केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले यांनी सांगितले की, बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी आमंत्रित केले असून, मी बारामतीला जाणार आहे. काँग्रेस पक्षाने अजित पवार यांचे योगदान लक्षात घेऊन ही जागा बिनविरोध निवडून द्यावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बारामतीमध्ये उमेदवार देऊ नये, अशी आमची भूमिका असल्याचे आठवले म्हणाले. अजित पवार हे राज्यातील एक मोठे नेते होते. त्यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आठवले यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले असल्याची माहितीही त्यांनी दिली. आठवले यांनी त्यांच्या राज्यसभा खासदारकीच्या तिसऱ्या कार्यकाळाबद्दल सांगितले. मला मिळालेल्या खासदार पदाचा उपयोग देशभरात पक्ष वाढवण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवण्यासाठी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मला पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे अनागोंदी सरकार असून, यंदाच्या निवडणुकीत भाजप सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेथे मी प्रचारात सक्रिय सहभाग घेणार आहे. आसाममध्ये चार ठिकाणी, तर तामिळनाडूमध्ये ४० उमेदवारांना आमच्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. तामिळनाडूमध्ये यंदा एनडीए सत्तेत येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पक्ष मान्यता टिकवून ठेवण्यासाठी विविध राज्यांमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहोत. पाँडिचेरीमध्ये आम्ही भाजपला साथ दिली आहे, तर केरळमध्ये एक जागा लढवत आहोत. सर्व जातींना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी आठवले यांनी केली. ओबीसींना देखील राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे. महिलांसाठी लोकसभेत २७३ जागा वाढवण्यासाठी लवकरच संसदेत विशेष विधेयक येणार आहे, ज्यामुळे महिलांना राजकारणात मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळेल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरपीआयला एक विधान परिषद आमदारकी आणि दोन महामंडळ पदे देण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाला लवकरच हा वाटा मिळावा, अशी आमची मागणी आहे, असे आठवले यांनी नमूद केले. पुणे महानगरपालिकेत भाजपने आरपीआयला उपमहापौर पद दिले आहे. त्यांच्यावर अन्याय होत नाही, पण त्यांना आवश्यक बैठकांना बोलावले गेले पाहिजे. दोन पक्षांमध्ये गैरसमज होऊ नयेत यासाठी चर्चा करून कोणताही वाद राहू नये, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. खरात प्रकरणाचा सखोल तपास व्हावा नाशिकचे अशोक खरात त्यांच्या चुकीमुळे गजाआड गेले आहे. मी कोणत्या ही भोंदूबाबाकडे जात नाही तरी मला राजकारणात सर्व पदे मिळत आहे. राजकारणी यांनी कोणत्याही अंधश्रद्धावर विश्वास ठेवू नये. पारदर्शक तपास याप्रकरणाबाबत सुरू असून सखोल तपास या गुन्ह्याचा झाला पाहिजे . चौकशी पूर्ण झाल्यावर सत्य बाब समोर येईल. अनेक जणांचे फोटो खरात यांच्या सोबत असले तरी प्रत्येकाचा त्यांच्याशी घनिष्ट संबंध असे म्हणता येणार नाही असे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
अशोक खरातचे वजन घटले; बारावा गुन्हा दाखल
नाशिक : प्रतिनिधी दुस-यांचे भविष्य सांगणा-या भोंदू अशोक खरातचे स्वत:चे भविष्यच आता अंध:कारमय झाले आहे. एसआयटी चौकशीत त्याच्या काळ्या कारनाम्यांची वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सततची चौकशी, त्यात असणारे विविध आजार यामु्ळे त्याचे वजन मागच्या काही दिवसांत ६ ते ७ किलोंनी कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले […] The post अशोक खरातचे वजन घटले; बारावा गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती : प्रतिनिधी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर अजित पवार यांच्या गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. अजित पवार गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली […] The post राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी
पुणे : प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ४०५ शासकीय शाळा आता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. तसेच, खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एका आदर्श शाळेत ‘क्रीडा प्रबोधिनी’ निर्माण केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे […] The post राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठी न बोलता येणा-या रिक्षाचालकांचा परवाना रद्द होणार?
मुंबई : प्रतिनिधी रिक्षा परवाना घेतल्यानंतरही मराठी बोलता येत नसलेल्या चालकांची पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षाचालकांच्या परवान्यांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात विविध शहरांमध्ये शासनाकडून रिक्षाचालकांना परवाने (परमीट) देण्यात आले असून, त्याच आधारे वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालवण्यास परवानगी […] The post मराठी न बोलता येणा-या रिक्षाचालकांचा परवाना रद्द होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठे 'राजकीय युद्ध' सुरू झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) बाहेर काढल्याने खळबळ उडाली असली, तरी विरोधकांना न मिळणारी गोपनीय माहिती दमानियांपर्यंत पोहोचतेच कशी? आणि या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव का नाही? असा टोकदार सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले. सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. अंजली दमानियांनी खरातचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले ही चांगली गोष्ट आहे. पण ही गुप्त माहिती त्यांना पुरवतंय कोण? असा सवाल अंधारे यांनी केला. दमानिया म्हणतात की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खरातला १७ कॉल केले होते. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंच्या दिशेने आहे. मात्र, ज्यांनी खरातच्या 'इशान्येश्वर' मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आणि १ कोटींचा निधी मंजूर केला, त्यांच्या कॉलचा रेकॉर्ड का समोर आला नाही? या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव नसणे ही मोठी 'गडबड' वाटते, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. एसआयटीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह अशोक खरातच्या संपत्तीची आणि त्याच्या संपर्कातील लोकांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या एसआयटीकडून (SIT) अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर का आली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिले होते, मग अद्याप गमे, आवारे आणि पोफळे यांना ताब्यात का घेण्यात आले नाही? एसआरए खात्यातील अधिकारी भांडे तिथे काय करत होते? सरकारला हे प्रकरण तडीला न्यायचे आहे की फक्त काही लोकांना राजकीयदृष्ट्या 'डॅमेज' करायचे आहे? असा घणाघात अंधारे यांनी केला. रूपाली चाकणकरांवर पुन्हा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली. चाकणकर यांना चौकशीचे समन्स निघाल्याची चर्चा असताना त्यांनी तीन दिवस मौन का बाळगले? मात्र, आता त्यांना कंठ फुटला आहे. या तीन दिवसांत त्यांनी तपास यंत्रणा 'मॅनेज' केल्या का? 'तपास यंत्रणा माझ्या हातात आहेत', असा संदेश त्या देऊ पाहत आहेत का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. केवळ चाकणकर यांना लक्ष्य करून चालणार नाही, तर या संपूर्ण प्रकरणामागील सुत्रधारांना शोधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. लेकींच्या अब्रूशी खेळू नका अशोक खरातने महाराष्ट्रातील अनेक लेकींच्या अब्रूशी खेळ मांडला आहे. अशा प्रवृत्तीला गजाआड पाठवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मात्र, सध्या ज्या प्रकारे गोपनीय माहिती बाहेर येत आहे, त्यावरून हे प्रकरण एका ठराविक दिशेने वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय येतो, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.
मजुराच्या लेकीची पोलिस शिपाई पदाला गवसणी
पुर्णा : हालाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत दिवसरात्र मजुरी करून मुलांना शिकवणा-या बापाच्या कष्टाला अखेर गोड फळ मिळाले आहे. पुर्णा तालुक्यातील अजदापुर येथील मजूर काम करणा-या नामदेव हिवरे यांची मुलगी सीमा हिवरे हिने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परभणी पोलिस भरतीत यश संपादन करत महिला पोलिस शिपाई पदाला गवसणी घातली आहे. तिचे हे यश […] The post मजुराच्या लेकीची पोलिस शिपाई पदाला गवसणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बोधवड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पूर्वी मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, पण आता तसं होणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी नाव न घेता जामनेरमधील एका बड्या मंत्र्यावर टीका केली. माझ्या राजीनाम्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारवायांचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत अधिकच खळबळजनक विधान केले. जे खरातकडे गेले असतील, त्यांच्यासोबत रात्र घालवली असेल, त्यांना जाऊन विचारा, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर गंभीर आरोपांचे संकेत दिले. खडसे यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख जामनेरकडे असल्याची चर्चा रंगली आहे. मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्ही समजून घ्या, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांच्याकडे इशारा केल्याचे मानले जात आहे. या सूचक वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जमीन खरेदी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे खडसे यांच्यावर दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. भुसावळ तालुक्यातील व्यवहारावरून हा गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून खडसेंवर टीका होत असताना त्यांनी मात्र संघर्षाची भूमिका घेतली आहे. खोट्या गुन्ह्यांना मी घाबरणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गिरीश महाजन यांचा पलटवार दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर पलटवार केला आहे. आम्ही कोणत्याही भोंदू बुवा-बाबाकडे जात नाही. अशा बाबकडे जाण्याची आम्हाला गरज नाही. कोणालाही हाथ दाखवून भविष्य पाहण्याची मला आवश्यकता नाही. माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. असे म्हणत महाजन यांनी खडसे हे बुवा-बाबाकडे जात असल्याचे म्हटले आहे. आमचे सरकार पडणार? असा दावा ते करत असतील तर त्यांना मंत्रीपदासाठी आमच्या शुभेच्छा, असे म्हणत महाजन यांनी खडसे यांना टोला लगावला आहे. नाथाभाऊ विरुद्ध गिरीशभाऊ वाद एकंदर पाहता, या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील नाथाभाऊ विरुद्ध गिरीशभाऊ, हा वाद पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. खडसे आणि महाजन यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात या प्रकरणावर कोणती राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
बारामती : प्रतिनिधी बारामती आणि राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुती प्रयत्नशील असली, तरीही महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धवसेना विरोधात उमेदवार देण्याचा विचार करत आहेत. काँग्रेसने तर उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून […] The post पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात १.३१ लाख हेक्टर रबी पिकांचे नुकसान
पुणे : प्रतिनिधी राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून, तब्बल १ लाख ३१ हजार ४६५ हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. गहू, हरभरा पिकांसह फळपिके आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मार्च महिन्यात राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये १ लाख २२ हजार ९९७ […] The post राज्यात १.३१ लाख हेक्टर रबी पिकांचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अनिल देशमुख-परमबीर सिंह एकाच व्यासपीठावर
जामठा : प्रतिनिधी विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार, ४ एप्रिल रोजी जामठा येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महाराष्ट्रातील राजकारणातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र, या शोकसभेमध्ये उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी. एकाच […] The post अनिल देशमुख-परमबीर सिंह एकाच व्यासपीठावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आखाती देशात युद्ध सुरू असल्याने शेतक-यांवर मोठा परिणाम होत आहे. भारत-अमेरिका कराराचा मोठा फटका शेतक-यांना बसणार आहे. भारताचे परराष्ट्र धोरण १०० टक्के चुकले आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे. शेतकरी संघटनेची पुढची रणनीती काय असावी, यावर शुक्रवार, ३ एप्रिल रोजी बैठक पार पडली. देशभरातील शेतकरी […] The post सरकारचे परराष्ट्र धोरण चुकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदली नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे यांच्या या इशाऱ्यामुळे भोंदू खरात प्रकरणात नाव येण्याची शक्यता असणाऱ्या अधिकारी वर्गात एकच खळबळ माजली आहे. भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या सर्वच प्रकरणांची एसआयटी अर्थात विशेष तपास पथक कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी खरातला मदत केल्याची माहितीही पुढे येत आहे. यात मंत्रालयापासून स्थानिक पातळीपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. सर्वच अधिकाऱ्यांवर होणार कारवाई चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी बोलताना म्हणाले, अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली केली जाणार नाही. त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार. मग हे अधिकारी कोणत्याही खात्याचे असले तरी काही फरक पडणार नाही. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. एसआयटी या प्रकरणी योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे यासंबंधी कुणाकडे काही पुरावे असतील तर ते एसआयटीला द्यावेत. नाशिकच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे जे काम झाले आहे, त्या लोकांवर अत्यंत कडक कारवाई केली जाईल. आमच्या अधिकाऱ्यांनी खरातला मदत केली असेल तर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. एसआयटी टीमकडून आमच्याकडे नाव आल्यानंतर त्यांना नोकरीवर ठेवले जाणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणात कुणीही सुटणार नाही. या प्रकरणी खरातच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशोक खरातला जमिनी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. सीएमओने बावनकुळेंना माहिती पुरवली नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री कार्यालय माहिती पुरवत असल्याचा आरोपही फेटाळून लावला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय अशी माहिती देणार नाही. त्यांनी स्वतः ही माहिती काढली असेल. त्यांनी त्यांच्याकडे असणारी माहिती एसआयटीला द्यावी. शिर्डी प्रकरणात माझ्याकडे सुनावणी लावली तर मी त्यावर निर्णय घेतो. दुष्कृत्यामध्ये सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे ते म्हणाले. हे ही वाचा... बावनकुळेंच्या कुटुंबीयांच्या नावे 1147 एकर जमीन?:सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती, गुन्हा दाखल; केवळ 28.44 एकर जमीन सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर जमीन असल्याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हेक्टर आणि आर मोजण्यात गल्लत झाल्यामुळे झाल्याचा दावा केला जात आहे. वाचा सविस्तर
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. या आधी पक्षाची जी भूमिका होती, त्याच भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. वास्तविक या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र तरी देखील काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आमची भावना कळवली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. यासंदर्भात चर्चा जरी सुरू असली तरी पक्षाने दोन्ही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केलेली आहे. उद्यापर्यंत उमेदवाराच नाव काँग्रेस पक्षाच्या वतीने अंतिम करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ सांगितले आहे. या पोटनिवडणूक संदर्भाची जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस पक्षात ठाम आहे. या संदर्भात राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील सर्व नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सपकाळ यांनी सांगितलं. त्यामुळे या संदर्भात उद्या दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे देखील ते म्हणाले. मन मोठे करून पाठिंबा दिला पाहिजे:फडणवीसांचे आवाहन या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थित होईल. यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे. मला आठवतं की, ज्या वेळेस आर. आर. आबांचे दुःखद निधन झालं होतं. त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. भाजपने ठरवले होते की, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठे करून बिनविरोध निवडणूक करायला हवी, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर आज 4 सभापतींची निवड प्रक्रिया पार पाडली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर जिल्हा परिषद सदस्यांमुळे बिनविरोध झाली. यावेळीही पोलिसांनी केवळ पत्रकारच नव्हे तर जिल्हा परिषद सदस्यांविषयीही आपला आडमुठेपणा दाखवला. सातारा जिल्हा परिषदेत आज समाज कल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापती तथा दोन विषय समित्यांच्या सभापतीची निवड प्रक्रिया पार पडली. त्यात समाज कल्याण सभापतीपदी भाजप सदस्य ऋषिकेश धायगुडे यांची निवड झाली, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे यांची निवड झाली. याशिवाय विषय समित्यांच्या सभापतीपदी भाजपच्या तेजस्विनी कदम व राष्ट्रवादीच्या लता कर्णे यांची निवड झाली. तत्पूर्वी, कालपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आज हे दोघेही काळ्या फिती लावून शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत एकत्र आले. पण राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे ऐनवळी गैरहजर राहिले. त्यामुळे अनिल देसाई व संदीप मांडवे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. शिवसेना - राष्ट्रवादीने केला निषेध दुसरीकडे, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे पक्षाच्या सदस्यांनी सभापती निवडीच्या वेळी दंडाला काळ्या फिती बांधून आपला निषेध व्यक्त केला. या सर्वांनी निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर ते आपला निषेध नोंदवण्यासाठी जिल्हा परिषद इमारतीच्या पायऱ्यांवर ठाण मांडून बसले होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या आडमुठेपणाविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते जमावबंदीचे आदेश उल्लेखनीय बाब म्हणजे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्य विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यामुळे आजच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ह्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खबरदारी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी केले होते.
भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गंभीर स्वरूप प्राप्त होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खरात हा केवळ भोंदू नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्याचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार-पाच देशांमध्ये हवाल्याच्या माध्यमातून पैशांची उलाढाल करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी सांगितले की, या व्यवहारांमध्ये केवळ वैयक्तिक फसवणूक नाही, तर भ्रष्ट अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचेही पैसे परदेशात पाठवले गेल्याची शक्यता आहे. हजारो कोटी रुपयांची रक्कम या मार्गाने बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याकडे केवळ एका गुन्हेगारी घटनेप्रमाणे न पाहता व्यापक आर्थिक आणि राजकीय संदर्भात तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे. विशेषतः अंमलबजावणी संचालनालय (ED) सारख्या संस्थांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कारण हवाल्याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचा संबंध थेट मनी लॉन्डरिंगशी जोडला जातो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ राज्य स्तरावर न होता राष्ट्रीय पातळीवर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी या मुद्द्याला राष्ट्रीय सुरक्षेशीही जोडले आहे. परदेशात मोठ्या प्रमाणावर पैसा पाठवला गेला असल्यास त्याचे परिणाम देशाच्या आर्थिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरू शकतात. त्यामुळे राज्य सरकारकडे यासंबंधी पुरावे उपलब्ध असतील, तर गृह विभागानेही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नको, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. धागेदोरे परदेशापर्यंत एकंदर पाहता, अशोक खरात प्रकरण आता केवळ स्थानिक गुन्ह्यापुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर करण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्रीय यंत्रणा आणि राज्य सरकार या दोन्हींकडून येत्या काळात काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण त्या काही रॉच्या प्रमुख नाहीत. त्यांच्याकडे कोणती यंत्रणा नाही. ही गुप्त माहिती त्यांना मिळाली ती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आल्याशिवाय मिळत नाही, त्यांचे आणि भाजपचे संबंध आहेच ते टाळूच शकत नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांनी एक निशाणा धरला आहे. संजय राऊत म्हणाले की, बाह्यशक्तीकडून धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते तेव्हा स्वकीय जास्त टार्गेटवर असतात. गोपनीय माहिती बाहेर येते म्हणजे सरकारच्या निशाण्यावर स्वकीय आहेत. प्रतापराव जाधव यांच्याकडे भोजनाचे आयोजन होत असते तिथे सर्वांचे जाणे येणं असते त्यामध्ये काही गैर नाही. दिल्लीमध्ये एकमेकांकडे जाणं येणे होत असते, त्यात काही वेगळे नाही. त्याचा आणि ऑपरेशन टायगरचा काहीही संबंध नाही. त्यावेळी पिंपरीत काटेंना उमेदवारी दिली होती संजय राऊत म्हणाले की, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर तिथे जी पोटनिवडणूक झाली तिथे अजित पवार यांच्या पक्षाने नाना काटे हा उमेदवार दिला होता. भाजपने सुद्धा अशा अनेक निवडणुका लढवल्या आहेत. भावना फक्त आम्हालाच असतात शिवसेनेला हे लक्षात घ्या. ही निवडणुक महायुती विरुद्ध मविआ अशी होणार आहे. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली पण त्यांनी काँग्रेसची चर्चा केली का याबद्दल मला माहिती नाही. बारामतीमध्ये पवारांना इतर कोणत्या पक्षाची गरज पडत नाही. त्यावर उद्धव ठाकरेंच बोलतील संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांची उद्धव ठाकरे यांची काय चर्चा झाली यावर त्यांची भूमिका काय यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे स्वत: पत्रकार परिषद घेत आपल्याशी संवाद साधतील. काँग्रेस बारामती निवडणूक लढवण्यावर ठाम आहे, त्यासाठी त्यांनी उमेदवारीसाठी 4 ते 5 लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितले आहे की अजित पवार माझे चांगले सहकारी होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच बारामती पोटनिवडणुकीवर बोलतील. काँग्रेस वेगळी भूमिका घेणार दिसते संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांचा पक्ष मविआमध्ये नाही तर महायुतीमध्ये आहे. मविआतील काँग्रेस पक्ष वेगळी भूमिका घेणार असे दिसत आहे. त्यामध्ये मविआ म्हणून आम्ही लक्ष घालावे असे मला वाटत नाही. पोटनिवडणुकीचा जो विषय आहे तो तिन्ही पक्षांनी एकत्र येत चर्चा करायला हवी. भाजपसोबत असलेल्या पक्षाला मदत होऊ नये अशी काँग्रेसची भूमिका असू शकते, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे भोंदू अशोक खरातसारखेच असल्याची टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. अनिल पाटील यांनी केलेल्या या तुलनेमुळे राष्ट्रवादी व ठाकरे गटातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पारोळा, पाचोरा व मुक्ताईनगर येथील शिंदे गटातील आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांची तुलना भोंदू अशोक खरातशी केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात ज्या प्रकारे खोटे भविष्य सांगून लोकांची दिशाभूल करत होता. त्याचप्रमाणे संजय राऊत सध्या राजकीय भविष्यवाणी करत आहेत. त्यांची भविष्यवाणी ही खरातच्या भविष्यवाणीसारखीच भ्रामक आहे, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रात सध्या संजय राऊत यांच्यासारखे नेते स्वतःला मोठे भविष्यकार समजत आहेत. पण त्यांनी इतर पक्षांविषयी अंदाज व्यक्त करण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. सध्या त्यांच्याच पक्षातील अनेक आमदार व खासदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर स्वतःचे घर सांभाळावे व नंतर इतरांवर भाष्य करावे, असे ते म्हणाले. अनिल पाटील यांच्या या विधानावर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. परिणामी, पुढील काही दिवस राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. अंजली दमानियांना CMO ने माहिती पुरवली - संजय राऊत दुसरीकडे, संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच माहिती पुरवली जात असल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, अंजली दमानिया या रॉ (RAW) च्या प्रमुख नाहीत. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे गुप्तहेर खातेही नाही. याचा अर्थ त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय मिळणार नाही. ही एवढी गुप्त माहिती आहे की, ती कोणताही व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. आता त्यांचे व मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. ही एकूण परिस्थिती पाहता सरकारच्या टार्गेटवर कुणीही आहे हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नेम धरला आहे. तो नेम काय आहे? ते तुम्हाला कळेल. जेव्हा बाह्यशक्तीकडून धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते, ती जनतेपर्यंत पोहोचवली जाते, तेव्हा सरकारच्या निशाण्यावर स्वकीय टार्गेटवर आहेत असा त्याचा अर्थ होतो, असे संजय राऊत म्हणाले. हे ही वाचा...
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. सर्वच पक्षांनी मन मोठे करून त्यांना पाठिंबा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पोटनिवडणुकीची आठवण काढत, ती निवडणूक देखील बिनविरोध केली असल्याचे सांगितले. या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थित होईल. यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे. मला आठवतं की, ज्या वेळेस आर. आर. आबांचे दुःखद निधन झालं होतं. त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. भाजपने ठरवले होते की, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठे करून बिनविरोध निवडणूक करायला हवी, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुनेत्रा पवारांनी शिवसेनेचा पाठिंबा मागितला या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांनी याआधी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता आमदारकीसाठी त्या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फोन संभाषणात सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे. सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस उमेदवार देणारच काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्व काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राहुरी मतदारसंघातही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप आणि रणनीती यावरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीसाठी सहा अर्ज तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
पंढरपूर : नाशकात कार विहिरीत पडल्याने मोठा अपघात झाला, त्या अपघातात ९ जण ठार झाले, ही घटना ताजी असतानाच इरटीका कार कालव्यात पडल्याने ३ जणांचा मृत्यू झाला. ही घटना पंढरपूरच्या नातेपुते निरा उजव्या कालव्यादरम्यान घडली. पंढरपूरच्या नातेपुते जवळ निरा उजवा कालव्याच्या पुलावरून एक ईरटीका गाडी अचानक कालव्यात पडली. ही कार मुंबईवरून फोंडशिरसकडे जात असताना थेट […] The post कार कालव्यात बुडाली; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक:वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात सुरूवातीला बिनविरोध'' निवडणुकीची चर्चा झाली. पण जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसे इच्छुकांची भाऊगर्दी वाढताना दिसत आहे. भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षश्रेष्ठींकडून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. पण निवडणुकीच्या मैदानात विरोधकांची संख्या वाढत असून भाजपपुढे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. वंचितकडून अहिल्यानगर कार्यकारिणीच्या बैठकीत अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेससुद्धा निवडणूक लढण्यास इच्छूक राहुरीच्या या रणांगणात आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे वंचितने आपला उमेदवार जाहीर केला असताना, दुसरीकडे काँग्रेसनेही राहुरी आणि बारामतीमध्ये निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही स्वतंत्र उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने ही लढत बहुरंगी आणि चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रयत्न बिनविरोध''साठी,पण चर्चा विरोधकांची''! अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत 50 इच्छुकांनी तब्बल 103 अर्ज नेले. तर गोविंद मोकाटे यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल करत श्रीगणेशा केला आहे. 6 एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून, 9 एप्रिलच्या माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल. केवळ कर्डिले आणि तनपुरेच नव्हे, तर काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजुभाऊ शेटे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेबठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारीअर्ज नेल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची भूमिका गुलदस्त्यात आहे. याशिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बसपा, आरपीआय (आठवलेगट) आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही दंड थोपटले आहेत. वरवर पाहता ही निवडणूक सोपी वाटत असली तरी, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या काही गटांना शांत ठेवणे भाजपसाठी कठीण जात आहे. निवडणूक बिनविरोध'' करण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते, मात्र इच्छुकांची वाढती संख्या पाहता आता या नेत्यांना थांबवून निवडणूक एकतर्फी करणे हे भाजपसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. 9 एप्रिलपर्यंत किती जणांचे मन वळवण्यात भाजपला यश येते, यावर निवडणुकीची गणिते अवलंबून असतील.
गत काही महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणारे नांदेड शहर शुक्रवारी पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरने हादरले. ताज्या घटनेत 3 जणांची निर्घृण हत्या झाली असून, 3 जण गंभीर जखमी झालेत. दोन टोळ्यांतील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. पण रस्त्यावर झालेला हा वाद नंतर थेट रुग्णालयापर्यंत पोहोचला आणि परिस्थिती आणखी चिघळली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात असलेल्या ई-स्वेअरलगत शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास 2 टोळ्यांत वाद झाला. त्यावेळी अरिजितसिंग चव्हाण हा धुरंधर-2 चित्रपट पाहून घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज व इतर काही हल्लेखोरांनी तलवार व खंजीरने हल्ला केला. त्यात 25 वर्षीय अरिजितसिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील व इतर एकाला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिकडे हल्लेखोरांना सरकारी दवाखान्यात दाखल केल्याची गोष्ट अरिजितसिंग चव्हाणच्या भावाला समजली. त्यानंतर त्याने तत्काळ रुग्णालयाच्या धाव घेतली. तिथे त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील (27) व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच हल्लकल्लोळ माजला. पोलिसांनी काय दिली माहिती? पोलिसांनी या घटनेविषयी सांगितले की, शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेतील दोन्ही टोळ्यांची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एका टोळीचा सदस्य अनिल पंजाबी हा सध्या तुरुंगात आहे. तर साहिल 2 महिन्यांपूर्वीच तुरुंगाबाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वीही कारवाई झाली होती. दुसरीडे, मृत अरिजितसिंग चव्हाणवर तब्बल 9 गुन्हे दाखल होते. त्याच्यासोबत आणखी एक जण होता. त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे. प्रस्तुत घटनेत अरिजितसिंग चव्हाणसह अरबाज व आवेज या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अरबाज, आवेजसह इतर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला गंभीरावस्थेत विष्णुपुरी स्थित सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अरिजितचा मृतदेहही तिथेच होता. त्यामुळे त्याचा भाऊ व वडिल तिथेच होते. त्याच्या भावाने तिथेच जखमींवर चाकू हल्ला केला. त्यात दोघेही ठार झाले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हडपसरमध्ये विद्यार्थी बसचा अपघात:25 ते 30 जखमी, विजेच्या खांबाला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, हडपसर येथील काळेपडळ परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमोल विनायक बोराटे (रा. महादेव मंदिराजवळ, काळेबोराटेनगर, हडपसर) या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसकर्मचारी नंदकुमार जावळे यांनी काळेपडळ पोलिसठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक हडपसरमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. काळेपडळ परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. या धडकेत बसमधील 25 ते 30 विद्यार्थ्यांना दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भरधाव वेगाने बस चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बसच्या धडकेने विजेचा खांब पूर्णपणे वाकला होता. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल महिलेचा वारंवार पाठलाग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निहाल लतिफ शेख (33, रा. कात्रज नवीन वसाहत, कात्रज) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 33 वर्षीय महिलेनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2017 ते ऑक्टोबर 2025 दरम्यान घडला.
पुणे शहरातील बिबवेवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बालविकास प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका स्वाती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइन 1098 कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा उलगडा झाला. सुपरवायझर मोनिका जाधव आणि संबंधित पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मुलीचा विवाह झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळेचा दाखला तपासण्यात आला असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम 9, 10 आणि 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची भूमिका तपासण्यास सुरुवात केली असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले
तिहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले, गँगवॉरमधून घडला थरार
नांदेड : प्रतिनिधी गँगवॉर मधील वर्चस्वातून नांदेड शहरात तिहेरी हत्याकांडाची घटना शनिवारी पहाटे घडली. यात एकाची निळा रोड लगतच्या कॅनल रोडवरील ई-स्क्वेअर परिसरात करण्यात आली तर ‘खून का बदला खून’ असे म्हणत या मयत तरुणाच्या भावाने हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांची शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाचा चाकूने वार करून हत्या केली. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ […] The post तिहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले, गँगवॉरमधून घडला थरार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा समाजापासून दलित, मुस्लीम, धनगरसमाज तुटला नाही पाहिजे. मराठा समाजापासून इतर समाज तोडण्याचे कुणाचे काही षंड्यत्र आहे का हे सुद्धा मराठा समाजाने बघितले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्राण आहेत, पुतळे बसवा पण त्याच्याआडून दुसरे काही सुरू नाही ना? याकडे लक्ष दिले पाहिजे. मनोज जरांगे म्हणाले की, वाद होतील अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारू नका. आपल्या राजांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे. त्यांनी जे केले ते कुणीही करु शकलेले नाही. छत्रपती शिवराय यांचा पुतळा वाद होईल अशा ठिकाणी बसवू नये. हे काही षंड्यत्र आहे का हे पाहिले पाहिजे. षंड्यत्र झाले की झाल्या जातीय दंगली सुरू. मराठ्यापासून दलित, मुस्लीम, धनगर तुटू नये याची काळजी घेतली पाहिजे. शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? मनोज जरांगे म्हणाले की, शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? ते लावण्यास सांगत मराठा समाजाच्या विरोधात इतर सर्व समाज करण्याचा प्रयत्न कोण करतंय का? यात मी लक्ष घालणार आहे. कारण विनाकारण दलित-मराठा वाद होत आहे. माझा समाज आणि मी यामध्ये बदनाम होत आहोत. मराठा समाज पुतळे बसवत नाहीये, आम्ही असे काही कोणाला सांगत नाही. बाहेर वेगळे मेसेज जात आहेत असे मला समजले. मराठ्याच्या अंगावर दलित, मुस्लीम, धनगर घालायचा पुतळ्याच्या आडून हे कोणी करतंय का याची माहिती घ्यावी लागेल. कोणाची प्रामाणिक इच्छा सुद्धा यामागे असू शकते. जागा विकत घेत आपण पुतळे बसवू, पण वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसवू नका. वाद मिटला ही चांगली गोष्ट मनोज जरांगे म्हणाले की, सोलापूरच्या अंजनगावमधील वाद मिटला ही चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्व समाजाला एकत्र ठेवले आहे.त्याच विचाराने आपण पुढे चालणं गरजेचे आहे. या गोष्टीच्या मागे कोण होते हे पोलिस शोधून काढतील आणि दोन्ही समाज तिथे एकत्र राहतील. दोन-चार लोकं वाद निर्माण करत असतात त्यामुळे सर्व समाजाने वाद वाढवायचा नसता. जर प्रकरण मिटले नसते तर तोडगा काढण्यासाठी तिथे जाणार होतो. आता तिथे जाण्याची गरज नाही. वाद नाही, तो लावला जात आहे का? हे शोधले पाहिजे. पुतळा कोणी विकला हे शोधणं गरजेचे आहे. माझ्यासोबत फोटो काढत मी त्यांच्यासोबत आहे असे म्हणत मला कोणी बदनाम करू नये.
सांगली शहरातील राम मंदिर चौकात आज पहाटे अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा रविवारी शहरातील त्रिकोणी बागेत बसवण्यात येणार होता. पण तत्पूर्वीच तो राम मंदिर चौकात बसवण्यात आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा पुतळा तेथून काढला. यासंबंधीच्या माहितीनुसार, शहरातील त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार होते. त्याचे भूमिपूजन आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते होणार होते. पण तत्पूर्वीच शिवतेज सावंत, आदित्य नाईक, आशिष खिचडे, अमित पाटील, सुजल कांबळे, राहुल माने, ऋषिकेश भोई आदी 60-70 जणांनी एकत्रित येऊन शनिवारी पहाटे 4.30 वा. हा पुतळा राम मंदिर चौकातील चबुतऱ्यावर उभारला. कार्यकर्त्यांचा युक्तिवाद काय? या कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तुत पुतळा राम मंदिर चौकातील चबुतऱ्यावर बसवण्यासाठी 16-17 वेळा आंदोलने करण्यात आली. त्यासाठी अनेक निवेदने दिली. त्यानंतरही प्रतापसिंह उद्यानात पुतळा बसवण्याचे मनपाने मान्य केले. पण त्यानंतर अचानक हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचा ठराव घेण्यात आला. ज्या लोकांनी पुतळ्यासाठी पाठपुरावा केला, त्यांना विचारात न घेता पुतळ्याचे ठिकाण बदलण्यात आले. रणभूमीत लढलेल्या योद्ध्याचा पुतळा बागेत बसवणे हे आम्हाला मान्य नव्हते. त्यामुळे आम्ही हा पुतळा राम मंदिर चौकात बसवला. ते पुढे म्हणाले, शहारातील सिव्हिल हॉस्पिटल व बस स्थानकाकडे जाणारा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा सणही चांगल्या पद्धतीने साजरा करता येणार नाही. काही नेत्यांच्या हट्टामुळे हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचा घाट घालण्यात आला. त्याला आमचा विरोध आहे. काय म्हणाले पोलिस अधिकारी? दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराजांचा उद्या त्रिकोणी बागेत उभारण्यात येणारा पुतळा शनिवारीच राम मंदिर चौकात बसवण्यात आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा पुतळा तेथून हटवला. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी या प्रकरणी सांगितले की, राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याची बाब अवघ्या 10 मिनिटांतच आमच्या गुड मॉर्निंग पथकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर डीवायएसपी संदिप भागवत यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी 6.40 वा. संबंधितांनीच पुतळा काढून घेतला. या प्रकरणी आता मनपात बैठक होईल. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाने तत्काळ धाव घेतली होती.
