शहरासाठी मंजूर २,७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (९ जानेवारी) बजावले. महापालिकेची निवडणूक सुरू आहे. निकालानंतर लोकनियुक्त मंडळ मनपाचा कारभार पाहील. अशा स्थितीत नवीन पाणीपुरवठा योजनेत अडथळे आणले जाऊ शकतात, अशी शंका सुनावणीप्रसंगी उपस्थित झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी योजनेच्या कामात अडथळे आणणाराची गय करणार नाही. कामात आणलेला अडथळा हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल. अशी व्यक्ती कुठल्याही पदावरील अथवा हुद्द्याची असो त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. नवीन पाणीपुरवठा योजनेत ३७०० अश्वशक्तीचे ३ पंप बसवले जाणार आहेत. त्यापैकी एक पंप बसवला असून त्याची चाचणी पूर्ण झाल्याचे सुनावणीप्रसंगी सांगण्यात आले. जॅकवेलसह २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत वेल्डिंग व इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. संबंधित कचरा एक पंप सतत सुरू ठेवल्यानंतर एक महिन्यात स्वच्छ होईल. २ पंप सुरू ठेवले तर कचरा स्वच्छ करण्यास १८ दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती जीव्हीपीआर कंपनीने दिली. अडीच हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जॅकवेलच्या ‘ए पोर्शन’चा स्लॅब पूर्ण झाला. अंतर्गत जलवाहिनीचे १५ झोन असून पहिल्या टप्प्यातील १२० किमीचे व दुसऱ्या टप्प्यातील २३७ किमीचे काम शिल्लक आहे. कामावर एक हजार कामगारांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ५०० कामगार कामावर असल्याचे सांगण्यात आले. योजनेतील ५३ जलकुंभांपैकी केवळ नऊ जलकुंभांचे काम पूर्ण केल्याचे सुनावणीदरम्यान सांगण्यात आले आहे. मनपा १५ दिवसांत देणार २१.१८ कोटी महापालिकेला शासनाकडून कर्जापोटी मिळालेले ८२२ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने, कामाच्या प्रगतीनुसार कंपनीस दिले जात असल्याचे मनपाचे वकील संभाजी टोपे यांनी सांगितले. जीव्हीपीआर कंपनीने जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेले बिल खातरजमा केल्यानंतर मनपाकडे पाठवले जाते. अशा प्रकारचे २१.१८ कोटींचे बिल मनपाकडे पाठवले आहे. ते तपासून १५ दिवसांत अदा केले जाईल, असे ॲड. टोपे यांनी न्यायालयास सांगितले. याचिकेत न्यायालयाचे मित्र ॲड. शंभुराजे देशमुख, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, मूळ याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अमित मुखेडकर, जीव्हीपीआरसाठी ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, जीवन प्राधिकरणातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाणीटंचाई, रखडलेली विकासकामे, अर्धवट रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न आणि रात्री-अपरात्री होणारा पाणीपुरवठा या मूलभूत समस्यांवरून सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गट (उबाठा) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उमेदवारीपासून ते विकासकामांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादच अधिक केंद्रस्थानी आला आहे. शिवसेनेचे उमेदवार बाबाभाऊ तायडे यांनी माजी नगरसेवकांवर विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत, पाणी योजनेचे “तीनतेरा” झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर खोटी आश्वासने, जातीय राजकारण आणि सत्तेसाठी हिंदुत्त्वाशी तडजोड केल्याचा आरोप केला आहे. उमेदवार पळून जाणे, बाहेरून उमेदवारी “आयात” केल्याचे आरोप, आणि पाणी प्रश्नावरून उभे राहिलेले आंदोलनाचे इशारे यामुळे निवडणूक रणधुमाळी अधिक तीव्र झाली आहे. ६५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रभागात टँकरवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा, बंद पथदिवे आणि अस्वच्छतेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मतदार कोणाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिव्य मराठी डिजिटलचा लढाई मनपाची मुद्दा नागरिकांच्या शो ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिंदे-ठाकरे शिवसेनेमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता या प्रभागातील समस्या सोडवल्या जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खैरेंनी पाणी योजनेचे तीन तेरा वाजवले शिवसेनेचे उमेदवार बाबाभाऊ तायडे म्हणाले की, आमच्य प्रभागात समस्यांचा डोंगर आहे. माजी नगरसेवकांनी आमच्या परिसराचे वाटोळे केले आहे.आमच्याकडे ड्रेनेज, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची टाकी नाही असे एक ना अनेक प्रश्न आहेत.परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.आमच्या परिसरात शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक कामे केली आहेत, या कामांवर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. नगरसेवकांचे काम होते ते त्यांनी केले नाही उलट आमच्या परिसराला तांडा म्हणून संबोधले यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविरोधात रोष आहे. त्यांना दांडा दाखवण्याचे काम आम्ही करणार आहोत. सत्तेशिवाय शहानपण नसते, आमच्याकडे आमदार आमचे, खासदार आमचे, मंत्री आमचे आहेत त्यामुळे आम्ही कामे करू शकत आहोत. चंद्रकांत खैरे यांनी पाणी योजनेचे तीन तेरा वाजवले. हिंदुत्त्वासाठी केलेली युती यांनी सत्तेसाठी तोडलीठाकरे गटाचे उमेदवार कुणाल राऊत म्हणाले की, आमच्या प्रभागात अनेक समस्या आहेत या वॉर्डात सत्ताधारी अनेक कामे केल्याचा दावा करतात ते ऐकले की एकच शब्द आठवतो, फेको, फेको आणि फेको लपेटो अशी परिस्थिती झाली आहे.याचे दोन्ही आमदार विधानसभेच्यावेळी काढावर निवडून आले आहेत. ते पण जातीच्या गणितामध्ये तफावत नसती तर हे दोन्ही आमदार पराभूत झाले असते. आम्ही पाण्यासाठी रक्त घ्या पण पाणी द्या असे आंदोलन संजय शिरसाट यांच्या घरासमोर करणार होतो त्यांनी आंदोलनच होऊ दिले नाही. हिंदुत्त्वासाठी केलेली युती यांनी सत्तेसाठी तोडली, काय उपयोग तुम्ही हिंदुत्त्वाच्या नावाने एकत्र येतात आणि युती तोडतात. ही लोकं जातीच्या नावाने राजकारण करतात, शहर पूर्णपणे भकास झाले आहे. आमच्याकडे पाणी येण्याची वेळ निश्चित नाही, त्यामुळे महिलांना खूप त्रास होतो. यांना प्रचाराला लोकं भेटत नाही. रस्ते यांनी केलेले नाहीत, ते केंद्र सरकारच्या निधीतून झाले आहेत. पाण्याचे आश्वासन दिले पण योजना पूर्ण करू शकलेले नाही. मनपा आयुक्तांनी पैसे लुटले आहेत दोन महिन्यात ते पळून जाणार आहे. ही कुणाची माणसं आहेत? रस्त्याचे उद्घाटन ६ महिन्यापूर्वी झाले आणि निवडणुकीवेळी काम करत मतदान मिळवायचे हे काम सत्ताधारी करत आहेत. तर जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम सुद्धा सरकारकडून सुरू आहे. हे सर्व ईडीला घाबरुन पळून गेलेली लोकं आहेत. सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागात राहतात ठाकरे गटाचे विलास संभाहारे म्हणाले की, आमच्या प्रभागात रात्री २ वाजता किंवा ३ वाजता येते. त्या वेळेत बदल करणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांकडून अनेक वेळा पाण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. मग पाणी का आले नाही केवळ पाइपलाइन टाकून ठेवल्या आहेत. सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागात राहतात त्यामुळे त्यांनी तिथून उमेदवारी घेतली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते सक्षम आहेत ते पक्षासाठी काम करू शकतात.केवळ २० टक्के काम राहिलेशिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा जगताप म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात पाहिला तर केवळ पाण्याची समस्या आहे, इतर कोणतीही समस्या नाही. पाण्याचा विषय आमच्या प्रभागात आहे तो येणाऱ्या ४ ते ५ महिन्यात संपणार आहे.यामुळे महीला खूश आहेत. आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, ८० टक्के कामे झालेली आहेत, आता आमच्यासाठी केवळ २० टक्के काम राहिलेले आहे. सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या आहेत. आम्ही जनतेचे काम करत आहोत मागील दोन निवडणुकीत आम्ही विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ. लोकांना पाणी न मिळण्यासाठी जुने नगरसेवक कारणीभूत आहेत, ते उबाठाचे नगरसेवक होते. पाण्याची योजना कुणी खाल्ली हे पाहणं महत्त्वाचे आहे. आमचे सरकार आल्यापासून अनेक कामे झाली आहेत, आता पाणी येणार आहे. मे महिन्यात पाणी येणार आहे, आम्ही खोटे बोलणारी लोकं नाहीत. उबाठा गटाला नेताच उरलेला नाही. पालकमंत्री-मंत्र्यांनी शहरासाठी काहीही केलेल नाही ठाकरे गटाचे प्रमोद दुथडे म्हणाले की, मनपा आल्यापासून तिच्यावर शिवसेना-भाजपची सत्ता आहे.त्यावेळी आम्ही एक ते दोन दिवसांनी पाणी देत होतो. पण हे सराकर आल्यापासून ८ ते १० दिवसांनी पाणी येते. बेरात्री पाणी येत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी नगरसेवक काहीच करु शकत नाहीत. पालकमंत्री असो की मंत्री त्यांनी शहरासाठी काहीही केलेल नाही. त्यांचे शहरामकडे लक्षच नाही. नगरसेवकांना जास्त काही निधी मिळत नसतो. पण नगरविकास मंत्री यांच्यामुळे प्रभागाचे नुकसान झाले आहे. बेरात्री येणारे पाणी आमच्या काळात देणार नाही.टँकर मुक्त प्रभाग करण्याचा आमचा हेतू राहणार असून दिवसा पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. काही लोकांनी माझ्यावर आरोप करणाऱ्या लोकांना माहिती नसेल की मी गेली २५ वर्षे लोकांची सेवा करत आहे, आमदारकी लढलो हे खरे पण पक्षाचा झेंडा म्हणजेच आमचा उमेदवार आहे. या आहेत प्रभागाच्या समस्या हिमायतबाग, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, भीमनगर, कानिफनाथ कॉलनी आदी भागांमध्ये मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. अर्धवट काम केलेले रस्ते, जुनाट ड्रेनेजलाइनमुळे सांडपाणी रस्त्यावर येणे, गलिच्छ नाले व डासांचा उपद्रव यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.या प्रभागातील अद्यापही टँकरने पाणीपुरवठा होतो. अनेक ठिकाणी तर टँकरदेखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना बोअर आणि विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.या परिसरात ६५ हजार नागरिक राहतात. मात्र, असे असले तरी घंटागाडी आठवड्यात तीन ते चार वेळेसच येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. प्रभागात १८ घंटागाड्या आहेत. मनपा आणि स्मार्ट सिटीने रस्त्याच्या कामासाठी मोठा खर्च केला. यामुळे रस्त्याचे जाळे वाढले. मात्र, अंतर्गत रस्त्याची कामे अद्याप बाकी असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांचा ताबा आणि स्ट्रीट लाइट बंद असल्याने रात्री अपघात व गुन्ह्यांचा धोका वाढल्याचे स्थानिकांन सांगितले. अशी आहे प्रभागाची व्याप्ती पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, हनुमान टेकडी, हिमायतबाग, विद्युत कॉलनी, गणेश कॉलनीचा काही भाग, चाऊस कॉलनी, विद्युत कॉलनी, साफल्यनगर, पेठेनगर, भीमनगर भागश:, कानिफनाथ कॉलनी, कुतुबपुरा, पराक्रम कॉलनी. एकूण मतदार । 35 हजार 602
छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांना रोजच्या आयुष्यात मूलभूत नागरी सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात समाविष्ट असलेल्या या प्रभागात पहाडसिंगपुरा, बेगमपुरा यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो. मात्र, या भागातील नागरिकांना पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते आणि पार्किंगसारख्या अत्यावश्यक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या समस्येमुळे आम्ही यावेळी मतदानचं करणार नाहीत असं प्रभागातील नागरिकांनी दिव्य मराठीच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये मत मांडले. दूषित पाण्याची समस्या कायम या प्रभागातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची. अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही. पाणी येण्याची कोणतीही ठरावीक वेळ नसल्यामुळे नागरिकांना जागून पाणी भरावे लागते. यावर बोलताना प्रभागातील रहिवासी कस्तुरीबाई गायकवाड म्हणतात 'आमच्या भागात एक तर ८-१० दिवसांनी पाणी येत. तेही वेळेवर नाही. रात्री - बेरात्री कधीही पाणी सोडल जात. त्याचा काही एक टाइम ठरलेला नाहीये. पाणी सोडल्यावर त्यातून आर्धा तास तर ड्रेनेजचे पाणी येते. त्यामुळे त्याचा वास एवढा येतो की, ते हातात सुद्धा घ्यावस वाटत नाही. आधीच एक तास पाणी येत. त्यातही आर्धा तास घाण पाणी आम्ही कस पाण्याचं नियोजन करावं तेच कळत नाही. दरवेळी विकत टँकर मागवणे म्हणजे आमच्या खिशाला कात्री बसणं आहे.' या प्रभागातील कामगार, महिला, वृद्ध नागरिक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रभागातील अनेक ठिकाणच्या लोकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ड्रेनेज लाईन चोकअप होते प्रभाग क्रमांक ३ मध्ये ज्याप्रमाणे पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत याचबरोबर ड्रेनेज व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट आहे. बेगमपुरा परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप झालेल्या आहेत. या भागातील रहिवासी वैष्णवी गायकवाड म्हणतात की, 'सतत ड्रेनेज लाईन चोकअप होत राहते. संपूर्ण रस्त्यावर घाण पाणी सांडलेले असल्यामुळे आम्हाला त्या दुर्गंधीत राहावं लागत आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत. आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे आमचे छोटे - छोटे लेकरं त्याच पाण्यात खेळतात. अनेकदा आम्ही तक्रार केली मात्र, बोलूनही काही एक फायदा नाही. ही लोक काहीच करत नाहीत. आमच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे.' आमच्या सुख दुःखात साथ नाही प्रभागातील वंदनाताई म्हणतात की, 'मध्यरात्री आम्हाला पाणी सोडतात. आम्ही सगळेजण झोपेत असतो. रात्री जर कोणाला मोटारीचा शॉक बिक बसला तर ही लोक बघायला सुद्धा येत नाहीत. माझ्या आईच्या घरी आग लागली होती. तर कोणीही बघायला आलं नाही. आम्ही काही पैसे मागत नाहीत. पण साधे सांत्वनपर शब्द सुद्धा यांच्या तोंडून निघाले नाहीत. जर आमच्या सुख -दुःखात साथ देऊ शकत नसतील तर आम्ही मतदान तरी का करायचं? ना आम्हाला पाणी व्यवस्थित मिळत, ना रस्ते बरोबर आहेत. सगळे अर्धवट काम करून सोडून दिली आहेत. त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जावं म्हणतात आमच्या हातात नाही. आमच्याकडे वेळ नाही. ड्रेनेज लाईन आमच्या फुटलेल्या आहेत पण त्याकडे कोणाचं लक्ष सुद्धा नाहीये. तेच पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत. कधी कधी तर असं वाटत की आम्ही गटार पितो आहोत. जर आमचे प्रश्न सोडवले जात असतील तरच मतदान. नाही तर नाही'. स्वच्छतेबाबतही परिस्थिती समाधानकारक नाही. काही भागांमध्ये कचरा गोळा करणारी गाडी नियमितपणे येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कचरा साचून राहतो. रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी येत नसल्याने अनेक ठिकाणी रहिवाशांनाच रस्ते साफ करावे लागत आहेत. ही बाब महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सतत फोन करून सांगावं लागत रहिवासी अर्चनाताई म्हणतात की, 'आमच्याकडे सतत पाण्याची पाईपलाईन फुटत राहते. त्यामुळे आम्हाला पाणीच व्यवस्थित मिळत नाही. ड्रेनेज फुटल्यानंतर आम्ही फोने केल्यानंतर त्यांना जाग येते. ड्रेनेज फुटल्यामुळे त्याच सगळं पाणी दारात येत आणि त्यामुळे आम्हाला त्याचा एवढा त्रास होतो की, कोणी ना कोणी आजरी पडतच. फक्त एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला फोन करून सांगायची वेळ येऊ नये. येणाऱ्या नगरसेवकाच आमच्याकडे लक्ष असावं.' आम्ही स्मशानात खेळतो प्रभागातील काही मुलांशी आम्ही संवाद साधला तेव्हा समजले की, येथील मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये. यावर बोलताना जय झाडगे म्हणतो 'मी ज्ञानेश्वर विद्यालयात शिकतो. माझ्या शाळेला खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये. आमच्या भागात कुठेच ग्राउंड नाहीये. त्यामुळे आम्हाला विद्यापीठच्या ग्राउंड मध्ये जाऊन खेळावं लागत. नाहीतर आम्ही स्मशानात जाऊन फुटबॉल खेळतो. आमची एवढीच अपॆक्षा आहे की, आम्हाला आमच्या भागात एक तरी छोटस का होईना पण ग्राउंड द्या. जेणेकरून आम्हाला स्मशानात खेळण्याची वेळ येऊ नये.' तसेच या प्रभागात अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठेही वाहन लावली जात असल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांना अडथळे निर्माण होतात. याचा थेट फटका येथील रहिवाशांना बसत आहे. एकूणच, छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. येत्या काळात तरी महापालिकेने या भागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. अशी आहे प्रभागाची रचना प्रभाग क्रमांक ३ मध्ये बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, विद्युत कॉलनी, हनुमान टेकडी, साफल्य नगर, पेठे नगर, भावसिंगपूरा भागशः, भीम नगर भागशः, कानिफनाथ कॉलनी, जयसिंगपुरा कुतुबपुरा, पराक्रम कॉलनी भागशः, गणेश कॉलनी भागशः, एन-12, चाऊस कॉलनी, हिमायत बाग यांचा समावेश होतो. या भागात एकूण 43062 लोकवस्ती आहे.
