बनीबेगम बागेत कत्तलखाना जमीनदोस्त; दोन शेड पाडले, पोलिस, महसूल, खुलताबाद न.प.ची संयुक्त कारवाई
शहरातील बनीबेगम बाग परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर पोलिस, महसूल विभाग, नगरपालिका प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने उभारलेले दोन शेड पूर्णपणे जमीनदोस्त केले. कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी याच परिसरातील अवैध कत्तलखान्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी धाड टाकली होती. या प्राथमिक कारवाईनंतर प्रशासनाने गुरुवारी दुपारी चार ते सायंकाळी सात या वेळेत अधिक कठोर संयुक्त मोहीम राबवली. वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. कारवाई सुरळीत पार पाडली. मोहिमेत पोलिस उपअधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, मुख्याधिकारी समीर शेख, मंडळाधिकारी विजय चव्हाण, तलाठी बंडू अव्हाड यांच्यासह नगरपालिका पथक, इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. अनधिकृत बांधकामे पाडली पोलिस, महसूल, नगरपालिका प्रशासनाने समन्वय साधला. कत्तलखान्याचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा निर्णय घेतला. कत्तलीसाठी उभारलेले दोन मोठे शेड जेसीबीने पाडले. संबंधित जागेवरील सर्व अनधिकृत बांधकामे उध्वस्त केली. परिसर साफ केला.
येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात सुरू असलेल्या सप्ताहात बुधवारी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी साधूंच्या मार्गदर्शनाने मीपणा संपतो, असा हितोपदेश भाविकांना दिला. भगवान महाराज डमाळे यांच्या नियोजनाखाली हा सप्ताह सुरू आहे. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तननात ‘साधू बोध झाला, तो ठायीच मुराला’ या ओळींचा जयघोष झाला. संत ज्ञानेश्वरांच्या अभंगवाणीवर आधारित विशेष आध्यात्मिक कार्यक्रमात मानवी जीवनातील आत्मज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात निरूपणकारांनी अभंगाचा अर्थ उलगडला. सद्गुरूंचा बोध झाला की मनातील द्वैत संपते, असे त्यांनी सांगितले. ‘कापूराची वाती उजळली ज्योती’ या ओळीचा संदर्भ दिला. कापूर जळल्यानंतर अवशेष राहत नाही. साधूंच्या उपदेशाने साधकाचा अहंकारही तसाच विरघळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. साधूंच्या मार्गदर्शनाने मीपणा संपतो. ईश्वराशी एकरूपता साधते, असा संदेश देण्यात आला. ज्याला असा बोध होतो तोच खरा भाग्यवंत ठरतो, असेही सांगण्यात आले. ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा’ या वचनाप्रमाणे ईश्वराचे नामस्मरणच पुण्याची खरी गणना करण्यास समर्थ आहे, असा हरिपाठाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी ‘हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’ या ओळींचे सामुदायिक गायन झाले. यामुळे परिसर मंत्रमुग्ध झाला होता. ज्ञानदेवांच्या उपदेशामुळे मनाला शांती मिळते. जीवनाला दिशा मिळते, असा सूर भाविकांमधून उमटला. या सप्ताहाची शुक्रवारी, आज सांगता होईल. किसन महाराज पवार (उत्तराधिकारी, मुकुंदराज संस्थान, अंबेजोगाई) यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.
जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गुरुवारी (दि. १६) कन्नड तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीत पाणीटंचाई, जनगणना, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, जलयुक्त शिवार कामांची प्रगती, जलजीवन मिशनची कामे, महाआवास व घरकुल कामांचा आढावा, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमार्फत मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील स्मशानभूमी, तीर्थक्षेत्र विकास व इतर सुविधा, आपले सरकार तक्रारी, लेक लाडकी योजना यासह इतर शासकीय योजनांचा संबंधित कार्यालयांकडून आढावा घेतला. विनय गौडा यांनी एसआयआर विशेष सखोल पुनर्वेक्षण कार्यक्रम, जनगणना यावर सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे, असे सांगितले. पाणीटंचाईग्रस्त गावांना त्वरित पाणीपुरवठा करावा. मागणी असेल तेथे विहीर अधिग्रहित करावी. प्रलंबित जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण कराव्यात, असे निर्देश दिले. यानंतर जनता दरबारात १८ नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित कार्यालयांच्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेऊन निर्णय घेण्यास सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी लता बागुल, तहसीलदार सारिका भगत, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे, प्रशांत काळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश राठोड, पुरवठा निरीक्षक वैभव तोंडे, प्राथमिक आरोग्य अधीक्षक डॉ. योगेश साळुंखे, तालुका कृषी अधिकारी संदीप सिरसाठ, बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ. निलेश राठोड, गटशिक्षणाधिकारी सबहत शेख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. तहसीलदार सारिका भगत यांनी आभार मानले. योजना जनेतपर्यंत पोहोचवा शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवणे हे सर्वांचे काम आहे. त्यात कसूर होता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. जनतेची कामे प्रलंबित राहणार नाहीत, याची नोंद सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन केले. ई-ऑफिस अंतर्गत ११ तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी प्रास्ताविक केले.
तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने ४० अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला आहे. प्रचंड उष्णतेमुळे ग्रामीण भागातील रस्ते अक्षरशः निर्मनुष्य झाल्याचे चित्र गुरुवारी (१६ एप्रिल) पाहायला मिळाले. दुपारच्या वेळेत गावोगावी शुकशुकाट जाणवत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले होते. उन्हाच्या झळा तीव्र असल्याने सकाळीच उकाडा जाणवत आहे. दुपारी परिस्थिती अधिकच बिकट होते. परिणामी शेतकरी, मजूर, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे कामकाजही विस्कळीत होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. विहिरी व बोअरवेलची पातळीही घटली आहे. जनावरांनाही उष्म्याचा फटका बसत असल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, उष्णतेची तीव्रता आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन तहसीलदार ज्योती पवार यांनी केले आहे. दुपारी घराबाहेर पडू नका ः डॉ. सुनील गायकवाड म्हणाले, नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडू नये. डोक्यावर संरक्षण ठेवूनच बाहेर पडावे. तसेच तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यावे. लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी, ताक, पन्हे यांसारख्या पेयांचा आहारात समावेश करा. अति चहा, कॉफी किंवा शीतपेये पिणे टाळा. यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते. तसेच उन्हाळ्यात हलके, सैल, फिकट रंगाचे सुती कपडे वापरा. यामुळे घाम शोषला जातो. हवा खेळती राहते, असेही त्यांनी सांगितले.
फुलंब्री मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ संलग्न डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी महाविद्यालयात रब्बी हंगाम शेतकरी मेळावा बुधवारी(१५ एप्रिल) मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्य ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या या महाविद्यालय व बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भाजीपाला, मका आणि सोयाबीन पिकांच्या बियाण्यांचे तसेच लागवड पद्धतीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी फायदेशीर करता येईल, याचे दर्शन शेतकऱ्यांना या माध्यमातून घडवण्यात आले. अध्यक्षस्थानी मित्र साधना प्रसारक मंडळाचे अध्यक्ष द्वारकादास पाथ्रीकर होते तर उद्घाटक राजेंद्र पाथ्रीकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बायर क्रॉप सायन्स लिमिटेडचे पीक कृषिशास्त्रज्ञ राजेंद्र पाटील होते. उषाताई पाथ्रीकर, वरुण पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बायर क्रॉप सायन्स लिमिटेडचे कृषितज्ज्ञ राजेंद्र पाटील यांनी शेतकरी हित आणि धोरण यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आणि शेतकरी मेळावा यांचा योग अधोरेखित केला. शेतकऱ्याचा आसूड' या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांनी सरकारची पीक धोरणे शेतकऱ्यांच्या हिताची असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. राजेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक शेती सोडून व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. पीक व रोगशास्त्र विभागाच्या तज्ज्ञ डॉ. नेहा पटाईत यांनी पिकांवरील रोग आणि कीड ओळखणे तसेच कीटकनाशके व तणनाशकांचा प्रभावी वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन केले. कक्षप ठकर, अनुश्री पाताडे, प्राचार्य कल्याण आपेट, डॉ. ऊर्मिला पानसरे, गजानन वाहेकर उपस्थित होते. डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करताना राजेंद्र पाथ्रीकर यांच्यासह विविध मान्यवर.
मुलांना पसायदान शिकवा; निष्ठेशिवाय जीवनात यश नाही- सचिन महाराज
सिल्लोड तालुक्यातील भवन येथे ४३ व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित कीर्तनसेवेत सचिन महाराज ढोले यांनी बुधवारी (१५) सायंकाळी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे चिंतन करताना निष्ठेचे महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले. कीर्तनासाठी निवडलेल्या अभंगातून त्यांनी सांगितले की मानवी जीवनात यशस्वी होण्यासाठी निष्ठा अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही साध्यापर्यंत पोहोचायचे असेल, तर प्रथम आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराज म्हणाले, “परमार्थाच्या मार्गावर भगवंताची पहिली पायरी म्हणजे निष्ठा. निष्ठा जपली, तरच भक्ती, साधना, जीवनातील प्रत्येक प्रयत्न सार्थकी लागतो.” उपस्थित भाविकांनी या विचारप्रवर्तक कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी समाधान व्यक्त केले. कीर्तनाचे आयोजन बाळू कळम, पांडुरंग गिरी, व भवन ग्रामस्थांनी केले होते. अभंग निरूपणासोबतच समाजप्रबोधनाचा उपस्थितांना दिला संदेश सचिन महाराज ढोले यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांना लहानपणापासूनच पसायदान शिकवा. संस्कार द्या. निष्ठेची शिकवण द्या. कीर्तनात अभंग निरूपणासोबतच समाजप्रबोधनाचा संदेश देताना त्यांनी श्रद्धा, संस्कार, चिकाटी यांचे महत्त्व पटवून दिले.
माहेरहून पैसे आणि दागिने आणण्यासाठी विवाहितेचा छळ करुन पतीने पत्नीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पतीसह आठ जणांवर विजापूर नाका पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. ही घटना लोकमान्य नगर, मजरेवाडी परिसरात बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी पतीस अटक केली आहे. जखमी नर्गीस फैजान शेख (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती फैजान, सासरा जावेद, सासू शमशाद, दीर फुरखान, जाऊ उमेरा, नणंद असिफा (सर्व मुलतानी बेकरीजवळ यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. कपड्यात लपवून आणले जाळण्यासाठी पेट्रोल पती फैजान याने नर्गीसची आई आणि बहिणीला घराबाहेर काढले आणि कडी आतून लावून घेतली. त्यानंतर त्याने कपड्यांत लपवून आणलेली पेट्रोलची बाटली नर्गीसच्या अंगावर ओतून तिला लायटरने पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत नर्गीस घराबाहेर आली दरवाजा उघडताच तो घरातून पळून गेला. मात्र पेटलेल्या अवस्थेत नर्गिस घराच्या बाहेर आली.आग विझवत तीस जखमी अवस्थेत उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरु असून तीच प्रकृती गंभीर आहे, आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाइकांनी केली.
पक्षांची सभांना पसंती, अपक्षांची सायकलवारी:मुख्यमंत्री फडणवीस यांची सोमवारी राहुरीत प्रचारसभा
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचादुसरा टप्पा सुरू झाला आहे. तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.एकीकडे भाजपचे कमळ'' फुलवण्यासाठी महायुतीने ताकद लावली असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तुतारी''ने रणशिंगफुंकले आहे. मात्र, या पक्षीय लढाईत अपक्ष उमेदवारांनीही प्रस्थापितांची चांगलीच डोकेदुखीवाढवली आहे. भाजप, राष्ट्रवादी (श.प.),वंचित यांनी सभांवर भर दिला आहे. तर अपक्षउमेदवार सायकलवारी करत आहेत. राहुरीच्याराजकीय मैदानात दिग्गज मैदानात उतरले आहेत.गुरुवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीप्रचारसभा घेतली तर २० एप्रिल रोजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. वंचितबहुजन आघाडीकडून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष रावसाहेबखेवरे यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके हे दलित आणि मुस्लिम मतांची किती मोट बांधतात,यावरही बरेच गणित अवलंबून आहे. तर काहीअपक्ष उमेदवार चक्क गळ्यात त्यांचे मतदानचिन्ह अडकवून घरोघरी प्रचार करत आहेत. भाच्याची माघार, पण मामा प्रचाराला येणार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सध्याबाळगलेले मौन'' सध्या राजकीय वर्तुळातचर्चेचा विषय ठरला आहे. खा.नीलेश लंकेयांनी तनपुरे महाविकास आघाडीलाच मदतकरतील, असे सूतोवाच केले असले, तरीप्रत्यक्ष तनपुरे समर्थकांमध्ये अद्याप संभ्रमावस्थाआहे. २० एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस आणि पंकजा मुंडे यांची सभा होतअसताना, दुसरीकडे, प्राजक्त तनपुरे यांनीमाघार घेतली असली तरी त्यांचे मामा वराष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते जयंतपाटील हेही स्टार प्रचारक म्हणून येणार आहेत.त्यामुळे तनपुरे गट कोणाकडे झुकणार, यावरहीराहुरीचे बरेचसे गणित ठरणार आहे.
गांधेली फाटा परिसरात बुधवारी (१५ एप्रिल) रात्री वकिलाचा मृतदेह आढळून आला होता. तृतीयपंथीयांशी झालेल्या वादातूनच त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी गुन्हे शाखा व एमआयडीसी सिडको पोलिसांच्या पथकाने तिघांना अटक केली. यात सादिक बशीर अन्सारी (४०, रा. शहानूरमियाँ दर्गा परिसर), नानासिंग हिरासिंग जुली (२०, रा. मुकुंदनगर) आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. अधिक माहितीनुसार, वकील मिथुन पुंडलिक भास्कर (४९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरातून बाहेर पडले होते. तेथून ते गांधेली फाटा येथे गेले. त्या ठिकाणी असलेला तृतीयपंथी सादिक यास भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. यातून त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. यात मिथुन वरचढ ठरू लागल्याने त्याने साडीतील चाकू काढून त्यांच्या मांडीवर मारला. झुडपातून जोराने आवाज येत असल्याने व टाळ्यांच्या आवाजाचे सिग्नल ऐकून दोन साथीदार आत गेले. मिथुन मोठ्याने ओरडत असल्याने व त्यांच्या मांडीतून अधिकचा रक्तस्राव सुरू असल्याने तिघांनी मिळून त्यांना तेथेच दाबून धरले. त्यानंतर काही वेळाने त्यांना अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने भोवळ आल्यावर रस्त्याच्या कडेला टाकून तिघांनी पळ काढला. रात्री अकरा वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला मृतदेह दिसल्याने त्यांनी पोलिसांना कळवल्याने त्यांना घाटीत हलवण्यात आले. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भावाचा मर्डरशी संबंध नाही, बहीण गर्दीत शिरलीच नाही सायंकाळी सात वाजेपासून मिथुन घराच्या बाहेर पडले होते. त्यांनी पत्नीला १० मिनिटांत परत येतो, असे कळवले होते. मात्र १० वाजूनही परत न आल्याने व त्यांचा फोन लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबाने एकमेकांकडे विचारपूस सुरू केली होती. गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) कार्यरत असणाऱ्या त्यांच्या भगिनी मथुरा भाचीसह त्यांच्या शोधासाठी घराच्या बाहेर पडल्या. त्यांनी ब्लॅक हॉर्स हॉटेलच्या समोरच्या बाजूला गर्दी पाहिल्यावर तेथे विचारपूस केल्यावर तेथील लोकांनी मर्डर झाल्याचे सांगितले. मात्र आपल्या भावाचा मर्डरशी संबंध नाही म्हणून त्यांनी गाडी माघारी फिरून नेली. पुढे गेल्यावर त्यांना भावाच्या मित्राचा फोन आल्यावर त्याने हकीकत सांगितल्यावर त्या भाचीला घरी सोडून घटनास्थळी गेल्या. सादिक गुरूकडे जाऊन लपला आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आल्याने सादिक याने शिवाजीनगर भागात राहणाऱ्या गुरूला तेथूनच संपर्क केला. त्यानंतर तो गुरूकडे जाऊन लपला. रात्री पोलिसांनी त्या भागात उभे राहणाऱ्या तृतीयपंथीयांच्या नेटवर्कचा शोध घेतल्यावर तो शिवाजीनगर भागात आढळला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याचबरोबर अन्य दोन साथीदारांचा ठावठिकाणादेखील कळवला. त्यानुसार सहायक निरीक्षक भारत पाचोळे, अर्जुन कदम, जगन्नाथ मेनकुदळे यांच्या पथकाने दोघांनाही अटक केली. झाल्टा फाटा ते गांधेली फाटा या संपूर्ण परिसरात तृतीयपंथीयांचे रात्रीचे खेळ सुरू असतात. त्या ठिकाणी परराज्यातून येणारे ट्रक चालक, परजिल्ह्यातून बाजारात आलेले चालक यांना ते टार्गेट करतात. त्यांना झुडपात घेऊन गेल्यावर त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जाते. त्यानंतर बाहेर असलेल्या दोघांना टाळी वाजवून आत येण्याचा इशारा दिला जातो. त्यात लागलीच अन्य काही साथीदार त्यांना आत येऊन लुटतात. मात्र अनेक जण याची तक्रार करत नाहीत. पोलिस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. यानुसार तृतीयपंथी आणि इतर गटांना विनानिमंत्रण लोकांच्या घरी, कार्यक्रमात जाऊन किंवा ट्रॅफिक चौकात सक्तीने पैशांची मागणी करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश १५ एप्रिल ते १३ जून २०२६ पर्यंत लागू राहील. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई होईल.
