पिंप्राळ्यात अक्षय्य तृतीयेला भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याची परंपरा ७७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा ३५ वर्षीय तरुण भगत हिरामण भील यांनी १५ मिनिटांत ६०० मीटर बारागाड्या ओढल्या. पिंप्राळा उड्डाण पुलापासून ते तलाठी कार्यालय असा उत्सव होता. गतवर्षी बारागाड्या निघाल्या त्या दिवशी पारा ४० अंशांच्या खाली होता. मात्र, या वर्षी रविवारी तापमान ४१ अंशांवर होते. म्हणून सायंकाळी बारागाड्या ओढल्या. गुलालाचे ताट फिरवले महिनाभर भगत हिरामण भील यांनी कोणाकडेही अन्न-पाणी घेतले नाही, की अंत्ययात्रेला गेले नाही. बारागाड्या ओढण्याच्या १० दिवस आधी पिंप्राळा गावातून घरोघरी गुलालाचे ताट फिरवण्यात आले. या ताटात भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे पैसे टाकून गुलाल कपाळाला लावतात. याच पैशातून पूजाविधीचे साहित्य आणलेले होते. -छायाचित्र : आबा मकासरे
परशुराम जयंती महोत्सवानिमित्त भद्रकाली ते काळाराम मंदिरापर्यंत उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील भाविक, जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि ऐतिहासिक राम-परशुराम भेट सोहळ्याने या यात्रेची शोभा वाढवली. यानिमित्त सामूहिक रामरक्षा पठण करून भक्तिमय वातावरणात महोत्सवाचा समारोप झाला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि जय परशुरामच्या जयघोषात भाविकांनी जयघोष केला. मिरवणुकीतील विविध वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत १५०० भाविक उपस्थित होते.
प्रतिनिधी | नाशिकरोड अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि या दिवशी घरोघरी आमरस-पुरणपोळीचा बेत ठरलेलाच असतो. हाच मुहूर्त साधत नाशिकच्या बाजारपेठेत आंब्यांचा गोडवा चांगलाच दरवळला. यंदा अक्षय तृतीयेनिमित्त नाशिकमध्ये तब्बल साडे सहा हजार क्विंटल आंब्यांची विक्रमी विक्री झाली असून, यामध्ये हापूस आणि केसर आंब्याने बाजी मारली आहे. बाजार समितीत आवक वाढली नाशिक बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरात आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. सचिव निवृत्ती बागूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरात सुमारे साडे पाच हजार क्विंटल हापूस आणि केसर आंब्याची आवक झाली. घाऊक बाजारात हापूस २०० ते ३५० रुपये (सरासरी ३०० रु.) तर केसर १५० ते २५० रुपये (सरासरी २०० रु.) प्रति किलो दराने विक्री झाला. किरकोळ बाजारात मागणी वाढल्याने ऐन सणासुदीला दरात किलोमागे ५० रुपयांची वाढ दिसून आली. लालबागचा आधार हापूस आणि केसरचे दर चढे असल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांनी लालबाग आंब्याला अधिक पसंती दिली. चवीला उत्तम आणि खिशाला परवडणारे दर असल्याने लालबागची विक्रीही मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, उद्यापासून आंब्यांच्या दरात घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दरावर वातावरणाचे सावट अक्षय तृतीयेला मागणी प्रचंड होती, मात्र आता ढगाळ वातावरणामुळे आंब्यांच्या साठवणुकीवर परिणाम होत आहे. मागणी घटण्याची शक्यता असल्याने उद्यापासून दरात घसरण पाहायला मिळू शकते. - एयाज शेख, फळविक्रेता
प्रतिनिधी | घाटनांद्रा कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व हंगामी मिरची लागवडीकडे यंदाही शेतकऱ्यांचा मोठा कल दिसत आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. यंदा लागवडीचा खर्च तब्बल दुपटीने वाढला आहे. तरीही ‘जोखीम घेतल्याशिवाय नफा नाही’ या विश्वासावर शेतकरी मिरचीला प्राधान्य देत आहेत. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये घाटनांद्रा परिसरात २५० ते २७५ हेक्टरवर मिरची लागवड होत होती. यंदा क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. ३५०० हेक्टरच्या वर लागवड झाली आहे. मे महिन्यापर्यंत लागवड सुरू राहणार असल्याचे शेतकरी सांगतात. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवरही उत्साह कमी झालेला नाही. यंदा मिरची लागवडीचा एकरी खर्च ४० हजार रुपयांच्या वर पोहोचला आहे. मल्चिंग पेपर, रोपे, खत, मजुरी या सर्व घटकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. गतवर्षी ११०० रुपयांना मिळणारा मल्चिंग पेपर यंदा १८०० रुपयांवर गेला आहे. रोपांची किंमत १.२० रुपयांवरून १.७० रुपयांपर्यंत वाढली आहे. मजुरी ३०० रुपयांवरून ५०० रुपयांवर पोहोचली आहे. खतांचे दर १९०० वरून २१०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. खर्च वाढत असतानाच मिरचीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. सध्या बाजारात मिरचीला सुमारे ४००० रुपये दर मिळत आहे. हा दर खर्चाच्या तुलनेत अपुरा ठरत आहे. पुढे भाव वाढेल, नुकसान भरून निघेल, या आशेवर शेतकरी टिकून आहेत. शालिक मोरे म्हणाले, यंदा मिरची लागवडीचा खर्च खूपच वाढला आहे. मल्चिंग पेपर, मजुरी सगळंच महागलंय. दुसरा पर्याय नाही. मिरचीच लावली. आता भाव वाढेल अशी अपेक्षा आहे. सागर मोरे म्हणाले, गतवर्षीपेक्षा यंदा जवळपास दुप्पट खर्च आला. सध्या बाजारभाव परवडणारा नाही. पुढे दर वाढतील, या आशेवर टिकून आहोत. दोन एकरावर मिरचीची लागवड केली आहे. दिगंबर मोरे म्हणाले, मिरचीचं पीक पटकन पैसे देतं म्हणून लागवड वाढवली. खर्च परवडत नाही. योग्य बाजारभाव हवा आहे. खर्च निघून थोडाफार नफा मिळाला तरी समाधान आहे. व्यापाऱ्यांनी यंदा चांगला दर द्यावा. यंदा तरी व्यापाऱ्यांनी मिरचीला चांगला दर द्यावा, अशी अपेक्षा आकाश मोरे, विलास मोरे, रवी निकम, अनिल मोरे, दिगंबर मोरे, दीपक मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अनिश्चित बाजारभाव याच्या कचाट्यात शेतकरी पुन्हा आशेच्या जोरावर शेती करताना दिसत आहे.
नळाला मोटार लावतानाउंडणगावात मुलाचा मृत्यू:गावात सण साजरा नाही
प्रतिनिधी | उंडणगाव अक्षय तृतीयेच्या दिवशी गावात हृदयद्रावक घटना घडली. सवित्रीबाई फुले शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा गणेश खंडू सोनवणे (११) याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तो सकाळी घरासमोर नळाला पाण्याची मोटर लावत होता. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कुटुंबाला मदत म्हणून मोटर सुरू करत होता. त्याचवेळी अचानक विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घरातील आजी, वडिलांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही जोरदार धक्का बसला. ते दूर फेकले गेले. आरडाओरड झाली. शेजारी धावत आले. वीज बंद केली. कुटुंबीय, शेजाऱ्यांनी गणेशला तातडीने गावातील दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून सिल्लोडला नेण्याचा सल्ला दिला. त्याला उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोड येथे नेण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दवाखान्यात वडिलांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. “डॉक्टर साहेब, मला एकच मुलगा आहे, त्याला वाचवा हो,” अशी विनंती त्यांनी केली. गणेशवरवर दुपारी दोन उंडणगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे. गणेश अभ्यासात हुशार, नम्र होता. सर्वांचा लाडका विद्यार्थी होता. त्याच्या जाण्याने शाळा, मित्रपरिवार, गावात हळहळ व्यक्त होत आहे. अक्षय तृतीया आनंदाचा सण असतो. या घटनेमुळे नागरिकांनी सण साजरा केला नाही. अनेकांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. घरात होता एकुलता एक गणेशची आई रोजनदारीने शेतात काम करते. वडील हमाली करतात. एकुलता एक मुलगा गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
प्रतिनिधी | खुलताबाद/वेरूळ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भद्रा मारुती मंदिरात यंदा विशेष सजावटीसोबतच भाविकांची उपस्थितीही विक्रमी ठरली. दिवसभरात अंदाजे ८० हजारांहून अधिक भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ यांनी ही माहिती देताना भाविकांच्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले, तर वेरूळला घृष्णेश्वर महादेव मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटे ४ वाजल्यापासूनच मंदिर परिसर ‘हर हर महादेव’, ‘ओम नमः शिवाय’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दिवसभरात २० हजारहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिर समितीने दिली. भद्रा मारुतीच्या सजावटीसाठी लागणारे आंबे छत्रपती संभाजीनगरचे अप्पा धुळे यांच्या पुढाकारातून आणण्यात आले होते. १५ हजार रुपये किमतीचे हे आंबे होते. या सजावटीची जबाबदारी संतोष बारगळ यांनी सांभाळली. सोहळ्यावेळी श्रीपाद जोशी गुरू, सुरेश गुज्जर, दत्ता इंगळे, मदन जाजू, कमलेश भाटिया आदी उपस्थित होते. वेरूळ | भाविकांसाठी पिण्याचे पाणी व वैद्यकीय पथकाची सोय केली होती. बंदोबस्तामुळे दर्शन रांग शिस्तबद्ध सुरू होती. महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग भाविकांसाठी सवलत देऊन सुरळीत दर्शन करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. अनेक भाविकांनी अक्षय्य तृतीयेला केलेले दान व खरेदी अक्षय राहते, या श्रद्धेतून अभिषेक व दानधर्म केला. पुजारी दीपक शुक्ला म्हणाले, आजच्या दिवशी घृष्णेश्वराचे दर्शन घडणे हे भाग्याचे लक्षण आहे. खुलताबादला गतवर्षी सुमारे ५५ ते ६० हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा हा आकडा ८० हजारांवर गेल्यामुळे मंदिर प्रशासनासाठी हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. सकाळी ५ वाजल्यापासून ते साडेअकरापर्यंत दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी गर्दीत काहीशी घट झाली होती.
निलजगाव पीएचसीतर्फे हनुमंतगावात टीबीमुक्त मोफत तपासणी अभियान:राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग
ढोरकीन | पैठण तालुक्यातील हनुमंतगाव येथे निलजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत टीबीमुक्त अभियान नुकतेच राबविण्यात आले. राज्य सरकारच्या टीबीमुक्त अभियानाचा भाग म्हणून ग्रुप ग्रामपंचायत येथे मोफत निदान व उपचार अभियान घेण्यात आले. ग्रामस्थांनी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोगाचे निदान, उपचार याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रयोगशाळेचे वरिष्ठ पर्यवेक्षक महेश कोरडे, टीबी हेल्थ व्हिजिटर इर्शाद सय्यद, रेडिओलॉजिस्ट रमेश तांबारे, वरिष्ठ पर्यवेक्षक आरिफ सय्यद, आरोग्य कर्मचारी वैभव कांबळे, चंद्रकांत व्ही. मगरे, अंगणवाडी कार्यकर्ते के. एम. लोमटे, एन. एम. गवांदे, आशा कार्यकर्ती पुजा भादे उपस्थित होते.
जळगाव शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता शिंदे:तर उपाध्यक्षपदी डोंगरे
प्रतिनिधी | लासूर स्टेशन जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शालेय समितीच्या अध्यक्षपदी कविता बाळकृष्ण शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर काशिनाथ डोंगरे यांची शनिवारी बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, जळगाव (ता. वैजापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्यामुळे शनिवारी नुकतीच पालकांची बैठक आयोजित कारण्यात आली होती. ८ वर्गामधून ९ सदस्य निवडून आले. सदरील ९ सदस्यांनी अध्यक्ष म्हणून कविता शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर डोंगरे यांची बिनविरोध निवड केली. निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी मुख्याध्यापक प्रभाकर पवार, शिक्षक सुधाकर तुपे, रामनाथ चापडे, सुधीर वाघमारे, दत्तात्रय भालसिंग, मावळते अध्यक्ष बाळकृष्ण शिंदे, सुनील पेंभरे, नंदू शिंगाडे यांनी पुढाकार घेतला.
केळगावात बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक:लेझीमचे आकर्षण
प्रतिनिधी | सिल्लोड महात्मा बसवेश्वर यांची जयंती रविवारी केळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. मारुती मंदिरापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ट्रॅक्टरवर महात्मा बसवेश्वर यांची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली. मिरवणूक गावातून काढण्यात आली. मिरवणूक सकाळी ८ वाजेपासून सुरू झाली. सुमारे १० वाजेपर्यंत चालली. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन झाले. परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजवला होता. प्रत्येक ठिकाणी श्रद्धेने पूजन झाले. मिरवणूक पुढे सरकत राहिली. गावात जल्लोषाचे वातावरण होते.
