नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ घालण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूरमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू होत असतानाच भाजपने आधीच आपली उमेदवार निश्चित केल्याचा दावा त्यांनी केला. भाजपकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार असणार असल्याचे नावही वडेट्टीवार यांनी जाहीर केले. विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे आरक्षण फिक्सिंग आहे, असे मी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. नागपुरात महापौर पदाचा उमेदवार आधीच ठरवण्यात आला असून आज मी त्यांचे नाव जाहीर करतो. शिवानी दानी या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असतील,असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला. आरक्षण प्रक्रियेत सुरू असलेल्या कथित गोंधळावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले. आरक्षणावर शिवसेनेने घेतलेले आक्षेप पूर्णपणे योग्य आहेत. गरज भासल्यास हे प्रकरण न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. नागपुरातील महापौर पदाच्या निवडीवरून आता राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपला 102 जागांवर मिळवला विजय नागपूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. एकूण 151 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत 102 जागांवर विजय मिळवला आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. मुंबईत सरकारने ST प्रवर्गाला डावलल्याचा दावा:पेडणेकरांचा सरकारवर गंभीर आरोप राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात पार पडली. या सोडतीनंतर अनेक महापालिकांमधील आरक्षण स्पष्ट झालं असलं, तरी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबईच्या आरक्षण सोडतीत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. ही सोडत ठरावीक राजकीय हितसंबंध लक्षात घेऊन काढण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर आरक्षण सोडत जाहीर राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या सोडतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. 50 टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यामुळे यंदा तब्बल 15 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार असून, उर्वरित 14 ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळणार आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादावर आता सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. शिवसेना उबठा गटाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ठाकरे गटाचे आरोप नियमबाह्य आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. आरक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत पार पडली असून त्यामध्ये कोणताही अन्याय किंवा पक्षपात झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. मुंबई महापालिकेत यावेळी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होणार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी सर्व प्रक्रिया शासन नियमांनुसार झाल्याचं सांगितलं. माधुरी मिसाळ यांच्या या स्पष्टीकरणानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना उबठा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर करण्यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते, या निर्णयामुळे अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय होत आहे. मुंबई महापालिकेत या प्रवर्गातील महिला नगरसेवक असतानाही त्यांना संधी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या तत्वांवर घाला घालणारा असल्याचंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणामुळे महापौर आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची चिन्हं आहेत. एकीकडे सरकार नियमांनुसार निर्णय झाल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट सामाजिक समतोल आणि प्रवर्गीय न्यायाचा मुद्दा पुढे करत आहे. खुल्या प्रवर्गातील महिला महापौर हा निर्णय राजकीय सोयीसाठी घेतला गेला का, असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. त्यामुळे येत्या काळात या आरक्षणावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत....
अमरावती : प्रतिनिधी अकोल्यातील अटोकमध्ये भाजप आणि एमआयएमच्या युतीने राज्यात खळबळ उडाली होती. नागरिकांचा संताप आणि विरोधकांच्या भूमिकेमुळे भाजपकडून हा निर्णय मागे घेण्यात आला होता. पण आता पुन्हा एकदा भाजप एमआयएमच्या या अभद्र युतीचा नवा अंक सुरू झाला आहे. अमरावतीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि एमआयएमकडून युती करण्यात आली आहे. या युतीनंतर पुन्हा एकदा राज्याच्या […] The post भाजप-एमआयएमची पुन्हा युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले असून, या सोडतीमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. 50 टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू केल्यामुळे यंदा तब्बल 15 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर विराजमान होणार असून, उर्वरित 14 ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या चार महापालिका – मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर – यांच्या आरक्षणाकडे विशेष लक्ष लागले होते. या चारही महापालिकांमधील आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकीय समीकरणे स्पष्ट होऊ लागली आहेत. मुंबई : सर्वसाधारण महिला आरक्षण राज्यातील सर्वात मोठी आणि आर्थिक राजधानी असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली आहे. महिला आरक्षणामुळे प्रमुख पक्षांमध्ये इच्छुक महिला नगरसेविकांची नावे पुढे येऊ लागली असून, पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. पुणे : सर्वसाधारण महिला महापौर राज्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेतही महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पुण्यातील महापालिका निवडणूक नेहमीच चुरशीची ठरते. महिला आरक्षणामुळे येथेही सर्व प्रमुख पक्षांकडून प्रभावी महिला चेहऱ्यांचा शोध सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर : सर्वसाधारण प्रवर्ग छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे येथे महिला अथवा पुरुष अशा दोन्ही उमेदवारांना संधी उपलब्ध आहे. या आरक्षणामुळे इच्छुकांची संख्या वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत पार पडली असून, यंदा महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. शहराचा प्रथम नागरिक कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीत 57 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होणार असल्याचे चित्र आहे.सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सुटल्याने भाजपमधील अनेक ज्येष्ठ आणि प्रभावी नगरसेवकांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये राजगौरव वानखेडे, महेश माळवतकर, विजय औताडे, गणेश नावंदर, शिवाजी दांडगे, रामेश्वर भादवे, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सुनील जगताप, अप्पासाहेब हिवाळे आणि रेणुकादास वैद्य या नगरसेवकांचा प्रामुख्याने समावेश आहे. नागपूर : सर्वसाधारण प्रवर्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतही महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे येथे कोणत्याही राखीव प्रवर्गाचा अडसर नसून, राजकीय वजनदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. नागपूरच्या महापौरपदाकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात पार पडली. या सोडतीनंतर अनेक महापालिकांमधील आरक्षण स्पष्ट झालं असलं, तरी मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मुंबईच्या आरक्षण सोडतीत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे. ही सोडत ठरावीक राजकीय हितसंबंध लक्षात घेऊन काढण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा मुद्दा अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाबाबत उपस्थित केला आहे. मुंबई महापालिकेत ST प्रवर्गातून दोन नगरसेवक निवडून आले असताना, महापौरपदाच्या आरक्षणासाठी चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग वगळण्यात का आला, असा थेट सवाल त्यांनी केला. जर ST प्रवर्गाचे नगरसेवक महापालिकेत आहेत, तर मग त्या प्रवर्गासाठी आरक्षण का ठेवण्यात आलं नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. महायुतीकडे ST प्रवर्गातील नगरसेवक नसल्यामुळेच हा प्रवर्ग जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आला का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. पेडणेकर यांनी पुढे आरोप केला की, आदिवासी प्रवर्गाला डावलण्यासाठी अचानक नियम बदलण्यात आले. यापूर्वी अशी कोणतीही अट नसताना, अचानक आदिवासी प्रवर्गासाठी किमान तीन जागा असाव्यात असा निकष लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हा नियम केवळ मुंबईपुरताच का लावण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नियम बदलताना कोणतीही स्पष्ट माहिती, लेखी निर्णय किंवा पूर्वसूचना देण्यात आली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. आरक्षणाची सोडत ही लोकशाही मूल्यांनुसार आणि पूर्ण पारदर्शकतेने होणं अपेक्षित असतं. मात्र, मुंबई महापालिकेच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच लॉटरी काढण्यात आल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. सत्ताधारी पक्षांकडे ज्या प्रवर्गातील जागा आहेत, त्याच प्रवर्गाच्या आधारे आरक्षण ठरवण्यात आलं, असा गंभीर दावा त्यांनी केला. यामुळे महापौरपदाचा निर्णय आधीच ठरवून ठेवला गेला असल्याचा संशय अधिक बळावतो, असंही त्या म्हणाल्या. आरक्षण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडणं गंभीर या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापलं असून, मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून पुढील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून या आरक्षण सोडतीविरोधात पुढील पावले उचलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी प्रवर्गाला न्याय न मिळाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. मुंबईसारख्या महापालिकेत आरक्षण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडणं हे गंभीर असून, यावर सरकारने तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक 2026 मध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपला 89 तर शिवसेनेला 29 जागा मिळाल्या असून एकूण 118 जागांसह महायुतीने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला 114 चा आकडा ओलांडला आहे. मात्र, निकाल जाहीर होताच विजयाच्या आनंदापेक्षा दोन्ही पक्षांमध्ये परस्पर आरोपांची धुसफूस सुरू झाल्याचं चित्र आहे. भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाही, यासाठी शिवसेनेनं लढवलेल्या 92 जागांकडे बोट दाखवलं जात आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते भाजपच्या बंडखोरांमुळेच अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याचा आरोप करत आहेत. शिवसेनेनं लढवलेल्या जागांपैकी सुमारे 30 प्रभागांमध्ये भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरी केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतो आहे. समाधान सरवणकर यांनी थेट भाजप पदाधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप चॅट सार्वजनिक करत सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. प्रभाग क्रमांक 173 मधील पराभवानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कदम यांनीही भाजपने कटकारस्थान रचल्याचा आरोप केला. जागावाटपात शिवसेनेकडे गेलेल्या प्रभागांमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी निवडणूक लढवून शिवसेनेच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं केल्यामुळे विजय कठीण झाला, असं पराभूत उमेदवारांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी पराभवाचं अंतर अत्यंत कमी असल्यामुळे भाजप बंडखोरीचा फटका बसल्याचा दावा केला जात आहे. अंधेरी पूर्वमधील वॉर्ड क्रमांक 121 मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला. येथे भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वळवी यांनी बंडखोरी करत 175 मतं घेतली. दिंडोशीतील वॉर्ड क्रमांक 41 मध्ये शिवसेनेच्या मानसी पाटील यांचा 596 मतांनी पराभव झाला, तर भाजपचे बंडखोर दिव्येश यादव यांना 1260 मतं मिळाली. अणुशक्तीनगरमधील प्रभाग क्रमांक 143 मध्ये शोभा जयभाये यांना 943 मतांनी पराभव पत्करावा लागला, येथे भाजपच्या महिला तालुका अध्यक्ष स्वाती उम्रटकर बंडखोर म्हणून उभ्या होत्या. कुर्ला प्रभाग क्रमांक 169 मध्ये शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर यांचा 970 मतांनी पराभव झाला. येथे भाजपचे बंडखोर अमित शेलार यांनी 3225 मतं घेतली. वर्सोवा प्रभाग क्रमांक 61 मध्ये शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा 2005 मतांनी पराभव झाला असून भाजपच्या उर्मिला गुप्ता यांनी 2737 मतं मिळवली. दिंडोशी प्रभाग क्रमांक 39 मध्ये विनया सावंत यांचा 2352 मतांनी पराभव झाला, तर भाजप मंडळ अध्यक्षाची पत्नी सुमन सिंग यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत बंडखोरी केली. मागाठाणे प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुवर्णा गवस यांचा 2884 मतांनी पराभव झाला, तर वांद्रे पूर्वमधील प्रभाग क्रमांक 94 मध्ये पल्लवी सरमळकर यांचा 2360 मतांनी पराभव झाला. सायन कोळीवाड्यातील प्रभाग क्रमांक 173 मध्ये शिवसेनेच्या पूजा कांबळे यांचा 4974 मतांनी मोठा पराभव झाला. येथे भाजपच्या बंडखोर मंडल अध्यक्ष शिल्पा केळुसकर यांना 9310 मतं मिळाली. कुलाबा प्रभाग क्रमांक 225 मध्ये शिवसेनेची स्टॅडींग सीट असतानाही भाजपने हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी देत मैत्रीपूर्ण लढतीत ती जागा जिंकली. या सर्व घटनांमुळे महायुतीला बहुमत मिळालं असलं, तरी अंतर्गत बंडखोरी आणि आरोपांमुळे पुढील काळात युतीतील ताणतणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भाजप नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले ब्रिटन स्थित भारतीय वंशाचे डॉक्टर संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात काढलेल्या लुक आउट सर्क्युलरला (एलओसी) आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार असून, कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे आहेत. ते सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. गत 10 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह मायदेशी परतले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दिवसभर चौकशी झाल्यानंतर त्यांची सायंकाळी उशिरा सुटका करण्यात आली. संग्राम पाटील हे भाजप सरकारविरोधातील आपल्या टीकेसाठी ओळखले जातात. त्यातूनच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर गत 19 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह लंडनच्या दिशेने निघाले होते. पण मुंबई पोलिसांनी लुक आउट सर्क्युलर जारी केल्यामुळे त्यांना लंडनला जाता आले नाही. ते बुधवारी चौकशीसाठी दिवसभरा मुंबई पोलिसांपुढे उपस्थित झाले. त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर त्यांनी आपल्या वकिलांमार्फत मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात जारी केलेल्या लुक आउट सर्क्युलरला आव्हान दिले. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. काय आहे संग्राम पाटलांवर आरोप? संग्राम पाटील यांच्याविरोधात समुदायांमध्ये वैर व द्वेषाची भावना निर्माण करणारी खोटी माहिती असलेली विधाने करण्याच्या आरोपांतर्गत भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 353 (2) अंतर्गत पुन्हा दाखल केला गेला आहे. या कलमांतर्गत कमाल 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. भाजपच्या समाजमाध्यम खात्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या निखिल भामरे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. भामरे यांनी त्यांच्या तक्रारीत 18 डिसेंबर रोजी त्यांना शहर विकास आघाडीच्या फेसबुक पेजवर 14 डिसेंबर रोजी पोस्ट केलेले काही मजकूर आढळून आला. त्या पोस्टमध्ये, भाजप आणि तिच्या प्रमुख नेत्यांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी आणि चुकीची माहिती नमूद केली होती. चुकीची माहिती पसरवण्याच्या उद्देशाने पाटील यांनी ती पोस्ट पुढे प्रकाशित केल्याचा दावाही भामरे यांनी तक्रारीत केला होता. हे ही वाचा… भाजप अजित पवारांना पुण्यात कोंडीत पकडणार:पुणे ZP च्या कारभाराच्या गोपनीय चौकशीचा टाकला डाव; वातावरण तापणार पुणे महापालिका निवडणुकीत दोस्तीत कुस्ती करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. भाजपने उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातच रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू केल्याची रणनीती आखली आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर
गणेश जयंतीच्या पावन पर्वावर शहरातील मंदिरांमध्ये गणरायाचे अलौकिक वैभव भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. समर्थनगरातील वरद गणेश, पन्नालालनगरातील अष्टविनायक, सिडको एन-१ येथील काळा गणपती, राजाबाजार येथील ग्रामदैवत या मंदिरांमध्ये चांदी-सोन्याची आभूषणे, आकर्षक अलंकार आणि देखण्या साजशृंगारातून भक्तांना दर्शनाचा अद्वितीय अनुभव मिळणार आहे. जयंतीच्या पर्वावर चांदी-सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झालेले गणराय, मौल्यवान आभूषणे, आकर्षक अलंकार आणि देखण्या साजशृंगारामुळे मंदिरांचे वैभव खुलून दिसते. वरद गणेश मंदिरांतील गणरायाला चांदी-सोन्याचे सिंहासन समर्थनगरातील वरद गणेश मंदिराची स्थापना १९७१ साली झाली.२०२१ मध्ये वरद गणेश मंदिरात गणरायाला ४३ किलो चांदी, सव्वा किलो सोन्याच्या सिंहासनावर विराजमान केले. गणरायाला सोन्याचा मुकुट, आशीर्वादरूपी सोन्याचा हात, गळ्यातील सोन्याची साखळी, सोन्याचे बाजुबंद आहेत. दीड ते दोन कोटींची ही आभूषणे आहेत. अष्टविनायकाचा चांदीचा मुकुट, हार, रेशमी वस्त्रांचा अलंकार पन्नालालनगरातील अष्टविनायक गणेश मंदिराची स्थापना १९८४ साली झाली. मंदिरात गणरायाच्या मुख्य मूर्तीसोबतच अष्टविनायकांच्या लहान आकारातील मूर्ती लक्षवेधक आहेत. मूर्तीला २ लाखांपर्यंत अलंकारिक शृंगार आहे. यात चांदीचा हार, चांदीचा मुकुट, रेशमी वस्त्र अशाच शृंगारातून गणरायाचे रूपही भक्तांना आकर्षित करते. काळा गणपतीला दीड कोटीच्या आभूषणांचा साज, चांदीची आहे सोंड सिडको एन-१ येथील भक्ती गणेश मंदिर ट्रस्टची स्थापना १९८५ साली झाली. यानंतर १९८७ साली मूर्तीची स्थापना करण्यात आली. मूर्तीला शेंदूरलेपन न केल्याने काळा गणपती म्हणून ओळख आहे. गणरायाला चांदीची सोंड, चांदीचा दात, कर्णफुले, चांदीचा टोप तसेच सोनसाखळी अशी आभूषणे आहेत. दीड कोटीची ही आभूषणे आहेत. ग्रामदैवताला दीड कोटीची आभूषणे शहराचे ग्रामदैवत समजले जाणारे राजाबाजार येथील संस्थान गणपती गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणपतीला साधारणपणे दीड कोटींच्या आसपास आभूषणे आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला सोन्याचा मुकुट, गळ्यातील हार, कंबरपट्टा, हाता-पायातील कडे, सोन्याचे दात, चांदीच्या दूर्वा, मूषक अशा प्रकारचा ऐवज आहे. शिवस्वराज्य प्रतिष्ठान ट्रस्टच्या गणेशाकडे ३.