राज्यातील ८२ टक्के शिक्षक मातृभाषेच्या प्रशिक्षणापासून वंचित
पुणे : राज्यातील ८२ टक्के शिक्षक मातृभाषेच्या प्रशिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव युनेस्कोच्या अहवालातून उघड झाले असून अभिजात भाषेचे स्वप्न अधांतरीच राहणार असल्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांनी वर्तविली आहे. महाराष्ट्राने मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळवून भाषिक अस्मितेचा लढा जिंकला असला, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र अस्वस्थ करणारे आहे. ‘युनेस्को’च्या ताज्या ‘भाषेचे महत्त्व : शिक्षण स्थिती अहवाल-२०२५’ अहवालाने राज्याच्या […] The post राज्यातील ८२ टक्के शिक्षक मातृभाषेच्या प्रशिक्षणापासून वंचित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
..तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करावी
मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर ‘लाडकी बहीण’ योजना बंदी केली पाहिजे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचा-याला सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ पालिकेने न दिल्याने तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. […] The post ..तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात १७६९ रुग्णांना सुमारे १४ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक साहाय्य मिळत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते. सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. आर्थिक वर्षातील मदत १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७६९ रुग्णांना सुमारे १४ कोटी २५ लाख ०२ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. पेपरलेस अर्ज प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसाहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठीनागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बालकांचे आरोग्य हे राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही केवळ आरोग्य क्षेत्राची जबाबदारी नसून समाजाची एकत्रित बांधिलकी आहे. या कराराच्या माध्यमातून आपण मुलांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत आहोत. हा करार नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत करण्यात आला असून, या अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-1 मधुमेह, जन्मजात हृदयरोग, दमा, स्थूलता, सिकलसेल, मानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे. करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेले हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहे. या करारांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे तसेच डॉ प्रशांत जोशी, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक, डॉ मीनाक्षी गिरीश, बालरोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. एम्स, नागपूर संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही, असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी यावेळी आपण दादांना न्याय मिळवून देण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचेही जोर देऊन सांगितले. सत्ताधारी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. करुणा मुंडे शर्मा या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी महायुतीला उपरोक्त इशारा दिला. त्या म्हणाल्या, वंजारी समाजाने आमदार धनंजय मुंडे यांना नाकारले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्यांना मंत्री करणाऱ्या पक्षाची सत्ता जाईल. त्यानंतर तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही. हा एका स्त्रीचा शब्द आहे. धनंजय यांनी स्वतःच्या बायकोला तुरुंगात डांबले. अनेक लोकांना जेलमध्ये टाकले. अशा 1000 लोकांची माझ्याकडे यादी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांना पुन्हा मंत्री केले तर मी मंत्रालयापुढे आंदोलन करेन. अजित पवारांना न्याय देण्यासाठी पोटनिवडणुकीत उडी करुणा मुंडे यांनी यावेळी आपण बारामतीची पोटनिवडणूक का लढवत आहोत? हे ही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मी बारामतीची पोटनिवडणूक अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे. कारण, अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. सुनेत्रा पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. या महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय मिळाला नाही, मग सर्वसामान्यांचे काय? एवढे दिवस झाले, पण हा घात होता अपघात हा मुद्दा कुणीही उचलला नाही. काँग्रेसने या निवडणुकीत आपला डमी उमेदवार उभा केला. नंतर माघार घेतली. मलाही खूप काही ऑफर आल्या. अनेक नेत्यांचे फोन आले. खासदार पार्थ पवार यांचाही फोन आला. पण मी माघार घेतली नाही. माझा विजय झाला तर सर्वप्रथम मी अजित पवारांच्या अपघाताचा एफआयआर दाखल करण्यासाठी लढा देईन. महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय भेटणार नसेल, तर कुणाला भेटणार? असे करुणा म्हणाल्या. ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी करुणा मुंडे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडे काम घेऊन गेले की, ते दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर निघून जातात. त्यामुळे जनतेने मला संधी दिली, तर मी त्या संधीचे 100 टक्के सोने करेल. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप व ट्रिपल इंजिन सरकार केवळ धूर काढणारे इंजिन आहे. हे सरकार लोकांना ईडी, सीडी व कुठेतरी अडकवण्याची भीती दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करते. ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी आहे. रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईवरही भाष्य या लोकांनी रवींद्र वायकर यांच्या घरी ईडी पाठवली होती. मध्यरात्री 2 वाजेपासून ईडीचे लोक त्यांना त्रास देत होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने मला ही गोष्ट सांगितली. रवींद्र वायकर यांनी मला घेऊन चला, पण मी शिवसेना सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. ईडीचे लोक रवींद्र वायकर यांच्या पत्नीलाही घेऊन जाणार होते. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला, असे करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या. दरम्यान, भोंदू अशोक खरातच्या टोळीला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करुणा मुंडे यांनी यावेळी केली.
कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३ इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-३० वर दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. ही घटना कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब कांकेर जिल्ह्यातील उडकुडा येथील रहिवासी होते. असे सांगितले जात […] The post २ गाड्यांच्या धडकेत ६ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे. उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकर्यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बर्याच वर्षांपासून शासनाकडे होत होती. उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. शिवाय, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. उरमोडी धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. सातारा, खटाव व माण तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळाला आहे. या धरणामुळे वर्षभर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची उत्पादकता आणि पीकपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीतही शेतकर्यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे. सिंचनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिलह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले. सहकार क्षेत्रात त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांच्या विकासाला गती दिली. सामाजिक कार्यातून त्यांनी शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासात भरीव योगदान दिले. स्थानिक पातळीवर लोकसंपर्क व विकासकामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे उरमोडी जलाशयाला त्यांचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचाच वारसा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चालवताना दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून उरमोडी धरण प्रकल्पच्या दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागले आहे.
सोन्याच्या मागणीत जगभरात लक्षणीय वाढ
नवी दिल्ली : आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत. द कोबेसी लेटरच्या अहवालानुसार, फेब्रुवारी महिन्यात सुमारे १९ टन सोन्याची खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे, सलग २३ महिन्यांपासून ही खरेदी सुरू आहे. ही खरेदी सोन्यावरील वाढत्या विश्वासाचे द्योतक मानले जात आहे. जानेवारी महिन्यात ६ टन सोन्याची खरेदी करण्यात […] The post सोन्याच्या मागणीत जगभरात लक्षणीय वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पक्षात शून्य किंमत असाऱ्या एका महिलेने 25 लाख रुपयांची खंडणी घेऊन काही पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. ठोंबरे यांनी ही महिला नेता कोण? हे स्पष्ट केले नाही. पण त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादी पक्षातील महिला नेत्यांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त आरोप केला. त्या म्हणाल्या, पक्षातील 'शून्य किंमत' असलेल्या एका महिलेने 25 लाख रुपयांची खंडणी घेऊन काही पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे. या कटाचा भाग म्हणून जय महाराष्ट्र चॅनेलचे पत्रकार रोहन कदम तीन दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये गेले होते. तिथे त्यांनी दारू पिऊन शेजारील खोलीतील एका महिलेचे चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित महिलेने कदम यांना मारहाण केली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता, कदम यांनी आपण 'स्टिंग ऑपरेशन' करत असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन पत्रकार या कटात सहभागी असल्याचा संशय आहे, असे त्या म्हणाल्या. रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट केले की, त्या अशा कोणत्याही षडयंत्राविरोधात पाऊल उचलण्यास सक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आरोप केला की, पक्षातील संबंधित महिलेने पत्रकारांना हाताशी धरून 25 लाख रुपयांची 'डील' केली आहे. रोहन कदम हा केवळ प्यादा असून, मुख्य आरोपीने तीन पत्रकारांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिल्याचेही त्यांनी नमूद केले. लॉज रुपाली ठोंबरेंशी संबंधित असल्याचा दावा यावेळी ॲड. विजय पाटील यांनी सांगितले की, ते सहसा पत्नीच्या राजकारणात पडत नाहीत, परंतु एखाद्या महिलेची राजकीय कारकीर्द बिघडवणे दुर्दैवी आहे. रोहन कदमने पोलिसांना दिलेल्या जबाबात सदर लॉज रुपाली पाटील यांच्याशी संबंधित असून, त्यांना बोलावण्यास सांगितले होते, असा दावा ॲड. पाटील यांनी केला. ॲड. पाटील यांच्या मते, रोहन कदम लॉजपासून केवळ ४०० मीटर अंतरावर राहतो. स्टिंग ऑपरेशनसाठी गेल्यावर त्याने आपल्या कार्यालयातील वरिष्ठांना याबाबत माहिती दिली नाही. रुपाली पाटील महिला शोषणाविरोधात आवाज उठवतात, त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. रोहन कदमला ताब्यात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यापूर्वीही रुपाली पाटील यांच्याबाबत चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. रोहन कदम लॉजवर गेल्याचे सर्व चित्रीकरण उपलब्ध असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाबही आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
कर्नल पुरोहित आता ब्रिगेडियर पदावर
मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढा देणारे कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्करात मोठी बढती मिळाली आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालानंतर लष्कराने त्यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती करण्यास मंजुरी दिली आहे. कर्नल पुरोहित ३१ मार्च २०२६ रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते, मात्र त्यांच्या निवृत्तीला आता स्थगिती देण्यात आली आहे. २००८ च्या मालेगाव […] The post कर्नल पुरोहित आता ब्रिगेडियर पदावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे. उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकर्यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बर्याच वर्षांपासून शासनाकडे होत होती. उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. शिवाय, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. उरमोडी धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. सातारा, खटाव व माण तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळाला आहे. या धरणामुळे वर्षभर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची उत्पादकता आणि पीकपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीतही शेतकर्यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे. सिंचनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिलह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले. स्थानिक लोकभावनेचा सन्मान सहकार क्षेत्रात त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांच्या विकासाला गती दिली. सामाजिक कार्यातून त्यांनी शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासात भरीव योगदान दिले. स्थानिक पातळीवर लोकसंपर्क व विकासकामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे उरमोडी जलाशयाला त्यांचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचाच वारसा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चालवताना दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून उरमोडी धरण प्रकल्पच्या दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागले आहे.
महिला अधिका-याच्या घरात कोट्यवधींचे घबाड
अमरावती : आंध्र प्रदेशलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत देवस्थान विभागाच्या सहाय्यक आयुक्त कलिंगिरी शांती यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे. एसीबीने ७ एप्रिल रोजी विजयावाडा आणि विशाखापट्टणम येथे एकाच वेळी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा पर्दाफाश केला. एसीबी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांती यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक मालमत्ता जमा […] The post महिला अधिका-याच्या घरात कोट्यवधींचे घबाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीच्या कोलकाता झोनल कार्यालयाने शहरात ८ ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई बिस्वजीत पोद्दार ऊर्फ ‘सोना पप्पू’, जय एस. कमदार आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. या छापेमारी दरम्यान ईडीने तब्बल १.४७ कोटी रुपये रोख, […] The post कोलकात्यात ‘ईडी’ची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीचे राजकारणावर टीका केली. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […] The post राजकारण नीतिमत्ताहीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उबाठाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उबाठा गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, खासदारांच्या कथित बंडाच्या वावड्या केवळ 'राजकीय स्टंट' असल्याचे समोर आले आहे. नेमके शिंदेंची पोस्ट काय? एकनाथ शिंदे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे. उबाठाकडून लोकप्रतिनिधींची बदनामी?- म्हस्के अशा पद्धतीची कुठलीही बैठक झालेली नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार आमच्याकडे घेण्याची काही गरज वाटत नाही. त्यांच्यामध्ये काही नाराजी असेल तर आमदार-खासदारांची बदनामी करणे उबाठाच्या नेत्यांनी करू नये. तुमच्यासोबत असलेल्या लोकांची बदनामी करण्याचे काम उबाठाच्या नेत्यांनी करू नये, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के म्हणाले की,दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदार एकत्र असतात. आपल्या राज्यातील मंत्र्यांने चहा पानाला बोलावले तर जातात. प्रतापराव जाधवांकडे जेवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा खासदार होते. त्यामुळे काहीही बातम्या पसरू नये. अरविंद सावंत यांचे पक्षातील विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असावे. उबाठातीलच काही लोकं या अफवा पसरवत लोकप्रतिनिधींना बदनाम करत आहेत.
राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेवरून राज्य सरकारला तीव्र शब्दांत सुनावले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यास ही योजना बंद करण्याचा विचार करा, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या टिप्पणीमुळे राज्याच्या आर्थिक धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही सुनावणी एका निवृत्त महिलेच्या याचिकेवर झाली. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या या महिलेने सातव्या वेतन आयोगानुसार मिळणारे निवृत्तीवेतन आणि इतर लाभ न मिळाल्यामुळे न्यायालयात धाव घेतली होती. यावर पालिकेच्या वकिलांनी कोर्टात मांडले की, या लाभांसाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही, कारण राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळत नाही. यावर न्यायालयाने कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत सरकारच्या प्राधान्यक्रमांवर सवाल उपस्थित केला. न्यायालयाने विचारले की, लाडकी बहीण योजनेसाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करता, मग पेन्शनसाठी पैसे कसे नाहीत? सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा परिस्थितीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे. जर निधीची कमतरता असेल, तर अशा मोठ्या योजनांचा पुनर्विचार करावा, असेही न्यायालयाने सूचित केले. या वक्तव्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचेही समोर आले आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 43 लाख महिलांनी नोंदणी केली होती. प्रत्येक लाभार्थी महिलेला दरमहा 1,500 रुपये दिले जात असल्याने वार्षिक खर्च सुमारे 43,740 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक संतुलनावर या योजनेचा परिणाम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. योजनेतील पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या पडताळणीत 71 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे या महिलांना योजनेतून वगळण्यात आले. तसेच काही प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचारी, तसेच महिलांच्या नावावर पुरुषांनीही लाभ घेतल्याचे आढळून आले. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर आल्या आहेत. सरकार काय भूमिका घेणार, याकडे लक्ष या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाभार्थ्यांची सखोल पडताळणी सुरू केली आहे. पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनाही योजनेचा लाभ मिळत असल्याचे आढळल्याने केवायसी मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थी कमी झाले आहेत. मात्र, न्यायालयाच्या निरीक्षणानंतर आता या योजनेबाबत सरकार काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई : आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील रंगतदार सामन्यात मुकुल चौधरीच्या रुपात नव्या हिरोने सुपर हिट ट्रेलर रिलीज केला. लखनौच्या संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुकुलने वादळी खेळी करत हातून निसटलेल्या सामन्यात एलएसजीच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. पहिल्या दोन सामन्यात एकही षटकार न मारणा-या २१ वर्षीय बॅटरने ७ गगनचुंबी […] The post तो लय बेक्कार मारतो! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देवाभाऊंनी कोणत्याही पक्षाची डेड बॉडी केलेली नाही, तो अधिकार जनतेला असतो. उबाठा गटाची डेड बॉडी करण्याचे काम जनतेने केले आहे. जनतेने तुम्हाला विधानसभेला 20 तर एकही मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तुमच्याकडे दिली नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करूच नका, जनतेने तुमच्या कानाखाली मारली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांचे नाव ऑलरेडी काँग्रेसच्या ऑपरेशनमध्ये आले आहे. ते काँग्रेस पक्षामध्ये जाणार आहेत, ते ठरलेले आहे. पुढच्या वेळी त्यांना खासदारकी मिळणार नाही, ती मिळावी यासाठी ते राहुल गांधी यांच्या संपर्कात असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे. तुमची निष्ठा ही उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी नाही तर सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि उरली सुरली सिल्वर ओकच्या दारात ठेवलेली आहे. तुम्ही निष्ठेच्या गप्पा मारू नका, तुमचा एक पाय काँग्रेसमध्ये आहे, दुसरा कोणत्याही क्षणी जाईल. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. तुमचा पक्ष अस्तित्वाला उरलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेने ही तुमची अवस्था केली आहे. ऑपरेशन लोटस, टायगर सांगण्यापेक्षा पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष द्या. ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्या दिवशी तुम्हाला समजणार सुद्धा नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे 40 आमदार निघून गेले. त्या सरकारचे सर्वेसर्वा संजय राऊत हे होते. तरीही 40 आमदार गेले तुम्हाला कळले नाही,आता काय कळेल. राऊतांनी बालीश वक्तव्ये करू नये, स्वत:च्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी आहेत याकडे लक्ष द्या. नवनाथ बन म्हणाले की, संजूबाबा राऊत हे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या मु्द्द्यावर भाजपवर टीका करत आहेत. त्यांना आठवण करुण देतो गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे उमेदवार असताना त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होतो. अन् निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. ही प्रथा मोडण्याचे काम राहुल गांधी यांच्या काँग्रेसने केले आहे,हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही असे काही सुरू केले या भानगडीत राऊतांनी पडू नये. जेव्हा आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नव्हता. पण काँग्रेसने तसे सौजन्य बीड लोकसभेच्या वेळी दाखवले नाही. काल पण 4 वेळा विनंती केल्यावर काँग्रेसने उमेदवारी अर्ज पराभवाच्या भीतीने मागे घेतला.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकांत पुरोहित यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यातच कर्नलपदी बढती झाली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे हे विशेष. कर्नल श्रीकांत पुरोहित हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी होते. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांचे लष्करी करिअर पूर्णतः ठप्प झाले होते. त्यांनी तब्बल 9 वर्षे तुरुंगात काढली. त्यानंतर 2017 मध्ये जामीन मंजूर झाला आणि ते पुन्हा लष्करात रुजू झाले. पण त्यांच्या बढतीचा व सेवाज्येष्ठतेचा मुद्दा प्रलंबित होता. गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांची मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून निर्दोष सुटका केली. त्यानंतर 2 महिन्यांतच म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना कर्नल पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे एका याचिकेद्वारे आपल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने प्रमोशन व इतर लाभ मिळावेत अशी मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने त्यांची मागणी मान्य केली. कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा पदोन्नतीवर असलेला दावा न्याय आहे. त्यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नत करण्यास मंजुरी देण्यास हरकत नाही. त्यांच्या तक्रारीचे निवारण होईपर्यंत त्यांची निवृत्ती स्थगित ठेवण्यात यावी, असे खंडपीठाने 16 मार्च 2026 रोजी दिलेल्या आपल्या निकालात म्हटले आहे. कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते. पण आता त्यांच्या निवृत्तीला स्थगिती मिळाली आहे. भारतीय लष्करातील सूत्रांच्या माहितीनुसार प्रस्तुत बढती म्हणजे कर्नल पुरोहित यांच्या तुरुंगवास व खटल्यादरम्यान वाया गेलेल्या वर्षांची एकप्रकारे भरपाईच आहे. त्यांची कारकीर्द विनाव्यत्यय सुरू राहिली असती, तर आज ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले असते. आता ब्रिगेडियर म्हणून ते एका वरिष्ठ कमांडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा सक्रिय होतील. कोण आहेत कर्नल पुरोहित? लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित हे भारतीय लष्करातील एक अनुभवी अधिकारी आहेत. ते लष्करी गुप्तचर विभागात कार्यरत होते. त्यांना हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषांचे उत्तम ज्ञान आहे. जम्मू-कश्मीरमधील अतिरेकी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या मोहिमांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मालेगाव शहरात 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यात 6 जण ठार, तर 100 हून अधिक जण जखमी झाले. हा स्फोट एका दुचाकीमध्ये लपवलेल्या स्फोटकांद्वारे झाला होता. तपासात ही दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर झालेल्या तपासात कर्नल पुरोहित यांचे नाव पुढे आले होते. कर्नल पुरोहित यांनी अभिनव भारत नामक संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून या स्फोटाचा कट आखला, तसेच स्फोटासाठी स्फोटकेही पुरवली, असा त्यांच्यावर आरोप होता.
सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी बिग बजेट अॅक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून दिग्गज कॉमेडियन राजपाल यादवची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. सलमान खानच्या या बहुप्रतिक्षित अॅक्शन एंटरटेनरमध्ये राजपाल यादव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात दाक्षिणात्य सुंदरी नयनतारा मुख्य […] The post सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीयपद्धतीने पर्दाफाश केला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून, वेशांतर करून या कॉर्पोरेट जाळ्याचा भांडाफोड करणाऱ्या महिला पोलिसांचे धाडस आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 9 धाडसी मुलींमुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: उपआयुक्त मोनिका राऊत या महिला अधिकाऱ्याची निवड केली. त्यांच्यासोबत स्वतंत्र तीन महिला अधिकारी, कर्मचारी अशा मोजक्याच 7 कर्मचाऱ्यांची टीम तयार करून सर्व सूचना दिल्या. अतिशय बारकाईने व सर्वंकष नियोजन करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यात आला. सामाजिक दडपण आणि कुटुंबाच्या भीतीपोटी पीडित युवती गप्प होत्या. मात्र, 9 धाडसी मुलींनी आणि धर्मांतराचा प्रयत्न झालेल्या देवळाली कॅम्पमधील तरुणाने पुढे येऊन तक्रार नोंदवल्याने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. आरोपी इतके निर्ढावलेले होते की, एखादी मुलगी कामावर आली नाही तर ते थेट तिच्या आईशी संपर्क साधून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असत. या प्रकरणात कंपनीतील पुण्यातील महिला एचआर आणि असिस्टंट मॅनेजर स्तरावरील व्यक्तींचाही सहभाग असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. ‘विकेंड ट्रिप’च्या बहाण्याने शोषण तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सफी भिकन शेख, असिफ आफताब, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, दानिश शेख आणि तौसीफ आत्तर यांसारख्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी कंपनीत टीम लीडर सारख्या पदांचा गैरवापर केला. नोकरीच्या आमिषाने आलेल्या मुलींना सुरुवातीला विश्वासात घेतले जायचे. त्यांना अल्पावधीतच प्रमोशन देण्याचे तर काहींना कंपनीच्या मुंबई, पुण्याच्या शाखेत मोठ्या पदावर संधी उपलब्ध करून देण्याचे आमीष दाखवायचे. त्यानंतर त्यांना मोठ्या रिसॉर्ट्स किंवा वॉटरपार्कच्या ठिकाणी ‘विकेंड ट्रिप’च्या बहाण्याने नेले जात असे. तिथे नियोजनपूर्वक त्यांच्या भावनांशी खेळून, त्यांना फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले जात आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असे. पीडितेचे राहणीमानही बदलले तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडितेच्या मनावर इतका पगडा निर्माण केला होता की, तिने स्वतःच्या धर्मातील रूढी-परंपरा सोडून संशयितांच्या धार्मिक प्रथांचे पालन करण्यास सुरुवात केली होती. पीडित तरुणी गेल्या दोन वर्षांपासून सलग महिना-महिनाभर उपवास (रोझा सदृश उपवास) धरत होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी कितीही आग्रह केला किंवा घरी बोलावले, तरी ती त्यांना स्पष्टपणे नकार देत असे. आरोपींच्या प्रभावामुळे पीडितेने तिचे राहणीमानही पूर्णपणे बदलले होते. गेल्या वर्षभरापासून तिने 'लिप्स्टिक' लावणेही बंद केले होते. तिच्या नैसर्गिक पेहरावात आणि वागण्याबोलण्यात झालेला हा बदल पाहून तिचे जवळचे लोकही अवाक झाले होते. असा झाला तपासाचा थरार महिला पोलिसांचे वेशांतर हे रॅकेट अत्यंत संघटित आणि कॉर्पोरेट स्तरावर कार्यरत असल्याने त्याचे पुरावे गोळा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान महिला पोलिसांनी धाडसी पाऊल उचलले. अधिकाऱ्यांनी वेशांतर करून संबंधित कंपनीत आणि संशयित ठिकाणी वावर ठेवला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या जाळ्यातील व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. आरोपींची कार्यपद्धती, त्यांच्या संभाषणाची पद्धत आणि मुलींना कशा प्रकारे जाळ्यात ओढले जाते, याचे ठोस पुरावे गोळा केले. काही ठिकाणी योग्य ऑडिओ व्हिज्युअल पुरावेदेखील गोळा केले. 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या पथकाने सलग 10 दिवस कधी दिवसा तर कधी रात्री उशिरापर्यंत आयटी कंपनीच्या कार्यालयात वेशांतर करून तिथे वावर ठेवला. एवढेच नव्हे तर संशयितांचे संभाषण, त्यांचा वावर, त्यांची मुलींवर असणारी नजर, टोमणे मारणे, हेतूत: जवळ जावून स्पर्श करणे, त्यांच्या चेहऱ्याला, गालाला हात लावणे, खुर्चीवरून उठल्यावर अथवा बसताना पार्श्व भागावर हात फिरवणे असे प्रकार नजरेस आले. पोलिसांनी 40 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमरे तपासले. त्याचबरोबर या पीडित महिलांना तास-तास भर भेटून त्यांच्या व्यथा समजून घेत त्यांना धीर दिला. संपूर्ण पोलिस यंत्रणा तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिल्याने त्या अन्यायाच्या विरोधात पुढे आल्या. तो खुर्चीजवळ माझ्या अंगाला स्पर्श होईल, असा उभा होता मला वाटलं होतं की ही मोठी, बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. तिथे आपल्यासाठी चांगल्या कामाचे वातावरण असेल. पण हळूहळू लक्षात आले की तिथे कामापेक्षा माझा धर्म आणि माझ्या विचारांबद्दल जास्त बोललं जातंय. माझ्या मनात माझ्याच धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘जिहाद’पेरला जात असल्याचे वेळीच लक्षात आलं. एवढंच नव्हे तर तौसिफ अत्तार नावाचा प्रोसेस लीडर एकदा माझ्या अंगाला स्पर्श होईल अशा पद्धतीने माझ्या खुर्चीजवळ उभा होता. हे शब्द आहेत नाशिक येथील आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार झालेल्या 25 वर्षीय तरुणीचे. तिने ‘दिव्य मराठी’ला सांगितलेली आपबिती तिच्याच शब्दांत. मी प्रोसेस असोसिएट पदावर होते. प्रोसेस लीडर तौसिफ अत्तारशी नेहमी कामानिमित्त बोलणं होत असे. दुसऱ्या विभागातील काही जणींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी एचआर हेडकडे झाल्याचे माझ्या कानावर आलं होतं. एकदा ऑफिसच्या लॉबीमध्ये मी आणि दोन मैत्रिणी ताक पीत होतो. फोन आल्याने दोघीजणी निघून गेल्यावर दोन पाच मिनिटात तौसिफ आला. बहुतेक तो दोघी जाण्याची वाट बघत असावा. मग मी बसलेल्या खुर्चीजवळ अंगाला स्पर्श होईल असा तो उभा राहिला. माझ्याकडे वेगळ्याच नजरेने एकटक रोखून बघत होता. मी ताक पिताना त्याने ‘क्या पी रही हो’ असे विचारलं. मी त्याला ‘छांस पी रही हूं’ असे सांगितले. तेव्हा तौसिफने स्वत:च्या गुप्तांगाकडे इशारा करून ‘मेरे पास भी छांस है, तुझे चाहिये क्या’ असे विचारत अश्लील हावभाव केले. कायद्याच्या बालेकिल्ल्यात भरपेट ‘पाहुणचार’ या प्रकरणातील पाच संशयितांना कायद्याच्या बालेकिल्लामध्ये हजर करत भरपेट पाहुणार करण्यात आला. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने आज (दि. 10) त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, फरार एचआर मॅनेजर अश्विनी चेनानी यांना गुन्हे शाखेच्या पथकाने कात्रज येथून ताब्यात घेतले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी या संशयितेचाही चांगलाच ‘पाहुणाचार’ केला.
व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची विमानतळावर भेट घेतली. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या विमानाच्या मृत पायलटचा मुलगाही उपस्थित होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका, व्ही के सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणे टाळा, अन्यथा सर्व काही अडचणीचे ठरेल, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात की घातपात? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या प्रकरणी उपरोक्त आरोप केला आहे. रोहित पवार शुक्रवारी एका पोस्टमध्ये म्हणाले, दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो, प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग रिसिव्ह करतो, त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो, त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागद देतो, विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का? माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका… व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका.. आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या.. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. महाराष्ट्र शासनसोबत आधी केवळ विमानसेवेपुरता मर्यादित असलेला व्ही. के. सिंग ज्याप्रकारे आंध्रप्रदेशमध्ये तेथील नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने तेथील मोठ्या प्रकल्पांच्या कामांसाठी मध्यस्थ / दलाल म्हणून काम करत होता त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी मध्यस्थ / दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची नवी माहिती समोर येत आहे. ही माहिती सत्य असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे? असा प्रश्न पडतो. इतकं सर्वकाही असताना सत्तेत असलेला पक्ष शांत बसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा करतोय, याचं अधिक दुःख वाटतं. याप्रकरणी सीबीआय कडून अधिक सखोल चौकशी होईल, ही अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे प्रशासन संविधानानेच चालते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी थेट कर्नाटकात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेला झिरो एफआयआर नंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रात वर्ग केला आहे. पण अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. रोहित पवार यांनी या प्रकरणीही संताप व्यक्त केला आहे. ते यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले होते, अनेक प्रयत्न करुनही अजितदादांच्या विमान अपघाताचा गुन्हा दुर्दैवाने महाराष्ट्रात दाखल होऊ शकला नाही, पण कोणताही वशिला न विचारता कर्नाटक पोलिसांनी झिरो नंबरने हा गुन्हा दाखल करुन महाराष्ट्राकडं वर्ग केला आणि कर्नाटकातील प्रशासन हे संविधान आणि नियमानुसारच चालतं, हेही यानिमित्ताने दाखवून दिलं. खुद्द अजितदादा उपमुख्यमंत्री असलेल्या गृहराज्यातील त्यांच्याच युतीचं सरकार असूनही दादांना न्याय मिळाला नाही पण कर्नाटकने मात्र त्यांना न्याय देण्याचं काम केलं. प्रशासनाकडून कसं काम करुन घ्यायचं हे त्या विभागाचे प्रमुख म्हणून मंत्री महोदयांवर अवलंबून असतं. त्यामुळं न्यायाच्या या लढाईत केलेल्या सहकार्याबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे आभार, असे ते म्हणालेत.
निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची १६ आणि १७ एप्रिल रोजी 'डायग्नोस्टिक टेस्ट' केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी ठरणार आहे. बीईएलचे इंजिनिअर्स करणार तपासणी सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'चे (बीईएल) तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करतील. या प्रक्रियेत यंत्राच्या 'बर्न मेमरी'मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाईल. निकालावर टांगती तलवार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीतून शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी नसीम खान (काँग्रेस) यांचा अत्यंत निसटत्या फरकाने पराभव केला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी या तक्रारीची दखल घेत तपासणीचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्याच्या निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. काय आहे 'डायग्नोस्टिक टेस्ट'? हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. १६ आणि १७ एप्रिलला होणाऱ्या या तपासणीतून सत्य जनतेसमोर येईल, असे मत या प्रकरणी याचिकाकर्ते नसीम खान यांनी व्यक्त केले. २०,६२५ मतांच्या फरकाने नसीम खान पराभूत चांदिवली विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत अवघ्या ४०९ मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवणाऱ्या लांडेंनी २०२४ मध्ये मात्र ही आघाडी तब्बल २०,६२५ मतांपर्यंत खेचून नेली. चांदिवलीत एकूण ५३% मतदान झाले. यात दिलीप लांडे यांनी १,२४,६४१ मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला, तर नसीम खान यांना १,०४,०१६ मतांवर समाधान मानावे लागले. २०१९ च्या 'काट्याच्या' लढतीनंतर नसीम खान यावेळी मुसंडी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र लांडेंनी मोठ्या फरकाने खान यांना अस्मान दाखवत राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालातील मतमोजणीच्या तफावतीवरून आता ईव्हीएमच्या 'डायग्नोस्टिक टेस्ट'ची चर्चा रंगली आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. रिश्ते मायने रखते है, असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे. त्यामुळे बारामतीतील राजकारणात वेगळाच रंग भरला आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला जाणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर देण्याऐवजी वेगळाच दृष्टिकोन मांडला. हा प्रश्न अजित पवार गटाने विचारायला हवा, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष संकेत दिले. जर त्यांच्याकडून बोलावणे आले, तर प्रचारासाठी जाण्याचा विचार करू शकते, असे त्यांनी सूचित केले. त्यामुळे कुटुंबातील नातेसंबंध आणि राजकारण यातील समतोल कसा साधला जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रक्रियेची जबाबदारी अजित पवार गटाकडे होती, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली. याबाबतचे उत्तर त्यांनाच विचारावे, असे म्हणत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. तसेच निवडणुकीच्या काळात कार्यकर्ते उत्साहाने निवडणूक लढवतात, त्यामुळे स्पर्धा होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सुप्रिया सुळे या पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा कुटुंबाच्या ऐक्याचा उल्लेख करत, संपूर्ण कुटुंब सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी आहे, असे सांगितले. त्यामुळे पवार कुटुंबातील नातेसंबंध अजूनही मजबूत असल्याचा संदेश त्यांनी दिला. बारामती पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आधीच जाहीर झाला आहे. 30 मार्च 2026 रोजी अधिसूचना जारी झाली असून 6 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी झाली, तर 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मतदान 23 एप्रिल रोजी होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी माघार घेतल्याचेही दिसून आले. एकूण 53 उमेदवारांपैकी 30 जणांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनीही माघार घेतल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, अभिजीत बिचुकले आणि करुणा मुंडे-शर्मा यांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे आता बारामतीत एकूण 23 उमेदवार रिंगणात असून, 23 एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील त्यावेळेसच आपल्याला कळेल. कोणतेही ऑपरेशन करताना ते काही बँडबाजा लावून केले जात नाही. आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत जे रोज एकनाथ शिंदेंना सांगत असतात पण योग्य वेळी निर्णय घेणं ही शिंदेंची ख्याती आहे, असे शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, या महिनाभरात तुम्हाला ऑपरेशल टायगर आहे की आणखी काही आहे हे महिनाभरात कळेल. आता सर्व काही शेवटच्या टप्प्यात आहे, तुम्हाला काही जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच उबाठामध्ये तुम्हाला स्फोट झालेला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलाताना शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे. शिंदेंसोबत जाणार नाही- सावंत अरविंद सावंत यांनी या सर्व बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मी सध्या रागातही आहे आणि मला कीवही येते, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. सकाळी अचानक ही बातमी पाहून धक्का बसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कालपर्यंत इतर खासदारांची नावे घेतली जात होती, मात्र आज अचानक त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.शिंदे यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या ते शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहे. राऊत यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांनाही फेटाळून लावत ठाकरे गटातील एकजूट अधोरेखित केली. आमचे नऊ खासदार एकत्र आहेत. काही नावं वाचून मला हसू आलं. उद्या माझं आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील, या प्रकारच्या बातम्या केवळ वातावरण तापवण्यासाठी किंवा काहीतरी घडत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत.
महाराष्ट्र आणि देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलाच आहे. फोडा, तोडा, मोडा आणि राज्य करा असे सुरू आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काहीच राहिलेली नाही, कुठेही जावं, कुणाच्याही मांडीवर बसावं, कुणी कुणाला डोक्यावर घ्यावे अन् डोक्यावर घेत पायाखाली तुडवावे ही एक फॅशन झाली आहे, बघू पुढे काय होते ते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. देशात जे सरकार आहे त्यांच्या काळात देश कर्जबाजारी झाला आहे. जनता परेशान आहे. या परिस्थितीत फोडा फोडीचा विचार येणाऱ्यांना देव सदबुद्धी देईल. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी उबाठाचे खासदार सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतात, सत्ता त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही सुद्धा जात असतो. मतदारसंघातील कामे असतात त्यासाठी जाण्यात गैर काय? उद्धव ठाकरे वेळ देत नाही हा केवळ आरोप आहे, आम्ही ज्या ज्या वेळी त्यांची वेळ मागितली त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आहे. कोणाचे जेवन चांगले वाटले म्हणून खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले असतील. यावर जास्त काही बोलणं योग्य नाही. पक्ष फुटण्याची काही चिन्ह आता तरी काही दिसत नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे सत्तेत असूनसुद्धा अस्वस्थ आहेत. त्यांचे अनेक मंत्री अस्वस्थ आहेत. हे पाहता पुन्हा एकमेकांची तारीफ करत एकमेकांच्या जवळ येणं हे चांगले संकेत आहे असे मी मानतो. त्यांना वेगळ्या ॲंगलने पाहण्याची गरज नाही. राजकारण हे निवडणुकीपुरते असायला हवे. निवडणुकीनंतर भाजपच्या नगरसेवकाला जास्त आणि दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना कमी निधी असे महाराष्ट्रात असे कधीही झाले नाही. सरकारने सर्वांना विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचा विचार केला आहे. पण आता ही नवीन पद्धत रुजली आहे की विरोधकांना पैसे द्यायचे नाही, त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व जण एकमेकांच्या संपर्का असतो. बारामतीबद्दल सुद्धा प्रदेशाध्यक्षांनी दोन ते 3 वेळा फोन करत काय भूमिका घ्यावी या संदर्भात आमच्याशी चर्चा केली. मी पण त्यांना फोन केला की आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. एकीकडे फोन करत विनंती करायची आणि दुसरीकडे विरोधी वक्तव्ये करायची याला काहीही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांचा अपमान करत आहात. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती केली म्हणून माघार केली.
राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून यासाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा असली तरी, पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या कथित बैठकीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ऑपरेशन टायगरच्या संदर्भात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गुप्त बैठक झाली. या बैठकीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत शिंदे हे आपले प्रयत्न यशस्वी करून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून संवाद साधला होता. त्या बैठकीत सर्व खासदारांनी पक्षाशी निष्ठावंत राहण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या या भेटीच्या वृत्तामुळे त्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री झालेल्या या बैठकीत ठाकरे गटातील आठ खासदार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, त्या रात्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक वेगळ्या मार्गाने वळल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात ही बैठक झाल्याचा दावा केला जात आहे. ही बैठक उशीरा रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालल्याची माहिती आहे. यावेळी शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते, असेही सांगितले जाते. या बैठकीला ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते, अशी चर्चा आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आणखी दोन खासदार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाल्याचेही सांगितले जाते. या बैठकीत संबंधित खासदारांना शिंदे गटात सामील होण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्व दाव्यांवर संबंधित खासदारांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी अशा कोणत्याही बैठकीची माहिती नसल्याचे सांगत, बैठक झाली असेल तर फोटो दाखवा, असे खुले आव्हान दिले. अरविंद सावंत यांनीही ठामपणे सांगितले की, काहीही झालं तरी मी शिंदे यांच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे निर्माण झालेला गोंधळ अधिकच वाढला असून, या प्रकरणात नेमके सत्य काय, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान ठाण्यात कथित गुप्त बैठक झाल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, या बैठकीत सहभागी असल्याचे सांगितल्या गेलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांनी आता या सर्व दाव्यांना ठामपणे नकार दिला आहे. एकामागोमाग एक खासदार पुढे येत आपली भूमिका स्पष्ट करत असल्याने या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार संजय जाधव परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी थेट भूमिका मांडली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातच आहे. त्यामुळे ठाण्यात झालेल्या कोणत्याही बैठकीशी माझा संबंध नाही. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ते कोणत्याही बैठकीला गेले नाहीत आणि कोणाशीही संपर्क झालेला नाही. सध्या ते आपल्या कामात व्यस्त असून पक्षांतराचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. खासदार नागेश पाटील आष्टीकर याचप्रमाणे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही या कथित बैठकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सूत्रांकडून त्यांच्या नावाचाही या बैठकीत समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी या सर्व बातम्यांना स्पष्टपणे फेटाळले. अशी कोणतीही बैठक झाली आहे, याची मला माहितीच नाही. मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चांना आणखी धक्का बसला आहे. खासदार संजय देशमुख यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनीही अशाच प्रकारे या बैठकीत सहभाग नाकारला आहे. त्यांनी सांगितले की, मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन कोणत्याही बैठकीत सहभागी झालो नाही. मला या बैठकीचे ना निमंत्रण होते, ना कुणी बोलावले. त्यामुळे अशा बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे या चर्चांची विश्वसनीयता आणखी कमी झाली आहे. राजकारण आणखी तापण्याची शक्यता या खासदारांच्या प्रतिक्रियांमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. एकीकडे गुप्त बैठकीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे संबंधित खासदारच या दाव्यांना नकार देत असल्याने नेमकं सत्य काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता राजकीय वर्तुळासह जनतेचंही लक्ष लागले आहे.एकूणच, ठाकरे गटातील खासदारांनी एकमुखाने दिलेल्या इन्कारामुळे सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर संशय व्यक्त केला जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सत्ताधारी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते आमच्या पक्षात आले तर सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन, असे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. महेश शिंदे यांच्या या विधानामुळे शिवसेना शरद पवार गटाच्या नेत्यांना फोडण्याच्या प्रयत्नांत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांत सध्या राजकीय पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यापुढे शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ते म्हणाले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन. मी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये येण्याचा सल्लाही दिला आहे. शशिकांत शिंदे शिवसेनेत आले पाहिजेत. ते तिकडे कशाला थांबलेत माहिती नाही. त्यांनी इथे यावे, असे ते म्हणालेत. प्रिया शिंदेंच्या कुणबी दाखल्याचा वाद न्यायप्रविष्ट साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व आमच्यात कोणतेही मतभेद नसून, आगामी काळात सर्वकाही व्यवस्थित होईल, असा दावाही महेश शिंदे यांनी यावेळी केला. तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर भाष्य करण्यासही नकार दिला. आमच्याकडून ओबीसी बांधवांवर कोणताही अन्याय झाला नाही. प्रतिस्पर्धी पक्षाने कुणबी उमेदवार दिल्यामुळे आम्हीही कुणबी उमेदवार दिला. प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचा दाखला वैध आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे त्याची कुणीही मीडिया ट्रायल करू नये, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या सर्वच निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता पक्ष संघटनेचा विस्तार व पक्ष बळकटीला प्राधान्य देत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकार्यक्षम नेत्यांना घरी बसवण्याचा इशारा दिल्यामुळे शिवसेनेतील सर्वच नेते अंग झटकून पक्ष विस्ताराच्या कामाला लागलेत. या पार्श्वभूमीवर महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यापुढे शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकनाथ शिंदे व ठाकरेंच्या 8 खासदारांची गुप्त बैठक दुसरीकडे, एकनाथ शिंदे व ठाकरे गटाच्या 8 खासदारांची बुधवारी रात्री गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदेंची गाडी अचानक ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात शिंदे व ठाकरे गटाच्या खासदारांची भेट झाली. ही बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती असा दावा केला जात आहे. या बैठकीला शिंदेंसोबत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेही हजर होते, तर ठाकरे गटाकडून खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत शिंदेंनी या खासदारांना आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर व अरविंद सावंत यांनी या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.
शहीद झालेल्यांच्या पुत्रांना पीएसआयपदी थेट नियुक्ती:‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट
नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक संतोष महिपत घाग आणि शहीद पोलिस हवालदार हरिदास चिंतामण सयाम यांच्या वारसांना पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गृह विभागाने गुरुवारी जारी केला. नक्षलविरोधी कारवाईत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना गट-अ आणि गट-ब संवर्गात नियुक्ती देण्याची तरतूद 1009 च्या शासन निर्णयानुसार आहे. याच तरतुदीचा आधार घेत, विराज संतोष घाग आणि विकास हरिदास सयाम यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्यांना ही विशेष नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून ही नियुक्ती करताना त्यांना ‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट घालण्यात आली आहे. एकूणच शहिदांच्या वारसांना यामुळे न्याय मिळाला आहे. शहिदांच्या त्यागाची दखल नक्षलविरोधी कारवायांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता सामाजिक सुरक्षा प्रदान करणे ही सरकारची मुख्य भूमिका आहे. ‘विशेष बाब’ म्हणून थेट ‘गट-ब’ अधिकारी पदावर नियुक्ती देऊन सरकारने एक संवेदनशील प्रशासकीय पाऊल उचलले आहे. कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या कुटुंबाची जबाबदारी शासन घेते, हा सकारात्मक संदेश पोलिस दलात आणि समाजात पोहोचवणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर हे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. या कथित आठ खासदारांमध्ये खासदार अरविंद सावंत यांचे नावही समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अधिकच खळबळ उडाली. सावंत हे ठाकरे गटातील महत्त्वाचे आणि अनुभवी नेते मानले जात असल्याने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने या चर्चेला अधिक वजन मिळाले. मात्र, ही माहिती समोर येताच सावंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत यांनी या सर्व बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मी सध्या रागातही आहे आणि मला कीवही येते, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. सकाळी अचानक ही बातमी पाहून धक्का बसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कालपर्यंत इतर खासदारांची नावे घेतली जात होती, मात्र आज अचानक त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिंदे यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यांनी या प्रकाराला कडाडून विरोध दर्शवत अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या मते, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेनेही अशा खोट्या बातम्यांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असली तरी ठाकरे गटातील नेत्यांनी मात्र एकमुखाने या दाव्यांना फेटाळले आहे. कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा पुन्हा एकदा पुढे आला आहे. त्यामुळे या चर्चांमागे नेमकं काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच, ऑपरेशन टायगर मुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. अरविंद सावंत यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. येत्या काळात या चर्चांचा नेमका परिणाम काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
चेन स्नॅचिंग प्रकारात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून चाकूचा धाक दाखवत अंगावरील सव्वातोळे सोन्याचे मिनी गंठण हिसकावण्याचा प्रकार उघडकीस आला. शिवगंगा नगरात एका वृद्ध महिलेच्या घरात ही घटना झाली. या प्रकरणी जयश्री अरुण केत (वय 72, रा. शिवगंगा नगर भाग 4, मजरेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरावर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचे प्रकार झाले. आता चोरांचे धाडस इतके वाढले की, घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत लुटायला सुरुवात केली. घरातील वृद्धांना त्यांनी ‘लक्ष्य’ केल्याचे दिसून येते. त्यासाठी पाळत ठेवूनच हा प्रकार होत असावा, असे या घटनेवरून दिसून येते. केत यांचे किराणा दुकान आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी दुकानासमोर साफसफाई केली. घरात गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या चोरांना कापडाने त्यांचे तोंड दाबले आणि चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सव्वातोळ्याचे मिनी गंठण लंपास केले. आरडाओरड करेपर्यंत चोर पसार झाला. केत पती-पत्नी दोघेच राहतात. गुरुवारी पहाटे पती अरुण केत दुकानातील काही साहित्य आणण्यासाठी बाहेर पडले होते. जयश्री केत यांनी स्वच्छता दुकानाचे शटर खाली खेचले. त्यानंतर घरात गेल्या. दबा धरून बसलेला 25 ते 30 वर्षांचा असावा. त्याने चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. त्याच्या हातातील पांढऱ्या ओढणीने त्याने जयश्री केत यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. केत यांनी प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने खिशातून चाकू काढला. जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या. त्यांच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे करत आहेत. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोराचा माग काढता आलेला नाही, असे ते म्हणाले. यापूर्वीचे चेन स्नॅचिंग... यापूर्वीच्या चेन स्नॅचिंग प्रकारात चोरांनी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना ‘लक्ष्य’ केले होते. दुचाकीवर डबलसीट येणारे चोर हेल्मेट वापरत होते. मागून येत चेन हिसकावली की, धूम ठोकायचे. परंतु शिवगंगा नगरातील प्रकारातील चोर वेगळे आहेत. यातील चोराने चेहरा काळ्या कापडाने झाकलेला होता. तो घरातच दबा धरून बसलेला असावा. आणण्यासाठी बाहेर पडले होते. जयश्री केत यांनी स्वच्छता दुकानाचे शटर खाली खेचले. त्यानंतर घरात गेल्या. दबा धरून बसलेला 25 ते 30 वर्षांचा असावा. त्याने चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. त्याच्या हातातील पांढऱ्या ओढणीने त्याने जयश्री केत यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. केत यांनी प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने खिशातून चाकू काढला. जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या. त्यांच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे करत आहेत. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोराचा माग काढता आलेला नाही, असे ते म्हणाले. पाळत ठेवल्याचा संशय चोर ज्या अर्थी पहाटेच घरात दबा धरून बसला, त्याअर्थी त्याने या घरावर पाळत ठेवली होती. घरात कोण कोण आहेत, पहाटे किती वाजता उठतात, पती कधी बाहेर पडतो. या बाबी हेरूनच चोर परिसरात गेला. पती बाहेर गेले, पत्नी झाडू घेऊन बाहेर आल्या आणि चोर घरात शिरून दबा धरून बसला. पाळत ठेवूनच असा प्रकार करता येतो, असे पोलिस म्हणाले. चेहऱ्यावर काळ्या रंगाचे कापड घालून घरातच दबा धरून होता चोर जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या आणि चोराने त्यांच्या गळ्यातील गंठण घेतले.वयोवृद्ध किंवा महिला पहाटेच्या सुमारास लवकर उठल्यानंतर आसपास संशयित ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काही चोरटे पाहणी करून निर्जन ठिकाणी दबा धरून बसतात. अचानक पाठीमागून येऊन झडप घालतात. काही कळण्याच्या आगोदर दागिने घेऊन लंपास होतात. अशा वेळी शक्य असल्यास घरात परिसरात किंवा दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून चोरट्याचा शोध घेता येईल.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत. ऑपरेशन टायगर या नावाने सुरू असलेल्या चर्चांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हालचालींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना, शिवसेना ठाकरे गटाने मात्र या दाव्यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या ते शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. राऊतांनी सूचक शब्दांत सत्ताधाऱ्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या गटातील आठ खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. या संदर्भात झालेल्या एका कथित गुप्त बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या घडामोडींमुळे पुढील काही दिवसांत राज्यातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्व चर्चांना संजय राऊत यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे. शिवसेनेचे नऊ खासदार एकजुटीने एकत्र आहेत, त्यांच्यात कोणतीही फूट पडणार नाही, असा दावा त्यांनी केला. ठाकरे गटातील एकाही खासदाराला फोडणे शक्य नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना थेट आव्हान दिले. त्यामुळे ऑपरेशन टायगर, खरेच यशस्वी होणार की फक्त राजकीय हवा आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदखेड्याच्या तापी नदीतून अवैधरित्या उपसा करून 30 ब्रास वाळूची नाशिकला चोरटी वाहतूक करणारे 6 डंपर व मुरूमचे दोन ट्रॅक्टर महसूलच्या तीन विशेष पथकांनी जप्त केले. गुरुवारी (दि.9) सकाळी मनमाड चौफुली व सवंदगाव परिसरात केलेल्या कारवाईत हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी सिध्दार्थ रामकुमार यांनी सिन्नर महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही छापेमारी केली. . मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची खात्री करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी रामकुमार हे तीन पथकांसह मालेगावात पोहोचले. त्यांनी मनमाड चौफुली परिसरात सापळा रचला. यावेळी तब्बल सहा डंपर वाळू वाहतूक करताना मिळून आले. पथकांनी पाठलाग केल्याने काही संशयितांनी वाहनांसह पळ काढला. मात्र, पथकाने पोलिसांच्या मदतीने सर्व डंपर पकडले. वाळू उत्खनन तसेच वाहतुकीचा कुठलाही परवाना डंपरचालकांकडे आढळून आला नाही. यादरम्यान दुसरी कारवाई सवंदगाव परिसरात करण्यात आली. बाजारभावाच्या पाच पटीने 21 लाखाचा दंड सहा डंपरमध्ये प्रत्येकी पाच यानुसार 30 ब्रास वाळू आढळली. बाजारभावाच्या पाच पटीने 21.44 लाग रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मुरूमचा स्वतंत्र दंड आकारला जाणार आहे. पथकाने किल्ला व मालेगाव तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाया केल्या आहेत. मंत्री बावनकुळेंच्या आदेशाने कारवाई महसूलमंत्री बावनकुळे यांनी मागील आठवड्यात बैठक घेतली होती. मालेगावात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असताना गौण खनिजची महसूल वसुली खूपच कमी असल्याचे लक्षात आल्याने कारवाईचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एकूण 23 उमेदवार रिंगणात उरले असून, या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक सरळ झाली आहे. विशेष म्हणजे या 23 उमेदवारांपैकी केवळ 10 उमेदवार बारामती मतदारसंघातील आहेत, तर उर्वरित 13 उमेदवार बाहेरील भागातील आहेत. सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि पुणे या भागांतून आलेले उमेदवारही या लढतीत उतरले आहेत. या निवडणुकीत महत्त्वाचा टप्पा ठरला तो काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या माघारीचा. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आकाश मोरे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करू शकतील, अशी चर्चा होती. बारामतीत धनगर समाजाची मतसंख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे मताधिक्य कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बारामतीत अजित पवार यांनी नेहमीच मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीतही सुनेत्रा पवार यांना दणदणीत विजय मिळवून देणे, ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. यासाठी पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्यांनी सक्रिय भूमिका घेतली. अखेर काँग्रेसला माघार घ्यायला राजी करण्यात यश आले आणि त्यामुळे निवडणुकीतील मुख्य स्पर्धा कमी झाल्याचे चित्र आहे. आता या निवडणुकीत चर्चेत राहू शकतील अशी दोनच नावे पुढे येत आहेत, ती म्हणजे अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा मुंडे. मात्र हे दोघेही बारामतीबाहेरील असल्याने ते प्रत्यक्षात कितपत प्रभाव टाकू शकतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर सध्या कोणतेही ठोस आव्हान नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे, तर निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत उरलेल्या उमेदवारांची यादी पाहिली असता विविध भागांतील आणि विविध पार्श्वभूमी असलेले उमेदवार रिंगणात असल्याचे दिसते. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही. खरी लढत कोण देणार, याकडे सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या यादीत प्रमुख नाव म्हणून सुनेत्रा अजित पवार (बारामती, राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या मोठी असली तरी खरी लढत कोण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते. त्यामुळे बरेचदा असे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शासन त्यांना धरणाचे पाणी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून शासनाने योग्य ती उपाययोजना करावी, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी मांडले. धरणग्रस्तांसाठी तहहयात लढणारे कार्यकर्ते प्रा. साहेबराव विधळे यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघर्षधारा’ या गौरवग्रंथाचे विमोचन डॉ. पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी, मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी, डॉ. प्रतिभा विधळे, पुष्पाताई बोन्डे, माणिकराव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात. अनेकजण विस्थापित होतात. मात्र विस्थापितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन होत नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला संघर्ष येतो. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आवश्यक असते. अप्परवर्धा धरणग्रस्तांसाठी असाच लढा प्रा. साहेबराव विधळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने दीर्घकाळ दिला. त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला. ही बाब प्रकल्पग्रस्तांच्या न्यायलढ्याच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची आहे. यावेळी बोलताना नागेश चौधरी म्हणाले, आज संधीप्राप्त लोक समाजविन्मुख आयुष्य जगण्यावर भर देत आहेत. मात्र प्रा. साहेबराव विधळे यांनी कायम समाजसन्मुख भूमिका अंगीकारून कार्य केले. धरणग्रस्तांचा लढा असो की बहुजन संघर्ष समितीचे प्रबोधनाचे कार्य असो, सर्वांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेऊन गुणात्मक कार्य केले. आचार्य वेरुळकर गुरुजी म्हणाले, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये पीडित व्यक्तीच्या संघर्षात उभे राहण्याची प्रेरणा आहे. प्रा. साहेबराव विधळे यांनी विविध चळवळींमध्ये केलेले कार्य असेच असल्याने ते अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडे म्हणाले, प्रा. साहेबराव विधळे यांचे जीवनकार्य हे कष्टकरी, बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी राहिले आहे. धरणग्रस्तांच्या सोबतीने त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. मंडल आयोगाच्या प्रबोधन कार्यात हिरीरीने पुढाकार घेतला. तसेच बहुजन संघर्ष समितीतही कार्य केले. फुले-शाहू-आंबेडकरांच ्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी मागील पन्नास वर्षे केलेले सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा हा सत्कार एक प्रकारे नव्या सामाजिक चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. सूत्रसंचालन पूजा गावंडे आणि पल्लवी वानखडे यांनी केले. आभार डॉ. संतोष यावले यांनी मानले. प्रारंभी अहाना पाटील आणि अधिराज या दोन चिमुकल्यांनी गीत गायन केले. इतर चळवळीतील पुढाऱ्यांचाही सत्कार यावेळी सुरेशराव बोरकर, दिवाकर शंभरकर, बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचे माणिकरावजी गंगावणे, बबलू दुर्गे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सतीश चौधरी, ओमप्रकाश कुटेमाटे या सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. भारत पाटणकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रा. साहेबराव विधळे आणि डॉ. प्रतिभा विधळे यांना मानपत्र व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
वाहनाच्या धडकेत बिबट्याचा तडफडून मृत्यू:बचाव पथक उशिरा पोहोचले, तिवसा जवळ महामार्गावरील घटना
रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची बिबटाच्या बछड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेला हा बछडा घटनास्थळीच दोन ते तीन तास तडफडत राहिला. अखेर वन विभागाच्या शेड्यूल १ बचाव पथकाने घटनास्थळी पोहचून जखमी बिबटावर पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्राथमिक उपचार केले. या बिबट्याला तातडीने नागपूर येथे पाठवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बचाव पथक वेळेवर पोहोचले असते तर बिबट्याच्या बछड्याचे प्राण वाचू शकले असते, अशा प्रतिक्रिया प्राणी मित्रांसह नागरिकांनी व्यक्त केल्या. गुरुवार ९ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट्याचा बछडा जखमेमुळे विव्हळत असलेला काहींना दिसला. महामार्गावर तिवसा शहरापासून १ कि.मी. अंतरावर एक ते सव्वा वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा रस्ता ओलांडत असतांना एका अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. यातच तो गंभीर जखमी स्थितीत रस्त्याच्या बाजूला तो पालापाचोळ्यात उर्वरित, पान ४ जबडा, कंबरेसह पायाला मार कदाचित सकाळी ६ ते ७ वाजता ही घटना घडली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याचा व पालापाचोळ्याचा रंग सारखा असल्याने अनेकांच्या नजरेत प्रथमदर्शनी तो पडला नाही. अखेर कुणाची तरी नजर जखमी बिबटा वर पडली. ही घटना उघडकीस आली. यात बिबट्याच्या जबड्याला व कंबरेसह पायाला जबर मार लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. त्यामुळे होणाऱ्या वेदनेने बिबट्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.