रस्ता रुंदीकरणात ज्यांची रोजीरोटी गेली, त्या चिकलठाण्यातील ७० व्यापाऱ्यांच्या जखमेवर पुन्हा एकदा संकट आले आहे. व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी मनपाने पुढाकार घेत चिकलठाण्यातील गट नंबर ७३७ मधील २३ गुंठे जमीन महसूल विभागाकडून घेतली होती. त्यासाठी महसूल विभागाला ६.३० कोटी रुपये मोजले, पण मोबदल्यात पूर्ण जागा मिळवण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. २३ गुंठ्यांचे पैसे भरूनही प्रत्यक्षात केवळ १४ गुंठेच जागा पदरात पडल्याने या व्यवहारात नक्की गौडबंगाल काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासन जेव्हा गेले, तेव्हा शेजारी असलेल्या जागा मालकांनी यावर आक्षेप घेतला. ही जागा वक्फ बोर्ड, दर्गाची असल्याचे दावा करण्यात आला. त्यामुळे २३ गुंठ्यांचे पैसे भरून मनपाच्या हाती १४ गुंठेच जमीन मिळाली आहे. मनपाने नियोजन केल्याप्रमाणे या ठिकाणी ११० गाळे, उद्यान, वॉकिंग प्लाझा, महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जागा याचे नियोजन केले होते. आता मात्र या सगळ्या नियोजनाला कात्री लावण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे रस्ता रुंदीकरण मोहीम होऊन ६ महिने होऊन गेले. तेव्हापासून या व्यापाऱ्यांच्या उपजीविकेवर गदा आली आहे. महसूलमंत्र्यांनी आदेश देऊनही चालढकलपणा या ठिकाणी व्यापारी संकुल व्हावे याकरिता स्थानिक आमदार अनुराधा चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकुलसाठी ही जागा द्यावी, असे आदेश दिले होते. असे असताना देखील २३ गुंठेच्या जागी १४ गुंठेच जागा देण्यात आली. पैसे भरण्या पूर्वी ही जागा मोजली नाही. आता गाळ्यांच्या किमती वाढण्याची शक्यता मनपाने ना नफा ना तोटा तत्त्वावर व्यापाऱ्यांना १५ ते २० लाखांत गाळे देण्याचे आश्वासन दिले होते. उर्वरित गाळे बाजार भावाने विकून प्रकल्प खर्च काढला जाणार होता. आता जागाच ९ गुंठ्याने कमी झाल्यामुळे गाळ्यांची संख्या घटली आहे. परिणामी, प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अडचणीत येईल किंवा गाळ्यांच्या किमती वाढतील. सिटी सर्व्हेला जागा शोधण्याचे आदेश याबाबत बैठक झाली. २३ गुंठे जागेसाठी पैसे भरण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात १४ गुंठेच जागा आहे. कागदोपत्री असलेली ९ गुंठे जागा कुुठे गेली आहे. हे शोधण्याचे आदेश सिटी सर्व्हे विभागाला आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार लकवरच कारवाई सुरु होईल. -अपर्णा थेटे, उपायुक्त, मनपा याबाबत बैठक झाली याबाबत मनपा आणि महसूल विभागात बैठक झाली आहे. त्यांनी तशी २४ गुंठे जागा देण्यात आली आहे. मात्र समोरची १० गुंठे जागा ही डीपी रस्त्यात जाते. त्यामुळे त्यांना ही राहिलेली ९ गुंठे जागा ही मागच्या बाजूला द्यावी लागेल. या बाबत लवकर निर्णय घेऊन प्रश्न सोडवला जाईल. -जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी जागा मिळाली आहे व्यापारी संकुलासाठी लागणारी जागा मनपाला मिळाली आहे. यात काही अडचण असल्यास ती तत्काळ सोडवण्यात येईल. यासाठी प्रशासनाची बैठक लावून तिढा सोडवण्यात येईल.-अनुराधा चव्हाण, आमदार
मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकतेचे नवे पर्व सुरू झाले आहे. “ई-टीडीआर’ प्रणाली १५ एप्रिल २०२६ पासून प्रत्यक्ष कार्यान्वित झाली असून, यामुळे २,००० कोटींच्या बाजारपेठेतील बिल्डर लॉबीची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. मुंबईत दरवर्षी सुमारे ७० लाख चौरस फूट टीडीआरची मागणी असताना पुरवठा मात्र केवळ १० लाख चौरस फुटांपर्यंतच मर्यादित आहे. यामुळे टीडीआरचे दर सध्या ४,००० ते ५,००० रुपये प्रतिचौरस फुटांवर पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शेअर मार्केटप्रमाणे ऑनलाइन बोली लावून व्यवहार सुरू झाले आहेत. मध्यस्थांची साखळी संपल्याने सामान्य जमीन मालकांना याचा थेट फायदा मिळणार आहे. महापालिकेला २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात विकास आराखडा शुल्कातून ९,७०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. एआय तंत्रज्ञानावर आधारित ही प्रक्रिया रिअल इस्टेटमधील “काळाबाजार’ कायमचा बंद करण्यासाठी प्रभावी ठरेल. काय होते आधी आणि आता काय बदलले? पारदर्शकतेचा अभाव वि. १००% डिजिटल रेकॉर्ड:पूर्वी टीडीआर व्यवहारात कमालीची गुप्तता होती. एजंट आणि मोठे विकासक संगनमताने भाव ठरवत. त्यामुळे सामान्यांची लूट होत. आता ई-टीडीआरमुळे शेअर मार्केटप्रमाणे ऑनलाइन बोली लागते. प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद उपलब्ध आहे.मध्यस्थांची साखळी वि. थेट संवाद: जुन्या व्यवस्थेत दलालांशिवाय व्यवहार पूर्ण होणे अशक्य होते. ई-टीडीआरमुळे मध्यस्थांची गरज नाही. खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात थेट संवाद होतो. दलालीचा खर्च वाचतो.महिन्यांचा विलंब वि. एआयद्वारे जलद प्रक्रिया:पूर्वी कागदपत्र पडताळणीसाठी अनेक महिने फाइल रखडत असे. आता नवीन प्रणालीत एआय तंत्रज्ञानाद्वारे कागदपत्रांचे त्वरित विश्लेषण. काय आहे ‘ई-टीडीआर’ आणि नेमका बदल काय? आतापर्यंत टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) मिळवणे आणि तो विकणे ही प्रक्रिया अत्यंत किचकट होती. ती “सेटिंग’वर आधारित होती. एखाद्याची जमीन रस्ते किंवा उद्यानासाठी आरक्षित झाल्यास, त्या बदल्यात मिळणारे डीआरसी (विकास हक्क प्रमाणपत्र) विकताना सामान्य जमीन मालकाला प्रचंड त्रास सहन करावा लागत असे. योग्य भाव न मिळणे, दलालांची साखळी, कागदपत्रांची दिरंगाई यामुळे सामान्य नागरिक भरडला जात होता. टीडीआर मार्केटवर आतापर्यंत मोजक्या विकासकांचे वर्चस्व होते. तिथे आता “स्टॉक एक्स्चेंज’सारखी पारदर्शकता आली आहे. पूर्वी सामान्य नागरिकाची जमीन आरक्षित झाली की, त्याला डीआरसी विक्रीसाठी अनेक तांत्रिक अडचणी यायच्या. मध्यस्थांमुळे अपेक्षित पैसा मिळत नसे. मात्र, १५ एप्रिलपासून अमलात आलेल्या या डिजिटल प्रणालीमुळे अनियंत्रित खेळाला चाप बसला आहे. एआय तंत्रज्ञान आणि सुरक्षित बँक गेटवेमुळे आता केवळ एका क्लिकवर व्यवहार पूर्ण होत आहेत. हा निर्णय रिअल इस्टेटमधील अपारदर्शक कार्यपद्धतीला छेद देणारा आहे.
महिला लैंगिक अत्याचार, कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरातने त्याच्या स्वत:च्या दोन भाचांच्या ८ खात्यात ४ कोटी ८० लाख रुपयांची उलाढाल केली होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. राहता येथील समता पतसंस्थेत ही खाती होती. दरम्यान, खरातच्या शिर्डीतील जमीन खरेदी प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पनाच्या जामिन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, सध्या इतर प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘७१-४९’ फॉर्म्युलाचाही तपास सुरू भोंदू खरातने समता पतसंस्थेत ५७ जणांच्या नावावर तब्बल १०० खात्यांचा व्यवहार पोलिसांनी तपासला. तेव्हा अनेक खात्यांमध्ये ७१ लाख आणि ४९ लाख रुपये अशाच ठराविक रकमा वारंवार जमा केल्या आणि काढण्यात आल्याचे दिसले. विशेष म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या नावावर दोन खाती उघडली होती. यातील आणखी संशयास्पद बाब म्हणजे बहुतांश खाती कोरोना संकटकाळात प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला उघडण्यात आली. या सर्व खात्यांमध्ये खरातचेच नाव नॉमिनी म्हणून नोंदवले गेले होते. अंकशास्त्राच्या आधारे लोकांना गंडा घालणारा खरात हा स्वत:च्या व्यवहारातही ठराविक अंकांचा वापर करत होता का, की हा केवळ आर्थिक व्यवहार लपवण्याचा तांत्रिक फॉर्म्युला होता, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुलींशी मैत्री करून त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढण्याचाधक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात नुकताच समोर आला आहे. केवळ मित्रांमध्ये आपली ‘मर्दानगी’ सिद्ध करण्यासाठी आणि फुशारकी मारण्यासाठी १९ वर्षीय ब्लॉगर अयान तन्वीर हे कृत्य करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यासाठी तो एका मित्राच्या भाड्याच्या खोलीचा वापर करत होता. त्याच्या मित्राने खोली भाड्याने घेतली होती. मात्र, अयान त्याला प्रत्येक वेळी ५०० रुपये देऊन ती खोली काही वेळासाठी वापरत असे. आरोपी अयान सोशल मीडियावर ब्लॉगर म्हणून सक्रिय असल्याने त्याने जवळपास १७ ते १८ हजार फॉलोअर्स तयार केले होते. याच माध्यमातून त्याने काही मुलींना जाळ्यात ओढले. मित्राने डेटा मोबाइलमध्ये घेतल्याने व्हिडिओ व्हायरल या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अयानच्या जिवलग मित्रामुळेच झाला. अयान आणि उजेर हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे जिवलग मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी ते चहा पिण्यासाठी बाहेर गेले होते. त्या वेळी अयान आपला मोबाइल उजेरकडे देऊन काही वेळासाठी बाहेर गेला. उजेरला अयानच्या मोबाइलचा पासवर्ड माहीत होता. त्याच वेळी उजेरने अयानच्या सोशल मीडिया अकाउंटमधील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओंचा ॲक्सेस स्वतःकडे घेतला आणि तो आक्षेपार्ह सर्व डेटा आपल्या मोबाइलमध्ये घेतला. त्यानंतर उजेरने हे फोटो, व्हिडिओ एका मित्राला पाठवले, तिथून ते दुसऱ्याकडे आणि अशा प्रकारे अनेकांपर्यंत हे व्हिडिओ व्हायरल झाले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरच अयानच्या या कृत्याचे बिंग फुटले. मेळघाटातील महाविद्यालयात घेत आहे बीएस्सीचे शिक्षण अयान हा मेळघाटच्या महाविद्यालयात बीएस्सीचे शिक्षण घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड सक्रिय होता. तो कुठेही गेला तरी त्याचे ब्लॉग तयार करून सोशल मीडियावर अपलोड करणे, हा त्याचा नित्यक्रम होता. या ब्लॉगमुळे त्याचे जवळपास १७ ते १८ हजार फॉलोअर्स झाले होते. यात अनेक मुलींचा समावेश होता. त्याच्या ब्लॉगला कोणी लाइक केले, त्यावर कमेंट केली की, अयान त्यांना हेरायचा. अशा मुलींना रिप्लाय देऊन तो सुरुवातीला चॅटिंग करायचा. मुलींच्या संमतीविना काढलेले ३९ आक्षेपार्ह फोटो आरोपीकडे १८ व्हिडिओ : अयानने आपल्या विकृत आनंदासाठी आणि मित्रांना दाखवण्यासाठी मुलींचे १८ आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित केले.३९ फोटो : पीडित मुलींच्या संमतीविना काढलेले ३९ आक्षेपार्ह फोटो आरोपीने आपल्या मोबाइलमध्ये साठवून ठेवले होते.८ तरुणी : ब्लॉगिंगच्या माध्यमातून जाळ्यात ओढलेल्या एकूण ८ तरुणी अयानच्या या विकृत मानसिकतेच्या शिकार झाल्या. २ मुलींवर लैंगिक अत्याचार, आठ जणींसोबत गैरवर्तन अयानने आठ मुलींसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचे समोर आले आहे, तर व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरून त्याने २ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. मुलगी जाळ्यात आल्यानंतर तिला परिसरातील धरणावर किंवा आजूबाजूच्या निर्मनुष्य परिसरात, कॅफेवर दुचाकीवरून फिरायला नेणे किंवा कधी अमरावतीला आणणे आणि तिथे गैरवर्तन करणे, असा त्याचा नित्य कार्यक्रम होता, असेही तपासामध्ये समोर आले आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान आणि परतवाडा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी-कर्मचारी एकत्रित येवून केक कापतानाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत परतवाडा ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना तत्काळ मुख्यालयात संलग्न (अटॅच) केले आहे.
शहरात गँगवॉरने डोके वर काढले आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन गटांतील संघर्षानंतर पवन दिवेकर या गुंडाने हवेत दोनदा गोळीबार केला. गजबजलेल्या पुंडलिकनगर रोडवरील हनुमाननगर चौकात हा प्रकार घडला. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पुंडलिकनगर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पवन दिवेकरच्या साळवे नामक नातेलगास ताब्यात घेतले. अधिक माहितीनुसार, रांजणे व साळवे यांच्यात दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात वाद झाला. गुरुवारी दुपारी न्यायनगर भागात त्यांच्यात पुन्हा वादावादी झाली. नंतर रात्री ९ च्या सुमारास साळवे व रांजणे हनुमाननगर चौकात भिडले. या वेळी साळवेने नातेवाईक पवन दिवेकर यास घटनास्थळी बोलावले. तो सिनेस्टाइल पद्धतीने बिअरची बॉटल आणि गावठी पिस्तुलासह घटनास्थळी पोहोचला. रांजणे गटाला जोरजोरात शिवीगाळ सुरू केली. या वादातूनही बाजूला जाऊन त्याने टपरीवरून गुटखा खरेदी करून तोंडात टाकला. तो बाजूला गेल्याने रांजणेच्या गँगचा आवाज चढला. त्यामुळे संतापलेल्या दिवेकरने घोळक्याच्या मधोमध शिरत दोनदा हवेत गोळीबार केला. दिवेकरवर खुनाचाही गुन्हा पवन दिवेकर व त्याच्या ‘पीडी कंपनी’ने चार ते पाच वर्षांत अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. दोन वर्षांपासून जीवघेणे हल्ले, चाकूने मारहाण यासह विविध ८ गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. त्याच्यावर २०१९ साली खुनाचा गुन्हाही दाखल आहे. तसेच १४ गुन्हे दाखल आहेत.
