अहमदाबाद विमानतळावरून ४ कोटी रुपयांचा गांजा जप्त
अहमदाबाद : अहमदाबादच्या कस्टम विभागाने बँकॉकहून आलेल्या एका मुलीच्या ट्रॉली बॅगमधून ४ किलो हायब्रिड गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे. अहमदाबाद विमानतळावर तिची बॅग हरवल्याची तक्रार मुलीने दाखल केली होती. नंतर, बॅग सापडल्यानंतर मुलीला फोन करण्यात आला, तेव्हा ती विमानतळावर पोहोचली नाही. यामुळे कस्टम विभागाला संशय आला. बॅगची […] The post अहमदाबाद विमानतळावरून ४ कोटी रुपयांचा गांजा जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर घरावर कोसळले
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला
संगमनेर : संगमनेर येथील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले होते. यावेळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील एका तरुणाने हात मिळवण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. मालपाणी उद्योग समूहाच्या सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे. रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्याची बातमी संगमनेरमध्ये वा-यासारखी पसरली. त्यानंतर खताळ समर्थक आक्रमक […] The post संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावतीतील जुना रेल्वे उड्डाणपूल बंद केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून तीन नवे पर्याय समोर आले आहेत. पहिला पर्याय म्हणजे रेल्वे स्टेशन ते बेलपुरा मार्गाचे सुधारीकरण करणे. दुसरा पर्याय जयस्तंभ चौक ते राजकमल चौक दरम्यान नेहरू मैदानातून पायी व दुचाकींसाठी नवा मार्ग तयार करणे. तिसरा पर्याय हमालपुरा आणि बस स्टँड रोडला जोडणाऱ्या उस्मानिया मस्जिद कम्पाऊंडजवळील रस्ता रुंदीकरण करणे. आमदार सुलभा खोडके, विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उड्डाणपुलाची पाहणी केली. तासभराच्या पाहणीत उड्डाणपुलाची दोन्ही टोके, जयस्तंभ चौकातील सामरा कॉम्प्लेक्सजवळील नेहरू मैदान मार्ग आणि रेल्वे उड्डाणपुलाखालील मार्गाचे निरीक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या तीनही पर्यायांवर एकमत झाले. कॅम्प आणि काँग्रेसनगर भागातील अमरावती व अंबागेट तसेच जवाहरगेटच्या आतील अमरावती जोडणारा मार्ग बंद झाल्याने राजकमल चौक, जयस्तंभ चौक, इर्विन चौक मार्गे प्रवास करावा लागत आहे. कॅम्प भागात अनेक शासकीय कार्यालये असल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे. बैठकीला तहसीलदार विजय लोखंडे, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त मेघना वासनकर, शहर अभियंता रवींद्र पवार आणि विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण वांगे उपस्थित होते.
एनएचएमचा संप कायम:कामावर परतण्याच्या आदेशाला नकार; आंदोलनस्थळी रक्तदान शिबिर
अमरावतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम) कर्मचाऱ्यांचा कायम नोकरीसाठीचा संप दहाव्या दिवशीही सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी एनएचएम आयुक्तांचे कामावर परतण्याचे आदेश धुडकावून लावले आहे. आंदोलनकर्त्यांनी ऋषिपंचमी निमित्त आंदोलनस्थळी झुणका-भाकरीचा प्रसाद घेतला. शासनाने गतवर्षी १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे १९ ऑगस्टपासून कर्मचारी राज्यव्यापी संपात सहभागी झाले आहेत. संपकर्त्यांनी आज आंदोलनस्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषदेपासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हाधिकारी आणि खासदारांना निवेदने दिली होती. 'आयटक'शी संबंधित महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यातील २०० डॉक्टर, ६०० परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांसह एकूण दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी आहेत. उद्या शुक्रवारी आंदोलनकर्ते राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अर्थात मध्य प्रदेशातील गावांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील जलसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आज, गुरुवारी दुपारी १ वाजता धरणाची तीन दारे ३० सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आली होती. त्यानंतर सायंकाळी साडे सहा वाजता पुन्हा ४ दारे ३० सेंटीमीटरने उघडली गेली. दरम्यान सातही दारे ३० सेंटीमीटरने उघडण्यात आल्यामुळे सायंकाळापासून या धरणातून ३३७.४७ घनमीटर प्रति सेकंद एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नागरिकांनी त्याठिकाणी जाऊन याची देही याची डोळा धरणाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी तिकडे जाण्याचा बेत आखला आहे. अमरावती व बडनेरासह मोर्शीकरांसाठी जीवनदायी ठरलेल्या व विदर्भातील मोठ्या असलेल्या अप्पर वर्धा धरणाची ऑगस्ट महिन्याची पाणी साठवण क्षमता ३४२.५० मीटर इतकी आहे. त्याचवेळी आजघडीला या धरणात ३४१.९८ मीटर पाणीसाठा जमा झाला आहे. तांत्रिक भाषेत सांगायचे तर हे धरण ९१.७५ टक्के इतके भरले असून ११९.४४ घनमीटर या प्रमाणात पाण्याची आवक (येवा) सुरू आहे. त्यामुळे संभाव्य पावसाची स्थिती पाहता धरण प्रचलन सूची नुसार धरणाचे सात दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून ३३७.४७ घनमीटर प्रति सेकंद एवढ्या पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात केला जात आहे. मागील काही दिवसापासून अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने या धरणाची पाण्याची पातळी वाढत आहे. या धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडल्या जाईल, अशा सूचना एक दिवसाआधी, २७ ऑगस्टलाच धरण प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानुषंगाने आजपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांना दक्षतेचा इशारा जलाशयात येणारा पाण्याचा येवा पाहून जलाशय परिचलन आराखड्याप्रमाणे पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदी काठावरील गावांना तसेच नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वतःची काळजी बाळगावी व नदी पात्राजवळ जाणे टाळावे असा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांनी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे राहत होत्या. त्यांनी त्यांच्या घराच्या इमारतीवरून उडी मारली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. डोंबिवलीमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 1 वाजता घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरिता व्यवसायाने वकील होत्या. महाराष्ट्रात डीजेवर बंदी घालण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एक दिवस आधी भाडेकरूशी भांडण झाले होते उपपोलिस आयुक्त सचिन गोरे म्हणाले की, सरिता यांनी त्यांच्या ऑफिसच्या मागची खोली एका महिलेला भाड्याने दिली होती. बुधवारी खोली रिकामी करण्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर महिलेने सरितावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. सरिता हिरली फाउंडेशन नावाची संस्था चालवत होत्या. त्या उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास आणि वालधुनी नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी काम करत होत्या. वायू आणि जल प्रदूषणाविरुद्ध काम केल्यामुळे त्यांना अनेक लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी हा हल्ला झाल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात गेले असता अमोल खताळ यांच्याशी हात मिळवण्यासाठी एक तरुण आला आणि यावेळी त्याने हल्ला केला असल्याचे समजते. मात्र, या हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. गैरसमज सुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही एका वृत्तवाहिनीशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मी या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. हा हल्ला जो कोणी केला आहे, जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक होते व ते कोणाकडून पुरस्कृत होते याची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु, अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून महायुतीच्या आमदारांचा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल असे वाटत असेल कोणाला तर मला वाटते हा त्यांचा गैरसमज आहे आणि तो गैरसमज सुद्धा दूर करायला वेळ लागणार नाही. शेवटी कायदा हातात घेणे उचित नाही, असे विखे पाटलांनी म्हटले आहे. लोकशाहीच्या कौलाल मान्य केले पाहिजे- विखे पाटील पुढे बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काही लोकांनी लोकशाहीच्या कौलाल मान्य केले पाहिजे. आता जर त्यांना लोकशाही मान्य नाही, ठोकशाहीच मान्य असेल तर मला वाटते त्याच पद्धतीने तालुक्यातील कार्यकर्ते उतरतील, असा इशारा विखे पाटील यांनी दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा अप्रत्यक्ष रोख हा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर असल्याचे समजते. तसेच गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यातूनच हा हल्ला झाला असावा का, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संगमनेरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्मण झाली आहे. अमोल खताळ यांचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी कार्यक्रम होता व जिथे हल्ला झाला त्या मालपानी लॉनच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आहेत. अमोल खताळ येथील गणेशोत्सवासाठी आले होते. यावेळी एक तरुण हात मिळवण्याच्या बहाण्याने आला आणि त्याने हल्ला केला. यावेळी खताळ यांचे जे सुरक्षारक्षक होते त्यांनी वेळीच त्याला रोखले आणि त्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नव-यानेच बायकोला संपवले
परभणी : आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नव-यानेच बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील सोनपुर तांडा येथे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घुणपणे खून केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सगळीकडे गणेशोत्सव सणाचा उत्साह पाहायला मिळत असून गावोगावी आनंदाचे आणि सणासुदीचे वातावरण आहे. गणपती भक्तीत घरोघरी, गावोगावी आनंद उत्साह असताना […] The post भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून नव-यानेच बायकोला संपवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी:लातूर जिल्ह्यात कोसळधारा, अनेक गावांचा संपर्क तुटला
यंदाच्या गणेशोत्सवाचे आगमन पावसाच्या आगमनाने झाले आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज पुन्हा एकदा मुंबईसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या सोळा तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा जास्त मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अरुंद आणि कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने खबरदारी म्हणून वाहतूक थांबवण्यात आली आहे. यापूर्वी नांदेड जिल्ह्यातही 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले होते. लातूर जिल्ह्यात मुसळधार आज मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे १० पेक्षा जास्त मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे, तर बोरगावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. लेंडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. उदगीर-मुक्रमाबाद रस्त्यावरील धडकनाळ पूल वाहतुकीसाठी बंद उदगीर-मुक्रमाबाद रस्त्यावरील धडकनाळ येथील अरुंद आणि कठडे नसलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मागील सोळा तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शेतात पाणी साचले असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक गावांच्या सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर जिल्ह्यातील इतरही दहा अरुंद पुलांवरून पाणी वाहत असल्याने ते पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. भंडाऱ्यात चार शेळ्यांचा मृत्यू आज भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील निलागोंदी गावात मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एका गाईसह चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक गाय गंभीर जखमी झाल्या. जखमी झालेल्या ३५ वर्षीय महिलेला, वैशाली वंजारी, यांना तातडीने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. ढिगारा हटवून मृत आणि जखमी जनावरांना बाहेर काढण्यात आले. जखमी जनावरांवर उपचारही करण्यात आले.
टीम इंडियाची स्पॉन्सरशिप ज्यांनी घेतली, तेच बुडाले!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रायोजक ड्रीम-११ ने अलीकडेच ‘बीसीसीआय’शी असलेला मुख्य करार संपुष्टात आणत असल्याचे जाहीर केले. ‘ड्रीम ११’ने हा निर्णय ऑनलाईन गेमिंगविषयक नव्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर घेतला. अर्थात, ‘बीसीसीआय’च्या एखाद्या प्रायोजकाने आपला मुख्य करार मध्येच संपुष्टात आणण्याचा हा पहिला प्रसंग अजिबात नाही. उलटपक्षी, ज्या कंपन्यांनी टीम इंडियाची स्पॉन्सरशिप घेतली, तेच बुडाले, […] The post टीम इंडियाची स्पॉन्सरशिप ज्यांनी घेतली, तेच बुडाले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हवाई दलातून निवृत्त झालेल्या विंग कमांडरच्या घरी घरफोडी करणर्या मोलकरणीला वानवडी पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या. तिच्याकडून चोरी करण्यात आलेल्या ५ लाख ८७ हजारांचा ऐवज चोरी केली. सुधा राजेश चौगुले (३५, रा. बोराटे वस्ती, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून चोरी केलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत सतिश द्वारकादेश मकाशीर (७८, के्रस्ता सोसायटी, सोपानबाग, घोरपडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. सतिश मकाशीर हे हवाई दलातून विंग कमांडर पदावरून निवृत्त झाले आहेत. ते आणि त्यांची पत्नी हे घोरपडी येथील सोपानबाग परिसरातील क्रेस्टा सोसायटीतील सदनिकेत राहण्यात आहेत. त्याच्या घरी सुधा चौगुले ही घरकाम करत असताना तिने घरातील ५ लाख ८७ हजारांचे सोन्याचे दागिने आणि हिर्याचे दागिने असा ऐवज चोरी करून नेला. हा प्रकार २१ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान घडला. याप्रकरणी सुरूवातीला अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना व तांत्रिक तपासात ही चोरी सुधा चौगुले हीने केल्याचा संशय बळावला. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने, गुन्हे निरीक्षक राजकुमार डोके, सहायक पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, अमंलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाने, अमोल गायकवाड, अभी चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
थलपती विजयच्या बाऊन्सरने कार्यकर्त्यांना रॅम्पवरुन फेकले
मदुराई : वृत्तसंस्था थलपती विजय याने राजकारणात प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी पहिलीच राजकीय सभा झाली. या कार्यक्रमात मोठी गर्दी होती. पहिल्याच कार्यक्रमात थलपती विजय यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बाऊन्सर्सने एका व्यक्तीला मारहाण केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके)चे प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय यांना जवळून […] The post थलपती विजयच्या बाऊन्सरने कार्यकर्त्यांना रॅम्पवरुन फेकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ऑपरेशन सिंदूर थांबवले, आता भारताला चालवाल काय? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुरीच्या गणपती देखाव्यात असा टीकात्मक सवाल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावरही टीका करण्यात आली आहे. भारत के प्रमुख मुक दर्शक' अशी टीका केली आहे. या शिवाय शेतकऱ्यांची दयनीय स्थिती, वेगळ्या विदर्भाविषयी सत्ताधाऱ्यांना असलेला खोटा कळवळा हे विषय हाताळण्यात आले आहे. नागपुरातील गुलाब पुरी यांचा गणपती गणेश स्थापनेच्या निमित्ताने हाताळण्यात येणाऱ्या वादग्रस्त विषयांमुळे राज्यात प्रसिद्ध आहे. ६६ वर्षांपूर्वी पाचपावली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी यांनी वादग्रस्त देखाव्यातून सामाजिक संदेश देणारा गणपती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा सुरू केली. हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना न करता गणेशोत्सवा दरम्यानच्या कुठल्याही दिवशी स्थापन केला जातो. त्यांचा मुलगा चंद्रशेखर पुरी ही परंपरा पुढे चालवित आहे. २०२४ मध्ये संपूर्ण देश बदलापूर येथील मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने हादरला होता. त्या नंतर मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. तशातच सरकारने लाडकी बहिण योजना आणली. एकीकडे लाडकी बहिण योजना असताना महिलांवरील अत्याचारात वाढ का, असा सवाल करणारा देखावा सादर करण्यात आला होता. वेगळ्या विदर्भाची मागणी खूप जूनी आहे. राजकीय पक्षांचे त्याकडे दुर्लक्ष आहे. २०२४ मध्ये गणपतीलाच विदर्भाचा मुख्यमंत्री करण्यात आले आहे. विदर्भवाद्यांनी तिथे जय विदर्भच्या घोषणाही दिल्या होत्या. पूर्वी गुलाब पुरी यांनी गणपतीची स्थापना केली की लगेच ती मूर्ती पोलिस जप्त करायचे. चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्यावतीने पुरी हे गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना करतात. त्यासोबत ज्वलंत सामाजिक समस्यांवर आधारित देखावेही असतात. १९९३ साली गुलाब पुरी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर, नरेंद्र यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. २००५ साली न्यायालयाने पुरींना गणपतीची प्रतिष्ठापना करू देण्याचे आदेश दिले होते. २०१० साली पुरी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमा उभारल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी या प्रतिकृती जप्त केल्या होत्या. तर २०१९ मध्ये ‘प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते ते कुठे आहेत’, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला होता. २०२० मध्ये परवानगी नाकारली होती.
