SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
...

माजी मंत्री आमदार अमित देशमुख  यांनी घेतला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामांचा आढावा 

बच्चेवार यांच्या अमोल उद्योग दुकानास भेट देऊन व्यापा-यांशी साधला संवाद लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ मार्च रोजी दुपारी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथील विकसित झालेल्या कामाची पाहणी करून […] The post माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामांचा आढावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Mar 2026 1:15 am

राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई नाही : मुख्यमंत्री

गॅससाठी रांगा; मुख्यमंत्री म्हणतात पुरवठा सुरळीत मुंबई : प्रतिनिधी राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही. काहीजण विशेषत: काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करुन त्यांनी रांगा लावाव्यात, असा प्रयत्न करत आहे, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. राज्य सरकारने आज गॅस वितरणाबाबत नियमावलीही जाहीर केली आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे मध्य पूर्वेतून होणा-या गॅस पुरवठ्यावर परिणाम […] The post राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई नाही : मुख्यमंत्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Mar 2026 1:10 am

पीएनजी कनेक्शन असल्यास गॅस सिलिंडर मिळणार नाही

केंद्र सरकारचा नवा आदेश जारी नवी दिल्ली : वृत्तसंस्था गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ज्यांच्या घरात पाइपद्वारे पीएनजी या नैसर्गिक गॅसचा पुरवठा होतो, अशा ग्राहकांना घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन ठेवता येणार नाही. ‘ज्यांच्याकडे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांनी एलपीजी कनेक्शन तात्काळ परत करावे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. तसेच पीएनजी कनेक्शन असलेल्या व्यक्तींना एलपीजी सिलिंडर […] The post पीएनजी कनेक्शन असल्यास गॅस सिलिंडर मिळणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Mar 2026 1:08 am

भारताच्या मैत्रीचा रशियाला विसर

आधी सूट, आता चढ्या दराने कच्चे तेल विक्री मॉस्को : वृत्तसंस्था मध्य पूर्व आशियात युद्ध सुरू झाल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी खनिज तेलाची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणने होर्मुझ मार्ग बंद केल्याने अनेक देशांची कोंडी झाली आहे. खनिज तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. ही परिस्थिती पाहता अमेरिकेने भारतह्याला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली. त्यासाठी ३० दिवसांची […] The post भारताच्या मैत्रीचा रशियाला विसर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Mar 2026 1:05 am

सिलिंडरचा काळाबाजार!

सरकार म्हणते, तुटवडा नाही, ग्राहकांना सिलेंडर मिळत नाही गॅस तुटवड्यामुळे देशभरात गोंधळाची स्थिती नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका-इस्रायलने इराणशी केलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजीचा तुटवडा वाढत चालला आहे. देशभरात उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, पंजाब, छत्तीसगड, हरियाणामध्ये गॅससाठी लोकांची पळापळ सुरू आहे. उत्तर प्रदेशात सिद्धार्थनगरमध्ये काल रात्रीपासून लोक गॅस एजन्सीजबाहेर सिलिंडरची वाट पाहत आहेत. बिहारमध्ये गॅस सिलिंडरच्या […] The post सिलिंडरचा काळाबाजार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Mar 2026 1:01 am

लॉटरीऐवजी वेतनाच्या आधारावर मिळणार व्हिसा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेने एच-१ बी व्हिसा प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. लाभार्थ्यांची निवड आता लॉटरीऐवजी पगाराच्या आधारे केली जाईल. हे साध्य करण्यासाठी यूएस इमिग्रेशन एजन्सीने फॉर्म आय-१२९ ही एक नवीन प्रणाली तयार केली आहे, जी १ एप्रिल २०२६ पासून अनिवार्य आहे. परदेशी कामगारांसाठी अर्ज करताना कंपन्यांना नोकरीशी संबंधित माहिती देणे आवश्यक असेल. यामुळे अधिक […] The post लॉटरीऐवजी वेतनाच्या आधारावर मिळणार व्हिसा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Mar 2026 12:55 am

तहसीलदार प्रदीप शेवाळे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद:'साहेब' नव्हे, 'तहसीलदार' म्हणा; क्षेत्रभेटीत मनमोकळ्या गप्पा

अमरावती: धारणी येथील जिल्हा परिषदेच्या पीएम श्री सेमी इंग्रजी पूर्व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे, शेवाळे यांनी विद्यार्थ्यांना 'साहेब' न म्हणता केवळ 'तहसीलदार' असे संबोधण्यास सांगितले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला. शालेय उपक्रमांतर्गत शिक्षकांनी या क्षेत्रीय भेटीचे आयोजन केले होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तालुक्यातील तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाणे यांसारख्या विविध शासकीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेट दिली. या भेटींचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची माहिती देणे हा होता. भेटीदरम्यान तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि तालुका कृषी अधिकारी उमेश यादव यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना तालुक्याची भौगोलिक माहिती दिली. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार राजेश माळी आणि वरिष्ठ लिपिक निलेश सपकाळ हे देखील उपस्थित होते. एका विद्यार्थ्याने तहसीलदारांना त्यांच्या वेतनाबद्दलही प्रश्न विचारला. कृषी अधिकारी उमेश जाधव यांनी कृषी विभागाचे महत्त्व, फळझाडे आणि पिकांविषयी माहिती दिली. त्यांनी कृषी विभाग मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याला भेट दिली असता, आरोपींना कोठडीत कसे ठेवले जाते, हे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडी दाखवण्यात आली. या क्षेत्रीय भेटीच्या आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक प्रभुदास बिसंदरे, सहाय्यक शिक्षिका नूतन गैलवार, सीमा भुजाडे, बंशीलाल कासदेकर आणि ऋतिका यांनी सहकार्य केले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 10:00 pm

दहावी बोर्ड पेपर फसवणूक प्रकरण:आरोपीला 14 दिवसांची कोठडी, टेलिग्रामद्वारे विद्यार्थ्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई

पुण्यात दहावी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आधीच मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एका १८ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील चैतन्य विनोद शेंडे असे आरोपीचे नाव असून, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून, तपासात आरोपी टेलिग्रामद्वारे विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील तपासासाठी आवश्यकता भासल्यास पुन्हा पोलीस कोठडी रिमांड मिळवण्याच्या अटीवर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महाराष्ट्र स्टेट बोर्ड २०२६ पेपर्स या नावाने टेलिग्रामवर एक ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा काही तास आधी उपलब्ध करून देण्याचा दावा केला जात होता. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले जात असे. तांत्रिक तपासणीत असे आढळून आले की, आरोपी टेलिग्राम ग्रुपवर पीडीएफ फाईल अपलोड करत असे. या फाईलला पासवर्ड ठेवून पेपर पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून क्यूआर कोड किंवा यूपीआयद्वारे पैसे मागितले जात होते. पैसे भरल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रुपमधून ब्लॉक केले जात असे, ज्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक होत होती. या फसवणुकीची पद्धत अत्यंत चलाखीची होती. आरोपी आधीच एक पीडीएफ फाईल अपलोड करत असे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष परीक्षा झाल्यानंतर त्याच फाईलमध्ये खरा प्रश्नपत्रिका मजकूर टाकून ती संपादित करत असे. फाईलची अपलोड केलेली वेळ मात्र बदलत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ती आधीच अपलोड केल्याचा भास होत असे आणि त्यांना संशय येत नव्हता. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे विभागीय मंडळाचे अधिकारी चंद्रकांत वैजनाथ जेवळीकर (वय ५३) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम २२३, ३(५) तसेच महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ चे कलम ६ व ७ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ व ७२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:59 pm

ज्येष्ठ नागरिक मंडळाकडून पालिकेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार:महापौर, उपमहापौर यांचा सन्मान; विविध मागण्यांचे निवेदन सादर

अमरावती येथील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाने महानगरपालिकेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे आणि स्थायी समितीचे सभापती अविनाश मार्डीकर यांचा त्यांच्या दालनात शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सन्मानाने सुरक्षित व आरोग्यदायी जीवन जगता यावे यासाठी शासनाच्या २०१३ च्या ज्येष्ठ नागरिक धोरणाची महापालिकेत योग्य अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. प्रशासकीय विभागाने कृती आराखडा तयार करून कार्यवाही करावी, असेही निर्देशित केले आहे. मंडळाने महानगरपालिकेत ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्याची मागणी केली. तसेच, शहरातील ज्येष्ठ नागरिक मंडळांसाठी विरंगुळा केंद्र आणि सुविधा केंद्रासाठी विनामूल्य इमारत व साहित्य पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांच्या दिवसभराच्या देखभालीसाठी ज्येष्ठ नागरिक भवन (डे केअर युनिट) उपलब्ध करून द्यावे आणि शहर बसमध्ये जागा आरक्षित ठेवून ५० टक्के प्रवास सवलत द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले. या मागण्यांवर चर्चा करताना, अमरावती शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले. याप्रसंगी संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम गावंडे, उपाध्यक्ष डॉ. दामोदर पवार, डॉ. दिलीपसिंह खांबरे, दीपकराव जुनघरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:58 pm

अमरावती आकाशवाणी केंद्रात कायद्याचा जागर:सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त महिलांच्या अधिकारांवर मार्गदर्शन

अमरावती | महिला शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आकाशवाणीच्या अमरावती केंद्रात 'कायदे-जागर' या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कार्यस्थळी महिलांचे अधिकार आणि संबंधित कायद्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रम प्रमुख भैयालाल टेकाम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे आणि अभियंता सुनील किनीकर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख यांनी कार्यस्थळी महिलांचे अधिकार, त्यासंबंधीचे कायदे, महिला तक्रार निवारण समितीची स्थापना, तिची कार्यपद्धती आणि तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया यावर विस्तृत माहिती दिली. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यामागील उद्देश आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, याविषयीही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी आशिष गावंडे यांनी कार्यालयीन वातावरणात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांच्या परस्पर वर्तनातील मर्यादा, जबाबदाऱ्या आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्याची गरज यावर आपले विचार मांडले. कार्यालयात परस्पर सन्मान, संवेदनशीलता आणि नियमांचे योग्य पालन केल्यास कार्यक्षमता वाढते तसेच कार्यालयाची सकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भैयालाल टेकाम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हा कार्यक्रम महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच महिलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून आणि पुष्पांजली वाहून आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथींना झाडांचे रोप देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सपकाळे यांनी केले, तर आभार स्नेहल ठाकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला उद्घोषिका अवंती मोरे, प्रज्ञा इंगोले, संध्या वाडेकर, सरिता देशमुख, मंगला देशमुख, श्यामली देशमुख, प्रणाली देशमुख तसेच नितीन भट, श्रीहरी दिघडे, आकाश अटाळकर, जीवन माहुरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:52 pm

व्यावसायिक सिलेंडर बंदीमुळे 25 हजार रोजगार धोक्यात:लग्न समारंभातील जेवणातून गरम पदार्थ हद्दपार, चुली पेटण्याची वेळ

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी आल्याने केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंटच नव्हे, तर केटरिंग आणि मेस व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे लग्न समारंभातील जेवणातून गरम पदार्थ हद्दपार झाले असून, २५ हजार कामगार आणि महिलांचा रोजगार धोक्यात आला आहे. केटरिंग व्यावसायिक आता आयोजकांशी करार करताना केवळ एकदा शिजवलेले किंवा थंड पदार्थांचा पुरवठा करणार असल्याचे स्पष्ट करत आहेत. काही ठिकाणी तर मंगल कार्यालयांच्या संचालकांना स्वयंपाकासाठी चुली पेटवण्याची तयारी ठेवावी लागत आहे. अमरावती शहरात सुमारे २५० केटरिंग व्यावसायिक आहेत. हे व्यावसायिक मंगल कार्यालयांमध्ये आणि घरगुती शुभप्रसंगी सेवा देतात. प्रत्येक व्यावसायिकाकडे किमान १०० कर्मचारी असल्याने व्यवस्थापक, हेल्पर, भट्टी कारागीर, भाजी चिरणाऱ्या महिला, पोळ्या लाटणारे कामगार, धुणी-भांडी करणारे आणि वाढपी अशा सुमारे २५ हजार कामगार व महिलांचा रोजगार यामुळे अडचणीत आला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणशी पुकारलेल्या युद्धामुळे सध्या देशात सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद केला असून, तोच गॅस घरगुती सिलिंडरच्या रिफिलिंगसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिक सिलिंडरवर अवलंबून असलेले सर्व घटक अडचणीत आले आहेत. केटरिंग व्यावसायिक सुयोग कथलकर यांनी सांगितले की, जेवण पुरवण्याचा करार करतानाच आयोजकांना ही बाब लक्षात आणून द्यावी लागत आहे. पूर्वी लग्न किंवा इतर शुभकार्यांमध्ये गरम पोळी, भजी, उकळती कढी, पुरी, नूडल्स, मंचुरियन, डोसा असे पदार्थ पाहुण्यांना वेळेवर शिजवून वाढले जात होते. परंतु, सिलिंडरच्या तुटवड्यामुळे आता या पदार्थांऐवजी एकदाच शिजवलेले डाळ, भात, भाजी, पोळी, दहिवडा, रबडी, हलवा असे पदार्थ दिले जात आहेत. अशी तयारी असणाऱ्या आयोजकांसोबतच आता करार केले जात आहेत. ज्या आयोजकांशी आधीच करार झाले आहेत, त्यांना काही पदार्थ कमी करण्यास किंवा अतिरिक्त सिलिंडर पुरवण्यासाठी विनंती केली जात आहे. ज्या ठिकाणी अशी तडजोड शक्य नाही, तेथे चुली पेटवण्याची तयारी आयोजकांनी ठेवावी, असा करार केला जात आहे. मात्र, शहरातील अनेक मंगल कार्यालये वातानुकूलित (एअरकुल्ड) असल्याने तेथे चुली पेटवण्याची सोय नाही. चुलीसाठी लागणारे लाकूड कोठून आणायचे, ते कुठे साठवायचे आणि धुराचे नियोजन कसे करायचे, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत पार्किंग किंवा परिसरातील मोकळ्या जागेत तात्पुरती व्यवस्था केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:41 pm

ओरिएंटल इन्शुरन्सला ग्राहक न्यायालयाचा दणका:पीडित महिलेचा 5 लाख 4 हजार 314 रुपयांचा विमा दावा मंजूर

अमरावती येथील ग्राहक न्यायालयाने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला मोठा दणका दिला आहे. उपचारादरम्यान पतीचे निधन झाल्यानंतर विम्याची रक्कम नाकारल्याप्रकरणी न्यायालयाने पीडित महिलेचा ५ लाख ४ हजार ३१४ रुपयांचा दावा मंजूर केला आहे. वैशाली अनिल अग्निहोत्री (विवाहानंतरचे नाव पल्लवी नारायण चिखलकर), रा. पटवीपुरा, अंबागेट, अमरावती, यांनी ही तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेचे पती दुध डेअरीचा व्यवसाय करत होते. त्यांना सतत ताप येत असल्याने ३० ऑगस्ट २०२२ रोजी अमरावती येथील पारश्री क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. उपचारांनंतर बरे वाटल्याने ६ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली. मात्र, घरी गेल्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यामुळे त्याच दिवशी सायंकाळी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ९ ऑक्टोबर २०२२ रोजी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ६ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या ३४ दिवसांच्या कालावधीत उपचारांसाठी ३ लाख ४५ हजार ९०० रुपये, औषधांसाठी १ लाख ३६ हजार ७१४ रुपये आणि विविध चाचण्यांसाठी २१ हजार ७०० रुपये असा एकूण ५ लाख ४ हजार ३१४ रुपयांचा खर्च आला. या खर्चाची सर्व कागदपत्रे आणि पुरावे त्यांनी २ नोव्हेंबर २०२२ रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे दावा सादर करताना दिले. मात्र, कंपनीने त्यांचा दावा मंजूर करण्यास टाळाटाळ केली. २९ नोव्हेंबर रोजी चौकशी केली असता, दाव्याची शहानिशा सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर कंपनीने त्यांचा दावा नाकारल्याचा संदेश पाठवला. त्यामुळे त्यांनी अपीलीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले, परंतु संबंधित यंत्रणेनेही दावा नाकारण्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. यानंतर, त्यांनी २६ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे खटला दाखल केला. या प्रकरणाची अनेकदा सुनावणी झाली, आरोप-प्रत्यारोप आणि खुलासेही झाले. मात्र, कंपनीने दावा नाकारताना कोणताही ठोस आधार दिला नाही, तसेच काही प्रसंगांमध्ये प्रत्युत्तर दाखल करणे किंवा युक्तिवाद करणे टाळले. अखेरीस, ग्राहक न्यायालयाने तक्रारदार महिलेची बाजू ग्राह्य धरत त्यांचा वैद्यकीय खर्चाचा दावा मान्य केला. न्यायालयाचे अध्यक्ष श्रीपाद कुळकर्णी आणि सदस्य ए.पी. वैद्य यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. तक्रारदार महिलेतर्फे ॲड. संतोष पातुर्डे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने मंजूर केलेल्या रकमेवर ओरिएंटल विमा कंपनीने दावा दाखल केल्याच्या तारखेपासून ६ टक्के व्याज द्यावे, असा आदेशही ग्राहक न्यायालयाने दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:35 pm

अर्थसंकल्प अडथळ्यावरून भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन:राहुल गांधींनी संसदेच्या पायऱ्यांवर केलेल्या निदर्शनाचा अमरावतीत निषेध

संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या मकर द्वारावर केलेल्या आंदोलनाचा भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा शाखेने निषेध केला. लोकशाहीच्या मंदिरात घडलेली ही घटना खेदजनक असल्याचे भाजपने म्हटले आहे. या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी राजकमल चौकात सुमारे तासभर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे महानगर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी केले. यावेळी काँग्रेसविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. भाजपने राहुल गांधींच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. या आंदोलनात माजी अध्यक्ष किरण पातूरकर, नगरसेवक विनोद तानवैस, बादल कुलकर्णी, नगरसेविका लविना हर्षे, नगरसेविका राधा कुरील, सुनील खराटे, सचिन रासने, राजू कुरील, मिलिंद बांबल, गजानन देशमुख, कमल मालवीय, आकाश पाटील, संजय शादी, लता देशमुख, वंदना मडघे, राजेंद्र मेटे, कुणाल टिकले, उमेश निलगिरे, अलका सरदार, शैलेंद्र चव्हाण, प्रफुल बर्वे, तुषार चौधरी, आकाश पाटील, कीर्तिदीप सराफ, दीपक अनासाने, अशोक पंचारे, आदित्य खैरकार, अनिकेत तारवाणी, मनीष आडविकार, भूषण हरकुट, रवी पारवे, भय्या तिरपुडे, मीना पवार, अंजली पाठक, उज्ज्वल महाजन, सपना कंडलकर, गीता साहूकार, गीता सावरकर, मीना काळे, राधिका जोशी आणि संगीता बुरंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:33 pm

शनिवारवाडा मूळ सात मजली स्वरूपात उभारावा:आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी; 1828 मध्ये आगीत झाले होते नुकसान

आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत मराठा साम्राज्याचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याला मूळ सात मजली स्वरूपात पुन्हा उभारण्याची मागणी केली आहे. १८२८ साली लागलेल्या भीषण आगीत या ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे त्याचे मूळ वैभव हरपले आहे. राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच धर्तीवर, ऐतिहासिक प्रतीक असलेल्या शनिवारवाड्यालाही पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मूळ स्वरूपात सात मजली उभारण्यात यावे, असे रासने यांनी म्हटले. रासने यांनी कसबा मतदारसंघातील इतरही अनेक प्रश्न विधानसभेसमोर मांडले. यामध्ये शनिवारवाडा–स्वारगेट तसेच सारसबाग–शनिवारवाडा या प्रस्तावित भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने तयार करून पुणे शहरातील पहिला भुयारी मार्ग प्रत्यक्षात आणण्याची मागणी केली. याशिवाय, मामलेदार कचेरी परिसरात थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली. शहराचा मूळ गावठाण भाग असलेल्या कसबा मतदारसंघात शेकडो जुने वाडे आहेत. युडीसीपीआर (UDCPR) नियमावलीतील काही अटींमुळे या वाड्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी या नियमावलीत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच, मतदारसंघातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमधील अनेक इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध समस्या यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प तातडीने हाती घेण्याची आवश्यकता असल्याची भूमिका रासने यांनी विधानसभेत मांडली.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:31 pm

भाजपमध्ये विधानपरिषदेची अपेक्षा होती:राज्यसभेचा विचार नव्हता, पक्षाशी निष्ठाच ठरली 'टर्निंग पॉईंट' - खासदार रामराव वडकुते