७५ कोटींची आभूषणे औरंगपुरा परिसरातील शिवस्वराज्य प्रतिष्ठान गणेश सार्वजनिक ट्रस्टचा गणपतीकडे मयूर, सूर्यकमल यासारखे चांदीचे ६ जोड कानातले आहेत. तसेच चांदीचा जगगन्नाथपुरी हार, ९ प्रकारचे चांदीचे मोदक, २ मूषक, त्यापैकी १ किलोचा एक मूषक आहे. तसेच २८ प्रकारच्या चांदीच्या दूर्वा, चांदीचे पायातले. २२ चांदीच्या अंगठ्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेत भाजप आणि एमआयएम यांच्यात झालेल्या अनपेक्षित युतीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी मानल्या जाणाऱ्या या दोन पक्षांनी समितीच्या सभापती पदासाठी एकमेकांना साथ दिल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. अचलपूर नगरपालिकेतील शिक्षण आणि क्रीडा समितीच्या सभापती पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत भाजप आणि एमआयएमने परस्पर सहकार्य केले. या युतीत एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाले आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, विरोधकांकडून तसेच सत्ताधारी गटातील काही कार्यकर्त्यांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या युतीमध्ये एमआयएमचे 3 नगरसेवक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नगरसेवक आणि 3 अपक्ष नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. या संख्याबळाच्या जोरावर समितीच्या सभापती पदावरील निवडणूक सहज पार पडली. मात्र, ही युती नेमकी कशी आणि कोणाच्या पुढाकाराने झाली, याबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. आम्हाला काहीही माहिती नाही- लहाने दरम्यान, 'दिव्य मराठी डिजिटल'शी बोलताना भाजपच्या नगरसेविका अक्षरा लहाने यांचे पती रुपेश लहाने यांनी या युतीबाबत आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, “एमआयएमसोबत जी युती करण्यात आली, त्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. आमच्या गटनेत्यांनी आणि नगराध्यक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. याबाबत आम्हाला आधी कल्पना देण्यात आलेली नव्हती.” त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीचीही चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार का? अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रूपाली माथने या निवडून आलेल्या आहेत. अचलपूर ही अमरावती जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका असून, येथे एकूण 39 नगरसेवक आहेत. त्यामुळे येथे होणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते. भाजप आणि एमआयएम यांच्यातील ही युती तात्पुरती आहे की आगामी काळातील राजकीय समीकरणांचे संकेत देणारी आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत दोस्तीत कुस्ती करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. भाजपने उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना पुणे जिल्ह्यातच रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू केल्याची रणनीती आखली आहे. यामुळे पुण्यात पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. अजित पवारांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपवर तीव्र हल्ले चढवले होते. पुण्यातील त्रिकूट तर पिंपरी चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांच्यावर त्यांनी तिखट टीका केली होती. प्रत्युत्तरादाखल महेश लांडगेंनीही अजित पवारांवर जोरदार पलटवार करत निवडणुकीत रंगत आणली होती. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवारांचे नाव न घेता त्यांना आरसा पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर प्रत्यक्ष निकालात भाजपचा प्रचंड विजय झाला, तर राष्ट्रवादीचा मानहाणीकारक पराभव झाला. त्यानंतर आता हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. अजित पवारांना जिल्ह्यातच रोखण्याचा डाव यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजपने जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय सुरू केला आहे. या चौकशीचा वापर जिल्हा परिषदेच्या प्रचारात पवारांना अडचणीत आणण्यासाठी केला जाणार आहे. भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच 73 जागांवर सक्षम उमेदवार दिलेत. यामाध्यमातून पक्षाने राष्ट्रवादीपुढे कडे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, बहुतांश ठिकाणी हे दोन्ही गट एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढताना दिसतील. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे आदी नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन्ही खासदार शरद पवार गटाचे आहेत. तर 10 पैकी 8 आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांनी भाजपचा वारू रोखण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भाजपने अजित पवारांविरोधातील नेत्यांना धरले हाताशी दुसरीकडे, भाजपने अजित पवारांच्या जिल्ह्यातील राजकीय ताकदीला शह देण्यासाठी माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप आदींना पक्षात प्रवेश दिला आहे. याशिवाय इंदापूर येतील नाराज प्रदीप गारटकरही भाजपवासी झालेत. हे ही वाचा… मुंबईत ठाकरेंना मोठा दिलासा!:काल दिवसभर 'नॉट रिचेबल' नगरसेविका मध्यरात्री स्वगृही; मिलिंद नार्वेकरांच्या मध्यस्थीने 'नाट्य' संपले मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या रणधुमाळीत काल दिवसभर सुरू असलेला 'नॉट रिचेबल'चा सस्पेन्स अखेर मध्यरात्री संपला आहे. प्रभाग १५७ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. मध्यरात्री त्या आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या असून, आज त्या मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. वाचा सविस्तर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, स्थानिक लोकांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतला आहे त्यावर राज ठाकरे खूप नाराज आहेत. राज साहेब म्हणतात की ही माझी भूमिका नाही. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही... जर स्थानिक लोकांनी पक्षाविरुद्ध जाऊन निर्णय घेतला असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. उदाहरणार्थ, अंबरनाथमध्ये जेव्हा 12 काँग्रेस नगरसेवक भाजपसोबत गेले तेव्हा त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. आमच्या पक्षातही जो कोणी आमच्याविरुद्ध काम करतो त्याला काढून टाकले जाते. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची संभाव्य युती होण्याच्या चर्चा सुरू असतानाच, या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. या सर्व राजकीय हालचालींबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच माहिती होती, असा दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक निर्णय हा अचानक घेतलेला नव्हता, तर त्यामागे पक्षनेतृत्वाला कल्पना होती, असं चित्र राऊत यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली असताना, कल्याण-डोंबिवलीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या नगरसेवकांना विश्वासात घेत थेट शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात असताना, संजय राऊत यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितलं की, कल्याण-डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेतला आहे. मात्र, स्थानिक नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे व्यथित असल्याचा दावा राऊत यांनी केला. या संदर्भात संजय राऊत यांनी थेट राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचाही खुलासा केला. राऊत म्हणाले की, काही लोक राजकारणात काही मिळालं नाही तर मी सोडून जातो, या मानसिकतेने वागतात. ही मानसिक अस्थिरता राजकारणासाठी घातक आहे. ही माझी किंवा आमच्या पक्षाची भूमिका नाही, असं राज ठाकरे यांनीही स्पष्ट केल्याचं राऊत यांनी सांगितलं. हा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला गेला असून, त्यात पक्षप्रमुखांची थेट भूमिका नव्हती, असंही राज ठाकरे यांचं मत असल्याचं राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी शंकराचार्यांवर भररस्त्यात झालेल्या कथित हल्ल्याचाही तीव्र शब्दांत निषेध केला. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं सरकारविरोधी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईवर बोलताना राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर थेट निशाणा साधला. त्यांनी शिंदेंना ढोंगी हिंदुत्ववादी अशी टीका करत, या घटनेचा निषेध शिंदे यांनी का केला नाही, असा सवाल उपस्थित केला. हिंदुत्वाची भाषा करणाऱ्यांनी अशा प्रसंगी गप्प बसणं हे दुटप्पीपणाचं लक्षण असल्याचा आरोप राऊत यांनी केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन शंकराचार्यांना पाठिंबा देतील, असं आश्वासनही संजय राऊत यांनी दिलं. मात्र, सरकारमधील जबाबदार व्यक्ती आणि मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रकरणावर शांत का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एकीकडे हिंदुत्वाचा गजर करायचा आणि दुसरीकडे धार्मिक नेत्यांवर झालेल्या हल्ल्यावर मौन बाळगायचं, हे महाराष्ट्र स्वीकारणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय गणितांबरोबरच राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरही नव्याने प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
पुण्यातील मुंढवा भागात प्रेमसंबंधातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रवीण धनंजय माने (वय 24, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेश सरोदे (वय 35, रा. भीमनगर, मुंढवा) याच्यासह चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने याने मुंढवा पोलिसठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवीण माने खाजगी कंपनीत नोकरी करत असून त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. आरोपी सरोदे याने माने याला त्या तरुणीशी असलेले संबंध तोडण्यास सांगितले होते. मात्र, माने याने हे संबंध तोडले नाहीत. आरोपींनी दिलेल्या धमक्यांना देखील त्यानी जुमानले नाही. याच कारणावरून आरोपी सरोदे याने माने याला मुंढवा येथे बोलावून घेतले. सरोदे आणि त्याच्या साथीदारांनी माने याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. पोलिसांकडे तक्रार दिल्यास जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.जखमी माने याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पसार झालेल्या सरोदे याला अटक केली असून, त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलिसनिरीक्षक स्मिता वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक एस. पिंगुवाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ईव्हीच्या वाढत्या संख्येबरोबरच या वाहनांना आवाज नसल्याने होणाऱ्या अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अशा वाहनांमध्ये विशिष्ट आवाज असावा याकरिता पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) तर्फे वाहन उत्पादक कंपन्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. एआरएआयच्या शिफारशीनुसार ऑक्टोबर महिन्यापासूनच चारचाकी वाहनांमध्ये ठरावीक आवाज असणे बंधनकारक करण्यात आले. दुचाकीत विशिष्ट आवाजासाठी संशोधन करण्यास वेळ लागणार असल्याची माहिती एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली. डॉ. मथाई म्हणाले, नेमका कसा आवाज असावा, वाहन किंमत वाढणार नाही यासाठी आयआयटी दिल्लीसोबत पुढील तीन वर्षे अभ्यास केला जाईल. काय असेल एक्स्पोमध्येॽ ‘एसआयएटी एक्स्पो २०२६’ मध्ये एसआयएटी २०२६ मध्ये ६०० हून अधिक शोधनिबंध सादर केले जातील. १० देशांतील २७५ प्रदर्शकांचे ३८७ स्टॉल्स असतील. अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स (एडीएएस), एआय, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, ई-मोबिलिटी, हायड्रोजन तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांतील नवकल्पना येथे प्रदर्शित केल्या जाणार आहेत. स्टार्टअप्स व सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र पॅव्हेलियनही असणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत साम, दाम, दंड आणि भेदाचा उघड वापर झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. निवडणुकीत पैशांचा पाऊस पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच, आता भाजप आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबतचा खळबळजनक संवाद ऐकायला मिळत असून, यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींमधील संवाद ऐकू येतो. त्यातील एक व्यक्ती आमदार नारायण कुचे असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित व्यक्ती आमदारांना पैसे वाटण्यासाठी थोडा अंधार पडू द्या, अशी सूचना करते. त्यावर आमदार कुचे म्हणतात, अंधारात कुठे पैसे वाटतात? गोरगरीब लोकांना नोटा चांगल्या दिसल्या पाहिजेत. तसेच, पोलीस गाडी मागवतो, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो, असेही कथित उत्तर या संवादात ऐकायला मिळते. दरम्यान या ऑडिओ क्लिपची पुष्टी ‘दिव्य मराठी’ करत नाही. प्रभाग २४ मधील विजय आणि मुकुंदवाडीतील राडा आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीने महापालिका निवडणुकीत प्रभाग २४ मधून नशीब आजमावले होते आणि त्या निवडूनही आल्या आहेत. मात्र, त्यांच्या या विजयानंतर मुकुंदवाडी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. नारायण कुचे यांच्या बहिणीच्या विजयाला वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शवला होता. निवडणुकीचा निकाल चुकीच्या पद्धतीने लावला, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आता ही ऑडिओ क्लिप समोर आल्याने या वादाला नवीन तोंड फुटले आहे. व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय म्हटलंय? व्यक्ती 1 : हॅलो, कुचे साहेब व्यक्ती 2 : हा बोल व्यक्ती 1 : थोडासा अंधार पडू द्या ना व्यक्ती 2 : अंधारात कुठं पैसे वाटत असतात होय, गोरगरीब लोकांना नोटा चांगल्या दिसल्या पाहिजेत. व्यक्ती 1 : आहो, कुचे साहेब एक मिनीटं ऐकून घ्या, सगळीकडे चर्चा सुरू आहे, म्हणून म्हणतोय जरा अंधार पडू द्या, व्यक्ती 2: अंधारात नसतं जमत, जरा गडद होऊन जाऊ दे व्यक्ती 1 : आडीला चालू आहे, पीआयची गाडी मागवितो. व्यक्ती 2 : बिंधास्त पैसे वाटा तुम्ही, गरीब जनतेचं भलं होऊ द्या. व्यक्ती 1 : जरा अंधार होऊद्या वाटतो. आहो, आमदार साहेब तुम्ही आत्तापर्यंत भलंच करत आलेला आहेत. व्यक्ती 2: चालेल, ओके, ओके व्यक्ती 1 : जरा अंधार पडू द्या, आमदार माणूस जर दिवसा ढवळ्या असं करू लागला तर कसं, वेगळं वाटतं ना व्यक्ती 2 : बरं ठिके, ओके ओके विरोधकांच्या हाती आयते कोलीत ही ऑडिओ क्लिप सध्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. मात्र, ही क्लिप नेमकी कोणाची आहे आणि ती अधिकृत आहे का? याची अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुष्टी केलेली नाही. राजकीय सूडापोटी ही क्लिप व्हायरल केली गेली आहे की यात काही तथ्य आहे? याचा तपास होणे गरजेचे आहे. निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याच्या तक्रारी आधीच निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. आता या क्लिपमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मनपा निवडणुकीत अवघ्या दोनच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसमध्ये आता पराभवानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. आत्मचिंतनासाठी खासदार प्रणिती शिंदे व प्रभारी मोहन जोशी यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी नेतृत्वावरील राग जाहीरपणे व्यक्त केला. प्रणिती शिंदे यांनी बळ दिले नाही, अशी उमेदवारांची तक्रार होती पण त्यांच्यावर थेट टीका करण्याचे धाडस कुणीही दाखवले नाही. त्या ऐवजी नगरसेवकपदी निवडून आलेल्या शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना टार्गेट करून राग व्यक्त केला. प्रभाग 22 मधून माजी महापौर संजय हेमगड्डी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांची पत्नी राजनंदिनी, ब्लॉक अध्यक्ष गायकवाड यांचा मुलगा शीतल यांनी निवडणूक लढविली. या प्रभागात काँग्रेसच्या चौघांचाही पराभव झाला. तेथे ‘एमआयएम’ने दुसऱ्या क्रमांकाची मिळवली. याबद्दल हेमगड्डी म्हणाले, ‘शहराध्यक्ष चेतन नरोटे स्वत: उमेदवार होते. त्यामुळे इतर प्रभागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांनी निवडणुकीपुरते तरी प्रभारी नेमून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणे गरजेचे होते. यापूर्वी 1999 मध्ये शहराध्यक्ष प्रकाश यलगुवार यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी डॉ. पुंजाल यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवले होते. 2002 मध्ये ॲड. यू. एन. बेरिया यांनीही हेच केले होते. तेव्हा पक्षाला यश मिळाले. पण नरोटेंनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवले. त्यामुळे इतर उमेदवारांपर्यंत यंत्रणा पोहोचलीच नाही. प्रचाराचे नियोजन आम्हालाच करावे लागले. मलाही पॅनेल सोडून एकटा निवडून येणे सहज शक्य होते. पण, मी चौघांसाठी लढलो.’ माझा राजीनामा घ्या, पक्षाची पुनर्रचना करा- गणेश डोंगरे नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी पक्षाच्या सर्वच विभागांची पुनर्रचना करा. पराभावाची नैतिकता स्वीकारून युवक काँग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी स्वत:पासून त्याची सुरुवात करतो, अशी भूमिका युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांनी मांडली. ब्लॉक अध्यक्ष गायकवाड यांच्यासह इतर उमेदवारांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. क्रमांकाची मिळवली. याबद्दल हेमगड्डी म्हणाले, ‘शहराध्यक्ष चेतन नरोटे स्वत: उमेदवार होते. त्यामुळे इतर प्रभागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांनी निवडणुकीपुरते तरी प्रभारी नेमून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणे गरजेचे होते. यापूर्वी 1999 मध्ये शहराध्यक्ष प्रकाश यलगुवार यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी डॉ. पुंजाल यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवले होते. 2002 मध्ये ॲड. यू. एन. बेरिया यांनीही हेच केले होते. तेव्हा पक्षाला यश मिळाले. पण नरोटेंनी सर्व अधिकार स्वत:कडे ठेवले. त्यामुळे इतर उमेदवारांपर्यंत यंत्रणा पोहोचलीच नाही. प्रचाराचे नियोजन आम्हालाच करावे लागले. मलाही पॅनेल सोडून एकटा निवडून येणे सहज शक्य होते. पण, मी चौघांसाठी लढलो.’ स्वत:च्या चुकांचे खापर दुसऱ्यावर नको- नरोटे टीकेला उत्तर देताना नरोटे म्हणाले, ‘स्वत:च्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा आत्मचिंतन करावे. निवडणूक काळात सातत्याने बैठका सुुरू होत्या. स्वत: शिंदेसाहेब, प्रणितीताई सोलापुरात होत्या, त्यावेळी प्रभारी नेमण्याबाबत किंवा पदभार देण्याबाबत ते काहीच बोलले नाही अन् आता दुसऱ्याकडे बोट दाखविणे योग्य नाही.’ टीका करणाऱ्यांनी घरी बसावे- प्रणिती शिंदे पक्षविरोधकांची गय करणार नाही. पक्षावर टीका करणाऱ्यांनी घरी बसावे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी खडेबोल सुनावले. यापुढे मैदानात उतरून लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक ताकद दिली जाईल. पक्ष अधिक सक्षम करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येईल. पराभव झाला तरी उमेदवारांनी शॅडो नगरसेवक म्हणून जनतेच्या अडचणी सोडवाव्यात,’ असेही त्या म्हणाल्या. तर भाजप नव्हे ईव्हीएम निवडून आल्याची टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.
केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून 2014-15 मध्ये अशोक लेलँड कंपनीकडून 240 सिटी बसची (जन बस) खरेदी करण्यात आली होती. मात्र यापैकी 99 बसेसची चेसी क्रॅक झाल्याचे उघडकीस आल्यामुळे त्या वापराअभावी पडून होत्या. परिणामी मनपाने या कंपनीचे बिल मंजूर केले नव्हते. कंपनीने बस दुरुस्त करून देण्याची तयारी दर्शवली, पण मनपाने बदलून नव्याच बस पाहिजेत, असा आग्रह धरला. परिणामी हे प्रकरण आधी लवादात गेले. तिथे कंपनीच्या बाजूने निकाल लागला. पण थकीत पैसे वसुलीसाठी कंपनीने न्यायालयात धाव घेतली. तिथे रक्कम वसुलीसाठी महापालिका आयुक्तांना दिवाणी कारागृहात ठेवण्यासाठी न्यायालयाने नोटीस बजावली होती. अखेर हे अंगलट आल्यानंतर आतापर्यंत महापालिका प्रशासनाने दोन टप्प्यांत 17.30 कोटी रुपये कंपनीला देण्यासाठी कोर्टात भरले आहेत. त्यापैकी 6 कोटी 25 लाख रुपये आधीच भरले, तर आणखी 10 कोटी 93 लाख रुपयांचा धनादेश नुकताच 13 जानेवारी रोजी महापालिकेने न्यायालयात सादर केला आहे. एकूणच, या प्रकरणात सोलापूरकरांच्या सेवेत कधीच न आलेल्या व सध्या भंगारात उभ्या असलेल्या 99 बसेसच्या देयकापोटी महापालिकेला थकीत रकमेच्या व्याजासह व वकिलांच्या शुल्कासह 57 कोटींचा भुर्दंड मनपाला बसला आहे. त्यापैकी अजून 40 कोटी रुपये मनपाला भरणे आहेत. या थकीत रकमेवर दररोज 81 हजार रुपयांचे व्याज सुरू आहे, हे विशेष. न्यायालयात अंतिम निर्णय लागल्यानंतर ही रक्कम कंपनीला वर्ग करण्यात येईल. 12 जानेवारीपर्यंत देणे रक्कम मूळ रकमेसह व्याज 44.09 कोटीवाढीव रकमेसह व्याज5.55 कोटीडिपॉझिटसह व्याज 1.49 कोटी नागरिकांना सेवा नाही, पण व्याजाचा 20 कोटी भुर्दंड करातून केंद्र सरकारकडून 46 कोटी आले होते. बस खरेदीसाठी यापूर्वी ती रक्कम मनपाने खर्च केली. मात्र नागरिकांना सिटीबसची सेवा न देता अजून 17.36 कोटी रुपये महापालिका तिजोरीतून मनपा आयुक्तांनी भरले आहेत. याशिवाय 20 कोटी रुपये व्याजापोटी भरावे लागणार आहे. म्हणजे केंद्र सरकारने दिलेल्या निधीशिवाय आणखी 30 कोटींचा भुर्दंड मनपाला बसणार आहे. नागरिकांच्या कराच्या पैशातून ही उधळपट्टी होत आहे. मूळ रक्कम व 10 % व्याजाप्रमाणे वसुली अशी 1 2014-15 मध्ये यूपीए सरकारचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरासाठी 240 बस मोफत मिळाल्या होत्या. त्यापोटी केंद्राने 46 कोटी रुपये महापालिकेस दिले. त्यातून अशोक लेलँड कंपनीकडून घेतलेले 100 बसचे चेसी क्रॅक झाल्याने ते वाहतूक योग्य नाहीत, असा अहवाल तत्कालीन आरटीओ बजरंग खैरमाटे यांनी दिला होता. त्यावर मनपाने कंपनीकडे नवीन बसची मागणी केली. पण कंपनीने ते मान्य केले नाही. 2 कंपनीने चेसी दुरुस्त करून देण्याची तयारी दर्शवली, ते मनपाला मान्य नव्हते. करारानुसार कंपनीने लवादकडे दाद मागितली. त्यात कंपनीच्या बाजूने निकाल लागला. त्यानुसार वसुलीसाठी कंपनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. दिवाणी न्यायाधीश एम. पी. शिंदे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. यात महापालिकेच्या वतीने ॲड. उमेश मराठे, कंपनीच्या वतीने ॲड. दिनेश पुरंदरे, ॲड. विद्यावंत पांढरे हे काम पाहत आहेत.
