिंदे गटात थेट संघर्ष पाहायला मिळाला. काही ठिकाणी भाजप आणि एमआयएममध्येही थेट लढती झाल्या.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:12 am

राष्ट्रवादीला का नाकारले यापेक्षा भाजपचा स्वीकार महत्त्वाचा:पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक प्रचार करूनही मिळाल्या नाहीत अधिक जागा

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता आणली असून भाजपचे तब्बल ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक प्रचार केलेला असताना त्यांना कमी जागा मिळाल्या आहेत. पुणेकरांनी अजितदादांना नाकारले का, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मी असे म्हणणार नाही की पुणेकरांनी त्यांना नाकारले. पण मी असे म्हणेन की, पुणेकरांनी मोदींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारले. पुण्यात शनिवारी फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे ग्रँड टूरचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबाबत फडणवीस म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे आभार मानतो. त्यांनी भाजपवर प्रचंड मोठा विश्वास ठेवला. ज्या पद्धतीचा विजय पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी दिला आहे, त्याचा आनंद तर आहेच, पण त्याहीपेक्षा जबाबदारीचे भान आहे. जनतेने जो विश्वास व्यक्त केला आहे त्याला पात्र होण्यासाठी आम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. जे व्हिजन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत, असे या वेळी फडणवीस म्हणाले. भारतभूषण बराटेंना २५ हजारांचे मताधिक्य प्रभाग ३२-ब मधून भारतभूषण बराटे यांना २५ हजारांचे, तर प्रभाग ४-ब मधून रत्नमाला सातव यांना २३ हजारांचे मताधिक्य मिळाले. मुंबई महापालिकेत नील सोमय्या यांनी १५ हजार मतांचे मताधिक्य मिळवत प्रथम क्रमांक मिळवला असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन निकाळजे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. राघवेंद्र मानकर २६ हजारांवर मते घेऊन राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी पुणे| पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी शुक्रवारी जाहीर झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बापू मानकर हे तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजयी ठरले आहेत. भाजपच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. “दादा’ जनता अन् आम्ही सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “पुण्याचे दादा कोण?’ असे विचारले असता ते म्हणाले की, पुण्याचे दादा हे पुण्याची जनता असून आम्ही त्यांचे सेवक आहोत. मुंबईच्या यशावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंबईत महायुतीला ११९ जागा मिळाल्या असून आमच्या १४ जागा कमी मतांनी हरलो आहोत. एवढ्या जागा ३ निवडणुकांत शिवसेना एकसंघ असताना त्यांना मिळाल्या नाहीत.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:05 am

टीका:भाजप आम्हाला संपवू शकत नाही- उद्धव ठाकरे, जमिनीवर शिवसेना अजून कायम

“भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून आणि नियम बदलून कागदावर शिवसेना संपवली असेल; पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकले नाहीत. कालच्या निवडणुकीत मुंबईकरांनी आणि कडव्या शिवसैनिकांनी हे दाखवून दिले आहे की, पैशाच्या धबधब्यासमोर आजही निष्ठा ताठ मानेने उभी आहे,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. या वेळी त्यांना नगरसेवक भेटायला आले होते. आकड्यांच्या खेळात आमचा महापौर होताना दिसत नसला, तरी शिवसेनेने दिलेली झुंज ही ऐतिहासिक आहे, असे त्यांनी नमूद केले. “त्यांच्या विजयावर गद्दारीचा आणि भ्रष्टाचाराचा डाग आहे, पण आमच्या पराजयाला स्वाभिमानाचे तेज आहे,” असे सांगताना त्यांनी शिवसैनिकांचे मनोबल उंचावले. एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना भाजपने अडीच वर्षे सत्तेसाठी वापरले, त्यांना आता फेकून देण्याची वेळ आली आहे. “माझा पक्ष फोडून त्यांनी मुख्यमंत्री बनवला, आता भाजप आपला महापौर बसवण्यासाठी शिंदे गटाचीच पार्टी फोडेल का?” असा मिश्किल सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. मुंबईची अस्मिता विकणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, ही तर केवळ एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भाजपचे हिंदुत्व केवळ ढोंग भाजपचे हिंदुत्व हे केवळ ढोंग असून, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठीबहुल परिसरातील शिवसेनेचा गड शाबूत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. ठाकरे म्हणाले की, चार दिवस पैसे वाटून निष्ठा विकत घेता येत नाही. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी मुंबईच्या तिजोरीवर लक्ष ठेवून असतील.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 7:03 am

शिंदेंच्या ‘होम ग्राउंड’वर भाजपची खेळी; विरोधात बसण्याची तयारी:शिंदेंना 75, तर भाजपला 28 जागा, तरीही भाजप नाराज

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व गाजवले असले तरी युतीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने आता थेट ‘विरोधात बसण्याची’ तयारी दर्शवून सर्वांनाच धक्का दिला आहे. “सत्ता अमर्याद नसावी, त्यावर अंकुश हवा,’ अशी भूमिका घेत भाजप नेत्यांनी थेट संघर्षाचे संकेत दिले आहेत. ठाण्यातील १३१ जागांपैकी महायुतीने १०३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकल्या आहेत. भाजपला २८ जागांवर यश मिळाले असून शरद पवार गटाने १२, अजित पवार गटाने ९ आणि उद्धव ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. ठाण्यात उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीचाही पराभव झाला. त्यामुळे ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपची सत्तेतील वाट्यासाठी दबावतंत्राची खेळी शिवसेना फुटीचा फायदा थेट भाजपला होईल असे म्हटले जात होते. पण त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. शिंदेंचे एकतर्फी वर्चस्व असले तरी “सत्ता अमर्याद नसावी’ म्हणत भाजप शिंदेंच्या प्रभावावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. महापौरपदासाठी स्वतःहून न जाण्याचा पवित्रा घेऊन भाजपने सत्तेत सन्मानजनक वाट्यासाठी दबावतंत्राची खेळी खेळली आहे. राज्यात युती असली तरी स्थानिक पातळीवर “शरण’ न जाता आक्रमक विरोधकाची भूमिका घेत भाजपने आपली भविष्यातील विस्ताराची रणनीती स्पष्ट केली आहे. महापौरपदासाठी चर्चा करायला जाणार नाही महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने स्पष्ट केले आहे की ते महापौरपदाच्या चर्चेसाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत. “त्यांना (शिवसेनेला) चर्चा करायची असेल तर ते येतील, आम्ही जाणार नाही,’ असे म्हणत भाजपने आपला कडक पवित्रा जाहीर केला आहे. “सत्ता अमर्याद नसावी, त्यावर कुणाचे तरी नियंत्रण हवे,’ या विधानामुळे ठाण्याच्या राजकारणात आता चर्चांना उधाण आले आहे. एकूणच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना-भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. मात्र भाजपच्या या भूमिकेवर शिंदे गटाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत हा वाद आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जागावाटपावरून सुरू झालेला हा सुप्त संघर्ष आता सत्ता स्थापनेबाबत टोकाला पोहोचला असल्याचेही दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू, भाजप आमदारांचा पवित्रा भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. केळकर म्हणाले की, “आम्ही ४० जागा लढवल्या आणि २८ जागांवर यश मिळवले. २०१७ च्या तुलनेत आमच्या ५ जागा वाढल्या आहेत. आम्ही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करू. वेळ पडली तर विरोधात बसायलाही आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले आहे. भाजपच्या या भूमिकेवर आता ठाण्यातील शिंदेसेनेचे स्थानिक पदाधिकारी काय निर्णय घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपची युती नकोची होती भूमिका ठाण्यात निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेशी युती नको अशीच भूमिका घेतली होती. भाजपच्या १८ प्रांत अध्यक्षांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना पत्र पाठवले होते. मात्र, भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार युतीत निवडणुका लढवण्यात आल्या. आता निकालानंतर पुन्हा भाजपचा विरोधी सूर आल्याने भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध संपले नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी स्थानिक स्तरावर प्रचंड दबाव असल्याने, युतीमधील ही अंतर्गत धुसफूस उघडपणे चव्हाट्यावर आली.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 6:59 am

कुव्यवस्थापन:स्मार्ट सिटी झाली, पण संस्थांकडे देखभालीसाठी पैसेही नाहीत..., राज्य वित्त आयोग वेळेवर स्थापन नाही