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर अजित पवार यांच्या गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील 15 ते 20 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. अजित पवार गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असून भविष्यातील राजकीय दिशा काय असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पक्षातील वाढत्या अस्थिरतेमुळे आणि अंतर्गत वादांमुळे काही नेते पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय तपासत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, पक्षातील सततच्या संघर्षाचा थेट परिणाम आमदारांच्या मतदारसंघावर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मतदारांमध्येही नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपले राजकीय नुकसान होईल, अशी भीती अनेक आमदारांना वाटत आहे. त्यामुळे काही जण शरद पवार गटाकडे झुकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अंतर्गत असंतोष उघडपणे समोर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सलोखा होण्याची शक्यता कमी दिसत असली, तरी अंतर्गत असंतोष मात्र उघडपणे समोर येत आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काळात अजित पवार गटातील आमदारांचा अंतिम निर्णय काय होतो, यावरच पुढील राजकीय दिशा ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग निधी खर्चात सपशेल नापास झाला असून विभागाचा तब्बल 29 लाखांचा निधी समग्र शिक्षा अभियानाकडे परत करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावी परिक्षा असल्यामुळे निधी खर्चाचे नियोजन झाले नसल्याचे कारण शिक्षण विभागाने दिले आहे. यामध्ये अविष्कार अभियान व विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या निधीचा समावेश आहे. राज्यात समग्र शिक्षा अभियानांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयास विविध उपक्रमांसाठी निधी दिला जातो. यामध्ये शाळा दुरुस्ती, शाळा बांधकामे, संयुक्त शाळा अनुदान, दिव्यांग समावेशीत शिक्षण या शिवाय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी अविष्कार अभियान राबविण्यासाठी निधी दिला जातो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उपलब्ध निधीतून शाळा दुुरस्ती व बांधकामाच्या कामासोबतच विद्यार्थ्यांच्या दैाऱ्यासाठी मिळालेल्या निधीचे नियोजन करणे अपेक्षीत असून सदर निधी खर्च करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या जातात. निधी खर्च न त्याची कारणे नमुद करून निधी समग्र शिक्षा अभियानाकडे परत पाठविणे आवश्यक आहे. मात्र शिक्षण विभागाचे योग्य नियोजन असल्यास उपलब्ध निधी परत जात नाही. मात्र हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कुचकामी नियोजनामुळे तब्बल 29 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. यामध्ये काही निधी खर्च होऊन शिल्लक राहिल्यामुळे परत गेला तर विद्यार्थ्यासाठी प्राप्त झालेल्या निधीचे दहावी व बारावीच्या परिक्षेमुळे नियोजन करता आले नसल्याचे कारण देत निधी परत करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अविष्कार अभियान तसेच अभ्यास दौऱ्याला विद्यार्थी मुकले असल्याचे चित्र आहे. समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी 2.87 लाख रुपये तर अविष्कार अभियानासाठी 5.75 लाखांचा निधी उपलब्ध केला होता. सदर दोन्ही निधी परत करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. या शिवाय इयत्ता आकरावी व बारावीच्या प्रयोगशाळेसाठी मिळालेला 4 लाखांचा निधी जिल्हा परिषद शाळेत सदर वर्ग नसल्याचे कारण दाखवत परत करण्यात आला आहे.
लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे अटक झालेल्या अशोक खरात याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या खरातला 18 मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यानंतरपासून तो पोलिस कोठडीत असून विशेष तपास पथकाकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान त्याचे अनेक काळे कारनामे उघड झाले असून हे प्रकरण केवळ अत्याचारापुरते मर्यादित नसून ब्लॅकमेलिंग, अश्लील व्हिडीओ तयार करणे आणि आर्थिक फसवणूक यासारख्या गंभीर बाबीही समोर आल्या आहेत. दरम्यान, खरातच्या प्रकृतीबाबतही चिंताजनक माहिती समोर आली आहे. अटकेनंतर त्याचे वजन सुमारे 6 ते 7 किलोने घटल्याचे समजते. अटकेच्या वेळी त्याचे वजन 79 किलो होते, मात्र सध्या त्यात मोठी घट झाली आहे. त्याला पाच विविध आजारांनी ग्रासल्याची माहिती असून सतत औषधोपचार सुरू आहेत. आजारांमुळे तो अशक्त झाला असून त्याची तब्येत साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. अटक होण्यापूर्वी ऐषारामी जीवन जगणारा खरात आता पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी ताठ मानेने फिरणारा आणि लोकांना भविष्य सांगण्याचा दावा करणारा हा व्यक्ती आता गजाआड आहे. 17-18 दिवसांपूर्वी मोकळेपणाने फिरणाऱ्या खरातला आता छोट्याशा कोठडीत दिवस काढावे लागत आहेत. त्याच्या आयुष्यात झालेला हा अचानक बदल त्याच्यासाठी धक्कादायक ठरत असून मानसिकदृष्ट्याही तो खचल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान उघड झालेल्या माहितीमुळे पोलिस आणि तपास अधिकारीही चक्रावले आहेत. महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करणे, त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करून धमकावणे आणि वारंवार अत्याचार करणे, तसेच इतर भक्तांना फसवून आर्थिक फायदा मिळवणे अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी त्याला पॅरालिसिसचा झटका एकीकडे आजारपण आणि दुसरीकडे पोलिसांची सततची चौकशी या दुहेरी ताणामुळे खरात पूर्णपणे हवालदिल झाल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी त्याला पॅरालिसिसचा झटका आला होता आणि त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. एका हाताची हालचाल व्यवस्थित होत नसल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत त्याच्यावर औषधांचा मारा सुरू असताना चौकशीचाही दबाव कायम आहे. एकंदर पाहता, स्वतःच्या कृत्यांमुळेच खरात आज गंभीर अडचणीत सापडला असून त्याचे भविष्य पूर्णपणे अनिश्चित झाल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश वेगाने पसरत असून, त्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. संबंधित संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता सलमान खान यांच्या नावाचा वापर करून मंत्रालयात ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ नावाचा कक्ष सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच गरजू रुग्णांना २५ लाखांपर्यंत आर्थिक मदत, ‘शेटे साहेब’ यांचा संपर्क क्रमांक, ‘Being Human’ संस्थेचा ईमेल, दादरमधील ‘HOPE SPECIALITY PHARMA’ आणि नाशिकमधील ‘आरोग्यदूत’ संस्थेमार्फत स्वस्त औषधे व मोफत उपचार मिळतील, असेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून संबंधित संदेश पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयात ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ नावाचा कोणताही कक्ष किंवा योजना अस्तित्वात नाही. सातव्या मजल्यावर केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अधिकृतपणे कार्यरत आहे. अशा प्रकारचे संदेश समाजमाध्यमांवर वेगाने पसरत असल्याने नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. विशेषतः वैद्यकीय मदतीसारख्या संवेदनशील विषयांमध्ये अफवांवर विश्वास ठेवल्यास गरजू रुग्णांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक आहे. वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी केवळ अधिकृत माध्यमांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, “राज्यात सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सलमान खान यांच्या नावाने ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ आदींबाबत फिरणारे संदेश पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे आहेत. मंत्रालयात अशा प्रकारची कोणतीही योजना किंवा कक्ष अस्तित्वात नसून, सातव्या मजल्यावर केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अधिकृतरीत्या कार्यरत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी रुग्णांनी १८००१२३२२११ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. नागरिकांनी अशा फसव्या संदेशांपासून सावध राहावे आणि गरजू रुग्णांना खरोखर मदत हवी असेल तर फक्त अधिकृत चॅनेल्सचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसऱ्यांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरातचे स्वतःचे भविष्यच आता अंधकारमय झाले आहे. एसआयटी चौकशीत त्याच्या काळ्या कारनाम्यांची वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सततची चौकशी, त्यात अंगी असणारे विविध आजार यामु्ळे त्याचे वजन घटले आहे. तसेच प्रकृतीही खंगली आहे. भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या सर्वच प्रकरणांत एसआयटी अर्थात विशेष तपास पथक त्याची कसून चौकशी करत आहे. पण अशोक खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोठडीत त्याचे वजन कमी होऊन प्रकृती खंगल्याची बाब समोर आली आहे. कोठडीत औषधोपचार, पण प्रकृती साथ देईना भोंदू अशोक खरात 17-18 दिवसांपूर्वी उघडपणे समाजात वावरत होता. पण आज त्याच्यावर छोट्याशा कोठडीत आपले आयुष्य काढण्याची वेळ आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरातचे पोलिस कोठडीत झपाट्याने वजन कमी झाले आहे. विविध आजारांमुळे त्याचे शरीरही खंगले आहे. त्यातच त्याला सततच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तो सध्या प्रचंड तणावाखाली आहे. त्याला जवळपास 5 आजार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणी त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. पण सध्या तो हवालदिल झाल्यासारखे वर्तन करत आहे. मागच्या काही दिवसांत अशोक खरातचे वजन 6 ते 7 किलोंनी कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. 18 मार्च रोजी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याचे वजन 79 किलो होते. पण आता त्यात बरीच घट झाल्याची माहिती आहे. यावरून त्याची प्रकृती त्याची साथ देत नसल्याचे स्पष्ट होते. खरातला काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा त्याच्यावर उपचार झाले होते. पण त्याचा फटका त्याला आज बसत आहे. त्याच्या एका हाताची हालचाल सध्या नीट होत नसल्याचे समजते. कांदा व्यापाऱ्याने दाखल केला 12 वा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत अशोक खरातविरोधात बारावा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा एका कांदा व्यापाऱ्याने दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू खरातने कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. त्याने व्यापाऱ्याकडून 60 लाख रुपये किंमत असलेली जागा वृद्धाश्रमाच्या नावावर केवळ 22 लाख 25 हजार रुपयांत खरेदी केली. इतकेच नाही, तर वृद्धाश्रमाच्या जागेच्या बदल्यात चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. यातून त्याने व्यापाऱ्याकडून तब्बल 85 लाख रुपये उकळले, परंतु कोणतीही जागा दिली नाही. ...अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आरोपी खरातने कांदा व्यापाऱ्याची केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही, तर त्याने व्यापाऱ्याला मानसिक त्रासही दिला. व्यापाऱ्याने आपल्या पैशांचा किंवा जागेचा तगादा लावला, तेव्हा 'जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल,' असा शाप त्याने त्या व्यापाऱ्याला दिला. मागील अनेक दिवसांपासून खरात या व्यापाऱ्याचा असा छळ करत होता. शिंदेंचे खरातला 17, चाकणकरांचे 177 कॉल सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते. हे एवढे कॉल त्यांनी का केले होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. नीलम गोऱ्हेंनी घेतली होती खरातची भेट - तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच मला माहिती दिली होती. याचे पुरावे योग्य वेळी व योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्यात. दरम्यान, रुपाली चाकणकरांनी स्वतःहून एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे, असेही त्या म्हणाल्यात. महिलांना गर्भपाताची औषधी दिल्याचा संशय उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. पण त्यापैकी एकही महिला गरोदर झाली नव्हती. त्यामुळे अशोक खरात महिलांना एखादी गर्भनिरोधक औषधी देत होता काय? या प्रश्नाचे उत्तर एसआयटी शोधत आहे. या प्रकरणी एसआयटी नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी करण्याचीही चौकशी आहे. हे डॉक्टर अशोक खरातच्या नियमित संपर्कात होते. एसआयटी या प्रकरणी बुधवारी कोर्टात एखादी नवी माहिती सादर करण्याची शक्यता आहे.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाही, ते कडक कारवाई करतील. खरातमुळे हिंदू धर्माला गालबोट लागले आहे, पुजेच्या नावाने जो महिलांचे शोषण करत होता, त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, खरात प्रकरणाची जास्त काही माहिती आपल्याकडे नाही. मी कालच दिल्लीतून पुण्यात आले. पुण्यात आल्यापासून मी म्हशी प्रकरणाकडे लक्ष देऊन आहे.पण या प्रकरणी जे जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. खरातने हिंदू धर्माला गालबोट लागेल असे कृत्य केलं, जनतेने भोंदू बाबांना ओळखले पाहिजे, त्याला महादेव आणि माता पार्वतीचा श्रीप लागला आहे. तो एकतर जेलमध्ये सडेल किंवा त्यांच्यावर मोठी कारवाई होईल. म्हशींच्या व्यवहारात टिपूचा काय संबंध? पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात काल टिपू सुलतानच्या घोषणा दिल्या गेल्या. म्हशी खरेदी-विक्री सुरू असेल तर त्यामध्ये टिपू सुलतानचा काय संबंध आहे. प्रत्येक ठिकाणी हे सुरू आहेत मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. टेम्पो पोलिसांकडे का नाही? मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पोलिसांनी म्हशींना भरलेला टेम्पोवर कारवाई केली, त्यांच्यावर FIR दाखल केला आणि तो टेम्पो म्हशीसह दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात दिला. याच टेम्पोवर यापूर्वी कारवाई झाली आहे, तर म्हशीसुद्धा दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आला. पोलिसांनी तक्रार दिलेल्या व्यक्तीची माहिती सुद्धा घेतली नाही. यासंदर्भात कारवाई करण्यात यावी म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिस या रॅकेटमध्ये सहभागी आहेत का? मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, वानवडीमध्ये 4 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. प्रशासनच जर नियम मोडत असेल तर काय करायचे. ती जी गाडी पकडण्यात आली होती त्यामध्ये नियमांपेक्षा जास्त म्हशी भरल्या होत्या. म्हशी गोवंशात येत नसल्या तरी त्यांना अनुसूचित प्राणी म्हणून दर्जा देण्यात आला आहे त्यावर काही नियम आहेत. म्हशी कापण्यासाठी मिळणारा दाखला त्यांच्याकडे नव्हता. तरी सुद्धा ती गाडी म्हशीची कत्तल करण्यासाठी चालली होती. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा दाखला मिळाला नाही. त्याच्यावर FIR दाखल झाला तर ती गाडी शासनाच्या ताब्यात पाहिजे ना? पोलिसांनी ती गाडी जप्त करायला हवी होती, म्हशी गोशाळेत पाठवायला पाहिजे होत्या. पण ज्यांनी व्यवहार केला त्यांच्याकडेच ह्या म्हशी देण्यात आल्या. त्यांनी त्या तिथे ठेवल्याच नाही. त्यांनी त्या म्हशी मावळला नेल्या. हे जे रॅकेट आहे त्यांना कायद्याचे काही देणंघेणं नाही. आरोपीवर यापूर्वी 25 ते 30 गुन्हे दाखल आहेत, तरी त्याच्यावर कारवाई केली नाही. उलट कारवाईची मागणी करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले. पोलिस या रॅकेटमध्ये सहभागी आहेत का अशी शंका निर्माण होते असे खासदार कुलकर्णी यांनी म्हटले आहे. पीआयने चुकीचा तपास केला मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, भाऊसाहेब पाटील नावाच्या पीआयने संपूर्ण तपास चुकीच्या पद्धतीने केला आहे. त्यांना निलंबित केले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. त्यांच्या हद्दीत दरवेळेला मोठ्या प्रमाणात गोमांस सापडते, मासं विक्रीची दुकाने आहेत त्यावर शहानिशा होत नाही. मी आंबेगावमधील मुलांना 8 तारखेला जी अटक झाली त्या संदर्भात पोलिस आयुक्तांना फोन केला होता. म्हशीची नुसतीच खरेदी विक्री असेल तर त्यामध्ये विशिष्ट समाजाचेच लोकं त्यामध्ये कसे असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
AI शिक्षण अन् समाजात मोठे परिवर्तन घडवते:भारती विद्यापीठात 'रिस्पॉन्सिबल एआय' परिषदेचे उद्घाटन
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'रिस्पॉन्सिबल, रिस्क-अवेयर अँड रेग्युलेटेड एआय' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. डॉ. नीरज सक्सेना यांच्या हस्ते झालेल्या या परिषदेत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण आणि समाजात मोठे परिवर्तन घडत असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला डॉ. नीलांजन डे, डॉ. अस्मिता जगताप आणि कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसीय या परिषदेत जगभरातील दहा प्रमुख तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती, आव्हाने आणि नियामक चौकटींवर सखोल चर्चा हे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. परिषदेसाठी 800 हून अधिक संशोधन लेख प्राप्त झाले असून, त्यापैकी 368 निवडक लेख विविध नामांकित आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध केले जातील. उद्घाटनप्रसंगी डॉ. सक्सेना यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण आणि समाजात मोठे बदल होत असल्याचे सांगितले. पारंपरिक अभ्यासक्रम, वर्गखोल्या आणि परीक्षांचे महत्त्व कमी होत असून, कौशल्याधारित शिक्षण, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेला अधिक प्राधान्य मिळत आहे, असे ते म्हणाले. शिक्षणाचे भविष्य केवळ उत्तरांमध्ये नसून विचारक्षमतेमध्ये आहे, यावर त्यांनी भर दिला. डॉ. अस्मिता जगताप यांनी एआयच्या नैतिकतेवर भर दिला. जबाबदारीशिवाय नवकल्पना धोकादायक ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आरोग्य, शिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात मानवी संवेदनशीलता जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डॉ. नीलांजन डे यांनी 'डार्क डेटा'च्या जोखमींबाबत इशारा दिला. चुकीच्या माहितीमुळे चुकीचे निष्कर्ष निघू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विवेक सावजी यांनी एआयचा जबाबदारीने आणि नियमनबद्ध वापर करण्याचे महत्त्व सांगितले. अशा परिषदांमुळे ज्ञानविनिमय, संशोधन आणि व्यावहारिक उपाययोजनांना चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात 28 व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. युवा शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांच्या सुमधुर गायनाने आणि पं. नानासाहेब पानसे यांच्या पखवाज घराण्याचे युवा वादक कृष्णा साळुंखे यांच्या दमदार पखवाज वादनाने महोत्सवाचा श्रीगणेशा झाला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळातर्फे दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात संपन्न होत आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, बासरीवादक दीपक भानुसे, गायक पं. रघुनाथ खंडाळकर आणि वास्तू उद्योजक अजित घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, संगीत आपल्या जीवनात हवेची हळुवार झुळूक घेऊन येते. पं. सुधाकर चव्हाण आणि कलाश्री संगीत मंडळाने पिंपरी चिंचवड शहरात ही समाधानाची झुळूक आणण्याचे काम केले आहे, यासाठी रसिक त्यांचे ऋणी आहेत. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान विकास दिनासोबतच विरासत दिन साजरा करून संस्कृती आणि संगीताला चालना देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्रीही कलागुणांना प्रोत्साहन देतात. कै. लक्ष्मण जगताप यांनी कोरोना काळात कलाकारांना मदत केली होती आणि ग. दि. माडगूळकर नाट्यगृह तसेच नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. भविष्यातही संस्कृतीला चालना देण्याचे काम असेच सुरू ठेवणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. काळाच्या ओघात मागे पडत चाललेले अखिल भारतीय शास्त्रीय संगीत कलाश्री महोत्सवांसारख्या उपक्रमांमुळे पुन्हा रसिकांना अनुभवता येत आहे, याचा आनंद आहे. मानसिक त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकाने शास्त्रीय संगीताकडे वळावे, ज्यामुळे डॉक्टरांची गरज भासणार नाही, असेही जगताप यांनी नमूद केले.