आज आरक्षणाचा फैसला, मुंबईकडे नजरा:नाशिक मनपा नगरसेवकांच्या स्वागताची बैठक, चर्चा महापौरपदाची
महापालिकेच्या महापौरपदाचा निर्णय आज (दि. 22) होणार असून मुंबईत होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापालिकेत 72 जागांसह भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले असले, तरी महापौरपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, हे आजच्या आरक्षण सोडतीवर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, हे आरक्षण ‘रोटेशन’ पद्धतीने निघणार की, ‘चिठ्ठी’ टाकून, यावरच इच्छुकांचे भवितव्य ठरणार आहे. महापालिका आरक्षणाच्या इतिहासानुसार, 2017 मध्ये पहिले अडीच वर्ष ‘अनुसूचित जमाती’ आणि त्यानंतरचे अडीच वर्ष ‘सर्वसाधारण’ गट असे आरक्षण होते. आता रोटेशन पद्धतीचा अवलंब केल्यास, 17 वे महापौरपद ‘अनुसूचित जाती’ प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी ओबीसी आरक्षणाचीही शक्यता स्थानिक पातळीवर वर्तवली जात आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीमुळे रखडलेली लोकप्रतिनिधींची प्रतीक्षा आता संपली असून आजच्या सोडतीनंतर नाशिकच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालीच एकहाती यश आल्याने सत्तेची सूत्रेही त्यांच्याच हाती राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी इच्छूक असलेल्यांमध्ये ‘एससी’ आरक्षण निघाल्यास चार जणांची नावे चर्चेत आहेत. तर ओबीसीचे आरक्षण आल्यास इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र सर्वच दृष्टीने सक्षम असणाऱ्या तिघांकडून आतापासून ‘भाऊ’कडे लॉबिंग केली जात आहे. त्यात निष्ठावंत म्हणून तर काहींकडून सिंहस्थ काळात पक्षाचा चेहरा म्हणून महापौरांकडे जबाबदारी राहणार असल्याने त्या दिशेने विचार सुरू असल्याचे दिसते. ‘दोरी भाऊंच्याच हाती’
आईसोबत वाद घालतो, या कारणातून लहान भावाने मोठ्या भावाचा चाकूने वार करून खून केल्याचा प्रकार बुधवारी (दि. 21) सायंकाळी आडगाव परिसरातील सोसायटीत घडला. संदीप विजय गायकवाड (33) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडगावला सद्भावना पोलिस हाउसिंग सोसायटीतील फ्लॅट 17 मध्ये दुपारी संदीप आणि अरविंद गायकवाड या दोघा भावांमध्ये वाद झाले. लहान भाऊ अरविंद हा मद्यधुंद अवस्थेत होता. दोघांत वाद होताच अरविंदने संदीपच्या छातीत चाकू खुपसला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आडगाव पोलिसांना कळवले असता पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले. आईला विचारले असता, लहान मुलगा अरविंद हा जेवण करण्यापूर्वी कांदा कपात असताना वाद घालत होता. मोठा मुलगा संदीप समजावण्यासाठी गेला असता वाद झाले आणि संदीपचा खून झाल्याचे आईने सांगितले. याप्रकरणी वैभव वाकेकर यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलिस ठाणयात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील पुढील तपास करत आहेत. दोघेही भाऊ बेरोजगार दोघे भाऊ शिक्षणानंतरही बेरोजगार आहेत. मृत संदीप गायकवाड याने आयटीआयपर्यंत शिक्षण घेतले होते. तर लहान भाऊ अरविंद याने डिप्लोमापर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, दोघांनाही अद्याप नोकरी मिळालेली नव्हती. त्यामुळे ते घरीच असत. आईसोबत लहान भावाचे पटत नसल्याने तो तिला उलटून बोलत. हे वागणे मोठ्या भावाला खटकत असल्याने तो त्याला हटकायचा. आई हृदयविकाराने त्रस्त मृत तरुणाची आई हृदयविकाराने पीडित असल्याने मोठ्या भावाने लहान भावाला ‘तिला बोलू नको’ असे सांगितले. याचा राग आल्याने संशयिताने हल्ला केला. वडील ग्रामीण पोलिस दलात अंमलदार आहेत. ते संभाजीनगर येथे टपाल घेऊन गेले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ते नाशिकमध्ये परतणार आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या रणधुमाळीत आता मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याने महायुतीचे पारडे जड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली असून, मनसेची ठाकरे गटासोबतची युती कशी 'फसवणूक' होती, याचे विश्लेषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लालबाग-शिवडी येथील शिंदे गटाचे पदाधिकारी संतोष रघुनाथ नलावडे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे मनसेचे मोठे नुकसान झाले. उबाठाने मनसेची फसवणूक केली आणि केसाने गळा कापला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. संतोष नलावडे यांची पोस्ट जशास तशी... नलावडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 2017 च्या निवडणुकीत मनसेचे स्वबळावर लढून 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यापेक्षा यावेळी स्थिती अधिक चांगली होती. परंतु उबाठा सोबत युती केल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. उबाठाने मुळात कमी जागा मनसेला दिल्या. त्यातही निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा स्वतःकडे ठेऊन पडीक जागा मनसेच्या माथी मारल्या. निवडणुकीत मनसेला मदत केली नाही. मनसेच्या प्रभागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांना अन्य प्रभागात जाऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसेचे उमेदवार एकाकी लढत होते, असं संतोष नलावडे यांनी सांगितले. मागच्यावेळी मनसेचे निवडून आलेले नगरसेवक उबाठाने पळवले होते. मनसेला संपवण्यासाठी आजवर अनेक प्रयत्न केले. परंतु मनसेला असे संपवता येणार नाही हे लक्षात आल्यावर युती करून केसाने गळा कापला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अन्य कशाही पेक्षा महाराष्ट्र महत्वाचा आहे हे निवडणुकीपूर्वी सांगितले होते. आता त्याच विचाराने महाराष्ट्र व मुंबईच्या विकासासाठी भाजप आणि स्व.बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या खऱ्या शिवसेनेसोबत जावे लागेल. 2019 साली जनतेने वेगळा जनादेश दिलेला असताना तो नाकारून स्वार्थासाठी उद्धव ठाकरे हिंदुत्वविरोधी विचारधारेसोबत गेले होते. मनसेने हिंदुत्व व बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या लोकांसोबत पुढे जायला कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते कोणाचेच होऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहणे चुकीचे नाही, तर धोक्याचे आहे. हीच वेळ आहे मनसेला सावरण्याची, असेही संतोष नलावडे यांनी पोस्टद्वारे म्हटले आहे. ठाकरे गटाचे उरलेले ७ नगरसेवकही वाटेवर? एकीकडे मनसे सत्तेत सहभागी होत असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या ७ नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंची चिंता वाढली आहे. या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना स्पष्टपणे सांगितले की, भाजप आणि शिंदे गटाकडून आम्हाला सतत संपर्क केला जात आहे. जर तिथून 'सन्मानजनक प्रस्ताव' आला, तर आम्ही विचार करू. या विधानामुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता असून, हे ७ नगरसेवकही लवकरच महायुतीचा रस्ता धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दावोसवरून मुख्यमंत्र्यांचे लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर असले, तरी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीबाबतच्या प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारीक लक्ष आहे. महापौर महायुतीचाच होईल, असा ठाम विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. बाळासाहेबांच्या विचाराने पुढे जाणाऱ्या 'खऱ्या' शिवसेनेला मनसेने साथ दिल्याबद्दल शिंदे गटाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या रणधुमाळीत काल दिवसभर सुरू असलेला 'नॉट रिचेबल'चा सस्पेन्स अखेर मध्यरात्री संपला आहे. प्रभाग १५७ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. मध्यरात्री त्या आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या असून, आज त्या मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. काल सकाळी शिवसेना भवन येथे बोलावण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर होत्या. इतकेच नव्हे तर कोकण भवन येथे पक्षाचा 'गट' नोंदवण्यासाठी सर्व नगरसेवक गेले असतानाही म्हस्के तिथे पोहोचल्या नव्हत्या. त्यांचा फोन बंद असल्याने त्या शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच तिथे प्रवेश करतील, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. मुंबईत ६५ नगरसेवक निवडून आलेल्या ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. नार्वेकरांच्या निवासस्थानी 'मध्यरात्री' एन्ट्री ठाकरे गटाचे संकटमोचक मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी या प्रकरणात तात्काळ मध्यस्थी केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मध्यरात्री डॉ. म्हस्के नार्वेकरांच्या निवासस्थानी पोहोचल्या. नेमकं काय घडलं होतं आणि त्या का संपर्काबाहेर होत्या? याचे स्पष्टीकरण त्या स्वतःच देणार आहेत. आज सकाळी ११ वाजता मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्या 'मातोश्री'वर जाणार असून, तिथे उद्धव ठाकरेंशी संवाद साधल्यानंतर त्या कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी रवाना होतील. कोण आहेत डॉ. सरिता म्हस्के? डॉ. सरिता म्हस्के यांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आणि संघर्षाचा राहिला आहे. त्यांनी २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र अवघ्या ४०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२५ च्या सुरुवातीला त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. महायुतीच्या जागावाटपात प्रभाग १५७ ची जागा भाजपने स्वतःकडे ठेवल्याने म्हस्के यांनी बंडाचे निशाण फडकवत शिंदेंची साथ सोडली आणि 'मातोश्री'वर जाऊन मशाल हाती घेतली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या अनुभवी उमेदवार आकांक्षा शेट्टे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. सत्तास्थापनेच्या आकडेमोडीत महत्त्व मुंबईत भाजप आणि शिंदे गटात महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना, प्रत्येक नगरसेवकाचे मत महत्त्वाचे ठरत आहे. अशा परिस्थितीत आपल्या नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान ठाकरे गटासमोर आहे. सरिता म्हस्के यांच्या परतण्याने ठाकरे गटाचे संख्याबळ पुन्हा भक्कम झाले असून, आता सर्व नगरसेवकांची गट नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष प्रतिष्ठेच्या महापौरपदाकडे लागले आहे. या महापालिकांच्या महापौरपदासाठी आज (गुरुवार) आरक्षणाची सोडत जाहीर होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष त्याकडे लागले आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर या प्रक्रियेला प्रारंभ होईल. या सोडतीनंतरच कोणत्या शहराचा कारभार कोणाच्या हाती असेल, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. यंदा ५० टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील एकूण २९ महापालिकांपैकी १५ महापालिकांच्या महापौरपदी महिलांची वर्णी लागणार आहे, तर उर्वरित १४ ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळेल. महिलांसाठी राखीव असलेल्या १५ जागांपैकी ४ महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर ९ महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे. उर्वरित जागांवर अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित केले जाईल. मुंबईच्या महापौरपदासाठी 'चक्राकार' पद्धत देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईच्या महापौरपदाबाबत कमालीची उत्सुकता आहे. मुंबईसाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. गेल्या वेळी हे पद अनुसूचित जाती महिला आणि खुला प्रवर्गासाठी आरक्षित होते. त्यामुळे यंदा नेमके कोणते आरक्षण पडते, यावर अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आपल्या पक्षातील कोणत्या प्रवर्गाचे नगरसेवक निवडून आले आहेत, याचा लेखाजोखा सर्वच राजकीय पक्षांनी आधीच तयार ठेवला आहे. राजकीय हालचालींना येणार वेग आरक्षण निश्चित झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महापौरपदाच्या शर्यतीला सुरुवात होईल. ज्या प्रवर्गासाठी आरक्षण निघेल, त्या प्रवर्गातील निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये लॉबिंग सुरू होणार आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांत आरक्षणाची चिठ्ठी कोणाच्या बाजूने निघते, यावर सत्तेची समीकरणे फिरणार आहेत. मंत्रालयातील नगरविकास विभागामार्फत ही प्रक्रिया पार पडणार असून, दुपारपर्यंत सर्व २९ शहरांमधील आरक्षणाचे अधिकृत चित्र स्पष्ट होईल. हे ही वाचा… शिवसेना ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के 'नॉट रिचेबल'!:म्हस्के आमच्याच संपर्कात, कुठेही गेलेल्या नाहीत; अनिल परबांचे स्पष्टीकरण महापालिका निवडणुकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या निवडीवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच विजयी नगरसेवकांची पळवापळवी देखील करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईसह उपनगरातील महापालिकांमध्ये नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असून शिवसेना ठाकरे गटाचे 4-5 नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. त्यात मुंबई वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के नोट रिचेबल आहेत. यावर आता आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर वाचा…
शहरातील स्वच्छतेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेक प्रभागांमध्ये मागील १५ दिवसांपासून निवडणुकीच्या धामधुमीत घंटागाड्याच फिरकल्या नसल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठला आहे. एवढेच नव्हे तर मोकळ्या जागा आणि कंटेनरच्या जवळही कचऱ्याचे ढिग दिसत आहेत. मनपा प्रशासन, नियमित स्वच्छता अधिकारी, कर्मचारी महानगर पालिका निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिल्याने त्यांचे शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. एकिकडे शहराच्या स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी सोडवण्यासाठी मनपा स्वच्छता विभागाने ०७२१२६७२३००, ७५१७५१६१६२ हे दोन हेल्पलाईन क्रमांक एक मो.क्र.७०३००९२६४८ उर्वरित, पान४ ^कोणकोणत्या प्रभागात घंटागाडी निवडणुकीच्या काळात फिरकली नाही, याबाबत तत्काळ सॅनिटरी इन्सपेक्टरला (एसआय) माहिती घेण्यास सांगणार आहे. तसेच स्वच्छता कंत्राटदारालाही याबाबत कळवून तत्काळ कारवाई करण्यास सांगितले जाईल. - डॉ. अजय जाधव, वैद्यकीय स्वच्छता अधिकारी. हातावर पोट असलेले घंटागाडी चालक हे जेथे त्यांना जास्त कमाई होईल, तिकडे प्राधान्याने लक्ष देत असतात. हे साहजिकही आहे. कारण, दु.१२ पर्यंतच ते घंटागाडीवर काम करतात. तुटपुंज्या पगारात कसे भागणार म्हणून नंतर दुसरे काम करावे लागते. अशा बहुतेक घंटागाडी चालकांना यावेळी निवडणुकीच्या निमित्ताने कमाई करण्याची आयतीच संधी मिळाली. त्यामुळे काहींनी १५ दिवसांच्या सुट्या टाकल्या. ते प्रचार कार्यात व्यस्त झाले. अशात झोननिहाय कचरा कंत्राटदाराने त्यांच्या जागी अन्य घंटागाडीची व्यवस्था करणे अनिवार्य असतानाही केले नाही. महानगर पालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले. त्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. एवढेच नव्हे तर स्वच्छता कंत्राटदारांनाही मनपाकडून नियमित देयक (बिल) मिळत नसल्याने तेही वैतागले आहेत. क्षितीज नागरिक बेरोजगार सहकारी संस्थेने झोन क्र. ३ दस्तूरनगरचे स्वच्छता कंत्राट सोडले आहे. इतर स्वच्छता कंत्राटदारही याच विचारात आहेत. मात्र, अद्याप त्यांनी कंत्राट सोडले नाही. दस्तूरनगर झोनमध्येही सर्वत्र कचरा साठला असून मनपाला येथील स्वच्छतेसाठी आणखी ३ ते ४ दिवस लागणार आहेत. घंटागाडी चालक राहिले निवडणुकीच्या कामातच एसआयला तत्काळ माहिती घेण्यास सांगणार
दरात तेजी आल्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली आहे. आज, बुधवारी दिवसभरात तब्बल ५ हजार ८०८ क्विंटलचे व्यवहार झाले. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५२५० ते ५४०० रुपयांचा दर मिळत आहे. शासनाने यावर्षी सोयाबीनचे आधारभूत मुल्य प्रतिक्विंटल ५ हजार ३०० रुपये निश्चित केल्याने बहुतेक उत्पादक खासगी बाजाराकडे वळले आहेत. अतिवृष्टी आणि पूरस्थिती अशा दुष्टचक्रातूनही बहुतेक सोयाबीन उत्पादकांनी आपले पीक वाचविले. त्यामुळे सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली आहे. प्रारंभीच्या काळात काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवले होते. परंतु आता चांगला दर मिळत असल्याने अनेकांनी ते विकायला काढले आहे. केंद्र शासनाने यावर्षी सोयाबीनचे आधारभूत मुल्य प्रतिक्विंटल ५ हजार ३०० रुपये निश्चित केले आहे. एवढेच नव्हे तर बडनेरा येथील कृऊबासच्या उपकेंद्रात यासाठी शासकीय खरेदी केंद्रही उघडण्यात आले आहे. परंतु शासकीय विक्रीनंतर रक्कम त्वरेने मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक खाजगी बाजारालाच प्राधान्य देत आहेत. या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ हजार ८०८ क्विंटल सोयाबीनची खरेदी-विक्री करण्यात आली. पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसालाही सध्या चांगला भाव मिळत आहे. दोन दिवसांपासून अमरावतीमध्ये कापसाचे भाव साधारणपणे प्रतिक्विंटल ७९०० ते ८१०० रुपये मिळत होते. अशाप्रकारे कापसाचा दर सरासरी प्रतिक्विंटल ८००० रुपये आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी हा दर प्रतिक्विंटल ७९०० ते ८०५० रुपयांपर्यंत नोंदवला गेला. मात्र, बाजारपेठेतील आवक आणि दर्जा यावर हे दर बदलू शकतात. दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत ही रक्कम अधिक असल्याने सोयाबीनसोबतच कापूस उत्पादकही आनंदून गेला आहे. दिवसभराची आवक अशी धान्य आवक (क्विंटलमध्ये) सोयाबीन ५८०८, तूर १०२३, मका ३२१, हरबरा ९१, तीळ ४४ उडीद १३, गहू ०६, एकूण ७३०६ (२०७ वाहनातून वरील धान्य आणले गेले. ज्वारी, मूगाची आवक नाही.)
प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शंकरपट शर्यतीचा थरार:शंकरपटाची धुळवळ; 11 लक्ष रुपयाच्या बक्षिसांची लयलूट
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी बहिरम यात्रेतील तमाशा फड सारख्या कुप्रथांना हद्दपार केले. तेव्हापासून सातपुडाच्या पायथ्याशी भरत असलेल्या बहिरम यात्रा परिसरामध्ये दरवर्षी शंकर पट आयोजन करण्यात येते. यावर्षीही २२ ते २४ जानेवारी दरम्यान सलग ३ दिवस विदर्भ केसरी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये ११ लक्ष रुपयाच्या बक्षिसांची लयलुट होणार आहे. या बैल जोडीच्या शर्यतीत अमरावती जिल्हासह इतर जिल्हा व शेजारच्या राज्यातील बैलजोड्या शर्यती साठी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे ३ गटात होणार्या यात शर्यतील एकूण ११ लक्ष रुपयाची बक्षीस जाहीर करण्यात आली आहे. तर धुरकरी सन्मान बक्षिसाच्या निर्धारित केलेले केलेले रोख बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये अचूक मिनिट व सेकंद सांगण्याचे काम म्हणजे घड्याळाची जबाबदारी हिंगोलीचे राजु मंडाळे व इतर सहकारी सांभाळणार आहे. विदर्भ केसरी शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन हे चांदूरबाजार नवनिर्वाचित नगराध्यक्ष मनीषा नागलीया, शल्य चिकीत्सक डॉ. प्रभु जवंजाळ, अचलपूर उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, चांदूरबाजार तहसीलदार सोनल सूर्यवंशी, शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन ठाणेदार महेंद्र गवई, चांदूरबाजार पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.निलेश वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा होणार आहे. बक्षिस वितरण सोहळ्याला माजी राज्यमंत्री बच्चु कडू तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.