भाजपचे नवनियुक्त राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी खासदारकी मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळेल अशी अपेक्षा नव्हती, तर विधानपरिषदेची शक्यता वाटत होती, असे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील दिव्य मराठी कार्यालयात संवाद साधताना वडकुते म्हणाले की, त्यांचे काम आणि पक्षनिष्ठा यामुळेच त्यांना ही संधी मिळाली आहे. त्यांनी आपले काम सातत्याने सुरू ठेवले होते. धनगर आरक्षण प्रश्नावर भाजपच तोडगा काढू शकते धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर केवळ भाजपच तोडगा काढू शकते, असा विश्वास वडकुते यांनी व्यक्त केला. सध्या आदिवासींना ज्या सवलती मिळत आहेत, त्याच धर्तीवर धनगर समाजालाही आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. या प्रश्नावर १६ तारखेला ताकदीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांनी धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत असला तरी, कायदेशीर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे वडकुते यांनी नमूद केले. पक्षाशी निष्ठा आणि धोरणानुसार कार्य हाच टर्निंग पॉइंट वडकुते यांनी सांगितले की, सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला पक्षाने राज्यसभेत काम करण्याची संधी दिली. सर्वसामान्यांसाठी सातत्याने काम करणे, पक्षाशी निष्ठा आणि पक्षाच्या धोरणानुसार कार्य करत राहणे हाच त्यांच्यासाठी 'टर्निंग पॉइंट' ठरला. विधान परिषद सोडल्यानंतर अनेकांनी त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले. मराठवाड्यातील प्रश्न संसदेत मांडणार खासदार म्हणून ते हिंगोलीचे सिंचन, रेल्वे आणि मराठवाड्यातील इतर प्रश्न संसदेत मांडणार आहेत. शेतीला पाणी, वीज मिळावी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी मूल्यवर्धन करण्यावर त्यांचा भर राहील.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:22 pm

कोल्हापुरात निसर्गाचा लहरीपणा:भर उन्हाळ्यात गारपिटीसह वादळी पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली

राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र निसर्गाचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. शनिवारी दिवसभर प्रचंड उकाडा सोसल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्याच्या काही भागांत मोठे नुकसान झाले असून, उन्हाळ्याच्या सुट्टीत कोल्हापूरकरांनी पावसाळ्याचा थरार अनुभवला. मिळालेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील कापसी खोऱ्यात पावसाने अक्षरशः रौद्र रूप धारण केले होते. सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावामुळे अनेक घरांवरील कौले उडून गेली, तर काही ठिकाणी घरांच्या काचा फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वादळ इतके भीषण होते की, अनेक ठिकाणी महाकाय झाडे उन्मळून पडली असून पत्र्याचे शेडही कागदासारखे हवेत उडून गेले. या नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. एकाच दिवशी दोन ऋतूंचा अनुभव विदर्भ आणि मराठवाड्यातील सोलापूरमध्ये पारा वाढल्याने नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत. मात्र, कोल्हापुरात चित्र अगदी उलट होते. दिवसभर घामाच्या धारांनी नागरिक त्रस्त असताना संध्याकाळी पावसाच्या धारांनी त्यांना चिंब भिजवले. ढगांच्या कडकडाटासह विजांच्या लखलखाटाने कोल्हापूरचे आकाश चमकून निघाले होते. दिवसभर उकाडा आणि संध्याकाळच्या सुमारास आलेल्या पावसाने कोल्हापूरकरांनी एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव घेतला. हवामान विभागाचा 'यलो अलर्ट' वातावरणातील हा बदल लक्षात घेता, भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी सायंकाळी ५:४५ वाजता तातडीचा इशारा जारी केला आहे. कोल्हापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' देण्यात आला असून, पुढील काही तासांत या भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विजा चमकत असताना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि झाडांखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:06 pm

महिला काँग्रेसचे पुण्यात रस्त्यावर चूल पेटवून आंदोलन:घरगुती गॅसची दरवाढ रद्द करून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करून, गॅस पुरवठा सुरळीत करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व चौकात रस्त्यावर चूल पेटवून शनिवारी संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. चौकात पारंपरिक पद्धतीने शेणाने सारवून शेणाच्या गोवऱ्यांचा ढीग रचून चूल मांडण्यात आली आणि त्यावर महिला कार्यकर्त्यांनी स्वयंपाक केला. महागाईमुळे गरीब, मध्यमवर्गीय, कष्टकरी महिला वर्ग आधीच पिचला आहे. त्यातच अचानकपणे घरगुती गॅस सिलेंडर चे दर ६० रुपयांनी वाढविण्यात आले. सरकारचा हा निर्णय अनाकलनीय आहे. गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद पडत आहेत. घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला असून तो वेळेवर मिळणेही अवघड झाले आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे घडत आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे स्वाती शिंदे यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले. गॅस दरवाढीच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आंंदोलन केले. 'महागाईला आळा घाला, गॅस सिलेंडर स्वस्त करा', 'जनतेची लूट थांबवा, गॅस दर कमी करा', गॅसच्या किंमती कमी करा, नाहीतर खुर्ची खाली करा' अशा घोषणा फलकांवर लिहीलेल्या होत्या. आंदोलनात स्वाती शिंदे यांच्या समवेत नगरसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, रेखा जैन, ॲड.अंजली देसाई, ॲड.राजश्री दामले-चव्हाण, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, गितांजली प्रकाश, दिपाली पवार, मनोरमा चौधरी, वर्षा सपकाळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 7:52 pm

जळगावात मनपा कंत्राटाच्या वादातून राडा:पोलिस ठाण्यातच दोन गट एकमेकांना भिडले, भाजपचे नगरसेवक जखमी; 10 जण ताब्यात

राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट सत्तेत एकत्र असले तरी, जळगावात मात्र स्थानिक वर्चस्व आणि महापालिकेच्या कंत्राटावरून दोन्ही पक्षांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शनिवारी दुपारी जळगाव महापालिकेच्या एका कंत्राटाच्या वादातून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते थेट पोलिस ठाण्यातच एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळाले. या राड्यामध्ये भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे आणि माजी नगरसेवक कैलास सोनवणे जखमी झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या एका निविदेवरून भाजपचे नगरसेवक कल्पेश सोनवणे आणि शिवसेनेचे राहुल ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास बालाजी पेठ भागात दोन्ही गट समोरासमोर आले. तिथेच दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक होऊन वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटात रस्त्यावरच हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही बाजूचे लोक तक्रार देण्यासाठी शनिपेठ पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच राडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दोन्ही गट पुन्हा एकदा आपसात भिडले. पोलिसांच्या डोळ्यादेखतच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिस ठाण्यातील या अनपेक्षित गोंधळामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर करत सौम्य लाठीमार केला आणि जमावाला पांगवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत, परिस्थितीची पाहणी केली. गोंधळ घालणाऱ्यांना घेतले ताब्यात या राड्यामागे केवळ कंत्राटाचा वाद नसून आगामी महानगरपालिका निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या सोनवणे पिता-पुत्रांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, महापालिकेतील टेंडर मिळवण्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील १० जणांना आम्ही ताब्यात घेतले असून, परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे ही वाचा… भीमाशंकरमध्ये भाजप खासदारासाठी नियम धाब्यावर?:भाविकांना अडीच महिन्यांपासून बंदी, निशिकांत दुबेंसाठी उघडले दरवाजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद असताना, झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने नियमांना केराची टोपली दाखवली आहे. आज (दि. १४) दुपारी २ वाजता दुबे यांनी हेलिकॉप्टरने येऊन विशेष दर्शन घेतल्याने प्रशासकीय दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 7:47 pm

बंगालमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक बनवले जातेय

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्येच ममता सरकारवर थेट निशाणा साधला. कोलकात्यातील परिवर्तन संकल्प यात्रा सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, बंगालमध्ये हिंदूंना अल्पसंख्यक बनवले जात आहे. आता या निर्मम सरकारचा अंत निश्चित असून बंगालमधून महाजंगलराजचा खात्मा निश्चित आहे. तृणमूल काँग्रेसने सभेला येणा-या नागरिकांना चोर म्हणून संबोधल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, खरे […] The post बंगालमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक बनवले जातेय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:56 pm

वांगचुक यांची नजरकैद रद्द

नवी दिल्ली : लडाखमधील पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने त्यांच्या विरोधातील नजरकैद तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार लागू केलेली कारवाई मागे घेतल्याची माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केले असून सरकार लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण […] The post वांगचुक यांची नजरकैद रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:54 pm

‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ भारताकडे झेपावली

नवी दिल्ली : मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून एलपीजी गॅसने भरलेली भारताची शिवालिक आणि नंदा देवी ही दोन जहाजे जगातील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणा-या ‘होर्मुज सामुद्रधुनी’तून सुरक्षितपणे बाहेर पडली आहेत. इराणच्या विशेष सहकार्यामुळे हा मार्ग मोकळा झाला असून, ही जहाजे आता भारताच्या दिशेने वेगाने झेपावत आहेत. शिवालिकनंतर नंदा […] The post ‘शिवालिक’ आणि ‘नंदा देवी’ भारताकडे झेपावली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:53 pm

देशात उन्हासह पावसाची हजेरी

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ : मध्य प्रदेशमध्ये उष्णतेचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. यामुळे उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे. शुक्रवारीही नर्मदापुरममध्ये सलग दुस-या दिवशी तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहिले. हवामान विभागाच्या मते, १५ मार्चपासून राज्यातील हवामान पुन्हा बदलू शकते. या काळात काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये तीव्र उष्णतेचा प्रभाव दिसू लागला आहे. शुक्रवारी राज्यात पहिल्यांदाच दिवसाचे […] The post देशात उन्हासह पावसाची हजेरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:50 pm

ऑटोरिक्षातून महिलेवर लघवी; संतप्त जमावाकडून तरुणाची हत्या

चेन्नई : चेन्नईमध्ये एका धक्कादायक घटनेत महिलेवर लघवी केल्याच्या आरोपानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत […] The post ऑटोरिक्षातून महिलेवर लघवी; संतप्त जमावाकडून तरुणाची हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:48 pm

इराण पूर्णपणे पराभूत

वॉशिंग्टन : अमेरिका-इस्रायलच्या लष्कराने २८ फेब्रुवारी रोजी संयुक्तपण इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत संघर्ष पेटल्याचे पाहायला मिळाले होते. या संघर्ष आता चांगलाच वाढला असून अमेरिकेने इराणच्या तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेल्या खर्ग बेटावरील लष्करी लक्ष्यांवर भीषण हवाई हल्ले केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली होती. यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. या […] The post इराण पूर्णपणे पराभूत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:46 pm

उत्तर कोरियाने डागले क्षेपणास्त्र

टोकीयो : उत्तर कोरियाने पूर्व दिशेने समुद्राकडे संशयास्पद आंतरखंडीय (बॅलिस्टिक) क्षेपणास्त्र डागले असल्याची माहिती मिळत आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने याला दुजोरा दिला आहे. पश्चिम आशियात इराण-इस्रायल यांच्यात आधीच युद्धाचा भडका उडालेला असताना आता पूर्व आशियातही तणाव निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. उत्तर कोरियाकडून होणा-या लष्करी हालचालीनंतर जपान सरकारने तातडीचा इशारा दिला आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने […] The post उत्तर कोरियाने डागले क्षेपणास्त्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:45 pm

डोनाल्ड ट्रम्प यांचे आता ‘मी पुन्हा येईन’

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकारी लॉरा लूमर यांनी मोठे भाष्य केले असून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक खास संदेश पाठवला असल्याचे लॉरा लूमर यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२६’ मध्ये बोलताना म्हटले आहे. यावेळी लॉरा लूमर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा एक खास संदेश वाचून दाखवला. लॉरा लूमर यांनी म्हटले की, […] The post डोनाल्ड ट्रम्प यांचे आता ‘मी पुन्हा येईन’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:43 pm

भैरप्पांच्या तोडीचा कादंबरीकार मराठीत अजूनही नाही:ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांचे पुण्यातील परिसंवादात मत

ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी यांनी मराठी साहित्यात कन्नड कादंबरीकार डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या तोडीचा कादंबरीकार अजूनही झालेला नाही, अशी खंत व्यक्त केली. विवेक व्यासपीठ, विवेक साहित्य मंच आणि विदिशा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका परिसंवादात त्या बोलत होत्या. हा परिसंवाद दिवंगत कन्नड कादंबरीकार डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या साहित्यिक योगदानाला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार श्रीधर लोणी, मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठीच्या प्राध्यापिका डॉ. रूपाली शिंदे आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. 'भैरप्पांच्या साहित्याचा अनुवादः मुक्त संवाद' या सत्रात शिक्षण विवेकच्या संपादक डॉ. अर्चना कुडतरकर यांनी उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली. श्रीधर लोणी यांनी 'भैरप्पा यांच्या साहित्यातील सामाजिक जाणिवा' या विषयावर, तर डॉ. रूपाली शिंदे यांनी 'भैरप्पा यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमा' या विषयावर विशेष मांडणी केली. उमा कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वेगवेगळ्या टप्प्यांमधून कन्नड कादंबरी विकसित झाली आणि भैरप्पांनी या सर्व टप्प्यांवरील कादंबऱ्या वाचकांसमोर ठेवल्या, ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे. 'वंशवृक्ष' ही मी अनुवादित केलेली भैरप्पांची पहिली कादंबरी होती, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. येथूनच लेखक आणि अनुवादक म्हणून त्यांचे ऋणानुबंध जुळले आणि भविष्यात त्याचे उत्तम स्नेहात रूपांतर झाले. भैरप्पांचे पहिले प्रेम भारतीय शास्त्रीय संगीतावर होते. त्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकताना त्यांची सर्जनशीलता अधिक बहरून येत असे. त्यांच्या लेखनात शास्त्रीय संगीताची वैशिष्ट्ये दिसून येतात. कादंबरी लेखनावरील त्यांची हुकूमत शास्त्रीय संगीताप्रमाणे लय, ताल आणि आलापीसारखी सुरेल आहे. यामुळे त्यांच्या निवेदनात एक ठहराव जाणवतो. भैरप्पांनी त्यांच्या लेखनातून मांडलेली मूल्यव्यवस्था भारतीय होती. कुलकर्णी म्हणाल्या की, साहित्य गांभीर्याने घेतल्याने भैरप्पांच्या या मूल्यांचा काही प्रमाणात परिणाम त्यांच्या व्यक्तिगत जीवनशैलीवर झाला, कारण त्यांच्या लेखनातून त्यांना मूल्यांची दुसरी बाजू देखील समजली. ते मूल्य संवेदना मानतात आणि ती संवेदना पक्की असते, जी प्रत्येक वेळी वर दिसत नसली तरी ती अस्तरासारखी असते.भैरप्पा गेल्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन मला नाशिकमध्ये करता आले. यानिमित्ताने मला ऋषीऋण फेडता आले, असे मी मानते. यावेळी बोलताना दिलीप करंबेळकर म्हणाले की, तत्त्वज्ञान या विषयाचा भैरप्पा यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या कादंबऱ्यांमधून या तत्वज्ञानाची मूल्यात्मक मांडणी झालेली आहे. मात्र, या मांडणीमुळे त्यांच्या कादंबऱ्या किचकट झाल्या नाही, तर वाचनीय झाल्या. ही त्यांच्या कादंबरी लेखनाची ताकद आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 6:20 pm

डी.लिट मुळे 'स्वयंपूर्ण गोवे' उपक्रमाला आणखी बळ येईल:गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे टिळक विद्यापीठात प्रतिपादन

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी सांगितले की, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून मिळालेली डी. लिट. पदवी 'स्वयंपूर्ण गोवे' या उपक्रमाला आणखी बळ देईल. ही पदवी सर्व गोवेकरांना समर्पित करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकुलात 44 वा पदवीप्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आंध्र प्रदेशातील एएमआर समूहाचे अध्यक्ष ए. महेशकुमार रेड्डी आणि ओबी हॉस्पिटॅलिटिज कंपनीचे शेफ-ओनर हेमंत ओबेरॉय यांना सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरवण्यात आले. विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. श्रीकुमार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी कुलगुरु डॉ. गीताली टिळक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक, उपाध्यक्षा डॉ. प्रणति रोहित टिळक, विश्‍वस्त सरिता साठे, निखिल मराठे आणि प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यांच्यासह विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख व अधिष्ठाता उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, गोमंतकांच्या 'स्वयंपूर्ण गोवा' या उपक्रमासाठी ही पदवी मिळाली आहे. सर्व गोवेकरांमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला असून, या पदवीमुळे माझ्या कार्याची गती वाढेल. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी गोवा अनेक गोष्टींसाठी शेजारच्या राज्यांवर अवलंबून होता. ते म्हणाले की, कृषी, फलोत्पादन आणि दुग्धव्यवसाय संदर्भातही गोवा मोठ्या प्रमाणात परावलंबी होता. राज्यात पर्यटन क्षेत्र अधिक असल्याने कृषी आणि फलोत्पादन कमी होत चालले होते. कोरोना काळात याची प्रकर्षाने जाणीव झाली. तेव्हाच गोवा स्वयंपूर्ण झाला पाहिजे, असे मी ठरवले. यातूनच 'स्वयंपूर्ण गोवा' ही मोहीम सुरू करण्यात आली. 2 ऑक्टोबर 2020 रोजी गोव्यातील सर्व ग्रामपंचायती आणि नगर पंचायतींना या उपक्रमाशी जोडून घेण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही यात सहभाग घेतला. स्वतः या उपक्रमाच्या अग्रभागी राहून मी तो राबवला. पुढील दोन वर्षांत ही मोहीम पूर्णतः यशस्वी झाल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमांतर्गत राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचविल्या. योजनांचा शंभर टक्के लाभ नागरिकांना मिळाला. त्यातून गोवा विविध क्षेत्रांत स्वयंपूर्ण होत गेला. कृषी, फलोत्पादनात क्रांती झाली. फलोत्पादनातील काही पदार्थ आम्ही शंभर टक्के आयात करत होतो. तेच पदार्थ आम्ही आता निर्यात करत आहोत. ही स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाची फलश्रुती आहे. आपण गोव्यातील तरूणांना कौशल्यविकासावर आधारित प्रशिक्षण देत आहोत. त्याचा परिणाम असा झाला की, पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जे ईशान्य भारतातील तरूण काम करत होते. तेथे आता गोव्यातील तरूण काम करत असल्याचेही सावंत यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 6:18 pm

भीमाशंकरमध्ये भाजप खासदारासाठी नियम धाब्यावर?:भाविकांना अडीच महिन्यांपासून बंदी, निशिकांत दुबेंसाठी उघडले दरवाजे

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन बंद असताना, झारखंडमधील भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने नियमांना केराची टोपली दाखवली आहे. आज (दि. १४) दुपारी २ वाजता दुबे यांनी हेलिकॉप्टरने येऊन विशेष दर्शन घेतल्याने प्रशासकीय दुजाभावावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भीमाशंकर मंदिराच्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे मंदिर ९ जानेवारी ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. स्थानिक नागरिक, सर्वपक्षीय नेते आणि वारकरी संप्रदायाने भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय मोठ्या मनाने स्वीकारला होता. इतकेच नव्हे तर, हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या 'महाशिवरात्री' उत्सवालाही भाविकांनी मंदिराबाहेरूनच दर्शन घेतले. मात्र, आज थेट हेलिकॉप्टरने आलेल्या खासदारांसाठी प्रशासकीय नियम पायदळी तुडवून मंदिराचे दरवाजे उघडले गेल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी म्हणतात - मला माहितीच नाही या प्रकरणाची माहिती मिळताच खळबळ उडाली असून, व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणावर आश्चर्य व्यक्त केले. प्रशासनाकडून दर्शनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आलेली नव्हती, या घटनेबद्दल मला कोणतीही माहिती नाही, असे सांगत त्यांनी या प्रकारापासून हात झटकले आहेत. यामुळे मंदिर प्रशासनाने नेमक्या कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. निशिकांत दुबेंची वादग्रस्त पार्श्वभूमी डॉ. निशिकांत दुबे हे झारखंडमधील गोड्डा मतदारसंघाचे खासदार असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. निशिकांत दुबे हे केवळ या दर्शनामुळेच नव्हे, तर त्यांच्या जुन्या वादग्रस्त विधानांमुळेही महाराष्ट्रात चर्चेत राहिले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी राज ठाकरे आणि मराठी अस्मितेवर टीका करताना मराठी लोकांना पटक-पटक कर मारेंगे असे वादग्रस्त विधान करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या दुखावल्या होत्या. अशा वादग्रस्त नेत्यासाठी भीमाशंकर मंदिरात 'रेड कार्पेट' अंथरल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. हे ही वाचा… लिफ्टच्या दारात अडकला चिमुकलीचा हात:बघ्यांच्याही काळजाचा चुकला ठोका, पिंपरी-चिंचवडमधील घटना; VIDEO 'नजर हटी दुर्घटना घटी' या म्हणीचा प्रत्यय देणारी एक थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात समोर आली आहे. एका गृहनिर्माण सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही महिन्यांच्या चिमुकलीचा हात दरवाजाच्या सापटीत अडकल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, लिफ्टमध्ये उपस्थित नागरिक आणि आईच्या तत्परतेमुळे काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर मुलीचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 6:14 pm