भविष्यात एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक नवोन्मेष, शाश्वत प्रशासन आणि संशोधन यांना व्यवहाराशी एकत्रित करणे आवश्यक आहे. ज्ञानावर आधारित निर्णय घेणे भारताच्या विकासाचा पुढील टप्पा निश्चित करेल असे मत हरियाणाचे माहिती प्रमुख आयुक्त आणि माजी मुख्य सचिव डॉ.टी.व्ही.एस.एन.प्रसाद यांनी व्यक्त केले. बांधकाम क्षेत्रात देशातील आघाडीचे विद्यापीठ निकमार ने आयोजित केलेल्या कंस्ट्रक्शन, रियल एस्टेट, इफ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट वरील नव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुषमा कुलकर्णी आणि परिषदेचे संयोजक व विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. रजनीकांत राजहंस उपस्थित होते.या वेळी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्टतेला देखील येथे मान्यता देण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. प्रसाद म्हणाले, शहरीकरण, हवामान बदल आणि संसाधान कार्यक्षेमतेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षण जगत आणि उद्योग यांच्यात अधिक सधन सहकार्य असले पाहिजे. सध्याच्या युगात, पायाभूत सुविधांमध्ये थ्रीडी प्रिंटिंग, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याचबरोबर ड्रोन आणि रोबोट्सचा देखील वापर होतांना दिसतो. या क्षेत्रात शाश्वत बांधकाची आवश्यकता आहे. यासोबतच, संशोधन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, नियोजन आणि वेळापत्रक, शाश्वत साहित्य आणि तंत्रज्ञान आणि काळानुसार डिजिटल परिवर्तन आवश्यक आहे. डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी सर्व सहभागींच्या योगदानाचे कौतुक केले आणि बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि सहकार्य पुढे नेण्यासाठी विद्यापीठाच्या वचनबद्धतेवर भर दिला. या वर्षी परिषदेमध्ये १८ देशांमधील २०० हून अधिक शोधनिबंधांचा सहभाग होता. ज्यामध्ये सहा प्रमुख विषयांचा समावेश होता. संशोधन, केस स्टडीज, डॉक्टरेट संगोष्ठी, प्रॅक्टिशनर इनसाइटस, उद्योग प्रदर्शन आणि हॅकेथॉन.
शी जिनपिंग यांच्या पत्राने संंबंध सुधारण्याला बळ; भारत-चीन सहकार्याची इनसाईड स्टोरी
बीजिंग : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या चीनच्या दौ-यावर जात आहेत. ७ वर्षांनी भारतीय पंतप्रधान चीनमध्ये जात असल्याने भारत-चीन यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दिशेने ही सुरुवात असल्याचे बोलले जाते. मात्र चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या एका सीक्रेट पत्रामुळे या संबंधांना सुरुवात झाली. ज्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याला निर्णायक वळण आले. मार्चमध्ये चीनसोबत अमेरिकेचा तणाव वाढला […] The post शी जिनपिंग यांच्या पत्राने संंबंध सुधारण्याला बळ; भारत-चीन सहकार्याची इनसाईड स्टोरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहारात अलर्ट, ‘जैश’चे तीन दहशतवादी घुसले!
पाटणा : वृत्तसंस्था जैश-ए-मोहम्मदशी संबंधित तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमार्गे बिहारमध्ये घुसल्याचे गुप्तचर यंत्रणांना आढळल्याने बिहार पोलिस मुख्यालयाने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. या दहशतवाद्यांची ओळख हसनैन अली (रावळपिंडी), आदिल हुसेन (उमरकोट) आणि मोहम्मद उस्मान (बहावलपूर) अशी झाली आहे. जैशचे तीन दहशतवादी नेपाळ सीमेवरून बिहारमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल राज्य पोलिस मुख्यालयाने सीमावर्ती जिल्ह्यांना सतर्क केले. […] The post बिहारात अलर्ट, ‘जैश’चे तीन दहशतवादी घुसले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाखनी तालुक्यात २८ ऑगस्टला दुपारच्या दरम्यान मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात निलागोंदी येथे गौरीशंकर केवळराम वंजारी यांचे अनिवासी जीर्ण घराची भिंत लगतच्या टेकचंद सिताराम वंजारी(वय ४२,रा.निलागोंदी, ता.लाखनी) यांच्या अंगणात व गुरांच्या गोठ्यावर पडली. ही घटना गुरुवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत अल्पभूधारक शेतकरी टेकचंद वंजारी यांची एक गाय, दोन शेळ्या व दोन कोंबड्या मलब्यात दबून जागीच ठार झाल्या. तर टेकचंद यांची पत्नी वैशाली वंजारी या गंभीर जखमी झाल्या. तसेच एक गाय गंभीर जखमी झाली असून गायीचा पाय मोडलेला आहे. जखमी वैशाली वंजारी या विटाच्या ढिगाऱ्याखाली दबल्या होत्या. त्यांना पावडा व हाताने ओढून मलब्याबाहेर काढण्यात आले. जखमी महिलेला साकोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर आहे. जखमी महिलेच्या मानेला गंभीर जखम आहे. या घटनेत नुकसानग्रस्त शेतकरी टेकचंद वंजारी यांचे तलाठी पांचनाम्यानुसार १ लाख २२ हजार ५०० रुपयांच्या पशुधनाची नुकसान झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.मोरगाव साझाचे तलाठी निशांत नेवारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश कापगते यांनी घटनेचा पंचनामा केला.सरपंच वर्षा वंजारी,उपसरपंच महेश हटवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष यशोराज हटवार,ग्रामपंचायत सदस्य छत्रपती हटवार यांनी जेसीबी बोलाविली.जेसीबी व गावकऱ्यांच्या मदतीने मलबा बाहेर काढण्यात आला.
अटारी बॉर्डर जलमय; पाकच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतासह पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. अटारी-वाघा बॉर्डर पूर्णपणे पाण्याखाली आल्यामुळे सुरक्षेची चिंता वाढली आहे. भारतातील गुरुदासपूर, पठाणकोट आणि तरनतारन सारख्या जिल्ह्यांपासून ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांतापर्यंत, नद्यांना पूर आला आहे. धुसी धरण फुटल्यामुळे आणि करतारपूर कॉरिडॉरभोवती पाणी साचल्याने अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. दोन्ही बाजूंचे हजारो लोक बेघर झाले […] The post अटारी बॉर्डर जलमय; पाकच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार
धाराशिव : प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असून बुधवारी रात्री सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी दिवसभर सुरूच होता. या पावसामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील एकाही महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झालेली नाही. यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मे महिण्यातच हजेरी लावली होती. त्यामुळे शेतक-यांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण केल्या. […] The post धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
परभणीच्या माटेगावला पुराचा वेढा
परभणी : श्री गणरायाच्या आगमनासोबतच जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. बुधवारी रात्री पासून सुरू असलेला हा पाऊस गुरूवार, दि. २८ ऑगस्ट रोजी देखील सुरूच होता. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या शेतात पाणी साचले असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या पावसामुळे पूर्णा- झिरोफाटा रस्त्यावरील माटेगाव जवळील थूना नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी […] The post परभणीच्या माटेगावला पुराचा वेढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरातील टिळक रस्त्यावर नेमून दिलेल्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण न करता पूरम चौकात एकत्र येऊन कारवाई करणाऱ्या तीन वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या प्रकरणी दंडाचे आदेश दिले. खडक वाहतूक विभागातील पोलीस हवालदार संतोष यादव, पोलीस शिपाई बालाजी पवार आणि मोनिका करंजकर-लांघे यांना १५ मे रोजी वेगवेगळ्या चौकांवर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली होती. संतोष यादव यांना स. प. महाविद्यालय चौक, बालाजी पवार यांना हिराबाग चौक आणि मोनिका करंजकर यांना भावे चौक येथे नियुक्त करण्यात आले होते. मात्र, तिघेही आपापल्या नेमून दिलेल्या जागी न राहता टिळक रस्त्यावरील पूरम चौकात एकत्र आले. तेथे त्यांनी वाहतूक नियंत्रणाऐवजी वाहने थांबवून कारवाई करताना आढळले. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी तिघांना निलंबित केले होते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना प्रथम पाच हजार रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांनी दिलेला खुलासा अंशतः समाधानकारक असल्याने दंडाची रक्कम दीड हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. ४३ निलंबित कर्मचारी पु्न्हा सेवेत पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाबाबतचा आढावा नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ४३ पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खडक वाहतूक शाखेतून निलंबित करण्यात आलेले पोलीस हवालदार यादव, पवार आणि करंजकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आली. त्यांची पोलीस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
छायाचित्रकार नसते तर देशाचा इतिहास कधीच कळला नसता. छायाचित्रांमुळे आपल्या देशाचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचतो. तो इतिहास जपण्याची आणि टिपण्याची मोठी जबाबदारी छायाचित्रकारांवर आहे,असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त पुणे फेस्टिव्हल व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विविध वृत्तपत्रांतील ४५ छायाचित्रकारांनी टिपलेली सुमारे ३०० छायाचित्रे बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार प्रणिती शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाल्या, समाजमाध्यमांमुळे वृत्तपत्रातील छायाचित्रकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांची सत्यता अनेकदा कमी असते; मात्र वृत्तपत्रातील छायाचित्रकारांना एकेक छायाचित्र टिपण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. ते समाजातील भावना टिपतात. अनेक छायाचित्रे बोलकी ठरतात, हीच त्यांची खरी कला आहे. पुढील पिढी जेव्हा ही छायाचित्रे पाहील, तेव्हा तिला आपले भविष्य आणि समाजाची दिशा समजू शकेल. उल्हास पवार म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलची सुरुवात केली. हा फेस्टिव्हल आज जगभरात पोहोचला आहे. छायाचित्रांचे महत्त्व आजही तेवढेच आहे. पुणे फेस्टिव्हलने हे प्रदर्शन भरविले, हे कौतुकास्पद आहे. प्रा. डॉ. पराग काळकर यांनी सांगितले,वृत्तपत्रातील छायाचित्रकार समाजमन ओळखून त्यातील भावना लोकांपर्यंत पोहोचवतात. छायाचित्रांचे प्रदर्शन होणे गरजेचे आहे. प्रास्ताविक पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी केले. ते म्हणाले, पुणे फेस्टिव्हल यंदा ३७व्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदा पुणे श्रमिक पत्रकार संघ आमच्या उपक्रमात सहभागी झाला असून, त्यानिमित्ताने छायाचित्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विविध विषयांवरील छायाचित्रे यामध्ये प्रदर्शित केली आहेत. पुण्यातील संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन आडेकर यांनी केले. तसेच व्यवस्थापन सचिन आडेकर व आबा जगताप यांनी केले.हे छायाचित्र प्रदर्शन शनिवार, ३० ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व कलादालन येथे सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
चंद्रपूरात भीषण अपघात:भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तिघांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कापणगाव येथे झालेल्या या भीषण अपघातात ऑटो चालक प्रकाश मेश्राम (48, पाचगाव), रवींद्र बोबडे (48, पाचगाव), शंकर पिपरे (50, कोची) आणि वर्षा मांदाडे (50, खामोनी) यांचा मृत्यू झाला आहे. यातील एक प्रवासी किरकोळ जखमी असून त्याच्यावर राजुरा येथे उपचार सुरू आहेत. तर तिघांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक हा राजुराकडून खामोनी-पाचगाव येथे जात होता, तर रिक्षा गडचांदूर येथून राजुराच्या दिशेने जात होती. कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवे वर रिक्षा येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक प्रकाश मेश्राम याच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी इथून जात असलेले राजुर मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत दिली. कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू कल्याण येथील निक्कीनगर परिसरात 23 ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला होता. आपल्या मुलाला शाळेत सोडून परत येत असताना दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रकची धडक बसली. यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
पुणे: आर्टफिशिअल तंत्रज्ञान अर्थात एआयचा वापर सकारात्मकरित्या केल्यास आपण कामे प्रचंड वेगाने करू शकतो. एआय विधायक रित्या वापरल्यास मानवासमोरील अनेक दुर्दम्य संकटे सोडवू शकते. एआय तंत्रज्ञान कितीही अद्ययावत असले तरी, त्याला कायमच मानवी स्पर्शाची कायमच गरज लागणार आहे. त्यामुळे, भविष्यात एआयला संकट न समजता, संधी समजावे, असे आवाहन इन्स्टिट्यूट ऑफ डिजाईनचे अधिष्ठाता डॉ.नचिकेत ठाकूर यांनी […] The post एआय संकट नव्हे, संधी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर मध्यरात्री एका इनोव्हा कारने अचानक पेट घेतला, या घटनेत ही कार जळून खाक झाली आहे. यावेळी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या या कारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे, मात्र अद्याप नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले […] The post ‘शिवतीर्थ समोर कार पेटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओबीसी समाजही करणार उपोषण ; महासंघाची बैठक
नागपूर : प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. उद्या २७ ऑगस्टला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मात्र आता ओबीसी समाजाकडून या मराठा आरक्षणाला विरोध करण्यात येत आहे. याबाबत आज नागपुरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी काळातील ओबीसी आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली […] The post ओबीसी समाजही करणार उपोषण ; महासंघाची बैठक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिघांना लोखंडी रॉडने मारहाण ;बीडमध्ये खळबळ
बीड : प्रतिनिधी बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माय-लेकीसह तिघींना बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. काही जागेच्या कारणावरुन ही मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बीडच्या च-हाटा येथे मायलेकीसह तिघींवर चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून लोखंडी पाईप आणि रॉडने मारहाण करण्यात […] The post तिघांना लोखंडी रॉडने मारहाण ;बीडमध्ये खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात 29 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय विचारमंथन शिबिरात मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एकमताने हा पाठिंब्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आपल्या आंदोलनाची तयारी करून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आणि त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. मनोज जरांगे यांच्या या भूमिकेमुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच, आता रामदास आठवले यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. आठवले गटाच्या सक्षमीकरणासाठी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय विचार मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला केंद्रीय मंत्री रामदास आठवले देखील उपस्थित होते. ते म्हणाले, या शिबिरात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याची भूमिका आधीपासून असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांची मागणी आहे की सर्व मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणे शक्य नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, अशी आमची भूमिका आहे. तसेच मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एखादी बैठक घ्यावी आणि फडणवीस यांच्यावरील टीका टाळावी, असा सल्ला देखील रामदास आठवले यांनी दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकार उलथवून लावेल, असा इशारा दिला होता. त्यावर अनेकांनी टीका देखील केली होती. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील सरकार उलथवून टाकायला मनोज जरांगे यांच्याकडे किती आमदारांचा पाठिंबा आहे? असा सवाल केला होता. यावर आता किती आमदारांचा जरांगे यांना पाठिंबा आहे, हे समोर आले आहे. किती आमदारांचा मनोज जरांगेंना पाठिंबा? चार सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित, आमदार राजू नवघरे आणि शिवसेना शिंदे गटाचे विलास भुमरे या आमदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षातील तीन खासदार आणि दोन आमदारांचा पाठिंबा आहे. यात शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील तर शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पाठिंबा दिला आहे.