महाराष्ट्रातील दीडशेहून अधिक गजलकारांच्या उपस्थितीत आगामी ७ व ८ फेब्रुवारीला अमरावतीत अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन येथील श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात होईल. संमेलनाचे यजमानपद सुरेश भट प्रतिष्ठान आणि वसंतराव पालेकर प्रतिष्ठानने स्वीकारले आहे. सदर संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रसिद्ध गजलकार सीए नाना लोडम यांची निवड करण्यात आली आहे. या आयोजनाबाबत लोडम यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रसिद्ध कवी व गजलकार वैभव जोशी हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असून उद्घाटन डॉ. राम पंडित (मुंबई) यांच्या हस्ते केले जाईल. यावेळी शाहीर सुरेशकुमार वैराळकर पुणे, दगडू दादा लोमटे अंबाजोगाई, संतोष बोरगावकर, डॉ. गणेश गायकवाड, शिवाजी जवरे, निवृत्त माहिती महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात एकूण १३ मराठी गझल मुशायरे रंगणार असून एक तरन्नूम मुशायरा आणि परिसंवाद व गजल गायन मैफिल राहणार आहे. याशिवाय वैभव जोशी यांची ‘सोबतीचा करार’ ही मैफलसुद्धा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलन हे अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संमेलनासाठी एक आयोजन समिती गठित करण्यात आली असून त्यामध्ये स्वागताध्यक्ष नाना लोडम, प्रसिद्ध वऱ्हाडी कवी नितीन देशमुख, अनंत नांदुरकर-खलीश, नवोदित गजलकार नितीन भट, कवी संजय इंगळे तिगावकर यांच्यासह सहसमन्वयक संदीप देशमुख, मारुती मानमोडे, निलेश कवडे, अजिज खान पठाण, रेणुका पुरोहित यांचा समावेश आहे. रसिकांना भरगच्च मेजवानी मिळणार अमरावती शहर ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असून कविवर्य सुरेश भट यांची गृहनगरी आहे. अशा शहरात मराठी गजलेची भरगच्च मेजवानी रसिकांना मिळणार आहे. शंभर वर्षांपूर्वी विदर्भ साहित्य संघाची स्थापना याच शहरात झाली होती. त्यामुळे येत्या काळात शंभरावे अ. भा. मराठी साहित्य संमेलन येथे घेण्यासाठीही काही मराठी सारस्वत तयारीला लागले आहेत. प्रसिद्ध मराठी गजलकार भीमराव पांचाळे हेही याच जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या सर्व पाचही विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. या निवडीमुळे नगर पंचायतीच्या कामकाजाला नवसंजीवनी मिळणार असून शहरातील मूलभूत सुविधा व विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये अर्थ व नियोजन समितीच्या सभापती अब्दुल जमीर अब्दुल रहीम, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापत ज्योत्स्ना अमोल धवस, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती मो. रियाज मो. मुमताज, पाणीपुरवठा व जलनिसारण समिती सभापती वासुदेव अवधुतराव लोखंडे आणि महिला व बालकल्याण समिती सभापती कांता गजानन लोमटे यांचा समावेश आहे. वित्त व नियोजनासह विकासकामांसाठी निधीचे योग्य नियोजन, अंदाजपत्रक आणि विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे अर्थ व नियोजन समितीचे काम आहे. तर शहरातील स्वच्छता व्यवस्था, कचरा संकलन व व्यवस्थापन, आरोग्य सेवा, साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे काम स्वच्छता समितीमार्फत केले जाईल. दरम्यान शहरातील अंतर्गत रस्ते, गटारी, सार्वजनिक इमारती, नागरी सुविधा तसेच सुरू असलेली व प्रस्तावित विकासकामे वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करण्याची जबाबदारी शहर सुधार समितीवर राहणार आहे. महिला व बालकल्याण समितीमार्फत महिलांचे सक्षमीकरण, बालकल्याणच्या योजना, शिक्षण, आरोग्य व पोषणविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवण्यावर सदर समितीचा भर राहणार आहे, तर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, नवीन नळजोडण्या तसेच सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यावर पाणी पुरवठा समितीचा भर राहणार आहे. मविआची पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता सदर निवडीमुळे नगर पंचायतीच्या सर्व विषय समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा समावेश आहे. पाचही विषय समित्या बिनविरोध झाल्याने नगर पंचायतीतील सत्तेवर महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिरासाठी भालेवाडी या गावांमध्ये आलेलो आहोत. आपण सर्वांनी गावकऱ्यांच्या विचाराने चांगल्या पद्धतीचे काम या भालेवाडीमध्ये करावे. सध्या सर्वत्र वृक्षारोपण करत असताना परदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणात लागवड होताना दिसते. देशी वृक्ष हे बहुगुणी असून आपल्याला पशुपक्षी, प्राणी, फुलपाखरे यांना जर नवसंजीवनी द्यायची असेल तर देशी वृक्षांची लागवड होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा यांनी व्यक्त केले. ते श्री विद्या विकास मंडळ संचलित,श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या भालेवाडी येथे संपन्न होत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल सुभाष शहा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र वडजे, मुजफ्फर काझी, सरपंच डॉ. श्रीकांत दवले, उपसरपंच उषा चंद्रकांत गवळी, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड, ग्रामस्थ उपस्थितीत होते. पुढे बोलताना अध्यक्ष राहुल शहा म्हणाले की, आपण केलेल्या कामाचा कामाचा गावासाठी चांगल्या पद्धतीने उपयोग व्हावा. असे काम करून आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक ही ही वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरातील श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमासाठी बालेवाडी गावचे ग्राम विकास अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच बालेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वरिष्ठ विभागातील कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजाराम पवार, प्रा. डॉ. जावेद तांबोळी, प्रा. डॉ. सुधाकर राठोड तसेच कनिष्ठ विभागाचे प्रा. संगमेश्वर पाटील यांनी परिश्रम घेतले. श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ^राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरातील श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असून भालेवाडी गावाच्या विकासात आपले भरीव योगदान द्यावे अशा, अपेक्षा यावेळी व्यक्त केल्या. डॉ.औदुंबर जाधव, प्राचार्य श्रम संस्कार शिबिर युवकांसाठी महत्त्वाचे ^राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिर युवकांना महत्त्वाचे आहे. शाश्वत विकासासाठी युवकांची भूमिका कशी असायला पाहिजे. या संबंधीचे मार्गदर्शन केले. हा शाश्वत विकास करत असताना त्याची सुरुवात स्वतःपासून करा. प्रा. डॉ. राजेंद्र वडजे, संचालक
विज्ञानामुळे आपल्या ज्ञानात अधिक भर पडत असते. विज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर जीवनात सकारात्मक येते आणि चिकित्सक वृत्ती, जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते आणि मग आपल्यामधून शास्त्रज्ञ, उद्योजक घडत असतात. म्हणून आपल्या संशोधन प्रकल्पांचा समाजासाठी उपयोग व्हावा, तरच आपल्याला त्यातून आनंद घेता येईल. असे प्रतिपादन विठ्ठल महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांनी केले. राज्य विज्ञान संस्था, रविनगर, नागपूर व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘५३ व्या सोलापूर जिल्हा स्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात डॉ. मीनाक्षी पवार बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश नांगरे हे होते. महाराष्ट्र राज्य विज्ञान महामंडळाचे संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी स्वेरीतील विज्ञान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या विज्ञान मंडळातील सर्व सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष व समन्वयक संजय भस्मे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू चव्हाण, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ, नीलकंठ लिंगे आदी प्राध्यापक उपस्थित होते. या प्रदर्शनातून प्राथमिक गटात प्रथम बसवराज तोळनुरे (प्रकल्प-सौर कृषी पंप), द्वितीय विरोचंद कराळे (हॅन्ड डेस्टर कार), तृतीय प्रेमराज शेळके (ट्रान्समिशन लाईन), माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम महेश टेंगळे (स्मार्ट अॅग्रिकल्चर), द्वितीय आयुब लाड (स्मार्ट स्कूल) व तृतीय जुनेद शेख (ऊमन सेफ्टी अँड मल्टीपर्पज सेफ्टी), दिव्यांग गटातून प्राथमिक गटात प्रथम सुप्रीया शिंदे (जल, संधी, व्यवस्थापन), दिव्यांग माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम गणेश निकम (अंडी उबवणे मशीन), प्राथमिक शिक्षक गटात प्रथम विशाल रेपाळ (माझी गणित शाळा), माध्यमिक शिक्षक गटात प्रथम मंगेश सोनटक्के (खेळातून जीएसटी आणि कृतीयुक्त आराखडा), योगशाळा व परिचर गटात प्रथम शशिकांत शेंडे (निर्मिती वैज्ञानिक संकल्पना सहल) हे विद्यार्थी व शिक्षक विजेते ठरले. हे विद्यार्थी व शिक्षक विजेते ठरले
अपघात तसेच इतर अत्यावश्यक सेवेसाठी रुग्ण सिव्हिल हॉस्पिटल (छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय) येथे येतात. त्यांच्यावर कॅज्युलिटी विभागात उपचार केले जातात. पुन्हा दुसऱ्या इमारतीत शिफ्ट केले जाते. आता रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर व कर्मचारी यांची धावपळ आता थांबणार आहे. कारण, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅज्युलिटीसाठी स्वतंत्र नवी इमारत तयार होत आहे. या इमारतीमध्ये ५० बेड असणार आहेत. सध्या रुग्णालयात कॅज्युलिटी विभाग सुरु असून त्याच विभागाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही इमारत बांधण्यात येत आहे. जून महिन्यात या इमारतीचे काम पूर्ण होऊन ती वापरात येणार आहे. यासाठी वेगळ्या मनुष्यबळाची आवश्यकता नसल्याने सध्या कार्यरत असलेले तज्ञ रुग्णसेवा करतील. तसेच अत्यावश्यक रुग्णांना तिथेच ॲडमीट करण्यात येणार आहे. या इमारतीत स्वतंत्र प्रयोगशाळेची व्यवस्था करण्यात येणार आहे. यात रक्त, सोनोग्राफी, एक्सरे आदी प्रकारच्या तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना तपासणीसाठी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही. ^अत्यावश्यक रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत, यासाठी नवी इमारत बांधण्यात येत आहे. रुग्णाची प्रकृती स्थिर होईपर्यंत त्याच्यावर नव्या इमारतीत उपचार करण्यात येणार आहे. त्यानंतर रुग्णाच्या आजाराप्रमाणे त्याला संबंधित विभागात अॅडमीट करण्यात येईल. ही इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. डॉ. ऋत्विक जयकर, अधिष्ठाता कॅज्युलिटीसाठी बांधण्यात येणाऱ्या नव्या इमारतीत चार विभाग असणार आहेत. यात सर्जरी, स्त्री रोग व प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक आणि मेडिसिन या विभागांचा समावेश आहे. हे सर्व विभाग अत्यावश्यक सेवेत असल्याने नव्या इमारतीत हे विभाग असणार आहेत. नव्या इमारतीमुळे सिव्हिल हॉस्पिटलला चार ऑपरेशन थिएटर मिळणार आहेत. या नव्या इमारतीत दोन मेजर व दोन मायनर ऑपरेशन थिएटर असणार आहेत. दुसऱ्या ब्लॉकमध्ये नेऊन ऑपरेशन करण्याऐवजी नव्या इमारतीतच रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येतील. त्यामुळे इतर ऑपरेशन थिएटरवरील भार कमी होणार आहे. मिळणार चार नवे ऑपरेशन थिएटर प्रकृती स्थिर होईपर्यंत उपचार
तब्बल ९ वर्षांनी आलेल्या निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य शोधायला निघालेल्या कार्यकर्त्याची दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रचंड धावपळ उडाली. ९ वर्षांनी आलेली वेळ चुकते की काय या भीतीने त्याच्या छातीत धाकधूक वाढली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस होता आणि यामुळे तहसील कार्यालयास जत्रेचे स्वरूप आलेले होते. पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी मंगळावर अखेर तब्बल ७४४ उमेदवारी अर्ज विक्री झाले होते. परंतु मंगळवार अखेर २१३ अर्ज दाखल झाले होते. उर्वरित उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी धावपळ सुरू होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ९ वर्षांनी होत आहेत आणि अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू केलेली होती. अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भालके गट आणि इतर अपक्ष उमेदवार आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल करण्यास येत होते. उमेदवारांसाठी अर्ज तपासून घेणे, अनामत रक्कम जमा करणे, त्याची पोहोच घेणे, आणि परत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करणे ही प्रक्रिया तारेवरची कसरत ठरलेली होती. दुपारी अडीच वाजल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरश झुंबड उडाली होती. कार्यकर्त्यांना आवरताना बुधवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, तालुका पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर या दोन पोलिस निरीक्षकांसह ८ सहायक पोलिस निरीक्षक उपनिरीक्षक ४० पोलिस अंमलदार तैनात होते. याचबरोबर मुख्य रस्त्यावर वाहतुक सुरळीत करणेसाठी वाहतुक पोलिस तैनात होते. आवरताना पोलिसांचीही दमछाक होत होती. दुपारी तीनचा ठोका पडला आणि मुदत संपल्याचे जाहीर होताच पोलिसांनी सर्व गर्दी आवाराच्या बाहेर हुसकावून काढली. भाजपचे एबी फॉर्म अडीच वाजता आले नेत्यांच्या सूचनेनुसार भाजप कडून अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत. परंतु अर्जासोबत ए बी फॉर्म जोडणे अनिवार्य होते. हा एबी फॉर्म कधी मिळणार याकडे उमेदवार डोळे लावून बसले होते, सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. दुपारी दीड वाजता प्रणव परिचारक एबी फॉर्म घेऊन आले आणि त्यांनी ते फॉर्म जमा केले. तेव्हा भाजप उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले तर ज्यांना फॉर्म मिळाले नाहीत ते निराश झाले.
मानसिक गणना आणि गणितीय समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी अबॅकस ही एक पारंपारिक उपयुक्त पद्धत आहे. जलद व अचूक गणना करण्यासाठी व एकाग्रता वाढविण्यासाठी उपयोगी पडत असलेल्या अबॅकसचे महत्त्व अधोरेखित होते. या परीक्षेत यशस्वी झालेल्यांसाठी अमेझिंग अबॅकसने आयोजित केलेला गौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन ट्रेकॅम्पचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ विशाल लाहोटी यांनी केले. शहरात नावाजलेल्या अमेझिंग अबॅकस संस्थेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून लाहोटी बोलत होते. यश ग्रँड येथे झालेल्या या सोहळ्यास फॅशन डिझायनर मेघा लाहोटी, पत्रकार संदीप जाधव, अमेझिंग अबॅकसच्या संचालिका अश्विनी बल्लाळ व संचालक किरण बल्लाळ उपस्थित होते. अमेझिंग अबॅकस बक्षीस वितरण कार्यक्रमात डिस्ट्रीक्ट लेव्हलवर बेसिक मॅथ कॉम्पिटिशन घेण्यात आली. त्यामध्ये १५० विद्यार्थी व पालकही सहभागी झाले होते. अर्पिता सोनटक्के, स्मिता जाधव आणि सृष्टी धोकरिया यांनी परीक्षण केले. त्यामध्ये प्रथम तिघे आणि उत्तेजनार्थ असे बक्षीस वितरण केले. अमेझिंग अबॅकसच्या बेसिक मॅथ स्पर्धेमध्ये आज्ञा कुलकर्णी, सानवी अग्रवाल, संतानिका लोंढे आणि अनुष्का दिनकर या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. तसेच सान्वी अग्रवाल, आर्वी शेवाळे, विहान बजाज, सुकन्या चौधरी, मुग्धा विभूती, रिदिमा चिटमील, ओम झोरेकर, प्रथमेश शिंदे, अर्णव शिंदे, आरव माकिजा, मयंक भागवत, पूर्वल खरात, विनायक बोनगीरवार, वेदिका काळबांडे आदी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी किरण बल्लाळ, संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जयश्री कांबळे, कांचन दंडाळे, श्रद्धा देशमुख, डिंपल शर्मा, प्रज्ञा विभुती आदींनी परिश्रम घेतले.
आजच्या काळात महिलांनी आत्मविश्वासाने समाजात वावरावे, त्यासाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण अत्यावश्यक आहे. कराटेसारख्या शारीरिक प्रशिक्षणामुळे केवळ शारीरिक ताकदच नव्हे तर मानसिक धैर्यही वाढते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांनी केले आहे. येथील चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्समधील विद्यार्थी विकास मंडळ व महिला सबलीकरण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय कन्या अभियान’ अंतर्गत कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. सादिक सय्यद, प्रा. प्रदीप यादव, प्रा. डॉ. मंगल घोलप, डॉ. अनिकेत खत्री, प्रा. योगीराज चंद्रात्रे, प्रा.अजय गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्या डॉ. अंजली कदम यांनी महिलांनी स्वतःचे आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच महिलांनी शिक्षणाबरोबरच आत्मसंरक्षणाचे धडे आत्मसात करावेत असे सांगितले. गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयाच्या प्रा. विना मुंगसे यांनी विद्यार्थिनींना समाजातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी धैर्य व आत्मविश्वासाची गरज असल्याचे अधोरेखित केले. राष्ट्रीय पंच व ऑल इंडिया बॉक्सिंग खेळाडू प्रतिभा गायकवाड यांनी विद्यार्थिनींना प्रत्यक्ष सराव करून १० दिवस कराटेचे प्राथमिक धडे दिले. त्यांनी आत्मसंरक्षणाच्या विविध तंत्रांची प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थिनींना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी जेजुरकर यांनी केले तर आभार प्रा. प्रियंका वहाडणे यांनी मानले.
युवक सोशल मीडियामुळे दिवसेंदिवस भरकटत चालला असून एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजातील अडीअडचणी युवकांच्या लक्षात येतील. स्वयंसेवकांचा व गावाचा सर्वांगीण विकास शिबिराच्या माध्यमातून होईल, असे मत जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांनी व्यक्त केले. निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भगूर येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या पूजा दहातोंडे, डॉ . हेमंत गांगुर्डे, सरपंच वैभव पूरनाळे, उपसरपंच नागेश पुरनाळे, विमल सातपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. दुकळे आदी उपस्थित होते. पूजा दहातोंडे म्हणाल्या, तरूण वयात संगत गुण किती महत्त्वाचे आहे त्याचबरोबर योग्य संगत असावी तरुण वयात समाजकार्य करावे. मुलींचा बालविवाह झाल्यानंतर मुलींना भविष्यात असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो त्यासाठी बालविवाह थांबवणे आवश्यक आहे. यासाठी युवकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष निजवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन राठोड यांनी केले. तर आभार प्रा. अमोल खोसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पृथ्वीराज कराळे, प्रा. प्रथमेश वावरे, प्रा. दिक्षा सरसे, प्रा. माधुरी पोटफोडे व इतर प्राध्यापक व प्रध्यापाकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्यने स्वयंसेवक सहभागी झाले होते.
नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष बुधवारी आणखी तीव्र झाला. तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या नगरपरिषदेच्या विविध समित्यांच्या सभापतिपदांच्या निवडीत भाजपने राजकीय डावपेचांचा कुशल वापर करत नगरपरिषदेत आपले वर्चस्व निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट व शरदचंद्रजी पवार गटातील अंतर्गत फूट आणि सतत बदलणाऱ्या आघाड्यांचा फायदा घेत भाजपने निर्णय भूमिका घेतल्याने सभापतीच्या निवडीच्या वेळेस राजकीय गणित तयार झाले. या निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माया मुंडे होत्या. यावेळी मुख्याधिकारी विजय घाडगे उपस्थित होते. सभापतिपदाच्या निवडीत भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे २ नगरसेवक भाजपसोबत आल्याने नवीन राजकीय आघाडी उदयास आली. अवघ्या आठवडाभरापूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीत मात्र पूर्णतः वेगळे चित्र पाहायला मिळाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) भाजपला डावलत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्याशी आघाडी करत सिराजुद्दीन पटेल यांना उपनगराध्यक्षपदी निवडून आणले होते. या घडामोडीमुळे भाजपला राजकीय धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने समित्यांच्या निवडीत आक्रमक आणि नियोजनबद्ध पवित्रा घेतला. आमदार मोनिका राजळे यांनी या प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावत राष्ट्रवादीतील फुटीचा राजकीय लाभ घेत दोन्ही गटांना सोबत आणले. परिणामी समित्यांच्या निवडीत भाजपचे वजन अधिक ठळकपणे जाणवले. दरम्यान, नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष तथा नियोजन व विकास समिती सभापतिपदी सिराजुद्दीन पटेल, बांधकाम समिती सभापतिपदी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कैलास तिजोरे, महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या परवीन शेख, पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रिजवान शेख, आरोग्य समिती सभापतिपदी भारतीय जनता पार्टीच्या दीप्ती गांधी यांची निवड करण्यात आली. दोन्ही राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीचा फायदा भाजपला झाला.