महिला आरक्षण विधेयकावरून घमासान
सत्ताधा-यांकडून समर्थन, विधेयकामागे राजकीय हेतू : विरोधक जागा वाढवायची गरज काय?, विरोधकांचा सवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले असून, संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक २०२६ आणि सीमांकन विधेयक २०२६ आज संसदेत मांडण्यात आले आणि महिला आरक्षण विधेयकासह सर्व विधेयकांवर चर्चा सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्री […] The post महिला आरक्षण विधेयकावरून घमासान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी आयपीएल २०२६ मधील २४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यामध्ये मुंबईला घरच्या मैदानावर पंजाबने सात विकेटने पराभूत केले. पंजाबने मुंबईच्या १९६ धावांची यशस्वीपणे पाठलाग केला. त्यामुळे क्विंटन डिकॉक याची शतकी खेळी वाया गेली. पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईची गाडी अजूनही विजयाच्या रूळावर येताना दिसत नाही तर दुसरीकडे […] The post पंजाबने उडविला मुंबईचा धुव्वा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे
लातूर : प्रतिनिधी शालेय शिक्षणानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून दिव्यांग विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहतील, असे प्रतिपादन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी बुधवारी केले. जीवन विकास प्रतिष्ठान संचलित अॅड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालय, सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधिर विद्यालय व मतिमंद विद्यालय […] The post व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरटीईची प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू
लातूर : प्रतिनिधी २०२६-२७ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशाची सोडत (लॉटरी) सोमवार दि. ६ एप्रिल रोजी निघाली होती. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश शाळा निहाय विद्यार्थी निवड यादी जाहीर झाली आसून लातूर जिल्हयातील २ हजार २६९ मोफत प्रवेशापैकी गेल्या सात दिवसात केवळ सातच प्रवेश झाले आहेत. पालकांच्या पाल्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी […] The post आरटीईची प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाची मागणी केली आहे. माजी खासदार आणि माजी आमदारांना दिली जाणारी पेन्शन योजना कायमची बंद करावी, अशी मागणी करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. राजू पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना स्वतःचाही उल्लेख आवर्जून केला आहे. ते म्हणाले, सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. राजू पाटील पुढे म्हणतात, एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेंशन व इतर सुविधांचा भार पण भविष्यात वाढतच जाणार आहे. खरंतर माजी खासदार व माजी आमदार (यात मी पण आलो.) यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेंशन योजना कायमची बंद करायला हवी.संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही राजू पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्रातील खासदारांची संख्या ७२ वर पोहोचणार? केंद्र सरकार २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे. यामुळे लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातून ४८ खासदार लोकसभेत जातात. पुनर्रचनेनंतर ही संख्या ७२ पर्यंत वाढू शकते. खासदारांची संख्या वाढल्यास भविष्यात माजी खासदारांच्या पेन्शनचा आकडाही प्रचंड मोठा असेल, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. संसदेत चर्चेची मागणी सध्या सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयकावर सखोल चर्चा होत आहे. याच अधिवेशनात लोकप्रतिनिधींच्या पेन्शनचा विषयही चर्चेला घ्यावा, अशी विनंती राजू पाटील यांनी केली आहे. सामान्य माणसाने आयुष्यभर काम केल्यावर त्याला पेन्शनसाठी झगडावे लागते, मग लोकप्रतिनिधींना ही सवलत का? असा उपरोधिक सवालही या मागणीतून अधोरेखित होत आहे. हे ही वाचा… आम्ही बाळासाहेबांचे संस्कार विकत घेतले नाहीत:किशोरी पेडणेकरांचे विधान; माफी मागेपर्यंत बीएमसीचे सभागृह चालणार नाही, महापौरांचा पवित्रा मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सभागृहात अक्षरशः ठिणगी पडली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले, मात्र दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतरही हा पेच सुटू शकला नाही. सविस्तर वाचा…
छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामांसाठी महावितरणने शुक्रवारी (17 एप्रिल) काही भागांमध्ये वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक परिसरांमध्ये ठराविक वेळेत वीज खंडित राहील, अशी माहिती महावितरणने दिली आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भीमटेकडी फीडर आणि दिल्लीगेट फीडरवरील अंबर हिल, एव्हरेस्ट कॉलेज, सईदा कॉलनी, हर्सुल गाव, कोलथनवाडी रोड, जहांगीर कॉलनी, चेतनानगर आणि फातेमा कॉलनी या भागांतील वीजपुरवठा बंद राहील. याशिवाय, सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पडेगाव उपकेंद्रावरील सर्व फीडर, निशांत पार्क फीडर आणि रेल्वे स्टेशन फीडरवरील उद्योग इंद्रकमल, स्काय सिटी, निशांत पार्क परिसर, मास्टर कुक हॉटेल, दिशानगरी, झेड गॅलेक्सी, शिवकला नेत्रालय, द्वारकादास नगर, शाहनूरवाडी आणि समाधान कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा खंडित होईल. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन उपकेंद्रावरील सर्व फीडर्सवरील ग्राहकांची वीज बंद राहील. तसेच, सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत म्हाडा कॉलनी, चिकलठाणा गाव, सावित्रीनगर, विमानतळासमोरील भाग, प्रकाशनगर, रामनगर, नारेगाव, एन-11, एन-12, एन-1, पॉवरलूम, गौतम दा मिल, ग्रीव्हज, सिंधी कॉलनी, खोकडपुरा, बंजारा कॉलनी, उस्मानपुरा, एसबीएच कॉलनी आणि विकास नगर या परिसरातील वीज बंद राहील. महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कामाच्या नियोजनानुसार, वीजपुरवठा दिलेल्या वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर पूर्ववत होऊ शकतो, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी समाजाला सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. निस्वार्थ बुद्धी आणि प्रामाणिकपणा असेल तरच सेवाकार्य यशस्वी होते, असे ते म्हणाले. खरी सेवा आपुलकीच्या भावनेतून निर्माण होते आणि याच आपलेपणामुळे समाजात चांगुलपणा टिकून आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. भागवत पुणे जिल्ह्यातील नांदोशी येथे 'लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या कोनशिला समारंभात बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, आनंद भोसले आणि संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. भागवत यांनी लतादीदी आणि आशाताई यांच्या संगीताचे सामर्थ्य अलौकिक असल्याचे सांगितले. शिक्षण आणि आरोग्य या जीवनावश्यक गरजा असून, प्रत्येकाला सुलभ व परवडणाऱ्या सेवा मिळायला हव्यात, असे ते म्हणाले. शासन व प्रशासन या दिशेने प्रयत्न करत असले तरी, 'हा देश माझा आहे' या भावनेने समाजानेही अशा कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मंगेशकर कुटुंबाच्या देशभक्तीचा गौरव केला. मंगेशकर कुटुंबीय केवळ संगीतासाठीच नव्हे, तर प्रखर देशभक्तीसाठीही ओळखले जाते, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांशी या कुटुंबाचे घनिष्ठ नाते असल्याचेही त्यांनी सांगितले. पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने नेहमीच सेवाभाव जपून हजारो रुग्णांना उपचार दिले आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले. आजच्या काळात 'अफोर्डेबल केअर'ची मोठी गरज असून, धर्मादाय संस्था आर्थिक संकटामुळे व्यावसायिकीकरणाकडे वळत असल्या तरी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केवळ सेवा हाच उद्देश ठेवला आहे. हाच वारसा आता 'लता-आशा' रुग्णालयाच्या रूपाने विस्तारणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसराकडे येणारा रस्ता प्रशस्त करणे आणि पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, धर्मादाय संस्थांना सवलती देण्याचाही प्रयत्न राहील, असे ते म्हणाले.
एसबीआयमार्फत जिल्हा बँकेला मागणीच्या तुलनेत अपुरा चलन पुरवठा
लातूर : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत लातूर जिल्ह्यासाठी चलन पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियुक्त स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत अपु-या चलन पुरवठ्यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय व सर्व १२२ शाखेत तात्पुरती चलन रोख रक्कमेची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेकडून आरबीआय/ एसबीआय यांना पाठपुरावा, समन्वय सुरू असून मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी रक्कम एसबीआय […] The post एसबीआयमार्फत जिल्हा बँकेला मागणीच्या तुलनेत अपुरा चलन पुरवठा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शारदा इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या निकालात उत्तुंग यश
लातूर : प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शारदा इंटरनॅशनल स्कूल, लातूर या शाळेने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा सुंदर संगम म्हणजेच हा उज्ज्वल निकाल होय. या परीक्षेत रणवीर ज्ञानेश्वर साळुंखे याने ९९.२० […] The post शारदा इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या निकालात उत्तुंग यश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:47 प्रतिसाद किटचे वाटप, तात्काळ मदतीसाठी सज्ज
अमरावती जिल्ह्यात आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा उद्देश जीवित व वित्तहानी टाळणे हा आहे. या प्रशिक्षणात शहर आणि ग्रामीण दोन्ही पोलीस दलातील शिपाई सहभागी झाले होते. यावेळी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ४७ 'आपत्ती प्रतिसाद किट'चे वाटप करण्यात आले. जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी होणारी हानी टाळण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी या शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. पोलीस कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात आपत्ती व्यवस्थापन किट हाताळणे, मोठे व मध्यम आकाराचे स्ट्रेचर, लाईफ जॅकेट, हॅडग्लोज, गमबूट, सेप्टी नेट, ३० मीटर रॅपलिंग रोप आणि किट स्टोरेज बॉक्सचा वापर करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच वैद्यकीय प्रथमोपचार (सीपीआर), आपत्तीमध्ये जखमींना उचलण्याच्या पद्धती आणि प्राथमिक उपचार यावरही भर देण्यात आला. पूर, आग, वीज कोसळणे, भूकंप आणि उष्माघातासारख्या विविध आपत्तींचा सामना कसा करावा, तसेच अशा परिस्थितीत घ्यावयाची काळजी व कार्यवाही याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी व्यक्त केला. या प्रशिक्षणात क्रिएटिव्ह न्यू टेक लिमिटेडचे प्रा. डॉ. विलास बैले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग पचौरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन भारसाकडे, विनय कढाणे आणि संतोष कविठकर यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. सुरेंद्र रामेकर यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य आणि सुमीत बांबल यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
बालविवाह करतो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम
लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दि. १६ एप्रिल रोजी सखी सावित्री समिती व विशाखा (अंतर्गत तक्रार) समितीमार्फत बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन व्हीएलसी हॉल मध्ये करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाल हक्क कार्यकर्ते व समाजसेवक सद्दाम शेख यांनी बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून तो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम करतो, […] The post बालविवाह करतो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्ह्यात मका आणि ज्वारीच्या सरकारी खरेदीसाठी १० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मागणी होती. या केंद्रांवर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आगामी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही केंद्रे मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, वरुड, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या १० तालुक्यांमध्ये सुरू होतील. संबंधित तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयातच ही खरेदी प्रक्रिया राबवली जाईल. राज्य पणन महासंघाचे संचालक नितीन हिवसे, काँग्रेसचे खासदार बळवंतराव वानखडे आणि चांदूर रेल्वेचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी या केंद्रांच्या स्थापनेसाठी आग्रही भूमिका घेतली होती. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच खरेदी सुरू केली जाईल. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची तयारी केली आहे. ठिकठिकाणचे खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि जिनींग-प्रेसींग युनिट्समार्फतही ही सूचना संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. दरम्यान, मका आणि ज्वारीच्या खरेदीपूर्वी शासनाने तूर आणि हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, बारदाण्याच्या (पोत्यांच्या) कमतरतेमुळे सध्या त्या ठिकाणची खरेदी थांबली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार वानखडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयावर धडक देऊन बारदाना तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. बारदाना न मिळाल्यास शेतकरी आपली तूर आणि हरभरा कार्यालयात आणतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंदडा ट्रेडर्समधील आग ३ तासांनंतर नियंत्रणात
लातूर : प्रतिनिधी शहरातील जुन्या एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-१/२ व १/३ मधील मुंदडा ट्रेडर्स या अॅल्युमिनियम कोटिंग व अॅल्युमिनियम शीट निर्मिती करण-या उद्योगामध्ये दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास कोटिंग प्रक्रियेसाठी वापरण्यात येणा-या बॉयलरचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दुपारी ३.३२ वाजता कॉल आल्यानंतर अग्निशमन […] The post मुंदडा ट्रेडर्समधील आग ३ तासांनंतर नियंत्रणात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वन्यजीव अपघात रोखण्यासाठी अमरावतीत अनोखा उपक्रम:अपघातप्रवण रस्त्यांवर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटली
अमरावती महानगरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर वन्यप्राण्यांची वर्दळ असते, ज्यामुळे अनेकदा अपघात घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाईल्डलाईफ रेस्क्यू फाऊंडेशन आणि बिगकास्ट कन्झर्वेशन ट्रस्ट इंडिया या संस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. अपघातप्रवण स्थळांवर रस्त्यांवर पट्टे आखून त्यावर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. अमरावतीमधून चांदूर रेल्वे, नागपूर, मोर्शी आणि यवतमाळकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वळणांवर रात्री उशिरा रोही, हरिण, काळवीट, नीलगाय, चितळ आणि बिबट यांसारख्या प्राण्यांची ये-जा असते. या वळणांवर चढ-उतार असल्याने वाहनांची गती वेळेवर नियंत्रित होत नाही, परिणामी यापूर्वी अनेक प्राण्यांचे अपघात झाले आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी हा चित्रकला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत अमरावतीतील रस्त्यांवर वन्यप्राणी-वाहन अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वाढती वाहतूक, रस्त्यांचे जाळे आणि वन्यजीवांच्या अधिवासांचे तुकडीकरण यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. या अपघातांमध्ये बिबट्या, चितळ, काळवीट आणि नीलगाय यांसारख्या अनुसूची-१ (शेड्युल वन) प्रजातींचा मृत्यू झाला आहे, जी जैवविविधतेसाठी चिंताजनक बाब आहे. हे अपघात प्रामुख्याने वन्यजीव कॉरिडॉरमध्ये घडले आहेत, जे वन्यप्राण्यांच्या स्थलांतरासाठी आणि हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणीय मार्ग आहेत. या भागांमधून वेगाने जाणारी वाहने प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण करतात आणि अपघातांची शक्यता वाढवतात. या समस्येवर उपाय म्हणून, दोन्ही संस्थांनी व्यवहारशास्त्र आणि दृश्य ग्रहणशक्तीचा वापर करून रस्त्यावर आकर्षक वन्यजीव चित्रकला रेखाटली आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे रस्ते सुरक्षिततेसोबतच पर्यावरण संवर्धनाबद्दलही जागरूकता वाढत आहे. या मोहिमेत कुणाल दातेराव, बबलू बोबडे, अमीन गुडे, जिया बुगदादी, सुमेध गवई, अमित मोटीवाला, मेहुल रायचंद, नरेश पाठाडे, आकाश हरले आणि प्रसाद वानखेडे या तरुणांनी सहभाग घेतला आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. शंकर बुंदेले यांना 'सर्वोत्कृष्ट ज्योतिषाचार्य' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील 'ज्योतिष स्टार संस्थान'ने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. हा पुरस्कार संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात देण्यात आला. विख्यात ज्योतिषाचार्य अनिल वत्स यांच्या हस्ते प्रोफेसर बुंदेले यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या अधिवेशनाला जगभरातील अनेक ज्योतिषाचार्य उपस्थित होते. या अधिवेशनात प्रोफेसर बुंदेले यांनी 'जन्मकुंडली के विश्लेषण में नवमांश एवं अन्य वर्ग फलित कुंडलियों की भूमिका' या विषयावर आपले संशोधन सादर केले. ज्योतिष विज्ञान हा एक स्वतंत्र विषय असून, मानवी जीवनाचे विविध पैलू समजून घेतल्यानंतर फलज्योतिष ठरविण्यात येते, असे त्यांनी नमूद केले. प्रमुख अतिथी अनिल वत्स यांनी प्रोफेसर बुंदेले यांच्या शोधनिबंधावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, बुंदेले यांनी मांडलेले ज्योतिषीय सूत्र विज्ञाननिष्ठ आहे. त्यांच्या या परिश्रमाचे वत्स यांनी कौतुक केले. या यशाबद्दल प्रेमचंद बिजोरे आणि रामदास नोटावाले यांच्यासह अनेकांनी प्रोफेसर डॉ. शंकर बुंदेले यांचे अभिनंदन केले आहे.
रावजी तांडा येथील नागरिकांचे उपोषण मागे
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील रावजी तांडा येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे अखेर येथील तांडावाशीयांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. हे उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर तांडावासीयांनी उपोषण मागे घेतले. रस्त्यासाठी जळकोट तहसीलसमोर दि. १५ एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुस-या दिवशी जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी उपोषणकर्त्यांची […] The post रावजी तांडा येथील नागरिकांचे उपोषण मागे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शाळेजवळील डी. पी. काढण्याची रेणापूर शहर काँग्रेसची मागणी
रेणापूर : प्रतिनिधी येथील शाळेच्या व मेन रोडच्या लगत असलेला डी.पी तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रेणापूर शहर काँग्रेसच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. येथील श्रीराम विद्यालय समोरील मेन रोडलगत उघडा धोकादायक डी.पी असल्याने शाळेतील लहान मुले, मुली तसेच नागरिकांना डी.पीचा धोका होत असल्याचे निर्दशनास आले आहे. अनेकदा येथील डी.पीस शॉर्टसर्किट होत […] The post शाळेजवळील डी. पी. काढण्याची रेणापूर शहर काँग्रेसची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ग्रामीण भागातून अमरावती जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणपोईचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या या पाणपोईचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी कर्मचारी एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि अशा उपक्रमांमुळे संघटनेची ताकद व बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून 'पानेरी' नावाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा देणारा नसून, समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले. त्यांच्या मते, 'पानेरी' हा उपक्रम माणुसकीची परंपरा जपणारा आणि समाजसेवेचा एक आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे, २०१३ पासून सुरू असलेला हा 'पानेरी' उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जात असून, तो आता एक प्रेरणादायी परंपरा बनला आहे. या माध्यमातून कर्मचारी वर्ग आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि शिवजयंतीलाही दरवर्षी कर्मचारी संघटनेतर्फे अमरावतीकरांना फराळाचे वितरण केले जाते. या उपक्रमाच्या यशासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले. यावेळी निलेश तालन, ज्ञानेश्वर घाटे, श्रीकांत मेश्राम, विजय कोठाळे, मंगेश मानकर, नितीन माहोरे, संजय मुंद्रे, अर्पणा आत्राम, जीवन नारे, परमेश्वर राठोड, सतीश पवार, राहुल रायबोले, स्वप्निल कुरेकर, आदित्य तायडे, प्रमिलाताई उंबरकर, दिनेश खंडारे, विजय काळे, निशांत तायडे, अशोक धोटे, उत्तम डोंगरे, गजानन इंगळे, चांदुरे आदींसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
औसा तांड्यावरील पोल्ट्री फार्ममुळे आरोग्यास धोका
औसा : प्रतिनिधी औसा ते भादा रस्त्यावर असलेल्या औसा तांड्याजवळ विनापरवाना व कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र न घेता उभारण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने ही अनधिकृत पोल्ट्री तातडीने बंद करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे केली आहे. औसा तांड्याजवळ पाण्याच्या टाकीजवळ एका सेवानिवृत्त शासकीय अधिका-याने दोन ते […] The post औसा तांड्यावरील पोल्ट्री फार्ममुळे आरोग्यास धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशहितासाठी संशोधन करा:कुलगुरू डॉ. बारहाते यांचे संशोधन मार्गदर्शक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून संशोधन करावे आणि त्याची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘संशोधन मार्गदर्शक अभिमुखता’ कार्यशाळेत ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. विद्यापीठाचा गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या विभागीय अध्यक्ष डॉ. मीनल भोंडे यांच्या हस्ते झाले. सिम्बायोसिस सेंटर फॉर मेडिकल इमेजिंग, पुणे येथील डॉ. भूषण बोरोटीकर हे बीजभाषक म्हणून उपस्थित होते. डॉ. भूषण बोरोटीकर यांनी संशोधनातील गुणवत्ता, प्रामाणिकता, चौर्यकर्म (प्लॅजिअरिझम) नियंत्रण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन निकष यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. मीनल भोंडे यांनी संशोधन संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शकांची आणि संशोधकांची जबाबदारी अधोरेखित केली. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता व पारदर्शकता अधिक प्रभावी व्हावी आणि संशोधन व्यावसायभिमुख व समाजाभिमुख व्हावे, यासाठी सर्व मार्गदर्शकांनी जातीने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनानंतरच्या दुपारच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख होत्या. संशोधक आणि मार्गदर्शक नियमावलींचा अभ्यास करून संशोधन आणि कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी आय.क्यू.ए.सी.चे संचालक डॉ. संदीप वाघुळे, विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य डॉ. हेमंत चांडक, अ.भा. शैक्षिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश मुंदे यांचीही उपस्थिती होती. पॅनेल चर्चेदरम्यान संशोधन गुणवत्ता, मार्गदर्शक-विद्यार्थी संबंध, प्रकाशन प्रक्रिया व संशोधनातील नैतिकता या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. समारोप सत्राला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि उपकुलसचिव डॉ. मीनल मालधुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. मंगेश अडगोकार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. संदीप वाघुळे यांनी आय.क्यू.ए.सी.ची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वि. रा. मांडवकर यांनी केले, तर डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी आभार मानले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या सर्व अध्यक्ष, महामंत्री, महिला प्रमुख, सहप्रमुख तसेच अभ्यास मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेला विविध विद्याशाखांमधील संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक आणि पीएच.डी. संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार, आमदार वाढतील तर पेन्शनचा भारही वाढेल
मुंबई : सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठया प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. पेंशन योजना कायमची बंद करायला हवी, अशी मागणी […] The post खासदार, आमदार वाढतील तर पेन्शनचा भारही वाढेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदवली मतदारसंघात EVM मध्ये घोटळा झाल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन तपासणीचे आदेश दिले आहेत. दिनांक १६ व १७ एप्रिलला यातील काही मशीनची तपासणी बोरीवली येथे सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नसीम खान प्रसार माध्यमांशी बोलत होते. नसीम खान पुढे म्हणाले की, न्यायालयाने डेटा सहित तपासणी करण्याचा आदेश दिला होता, तो पाळण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत आहे. निवडणूक आयोगाची SOP सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांना हरताळ फासणारी आहे. CU, BU, VVPAT फक्त जोडणी करून दाखवली. त्याला आमचा विरोध आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडल्या पाहिजेत व त्याची सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाचा गैरकारभार, घोटाळे यांचा पर्दाफाश केलेला आहे पण आयोग मात्र विरोधांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. हा फक्त चांदिवली विधानसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर हा लोकशाही आणि निवडणुकांची निष्पक्षता व पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असेही नसीम खान म्हणाले.