‘समृद्धी’वर ट्रकने अचानक लेन बदलली; ट्रक धडकून एक ठार
वैजापूर : भरधाव वेगाने जाणा-या ट्रकने दुस-या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने चालक जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघातसमृद्धी महामार्गावर जांबरगाव शिवारात रविवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडला. शेख अन्वर शेख गफार(वय ४०, रा. आवार, ता. खामगाव), असे या घटनेतील मयताचे नाव आहे. तर चालकाचा भाचा शेख महंमद शेख असरार (१९, रा. […] The post ‘समृद्धी’वर ट्रकने अचानक लेन बदलली; ट्रक धडकून एक ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रान पेटवले आहे. त्यात आता ओबीसी नेत्यांनीही उद्यापासून राज्यभरात जनजागृती अभियान राबवून 15 दिवसांत मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वादाची ठिणगी पडून वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील उद्यापासून मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार आहेत. त्याला ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आज नागपुरात एक महत्वपूर्ण बैठक झाली. महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात आली. तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीला कडाडून विरोध करण्यात आला. 15 दिवसांत मुंबई गाठणार बबनराव तायवाडे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास आमचा ठाम विरोध आहे. आजच्या बैठकीत उद्यापासून राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पत्रकार परिषद घेऊनही ओबीसी समाजाची भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण केले जाईल. इतरही जिल्ह्यांत स्थानिक पदाधिकारी उपोष करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर पुढील 15 दिवसांत आम्ही मुंबईच्या दिशेने प्रयान करण्याचा प्रयत्न असेल. सरकारने आम्हाला ओबीसी आरक्षणाला हात न लावण्याची हमी दिली आहे. त्यावर सरकारने ठाम रहावे. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले जाते, त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देऊन आमच्या समाजाचे आरक्षण कमी करू नये. विशेषतः मराठा समाजातील नागरिकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, असे तायवाडे म्हणाले. मराठा तेवढाच मेळवावा, ओबीसी मुळासकट संपवावा दुसरीकडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची केलेली मागणी बेकायदा असल्याचा दावा केला आहे. मनोज जरांगेंची मागणी बेकायदा आहे. सरकारने त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात अराजक निर्माण होऊ शकते. मराठा तेवढाच मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा असा जरांगेंच्या मागणीचा अर्थ होतो. ओबीसी आंदोलनाविरोधात प्रतिआंदोलन पुकारतील. त्यांची संख्या जेवढी आहे, त्याच्या 10 पटीने ओबीसी समाज रस्त्यावर उतरलेला दिसेल, असे ते म्हणाले. हे ही वाचा... कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही:पण मराठा नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, फडणवीसांचा अप्रत्यक्षपणे जरांगेंना टोला मुंबई - मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला. वाचा सविस्तर
मुंबई : सरकारने ठरवले तर पाच मिनिटात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सरकार ते करत नाही. भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आश्वासन पाळावे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्यात प्रचंड मोठे बहुमत असून त्यांनी दिल्लीत जाऊन आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी. राजधर्माचे पालन करत तातडीने मराठा समाजाला […] The post मराठा आरक्षणाची घोषणा करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा समजायला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जारांनेग पाटलांची मागणी बेकायदा आहे. शासनाने त्यांना फॅक्ट समजून सांगितले पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा हाके यांनी दिला आहे. तसेच मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरांगेंच्या मागणीला अर्थ होतो, असेही हाके यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील. त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल, अशी घोषणाच हाके यांनी केली आहे. जरांगे कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभे करतील याचा नेम नाही, असे हाके म्हणाले. अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवली, जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविरोधात खालच्या स्थरावर टीका करत आहेत, मात्र तरी देखील सत्तेतील माणसे जरांगे पाटलांना रसद पुरवत आहेत. ओबीसीच्या मंत्र्यांनी गट निर्माण करून मुख्यमंत्र्यांना बोलले पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या नारायणगाव येथे दाखल झाले असून 29 तारखेला मुंबईत धडकणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, परंतु काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी पोलिसांनी आझाद मैदानावर एक दिवसाची आंदोलनाची परवानगी दिली असल्याचे समोर आले होते. मात्र, मनोज जरांगे हे आंदोलनावर तसेच आझाद मैदानावर उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूरच्या चार वकिलांची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती
नागपूर : नागपूर येथील अॅड. मेहरोज अश्रफ खान पठाण, अॅड. राज दामोदर वाकोडे, अॅड. नंदेश शंकरराव देशपांडे व अॅड. रजनीश रत्नाकर व्यास, या चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयाच्या सर्वोच्च कॉलेजियमने यासंदर्भात काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारला सादर केलेला प्रस्ताव बुधवारी मंजूर करण्यात आला. अॅड. मेहरोज खान पठाण मुंबई उच्च […] The post नागपूरच्या चार वकिलांची उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसमत तालुक्यात मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पिक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तयार करण्याच्या सूचना तहसीलदार शारदा दळवी यांनी गुरुवारी तारीख 28 दिल्या आहेत. वसमत तहसील कार्यालयात तहसीलदार शारदा दळवी यांनी तलाठी, मंडळ अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, कृषी सेवक कृषी पर्यवेक्षक यांची बैठक घेतली. यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांची उपस्थिती होती. वसमत तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदी व नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात पाणी शिरल्याने जमिनी खरडून गेल्या असून काही ठिकाणी पिकेही वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत तहसीलदार दळवी यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यामध्ये मागील पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर तक्रारीही केल्या आहेत. तालुक्यात मूग उडीद तूर कापूस हळद सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या पथकाने वस्तुनिष्ठ पंचनामे करावे. एकही शेतकरी नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. ज्या ठिकाणी पंचनामे केले जात आहेत त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तालुक्यातील पीक नुकसानीच्या शेतकरी निहाय याद्या सादर कराव्यात. पीक नुकसानीच्या पंचनामा बाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी येता कामा नये याकडे लक्ष देण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सदर पंचनामे तातडीने पूर्ण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जन्मदात्यानेच आपल्या लेकीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला होता. या घटनेतील आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला असून सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून धिंड काढण्यात आली होती. या घटनेने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात ऑनर किलिंगची ही घटना घडली होती. सुनेला नको त्या अवस्थेत प्रियकरासोबत सासऱ्याने तसेच नवऱ्याने पाहिले होते. त्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी, काकांनी तसेच आजोबांनी मुलीची व तिच्या प्रियकराची गावातून धिंड काढली. धिंड काढून झाल्यावर वडिलांनी या प्रेमीयुगुलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर विहिरीत ढकलून देत हत्या केली. या प्रकरणी मुलीचे आजोबा, काका आणि वडिलांना 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजीवनी कमळे (19, गोळेगाव) व लखन बालाजी भंडारे (19, बोरजुनी) असे या घटनेतील मयत तरुण-तरुणाचे नाव आहे. बोरजुनी येथील रहिवासी असलेल्या संजीवनी आणि एका तरुणाचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांना संजीवनीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. गेल्या वर्षी संजीवनीचे लग्न गोळेगाव येथील एका तरुणासोबत झाले, तरीही संजीवनी आणि त्या तरुणाच्या भेटीगाठी सुरू होत्या. अखेरीस, या दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी मयत तरुणीचे वडील, काका, पती, सासू-सासरे यांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. तसेच अशा पद्धतीने हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेष म्हणजे गावातून धिंड काढत असताना कोणत्याही नागरिकाने याची माहिती पोलिसांना देण्याची तसदी घेतली नसल्याचे दिसून आले. गावा-खेड्यात अद्यापही अशा घटना घडत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने कुख्यात अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. यामुळे गवळीचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. कमलाकर जामसंडेकर यांची 18 वर्षांपूर्वी 2 मार्च 2007 रोजी हत्या करण्यात आली होती. जामसंडेकर त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक होते. ते आपल्या घाटकोपर येथील घरात टीव्ही पाहत असताना अरुण गवळी गँगचे गुंड त्यांच्या घरात शिरले आणि त्यांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली. तेव्हापासून अरुण गवळी तुरुंगात बंदिस्त आहे. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी त्याने सुप्रीम कोर्टात अनेकदा याचिका दाखल केली. पण कोर्टाने ती फेटाळली. अखेर कोर्टाने आज त्याला जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला. आमदार असताना जन्मठेपेची शिक्षा उल्लेखनीय बाब म्हणजे कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामुळे मुंबईत तेव्हा मोठी खळबळ माजली होती. तेव्हा या घटनेची मोठी चर्चा झाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला होता. त्यानंतर अरुण गवळीला अटक केली होती. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने गवळीसह इतर 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर सुरेश पांचाळ, दिनेश नारकर व गणेश साळवी या सहआरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. विशेष म्हणजे ही घटना घडली त्यावेळी अरुण गवळी आमदार होता. त्यामुळे एका आमदाराला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची ती पहिलीच वेळ होती. कशी झाली होती जामसंडेकरांची हत्या? 2 मार्च 2007 रोजी सायंकाळी कमलाकर जामसंडेकर आपले नियमित काम संपवून घरी परतले होते. ते घाटकोपरच्या असल्फा व्हीलेज येथील रुमानी मंझील चाळीत राहत होते. ते आपल्या घरात निवांत टीव्ही पाहत असताना अरुण गवळीचे गुंड त्यांच्या घरात शिरले. त्यांनी जामसंडेकर दिसताच त्यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, सदाशिव सुर्वे व साहेबराव भिंताडे यांनी जामसंडेकर यांच्या हत्येची गवळीला 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणात सुर्वे व भिंताडे यांनाही अटक झाली होती. त्यानंतर 21 मे 2008 रोजी अरुण गवळीच्याही भायखळा येथील दगडी चाळीतून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. 27 जुलै 2008 रोजी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती. गवळीच्या पक्षाच्या उमेदवाराचा केला होता पराभव मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कमलाकर जामसंडेकर यांनी अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे उमेदवार अजित राणे याचा अवघ्या 367 मतांनी पराभव केला होता. त्यानंतर नगरसेवक म्हणून काम करत असतानाच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
बीड जिल्ह्यात वाण नदीला पूर; दोघेजण वाहून गेले, एक ठार
बीड : प्रतिनिधी जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील बहुतांश भागात सकाळ पर्यंत पावसाची रिप रिप सुरूच होती.धारूर येथील वाण नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतानाही चार चाकी व ऑटो वाहून गेल्याने यात एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकाचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. धारूर तालुक्यातील वाण नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून वाहणा-या पाण्याचा […] The post बीड जिल्ह्यात वाण नदीला पूर; दोघेजण वाहून गेले, एक ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३५ हजार महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण
पुणे : प्रतिनिधी ओम गं गणपतये नम:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून श्री गणरायाला नमन केले. श्री गणेश नामाचा जयघोष करीत ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला.अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर केला. निमित्त होते,श्रीमंत […] The post ३५ हजार महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोलीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांचे मागील दहा दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरुच असून गुरुवारी ता. २८ सुमारे ४०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाकडे तसेच ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यातील आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत सामावून घ्यावे, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना ४० हजार रुपये एकत्रित मानधन द्यावे यासह इतर मागण्यांसाठी सुमारे ३० हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी ता. १९ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून समुदाय आरोग्य अधिकारी देखील या आंदोलनात सहभागी असल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्राचे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील सुमारे ४०० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आला. शासनाच्या विरोधात घोषणा देत तसेच शासनाच्या विरोधातील फलके हाती घेऊन काढण्यात आलेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी खासदार नागेश पाटील यांनाही निवेदन दिले. यावेळी खासदार पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शासना दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडेही मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यावेळी शंकर तावडे, श्रीपाद गारूडी, पी. एस. गिरी, एन. ए. बुर्से, प्रसाद कुलकर्णी, राजेश्वर पुंडगे, एस. एस. करेवार, बी. आर. खेबाळे, बी. डी. शेळके, दीपक पवार, व्ही. बी. बेले, शेख मुुनाफ, बालाजी उबाळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
मुंबई : वृत्तसंस्था देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडूंनी भाग घेतला आहे. मात्र असे असूनही क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण कोट्यवधींची संपत्ती असून लाईव्ह कव्हरेज दाखवू शकत नसतील तर काय फायदा? अशा प्रकारे टीका केली आहे. दरम्यान, गल्लीबोलातील क्रिकेट सामने हल्ली युट्यूबवर लाईव्ह दाखवले जातात. एखाद्या […] The post बीसीसीआयवर क्रीडाप्रेमी नाराज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जॅकलिनने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमल्याचे दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी लालबागच्या दर्शनासाठी येत आहे. गणेशत्सोवाच्या पहिल्याच दिवशी जॅकलिन फर्नांडिसने देखील लालबागच्या राजेचे दर्शन घेतेले आहे. यावेळी तिच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार देखील पाहायला मिळाले. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. जॅकलिन फर्नांडिस तसेच […] The post जॅकलिनने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गणरायाच्या आगमनासोबतच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत आज पावसाचे आगमन झाले आहे. मागील पंधरवड्यात अतिवृष्टीचा जोरदार फटका बसलेल्या नांदेड जिल्ह्यालाही शुक्रवारी पावसाने चांगलेच झोडपले. यामुळे जिल्ह्यातील विविध नदी नाल्यांना पूर येऊन अनेक गावांचा मुख्यालयाशी असणारा संपर्क तुटला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवार सायंकाळपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. काही गावांत रात्री, तर काही गावांत गुरूवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरस्थिती उद्भवली आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. विशेषतः मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले आहे. येथील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे चांडोळा, येवती, मुखेड, जांब, बाऱ्हाळी, मुक्रमाबाद, अंबुलगा व जाहुर या 8 मंडळांना पावसाचा फटका बसला आहे. येथील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. बुडित क्षेत्रातील हसनाळ व रावणगाव या गावांना पुन्हा पावसाच्या पाण्याने वेढले आहे. कंधार तालुक्यातील 4 गावांचा संपर्क तुटला कंधार तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. तालुक्यातील हाळदा, दहीकळंबा, भूकमारी, धानोरा कौठा, चौकी महाकाय, मंगलसांगवी, लाडका, गोणार, शेलाळी, चौकी धर्मपुरी, देवईचीवाडी, गुंडा, जाकापूर, चिखली, नारनाळी, आलेगाव, बारूळ, पेठवडज, औराळ आदी 20 गावांत पुराचे पाणी शिरले असून, लाडका, मानसिंगवाडी, रुई व मोहिदा परांडा या 4 गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. तालुक्यात गुरूवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 55.6 मिमी पाऊस झाला. पावसाचा जोर आणखी वाढतच आहे. पावसामुळे उर्ध्वमानार प्रकल्प धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे या धरणात येणारे अतिरिक्त पाणी खालच्या भागात सोडले जात आहे. सध्या उर्ध्वमानार धरणाचे 7 दरवाजे 0.5 मीटरने उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. हा विसर्ग पावसाची स्थिती पाहून वाढवला जाणार आहे. त्यामुळे कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. नायगाव तालुक्यात शेतशिवारात सर्वत्र पाणी नायगाव तालुक्यातील नरसी येथे आज सर्वाधिक 115 मिलिमीटर पाऊस झाला. नायगावातीलही अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. नायगाव तालुक्यातील नरसी - बिलोली मार्ग वाहतुकीसाठी तूर्त बंद करण्यात आला आहे. मुखेड तालुक्यातील जाहूर - उंद्री - देगलूर हा मार्ग बंद झाल आहे. शेतशिवारात सर्वत्र पाणी घुसले आहे. त्यामुळे अगोदरच पाण्यात असणारी पिके आता पूर्णतः वाया गेली आहेत. गडगा परिसरात रात्रीपासून ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू असून, आताही जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ओहोळ व नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
राधानगरीचे पाच दरवाजे पुन्हा खुले
कोल्हापूर : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या धामधुमीतच राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने, धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. या दरवाजांमधून होणारा ७१४० क्युसेक्स आणि वीजगृहातून १५०० क्युसेक्स असा एकूण ८६४० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणाच्या […] The post राधानगरीचे पाच दरवाजे पुन्हा खुले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उमरीत पावसाचे थैमान; घर, दुकानात शिरले पाणी
उमरी : प्रतिनिधी थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर बाप्पाच्या आगमनासोबतच वरुण राजाने देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हजेरी लावली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. आज (दि.२८) सकाळपासूनच उमरी शहर व तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. भोकर भागात जोरदार पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. कामारेड्डी भागात […] The post उमरीत पावसाचे थैमान; घर, दुकानात शिरले पाणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी असलेल्या पुण्यात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सुमारे 70 एकर जागेवर पिंपरी-चिंचवड शहरात आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे,भारतीय व्यवस्थापन संस्था (आय आय एम) स्थापन केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोशी येथे आयआयएम कॅम्पससाठी जागा दिली आहे. सध्या देशात २१ भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) कार्यरत आहेत. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे मुंबई व नागपूर अशा दोन आयआयएम आहेत. आयआयएम नागपूर येथील शाखा सुरू होत आहे. गेले वर्षभर यासाठी पाठपुरावा सुरू होता. उद्योग नगरी, कामगार नगरी, आयटी हब आणि ऑटो हब अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यात देशातील व्यवस्थापन क्षेत्राची उच्चतम संस्था प्रारंभ करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी पुणे, मुंबई व नागपुरात काही बैठकी घेतल्या. दरम्यान, महसूल मंत्री यांनी मोशी येथील 70 एकर जागेला मान्यता दिली आहे. 'आयआयएम' च्या कामाला आता गती मिळेल. भूसंपादनाची प्रक्रिया प्रारंभ होत आल्याने आपण आनंदी आहोत असे सांगून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, गणेश आगमनाचा उत्साह सुरू असतानाच शहरात आता आयआयएम सारखी नामांकित संस्था सुरू करण्याच्या कार्याचा खऱ्या अर्थाने ‘‘श्रीगणेशा’’ झाला आहे. पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असून येथे देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक वास्तव्यास आहेत. मुंबई-पुणे कनेक्टिव्हीटी, औद्योगिक विकास आणि शैक्षणिक वातावरण लक्षात घेता आयआयएमसारखी संस्था सुरू होणे हे शहरासाठी अभिमानास्पद आहे.