प्रतिनिधी | वेरूळ स्थानिक विकास, ऐतिहासिक वारसा जतन आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी छावा संघटनेने पुढाकार घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची महत्त्वपूर्ण भेट घेतली. या बैठकीत विविध विकासात्मक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा पार पडली. छावा संघटनेचे संस्थापक रवींद्र बोडखे यांनी आपले सहकारी श्रीकांत तौर यांच्यासह ही भेट घेतली. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण, आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. बैठकीदरम्यान परिसरातील रस्ते, इतर पायाभूत सुविधा आणि वेरूळ येथील ऐतिहासिक शहाजीराजे भोसले गढीच्या जतन व संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. छावा संघटनेतर्फे शासनासमोर काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये २००७ मध्ये स्थापन समितीच्या कार्यकाळ व वैधतेबाबत स्पष्ट माहिती जाहीर करणे, समितीचे पुनर्गठन करून त्यामध्ये छावा संघटनेचे प्रतिनिधी व आमदार प्रशांत बंब यांचा समावेश करणे, छावा संघटनेच्या कार्याचा गौरव म्हणून गढी परिसरात संगमरवरी शिलालेख उभारणे, गढीचे संवर्धन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण नियमांनुसार करण्यासाठी शासनाने आवश्यक सहकार्य करणे, या सर्व मागण्यांवर उपस्थित मान्यवरांनी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
प्रवचन:अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस- शांतीगिरी महाराज
प्रतिनिधी | वेरूळ अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस. जनार्दन स्वामी यांनी आयुष्यभर ‘धर्म, सेवा व शांती’ या त्रिसूत्रीचा प्रचार केला. त्यांचे जीवन म्हणजे निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असा हितोपदेश शांतीगिरी महाराज यांनी दिला. अक्षय्य तृतीया या दिनाचे औचित्य साधून येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या जन शांती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या मध्यवर्ती कार्यक्रमात महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी हजारो भाविकांना मार्गदर्शनपर प्रवचन केले. सकाळी विधिवत पूजा, अभिषेक व लक्ष्मीनारायण यांच्या मंत्रोपचाराने सोहळ्याला प्रारंभ झाला. अक्षय्य तृतीया हा दिवस दान, जप-तप व पुण्यकर्मासाठी अक्षय फलदायी मानला जातो. याच दिवशी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांनी धर्मकार्याला सुरुवात केली होती अशी माहिती मिळते. महाराजांनी जनार्दन स्वामींच्या कार्याचा आढावा घेत सांगितले की, स्वामीजींनी गोरगरीब, अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, आरोग्य व अध्यात्म या क्षेत्रांत भरीव योगदान दिले. १९८९ मध्ये जनार्दन बाबांच्या महानिर्वाणानंतर शांतीगिरी महाराजांनी त्यांच्या कार्याची धुरा खांद्यावर घेतली. त्यानंतर देश-विदेशात शांती, बंधुता व अध्यात्माचा संदेश पोहोचवण्यासाठी त्यांना ‘महामंडलेश्वर’, ‘विश्वशांतिदूत’ तसेच ‘अध्यात्म शिरोमणी’ व जगद्गुरू यांसारख्या उपाधींनी सन्मानित करण्यात आले आहे. कार्यक्रमात उदकुंभदान, अन्नदान व वस्त्रदान करण्यात आले. ‘एष धर्मघटो दत्तो ब्रह्माविष्णुशिवात्म कः’ या मंत्राने शेकडो भाविकांनी घटदान केले. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात व मध्य प्रदेशातून सुमारे हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. विश्वशांती व मानवतेचा संदेश देत शांतीगिरी महाराजांच्या प्रवचनाने सोहळा संस्मरणीय ठरला . गरजूला मदत करण्याचा संकल्प करा रविवारच्या प्रवचनात महाराजांनी तरुण पिढीला आवाहन केले की, मोबाइल व भौतिक सुखांच्या मागे धावताना आपली संस्कृती व संस्कार विसरू नका. अक्षय्य तृतीयेला केलेले दान, ज्ञानदान व सेवाकार्य पिढ्यान््पिढ्या पुण्यसंचय करते. जनार्दन स्वामींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने किमान एका गरजूला मदत करण्याचा संकल्प करावा.
भगवान परशुराम जयंतीत नादब्रह्माचा जल्लोष:ढोल-ताशांच्या गजराने अवघा परिसर भक्तिमय
भगवान परशुराम जयंतीनिमित्त सावरकर चौकात ‘ब्रह्मनाद’ ढोल पथकाने दिमाखदार सादरीकरण केले. या वेळी ढोल-ताशांच्या गजराने अवघा परिसर भक्तिमय झाला होता. परशुराम जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी समाजबांधव आणि नागरिकांनी मोठी गर्दी करत या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
बाहेरगावाहून बसस्थानकावर उतरल्यानंतर रिक्षाने घरी जाण्यासाठी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकात आलेल्या तरुणीची छेड काढल्याच्या संशयावरून एका ३८ वर्षांच्या तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (१८ एप्रिल) मध्यरात्री घडली. या मारहाणीत तरुण जखमी झाला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, हा प्रकार केवळ गैरसमजातून झाल्याने दोन्ही पक्षांनी तक्रार देण्यास नकार दिला आहे शहरात राहणारी ही तरुणी रात्री उशिरा गावाहून आली होती. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक चौकात ती रिक्षाची वाट पाहत असताना रिक्षात बसताना एका तरुणाचा तिला धक्का लागला. यावरून वाद होऊन परिसरात आरडाओरड झाली. तरुणीची छेड काढली जात असल्याचे समजून जमलेल्या जमावाने त्या तरुणाला चोप दिला. माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात पाठवले, तर तरुणीला पोलिस ठाण्यात नेले.
दैनिक‘दिव्य मराठी’च्या ज्युनियर एडिटर-८प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांचासन्मान सोहळा शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमधील दै. दिव्य मराठी कार्यालयात पार पडला. दै. ‘दिव्यमराठी’चे राज्य वितरण प्रमुख प्रदीप पांडे व मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. राज्यस्तरावरील विजेत्यांची नावे शौर्य महेंद्र गायकवाड - टिंकलिंगस्टार इंग्लिश स्कूल, बीड; प्रीतीसोमनाथ तांदळे - श्री संत सावतागुरुकुल, फुलंब्री; गायत्री ज्ञानेश्वरपांचाळ - स्वामी विवेकानंद कॉलेज,मंठा; साक्षी चव्हाण - कुलभूषणज्युनियर कॉलेज, छत्रपतीसंभाजीनगर आदी. युनिट विजेत्यांची नावे श्रेया अनिल वेदपाठक - आ. कृ.वाघमारे प्रशाला; गौतमी जगताप -ओम प्रायमरीस्कूल;तेजस्विनीसुनील बनसोडे- संत सावता गुरुकुल, फुलंब्री; दर्शनदत्तात्रय केंडकर - ऑक्सिलिमकॉन्व्हेंट स्कूल, अहमदनगर; स्वामिनीसुहास करांदे - ऑक्सिलिम कॉन्व्हेंटस्कूल, अहिल्यानगर; शाश्वतपरमेश्वर आंधळे - टिंकलिंग स्टारइंग्लिश स्कूल, बीड; सायली राजेंद्रमिसाळ - गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर, वेरुळ; श्रुती शरद घोलप -देवगिरी महाविद्यालय, छत्रपतीसंभाजीनगर आदी.
ब्रिटनची नोकरी सोडून भारतात अनाथांना शिकवतात जॉयस:महाराष्ट्रात वंचितांची सेवा करतात
जॉयस कॉनोली... अहिल्यानगरच्या गल्ल्यांमध्ये हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. स्कॉटलंडच्या जॉयस १० वर्षांपासून येथे वंचितांच्या जीवनात आनंदाचे रंग भरत आहेत. युकेमधील ‘लीड्स बेकेट युनिव्हर्सिटी’ची नोकरी सोडून त्या गल्लोगल्ली फिरून मुलींना शिकवतात. त्या येथे ‘स्नेहालय’ प्रकल्पासाठी समर्पित आहेत. ५६ वर्षांच्या जॉयस स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या कार्यामुळे इतक्या प्रभावित झाल्या की २०१६ मध्ये त्या भारतात आल्या. सध्या त्या ५ हजार हातावर पोट असलेल्या मजुरांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील सक्रियपणे कार्य करत आहेत. या निराधार मुलांशी त्यांचे असे नाते निर्माण झाले आहे की १० वर्षांपासून त्या स्नेहालयमध्येच स्थायिक झाल्या आहेत. ‘मलाला’ मोहिमेचे केले नेतृत्व: अहिल्यानगरमध्ये आल्यापासून जॉयस यांनी ‘मलाला फंड’च्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा संकल्प केला आहे. स्नेहालयच्या डॉ. प्रीती भोंबे यांनी सांगितले की, त्यांच्या प्रयत्नांमुळे जवळपास २५% मुली शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्या. त्या अनाथ मुलांना स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे (व्यक्तिमत्व विकास) धडे शिकवतात. सेवा करून मला समाधान मिळते स्नेहालय हे माझे घर आहे. येथील लोक माझे कुटुंब. मानवतेची भाषा आपल्याला जोडते. येथील मातीत सेवा करून मला समाधान मिळते. ते मी जगातील कोणत्याही ऐश्वर्याच्या बदल्यात सोडू शकत नाही. -जॉयस कॉनोली
नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी (सीओ) निखिल लक्ष्मण फराटे यांच्यावर उपनगराध्यक्षा शालिनी सुखदान यांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांनी थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फराटे यांनी बेकायदा कामे करण्यास नकार दिल्याने हा जीवघेणा हल्ला केला. गोळीबार करताना कट्ट्याचा ट्रिगर अडकल्याने फराटे यांचे प्राण बचावले. फराटे यांनी या घटनेच्या तब्बल सहा दिवसांनंतर तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळी पंचायत कार्यालयातील बैठकीदरम्यान सुखदान याने फराटे यांना दमदाटी केली. त्यानंतर पावणेआठच्या सुमारास फराटे चारचाकीने अहिल्यानगरकडे निघाले असता सुखदानने ‘बुलेट’वरून पाठलाग करत खोलेश्वर गणपती चौकाजवळ त्यांची गाडी अडवून गावठी कट्टा काढून फराटे यांच्यावर गोळीबार केला. फराटे वाकल्याने बचावले. त्यानंतर सुखदानने दुसरा फायर करण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रिगर अडकल्याने फराटे यांनी गाडी वेगाने पळवून जीव वाचवला. ‘घटनेनंतर घाबरलो होतो, त्यामुळे उशिरा फिर्याद दिली’ “संजय सुखदान ही खुनशी व गुंड प्रवृत्तीची व्यक्ती आहे. त्याने थेट गोळीबार केल्याने मी प्रचंड घाबरलो होतो. त्यामुळे फिर्याद द्यायला उशीर झाला. सुखदान यांच्याकडून मला काय त्रास होता, याची सविस्तर माहिती मी पोलिसांना फिर्यादीत दिली आहे. याव्यतिरिक्त मला जे काही सांगायचे आहे, ते मी थेट न्यायालयातच सांगेन.” - निखिल फराटे, मुख्याधिकारी, नेवासे नगरपंचायत दिव्य मराठी इनसाइड स्टोरी - बेकायदा कामे व मतदार यादीत बदलासाठी सीओंना धमक्या मुख्याधिकारी फराटे हे सप्टेंबर २०२५ पासून नेवासे येथे कार्यरत आहेत. आरोपी संजय सुखदान हा पत्नीच्या पदाचा गैरवापर करून फराटे यांच्यावर बेकायदा कामांसाठी आणि प्रभाग क्र. २ च्या मतदार यादीत नियमबाह्य बदलासाठी दबाव टाकत होता. नकार दिल्याने तो खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देत असे.
तापमान वाढीने राज्यात 900 मे.वॅ. वीज तुटवडा:वीजचोरी व थकबाकी असणाऱ्या भागांतच भारनियमन
राज्यात वाढलेल्या तापमानामुळे कूलर आणि एसीचा वापर वाढला असून विजेच्या मागणीने ३१ हजार मेगावॅटचा टप्पा ओलांडला आहे. महानिर्मिती, खासगी वीज कंपन्या आणि केंद्रीय वीज केंद्रांकडून वीज खरेदी करूनही ऐन सर्वाधिक मागणीच्या काळात (सायंकाळी) ९०० ते १ हजार मेगावॅट विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, महावितरणला गेल्या तीन दिवसांपासून (१६ ते १८ एप्रिल) सायंकाळी ७ ते ८ या वेळेत आपत्कालीन भारनियमन करावे लागत आहे. ज्या निमशहरी वस्त्या किंवा ग्रामीण भागात विजेची चोरी आणि तांत्रिक गळती प्रचंड (साधारण ४२% ते ५८% पेक्षा अधिक) आहे तसेच वीज बिल वसुलीचे प्रमाण नीचांकी आहे, अशाच भागांचा या श्रेणीत समावेश होतो. यापूर्वी १३ एप्रिल रोजीही केवळ जी-३ फीडरवर सायंकाळी ६.४८ ते ७.१५ वाजेपर्यंत वीज कपात करण्यात आली होती. दिवसा दिलासा, सायंकाळी तूट सध्या दिवसाची विजेची गरज बऱ्याच अंशी सौरऊर्जेवर भागवली जात आहे. मात्र, सायंकाळी सौरऊर्जा उपलब्ध नसल्याने व मागणी वाढत असल्याने ही तूट निर्माण होत आहे. शिवाय गॅसच्या टंचाईमुळे बहुतांश भागात विद्युत उपकरणांच्या वापरामुळेही तूट वाढली आहे. भारनियमन तात्पुरता उपाय ही भारनियमनाची स्थिती कायमस्वरूपी नाही. येत्या तीन-चार दिवसांत तापमानाचा पारा थोडा खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजेची मागणी घटेल आणि त्यानंतर कोणत्याही फीडरवर आपत्कालीन भारनियमन करण्याची वेळ येणार नाही, अशी अधिकृत माहिती महावितरण व महानिर्मितीच्या सूत्रांनी दिली आहे. अॅनालिसिस - प्रामाणिक ग्राहकांना फटका नाही, ‘हे’ भाग टार्गेटवर राज्यात सरसकट वीज कपात न करता महावितरणने भारनियमनासाठी फक्त ‘जी-१ ते जी-३’ या गावठाण फीडर्सची निवड केली आहे. यामागील ‘इनसाइड स्टोरी’ अशी आहे की, तुटवड्याच्या काळात प्रामाणिक वीज ग्राहकांना झळ बसू नये म्हणून महावितरणने जाणीवपूर्वक गळती असलेल्या भागांना लक्ष केले आहे.