अमेरिका आणि इस्रायलने इराणशी पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही रांगेत उभे राहूनच सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे. कमी-अधिक प्रमाणात भारत, इन्डेन आणि एचपी या तिन्ही प्रकारच्या गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोरचे हे चित्र आहे. संबंधित प्रतिनिधीने आज, गुरुवारी, सकाळच्या सत्रात काही वितरकांच्या कार्यालयांसमोर पाहणी केली. यावेळी काही ग्राहकांनी सिलिंडर मिळण्याआधीच त्यांना डिलीव्हरीचा संदेश आल्याची धक्कादायक माहिती दिली. यावर संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याचे म्हणणे होते की बुकिंग झाल्यानंतर साधारणत: १२ दिवसांत सिलिंडर मिळेल. मात्र काही ग्राहक त्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतरही सिलिंडर मिळालेच नाहीत, अशी तक्रार नोंदवत होते. उर्वरित, पान ४ मला केवायसीसाठी मागितले पैसे ^मी साईनगर भागातील गॅस एजन्सीचा ग्राहक आहे. मला सिलिंडर रिफील करून घ्यायचे आहे. मात्र मी केवायसी केली नाही, असे संबंधित एजन्सीचे म्हणणे आहे. त्यासाठी ३०० रुपयांची मागणी करण्यात आली. माझ्यासमोर एक महिला होती. तिचीही तशीच तक्रार होती. महिलेकडे तेवढीच रक्कम होती. परंतु घरी ये-जा करण्यासाठी पैसे शिल्लक राहायला हवे, म्हणून तिच्याकडून २०० रुपये घेण्यात आले. पैसे नसल्यामुळे मला मात्र परत फिरावे लागले. - संदीप मोरस्कर, म्हाडा कॉलनी, अमरावती. रांगांनी प्रशासनाच्या माहितीला पूर्णपणे खोडून काढले जिल्ह्यात आयओसीचे सर्वाधिक २५, बीपीसीएलचे १७ आणि एचपीसीएलचे १४ गोदाम आहेत. अशाप्रकारे एकूण ५६ गोदामे मिळून दररोज २४ हजार ५७४ सिलिंडर साठवले जातात. एकूण साठवण क्षमता ही रोजच्या वापराच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यकतेएवढे सिलिंडर ग्राहकांना निश्चितच पुरविले जात आहेत. परंतु गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोर कायम असलेल्या रांगांनी प्रशासनाच्या या माहितीला निकषांच्या आधारे खोडून काढले आहे.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी 160 जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण करून हा अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे खरात यांच्या भोवतीचा कायदेशीर फास अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तपासादरम्यान विविध डिजिटल उपकरणांमधून मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली आहे. तीन पेन ड्राइव्हमध्ये 32 जीबी क्षमतेचा डेटा, त्यात 19 स्वतंत्र फोल्डर, तसेच 64 जीबी क्षमतेचा ओटीजी पेन ड्राइव्ह आणि एक लॅपटॉप यांची तपासणी करण्यात आली आहे. या सर्व उपकरणांमधील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बारकाईने तपासली जात आहे. या सर्व मिळून 160 जीबीपेक्षा अधिक डेटा तपास पथकाच्या हाती लागला आहे. या डिजिटल पुराव्यांमध्ये नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील समोर आला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी उघड होत आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याला वेगळे कोडवर्ड दिले असून ‘A’, ‘B’ आणि ‘C’ अशा स्वरूपात त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यापैकी ‘A’ या कोडमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे संकेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात साक्षीदारांचे जबाबही नोंदवले गेले असून, न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित संकलित केले जात आहेत. डिजिटल पुराव्यांमधील माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक बळकट होत आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाचा विस्तार वाढत असून, आणखी नवे पैलू समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान काही गंभीर आरोप मांडण्यात आले. एका प्रकरणात पीडितेला विशिष्ट आश्वासन देत तिला फसवण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तपासासाठी अधिक वेळ देत पोलिस कोठडी मंजूर केली. अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यात एकूणच, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. तपास यंत्रणा आता या सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पूर्णा नदीवर अडीच कोटीतून उभारणार घाट:आ. सावरकरांच्या हस्ते भूमिपूजन
म्हैसांग येथे पूर्णा नदीवर आमदार रणधीर सावरकर यांच्या अडीच कोटी रुपयांच्या विशेष विकास निधीतून घाट उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने पूर्णा नदीवर येतात. पूर्णा नदीवर दशक्रिया, अस्थी विसर्जन आदी विधी सुद्धा पार पडतात. भाविकांच्या मागणीची दखल घेत आ. रणधीर सावरकर यांनी नदीवर घाट उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाविकांची सुविधा होणार आहे. घाट उभारुन हिंदू संस्कृती व परंपरा कायम राखण्यास मदत होणार आहे. धार्मिक परंपरा अविरतपणे सुरू राहावी, यासाठी आ. सावरकर यांनी दिशादर्शक कार्य केले आहे, असे प्रतिपादन सुरेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रशेखर गावंडे, मिलिंद देशमुख, मनोज देशमुख, रुपेश गावंडे, रामकृष्ण साटोटे, विजय देशमुख, अरुण देशमुख, राजेश बेले, अनिल गावंडे, प्रवीण हगवणे, चंदा लव्हाळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारे शिक्षण देण्याच्या उद्देशाने येथील किडझी प्री स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वार्षिक शैक्षणिक सहल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ‘प्रत्यक्ष शिक्षणा’चा अनोखा आणि समृद्ध अनुभव घेता आला. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना शहरातील भाजी बाजार, फळ बाजार, गोशाळा तसेच पोलिस ठाण्याला भेट देण्यात आली. भाजी व फळ बाजारात मुलांनी विविध भाज्या आणि फळांची ओळख करुन घेतली. विक्रेते, ग्राहक आणि व्यवहाराच्या पद्धतीची माहिती घेताना विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. गोशाळेला दिलेल्या भेटीत मुलांनी गायींची देखभाल, त्यांचे महत्त्व आणि प्राण्यांप्रती जिव्हाळ्याबाबत माहिती जाणून घेतली. या अनुभवामुळे त्यांच्या मनात प्राण्यांप्रती प्रेम, संवेदनशीलता वाढीस लागली. दरम्यान, ‘कम्युनिटी हेल्पर्स’ची ओळख करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याची भेट घडवली. येथे ठाणेदार अजित जाधव यांनी उपस्थित राहून मुलांशी संवाद साधला. पोलिसांचे दैनंदिन कामकाज, समाजातील त्यांची भूमिका व जबाबदाऱ्यांबाबत त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. मुलांनीही उत्सुकतेने प्रश्न विचारत या भेटीचा आनंद घेतला. बौद्धिक, सामाजिक विकासास मदत या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे ॲड. अविन अग्रवाल यांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. संपूर्ण सहलीचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका चंचल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी शाळेचे संचालक पियुष भोजगढिया, नितेश अग्रवाल आणि सुमित वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. या सहलीमुळे मुलांच्या चेहऱ्यावर समाधान, आनंदाचे भाव झळकले.
जिल्हा सह. बँक अध्यक्षपदी डॉ. कोरपे, उपाध्यक्षपदी ठाकरे
अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांचे एक- एकच अर्ज आले. त्यामुळे अध्यासी अधिकारी गितेशचंद्र साबळे यांनी अध्यक्षपदी डॉ. जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने जिल्हा बँकेची सत्ता राखत पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. २१ पैकी ११ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक झालेल्या १० जागांवरही सहकार पॅनलनेच बाजी मारली आहे. गुरुवारी झालेल्या सभेत बँकेचे संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे, गोपाल काकड, अजिंक्य राऊत, कल्पना पाचपोर, अरविंद इंगोले, रामेश्वर वाघ, अनिलकुमार जाधव, जावेद खान, हिदायत उल्लाह खान पटेल, डॉ. धीरज देशमुख, उषा हिंगणकर, संदीप खारोडे, अभिषेक तिडके, धनंजय गोरे, शोभा झनक, नितीन जाधव, विश्वनाथ ताथोड, ललीत बहाळे, गीता ठाकरे, अपर्णा धोत्रे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते. निवडणुकीत डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने २१ पैकी १० जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ जागांवरही सहकार पॅनलने वर्चस्व राखले. बँकेवर कोरपे कुटुंबाचे वर्चस्व अकोला वाशीम जिल्हा सहकारी बँकेवर सहकार पॅनलचे १९६५ पासून वर्चस्व आहे. बँकेचे यश व सहकार पॅनलच्या वर्चस्वाचे शिल्पकार हे सहकारमहर्षी डॉ. वामनराव कोरपे मानले जातात. ते १९६५ मध्ये पहिल्यांदा बँकेचे अध्यक्ष झाले व त्यांच्या कार्यकाळात बँकेने प्रगती केली. तो बँकेचा सुवर्णकाळ मानला जातो. अण्णासाहेब कोरपे यांच्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी बँकेचे नेतृत्व सांभाळत वर्चस्व टिकवून ठेवले.
मल्लिकार्जुन अन् पाचपीर देवाच्या यात्रेला सुरुवात:बोरेगांव यात्रेमुळे हिंदू- मुस्लिम समाजात एकोपा
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन व पाचपीर देवाच्या यात्रेस गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी श्री मल्लिकार्जुन देवास रुद्राभिषेक घालण्यात आले. त्यानंतर मूर्तीला १०८ बिल्व अर्पण करण्यात आले आहे. पाचपीर देवास गलिपधारण करण्यात आले आहे. त्यानंतर मज्जलसी हा मुख्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पाचपीर देवास दंडवत घालण्यात येणार आहे. त्यानंतर नैवेद्य अर्पण करण्यात येईल सकाळी ८ वाजता श्री मल्लिकार्जुन देवाची पालखी व काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता हालचिंचोळी येथील श्री माऊली हरिभजन मंडळ व सोलापूर येथील शिवशक्ती भजन मंडळाचे गायक महांतेश घंटे, राजश्री तानवडे, रेणुका हत्ते यांचा भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, रात्री नऊ वाजता स्वरसाधना ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जय हनुमान भजन मंडळ ( आलूर) व गेनसिद्ध पारिजात भजन मंडळ (कुंभारी) यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता जंगी कुस्त्यांचे फड रंगणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल, रात्री ९ वाजता हुट्टीत मगा विषवाद साकु मगा अमृतवाद हे कौटुंबिक कन्नड नाटक सादर करण्यात येणार आहे. तरी बोरेगाव परिसरातील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस गुरुवार दि.१६ एप्रिल रोजी सकाळी श्री गवई स्वामी अभिषेक व रात्री श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे.तर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याचा कार्यक्रम व प्रसादाने सांगता होणार आहे. मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस दि. १६ रोजी सकाळी श्री गवई स्वामी अभिषेक व रात्री श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे. दि. १७ रोजी सकाळी श्रींस तेल लावण्याचा कार्यक्रम व प्रसाद रात्री वसंत पूजा, गाभाऱ्यातील आरती,चंदन उटी व प्रसाद होणार आहे. शनिवार दि. १८ रोजी रात्री वसंत पुजा,गाभान्यातील आरती, चंदन उटी, प्रसाद व नंतर विनायकबुवा मोहोळकर यांचे प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१९ रोजी चंदन उटी, प्रसादानंतर रघुनाथबुवा रचित, सोमनाथबुवा कुर्डे (महाराज) यांचे चक्रीभजन, रात्री १ वा. श्रीक्षेत्र वडवाळहून श्रींच्या छत्रीचे आगमन, पहाटे ४ वा.श्रींची पालखीसह स्वर्गाची सवाद्य मिरवणुक, भाकणूक व प्रसाद होणार आहे. सोमवार दि. २० रोजी रात्री वसंत पुजा बाहेरील आरती चंदन उटी व प्रसाद तर मंगळवार दि.२१ रोजी रात्री वसंत पुजा बाहेरील आरती चंदन उटी व प्रसाद श्री क्षेत्र नागनाथ महाराज यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १७ रोजी रात्री ८ वाजता हभप कृष्णा महाराज जोगदंड कामरखेडा (लातूर) यांचे भारूड कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. २० रोजी रात्री ८ वाजता हभप माऊली महाराज कदम यांचे किर्तन होणार आहे. मंगळवार दि. २१ रोजी भरत शिंदे (बाळासाहेब महाराज) कांबळेश्वर यांचे किर्तन तर शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत शाहीर राजू बाघमारे व बन्सी कांबळे यांचा कलगी तुरा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. २६ रोजी संत नामदेव भजनी मंडळ मोहोळ यांचा हरिजागर होणार आहे. प्रसाद होणार आहे. बुधवार दि.२२ रोजी सकाळी श्री भिकलिंग महाराजांना अभिषेक व रात्री श्रींची सवाद्य मिरवणूक युज्य भक्त श्री भिकलिंग महाराजांची भेट व नयनरम्य शोभेचे दारूकाम होणार आहे.गुरुवार दि.२३ रोजी सकाळी श्रींची महापूजा दुपारी ४ वा. श्रींच्या पालखीची गणांसह सवाद्य मिरवणूक, भाकणूक व प्रसाद होणार आहे. शुक्रवार दि. २४ रोजी कलगी-तुरे, भेदीक गाणी यांचा सामना दु. ४ वा. कुस्त्यांचा फड,महाप्रसाद व सायं. ६ वा. श्रींच्या छत्रीचे वडवळाकडे प्रस्थान होणार आहे.रविवार दि.२६ रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याचा कार्यक्रम व प्रसाद कार्यक्रमाने सांगता होणार आहे. श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे.यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्तासह स्वयंसेवक बंदोबस्त, भाविकांना स्पीकरद्वारे सूचना संदेश, मोटरसायकल पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग, यात्रेकरूंसाठी बैठक व्यवस्था, व्यापारी दुकानासाठी जागा व्यवस्था, जागोजागी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबरोबरच अति आवश्यक सुविधांचे आयोजन करण्याचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. भक्तांसाठी आवश्यक सोयी- सुविधा
अक्कलकोट मानवी जिवाला विसावा देणारं ठिकाण म्हणजे रामनाम असल्याचे निरुपण कल्याण येथील हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी केले. ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेच्या पूर्व रंगात पाचवे पुष्प समर्थ रामदास स्वामींच्या अभंगावर गुंफत निरुपण करताना बोलत होते. कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार हभप गणेश बुवा गाडगीळ व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या कीर्तन सेवेत पुढे निरुपण करताना हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी मनुष्याने आदर्श जीवन सर्वार्थाने कसे जगावे हे शिकवणारे चरित्र म्हणजे राम. विष प्राशन केल्यावर शंकराचा दाह सुद्धा राम नामाने शांत झाला म्हणून आधी तो गावा सगुण उपासना मग त्याचे ध्यान म्हणजेच सगुणाकडून निर्गुणाकडे मार्गक्रमण आणि समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे राम सर्व काम पुरवतो, तो राम असे निरूपण करुन प्रत्येकाने रामनाम घेण्यास आपल्या जीवनात आवर्जून स्थान द्यावे असे निरुपण केले. या कीर्तन सेवेत त्यांना तबल्यावर कोल्हापूरचे तबलावादक डॉ. सचिन कचोटे, संवादिनीवर अक्कलकोटचे प्रा.मयूर स्वामी यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वला सरदेशमुख, संपतराव शिंदे, स्वामीनाथ लोणारी, संजय पाठक यांच्यासह सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. श्री गणेशाच्या आरतीने सेवेची सांगता पुढे कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात कैवल्य पद सुद्धा प्राप्त करून देईल असे ज्यांनी आयुष्यात आधी केले मग सांगितले असे गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज. ‘ज्याचा लवकिक काही नसे ज्याचे घरी पण कुबेर लोळे दारी तो वाटे तेची करी ऐसां नाही पहिला' या श्लोकाचा परिचय देत ज्या राम नामात शक्ती आहे, त्या रामाला शरण जा. तो सर्व इच्छा पूर्ण करतो त्याच्यासाठी राममंदिर स्थापन केले हा कथा भाग घेतला. आजही राम नाम जिथे आपल्या मनाच्या पटलावर गोंदवले जाते ते गोंदवलेकर महाराज सगळ्यांना नाम घेण्याचा आग्रह करतात. तसेच स्वामीचे प्रचलीत वाक्य ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' याचीही विश्लेषण हभप गाडगीळ बुवा यांनी करीत श्री गणेशाच्या आरतीने व श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणाने या नारदीय कीर्तन सेवेची सांगता करण्यात आली.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत मोठी घडामोड समोर आली असून, राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून ‘सरफेसी’ कायद्याअंतर्गत ई-लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून दि. २२ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ई-लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रसिद्ध झालेल्या नोटिसनुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे एनसीडीसीचे तब्बल ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये इतके कर्ज थकीत आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावासाठी काढण्यात आली आहे. या लिलावामध्ये कारखान्याच्या ९५ हेक्टर ७४ आर क्षेत्रातील जमीन, त्यावरील सध्याच्या इमारती तसेच पुढे उभारण्यात येणाऱ्या स्थावर मालमत्तेचाही समावेश करण्यात आला. याशिवाय साखर कारखाना, डिस्टिलरी, को-जनरेशन वीज प्रकल्प, साखर मिल आणि संबंधित यंत्रसामग्री देखील लिलाव प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली. सध्या आदिनाथ कारखाना करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यात असल्याने या नोटीसीमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. कारखान्याचे भवितव्य काय होणार, याकडे आता शेतकरी, सभासद आणि कामगारांचे लक्ष लागले असून, अनेक शेतकरी व सभासदांनी कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ^आदिनाथ कारखान्याबाबत आलेली ई-लिलाव नोटीस ही बँकेची नियमित प्रक्रिया असून प्रत्यक्ष लिलाव होणार नाही. यापूर्वीही अशाच प्रकारची नोटीस आली होती. यावेळीही चेअरमन, संचालक मंडळ व प्रशासनाच्या संमतीने संबंधित नोटीसला योग्य उत्तर दिले जाणार असून सदर लिलाव प्रक्रिया स्थगित केली जाईल. सर्जेराव राऊत, प्रभारी कार्यकारी संचालक, (आदिनाथ सह. कारखाना.) ^स्व. कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी आदिनाथ कारखाना सुरू होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यांच्याच पुत्रांच्या अध्यक्षतेत कारखान्यावर दोनदा लिलावाची नोटीस येणे दुर्दैवी आहे. निवडणुकीत सोन्याचा धूर काढण्याची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात साधा बगॅसचाही धूर निघाला नाही. नारायण पाटील हे निष्क्रिय चेअरमन ठरले आहेत. सुभाष गुळवे, उपाध्यक्ष, बारामती ॲग्रो कारखाना.