महापौर पदावरून वाद, सोलापुरात मराठा युवकांचे ‘थाळीनाद आंदोलन’

सोलापूर : सोलापूर येथे मराठा समाजाच्या वतीने रविवार दि. 13 मार्च रोजी ‘थाळीनाद आंदोलन’ करण्यात आले. महापूर निवडीत समाजाला डावलून कथित राजकीय अन्यायाच्या निषेधार्थ चार हुतात्मा चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच सोलापूरमधील भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर मराठा समाजाला प्रमुख पदांपासून दूर ठेवत राजकीय अन्याय […] The post महापौर पदावरून वाद, सोलापुरात मराठा युवकांचे ‘थाळीनाद आंदोलन’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 6:13 pm

पिण्यासाठी पाणी मागणे ठरले महागात:नागपुरात वृद्ध महिलेला 'मुले चोरणारी' समजून नागरिकांची मारहाण, पोलिसांनी वाचवला जीव

सोशल मीडियावर पसरणाऱ्या ‘लहान मुले पळवणाऱ्या टोळी’च्या खोट्या अफवांनी नागपुरात पुन्हा एकदा उग्र रूप घेतले आहे. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी परिसरात एका ६० वर्षीय वृद्धेला जमावाने मूल चोरणारी समजून अमानुषपणे मारहाण केली. सुदैवाने, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे या महिलेचा जीव वाचला असून, चौकशीनंतर ती महिला पूर्णपणे निर्दोष असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध महिला औषध घेण्यासाठी रुग्णालयात गेली होती. औषध घेऊन घरी परतत असताना त्यांना प्रचंड थकवा जाणवला. औषध घेण्यासाठी त्यांना पाण्याची गरज होती, म्हणून त्यांनी जवळच खेळणाऱ्या एका लहान मुलाकडे पिण्यासाठी पाणी मागितले. ही महिला मूळची उत्तर भारतीय असल्याने त्या भोजपुरी भाषेत बोलत होत्या. मात्र, स्थानिक नागरिकांना त्यांची भाषा समजली नाही. एका ओरड्यामुळे जमाव झाला हिंसक याच दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने अचानक आरडाओरडा सुरू केला. ही वृद्ध महिला आपल्या लहान मुलीला बॅगेत भरून पळवून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिने केला. हा आरोप ऐकताच परिसरातील नागरिक गोळा झाले आणि त्यांनी काहीही शहानिशा न करता वृद्धेला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ देखील समोर आला असून त्यात जमाव वृद्धेला अमानुषपणे मारत असल्याचे दिसत आहे. पोलिसांची तत्परता अन् सत्याचा उलगडा घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वृद्धेला जमावाच्या तावडीतून सोडवून सुरक्षितपणे पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर महिलेच्या मुलगा आणि सुनेला पाचारण करण्यात आले. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर समोर आले की, ही महिला केवळ पाणी मागण्यासाठी थांबली होती आणि अपहरणाचा कोणताही प्रकार घडला नव्हता. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन नागपुरात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मूल पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या अनेक बनावट पोस्ट व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नये. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना कळवावे, मात्र स्वतः मारहाण करू नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हे ही वाचा… लिफ्टच्या दारात अडकला चिमुकलीचा हात:बघ्यांच्याही काळजाचा चुकला ठोका, पिंपरी-चिंचवडमधील घटना; VIDEO 'नजर हटी दुर्घटना घटी' या म्हणीचा प्रत्यय देणारी एक थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात समोर आली आहे. एका गृहनिर्माण सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही महिन्यांच्या चिमुकलीचा हात दरवाजाच्या सापटीत अडकल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, लिफ्टमध्ये उपस्थित नागरिक आणि आईच्या तत्परतेमुळे काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर मुलीचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 5:28 pm

बैलाने सुरक्षा रक्षकांना पळविले

बेगुसराय : बेगुसरायमध्ये मुख्यमंत्री नितीश यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसून आले. समृद्धी यात्रेअंतर्गत मुख्यमंत्री थोड्याच वेळात ज्या हेलिपॅडवर उतरणार आहेत, तिथे एक बैल घुसला. बैलने तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना पळवून लावले. स्वत:ला वाचवण्यासाठी एक पोलिस कर्मचारी अग्निशमन दलाच्या गाडीवर चढला. यामुळे तिथे गोंधळ निर्माण झाला. थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर येथे उतरणार होते. मुख्यमंत्री नितीश […] The post बैलाने सुरक्षा रक्षकांना पळविले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 5:18 pm

रांगा कायम; ‘पॅनिक बुकिंग’ करू नका

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅसची टंचाई शुक्रवारीही कायम आहे. अनेक शहरांमध्ये गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लागल्या असून, नागरिकांना सिलिंडरसाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. १८०० रुपये किंमत असलेला व्यावसायिक गॅस सिलिंडर […] The post रांगा कायम; ‘पॅनिक बुकिंग’ करू नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 5:15 pm

शिपिंग कंपन्यांची लुटमारी

मुंबई : शिपिंग कंपन्यांच्या लुटमारीमुळे निर्यातदार त्रस्त झाले असून दर ८०० डॉलर्सवरून ८००० डॉलर्सची जबरी वसुली करण्यात येत आहे. जेएनपीए बंदरात १३ दिवसांनंतरही केळी, द्राक्ष, डाळिंब, कांद्याचे १,२०० कंटेनर अडकले आहेत. निर्यातीची समस्या उद्भल्याने जेएनपीएच्या रॉयल्टीसह निर्यातदार कंपन्या व्यापा-यांचे १२५ कोटींहून अधिक आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, शिपिंग कंपन्यांवर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याने त्यांनीही युद्ध परिस्थितीचा […] The post शिपिंग कंपन्यांची लुटमारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 5:13 pm

देशात डेटा केंद्रांची विजेची मागणी ८००% वाढणार

नवी दिल्ली : देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि डिजिटल सेवांच्या वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्सची विजेची मागणी वेगाने वाढण्याचा अंदाज आहे. २०३१-३२ पर्यंत डेटा सेंटर्सकडून विजेची मागणी १३.५६ गिगावॉटपर्यंत पोहोचू शकते. सध्या देशात डेटा सेंटरची क्षमता वेगाने वाढत आहे. ही २०२० मध्ये ३७५ मेगावॉट होती, जी २०२५ पर्यंत वाढून सुमारे १,५०० मेगावॉट झाली आहे. पुढील सुमारे […] The post देशात डेटा केंद्रांची विजेची मागणी ८००% वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 5:11 pm

लिफ्टच्या दारात अडकला चिमुकलीचा हात:बघ्यांच्याही काळजाचा चुकला ठोका, पिंपरी-चिंचवडमधील घटना; VIDEO

'नजर हटी दुर्घटना घटी' या म्हणीचा प्रत्यय देणारी एक थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात समोर आली आहे. एका गृहनिर्माण सोसायटीच्या लिफ्टमध्ये काही महिन्यांच्या चिमुकलीचा हात दरवाजाच्या सापटीत अडकल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, लिफ्टमध्ये उपस्थित नागरिक आणि आईच्या तत्परतेमुळे काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर मुलीचा हात सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे. दिघी परिसरातील एका सोसायटीत एक महिला आपल्या चिमुकलीला कडेवर घेऊन लिफ्टने जात होती. लिफ्ट इच्छित मजल्यावर थांबली आणि दरवाजा उघडला. मात्र, काही क्षणातच दरवाजा पुन्हा बंद होऊ लागला. यावेळी कडेवर असलेल्या चिमुकलीने सहज आपला हात लिफ्टच्या सरकत्या दरवाजावर ठेवला. दरवाजा बंद होताना तिचा कोवळा हात थेट दरवाजा आणि भिंतीच्या सापटीत अडकला. आईचा प्रयत्न अन् उपस्थितांची धावपळ मुलगी ओरडू लागताच आईच्या लक्षात हा प्रकार आला. आपला पाय दरवाजाच्या मध्ये घालून तिने दरवाजा बंद होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलीचा हात पूर्णपणे अडकून पडला होता. वेदनेने चिमुकली रडू लागल्याने परिसरात असलेल्या नागरिकांनी तातडीने लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. काही मिनिटे सर्वांचा जीव टांगणीला लागला होता. अखेर उपस्थितांच्या धडपडीनंतर दरवाजाची सापट थोडी सैल झाली आणि चिमुकलीचा हात सुरक्षित बाहेर आला. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल या सर्व घटनेचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा येत असून लिफ्टच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासनाचे पालकांना आवाहन या घटनेनंतर प्रशासनाकडून आणि गृहनिर्माण सोसायट्यांकडून पालकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. लिफ्टचा वापर करताना विशेषतः लहान मुले सोबत असताना पालकांनी प्रचंड सावध राहणे गरजेचे आहे. मुलांचे हात दरवाजापासून लांब ठेवावेत. लिफ्ट पूर्ण थांबल्याशिवाय आणि दरवाजा स्थिर झाल्याशिवाय हालचाल करू नये. ऑटोमॅटिक दरवाजाच्या सापटीत हात जाणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 5:00 pm

गोव-यांचे दर वधारले

पुणे/नागपूर : इराणवर इस्रायल-अमेरिकेने चढवलेलला हल्ला., त्यानंतर युद्धाला फुटलेलं तोडं, याला आज 15 दिवस उलटून गेले आहेत. पण तीन देशांच्या या युद्धाच्या अख्ख्या जगाला फटका बसत असून अनेकांना त्याची झळ पोहोचली आहे. भारताला युद्धाचे चटके बसत असून इंधन टंचाईमुळे, गॅसच्या तुटवड्यामुळे लोकं हवालदिल झाले आहेत. महाराष्ट्राही गॅसची टंचाई असून लोकं पॅनिक झाले आहे, गॅसऐवजी इंडक्शन, […] The post गोव-यांचे दर वधारले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 4:43 pm

प्रथम अजितदादा विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज द्या

पुणे : सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास करणा-या यंत्रणांनी आपला अहवाल पुढच्या वर्षी द्यावा, पण प्रथम अजित पवार विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे. अजित पवार यांचा गत २८ जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या […] The post प्रथम अजितदादा विमानात बसतानाचे सीसीटीव्ही फुटेज द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 4:35 pm

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया:29 वर्षांपूर्वीची कुस्ती आखाड्यात झालेली दुखापत बळावली, महिनाभर विश्रांती

पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आज पुण्यातील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली जुनी दुखापत पुन्हा उफाळून आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपचारानंतर मोहोळ यांना आता किमान महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याने त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांना काही काळ ब्रेक लागणार आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भावना व्यक्त करताना या दुखापतीचा इतिहास सांगितला. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळत असताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. या एका दुखापतीमुळे मोहोळ यांना आपले कुस्तीचे स्वप्न अर्धवट सोडावे लागले होते. गेली अनेक वर्षे त्यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केले, मात्र सार्वजनिक जीवनातील सततचा प्रवास आणि धावपळ यामुळे हा त्रास असह्य झाला होता. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जनसेवेचा खंड शारीरिक त्रासापेक्षा मोठा सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून, मतदारसंघातही विकासकामे आणि भेटीगाठींचे मोठे नियोजन होते. अशा महत्त्वाच्या काळात विश्रांती घ्यावी लागत असल्याने मोहोळ भावुक झालेत. मला शारीरिक त्रासापेक्षा जनसेवेच्या कामात पडणाऱ्या या खंडामुळे अधिक त्रास होत आहे, अशी भावूक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. आगामी 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचाही हा महत्त्वाचा काळ असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना कामात सातत्य राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील महिनाभर विश्रांतीचा सल्ला शस्त्रक्रियेनंतर मोहोळ पुढील ७ ते ८ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच असतील. त्यानंतर त्यांना घरी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुमच्या शुभेच्छांच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरात पुन्हा एकदा पहिल्यापेक्षा जास्त जोमाने जनसेवेसाठी हजर होईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट जशास तशी… मुरलीधर मोहोळ आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले, क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती ! २९ वर्षांपूर्वी... कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली... इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती ! खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने…

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 4:33 pm

नरेंदर आणि सिलिंडर दोन्ही गायब

मुंबई : भाजपने सर्व काही अदानींना विकले फक्त काही नदी नाले शिल्लक होते त्यातील मिठी नदी, मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढला पाहिजे, ही मिठी नदीच्या माध्यमातून साकार होऊ शकते. आता गटारांची किंमत आता वाढली आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती दिसते आहे. आम्ही […] The post नरेंदर आणि सिलिंडर दोन्ही गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 4:14 pm

राज्यात गॅस पुरवठ्याची नियमावली जारी

मुंबई : इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिका-यांना सुचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. या प्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठयावर अंशत: निर्बंध लादण्यात आलेत. […] The post राज्यात गॅस पुरवठ्याची नियमावली जारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 4:12 pm

पुण्यात 'रिक्षामित्र फीडर' सेवा:मेट्रो प्रवाशांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' मिळणार

पुणे शहरात 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी'साठी 'रिक्षामित्र फीडर' सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि पुणे मेट्रोच्या सहकार्याने शनिवारी ही सेवा सुरू झाली. याप्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, अनिलकुमार कोकाटे, अग्रवाल आणि 'बघतोय रिक्षावाला' संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर उपस्थित होते. तसेच, आजी-माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी आणि संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. महानगरांमध्ये पर्यावरणपूरक मेट्रोचे जाळे विस्तारण्यावर सरकारचा भर आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा, यासाठी कोथरुडमध्ये वर्षभरापूर्वी सुरू केलेली शटल बससेवा यशस्वी ठरली आहे. पाटील यांनी सांगितले की, १९८२ पासून त्यांचा पुण्याशी संबंध आहे आणि नागरिकांनी स्वतःच्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, अशी त्यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. 'बघतोय रिक्षावाला' संघटनेच्या सहकार्याने पुणे रेल्वे स्थानकावर सुरू केलेल्या 'प्रीपेड रिक्षासेवे'ला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी 'रिक्षामित्र फीडर सेवा' सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमालाही पुणेकर चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, मंत्री पाटील समाजहिताचे विविध उपक्रम शांतपणे आखतात आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी करतात. यापूर्वी त्यांनी सुरू केलेल्या शटल बससेवेचा सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. 'रिक्षामित्र फीडर' सेवा देखील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, पुणे शहरात खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीमधील स्पर्धा निरर्थक आहे. शहराचे वाढते आकारमान पाहता, रस्त्यांची रुंदी वाढवणे एका मर्यादेनंतर शक्य होणार नाही. मेट्रो प्रत्येक गल्लीबोळात जाऊन घरापर्यंत सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे रिक्षा हाच सर्वोत्तम पर्याय आहे, जो घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत प्रवाशांना सेवा देऊ शकतो. ही सेवा भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल, असे हर्डीकर म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 4:05 pm

राज्यात LPG चा कोणताही तुटवडा नाही:गॅस, इंधन तुटवड्याच्या फक्त अफवा अन् संभ्रम; राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नाही. या प्रकरणी केवळ संभ्रम व अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9 हजार मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून 11 हजार मेट्रिक टनांपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत, असे ते म्हणालेत. इराण विरुद्ध इस्त्रायल - अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाशी संबंधित नियमावली जाहीर केली आहे. त्यात प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा? यासंबंधी स्पष्ट केले आहे. विशेषतः शैक्षणिक क्षेत्र व इतर काही क्षेत्रांना 100 टक्के, तर इतर घटकांना 70 ते 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. पण त्यानंतरही सर्वसामान्यांमधील गॅसच्या पुरवठ्याविषयी असलेली भीती संपली नाही. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी उपरोक्त आवाहन केले आहे. गत 6 महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलिंडर उपलब्ध छगन भुजबळ शनिवारी एका पोस्टद्वारे म्हणाले की, आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत अनेक संभ्रम आणि अफवा राज्यात पसरल्या आहेत. राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नसून, नागरिकांनी इंधन किंवा गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने मी जनतेला करत आहे. राज्यात घरगुती एलपीजीची दैनंदिन मागणी 9,000 मेट्रिक टन असताना, उत्पादन वाढवून ते 11,000 मेट्रिक टनांपर्यंत नेले आहे. मार्च महिन्यात गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होत राहील, याबाबत नागरिकांनी निश्चिंत राहावे. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. रुग्णालये, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवांना गॅस पुरवठा प्राधान्याने मिळेल, याची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा तक्रारींसाठी तालुका व जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअ‍ॅप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुरवठा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… साईबाबा संस्थानाकडून भाविकांना आता फक्त एकच लाडू प्रसाद:गॅस टंचाईचा परिणाम; काटकसर करून उपलब्ध साठा टिकवण्याचा प्रयत्न इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र देशभर दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम आता महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवरही जाणवू लागला आहे. शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका बसला असून प्रसाद वितरणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असल्याने प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात लाडू तयार केले जातात. मात्र गॅस साठा मर्यादित असल्यामुळे संस्थानने आता प्रत्येक भाविकाला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 4:01 pm

खानावळीत घरगुती गॅस वापरल्यास कारवाई:जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा इशारा, एजन्सी धारकांचीही घेतली बैठक

हिंगोली जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरची कुठलीही अडचण नाही, मात्र घरगुती गॅस सिलेंडरचा खानावळी, हॉटेल्समधून वापर झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शनिवारी ता. १४ दिला आहे. त्यासाठी वेळोवेळी खानावळी , हॉटेल्स, ढाबे यांची तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हिंगोली जिल्हयातील गॅस एजन्सीधारकांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी जिल्ह्यातील घरगुती गॅस सिलेंडरची मागणी व पुरवठा याचा आढावा घेतला. तसेच एजन्सीधारकांशी चर्चाही केली. यावेळी काही एजन्सीधारकांनी ग्राहकांकडून रिकामे सिलेंडर नसतांनाही नंबर लावले जात आहेत त्यामुळे जिल्ह्यात वेटींग जास्त दिसत असल्याचे सांगितले. गॅस सिलेंडरचा सुरळीत पुरवठा सुरु असून ग्राहकांना तातडीने सिलेंडर दिले जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हिंगोली जिल्हयात घरगुती गॅस सिलेंडरची कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मात्र त्याचे शॉर्टेज होऊ देऊ नका, ग्राहकांना वेळेत व सुरळीत सिलेंडरचा पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हयात सध्याच्या स्थितीत व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा सध्या प्राधान्याने वैद्यकीय क्षेत्र तसेच शैक्षणिक संस्थांच्या खानावळींसाठी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, व्यावसायिक खानावळी, कॅफे, खाद्यपदार्थ विक्री करणारे हातगाडे आदी ठिकाणी तपासणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या तपासणीदरम्यान कुठेही घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या वापर आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गॅस कंपनीचे विक्री अधिकारी व प्रतिनिधींना प्रशासनाकडून गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत आवश्यक काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, नागरीकांनाही घाबरून जाऊन गॅस सिलेंडरची अनावश्यक अतिरिक्त बुकिंग किंवा साठा करू नये. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 3:50 pm

साईबाबा संस्थानाकडून आता फक्त एकच लाडू

शिर्डी : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र देशभर दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम आता महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवरही जाणवू लागला आहे. शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका बसला असून प्रसाद वितरणावर मर्यादा आल्या आहेत. साई संस्थानच्या माहितीनुसार, दररोज सुमारे पंचेचाळीस हजार लाडू पाकीटांची विक्री केली जाते. याशिवाय दर्शनासाठी उभ्या […] The post साईबाबा संस्थानाकडून आता फक्त एकच लाडू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 3:48 pm

पुष्पा स्टाईलची गरज नाही; आम्ही जन्मापासूनच झुकत नाही:मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला; म्हणाले- शिवसेना कधीच झुकली नाही