वादळी वा-यासह पाऊस, नांदेडमध्ये २, धाराशिवमध्ये एका बैलाचा मृत्यू नांदेड, धाराशिव जिल्ह्यात अवकाळी तडाखा उमरी/उमरगा : प्रतिनिधी मराठवाड्यात सूर्य आग ओकत असताना दोन दिवसांपासून काही ठिकाणी वातावरणात बदल झाला असून, ब-याच भागात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. धाराशिव, नांदेडसह लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी तडाखा बसला. नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वादळी वा-यासह झालेल्या पावसादरम्यान […] The post विजांचा धुमाकूळ, ३ बैल ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तन्वी कोलते ठरली यंदाची बिग बॉस
मुंबई : ११ जानेवारी २०२६ रोजी कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस मराठी सिझन ६ ने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. १९ एप्रिल रोजी सहाव्या सिझनचा ग्रँड फिनाले उत्साहात पार पडला. १०० दिवसांच्या या खेळात पाचही स्पर्धकांनी आपली जागा निर्माण केली होती. टॉप ५ स्पर्धकांमधून तन्वी कोलतेने बाजी मारली. प्रेक्षकांकडून मिळालेल्या मतांच्या जोरावर आणि उत्कृष्ट टास्क […] The post तन्वी कोलते ठरली यंदाची बिग बॉस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिका-इराण चर्चेच्या दुस-या फेरीसाठी तयार
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराण संघर्ष निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या युद्धविरामाची मुदत संपत आली असताना दोन्ही देशांमध्ये पुन्हा शांतता चर्चेची हालचाल सुरू झाली आहे. दरम्यान, इराणने प्रस्तावित करार नाकारल्यास इराणच्या अणुप्रकल्पांसह सर्वच ऊर्जा प्रकल्प नष्ट करण्याचा इशारा अमेरिकेने दिला तर त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारीही […] The post अमेरिका-इराण चर्चेच्या दुस-या फेरीसाठी तयार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोला, वर्ध्यात पारा तब्बल ४५ अंशांवर!
देशात सर्वांधिक हॉट शहरे म्हणून नोंद अकोला : उष्णतेच्या लाटेने विदर्भ होरपळून निघत असून, रविवारी तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला. देशात रविवारी सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला आणि वर्धा येथे नोंदविले गेले. विदर्भातील सर्व शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले असून, नागपूर आणि अमरावतीमधील तापमानही ४४ अंशांच्या वर नोंदविण्यात आले. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने […] The post अकोला, वर्ध्यात पारा तब्बल ४५ अंशांवर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांच्या पार्किंगला बंदी!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी देशभरात अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या निर्देशांमध्ये एक्स्प्रेसवेसारख्या रस्त्यांवर अवजड वाहनांच्या पार्किंगवर बंदीचाही समावेश आहे. प्रशासकीय सुस्ती किंवा पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे एक्स्प्रेसवे धोक्याचे मार्ग बनू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने देशभरात रस्ते सुरक्षा निर्देश जारी केले. त्यात यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला आहे. […] The post एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांच्या पार्किंगला बंदी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिलांना आरक्षण देण्यासाठीच्या घटनादुरुस्ती विधेयकासह अन्य दोन विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावून अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेण्याची कृती केंद्र सरकारच्या चांगलीच अंगलट आल्याचे शुक्रवारी दिसले. मोदी सरकारने मांडलेले घटनादुरुस्ती विधेयक आवश्यक बहुमताच्या अभावी शुक्रवारी लोकसभेत नामंजूर झाले. त्यामुळे केंद्र सरकारवर मोठी नामुष्की तर ओढवलीच शिवाय या विधेयकासमवेत मांडण्यात येणारी अन्य दोन […] The post मोदी सरकार आपटले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोन बेपत्ता मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला
चाकूर : प्रतिनिधी चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे. दि. १९ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ७ वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर […] The post दोन बेपत्ता मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अक्षय तृतीयेनिमित्त लातूरच्या बाजारपेठेत कोट्यवधी रूपयांची उलाढाल
लातूर : प्रतिनिधी अक्षय तृत्तीयेला सोने, घर, गाडी खरेदीला विशेष म्हत्व असते. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोने आणि सोन्याच्या दागीन्याची विशेष खरेदी केली जाते. रविवारी सराफा बाजारात सोन्याचे दर ३ हजार रूपयांनी वाढून दीड लाखाच्या वर गेले. असे असले तरी अक्षय तृत्तीयेच्या दिवशी लातूरच्या बाजार पेठेत कोट्यावधी रूपयांची उलाढाल झाली आहे. वैशाख महिन्यातील शुक्लपक्षात येणा-या […] The post अक्षय तृतीयेनिमित्त लातूरच्या बाजारपेठेत कोट्यवधी रूपयांची उलाढाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२०१ ग्रामपंचायतींचे होणार मुल्यमापन
लातूर : योगीराज पिसाळ लातूर जिल्हयातील ७८७ ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात आले आहे. जिल्हयातील कोणत्या ग्रामपंचायतीने विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात केली. त्यासंदर्भाने ग्रापंचायती प्रत्येक घटक निहाय स्वमुल्यांकनाचे प्रस्ताव दि. २५ एप्रिल पर्यंत ऑनलाईन सादर करत आहेत. त्यानंतर सांगली जिल्हयाच्या तालुका स्तरीय टिमकडून लातूर जिल्हयातील सर्वाधिक गुणांकन असलेल्या […] The post २०१ ग्रामपंचायतींचे होणार मुल्यमापन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आमदार अमित देशमुख यांच्या फोटोचा अवमान करणे पडले महागात
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध करून त्यांची मानहानी केल्याप्रकरणी लातूरच्या गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक शांतता भंग करणे आणि जिल्हाधिका-यांच्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपकाही संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. ऍड. किरण शेषेराव जाधव यांनी दिलेल्या […] The post आमदार अमित देशमुख यांच्या फोटोचा अवमान करणे पडले महागात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अल्पवयीन विद्यार्थ्यास लुटणा-या आरोपींना अटक
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणा-या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.दनांक १४ मार्च २०२६ रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय १७ वर्षे, […] The post अल्पवयीन विद्यार्थ्यास लुटणा-या आरोपींना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील हवामानात मोठा बदल:सोलापूर, इंदापूर आणि परभणीत पावसाचा धुमाकूळ; विविध ठिकाणी विजा कोसळल्या
राज्यात हवामानाचा मोठा विरोधाभास पाहायला मिळत असून, एका बाजूला उन्हाचा चटका वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला सोलापूर, पंढरपूर, परभणी आणि इंदापूरसह अनेक भागांत अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली आहे. वेगवान वादळी वारा आणि विजांच्या लखलखाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यात रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला असून, कांदलगाव, सरडेवाडी, शहा, हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली आहे. कासेगावात झाडावर वीज पडली पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, तालुक्यातील कासेगाव येथे नारळाच्या झाडावर वीज कोसळून झाड जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे द्राक्ष आणि डाळिंबासारख्या फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. खर्डीत एकाच दिवसांत 4 वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळली पंढरपूर तालुक्यातील खर्डी गावात एकाच दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे प्रचंड वातावरण निर्माण झाले आहे. बनकर माळी वस्ती येथील उसाच्या शेतावर वीज पडल्याने पिकाने पेट घेतला, तर मुस्लिम कब्रस्तान परिसरातील कडबा आणि जळकेवाडी येथील नारळाचे व आंब्याचे झाड वीज कोसळून जळून खाक झाले. गेल्या दोन दिवसांत या परिसरात एकूण पाच वेळा वीज पडल्याच्या घटना घडल्या असल्या, तरी सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, निसर्गाच्या या प्रकोपाने खर्डी परिसरात चिंतेचे सावट पसरले आहे. परभणीत वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी परभणी जिल्ह्यात दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर संध्याकाळी वातावरणात अचानक नाट्यमय बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने परभणीकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा दिला असला, तरी बळीराजाच्या चिंतेत मात्र मोठी भर घातली आहे. फळबागा आणि इतर पिकांना या पावसाचा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी पावसाचा इशारा कायम ठेवला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचे व सतर्कतेचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसासह गारपीट सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर आणि दर्शनाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः दर्शनाळ येथील शेतकरी अर्जुन गाडेकर यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने साठवलेला गहू, ज्वारी आणि कांदा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. अनेक भागांत काढून ठेवलेली पीके भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, अस्मानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
भव्य आतिषबाजीने उजळला लातूरमधील महात्मा बसवेश्वर चौक
लातूर : प्रतिनिधी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महराज यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर चौक येथे नव्या एलईडी नामफलकाचे थाटामाटात अनावरण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, उपमहापौर अॅड.स्रेहलजी उटगे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यावेळी करण्यात आलेल्या भव्य आतिषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि उपस्थित नागरिकांनी जल्लोषात सहभाग घेतला. महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित […] The post भव्य आतिषबाजीने उजळला लातूरमधील महात्मा बसवेश्वर चौक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच्या राजकारणातील ‘तात्या’ हरपले
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि शहराच्या राजकीय व सामाजिक पटलावरील एक सर्वसमावेशक नेतृत्व सुरेश (तात्या) निवृत्तीराव पवार यांचे आज, रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण लातूर शहरावर शोककळा पसरली आहे. एका अत्यंत मनमिळावू आणि जनसामान्यात प्रेमळ प्रतिमा असलेल्या नेत्याच्या जाण्याने, लातूरकरांनी आपल्या परिवारातील सदस्य गमावल्याची भावना […] The post लातूरच्या राजकारणातील ‘तात्या’ हरपले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपी नराधम सोमा सालिक मेश्राम (37) याला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. भंडारा तालुक्यातील मोहदुरा गावात मैत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच जिवाभावाच्या मैत्रिणीच्या वडिलांनी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलगी आणि आरोपी सोमा मेश्रामची मुलगी एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती, याच विश्वासाचा गैरफायदा नराधम चुलत्याने घेतला. गुरुवारी रात्री पीडित मुलगी मैत्रिणीकडे मुक्कामी असताना, आरोपीने तिला दुचाकीवर फिरायला नेण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले आणि गुंजेपार परिसरातील एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अघोरी कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढवलेला भीषण प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. ही बातमी गावात समजताच सर्वत्र संतापाची लाट उसळली, मात्र समाजात होणारी चर्चा आणि झालेल्या अत्याचारामुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या पीडित मुलीने टोकाचे पाऊल उचलत विषप्राशन केले. तिला तात्काळ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भंडारा पोलिसांनी तातडीने हालचाली करत नराधम आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून, या धक्कादायक प्रकारामुळे पुन्हा एकदा महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी देशभरात 'सृजन संघटन अभियान' सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नवे पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ग्रामीण आणि शहर असे दोन्ही जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. यासाठी मुलाखती आणि कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी केंद्रीय निरीक्षक आफताब अहमद (हरियाणा आमदार) आणि राज्याचे निरीक्षक भाई जगताप (आमदार) हे चार दिवस अमरावतीत होते. या काळात निरीक्षकांनी विश्रामगृहावर अनेक पदाधिकाऱ्यांशी 'वन टू वन' संवाद साधला. काही जणांनी सामूहिकरित्याही आपली भूमिका मांडली. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष कोण असावा, याबाबत त्यांनी मते जाणून घेतली. ही मते बंद लिफाफ्यात एका अहवालाच्या स्वरूपात २३ किंवा २४ एप्रिल रोजी पक्षश्रेष्ठींकडे सादर केली जातील. त्यानंतर साधारणतः २८ एप्रिलच्या आसपास नव्या नेतृत्वाची निवड घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठीच्या दावेदारांबद्दलचा अहवाल पाठवताना सर्वसाधारण (खुला प्रवर्ग), इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (व्हीजे-एनटी), अल्पसंख्याक आणि महिला अशा प्रत्येक संवर्गातून संभाव्य नावे समाविष्ट करावीत, असा पक्षादेश आहे. त्यामुळे निरीक्षकांकडून पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्या जाणाऱ्या अहवालात या सातही संवर्गातील नावांचा समावेश असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यमान अध्यक्षांना विरोध असल्याने या पदासाठी १४ जणांनी अर्ज भरले आहेत. या संदर्भात खासदार बळवंतराव वानखडे यांनी म्हटले आहे की, मी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे, परंतु मी स्पर्धेत नाही. निरीक्षकांसमोर झालेल्या चर्चेदरम्यान बहुतेक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी बबलू देशमुख यांनाच पुन्हा संधी देण्याची मते मांडली आहेत, असेही ते म्हणाले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे वानखडे यांनी स्पष्ट केले.
अमरावतीत रोज 64 जणांना श्वानदंश:मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र अद्यापही नाही
अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी ६४ नागरिकांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारणीला अद्याप गती मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण २३,३९९ नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयांमधील असून, खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या यात समाविष्ट नाही. त्यामुळे श्वानदंशाची खरी आकडेवारी याहून अधिक भयावह असण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, अमरावती महानगरपालिका प्रशासनाने भटक्या श्वानांची मोजदाद आणि त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निवारा केंद्रासाठी जागेची निश्चिती झाली असून, लवकरच बांधकाम पूर्ण होऊन केंद्र कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित वेग आलेला नाही, त्यामुळे नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नांदगाव खंडेश्वर येथे द ग्रॅज्युएट फाउंडेशनने आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवात २७१ सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला. ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. यापैकी १२२ उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत, तर उर्वरित उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्रे पाठवली जातील. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रथमच अशा प्रकारचा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याने युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. 'कंपन्या आपल्या दारी' या संकल्पनेतून विविध नामांकित कंपन्यांना थेट नांदगाव खंडेश्वर येथे आणण्यात आले. यामुळे ग्रामीण युवकांना मोठ्या शहरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच मुलाखती देण्याची आणि रोजगार मिळवण्याची संधी मिळाली. या नोकरी महोत्सवात एकूण ७३५ उमेदवारांनी नोंदणी करून विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमोर मुलाखती दिल्या. त्यापैकी २७१ उमेदवारांची निवड करण्यात आली. फुकोक इंडिया लि. (चाकण, पुणे), जाधव गिअर लि. (अमरावती), धूत ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स प्रा. लि. (संभाजीनगर), ऑटो कॉम्पोनंट्स प्रा. लि., इलेक्ट्रिकल सिस्टिम प्रा. लि., ईगल हाय-टेक इंडस्ट्रियल प्रा. लि. (संभाजीनगर), प्रिसिजन मॅपिंग लि., सनसेट पॉवर सोल्युशन्स प्रा. लि., एम. के. किचन प्रा. लि. (अमरावती) या नामांकित कंपन्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. निकु खालसा होते. नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष मोहम्मद जमीर, नगरसेवक अक्षय पारस्कर, योगेश चव्हाळे, वासुदेव लोखंडे, मोहम्मद साजिद, अविनाश ब्राम्हणवाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. द ग्रॅज्युएट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. नितीन टाले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. बेरोजगारी कमी करण्यासाठी समाजाने एकत्र येऊन सकारात्मक उपक्रम राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष बोरकर व प्रा. गजानन काकडे यांनी केले, तर प्रा. रुपेश फुके यांनी आभार मानले. ग्रामीण भागातील युवकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात यावेत, अशी अपेक्षा उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
परतवाडा येथील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केली आहे. सेनेच्या एका प्रतिनिधीमंडळाने अमरावती येथे जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. शिवसेनेच्या मते, ही घटना अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि निंदनीय आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मो. अयाज मो. अहमद याने काही मुलींचे लैंगिक शोषण केले. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. सदर घटनेतील आरोपींवर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अरबट यांनी केली. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणात आदर्श उदाहरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख अरुणा इंगोले, उपजिल्हाप्रमुख सुनील केने, महानगर प्रमुख रश्मी तायडे, तसेच सुधीर खंडार, गजानन कात्रे, यश बनसोड, मंगेश ढोके, गणेश भुजाडे, संजय देशमुख, शहर प्रमुख वृंदा मुक्तेवार, अस्मिता बोडे, अर्चना कांबळे, ज्योती राईकवार, सागर गेठे, राहुल भुंबर, गणेश गावंडे, विनय गावंडे आणि इतर महिला शिवसैनिक उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी झाली असून, अनेक संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची निंदा केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. एक दिवसापूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घटनेची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि योग्य ते निर्देश दिले.
शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि अन्यायकारक निर्णयांविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने अमरावती येथे आंदोलन केले. संघटनेने शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करत आपल्या मागण्या मांडल्या. निवेदन देण्यापूर्वी, संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ पदाधिकारी सुनील केणे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राजनकर, अध्यक्ष रूपेश टाले, सरचिटणीस निलेश टोम्पे आणि कार्याध्यक्ष विनायक पवार यांनी केले. शिक्षकांचे वेतन थांबवणे, वर्षानुवर्षे थकित देयके मंजूर न करणे, शिक्षकांना निवडणूक तसेच इतर अशैक्षणिक कामांमध्ये सक्तीने गुंतवणे, परीक्षा काळात पटपडताळणीचे अव्यवहार्य आयोजन करणे आणि संचमान्यतेतील गंभीर त्रुटी यांसारख्या निर्णयांविरोधात शिक्षक सेनेने एल्गार पुकारला आहे. हे आंदोलन त्याच मालिकेचा एक भाग होते. या आंदोलनाद्वारे अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ समायोजन, थकित देयकांचे वितरण, बी.एल.ओ. कामातून शिक्षकांची मुक्तता, परीक्षा काळातील पटपडताळणीला स्थगिती, त्रुटीग्रस्त संचमान्यता तातडीने निकाली काढणे, वेतनातील विलंब थांबवणे, विना-अनुदानित शाळांना मूल्यांकनाची पुन्हा संधी आणि विदर्भातील शाळा २६ जूननंतरच सुरू करण्याची मागणी करण्यात आली. राज्यात वाढत असलेल्या प्रशासकीय दुर्लक्षावर टीका करताना अध्यक्ष रूपेश टाले यांनी उपस्थितांना संबोधित केले. शासनाने मागण्या तात्काळ मान्य न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, महिला शिक्षिका आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, इतर शिक्षक संघटनांनीही प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. तापमानातील वाढ लक्षात घेता शाळांच्या वेळा बदलण्यात याव्यात, निकाल घोषित करण्यापूर्वी पेपर तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. म. रा. प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक भारती या संघटनांनीही या मागणीसाठी पाठिंबा दर्शवला आहे.
सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून १० लाखांचे दागिने लंपास
कुर्डूवाडी : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे १० लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. पासून ते दि. १८ रोजी सायं ८ वा दरम्यान कुर्डूवाडी शहराजवळील छोरिया टाऊनशीप, कुर्डू हद्दीत (ता.माढा) येथे घडली. याबाबत विठ्ठल निवृत्ती ननवरे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद […] The post सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून १० लाखांचे दागिने लंपास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्कॉलर्स प्वाईंट सचिवांचा मृतदेह माडू नदीपात्रात आढळला:आत्महत्या की इतर कारणे? पोलिस तपास सुरू
मोर्शी येथील माडू नदीपात्रात स्कॉलर्स प्वाईंट इंग्लिश स्कूलचे सचिव गजानन उद्धवराव शहाणे (वय ५५, रा. दुर्गानगर, मोर्शी) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या शहाणे यांचा मृतदेह अमरावती येथील शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रविवारी बाहेर काढला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शहाणे शनिवारी सकाळी नऊ वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी मोर्शी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मोर्शी-वरुड रोडवरील माडू नदीच्या मध्यभागी एक मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शोध व बचाव पथकाचे व्यवस्थापक सुरेंद्र रामेकर यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी पोहोचलेल्या आपदा मित्रांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली लाइफ जॅकेट, दोरी आणि बांबूच्या स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र सागर तायडे, प्रियंशू तायवाडे, विवेक सावरकर यांच्यासह पोलीस व महसूल प्रशासनाने सहकार्य केले. गजानन शहाणे यांनी आत्महत्या केली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन उकंडे, स्कॉड विभागाचे स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते, शेखर वाडीभस्मे, अथर्व कोहळे आणि प्रितेश कांबळे करत आहेत.
पंजाबचे लखनौला २५५ धावांचे लक्ष्य
मोहाली : आयपीएलच्या २९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपरजायंट्ससमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यू चंदीगड येथे एलएसजीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने ७ गडी गमावून २५४ धावा केल्या. ही या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी बंगळूरने चेन्नईविरुद्ध २५० धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रियांश आर्याने ९३ धावा आणि कूपर कॉनॉलीने ८७ धावा केल्या. या दोघांनी […] The post पंजाबचे लखनौला २५५ धावांचे लक्ष्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डेंग्यूविरुद्धच्या पहिल्या लसीला भारताची मंजुरी
नवी दिल्ली : देशात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करते. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून डेंग्यूवरील पहिल्या लसीला म्हणजेच टीएके-००३ अर्थात (क्युडेन्गा) ला भारत सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने ४ ते ६० वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे मानले आहे. जपानच्या […] The post डेंग्यूविरुद्धच्या पहिल्या लसीला भारताची मंजुरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात 'धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सामंत यांनी सांगितले की, शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सारसबागेजवळील शिवसेना भवनात हा कक्ष सुरू झाला. शिवसेनेचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्या पुढाकाराने या कक्षाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे, सुधीर कुरूमकर, आबा बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सामंत यांनी शिवसैनिकांना आवाहन केले की, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. ही सहाय्यता कक्षाची चळवळ गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा उपक्रमांमुळे समाज घडतो आणि नेतृत्वही विकसित होते, असे ते म्हणाले. वैभव वाघ यांच्यासारख्या तरुणाच्या पुढाकारातून हा उपक्रम पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, शासनामार्फत विविध योजना आणि आरोग्य सुविधांसाठी निधी उपलब्ध असतो, परंतु माहितीअभावी त्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. हा कक्ष अशा योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मदत करेल. अडचणीच्या काळात मदतीसाठी येणाऱ्या लोकांसाठी शिवसेना भवन हे दिघे साहेबांच्या आनंदाश्रमाप्रमाणे वाटावे, असे कार्य येथून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक
मुंबई : बिग बॉस मराठी ६ च्या भव्य महाअंतिम सोहळ्यात ‘राजा शिवाजी’ या बहुचर्चित चित्रपटाची विशेष झलक पाहायला मिळाली. या वेळी अभिनेते आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख, अभिषेक बच्चन आणि या चित्रपटाच्या निर्मात्या जिनिलिया देशमुख यांनी हजेरी लावत कार्यक्रमाची रंगत वाढवली. या चित्रपटाच्या टीमने बिग बॉसच्या मंचावर केवळ संवादच साधला नाही, तर फिनालेमध्ये प्रेक्षकांचा उत्साहही […] The post ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित ‘दत्तधाम दरबार’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या या दरबाराचा संपूर्ण परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल चार तास परिसराची कसून झाडाझडती घेत सविस्तर स्पॉट पंचनामा केला. यावेळी दरबारात भक्तांना दिल्या जाणाऱ्या विविध संशयास्पद औषधांचे नमुनेही पोलिसांनी जप्त केले असून, या धडक कारवाईने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजेंद्र गडगेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, गडगेच्या या कथित दरबारामागील आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीचे जाळे उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडच्या तरुणाकडून 22 हजार रुपये उकळले अहिल्यानगरमधील संगमनेरचा तथाकथित भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या कारनाम्यांची व्याप्ती आता राज्याच्या इतर भागांतही पसरल्याचे उघड झाले असून, बीडमधील एका तरुणाची फसवणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. पोटाचा आजार बरा करणे आणि विवाह जमवून देण्याच्या नावाखाली या भोंदूने माजलगाव येथील एका तरुणाकडून तब्बल 22 हजार रुपये उकळल्याचा गंभीर आरोप आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने या भोंदू विरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे 'दत्तधाम सरकार' या नावाने दरबार भरवून मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करणाऱ्या या भोंदूला पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन तक्रार दिल्यानंतर संगमनेर पोलिसांनी राजेंद्र गडगेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला सध्या पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्या दरबारातील संशयास्पद व्यवहारांची आणि फसवणुकीच्या जाळ्याची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. कॅन्सरसारखे आजार मंत्रोच्चाराने बरे केल्याचा दावा राजेंद्र गडगे आपल्या 'दत्तधाम सरकार' दरबारात कॅन्सर, सांधेदुखी आणि मणक्याच्या त्रासासारखे गंभीर आजार केवळ मंत्रांच्या जोरावर बरे केल्याचे बनावट दावे करत असे. या कथित चमत्कारांचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून तो ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या नागरिकांना जाळ्यात ओढायचा. व्यवसायातील नुकसान भरून काढण्याचे आणि वैयक्तिक समस्या सोडवण्याचे आमिष दाखवून तो लोकांच्या अज्ञानाचा आर्थिक फायदा घेत असल्याचे आता समोर येत असून, कोठडीदरम्यान त्याचे आणखी अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता आहे.
कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील एका तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावणाऱ्या नांदेडच्या पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रविवारी ता. १९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तब्बल २२ तासांनी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील नवनाथ लाखाडे (२४) या तरुणाची नांदेड पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीक अभिषेक सातपुते याच्या सोबत मैत्री होती. मागील आठ ते दहा वर्षापासून ते चांगले मित्र होते. त्यानंतर शनिवारी ता. १८ दोघेही वडगाव येथे भेटले होते. त्यानंतर ते आखाडा बाळापूर येथे आले. सायंकाळच्या सुमारास पुन्हा वडगाव शिवारात गेले. यावेळी अभिषेक याने नवनाथ याच्याकडे अनैसर्गिक संबंध ठेऊ दे असा तगादा लावला. यापुर्वीही त्याने असा तगादा लावला होता. मात्र नवनाथ याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र शनिवारी ता. १८ अभिषेक याने सकाळपासूनच त्याच्याकडे या प्रकाराचा तगादा लावला. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून नवनाथ याने वडगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत नवनाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र जो पर्यंत अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भुमीका मयत नवनाथ याच्या कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर आज आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात महिला व पुरुषांचा जमाव एकत्र आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या पथकाने तातडीने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जाऊन जमावासोबत संवाद साधला. सायंकाळी उशीरा नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीवरून अभिषेक सातपुते याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर २२ तासानंतर मयत नवनाथ याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, एस. पी. रोहिणकर यांच्या पथकाने अधिक तपास सुरु केला आहे.
निवृत्त सहायक आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक:पत्नी, मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघे रा. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना), दत्ता केदारी (रा. बोरज) आणि बाळासाहेब वाळुंज (रा. कामशेत, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजित विलास उंद्रे (वय ३५, रा. मांजरी खुर्द) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहायक पोलीस आयुक्त पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सहायक आयुक्तांनी २०२६ मध्ये खेड तालुक्यातील बोरज येथे मुंबईतील एका व्यावसायिकाची १२ एकर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले. ही जमीन खरेदी केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष त्यांनी दाखवले. त्यानंतर सहायक आयुक्तांनी मुंबईतील व्यावसायिकाच्या नावाने एका बँकेत खाते उघडले आणि तक्रारदाराकडून ५० लाख रुपये घेतले. तसेच, सोलापूर येथील एका बँकेत खासगी कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून आरटीजीएसद्वारे २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी व्यावसायिकाकडून आणखी पैसे घेण्यात आले. खरेदीखत करायचे असल्याचे सांगून सहायक आयुक्ताने तक्रारदार व्यावसायिकाकडून १ कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. खेडमधील जमीन मुंबईतील व्यावसायिकाची होती, मात्र तो हयात असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. जेव्हा तक्रारदार व्यावसायिकाने पैसे परत मागितले, तेव्हा सहायक आयुक्तांनी टाळाटाळ केली आणि त्यांना धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपासात असे उघड झाले आहे की, सहायक आयुक्तांनी काही रक्कम पत्नी आणि मुलाच्या खात्यात जमा केली होती. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या इतर दोघांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा फाटा शिवारात वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १९ सागवान लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो अन लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. वन विभागाच्या या कारवाईमुळे सागवान तस्करांमधून खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जंगलामधून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, विश्वनाथ टाक, माधव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून पहाटे, दुपारी तसेच रात्रीच्या वेळी जंगल परिसरात गस्त घातली जात आहे. दरम्यान, आज दुपारी उमरा फाटा शिवारातून एका टेम्पोमध्ये सागवान लाकुड भरून वसमतकडे नेला जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल काळे, वनरक्षक अशोक चव्हाण यांच्यासह पथकाने वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी एक टेम्पो उमराफाटा शिवारातून वसमतकडे जात असतांना वन विभागाच्या पथकाने टेम्पो चालकास थांबण्याची सूचना केली. त्यानंतर चालकाची चौकशी सुरु केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. याप्रकारामुळे वन विभागाच्या पथकाने टेम्पोची तपासणी केली असता त्यात सागवून लाकूड भरलेले दिसून आले. सदर सागवानाचा वाहतुकीचा तसेच तोडणीचा परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने टेम्पो व लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाकडून पुढील कारवाई केली जात आहे.