प्रशासन सतर्क:चुर्मापुरीतील पुतळे कारखाना अतिक्रमण काढणार, विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा
मोडनिंब येथील दोन्ही महापुरुषांचे पुतळे ग्रामस्थांनी स्वखुशीने गुरुवारी सायंकाळी सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान पुतळे उभा करणारा कोठडीतील मास्टरमाइंड बाळराजे आवारे पाटील याचा चुर्मापुरी (ता.अबंड, जि.जालना) येथील पुतळा तयार करण्याच्या कारखान्याचे अतिक्रमण करुन थाटलेले पत्राशेड हटवण्याचे आदेश तेथील प्रांताधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत. महापुरुषांचे पुतळे विना परवानगी रातोरात उभे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने माढा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गुरुवारी माढा पोलिस ठाण्यात बैठक घेऊन विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा खावी लागेल, असा सज्जड दमच माढा पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी व सपोनि रोहित शिंदे यांनी दिला. या बैठकीसाठी पृथ्वीराज सावंत, दादासाहेब साठे, पीएसआय महम्मद शेख, दिनेश जगदाळे, रवी सरवदे, सुधीर लंकेश्वर, अमर लंकेश्वर, शहाजी ढावरे, शंभूराजे साठे, किरण पवार, नगरसेवक अरुण कदम, बाबा मस्के अरविंद खरात आदी उपस्थित होते. सपोनि रोहित शिंदे यांनी सामाजिक सलोखा बिघडेल किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये अशा सक्त सूचना दिल्या. सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चुर्मापुरीच्या कारखान्यात विविध महापुरुषांचे पुतळे अस्ताव्यस्त पडलेले असून ते निकृष्ट दर्जाचे असल्याची शक्यता आहे. आगामी काळात विविध महापुरुषांच्या जयंती, उत्सव साजरे होणार असून या कालावधीत हे अनधिकृत पुतळे विना परवानगी कोणत्याही ठिकाणी बसवले जाण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी भोकरदन, बुलढाणा व सोलापुरात अनधिकृत पुतळे स्थापनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ते उभे करावेत. महापुरुषांना जातीच्या बंधनात आपण कोणीही अडकवू नये. या पुतळ्यामुळे सामाजिक समता धोक्यात येईल असे वर्तन कोणीही करू नये. आवारे पाटलाविरुद्ध महाराष्ट्रभरात गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल असून १७ फेब्रुवारी रोजी माजलगाव (जि. बीड) येथे झालेल्या शिवस्मारक यात्रेच्या समारोप कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करून महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी कोणत्याही प्रशासनाची परवानगी घेणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच जर पोलिसांनी याला विरोध केला तर पोलिसांची वर्दी बाजूला ठेवून फटके दिले जातील' अशी धमकी देऊन पोलिस प्रशासनाला थेट आव्हान दिले होते. दरम्यान, आवारे पाटलाच्या अनधिकृत व बेकायदेशीर कृती आणि चिथावणीखोर वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले. इतिहासाशी केलेली छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी महासंघाने दिला. शालेय पुस्तकांत मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत आणि स्पष्ट स्वरूपात द्यावा. डिजिटल माध्यमांद्वारे (QR कोड) नकाशाची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी. अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाद्वारे समजणे आवश्यक असताना तो वगळणे ही अस्मितेशी तडजोड आहे, अशी भावना महासंघाने व्यक्त केली. शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी दिला. या प्रसंगी शिवाजीराव मोरे, हनुमंत कदम, सचिन गंगथडे, वैभव चव्हाण यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बदलत्या काळातील उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी श्री मैड क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ‘प्री-वेडिंग फोटोशूट’वर बंदी आणि जेवणातील पदार्थांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचे ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. पुणे येथे सात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी उर्वरित पान ४ अनावश्यक खर्च टाळावा या बैठकीत लग्नाशी संबंधित दोन मुख्य विषयांवर चर्चा झाली. सध्याच्या काळात वाढत असलेले ‘प्री-वेडिंग फोटोशूट’ टाळावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे. तसेच, लग्नामध्ये प्रतिष्ठेपायी अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी ५० हून अधिक पदार्थ करण्याऐवजी कमीत कमी आणि मोजकेच पदार्थ करावेत, असा ठराव झाला. समाजाचा विकास होईल ^ समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करणे ही काळाची गरज आहे. बहुतांश लग्नसमारंभात वारेमाप खर्च केला जातो. परिस्थिती नसलेल्यांना त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येते. त्यामुळे लग्नातील दिखावा कमी करून आपण जर त्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला, तर समाजाचा खरा विकास होईल. - गोपालजी वर्मा, अध्यक्ष, युवा मंच
तालुक्यातील आठवड येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने पायी आणलेल्या जलाने म्हसोबा महाराज मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. कावड यात्रेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महापूजा करण्यात आली. भाविकांनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री ८ वाजता म्हसोबा महाराज पालखी छबीना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री ११ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. ८ एप्रिलला १० ते १२ या वेळेत कलाकारांची हजेरी कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांसाठी वांगे-भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी ३ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजित करण्यात आला होता. यात अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटूंनी हजेरी लावली. पंच म्हणून अतुल लगड, अशोक चोभे, बापूसाहेब गुंजाळ, भगवान लगड, बाळासाहेब लोखंडे, विष्णू घाणमोडे यांनी काम पाहिले. विजेत्या मल्लांना बक्षीसे वाटप नियोजन उपसरपंच शंकर मोरे, माजी उपसरपंच तुकाराम दाताळ, बापूराव चोभे, अक्षय लगड यांनी पार पाडले. रात्री ९ वाजता होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्घाटन मागील वर्षीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त प्रिती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील महिला आणि यात्रेसाठी उपस्थित पाहुण्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील काही दात्यांनी या कार्यक्रमात विजेत्यांना दिलेल्या गृहोपयोगी वस्तू बक्षिसाचे प्रायोजकत्व करून सहकार्य केले. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच बी. एस. लगड यांनी केले. यावर्षी या कार्यक्रमात आश्लेषा कोरडे यांनी विजेतेपद पटकवले. यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमेटीने परिश्रम घेताले. दोन्ही दिवस यात्रा शांततेत पार पडावी यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे चिचोंडी पाटील बीटचे पोलिस हवालदार शैलेश सरोदे आणि पोलिस हवालदार महेश भवर यांना बंदोबस्त ठेवला. यावेळी नगर जिल्ह्यातील भाविकांनीही ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गावात मोठी गर्दी केली होती. यात्रा उत्सवामुळे गावात नवचैतन्य उत्सवामुळे गावात नवचैतन्य आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्येही वेगळाच उत्साह जाणवत होता. या यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य केले. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आठवड गाव भाविकांच्या गर्दीने गजबजले होते.
श्रीरामनवमी आणि उरूस उत्सवाच्या काळात पाणीवापर वाढल्याने श्रीरामपूर शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले होते. साठवण तलावात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पालिकेची धाकधूक वाढली होती. मात्र, नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाटबंधारे विभागाची ३ कोटींची थकबाकी भरल्याने गुरुवारी सायंकाळी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार आहे. यामुळे शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सुटलेले पाणी ओझरपर्यंत नदीपात्रातून आणि तिथून कालव्याद्वारे श्रीरामपूरला पोहोचते. उन्हाळ्यामुळे हे पाणी शहरात पोहोचायला किमान तीन दिवस लागतील. सुरुवातीचे गढूळ पाणी सोडून द्यावे लागत असल्याने प्रत्यक्ष साठा होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाची मोठी कसरत होणार आहे. पूर्वी शेती आणि पिण्यासाठी एकत्रित आवर्तन सुटत असे. मात्र, राजकीय वजन वापरून नेत्यांनी ही आवर्तने स्वतंत्र करून घेतली. परिणामी पाण्याचा अपव्यय वाढला असून ४५ दिवसांच्या आवर्तन चक्रामुळे साठवणुकीवर ताण येत आहे. नगरपालिका दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी पुरवठा करीत आहे.सध्या एकच साठवण तलाव वापरात असल्याने जानेवारी फेब्रुवारी पर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. त्यानंतर सण उत्सव, यात्रा आणि उन्हाळा लक्षात घेता रोज पाणी पुरवठा केला जात होता. मिल्लतनगर तलावाचे काम सुरू असल्याने सध्या शहर एकाच तलावावर अवलंबून आहे. जोपर्यंत नवीन आवर्तनाचे पाणी तलावात पडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. पाणी साठवणुकीचे गणित शहराला दररोज २ कोटी लिटर पाणी लागते, गोंधवणी येथील सिमेंट तलावात ३७५ दशलक्ष लिटर क्षमता, मिल्लतनगर येथील मातीच्या तलावाचे खोलीकरण व अस्तरीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहराची साठवण क्षमता १ हजार दशलक्ष लिटरवर जाईल. दोन-तीन दिवसांत श्रीरामपूर शहरात पाणी येईल ^आम्ही पदभार स्वीकारताच पाटबंधारे विभागाचे ३ कोटी रुपये भरले आहेत. सध्या पालिकेची थकबाकी केवळ २ कोटी १ लाख असून, अतिरिक्त ९९ लाख रुपये आपल्याला परत मिळणार आहेत. गुरुवारी सायंकाळी आवर्तन सुटणार असून दोन-तीन दिवसात पाणी शहरात येईल. - करण ससाणे, नगराध्यक्ष, श्रीरामपूर.
राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली. या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आणि लोकसहभागाचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अशा प्रकारचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेला चालना मिळते. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक संस्था आहेत. शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार विनीत धसाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या यशोगाथेवर प्रकाश टाकला. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता टिकून असल्याचे सांगत, त्यांनी पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वर्षभरात विविध उपक्रमांत चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात आले. पुणे येथील उद्योजक शंकर मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्हे उपलब्ध करून दिल्याबद्दल, युवा उद्योजक ऋषिकेश मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, लावणी आणि कोळीगीतांवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या सोहळ्याला माजी मुख्याध्यापिका वंदना कांडेकर, प्रभूजी बाचकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, माजी अध्यक्ष भास्कर पेरणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, निसार सय्यद, शिवाजी खडके, स्वाती धसाळ, अश्विनी चव्हाण, विक्रम पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, अशोक तोडमल, रेवन्नाथ खडके यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि महिला उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका संगीता बेदरे आणि शिक्षक रमेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.
जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते, हे पारनेर तालुक्यातील कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. ६० व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत रौप्यपदक पटकावून पारनेर महाविद्यालयाच्या साक्षी भंडारी हिने थेट जपानमध्ये होणाऱ्या 'एशियन क्रॉस कंट्री' स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे. तालुक्यातील अळकुटी येथील मोलमजुरी करणाऱ्या आईची लेक आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीवर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे. वडील पक्षघाताने विकलांग, मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढणारी आई.धावण्यासाठी अद्ययावत बुटांची आणि आधुनिक मैदानाची सोय नाही.अश्या सर्व प्रतिकुलतेवर मात राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत यश मिळवले आहे.इच्छाशक्ती प्रबळ असली की गरिबी आणि प्रतिकूल परिस्थिती यशाच्या आड येत नाही अळकुटी सारख्या छोट्या गावातील साक्षी भंडारीने अधोरेखित केले आहे. साक्षीचे वडील अर्धांगवायूचा आजार असल्याने कुटुंबाचा संपूर्ण डोलारा तिच्या आईवर आहे. आई मोलमजुरी करून घराचा गाडा ओढते. अशा खडतर परिस्थितीत साक्षीने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांभाळत, वडिलांची सेवा करत आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आपला धावण्याचा सराव अविरत सुरू ठेवला. साक्षीची मोठी बहीण शितल हिने शालेय जीवनात धावण्याच्या स्पर्धेत मिळविलेले यश साक्षीसाठी प्रेरणादायी ठरले. गावात सुसज्ज मैदानाची कोणतीही सुविधा नसताना साक्षीने आळकुटीच्या मोकळ्या माळरानावर सराव सुरू केला. या प्रवासात तिला प्रशिक्षक श्रीराम आवारी यांचे मार्गदर्शन लाभले.चालू शैक्षणिक वर्षात साक्षीने पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात' प्रथम वर्ष कला शाखेत प्रवेश घेतला.तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांचे प्रोत्साहन आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संजय गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या दर्जेदार क्रीडा सुविधांमुळे तिचा सराव अधिक शास्त्रीय आणि योग्य पद्धतीने होऊ लागला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून साक्षीने एकूण आठ स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यात दोन सुवर्णपदके तर सहा रौप्यपदकांची कमाई तिने केली आहे. साक्षीची मोठी बहीण भाग्यश्री भंडारी ही पारनेर महाविद्यालयाच्या मराठी विभागाची माजी विद्यार्थिनी आहे. तिनेही राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील धावण्याच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. बहिणींचा हाच वारसा साक्षीने समर्थपणे पुढे नेला आहे. सध्या प्रथम वर्ष कला शाखेत शिक्षण घेत असलेल्या साक्षीने आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा डौलाने फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तिच्या या जपानवारीसाठी संपूर्ण तालुक्यातून आणि क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पन्नासहून अधिक स्पर्धांत सहभाग साक्षीने आजपर्यंत पन्नासहून अधिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला यातील राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तिने तीस पदकांची कमाई केली तर राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग घेऊन दहा पदके प्राप्त केली आहेत.