बहुतेक हिंदी भाषिक राज्यांमध्ये, स्वच्छता, ड्रेनेज, पिण्याचे पाणीपुरवठा आणि रस्ते बांधकाम यासारख्या शहरी आणि ग्रामीण कामांवर परिणाम होत आहे. याचे कारण म्हणजे राज्य वित्त आयोग (एसएफसी) वेळेवर स्थापन केला जात नाही. जरी तो स्थापन केला गेला तरी त्याच्या शिफारशींचे पालन केले जात नाही. जरी शिफारसी स्वीकारल्या गेल्या तरी, अंमलबजावणी अहवाल जारी केला जात नाही. शहरी संस्थांच्या आर्थिक व्यवस्थापनावर काम करणाऱ्या जनआग्रह या स्वयंसेवी संस्थेने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात हे उघड झाले आहे. अहवालानुसार, राज्य वित्त आयोगांच्या स्थापनेसाठी घटनात्मक तरतुदींनंतर १७ राज्यांमध्ये फक्त २५ राज्य वित्त आयोग स्थापन करण्यात आले. तथापि, यापैकी १४ राज्यांनी आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे अहवाल सादर करण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ घेतला. उर्वरित राज्यांनी कोणताही अहवाल सादर केला नाही. जनआग्रहने ९ राज्यांच्या वित्त आयोगांच्या १,१३८ शिफारशींचा अभ्यास केला. त्यापैकी फक्त ६८% स्वीकारण्यात आल्या. उर्वरित शिफारशी विनाकारण नाकारण्यात आल्या. एकंदरीत, राजस्थान, हरियाणा, तामिळनाडू, बिहार, केरळ, आसाम आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यांमध्ये सर्व सात वित्त आयोग वेळेवर स्थापन करण्यात आले. तथापि, तामिळनाडू आणि केरळ वगळता, इतर पाच राज्यांमध्ये राज्य वित्त आयोगांच्या शिफारशी पूर्णपणे अंमलात आणल्या गेल्या नाहीत. यासारख्या समस्या

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 6:53 am

धर्मांतर रॅकेटचा म्होरक्या छांगुरबाबाच्या फरार साथीदारास अखेर नागपुरात अटक:दोन दिवस पाळत ठेवत यूपी व नागपूर एटीएसची संयुक्त कारवाई

उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार व स्वयंघोषित धर्मगुरू छांगुरबाबाच्या ‘धर्मांतर सिंडिकेट’ चे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले असून राजस्थान, लखनऊ, बलरामपूर व पुण्यानंतर यूपी एटीएसने नागपूर एटीएस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने जरीपटका भागातून इरदुल इस्लाम वल्द गुलाम येजदानी या त्याच्या सहकाऱ्याला शनिवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आशी नगर येथील गवसीया मशीद परिसरातील घरातून शनिवारी पहाटे ५. ३० वाजता अटक केली. छांगूर बाबाच्या नेटवर्कसाठी निधी व लॉजिस्टिक्स व्यवस्थापन पाहत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कोण आहे छांगूरबाबा? इरदुलच्या बँक खात्यावर कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार इरदुल इस्लाम हा मूळचा नागपूरचा रहिवासी असून त्याचा सोलर पॅनेल इन्स्टॉलेशनचा व्यवसाय आहे. छांगुरबाबाच्या आश्रमात सोलर पॅनेल बसवण्याचे काम मिळाल्याने त्यांच्या संपर्कात आलो, धर्मांतराशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा इरदुलने केला आहे. पण इरदुलच्या बँक खात्यातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार एटीएसच्या रडारवर आहेत. हा पैसा नेमका कुठून आला, तो धर्मांतर रॅकेटसाठी वापरला गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन उर्फ करीमुल्ला शाह हा ‘धर्मांतर सिंडीकेट’चा सूत्रधार आहे. त्याचे नागपुर शहरात जुने संबंध होते. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशात जाऊन धर्मांतराचे मोठे जाळे उभारले असून तो तरुणी, मजूर, विधवा आणि निराधार तरुणीना मोठे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. छांगूर बाबाला गेल्या वर्षी ५ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याची सहकारी नीत रोहरा उर्फ नसरीनही अटकेत आहे. या रॅकेटला आखाती देशांतून १०० कोटींचा निधी मिळाल्याची माहिती समोर आली.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 6:49 am

विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी:23 जानेवारीला परंपरेनुसार भाविकांच्या उपस्थितीत सोहळा

पंढरपूर येथे माघ शुद्ध १ ते ५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आली असून, वसंत पंचमी अर्थात २३ जानेवारी रोजी परंपरेनुसार विवाह सोहळा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यानिमित्ताने साध्वी अनुराधा (दिदी) राजेंद्र शेटे यांचे रूक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन दिनांक १९ ते २२ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी ४. ते ६. या वेळेत करण्यात आले आहे. वसंत पंचमी दिनी सकाळी १० ते १२ या वेळेत विठ्ठल रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा विधिवत मंत्रोच्चारात संपन्न होणार आहे. पहाटे काकडा आरतीवेळी विठ्ठलास सोन्याच्या मुकुटाऐवजी मंदिरातील पांढरे पागोटे परिधान करण्यात येते. या दिवसापासून रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठलास पांढरा पोशाख परिधान केला जातो. यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येईल. त्यानंतर श्री विठ्ठलास विवाह स्थळी येण्याचे निमंत्रण देण्यात येते. श्री रूक्मिणी मातेस पांढरा पोशाख व पारंपारिक अलंकार परिधान करून पाद्यपूजा, नैवेद्य व आरती होते. दुपारी १२ वाजता श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्ती श्री विठ्ठल सभामंडपात आणून विवाह सोहळा विधीवत पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पोशाखानंतर पाद्यपूजा करण्यात येणार आहे. प्रतीकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा व्ही.आय.पी. गेट, श्री संत नामदेव पायरी, महाद्वार पोलीस चौकी, कालिका देवी मंदिर, काळा मारुती चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती मंदिर, माहेश्वरी धर्मशाळा, महाद्वार पोलीस चौकी, पश्चिम द्वार, व्ही.आय.पी. गेट या मार्गाने निघणार आहे. भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार भाविकांना सोहळा पाहता यावा यासाठी चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी येथे एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार असून, विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. संदेश भोसले यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 18 Jan 2026 6:47 am

आता आरक्षण सोडतीवर नजर

नगरसेवक तयार, मात्र महापौरपदाचे आरक्षण गुलदस्त्यात बुधवारी आरक्षणाच्या सोडतीची शक्यता मुंबई : प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी आरक्षण काढल्यास पाडापाडीचे राजकारण होईल, या भीतीने नगर विकास विभागाने महापौर पदाचे आरक्षण आजवर काढले नव्हते. आता निवडणूक संपल्यानंतर महापौरपदाची लॉटरी काढण्यासाठी नगर विकास विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येणा-या बुधवारी आरक्षणाची सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महापालिकांचे निकाल […] The post आता आरक्षण सोडतीवर नजर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Jan 2026 1:01 am

भारताच्या एआय, सेमीकंडक्टर क्षेत्राला धक्का!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका आणि तैवान यांच्यात नुकताच एक मोठा व्यापारी करार झाला आहे. हा करार ५०० डॉलरचा आहे. या अंतर्गत तैवानच्या वस्तूंवर आकारला जाणारा कर २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. या बदल्यात तैवान अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात २५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये कारखाने, रिसर्च लॅब आणि औद्योगिक उद्यानांचा समावेश […] The post भारताच्या एआय, सेमीकंडक्टर क्षेत्राला धक्का! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Jan 2026 12:58 am

मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती

शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांत नाराजी?, फडणवीसांचेही सुतोवाच मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होताच दुस-याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. परंतु या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधात […] The post मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Jan 2026 12:56 am

मुंबई आता थांबणार नाही

विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांचे समर्थन : मुख्यमंत्री मुंबई : प्रतिनिधी मुंबईत आज महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. काही जागा अगदी थोडक्या मतांनी पराभूत झाल्या अन्यथा आज आपण सेंच्युरी मारली असती. मराठी माणसाला जे स्वत:ची जहागीर समजत होते, त्यांनाही मुंबईचा मराठी माणूस भाजप आणि विकासासोबतच आहे हे समजले असेल. लोकांनी पंतप्रधान […] The post मुंबई आता थांबणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Jan 2026 12:54 am

समीकरणांची जुळवाजुळव!

मुंबईत ठाकरेंचा बॉम्ब, शिंदेंच्या पोटात गोळा!, नगरसेवक सुरक्षितस्थळी मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. परंतु तिन्ही पक्षांनी जोर लावूनही त्यांना काठावरच बहुमत मिळविता आले. कारण ठाकरे बंधूंनी जोर लावल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला तर शिंदे सेना तिस-या क्रमांकावर फेकली गेली. त्यामुळे महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी समीकरणे जुळविण्याच्या […] The post समीकरणांची जुळवाजुळव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Jan 2026 12:50 am

महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेचे रणशिंग:राष्ट्रवादीची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणकोणत्या दिग्गजांचा समावेश?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आज आपल्या ४० स्टार प्रचारकांची जंगी यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी या ही माहिती दिली. महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याचे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता ग्रामीण भागातील 'मिनी मंत्रालय' मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या या ४० प्रचारकांच्या माध्यमातून पक्ष ग्रामीण भागात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे. या यादीमध्ये अल्पसंख्याक समाजाचे नेते, महिला प्रतिनिधी आणि युवक नेत्यांचा समतोल साधण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच चर्चेत असलेले नवाब मलिक आणि झिशान सिद्दीकी यांनाही स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमुख स्टार प्रचारक खालीलप्रमाणे: मंत्रिमंडळातील चेहरे: दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवाळ आणि धर्मरावबाबा आत्राम. खासदार: सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील. इतर महत्त्वाचे नेते: रूपाली चाकणकर (महिला प्रदेशाध्यक्षा), अमोल मिटकरी, सुरज चव्हाण, समीर भुजबळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील. ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्याची रणनिती महापालिका निवडणुकांनंतर लगेचच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने, ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ताकदवान प्रचार यंत्रणा उभी केली आहे. अनुभवी नेते, संघटनात्मक पदाधिकारी आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी यांचा समन्वय साधत प्रचार अधिक प्रभावी करण्याची रणनिती आखण्यात आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत रणांगणात उतरण्याची तयारी पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार असून, ग्रामीण महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 11:35 pm