पंढरपुरात श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान
पंढरपूर : विशेष प्रतिनिधी हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असते. त्यानिमित्ताने पंढरपुरातील श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली. यामध्ये श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंच पेटी तांबडी, जव मणी पदक, जवेच्या […] The post पंढरपुरात श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अभिजित गाडे (वय २७, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित २४ वर्षीय तरुणीची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर आरोपीने तिला जाळ्यात ओढले. तिला चित्रपटात काम मिळवून देणार असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. चित्रपटात काम मिळवून न दिल्याने तरुणीने विचारणा केली. तेव्हा आरोपीने तरुणीची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत. नदीपात्रात एकाचा गळा चिरून खून झेड ब्रीज जवळील व लकउी पुल यांच्या मधील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत एका अज्ञात तरूणाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी साडेसात वाजता समोर आला आहे. खून झालेलया तरूणाची अद्याप ओळख पटली नसून याप्रकरणी मात्र डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अमंलदार आकाश बाळासाहेब सोनवणे (32, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली मात्र मृत्यू झालेल्याची ओळख अद्याही पटू शकली नाही. पुढील तपास डेक्कन पोलिस करत आहे.
पुण्यातील हांडेवाडी येथील करिअप्पा कॅम्पस परिसरातील यशोतेज ॲकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने १० नोव्हेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलीस तपासात ही आत्महत्या नैराश्यातून आणि संस्थेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ॲकॅडमीचे संस्थापक तेजस पाटील, संचालक व सीईओ विकास पाटील आणि वॉर्डन वसंत सरकटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधूत उल्हास बडे (वय १६, मूळ रा. बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने निवासी खोली क्रमांक ५१३ मध्ये पंख्याला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले होते. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अवधूतवर त्याच्या रूममेटचे तीन हजार रुपये चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणानंतर वॉर्डनने त्याला ॲकॅडमीमधून काढून टाकण्याची सूचना दिली होती. या दबावामुळे अवधूत मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात गेला होता. महत्त्वाचे म्हणजे, अवधूत अल्पवयीन असतानाही अशा परिस्थितीत त्याचे योग्य समुपदेशन करण्यात आले नाही. तसेच, घडलेल्या प्रकाराची माहिती त्याच्या पालकांनाही वेळेत देण्यात आली नाही. संबंधित पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने आणि आवश्यक काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अवधूतचे आई-वडील दोघेही शिक्षक असून, तो यशोतेज ॲकॅडमीमध्ये ११ वीचे शिक्षण घेण्यासोबतच एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. फुरसुंगी पोलीस ठाण्यात अवधूतचे वडील उल्हास बडे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात एका अज्ञात चोरट्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 'चड्डी-बनियान' परिधान केलेल्या या चोरट्याचा प्रयत्न फसला असला तरी, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने आकाशवाणी परिसरातील एका एटीएम सेंटरला लक्ष्य केले. त्याने ओळखी लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता आणि तो केवळ चड्डी व बनियानवर होता. एटीएममध्ये प्रवेश करताच त्याने सर्वप्रथम दिवे बंद केले. त्यानंतर चोरट्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. त्याने मशीनवर अनेकदा प्रहार केले, मात्र एटीएमची सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याने त्याला यश आले नाही. मशीन न फुटल्याने चोरट्याला रिकाम्या हाताने पळ काढावा लागला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवाहर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असून, त्या आधारे पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट!:कथित ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव उघड; कठोर कारवाईची मागणी
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्षांनी हा गंभीर दावा केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या कथित रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी उघड केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक तरुण आणि तरुणी यांच्यातील संवादातून मुलींच्या तस्करीचे भयावह वास्तव समोर आले आहे. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून मुलींना फूस लावून पुण्यात नेले जात असून यामागे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे, ज्यात काही महिलांसह अनेक लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तस्करीसाठी मुलींची नकली आधार कार्ड तयार केली जात असल्याची धक्कादायक बाबही या संवादातून उघड झाली आहे. हे काम जरी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटत असले, तरी ते 'शाप' देणारे आहे, अशी कबुलीही त्या तरुणीने दिली असून, या प्रकारामुळे यवतमाळ जिल्ह्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्षांनी कडक कारवाईची मागणी केली असून, आदिवासी भागातील निरागस मुलींना जाळ्यात ओढून त्यांची तस्करी करणे हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे म्हटले आहे. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरत आहे. विशेष म्हणजे, व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये 'शुभम मामा', 'कल्याणी आत्या' आणि 'मजहर कुरेशी' अशा नावांचा स्पष्ट उल्लेख असल्याने हे सर्वजण या रॅकेटचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप केला जात आहे. या धक्कादायक खुलाशानंतर आता पोलिस प्रशासनाकडून नेमकी काय पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ऑडिओ क्लिपमधील संवाद (दिव्य मराठी या कथित ऑडिओ क्लिपमधील संवादाची पुष्टी करत नाही) मुलगा: काय म्हणते, काय चाललंय?मुलगी: मी पोरींना घेऊन पुण्याला कामासाठी चालले आहे.मुलगा: अच्छा-अच्छा.मुलगी: मी एकटी नाहीये, मग काय दहा जण नेणार का? शुभम मामा आहे ना… पोरी काढणारा (पुरवणारा).मुलगा: शुभम मामा कोण? कुठला आहे तो?मुलगी: आपल्याच गावातला आहे, फुकट नगरचा.मुलगा: ते कल्याणी आत्या करते ना हे काम?मुलगी: हो, तीच.मुलगा: तिने काम सोडलं होतं ना?मुलगी: नाही, सोडलं नाहीये.मुलगा: ती आपल्या गावात घरापाशीच दिसते… कल्याणी आत्या.मुलगी: ती आता सगळं काम मोबाईलवरूनच करते.मुलगा: अच्छा, असं आहे का?मुलगी: तिला या कामासाठी आधी जेल झाली होती, तेव्हापासून ती फक्त मोबाईलवरूनच सगळं हाताळते. तिचं काम नील (निकाली) झालं की ती आता जाईलच.मुलगा: तिचा नवरा?मुलगी: कल्याणी आत्याच्या बापाने तिचं लग्न लावून दिलं होतं, तिथून ती निघाली होती.मुलगा: मजहर कुरेशी?मुलगी: हो, त्याच्यासोबत करून दिलं होतं. हे फार खतरनाक काम आहे.मुलगा: मदन कुरेशी हे काम करतो का?मुलगी: हो, ते कुरेशी हेच काम करतात. पैसा लय भेटतो, पण लोकांची बदुआ लागते.मुलगा: मग तुला काय वाटतं, हे चांगलं काम आहे का?मुलगी: मला चांगलं नाही वाटत बा, मी फक्त सांगत आहे. पैसा मिळतो पण बदुआ लागते.मुलगा: अच्छा, मग मुली काढण्यात आणि विकण्यात हे तिघे-चौघेच आहेत का?मुलगी: बापरे! तिघे-चौघे नाही, यात लय जण आहेत. हे पूर्ण रॅकेट आहे. यात पूनम आत्या आहे, आणखी किती जण आहेत हे मी सांगूच शकत नाही.मुलगा: बापरे! मग यात मेन (प्रमुख) कोण आहे?मुलगी: यात कुणी एक मेन नाही, जे काम लावून देतात ते मेन आहेत. माझ्या आईची पोरगी, पूनम आत्या आणि कल्याणी आत्या काम लावून देतात. मग त्यांना घेऊन जावं लागतं. त्यासाठी आधार कार्ड लागतं, माझ्या आईचं नकली आधार कार्ड बनवलं आहे… आणि आता मम्मी पुण्याला चालली आहे.
बोरिवली (पश्चिम) येथील ऐतिहासिक इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या समोरील 'मधुमिलन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी' (मंगलकुंज) सध्या भ्रष्टाचार आणि गंभीर प्रशासकीय अनियमिततेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 66 वर्षे जुन्या असलेल्या या प्रतिष्ठित सोसायटीत 90 टक्के रहिवासी गुजराती भाषक असून, त्यामध्ये कच्छी जैन समाज आणि इतर गुजराती समुदायाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मॅनेजिंग कमिटीने पुनर्विकासाच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीमुळे आणि 79 लाख रुपयांच्या टॅक्स घोटाळ्यामुळे या 200 कुटुंबांचे भविष्य आता टांगणीला लागले आहे. याप्रकरणी रहिवाशांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. गोपनीयतेच्या नावाखाली पुनर्विकासाचा 'गुप्त' प्लॅन सोसायटीच्या सदस्यांनी मॅनेजिंग कमिटीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. लोकशाही आणि सहकारी संस्थांच्या नियमांना हरताळ फासत कमिटीने कामकाज चालवल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. कोणतीही सर्वसाधारण सभा (GBM) न घेता किंवा सदस्यांची अधिकृत संमती न घेताच, कमिटीने मुंबई महानगरपालिकेत (BMC) पुनर्विकासाचा एक गुप्त आराखडा सादर केला. पालिकेच्या फाईल्समधून या छुप्या कारभाराचे दस्तऐवज जेव्हा सदस्यांच्या हाती लागले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सोसायटीचे सदस्य विरल सावला यांनी थेट सचिव देवेंद्र सयानी यांच्यावर निशाणा साधला आहे. सयानी यांनी स्वतःला सर्वसत्ताधीश समजून हा कट रचल्याचा आरोप सावला यांनी केला. मूळ दुकानदारांना इमारतीच्या मागील बाजूस ढकलून, समोरील मोक्याची आणि कोट्यवधींची व्यावसायिक जमीन हडपण्याचा हा डाव असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. 79 लाखांचा कर हडपला; कमिटी बरखास्त या भ्रष्टाचाराचे पुरावे केवळ कागदपत्रांपुरते मर्यादित नाहीत, तर आर्थिक व्यवहारातही मोठा गैरप्रकार समोर आला आहे. सदस्यांकडून वसूल केलेला 79 लाख रुपयांचा मालमत्ता कर (Property Tax) सरकारी तिजोरीत जमाच करण्यात आला नाही. या गंभीर आर्थिक अनियमिततेची दखल घेत उपनिबंधकांनी (Sub-Registrar) विद्यमान मॅनेजिंग कमिटी तत्काळ प्रभावाने बरखास्त केली आहे. तसेच, सहनिबंधकांनीही या कमिटीला कोणत्याही प्रकारचे नवीन प्रशासकीय किंवा आर्थिक निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे. प्रशासकीय अभद्र युती आणि सद्यस्थिती कमिटी बरखास्त होऊनही जुने सदस्य पडद्यामागून सूत्रे हलवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, सचिव देवेंद्र सयानी यांनी या सर्व आरोपांवर मौन बाळगले आहे. बोरिवलीसारख्या प्रमुख गुजराती बहुल भागात घडलेल्या या घोटाळ्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय (मंत्रालय) या बिल्डर आणि भ्रष्ट कमिटीच्या अभद्र युतीतून 200 कुटुंबांना कसा दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूर हादरले!:दोन भाऊ बेपत्ता, घरापासून 60 फुटांवर चिमुकल्याचा मृतदेह; दुसरा अद्याप बेपत्ता
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात दोन सख्खे चुलत भाऊ घरातून बेपत्ता झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, यातील 6 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह घराच्या अवघ्या 60 फुटांवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास स्वामी कुटुंबातील देवांश (6 वर्षे) आणि साईचरण (11 वर्षे) हे दोघेही बेपत्ता झाले होते, ज्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. शोधमोहीम सुरू असतानाच देवांशचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला, मात्र 11 वर्षांचा साईचरण अद्यापही बेपत्ता असून पोलिस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे. 11 वर्षीय साईचरण दिनेश स्वामी हा अद्याप बेपत्ता असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही मुले बेपत्ता होण्यामागचे नेमके कारण काय आणि 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू हा घातपात आहे की अपघात, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलिस तपासातूनच यावर प्रकाश पडणार आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट टीम, श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यासाठी आणि बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली असून, या घटनेमागील गूढ उकलण्यासाठी सर्व यंत्रणांच्या माध्यमातून युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर आणि अहमदपूर येथील पोलिसांची पथके चाकूर येथे दाखल झाली आहेत. जवळपास दहा पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या मुलाबाबत माहिती गोळा करून त्याचा शोध घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा खून केला आहे. विलास शेळके असे आरोपीचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुणावर चाकूने वार करत जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि त्याचा पुतण्या सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून मागील अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. याच वादातून विलासच्या मनात सुजितबद्दल कमालीचा द्वेष निर्माण झाला होता, ज्याचे पर्यावसान अखेर एका भीषण घटनेत झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास हा जुना वाद उफाळून आला आणि रागाच्या भरात विलासने पुतण्यावर हल्ला चढवला, ज्यामुळे या कौटुंबिक वादाचा अंत एका दुर्दैवी घटनेने झाला. घटनेच्या रात्री सुजित आपल्या आजी-आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपी विलासने तिथे येऊन त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसान काही वेळातच भीषण हल्ल्यात झाले; विलासने संतापाच्या भरात आपल्याकडील चाकूने सुजितच्या पोटावर सपासप वार केले. या रक्तरंजित हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खामसवाडी गावात भररात्री घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जमिनीच्या हव्यासापोटी सख्ख्या चुलत्यानेच पुतण्याचा काटा काढल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मृत सुजित शेळकेच्या आईने दिलेल्या जबाबावरून शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रक्ताच्या नात्यात जमिनीच्या वादातून घडलेल्या या भीषण हत्याकांडाने संपूर्ण गाव हादरले आहे.
