SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

23    C
... ...View News by News Source

नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना पदमुक्त करा:भाजपच्या शिष्टमंडळाचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी‎

येथील नगरपालिका निवडणुकीत भाजपाचे नुकसान करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष यतीन कदम व आमदार राहुल आहेर यांच्याकडे केली आहे. नगरपालिकेची निवडणुकीत पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त दोन जागेसाठी युती करून भारतीय जनता पार्टीचे नुकसान करणाऱ्या मंडल अध्यक्ष संजय सानप व व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांना पदमुक्त करावे, अशी मागणी निवेदनात म्हटले आहे. दत्तराज छाजेड यांना पक्षाने एबी फॉर्म दिलेला असताना पक्षातील कोणालाही विश्वासात न घेता निवडणुकीतून माघार घेतली. याची पक्षाने नोंद घ्यावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष सजन कवडे, जिल्हा चिटणीस डॉ. राजेंद्र आहेर, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप थोरात, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, अभय निकम यांच्या स्वाक्ष्ऱ्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 8:24 am

सामाजिक दायित्व:विंचूर रस्त्याची स्वखर्चाने केली डागडुजी, अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे महेश होळकर यांचा उपक्रम‎

लासलगाव ते विंचूर या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झालेले आहे, मात्र प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते महेश होळकर यांनी मुरूम टाकत खड्डे बुजवून सामाजिक बांधीलकी जपली. लासलगाव ते विंचूर काँक्रिटीकरण चौपदरीकरणाचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब आहे. तत्पूर्वी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात घडत असल्याने अनेक दुचाकी चालकांना प्राण गमवावे लागले आहेत. मंजुळा पॅलेस तसेच होळकरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. सामाजिक कार्यकर्ते महेश होळकर यांनी जेसीबीच्या आधारे स्वखर्चाने मुरूम टाकत अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवले. शहरात असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या काँक्रीटमधून लोखंड बाहेर आल्याने दुचाकीमध्ये अडकून अनेक वाहन चालक जखमी होत आहेत. काँक्रिटीकारणाचे काम जेव्हा करायचे तेव्हा करा, मात्र तात्पुरती का होईना या रस्त्याची डागडुजी करा, अशी मागणी होत आहे. वर्षभरात १७ जणांचा अपघाती मृत्यू लासलगाव- विंचूर मार्गाच्या चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळालेली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात या रस्त्यावर झालेल्या अपघातात १७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या रस्त्यात तीन ते चार ठिकाणी वळण असल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठ्या गाड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघात होतात. चौपदरीकरण रस्त्याचे काम होईपर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवले शहरातील काँक्रिटीकरण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. होळकरवाडी येथे चारचाकी गाड्या देखील नुकसानग्रस्त होत आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकला आहे. मंजूर रस्त्याचे काम तातडीने कराच, मात्र त्यापूर्वी तात्पुरती डागडूजी करावी. - महेश होळकर, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 8:22 am

घसरल्याने साताळ्यात फुलकोबीमध्ये सोडल्या मेंढ्या:कोबी 5, वांगी 7, भेंडीसह टोमॅटो 10 रुपये किलो‎

फुलंब्री बाजारामध्ये आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर अल्प प्रमाणात आले असून साताळ्यासह अनेक ठिकाणी फुल व पत्ताकोबीच्या शेतात शेतकऱ्यांनी जनावरे सोडली आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी ४० रुपये प्रतिकिलो असलेली फुलकोबी आता ५ रुपयांवर आली आहे. तर, मेथीसह पालक भाजीचेही दर चारपटीने घसरले आहेत. महिनाभरापूर्वी या भाज्यांची एक जुडी २० रुपयांना होती, ती आता दहा रुपयांत ३ जुड्या मिळत आहेत. दर घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. गतवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तालुक्यात रब्बीचा पेरा वाढलेला आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पाणी असल्यामुळे भाजीपाल्याची लागवड केली आहे. तालुक्यात ३९१ हेक्टरवर भाजीपाला आहे. आता बाजारात मागणीपेक्षा जास्त भाजीपाला आल्यामुळे भाव घसरल्याचे दिसून येत आहे. नेहमी भाजीपाल्याचे दर वाढल्याची ओरड करणारे आता शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे. भाजीपालानिहाय दर भाजीपाला आता गत महिना मिरची ४० ७० (किलो) फुलकोबी ५ ४० टोमॅटो १० ६० वांगी ७ ४० भेंडी १० २० मेथी ३ (जुडी) २० (जुडी) कोथिंबीर ५ (जुडी) २० (जुडी) केलेला खर्चही निघत नाही, यामुळे जसे मका, कपाशी पिकांना विम्याचे कवच असतात तसे भाजीपाल्याला विम्याचे कवच द्यावे. जेणेकरून भाजीपाला पीक उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत येणार नाही. - सतीश बलांडे, भाजीपाला उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ बेडके म्हणाले, ‘‘भाजीपाल्यासाठी खर्चात वाढ झाली आहे. त्यातच वन्यप्राणी व कीड तसेच रोगांपासून पिकांच्या रक्षणासाठी रात्र रात्र थंडीत जागावे लागते. परंतु, आता दर घसरल्याने आमचा त्रास दिसत नाही का?’’

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 8:01 am

शूलिभंजन येथील वीटभट्टीवर एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू:झोपण्यापूर्वी हाॅटेलवर मित्रांसोबत जेवण, संभाजीनगरात शवविच्छेदन‎

शूलिभंजन येथील वीटभट्टीवर झोपलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. दीपक देवसिंग मानधरे असे मृताचे नाव असून तो शूलिभंजनचा रहिवासी होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र अमोल कचरू सौदागर होता. अमोल कसाबखेडा येथील असून सध्या शूलिभंजन येथे राहतो. दोघे गेल्या चार वर्षांपासून मित्र होते. मृत दीपक व अमोल हे मित्र होते. शुक्रवारी सायंकाळी दोघांची भेट झाली. रात्री त्यांनी एका दुकानातून पँट व शर्ट खरेदी केला. दहा वाजता हॉटेलमध्ये जेवण केले. ११ वाजता दीपक मित्रासोबत शूलिभंजन येथील वीटभट्टीवर पोहोचला. रात्री बारा वाजता दोघे भट्टीवर झोपले. सकाळी अमोल विटा थापण्यासाठी खाली उतरला. त्याच वेळी त्याला चक्कर येऊन तो कोसळला. दरम्यान, दीपकला मजुरांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मृतावस्थेत आढळला. वीटभट्टी पेटवल्यानंतर ती शिजण्यासाठी किमान दहा दिवस लागतात. त्यामुळे झोपलेल्या ठिकाणी थेट धूर किंवा उष्णता पोहोचण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. तरी वीटभट्टीतील उष्णतेचा अप्रत्यक्ष परिणाम झाला का, जेवणातून विषबाधा झाली का, की अन्य कारण होते, याचा तपास सुरू आहे. दीपकच्या नातेवाइकांनी, ‘झोपलेल्या अवस्थेत मृत्यू कसा होऊ शकतो?’ असा सवाल उपस्थित केला. शवविच्छेदनात कोणताही संशय राहू नये यासाठी शवविच्छेदन खुलताबाद शासकीय रुग्णालयाऐवजी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. नातेवाइकांची शंका

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 8:00 am

रोज शिवरायांच्या पुतळ्याची‎स्वच्छता, दोघांवर जबाबदारी‎:आळंद ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत, शिवजयंतीची तयारी जोरात

येथे शिवजयंतीचा उत्साह आतापासूनच सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता आणि रंगरगोटी करण्यात आली आहे. आळंद ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी विशेष कारागीर पाचारण केले असून, आधुनिक मशीनच्या साहाय्याने पुतळ्याचे सौंदर्य अधिक खुलवण्यात आले आहे. पुतळ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला. केवळ सणापुरती स्वच्छता न ठेवता, शिवस्मारकाचे पावित्र्य वर्षभर जपण्यासाठी आळंद ग्रामस्थांनी एक आदर्श निर्णय घेतला आहे. शिवस्मारक समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने आता दररोज दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे. हे स्वयंसेवक दररोज पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करतात.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:59 am

‘दिव्य मराठी’च्या दिनदर्शिकेचे दानवेंच्या हस्ते प्रकाशन:बहुचर्चित दिनदर्शिकेचे आज जिल्ह्यात होणार वितरण, मान्यवरांनी केले दिव्य मराठीचे ‎कौतुक‎

‘दिव्य मराठी’च्या छत्रपती संभाजीनगर दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गुरुवारी ( ८ जानेवारी) सायंकाळी हॉटेल सयाजी येथे झाले. व्यासपीठावर सिल्लोडचे सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी यांच्यासह फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अभिलाष मोहन सोनवणे आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गणोरकर आदी उपस्थित होते. या बहुचर्चित दर्जेदार दिनदर्शिकेचे वितरण आज, रविवारी ‘दिव्य मराठी’च्या अंकासोबत होणार आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, आमचे मित्र शिक्षणमहर्षी मोहन सोनवणे यांनी खामगाव येथे श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत शिक्षणाची गंगा आणली. शाळा- कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री गोरक्ष आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजही काढले. यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनींचे उच्च शिक्षणाचे, करिअरचे स्वप्न पूर्ण झाले. कायम विविध उपक्रम राबवणारे मोहन सोनवणे यांनी यंदा दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची दिनदर्शिकाही काढली आहे. याबद्दल त्यांचे व दिव्य मराठीचे अभिनंदन. श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अभिलाष मोहन सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:58 am

वाचन, विचार आणि वक्तृत्वाला चालना; मुलांची दमदार कामगिरी:खुलताबादेत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग

येथील घृष्णेश्वर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खुलताबाद येथे आज शुक्रवार, दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील विविध शाळांमधून लहान व मोठा गट अशा दोन गटांत एकूण ३० विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक विषयांवर प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक/ प्राचार्य संजय वरकड होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ललिता मेवाळ, उच्च माध्यमिक पर्यवेक्षक परमेश्वर हजारे, माध्यमिक पर्यवेक्षक हरिश्चंद्र धांडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर उर्फ भाऊ व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुणे व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेसंदर्भात राजेंद्र सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य संजय वरकड यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याचे कौतुक करत आत्मविश्वास, वाचन व विचारस्वातंत्र्य जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपान आढाव, रामेश्वर राठोड, रामेश्वर धारे, मनोज दोडेवार, धीरज मगरे, निलेश बागडे, आनंद पाटील, राजेश बांगे, बिराजदार, मिलिंद बोडके, संगीता शिंदे, प्रभाकर काकडे, रवी सावजी, भगवान कोलते, आढाव, साजिद कुरेशी यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते व लहान गट प्रथम : कु. सबुरी दादासाहेब पवार, कमला नेहरू कन्या विद्यालय, खुलताबाद द्वितीय : कु. आराध्या रामेश्वर मिसळ, सामंतभद्र विद्यामंदिर, वेरूळ तृतीय : कु. दिव्या हरिभाऊ पाडले, न्यू हायस्कूल, गदाना मोठा गट प्रथम : अर्जुन संतोष ठाले, संत जनार्दन स्वामी विद्यालय, वेरूळ द्वितीय : कु. वैष्णवी जनार्दन कोरडे, जि. प. शाळा, कसाबखेडा तृतीय : कु. प्रगती प्रकाश बरडे, न्यू हायस्कूल, गदाना

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:56 am

कन्नडमध्ये प्रलंबित प्रश्न सोडवून शहराचा कायापालट करणार:माजी आमदार नामदेवराव पवार यांची पालिकेत ग्वाही‎

कन्नड शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवून शहराला वैभव मिळवून देण्याचा निर्धार माजी आमदार नामदेवराव पवार यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या नव्या नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पवार म्हणाले, लोकांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. त्यांनी ठाम भूमिका घ्यावी. अडथळा आणणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल. अंबाडी धरणात भरपूर पाणी असूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. पाणी वितरण यंत्रणा सुरळीत केल्यास ही समस्या कमी होईल. नगराध्यक्षा फरीन बेगम म्हणाल्या, ही निवडणूक माझी नसून सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांची आहे. आपण सर्वजण एक आहोत, हीच कन्नडची ताकद आहे. सासरे स्व. अब्दुल वाहेद सेठ यांचे संस्कार आणि पती अब्दुल जावेद सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल. मूलभूत सुविधांवर लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. नगरसेवक अब्दुल जावेद यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील, यमुनाताई पवार यांच्यासह डॉ. सदाशिव पाटील, सचिन पवार, सचिन काळे, तारेख शेठ, इरफान हाजी, विखारमामू, याकूब शेख यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:56 am

विद्यार्थ्यांनी अनुभवली गडकिल्ल्यांविषयी माहिती:पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयाची हिवाळी सहल‎

सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयाची विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली चार दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. सहल निघताना विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर, पालक व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सहलीमध्ये इयत्ता नववी ते बारावी च्या १६४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यास मदत करणे, भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख करून देणे हा होता. तर या सहलीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, ऐतिहासिक तसेच निसर्गसौंदर्याने नटलेली पर्यटन स्थळ दाखवण्यात आली त्यामध्ये इमॅजिका वॉटर पार्क लोणावळा, पाली गणपती, मुरुड जंजिरा किल्ला, श्रीवर्धन समुद्रकिनारा, चवदार तळे महाड, किल्ले रायगड, राजमाता जिजाऊ समाधी पाचाड, किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, महाबळेश्वर, जेजुरी अशा विविध प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवण्यात आले. प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे म्हणाले की, या सहलीमुळे विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि पर्यटनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्याचबरोबर अभ्यासक्रमाचा भाग प्रत्यक्ष अनुभवता आला. सहलीदरम्यान लोणावळा येथील इमॅजिका वॉटर पार्क येथे पाण्यामध्ये खेळण्याच्या मनसोप्त आनंद विद्यार्थ्यांनी घेतला, पालीच्या गणपतीचे दर्शन घेतले, मुरुड जंजिरा येथील समुद्रातील ऐतिहासिक किल्ल्यावर विद्यार्थ्यांना बोटीच्या माध्यमातून नेण्यात आले. श्रीवर्धन समुद्रकिनारा अत्यंत काळजीपूर्वक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व शिक्षकांनी विशेष दक्षता घेत विद्यार्थ्यांना या समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गसौंदर्याचा अनुभव दिला, महाड येथील चवदार तळ्याच ऐतिहासिक महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले, तसेच राजमाता जिजाऊ समाधीचे पाचाड येथे दर्शन घेतले, रायगड, प्रतापगड किल्ल्याची ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना दिली, महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी गार्डन, मॅप्रो गार्डन तसेच वाई येथील गार्डन पाहिल्या नंतर शेवटी जेजुरीला सर्व विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. याप्रसंगी आयोजित केलेल्या सहलीबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत असून महाविद्यालयाचे शिक्षक प्रदीप कानडजे, राजेश ठोंबरे, सुनील तांबे, भास्कर केरले, सुनील सागरे, योगेश निंभोरे, एकनाथ जंजाळ, प्रफुल्ल कळम, गजानन सपकाळ, डॉ. गणेश दिवटे, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, महादेवी ठवरे, अक्षय निकम यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात आले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरणारा आहे, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती : सहलीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निसर्गाचे सान्निध्य अनुभवले, विविध झाडे, फुले पाहिली आणि पर्यावरणाबद्दल माहिती घेतली. ऐतिहासिक स्थळी भेट दिल्याने विद्यार्थ्यांना इतिहासातील महत्त्वाच्या घटना आणि स्थळांची माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांचा अभ्यास अधिक मनोरंजक झाला. प्रवासात भक्ती गीते, अभंग, नाटिका, गाणी, खेळ, वनभोजन यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:54 am

उद्धवसेनेचे रणशिंग:365 दिवसांपैकी शहराला 44 दिवसच पाणी मिळाले याचे दुःख वाटते- ठाकरे, पाणीप्रश्न, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार

मी मुख्यमंत्री असताना या शहराच्या पाणी योजनेसाठी महानगरपालिकेचा हिस्सा राज्य सरकारतर्फे भरण्याचे आश्वासन दिले होते, जेणेकरून शहराची तहान भागेल आणि नागरिकांवरही त्याचा बोजा पडणार नाही. मात्र, या सरकारने ८२२ कोटी रुपयांचे कर्ज काढायला लावले आहे, याची फेड शहरवासीयांना करावी लागणार आहे. शहराला ३६५ पैकी केवळ ४४ दिवस पाणी येते, याचे मोठे दुःख वाटते. इथे माणसं राहतात की नाही? मी मुख्यमंत्री असताना उद्घाटन केलेल्या योजना अद्याप पूर्ण झाल्या नाहीत याचे मोठे दुःख वाटत असल्याची खंत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील नेते उपस्थित होते. शहरातील आणि जालना महानगरपालिकेचे उमेदवार दुसऱ्या स्टेजवर बसलेले होते. या वेळी शहराच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना ठाकरे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगरमध्ये माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, मात्र दारूचे लायसन्स आणि बिअर बारला परवानगी तातडीने मिळते.’ आग लागली तर विझवायला पाणी नाही “नशामुक्त संभाजीनगर करू म्हणणारे अजित पवार सध्या सत्तेत आहेत, सत्तेत असताना शहरात ड्रग्जचा सुळसुळाट झाला तो त्यांच्याकडून थांबवला जात नाही. हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही घरी पाणी येत नाहीये, मग कशाला धर्माच्या नावाने आग लावता? तुमच्याकडे विझवायला पाणी नाही,’ असे ठाकरे म्हणाले. जुना भाजप उरला नाही जुना भाजप आता उरला नाही, आताच्या भाजपला भ्रष्टाचारी, गुन्हेगार आणि बलात्कारी चालत आहेत. बदलापूर प्रकरणातील सहआरोपीला स्वीकृत सदस्य पद देणारा भाजप आता विकृतीचा समर्थक झाला आहे. पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना ज्यांनी पक्षात घेतले, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे ठाकरे म्हणाले. ही अस्मितेची लढाई आहे मुंबईतील ठेवी मोडणाऱ्या आणि राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्ता दिली तर महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे उरणार नाहीत. दीड हजार रुपये देऊन तुमचे मत नाही तर तुमचे आयुष्य घेतले जात आहे. मताची नाही, तर आयुष्याची किंमत करा. पैसे देऊन आणलेला एकही माणूस या मैदानात नाही, हे तुमचे प्रेम आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. गुंडागर्दी बंद करण्यासाठी शहरावर भगवा फडकवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. बाळासाहेबांच्या सभेची आठवण झाली : चंद्रकांत खैरे यांच्या भावना १९८८ च्या बाळासाहेबांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी जमली होती. त्याचीच प्रचिती आज पुन्हा आली. या मैदानात शिवसैनिकांना बसण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. हे ठाकरेंवरचे शिवसैनिकांचे प्रेम आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी मी पदाधिकाऱ्यांना फोन केले आणि घरोघरी फिरल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:51 am

तुम्हाला मिळालेलेच नव्हे, तर गाडीतील पैसेही घेऊन पळा!:‘वंचित’चे ॲड. प्रकाश आंबेडकरांचा मतदारांना अजब सल्ला

‘१२ तारखेपासून मतदानासाठी पैसे मिळतील. ते पैसे तर घ्याच, त्याशिवाय गाडीत असलेले सर्व पैसे घेऊन पळा. पोलिस तुम्हाला काहीही करणार नाहीत. कारण जो तक्रार करायला जाईल तर त्याला पैसे कुठून आले हे सांगावे लागेल. कारण हे पैसे तुमच्या- आमच्यासारख्यांकडून ओरबाडलेले आहेत. ते आपलेच पैसे आहेत. पैसा घेतला तरी मतदान आपल्याच माणसाला करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या आमखास मैदानावरील प्रचारसभेत ते शनिवारी(१० जानेवारी) बोलत होते. या वेळी राज्य सदस्य अमित भुईगळ, अफसर खान यांच्यासह सर्व ६० उमेदवारांची विचारमंचावर उपस्थिती होती. पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमेरिकेच्या विश्वगुरूने टेरिफ ५० टक्के वाढवले. भविष्यात ते ५०० टक्के होईल. त्यामुळे पर्यायाने डॉलरची किंमत १३० पर्यंत पोहोचेल. त्या तुलनेत चाकरमान्यांचे वेतन आणि कामगारांची मजुरी वाढणार नाही. मुस्लिमांवर अत्याचार झाले तेव्हा मुस्लिम नेते काय करत होते? मुस्लिम युवकांनी टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवले तेव्हा मदतीसाठी कोणते मुस्लिम नेते अन् नगरसेवक पुढे आले? वंचित बहुजन आघाडी ही धर्मनिरपेक्ष ताकद म्हणून उभी राहिली आहे. त्यामुळे मुस्लिमांवर अत्याचार झाले तेव्हा आमच्याच पक्षाने भूमिका घेतली होती याचा कदापि विसर पडू देऊ नका. त्यामुळे मौलवींनी एमआयएमचा नाद सोडून धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:48 am

‘लाडकी बहीण’च्या निधीवरून रणकंदन:मतदानाआधी 3000 रुपये वाटपाचा घाट

महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निधी वितरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या हालचालींवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र आक्षेप घेतला आहे. हा थेट आचारसंहितेचा भंग असून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका मतदानाच्या एक-दोन दिवस आधीच (१४ जानेवारी- मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर) सरकार दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याच्या तयारीत आहे. १ कोटीहून अधिक महिला मतदारांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे म्हणजे ही ‘सामूहिक सरकारी लाच’ असून सत्ताधारी पक्षाला फायदा पोहोचवण्याचा हा प्रकार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ....तर खालील कारवाई होऊ शकते निधी वितरणावर स्थगिती: मतदान होईपर्यंत बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेवर आयोग स्थगिती आणू शकतो.नोटीस बजावणे: संबंधित विभागाच्या सचिवांना किंवा जबाबदार मंत्र्यांना आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत नोटीस दिली जाऊ शकते.जाहिरातींवर बंदी: या योजनेच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी जाहिराती किंवा बॅनर्स हटवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. आमचा योजनेला विरोध नाही,पण... काँग्रेसने म्हटले, योजनेला किंवा आर्थिक लाभाला विरोध नाही. मात्र, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी निधी मतदानानंतरच द्यावा, अशी मागणी पक्षाने केली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘संक्रांत गोड’ करण्याच्या नावाखाली सरकार निधी वितरणासाठी आग्रही आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या कडक भूमिकेमुळे या निर्णयाला ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:32 am

सांगलीत टोलेबाजी:भाजपची अवस्था ‘पिंजरा’ तील मास्तरा’सारखी- जयंत पाटील यांनी शेरोशायरीतून साधला निशाणा

भाजपची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. “ये बंद करने आए थे तवायफो के कोठे, मगर सिक्को की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे,’ अशा शेरोशायरीतून जयंत पाटलांनी भाजपला टोला लगावला. सांगलीत प्रचार सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करून सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजप काय करतोय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत. आता आपले गडीदेखील तिथे चाललेत. काँग्रेस सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. भाजपवाले ओवेसींसोबत बसतात जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएमसोबत युती करतात. ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:18 am

'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा':रस्त्याला वर्षही होऊ दिल नाही की रस्ता फोडून टाकला, नळाला गटाराचे पाणी येते म्हणत संभाजीनगरमधील नागरिकांचा आक्रोश