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही जिल्ह्याची परिस्थिती पालकमंत्र्यांकडून शासनाकडे मांडली जात नाही. त्यामुळे शेतकरी व सर्व सामान्यांच्या प्रश्नावर पालकमंत्री गंभीर नाहीत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी गुरुवारी ता. २८ पत्रकारांशी बोलताना केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पिकनुकसानीची माहिती व प्रशासनाकडून झालेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. जिल्ह्यात पिक नुकसानीचे तातडाने पंचनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार आष्टीकर म्हणाले की, अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान हिंगोली, नांदेड व परभणी जिल्हयात झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावल्या गेल्या असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यानंतरही शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला. हिंगोलीचे पालकत्व स्विकारलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नुकसानीची माहिती घेऊन मंत्रिमंडळात मांडली पाहिजे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली पाहिजे. मात्र पालकमंत्री जिल्ह्यातील शेतकरी व महत्वाच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधीपक्ष म्हणून आम्ही बरेचदा शासन दरबारी पाठपुरावा करतो. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम पालकमंत्र्यांचे आहे. पालकमंत्र्यांनी मंत्रिमंडळात माहिती दिली तर शासनाकडून मदत मंजूर होईल. मात्र अद्यापही पालकमंत्र्यांची नुकसानीची माहिती शासनाकडे मांडली नसल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी का उभे राहात नाही हे कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी महिन्यातून दोन महिन्यातून एकदा जिल्ह्यात येऊन आढावा घेणे आवश्यक आहे. मात्र पालकमंत्री येत नाहीत अन सरकारच्या कानावर आवाज जात नाही हि गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला आमचा पाठींबा असून शुक्रवारी ता. २९ आयोजित आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचेही खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी यावेळी सांगितले
भाजपचा ‘१०० प्लस’; इच्छुकांची दाणादाण
नाशिक : प्रतिनिधी भाजपसह महायुतीच्या तिन्ही पक्षांनी नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यात सुरुवातीला वेग घेतलेला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आता बचावात्मक स्थितीत आला आहे. भाजपचे ‘हंड्रेड प्लस धोरण’ त्याला कारणीभूत ठरण्याची चिन्हे आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर जो जो इच्छुक असेल त्या सगळ्यांना कोणतीही तपासणी न […] The post भाजपचा ‘१०० प्लस’; इच्छुकांची दाणादाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही मराठा समाजासाठी हिताची नाही, असे ते म्हणालेत. तसेच मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मराठा समाजाच्या नेत्यांनी अभ्यास करून मागणी करावी, असा टोलाही त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जरांगेंना हाणला. मनोज जरांगे यांनी मुंबईला निघण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत आणि एकनाथ शिंदे यांना काही बोलू देत नाहीत, असा आरोपही जरांगे यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? ओबीसीमध्ये जवळपास 350 जाती आहेत. मेडिकलच्या प्रवेशाचे बघितल्यास ओबीसीचा कटऑफ एसीबीसीच्या वर आहे. एसीबीसीच्या कटऑफ ईडब्ल्यूएसच्या वर आहे. त्यामुळे आताच्या मागणीने किती भले होणार, याची मला कल्पना नाही. आकडेवारी नीट पाहिल्यास मराठा समाजाच्या हिताचे काय आहे, ते आपल्या लक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. समाजाच्या नेत्यांनी विचार करून मागणी करावी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून मागणी केली पाहिजे, ही जबाबदारी मराठा समाजाच्या नेत्यांची आहे. एसीबीसी किंवा ईडब्ल्यूएसची मागणी असेल, तर राजकीय आरक्षण मिळणार नाही. राजकीय आरक्षणाचा हेतू असेल, तर वेगळी गोष्ट आहे. पण तो हेतू नसेल आणि सामाजिक, आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल, तर मागणीचा योग्यप्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जरांगेंचे आंदोलन आमच्यासाठी राजकीय नाही मनोज जरांगेंचे आंदोलन कुठेतरी राजकीय होत चाललंय हा प्रश्न आता दिसतोय. यापूर्वी काय झाले? हे सर्वांनी बघितले आहे. आजही आंदोलनासाठी रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत? हे आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्यासाठी मनोज जरांगेंचे आंदोलन राजकीय नाही. आम्ही त्याला सामाजिक चष्म्यातून पाहू. काही राजकीय पक्ष त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी आणि शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी निर्णय घेतले मराठा समाजासाठीचे निर्णय मी मुख्यमंत्री आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ 15 वर्ष हा स्थापन झाले नाही? 15 वर्षे कुणाची सत्ता होती? असा सवाल करत, मी ते उभे केल्याचे फडणवीसांनी सांगितले. आज दीड लाख उद्योजक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने तयार केलेत. आज सारथीच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस अधिकारी तयार होत आहेत. एमपीएससीचे विद्यार्थी तयार होत आहेत. स्पर्धापरिक्षांमध्ये विद्याथी टिकत आहे. मविआ सरकारे मराठा समाजासाठी घेतलेला एक निर्णय दाखवावा मराठा समाजासाठी शिक्षणाच्या योजना, वसतीगृहाच्या योजना, वसतीगृह होईपर्यंत भत्त्याच्या योजना सगळे आम्ही केलेले आहे. त्यामुळे काही लोक तोंड वर विचारतात, त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी मराठा समाजासाठी नेमके काय केले? ते सांगावे. अडीच वर्ष जे सरकार होते, त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दिले आहे.
रेणापूर मध्यम प्रकल्पाची २ दारं उघडली
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दोन दारे उघडण्यात आली असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रेणापूर मध्यप्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज सकाळी ठीक ८.१५ वाजता रेणापूर प्रकल्पाचे २ द्वार उघडण्यात आले आहेत. रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. […] The post रेणापूर मध्यम प्रकल्पाची २ दारं उघडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टी; चोबळी नदीला पूर
अहमदपूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात २७ ऑगस्टपासून संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना पावसाने चांगलेच घेरले आहे. अहमदपूर तालुक्यातील चोबळी नदीला पूर आल्यामुळे वायगाव पाटी ते गादेवाडी हा रस्ता बंद झाला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अहमदपूर तालुक्यात दमदार पाऊस पडतो आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. […] The post अहमदपूर तालुक्यात अतिवृष्टी; चोबळी नदीला पूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मांजरा नदीचे रौद्र रूप; पाणी पात्राबाहेर
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे उजेड आणि परिसरातील शिवारात मांजरा नदीचे रौद्र रूप पाहण्यास मिळत आहे. नदीपात्राबाहेर पाणी शेत शिवारातून वाहात आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येते आहे. सततच्या होणा-या पावसाने मांजरा नदीने रौद्र रूप धारण केले आहे. नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. नदीकाठच्या शेतातील सोयाबीन, मूग पिकामधून पाणी वाहत […] The post मांजरा नदीचे रौद्र रूप; पाणी पात्राबाहेर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या इथेनॉल निर्मिती कंपनीच्या शेअरचा भाव 20 दिवसांत तब्बल 60 टक्क्यांनी वाढल्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निखील गडकरींची कंपनी इथेनॉल निर्मिती करते. त्यामुळेच त्याचे बाबा (नितीन गडकरी) आपल्या डोक्यावर E20 म्हणजे 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा वापर हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. इथेनॉल हे उसासारख्या पिकांपासून तयार केले जाते, ते पेट्रोलमध्ये मिसळल्याने जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडच्या उत्सर्जनात घट होते. पर्यायाने हवेची गुणवत्ता सुधारून हरितगृह वायूंचे प्रमाण कमी होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात, इथेनॉल उत्पादनामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. निखील गडकरींचे बाबा म्हणत... अंजली दमानिया गुरूवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या की, Cian Agro ह्या कंपनीचा भाव 5 ऑगस्टला ₹398 होता, तो आज 28 ऑगस्ट ला ₹701 कसा झाला? 20 दिवसात 60% वाढ? इतकी अफलातून वाढ कशी झाली? ही कंपनी निखिल गडकरी ह्यांची आहे. त्याचे नाव पूर्वी Umred Agro ह्या नावाने होती. ही कंपनी इथेनॉल निर्मिती करते आणि म्हणून ह्या निखिल गडकरींचे बाबा, आपल्या डोक्यावर E20 म्हणजे, 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल ठोकत आहेत. जितके इथेनॉल मिश्रित पेट्रोल आपण वापरू, आपल्या गाड्यांचे एवरेज कमी होणार व मेंटेनेंस चा खर्च वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सोन्याची खाण हाती लागली का? ज्या कंपनीच्या शेयर ची किंमत जुलै 2024 पर्यंत, ₹42 होती त्या कंपनीत असे काय झाले की त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत एका वर्षात ₹701 झाली? सोन्याची खांड सापडली का? ही जादूची कंपनी Cian Agro आहे आणि त्या कंपनीच्या मालकांच्या बाबांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्यांनी इथेनॉल वापरायला आपल्याला भाग पाडले आणि मुलाच्या कंपनी ला भरमसाठ प्रॉफिट, असेही दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी यापूर्वी अनेकदा नितीन गडकरी व त्यांच्या पूर्ती उद्योग समुहावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी त्यांच्यात मोठा वाद रंगला होता.
आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. 14 टक्के आरक्षण दिले मराठा आर्थिक विकास महामंडळाचे पुनर्जीवन केले. पण उद्धव ठाकरे यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण गेलं. त्यामुळे आरक्षणाचे पाप उद्धव ठाकरेंचे आहे. संजय राऊत यांनी सामना मध्ये मराठा मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणत व्यंगचित्र काढलं होतं. आमच्या मराठा समाजाचा अपमान करणाऱ्या संजय राऊत यांची आरक्षणावर बोलण्याची पात्रता नाही, आधी त्यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. नवनाथ बन पुढे बोलताना म्हणाले की, औरंगजेब फॅन क्लब प्रवक्ते पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका करतात, पण महाराष्ट्राची जनता जाणते की महायुती सरकारने दिलेलं आरक्षण मविआ सरकारमुळेच गेलं होतं. त्या यामुळे राऊत यांनी आरक्षणावर बोलण्याऐवजी जनतेची माफी मागावी. इतर एकाही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही. ते आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. याची आठवणही बन यांनी करून दिली. राऊतांना लगावला खोचक टोला नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांची परंपरा कुबुद्धी ची आहे का? देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या परंपरेवर बोलण्याचा अधिकार राऊत यांना नाही. गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की सकाळी उठून बडबड करण्याची कुबुद्धी त्यांना देऊ नये, असा खोचक टोलाही बन यांनी राऊतांना लगावला आहे. मनसे-शिवसेना नात्याबाबतही काढला चिमटा नवनाथ बन म्हणाले की, नवनाथ बन म्हणाले की, तुमच्या कर्तृत्वामुळे राज ठाकरे यांना शिवसेना सोडत वेगळा पक्ष काढण्याची वेळ आली. तो पर्यंत तुम्हाला भावाबद्दल प्रेम नव्हते. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले आणि महाराष्ट्रातील जनतेने त्यांना घरी बसवले मग तु्म्हाला लाडका भाऊ आठवला. हे दोघे भाऊ असेच एकत्र रहावेत. तुम्हाला लाडका भाऊ आज आठवला. 2014 आणि 2019 ला राज ठाकरेंनी हात पुढे केला पण तुम्ही त्यांच्यासोबत गेला नाहीत. मात्र आता जनतेने घरी बसवल्यानंतर आणि आपलं दुकान बंद होऊ लागल्यानंतर भाऊ आठवतोय. येत्या काळात दोन भाऊ एकत्र राहावेत ह्याच आमच्या शुभेच्छा आहेत.
चाकूरसह परिसराला पावसाने झोडपले
चाकूर : अ.ना.शिंदे दिंनाक २७ ऑगस्ट रोजी बुधवारी रात्री सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेला पाऊस मुसळधार पाऊस रात्रभर सुरू होता. तर आज गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळ पासुनच मुसळधार पावसाने लातूर जिल्ह्यात हजेरी लावली. चाकूर तालुक्यात चाकूरसह परिसरातील सर्व गावांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे नदी,नाले आणि ओढे तुडूंब,नागरिकांच्या राहत्या घरात पाणी शिरले आहे. अनेक […] The post चाकूरसह परिसराला पावसाने झोडपले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुसळधार पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
नांदेड : प्रतिनिधी दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये विस्कळीत पणा आला आहे. यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आले असून काही उशीरा धावतील तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी सुटलेली गाडी (१७०५७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेस ही गाडी […] The post मुसळधार पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
पुणे : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी काल (२७ ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवर पोहचले. यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत व्यक्तीचे […] The post जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. मुंबईतील आपल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. बाळ कर्वे यांनी 3 दिवसांपूर्वीच आपला 95 वा वाढदिवस साजरा केला होता हे विशेष. बाळ कर्वे यांच्या कन्या स्वाती कर्वे यांनी एका पोस्टद्वारे बाळ कर्वे यांच्या निधनाची माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांनी गुरूवारी सकाळी 10.15 वा. अखेरचा श्वास घेतला, असे त्या म्हणाल्या. बाळ कर्वे यांनी 1979 साली दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या चिमणराव या मालिकेत गुंड्याभाऊंची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. त्यांना चित्रपटसृष्टीतही गुंड्याभाऊ याच नावाने ओळखले जात होते. 'जैत रे जैत' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी बन्याबापू, लपंडाव, गोडी गुलाबी, चातक चांदणी आदी अनेक चित्रपट केले. सई परांजपे यांच्या 'कथा' या एकमेव हिंदी सिनेमात त्यांनी अभिनय केला होता. बाळ कर्वे यांचा जन्म 25 ऑगस्ट 1930 रोजी झाला होता. त्यांची चिमणराव ही मालिका प्रदर्शित झाली आणि त्यानंतर लोक त्यांना गुंड्याभाऊ या नावानेच ओळखू लागले. त्यांनी गत अनेक दशके कलाक्षेत्रावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी विजया मेहता व विजया जोगळेकर - धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नाट्यप्रवासाची सुरुवात केली. त्यांनी रथचक्र, तांदूळ निवडता निवडता, मनोमनी, आई रिटायर होते, कुसूम मनोहर लेले आदी नाटकांतही त्यांनी काम केले. मराठी मनोरंजन विश्वातील 'प्रीतीचं झुळझुळ पाणी' हे गाजलेले गाणे बाळ कर्वे यांच्यावर चित्रित झाले आहे. उत्कृष्ट अभिनय, मराठी भाषेवर प्रभुत्व, नम्र स्वभाव, अभिनयाची समज आणि सहकलाकारांसोबतची मैत्री अशा गुणांमुळे बाळ कर्वे ओळखले जात असत. इंजिनिअर ते अभिनेता असा प्रवास पुणे येथील इंजिनिअर ते अभिनेते त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून ते स्थापत्य अभियंता झाले. त्यानंतर ते मुंबई महापालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीस लागले. त्यांनी तब्बल 32 वर्षे नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते विलेपार्ले येथील आपल्या एका नातेवाईकाकडे राह9त होते. त्याच इमारतीत सुमंत वरणगावकर राहत होते. ते रंगभूमीशी संबंधित होते. नाटकांची आवड असल्यामुळे त्यांची बाळ कर्वेंशी मैत्री झाली. त्यानंतर त्यांनी या दोघांनी मिळून किलबिल बालरंगमंच नामक एक संस्था स्थापन केली. या संस्थेंच्या माध्यमातून त्यांनी बालनाट्यांची निर्मिती सुरू केली.त्यानंतर बाळ कर्वे यांना चिं. वि. जोशी यांच्या चिमणराव मालिकेत गुंड्याभाऊंची भूमिका मिळाली. वस्तुतः या भूमिकेसाठी प्रारंभी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे नाव चर्चेत होते. पण काही कारणास्तव त्यांना हे नाटक करता आले नाही. त्यामुळे ही भूमिका बाळ कर्वे यांच्या वाट्याला आली. त्यानंतर त्यांनी या संधीचे सोने करत गुंड्याभाऊंची भूमिका अजरामर केली. या मालिकेने मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. लोक कर्वे यांना गुंड्याभाऊ म्हणूनच हाका मारू लागले. गुंड्याभाऊ या पात्राने मिळवून दिलेली ओळख इतकी आहे की, आजही विलेपार्ल्यातून फिरताना मला लोक गुंड्याभाऊ म्हणूनच हाक मारतात, असे कर्वे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
नांदेड येथे अतिवृष्टी; हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