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत
तेहरान : आयआरजीसी अर्थात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराण लष्कराचा भाग असलेल्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनी पार करत असलेली दोन तेल जहाजे परत पाठवली आहे. आयआरजीसीशी संलग्नित असलेल्या तस्रीम वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणच्या नौदलाने नाकेबंदी सुरू केली असून, इराणच्या सशस्त्र दलाने रविवार दि. १९ एप्रिल रोजी दोन तेल जहाजांना परत पाठवले. […] The post दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट, २० कामगार ठार
विरधुनगर : तामिळनाडूतील विरधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात २० कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात The post फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट, २० कामगार ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा असून, याच रागातून सभेच्या ठिकाणच्या आणि शहरभरातील बॅनर्सवर महेश शिंदेंना स्थान देण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून फारकत घेत भाजपशी हातमिळवणी केल्याचा आणि पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यातूनच बॅनर्सवरून त्यांचे फोटो गायब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांनी हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला असून, बॅनर्सवर फोटो नसणे ही केवळ काही कार्यकर्त्यांकडून चुकून झालेली गोष्ट असल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. सोमवारी एकनाथ शिंदे यांची सभा होणार असून त्यांच्या सभेला महेश शिंदे उपस्थित राहणार का, तसेच ते व्यासपीठावर दिसणार का, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे. सातारा जिलहा परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीला बहुमत असतानाही भाजपने सदस्य फोडून सत्ता मिळवली. या प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाचे सदस्य भाजपच्या बाजूने गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. तसेच निवडणुकीच्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की देखील झाली होती.
ITMS प्रकल्प अंतिम टप्प्यात:पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांना आता स्वयंचलित चलन येणार
पुणे शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी राबवण्यात येत असलेला इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रणालीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आता स्वयंचलित पद्धतीने चलन (ई-चलन) जारी केले जाईल, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक आणि पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली. पाटील हे सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (SEAP) तर्फे हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित 'पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग' कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ग्लोबल सस्टेनिबिलिटी इम्पॅक्ट कोच किरण डी. एम., पिनॅकल इंडस्ट्रीजचे डॉ. सुधीर मेहता, क्लायमट ट्रूपर्स फाउंडेशनचे सत्या नटराजन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्रो. राजीव येरवडेकर, SEAP चे अध्यक्ष शिवराज साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कॉर्पोरेट संस्थांना त्यांच्या सीएसआर (CSR) निधीचा प्रभावीपणे वापर करता यावा आणि तो योग्य संस्थांपर्यंत पोहोचून समाजोपयोगी कामे व्हावीत, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाटील यांनी पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला. १९९५ मध्ये ८६ चौरस किलोमीटर असलेले पुणे शहर २०२५ पर्यंत ३७३ चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे, म्हणजेच ३३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाहनांच्या वेगाच्या मर्यादेत पुणे जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांचे प्रमाण केवळ ११ टक्के आहे. २०१२ मध्ये पीएमपीएमएल बससेवेचा वापर करणारे १२ लाख प्रवासी होते, हा आकडा आजही बदललेला नाही. सध्या मेट्रोचा वापर करणारे सुमारे तीन लाख लोक आहेत, तर खासगी वाहनांची संख्या ७८ लाखांपर्यंत पोहोचली आहे. पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यामध्ये ट्रॅफिक आणि ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगची विशेष टीम तयार केली जाईल. तसेच, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. ITMS च्या अंमलबजावणीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन मिळेल, ज्यामुळे वाहतूक पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल. शहरातील ३२ महत्त्वाचे रस्ते निश्चित करून त्यावर काम सुरू झाले आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही पाटील यांनी सांगितले. पाटील पुढे म्हणाले की, “वाहतुकीचे नियम तोडल्यामुळेच शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मॅपमाय इंडिया, गुगल, टॉमटॉम यांची मदत आम्ही घेत आहोत. शहरांमध्ये नव्याने विकसित होत असणारे रस्ते, उड्डाणपूल यांची उभारणी करण्याआधी योग्य ती माहिती घेऊन काम करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. पुढल्या पाच वर्षांत पुण्यामध्ये १२० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होईल. नागरिकांनी देखील सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची गरज आहे.”
भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट
पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे. 'धवल' (पांढरा) आणि 'गिरी' (पर्वत) या संस्कृत शब्दांवरून याचे नाव 'पांढरा पर्वत' असे पडले आहे. काली गंडकी नदीच्या जगातील सर्वात खोल दऱ्यांपैकी एक असलेल्या खोऱ्याच्या पश्चिमेस हे शिखर आहे. याची १५ हजार फूट उंचीची दक्षिणेकडील भिंत चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. यापूर्वी, भगवान चवले यांनी १७ मे २०१८ रोजी सकाळी ६:३० वाजता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले होते. एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी त्यांनी चार वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले होते. २०१७ मध्ये खराब हवामानामुळे त्यांना शिखर माथ्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरून परत फिरावे लागले होते, मात्र २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यश मिळवले. एव्हरेस्टपूर्वी त्यांनी सह्याद्रीतील खडापारसी, वजीर, ड्युक्स नोज, लिंगाणा, तैलबैल, ढाकभैरी यांसारखी कठीण शिखरे आणि हिमालयातील स्टोक कांगरी, घोलप कांगरी, भागीरथी, आयलंड पीक सर केली आहेत. एव्हरेस्टनंतर त्यांनी जगातील पाचवे सर्वात उंच शिखर माउंट मकालू देखील पादाक्रांत केले आहे. माउंट धौलागिरीच्या यशस्वी चढाईसह, भगवान चवले यांनी नेपाळमधील सर्व सात अष्टहजारी (८,००० मीटरपेक्षा उंच) शिखरे सर करण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये माउंट एव्हरेस्ट, माउंट कांचनजंगा, माउंट मकालू, माउंट ल्होत्से, माउंट मनास्लु, माउंट अन्नपूर्णा १ आणि आता माउंट धौलागिरी यांचा समावेश आहे. असे करणारे ते कदाचित देशातील पाचवे गिर्यारोहक ठरले आहेत. धौलागिरी शिखराचा शोध १८०८ मध्ये लागला, तेव्हा काही काळ त्याला जगातील सर्वात उंच पर्वत मानले जात होते. १३ मे १९६० रोजी स्विस-ऑस्ट्रियन पथकाने (मॅक्स आयसेलिन यांच्या नेतृत्वाखाली) पहिल्यांदा हे शिखर सर केले. महाराष्ट्रातील प्रसाद जोशी, केवल कक्का आणि जितेंद्र गवारे यांनी यापूर्वी धौलागिरी सर केले आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील अजून २ गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले पीआय शिवाजी ननावरे व एसपीआय द्वारका ढोके या दोघांनीही या शिखराला यशस्वी गवसणी घातली. हे दोघेही पोलिस प्रशासनातील अधिकारी आहेत. यामुळे महाराष्ट्र पोलिससाठी सुध्दा गौरवाची बाब आहे.
नागपूरच्या कामठीत सिलिंडरचा स्फोट:40 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू तर 10 जखमी; गॅस गळतीमुळे लागली आग
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंदी परिसरात सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानतावणे कुटुंब सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अतुल पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता गॅस गळतीमुळे आग लागली. त्यानंतर काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण घरात आग पसरली. घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागल्यानंतर पत्नी व मुले घराबाहेर पाडण्यात यशस्वी झाले. मात्र अतुल हे बेडरूममध्येच अडकून पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. घरात लागलेल्या आगीला विझवण्यासाठी विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काहीजणांनी प्रयत्न केले. यात ते देखील जखमी झाले. या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असली तरी तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, या घटनेचा पुढील सखोल तपास सुरू आहे.
नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट संरक्षण करार आता लागू झाला आहे. या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर ३००० सैनिक तैनात करू शकतील. यासोबतच ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमानांच्या तैनातीलाही परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळ, हवाई तळ आणि बंदरांचा वापर करू शकतील, ज्यामुळे […] The post भारत-रशियात करार लागू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कळमनुरी-आखाडा बाळापूर मार्गावर दोन ट्रकची भीषण धडक:एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर
कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर कामठा फाटा शिवारामध्ये भरडा ट्रकची सभासमोर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी तारीख 19 पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर डोंगरगाव पूल जवळ पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहने एकाच मार्गावरून धावतात. दरम्यान आज पहाटे हिंगोली कडून एक ट्रक ( RJ 09 GC 0967 ) नांदेड कडे जात होता. सदर ट्रक कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर कामठा फाटा शिवारात आला असताना नांदेड कडून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. सदर अपघातामध्ये चालक आशीम सलीम घाची (वय 30वर्षे रा.अरवली जिल्हा गुजरात) जागीच ठार झाला. तर तुफान गवारवाल राठोड (वय 35 वर्षे रा.रावनखेडी ता.झालडा जिल्हा उज्जैन), बाबुलाल ज्ञानुराम मकवाना (वय 40वर्षे रा. धाबलाहारदू ता.तुशना जिल्हा उज्जैन), हफीज आझम मुलतानी (वय 35 वर्षे रा.मुदुसा अरवली गुजरात) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळतात महामार्ग पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ अनमोड,जमादार सोपान थिटे, गजानन कोरडे, प्रवीण राठोड पथकाने तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील जखमींना तातडीने आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. या घटनेची आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.
मराठी भाषा प्राचीन असून उपक्रमशीलतेद्वारे मराठी भाषेचा अभिजाततेचा दर्जा अधोरेखित होत राहिल, असा विश्वास प्रसिध्द सिने- नाट्य कलावंत आनंद इंगळे यांनी व्यक्त केला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे अभिमंच, अॅमस्टरडमच्या संयुक्त विद्यमाने विश्व मराठी एकांकिका, बालनाट्य आणि कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृह संपन्न झाला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंगळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतपाल नितीन ढमाले, उद्योजक दिलीप कोटीभास्कर, हेरिटेज क्लबचे अध्यक्ष शुभ्रो सेन आणि सचिव सोनाली चौबळ उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आनंद इंगळे म्हणाले की, मराठी भाषा टिकविण्यात अशा उपक्रमांचे योगदान मोठे असून अशा स्पर्धा सातत्याने आयोजीत करणे आणि त्यात भाग घेत राहणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना नितीन ढमाले म्हणाले की, मराठी भाषा टिकण्यासाठी आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्या दृष्ट्रीने हा उपक्रम स्तुत्य असून कला आणि साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा नवीन पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे. यावेळी प्रसिद्ध उद्योजक दिलीप कोटीभास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. लीना गोगटे आणि अविनाश ओगले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेबाबत माहिती देताना अविनाश ओगले म्हणाले की, या स्पर्धेसाठी बेल्जियम आणि स्विझरलँड येथून प्रथमच प्रवेशिका आल्या असून १२ देशांतून २९ संघांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे गझलकारा अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. जोशी यांनी गझल लेखनात आकृतीबंधाबरोबरच आशय आणि शब्दांचा ओलावा असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९) पार पडला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर, मैथिली आडकर आणि प्रज्ञा महाजन या प्रसंगी मंचावर उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी गझल लेखनावर मार्गदर्शन करताना सांगितले की, गझल लिहिताना आकृतीबंधाचा विचार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे लिखाणात आशय आणि शब्दांचा ओलावा असावा. गझल लेखनात आचारसंहिताही पाळली गेली पाहिजे. उत्तम गझल निर्मितीसाठी तंत्र, प्रतिभा आणि अनुभव यांचा मिलाफ आवश्यक असतो. सुरुवातीस तंत्र, नंतर स्वत:तील प्रतिभेचा शोध आणि अनुभव अशा प्रक्रियेतून आतून उमलून आल्यानंतर उत्तम गझलेची निर्मिती होते, असे त्यांनी नमूद केले. कसदार लेखनासाठी पुनर्लेखन अत्यंत आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. लोकांतात समाजदर्शन घडते तर एकांकात आत्मदर्शन घडते, असेही ते म्हणाले. ज्या वेळेला आत्मदर्शन आणि समाजदर्शन एकरूप होते, त्या वेळेला अप्रतिम गझलेची निर्मिती होते. उत्तम कलाकृतींचे सृजन व्हावे आणि दुय्यम कलाकृतींचे हनन व्हावे यासाठी संपादन व समीक्षण होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज साहित्य क्षेत्रात समीक्षकांची वानवा असून समीक्षेचे अध:पतन म्हणजेच साहित्य क्षेत्राचे अध:पतन होय, असे प्रा. जोशी म्हणाले. गझलकारांमध्ये आढळणारा मोकळेपणा कवींमध्ये दिसून येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ॲड. आडकर यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून सहकाऱ्याच्या स्मृती जपून ठेवण्याचे उदात्त कार्य केले आहे. दीपक करंदीकर हे साहित्याच्या सर्व प्रांतात लीलया संचार करणारे, संस्थात्मक कार्य करत लेखन व सादरीकरण करणारे उत्तम व्यक्तिमत्त्व होते, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिता पैठणकर म्हणाल्या की, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कवितेने मला साथ दिली तर गझलेने जगण्याचे भान दिले. गझलेतून व्यक्त होत मानसिकदृष्ट्या सबल झाले. कविता आणि गझल माझ्या जगण्याचे स्फुरण आहेत. हा सन्मान माझ्यासाठी एक जबाबदारी असून लेखनात नाविन्य ठेवण्याचा प्रयत्न करेन. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली आणि दीपक करंदीकर यांच्यासमवेतच्या मैत्रीचा धागा उलगडला.
'नोटसम्राट 2' पुस्तकाचे प्रकाशन:नोटबंदीच्या लढ्यावर आधारित, मोदींच्या निर्णयांचे समर्थन
प्रा. विनायक आंबेकर लिखित 'नोटसम्राट 2 - नोटबंदीचा लढा' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या हस्ते 'अग्निपंख प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि लेखक प्रा. आंबेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना केशव उपाध्ये यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पंतप्रधानांना देशातील प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास केल्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सखोल जाणीव आहे. जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांच्या योजना आणि विकासकामांमागील मुख्य भूमिका होती. उपाध्ये यांनी पुढे नमूद केले की, जनहिताचे निर्णय घेताना पंतप्रधान मोदी कधीही कचरले नाहीत. त्यांच्या दूरदृष्टीच्या भूमिकेमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला. विरोधकांनी मात्र केवळ राजकीय विरोधासाठी मोदीजींना विरोध केला, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध होत असून, गेल्या बारा वर्षांत घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम समाज अनुभवत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अभय कुलकर्णी यांनी माहितीच्या युद्धावर भाष्य केले. ते म्हणाले की, विषय तज्ज्ञांनी त्यांची तांत्रिक माहिती सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिणे आवश्यक आहे. सध्या माहितीचे युद्ध हे कुठल्याही देशाच्या थेट आक्रमणापेक्षा गंभीर आहे. डिजिटल माध्यमांमध्ये पाश्चिमात्य देशांकडून अधिक आशय निर्मिती होते, तर आपल्याकडून मर्यादित प्रमाणात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात डिजिटल माध्यमांमध्ये वेगाने आशय निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पुस्तकाचे लेखक प्रा. विनायक आंबेकर यांनी नोटबंदीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात 1996 पर्यंत बनावट नोटांची समस्या नव्हती. त्यानंतर प्रथमच भारताच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या आणि तेव्हापासून बनावट नोटांचा प्रश्न सुरू झाला. आंबेकर यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून भारतात पाठवायला सुरुवात केली. 2004 ते 2014 या काळात देशांतर्गत झालेल्या 500 अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे हे पैसे वापरले गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदींना स्वेच्छेने नव्हे, तर अनिवार्यता म्हणून नोटबंदी करावी लागली. हे पुस्तक ही सर्व माहिती रंजक पद्धतीने कथानकाच्या स्वरूपात मांडते.