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक जशी जवळ येत आहे, तशीच शहराच्या झाकून ठेवलेल्या वेदनांची फाईल उघडू लागली आहे. दिव्य मराठीतर्फे आयोजित ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांनी मोकळेपणाने मांडलेले अनुभव केवळ तक्रारी नाहीत, तर वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षाची साक्ष देणारे वास्तव आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याऐवजी नळातून गटाराचे पाणी येते, कचऱ्याचे ढीग वस्त्यांच्या उंबरठ्यावर साचले आहेत, वर्षभरातच रस्ते फोडून नागरिकांचे हाल केले जात आहेत, तर वीज, ड्रेनेज आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. निवडणूक जवळ आली की कामे सुरू होतात, उद्घाटने होतात; मात्र नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील प्रश्न तसेच राहतात. ‘आम्ही कचऱ्यात जगतो’, ‘घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे’ या शब्दांतून प्रभाग ८ मधील असह्य वास्तव समोर आले असून, ही केवळ एका प्रभागाची कथा नसून, संपूर्ण शहराच्या नागरी व्यवस्थेचे विदारक प्रतिबिंब ठरत आहे.कोणत्या समस्या या नागरिकांना त्रास देत आहेत जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून... पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी आंबेडकर नगर मध्ये राहणाऱ्या रहिवासी तान्हाबाई पोटफोडे म्हणतात की, ‘आमच्याकडे जेव्हा पाणी सोडल जात तेव्हा दूषित पाणी येते. ड्रेनेज लाईन सगळ्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे तेच पाणी पिण्याच्या पाईप मध्ये उतरत आणि तसच मिक्स होऊन पाणी येते. आम्हाला लाईटचा सुद्धा इतका त्रास आहे की, ज्या दिवशी पाणी येईन त्याच दिवशी त्याच वेळेला आमची लाईट जाते. हा त्रास पूर्ण गल्लीला आहे. त्यामुळे एवढा त्रास आमचा सोडवावा हीच अपेक्षा आहे.’ मुबलक-स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत देशमुख म्हणाले की, आमच्या प्रभागात अनेक समस्या आहेत. यामध्ये मुख्य समस्या आहे ती म्हणजे प्रभागात आरोग्य केंद्र नाही. बाजूच्या प्रभागात जावे लागते. ते सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर परिसरातील मैदाने विकसित करण्याचा आमचा मानस आहे. मागच्या नगरसेवकांनी काहीच कामे केलेली नाहीत. त्याच्या कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले असते. अनेक कामे पूर्वी मंजूर झाली असून आता निवडणुकीच्या तोंडावर मतदान मिळावे म्हणनू सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच प्रभागात पिण्याचा पाण्याचा विषय देखील गंभीर झाला आहे. माझ्या प्रभागात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा त्यावर सत्ताधारी सर्वच पक्षांकडून राजकारण केले जात आहे. मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पाण्याची वेळ बदलून महिलांना त्रास होणार नाही अशा वेळी पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. 39 हजारांपेक्षा जास्त मतदार असणाऱ्या प्रभागाचे नगरसेवक त्यांच्या आफीस ते घर रस्ता व्यवस्थित करू शकत नाही ते प्रभागाला काय न्याय देऊ शकतील. आमच्या प्रभागात केवळ बिले काढण्यासाठी कामे केली आहे. जनता त्यांच्यावर नाराज आहे, ठेकेदारांची घरे भरण्याचे काम मागील लोकप्रतिनिधींनी केले आहे. चांगला रस्ता फोडून टाकला प्रभागातील रहिवासी प्रकाश पोटफोडे म्हणाले ,'आमच्या घरासमोर जो रस्ता बांधला त्याला एक वर्ष झाले. मात्र तो आता पाण्याची पाईपलाईन टाकायची म्हणून फोडून टाकला. यामुळे आम्हाला याचा एवढा त्रास होतोय की, घराच्या बाहेर निघता पण येत नाहीये. घरात म्हातारे लोक आहेत. त्यांनी कस राहावं. लहान मुलं इथे खेळतात. ते त्या खड्यात पडत आहेत. या फोडलेल्या रस्त्यामुळे अनेकांच्या ड्रेनेज लाईन पण फुटल्या आहेत. त्यामुळं ते घाणरेडे पाणी पिण्याच्या पाण्यात येतंय. दूषित पाण्यामुळे आमच्या गल्लीतले अनेक लोक आजारी पडले आहेत. आधी चांगले रस्ते करतात , मग ते फोडतात आणि पाईपलाईन टाकायची म्हणून आम्हाला गप्प बसवतात.' नशेखोर मुलांचे प्रमाण वाढतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश जाधव म्हणाले की, आमच्या प्रभागात वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा खूप मोठा आहे. नशेखोर मुलांचे प्रमाण वाढत आहे. मुले नशेखोरर होऊ नये यासाठी आम्ही संस्कार केंद्र सुरू करणार आहोत. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आणि बसण्यासाठी नाना-नानी पार्क सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या प्रभागातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आम्ही अभ्यासिका उभारण्याकडे लक्ष देणार आहोत. माझ्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या ही देशी दारुचे आहे त्यामुळे महिलांना सुरक्षित असल्याची भावना येत नाही. यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. अनेक अल्पवयीन मुले नशेखोर झाले आहेत. रोजगार, व्यसनमुक्ती या मुद्यावर काम करणार आहे. कचरा गाडी येत नाही, पाणी येते तर ते गढूळ पाणी येते. हे थांबले पाहिजे. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत. चोहीकडे कचऱ्याचे साम्राज्य नारेगाव भागात राहणारे रहिवासी उबेद बागवान म्हणतात ,'वीस वर्षांपासून ही वस्ती निर्माण झाली आहे. तेव्हापासून आमच्याकडे कचऱ्याची मोठी गंगाच वाहते. गल्ली म्हणू नका, रस्ता म्हणू नका, सोसायट्या जिथे तिथे तुम्हाला कचराच पाहायला मिळेल. आमच्यकडे कचऱ्याचे साम्राज्य आहे. महानगरपालिकावाले इथे येत नाहीत, पाहत नाहीत की आम्हाला काय त्रास होतोय ते. घंटा गाडी आमच्याकडे आठवड्याला एकदा येते. त्यामुळे साचलेला कचरा आम्ही खुल्या जागेवर किंवा मग नाल्यात टाकतो. जेव्हा घंटा गाडीवाला येतो तेव्हा एका ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांना शिट्टी वाजवून तिथेच बोलवतो. आता मला सांगा एवढा साचलेला कचरा प्रत्येकानी दुरून कसा आणावा. आमच्याकडे जारच्या पाण्याच्या गाड्या येतात. मग घंटा गाडीवाला का नाही?' असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या तोंडावर कामे सुरू राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लता गायकवाड म्हणाल्या की, आमच्या परिसरात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची आहे. आमच्या प्रभागात पाणी 10 दिवसांनी येते. एक तासभर पाणी येते यातही दुषित पाणी येते. यासोबतच ड्रेनेज आणि कचऱ्याची समस्या आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यातच अल्पवयीन मुलांचे नशेखोरीकडे वळण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. ते चांगल्या मार्गावर यावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रभागात रस्त्याची अनेक कामे अर्धवट सोडण्यात आलेली आहेत. अनेक दिवस न झालेली कामे निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली आहेत. या कामांची उद्घाटने होऊन 3 वर्षे होऊन गेली आहेत. या आहेत समस्या प्रभागातील मोठी वसाहत असलेल्या मयूर पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण, पथविक्रेत्यांचा भरणा यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.पावसाळ्यात मयूर पार्क, मारुतीनगर, जाधववाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. प्रभागात विजेची मोठी समस्या आहे. रोज अनेक वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित होत असतो. विशेषतः सकाळच्या सत्रात वीज नसल्याने नोकरदार वर्गाचे हाल होतात. पाणी, ड्रेनेज व गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात मयूर पार्क, मारुतीनगर, जाधववाडी, सुरेवाडीत रस्त्यांवर पाणी साचते. रस्ते चिखलमय होत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ येत आहे. मयूर पार्क, सुरेवाडी भागात कचरा नेण्यासाठी घंटागाड्या नियमितपणे येतात. जाधववाडी बाजार समिती परिसरात मात्र कचरा उचलला जात नाही. ८ दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त प्रभागातील विविध वसाहतींमध्ये ८ दिवसांआड पाणी येते. मात्र, पाणी पुरेशा दाबाने सोडले जात नाही. त्यामुळे नागरिकांना विद्युत पंप वापरावा लागतो. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक ८ मध्ये मयूरपार्क, ऑडिटर सोसायटी, सिद्धेश्वर नगर, राजे संभाजीनगर, म्हस्केवाडी, प्रथमेश सोसायटी, गुरुदत्त नगर, सुजाता सोसायटी, नाथनगर, सुरेवाडी, वसंतनगर अर्धवट, एस.टी. कॉलनी, गोकुळ नगर, सिद्धेश्वर नगर, म्हसोबानगर भाग, भक्तीनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, मिसारवाडी भाग, M.I.D.C. चिकलठाणा, सनी सेंटर, राठी संसार, आरती नगर भाग, आंबेडकर नगर, फुलेनगर, गौतम नगर, जाधववाडी, रामकृष्ण सोसायटी, मारुती नगर, भवानी नगर, नारेगाव भागश: यांचा समावेश होतो.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 7:16 am

मी महापालिका बोलतेय...:निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ, भाजपचं संख्याबळ वाढत गेलं तसं महापौरपदाचा कार्यकाळही जास्त मिळाला

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत ‘तुझं माझं जमंना आणि तुझ्याविना करमंना’ हे आहे शिवसेना-भाजप युतीचं नातं. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये आपण युती-आघाडीबाबत खूप माहिती घेतली. आता आपण महापौरपद मिळवण्यासाठीच्या वाटाघाटी समजून घेऊयात. महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष शिवसेना, त्यानंतर भाजप असाच आजवरचा इतिहास राहिला आहे. या आधी झालेल्या निवडणुकीत एमआयएमने तर भाजपचाही रेकॉर्ड तोडला. त्या विषयावर मी नंतर सांगेन. आता महापौरपद घ्यायचं तर संख्याबळानुसार. सुरुवातीला महापौरपद शिवसेनेकडे आणि उपमहापौरपद भाजपकडे हे सूत्र बदललं २००० पासून. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलं, ‘आम्ही जागावाटप करू, तुम्ही काळजी करू नका. परस्परांवर विश्वास ठेवा.’ त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते शांत झाले. मग संख्याबळानुसार एक वर्षासाठी भाजपला महापौरपद मिळालं. तेव्हा ते पहिल्या वर्षी घ्यायचं की नंतर हा मुद्दा चर्चेचा आला. अखेर पहिलं वर्ष भाजपला मिळालं. नंतर शिवसेनेला चार महापौर मिळाले. हीच गोष्ट पुढे कायम राहिली. २००५ मध्ये पहिलं एक वर्ष शिवसेना, मधली दोन वर्षे भाजप आणि राहिलेली दोन वर्षे शिवसेना. म्हणजे तीन विरुद्ध दोन वर्षे. त्यात भागवत कराड यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली. त्यामुळे सध्या तरी दुसऱ्यांदा महापौर होणारे भागवत कराड हे एकमेव आहेत. २०१० मध्ये भाजपने मोठी झेप घेत अडीच-अडीच वर्षे महापौरपद मागितलं. या संधीत विजया रहाटकर यांना अडीच वर्षांचा काळ मिळाला. हा काळ पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महापौर आहेत. महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा करूनही या महापालिकेत त्याचे तुकडे केले जातात. सलग अडीच वर्षे महापौरपद विजया रहाटकर यांच्यानंतर नंदकुमार घोडेले यांच्या नशिबी आलं. घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले या देखील एक वर्ष महापौर राहिल्या. त्यामुळे एका घरात सर्वाधिक काळ महापौरपद त्यांच्याकडे राहिले. आता या गोळाबेरजेचा विचार केला तर भाजपला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ महापौरपद मिळालं असलं तरी शिवसेना सर्वाधिक काळ सत्तेवर राहिली. विशेषत: शेवटच्या निवडणुकीत म्हणजे २०१५ मध्येही शिवसेनेचाच बोलबाला राहिला. महापालिकेतील हा वाद वरिष्ठांकडे जायचा तेव्हा खैरे आणि हरिभाऊ बागडे एकमेकांवर टीका करायचे. एकदा तर बागडे यांनी थेट, ‘तुम्ही लोकसभेत लढवून दाखवा,’ असं थेट आव्हानच दिलं होतं. महापालिकेतील एका वादातून कराड यांनाही शिवसेनेनं चांगलंच धारेवर धरलं. वाद मिटल्यानंतर कराड म्हणाले, ‘हे आमचं घरातलं भांडण आहे. आता ते मिटलं.’ थोडक्यात काय तर या महापालिकेत निवडणुकीनंतर जे युद्ध सुरू होतं ते शिवसेना, भाजपमधील जागा पटकावण्याचं असतं.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:58 am

बाॅम्बे महाराष्ट्राचे नाही, ते तर आंतरराष्ट्रीय शहर!:भाजप नेते अण्णामलाईंचे वक्तव्य, टीकेची झोड

भाजपचे स्टार प्रचारक, तामिळ नेते अण्णामलाईंनी “मुंबई महाराष्ट्राचे शहर नसून ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे’, असे विधान केले. त्यावर िवरोधकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव उघड होत असल्याची टीका केली. शिंदेसेनेनेही या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपने अण्णामलाईंना नीट समजावून सांगावे, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले. मुंबईतील वॉर्ड क्रमांक ४७ मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना अण्णामलाई असेही म्हणाले की, केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आणि मनपा भाजपचा महापौर असेल तरच विकास होईल. त्यावर खा. संजय राऊत फडणवीस-शिंदेंना उद्देशून म्हणाले की, “कुणीही लुंग्या-सुंग्या येतो आणि मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून आमच्या तोंडावर चप्पल मारून जातो. मग तुमचा स्वाभिमान कुठे गेला? अण्णामलाईवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, संबंधित विधानाचा नेमका संदर्भ आणि बोलण्याचा रोख तपासून पाहावा लागेल.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:57 am

फडणवीस-शिंदेंना खाेट्यागुन्ह्यात गाेवण्याचा हाेता कट:रश्मी शुक्ला यांचा निवृत्तीच्या 5 दिवस आधी अहवाल बाॅम्ब

विशेष तपास पथकाने (एसआयटी) राज्याच्या गृह विभागाकडे सादर केलेल्या एका अहवालामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांना २०१६ सालच्या एका गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, असा गंभीर ठपका या अहवालात ठेवला आहे. माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने अनेक महिने तपास केला. शुक्ला यांनी सेवानिवृत्तीच्या ५ दिवसांपूर्वी अहवाल गृह विभागाकडे सुपूर्द केला. अहवालात माजी डीजीपी संजय पांडेंसह तिघांवर ठपका ठेवला आहे. ठाण्यातील २०१६ मधील गुन्ह्याचा फेरतपास ही तत्कालीन विरोधी पक्षनेते व कॅबिनेट मंत्र्यांना लक्ष्य करण्यासाठी आखलेली सुनियोजित चाल होती, असे अहवालात नमूद आहे. सुडाचे राजकारण होते हे स्पष्ट झाले आम्हाला अडकवण्यासाठी ‘वरूनच’ येणाऱ्या सूचनांवर तेव्हाचे पोलिस आयुक्त व अधिकारी काम करत होते, हे स्पष्ट झाले आहे. लोकांना धमकावून, खोट्या केसेस कशा तयार केल्या जात होत्या. त्यांनी प्रयत्न करून पाहिला, पण त्यांचा हा कट अपयशी ठरला. सुडाचे राजकारण कशा टोकाचे चालले होते, हे मात्र स्पष्ट झाले. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ऑडिओ रेकॉर्डिंग समोर आल्याने कट उघडकीस अंतर्गत संवाद, रेकॉर्डिंग व अधिकृत नोंदींतील तफावतीवरून तपासावर अनुचित प्रभाव टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मूळ तक्रारदाराने दिलेले ऑडिओ रेकॉर्डिंग. या रेकॉर्डिंगमध्ये वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण कसे हाताळावे व राजकीय नेत्यांना अटक करण्याबाबत चर्चा करतात. यामुळे पोलिस दलात सत्तेचा दुरुपयोग व राजकीय हस्तक्षेपाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. एसआयटीच्या तपासात पांडेसह तिघांवर ठपका माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा अहवाल एसआयटी चौकशीवर आधारित आहे. यात त्यांनी तत्कालीन डीजीपी संजय पांडे, पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व सहाययक पोलिस आयुक्त सरदार पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. या अधिकाऱ्यांनी मिळून फडणवीस व शिंदे यांना गुन्ह्यात अडकवण्याचा कट रचला होता, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांचा ‘वादग्रस्त’ प्रवास महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३ जानेवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाल्या. १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी शुक्लांनी पुण्यात सुरू केलेला ‘बडी कॉप’ उपक्रम प्रचंड गाजला. महाविकास आघाडीच्या काळात ‘फोन टॅपिंग’ प्रकरणामुळे त्या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या होत्या.1 ठाण्यातील व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल व संजय पुनामिया यांच्या जमिनीच्या (यूएलसी) वादाचे २०१६ चे हे प्रकरण होते. २०१७ मध्येच तपासाअंती कोर्टात कागदपत्रे सादर केली गेली. तरीही २०२१ मध्ये तत्कालीन डीजीपी संजय पांडेंनी याप्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले.2 महायुती सत्तेत आल्यावर पुनामियांच्या तक्रारीवरून २०२४ मध्ये पांडे व इतरांवर खंडणीचा गुन्हा दाखल. तपासात, सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील यांनी फडणवीस व शिंदे यांना गोवण्यासाठी पांडे व इतरांनी दबाव टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर एसआयटी स्थापन केली. एसआयटीच्या अहवालाचे ‘विधिक परीक्षण’ केल्यानंतर गृह विभाग हा अहवाल विधी व न्याय विभागाकडे अभिप्रायासाठी पाठवेल. दोषींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवण्याचे आदेश गृह विभाग देऊ शकतो. सेवेतील दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे निवृत्तिवेतन थांबवून चौकशी शक्य.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:51 am

शहराच्या पाणी योजनेची फाइल 2.5 वर्षे कमिशनसाठी मातोश्रीवर- सावे:उद्धव ठाकरेंमुळे शहराला विलंबाने पाणी मिळत असल्याचा आरोप

शहरासाठी केवळ ५५ दिवसांत २०१९ मध्ये १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. निविदा प्रक्रिया अंतिम होऊन कार्यारंभ आदेशही मिळाले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टक्केवारीसाठी फाइल मातोश्रीवर अडीच वर्षे प्रलंबित ठेवली. पाणीपुरवठा विभाग, पालकमंत्री ते मातोश्री अशी फाइल फिरत राहिली. अडीच वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित राहिल्याने शहराला पाणी मिळू शकले नाही, असा आरोप राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला. भाजप-शिवसेना युतीचे सरकार २०२२ मध्ये आल्यानंतर नव्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळाली. केंद्राचा एक हजार कोटींचा हिस्सा प्राप्त झाल्याने आता २७४० कोटींवर योजना गेल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहराला तीन महिन्यांत पाणी मिळणार असल्याचा पुनरुच्चारही केला. ‘दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित “नेताजी इन न्यूजरूम’ कार्यक्रमात अतुल सावे यांनी शनिवारी (१० जानेवारी) हजेरी लावली. विधानसभा निवडणूक २०१९ नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर थांबवली. संपलेली पाणीपुरवठा योजना फडणवीस यांनी पुन्हा सरकार आल्यानंतर नव्याने बैठक घेत युद्धपातळीवर सुरू केली. आता योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ३७०० हॉर्स पॉवरची चाचणी यशस्वी झाली. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहरासाठी ६५० कोटींचे रस्ते, २३० कोटी कचरा नियोजन आणि २७४० कोटी पाण्यासाठी प्राप्त झाले.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:48 am

रागदरबार:संगीताच्या वेडापायी 11 व्या वर्षीच घर सोडले, खिशातले पैसे संपले की रेल्वेत गाणे गायले, पहाडी आवाजाने संपूर्ण जगाला व्यापणारे पंडित भीमसेन जोशी!