पुण्यात बांधकाम वादातून नागरिकाला धमकी:राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल
बांधकाम वादातून एका नागरिकाला धमकावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर पोलीस ठाण्याबाहेरच ही घटना घडली असून, सचिन रघुनाथ चाकणकर (वय 46, रा. बाणेर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन चाकणकर यांचा त्यांच्या चुलत भावांशी मालमत्तेवरून वाद सुरू आहे. या वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला पुणे महानगरपालिकेने 'स्टॉप वर्क' नोटीस बजावली होती. असे असतानाही बांधकाम सुरूच असल्याने चाकणकर कुटुंबीयांसह या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे तेथे आले. त्यांनी चाकणकर यांच्याशी वाद घालत, माझ्या कार्यकर्त्यांचे काम थांबवतोस का? तुझे घरही पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच, नगरसेवकाने आपल्या चालकाला 'बांबू काढ' असे सांगत मारहाणीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली. प्लॉट विक्रीमध्ये फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल दोन हजार स्केअर फुटचा मोकळा प्लॉट दाखवून त्या बदल्यात 48 लाख रूपये घेऊन प्लॉट न देता फसवणूक केलयाप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिष गिरीधरीलाल चौधरी (48), दिनेशकुमार गिरीधरीलाल चौधरी (45), सुरेश गिरीधरीलाल चौधरी (42रा) आणि उर्मिला सुरेश चौधरी (35, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेशकुमारता राजी चौधरी (41, रा. स्वामी रेसिडेन्सी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात 48 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तक्रार दिली आहे.
नाशिकमध्ये बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कुटुंबातील 5 वर्षीय मुलीवर 24 वर्षीय कामगाराने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेआठ वाजता उघडकीस आला. मुंबईनाका पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी माहिती दिली. खोडेनगर येथील एका बांधकाम साईटवर मध्य प्रदेशातील कुटुंब काम करत आहेत. याच साईटवर संशयितही कामाला आहे. पीडित मुलीचा भाऊ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने वडील आणि मुलगी सिव्हीलच्या आवारातच राहतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजता वडील मुलीला कामावर घेऊन गेले. दुपारी 12 वाजता इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम करण्यास गेले होते. खाली मुलगी खेळत होती. संशयिताने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष देत तिला इमारतीच्या एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केला. रक्तस्त्राव झाल्याने मुलीच्या आईला लक्षात आली घटना मुलीच्या शरीरीतून रक्त आल्याचे आईच्या लक्षात आले. तिला सिव्हीलमध्ये दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. रुग्णालयाने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी रात्रीच परिसरात संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पीडित कुटुंब रोजगाराकरिता नाशिकमध्ये आले आहे. मजुरी करत हलाखीचे जीवन जगत आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचे समजताच तिच्या आईला भोवळ आली होती. डोंबिवलीत तरुणीवर सामूहिक अत्याचार डोंबिवली शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली जवळील खंबाळपाडा परिसरात दोन दिवसांपूर्वी एका 22 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित तरुणीच्या ओळखीच्या असलेल्या तीन रिक्षाचालकांनीच हे घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपींनी पीडित तरुणीला खंबाळपाडा येथील एका सदनिकेमध्ये (फ्लॅट) मेजवानीच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. ओळखीचे असल्याने तरुणी तिथे गेली. मात्र, मेजवानी सुरू असताना या तिन्ही रिक्षाचालकांनी संगनमत करून पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केले.
राज्यातील राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत असून सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे नवा राजकीय रंग चढला आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिवंगत अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांनी याआधी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता आमदारकीसाठी त्या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फोन संभाषणात सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यामुळे स्पर्धा अटळ झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला दिल्लीहून हिरवा कंदिल मिळाल्याचे सांगितले जात आहे. बारामतीसाठी सहा इच्छुकांनी उमेदवारी मागितली असून राहुरीसाठी चार जणांनी अर्ज केले आहेत. या सर्वांची ऑनलाइन मुलाखत घेण्यात आली आहे. आता काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेस स्वतः उमेदवार उभा करेल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. काँग्रेसला राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर पुढील दिशा काय ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अजूनही विश्रांती मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतीय हवामान विभाग यांनी पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. आजही सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव कायम असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. यात अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच काही ठिकाणी विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील हाताशी आलेली पिके वाया जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यांत पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. या भागासाठीही हवामान खात्याने येलो अलर्ट दिला होता. पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. टोकावडे, मोरोशी, शिरोशी आणि धसई परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा, चिकू आणि इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दोन बैलांवर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विजेच्या कडकडाटामुळे गंभीर घटना घडली. अहिल्यापूर शिवारात झाडाखाली उभ्या असलेल्या दोन बैलांवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर जनावरांचेही नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याचप्रमाणे शिक्षण हे सुद्धा मानवाची मूलभूत आणि महत्त्वाची गरज आहे. कारण शिक्षणामधूनच भावी सृजनशील समाजाची निर्मिती होते, असे मत श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे पदवी वितरण समारंभ कार्यक्रमांमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी व्यक्त केले. स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत दि.३० मार्च रोजी पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिनेट सदस्य डॉ. रवींद्र मुंद्रे, अजिंक्य भाऊ जाधव, संचालक वेंकटेश सेवा समितीचे गायकवाड, प्रा. डॉ. संतोष इंगोले, प्रा. डॉ. दत्तात्रय ढवारे हे उपस्थित होते. या पदवी वितरण प्रसंगी डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी विद्यार्थी हा समाजाचा देशाचा अत्यंत महत्त्वाचा क्रियाशील घटक आहे. त्यामुळे शिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक व देशाच्या जबाबदारीची भावना सतत मनामध्ये तेवत ठेवली पाहिजे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जीवनाचा सर्वांगीण विकास आहे. या माध्यमातून मानवाने आपले जीवन परिपूर्ण करावे, त्याचबरोबर शिक्षणामधून बुद्धीप्रमाणेवाद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक कला शाखाप्रमुख प्रा.डॉ. संतोष इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश कथन केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अजिंक्य भाऊ जाधव यांनी ज्या विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, परंतु त्याचबरोबर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.कार्यक्रमाचे आभार विज्ञान शाखाप्रमुख प्रा.डॉ. दत्तात्रय ढवारे यांनी मानले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्याप्रसंग ी बीए, बीएससी, एमए, एमएससीच्या ३३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या.या कार्यक्रमाची संचालन प्रा. डॉ. पद्मानंद तायडे यांनी केले तर या कार्यक्रमाला प्रा. डॉ. संतोष धामणे, प्रा. डॉ. विजय जाधव, प्रा.डॉ.रिंकू-रुके, प्रा. भारती राणे, प्रा. साक्षी काबरा, प्रा. मयुरी कुटे, प्रा. खान, प्रा.लहाने आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या तण व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढावा. तसेच तणनाशक सहिष्णू व कीटक प्रतिरोधक एचटीबीटी कापूस बियाणे तंत्रज्ञान स्वीकारण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे खासदार संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, प्रशांत पडोळे, शेतकरी संघटनेचे मिलिंद दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. देशातील कापूस उत्पादन २०१३-१४ मध्ये ४० दशलक्ष गाठींच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता सुमारे ३१ दशलक्ष गाठींवर घसरले आहे. दरम्यान, देशातील वस्त्रोद्योगाला सुमारे ४५ दशलक्ष गाठींची गरज भासणार असल्याने मागणी-पुरवठ्यातील तफावत वाढत आहे. उत्पादकता देखील जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यवतमाळसारख्या कापूस पट्ट्यात तण नियंत्रणासाठी प्रचंड मजुरांची गरज भासत आहे. उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत आहे. तणनाशक सहिष्णू एचटीबीटी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन तण व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असा दावा करण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, तणांमुळे कापूस पिकाचे ४० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच शेतीतील कामे वेळेत पूर्ण होऊन महिलांचा सहभाग वाढण्यास आणि तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यास चालना मिळेल. २०२३ मध्ये कृषी भवन येथे झालेल्या चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या अनेक शिफारसी अद्याप प्रलंबित असल्याने त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. एचटीबीटी कापूस तंत्रज्ञानाला मान्यता द्यावी, अशी एकमुखी भूमिका यावेळी मांडण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित निर्णय घेतल्यास तण व्यवस्थापनाची समस्या कमी होऊन कापूस क्षेत्र अधिक सक्षम, शाश्वत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
तालुक्यात सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दर्यापूरमध्ये एकच गॅस एजन्सी असल्याने सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होत आहे. घरगुती वापरासाठी सिलिंडर उपलब्ध नसल्याने महिलांसह कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच एजन्सीसमोर आणि दर्यापूर पासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या गोदामापर्यंत रिकाम्या सिलिंडरसह जाऊन लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक आहे. मात्र, आखातात सुरूच असताना देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बुकिंग केल्यावरही ७ ते १० दिवस प्रतीक्षा केल्यानंतही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत असून, स्वंयपाकाची गैरसोय वाढली आहे. दुसरीकडे तुटवड्याचा फटका हॉटेल व खानावळ, फूटपाथवरील व्यावसायिकांनाही बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्राहकांना सेवा देणेही कठीण होत असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना गॅस सिलिंडरची कमतरता अधिकच तीव्र झाली आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांवरही याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. आयोजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या अडचणीत या गॅस सिलिंडर तुटवड्याने अधिक भर घातली आहे. संबंधित गॅस एजन्सी व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सिलिंडरचा काळाबाजार दर्यापूर तालुक्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा गेल्या महिनाभरापासून निर्माण झाला आहे. जास्ती पैसे दिल्यास सिलिंडर उपलब्ध होत आहे. राजरोसपणे काळाबाजार सुरू असून, त्याकडे तालुका प्रशासन डोळेझाक करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. - सोनल प्रमोद तायडे, गृहिणी, दर्यापूर दर्यापूर तालुक्यात सध्या गॅस सिलिंडरची निर्माण झालेली टंचाई ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. सर्वसामान्यांना पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. महिलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे. - अंकुश कावडकर, जिल्हाध्यक्ष, युवा सेना
अ.भा.श्री गुरूदेव सेवामंडळाच्या प्रचारकांची प्रशिक्षण कार्यशाळा;माध्यमांचा केला वापर
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय श्रीगुरुदेव प्रचारकांची प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या झाली. गुरुकुंज आश्रम येथे झालेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून प्रांत, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील सेवाधिकारी आणि प्रचारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सर्वाधिकारी प्रकाश वाघ होते, तर सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून आजीवन प्रचारक लक्ष्मणदास काळे उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन दिवसीय कार्यशाळेत प्रचारकांचे व्यक्तिमत्त्व विकास, संस्थेची उद्दिष्टे, सामाजिक बांधिलकी, शाखा विस्तार, महिलांची भूमिका, ग्राम व राष्ट्रनिर्माणातील योगदान, तसेच आधुनिक प्रचार माध्यमांचा वापर अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. लक्ष्मणदास काळे, अॅड. दिलीप कोहळे, प्रकाश वाघ, गोपाल कडू, पौर्णिमा सवाई, प्रा. सुभाष लोहे, अमोल बांबल आणि निलेश गावंडे यांनी विविध सत्रांत मार्गदर्शन केले. मुक्तचर्चा सत्रात प्रचारकांना अनुभव मांडण्याची संधी मिळाली. या संवादात्मक उपक्रमामुळे त्यांच्या शंकांचे निरसन होऊन कार्यातील अडचणींवर उपाय शोधण्यास मदत झाली. सहभागी प्रचारकांनी कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रात अधिक नियोजनबद्ध आणि जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. समारोप सत्रात उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील यांनी मार्गदर्शन करत प्रचारकांना शुभेच्छा दिल्या. प्रचार प्रमुख गोपाल कडू यांनी सर्व मान्यवर, सेवाधिकारी, प्रचारक आणि आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. या कार्यशाळेमुळे प्रचार कार्याला नवी ऊर्जा मिळून संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन अमोल बांबल यांनी केले. सरचिटणीस जनार्दन बोथे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सरचिटणीस जनार्दन बोथे यांना केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रसंतांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रसार करण्यासाठी सुसूत्र आणि प्रभावी प्रचार यंत्रणेची गरज अधोरेखित केली. बदलत्या काळानुसार प्रचारकांनी आधुनिक साधनांचा वापर करून समाजाशी सुसंवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या सृजन संघटन अभियानासाठी आलेल्या पक्ष निरीक्षक आफताब अहमद व भाई जगताप यांची काँग्रेस भवनातील सभागृहात शुक्रवारी ३ रोजी दु. १२.१५ दरम्यान बैठक सुरू असतानाच बाहेर काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक हमरीतुमरी सुरू होती. यावेळी धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माजी नगरसेवकांनी उघडपणे पदाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. हेच या वादाचे मूळ कारण होते. माजी नगरसेवक सलीम बेग यांनी शहराध्यक्ष बबलू शेखावत व विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासोबत वाद घातला, दरम्यान फिरोज खान यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने वाद चिघळून धक्काबुक्कीपर्यंत गेला. त्यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी, नेत्यांनी वाद घालणाऱ्यांना शांत केले. त्याचवेळी अन्य एका घटनेत माजी नगरसेवक शोभा शिंदे तसेच विद्यमान नगरसेविका अर्चना आत्राम यांच्यातही जोरदार शाब्दिक चकमक झाली. माजी नगरसेविका उर्वरित. पान ४ मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने वाद चिघळून धक्काबुक्कीपर्यंत गेला. दिलीप एडतकर यांचा राजीनामा नामंजूर; वयक्तिक कारण समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर यांनी त्यांच्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. त्यांनी आपल्याला दिलेले पद हे नाममात्र असल्यामुळे या पदावर काम करण्याची इच्छा नसल्याचे राजीनाम्यात म्हटले होते. ते का नाराज आहेत, असे विचारले असता त्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही, असे उत्तर माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले. ते नाराज नाहीत तर मग ते पत्रपरिषदेला का उपस्थित नाहीत? असा प्रश्न विचारला असता त्यांना पत्रपरिषदेचे आमंत्रण देण्यात आले होत. परंतु, काही वैयक्तिक कारणामुळे ते आले नसावेत. ते अजुनही काँग्रेसमध्येच आहेत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुतळा वादावर अखेर तोडगा निघाला आहे. माढा तालुक्यातील खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या प्रकरणामुळे गावात तसेच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी एकमताने निर्णय घेतल्यामुळे हा वाद शांत झाला आहे. या प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला होता ती जागा खेलोबा मंदिर देवस्थानाची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या ठिकाणाहून पुतळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता मराठा आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी मिळून नव्या जागेचा शोध घेणार आहेत. गावातील वातावरण बिघडू नये यासाठी प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत मध्यस्थी केली. या तोडग्यासाठी शुक्रवारी रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, आयजी सुनील फुलारे, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच माजी आमदार राजन पाटील आणि दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेनंतर सर्वांनी एकमताने पुतळा स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. तसेच नव्या ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणाही करण्यात आली. या वादामुळे गावात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू होते. खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आमरण उपोषण सुरू केले होते, तर धनगर समाजाकडून ठिय्या आंदोलन छेडण्यात आले होते. सलग तीन ते चार दिवस गावात तणावाची स्थिती होती. मात्र तोडगा निघाल्यानंतर फरांडे महाराजांनी उपोषण मागे घेतले. तसेच आंदोलकांनीही आपले आंदोलन थांबवत गावात शांतता प्रस्थापित केली. गाव तणावमुक्त झाले तोडगा निघाल्यानंतर अंजनगावातील परिस्थिती पूर्णपणे निवळली असून गाव तणावमुक्त झाले आहे. बाहेरून आलेले नेते आणि कार्यकर्तेही परतले आहेत. मराठा आणि धनगर समाजातील आंदोलकांनी आंदोलनस्थळ रिकामे केले आहे. सध्या गावात कोणतेही आंदोलन सुरू नसले तरी पोलिसांचा बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. आज दोन्ही समाजाचे प्रतिनिधी आणि प्रशासनिक अधिकारी मिळून नव्या जागेची पाहणी करणार असून त्यानंतर पुतळा स्थलांतराची प्रक्रिया सुरू होणार आहे.