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात गाणपत्य सांप्रदायाच्या परंपरेनुसार श्री गणेश आणि देवी शारदा यांचा 'शारदेश मंगलम्' विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसर सनई आणि मंगलाष्टकांच्या स्वरांनी निनादला होता. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. संकेत मते यांच्यासह तुषार रायकर यांनी सपत्नीक पूजन केले. या मंगल सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. विवाह सोहळ्यापूर्वी मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. रविवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग देखील झाला. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी या सोहळ्याचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने ओळखले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी, तर ज्ञानशक्तीला देवी बुद्धी म्हणतात. अश्विन महिन्यात शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे संबोधले जाते. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता आणि आल्हाददायकता असल्याने तिला शारदा म्हणतात. देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हटले जाते. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतचा महामिलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम् आहे. या सोहळ्यानिमित्त आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, तसेच वृद्धाश्रम, दिव्यांग मुलांच्या संस्था आणि मंदिरात उपस्थित भाविकांना वाटण्यात येणार आहे. रात्री भारतीय वारकरी महिला मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते.
बदलत्या हवामानामुळे मनुष्याच्या जीवितास धोका
नवी दिल्ली : भारतात ‘दमट उष्णता’ हवामान बदलाचे सर्वात धोकादायक रूप बनत चालली आहे. हे वाढते तापमान व जास्त आर्द्रता यांचे असे समीकरण आहे, ज्यामध्ये शरीर घामाच्या माध्यमातून स्वत:ला थंड करू शकत नाही. जर्नल क्लायमेट डायनॅमिक्समधील अभ्यासानुसार केरळमध्ये याचा जास्त धोका आहे. भारतात आतापर्यंत उष्णतेच्या लाटेची ओळख मुख्यत्वे तापमानाच्या मर्यादेवरून केली जात असे. परंतु अभ्यासानुसार, […] The post बदलत्या हवामानामुळे मनुष्याच्या जीवितास धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने या प्रकल्पाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली असून, कोकणच्या पर्यावरणाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प प्रस्तावित असून, दरवर्षी ०.९ दशलक्ष टन बॉक्साईट उत्खनन […] The post रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड
जळगाव : प्रतिनिधी राज्यात अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेली गुंतवणूक किंवा खरेदी घरात कायमस्वरूपी समृद्धी घेऊन येते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. याच पार्श्वभूमीवर आज सराफा बाजारात मोठी गर्दी […] The post अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकिस्तानी फुगे मिळाल्याने खळबळ
भरमौर/चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी शेतात एक संशयास्पद फुगा सापडल्याने खळबळ उडाली. त्यावर पीआयए असे लिहिलेले होते, तसेच उर्दूमध्ये काही शब्द आणि पाकिस्तानचा झेंडा काढलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एक ग्रामीण आपल्या जनावरांना चरायला घेऊन शेतात गेला होता. याचवेळी त्याची नजर या असामान्य फुग्यावर पडली. जवळ जाऊन पाहिल्यावर फुग्यावर बनवलेली चिन्हे आणि […] The post पाकिस्तानी फुगे मिळाल्याने खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता
यवतमाळ : प्रतिनिधी सध्या राज्यात महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातून तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही एक अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. राळेगावातील जवळपास ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या […] The post राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट […] The post राज्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉक्टरांच्या हलगर्जीने एकाचा मृत्यू?
लातूर : लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली असून एका १७ वर्षांच्या कोवळ्या तरुणाला साध्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केले पण डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे त्या तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. लातूरचे शासकीय रुग्णालय आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अभिजीत आनंद काळे, वय अवघे १७ वर्ष. कानाच्या वर असलेल्या साध्या चरबीच्या गाठीवर शस्त्रक्रिया […] The post डॉक्टरांच्या हलगर्जीने एकाचा मृत्यू? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तेहरान: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यातील तणाव आता एका नव्या टोकाला पोहोचला आहे. “इराणला अण्वस्त्र संपन्न होऊ देणार नाही,” या ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणने चोख प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्या अण्वस्त्र आणि अणुऊर्जा अधिकारांपासून आम्हाला वंचित ठेवण्याचा कोणताही अधिकार डोनाल्ड ट्रम्प यांना नाही,” अशी ठाम भूमिका इराणने मांडली आहे. नुकत्याच दिलेल्या एका निवेदनात डोनाल्ड […] The post अण्वस्त्र हक्कांवरून अमेरिका-इराणमध्ये पुन्हा ठिणगी; ‘आमचे अधिकार हिरावण्याचा ट्रम्प यांना अधिकार नाही’ इराणचा पलटवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती पोलिसांना परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेल्या आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे. यामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता वाढली आहे. परतवाडा लैंगिक शोषणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर पीडित तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचे 5 मोबाईल फोन जप्त केले होते. या मोाईल्समध्ये सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो व चॅट्स होते. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी ते डिलीट केले होते. स्थानिक पातळीवर हा डेटा रिकव्हर करणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी हे पाचही मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळे पाठवले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, 3 मोबाईलमधील डेटा पूर्णपणे रिकव्हर झाला आहे. त्यामुळे डिलीट केलेले व्हिडिओ व फोटो पुन्हा रिस्टोअर झालेत. या रिकव्हर डेटाच्या मदतीने आता पोलिस या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? तसेच या प्रकरणी आणखी काही तरुणींची फसवणूक झाली आहे का? याचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रकरणी आरोपींच्या बँक खात्यांची व आर्थिक व्यवहाराचीही चौकशी केली जाणार आहे. 15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवण्यात यश दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणातील एका 15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांना न घाबरता समोर येण्याचे आवाहन केले होते. अमरावतीचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने यासंबंधी रात्रंदिवस तपास करून या पीडित मुलीचा नागपुरात शोध घेतला होता. अखेर ती शनिवारी अमरावतीत आली आणि तिने आपला जबाब नोंदवला. नेमके काय आहे परतवाडा प्रकरण? अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणींना प्रेम जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल करण्याची गंभीर समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद नामक मुख्य आरोपीसह इतर काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने सोशल मीडियाच्या मदतीने पीडित तरुणींशी मैत्री केली. त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. त्यांचे अश्लील व्हिडिओ व फोटोही व्हायरल केले. पोलिसांनी या प्रकरणी आता आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींची चौकशी सुरू केली आहे.
राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2026 असणार आहे. 2 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 मे आहे. तर 12 मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. रूपाली ठोंबरे यांचे पत्र जशास तसे रूपाली पाटील ठोंबरे आपल्या पत्रात लिहितात की, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून मा. अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यांने लढा दिला आहे. माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे. मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगत आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे. आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल. त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे. म्हणून आपणास नम्म्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, ही नम्र विनंती, असे रूपाली पाटील यांनी पत्रात लिहिले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण रूपाली पाटील-ठोंबरे या पुण्यातील एक आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या नेहमीच मीडियामध्ये सक्रिय असतात. सध्या महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, रूपाली पाटील यांनी थेट उमेदवारीची मागणी केल्यामुळे पुणे राष्ट्रवादीत आता कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझ्या कार्याचा आणि अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. आता पक्षश्रेष्ठी रूपाली पाटील यांच्या या मागणीवर काय निर्णय घेतात आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर!
मुंबई : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून (२१ एप्रिल) राज्यातील सरकारी कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास तब्बल १७ लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले. संपामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि अन्य अत्यावश्यक सेवांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी […] The post राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशभरातील राज्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हयाचा मोलाचा सहभाग रहिला आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रथम आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या प्रशिक्षणामुळे आता कामांमध्ये अचूकता अन गतीमानता येणार आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम देशभरात हाती घेतला आहे. या उपक्रमांमध्ये विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रमासह इतर उपक्रम जिल्हा परिषद व इतर शासकिय कार्यालयांनी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अभियानांतर्गत केंद्राच्या सूचने नुसार ता. २ ते ता. ८ एप्रील या कालावधीत साधना सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमधून सुमारे ५०९८ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५०२२ कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर ४७२२ कर्मचाऱ्यांनी चारतासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्हयांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचे कळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. देशभरात या अभियानांमध्ये महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली असून राज्याच्या या कामगिरीमध्ये हिंगोलीचा मोलाचा सहभाग राहिला आहे. या शिवाय मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद (९० टक्के) सहाव्या क्रमांकावर, नांदेड जिल्हा परिषद (८५टक्के) चौदाव्या क्रमांकावर, लातुर जिल्हा परिषद (८४ टक्के) सतराव्या क्रमांकावर, जालना जिल्हा परिषद (८३ टक्के), एकेवीसाव्या क्रमांकावर, बीड जिल्हा परिषद (७८ टक्के) सव्वीसाव्या क्रमांकावर, धाराशिव (७४टक्के) एकतीसाव्या तर परभणी जिल्हा परिषद (६८ टक्के) बत्तीसाव्या क्रमांकावर आली आहे. कामामध्ये सुधारणा अन गतीमानता येणार - सीईओ विवेक गायकवाड हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला हि जिल्हयासाठी आनंदाची बाब आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा येणार असून कामात गतीमानता व अचुक कामे होतील. त्यामुळे प्रशासन गतीमान होऊन नागरीकांची कामे जलदगतीने होतील.
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) 'एसआयटी'ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या पापाचा पाढा वाचताना पोलिसही चक्रावून गेले आहेत. यातील ८ गुन्हे हे थेट महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित ७ गुन्हे खंडणी, बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. एका बाजूला पोलिस कोठडीतून सुटका होत नाही, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खरातच्या १०० कोटींहून अधिक मालमत्तेची आणि आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत दुपटीने वाढ झाली आहे. कोर्टात काय घडले? अशोक खरात याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टासमोर हजर केले होते. आजची ही महत्त्वाची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची गरज स्पष्ट करताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. आरोपीची पद्धत एकच असली, तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. ते द्रव्य कुठून आणले आणि यामागे कोणाचे मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी ही मागणी खोडून काढताना सांगितले की, पोलिस तेच जुने मुद्दे मांडून पुन्हा पुन्हा कोठडी मागत आहेत. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांची वाढती संख्या विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खरातचे डोके दुखायचे थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही दरम्यान, अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टाकडे एक मागणी केली आहे. अशोक खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. त्याच्या वेदनांवर पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे खरातला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप ११ गुन्ह्यांची चौकशी बाकी आतापर्यंत अशोक खरातच्या केवळ ४ गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित ११ गुन्ह्यांमध्ये अद्याप त्याची सखोल चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पाचव्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला आता पोलिस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. एसआयटीने खरातच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे मोठे दुवे समोर येण्याची शक्यता आहे. तपासातील ७ धक्कादायक आणि थरारक बाबी : रिमोट कंट्रोलचा साप: भक्तांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी खरात २० फुटांचा एक बनावट नाग 'रिमोट कंट्रोल'ने फिरवत असे. या 'चमत्कारा'ला नागरिक दैवी शक्ती मानून घाबरत होते. बनावट चमत्कार: दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसारख्या वस्तूंचा वापर करून तो चमत्काराचा बनाव करायचा. बड्या हस्तींशी 'कनेक्शन': तपासादरम्यान खरातचे अनेक बडे नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी असलेले जवळचे संबंध उघड झाले आहेत. त्या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ५०० कोटींची मालमत्ता: खरातची संपत्ती ५०० कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. 'ईडी' आता त्याच्या मालमत्तेची चौकशी करत आहे. पत्नी अद्याप फरार: खरातची पत्नी कल्पना ही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून ती सध्या फरार आहे. अटकेपासून वाचण्यासाठी तिचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुंगीच्या द्रव्याचा वापर: पीडित महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा गुंगी येण्यासाठी तो विशिष्ट औषधांचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ब्लॅकमेलिंगचे रॅकेट: फसवणूक आणि अत्याचारासोबतच खंडणी उकळण्याचे मोठे रॅकेट तो चालवत होता.