देशभरात गाजलेल्या पुष्पा चित्रपटातील संवाद आणि शैलीवरून आता राजकीय वर्तुळातही चर्चा रंगताना दिसत आहे. या चित्रपटातील झुकेगा नही, हा संवाद प्रेक्षकांच्या तोंडी कायमचा बसला आहे. अनेक जण हा संवाद आणि अभिनेता अल्लू अर्जुनची हनुवटीवर हात फिरवत केलेली शैली नक्कल करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही याच मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टोला लगावला आहे. राजकारणात पुष्पा सारखी शैली दाखवण्याची गरज नाही, कारण आम्ही जन्मापासूनच कोणासमोर झुकलेलो नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. शिवसेना सांगली जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेना म्हणजे संघर्ष आणि आक्रमकता असे स्पष्ट करत विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. सध्या सर्वत्र पुष्पा, चित्रपटाची चर्चा होत असली तरी आम्हाला चित्रपटातील संवाद बोलण्याची गरज नाही, कारण शिवसेना कधीही झुकलेली नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतही भाष्य केले. कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या ठेवी सुमारे एक्याण्णव हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यानंतर शहरात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात आले आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. त्यामुळे 2025 पर्यंत या ठेवी कमी होऊन सुमारे एकोणऐंशी हजार चारशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांवर आल्या. मात्र यावर्षी पुन्हा दीड हजार कोटी रुपयांची वाढ होऊन ठेवी एक्याऐंशी हजार एकशे चौतीस कोटी रुपयांवर पोहोचल्याचे त्यांनी सांगत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले. उद्योग बंद पडू देणार नाही दरम्यान, राज्यात एलपीजी, सीएनजी आणि उद्योगांसाठी लागणाऱ्या गॅसच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने काही औद्योगिक क्षेत्रांतील उद्योगांवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी मान्य केले. काही औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांना अडचणी येत असल्याने सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्योग बंद पडू देणार नाही, असे आश्वासन देत उद्योजकांच्या समस्या आणि अडचणींचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 3:40 pm

मुलींकडून शुल्क आकारणा-या महाविद्यालयांवर कठोर कारवाई

मुंबई : मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याचा निर्णय २ वर्षांपूर्वी अंमलात आलेला असताना जे शुल्क आकारत असतील, त्या महाविद्यालयांची मान्यता रद्द केली जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली. सरकारकडून प्रतिपूर्ती उशिराने होते, म्हणून अनेक महाविद्यालये विद्यार्थिनींकडून शुल्क आकारतात, याकडे समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मंत्री […] The post मुलींकडून शुल्क आकारणा-या महाविद्यालयांवर कठोर कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 3:36 pm

हुर्रे…‘एलपीजी गॅस’ला पर्यायी ‘डीएमई गॅस’ सापडला

पुणे : एकीकडे एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे संपूर्ण जग हैराण झालेले असताना पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञांना एलपीजीला पर्याय ठरू शकेल अशा डायमिथाईल इथर अ डीएमई (डीएमई) गॅसची निर्मिती करण्यात यश आले आहे. अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात आज सलग १४ व्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. या युद्धाचा थेट फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून युद्धामुळे जगभरात […] The post हुर्रे…‘एलपीजी गॅस’ला पर्यायी ‘डीएमई गॅस’ सापडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 3:14 pm

गॅस सिलिंडरसाठी लोकांनी रांगा लावाव्यात, त्यासाठी पॅनिक करण्याची काँग्रेसची बुद्धी:देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा; ही वृत्ती देशाला घातक असल्याचा आरोप

काही पक्ष विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी गॅस सिलिंडरसाठी रांगा लावाव्यात, असा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आपल्याला महिनाभर पुरेल इतका पुरवठा आधीच करण्यात आला आहे. आवश्यकतेप्रमाणे गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. मात्र देशात पॅनिक तयार करायचे, ही काँग्रेसची बुद्धी आहे आणि ही देशाला घातक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने, गॅस कंपनी यांनी सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की घरगुती गॅसचे कुठेही संकट नाही. जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी गॅसची दिलेली आहे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे विनाकारण रांगा लावण्याचेही कारण नाही. ऑनलाईन बुकिंग करता येते आणि लोकांना त्यानुसार गॅसचा पुरवठा देखील होत असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. वास्तविक न्यू एरा क्लीनटेक इंटिग्रेटेड कोल गॅसीफिकेशन ॲण्ड कार्बन कॅप्चर प्रकल्प आणि ग्रेटा एनर्जीच्या गॅसीफिकेशन आधारित इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात रोजगार निर्मिती होणार असून हे दोन्ही प्रकल्प केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. या प्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर अंशतः निर्बंध लादण्यात आलेत. सरकारच्या निर्देशांनुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना 100 टक्के गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांनाही 100 टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस/तुरुंग यांना 70 टक्के गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 2:57 pm

केकेआरला मिळाला मुस्तफिजुरचा पर्याय

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेशात हिंदुंवर होणा-या अत्याचारमुळे बीसीसीआयने बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमधून बाहेर काढले होते. त्याच्या अनुपस्थितीत केकेआरचा संघ कुणाला खेळवणार हा प्रश्न सा-यांनाच पडला होता. या प्रश्नाचे अखेर उत्तर मिळाले असून तब्बल ६ फूट ८ इंच उंचीचा गोलंदाज त्यांच्या ताफ्यात सामील […] The post केकेआरला मिळाला मुस्तफिजुरचा पर्याय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 2:15 pm

अक्षय सोबत काम करुन मानसिक त्रास झाला

मुंबई : धुरंधर चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या अक्षय खन्नाबाबतफराह खानने रणवीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये एक रंजक किस्सा सांगितला. ९० च्या दशकात अक्षयसोबत काम करणे आपल्यासाठी मानसिक त्रासाचे होते, असे फराहने म्हटले आहे. त्यावेळी अक्षय सेटवर अत्यंत चिडचिडा असायचा आणि त्याचा स्वभाव खूप वेगळा होता, ज्यामुळे फराह त्याच्यासोबत काम करण्यास टाळाटाळ करायची. मुलाखतीत फराह खान म्हणाली ९० च्या […] The post अक्षय सोबत काम करुन मानसिक त्रास झाला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Mar 2026 2:13 pm

साईबाबा संस्थानाकडून भाविकांना आता फक्त एकच लाडू प्रसाद:गॅस टंचाईचा परिणाम; काटकसर करून उपलब्ध साठा टिकवण्याचा प्रयत्न

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र देशभर दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम आता महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवरही जाणवू लागला आहे. शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका बसला असून प्रसाद वितरणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असल्याने प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात लाडू तयार केले जातात. मात्र गॅस साठा मर्यादित असल्यामुळे संस्थानने आता प्रत्येक भाविकाला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. साई संस्थानच्या माहितीनुसार, दररोज सुमारे पंचेचाळीस हजार लाडू पाकीटांची विक्री केली जाते. याशिवाय दर्शनासाठी उभ्या असलेल्या भक्तांना दररोज जवळपास पन्नास हजार बुंदी प्रसाद पाकीटांचे मोफत वितरण केले जाते. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची आवश्यकता असते. सध्या गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे प्रसाद तयार करताना इंधन बचत करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय संस्थानने घेतला असून यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साई संस्थानकडे सध्या लाडू बनवण्यासाठी लागणारा गॅस फक्त दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच उरला असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गॅसचा वापर नियंत्रित ठेवण्यासाठी संस्थानाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार आहे. गॅस वापरात काटकसर करून उपलब्ध साठा अधिक काळ टिकवण्याचा प्रयत्न संस्थानकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. गुजरातमधील हाजीराबाद येथून गॅस टँकर दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या इंडेन बॉटलिंग प्रकल्पातून होणाऱ्या गॅस सिलिंडर पुरवठ्यावरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. यापूर्वी या प्रकल्पातून दररोज सुमारे शंभर गाड्यांमधून सिलिंडरची वाहतूक केली जात होती. मात्र सध्या ही संख्या कमी होऊन फक्त तीस ते पंचेतीस गाड्यांपर्यंत मर्यादित झाली आहे. प्रकल्पातील दोन भरणी केंद्रांपैकी सध्या फक्त एकच केंद्र सुरू असल्याची माहिती आहे. गुजरातमधील हाजीराबाद येथून गॅस टँकर येत असले तरी संभाव्य टंचाई टाळण्यासाठी कोटा कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तरीही ग्राहकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी रोज काही प्रमाणात सिलिंडर भरून पाठवले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 2:02 pm

मुरलीधर मोहोळ यांच्या पायावर शस्त्रक्रिया:केंद्रीय राज्यमंत्र्यांना एका महिन्याची सक्तीची विश्रांती

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जुन्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागल्याने किमान एका महिन्याची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी सामाजिक माध्यमांवर याबाबतची माहिती देत नागरिकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मागितल्या आहेत. मोहोळ म्हणाले, सुमारे 29 वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्या दुखापतीमुळे त्यांना कुस्ती सोडावी लागली. इतकी वर्षे या दुखापतीकडे दुर्लक्ष झाले; मात्र अलीकडे त्या त्रासात वाढ झाल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी किमान एक महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या संसद अधिवेशन सुरू असताना ही शस्त्रक्रिया करावी लागल्याने कामांपासून काही काळ दूर राहावे लागणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अधिवेशनासोबतच देशभरातील प्रवास, लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग या सर्व कामांवर काही काळ विराम द्यावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच यंदा होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबतही त्यांनी विशेष उल्लेख केला. या सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचा त्रास दुखापतीपेक्षाही जास्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या बळावर आपण लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कामाला लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिन्याभरात पूर्वीपेक्षा अधिक जोमाने जनतेच्या सेवेत हजर होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 1:53 pm

संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली आहे का?:उबाठा गट ताब्यात घेण्यासाठी राऊतांचे प्रयत्न- नवनाथ बन

मिठी नदीचे नाव काढत संजय राऊत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. मिठी नदी कोणाला विकली, तिचा गाळ खात कोण श्रीमंत झाले, त्यातून कुणी घरे बांधले हे मुंबईकरांना माहिती आहे. दिनु मोर्या कुणाचा मित्र होता, कुणाच्या मित्राची चौकशी झाली, मिठीच्या माध्यमातून कशा पद्धतीने मुंबईकरांना लुटले याची संपूर्ण माहिती सर्वांना आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात जोराचे भांडण सुरू आहे. रोज उठायचे मिठी नदीचे नाव घेत त्यामधील भ्रष्ट्राचार बाहेर आला पाहिजे यासाठी राऊत प्रयत्न करत आहे. ते समोर आले की आदित्य ठाकरे आणि कंपनीचा भ्रष्टाचार पुढे येणार आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी राऊत रोज त्यावर बोलत आहेत. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याची सुपारी नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी सुपारी घेतली आहे की येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे यांना संपवायचे आणि उबाठा गट आपल्या ताब्यात घ्यायचा, म्हणून मिठी नदीचे नाव वारंवार त्यांच्याकडून घेण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंना या प्रकरणी अडचणीत आणण्याचे काम राऊतांकडून सुरू आहे. या नदीचा गाळ खाणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अदानी-अंबानींच्या लग्नात जाऊन कुणी डान्स केला होता. कोणी हात जोडले होते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही नवनाथ बन म्हणाले की, सरकार अफवा पसरवण्याचे काम करत नाही तर माहिती देण्याचे काम करते. राऊतांकडून रोज सकाळी अफवा पसरवण्याचे काम होते. आज शहरामध्ये बुकींग करताच 25 दिवसांमध्ये सिलिंडर मिळते. साठेबाजीमुळे काही ठिकाणी तुटवडा आहे, पण घरगुती सिलिंडर कमी पडणार नाही.गॅसचा पाईप असेल तर सिलिंडर का हवे आहे.लोकांना सिलिंडर मिळू नये म्हणून त्यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहे. 40 देशांतून कच्च्या तेलाची आयात नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 140 कोटी भारतीयांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात रोज बैठका होत असून आपन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. इराणकडून सुरक्षितपणे पुरवठा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर 40 देशांकडून कच्चे तेल आपण आयात करत आहोत.आपल्याकडे कुठेही पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लागलेल्या नाहीत. फक्त काही ठिकाणी गॅसचा प्रश्न निर्माण झाला आहे, पण त्याचा फटका जनतेला बसू नये याची पूर्ण काळजी सरकार घेत आहे. राऊतांसारखे घरात बसणारे हे सरकार नाही.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 1:50 pm

मुलीची लग्नपत्रिका वाटून परताना काळाचा घाला:गिट्टीने भरलेला ट्रक उलटल्याने इंदोरा येथील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू

नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा प्रत्यय लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आला आहे. ज्या घरात काही दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले होते, त्याच घराचा आधारस्तंभ काळाने हिरावून नेला. आपल्या लाडक्या मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून मित्रासोबत घरी परतणाऱ्या पित्याचा भीषण रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. अर्जुनी मोरगाव जवळील अरूण नगर परिसरात गिट्टीने भरलेला १२ चक्का ट्रक दुचाकीवर उलटल्याने झालेल्या या भीषण अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरा येथील प्रतिष्ठित नागरिक रमेश सावस्कार (वय ४८) यांच्या मुलीचे लग्न २ एप्रिल रोजी नियोजित आहे. सध्या सर्वत्र लग्नाची लगबग सुरू असून, रमेश सावस्कार हे आपले मित्र अशोक काळबांदे (वय ५२) यांच्यासोबत सासुरवाडी खामखुरा येथे निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेले होते. १३ मार्च रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास, पत्रिका वाटप आणि जेवण आटोपून दोघेही दुचाकीने आपल्या गावाकडे परतत होते. दरम्यान अर्जुनी मोरगाव जवळील अरूण नगर परिसरातून जात असताना, समोरून गिट्टीने भरलेला एक १२ चाकी ट्रक भरधाव वेगात येत होता. दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अवजड ट्रक थेट सावस्कार यांच्या दुचाकीवर पलटी झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकखाली दबल्या गेल्यामुळे रमेश सावस्कार आणि अशोक काळबांदे या दोघांचाही जागीच चेंदामेंदा होऊन मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले होते, मात्र अशोक काळबांदे यांच्या खिशातील पाकीटावरून त्यांची ओळख पटली. ​गावावर शोककळा, सर्वत्र हळहळ मृतक रमेश सावस्कार हे इंदोरा येथील 'कमलाबाई कृषी केंद्रा'चे मालक होते, तर अशोक काळबांदे हे 'अशोक फोटो स्टुडिओ' चे मालक होते. व्यवसायानिमित्त या दोन्ही व्यक्तींचा परिसरात मोठा जनसंपर्क होता. ज्या घरात सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता शोककळा पसरली असून सावस्कार आणि काळबांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 1:15 pm

अनुसूचित जातींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण:बार्टी आणि विज्ञान उद्यानाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात शुभारंभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम लक्ष्मीबाई भाऊराव पाटील इनोव्हेशन फाउंडेशन, एस. एम. जोशी महाविद्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जातींच्या बेरोजगार युवक-युवतींसाठी पूर्णपणे मोफत राबविण्यात येत आहे. या तीन महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत ग्राफिक डिझायनर, सोशल मीडिया एक्झिक्यूटिव्ह, आयटी हेल्पडेस्क अटेंडंट, जीएसटी असिस्टंट, सीनियर असोसिएट – डेस्कटॉप पब्लिशिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल मेंटेनन्स टेक्निशियन आणि ड्रोन सर्व्हिस टेक्निशियन अशा सात अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एकनाथ मुंढे होते. विज्ञान व तंत्रज्ञान उद्यान, पुणे येथील प्रकल्प संचालिका सोनाली भट्टाचार्जी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच, एस. एम. जोशी महाविद्यालयाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. संजय अहिवळे यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. एकनाथ मुंढे यांनी विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. सोनाली भट्टाचार्जी यांनी युवक सशक्तीकरणासाठी कौशल्य विकासाची गरज अधोरेखित केली आणि अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे प्रकल्प समन्वयक डॉ. मनोज कुलकर्णी यांनी केले. बार्टीचे महासंचालक आणि विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी सहकार्य केले. विज्ञान व तंत्रज्ञान उद्यानचे प्रकल्प व्यवस्थापक वैभव निमगिरे यांनी आभार प्रदर्शन केले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 1:08 pm

राष्ट्रनिर्मितीसाठी समाजाची भागीदारी महत्त्वाची:रामदेव बाबा यांचे प्रतिपादन; भारतीय शिक्षण पद्धतीवर दिला जोर

पतंजली योगपीठाचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू स्वामी रामदेव बाबा यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी राजकारण नव्हे, तर समाजाची भागीदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे 'लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर'च्या (एलटीसी) उद्घाटनावेळी ते बोलत होते. हे केंद्र विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व विकासातून राष्ट्रनिर्मितीसाठी अमूल्य योगदान देईल, असेही त्यांनी नमूद केले. वै. उर्मिला कराड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये उभारण्यात आलेल्या या 'लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर'चे उद्घाटन झाले. याप्रसंगी स्वामी रामदेव बाबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते, तर 'लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर'चे संकल्पक व निर्माते डॉ. राहुल कराड यांचीही उपस्थिती होती. स्वामी रामदेव बाबा म्हणाले की, जीवन परिवर्तनात शिक्षण आणि स्वयंशिस्त महत्त्वाची असते. तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असून, त्यांनी आपली स्वप्ने केवळ पगारापुरती मर्यादित न ठेवता समाज व राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देण्याची असावीत. धैर्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमातून निर्धारित ध्येय गाठण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत.विचार प्रणा ली अत्यंत गतिमान असल्याने आहार व विचारांप्रती सतत सजग राहावे, तसेच शरीर, मन आणि भावनांना नियंत्रित करावे. डिजिटल माध्यमांमुळे मुले दररोज ८ तास वेळ वाया घालवतात, त्यातून त्यांना काहीच उपलब्ध होत नाही, यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. खेड्यांमध्ये काम करण्यासारखे खूप काही आहे. तेथे आदर्शग्राम व चारित्र्य निर्मितीसाठी उत्तम शिक्षण व्यवस्था उभी करावी. स्वातंत्र्यानंतरही देशात भारतीय शिक्षण पद्धती नाही, त्यासाठी कार्य करावे, असे आवाहन स्वामी रामदेव बाबा यांनी केले. केंद्रीय कृषि व किसान कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ऑनलाइन भाषणात 'लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर'ला (एलटीसी) एक अद्वितीय उपक्रम म्हटले. भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील अनुभवजन्य शिक्षणाचा हा गाभा असून, देशाला बलशाली बनवण्यास, आत्मविश्वासू व राष्ट्रनिर्माते युवक घडवण्यास मदत करेल, असे ते म्हणाले. यावेळी 'लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर'च्या (एलटीसी) माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार, राजीव गांधी खेल रत्न अवॉर्डी रंजन सोधी, संजीव निकम, नंदकिशोर पाचपुते, ह.भ.प. बापूसाहेब मोरे, आमदार रमेशअप्पा कराड, राजेश कराड, योगेश पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे सीओओ डॉ. प्रसाद खांडेकर व विद्यार्थी प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन संदेशात सांगितले की, दूरदर्शी विचार करुन डॉ. राहुल कराड यांनी उभारलेल्या जीवन परिवर्तन केंद्र (एलटीसी) प्रकल्पामुळे अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था व समाजाला नवी दिशा मिळेल. पाच तत्वांवर आधारित केंद्र मानव कल्याणासाठी आहे. डॉ. राहुल कराड म्हणाले, कृषी (शेती) आणि निसर्ग, शारीरिक तंदुरूस्ती आणि खेळ, संघटन कौशल्य आणि नेतृत्व, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण व अध्यात्म आणि मनःशांती या ५ स्तंभावर आधारित हे केंद्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक आरोग्य जोपासण्याबरोबरच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण विकसित करण्याचा हा शैक्षणिक क्षेत्रातील मैलाचा दगड आहे. हे केंद्र संपूर्ण भारताचे असून विद्यार्थ्यांनी येथून लाभ घेऊन बाहेर निघावे व देश परिवर्तनासाठी कार्य करावे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 1:07 pm

गॅस पुरवठ्याची नियमावली जारी:शैक्षणिक संस्थांना 100%, इतरांना 70 ते 50% गॅस पुरवण्याचे आदेश; सरकारच्या परिपत्रकात काय? वाचा