परिमंडळातील पिंपळगाव राजा हे १०० टक्के स्मार्ट मीटर लावलेले पहिले शाखा कार्यालय ठरले आहे. येथील सर्व ४२६३ ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहे. यामुळे येथील फिडरच्या इनपूटमध्ये सहा महिन्यात ३३ टक्के घट आली आहे. तसेच बिलिंगची कार्यक्षमता ८४ वरुन ९५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. मीटर लावण्याची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू होती. वीज बिलांशी संबंधित तक्रारीही शून्य झाल्या आहेत, असे महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले. नाईक यांच्या हस्ते शेवटचे स्मार्ट मीटर बसवून या वितरण केंद्राचे शंभर टक्के स्मार्ट मीटरीकरण झाल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे. या वेळी माहिती देतांना नाईक म्हणाले की, स्मार्ट मोबाइल व स्मार्ट टीव्हीसारखेच स्मार्ट मीटरममुळे अधिक पारदर्शक व अचूक सेवा मिळणार आहे. त्याचा वीज ग्राहकाना मोठा फायदा होणार असल्याचे देखील मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी सांगितले. अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनात तसेच कार्यकारी अभियंता विरेंद्र जसमातिया, उपकार्यकारी अभियंता हिराळकर आणि कनिष्ठ अभियंता राजपूत व वितरण केंद्रातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पुढाकार घेत स्मार्ट मीटरबाबत वीज ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले. स्मार्ट मीटरचे फायदे सांगून मतपरिवर्तन घडवले. सरासरी बिल, रिंडिंग न झाल्याच्या तक्रारी संपणार स्मार्ट मीटरचे वाचन स्वयंचलित पद्धतीने होते. त्यामुळे सरासरी बिल, मीटर वाचन न झाल्याच्या तक्रारी यापुढे राहणार नाहीत. तसेच ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती प्रत्येक तासाला मोबाइलवर पाहता येणारअसल्याचे देखील सांगण्यात आले आहे.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर रकमेची मागणी केल्याचा आरोप अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला. अधिकाऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही पोलिसांना दिली आहे. यात अधिकारी बघून घेऊ असे म्हणत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र हे सर्व आरोप अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले आहेत. जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष विवेक बिजवे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत गैरअर्जदार म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांचे नाव नमूद केले. तक्रारीनुसार, खनिकर्म विभागाचा कार्यभार आपल्याकडे असल्याचे सांगून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी १९ मार्च रोजी त्यांना शासकीय निवासस्थानी बोलावले. त्यांनी तुमच्या संघाच्या प्रत्येक सदस्याकडून मला किती रक्कम वसूल करून देता? असे विचारल्याचा आरोप उर्वरित पान ४ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावल्याचा आरोप जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाच्या सदस्यांनी केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. तुमच्या संघाच्या म्हणजे (खाणधारकांकडून) प्रत्येक सदस्याकडून मला किती रक्कम वसूल करून देता असे म्हटले. मात्र आमच्या प्रत्येक सदस्याने शासकीय देणे पूर्णपणे भरलेले आहे व कोणताच भरणा आमच्याकडे थकबाकी नाही, असे आम्ही म्हटले. यावर त्यांनी तुम्हाला काय करायचे आहे ते नाहीतर मला कारवाई करावी लागेल, असे म्हटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सरकारी निवासस्थानी झाली उद्योजक-अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट माझ्यावरील आरोप चुकीचे ^महसुली उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक होते. रॉयल्टीबाबत खाणधारक, क्रशरचे मालक यांची वरिष्ठांच्या सूचनेनुसार बैठक घेतली. खाणधारकाच्या वार्षिक मायनिंग प्लॅन'नुसार आर्थिक वर्षात किती ॲडव्हान्स रॉयल्टी' भरायचे आहे, याबाबत चर्चा झाली. बैठकीचे इतिवृत्तही उपलब्ध आहे. १०० टक्के महसूल गोळा होण्यासाठी प्रयत्न केले. मी कोणाकडेही पैशांची मागणी केलेली नाही. माझ्यावर केलेले आरोप संपूर्णपणे बिनबुडाचे व चुकीचे आहेत. - प्रमोद गायकवाड, अप्पर जिल्हाधिकारी.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अत्यंत धक्कादायक अपघात घडला आहे. पाण्याने भरलेल्या विहिरीत कार कोसळल्याने 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना दिंडोरी शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली. संबंधित कार थेट विहिरीत पडल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर गावातील सुनील दत्तू दरगोडे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक एका खासगी क्लासच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमावरून परतत होते. याच दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याबाहेर जाऊन पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की, कार थेट पाण्यात बुडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश असल्याने दुःख व्यक्त केले जात आहे. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा आणि दोन महिलांचा समावेश आहे. तसेच, एकाच कुटुंबातील पाच जणांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मृतांची ओळख राखी सुनील दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे आणि त्यांच्या चार नातेवाईक अशी झाली आहे. हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोर गावचे रहिवासी होते. दरम्यान, अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांसह प्रशासनानेही मदतकार्य हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत क्रेनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, तोपर्यंत कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अंधारामुळे आणि विहिरीत पाणी असल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. संपूर्ण दिंडोरी परिसरात शोककळा घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले. संबंधित कार ही मारुती सुझुकी अर्टिगा (MH15-JS-1053) असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण दिंडोरी परिसरात शोककळा पसरली आहे.
अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी विकोपाला गेला. माजी आमदार राजन पाटील यांनी दोन गटाची अनगर येथे बैठक घेऊन शिष्टाईचा प्रयत्न केला. परंतु मोजणी ठरल्यानंतर, मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पोलिसांसमोरच कॉलर पकडल्याने नवा वाद पेटला. महसूल प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दोन किलोमीटर परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू केले असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. सलग तिस-या दिवशी गावात पोलिसांचा डेरा कायम आहे. तोडग्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह इतरांची मोहोळ येथे उशीरापर्यंत बैठक सुरु होती. गेल्या दोन दिवसांपासून अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून दोन गटांतील तणाव मिटवण्यासाठी शुक्रवारी दुपारी माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर येथे बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. जागा मोजणीस दोन्ही गटांनी मान्यता दिली. परंतु जागा मोजणीला गेलेल्या अधिकाऱ्यांशी कॉलर पकडून हाके यांनी हमरीतुमरी केली. यामुळे वातावरण आणखीच चिघळले असून यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी झाली. अंजनगाव | येथे पुतळ्याच्या जागेवरून सुरू असलेला वाद शुक्रवारी विकोपाला गेला. दोन किलोमीटर परिसरात जमाव बंदीचे आदेश लागू केले आहे. 815 दोन दिवसांपासून रस्ता रोखून धरल्याने सोलापूरकडे जाणारी वाहतूक शेटफळ मार्गे वळवली. आ.अभिजीत पाटील दोन दिवसांपासून अंजनगांवमध्ये ठाण मांडून बसले असून अद्यापपर्यंत यावर तोडगा निघू शकलेला नाही.जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आवाहनानंतर पुतळा मंदिराच्या जागेत येत असल्यास तो काढून घेण्याचे तर तो पुतळा मंदिराच्या जागेत येत नसल्यास आहे, त्या ठिकाणी ठेवण्याबाबत दोन्ही गटाकडून मान्यता देण्यात आली. परंतू हाके यांनी मोजणी अधिकाऱ्यांना हुसकावून लावल्याने वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा मंदिराच्या जागेत येत असल्याने मंदिर समितीच्या वतीने सुरू केलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सदरील जागेची मोजणी केल्यानंतर पुतळा मंदिराच्या जागेत आल्यास तो स्वतःहून काढून घेण्याची लेखी हमी पोलिसांनी घेतली. या पत्रावर दत्तात्रय पाटेकर, ओंकार चव्हाण, गजानन कृपाळ यांच्यासह नाईक मोहिते यांच्या सह्या आहेत.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रेस्ट कॅन्सरच्या प्रमाणाही वाढ झाल्याचे दिसते. याला प्रतिबंध करण्यासाठी महिलांनी सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे, असे प्रतिपादन पिंक रिव्हाल्युशनच्या प्रमुख डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी व्यक्त केले. अस्तित्व संस्थेने वाणीचिंचाळे येथे आयोजित केलेल्या ग्रामीण महिलांचे आरोग्य व पोषण विषयक चर्चासत्रात त्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. या वेळी मंचावर तालुका आरोग्याधिकारी डॉ. संदीप देवकते, जिल्हा परिषद सदस्य संगीता मोटे,तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, कीर्तनकार संगीता कोंडे, प्राज फाउंडेशनचे सुरेश रेणुसे, अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे, सपोर्ट फाउंडेशनच्या रेश्मा कदम, पल्लवी वडणे, घेरडीच्या सरपंच आरती जगधने, माजी सरपंच सुरेखा पुकळे, वाणीचिंचाळे गावच्या सरपंच प्रियांका गडहिरे,श्रीपाद कोंडे इत्यादी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप देवकते म्हणाले की अस्तित्व संस्था हे खरंतर महिलांच्या आरोग्यासाठी करीत असलेले काम हे महिलाबरोबर समाजाची गरज आहे अस्तित्वच्या संस्थेच्या कामाला तालुका आरोग्य विभाग नेहमी सहकार्य करेल. तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव म्हणाल्या, आरोग्याची काळजी घेत असताना फास्ट फूड, उपवासाचे पदार्थ, पॅकिंगचे पदार्थ खाणे टाळावे स्वच्छ, सकस आहार घ्यावा व तणावमुक्त रहावे असे सांगितले. प्राज फाऊंडेशन चे सुरेश रेणुसे यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगितली व प्राज फाउंडेशन करत असलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली.त्यानंतर पुणे येथील कीर्तनकार संगीता कोंडेताई यांचे कीर्तन झाले कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या आरोग्य, महिलांनीही नियमित व्यायाम केला पाहिजे या वेळी डॉ. जवंजाळ म्हणाल्या, आरोग्याची काळजी घेणे हे सध्या खूप आवश्यक असून, महिलांनी नि:संकोचपणे नियमित व्यायाम केला पाहिजे, सकस आहार घेतला पाहिजे. या कामाला तालुका आरोग्य प्रशासन नेहमी सहकार्य करेल. अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची एचपीव्ही लस योग्य वयातील मुलींना व महिलांना देण्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन त्यासाठी संस्थेने पुढाकार घ्यावा. ^ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजासह महिलांनी पुढे आलं पाहिजे. प्रतिबंध हा उपचारापेक्षा कधीही श्रेष्ठ असतो, प्रतिबंधासाठी आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून त्यांची टीम तालुक्यातील महिला आरोग्यासाठी काम हे कौतुकास्पद असून या कामाला तालुका आरोग्य प्रशासन नेहमी सहकार्य करेल. -डॉ संदीप देवकते, तालुकाारोग्य अधिकारी आरोग्यासाठी फास्ट फुड खाणे टाळले पाहिजे ^ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी अस्तित्व संस्था नेहमी अतिशय चांगले काम करीत आहे. महिलांनी पण आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. फास्ट फूड, उपवासाचे पदार्थ, बिस्किट्स, पॅकिंगचे पदार्थ खाणे टाळावे स्वच्छ आणि सकस आहार घेतला पाहिजे, तणावमुक्त राहिले पाहिजे डॉ. दीपाली जाधव, (तालुका कृषी अधिकारी) आरोग्य, पोषण व उपजिविका विषयक संदेश देऊन अतिशय प्रभावी कीर्तन सादर केले. आरोग्याची काळजी घेणे हे सध्या खूप आवश्यक आहे. या चर्चासत्रात सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील ६०० पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्चना खर्चे, सुनिता गडहिरे, प्रविण सूर्यगंध, यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन अक्षता सोनवले यांनी केले. जीवनशैली बदलण्याची महिलांना आवश्यकता
मोहोळ तालुक्यातील येणकीत ढोल, हलगी, झांज, ताशा तालावर वाजत- गाजत पालखीस फुगे, हार, तुरे लावण्यात, भंडारा, खोबरे, लोकर, खारीक उधळण करत महालिंगराया, बिरोबा, जकराया महाराज की जय या जल्लोषात मोठ्या उत्साहामध्ये गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ दरम्यान गुरु- शिष्य, बंधू भेटीचा नयनरम्य सोहळा पार पडला. हुलजंतीचा महालिंगराया, हुन्नूरचे बिरोबा पालखीचे सकाळी ९ च्या दरम्यान विसावयावर आगमन झाले. दुपारी ४ दरम्यान वेशी जवळ पालखी सोहळा भेट झाली. हिंदू- मुस्लिम प्रतीक असलेले एक भगवीपताका, एक हिरवी पताका ध्वज भेट संपन्न झाली. दरम्यान मार्तंग समाजाच्या वतीने बकरी बलिदान देण्यात आले.ही बकरी येणकी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले होते. वाजत- गाजत पालखी जकराया मंदिरामध्ये आगमन होताच भाकणूक कार्यक्रम संपन्न झाला. रात्री धनगरी ओव्याच्या कार्यक्रमाने येणकीसह परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवार दि.३ एप्रिल रोजी सकाळी ग्रामस्थांचा नैवेद्य ताट दाखवण्यात आले. ४ दरम्यान जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. तर शनिवार दि.४ एप्रिल रोजी गावातील सासरी गेलेल्या मुलींचा देवास ताट नैवेद्य दाखवण्याचा मान असून सदर ताट नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी अग्निविना कुंड पेटवण्याचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वाजेच्या दरम्यान छबिना कार्यक्रम होणार आहे. तर रविवार दि.५ एप्रिल रोजी रोजी पहाटे ४ दरम्यान देवाचा परतीचा प्रवास होणार असून या नयनरम्य सोहळ्यास पहाटे देवास निरोप देण्यासाठी जड अंतःकरणाने भक्तजन उपस्थित राहण्यासाठी सज्ज होणार आहे.
नीरा देवघर सिंचन प्रकल्पास मान्यता देण्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडे (पीआयबी) ३ हजार ५९१.४६ कोटी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय जल शक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी यांनी लेखी उत्तर दिले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेत या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले. खासदार मोहिते पाटील यांनी नीरा देवघर सिंचन प्रकल्पास आर्थिक मान्यता देण्यासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (पीआयबी) कडे प्रस्ताव सादर केला होता काय? असा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच या प्रस्तावाच्या परीक्षणासाठी मंडळाची बैठक निश्चित करण्यात आली होती काय? संबंधित मंत्रालयाच्या विनंतीवरून ही बैठक पुढे ढकलण्याची कारणे काय होती? असे प्रश्न विचारले होते. केंद्र सरकारच्या या उत्तरामुळे निरा देवघर सिंचन प्रकल्पाची मंजुरी अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले असून, माढा मतदारसंघातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. पीआयबीच्या बैठकीची लागली उत्सुकता या प्रस्तावाच्या परीक्षणासाठी ७ जून २०२४ रोजी पीआयबीची बैठक निश्चित केली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली. नवीन तारीख निश्चित केलेली नाही. तसेच या प्रकल्पाच्या संदर्भात पुढील प्रक्रिया मंडळाच्या मूल्यांकन व शिफारशींनंतरच होणार असल्याचे सरकारने लेखी उत्तर देत स्पष्ट केले.
टेंभुर्णीत जल पर्यटन जमीन मोजणीवरुन ठिणगी:आमच्या जमिनींवर पर्यटनाचा सोहळा नको, सुरेश पाटील संतप्त
आमच्या जमिनींवर पर्यटनाचा सोहळा नको, तर हक्काचा न्याय हवा, अशी आक्रमक भूमिका घेत उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेने प्रस्तावित जल पर्यटन प्रकल्पा विरुद्ध शंख फुंकला आहे. जल पर्यटन प्रकल्पामुळे बाधितांच्या उपजीविकेवर गदा येणार असून, प्रशासनाने मोजणी न थांबवल्यास सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे. उजनी येथील जल पर्यटन प्रकल्प व धरण परिसरातील अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणीला धरणग्रस्त शेतकरी संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या हक्कांबाबत गंभीर मुद्दे मांडण्यात आले असून, योग्य तो निर्णय न झाल्यास सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या जल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. भीमा नगर येथील उजनी धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता सु.उ.डुंबरे यांना उपोषणाचे निवेदन दिले. या वेळी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्यासमवेत धरणग्रस्त शेतकरी अमोल पाटील, रामचंद्र पानबुडे, हरिश्चंद्र काळे, नवनाथ मेटे, बाबा पानबुडे, बाळासाहेब मेटे, धवल पाटील, विष्णू पानबुडे, अशोक स्वामी, परमेश्वर मेटे उपस्थित होते. तसेच, संबंधित जमिनींबाबत पूर्वी जिल्हाधिकारी स्तरावर निर्णय घेण्यात आले असून, त्या अनुषंगानेच पुढील कार्यवाही करावी. उजनी धरण परिसरातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला मूळ शेतमालकांच्या उपजिविकेची साधने केली उभी निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, या जमिनींवर मूळ मालकांच्या वारसांनी शेती व इतर उपजीविकेची साधने उभी केली आहेत. अनेक ठिकाणी घरे, मंदिरे व इतर बांधकामेही उभी आहेत. त्यामुळे या जमिनी परत मिळाव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील बहुतेक महत्त्वाच्या चौकांमध्ये गेल्या २५ दिवसांपासून सकाळी १० ते दुपारी १२ च्या दरम्यान गॅस सिलिंडर वितरित करणाऱ्या गाड्या उभ्या असलेल्या दिसतात. या गाड्यांभोवती ग्राहकांचा मोठा गराडा असतो, मात्र गाडी आली तरी गॅस मिळेलच याची शाश्वती नसते. नोकरी करणाऱ्यांना सिलिंडरसाठी अर्धी किंवा पूर्ण दिवसाची सुटी घ्यावी लागते, तर व्यावसायिकांना केवळ गॅससाठी ४ ते ५ तास आपल्या दुकानाचे शटर बंद करून रांगेत उभे राहावे लागत आहे. हे विदारक चित्र आहे शहरातील विस्कळीत गॅस वितरणाचे. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर घरपोच सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागते. शहरातील काही एजन्सी घरपोच सिलिंडर देत आहेत तर अनेक एजन्सीकडून दिले जात नसल्याने नागरिकांना एजन्सीबाहेर रांगा लावाव्या लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका सावेडी, प्रोफेसर कॉलनी या भागातील त्या सेवानिवृत्त नागरिकांना बसत आहे, ज्यांची मुले नोकरीनिमित्त परदेशात किंवा मुंबई-पुण्यात स्थायिक आहेत. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार गॅस टंचाई नसल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिले काही दिवस पुरवठा सुरळीत होता, मात्र नंतर टंचाई निर्माण झाल्याने एजन्सींनी घरपोच गॅस देणे बंद केले आहे. सर्जेपुरा, नवनागापूर, तपोवन रोड, केडगाव, भिंगार आणि कल्याण रोड या भागातील नागरिक गॅसच्या गाड्यांच्या प्रतीक्षेत चौकाचौकांत ताटकळत उभे असलेले पाहायला मिळतात. हेमा बडे, जिल्हा पुरवठा अधिकारी ^ २६ दिवसांपासून कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने आम्हाला चुलीचा वापर करावा लागत आहे. त्यातच दर १९५ रुपयांनी वाढल्याने प्रत्येक पदार्थामागे २५ टक्के दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. गॅस वाचवण्यासाठी आम्ही मांसाहारी पदार्थ मेन्यू कार्डमधून हटवले आहेत. सध्या मटकी, शेवभाजी आणि पनीर या पदार्थांवरच भर दिला आहे. अजिंक्य राऊत, हॉटेल व्यावसायिक. उपनगर परिसरात सर्वाधिक फटका घरपोच गॅस मिळणे बंद झाल्याने सावेडी आणि प्रोफेसर कॉलनीतील वयोवृद्ध ग्राहकांचे मोठे हाल होत आहेत. ज्यांची मुले परदेशात किंवा परगावी आहेत, अशा सेवानिवृत्त वडिलांना स्वतः सिलेंडर आणण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. घरपोच सिलिंडरच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या वयोवृद्धांची मोठ्याप्रमाणात फरफट होत आहे. प्रश्न : घरपोच सिलिंडर का नाही? उत्तर : सर्व एजन्सींना घरपोच गॅस देण्याबाबत स्पष्ट पत्र दिले आहे. प्रश्न: टंचाई नाही, मग रांगा कशा? उत्तर: शहरासह जिल्ह्यात कुठेही गॅस टंचाई नाही. ग्राहकांच्या रांगा लागू नयेत म्हणून एजन्सींना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्न: काळ्या बाजारात चढ्या दराने विक्रीच्या तक्रारी आहेत? उत्तर: अशा तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करू.