हिंदू खतरे मै कुठे आहे असा सवाल संजय राऊत विचारत आहेत, 1992 ला शिवसेना रस्त्यावर उतरली हे सांगत आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहे, औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात? अफजल खानाच्या पिल्लावळींना सांभाळत आहात? आता अचानक तुम्हाला हिंदूंबद्दल ऐवढी काळजी वाटू लागली का? आजान स्पर्धेवेळी ही काळजी कुठे गेली होती, जनाब राऊत म्हणून घेत होतात तमेव्हा काळजी नव्हती का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला त्यावेळी तुम्ही गप्प होतात त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? याकूब मेमनच्या कबरींचे सुशोभीकरण झाले त्यावेळी तु्म्हाला हिंदूची काळजी नव्हती का? महाराष्ट्रात अनेक धर्मांतरण झाले त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? टीसीएसवर बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंची झाली नाही. म्हणून त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुम्हाला दाढ्या कुरवळायच्या आहेत हे जनतेला माहिती आहे. उबाठा गट लुळा-पांगळा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलण्याचा राष्ट्रीय रोग झाला आहे असे संजय राऊत यांनी टीका केली होती यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, जनतेने तुम्हाला लुळं पांगळं केले आहे. विधानसभा निवडणूक असो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक उबाठा गट लुळा-पागळा केला आहे. नरेंद्र मोदी हे आजार नाही तर देशाचा आधार आहेत. ते राष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहे. राऊतांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित करावे नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना देशाबद्दल काही वाटत नाही कारण त्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे. महिला विधेयक बिल मंजूर झाले नाही हा देशाला अपमान झाला आहे. महिलांना सन्मान देण्याचा तो प्रयत्न भाजप सरकारने केला, पण तुम्ही ते मंजूर न करू देत नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम केले आहे. 2023 मध्ये तत्वत मान्यता मिळालेल्या या विधेयकाच्या अंमलबजावणीस अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, याचा हिशेब जनता नक्कीच घेईल. तुम्ही माध्यमांचा वापर कसा करायचा हे सांगू नका. राऊतांनी पाकिस्तानच्या जनतेनला संबोधित करावे त्यांना तिथले लोकं ऐकतील. उबाठाची अवस्था बघा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे नाव किती वेळा घेतले हे मोजत बसण्यापेक्षा आपल्यापक्षाची अवस्था बघितली असती तर किमान उबाठा गट महाराष्र्टात वाढला असता. काँग्रेस मुक्त देश करण्याचे काम जनतेने केले आहे. काँग्रेसला किंमत नाही हे जनतेने दाखवून दिले आहे. लोकसंख्या वाढल्याने खासदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. तुम्ही त्याला विरोध का केला. दक्षिण राज्यातील खासदार संख्या वाढणार होती त्यांचे संजय राऊत यांनी नुकसान केले आहे. त्यावेळी मोदी सरकार गप्प बसले नाही नवनाथ बन म्हणाले की, पहलगाम हल्यानंतर मोदी सरकार गप्प बसले नाही. हल्ला करणाऱ्या एकाएका दहशतवाद्यांना मारण्याचे काम सैनिकांनी आणि मोदी सरकारने केले आहे. उलट पहलगाममध्ये धर्म विचारत लोकांना मारलेच नाही असे मुक्ताफळे काँग्रेसच्या लोकांनी उधळली होती. त्यावर संजय राऊत गप्प बसले होते. उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला पेटवायचा आहे. कारण त्यांना वाटते की यामुळे आपल्याला राजकीय फटका बसू शकतो.
नाशिक येथील टीसीएस कंपनीत घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने आपले लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जबरदस्थीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. पीडितेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपी व आपली ओळख 4 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले आहे. महाविद्यालयात एकत्र शिकत असताना त्यांच्यात मैत्री झाली होती. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. जुलै 2022 मध्ये त्याने पीडितेवर पहिल्यांदा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे अगोदरच लग्न झाले होते. पण त्याने ही वस्तुस्थिती लपवून पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही काळानंतर पीडितेला टीसीएसच्या नाशिक येथील युनिटमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा आरोपीही तिथे कार्यरत होता. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी पीडितेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीच्या पत्नीनेच पीडितेशी साधला संपर्क या घटनेनंतर फेब्रुवारी 2026 मध्ये पीडितेला आरोपी विवाहित असल्याची व त्याला 2 मुले असल्याची बाब समजली. ही माहिती मिळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने स्वतः पीडितेशी संपर्क साधून तिला ही माहिती दिली. त्यानंतर पीडितेने या प्रकरणी आरोपीला जाब विचारला. तेव्हा त्याने स्पष्ट् केले की, त्याचा तिच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता. कारण, तो अगोदरच विवाहित होता. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी हा आपल्या इतर 2 सहकाऱ्यांसोबत कंपनीच्या उपहारगृहात तिच्याशी वारंवार भेटत होता. हे तिघे मिळून अनेकदा देवदेवतांविषयी अवमानकारक शेरेबाजी करत होते. आरोपी तरुणाने आपल्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी माझे लैंगिक शोषण केले. मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. निदा खान अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात दुसरीकडे, या प्रकरणातील अन्य एक संशयित निदा खान हिने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे. निदाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला आहे की, एका महिलेवर दुसऱ्या महिलेच्या विनयभंगाचा आरोप ठेवता येत नाही. शिवाय, निदा खान 2 महिन्यांची गर्भवती असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. जामीन मंजूर करण्यासाठी हे तथ्य एक आधार म्हणून सादर करण्यात आले आहे. निदा खान सध्या फरार आहे. तिच्या शोधासाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात पोलिसांचे एक पथक तळ ठोकून आहे. टीसीएसची काय आहे भूमिका? टीसीएसने शुक्रवारी स्पष्ट केले की, निदा खान ही कंपनीमध्ये 'एचआर मॅनेजर' (HR Manager) या पदावर कार्यरत नव्हती. प्राथमिक चौकशीच्या आधारे, कंपनीला 'नैतिकता' (Ethics) किंवा 'POSH' (लैंगिक छळ प्रतिबंधक) यंत्रणांद्वारे अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. कंपनीने पुढे असेही नमूद केले की, ते या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत; यासाठी एका देखरेख समितीची (Oversight Panel) स्थापना करण्यात आली आहे. तपासात मदत करण्यासाठी बाह्य संस्थांचीही (External Agencies) मदत घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती, छळवणूक किंवा गैरवर्तन याबाबत कंपनीच्या धोरणात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) बाळगली जाते. पीडितेला अश्लील मेसेज पाठवल्याचे स्पष्ट न्यायालयाने या प्रकरणातील रजा मेमन व शफी शेख या 2 अन्य सहआरोपींची पोलिस कोठडीत 20 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप संभाषणांतून (चॅट्समधून) असे उघड झाले की, आरोपींनी पीडितेला अश्लील संदेश पाठवले होते आणि त्याद्वारे तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केला होता. लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारींनंतर, नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणी एकूण 9 एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. तसेच या संदर्भात 8 जणांना अटकही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एका उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी या प्रकरणाची अत्यंत सखोल व सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश दिले. राज्यात धर्मांतराशी संबंधित घटना कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे या घटनेच्या चौकशीत कोणत्याही पैलूकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे ते म्हणालेत. हे प्रकरण उजेडात आणल्याप्रकरणी त्यांनी नाशिक पोलिसांचे कौतुकही केले.
अमरावती हादरवून सोडणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात अखेर एक मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. सामाजिक भीती आणि कलंकाची पर्वा न करता, नागपूरच्या एका १५ वर्षीय धाडसी मुलीने पुढे येत विशेष तपास पथकासमोर (SIT) आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात ओळख पटलेल्या ८ पीडितांपैकी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समोर येणारी ही पहिलीच पीडिता ठरली असून, यामुळे आरोपींविरोधात पुराव्यांची साखळी अधिक भक्कम झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने काही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ काढले होते. या प्रकरणातील इतर सात पीडित मुलींची ओळख पटली असली, तरी बदनामीच्या भीतीने त्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. मात्र, नागपूरच्या या पीडितेने पुढाकार घेतल्यामुळे पोलिसांसमोर असलेली सर्वात मोठी कायदेशीर अडचण दूर झाली आहे. आता पीडितेच्या थेट जबाबामुळे या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २५० किलोमीटरचा प्रवास अन् असीम धैर्य मिळालेल्या माहितीनुसार, या पीडितेने शनिवारी नागपूर ते अमरावती (परतवाडा) असा तब्बल २५० किलोमीटरचा प्रवास करून पोलिसांच्या चौकशीला सहकार्य केले. यवतमाळच्या पोलिस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखालील महिला पथकाने तिचा जबाब नोंदवून घेतला. अशी झाली होती आरोपीशी ओळख या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने काही अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्याचे चित्रीकरण केले होते. इतर ७ पीडित मुलींची ओळख पटली असली तरी, समाजात बदनामी होईल या भीतीने त्या अद्याप समोर आलेल्या नाहीत. इतर मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्यात ओढले गेले असताना, ही नागपूरची पीडिता मात्र एका 'उर्स' दरम्यान आरोपीच्या 'ऑफलाईन' संपर्कात आली होती. या पीडितेने दाखवलेल्या धैर्यामुळे आता इतर मुलींनाही पुढे येण्यासाठी बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींवरील कायद्याचा फास होणार घट्ट पोलिसांनी सुरुवातीला हा गुन्हा स्वतःहून (suo motu) दाखल केला होता, जो केवळ गोपनीय सूत्रांच्या माहितीवर आधारित होता. मात्र, आता पीडितेचा प्रत्यक्ष जबाब मिळाल्यामुळे पोलिस एफआयआरमध्ये पॉक्सो (POCSO) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) अधिक कडक कलमांचा समावेश करणार आहेत. पोलिसांसमोर होते मोठे आव्हान १३ एप्रिल रोजी दाखल झालेला हा गुन्हा तांत्रिक पुराव्यांवर उभा होता. अयानच्या चौकशीत आठ पीडितांची नावे निष्पन्न झाली होती, मात्र एकही पीडिता अधिकृत तक्रार द्यायला तयार नसल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला होता. नागपूरच्या या मुलीने पुढाकार घेतल्याने आता अयान आणि त्याच्या टोळीला कडक शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मुलगी मानसिकदृष्ट्या स्थिर आणि निरोगी असून तिचा जबाब तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन
मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू दर्शन कुमार यांचे शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दर्शन कुमार हे जरी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले असले, तरीही या उद्योगामध्ये एक दयाळू आणि उदार मनाचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. […] The post गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दीपिका-रणवीर पुन्हा होणार आई-बाबा
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ही जोडी दुस-यांदा आई-बाबा होणार असून, रविवारी सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. या घोषणेनंतर सिनेसृष्टीसह चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दीपिका आणि रणवीरने इन्स्टाग्रामवर एक अतिशय गोंडस फोटो शेअर करत ही […] The post दीपिका-रणवीर पुन्हा होणार आई-बाबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर महिलांना संसदेत येण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे सामान्य महिलांना संसदेत येण्याची संधी होती, मात्र विरोधी पक्षांनी हे प्रयत्न हाणून पाडले, असे आठवले म्हणाले. महिलांना लोकसभेत आरक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या चांगल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी धुळीस मिळवले, असे आठवले यांनी सांगितले. या विरोधात रिपब्लिकन पक्ष (रिपाइं) देशभरात काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. आठवले यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने महिलांना आरक्षण दिल्यामुळे देशभरात लोकसभेच्या जागा वाढणार होत्या. नियमानुसार, दक्षिण आणि उत्तर दोन्हीकडील राज्यांच्या जागा समसमान वाढणार होत्या, त्यामुळे कोणत्याही राज्याला झुकते माप देण्याचा प्रश्नच नव्हता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये त्यांच्या सध्याच्या जागेनुसार जागा वाढल्या असत्या. हे सर्व माहीत असतानाही, केवळ सत्ताधारी पक्षांना याचा फायदा होईल या एकाच भावनेपोटी महिलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. या प्रकरणी रिपाइंच्या माध्यमातून देशभरात महिलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, राज्यात रिपाइंला एक विधान परिषद सदस्य (MLC) आणि दोन महामंडळांची अध्यक्षपदे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपाइंला जागा न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सरकारने महामंडळांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महामंडळांचा कालावधी निघून जात असून कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याचे आठवले यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, युवक उपाध्यक्ष शरद शेगावकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, राज्य उपाध्यक्ष ब्रह्मानंद चवहाण, राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, गजानन बागुल, संतोष सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग
पुणे : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महानैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात […] The post अक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
समृद्धी महामार्गावर बस अपघात; चिमुकली ठार, २५ प्रवासी जखमी
मेहकर: प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी सहाच्या सुमारास चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मेहकर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती पुढील कारवर आदळली, ज्यामुळे कारचेही […] The post समृद्धी महामार्गावर बस अपघात; चिमुकली ठार, २५ प्रवासी जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी महापौर सुरेश पवार यांचे निधन
लातूर : प्रतिनिधी अनेक वर्षांपासून लातूरच्या राजकारणात कार्यरत असणारे माजी सुरेश पवार यांचे निधन झाले आहे. पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे अकाली निधन झाले. अनेक वर्ष लातूरच्या राजकारणात कार्यरत असताना कधी कोणाशीही मनभेद , वैरभाव नसणारे सर्वांचे तात्या, यशस्वी राजकारणी एक चांगले व्यक्तिमत्व जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. […] The post माजी महापौर सुरेश पवार यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून केलेले संबोधन पाहता विरोधकांच्या ताकदीपुढे केंद्र सरकार अक्षरशः थंड पडल्याचे स्पष्ट होते, अशी टीका एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केंद्रावर निशाणा साधताना केली आहे. सत्ताधारी भाजपची सत्तेतून उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. पंतप्रधानांचे हे संबोधन, जे साधारणपणे अर्धा तास चालले, ते 'नारी शक्ती वंदन अधिनियम' या विषयावर केंद्रित होते. त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या संबोधनानंतर आता त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएमचे (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर सडकून टीका केली आहे. मोदींचे भाषण पाहता आता सत्ताधारी भाजपची सत्तेतील उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजपची उलटगणती सुरू झाली वारिस पठाण रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र यांचे भाषण काही वेळच पाहिले. आता भाजपची उलटगणती सुरू झाली आहे. पंतप्रधानांचे रडगाणे व विलाप हे त्याचे द्योतक आहे. नेमक्या याच कारणामुळे मी त्यांचे भाषण बंद करून आयपीएल पाहण्याचा आस्वाद घेतला. याच सरकारने 2023 मध्ये 5 दिवसांचे अधिवेशन बोलावले होते. त्यात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा ते पारित करण्यात आले. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्याची गरज होती. पण त्यांनी ते केले नाही. आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पद्दुचेरी या 5 राज्यांत विधानसभेची निवडणूक सुरू आहे, असे ते सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले. मोदींचे रडगाणे हा जनतेला मूर्ख बनवण्याचा फंडा माझ्या मते आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. याहून अधिक महिलाचा सन्मान काय असू शकतो? सरकारने हे विधेयक का आणले? त्यांचा हेतू काय आहे? हे जनतेला समजले आहे. त्यामुळे हे रडगाणे केवळ मूर्ख बनवण्याचे काम आहे. आज 12 वर्षांत पहिल्यांदाच भाजप सरकारने आणलेले एखादे विधेयक पडले आहे, असे वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले. देशाच्या जनतेला वाटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनात देशाच्या विकासाची गोष्ट करती. पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की, ते घाबरलेले आहेत. विरोधकांची ताकद पाहून सरकार अक्षरशः थंड पडले आहे. नरमले आहे, असेही वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले.

28 C