भाजपच्या 'स्वबळ' भूमिकेनंतर राष्ट्रवादीची रणनीती:स्वकीयांची मोट बांधून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवू, मंत्री मकरंद पाटील यांचा निर्धार

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत. पालककमंत्री असताना तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांचे सातत्याने जिल्ह्यावर लक्ष राहिले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी आहे. पवार साहेब अजितदादांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. महायुतीमधील आमचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते स्वबळावर लढण्याचे सूतोवाच करत आहेत. अशा परिस्थितीत स्वकियांची मोट बांधून आम्ही निवडणुकीला सामोरे जावून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवू, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मकरंद पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 200 पेक्षा जास्त उमेदवारांनी दोन दिवसांत राष्ट्रवादीतर्फे मुलाखती दिल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सकारात्मक भावना जनतेमध्ये आहे. भाजप हा महायुतीमधील प्रमुख पक्ष आहे. मात्र, त्यांच्या नेत्यांनी स्वबळावरच निवडणूक लढण्याचं सुतोवाच केले आहे. अशा परिस्थितीत जी मंडळी आमच्यासोबत येण्याचे मान्य करत आहेत, अशा समविचारी पक्षांशी चर्चा करुन समन्वयाने पुढे कसे जाता येईल, अशी वाटचाल आमची राहिल. जयकुमार गोरे यांनी फलटण येथे केलेल्या टिकेबाबत छेडले असता मकरंद पाटील म्हणाले, निवडणुका म्हटल्यावर टीका होणार, हे चालत राहणार आहे. मकरंद गोरे यांनी केलेल्या टीकेची मी त्याची माहिती घेतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर एकाच चिन्हावर लढणार का? असे विचारले असता निवडणुकीला सामोरे जाण्याबाबतची चर्चा झाल्यानंतर एकत्र येवून कुठल्या चिन्हावर लढायचे? हे ठरविण्यात येईल, असेही मकरंद पाटील यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:46 pm

काँग्रेस-वंचितच्या विजयी उमेदवारांशी आमदार अमित देशमुख यांनी साधला संवाद

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १७ जानेवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले मतदार, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस […] The post काँग्रेस-वंचितच्या विजयी उमेदवारांशी आमदार अमित देशमुख यांनी साधला संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 10:28 pm

कॉटन सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्य व पर्यावरणासाठी आवश्यक : डॉ. जोशी

लातूर : प्रतिनिधी प्लास्टिक पॅड्स पर्यावरणासाठी घातक असून त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळून कॉटन पॅड्स वापरण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी यांनी केले. दयानंद कला महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने आणि प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार, ‘मासिक पाळीतील सॅनिटरी पॅड जनजागृती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […] The post कॉटन सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्य व पर्यावरणासाठी आवश्यक : डॉ. जोशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 10:22 pm

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी लातूर महानगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने ४७ जागेवर ऐतिहासिक विजय संपादन केला असून याबद्दल शहरातील विविध प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शनिवारी आशियाना निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकाचे अभिनंदन करून दिलीपराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व […] The post माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 10:21 pm

नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे

लातूर : प्रतिनिधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणा-या अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय १२) हिचा ४ जानेवारी रोजी झालेला मृत्यू हा खूनाचा नाही असे प्राथमीक तपासात निदर्शनात येत आहे. या प्रकरणी राज्य शासनाने नांदेडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची एसआयटी नेमण्यात आली असून आजपासून आपण तपासाला सुरूवात करीत असल्याची माहिती […] The post नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 10:20 pm

सीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी

चाकूर : प्रतिनिधी सीमा सुरक्षा दल, चाकूर (महाराष्ट्र)च्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर सीमा सुरक्षा दलातील ३३४ नवीन हवालदारांचा शपथविधी समारंभ परेड उत्साहात पार पडली. या शपथ परेडची सलामी विनीत कुमार, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, सीमा सुरक्षा दल, चाकूर यांनी घेतली. या नेत्रदीपक परेडचे नेतृत्व प्रशिक्षीत हवालदार अंबर पांडे यांनी केले. […] The post सीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 10:17 pm

येवद्यात जलपुरवठा चौकशीवर नागरिकांना संशय:मानवाधिकार आयोगाच्या पथकावर थातुरमातुर चौकशीचा आरोप

येवदा गावात अशुद्ध जलपुरवठा आणि पाइपलाईन गळतीबाबत दाखल तक्रारीच्या चौकशीवर नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या चौकशी पथकाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संगनमत करून चौकशी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा, नितीन बढे आणि गावातील इतर नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई येथे या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाकडून पोलीस निरीक्षक (अन्वेषण विभाग) दयानंद सरवदे आणि त्यांचे सहकारी स्वप्निल पाटील यांनी १४ जानेवारी रोजी येवदा गावात पाहणी केली. मात्र, हे पथक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्याच वाहनातून गावात पोहोचल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तक्रारदार ओमप्रकाश शर्मा यांनी चौकशीदरम्यान आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. जीवन प्राधिकरणाने आधीच ठरवून काही निवडक व्यक्तींचे जबाब नोंदवले. परंतु, गावाच्या जलपुरवठा समस्येशी थेट संबंधित असलेले सरपंच अमानुल्ला पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष भरत गावंडे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य यांचे जबाब घेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबाची आवश्यकता नाही, असे उत्तर दिल्याचे शर्मा यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मते, जीवन प्राधिकरणाने चौकशी पथक येण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच घाईघाईने काही दुरुस्त्या केल्या. या दुरुस्तीचे फोटो काढण्यात आले, परंतु सध्या सुरू असलेल्या अनेक गळतींपैकी केवळ दोन-तीन गळतींचेच फोटो घेतले गेले. विशेष म्हणजे, जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी ज्या पद्धतीने बोलत होते, त्याच पद्धतीने चौकशी अधिकारीही संवाद साधत असल्याचे दिसून आले. ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितले की, चौकशी अधिकारी गावात येताच जलपुरवठ्याची वास्तविक समस्या पाहण्याऐवजी त्यांच्या घरच्या नळजोडणीची चौकशी करू लागले. मीटर, पाणीबिल आणि मोटार यासंबंधी प्रश्न विचारून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी त्या दिवशी सुरू असलेल्या गळती दाखवल्या, मात्र त्यांचे फोटो घेण्यात आले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार जबाब नोंदवण्यात आला नाही आणि सरपंचांचे जबाब घेण्याची मागणी केली असता त्यास नकार देण्यात आला. यामागे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा संशय शर्मा यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:16 pm

समसापूर येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी रेणापूर तालुक्यातील समसापुर येथील भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक सिद्धेश्वर तुकाराम गरड यांच्यासह नवनाथ वाघमारे, लहुकांत चव्हाण, विक्रांत भुजबळ, चंद्रकांत कोरनूळे, बाळु मुदामे व विशाल अंधारे यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीण मतदारसंघातील विकासकामे, […] The post समसापूर येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 10:15 pm

अमरावती महापालिका निवडणुकीत अपक्षांना सपशेल नाकारले:120 पैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही

अमरावती महापालिका निवडणुकीच्या शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ६६१ उमेदवारांपैकी १२० जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवारांना किमान २० ते कमाल दीड हजार मते मिळाली आहेत. महापालिकेच्या २२ प्रभागांमधील ८७ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये चुरस होती आणि अपक्षांनाही काही जागा मिळतील असा अंदाज होता, मात्र तो फोल ठरला. माघार घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण ६६१ उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. यापैकी ५४१ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे होते, तर १२० उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. या १२० अपक्ष उमेदवारांपैकी एकालाही मतदारांनी विजयापर्यंत पोहोचू दिले नाही. मतदारांनी अपक्षांना नाकारण्यामागे काही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवार निवडून आल्यास काही वेळा 'घोडेबाजार' होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मतदारांना नुकसान सोसावे लागते. तसेच, अपक्षांना राजकीय पाठबळ नसल्याने ते प्रभागाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांकडून पुरेसा निधी मिळवू शकत नाहीत, अशी मतदारांची धारणा आहे. महापालिका निवडणुकांमध्ये अपक्षांना नाकारण्याची ही भूमिका गेल्या काही वर्षांपासून अधिक दृढ होत आहे. दिव्य मराठीच्या आकडेवारीनुसार, १९९२ मध्ये मनपाची पहिली निवडणूक एक सदस्यीय निवड पद्धतीने झाली होती, ज्यात तब्बल २८ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर १९९७ मध्ये ही संख्या २५ पर्यंत खाली आली. २००२ मध्ये ५, २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये ८ आणि २०१७ मध्ये केवळ एक अपक्ष उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाला होता. यंदाच्या निवडणुकीत, तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या या मतदानात अमरावतीकर मतदारांनी एकाही अपक्ष उमेदवाराला निवडून न देण्याचा निर्णय घेतला.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:15 pm