खादगाव दोहरी तांडा गारखेडा शिवारातून ४० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तब्बल ट्रकभर वीज पंपांच्या वायरिंगची चोरी झाली आहे. १५ ते २० चोरट्यांची सशस्त्र टोळी असून ऐन हंगामात वीज पुरवठा खंडित झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जामनेर तालुक्यात वीज पंप व त्यासाठी लागणाऱ्या वायरची चोरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खादगाव, दोहरी तांडा, गारखेडा हा परिसर वाघूर धरणाच्या बॅक वॉटरला लागून असल्याने धरणाकाठच्या असंख्य शेतकरी धरणात वीज पंप टाकून शेतीसाठी पाणी उचलतात. गेल्या आठ दिवसात खादगाव, डोहरी तांडा, गारखेडा या परिसरातून ट्रकभर वायरिंसह काही वीज पंपाची चोरी झाली. खादगाव येथील मंगला सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोरट्यांचा बंद॰बस्त करण्याची मागणी केली. चोऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले जामनेर तालुक्यात छोटी मोठी तब्बल ४९ धरणे आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धरणावर वीज पंप टाकून वीज कनेक्शन घेत आपापले शेती बागायत केली आहे. सध्या रब्बी हंगामाचे दिवस असून पिकांना पाणी देण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांचे वीज पंप सुरू आहेत. चोरट्यांनी हीच संधी साधून यापूर्वीही अनेक ठिकाणी वीज पंपाच्या वायरची चोरी केली आहे. धारदार शस्त्रांनी पाईपसह वायर कापून त्याच ठिकाणी रस्त्यावर जाळून तारा घेऊन गेले आहेत. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त करावा ^आठ दिवसात दोन वेळा वीज पंपांसह वायरिंगची चोरी दहा ते पंधरा सशस्त्र चोरांचे टोळके आहे. त्यामुळे चोरटे पकडण्यासाठी शेतकरीही धजावत नाहीत. चोरट्यांची मुजोरी वाढली असून पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांचे नुकसान थांबवावे. - श्रीराम पाटील, शेतकरी,
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या लोहोणेर येथील जनता विद्यालयात कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षेला सामोरे जाण्याचा संकल्प केला. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत कॉपीमुक्त परीक्षा देण्याचा संकल्प करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब न करता प्रामाणिकपणे, आत्मविश्वासाने व तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, या उद्देशाने कॉपीमुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका कल्पना शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून दिलेली परीक्षा हीच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करते. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक निंबा ठाकरे, पर्यवेक्षक विलास निकम, तसेच सर्व शाळेत कॉपीमुक्त परीक्षेबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. अभ्यासात सातत्य ठेवून कॉपी न करता परीक्षेत मिळवलेले गुण हे खूप महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर देवून परीक्षेला सामोरे जावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर सेवक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीचे प्रमुख सुनील एखंडे यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त परीक्षेची शपथ दिली. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा बसावा तसेच परीक्षेचे वातावरण अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक राहावे, या उद्देशाने दि. १९ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा अभियान सप्ताह राबविण्यात येणार आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती कमी होऊन ते अभ्यासाची योग्य तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जातील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कसबे सुकेणे निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथील वरद विनायक मंदिरात गुरुवारी (दि. २२) गणेश जयंती सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसहा वाजता ध्वजारोहण, सात वाजता नित्य महाआरती, सव्वा सात ते साडेआठ वाजेपर्यंत श्री गणेश सहस्त्रावर्तन अभिषेक होईल. निलेश गुरुजी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पौरोहित्य खाली होणार आहे. साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत श्री गणेश याग (होम हवन) सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत संगीत भजन व प्रवचन, दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशभक्त अंबादास चौधरी यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. संध्याकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत दीपोत्सव, नित्य महाआरती व संगीत भजन होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शहरातील श्री इच्छामणी गणेश मंदिरात गुरुवारी (दि.३३) गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाची सुरुवात सकाळी ७ वाजेपासून होणार सुरू होणार आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत अभिषेक, गणेश पूजन, गणेश याग, महायज्ञ व महापूजा, असे धार्मिक विधी पार पडणार आहेत. सायंकाळी ६ ते १० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ७ ते १० दरम्यान धनराज म्हसणे यांचा महाराष्ट्राची लोकधारा भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार असून सायंकाळी ७:३० वाजता श्रींची महाआरती होईल. हा धार्मिक सोहळा श्री इच्छामणी गणेश मंदिर, नवयुग तरुण मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
अडसरे प्रकरणातील संशयितास फाशी द्या:घाेटी पोलिसांकडे मनसेची मागणी
इगतपुरी तालुक्यातील अडसरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या शिक्षकाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कठोर भूमिका घेतली असून, आरोपीला जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे इगतपुरी तालुक्याच्या वतीने घोटी पोलिसांना निवेदन देण्यात आले. मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना अत्यंत निंदनीय असून केवळ निषेध करून चालणार नाही. अशा अमानवी कृत्य करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून समाजात कडक संदेश जाईल. दोषीला शिक्षा होईपर्यंत मनसे विद्यार्थी सेना हा लढा थांबवणार नाही, असा इशाराही देण्यात आला. मनसे विद्यार्थी सेनेचे नाशिक जिल्हा पदाधिकारी आत्माराम मते यांनी दोषीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मनसे जिल्हा संघटक भगीरथ मराडे, तालुकाध्यक्ष रामदास आडोळे, आत्माराम मते, गणेश मुसळे, संस्कार टिळे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
येथील स्वर्गीय निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (२०) लाल कांद्याची विक्रमी आवक नोंदवण्यात आली. या वर्षातील उच्चांकी अशी २१,५०० क्विंटल आवक झाली असली तरी डिसेंबर महिन्याच्या तुलनेत सरासरी भावात घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेने भाव कमी असल्याने शेतकरी वर्गाने बाजार भाव वाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. कांदा उत्पादनावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आहे. आज मंगळवारी बाजार आवारात एकूण १,३८६ वाहनांतून लाल कांद्याची मोठी आवक झाली. लिलावादरम्यानचे बाजारभाव किमान दर ८०० प्रति क्विंटल, सर्वोच्च कमाल दर१,७५१ प्रति क्विंटल, सरासरीदर १,५०० प्रति क्विंटल होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत बाजारभावात प्रति क्विंटल १०० रुपयांची वाढ झाली असली आहे. डिसेंबर अखेरीस असलेल्या २,१०० रुपयांच्या सरासरी दराच्या तुलनेत ५०० रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षाही भाव कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. सात दिवसात झालेली आवक २९ डिसेंबर - १५,२२५ क्विंटल ३१ डिसेंबर - १२,७४७ क्विंटल ०४ जानेवारी - १९,७५७ क्विंटल ०९ जानेवारी - १६,५०० क्विंटल १२ जानेवारी - २०,४३० क्विंटल १९ जानेवारी - २०,८६० क्विंटल २० जानेवारी - २१,५०० क्विंटल (विक्रमी)
गट, गणांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात सिल्लोड वगळता इतरत्र भाजप-शिवसेनेत युतीची घोषणा झाली होती. पण, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (२१ जानेवारी) पैठण, कन्नडसह फुलंब्रीत पक्षाकडून ऐनवेळी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे युतीची घोषणा होऊनही अनेकांनी पक्षाकडून स्वतंत्र अर्ज भरले. पैठणला शिवसेना (शिंदे गट) व भाजपची युती होऊन भाजपला बिडकीनची एकमेव जिल्हा परिषदेची जागा देण्यात आली, मात्र बुधवारी भाजपने चार एबी फॉर्म दिल्याने तीन वाजेनंतर आलेले एबी फॉर्म घेऊ नये, यासाठी शिवसेनेचे पाचोडचे जिल्हा परिषदेचे उमेदवार शिवराज भुमरे, भूषण कावसानकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत वाद झाला. काही काळ अर्ज भरण्याची प्रतिक्रिया थांबली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद टळला. ऐनवेळी भाजपकडून दत्तात्रय गोर्डे यांनी नवगाव गटातून उमेदवारी अर्ज भरत भाजपचा एबी फॉर्म जोडला. शिवाय विहामांडवा येथील उमेदवारालाही भाजपचा एबी फार्म देण्यात आला होता. भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट म्हणाले, शिवसेना-भाजपची युती झाली असून एक जागा भाजप लढत आहे. आज चार एबी फॉर्म दिले. मात्र युती तुटलेली नाही. शिवसेनेचे आ. विलास भुमरे यांनी सांगितले की, अधिकृत भाजपची यादी व एबी फॉर्म कुणाला दिले हे समोर आल्यानंतर युतीवर भाष्य करू. दोन्ही राष्ट्रवादी घडाळावर लढणार जिल्ह्यात ४१ गट, ८५ गणांत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित उमेदवार दिले. हे सर्व घडाळ चिन्हावर लढणार आहेत. फुलंब्री | काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने वरून पाथ्रीकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज भरला. तर, काँग्रेसच्या आजीनाथ सोनवणे यांनी खामगाव गणातून तुतारी हे चिन्ह घेतले आहे, तर भाजपचे खामगावचे सरपंच मनोहर सोनवणे यांनी भाजपने उमेदवारी नाकारल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यासाठी फुलंब्री तहसील कार्यालय परिसरात झालेली गर्दी.
जामडी तांडा येथील तरुण शेतकरी राजू रामचंद्र पवार यांचा अनैतिक संबंधाला कंटाळलेल्या महिलेने आपल्या मुलाच्या मदतीनेच काटा काढला असल्याचे समोर आले आहे. आठ दिवसांनंतर पोलिसांना खुनाचा उलगडा झाला असून मंगळवारी (दि. २०) रात्री उशिरा पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी (दि. २१) संशयित माय-लेकास कन्नड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जामडी फॉरेस्ट शिवारात १३ जानेवारी रोजी जामडी येथील राजू रामचंद्र पवार यांचा मृतदेह आढळला होता. मृताचा भाऊ प्रकाश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड ग्रामीण पोलिसांचे पथक तपासात गुंतले. आठ दिवस तपास सुरू राहिला. ५० पेक्षा जास्त संशयितांची चौकशी झाली. मात्र कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. मृत राजू पवार बंजारा समाजाचे असल्याने त्यांची भाषा समजणाऱ्या व्यक्तींना माहिती काढण्यासाठी नेमण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतले. तिने माहिती लपवली. मात्र विश्वासात घेतल्यावर तिने खुनाची कबुली दिली. महिलेच्या मुलाने राजूच्या डोक्यात मारले. महिलेने गुप्तांग दाबून त्याला ठार केले. मृतदेह झाडाच्या मुळाखाली पाण्यात लपवला. अंडरपँट, चप्पल, मोबाइल वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या स्थळापासून दूर विरोधी दिशेला टाकला. क्राइम पेट्रोल, सीआयडी, दृश्यम चित्रपट पाहून गुन्ह्याच्या कटाचे नियोजन महिलेच्या मुलाने केले होते.
करमाडला बसची दुचाकीला धडक:रोशनगावचा एक जण गंभीर जखमी
एसटी बसने दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि. २१) सकाळी साडेअकरा वाजता छत्रपती संभाजीनगर-जालना मार्गावरील करमाड शिवारातील शिव पेट्रोलियम पंपासमोर घडली. कारभारी शेख (५०, रा. रोशनगाव, ता. बदनापूर) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. एसटी बस (एमएच १४ एलएक्स ८८३१) अकोल्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. बुधवारी साडेअकरा वाजता बस करमाड शिवारातील शिव पेट्रोलियम पंपाजवळ येताच दुचाकी (एमएच २१ एजी ३७०७) चालकाने अचानक दुभाजकामधून वळण घेतले. या वेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या वेळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील शेख हे उंच उडून दूर फेकले गेले. त्यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले, तर दुचाकी चक्काचूर होऊन तिचे अनेक पार्ट दूरपर्यंत विखुरले गेले होते. एसटी बस ही दुभाजकावर मधोमध जाऊन अडकली. अपघाताची माहिती सोनू उकर्डे यांनी जगद््गुरू नरेंद्राचार्य महाराज ॲम्ब्युलन्सला दिली असता चालक बाळू कातखडे यांनी जखमीला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या वेळी पोलिस अंमलदार विजय जारवाल, प्रशांत नांदवे, विनोद खिल्लारे यांनी बघ्यांच्या गर्दीला दूर करीत दुभाजकाच्या मध्ये अडकलेल्या बसला क्रेनच्या साह्याने बसला दूर केले. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले.
फुलंब्री तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवार रोजी तहसील कार्यालयात जणू यात्रेचे स्वरूप आले होते. या वेळी उमेदवारी अर्ज भरताना मोठी गर्दी झाली होती तर शेवटच्या दिवशी चार जिल्हा परिषद गटासाठी ५० तर पंचायत समिती गणासाठी ११९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. फुलंब्री तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही तिरंगी लढत होण्याचे चिन्ह असून या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी झाली असून ऐन वेळेवर महायुती तुटली असून भाजपच्या वतीने सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करत बी फार्म दिला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला अनेक ठिकाणी उमेदवार मिळाले नसल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने फुलंब्री तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजेपासून मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केली होती यामध्ये १२ टेबलवर उमेदवारी अर्ज तपासणी डिपॉझिट भरणे आधी सुविधा निवडणूक गावाकडून करून देण्यात आल्या होत्या त्यानंतर तहसीलदार यांच्या दालनात निवडणूक फॉर्म भरायचे होते हे फार्म तीन वाजेपर्यंत भरण्याची मुदत असल्याने तहसीलदार यांच्या दालनासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर तहसील बाहेरही उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले तीन वाजेच्या दरम्यान तहसील कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले तर आत मध्ये चार ते साडेचार वाजेपर्यंत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामध्ये काही उमेदवारांना वेळेत बी फार्म किंवा सूचक यांच्या सह्या झाल्या नसल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या परंतु वेळेचे बंधन असल्याने निवडणूक विभागाने त्यांना आत मध्ये प्रवेश नाकारला होता.
पैठण हे ऐतिहासिक व धार्मिक शहर आहे. गोदावरीच्या काठावर दररोज शेकडो धार्मिक विधी पार पडतात. मात्र, गोदावरी घाटावर जाण्यापूर्वीच भाविकांना पार्किंगच्या नावाखाली आर्थिक लुटीला सामोरे जावे लागते. चारचाकी वाहनांसाठी १०० रुपये, तर दुचाकीसाठी ३० रुपये जबरदस्तीने आकारले जातात. कोणतीही अधिकृत पावती किंवा वाहन सुरक्षेची व्यवस्था नाही. विशेष म्हणजे शहरात तीन ठिकाणी अनधिकृतपणे खासगी पार्किंग सुरू आहे. काही ठिकाणी २०० रुपयांपर्यंत वसुली केली जाते. संत एकनाथ महाराज मंदिर परिसर आणि मोक्ष घाट येथे सध्या दोन पार्किंग सुरू आहेत. येथे वीस ते शंभर रुपयांपर्यंत सर्रास पैसे उकळले जातात. धार्मिक विधी, दशक्रिया व पूजेसाठी येणाऱ्या भाविकांची लूट थांबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याकडे आमदार विलास भुमरे यांनी लक्ष देण्याची मागणी : मोक्ष घाटाच्या प्रवेशद्वाराजवळ खासगी जागेचा आधार घेत अनधिकृतपणे पार्किंग सुरू आहे. ‘फिक्स रेट’ने पैसे वसूल केले जातात. प्रशासनाकडून ठोस कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मोक्ष घाट व नाथ मंदिर परिसरात युवकांची टोळी पैसे वसुलीत सक्रिय आहे. काही ठिकाणी दोन ते तीन युवक दमदाटी करून भाविक व कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करतात. जाब विचारल्यास वाद घालणे, शिवीगाळ करणे व मारहाणीची धमकी देण्याचे प्रकारही घडतात. धार्मिक विधींसाठी आलेले भाविक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. माहिती घेऊन अनधिकृत पार्किंग बंद करू चर्चा करून निर्णय घेऊ पल्लवी अंभोरे, मुख्याधिकारी, पैठण पैठण येथे पार्किंगमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसताu वसुली मात्र होते. छाया : रमेश शेळके या संदर्भात नगराध्यक्षा विद्या कावसाणकर यांनी सांगितले की, “या प्रकाराची माहिती घेऊन भक्त-भाविकांची कोणतीही लूट होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अनधिकृत पार्किंग बंद करण्याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल. Q. शहरात तीन ठिकाणी अनधिकृत पार्किंग सुरू आहेत. या थांबतील का? A. शहरातील कोणत्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग आहेत याची माहिती घेऊन त्या बंद करू. Q. पार्किंगच्या नावाखाली अनेक महिन्यांपासून लूट होत असताना याकडे दुर्लक्ष का होतेय? Q. संत एकनाथ महाराज मंदिरासह मोक्षघाटावर अशी पार्किंग आहे काय याची माहिती घेऊ. अनधिकृत असेल तर बंद करू. Q. पार्किंगसाठी पैसे घेतले जातात, तरीही अनेक गाड्या या ठिकाणाहून चोरी का होतात? A. पार्किंग अधिकृत असेल तर वाहने सुरक्षित राहणे महत्त्वाचे आहे. सर्व पार्किंगची माहिती घेऊन कारवाई करू. पार्किंगसाठी कोणतीही अधिकृत व्यवस्था नसताना “आम्ही कंत्राट घेतले आहे” असा बनाव करून काही युवक थेट वाहनधारकांची फसवणूक करत आहेत. कोणतीही प्रशासनाची पावती नसताना पैसे घेतले जातात. याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वारकऱ्यांनी केला आहे.
शहराच्या प्रथम नागरिकत्वाचा मान म्हणजेच महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याचा फैसला आज गुरुवारी (२२ जानेवारी) होणार आहे. राज्यातील २९ महापालिकांच्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत. महापालिका निवडणुकीत ५७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपमध्ये अनुसूचित जमाती वगळता सर्व प्रवर्गांत तगडे उमेदवार आहेत. शहर भाजपचे नेतृत्व करणारे बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांची भूमिका महापौर निवडीत अत्यंत कळीची ठरणार आहे. असे असतानाही अनेक इच्छुकांनी थेट मुंबई गाठून वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री खा. डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे आणि आ. संजय केणेकर यांच्या माध्यमातून स्वतःचे नाव पुढे करण्यासाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी केली आहे. आरक्षण काहीही निघो, भाजप सज्जच एखादा उमेदवार खुल्या प्रवर्गातून निवडून आला असला तरी त्याच्याकडे राखीव प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र असल्यास तो आरक्षित जागेवर दावा करू शकतो. तसेच खुल्या प्रवर्गासाठी कोणत्याही राखीव प्रवर्गातील उमेदवार अर्ज भरू शकतो. त्यामुळे भाजपकडे उमेदवारांची कमतरता नाही, मात्र ‘बंडखोरी’ टाळून सर्वांचे समाधान करणे हे नेत्यांसमोर आव्हान असेल. “मी शहरातच, अफवांकडे दुर्लक्ष करा’ “महापौरपदासाठी मी कोणतीही लॉबिंग केलेली नाही. मी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटायला मुंबईला गेल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत, त्या चुकीच्या आहेत.-अनिल मकरिये, नगरसेवक, समर्थनगर. पक्षीय ताकद आणि प्रवर्गनिहाय तगडे उमेदवार भाजपकडे ५७ स्वतःचे आणि ५ अपक्ष अशा ६२ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने भाजपचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. खुला प्रवर्ग (पुरुष): राजगौरव वानखेडे, महेश माळवतकर, विजय औताडे, गणेश नावंदर, शिवाजी दांडगे, रामेश्वर भादवे, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सुनील जगताप, अप्पासाहेब हिवाळे, रेणुकादास वैद्य. खुला प्रवर्ग (महिला): सुवर्णलता पाटील, ज्योती जैन, मोहिनी गायकवाड, अर्चना चौधरी, ॲड. माधुरी अदवंत, अनिता मानकापे, सुमित्रा मात्रे, सत्यभामा शिंदे, मुक्ता ठुबे, प्रियंका खोतकर, सविता कुलकर्णी, सुनीता साळुंके. ओबीसी (पुरुष व महिला): रामदास हरणे, मयूर वंजारी, राजू वाडेकर, सुरेखा सानप, मीना खरात, कीर्ती शिंदे यांसह २० उमेदवार शर्यतीत आहेत. अनुसूचित जाती (पुरुष व महिला): जिवकपाळ हिवराळे, चंद्रकांत हिवराळे, जालिंदर शेंडगे, भारती सोनवणे, आशा नरेश भालेराव, सीमा साळवे यांसारखे १४ चेहरे उपलब्ध आहेत.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या ५६ व्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्रात ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटी रुपयांचे ८१ सामंजस्य करार झाले. यातून ४२ लाख रोजगार निर्माणहोणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्राच्या औद्योगिक इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दावोसमधून आलेली ही सर्वात गुंतवणूक मोठी घोषणा असल्याचे म्हटले जात आहे. कारण २०२१ ते २५ या ५ वर्षांत सुमारे २२ लाख कोटींचे करार झाले होते. अदानी समूहाने राज्याच्या प्रगतीसाठी ६६ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे ६,०५,०२२ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ‘मास्टर प्लॅन’ सादर केला. यात प्रामुख्याने धारावी पुनर्विकास, पायाभूत सुविधा, हरित उर्जा, तंत्रज्ञान प्रकल्पात ही गुंतवणूक असेल. पायाभूत सुविधा, हरित ऊर्जा आणि तंत्रज्ञानात अदानी समूह राज्याचा ‘दीर्घकालीन धोरणात्मक भागीदार’ म्हणून काम करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे आगामी ७ ते १० वर्षांत महाराष्ट्राचे आर्थिक चित्र पूर्णपणे पालटणार आहे. राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी ही गुंतवणूक मैलाचा दगड ठरेल, असे फडणवीस म्हणाले. संभाजीनगरात १७,७०० कोटींची गुंतवणूक विभाग करार संख्या गुंतवणूक रक्कममुंबई महानगर प्रदेश ३७ २३,९३,३०० लाख कोटीइतर विभाग ७ ७२,७२० लाख कोटीकोकण ११ ३,१०,८८६ लाख कोटीनागपूर ०९ १,९५,९५० लाख कोटीनाशिक ०७ ३०,१०० कोटीछत्रपती संभाजीनगर ०२ १७,७०० कोटीपुणे ०४ ३,२५० कोटीअमरावती ०१ १,००० कोटी काँग्रेसकडून श्वेतपत्रिकेची मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष, खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दावोस दौरा जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. लोढा डेव्हलपर्स, रहेजासारख्या मुंबईस्थित कंपन्यांच्या करारासाठी दावोसला जाण्याची गरज काय? गुंतवणूक, रोजगारावर सरकारने श्वेतपत्रिका काढावी. एमएमआरडीए: ९.५ लाख कोटींचे करार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) १२ जागतिक संस्थांसोबत ९.५२ लाख कोटींचे सामंजस्य करार केले. यामुळे मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ९.५ लाख थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. भारतीय कंपन्यांच्या विदेशी भागीदारांमुळे दावोसला करार केले जातात : फडणवीस “मुंबईत मंत्रालयाऐवजी दावोसला करार का?’ या विरोधकांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, दावोसला जगभरातील मोठे उद्योजक येतात. भारतीय कंपन्यांच्या विदेशी भागीदारांना आणि संचालक मंडळाच्या सदस्यांना कराराच्या वेळी उपस्थित राहण्याची इच्छा असते. हे सर्व सदस्य मुंबईत येऊ शकत नाहीत, परंतु दावोसमध्ये ते सहज उपलब्ध असतात. म्हणून तेथे करार केले जातात. अदानी समूह ७ वर्षांत ६ लाख कोटी रुपये गुंतवणार जामनेरमध्ये कोका-कोलाचा प्रकल्प येणार जामनेर एमआयडीसीत (जळगाव) ‘कोका-कोला’ कंपनी प्रकल्प उभारणार आहे. फडणवीसांनी कोका-कोलाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्टझमन यांची भेट घेऊन यावर शिक्कामोर्तब केले. याविषयी महाजन म्हणाले की, या प्रकल्पामुळे तालुक्याच्या विकासाला मोठी गती मिळेल.