एक 2 वर्षांचा मुलगा वाजंत्ऱ्यांचा आवाज ऐकत बॅन्डवाल्यांच्या मागे मागे गेला. एका वाड्याच्या बाहेर तो आवाज ऐकत तिथेच ओट्यावर झोपी गेला. इकडे त्याचे वडील गावभर त्याला शोधून परेशान. शेवटी पोलिस ठाणे गाठत मुलगा हरवल्याची तक्रार करत असतानाच एक इसम तिथे लहान मुलाला कडेवर घेऊन आला. आमच्या वाड्याच्या बाहेर हा मुलगा वाजंत्र्यांच्या मागे मागे आला होता, हा कोणाचा मुलगा आहे? तेवढ्यात त्या मुलाचे वडील आपल्या मुलाला ओळखतात आणि पटकन कडेवर घेतात आणि म्हणतात, अरे हे माझेच पोर.. भीमसेन नाव याचे. पंडित भीमसेन जोशी...भारतीय परंपरेतील एक असा सत्त्वशील सूर, ज्याची जादू जगालाच नव्हे, तर संपूर्ण अवकाशाला व्यापून उरली आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात भीमसेन जोशी यांनी त्यांच्या अपूर्व गायकीने सर्वोच्च स्थान प्राप्त केले. 'रागदरबार'च्या आजच्या भागात आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवनाविषयी तसेच त्यांनी भारतीय संगीतात दिलेल्या योगदानाबद्दल जाणून घेणार आहोत. भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकातील गदग येथे 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. भीमसेन जोशी यांचे वडील गुरुराज जोशी हे संस्कृत पंडित होते. त्यांना वाटायचे की भीमसेनने संस्कृतचा अभ्यास करून पंडित व्हावे. भीमसेन यांचे प्राथमिक शिक्षण गदगमध्ये झाले. परंतु, त्यांना शालेय शिक्षणात कधीच रस आला नाही. लहान वयातच त्यांना संगीताचे वेड लागले होते. पंडित भीमसेन जोशी यांना संगीताची विशेषतः गायनाची प्रचंड आवड होती. आपण संगीताशिवाय राहूच शकणार नाही, अशी त्यांची भावना होती. जिथे कुठे वाजंत्री ऐकू येई, त्या दिशेने भीमसेन जोशी निघायचे. भीमसेन जोशींचे हे वागणे बघून वडिलांनी चक्क त्यांच्या सगळ्या शर्टवर 'जोशी गुरुजींचा मुलगा' असे लिहून ठेवले. जेणेकरून भीमसेन पुन्हा कुठे वाजंत्र्यांच्या मागे मागे गेले आणि हरवले तर लोकांना समजावे आणि घरी आणून सोडतील, असा त्या मागचा उद्देश. भीमसेन जोशी यांच्या डोक्यातून गाण्याचे वेड जायलाच तयार नव्हते. एकदा भीमसेन जोशी शाळेतून घरी आले आणि त्यांनी त्यांच्या आईला विचारले की हे ग्वाल्हेर कुठे आहे? त्यावर आईने सांगितले की ते इथून खूप लांब उत्तरेकडे आहे. हा प्रश्न विचारण्या मागची गोष्ट अशी होती की भीमसेन जोशींनी बाहेर कुठेतरी एक गाण्यातली चीज ऐकली होती आणि मास्तरांना विचारले असता ही ग्वाल्हेर घराण्याची चीज आहे. ती चीज भीमसेन जोशींना फार आवडली होती. त्यांनी मनाशी पक्क केले होते की आता ग्वाल्हेरला जाऊनच गाणे शिकायचे आणि वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधात घर सोडले. सरावासाठी भीमसेन जोशी उस्ताद अब्दुल करीम खान, वझेबुवा, केसरबाई केरकर तसेच उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या रेकॉर्डिंग ऐकत रियाज करायचे. पु. ल. देशपांडे यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत सांगताना भीमसेन जोशी म्हणतात, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन..' आमच्याकडे एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखे पेपरमध्ये वगैरे येत नव्हते. शाळा सोडून मी तिथे जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकले की असे वाटायचे, अशा प्रकारचे गाणे मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला. भीमसेन जोशी घर सोडून गुरूंच्या शोधात गेले आणि इकडे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली होती. त्यांच्या वडिलांना एवढी खात्री होती की संगीताच्या शोधातच आपला मुलगा भटकत असणार. खिशात पैसा आणि खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत भीमसेन जोशी यांनी ग्वाल्हेर, लखनऊ, रामपूर अशी शहरे पालथी घातली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्यांनी विनातिकीट केला. याचाही एक किस्सा आहे.. भीमसेन जोशी गुरूच्या शोधात ग्वाल्हेरपर्यंत गेले. या प्रवासात त्यांच्या खिशातले पैसे संपले की ते रेल्वेत गाणं गायचे. लोकांना वाटायचे, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असून सुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे असे. असे करत त्यांनी चतुराईने रेल्वेचा प्रवास केला. एकदा तर भीमसेन जोशींना एका पोलिस शिपायाने पकडले, तेव्हा देखील भीमसेन यांनी त्यांनाही गाणे ऐकवले आणि त्या शिपायाने सोडूनही दिले. इकडे भीमसेन जोशींच्या वडिलांनी शोधमोहीम सुरू केलीच होती. अखेर जालंधर येथे पंडित मंगतराम यांच्या घरी भीमसेन जोशी सापडले. तिथून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी आणले. मुलाचे गाण्यासाठीचे विलक्षण वेड पाहता, वडिलांनी भीमसेन जोशींना त्यांच्या गावाजवळ कुंदगोळ गावी नेले. तिथे रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे भीमसेन जोशींनी शिकण्यास सुरुवात केली. परंतु, रामभाऊ कुंदगोळकरांकडे शिकणे काही सोपे नव्हते.. सूर चुकला आणि गुरुजींनी अडकित्ता फेकून मारला.. भीमसेन जोशींनी पंडित रामभाऊ कुंदगोळकरांकडे गुरू-शिष्य परंपरेने शिकण्यास सुरुवात केली. तिथे गुरूंनी घरच्या कामात चांगलेच जुंपले होते. रामभाऊ कुंदगोळकरांचे शिष्यत्व मिळवण्यासाठी त्यांना अथक परिश्रम घ्यावे लागले. एक-दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागायचे आणि तेव्हा मग गुरुजी त्यांना शिकवायचे. पु.ल. देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीत भीमसेन जोशींनी याविषयी सांगितले आहे की, 'रामभाऊ कुंदगोळकर गुरुजी परीक्षा बघायचे. कारण माझ्यासमोर दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथे पुण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणे वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचे. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो.' पुढे भीमसेन जोशी सांगतात, 'मी पहाटे चारला उठायचो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचे. 50-60 घागरी पाणी आणायचे. मग तंबोरा घ्यायचा. मग त्याने सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरी सुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंद्रामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.' एके दिवशी सराव सुरू असताना भीमसेन जोशींचा सूर चुकला. यावर त्यांच्या गुरूंनी हातात असलेला अडकित्ता त्यांना फेकून मारला आणि त्याची खूण भीमसेन जोशींच्या डाव्या डोळ्यावर आयुष्यभर राहिली, असाही एक किस्सा फार प्रचलित आहे. 16 तासांचा रियाज.. पंडित रामभाऊ हे सवाई गंधर्व म्हणून ओळखले जायचे. त्यांच्याकडेच भीमसेन जोशी यांनी सुरुवातीचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. सवाई गंधर्व हे किराणा या घराण्याचे गायक होते. सवाई गंधर्व हे अतिशय कडक शिस्तीचे गुरू होते. भीमसेन जोशी यांच्याकडून ते सुरुवातीला रोज 8 तास रियाज करून घ्यायचे. या काळात तोडी, पुरिया, मुलतानी या रागांवर मेहनत घेतली. हा रियाज पुढे जाऊन 16 तासांचा झाला. 1936 ते 1941 या काळात भीमसेन जोशी यांनी शास्त्रीय संगीत पूर्णपणे आत्मसात केले. त्यानंतर गुरूंच्या आज्ञेने भीमसेन जोशी पुण्याला आले. भीमसेन जोशींनी 1941 नंतर स्वतंत्र मैफिलींना सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय केवळ 19 वर्षे होते. 1950 ते 1970 या काळात तर भीमसेन जोशींचे नाव जगभर पसरले होते. 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात लेखिका सुनीता देशपांडे लिहितात, भाई (पु.ल. देशपांडे), वसंता (वसंत देशपांडे) आणि भीमसेन, पुण्यात पंचविशीतील तरुण जवळचे मित्र होते. त्यांना एकमेकांच्या कलेचा खूप आदर होता. पण तरुणपणीचे रक्त...एका शनिवारी पु. ल. देशपांडेच्याच घरी वसंतराव गायले ते भीमसेनच्या वरचढ, म्हणजे आदल्या शनिवारी भीमसेन गायले होते, ते सर्व आणि शिवाय इतर थोडे जास्त. पहाटे सगळे घरी गेले, पण भीमसेन यांच्यातील कलावंताचा अहंकार दुखावला गेला असावा. पु. लं.च्या घराची बेल काही तासांतच वाजली. सुनीताबाई लिहितात…मला दुधवाला असेल असे वाटले, म्हणून दार उघडले, तर भीमसेन हजर! परत सर्व जमवाजमव केली आणि भीमसेनची एक उत्कृष्ट मैफिल झाली. घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.. पंडित भीमसेन जोशींना गाड्या फार आवडायच्या. नुसत्याच आवडत नव्हत्या तर त्या भरधाव वेगाने पळवण्याचा जणू त्यांचा छंदच होता. या बाबतीतला एक किस्सा लेखक सुधीर गाडगीळ यांनी सांगितला आहे. ते सांगतात, 'पंडितजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरधाव चालवण्यात जसा त्यांचा हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यातही ते तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिनसह सगळ्या पार्टची माहिती त्यांना होती. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती ते गॅरेजवाल्याला अगदी बिनचूक सांगायचे.' पुढे सुधीर गाडगीळ सांगतात, 'एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते. पंडितजींनी नुकतीच नवीन मर्सिडीज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडीज काढली आणि म्हणाले बसा. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फूल स्पीडमध्ये सोडली होती. तासाभरातच आम्ही कोरेगाव भीमाला पोहोचलो. समोर नदीवरचा पूल होता. पलीकडे एक ट्रक येताना दिसत होता. पूल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता.' गाडगीळांनी यावर न राहवून हुश्श केले. यावर भीमसेन जोशी त्यांना म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल, पण मांडीला खरचटणार नाही.. भीमसेन जोशी यांना कारची आवड होतीच आणि जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे स्वतः गाडी चालवत ते जायचे. संपूर्ण भारत त्यांनी गाडी चालवत त्या काळी पालथे घातले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भीमसेन जोशींचे भारतभर कार्यक्रम होण्यास सुरू झाले होते. अनेकवेळा तर सलग 2 दिवस गाडी चालवून लगेच मैफिलीत गायलाही बसायचे आणि लगेच तिथून निघून गाडी चालवत दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर असायचे. थकवा आणि मरगळ हे शब्दच जणू त्यांच्या शब्दकोशात नव्हते. भीमसेन जोशींना चंबलच्या डाकूंनी आडवले... पंडितजींचा एक किस्सा तर फारच भन्नाट आहे. भीमसेन जोशींना प्रवासात असताना एकदा चंबलच्या डाकूने अडवले होते. झाले असे की, तो काळ होता 60 च्या दशकाचा. दिल्लीत भीमसेन जोशी गाण्यासाठी गेले होते. दिल्लीची मैफल संपवून ते मुंबईकडे परत निघाले होते. सवयीनुसारच पंडितजी गाडी चालवत होते. ग्वाल्हेर आल्यावर एका पेट्रोल पंपावर ते थांबले. तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. तेव्हा पेट्रोल पंपवाल्यांनी विचारले, 'तुम्ही कुठे चालला आहात?' त्यावर सांगितले की आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. तेव्हा पेट्रोल वाल्याने सांगितले की आता पुढे जाऊ नका. कारण पुढे चंबळच्या खोऱ्यात खतरनाक इब्राहीम डाकूचा एरिया आहे. तो कोणालाही जीवंत सोडत नाही. आज इथेच मुक्काम करा आणि पहाटे निघा. त्यावर भीमसेन म्हणाले, आम्ही गाणे बजावणे करणारे, आम्हाला कोण काय करणार? अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकतील ते भीमसेन कसले? पुढे गेल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरांची टोळीच उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बंदुका होत्या. त्यांचे चेहरे मफलरने झाकले होते. त्यांनी गाडी अडवली आणि डिक्की उघडायला लावली. भीमसेन जोशी यांनी उघडली. तिथे वाद्य ठेवलेली होती. वाद्याची झिप उघडायला सांगितली. तिथे हार्मोनियम, तबला, ढोलकी अशी वाद्य होती. त्यावर त्या डाकूंचा मुखिया म्हणाला, आप तो कोई गाणे बजाने वाले कलाकार लगते है. त्यावर आप्पा जळगावकर म्हणाले, जी हां त्यावर मुखिया ने विचारले, कौन है गाने वाला? तेव्हा त्यांनी पंडितजींकडे बोट दाखवून सांगितले, भीमसेन जोशी! ते नाव ऐकल्यावर त्या डाकूने लोटांगण घातले आणि म्हणाला, भाईसाब, गलती हो गयी. आप तो माता सरस्वती के भक्त हो. असे म्हणून सन्मानाने त्यांनी त्यांना पाठवून दिले. भीमसेनजी ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर हसले आणि म्हणाले, मी म्हणालो होतो ना. डाकू आम्हाला काय करणार? भीमसेन जोशी यांचे नाव तेव्हा कॅसेट आणि रेडिओच्या रूपाने त्या डाकूपर्यंत देखील पोहोचले होते आणि त्यातूनच त्यांनी त्यांची सुटका केली, असा किस्सा आप्पा जळगावकर यांनी सांगितला. आप्पा जळगावकर भीमसेन जोशींच्या सोबत हार्मोनियमच्या साथीसाठी नेहमी असायचे. पंडित भीमसेन जोशींची कीर्ती आता जगभर पसरली होती. त्यांचे भारतात मैफिली तर होत होत्याच, परदेशातही त्यांच्या मैफिली चांगल्याच गाजल्या. भीमसेन जोशी हे लखनऊआकाशवाणी केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार झाले होते. या काळात त्यांना थिरकवाजींचा तबला मनसोक्त ऐकायला मिळाला. बिस्मिल्लाह खान यांच्याशी तर अगदी मैत्रीचे नाते तयार झाले होते. भीमसेन जोशी यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे आक्रमकता, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी होती. नाटक चित्रपटातील योगदान भीमसेन जोशी यांनी अनेक नाटक तसेच चित्रपटांमध्येही मोठे योगदान दिले आहे. 'धन्य ते गायनीकळा' ह्या नाटकाचे त्यांनी संगीत-दिग्दर्शन केले (1968). गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे ह्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् ह्या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात (1997) संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा ह्या राष्ट्रैक्याच्या बहुभाषिक गीतातील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे. पुण्यातील रामेश्वर राममंदिरातर्फे भीमसेन जोशींना 'पंडित' या उपाधीने 1954 साली सन्मानित करण्यात आले, तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे 'गायनाचार्य' उपाधी मिळाली. भीमसेन जोशी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, पद्मश्री (1972), पद्मभूषण (1985), पद्मविभूषण (1999) ह्या व 2008 मध्ये ‘भारतरत्न’ ह्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्यांव्यतिरिक्त संगीतरत्न (1971), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (1976) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी त्यांना सन्मान्य डी. लिट पदवी प्रदान केली. अभंगांच्या नव्या पर्वाचा उदय पंडित भीमसेन जोशी यांनी 'संतवाणी'च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना एक सुखाद धक्का दिला. संगीतकार राम फाटक यांनी 'स्वरचित्र' उपक्रमाद्वारे पंडितजींकडून संतवाणी गाऊन घेतली आणि तिथूनच भावस्पर्शी अभंगांच्या एका नव्या पर्वाचा उदय झाला. 'ज्ञानियाचा राजा', 'माझे माहेर पंढरी', 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल', 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी' आणि 'रूप पाहता लोचनी', ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘टाळ बोले चिपळीला’, ‘बिजलीचा टाळ नभाचा मृदंग’ यांसारख्या शेकडो अजरामर रचनांमुळे त्यांच्या प्रत्येक मैफलीत संतवाणीचा आग्रह होऊ लागला. 1968 पासून लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या या भक्तिपर गीतांनी विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, आजही 'संतवाणी'च्या ध्वनिमुद्रिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच भीमसेन जोशी यांना ख्यालगायकीचा राजा म्हणून ओळखले जाते. गुरुजींच्या स्मरणार्थ 'सवाई गंधर्व महोत्सवा'ची सुरुवात 1952 मध्ये सवाई गंधर्वांच्या निधनानंतर, त्यांचे जावई नानासाहेब देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी 1953 मध्ये पुण्यात 'सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सवा'ची मुहूर्तमेढ रोवली. काळाच्या ओघात या महोत्सवाचे रूपांतर एका राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सोहळ्यात झाले असून, नामवंत दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणासह पंडितजींच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. पंडित भीमसेन जोशी यांचा असा विश्वास होता की, खरा कलाकार तोच असतो जो कौतुकासाठी प्रेक्षकांकडे पाहत नाही, तर आधी स्वतःच्या सादरीकरणाचा आनंद घेतो आणि नंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा विचार करतो. जर एखादा कलाकार आपल्या सर्जनशील प्रयत्नाने समाधानी असेल, तर त्याला खात्री बाळगता येते की प्रेक्षकही त्याच्या संगीताचे कौतुक करतील. भीमसेन जोशींचे वैवाहिक जीवन पंडित भीमसेन जोशी यांचे दोन विवाह झाले होते. पहिले लग्न त्यांच्या मामे बहीण असलेल्या सुनंदा यांच्याशी झाला, तर दुसरा विवाह नाटकाच्या निमित्ताने आयुष्यात आलेल्या वत्सला यांच्याशी झाला. दुसरे लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नीकडे तसेच पहिल्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांकडे भीमसेन जोशींचे काहीसे दुर्लक्षच झाले. पुण्यात वास्तव्यास असताना भीमसेन जोशी त्यांच्या दुसरी पत्नीसह व मुलांसह मोठ्या बंगल्यात राहायचे. तर तिथेच त्यांची पहिली पत्नी व पहिल्या पत्नीची मुले वाड्यात एका खोलीत राहत होते. पहिल्या पत्नीवर आपण मोठा अन्याय केला आहे, याचा गंड मनात असल्याने भीमसेन जोशी पहिल्या कुटुंबाला जमेल तशी मदत करत असत. भीमसेन जोशी यांचे पहिले पुत्र राघवेंद्र यांनी त्यांच्या पुस्तकात याविषयी सविस्तर लिहिले आहे. स्वरभास्कर कायमचा मावळला वत्सला बाईंच्या मृत्यूनंतर भीमसेन जोशी एकाकी राहायला लागले होते. तसेच त्यांच्यावर नऊ शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती देखील काहीशी अस्वस्थ होती. भरलेल्या संगीत दरबारात अचानक सतारची तार तुटावी आणि सर्वत्र गंभीर वातावरण व्हावे, अगदी तसे 24 जानेवारी 2011 रोजी झाले. भीमसेन जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले आणि स्वरभास्कर कायमचा मावळला. परंतु, त्या भास्कराचे सूर अजूनही अजरामर आहेत आणि राहतील.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:00 am

राजधानी दिल्ली देशात सर्वाधिक प्रदूषित शहर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील वार्षिक सरासरी पीएम १० चे प्रमाण (प्रदूषणाचे १० मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे सूक्ष्म कण-पर्टिक्युलेट मॅटर) २०२५ मध्ये देशात सर्वाधिक असून, ते १९७ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतके नोंदले गेले. हे प्रमाण राष्ट्रीय मानक असलेल्या ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा जवळपास तीनपट अधिक असल्याचे एका विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राने […] The post राजधानी दिल्ली देशात सर्वाधिक प्रदूषित शहर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:39 am

भाजपचे आता भ्रष्टाचार प्रथम

राष्ट्र प्रथमचा विसर, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल छ. संभाजीनगर : प्रतिनिधी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा पुढच्या ३ दिवसांनी थंड होणार आहेत. मतदानासाठी ५ दिवस शिल्लक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरला गेले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जावून भर प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चॅलेंज दिले. यावेळी त्यांनी मला शल्य […] The post भाजपचे आता भ्रष्टाचार प्रथम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:38 am

बनावट खत कारखान्याचा पर्दाफाश

साता-यात कारवाई, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त सातारा : प्रतिनिधी जावळीतील ड्रग्जनिर्मिती कारखान्यावरील धाडीनंतर खटाव तालुक्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकून बनावट खत निर्मिती करणा-या कारखान्याचा पर्दाफाश केला. कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वडूज (ता. खटाव) येथे टाकलेल्या धाडीत लाखो रूपये किंमतीची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली. तसेच कारखाना सील […] The post बनावट खत कारखान्याचा पर्दाफाश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:34 am

जनसेवा माथाडी व श्रमिक कामगार संघटनेचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा 

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२६ मधील काँग्रेस व वंचित बहुजन अघाडीच्या सर्व उमेदवारांना विविध सामाजिक संघटन कडून जाहिर पाठिंबा मिळत आहे. जनसेवा माथाडी व श्रमिक कामगार संघटनेकडून द. ९ जानेवारी रोजी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांना बाभळगाव निवासस्थानी लेखी पत्र सुपूर्द करीत लातुर शहर महानगरपालिका निवडणुकीतील शहरातल्या काँग्रेस व […] The post जनसेवा माथाडी व श्रमिक कामगार संघटनेचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:27 am

ओबीसी बहुजन आघाडीचा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन आघाडी पक्षाकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकशाही मूल्य व भारतीय संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्य यांचे रक्षण करणे तसेच महाराष्ट्रातील ओबीसी बहुजन भटके आदिवासी दलित अल्पसंख्यांक अशा सर्वांना सोबत घेऊन जाण्याची […] The post ओबीसी बहुजन आघाडीचा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:26 am

लातूरमधील लघुउद्योजकांच्या जिद्दीला सौ. अदितीताई देशमुख यांचे पाठबळ 

लातूर : प्रतिनिधी लातूरच्या औद्योगिक आणि व्यावसायिक नकाशावर आता महिला आणि स्थानिक लघुउद्योजकांनी आपली मोहोर उमटवायला सुरुवात केली आहे. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘महिला उद्योजिका व्हीडीएफ बाजार’ या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक लघुउद्योग आता भरारी घेत आहेत. याच उद्योजकांच्या संघर्षाची आणि यशाची प्रचिती घेण्यासाठी ट्वेंन्टीवन अ‍ॅग्री लि. च्या संचालिका सौ. […] The post लातूरमधील लघुउद्योजकांच्या जिद्दीला सौ. अदितीताई देशमुख यांचे पाठबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:25 am

भाजपाची कुटनिती ओळखा; मतांचे विभाजन रोखा

लातूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीच्या वादळाने भाजपाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता भाजपाच्या कमळाने घड्याळाला सोबत घेत दलित, अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्याची कुटनिती सुरु केली आहे. सुजान मतदार बंधू-भगिणींनी भाजपाची कुटनिती ओळखून मतांचे विभाजन रोखावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहुजन […] The post भाजपाची कुटनिती ओळखा; मतांचे विभाजन रोखा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:23 am

सत्तेचा, पैशांचा जोर दाखवणा-यांचा माज उतरवा 

लातूर : प्रतिनिधी अलीकडच्या काळात पैसा, जातीभेद व दमदाटी करुन निवडणुका जिंकल्या जात आहेत. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्यावर सत्तेत आलेले मनमानी कारभार करत आहेत. याचा फटका सर्व समान्यांना बसत आहे. यासाठी आपल्या मताची ताकत न विसरता आपल्या मतातून सत्तेच्या व पैश्यांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे मनसुबे बाळगणा-याचा माज उतरवा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा […] The post सत्तेचा, पैशांचा जोर दाखवणा-यांचा माज उतरवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:21 am

काँग्रेस-वंचितला साथ देऊन विकासाचा रथ गतिमान करा

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेची निर्मिती झाली तेव्हापासून या महानगरपालिकेचे प्रतिनिधीत्व काँग्रेस पक्षानेच केले आहे. एक अपवाद वगळला तर आतापर्यंत जे जे महापौर झाले ते सर्व काँग्रेस पक्षाचे होते. या सर्वानी लातूर शहर महापालिकेचा चौफेर विकास केला आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांचा वारसा घेऊन आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव […] The post काँग्रेस-वंचितला साथ देऊन विकासाचा रथ गतिमान करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:20 am

फिरत्या तारांगणातून उलगडले ब्रह्मांडाचे रहस्य

अहमदपूर : प्रतिनिधी येथील यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘फिरते तारांगण’ या अनोख्या उपक्रमातून ब्रह्मांडातील अद्भुत रहस्यांचा रोमांचक अनुभव घेतला. कला व भूगोल विभागाच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा भक्कमपणे रुंदावल्या. हवा भरून उभे केलेल्या विशेष डोममध्ये बसून विद्यार्थी जणू आकाशगंगेतच प्रवेश करतात असा भास होतो. पाहताना चंद्र, सूर्य, तारे आपल्या अगदी जवळ असल्याचा […] The post फिरत्या तारांगणातून उलगडले ब्रह्मांडाचे रहस्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:18 am

फातिमा शेख यांच्या कार्याचा प्रशासनास विसर

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जोडीने स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेणा-या फातिमा शेख यांचे स्त्री शिक्षणात उल्लेखनीय काम आहे मात्र ज्या स्त्री शिक्षणासाठी त्या आग्रही होत्या त्या शालेय मुलींना आज त्यांची साधी ओळख ही नसणे हे अनाकलनीय आहे. फातिमा शेख यांच्या कार्याचा प्रशासनास विसर पडला असून शासन स्तरांवर ही आद्य शिक्षिका फातिमा […] The post फातिमा शेख यांच्या कार्याचा प्रशासनास विसर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 1:17 am

पंजा आपला नव्हता, घड्याळ मोदींसोबत अन् पाना जोडीदार:अमरावतीत ओवेसींचा प्रस्थापित पक्षांवर घणाघात