भगवंताच्या संगतीत मिळणारा निरपेक्ष आनंद हा सर्वश्रेष्ठ असून तोच खरा काला आहे. काला म्हणजे जीवनाची परिपूर्णता, भक्तीचा सोहळा आणि हरिनामाच्या माध्यमातून अनुभवता येणारा सर्वोच्च आनंद आहे. मनुष्य देह हा या आनंदासाठीच लाभलेला असून भगवंताच्या संगतीतच खरे सुख प्राप्त होते, असे प्रतिपादन हभप प्रभाकर महाराज कावले यांनी केले. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप प्रभाकर महाराज कावले यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. सात दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात हरिनाम, अभंग, कीर्तन व संतविचारांनी परिसर दुमदुमून गेला होता. कीर्तनात हभप प्रभाकर महाराज कावले यांनी अभंगाच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान आणि भगवंताच्या संगतीचे महत्त्व अधोरेखित केले. देव आणि गोपाळ यांच्यातील संवादातून त्यांनी अज्ञानाचा नाश आणि पाप-पुण्याच्या बंधनातून मुक्त होणाऱ्या जीवनाचे तत्त्वज्ञान उलगडून सांगितले. यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संतांचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहोचते. अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाज सुसंस्कृत होतो व आपल्या संस्कृतीचे जतन होते. माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी सांगितले की, सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. सप्ताहाच्या सांगतेनिमित्त हभप प्रभाकर महाराज कावले यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. टाळ-मृदंगाच्या गजरात, अभंग-कीर्तनाच्या सुरावटीत आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. यावेळी परिसरातील भाविक उपस्थित होते.
अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी भागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. गुरुवारी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच, बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी पाथरे (बु.) येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. राहाता तालुक्यातील पाथरे बु. येथील शेतकरी संजय भाऊसाहेब घोलप व गोपालक सोपान घोलप यांच्या शेताला व गोठ्याला पालकमंत्र्यांनी भेट दिली. वादळी वाऱ्यामुळे विजेची तार अंगावर पडून आणि विद्युत धक्का बसल्याने ९ गायी दगावल्याच्या घटनेची त्यांनी पाहणी केली. मंत्री विखे पाटील यांनी घोलप कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना धीर दिला. यावेळी घोलप कुटुंबीयांना सहकार्य करून शासन स्तरावरून मदत कशी मिळेल, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. तसेच, वादळाने पडलेल्या वीजवाहक तारा व विजेच्या खांबांच्या समस्या तातडीने सोडवून गावातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देशही महावितरणला दिले. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांत झालेल्या पावसाने ४२ हजार ६१८ शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी पुन्हा जिल्ह्याच्या बहुतांशी भागात झालेल्या पावसाने जामखेडमध्ये १ पशुधन दगावले असून, संगमनेरमध्ये २, राहुरीत ९ आणि कोपरगावमध्ये १ घराचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे १०० टक्के पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी शिर्डीचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, नायब तहसीलदार हेमंत पाटील, मंडळ कृषी अधिकारी रमेश चौपडे, सहायक कृषी अधिकारी श्रीमती मीना जाधव, महावितरणचे अभियंता गाडे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संपत तांबे, बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू, सरपंच उमेश घोलप, संचालक अशोक घोलप, आबासाहेब घोलप, भाऊसाहेब घोलप, आप्पासाहेब दिघे उपस्थित होते. २,७५९ शेतकऱ्यांचे १८०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान राहाता तालुक्यात १८ मार्च, ३० मार्च व १ मार्च २०२६ रोजी झालेल्या पावसाने १ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील सुमारे २ हजार ७५९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले.. यामध्ये गहू, कांदा, द्राक्ष, मका, डाळिंब, हरभरा, टरबूज आणि आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मंत्री विखे यांनी पाहणीनंतर दिली. शेतात ठेवलेल्या उत्पादित मालाचे, वाऱ्याच्या वेगाने शेडनेट व पॉली हाऊसचेही नुकसान झाले.
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी:शेतकरी संघटनेची मागणी
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गहू, कांदा, केळी, डाळिंब, टरबूज, पपई, हरभरा, भुईमूग आदी रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः गव्हाची पिके जमिनीवर आडवी पडली असून कांद्याच्या पिकामध्ये पाणी साचल्यामुळे त्याची गुणवत्ता घसरली आहे. अशा नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने तातडीने मदत करावी, तसेच पंचनामे करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा करावी. १३ मार्चच्या परिपत्रकानुसार पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी जलसंपदा विभागाकडून सक्तीची कारवाई सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच अडचणीत असल्याने कर्जवसुली करू नये, असा शासनाचा आदेश असताना बेकायदेशीररीत्या सातबारा उताऱ्यावर शासनाचा बोजा चढवू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.या निवेदन देताना हरिभाऊ तुवर, मेजर अशोक काळे, बाबासाहेब नागोडे, डॉ. रोहित कुलकर्णी, अॅड. ज्ञानेश्वर शिरसाट, अॅड. बाळासाहेब कावळे, दादासाहेब नाबदे, कैलास पवार, कार्लस साठे आदी उपस्थित होते.
मानवतेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानाचा स्मृतीप्रित्यर्थ 'गुड फ्रायडे' श्रीरामपूर परिसरात भक्तिभावाने आणि गांभीर्याने साजरा करण्यात आला. शहरातील लोयोला सदन, टिळकनगरचे संत कॅथोलिक चर्च आणि आगाशेनगरच्या डी. पॉल चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. योला सदन धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू यांनी उत्तम शुक्रवार बद्दल माहिती सांगितली आणि तद्नंतर पवित्र क्रुसाची वाटेचा जिवंत देखावाची नाटिका श्रीरामपूर येथील युवकांनी सुंदर असा देखावा सादर केला.लोयोला सदन चर्च श्रीरामपूर, कॅथोलिक चर्च टिळकनगर, डी. पॉल चर्च आगाशेनगर या सर्व ठिकाणी देखावा सादर करण्यात आला. यावेळी श्रीरामपूर धर्मग्रामाचे धर्मगुरू रे. फा. प्रकाश भालेराव, रे. फा. रत्नाकार दुशिंग, रे. फा. मॅथ्यू परेरा तसेच लोयोला दिव्यवाणी चे धर्मगुरू रे. फा. अनिल चक्रनारायण, रे. फा. जेकब गायकवाड कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू रे. फा. पिटर डिसोझा, रे. फा. जाधव तसेच आगाशेनगर येथील डि पॉल चर्चचे धर्मगुरू रे. फा. फ्रको, रे.फा.शिजो तसेच संत लुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर, कनोसा होस्टेलच्या सर्व सिस्टर, टिळकनगर येथील सर्व सिस्टर, डी. पॉल येथील सर्व सिस्टर यासह सर्व भाविकांनी सहभागी झाले होते. क्रुसाच्या वाटेचा जिवंत देखाव्याची नाटिका युवक शुभम बारसे, रोहन गायकवाड , शेखर गायकवाड, संदेश रणदिवे, अविनाश रणदिवे, रोहन ठुबे, श्रेयस लोखंडे, समीर साळवे, प्रतिक गायकवाड, स्नेह रणदिवे, प्राजक्ता रणदिवे, प्रणिती त्रिभुवन, लुकस दिवे, शरद सोळस या सर्वांनी सादर केल्यानंतर नंतर येशूच्या सात शब्दावर प्रवचन झाले. उत्सव समितीने सर्वांनी साबुदाण्याची खिचडीचा लाभ घेतला.यावेळी जेम्स पंडीत, राजीव साळवे, सुरेश ठुबे, विलास बनसोडे, बबलू लोंढे, अशोक खंडागळे, दीपक कदम, भाऊसाहेब तोरणे इ.नी सहभाग घेतला. तसेच चर्च कमिटीचे कमलाकर पंडीत, विजय त्रिभुवन, सुरेश कोळगे, रावसाहेब संसारे, संदीप साळवे, रवि त्रिभुवन, रणजित लोखंडे, रवि लोंढे,लाजरस गायकवाड,पुष्पा कोळगे, लता बनसोडे, निर्मला अमोलिक, शोभा त्रिभुवन तसेच राजेंद्र भोसले, प्रकाश निकाळे, अजय लोंढे, पी. एस. निकम, अक्षय ठुबे या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून सेवा केली.
तालुक्यातील देवठाण, समशेरपूर, वीरगाव, गणोरे, तांभोळ, डोंगरगाव, हिवरगाव आंबरे, सावरगावपाट या आढळा खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून निसर्गाचा 'रुद्रावतार' पाहायला मिळाला. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवस झालेल्या तुफानी गारपीट, सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांसह शेडनेट आणि पॉलीहाऊसचे प्रचंड नुकसान झाले आहे. या असमानी संकटामुळे साधारण १७ गावांतील ५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली असून बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. वीरगाव येथे शेतकऱ्यांना विविध प्रकारांतील भाजीपाला रोपे देऊन शेतकऱ्यांना ती आपल्याच शेतात लागवडीखाली आणण्यास मदत करणारी विश्व हायटेक नर्सरी या गारपीटीत मोठ्या प्रमाणावर क्षतिग्रस्त झाली. विश्व हायटेक नर्सरीचे संचालक विरेंद्र थोरात यांनी प्रचंड मेहनत व आर्थिक खर्च करून अधुनिक पद्धतीनुसार उभारलेले पॉलीहाऊस या अवकाळी पावसात झालेल्या गारपीट पुरते जमिनदोस्त झाली. जिल्हा प्रशासनाकडून शेती व पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करावेत, अशा सूचना कृषी व महसूल प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सदस्य रावसाहेब वाकचौरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे. बुधवार व गुरुवरीवी वीरगाव येथील गारपीट व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपीट, चक्रीवादळ व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथील शेतकरी शरद तोरकड यांची शेडनेट उडून गेल्याने पिकांचे नुकसान झाले. शरद थोरात, अण्णासाहेब थोरात, संदीप तोरकड आदी शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. या गारपीटीत रब्बी पिकांमध्ये गहू, हरभरा, कांदा तसेच फळ पिकांमध्ये डाळिंब, द्राक्ष, पेरू आणि भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, झेंडू, कोबी, फ्लॉवर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. सोमवारी व मंगळवारी अकोल तालुक्यातील प्रवरा खोऱ्यांत झालेल्या अवकाळी पावसाने ऊस, टोमॅटो, कांदा गहू, हरभरा आदी पिकांचे नुकसान केले. यानंतर गारपीट व आवकाळीमुळे नुकसान समशेरपूर, सावरगावपाट, देवठाण आदींसह अनेक भागांतून आमदार डॉ. किरण लहामटे यांनी नुकसान पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासमवेत तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, मंडळ कृषी अधिकारी बिन्नर, जोरवेकर व वीरगाव येथील महसूल मंडळाधिकारी बाबासाहेब दातखिळे, तलाठी अमोल गडाख, विशाल चावडे, कृषी सहायक रूपाली बांगरे, ग्रामसेवक संजय वाघ, सुधीर शेळके, शिवाजी पाटोळे, अनिल सोनवणे उपस्थित होते. वीरगाव येथे पॉलीहाऊसच्या नुकसानीची पाहणी करताना रावसाहेब वाकचौरे, अनिल देशमुख, विरेंद्र थोरात व गावकरी. तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा आमदार डॉ. किरण लहामटे यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह समशेरपूर, सावरगावपाट, देवठाण परिसरात नुकसान पाहणी दौरा केला. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या, तर पंचायत समितीचे माजी सदस्य रावसाहेब वाकचौरे यांनी वीरगावमधील नुकसानीची पाहणी केली. त्यांनी मंत्री विखे-पाटील यांची भेट घेऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
अंजनेरी गड येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आठवडाभरापासून जपानुष्ठान सुरू होता. गुरुवारी (दि.२) विविध धार्मिक कार्यक्रमांनी या सोहळ्याची सांगता झाली. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटे तीन वाजता भाविकांनी अंजनेरी गड चढण्यास सुरुवात केली. पहाटेच्या मंगलमय वातावरणात गडावरील हनुमान जन्मस्थानाच्या मूळ स्थानी स्वामी शांतिगिरी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर जय श्रीराम आणि जय हनुमान'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. अंजनेरी गडाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि तेथे भव्य मंदिर उभारले जावे, या संकल्पनेतून स्वामी शांतिगिरी महाराज गेल्या २५ वर्षांपासून या धर्मसोहळ्याचे आयोजन करत आहेत. यावर्षीही आठवडाभराच्या या सोहळ्यात जपानुष्ठान, महायज्ञ, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, ध्यान, प्राणायाम आणि श्रमदान असे विविध आध्यात्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या सोहळ्यादरम्यान पालखी पूजन, संत-महंत, अतिथी आणि ब्रह्मवृंदाचा सन्मान करण्यात आला. तसेच हनुमान स्वरूप लहान बालकाचे पूजन करून जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना अध्यात्म आणि सेवेचे महत्त्व विशद केले. प्रतिनिधी |इगतपुरी मुंबई–आग्रा महामार्गालगत असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. आयोजित महाप्रसादाचा सुमारे २ हजार भाविकांनी लाभ घेतला. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. येथील गुप्ता पेट्रोल पंपाजवळ असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जन्मोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. सोहळ्याची सुरुवात पहाटे हनुमान जन्मोत्सवानिमित्त अभिषेक, विधिवत पूजा आणि आरतीने झाली. त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा मांडण्यात आली आणि भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आले. दुपारी महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे इगतपुरी शहरासह मंदिर परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनाच्या सुरांनी आणि जय हनुमानच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे विश्वस्त संतोष बैरागी, किशोर बैरागी, गणेश बैरागी, किशोर कृपलानी, योगेश हाके, अरुण मिश्रा यांच्यासह मानस लाइफस्टाइल रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
वैजापूर तालुक्यातील शिवराई, बेंदवाडी, बोर दहेगाव, गोळवाडी, करंजगाव या गावांना गेल्या १५ दिवसांपासून शिवराई ३३ केव्हीवरून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. काही ठिकाणी सतत वीज खंडित होत आहे. यामुळे या गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जनावरांसाठी पाणी मिळत नाही. महावितरणकडे वारंवार तक्रारी करूनही निर्णय होत नसल्याचा आरोप करत शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक झाले. सकाळी १० वाजेच्या सुमारास सर्व गावांतील शेतकरी, ग्रामस्थ शिवराई ३३ केव्ही सबस्टेशनवर पोहोचले. निषेध करत सबस्टेशनला कुलूप लावले. महावितरणचे अधिकारी येईपर्यंत तब्बल दोन तास सबस्टेशन बंद राहिले. दुपारी १२ वाजता महावितरणचे परसोडा शाखा अभियंता शिवराई सबस्टेशनवर आले. शिवराई, बोर दहेगाव, बेंदवाडी, करंजगाव, गोळवाडी येथील शेतकरी, ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला. वीज का मिळत नाही, असा जाब विचारला. शाखा अभियंत्यांनी आश्वासन दिल्यावरही शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. वैजापूर येथील सहायक अभियंता पांडव यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. यापुढे सर्व गावांना वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. शाखा अभियंता अजय ठेंनगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी सिंगल फेज लाईन चालू असल्यावर, त्यावर सिंगल फेज पाण्याच्या मोटारी चालवू नाही. त्यामुळे गावात वीज सुरळीत चालेल.
लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूरगावातील कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाला ७ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. १५ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, दिल्लीसह अनेक राज्यांतील तब्बल १० लाख भाविक हजेरी लावणार आहेत. शासकीय सुटीचा रविवार, देवीचा वार मंगळवार, शुक्रवार या दिवशी भाविकांची संख्या दुप्पट वाढते. शिवना नदीकाठी भव्य मंदिर आहे. दाक्षायणी माता मराठवाड्याचे आराध्य दैवत मानले जाते. प्रसन्न मूर्ती, आकर्षक विद्युत रोषणाई, डोक्यावर चांदीचा टोप, अंगभर दागिने अशी देवीची सजावट भाविकांचे लक्ष वेधते. दाक्षायणी ही दक्ष राजाची कन्या असल्याचे सांगितले जाते. या देवीचे पीठ लासूरगावाशिवाय कुठेही नसल्याने देशभरातील भाविक यात्रेनिमित्त दर्शनासाठी येथे येतात. देवी लासूरगावात प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. वडिलांकडून अपमान झाल्यानंतर तिने पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली. त्यानंतर शंकराने जटा आपटून तांडव केले. देवी पुन्हा लासूरगावी प्रकटली, अशी श्रद्धा आहे. मंदिराचे बांधकाम पूर्वी हेमाडपंती होते. सपत्नीक भाविकांना मिळेल आरतीचा मान मंदिर परिसरात ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. भाविकांची गैरसोय, अनुचित घटना यावर कॅमेऱ्यांची नजर असते, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी दिली. मंगळवारपासून (७ एप्रिल) यात्रोत्सव सुरू होत आहे. वैजापूरचे तहसीलदार, मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांनी आढावा घेतला. स्वच्छतागृह, शौचालय, उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन दर्शन रांगेत ग्रीन शेडनेट, भाविकांसाठी खाली मॅटिंग अशी कामे अंतिम टप्प्यात आहेत. सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून प्रथमच नवरात्र यात्रा उत्सवात दर्शन रांगेतील सपत्नीक भाविक जोडप्यांना देवीच्या आरतीचा मान देण्याचा उपक्रम सुरू झाला. यात्रेतही हा उपक्रम सुरू राहणार आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, लहान बाळ असलेल्या माता-भगिनींसाठी विशेष दर्शन रांग ठेवली आहे. हिरकणी कक्ष, आरोग्य कक्ष, पोलिस मदत कक्ष अशी व्यवस्था करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रम तिथीनुसार सुरू झाले. कुलस्वामिनीस कांकण बांधणे गुरुवारी (२६ मार्च), सकाळी झाले. गुरुवारी (२ एप्रिल) सायंकाळी मातेचा ध्वज-पताका व काठी मिरवणूक पार पडली. रविवारी (५ एप्रिल) सायं. मातेस वस्त्रालंकार परिधान करणे, ओटी भरणे होईल. मंगळवारपासून यात्रोत्सव प्रारंभ होईल. बुधवारी सायंकाळी मातेची पालखी, सहगादी, पोथी, टोप मिरवणूक होईल. १९ ला सांगात होईल.
कोळीबोडखा येथे शालेय समितीची बिनविरोध निवड:अध्यक्षपदी जिब्राइल पटेल यांची झाली निवड
पैठण तालुक्यातील जि.प.प्रा.व माध्यमिक शाळा, कोळीबोडखा उर्दू केंद्र पाचोड येथे शालेय व्यवस्थापन समितीची नव्याने स्थापना करण्यात आली. या निवडीत अध्यक्षपदी जिब्राइल पटेल तर उपाध्यक्षपदी सुमय्या फिरोज पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. समितीच्या गठनासाठी आयोजित पालक सभेत गावकरी व शिक्षकांच्या उपस्थितीत केंद्रप्रमुख बळीराम भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक इब्राहिम पटेल यांनी शासनाच्या जीआरनुसार समिती स्थापनेची सविस्तर माहिती दिली. तसेच मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक तुकाराम ढोले यांच्यासह फातेमा तनवीर, सुमेरा बेगम, ढवळे, आंधळे, गहेरवार, गंगथडे, जगताप व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. मागील समितीची मुदत संपल्यामुळे नव्या समितीची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून लतीफ मेहमूद सय्यद, रुकसाना अनिस पटेल, जमशाद शब्बीर पटेल, शाहीन राजू शेख, लैलाबी अलाउद्दीन सय्यद, तोफिक अब्बास शेख, ग्रामपंचायत सदस्या आफरीन एजाज शेख तसेच शिक्षणप्रेमी मौलाना शाकेर यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लासूर स्टेशन मराठवाड्याचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या श्रीक्षेत्र गवळीशिवरा (ता.गंगापूर) येथील जागृत श्री महारुद्र मारुतीच्या चरणी नतमस्तक होऊन पहाटेपासून सायंकाळपर्यंत जिल्हाभरातील तब्बल एक लाखाहून अधिक भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. सकाळी गावकऱ्यांसह भाविकांच्या उपस्थितीत सामूहिक महाआरतीने हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. दरम्यान, श्रीक्षेत्र गवळीशिवरा येथे हनुमान जयंतीनिमित्ताने आठवड्ाभरापासून सुरू असलेल्या श्रीराम कथेची सांगता कथा प्रवक्ते ह.भ.प. सचिन महाराज ढोले यांच्या काल्याच्या कीर्तनाने हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. या सात दिवसीय श्रीराम कथा महोत्सवासाठी परिसरातील सुमारे तीन हजार भाविक भक्तांची दररोज उपस्थिती असायची. कथेनंतर दररोज नवसाच्या भाविकांकडून महाप्रसाद ठेवण्यात यायचा. दरम्यान, उंदीरवाडी येथील भाविक वीट सप्लायर बद्रीनाथ कदम मित्रमंडळ यांच्यातर्फे रामकथेच्या काल्याच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी येथील महारुद्र ट्रस्टीचे विश्वस्त अध्यक्ष शांताराम पाटील केरे, उपाध्यक्ष पांडू केरे, सचिव सुखदेव गवळी, विश्वस्त अंबादास केरे, मारुती गवळी, विलास पांडे, पांडुरंग गवळी, सुभाष केरे आदींनी भाविकांच्या सोयीसुविधेसाठी पुढाकार घेतला. शिल्लेगावचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त होता.
प्रत्येकाने अहिंसा पाळावी, जातीय, धार्मिक भेदभाव त्यागून आदर्श जीवन जगावे, असे आवाहन आचार्य परमानंदजी महाराज यांनी महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. कन्नड शहरात महावीर जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी बोलताना परमानंदगिरी महाराज म्हणाले की, जगात युद्ध आहे. प्रचंड प्रमाणात हिंसा सुरू आहे. अस्थिरता आहे. जात-धर्माच्या, भेदभावाच्या भिंती माणसानेच उभ्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक मानवाने अहिंसा, भेदभाव त्यागून आदर्श जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी केले. शहरात महावीर जयंतीनिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले. याबद्दल नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी स्तंभपूजन करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार, नगरसेवक अब्दुल जावेद, महावीर गंगवाल, आनंद पांडे, अजित सेठी, नयन पहाडे, मनोज चुडीवाल, शैलेश झांजरी, शांतीकुमार चुडीवाल, हुकूमचंद पांडे, संतोष ठोळे, रवींद्र अजमेरा, सोमल चुडीवाल, सोनाली पाटोदी, सारिका पांडे, सोनाली ठोळे, प्रशांत जालनापूरकर, प्रदीप पहाडे, वर्धमान जैन, माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे, नगरसेवक सुनील पवार, रवींद्र राठोड, बंटी काशीनंद, संतोष निकम, राहुल वाघ, संदीप घोंगते, असद पवार, रत्नाकर पंडित, राम पवार, तन्वी सेठी, श्रीराम पवार, मनोज देशमुख, पवन ठाकूर, इम्रान शेख, शंकर राऊत, दानिश शेख, राकेश शर्मा, अनिल खंबाट, संजय जहागीरदार, सोनू धीवर आदींची उपस्थिती होती. या वेळी गावातील जुने महावीर मंदिर, समर्थनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, अण्णा भाऊ साठे चौक या मार्गावरून भव्य शोभायात्रा, मिरवणूक काढण्यात आली. मनोज पवार मित्रमंडळाच्या वतीने आइस्क्रीम व पाणी वाटप केले. सूत्रसंचालन जालनापूरकर यांनी केले. आभार जयकुमार जैन यांनी मानले. नवयुवक, युवती ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आचार्य परमानंदजी महाराज यांचा ४५ वा दीक्षा दिवस व महावीर जयंती एकाच दिवशी आल्याने जैन बांधवांत मोठा उत्साह होता. गावातील जैन मंदिर येथे नवयुवक, युवती ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या वर्षी नगर परिषदेने महावीर स्तंभस्थळी आकर्षक रोषणाई केली.
गंगापूर ग्रामीण शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास घडवत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगाव येथे अत्याधुनिक स्टेम इनोव्हेशन अँड लर्निंग सेंटर सुरू करण्यात आले आहे. अटलाशियन फाउंडेशन, अमेरिकन इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल इक्विलायझर कार्यक्रमांतर्गत हे केंद्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पदमपुरा येथून ढोरेगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे यांनी ढोरेगाव शाळेत स्थलांतरित होणाऱ्या स्टेम लॅब संदर्भातील अधिकृत पत्र निर्गमित केले आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ढोरेगावची उल्लेखनीय कामगिरी यानिमित्ताने पुन्हा समोर आली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित (स्टेम) या क्षेत्रातील आधुनिक शिक्षणाच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. नावीन्यपूर्ण, प्रयोगशील पर्वाची सुरुवात झाली आहे. लॅबमध्ये रोबोटिक्स, कोडिंग, एक्सपेरिमेंटल सायन्स, २१व्या शतकातील जीवनकौशल्यांवर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रमाची आवड निर्माण केली जाणार आहे. ढोरेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये स्टेम इनोव्हेशन अँड लर्निंग सेंटर सुरू झाले आहे.
आडगाव बु. परिसरातील खडी क्रेशर प्रकरणी महसूल विभागाने मंगळवारी व बुधवारी असे सलग दोन दिवस कारवाई केली. घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बेकायदेशीर उत्खनन झाले का, आवश्यक परवाने आहेत का, परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाले का, याची सखोल तपासणी करण्यात आली. तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी स्वतः पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी योगेश पंडित, ग्राम महसूल अधिकारी हरीश वाघ, संगीता ढोले, विजय राठोड, संजय राठोड यांच्या पथकाने तपासणी केली. गायरान गट क्रमांक १४६, १७९ मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधित १४ खडी क्रेशर मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या. आवश्यक कागदपत्रे तत्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पाहणीत अनेक ठिकाणी परवानगीशिवाय उत्खनन झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शासनाच्या मालकीच्या गायरान जमिनीचे नुकसान झाले का, याबाबत प्राथमिक तपास झाला. पंचनामा करून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रकरणाचा अधिक तपशीलवार तपास करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण होणार आहे. क्षेत्रफळ मोजणी एटीएसही करण्यात येणार आहे. प्रत्यक्षात किती उत्खनन झाले, याचा अचूक अंदाज प्रशासनाला मिळणार आहे. पंचनामा करण्यात आलेल्या मालकांमध्ये पंकज जगताप, भगवान पाटील, शिवा गावंडे, शेख सलीम शेख शब्बीर, रामनिवास गट्टानी, ब्रम्हदेव बोंगाणे, नंदलाल गूजाळे, जगदीश सारडा, ज्ञानेश्वर दसपूते, सविता ढाकणे, देवराव ढाकूरे, शेख अली, श्रीधर म्हस्के, कैलास भालेराव यांचा समावेश आहे. नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल तहसीलदार डॉ. बिडवे यांनी सांगितले की, संबंधितांकडून प्राप्त कागदपत्रांची तपासणी करून नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. गायरान जमिनीवरील बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बोरगाव बाजारमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा, टाक्यांची गाडी नियमित येत नाही- ग्रामस्थ
गेल्या काही दिवसांपासून गावात घरगुती गॅस पुरवठा करणारी गाडी नियमित येत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. महिलांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅस एजन्सीच्या नियोजनाअभावी परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शासनाकडून गॅसचा कुठलाही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जाते. तरीही सिलिंडर पुरवठा करणारी गाडी गावात नियमित येत नसल्याने गावकऱ्यांची गॅस मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस एजन्सीकडून होणारा पुरवठा विस्कळीत झाला आहे. आठ दिवसांतून दोन वेळा येणारी गाडी आता पंधरा दिवस उलटूनही फिरकत नाही. नोंदणी केलेल्या ग्राहकांना ताटकळत राहावे लागत आहे. सिलिंडर संपल्याने ग्रामस्थांना लाकूडफाटा गोळा करून स्वयंपाक करावा लागत आहे. वेळेचा अपव्यय होत आहे. श्रम वाढले आहे, गॅस एजन्सीकडून ब्लॅकमध्ये गॅस टाक्यांची विक्री होत असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत. शुक्रवारी पंधरा ते वीस दिवसांनंतर गॅस गाडी गावात आली. गॅस घेण्यासाठी एजन्सीसमोर मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गाडी आल्यावर नागरिकांनी कर्मचाऱ्याला धारेवर धरले. काही नागरिकांनी बेशिस्त वर्तन केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...तर आंदोलन करू नागरिकांनी सांगितले की, वेळेवर बुकिंग करूनही गाडी येत नाही. एजन्सीकडे विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात. प्रशासनाने लक्ष घालावे. गॅस पुरवठा सुरळीत करावा, येत्या काही दिवसांत गॅस गाडी नियमित सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
भक्तांच्या व्याधी निवारणाचा दावा करणारा आणि स्वतःला देवाचा अवतार सांगून महिलांच्या असहायतेचा फायदा घेणारा भोंदू खरात आजारांच्या चक्रव्यूहात पुरता अडकला आहे. बीपी, शुगर, भगंदर, बद्धकोष्ठ आणि पॅरालिसिस अशा पाच गंभीर व्याधींनी शरीर पोखरले असतानाही या भोंदूची लोभस प्रवृत्ती आणि फसवणुकीचे कुटील डाव आखण्याची प्रवृत्ती सुटलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे ज्या हातांनी तो लोकांची फसवणूक करायचा, त्याच हातांनी आता त्याला दिवसाला डझनभर गोळ्या खाव्या लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. समाजाला चमत्कारांच्या गप्पा सांगणारा हा भोंदू स्वतःच्या आरोग्यासाठी मात्र पूर्णपणे आधुनिक वैद्यकीय गोळ्यांवर अवलंबून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, खरातला पॅरालेसिसमुळे हात वर करता येत नाही. तो रोज मेंदूविकार तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधांचे सेवन करतो. ‘मी देवाचा अवतार, पैशांसाठी तगादा लावल्यास देवाचा कोप’ नाशिक | मोक्याचा ६० लाखांचा प्लॉट वृद्धाश्रमाकरिता २२ लाख २५ हजारांना कवडीमोल भावात खरेदी करून प्लॉट व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष देत प्लॉट विक्री व्यवहारात कांदा व्यापाऱ्याची ८५ लाखांना फसवणूक केली. ‘मी देवाचा अवतार आहे. पैशांसाठी आणि प्लॉटकरिता तगादा लावू नको, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल’ असा शाप देत कांदा व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू खरातविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरोधात नाशिकमध्ये दाखल झालेला हा १२ वा, तर राज्यातील एकूण १४ वा गुन्हा आहे.नांदूरशिंगोटे येथील कांदा व्यापाऱ्याने ही तक्रार दिली. २०१३-१४ मध्ये पाथर्डी गौळाणे रोडवर प्लॉट खरेदी केला होता. २०१९ मध्ये व्यवसायाकरिता प्लॉट विक्री करणे गरजेचे होते. त्यामुळे हे खरातच्या जाळ्यात अडकले. एकीकडे औषधांचा मारा, दुसरीकडे पोलिस चौकशी एकीकडे आजारांवर औषधांचा मारा आणि दुसरीकडे पोलिसांचा ससेमिरा अशा दुहेरी कात्रीत खरात सापडला आहे. शरीर साथ देत नसतानाही या भोंदूने विणलेल्या कारस्थानाचे जाळे आता त्याच्याच अंगलट येत आहे. औषधांच्या डोसपेक्षा त्याला कायद्याचा ‘डोस’ जड जात असल्याचे खरातवर दाखल गुन्ह्यातून निदर्शनास येत आहे. कोठडीत तणावामुळे वजन घटले एकेकाळी जी भीती व दरारा खरात याच्या नावाने होता, तो आता तणावात रूपांतरित झाला आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी त्याला अटक करून वैद्यकीय तपासणी केली असता वजन ७९ किलो होते. ते आता १६ दिवसांत ७ किलोने घटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासगी वैद्यकीय रेकॉर्डची माहिती देणे उचित नाही भोंदू खरात पाच आजारांवर औषध घेत आहे. वैद्यकीय रेकॉर्ड अत्यंत खासगी असते ते सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करता येत नाही. तसेच प्रत्येक आजारावर वेगवेगळी औषध दिले जातात. त्या आजारावर किती पॉवरची गोळी द्यावी हे उपचार करणारे डॉक्टर ठरवतात. ते पण रुग्णाच्या औषधांबाबत माहिती देणार नाहीत. - डॉ. प्रमोद गुंजाळ, फिजिशियन आता भोगतोय कर्माची फळे... ज्या हाताने शेकडो लोकांच्या आणि महिलांच्या आयुष्याशी खेळ केला, त्याला आज ही औषधे खात जगावे लागत आहे. अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत असतानाही तो घाणेरडे कृत्य करत होता. पापाचा घडा भरला की कर्माचे फळ मिळतेच, अशी भावना नागरिकांमध्ये उमटत आहे. प्लॉट अन् पैशांचाही गंडा सर्व्हे नंबर १९९ मधील ५१० वारांच्या प्लॉटची किंमत ६० लाख होती. खरातने वृद्धाश्रमाच्या नावे २२ लाख २५ हजारांना सृष्टी अशोककुमार खरात हिच्या नावे खरेदी केला. अद्याप वृद्धाश्रम बांधले नाही. चांगल्या लोकेशनवर प्लॉट घेऊन देण्याकरिता ८५ लाख रुपये घेतले, मात्र प्लॉट दिला नाही.
नागपुरात गुन्हेगारांची मुजोरी आता थेट ‘खाकी वर्दी’वर हात घालण्यापर्यंत पोहोचली आहे. आपल्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला “माझ्या मुलीपासून दूर राहा,” असा सज्जड दम भरणे एका राज्य राखीव पोलिस दलात कार्यरत जवानाच्या (एसआरपीएफ) जिवावर बेतले. पंकज ठाकूर यांचा दोन दोन पोलिस पुत्र असलेल्या दोघा भावांनी भररस्त्यात चाकूने सपासप वार करून खून केला. तर अर्पित सेंगल हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात गुंड प्रवृत्तीचे आकाश मंडल आणि हर्षित मंडल या भावांना पोलिसांनी अटक केली आहे. पंकज ठाकूर यांची १५ वर्षांची मुलगी आरोपी आकाश मंडल याच्या छेडछाडीमुळे त्रस्त होती. ठाकूर यांनी आकाशला तंबीही दिली होती. रस्त्यात गाठून दोघांवर वार गुरुवारी रात्री हनुमान जयंतीच्या महाप्रसादावेळीही पंकज यांनी आकाशला समजावले. पंकज ठाकूर आणि त्यांचे साळे कार्यक्रम संपवून घरी परतत असताना आरोपी आकाश आणि अर्पित सेंगल यांना दोघांनी शाळेजवळ गाठले. “खूप मोठा पोलिस झालास काय?” म्हणत आरोपींनी ठाकूर व सेंगल यांच्यावर हल्ला केला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी आरोप केला की, भोंदू खरातशी महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरेंसह उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी मोबाइलवर संवाद साधला होता. याची सखोल चौकशी करावी. मात्र, शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, त्यांनी पुरावे पोलिसांना द्यावेत. दरम्यान, कांदा व्यापारी फसवणूकप्रकरणी खरातवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्यांचे कॉल रेकॉर्ड काढणे बेकायदेशीर, कारवाई होऊ शकते दमानियांनी कॉल रेकॉर्ड जाहीर केले. यात कायदा स्पष्ट सांगतो की, एफआयआर रीतसर दाखल होऊन डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याची लेखी परवानगीविना कॉल रेकॉर्ड काढता येत नाहीत. गुन्हेगारी तपासासाठीच्या कायद्याचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक आहे. यात दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. खरातचा निकटवर्तीय आवारेंची ७ तास चौकशी शिर्डी |भोंदू खरातचा निकटवर्तीय व सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचे संस्थापक नामकर्ण आवारे यांची पोलिसांनी शुक्रवारी सात तास चौकशी केली. खरात टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर राहाता येथील समता पतसंस्थेत २५ मे २०२१ रोजी एका दिवसातच ५७ व्यक्तींच्या नावावर १०० खाती उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या सर्व खात्यांचा नॉमिनी खरात असल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी सात खातेदारांची पोलिसांनी चौकशी केली. यात त्यांनी आम्ही कुठलेही खाती उघडले नाही. व्यवहारही केले नाही. खात्यांवरील सह्याही आमच्या नाहीत, असे सांगितले. दुसरीकडे आवारेंनी समता पतसंस्थेतील आपल्या नावावरील सात खात्यांशी तसेच या खात्यांतून झालेल्या सुमारे १ कोटी २० लाखांच्या देवाणघेवाणीशी आपला संबंध नसल्याने म्हटले. सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत आवारेंच्या माध्यमातून उघडलेल्या तब्बल ३२ खात्यांची चौकशी सुरू असून, या सर्व खात्यांचा नॉमिनीही खरातच आहे. कायदेशीर पूर्तता करूनच खाती उघडली : कोयटे दरम्यान, कोपरगाव येथे समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, खरातशी संबंधित सर्व खाती कायदेशीर पूर्तता करूनच उघडण्यात आली. त्या खात्यांद्वारे झालेले व्यवहारही नियमांनुसारच झाले आहेत. शिर्डी पोलिसांनी पत्राद्वारे मागवलेली सर्व माहिती अवघ्या दोन तासांत सादर करण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित खाती तात्काळ गोठवली आहे. आत्महत्या प्रकरणाच्या पुर्नतपासाचे संकेत साई संस्थानचे कर्मचारी दिवटे यांच्या २०२२ मधील आत्महत्येप्रकरणी सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये खरातचा उल्लेख आहे. या प्रकरणाच्या पुनर्तपासाचे संकेत पोलिसांनी दिले. दरम्यान, शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणातील आरोपी किरण सोनवणे व अरविंद बावकेची कोठडी ३ दिवस वाढवण्यात आली आहे. कॉल केव्हाचे हे सांगितले नाही दमानिया म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल्स अशोक खरातला सामान्य सेलफोनवरून झाले होते. यात १० इनकमिंग आणि ७ आउटगोइंग कॉल्स आहेत. याचे उत्तर शिंदेंनी द्यायलाच हवे,” याव्यतिरिक्त भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (८ कॉल्स), सुनील तटकरे (८ कॉल्स), मंत्री आशिष शेलार (१ कॉल) आणि दीपक लोंढे (१८९ कॉल्स) यांची नावेही त्यांनी जाहीर केली आहेत. मात्र, हे कॉल केव्हा झाले, त्यात काय बोलणे झाले हे त्यांनी सांगितले नाही. ९ तास ३६ मिनिटांचे गुपित? दमानियांनी चाकणकरांवर आक्रमक निशाणा साधला. त्या म्हणाल्या, चाकणकरांनी खरातला १७७, तर त्यांच्या भगिनी प्रतिभा यांनी २३६ कॉल्स केले आहेत. इतका वेळ कोणीही आपल्या गुरूशी बोलत नाही,” चाकणकर यांनी खरातशी एकूण ३३ हजार ७२७ सेकंद म्हणजेच ९ तास ३६ मिनिटे संवाद साधल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून चाकणकरांना तत्काळ अटक करण्याची मागणी दमानिया यांनी केली.
गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर शनिवारपासून कमी होणार आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः आंबा, द्राक्ष आणि रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. आता पावसाचा जोर ओसरणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून रखडलेली शेतीकामे पुन्हा गती घेऊ शकतील. कुठे असेल प्रभाव? शनिवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. रविवार, सोमवारी पावसाचा जोर कमी होईल. मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस हजेरी लावू शकतो. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस केवळ ढगाळ हवामान आणि तुरळक सरींची शक्यता आहे.
इगतपुरीतील पंचतारांकित रिसॉर्टमध्ये चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केल्यानंतर आता या प्रकरणाचे धागेदोरे पोलिस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत. हे रॅकेट संरक्षण दिल्याशिवाय चालू शकत नसल्याने सीबीआयने संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. नाशिकसह अहिल्यानगर, नवी मुंबईमध्ये कॉल सेंटर सुरू होते. इगतपुरीमधील ‘रेन फॉरेस्ट’ रिसॉर्टवर छापा टाकून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात सीबीआयने अधिकाऱ्यांना नोटीस बजावल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. इगतपुरी येथील ‘रेन फॉरेस्ट’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकत बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त केले होते. अमेरिका, कॅनडातील परदेशी नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केली होती. छाप्यात पथकाने १ कोटी २० लाखांची रोकड व आलिशान गाड्या जप्त केल्या. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘प्रोटेक्शन मनी’ देत हे रॅकेट चालवत असल्याचा संशय आहे. डिसेंबरमध्ये हजेरी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने नोटीस दिल्याची माहिती आहे. दोन्ही अधिकारी दिल्ली येथे चौकशीकरिता गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दिल्ली गृह मंत्रालयाच्या निर्देशानंतर तपासाला वेग आला आहे. सीबीआयने नुकतीच ठाणे, पालघर, नवी मुंबई, नाशिक, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रात ही रॅकेट फोफावली, त्या अधिकाऱ्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. बदलीनंतर रॅकेट सुरूच ठाणे ग्रामीण, पालघर, नवी मुंबई येथून बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात हे कॉल सेंटर हलवले होते. या प्रकरणात नवी मुंबई कनेक्शन उघड झाले. तपासाची सुई आता नवी मुंबईतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वळली आहे. ‘प्रोटेक्शन मनी’ घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सीबीआयने संशयाच्या घेऱ्यातील अधिकाऱ्यांना नोटीस बजावत चौकशीला पाचारण केल्याची माहिती आहे.
नाशकातील राजकीय क्षेत्राला हादरा देणाऱ्या अशोक खरात प्रकरणानंतर आता त्यापेक्षाही मोठे आणि संतापजनक सेक्स स्कँडल उघडकीस आले आहे. गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून तब्बल १२१ महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी संशयित म्हणून ६३ वर्षीय रवींद्र गणपत एरंडे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवून ते “ब्लू फिल्म’ माफियांकडे विकल्याचा पोलिसांना दाट संशय असून, या प्रकारामुळे खरात प्रकरणानंतर महाराष्ट्राला दुसरा हादरा बसला आहे. आरोपी रवींद्र एरंडे याने स्वतःला वाचवण्यासाठी आणि समोरच्यांना अडकवण्यासाठी आधी सातपूर पोलिसांत खंडणीची खोटी तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून ४ जणांना अटकही केली. मात्र, तपासादरम्यान संशय बळावल्याने पोलिसांनी एरंडेचा ‘टॅब’ तपासला. तेव्हा त्यात ८१ अश्लील व्हिडिओ आढळले. तपासाचे ३ मुख्य पैलू : ज्याचा पोलिसांना करायचाय तपास ब्ल्ये फिल्म रॅकेट : एरंडेकडे मिळालेले १२१ व्हिडिओ प्रत्येकी २० मिनिटांचे आहेत. हे व्हिडिओ त्याने पॉर्न साइट्स किंवा ‘ब्ल्यू फिल्म’ बनवणाऱ्यांना विकले का? याचा तपास पोलिस करत आहेत.ब्लॅकमेलिंगचे जाळे: व्हिडिओच्या जोरावर त्याने पीडित महिलांकडून पैसे उकळले का किंवा त्यांना इतर कामांसाठी धमकावले का, याचाही शोध घेतला जात आहे.पीडितांची व्याप्ती: या जाळ्यात अडकलेल्या महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याने खळबळ उडाली.पोलिस कारवाई : संशयित रवींद्र एरंडे याला त्याच्या अशोकनगर येथील घरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गरजू महिलांना हेरून शोषण पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार एरंडे याने समाजातील कष्टकरी आणि गरजू महिलांना लक्ष्य केले होते. “मुलाला सरकारी नोकरी लावून देतो” किंवा “तुझे भविष्य उज्ज्वल करतो”, असे आमिष तो दाखवायचा. नाशिक आणि इगतपुरीतील विविध हॉटेल्समध्ये नेऊन तो महिलांवर अत्याचार करायचा. धक्कादायक म्हणजे, या अत्याचाराचे तो गुपचूप चित्रीकरणही करत असे. पोलिसांनी त्याच्याकडून ४ मोबाइल, २ पेनड्राइव्ह आणि १ मेमरी कार्ड जप्त केले आहे.
दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून नऊ ठार:मध्यरात्री काढले मृतदेह, एकाच कुटुंबातील 5 जणांचा समावेश
शहरातील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास राजू राजे यांच्या शेतातील विहिरीत कार (एमएच १५ जेएस १०५३) अनियंत्रित होऊन कोसळली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृत दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे असून त्यात एकाच कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. उर्वरित ४ जणांची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. विहिरीत पाणी आणि अधिक चिखल आणि अंधार असल्याने कार बाहेर काढण्यास अडचणींचा सामना करावा लागला. अखेर क्रेन आणि हायड्रा मशीनच्या सहाय्याने कार विहिरीतून बाहेर काढण्यात आली.
येडेश्वरीदेवीचा चैत्री पालखी सोहळा, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी येरमाळा : प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणा-या येरमाळा (ता. कळंब) येथील श्री येडेश्वरी देवीचा चैत्री पालखी सोहळा आई राजा उदे उदे… येडासरीचा उदे उदेच्या जयघोषात आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला. या यात्रेत राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक दाखल झाले होते. देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून […] The post येरमाळ््यात १५ लाखांवर भाविक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
समृद्धी महामार्गालगत गॅसची सर्वांत मोठी पाईपलाईन!
मुंबई : प्रतिनिधी आखाती देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधन आणि गॅसची अभूतपूर्व अशी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने सध्या पाईप गॅसवर भर दिला आहे. तसेच त्या दृष्टीने समृद्धी महामार्गाच्या बाजूने समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या वेळीच सरकारने मुंबई ते नागपूर अशी ६९४ किमी लांब नैसर्गिक गॅस वाहून नेणारी पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार […] The post समृद्धी महामार्गालगत गॅसची सर्वांत मोठी पाईपलाईन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
युद्धामुळे कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत, रुपयाचीही घसरण नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ््या पातळीवर फटका बसत आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जलवाहतूक ठप्प असून भारतात तयार होणा-या […] The post तेल, शाम्पू, साबण महागणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली
दिल्ली ते जम्मू-काश्मीरदरम्यान जोरदार धक्के नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्ली ते जम्मू आणि काश्मीरपर्यंत अनेक राज्यांत शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले. पंजाब, चंदीगड, हरियाणा आणि राजस्थानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगांमध्ये असल्याचे सांगण्यात आले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.९ होती. जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये सुमारे १० ते १५ सेकंद भूकंपाचे […] The post राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धुळे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी
वाहतूक ठप्प, तब्बल ४७ कि. मी. अंतरापर्यंत वाहने अडकली धाराशिव : प्रतिनिधी येरमाळ््यात शुक्रवारी येडेश्वरीदेवीचा चैत्री पालखी सोहळा उत्साहात पार पडला. या निमित्ताने येडेश्वरीच्या दर्शनासाठी १५ लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती. दुपारच्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला लागताच वाहतुकीचे ढिसाळ नियोजन केल्याने येरमाळ््यात धुळे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली. वाहने रस्त्यावरच अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा […] The post धुळे-सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ऐन परीक्षेच्या कालावधीत होणार पट पडताळणी मोहीम
जळकोट : प्रतिनिधी सन २०२५-२६ चे शैक्षणिक सत्र आता याच महिन्यामध्ये संपणार आहे . दि ११ एप्रिलपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आयोजित केलेल्या नियतकालिक मूल्यांकन चाचणी परीक्षेची सुरुवात दि ११ एप्रिलपासून सुरू होत आहे . याच दिवसापासून महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय याच्या वतीने पट पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. […] The post ऐन परीक्षेच्या कालावधीत होणार पट पडताळणी मोहीम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रक्रियावादी भूमिका ही न्यायव्यवस्थेतील अडथळा
लातूर : प्रतिनिधी सद्यस्थितीत न्याय व्यवस्थेत केवळ प्रक्रियावादी भूमिका मांडली जात आहे. न्यायमूर्तींनी एकाद्या प्रकरणातील निकाल देत असताना किंवा वकिल ज्या प्रकरणाची मांडणी करीत आहे. त्याच्या पलीकडे जाऊन पाहण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. न्याय व्यवस्थेत केवळ प्रकियावादी भूमिका निभावली जात असल्याने प्रकरणातील न्याय्यीकप्रणालीवर विपरित परिणाम होत आहे, असे परखड मत सुप्रसिध्द विधीज्ज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त […] The post प्रक्रियावादी भूमिका ही न्यायव्यवस्थेतील अडथळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर येथील प्रसिध्द पशू बाजाराचा शुभारंभ
रेणापूर : प्रतिनिधी एकेकाळी रेणापूरच्या विकासात व वैभवात भर पाडणारा तसेच पंचक्रोशीत नावारूपास आलेला रेणापूरचा जनावराचा बाजार केवळ जागा व मूलभूत सुविधा नसल्यामुळे गेल्या दोन अडीच दशकांपासून मोडकळीस आला आहे. या बाजारास पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन हा बाजार पूर्वी भरत होता त्याच ठिकाणी सुरू केला आहे. यावर्षी शुक्रवारी […] The post रेणापूर येथील प्रसिध्द पशू बाजाराचा शुभारंभ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आकांक्षा जाधवला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील आकांक्षा सुरेश जाधव बारावी कला हिने ५० किलो वजन गटातील फ्री स्टाईल राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे . हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर येथे दि.२८ व २९ मार्च या कालावधीत […] The post आकांक्षा जाधवला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांत सुरू असलेल्या अवकाळी पावसाने, सोसाट्याच्या वादळी वा-याने आणि भीषण गारपिटीने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. ऐन कापणीच्या आणि तोडणीच्या हंगामात निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेती पिकांचे अपरिमित नुकसान झाले असून बळिराजा पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. द्राक्ष, केळी आणि आंबा यांसारख्या फळबागांसह रबी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने ग्रामीण […] The post लहरी निसर्गराजा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माळहिप्परगा-पाटोदा मार्गावरील पूल बनला जीवघेणा
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द दरम्यान अतिशय कमी उंचीचा पूल आहे. पावसाळ्यात थोडाही पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी वाहते . गतवर्षी पावसाळ्यात या पुलावरून प्रवास करीत असताना पुरात वाहून जाऊन दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली होती. […] The post माळहिप्परगा-पाटोदा मार्गावरील पूल बनला जीवघेणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोहरेगाव येथे उद्या मोफत कर्करोग निदान शिबिर
रेणापूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे युवा नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पोहरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा कदम यांच्या पुढाकारातून सोमवार दि ६ एप्रील रोजी ‘मोफत कर्करोग (कॅन्सर) निदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत […] The post पोहरेगाव येथे उद्या मोफत कर्करोग निदान शिबिर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पावसासह आलेल्या जोरदार वादळी वा-यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच जोरदार वा-यामुळे गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके आडवी पडली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान […] The post अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप
लातूर : योगीराज पिसाळ जिल्हयात पावसाळा लांबल्यामुळे साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगामही उशिराने सुरू झाला. जिल्हयातील १२ साखर कारखान्यांनी मार्च अखेर पर्यंत ५५ लाख ३१ हजार २५० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ५२ लाख २४ हजार ८९७ क्विटल साखरेचे वेळेत व विक्रमी गाळप करून नवा इतिहास रचत ऊस गाळप हंगामाची सांगता झाली आहे. जिल्हयात पहिल्यांदाच […] The post ५५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पदोन्नतीनंतरच समायोजन करण्याचे शिक्षणाधिकारी अंधारे यांचे आश्वासन
लातूर : प्रतिनिधी २०२४-२५ च्या व २०२५_-२६ च्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनापूर्वी लातूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधर या सर्व पदांची पदोन्नती करण्याचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करून सदर पदांची पदोन्नती करण्यात यावी. तसेच ज्या शाळांची संच मान्यता चुकलेली आहे व २०२४-२५ च्या संच मान्यतेपेक्षा २० ऑक्टोबर २०२५ च्या […] The post पदोन्नतीनंतरच समायोजन करण्याचे शिक्षणाधिकारी अंधारे यांचे आश्वासन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

32 C