नागपूर-मुंबई राजमार्ग बनला अपघाताचा मार्ग:अंजनगाव बारीत 1 किमी अंतरात गतिरोधक नाहीत; नागरिक त्रस्त

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी गावातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई राजमार्गावरील एक किलोमीटरच्या सिमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. यामुळे या मार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. सध्या या मार्गाचे सौंदर्यीकरण सुरू असून, या कामादरम्यान गतिरोधक बसवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर यापूर्वी अनेक किरकोळ आणि गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या रबरी गतिरोधकांची व्यवस्था केली होती. मात्र, हे गतिरोधक अवघ्या तीन महिन्यांतच खराब झाले. यामुळे आता दोन्ही बाजूंनी येणारी वाहने वेगाने धावत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. या मार्गावर बस थांबे, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर, आठवडी बाजार, स्मशानभूमी, भिवापूर तलाव आणि अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचारी आणि वाहनचालकांना मोठी गैरसोय होते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. या मार्गाच्या दुतर्फा झाडाझुडपांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे बसच्या खिडक्यांवर फांद्या आदळून प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे, तसेच इतर वाहनचालकांनाही गैरसोय होत आहे. सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून एक हजार मीटरपर्यंत रस्ता दुभाजक बांधून पथदिव्यांचे नियोजन केले आहे. मात्र, यासाठी जुने पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो. तालुका क्रीडा संकुलाचा परिसर वगळता, या राजमार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर मजबूत व टिकाऊ गतिरोधक, झाडाझुडपांची छाटणी आणि पथदिव्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार केली असून, विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, गतिरोधकांचा अभाव, बंद पथदिवे आणि वाढते अतिक्रमण यामुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. हा राजमार्ग अमरावतीहून अंजनगाव बारीमार्गे थेट वर्धा-नागपूर, यवतमाळ-हिंगणघाटला जोडतो. या मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा देखील सुरू झाल्या आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:14 pm

वणी फाट्यावर कार-दुचाकी धडकेत दोघे गंभीर जखमी:नागपूरमार्गे येणाऱ्या बोलेरो गाडीने दुचाकीला मागून धडक दिली

तिवसा शहरापासून काही अंतरावर असलेल्या वणी फाटा येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना १७ जानेवारी रोजी घडली. नागपूरमार्गे येणारी एम.एच. २७. डी.ई. ४२८२ क्रमांकाची बोलेरो गाडी इंडियन गॅस एजन्सी गोडाऊनकडून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाकडे येत होती. याचवेळी बोलेरोने एम.एच. २७. बी.आर. ०२२६ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीसह दोन्ही युवक महामार्गालगत काही अंतरावर फेकले गेले. या अपघातात वणी येथील रहिवासी असलेले दुचाकीचालक श्रीकांत सुधीर देशमुख (वय ३५) आणि मंथन बबन देशमुख (वय १८) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:12 pm

अमरावती महानगरपालिकेत 4 माजी महापौरांपैकी 3 विजयी:उपमहापौरांमध्ये मात्र एकालाच यश, तिघांचा पराभव

अमरावती पालिका निवडणुकीत ४ माजी महापौर आणि ४ माजी उपमहापौर रिंगणात होते. यापैकी तीन माजी महापौरांनी विजय मिळवला, तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला. याउलट, माजी उपमहापौरांमध्ये केवळ एकालाच यश मिळाले, तर तिघे पराभूत झाले. विजयी झालेल्या माजी महापौरांमध्ये काँग्रेसचे विलास इंगोले आणि भाजपचे चेतन गावंडे व संजय नरवणे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या चरणजीत कौर उर्फ रिना नंदा यांना मात्र पराभव पत्करावा लागला. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ४ माजी उपमहापौरांमध्ये भाजपचे चेतन पवार, कुसुम साहू आणि संध्याताई टिकले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार यांचा समावेश होता. यापैकी केवळ शेख जफर शेख जब्बार यांनाच विजय मिळवता आला, तर इतर तिघांना पराभवाचा सामना करावा लागला. साईनगर, प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांनी निवडणूक लढवली. या प्रभागात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने पूर्ण ताकद लावली होती आणि तुषार भारतीय यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, चेतन गावंडे आपला पारंपरिक गड राखण्यात यशस्वी ठरले. भाजपचे संजय नरवणे विलासनगर प्रभागातून विजयी झाले, तर विलास इंगोले यांनी अंबागेटच्या आतील जुन्या अमरावती शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. माजी उपमहापौरांच्या बाबतीत या निवडणुकीचा निकाल काहीसा नकारात्मक राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे प्रभाग क्रमांक १५, छायानगर-पठाणपुरा येथून विजयी झाले. पराभूत झालेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक १८ राजापेठचे चेतन पवार, प्रभाग क्रमांक ६ विलासनगर-मोरबागच्या कुसुम साहू आणि प्रभाग क्रमांक १० बेनोडा-भीमटेकडी येथील संध्याताई टिकले यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पराभूत झालेल्या माजी उपमहापौरांपैकी काहींना गेल्या सभागृहात सोबत काम केलेल्या उमेदवारांविरुद्धच निवडणूक लढावी लागली. भाजपचे चेतन पवार यांना शिवसेनेतून (उबाठा) युवा स्वाभिमान पक्षात गेलेले माजी नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी पराभूत केले. तसेच, कुसुम साहू यांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा तायवाडे यांनी हरवले, तर संध्याताई टिकले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार अर्चना पाटील यांनी पराभूत केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:11 pm

आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला:त्यांना पक्षातून काढा, अमरावतीतील 22 पराभूत उमेदवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमरावतीत भारतीय जनता पक्षामध्ये मोठा अंतर्गत स्फोट झाला आहे. भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी केली आहे. आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला. नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या शेवटच्या पाच दिवसांत उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार करून पक्षाशी गद्दारी केली, असा खळबळजनक आरोप या उमेदवारांनी केला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या ८७ जागांपैकी भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी भाजपला युवा स्वाभिमानी पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने भाजपसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या २२ उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात थेट नवनीत राणा यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला आहे. नेमके काय म्हटले पत्रात? 'भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी केली आहे. भाजपात राहून भाजपाचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केले आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपाचा गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेलवर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपाच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या पाच दिवसांत नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या, असा आरोप भाजपच्या २२ उमेदवारांनी पत्रात केला आहे. भविष्यात अमरावतीत पक्षाचा नायनाट करतील नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या. भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला, असा आरोपही या उमेदवारांनी केला. नवनीत राणांच्या गद्दारीने आमचा पराभव आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आ. रवी राणा यांच्यासाठी झोकून काम केलं.. पण नवनीत राणा यांनी जाहीरपणे आम्हालाच गद्दार ठरवून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलं. भाजपाच्या प्रभावक्षेत्रात भाजपाला मूठमाती देऊनच राणा दाम्पत्याने मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पत्नीला स्टार प्रचारक' भाजपा नेता दर्शवून भाजपा उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम राणा दाम्पत्याने केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात राणा दाम्पत्य फिरकले देखील नाही. तिथे भाजपा कमी करण्याची छुपी व्यूहरचना त्यांनी आखली. आम्ही हरलो. पराभव आम्हाला मान्य आहे. पण आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी गद्दारी करून केला, असेही या पत्रात म्हटले आहे. नवनीत राणा काय म्हणाल्या? या पत्रावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही मी भाजपसाठी काम करते, असे नवनीत राणा यांनी म्हटले. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. कोणी टीका केली ते समोर बोलले नाहीत, माझ्या पाठीमागे बोलले आहेत, पाठीमागे कोणीही टीका करते म्हणून मी त्या दिवशी म्हटलं तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला, असे त्या म्हणाल्या. … म्हणून रवी राणांनी उमेदवार उभे केले विकास करणारे व्यक्ती म्हणून रवी राणा यांची ओळख आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात मतदारांनी त्यांचे उमेदवार निवडून दिले आहेत. युवा स्वाभिमान यांच्या सोबत भाजपची युती तुटली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री बावनकुळे आमच्या सोबत होते. १६-१६ वर्ष सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी रवी राणा यांनी उमेदवार उभे केले होते, असे स्पष्टीकरण नवनीत राणा यांनी दिले. … तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते अमरावतीमधील ज्या उमेदवारांना निवडायचे होते त्यांनाच लोकांनी निवडून दिले. भाजपमध्ये तिकीट वाटपात थोडा घोळ झाला होता, त्यामुळे जागा कमी निवडून आल्या ही माहिती भाजपच्या नेत्यांना आम्ही देणार आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपचे तिकीट मिळाले असते तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:04 pm

मुंबईतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये कलह:वर्षा गायकवाडांचा राजीनामा मागणाऱ्या भाई जगतापांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर आता पक्षांतर्गत कलह उफाळून आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार भाई जगताप यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिकरित्या पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने भाई जगताप यांनाच 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे. बीएसी निवडणुकीपुर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आघाडीसाठी काँग्रेसकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे देखील सोबत येणार असल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. काल निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला असताना काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला असून वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर थेट सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नेतृत्वाचा अभाव अन् संघटनात्मक अपयश मुंबई महापालिकेचे निकाल काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक राहिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाई जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बीएमसी निवडणुकीचे आकडे काँग्रेसच्या इतिहासात दुर्दैवी आहेत. पक्षाची स्थिती यापूर्वी कधीही इतकी वाईट नव्हती. मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा तीव्र अभाव होता आणि संघटना ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती, तशी ती हाताळली गेली नाही, अशी तोफ त्यांनी डागली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली. भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस दरम्यान, भाई जगताप यांनी माध्यमांमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर केलेली विधाने ही पक्षाच्या नियमावली, शिस्त आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचं नमूद करत काँग्रेसकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये संघटनात्मक कामकाज, नेतृत्व आणि अंतर्गत मतभेद हे पक्षाच्या अंतर्गत मंचांवरच मांडले गेले पाहिजेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते, सामूहिक नेतृत्वाला धक्का बसतो आणि सध्या आवश्यक असलेल्या संघटनात्मक एकतेला बाधा पोहोचते, असा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. ७ दिवसांचा अल्टीमेटम नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश भाई जगताप यांना देण्यात आले आहेत. निर्धारित कालावधीत समाधानकारक उत्तर न दिल्यास, काँग्रेसकडून पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. काँग्रेससमोर मोठे आव्हान मुंबईत भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. काँग्रेसला आता आपल्या मुंबईतील अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशातच दोन बड्या नेत्यांमधील हा वाद चव्हाट्यावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, दिल्लीतील हायकमांड यावर काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 9:27 pm

भाजपने मताला 15 हजार वाटूनही उमेदवार पडले:संजय जाधव यांचा खळबळजनक दावा, म्हणाले - सत्ता अन् पैशाची मस्ती जिरली

राज्यात अनेक महानगरपालिकांमध्ये भाजप महायुतीने मुसंडी मारली असली, तरी मराठवाड्यातील परभणीत मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तब्बल १९ वर्षांनंतर परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, या विजयानंतर खासदार संजय जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. भाजपने एका मताला १५ हजार रुपये वाटले, तरीही जनतेने त्यांना नाकारले, असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महानगरपालिका निवडणूक निकालानंतर परभणीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तसेच काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी खासदार संजय जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. नेमके काय म्हणाले संजय जाधव? नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना संजय जाधव आक्रमक झाले होते. ते म्हणाले, परभणीत पालकमंत्र्यांनी पैसा, सत्ता आणि सरकारी अधिकाऱ्यांचा प्रचंड गैरवापर केला. मताला १५ हजार रुपये वाटण्यात आले. मात्र, सत्तेची मस्ती असलेल्या पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवारही निवडून आणता आला नाही. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था पाहून संजय जाधव यांनी हळहळ व्यक्त केली. ज्यांच्याकडे पैसा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना पक्षात घेऊन निवडणुका लढवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी आता फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंना घातली भावनिक साद दरम्यान, संजय जाधव यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना मोगल-इंग्रजांचा दाखला देत खचून न जाता लढण्याचे आवाहन करत, भावनिक साद घातली. ते म्हणाले, ‘या देशावर मोगलांनी आणि इंग्रजांनीही दीर्घकाळ राज्य केलं, पण त्यांचंही साम्राज्य एक दिवस संपलं. भाजपचीही एक्सपायरी डेट आता लवकरच जवळ येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खचून न जाता ठामपणे लढा सुरू ठेवावा.’’ १९ वर्षांनंतर सत्तांतर; काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला २०११ मध्ये परभणी महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून येथे प्रथम राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेसची सत्ता होती. २००७ मध्ये नगर परिषद असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता. त्यानंतर तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ६५ जागांपैकी २५ जागा जिंकत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पहिल्यांदाच एकत्र येत लढवली असून, या युतीमुळे निवडणुकीला विशेष रंगत आली होती. निकालाने ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढवला असून, मराठवाड्यातील राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचं चित्र आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 9:08 pm

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ४ वर्षानंतर बुधवारी सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तब्बल चार वर्षांनंतर २१ जानेवारी रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी होणार आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये उत्साह संचारला असला तरी न्यायालयीन कामकाजाची रणनीती ठरविण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. याबाबत म. ए. समिती नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केले. परंतु, महापालिका निवडणुकीत गुंतलेल्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना अद्याप सवड मिळत नसल्याने मराठी भाषिकांतून संताप […] The post महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ४ वर्षानंतर बुधवारी सुनावणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 8:18 pm

ट्रम्पना भारताची चपराक; अमेरिकी डाळींवर शुल्क! सिनेटर्सची व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील ‘व्यापार युद्ध’ आता एका अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारतीय वस्तूंवर लादलेल्या करांना आता भारताने ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताने अमेरिकन डाळींवर, विशेषत: पिवळ्या वाटाण्यांवर ३०% आयात शुल्क लावून अमेरिकेच्या कृषी क्षेत्राला मोठा धक्का दिला […] The post ट्रम्पना भारताची चपराक; अमेरिकी डाळींवर शुल्क! सिनेटर्सची व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 8:16 pm

रशियाचे ५० लष्करी तळ सज्ज!

वॉशिंग्टन/मॉस्को/बिजींग : वृत्तसंस्था जगाच्या नकाशावर उत्तर ध्रुवाजवळ असलेला पांढराशुभ्र ग्रीनलँड आता रक्तरंजित संघर्षाचे केंद्र बनण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड सुरक्षित करण्याच्या हट्टापायी थेट डेन्मार्क आणि नाटो देशांना आव्हान दिले आहे. पण हा संघर्ष केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर आर्क्टिक महासागरातून निर्माण होणा-या नवीन ‘समुद्री कॉरिडॉर्स’वर ताबा मिळवण्यासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, हे […] The post रशियाचे ५० लष्करी तळ सज्ज! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 8:14 pm

न्या. वर्मांवर महाभियोग प्रक्रियेचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. लोकसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोग प्रक्रिया आणि भ्रष्टाचार आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या संसद समितीच्या वैधतेला आव्हान देणारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. या निकालामुळे आता न्या. वर्मा यांच्याविरुद्धची चौकशी आणि महाभियोग प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती […] The post न्या. वर्मांवर महाभियोग प्रक्रियेचा मार्ग मोकळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 8:12 pm

ट्रम्पच्या ‘ट्रेड डील’मुळे ११० डॉलर्सचा फटका?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका आणि तैवान यांच्यात नुकताच एक मोठा व्यापारी करार झाला आहे. हा करार ५०० अब्ज डॉलरचा आहे. या अंतर्गत तैवानच्या वस्तूंवर आकारला जाणारा कर (टॅक्स) २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. या बदल्यात, तैवान अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात २५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याव्यतिरिक्त, तैवान परदेशी गुंतवणुकीला पाठबळ देण्यासाठी […] The post ट्रम्पच्या ‘ट्रेड डील’मुळे ११० डॉलर्सचा फटका? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 8:10 pm

१ एप्रिलपासून होणार टोल नाका ‘कॅश फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणा-या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे ‘कॅशलेश’ होणार आहेत. याचाच अर्थ, १ एप्रिलनंतर टोल भरण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. केवळ ‘फास्टॅग’ आणि ‘युपीआय’ हे दोनच पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. केंद्रीय रस्ते वाहतूक […] The post १ एप्रिलपासून होणार टोल नाका ‘कॅश फ्री’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 8:08 pm

पुणेकरांनी विकासाच्या अजेंड्यावर पुन्हा पसंतीची मोहोर उमटवली:पारदर्शी कारभार करत पुणे सर्वोत्तम पालिका बनवा - मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, हा जनादेश आनंददायी असला तरी मोठी जबाबदारी आहे, असे फडणवीस म्हणाले. पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका ठरावी यासाठी प्रामाणिक आणि पारदर्शी कारभार करण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासन पुणे महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही फडणवीस यांनी 'भावी नगरसेवक' असे संबोधून त्यांचे मनोबल वाढवले. फडणवीस म्हणाले की, पुण्यात आपण इतिहास रचला असून, त्याचे तुम्ही सर्व शिल्पकार आहात. गेल्या ३०-३५ वर्षांत पुणे महापालिकेत इतके मोठे बहुमत कोणीही मिळवले नव्हते. पुण्यातील लढत चुरशीची होईल अशी चर्चा होती, पण पुणेकरांनी ती एकतर्फी ठरवली. हा जनादेश जबाबदारीची जाणीव करून देतो. जनतेचा विश्वास सार्थ केल्यास पुढील पंचवीस वर्षे आपल्याला कोणीही हटवू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी विजयानंतर लगेच पुढील पाच वर्षांचे नियोजन करतात, त्याचप्रमाणे आपल्यालाही पुढील पाच वर्षांच्या विकासकामांचे नियोजन करायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यासाठी मांडलेल्या विकास योजनांमुळे पुणेकर आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. नियोजित केलेल्या योजनांचे प्रत्यक्ष काम दोन वर्षांत सुरू होईल, असे नियोजन करून काम करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी झपाटून काम करावे. महापालिका हा सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा उपक्रम आहे, आपला व्यवसाय किंवा कमिशनचा धंदा नाही, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी कठोर शब्दांत सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला तरी, कोणाचाही उन्माद किंवा गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:42 pm