नांदेड : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत नांदेड जिल्ह्यास दुपारी ०१:०० वाजेपर्यंत ऑरेंज अलर्ट असून सद्यस्थितीत जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे. आज सकाळी १०:०० वाजता जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, कंधार, नायगाव या चार तालुक्यातील १७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. निझामसागर धरणातून सकाळी १०:०० वाजता २४ गेट उघडून १,९९,२४४ क्युसेक्स वेगाने विसर्ग चालू आहे. तसेच श्रीराम सागर […] The post नांदेड येथे अतिवृष्टी; हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे निघालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असे मृत पावलेल्या आंदोलकाचे नाव असून, ते केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी होते. या घटनेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देताना संवेदना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणसाठी याआधीही अनेकांनी बलिदान दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पदयात्रा सुरू केली आहे. मोर्चाचा जुन्नर येथे पहिला मुक्काम होता. सतीश देशमुख हे देखील मनोज जरांगेसोबत मोर्चात सहभागी झाले होते. जुन्नरमध्ये असताना सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी सतीश देशमुख यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे मराठा समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सतीश भैय्याचे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही - जरांगे आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये दु:खाची लाट पसरली. याबाबत जरांगेंनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेनं जाताना ही दुर्दैवी घटना घडली. सतीश भैय्याचे आताच बलिदान गेले. हे बलिदान वाया जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे आपण संयमाने आंदोलनाची लढाई लढू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी लातूरच्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात एका मराठा बांधवाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगे मुंबईला निघण्याच्या एक दिवसआधी घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. बळीराम मुळे (वय ३५) असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बळीराम मुळे याने आपल्या खिशात एक चिठ्ठी ठेवून विष प्राशन केले. या चिठ्ठीत त्याने सरकारवर 'मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा' करत असल्याचा आणि 'जरांगे पाटलांना वारंवार उपोषणाची वेळ आणत असल्याचा' आरोप केला. या घटनेची माहिती मिळताच, नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला तात्काळ लातूरच्या रुग्णालयात दाखल केले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात अतिवृष्टी
कंधार : प्रतिनिधी दि. २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कंधार तालुक्यात अतिवृष्टीचे भीषण चित्र पाहायला मिळाले आहे. सतत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढे दुधडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले असून, शेतशिवार पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले […] The post नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात अतिवृष्टी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दगडूशेठ गणपतीसमोर स्त्रीशक्तीचा जागर:ऋषीपंचमीला ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती
ओम गं गणपतये नमः:... ओम नमस्ते गणपतये... मोरया, मोरया... च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला. निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, पुणे विभागाच्या धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर, न्यायाधीश किरण क्षीरसागर, प्रसेनजीत फडणवीस, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अंकुश रासने यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पाऊस असला तरी पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. उपक्रमाचे ४० वे वर्ष होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गजानना गजानना मंगलमूर्ती गजानना या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. मोरया मोरया दगडूशेठ मोरया... असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. सुनेत्रा पवार म्हणाल्या, केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे भारतासह विविध ठिकाणांहून महिला मोठ्या संख्येने या उपक्रमासाठी आल्या आहेत. गणेशाचरणी लीन होत असताना बाप्पाच्या आशीर्वादाने सगळ्यांना आरोग्य, प्रगती आणि भरभराटीचे हे वर्ष जावो, अशी प्रार्थना त्यांनी केली. अर्चना भालेराव, प्रा. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. परदेशी अभिनेत्रीची पठणासाठी उपस्थिती पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला ऍना मारा या इटली येथील अभिनेत्रीने देखील हजेरी लावत सहभाग घेतला.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. आम्हीदेखील मराठा समाजाचे असल्याने त्यांच्या आंदोलनाचे समर्थकच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर आम्ही देश अन् महाराष्ट्र चालवत आहोत. मराठी माणूस म्हंटलो की छत्रपती शिवराय यांच्या आशीर्वादाने चालणारा माणूस आपण त्यांच्याकडे पाहतो, मग जे कुणी असतील. त्यामुळे एखाद्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल किंवा कुणाच्याही आईबद्दल बोलावे ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण नाही, असे भाजप आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. प्रसाद लाड पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला सांगितले की प्रत्येक स्त्रीला आपल्या आईच्या नजरेतून पाहा. म्हणून त्यांच नजरेतून आम्ही मनोज जरांगे पाटील यांना सांगितले की तुम्ही ज्या आईवरून शिव्या दिल्या त्याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही जर दिलगिरी व्यक्त केली नाही तर आम्हालाही त्याच भाषेत व्यक्त व्हावे लागेल. त्यांनी लगेच या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्यामुळे विषय संपला. कार्यकर्त्यांनी बॅनर लावले प्रसाद लाड म्हणाले की, महाराष्ट्राला संस्कृती आहे, परंपरा आहे, लोक इतिहास लक्षात ठेवतात, शिव्या शाप लक्षात ठेवत नाहीत याचे आठवन करुण देण्याचे काम आम्ही बॅनरच्या माध्यमातून केले आहे. बॅनर बऱ्याच कार्यकर्त्यांनी लावले आणि काढले.पण बॅनर काढणे हा मनपाचा विषय आहे. बॅनर लावले हे मान्य आहे. समाजाने फडणवीसांचे आभार मानावे प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत काही इतका मोठा माणूस नाही की त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही द्यावे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कुणीही विरोध केलेला नाही. उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलन करु नका हे सांगितले आहे. त्याच्याविरोधात जाऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने जरांगे पाटील यांना 1 दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांचे आपण आभार मानले पाहिजे की आमच्या समाजाच्या आंदोलनासाठी त्यांनी परवानगी दिली आहे. 5 हजार लोक तिथे येऊ शकतात असा त्यात उल्लेख आहे. चर्चेतून मार्ग काढावा प्रसाद लाड म्हणाले की, आरक्षणाचा विषय हा आंदोलनामुळे संपणार नाही तो चर्चेने सुटणार आहे. जर चर्चेने विषय सोडवायचे असेल तर उपसमिती बनवली आहे. त्यांचे प्रमुख विखे पाटील असून उदय सामंत त्या समितीमध्ये आहेत. या समितीच्या माध्यमातून चर्चा काढून मार्ग काढता येऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की एकनाथ शिंदे यांनी काही जीआर दिला होता असे त्याचे म्हणणे आहे. पण त्यावर चर्चेतून मार्ग काढावा. आम्ही सर्व जण आणि सरकार आरक्षणाच्या मुद्यावर तुमच्यासोबत आहोत. राऊतांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही- बन आमच्या मराठा बांधवांना आरक्षण देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते आरक्षण घालवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. ते आज मराठा समाजाबद्दल बोलत आहेत. संजय राऊत यांना मराठा आंदोलन किंवा मराठा आरक्षणाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर मराठा बांधवांचा सातत्याने अपमान करण्याचे काम संजय राऊत यांनी केली होते.
चाकूर तालुक्यातील टाकळगाव पुराच्या पाण्याखाली
लातूर : प्रतिनिधी सध्या राज्यात सर्वत्र पाऊस सुरू असून लातूर जिल्ह्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे चाकूर तालुक्यातील टाकळगाव तिरू नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली आले असल्याचे वृत्त समोर येत आहे. The post चाकूर तालुक्यातील टाकळगाव पुराच्या पाण्याखाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या बी.टेकच्या विद्यार्थिनीवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीनुसार, मुख्य आरोपीसह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. ऋतिक सांडू सलामपुरे (23) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने बी.टेक प्रथम वर्षाच्या एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. आरोपी केवळ एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पीडित तरुणीशी जबरदस्तीने लग्न केले. त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. हा त्रास सहन करण्यापलिकडे गेल्यानंतर पीडित तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून आपली आपबीती कथन केली. त्यानंतर तिच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी वेगवान कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्याच्या 2 सहकाऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. संभाजीनगर पाडसवान हत्याकांडाने हादरले उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजीनगरातील सिडको एन-6 भागात गत आठवड्यात जमिनीच्या वादातून प्रमोद रमेश पाडसवान (38) यांची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. यासंबंधीच्या माहितीनुसार, शहरातील संभाजी कॉलनीत वास्तव्यास असलेल्या पाडसवान कुटुंबाचे संताजी किराणा नावाचे मागील 25 वर्षांपासून दुकान आहे. आरोपी ज्ञानेश्वर निमोने याने मागील 3 वर्षांपासून पाडसवान यांच्या घरासमोरील सिडकोच्या अतिरिक्त जागेवर गणपती बसवणे सुरू केले होते. 2 वर्षांपूर्वी पाडसवान कुटुंबाने हा प्लॉट खरेदी केला होता. ही गोष्ट निमोनेंना खुपत होती. त्यातून त्यांच्यात नेहमीत खटके उडत होते. मागील 2 वर्षांपासून सुरू असलेला हा वाद यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी पुन्हा उफाळून आला. पाडसवान यांनी आपल्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी काही साहित्य आणून टाकले होते. पण निमोने यांनी त्याच प्लॉटवर गणपती बसवण्याचा हट्ट धरला होता. यामुळे ते पाडसवान कुटुंबाला प्लॉटवरील बांधकाम साहित्य काढून घेण्यासाठी धमकावत होते. त्यावर पाडसवान यांनी गणपती बसवण्यासाठी अर्धा प्लॉट देण्याची तयारी दर्शवली होती. पण निमोनेला ते मान्य नव्हते. त्याने संपूर्ण प्लॉटच रिकामा करून मागितला. यातून झालेल्या वादात प्रमोद पाडसवान यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घनटेचेही शहरात तीव्र पडसाद उमटत आहेत. हे ही वाचा... केंद्र सरकार देशाचे आहे की फक्त गुजरातचे?:आमदार रोहित पवार यांचा सवाल; मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व कमी केले जात असल्याचा आरोप मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गुरूवारी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर मुंबई व महाराष्ट्राचे महत्व पद्धतशीरपणे कमी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्र सरकार देशाचे आहे की फक्त गुजरातचे? असा खडा सवाल उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर
कोकणातील गुहागर येथून गावी खिल्लार (ता. सेनगाव) येथे निघालेले चव्हाण कुटुंबांचा संपर्क होत नसल्याने सुरु झालेली शोधाशोध अखेर 31 तासानंतर गुरुवारी ता. 28 संपली. सदर कुटुंब गोंदवले येथे सुखरुप असल्याचा संदेश मिळताच संपूर्ण गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. याबाबत त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील ज्ञानेश्वर चव्हाण हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह गुहागर येते राहतात. सन 2005 पासून ते गुहाकर परिसरात सहशिक्षक म्हणून काम करतात. सध्या ते रांगळेवाडी पोमेंदी (रा. गुहागर) शाळेत कार्यरत आहेत. सध्या गणेशोत्सवाच्या सुट्टया असल्यामुळे ज्ञानेश्वर हे त्यांची पत्नी स्मिता चव्हाण, मुलगा पीयूष व शौर्य यांच्यासह कारने मंगळवारी ता. 26 दुपारी गावाकडे निघाले होते. दरम्यान, गुहागर येथून निघालेले चव्हाण कुटुंबीय बुधवारी ता. 27 दुपारी खिल्लार येथे पोहोचणे अपेक्षीत होते. मात्र ते पोहोचले नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरु केला. त्यांचे मोबाईल देखील स्वीच ऑफ येत असल्याने संपूर्ण वारकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. काही नातेवाइकांनी थेट गुहागर मार्गावरून जाऊन शोध सुरु केला होता. त्यांच्या मोबाईलचे अखेरचे लोकेशन चिपळूण येथे येत असल्याने नातेवाइकांनी चिपळूण परिसर पिंजून काढला आहे. मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही. दरम्यान, त्यांनी एका ढाब्यावर जेवण करून पंढरपूरकडे जाण्याचे नियोजन केले होते असे एका ढाबा चालकाने सांगितले. त्यामुळे त्यांच्या काही नातेवाइकांनी पंढरपूरकडे जाऊन शोध कार्य सुरु केले होते. त्यानंतर त्यांच्या शाळेतील काही शिक्षक व पोलिस कर्मचाऱ्यांनी गोंदवले येथे जाऊन शोध घेतला असता चव्हाण कुटुंबीय सुखरुप आढळून आले. त्यांच्या सुखरुप असल्याचा संदेश मिळताच मागील 31 तासांपासून सुरू असलेला शोध थांबला अन गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पाण्यामुळे मोबाईल बंद पडले- ज्ञानेश्वर चव्हाण गणेशोत्सवाच्या सुट्टया असल्यामुळे गुहागर येथून गावी येत होते. रस्त्यात प्रचंड पाऊस झाला होता. या पावसात मोबाईल बंद पडले. त्यामुळे कोणाशीही संपर्क करता आला नाही. आम्ही सुखरुप आहोत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनासाठी ते आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र, मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्यापूर्वीच भाजपच्या वतीने त्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत. या बॅनरवर 'इतिहास हा कर्तृत्ववान व्यक्तींना लक्षात ठेवतो' असे लिहिलेले आहे. मुंबईला निघण्यापूर्वी, मनोज जरांगे यांनी सरकार उलथवून टाकण्याचा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही बोलू देत नाहीत, असा आरोपही जरांगे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच भाजपने जोरदार बॅनरबाजी करून त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या बॅनरवर काय आहे? मनोज जरांगे यांच्या टीकेला उत्तर म्हणून, भाजपने मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत. मुंबईतील दादर परिसरात हे बॅनर लावण्यात आले असून, त्यावर 'इतिहास शिव्यांना नाही, तर कर्तृत्ववान व्यक्तींना लक्षात ठेवतो' असे लिहिलेले असून, मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे आणि उच्च न्यायालयात ते टिकवणारे देवेंद्र फडणवीसच आहेत, असा दावा भाजपने या बॅनरमधून केला आहे. भाजप नेते आणि आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, नरेंद्र पाटील यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवरून मनोज जरांगेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्लॅनिंग केल्याचे पाहायला मिळत आहे. फडणवीसांनी आमच्या अटी-शर्थी काढून टाकाव्यात - जरांगे दरम्यान, मनोज जरांगे यांनी शिवनेरीहून मुंबईला निघण्याआधी पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी आमच्या अटी-शर्थी काढून टाकाव्यात, अशी विनंती केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीसांनी आम्हाला पाच हजार लोकांची किंवा एका दिवसाची अट घालू नये. माझ्यासोबत आलेले लोक मला मुंबईला सोडण्यासाठी येणारे आहेत. ते परत देखील जाणार आहेत. त्यामुळे ज्यांची इच्छा असेल, त्यांना येऊ द्यावे. ते परत जाणारच आहेत. कारण मुंबईत गेल्यानंतर त्यांना गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील आंदोलन सांभाळायचे आहे. आम्ही विजय मिळवण्याचे टप्पे केलेले आहेत. त्यामुळे त्याचे सरकारला आणि मलाही टेन्शन नाही. त्यामुळे फडणवीसांनी आमच्या अटी-शर्ती काढून टाकाव्यात, अशी विनंती मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
फडणवीस साहेब अटी-शर्ती काढून टाका