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी अमरावती येथे जाहीर सभा घेत धर्मनिरपेक्ष पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. वलगाव रोडवरील ॲकडेमीक हायस्कुलच्या प्रांगणात झालेल्या या सभेत ओवेसी म्हणाले की, जुलमी सत्ताधाऱ्यांशी लढण्याची क्षमता धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये उरलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहण्यात काहीच अर्थ नाही. ओवेसी यांनी यावेळी 'कमळ', 'पाना', 'हात' आणि 'घड्याळ' या चिन्हांना मत देणे म्हणजे मतांचा अपव्यय असल्याचे म्हटले. काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती, मात्र त्याच काळात अल्पसंख्याकांवर अनेक हल्ले झाले आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी कायदे केले गेले. 'युएपीए'सारखा कायदा काँग्रेस नेते पी. चिदंबरम गृहमंत्री असतानाच करण्यात आला, त्यामुळे 'पंजा' कधीच आपला नव्हता, असे ते म्हणाले. 'घड्याळ' सध्या मोदींच्या समर्थनार्थ उभे आहे, तर युवा स्वाभिमान पक्षाचा 'पाना' देखील त्यांचाच जोडीदार असल्याने त्यालाही मत देणे योग्य नाही, असे ओवेसींनी स्पष्ट केले. खासदार ओवेसींच्या मते, अल्पसंख्याकांना योग्य नेता न मिळाल्याने आतापर्यंत त्यांचा सर्वांनी वापर केला. त्यामुळे त्यांना सजग करण्याचे काम मी करत आहे. यासाठी अनेक जण माझा द्वेष करतात, पण मला त्याची पर्वा नाही. मी कोणालाही घाबरत नाही. आतापर्यंत मिळालेल्या प्रत्येक मंचावर मी माझी बाजू भक्कमपणे मांडली आहे. 'डरेगे तो मरेंगे' असे म्हणत त्यांनी उपस्थितांना धीट होण्याचा सल्ला दिला. या जगात फक्त अल्लाहला घाबरले पाहिजे, इतर कोणालाही नाही, असेही ते म्हणाले. आपल्या ३४ मिनिटांच्या भाषणात ओवेसींनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. शेतकरी, दलित, बेरोजगार आणि अल्पसंख्याकांवरील दुष्टचक्र कायम असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावतीसह राज्यात शाळांची स्थिती वाईट आहे, दवाखाने योग्य स्थितीत नाहीत आणि पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. हे सर्व बदलायचे असेल तर जनतेसाठी लढणारा पक्ष सत्तेत आला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ओवेसींनी केंद्र सरकारच्या चीन धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या केंद्र सरकार चीनला पायघड्या घालत आहे आणि 'आमच्या देशात या आणि गुंतवणूक करा' असे म्हणत आहे. मात्र हाच चीन भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या पाकिस्तानला मदत करतो आहे. चीनने भारताची सुमारे १५ हजार चौरस किलोमीटर जमीन हस्तगत केली असून त्यावर सैनिकी चौक्या बसविल्या आहेत. भारताच्या नाकावर टिच्चून भारतावरच हल्ले करणाऱ्या चीनला देशात गुंतवणुकीसाठी आमंत्रण देणे हा देशभक्त म्हणवणाऱ्या भाजप-संघाचा देशद्रोह नव्हे का, असा सवालही ओवेसींनी विचारला.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:44 pm

अमरावती कॉटन मार्केटमधील फळ बाजारात आग:पपईसह अनेक फळे जळून खाक, मोठे नुकसान

अमरावती येथील जुन्या कॉटन मार्केटमधील फळ बाजारात शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत पपईसह अनेक फळे जळून खाक झाली, ज्यामुळे पाच ते सात फळ उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या शेडमध्ये ही घटना घडली. येथे ठेवलेल्या पपईच्या ढिगाला आग लागली. बहुतेक फळ उत्पादकांनी आपली फळे येथे ठेवली होती, ज्यात पपईचा सर्वाधिक भरणा होता. कागदात गुंडाळलेली आणि प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवलेली अनेक फळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीच्या ज्वाळा दिसताच तेथील दुकानदारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या बंबाने आग लवकर आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील मोठा धोका टळला.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:41 pm

महसूल कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी चार आरोपींना अटक:कुऱ्हा पोलिसांची कारवाई, वाळूचा ट्रक पळवून नेणे भोवले

गौण खनिज तपासणी करत असताना महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी कुऱ्हा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवार, ९ जानेवारी रोजी चांदूररेल्वे येथून करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लक्ष्मण तुळशीराम चौधरी (३५, रा. बग्गी, ता. चांदूररेल्वे), शहबाज मुल्ला शफीमुल्ला (३७, रा. काजीपुरा, चांदूररेल्वे), स्वप्नील संजयराव कावरे (२४, रा. चमननगर, कुऱ्हा) आणि भावेश ज्ञानेश्वर देशमुख (२५, रा. पळसखेड, ता. चांदूररेल्वे) यांचा समावेश आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी घडली होती. कुऱ्हा पोलिस स्टेशन हद्दीत एमएच ४९ सीडी ८७३७ क्रमांकाचा १० चाकी ट्रक वाळू भरून अंजनसिंगीवरून कुऱ्ह्याकडे येत असताना पोलिसांनी त्याला थांबवले. आरोपींना वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता, त्यांच्याकडे परवाना नव्हता. महसूल पथकाच्या पाहणीत ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गौण खनिज आढळून आले. त्यामुळे तहसीलदारांनी सदर ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले. ट्रक कुऱ्हामार्गे तिवसा तहसीलमध्ये नेत असताना, ट्रकमागे एक कार आली. त्यातील चालकाने खाली उतरून ट्रक पळवून नेण्याबद्दल इशारा केला. महसूल कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली असता, आरोपींनी त्यांना मारहाण केली आणि ट्रक पळवून नेला. तेव्हापासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून ट्रक पळवून नेल्याच्या गंभीर प्रकारानंतर जिल्हाभरातील महसूल यंत्रणा सतर्क झाली होती. पोलिसांनी गुप्तपणे आरोपींचे वर्णन सार्वजनिक केले होते. दरम्यान, हे आरोपी चांदूररेल्वे येथे लपून बसल्याची माहिती एका गोपनीय सूत्राने पोलिसांना दिली. त्या माहितीची पडताळणी करून कुऱ्हा पोलिसांनी तेथे पोहोचून चौघांनाही अटक केली.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:39 pm

वन्य प्राण्यांच्या उच्छादामुळे तुरीचे पीक जमीनदोस्त:नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात

नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी: नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे पिके चांगली बहरली होती, मात्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांचे चांगले उत्पादन घेण्याचे स्वप्न भंगले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रानडुक्कर, हरिण आणि नीलगाय यांसारखे वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेतात घुसून तुरीचे उभे पीक फस्त करत आहेत. अनेक ठिकाणी पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले असून, त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी स्वतः रात्री जागून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु वन्य प्राण्यांची वाढती संख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले आहे. एका रात्रीत होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जफेड आणि दैनंदिन खर्च भागवणे त्यांच्यासाठी आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनीही संबंधित विभागाशी चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तुरीच्या उत्पादनावर अनेक शेतकऱ्यांचा वर्षभराचा महसूल अवलंबून असतो, त्यामुळे हे नुकसान त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणार आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस अशोक सोनारकर यांनी यावर उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यांच्या मते, ग्रामीण भागात वनविभागाचे पहारेकरी नियुक्त करणे, प्रकाशयोजनेचे जाळे वाढवणे, इलेक्ट्रिक फेंसिंगची सोय उपलब्ध करून देणे आणि संरक्षण भिंत उभारणे यांसारख्या उपायांची गरज आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करून त्यांना उचित नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. मंगरूळ चव्हाळा येथील शेतकरी अनिकेत शिरभाते यांनी सांगितले की, वन्य प्राण्यांच्या सततच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नुकसानभरपाई आणि संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्यास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. शिवाय पुढच्या त्रासालाही आळा बसेल. कृषीतज्ञांच्या मते, अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा आणि प्रभावी पिकसंरक्षणाची आवश्यकता आहे. वन्य प्राण्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:37 pm

अट्टल चोरटा जेरबंद, अनेक गुन्ह्यांची कबुली:कुऱ्हा पोलिसांनी 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

कुऱ्हा पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे. गस्तीवर असताना संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गजानन फकीरा मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूररेल्वे) असे आहे. कुऱ्हा ते चांदूररेल्वे मार्गावरील अप्पर वर्धाच्या पडीक क्वॉटरजवळ दुचाकी (एमएच ४० बीएस ९१४८) घेऊन जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली आणि त्याच्याजवळ वायर कटरही सापडले. आरोपीकडून ४ पाणबुडी मोटर (किंमत ३२ हजार रुपये), ५ किलो तांब्याची तार (किंमत ५ हजार रुपये) आणि ६ नोझल (किंमत ५ हजार रुपये) असा एकूण ४२ हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध यापूर्वी ४ ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ठाणेदार अनुप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय योगेंद्र लाड, जमादार उमेश वाघमारे, अनिल निंघोट आणि सागर निमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:36 pm

लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्या:काँग्रेसच्या पत्रावर बावनकुळे संतापले, 'विष कालवणारी विचारधारा' म्हणत डागली तोफ

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या हालचालींना काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हे पैसे निवडणुकीनंतरच वितरित करावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून टीका केली असून, काँग्रेसचा माता-भगिनींबद्दलचा द्वेष पुन्हा एकदा उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी १ कोटीहून अधिक महिला मतदारांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा करणे, हा मतदारांना प्रभावित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ही कृती म्हणजे एक प्रकारची 'सामूहिक सरकारी लाच' असून यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. आमचा या योजनेला विरोध नाही, मात्र निवडणुकीच्या निष्पक्षतेसाठी हे पैसे मतदानानंतरच दिले जावेत, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. नात्यात विष कालवणारी काँग्रेस - बावनकुळे काँग्रेसच्या या पत्रावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. आमच्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेस नेत्यांना बघवत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार संक्रांतीच्या पर्वावर बहिणींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी ही रक्कम देत असताना, त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही काँग्रेसची 'जहरी विचारधारा' असून राज्यातील महिला त्यांना कधीही माफ करणार नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले. संक्रांतीच्या मुहूर्तावर राजकारण तापले महायुती सरकार संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना दोन महिन्यांचा हप्ता एकत्रित देण्याच्या तयारीत आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा आणि या वितरणाची वेळ यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने यापूर्वीही या योजनेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याची आठवण करून देत बावनकुळे यांनी काँग्रेसवर 'महिला विरोधी' असल्याचा शिक्का मारला आहे. आता या प्रकरणावर राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आणि १० लाखाहून अधिक महिलांना मतदानापूर्वी हे पैसे मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:25 pm

संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर असताना फलटणचा सुपुत्र शहीद:दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण सुदानमध्ये विकास गावडे यांना वीरमरण

बरड (ता. फलटण) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यास आफ्रिकेतील दक्षिण सुदान या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. जवान गावडे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच फलटण तालुक्यासह त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. जवान विकास गावडे हे भारतीय लष्कारातील ११५ - इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नायक या पदावर सेवा बजावत होते. परदेशातील सैन्यांना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शांतीसेना असलेल्या मोहिमेत ते कार्यरत होते.त्यांची नियुक्ती सध्या आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेसाठी करण्यात आली होती.तिथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. जवान विकास गावडे हे बरड (ता. फलटण ) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते 22 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झाले.पुणे येथे त्यांनी सैन्य दलातील अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. ते भारतीय सैन्य दलात निष्ठेने सेवा बजावत होते.सध्या ते आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेत कार्यरत होते. संयुक्त राष्ट्राच्या शांति सेनेमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. त्यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच फलटण तालुका व त्यांचे मूळगाव असलेल्या बरड येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ, पत्नी,दोन वर्षांची छोटी मुलगी असा परिवार आहे.त्यांचे पार्थिव उदया रविवारी (ता. 11) रोजी सकाळी त्यांच्या मूळ गावी येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:57 pm

आदित्य-अमित बेरोजगार होतील म्हणून ठाकरे बंधू एकत्र आले:नीतेश राणेंची वरळीत तुफान फटकेबाजी, हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण प्रचंड तापले असून वरळी मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. वरळी हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. आम्ही देखील तीन-तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो आणि ही निवडणूक काही लहान मुलांबरोबर वाद घालण्याची नाही, अशा बोचऱ्या शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडले. आदित्य-अमित बेरोजगार होतील, म्हणून ठाकरे बंधू एकत्र आलेत, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर टोला लगावताना नितेश राणे म्हणाले, आपण एकत्र आलो नाही तर दोघेही बेरोजगार होऊन जातील, या भीतीने हे दोन भाऊ आता एकत्र आले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, जसा नेता आहे तसाच इथला त्यांचा उमेदवार आहे. हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून देत राणे यांनी उबाठा गटावर विखारी टीका केली. बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज पक्षामध्ये कोणाला घेतले जात आहे? बॉम्बस्फोटाचे आरोपी आणि 'हिरव्या सापांना' पक्षात स्थान दिले जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर अशांचे वाभाडे काढत त्यांना पक्षात स्थान दिले नसते, अशा शब्दांत नीतेश राणे यांनी समाचार घेतला. मराठी टक्का का घसरला? मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी विचारले की, तुमच्या सत्तेत मुंबईतील मराठी माणसाचा टक्का का घसरला? जर चुकून यांची पुन्हा सत्ता आली, तर मुंबईत आपली मंदिरेही सुरक्षित राहणार नाहीत. ही निवडणूक केवळ राजकीय नसून आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी नागरिकांना पटवून दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी जे जे आवश्यक आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कलानगरमध्ये फटाके वाजवणार मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत नितेश राणे यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिले. माझी इच्छा आहे की एकदा आमने-सामने व्हायला हवे, मग बघू आवाज कुठून निघतो, अशा शब्दांत त्यांनी थेट चॅलेंज दिले. तसेच, महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर आपण स्वतः विजयाची मिरवणूक काढू आणि फटाक्यांची एक माळ 'कलानगर'मध्ये (ठाकरे निवासस्थान) जाऊन लावू, असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तर भारतीयांना भाजप-शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही दरम्यान, नितेश राणे यांनी वसई विरार येथील सभेत बोलताना देखील मोठे विधान केले. उत्तर भारतीयांना सुरक्षा हवी असेल तर त्यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला मतदान करावे असं आवाहन करत त्यांनी उद्धवसेना-मनसेलाही थेट धमकी दिली आहे. वसई विरारमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांना सुरक्षा हवी असेल तर त्यांना भाजपा आणि शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला जागा दाखवण्याचं काम आमच्या खांद्यावर तुम्ही टाका हा विश्वास मी तुम्हाला देतो. इतर जे पक्ष आहेत ते केवळ राजकारण करायला येतील परंतु उद्धवसेना असेल, राज ठाकरेंच्या मनसेचे लोक तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतात तेव्हा तुम्हाला कुणी वाचवायला येत नाही. तुमच्यासाठी जर कुणी उभा असेल, तुम्हाला ताकद देत असेल तर ते फक्त भाजपा आणि शिंदेसेनेचे लोक आहेत असं त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:37 pm

ऑक्सफर्ड विद्यापीठावर फौजदारी गुन्हे दाखल करा:संभाजी ब्रिगेडची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणी ऑक्सफर्ड विद्यापीठासह संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या शैलीत आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्‍यु पवार आणि प्रदेश कार्याध्यक्ष उत्तम कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिला. जेम्स लेनच्या घृणास्पद व देशद्रोही लिखाणाला आता २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आता माफी मागणे म्हणजे गुन्ह्याची कबुलीच असल्याचे ब्रिगेडचे म्हणणे आहे. कामठे म्हणाले की, २००३ मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पत्र पाठवले होते. दोन दशके त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता अचानक माफी मागणे ही नैतिकतेतून किंवा इतिहासप्रेमातून आलेली नाही. ही माफी न्यायालयीन कारवाईतून सुटका मिळवण्यासाठी रचलेला डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. पवार यांनी यावेळी भांडारकर संस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेम्स लेनला संशोधनासाठी मदत करणाऱ्या, बदनामीकारक मजकुराला वैचारिक आधार देणाऱ्या आणि भारतीय इतिहासाचा अपमान करणाऱ्या भांडारकर संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर सरकारने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. हा सरकारी संरक्षणवाद नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी केला. प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी विचारले की, २२ वर्षे ज्यांची तोंडे बंद होती, त्यांना आज अचानक माफी कशी सुचली? जर गुन्हा केला नव्हता तर माफी कशासाठी? आणि माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली नाही का? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर कारवाई होणार की नाही? जेम्स लेनला मदत करणाऱ्यांना सरकारी संरक्षण दिले जात आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जर सरकार गप्प राहिले आणि आरोपींची सुटका झाली, तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून न्यायालयात लढेल आणि जनतेत सत्य मांडेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, मध्य जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, ज्‍योतिबा नरवडे आणि शहराध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:26 pm

आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही, तर बाळासाहेबांमुळे तुम्ही जगलेत:उद्धव ठाकरेंनी घेतला रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याचा समाचार

आजची सभा ही अभूतपूर्व आहे. सत्ताधाऱ्यांकडे सत्तेची मस्ती, पैशांची मस्ती, पण माझ्याकडे जनतेची मस्ती आहे. आज मला शिवसेना प्रमुखांची आठवण आली आज मी नवीन शिवसेनेला पुन्हा सुरुवात करतोय. आज कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आले आहेत. रावसाहेब दानवे हे पडलेले खासदार रावसाहेब दानवे हे पडलेले खासदार आहेत. ते पडले तरीही त्यांची मस्ती नाही उतरत आहे. त्यांच्या ताटात सर्व पक्षी जेवण करून गेलेत असे दानवे म्हणालेत मग आजही तुम्ही आमच्या ताटातलं का खात आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. रावसाहेब दानवे आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही, तर शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे. मी मुख्यमंत्री असतांना जी कामे सुरू संभाजीनगरमध्ये केली होती, ती बंद केलेली पाहून मला निराशा होत आहे. आपलं सरकार जर या गद्दारांनी पाडलं नसतं तर मी आज तुम्हाला पाणी देऊन दाखवलं असतं. मी केवळ पैसे दिले नव्हते, तर योजना पूर्ण करून देणार होतो. मी मुख्यमंत्री असतांना या पाणी योजनेची एक दोन वेळेस पाहणी केल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. …अस्तित्वाची लढाई आहे का? प्रेम जर नसतं तर माझ्याकडे काहीही नसतांना एवढी गर्दी जमली नसती. पण एवढी गर्दी जमल्यानंतरही जर पैश्यांची मस्ती निवडणूक फिरवणार असेल. तेव्हा मग ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? असे विचारले जाते. पण ही आमच्या नाही, तर जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. नशामुक्ती करण्यापेक्षा पाणी द्या- ठाकरे गद्दारांना काहीही कारभार कळलेला नाही. पण अजित पवारांच्या बॅनरखाली संभाजीनगर नशामुक्त करू असे पाहिले. तुमची सत्ता असतांना जर तुम्ही संभाजीनगर हे नशामुक्त करू शकत नसाल तर मनपा ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही शहर दारूमुक्त करणार हे कशावरून असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला. ज्या शहरात तुम्ही सर्वत्र दारूविक्री करतांना दिसत आहे. तर त्या शहरात तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था अजून तुम्हाला करता आलेली नाही. संभाजीनगरचं नाव हे आम्ही केल्याचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी केलं. जर तुमच्यात हिंमत असेल तर मोदींनी अहमदाबादचं नाव बदलून दाखवावं, असे आव्हानही ठाकरेंनी संभाजीनगरात बोलतांना केले. 'गुंड प्रथम, भ्रष्टाचार प्रथम'हे भाजपचं ब्रीदवाक्य पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली होती. या हत्याकांडातील आरोपी असलेल्या व्यक्तींनाच भाजपने प्रवेश दिला. यात एक तर तुम्ही आरोप करतात तो तरी खोटा आहे किंवा तुम्ही दोगले आहात. गुंड प्रथम, भ्रष्टाचार प्रथम, बलात्कारी प्रथम हेच आता भाजपचं ब्रीदवाक्य झालेलं आहे. निष्ठावंताच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे असल्याचे म्हणत जयंत पाटलांनी केलेल्या शेरोशायरीचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपवर शा‍ब्दिक हल्ला चढवला आहे. या भाषणानंतर कोणीतरी देवाभाऊकडे दोन हजार घ्यायला जावे. आज उद्धव ठाकरे हे विकासावर बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कचऱ्याचा, पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न आमच्या काळात सुधारला होता की नाही. मला दोन हजार देण्यापेक्षा पावसाने होरपळलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना मदत करा, असे आवाहनही ठाकरेंनी केले. अधिकाऱ्यांची मस्ती घेऊन तुम्ही निवडणूक उमेदवारांना माघार घ्यायला लावली जात आहे. सगळीकडे पैशाची मस्ती चालणार नाही. असेच सुरू राहिले तर जे काल परवा पश्चिम बंगालमध्ये झालं, तसेच लोक महाराष्ट्रातही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांच्या घोटाळा खरा की खोटा? ठाकरे म्हणाले की, अजित पवार म्हणतात की, ज्या लोकांनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसले आहेत. तसे ते माझ्याही काळात सत्तेत माझ्यासोबत होते. पण आज ज्या लोकांनी त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्यासोबत आज ते सत्तेत बसले आहेत. अजित पवारांच्या घोटाळ्याबाबत ठिगभर पुरावे कोण घेऊन गेले होते? त्यांच्यावर गुन्हा दाखल कुणी केला होता? मग आता त्यांना सत्तेत का घेतले? जर त्यांच्यावर केलेले आरोप खरे असतील तर कारवाई करा अन्यथा त्यांची जाहीर माफी मागा. घराण्याची परंपरा पुढे घेऊन चाललोय- ठाकरे मी आमच्या घराण्याची परंपरा सोबत घेऊन चाललो आहे. ठाकरे घराण्याची ही परंपरा आहे. ज्या लोकांना आमची लाज वाटते, त्यांनी माझ्या वडिलांचे नाव का लावायचे? असा प्रश्नही ठाकरेंनी केला.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:07 pm

ठाकरे गटाच्या औंढा नागनाथ तालुका प्रमुखावर गुन्हा दाखल:नागरिकांच्या प्रश्‍नावर मोर्चा काढल्याने कारवाई, प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप

औंढा नागनाथ तालुक्यातील नागरीकांच्या प्रश्‍नांवर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या औंढा नागनाथ तालुका प्रमुखावर प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेमध्ये काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता काही जणांना दुसरा देण्यात आला. या अनुदानामुळे लाभार्थ्यांनी त्यांची कच्ची घरे पाडून पक्की घरे बांधण्यास सुरवात केली. मात्र मागील काही दिवसापासून अनुदानाचा हप्ताच देण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीरीचे, जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मागील सहा ते आठ महिन्यापासून त्यांचेही अनुदान वाटप झाले नाही. दरम्यान, लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने वाटप करावे या मागणीसाठी ठाकरे गटाचे औंढा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर झटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुवारी ता. ८ गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून मिरवणुक काढली होती. त्यानंतर प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. औंढा तालुक्यात झालेले हे आंदोलन गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांच्या जिव्हारी लागले असून तालुका प्रमुख झटे यांनी केलेले आंदोलन राजकिय स्टंट असल्याचा आरोप केला. या शिवाय झटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून झालेला संवादही समाज माध्यमावर व्हायरल केला. या प्रकरणात प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचायत समितीचे कनिष्ठ आरेखक राजेश सवनेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ९ अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान,या प्रकरणात झटे यांनीही गटविकास अधिकाऱ्यांशी झालेल्या संपूर्ण संवादाची रेकॉर्डींग पत्रकाराकडे पाठवली आहे. त्यात गटविकास अधिकारी कल्हारे यांच्याकडून आंदोलन न करण्याची विनंती केली जात असल्याचे दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:53 pm

अन्.. ख-या प्रेमासाठी आणा ‘रोमिओ-ज्युलियट’ कलम! ‘पॉक्सो’मध्ये सुधारणेचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला

नवी दिल्ली : प्रतिनिधी किशोरवयीन मुला-मुलींच्या ख-या प्रेमासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रेमळ’ भूमिका मांडत, अशा जोडप्यांवर पॉक्सोतील कडक कलमांमुळे गुन्हेगारीचा शिक्का बसू नये म्हणून कायद्यात सुधारणेची सूचना केंद्र सरकारला केली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पॉक्सो) ‘रोमिओ-ज्युलियट कलम’ समाविष्ट करण्याचा मुद्दा केंद्र सरकारपुढे मांडला आहे. कायद्याचा गैरवापर टाळा : न्यायमूर्ती संजय करोल आणि एन. कोटिश्वर सिंग […] The post अन्.. ख-या प्रेमासाठी आणा ‘रोमिओ-ज्युलियट’ कलम! ‘पॉक्सो’मध्ये सुधारणेचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 8:19 pm

मुलांच्या सिरपमध्ये विष; ‘अल्मोंट-किड’वर बंदी

हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगणा औषध नियंत्रण प्रशासनाने मुलांना दिल्या जाणा-या ‘अल्मोंट-किड’ सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या सिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’ नावाचे अत्यंत विषारी केमिकल आढळल्याचे विभागाने एका अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे. कोलकाता येथील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या लॅब रिपोर्टनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बिहारमधील ‘ट्रिडस रेमेडीज’ या कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच […] The post मुलांच्या सिरपमध्ये विष; ‘अल्मोंट-किड’वर बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 8:18 pm

इराणमध्ये महिला शक्तीचा संतप्त उद्रेक!