देशात ८० टक्के मनोरुग्ण उपचारापासून वंचित!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि खर्चिक उपचार मोफत व्हावेत, या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजना जाहीर करतात. मात्र, प्रत्यक्षात देशात लाखो रुग्ण कोणत्या ना कोणत्या कारणावरून उपचारापासून वंचित राहात आहेत. त्यातच देशातील तब्बल ८० टक्के रुग्ण उपचारापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. इंडियन सायकेट्रिक सोसायटीने (आयपीएस) […] The post देशात ८० टक्के मनोरुग्ण उपचारापासून वंचित! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दुस-यांदा अमेरिकेची सत्ता हाती आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आश्चर्यकारक अन् धोकादायक निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकामागून एक धक्कादायक निर्णय घेतले जात असल्यामुळे ट्रम्प यांचे डोके निश्चितच बिघडले आहे असे सा-या जगाचे ठाम मत बनत चालले आहे. ट्रम्प सत्तेत आल्यापासून सातत्याने भारतासह जगाची चिंता वाढवणारे निर्णय घेत […] The post ट्रम्पचे डोके बिघडले? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर तालुक्यातील समसापूर गट क्रमांक ४६ व ४७ मधील शेतात ठेवलेला सोयाबीन आणि तुरीची गंज कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दि. ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी प्रल्हाद मारुती मुदामे […] The post सोयाबीन-तुरीची गंज जळून खाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मतदारांनी काँग्रेस-वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे
लातूर : प्रतिनिधी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळापासून धोरणं आखून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. तोच धागा पकडून लोकनेते विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचा विकास केला. त्यांच्या विचारावर पाऊल टाकत आमदार अमित देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख हे सुध्दा काम करीत असून काँग्रेस पक्षाचा हात आम आदमी के साथ, या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांच्या विकासाच्या योजना […] The post मतदारांनी काँग्रेस-वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर शहराच्या रस्त्यांवर घुमला लोकशाहीचा जयघोष
लातूर : प्रतिनिधी येणा-या काळात लातूर महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि जागरूक मतदार ही ओळख निर्माण व्हावी, यासाठी शहरात गुरुवारी एक अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. ५३ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी कॅडेट्स आणि लातूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदान जनजागृती रॅलीने लातूरकरांना मतदानाचा संदेश अतिशय प्रभावीपणे दिला. शहरातील दोन महत्त्वाच्या भागातून ही रॅली निघाली. स्वामी […] The post लातूर शहराच्या रस्त्यांवर घुमला लोकशाहीचा जयघोष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल नाशिक : प्रतिनिधी भाजपचे हिंदुत्व हे खरे आहे की चुनावी आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राम मंदिर केले म्हणून तुम्ही डंका पिटला आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्येला बसले, तेथील सगळी झाडे जर कापली तर आम्ही काय सांगणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. […] The post भाजप दलाल-उपटसुंभांचा पक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी जी-२४ ग्रुपचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा
लातूर : प्रतिनिधी संविधानिक संस्थाचे स्वातंत्र्य संपुष्टात आणून सर्व सत्ता एका विचारसरणीच्या हातात केंद्रित केल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आज भाजपने देशावर हुकूमशाही लादली आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आरएसएसच्या आधीपत्याखाली काम करणा-या जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी जी-२४ या ग्रुपने लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. हुकूमशाही […] The post जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी जी-२४ ग्रुपचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रभाग १४, १५, १७ मधील माफियाराज मोडून काढा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच इकडून तिकडे उडी मारुन गेलेल्यांनी प्रभाग क्रमांक १४, १५ आणि १७ मधील नागरिकांचा छळ केला. या भागात दहशत पसरवली आहे. या परिसरात माफियाराज सुरु आहे. हे मोडून काढायचे असेल तर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या चारित्र्यवान, उच्च शिक्षीत, कर्तव्यदक्ष, कर्तबगार, प्रामाणिक, गतिशील, सुसंस्कृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, […] The post प्रभाग १४, १५, १७ मधील माफियाराज मोडून काढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भविष्यात तुमच्या मुलांना पश्चाताप होऊ नये, 1500 रुपयांसाठी आपले आई-वडील विकले गेले असे म्हणू नये अशी जर इच्छा असेल शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत बोलताना केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली. नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामे विसरली. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा आलेच नाहीत. 2012 साली आमची सत्ता असताना त्यावेळी कुंभमेळा झाला. त्याचे नियोजन उत्तम करण्यात आले. त्यासाठी एकही झाड कापले नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा सत्कार झाला. मग आता काय झाले? भाजपचे आगोदरच ठरते. कुंभमेळ्याच्या नावाखाली आता झाडे तोडायची, नंतर साधू परत गेल्यानंतर ती जागा उद्योगतपीच्या घशात घालायची. यांचे हे सगळे आधीच ठरलेले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. फडणवीसांनी एकही काम केले नाही पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केले. पण एकही काम त्यांनी केले नाही. भाजपने फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोकांना भुलवले. 2017 साली आमची सत्ता गेली आणि भाजप निवडून आला. एवढे काम करूनही मला पराभव पाहायला लागला आणि ज्या लोकांनी काहीही केले नाही ते सत्तेत आले. आजही तेच सुरू आहे. पैसे वाटायचे आणि सत्ता मिळवायची हे काम सुरू आहे. आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली राज ठाकरे म्हणाले, नाशिकमध्ये आमची सत्ता असताना रतन टाटा यांच्या मदतीने आम्ही बोटॅनिकल गार्डन तयार केले होते. गेल्या पाच वर्षात यांनी त्याची काय अवस्था केली? नाशिकमध्ये आमची सत्ता असताना महापालिकेवर 700 कोटी कर्ज होते. पुढच्या पाच वर्षात आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली. पाच वर्षात विरोधकांकडूनही कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला नाही. मी कंत्राटदारांची बैठक घेतली होती. तुमच्याकडे जर कुणी पैसे मागितले तर सांगा, पण जर रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असे सांगितले होते. हे होऊ शकते, पण यांना आता करायचे नाही. कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर महाराष्ट्रात 60-70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, 1952 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते होते ना, मग बाहेरून का घेता? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे ठिक आहे, पण सगळीकडेच हे सुरू. त्यातून तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त कामंच करायची. भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला आमचा आई-बाप 1500 रुपयांसाठी विकले गेले, विकास झालाच नाही असे जर तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये असे वाटत असेल तर आम्हाला सत्ता द्या. आज आमच्या पाठिशी उभे राहा, भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला. हे शहर उत्तम करायचे असेल तर तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
ज्येष्ठाची 17 लाखांची फसवणूक:कायदेशीर कारवाईची भीती दाखवत सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची कायदेशीर कारवाईची भीती दाखवून १७ लाख ४३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या बँक खात्याचा वापर केल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास करत असल्याची बतावणी त्यांनी केली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवाद्यांनी केला असून, जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले. कायदेशीर कारवाईची आणि अटकेची भीती दाखवून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला धमकावले. अटक टाळण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा केली. परंतु आणखी पैशांची तक्रारदार यांना संशया आला त्यांनी खातरजमा केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा विविध घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
खराडीत युवकाची दगडाने ठेचून हत्या:इन्स्टाग्राम वादातून मित्रानेच केला खून, आरोपी अटकेत
खराडी परिसरात सोशल मीडियावरील जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास स्वीट इंडिया चौकाजवळील स्वास्थ क्लिनिक इमारतीसमोर घडली. आकाश उर्फ अक्षय किसन तराले असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी खराडी पोलिसांनी विजय उर्फ जलवा संजय वाघमारे याला अटक केली आहे. मृत आकाश हा मूळचा लोहगाव येथील खांडवे नगरचा रहिवासी होता आणि सध्या तो वाघोली येथे राहत होता. तो नेहमी त्याचा मित्र अमित चंद्रकांत भोसले याच्यासोबत खराडी परिसरात येत-जात असे. आकाश, अमित आणि आरोपी विजय हे तिघेही एकमेकांना ओळखत होते आणि त्यांची स्वीट इंडिया चौक परिसरात अनेकदा भेट होत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे सोशल मीडियावरील जुना वाद होता. आकाश त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर सूरज सालबे नावाच्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ ठेवत असल्याने विजय नाराज होता. यावरून त्यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. ८ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आकाश आणि अमित दुचाकीवरून खराडीत आले होते. रात्री नऊच्या सुमारास विजय हातात बिअरची बाटली घेऊन तिथे आला आणि आकाशला शिवीगाळ व धमक्या देऊ लागला. वाद वाढल्यानंतर विजयने बिअरच्या बाटलीने आकाशच्या डोक्यात वार केला. आकाश जमिनीवर कोसळताच आरोपीने जवळचा मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यावर पुन्हा वार करत निर्घृणपणे हल्ला केला. या घटनेने घाबरलेल्या अमितने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत आकाशला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खराडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पाकने शोधली ‘युपीआय’पेक्षा वेगवान, सुरक्षित पेमेंट प्रणाली
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानने आपल्या अडाणी जनतेसाठी भारताच्या प्रगत आणि सुरक्षित युपीआय सिस्टीमपेक्षाही फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली आहे. एखाद्याला पैसे पाठवायचे असतील तर पाकिस्तानी लोकांना बोटांनी टाईप करण्याची किंवा विशिष्ट मेनू शोधण्याची गरज राहणार नाही. पाकिस्तान आपल्या बँकिंग क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत असून, लवकरच तिथे व्हॉइस-अॅक्टिव्हेटेड बँकिंग अॅप्स लाँच केले जाणार आहेत. या सुविधेमुळे […] The post पाकने शोधली ‘युपीआय’पेक्षा वेगवान, सुरक्षित पेमेंट प्रणाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तामिळनाडूत भाजपची रणनीती; ५६ जागा, ३ मंत्रिपदावर ठाम
चेन्नई : वृत्तसंस्था भाजपाने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. २०२६ वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडू दौरा केला. त्यात भाजपा आणि एआयडिएमके दोन्ही पक्षात युती, जागावाटप आणि सत्ता फॉर्म्युल्याची चर्चा झाली. एआयडिएमकेचे महासचिव माजी मुख्यमंत्री एडप्पाडी पलानीस्वामी यांची नुकतीच अमित शाह यांच्यासोबत बैठक […] The post तामिळनाडूत भाजपची रणनीती; ५६ जागा, ३ मंत्रिपदावर ठाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लॅँड फॉर जॉब : लालूंच्या कुटूंबियांवर आरोप निश्चित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. रेल्वेतील कथित जमीन देऊन नोकरी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित केले आहेत. यामुळे आता या प्रकरणाचा रीतसर […] The post लॅँड फॉर जॉब : लालूंच्या कुटूंबियांवर आरोप निश्चित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सबरीमाला सोने चोरी; मुख्य पुजारी ताब्यात
सबरीमाला : वृत्तसंस्था सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी आज एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने मंदिर परिसरातील सोन्याचे दागिने गायब झाल्याप्रकरणी मंदिराचे मुख्य पुजारी कंडारारू राजीवारू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन सरकारने चोरीचा तपास […] The post सबरीमाला सोने चोरी; मुख्य पुजारी ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेअर मार्केटमध्ये पाचव्या दिवशी घसरण; ११.५६ लाख कोटी बुडाले!
मुंबई : वृत्तसंस्था भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण सुरूच असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, जवळपास दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा ८३ हजारांच्या पातळीवर आला आहे. गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल ११.५६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शुक्रवारी सेन्सेक्स सुमारे ४७० अंकांनी घसरून ८३,७०८ च्या आसपास पोहोचला. सकाळी सेन्सेक्स ८४,०२२ वर […] The post शेअर मार्केटमध्ये पाचव्या दिवशी घसरण; ११.५६ लाख कोटी बुडाले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पत्नीवर गर्भधारणेस सक्ती करता येत नाही!
नवी दिल्ली : प्रतिनिधी वैवाहिक कलह किंवा पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना पत्नीवर गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. असे करणे हे केवळ तिच्या शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन नसून तिच्या मानसिक त्रासात भर टाकणारे आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या टिप्पणीसह न्यायालयाने पतीकडून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यातून पत्नीची निर्दोष मुक्तता […] The post पत्नीवर गर्भधारणेस सक्ती करता येत नाही! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणच्या १०० शहरांत महागाईविरोधी भडका! हिंसाचारात ४५ ठार; तेहरान एअरपोर्ट, इंटरनेट-फोन बंद
तेहरान : वृत्तसंस्था इराणमध्ये महागाईविरोधात १३ दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान गुरुवारी रात्री परिस्थिती आणखी बिघडली. देशभरातील १०० पेक्षाही अधिक शहरांमध्ये हिंसक निदर्शनांचा वणवा पसरला आहे. निदर्शकांनी रस्ते अडवले, जाळपोळ, तोडफोड केली. लोकांनी खोमेनीचा मृत्यू आणि इस्लामिक रिपब्लिकचा अंत झाला अशा घोषणा दिल्या. काही ठिकाणी निदर्शक क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांनी […] The post इराणच्या १०० शहरांत महागाईविरोधी भडका! हिंसाचारात ४५ ठार; तेहरान एअरपोर्ट, इंटरनेट-फोन बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, पुण्याचे खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना शुक्रवारी पुण्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथे आयोजित श्रद्धांजली सभेत या लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. सुरेश कलमाडी (वय ८१) यांचे मंगळवारी निधन झाले होते. कलमाडी कुटुंबीयांच्या वतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी, चिरंजीव सुमीर, सून नंदिता आणि कन्या सोनाली व पायल यांचे मान्यवरांनी सांत्वन केले. पूना क्लबमधील हिरवळीवरील मांडवात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. फुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर सुरेश कलमाडी यांची तसबीर ठेवण्यात आली होती. मान्यवरांनी तसबिरीला फुले वाहून आणि दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. संपूर्ण मांडवात उदबत्तीचा सुवास दरवळत होता. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर सुरेश कलमाडी यांची विविध छायाचित्रे झळकत होती. बालपणापासून ते तरुणपणातील, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), हवाई दलातील, राजकारणातील, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि क्रीडा स्पर्धांमधील छायाचित्रांनी त्यांच्या जीवनाचा पट उपस्थितांसमोर उलगडला. सुरेश कलमाडी यांच्या विविध क्षेत्रांतील कार्यामुळे राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण, आर्थिक आणि आरोग्य अशा क्षेत्रांतील नामवंतांची मांदियाळी या सभेला जमली होती. कलमाडी यांनी नावीन्याचा ध्यास घेऊन शहराचा केलेला कायापालट, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव आणि पुणे व्यासपीठ यांसारख्या त्यांच्या कल्पक योजनांना पुणेकरांनी यावेळी आदराने स्मरण केले. कलमाडी हे एक उत्तम क्रीडा संघटक होते. त्यांनी पुणे शहरात सुरू केलेली मॅरेथॉन जागतिक पातळीवर नेली. पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे तसेच दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे त्यांनी केलेले दिमाखदार आयोजन या आठवणींना क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला. या श्रद्धांजली सभेत 'रघुपती राघव राजाराम', 'सूर निरागस हो', 'शिवनंदना हे शुभनायका' यांसारख्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. सरिता कुमठेकर (गायन), सायली चितोडकर (गायन), श्लोक मोकलकर (गिटार), शिवानंद वैरागकर (तबला), ओंकार डांगमाळी (किबोर्ड) आणि अभय ओक (बासरी) यांनी यात सहभाग घेतला. विवेक भागवत यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.
विरोधकांना 'कात्रजचा घाट' दाखवा!:पुणे महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचा आक्रमक एल्गार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील जाहीर सभेत पुणेकरांना आक्रमक आवाहन केले. पुणे महापालिकेसाठी शिवसेनेची पाटी कोरी असली तरी, त्यावर विकासाची अक्षरे लिहिण्याची ताकद शिवसेनेत आहे. पुणेकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान करून विरोधकांना कात्रजचा घाट दाखवावा आणि पुणे महापालिकेवर भगवा फडकवावा, असे ते म्हणाले. पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय आमचाच होणार, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेला व्यासपीठावर नीलम गोऱ्हे, तानाजी सावंत, रवींद्र धंगेकर, प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, नमेश बाबर, आबा बागुल यांसह शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांकडे लक्ष वेधत शिंदे म्हणाले की, प्रत्येक सभा, रोड शो आणि प्रचार रॅलीत 'लाडक्या बहिणींची' संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. महिलांचा सहभाग हा विजयाचा पाया असून, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला ठाम उभ्या असतात, त्यांचा मतपेटीत क्रमांक पहिलाच असतो, असा अनुभव त्यांनी विधानसभा ते नगरपरिषदांपर्यंत घेतला आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेत हॅट्ट्रिक झाली असून, आता महापालिकेत चौकार मारायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुणे हे महाराष्ट्राचे चैतन्य आणि विद्येचे माहेरघर असल्याचे सांगत, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे महापालिकेला विकासाचे अमृत देण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. आमचा अजेंडा सत्ता नसून विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा विकास हाच शिवसेनेचा झेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत विकासाभिमुख व लोककल्याणकारी निर्णय घेतल्याचा दाखला देत, त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवल्याचा अनुभव सांगितला. तसेच, कात्रजची वाहतूक कोंडीही दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द त्यांनी पुणेकरांना दिला. शिवसेना स्वबळावर लढत असल्याने तिला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही शिंदे यांनी विरोधकांना दिला. मी बोलतो ते करतो. एकदा कमिटमेंट केली की मागे हटत नाही, असे सांगत त्यांनी 'लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही, याची ग्वाही दिली. विरोध झाला, कोर्टात गेले तरीही योजना सुरू राहिली, कारण तुमचा एकनाथ शिंदे ठामपणे उभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेत मालक-नोकर नाहीत, सर्वजण सहकारी आहेत. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारी शिवसेना नाही. छातीवर वार घेणारे, कार्यकर्त्यांसाठी पुढे उभे राहणारे नेते आणि पदाधिकारी आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळालाच पाहिजे, कारण निवडणुकीत विजयाचा कणा कार्यकर्ताच असतो, असे त्यांनी नमूद केले.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर उभय नेत्यांची संयुक्त सभा पार पडत आहे. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाइलमध्ये भाषणाची सुरुवात केली, तेव्हा एकच जल्लोष पाहायला मिळाला. राज ठाकरे म्हणाले, आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारने कोणालाही देता येणार नाहीत, कारण काळलीच नाहीत. चार वर्षांपूर्वी मुदत संपून देखील या निवडणुका का होत नव्हत्या याचे उत्तर या सरकारने दिले पाहिजे. आता या निवडणुका होत आहेत, आणि ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार सुरू आहे. इतका चुकीचा कॅरम फुटला की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहे तेच समजत नाही. प्रत्येकाला विचारावे लागते, आज कुठे?, असा खरमरीत टोला लगावला.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तब्बल 17 अपक्ष उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिंदे यांनी या सर्व उमेदवारांचे पक्षाच्या वतीने स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे लातूरमध्ये शिवसेनेचे बळ वाढले असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदेंनी निकालाआधीच हा मोठा धडाका लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या या 17 उमेदवारांमध्ये काही भाजपमधील नाराज, तर काही इतर पक्षांत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अधिकृतपणे हाती भगवा झेंडा घेतला. या घडामोडीमुळे अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी निवडणूक लढवणे आता अधिक सोपे झाले असल्याचे बोलले जात आहे. अपक्षांच्या या पाठिंब्यामुळे लातूर महापालिकेच्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे पारडे जड झाले असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, लातूर महानगरपालिकेतील 17 अपक्ष उमेदवारांनी काल हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, विलास पारकर, धीरज देशमुख आणि लातूरचे माजी महापौर सुरेश पवार, शहरप्रमुख रविकांत चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, महिला जिल्हाप्रमुख अर्चना बिराजदार तसेच लातुर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते, अशी माहिती शिंदेंनी दिली.
दुुचाकी-कार अपघातात तीन मित्र ठार
गंगाखेड : लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील उरूसावरून गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी या गावी परत येत असताना दि. ८ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आनंदवाडी गावातील तीन मित्र ठार झाले. या घटनेमुळे आनंदवाडी गावात शोककळा पसरली असून शुक्रवारी चूल पेटली नाही. गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी गावचे तीन मित्र मोटारसायकलवरून (दुचाकी […] The post दुुचाकी-कार अपघातात तीन मित्र ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी एप्रिल-मे २०२६ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २,५०० नव्या गाड्या दाखल केल्या जातील, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यामुळे पीएमपीचा ताफा ४ हजार गाड्यांचा होईल आणि दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. खासदार मोहोळ शुक्रवारी पर्वती विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा व रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपचा भर असून, त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळही पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. विस्तारित पीएमआरडीएसह शहरातील बस मार्ग व फेऱ्यांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. ताफ्यात एक हजार ई-बस आणण्याची प्रक्रिया सुरू असून, या गाड्यांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सध्या ३९४ मार्गांवर सेवा देणाऱ्या पीएमपीच्या मार्गात आणखी किमान १०० नवीन मार्गांची भर पडेल. यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होत असलेले शहराबाहेरील परिसर तसेच औद्योगिक आणि आयटी हब्सपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे मोहोळ यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएमपीकडून २५ इलेक्ट्रिक दुमजली (डबल-डेकर) गाड्या भाडेतत्त्वावर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या वर्षात पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा डबल-डेकर धावणार आहेत. सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर मार्गांवर १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. बॅटरी क्षमता, ऊर्जा कार्यक्षमता आणि शहरातील वाहतूक परिस्थितीसाठीची उपयुक्तता तपासणाऱ्या तज्ज्ञ समितीच्या सकारात्मक अहवालानंतर या गाड्यांना हिरवा कंदील मिळाल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. या प्रस्तावित डबल-डेकर बस प्रमुख मार्गांवर धावतील. यामध्ये हिंजवडी फेज ३ (वर्तुळाकार), रामवाडी मेट्रो स्थानक - खराडी, मगरपट्टा सिटी - कल्याणी नगर मेट्रो, पुणे रेल्वे स्थानक - लोहगाव विमानतळ, देहू - आळंदी आणि चिंचवड - हिंजवडी या मार्गांचा समावेश आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात घडली घटना
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे आहे. हियांश त्याच्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ शेकत बसला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत त्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट चिमुकल्याला ठार करून जंगलात पसार झाला. खडकी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून, यापूर्वीही ग्रामस्थांनी वन विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. वेळेवर उपाययोजना न झाल्याने एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबाला तत्काळ मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
बोपोडीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार:सनी निम्हण यांची घोषणा, आरोग्य सुविधा बळकट करणार
पुण्यातील बोपोडी परिसरात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. बोपोडी परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निम्हण यांनी दिले. या भागात महापालिकेचे दोन दवाखाने असून, त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच एक ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ही घोषणा चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड आणि सपना छाजेड यांच्या बोपोडी परिसरात काढलेल्या पदयात्रेदरम्यान करण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारांशी संवाद साधताना सनी निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसराचा सर्वांगीण व समतोल विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या बोपोडीतील नागरिकांना उपचारासाठी पिंपरीतील वाय.सी.एम. हॉस्पिटल, खडकीतील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये जावे लागते. येथील शेवाळे दवाखाना कार्यरत असला तरी, त्यात सोयी-सुविधांचा अभाव असून केवळ ओपीडी सेवा उपलब्ध आहे. खेडेकर दवाखान्यात अत्याधुनिक सोयी-सुविधांसह ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे निम्हण यांनी स्पष्ट केले. तसेच, संजय गांधी दवाखाना, जो सध्या बांधून तयार आहे पण सुरू झालेला नाही, तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू केला जाईल. यामुळे बोपोडीच्या नागरिकांची आरोग्यसेवा बळकट होईल, असे निम्हण यांनी सांगितले.
नागपुरात वाळू व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी:चौकशी टाळल्याने कारवाई, पहाटेपासून 10 पथके सक्रिय
नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात वाळू व्यवसायाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून नागपूर आणि दिल्ली येथील ईडीच्या सुमारे १० पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणलेल्या वाळू विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. हे प्रकरण चार वर्षांपूर्वीचे असून, शासनाची वाळू रॉयल्टी चुकवून २०२१ मध्ये कोट्यवधी रुपयांचा वाळू व्यवसाय केल्याप्रकरणी काही वाळू व्यावसायिकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीकडून ही कारवाई करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी चौकशीसाठी अनेकदा बोलावण्यात आले होते. मात्र, चौकशीत अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे ईडीने थेट छापेमारीचा मार्ग स्वीकारला. सावनेरमध्ये प्रफुल्ल आणि उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते यांच्यावर, तर पाटणसावंगी येथे शरद रॅाय आणि मनोज गायकवाड यांच्यावर ईडीने धाडी टाकल्याची चर्चा आहे. खापा येथे अमित राय यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही कारवाई करण्यात आली. यातील एक व्यावसायिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संबंधित असल्याचे समजते. या व्यावसायिकांविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून या कारवाईबाबत गुप्तता बाळगली जात आहे. व्यावसायिकांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
राष्ट्रीय 'इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0' हॅकेथॉन पुण्यात:400 हून अधिक संघांचा सहभाग अपेक्षित
राष्ट्रीय स्तरावरील 'इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० – २०२६' चे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे आयोजित ही स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयओआयटी) येथे होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला चालना मिळावी, हा या हॅकेथॉनचा मुख्य उद्देश आहे. इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, यंदा या हॅकेथॉनचे तिसरे वर्ष असून, दरवर्षी स्पर्धेचा प्रतिसाद आणि व्याप्ती वाढत आहे. मागील वर्षी देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ४०० हून अधिक संघांनी यात सहभाग घेतला होता. यंदाही देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. या हॅकेथॉनमध्ये एज्युटेक, पर्यावरण, आरोग्यसेवा, ट्रॅफिक मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन आणि ॲग्रिटेक यांसारख्या विषयांवरील सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना दिले जाईल. एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास २ लाख रुपये, उपविजेत्या संघास १ लाख रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. प्रत्येक विषय गटातील विजेत्यांनाही स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार असून, सर्वाधिक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्पाला ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एआयसीटीई, तंत्रशिक्षण संचलनालय, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे आणि सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ यांचा पाठिंबा लाभला आहे. विद्यार्थ्यांनी innovateyou.in या संकेतस्थळावर ५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन यादव यांनी केले आहे. नोंदणी करताना अडचणी आल्यास विद्यार्थी +91 83900 38371 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. नोंदणीकृत स्पर्धकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, विजयी संघांना पुढील टप्प्यात बूट कॅम्प, स्टार्टअप एक्स्पो आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.
पुण्यातील कॅनालमध्ये बुडताना चौघांना वाचवणाऱ्या तरूणाचाच साताऱ्यातील वीर धरणात बुडून मृत्यू झाला आहे. विनोद सुरेश गेंडे (वय 34. मूळ रा. विठ्ठलवाडी-मुळशी, सध्या रा. कोथरूड, पुणे), असे मृत तरूणाचे नाव आहे. घटनेनंतर तब्बल 30 तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात महाबळेश्वर, प्रतापगड आणि शिरवळ सर्च अँड रेस्क्यू टीमना यश आलं आहे. पोलिस आणि नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा त्याच्या अपार्टमेंटमध्ये राहणारा रिक्षा चालक आणि अपार्टमेंटच्या सुरक्षा गार्ड या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बुधवारी (7 जानेवारी) वीर धरण परिसरात आला होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. अवघ्या वर्षापुर्वीच त्याचा विवाह झाला होता. तो उत्तम जलतरणपटू होता. विनोद गेंडे हा सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीचा विक्री प्रतिनिधी होता. पुण्यातील कोथरूड परिसरातील अपार्टमेंटमध्ये तो वास्तव्यास होता. त्याच अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रिक्षा चालक आणि सुरक्षा गार्ड सोबत तो पार्टी करण्यासाठी बुधवारी दुपारी वीर धरण परिसरात आला होता. धरणाच्या पाण्यात उतरल्यावर विनोद पोहत दूरवर गेला, तर एका मित्राला चांगले पोहता नेत नसल्याने तो काठावरच होता. खोल पाण्यात गेलेला विनोद अचानक धरणात बुडाला. त्यामुळे दोन्ही मित्र घाबरले. त्यांनी विनोदच्या मोबाईलवरून त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. विनोदच्या पत्नीने कॉल रिसिव्ह केला. मात्र, तिला धक्का बसेल म्हणून दोघांनी तिला घटनेबद्दल कल्पना दिली नाही. त्यानंतर पत्नीने विनोदच्या बहिणीला फोन करून पतीच्या मित्रांचा फोन आल्याचे सांगितले. विनोदच्या बहिणीने तिच्या पतीला सांगितल्यानंतर त्यांनी विनोदच्या मित्रांशी संपर्क साधला असता नेमकी घटना समोर आली. त्यानंतर विनोदचे भावजी हे तातडीने शिरवळला आले. शिरवळ पोलिसांनी या घटनेची माहिती महाबळेश्वर, प्रतापगड आणि शिरवळ रेस्क्यू टीमला दिली. परंतु, बुधवारी अंधार पडल्याने शोध मोहीम राबवता आली नाही. गुरुवारी सकाळी 10 वाजता महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड आणि शिरवळ सर्च अँड रेस्क्यू टीमने बोटीच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली. सायंकाळी 6 वाजता विनोदचा मृतदेह गळाला लागला. धरणाच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचे कारण शवविच्छेदनातून समोर आले. विनोद गेंडे याच्या आई-वडीलांचा कोरोना काळात मृत्यू झाला होता. त्याला तीन विवाहित बहिणी आहेत. विनोद हा एका सौंदर्य प्रसाधने कंपनीच्या उत्पादनाचा विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होता. त्याचा वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. संसार वेलीवर फूल उमलण्यापुर्वीच विनोदचा मृत्यू झाल्याने विनोदच्या नातेवाईकांसह मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. विनोद हा पट्टीचा पोहणारा होता. मुळशी धरणात देखील तो पोहायचा. पुण्यातील खडकवासला-एनडीए मार्गावरील कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या तीन जणांना आणि सेव्हन लव्ह चौक, स्वारगेट येथील कॅनालमध्ये बुडणाऱ्या एकाचा जीव विनोदने वाचवला होता. मात्र, त्याचाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कोथरूड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी युती केली आहे. यावरून महायुतीमधील घटक पक्षांनी विशेषतः भाजपचे जोरदार टीका केली आहे. आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भाष्य करत टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भावनात्मक मते मागायची आहेत. महाराष्ट्रातील जनता विकासाला मत देते. राज ठाकरे ईव्हीएम मशीन, मतचोरीवर बोलले. पण ते काहीच चालत नसल्यामुळे आता असे बोलत आहेत. पंचवीस वर्ष तुमचा महापौर होता, मुख्यमंत्रीपद होते, त्यावेळेस तुम्ही काय केले? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुम्हाला मुंबईचा खरेच विकास करायचा असेल तर व्हीजन डॉक्युमेंट द्या. त्यांच्याकडे काहीही प्लॅन नाही. त्यांना फक्त भावनात्मक बोलायचे आहे. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच फॉर्म्युला चालणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, चंद्र सूर्य असतील तोपर्यंत त्यांना दिल्लीचे ऐकावे लागेल. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष आहे, पक्षाची शिस्त आहे. सर्वात मोठा पक्ष आहे. रस्त्यावरचा पक्ष थोडीच आहे. या पक्षाला एक भूमिका आहे. आम्ही अंतिम निर्णय स्वीकारणारी लोक आहोत. आतापर्यंत भाजपचया सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय केंद्र सरकारने पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारचा निर्णय देवेंद्र फडणवीस पूर्ण करतात, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचे सरकार मजबूत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र काम करतील. आम्ही समन्वय समितीत निर्णय घेतला, त्यावेळेस उदय सामंत हजर होते. पंधरा ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत, काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. तसेच लोक आम्हाला मत देतील. विरोधी पक्ष किंचित झालेला दिसेल, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुती बहुतांश ठिकाणी एकत्रच लढत असली, तर काही ठिकाणी मात्र स्वबळावर लढत आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे, तर नवी मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप स्वबळावर लढत आहेत. येथील निवडणूक ही एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशी रंगणार आहे. भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करेन, असे म्हणत थेट आव्हानच दिले आहे. नवी मुंबईत शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. गणेश नाईक आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई शहरात सुरू केलेल्या 'नवी मुंबई, नवे सरकार' या प्रचाराला 'नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं' असल्याचे प्रत्युत्तर गणेश नाईक यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिले. गणेश नाईक म्हणाले की, ठाणे हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. केंद्रीय नेतृत्वाने रोखले नसते आणि माझ्याकडे जबाबदारी दिली असती तर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटून दाखवले असते. तसेच गेल्या पाच वर्षात प्रशासकीय कालावधीत नवी मुंबईला लुटणाऱ्यांना येथील मतदार घरचा रस्ता दाखवतील, असेही गणेश नाईक यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. गणेश नाईकांना हलक्यात घेतले एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना गणेश नाईक म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याशी माझे काहीही वैयक्तिक मतभेद नाही. पण एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात, मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार करेन. पण तुम्ही गणेश नाईकांना हलक्यात घेतले ना.... तुमच्या आधी मी इथे तीन वेळा ठाणे जिल्ह्याचा पालमंत्री होतो. तुमच्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबईत समावेश करताना मंत्रालयात बैठक बोलावली. त्यात आम्हाला विचारले देखील नाही, अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली. टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करून टाकेल तसेच हा प्रस्ताव पूर्वी मीच मांडला होता. पण त्यात काही तरी अटी होत्या. गणेश नाईकांना हलक्यात घेतले. भाजपने मला परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करून टाकेल, असा इशाराच नाईकांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. तसेच यावर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.
परभणी शहर मी दत्तक घ्यायला तयार आहे, पण महापालिकेत राष्ट्रवादीच्या घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच माझ्या विचारांची महानगरपालिका निवडून दया. सर्व स्तराचा विकास करायचे काम माझे आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वतः करणार, असेही पवारांनी यावेळी म्हटले. परभणीत प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, परभणीचा जसा पाहिजे तसा विकास दुर्दैवाने झाला नाही. सर्व धर्मातील उमेदवार मग नवीन असो की जुने देण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. पिंपरी चिंचवडचा विकास कसा केला हे विचारा, असे अजित पवार म्हणाले. इथल्या विकासाचा पाठपुरावा करणार पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, केंद्राचा आणि राज्याचा निधी कसा आणायचा याची सांगड घालावी लागते. परभणीत पिण्याच्या पाण्याची योजना, भूमिगत गटार योजना हातात घेतली आहे. सर्व रस्ते चांगले करू. सर्व जाती धर्मातील नागरिकांना सुविधा देऊ. जाती पातीचा, नात्याचा उमेदवार आहे म्हणून बघू नका, विकास कोण करेल हे बघा. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वतः करणार, असे आश्वासन देखील पवारांनी यावेळी दिले. परभणीला धूळमुक्त आणि खड्डेमुक्त करणार परभणी धूळ आणि खड्ड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मी धुळमुक्त, खड्डेमुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घेतो. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असेल तिथे कॅन्सरचे रुग्णालय उभे करणार. राज्याचा केंद्राचा निधी आणू, जसे पिंपरी चिंचवड, बारामती केले तसेच परभणी करू, असे आश्वासन अजित पवारांनी दिले. इथली एमआयडीसी बंद आहे ती चालू करू, तसेच उद्योगपती पाणी, जमीन, लाईट आणि रस्ते आहेत का नाही ते पाहत असतात, असेही पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पहिले जकात मिळत होता, पुन्हा एलबीटी मिळत होता, त्यात सर्व होत होते. मात्र, आता जीएसटी मिळतोय, पण त्यात आमचे भागत नाही. आम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळत नाही. सगळी काम करता येतात, पण पैशांचे सोंग करता येत नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा पाहिजे असतात, मी त्या 100 टक्के परभणीला देणार. महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू माझे अनेक उद्योगपती मित्र आहेत. मध्यंतरी बारामतीला गौतम अदानी आले होते. त्यांनाही मी बोलू शकतो. 35 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक महत्त्वाच्या विकास कामांना निधीही दिला. परभणी महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू. महापालिकेत सरकारने मान्यता दिली तर भरती करू. परभणीकरांना हेवा वाटेल असे क्रीडा संकुल तयार करून देईल, क्रीडा खाते माझ्याकडेच असल्याचेही पवारांनी सांगितले. परभणीतील सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाह,परदेश्वर मंदिर परिसर याचा विकास आराखडा तयार करून निधी देवू. परभणी शहर दत्तक घ्यायला तयार पण महापालिकेत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.
मुंबई : सत्ताधारी महायुतीच्या धाक, दडपशाहीमुळे जनता दहशतीत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिकेच्या निवडणुकीत पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात आहे. राज्यात येत्या १५ तारखेला मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधीलच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या ३ घटकपक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला […] The post दडपशाहीमुळे जनता दहशतीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांना पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचया युतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, कार्यकर्त्यांची इच्छा, जे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते होते, त्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांची ही इच्छा होती आणि ते एक टीमवर्क होते. याच टीमवर्कच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? महापालिकेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएबरोबर जाईल का? तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि रोहित पवार राज्यात मंत्री होतील अशा चर्चा सुरू आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या चर्चा मी व्हॉट्सअप ग्रुपवर वाचल्या आहेत. मात्र, मी त्या चर्चांवर फार विचार करत नाही. जे माझ्या कामाच्या बाहेर आहे, त्याचा विचार मी कशाला करू? मी वास्तवात जगत असते. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे लोक वेगवेगळ्या माध्यमातून मते मांडत असतात. लोक काय बोलतात, लोक पक्षाबाबत काय बोलतात, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, या ऐकून घ्यायच्या असतात, असे सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? तसेच सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार अशा देखील चर्चा सुरू असतात, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, 11 वर्षांपासून मी चर्चा ऐकते. लोक बोलत असतात, पण आपण आपले काम करत राहायचे. बारामतीच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्यांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे माझी पहिली जबाबदारी माझ्या मतदारसंघातील मूलभूत सुविधा सोडवणे आहे. लोकांनी मला ज्या कामांसाठी दिल्लीत पाठवले ते काम मी पूर्ण केले पाहिजे, ते काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे सुळे यांनी म्हटले.
बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे २१ वे त्रैवार्षिक अधिवेशन १० व ११ जानेवारी २०२६ रोजी आळंदी येथे आयोजित करण्यात आले आहे. आळंदी येथील आर.एम.डी. सभागृह, फूटवाले धर्मशाळा येथे होणाऱ्या या अधिवेशनात देशभरातून १ हजारहून अधिक बँक अधिकारी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. अश्विनी देव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना, भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महासचिव रविंद्र हिमते, अखिल भारतीय सचिव (वित्तीय क्षेत्र) गिरीशजी आर्य आणि असोसिएशनचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. या अधिवेशनात भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने, तसेच अधिकारी व सामान्य ग्राहकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाईल. या चर्चांमधून विविध धोरणात्मक ठराव संमत केले जाणार आहेत. अधिवेशनातील प्रमुख ठरावांमध्ये आयकर कायदा १९६१ मधील कलम १७ (२) (viii) मध्ये दुरुस्ती करून परिक्विझिट करातून दिलासा देण्याची मागणी समाविष्ट आहे. तसेच, एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रकरणात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय, एनपीएस लागू होण्यापूर्वी जाहीर झालेल्या जाहिरातींमधून भरती झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणीही केली जाईल. पदोन्नती परीक्षांमध्ये पारदर्शकता आणणे, अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या कामकाजाच्या तासांवर नियंत्रण ठेवून काम-जीवन समतोल राखणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणीही या अधिवेशनात ठळकपणे मांडण्यात येणार आहे.
येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण:गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल
येरवडा कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकरप्पा गराळे (वय ६५) असे जखमी कैद्याचे नाव आहे, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैदी फजिल अहमद अब्दुलकयुम अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहातील हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षा भोगत असलेले गराळे आणि अन्सारी यांना कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे खुल्या कारागृहात काम देण्यात आले होते. खुल्या कारागृहातील बराक क्रमांक एक परिसरात त्यांच्यात वाद झाला. या वादातून अन्सारीने गराळे यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारले, ज्यामुळे गराळे फरशीवर पडून जखमी झाले. मारहाणीत गराळे यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या महिन्यात याच येरवडा कारागृहात एका कैद्याचा फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. कारागृहात अशा हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तरुणाला दगडाने मारहाण पुणे शहरात कोथरूड भागात एका तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन बाळू कोंढाळकर (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढाळकर हे सुतारदरा परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी दोघांनी काही कारण नसताना त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन रस्त्यात पडलेल्या दगडाने मारहाण केली. पोलीस हवालदार योगेश सुळ तपास करत आहेत.|
चार हजार गृहप्रकल्पांपासून ‘महारेरा’ अनभिज्ञ
मुंबई : ‘महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण’ (महारेरा) कडे २०१७ पासून नोंदणी झालेल्या राज्यातील सुमारे चार हजार प्रकल्पांबाबत काहीही माहिती उपलब्ध नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. या प्रकरणी महारेराने विविध ४४५ नियोजन प्राधिकरणे, यंत्रणांना पत्रे पाठवून या प्रकल्पांविषयी अधिक माहिती मागविली आहे. हे प्रकल्प पूर्ण झाले का अथवा या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा […] The post चार हजार गृहप्रकल्पांपासून ‘महारेरा’ अनभिज्ञ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे मानपाडा, कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. असे असतानाच, या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हारल झाला असून त्यात आगरी समजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत पोलिस कारवाईच्या धमक्या दिल्याचे समजते. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समजाविषयी आक्षेपार्ह विधान करत अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचे ऐकू येत आहे. (दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.) मीनाक्षी शिंदे यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे आगरी समाजात नाराजीचा सूर उमटला असून याचा जाहीर निषेध केला जात आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यासोबत एक संदेशही लिहिण्यात आला आहे. पायाखालची जमीन खचली आहे म्हणून धमक्यांची भाषा केली जात आहे. मात्र नागरिक या धमक्यांना भीक घालणार नाही. तसेच ठाण्याच्या प्रथम नागरिकपदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता क्रांतीची मशाल पेटणार असून जनता ही हुकुमशाही मोडून काढेल, असेही म्हटले आहे. नेमका वाद काय? ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर हा परिसर येतो. याच प्रभागातून माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे निवडून येतात. परंतु, याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर गेल्यावर्षी निवडून आले. यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यात मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. यामुळे पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले होते. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनीही राजीनामा दिला होता. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाने भूषण भोईर यांची उमेदवारी रद्द करत वायचळ यांना उमेदवारी दिली. याच कारणांमुळे आता भूषण भोईर यांनी बंडखोरी केली आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने जोरदार झटका दिला आहे. शिंदे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून अंबरनाथमध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने अंबरनाथची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला मोठा हादरा बसला आहे. शिंदे गटाच्या या राजकारणामागे एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे असल्याचा दावा केला जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे 16, तर शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. पण भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रथम काँग्रेससोबत आघाडी केली. पण वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्यानतंर भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यानंतर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. पण भाजपच्या या खेळीमुळे शिंदे गट दुखावला गेला. परिणामी, त्याने भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटून टाकण्याची धूर्त राजकीय खेळी खेळली. श्रीकांत शिंदेंनी फिरवले फासे शिंदे गटाचे खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या संपर्कात गेलेल्या अजित पवारांच्या पक्षाशी संधान साधले. त्यांना विश्वासात घेत त्यांच्यापुढे अंबरनाथमध्ये युती करून संयुक्त सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला तत्काळ होकार दिला. त्यानुसार आता शिदे गटाचे 27, राष्ट्रवादीचे 4 व एका अपक्ष उमेदवाराच्या मदतीने त्यांनी 32 नगरसेवकांचा एक गट स्थापन केला. या सर्वांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला, तसेच तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे अंबरनाथमध्ये शिंदे गटाचा झेंडा फडणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप - शिंदे गटासाठी होती प्रतिष्ठेची लढाई उल्लेखनीय बाब म्हणजे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर व भजापच्या तेजश्री करंजुले यांच्यात नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. त्यात भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या. भाजपच्या ताब्यात नगराध्यक्षपद गेले असले तरी इथे शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपने काँग्रेसच्या मदतीने येथील सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. पण शिंदे गटाच्या चलाख खेळीमुळे त्यांचा प्रयत्न फसला. खाली पाहा अंबरनाथमधील पक्षीय बलाबल
मिशन ॲडमिशन:जवाहर नवोदय विद्यालयातील रिक्त जागेवर प्रवेश; 7 फेब्रुवारी रोजी चाचणी परीक्षेचे आयोजन
कन्नड येथील जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता 6 व 11 वीच्या काही जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या जागांवर प्रवेश देण्यासाठी पुन्हा चाचणी परीक्षा होणार आहे. कन्नड येथे पाच केंद्रावर शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.15 ते 01.45 दरम्यान ही परीक्षा होईल. चाचणी परीक्षेकरिता ज्या विदयार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, अशा संबंधित पालकांनी सदर परीक्षेचे परीक्षा हॉल टिकीट / अॅडमिटकार्ड www.navodaya.gov.in, https://cbseitms.nic.in/2025/nvsix 9 किंवा https://cbseitms.nic.in/2025/nvsxi 11 या संकेतस्थळावरून रजिस्ट्रेशन नंबर व Password (Dateof Birth) चा उपयोग करून डाउनलोड करून प्रिंट घ्यावी. हे अॅडमीट कार्ड परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन प्राचार्य बुल्लन सरोज यांनी केले आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिलाही भारताची पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैंसी यांनी शुक्रवारी येथील एका सभेत बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. राष्ट्रवादीला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला पाठिंबा, असे ते म्हणाले. सोलापूरचे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते सध्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी त्यांच्याविरोधात सभा घेतली. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. तसेच एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ..पण तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन ओवैसी म्हणाले, आपण सोलापूरला पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथे एवढ्या वर्षांपासून राहत आहेत. पण काहीच करत नाहीत. पाकिस्तानच्या राज्यघटनेत एकाच धर्माचा माणूस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो असे नमूद आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कोणताही व्यक्ती भारतीय पंतप्रधान होऊ शकतो. एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. पण कदाचित तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन. पण एक दिवस हा दिवस नक्की उजडेल. ते पुढे म्हणाले, मी देशाच्या संसदेत बोलणारा माणूस आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्या मांडीवर जाऊन बसलेत. त्यामुळे त्यांना मत देणे हे नरेंद्र मोदींना मत देण्यासारखे आहे. अजित पवारांना मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काहीही देणेघेणे नाही. पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही एकच त्रिमूर्ती आहे. ते तुमच्यापुढे येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करतली. पण त्यांना तुम्ही मतपेटीतून उत्तर द्या. एमआयएम हा गरिबांचा पक्ष आहे. तो गरिबांसाठी काम करतो. ..तर मग मी तुमच्या बापावर बोलेन कुणी तरी माझ्या शेरवाणीला हात घालण्याचे विधान केले. त्यांनी त्यांच्या राजकीय बापाला म्हणजे अजित पवारांना माझ्यापुढे आणून बसवावे. मी त्यांना 3 मिनिटांत मूके केले नाही तर मग सांगा. येथील नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी एमआयएमला संजिवनी मिळाली. आज पुन्हा येथील जनतेने एमआयएमच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार व शिंदे गटाचे लोक या परिसराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एवढेच लक्षात घ्यावे की, हा परिसर माझा आवडता आहे. हा परिसर सोलापूरचे हृदयस्थान आहे. त्यामुळे तुम्ही या परिसराविषयी काही बोललात, तर मग मी तुमच्या बापावर बोलेन, असा इशाराही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी आपल्या विरोधकांना दिला.
‘आरटीई’ प्रवेशांची प्रक्रिया सुरू
पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, ९ ते १४ जानेवारी या कालावधीत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीबाबत […] The post ‘आरटीई’ प्रवेशांची प्रक्रिया सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष
इचलकरंजी : भाजप हाच सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचतात. भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते कैद्यासारखे आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, निवडणुकीमध्ये उमेदवारांची पळवापळवी, दबावतंत्राचा वापर, दमदाटी […] The post भाजप देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शक्तिपीठ महामार्ग कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार
मुंबई/कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे. काही लोकांनी त्याला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून तो कमीत कमी बागायती शेतीमधून जाणारा असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी केला. महापालिका निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आम्ही आवाहन करणार असून कोल्हापूरकर त्याला प्रतिसाद […] The post शक्तिपीठ महामार्ग कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ठाकरे गटाच्या यमुनाबाई देशमुख तर उपनगराध्यक्षपदी शिलानंद वाकळे यांची शुक्रवारी ता. ९ निवड झाली आहे. या निवडीच्या घोषणानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सेनगाव नगर पंचायतीमध्ये ठाकरे गटाचे पाच, राष्ट्रवादीचे (अजित पवारगट) पाच, काँग्रेस दोन तर भाजपाचे पाच सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठी ठाकरे गटाच्या यमुनाबाई देशमुख तर भाजपाच्या मिराबाई खाडे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज पिठासन अधिकारी तथा तहसीलदार सखाराम मांडवगडे, प्रभारी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी आज बैठक झाली. यावेळी हातवर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये ठाकरे गटाच्या देशमुख यांना ११ तर भाजपाच्या खाडे यांना पाच मते मिळाली. उपनगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचे शिलानंद वाकळे व भाजपाचे अमोल तिडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये वाकळे यांना ११ तर तिडके यांना पाच मते मिळाली. या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या एका सदस्याने ठाकरे गटाच्या बाजूने मतदान केले तर एक सदस्य गैरहजर होता. दरम्यान, पिठासन अधिकारी मांडवगडे, मुख्याधिकारी मुंडे यांनी नगराध्यक्षपदी देशमुख व उपनगराध्यक्षपदी वाकळे यांच्या निवडीची घोषणा करताच नगरपंचायत परिसरात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यांचा सत्कार करण्यात आला. नुतन अध्यक्ष व उपनगराध्यक्षांना आता सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळणार असून या कालावधीत पिण्याचे पाणी, शहर स्वच्छतेसह नागरी सुविधा देण्यासाठी काम करावे लागणार आहे.
शिंदे, अजित पवारांची एमआएमसोबत युती
मुंबई : महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेले त्यांचे मित्रपक्ष म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गय, यांनीही भाजपच्या पावलावर पाऊल टाकल्याचे दिसत आहे. भाजपनंतर शिंदे आणि अजित पवारांची एमआयएमसोबत युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आले आहेत. त्यामुळे […] The post शिंदे, अजित पवारांची एमआएमसोबत युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सेलू येथे १० ते ११ जानेवारी दरम्यान संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हुबळी, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरचे कलावंत रसिकांना मंत्रमुग्ध करतील, अशी माहिती साहित्य संगीत कला मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी दिली. ज्या मराठवाड्याच्या भूमीत देवगिरी किल्ल्यावर 'संगीत रत्नाकर' सारख्या महान ग्रंथाची रचना आचार्य शारंगदेवाने केली, गोपाल नायक सारखा महान गायक ज्या भूमीत जन्मला, अजिंठा वेरूळच्या शिल्पांत चित्रांत मंदिरांवरील शिल्पांमध्ये गायन वादन नृत्याचे पुरावे जिथे आढळून येतात ती ही सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भूमी. मराठवाड्याच्या याच मातीतील भूमीपुत्र सेलूचे महान संगीतकार गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर. त्यांनी चालवलेल्या सांगितीक वारश्याची आठवण म्हणून २०१८ पासून सेलू शहरांत संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवा चे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे हे ८ वे वर्ष असून १०-११ जानेवारी २०२६ रोजी हा संगीत महोत्सव संपन्न होतो आहे. महोत्सवाचे उद्घाटन सूरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी लातूरच्या सायली टाक आणि मुंबईच्या सायली तळवलकर यांचे गायन होईल. सोबतच पुण्याचे कलावंत नीतेश पुरोहित यांचे सरोद वादन होईल. रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या मृगनयनी सिस्टर्सचे भरतनाट्यम रंगेल. छत्रपती संभाजीनगरचे कलावंत वैभव पांडे, हुबळीचे कुमार मर्डुर यांचे गायन होईल. सोबतच मुंबईचे किशोर पांडे यांचे तबला सोलो होईल. या कलावंतांना प्रशांत गाजरे, शांतीभूषण देशपांडे - चारठाणकर, यश खडके, प्रशांत जोशी-सावरगावकर, जगमित्र लिंगाडे (छत्रपती संभाजीनगर) यांची साथसंगत लाभेल. संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवात यापूर्वी पं. रघुनंदन पणशीकर, पं. विजय कोपरकर, पं. कृष्णेंद्र वाडीकर, प्रसाद खापर्डे, पं. कैवल्यकुमार, विदुषी यशस्वी सरपोतदार, नागेश आडगावकर, ईश्वर घोरपडे, अभिजीत अपस्तंब, पंकज देशपांडे, हेमांगी नेने, तबला वादक पं. राम बोरगावकर, सारंगीवादक पं. संगीत मिश्रा, सुंदरीवादक कपिल जाधव, बासरीवादक ऐनोद्दीन वारसी, सनईवादक पं. कल्याण अपार, महागामी गुरुकुलाच्या शिष्यांची ओडीसी व कथ्थक नृत्यं सादर झालेली आहेत. ही सगळी चळवळ लोकसहभागांतून चालू आहे. सेलूसोबतच परभणी, वसमत, फुलंब्री, जालना, शेंदूरवादा, छत्रपती संभाजीनगर, वसमत येथेही शास्त्रीय संगीत विषयक उपक्रम साजरे होतात. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भाजप नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाला महापालिका निवडणुकीत मतदारांना सर्वांचे मटण खाऊन केवळ भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी त्यांचा चिमटा काढत त्यांचा उल्लेख अशोक चव्हाण नव्हे तर 'आदर्श चव्हाण' असा केला आहे. राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगला आहे. यामुळे राज्याचे वातावरण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. नांदेडमध्येही या निमित्ताने राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. त्यात आता भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मतदारांना उद्देशून केलेल्या एका वादग्रस्त विधानाची भर पडली आहे. ते म्हणाले, सध्या निवडणूक सुरू आहे. सर्वच लोक पार्ट्या खाऊ घालतील. याची पार्टी, त्याची पार्टी... मी तर म्हणेन रोज खा मटण, परंतु कमळाचे दाबा बटण. एवढे काम करा. नाही तर एकाचे मटण खाऊन दुसऱ्याला मतदान कराल. मी काही मटण देणार नाही, पण सांगितलेले लक्षात घ्या, असे ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी यावेळी आपल्याला सोडून गेलेल्याची राजकीय कारकिर्द संपल्याचाही दावा केला. ते म्हणाले, जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. एक गेला आणि दुसरा आला. (जवळच्या एका उमेदवाराला उद्देशून म्हणत). जे मला सोडून गेले ते बरबाद झाले. त्यामुळे कुणीही माझ्या नादी लागू नका. कारण, लागले तर तुमचे वाईट होईल, असे ते म्हणाले. आदर्श चव्हाण म्हणत काँग्रेसची टीका दुसरीकडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी अशोक चव्हाणांचा उल्लेक आदर्श चव्हाण असा केला आहे. आदर्श चव्हाण... अच्छा अशोक चव्हाण का? मला वाटले आदर्श चव्हाण. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा असे अजिबात करत नव्हते. आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृतीही बदलली आहे. म्हणजे मतदारांची किंमत त्यांनी एका मटणापुरती केली आहे. हे मतदारांचे महत्त्व कमी करणारी गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक चव्हाण यांनी गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली होती. हे ही वाचा... शरद अन् अजित पवार भाजपला उल्लू बनवत आहेत:प्रकाश आंबेडकर यांचा दावा; सत्तेसाठी तत्त्वांचे राजकारण बाजूला पडत असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद व अजित पवार एकच असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार एकच आहेत. ते सत्तेसाठी फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत. सत्तेसाठी तत्वे बाजूला ठेवून वागत आहेत, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
घोडबंदर घाटात ११ वाहनांचा विचित्र अपघात
घोडबंदर : येथील गायमुख घाटाच्या उतरणीवर शुक्रवारी सकाळी एक-दोन नव्हे तर तब्बल ११ वाहनांचा विचित्र अपघात झाला. सिमेंट वाहतूक करणा-या कंटेनरमुळे हा अपघात झाला. यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. दरम्यान, या घटनेत ४ हून अधिक जण जखमी झाले असून, पोलिसांच्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा कंटेनर (एमएच ०४ केएफ ०७९३) शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास […] The post घोडबंदर घाटात ११ वाहनांचा विचित्र अपघात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपचे नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी मुंबईत महायुतीची सत्ता आली तर मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे होईल हा उद्धव ठाकरे यांचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुंबईत महायुतीची सत्ता आलाल्यानंतर मुंबईचे नामकरण बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरेंची सत्ता आली तर मात्र मुंबईचे मोहम्मद लँड जरूर होईल, असे ते म्हणालेत. नीतेश राणे यांच्या या टीकेमुळे मुंबईतील राजकारण चांगलेच तापले आहे. खासदार संजय राऊत व अभिनेते महेश मांजरेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एक संयुक्त मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर मुंबईचे नाव बॉम्बे करण्याचा आरोप केला होता. मुंबईतील मराठी माणसांचे हित व मराठी अस्मितेच्या मुद्यावर प्रचार केंद्रित करून महायुती सत्तेत आल्यास मुंबईचे अस्तित्वच धोक्यात येईल. महायुती मुंबईचे नाव पुन्हा बॉम्बे असे करेल, असे ते म्हणाले होते. मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी त्यांचा हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला. मुंबईचे मोहम्मद लँड होईल - नीतेश राणे उद्धव मामु बोलतात की, महायुती सत्तेत आली तर मुंबईचे परत बॉम्बे करून टाकतील. हे तर शक्यच नाही. पण उद्धव मामु सत्तेत आले तर मुंबईचे मोहम्मद लँड नक्कीच करून टाकतील, असे नीतेश राणे शुक्रवारी आपल्या एका ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवत म्हणाले. उद्धव ठाकरेंमुळे मुंबईत बांगलादेशी, रोहिंगे वाढले नीतेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतही उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वेगळी होती आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी आहे. मराठी माणूस, हिंदू समाजाला मुंबईत सुरक्षित ठेवण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. पण त्यांच्यानंतर पुढच्या पिढीने नेमका विरोधाभास केला. पूर्वी शिवसेना आहे म्हणून मुंबई आहे असे म्हटले जात होते. पण आता उद्धव ठाकरे आहेत म्हणून बांगलादेशी व रोहिंगे आहेत असे नवे समीकरण तयार झाले आहे. टिस्सच्या अहवालानुसार उद्धव ठाकरे यांचे राज्य असलेल्या मुंबईत बांगलादेशी व रोहिंगे वाडत चालले आहेत. 2030 पर्यंत हा टक्का अधिकच वाढण्याची भिती आहे, असे नीतेश राणे म्हणाले आहेत. आत्ता पाहू काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत भाजपचा मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही, पण आज मुंबईची संस्कृती मारली जात आहे. कुणीही येते आणि सांगत की इथल्या भागाची भाषा ही गुजराती आहे. आमच्यावर हिंदी सक्ती करणार, आमची अस्मिता, संस्कृती मारणार आणि नावाला मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवणार तर या गोष्टीला काही अर्थ नाही. बस म्हटले की बस आणि उठ म्हटले की उठ म्हणणारी ही लोक आहेत. त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा?, असे ते भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधताना म्हणाले होते.
भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा
मुंबई : छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप आणि शिंदे सेनेची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. यानंतर आता मुंबईतही एकत्र निवडणूक लढवणा-या या दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडणारी एक घटना घडली. शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने येताना दिसले. याठिकाणी भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिवसेनेच्या पूजा कांबळे […] The post भाजपच्या कार्यकर्त्यांकडून ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपुरात वर्षातील १५० दिवस हवा खराब:केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून माहिती समोर
नागपुरात वर्षातील सरासरी १५० दिवस हवा प्रदूषित असते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणांवर आधारित एका संशोधन अहवालातून ही बाब उघड झाली आहे. नागपूरकरांना वाहतूक कोंडीसोबतच आता खराब हवेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. अहवालानुसार, शहरातील विविध भागांमध्ये प्रदूषित दिवसांची संख्या लक्षणीय आहे. महाल परिसरात सर्वाधिक १८० दिवस हवा प्रदूषित आढळली, तर जीपीओ चौकात १७४ दिवस, रामनगरमध्ये १५४ दिवस आणि अंबाझरीमध्ये १३७ दिवस हवा प्रदूषित होती. मागील वर्षातील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, अंबाझरी भागात ३६५ दिवसांपैकी २२८ दिवस हवा चांगली किंवा समाधानकारक होती, तर १३७ दिवस प्रदूषित आढळली. महालमध्ये १८० दिवस प्रदूषित आणि १८५ दिवस चांगली हवा होती. रामनगरमध्ये १५४ दिवस प्रदूषित तर २११ दिवस चांगली हवा नोंदवली गेली, तर जीपीओ येथे १७४ दिवस प्रदूषित आणि १९१ दिवस चांगली हवा होती. नागपुरातील वाढत्या प्रदूषणामागे अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने वाहतूक, वाहनांचा धूर, औष्णिक ऊर्जा प्रकल्प आणि उद्योगांमधून होणारे वायू प्रदूषण यासाठी जबाबदार आहे. याशिवाय, आधुनिक जीवनशैलीमुळे घरात आणि घराबाहेरही वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. कचरा जाळणे, लाकूड आणि कोळसा वापरणे यामुळेही हवेची गुणवत्ता खालावत आहे. या वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दमा, श्वसन विकार, टीबी, कर्करोग, सर्दी, खोकला, डोळ्यांचे आजार, त्वचेचे विकार आणि हृदयरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
राज्यातील पाणंद रस्ते आता सातबारा उता-यावर
पुणे : राज्य सरकारने राज्यभरात पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली असून आता भूमी अभिलेख विभाग असे पाणंद रस्ते नकाशावर दिसत असल्यास त्यांची नोंद सातबारा उता-यावर करणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे. सातबारा उता-यावर रस्त्याचा उल्लेख झाल्याने असे रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतक-यांना जागा द्यावी लागणार आहे. परिणामी […] The post राज्यातील पाणंद रस्ते आता सातबारा उता-यावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर आणि अर्चक पुरोहित संपर्क आयामातर्फे हिंदू नववर्ष आणि कालगणनेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी वक्ते तयार करण्यात येणार आहेत. यासाठी नागपूर, पुणे, ठाणे आणि संभाजीनगर शहरांमध्ये विशेष मोहीम राबवली जाईल, अशी माहिती आयामाचे संयोजक अनिल सांबरे यांनी दिली. या मोहिमेसाठी इच्छुक व्यक्तींना गुगल लिंकद्वारे आवाहन करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांसाठी वक्ता प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जाईल. नोंदणीची अंतिम मुदत २० जानेवारी असून, प्रशिक्षण वर्ग रविवारी २५ जानेवारी रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत होईल. या प्रशिक्षण वर्गात दोन तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. कोणताही स्वयंसेवक किंवा वक्ता यात सहभागी होऊ शकतो. जे विद्यमान वक्ते आहेत किंवा ज्यांना हा विषय इतरांपर्यंत पोहोचवण्याचा आत्मविश्वास आहे, अशा सर्व भावी वक्त्यांनी हिंदू सनातन कालगणनेच्या प्रचार-प्रसारासाठी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वक्ता म्हणून नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/bDpcc51fF1JJsaXMA या लिंकवर फॉर्म भरावा. येत्या गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्ष युगाब्द ५१२८ सुरू होत आहे. या नववर्षाचे स्वागत सर्वांनी अभिमानाने, उत्साहात आणि सार्वजनिकरित्या करावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा विषय विविध मंदिरे, संस्था, शाळा, महाविद्यालये आणि मंडळांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने वक्त्यांची आवश्यकता आहे. या वक्त्यांना हिंदू कालगणनेची सखोल माहिती देणे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, या हेतूने वक्ता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू:पुण्यात वडगाव बुद्रुक परिसरात अपघात; जीपचालकाला अटक
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली असून, पोलिसांनी आरोपी जीपचालकाला अटक केली आहे. प्रतिभा दत्तात्रय घडशी (वय ५५, रा. धबाडी, आंबेगाव बुद्रुक, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकी चालवणाऱ्या मंगला अशोक काकडे (वय ६०, रा. श्री दत्त संस्कृती रेसीडन्सी, धबाडी, पुणे) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी जीपचालक राजकुमार ज्ञानेबा राजपंगे (वय ३८, रा. श्री भैरवनाथ मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. मंगला काकडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला काकडे आणि प्रतिभा घडशी या वडगाव बुद्रुकमधील धबाडी रस्त्याने जात असताना चरवड बंगल्यासमोर पाठीमागून आलेल्या भरधाव जीपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत घडशी यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात दोन दुचाकींचे नुकसान झाले. गंभीर जखमी झालेल्या घडशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एस. साळुंके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बेकायदेशिररित्या सिलिंडर भरणा प्रकरणी कारवाई लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल बेकायदेशिररित्या मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना घरगुती वापराचे व हॉटेल व्यासवसायीक सिंलेडरच्या टाक्यांचा साठा केल्याप्रकरणी दोघांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनकुमार उर्फ रामवीर लाखनसिंग तोमर (31, रा. केसनंद, पुणे) आणि सागर इंगळे अशा दोघांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केसनंद रोडवरील छावणी फॅमेली रेस्टारंट येथील ओम गॅस सर्व्हिस ॲण्ड रिपेरिंग येथे हा प्रकार सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका खळबळजनक वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, अशी थेट भविष्यवाणी केली. निकाल आल्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्यामुळे बीएमसी निवडणुकीच्या आधीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असले तरी या युतीला आता कोणतेही राजकीय महत्त्व उरलेले नाही. त्यांच्या मते, जर 2009 सालीच शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते, तर महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आज वेगळी असती. त्या काळात या युतीला मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळाला असता. मात्र आता वेळ निघून गेली असून, दोन्ही नेत्यांकडे पूर्वीसारखी मतांची ताकद राहिलेली नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. विशेषतः मनसेबाबत बोलताना त्यांनी अत्यंत परखड मत मांडले. राज ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या निवडणुकीनंतर राज ठाकरे यांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पराभव होणार आहे. या युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना होऊ शकतो, मात्र राज ठाकरे यांना त्यातून काहीही मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या मतांचा आधार आता संपलेला असून, त्यांची भूमिका या युतीत दुय्यम ठरेल, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे केवळ निवडणूक हरतील असे नाही, तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाची नोंद त्यांच्या नावावर होईल, ही माझी ठाम भविष्यवाणी आहे, असे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही याच मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, पण विचारांचा वारसा मिळत नाही, अशी खोचक टिप्पणी करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारधारेशी संबंधित वारसा मिळालेला नाही, असा आरोप केला. या वक्तव्यामुळे ठाकरे गटात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे थेट वैचारिक वारशावर सवाल उपस्थित केल्याने राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्द्यावरून पलटवार दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यांना ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्द्यावरून पलटवार केला. आम्ही सातत्याने सांगत आहोत की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे स्पष्ट केले. मात्र भाजपकडून मुंबईचा महापौर हिंदू असेल, असे वक्तव्य केले जात असल्याने त्यांनी यामागील अर्थावरच सवाल उपस्थित केला. भाजप मराठी माणसाला हिंदू मानत नाही का, असा थेट प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. याच मुद्द्यावर पुढे जात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. वाक्युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाहीत, असा सवाल करत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा संदर्भ दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या झाडणारे मोरारजी देसाई हे हिंदू होते की नव्हते, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या दाव्यांवरच आव्हान उभे केले आहे. या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध हिंदू या मुद्द्यावरून नवा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर थेट प्रश्न उपस्थित करत असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे भाजपच्या हिंदुत्वाच्या व्याख्येवरच सवाल करत आहेत. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वाक्युद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये चुकीचा उमेदवार दिल्याप्रकरणी भाजपच्या वरिष्ठांनी झापल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. यामुळे पुणे भाजपच्या गोटात एकच खळबळ माजील आहे. चंद्रकांत पाटील यांची एकही भविष्यवाणी आजपर्यंत खरी ठरली नसल्याचा दावाही या पदाधिकाऱ्याने केला आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल बालवडकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उमेदवारीबाबत चुकीचे निर्णय घेतल्याने पाटील यांना पक्षातील वरिष्ठांकडून चांगलेच झापले गेल्याचा दावा बालवडकर यांनी केला. त्यांच्या आजवर एकही भविष्यवाणी खरी ठरली नसल्याचेही बालवडकर म्हणाले. बालवडकर यांच्या मते, उमेदवारीच्या चुकीच्या निर्णयामुळे हा आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. त्यामुळेच माजी प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्र्याला प्रभाग ९ मध्ये दारोदारी फिरावे लागत आहे. पाटील जितके प्रभागात फिरतील, तितकी राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी वाढत जाईल, कारण नागरिकांना आता केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामाचे राजकारण हवे आहे, असेही त्यांनी नमूद केले. ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या निकषांवरच लढली जाईल, असा निर्धार बालवडकर यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रभाग ९ मधील सुस गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पदयात्रेचे स्वागत करत होते. या पदयात्रेत प्रभाग क्रमांक ९ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि अमोल बालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पदयात्रेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत सुस परिसरात आजवर करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली, तसेच भविष्यातील विकास आराखड्याबाबतही चर्चा करण्यात आली. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही पदयात्रा शिस्तबद्ध, उत्साहपूर्ण आणि प्रभावी ठरली. यामुळे प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.
पुण्यातील ‘द स्मॉल ॲनिमल क्लिनिक’मध्ये यकृत आणि प्लीहाच्या मोठ्या ट्युमरने ग्रस्त असलेल्या १३ वर्षीय कुत्र्यावर जगातील पहिली यशस्वी कॅथलॅब एम्बोलायझेशन प्रक्रिया पार पडली आहे. या विनाशस्त्रक्रियेमुळे तब्बल २.५ किलो वजनाची गाठ लक्षणीयरीत्या कमी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. 'मफिन झोरे' नावाच्या या लॅब्राडोर कुत्र्याला (नर) गेल्या काही महिन्यांपासून गंभीर ॲनिमिया, प्लेटलेट्सची तीव्र कमतरता, श्वास घेण्यास त्रास आणि पोटात मोठी गाठ अशा लक्षणांनी ग्रासले होते. वैद्यकीय तपासणीत त्याचे हिमोग्लोबिन अवघे ३.५ mg/dl आणि प्लेटलेट्स केवळ ३० हजार असल्याचे समोर आले. अल्ट्रासाऊंड व सीटी स्कॅनमध्ये यकृत व प्लीहेत मोठ्या कर्करोगाच्या गाठी असल्याचे निदान झाले. पारंपरिक खुल्या शस्त्रक्रियेमुळे जीवघेणा रक्तस्राव होण्याचा धोका लक्षात घेता, पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमने किमान आक्रमक कॅथलॅब एम्बोलायझेशन करण्याचा निर्णय घेतला. व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. धर्मेश गांधी, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे आणि कॅथलॅब टीमच्या सहकार्याने ही प्रक्रिया यशस्वी करण्यात आली. या प्रक्रियेत, फेमोरल धमनीतून मायक्रो-कॅथेटरद्वारे गाठींना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या बंद करण्यात आल्या. यामुळे गाठीचा रक्तपुरवठा थांबला आणि तिचा आकार हळूहळू कमी होऊ लागला. प्रक्रियेनंतर अवघ्या ४८ तासांत मफिनच्या हिमोग्लोबिन पातळीत सुधारणा दिसून आली. पंधरा दिवसांत गाठीचा आकार ७० टक्क्यांहून अधिक कमी झाला. सध्या मफिनची प्रकृती स्थिर असून, तो पुन्हा सक्रिय जीवन जगत आहे. या दुर्मिळ यशस्वी उपचारामुळे पशुवैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.
सीमेवरील सैनिकांना ५०० किलो तिळगुळ:पुणेकरांकडून मकर संक्रांतीनिमित्त कृतज्ञता व्यक्त
मकर संक्रांतीनिमित्त सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पुणेकरांनी ५०० किलो तिळगुळ पाठवला आहे. सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित तिळगुळ पूजन कार्यक्रमात विद्यार्थी आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भारत मातेचा जयघोष करत सैनिकांच्या वीरतेला नमन केले. अप्पा बळवंत चौकातील नूमवि प्राथमिक शाळेच्या सभागृहात हा तिळगुळ पूजन कार्यक्रम पार पडला. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजन वडके, १९ मराठा लाईट इन्फंट्रीचे निवृत्त मेजर बजरंग निंबाळकर, गायिका मनीषा निश्चल, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते आणि मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाचे यंदा २८ वे वर्ष असून, १९९७ पासून सैनिकांसाठी तिळगुळ पाठवण्याची ही परंपरा सुरू आहे. आनंद सराफ यांनी सांगितले की, भारतीय सण माणसाचे नाते दृढ करतात. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी पुणेकरांच्या माध्यमातून हा तिळगुळाचा गोडवा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. निवृत्त मेजर बजरंग निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लढण्यासाठी प्रोत्साहन देणारा आणि पाठीवर शाबासकीची थाप देणारा कोणी असेल तर सैनिक सीमेवर अधिक चांगल्या प्रकारे लढू शकतो. समाज चांगला असेल तर चांगले सैनिक घडण्यास मदत होते. दिवाळी फराळ, भेटवस्तू आणि तिळगुळ यांसारख्या वस्तू सैनिकांना सर्वाधिक पुण्यातूनच येतात, असेही त्यांनी नमूद केले. या आयोजनात विष्णू ठाकूर, अनिल पानसे, नीला कदम, दत्तात्रय वेताळ, कल्याणी सराफ आणि शेखर कोरडे यांनी सहकार्य केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील परस्पर आरोपांवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. हे आरोप भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी रंगवलेले नाट्य असून, ती केवळ 'नुरा कुस्ती' असल्याचा घणाघात अंधारे यांनी केला. निवडणुका संपल्यानंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन जनतेच्या पैशांची लूट करतील, असेही त्या म्हणाल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुनावळे–ताथवडे–वाकड प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना (उबाठा) पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार आणि सागर विजय ओव्हाळ यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, प्रभारी अशोक वाळके, रोमी संधू, रामभाऊ सपकाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अंधारे यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. उबाठा पक्षाच्या 'मशाल' चिन्हाबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. प्रिंटिंगमध्ये चिन्ह स्पष्ट दिसत नसून, मागील निवडणुकीतील 'तुतारी–पिपाणी' चिन्हाप्रमाणेच हा खोडसाळपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत आयोगाकडे अधिकृत तक्रार नोंदवली असल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले असले तरी, भाजप आणि राष्ट्रवादीने शहराचे वाटोळे केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. त्यांनी शहरातील वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी, ड्रग्स रॅकेट, अनधिकृत बांधकामे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. महेश लांडगे हे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे प्रतिनिधी असून, निवडणुकीनंतर भाजप-राष्ट्रवादी 'तुझ्या गळा, माझ्या गळा' करतील, असे अंधारे म्हणाल्या. दोन्ही पक्ष 'चोर चोर मौशेरे भाई' असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी आपल्या आरोपांवर ठाम राहिल्याचे स्पष्ट केले.
देशासाठी खेळणे आणि विजयात निर्णायक योगदान देणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न
राजापूर : देशासाठी खेळणे आणि विजयात निर्णायक योगदान देणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. १९८६ साली लॉर्ड्सवर केलेल्या नाबाद १२६ धावांच्या खेळीमुळे भारताने इंग्लंडवर कसोटीतील पहिला ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणा-या लॉर्ड्सवर झळकावलेल्या माझ्या तीन शतकांपैकी १९८६ मधील शतकी खेळी विशेष अविस्मरणीय आहे, अशा शब्दांत भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे […] The post देशासाठी खेळणे आणि विजयात निर्णायक योगदान देणे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तरुणाईच्या सर्जनशीलतेचे व्यासपीठ
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (पिफ) देश-विदेशांतील दर्जेदार चित्रपटांचे अवकाश खुले करण्याबरोबरच भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांशी पुणेकरांचा संवाद घडवून आणला आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातील तरुणांना विचार मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गेल्या सात-आठ वर्षांत पिफच्या मराठी चित्रपट स्पर्धा विभागात दुर्गम भागातील तरुणांनी उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे तयार केलेल्या चित्रपटांना […] The post पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव तरुणाईच्या सर्जनशीलतेचे व्यासपीठ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद व अजित पवार एकच असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार एकच आहेत. ते सत्तेसाठी फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत. सत्तेसाठी तत्वे बाजूला ठेवून वागत आहेत, असे ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सध्या सत्ताधारी महायुतीसोबत आहे. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचा दुसरा गट सध्या विरोधी बाकावरील महाविकास आघाडीसोबत आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकाविरोधात टीकाटिप्पणी कर असले तरी त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी युती केली आहे. त्यांच्या युतीविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही पवार एकच असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर सोलापूर येथील आपल्या सभेत बोलताना म्हणाले, दोन्ही पवार एकच आहेत. त्यांनी भाजपला उल्लू बनवले आहे. चौकशीचे ससेमिरा मागे लागला म्हणून एक जण भाजपसोबत गेला. स्वतःची चौकशी थांबवली. आता एकजण डोळे दाखवत असताना दुसरा तुझी 70 हजार कोटींची फाईल पेंडिग असल्याची आठवण काढून देत आहे. आमचा भाजपला प्रश्न आहे, तुम्ही एवढे दिवस ही फाईल का दाबून ठेवली? याचा खुलासा करा. जर फेव्हरेबल असतील तर युती झाली पाहिजे. पण पुण्यात व ठाण्यात युती नाही. याचा राजकीय अर्त असा काढतोय की, भाजपला दोन्ही पक्षांना (शिवसेना व राष्ट्रवादी) संपवायचे आहे. म्हणून त्यांनी त्याला वाऱ्यावर सोडले आहे. विरोधी पक्षाची स्पेस कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तो किती यशस्वी होईल याविषयी साशंकता आहे. अभद्र युती करणाऱ्यांना सतेतून बेदखल करा आंबेडकर म्हणाले, मी मागच्यावेळी म्हटले होते की, तुम्हाला भविष्यात अभद्र युत्या पहावयास मिळतील. त्यानुसार अकोटमध्ये भाजप व एमआयएमची युती झाली. भाजपने सत्तेसाठी तत्त्व सोडले. तर एमआयएमने आरएसएस विरोध सोडला. काँग्रेसनेही अंबरनाथमध्ये भाजपसोबत युती केली. आता पक्ष व विचार महत्त्वाचा नाही. सत्तेतून मिळणारे टेंडर महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे लोकांनी अभद्र युतीची सरकारने दूर ठेवली पाहिजेत. काँग्रेस व वंचित हे दोन्ही पक्ष सेक्युलर आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईत युती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोटच्या प्रकरणात कारवाई करण्याचा इशारा दिला. पण 24 तास झाले तरी त्यावर काहीही झाले नाही. एकीकडे देशावर संकट आले आहे आणि दुसरीकडे देश चालवणारे अनैतिक पद्धतीने सत्तेत येत आहेत. मतदारांना माझे एवढेच सांगणे आहे की, अनैतिक चालणारे, पाकीट वाटणारे आता बाजूला ठेवा. ते बाजूला गेले तरच शहराचे प्रश्न सुटतील. परिवाहन, चादर सारखे अनेक प्रश्न सोलापुरात आहेत. पण त्याची आखणी झाली नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. प्रणिती शिंदे लवकरच भाजपमध्ये जाणार सुजात आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला होता. प्रकाश आंबेडकरांनी सुजात यांच्या दाव्याचे जोरदार समर्थन केले. सुजात आंबेडकर जे बोलले ते योग्यच आहे. ते खरेच बोललेत. तुम्हाला लवकरच त्याची प्रचिती येईल. कुणाच्या रक्तात किती भाजप आहे हे सर्वांना दिसत आहे. कोण किती एकनिष्ठ आहे हे लवकरच दिसून येईल. पण सध्या महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्याचा अतोनात प्रयत्न केला. मल्ला शिदे नावाच्या व्यक्तीला मारहाण करून त्याच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला. यामुळे आमचे निम्मे उमेदवार फॉर्म भरायला आले नाही, असे आंबेडकरांनी यावेळी सांगितले.
वसमत ते चोंढी मार्गावर कोर्टाफाटा शिवारात बँकेची रोकड नेणाऱ्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीला कारने धडक देऊन दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी १० लाखांची रोकड पळविल्याची घटना शुक्रवारी ता. ९ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांच्या पथकाने तातडीने गावकरी व परिसरातील पोलिस ठाण्यांना अलर्ट केल्याने दोन संशयीत हाती लागले आहेत. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा आहे. याशाखेतील कर्मचारी ज्ञानेश्वर भोसले हे नेहमी प्रमाणे रोकड आणण्यासाठी त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत येथे गेले होते. वसमत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून १० लाख रुपयांची रोकड घेऊन ते परत चोंढी येथे येत असतांना कोर्टा फाटा शिवारात पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामुळे ज्ञानेश्वर हे खाली पडले. यावेळी पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ज्ञानेश्वर यांना धमकी देऊन त्याच्याकडील दहा लाख रुपये रोकड असलेली बॅग पळविली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ज्ञानेश्वर घाबरून गेले. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. तर या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार संदीप टाक, भगीरथ सवंडकर, भुरके, भालेराव, विनायक जानकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यांना माहिती दिली शिवाय काही गावकऱ्यांनाही माहिती दिली. पुयनी शिवारात गावकरी व पोलिसांनी दोन संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडली आहे. बँक शाखेपर्यंत रोकड पोहोचविण्याची गरज जिल्हामध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांना जिव धोक्यात घालून रोकडची वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे तालुका शाखेने किंवा मुख्य शाखेने जिल्हाभरातील इतर शाखेपर्यंत रोकड पुरवठा केल्यास या घटना घडणार नसल्याचे बोलले जात आहे.
हिंगोली जिल्हयात आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत रेडगाव व वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत वाखारी येथे पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ६ दुचाकी, २ मोबाईलसह ३.९४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी १८ जणांवर गुरुवारी ता. ८ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातून अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कार्यान्वीत करण्यात आली आहेत. या शिवाय स्थानिक पोलिसांना देखील अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापे टाकण्याचे आदेश पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांनी दिले आहेत. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत रेडगाव येथे झन्नामन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव, शिवाजी पवार, पिराजी बेलो, राजेश घोंगडे यांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये सहा जण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. मात्र पोलिसांना पाहताच दोघे फरार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, तीन दुचाकी, दोन मोबाईल असा २.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी धोंडीबा बागल, संतंोष रायवाडे, नकुल जाधव, शशीकांत सवंडकर यांच्यासह इतर दोघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, केशव गारोळे, रामेश्वर लोखंडे, विकास राठोड, नामदेव बेंगाळ, संतोष बोथीकर यांच्या पथकाने वाखारी शिवारात जुगार अड्डयावर छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन दुचाकी, रोख रक्कम असा १.६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी देविदास येवले, गणेश लेंगडे, आदिनाथ गुंडाळे, राजेश सवराते, राहुल गवंदे, रत्नेश्वर डोणे, राजरतन गवंदे, सुरेश गवंदे, दिगंबर नादरे, गंगाप्रसाद बर्वे, विशाल ढोरे, पिराजी हंबडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
सत्ताधारी महायुतीच्या धाक, दडपशाहीमुळे जनता दहशतीत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिकेच्या निवडणुकीत पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात आहे. अजित पवार व पुण्यातील एका स्थानिक आमदाराचे विधान ऐकले तर हे लोक एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जायचेच राहिलेत, असे ते म्हणालेत. राज्यात येत्या 15 तारखेला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधीलच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना या मुद्यावरून महायुतीवर चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत सध्या पातळी सोडून टीका केली जात आहे. काल अजित पवार व पुण्यातील एका स्थानिक आमदाराचे विधान ऐकले, तर हे लोक एकमेकांच्या अंगावर तलवारी घेऊन धावून जायचेच राहिलेत. कुणी दरोडा म्हटले, तर कुणी औकात काढली. सत्तेत असणारे हे दोन्ही पक्ष ज्या पद्धतीने एकमेकांसोबत भांडत आहेत, त्यावरून सत्ता हीच त्यांच्यासाठी सर्वोच्च असल्याचे स्पष्ट् होते. त्यांच्यात विचार कुठेच दिसत नाही. या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला त्यांची विचित्र भूमिका बघायला मिळत आहे. निवडणुकीत पोलिस व गुंडांचा वापर केला जात आहे. हे पाहून जनता घाबरली आहे. भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहे. जनतेच्या मनात राग व संताप विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात सध्या राग व संताप दिसत आहे. परंतु जनता हतबल आहे असेच म्हणावे लागेल. कारण हे सरकार यंत्रणा, निवडणूक आयोग, पोलिस व गुंडांचा वापर करून चालवले जात आहे. तिन्ही पक्षांनी गुंडांचा आश्रय घेतल्यामुळे जनता दहशतीखाली जगत आहे. अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही अशी अवस्था या या महाराष्ट्रात दिसली असती. मुळात आज निवडणुकीला काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. अंबरनाथमध्ये आमचे नगरसेवक पळवले गेले. यामुळे भाजप हा स्वच्छ पक्ष आहे का? यांचा चेहरा स्वच्छ राहिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काल जयंत पाटलांनी एक किस्सा सांगितला. 'ये आये थे तवायफ का कोठा बंद करने के लिए, पर सिक्कों की खणक देख खुद ही मुजरा कर बैठे; असे ते म्हणाले. सध्या हेच भाजपमध्ये हेच सुरू आहे. सगळ्या सत्ताधाऱ्यांचे स्वच्छता व स्मार्ट सिटीचे बोर्ड लागलेले असतात, पण त्याखाली कुत्री बसलेली दिसतात. ही यांची स्वच्छता. भाजपचा तेरे राज में युवा हो गया बरबाद..ते पुढे म्हणाले, पैसा आला, पण तो गेला कुठे? चंद्रपूरमध्ये पैसा आला. अमृत योजना आली. भूमिगत गटार योजना आली. पण गेली कुठे? चंद्रपुरात बंद गटार योजना आली. फक्त लाईन टाकली, रोड खोदले. पण त्याचे कनेक्शन एकाही घराला दिले नाही. पूर्ण शहर टक्केवारीसाठी उद्ध्वस्त करून टाकले. शहर भकास करण्याचा प्रकार सुरू झाले आहे. आज शहराला पाणी मिळत नाही. मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पूर्ण शहर ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहे. चंद्रपूर शहराची ही गती व स्थिती पाहिल्यानंतर भाजपचा तेरे राज में युवा हो गया बरबाद, तू कितना भी चिल्ला फिर से नही करेगा तुझे याद, असे म्हणण्याची वेळ आली आहे. जनता या सर्व गोष्टींचा नक्कीच विचार करेल. बिनविरोध निवडणुकीसाठी उमेदवारांना धमकावण्यात आले विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महापालिका निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर होत असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, महापालिका निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर केला जात आहे. एकेका वॉर्डासाठी 1 कोटीचे बजेट ठेवण्यात आले आहे. नागपुरात 5-5 कोटी, मुंबईत 10-10 कोटींचे बजेट आहे. हा पैसा आला कुठून? पैसा येतो कुठून? आमदार व पक्ष फोडण्यासाठी पैसे आले कुठून? निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारांना पैसे देण्यात आले. त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांना धमकावण्यात आला. हे सर्व पाहिल्यानंतर खरेच आपण लोकशाहीत जगतो का हा खरा प्रश्न पडतो. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल, हा देश संविधानानुसार चालावा असे वाटत असेल ते या निवडणुकीत नक्कीच विचार करतील आणि निवडणुकीचे निकाल आपल्याला बदलेले दिसतील, असे वडेट्टीवार म्हणाले.
कळमनुुरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून शिवीगाळ करणाऱ्या तिघांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कळमनुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ८ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पोलिस ठाण्यांतर्गत एका गावामध्ये एक अल्पवयीन मुलगी शिक्षण घेते. गावातील एका तरुणाने मागील तीन दिवसांपासून त्या मुलीचा पाठलाग सुरु केला होता. मात्र त्या अल्पवयीन मुलीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. सोमवारी ता. ५ सदर मुलगी गावाजवळील बसस्थानकाजवळ आली असतांना शेख लोहमान या तरुणाने त्या मुलीकडे पाहून शेरेबाजी करण्यात सुरुवात केली. मात्र त्यानंतरही त्यामुलीने त्याला दाद दिली नाही. दरम्यान, गुरुवारी ता. ८ दुपारी सदर अल्पवयीन मुलगी बाहेर जाण्यासाठी बसस्थानकाजवळ आली असतांना त्या ठिकाणी शेख लोहमान हा देखील आला. त्याने पुन्हा एकदा मुलीचा विनयभंग केला व शेरेबाजी केली. तसेच त्यावेळी शेख एहसान व शेख वकील याने त्या मुलीस अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलीस सोबत घेऊन थेट कळमनुरी पोलिस ठाणे गाठले. यावेळी त्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख लोहमान, शेख एहसान, शेख वकील यांच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, उपनिरीक्षक सतीष ठेंगे, जमादार गजानन होळकर यांची दोन पथके आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आली होती. मात्र गुन्हा दाखल झाल्याचा सुगावा लागताच आरोपी पसार झाले आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात भाजप व शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा तणाव आता थेट मुंबईतही उफाळून आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणारे हे दोन्ही मित्रपक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर आमनेसामने आल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला, ज्यामुळे मतदानाच्या काही तास आधीच राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघडपणे समोर आला असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वॉर्ड क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही उमेदवारांचे प्रचार फेरी सुरू असताना दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकाच परिसरात एकत्र आले. सुरुवातीला वातावरण शांत होते, मात्र अचानक भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी माईकवरून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरली जाणारी ही घोषणा आता थेट मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिली गेल्याने शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. या घोषणाबाजीमुळे काही वेळातच प्रचाराचे वातावरण तणावपूर्ण बनले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात प्रत्युत्तरात्मक घोषणा देत नाराजी व्यक्त केली. मित्रपक्षाकडूनच अशा प्रकारची भाषा वापरली जात असल्याने आम्हाला अपमानित केल्याची भावना निर्माण झाली, अशी प्रतिक्रिया अनेक शिंदे समर्थकांकडून व्यक्त करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना घडलेल्या या प्रकारामुळे मुंबईतील निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण लागले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या घटनेचा परिणाम मतदारांच्या मानसिकतेवरही होऊ शकतो. या वादामागची पार्श्वभूमी पाहिली असता, भाजप–शिवसेना यांच्यातील जागावाटपातील गुंतागुंत पुन्हा समोर येते. वॉर्ड क्रमांक 173 हा अधिकृत जागावाटपानुसार शिंदे सेनेला सुटलेला होता. त्यानुसार शिंदे गटाने पूजा कांबळे यांना अधिकृत उमेदवारी दिली. मात्र, भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनीही भाजपचा कलर झेरॉक्स असलेला एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तो अर्ज वैध ठरला. त्यामुळे दोन्ही पक्षांना नाईलाजाने या वॉर्डमध्ये मैत्रीपूर्ण लढतीला सामोरे जावे लागले. सुरुवातीला ही लढत सौहार्दपूर्ण राहील, असे संकेत होते, मात्र प्रत्यक्ष प्रचार सुरू झाल्यानंतर ‘दोस्तीत कुस्ती’चे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे. या घटनेनंतर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. भाजपमध्ये कोण महारथी आहेत, हे पाहावे लागेल. अशा घोषणा देण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले पाहिजे, असा थेट टोला त्यांनी लगावला. आमच्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात, हे विसरू नका, असे म्हणत शिरसाट यांनी भाजपला आठवण करून दिली. तसेच, ज्यांनी या घोषणा दिल्या त्यांची भाषा कुठे गेली, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संबंधित कार्यकर्त्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. पक्षाच्या मित्रपक्षाबाबत अशा प्रकारची घोषणाबाजी अयोग्य असून, यामुळे चुकीचा संदेश जातो, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले. मात्र, मतदानाच्या तोंडावर ही कारवाई कितपत प्रभावी ठरेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. महायुतीतील वरिष्ठ नेते या वादावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतील का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रपक्षांतील वाद सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात एकीकडे मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेत असे मतभेद उफाळून येत असताना, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यातील युती तुटल्याचे पडसादही जाणवत आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या निर्णायक टप्प्यावर मित्रपक्षांतील हे वाद सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. मतदानाच्या काही तास आधी उघड झालेली ही फूट मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करेल का, की अंतर्गत वाद असूनही महायुतीला अपेक्षित यश मिळेल, याचा फैसला आता मतपेटीतूनच होणार आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मधील ही घटना केवळ स्थानिक वाद न राहता, महायुतीतील अंतर्गत संघर्षाचे प्रतीक ठरत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे.
समलैंगिक संबंधाच्या नादातून एका 66 वर्षीय कापड व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब समोर आली आहे. हा व्यापारी समलैंगिक संबंधांच्या नादा आग्र्याला गेला. पण तिथे हे प्रकरण प्रथम अपहरण व नंतर पैसे उकळण्यापर्यंतच्या खोट्या गुन्ह्यापर्यंत गेले. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत काही तासांतच हे प्रकरण उजेडात आणले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित 66 वर्षीय व्यावसायिकाचा महाराष्ट्रात कापडाचा व्यवसाय आहे. हा व्यक्ती गत काही दिवसापासून गे-डेटिंग अॅप वापरत होता. त्या माध्यमातून त्याची मैत्री काही पुरुषांशी झाली होती. या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची मैत्री समलैंगिक संबंधांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आग्र्यात एकमेकांना भेटण्याचे ठरवले. हा व्यावसायिक आनंदात तिथे पोहोचला. तेथील दरेसी परिसरातील हॉटेलमधील एक खोली त्यांनी बूक केली. तो व्यावसायिक त्या पुरुषांसोबत बाहेर फिरण्यास हाथरसला गेला. तिथेच या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. 66 वर्षीय व्यक्ती व त्याच्या पुरुष मित्रांमध्ये कथितपणे वाद झाला. हा वाद एवढा टोकाला पोहोचला की, सदर पुरुषांनी त्या व्यक्तीकडून 1.20 लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतली. एवढेच नव्हे तर त्याची अंगठी व मोबाईल फोनही हिसकावून घेण्यात आला. यामुळे कापड व्यावसायिक प्रचंड हादरला. भीती, बदनामी व प्रकरण आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता, यामुळे त्याला चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडण्यात आले. तो आग्र्याला परतला आणि रात्री उशिरा एत्माद्दौला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचला. त्याने आपल्यासोबत लुटमार झाल्याची तक्रार नोंदवली. संपूर्ण प्रकरणच निघाले बोगस तो म्हणाला, काही अज्ञात लोकांनी त्याचे अपह्रण केले. त्याच्याकडून पैसे मिळाल्यानंतर त्याला सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी वृद्ध थांबलेल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही खंगाळले. त्यात पीडित व्यावसायिक स्वतःहून आरोपींसोबत जात असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीने ज्या लोकांविरोधात तक्रार नोंदवली होती, त्यांची चौकशी केली. त्यांचे बँक व्यवहार तपासले. यामुळे पोलिसांना तक्रारदारावर संशय बळावला. त्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली. अखेर वृद्धाने नेमके काय घडले? याचा पाढा पोलिसांपुढे वाचला. पोलिसांनी सांगितले की, त्या व्यावसायिकाने मोबाईल अॅपद्वारे काही पुरुषांशी मैत्री केली होती. त्या मैत्रीचे समलैंगिक संबंधांत रुपांतर झाले. हे अपहरणाचे प्रकरण नसून, समलैंगिक संबंध, वाद व बदनामीच्या भितीने रचलेले कुभांड आहे. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत व्यावसायिकासह 5 जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच ज्या बँक खात्यात 1.20 लाख रुपये ट्रान्सफर झाले ते खातेही गोठवले आहे. आता या सर्व आरोपींविरोधात कारवाई केली जात आहे. प्रस्तुत प्रकरणात कुणाचीही फसवणूक झाली नाही. केवळ वैयक्तिक वाद व बदनामीच्या भितीने अपहरण व लुटीचा खोटा प्रकार उभा करण्यात आला, असे पोलिसांनी या प्रकरणी स्पष्ट केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना, एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर जलील यांनी थेट पोलिसांकडे तक्रार करत हा हल्ला झाला आहे आणि आता पोलिस काय कारवाई करतात ते पाहू, अशी प्रतिक्रिया दिली. इतकेच नव्हे तर, या हल्ल्यामागे गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दानवे यांनी जलील यांना थेट भाजपचा हस्तक ठरवत, छत्रपती संभाजीनगर शहराला त्यांनी व्यसनाधीनतेकडे ढकलल्याचा आरोप केला. काळे धंदे करणारा व्यक्ती पैशाच्या जोरावर आणि सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणाखाली निवडून येतो, अशी घणाघाती टीका करत दानवे यांनी जलील यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली. आमची लढत इम्तियाज जलील यांच्याशी नाही, तर थेट भाजप आणि शिंदे गटाशी आहे, असे स्पष्ट करत त्यांनी एमआयएमसोबत कोणतीही राजकीय लढाई नसल्याचेही सांगितले. अंबादास दानवे पुढे म्हणाले की, शिंदे गटामध्येच सध्या अंतर्गत संघर्ष सुरू आहे. एकमेकांविरोधात आव्हाने उभी राहत असून, त्यांच्यातच ताणतणाव वाढले आहेत. त्यामुळे शहरातील राजकारणात खरी लढत कुणामध्ये आहे, हे जनतेला स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. इम्तियाज जलील यांच्या वाहनावरील हल्ल्याच्या मुद्द्यावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत, हे सगळे सत्ताधाऱ्यांचे राजकीय खेळ असल्याचे संकेत दानवेंनी दिले. निवडणुकीच्या तोंडावर अशा घटनांमधून वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी सूचित केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरूनही अंबादास दानवे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. काल फडणवीसांचा दौरा म्हणजे टॉक शो नव्हता, तो थेट ‘फेक शो’ होता, असा टोला त्यांनी लगावला. शहराच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री केवळ नेहमीची स्क्रिप्ट वाचून गेले, असा आरोप त्यांनी केला. ते ज्या शहरात जातात तिथे फक्त शहराचं नाव बदलतं, बाकी भाषण मात्र तसंच असतं, अशी उपरोधिक टीका करत, भाजप सभेला सामोरे जाण्याऐवजी पळ काढत असल्याचा आरोप दानवेंनी केला. त्यांच्या मते, भाजपने जाणीवपूर्वक जाहीर सभा न घेता टॉक शोचा मार्ग स्वीकारला. समृद्धी महामार्गाच्या जमिनींच्या मुद्द्यावरूनही दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. आम्ही अडथळा आणला नसता, तर शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या असत्या, असा दावा करत, शिवसेना ठाकरे गटामुळेच शेतकऱ्यांना पाचपट दर मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आमचा जमिनी देण्याला विरोध नव्हता, मात्र दर अन्यायकारक असल्यामुळे आम्ही विरोध केला, असे स्पष्ट करत, उद्धव ठाकरे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून मैदानात उतरल्याचेही त्यांनी ठामपणे मांडले. त्यामुळे फडणवीसांनी आमच्यावर आरोप करण्याऐवजी स्वतःची भूमिका तपासावी, असा सल्लाही त्यांनी दिला. छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवरही अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. शहराला वर्षातील 365 दिवसांपैकी अवघे 44 दिवस पाणी मिळते, असा आरोप करत त्यांनी आकडेवारी मांडली. सध्या शहराला 140 एमएलडी पाणी मिळत असताना, गरज मात्र 240 एमएलडीची असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी फक्त तारखा दिल्या, प्रत्यक्षात पाणी मात्र अजून दिलेले नाही, असा आरोप करत ‘लबाडांनो पाणी द्या’ म्हणत आंदोलन केल्याची आठवण त्यांनी करून दिली. भाजप अजूनही आश्वासनांच्या पलीकडे गेलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे जनता आता बदलासाठी तयार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा प्रचार सध्या जोरात सुरू असल्याचे दानवे यांनी सांगितले. दहा तारखेला उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असून, त्यानंतर प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण प्रचारयंत्रणा रस्त्यावर उतरली असून, संभाजीनगर महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेचेच वर्चस्व प्रस्थापित होईल, असा ठाम विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे जनता आता बदलासाठी तयार असून, आगामी निवडणूक शहराच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
घोडबंदर येतील गायमुख घाटाच्या उतरणीवर शुक्रवारी सकाळी एक-दोन नव्हे तर तब्बल 11 वाहनांचा विचित्र अपघात झाला. सिमेंट वाहतूक करणाऱ्या कंटेनरमुळे हा अपघात झाला. यामुळे या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी झाली. दरम्यान, या घटनेत 4 हून अधिक जण जखमी झाले असून, कंटेनर चालक फरार झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा कंटेनर (एमएच 04 केएफ 0793) शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास घोडबंदर स्थित गायमुख घाट उतरून ठाण्याच्या दिशेने येत होते. तब्बल 35 ते 40 टन सिमेंट वाहून नेणाऱ्या या कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर सकाळी 7.45 वा. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना लगतच्या रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे गायमुख घाट ते वसई खाडी पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जखमींमध्ये रिक्षाचालक शिवकुमार यादव (56) यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर तस्किन शेख (45) व अनिता पेरवाल (45) या 2 महिला प्रवाशांनाही जबर दुखापत झाली आहे. कारचालक रामबली, बाबूलाल (22) यांच्याही कंबरेला या अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना ओवळा येथील टायटन रुग्णालयात दाखल करम्यात आले आहे. इतर काही वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. रस्त्यावर ऑईल सांडल्याने परिस्थिती गंभीर या अपघातात होंडा सिटी, व्हॅगनार, इर्टिगा, महिंद्रा XEV 9E, इनोवा, डिझायर, ब्रेझा, फोर्ड कार तसेच ऑटो रिक्षा अशा एकूण 11 वाहनांचे नुकसान झाले आहे. काही वाहनांचे पुढील व मागील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातग्रस्त वाहनांमधून रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली होती. पण पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या मदतीने या ऑईलवर माती टाकून संभाव्य अपघात टाळण्याचा प्रयत्न केला. या अपघातामुळे ठाणे - घोडबंदर रोडवरील दोन्ही वाहिन्यांवर सुमारे 2 तास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांचे हाल झाले. अखेर अपघातग्रस्त सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हटवण्यात आली असून सध्या घोडबंदर रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, कंटेनर चालकाचा शोध घेण्याचे काम कासारवडवली पोलिस करत आहेत.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक 9 ही निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. ऐनवेळी उमेदवारी कापल्यामुळे या प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आलेले आणि त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले युवा नेते अमोल बालवडकर सध्या भाजपवर आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्या विरोधात प्रचारासाठी थेट भाजपचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात उतरले असून, त्यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये जोरदार प्रचार करत भाजपची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी मोठी भविष्यवाणी करत राजकीय वातावरण अधिक तापवले. प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपचे उमेदवार लहू बालवडकर हे केवळ विजयीच होणार नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येतील, असा दावा त्यांनी केला. आपली भविष्यवाणी नेहमी खरी ठरल्याचा उल्लेख करत, 2017 च्या निवडणुकीत मुंबईतील जागांचा अचूक अंदाज आपण आधीच वर्तवला होता, असेही त्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अनेक जण मला विचारतात काय होईल, आणि मी जे सांगतो ते घडते, असे सांगत लहू बालवडकर बालेवाडीतही विक्रमी मतांनी निवडून येतील, असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटलांच्या या भविष्यवाणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल बालवडकर यांनी जोरदार पलटवार केला. चंद्रकांत पाटलांनी आता पोपट घेऊन फिरायला हवे, असा खोचक टोला लगावत त्यांनी भाजप नेत्यांना डिवचले. जर मला उमेदवारी दिली असती तर पाटलांवर आज दारोदारी फिरायची वेळ आली नसती, असे म्हणत त्यांनी भाजप नेतृत्वावर थेट निशाणा साधला. भाजपने ऐनवेळी आपले तिकीट कापल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपविरोधात मोर्चा उघडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, पुणे शहरातील महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांनी घेतलेली पहिली सभा ही अमोल बालवडकर यांच्या समर्थनार्थ होती, यावरून राष्ट्रवादीने त्यांना किती महत्त्व दिले आहे, हेही अधोरेखित झाले. आपली उमेदवारी कशी कापण्यात आली, याबाबत बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी मागितल्यामुळे माझ्यावर राग ठेवून महापालिकेचे तिकीट कापण्यात आले. शेवटपर्यंत तिकीट देतो म्हणून झुलवण्यात आले, असा आरोप करत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ज्यांनी माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात येत्या चार वर्षांत अश्रू आणूनच मी बदला घेईन, असे त्यांनी ठणकावून सांगितले. एका दादाने दीड वर्ष माझ्याविरोधात कटकारस्थान केले, पण दुसऱ्या दादाने म्हणजेच अजित पवारांनी अवघ्या दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म केला, असे म्हणत त्यांनी नव्या पक्षातील समाधान व्यक्त केले. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट आणि तीव्र लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगरात गुरुवारी (८ जानेवारी) दुपारी नशेत तर्र असलेल्या ३ तरुणांनी हातात तलवारी घेऊन परिसरात उच्छाद मांडला. या टोळक्याने भररस्त्यात तलवारी फिरवत सामान्य नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. दुपारी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास एका काळ्या-पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून २० ते २२ वयोगटातील तीन तरुण आले. त्यांच्याकडे तीन धारदार तलवारी आणि लाकडी दांडके होते. बजाजनगरातील महाराणा प्रताप चौक, सावरकर कॉलनी आणि मोहटादेवी चौक या भागात या तरुणांनी आरडाओरडा करत दहशत माजवली. गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ : या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्हेगारांची दुचाकी आणि दोन तलवारी जप्त केल्याचे समजते. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झालेला नव्हता. वाहनधारकांसह पादचाऱ्यांवर वार करण्याचा प्रयत्न या माथेफिरूंनी केवळ दहशतच माजवली नाही, तर वाटेत येणाऱ्या वाहनधारकांवर आणि पादचाऱ्यांवर वार करण्याचा प्रयत्न केला. यात दोन जण जखमी झाले आहेत. संतापलेल्या या तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभी असलेली अनेक वाहने फोडून मोठे आर्थिक नुकसान केले. दारू द्या म्हणत दुकानासमोर राडा दारू द्या म्हणत एकाने दुकानदाराला शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार ६ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास इंदिरानगर भाजीमंडई येथे घडला. अमित दाभाडे (रा. गल्ली क्र.३, संजयनगर) असे मारहाण करणाऱ्याचे नाव असून त्याच्या विरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात देशी दारू दुकान चालक सत्यजित शिरीषजैस्वाल (२९, रा. पिसादेवी) यांनी फिर्याद दिली.त्यानुसार फिर्यादी नेहमीप्रमाणे दुकानावर बसलेलेअसताना अमित दाभाडे नावाचा व्यक्ती तेथे आला.त्याने लवकर दारू द्या, अशी मागणी करत शिवीगाळसुरू केली. फिर्यादीने त्याला समजावण्याचा प्रयत्नकेला असता, आरोपीने अचानक दुकानाजवळ पडलेला दगड उचलून फिर्यादीला मारहाण केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने परळी नगरपालिकेत असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वातील एमआयएमशी हातमिळवणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी शिंदे गटावर सडकून हल्ला चढवत त्यांना बंड अन् तत्त्वांच्या गप्पा कायमच्या थांबवण्याचा टोला हाणणला आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत युती व आघाड्यांना चांगलाच जोर चढला आहे. दोन दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप व काँग्रेसने एकमेकांशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी युती केली होती. यामुळे राज्याच्या एकच खळबळ उडाली होती. काँग्रेस व भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या युत्या करताना नेतृत्वाला अंधारात ठेवण्याचा आरोप केला होता. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी शिवसेनेने परळी नगरपालिकेत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व एमआयएमशी युती केली आहे. बंड आणि तत्त्वांच्या गप्पा कायमच्या थांबवा ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, एकनाथ शिंदे जी, परळी नगरपालिकेत शिंदे गट-एमआयएम-राष्ट्रवादीची जी युती झाली आहे, ती पाहून आता तुमच्या 'बंड' आणि 'तत्त्वांच्या' गप्पा कायमच्या थांबवा. राष्ट्रवादी नको नको म्हणता म्हणता, आता तुम्ही थेट 'एमआयएम-वासी' झालात? ज्यांच्यावर टीका करून सत्तेची पायरी चढलात, आज त्याच्याशीच जमलं तुमचं! हीच का तुमची खरी वैचारिक भूमिका? परळीतल्या या नव्या 'सत्तेच्या संसाराचा' चेहरा महाराष्ट्राने पाहिला आहे. ही नवी युती मुबारक एकनाथ शिंदे, असे त्यांनी म्हटले आहे. दानवेंनी आपले हे ट्विट एकनाथ शिदे यांनाही टॅग केले आहे. परळीत नेमके काय घडले? उल्लेखनीय बाब म्हणजे बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परळी नगरपरिषद निवड नुकतीच करण्यात आली. त्यात राष्ट्रवादी व मित्र पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष, 2 अपक्ष आदी 24 जणांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यात एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचाही समावेश करण्यात आला आहे. उर्वरित सदस्यांत अपक्ष, राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. निवडणूक प्रचारात एमआयएमने केली होती मुंडेंवर टीका नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमच्या उमेदवार शेख आयशा मोहसीन यांच्या प्रचारार्थ एमआयएमचे प्रदेश सरचिटणीस समीर बिल्डर यांनी सभा घेतली होती. या सभेत मंत्री पंकजा मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्या प्रभागात काँग्रेस व एमआयएमचे उमेदवार विजयी झाले. आता हेच उमेदवार राष्ट्रवादीच्या गटात सहभागी झालेत. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहारांतर्गत खिचडीसाठी तांदूळ कमी का दिला या कारणावरून मुख्याध्यापिकेस ढकलून देत जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुरुवारी ता. ८ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा असून या ठिकाणी ४७ विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान्ह भोजनामध्ये खिचडीचे वाटप केले जाते. खिडचीसाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या तुलनेत तांदूळ व इतर साहित्य् खिचडी शिजविणाऱ्या महिलांना दिले जाते. दररोज वाटप होणाऱ्या तांदूळाचा हिशेब शाळा प्रशासनाला ठेवावा लागतो. दरम्यान, सध्या औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथील यात्रा असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्या रोडावली आहे. शाळेत १० ते १२ विद्यार्थीच असल्यामुळे मु्ख्याध्यापिका मंजश्री चौधरी यांनी विद्यार्थी संख्येच्या तुलनेतच तांदूळ खिचडी शिजविण्यासाठी दिला होता. सदर प्रकार माहिती झाल्यानंतर गावातील गजानन जाधव व गोकर्णा जाधव शुक्रवारी ता. ८ शाळेत आले. यावेळी मुख्याध्यापिका चौधरी ह्या वर्गावर शिकवत होत्या. मात्र त्यानंतरही गजानन व गोकर्णा यांनी खिचडी शिजविण्यासाठी तांदूळ कमी का दिला यावरून वाद घालण्यास सुरवात केली. विद्यार्थी कमी असून दररोज वाटप केलेल्या तांदूळाचा हिशेब ठेवावा लागतो असे चौधरी यांनी सांगितले. दरम्यान त्यांचे म्हणणे एेकून न घेता दोघांनी त्यांना वर्गातच ढकलून देत त्यांना शिवीगाळ केली तसेच जिवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी मुख्याध्यापिका चौधरी यांनी औंढा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन व गोकर्णा यांच्या विरुध्द शासकिय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत.
सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे सततची नापिकी व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेच तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली असून याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ८ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील सुनील उत्तम पायघन (३५) यांना त्यांच्या वडिलांच्या नावे जयपूर शिवारात चार एकर शेती आहे. सुनील हेच वडिलांची शेती करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. मागील दोन ते तीन वर्षापासून सतत नापिकी होत होती. मात्र पुढील हंगामात चांगले पिक येईल या आशेवर ते होते. दरम्यान, यावर्षी खरीप हंगामात त्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली होती. मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन लागवडीचा खर्चही निघाला नाही. तर तुरीच्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा याची चिंता त्यांना लागली होती. सदर बाब त्यांनी त्यांच्या पत्नीलाही बोलून दाखवली. त्यानंतर शेतात जाऊन येतो असे सांगून ते शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी जेवणाचा डबा घेऊन गेल्या असतांना त्यांना सुनील यांचा मृतदेह आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण, किशोर कातकडे, पाचपुते यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पुजा पायघन यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूूची नोंद करण्यात आली आहे. जमादार पाचपुते पुढील तपास करीत आहेत. मयत सुनील यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी व एक मुलगा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महायुती सरकारवर अतिशय तीव्र शब्दांत टीका केली आहे. मालेगाव येथे आयोजित एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत बोलताना ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून हल्ला चढवला. सत्ताधारी मुंबईत बसून एकत्र वडापाव खातात आणि निवडणुका आल्या की वेगवेगळे होतात, असा खोचक टोला लगावत त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर एकाच वेळी निशाणा साधला. मालेगावच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचणे गरजेचे असून, सत्ताधाऱ्यांचा कचरा उचलून फेका, तेव्हाच मालेगावची खरी प्रगती होईल, असे थेट आवाहन त्यांनी नागरिकांना केले. ओवैसी यांनी आपल्या भाषणात मालेगावच्या स्थानिक प्रश्नांवरही सविस्तर भाष्य केले. मालेगावच्या पॉवरलूम उद्योगासमोर उभ्या असलेल्या अडचणींचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे पॉवरलूम उद्योगावर मोठा आर्थिक ताण आला आहे. या उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांचे भवितव्य धोक्यात आले असताना सत्ताधाऱ्यांनी मात्र गेली 15 वर्षे लूटमार केल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःचे खिसे भरले. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा निवडून देऊ नका, असा स्पष्ट संदेश ओवैसी यांनी दिला. मालेगावच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. सफाई व्यवस्थेवर बोलताना ओवैसी यांनी महापालिकेतील कचरा कंत्राटाचा मुद्दा उपस्थित केला. सफाईचं कंत्राट कोणाकडे आहे, हे मालेगावकरांना माहीत आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्याचं कंत्राट ज्यांच्याकडे आहे, त्यांनाच कचऱ्यासारखं उचलून फेका, असे जहरी शब्द वापरत त्यांनी नागरिकांना एमआयएमला साथ देण्याचे आवाहन केले. मालेगाव स्वच्छ, सुरक्षित आणि विकसित करायचं असेल, तर एमआयएमला निवडून देणं हाच पर्याय आहे, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. महापौरपदाच्या उमेदवारीवर बोलताना ओवैसी यांनी एमआयएमचे उमेदवार अब्दुल मलिक यांचं नाव पुढे केलं. अब्दुल मलिक महापौर झाले, तर शाळा, रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा नीटपणे राबवल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही घणाघाती टीका केली. अजित पवार जे शरद पवारांचे झाले नाहीत, ते तुमचे काय होणार? असा सवाल उपस्थित करत त्यांनी मालेगावमधील अजित पवारांच्या स्थानिक प्रतिनिधींवर नाव न घेता निशाणा साधला. अजित पवार भाजपविरोधात एखादं वाक्य बोलतात आणि काही तासांतच ते मागे घेतात, असा आरोप करत त्यांनी त्यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत ठरवण्याचा प्रयत्न केला. ओवैसी पुढे म्हणाले की, मालेगाव महापालिकेचं बजेट मोठं आहे, पण हा पैसा नेमका कुठे जातो? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. सत्ताधारी विकासाऐवजी जनतेचं ‘रक्त पिण्याचं’ काम करत असल्याची टीका त्यांनी केली. एमआयएम सत्तेत आल्यास तीन वर्षांत महापालिकेचा चेहरा बदलून दाखवू आणि मालेगावसाठी स्पष्ट व्हिजन प्लॅन तयार करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्याच्या सत्ताधाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसून, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबईत एकत्र बसून सगळे एकमेकांशी गोड बोलतात, पण निवडणुका आल्या की आपापसात भांडतात, असे म्हणत त्यांनी महायुतीची एकजूट फोल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. भाजपवर टीका करताना ओवैसी यांनी बनावट जन्म दाखल्याच्या प्रकरणाचाही उल्लेख केला. भाजपचा एक नेता मालेगावला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे, असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केलं की, एमआयएमचा महापौर सत्तेत आल्यानंतर अशा लोकांचाही हिशेब केला जाईल. बिहारमधील एका डॉक्टरच्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी देशभरात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाकडे लक्ष वेधलं. सरकारमध्ये मुस्लिम प्रतिनिधित्व कमी असल्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, असं मतही त्यांनी मांडलं. त्यामुळे शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि तुमच्या हक्कांसाठी उभे राहा, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला. भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात ओवैसी यांनी मालेगावमधील सामाजिक समस्यांवर थेट भाष्य केलं. महिलांना त्रास, मुलांच्या शिक्षणाच्या समस्या, निकृष्ट शाळा आणि वाढती गुन्हेगारी या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख करत त्यांनी गेली 15 वर्षे मालेगावात गुंडाराज असल्याचा आरोप केला. हा गुंडाराज संपवायचा असेल, तर एमआयएमला साथ देणं आवश्यक आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. एमआयएम तुमच्यासाठी लढते, तुमचा आवाज बनते, असं सांगत त्यांनी मालेगावकरांना परिवर्तनासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. ओवैसी यांच्या या आक्रमक भाषणामुळे मालेगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयांवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. अत्यंत कमी कालावधीत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून विरोधी पक्षांना प्रचारासाठी पुरेसा वेळच मिळू न दिल्याचा आरोप त्यांनी केला. वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सत्ताधाऱ्यांना निवडणुकीच्या तारखा आधीच माहिती असतात, त्यामुळे त्यांची तयारी पूर्ण असते; मात्र विरोधी पक्ष अंधारात ठेवले जातात. केवळ आठ दिवसांत 29 महानगरपालिकांमध्ये प्रचार करणे शक्य नसताना अशा पद्धतीने निवडणुका लावणं योग्य नाही, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली ही टीका राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी ठरली आहे. कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला काहीच दिवस उरलेले असतानाही ठाकरे बंधूंच्या संयुक्त किंवा स्वतंत्र सभा अद्याप का झालेल्या नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी प्रचाराच्या पारंपरिक कल्पनांवरच भाष्य केलं. बाहेरून दिसतो तोच प्रचार असतो, असं समजणं चुकीचं आहे, असं सांगत त्यांनी स्पष्ट केलं की, आमचं काम बराच काळ आधीपासून सुरू आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मतदारसंघांमध्ये सातत्याने काम करत आहेत. प्रचार म्हणजे केवळ मोठ्या सभा नाहीत, तर संघटनात्मक पातळीवर आतूनही अनेक हालचाली सुरू असतात. त्यांच्या मते, मुंबई आणि ठाण्यात मनसेची तयारी व्यवस्थित असून योग्य दिशेने गोष्टी सुरू आहेत. मात्र, 29 महानगरपालिकांपैकी सर्व ठिकाणी पोहोचता न आल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राज ठाकरे यांनी पुढे बोलताना निवडणुकीच्या वातावरणावर सविस्तर भाष्य केलं. माझ्या मते निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे, असं सांगत त्यांनी मतदारांच्या मानसिकतेकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले की, पूर्वी आणि आताच्या निवडणुकांमध्ये मोठा फरक आहे. पूर्वी सोशल मीडिया नव्हता, तेव्हा लोक रस्त्यावर उतरून आपला राग व्यक्त करायचे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आज लोक आपल्या मोबाईलवरून, सोशल मीडियावरून असंतोष व्यक्त करतात. त्यामुळे बाहेरून शांतता दिसत असली, तरी लोकांच्या मनात प्रचंड राग आणि चीड साचलेली आहे. सध्या जे काही चाललं आहे, त्याबद्दलचा हा असंतोष 15 तारखेला मतदानाच्या दिवशी नक्कीच दिसून येईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या वेळेवरूनही राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. 31 डिसेंबरच्या सुमारास लोक सुट्ट्यांसाठी बाहेर जातात आणि साधारण 4-5 जानेवारीला परत येतात. त्यानंतर 5 जानेवारी ते 13 जानेवारी असा केवळ आठ दिवसांचा कालावधी प्रचारासाठी उरतो, असा हिशोब त्यांनी मांडला. एवढ्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचार कसा शक्य आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक गंभीर चर्चा देखील समोर आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा लक्षात घेऊनच 15 जानेवारीला मतदान ठरवण्यात आलं का? 15 तारखेला मतदान, 16 तारखेला निकाल आणि 17-18 तारखेला मुख्यमंत्री दावोसला जाणार, हा सगळा योगायोग आहे की नियोजनबद्ध मांडणी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून राज ठाकरे अधिक आक्रमक झाले. इतका आत्मविश्वास येतो कुठून? असा सवाल करत त्यांनी थेट ‘मॅचफिक्सिंग’चा संशय व्यक्त केला. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो, पण जर आधीच निकालाची खात्री असल्यासारखा आत्मविश्वास सत्ताधाऱ्यांकडे दिसत असेल, तर तो चिंताजनक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या मते, निवडणुकांचा हा संपूर्ण पॅटर्न संशयास्पद आहे. अशा प्रकारे आखलेला निवडणूक कार्यक्रम लोकशाही मूल्यांना धक्का देणारा असल्याचं सूचक विधान त्यांनी केलं. महानगरपालिका निवडणुकांच्या तांत्रिक बाबींवरही राज ठाकरे यांनी सविस्तर टीका केली. वॉर्डनिहाय आरक्षण उशिरा जाहीर झाल्यामुळे विरोधी पक्षांना उमेदवार निश्चित करता आले नाहीत, असं त्यांनी सांगितलं. अनेक दिवस मतदारसंघांच्या याद्याच जाहीर झाल्या नव्हत्या. कधी डिसेंबरमध्ये निवडणुका होतील, कधी मार्चमध्ये होतील, अशा चर्चा सुरू होत्या. या अनिश्चिततेमुळे राजकीय पक्षांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अशा प्रकारचं अनिश्चित वातावरण आणि असा निवडणूक पॅटर्न मी माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कधीच पाहिलेला नाही, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. पूर्वी निवडणुका ठराविक वेळेत होत असत, पण आता काय चाललंय तेच कळेनासं झालं आहे, असं त्यांनी नमूद केलं. निवडणूक यंत्रणा ही विरोधकांना अडचणीत आणणारी राज ठाकरे यांनी काही महानगरपालिकांमध्ये चार प्रभाग करण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केला. चार प्रभाग करण्याची गरज नेमकी काय होती? असा सवाल करत त्यांनी सांगितलं की, ज्यांच्या हातात सत्ता असते ते अशा गोष्टींची तयारी खूप आधीपासून करतात. यामुळे सत्तेबाहेर असलेले पक्ष बेसावध राहतात आणि त्यांना योग्य नियोजन करता येत नाही. ही सगळी प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक असल्याचं त्यांनी सूचित केलं. सत्ताधाऱ्यांच्या सोयीने आखलेली निवडणूक यंत्रणा ही विरोधकांना अडचणीत आणणारी आहे, असा स्पष्ट आरोप करत राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उभं केलं.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात वातावरण तापले असून, भाजप आमदार पैलवान महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद चिघळताना दिसत आहे. अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत अशी जहरी टीका करून लांडगेंनी सुरू केलेला हल्लाबोल आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचला आहे. या टीकेला अजित पवारांनी मोजक्या शब्दांत उत्तर देत विषय संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतरही महेश लांडगेंनी पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष्य करत संघर्ष अधिक धारदार केला आहे. त्यामुळे येणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत हा संघर्ष निर्णायक ठरण्याची चिन्हं आहेत. महेश लांडगेंनी आपल्या ताज्या वक्तव्यात थेट केंद्रातील आणि राज्यातील घडामोडींचा संदर्भ देत अजित पवारांवर गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असल्याचं सांगितलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी काही लोक भाजपमध्ये दाखल झाले, असा टोला लावत त्यांनी अजित पवारांकडे रोख बोट दाखवलं. पुढे ते म्हणाले की, आता देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे उघड होण्याची भीती असलेले लोकही भाजपमध्ये जमा होऊ लागले आहेत. या विधानामुळे भाजपची कोंडी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण हे आरोप केवळ विरोधकांवर नाहीत, तर सत्ताधारी आघाडीतीलच एका महत्त्वाच्या नेत्यावर आहेत. या वादाला खऱ्या अर्थाने पेटवणारी ठरली ती पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांनी केलेली भ्रष्टाचाराचा आका, ही टिप्पणी. अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे महेश लांडगेंवर निशाणा साधत पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा सूत्रधार कोण आहे, हे जनतेसमोर आणणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर संतप्त झालेल्या महेश लांडगेंनी एकेरी आणि आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं. तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतोस, मग आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? असा सवाल करत, तुझा कार्यक्रम आमच्या लाडक्या बहिणी करतील. आमच्या नादी लागू नको, असा थेट इशारा त्यांनी दिला. इतकंच नव्हे, तर आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्यांनी आपली भाषा आणखी तीव्र केली. महेश लांडगेंनी आपल्या वक्तव्यात वारंवार देवा भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला. देवा भाऊ शांत बसतात, पण एकदा का इशारा दिला, की 70 हजार कोटींचे घोटाळे करणारेही घाबरून जातात, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षात भाजप कोणतीही तडजोड करणार नाही, असा संदेशही या वक्तव्यातून देण्यात आला. या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे. याआधी महेश लांडगेंनी अजित पवारांवर थेट हल्ला चढवत, अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत, असा आरोप केला होता. तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा, अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांवर वैयक्तिक टीका केली. ते पिंपरी-चिंचवडचे आका नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे आका आहेत, हे त्यांनीच जाहीर करावं, असा टोमणाही त्यांनी मारला. याच वेळी त्यांनी थेट कुस्तीच्या भाषेत अजित पवारांना आव्हान देत, पूर्वीचे वस्ताद विरुद्ध आजचे पैलवान, अशी लढाई पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात सुरू झाल्याचं चित्र रंगवलं. महेश लांडगेंनी पुढे बोलताना अजित पवारांच्या मानसिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सध्या अजित पवारांचा अहंकार बोलतोय. ते नैराश्यात आहेत, असा आरोप करत त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचाच असल्याचं ठामपणे सांगितलं. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्यांनी आम्हाला भ्रष्टाचार शिकवू नये, असा पलटवार करत, पार्थ पवारांच्या पराक्रमांचा उल्लेखही त्यांनी केला. जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी-चिंचवडचे होतील का? असा सवाल करून लांडगेंनी संघर्ष आणखी टोकदार केला. या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र संयम राखलेला दिसतो. मी कोण आहे, हे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत कळ काढा, त्यानंतर उत्तर देतो, असं म्हणत त्यांनी थेट प्रत्युत्तर देणं टाळलं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या ‘एक अलार्म, पाच काम’ या कॅम्पेनची माहिती देताना अजित पवार म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खड्डे, कचरा, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि गुन्हेगारी हे खरे अलार्म आहेत. या मुद्द्यांवर रॅप सॉंगच्या माध्यमातून भाजपच्या स्थानिक कारभारावर टीका करण्यात आली असून, हे गाणं केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरतंच मर्यादित आहे, केंद्र किंवा राज्य सरकारशी त्याचा संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जात असल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसतो, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
मुंबई आणि महाराष्ट्राच्या भवितव्यावरून पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा स्फोटक दावा समोर आला असून, ठाकरे बंधूंनी थेट दिल्लीकडे बोट दाखवत भाजपवर घणाघाती आरोप केले आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे कारस्थान दिल्लीत सुरू असल्याचा गंभीर दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात, त्याला फारसे महत्त्व उरत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. वर बसलेले दोघेजण (दिल्लीतील सत्ताकेंद्र) वेगळाच विचार करत असतील, तर इथले मुख्यमंत्री काहीही करू शकत नाहीत, असा थेट हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका अधिक महत्त्वाची मानली जात आहे. ‘सामना’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीच्या उत्तरार्धात ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार शब्दांत टीका केली. या मुलाखतीचा हा भाग खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक-कलाकार महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत प्रदर्शित झाला. यावेळी मुंबई, महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचं भवितव्य आणि भाजपच्या राजकारणावर ठाकरे बंधूंनी अत्यंत परखड भूमिका मांडली. भाजपलाही एक एक्सपायरी डेट आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत, सध्याची सत्ता शाश्वत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मराठी माणसाने आता आपापसातील भांडणं, मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, विदर्भ वेगळा होईल, अशा शक्यता वारंवार व्यक्त होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच सूर्य-चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, अशी गर्जना केली होती. याच वक्तव्यावर संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंना थेट प्रश्न विचारला की, या शब्दांवर विश्वास ठेवायचा का? यावर राज ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट आणि कठोर उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या हातात मुळात काहीच नाही. इच्छा चांगली असू शकते, पण दिल्लीहून जे आदेश येतील, तेच त्यांना पाळावे लागतात, असा आरोप राज ठाकरेंनी केला. वरून सांगितलं की ही जमीन अदानीला द्यायची, तर सही करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्यायच नसतो, असे विधान करत त्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, सत्तेचा सगळा कारभार ‘Obey the Order’ या एका तत्वावर चालतो. त्यामुळे मुख्यमंत्री सूर्य-चंद्राचे दाखले कितीही दिले तरी खरी चिंता दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या मनात काय आहे, हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. इथल्या लोकांच्या मनात काय आहे, हा विषयच कुणाला महत्त्वाचा वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. मोदी-शहा या ‘वर बसलेल्या दोघांच्या’ विचारांनुसारच निर्णय होत असल्याचा आरोप करत, राज्याच्या स्वायत्ततेवरच प्रश्न उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावर सविस्तर भूमिका मांडली. मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण मुंबईची संस्कृती, ओळख आणि आत्मा हळूहळू मारला जातोय, ही खरी चिंता आहे, असे त्यांनी सांगितले. कोणीही येतो आणि एखाद्या भागाची भाषा गुजराती असल्याचं सांगतो, आमच्यावर हिंदीची सक्ती केली जाते. म्हणजेच मराठी अस्मिता, संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. नुसतं नावापुरतं मुंबई महाराष्ट्रात ठेवायचं आणि आतली सगळी ओळख पुसून टाकायची, याला काहीच अर्थ नाही, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईच्या आर्थिक महत्त्वावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण मुंबईची जी लक्ष्मी म्हणतो, ती आज कुठे गेली आहे? कोणाच्या हातात आहे? यावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मराठी माणूस हा पूर्वी कामगार, श्रमिक आणि लढवय्या होता. आज तो शहराबाहेर ढकलला गेला असून, संपूर्ण मुंबईची संपत्ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात केंद्रीत झाली आहे. ही संपत्ती सातत्याने गुजरातकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जमिनीचा तुकडा तुमच्याकडे राहील, पण संपत्ती आमच्याकडे राहील, हीच सध्याची नीती असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. राज ठाकरे यांनी या चर्चेत आणखी एक वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा मांडला. माझं मत थोडंसं वेगळं आहे. आता परिस्थिती फक्त संपत्तीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता त्यांना मुंबईचा तुकडाही हवा आहे, असा दावा त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळातही मुंबई गुजरातला देण्याची मागणी करणारे अमराठी धनदांडगे होते, आणि आजही तीच मानसिकता अधिक मोठ्या प्रमाणात दिसून येते, असे त्यांनी सांगितले. तेव्हा पाच लोक होते, आज पाचशे झाले आहेत, असा इशारा देत धोका किती वाढला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. दोन्ही विमानतळ नवी मुंबईत हलवले जातील एमएमआर (मुंबई महानगर प्रदेश) संदर्भात सुरू असलेल्या घडामोडींवरही राज ठाकरे यांनी सविस्तर भाष्य केलं. वाढवण बंदर, त्याला लागून विमानतळ, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईतील कार्गो हळूहळू तिकडे हलवणं—ही सगळी एक नियोजित रणनीती असल्याचा दावा त्यांनी केला. आता सुरुवात झाली आहे. पुढे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोन्ही विमानतळ नवी मुंबईत हलवले जातील, असा दावा त्यांनी केला. सध्या मुंबईतील विमानतळ अदानी समूहाकडे असून, त्याचं प्रचंड क्षेत्रफळ भविष्यात विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जाईल, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्या जागेत किमान 50 शिवाजी पार्क मैदानं मावतील, असे सांगत, ही सगळी योजना मुंबई तोडण्याचाच भाग असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला.
डॉ.भाऊसाहेब देशमुख जेव्हा लंडनमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना भारतातील शिक्षण व्यवस्थेचा विचार आला व त्यानुसार त्यांनी आपल्या जीवनात शिक्षण हे समाजातल्या तळागाळापर्यंत झिरपलं पाहिजे, असा विचार अंगिकारून आपले कार्य केले. आकाशात भरारी घेणे हे रंगावर अवलंबून नसतं तर अंतरंगावर अवलंबून असतं असे प्रतिपादन प्राध्यापक डॉ. रणजित गणोदे यांनी केले. गुरूदेव विद्यालय नरदोडा येथे डॉ.भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचा जयंती उत्सव व वार्षिक उत्सव सोहळा नुकताच झाला. यावेळी उद्घाटक म्हणून प्रा.डॉ.गणोदे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारीणी सदस्य प्राचार्य केशव गावंडे उपस्थित होते. तसचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पद्मावती तेलगोटे, उत्सव प्रमुख श्रीकृष्ण इंगळे, आजीवन सभासद केशव येवले,सरपंच विलास पोटे, शाळा समिती सदस्य विलास टाले, सुनंदा टाले,अजाब टाले,गणेश टाले, रजनी काळे, शिक्षिका संघमित्रा खंडारे,मृदुला थोरात उपस्थित होत्या. पुढे बोलतांना डॉ.गणोदे यांनी आजच्या शिक्षण व्यवस्थेवर सखोल प्रकाश टाकला. दरम्यान अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य केशव गावंडे यांनी भाऊसाहेबांच्या कार्याची उत्तुंग झेप समाजाच्या पर्यंत कशी पोहोचली याचे विवेचन केले. त्यानुसार आजच्या शाळा वाढल्या पाहिजेत, असा मौलिक विचार उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका पी.डी. तेलगोटे यांनी शाळेच्या विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी मीळवलेल्या यशाचा व शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला. सूत्रसंचालन एम.आर.थोरात तर आभार प्रदर्शन एस.आर.इंगळे यांनी केले.
जसापूरवासीयांनी गजानन माऊली वारी पालखी सोहळ्यातून एकात्मतेचा संदेश दिला असून संपूर्ण गावामध्ये सडा-सारवण, रांगोळ्यांतून श्रद्धा उमटली. गाव गाड्याच्या संस्कृतीचे जतन करून जाती–धर्माच्या पलीकडे भक्ती पोहोचली आहे. श्री. संत भैय्याजी महाराज जसापूर (भडांगे) ते श्रीक्षेत्र शेगावकडे निघोलेली ही पवित्र पालखी पायदळ वारी भक्तिपूर्ण वातावरणात बुधवारी, ७ रोजी ही दिंडी मोठ्या उत्साहात शेगावकडे रवाना झाली. रामकृष्ण महाराज अकोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व धनेश महाराज ढोके, प्रदीप रोडे महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा भक्तीमय वातावरणात होत आहे. ही दिंडी ११ जानेवारी रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचणार असून तेथे पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात येणार आहे. वारीच्या प्रारंभी गावातील मंदिरामध्ये पालखीची विधीवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण गावातून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी प्रत्येक घरासमोर मोठमोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या. सडा-सारवण करून पाणी शिंपण्यात आले. ‘जय गजानन माऊली’च्या जयघोषात दिंडीतील भाविक पावल्या खेळत पुढे सरकत होते. प्रत्येक घरासमोर पालखीचे पूजन करण्यात येत होते. हे भक्तीमय दृश्य पाहून संपूर्ण गाव अक्षरशः माऊलीच्या गजरात न्हाऊन निघाले. जसापूर (भडांगे) वासीयांनी या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून भक्तीचा जागर करत गजानन महाराजांवरील आपली अपार श्रद्धा व्यक्त केली. भक्ती, एकता आणि संस्कारांचा संगम असलेला हा पालखी सोहळा परिसरात भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या पालखी सोहळ्यात सेवाधारी आशिष काळे, विणेकरी प्रतीक महाराज भडांगे, गायनाचार्य विठोबा पांडे, पवन काढणे, विनोद भडांगे, ज्ञानेश्वरी पाटेकर, विजया रोडे, मृदंगाचार्य गजानन भारसाकडे, जय पाटेकर, गोकुळ राऊत, विलास भडांगे, ऋषिकेश मेहरे, मधुकर मेहरे, प्रवीण नागे, सुनील भडांगे, अल्पेश, सोहम राऊत यांच्यासह जसापूर (भडांगे), नायगाव, भांबोरा, आराळा आदी गावांतील असंख्य गजानन भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचे सांघिक पारितोषिक यावर्षी अकोला येथील राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. आदित्य टोळे, रितेश तिवारी, कौस्तुभ पाचडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून पुरस्कार प्राप्त केले. शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ जयंती निमित्ताने आयोजित स्व. माणिकराव घवळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा यावर्षीचा विषय ‘भारताच्या विकासामध्ये तरुणांचे प्रश्न दुर्लक्षित झाले आहेत’ हा होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपले वैचारिक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय आणि स्व. माणिकराव घवळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, प्राचार्य डॉ. वर्षा देशमुख, प्रा. डॉ. महेंद्र मेटे, परीक्षक प्रा. डॉ. स्वप्नील इंगोले, प्रा. डॉ. एकनाथराव तट्टे, प्रा. मॅझनी बायदनी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे सांघिक पारितोषिक राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय अकोला येथील वैष्णवी पागृत, अंकिता कांगदे यांच्या संघाने पटकाविले. त्यांना मान्यवरांच्या हस्ते फिरता चषक अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे प्रथम वैयक्तिक पुरस्कार आर.डी.आय. के महाविद्यालय बडनेरा येथील आदित्य टोळ यांनी पटकावले. त्याला रोख रक्कम ७ हजार, स्मृतीचिन्ह, ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी सन्मानित केले. नागपूर येथील रितेश तिवारी याला रोख ५ हजार, ग्रंथ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन द्वितीय पुरस्काराने गौरवण्यात आले. स्पर्धेचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा कौस्तुभ पाचडे याला देण्यात आले. ३ हजार, स्मृतीचिन्ह, ग्रंथ आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबतच या स्पर्धेत विशाल खर्चवाल नागपूर, पूर्वा मानकर शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती, शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीची पृथा देशमुख, सिपना अभियांत्रिकी बडनेरा ची विद्यार्थिनी श्रावणी रोठे, मुंबई विद्यापीठ येथील सिद्धार्थ साठे, नागपूर विद्यापीठाचा ओम ढोक, भारतीय महाविद्यालय मोर्शी येथील पार्वती आरशिया, आणि श्री.शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचा सौरभ वैद्य यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे संचालन प्रा.रत्नाकर शिरसाठ व मयूर चौधरी, प्रास्ताविक प्रफुल्ल घवळे, आभार प्रदर्शन प्रा.डॉ. शितल तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा.डॉ.अमित गावंडे, वैशाली गरकळ (घवळे), प्रा.रणजीत देशमुख, विजय देशमुख, निलेश वानखडे, प्रवीण मिसाळ, प्रा संदिप वानखडे, प्रकाश अवझाड, नरेंद्र जवंजाळ, उमेश पवार, यश इंगोले यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर व डॉ.महेंद्र मेटे यांनी काम पाहिले. तरुणाईंमध्ये बदल घडवण्याची क्षमता आज समाजासमोर अनेक ज्वलंत विषय उभे आहेत, त्यामध्ये शिक्षण, बेरोजगारी, पर्यावरण, भ्रष्टाचार, सामाजिक विषमता यांचा समावेश आहे. या प्रश्नांवर गप्प बसणे म्हणजे अन्यायाला साथ देणे होय. म्हणूनच तरुणांनी आता केवळ पाहणारे न राहता बोलते, विचार करते आणि कृती करते झाले पाहिजे. तरुणाईकडे ऊर्जा आहे, विचारांची ताकद आहे आणि बदल घडवण्याची क्षमता आहे. सोशल मीडियावर मत मांडण्यापलीकडे जाऊन संवाद, चर्चा आणि सकारात्मक कृती करणे गरजेचे आहे. असे मत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी व्यक्त केले.
महाळुंग मुंडफणेवस्ती येथील जिल्हा परिषद शाळा मुंडफणेवस्ती येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड, श्रीपूर यांच्या वतीने संगणक भेट देण्यात आला. पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांनी केले. सदर संगणक कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक वाघ व शिक्षक मुलाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब मुंडफणे, कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत व जोशी आदी उपस्थित होते. मुंडफणे जिल्हा परिषद शाळेस ब्रिमा सागर कारखान्याने संगणक भेट दिल्याबद्दल कारखान्याचे नगरसेवक नानासाहेब मुंडफणे यांनी आभार मानले. याप्रसंगी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया म्हणाले की, आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. संगणक हे केवळ एक साधन नसून ज्ञानप्राप्तीने प्रभावी माध्यम आहे. मात्र ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, याची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. लहान वयातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, त्यांची विचारशक्ती विकसित होते आणि भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी ते सक्षम बनतात.
पंढरपूर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी बहुमताच्या जोरावर परिचारक गटाच्या नगरसेवकाची निवड होणार असून या पदासाठी कुणाची वर्णी लागते याकडे शहराचे लक्ष लागले आहे. त्याच बरोबर स्वीकृत नगरसेवक पदासाठीही परिचारक गटात अनेक जण इच्छुक आहेत, मात्र परिचारक कुणाला संधी देतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.पंढरपूरच्या नगराध्यक्ष तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके या विजयी झाल्या. परंतु सभागृहात २४ जागा जिंकून परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मोठे बहुमत मिळवले आहे. भाजपकडून उपनगराध्यक्ष पदासाठी अनेक जन इच्छुक असले तरी परिचारक यांच्याकडे अद्याप कुणी मागणी केलेली नाही. नगराध्यक्ष भालके या लवकरच उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करतील, त्यानंतर या पदाच्या निवडीसाठी हालचाली गतिमान होतील, असे दिसते. सध्या तरी या पदासाठी आपली वर्णी लागावी म्हणून परिचारक यांच्याकडे फारसे कोणी प्रयत्न सुरू केले नाही. मात्र भालके यांच्या समोर उपनगराध्यक्ष म्हणून प्रभावी राहील अशा नवीन चेहऱ्याला परिचारक संधी देतील, अशी चर्चा सुरू आहे. स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह अधिक प्रमाणात सभागृहातील संख्या बळानुसार परिचारक यांच्या भाजपला २ तर तीर्थक्षेत्रला १ जागा मिळेल. परिचारक गटाकडून माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांना स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्तीची मागणी समर्थकांनी केली आहे. संग्राम अभ्यंकर यांच्याही नावाची चर्चा असून आश्वासन दिलेल्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला .
येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या विसाव्या लेझीम स्पर्धेत मुलींच्या खुल्या गटात येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयाने तर ग्रामीण मुली गटात कोळेगावच्या विजयसिंह मोहिते- पाटील विद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. गेली २० वर्षांपासून येथील विजय चौकात या स्पर्धा आयोजित केल्या जातात.त्यानुसार यावर्षी दि. ७ ते ९ जानेवारी या कालावधीत या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.यामध्ये मुलां मुलींबरोबरच शहरी व ग्रामीण असे विभाग केले असून या स्पर्धेत प्राथमिकचे ५, मुलांचे ३१ व मुलींचे २२ असे एकूण ५८ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाना दोन डाव खेळता येत आहेत. स्पर्धेत मुलींच्या खुल्या गटात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालय अकलूज प्रथम, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज द्वितीय, तर श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महिला वसतिगृह अकलूज आणि औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय (पदवी) अकलूज यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला आहे. शहरी मुले अ गटात सदाशिवराव माने विद्यालय शहरी मुले ब गटात विजयसिंह मोहिते विद्यालय वाघोली प्रथम, जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर यांनी द्वितीय व कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती यांना तृतीय क्रमांक मिळाला आहे. ग्रामीण मुली गटात विजयसिंह मोहिते-पाटील विद्यालय कोळेगाव प्रथम, श्री संत तुकाराम विद्यालय बोंडले द्वितीय, सदाशिवराव माने विद्यालय माणकी तृतीय,श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय मांडवे चतुर्थ, श्री गणेश विद्यालय पिंपळनेर व श्रीनाथ विद्यालय, लोंढे-मोहितेवाडी यांनी विभागून पाचवा क्रमांक पटकावला. विद्यालय अकलूज प्रथम, महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर द्वितीय व मोरजाई विद्यालय मोरोची यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. विजेत्या संघांना जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील,नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सुत्रसंचलन किरण सूर्यवंशी, शकील मुलाणी व ईलाई बागवान यांनी केले.
कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, सोलापूर कबड्डी असोसिएशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत पुणे येथील राकेशभाऊ घुले कबड्डी संघ विजेता ठरला व प्रथम क्रमांकाचे ३१ हजार रूपये रोख व आकर्षक चषक पटकावला. स्वास्तिक क्रीडा मंडळ, मुंबई उपनगर हा संघ २१ हजार रूपये रोख व चषक या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी ठरला. तृतीय क्रमांकाचे ११ हजार रूपये रोख व चषक विभागून छावा क्रीडा मंडळ, कोल्हापूर व शिवप्रतिष्ठान क्रीडा मंडळ, धाराशिव या दोन संघात विभागून देण्यात आले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, माजी आमदार राजेंद्र राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र पवार होते. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, संस्था अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव व संस्था पदाधिकारी, विद्यापीठ अधिष्ठाता डॉ. शशिकांत तांबे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, महाराष्ट्र महिला कबड्डी असोसिएशनच्या अंधारे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. रोहित डिसले यांनी केले. यावेळी कुलगुरू डॉ.दामा व माजी आमदार राऊत, राजेंद्र पवार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. आभार प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. प्रेमा दळवी व प्रा. रूपाली शिंदे यांनी केले. वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान विशाल ताटे यांना बेस्ट रेडर, विक्रम परमार यांना बेस्ट डिफेंडर तर ज्ञानेश्वर जाधव ऑल-राऊंडर म्हणून सन्मानित करण्यात आले.

22 C