इराण विरुद्ध इस्त्रायल - अमेरिका युद्धामुळे राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिकांच्या गॅस एजन्सीपुढे लांबलचक रांगा लागल्या आहेत. यामुळे सरकारने एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा? यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. यात काही क्षेत्रांना 100 टक्के, तर काही क्षेत्रांना 70 ते 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. या प्रकरणी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर अंशतः निर्बंध लादण्यात आलेत. परिणामी, गॅसवर अवलंबून असणाऱ्या राज्यातील उद्योग, व्यवसायांना जबर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाविषयी एक नियमावली जारी केली आहे. त्यानुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना 100 टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर इतर संस्था व विभागांना 70 ते 50 टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिलेत. राज्याचे सहसचिव अशोक आत्राम यांनी या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले आहे की, आपल्या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, शैक्षणिक संस्थांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खानावळी इत्यादींना एलपीजी गॅस सिलिंडरच्या 100 टक्के वाटपाबाबतची कार्यवाही करण्यात यावी आणि त्याबाबतचा अहवाल शासनास दररोज सादर करण्यात यावा. कोणत्या क्षेत्राला किती मिळणार गॅस? सरकारच्या निर्देशांनुसार, रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक सेवांना 100 टक्के गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम व अनाथाश्रमांनाही 100 टक्के गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस/तुरुंग यांना 70 टक्के गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला 50 टक्के गॅस पुरवठा करण्याची मर्यादा सरकारने आखून दिली आहे. हे ही वाचा... हॉटेल व्यवसाय चुलीवर:मुंबई, संभाजीनगरसह प्रमुख शहरांतील हॉटेलांत पेटल्या चुली; गॅस बुकिंगचे नंबरही बंद, तुमच्याकडे काय? इराण विरुद्ध इस्त्रायल - अमेरिका युद्धाच्या थेट झळा आता महाराष्ट्राला बसत आहेत. राज्यात जवळपास सर्वच शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यातच सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध घातल्यामुळे हॉटेल व्यावसायिकही अडचणीत सापडलेत. पण त्यांनी या ही बिकट परिस्थितीत चूल पेटवून आपला व्यवसाय पुढे चालवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 1:03 pm

भाजपने अदानींना सर्व काही विकले:आता गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा, नरेंदर अन् सिलिंडर दोन्ही गायब - संजय राऊत

भाजपने सर्व काही अदानींना विकले फक्त काही नदी नाले शिल्लक होते त्यातील मिठी नदी, मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढला पाहिजे, ही मिठी नदीच्या माध्यमातून साकार होऊ शकते. आता गटारांची किंमत आता वाढली आहे. मोदींच्या कृपेने नदी, नाले, गटारांची किंमत वाढली आहे, असा पंतप्रधान जगात झाला नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती दिसते आहे. आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. भाजप मोदी यांच्या विरोधात कधीपासून जात आहे? नरेंदर अन् सिलिंडर भी गायब अशी घोषणा संसदेत गाजत आहे. यापुढे नरेंद्र मोदी संसदेत येतील असे वाटत नाही कारण त्यांना तोंड दाखवायला जागा नाही. मोदी यावर बोलत नाही संजय राऊत म्हणाले की, अखाती देशातील युद्धामुळे भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पण सरकारकडून त्या संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत की सर्व काही अलबेल आहे. एलपीजीची टंचाई अजिबात पडणार नाही, भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे. कुठेही सिलिंडरचे भाव वाढणार नाही. या अफवा महाराष्ट्राचे आणि केंद्राचे सरकार पसरवत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यात प्रचारात अडकलेले आहे. त्यांच्या प्रचार सभेतील कोणत्याही भाषणात या विषयाचा उल्लेख नाही. एलपीजी अभावी अनेक हॉटेल्स बंद संजय राऊत म्हणाले की, सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. 25 दिवस सिलिंडर मिळणार नाही असे चित्र आहे. अनऑर्गनाईज लेबर जाक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे ती हॉटेल इंडस्ट्री 40 टक्के बंद झाली आहे. मुंबईसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एलपीजी अभावी हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाही, लोकांनी काय करायचे.नोटबंदीच्या वेळी लाइनमध्ये लोकं मारली गेली. तेच सिलिंडरच्या रांगेत होईल अशी परिस्थिती देशभरात झाल्याचे दिसते आहे. हे सरकार जनताविरोधी संजय राऊत म्हणाले की, हे सरकार जनताविरोधी आहे.आंतरराष्ट्रीय राजकारणात अपयशी ठरल्याने आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. इराणकडून संवाद झाला असे सांगितले जात नाही. केंद्र सरकारकडून अफव पसरवल्या जात आहेत. इराणसोबत संवाद साधला गेला पाहिजे. इराणला नैतिक पाठबळ देणं गरजेचे आहे. युद्ध युद्धांच्या ठिकाणी आहे, पण आपण तटस्थ भूमिका घेणे गरजेचे होते. इराणच्या दुखात सहभागी होणं गरजेचे होते. केवळ तेलाचे टँकर सोडा इतकाच आपला संबंध आहे का तर नाही? असे राऊतांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 12:45 pm

पीसीसीओइ - सीआयआयएलतर्फे 'इनोव्हेट-एक्स' स्टार्टअप स्पर्धा:रविवारी उद्घाटन; विद्यार्थ्यांना २ लाखांची बक्षिसे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पीसीसीओइ सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड लिंकेजेस फोरम (पीसीसीओइ-सीआयआयएल) यांच्या वतीने 'इनोव्हेट-एक्स' या तीन दिवसीय स्टार्टअप कल्पना सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे रविवारी, १५ मार्च रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्यासह इतर प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. ही माहिती पीसीसीओइचे संचालक, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी दिली. या स्पर्धेत विविध शाखांमधील विद्यार्थी एकत्र येऊन नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करतील. मानवी जीवनातील समस्यांवर अभिनव उपाय शोधण्यासाठी ते प्रकल्प विकसित करणार आहेत. सहभागी विद्यार्थ्यांना अनुभवी मार्गदर्शक, स्टार्टअप संस्थापक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. यामुळे त्यांना स्टार्टअप संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल आणि उद्योजकता, नवोन्मेष व व्यवसाय अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण व्यावहारिक मार्गदर्शन मिळेल. जास्तीत जास्त पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी https://ennovatex26.in/ येथे नोंदणी करावी. या स्पर्धेत नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि संघांना एकूण दोन लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, रविवारी सकाळी उद्घाटन आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप संकल्पनांचे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवशी, सोमवारी निवड यादीतील स्टार्टअप्सना व्यावसायिक मार्गदर्शन मिळेल. समारोपाच्या दिवशी, मंगळवारी गुंतवणूक आणि उद्योग व्यवसायाशी संबंधित सहभागी संघांचे सादरीकरण, प्रश्नोत्तरे आणि पॅनलिस्ट मार्गदर्शन तसेच बक्षीस वितरण समारंभ होणार आहे, अशी माहितीही अर्चना पाचणकर यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 12:28 pm

स्वारगेटमध्ये अवैध रिक्षांवर कारवाई:३७५ केसेसची नोंद, पुणे वाहतूक पोलिसांकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष मोहीम

पुणे शहर वाहतूक शाखेने स्वारगेट परिसरात अवैध प्रवासी रिक्षांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये एकूण ३७५ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. जादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, युनिफॉर्म न घालणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली. ही मोहीम स्वारगेट वाहतूक विभागामार्फत स्वारगेट जेधे चौक, स्वारगेट बसस्थानकाचे इनगेट-आउटगेट तसेच स्वारगेट महामेट्रो समोर या प्रमुख ठिकाणी राबवण्यात आली. १० मार्च २०२६ रोजी झालेल्या पहिल्या कारवाईत एकूण १४६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जादा प्रवासी घेणाऱ्या १११ रिक्षाचालकांवर आणि भाडे नाकारणाऱ्या ३२ चालकांवर कारवाई झाली. तसेच, नियमभंग करणाऱ्या तीन फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या. यानंतर, १२ मार्च २०२६ रोजी स्वारगेट वाहतूक विभाग आणि पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त पथकाने पुन्हा विशेष मोहीम राबवली. या कारवाईत स्वारगेट वाहतूक विभागाने एकूण १८६ केसेस नोंद केल्या. यामध्ये जादा प्रवासी घेणाऱ्या ९२ रिक्षा, भाडे नाकारणाऱ्या २१, युनिफॉर्म नसलेल्या ४८ तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १८ रिक्षाचालकांचा समावेश होता. यावेळी सात फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, आरटीओ पुणे यांनी ४३ प्रकरणांवर स्वतंत्र कारवाई केली. या दोन्ही दिवसांच्या कारवाईत स्वारगेट वाहतूक विभाग आणि आरटीओ पुणे यांच्या संयुक्त मोहिमेत एकूण ३७५ केसेस नोंदवण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकारी एपीआय शोभा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकातील अंमलदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. पुणे शहर वाहतूक शाखेकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष कारवाया पुढेही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सर्व रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 12:25 pm

वि'चित्रा' ताईंनी सवयीप्रमाणे नाक खुपसले:गॅस मिळेपर्यंत सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांना सवाल

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी 'गॅस पुरवठा सुरळीत आहे' असा दावा केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. सिलिंडर येईपर्यंत 25 दिवस आम्ही सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? असा थेट सवाल खडसे यांनी चित्रा वाघ यांना विचारला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गॅस सिलिंडरची प्रतिकृती हाती घेऊन निदर्शने केली. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ यांनी आंदोलनात हस्तक्षेप करत 'गॅस पुरवठा सुरळीत असून बुकिंग केल्यावर 25 दिवसांत सिलिंडर मिळते' असे विधान केले होते. त्यांच्या याच विधानाचा समाचार रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला आहे. रोहिणी खडसे यांचे 'ते' ट्विट चर्चेत रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये चित्रा वाघ यांचा उल्लेख 'विचित्रा ताई' असा करत खोचक टीका केली. काल गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना विचित्रा ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले. ताई म्हणतात सिलिंडर 25 दिवसांत मिळते. अहो ताई, जर एखाद्या सामान्य गृहिणीच्या घरचा गॅस आज संपला असेल, तर तिने 25 दिवस काय करावं? 25 दिवस वाट पाहायची का? बरं, पाहतो वाट! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? असा उपरोधिक सवाल खडसे यांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 12:16 pm

दोन अपत्य धोरण कडक करा, तिसऱ्या अपत्याला मतदान हक्क नको:नियम मोडणाऱ्यांवर कारवाई हवी- आदिनाथ महाराज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नेवासा देवगड येथे आयोजित हिंदू संमेलनात तारकेश्वरगडचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी तिसऱ्या अपत्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे. दोन अपत्यांनंतर जन्मलेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देऊ नये, असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आपल्या भाषणात आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की, देशभरात केंद्र आणि राज्य सरकारकडून ‘हम दो हमारे दो’ हा नारा दिला जातो. मात्र प्रत्यक्षात या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी नियम मोडले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी शासकीय नोकरी किंवा पदासाठी दोन अपत्यांचे बंधन असले, तरी प्रत्यक्षात नियम मोडण्याचे प्रमाण मोठे आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी दोन अपत्यांनंतर जन्मलेल्या सर्वांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी भूमिका मांडली. लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देव, देश अन् धर्मासाठी एकसंघ राहणे गरजेचे आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की, पूर्वी लोक एकमेकांना भेटल्यावर ‘राम राम’ म्हणत अभिवादन करत असत; मात्र काही वर्षांपूर्वी नव्या पिढीला असे अभिवादन करणे मागासलेपणाचे वाटत होते. आता मात्र ‘जय श्रीराम’ म्हणण्यात लोकांना अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शिवाजी महाराज की जय’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यातही समाजाला गौरव वाटत असल्याचे ते म्हणाले. आज समाजात दिसणारे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव हे मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यामुळे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. संस्कार, संस्कृती आणि कुटुंबातील एकजूट जपण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. देव, देश आणि धर्मासाठी समाजाने एकसंघ राहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 11:52 am

बुलढाण्यात रुग्णालयातून सिलिंडरच लंपास:गॅससाठी रांगा, पण चोरट्याची थेट स्वयंपाकघरावर नजर; रुग्णालयाच्या किचनमधून चोरी

देशभरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत चर्चा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असताना एका चोरट्याने थेट रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातून भरलेला गॅस सिलिंडर पळवला. बुलढाणा शहरातील क्षयरोग आरोग्यधाम म्हणजेच टीबी रुग्णालयात ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या ठिकाणी एकूण सतरा गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक भरलेला सिलिंडर चोरट्याने पळवून नेल्याचे उघड झाले आहे. याशिवाय स्वयंपाकगृहातील काही साहित्यही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची माहिती मिळताच परिसरात चर्चा सुरू झाली. या घटनेनंतर काही रुग्णालयांतील कॅन्टीन चालकही सतर्क झाले असून रात्री सुरक्षा वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गॅस पुरवठ्याबाबत राज्यातील काही भागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून गॅसचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले तरी घरपोच वितरण सेवा बंद झाल्याने नागरिकांना एजन्सीबाहेर जाऊन सिलिंडर घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा गॅस वितरणात हेराफेरी होत असल्याचाही आरोप काही नागरिकांनी केला आहे. वितरण करणारे कर्मचारी ओळखीच्या लोकांना प्राधान्य देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. एजन्सी सुरू होण्यापूर्वीच सकाळी सात वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाकडून गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गॅस पुरवठ्याच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 11:27 am

रत्नागिरी हादरली!:अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ केला व्हायरल, दोन्ही आरोपी अटकेत

रत्नागिरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 22 फेब्रुवारी रोजी शहरातील राजिवडा परिसरात घडली. जुबेर सलीम शेख (वय 22) आणि मुस्तकीन गडकरी (वय 24) या दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलाला गाठून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. एवढ्यावरच न थांबता या नराधमांनी या कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण केले. पीडित मुलगा या प्रकारामुळे प्रचंड घाबरला होता, त्यामुळे त्याने सुरुवातीला घरात कोणालाही काहीही सांगितले नाही. व्हिडीओ व्हायरल झाल्याने उलगडा आरोपींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. 12 मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास हा व्हिडीओ आला. व्हिडीओमधील मुलगा आपलाच असल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी विलंब न करता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांची कडक कारवाई पोलिसांनी या घटनेची दखल घेतल्यानंतर या दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसारही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्वतः तपास हाती घेतला आहे. तसेच आता हा व्हिडिओ अजून कुठे प्रसारित करण्यात आला आहे का, याचा देखील तपास करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 11:21 am

बळजबरीने गर्भपात:जालन्याच्या टोळीचा घरातच शस्त्रक्रियेचा घाट; मनपा कंत्राटी कर्मचाऱ्याचीच ‘डील’, जुन्याच गुन्हेगारांचा सहभाग; शोधात पथक जालन्याला

नारेगावातील विवाहितेला दोन मुलींनंतर तिसऱ्यांदा मुलगीच होणार असल्याचे समजताच तिचा बळजबरीने गर्भपात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी पती अरबाज सय्यद, सासू आसिया आणि सासरा फेरोज सय्यद या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी (13 मार्च) न्यायालयाने या तिन्ही आरोपींना 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण कटात महापालिकेच्याच एका कंत्राटी कर्मचाऱ्याने दलाल म्हणून भूमिका बजावली. त्यानेच या कुटुंबाला जालन्यातील टोळीशी जोडून दिले. त्याच्या सोबत महालॅबचा कर्मचारीही असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पीडितेच्या घरात आधीच 5 आणि 2 वर्षांच्या मुली आहेत. तिसऱ्यांदा मुलगी नको, या अट्टहासातून अरबाज हा गर्भलिंग निदानासाठी कोणाच्या तरी शोधात होता. एका दिवशी एका वॉशिंग सेंटरवर तो या विषयावर बोलत असताना महापालिकेच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने त्याचे बोलणे ऐकले. मदतीच्या बहाण्याने या कर्मचाऱ्याने अरबाजला जालन्यातील सतीश सोनवणे आणि कमल तीनगोटे या बोगस डॉक्टरांच्या टोळीशी संपर्क करून दिला. या कर्मचाऱ्याने केवळ मध्यस्थीच केली नाही, तर संशयितांशी ‘डील’ करून देण्यातही पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. माहेरच्या लोकांनी उधळला डाव जालन्याची ही टोळी नारेगावात पीडितेच्या घरी आली होती. तिथेच तिची तपासणी करून गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. इतकेच नाही, तर घरातच शस्त्रक्रिया करून गर्भ काढण्याचा घाट या बोगस डॉक्टरांनी घातला होता. मात्र, पीडितेच्या माहेरच्या लोकांना या हालचालींचा संशय आला. त्यांनी कोणताही विलंब न लावता पोलिसांना पाचारण केले. पोलिसांची गाडी जवळ येताच ही बोगस टोळी पळून जाण्यात यशस्वी झाली, मात्र पतीने रचलेले हे कारस्थान उघड झाले. सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांचे पथक सध्या या टोळीच्या अटकेसाठी जालन्यात तळ ठोकून आहे. सरकारी यंत्रणेतच दडले आहेत ‘भक्षक’ हे प्रकरण केवळ एका कुटुंबाचे नसून, यंत्रणेत दडलेल्या त्रुटींवर बोट ठेवणारे आहे. महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी जेव्हा बोगस टोळीला ग्राहक शोधून देण्याचे काम करतो, तेव्हा ही साखळी किती खोलवर पसरली आहे, हे लक्षात येते. मयूर पार्कसारख्या सुशिक्षित भागात पॅथॉलॉजी लॅब चालवणारा व्यक्ती जेव्हा यात सहभागी असतो, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा? केवळ पतीने गर्भपात केला हा गुन्हा नसून, ही संपूर्ण ‘इकोसिस्टिम’ उद्ध्वस्त करणे ही पोलिसांसाठी सर्वात मोठी परीक्षा आहे. मनपाकडील व्हिडिओमुळे संशयितांची ओळख या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांसोबत पंचनाम्यात सहभाग घेतला. शहरात यापूर्वी घडलेल्या गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणांमधील काही संशयितांचे व्हिडिओ आरोग्य विभागाच्या रेकॉर्डवर होते. पथकाने हे व्हिडिओ पीडितेसमोर ठेवले आणि एका ‘ओळख परेड’प्रमाणे तिने त्यातील सतीश सोनवणे, कमल तीनगोटे आणि अनिल जाधव ऊर्फ सपकाळ यांना तत्काळ ओळखले. अनिल जाधव हा मयूर पार्क भागात ‘महालॅब’ नावाने पॅथॉलॉजी लॅब चालवत असल्याचे समोर आले आहे. लॅबच्या नावाखाली हा व्यक्ती बोगस टोळीला तांत्रिक मदत पुरवत होता. मागच्या दाराने आरोपींना केले होते पलायन विवाहितेने या प्रकाराबद्दल माहेरी फोनवरून कळवले. त्यानंतर पोलिसांसह माहेरची मंडळी पीडितेच्या घरी पोहोचली. त्यावेळी त्यांची चाहूल आरोपींना लागली. गर्भपात करण्यासाठी आलेली टोळी आरोपी अरबाजच्या घराच्या मागच्या दरवाजातून पळून गेल्याने पोलिसांच्या हाती लागली नव्हती.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 11:10 am

आता LPG फुकट मिळणार, फक्त नाक बंद करून श्वास घ्या:गॅस तुटवड्यावरून संजय राऊतांचा PM मोदी, भाजपला उपरोधिक टोला