कल्याण-डोंबिवली मनपात मनसेच्या सर्व ५ आणि उद्धवसेनेच्या ११ पैकी ४ नगरसेवकांनी चक्क शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसच्या दोघांनीही बाहेरून पाठिंबा दिल्याने ५० नगरसेवक असलेल्या भाजपला बाजूला ठेवून शिंदेसेनेचा महापौर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १२२ जणांच्या सभागृहात शिंदेसेनेकडे ५३ नगरसेवक आहेत. दरम्यान, मनसे-शिदेसेना हातमिळवणीने उद्धव-राज ठाकरेंमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यांनी मुंबईत एकत्र निवडणूक लढवली असली तरी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी केली आहे. मनसेच्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी उद्धवसेनेने केली आहे. तर हा स्थानिक पातळीवरचा निर्णय असल्याचा दावा मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी केला आहे. दुसरीकडे या घडामोडीवर भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. परंतु, सूत्रांनी सांगितले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने होत असलेल्या या फोडाफोडीने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. राजकीय स्थिरतेसाठी पाठिंबा दिल्याचा पाटील यांचा दावा मनसेचे माजी आमदार राजू पाटील म्हणाले की, राजकीय परिस्थितीत स्थिरता राखण्यासाठीच मनसेनं महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून, हा निर्णय कोणत्याही वैयक्तिक स्वार्थातून घेतलेला नाही. राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच हा निर्णय घेतला. भविष्यात काहीही होऊ शकते : बाळा नांदगावकर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, “भविष्यात काहीही होऊ शकते. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. कोणीही मित्र वा शत्रू नसतो. कोणतीही गोष्ट करताना नकारात्मक बघून चालत नाही. राज ठाकरेंनी हकालपट्टी करावी : खा. संजय राऊत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, शिंदेसेनेसोबत जाणारे बेईमान, महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यांच्यामुळे राज ठाकरे व्यथित आहेत. अंबरनाथला काँग्रेसने केली तशी कारवाई राज यांनी करावी. मुंबईसह सत्ता आणि राज्यात प्रभाव नसल्याचा परिणाम राज ठाकरे पुढे काय करतील?-विकासकामे महत्त्वाची असा यूटर्न घेऊन ते कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवकांचे समर्थन करू शकतात.हा मुंबईचा ट्रेलर आहे का?-आताच तसे म्हणणे काहीसे चुकीचे ठरेल. मात्र, मनसेचे ६ नगरसेवक महायुतीला बाहेरून पाठिंबा देऊ शकतात किंवा मतदानावर बहिष्कार टाकू शकतात.उद्धव ठाकरेंपुढे काय पर्याय आहे?-भाजप, शिंदेसेनेवर आगपाखड करत आपल्या नगरसेवकांना बंदिस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंनी राज्यातील इतर मनपाकडे लक्ष दिले नाही. आता मुंबईत सत्ता नाही. राज्यात प्रभाव नाही. त्याचा परिणाम लगेच दिसून येत आहे.मुंबई महापालिकेत भाजप-शिंदेसेनेतही फाटाफूट होईल का?-कल्याण-डोंबिवली, ठाण्यात तसे होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, दिल्लीतून सुरू असलेल्या हालचाली पाहता मुंबईत फाटाफुटीची शक्यता अत्यंत धूसर आहे. २९ महापौरपदांसाठी आज सोडत, मुंबईकडे सर्वाधिक लक्ष मुंबई | मुंबईसह राज्यातील २९ महापौरांच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता मंत्रालयात निघणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबईचे आरक्षण काय निघणार, यावर देशाचे लक्ष लागले आहे. कारण मुंबईत अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी २ राखीव जागांवर उद्धवसेनेचे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे निवडून आले आहेत. महायुतीत सर्वाधिक ८९ जागा जिंकणाऱ्या भाजपकडे किंवा २९ जागा असलेल्या शिंदेसेनेकडे या प्रवर्गातील नगरसेवकच नाही. त्यामुळे मुंबईचे महापौरपद ‘एसटी’ प्रवर्गासाठी आरक्षित झाले तर महायुतीसमोर मोठा राजकीय पेच उभा राहू शकतो.
गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले हत्या प्रकरणात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्रीराम गावंडेसह १० आरोपींना अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाच जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. साडेसहा वर्षांनंतर बुधवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. ६ मे २०१९ रोजी धर्मादाय आयुक्त कार्यालयात एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी आले असताना संस्थेच्या सभासद नोंदणी आणि मालमत्तेच्या वादातून दुपारी पावणेबाराच्या सुमारास किसनराव हुंडीवाले यांची क्रूरपणे हत्या केली होती. यात १५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. तिघांची साक्ष पूरक ठरल्याने गुन्हा सिद्ध या घटनेतील मृत किसनराव हुंडीवाले यांचे पुत्र प्रवीण किसनराव हुंडीवाले, फिर्यादीचे वकील ॲड. नरेंद्र धूत आणि पोलिस कॉन्स्टेबल राजेश वानखडे यांची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली. आरोपींनी हुंडीवालेंच्या डोक्यात अग्निशमन यंत्राने वार केले. त्यांच्या डोळ्यात टोचे घालून क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे सबळ पुराव्यानिशी ॲड. उज्ज्वल निकम यांनी सिद्ध केले. यात तीन प्रत्यक्ष साक्षीदारांच्या साक्ष एकमेकांना पूरक ठरल्या. घटना घडल्यानंतर तातडीने किसनराव हुंडीवाले यांचे पुत्र प्रवीण हुंडीवाले यांनी शहरातील एका दूरचित्र वाहिनीला दिलेली मुलाखत न्यायालयाने ग्राह्य धरली.
शिवसेना-भाजप युतीची जिल्हा परिषदेत घोषणा करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने पक्षाचा राजीनामा देऊन इतर पक्षात कोलांटउड्या घेऊन तिकीट मिळवले आहे. जिल्हाभरात पक्षांतर करून सुमारे २५ पेक्षा अधिक उमेदवारांनी पक्षाकडून फॉर्म भरले आहेत. त्यामुळे युती आणि आघाडी फक्त कागदावरच राहिले. छत्रपती संभाजीनगरात २५ जागेवर शिवसेना आणि २७ जागेवर भाजप अशी युतीची घोषणा झाली होती, तर उद्धवसेनेकडून ३०, काँग्रेस २२, वंचित ६ आणि राष्ट्रवादी ५ अशी महाविकास आघाडीमध्ये जागेचे वाटप झाले होते. दोन्ही राष्ट्रवादी एकाच चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख आणि शरद पवार पक्षाचे ख्वाजा शरीफउद्दीन यांनी सांगितले. ४१ गटात तर ८५ गणामध्ये आम्ही उमेदवार दिले असून या कालावधीत इतर पक्षाचे मातब्बर उमेदवार आमच्याकडे आले असून त उमेदवारी दिल्याचे ते म्हणाले. फुलंब्री, कन्नड, पैठणमध्ये बंडखोरी पैठणमध्ये ९ पैकी शिवसेना ८ आणि भाजपला बिडकीन गट सुटला होता. मात्र पैठण तालुक्यात नवगाव गटात दत्ता गोर्डे यांच्या आई चंद्रकला राधाकिशन गोर्डे यांनी फॉर्म भरला. बिडकीन भाजपसाठी सुटला असताना शिवसेनेनेदेखील उमेदवारी अर्ज भरला. कन्नड आणि फुलंब्रीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पश्चिममध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले. एमआयएमकडूनची सूची जाहीर जि. प. तथा पंचायत समिती निवडणुकीसाठी एमआयएमने उमेदवारांची २४ जागांची सूची जाहीर केली आहे. यात सहा गटांमध्ये तीन नॉन मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. उर्वरित १८ गणांमध्ये पक्षाने मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. सूची जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकीय वातावरणात चुरस वाढली असून त्याचा आगामी निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपने केवळ तीन बी फॉर्म दिले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती करण्यात आली आहे. फुलंब्री तालुक्यात दोन, तर कन्नड तालुक्यातील एका गटात उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अद्याप विलंब असून कुणी बंडखोरी केली असेल तर त्यावर तोडगा काढू,-अतुल सावे, मंत्री. ऐनवेळी युतीची घोषणेमुळे पंचाईत मागील १० वर्षांपासून जिल्हा परिषदसाठी सर्वच पक्षातील इच्छुक तयारी करत होते. ऐनवेळी युतीची घोषणा झाली. त्यामुळे अनेकांनी आता बंडखोरी केली. आता बंडखोरांना आवरणे कठीण झाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी हात टेकले. बंडखोरांना मागे घेण्यासाठी आग्रह केला जात नाही. ...म्हणून आम्हीही अर्ज भरले आम्ही युतीसाठी एकत्रित जागा लढण्याबाबत घोषणा केली होती. मात्र ऐनवेळी भाजपकडून कन्नड, फुलंब्री, पैठण आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यात फॉर्म भरण्यात आले. त्यामुळे आमच्याकडूनदेखील आम्ही अर्ज भरले आहेत. -संजय शिरसाट, पालकमंत्री. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश छत्रपती संभाजीनगर| जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आणि ७ फेब्रुवारीची मतमोजणी लक्षात घेता हे कडक पाऊल उचलण्यात आले आहे. निवडणूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. मतदान केंद्रांवर काय निषिद्ध? ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास (जमावबंदी) मनाई करण्यात आली आहे. केंद्रात मोबाईल, कार्डलेस फोन, वायरलेस सेट, लाऊडस्पीकर आणि स्फोटक वस्तू नेण्यास पूर्णपणे बंदी असेल.
अजबनगर-खोकडपुरा प्रभागातून भाजपने यश मिळवले आहे. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांचा भाजपचे रामेश्वर भादवे यांनी पराभव केला. या लढतीचे वैशिष्ट्य म्हणजे, भादवे यांना रोखण्यासाठी उद्धवसेना गटाने त्यांच्या सासूबाईंनाच मैदानात उतरवले होते, मात्र जावयाने ही राजकीय कोंडी फोडत विजय खेचून आणला. अंबादास दानवे यांनी आपले बंधू राजेंद्र दानवे यांच्या विजयासाठी भाजप उमेदवार रामेश्वर भादवे यांच्या सासूबाई यशोदा सतीश कटकटे यांना उमेदवारी देऊन मोठी खेळी केली होती. मात्र, मतदारांनी भादवे यांच्यासह भाजपच्या पूर्ण पॅनलवर विश्वास दर्शवला. मतदारांचा कौल एकतर्फी राजेंद्र दानवे आणि यशोदा कटकटे या दोघांनाही दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता आली नाहीत. उबाठाचे उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर एमआयएम आणि राष्ट्रवादीचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. या निकालाने अजबनगरमध्ये भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दानवेंची रणनीती अपयशी भावाला निवडून आणण्यासाठी अंबादास दानवे यांनी माजी नगरसेवक सतीश कटकटे यांच्या पत्नीला (भाजप उमेदवाराच्या सासूला) उमेदवारी देऊन भादवे यांची अडचण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही रणनीती मतदारांनी पूर्णपणे नाकारली.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना डिसेंबरचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थींना डिसेंबर २०२५ चा लाभ मतदानापूर्वीच खात्यात जमा होणार आहे. तसेच तांत्रिक चुकांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १ जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा १५०० हजार लाभ देण्यात आला होता. डिसेंबरचा लाभ मकरसंक्रातीला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र १५ जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका असल्याने विरोधी पक्षांनी हरकत घेतली हेाती. त्यामुळे डिसेंबरचा लाभ थांबवण्यात आला होता. आता ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानापूर्वीच बहिणींच्या खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये जमा होणार आहेत. सामाजिक न्याय विभागाचा हा निधी प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य व पोषणासाठी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने २८ जून २०२४ रोजी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना १ जुलै २०२४ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. विशेष म्हणजे, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता (३००० रुपये) रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यात जमा करून या योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ झाला. मात्र, आता योजनेत अडचणी येत आहेत. ई-केवायसी अर्जामध्ये कुटुंबातील कुणी सरकारी नोकरीत नाही ना, असा प्रश्न विचारण्यात आला होता. नकारात्मक पद्धतीने हा प्रश्न विचारण्यात आल्याने अनेक महिलांचा गोंधळ झाला. अनेक महिलांनी चुकीची माहिती नोंदवल्याने त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक असल्याचे सिस्टिममध्ये दिसून आले. परिणामी त्यांची पात्रता तात्पुरती रद्द झाली आहे. त्यामुळे महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते अडकून पडले आहेत. तांत्रिक कारणाचा फटका सुमारे २४ लाख महिलांना सहन करावा लागला आहे. मात्र, आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांचे अडकलेले हप्ते युद्धपातळीवर जमा केले जाणार आहेत. केवायसी चुकलेल्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी काही कारणास्तव ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरचद याची तपासणी होणार आहे. - अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादावर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नवा ट्विस्ट समोर आला आहे. राज्य शासनाने २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजवंदनासाठी अधिकृत यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे रायगडमध्ये यापूर्वी मंत्री अदिती तटकरे यांना जो मान दिला जात होता तो यंदा भरत गोगावलेंकडे गेल्याने तटकरेंना मोठा झटका बसला आहे, तर नाशिकमध्येही दादा भुसे यांची नाराजी बाजूला सारत गिरीश महाजन यांच्याकडेच ध्वजवंदनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, यंदाच्या वर्षी गोगावले रायगडमध्ये ध्वजवंदन करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे. गोगावलेंची वारंवार नाराजी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यापासून शिंदेसेनेचे भरत गोगावले आक्रमक झाले होते. “रायगडवर आमचा दावा आहे,’ असे म्हणत त्यांनी आपली नाराजी वारंवार बोलून दाखवली होती. १ मे महाराष्ट्रदिनी नाशिकमध्ये गिरीश महाजन, तर रायगडमध्ये महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन पार पडले होते. प्रत्येक वेळी शासकीय सोहळ्यांमध्ये तटकरे यांना मिळणाऱ्या मानामुळे शिंदे गटात अस्वस्थता होती.
नागपूर : टी-२० वर्ल्डकपचा बिगुल वाजण्यापूर्वी भारतीय संघाची टी-२० क्रिकेटमध्ये विजयाची मालिका सुरू आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच सामन्यात भारताने ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर किवींना धूळ चारत टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी मैदानात फटकेबाजी केली. निर्धारित २० षटकांत भारताने ७ गडी […] The post न्यूझीलंडविरुद्ध विजयी सलामी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लिव्ह इनमध्ये पत्नीचा दर्जा मिळाला तरच महिला सुरक्षित
चेन्नई : वृत्तसंस्था लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणा-या महिलांना पत्नीचा दर्जा मिळाल्यासच त्यांना संरक्षण मिळेल, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केली आहे. अशा नात्यांमधील महिलांना वैवाहिक सुरक्षेची कमतरता असते. त्यामुळे संरक्षण देण्याची जबाबदारी न्यायालयाची असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती एस. श्रीमती यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना हे निरीक्षण नोंदवले. पुरूषावर महिलेसोबत लिव्ह इन […] The post लिव्ह इनमध्ये पत्नीचा दर्जा मिळाला तरच महिला सुरक्षित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विठ्ठलराव कोल्हे विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा
जळकोट : प्रतिनिधी जळकोट येथून जवळच असलेल्या जांब बु येथील कै. विठ्ठलराव कोल्हे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वंय शासन दिन साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी संपूर्ण शाळा आपल्या हातात घेतली होती, विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरित्या शाळा चालवून दाखवली. मुख्याध्यापक म्हणून जान्हवी धनराज मोरे, उपमुख्याध्यापक वैष्णवी दयानंद कानगुले, पर्यवेक्षक म्हणून राजसुंदरी मुंडकर, कारकून म्हणून प्रांजली […] The post विठ्ठलराव कोल्हे विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर जि. प., पं. स. निवडणूक, गटांसाठी ४० तर गणांसाठी ४६ नामनिर्देशनपत्र दाखल
रेणापूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रेणापूर तालुक्यात ४ जिल्हा परिषद गटातून ४० व ८ पंचायत समिती गणांमधून एकूण ४६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी संदिप कुलकर्णी यांनी दिली. रेणापूर तालुक्यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी […] The post रेणापूर जि. प., पं. स. निवडणूक, गटांसाठी ४० तर गणांसाठी ४६ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर तालुक्यात १० गटांसाठी ७६ तर २० गणासाठी १२५ नामनिर्देशन दाखल
लातूर : प्रतिनिधी तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट व २० पंचायत समिती गणांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या बुधवार दि. २१ जानेवारी रोजीच्या शेवटच्या दिवशी ७६ जणांनी गटांसाठी तर १२५ जणांनी गाणांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले. शहरातील तहसील कार्यालयातील निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात लातूर तालुक्यातील १० गटांसाठी व २० गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. […] The post लातूर तालुक्यात १० गटांसाठी ७६ तर २० गणासाठी १२५ नामनिर्देशन दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात अमृत महोत्सव निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा
लातूर : प्रतिनिधी येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयातील अंतरिक गुणवत्ता हमी कक्ष आणि हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन विशेष औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांचा ७५ वा अमृत महोत्सव आणि १० जानेवारी विश्व हिंदी भाषा दिवस यांचे निमित्त साधून हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासकीय […] The post श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात अमृत महोत्सव निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेत किरण कुलकर्णी राज्यात तृतीय
लातूर : प्रतिनिधी येथील के. के. ग्राफिक्सचे संचालक किरण कुलकर्णी यांनी राज्यस्तरीय लोगो डिझाइन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योगजगत विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय लोगो डिझाइन स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. […] The post राज्यस्तरीय लोगो डिझाईन स्पर्धेत किरण कुलकर्णी राज्यात तृतीय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पथनाट्यातून मांडली श्री गुरू तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाची गाथा
लातूर : प्रतिनिधी ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त लातूर जिल्हा शिक्षण विभागामार्फत ‘हिंद दी चादर’ पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून श्री गुरु तेग बहादूरजी यांची जीवनगाथा उभी केली. हा उपक्रम श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अमर बलिदानाची आठवण करून […] The post पथनाट्यातून मांडली श्री गुरू तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाची गाथा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन स्थगित:स्थानिक मागण्या मान्य, अन्य मागण्या संदर्भात आश्वासन
पालघर जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, आदिवासींनी जल, जमीन आणि जंगल या प्रश्नांसाठी साठ किलोमीटरचा लाँग मार्च काढला. सुमारे ४० हजार लोकांनी त्यात भाग घेतला. दोन दिवसांच्या आक्रमक आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने सहा तास आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर त्यातून काही प्रश्न मार्गी लागले, तर काही प्रश्न तीन महिन्यांत सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालचे आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रश्न तीन महिन्यात सुटले नाहीत, तर पुन्हा मोठे आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. कष्टकऱ्यांचे आणि आदिवासींचे प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होते. जल, जमीन आणि जंगलाशी निगडित या समस्या सुटाव्यात, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वारंवार आंदोलन केली; परंतु आश्वासनापलीकडे त्यांच्या हाती काही पडले नव्हते. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड डॉ. अजित नवले, मरियम ढवळे आणि आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली साठ किलोमीटरचा लॉन्ग मार्च काढण्यात आला. सव्वासहा तास चर्चा चारोटीपासून सुरू झालेल्या ‘लाँग मार्च’ मुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांनी वेढा घातल्याने पालघर-बोईसर मार्ग बंद झाला होता. शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली. ठाणे-पालघर जिल्हा कृती समितीच्या चर्चा केली. सव्वासहा तास चाललेल्या चर्चेतून काही प्रश्न मार्गी लागले, तर काही प्रश्न कालबद्ध पद्धतीने सोडवण्याचे आश्वासन देणारे पत्र जिल्हा प्रशासनाने दिले. त्यानंतर आ. निकोले, डॉ. ढवळे यांनी हे आंदोलन पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. वनपट्टयांची पाहणी करणार वाढीव वनपट्टे कसणाऱ्यांना देण्यासंदर्भात केलेली मागणी जिल्हा प्रशासनाने मान्य केली आहे. त्यासाठी प्रत्यक्षात जागेवर जाऊन पाहणी करून वाढीव क्षेत्राचा आढावा करण्यात येणार आहे. वरकस जमिनी, देवस्थानच्या जमिनी, गायरान जमिनी तसेच अन्य जमिनी संबंधितांच्या नावावर करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती प्रत्यक्षात पाहणी करून तिच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येईल, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले. तळघर दावे तयार करणार वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय जमिनीवर घर असणाऱ्या आदिवासी, कष्टकऱ्यांच्या नावावर या घराची जमीन करण्यासाठी तळघर दावे तयार करण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा तयार करण्यात आला असून हे काम करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. शेतकरी, आदिवासींचा ‘स्मार्ट मीटर’ला असलेला विरोध लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर तशी चर्चा करण्यात येणार आहे. ‘स्मार्ट मीटर’ लावण्यासाठी बळबजरी केली जाणार नाही, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. पालघर जिल्हा ‘स्मार्ट मीटर’ योजनेतून वगळावा, यासाठी जिल्हा प्रशासन वरिष्ठांशी संपर्क साधणार आहे. जलजीवन योजना वर्षअखेरीस पूर्ण करणार ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली कामे या वर्षअखेर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले; याशिवाय जिल्ह्यातील विविध धरणांचे पाणी शेती व पिण्यासाठी राखून ठेवण्यासाठी एक योजना तयार करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क असून या कामाची मजुरी वेळेवर देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे जिल्हा प्रशासनाने झालेल्या चर्चेत मान्य केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मागणी केल्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानातून प्रत्येक कुटुंबाला तीन किलो तांदूळ दोन किलो गहू देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने दाखवली. दर तीन महिन्यांनी आढावा बैठक त्याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी कंत्राटी शिक्षकांची विशेष भरती मोहीम राबवण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मागणी केलेल्या विविध स्थानिक पातळीवरील प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. तसेच उर्वरित मागण्या तीन महिन्यांत मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाने ‘लाँग मार्च’ तसेच घेराव आंदोलन तीन महिने स्थगित करण्याची घोषणा आमदार निकोले यांनी केली. वाढवण बंदर व मुरबे बंदर रद्द करण्याबाबत आंदोलकांच्या मागण्या राज्य सरकारला कळवण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले. आदिवासी भागातील अनेक लहान लहान प्रश्न असून अधिकारी वर्गाशी समन्वय वाढावा, यासाठी दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. तसे आश्वासन आंदोलनकर्त्यांना यावेळी देण्यात आले.
साताऱ्यात भाजपाचा 'एल्गार':जिल्हा परिषदेच्या 60 तर पंचायत समितीच्या 118 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. सकाळपासून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केल्याने अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी झाली होती. सातारा जिह्यात भाजपाने तब्बल 60 ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी अर्ज भरले असून पंचायत समितीसाठी 118 ठिकाणी अर्ज भरले आहेत. एकनाथ शिंदे गटाचे नेते एबी फॉर्म वाटून चक्क आजारी पडल्याने माहिती समजू शकली नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाने 18 जिल्हा परिषद गट आणि 26 गणात उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी अजितदादा गटानेही अर्ज मोठया संख्येने भरलेले आहेत. त्यांची आकडेवारी समजू शकली नाही. दरम्यान, अर्ज छाननी दि. 22 रोजी असून दि. 23 ते 27 दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने त्या दरम्यान निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सातारा आणि जावली तालुक्यात भाजपाचे एबी फॉर्म म्हसवे गटातून वसंतराव मानकुमरे, कुडाळ गटातून जयश्री गिरी, कुसूंबी गटातून अर्चना रांजणे, पाटखळ गटातून अॅङ गौरी नलावडे, लिंब गटातून सर्जेराव सावंत, खेड गटातून संदीप शिंदे, कोडोली गटातून निता बाळासाहेब खरात, कारी गटातून राजू भोसले, शेंद्रे गटातून पूजा मोरे, वर्णे गटातून वैभव चव्हाण, नागठाणे गटातून अजित साळुंखे तर गणासाठी खर्शी बारामुरेतून गोरखनाथ महाडिक, म्हसवेतून रेश्मा पोफळे, कुडाळमधून सौरभ शिंदे, सायगावमधून चारुशिला पवार, आंबेघर तर्फ मेढामधून विजय सपकाळ, कुसुंबीतून पुष्पा चिकणे, शिवथरमधून किशोर शिंदे, पाटखळमधून राहुल शिंदे, लिंबमधून प्रभाकर पवार, कोंडवेतून महेश गाडे, खेडमधून मधू कांबळे, क्षेत्र माहुलीतून स्वाती जाधव, कोडोलीतून रामदास साळूंखे, संभाजीनगरमधून विजया साळूंखे, परळीतून वसंतराव भंडारे, कारीतून शोभा लोटेकर, निनाम मधून प्रमिला सुतार, शेंद्रेतुन कोमल दळवी, वर्णेतुन साक्षी माने, अपशिंगेतून मानसिंग मोरे, नागठाणेतून राजेंद्र ढाणे, अतितमधून सुषमा जाधव यांना तिकीट दिले असून त्यांनी उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे.
टोळक्याने दहशत माजवून 23 वाहनांची तोडफोड:पुण्यात तळजाई वसाहतीत मध्यरात्रीची घटना, एकाला अटक
पुणे शहरात पद्मावतीतील तळजाई वसाहतीत टोळक्याने २३ वाहनांची तोडफोड केली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मावतीतील तळजाई वसाहतीत राहणाऱ्या एका तरुणाचा आरोपींशी वाद झाला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास तरुण तळजाई वसाहत परिसरातून जात असताना आरोपींनी त्याला अडवून मारहाण केली. तरुण त्यांच्या तावडीतून पळून गेल्यानंतर, टोळके खंडाळे चौकात त्याचा पाठलाग करत आले. आरोपींनी कोयते आणि बांबू उगारून परिसरात दहशत माजवली. त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करत टेम्पोसह अनेक दुचाकींची तोडफोड केली. तोडफोडीची घटना सुरू असताना भयभीत झालेल्या नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. सहकारनगर पोलिसांनी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले की, वैयक्तिक वादातून ही घटना घडली असून, एकाला अटक केली आहे आणि इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर तळजाई वसाहतीतील रहिवासी दहशतीखाली आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यातही तळजाई वसाहतीत अशाच प्रकारे टोळक्याने वाहनांची तोडफोड केली होती. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. वैयक्तिक वादातून तोडफोड तळजाई वसाहतीत टोळक्याने १५ ते १६ वाहनांची तोडफोड केली. वैयक्तिक वादातून ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून, साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. - मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन
अमरावतीत तिसरे अ. भा. एल्गार मराठी गजल संमेलन:7 आणि 8 फेब्रुवारी रोजी आयोजन
अमरावती येथे ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी तिसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात महाराष्ट्रातील दीडशेहून अधिक गजलकार सहभागी होणार आहेत. हे संमेलन येथील श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात पार पडेल. सुरेश भट प्रतिष्ठान आणि वसंतराव पालेकर प्रतिष्ठान यांनी या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले आहे. प्रसिद्ध गजलकार सीए नाना लोडम यांची या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, प्रसिद्ध कवी व गजलकार वैभव जोशी हे संमेलनाचे अध्यक्ष असतील. मुंबईचे डॉ. राम पंडित यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन केले जाईल. या संमेलनात एकूण १३ मराठी गजल मुशायरे आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय, एक तरन्नूम मुशायरा, परिसंवाद आणि गजल गायन मैफिलही रंगणार आहे. संमेलनाध्यक्ष वैभव जोशी यांची 'सोबतीचा करार' ही विशेष मैफल देखील होणार असल्याचे लोडम यांनी स्पष्ट केले. यावेळी शाहीर सुरेशकुमार वैराळकर (पुणे), दगडू दादा लोमटे (अंबाजोगाई), संतोष बोरगावकर, डॉ. गणेश गायकवाड, शिवाजी जवरे आणि निवृत्त माहिती महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन अमरावती जिल्ह्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास लोडम यांनी व्यक्त केला. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. यात स्वागताध्यक्ष नाना लोडम, प्रसिद्ध वऱ्हाडी कवी नितीन देशमुख, अनंत नांदुरकर-खलीश, नवोदित गजलकार नितीन भट, कवी संजय इंगळे तिगावकर यांचा समावेश आहे. सहसमन्वयक म्हणून संदीप देशमुख, मारुती मानमोडे, निलेश कवडे, अजिज खान पठाण आणि रेणुका पुरोहित हे जबाबदारी सांभाळत आहेत. अमरावती शहर हे विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते आणि कविवर्य सुरेश भट यांची ही गृहनगरी आहे. या शहरात मराठी गजलेची एक समृद्ध मेजवानी रसिकांना मिळणार आहे. शंभर वर्षांपूर्वी विदर्भ साहित्य संघाची स्थापना याच शहरात झाली होती, तसेच प्रसिद्ध मराठी गजलकार भीमराव पांचाळे हे देखील याच जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
अमरावती बाजारात सोयाबीनची आवक वाढली:दिवसभरात 5808 क्विंटलचे व्यवहार, दरात तेजी कायम
अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल ५ हजार ८०८ क्विंटल सोयाबीनचे व्यवहार झाले. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५२५० ते ५४०० रुपयांचा दर मिळत असून, दरातील तेजीमुळे शेतकरी खाजगी बाजाराला प्राधान्य देत आहेत. यावर्षी अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा सामना करूनही अनेक सोयाबीन उत्पादकांनी आपले पीक वाचवले. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या प्रतीक्षेत सोयाबीन साठवून ठेवले होते. आता बाजारात चांगला दर मिळत असल्याने त्यांनी विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे आवक वाढली आहे. केंद्र शासनाने यावर्षी सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ५ हजार ३०० रुपये आधारभूत मूल्य निश्चित केले आहे. बडनेरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपकेंद्रात यासाठी शासकीय खरेदी केंद्रही उघडण्यात आले आहे. मात्र, शासकीय खरेदीनंतर रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने सोयाबीन उत्पादक खाजगी बाजारातच आपली विक्री करत आहेत. बुधवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण ७ हजार ३०६ क्विंटल धान्याची आवक झाली. यात सोयाबीन ५८०८ क्विंटल, तूर १०२३ क्विंटल, मका ३२१ क्विंटल, हरभरा ९१ क्विंटल, तीळ ४४ क्विंटल, उडीद १३ क्विंटल आणि गहू ६ क्विंटल यांचा समावेश होता. ही सर्व आवक २०७ वाहनांमधून झाली. ज्वारी आणि मूगाची आवक झाली नाही. दरम्यान, 'पांढरं सोनं' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसालाही सध्या चांगला भाव मिळत आहे. अमरावतीमध्ये कापसाचे भाव प्रतिक्विंटल ७९०० ते ८१०० रुपये असून, सरासरी दर ८००० रुपये प्रतिक्विंटल आहे. जिल्ह्याच्या काही भागांत हा दर ७९०० ते ८०५० रुपयांपर्यंत नोंदवला गेला. गतवर्षीच्या तुलनेत हे दर अधिक असल्याने कापूस उत्पादकही समाधानी आहेत. बाजारातील आवक आणि कापसाच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये बदल होऊ शकतो.
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या सर्व पाचही विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली आहे. तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. या निवडीमुळे नगरपंचायतीच्या कामकाजाला नवीन ऊर्जा मिळेल आणि शहरातील मूलभूत सुविधा व विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये अर्थ व नियोजन समितीचे सभापती म्हणून अब्दुल जमीर अब्दुल रहीम, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती म्हणून ज्योत्स्ना अमोल धवस, सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती म्हणून मो. रियाज मो. मुमताज, पाणीपुरवठा व जलनिसारण समितीचे सभापती म्हणून वासुदेव अवधुतराव लोखंडे आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून कांता गजानन लोमटे यांचा समावेश आहे. या समित्या शहरातील विविध महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्य करतील. अर्थ व नियोजन समिती विकासकामांसाठी निधीचे योग्य नियोजन, अंदाजपत्रक आणि योजनांची अंमलबजावणी करेल. स्वच्छता समिती शहरातील आरोग्य व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि साथीचे आजार रोखण्यासाठी उपाययोजना राबवेल. सार्वजनिक बांधकाम समिती अंतर्गत रस्ते, गटारी आणि सार्वजनिक इमारतींसह विकासकामे वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी सांभाळेल. महिला व बालकल्याण समिती महिला सक्षमीकरण, बालकल्याण योजना आणि शिक्षण, आरोग्य व पोषणविषयक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करेल, तर पाणीपुरवठा समिती शहराला सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करेल आणि सांडपाणी व्यवस्थापन सुधारेल. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्राप्ती मारोडकर होत्या. वरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले, तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांनी सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. सर्व समित्यांच्या निवडीनंतर नवनियुक्त सभापतींचे नगराध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बिनविरोध निवडीमुळे नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा समावेश आहे. पाचही विषय समित्या बिनविरोध झाल्याने नगरपंचायतीतील सत्तेवर महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
अमरावती जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) सभा आगामी शनिवार, २४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सन २०२६-२७ साठीचा विकास आराखडा निश्चित केला जाणार आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा शनिवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सुरू होईल. चालू आर्थिक वर्षासाठी (३१ मार्च रोजी संपणारे) अमरावती जिल्ह्याचा विकास आराखडा ४७४ कोटी ७८ लाख रुपये आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षाचा विकास आराखडा निश्चितच ५०० कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान, विविध विभागांकडून करण्यात येणारी मागणी आणि लोकप्रतिनिधींकडून त्याला दिला जाणारा प्रतिसाद यानंतरच नेमका आकडा निश्चित होईल. तसेच, चालू आर्थिक वर्षात विविध यंत्रणांनी डिसेंबर अखेरपर्यंत केलेल्या खर्चाची पडताळणी करून त्यास मान्यता दिली जाईल. गेल्या २९ ऑगस्ट रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताला मान्यता देणे आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार वेळेवर येणाऱ्या इतर विषयांवरही चर्चा करून योग्य ते निर्णय घेतले जातील. या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२५-२६ साठी सुमारे १ हजार ११५ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार ही मागणी केली होती, परंतु नेहमीप्रमाणे ती पूर्णपणे मान्य झाली नाही. गतवर्षीच्या रकमेत थोडीफार वाढ मिळण्याची शक्यता आहे. या मागणीला अंतिम स्वरूप राज्याच्या अर्थसंकल्पातच मिळणार असल्याने, या सभेचे मागणीपत्र थेट राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवले जाईल. मागील काही वर्षांपासून डीपीसीच्या बजेटमध्ये वाढ होताना दिसत आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३९५ कोटी, २०२४-२५ मध्ये ४७४ कोटी आणि २०२५-२६ मध्ये ४१७.७८ कोटी रुपये मंजूर झाले होते, तर मागणी १ हजार ११५ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपयांची होती.
अचलपूरमध्ये मजुराचा खून, सहकारी मजुरावर गुन्हा दाखल:थ्रेशरच्या कामावरून झालेल्या वादातून एकाची हत्या
अचलपूर तालुक्यातील कविठा शेतशिवारात एका मजुराचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. २० जानेवारीच्या रात्री थ्रेशरच्या कामावरून झालेल्या वादातून सहकारी मजुरानेच विरू शिवकली मरस्कोल्हे (वय ४०) या मजुराची हत्या केली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी भोंदू ब्रिजलाल कवडेकर (वय ३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेसंदर्भात बुंदेलपूरा, अचलपूर येथील पंकज प्रभाकर वानखडे (वय ३१) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पंकज वानखडे यांच्याकडे ट्रॅक्टर आणि थ्रेशर मशीन असून, त्यावर मजूर काम करतात. तुर काढणीचा हंगाम सुरू असल्याने त्यांनी काजलडोह (ता. चिखलदरा) येथील विरू मरस्कोल्हे आणि भोंदू कवडेकर या दोन मजुरांना कामासाठी बोलावले होते. २० जानेवारी रोजी इक्बाल यांच्या शेतात थ्रेशरचे काम सुरू होते. सायंकाळी सुमारे ६ वाजता काम संपल्यानंतर दोन्ही मजूर रात्रीच्या मुक्कामासाठी कविठा रोडलगत असलेल्या गुरांच्या गोठ्याजवळ थांबले होते. रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर २१ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता भोंदू कवडेकर हा पंकज वानखडे यांच्या घरी आला आणि त्याने विरू मरस्कोल्हे याच्याशी भांडण होऊन मारहाण झाल्याचे सांगितले. पंकज वानखडे आणि त्यांचे वडील प्रभाकर वानखडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, विरू मरस्कोल्हे चुलीजवळ निश्चल अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या चेहऱ्यावर, डाव्या भुवईवर आणि गालावर जखमा तसेच रक्तस्राव झाल्याचे दिसून आले. विरूचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तात्काळ डायल ११२ वरून पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. पंकज वानखडे यांच्या तक्रारीवरून भोंदू ब्रिजलाल कवडे याच्याविरोधात मारहाण करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अचलपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
जागतिक बाजारपेठेतील वाढती अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे कल वाढल्याने मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातूंनी ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) सोन्याच्या दराने प्रथमच दीड लाखाचा टप्पा ओलांडला असून चांदीने ३.२७ लाख प्रति किलोचा टप्पा गाठून सर्वांनाच चकित केले आहे. सोन्याचा भाव ६८६१ […] The post चांदीची चांदी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी २०२५-२०२६ च्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने अधिकृत युतीची घोषणा केली आहे. ही युती जिल्हा परिषदेच्या ७३ जागांवर आणि पंचायत समितीच्या १४६ जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. या युतीची घोषणा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीरंग पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय सचिव व पुणे जिल्हा समन्वयक ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेसाठी नेमलेले निरीक्षक प्रशांत जगताप व ॲड. अभय छाजेड तसेच वंचित बहुजन आघाडीचे विशाल गवळी उपस्थित होते. जातीयवादी शक्तींच्या विरोधात एकत्रित लढण्यासाठी आणि मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही आघाडी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आघाडीसाठी दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांशी चर्चा झाली असून, त्यांनी स्थानिक पातळीवर उमेदवार निश्चित केले आहेत. दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी याला मान्यता दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर या आघाडीची आकडेवारी जाहीर केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. अनुज्ञप्ती चाचणीच्या अपॉइंटमेंट कोट्यात 22 जानेवारी पासून वाढ पक्की अनुज्ञप्ती चाचणी अपॉइंटमेंट वेळेत मिळण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे अंतर्गत आयडीटीआर व आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे पक्क्या अनुज्ञाप्तीच्या अपॉइंटमेंट कोट्यामध्ये खालीलप्रमाणे 22 जानेवारी 2026 पासून वाढ करण्यात येत आहे. या अपॉइंटमेंट सकाळी 6 वाजलेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत घेता येईल. आळंदी रोड कार्यालय, फुलेनगर येथे केवळ दुचाकी संवर्गातील चाचणी असल्यास आळंदी रोड कार्यालय येथे चाचणीकरिता उपस्थित रहावे. केवळ दुचाकी वगळता इतर सर्व संवर्गातील चाचणी या आयडीटीआर, कासारवाडी, पुणे येथे होणार आहेत. अनुज्ञाप्तीचा अपॉइंटमेंट कोटा पुढीलप्रमाणे करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांची शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत 7 दिवसात संपत आहे अशा उमेदवारांकरीता अतिरिक्त 99 अपॉइंटमेंट पुढीलप्रमाणे सुरु करण्यात आल्या आहेत. दुचाकी 32, तीनचाकी 13 व चारचाकी 54. उमेदवारांनी शिकाऊ अनुज्ञप्तीच्या कोट्यातील अपॉइंटमेंट ही आगाऊ शिकाऊ अनुज्ञप्तीची मुदत संपण्यापूर्वीच्या सात (7) दिवसात घेता येते. त्यामुळे सर्व अर्जदारांनी वाढीव कोट्याचा लाभ घेत आपली अपॉइंटमेंट शक्य तितक्या लवकर आरक्षित करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
नामांकित मोबाईल दुकानाचा मालकच आरोपी
लातूर : प्रतिनिधी रविवार दि. १८ जानेवारी रोजी सकाळी ०८.३० वा. चे सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना हॉटेल इनराईस बाय सयाजी, जुनी एमआयडीसी, समोरील रोडवर फिर्यादीच्या हातातील १ लाख १२ हजार ५०० रुपयाचा सॅमसंग कंपनीचा एस-२५ अल्ट्रा मोबाईल दोन अनोळखी आरोपींनी हिसकावुन चोरुन नेला होता. सदरील गुन्ह्यातील दोन आरोपीसह एक विधी संघर्ष बालक यांना ४ […] The post नामांकित मोबाईल दुकानाचा मालकच आरोपी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली. न्यायालयात फक्त दोन न्यायाधीशांचे खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही. सीमाप्रश्नासारख्या घटनात्मक आणि आंतरराज्यीय प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणे आवश्यक असल्याने प्रकरण पुढे ढकलण्यात आले. विशेष म्हणजे, तब्बल आठ वर्षांनंतर महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या मूळ दाव्यावर […] The post महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दुस-या टप्प्यातील जि. प. निवडणूक कार्यक्रम लांबणीवर?