पुणे ग्रँड टूर : 19 जानेवारीला शाळा-महाविद्यालये बंद:स्पर्धा मार्गावरील वाहतूक 8 तास बंद राहणार

पुणे ग्रँड टूर २०२६ अंतर्गत आयोजित प्रोलॉग सायकल स्पर्धेमुळे सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक आठ तास बंद राहणार आहे. या पार्श्वभूमीवर, स्पर्धा मार्गावरील पुणे शहरातील अनेक भागांतील शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक शैक्षणिक संस्था पूर्ण वेळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता आणि त्यांना जोडणारे उपरस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहतील. पुणे ग्रँड टूरच्या प्रोलॉग स्पर्धेतील सायकल रॅली या मार्गांवरून जाणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक बंदीमुळे विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी विशेष सूचना जारी केल्या आहेत. छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड, विश्रामबाग वाडा-कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरुड-बावधान, सिंहगड रोड आणि वारजे-कर्वेनगर या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शैक्षणिक संस्था १९ जानेवारी रोजी पूर्ण वेळ बंद ठेवणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद केले आहे. शहरातील कार्यालयांनाही शक्य असल्यास सुटी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुटी देणे शक्य नसल्यास मेट्रो सेवा किंवा अन्य पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असेही पोलिसांनी सांगितले आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित वार्ड कार्यालयांच्या शिक्षणाधिकाऱ्यांवर सर्व शाळा व महाविद्यालयांना आदेशाची माहिती कळविण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पुणे ग्रँड टूर २०२६ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा असल्याने शहराच्या वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने हे कठोर उपाय योजले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:28 pm

सामाजिक कार्यासाठी समर्पणाची गरज - अविनाश धर्माधिकारी:सुनीता भोसले आणि मंगेशी मून यांना 'वसुधा परांजपे स्मृती पुरस्कार' प्रदान

विद्यार्थी साहाय्यक समिती आणि परांजपे कुटुंबीयांतर्फे वसुधा परांजपे स्मृती समाजसेवा पुरस्कार क्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक सुनीताताई भोसले यांना, तर वसुधा परांजपे स्मृती शिक्षणसेवा पुरस्कार उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक मंगेशीताई मून यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी सामाजिक कार्यासाठी ध्येयासक्त, समर्पित आणि सेवाभावी वृत्तीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हा पुरस्कार फर्ग्युसन रस्त्यावरील समितीच्या मोडक सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, मानपत्र व पुष्पगुच्छ असे होते. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ना. परांजपे आणि समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर व्यासपीठावर उपस्थित होते. अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेऊन समर्पण वृत्तीने सतत कार्यरत राहणे, हे महाराष्ट्राचे वेगळेपण आणि वैभव आहे. मंगेशीताई मून आणि सुनीताताई भोसले यांच्यासारख्या भगिनींच्या कार्यातून ही वृत्ती दिसून येते. हे वैभव वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की, एकेकाळी भारत जगातले सर्वाधिक समृद्ध शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखला जात होता. तक्षशिला, नालंदा यांसारखी ज्ञानाची केंद्रे जगभरातील जिज्ञासूंना आकर्षित करत होती. मधल्या काळात ही परंपरा खंडित झाली. आता पुन्हा त्या प्राचीन समृद्ध ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चाणक्य मंडलच्या माध्यमातून कार्यकर्ता अधिकारी घडवण्याचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी नमूद केले. मंगेशीताई मून यांनी उमेद संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, रस्त्यावरच्या अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य उमेद संस्थेच्या माध्यमातून केले जाते. ही मुले शिक्षणाच्या माध्यमातून जबाबदार समाजघटक बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मुले शिक्षण घेऊन उत्तम काम करत आहेत, तर काही क्रीडा क्षेत्रात चमकत आहेत. सुनीताताई भोसले यांनी फासेपारधी समाजातील आपल्या अनुभवांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, जन्मतःच आम्हाला गुन्हेगार मानले जाते. आईमुळे शिक्षणाचे महत्त्व समजले आणि महापुरुषांचे चरित्र कळले. शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांचे कार्य उमगल्याने आता सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:27 pm

सारसबाग सिद्धिविनायक माघी उत्सव सोमवारपासून सुरू:भैय्याजी जोशी उपस्थिती; नानासाहेब पेशवे पुरस्कार प्रदान होणार

पुणे येथील श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक माघी महोत्सव सोमवार, १९ जानेवारी ते शनिवार, २४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्काराचे वितरणही होणार आहे. यंदाचा श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार चेन्नईचे महामहोपाध्याय आर. मणि द्राविड शास्त्री आणि तिरुपतीचे डॉ. कुटुंब शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात पार पडेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही माहिती श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत आणि आशिष कुलकर्णी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्री ब्रम्हणस्पती सूक्त पठण होईल. सायंकाळी ६ वाजता सुहास हिरेमठ यांचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता व्हायोलिन वादक राजस उपाध्ये आणि संतूर वादक निनाद दैठणकर यांची व्हायोलिन-संतूर जुगलबंदी सादर होईल. मंगळवार, २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्रीसूक्त पठण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. गुरुदास नुलकर ‘निसर्ग संवर्धन आणि स्व-सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान देतील. रात्री ८ वाजता सीए ऋषिकेश बडवे यांचे शास्त्रीय गायन होईल. बुधवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम ‘ज्योतीने तेजाची आरती’ या विषयावर व्याख्यान देतील. रात्री ८ वाजता वृषाली मावलंकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सुगम व भक्तिसंगीताचे कार्यक्रम सादर होतील. गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गणेशयाग होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. अंजली पर्वते यांचे ‘प्राचीन भारतातील तेजस्वी स्त्रिया’ या विषयावर व्याख्यान होईल. रात्री ८ वाजता राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरीवादन सादर केले जाईल. महोत्सवाचा समारोप शनिवार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाने होईल. हे सर्व कार्यक्रम सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:24 pm

पुण्यात क्विक कॉमर्सचा वेगवान विक्रम:3 मिनिटांत आयफोन डिलिव्हरी; एका ग्राहकाने वर्षभरात खर्च केले 13 लाख रुपये

भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे आता क्विक कॉमर्सचेही केंद्र बनले आहे. ‘हाऊ इंडिया इन्स्टामार्टेड 2025’ या अहवालानुसार, देशातील सर्वात जलद आयफोन डिलिव्हरीचा विक्रम यंदा पुण्यात नोंदवण्यात आला. अवघ्या 3 मिनिटांत एका ग्राहकाला नव्या कोऱ्या आयफोनची डिलिव्हरी मिळाली. पुणेकरांची खरेदीची आवड केवळ वेगापुरती मर्यादित नसून, खर्च करण्याची त्यांची तयारीही मोठी आहे. शहरातील एका इन्स्टामार्ट ग्राहकाने वर्षभरात तब्बल 13 लाख रुपये खर्च करून सर्वाधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा मान पटकावला. या खरेदीमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून स्नॅक्स, लाइफस्टाइल उत्पादने आणि सणासुदीच्या खरेदीचा समावेश होता. विशेष म्हणजे, एका इन्स्टामार्ट अकाउंटवरून केवळ बटाटा चिप्ससाठीच 1.5 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. स्नॅक्सप्रमाणेच पुणेकरांचा फिटनेसकडेही ओढा वाढलेला दिसतो. 2025 मध्ये स्पोर्ट्स आणि फिटनेस या श्रेणीत 475 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे पुणे आरोग्य आणि वेलनेससाठी जागरूक शहर म्हणून पुढे आले आहे. स्विगीचे चीफ बिझनेस ऑफिसर हरी कुमार गोपीनाथन यांनी सांगितले की, “क्विक कॉमर्स आता केवळ तातडीच्या गरजांपुरता मर्यादित राहिलेला नाही. दैनंदिन वस्तूंपासून प्रीमियम खरेदीपर्यंत, इन्स्टामार्ट आधुनिक भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे.” रात्री उशिरा होणाऱ्या खरेदीत पुणेकर दही आणि मिनरल वॉटरला पसंती देतात. घरगुती स्वयंपाकासोबतच जागतिक चवींचाही प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सणासुदीच्या ‘क्विक इंडिया मुव्हमेंट’ सेलदरम्यान मखाणा, कोरियन सॉसेस आणि नाचोजची विक्री लक्षणीय वाढली. 2025 मध्ये पुणे केवळ किराणा खरेदीपुरते मर्यादित न राहता इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, मेकअप आणि वाहन देखभाल अशा विविध श्रेणींमध्ये झपाट्याने पुढे गेले आहे. वेग, सोय आणि विश्वासार्हता यामुळे पुणे खऱ्या अर्थाने ‘इन्स्टामार्टेड’ झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:23 pm