पुण्यातील विश्रांतवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात नक्षलवादी कमांडर हिडीमाच्या समर्थनार्थ केलेल्या नृत्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) स्वारगेट चौकात आंदोलन केले. यावेळी नक्षलवादी कमांडर हिडीमाचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अभाविपने वसतिगृहातील विद्यार्थी, गृहपाल आणि अधिकारी यांच्यावर देशविरोधी कारवाई आणि त्याला पाठबळ दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणीही अभाविपच्या वतीने करण्यात आली. या आंदोलनात अभाविपचे पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हाणकर, सहमंत्री आलोक पवार आणि अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते. ही घटना पुण्यातील विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहात घडली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात नक्षलवादी कमांडर हिडीमाच्या गाण्यावर नृत्य केल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की त्यांनी 'हिडीमा' नव्हे, तर 'पर्व' असा उल्लेख केला होता. मात्र, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. माडवी हिडीमा हा छत्तीसगडमधील एक कुख्यात नक्षलवादी कमांडर होता. त्याच्यावर सुरक्षा दलांच्या जवानांच्या हत्येचे अनेक गंभीर आरोप होते. वयाच्या १६ व्या वर्षी तो नक्षलवाद्यांसोबत गेला आणि नंतर नक्षलवाद्यांचा सर्वात क्रूर कमांडर बनला. त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे बक्षीस होते आणि तो एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील एका चकमकीत तो मारला गेला होता. अशाप्रकारे क्रूर हीडमाचे पुन्हा एकदा गाण्याच्या माध्यमातून उद्दतीकरण होत असल्याचा आरोप अभाविप ने केला आहे. त्याच्या निषेधार्थ त्यांनी आंदोलन करून याबाबत इशारा देखील दिला.
पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ३२,६४६ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही नोंदणी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या संकेतस्थळावर केली आहे. जिल्ह्यात एकूण ६,०९४ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत, ज्यात ग्रामीण भागात ४,३९५ आणि नागरी भागात १,६९९ केंद्रे आहेत. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांमध्ये पुणे महानगरपालिकेंतर्गत १०,०३४, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ३,७१०, आंबेगाव तालुक्यात ९५२, बारामतीमध्ये १,७५५, भोरमध्ये ५२३, दौंडमध्ये १,५१४, हवेलीमध्ये २,०५५, इंदापूरमध्ये १,४९४, जुन्नरमध्ये १,६६१, खेडमध्ये २,०६४, मावळमध्ये १,७१२, मुळशीमध्ये ७८८, पुरंदरमध्ये ८८४, शिरूरमध्ये १,९२६ आणि वेल्हे तालुक्यात १२४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. शहरी भागातून १,४५० नवीन लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना गरोदरपणात चांगला आहार व आरोग्य मिळावे, तसेच त्यांनी या काळात मजुरी करू नये, हा आहे. या योजनेमुळे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासही मदत होते. सन २०१७ पासून ही योजना आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत होती. आता महाराष्ट्रात जून २०२५ पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही योजना कार्यान्वित केली जात आहे. आनंद खंडागळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) यांनी सांगितले की, नवीन लाभार्थ्यांच्या नोंदीचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. उर्वरित पात्र महिलांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश साध्य करण्यासाठी विभागाकडून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे.
राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ४ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महसूल, सिडको आणि जीएसटी विभागातील प्रशासकीय समीकरणे बदलली आहेत. सलग दुसऱ्या दिवशी बदल्या करण्यात आल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. १. जी. श्रीकांत (IAS: २००९) : विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर जी श्रीकांत हे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त होते. 15 दिवसांपूर्वीच त्यांची नवी मुंबई येथे 'जल जीवन मिशन'चे अभियान संचालक म्हणून बदली झाली होती. मात्र, जी. श्रीकांत पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली होऊन येणार असून, यावेळी त्यांच्याकडे मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जी श्रीकांत हे गेल्या पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आधी जीएसटी आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त, प्रशासक म्हणून कार्य केले आहे. त्यापूर्वी ते मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत. २. जितेंद्र पापळकर (IAS: २०१०) : सह आयुक्त, जीएसटी, मुंबई छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र पापळकर यांची बदली आता सह आयुक्त, जीएसटी, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून संभाजीनगर विभागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. ३. गंगाथरन डी. (IAS: २०१३) : अभियान संचालक, जल जीवन मिशन गंगाथरन डी. यांची नियुक्ती अभियान संचालक, जल जीवन मिशन, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आता गंगाथरन यांच्याकडे असेल. ४. जगदीश मिनियार (IAS: २०१५) : आयुक्त, महिला व बालविकास, पुणे छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोचे (नवी शहरे) मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत असलेले जगदीश मिनियार यांची आता पुणे येथे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
आकांक्षित जिल्हा व तालुका विकास कार्यक्रमांतर्गत सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कामांची गुणवत्ता वाढवावी व लक्षणीय सुधारणा साधावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी तारीख 16 दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिगंबर माडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले की, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विविध परिमाणांची नियमित तपासणी करून प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. जिल्हा किंवा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्यास नीती आयोगाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. हा निधी विविध विकास कामांसाठी उपयोगात आणता येणार असून, त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. उत्तम कामगिरीच्या आधारे डेल्टा रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. गृहविकास (हाऊसिंग) क्षेत्रात सध्या 16.52 टक्के प्रगती असून, त्यात वाढ करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन, आरोग्य तपासणी, घरकुल या घटकांमध्येही सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कारही दिले जातात, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विभागांनी स्पर्धात्मक भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य व पोषण विभागाला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी एन-क्वॉस (NQAS) सर्टिफिकेशन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे सांगितले. पूरक पोषण आहार 100 टक्के सुनिश्चित करणे, तसेच अतितिव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील त्रुटी दूर करून वितरण व्यवस्थेत सुधारणा करावी, असे निर्देश देण्यात आले. फेस रिकग्निशन, भारत नेट, प्रधानमंत्री आवास योजना व प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान यामध्ये प्रगती साधण्यावर भर देण्यात आला. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची ओळखपत्रे, स्थलांतर, टीसी व यु-डायस प्रणालीतील नोंदी अद्ययावत ठेवाव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व बदलांची काटेकोर नोंद करावी, असेही सांगितले. पशुसंवर्धन विभागात औषध साठ्याचे ऑडिट करून वितरणाची अद्ययावत माहिती ठेवावी. मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य बीज व विक्रीची माहिती सादर करावी. ग्रामविकास विभागाने रस्ते, सभागृह व सामाजिक सुविधांतील वाढीची आकडेवारी द्यावी. सिंचन व जलसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात किती वाढ झाली याचा अहवाल सादर करावा. केवळ सीएनबी बांधकाम न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला का, याची खात्री करावी. शाळा व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची माहितीही सादर करावी. क्रीडा विभागाने क्रीडांगणे व व्यायामशाळांच्या विकासाची माहिती द्यावी. ग्रामपंचायतीमार्फत कामे न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच कामे करून घ्यावीत, असेही स्पष्ट करण्यात आले. आरोग्य व स्वच्छतेवर लक्ष आरोग्य विभागात दैनंदिन व मासिक तपासण्या नियमित कराव्यात. औषधांची स्वतः तपासणी करणे, स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्थेवर लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कामापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रे घेणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सभागृहात अक्षरशः ठिणगी पडली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले, मात्र दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतरही हा पेच सुटू शकला नाही. सभागृहात महापौरांच्या सन्मानावरून चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटले. नवनिर्वाचित सदस्यांनी महापौरांचा मान राखला पाहिजे, असा मुद्दा सभागृह नेते गणेश खणकर यांनी उपस्थित केला. याला प्रत्युत्तर देताना आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतलेले नाहीत, असे विधान किशोरी पेडणेकर यांनी केले. त्यांचा रोख हा शिवसेना शिंदे गटाकडे होता. किशोरी पेडणेकर यांच्या या विधानातून बाळासाहेबांचा अवमान झाल्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी काढला आणि संपूर्ण सभागृह घोषणाबाजीने दणाणून गेले. किशोरी पेडणेकर माफी मागा, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी दिल्या. १० मिनिटांची तहकुबी आणि निलंबनाची मागणी वातावरण तणावपूर्ण झाल्याने महापौर रितू तावडे यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र, पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही शांतता प्रस्थापित झाली नाही. उलट, सभागृह नेते गणेश खणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, किशोरी पेडणेकर यांनी थेट बाळासाहेबांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या सदस्याला सभागृहात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी खणकर यांनी लावून धरली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आवाजाची धार वाढली. निधी वाटपावरून विरोधकांचा संताप या गदारोळात काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मूळ मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात विरोधकांच्या प्रभागांना निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांना बोलू दिले जात नाही आणि निधीही दिला जात नाही, असे म्हणत आझमी यांनी सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध केला. मात्र, त्यांच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याने विरोधकही आक्रमक झाले. पेडणेकरांचे स्पष्टीकरण आणि महापौरांचा इशारा वाढता विरोध पाहून किशोरी पेडणेकर यांनी आपले स्पष्टीकरण मांडले. त्या म्हणाल्या, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी बाळासाहेबांचे विचार किंवा संस्कार विकत घेतले नाहीत, असे म्हटले होते. सत्ताधारी मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी हा गदारोळ करत आहेत. असे सांगून त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, महापौर रितू तावडे या स्पष्टीकरणाने समाधानी झाल्या नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नसून ते सर्वांचे आहेत. त्यांच्या संदर्भात चुकीचे शब्द वापरणे खपवून घेतले जाणार नाही. जोपर्यंत पेडणेकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार नाही, असा कडक इशारा महापौरांनी दिला आणि सभागृह पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले.
वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचलेला असतानाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देत साधेपणा, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या या दौऱ्यामुळे वर्धा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेवाग्राम आश्रमात आगमन होताच राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर आश्रमात जतन करून ठेवलेल्या गांधीजींच्या ऐतिहासिक वस्तूंची त्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी गांधी विचारांचा जवळून अनुभव घेतला. भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी स्वतः सूत काताई करत गांधीजींच्या स्वावलंबनाच्या तत्त्वांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. साधेपणातून मोठा संदेश देणारी ही कृती विशेष ठरली. उष्णतेचा तीव्र कडाका असतानाही राष्ट्रपती मुर्मू यांनी आश्रम परिसरात बेलाच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले. ४५ अंश तापमानात केलेल्या या वृक्षारोपणातून त्यांनी निसर्गसंवर्धनाचा ठोस संदेश दिला. नागरिकांनी वृक्षलागवडीकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही या कृतीतून अधोरेखित झाले. या प्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे सेवाग्राम आश्रम पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला असून, गांधी विचार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देशभर पोहोचवणारा हा दौरा ठरला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ६१ बालविवाह रोखले:जिल्हा महिला व बालविकास विभागाने वर्षभरात केली कारवाई
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास विभागाने गेल्या वर्षभरात ६१ बालविवाह रोखले आहेत. कायद्यानुसार, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह ठरतो आणि तो करण्यास सक्त मनाई आहे. बालविवाह केवळ कायद्यानेच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक, बालमानसशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक मानले जातात. हे विवाह मंगल कार्य नसून, मुलामुलींच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे असे विवाह रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. जागरूक नागरिकांचा सहभाग आणि यंत्रणेचा तात्काळ प्रतिसाद यामुळे हे बालविवाह रोखणे शक्य झाले. बालविवाह प्रतिबंध ही एक चळवळ होण्यासाठी सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे यांनी केले आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ६१ बालविवाह रोखण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये २५, पैठणमध्ये ८, गंगापूरमध्ये ८, वैजापूरमध्ये ३, कन्नडमध्ये २, खुलताबादमध्ये २, फुलंब्रीमध्ये ४, सोयगावमध्ये २ आणि सिल्लोडमध्ये ७ बालविवाह रोखले गेले. रोखलेल्या ६१ प्रकरणांपैकी ५ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले, तर २ पीडित बालिकांना बालगृहांमध्ये संरक्षण पुरवण्यात आले. इतर प्रकरणांमध्ये बालविवाह रोखून पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. नागरिकही बालविवाह निर्मूलनात योगदान देऊ शकतात. आपल्या परिचयात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ नजीकचे पोलीस ठाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाइल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाते. समाजातील सजग नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाईन १०९८ वर बालविवाहाची माहिती दिल्यास, ती तक्रार संबंधित जिल्ह्यातील चाइल्ड हेल्पलाईनला जोडली जाते. ही सेवा पूर्णपणे निःशुल्क आहे. या हेल्पलाईनवरून समन्वय साधून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, संबंधित क्षेत्राचे पोलीस अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयातून एक पथक तयार केले जाते. हे पथक घटनास्थळी भेट देऊन पोलिसांच्या मदतीने बालविवाहास प्रतिबंध करते. आवश्यकता भासल्यास पीडित बालिकेस आश्रय दिला जातो आणि तिचे व तिच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. बालिकेचे पुनर्वसन करण्याचीही उपाययोजना केली जाते.
इंधनाअभावी मोबाईल टॉवर बंद होणार?
नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इंधन संकटाचे ढग संपूर्ण जगावर दाटले आहेत. डिझेलचा पुरवठा कमी झाला असून याचा मोठा फटका टेलिकॉम कंपन्यांना बसत आहे. केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेताना एक महत्त्वपूर्ण समस्या समोर आली आहे. टेलिकॉम क्षेत्राला अत्यावश्यक सेवा मानले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र टॉवरसाठी लागणारे डिझेल मिळवताना या कंपन्यांना प्राधान्य […] The post इंधनाअभावी मोबाईल टॉवर बंद होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक TCS मधले हे केवळ धर्मांतर नाही, तर राष्ट्राविरुद्ध रचलेला एक सुनियोजित डाव आहे, असा गंभीर आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण देशाची सद्सद्वविवेकबुद्धी हादरल्याचा उल्लेखही या याचिकेत करण्यात आलाय. नाशिक TCS प्रकरणाने देशभर हलकल्लोळ माजवला आहे. हे सक्तीचे किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर ही केवळ धार्मिक बाब नसून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे, असे सांगणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. धर्मांतराशी संबंधित एक स्वयं-प्रेरित (suo motu) प्रकरण यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आता नाशिक टीसीएस प्रकरणासंदर्भात त्याच प्रकरणात एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल करणाऱ्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, नाशिकमधील संघटित धर्मांतराचे हे प्रकरण संपूर्ण राष्ट्राच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का देणारे आहे. याचिकेत नेमके काय? सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अनेक महत्त्वपूर्ण दावे आणि मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, सक्तीचे किंवा फसवणुकीचे धर्मांतर देशासाठी एक गंभीर धोका आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा हे एका मोठ्या, संघटित आणि जबरदस्तीच्या मोहिमेचा भाग म्हणून घडते, तेव्हा त्याला दहशतवादी कृत्य मानले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे, असे म्हटले आहे की सक्तीचे किंवा फसवणुकीचे धर्मांतर ही एक वेगळी धार्मिक घटना नसून एक सुनियोजित कट आहे. परकीय शक्तींकडून निधी याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की या कटासाठी अनेकदा परकीय शक्तींकडून निधी पुरवला जातो. याचा उद्देश देशातील धार्मिक लोकसंख्येचे संतुलन बदलून भारताची एकता, अखंडता आणि सुरक्षेला धोका निर्माण करणे हा आहे. या याचिकेत असेही म्हटले आहे की, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी, हे स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकतेच्या अटींच्या अधीन आहे. याचा अर्थ असा की, या स्वातंत्र्याच्या नावाखाली सक्तीने किंवा फसवणुकीने धर्मांतर केले जाऊ शकत नाही. न्यायालयाकडे दोन मागण्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाकडे दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. पहिली मागणी अशी आहे की, केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांना फसवणूक किंवा बळजबरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात यावेत. दुसरी मागणी अशी आहे की, केंद्र आणि राज्य सरकारांना धर्मांतराच्या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र विशेष न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश देण्यात यावेत. आता यावर न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.