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक घेण्यासाठी न्यायालयाने अनुमती दिली असली तरी सर्व निवडणुका अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे. आज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार होती मात्र हे प्रकरण पोहोचू न शकल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. यामुळे […] The post दुस-या टप्प्यातील जि. प. निवडणूक कार्यक्रम लांबणीवर? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून फुलंब्रीमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस उफाळून आली असून, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला लक्ष्य केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा गंभीर आरोप करत आक्रमक कार्यकर्त्यांनी कार्यालयात शिरून फर्निचरची मोठी तोडफोड केली आणि जोरदार घोषणाबाजी करत राडा केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत भरदिवसा घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. तिकीट वाटपातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक, हेच कार्यकर्त्यांच्या या तीव्र संतापाचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. पाल जिल्हा परिषद गटातून माजी युवक काँग्रेस अध्यक्ष वरुण पाथ्रीकर यांच्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला डावलून शेवटच्या क्षणी ज्ञानेश्वर जाधव यांना संधी देण्यात आल्याने, तसेच बाबरा गटात अजिनाथ सोनवणे यांना आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलल्याने कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध सुटला. पैसे घेऊन उमेदवारी विकली जात असून हे काँग्रेस पक्ष संपवण्याचे कारस्थान आहे, असा थेट आणि गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. दुपारी तीनच्या सुमारास शेकडो संतप्त कार्यकर्ते अचानक खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयात घुसले आणि त्यांनी तिथे प्रचंड धुमाकूळ घातला. केवळ घोषणाबाजीवरच न थांबता या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या, टेबल आणि फर्निचरची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली. या गोंधळादरम्यान खासदारांचे बंधू जगन्नाथ काळे आणि तालुकाध्यक्ष संतोष मेटे यांना आंदोलकांनी तब्बल अर्धा तास घेराव घालून तिकीट वाटपावरून जाब विचारला. कार्यालयातील परिस्थिती अत्यंत गंभीर आणि हिंसक बनल्याचे पाहून तिथे उपस्थित असलेल्या विश्वास औताडे यांनी प्रसंगावधान राखत तिथून तातडीने पळ काढला. निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे काँग्रेसची मोठी नाचक्की झाली असून, उघड झालेली गटबाजी आणि कार्यकर्त्यांमधील तीव्र असंतोष याचा थेट फटका मतदानावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केवळ फुलंब्रीच नव्हे, तर निधोना पंचायत समिती गणातील नाराजीही आता पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते या वादावर कशा प्रकारे पडदा टाकतात आणि ऐन निवडणुकीत उफाळून आलेली ही बंडखोरी रोखण्यात त्यांना कितपत यश येते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणासाठी आज गुरूवारी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. महापौरपदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. या सोडतीनंतर महापौर पदाची लॉटरी कुणाला लागणार, हे स्पष्ट होईल. महापौर पदाच्या आरक्षणात स्पष्टता आल्यानंतर महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडीना वेग येणार आहे. आजच्या आरक्षण सोडतीत सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या मुंबई महापौरपदाच्या सोडतीकडे […] The post महापौरपदासाठी गुरूवारी सोडत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपकडून विनोद तावडे, आशिष शेलार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी
मुंबई : प्रतिनिधी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितीन नबीन यांनी संघटनात्मक पातळीवर निर्णय घेण्यास सुरूवातही केली आहे. देशभरातील विविध राज्यात होणा-या निवडणुकांची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांवर महत्त्वाच्या जबाबदा-या सोपवण्यात आल्या आहेत. केरळ विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रभारी म्हणून […] The post भाजपकडून विनोद तावडे, आशिष शेलार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची या तिन्ही महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर होण्यासंदर्भात यापूर्वीच झालेल्या भेटीत सविस्त्र चर्चा झालेली आहे. तिन्ही महानगरपालिकेमध्ये महायुतीला जनादेश मिळाला आहे त्यामुळे या जनादेशानुसारच तीनही महानगरपालिकेत महायुतीची सत्ता स्थापन होणार असल्याची माहिती भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. मनसेचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर स्थानिक पातळीवर मनसेने शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हा निर्णय पूर्णतः स्थानिक पातळीवरील असून, स्थानिक प्रश्न आणि त्यासंबंधीत परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात आला असल्याचे मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर स्पष्ट केले आहे. जिथे महायुती म्हणून लढलो, तिथे महायुतीचा महापौर बसेल- श्रीकांत शिंदे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, आज 53 नगरसेवकांसह आम्ही गट नोंदणी करायला आलो. कल्याण डोंबिवलीत महायुतीसोबत मनसे आल्याने आमची ताकद वाढली आहे. याठिकाणी शिवसेना-भाजपा-मनसे एकत्रित येऊन महायुती सत्ता स्थापन करणार आहोत. विकासासाठी जे आमच्या सोबत येतील त्यांचे स्वागत आहे. ठाकरे सेनेने पाठिंबा दिला तरीही त्यांचे स्वागत आहे. उल्हासनगरमध्येही वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. तिथे जो मॅजिक फिगर आहे तो शिवसेनेने पार केला आहे. महाराष्ट्रात महायुती म्हणून निवडणूक लढलो तिथे महायुतीचा महापौर बसेल. वाचा सविस्तर
मुंबई : प्रतिनिधी ‘एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी’ अशी घोषणा ठाकरे बंधूंनी केली होती; परंतु निवडणुकीत अपयश आल्यानंतर विघटनाला सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील निवडून आलेले ४ नगरसेवक बेपत्ता झाल्याने आधीच ठाकरे गटात अस्वस्थता असताना तेथे मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून आणखी एक धक्का दिला आहे. आता मुंबईत मनसे उद्धव ठाकरे […] The post मनसेची शिंदेसेनेला साथ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोदी-योगी सरकारने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला घाट
मुंबई : प्रतिनिधी मोदी-योगी यांच्या डबल इंजिन सरकारने काशीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला आहे. घाटावरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती तसेच शिवलिंगही उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. हा प्रकार हिंदू श्रद्धेवर आणि सांस्कृतिक वारशावर थेट आघात आहे. या गंभीर प्रकरणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी […] The post मोदी-योगी सरकारने बुलडोझर लावून उद्ध्वस्त केला घाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात आयोजित 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चीनच्या 'ली निंग स्टार' संघाचा सायकलपटू ल्यूक मडग्वे याने 'मराठा हेरिटेज सर्किट' टप्प्यात सलग दुसरा विजय मिळवला. या विजयासह त्याने 'यलो जर्सी'वरील आपले वर्चस्व कायम राखले. आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या हस्ते यशस्वी सायकलपटूंचा गौरव करण्यात आला. स्पर्धेचा हा दुसरा टप्पा 'मराठा हेरिटेज सर्किट' अंतर्गत १०५.३ किलोमीटरचा होता. पुण्याच्या कॅम्प परिसरातील लेडीज क्लब येथून दुपारी १२.३० वाजता शर्यतीला प्रारंभ झाला आणि सिंहगड रोडवरील नांदेड सिटी येथे तिचा समारोप झाला. डोंगराळ भूभाग, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाचे रस्ते यामुळे हा टप्पा सायकलपटूंच्या ताकद, तंत्र आणि सहनशक्तीची कसोटी पाहणारा ठरला. ल्यूक मडग्वेने ०२:३१:४९ या वेळेत शर्यत पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. थायलंडच्या 'रुजाई इन्शुरन्स' संघाचा अॅलन कार्टर बेटल्स दुसऱ्या स्थानावर राहिला, तर बेल्जियमचा यॉर्बन लॉरिसेन याने तिसरे स्थान मिळवले. दुसऱ्या टप्प्यानंतर विविध श्रेणींतील जर्सी विजेते निश्चित झाले आहेत. यात यलो जर्सी (एकूण आघाडी) ल्यूक मडग्वे (चीन), पोल्का डॉट जर्सी (किंग ऑफ द माउंटेन्स) स्टीफन बेनेटन (गुआम), ऑरेंज जर्सी (सर्वोत्कृष्ट आशियाई सायकलपटू) जंबालजाम्ट्स सेनबायर (मंगोलिया/स्पेन), व्हाईट जर्सी (सर्वोत्कृष्ट युवा सायकलपटू) तिजसेन विगो (नेदरलँड्स) आणि ब्ल्यू जर्सी (भारताचा सर्वोत्तम सायकलपटू) मनव सरदा (इंडियन डेव्हलपमेंट टीम) यांचा समावेश आहे. ही स्पर्धा भारतातील सायकलिंग क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. UCI 2.2 श्रेणीतील ही देशातील पहिली पाच दिवसांची मल्टि-स्टेज 'कॉन्टिनेंटल सायकल रेस' आहे. या स्पर्धेत पाच खंडांतील ३५ देशांचे १७१ आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू सहभागी झाले आहेत. एकूण ४३७ किलोमीटरचा मार्ग पुणे जिल्ह्यातील ९ तालुके आणि १५० गावांतून जातो. विशेष म्हणजे, अवघ्या ७५ दिवसांत या जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी रस्ते व पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. विजयानंतर बोलताना ल्यूक मडग्वे म्हणाला, “आजचा दिवस अत्यंत उष्ण होता आणि चढाव खूप आव्हानात्मक होते. मात्र, संघातील सहकाऱ्यांच्या उत्तम साथीतून हा विजय मिळवता आला.” स्पर्धेचा तिसरा टप्पा २२ जानेवारी २०२६ रोजी 'वेस्टर्न घाट गेटवे' अंतर्गत पुरंदर ते बारामती (१३४ किमी) दरम्यान पार पडणार आहे. या टप्प्यात पुणेकरांना जागतिक दर्जाच्या सायकलपटूंच्या वेगवान आणि थरारक कामगिरीचा अनुभव घेता येणार आहे.
राज्यात विरोधक, अकोल्यात मैत्री?:सत्तेसाठी भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची साद; बहुमतासाठी अडले
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर निवडीकडे लागले असून, अकोला महानगरपालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्तेसाठी नवीन समीकरणे उदयाला येत आहेत. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अकोल्यात सत्तेचा पेच निर्माण झाला असतानाच, भाजपने चक्क शिवसेना ठाकरे गटाला युतीची खुली ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असले, तरी अकोल्यात स्थानिक सत्तेसाठी हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून, या संभाव्य युतीमुळे अकोल्याच्या राजकारणात नवी वळणे येण्याची चिन्हे दिसत आहेत. अकोला महानगरपालिकेत बहुमताचा 41 हा आकडा गाठण्यासाठी भाजपने शिवसेना ठाकरे गटाला थेट सत्तेची साद घातली असून, भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीने या संभाव्य युतीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 80 सदस्यीय महापालिकेत 38 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमतासाठी त्यांना अजून 3 जागांची आवश्यकता आहे. अशा स्थितीत ठाकरे गटाचे 6 नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत असून, ही युती झाल्यास हा आकडा 44 वर पोहोचून सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे. राज्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू असताना अकोल्यातील ही स्थानिक तडजोड राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपने शिवसेना ठाकरे गटाकडे मदतीचा हात मागितला असून, त्या बदल्यात ठाकरे गटाने उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापती पदाची महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. या प्रस्तावावर भाजपच्या गोटात सध्या विचारविनिमय सुरू असतानाच, दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये एक गुप्त बैठक पार पडली असून त्यात शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले की, शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर जो पक्ष सकारात्मक भूमिका घेईल, त्याच्यासोबत आम्ही हातमिळवणी करण्यास तयार आहोत. सध्या तरी आमचे सत्तेचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत.
महापालिका निवडणुकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या निवडीवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच विजयी नगरसेवकांची पळवापळवी देखील करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईसह उपनगरातील महापालिकांमध्ये नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असून शिवसेना ठाकरे गटाचे 4-5 नगरसेवक फुटल्याची चर्चा आहे. त्यात मुंबई वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के नोट रिचेबल आहेत. यावर आता आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सरिता म्हस्के या नोट रिचेबल असल्याने एकच खळबळ उडाली होती. आता यावर अनिल परब यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, नगरसेविका सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील एक महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वेळ आहे. त्यामुळे सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल. म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे, अशी माहिती परब यांनी दिली. तसेच पुढील एक महिन्यात त्या न आल्यास काय कारवाई करायची याबाबत पक्षश्रेष्ठी ठरवतील, पण अशी वेळ येणार नसल्याचेही परब यांनी स्पष्ट केले आहे. मनसेने घेतलेल्या भूमिकेवर आम्ही बोलणार नाही मुंबईच्या महापौरबाबत प्रश्न विचारला असता अनिल परब म्हणाले, देवाच्या मनात काय आहे हे उद्या सकाळी 11 वाजता कळेल, असे उत्तर त्यांनी दिले आहे. त्यामुळे मुंबईच्या महापौर संदर्भात आणखी सस्पेन्स वाढला आहे. तसेच महापौर पदाचे आरक्षण जाहीर होऊ द्या, उमेदवार ठरू द्या, मग पाहू काय करायचे, असेही परब यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच कल्याणमध्ये मनसेने घेतलेल्या भूमिकेवर अनिल परब यांनी बोलणे टाळले आहे. मनसेने घेतलेल्या भूमिकेवर आम्ही बोलणार नाही. तो त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, असे परब यांनी म्हटले. दरम्यान, मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले असून महापौरपदासाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. ठाकरे गटाने बोलावलेल्या नगरसेवकांच्या महत्त्वाच्या बैठकीला आणि गट नोंदणीसाठी नवी मुंबईला रवाना झालेल्या पथकातून नगरसेविका सरिता म्हस्के या गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. म्हस्के या शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या शक्यतेने खळबळ उडाली असून, त्यांच्या या गूढ अनुपस्थितीमुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण तर शिंदे गटाच्या पुढील हालचालींबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
नियंत्रण रेषेवर ना‘पाक’ कारवाया
कुपवाडा : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये २०-२१ जानेवारीच्या रात्री भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यात गोळीबार झाला, अशी माहिती समोर आली. सहाव्या राष्ट्रीय रायफल्सचे सैनिक सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि नियंत्रण रेषेवरील अंध ठिकाणे दूर करण्यासाठी केरन बाला भागात उच्च तंत्रज्ञानाचे पाळत ठेवणारे कॅमेरे बसवत असताना ही चकमक झाली. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. […] The post नियंत्रण रेषेवर ना‘पाक’ कारवाया appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीनगरमध्ये हवेचे प्रदूषण सर्वात खराब
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचे वायू प्रदूषण ७ वर्षांतील सर्वात वाईट पातळीवर पोहोचले आहे. बुधवारी शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३०८ नोंदवला गेला. वायू निरीक्षण डेटानुसार, जानेवारीमध्ये शहराची वायू गुणवत्ता खूपच खराब राहिली आहे. श्रीनगरमधील सध्याची सरासरी पीएम२.५ एकाग्रता ११५ मायक्रोग्राम प्रति क्यूबिक मीटर आहे, जी डब्ल्यूएचओने दिलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. या पातळीवरील संपर्कामुळे […] The post श्रीनगरमध्ये हवेचे प्रदूषण सर्वात खराब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हवाईदलाचे ट्रेनी विमान तलावात कोसळले
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आज दुपारी भारतीय हवाईदलाचे एक प्रशिक्षण विमान कोसळून अपघात झाला. हे विमान शहरानजीक असलेल्या केपी कॉलेजमागील एका जलपर्णीने भरलेल्या तलावात कोसळले. वैमानिकांच्या प्रसंगावधानामुळे दाट लोकवस्तीच्या भागात कोसळण्याऐवजी विमान तलावात पडल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचे संतुलन बिघडले. विमानाचे इंजिन निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रॉकेटसारखा मोठा […] The post हवाईदलाचे ट्रेनी विमान तलावात कोसळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जगातील २२ मुस्लिम देशांचा भारतावर विश्वास
नवी दिल्ली : भारतात दुस-यांदा अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. अरब लीग मधील २२ सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होतील अशी शक्यता आहे. हे एक उच्चस्तरीय संमेलन आहे. पश्चिम आशियात सुरु असलेले युद्ध आणि अस्थिरता या दरम्यान ही बैठक होत आहे. भारताचे वाढते कूटनितीक महत्व यातून अधोरेखित होते. गाझा युद्ध, इराण-अमेरिका […] The post जगातील २२ मुस्लिम देशांचा भारतावर विश्वास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूर परिसरात धडक कारवाई करत तब्बल 25 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. यातील मुख्य आरोपीने अमली पदार्थांचा पुरवठा अहिल्यानगरमधील एका पोलिस कर्मचाऱ्यानेच केल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. या गंभीर घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, जर पोलिसांकडूनच ड्रग्समाफीयांना साथ दिली जात असेल तर राज्यासाठी नक्कीच ही धोक्याची घंटा मानावी लागेल. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, 18 तारखेला रात्री उशिरा पुणे ग्रामीण पोलिसांनी शिरूरमधील एका गॅरेज चालकाकडे तब्बल 2 कोटी पेक्षा जास्त किमतीचे एक किलो मेफेड्रॉन तर इतर दोघांकडे 9 किलो असे एकूण तब्बल 25 कोटीचे ड्रग्स पुणे पोलिसांनी पकडले आहे. यातील प्रमुख आरोपीने अहिल्यानगरमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने त्याला ड्रग्स पुरवल्याची माहिती दिली असल्याचे समजते. त्यामुळे सापडलेले ड्रग्स हे अहिल्यानगर नार्कोटिक्स गोडाऊनमधील असल्याचा संशय निर्माण होत आहे. पुढे रोहित पवार म्हणाले, याच प्रकरणात काल नगर मधील LCB शाखेतील नार्कोटिक टेबल सांभाळणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारे जर पोलिसांकडूनच ड्रग्समाफीयांना साथ दिली जात असेल तर राज्यासाठी नक्कीच ही धोक्याची घंटा मानावी लागेल. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांच्या प्रतिमेला डाग लावणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, ही विनंती, असे पवारांनी म्हटले आहे.
अंतराळवीर सुनीता विलियम्स निवृत्त
न्यू यॉर्क : नासा ची अनुभवी आणि लोकप्रिय अंतराळवीर सुनीता विलियम्सने २७ वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक सेवा बजावल्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. तिची निवृत्ती ही २७ डिसेंबर २०२५ रोजीपासून प्रभावी झाली. तिने तिच्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशनवर तीन मोहिमा पूर्ण केल्या. तर मानवी अंतराळ उड्डाणात अनेक विक्रम नावावर कोरले. तिची निवृत्ती ही अंतराळ उड्डाणाच्या एका […] The post अंतराळवीर सुनीता विलियम्स निवृत्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वोच्च न्यायालयाचे माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधीवर ताशेरे
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या सुरू असलेल्या प्रकरणाशी संबंधित वक्तव्ये आणि वर्तनाबद्दल प्राणी हक्क कार्यकर्त्या आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारी यांच्या खंडपीठाने सांगितले की, केवळ न्यायालयाच्या ‘औदार्यामुळे’च त्यांच्याविरुद्ध अवमान कारवाई सुरू करण्यात आलेली नाही. भटक्या श्वानांच्या […] The post सर्वोच्च न्यायालयाचे माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधीवर ताशेरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील
चेन्नई : यावर्षी होणा-या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील टीटीव्ही दिनाकरन यांच्या नेतृत्वातील अम्मा मक्कल मुनेत्र कळगम पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाला आहे. यासह भाजपची राज्यातील ताकद वाढेलच, शिवाय तामिळनाडूतील राजकीय समीकरणांमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्ष अनेक वर्षांपासून तामिळनाडूत सत्ता मिळवण्याचा […] The post टीटीव्ही दिनाकरन यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

29 C