आयुर्वेदावर विश्वास ठेवा, प्रशांत दामले यांचे आवाहन:वैद्य खडीवाले संस्थेतर्फे वैद्यकीय पुरस्कार प्रदान

आयुर्वेदात अनेक चमत्कार असले तरी ते अजूनही सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आयुर्वेदात अपार ताकद असून, त्याला कोणताही पर्याय नाही. केवळ भारतातच नव्हे, तर जगातही आयुर्वेद नंबर एक आहे. मात्र, त्यासाठी सामान्य माणसाने आयुर्वेदावर विश्वास ठेवून तो कृतीत उतरवला पाहिजे, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे यंदाचा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार मुंबईचे वैद्य नरेंद्र भट्ट यांना प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे हे ४१ वे वर्ष होते. याप्रसंगी वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, वैद्य विवेक साने, वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. मुख्य पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे होते. आयुर्वेद, वनस्पती शास्त्र, रसशास्त्र, चिकित्सा इत्यादी विविध आयामांमध्ये महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वैद्यांना वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रशांत दामले यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवाविषयी सांगितले की, नाटकाच्या कामामुळे त्यांचा दिनक्रम निसर्गाविरोधी असतो, ज्यामुळे शरीरावर परिणाम दिसू लागले होते. मात्र, २००८ पासून सातत्याने आयुर्वेदाचे पालन केल्यामुळे त्यांना आजपर्यंत पित्ताचा त्रास झाला नाही. आयुर्वेदात संयम महत्त्वाचा असून, तात्काळ परिणामांची अपेक्षा न करता सातत्य ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. आज मेडिकल कॉलेजसाठी ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो आणि डॉक्टर झाल्यानंतर तो खर्च वसूल करण्याची मानसिकता तयार होते. यामुळे आपण हॉस्पिटलच्या दृष्टचक्रात अडकतो. स्वतःची तब्येत स्वतः सांभाळणे गरजेचे आहे. आयुर्वेद आपल्याला स्वतःच्या शरीराची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकवतो, असे दामले म्हणाले. वैद्य नरेंद्र भट्ट यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आयुर्वेद पुनरुज्जीवित करायचा असेल, तर निसर्गाकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही. आयुर्वेद सांगतो की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्येक प्रकृती स्वतंत्र आहे. त्यामुळे एकसारख्या उपचारांची चौकट आयुर्वेदाला मान्य नाही. आयुर्वेद वाचवायचा असेल, तर आयुर्वेदाचे रुग्णही डॉक्टर झाले पाहिजेत, म्हणजेच समाजाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. आपली तंत्रे, आपली रचना, आपली संस्कृती आणि आपली शिक्षणपद्धती या सर्वांनी डॉक्टरांसारखा विचार केला पाहिजे. जर आपण सर्वांगीण आणि समग्र दृष्टिकोन ठेवला, तर एआयचा उपयोग आयुर्वेद आणि मानवतेच्या सेवेसाठी निश्चितच करता येईल. आयुर्वेद क्षेत्रातही गुंतवणूक अपरिहार्य असून, ती गुंतवणूक विश्वास आणि विकास या दोन पातळ्यांवर असली पाहिजे, कारण शेवटी ही गुंतवणूक रुग्णासाठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:12 pm

पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तांकडून 'पर्यावरण संतुलित पुणे' संकल्पनेवर भर:पु.ल. देशपांडे उद्यानात 'द बिग ग्रीन फेस्ट २०२६' चे उद्घाटन

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी 'पर्यावरण संतुलित पुणे' ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचा विश्वास व्यक्त केला. भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचा वसा जपण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंहगड रस्त्यावरील कलाग्राम, पु.ल. देशपांडे उद्यान येथे स्फूर्ती फाउंडेशनतर्फे आयोजित 'द बिग ग्रीन फेस्ट २०२६' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निसर्ग छायाचित्रकार डॉ. इराक भरुचा, गोखले इन्स्टिट्यूटमधील शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ. गुरुदास नूलकर, सुहाना प्रवीण मसाले उद्योग समूहाचे आनंद चोरडिया, ज्येष्ठ उद्योजक सतीश मगर, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या पूर्वा केसकर आणि स्फूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेली 'द ग्रीन डिक्लरेशन' ही पुस्तिका मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. या पुस्तिकेत भविष्यातील पृथ्वी कशी असावी, याविषयी विद्यार्थ्यांचे विचार मांडले आहेत. या महोत्सवात शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल या विषयांवर विविध उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था आणि शाळा यामध्ये सहभागी झाल्या आहेत. 'हरित बगीचा', 'विरासत', 'इको निर्माण', 'वेस्ट की पाठशाळा', 'मंथन बॉक्स', 'सूर फॉर सस्टेनबीलीटी', 'द ग्रीन गुरूकुल', 'इको मार्केट प्लेस', 'चेंज मार्कर हब' अशा विविध उपशिर्षकांतर्गत प्रकल्प सादर करण्यात आले. पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानामुळे आजची पिढी पर्यावरणाबाबत अधिक सजग आहे. पुणे शहरात पर्यावरणपूरक दृष्टिकोन रुजवण्यासाठी पुणे मनपा प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ केला जाईल. प्रभाग स्तरावर बालसभांचे आयोजन करण्यात येईल. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मनपा स्तरावर एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, जो चांगल्या संकल्पना सुचवेल. डॉ. गुरुदास नूलकर यांनी हवामान बदलाला एक मोठी समस्या म्हटले. आपल्या पिढीने केलेल्या निसर्गाच्या पिळवणुकीमुळे हा प्रश्न निर्माण झाला असून, यावर वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:11 pm

छांगुरबाबा धर्मांतरण प्रकरणात नागपूर कनेक्शन उघड:फरार आरोपी इरदुल इस्लामला यू.पी. एटीएसने केली अटक

छांगुरबाबाच्या धर्मांतरण नेटवर्कचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे. राजस्थान, लखनऊ, बलरामपूर आणि पुण्यानंतर आता नागपूरमध्येही या प्रकरणाची पाळेमुळे आढळली आहेत. आशी नगर येथील गवसीया मशीदजवळ राहणाऱ्या इरदुल इस्लाम वल्द गुलाम येजदानी याला उत्तर प्रदेश एटीएसने नागपूर एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. शनिवारी पहाटे ५.३० वाजता त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरदुल इस्लाम हा छांगुरबाबा प्रकरणात फरार होता. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेश एटीएसने अटक वॉरंट जारी केले होते आणि तेव्हापासून ते त्याच्या शोधात होते. इरदुल इस्लाम मूळचा नागपूरचा असून, तो गौसीया मशिदजवळ पत्नी, आई-वडील आणि लहान भावासह राहतो. इरदुल इस्लाम वल्द गुलाम येजदानी याचा सोलर पॅनेल इन्स्टॉलेशनचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने तो भारतभर प्रवास करत असे. याच दरम्यान तो छांगुरबाबाच्या संपर्कात आला. छांगुरबाबाच्या आश्रमातील सोलर पॅनेल इन्स्टॉलेशनचे काम मिळाल्याने आपण संपर्कात आलो, धर्मांतरण प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, असे इरदुल इस्लाम येजदानीचे म्हणणे आहे. मात्र, इरदुल इस्लाम येजदानीच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हा पैसा कुठून आला, याबाबत एटीएसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एटीएसला या व्यवहारांमागे धर्मांतरणासाठी वापरलेल्या पैशांचा संशय आहे. इरदुल इस्लाम नागपुरात येणार असल्याची माहिती नागपूर एटीएसला मिळाली होती. त्यानंतर दोन दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तो नागपूरला आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर एटीएस आणि जरीपटका पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास त्याला अटक करून लखनऊ एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. लखनऊ न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट काढले होते. दुपारी त्याला न्यायालयात हजर करून ट्रान्झिट पी.सी. मिळवण्यात आला. छांगुरबाबा अनेक वर्षांपासून धर्मांतरणाचे सिंडिकेट चालवत होता. धर्मांतरासाठी त्याला आखाती देशांमधून कोट्यवधी रुपये मिळत असत. उत्तर प्रदेश पोलिसांनी जमालुद्दीन उर्फ छांगुरबाबा याच्यावर धर्मांतराचा आरोप लावला आहे. छांगुरबाबा हा बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला तहसीलमध्ये असलेल्या रेहरा माफी गावचा रहिवासी आहे. धर्मांतरण रॅकेट प्रकरणात सध्या तो आणि त्याची सहकारी नीत रोहरा उर्फ नसरीन यांना अटक करण्यात आली आहे. तरुणींना फूस लावून छांगुरबाबा त्यांचे धर्मांतर घडवून आणत असे. या नेटवर्कला परदेशातून १०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:10 pm

पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शहरात विजयी जल्लोष सुरू असतानाच गांधीनगर भागात राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्यांनी व दगडाने हल्ला झाल्याचे वृत्त आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया हे देखील याच प्रभागातून निवडणूक लढवत होते. तुमच्यामुळेच माझा पराभव झाला, […] The post पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 6:43 pm

पैसे ओतून, माणसे चोरून निवडणूक जिंकली

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी अभिमानास्पद लढत दिल्याचा दावा केला आहे. ठाकरे बंधूंनी सगळीकडेच खूप चांगली लढत दिली. आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण भाजपने अमाप पैसे ओतून व माणसे चोरून निवडणूक जिंकली, असा दावा महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी […] The post पैसे ओतून, माणसे चोरून निवडणूक जिंकली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 6:40 pm

चिकणी तांडा येथे मुलाकडून वडीलांचा दगड डोक्यात घालून खून

धाराशिव : प्रतिनिधी दुसरे लग्न केले तसेच पहिल्या पत्नी चे कुटुंब नियोजन ऑपरेशन केले नाही या कारणावरून जन्मदात्या वडीलांचा डोक्यात दगड घालून खून केला. हि खळबळजनक घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारात चि कणी तांडा येथील शेतात शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली . याप्रकरणी आरोपी मुलावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे […] The post चिकणी तांडा येथे मुलाकडून वडीलांचा दगड डोक्यात घालून खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 6:38 pm

आता पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्या:पुणे-पिंपरीत 'पानिपत' झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची मागणी

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे. या 'पानिपत'नंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी सर्व निवडणुका 'बॅलेट पेपर'वर घेण्याची मागणी केली आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे मत मिटकरी यांनी व्यक्त केले. राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांत भाजपला सर्वाधिक यश मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ अहिल्यानगरमध्ये चांगले यश प्राप्त झाले. मात्र, त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यातील यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत, विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या या मागणीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ईव्हीएमवरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पराभवावर आश्चर्य व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, दोन्ही शहरांत प्रचंड काम करूनही आमचा पराभव कसा होऊ शकतो? ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो, हा मोठा प्रश्न आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल, तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. पवार कुटुंबियांच्या बैठकीवर स्पष्टीकरण दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ही बैठक दैनंदिन प्रक्रियेचा भाग होती. कुटुंब म्हणून पवार कुटुंब नेहमीच एक आहे, मात्र राजकीय एकत्रिकरणाचा निर्णय हा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हेच घेतील. २९ पैकी २४ महापालिकांवर महायुतीचा झेंडा शुक्रवारी (१६ जानेवारी) जाहीर झालेल्या महानगरपालिकांच्या निकालात भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एकूण २९ पैकी २४ महापालिकांवर भाजप-शिंदेसेना युतीने वर्चस्व मिळवले असून, ९ ठिकाणी भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. भाजप हा राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, जवळपास सर्वच ठिकाणी त्यांच्या जागा वाढल्या आहेत. याउलट उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेला आपल्या जुन्या जागा टिकवण्यातही अपयश आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 6:23 pm

दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने ‘लाडकी’चा संताप

भंडारा : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात महिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच […] The post दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने ‘लाडकी’चा संताप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 5:55 pm

६ नगरसेवक सत्ताधा-यांना पुरून उरतील!

मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीत मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेला राज्यात सर्वाधिक यश हे मुंबईत मिळाले आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेच्या ५ नगरसेवकांनी बाजी मारली आहे. नवी मुंबईमध्येही एक मनसैनिक निवडून आला आहे. या महापालिकांशिवाय अन्य महापालिकांमध्ये मनसेला खातेही उघडता आलेले नाही. मिनी विधानसभा समजल्या जाणा-या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित असे यश मिळाले […] The post ६ नगरसेवक सत्ताधा-यांना पुरून उरतील! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 5:53 pm

महिन्यातून दोनदा बसस्थानकांत स्वच्छता मोहीम

मुंबई : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यामुळे स्वत: परिवहन विभागानेच याबाबत कंबर कसली आहे. बसस्थानकांच्या संपूर्ण आवारात, तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक, तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचा-यांच्या सहभागातून ही […] The post महिन्यातून दोनदा बसस्थानकांत स्वच्छता मोहीम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 5:52 pm

इतिहास माझ्या आवडीचा!:मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात पार पडली शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयच्या (CSMVS) चिल्ड्रन्स म्युझियमतर्फे ‘म्युझियम्स अ‍ॅज क्लासरूम्स: एक्सप्लोरिंग नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ या विषयावरची शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी नालंदा लर्निंग सेंटर, CSMVS पार पडली. ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट: अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ या अभ्यास दालनाच्या माध्यमातून संग्रहालयाला एक सजीव आणि प्रभावी वर्गखोली म्हणून नव्याने मांडण्याचा उद्देश या कार्यशाळेचा होता. परस्परसंवादी इतिहास, वस्तू आणि शिक्षणाच्या विविध शक्यतांचा शोध घेत या कार्यशाळेची सांगता झाली. कशासाठी आयोजन? मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयतले चिल्ड्रन्स म्युझियम इतिहास, संस्कृती आणि आधुनिक शिक्षणपद्धतीला जोडण्याचे काम कारते. त्यासाठी विविध प्रदर्शन, कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करते. ही कार्यशाळा सुद्धा संग्रहालय आणि शाळांमधील सहकार्य बळकट करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण, चौकशी-आधारित शिक्षण अनुभव विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले वस्तू-आधारित (Object-based) आणि चौकशी-आधारित (Inquiry-led) शिक्षणपद्धतीवर भर देत, विद्यार्थ्यांना संग्रहालयातील वस्तूंशी प्रश्नोत्तर, अर्थलावणे, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे कसे जोडता येते, याचे प्रात्यक्षिक या प्रशिक्षणात दाखविण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) यानुसार अनुभवाधारित व कौशल्याधिष्ठित शिक्षण कसे राबविता येईल, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. समज वाढवण्याची पद्धती कार्यशाळेत अनुभवाधारित व चौकशी-आधारित शिक्षणाची रचना, इतिहास, कला, भूगोल, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांचा आंतरशाखीय समन्वय, तसेच संग्रहालयातील वस्तूंचा प्राथमिक शिक्षणस्रोत म्हणून वापर करून संकल्पनात्मक समज वाढविण्याच्या पद्धती यांचा समावेश होता. याशिवाय NCF मधील इयत्तानिहाय कौशल्ये आणि अभ्यासक्रम विषयांशी संग्रहालय-आधारित शिक्षण कसे संलग्न करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. संग्रहालयांची भूमिका सांगितली दोन तासांच्या या कार्यशाळेत शिक्षक, अभ्यासक्रम विकासक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक अशा एकूण ३० सहभागी उपस्थित होते. ही कार्यशाळा वैदेही सावनल, सहाय्यक संचालक – प्रदर्शने, शिक्षण व सार्वजनिक कार्यक्रम, CSMVS यांनी मार्गदर्शित केली. यावेळी त्यांनी सहभागींसोबत संवाद साधत आधुनिक शिक्षणप्रक्रियेत संग्रहालयांची भूमिका अधोरेखित केली. कार्यशाळेबद्दल शिक्षक म्हणाले... प्राचीन इतिहासाशी संबंधित संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवता येतील, यावर विचार करण्याची संधी या प्रशिक्षणामुळे मिळाली. हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी ठरला.- आर्या घोटीकर, प्राध्यापिका, फर्ग्युसन कॉलेज, पुणे म्युझियम क्लासरूम’ ही संकल्पना अत्यंत प्रभावी आहे. इतिहास विद्यार्थ्यांना विविध आणि रंजक पद्धतीने शिकवता येतो, याची जाणीव या कार्यशाळेमुळे झाली.- धीरज जाधव, कला शिक्षक, पुणे आजची कार्यशाळा आमच्यासाठी अत्यंत अनोखा अनुभव ठरली. इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावी आणि सोप्या पद्धतीने कसा पोहोचवता येईल, याबाबत या प्रशिक्षणातून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.- माया दिवाकर, शिक्षिका इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत नव्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने कसा पोहोचवता येईल, याबाबत येथे उपयुक्त माहिती मिळाली. ही कार्यशाळा अनुभवण्यासाठी सुरतहून येणे सार्थ ठरले.- सुखजित कौर रोहिल्ला, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ हे दालन विद्यार्थ्यांना इतिहास शिकवणे अधिक सोपे करते. प्राचीन भारताविषयी इतक्या व्यापक स्वरूपात माहिती मिळणे ही आमच्यासाठी पर्वणी आहे.- प्रिया चुघ, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत इतिहास अधिक रंजक आणि संशोधनात्मक पद्धतीने शिकविण्यासाठी येथे मिळालेले मार्गदर्शन आम्ही निश्चितच वर्गात वापरणार आहोत.- विनीथा गोविंदन, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 5:50 pm

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या:नाना पटोलेंचे राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणाले की, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला, त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतीला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत, या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे म्हणून जनभावनेचा विचार करून या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे नाना पटोले या पत्रात म्हणाले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 5:36 pm