पुणे : प्रतिनिधी समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्या, गोरगरीब मराठ्यांना न्याय द्यावा, त्यांनी जर आज सरसकट आरक्षणाची अंमलबजावणी केली तर आम्ही शिवनेरीवरुनच गुलाल उधळू आणि मागे जाऊ. मात्र मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही मुंबईत येणारच, फडणवीस साहेब मोर्च्यासंबंधी ठेवलेल्या अटीशर्ती काढून टाका,आम्ही मुंबईला येणारच असा निर्धार मनोज जरांगे यांनी शिवनेरीच्या पायथ्याशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत […] The post फडणवीस साहेब अटी-शर्ती काढून टाका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे, आमचे मुख्यमंत्री याच भूमिकेचे आहेत. 50 वर्षे शरद पवार आणि काँग्रेसचे मराठा नेते मुख्यमंत्रिपदावर होते पण कधीही त्यांनी मराठा समाजासाठी निर्णय घेतला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर मराठा समाजासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकले हे सर्व फडणवीसांच्या सरकारमध्ये झाले, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, यानंतर एकनाथ शिंदेंनी यासाठी पुढाकार घेतला आणि आता पुन्हा देवेंद्र फडणवीस हे पुढाकार घेत आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेऊन आणि वेगवेगळ्या माध्यमातून मागण्या मान्य करत असतानाही बाकी नेत्यांना सोडून केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे त्यांच्याबद्दल एकेरी बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस मराठा नाही ही चूक आहे का?, खऱ्या अर्थाने ही चूक आहे का? त्यांना टार्गेट करणे सुरू आहे ते योग्य नाही. तुम्ही मागण्या करा पण मराठा समाजाच्या माध्यमातून तुम्ही एका नेत्याला टार्गेट करणं योग्य नाही. काँग्रेसची भूमिका मागासवर्गीय समाजाचे आरक्षण काढण्याची? मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याच भूमिकेतून आम्ही काम केले आहे. पण काँग्रेस पक्षाचे नेमके मत काय याची स्पष्टता ली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यावरून दुमत नाहीच पण काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले पाहिजे की मागासवर्गीय समाजाचे आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपला निर्णय आहे का? किंवा मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावे या विषयी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. काँग्रेसची आरक्षणाच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मागास 353 जातीचा आणि 18 पगड जातीचा ओबीसी समाज यांचे आरक्षण काढून आपण इतर समाजाला द्यायचे का? हा जो संवैधानिक प्रश्न आहे, यावर काँग्रेसचे मत काय? त्यांनी जरा खुले समर्थन दिले असेल तर ते ओबीसी विरोधात आहे. ओबीसीच्या समर्थनार्थ राहुल गांधी एकीकडे बोलत असतात, जातीय जन-गणनेची मागणी करतात आणि दुसरीकडे असे नौटंकी करणे यामुळे त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. काँग्रेसच्या भूमिकेवर स्पष्टता आली पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनोज जरांगे यांची भेट सरकारने घेतलीच पाहिजे. आंदोलनकर्त्यांचे मत आपण समजून घेतले पाहिजे पण कोणताही निर्णय घेत असताना एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देणं यावर शासन योग्य निर्णय घेईल. काँग्रेसच्या भूमिकेवर स्पष्टता आली पाहिजे. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी होता कामा नये. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे, आमचे मुख्यमंत्री याच भूमिकेचे आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे म्हटले आहे. मनोज जरांगे मुंबईत दाखल झाल्यानंतर सरकारची मंत्रिमंडळ उपसमिती त्यांच्यासोबत चर्चा करेल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. आम्ही कालही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, असा दावाही त्यांनी केला. मराठा आरक्षणाच्या मागणी मनोज जरांगे हे काल मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचे दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईकडे मार्गस्थ होतील. दरम्यान, मनोज जरांगे यांच्याशी भेटीबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील काल म्हणाले होते. आंदोलकांची चर्चेची तयारी असेल, तर सरकारही चर्चेसाठी तयार आहे, असेही त्यांनी काल म्हटले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी शिवनेरीवरून माध्यमांशी बोलताना आम्ही भेटायला तयार आहोत, असे म्हटले आहे. त्यामुळे आपणही मनोज जरांगेंशी चर्चेला तयार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नेमके काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? चर्चेमधून काही साध्य होत असेल, जरांगे पाटील मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू. असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. आम्ही चर्चेला कधीच नकार दिलेला नाही. कालही आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगे यांचा गैरसमज झाला असावा. मी केलेला चर्चेचा निरोप त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचला नसावा किंवा काही गैरसमजामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी. मी त्यांना भेटून तो गैरसमज दूर करेन, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. समिती चर्चेसाठी मुंबईत जाणार विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य म्हणून ते स्वतः मुंबईत जातील आणि त्यांच्याशी चर्चा करतील. आम्ही कालही चर्चेसाठी तयार होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार आहोत. जरांगे पाटील यांनी भेटण्याची तयारी दर्शवली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. एका दिवसाची परवानगी हा कोर्टाचा निर्णय आंदोलनाला एका दिवसाची दिलेली परवानगी ही मराठा समाजाची चेष्टा असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले होते. याबाबत पत्रकारांनी राधाकृष्ण विखे पाटलांना असता, तो निर्णय न्यायालयाने दिलेला असल्याचे ते म्हणाले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावा आपण काय भाष्य करणार. मनोज जरांगे यांनी न्यायालयाकडे पुन्हा जास्त दिवस थांबण्यासाठी मागणी केली आणि ती न्यायालयाने मान्य केली, तर त्याला सरकारचा विरोध असण्याचे काही कारण नाही, असे विखे पाटील म्हणाले. मराठा आंदोलनाचे केले कौतुक राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांनी शांततेने आंदोलन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मनोज जरांगेंचे अतिशय शांतपणे आंदोलन सुरू आहे. याबाबत मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. मराठा समाजाच्या भावना राज्यातीन जनतेसमोर व्यवस्थित जात आहेत. सरकारच निश्चितच त्याचा आदर करेल, असे मी आश्वस्त करू इच्छितो, असे त्यांनी म्हटले. लवकरच जरांगेंना भेटीची वेळ कळवण्यात येईल उदय सामंत आणि तुमची मनोज जरांगेंसोबत भेट होणार आहे, अशी चर्चा आहे. याबाबत त्यांना विचारले असता, उदय सामंत यांच्याबाबात माझे काल बोलणे झाले होते. मी आता सगळ्या समिती सदस्यांशी बोलणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या सगळ्या सदस्यांना मुंबईला येण्यासाठी विनंती करतोय. मनोज जरांगे यांनी भेटण्याची तयारी दर्शवलेली आहे, ही एक सकारात्मक बाब आहे. त्यामुळे चर्चेला पुढे घेऊन जाण्यासाठी मार्ग दिसतोय. त्यामुळे समिती सदस्यांसोबत चर्चा करून लवकरच मनोज जरांगे यांना भेटीची वेळ कळवण्यात येईल, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याचे रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर पोहोचलेत. त्यांच्या मोर्चामुळे मुंबई व उपनगरांतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बदल केलेत. पोलिसांच्या अधिसूचनेनुसार, लोणावळा, खोपोली येथून मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत येणाऱ्या वाहनांना तसेच रायगड जिल्ह्यातील खालापूर शेडुंग मार्गे येणाऱ्या वाहनांनी पनवेल शहर व कळंबोली परिसरातील महामार्गावर शिरकाव करू नये म्हणून आंदोलकांची वाहने येतील त्यावेळी मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरून कोनफाट्याकडे तसेच बोर्ले टोलनाका ते पळस्पे फाटा महामार्गावर प्रवेश बंदी असणार आहे. यावेळी दुचाकी व हलक्या वाहनांना कळंबोली सर्कलमार्गे पनवेल शीव महामार्गावरील आणि खालापूर व खोपोली मार्गाचा वापर करता येईल. पोलिसांनी या प्रकरणी आंदोलकांना कळंबोलीच्या मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील पनवेल शीव महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जाण्याचे आवाहन केले आहे. हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा पर्याय मुंबई - गोवा महामार्गावरील पळस्पे ते अटलसेतूला जोडणाऱ्या जेएनपीटी महामार्गावर आंदोलकांच्या वाहनांना वाट मोकळी करून दिली जाईल. यावेळी अवजड वाहनांना पळस्पे ते गव्हाणफाटा दरम्यान प्रवेशबंदी असेल. पण दुचाकी व हलक्या वाहनांना साईगाव, दिघोडे, चिरनेर या पर्यायी मार्गांचा वापर करता येईल. पनवेल येथील पळस्पे फाटा ते डी पॉईंट जेएनपीटी मार्गावरून आंदोलकांची वाहने जातील तेव्हा हा मार्ग अवजड व इतर वाहनांसाठी बंद असेल. त्यावेळी हलक्या वाहनांना पनवेल शहर, कळंबोली उरणफाटा या अंतर्गत मार्गांचा वापर करता येईल. गव्हाणफाटा पोलिस चौकीच्या अंतर्गत येणारी जेपीटी महामार्ग ते गव्हाणफाटा आणि किल्ला जंक्शन या मार्गावरून आंदोलकांची वाहने पामबीच मार्गे वाशीपर्यंत जातील. या कालावधीत इतर वाहनांची या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाईल. यावेळी हलक्या वाहनांना नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांचा वापर करता येईल, असे पोलिसांनी आपल्आ अधिसूचनेत सांगितले आहे. सानपाडा रेल्वेस्थानक कसे गाठाल? सीबीडीमधील वाहनांनाही आंदोलकांची वाहने पामबीच मार्गावरून जातील तेव्हा हा मार्ग वापरता येणार नाही. यावेळी आर्ममार्ग व ठाणे मार्गाचा वापर करण्याचा पर्याय वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून दिला आहे. आंदोलकांची वाहने वाशीतून मार्गस्थ होतील त्यावेळी वाशी प्लाझा व वाशी रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी असेल. या स्थितीत वाशीतील हलक्या वाहनांना पनवेल शीव महामार्ग मार्गे सानपाडा रेल्वेस्थानकाजवळील सेवा रस्त्याने वाशी रेल्वे स्थानक गाठता येईल. वाहतूक पोलिसांचे हे निर्बंध केवळ आंदोलक काळापुरते लागू राहतील. रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस व जीवनावश्यक सेवा आदी आप्तकालीन सेवांतर्गत येणाऱ्या वाहनांना या बंदीतून सूट असेल. वाहनचालकांनी गर्दी व अडचणी टाळण्यासाठी पोलिसांनी आखून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही नवी मुंबई वाहतूक पोलिस दलाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे.
कबुतरांसाठी आंदोलन करणाऱ्यांना सरकार परवानगी देते.तर मराठी माणसांना त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मग ते कुणीही असो. मुंबईमध्ये जर कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते तर मराठी माणूस जर त्यांच्या मागण्यासाठी राज्याच्या राजधानी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या कायदा-सुव्यवस्थेची काळजी घेणं गरजेचे आहे. संजय राऊत म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रामध्ये गेली 10 वर्षे मोदी सत्तेत बसले आहेत. आरक्षणाचा विषय त्यांच्याकडूनच सोडवला जाऊ शकतो. ते केवळ आश्वासन देत फिरत आहे. देवेंद्र फडणवीस 5 वर्षांहून अधिक मुख्यमंत्री आहेत ना हे खापर तुम्ही दुसऱ्यावर फोडू शकत नाही. राधाकृष्ण विखे पाटलांना प्रशासनाचा अनुभव आहे. तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवत बसू नका. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंशी चर्चा करावी संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारला नव्याने माहिती देणं गरजेचे नाही. विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. पुन्हा सरकार आलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून त्यांनी हे पूर्ण करावे. मुंबई ही मराठी माणसाची आहे, त्यांना मुंबईमध्ये येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. मुंबईमध्ये येण्यापासून त्यांना रोखू नये, ही आमची भूमिका आहे, मराठी माणसांमध्ये फुट पाडण्याचे काम सुरू संजय राऊत म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यापेक्षा जास्त त्यावर राजकारण सुरू आहे. जाती-जातींमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या 10 वर्षांमध्ये जास्त झाले आहे. केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी जातीजातींचे तुकडे पाडण्याचे काम केले. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट निर्माण केली होती. त्यांत प्रत्येक जातीचा माणूस दिसून येत होता. पण एकजूट राहू नये यासाठी या लोकांकडून प्रयत्न सुरू आहेत. हे सर्व सत्ता मिळवण्यासाठी फडणवीसांनी सुरू केले आहे. हे दुर्दैवी आहे. हे मराठी माणसांसाठी वेदनादायक आहे. जरांगे पाटील मोठे नेते संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे मोठे नेते असून त्यांच्या पाठीमागे त्यांचा समाज मोठ्या प्रमाणात उभा आहे. ते त्यांच्या समाजाच्या काही मागण्या घेऊन सरकारकडे येत आहेत. ते काही इतर देशाच्या नेतृत्वाकडेच ही मागणी करु शकत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून ते त्यांच्याकडे आले आहेत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे पदावर नसतील तर ते दुसऱ्या व्यक्तीकडे आपल्या मागण्या घेऊन जातील असेही राऊतांनी म्हटले आहे. तुमच्याकडे व्यक्ती म्हणून नव्हे तर पालक म्हणून आम्ही मागणी केली आहे.
राज्यात गणेश चतुर्थीच्या काळात राज्यात जोरदार पाऊस परतण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण, तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या काळात नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. महाराष्ट्रात 8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचा मोठा तडाखा बसला होता. मुंबईसह नांदेड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने उघडीप देत थोडा दिलासा दिला होता. मात्र, आता पुन्हा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीवादळी वाऱ्यांमुळे देशभरातील हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. घाटमाथा आणि कोकणात पाऊस मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरसह संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज मराठवाड्यात जवळपास 8-10 दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला होता, त्यानंतर पावसाने उघडीत दिली होती. आता मात्र हवामानात काही बदल जाणवत असल्याने पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत (31 ऑगस्टपर्यंत) मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही आजसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे ही वाचा... पालघरमध्ये इमारत कोसळली, मृतांची संख्या 15वर:अपघातावेळी चौथ्या मजल्यावर बर्थडे पार्टी सुरू होती; पाहुणेही ढिगाऱ्याखाली गाडले गेले पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये बुधवारी रात्री एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. विरार परिसरातील विजय नगरमध्ये बुधवारी रात्री १२.०५ वाजता सुमारे ५० फ्लॅट असलेले चार मजली रमाबाई अपार्टमेंट शेजारी असलेल्या एका रिकाम्या घरावर कोसळले. सविस्तर वाचा...
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये बुधवारी रात्री एक चार मजली इमारत कोसळली. या इमारतीतील मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. विरार परिसरातील विजय नगरमध्ये बुधवारी रात्री १२.०५ वाजता सुमारे ५० फ्लॅट असलेले चार मजली रमाबाई अपार्टमेंट शेजारी असलेल्या एका रिकाम्या घरावर कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या मजल्यावर एका वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असताना इमारतीच्या एका भागात १२ फ्लॅट कोसळले, ज्यामुळे रहिवासी आणि पाहुणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या अपघातात मुलगी आणि तिच्या आईचाही मृत्यू झाला. लोकांच्या तक्रारीवरून बांधकाम व्यावसायिकाला अटक पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखर यांनी गुरुवारी सकाळी पुष्टी केली की या घटनेत एका मुलीचाही समावेश होता जिचा वाढदिवस त्यावेळी साजरा केला जात होता. जखमी झालेल्या आणि वाचवलेल्या सहा जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी कोणी अडकले आहे का हे शोधण्यासाठी पथके ढिगाऱ्यांची तपासणी करत आहेत. स्थानिकांनी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. अनधिकृत इमारतीत इतक्या रहिवाशांना कसे राहण्याची परवानगी देण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी लोकांनी केली आहे. व्हीव्हीएमसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी बिल्डरला अटक केली. जवळच्या झोपडपट्ट्यादेखील रिकाम्या कराव्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम म्हणाले की, २०१२ मध्ये बांधलेल्या रमाबाई अपार्टमेंटमध्ये ५० फ्लॅट आहेत आणि कोसळलेल्या भागात १२ फ्लॅट होते. खबरदारीचा उपाय म्हणून, इमारतीच्या आजूबाजूच्या सर्व चाळी रिकामी करण्यात आल्या आहेत आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बाधित कुटुंबांना तात्पुरते चंदनसर समाज मंदिरात ठेवण्यात आले आहे. त्यांना अन्न, पाणी, वैद्यकीय मदत आणि इतर आवश्यक सेवा पुरवल्या जात आहेत.
कुऱ्हा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस 24 तासात घेतले ताब्यात
कुऱ्हा सालोरा ते धोत्रा दरम्यानच्या रस्त्यावर इसमावर चाकूचे वार करुन त्याला यमसदनी धाडणाऱ्या आरोपींना कुऱ्हा पोलिसांनी २४ तासांच्या आंत अटक केली आहे. धोत्रा येथील पोलिस पाटील यांनी कुऱ्हा पोलिस स्टेशन येथे माहिती दिली होती की एका व्यक्तीला चाकू मारून गंभीर अवस्थेत ग्राम सालोरा ते धोत्रा रस्त्यावर सोडून देण्यात आले आहे त्यावरून ठाणेदारांसह कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान जखमी व्यक्तीस स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात तिवसा येथे नेले होते. मात्र हा व्यक्ती मृत पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी तो व्यक्ती हा शिवा सोना राठोड (वय ५५, रा.सालोरा तसरे) आहे, हेही स्पष्ट झाले होते. त्यांच्या हत्येचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यानंतर फॉरेन्सिक एक्स्पर्ट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. प्रेमसिंग दशरथ चव्हाण (वय ४२, रा.सालोरा तसरे) यांच्या जबानी रिपोर्टवरून याप्रकरणी कुऱ्हा येथे कलम १०३(१) बी एन एस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर लगेच अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता पथक तयार करण्यात आले. आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून व साक्षीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीकृष्ण भिकु राठोड (वय ४०, रा. सालोरा तसरे) याच्यावर संशय घेण्यात आला. पोलिसांनी त्याला २४ तासांत ताब्यात घेऊन विचारपूस केली असता संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पुढील तपास कुऱ्हा पोलिस स्टेशनचे अधिकारी करीत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डॉ अनुप वाकडे, पोलिस अंमलदार सोमेश्वर सपाटे, उमेश वाघमारे,अनिल निंगोट,दर्पण बनसोड, हेमंत डहाके, सागर निमकर यांनी केली. पोलिसांनी जेरबंद केलेला हाच तो आरोपी.