पारनेर बाजार समिती सभापतिपदी बेलकर:उपसभापतिपदी संदीप सालके बिनविरोध
पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर तर उपसभापतिपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाली.मावळते सभापती किसनराव रासकर आणि उपसभापती किसनराव सुपेकर यांनी आपले राजीनामे दिल्याने, गुरुवारी (९ एप्रिल) पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजार समितीच्या सभागृहात, सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत सभापती, उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.यावेळी सभापती पदासाठी गंगाराम बेलकर तर उपसभापती पदासाठी संदिप सालके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने,अध्यासी अधिकारी विकास जाधव यांनी बेलकर व सालके यांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवड झाल्यानंतर खासदार लंके समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात फटाके, शोभेच्या दारूची आतषबाजी केली.गुलाल उधळत जल्लोष केला. माजी सभापती बाबासाहेब तरटे, किसनराव रासकर, किसन सुपेकर, बापूसाहेब शिर्के,रा. या. औटी, विजय पवार,डॉ.आबासाहेब खोडदे, अशोक कटारिया,चंदन भळगट,मेघा रोकडे,शंकर नगरे,पद्मजा पठारे, बाबासाहेब न-हे,तुकाराम चव्हाण, सचिव सुरेश आढाव बैठकीला उपस्थित होते.
दिंडोरी तहसील कार्यालयातील रोजगार हमी योजना (रोहयो) विभागाची इमारत अत्यंत जर्जर झाली असून, छताचे प्लास्टरला भगदाड पडले आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि कामासाठी येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. इमारतीची पडझड सुरू असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कार्यालयाच्या छताचे सिलिंग अनेक ठिकाणी निखळले असून, पावसाळ्यात पाणी गळतीमुळे महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणक संच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील हजारो मजुरांचे मस्टर्स, पगार आणि नवीन कामांचे नियोजन याच कार्यालयातून चालते. मात्र, जागेअभावी बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही. इमारतीचे खांब कमकुवत झाले असून, भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे कर्मचारी सतत भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातून मजूर आणि ग्रामस्थ आपल्या तक्रारी किंवा कामांच्या मंजुरीसाठी या कार्यालयात येतात. इमारतीच्या धोकादायक अवस्थेमुळे कार्यालयात थांबणेही त्यांना असुरक्षित वाटते. विशेषतः पावसाळ्यात येथील परिस्थिती अधिकच गंभीर होते. प्रशासनाकडून या इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन जागेत स्थलांतर करण्याबाबत ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. एखादी मोठी जीवितहानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. या महत्त्वाच्या विभागासाठी तातडीने सुरक्षित इमारत उपलब्ध करून द्यावी किंवा सध्याच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शासनाकडून मजुरांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात, मात्र ज्या कार्यालयातून या योजनांचे नियोजन होते, त्याच कार्यालयाची अशी अवस्था असणे दुर्दैवी आहे. या कार्यालयाची दुरुस्ती करावी आणि तुटलेल्या फरशा बदलून द्याव्यात. - आप्पा वाटणे, तालुका सेक्रेटरी माकप नवीन तहसील कार्यालय अंतिम टप्प्यात असून, त्या ठिकाणी फर्निचरचे काम सुरु आहे. या ठिकाणी खर्च करता येत नाही. रोजगार हमी योजनेच्या कार्यालयासाठी दुसरीकडे जागा उपलब्ध करून दिली जाईल. - मुकेश कांबळे, तहसीलदार दिंडोरी
नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील चापडगाव निसर्ग पर्यटन संकुल येथे पार पडला. यावेळी वन संवर्धन कार्यात योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ञ, लेखक आणि पर्यावरण अभ्यासक प्राचार्य डॉ. किशीर पवार, वन विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवासे, सहाय्यक वन संरक्षक हेमंत उबाळे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यात १७० बिबट्यांना रेस्क्यू करणारे लेपर्डमन हे वन विभागाच्या सेवेतून निवृत्त झाल्या बद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वन परिक्षेत्र अधिकारी बढती मिळाल्याबद्दल अशोक काळे, शासनाचे सुवर्ण पदक जाहीर झाल्या बद्दल वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, सहाय्यक वन संरक्षक भगवान ढाकरे हे निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘पक्षी’ या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी डॉ. योगेश महाले आणि नगरसेविका डॉ. पूनम महाले यांचे सहकार्य लाभले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. आनंद बोरा यांनी केले. या स्पर्धेत पहिली ते सातवी गटात प्रथम पारितोषिक दिव्या गीते, द्वितीय हर्षदा महाले, तृतीय सिद्धी कासार तर उत्तेजनार्थ पारितोषिक संस्कृती मुरकुटे, वैष्णवी कुरणे, आराध्या सोनवणे यांना तसेच मोठ्या गटात प्रथम पारितोषिक आरोही माने, द्वितीय तनुजा मांडलिक, तृतीय संस्कृती ठोंबरे, तर उत्तेजनार्थ पारितोषिक विभुती मुरकुटे, आदिती गुंजाळ, समृद्धी सोनवणे, प्रांजळ शेळके या विद्यार्थ्यांनी पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
पुणे विद्यापीठ कुलगुरूंचा राजीनामा घेण्यात यावा:इगतपुरी येथे भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक आणि प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या राजीनाम्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी तहसीलदार अभिजित बारवकर यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. गेल्या दोन-तीन वर्षांपासून विद्यापीठातील कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि निकाल या महत्त्वाच्या घटकांमध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्या असून, विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक पदांवर प्रभारी अधिकारी नेमल्यामुळे नियोजनाचा अभाव असून, सीएएस आणि पीएच.डी. संबंधित प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थी हिताच्या प्रश्नांऐवजी कुलगुरू राजकारण आणि दबाव तंत्राचा वापर करत असून, सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिल सदस्यांच्या कुटुंबियांची सोशल मीडियावर बदनामी होत असल्याचा प्रकारही निषेधार्ह असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी भाजपच्या जिल्हा सरचिटणीस पल्लवी शिंदे, प्रफुल्ल कुमट, अण्णासाहेब डोंगरे, अरुण शेलार, महेंद्र कुवर, दिपा रॉय, प्रतिभा काळे आदी उपस्थित होते.
शरद पवार गटाला धक्का:फुलंब्री पं. स. उपसभापतींचा भाजपत प्रवेश
तालुक्याच्या राजकारणात गुरुवारी मोठी उलथापालथ झाली. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पंचायत समिती निवडणूक लढवलेल्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे यांनी समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. खामगाव येथे माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. खामगावला भाजपतर्फे नवनिर्वाचित पं.स. सदस्य, सभापती, उपसभापती यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या वेळी जि.प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, गोपाल वाघ, निखिल चव्हाण उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जि.प. सदस्य गंगाधर पाटील सोनवणे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. आता सासरे आणि सून दोघेही भाजपत गेल्याने तालुक्यात काँग्रेसला धक्का बसला. काँग्रेससमोर मोठे आव्हान तालुक्यात ५१ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला बसलेला हा धक्का आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
खंडाळ्यामध्ये जनता दरबार:घरकुल, शेततळ्यांच्या तक्रारी
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील आरोग्य उपकेंद्रात गुरुवारी (दि. ९) जनता दरबार झाला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. गाव पातळीवरील सांडपाणी व्यवस्थापन, घरकुल, शेततळे, गायगोठे, रस्ते, पाणी, वीज, विकासकामे अशा तक्रारी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, तक्रारींचे त्वरित निवारण व्हावे, या उद्देशाने दरबार घेण्यात आला. नागरिकांनी समस्या मांडल्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले. महावितरण विभाग, पशुवैद्यकीय विभाग, रोजगार हमी योजना यांच्याशी संबंधित तक्रारी पुढील महिन्यात होणाऱ्या जनता दरबारापर्यंत मार्गी लागणे आवश्यक असल्याचे संजय निकम यांनी सांगितले. तक्रारी मार्गी लागल्या नाहीत तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य हुसेन शेख, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश शिंदे, विस्ताराधिकारी राठोड, विलास पवार, बाबाराव थोरात, ग्रामपंचायत अधिकारी भीमराज दाने, दस्तगीर शेख आदी उपस्थित होते.संजय निकम यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट दिली. कर्मचारी, आशा सेविका यांची सविस्तर माहिती घेतली.
पैठणच्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. दररोज १०० पेक्षा अधिक हायवांद्वारे सुमारे १ हजार ब्रास वाळू काढली जात असल्याची बाब समोर आली आहे. बेसुमार उपशामुळे नदीपात्राचा नैसर्गिक समतोल बिघडत असून, पर्यावरणप्रेमींनी तातडीने लगाम घालण्याची मागणी केली आहे. पाटेगाव येथे एकाच वाळूपट्याचा लिलाव झालेला आहे. इतर ठिकाणी २४ तास अवैध उपसा सुरू असल्याचे सांगितले जाते. हिरडपुरी, आपेगाव, मायगाव, नायगाव, कुरणपिंप्री, तुळजापूर, टाकळी अंबड, मुंगी येथे बेसुमार अवैध वाळू उपसा होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एकाच वाळूपट्याला अधिकृत परवानगी दिल्याचे सांगितले जाते. त्याच नावाखाली सर्वत्र उपसा सुरू झाल्याचा आरोप आहे. यामुळे दररोज सुमारे १०० वाहनांद्वारे १० हजारांहून अधिक ब्रास वाळूची वाहतूक होत असल्याचेही सांगितले जाते. हिरडपुरी, तुळजापूर, आपेगाव, कावसान येथून १०० पेक्षा अधिक जड वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा सुरू असल्याचेही नमूद केले जाते. केवळ या महिन्यांत दहा हजार ब्रास वाळू काढली गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंत्रांचा वापर वाढल्याने मजुरांवर परिणाम झाला आहे. पूर्वी हजारो नागरिकांना मिळणारा रोजगार कमी झाल्याचे सांगितले जाते. नियमांनुसार एका वाहनात २ ते ३ ब्रास वाळू असणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ५ ते ७ ब्रास वाळू भरली जात असल्याचेही समोर आले आहे. अवैध वाळूवर कारवाई करू शहरासह तालुका हद्दीतील गोदावरीतून अवैध वाळूचा उपसा होत असेल तर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली.
राज्यात स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि अवैध गर्भपाताच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार अत्यंत कठोर पावले उचलत आहे. यापुढे अवैध गर्भपातासारखे गंभीर गुन्हे वारंवार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध आणि रुग्णालयांविरुद्ध (‘संघटित गुन्हेगारीचे केंद्र’) म्हणून मकोका अंतर्गत कारवाई करणार आहे. या संदर्भात कायद्यात सुधारणा करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. मराठवाडा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अवैध गर्भपाताच्या घटना घडल्या. या प्रकरणांमध्ये आरोपी कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन सुटतात. ते पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करतात. ही बाब गंभीर असल्याचे आबिटकर यांनी सांगितले. ही गंभीर बाब रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय आमदारांशी चर्चा झाली. त्यानंतर बैठकही घेण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य आणि शिक्षेची तरतूद वाढवण्यासाठी विधी व न्याय विभागाची परवानगी आवश्यक होती. गर्भपातप्रकरणी सध्या कोणते कलम लागते? सध्या अवैध गर्भपात आणि स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणांत प्रामुख्याने पीसीपीएनडीटी कायदा (१९९४): गर्भधारणापूर्व आणि प्रसूतिपूर्व निदान तंत्र कायदा. याअंतर्गत लिंगनिदान करणे हा गुन्हा आहे. एमटीपी कायदा (१९७१): वैद्यकीय गर्भपात कायदा. यानुसार विनापरवाना किंवा चुकीच्या पद्धतीने गर्भपात केल्यास कारवाई होते. भारतीय दंड संहितेच्या कलम ३१२ ते ३१५ नुसार (गर्भवती स्त्रीचा गर्भपात करणे, जीवितास धोका निर्माण करणे) कारवाई केली जाते. पळवाट : यातील बहुतांश गुन्ह्यांमध्ये कमी शिक्षा आहे. जामिनाची तरतूद आहे. त्यामुळे आरोपी कायदेशीर पळवाटा शोधून लवकर बाहेर येतात. काय आहे मकोका? : मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट, १९९९). हा राज्याचा अत्यंत कडक कायदा आहे. तो मुळात संघटित गुन्हेगारी, टोळ्या, दहशतवादी कारवाया मोडून काढण्यासाठी तयार करण्यात आला आहे. संयुक्त कारवाईचे आदेश बीड आणि मराठवाड्याच्या काही भागांत अशा घटना अधिक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि आरोग्य विभागाच्या पथकाला सामूहिक सूचना दिल्या आहेत. संशयास्पद केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी वाढवून कडक देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे आबिटकर यांनी सांगितले. मकोकामुळे गर्भपात रॅकेटचा मुळासकट नायनाट होईल सोनोग्राफी करणारे, बोगस डॉक्टर, एजंट यांची मोठी संघटित साखळी कार्यरत असते. सध्याच्या कायद्यांत जामिनाच्या पळवाटा असल्याने आरोपी लवकर सुटतात. त्यामुळे याला संघटित गुन्हेगारी मानून थेट मकोका लावल्यास या गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल.- डॉ. नागनाथ कोडे (सेवानिवृत्त सहा.आयुक्त) तर नोंदणी होणार रद्द जे दवाखाने किंवा हॉस्पिटल्स वारंवार अशा प्रकारची अवैध कृत्ये करत आहेत, त्यांचे रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशा रुग्णालयांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही. अशांची नोंदणीच तत्काळ रद्दचे आदेश आहेत. पुढील अधिवेशनापर्यंत निर्णय अपेक्षित स्त्रीभ्रूणहत्येसंदर्भात दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल करावे लागणार आहेत. यासाठी विधी व न्याय विभागाकडून माहिती मागवण्यात येईल. त्यानंतर जवळपास पुढील अधिवेशनापर्यंत या प्रकरणात ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आहे, परंतु तोपर्यंत काय, हा प्रश्न कायम राहतो.
‘नीट’ची (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) तयारी करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले. हा प्रकार २०२३ ते एप्रिल २०२६ दरम्यान घडला. या प्रकरणी जयदत्त जगन्नाथ चोरगे (२४, रा. कोल्हे होड, ता. गेवराई, जि. बीड) याच्यावर बुधवारी (८ एप्रिल) जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी जालना जिल्ह्यातील असून, ती शहरात ‘नीट’ची तयारी करत आहे. जून २०२३ मध्ये तिची ओळख जयदत्तशी झाली. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. २८ जून २०२३ रोजी मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला. त्यानंतर १ मार्च २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात ते शिवाजीनगर आणि बीड बायपास परिसरात ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. याच काळात जयदत्त इतर मुलींच्या संपर्कात असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने जाब विचारला असता, त्याने तिला मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करत आहेत. सोने विकून दिले पैसे जानेवारी २०२६ मध्ये जयदत्तला एम.कॉम.च्या प्रवेशासाठी पैशांची गरज होती. त्या वेळी तरुणीने सोने मोडून ८० हजार रुपये त्याला दिले. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी लग्नासंदर्भात दोन्ही कुटुंबांची शहागड येथे बैठक झाली. मात्र, जयदत्तच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. तरीही जयदत्तने आपण लग्न करणारच असल्याचे खोटे आश्वासन तरुणीला दिले.
शेतकऱ्यांच्या नावावर ॲग्रो कंपन्या उभा करायच्या आणि त्यातून कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार करून पैसा काळ्याचा पांढरा करायचा, असा फंडा भोंदू अशोक खरातने सुरू केला होता. ‘मला संचालक करा, भराभराट होईल’ असे भविष्य सांगत हा भोंदू खरात काळा पैसा रिचवत होता. खरातने कागदावर दाखवलेल्या व्यंकटेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या जागेवर‘दिव्य मराठी’ने प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथे वांग्याची शेती आढळली. ४ वर्षांत अशा ६ कंपन्या अशोक खरात व पत्नी कल्पनाने उभ्या करून माया जमवली. ७० कोटींच्या खरेदीवर ७० कोटींचीच विक्री दाखवून या कंपनीने गणिताचे सर्व नियम धाब्यावर बसवले. २०२२-२३ मध्ये कंपनीच्या खात्यात जेमतेम ६२ हजार रुपये होते. २०२४ अखेर याच खात्यात ६ कोटी ७३ लाखांची रक्कम दाखवण्यात आली. कंपन्यांच्या व्यवहारात पारदर्शकता राहावी म्हणून सरकारने ‘ऑडिट ट्रेल’ अनिवार्य केले आहे. कुणी काय बदल केला, हे यात पकडले जाते. मात्र खरातच्या कंपनीने ते बंद ठेवले. ऑडिटवेळी सीएने ही बाबदेखील समोर आणली होती. ‘ऑडिटर ट्रेल’ बंद करून गैरव्यवहार ऑडिटरने रिपोर्टमध्ये लिहिले की, कंपनीने ऑडिट ट्रेल हे फीचर सुरू केले नाही. व्यवहाराच्या शेवटी स्टॉक शून्य दाखवण्यात आला, त्यातून बोगस खरेदी-विक्री झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. म्हणजे मागील तारखेत जाऊन हव्या तशा नोंदी बदलता याव्यात, म्हणूनच हा खटाटोप का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४ महिन्यांत ईशान्येश्वर कंपनी त्यानंतर चारच महिन्यांत १० डिसेंबर २०२१ ला ईशान्येश्वर फार्मर प्रोड्यंसर कंपनी स्थापन केली. त्यात असलेले नामदेव आव्हाड, नागेश शेळके हेच मुहूर्त, नवसपूर्तीचे संचालक होते. फेब्रुवारीमध्ये गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाल्यावर या संचालकांनी राजीनामे दिले. आशीर्वाद म्हणून केले संचालक व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी सौरभ बरकेने १२ जुलै २०२१ ला स्थापन केली. दर्शनाच्या निमित्ताने आपली खरातशी ओळख झाल्याचे बरके म्हणाले. मला संचालक म्हणून घ्या, तुमच्या कंपनीची भरभराट होईल, असे खरात म्हणाल्याने त्याला संचालक म्हणून घेतले. दैवी शक्तीचा बनाव करून १६ एकर जमीन हडपली; खरातवर सिन्नरमध्ये १७ वा गुन्हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील १६.५० एकर जमीन पूजाविधी आणि संमोहनाद्वारे लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विश्वास संपादन करून त्यांना “तुमच्या कुटुंबावर संकट आहे” अशी भीती घातली आणि लाखो रुपयांची जमीन कवडीमोल भावाने स्वतःच्या नावे करून घेतली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात भोंदू कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, त्याची पत्नी कल्पना खरात (दोन्ही रा. कहांडळवाडी) यांच्यासह २ ते ३ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. शिर्डीतील साईबाबा संस्थानचे कर्मचारी दिवटे आत्महत्या प्रकरणी फेरतपासाची मागणी शिर्डी | शिर्डीतील साईबाबा संस्थानचे कर्मचारी विकास रामदास दिवटे यांच्या २०२२ मधील आत्महत्या प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. सुसाइड नोटमध्ये नाव असतानाही ‘क्लीन चिट’ मिळवणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्याविरोधात आता फेरतपासाची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात दिवटे यांच्या भावाने राहाता न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही दोन्ही बाजू ऐकून घेत हा अर्ज स्वीकृत केल्याने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ७ महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार; तिसऱ्या गुन्ह्यात १३ पर्यंत पोलिस कोठडी भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सलग चौथ्यांदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस कोठडीच्या मागणीसाठी त्यावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. खरात याने पीडिता ही सात महिन्यांची गरोदर असताना, “ही पूजा केली नाही तर तुझा गर्भ राहणार नाही” असा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. सिन्नर तालुक्यातील दोडी बु. येथील हे वांग्याचे शेत. खरातच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या ईशान्येश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या नोंदणीकृत पत्त्यावर हे लोकेशन दाखवण्यात आले. याचप्रमाणे खरातशी संबंधित खालील फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या लोकेशनवरही काहीही आढळले नाही.