तेहरान : वृत्तसंस्था इराणमध्ये सध्या सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा लाव्हा उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांत तेहरानच्या रस्त्यांवरून अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये इराणी महिला अत्यंत निर्भयपणे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या जळणा-या फोटोंवरून सिगारेट पेटवताना दिसत आहेत. हे केवळ एक कृत्य नसून, दशकांपासून चाललेल्या […] The post इराणमध्ये महिला शक्तीचा संतप्त उद्रेक! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 8:17 pm

‘तोयबा’चे मुनीर यांना चॅलेंज; पाकिस्तानात सत्तांतराची चिन्हे

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तान सध्या अशा वळणावर उभा आहे जिथे त्याला शत्रूची गरज नाही. ज्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या लष्कराने आणि आयएसआयने भारताच्या विरोधात वापरण्यासाठी जन्म दिला, आता त्या संघटना खुद्द पाकिस्तानच्याच मुळावर उठल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा या खतरनाक संघटनेने आता पाकिस्तान सरकारला ‘चोर’ संबोधत उघडपणे बंडाचे निशाण फडकावले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये लष्करी सत्तापालट किंवा गृहयुद्धाची भीती […] The post ‘तोयबा’चे मुनीर यांना चॅलेंज; पाकिस्तानात सत्तांतराची चिन्हे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 8:15 pm

रेल्वे ‘ड्रेसकोड’ बदलणार; वसाहतवादी खुणा पुसणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रेल्वे मंत्रालयाने ड्रेसकोडमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून स्वदेशी पोशाख अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रेल्वे मंत्रालय रेल्वेच्या प्रभागांसह इतर ठिकाणांना ब्रिटीशांनी दिलेली नावे बदलणार असून आता त्यांना भारतीय नाव देण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये आयोजित एका पुरस्कार सोहळ्यात रेल्वेच्या नव्या निर्णयाबाबत विचार सुरू असल्याची माहिती दिली. […] The post रेल्वे ‘ड्रेसकोड’ बदलणार; वसाहतवादी खुणा पुसणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 8:14 pm

अमेरिका व्हेनेझुएलाचे तेल भारताला पुरवणार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिका, भारताला व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करण्याची परवानगी देऊ शकतो. ट्रम्प प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिका-याने ही माहिती दिली आहे. भारतातील मोठी खासगी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने व्हेनेझुएलामधून पुन्हा कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी अमेरिकेकडून मंजुरी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचा अर्थ असा की, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे जो व्यापार थांबला होता, तो आता पुन्हा सुरू होऊ […] The post अमेरिका व्हेनेझुएलाचे तेल भारताला पुरवणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 8:11 pm

पतंगाचा नाद बेतला जीवावर:पुण्यात इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल

कात्रजमधील आंबेगाव खुर्द परिसरात पतंग उडवताना इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेस जबाबदार धरून बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारतीतील जिन्याला कठडे नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. श्लोक नितीन बांदल (वय १२, रा. स्वरा क्लासिक इमारत, सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव खुर्द, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. श्लोक पाचवीत शिकत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत कामाला आहेत. श्लोकचे मामा अमोल सुभाष इंगवले (वय ३५, रा. औदुंबर निवास, कात्रज गावठाण) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव खुर्द परिसरात एका गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. गुरुवारी (८ जानेवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास श्लोक शाळा सुटल्यानंतर पतंग उडवण्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गेला होता. सहाव्या मजल्यावरून तोल जाऊन तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले आणि सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीदरम्यान, इमारतीचे काम अर्धवट असल्याचे आणि जिन्यांना कठडे नसल्याचे उघड झाले. बांधकाम व्यावसायिकांच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, योगेश शिळीमकर आणि महेश धूत या बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:48 pm

बाणेरमध्ये मतदारांना पैशांचे आमिष, गुन्हा दाखल:बाणेर पोलिसांकडून 2.63 लाखांची रोकड जप्त; अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी परिसरात मतदारांना पैशांचे आमिष दाखवल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर पोलिसांनी ही कारवाई करत २ लाख ६३ हजार रुपयांची रोकड जप्त केली. हा अदखलपात्र गुन्हा भारतीय न्यायसंहिता १७० आणि १७३ अन्वये नोंदवण्यात आला आहे. बाणेर-बालेवाडी प्रभागातील (प्रभाग क्रमांक ९) महापालिका निवडणूक चुरशीची असल्याने मतदारांना प्रलोभन दाखवले जात असल्याची माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना मिळाली होती. शुक्रवारी (९ जानेवारी) त्यांना बाणेर भागातील रोहित लक्ष्मण उत्तेकर यांच्या ॲटोकेअर गॅरेजजवळ दोघे जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मत देण्यासाठी पैशांचे आमिष दाखवत असल्याची विशिष्ट माहिती मिळाली. या माहितीनंतर पोलीस निरीक्षक सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला कळवले. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गणेश सुनील लिंगायत (वय २४, रा. बालेवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील दुचाकी ऋषीकेश भगवान बालवडकर (रा. बालेवाडी) यांच्या मालकीची असल्याचे उघड झाले. या दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ऋषीकेश बालवडकर यांच्या घरी छापा टाकला असता, त्यांच्या घरातून एक लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पैसे वाटप करण्यासाठी गॅरेजची जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रोहित उत्तेकर, गणेश लिंगायत आणि ऋषीकेश बालवडकर यांच्याविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत आणि सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या अलका सरग, सहायक निरीक्षक स्वाती लामखेडे, कैलास डाबेराव, उपनिरीक्षक सुप्रिया मांढरे, तसेच पोलीस कर्मचारी गणेश गायकवाड, अतुल भिंगारदिवे, प्रीतम निकाळजे, गजानन अवतिरक, विकास भोरे, दत्ता काळे आणि रमेश क्षीरसागर यांचा समावेश होता.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:46 pm

साताऱ्यात बोगस 'खत-कीटकनाशक' रॅकेटचा पर्दाफाश:30 लाखांचा साठा जप्त, कृषी विभाग अन् स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाच्या संयुक्त कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किमतीची बनावट रासायनिक खते व कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षक सातारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हास्तरीय भरारी पथक आणि सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने वडूज, तालुका खटाव येथे छापा टाकला.या कारवाईत जिल्हा परिषद साताराचे कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. संजय फडतरे, कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) के. के. राऊत यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रोहित फारणे व इतर पोलीस अधिकारी सहभागी होते. छाप्यात वडूज येथील प्रतीक काळे यांच्या राहत्या घरासमोरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या दाखवलेल्या गोदामात मोठ्या प्रमाणावर बनावट रासायनिक खते व कीटकनाशकांचा साठा आढळून आला. यामध्ये अनुदानित रासायनिक खतांपैकी पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड कंपनीचे डीएपी (१८:४६) खताच्या ९० भरलेल्या गोण्या तसेच डीएपी खत म्हणून वापरण्याच्या उद्देशाने साठवलेला सुमारे ३९० गोण्यांचा नाव नसलेला कच्चा माल आढळून आला. याशिवाय म्युरेट ऑफ पोटॅश या रासायनिक खताच्या १५ गोण्या जप्त करण्यात आल्या. तसेच नॅशनल अ‍ॅग्रो हायटेक कंपनीच्या नावाने सुमारे १ मेट्रिक टन बोरिक अ‍ॅसिड, क्लोरोपायरीफॉस १० टक्के दाणेदार कीटकनाशक सुमारे २.७ मेट्रिक टन, ग्लायफोसेट ४१% एसएल या तणनाशकाच्या १ लिटर क्षमतेच्या सुमारे ३८० बाटल्या तसेच २०० लिटरच्या बॅरलमध्ये साठवलेले संशयित ग्लायफोसेट आढळून आले. हे द्रव्य १ लिटरच्या बाटल्यांमध्ये भरून विक्रीसाठी वापरण्याचा उद्देश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय उंदीरनाशक झिंक फॉस्फेट सुमारे १२ किलो (१० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये) तसेच संशयित कीटकनाशक अ‍ॅल्युमिनियम फॉस्फाईड सुमारे २० किलो (१० ग्रॅम पॅकेटमध्ये) जप्त करण्यात आले. त्याचबरोबर पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड व जय किसान कंपनीच्या १८:४६ व १०:२६:२६ या खतांच्या सुमारे १,५८० नव्याने छापील रिकाम्या गोण्या, इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश खताच्या सुमारे २५० रिकाम्या गोण्या तसेच इफको को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या १८:४६ खताच्या सुमारे २०० नव्या छपाईच्या रिकाम्या गोण्या आढळून आल्या. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे २५.५० लाख रुपये इतकी असून तपासादरम्यान सुमारे १,९८० वापरलेल्या गोण्या आढळून आल्याने यापूर्वी अंदाजे ३० लाख रुपयांचे बनावट खत विकले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मोजे टाकळवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, टाकळवाडी (ता. फलटण, जि. सातारा) येथे बोगस रासायनिक खत प्रकरणी दाखल तक्रारीच्या अनुषंगाने व मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सातारा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून सुरू आहे. भेसळखोरांच्या मुसक्या आवळा वडूजमध्ये बनावट खतांचा आणि कीडनाशकांचा पर्दाफाश झाला असून, दोन-तीन कंपन्यांच्या नावाने बनावट डीएपी खतांचा मोठा साठा सापडला. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. यापूर्वीही याच भेसळखोरांचा सहभाग असून कृषी विभागाच्या कानाडोळ्यामुळे हा धंदा फोफावला. भेसळखोरांच्या मुसक्या आवळा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन छेडणार अशी ठाम मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:37 pm

वसमत बँक कर्मचारी लूट प्रकरण:कुरुंदा पोलिसांकडून तिसऱ्या आरोपीला बेड्या, अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना

वसमत तालुक्यातील कोर्टाफाटा शिवारात बँक कर्मचाऱ्यास लुटणाऱ्या आणखी एकास पोलिसांच्या पथकाने शनिवारी ता. १० अटक केली आहे. या शिवाय अन्य आरोपींच्या शोधासाठी कुरुंदा पोलिसांचे पथक रवाना झाले असून पुढील दोन दिवसांत या प्रकरणाचा गुंता सुटणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिले्ल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्याचे कोर्टा फाटा शिवारात ८ लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी ता. ९ सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी भेट देऊन कुरुंदा पोलिसांना आवश्‍यक सूचना दिल्या. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार संदीप टाक, भगीरथ सवंडकर, गजानन भालेराव यांच्या पथकाने तातडीने माहिती घेऊन ओंकार कदम (रा. भोगाव), सत्यम इंगोले (रा. पळसगाव) या दोघांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी या घटनेतील इतरांची माहिती दिली. या प्रकरणात लुटलेली रक्कम वाटून घेण्याचे ठरल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पाच दिवसांपासून रेकी सुरु होती असेही स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या ओंकार व सत्यम यांना आज वसमत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची पाच दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी इतर आरोपींची माहिती घेण्यास सुरवात केली असून त्यामध्ये ओंकार गव्हाणे (रा. भोगाव) याचाही सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने आज त्याला अटक केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके मराठवाड्यासह इतर जिल्हयात रवाना झाली आहेत. या पथकाकडून उर्वरीत आरोपी लवकरच ताब्यात येतील असा दावा पोलिसांनी केला आहे. सर्व आरोपींच्या अटकेनंतर संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे ही वाचा… हिंगोली, वसमतमध्ये उपनगराध्यक्ष पदाचा तिळगुळ कोणाला मिळणार?:पहिली सभा शुक्रवारी, कळमनुरीत शिवराज पाटील यांची वर्णी हिंगोली पालिकेची पहिली सर्व साधारण सभा शुक्रवारी ता. १६ रोजी होणार असून उपनगराध्यक्षपदाची तिळगुळ कोणाला मिळणार याची उत्सूकता राजकिय वर्तुळाला लागली आहे. तर दुसरीकडे कळमनुरीत शिंदेसेनेचे शिवराज पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:08 pm

पिंपरी-चिंचवडच्या राजकीय आखाड्यात मुख्यमंत्र्यांची एन्ट्री:शायरीतून अजितदादांना चिमटा, तर महेश लांडगेंना शांत राहण्याचा सल्ला

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांचे रणांगण सध्या चांगलेच तापले आहे. पिंपरीत भाजप आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक युद्धाने टोक गाठले असतानाच, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेतली आहे. महेशदादा, ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. हा त्यांचा वैताग आहे. आपण फक्त कामावर बोलूया, असा सल्ला देत फडणवीस यांनी एका शायरीच्या माध्यमातून अजित पवारांना मिश्कील टोला लगावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सामना रंगला आहे. अजित पवारांनी भाजपवर टीका केल्यानंतर महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले होते. आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, जन्मतःच लंगोट घालणारे आम्ही आहोत, अशा शब्दांत लांडगे यांनी अजित पवारांना खुले आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा असल्याने ते काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. फडणवीसांनी शायरीतून साधला निशाणा प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महेश लांडगे यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आणि अजित पवारांच्या टीकेचा समाचार घेण्यासाठी शायरीचा आधार घेतला. ते म्हणाले: परिंदे को मिलेगी मंजिल यकीनन, ये उनके फैले हुये पंख बोलते है! और वही लोग रहते है खामोश, अक्सर जमाने मे जिनके हुनर बोलते है !! या ओळींतून त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या टीकेवर भाष्य करत, ज्यांचे काम बोलते त्यांना बडबड करण्याची गरज नसते, असा संदेश दिला. देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना 'गुरुमंत्र' विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना आपला तोल जाऊ देऊ नका, असे आवाहन फडणवीस यांनी महेश लांडगे यांना केले. ते म्हणाले, “आपले काम बोलतंय, त्यामुळे हा वैताग आहे, हा त्रागा आहे, हा राग राग आहे. जरा समजून घ्या दादा, ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका. त्यांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. त्यामुळे त्यांना आरोप-प्रत्यारोपात ही निवडणूक गुंतवून ठेवायची आहे. पण, आपण विकासाच्या मुद्यावर बोलत रहायला हवे. म्हणजे, आरोप-प्रत्यारोप करत बसण्याची वेळ येणार नाही. महेश दादा तुम्ही फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करुन द्या. म्हणजे टीका करण्याची गरज पडणार नाही”, असा सल्लाच फडणवीसांनी महेश लांडगेंना दिला. हे ही वाचा… पुणेकरांना मोफत बस अन् मेट्रो सेवा देणार:अजित पवारांची मतदारांना ग्वाही; दोन्ही राष्ट्रवादीचा पुण्यासाठी संयुक्त जाहीरनामा जाहीर पुणे महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सुपूर्द केल्यास नागरिकांना बस व मेट्रो सेवेचा मोफत लाभ देण्यात येईल, अशी घोषणा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. या योजनेमुळे शहर प्रदूषणमुक्त होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि पुणेकरांचे दररोज होणारे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान वाचेल, असे ते म्हणालेत. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 6:36 pm

महाराष्ट्रातील महापौरपदाचा पहिला उमेदवार जाहीर

मालेगाव : प्रतिनिधी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. तर १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. अशातच निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असताना महाराष्ट्रातील महापौरपदाचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मालेगाव महापालिकेत एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी थेट महापौरपदाचे उमेदवार म्हणून माजी महापौर अब्दुल मलिक युनूस […] The post महाराष्ट्रातील महापौरपदाचा पहिला उमेदवार जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 6:25 pm

भाजपच्या तुषार आपटेने दिला नगरसेवकपदाचा राजीनामा

ठाणे : प्रतिनिधी बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकारातील सहआरोपी तुषार आपटे याला भाजपने बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केले होते. भाजपच्या या निर्णयाचा राज्यभरातून निषेध झाल्यानंतर आता तुषार आपटे याने स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. शाळेची बदनामी होऊ नये आणि भाजपला त्रास होऊ नये यासाठी मी राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया त्याने […] The post भाजपच्या तुषार आपटेने दिला नगरसेवकपदाचा राजीनामा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 6:23 pm

देवदेवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल

सांगली : प्रतिनिधी शक्तिपीठ हा महामार्ग केवळ विकासासाठी नसून, गौण खनिज वाहतूक, गडचिरोलीतील खनिज, काही स्टील कंपन्यांची वाहतूक आणि त्यातून होणा-या ६० हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचारासाठीच रेटला जात असल्याचा आरोप शेट्टींनी केला. देवदेवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून हा महामार्ग पुढे नेण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जर सरकारचा हेतू खरोखर स्वच्छ असेल, तर सर्वप्रथम […] The post देवदेवतांच्या नावाखाली जनतेची दिशाभूल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 5:33 pm

विरोधी पक्ष फोडण्यासाठी कुंभमेळ्याच्या बजेटचा वापर

पुणे : प्रतिनिधी तपोवनातील वृक्षतोडीवरून विरोधकांच्याच नव्हे, तर अवघ्या नाशिककरांच्या रडारवर आलेले नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. गिरीश महाजन कुंभमेळ्याचे बजेट विरोधी पक्ष फोडाफोडीसाठी वापरतात असा अत्यंत गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी १० जानेवारी रोजी पुण्यामध्ये बोलताना केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही […] The post विरोधी पक्ष फोडण्यासाठी कुंभमेळ्याच्या बजेटचा वापर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 5:29 pm

ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होईल

जालना : प्रतिनिधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले, याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्याच्यावर योग्य कारवाई होईल. ज्यांनी ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होत असते. निष्पक्षपणे कारवाई होईल. चिंता करण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या […] The post ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होईल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 5:23 pm

खारघरमध्ये पुन्हा राडा!

मुंबई : प्रतिनिधी खारघर प्रभाग क्र. पाचमधील प्रभाग रॅली दरम्यान निवडणूक आयोगाच्या कर्मचा-यांना मारहाण केल्याची घटना ताजी असताना ९ जानेवारी रोजी पुन्हा खारघरमध्ये निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर झालेल्या गैरवर्तनामुळे शहर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. हिरानंदानी परिसरात नेमणूक असलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकावर तपासणीदरम्यान शिवीगाळ करण्यात आली असून चित्रीकरणासाठी वापरण्यात येणा-या कॅमे-याची तोडफोड केल्याची गंभीर […] The post खारघरमध्ये पुन्हा राडा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 5:21 pm

टॅक्सी-ट्रकची भीषण धडक; पाच जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

नंदुरबार : प्रतिनिधी नंदुरबारमध्ये भीषण अपघात झाला आहे. नंदुरबारहून शहादाच्या दिशेने जाणा-या प्रवासी टॅक्सी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत ५ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत गाडीचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. १० जानेवारी […] The post टॅक्सी-ट्रकची भीषण धडक; पाच जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 5:17 pm

‘लाडकी’च्या खात्यात येणार ३ हजार

मुंबई : प्रतिनिधी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मकरसंक्रांतीला ३ हजार रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पोस्ट करत दिली आहे. परंतु सरकारकडून मकर संक्रांतींच्या दिवशी निधी वितरित करण्यात आला तर निवडणुकीच्या आचारसंहितेचा हा भंग नाही का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी […] The post ‘लाडकी’च्या खात्यात येणार ३ हजार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 5:15 pm

परभणीत कीर्तनाहून येताना भीषण अपघात; ३ ठार

परभणी : प्रतिनिधी कीर्तनाहून घराकडे येताना मराठवाड्यातील परभणीत भयंकर अपघात झाला. यामध्ये तीन वारक-यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दत्ता महाराज मुडेकर, माऊली महाराज कदम, प्रसाद महाराज कदम यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मराठवाड्यातील वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू आहे. परभणी-जिंतूर मार्गावर कार आणि मोटारसायकलचा आज पहाटे […] The post परभणीत कीर्तनाहून येताना भीषण अपघात; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 5:12 pm

नागपूरच्या रणधुमाळीतील 'लढवय्या' माता:एका महिन्याच्या बाळासह भाजप उमेदवाराकडून प्रचाराचा झंझावात, मतदारांसह विरोधकही थक्क

राजकारणात संघर्षाच्या अनेक कथा आपण ऐकतो, मात्र नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात एका मातेच्या जिद्दीची अनोखी गोष्ट सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. प्रभाग ३० मधील भाजपच्या उमेदवार पायल कुंदेलवार या आपल्या अवघ्या एक महिन्याच्या चिमुकलीला, शर्वरीला कडेवर घेऊन प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. मातृत्व आणि कर्तव्य यांची एक आगळीवेगळी सांगड घालत त्यांनी सुरू केलेला हा प्रवास पाहून मतदार आणि विरोधकही थक्क झाले आहेत. निवडणुकीची घोषणा झाली आणि त्याच सुमारास पायल यांना मातृत्वाचा आनंद मिळाला. मात्र, बाळंतपणानंतर विश्रांती घेण्याऐवजी त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी आणि जनसेवेचा वसा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या तापलेल्या वातावरणात आणि प्रचाराच्या धबडग्यात पायल यांची मोठी ओढाताण होत आहे. कधी त्या आपल्या बाळाला गाडीत सुरक्षित ठेवून चौकसभा आटोपतात, तर कधी बाळ कडेवर असतानाच मतदारांच्या गाठीभेटी घेतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि कामाप्रती असलेली निष्ठा कार्यकर्त्यांमध्येही नवा उत्साह भरत आहे. भाजप स्त्रियांना कमकुवत मानत नाही - पायल कुंदेलवार आपल्या या आव्हानात्मक प्रवासाबद्दल बोलताना पायल कुंदेलवार भावूक होतात. त्या सांगतात की, मातृत्वाचा आनंद आयुष्यात सर्वोच्च आहेच, पण समाजाने आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ ठरवणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. भाजप हा असा पक्ष आहे जो स्त्रियांना कधीच कमकुवत मानत नाही. नऊ महिने गरोदर असतानाही मी प्रभागात सक्रियपणे काम केले आहे आणि आता माझी मुलगी शर्वरी ही देखील माझ्या या राजकीय प्रवासातली सर्वात लहान पण महत्त्वाची सोबती बनली आहे. कुटुंबाची भक्कम साथ आणि जिद्दीचा प्रवास एक महिन्याच्या लहान बाळाला घराबाहेर नेणे हे कोणत्याही मातेसाठी जिकिरीचे काम असते. या कसरतीत पायल यांना त्यांच्या कुटुंबाची मोठी साथ मिळत आहे. जेव्हा जास्त वेळ बाहेर फिरायचे असते, तेव्हा त्या बाळाला कारमध्ये सोबत नेतात, जेणेकरून तिला तिथे शांत झोप मिळेल आणि तिचे दूध वेळेवर होईल. या प्रवासात त्यांचे पती, आई आणि सासूबाई त्यांची मोठी ताकद बनून उभे आहेत. आपण जेव्हा जनसेवेसाठी बाहेर असतो, तेव्हा हे सर्वजण शर्वरीला जिवापाड जपतात, म्हणूनच आपण निश्चिंतपणे मतदारांपर्यंत पोहोचू शकतो, असे पायल कुंदेलवार आवर्जून नमूद करतात. प्रचारातला 'नवा चेहरा' आणि मतदारांचे कुतूहल प्रभाग ३० मधील नागरिकही पायल कुंदेलवार यांच्या या धडपडीचे मोठे कौतुक करत आहेत. एका हातात राजकारण आणि दुसऱ्या हातात पाळणा अशा अनोख्या स्वरूपात सुरू असलेला हा प्रचार सध्या नागपुरात आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. स्वतःच्या सुखसोयींचा विचार न करता चिमुकल्या बाळासह मतदारांच्या दारापर्यंत पोहोचणाऱ्या या 'लढवय्या' मातेच्या पदरात आता नागपूरची जनता विजयाचे दान टाकणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 5:10 pm

निवडणुकांमध्ये भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती मुद्दाम बिघडवली जात असून समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. भाजप निवडणुकांमध्ये यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जर आज सरकारने प्रशासन, तपास यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्थेचा वापर केला नाही, तर भाजप कुठेही जिंकू शकणार नाही. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना […] The post निवडणुकांमध्ये भाजपकडून यंत्रणांचा गैरवापर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 4:48 pm

तुषार आपटेला हटवा, नाहीतर रस्त्यावर उतरू

मुंबई : प्रतिनिधी बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणा-या दोन अत्यंत अल्पवयीन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या विकृत प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपकडून बदलापूर-कुळगाव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती मिळाली असता राज्यातून तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे ठाणे […] The post तुषार आपटेला हटवा, नाहीतर रस्त्यावर उतरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 4:45 pm

मुंबईत काँग्रेसचा 'स्वबळ' की 'केविलवाणा' लढा?:20 जागांवर उमेदवारच नाहीत, वर्षा गायकवाडांच्या हट्टाने काय साध्य झाले?

मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने पहिल्यांदा राज ठाकरे यांच्या 'मनसे'ला साद घालत युती केली. त्यानंतर काँग्रेसलाही सोबत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रस्तावाला हरताळ फासत 'स्वबळा'चा नारा दिला. मात्र, हा स्वबळाचा नारा आता काँग्रेसच्याच अंगाशी आल्याचे चित्र दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत युती करूनही तब्बल ३६ जागांवर उमेदवार उभे करण्यात या आघाडीला अपयश आले असून, यामुळे राजकीय वर्तुळात वर्षा गायकवाड यांच्या 'बालहट्टा'ने काय साध्य झाले? मोठी चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाने सुरुवातीला राज ठाकरे यांच्या मनसेला सोबत घेतले आणि त्यानंतर काँग्रेसलाही सोबत घेण्यासाठी मनस्वी प्रयत्न केले. मात्र, खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध करत स्वबळाचा नारा दिला. राज ठाकरेंची विचारसरणी आणि उत्तर भारतीय मतपेढीचा दाखला देत त्यांनी युती नाकारली. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसची अवस्था 'तोळामासा' झाली असून, कार्यकर्त्यांची फळी असतानाही २० जागांवर उमेदवार न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रभागांमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच नाही मुंबईतील अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये काँग्रेसने मैदानातून पळ काढल्याचे चित्र आहे. प्रभाग क्रमांक ६, ११, १२, १३, १४, १५, १९, २१, ३०, ४६, ८०, ८४, ११७, १५३, १८२ आणि १९८ मध्ये काँग्रेसचा एकही अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी हट्ट करूनही जागा रिकाम्या राहिल्याने मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. यामुळे या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली असून, नेतृत्वाच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वंचितशी युती, पण ताळमेळ शून्य काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत त्यांना ६२ जागा सोडल्या. मात्र, या ६२ पैकी १६ जागांवर वंचितला उमेदवारच देता आलेले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेस आणि वंचितमध्ये युती होऊनही ५ जागांवर हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. 'कोणाचा पायपूस कोणाला नाही' अशी स्थिती या युतीमध्ये दिसत असून, यामुळे भाजप-शिवसेना युतीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे बंधूंची 'फिल्डिंग'; अमित-आदित्य मैदानात एकीकडे काँग्रेसमध्ये दुफळी आणि गोंधळ असताना,दुसरीकडे ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज ठाकरे) मोठी एकी दाखवली आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी मोठी यंत्रणा राबवली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही तरुण नेते मुंबईचा कानाकोपरा पिंजून काढत असून, प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांच्या एका निर्णयामुळे मुंबईत काँग्रेसचा 'हात' अधिकच कमकुवत झाल्याची चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 4:41 pm

भाजप हा खाणाऱ्यांचा अन् बलात्काऱ्यांचा पक्ष:घरातील मुली सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपला मतदान करून नका - आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी शनिवारी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. भाजप हा आतापर्यंत केवळ खाणाऱ्यांचा पक्ष होता. तो आता बलात्काऱ्यांचा पक्ष झाला आहे. या पक्षाने बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवकपद दिले आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका, असे ते म्हणालेत. बदलापूर येथील एका शाळेत काही महिन्यांपूर्वी 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी अक्षय शिंदेसह तुषार आपटेवर गुन्हा दाखल केला होता. पण आता भाजपने या तुषार आपटेलाच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद बहाल केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर आपटेने आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी भाजपच्या मतदारांना आपल्या कुटुंबातील मुले, मुली सुरक्षित ठेवण्यासाठी यावेळी भाजपला मतदान न करण्याचे आवाहन केले आहे. भाजप व संघाने व्यभिचाराचा मार्ग निवडला प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजप व संघाच्या लोकांना आपल्या कुटुंबातील मुले व मुली शाबूत ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका. कारण, बदलापूरमध्ये जे कांड झाले होते, त्यातील सूत्रधाराला भाजपने स्वीकृत नगरसेवकाचे पद दिले आहे. भाजप हा आतापर्यंत खाणाऱ्यांचा पक्ष होता, पण आता तो बलात्काऱ्यांचा पक्ष झाला आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता भाजप प्रतिष्ठित नागरीक म्हणून आपल्या पक्षात स्थान देत आहे. भाजप व संघाने हा व्यभिचाराचा मार्ग अवलंबला आहे. हे थांबवायचे असेल तर संघ व भाजपच्या ज्या लोकांना आपले कुटुंब सुरक्षित रहावे असे वाटत असेल तर त्यांनी महापालिका निवडणुकीत भाजपला मतदान करू नये. भाजपचे हे जे नवीन कॅरेक्टर उभे राहत आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. या कॅरेक्टरला बदलायचे असेल तर भाजप व संघाला मतदान करणारा मतदारच ते बदलू शकतो. मी या सर्वांना आवाहन करतो की, मतभेद निश्चितपणे आहेत. टोकाचे मतभेद आहेत. पण केवळ मतभेद आहेत म्हणून आम्ही व्यभिचाराचा मार्ग अवलंबलेला नाही. भाजप व संघाने व्यभिचाराचा मार्ग अवलंबला आहे. ते थांबवणे आमच्या नव्हे तर तुमच्या हातात आहे. हे थांबवायचे असेल तर या महापालिका निवडणुकीत भाजप व संघाच्या मतदारांनी भाजपला मतदान करू नये. हे केले तर तुमच्या नेतृत्वाला योग्य तो संदेश मिळेल. भ्रष्टाचारी व बलात्कारी लोकांना तुम्ही साथ देणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर नाही हा संदेश देऊन तुम्ही आपला पक्ष वाचवा असे मी आवाहन करतो, असे प्रकाश आंबेडकर संघ व भाजपच्या मतदारांना आवाहन करताना म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 4:29 pm

काँग्रेसची हिंगोलीत आढावा बैठक संपन्न:आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय

हिंगोली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय काँग्रेस समितीच्या बैठकीत शनिवारी ता. १० घेण्यात आला आहे. त्यासाठी बुथसमित्या, गटनिहाय समित्यांकडे लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी ठरविण्यात आले. तर पक्ष सोडलेल्यांचा विषय काढून विाकारण त्यांना मोठे करू नका असेही यावेळी नेत्यांनी सांगितले. हिंगोली येथील सराफ ब्लँक्वेट हॉल येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पक्षाच्या अखील भारतीय काँग्रेस समितीच्या पदाधिकारी तथा मराठवाडा सह प्रभारी रेहाना चिश्‍ती, मलंग शेख, जिल्हा प्रभारी कल्याण दळे, सहप्रभारी साहेबराव कांबळे, नागसेन बिरजे, जिल्हाद्यक्ष सुरेश सराफ, विनायक देशमुख, डॉ. सतीष पाचपुते, गजानन देशमुख, डॉ. रमेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हयातील काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी ताकदीनिशी लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर ठिक अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचेही ठरविण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्वबळाचा नारा दिला. हिंगोली जिल्हयात कोणाच्याही पक्षातून बाहेर जाण्याने पक्षाचे नुकसान झाले नाही. ज्यांना काँग्रेसने मोेठे केले त्यांनी पक्ष सोडला. मात्र आता पक्ष सोडणाऱ्यांचे नांव घेऊन विनाकारण मोठे करू नका असेही नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी काळात जिल्हयात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी बुथ समित्या, जिल्हा परिषद गटनिहाय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून गावपातळीवर जनसंपर्क वाढविण्याचा निर्णय यावेळी घेेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नांव बदलू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दल अपशब्द काढणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणा यांच्या प्रतिकात्मक छायाचित्राला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 4:18 pm

लंडनस्थित डॉ. संग्राम पाटलांना मुंबई विमानतळावर अटक:काँग्रेससह ॲड. सरोदेंनी व्यक्त केला संताप, लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप

आपल्या निर्भीड राजकीय मतांसाठी आणि कोरोना काळात केलेल्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध असलेले लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अनपेक्षित कारवाईमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे. डॉ. पाटील यांना नेमक्या कोणत्या कारणास्तव रोखण्यात आले, याचा खुलासा अद्याप पोलिसांनी केलेला नाही, मात्र या कारवाईचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, ही कारवाई म्हणजे लोकशाहीची गळचेपी असल्याची टीका केली आहे. डॉ. संग्राम पाटील हे व्यवसायाने डॉक्टर असून लंडनमध्ये स्थायिक आहेत. कोरोना महासाथीच्या काळात जेव्हा जगभरात भीतीचे वातावरण होते, तेव्हा डॉ. पाटील यांनी आपल्या ‘Dr Sangram G Patil’ या युट्युब चॅनल आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून लाखो लोकांना धीर देण्याचे काम केले होते. विज्ञानावर आधारित माहिती आणि खरी परिस्थिती मांडत असतानाच त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही अनेकदा सडेतोड टीका केली होती. याच कारणावरून त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर काही काळ निर्बंधही घालण्यात आले होते, ज्याचा खुलासा त्यांनी स्वतः एका व्हिडिओद्वारे केला होता. ही आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की : सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. संग्राम पाटील यांच्या अटकेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. भारतात लोकशाही जिवंत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटलांना मुंबई विमानतळावर येताक्षणीच अटक करणे अत्यंत दुर्दैवी आहे. ही कारवाई आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची नाचक्की करणारी आहे. मुंबई पोलीस आणि गृह मंत्रालयाने डॉ. पाटलांना नेमकी कोणत्या कारणास्तव अटक केली, याचा तातडीने खुलासा करावा. काँग्रेस पक्ष या दडपशाहीचा जाहीर धिक्कार करतो, अशी संतप्त प्रतिक्रिया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. संग्राम पाटलांची अटक अन्याकारक - सरोदे या कारवाईवर ॲड. असीम सरोदे यांनी देखील संताप व्यक्त केला. ते आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणाले, संग्राम पाटील यांना लंडनहून मुंबईत उतरताच पोलिसांनी एअरपोर्टवर ताब्यात घेतले. आत्ताच त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांना व त्यांच्या पत्नीला पहाटे 2 वाजतापासून पोलिसांनी चौकशीच्या निमित्ताने ताब्यात ठेवलेले आहे. खरे तर हे अन्याकारक आहे आणि छळवाद आहे. कायदेशीर मदतीसाठी पावले उचलणार असिम सरोदे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, संग्राम पाटील हे लंडन मध्ये राहतात. सातत्याने सत्य, निर्भीड आणि स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एक उत्तम भारतीय जे आता लंडनवासी आहेत त्यांच्यामध्ये डॉ संग्राम पाटील यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी लंडनमध्ये माझे भाषण आयोजित केले होते. पोलीस त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचा बॉण्ड लिहून घेऊन त्यांना अटी आणि शर्ती घालून सोडले जाईल असे दिसते. मी त्यांच्या संपर्कात आहे आणि संग्राम पाटील यांना कोणतीही कायदेशीर मदत लागल्यास तशी पावले उचलण्यात येतील. पण पोलिसांनी अन्यायकारक कारवाई करू नये, कोणत्याही राजकीय व्यक्तीला पोलिसांनी स्वतःचा गैरवापर करू देऊ नये. आशा करूया की संग्राम पाटील यांना अटक करण्यात येणार नाही, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 4:11 pm

शिवसेना एकच, ती म्हणजे ठाकरेंची

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी नाही. तो एसंशि गट आहे. ही अमित शहांची कपटनीती आहे. उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय […] The post शिवसेना एकच, ती म्हणजे ठाकरेंची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 4:08 pm

‘बदलापूर’ प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपकडून नगरसेवकपद

मुंबई : प्रतिनिधी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका सहआरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी विरोधकांनी विशेषत: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपवर टीकेची झोड उठवत गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणे हाच भाजपचा खरा अजेंडा असल्याचे म्हटले आहे. बदलापूर येथील एका नामांकित शाळेत काही महिन्यांपूर्वी २ चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी […] The post ‘बदलापूर’ प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपकडून नगरसेवकपद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 4:06 pm

मुंबईत फ्रीजचा स्फोट; ३ ठार

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील एका इमारतीत पहाटे भीषण आग लागली. या दुर्दैवी अग्निकांडात ३ जणांचा गुदमरून मृत्यू झाला, ज्यात २ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. अग्निशमन दलाने आग विझविली असली तरी, आगीचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. गाढ झोपेत असलेल्या […] The post मुंबईत फ्रीजचा स्फोट; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 4:00 pm

उद्धव ठाकरेंच्या डोळ्यांत पाणी:पत्रकाराने टोकताच स्वतःला सावरत म्हणाले, हे अश्रू नव्हे अंगार आहेत; मुंबईतील प्रदुषणाला दिला दोष

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एका मुलाखतीत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. पत्रकारांनी याविषयी टोकताच त्यांनी हे अश्रू नव्हे तर अंगार असल्याचे नमूद करत त्यांनी त्याचा दोष मुंबईतील प्रदुषणाला दिला. मातोश्रीने वाचवले नसते तर आज नरेंद्र मोदी दिसले नसते. पण त्यांनीच बाळासाहेबांच्या मुलाला उचलून फेकले, असे ते यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले. अमित शहांच्या कपटनितीला मी यश मानत नाही:उद्धव ठाकरे यांचा 'बिनविरोध'वर घणाघात; देवेंद्र फडणवीस यांच्यावरही साधला निशाणा उद्धव ठाकरे यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात एका प्रश्नाला उत्तर देताना ते भावूक झाल्याचे दिसून आले. ते म्हणाले, उपनगरात राहणारी एक मराठी महिला परदेशातून आली होती. त्यांनी मातोश्रीत येऊन भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. भेटल्यानंतर त्यांच्या डोळ्यांत अक्षरशः अश्रू आले. हे वैभव आहे ते आहे. ते तुम्ही बदनाम का करता? ते बदनाम करू नका. मी कुठे काय तुमच्याबद्दल बोलतोय. मी राजकारणातले बोलतो. जे पटत नाही त्यावर बोलतो. मी कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही. अगदी नरेंद्र मोदी मला नकली संतान म्हणाले. ही कोणती संस्कृती? तुम्हाला मातोश्रीने वाचवले. अन्यथा मोदी दिसलेच नसते. आमचे प्रमोद महाजन असते तरी ते दिसले नसते. कारण, प्रमोद एक कर्तबगार माणूस होता. त्यांना संपूर्ण देशाची जाण होती. त्यांचा जन्म कुठे झाला हे मला माहिती नाही. पण ते मुंबईत आले तर त्यांना मुंबईची पक्की माहिती असायची, पुण्यात गेले तर पुण्यातील गोष्टी, दिल्लीत गेले तर दिल्लीतील किंवा इतर कोणत्याही राज्यात गेले तर त्यांना तेथील गोष्टी माहिती असायच्या. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तेव्हा मोदींना राजधर्माची शिकवण देत उचलून फेकत होते. तेव्हा ज्या मातोश्रीने व बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवले त्या बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही नकली संतान म्हणालात, असे ते म्हणाले. हे अश्रू नव्हे, अंगार आहेत यावेळी पत्रकाराने उद्धव यांना तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याचे सांगितले. त्यावर उद्धव म्हणाले, हे अश्रू नाहीत. हे अंगार आहेत. हे कदाचित प्रदुषणामुळे झाले असेल. मी अश्रू ढाळणाऱ्यांपैकी नाही. मला जे पटत नाही ते पटत नाही. पण मला माझ्या शत्रूचे पटले तरी मी ते मला पटले म्हणून सांगतो. माझी अशीच दुसऱ्यांकडूनही आहे. माझे पटत नसेल, तर मला समजून सांगा. कारण, माझे आजोबा व्यासंगी होते. ते म्हणायचे मी इतिहास चिवडतो. ते इतिहासातील गोष्टी बाहेर काढायचे. बाळासाहेबांची ओळख करून द्यायची गरज नाही. टीका अशी केली पाहिजे की, त्यात ओरबाडणे असता कामा नये. टीकाकाराला कळले पाहिजे की नेमके त्याचे काय चुकत आहे. आता आपण लोकांच्या आयुष्याशी खेळतोय. बिनविरोध निवडणुका करून लोकांच्या मतदानाचा अधिकार काढून घेत आहोत. निवडणुकीत वाट्टेल तसे पैसे वाटून सत्ता मिळतोय. पुन्हा सत्तेतून पैसा आणि पैशांतून सत्ता असा खेळ सुरू आहे. पण सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याचे काय? याचे मला वाईट वाटत आहे. आम्हाला लोकांच्या आयुष्यासाठी सत्ता हवी आहे. आता लोकांनी त्यांना त्यांचे जीवन कसे हवे हे ठरवले पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई महापालिकेचा 15 तारखेला रणसंग्राम उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. सत्ताधारी भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक मोठी फौज मुंबईच्या रणांगणात उतरली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी युती केली आहे. ठाकरे बंधू एकदिलाने या निवडणुकीत भाजपच्या बलाढ्या ताकदीचा सामना करत आहेत. काँग्रेसने या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करून आपली वेगळी वाट निवडली आहे. शरद पवार या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या मागे उभे आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 3:13 pm

जनआक्रोशाला अखेर यश:भाजपची नामुष्की टाळण्यासाठी तुषार आपटेंचा राजीनामा, बदलापूरमध्ये राजकीय खळबळ

बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या राजकीय वातावरणात मोठी घडामोड घडली आहे. या गंभीर प्रकरणातील सहआरोपी आणि बदलापूर-कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनंतर आपटे यांनी स्वखुशीने राजीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या एका दिवसापूर्वीच त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे या राजीनाम्यामुळे बदलापूरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहेात....

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 3:08 pm

कोल्हापुरात थेट ‘स्टॅम्प’वर जाहीरनामा

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीची चर्चा होत असतानाच आता निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही, असे उमेदवारांनी थेट स्टॅम्पवरचे लिहून दिले आहे. त्याची राज्यभर चर्चा सुरू आहे. राज्यभरातील महापालिका निवडणुकांची लगीनघाईन आता जवळ आली आहे. सध्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. तर निवडणुकीपूर्वी आश्वासनांची खैरात करत जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात […] The post कोल्हापुरात थेट ‘स्टॅम्प’वर जाहीरनामा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 2:36 pm

ऑनलाइन गेममुळे तरुणाची लाखोंची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलिसांत गुन्हा दाखल

ऑनलाइन गेमच्या आमिषाने एका तरुणाची तब्बल ३६ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा वाघोली पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणी एका व्यावसायिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३० वर्षीय तरुण वाघोली भागातील एका सोसायटीत राहतो. गेल्या वर्षी त्याच्या मोबाइल क्रमांकावर गुंतवणुकीबाबत एक संदेश आला होता, ज्यात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते. चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठवून ऑनलाइन गेम खेळल्यास चांगले पैसे मिळतील, असे सांगितले. या आमिषाला बळी पडून तरुणाने गेल्या आठ महिन्यांत ऑनलाइन गेमच्या नादात ३६ लाख ७४ हजार रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, 'ऑनलाइन टास्क'च्या आमिषाने आणखी एका तरुणाची सहा लाख ७७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार हडपसर परिसरात घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी (ऑनलाइन टास्क) देण्याबाबत संदेश पाठवला होता. सुरुवातीला चोरट्यांनी तरुणाला एक छोटे काम दिले आणि परताव्यापोटी काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली. यामुळे तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर त्याने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले, मात्र त्याला कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ऑनलाइन गेम आणि टास्कच्या आमिषाने अनेक तरुणांनी पैसे गमावले आहेत. शाळकरी मुलेही याच्या आहारी गेल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी शिरूरमधील एका शाळकरी मुलाचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली होती. अशा ऑनलाइन गेम किंवा टास्कचे आमिष दाखवणाऱ्या जाहिराती आणि लिंक्सना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 2:27 pm

तुषार आपटेचे भर चौकात मुंडके छाटा अन् अर्पण करा:कालीचरण महाराजांनी व्यक्त केला संताप; भाजपने दिले आहे स्वीकृत नगरसेवकपद

भाजपने बदलापूर बलात्कार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक पद दिल्याच्या मुद्यावर कालीचरण महाराजांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुषार आपटेचे भर चौकात मुंडके छाटा व ते चरणी अर्पण करा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणाचा वाद अधिकच तापला आहे. बदलापूर येथील एका शाळेत काही महिन्यांपूर्वी 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभरात विशेषतः बदलापुरात तीव्र पडसाद उमटले होते. स्थानिकांनी या घटनेविरोधात तीव्र निदर्शने करत रस्ते व रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. यामुळे बदलापूर येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी अक्षय शिंदेसह तुषार आपटेवर गुन्हा दाखल केला होता. पण आता भाजपने या आपटेलाच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद बहाल केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. तुषार आपटेचे मुंडके छाटून अर्पण करा या पार्श्वभूमीवर कालीचरण महाराजांनी तुषार आपटेचे शिरकान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुषार आपटेला भर चौकात उभे करून त्याचे मुंडे छाटले पाहिजे. त्यानंतर ते कालीचरण महाराजांना अर्पण केले पाहिजे. आरोप सिद्ध होत असतील तर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मतदारांना महापालिका निवडणुकीत धर्माचे रक्षण करणाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचेही आवाहन केले. आमचा उद्देश धर्म राज्याचा आहे. जो हिंदू हिताचे आचरण करेल, त्याला मतदान करा. दोन उमेदवार हिंदू हिताचे असतील तर जो सर्वाधिक हिंदू आचरण करेल त्याला मतदान करा. लोकांनी आपापल्या अनुभवावर उमेदवारांना निवडून द्यावे. हिंदूंचे विभाजन होता कामा नये. सध्या कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाहीत. ही स्थिती भारतातही होऊ शकते. हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणाचे हिंदूकरण करणे महत्त्वाचे आहे. हिंदू व्होटर करणे हा आमचा अजेंडा आहे, असे ते म्हणाले. कोण आहेत कालीचरण महाराज? 53 वर्षीय कालीचरण महाराज मूळचे अकोल्याचे आहेत. भावसार समाजाचे असलेल्या कालीचरण महाराजांचे खरे नाव अभिजीत धनंजय सरग असे आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या महाराजांच्या वडिलांचे अकोल्याच्या जयन चौकात मेडिकलचे दुकान आहे. त्यांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले. त्यांना ओळखणारे सांगतात की, त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी त्यांनी अनेक धार्मिक शास्त्रांचा अभ्यास केला आहे. कालीचरण महाराजांच्या वडिलांनी आर्थिक तंगीमुळे त्यांना बालपणी त्यांच्या मावशीच्या घरी पाठवले. या काळात त्यांची हिंदीवरील कमांड वाढली. इंदूरमध्ये ते भय्यूजी महाराजांच्या संपर्कात आले. येथूनच त्यांच्या नावाला महाराज हा शब्द चिकटला. ते आपले केस नेहमी मोकळे ठेवतात. कपाळावर मोठी लाल टिकली लावतात. ते सहसा लाल कपडे घालतात. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. 2017 च्या अकोला नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आपेल नशीब आजमावले. पण त्यांचा पराभव झाला.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 2:25 pm