केंद्र सरकारने महिला आरक्षणासाठी आणलेल्या ऐतिहासिक 'नारी शक्ती वंदन' विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणादरम्यान एका सत्ताधारी खासदाराने आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावर संतापलेल्या अरविंद सावंतांनी, मी तोंड उघडले तर तडीपार आणि गोध्रा हत्याकांडही समोर येईल, असा रोखठोक इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. केंद्र सरकार नारी शक्ती वंदन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आले आहे. विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकामागील सरकारची भूमिका स्पष्ट केली. हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आम्हाला याचे कोणतेही श्रेय घ्यायचे नाही, असे मोदींनी यावेळी नमूद केले. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. आदित्य ठाकरेंच्या नावावरून ठिणगी खासदार अरविंद सावंत हे विधेयकावर आपले मत मांडताना सरकारचा हेतू स्वच्छ नसल्याची टीका करत होते. याच वेळी सत्ताधारी बाकावरून एका खासदाराने मध्येच आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आक्षेप घेतला. जे या सभागृहाचे सदस्य नाहीत, अशा व्यक्तीचे नाव अशा पद्धतीने घेणे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी सुनावले. मी गोध्रा हत्याकांडाचे नाव घेऊ का? सत्ताधाऱ्यांच्या या हस्तक्षेपामुळे अरविंद सावंत प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधारी बाकांकडे रोख करत सुनावले. ते म्हणाले, तुम्ही जर मर्यादा ओलांडणार असाल, तर लक्षात ठेवा. मी अशा लोकांची नावे घेतली आहेत जे तुरुंगात गेले होते. आता मी 'तडीपार' कोण होते त्यांचे नाव घेऊ का? महिलांवरील अत्याचाराची पूर्ण यादीच माझ्याकडे आहे. मी जर बोलायला लागलो तर गोध्रा हत्याकांड आणि 'एपस्टीन फाईल्स'चे नावही समोर येईल, हे विसरू नका, असा इशारा अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. नावे कामकाजातून वगळली सभागृहात दोन्ही बाजूंनी आरडाओरड वाढल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर तालिका अध्यक्षांनी मध्यस्थी करत परिस्थिती सावरली. आदित्य ठाकरे यांचे नाव संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिल्यानंतर हा गदारोळ शांत झाला आणि अरविंद सावंत यांनी आपले भाषण पूर्ण केले.
‘मुंदडा इंडस्ट्रीज’ला भीषण आग; ३ होरपळले
लातूर : जुनी एमआयडीसी परिसरातील ‘मुंदडा इंडस्ट्रीज’(काच कारखाना)ला गुरूवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३:१५ च्या दरम्यान भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले आहे. तर या आगीत ३ कर्मचारी होरपळले असून त्यांना प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण […] The post ‘मुंदडा इंडस्ट्रीज’ला भीषण आग; ३ होरपळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात उन्हाचा तडाखा वाढतच चालला असून, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र घामाघूम झाला आहे. विदर्भातील अकोला शहराने तर उष्णतेचे जागतिक विक्रम मोडीत काढले असून, ते जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अकोला आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने 'हाय अलर्ट' जारी केला असून उष्माघाताचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. अकोल्याचा पारा ४४.२ अंशांवर गेल्याने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. नागरिकांना उन्हापासून वाचवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील शासकीय व ग्रामीण रुग्णालयांत एकूण १३७ उष्माघात खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात नागरिकांना सतर्क करण्यासाठी 'दवंडी' देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात ओआरएस (ORS) आणि आवश्यक औषधांचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपुरात उष्माघातासाठी विशेष 'कोल्ड वॉर्ड' नागपुरातही तापमानाचा पारा ४४ अंशांच्या घरात असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (GMC) अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी माहिती दिली की, उष्माघाताच्या रुग्णांच्या शरीराचे तापमान तातडीने कमी करण्यासाठी विशेष 'कोल्ड वॉर्ड' तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये एसी, कुलर आणि कोल्ड बाथची (थंड पाण्याचे टब) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भातील इतर शहरांचे तापमान: मराठवाड्यात सलग पाचव्या दिवशी ४० पार मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत सलग पाच दिवसांपासून पारा ४१ अंशांच्या वर आहे. परभणीमध्ये आज ४१.०४ अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तर हिंगोलीतील ४१ अंश तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. रस्त्यावर लोक डोक्याला रुमाल आणि गमछा बांधूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. पुणेकरांना १७ एप्रिलला उष्णतेच्या लाटेचा इशारा पुण्यातही तापमानाचा आलेख चढता असून १७ एप्रिल रोजी शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यातील पारा ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, १८ आणि १९ एप्रिल रोजी पावसाची शक्यता असल्याने पुणेकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळू शकतो. प्रशासनाकडून नागरिकांसाठी 'गाईडलाईन्स' वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तहान नसली तरीही भरपूर पाणी प्या आणि ओआरएस किंवा लिंबू पाण्याचा वापर करा. उन्हात बाहेर पडताना सुती कपडे, टोपी आणि गॉगलचा वापर करा. यासोबतच चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळ जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशभर चर्चेत राहिलेल्या नाशिक TCS कांडात आता आणखी एक बाजू समोर आलीय. या प्रकरणातला संशयित आरोपी शाहरुखची पत्नी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तिने सर्व आरोप फेटाळले. धर्मांतरासारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. सोबतच शाहरुख सहकाऱ्यांशी फक्त थट्टा-मस्करी करायचा. त्याला केलेली अटक, पुरावे या साऱ्यांवरच तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून, एचआर मॅनेजर निदा खान अद्यापही फरार असल्याचे समजते. नाशिकमधील TCS BPO कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण झाले. धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर तक्रारी पोलिसांकडे आल्या. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या 7 अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. 26 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान 9 महिलांनी एफआयआर (FIR) दाखल केले. त्यांनी कंपनीच्या मुस्लिम टीम लीडर्स आणि एचआर (HR) मॅनेजरवर लैंगिक छळवणुकीसह जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासारखे गंभीर आरोप केलेत. त्यामुळे थेट दिल्लीपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटलेत. ‘धर्मांतराचे आरोप खोटे’ संशयित आरोपी शाहरुखच्या पत्नीने 'आजतक'शी बोलताना सर्व आरोप फेटाळलेत. शाहरुखच्या पत्नी म्हणाली की, सर्वात आधी एफआयआरमध्ये नक्की काय लिहिले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. एफआयआरमध्ये जे म्हटले आहे, त्यात कुठेही धर्मांतर किंवा कोणतेही रॅकेट चालवल्याचा आरोप नाही. त्यात फक्त इतकेच म्हटले आहे की, ते थट्टा-मस्करी करायचे किंवा गप्पा मारायचे. हे प्रकरण धर्मांतर रॅकेट म्हणून ज्या प्रकारे मांडले जात आहे, ते चुकीचे आणि खोटे असल्याचे तिने सांगितले. शाहरुखने महिला कर्मचाऱ्यांच्या पेहरावावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, कॉर्पोरेट क्षेत्रात जर कोणी कोणाच्या कपड्यांवर काही बोलले, तर ते सहसा कौतुक (कॉम्प्लिमेंट) असते. याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाला जज करत आहे किंवा त्रास देत आहे. या आरोपांना विनाकारण मोठे करून दाखवले जात असल्याचे तिने स्पष्ट केले. 'त्या' मुलींना कधी पाहिलेही नाही… काही तक्रारींमध्ये असा दावा करण्यात आला होता की, महिला कर्मचाऱ्यांना रिसॉर्टवर नेण्याचे प्रस्ताव दिले गेले. यावर शाहरुखची पत्नी म्हणाली की, हे सर्व पूर्णपणे खोटे आहे. ज्या मुलींची नावे समोर आली आहेत, त्यांना आम्ही कधी पाहिले देखील नाही. माझे पती स्वतः टीम लीडर आहेत आणि त्यांच्या हाताखाली 15-20 लोक काम करतात. जर कोणी चूक केली तर ते ओरडतात आणि चांगले काम केले तर कौतुकही करतात. पण या आरोपांना कोणताही आधार नाही. तिने पुढे असेही सांगितले की, दुसरा एक आरोपी दानिश आणि एका महिला कर्मचारी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, ज्याचा आता या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. आम्हाला माहिती आहे त्यानुसार, त्यांच्यात चार वर्षांपासून नाते होते आणि ही बाब कॅम्पसमध्ये सर्वांना ठाऊक होती. जर दोन सज्ञान व्यक्ती नात्यात असतील, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे ती म्हणाली. ‘इतक्या वर्षात एकही तक्रार नाही’ शाहरुखच्या पत्नीने त्याच्या कामाच्या रेकॉर्डचाही उल्लेख केला. ती म्हणाली की, तो अनेक वर्षांपासून तिथे काम करत आहे. जर असा काही प्रकार असता तर आधीच तक्रारी आल्या असत्या. पण आजवर त्याच्याविरुद्ध एकही तक्रार आलेली नाही. नुकतीच त्याने कंपनीची एक मोठी परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्याला प्रमोशन देखील मिळाले होते. एफआयआरमध्ये काही ठिकाणी हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. यावर पत्नीने सांगितले की, आम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हते. जेव्हा या गोष्टी समोर आल्या तेव्हा आम्हाला समजले. मी स्वतः पतीला विचारले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी कधीही असे विधान केलेले नाही. टीसीएस सारख्या मोठ्या आणि व्यावसायिक कंपनीत काम करणारी व्यक्ती अशा गोष्टी कशी करू शकते, हे अनाकलनीय आहे. अटकेआधी नोटीसही नाही शाहरुखच्या अटकेबाबतही त्याच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले. तिने सांगितले की, 1 एप्रिलच्या रात्री पोलीस साध्या गणवेशात आमच्या घरी आले आणि स्टेटमेंटवर सही करण्यासाठी शाहरुखला सोबत यावे लागेल असे सांगितले. आम्ही पूर्ण सहकार्य करत होतो, त्यामुळे तो त्यांच्यासोबत गेला. पण नंतर समजले की त्याला अटक करण्यात आली आहे. आम्हाला आधी कोणतीही नोटीस दिली गेली नव्हती. कार्यालयातील इतर लोक तिथे उपस्थित असताना केवळ काही ठराविक लोकांनाच का अटक करण्यात आली, असा आरोपही तिने केला. महिला कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या आरोपावर ती म्हणाली, हे आरोपही धादांत खोटे आहेत. जर असे काही घडले असते तर त्याचे पुरावे असायला हवे होते. इतका मोठा तपास सुरू आहे, पण अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. ‘चार वर्षे गप्प का राहिल्या?’ तिने सवाल केला की, जर कोणासोबत इतके काही घडत होते, तर त्यांनी आधी तक्रार का केली नाही? कंपनीत मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांना का सांगितले नाही? थेट इतके मोठे आरोप करणे आणि ते मीडियात अशा प्रकारे प्रसिद्ध करणे योग्य नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे कुटुंब तपासात पूर्ण सहकार्य करत असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे तिने शेवटी सांगितले.
सिग्नल यंत्रणेत बिघाड करून शिर्डी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले
परभणी : मानवत तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवार, दि.१६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड करून लुटण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी रेल्वे थांबताच जनरल डब्यासह आरक्षित डब्यातील दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समजते. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मानवतरोड रेल्वे स्थानकावर […] The post सिग्नल यंत्रणेत बिघाड करून शिर्डी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘डेटिंग’च्या जाळ्या अडकल्या ५०० महिला
नवी दिल्ली : चित्रपट असो वा नाटक… वेगवेगळ्या ओळखी सांगून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणा-या आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या ठगांच्या गोष्टी तुम्ही आजवर पडद्यावर पाहिल्या असतील. अशीच फिल्मी स्टाईल फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका ठगाने तब्बल ५०० हून अधिक महिलांची सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केली असून दिल्ली सायबर पोलिसांनी त्याला अटक केली […] The post ‘डेटिंग’च्या जाळ्या अडकल्या ५०० महिला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोहोळचा पारा ४१° वर; रखरखत्या उन्हामुळे तहसील कार्यालय आणि मुख्य रस्ते ओस!
मोहोळ (प्रतिनिधी): एप्रिल महिन्याच्या मध्यावरच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, मोहोळ तालुक्यातील तापमानाने आज ४१C सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. प्रखर उष्णतेच्या झळांमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, एरव्ही गजबजलेल्या तहसील कार्यालयासह शहराच्या मुख्य रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मोहोळमध्ये आज कमाल तापमान ४१C तर किमान तापमान २७C नोंदवले गेले. त्यामुळे विविध शासकीय कामांवर […] The post मोहोळचा पारा ४१ वर; रखरखत्या उन्हामुळे तहसील कार्यालय आणि मुख्य रस्ते ओस! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्यात येणाऱ्या नियोजन भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज वांद्रे पूर्व येथे उत्साहात पार पडला. मुंबई उपनगरचे पालकमंत्री तसेच माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधिवत भूमिपूजन व कुदळ मारून या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ केला. या भूमिपूजन सोहळ्यास आमदार संजय उपाध्याय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जागेची पूजा अर्चना केली. बांद्रा (पूर्व) येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात “नियोजन भवन” उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र नियोजन भवन उभारण्याच्या सूचनेनुसार हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सुमारे ७४१.०४ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी तांत्रिक मान्यताही प्रदान करण्यात आली आहे. एकूण १०३१.२५ चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीचे काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तळमजला आणि एक मजला असलेली मुख्य इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये ३०० आसनक्षमतेचे भव्य सभागृह, दोन स्वतंत्र ग्रीन रूम, किचन व पॅन्ट्री तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन समितीचे कार्यालय आणि लहान सभागृहाचीही व्यवस्था असेल. दुसऱ्या टप्प्यात अंतर्गत सजावट, सभागृहाचे ध्वनीरोधक काम, फॉल्स सिलिंग, दरवाजे तसेच आवश्यक फर्निचर आणि इतर पूरक सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री ॲड.शेलार यांनी सर्व संबंधितांना यावेळी दिल्या.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला तणाव जागतिक स्तरावर काहीसा निवळला असला, तरी त्याचे पडसाद भारतातील स्वयंपाकाच्या गॅसवर (LPG) अद्यापही उमटत आहेत. राज्यात गॅसचा तुटवडा अद्यापही काही प्रमाणात कायम असून, नागरिकांना एका सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाकडून 'पुरवठा सुरळीत' असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती भयावह आहे. याच संतापातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ग्राहकाने गॅस मिळत नसल्याने चक्क स्वतःचे डोकं फोडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरालगतच्या वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीबाहेर आज दुपारी १ च्या सुमारास हा थरार घडला. बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. नेमाने हे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी एजन्सीच्या पायऱ्या झिजवत होते. वारंवार चकरा मारूनही गॅस मिळत नसल्याने आज त्यांचा संयम सुटला. बायकोला काय तोंड दाखवू म्हणत फोडले डोके अनेक दिवस झाले गॅस मिळत नाहीये, आता रिकाम्या हाताने घरी गेल्यावर बायकोला काय तोंड दाखवू? असा उद्विग्न सवाल करत त्यांनी संतापाच्या भरात गॅस एजन्सीच्या बाहेरच स्वतःचे डोकं फोडून घेतले. या प्रकारामुळे एजन्सीबाहेर मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन नेमाने यांना तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने सर्वसामान्य नागरिकांमधील वाढता असंतोष अधोरेखित केला आहे. अकोल्यात रांगेतच व्यक्तीचा मृत्यू केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण राज्यात गॅसची हीच अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी अकोल्यात गॅसच्या रांगेत उभे असताना एका वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेवरून राजकारणही तापले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. सिलिंडर बुक करा, २५ दिवसांनी येईल, असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची माफी मागावी, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. तर अकोल्यातील त्या व्यक्तीच्या मृत्युला सरकारच जबाबदार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रशासकीय दावे आणि वस्तूस्थिती पुरवठा विभागाकडून गॅसची कमतरता नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिकांपासून ते सामान्य गृहिणींपर्यंत सर्वांचेच बजेट आणि दैनंदिन कामकाज या टंचाईमुळे कोलमडले आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर किलोमीटर लांब रांगा पाहायला मिळत असून, ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
पत्नीला पेट्रोल टाकून जीवंत जाळले
सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरात पती-पत्नीच्या वादातून एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. फैजान शेखने पत्नी नर्गिसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या नर्गिसवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या काही महिन्यातच घटस्फोटाच्या वादातून हा प्रकार घडला. आरोपी पती फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना घरगुती हिंसाचाराचे भयाण रूप दर्शवते. सोलापुरात एक अत्यंत […] The post पत्नीला पेट्रोल टाकून जीवंत जाळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे 'शेतकरी न्याय सत्याग्रह' आंदोलन करण्यात आले. भारत-अमेरिका कराराविरोधात पुकारलेल्या या सत्याग्रहाला पुणे जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा असून, तो तात्काळ मागे न घेतल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. आंदोलनाला शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आगामी काळात हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांनी केंद्र सरकारच्या तथाकथित 'किसान ट्रेड डील'वर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेली धोरणे शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. कर्जमाफी होत नाही, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळत नाही, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण युवक काँग्रेसच्या माध्यमातून गावागावातून युवकांना एकत्र करून हा लढा अधिक बळकट करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. 'शेतकरी वाचवा, युवक वाचवा, भारत वाचवा' हा नारा जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे, असे पवार यांनी नमूद केले. सत्याग्रहात माजी आमदार रामहरी रुपनवर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष लहू निवंगुने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, वीरधवल गाडे, विश्वजीत जाधव, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, सौरभ अमराळे, यशवंत मोहोळ, वैभव यादव, अशोक घोलप, सौरभ रुपनवर, वैभव बुरंगुले, संकेत गवारी, राहुल जाधव आणि संदीप सातकर आदी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
परदेशातून देणगी स्वीकारण्यास शास्त्रींना परवानगी
नवी दिल्ली : बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांना परदेशातून देणग्या स्वीकारण्यासाठी आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामला भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने परकीय योगदान नियमन कायद्याअंतर्गत ही मंजुरी दिली आहे. यानंतर आता परदेशात राहणारे लोक धीरेंद्र शास्त्री यांच्या संस्थेला कायदेशीररित्या देणगी देऊ शकतील. परदेशातून देणग्या स्वीकारण्यासाठी संस्थेला विशेष परवानगीची […] The post परदेशातून देणगी स्वीकारण्यास शास्त्रींना परवानगी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोहिनूर कट्टातर्फे आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ पर्यावरण व पाणी तज्ज्ञ तसेच गोमुखचे अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. परांजपे यांनी राम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तिच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. नदीची वारी-परिक्रमा व्हावी आणि मानवनिर्मित चुकांमुळे झालेले प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. परांजपे यांनी 'राम नदी काल-आज-उद्या' या विषयावर आपले विचार मांडले. नदी परिसरातील नैसर्गिक अधिवासही जतन करणे हे मानवाचे कर्तव्य असून, राम नदी प्रदूषित होण्यास मानवच जबाबदार आहे, यावर त्यांनी भर दिला. राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा आणि तिची स्वच्छता राखण्यासाठी युवा पिढी प्रेरित व्हावी, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक विनीत गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव आणि अनिल गायकवाड मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. विजय परांजपे पुढे म्हणाले की, नदीचे संरक्षण-संवर्धन याविषयी अभ्यास करताना नदीतील जिवंत झरे, खडक, धबधबे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मानवनिर्मित प्रदूषणामुळे झालेला नदीचा ऱ्हास समजून घेऊन त्या चुका पुन्हा होऊ न देता सुधारणा करणे गरजेचे आहे. नदीच्या पाण्यात स्वशुद्धीकरणाची यंत्रणा अस्तित्वात असतेच; परंतु मानवाने छोट्या प्रक्रियांमधून नदीच्या पाण्याची शुद्धता सांभाळणे, त्याकरिता नदीला येऊन मिळणाऱ्या नाले-ओढ्यांचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना नदीची परिक्रमा करून तिची वैशिष्ट्ये नोंदवण्याचा, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून विश्लेषण करण्याचा सल्ला दिला. विनीत गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, भारतीय परंपरेत नदीला मातेसमान मानले जाते आणि तिचे पूजन केले जाते. नदी प्रदूषित झाल्यास संपूर्ण सृष्टीचे चक्र बिघडते, त्यामुळे नद्या स्वच्छ राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे कार्य कुणा एकाचे नसून, यासाठी योग्य त्या मार्गदर्शनाखाली समाजाने एकत्र काम करणे आवश्यक आहे. कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सव युवा पिढीसाठी प्रेरक असून, या उपक्रमास सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या १९.२ किमी लांबीच्या राम नदीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे जास्तीत जास्त शुद्ध व्हावा आणि ती अविरल व निर्मल व्हावी, या उद्देशाने सातत्याने काम चालू आहे. अशी नदी शांतताप्रिय व आनंदी समाज घडवण्यासाठी मदत करेल आणि यातून भावी पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग निर्माण होईल. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वसमावेशक व शाश्वत प्रारूप तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हा महोत्सव आहे.
वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने
मुंबई : प्रतिनिधी काशीगाव मेट्रो परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीच्या वादावरून मीरा-भाईंदरच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागातील मोठ्या जमिनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या असल्याचा दावा केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली. जर माझ्याकडे ३० टक्के […] The post वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने यासाठी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवशी संध्याकाळी निकालही घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेत असतील तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, इतर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आघाडीतील जागावाटपावरून मतभेद उघड होण्याची चिन्हे दिसत आहेत. सपकाळ यांनी पुढे बोलताना राजीव सातव यांच्या जागेचा मुद्दाही उपस्थित केला. ही जागा काँग्रेसची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राजकीय संस्कृतीबद्दल केलेल्या विधानाची आठवण करून देत, आता तीच संस्कृती दाखवत ही जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील गणित पाहता सत्ताधारी महायुती मजबूत स्थितीत असल्याचे दिसते. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपकडे 131, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे 46 असल्याने त्यांचा केवळ एक उमेदवार निश्चित विजयी होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. त्यामुळे दुसऱ्या जागेसाठी महाविकास आघाडीला अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही मतांची जुळवाजुळव करणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रमही स्पष्ट करण्यात आला आहे. 23 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून 30 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. 2 मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण केली जाणार असून या निवडणुकीतून राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मांजरी परिसरात एका फ्लेक्स व्यावसायिकाच्या घरातून तब्बल 11 लाख 11 हजार रुपयांची घरफोडी झाली आहे. याप्रकरणी मांजरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी 9 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. छाया शरद कवळे (वय 43, रा. ग्रॅडबे सोसायटी, मांजरी) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेचे पती फ्लेक्स व्यावसायिक आहेत. 13 एप्रिल रोजी त्यांनी घरातील ऐवज आणि रोकड तपासली असता, 25 हजार रुपयांची रोकड आणि साडेसात तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 9 एप्रिलपर्यंत हे दागिने आणि रोकड जागेवरच होती. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून हा ऐवज चोरून नेला. मांजरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम आणि त्यांच्या तपास पथकातील पोलिस निरीक्षक महेश कवळे पुढील तपास करत आहेत. कर्ज फेडण्याच्या बहाण्याने फसवणूक तीन टाटा कंपनीच्या 1613 च्या गाड्या विकत घेतल्यानंतर एकाने फायनान्स कंपनीचे सर्व कर्ज फेडतो म्हणून गाड्या घेऊन त्या गाड्यांची परस्पर विक्री केली. याप्रकरणी विश्र्वासघात केल्याने सुरेश उर्फ उत्तम उर्फ बापू मुरलीधर गायकवाड (रा. माळवाडी, डोंगरगाव ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पांडुरंग भाऊसाहेब पायगुडे (50, रा. वाडेबोलाई ता. हवेली, जि. पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्याकडील 22 लाखांच्या तीन चार चाकी गाड्यांचा अपहार करण्यात आला. हा प्रकार मार्च 2022 ते जुन 2023 दरम्यान घडला. नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील तेलपुरवठा खंडित झाला आहे. भारतामध्येही इंधनाची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत, इराणमधून सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आलेला एक टँकर गुजरात किना-यावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या टँकरबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने भारतीय तेल कंपन्यांनी हे इराणी तेल स्वीकारण्यास नकार दिला आहे. ‘द […] The post इराणचे तेल स्वीकारण्यास नकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मंगरुळ खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा; पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
तुळजापूर : तालुक्यातील मंगरुळ येथे घडलेल्या युवकाच्या खूनप्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. कृष्णाथ आनंद साठे (वय ३६) यांचा मृतदेह तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ आढळून आला होता. डोक्यात दगडाने वार करून हत्या […] The post मंगरुळ खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा; पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदू खरातचा अंक खेळ; कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत ९ चा प्रभाव
नाशिक : प्रतिनिधी भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणा-या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वत:साठी ९ हा अंक अत्यंत शुभ मानत होता. त्यामुळेच त्याने आपल्या गाड्यांचे नंबरही खास करून असे निवडले होते. तपास यंत्रणांच्या चौकशीत असे समोर आले की, खरातने आरटीओमधून चॉईस नंबर घेऊन आपल्या गाड्यांचे क्रमांक निश्चित […] The post भोंदू खरातचा अंक खेळ; कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत ९ चा प्रभाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकनंतर संगमनेरमध्ये भोंदूबाबा; मंत्रोच्चाराने आजार बरे करण्याचा दावा
अहिल्यानगर : प्रतिनिधी नाशिकच्या अशोक खरातने मांडलेल्या भोंदूगिरीच्या खेळाचा तपास सुरू असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून अशाच एका लुटारू बाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. मंत्रांच्या जोरावर शारीरिक व्याधी दूर करण्याचा दावा संगमनेरच्या कोल्हेवाडी येथील दत्तधाम आश्रमातून केला जात आहे. कोल्हेवाडीतील दत्तधाम आश्रमात सध्या या तथाकथित महाराजाचा दरबार भरत असून, मंत्रोच्चाराने कॅन्सरसारखे आजारही बरे होतात, […] The post नाशिकनंतर संगमनेरमध्ये भोंदूबाबा; मंत्रोच्चाराने आजार बरे करण्याचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपचाराच्या नावाखाली महिलांचे शोषण; मुंबईतला भोंदूबाबा अटकेत
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या दिंडोशी परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उपचारांच्या नावाखाली महिलांना मध्यरात्री बोलावून त्यांचे शोषण करणा-या आणि भक्तांची लूट करणा-या मुंबईतील एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. रिदम पांचाळ ऊर्फ मॉन्टी पांचाळ (३७) असे या भोंदूबाबाचे नाव असून दिंडोशी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक अॅड. सिद्धार्थ शर्मा यांच्या […] The post उपचाराच्या नावाखाली महिलांचे शोषण; मुंबईतला भोंदूबाबा अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी झटणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे. 13 एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मजल मारत एक नवा विक्रम नोंदवला. 5364 मीटर म्हणजेच 17,594 फूट उंचीवर पोहोचत त्यांनी आपल्या जिद्दीचा आणि चिकाटीचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे, हा प्रवास त्यांनी कोणत्याही विशेष सुविधा न घेता पूर्ण केला. हा संपूर्ण ट्रेक अत्यंत खडतर मानला जातो. सलग आठ दिवस दररोज 12 ते 14 किलोमीटर पायी चालत, डोंगर-दऱ्यांमधून चढाई करत हा प्रवास पार करावा लागतो. जसजसे उंची वाढत जाते, तसतसे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तर फक्त 45 टक्के ऑक्सिजन उपलब्ध असतो. त्यामुळे श्वास घेणेही कठीण होते. याशिवाय उणे 15 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणारी थंडी ही आणखी एक मोठी परीक्षा होती. या कठीण परिस्थितीत बच्चू कडू यांनी आपल्या मुलासोबत हा ट्रेक पूर्ण केला. ‘द अल्पायनिस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून आयोजित या मोहिमेत त्यांना एव्हरेस्टवीर भगवान चवले यांचे मार्गदर्शन लाभले. एकूण 14 सहकाऱ्यांसह त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. शेवटच्या दिवशी 17 किलोमीटरचा लांब टप्पा पार करत त्यांनी बेस कॅम्प गाठला. या संपूर्ण मोहिमेत त्यांनी शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी दिली. सामाजिक मूल्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न या मोहिमेला बच्चू कडूंनी एक सामाजिक आणि प्रेरणादायी संदेशही जोडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही मोहीम भारताचे संविधान आणि भगवद्गीता यांना समर्पित केली. यामागे देशभक्ती आणि सामाजिक मूल्यांचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. दरम्यान, नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा पाहून बच्चू कडूंनी महाराष्ट्रातही अशाच सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. राज्यात साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. जनआंदोलनातून पुढे आलेले लढवय्ये नेते बच्चू कडू यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नाही, तर जनआंदोलनातून पुढे आलेले लढवय्ये नेते म्हणून आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते म्हणून त्यांनी दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासात आता एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची कामगिरीही जोडली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारे ते कदाचित पहिलेच नेते ठरले असून, त्यांच्या या यशाची राज्यभरात चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे देगलूर नाका परिसरात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू
नांदेड : सुनिल पारडे नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देगलूर नाका परिसरात महापालिकेच्या वतीने नाल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ४ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुदैर्वी घटना आज १६ एप्रिल रोजी गुरूवारी दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात शोककळा पसरली आहे.तर […] The post महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे देगलूर नाका परिसरात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देगलूर नाका परिसरात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू
नांदेड : प्रतिनिधी जिल्ह्यातील देगलूर नाका परिसरातील एमजीआर गार्डनच्या बाजूला ओपन प्लॉटिंगमध्ये पाण्यात बुडून चार मुलांचे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत मोहम्मद अदनान मोहम्मद फिरोज (वय १० इस्लामपुरा), मोहम्मद अली मोहम्मद इदरीस (वय १३इस्लामपुरा) सय्यद इरफान सय्यद फिरोज (वय १३ इस्लामपुरा ) व इतर एक असे चौघे पाण्यात बुडाले. चौघांचे मृतदेह विष्णुपुरी येथे […] The post देगलूर नाका परिसरात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील वातावरण तापलेले असतानाच आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मोठी बाईक रॅली काढली. या रॅलीत शेकडो महिला, तरुणी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तापमान 38 ते 39 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असतानाही आंदोलकांनी उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. ही रॅली ज्या कंपनीत हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणाहून सुरू झाली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. रॅलीदरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला. धर्मांतराच्या कथित षडयंत्राविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी सातत्याने करण्यात आली. या आंदोलनात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. अनेक तरुणी आणि महिला दुचाकीवरून सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे या रॅलीला रणरागिणींची बाईक रॅली, असे स्वरूप प्राप्त झाले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही या रॅलीत सहभाग घेत आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे पीडित महिलांना तात्काळ न्याय मिळावा आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी होती. या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. विविध हिंदुत्ववादी संघटना या मुद्द्यावर एकत्र आल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. कारवाई करण्याचा दबाव रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले होते. आंदोलकांची संख्या मोठी असतानाही रॅली शांततेत पार पडली, मात्र घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण राहिले. दरम्यान, या आंदोलनामुळे नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणाला अधिकच वेग मिळाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. प्रशासनावरही या प्रकरणात जलद आणि ठोस कारवाई करण्याचा दबाव वाढताना दिसत आहे.
राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांदा, बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक ठिकाणी जड गोण्यांची चढउतार करताना कामगारांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर सरकारने हिरवा कंदील दिला आहे. माथाडी कामगारांना दररोज जड गोण्या उचलण्याचे काम करावे लागते. अनेकदा 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलताना त्यांच्या शरीरावर ताण येतो. यामुळे पाठदुखी, सांधेदुखी आणि इतर गंभीर व्याधी निर्माण होण्याची शक्यता वाढते. विशेषतः वय वाढल्यानंतर या त्रासाचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गोण्यांच्या वजनावर मर्यादा घालणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनीही सांगितले होते. या निर्णयामागे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचाही मोठा वाटा आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जड वजन उचलण्यावर मर्यादा असावी, असा निर्णय यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला होता. केंद्र सरकारनेही यासंदर्भात राज्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने याआधीच परिपत्रकाद्वारे मार्गदर्शन केले होते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विविध कामगार संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कामगार संघटना, व्यापारी संघटना, कामगार विभाग, तसेच किराणा बाजार आणि दुकाने मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच हा निर्णय अंतिम करण्यात आला. त्यामुळे हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने बाजार समित्यांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी गोण्यांचे वजन 50 किलोच्या मर्यादेत ठेवावे यासाठी जनजागृती करण्यास सांगितले आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची चढउतार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा दरम्यान, या नव्या नियमामुळे बाजार समित्यांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. उलट, कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून त्यांना दिलासा मिळेल. एकूणच, या निर्णयामुळे माथाडी कामगारांच्या खांद्यावरील जड ओझे हलके होणार असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई : प्रतिनिधी दलित पँथरचे प्रणेते आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित ‘ढसाळ’ या चरित्रपटाची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्याचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत मुंबईत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या […] The post ललित प्रभाकर साकारणार ‘ढसाळ’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय, सकाळी सात वाजल्यापासूनच कडाक्याचे ऊन जाणवत असून राज्य उष्णतेच्या ‘रेड झोन’मध्ये आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश ‘अति उच्च उष्णता धोका’ श्रेणीत करण्यात आला आहे. उष्मघातामुळे राज्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अकोला, हिंगोली आणि वाशिम या ठिकाणी उष्णघातामुळे ३ जणांचा मृत्यू […] The post महाराष्ट्र ‘रेड झोन’मध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कधी मनपाची सुद्धा निवडणूक लढले नाही त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या बोलताना मतदारसंघ असे फोडले जातील तसे फोडले जातील असे सांगू नये. राऊत यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. त्यामुळे तुम्ही मतदारसंघाची चिंता करू नका, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्या विधेयक मंजूर झाल्यावर सांगा, ठाकरे, काँग्रेस देशाचे शत्रू आहेत का? हे सांगा असेही बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की,कुठल्याही खासदारांना संसदेत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ही माहिती संजय राऊत यांना नाही का? मनाला येईल ती वायफळ बडबड करण्याचा तुमचा धंदा गेली 4 ते 5 वर्षे सुरू आहे. उद्या तृणमृल काँग्रेस, काँग्रेस, उबाठाचे खासदार विधेयकाला पाठिंबा देणार आहेत आणि संजय राऊत तोंडावर पडणार आहेत. राऊतांच्या पक्षाकडून महिलांना शिवीगाळ नवनाथ बन म्हणाले की, नारी शक्ती विधेयक हे काही भाजप शक्ती विधेयक नाही.तर भारत शक्ती विधेयक आहे. महिलांना सन्मानाचे स्थान मिळण्यासाठी हे विधेयक आहे. महिलांची शक्ती वाढवणारे हे बिल आहे. लोकसभेत महिलांचे नेतृत्व पुढे यावे म्हणून हे विधेयक आहे. राऊतांकडून या विधेयकाला विरोध करण्यात येतोय कारण त्यांच्या पक्षाकडून महिलांना शिवीगाळ करण्यात येते, हे बिल आले तर आपल्या पक्षाचे काही खरे नाही हे राऊतांना समजले म्हणून ते विरोध करत आहे. या विधेयकाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान होऊ नये अशी राऊतांची इच्छा आहे. राऊतांना देशाचे तुकडे व्हावे असे वाटते नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या मनात कितीही इच्छा असेल की या देशात वनवा पेटावा तरी या देशात असे काही होणार नाही. कारण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा आहे. नारी शक्ती विधेयकाच्या माध्यमातून उत्तर VS दक्षिण असा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला देशाचे तुकडे व्हावे असे वाटते आहे, पण असे काहीच होणार नाही. इतर देशात जेव्हा हिंसाचार झाला त्यावेळी तुम्ही स्वप्न पाहिले होते पण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. आम्ही तुमच्यासारखे घरात बसत नाही नवनाथ बन म्हणाले की, 5 राज्यातील निवडणूक ही काय केवळ विरोधी पक्षातील खासदारांनाच आहे का? भाजपचे खासदार या निवडणुकीत मेहनत घेत आहेत. भाजपचे खासदार हे तुमच्यासारखे घरात बसून राहत नाही. ते लोकांमध्ये जातात, ते जर संसदेमध्ये येऊ शकतात तर बाकीच्या खासदारांना येण्यास काय समस्या आहे. विनाकारण पराभव होणार हे माहिती असल्याने ते पराभवाची कारणे शोधत असतात.
सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026’ हा एक मैलाचा दगड ठरणार असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटनाला नवे परिमाण देण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यातील कोयना बॅकवॉटर परिसराचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य जगभर पोहोचवण्यासाठी कोयना तापोळा मुनावळे बॅकवॉटर महोत्सव 2026 भव्य स्वरूपात येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि सहसंचालक संतोष जाधव यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महोत्सवाचे स्वरूप, नियोजन आणि विविध आकर्षणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महोत्सव महाबळेश्वर – तापोळा – मुनावळे या निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटनाला मोठी चालना मिळणार मंत्री देसाई यांनी सांगितले की, कोयना बॅकवॉटर परिसराला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनांनुसार महोत्सवाचे नियोजन अत्यंत भव्य आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सातारा जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. सुधारित रस्ते आणि सुविधा यामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ व सुखकर होणार आहे. महोत्सवात पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स), हेलिकॉप्टर राईड, बग्गी राईड, ड्रोन शो, हाऊसबोट, फ्लोटिंग मार्केट, टेंट सिटी, खाद्य जत्रा, हेरिटेज वॉक विथ राईड , मॉर्निंग योगा, किल्ले व शस्त्र प्रदर्शन, तसेच बालमेळा यांसारख्या उपक्रमांचा समावेश असेल. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शालेय सुट्ट्यांच्या कालावधीत महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यटन, संस्कृती आणि साहसी उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल. तसेच तापोळा परिसरात महोत्सवासाठी योग्य स्थळ निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले आहेत. महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यावरही भर देण्याच्या सूचना पर्यटन विभागाला दिल्या आहेत.
अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या एका भोंदूबाबाला मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ असे या भोंदूबाबाचे नाव असून, गेल्या अनेक दिवसांपासून मालाड परिसरात 'भूत उतरवण्याच्या' नावाखाली त्याचे अघोरी प्रकार सुरू होते. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रिदम पांचाळ हा गेल्या दोन वर्षांपासून मालाडमध्ये दर गुरुवार आणि रविवारी अघोरी पूजेचे आयोजन करायचा. माझ्या अंगात देवी येते असा दावा करून तो रात्री 6 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत विधी करायचा. सुरुवातीला हे प्रकार त्याच्या घरापुरते मर्यादित होते, मात्र 4 एप्रिल रोजी त्याने चक्क मनपाच्या उद्यानात शेकडो लोकांच्या उपस्थितीत उघडपणे जादूटोण्याचा प्रकार केल्याने संताप व्यक्त केला जात होता. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, मालाड परिसरातील रहिवासी असलेला रिदम पांचाळ गेल्या दोन वर्षांपासून दर गुरुवार आणि रविवारी अघोरी पूजेचे आयोजन करत असे. माझ्या अंगात देवी संचारते असा दावा करून तो रात्री 6-7 वाजेपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत विधी करायचा. सुरुवातीला हे प्रकार घरापुरते मर्यादित होते, मात्र 4 एप्रिल रोजी त्याने चक्क मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक उद्यानात शेकडो लोकांना जमवून उघडपणे जादूटोण्याचे प्रयोग केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. अघोरी साहित्यामुळे दहशतीचे वातावरण हा भोंदूबाबा उपचारांच्या नावाखाली भक्तांकडून अत्यंत संशयास्पद आणि अघोरी साहित्याची मागणी करायचा. यामध्ये बकऱ्याचे काळीज (कलेजा), स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली आणि सिगारेट यासारख्या गोष्टींचा समावेश होता. हे साहित्य विधीनंतर चार रस्यांच्या मध्यभागी (चौकात) नेऊन ठेवण्यास तो सांगत असे. या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रहिवाशांच्या जागरूकतेमुळे कारवाई वारंवार सांगूनही रिदमने आपले प्रकार थांबवले नाहीत. अखेर दोन आठवड्यांपूर्वी स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत त्याच्या अघोरी कृत्यांचे व्हिडिओ पोलिसांना दिले आणि सामूहिक स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली होती. प्राथमिक चौकशीनंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपी रिदम पांचाळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत असून तपासाचा आवाका वाढत आहे. यावर बोलताना भाजपच्या देवयानी फरांदे यांनी मोठी मागणी केली आहे. धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला पाहिजे. त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे, असे भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांनी नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी म्हटले आहे. देवयानी फरांदे म्हणाल्या की, ज्या पद्धतीने हिंदूच्या मुलींना फसवून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत. त्यांना नमाज पडायला लावताय, रोजे ठेवायला लावताय त्यांचे धर्मांतर करताय हे हिंदुस्तानमध्ये चालणार नाही. असे जे कोणी धर्मांतर करायला लावत असतील त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करावे, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. दिल्ली टीमची धडक नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थेट दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी कंपनीत सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला असून, परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 20 दिवसांपासून निदा खान फरार नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. निदा खान ही गेल्या जवळपास 20 दिवसांपासून फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून तीन स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. निदा खान कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम करत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीच या संपूर्ण प्रकारणात प्रमुख भूमिका बजावत होती. विदेशी अर्थसहाय्याबाबत निदा सापडल्यानंतर स्पष्टता प्रकरणातील मुख्य संशयित, मूळची पुण्याची असलेली कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान ही गेल्या दहा दिवसांपासून फरार आहे. ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसून, नाशिक पोलिसांची विविध पथके तिच्या मागावर आहेत. तिच्या अटकेनंतरच या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर येण्याची आणि या कारस्थानामागे मलेशिया कनेक्शन किंवा विदेशी संस्थांचे अर्थसाहाय्य आहे की स्थानिक पातळीवरच कुठली संस्था मदत करत आहे, हे सत्य उघडकीस येईल, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. कट्टरपंथीयांच्या संस्था, फॉरेन फंडिंगचा शोध या गुन्ह्यात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून निदा खान हिचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या गुन्ह्यात संशयितांना काही कट्टरपंथीय संस्था मदत करत होत्या का? आणि फॉरेन कंपन्यांनी अर्थसाहाय्य केले का? याचा तपास केला जाईल. मात्र, अद्याप याबाबत काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. - संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्याच्या मृतदेहावरील उत्तरीय तपासणीचा तिढा गुरुवारी ता. 16 सकाळ पर्यंत कायम होता. जो पर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याचे कुटुंब व गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हा तिढा कधी सुटणार याची प्रतिक्षा पोलिस दलाला लागली आहे. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गोरख पातळे (26) या शेतकऱ्याने विहीरीचे अनुदान भरण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याने बुधवारी ता. 15 शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा मगच मृतदेह खाली काढा अशी भूमिका गोरख यांचे कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतली. मात्र रात्री आठ वाजता झालेल्या चर्चेनंतर सात तासांनी मृतदेह खाली उतरविण्यात आला. दरम्यान, मयत गोरख यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. आज सकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र गावकरी व मयत गोरख यांच्या कुटुबियांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा मगच उत्तरीय तपासणी करा अशी भुमीका कायम असल्याने पोलिस यंत्रणा देखील हतबल झाली आहे. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष गजानन कावरखे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, प्रविण महाजन, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात जाऊन मयत गोरख यांच्या कुटुंबियांची तसेच गावकऱ्यांची भेट घेतली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत उत्तरीय तपासणीचा तिढा सुरुच होता. त्यामुळे मागील 21 तासापासून मृतदेह उत्तरीय तपासणीच्या प्रतिक्षेत आहे. आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
घाटीत एमआरआयसाठी एक महिन्याची प्रतीक्षा:रुग्णांची वाढती संख्या, सुट्ट्यांमध्येही सेवा सुरू राहणार
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना आता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत येथे केवळ 1 हजार रुपयांत ही सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येत असून, ही प्रतीक्षा कमी करण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशीही एमआरआय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी रुग्णालयात एमआरआयसाठी 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो, तर घाटीत तो अवघ्या १ हजार रुपयांत उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 50 टक्के सवलत मिळत असल्याने रुग्णांचा ओढा घाटीकडे वाढला आहे. सध्या घाटी रुग्णालयात रेडिओलॉजी विभाग, सुपरस्पेशालिटी विभाग आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एमआरआयची सुविधा उपलब्ध आहे. या तीन एमआरआय मशीन असूनही रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रतीक्षा यादी वाढत आहे. मराठवाड्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे घाटीतील एमआरआय विभागात दररोज सुमारे 90 एमआरआय तपासण्या केल्या जातात. रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले की, रेडिओलॉजीमध्ये 40, सुपरस्पेशालिटीमध्ये 25 ते 30 आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 25 अशा एकूण 90 तपासण्या होतात. एमआरआय ही तातडीची (इमर्जन्सी) सुविधा नसली तरी, ज्यांना त्वरित गरज आहे अशा रुग्णांना प्राधान्य दिले जाते. एमआरआय तपासणी मेंदूचे विकार (उदा. अर्धांगवायू, मेंदूतील गाठी, फिट्स), मणक्याचे आजार (उदा. कंबरदुखी, मणक्यातील गादी सरकणे) आणि सांधे व स्नायूंच्या समस्या (उदा. लिगामेंट इंज्युरी) तपासण्यासाठी आवश्यक असते. या समस्येवर उपाय म्हणून, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले की, रुग्णालयातील तीन एमआरआय मशीनचे योग्य नियोजन करून सुट्ट्यांच्या दिवशीही एक मशीन सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. रेडिओलॉजी, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर या तिन्ही ठिकाणी तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. सुक्रे यांनी पुढे सांगितले की, एक विशेष मोहीम (ड्राइव्ह) राबवून ही प्रतीक्षा यादी कमी करावी लागणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर तपासणी मिळण्यास मदत होईल.
सोलापूर शहराच्या 1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपा आपला हिस्सा भरण्यासाठी ‘बाँड’ च्या स्वरुपात 200 कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. या योजनेचा विषय मनपाच्या 20 एप्रिल रोजीच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे. तिथे अंतिम मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. व्याजदर, परताव्याची हमी दिली तर चांगल्या कंपन्या, नागरिकांचा सहभाग वाढेल, असे तज्ञांचे मत आहे. हे बाँडमध्ये दोन प्रकार असून एक पब्लिक बाँड आणि दुसरे प्रायव्हेट बाँड आहे. पब्लिक बाँड या प्रकारात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येते, तर प्रायव्हेट बाँड प्रकारात फक्त कंपन्यांना सहभागी होता येते. सोलापूर मनपाने मात्र हे दोन्ही पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. यासाठी ‘एस्क्रो’ बँक खाते उघडले जाणार आहे. जर मनपा वेळेत व्याज देऊ शकली नाही तर या खात्यातून व्याज वळते केले जाईल. पाणी योजनेसाठी जागतिक बँक 600 कोटी देणार आहे. बाँडच्या माध्यमातून जे गुंतवणुकदार गुंतवणूक करतील त्यांना जागतिक बँकेकडून काही सुविधा मिळतील, असे महापालिकेचे म्हणणे आहे. पहिले तीन वर्षे फक्त व्याज, नंतर 7 वर्षे मुद्दलही मिळेल नाशिक मनपा बाँडधारकांना 8.20 टक्के व्याजदर देत आहे. सोलापूरमध्ये व्याज दर निश्चित नाही. व्याज दर महिन्याला द्यायचे की सहा महिन्याला हेही ठरले नाही. मात्र 200 कोटींसाठी सुमारे 4 कोटी रुपये दरमहा व्याज द्यावे लागेल. सुरुवातीचे तीन वर्ष फक्त व्याज दिले जाणार. नंतर सात वर्षात व्याज व मुद्दल दोन्ही परतावा करावा लागेल. परताव्यासाठी दहा वर्षाचा कालावधी असेल. या सर्व मुद्द्यांची अंतिम रूपरेषा सर्वसाधारण सभेत व जागतिक बॅँकेशी चर्चा ठरवली जाईल. 10 वर्षात परतावा होईल का? याचा विचार करावा सोलापूर पालिकेनेही 8.20 टक्के व्याज दिले तर कंपन्यांचा प्रतिसाद मिळेल. मात्र, दहा वर्षात परतावा होईल का ? याचा विचार करणे गरजेचे आहे. बाँड घेतल्यानंतर जागतिक बँकेकडून काही सुविधा मिळण्याचा प्रश्न नाही. महापालिका गॅरंटी काय देणार? परतावा कसा करणार ? या गोष्टींचा करार झाला की चांगल्या कंपन्या येतीलच. प्रायव्हेट बाँडसह पब्लिक बाँड ही सुरु केले तर अधिक चांगला प्रतिसाद मिळेल. - धनराज नोगजा, सी.ए. नळांना मीटर, मक्तेदार वसूल करेल पाणीपट्टी जागतिक बँक 600 रुपयांचे कर्ज देत आहे. केंद्रीय योजनेतून 300 कोटी आणि बाँडच्या माध्यमातून 200 कोटी उभे केले जातील. ही योजना पूर्ण झाल्यानंतर रोज पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र नळांना मीटर लागेल. देखभाल व पाणीपट्टी वसूली मक्तेदारामार्फत केली जाईल. जागतिक बँकेतून प्रथम निधी मिळेल. योजनेचे पन्नास टक्के काम झाल्यानंतर महापालिका निधी उभा करणार आहे. त्यामुळे बाँडचा विषय कदाचित पुढच्या वर्षी सुरु होईल. जागतिक बँकेच्या निधीचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर होईल बाँड काढण्याची प्रक्रिया 1400 कोटी रुपयांच्या पाण्याच्या योजनेसाठी 200 कोटींचा निधी उभा करण्यासाठी मनपा बाँडच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सर्व प्रकिया एकदा पूर्ण झाली की बाँडबाबतच्या कारवाईला सुरुवात होईल. मनपा आयुक्तांकडून तसे आवाहन केले जाईल. कंपनी व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. -रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा अधिकारी, मनपा
नाशिक शहरातील उपनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाने ‘थांब, तुझा गेमच करतो’ अशी धमकी देत दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘तुझा गेमच करतो’ अशी उघड धमकी देत दहशत माजवणाऱ्या संशयितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल रण्यात आले असून, पोलिस आता त्यांच्या शोधात आहेत. आगार टाकळी येथील रहिवासी सिद्धार्थ प्रकाश पगारे (26) हे 14 एप्रिलच्या रात्री मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री 11:30 च्या सुमारास डीजेच्या तालावर नाचताना गर्दीत अक्षय लोखंडे याला त्यांचा किरकोळ धक्का लागला. या शुल्लक कारणावरून संतापलेल्या अक्षयने सिद्धार्थ यांना जातीवाचक शिवीगाळ करीत ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. काही वेळातच अक्षय लोखंडे हा त्याच्या एका साथीदारासह दुचाकीवरून टाकळीगाव येथील आंबेडकर पुतळ्याजवळ आला. त्याने सिद्धार्थ यांना अडवून थेट खिशातून पिस्तूल काढले आणि त्यांच्या दिशेने रोखून “थांब, तुझा गेमच करतो” अशी गर्दीत ओरडून धमकी दिली. संशयिताने पिस्तुलाचा घोडा दाबला. सुदैवाने गोळी झाडली गेली नाही. त्याचवेळी सिद्धार्थ यांनी प्रसंगावधान राखून खाली वाकत स्वत:चा बचाव केला. यावेळी संशयिताच्या साथीदारानेही धारदार शस्त्राचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. काही महिन्यांपूर्वीच उपनगर परिसरात धारदार शस्त्रांनी जाधव बंधूंवर वार करत हत्या करण्यात आली होती. त्याची चर्चा अजूनही परिसरात आहे. त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरलेली असते. मात्र, पोलिस गस्त कमी पडत असल्याने गुंडांचे फावते, अशी तक्रार नागरिक करत आहेत. संशयित फरार; परिसरात तणावाचे वातावरण या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर सिद्धार्थ यांनी थेट उपनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या या गुंडांना तातडीने अटक करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. यासोबतच, विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असल्याने त्या जागांसाठीही पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता परिषद निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 मतदारसंघांतील निवडणुकीचा अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. जरी राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप बाकी असल्या तरी परिषद निवडणुकीत त्याचा अडथळा येणार नसल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुका राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषदेतील 9 विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नवीन सदस्य निवडण्यासाठी राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगितले जात आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीची स्थिती मजबूत असल्याचे दिसते. भाजपकडे 131, शिवसेना (शिंदे गट) 57 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40 आमदार असून, इतर सहयोगी पक्षांसह महायुतीचे एकूण संख्याबळ 234 वर पोहोचते. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि शिवसेना (ठाकरे गट) 20 असे मिळून 49 आमदार आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 286 आमदारांचे सभागृह आहे. शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्याचीही शक्यता विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. या गणितानुसार महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, असे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ एक जागा निश्चित मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही मते मिळवणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीची बाजू वरचढ राहण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी राजकीय घडामोडींमुळे शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध नाही, पण हे बिल पहिलेच मंजूर झाले आहे. महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या 'मनमानी'ला विरोध आहे आणि राहणार, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकारने विरोधकांशी चर्चा करायला हवी होती, मसुदा समोर आल्यावर काय चर्चा करणार? आठ दिवसांनी जर बिलावर चर्चा झाली तर काय मोठा फरक पडणार आहे? एवढी कसली घाई झाली आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्ही मतदान करत नारी शक्ती विधेयकाला विरोध करत हे बिल पाडणार आहोत. 364 मते असल्याशिवाय हे मंजूर होणार नाही. सरकारकडे 292 मते आहेत, ते जास्तीत जास्त 300 होऊ शकतो. पण आमच्याकडे मोठा आकडा आहे, हे बिल मंजूर होऊ देणार नाही. बिलाला विरोध म्हणून सभा त्याग करणार नाही. सरकारला मतद करणारे देशाचे दुश्मन असतील. 2023 मध्येच बिल मंजूर संजय राऊत म्हणाले की, नारी शक्ती हे बिल 2023 मध्ये मंजूर झालेले आहे. केंद्र सरकार देशातील नागरिकांना फसवत आहे. त्या विधेयकामध्ये जनगणनेसंदर्भात काही चर्चा होत्या. हे बिल ऐतिहासिक आहे असे केंद्र सरकार म्हणत आहे. सध्या जितके खासदार आहेत त्यामध्ये महिलांना आरक्षण द्या, नवे मतदारसंघ निर्माण करत तुम्हाला हे बिल लादायचे आहे, सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यांना हे बिल मंजूर करण्यासाठी बहुमत मिळणार नाही. नारी शक्ती बिल नसून केवळ भाजपा शक्ती बिल आहे. हे बिल आम्ही संसदेत मंजूर होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार संजय राऊत म्हणाले की, 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल मंजुरीसाठी आणायची सरकारला काही गरज नव्हती. जर तुम्हाला ऐतिहासिक बिल मंजूर करायची आहे, लोकशाही मजबूत करायची आहे. महिलांचा लोकशाहीत सहभाग वाढवायचा आहे. पण अनेक खासदार सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना तुम्ही मतदानापासून रोखत बिल मंजूर करूण घेऊ असा सरकारचा प्रयत्न आहे. केरळमधील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत, पश्चिम बंगालमधील सर्व खासदारांना आणायचा प्रयत्न आहे. तर द्रमुकचे सर्व खासदारही अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहे.
भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वतःसाठी 9 हा अंक अत्यंत शुभ मानत होता. त्यामुळेच त्याने आपल्या गाड्यांचे नंबरही खास करून असे निवडले, ज्यांची बेरीज 9 येईल. तपासादरम्यान ही बाब समोर आल्यानंतर त्याच्या अंधश्रद्धेच्या खेळाचा आणखी एक पैलू उघड झाला आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीत असे समोर आले की, खरातने आरटीओमधून चॉइस नंबर घेऊन आपल्या गाड्यांचे क्रमांक निश्चित केले होते. या सर्व नंबरांची बेरीज 9 येईल याची तो विशेष काळजी घेत असे. अंकशास्त्राच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून त्याने अनेकांना जाळ्यात ओढले. मोठमोठ्या नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना त्याने आपल्या प्रभावाखाली घेतल्याचे आरोप आहेत. दरम्यान, खरातविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप त्याच्यावर आहेत. एसआयटीच्या तपासानंतर आणि हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी व व्यावसायिकांनी त्याच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे त्याच्या गैरकृत्यांची व्याप्ती किती मोठी होती, याची कल्पना येत आहे. अंकशास्त्रानुसार 9 हा अंक बंधुत्व, समृद्धी, भाग्य आणि मानवतावादी कार्याशी जोडलेला मानला जातो. तसेच मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने हा अंक ऊर्जा आणि यशाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे खरातने 9 या अंकाला विशेष महत्त्व दिले होते. पैसा आणि यश मिळवण्यासाठी हा अंक उपयोगी ठरतो, असा त्याचा विश्वास होता. खरातच्या ताब्यातील इतर वाहनांवरही 9 अंकाचा प्रभाव दिसून आला आहे. उदाहरणार्थ, त्याच्या एका गाडीचा नंबर 6453 असून, त्याची बेरीज 18 होते आणि पुढे 1+8 केल्यास ती 9 येते. यावरून त्याने प्रत्येक गोष्टीत अंकशास्त्राचा वापर करून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. तपास यंत्रणांनी त्याच्या मालमत्तांची तपासणी केल्यानंतर त्याच्या ऐषारामी जीवनशैलीचे अनेक पुरावे समोर आले आहेत. अंकाच्या खेळामुळे आता अडचणीत दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू असून त्याने कमावलेला पैसा नेमका कुठून आला आणि कुठे वापरला गेला, याचा शोध घेतला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांसह अनेक मोठ्या व्यक्ती त्याच्या जाळ्यात अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे 9 या अंकावर विश्वास ठेवून साम्राज्य उभं करणारा खरात, त्याच अंकाच्या खेळामुळे आता अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणानंतर आता सिरेहकशाह बाबा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम केले जाणार असून सध्याच्या स्थितीत 14 कोटी रुपये खर्चुन सांडव्याच्या कामासह संरक्षण भिंतीचे काम केले जात आहे. या शिवाय तलावातील गाळ काढण्याचे कामही हाती घेण्यात आले असून यामुळे तलावात तब्बल 932 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. त्यामुळे भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होणार असून तलावाच्या सुशोभीकरणामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. हिंगोली शहरात जलेश्वर तलाव व सिरेहकशाह बाबा तलाव आहेत. या तलावामध्ये् दरवर्षी कोट्यावधी लिटरचा पाणीसाठा होतो. मात्र मागील काही वर्षात या तलावाच्या सुशोभीकरणाची मागणी केली जात होती. त्यानुसार जलेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून या ठिकाणी संरक्षण भिंत, सांडव्याचे काम करण्यात आले आहे. या शिवाय तलावातील गाळ काढल्यामुळे तलावातील पाणीसाठा वाढला आहे. सध्या तलावाचे काम सुरु आहे. दरम्यान, शहरातील 142 एकर क्षेत्रावर सिरेहकशाह बाबा तलावाच्या दुरुस्तीसोबतच सुशोभीकरणाचे काम हाती घेण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार तलावातील गाळ काढणे आवश्यक असल्याने सध्या मृद व जलसंधारण विभागाकडून तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे तलावात पाणीसाठा वाढणार आहे. तलावात साठलेले पाणी पावसाळ्यात पाणी वाहून जाऊ नये यासाठी 630 मिटर लांबीची संरक्षण भिंतीचे बांधकाम केले जात आहे. या शिवाय दर्गाह परिसरात पाण्याची धोका निर्माण होऊ नये यासाठी 197 मिटरची भिंत बांधली जात आहे. याशिवाय सांडव्याचे कामही केले जाणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, अभियंता उमेश अलमुलवाड यांच्या पथकाने कामकाजाची पाहणी केली. सदर कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 932 टीसीएम पाणीसाठा होणार तलावातील गाळ काढणे व संरक्षण भिंतीमुळे तलावात तब्बल 932 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. यामुळे परिसरात भुगर्भात पाणी पातळी वाढणार असून त्याचा नागरीक व शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सुशोभीकरण करण्याची तयारी ठेवा या तलावाचे पर्यटन विकास योजनेतून सुशोभीकरण करण्याची तयारी ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या आहेत. त्यानुुसार तलावात बोटींगसह पर्यटनस्थळ विकसीत केले जाणार असून शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
काशीगाव मेट्रो परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीच्या वादावरून मिरा-भाईंदरच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागातील मोठ्या जमिनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या असल्याचा दावा केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. मात्र, या प्रकरणाने आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचे रूप धारण केले असून दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली. जर माझ्याकडे 30 टक्के जमीन असती, तर सरनाईक मला दूरून बोलावले असते. इतकेच नव्हे तर ते माझे ड्रायव्हर झाले असते, असे वादग्रस्त वक्तव्य मेहता यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून या वक्तव्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. या वक्तव्याचा निषेध करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी मेहता यांच्या वक्तव्याला अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे संबोधले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, परंतु व्यक्तीगत पातळीवर टीका करताना मर्यादा पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वेश सरनाईक यांनी पत्रात पुढे नमूद केले की, जनतेने दिलेल्या कौलानंतर लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. चार वेळा निवडून आलेल्या आमदाराबाबत आणि सध्याच्या मंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे ही राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही. राजकारण हे केवळ वक्तव्ये करण्यासाठी नसून ते संस्कार आणि जबाबदारीची गोष्ट आहे, असे सांगत त्यांनी सभ्यतेचे भान राखण्याचे आवाहन केले. या संपूर्ण वादामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही या प्रकरणावरून संताप व्यक्त होत असून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी प्रतिक्रिया देताना, आमचा नेता संयमी आहे, त्यामुळे आम्हीही संयम पाळतो, असा टोला लगावला. तसेच आवश्यक असल्यास उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता दरम्यान, काशीगाव मेट्रो परिसरातील जमीन वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याने आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे हा वाद नेमका कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य आरोपी निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून तिचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी निदा खानच्या अटकेसाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. तरीही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम पाहणारी निदा खानच या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असल्याचे समोर आले आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कंपनीतील कामाच्या मीटिंगच्या माध्यमातून काही महिलांना लक्ष्य केले जात होते. विशेषतः हिंदू तरुणींना वेगळे करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात होता. त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात होते. विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक तसेच लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व कारवायांमध्ये निदा खान सक्रियपणे भूमिका बजावत असल्याचे पोलिसांना आढळले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या एचआर अधिकारी अश्विनी चैनानी हिच्या चौकशीतूनही अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. तिच्या जबाबातून निदा खानच या संपूर्ण प्रकारामागील प्रमुख व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा पुरुष आणि दोन महिला आरोपींचा समावेश असलेल्या या प्रकरणात एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून कारवाया राबवल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठे आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. निदा खानविषयी मिळालेल्या माहितीनुसार, ती वयाच्या 26 व्या वर्षी पासून कंपनीत टीम लीडर म्हणून काम करत होती. 2021 पासून ती कंपनीत कार्यरत होती. नाशिकच्या द्वारका परिसरात तिचे माहेर असून तिचे पती एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे. नव्याने नोकरीला लागलेल्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तीच शिफारस करत असे आणि त्यातूनच त्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप आहे. आर्थिक व्यवहारांमध्येही तिचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय संबंध उघड होण्याची शक्यता दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी निदा खानची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तिच्या अटकेनंतर या रॅकेटमागील खरे सूत्रधार आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय संबंध उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांनी तिचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याचाही संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसाठी हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थेट दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी कंपनीत सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला असून, परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेली निदा खान ही गेल्या जवळपास २० दिवसांपासून फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून तीन स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. निदा खान कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम करत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीच या संपूर्ण प्रकारणात प्रमुख भूमिका बजावत होती. दरम्यान, कंपनीच्या दिल्ली मुख्यालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक थेट नाशिकमध्ये येऊन कंपनीची ‘झाडाझडती’ घेत आहे. तपासादरम्यान कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कंपनीने सुमारे 150 कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंपनीच्या कार्यालयात सध्या पूर्णपणे शांतता असून कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाचे अधिकारी जेव्हा तपासासाठी कंपनीत पोहोचले, तेव्हा त्यांना एकही कर्मचारी तेथे आढळला नाही. अधिकाऱ्यांनी शॉप अॅक्ट परवाना तसेच इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली असून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच अंतर्गत चौकशीदरम्यान अनेक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, त्यातून काही गंभीर बाबी समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कामाच्या मीटिंगच्या नावाखाली काही महिलांना लक्ष्य केले जात होते. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप आहेत. विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक आणि लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. हा सर्व प्रकार एका विशिष्ट व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चालवला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, यात मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशीतूनच निदा खानच्या भूमिकेचा उलगडा या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून, कंपनीची एचआर अधिकारी अश्विनी चैनानी हिचाही त्यात समावेश आहे. तिच्या चौकशीतूनच निदा खानच्या भूमिकेचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून 18 एप्रिल रोजी आयोगाचे पथक नाशिकमध्ये येणार आहे. पीडित महिलांशी संवाद साधून संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याने या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारंजा नगरीत नव्याने स्थापन झालेली ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ ही संस्था केवळ एका संघटनेची निर्मिती नसून, सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी आहे. या संस्थेची प्रेरणा संत रविदासांच्या विचारांतून आलेली आहे, ही तिची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. संत रविदासांनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि श्रमप्रतिष्ठेची भूमिका ही भारतीय समाजव्यवस्थेला दिशादर्शक ठरलेली आहे. जात, पंथ, आर्थिक स्थिती यापलीकडे जाऊन माणूसपणाला केंद्रस्थानी ठेवणारा त्यांचा विचार आजही तेवढाच सुसंगत आहे. या विचारांना केवळ अभिवादन करण्यापेक्षा त्यांची अंमलबजावणी करण्याचा संस्थेचा निर्धार अधिक महत्त्वाचा ठरतो असे विचार आमदार सई डहाके यांनी येथे व्यक्त केले. कारंजा येथील श्री संत रविदास फाउंडेशनचे उद्घाटन व प्रथम कार्यारंभ म्हणून आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. मंगळवारी १४ एप्रिल रोजी येथील नूतन सांस्कृतिक भवन मध्ये श्री संत रविदास फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गुरु रविदास विश्व महापिठाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव धाडवे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक पंजाबराव नायक, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर, सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हादराव पानझाडे, मानोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पांडुरंग गव्हाळे हे उपस्थित होते. दरम्यान उपस्थित अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घुडे, उपाध्यक्ष खुशाल राजगुरे, सचिव महादेव अंबाळकर, कोशाध्यक्ष मधुकरराव सोनटक्के, सदस्य कैलास ठोसरे, गजानन राजगुरे, ज्ञानेश्वर अंबाळकर, बाबाराव वानखडे, रविंद्र इंगळे यांनी उपस्थित अतिथींचे अतिथींचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढे बोलताना आमदार डहाके म्हणाल्या की, समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था या लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीसाठीही महत्त्वपूर्ण ठरतात. ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ने सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेत जागरूकता, एकजूट आणि सकारात्मकता निर्माण केली, तर ती खऱ्या अर्थाने परिवर्तनाची वाहक ठरेल. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात सामाजिक बांधिलकी ही अनेकदा दुय्यम ठरताना दिसते. व्यक्तिकेंद्री विचारसरणीच्या वाढत्या प्रभावामुळे सामूहिक हिताच्या संकल्पना मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी चर्मकार समाजातील काही सजग कार्यकर्ते पुढाकार घेत समाजासाठी संघटीत पणे कार्य करण्याचा निर्णय घेतात, ही बाब निश्चितच आश्वासक आहे. ‘श्री संत रविदास फाउंडेशन’च्या स्थापनेतून हाच सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित होतो. पंजाबराव नायक, प्रल्हादराव पानझाडे यांनीही आपले विचार मांडले. ज्ञानेश्वर घुडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन फाउंडेशनचे सचिव महादेव अंबाळकर यांनी केले तर उपाध्यक्ष खुशाल राजगुरे यांनी आभार मानले. संस्थेतपुरते मर्यादित नको आजचा हा कार्यक्रम केवळ एका संस्थेच्या उद्घाटनाची औचित्य नाही तर समाज जीवनाला नवी दिशा देणाऱ्या विचार प्रवाहाचा आरंभ आहे असे ते म्हणाले. वसंतराव धाडवे यांनी कारंजा नगरीत सुरू झालेले हे नवे दालन केवळ एका संस्थेतपुरते मर्यादित न राहता व्यापक सामाजिक चळवळीचे रूप धारण करेल अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
शहरात बुधवारी ४४.२ अंश तापमान नोंदवल्या गेले. मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंशांवर होता. भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट आली आहे. अमरावतीचे तापमान ४४ अंश नोंदवले गेले आहे. तिसऱ्या क्रमांकावर वर्धा जिल्ह्याचे तापमान ४३.९ अंश नोंदवले गेले तर नागपूरचा पारा ४३.४ अंश राहिला आहे. अकोल्यात बुधवारी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा घेत सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती फुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने आदी उपस्थित होते. प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात १३७ खाटा राखीव ठेवल्या आहेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवा, उष्माघातापासून दक्षतेबाबत नागरिकांत जनजागृती करा, ग्रामीण भागात दवंडी द्या, शहरात होर्डिंग्ज, ध्वनीचित्रफीतीद्वारे जनजागृती करा, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान कामगारांसाठी आस्थापनांनी पेयजल, कुलर आदी सुविधा कराव्या. उन्हात अधिक वेळ श्रमाची कामे टाळावी, कारखान्यांच्या बॉयलर रुममध्ये काम टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी हे करा डोक्यावर टोपी, रुमाल बांधा किंवा छत्रीचा वापर करा, हलक्या रंगाचे सुती कपडे घाला, भरपूर पाणी प्या, ताक, लिंबूपाणी, नारळ पाण्याचे सेवन करा, दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात काम करणे टाळा, उन्हात अनवाणी चालू नका, लहान मुलांना बंद गाडीत ठेवू नका. मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड पेये टाळा.

28 C