मुंबईच्या दिंडोशीतील संतोषनगरमध्ये ३ एप्रिल रोजी देवीच्या पालखी यात्रेवर ड्रग माफिया सबू शेख, सोहेल शेख व काही जणांनी दगडफेक केली. या प्रकरणी ११ जणांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशावरून मुंबई मनपाने ‘अॅक्शन मोड’मध्ये येत ड्रग माफियांच्या सुमारे ३ हजार चौरस फुटांच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवून ते दीड तासात जमीनदोस्त केले. मुंबईत अशा प्रकारे कारवाईची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी मार्च २०२५मध्ये नागपुरात मुख्य दंगलखोर फहीम खानचे बांधकाम मनपाने पाडले होते. ३ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दिंडोशीत देवीच्या पालखीवर दगडफेक झाली होती. त्यात भाविक व पोलिस जखमी झाले. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार सबु शेख कोठडीत असून त्याच्या संपत्तीची चौकशी ईडी, अमली पदार्थ विरोधी पथकाकडूनही होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आक्रमक, उद्धवसेनेचा पाठिंबा दिंडोशी येथे उद्धवसेनेचे सुनील प्रभू आमदार आहेत. सूत्रांनुसार केरळ प्रचार दौऱ्यावरून परतल्यावर मुख्यमंत्र्यांनी दगडफेकीच्या घटनेचा आढावा घेत मनपाला कारवाईचे आदेश दिले. मुस्लिम मतांवर डोळा ठेवून कारवाईवेळी उद्धवसेनेकडून काही प्रमाणात विरोध होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात आमदार प्रभूंनी प्रशासनावर टीका करत कारवाईला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, मी अडीच-तीन वर्षांपासून विधानसभेत येथील ड्रग्ज विक्रीबाबत आवाज उठवत आहे. येथे कारवाईसाठी पोलिस आयुक्तांना लेखी पत्रेही दिली होती.
देशातील वीज वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने ‘मीटरिंग नियमावली २०२६’ लागू केली. त्यानुसार १ एप्रिल २०२६ पासून देशभरात प्रत्येक घरात ‘स्मार्ट प्री-पेड मीटर’ बसवणे बंधनकारक केले आहे. यामुळे सर्वसामान्यांना आता मोबाइलप्रमाणे आपले वीज मीटर रिचार्ज करावे लागणार आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे सचिव राकेश कुमार यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, मोबाईल किंवा इंटरनेटचे नेटवर्क उपलब्ध असलेल्या सर्व ठिकाणी जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर लावले जातील. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसवण्यास सुरुवात झाली आहे. सर्व मीटर बदलल्यानंतरच ‘प्री-पेड’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. ग्राहकांवर बोजा पडू नये म्हणून याची कालबद्धता ठरविण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात आले आहेत. पुश बटण दाबून दररोज बॅलन्स अन् युनिटस््ही तपासता येईल स्मार्ट मीटर तंत्रज्ञान कसे काम करते?हे मीटर पूर्णपणे वायरलेस असून त्यात डीटीएच प्रमाणे एक विशिष्ट सीमकार्ड असेल. ते सुरक्षित नेटवर्कद्वारे थेट राज्याच्या वीज कंपनीच्या मुख्य सर्व्हरशी जोडलेले असेल. यातून वीज वापराचा डेटा स्वयंचलितपणे कंपनीला मिळेल.रिचार्ज कसे करायचे व बॅलन्स संपल्यावर काय? ग्राहकांना व उद्योगांना काय फायदा? ग्राहकांसाठी : ‘रिमोट रीडिंग’ तंत्रज्ञानामुळे मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्याची गरज उरणार नाही. मानवी चुकांमुळे येणाऱ्या अवाजवी आणि चुकीच्या बिलांचा फटका ग्राहकांना बसणार नाही. तसेच, बंद घरांची बिले भरण्याची कटकट संपेल.उद्योगांसाठी: ६५० व्होल्टपेक्षा अधिक दाबाचा वीज पुरवठा घेणाऱ्या उद्योगांसाठी ‘मेन मीटर‘, ‘चेक मीटर’ आणि ‘स्टँडबाय मीटर’ कुठे बसवावेत, याची स्पष्ट नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मीटरिंग अचूक होऊन वाद टळतील.सरकार व वीज कंपन्यांसाठी: वीज वापराचा अचूक डेटा मिळेल आणि वीजचोरीला १०० टक्के आळा बसेल, असा सरकारचा दावा आहे.
विभक्त राहणाऱ्या पत्नीचा पतीनेच चारित्र्याच्या संशयातून चाकूने गळा चिरून खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना करमाड शिवारातील ‘शिवसमर्थ’ पेट्रोल पंपावर घडली. गुरुवारी (९ एप्रिल) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास हा थरार घडला. पूजा गावंडे (२७, रा. चित्तेपिंपळगाव, ह. मु. करमाड) असे मृत महिलेचे नाव आहे, तर सत्यम रावसाहेब गावंडे (२८, रा. चित्तेपिंपळगाव) असे मारेकरी पतीचे नाव आहे. या घटनेनंतर कचनेर शिवारात एका शेतात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अवघ्या दीड तासात बेड्या ठोकल्या आहेत. पूजा गावंडे या गेल्या दीड महिन्यापासून करमाड येथील पेट्रोल पंपावर काम करत होत्या. गुरुवारी दुपारी संशयित सत्यम दुचाकीवरून पंपावर आला. स्टँडजवळ दुचाकी उभी करून त्याने अचानक पूजाचा हात पकडला आणि काही कळण्याच्या आतच तिच्या पाठीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. पूजा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळताच नराधम सत्यमने तिचा गळा चिरला. हा संपूर्ण थरार पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खून केल्यानंतर सत्यमने दुचाकीवरून पिंपरीराजामार्गे कचनेरच्या दिशेने पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने माहिती मिळवत त्याचा पाठलाग केला आणि शेतात लपलेल्या सत्यमला शिताफीने अटक केली. सत्यम चाकू घेऊन माझ्यामागे धावला, जीव वाचवून पळालो मी पंपावरील केबिनमध्ये बसलो होतो. अचानक महिलेचा ओरडण्याचा आवाज आल्याने मी तातडीने बाहेर आलो. तेव्हा एक जण कर्मचारी पूजावर चाकूने सपासप वार करताना दिसला. तिला वाचवण्यासाठी धावलो. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने चाकू उगारून माझा पाठलाग केला. मग मी लांब पळालो. आरोपीनेही दुचाकीसह पळ काढला. रेकी केली, गर्दी नसताना शांत डोक्याने हत्या पत्नीची हत्या करण्यासाठी सत्यम सकाळी पेट्रोल पंपावर आला होता. परंतु पंपावर गर्दी असल्याने त्याला संधी साधता आली नाही. दुपारी पंपावर गर्दी नसताना त्याने शांतपणे गळा चिरून पत्नीची हत्या केली. त्यानंतर कमरेला चाकू खोचून दुचाकीवरून पळ काढला.
महाविद्यालयातील विद्यार्थिनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार असल्याचे सांगून प्राचार्याला पोक्सोच्या गुन्ह्याची भीती दाखवत शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार १८ जुलै ते २८ जुलै २०२५ दरम्यान घडला होता. या प्रकरणाची माहिती यातील संबंधित मुलीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन सांगितली. पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेला याचा तपास करण्यास सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, मार्शल सोनाली हिंगे आणि पोलिस अंमलदार सुदाम तायडे अशी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांची नावे आहेत. हे सर्वजण शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. अजित बडे हे आता सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दामिनी मार्शल म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली हिंगे रीलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. याबाबत एका प्राचार्यांनी तक्रार दिली आहे. जुलै २०२५ मध्ये ते काम करीत असलेल्या महाविद्यालयात हे तिघे पोलिस गेले. अजित बडे याने विचारले की, तुम्ही एका मुलीची कागदपत्रे काढून ठेवली आहेत का? त्यावर प्राचार्यांनी प्रवेशाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे आम्ही आमच्याकडे ठेवतो. त्यावर बडे याने या विद्यार्थिनीला तुम्ही मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीमध्ये ओढले असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आली असल्याचे सांगितले. पुणे ‘दामिनी मार्शल’ पथकात सोनाली हिंगेचे सोशल मीडियावर एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ड्युटीवरील आणि डान्सच्या रील्समधून ती तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. पुण्याच्या ‘दामिनी मार्शल’ पथकात काम करते. खंडणीच्या गुन्ह्यामुळे पोलिस दलासह सोशल मीडियावरही मोठी खळबळ उडाली आहे. मुलगी म्हणाली, पोलिसांनी मला खोटा अर्ज करण्यास सांगितले याबाबत या संबंधित मुलीने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन काही दिवसांपूर्वी याची माहिती दिली. आपल्याला पोलिसांनी कसा खोटा अर्ज करायला सांगितले, हे या मुलीने सांगितले. पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी याची चौकशी केली. प्राचार्यांना बोलावून मुलीचा तक्रार अर्ज दाखवला. त्या वेळी प्राचार्यांनी पोलिसांनी आपल्याकडून कसे पैसे उकळले, याची माहिती दिली. त्याची चौकशी केल्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. त्यानुसार गुरुवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप तपास करत आहेत.दरम्यान, याआधी संशयितांनी आणखी कुणाला अशाच पद्धतीने फसवले आहे का ? याचाही पोलिस आता कसून तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी संबंधित प्राचार्याला ‘पोक्सो’ गुन्ह्याची भीती दाखवली संबंधित विद्यार्थिनी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याने तुमच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखवली. आपल्याला अटक होईल, संस्थेचे नाव बदनाम होईल, अशी धमकी दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी त्यांनी मुलीशी बोलून काही होतेय का हे सांगतो, त्यानंतर त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर बडे याने त्यांना धमकावले. शेवटी प्राचार्यांनी बदनामीच्या भीतीने ७ लाख रुपये मुलीच्या शिक्षणासाठी दिले. मात्र, त्यानंतरही हा प्रकार सुरूच राहिल्याने संबंधित प्राचार्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.
अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार
प्रतिभा चाकणकर रुपाली चाकरणकरांच्या भगिनी कोट्यवधींचे व्यवहार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार अहिल्यानगर : प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीने आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने अशोक खरातला आणखी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे खरातचा पोलिसांच्या तावडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. खरातवर एकूण १२ गुन्हे दाखल असून एसआयटीने न्यायालयातून आज लगेचच तिस-या […] The post अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इस्रायल, अमेरिकेचे हल्ले सुरूच, होर्मुझवर इराणचे नियंत्रण विश्वासघात केल्यास सर्वनाश, ट्रम्प यांचा इराणला इशारा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था इराण आणि अमेरिकेमध्ये १४ दिवसांच्या युद्धविरामाचा निर्णय झाला. या निर्णयानंतर आखातातील तणाव कमी होईल, असे वाटत होते. मात्र, इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत […] The post शस्त्रसंधी हवेतच? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुकुल चौधरीची धमाकेदार खेळी, लखनौचा विजय
कोलकाता : वृत्तसंस्था मुकुल चौधरीने मोक्याच्या क्षणी जोरदार फटकेबाजी करीत शानदार अर्धशतक झळकावले आणि घरच्या मैदानावर खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्सचा लखनौ सुपर जाएंटस संघाने पराभव केला. त्यामुळे अजिंक्य राहणेच्या संघाला मोठा धक्का बसला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ४ विकेटसच्या मोबदल्यात १८१ धावा करीत लखनौसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. १८२ धावांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी लखनौचा […] The post मुकुल चौधरीची धमाकेदार खेळी, लखनौचा विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आरक्षण विधेयकाला विशेष अधिवेशनात मंजुरी?
मसुदा मंजूर, आता १६ ते १८ एप्रिलदरम्यान विशेष अधिवेशन नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणा-या विधेयकाच्या मसुद्याला काल मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढेल, ज्यापैकी २७३ जागा महिलांसाठी राखीव असतील. त्यातच आता सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन […] The post महिला आरक्षण विधेयकाला विशेष अधिवेशनात मंजुरी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बाकली येथे यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या उत्साहात
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी बाकलीचे श्रीक्षेत्र हनुमान मंदीर देवस्थानच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा शुभारंभ श्री क्षेत्र मारोती आश्रमचे महंत शिवरामदास गुरु नारायणदास वैरागी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संत महतांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील मल्लांच्या जंगी कुस्त्या झाल्या. तालमीतील मातीचा सुगंध, अंगावर पिळदार स्रायू, पहाटेच्या सरावाने कमावलेली अफाट ताकद, दुध-तुपावर पोसलेले शरीर आणि […] The post बाकली येथे यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केज येथील तहसीलदार कार अपघातात ठार
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर पिंपळफट्यापासून काही अंतरावर व नेहरूनगरजवळ लातूर-अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार दि. ९ रोजी पहाटे झालेल्या भीषण कार अपघातात केज (जि. बीड) येथील तहसीलदार राकेश अण्णासाहेब गिड्डे (वय ३१) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रशासन व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिरज तालुक्यातील (सांगली) बेडक […] The post केज येथील तहसीलदार कार अपघातात ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपाध्यक्षांसह सभापतींना आज खातेवाटप
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेत चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रीया पार पडल्यानंतर चार पैकी दोन सभापतींना खाते वाटप झाले. तर उर्वरीत दोन सभापतींना व उपाध्यक्षांना आगामी शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक बोलवून पदभार देणे आवश्यक होते. मात्र उर्वरीत दोन्ही सभापतींनी पुढील सभेच्या १० दिवस अगोदरच आपल्या पदाचा पदाभार […] The post उपाध्यक्षांसह सभापतींना आज खातेवाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्णसंधी
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांसाठी पोषक शैक्षणिक वातावरण आहे. म्हणून विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असल्याचे मत विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी व्यक्त केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयास लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक रामराव चवणे यांनी पदावर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी महाविद्यालयात चवणे यांचा सन्मान व सत्कार […] The post विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्णसंधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चिंचोलीराव वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट
लातूर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोलीराव वाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास गुरुवारी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भेट देऊन दर्शन घेतले, प्रार्थना केली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तना निमित्त दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी हभप नितीन महाराज हिप्पर्गेकर, […] The post चिंचोलीराव वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जुन्यांचे हाल, नवीन अर्ज धूळखात
लातूर : प्रतिनिधी ‘सब का साथ, सबका विकास’, ही देशाचे पंपप्रधान नरेंद्र मोदी यांची टॅग लाईन असली तरी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वृद्ध, दिव्यांग व विधावांना ना साथ आहे ना विकास, असे चित्र दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याने या लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. लातूरच्या तहसील कार्यालयात या योजनेच्या […] The post जुन्यांचे हाल, नवीन अर्ज धूळखात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद
लातूर : प्रतिनिधी राज्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत दि. ९ एप्रिल रोजी लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा चंदीगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एच. एस. लकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या […] The post पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे निरीक्षक हरमिंदरसिंग लकी यांनी घेतली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट
लातूर : प्रतिनिधी आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा चंदीगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरमिंदरसिंग लकी, प्रदेश निरीक्षक राजदीप सिद्धू, प्रदेश निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी गुरुवारी भेट दिली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हरमिंदरसिंग लकी यांनी आखिल […] The post काँग्रेसचे निरीक्षक हरमिंदरसिंग लकी यांनी घेतली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व’ची धमाल
लातूर : प्रतिनिधी शिवछत्रपती शिक्षण संस्थाद्वारा संचलित येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व-२०२६’ उत्साहाच्या वातावरणात पार पडले. दोन दिवशीय या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करुन धमाल उडवून दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण करण्यात आले. ‘शांतिपर्व-२०२६’ स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण झाले. त्यावेळी शिव छत्रपती शिक्षणसंस्था गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या नेहमीच पाठीशी उभी आहे. शिक्षणक्षेत्रात अत्याधुनिक […] The post शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व’ची धमाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बंजारा टायगर संघटनेच्या वतीने राज्यातील बंजारा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित कामे, निधीवाढ, तसेच तांड्यांच्या मूलभूत सुविधांसंदर्भातील प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्याची वेळ मागितली. जयकुमार गोरे यांनी या मागणीची दखल घेत तात्काळ भेटीसाठी वेळ देत आंदोलकांशी मंत्रालयात चर्चा केली. यावेळी आंदोलकांच्या सर्व मागण्या शांतपणे आणि सविस्तर ऐकून घेत संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. प्रलंबित कामांना गती देणे, मंजूर निधी वेळेत वितरित करणे, तसेच तांड्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय लवकर घेण्याबाबत जयकुमार गोरेंनी संबंधित विभागांना सूचना करण्याचे आश्वासन दिले. जयकुमार गोरे यांनी आंदोलकांना संवादाच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी जयकुमार गोरे यांनी दिले. या सकारात्मक भूमिकेची दखल घेत आंदोलकांनी तात्काळ आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली असून, पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे ही वाचा… सातारा झेडपी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांनुसार:प्रश्नचिन्हाचे कारण नाही, न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा थांबवावी – आमदार महेश शिंदे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, असे आवाहन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाली असून ती वैध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. सविस्तर वाचा…
तीर्थटनासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंदाने नेपाळच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा वाराणसी-गोरखपूर महामार्गावर उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे आणि परिसरातील ४४ भाविक काही दिवसांपूर्वी खासगी बसने धार्मिक पर्यटनासाठी तीर्थयात्रेवर निघाले होते. या भाविकांनी अयोध्या आणि वाराणसी येथील दर्शन आटोपले होते. आज सकाळी ही बस वाराणसीहून नेपाळच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना ही दुर्घटना घडली. नवसारा परिसरात समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात दोन महिलांचा मृत्यू या घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील रहिवासी सरस्वती पाखरे आणि अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई या दोन ज्येष्ठ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ३५ प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी मोताळा तालुक्यात पोहोचताच धामणगाव बढे आणि रोहिनखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या परिवारातील सदस्य सुरक्षित आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली आहे. प्रशासनाची तत्परता आणि मदतकार्य अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. उत्तर प्रदेशचे एसएसपी राकेश मिश्रा यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले आहेत. जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धेने तीर्थाटनावर निघालेल्या या भाविकांच्या प्रवासाचा अंत इतक्या भीषण अपघातात होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असून, जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्यासाठी समन्वय साधला जात आहे.
अमरावती येथे आयोजित प्रा. साहेबराव विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला. धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करत शासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. डॉ. पाटणकर म्हणाले की, कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते, ज्यामुळे अनेकदा शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. धरणग्रस्तांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कार्यकर्ते प्रा. साहेबराव विधळे यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघर्षधारा’ या गौरवग्रंथाचे विमोचन डॉ. पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागपूर येथील ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी, मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी, डॉ. प्रतिभा विधळे, पुष्पाताई बोन्डे, माणिकराव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात, अनेकजण विस्थापित होतात, मात्र त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन होत नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला संघर्ष येतो. त्यामुळेच त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आवश्यक असते. अप्परवर्धा धरणग्रस्तांसाठी प्रा. साहेबराव विधळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने दीर्घकाळ लढा दिला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय लढ्याच्या इतिहासातील ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. पाटणकर यांनी नमूद केले. यावेळी बोलताना नागेश चौधरी म्हणाले की, आज संधी प्राप्त लोक समाजविन्मुख आयुष्य जगण्यावर भर देत आहेत. मात्र प्रा. साहेबराव विधळे यांनी कायम समाजसन्मुख भूमिका अंगिकारून कार्य केले. धरणग्रस्तांचा लढा असो की बहुजन संघर्ष समितीचे प्रबोधनाचे कार्य असो, सर्वांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेऊन गुणात्मक कार्य केले. आचार्य वेरुळकर गुरुजी म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये पीडित व्यक्तीच्या संघर्षात उभे राहण्याची प्रेरणा आहे. प्रा. साहेबराव विधळे यांनी विविध चळवळींमध्ये केलेले कार्य असेच असल्याने ते अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडे म्हणाले की, प्रा. साहेबराव विधळे यांचे जीवनकार्य कष्टकरी, बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी राहिले आहे. धरणग्रस्तांच्या सोबतीने त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. मंडल आयोगाच्या प्रबोधन कार्यात हिरीरीने पुढाकार घेतला, तसेच बहुजन संघर्ष समितीतही कार्य केले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी मागील पन्नास वर्षे केलेले सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा हा सत्कार एकप्रकारे नव्या सामाजिक चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे, असेही वानखडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. प्रारंभी अहाना पाटील आणि अधिराज या दोन चिमुकल्यांनी गीत गायन केले.
समाज कल्याण विभागाच्या समता सप्ताहाला प्रारंभ:14 एप्रिलपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाने 'समता सप्ताह' सुरू केला आहे. हा सप्ताह १४ एप्रिलपर्यंत चालणार असून, या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी सांगितले की, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच, संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणारी व्याख्याने आणि वक्तृत्व स्पर्धा जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आल्या आहेत. १० एप्रिल रोजी समतादूतांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पथनाट्ये व लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी प्रबोधन केले जाईल. याच दिवशी मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाईल, ज्यात त्यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान आयोजित केले आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे, शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे घेतली जातील. १२ एप्रिल रोजी 'संविधान जागर' कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर माहिती दिली जाईल. महिलांसाठी विशेष मेळावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. १३ एप्रिल रोजी जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन असून, शासकीय कार्यालये आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याच दिवशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित केली जातील. सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी होईल. या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम, विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विभागाने कळविले आहे.
डॉ. दिनेश वाघाडेंची आयएमए अमरावती अध्यक्षपदी निवड:सिताराम बाबा कॉलनीवासियांनी केला सत्कार
डॉ. दिनेश वाघाडे यांची नुकतीच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या अमरावती शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिताराम बाबा कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभात आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ. राजू डांगे, इच्छापूर्ती गणेश मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर तीनखेडे, माजी अध्यक्ष अरुणभाऊ ठाकरे, प्रा. मिलिंद चुटके आणि कोषाध्यक्ष प्रदीप सागळे उपस्थित होते. त्यांनी संयुक्तपणे डॉ. वाघाडे यांना शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तिका देऊन सन्मानित केले. डॉ. दिनेश वाघाडे यांनी यापूर्वी आयएमएमध्ये उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे. ते सायंटिफिक उपसमितीचे अध्यक्ष तसेच सीडब्ल्यूसी सदस्य आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त, डॉ. वाघाडे अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत आणि फिजिशियन असोसिएशनचे सचिवही राहिले आहेत. सिताराम बाबा कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ते अनेकदा मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करतात आणि कॉलनीतील रहिवाशांना तातडीच्या वेळी प्राधान्याने वैद्यकीय सेवा देतात. ते हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक म्हणूनही परिचित आहेत. यावेळी डॉ. वाघाडे यांच्या पत्नी मेघा दिनेश वाघाडे आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या.
अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांची खरी संख्या पडताळण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. शनिवार, ११ एप्रिल रोजी या पटपडताळणीचा पहिला टप्पा सुरू होत असून, यामुळे शाळेच्या पटावरील खोट्या विद्यार्थी संख्येचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ही पटपडताळणी तीन टप्प्यांत केली जाईल. ११ एप्रिलनंतर उर्वरित शाळांची पडताळणी १५ आणि २२ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चारही माध्यमांच्या एकूण २ हजार ८७१ शाळा आहेत. या शाळांमध्ये ४ लाख ८३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, ६ हजारांहून अधिक शिक्षक त्यांना शिकवतात. पटपडताळणीसाठी एकूण शाळांना तीन गटांत विभागण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सुमारे ९५० शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवर (EO) यासाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) शिक्षक हे अधिकारी पटपडताळणी करतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे त्यांना या पटपडताळणीतून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेला जेवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तेवढीच त्यांची संख्या गृहीत धरली जाईल. विद्यार्थ्यांची मोजदाद पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. यासाठी शासनाच्या 'स्टुडंट्स पोर्टल'चा वापर केला जाईल. संबंधित अधिकारी शाळेत पोहोचल्यावर पोर्टल उघडून विद्यार्थ्यांची नावे पाहतील आणि हजेरीपटानुसार उपस्थितीची नोंद करतील. या पटपडताळणीमुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक धास्तावले आहेत. पडताळणीच्या दिवशी एकही विद्यार्थी गैरहजर राहणार नाही, याची ते विशेष काळजी घेत आहेत. गैरहजेरी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष परीक्षांचे नियोजनही केले आहे, जेणेकरून विद्यार्थी उपस्थित राहतील.
अमरावतीमध्ये गेल्या महिनाभरापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सुरू झालेला हा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही सिलिंडरसाठी लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. भारत, इंडेन आणि एचपी या तिन्ही गॅस वितरकांच्या कार्यालयांबाहेर हेच चित्र दिसत आहे. अनेक ग्राहकांना सिलिंडर प्रत्यक्षात मिळण्यापूर्वीच 'डिलिव्हरी झाली' असा संदेश येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एजन्सी कर्मचाऱ्यांनुसार, बुकिंगनंतर साधारणतः १२ दिवसांत सिलिंडर मिळायला हवे, परंतु काही ग्राहकांना त्यापेक्षा जास्त काळ वाट पाहूनही सिलिंडर मिळालेले नाही. जेव्हा ग्राहक यासंदर्भात चौकशी करतात, तेव्हा एजन्सी कर्मचारी 'तुमचा नोंदणीकृत फोन नंबर सांगा, सिस्टीमवर तपासू' असे सांगतात. मात्र, त्याचवेळी आतून 'सर्व्हर डाऊन' असल्याचा संदेश दिला जातो. एचपीचे ग्राहक रवींद्र पाठक यांनी सांगितले की, त्यांना बुकिंगचा संदेश येऊन आठ दिवस झाले, तरी 'आगामी आठ तासांत बुकिंगचा संदेश येईल, कृपया संयम बाळगा' हा संदेश अद्यापही 'आठ तास' पूर्ण झाल्याचे दाखवत नाही. सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची होणारी ही धावपळ पाहता, प्रशासन 'पुरेशा प्रमाणात सिलिंडर उपलब्ध आहेत' असा जो दावा करत आहे, तो किती फोल आहे हे स्पष्ट होते. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात दररोज १५,७९४ सिलिंडरचा वापर होतो, ज्यात उज्ज्वला योजना आणि नियमित ग्राहक यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आयओसीचे २५, बीपीसीएलचे १७ आणि एचपीसीएलचे १४ असे एकूण ५६ गोदामे आहेत. या गोदामांमध्ये दररोज २४,५७४ सिलिंडर साठवले जातात. ही साठवण क्षमता रोजच्या वापराच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यकतेनुसार सिलिंडर ग्राहकांना पुरवले जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोर कायम असलेल्या रांगा प्रशासनाच्या या माहितीला खोडून काढत आहेत. दरम्यान, म्हाडा कॉलनी, अमरावती येथील संदीप मोरस्कर यांनी एका एजन्सीने केवायसीसाठी ३०० रुपये मागितल्याची तक्रार केली आहे. त्यांच्यासमोर एका महिलेकडून घरी जाण्यासाठी पैसे शिल्लक राहावेत म्हणून २०० रुपये घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अमरावतीत पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रक्तदान शिबिरांची शृंखला सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे जमा झालेल्या रक्ताचा वापर तुला करण्यासाठी केला जाईल. या अनोख्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री माहेश्वरी पंचायत, श्री गोरक्षण संस्था आणि रामचरित मानस परिषद यांसारख्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ‘गौ माता सन्मान समिती’ ची स्थापना केली आहे. या समितीमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी माध्यमांना देण्यात आली. सहसंयोजक सुरेश साबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गोरक्षण संस्थेत होणार आहे. तत्पूर्वी, धनराज लेन येथील माहेश्वरी भवनातून भगवान श्री परशुराम आणि गौमातेची शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा सक्करसाथ, जवाहर गेट, प्रभात चौक, सरोज चौक, श्याम चौक, अंबादेवी रोडमार्गे गांधी चौक असा प्रवास करून गोरक्षण संस्थेत पोहोचेल. गोरक्षण संस्थेत परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज आणि राजराजेश्वर माऊली यांच्या उपस्थितीत गौमातेची रक्ततुला केली जाईल. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. अमरावतीत १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. आर. बी. अटल, संयोजक रमेश छांगाणी, प्रचारप्रमुख संजयकुमार राठी, रक्तदान समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, दीपक मंत्री आणि नवल चांडक आदी उपस्थित होते. यावेळी गौमातेच्या संवर्धनासाठी गौहत्याबंदी कायद्याची मागणीही करण्यात आली. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी २७ एप्रिल रोजी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पैदल मार्च काढण्यात येणार असून, सरकारला निवेदन दिले जाईल. या आंदोलनाचा समितीच्या कार्यक्रमाशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दर्यापूर येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, येवदा आणि वडनेर गंगाई येथे अधिक आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. डॉ. बोंडे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि विविध यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरील सूचना केल्या. दर्यापूर तालुका शासनाच्या निर्देशांकानुसार अल्पसंख्याक संवर्गात येत असल्याने, या तालुक्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. येवदा आणि वडनेर गंगाई येथील रुग्णांच्या विविध तपासण्यांचे नमुने अमरावती येथे पाठवावे लागतात, ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. तपासणीची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध झाल्यास रुग्णांची अडचण दूर होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे डॉ. बोंडे यांनी नमूद केले. यावेळी डॉ. बोंडे यांनी विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली. यंत्रणांनी लोकाभिमुख कामे करताना आपले उत्तरदायित्व पाळावे आणि शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गरजूंना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी संबंधितांना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत असल्याने, नगरपालिकांनी पुढाकार घेऊन शहरातील अतिक्रमणे काढावीत. तसेच, 'सर्वांसाठी घरे' या शासनाच्या भूमिकेनुसार पट्टेवाटप करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४ प्रस्ताव पाठवण्यात यावेत. यावली शहीद येथील शहीद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी खात्री त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळवून घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत केंद्र सरकारच्या 'नमो उद्यान' आणि 'वड उद्यान' या विषयांवर अधिक चर्चा झाली. वन विभागामार्फत जिल्ह्यात ही उद्याने तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण करावीत आणि ती तयार करताना झाडांची संख्या अधिक असावी, असेही डॉ. बोंडे यांनी निक्षूण सांगितले.
पुणे, प्रतिनिधी: इंदापूर येथील पंधारवाडी येथील जयभवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव नाना चंद्रकांत बोराटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहात पकडले. नवीन पीक कर्ज मंजूर केल्याच्या मोबदल्यात त्याने एका शेतकऱ्याकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात करण्यात आली. नाना चंद्रकांत बोराटे (वय 43, रा. मु. पो. गोकळी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सचिवाचे नाव आहे. या प्रकरणी एका 34 वर्षीय शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराची वडिलोपार्जित शेती असून, त्यांनी 24 मार्च 2026 रोजी जिल्हा सहकारी बँकेचे जुने पीक कर्ज भरले होते. त्यानंतर तक्रारदाराने पंधारवाडी येथील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत पुणे जिल्हा बँकेकडे नवीन पीक कर्जासाठी प्रस्ताव सादर केला होता. या सहकारी सोसायटीत बोराटे सचिव म्हणून कार्यरत आहे. 7 एप्रिल रोजी तक्रारदार बोराटेला इंदापूर येथील वडापुरी येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भेटले. त्यावेळी बोराटेने त्यांना 2 लाख 76 हजार रुपयांचे पीक कर्ज मंजूर झाल्याचे सांगत, त्या बदल्यात दोन हजार रुपयांची लाच मागितली. शेतकऱ्याला लाच देणे मान्य नसल्याने, त्याने 8 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर, 9 एप्रिल रोजी बोराटेला पंधारवाडी येथील सहकारी सोसायटीच्या आवारात एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजीत पाटील, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे आणि शैलजा शिंदे यांच्या पथकाने केली.
पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणले:35 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला बेड्या
पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड परिसरात झालेल्या तीन खुनांचा छडा लावत रेकॉर्डवरील तिघा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींपैकी एकावर ३५ गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. शिरोली, ता. आंबेगाव), नंदलाल दिलीप होले (वय ३१, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) आणि निलेश कैलास सणस (वय ३४, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) अशी आहेत. यातील पहिली घटना १८ मार्च रोजी खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जैदवाडी येथे घडली होती. धनंजय मारुती घेवडे (वय ३३, रा. राक्षेवाडी, ता. खेड; मूळ रा. कारेगाव, ता. आंबेगाव) यांचा डोक्यावर आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचे भाऊ सचिन मारुती घेवडे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पथक समांतरपणे करत होते. पोलिसांनी खेड ते वडगाव निंबाळकर या १४५ किलोमीटरच्या रस्त्यावरील ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यातून ललित खोल्लम आणि नंदलाल होले हे सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयित आरोपी वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर २५ मार्च रोजी सापळा रचण्यात आला. आरोपींनी आजूबाजूच्या उसाच्या शेताचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नदीच्या दिशेने धावले. मात्र, नदीपात्रात उडी मारण्यापूर्वीच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की, मयत धनंजय घेवडे आणि आरोपी होले हे एकाच गावात राहत होते. होले आणि निलेश सणस यांचे घेवडे यांच्याशी काही कारणावरून भांडण झाले होते. याच रागातून खोल्लम आणि होले यांनी लोखंडी रॉड आणि दगडाने मारून घेवडे यांचा खून केला. या गुन्ह्यासाठी निलेश सणस याने इतर आरोपींना पैसे पुरविल्याचेही तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी ललित खोल्लम याने श्रीकांत विलास वाडेकर (वय २६) आणि त्यांची आई रुपाली विलास वाडेकर (वय ४६, दोघेही रा. शिरोली, ता. खेड) यांचाही खून केल्याची कबुली दिली. यामुळे आणखी दोन खुनांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी खोल्लम आणि रुपाली वाडेकर यांचे प्रेमसंबंध होते. पैसे मागण्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. दरम्यान, रुपाली यांचा मुलगा श्रीकांत हाही आरोपी खोल्लमकडे पैशांची मागणी करत होता. याचा राग मनात धरून खोल्लमने श्रीकांतला खेड येथे बोलावून त्याचे अपहरण केले व त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. त्यानंतर आरोपी नंदलाल होलेच्या मदतीने श्रीकांतचा मृतदेह मंचर परिसरात जाळून टाकला आणि राख घोड नदीपात्रात टाकली.याप्रकरणी ठाणे शहरातील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच श्रीकांतची आई रुपाली वाडेकर या आरोपीला “माझा मुलगा कुठे आहे?” अशी वारंवार विचारणा करून भांडण करत होत्या. त्यामुळे आरोपी खोल्लमने रुपाली यांना शिरोली येथील सदनिकेत बोलावून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली व गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खोल्लम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी २ खुनांचे, १ खुनाच्या प्रयत्नाचे, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ३५ गुन्हे दाखल आहेत. तसेच नंदलाल होले याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपींवर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या दोघे जामिनावर बाहेर आहेत.

30 C