इराण विरुद्ध इस्त्रायल - अमेरिका युद्धामुळे अवघ्या जगाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. विशेषतः या युद्धामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात स्वयंपाकाच्या गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. या प्रकरणी सर्वसामान्य नागरिकांची होरपळ होत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यासंबंधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजपला सणसणीत टोला हाणला आहे. आता एलपीजी फुकट मिळेल, फक्त नाक बंद करून श्वास घ्या, असे त्यांनी म्हटले आहे. आखातातील युद्धामुळे भारतात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे राज्यभरातील अनेक हॉटेल्स, अन्नपदार्थांचे छोटे व्यवसाय ठप्प झालेत. सरकार देशात स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा करत आहे. पण प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. अनेकांना सिलिंडर बुक करूनही मिळत नाही. यामुळे जनतेच्या संतापाचा कडेलोट होत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मोदी नालीतून गॅस निर्मिती करण्यावर भाष्य करत आहेत. काय म्हणाले संजय राऊत? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच व्हिडिओचा दाखला देत संजय राऊत यांनी मोदी व त्यांच्या पक्षावर निशाणा साधला आहे. ब्रेकिंग - मिठी नदी नाल्यात जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे. भाजपने ह्या साठ्याला तत्काळ राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. आता एलपीजी अर्थात स्वयंपाकाचा गॅस मोफत मिळणार. फक्त नाक बंद करून श्वास घ्या, असे संजय राऊत यांनी भाजप व पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत म्हटले आहे. त्यांचे हे ट्विट काही वेळातच चांगलेच व्हायरल झाले आहे. गटार गॅसमध्ये अदानी, अंबानींनी गुंतवणूक करावी संजय राऊत यांनी यासंबंधी शुक्रवारीही सरकारवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी देशात सर्वकाही सुरुळीत असल्याचा दावा करत आहेत. पण त्यांनी बिहार, महाराष्ट्र किंवा इतर राज्यात जाऊन पाहावे. मोदींनी नोटाबंदीनंतर लोकांना पुन्हा रांगेत उभे केले आहे. मोदींच्या घरी एलपीजी इराण किंवा इस्त्रायलमधून येत असेल. पण सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडला आहे. त्यांनी सूचवलेल्या गटार गॅसच्या प्रकल्पात अदानी व अंबानींनी गुंतवणूक केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. भाजपने परतावून लावली होती टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राज्यात गॅस टंचाई नाही. नागरिकांना बुकिंग केल्यानंतर 2 दिवसांत घरपोच गॅस मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. जनतेत घबरात निर्माण करण्यासाठी 2012 साली काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्यांचे फोटो व्हायरल करण्याची नामुष्की ठाकरे गट व काँग्रेसवर ओढावली आहे. सरकारला आपल्या जबाबदारीचे भान असून, सरकार ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. पण संजय राऊत व काँग्रेस गॅस टंचाईच्या नावाने जनतेच्या मनात भीती निर्माण करत आहेत, असे ते म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 11:03 am

सरकार कुणाला फसवते आहे?:भंपक दाव्यांपेक्षा गॅस एजन्सींबाहेर लागलेल्या रांगा, बंद खाणावळींतून सत्य समोर; ठाकरेंचा निशाणा

एकीकडे सरकार गॅस सिलिंडरचे साठे पुरेसे आहेत, असे सांगते. गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते आणि दुसरीकडे गॅस बुकिंगचा कालावधी वाढवते याला विरोधाभास नाही तर काय म्हणायचे? सरकारच्या भंपक दाव्यांपेक्षा गॅस एजन्सींबाहेर लागलेल्या रांगा आणि बंद पडणाऱ्या खाणावळींतून तुटवड्याचे सत्य समोर येते आहे. सरकार कुणाला फसवते आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे. सामनामधील अग्रलेख देखील वाचा.... अमेरिका व इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धाने जगभरातील अनेक देशांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बहुतांश देशांना पेट्रोल, डिझेल व एलपीजी सिलिंडरचा पुरवठा आखाती देशांतूनच होतो आणि इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर बंदी आणल्यामुळे यावर विसंबून असलेल्या देशांची मोठीच पंचाईत झाली आहे. एकीकडे इंधन व एलपीजी सिलिंडरचे साठे कमी होत चालले आहेत आणि दुसरीकडे युद्धामुळे नव्या पुरवठ्याचा ओघ नगण्य म्हणावा इतका असल्याने अनेक देश धास्तावले आहेत. भारतामध्ये तर स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. केंद्रीय सरकार तुटवड्याचा कितीही इन्कार करीत असले तरी प्रत्यक्षात स्थिती भयावह बनली आहे. स्वयंपाकाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शहरांना याचे चटके बसू लागले आहेत. गॅसच मिळत नसल्याने अनेक छोटी उपाहारगृहे व खाणावळी बंद पडू लागल्या आहेत. यामुळे शिक्षणासाठी व कामासाठी शहरांत गेलेल्या विद्यार्थी आणि कष्टकरी वर्गाचे हाल होत आहेत. उद्योगांचा गॅसपुरवठा सरकारने आधीच बंद केला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. शिवाय आहे तो गॅसचा साठा संपला की येत्या काही दिवसांत देशभरातील हजारो कारखाने बंद पडण्याचा धोका आहे. तसे झाले तर लाखो कामगांवर बेकारीची कुऱहाड कोसळू शकते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 30 टक्क्यांहून अधिक हॉटेल्स-रेस्टॉरंट्सनी आपल्या व्यवसायाला टाळे ठोकले आहेत. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे व या लगीनघाईत गॅस टंचाईमुळे लग्न समारंभांच्या जेवणाची कंत्राटे घेणाऱ्या केटरिंग व्यवसायावर तर मोठेच संकट कोसळले आहे. गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी दामदुप्पट खर्च होत असल्याने अनेक केटरिंग व्यावसायिकांनी मंगलकार्याच्या ऑर्डर्स घेणे बंद केले आहे. मार्च-एप्रिल हे महिने म्हणजे पर्यटनाचा हंगाम. मात्र गॅसच्या तुटवड्यामुळे पर्यटनस्थळांवरील ओघही कमी झाला आहे. कोकणातील गणपतीपुळे प्रसिद्ध देवस्थानालाही गॅस टंचाईचा जबर फटका बसला आहे. सिलिंडरअभावी गणपतीपुळे मंदिरातील लाडू व खिचडीचा प्रसाद बंद करावा लागला. सारे काही आलबेल आहे, गॅसचा पुरवठा अगदी सुरळीत सुरू आहे, असे दावे सरकारच्या वतीने करण्यात येत असले तरी गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या प्रचंड रांगा सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करण्यास पुरेशा आहेत. मुंबई-पुण्यातच नव्हे तर मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर या शहरांतही घरगुती गॅस सिलिंडर रिफिल करण्यासाठी गॅस एजन्सींबाहेर ग्राहक तासन्तास रांगेत उभे आहेत. पुण्यामध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृहांतील खाणावळींनी जेवणातून पोळी-भाजी बादच केली आहे. गॅस टंचाई दूर होत नाही तोपर्यंत पोळीऐवजी वरणभातच खावा लागेल, असे मेसेज वसतिगृहांतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर धाडण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या पैठणच्या नाथषष्ठी यात्रेलाही गॅस टंचाईचा जबर फटका बसला. गॅसच्या तुटवड्यामुळे पैठणमध्ये दूरदूरवरून येणाऱ्या दिंड्यांना अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. मुंबईतील मोठ्या सोसायट्या व निवासी संकुलांना पाईपद्वारे नैसर्गिक वायू मिळत असला तरी पश्चिम उपनगरांतील कांदिवलीपासून पूर्व उपनगरांतील धारावी ते भांडुपपर्यंत गॅस एजन्सींबाहेर लागल्या आहेत. मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात पश्चिम आशियातील युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसची प्रचंड टंचाई निर्माण झाली असतानाही केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी मात्र देशात गॅस सिलिंडरचे पुरेसे साठे असल्याचे व सारे काही सुरळीत असल्याचे सांगतात, याला काय म्हणावे? देशातील कोट्यवधी कुटुंबांच्या घरात स्वयंपाकासाठी गॅसची टंचाई भासणार नाही, याची काळजी घेण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. देशात इंधनाची कमतरता तर नाहीच, शिवाय एलपीजीचे उत्पादन 28 टक्के वाढविण्यात आले आहे, असा हरदीप पुरी यांचा दावा आहे. पुरी यांनी लोकसभेत राणाभीमदेवी थाटात दिलेली गॅस उत्पादन वाढीची माहिती खरी असेल तर देशभरातील गॅस एजन्सींबाहेर ग्राहकांच्या रांगा का लागल्या आहेत व देशातील लहानमोठी उपाहारगृहे आणि खाणावळी बंद का पडत आहेत, याचे उत्तर पेट्रोलियम मंत्र्यांनी द्यायला हवे. एलपीजीचे साठे पुरेसे असतील, तर सरकारने सिलिंडरचे बुकिंग करण्याचा कालावधी का वाढवला? शहरांत 21 दिवसांऐवजी आता 25 दिवसांनी, तर ग्रामीण भागांत तब्बल 45 दिवसांनंतरच गॅस बुक करता येईल असा नियम का करण्यात आला? एकीकडे सरकार गॅस सिलिंडरचे साठे पुरेसे आहेत, असे सांगते. गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते आणि दुसरीकडे गॅस बुकिंगचा कालावधी वाढवते याला विरोधाभास नाही तर काय म्हणायचे? सरकारच्या भंपक दाव्यांपेक्षा गॅस एजन्सींबाहेर लागलेल्या रांगा आणि बंद पडणाऱ्या खाणावळींतून तुटवड्याचे सत्य समोर येते आहे. सरकार कुणाला फसवते आहे?

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 10:51 am

संभाजीनगरात विद्यार्थ्यांकडून भाडेतत्त्वावर बँक खाते घेऊन वळवली ‘सायबर फ्रॉड’ची रक्कम:मित्रनगरातील लक्ष तलरेजा याला अटक, प्राथमिक तपासात 12 लाखांचा व्यवहार निष्पन्न

शहरातील महाविद्यालयातील तरुणांकडून त्यांची बँक खाती अवघ्या 2 ते 3 हजारांना भाडेतत्त्वावर घेऊन त्या खात्यांमध्ये सायबर फ्रॉडच्या माध्यमातून आलेली रक्कम साठवली. ही रक्कम इतर खात्यांमध्ये वळती करण्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी लक्ष भरतलाल तलरेजा (22, रा. फ्लॅट नंबर 6, कृष्णा रेसिडेन्सी, मित्रनगर) याला अटक करण्यात आली असून 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. राज्यातील काही खात्यांत सायबर चोरट्यांनी पळवलेली रक्कम वळती होत असल्याचे दिसून आले होते. त्यानुसार, सायबर पोलिसांनी ट्रेसिंग केल्यावर काही खाती शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्या खातेधारकांची चौकशी करून सहायक निरीक्षक कदीर देशमुख यांचे पथक लक्षपर्यंत पोहोचले. तो शहरातील विविध एटीएममधून रोखीत पैसे काढत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. ही कारवाई उपनिरीक्षक गणेश गिरी, हेड कॉन्स्टेबल योगेश तळवंदे, अंमलदार गोकुळ कुत्तरवाडे यांच्या पथकाने केली. दरम्यान, तलरेजा कुटुंबीय मूळ पाकिस्तानचे आहे. 25 वर्षांपूर्वी त्यांचे वडील भारतात वास्तव्यास आले. त्यांना तीन वर्षांपूर्वी भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे. आरोपी लक्षवर यापूर्वी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल होता. फसवणुकीच्या गुन्ह्यात एटीएस यांनीही त्याची चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खात्याशी लिंक सिमकार्डपासून सर्व किटच आरोपीकडे सापडली आरोपी लक्ष याच्या झडतीत त्याच्याकडे शहरातील अनेक युवकांच्या बँक खात्यांशी लिंक असलेले सिम कार्ड, पासबुक, चेकबुक मिळून आले आहे. युवकांकडून खाते घेताना ओटीपीची अडचण येणार नाही याचीही तो काळजी घ्यायचा. खातेधारकाला त्याच्या खात्यातील व्यवहाराची माहिती मिळत नव्हती. प्राथमिक तपासात 12 लाख 55 हजारांचा व्यवहार असल्याचे निष्पन्न झाले आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शहरातून चालते सायबर रॅकेट मागील सहा महिन्यांत बेंगळुरू, हरियाणा, मुंबई, तामिळनाडू पोलिसांच्या पथकांनी शहरातील तरुणांना सायबर चोरीत अटक केली आहे. शहरातील बडे हॉटेल्स, फ्लॅट्स येथे हा संपूर्ण सेटअप उभा असल्याचे उघड झाले. आरोपी लक्षच्या माध्यमातून शहरातील सायबर चोरट्यांचे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. शहरातील अनेक महाविद्यालये, हेस्टेल्स, विशेष करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांची खाती सायबर चोरट्यांकडे भाड्याने दिली असल्याची माहिती आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 10:42 am

गॅस पुरवठ्यावर देखरेखीसाठी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील प्रशासन सज्ज:गॅस पुरवठ्यावर नजर; 24 तास नियंत्रण कक्ष

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या इराण-इस्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्याबाबत देशभरात चर्चा सुरू असताना राज्य शासनाने गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. घरगुती तसेच व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. ठाणे जिल्हा प्रशासनाने या पार्श्वभूमीवर 24 तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष सुरू केला असून नागरिकांसाठी 8169230665 हा हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. संभाव्य टंचाई टाळण्यासाठी आणि गॅस पुरवठा साखळीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समितीही स्थापन करण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत करण्यात आली आहे. या समितीत पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी असतील. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, वाहतूक आणि वितरणात अडथळे येऊ नयेत तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी समिती दररोज परिस्थितीचा आढावा घेणार आहे. युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नियंत्रण कक्षाद्वारे सातत्याने देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे. गॅस एजन्सी आणि पेट्रोलपंपांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या पेट्रोलपंपांवर पुरेसे इंधन उपलब्ध असून गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर साधारणपणे पंचवीस दिवसांच्या आत वितरण होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी केले आहे. दरम्यान, आखाती प्रदेशातील तणावाचा परिणाम काही उद्योगांवर दिसू लागल्याचे चित्र आहे. गुढीपाडव्याचा सण जवळ आला असताना नाशिकमध्ये साखरेपासून बनवले जाणारे हारकडे तयार करणाऱ्या कारखान्यांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. गॅसअभावी काही कारखाने तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. त्यामुळे आधी घेतलेल्या ऑर्डरही रद्द कराव्या लागत असल्याची माहिती कारखानदारांनी दिली आहे. सणासुदीच्या काळात अशा अडचणी निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 10:23 am

विरारमध्ये अवैध शुक्राणू बँकेचा भांडाफोड:सायंटिफिक कंपनीच्या आड सुरू होता अवैध वैद्यकीय व्यवसाय; दोन जणांवर गुन्हा दाखल

विरार परिसरात अवैधरित्या शुक्राणू साठवून त्याचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला. कोणतीही अधिकृत वैद्यकीय पात्रता किंवा शासनाची परवानगी नसतानाही दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक करून त्याची विक्री केली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला विरारमधील पद्मीबाई टॉवर येथे असलेल्या ‘जीवदानी सायंटिफिक’ कंपनीत बेकायदेशीररित्या शुक्राणू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे आदेश देण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी तपासासाठी विशेष वैद्यकीय पथक तयार केले आणि संबंधित ठिकाणी अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार 9 मार्च रोजी आरोग्य विभागाच्या पथकाने पद्मीबाई टॉवरमधील ‘जीवदानी सायंटिफिक’ कंपनीवर अचानक छापा टाकला. तपासणीदरम्यान ही कंपनी मयूर भागवत संखे आणि कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे समोर आले. या ठिकाणी आवश्यक परवानग्या किंवा वैद्यकीय पात्रता नसतानाही शुक्राणूंची साठवणूक केली जात असल्याचे आढळले. तपासादरम्यान संबंधित ठिकाण सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम 2021 अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणीकृत नसल्याचेही स्पष्ट झाले. तपास अधिक सखोल केल्यानंतर या ठिकाणी दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक करून त्यांचा बेकायदेशीर व्यापार केला जात असल्याचे उघड झाले. हा प्रकार कायद्याचे गंभीर उल्लंघन असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत प्रशासन गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बदलापूरमध्येही स्त्रीबीज विक्रीच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश दरम्यान, बदलापूरमध्येही स्त्रीबीज विक्रीच्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. सुलक्षणा गाडेकर नावाच्या महिलेने घरातूनच स्त्रीबीज वाढवणारी इंजेक्शन्स साठवून ठेवून गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवत त्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित महिलांना आयव्हीएफ केंद्रांमध्ये पाठवून ऑपरेशनद्वारे स्त्रीबीज काढून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व आयव्हीएफ केंद्रांची संयुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकांकडून विविध शहरांतील आयव्हीएफ केंद्रांची तपासणी सुरू असून अनियमितता आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्करीशी संबंध असण्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 10:01 am

धर्मांतराच्या विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म ठरणार आईच्या मूळ धर्मानुसार:धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मधील तरतुदींवर मोठी चर्चा

महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत मांडले आहे. या विधेयकात अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या असून विशेषतः बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलांच्या धर्माबाबत स्पष्ट नियम प्रस्तावित करण्यात आला आहे. या विधेयकानुसार अशा विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म आईने विवाहापूर्वी स्वीकारलेला मूळ धर्म मानला जाईल. या तरतुदीमुळे इतर राज्यांतील धर्मांतरविरोधी कायद्यांपेक्षा महाराष्ट्रातील प्रस्तावित कायदा काही बाबतीत अधिक वेगळा ठरत असल्याचे सांगितले जात आहे. या विधेयकात असे नमूद करण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे धर्मांतर बेकायदेशीर पद्धतीने घडवून आणले गेले आणि त्या धर्मांतराच्या आधारे विवाह किंवा विवाहासारखा संबंध निर्माण झाला, तर त्या संबंधातून जन्मलेल्या मुलाचा धर्म आईच्या मूळ धर्मानुसार ठरवला जाईल. यामुळे मुलाच्या धार्मिक ओळखीबाबत स्पष्टता राहील, असे सरकारचे मत आहे. काही राज्यांमध्ये अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना मालमत्तेतील हक्क दिले जातात, मात्र मुलाच्या धर्माबाबत स्पष्ट तरतूद अनेक कायद्यांमध्ये नसल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील या विधेयकात मात्र हा मुद्दा स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. या विधेयकात मुलांच्या हक्कांबाबतही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलाला दोन्ही पालकांच्या मालमत्तेवर वारसाहक्क मिळेल. हा वारसाहक्क संबंधित वारसा कायद्यांनुसार लागू राहील. त्याचबरोबर अशा मुलांना भारतीय नागरी सुरक्षा संहितेतील कलम 144 नुसार देखभाल मिळण्याचा हक्कही असेल. पत्नी, मुले आणि पालकांच्या देखभालीसंबंधी असलेल्या या तरतुदींचा लाभ त्यांना मिळू शकतो. मुलांच्या संगोपनाचा अधिकार मात्र आईकडे राहील, असेही या विधेयकात नमूद करण्यात आले आहे. तथापि, आवश्यक असल्यास न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते. धर्मांतराच्या प्रक्रियेबाबतही या विधेयकात स्पष्ट नियम ठरवले आहेत. कोणत्याही व्यक्तीला आपला धर्म बदलायचा असल्यास त्या व्यक्तीने किमान साठ दिवस आधी जिल्हाधिकारी यांना लेखी सूचना देणे बंधनकारक असेल. या सूचनेमध्ये संबंधित व्यक्तीची वय, व्यवसाय, पत्ता, सध्याचा धर्म, स्वीकारू इच्छित असलेला धर्म आणि धर्मांतराच्या विधीची माहिती देणे आवश्यक राहील. या सूचनेनंतर जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाऊ शकते. धर्मांतर स्वेच्छेने होत आहे की त्यामागे कोणताही दबाव किंवा फसवणूक आहे का, याची खात्री करण्यासाठी ही चौकशी केली जाईल. जिल्हा प्रशासनाला आवश्यक वाटल्यास पोलिसांकडूनही तपास करून घेतला जाऊ शकतो. तसेच प्रस्तावित धर्मांतराबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी स्थानिक पातळीवर माहिती दिली जाऊ शकते. या प्रक्रियेचा उद्देश धर्मांतर स्वेच्छेने होत आहे की नाही याची खात्री करणे हा आहे. सरकारच्या मते, बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी अशी पूर्वसूचना व्यवस्था आवश्यक आहे. धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही नियम पाळणे आवश्यक राहील. धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीने आणि धर्मांतराचा विधी पार पाडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेने साठ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणा सादर करणे बंधनकारक असेल. या घोषणेत धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, व्यवसाय, पत्ता, पालकांची नावे, पूर्वीचा धर्म, स्वीकारलेला धर्म, धर्मांतराची तारीख आणि स्थळ तसेच त्या विधीची माहिती नमूद करावी लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयात अशा सर्व घोषणांची नोंद ठेवली जाईल. जर ही घोषणा ठरावीक कालावधीत सादर केली नाही, तर संबंधित धर्मांतर कायद्याने अमान्य ठरवले जाऊ शकते. अशा प्रकारे धर्मांतराच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रशासनाची नजर राहणार आहे. या तरतुदीमुळे बेकायदेशीर पद्धतीने होणारे धर्मांतर थांबवण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. धर्मांतराची व्याख्याही विस्ताराने

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:50 am

सोमनाथ सूर्यवंशी मृत्युप्रकरणी हायकोर्टाने निकाल राखून ठेवला:याचिकेत दुरुस्तीनंतर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण

परभणी येथे पोलिस कोठडीत मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. यात मूळ याचिकेत दुरुस्ती अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी (13 मार्च) दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती संदीपकुमार मोरे आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्यासमोर झाली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूच्या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करावेत यासाठी सूर्यवंशी यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांची बाजू ॲड. प्रकाश आंबेडकर मांडत आहेत. सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर दुरुस्ती अर्जावरील निकाल खंडपीठाने राखून ठेवला आहे. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. आंबेडकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. मिलिंद संदानशिव यांनी सहकार्य केले. गृहमंत्र्यांच्या कोर्टात हजेरीसाठी याचिकेत दुरुस्ती या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबानंतर त्यावर पुढील कार्यवाही कुणी करावी, कशी करावी, याबाबत कायद्यात स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत खुलासा करण्यासंदर्भात संबंधित गृहमंत्र्यांना न्यायालयात बोलावण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, मूळ याचिकेत ही मागणी नसल्याने दुरुस्ती करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आला होता. मूळ याचिकेत दुरुस्ती अर्ज सादर केल्यानंतर शुक्रवारी त्यावर सुनावणी झाली. ॲड. आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी गृहमंत्र्यांना बोलावण्याची विनंती केली.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:35 am

जयराम चाटेच्या देहबोलीवर प्रश्नचिन्ह:महागडी चप्पल, उघडं बटण अन् निर्विकार चेहरा; 14 महिन्यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतरही अवतार आणि देहबोलीवर चर्चा

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी जयराम चाटे याला शुक्रवारी (१३ मार्च) कडक पोलिस बंदोबस्तात जिल्हा कारागृहातून बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या भावाचे निधन झाल्यानंतर होणाऱ्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी त्याने न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. केज तालुक्यातील तांबवा या मूळ गावी जाण्यासाठी त्याच्या वकिलामार्फत अर्ज करण्यात आला होता. न्यायालयाने या अर्जावर सुनावणी करत काही अटी आणि शर्ती घालून मर्यादित वेळेसाठी बाहेर जाण्याची परवानगी मंजूर केली. न्यायालयाने जयराम चाटेला सकाळी नऊ ते दुपारी चार या कालावधीतच गावात जाऊन धार्मिक विधीत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. या सात तासांच्या कालावधीत विधी पूर्ण करून पुन्हा कारागृहात हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याला बीड जिल्हा कारागृहातून बाहेर काढण्यात आले आणि तांबवा गावाकडे नेण्यात आले. त्याच्या भावाचे दोन मार्च रोजी निधन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर बाराव्या दिवशी होणाऱ्या धार्मिक विधीसाठी त्याला ही तात्पुरती सवलत देण्यात आली होती. जयराम चाटेला कारागृहातून बाहेर काढताना पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता. मोठा पोलिस ताफा, शस्त्रधारी कर्मचारी आणि सततची नजर ठेवून त्याला गावाकडे नेण्यात आले. मात्र, त्यावेळी त्याचा अवतार आणि देहबोली पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याने पूर्णपणे दाढी काढलेली होती, कपाळावर मोठा लाल गंध लावलेला होता. अंगात काळ्या रेघांचा शर्ट, राखाडी रंगाची जिन्स आणि पायात महागडी चप्पल असा त्याचा पेहराव होता. विशेष म्हणजे शर्टचे पहिले बटण उघडे ठेवलेले होते आणि हातात रुमाल घेऊन तो अगदी शांतपणे चालताना दिसत होता. चेहऱ्यावर तणाव किंवा भीती दिसत नसल्याची चर्चा गंभीर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असूनही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव किंवा भीती दिसत नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. जवळपास चौदा महिन्यांनंतर तो तुरुंगाबाहेर आला असल्याने त्याच्या हालचालींकडे अनेकांचे लक्ष लागले होते. विधी पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या वेळेनुसार त्याला पुन्हा कारागृहात परत आणण्यात आले. दरम्यान, या काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. तांबवा गावातही पोलिसांची कडक व्यवस्था ठेवण्यात आली होती.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:21 am

सृजनतेसाठी कीर्तन महोत्सवाची उपयुक्तता- जगन्नाथ महाराज:ज्येष्ठ गुरुवर्य गोपाळ महाराज उगवेकर यांचा गौरव

कीर्तन सोहळ्यांमुळे समाजाची जडणघडण सुदृढ होऊन आदर्श व नितीमय समाजव्यवस्था निर्माण होत असते. आज समाजात निती मूल्यांचा उगम अशा महोत्सवाच्या माध्यमातूनच निर्माण झाला आहे. महाराष्ट्र हे अशा नीतिमूल्यांचे शक्तिपीठ व कार्यशाळा असून अगदी सनदी अधिकारीही महाराष्ट्रात सेवा करण्याची संधी सोडत नाहीत. निती मूल्यांची जोपासना करणारे असे महोत्सव सातत्याने वाढून भक्तिमार्ग अधिक सुदृढ झाला पाहिजे, असे भावोद्गार जगन्नाथ महाराज पाटील यांनी काढले. ते श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समिती, गायत्री नगर कौलखेडच्या वतीने आयोजित कीर्तन महोत्सवात हितोपदेश करत होते. गायत्री नगरच्या प्रांगणात प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनातील कीर्तन महोत्सवात मुंबई येथील कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांनी कीर्तनाचे अंतिम पुष्प सादर केले. आता माझ्या भावा, अंतराय नको देवा, आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन, येथे राखावे बांधोन, तुका म्हणे वाटे, नका फुटो देऊ फांटे' या तुकोबांच्या अभंगावर त्यांनी आपले महोत्सवाचे कीर्तन सादर केले. पाटील महाराज यांनी आपल्या कीर्तनात संत श्रेष्ठ तुकोबा भक्तीमध्ये कोणतीही अडचण न आणण्याची विठोबाला याचना करत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, साधुसंत भगवंता जवळ अरिष्टाच्या निर्दालनाची अथवा वाईटाच्या निघून जाण्याची, चांगले येण्याची तथा जे जे चांगले आहे ते कायम राहण्याची सातत्याने कामना करत असतात. जीवांचे कल्याण हाच उद्देश संतांचा या माध्यमातून असतो. आपल्यासाठी काहीही न मागता जगत कल्याणाची भाषा सातत्याने वापरणारा संत व वारकरी संप्रदाय आहे. यामुळेच भक्तीची गती अधिक तीव्र झाली असून मनुष्याने अशा संत संगतीची कास धरून या पृथ्वीवर येण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण करावे असे आवाहन जगन्नाथ महाराज पाटील यांनी केले. सर्वप्रथम समितीच्या वतीने जगन्नाथ महाराज यांचे स्वागत करण्यात आले. या समारोप कीर्तनात भक्तगण उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याने गौरव कीर्तन महोत्सवात जगन्नाथ महाराज पाटील यांच्या हस्ते व महोत्सवाचे मार्गदर्शक प्रशांत महाराज ताकोते यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ गुरुवर्य संतश्री गोपाळ महाराज उगवेकर यांना पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. गुरुवर्य गोपाळ महाराज उगवेकर हे विदर्भातील संपूर्ण संत परंपरेचा रस असून, त्यांची उपस्थिती ही अध्यात्माची महती आहे. संतांच्या उपस्थितीतला हा दुर्लभ योग असल्याचा भावोद्गार जगन्नाथ महाराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:01 am

यूजीसी कायदा लागू करण्याची मागणी:भारत मुक्ती माेर्चाची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर दिली धरणे‎

यूजीसी कायदा तातडीने लागू करा, ओबीसींची जातीनिहाय जनगणनेच्या अधिसूचनेत ओबीसींच्या जातींचा कॉलम हवा, यासह अन्य मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय िपछडा ओबीसी वर्ग मोर्चातर्फे शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यूजीसी कायदा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय िपछडा ओबीसी वर्ग मोर्चातर्फे अनेक दिवसांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी तीन मुद्द्यांवर चार टप्प्यात आंदोलन जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर १३ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. आत २३ मार्च रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात येणार अहे. २३ एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात येणार आहे. दरम्यान शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात अॅड. सारंग निखाडे, गजानन वाकोडे, रवींद्र गवई, विजय तिडके, मंगला गवई, वंदना अवचार, शाम अवचार, राहुल वाकोडे, चंद्रप्रभा शेगोकार, सुहास उपर्वट, राहुल वानखडे, लिलाबाई संसारे आदी होत्या. आंदोलनाला विविध ओबीसी संघटनांसह बहुजन क्रांती मोची, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टीचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:00 am

मळसूरमध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमातून प्रबोधन:जय बजरंग कला महाविद्यालयाचे रासेयो शिबिर, गावात साफसफाईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन‎

जय बजरंग कला महाविद्यालय चान्नी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दत्तक ग्राम मळसूर येथे सोमवारपासून (दि.९) सुरू आहे. गावात शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये शिक्षण, आरोग्य, मुलींचे शिक्षण, लिंगभेद समानता, स्वच्छता, स्वयंरोजगार, स्वयंपूर्ण खेडे आदींबाबत जनजागृती करत प्रबोधन करण्यात आले. तसेच गावात साफसफाई करत ग्रामस्वच्छतेचे व श्रमसंस्काराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. गुरुवारी पातूर येथील अंकुर साहित्य परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष कवी संमेलन घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थ्यांना सुमधूर गीतांचा आस्वाद घेता आला. कार्यक्रमात अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय संघटक देवानंद गहिले, पातूर तालुका सचिव प्रा. विठोबा गवई, गायिका प्रा. करुणा गवई, कलावंत रुपेशभाऊ इंगळे यांनी सुरेख कविता व गीतांचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांची मने जिंकली. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. नीलेश सोनोने यांनी केले. आभार आंचल सरदार यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मळसूर गावातील दिलीप काळे, जगन गवळी, किशोर रौंदळे, रमेश राखोडे, अनिरुद्ध इंगळे आणि विनोद गाडगे यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिरात घेतलेल्या कवी संमेलनामुळे शिबिरातील विद्यार्थ्यांना साहित्य, कविता आणि गीतांच्या माध्यमातून प्रेरणा मिळाली. मानवता मूल्य, सामाजिक जबाबदारीचे दिले धडे जय बजरंग विद्यालयाचे संगीत शिक्षक वसंत ढोकणे यांनी ‘माझी माय’ कवितेचे वाचन करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नंदू भटकर यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विनोद राऊत उपस्थित होते. त्यांनी मानवता धर्म या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना मानवतेचे मूल्य, सामाजिक जबाबदारी आणि आदर्श जीवनाचे धडे मिळाले. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 9:00 am

इफ्तारनंतर चहा पिण्यासाठी निघाले अन् मृत्यूने गाठलं:सोलापूरमध्ये भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; भरधाव कारची कंटेनरला धडक

सोलापूर शहरातून भीषण अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर-विजापूर बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने धावणाऱ्या कारची कंटेनरला जोरदार धडक बसल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इमादुद्दीन बागवान आणि अमन बागवान या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचूर झाली असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च रोजी संध्याकाळी दोन्ही तरुणांनी रोजा इफ्तार केला होता. त्यानंतर चहा पिण्यासाठी आणि थोडा फेरफटका मारण्यासाठी ते बाहेर पडले होते. रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास सोलापूर-विजापूर बायपास रस्त्यावर त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची तीव्रता पाहता कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला होता. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र अपघात इतका गंभीर होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांची मोठी गर्दी जमली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार दरम्यान, नांदेडमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. एमजीएम महाविद्यालयात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सुनील कुलकर्णी असे त्या कर्मचाऱ्यांचे नाव असून महाविद्यालयाकडून त्यांची काही रक्कम थकीत असल्याचे सांगितले जात आहे. ही रक्कम मिळत नसल्याने त्यांनी संतापाच्या भरात हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आधार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली असून विमानतळ पोलिस अधिक तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:59 am

समोसा, कचोरी, सांबारवडा महागला:हाॅटेलमधील मेन्यू 50 टक्क्यांनी झाले कमी, खाद्य पदार्थांचे भावही वाढल्याने खवय्ये नाराज‎

व्यावसायिक सिलिंडर मिळणे बंद झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील काही हॉटेल्सने ५० टक्के तर काही रेस्टॉरेंटने ७५ टक्के मेन्यू कपात केली आहे. समोसा, कचोरी, दोसा, सांबारवड्याची किंमत वाढली असून तवा रोटी, भाजलेले पापड मिळणे बंद झाले आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने सध्या असलेला स्टॉक एक ते दोन दिवसांत संपणार असल्यामुळे जर दोन दिवसांत गॅस पुरवठा सुरू झाला नाही तर मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय ठप्प होईल, अशी चिंता अमरावती रेस्टॉरेंट अॅण्ड लॉजिंग असोसिएशनने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक वस्तुंचे भाव वाढल्यामुळे पदार्थ दुप्पट किंमतीने विकावे लागत आहेत. सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे. ज्यांच्याकडे जागा आहे, ते इंडक्शन, सोलर कुकर, चुल, डिझेल भट्टी, इलेक्ट्रीक शेगडीचा वापर करताहेत. शहरात २७५ लहान मोठे हॉटेल, रेस्टॉरेंट आहेत, तर जिल्ह्यात ही संख्या किमान ८०० च्या वर आहे. प्रशासनाचा हॉटेल व्यावसायिकांना दुहेरी मार बसत आहे. एकिकडे महागाई वाढली असून दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडर मिळेनासे झाले आहे. शासनाने आम्हाला पर्याय उपलब्ध करून द्यावा. ग्राहकांना मागणीनुसार उर्वरित. पान ४ आमच्याकडे सिलिंडर भरपूर आहेत. पण, उगाच पसरणाऱ्या अफवा व आपल्याला सिलिंडर मिळणार नाही, या भितीपोटी काही ग्राहक गॅस एजन्सीपुढे गर्दी करून गोंधळ घालत आहेत. आज आम्ही दिवसभरात १६०० सिलिंडर घरी पोहोचवले तर २५० सिलिंडर पावती फाडून एजन्सीत आलेल्या ग्राहकांना दिले. ग्राहकांची लांब रांग असल्यामुळे आपल्याला सिलिंडर मिळणार नाही, या भितीपोटी एक, दोन ग्राहकांनी सिलिंडर रस्त्यावर आडवे करून, त्यावर बसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र, पोलीसांनी लगेच स्थितीवर नियंत्रण मिळल्याची माहिती देशमुख गॅस एजन्सीद्वारे देण्यात आली. शहरातील होस्टेलवर कॅटरर्स जेवण तयार करतात. त्यांना व्यावसायिक सिलिंडर मिळणे बंद झाल्यामुळे व त्यांच्याकडे असलेला सिलिंडरचा साठाही संपल्याने नाईलाजाने होस्टेलमध्ये लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागत असून मेन्यूतही घट करण्यात आली आहे. दोन भाज्यांऐवजी आता एकच भाजी तयार केली जात आहे. त्याचप्रमाणे भाजून तयार केले जाणारे पदार्थ जसे पापडही मेन्यूतून कमी करण्यात आले असल्याची माहिती पीडीएमसी मुलींच्या वसतीगृहात जेवण पुरवणारे कॅटरर्स बाबू सगणे यांनी दिली. जिल्ह्यातील सुमारे १० हजार हॉटेल कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली असून मेन्यूही कमी करण्यात आले आहेत. तसेच मेन्यूचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी. - सारंग राऊत, सचिव, अमरावती रेस्टॉरेंट अॅण्ड लॉजिंग असो.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:43 am

पालकमंत्र्यांना आराखडा दाखवणार:त्यानंतरच उर्वरित प्रक्रिया केली जाणार, श्री अंबादेवी मंदिर पुर्नविकास‎

शहरवासीयांचे आराध्य दैवत श्री अंबादेवी मंदिराचे सौंदर्यीकरण, विकासाचा जो प्राथमिक आराखडा एमएसआय डीसीने तयार केला आहे, त्याचे सादरीकरण आगामी काही दिवसांत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे केल्यानंतरच सर्वानुमते या आराखड्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनाही हा विकास आराखडा दाखवला जाण्याची शक्यता आहे. नागपुरात कोराडी येथे असलेल्या महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच अमरावती येथील श्री अंबादेवी मंदिराचा विकास केला जाईल, असे पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्रीही म्हणाले होते. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या मंदिराच्या विकासाकरिता जेवढे प्रयत्न शक्य उर्वरित. पान ४ अखेर विकासाचा मुहूर्त सापडला गेल्या दोन वर्षांपासून मंदिराच्या विकासाबाबत तयारी, मंदिराचे संकल्पचित्र तयार करणे तसेच मंदिर संस्थानाद्वारे शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. संस्थानाच्या वर्तमान पदाधिकाऱ्यांनी महानगर पालिका, जिल्हाधिकारी यांच्यासह राज्य शासनाकडे मंदिराचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. विकासकाम नेमके केव्हा सुरू होणार ते कळेल. कदाचित चैत्र नवरात्र झाल्यानंतर होऊ शकते.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:42 am

मेळघाटाच्या कुशीत घुमला युवाशक्तीचा जागर‎:मेळघाटातील निसर्ग अनुभव युवकांसाठी एक जीवनदायी शिक्षण, डॉ. रवींद्र कडू; जळगाव विद्यापीठाचा डंका‎

प्रतिनिधी | अमरावती निसर्ग आणि मानवाचे नाते उलगडण्यासाठी ट्रेकिंग हे एक उत्तम माध्यम आहे. त्यातून मिळणारा अनुभव हा खऱ्या अर्थाने जीवनाचे शिक्षण देणारा असतो. असे प्रतिपादन राज्यपाल नामीत व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने ७ ते ११ मार्च दरम्यान चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्था येथे राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या समारोपीय समारंभातत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी रा.से.यो.चे संचालक डॉ. निलेश कडू, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. जयंत वडतकर, प्राचार्य डॉ. राजेश जयपूरकर, आर्किटेक्ट उमेश पाटणकर, वन प्रशिक्षण संस्थेचे वनपरिक्षेत्र अधिकारी राघवेंद्र मुन, वंदना मुन तसेच पाचही जिल्ह्यांचे रा.से.यो. जिल्हा समन्वयक उपस्थित होते. डॉ. रवींद्र कडू पुढे म्हणाले, मेळघाटातील जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी येथे आलेल्या स्वसंसेवकांनी निसर्ग संवर्धनाला महत्त्व दिले पाहिजे. पटवून दिले. मेळघाटातील जंगलात आजही अशा अनेक वनस्पती आहेत. ज्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. संशोधकांसाठी हे क्षेत्र मोठे आव्हान आणि संधी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून, ती अनुभवांची गोळाबेरीज आहे. ट्रेकिंगमुळे व्यक्तीचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. भारतामध्ये युवकांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. विकसित भारताकडे वाटचाल करताना युवकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. पाच दिवस चाललेल्या या साहसी क्रीडा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी ऍडव्हेंचर, प्रात्यक्षिके, सांस्कृतिक, शिस्त व वागणूक आणि लेखी परीक्षा अशा विविध अक्टीव्हीटींमध्ये सहभाग घेतला. परीक्षकांनी सर्व प्रकारांचे मूल्यांकन करून त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी उत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार पटकावला. तसेच उत्कृष्ट संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. सचिन चव्हाण, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व प्रा. अर्चना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून प्रथमेश चाटे, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी व रंजित जाधव, मुंबई विद्यापीठ, श्रृष्टी राणे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, पारुल तिवारी, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे १९ विद्यापीठातील सहभागी कार्यक्रम अधिकऱ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर अॅडव्हेंचर हबचे मनिष ढाकुलकर व त्यांच्या संपूर्ण टीमचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन, महाराष्ट्र गीत, विद्यापीठ गीत आणि रासेयो लक्ष गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. पाचही दिवसाचे अहवाल वाचन डॉ. विशाल गजभिये यांनी केले. संचालन डॉ. सुधीर कोहचाळे, तर आभार डॉ. विकास देशमुख यांनी मानले. शिबिराकरीता राज्यभरातील १९ विद्यापीठातील ९८ विद्यार्थी व १५ संघ व्यवस्थापक, विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियोजन, सळसळते रक्तच घडवेल देशाची प्रगती : कडू अध्यक्षीय भाषण करताना डॉ. निलेश कडू म्हणाले, दैनंदिन जीवनात शिस्त आणि नियोजनाचे महत्त्व अधोरेखित करताना, शांत डोक्याने केलेले नियोजन आणि युवकांमधील सळसळते रक्तच देशाच्या प्रगतीसाठी आणि सामाजिक सुधारणेसाठी कारणीभूत ठरेल, असा विश्वास विद्यापीठ रासेयो विभागाचे संचालक डॉ. निलेश कडू यांनी राज्यस्तरीय साहसी क्रीडा शिबिराच्या समारोपिय कार्यक्रमात व्यक्त केला. ते पुढे म्हणाले कि यशस्वी जीवनासाठी शांत डोक्याने विचार करून आपल्या कामाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही कार्यासाठी सळसळते रक्त असणारे उत्साही स्वयंसेवक ही देशाची मोठी ताकद आहेत. एका हाताने टाळी वाजत नाही, या म्हणीचा आधार घेत त्यांनी स्पष्ट केले की, शिबिराच्या यशासाठी आयोजक आणि सहभागी दोघांचेही सहकार्य महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांची साथ आणि आमचा प्रयत्न यातूनच विकासाचे ध्येय गाठता येईल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:41 am