भाजप राज्यातील सर्वात दुबळा पक्ष; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ:निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोळ घातल्याचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पुणे येथे बोलताना सपकाळ यांनी भाजप हा राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनल्याचे म्हटले. निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ घातल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सपकाळ म्हणाले की, २८८ विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतदार यादीत घोळ असल्याचे निवडणूक आयोगाने मान्य केले होते. दुबार नावे शोधून एकाच ठिकाणी मतदान करण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. मनपा निवडणुकीतही निवडणूक आयोगाने मतदार यादीत घोळ घातला असून, यावर त्यांचा कोणताही धाक नसल्याचे सपकाळ यांनी म्हटले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रभाग रचनेत गैरप्रकार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपला आता निवडणुका जिंकण्यासाठी गैरप्रकार आणि भ्रष्टाचार करावा लागत आहे, तसेच दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यावे लागत आहेत, असे सपकाळ यांनी नमूद केले. यामुळेच भाजप आज राज्यातील सर्वात दुबळा पक्ष बनला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी काँग्रेस प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, ॲड अभय छाजेड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष अजित दरेकर आणि सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपवर दररोज टीका करतात, तरीही ते सत्तेत भाजपसोबत आहेत, यावर सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांचे हे वागणे योग्य नसल्याचे काँग्रेसची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार असून, अजित पवार भ्रष्टाचाराचे आरोप करत असतानाही त्यांचा राजीनामा घेत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'नूरा कुस्ती' खेळत असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. सपकाळ यांनी मुंढवा जमीन प्रकरणात अप्रत्यक्ष भ्रष्टाचार झाल्याचा आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात गैरप्रकार केल्याचा आरोप केला. अजित पवार भ्रष्टाचाराचे समर्थन करत असल्याचा दावाही त्यांनी केला. पुण्यातील राजकारणी स्वार्थासाठी भूमिका बदलत असल्याचा आरोप करत, पुणे शहर आता विद्येचे माहेरघर किंवा सांस्कृतिक शहर न राहता 'ड्रग शहर' आणि 'कोयता शहर' बनले आहे, असे सपकाळ म्हणाले. सत्तेचे सौदागर शहर विकत घेण्यास लागले असून, शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी म्हणून एकत्र येण्याचा प्रयत्न झाला, पण तो प्रत्यक्षात येऊ शकला नाही. काँग्रेसने अजित पवार यांच्या पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे आघाडी होऊ शकली नाही. सध्या शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यात युती झाली असून, एकत्रित प्रचार सुरू असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 1:14 pm

भाजप सत्तेसाठी खालच्या थराला गेलंय:विजय वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टीका; म्हणाले-यंत्रणांचा गैरवापर थांबला तर ते कुठेच जिंकणार नाही

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका करत अनेक मुद्द्यांवर परखड भूमिका मांडली. आगामी महापालिका निवडणुकांपासून ते बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण, मंत्र्यांच्या संपत्तीत झालेली वाढ, रश्मी शुक्ला अहवाल, ध्रुवीकरणाचे राजकारण आणि मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरण यावर वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती महाराष्ट्रासाठी घातक असल्याचा आरोप करत, भाजप केवळ सत्तेसाठी राज्यातील वातावरण बिघडवत असल्याचे ते म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महापालिकेबाबत ठाम दावा केला. चंद्रपूर महापालिकेत शंभर टक्के काँग्रेसचा तिरंगा फडकणार असून, ते रोखण्याची ताकद कुणातही नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मुंबई महापालिकेवरही त्यांनी भाष्य करत भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपला आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई ताब्यात हवी आहे, मात्र हा ताबा मुंबईकरांच्या विकासासाठी नसून गुजरातच्या दावणीला मुंबई बांधण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमधील ‘आक्यांना’ मुंबई हवी आहे, कारण मुंबई ताब्यात आली तर महाराष्ट्र ताब्यात राहील, अशी भाजपची भूमिका असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या भाषणातून मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची चिंता दिसत नसून, भविष्यात महाराष्ट्र महाराष्ट्रीय जनतेचा राहील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजप निवडणुकांमध्ये यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, जर आज सरकारने प्रशासन, तपास यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्थेचा वापर केला नाही, तर भाजप कुठेही जिंकू शकणार नाही. भाजप 51 टक्के मतांचे स्वप्न पाहत आहे, मात्र निवडणूक आयोगाने आपले काम नीट केले तर भाजपची सत्ता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्यातील जनतेत प्रचंड नाराजी असून अनेक ठिकाणी उमेदवारांना लोक थेट हाकलून देत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती मुद्दाम बिघडवली जात असून समाजात ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील महिलांना गृहीत धरून भाजपचे राजकारण सुरू बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला भाजपकडून नगरसेवक बनवण्यात आल्यावर वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आपण स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आणि संबंधित संस्थेला घटनेची माहिती होती, असे त्यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन आणि संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपण केली होती, असेही ते म्हणाले. अशा प्रकरणात नाव असलेल्या लोकांना नगरसेवक बनवणे म्हणजे भाजपची मानसिकता उघड करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक ठिकाणी बलात्काराचे आरोपी बाहेर आले की त्यांचा सत्कार केला जातो, अशी टीकाही त्यांनी केली. महाराष्ट्रातील महिलांना गृहीत धरून भाजपचे राजकारण सुरू असून, सत्तेसाठी भाजप खालच्या थराला जात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. गेल्या पाच वर्षांत काही लोकांनी हजारो कोटींची संपत्ती जमा केली मंत्र्यांच्या संपत्तीवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी गेल्या पाच वर्षांत काही लोकांनी हजारो कोटींची संपत्ती जमा केल्याचा आरोप केला. कुणाची संपत्ती किती वाढली, याची चौकशी झाली तर कोणीही सुटणार नाही, असे त्यांनी सांगितले. काही मंत्र्यांच्या व्यवहारांची आणि संपत्तीची माहिती खुलेपणाने उपलब्ध असून, त्यांनी दाखवलेली संपत्ती प्रत्यक्षात खूपच कमी असल्याचा दावा त्यांनी केला. ही संपत्ती कष्टातून मिळाली असली तरी ती शंभर पट नव्हे, तर दोनशे पट वाढलेली आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. रश्मी शुक्ला यांचा अहवाल सोयीचा रश्मी शुक्ला अहवालावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी हा अहवाल सोयीचा असल्याचे सांगितले. रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू होता, हे सर्वांनाच माहीत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्यांच्या काळात तयार झालेला अहवाल सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा असणे यात नवीन काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या अहवालात तथ्य असल्याचे आपण मानत नसल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानपदावरून ओवैसी यांच्या वक्तव्यावर बोलताना, जो कोणी संविधान मानतो तो पंतप्रधान होऊ शकतो, लोकशाहीत जनता ज्याला निवडून देईल तोच पंतप्रधान होतो, असे त्यांनी सांगितले. ओवैसी मुस्लिम कार्ड खेळतात आणि भाजप हिंदू कार्ड, मात्र दोघेही ध्रुवीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन होणार नाही मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. मुंबईत काँग्रेसचे चांगले नगरसेवक निवडून येतील आणि काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा त्यांनी केला. महापौर काँग्रेसच्या पाठिंब्यावरच होईल, हे स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. कुणाला सत्तेसाठी गरज पडली, तर काँग्रेसशिवाय पर्याय नसेल, असा ठाम विश्वास व्यक्त करत वडेट्टीवार यांनी भाजपला आगामी निवडणुकांसाठी थेट आव्हान दिले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 1:11 pm

तुषार आपटे हटवा, नाहीतर रस्त्यावर उतरू:नियुक्तीविरोधात मनसेचा महामोर्चाचा; अविनाश जाधव यांचा भाजपला थेट इशारा

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन अत्यंत अल्पवयीन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या विकृत प्रकरणात सहआरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपकडून बदलापूर–कुळगाव नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आल्याने पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते, पालकवर्ग आणि विविध राजकीय पक्षांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हा निर्णय नैतिकतेला धरून नसल्याचा आरोप होत आहे. विशेषतः बाल लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील गुन्ह्यात नाव असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून मान्यता देण्यात आल्याने समाजात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपला थेट इशारा देत, तुषार आपटे याचा स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा बदलापूरमध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट केले आहे. 13 किंवा 14 जानेवारी रोजी बदलापूरमध्ये मनसेकडून मोर्चा काढण्यात येईल आणि रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. बालकांवरील अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला सत्तेचा अधिकार देणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे जाधव यांनी नमूद केले. अविनाश जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करताना म्हटले की, भाजप स्वतःला पांढरपेशा आणि शिस्तप्रिय पक्ष म्हणवतो, मात्र प्रत्यक्षात तुषार आपटेसारख्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला नगरसेवकपद देण्यात येते, यावरून पक्षाची मानसिकता स्पष्ट होते. बदलापूरमधील शाळेत जेव्हा लहान मुलींवर अत्याचार झाला, तेव्हा हजारो नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते, रेल्वे ट्रॅकवर आंदोलन झाले होते. त्या घटनेनंतरही भाजपने असा निर्णय घेणे हे पीडित मुलींच्या वेदनांवर मीठ चोळण्यासारखे असल्याचा आरोप त्यांनी केला. तुषार आपटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यामुळे त्याला संरक्षण दिले जात आहे का, असा थेट सवालही जाधव यांनी उपस्थित केला. त्यांनी भाजप नेतृत्वाला उद्देशून म्हटले की, जर हेच प्रकरण भाजपच्या एखाद्या नेत्याच्या मुलीबरोबर घडले असते, तर आरोपीला अशा प्रकारे सन्मानाने पक्षात स्थान दिले असते का? त्या चिमुरड्या मुलींचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करा. न्यायालयात खटला प्रलंबित असताना आणि आरोपी निर्दोष ठरलेला नसताना त्याला लोकप्रतिनिधी बनवणे म्हणजे न्यायव्यवस्थेची थट्टा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपकडून दोन, शिवसेनेकडून दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एका सदस्याची नियुक्ती करण्यात आली. मात्र, भाजपकडून तुषार आपटे याचे नाव स्वीकृत नगरसेवक म्हणून जाहीर होताच सभागृहाबाहेर आणि शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. सामाजिक माध्यमांवरही या निर्णयावर तीव्र टीका सुरू झाली असून, भाजपच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुषार आपटे हे बदलापूर शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित चकमकीत मृत्यू झाला होता. तपासादरम्यान शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या काळात तुषार आपटे शाळा व्यवस्थापनात सचिव पदावर कार्यरत होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 44 दिवस फरार होता, ही बाबही चर्चेचा विषय ठरली होती. अखेर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर अवघ्या 48 तासांत त्याला जामीन मंजूर झाला होता. तुषार आपटे जामिनावर बाहेर सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट असून तुषार आपटे जामिनावर बाहेर आहे. मात्र, न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच त्याला नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून स्थान देण्यात आल्याने नैतिकता, कायदा आणि सामाजिक जबाबदारी या मुद्द्यांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर बदलापूरमधील राजकीय वातावरण तापले असून, भाजप या दबावाला कसा प्रतिसाद देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 12:38 pm

दुनियेला सांगा नोटाला मतदान टाका:आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊन दाखवू, शिंदे गटाच्या महिला उमेदवाराचे विधान; पाहा VIDEO

'दुनियेला ओरडून सांगा नोटाला मतदान टाका. आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ', अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका महिला उमेदवाराने कामाचा हिशोब मागणाऱ्या मतदारांना अक्षरशः उडवून लावले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ठाणे महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवार आता मतदारांच्या घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागत आहेत. त्यात काही दक्ष मतदार उमेदवारांना त्यांनी केलेल्या कामाचा हिशोब मागत त्यांना धारेवर धरत आहेत. त्यात सजग उमेदवार त्यांच्या मनासारखी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही उमेदवार या प्रश्नांमुळे दांडी गूल झाल्याच्या आवेशात मतदारांनाच काय करायचे ते करा असा उलटप्रश्न करत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यात घडला आहे. नेमकी काय घडली घटना? ठाणे महापालिकेच्या कळवा भागातील विटावा, भोलानगर, आनंदनगर, गणपती पाडा या प्रभाग क्रमांक 24 अ मधून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार प्रियंका पाटील निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत त्या याच प्रभागातून निवडून आल्या होत्या. सध्या त्या घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यात एकेठिकाणी काही महिला मतदारांनी त्यांना त्यांनी मागील 5 वर्षांत केलेल्या कामाचा हिशोब मागितला. या अनपेक्षित प्रकारामुळे प्रियंका काहीशा गोंधळल्या. त्यानंतर त्या संतापाच्या सूरात म्हणाल्या, अरे जा दुनियेला सांगा नोटाला मतदान टाका, आम्ही आमच्या जीवावर निवडून दाखवून तुम्हाला. त्यावर प्रश्न विचारणाऱ्या महिलाही चांगल्याच चवताळल्या. आम्ही तुम्हाला केवळ प्रश्न विचारला आहे. त्यावर एवढे ओरडायला काय झाले? आम्ही तुमच्याच प्रभागात राहतो. आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. त्यावर प्रियंका पाटील यांनी त्यापैकी एका महिलेचा हात धरून पुढे ओढत नेताना दिसून येत आहेत. यावेळी स्थानिक महिलांचा सूरही संतप्त झाला. परिणामी, प्रियंका पाटलांना आपला राग आवरता घेत त्यांची मनधरणी करावी लागली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खाली पाहा घटनेचा व्हिडिओ मिनाक्षी शिंदेंचीही ऑडिओ क्लिप व्हायरल दुसरीकडे, शिंदे गटाच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचीही एक ऑडिओ क्लिप ठाण्यात व्हायरल झाली आहे. त्यात त्या एका व्यक्तीशी फोनवरून संवाद साधत आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह शब्द वापरताना दिसून येत आहेत. यामुळे स्थानिक आगरी समाजात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. मतदार आपल्या विरोधात जात असल्याची बाब लक्षात येताच मिनाक्षी शिंदे यांनी ही फेक ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या, आमच्या प्रभागात शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. आम्हाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. आपण जिंकणार नाहीत हे लक्षात येताच ते असे फेक ऑडिओ प्रसारित करत आहेत. त्यांनी एआयच्या मदतीने आणखी काही व्हिडिओ तयार केलेत. ते निवडणुकीच्या तोंडावर जारी केले जातील असे त्या म्हणाल्यात.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 12:33 pm

नांदेडमध्ये महिला उमेदवाराचा शासकीय बाँडवर राजीनाम्याचा शब्द:लिहून दिली विकासाची जबाबदारी; ठाकरेंच्या उमेदवाराची वेगळी वाट

निवडणुका जवळ आल्या की मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून विकासाचे मोठमोठे शब्द, रंगीबेरंगी जाहीरनामे आणि गगनाला भिडणारी आश्वासने दिली जातात. शहराच्या सर्वांगीण विकासाचे आराखडे मांडले जातात, मात्र निवडणुका पार पडल्यानंतर त्यातील किती आश्वासने प्रत्यक्षात उतरतात, यावर नेहमीच प्रश्न उपस्थित होतात. अशाच पार्श्वभूमीवर नांदेड महापालिका निवडणुकीत प्रचाराची एक आगळीवेगळी आणि लक्षवेधी पद्धत समोर आली असून, तिने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका महिला उमेदवाराने थेट शासकीय बाँडवर लिहून देत वचनपूर्ततेची हमी दिल्याने ही निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर चर्चेचा विषय ठरत आहे. नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवणाऱ्या नीता जैन या उमेदवाराने प्रचारात पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. मतदारांसमोर बोलून आश्वासने देण्याऐवजी त्यांनी ते थेट लेखी स्वरूपात दिले असून, तेही शासकीय बाँडवर. नीता जैन यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत प्रभागातील मूलभूत नागरी समस्या सोडवण्यात त्या अपयशी ठरल्या, तर त्या आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देतील. राजकारणात क्वचितच दिसणाऱ्या या धाडसी भूमिकेमुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. अनेक वेळा निवडून आलेले लोकप्रतिनिधी आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप होतो. अशा परिस्थितीत शासकीय बाँडवर लिहून दिलेले हे वचन केवळ शब्दांचे नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याचे प्रतीक मानले जात आहे. नीता जैन यांच्या या पावलामुळे ‘काम न झाल्यास राजीनामा’ ही संकल्पनाच चर्चेत आली असून, मतदारांमध्ये त्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आजवर अनेक उमेदवारांनी प्रचारादरम्यान मोठमोठी आश्वासने दिली, परंतु निवडणुकीनंतर त्याचा पाठपुरावा किती झाला, यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहिले. अशा पार्श्वभूमीवर नीता जैन यांचे हे लिखित आश्वासन मतदारांच्या नजरेत वेगळे ठरत आहे. प्रभाग क्रमांक 16 पुरतेच नव्हे, तर संपूर्ण नांदेड शहरात त्यांच्या या अनोख्या प्रचारपद्धतीची चर्चा सुरू आहे. काही नागरिक याकडे सकारात्मक आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणून पाहत आहेत, तर काही जण याला राजकीय धाडस मानत आहेत. या घटनेमुळे नांदेड महापालिका निवडणुकीतील प्रचाराला एक नवा आयाम मिळाल्याचे चित्र आहे. आश्वासनांच्या राजकारणात प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारण्याची ही पद्धत भविष्यात इतर उमेदवारांसाठीही उदाहरण ठरेल का, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मतदारांसमोर विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे लिखित वचन किती प्रभावी ठरेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. नीता जैन यांची ही रणनीती मतदारांना कितपत भावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रादेशिक पक्ष आणि आघाड्यांनीही ताकद पणाला लावली दरम्यान, नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, विविध पक्षांकडून सभा, कोपरा सभा, पदयात्रा आणि वैयक्तिक संपर्क मोहिमा राबवल्या जात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांसह 14 प्रादेशिक पक्ष आणि विविध आघाड्यांनीही आपली ताकद पणाला लावली आहे. स्थानिक प्रश्न, जातीय समीकरणे आणि विकासाच्या मुद्द्यांवरून प्रचार अधिक आक्रमक होताना दिसत आहे. 81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात या निवडणुकीत एकूण 81 जागांसाठी 491 उमेदवार रिंगणात उतरले असून, त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांसारख्या प्रमुख पक्षांसोबतच प्रादेशिक पक्षांनीही आपली रणनीती आखली आहे. अशा चुरशीच्या वातावरणात नीता जैन यांचा शासकीय बाँडवरील शब्द मतदारांच्या निर्णयावर किती प्रभाव टाकतो, याचे उत्तर 16 जानेवारीला निकालाच्या दिवशीच मिळणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 12:22 pm

बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी:BJP स्टार प्रचारक अण्णामलाईंच्या वक्तव्याने राजकीय वाद पेटला; मुंबईची ओळख पुसायची का? शिवसेनेचा कडाडून हल्लाबोल

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असतानाच भाजप नेते के. अण्णामलाई यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अमराठी मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने भाजपकडून उत्तर प्रदेश, बिहारसह देशातील विविध राज्यांतील नेत्यांना मुंबईत प्रचारासाठी उतरवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर तामीळनाडू भाजपचे नेते अण्णामलाई मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये प्रचारासाठी आले होते. मात्र या प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्याने केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक व सांस्कृतिक पातळीवरही मोठी खळबळ उडवून दिली आहे. प्रचारावेळी अण्णामलाई यांनी ‘बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी’ असे वादग्रस्त विधान केले. मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करत त्यांनी हे शहर महाराष्ट्राचे नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे मत मांडले. त्यांच्या या विधानामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबई ही केवळ एक महानगर नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा, इतिहासाचा आणि संघर्षाचा अविभाज्य भाग असल्याची भावना पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. एका मुलाखतीत बोलताना अण्णामलाई यांनी मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणत आपली भूमिका अधिक ठळकपणे मांडली. ते म्हणाले की, बॉम्बे हे महाराष्ट्रातले शहर नाही, तर ते आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शहर आहे. यासोबतच त्यांनी ‘ट्रिपल इंजिन सरकार’ची संकल्पना मांडली. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल, तरच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. देशातील इतर मोठ्या शहरांचे उदाहरण देत त्यांनी चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादमधील सत्तासंरचना सांगितली आणि मुंबई हे असे एकमेव शहर असल्याचे सांगितले, जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य असल्याचा दावा केला. शेवटी पोटातले ओठांवर आलेच - अखिल चित्रे अण्णामलाईंच्या या वक्तव्यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना राज्य संघटक अखिल चित्रे यांनी भाजपवर थेट हल्लाबोल करत जोरदार शब्दांत निषेध व्यक्त केला. शेवटी पोटातले ओठांवर आलेच, असे म्हणत त्यांनी भाजपवर मराठी माणसाला चिथावण्याचा आरोप केला. निवडणुकांसाठी बाहेरच्या नेत्यांना मुद्दाम आणून मुंबईबाबत अशी विधाने करून मराठी अस्मितेला डिवचू नये, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईला ‘बॉम्बे’ म्हणणे आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवणे हे सहन केले जाणार नाही. पुन्हा तुमचा कुणी भाजपवाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला, तर तुमची मराठी माणसाशी थेट गाठ आहे, असा इशाराही त्यांनी दिला. शहरांची नावे ही केवळ शब्द नसतात, तर ती भाषा, इतिहास, संघर्ष, अभिमान आणि स्वाभिमानाचे प्रतीक असतात. मुंबई म्हणजे केवळ एक आर्थिक राजधानी नाही, तर ती महाराष्ट्राच्या ओळखीचा कणा आहे, असे सांगत चित्रे यांनी मुंबई म्हणजे मुंबईच, बॉम्बे नाही आणि मुंबई महाराष्ट्राचीच आहे, असे ठासून सांगितले. वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले भाजपकडून निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केले जात असलेले हे वक्तव्य म्हणजे मुंबईच्या आणि मराठी अस्मितेच्या अस्तित्वालाच आव्हान देणारे असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या विधानामुळे निवडणुकीच्या प्रचारात भावनिक मुद्दे अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, अण्णामलाईंच्या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. अमराठी मतदारांवर लक्ष केंद्रित करताना मुंबई आणि महाराष्ट्राच्या ओळखीबाबत केलेल्या विधानांचा भाजपला किती राजकीय फायदा किंवा तोटा होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, मुंबईच्या नावावरून आणि अस्मितेवरून सुरू झालेला हा वाद निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 12:06 pm

वटकळी शिवारात गुटखा, कारसह 6.38 लाखांचा मुद्देमाल जप्त:सेनगाव पोलिसांची कामगिरी, एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल

सेनगाव ते रिसोड मार्गावर वटकळी शिवारात पोलिसांनी एका कारसह गुटख्याची पोती असा ६.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एका व्यक्ती विरुध्द शनिवारी ता. १० सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिंतूर ते रिसोड मार्गावर एका कारमधून गुटख्याच्या पोत्यांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार ओमनाथ राठोड, आंबादास गायकवाड, सुभाष चव्हाण, अंभोरे यांच्या पथकाने शुक्रवारी ता. ९ मध्यरात्री बारा वाजल्या वटकळी शिवारात थांबून वाहनाची तपासणी सुरु केली होती. यामध्ये पहाटे दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास रिसोड कडून येणारी एक कार पोलिसांनी थांबवली. यावेळी पोलिसांनी कारचालक शेख मकसुद याची चौकशी सुरु केली असता त्याने कारमधील पोत्यांबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पोते उघडून पाहिले असता त्यात गुटखा आढळून आला. यामध्ये व्हि वन बिग तंबाखू, विमल पान मसाला, प्रिमीयर आरएमडी, एम. सेटेंड तंबाखू गोल्ड, प्रिमीयम पानपराग आदी प्रकारच्या गुटख्याचा समावेश होता. पोलिसांनी गुटखा व कार असा ६.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिस ठाण्यात आणला. याप्रकरणी जमादार ओमनाथ राठोड यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी शेख मकसुद (रा. वरुडवेस जिंतूर) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी शेख मकसुद याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने रिसोड येथून भरलेला गुटखा जिंतूरकडे विक्रीसाठी नेत असल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले आहे. तर आता रिसोड येथून कोणाकडून गुटखा खरेदी केला याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:46 am

देशात एकपक्षीय राजवट आणण्याचा डाव:राजकारणाचे तीनतेरा वाजवणाऱ्या भाजपला घरी बसवा, आंबेडकरांचे मतदारांना आवाहन

भारतीय जनता पक्षाने छोट्या व प्रादेशिक पक्षांना फोडून कमकुवत केले आहे. काँग्रेसमध्ये आता अवसान राहिलेले नाही. विरोधी पक्षांना संपवून एकपक्षीय राजवट आणण्याचा भाजपचा डाव मतदारांनी उधळून लावावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. हुकूमशाही पद्धतीने वागणाऱ्या भाजपशी दोन हात करण्याची धमक केवळ वंचित बहुजन आघाडीकडेच आहे, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. पुणे महानगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग 6 आणि प्रभाग 13 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात जाहीर सभा झाली. यावेळी आघाडीचे सरचिटणीस प्रियदर्शन तेलंग, शहराध्यक्ष अरविंद तायडे, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील डॉ. निकिता गायकवाड, रामिजा रज्जाक नरसणगी, स्वाती सुरेश धनगर, अ‍ॅड. गजानन श्रीराम चौधरी, तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील शैलेश ऊर्फ पाला मोरे आणि सलमा सादिक शेख हे उमेदवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. संविधानाच्या रक्षणासाठी जागृत राहण्याची गरज ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिले. मात्र आज संविधानात बदल करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. संविधान धोक्यात आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. त्याच्या रक्षणासाठी जागृत राहावे लागेल. जोवर आपण जागरूक आहोत, तोवर संविधानाला हात लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. भाजपला हरवायचे असेल, तर आपल्याला 100 टक्के मतदान करावे लागेल. सामान्यांच्या हक्कांसाठी, शोषित, पीडित, वंचित व मागास घटकांसाठी न्याय मिळवून देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे. राजकारणाचे तीनतेरा वाजवणाऱ्या भाजपला घरी बसवा ते पुढे म्हणााले, लोकांची घरे, पक्ष फोडून, भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन राजकारणाचे तीनतेरा वाजवणाऱ्या भाजपला घरी बसवण्याची वेळ आली आहे. आज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था दयनीय आहे. एका शिवसेनेत जान नाही, तर दुसऱ्या शिवसेनेला खच्ची करण्याचे काम भाजपने केले आहे. अशावेळी जनतेच्या हितासाठी काम करणारे व लढणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन आंबेडकरांनी मतदारांना केले. यावेळी बोलताना माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड म्हणाले की, पुणे शहरातील फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे लोक एकवटले असून, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहत आहेत. काँग्रेससह अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या सर्वांनीच शहराचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. अलिकडेच अजित पवार यांनी महार वतनाची जमीन लाटण्याचा केलेला प्रयत्न, तसेच शरद पवार यांचा पक्ष गिळंकृत करण्याचा केलेला प्रयत्न याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, असेही गायकवाड यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:33 am

भाजपचे चाललंय काय?:बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपीला दिले स्वीकृत नगरसेवक पद; विरोधकांची टीकेची झोड

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एका सहआरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी विरोधकांनी विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपवर टीकेची झोड उठवत गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणे हाच भाजपचा खरा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे. बदलापूर येथील एका नामांकित शाळेत काही महिन्यांपूर्वी 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणी शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. बदलापूरकरांनी या घटनेविरोधात तीव्र निदर्शने केली होती. रस्ते व रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. यामुळे बदलापूर येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते. या प्रकरणात पोलिसानी अक्षय शिंदेसह तुषार आपटे विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपने तुषार आपटेला थेट कुळगाव बदलापूर नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पद बहाल केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. भयमुक्त महाराष्ट्र वगैरे सर्व बाजार गप्पा ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, ​बदलापूरच्या चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला 'पार्टी विथ डिफरन्स'कडून थेट स्वीकृत नगरसेवक पद! ​आता जनतेला समजले असेलच की घटनेच्या 44 दिवसांनंतर त्याला अटक का झाली! आधी एमआयएम, मग काँग्रेससोबत युती आणि आता आरोपींना राजाश्रय... हा भाजपच्या मनमानी कारभाराचा 'तिसरा एपिसोड' आहे. ​'भयमुक्त महाराष्ट्र' वगैरे सर्व बाजार गप्पा आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीला पोसणे हाच भाजपचा खरा अजेंडा आहे का? असा सवाल दानवे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. भाजपने लैंगिक अत्याचाराचे बक्षीस दिले खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या शाळेच्या आवारात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला, त्या शाळेच्या संचालकांवर काही जबाबदारी नाही का? हे आपटे नावाचे गृहस्थ आरएसएस व भाजपचे आहेत. त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन भाजपने लैंगिक अत्याचारासाठी 'इनाम' दिले आहे का? आरोपी अद्याप न्यायालयातून निर्दोष सुटलेले नाहीत. खटला अजून प्रलंबित आहे. भाजपकडून हा खटला चालू दिला जात नाही. भविष्यात फडणवीस त्यालाही 'क्लीन चिट' देतील. अत्याचार प्रकरणातील आरोपीला थेट स्वीकृत नगरसेवक करून पालिकेत पाठवणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकण्यासारखे आहे. हे कृत्य अत्यंत घृणास्पद, लज्जास्पद आणि राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे, असे राऊत म्हणाले. आत्ता पाहू कोण आहे तुषार आपटे? तुषार आपटे हा बदलापूर येथील एका शाळेत 2 अल्पवयी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा कथित चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तुषार आपटे त्या काळात शाळा व्यवस्थापनात सचिव पदावर कार्यरत होता. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार आपटे तब्बल 44 दिवस फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केली. पण त्यानंतर अवघ्या 48 तासांतच त्याला जामीन मंजूर झाला.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:25 am

हिंगोली, वसमतमध्ये उपनगराध्यक्ष पदाचा तिळगुळ कोणाला मिळणार?:पहिली सभा शुक्रवारी, कळमनुरीत शिवराज पाटील यांची वर्णी

हिंगोली पालिकेची पहिली सर्व साधारण सभा शुक्रवारी ता. १६ रोजी होणार असून उपनगराध्यक्षपदाची तिळगुळ कोणाला मिळणार याची उत्सूकता राजकिय वर्तुळाला लागली आहे. तर दुसरीकडे कळमनुरीत शिंदेसेनेचे शिवराज पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंगोली, कळमनुरी पालिकेवर शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शिंदेसेनेची एकहाती सत्ता आली असून वसमत येथे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून देत पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. त्यानंतर आता पालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार तसेच स्विकृत सदस्य पदी कोणाची निवड करायची याबाबत राजकिय हालचाली गतीमान झाल्या होत्या. दरम्यान, कळमनुरी पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी ता. १३ नगराध्यक्षा आश्‍लेषा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यासभेत उपनगराध्यक्षपदी शिवराज पाटील यांची निवड होण्याचे संकेत आहेत. या शिवाय स्विकृत सदस्यासाठी शिंदेसेनेचे १३ व राष्ट्रवादीचे चार असे सदस्य सोबत घेतले जाणार असून या ठिकाणी शिंदेसेनेचे दोन स्विकृत सदस्य होणार आहेत. त्यासाठी बबलू पत्की, आयाज पठाण यांची निवड निश्‍चित मानली जात असून आमदार संतोष बांगर यांनी या नावांना हिरवा कंदील दाखविल्याचे सुत्रांनी सांगितले. या सोबतच हिंगोली पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा रेखा बांगर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ता. १६ होणार आहे. यावेळी उपनगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पालिकेत शिंदेसेनेचे १७ नगरसेवक असून राष्ट्रवादीचे (अजित पवारगट) १०, भाजपा पाच तर काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. त्यामुळे या ठिकाणीही आमदार बांगर कोणाच्या नावाला पसंती देणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र त्यानंतरही उपनगराध्यक्षपदासाठी माबूद बागवान यांचेच नांव आघाडीवर आहे. तर स्विकृत सदस्यपदासाठी अनिल नेनवाणी, बापुराव बांगर यांचे नांव आघाडीवर आहे. वसमत नगर पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ता. १५ नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पालिकेत राष्ट्रवादीचे १६, काँग्रेस ४, भाजपा ४, शिंदेसेना २, ठाकरेगट २ व इतर दोन असे संख्या बळ आहे. उपनगराध्यक्षपदासाठी आमदार राजेश नवघरे कोणाला पसंती देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:07 am

संभाजीनगरच्या भावी नगरसेवकांनो खबरदार:निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकोर्ट कठोर; 2,740 कोटींच्या योजनेचे काम थांबवू नका, नवनियुक्त लोकप्रतिनिधींना थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 2,740 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणूक प्रक्रियेनंतर नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या कामात कोणताही हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट आणि ठाम इशारा न्यायालयाने दिला आहे. निवडणूक निकालानंतर लोकनियुक्त मंडळ महापालिकेचा कारभार हाती घेणार असले तरी, या दरम्यान सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी न्यायालयाने आधीच सावधगिरीचा इशारा दिला आहे. या संदर्भातील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, या योजनेच्या कामात कोणत्याही स्वरूपाचा अडथळा सहन केला जाणार नाही. जाणूनबुजून कामात व्यत्यय आणणे हे थेट न्यायालयाचा अवमान मानले जाईल. अडथळा निर्माण करणारी व्यक्ती कोणत्याही पदावर किंवा हुद्द्यावर असली, तरी तिच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा अत्यंत कठोर इशाराही न्यायालयाने यावेळी दिला. या स्पष्ट भूमिकेमुळे प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या भव्य पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 3,700 अश्वशक्तीचे तीन मोठे पंप बसविण्यात येणार आहेत. यापैकी एक पंप आधीच बसवण्यात आला असून, त्याची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मात्र जॅकवेलसह 2,500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीत वेल्डिंग प्रक्रियेतून निर्माण झालेला कचरा आणि साचलेला गाळ मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. हा गाळ आणि कचरा काढण्यासाठी पंप सतत चालू ठेवावा लागणार असून, एक पंप सुरू ठेवल्यास ही प्रक्रिया सुमारे एका महिन्यात पूर्ण होईल, तर दोन पंप वापरल्यास ती सुमारे 18 दिवसांत पूर्ण होऊ शकते, अशी माहिती जीव्हीपीआर कंपनीने न्यायालयाला दिली. योजनेतील पायाभूत कामांबाबतही न्यायालयात सविस्तर माहिती देण्यात आली. 2,500 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच जॅकवेलच्या ‘ए पोर्शन’चा स्लॅबही पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे काम अजून मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. एकूण 15 झोनपैकी पहिल्या टप्प्यातील 120 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यातील 237 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे काम अद्याप शिल्लक आहे. या कामासाठी सुमारे एक हजार कामगारांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ 500 कामगार सध्या कार्यरत असल्याची बाब सुनावणीदरम्यान समोर आली. त्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले. याशिवाय, या पाणीपुरवठा योजनेतील एकूण 53 जलकुंभांपैकी आतापर्यंत केवळ नऊ जलकुंभांचेच काम पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित जलकुंभांचे काम वेगाने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही या सुनावणीत अधोरेखित झाले. आर्थिक बाबींविषयी माहिती देताना महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी सांगितले की, शासनाकडून कर्ज स्वरूपात मिळालेले 822 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने आणि कामाच्या प्रगतीनुसार संबंधित कंपनीला अदा करण्यात येत आहेत. जीव्हीपीआर कंपनीने जीवन प्राधिकरणाकडे सादर केलेली बिले तपासून ती महापालिकेकडे पाठवली जातात. सध्या 21.18 कोटी रुपयांचे बिल महापालिकेकडे प्राप्त झाले असून, त्याची तपासणी करून पुढील 15 दिवसांत ही रक्कम कंपनीला दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. संभाजीनगरच्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीत विविध पक्षकारांनी आपापली बाजू मांडली. न्यायालयाचे मित्र म्हणून अ‍ॅड. शंभुराजे देशमुख उपस्थित होते. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली, तर मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अमित मुखेडकर यांनी युक्तिवाद केला. जीव्हीपीआर कंपनीकडून ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि जीवन प्राधिकरणातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने पाणीपुरवठा योजनेच्या कामावर कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय अडथळा येऊ नये, यासाठी कठोर भूमिका घेतली असून, या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:02 am

छत्रपती संभाजीनगरमध्ये मांजाचा कहर:एकाच नायलॉन मांजाने 2 दुचाकीस्वारांचे गळे कापले, एकाचा डोळा थोडक्यात वाचला

सिडको एन-७ भागातील देवगिरी बँकेसमोर गुरुवारी (८ जानेवारी) सायंकाळी ५.३० च्या सुमारास तुटून आलेल्या एकाच नायलॉन मांजाने दोन दुचाकीस्वार जखमी झाले. या भीषण घटनेत एका तरुणाच्या डोळ्याला तब्बल २१ टाके पडले असून, दुसऱ्या तरुणाच्या मानेला ३ टाके पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सय्यद अहमद रक्ताने माखलेले असतानाच, त्यांच्या अगदी मागून येणारे शेख यासीन शेख मोसीन (रा. रहेमानिया कॉलनी) हेदेखील त्याच लोंबकळणाऱ्या मांजाच्या विळख्यात अडकले. त्यांच्या मानेला मांजाने जोरात घासले गेल्याने तेदेखील गंभीर जखमी झाले. भररस्त्यात दोन तरुण एकामागून एक रक्ताने माखलेले पाहून नागरिक हादरून गेले. २१ टाके, कायमस्वरूपी व्रण रस्त्यावरील नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दोघांच्या अंगावर गुंडाळलेला मांजा कापला आणि त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान सय्यद अहमद यांच्या डोळ्याच्या बाजूला झालेली जखम इतकी खोल होती की, डॉक्टरांना २१ टाके घालावे लागले. थोड्या फरकाने त्यांचा डोळा वाचला असला तरी चेहऱ्यावर कायमस्वरूपी व्रण उमटले आहेत, तर शेख यासीन यांच्या मानेला ३ टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अज्ञातावर गुन्हा दाखल, शोध सुरूयाप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात पतंगबाजावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोपान नरळे करत असून पतंगबाजांचा शोध सुरू आहे. दिव्य मराठी फर्स्ट पर्सन, सय्यद अहमद मिस्बाउद्दीन चिस्ती (जखमी तरुण)काही कळायच्या आत तो मांजा फासासारखा माझ्या गळ्याला आवळला गेला...'मी गुरुवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास माझ्या दुचाकीवरून नेहमीप्रमाणे नारेगावकडे निघालो होतो. गाडीचा वेग मध्यम होता. सिडको एन-७ भागातील देवगिरी बँकेसमोर मी पोहोचलो आणि अचानक एक तुटलेला मांजा वाऱ्याच्या वेगाने माझ्या दिशेने आला. तो मांजा आहे हे समजण्यापूर्वीच तो माझ्या चेहऱ्याभोवती फासासारखा अडकला. तो नायलॉन मांजा इतका धारदार होता की जसा मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तसा तो माझ्या नाकावर आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात खोलवर रुतत गेला. प्रचंड वेदना झाल्या आणि चेहऱ्यावरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. मी रक्ताने माखलेला असतानाच, माझ्या अगदी मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या गळ्यालाही तोच लोंबकळणारा मांजा अडकला. मांजा त्याच्या मानेला जोरात घासला गेल्याने तोही रक्ताळला. भररस्त्यात आम्हा दोघांनाही अशा अवस्थेत पाहून नागरिक मदतीसाठी धावून आले. हा नायलॉन मांजा केवळ धागा नाही, तर तो साक्षात मृत्यूचा फास आहे. नायलॉन मांजा रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमा : खंडपीठ कायदेशीर बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री आणि वापर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी नायलॉन मांजाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांना तातडीने विशेष कार्यदल स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमी तीन पीडित बालकांना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. सर्व डेटा ६ आठवड्यांत द्या : प्रशासनाला या आदेशांच्या अंमलबजावणीचा सविस्तर डेटा ६ आठवड्यांत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा लागणार आहे. अनुपालन न झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. खंडपीठाने दिले महत्त्वाचे निर्देश नायलॉन मांजाचे ऑनलाइन मार्केटिंग रोखण्यासाठी आयटी तज्ज्ञ, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुढील चार आठवड्यांच्या आत पीडित भरपाई निधी आणि भविष्यासाठी कायमस्वरूपी धोरण तयार करावे. मनपाने तपासणी करून दोषींचे परवाने रद्द करावेत, दुकाने सील करावीत आणि फौजदारी खटले चालवावेत. उत्पादन, विक्री आणि वितरणाची साखळी तोडण्यासाठी आंतरविभागीय समन्वय अनिवार्य करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:58 am

पुणेकरांना मोफत बस अन् मेट्रो सेवा देणार:अजित पवारांची मतदारांना ग्वाही; दोन्ही राष्ट्रवादीचा पुण्यासाठी संयुक्त जाहीरनामा जाहीर

पुणे महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सुपूर्द केल्यास नागरिकांना बस व मेट्रो सेवेचा मोफत लाभ देण्यात येईल, अशी घोषणा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. या योजनेमुळे शहर प्रदूषणमुक्त होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि पुणेकरांचे दररोज होणारे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान वाचेल, असे ते म्हणालेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने शनिवारी अष्टसूत्री प्रगतीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, दीपक मानकर, सुभाष जगताप, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, प्रदीप देशमुख आदी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. मोफत बस व मेट्रो प्रवास यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यात दररोज 30 लाख वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत इंधन आणि वेळेचा अपव्यय होतो. यामुळे पुणेकरांचे दररोज 30 कोटी रुपये, म्हणजेच वर्षाला 10 हजार 800 कोटी रुपये वाया जातात. मोफत बस आणि मेट्रो सेवा दिल्यास दोन्ही कंपन्यांना मिळून वर्षाला केवळ 300 कोटी रुपये द्यावे लागतील. अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील जुने वाडे, म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन आणि 150 मॉडेल शाळा उभारण्याचेही आश्वासन दिले. तसेच, शहराला दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तथा टँकर माफियांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणा सुधारण्यावर भर देण्याचीही ग्वाही दिली. महिलांना 5 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज शहरातील गंभीर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी खड्डेमुक्त रस्त्यांचे नियोजन आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराला देशात आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. सोसायट्यांना स्वच्छतेबाबत 20 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. नागरिकांना हायटेक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच, कॉर्पोरेशन शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले जातील. एवढेच नव्हे तर पालिकेचे मोफत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे वचनही अजित पवार यांनी दिले आहे. प्रस्तुत जाहीरनामा पुढील 5 वर्षांसाठी आहे. आम्ही आळशी नसून, पहाटे 6 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारी माणसे आहोत. पुण्याची दिशा बदलणारा हा जाहीरनामा आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. वैद्यकीय सुविधा पुणे महानगरपालिका क्षेत्रात 200 'राजमाता जिजाऊ क्लिनिक' (अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र) उभारली जातील. येथे तपासणी, आरोग्य सेवा आणि महत्त्वाची औषधे मोफत मिळतील. यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल. आनंदीबाई जनजागृती मोहीम वरील सर्व आरोग्य केंद्रांच्या परिसरात दरमहा विशेष शिबिरे आयोजित केली जातील. याद्वारे नवविवाहित महिलांना सीझर टाळण्याचे उपाय, आरोग्य आणि सुरक्षित बाळंतपणाबाबत मार्गदर्शन केले जाईल. आई आणि बाळाचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला दिला जाईल. MRI, CT स्कॅन व तत्सम चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या लॅब PPP मॉडेल अंतर्गत उभ्या करणार. सध्या पीएमसीद्वारे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये मंजूर असलेल्या सुमारे 940 बेडपैकी केवळ 425 बेड उपलब्ध आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी विद्यमान रुग्णालयांचे अद्ययावतीकरण केले जाईल. तसेच नवीन रुग्णालयांची उभारणी करून एकूण बेडची वाढवली जाईल. विशेषतः वाघोली (500 बेड), अण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर (300 बेड), वारजे (350 बेड) तसेच कोंढवा-येवलेवाडी-महंमदवाडी (250 बेड) येथे नवीन रुग्णालये उभारून व विद्यमान रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करून एकूण 1,400 अतिरिक्त रुग्णालयीन बेड उपलब्ध करून दिले जातील. आजच्या 425 बेडच्या 7 पट, असे एकूण 2800 बेड उपलब्ध होणार.राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील इतर आश्वासने खाली वाचा

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:53 am

भाजप सोडून अजित पवार आमच्यासोबत लढताहेत हेच महत्त्वाचे:संजय राऊतांनी केले स्पष्ट; तुषार आपटेंच्या नियुक्तीवरून वादंग

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील युतीबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असली, तरी सध्याच्या निवडणुकीत ते भाजप सोडून आमच्यासोबत लढत आहेत, हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. राजकारणात भूमिका आणि बाजू वेळेनुसार बदलत असतात, मात्र भाजपविरोधात उभे राहणे हा मुद्दा आमच्यासाठी निर्णायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याचे चित्र समोर आले असले, तरी त्यात कोणतेही आश्चर्य वाटण्यासारखे नाही, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले. पवार कुटुंबीयांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू भाजपविरोध हाच राहिला असून, शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ठाम विरोध आहे, असे राऊत म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी या वैयक्तिक नसून राजकीय भूमिकांवर आधारित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बदलापूर महानगरपालिकेत तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर महानगरपालिकेतील वातावरण तापले असून, आगामी काळात याचे पडसाद राजकीय पातळीवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी आरोप केला की, तुषार आपटे हे बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी आहेत. अशा गंभीर आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक बनवण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपकडून नैतिकतेच्या गप्पा मारल्या जातात, मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारच्या नियुक्त्या करून चुकीचा संदेश दिला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. तुषार आपटेंच्या नियुक्तीमुळे बदलापूर शहरात चर्चांना उधाण आले असून, या निर्णयामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून महापालिकेत ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे या नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या वादामुळे भाजपवर टीकेची झोड उठली आहे. संजय राऊतांच्या आरोपांनंतर हे प्रकरण अधिक चिघळण्याची चिन्हे असून, येत्या काळात या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईबाबत भाजपच्या प्रचारासाठी आलेले अण्णामलाई यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असल्याची टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे हे अस्वीकार्य असून, भाजपला मुंबई तोडण्याची भाषा मान्य आहे का, असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला. भाजपच्या प्रचार सभेत आलेल्या नेत्यांकडून मुंबईबाबत असे विधान होणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईसंदर्भात इतके गंभीर वक्तव्य केले जात असताना शिंदे गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईच्या एकात्मतेवर घाला घालणाऱ्या वक्तव्यांवर सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडायला हवी, असे सांगत राऊत यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:32 am