तिवसा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद), तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती व आत्मा, कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव व प्रदर्शनाचे सोमवारी पंचायत समिती सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या विविध रान भाज्यांचे महत्त्व, ओळख व औषधीयुक्त गुणधर्म लोकांसमोर आणणे, त्यांचा पोषण मूल्यांसह पारंपरिक पाक कलेचा वारसा जपणे, हा महोत्सवाचा उद्देश होता. या महोत्सवात महिलांनी पाटवळ, कापालफोडी, पाथरी, भारंग, फुडशी, तांदुळजा, शेवगा, अंबाडी, कोंबडा, बांबू कोंब, गव्हाला, चाकवत, कोळकूट आदी ३० हून अधिक रानभाज्यांचे थेट प्रदर्शन केले. याशिवाय रान भाज्यांपासून बनवलेले पारंपरिक व नवनवीन पदार्थ यांची ओळख व विक्रीहेतू छोटेखानी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, सहा.गटविकास अधिकारी नारायण आमझरे, तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे आदींसह कृषी विभागअंतर्गत सचिन हरले, सचिन राऊत यांची उपस्थिती होती. उमेद कक्ष येथील तालुका अभियान व्यवस्थापक हरिष फरकाडे, अजय कुलथे, स्वप्नील रोहनकर, प्रभाग समन्वयक श्रीकृष्ण काळे, सुमीत वासुकर, परिक्षीत भडके, कक्षातील इतर कर्मचारी उपस्थित होते. या महोत्सवाच्या माध्यमातून आता मोठी आर्थिक उलाढालही झाली आहे. महोत्सवातील रान भाज्या पाहण्यासाठी महिलांसह पुरूषांनी गर्दी केली होती.
2.5 लाख जंतनाशक गोळ्या देणार:जंतदोष निवारण्यास आरोग्य विभाग वेळापत्रक निश्चित करणार
मुलांमधील जंतदोष निवारण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. २०२४ मध्ये या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याचे आल्या होत्या. यंदाही यामध्ये काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाही सप्टेंबर महिन्यात शाळांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे वितरण होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. खानपानाद्वारे विविध प्रकारचे जंतु मुलांच्या पोटात जातात. या जंतूंमुळे अन्नातील पौष्टिक तत्त्वच मुलांच्या शरीराला मिळत नाहीत. त्यामुळे मुलांचा शारीरिक विकासही खुंटतो, तसेच विष्ठेद्वारेही जंत बाहेर पडू लागतात. त्यामुळे मूल आजारी राहते. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १९ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतच गोळ्या दिल्या जाणार आहेत. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर आणि फेब्रुवारी-मार्च महिन्यात शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे मुलांमधील आजारांवरवर नियंत्रण मिळवणे हा आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर ही मोहीम राबवली जाते. शाळा व अंगणवाडी केंद्रांतून मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात. जंतनाशक गोळ्या वितरणाचे वेळापत्रक अद्याप वरिष्ठ स्तरावरून जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेला मिळालेले नाही. सप्टेंबर महिन्यात जंतनाशक गोळी वाटप मोहीमराबविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. पोटातील जंत नियंत्रणासाठी ही गोळी उपयुक्त आहे. जंतांमुळे होणारे कुपोषण, वाढ खुंटणे, पोटात दुखणे, रक्तक्षय यावर नियंत्रण मिळते. सप्टेंबरमध्ये वाटप करणार जंतांमुळे हा होतो त्रास पोटात वारंवार दुखणे, भूक न लागणे, अतिसार व मळमळ, शरीरात दुर्बलता, रक्तक्षय, कुपोषण शासकीय रुग्णालयांत मोफत मिळते गोळी शासकीय रुग्णालयांतही जंतनाशक गोळी मोफत मिळते. ज्या विद्यार्थ्यांना शाळेतून गोळी मिळणार नाही, त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयात जाऊन मोफत गोळीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यामुळे मुलांचे आजार दूर होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. जयश्री शेळके यांनी आपल्या अर्जात या मतदारसंघातील मतमोजणीवर आक्षेप घेत निवडणूक याचिका दाखल केली असून, फेरमोजणीची मागणी केली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ही याचिका फेटाळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, शेळके यांनी गायकवाड यांचा अर्ज निराधार असल्याचे सांगत आपल्या याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घेण्याची विनंती केली आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड हे अवघ्या 841 मतांनी निवडून आले आहेत. केवळ 800 मतांच्या फरकामुळे ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मतमोजणीवर आक्षेप घेत, मतमोजणी प्रक्रियेत अनेक अनियमितता झाल्याचा दावा केला आहे. जयश्री शेळकेंनी याचिकेत काय म्हटले? जयश्री शेळके यांच्या मते, मतदार यादीमध्ये 3 हजार 561 बोगस नावे होती. अनेक मतदारांची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी होती आणि काही ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावरही मतदान झाले. त्यामुळे, सर्व ईव्हीएम न्यायालयात आणून न्यायालयासमक्ष पुन्हा मोजणी केली जावी, अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय शेळके यांनी मतदारसंघाची संपूर्ण मतदारयादी, मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाड यांचे विजयाचे प्रमाणपत्र तसेच इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश द्यावेत, अशी स्वतंत्र मागणीही केली आहे. या प्रकरणात त्यांच्यावतीने अॅड. आकाश मून यांनी युक्तिवाद केला. जयश्री शेळकेंच्या याचिकेविरोधात गायकवाडांचा अर्ज जयश्री शेळके यांनी संजय गायकवाड यांच्या विजयाला आव्हान देत निवडणूक याचिका दाखल केल्यानंतर, संजय गायकवाड यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील ऑर्डर 7, नियम 11 अंतर्गत अर्ज दाखल करून ही याचिका फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. मात्र, शेळके यांनी त्याला उत्तर देताना, संजय गायकवाड यांचा अर्ज गुणवत्ताहीन व निराधार आहे. त्यामुळे निवडणूक याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. बुलढाणा मतदारसंघातील मतदान बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांना 91 हजार 660 मते मिळाली. तर ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांना 90 हजार 819 मते मिळाली. संजय गायकवाड हे अवघ्या 841 मतांनी विजयी झाले होते. दरम्यान, काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर जयश्री शेळके यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, न्यायालय काय निर्णय देते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये आयडियल जॉब प्लेसमेंट सर्विस या संभाजीनगर येथील जॉब प्लेसमेंट कंपनीमार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ४० विद्यार्थ्यांना रोजगार संबंधीचे नियुक्तीपत्रे देण्यात आले. कंपनीचे योगेश तांगडे व दीपक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी संस्थेचे सचिव डॉ सद्गुण राव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करियर कौन्सिलिंग आणि प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून प्रभारी प्रा. डॉ.दयानंद राऊत नेतृत्वामध्ये विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी नोंदणी साठी गौरव,आकांक्षा गुजर, नेहा नेमाने,श्रेया चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.मनोहर वासनिक, संस्था सहसचिव डॉ. नीलिमा देशमुख, डॉ. हर्षा ढाले यांचे सह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
संस्कार भारती, बुलडाणा जिल्हा व टिळक स्मारक महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त स्थानिक कलाकारांच्या वतीने भगवान श्रीकृष्ण यांच्यावर संगीतमय नाट्य कलाकृती सादर करण्यात आली. याचे लेखन, दिग्दर्शन व निवेदन खामगाव येथिल सिद्धहस्त लेखिका प्रा. विद्या कावडकर यांनी केले. या नाटकाचे संगीत संयोजन गायिका डॉ. प्राजक्ता हसबनीस हिने तर गायन डॉ. प्राजक्ता हसबनीस व प्रा. सीमा देशमुख यांनी केले. त्यांना संवादिनी वर प्रा. डॉ. प्रवीण आळशी, तबल्यावर कमलाकर गाठे तर ढोलकीवर प्रथमेश शिवरकर यांनी साथ संगत दिली. या नाटकात नारद आणि पेंद्या किरण रेठेकर, कंस व दुर्योधन शेखर कुळकर्णी, कर्ण शशांक कस्तुरे, भगवान श्रीकृष्णाची भूमिका सचिन कुळकर्णी, बलराम व वसुदेव विजय राखोंडे, अक्रूर आणि विदुर रघुनाथ खेर्डे, सुदामा व अश्वत्थामा कमलाकर गाठे, दास सागर ताकवाले व गणेश चांदुरकर, कान्होपात्रा व राधा डॉ. कल्याणी गाठे, मीरा व रुख्मिणी वृषाली मलकापूरकर, राधा ज्योती पाटील, पुतना व कुबजा डॉ. अलका तांबट, उत्तरा अनुजा चितळे, यशोदा सीमा पाटील, नंदराजा वंदना गावंडे, द्रौपदी कृतिका वरणगावकर, गांधारी शोभा शिंगटे, देवकी माधुरी हसबनीस, कृष्ण अनुपमा भडंग, गवळणी शिवानी कुळकर्णी, स्मिता देशमुख, वर्षा सातव तर दासी म्हणून कविता शिंगटे यांनी भूमिका पार पडल्या. सर्व कलाकारांचे नेपथ्य मीनाक्षी खेर्डे हिने केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अदिती गोडबोले, रंजना मुळे यांनी सहकार्य दिले तर प्रकाश व साऊंड व्यवस्था कैलास गुरव यांनी केली. या नाटकामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्म, कंस वध, गवळणी, रासलीला याच्या सह भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेले तत्वज्ञान सादर करण्यात आले. या नाटकाला तालुका संघचालक संतोष देशमुख, वनवासी सेवा समितीचे अध्यक्ष कन्हैय्यालाल पारिक यांच्यासह शहरातील प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती संस्कार भारती चे जिल्हा महामंत्री रघुनाथ खेर्डे यांनी दिली.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, शहर क्षयरोग कार्यालय, महानगरपालिकेतर्फे टीबी मुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने रा. तो. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी क्षयरोग संवेदीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अतीजोखीम गटातील १ लाख ४ हजार १३ एवढ्या लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. टी.बी. या संसर्गजन्य रोगाला देशातून हद्दपार करण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारच्या वतीने टी.बी. मुक्त भारत अभियान देशात राबवण्यात येत आहे. यासाठी स्थानिक स्तरावर कार्यशाळा, प्रबोधनपर कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान महापालिकेडूनही अभियानांतर्गत कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेला डॉ. व्ही. पी. कन्नन, डॉ. छाया वानखडे, आरएमओ डॉ. एम. बी. देवकते, शिवराज बबेरवाल, ट्रिटमेंट सुपरवायजर दीपक पाटील, लॅब सुपरवायजर उमेश पद्मने, जिल्हा समन्वयक हेमंत भाकरे, प्रतीक गाडगे, आकाश मनवर, दिनेश घायवट, विक्रांत वानखडे आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक उमेश पद्मने यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियानांतर्गत निक्षव मित्रद्वारे नांेदणी करुन क्षयरुग्णांना कोरडी धान्याची किट्स वाटप करुन क्षयरुग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. क्षयरुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, प्रयोगशाळा तपासणी, ट्रुनॅट, सिबिनेट तपासणी मोफत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असून क्षयरुग्णांना एचआयव्ही, डायबिटिक तपासणी तसेच औषधोपचार मोफत असण्याबाबत माहिती दिली. त्याच प्रमाणे एक हजार रुपये निक्षय पोषण आहार योजनेंतर्गत डीबीटी स्वरुपात क्षयरुग्णाच्या बँक खात्यात जमा होत असल्याबाबत सांगितले. १० नागरी आरोग्य केंद्र, १६ आयुष्मान आरोग्य मंदिर, २ आपला दवाखाना आदींमार्फत आहार व स्वयंसेवकांकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अभियान १ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत शहरात मोहीम राबवण्यात येणार आहे. जोखीमग्रस्त भाग, स्लम भाग, मागील वर्ष आधीचे क्षयरुग्ण त्यांचे संपर्क, संपर्कातील व्यक्ती, तंबाखू, दारू व्यसन करणार तसेच एचआयव्ही संशयित इत्यादी त्याचप्रमाणे दोन आठवड्यापेक्षा सतत येणारा खोकला, दोन आठवड्यातील आधिक कालावधीतील ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, थंुंकी वाटे रक्त येणे, मानेवर गाठी येणे इत्यादी लक्षणे, तसेच ६० वर्षावरील वयोवृद्ध, डायबिटिक क्षयरुग्ण अशा व्यक्तीची तपासणी करण्यात येणार आहे. किट्सचे वितरण प्रधानमंत्री टीबी मुक्त अभियान अंतर्गत पोषण आहार किट्स वाटप करण्यात येणार आहे. तरी वैयक्तिक, सामाजिक, मंडळे, स्वयंसेवी संस्था या योजनेच्या कोरडी धान्याची किटस वाटप करु शकतात. तसेच दीपक पाटील यांनी क्षयरोग म्हणजे काय, लक्षणे, क्षयरोगाचे प्रकार, उपस्थित सुविधा तसेच क्षयरुग्णांची संस्था याबाबत माहिती देण्यात आली.
पावसामुळे चिखल; बाप्पाला नेताना गणेशभक्तांची कसरत:मूर्ती प्लास्टिकने झाकली; छत्रीही धरली
अकोला प्रत्येक गणेश भक्त ज्याची आतुरतेने वाट बघतो त्या लाडक्या गणपती बाप्पांचे २७ ऑगस्ट रोजी वाजत-गाजत आगमन झाले. दुपारी अचानक पाऊस झाल्याने मूर्ती व अन्य पूजेचे साहित्याची दुकाने थाटलेल्या अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे बाप्पा घरी, मंडपात नेताना गणेशभक्तांना चांगलीच कसरत करावी लागली. जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या गणेशोत्सव प्रमाणावर साजरा केला जातो. यंदाही घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी बाप्पा ६ सप्टेंबरपर्यंत विराजमान राहणार आहेत. महानगरात डाबकी रोड, जयहिंद चौकसह अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गणेश मूर्ती व पूजेच्या साहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. मैदानावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप टाकून गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. दुपारी अचानक पाऊस सुरु झाला. सुमारे दीड पाऊस सुरु होता. परिणामी मैदानावर चिखल झाला. चिखल तुडवतच गणेशभक्तांना मार्ग काढावा लागत होता. दुकानासमोर लाकडी फळीवरून गणेशभक्त जात होते. काही जण तर चिखलामुळे कोसळले. पोलिसांची दमछाक अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानासमोर उड्डाणपूल संपतो. याच ठिकाणी उड्डाणपुलावर दुचाकी, चार चाकी वाहने उभी करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी टळण्यासाठी वाहतूक पोलिस वाहन उभे राहू देत नव्हते. जुने शहरातून वाहतूक वळवली जयहिंद चौक परिसरातही मूर्तीसह अन्य साहित्याची दुकाने थाटण्यात आली. मोठ्या पुलावरून जय हिंद चौकात जाताना शंकर साऊंड सर्व्हिसजवळ मोठी वाहने पुढे जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे पुढे जयहिंद चौकात फारशी वाहतुकीची कोंडी झाली नाही.