मासेमारांना सुविधा देण्याच्या पर्यायांवर बैठकीत चर्चा:कार्यवाहीवर विशेष भर, फिशरीज हब प्रकल्पासंदर्भात आढावा, व्यवस्थापनासह योजनांवरही खल‎

फिशरीज हब प्रकल्पाशी संबंधित जिल्हानिहाय उत्पादन क्षमता, उपलब्ध संसाधने तसेच प्रकल्पाची उपयुक्तता तसेच मत्स्य व्यवसायाच्या वाढत्या संधी लक्षात घेता प्रकल्पाचा प्रभावी वापर करून मासेमारांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांवर महानगर पालिकेत शुक्रवार १३ रोजी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.प्रकल्पाच्या संचालनासाठी शासन निर्णयानुसार कार्यान्वयन व रखरखाव (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) तसेच पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप धोरण निश्चित करण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले. प्रकल्पाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी शासनाच्या धोरणांचा आधार घेत पुढील कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला. फिशरीज हब प्रकल्पाच्या अंतर्गत विविध प्रक्रिया, साठवण, प्रक्रिया केंद्र, बाजार व्यवस्थापन इत्यादींसाठी दैनंदिन वापराकरिता सुमारे १ लाख ५० हजार लिटर प्रतिदिन पाण्याची आवश्यकता भासणार असल्याने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. या अनुषंगाने आवश्यक त्या विभागांशी समन्वय साधून पाणी नियोजनाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता मनपात फिशरीज हब प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, भविष्यातील कार्ययोजना, प्रकल्पाची व्यवहार्यता तसेच विविध प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान फिशरीज हब प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसंदर्भात मासेमार संघटना, संस्था तसेच संबंधित व्यावसायिक यांच्या सहभागातून प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचे संचालन, व्यवस्थापन व दीर्घकालीन उपयोगिता लक्षात घेता मासेमार संघटना, सहकारी संस्था तसेच व्यवसायिकांकडून प्रस्ताव मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित घटकांचा सहभाग वाढवून प्रकल्पाला अधिक चालना देण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले. सर्व पाचही जिल्‍ह्यातील सहाय्यक आयुक्‍त मत्‍स्‍य विभागांना मत्‍स्‍य उत्‍पादनाबाबत तसेच कार्यक्षेत्रातील तलाव बाबत माहिती सादर करण्‍याचे निर्देश देण्यात आले. सद्यस्थितीत बाजार परिसरात कार्यरत असलेल्या मासेमार संघटना, संस्था तसेच मच्छीमार यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. मासळी विक्री, साठवण आणि वाहतूक यासंदर्भातील व्यवस्था अधिक सुस्थितीत करण्यासाठी नियोजनात्मक उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान पशु शल्‍य चिकीत्‍सक तथा फिशरीज हब चे नोडल अधिकारी डॉ.सचिन बोंद्रे यांनी फिशरीज हब प्रकल्पाविषयी मार्गदर्शनपर प्रेझेंटेशन सादर केले. या सादरीकरणांमध्ये प्रकल्पाची कार्यपद्धती, संभाव्य सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच व्यवस्थापन पद्धती याविषयी माहिती देण्यात आली. या बैठकीत अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, पशुशल्‍य चिकीत्‍सक तथा फिशरीज हबचे नोडल अधिकारी डॉ.सचिन बोंद्रे, शहर अभियंता रवींद्र पवार, सचिन बोंडे अधिष्‍ठाता मत्‍स्‍य विज्ञान, विद्यापीठ, नागपूर, डॉ.सागर जोशी सहयोगी प्रा., सुनील जांभुळे प्रादेशिक उपायुक्‍त, मत्‍स्‍य व्‍यवसाय, अमरावती, दि.रा. खोपे सहाय्यक आयुक्‍त मत्‍स्‍य व्‍यवसाय अकोला, प्रियंका झोड सहाय्यक आयुक्‍त मत्‍स्‍य व्‍यवसाय वाशीम, कार्यशाळा उपअभियंता स्‍वप्निल जसवंते, महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ, मत्स्य विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी, संघटना उपस्थित होते. आर्थिक पडताळणीचा संयुक्त अहवाल तयार करणार प्रकल्पाची व्यवहार्यता तसेच आर्थिक पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र मत्स्य विकास महामंडळ (एमएफडीसी) व महानगरपालिका उपायुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सविस्तर अहवाल तयार करण्याबाबतही बैठकीत निर्णय घेण्यात आला. हा संयुक्त अहवाल तयार करून पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.उपायुक्त कार्यालयामार्फत प्राप्त पत्रानुसार विविध प्रशासकीय व तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्यात आले. प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून कार्यवाही करण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:39 am

नेदरलँडमधील कंपनीव्दारे कापूस प्रक्रिया, संशोधन, विकास केंद्र होणार:केंद्रीय सचिवांकडून पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमधील कामांची पाहणी‎

नांदगाव पेठ पंचतांराकीत एमआयडीसी येथे नव्याने विकसित होत असलेल्या ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क'ला शुक्रवारी (दि. १३) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव नीलम शमी राव यांनी भेट देऊन पाहणी केली. देशातील सात राज्यांमध्ये विकसित होणाऱ्या टेक्सटाईल पार्क्सपैकी अमरावती येथील पार्कच्या कामाची पाहणी केली. तसेच पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र शासनाचे उद्योग सचिव मा. डॉ. पी अन्बलगन, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. एकूण १ हजार २० एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या या पार्कमध्ये रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, केबलिंग, पथदिवे, पाणीपुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्णतः कार्यान्वित झाले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकल्पात १०० एकर क्षेत्रावर एमआयडीसीतर्फे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच, या प्रकल्पात नेदरलँडमधील ‘मेसर्स टिटिवायएम मॅनेजमेंट बी.व्ही.' या कंपनीद्वारे कापूस प्रक्रिया आणि संशोधन व विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ६६ एकर जमिनीवर पहिली परकीय गुंतवणूक करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:38 am

जिल्हाकचेरीसमोर आंदोलन:गॅस सिलिंडरचा भडका; दरवाढ विरोधात काँग्रेस झाली आक्रमक्र, प्रतीकात्मक चूल पेटवून केंद्र शासनाचा केला निषेध‎

प्रतिनिधी | अमरावती केंद्र शासनाच्या गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक चूल पेटवून शासनाचा निषेध केला. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून करण्यात आले. केंद्र सरकारने अलीकडेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपये इतकी वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला, विशेषतः महिलांना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना, मोठा आर्थिक फटका बसत आहे. या अन्यायकारक निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभर काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने अलीकडेच घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपये आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपये इतकी वाढ केली आहे. ही दरवाढ पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा किमतींमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला, विशेषतः महिलांना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना, मोठा आर्थिक फटका बसत आहे. या अन्यायकारक निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभर काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली होती. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. हे आंदोलन शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर तथा विरोधी पक्षनेते मनपा विलास इंगोले, महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक अनिल अग्रवाल, डॉ. अर्चना आत्राम, मालता गवई, राजश्री जठाले, मैथिली पाटील, शिल्पा तुषार राऊत, किरण चंदवाडकर, आरती पिंपळे, सीमा तिवारी, हर्षा काळे, सारिका मेश्राम, सरस्वती पाटील, शारदा प्रजापती, आरती पांडे, अनिता राजवाडे, नीता मोहोड, संजय शिरभाते, प्रशांत महल्ले, अभिनंदन पेंढारी, गजानन जाधव, सुरेश रतावा, हाजी निसार जेके, किशोर राईबोले, नौशाद अली, संजय बोबडे, अब्दुल रफिक, सादिक शाह, अरुण जयस्वाल, विजय वानखडे, बासित अजीज, विजय आठवले, धीरज हिवसे, विक्की वानखडे, प्रथमेश बाखडे, कलीम शेख, संजय मोरे यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. काय आहे मागणी केंद्र सरकारने दरवाढ निर्णय तात्काळ रद्द करावा. सर्वसामान्य जनतेवर होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी. शहर काँग्रेस कमिटी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत लढा देत राहील. केंद्र सरकारने ही अन्यायकारक दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली असून तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:37 am

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे ऊस शेतीत क्रांती:कमी खर्चात अधिक उत्पादन शक्य, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग कारखान्यात शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन‎

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस पिकासाठी आवश्यक तेवढेच पाणी व रासायनिक खतांचा वापर करता येणार असून त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ञ डॉ. समाधान सुरवसे यांनी व्यक्त केले. श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेचा शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी डॉ.तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडोळ आदी तज्ञ उपस्थित होते. यावेळी डॉ.सुरवसे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खत व पाण्याचे अचूक नियोजन करता येते. त्यामुळे पिकाला आवश्यक तेवढ्याच प्रमाणात खत आणि पाणी देणे शक्य होते. परिणामी मातीचे आरोग्य टिकून राहते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. याशिवाय (एआय )तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोग व किडींबाबत आगाऊ सूचना मिळत असल्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात साधारण १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असून कमी खत, कमी पाणी आणि वेळेची बचत होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. कारखान्याच्या वतीने दरवर्षी ‘ऊस भूषण’ पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जास्तीत-जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली. पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर क्षारपड व चोपड जमिनीचे क्षेत्र वाढत आहे. अशा परिस्थितीत हे आधुनिक तंत्रज्ञान जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात साधारण १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असून कमी खत, कमी पाणी आणि वेळेची बचत होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. कमी खर्चात अधिक आणि चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ.तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडवळ, अविनाश पांगारकर, नितीन शिंदे यांनीही शेतकऱ्यांनी ॲपचा वापर कसा करावा याबाबतची सखोल माहिती दिली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:19 am

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ स्पर्धेत कर्मयोगी यश:छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात विद्यार्थ्यांची बाजी‎

छत्रपती संभाजीनगर येथील एमआयटी कॅम्पसमध्ये सृजन ट्रस्ट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने आयोजित ‘डिपेक्स-२०२६’ या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनात पंढरपूरच्या कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) च्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण यश संपादित केले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील आयटीआय, डिप्लोमा व डिग्रीच्या ४०० हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पामधून कर्मयोगीच्या प्रकल्पांनी आपली मोहोर उमटवली. ग्रामीण विकासासाठी तांत्रिक नवकल्पना शोधणे आणि विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देणे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व प्रकल्पांसाठी प्रा. आर.एस. भोई, प्रा. जी.ए. कोरके, प्रा. एम.एस. धुमाळ, प्रा. आर.एल. माने यांसह प्रकल्प समन्वयक प्रा. एन.आर. उत्पात आणि विविध विभागप्रमुखांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ. अजित कणसे, प्राचार्य डॉ. एस.पी. पाटील, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके व सर्व प्राध्यापकांनी विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. सिव्हिल विभाग प्रथम क्रमांक विद्यार्थ्यांनी ‘पुनर्वापरित प्लास्टिक, टाकाऊ वाळू आणि कचऱ्यापासून वीट निर्मिती’ हा प्रकल्प सादर केला होता. या नाविन्यपूर्ण उपक्रमास प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. यामध्ये ओम मनोज हावळ, सूरज नाना कवडे, श्रीराज यशवंतराव राजे घाडगे व दादासाहेब जालिंदर मसवडे यांचा सहभाग होता.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:19 am

बदलत्या काळानुसार पालकांनी मुलींवर चांगले संस्कार करावेत:स्त्रीभूषण पुरस्कार कार्यक्रमात उज्ज्वला सोपल यांचे प्रतिपादन‎

बदलत्या काळानुसार आता मुलीच्या जन्माचेही स्वागत करण्यात येत असून आज मुलींवर चांगले संस्कार करुन तिला स्वत: पायावर उभा करण्यासाठी पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उज्ज्वला सोपल यांनी व्यक्त केले. येथील स्व. शोभाताई सोपल बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त स्त्री भुषण पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोपल म्हणाल्या संस्थेने महिलांसाठी विविध प्रेरणादायी उपक्रम राबवले आहेत. गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केले आहे. यावेळी वृक्षारोपन केले आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन शेफ सरिता पद्मन या उपस्थित होत्या. यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांना स्त्री भुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच महिलांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी मेहंदी, पाककला आणि वेशभूषण या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मेहंदी स्पर्धेत मधुरा भुमकर, वैष्णवी जाधव, साक्षी व शीतल गायकवाड, धनश्री पवार. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन मयुरी उबाळे आणि प्रतीक्षा देशमुख यांनी काम पाहिले. पाककला स्पर्धेत सीमा कापसे , अंजली कुलकर्णी, शारदा रायचूरकर ,प्रियंका साखरे, प्रिया रुद्राके , अनुराधा होतपेट्टी, वैशाली देशमुख. या महिलांना पारितोषिक

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:18 am

होम मिनिस्टर स्पर्धेत अमृता खटमोडेंना पैठणी:राष्ट्रीय अध्यक्ष जंगम संघटनेचे श्रावण जंगम, नगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या हस्ते उद्घाटन‎

वाशिंबे जागतिक महिला दिनानिमित्त वाशिंबे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या वतीने विविध स्पर्धांच्या माध्यमातून हा कार्यक्रम रंगतदार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष जंगम संघटनेचे श्रावण जंगम, नगराध्यक्ष राहुल बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावल्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘पैठणीचा खेळ’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महिलांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत आनंद लुटला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा स्पर्धांमधून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांक पटकावत दिवेगव्हाण येथील भगिनी अमृता उमेश खटमोडे यांनी ‘होम मिनिस्टर’चा किताब जिंकत फ्रिज हे बक्षीस मिळवले. द्वितीय क्रमांक अंजली अतुल रणदिवे यांना पिठाची चक्की देण्यात आली. तसेच योगिता पंकज पवार यांना कुलर, तर भक्ती कळसाईत आणि सुप्रिया शिंदे यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून महिलांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटरी पॅडचे वाटपही करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना वाव मिळाले पाहिजे या कार्यक्रमाचे यावर्षी दुसरे वर्ष असल्यामुळे महिलांमध्ये विशेष उत्सुकता दिसून आली. प्रत्येक महिलेमध्ये अनेक सुप्त कलागुण दडलेले असतात. मात्र संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे ते अनेकदा व्यक्त होऊ शकत नाहीत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना एक आनंददायी व्यासपीठ मिळावे. या उद्देशाने ग्रामपंचायत वाशिंबे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:18 am

मगरवाडी- पोहोर गावमधील विकासकामांसाठी निधी देऊ:खासदार प्रणिती शिंदें यांनी दिले ग्रामस्थांना आश्वासन‎

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी आणि पोहोरगाव या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. या गावभेट दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या मूलभूत समस्या जाणून घेतल्या असून अनेक प्रलंबित कामांना गती देण्याचे आश्वासन दिले.या भेटीदरम्यान खासदार शिंदे यांनी पाणी, रस्ते, आरोग्य आणि वीज या विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना खासदार शिंदे म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याची आणि सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची नितांत गरज आहे. ही लोकशाहीतील भूमिका आम्ही सक्षमपणे बजावत असून भविष्यातही सातत्याने लोकांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिली. या दौऱ्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा समन्वयक मनोजदादा यलगुलवार, सादिक मुलाणी, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक नेताजी सावंत, सुरेश सावंत, मगरवाडीच्या सरपंच छाया शेजाळ, पोहोरगावचे सरपंच भारत वाघमारे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पोहोरगाव या गावाला जोडणारा रस्ता आणि तरुणांसाठी व्यायामशाळा उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी विजेच्या ट्रान्सफॉर्मरची समस्या मांडताच खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळावरूनच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:15 am

सभापतीच्या निवडीत प्रादेशिक समतोल साधत राऊतांनी दिला निष्ठावंतांना न्याय:बार्शी पंचायत समितीवर सलग पाचव्यांदा राऊत गटाची सत्ता‎

पंचायत समिती निवडणुकीनंतर दि. १२ रोजी सभापती, उपसभापती निवडीप्रसंगी भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत नेते, कार्यकर्त्यांची कदर केल्याचे तसेच प्रादेशिक समतोल साधत निवडी केल्याचे दिसून येते. एखादया पदावर व्यक्तीची निवड करत असताना निष्ठा, प्रामाणिकपणा याबरोबरच पक्ष, नेत्याच्या विजयासाठी घेतलेले परिश्रम, त्या पक्षाला/ नेत्याला गाव, शहरातून दिलेले मताधिक्य तसेच भौगोलिक समतोल साधला जाईल या बाबी प्राधान्याने विचारात घेतल्या जातात. भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी विरोधी सोपल गटाला नमवत बार्शी बाजार समितीपाठोपाठ, नगरपालिका व पंचायत समिती या निवडणूकीत घवघवीत यश मिळवले. बाजार समिती १८-०, नगरपालिकेत नगराध्यक्षपद व सदस्यपदाच्या २३-१९ व जिल्हा परिषद ६-० व पंचायत समिती १२-० अशा फरकाने निवडणूका जिंकल्या. यातील बाजार समिती सभापतीपदी पांगरीच्या गरड यांच्या माध्यमातून ३० वर्षांपासून कार्यरत असलेल्या जुन्या निष्ठावंताला संधी दिली. बाजार समिती पाठोपाठ पंचायत समितीतही त्यांनी जुन्या निष्ठावंतांना न्याय दिल्याचे पाहायला मिळाले. पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्याने कोणत्याही प्रवर्गातून निवडून आलेली महिला यासाठी पात्र होती. तालुक्यातून विविध प्रवर्गाच्या सहा महिला निवडून आल्या होत्या. तथापि, इतर प्रवर्गातून निवडून आलेल्या महिलांना त्या-त्या प्रवर्गासाठी सभापतीपद राखीव झाल्यानंतर संधी मिळते. त्यामुळे ते प्रवर्ग सोडून जात प्रवर्गाचे आरक्षण नसलेल्या घटकांतील महिलेला संधी मिळण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे सर्वसाधारण महिला प्रवर्गातून विजयी झालेल्या मिनाक्षी रोंगे, विमल काटे, जयमाला जाधव या तीनही महिलांची नावे चर्चेत होती. रोंगे, काटे व जाधव हे तीनही परिवार राऊत यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. यापैकी जाधव परिवारातील झुंबर जाधव यांना बाजार समितीचे उपसभापतीपदाची संधी गेल्या टर्ममध्ये मिळालेली होती. रोंगे व काटे यांच्यात काटे हे वैराग भागातील असल्याने व उपसभापती पद वैराग भागाला मिळणार असल्याने रोंगे यांचे पारडे जड झाले. रोंगे हे मूळचे खडकलगांव येथील म्हणजे उत्तर बार्शी भागातील आहेत. खडकलगांवकरांनी राऊत यांना विधानसभा निवडणूकीत ग्रामीण भागातून सर्वाधिक मताधिक्य दिले आहे. यात दिपक रोंगे व त्यांच्या परिवाराचाही मोलाचा वाटा होता. राजकारणात संयम, निष्ठा व प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो, हेही यातून अधोरेखित होते. सभापतीपद उत्तर बार्शीला दिल्याने उपसभापतीपद वैराग भागाला असा प्रादेशिक समतोल यात आहे. राऊत यांच्या राजकीय जडणघडणीत माजी आमदार स्व.चंद्रकांत निंबाळकर यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. संतोष निंबाळकर हे चंद्रकांतनानांचे पुत्र आहेत. संतोष निंबाळकर यांना आजवरच्या राजकीय वाटचालीत जि.प.सदस्य वगळता मोठे पद मिळालेले नाही. राऊत यांना यानिमित्ताने ही कसर भरून काढायची संधी मिळाली. खरेतर सभापतीपद महिलांसाठी आरक्षित असल्याने उपसभापतीपदावर त्यांना समाधान मानावे लागले. निंबाळकर घराण्याचे राजकीय वलय व पदाचे भौगोलिक समतोल साधण्याच्या दृष्टीकोनातून अडीच वर्षानंतर त्यांना सभापतीपदी संधी मिळू शकते. राऊत यांना कसर भरून काढायची संधी मिळाली

दिव्यमराठी भास्कर 14 Mar 2026 8:15 am