अकोला गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठान अकोलाच्या वतीने आनंद आश्रम मोठी उमरी येथे शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग सदर कार्यशाळेत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सुबक अशा गणेश मूर्ती तयार केले व त्यामध्ये पर्यावरण संदेश देत प्रत्येक मूर्ती मधून एक बी टाकण्यात आली. जेणेकरून मूर्ती विसर्जन केल्यावर त्याचे झाडांमध्ये रूपांतर होईल. या कार्यक्रमाला आनंद आश्रमातील तपोधिरा दीदी, प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील जैविक निर्मिती मिशन येथे कार्यरत प्रा. अनुराधा घोरळ, गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन बुंदेले सचिव इशिका चंदनपत्री उपस्थित होते. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून गणेश सोळंके यांनी आपले योगदान दिले. सोबतच कार्यक्रमाला श्री शिवाजी महाविद्यालयातील संजय काकड व प्रा. सुषमा मळसने यांनी सहकार्य केले. या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सायली गोतमारे, वैष्णवी ताथोड, रोशन चव्हाण, प्रेम अलोट सोनाली सिंह, अनुष्का सिंह रोनक चंदन यांनी अथक परिश्रम घेतले. गाडगेबाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी
गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत वन:शाकम पावसाळी रानमेवा-उत्सव खवय्येगिरी'चा अंतर्गत रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांची स्पर्धा व मिलेट्सच्या पदार्थांची खाऊगल्ली तसेच रानभाज्या व औषधी वनस्पती सेवा असा अभिनव उपक्रम नुकताच विधी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धा व अभिनव उपक्रमाला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बहुतांश रानभाज्यांची ओळख तसेच त्यापासून बनवलेल्या नवनवीन पदार्थ चाखण्याची संधी देखील अकोलेकरांना यावेळी उपलब्ध करून देण्यात आली. या स्पर्धेमुळे आपण आपल्या मातीतल्या चवांशी, आठवणींशी पुन्हा एकदा जोडले गेलो आहोत अशी सहभागींची प्रतिक्रिया होती. या स्पर्धेत रजनी आडे यांनी १००१ रुपयांचे प्रथम पारितोषिक व सन्मानपत्र पटकावले तर द्वितीय क्रमांकाच्या मानकरी माया गोटफोडे यांनी ७०१ रुपये व सन्मानपत्र मिळवले तर तृतीय क्रमांक नेहा बनसोड यांनी ५०१ रुपये रोख व सन्मानपत्र मिळवले. अनेक वैविध्यपूर्ण पदार्थांसाठी १४ पारितोषिके व सन्मानपत्र यावेळी बहाल करण्यात आली. पारितोषिकांचे वितरण अकोला एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीकृष्ण अमरावतीकर व सेवासदनचे उपाध्यक्ष रवीबाबू गोयनका यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्रियंका पडगीलवार यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व सांगितले. तर रानभाज्या लुप्त होण्यामधून कशा समस्या निर्माण होतात यावर डॉ. पल्लवी दिवेकर यांनी चिंता व्यक्त केली. परीक्षक म्हणून आहार तज्ञ डॉ. प्रज्ञा बरालिया, प्रियंका पडगिलवार व डॉ. पल्लवी दिवेकर होते. प्रास्ताविक डॉ. नीलिमा टिंगरे यांनी केले. पाहुणे परिचय माधवी तायडे यांनी केला. परीक्षक परिचय जयेश लगड यांनी, सूत्रसंचालन पल्लवी डोंगरे यांनी तर आभार डॉ. रत्ना चांडक यांनी मानले. रानभाज्यांची माहिती, प्रसार व गोडी लागण्यासाठी वन:शाकमच्या अध्यक्षा प्रियंका पडगिलवार, सचिव पल्लवी दिवेकर तसेच मुख्य कार्यकारिणी सदस्य डॉ. रत्ना चांडक, डॉ. नीलिमा टिंगरे, विदुला चौधरी, धनंजय भगत व जयेश लगड यांनी हा महोत्सव साकार केला. रानभाज्यातून वैविध्यपूर्ण संस्कृतीची ओळख वन:शाकमच्या या उपक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले अकोला एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अॅड. आर. आर. देशपांडे यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. आज रानभाज्यांच्या चवीत केवळ मसाले नव्हते, तर संस्कृतीची चव होती असे सांगितले. रानभाज्या आपल्या वैविध्यपूर्ण समृद्ध, पौष्टिक व रूचकर खाद्य संस्कृतीची ओळख करून देतात, असेही त्या म्हणाल्या. यावेळी संस्थेचे सहसचिव शार्दूल दिगंबर उपस्थित होते.
प्रतिनिधी | अकोला एक दोन तीन चार...गणपतीचा जयजयकार', गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया'च्या गजरात भर पावसात अकोलेकरांनी लाडक्या बाप्पाचे गुरुवारी जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा दणदणाटात आणि गुलालाची उधळण शहरातील प्रत्येक चौका-चौकात दिवसभर सुरू होती. गुरुवारी सकाळपासून गणरायाच्या आगमनासाठी सर्वत्र लगबग होती. शहरातील मुख्य चौक व बाजार गर्दीचे फुलले होते. भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचे घरोघरी आगमन झाले. रात्रीपर्यंत गणेश मंडळाच्या मिरवणुकीत वाद्यांचा दणदणाटात सुरू होता. भक्तांनी बाप्पाच्या गाण्यांवर ताल धरला होता. गणेशमूर्तींची खरेदी व बाप्पाच्या पूजेसाठी लागणारी साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी बघण्यासारखी होती. चौक-चौकामध्ये विविध साहित्याची विक्री जोरात सुरू होती. बाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांची रीघ लागली होती. मोदक, लड्डूची सर्वाधिक खरेदी झाली. फुलांनाही प्रचंड मागणी होती. महाराष्ट्राचे आराध्यदैवत विघ्नहर्ता गणरायाची गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठापना झाली. संपूर्ण जिल्ह्यात पुढचे दहा दिवस गणेशोत्सव मंगलमय वातावरणात साजरा होणार आहे. सार्वजनिक मंडळाचे देखाव्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. देखावे बघण्यासाठी दरवर्षीप्रमाणे नागरिकांची गर्दी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी ज्येष्ठ गौराईचेही आगमन होईल. गौरी, गणपतीच्या विसर्जनापर्यंत पुढचे दिवस चैतन्यपूर्ण असणार आहे. मंडळ २०२३ २०२४ २०२५ सार्वजनिक १६३० १६९८ १७५० शहरी ६२० ६७८ ६९४ ग्रामीण ९७० १०२० १०५६ मनपाकडून ३१२ मंडळांना परवानगी सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगीसाठी महापालिकेत एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आतापर्यंत ३१२ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षी हीच संख्या ३०५ होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा किमतींमध्ये १० टक्केपर्यंत वाढ दिसून आली. मात्र, भक्तांमध्ये खरेदीचा उत्साह कुठेच कमी नव्हता. बाजारामध्ये १०० रुपयापासून हजारोरूपयापर्यंत गणेश मूर्ती विक्रिला होत्या. बहुतेकांनी १ हजार ते ५ हजारापर्यंत मूर्ती घरी स्थापनेसाठी खरेदी केल्या होत्या. हाच उत्साह मखर, सजावट साहित्य खरेदी करताना दिसून आला. ३५६ गावांमध्ये एक गाव, एक गणपती' यंदा जिल्ह्यात ३५६ गावांनी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबवण्याचे जाहीर केले आहे. यामुळे या गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. मागील वर्षी २९१ गावांत उपक्रम यशस्वी झाला होता. मूर्ती खरेदीसाठी येथे झाली भक्तांची गर्दी अकोला क्रिकेट क्लब, जनता बाजार, जय हिंद चौक, दगळी पुलं, कौलखेड चौक, गांधी रोड, राऊतवाडी, जठारपेठ चौक, डाबकी रोड, तुकाराम चौक भागांमध्ये विविध साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी भाविकांनी गर्दी झाली होती. गणरायाला घरी घेऊन जाताना भक्तांचा उत्साह आणि जोश बघण्यासारखा होता. यंदा संख्या वाढली मंडळांनी सामाजिक उपक्रमांवर दिला भर सार्वजनिक मंडळाकडून आकर्षक देखावे उभारण्यात येत आहेत. यंदा लहान मंडळांकडूनही मोठे-मोठे मंडप व देखावे उभारण्यात येत आहेत. सामाजिक उपक्रमांवर अनेकांचा भर आहे. सार्वजनिक गणपती मंडळामुळे शहरातील चौक, रस्ते रोषणाईने उजळून निघाले आहेत. आतापर्यंत ३१२ सार्वजनिक मंडळांनी प्रशासनाकडे नोंद केली आहे. गुरुवारी रात्रीपर्यंत मंडळांची नोंदणी सुरू होती.
महापालिका, माझी अमरावती फाउंडेशन व सात्विक गणपती यांच्या संयुक्त सहकार्याने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत सांस्कृतिक भवन, अमरावती येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती हा उपक्रम प्रथमच राबवण्यात आला. या कार्यशाळेत सहभागी नागरिक, विद्यार्थ्यांनी मातीपासून स्वयंहस्ते गणेश मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली. मूर्ती बनवताना मातीचा वापर करून प्लास्टर ऑफ पॅरिससारख्या पर्यावरणाला हानीकारक घटकांपासून दूर राहण्याचा संदेश या वेळी देण्यात आला. कार्यशाळेमध्ये प्रशिक्षकांनी उपस्थितांना मूर्ती तयार करण्याच्या विविध पद्धती आणि त्यामागील शाश्वततेचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यशाळेसाठी लागणारे सर्व साहित्य अमरावती महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प घेतला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास लोकांना प्रोत्साहित करणे तसेच ‘हरित आणि स्वच्छ अमरावती’चा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवणे. आपल्या हातांनी घडवलेली ही मातीची बाप्पाची मूर्ती म्हणजे निसर्गाशी असलेली आपली नाळ जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे, असे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरावती महापालिका, सात्विक गणपतीचे संस्थापक मयुरी खताळे, माझी अमरावती फाउंडेशन संस्थापक सात्विक मुंडवायिक तसेच स्वयंसेवक व कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांचे विशेष योगदान लाभले. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पुढील सूचना दिल्या की, पीओपीपासून बनवलेल्या मूर्तींची स्थापना करणे टाळा, नैसर्गिक मातीच्या मूर्तीच निवडा. नैसर्गिक रंगांचा वापर करा, जे जलप्रदूषण टाळण्यास मदत करतात. घरगुती विसर्जनासाठी कृत्रिम टँक किंवा कुंड्या वापरा, जेणेकरून नदी, तलाव यांचे प्रदूषण रोखता येईल. मूळ परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल राखत गणेशोत्सव साजरा करा. त्यांनी शेवटी असेही म्हटले की, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण जेव्हा पर्यावरणाचे भान ठेवतो, तेव्हा आपली संस्कृतीही अधिक समृद्ध होते. चला, या वर्षी आपल्या हातांनी हरित अमरावतीसाठी बाप्पा घडवू या. घरोघरी मातीच्या मूर्ती वापराव्या घरी घरी स्वतःच्या संकल्पनेतून मूर्ती तयार कराव्या असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. या वेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे,भांडार अधिक्षक मंगेश जाधव, नगरसचिव संदिप वडुरकर, उद्यान निरिक्षक श्रीकांत गिरी, अधिकारी, कर्मचारी, माझी अमरावती फाउंडेशन व सात्विक गणपतीचे प्रतिनिधी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील श्री क्षेत्र वडवळ येथे विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. दारूबंदीसाठी सर्व ग्रामस्थांनी एकजूट दाखवली. यावेळी ग्रामविकास अधिकारी सचिन वसेकर यांनी अहवाल वाचन केले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जालिंदर बनसोडे होते. यावेळी माजी सरपंच सुरेश शिवपूजे, राहुल मोरे, धनाजी चव्हाण, शाहू धनवे, हरिदास पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दारूबंदीसाठी वेळोवेळी विविध बैठका घेऊन तरूणांनी नियोजन केले. १५ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी विशेष बैठक घेऊन या बैठकीत गावात दारूबंदी करण्यावर सर्वांचे एकमत झाले. ग्रामसभा घेऊन त्यात दारूबंदीचा ठराव मांडण्याचे ठरले. ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या आव्हानाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्रामसभेला आवश्यक असणारी गणपूर्ती झाली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बापूसाहेब दळवे यांनी केले. यापूर्वी अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी यापुढे उत्तम व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. गावातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या तरुण मंडळांनी व्यसनमुक्तीच्या या अभियानात सहभाग घेत अभियान यशस्वी करण्याचा निर्धार केला. हात उंचावून ठरावाला दिला पाठिंबा ग्रामसभेत लोकसेवा हक्क हमी कायदा अंमलबजावणी, बालविवाह कायदा जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजना मंजूर घरकुल आढावा, ग्रामपंचायत कर वसुली, वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी लाभार्थी निवडणे, विविध योजनेतून विकास कामांचे प्रस्ताव सादर करणे या विषयानंतर दारूबंदीचा ठराव मांडला. ठरावाला उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी हात उंचावून पाठिंबा दिला.
मोहोळ या तालुका ठिकाणापासून भोयरे गाव दहा ते १२ किलोमीटर अंतराव आहे. या गावातून दररोज विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर पडतात. तालुक्याचे ठिकाण असलेल्या मोहोळला कचेरीच्या कामासाठी जावे लागते. भोयरे गावची एसटी बस सेवा २०२२ पासून बंद आहे. भोयरे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर नरखेड रस्त्याला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून, बऱ्याच दिवसांपासून बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने बस सेवा बंद आहे. तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावाला वाहतुकीची सोय नसल्याने वृद्ध, पुरुष, स्त्रिया, शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थ िनी आजारी व्यक्ती यांची येण्या-जाण्याची सोय नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नेतेमंडळी फक्त मतदानापुरते गावाकडे येतात त्यानंतर आमचे गाव दिसत नाही. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कालावधीत आम्ही बघून घेऊ अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. बंधाऱ्यापासून एसटी परत गेली तरी चालेल बंधाऱ्यावरून जाणे धोक्याचे आहे, असे सांगितले जाते. बंधाऱ्याच्या अलीकडून एसटी वळून नरखेडला परत आली तरीसुद्धा चालेल. बऱ्याच दिवसांपासून बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने बस सेवा बंद आहे. पण बंधाऱ्याची अडचण न सांगता विद्यार्थ्यांची येण्या-जाण्याची सोय करण्यात यावी, अशी माहिती भोयरे गावचे समाजसेवक बापू पवार, प्रमोद साठे, विलास थोरबोले यांनी व्यक्त केली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते गणेश पूजन व स्थापना विधी संपन्न झाला. दरम्यान, २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या दरम्यान मंदिर समितीच्या वतीने गीत, संगीत, अभंग अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आला. गणेश पूजनावेळी समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, तसेच मंदिरे समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार व धार्मिक वातावरणात हा सोहळा पार पडला. समितीच्या वतीने गणेशोत्सवाच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविक, नागरिक आणि भक्त मंडळींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. श्री गणरायांच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.गणेशोत्सव काळात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मंदिर समितीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम २८ ऑगस्ट : पैठण येथील श्रीकृष्ण गोसावी यांची अभंगवाणी. २९ ऑगस्ट : मुंबई येथील भाग्यश्री देशपांडे यांचे शास्त्रीय गायन आणि भक्ती संगीत. ३१ ऑगस्ट : पुणे येथील डॉ. भावार्थ देखणे यांचा नमो ज्ञानेश्वरा सांगितिक जीवनपट. ३ सप्टेंबर : गुंजेगाव येथील प्रियांका क्षीरसागर यांचे अभंगरंग. ४ सप्टेंबर : पनवेल येथील सौ श्रुती पाटील यांचा बोलावा विठ्ठल हा भक्ती संगीत कार्यक्रम. ५ सप्टेंबर : बेळगाव येथील रजत कुलकर्णी हे शास्त्रीय गायन आणि भक्तिसंगीत सादर करतील.
‘गणपत्ती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!’ या जयघोषात बुधवारी घरोघरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेश मंडळांसह नगरकरांनी बाप्पांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. शहर उपनगरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट करत गणरायांची मिरवणूक काढली. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत (सन २०२४ - २६३६ मंडळे) यंदा ४८३ सार्वजनिक गणेश मंडळांची वाढ झाली आहे. आता पुढील नऊ दिवस अवघे नगर गणेशमय होणार आहे. मंगळवारी सायंकाळी व बुधवारी दुपारपर्यंत शहर व उपनगरात गणेशमूर्ती नेण्याची लगबग सुरु होती. माळीवाडा परिसर, चितळे रोड, गांधी मैदान, प्रोफेसर कॉलनी चौक, पाइपलाइन रस्ता, तसेच भिंगार, केडगाव आदी भागात गणेशमूर्ती सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल होते. सार्वजनिक मंडळांकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक निघाली. यंदा जिल्ह्यात तब्बल ३११९ सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची प्रतिष्ठापना केली. मंडपांची सजावट, रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे शहरात व उपनगरात सणासारखे वातावरण होते. गणेशभक्तांची गर्दी, विविध सामाजिक उपक्रम आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर हे सर्व यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोलच्या गजरात मिरवणूक काढून श्रींची स्थापना केली. छाया : सिद्धार्थ दिक्षित. { सन २०२१ : ३८० { सन २०२२ : ३२५ { सन २०२३ : २८० { सन २०२४ : २६१ {सन २०२५ : २२१ अडीच हजार घरात मातीचे गणेश घरोघरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना व्हावी, यासाठी ठिकठिकाणी कार्यशाळा पार पडल्या. विद्यार्थी, महिला, हौशी कलाकारांनी पर्यावरणप्रेमी शाडूपासून मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले. या मूर्ती महाग असल्या तरी यंदा जवळपास अडीच हजार घरांत शाडू मातीच्या पर्यावरणपुरक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. भिंगार उपनगरात गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले. प्रथेप्रमाणे ब्राह्मण गल्लीतील मानाच्या देशमुख गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मारुती मंदिर परिसरात गणेशमूर्ती पूजेचे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. यंदा शहर उपनगरांतील सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे व पारंपारीक वाद्ये वाजवत मिरवणुका काढल्या. २२१ गावांत एक गणपती सन २०२१ मध्ये एक गाव एक गणपती उपक्रमात ३८० गावांनी सहभाग घेतला होता. यंदा २०२५ मध्ये २२१ गावांनी 'एक गाव एक गणपती'ची प्रतिष्ठापना केली. ही संख्या घसरलेली असली, तरी जिल्ह्यातील अनेक मंडळांनी पारंपरिक व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे.