महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा (वय ८७) यांचे आज रविवारी दुपारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, मानवतावादी समाजसुधारकांच्या विचारांचा एक मोठा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार सातत्याने मांडला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी साहित्याच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण काम केले. प्रामुख्याने बौद्ध साहित्य आणि मानवतावादी समाजसुधारकांच्या कार्यावर आधारित त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यातून नेहमीच समता आणि मानुसकीचा संदेश दिला गेला, ज्यामुळे त्यांना साहित्य वर्तुळात आदराचे स्थान प्राप्त झाले होते. महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा आणि आत्मचरित्राचा ठेवा रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्यकृतींनी वाचक वर्गावर मोठा प्रभाव टाकला आहे. यामध्ये संत कबीरांच्या विचारांवर आधारित 'कबीर वाणी' हा त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच 'तिमिरातुनी तेजाकडे' या ग्रंथामधून त्यांनी प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचा आणि जीवनप्रवासाचा ठेवा असलेल्या 'सोनजातक' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचा १४ भागांचा संच साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरला आहे. या ग्रंथातून त्यांनी केवळ स्वतःचा प्रवासच नाही, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचेही दर्शन घडवले आहे. उद्या सकाळी पार पडणार अंत्यविधी आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पार्थिव उद्या सोमवारी सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत त्यांच्या विमान नगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता येरवडा येथील विद्युत दाहिनी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
माजी आमदार दगडू सकपाळांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे चार दिवस राहिले असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या शिवशक्ती युतीच्या मुंबईतील पहिल्या जाहीर सभेच्या दिवशीच ‘मातोश्री’शी प्रामाणिक असलेले आणि सच्चे शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवडीचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवडीमध्ये उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांच्याकडून […] The post माजी आमदार दगडू सकपाळांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली
नाशिक : एटीएम कटरने फोडून रक्कम लुटण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र नाशिकच्या सटाणा येथे चोरट्यांनी एटीएम चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट जीपला दोरखंड बांधून एटीएम उखडून काढले आणि ते जीपमध्ये टाकून अवघ्या १२ मिनिटांत घटनास्थळावरून पोबारा केला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातील ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर परिसरात असलेल्या स्टेट […] The post दोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजितदादांंचा एकेरी उल्लेख लांडगेंना शोभत नाही
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना आमदार महेश लांडगेंवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना महेश लांडगे यांनी एकेरी भाषेत अजित पवार यांचा उल्लेख केला होता. यानंतर आता […] The post अजितदादांंचा एकेरी उल्लेख लांडगेंना शोभत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये असलेली युती आता केवळ नावापुरतीच उरली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ (ड) मध्ये भाजपने अधिकृत युती असतानाही चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (१० जानेवारी) रात्री उशिरा अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याने आता या प्रभागात भाजप समर्थित अपक्ष विरुद्ध युवा स्वाभिमान अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती आहे. प्रभाग क्रमांक १८ ही जागा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात आली होती. तिथे युवा स्वाभिमानने स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपने रणनीती बदलत अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा दिलेल्या या पाठिंब्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अमरावतीत रवी राणा यांनी ८७ पैकी ४१ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे आता युतीमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत. भाजपला मतांच्या विभाजनाची भीती भाजप आणि युवा स्वाभिमानमधील या अंतर्गत वादामुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊन भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संभाव्य धोका ओळखून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः अमरावतीत तळ ठोकून आहेत. यापूर्वी त्यांनी रवी राणा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जागावाटपावरून आणि उमेदवार देण्यावरून झालेला वाद न मिटल्याने अखेर भाजपने अपक्ष उमेदवाराला साथ देण्याचा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमधील दरी अधिकच रुंदावली आहे. साईनगरमधील प्रतिष्ठेची लढाई आज अमरावतीत प्रचाराचा 'सुपर संडे' असून सर्वच उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. यामध्ये सर्वाधिक चुरशीची लढत साईनगर प्रभागात पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपचे वजनदार नेते तुषार भारतीय आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडे यांच्यात थेट सामना रंगला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात रवी राणा यांनी दिलेले आव्हान तुषार भारतीय कसे पेलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रवी राणांची पदयात्रा आणि विजयाचा विश्वास सचिन भेंडे यांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांनी आज साईनगर प्रभागात मोठी पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी बोलताना रवी राणा यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. साईनगर प्रभागाची निवडणूक आता जनतेनेच आपल्या हातात घेतली आहे, त्यामुळे सचिन भेंडे यांचा विजय निश्चित आहे, असे विधान त्यांनी यावेळी केले. प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात रवी राणा यांनी आपली सर्व ताकद सचिन भेंडे यांच्या पाठीशी लावली असून, भाजपनेही तुषार भारतीय यांच्यासाठी कंबर कसली आहे.
डीवायएसपी वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; २ ठार
कोल्हापूर : प्रतिनिधी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणा-या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बंगळुरूवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे […] The post डीवायएसपी वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात; २ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पूरमुक्त मुंबई, ११ लाख घरे, छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचे काय झाले?
मुंबई : प्रतिनिधी महायुतीने मुंबईसाठी वचननामा जाहीर केल्यानंतर काँग्रेसने तोफ डागली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी २०१७ चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून २०२६ […] The post पूरमुक्त मुंबई, ११ लाख घरे, छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचे काय झाले? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बडतर्फ IAS पूजा खेडकर यांच्या घरी मोठी चोरी:औंध निवासस्थानी आई-वडील, वॉचमनसह पाच जण बेशुद्ध आढळले
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या औंध येथील निवासस्थानी मोठी चोरी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत पूजा खेडकर यांचे आई-वडील, घरातील वॉचमन, वाहनचालक आणि कुक असे एकूण पाच जण बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चतुःशृंगी पोलीस ठाण्यात औंध परिसरातील साकाळ नगर येथील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील बंगला क्रमांक ११२ येथे चोरी झाल्याची माहिती फोनद्वारे मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पूजा खेडकर यांच्यासह त्यांचे दोन भाऊ विनय बुधवंत आणि हर्षद बुधवंत उपस्थित होते. पाहणीदरम्यान, कार पार्किंग परिसरात वॉचमन जितेंद्र सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर पूजा खेडकर यांनी पोलिसांना त्यांच्या आई-वडिलांची खोली दाखवली, जिथे दोघेही पलंगावर बेशुद्ध अवस्थेत होते. खोलीतील लाकडी कपाटे फोडलेली असून त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. बंगल्यातील इतर तीन खोल्यांची तपासणी केली असता, तेथेही कपाटांमधील सामान विखुरलेले आढळले. यानंतर रुग्णवाहिका बोलावून पूजा खेडकर यांचे आई-वडील आणि वॉचमन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपासात तळमजल्यावरील एका खोलीत वाहनचालक दादासाहेब ढाकणे आणि बंगल्याच्या बाहेरील खोलीत कुक सुजित रॉय हेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. दरम्यान, पूजा खेडकर यांना तक्रार दाखल करण्याबाबत विचारले असता, आई-वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने सध्या तक्रार देणे शक्य नसून, नंतर तक्रार देऊ, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, चोरीत नेमके काय आणि किती साहित्य लंपास झाले, याचा तपशील तक्रार मिळाल्यानंतर स्पष्ट होईल.
एक गेल्याशिवाय शंभर येत नाही:रामदास आठवलेंची पुण्यात विरोधकांवर काव्यातून फटकेबाजी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथील नागपूरचाळ येथे भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) च्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी विकास आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर भाजप-आरपीआय एकत्र असल्याचे प्रतिपादन केले. प्रभाग क्रमांक २ मधील अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती. आठवले यांनी आपल्या छोटेखानी पण प्रभावी भाषणात विरोधकांवर कवितेच्या माध्यमातून टीका केली. एक गेल्याशिवाय शंभर येत नाही. ज्यांना संधी दिली, ते निघून गेले; मात्र जनता विकासाच्या बाजूने भक्कमपणे उभी राहते, असे ते म्हणाले. प्रभाग क्रमांक २ हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असून, येथील मतदार भाजप-आरपीआयच्या उमेदवारांना निवडून योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारांच्या दैनंदिन प्रश्नांकडे लक्ष वेधत आठवले यांनी विकासाच्या मुद्द्यावर आरपीआय भाजपसोबत असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय विभागामार्फत बेरोजगारांना रोजगाराची संधी, प्रत्येक नागरिकाला आरोग्यसेवा, विधवा भगिनींना मदत तसेच परिसराचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी भाजप-आरपीआयच्या चारही अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. ऍड. रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे, आदिती बाबर आणि राहुल जाधव हे उमेदवार या सभेत उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक डॉ. हुलगेश चलवादी, ऍड. भगवान जाधव, अशोक कांबळे, मंगेश गोळे, बाळासाहेब जानराव, सुभाष चव्हाण, नानासाहेब नलावडे, महेश पाटील, मंदार खरात, प्रकाश साळुंखे, राजू बाफना, राकेश मोहिते, हर्षद जाधव, डॉ. योगेश कदम, प्रकाश सोनवणे, विनोद टोपे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देवालयांना केवळ 'मॉन्युमेंट' संबोधू नका:पंकज सक्सेना यांचे पुण्यातील व्याख्यानात आवाहन
भारतीय शिक्षण आणि तत्त्वज्ञान तज्ज्ञ पंकज सक्सेना यांनी आपल्या प्राचीन वारसास्थळांना केवळ 'मॉन्युमेंट' किंवा 'म्युझियम' असे संबोधू नये, असे आवाहन केले आहे. पुण्यातील 'नेशन फर्स्ट' आणि 'चाणक्य मंडल परिवार' यांच्या वतीने आयोजित 'भारत विमर्श' उपक्रमाच्या पहिल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सक्सेना म्हणाले की, आपली देवालये या केवळ निर्जीव वास्तू किंवा वस्तुसंग्रहालयातील कलावस्तू नाहीत. त्या आपल्या समृद्ध ज्ञानपरंपरा, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, कलात्मक आणि आर्थिक अनुभवांचे जिवंत व चैतन्यपूर्ण घटक आहेत. त्यामुळे अशा प्राचीन वारसास्थळांना केवळ वास्तू किंवा संग्रहालये या संज्ञांपुरते मर्यादित करणे योग्य नाही. देशाचा सामाजिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा नव्या पिढीला समजावा आणि भारतीय ज्ञानप्रणालींच्या सखोल पैलूंचे त्यांना आकलन व्हावे, या उद्देशाने 'भारत विमर्श' या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. बंगळूर-मुंबई महामार्गावरील बाणेर येथील बंटारा भवनच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पंकज सक्सेना यांच्यासह पुणे महानगर जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष प्रकाश धोका, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मिलिंद मोडक, कर्नल नंदू कोरेगावकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. वासुदेव आयटल उपस्थित होते. तसेच, मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, निवृत्त ब्रिगेडियर संग्राम दळवी, नांदेड सिटीचे संचालक नरसिंग लगड, एक भारत हम भारत संस्थेच्या अनुराधा गोखले आणि सैन्यदल, वैद्यकीय, उद्योजक क्षेत्रातील अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सक्सेना यांनी आधुनिक हिंदू समाजाने आपल्या प्राचीन आणि समृद्ध सभ्यतेशी जोडून घेण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, 'हिंदू' या संज्ञेचा निर्भयपणे उच्चार आता सुरू झाला आहे आणि संपूर्ण राष्ट्रात हिंदू चैतन्याची लाट पसरत आहे. हे चैतन्य केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक, साहित्यिक आणि आर्थिक क्षेत्रांतही प्रवाहित व्हावे, यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे. 'भारत विमर्श' हा अशाच प्रयत्नांची सुरुवात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ३८ मधील महाविकास आघाडीतील जागावाटपाचा पेच अखेर सुटला आहे. काँग्रेसने एकाच उमेदवाराला अधिकृत उमेदवारीचे पत्र दिल्याने, आता काँग्रेसचा एक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चार उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. यापूर्वी प्रभाग ३८ मध्ये काँग्रेसकडून तीन, तर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला होता. आघाडीच्या जागावाटपात या प्रभागातील चार जागा शिवसेनेला आणि एक जागा काँग्रेसला असे निश्चित झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांच्या दोन कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या दिवशीही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने काँग्रेसचे तीन उमेदवार रिंगणात होते. यामुळे आघाडी धर्म पाळून काँग्रेसने एकाच जागेवर उमेदवारी निश्चित करावी, अशी मागणी शिवसेनेकडून सातत्याने केली जात होती. हा पेच सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी ३८-अ गटातून उभ्या असलेल्या अस्मिता भूषण रानभरे याच एकमेव अधिकृत उमेदवार असल्याचे पत्र जारी केले. या पत्रामुळे काँग्रेसचे अन्य दोन्ही उमेदवार बंडखोर ठरले आहेत. शिंदे यांनी प्रभाग ३८ मधील अस्मिता रणभरे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, कल्पना थोरवे आणि वसंत मोरे या पाचही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बंडखोर यांच्यावर यापुढे पक्षा मार्फत कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत चांगला प्रतिसाद दिला. या जाहीर सभेत प्रभाग क्रमांक ०९ साठीचा सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख जाहीरनामा (वचननामा) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला. हा वचननामा तयार करताना प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या, विकासाच्या गरजा आणि भविष्यातील आव्हानांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. यावेळी उमेदवार लहू गजानन बालवडकर यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की, प्रभागात विकास घडवून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीला निवडून देणे आवश्यक आहे. पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचाच महापौर असेल, त्यामुळे शहरासह प्रभागाचा विकास अधिक वेगाने साध्य होईल. बालवडकर यांनी पुढे सांगितले की, प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. मी २०१९ पासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून नागरिकांच्या अनेक अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विविध लोकहिताचे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. या वचननाम्यात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था, सुरक्षित व अपघातमुक्त रस्ते, पादचारी सुविधा, अत्याधुनिक मल्टीलेव्हल पार्किंग, स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल आणि अतिक्रमणमुक्त फूटपाथ यांसारख्या महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश आहे. यासोबतच स्वच्छ, झिरो-वेस्ट आणि पर्यावरणपूरक प्रभाग घडवण्यासाठी कचरा विलगीकरण केंद्रे, आधुनिक कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण व हरित पट्ट्यांची निर्मिती करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या कामांमध्ये पारदर्शकता व गती आणण्यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स सिस्टीम’, दर तीन महिन्यांनी जनसंवाद सभा आणि २४ तास कार्यरत जनसेवा कार्यालये यांसारख्या लोकाभिमुख निर्णयांचाही या वचननाम्यात समावेश आहे. तसेच, सौर ऊर्जा व रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर, रस्ते बांधणीपूर्वी पीएमसी, एमएसईबी, मेट्रो व इतर यंत्रणांमध्ये समन्वय साधून टिकाऊ व दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. महिलांची सुरक्षा, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, सुरक्षित वॉकिंग ट्रॅक, तरुणांसाठी क्रीडा संकुले, ओपन जिम आणि वाचनालये या सुविधांचाही वचननाम्यात उल्लेख आहे. याशिवाय, बेबी डे केअर सेंटर्स, पाळीव प्राण्यांसाठी पेट्स केअर सेंटर्स, बसस्टॉप नूतनीकरण आणि ड्रग्समुक्त प्रभाग या संकल्पनांचाही समावेश आहे. बाणेर–बालेवाडी–पाषाण–सुस–महाळुंगे परिसरासाठी स्वतंत्र विशेष विकास आराखडा तयार करण्याचे आश्वासनही या वचननाम्यात देण्यात आले आहे. निवडणुकीनंतर लगेचच विकासकामांना सुरुवात करून पुढील पाच वर्षे नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सभेच्या शेवटी नागरिकांनी या विकासाच्या संकल्पाला जोरदार पाठिंबा दिला.
मुंबई विमानतळ बंद करण्यात येऊन ती जागा हडपण्याचा डाव असल्याची शंका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपस्थित केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या या आरोपावर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पलटवार केला आहे. मुंबईतील सांताक्रुज विमानतळ बंद झाले, ते काय विकले का सरकारने? असा सवाल महाजन यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला आहे. प्रकाश महाजन म्हणाले, राज ठाकरे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून सांगतो, तुमच्या डोक्यावर कोणी नाही म्हणून तुम्ही असे बेलगाम झाले आहात. मग तुम्ही कशाला अमित शहा, सोनिया गांधी यांना भेटायला गेले होते. मुख्यमंत्री या पदाचा मान ठेवा, प्रत्येक पक्ष चालवण्यासाठी एक पद्धत असते, असा पलटवार महाजन यांनी केला आहे. पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, मुंबईतील सांताक्रुज एअरपोर्ट बंद झाले, ते काय विकले का सरकारने? कदाचित यांचे व्यवसाय बिल्डर असल्यामुळे त्यांचा डोळा त्या जागेवर असेल. सुगीत संधी की संधीत सुगी ते शोधत आहेत, हे माहीत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. बाळासाहेबच ब्रॅंड होते, त्यांच्या पुढची पिढी बोलताना ब्लॅंक होते, भविष्यात एक बोलेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील आणि दूसरा बोलेल राज ठाकरे मुख्यमंत्री होतील, काही सांगता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावर देखील प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे राजकीय विधान आहे, असा माझा अनुभव आहे. कोणत्याही ठाकरेला त्यांची चूक दाखवलेली अजिबात आवडत नाही. त्यांना सल्ला दिलेला देखील आवडत नाही. उद्धव ठाकरेंचे हे राजकीय विधान आहे. स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी हे एक चावट विधान आहे. दोन्ही भावांमध्ये वितुष्ट आणणारा संजय राऊतच प्रकाश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, जे उद्धवला बोलता येत नाही ते याच्या तोंडात टाकून दिले जाते. आता दोन्ही भावाचा संजय राऊत प्रवक्ता झाला आहे. शिवसेनेच्या वचनाला 2019 मध्ये तडा याचमुळे गेला. दोन्ही भावांमध्ये वितुष्ट आणणारा हाच आहे. आता दोन्ही भावांना बोहल्यावर उभा करणारा हाच भटजी आहे. याच्या मनात सुप्त राग आहे. याच्या भावाला आणि याला कधीच केंद्रात आणि राज्यात मंत्री केले नाही, त्याचा राग याच्या मनात आहे आणि तो राग अशा पद्धतीने सगळ्यांचे कसे वाटोळे होईल हे पाहून संजय राऊत करतो आहे, अशी खरमरीत टीका महाजन यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून 2026 साठीचा वचननामा जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध झाला. यावर आता कॉंग्रेसने टीका केली आहे. त्यांनी 2017 चा भाजपचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. 4 वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करत म्हटले, गेले दोन महिने हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम केल्यानंतर प्रचार संपण्याच्या दोन दिवस आधी महायुतीने आपला जुमलानामा जाहिर केला आहे. मुख्यमंत्री म्हणतात की त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे. मग त्यांनी 2017 चा भाजपचा जाहिरनामा पाहण्याची तसदी त्यांनी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून थेट सत्ता असताना काय केले? हा आमचा प्रश्न आहे. यातील काही आश्वासने आम्ही आठवण करून देत आहोत. 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले? अजून काही भाजपच्या हायलाइट्स आम्ही लवकरच जाहिर करु, असे सावंत यांनी म्हटले आहे. पुढे सचिन सावंत म्हणाले, मुख्यमंत्री हे सपनों के सौदागर म्हणजे स्वप्नांचे व्यापारी आहेत. त्यामुळे सोनेरी भविष्याचे रंग दाखवताना वर्तमान किती काळा आहे हे सांगत नाहीत. त्यांच्या सर्व मुलाखतीतून भविष्यातील संकल्पना सांगतात पण आतापर्यंतची आश्वासनांचे काय झाले हे सांगत नाहीत. ईस्टर्न फ्री वे 2017 साली ठाण्याला जोडण्यात येणार होते. पूरमुक्त मुंबई 2017 साली आश्वासन होते ते आश्वासन आजही आहे. मुख्यमंत्री जी तारीख देतात ती कधीच पूर्ण होत नाही. तारीख पर तारीख हा डायलॉग मुख्यमंत्र्यांकडून घेतला असावा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डॉलर होणार यासाठी 2019 पासून वेगवेगळ्या तारखा देत आले. अद्याप जवळपासही पोहोचलो नाही. एलेव्हेटेड रोडचे काय झाले? बांगलादेशी-रोहिंग्या सर्वात जास्त शोधून काढले असे मुख्यमंत्री म्हणतात मग आकडेवारी जाहीर करा, असे आव्हान सावंत यांनी केले आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार:बेस्ट बसच्या तिकीटात महिलांना 50 टक्के सूट; महापालिकेसाठी महायुतीचा वचननामा जाहीर मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे. वाचा सविस्तर
2.38 कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोन संचालक अटकेत:आर्थिक गुन्हे शाखेची हैद्राबाद विमानतळावर कारवाई
ठेवीदारांची २ कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी 'ट्रेडज इन्व्हेस्टमेंट प्रा. लि.' कंपनीच्या दोन संचालकांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ३० डिसेंबर रोजी हैद्राबाद विमानतळावर ही कारवाई केली. सचिन खडतरे (रा. करकंब, पंढरपूर, सोलापूर) आणि प्रसाद कुलकर्णी (वय ३६, रा. सारंग सोसायटी, नांदेडसिटी, पुणे) अशी अटक केलेल्या संचालकांची नावे आहेत. या प्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी खडतरे आणि कुलकर्णी यांनी ठेवीदारांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा आठ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यांनी ठेवीदारांकडून २ कोटी ३८ लाख रुपये जमा केले. कंपनीच्या संकेतस्थळावर परतावा मिळाल्याचे भासविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात ठेवीदारांना कोणताही परतावा मिळाला नाही. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी परदेशात पसार होण्याची शक्यता असल्याने आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्याविरुद्ध 'लूक आऊट नोटीस' बजावली होती. ३० डिसेंबर रोजी सचिन खडतरे आणि प्रसाद कुलकर्णी हे शारजा येथून हैद्राबादला विमान प्रवास करत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने हैद्राबाद विमानतळावर सापळा रचून दोघांना अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहायक निरीक्षक चेतन मोरे, राजेश लांघी, विनोद चव्हाण आणि मुसळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्या आरोपींना पुण्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याणीनगर परिसरात भरदिवसा एका सदनिकेत घुसून दरोडा टाकण्याचा प्रयत्न पोलिसांनी उघडकीस आणला आहे. एका अल्पवयीन पुतणीने मित्राचे थकीत घरभाडे भरण्यासाठी काकूच्या घरीच दरोडा टाकण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन पुतणीसह तिघांना २४ तासांच्या आत अटक केली आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास कल्याणीनगर भागात घडली. तक्रारदार महिला आपल्या सदनिकेत असताना, चेहरा झाकलेले दोन अज्ञात व्यक्ती सुरी आणि दोरी घेऊन घरात घुसले. महिलेने त्यांना पाहताच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आवाज ऐकून सोसायटीतील रहिवासी जमा होऊ लागल्याने दोन्ही आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक व्यक्ती सोसायटीच्या परिसरात थांबलेला दिसला, ज्याने आपला चेहरा झाकलेला होता. पोलिसांनी तपास सुरू केला. दरोड्याचा प्रयत्न झाला तेव्हा महिलेची अल्पवयीन पुतणी घरात उपस्थित होती. पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. सखोल चौकशीनंतर पुतणीने मित्राचे घरभाडे थकल्यामुळे काकूच्या घरात दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिली. पुतणीने तिच्या साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. काकूने आरडाओरडा केल्यामुळे तिचे मित्र आणि साथीदार घटनास्थळावरून पळून गेल्याचे तिने सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी यश मोहन कुर्हाडे (वय २०, रा. केसनंद), वृषभ प्रदीप सिंग (वय २१, रा. चऱ्होली, आळंदी रस्ता) आणि प्राज विवेक भैरामडगीकर (वय १८, रा. येरवडा) या तिघांना अटक केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे उपायुक्त चिलूमला रजनीकांत आणि सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, विजय ठाकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, प्रदीप सुर्वे, पोलीस कर्मचारी नटराज सुतार, संदीप जायभाय, गणेश पालवे, मुकुंद कोकणे, शैलेश वाबळे आणि बालाजी सोगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महानगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 200 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून लवकरच हे कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना होणार आहेत. राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका होत असून यामध्ये कोकण, नाशीक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नागपूर विभागातील महानगर पालिकांचा समावेश आहे. या निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांतेत पार पडावी तसेच कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या पोलिस बंदोबस्तासोबतच राज्य राखीव दलाचे जवान देखील तैनात केले जाणार आहेत. या महानगर पालिकांसाठी गुरुवारी ता. 15 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून शुक्रवारी ता. 16 रोजी मतमोजणी होणार आहे. या पालिका निवडणुकीत मतदान कालावधीत तसेच मतमोजणीच्या वेळी कुठेही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस दला सोबतच इतर जिल्हयातील पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली जिल्हयातील 200 पोलिस कर्मचारी पाठविले जाणार आहेत. यामधे जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत काही कर्मचारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी नियुक्त कर्मचारी रवाना केले जाणार आहेत. यामध्ये 80 पोलिस कर्मचारी मुंबई येथे पाठविले जाणार असून 20 पोलिस कर्मचारी छत्रपती संभाजीनगर येथे तर 100 पोलिस कर्मचारी नाशीक येथे पाठविले जाणार आहेत. शनिवारपर्यंत ता. 17 रोजी हे कर्मचारी त्यांना नेमुन दिलेल्या ठिकाणावर बंदोबस्तासाठी राहणार आहेत. त्यानंतर संबंधित जिल्हयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच या कर्मचाऱ्यांची हिंगोलीत पुन्हा रवानागी होणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
‘लाडकी’ च्या हप्त्याबाबत काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : प्रतिनिधी लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांना देण्यात यावी, अशी मागणीच काँग्रेसने या पत्रातून केली आहे. महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा हप्ता नेहमीच वादाच्या भोव-यात राहिला आहे. लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेला […] The post ‘लाडकी’ च्या हप्त्याबाबत काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिकेसाठी महायुतीकडून वचननामा जाहीर करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी मुंबईमधल्या मराठी माणसांसाठी तसेच येथील गिरणी कामगारांसाठी हक्काचे घर तयार करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच लाडक्या बहिणींना बेस्ट बसच्या तिकीटात 50 टक्के सूट देण्याचे आश्वासन महायुतीच्या वचननाम्यातून देण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत असलेल्या मराठी माणसाच्या हिताचे आणि मराठी भाषेचे रक्षण करणे आणि वाढवणे ही आमची जबाबदारी आहे आणि आमचे वचन देखील आहे. तसेच मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेला, याला जबाबदार कोण? मुंबईत मराठी माणसाला परत आणण्याची देखील आमची जबाबदारी आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. 20 हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून याची अंमलबजावणी पुढील एक वर्षात केली जाईल. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचे स्वप्न होते. 40 लाख लोकांना घर देणे. परंतु, मागच्या अनेक वर्षात काहीच झाले नाही. वारसा सांगणाऱ्यांची ती जबाबदारी होती. परंतु आता आम्ही ते पूर्ण करणार आहोत. सुनियोजित मुंबईचा विकास करण्याचे आमची जबाबदारी असून ती आम्ही या वचननाम्यातून करणार आहोत. गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचे आम्ही काम सुरू केले आहे. आतापर्यंत 12 हजार लोकांना घरे दिली आहेत. देशाच्या पंतप्रधानानांनी देखील घोषणा केली आहे की सर्वांसाठी घरे यानुसार आम्ही काम करत आहोत. मुंबईतला माणूस हा बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेलेला पुन्हा यावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल, अशी टीका विरोधक आमच्यावर करत असतात. पण पंतप्रधान मोदींनी मुंबईला फार महत्त्व दिले आहे. मुंबईला फीनटेक सीटी करण्याचा निर्धार आमचा आहे. बीकेसीला इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, स्टार्टअप हब उभारले जाणार आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष असून महापालिकेच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवणार आहोत. हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न करण्याचा आमचा मानस आहे. बेस्ट बसच्या तिकीटात लाडक्या बहिणींना 50 टक्के सवलत, लघु उद्योजकांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कोळीवाडा आणि गावठाण यांचे स्वतंत्र डीसीआर तयार करून पुनर्विकास, पुनर्विकास प्रकल्प राबवताना जी काही अडथळे येत होती, सगळे अडथळे आम्ही दूर केले आहेत. पाणीपट्टीत दरवर्षी 8 टक्के वाढ होते, पण ही वाढ पुढील 5 वर्षांसाठी स्थगित केली आहे. प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी 17 हजार कोटी रुपये खर्च करून पर्यावरण संवर्धन करणे, प्रदूषित पाणी समुद्रात सोडणे बंद केले जाणार. मुंबई खड्डेमुक्त करणार, असे आश्वासन शिंदेंनी दिले आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला मुंबई सोडून जावे लागणार नाही- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीचा वचननामा आज प्रकाशित केला आणि उपमुख्यमंत्र्यांनी या वचननाम्याचे हायलाइट आपल्या समोर ठेवले आहे. आम्ही मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना केवळ हातच घातला नाही तर ते प्रश्न सुटू शकतात, असा विश्वास आम्ही निर्माण केला आहे. आम्ही जो काही वचननामा देत आहोत, ते पूर्ण करणार आहोत. या वचननाम्यावर आधारित अॅक्शन टेकन रिपोर्ट आम्ही फॅक्ट शीट म्हणून लोकांसमोर मांडू. गृहनिर्मणाचा जो प्रश्न आहे मुंबईकरांचा, यातील विविध निर्णय आम्ही घेतले आहेत. एक संकल्प आम्ही आज घेतला आहे, मुंबईत राहणारा जो मराठी माणूस आहे, याला काहीही झाले तरी मुंबई सोडून जावे लागणार नाही. त्याला मुंबईतच घर देणार आणि हे आम्ही करून दाखवत आहोत. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच घर देणार पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जमिनीचा एक इंचही आम्ही विकणार नाहीत. तसेच वेगवेगळ्या एसआरएच्या योजना मार्गी लावण्याचे काम सुरू केले आहे. तसेच मी पुन्हा एकदा सांगतो धारावीचा विकास हा डीआरपी करणार आहे. यात स्वतः शासन भागीदार आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, त्याला धारावीमध्येच किमान 350 स्क्वेर फूटाचे घर देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. धारावीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे लघू व्यवसाय चालतात, त्यांना त्याच ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने एकोसिस्टम तयार करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळा आधुनिक करणार महानगरपालिकेत काम करणारे जेवढे सफाई कामगार आहेत, त्यांना मुंबईत मालकी हक्काचे घर देणार आहोत. शिक्षणाच्या क्षेत्रात देखील महापालिकेच्या माध्यमातून शाळा आधुनिक करणे, कौशल्ययुक्त करणे आणि हे करत असताना महापालिकेच्या प्रत्येक शाळेत आमच्या मुलांना मराठी नीट शिकता आली पाहिजे त्यासाठी मराठी लॅब तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. शिक्षणात ज्या काही आता नवीन शैक्षणीत सुविधा आल्या आहेत, त्या सगळ्या आम्ही वापरणार आहोत. आरोग्याच्या क्षेत्रात चांगल्या सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. 2 हजार नवीन बेड तयार करण्याचे काम करणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार मिठी नदीला निर्मळ करणार आहोत, यासाठी 5-6 वर्ष लागतील. यासोबत जेवढे मुंबईचे डंपिंग ग्राउंड आहेत त्यांना कॅपिंग करणे आणि डंपिंग बंद करणे, या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणार आहोत, गॅस निर्मिती देखील करता येऊ शकेल. यासाठी 17 हजार कोटींचा क्लायमेट अॅक्शन प्लॅन हाती घेतला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतल्या लोकल बंद दरवाजाच्या आणि एसीयुक्त करणार मुंबईतील लोकल ट्रेनसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बंद दरवाजाचे डबे आणि पूर्णपणे एसी डबे तयार करणार आहोत. लोकलमध्ये अतिशय चांगला प्रवास येणाऱ्या काळात करता येणार आहे. तसेच मुंबई लोकलला आणखी 3 डबे वाढवण्यासाठी चाचणी सुरू आहे. तसेच वॉटर टॅक्सी देखील सुरू करत आहोत. नवी मुंबईच्या विमानतळापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत वॉटर टॅक्सीने येता येईल, अशी सुविधा आम्ही करणार आहोत.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, असे निराशाजनक विधान सकपाळ यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर त्यांनी आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दगडू सकपाळ यांनी त्यांच्या मुलीला, रेश्मा सकपाळ यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडे केली होती. मात्र, त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर सकपाळ नाराज झाले होते. लालबाग, परळ तसेच शिवडी परिसरात त्यांनी शिवसेनेचे मोठे वर्चस्व निर्माण केले होते. परंतु, पदरी निराशा पडल्याने त्यांनी अखेर शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे. आपले संपूर्ण कुटुंब शिवसेनेत (ठाकरे गट) कार्यरत आहे. अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी झाल्यानंतर आपल्यावर गुन्हे दाखल झाले. पक्षासाठी झोकून काम केले. गेल्या 15 वर्षांमध्ये पक्षाकडे आपण काहीच मागितले नाही. आपल्या हयातीत मुलगी नगरसेविका व्हावी अशी इच्छा होती. त्यामुळे मुलीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु पदरी निराशा आली. शिवसेनेनेच मला मोठे केले. पण इतकी वर्षे सक्रिय सहभागानंतर पक्षाने आपल्याला दणका दिला, अशी खंत दगडू सकपाळ यांनी बोलून दाखवली. दगडू दादांचे नेतृत्व दगडासारखे कणखर आणि मजबूत- एकनाथ शिंदे दगडू सकपाळ यांच्या पक्षप्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दगडू सकपाळ यांनी शिवसेना वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले. दगडू दादांच्या प्रवेशामुळे खऱ्या अर्थाने लालबाग राजाचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला आहे. दगडू दादांचे नेतृत्व बघितले तर दगडासारखे कणखर आणि मजबूत आहे. दगडू दादा हे मुंबईतल्या शिवसेनेच्या पायाचा दगड आहे. पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते. बाळासाहेबांनी हेरलेली माणसे शिवसेना पुढे घेऊन जात होती. परंतु, त्याचे मोल आताचे उबाठा जाणत नाही आणि अशा कडवट कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे निर्णय का घ्यावे लागतात, याचा विचारही करत नाही. गेला की तो कचरा, असे बदनाम करतात. याने पक्ष मोठा होत नाही. ज्यांनी कष्ट केले, जेल भोगले, त्यांची अवहेलना करणे हे दुर्दैवी आहे.
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील 'सुवर्णगड' या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगेमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, मंत्र्यांच्या निवासस्थानासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे बेवारस वस्तू सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संशयास्पद बॅगेची सध्या तज्ज्ञ पथकांकडून कसून तपासणी केली जात असून, यात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात ‘प्लीज टेक फ्री शूज अँड क्लोथ्स’ असे लिहिल्याचे आढळून आले. या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिस सर्व तांत्रिक बाबींची कसून चौकशी करत आहेत. आमदार नितेश राणे यांची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आणि त्यांना लाभलेली कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहता, त्यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे संशयास्पद वस्तू मिळणे ही बाब गांभीर्याने घेतली जात आहे. उच्च सुरक्षा क्षेत्रात घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षेतील त्रुटींबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पोलिसांच्या सखोल तपासात नेमकी काय माहिती समोर येते आणि यामागे कोणाचा उद्देश आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सेनगाव तालु्क्यात अवैध वाळू वाहतूक:दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
सेनगाव तालुक्यातील बन शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 10 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस विभाग व महसूल विभागाची पथके कार्यरत आहेत. या पथकाकडून दररोज वाळू घाटांची पाहणी केली जात असून दिवसा व रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी पोलिस विभागाने स्वतंत्र पथकही स्थापन केले आहे. या शिवाय गाव पातळीवर खबऱ्यांनाही सतर्क करण्यात आले आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील बन शिवारात अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण, के. एम. थिट्टे, जे. एस. गायकवाड, पाचपुते यांच्या पथकाने शनिवारी ता. 10 वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी बन शिवारातील सुदाम वाघ यांच्या घराजवळ एका टिप्परची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. पोलिसांनी वाहन चालक स्वप्नील उर्फ पप्पू घुले (रा. रायगाव जि. बुलढाणा) याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी टिप्पर व वाळू जप्त केली. या सोबतच बन शिवारातच पोलिसांनी आणखी एक टिप्पर जप्त केले आहे. दोन्ही घटनेत पोलिसांनी दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी स्वप्नील घुले, सुरेश वाघ यांच्या विरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार के. एम. थिट्टे पुढील तपास करीत आहेत.
काही जण मतांचे दान घेऊन पळणारे- मंत्री बावनकुळे:विराेधकांवर निशाणा, विकास आराखडा तयार
काही जण मतांचे दान घेऊन पळणारे आहेत; मात्र आम्ही ते काम करीत नाही, अशा शब्दात भाजप नेते तथा महसूल मंत्री बावनकुळे यांनी शनिवारी विरोधकांवर निशाणा साधत थेट नाव न घेता शिवसेनेच्या शिंदे गटालाही टोला हाणला. तुमचे एक चुकीचे मत विकासपासून वंचित ठेवणार असून, विकसित अकोल्याचा आराखडाही तयार असल्याचे ते म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात जनसंवाद सभा जुने शहरातील शिवाजी नगरात झाली. येथून जवळच असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. सभेत ना. शिंदेंनी भाजपचे थेट न घेता पिण्याच्या पाण्यावरून टिकास्त्र डागले होते. निवडणुकीत राज्यातील महायुतीमधील प्रमुख प्रमुख घटक असलेले भाजप व शिवसेना (शिंदे गट) एकमेकांविरोधात मनपा निवडणूक लढत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणूक ही खासदार-आमदार-नगसेवका ंच्या राजकीय उर्वरित. पान ४ महानगरात सीसीटीव्हीचे जाळे विणण्यात येणार असल्याचे ना. बावनकुळे म्हणाले. यातून विशेषत: महिलांच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे. तसेच लाडकी बहीण योजना महायुती सरकारच्या काळात बंद होणार नसल्याचा पुर्नउल्लेख करीत लखपती दीदी योजना सुरु होणार आहे. प्रत्येक नगरसेवकाकडून महिलांचे २० गट तयार करून घेण्यात येणार असून, या गटाला १ लाख रुपये अनुदान देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. घरकुलांचा लाभही मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. हिंदुत्वाच्या मुद्दावरुन अकोला पश्चिम मतदारसंघ हा भाजपकडे गत ३० वर्षे होता. मात्र गतवर्षी कांँग्रेसने हा गड जिंकला. हिंदूंच्या मत विभाजनाचा फटका भाजपला बसला. केवळ १२९३ मतांनी पराभव झाला होता. आता महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा शिंदे गट, शिवसेना (उबाठा) स्वतंत्र लढत असून, हिंदुत्ववादी मते प्रामुख्याने या दोन गटांसह भाजपमध्ये विभाजित होणार आहेत. मात्र हिंदूंची सर्वाधिक मते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी या तीन पक्षांसह कांॅग्रेस-राकॉँनेही रणनिती आखली आहे. अशातच भाजपने जुने शहरात अनेक निष्ठावानांना डावलून कांॅग्रेसमधून आलेल्यांना संधी दिल्याने बंडखोरीही झाली आहे. त्यामुळे या बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी भाजपने रणनिती आखली असून, नेते हिंदुत्वाचा एकाही मुद्दा सोडत नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर विशेष लक्ष
धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित आदर्श विज्ञान, ज. भा. कला व बिर्ला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित जिज्ञासा' तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री छत्रपती हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी क्षितिज राजेंद्र कठाणे व प्रेम निरंजन दहेकर यांनी सादर केलेल्या प्रयोगाने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक डी.डी. चौधरी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पासाठी त्यांना शाळेतील शिक्षक रोंगे, गोळे, सुलके, जगताप, राणे, ढोणे व धवणे, ठाकरे, व मसराम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे परिसरात व शैक्षणिक वर्तुळात विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. हे विज्ञान प्रदर्शन स्व. श्री लक्ष्मीनारायण अग्रवाल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केले होते. शाश्वत भविष्य आणि पर्यावरण' यासारख्या विविध विषयांवर आधारित या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. क्षितिज आणि प्रेम यांनी नावीन्य पूर्ण प्रयोगातून परीक्षकांची मने जिंकली. त्यांना या यशाबद्दल रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
भारत देश हा लोकशाही शासन पद्धती असलेला सर्वात मोठा देश आहे. या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्र ओळखले जाते. समाजातील वंचित दुर्बल घटनांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे, व लोकशाही जिवंत ठेवावी. असे प्रतिपादन खासदार बळवंत वानखडे यांनी केले. दर्यापूर येथील कृषी भवन येथे रोहिणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून खा.वानखडे बोलत होते. या कार्यक्रमाला रोहिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर तर उद्घाटक खासदार बळवंतराव वानखडे, प्रमुख वक्ते म्हणून प्रा.पृथ्वीराजसिंह राजपूत, आमदार गजानन लवटे, नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, ॲड.गजानन पुंडकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधाकर भारसाकळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, रामू मालपाणी, युवासेना अंकुश कावडकर आदी उपस्थित होते. रोहिणी फाउंडेशनच्या वतीने शब्दाच्या सामर्थ्यातून समाज घडवणाऱ्या शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार व नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा गौरव करण्यात आला. या वेळी पाहुण्यांच्या हस्ते रोहिणी फाउंडेशनच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.दरम्यान दर्यापूर तालुक्यातील पत्रकार गजानन देशमुख, शशांक देशपांडे, धनंजय धांडे, सचिन मानकर, अमोल कंटाळे, विलास महाजन, गौरव टोळे, अनंत बोबडे, अजय वर, विनोद शिंगणे, गणेश साखरे, धनंजय देशमुख, युवराज डोंगरे, रवी नवलकार, नावेद सय्यद, आदेश खांडेकर, सूरज देशमुख, मोहन खरबरकर, शिलवंत रायबोले, शुभम घाटे, नासिर शहा, गजानन चौरपगार यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे व उपस्थित विविध पक्षांच्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाल तबला वादक शंभू मालवे याचाही सत्कार करण्यात आला. तसेच हरिना फाउंडेशन महिला शाखा व विश्वशांती महिला सहकारी पतसंस्था दर्यापूर यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख व नगराध्यक्ष मंदाकिनी भारसाकळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी फाउंडेशनचे सचिव निलेश पारडे व संचालन प्रा.धनंजय देशमुख आणि आभार रोहिणी फाउंडेशनचे सहसचिव अमोल कंटाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर, सचिव नीलेश पारडे, सहसचिव अमोल कंटाळे, संचालिका रितिका देशमुख, कार्यालय प्रतिनिधी समीक्षा चौरपगार यांनी परिश्रम घेतले. या सदस्यांचा सत्कार कार्यक्रमा दरम्यान प्रदीप मलीये, रमा सावळे, हबीब खान असद अल्ला, मुनिफा बी अयुब शहा, रामेश्वर चव्हाण,कविता गवई, रेखा चव्हाण, रामेश्वर तांडेकर, समीना परवीन सैय्यद नदीम, शेख नसीब शेख इस्माईल, वर्षा बोरेकर, अहमद खा शादत खा, मंदा इंगळे, मंगला तराळे, उद्धव नळकांडे, स्नेहा देशमुख, सुनीता चव्हाण, प्रवीणा गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.
कारवर दुचाकी आदळून तरुणीचा मृत्यू; 1 जखमी:राजपूत ढाबा ते चांगापूर चौक मार्गादरम्यान घडली घटना
राजपूत ढाब्याकडून वलगावच्या दिशेने भरधाव जाणारी दुचाकी समोरुन येणाऱ्या कारवर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या २५ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा गंभीर मार लागून मृत्यू झाला तर दुचाकी चालवणारा तरुण जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी १० जानेवारीला दुपारी तीन वाजताच्या सुमारास झाला आहे. र वीना शोभाराम भिलावेकर (२५, रा. बिजूधावडी ता. धारणी) असे मृतक तरुणीचे नाव आहे. याचवेळी अजय भुसूम (२७, रा. भंडोरा, जि. अमरावती.) असे जखमी तरुणाचे नाव आहे. रवीना शहरात एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती तर अजय हा पोलिस भरतीची तयारी करत आहे. अजय आणि रवीना एका दुचाकीने शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अमरावतीकडून चांगापूरच्या दिशेने जात होते. या वेळी अजय दुचाकी चालवत होता, त्याच्या दुचाकीची गती अतिसुसाट असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान अपघात झाला त्या मार्गाचे चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या काही भागातून एकाच दिशेने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहनांची गर्दी होतीच. यातच विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारवर अजय दुचाकीसह जाऊन आदळला. दुचाकी अतिवेगात असल्यामुळे ही धडक इतकी भिषण होती कि, दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. अपघातानंतर जखमी तरुण व तरुणीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरूच असतानाच शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांकडून अजय भुसूमविरुद्ध रॅश ड्रायव्हींग करुन अपघात घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
‘जुलमी सत्ताधाऱ्यांसोबत लढण्याची क्षमता धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये उरली नसल्याने त्यांच्या पाठिशी उभे राहण्यात हशील नाही. त्यामुळेच पाना, घड्याळ, हात या चिन्हांवर शिक्का मारणे म्हणजे मत वाया घालवणे होय,’ अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली. वलगाव रोडवरील ॲकडेमीक हायस्कूलच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी ओवेसी यांची जाहीर सभा झाली. या वेळी त्यांनी सत्ताधारी महायुतीसह सर्वच राजकीय पक्षांवर तोफ डागली. काँग्रेस गेली अनेक वर्षे सत्तेत होती. मात्र त्याच काळात अल्पसंख्यकांवर अनेकदा हल्ले झाले. त्यांना उर्वरित. पान ४ केंद्राने चीनसाठी का घातल्या पायघड्या? केंद्र सरकार चीनला पायघड्या घालत आहे. ‘आमच्या देशात या गुंतवणूक करा’, असे म्हणत आहे. मात्र हाच चीन देशाविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या पाकिस्तानला मदत करतो .देशाची सुमारे १५ हजार चौ. कि.मी. जमीन चीनने हस्तगत केली . त्यावर सैनिकी चौक्या बसवल्या असून, देशाच्या नाकावर टिच्चून देशावरच हल्ले करतो. तरीही मोदी सरकार त्याला देशात गुंतवणुकी साठी आमंत्रण देत आहे.
अंबरनाथमध्ये भाजपकडून लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला नगरपालिकेचे सदस्यत्व दिले असून यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाजा वाटत नाही? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी एक निवडणूक दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू-मुस्लिम वाद लावलेला नाही, माझ्याकडून मी 11 लाख इनाम देईल, असे थेट आव्हान राऊतांनी केले आहे. संजय राऊत म्हणाले, भाजपला असे वाटते की जनता मूर्ख आहे. त्यांनी केलेल्या सर्व पापकर्मांना जनता मान्यता देईल, असे त्यांना वाटते. माघार घेण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे. एमआयएमसोबत जेव्हा युती केली आणि गोंधळ झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले, अंबरनाथमध्येही कॉंग्रेससोबत युती केली तेव्हाही मुख्यमंत्र्यांना समोर येऊन सांगावे लागले की ही युती नाही. तरीही निर्लज्जपणे अंबरनाथ-बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित आरोपी, तुषार आपटे, ज्याच्याविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता, त्यांना अटक झाली होती आणि उघडपणे ते संघाचे काम करतात आणि त्यांना तुम्ही निर्दोषत्व सिद्ध न होता स्वीकृत सदस्य करतात अंबरनाथ नगरपालिकेत. एवढे धाडस यांच्यात येते कुठून? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे? पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, मी संशोधन करणार आहे. भाजपमध्ये त्यांच्यात एवढे धाडस येते कुठून? महाराष्ट्रात ज्या विषयावर लैंगिक अत्याचार प्रकरणी संतापाची लाट उसळली होती, त्या प्रकरणातील आरोपी, त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करतात, तुम्हाला काही लाजा वाटत नाही? ते असतील संघाचे कार्यकर्ते, केली असेल भाजपला मदत म्हणून त्याला ही बक्षिसी देता? उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला. तिथे निर्लज्जपणा दिसला तोच इथे दिसला. या महाराष्ट्राचे काय करून ठेवले आहे? हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भाजपचे किंवा फडणवीसांचे ते मोकाट सुटले आहेत. आम्ही काही केले तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे आणि तो आम्हाला पाठीशी घालेल हा जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्यातून या गोष्टी घडत आहेत. मुंबई पालिकेत हिंदू-मुस्लिम करतायत उद्धव ठाकरेंनी असे चॅलेंज केले आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू-मुस्लिम असा वाद लावलेला नाही आणि असे नसेल तर मी त्यांना एक लाख रुपये इनाम देईल. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि माझे अधिक 5 लाख रुपये. कधीही घेऊन जाऊ शकतात. त्यांना अमाऊंट वाढवायची असेल तरी चालेल. 11 लाख रुपये देईल मी. एक निवडणूक दाखवा ज्यात हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तान असा वाद लावलेला नाही. फडणवीस सारख्या शूर माणसाने हे आव्हान स्वीकारायला पाहिजे. मुंबई पालिकेत हिंदू-मुस्लिम करत आहेत. इथे पण अयोध्या आणत आहेत. आमचे सगळे आयुष्य या मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी गेले आहे. हा विकासच आहे. बाकी इनफ्रास्ट्रक्चर आहेच. राज्याचे मुख्यमंत्री आहात, कशाला खोटे बोलायचे? असेही राऊत म्हणाले. ठाकरे कुटुंबाची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की मी राज ठाकरेंकडे कधीही जाऊ शकतो पण उद्धव ठाकरे यांनी माझ्यासाठी दरवाजे बंद केले आहेत. यावर संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे खरे बोलतात. त्यांनी जो धोंडा गळ्यात बांधला आहे शिवसेनेच्या नावाखाली, तो त्यांना बुडवणार. म्हणजे कसे आहे की वेश्येच्या गळ्यात मणीहार आणि पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, अशा प्रकारचे धोरण भाजपच्या अमित शहा यांनी राबवले. उद्धव ठाकरेंसारखा सच्चा मित्र त्यांनी गमावला आहे, प्रखर हिंदुत्ववादी. भाजपला ज्याने हिंदुत्वाचा मार्ग दाखवला ते बाळासाहेब ठाकरे आहेत. मातोश्री हे हिंदुत्वाचे सर्वात मोठे केंद्र आहे. ठाकरे कुटुंबाची बदनामी म्हणजे महाराष्ट्राची बदनामी. ही बदनामी थांबवा, आम्ही त्यांचे स्वागत करू.
अमरावती मकरसंक्रांत सणाच्या खरेदीसाठी शनिवारी १० जानेवारीला महिलांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सुटीची पर्वणी साधत तीळगुळ, हळदी कुंकवाच्या वस्तूंसह वाण खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.मात्र, यंदाही साहित्याच्या किंमती वाढल्याने वस्तू खरेदीसाठी महिलांनी हात आखडता घेतला आहे. बुधवारी १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे. त्या निमित्ताने रविवारी सुटीचा मुहूर्त साधत महिलांसह तरुणींची बाजारपेठेत गर्दी होणार आहे. बाजारातील रेडिमेड तीळगुळ, तिळाचे लाडू, चिक्की, गुळाची रेवडी, साखरफुटाणे खरेदीला यंदाही प्राधान्य देण्यात आले. संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांमध्ये मुकुट, बाजूबंद, अंगठी, झुमके वेल, झुमके, गजरे, मोहनमाळ, सुट्टे तनमणी, मंगळसूत्र, बांगडी, घड्याळ, नथ, छल्ला, हार, फुलगुच्छ, नेकलेस, अशा दागिन्यांना महिलांनी पसंती दिली. हळदी कुंकवाचे वाण खरेदीसाठी आकर्षक वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी अधिक होती. महिलांसाठी वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण म्हणून मकर संक्रातीचा सण ओळखला जातो. या सणाला तीळगुळ द्या, गोड गोड बोला, असे म्हणत मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. शहरातील बाजारात तीळगुळासह विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र, यंदाही तीळगुळाचे भाव वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे स्थानिक तीळाचे आवश्यक उत्पन्न मिळाले नाही. यामुळे तीळाचे भावही वाढले आहे. सध्या बाजारात रेडिमेड तीळगुळ १२० ते १६० रुपये प्रति किलोने मिळत आहे. गुळाच्या रेवडीची किंमत १५० रुपये किलो आहे. मात्र, संक्रातीला तिळाला अन्यसाधारण महत्व आहे. तसेच तीळगुळ आरोग्यासाठी सर्वात लाभदायक आहे. सध्या बाजारात तिळाचे भाव १६० ते २०० रुपये प्रति किलो असून, गुळ ४५ ते ८० रुपये किलो आहे. साहित्य खरेदीला वेग मकर संक्रातीसाठी अनेक महिला एक महिन्यापासून तयारीला लागतात. साडी, रांगोळी चे डिझाइन तयार करणे, लुटण्यासाठी कोणती वस्तू ठेवायची, हळदी कुंकु, सुगड यासह इतर साहित्याचे नियोजन केले जाते. खरेदीसाठी तीन दिवस असल्याने शनिवारी महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
कॉटन मार्केट परिसरात फळ बाजाराला आग
येथील जुना कॉटन मार्केटमधील फळ बाजारात शेतकऱ्यांसाठी शेड बांधले आहेत. या शेडमध्ये असलेल्या पपईच्या ढिगाला शनिवारी १० जानेवारीला आग लागली. यामध्ये पाच ते सात फळ उत्पादकांची तेथे ठेवलेली फळे जळाली. आगीचे नेमके कारण कळाले नाही, मात्र शार्ट सर्कीटमुळे असे झाले असावे, असा अंदाज बांधला जात आहे. आगीची माहिती मिळतात जवळच असलेल्या मनपाच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळ गाठले. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. तरीही पाच ते सात फळ उत्पादकांना मात्र मोठा फटका बसला आहे. बहुतेक फळ उत्पादकांनी याठिकाणी आपापली फळे ठेवली होती. यामध्ये पपईचा सर्वाधिक भरणा होता. पपईचे प्रत्येक फळ हे कागदात गुंडाळून ठेवले होते. ही सर्व फळे प्लास्टीकच्या कॅरेटमध्ये होती. आगीने लगेच रौद्र रुप धारण केल्याने फळांनी भरलेले असे अनेक कॅरेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दरम्यान आगीच्या ज्वाळा दिसून येताच तेथे असलेल्या दुकानदारांनी शेडकडे धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यातच अग्नीशमन दलाचा बंब पोहोचल्याने आग लवकर आटोक्यात आणण्यात आली.
गौणखनीज तपासणी करताना दोन दिवसांपूर्वी महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकावर हल्ला केला होता. या हल्ला प्रकरणातील ४ आरोपींना कुन्हा पोलिसांनी शुक्रवार, ९ जानेवारीला चांदूररेल्वे येथून अटक केली. लक्ष्मण तुळशीराम चौधरी (३५) रा. बग्गी ता. चांदूररेल्वे, शहबाज मुल्ला शफीमुल्ला (३७) रा. काजीपुरा चांदूररेल्वे, स्वप्नील संजयराव कावरे (२४) रा. चमननगर कुऱ्हा व भावेश ज्ञानेश्वर देशमुख (२५) रा. पळसखेड ता.चांदूररेल्वे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ५ जानेवारीला कुन्हा पोलिस ठाणे हद्दीत १० चाकी ट्रक क्र. एमएच ४९ सीडी ८७३७ हा वाळू भरून अंजनसिंगीवरून कुऱ्ह्याकडे येत असताना पोलिसांनी त्याला थांबवले. त्यांना वाळू वाहतुकीचा परवाना मागितला, परंतु परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. महसूल पथकाच्या पाहणीवेळी त्या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गौण खनीजही आढळून आले. त्यामुळे तहसीलदारांनी सदर ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाण्याकरिता त्यांना सांगितले. दरम्यान ट्रक कुऱ्हामार्गे तिवसा तहसीलमध्ये नेत असताना ट्रकमागे एक कार आली. त्यामधील चालकाने खाली उतरुन ट्रक पळवून नेण्याबद्दल इशारा केला. तेव्हा महसूल कर्मचाऱ्यांनी आरडा-ओरड केली. मात्र त्यांना आरोपींनी मारहाण केली आणि ट्रक पळवून नेला. तेव्हापासून पोलिस त्यांच्या मागावर होते. महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करुन ट्रक पळवून नेल्याचा गंभीर प्रकार घडल्यानंतर जिल्हाभरातील महसूल यंत्रणा दक्ष झाली होती. वाळू व्यवसायिकांनी काही एक न जुमानता हा प्रकार केला होता. चालता ट्रक पळवून नेल्याने पोलिसांनी गुप्तपणे सर्वत्र संदेश पाठवून आरोपींचे वर्णन सार्वजनिक केले होते. दरम्यानच्या काळात हे आरोपी चांदूर रेल्वे येथे लपून बसल्याची खबर एका गोपनीय सूत्राने पोलिसांना दिली. त्या खबरीची पडताळणी केल्यानंतर कुऱ्हा पोलिसांनी तेथे पोहोचून चौघांनाही अटक केली.
या वेळी लोहारा तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणात निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढवण्याची तयारी करावी. सन्मानजनक जागा वाटप होऊन इतर पक्षांबरोबर आघाडी झाली तरच मिळून लढणार आहोत. आपसातील मतभेद बाजूला सारत एकीने निवडणुकीत उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाची आढावा बैठक लोहारा येथील बसवेश्वर मंदिरात संपन्न झाली. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही बैठक संपन्न झाली. लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील होते. या वेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख, काँग्रेसच्या प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, ॲड. सयाजी शिंदे, माजी सभापती नानासाहेब भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीस चंद्रकांत जाधव, बसवराज पाटील-कास्तीकर, रौफ बागवान, प्रकाश होनराव, अॅड. संगमेश्वर माशाळाकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष दत्ता गाडेकर,भुजंग देशमुख यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शामसुंदर तोरकडे यांनी तर सूत्रसंचलन केशव सरवदे यांनी केले. आभार दत्ता गाडेकर यांनी मानले. कार्यकर्त्यांना धडे, आढावा मात्र राहिला काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद गटनिहाय कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्याचे नियोजन केले होते. परंतु या बैठकीला उशीर झाल्याने बैठक झाली. पदाधिकारी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परंतु वेळेअभावी आढावा घेणे राहून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांना मत मांडण्यास संधी मिळाली नाही.
सुर्डी (ता. बार्शी) येथे तुरीच्या गोदावरी या सुधारित वाणाच्या वापरामुळे तूर उत्पादनात लक्षणीय वाढ होत असून कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील तुरीच्या गोदावरी वाणाचे पीक पैदासकार डॉ. दीपक पाटील यांनी केले. तेशबरी कृषी प्रतिष्ठान संचालित कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर यांच्या वतीने सुर्डी येथे बुधवार दि. ७ जानेवारी रोजी तुरीच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कडधान्य उत्पादकांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कडधान्य संशोधन केंद्र, बदनापूर येथील पीक पैदासकार डॉ. दीपक पाटील व कीड-रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत सोनटक्के उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दीपक पाटील यांनी गोदावरी वाण, बीज प्रक्रिया, मूलस्थानी जलसंधारण व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या वापरामुळे तूर पिकात झालेला सकारात्मक बदल प्रत्यक्ष दिसत असल्याचे सांगितले. पुढील वर्षी शेतकऱ्यांनी गोदावरी वाणाचे बियाणे सत्यप्रत बियाणे म्हणून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले. तूर हे पीक ऊसाला सक्षम पर्याय ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. लालासाहेब तांबडे यांनी तूर तूर उत्पादन वाढीसाठी सुधारित बियाणे, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन शक्य असल्याचे सांगितले. कृषी विज्ञान केंद्राकडून दिलेले सुधारित वाण प्रचलित वाणापेक्षा ३५ ते ४० टक्के अधिक उत्पादन क्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच १ किलो बियाणे प्रति एकर वापर, जैविक कीटकनाशकांचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्याचा सल्ला दिला प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ अमोल शास्त्री यांनी गोदावरी वाण व एकात्मिक पीक व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेल्या बदलाची माहिती दिली. सेंद्रिय कर्ब वाढणार ^तुरपिक शेतकऱ्याला ही समृद्ध करतं आणि जमिनीलाही समृद्ध करत. पालापाचोळा पडलेला असतो. त्यातून जमिनीला सुद्धा ४ ते ५ टन पालापाचोळ्या पासून खत भेटले जाते. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी खूप मदत होते. धीरज शेळके, शेतकरी
डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशालेत संविधान महोत्सवानिमित्त या सप्ताहाचे औचित्य साधून प्रशालेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. भारतीय संविधानाविषयी जनजागृती व्हावी आणि विद्यार्थिनींच्या कल्पकतेला वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी मुलींनी संविधानाची उद्देशिका, लोकशाहीचे महत्त्व, राष्ट्रीय प्रतीके आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विविध प्रकारच्या आकर्षक रांगोळ्या साकारल्या. रंगीबेरंगी छटा आणि रेखाटनातून विद्यार्थिनींनी संविधानाप्रती आपला आदर व्यक्त केला. या उपक्रमासाठी प्रशालेतील शिल्पा होडगे व पूनम शिंदे यांनी विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केले. संविधानातील मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी असे कार्यक्रम स्तुत्य असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विनायक देशपांडे, पर्यवेक्षक नीता मदने, संजय नाळे प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाढेगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज हे अभियान म्हणजे महाराष्ट्र शासनाने तुमच्या गावासाठी दिलेली एक अभिनव संधी आहे. या संधीचे सोनं करत स्थानिक मतभेद बाजूला ठेवून गावचा विकास पुढे न्यावा. या अभियानात चांगले काम केले तर रोख रकमेचा पुरस्कार मिळेल. गावाच्या विकासात चांगल्या पद्धतीने बदल करता येईल, तेव्हा मतभेद बाजूला ठेवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करा, असा संदेश सिने कलावंत संदीप पाठक यांनी दिला. याप्रसंगी सिने अभिनेत्री शिवाली परब म्हणाली की, या गावाला मोठी नैसर्गिक देणगी चांगल्या पद्धतीची आहे. आज दिसणारे गाव प्रगतीपथावर दिसत आहे, तुम्ही थोडासा प्रयत्न केला तर गाव पुरस्कारासाठी योग्य व सुंदर होईल. तुम्हाला आणखी ३ महिने वाढवून मिळाल्यामुळे कामाची संधी मिळाली आहे. या संधीचा उपयोग करून घेऊन गाव समृद्ध करा, या स्पर्धेचे स्वरूप न देता या नैसर्गिकतेला कार्याची जोड द्या. आपले गाव पुरस्कारात पुढे राहावे, अशा शुभेच्छा दिल्या. सिने कलावंत व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांचे वाढेगावमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांची बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये जुन्या वाद्य,वृंदाचा सहभाग करण्यात आला होता. सिने कलावंतासोबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, जिल्हा अभियान कक्षातील शिवराज राठोड, सुहास चिळेकर, पं. स. विस्तार अधिकारी अमोल तोडकरी यांचा सहभाग होता. रस्त्यावरून मिरवणूक जात असता अनेक नागरिकासह महिला स्वागत करत होते. सिने कलावंत व अधिकारी यांना वाढेगाव येथील त्रिवेणी संगमावर नेण्यात आले. संगमावर आगमन झाल्यानंतर जि. प. मुख्याध्यापक इंगोले गुरुजी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. या गावचे उपसरपंच शिवाजी दिघे यांच्या हस्ते संदीप पाठक यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाढेगावमध्ये झालेल्या कामाची तपशीलवार माहिती दिली. तसेच नदीवर व पाण्याच्या संदर्भात वृक्ष लागवडीच्या संदर्भात व नावीन्यपूर्ण राबवलेल्या कामाचा तपशील उपस्थितांच्या पुढे सादर केला. शेवटी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. बीट अंमलदार विलास बनसोडे व त्यांच्या सहकार्यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. झालेल्या कामांचे तपशील मांडले
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे परंपरेनुसार मकरसंक्रांत उत्सव साजरा करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीच्या उत्सवानिमित्त भोगीला दि.१३ जानेवारी रोजी श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ३ ते ४.३० या वेळेत करण्यात येणार आहे. यावेळी दि. १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त माता व भगिनींना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुलभ व्हावे, याकरिता पुरूष भाविकांनी शक्यतो मुखदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तसेच माता व भगिनींना श्री रुक्मिणी मातेस भोगी करावयाची असेल, त्यांनी मंदिरामध्ये पहाटे ४.३०ते ५.३० या वेळेत करावी. त्यादिवशी पहाटे ५.३० नंतर श्री रुक्मिणी मातेस पोषाख व अलंकार परिधान करण्यात येतील. सकाळी ६.३० वाजेपर्यंत दर्शन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. भाविकांच्या सोईच्या दृष्टीने दि. १३ जानेवारी रोजी श्री विठ्ठलाकडील काकडा आरती व नित्यपूजा पहाटे ४.३० ते ५.४५ या वेळेत होऊन पदस्पर्श दर्शन पहाटे ६ नंतर सुरू करण्यात येणार आहे. दि. १४ जानेवारी रोजी नेहमीच्या वेळेमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा झाल्यानंतर श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान केले. नंतर दर्शन सुरू करण्यात येणार आहे. तसेच दि.१५ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे श्री रुक्मिणी मातेची काकडा आरती व नित्यपूजा नेहमीच्या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन, दर्शनरांग व्यवस्थापन, कमांडोज नियुक्ती, टोकन दर्शन बुकिंग व्यवस्था बंद, चांगली स्वच्छता व्यवस्था, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करून भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदरचा उत्सव मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच सर्व सदस्य महोदयांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात येत असल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगितले.
सहकारमहर्षी स्व.शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथील संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते ९ जानेवारी मध्ये आयोजित केलेल्या २० व्या लेझीम स्पर्धेतील शेवटच्या दिवशी शहरी मुली ब गटात जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर संघाने प्रथम क्रमांक मिळवला. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त गेली २० वर्षांपासून या लेझीम स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी स्पर्धेत शहरी, ग्रामीण मुले व मुली मिळून ५८ संघात सुमारे ३ हजार लेझीम खेळाडू तसेच २०० वादक सहभागी झाले होते. शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते- पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, नूतन नगरसेवक सयाजीराजे मोहिते- पाटील, कृष्णप्रिया मोहिते-पाटील, दिपकराव खराडे-पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. जयसिंह मोहिते पाटील विद्यालय संग्रामनगर प्रथम, हनुमान विद्यालय लवंग द्वितीय व कृष्णानंद विद्यामंदिर पाटील वस्ती यांनी तृतीय क्रमांक पटकावला. शहरी मुली अ गटात महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर व सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी विभागून प्रथम, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज द्वितीय तर लक्ष्मीबाई कन्या प्रशाला यशवंतनगर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेमध्ये या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावले पारितोषिके
‘क्रेडाई पंढरपूर'च्या वतीने ‘ क्रेडाई गृहोत्सव २०२६' या प्रदर्शनाचे १६ ते १८ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. १६ जानेवारी रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, सचिव आशिष पोखरना यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. येथील रेल्वे मैदानाच्या जागेमध्ये या भव्य गृहोत्सव प्रदर्शनाच्या शामियाना उभारणी व इतर कामांचे विधिवत भूमीपूजन नुकतेच ह.भ.प. कबीर महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी पंढरपूर क्रेडाईचे अध्यक्ष आशिष शहा यांनी या प्रदर्शनाबाबत माहिती देताना सांगितले की, पंढरपूर शहरात दुसऱ्यांदा आयोजित करण्यात येत असलेला यावर्षीचा गृहोत्सव केवळ घरांपुरता मर्यादित न राहता, ग्राहकांना एकूणच सर्व बांधकाम क्षेत्राची माहिती देणारा आणि अधिक व्यापक स्वरूपाचा असेल. यामध्ये नामांकित बांधकाम व्यायसायिक तसेच बांधकाम क्षेत्रातील पुरवठादार, मटेरियल विक्रेते आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे स्टॉल्स देखील उपलब्ध असतील. २०२४ सालच्या गृहोत्सव प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या महोत्सवालाही पंढरपूर शहर आणि ग्रामीण नागरिक भेट देतील आणि त्यांना प्रदर्शनाचा उपयोग होईल. यावर्षी देखील प्रदर्शनाला असाच प्रतिसाद मिळेल याचा आम्हाला विश्वास आहे. यावेळी प्रमुख पाहुणे हभप कबीर महाराज यांनी या गृहोत्सव प्रदर्शनाला शुभेच्छा देतानाच पंढरपूर क्रेडाईच्या या ग्राहकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पंढरपूर क्रेडाईचे उपाध्यक्ष शार्दुल नलबिलवार, सचिव शशिकांत सुतार, खजिनदार महेश आराध्ये, सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी, पी.आर.ओ. मिलिंद वाघ, वूमन विंग कोऑर्डिनेटर श्रिया शिरगावकर आणि युथ विंगचे यश देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एटीएम फोडून 25 लाख केले लंपास:कटरचा केला वापर, चार जण सीसीटीव्हीत कैद
भाळवणी येथे बँकेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी टाकलेल्या धाडीत सुमारे २५ लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शनिवारी पहाटे २ ते २.३० या वेळेत गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्यात आले. या प्रकरणात चार संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पारनेर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके रवाना केली आहेत. भाळवणी येथील रोहिदास संभाजी रोहोकले यांच्या गाळ्यात गेल्या बारा वर्षांपासून बँकेचे एटीएम कार्यरत आहे. २४ तास सेवा देणाऱ्या या एटीएमला सुरक्षा रक्षक नसतानाही यापूर्वी चोरीचा कोणताही प्रकार घडलेला नव्हता. मात्र, शनिवारी पहाटे अचूक वेळ साधत चोरट्यांनी धाड टाकल्याने गावात चिंता व्यक्त केली जात आहे. एटीएममध्ये रोकड भरणे व देखभाल करण्याचे काम खाजगी एजन्सीकडे असून त्याचे नियंत्रण नाशिक येथील कार्यालयातून केले जाते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित पान ४ तपासाला वेग; रॅकेटचा संशय घटनेनंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम हाती घेतले आहे. ही चोरी एखाद्या संघटीत टोळीचा भाग आहे का, तसेच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असून लवकरच छडा लागेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
रस्त्याच्या कडेला उभ्या दुचाकीस्वाराला उडवून डंपर उलटला:एकाचा दुर्दैवी अंत
नेवासे-शेवगाव राज्यमार्गावरील भानसहिवरे शिवारात शनिवारी सकाळी ८:४५ वाजेच्या सुमारास एका भरधाव डंपरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या राजेंद्र गंगाधर भोईटे (५२) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात भोईटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर पळवण्याच्या प्रयत्नात थोड्या अंतरावर उलटला, मात्र काही लोकांनी जेसीबीच्या सहाय्याने तो सरळ करून पसार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला . दुचाकीस्वार राजेंद्र भोईटे हे शनिशिंगणापूरहून दर्शन घेऊन परतत होते. भानसहिवरे येथील एका दूध डेअरीजवळ फोन आल्यामुळे त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. ते फोनवर बोलत असताना, भानसहिवरेकडून नेवासे फाट्याकडे विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की भोईटे यांचा जागीच अंत झाला. नातेवाईकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार अपघातानंतर डंपरचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण डंपर पुढे जाऊन पलटी झाला. पोलिसांची सकाळी नऊ ते दुपारी ३ पर्यंत धावपळ डंपरचा पत्ता न लागल्याने पोलिस आणि नातेवाईकांमध्ये मोठी खडाजंगी उडाली. शेवटी पोलिसांनी तपास चक्रे फिरवून दुपारी ४ वाजेच्या सुमारास डंपर व चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
परभणी विद्यापीठाने संशोधित केलेला परभणी शक्ती' या वाणाचे बियाणे महाबीजमार्फत कृषी विभागाच्या माध्यमातून श्रीगोंदे तालुक्यातील दीड हजारांवर शेतकऱ्यांना मोफत वाटण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात पेरणी झालेली, ज्वारी अवघी दोन ते अडीच फूट वाढ झाली. डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना ही बाब कळाल्यावर त्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. पण त्यावर उत्तर न मिळाल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यानंतर कृषी विभागाने महाबीज बियाणे महामंडळाचे अधिकारी तसेच परभणी कृषी विद्यापीठातील तज्ञांना संपर्क करत १० जानेवारीला तातडीने पाहणी दौरा आखला. यावेळी शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञांसमोर प्रश्नांचा भडीमार केला. तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अरविंद कापसे (रा. पेडगाव रोड, श्रीगोंदे) यांनी याबाबत सर्वप्रथम आवाज उठवला. कापसे यांनी ज्वारीसह मुख्यत: जनावरांच्या चाऱ्यासाठी पाच एकरवर या वाणाची पेरणी केली. पण त्याची वाढच झाली नाही. शनिवारच्या पाहणी दौऱ्यात ज्वारी संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी ज्वारी पैदासकार डॉ. अंबिका मोरे, विभागीय व्यवस्थापक, जालना येथील राजाभाऊ मोराळे, दौंड साहेब, जिल्हा व्यवस्थापक महाबीज रवींद्र काळभोर, कृषी अधिकारी महाबीज तसेच तालुका कृषी अधिकारी चौधरी मॅडम आदींची उपस्थिती होती. अधिकाऱ्यांनी कापसे तसेच भोळे वस्ती येथील अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटला प्रत्यक्ष भेट दिली. दरम्यान, दोषींवर कारवाई व्हावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कापसे यांनी केली. या उदाहरणातून समजून घ्या नुकसान कापसे हे शेतीसह दुग्ध व्यवसायही करतात. जनावरांसाठी त्यांनी पाच एकरवर परभणी शक्ती वाण लावले. त्यांच्या कुटुंबातील पाच जणांना ४ किलोच्या बियाणांची प्रत्येकी एक बॅग मोफत मिळाली. या बॅगची अंदाजे किंमत ४०० रुपये आहे. याचाच अर्थ त्यांना दोन हजार रुपयांचे मोफत बियाणे मिळाले. पण ज्वारी लावलेल्या क्षेत्रावर जर त्यांनी तूर किंवा दुसरे पीक घेतले असते तर एकरी दीड लाख उत्पन्न झाले असते. त्यामुळे कापसे यांचे पिकाचे दीड लाख अन् वर्षभरात चाऱ्यासाठी अतिरिक्त दीड लाख असे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप कापसे यांनी केला. श्रीगोंदेत १५०० शेतकऱ्यांनी या वाण लावल्याचेही ते म्हणाले.
ग्रामीण नाट्य संघांनी परस्पर सहकार्याची भूमिका घ्यावी- डॉ. सोमनाथ मुटकुळे
ग्रामीण भागातील नाट्यकलावंतांना सादरीकरण करताना प्रकाशयोजना, ध्वनी, नेपथ्य व इतर तांत्रिक बाबींमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामीण नाट्य संघांनी एकमेकांना सहकार्य करत संघटितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, नाट्यदिग्दर्शक व समीक्षक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी केले. ग्रामीण नाट्यसंघांचा सहविचार मेळावा नुकताच डॉ. राजेंद्र धामणे यांच्या आश्रमात, मनगाव (ता. नगर) येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. सोमनाथ मुटकुळे होते. मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील यांनी केले. जिल्ह्यातील ग्रामीण नाट्य संघप्रमुख व तांत्रिक कलाकारांचा असा एकत्रित मेळावा प्रथमच होत असल्याने सर्व कलावंतांमध्ये विशेष उत्सुकता होती. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागातून दहा नाट्य संघप्रमुखांसह २२ कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. मेळाव्यात कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील नाट्यकलावंतांना येणाऱ्या बॅकस्टेज तंत्रज्ञानाच्या अडचणी, प्रशिक्षित तंत्रज्ञांचा अभाव, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होताना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. डॉ. मुटकुळे यांनी ग्रामीण आणि शहरी असा भेद न करता सर्व कलावंतांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण भागातील नाट्यसंघांना सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी आगामी काळात ग्रामीण नाट्य महोत्सवांचे आयोजन, तसेच तंत्रज्ञ घडवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे व कार्यशाळा प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला.
राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी व शाश्वत विकासाचे कार्य शिबिरात घडावे. ही योजना केवळ अतिरिक्त गुण मिळवण्याचे माध्यम नसून ती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संस्काराची शाळा आहे. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांसाठी नव्हे तर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने या योजनेत काम करावे, असे आवाहन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अरुण तनपुरे यांनी केले. लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने तालुक्यातील सडे येथे आयोजित सात दिवसीय हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. “आपण ज्या समाजात राहतो त्या समाजासाठी, देशासाठी आणि स्वतःसाठी कार्य केले पाहिजे. स्वतःचा विकास झाला तर कुटुंबाचा विकास होतो आणि कुटुंबाचा विकास झाला तर देशाचा विकास होतो.” शिबिरातून गावकऱ्यांचे मन बदलले नाही तरी स्वतःचे मन बदलले तर खऱ्या अर्थाने शिबिर यशस्वी झाले असे म्हणता येईल असे स्पष्ट करत तनपुरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे व महत्त्व स्वयंसेवकांना स्पष्ट करून सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सडे गावचे प्रगतशील शेतकरी भगवान झडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी पैसा ही माणसाची प्राथमिक गरज आहे. मात्र ती शेवटची गरज नाही. समाजात आपले नाव टिकेल असे कार्य केले पाहिजे. प्रत्येकाने स्वतःतील प्रभावी गुण ओळखून व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले. प्र. प्राचार्य डॉ. अनिता वेताळ यांनी विद्यार्थ्यांना वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी सरपंच सविता पानसंबळ, राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भाउसाहेब मोरे, उपसरपंच अर्चना देठे, सुरेश वाबळे, ज्ञानेश्वर कोळसे, मधुकर पवार, गणेश गाडे, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दत्तात्रय खिलारी यांनी तर विक्रम फाटक यांनी आभार मानले. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.योगिता मोरे , प्रा.डॉ.मनोज तेलोरे कार्यालयीन अधीक्षक गणेश देशमुख तसेच सडे गावचे प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय सहलीचा आनंद केवळ फिरण्यापुरता मर्यादित न ठेवता, साक्री येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे एक आदर्श उदाहरण समोर ठेवले आहे. ऐतिहासिक शिवनेरी गडावर नुकताच ‘एक मूठ कचरा’ हा विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी गड परिसराची स्वच्छता केली आणि पर्यावरण संरक्षणाचा कृतिशील संदेश या अभियानातून विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यालयाची सहल शिवनेरी गडावर गेली असता, पर्यटकांकडून परिसरात फेकण्यात आलेला प्लास्टिक कचरा, पाण्याच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तू पाहून विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा ध्यास घेतला. पर्यवेक्षक एस. एन. पाटील व शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसरातून कचरा संकलित केला आणि त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून गडाचा परिसर चकाचक केला. मान्यवरांकडून शाबासकीची थाप विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव व दादासाहेब रामराव पाटील बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील, अध्यक्षा मंगला पाटील, उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील तसेच गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे आणि प्राचार्य डी. एन. पाटील यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. संस्कार आणि टीम वर्कची शिदोरी या उपक्रमाबाबत माहिती देताना विद्यालयाचे प्राचार्य नैनेश शिंदे म्हणाले की, हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहीम नसून, विद्यार्थ्यांमध्ये आपल्या गौरवशाली गड-किल्ल्यांप्रती आदर आणि जबाबदारीची भावना निर्माण करणारा एक संस्कार आहे. यातून विद्यार्थ्यांना सांघिक कार्य आणि नेतृत्व कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली.
आज अभिषेक असता तर घोसाळकरांचे घर फोडण्याची भाजपची हिंमत झाली नसती, मला विनोद घोसाळकरांचा अभिमान वाटतोय. पण यावेळी भावनेत अडकू नका, मी तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात आलो नाही, तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावर आता भाजपच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 मधील ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचार कार्यालयात उद्धव ठाकरेंनी भेट दिली होती. त्यावेळी भाजपने घोसाळकरांच्या घरात भांडण लावून फोडाफोडी केली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, मी आणि अभिषेकने दोघांनी मिळून प्रत्येक निर्णय घेतले होते. अभिषेक असता तर जे काही असेल ते दोघांनी मिळूनच केले असते. मला असे वाटते की, अजूनही अभिषेक माझ्याबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे अभिषेकचे नाव घेऊन उगाचच प्रचार करत आहेत. निष्ठावंत वैगरे...ते चुकीचे आहे. उगाचच तुम्ही अभिषेकचे नाव कशाला घेत आहात. माझा नवरा आहे, मी काहीही करु शकते, अशी प्रतिक्रिया तेजस्वी घोसाळकर यांनी दिली आहे. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या त्या पत्नी. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार आहेत. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून प्रभाग क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुक्ताईनगर येथील तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. बालवाडी व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांनी पालक व श्रोत्यांची मने जिंकली. विविध रंगीबेरंगी वेशभूषेत सादर केलेल्या मराठी, हिंदी, बालगीत, रिमिक्स, अहिराणी व पोवाड्यांनी चैतन्य निर्माण केले. अध्यक्षस्थानी आमदार एकनाथ खडसे, व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, संचालक चंद्रशेखर बढे, रमेश खाचणे, शाळा समिती अध्यक्ष पुरुषोत्तम महाजन, महेश पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीलाल जोगी, मुख्याध्यापिका चित्रा भारंबे उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर शाळेतील विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धेतील विजेते, शासकीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका चित्रा भारंबे यांनी केले. बक्षीस वाचन आशा कोळी, सूत्रसंचालन अनिल चौधरी यांनी केले. शिक्षक शाळेत राबवत असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतात. प्राथमिक शाळा ही आयुष्यभर जपून ठेवण्यासारखी आठवण असते, असे आमदार खडसे यांनी सांगितले. शाळेचा माजी विद्यार्थी हितेश पोतदार यांची ऑक्सफर्ड विद्यापीठात अध्यापक म्हणून निवड होणे ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतो : आमदार खडसे
लासलगाव ते विंचूर या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झालेले आहे, मात्र प्रत्यक्ष काम अजून सुरू झालेले नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते महेश होळकर यांनी मुरूम टाकत खड्डे बुजवून सामाजिक बांधीलकी जपली. लासलगाव ते विंचूर काँक्रिटीकरण चौपदरीकरणाचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मंजूर झाले आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू होण्यास विलंब आहे. तत्पूर्वी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात घडत असल्याने अनेक दुचाकी चालकांना प्राण गमवावे लागले आहेत. मंजुळा पॅलेस तसेच होळकरवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. सामाजिक कार्यकर्ते महेश होळकर यांनी जेसीबीच्या आधारे स्वखर्चाने मुरूम टाकत अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवले. शहरात असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या काँक्रीटमधून लोखंड बाहेर आल्याने दुचाकीमध्ये अडकून अनेक वाहन चालक जखमी होत आहेत. काँक्रिटीकारणाचे काम जेव्हा करायचे तेव्हा करा, मात्र तात्पुरती का होईना या रस्त्याची डागडुजी करा, अशी मागणी होत आहे. वर्षभरात १७ जणांचा अपघाती मृत्यू लासलगाव- विंचूर मार्गाच्या चौपदरीकरण व काँक्रिटीकरणाला मंजुरी मिळालेली आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात या रस्त्यावर झालेल्या अपघातात १७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या रस्त्यात तीन ते चार ठिकाणी वळण असल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठ्या गाड्यांचा अंदाज येत नाही, परिणामी अपघात होतात. चौपदरीकरण रस्त्याचे काम होईपर्यंत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करण्याची गरज आहे. अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजवले शहरातील काँक्रिटीकरण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. होळकरवाडी येथे चारचाकी गाड्या देखील नुकसानग्रस्त होत आहेत. त्यामुळे या खड्ड्यांमध्ये जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकला आहे. मंजूर रस्त्याचे काम तातडीने कराच, मात्र त्यापूर्वी तात्पुरती डागडूजी करावी. - महेश होळकर, सामाजिक कार्यकर्ते, लासलगाव
घसरल्याने साताळ्यात फुलकोबीमध्ये सोडल्या मेंढ्या:कोबी 5, वांगी 7, भेंडीसह टोमॅटो 10 रुपये किलो
फुलंब्री बाजारामध्ये आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर अल्प प्रमाणात आले असून साताळ्यासह अनेक ठिकाणी फुल व पत्ताकोबीच्या शेतात शेतकऱ्यांनी जनावरे सोडली आहेत. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी ४० रुपये प्रतिकिलो असलेली फुलकोबी आता ५ रुपयांवर आली आहे. तर, मेथीसह पालक भाजीचेही दर चारपटीने घसरले आहेत. महिनाभरापूर्वी या भाज्यांची एक जुडी २० रुपयांना होती, ती आता दहा रुपयांत ३ जुड्या मिळत आहेत. दर घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. गतवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यामुळे तालुक्यात रब्बीचा पेरा वाढलेला आहे. असंख्य शेतकऱ्यांनी पाणी असल्यामुळे भाजीपाल्याची लागवड केली आहे. तालुक्यात ३९१ हेक्टरवर भाजीपाला आहे. आता बाजारात मागणीपेक्षा जास्त भाजीपाला आल्यामुळे भाव घसरल्याचे दिसून येत आहे. नेहमी भाजीपाल्याचे दर वाढल्याची ओरड करणारे आता शेतकऱ्यांची व्यथा समजून घेताना दिसत नसल्याचे बोलले जात आहे. भाजीपालानिहाय दर भाजीपाला आता गत महिना मिरची ४० ७० (किलो) फुलकोबी ५ ४० टोमॅटो १० ६० वांगी ७ ४० भेंडी १० २० मेथी ३ (जुडी) २० (जुडी) कोथिंबीर ५ (जुडी) २० (जुडी) केलेला खर्चही निघत नाही, यामुळे जसे मका, कपाशी पिकांना विम्याचे कवच असतात तसे भाजीपाल्याला विम्याचे कवच द्यावे. जेणेकरून भाजीपाला पीक उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत येणार नाही. - सतीश बलांडे, भाजीपाला उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष साईनाथ बेडके म्हणाले, ‘‘भाजीपाल्यासाठी खर्चात वाढ झाली आहे. त्यातच वन्यप्राणी व कीड तसेच रोगांपासून पिकांच्या रक्षणासाठी रात्र रात्र थंडीत जागावे लागते. परंतु, आता दर घसरल्याने आमचा त्रास दिसत नाही का?’’
शूलिभंजन येथील वीटभट्टीवर झोपलेल्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. दीपक देवसिंग मानधरे असे मृताचे नाव असून तो शूलिभंजनचा रहिवासी होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र अमोल कचरू सौदागर होता. अमोल कसाबखेडा येथील असून सध्या शूलिभंजन येथे राहतो. दोघे गेल्या चार वर्षांपासून मित्र होते. मृत दीपक व अमोल हे मित्र होते. शुक्रवारी सायंकाळी दोघांची भेट झाली. रात्री त्यांनी एका दुकानातून पँट व शर्ट खरेदी केला. दहा वाजता हॉटेलमध्ये जेवण केले. ११ वाजता दीपक मित्रासोबत शूलिभंजन येथील वीटभट्टीवर पोहोचला. रात्री बारा वाजता दोघे भट्टीवर झोपले. सकाळी अमोल विटा थापण्यासाठी खाली उतरला. त्याच वेळी त्याला चक्कर येऊन तो कोसळला. दरम्यान, दीपकला मजुरांनी उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मृतावस्थेत आढळला. वीटभट्टी पेटवल्यानंतर ती शिजण्यासाठी किमान दहा दिवस लागतात. त्यामुळे झोपलेल्या ठिकाणी थेट धूर किंवा उष्णता पोहोचण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले. तरी वीटभट्टीतील उष्णतेचा अप्रत्यक्ष परिणाम झाला का, जेवणातून विषबाधा झाली का, की अन्य कारण होते, याचा तपास सुरू आहे. दीपकच्या नातेवाइकांनी, ‘झोपलेल्या अवस्थेत मृत्यू कसा होऊ शकतो?’ असा सवाल उपस्थित केला. शवविच्छेदनात कोणताही संशय राहू नये यासाठी शवविच्छेदन खुलताबाद शासकीय रुग्णालयाऐवजी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. नातेवाइकांची शंका
येथे शिवजयंतीचा उत्साह आतापासूनच सुरू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याची शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता आणि रंगरगोटी करण्यात आली आहे. आळंद ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी विशेष कारागीर पाचारण केले असून, आधुनिक मशीनच्या साहाय्याने पुतळ्याचे सौंदर्य अधिक खुलवण्यात आले आहे. पुतळ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला. केवळ सणापुरती स्वच्छता न ठेवता, शिवस्मारकाचे पावित्र्य वर्षभर जपण्यासाठी आळंद ग्रामस्थांनी एक आदर्श निर्णय घेतला आहे. शिवस्मारक समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने आता दररोज दोन व्यक्तींची नियुक्ती करण्यात येत आहे. हे स्वयंसेवक दररोज पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करतात.
‘दिव्य मराठी’च्या छत्रपती संभाजीनगर दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते गुरुवारी ( ८ जानेवारी) सायंकाळी हॉटेल सयाजी येथे झाले. व्यासपीठावर सिल्लोडचे सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी यांच्यासह फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अभिलाष मोहन सोनवणे आणि संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद गणोरकर आदी उपस्थित होते. या बहुचर्चित दर्जेदार दिनदर्शिकेचे वितरण आज, रविवारी ‘दिव्य मराठी’च्या अंकासोबत होणार आहे. रावसाहेब दानवे म्हणाले की, आमचे मित्र शिक्षणमहर्षी मोहन सोनवणे यांनी खामगाव येथे श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत शिक्षणाची गंगा आणली. शाळा- कॉलेज, नर्सिंग कॉलेज, फार्मसी कॉलेजनंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री गोरक्ष आयुर्वेदिक मेडीकल कॉलेजही काढले. यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनींचे उच्च शिक्षणाचे, करिअरचे स्वप्न पूर्ण झाले. कायम विविध उपक्रम राबवणारे मोहन सोनवणे यांनी यंदा दिव्य मराठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची दिनदर्शिकाही काढली आहे. याबद्दल त्यांचे व दिव्य मराठीचे अभिनंदन. श्री गोरक्ष शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे सचिव अभिलाष मोहन सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना व अपघात विम्याचे कवच दिले आहे, सरकारच्या कोणत्याही योजना पासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नाही, अधिकार्यानी शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ मिळुन दिला पाहिजे असे मत आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केले. ते आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण विलास बापू भुमरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण करण्यात आले.यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी अधिकारी विकास पाटील, नंदु अण्णा काळे,दादा बारे, भुषण कावसाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात या योजनेअंतर्गत एकूण १७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना एकूण ३४ लाख रुपयांचे अनुदान आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच सन २०२५-२६ या वर्षासाठी एकूण १० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून त्यांच्यासाठी १९ लाख रुपयांचे अनुदान वितरणासाठी उपलब्ध झाले आहे. या अनुदानाचे वितरण तातडीने करण्यात यावे व कोणताही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार भुमरे यांनी यावेळी दिल्या. या योजनेअंतर्गत मेघलता रामा मुळे, शिवाजी पंढरीनाथ रहाटवाडे, रमेश अंबादास गायके, पियुष राजू शिंदे, मनीषा मलाजी शेकडे, योगेश अंबादास गरजे, मंदाबाई दत्ता घायाळ, गंगुबाई लक्ष्मण भावले, रामभाऊ केशव गालफाडे, मोनिका प्रवीण वाकडे यांना लाभ देण्यात आला. यापुढील काळात शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी. विकास पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपकृषी अधिकारी अशोक वाकचौरे व शाम कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
येथील घृष्णेश्वर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खुलताबाद येथे आज शुक्रवार, दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत खुलताबाद तालुक्यातील विविध शाळांमधून लहान व मोठा गट अशा दोन गटांत एकूण ३० विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक विषयांवर प्रभावी व आत्मविश्वासपूर्ण मांडणी करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक/ प्राचार्य संजय वरकड होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ललिता मेवाळ, उच्च माध्यमिक पर्यवेक्षक परमेश्वर हजारे, माध्यमिक पर्यवेक्षक हरिश्चंद्र धांडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्य संस्थापक कै. पंढरीनाथ पाटील ढाकेफळकर उर्फ भाऊ व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पाहुणे व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेसंदर्भात राजेंद्र सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य संजय वरकड यांनी विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याचे कौतुक करत आत्मविश्वास, वाचन व विचारस्वातंत्र्य जोपासण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपान आढाव, रामेश्वर राठोड, रामेश्वर धारे, मनोज दोडेवार, धीरज मगरे, निलेश बागडे, आनंद पाटील, राजेश बांगे, बिराजदार, मिलिंद बोडके, संगीता शिंदे, प्रभाकर काकडे, रवी सावजी, भगवान कोलते, आढाव, साजिद कुरेशी यांच्यासह शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते व लहान गट प्रथम : कु. सबुरी दादासाहेब पवार, कमला नेहरू कन्या विद्यालय, खुलताबाद द्वितीय : कु. आराध्या रामेश्वर मिसळ, सामंतभद्र विद्यामंदिर, वेरूळ तृतीय : कु. दिव्या हरिभाऊ पाडले, न्यू हायस्कूल, गदाना मोठा गट प्रथम : अर्जुन संतोष ठाले, संत जनार्दन स्वामी विद्यालय, वेरूळ द्वितीय : कु. वैष्णवी जनार्दन कोरडे, जि. प. शाळा, कसाबखेडा तृतीय : कु. प्रगती प्रकाश बरडे, न्यू हायस्कूल, गदाना
कन्नड शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवून शहराला वैभव मिळवून देण्याचा निर्धार माजी आमदार नामदेवराव पवार यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या नव्या नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. पवार म्हणाले, लोकांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. त्यांनी ठाम भूमिका घ्यावी. अडथळा आणणाऱ्यांना योग्य उत्तर दिले जाईल. अंबाडी धरणात भरपूर पाणी असूनही आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. पाणी वितरण यंत्रणा सुरळीत केल्यास ही समस्या कमी होईल. नगराध्यक्षा फरीन बेगम म्हणाल्या, ही निवडणूक माझी नसून सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांची आहे. आपण सर्वजण एक आहोत, हीच कन्नडची ताकद आहे. सासरे स्व. अब्दुल वाहेद सेठ यांचे संस्कार आणि पती अब्दुल जावेद सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल. मूलभूत सुविधांवर लक्ष दिले जाईल. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. नगरसेवक अब्दुल जावेद यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील, यमुनाताई पवार यांच्यासह डॉ. सदाशिव पाटील, सचिन पवार, सचिन काळे, तारेख शेठ, इरफान हाजी, विखारमामू, याकूब शेख यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
मी मुख्यमंत्री असताना या शहराच्या पाणी योजनेसाठी महानगरपालिकेचा हिस्सा राज्य सरकारतर्फे भरण्याचे आश्वासन दिले होते, जेणेकरून शहराची तहान भागेल आणि नागरिकांवरही त्याचा बोजा पडणार नाही. मात्र, या सरकारने ८२२ कोटी रुपयांचे कर्ज काढायला लावले आहे, याची फेड शहरवासीयांना करावी लागणार आहे. शहराला ३६५ पैकी केवळ ४४ दिवस पाणी येते, याचे मोठे दुःख वाटते. इथे माणसं राहतात की नाही? मी मुख्यमंत्री असताना उद्घाटन केलेल्या योजना अद्याप पूर्ण झाल्या नाहीत याचे मोठे दुःख वाटत असल्याची खंत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील नेते उपस्थित होते. शहरातील आणि जालना महानगरपालिकेचे उमेदवार दुसऱ्या स्टेजवर बसलेले होते. या वेळी शहराच्या दुरवस्थेवर बोट ठेवताना ठाकरे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगरमध्ये माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, मात्र दारूचे लायसन्स आणि बिअर बारला परवानगी तातडीने मिळते.’ आग लागली तर विझवायला पाणी नाही “नशामुक्त संभाजीनगर करू म्हणणारे अजित पवार सध्या सत्तेत आहेत, सत्तेत असताना शहरात ड्रग्जचा सुळसुळाट झाला तो त्यांच्याकडून थांबवला जात नाही. हिंदू आणि मुस्लिम दोघांच्याही घरी पाणी येत नाहीये, मग कशाला धर्माच्या नावाने आग लावता? तुमच्याकडे विझवायला पाणी नाही,’ असे ठाकरे म्हणाले. जुना भाजप उरला नाही जुना भाजप आता उरला नाही, आताच्या भाजपला भ्रष्टाचारी, गुन्हेगार आणि बलात्कारी चालत आहेत. बदलापूर प्रकरणातील सहआरोपीला स्वीकृत सदस्य पद देणारा भाजप आता विकृतीचा समर्थक झाला आहे. पालघर साधू हत्याकांडातील आरोपींना ज्यांनी पक्षात घेतले, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असे ठाकरे म्हणाले. ही अस्मितेची लढाई आहे मुंबईतील ठेवी मोडणाऱ्या आणि राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्ता दिली तर महापालिका कर्मचाऱ्यांचे पगार करायलाही पैसे उरणार नाहीत. दीड हजार रुपये देऊन तुमचे मत नाही तर तुमचे आयुष्य घेतले जात आहे. मताची नाही, तर आयुष्याची किंमत करा. पैसे देऊन आणलेला एकही माणूस या मैदानात नाही, हे तुमचे प्रेम आहे. ही आमच्या अस्तित्वाची लढाई नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. गुंडागर्दी बंद करण्यासाठी शहरावर भगवा फडकवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. बाळासाहेबांच्या सभेची आठवण झाली : चंद्रकांत खैरे यांच्या भावना १९८८ च्या बाळासाहेबांच्या सभेला अभूतपूर्व गर्दी जमली होती. त्याचीच प्रचिती आज पुन्हा आली. या मैदानात शिवसैनिकांना बसण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती. हे ठाकरेंवरचे शिवसैनिकांचे प्रेम आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी मी पदाधिकाऱ्यांना फोन केले आणि घरोघरी फिरल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.
‘१२ तारखेपासून मतदानासाठी पैसे मिळतील. ते पैसे तर घ्याच, त्याशिवाय गाडीत असलेले सर्व पैसे घेऊन पळा. पोलिस तुम्हाला काहीही करणार नाहीत. कारण जो तक्रार करायला जाईल तर त्याला पैसे कुठून आले हे सांगावे लागेल. कारण हे पैसे तुमच्या- आमच्यासारख्यांकडून ओरबाडलेले आहेत. ते आपलेच पैसे आहेत. पैसा घेतला तरी मतदान आपल्याच माणसाला करा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीच्या आमखास मैदानावरील प्रचारसभेत ते शनिवारी(१० जानेवारी) बोलत होते. या वेळी राज्य सदस्य अमित भुईगळ, अफसर खान यांच्यासह सर्व ६० उमेदवारांची विचारमंचावर उपस्थिती होती. पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अमेरिकेच्या विश्वगुरूने टेरिफ ५० टक्के वाढवले. भविष्यात ते ५०० टक्के होईल. त्यामुळे पर्यायाने डॉलरची किंमत १३० पर्यंत पोहोचेल. त्या तुलनेत चाकरमान्यांचे वेतन आणि कामगारांची मजुरी वाढणार नाही. मुस्लिमांवर अत्याचार झाले तेव्हा मुस्लिम नेते काय करत होते? मुस्लिम युवकांनी टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवले तेव्हा मदतीसाठी कोणते मुस्लिम नेते अन् नगरसेवक पुढे आले? वंचित बहुजन आघाडी ही धर्मनिरपेक्ष ताकद म्हणून उभी राहिली आहे. त्यामुळे मुस्लिमांवर अत्याचार झाले तेव्हा आमच्याच पक्षाने भूमिका घेतली होती याचा कदापि विसर पडू देऊ नका. त्यामुळे मौलवींनी एमआयएमचा नाद सोडून धर्मनिरपेक्ष भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘लाडकी बहीण’च्या निधीवरून रणकंदन:मतदानाआधी 3000 रुपये वाटपाचा घाट
महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असतानाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निधी वितरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून ३००० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या हालचालींवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र आक्षेप घेतला आहे. हा थेट आचारसंहितेचा भंग असून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महापालिका मतदानाच्या एक-दोन दिवस आधीच (१४ जानेवारी- मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर) सरकार दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याच्या तयारीत आहे. १ कोटीहून अधिक महिला मतदारांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे म्हणजे ही ‘सामूहिक सरकारी लाच’ असून सत्ताधारी पक्षाला फायदा पोहोचवण्याचा हा प्रकार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ....तर खालील कारवाई होऊ शकते निधी वितरणावर स्थगिती: मतदान होईपर्यंत बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेवर आयोग स्थगिती आणू शकतो.नोटीस बजावणे: संबंधित विभागाच्या सचिवांना किंवा जबाबदार मंत्र्यांना आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत नोटीस दिली जाऊ शकते.जाहिरातींवर बंदी: या योजनेच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी जाहिराती किंवा बॅनर्स हटवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. आमचा योजनेला विरोध नाही,पण... काँग्रेसने म्हटले, योजनेला किंवा आर्थिक लाभाला विरोध नाही. मात्र, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता टिकवण्यासाठी निधी मतदानानंतरच द्यावा, अशी मागणी पक्षाने केली. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘संक्रांत गोड’ करण्याच्या नावाखाली सरकार निधी वितरणासाठी आग्रही आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या कडक भूमिकेमुळे या निर्णयाला ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. “ये बंद करने आए थे तवायफो के कोठे, मगर सिक्को की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे,’ अशा शेरोशायरीतून जयंत पाटलांनी भाजपला टोला लगावला. सांगलीत प्रचार सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करून सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजप काय करतोय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत. आता आपले गडीदेखील तिथे चाललेत. काँग्रेस सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. भाजपवाले ओवेसींसोबत बसतात जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएमसोबत युती करतात. ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक जशी जवळ येत आहे, तशीच शहराच्या झाकून ठेवलेल्या वेदनांची फाईल उघडू लागली आहे. दिव्य मराठीतर्फे आयोजित ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांनी मोकळेपणाने मांडलेले अनुभव केवळ तक्रारी नाहीत, तर वर्षानुवर्षांच्या दुर्लक्षाची साक्ष देणारे वास्तव आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याऐवजी नळातून गटाराचे पाणी येते, कचऱ्याचे ढीग वस्त्यांच्या उंबरठ्यावर साचले आहेत, वर्षभरातच रस्ते फोडून नागरिकांचे हाल केले जात आहेत, तर वीज, ड्रेनेज आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा कोलमडलेल्या अवस्थेत आहेत. निवडणूक जवळ आली की कामे सुरू होतात, उद्घाटने होतात; मात्र नागरिकांच्या दैनंदिन जगण्यातील प्रश्न तसेच राहतात. ‘आम्ही कचऱ्यात जगतो’, ‘घरातून बाहेर पडणंही कठीण झालं आहे’ या शब्दांतून प्रभाग ८ मधील असह्य वास्तव समोर आले असून, ही केवळ एका प्रभागाची कथा नसून, संपूर्ण शहराच्या नागरी व्यवस्थेचे विदारक प्रतिबिंब ठरत आहे.कोणत्या समस्या या नागरिकांना त्रास देत आहेत जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्ट मधून... पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी आंबेडकर नगर मध्ये राहणाऱ्या रहिवासी तान्हाबाई पोटफोडे म्हणतात की, ‘आमच्याकडे जेव्हा पाणी सोडल जात तेव्हा दूषित पाणी येते. ड्रेनेज लाईन सगळ्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे तेच पाणी पिण्याच्या पाईप मध्ये उतरत आणि तसच मिक्स होऊन पाणी येते. आम्हाला लाईटचा सुद्धा इतका त्रास आहे की, ज्या दिवशी पाणी येईन त्याच दिवशी त्याच वेळेला आमची लाईट जाते. हा त्रास पूर्ण गल्लीला आहे. त्यामुळे एवढा त्रास आमचा सोडवावा हीच अपेक्षा आहे.’ मुबलक-स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत देशमुख म्हणाले की, आमच्या प्रभागात अनेक समस्या आहेत. यामध्ये मुख्य समस्या आहे ती म्हणजे प्रभागात आरोग्य केंद्र नाही. बाजूच्या प्रभागात जावे लागते. ते सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर परिसरातील मैदाने विकसित करण्याचा आमचा मानस आहे. मागच्या नगरसेवकांनी काहीच कामे केलेली नाहीत. त्याच्या कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलेले असते. अनेक कामे पूर्वी मंजूर झाली असून आता निवडणुकीच्या तोंडावर मतदान मिळावे म्हणनू सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच प्रभागात पिण्याचा पाण्याचा विषय देखील गंभीर झाला आहे. माझ्या प्रभागात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा त्यावर सत्ताधारी सर्वच पक्षांकडून राजकारण केले जात आहे. मुबलक आणि स्वच्छ पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पाण्याची वेळ बदलून महिलांना त्रास होणार नाही अशा वेळी पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असेल. 39 हजारांपेक्षा जास्त मतदार असणाऱ्या प्रभागाचे नगरसेवक त्यांच्या आफीस ते घर रस्ता व्यवस्थित करू शकत नाही ते प्रभागाला काय न्याय देऊ शकतील. आमच्या प्रभागात केवळ बिले काढण्यासाठी कामे केली आहे. जनता त्यांच्यावर नाराज आहे, ठेकेदारांची घरे भरण्याचे काम मागील लोकप्रतिनिधींनी केले आहे. चांगला रस्ता फोडून टाकला प्रभागातील रहिवासी प्रकाश पोटफोडे म्हणाले ,'आमच्या घरासमोर जो रस्ता बांधला त्याला एक वर्ष झाले. मात्र तो आता पाण्याची पाईपलाईन टाकायची म्हणून फोडून टाकला. यामुळे आम्हाला याचा एवढा त्रास होतोय की, घराच्या बाहेर निघता पण येत नाहीये. घरात म्हातारे लोक आहेत. त्यांनी कस राहावं. लहान मुलं इथे खेळतात. ते त्या खड्यात पडत आहेत. या फोडलेल्या रस्त्यामुळे अनेकांच्या ड्रेनेज लाईन पण फुटल्या आहेत. त्यामुळं ते घाणरेडे पाणी पिण्याच्या पाण्यात येतंय. दूषित पाण्यामुळे आमच्या गल्लीतले अनेक लोक आजारी पडले आहेत. आधी चांगले रस्ते करतात , मग ते फोडतात आणि पाईपलाईन टाकायची म्हणून आम्हाला गप्प बसवतात.' नशेखोर मुलांचे प्रमाण वाढतंय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेश जाधव म्हणाले की, आमच्या प्रभागात वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा खूप मोठा आहे. नशेखोर मुलांचे प्रमाण वाढत आहे. मुले नशेखोरर होऊ नये यासाठी आम्ही संस्कार केंद्र सुरू करणार आहोत. तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी आणि बसण्यासाठी नाना-नानी पार्क सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आमच्या प्रभागातील अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आम्ही अभ्यासिका उभारण्याकडे लक्ष देणार आहोत. माझ्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या ही देशी दारुचे आहे त्यामुळे महिलांना सुरक्षित असल्याची भावना येत नाही. यासाठी आम्ही अनेक आंदोलने केली आहेत. अनेक अल्पवयीन मुले नशेखोर झाले आहेत. रोजगार, व्यसनमुक्ती या मुद्यावर काम करणार आहे. कचरा गाडी येत नाही, पाणी येते तर ते गढूळ पाणी येते. हे थांबले पाहिजे. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत. चोहीकडे कचऱ्याचे साम्राज्य नारेगाव भागात राहणारे रहिवासी उबेद बागवान म्हणतात ,'वीस वर्षांपासून ही वस्ती निर्माण झाली आहे. तेव्हापासून आमच्याकडे कचऱ्याची मोठी गंगाच वाहते. गल्ली म्हणू नका, रस्ता म्हणू नका, सोसायट्या जिथे तिथे तुम्हाला कचराच पाहायला मिळेल. आमच्यकडे कचऱ्याचे साम्राज्य आहे. महानगरपालिकावाले इथे येत नाहीत, पाहत नाहीत की आम्हाला काय त्रास होतोय ते. घंटा गाडी आमच्याकडे आठवड्याला एकदा येते. त्यामुळे साचलेला कचरा आम्ही खुल्या जागेवर किंवा मग नाल्यात टाकतो. जेव्हा घंटा गाडीवाला येतो तेव्हा एका ठिकाणी थांबतो आणि सगळ्यांना शिट्टी वाजवून तिथेच बोलवतो. आता मला सांगा एवढा साचलेला कचरा प्रत्येकानी दुरून कसा आणावा. आमच्याकडे जारच्या पाण्याच्या गाड्या येतात. मग घंटा गाडीवाला का नाही?' असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या तोंडावर कामे सुरू राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार लता गायकवाड म्हणाल्या की, आमच्या परिसरात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची आहे. आमच्या प्रभागात पाणी 10 दिवसांनी येते. एक तासभर पाणी येते यातही दुषित पाणी येते. यासोबतच ड्रेनेज आणि कचऱ्याची समस्या आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यातच अल्पवयीन मुलांचे नशेखोरीकडे वळण्याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. ते चांगल्या मार्गावर यावे यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रभागात रस्त्याची अनेक कामे अर्धवट सोडण्यात आलेली आहेत. अनेक दिवस न झालेली कामे निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली आहेत. या कामांची उद्घाटने होऊन 3 वर्षे होऊन गेली आहेत. या आहेत समस्या प्रभागातील मोठी वसाहत असलेल्या मयूर पार्ककडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमण, पथविक्रेत्यांचा भरणा यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.पावसाळ्यात मयूर पार्क, मारुतीनगर, जाधववाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. प्रभागात विजेची मोठी समस्या आहे. रोज अनेक वेळा वीजपुरवठा काही मिनिटांसाठी खंडित होत असतो. विशेषतः सकाळच्या सत्रात वीज नसल्याने नोकरदार वर्गाचे हाल होतात. पाणी, ड्रेनेज व गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात मयूर पार्क, मारुतीनगर, जाधववाडी, सुरेवाडीत रस्त्यांवर पाणी साचते. रस्ते चिखलमय होत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते बरे, असे म्हणण्याची वेळ येत आहे. मयूर पार्क, सुरेवाडी भागात कचरा नेण्यासाठी घंटागाड्या नियमितपणे येतात. जाधववाडी बाजार समिती परिसरात मात्र कचरा उचलला जात नाही. ८ दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त प्रभागातील विविध वसाहतींमध्ये ८ दिवसांआड पाणी येते. मात्र, पाणी पुरेशा दाबाने सोडले जात नाही. त्यामुळे नागरिकांना विद्युत पंप वापरावा लागतो. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक ८ मध्ये मयूरपार्क, ऑडिटर सोसायटी, सिद्धेश्वर नगर, राजे संभाजीनगर, म्हस्केवाडी, प्रथमेश सोसायटी, गुरुदत्त नगर, सुजाता सोसायटी, नाथनगर, सुरेवाडी, वसंतनगर अर्धवट, एस.टी. कॉलनी, गोकुळ नगर, सिद्धेश्वर नगर, म्हसोबानगर भाग, भक्तीनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, मिसारवाडी भाग, M.I.D.C. चिकलठाणा, सनी सेंटर, राठी संसार, आरती नगर भाग, आंबेडकर नगर, फुलेनगर, गौतम नगर, जाधववाडी, रामकृष्ण सोसायटी, मारुती नगर, भवानी नगर, नारेगाव भागश: यांचा समावेश होतो.
जगात पश्चिम जर्मनीला गेलो की फ्रँकफर्ट शहर उद्यागाचे हब म्हणून ओळखले जाते. जर्मनीला जाणारी प्रत्येक व्यक्ती फ्रँकफर्ट शहराला भेट देते. भविष्यात छत्रपती संभाजीनगरची ओळख इलेक्ट्रिक व्हेइकलचे शहर म्हणून नावारूपास येणार आहे. एक लाख कोटींच्या गुंतवणुकीमधून केवळ ५० हजार कोटींचे अँकर प्रोजेक्ट आणण्यात यशस्वी ठरलो. भविष्यात यातून ५० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. मराठवाड्यातील तरुण नोकरीसाठी बेंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद आदी ठिकाणी जातात. तोच रोजगार आता त्यांना स्थानिक ठिकाणी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरवासीयांना दिलेल्या आश्वासनाची परतफेड उद्योगांच्या रूपाने केल्याचे राज्याचे बहुजन कल्याण विकास, अपारंपरिक ऊर्जा, दुग्धविकास व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील छत्रपती संभाजीनगरच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट सावे यांनी आपल्या सादर केली. पायाभूत सुविधा, उद्योग, डीएमआयसी, ऑरिक सिटी, विमानतळाचे विस्तारीकरण, इलेक्ट्रॉनिक, आयटी उद्योग, फार्म व केमिकल उद्योगाचे हब, रस्त्यांचा विकास हे बदलत्या छत्रपती संभाजीनगरचे चित्र असल्याचे अतुल सावे यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत झालेली प्रश्नोत्तरे जशीच्या तशी... प्रश्न : मोठ्या गुंतवणुकीसाठी शहर तयार आहे का? येणाऱ्या लोकांसाठी काय सुविधा राहतील?अतुल सावे : शहरातील गरवारे स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे वन-डे सामने होतील अशी सोय केली जाणार आहे. शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय विकसित केले जात आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक, उद्योग क्षेत्रातील व्यक्ती शहरात येणार असल्याने विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवावे लागणार आहे. यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत असून, ७३४ कोटी मंजूर केले आहेत. भूसंपादनाची अधिसूचना निघाली असून, जमीन ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.प्रश्न : निवडणूक केवळ पाणी, रस्ते दिव्यांवर लढता. आयटी पार्क, उद्याने, उद्योगांवर चर्चा का नाही?अतुल सावे : आता छोट्या बाबींवर वेळ खर्ची घालावा लागणार नाही. शिवसेनेसोबेत असताना छोट्या भावाच्या भूमिकेत होतो. आता बदल झालेला आहे. बिडकीन ते ऑरिक, आॅरिक ते वाळूज आणि ढोरेगाव असा रिंगरोड मंजूर केला आहे. केंब्रिज ते वाळूज अखंड उड्डाणपुलाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. प्रथम खालचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करावा लागेल. तांत्रिक बाबींचा पाठपुरावा सुरू आहे. ५२ हजार कोटींची गुंतवणूक अँकर प्रकल्पात झाली आहे. टोयोटा २० हजार कोटी, जेएसडब्ल्यू २७ हजार कोटी, एथर दोन हजार कोटी याशिवाय लिब्रोझोल, कास्मो, पिरामल, बडवे आदी मिळून एक लाख कोटींवर गुंतवणूक गेली. आठ हजार एकर जागा लघुउद्योगांसाठी डीएमआयसीमध्ये राखून ठेवली असून, तिचे संपादन केले जाईल. ५० एकर जागा टोयोटोला मोफत दिली जाईल. तेथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल आणि यातून दरवर्षी दहा हजार विद्यार्थी प्रशिक्षित होतील. भविष्यात नोकरीसाठी पुणे, मुंबई हैदराबादला जाण्याची गरज भासणार नाही. शहर आता पुढचा विचार करीत आहे.प्रश्न : उद्योजकांना राजकीय स्थैर्य हवे असते. एकीकडे आपण विकासाचे चित्र रंगवता, तर दुसरीकडे ‘खान की बाण’ मुद्द्याआधारे मतदारांना घाबरवले जाते का?अतुल सावे : असे होणार नाही. भाजप स्वबळावर आपला महापौर बनवेल. भाजपने नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर राजकारण केले आहे. रस्ते पाणी, कचरा, ड्रेनेज हे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लावले. शहर उद्योग आणि पर्यटनाचे केंद्र आहे. जगभरातून पर्यटकांसह विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. डीएमआयसीमध्ये अँकर प्रकल्पांचे काम सुरू करण्यात यश आले. आता दावोसमधून अजून प्रकल्प येणार आहेत. याची खात्री नागरिक, उद्योजकांना पटली आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘खान की बाण’संबंधी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही केवळ भगव्याचे राजकारण करणार आहोत आणि ते विकासाचे राहील.प्रश्न : उमेदवारीवरून आपल्यावर आरोप केले. राज्यभर संभाजीनगर गाजले ते भाजपमधील बंडखोरीमुळे?अतुल सावे : ११ वर्षांनंतर मनपाच्या निवडणुका होत आहेत. केंद्र-राज्यातील सत्ता आणि यातून झालेल्या विकासामुळे भाजपकडे मोठा वर्ग आकर्षिला गेला. इच्छुकांची संख्या यातून वाढली. मनपाच्या ११५ जागा आणि उमेदवारी मागणारे १,४०० कार्यकर्ते होते. यात काहीतरी मध्यममार्ग काढावा लागतो. यातही किमान ९० ते ९६ जागांवर आम्ही चांगले लढू शकतो याचा अंदाज आला. इतर मुस्लिम वॉर्डांमध्ये आमचे काम नसल्याने त्याचा विचार होणार नव्हता.प्रश्न : शिवसेनेसोबत युती नाही. स्थानिक नेत्यांनी तोडली, असा आरोप हातोय. विरोधक म्हणून ज्यांच्याविरोधात लढले, निवडणुकीनंतर त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करणार का? आपला मुख्य विरोधक कोण?अतुल सावे : शिवसेनेसोबत ५०:३७ चा फॉर्मुला ठरला होता. भाजपचा नगरसेवक असलेली जागा त्यांना सोडणे शक्य नव्हते. संबंधित नगरसेवकांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला होता. त्यांना उमेदवारी नाकारली असती अथवा जागा शिवसेनेला सोडली असती तर मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला असता. जागेच्या वादासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यात चर्चा झाली. ९४ पैकी ८८ ठिकाणी भाजपची स्थिती चांगली होती. आम्ही चर्चेत असताना शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली. आमची अडचण झाली. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी युती तोडली नाही. शिवसेना मित्रपक्ष असून त्यांच्यावर टीकादेखील आपण केली नाही. आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहोत. आमचा विरोधक एमआयएम आहे. आपण एमआयएमचा हिरवा साप म्हणून उल्लेख करतो. समाजात त्यांच्या माध्यमातून तेढ निर्माण केली जाते.प्रश्न : रिपाइंचा केवळ वापर होत असल्याचा आरोप झाला. त्यांना उमेदवारी का दिली जात नाही?अतुल सावे : रिपाइंच्या नागराज गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली. पडेगाव येथून एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला. भाजपकडे वर्षानुवर्षे काम करणारे मागासवर्गीय पदाधिकारी आहेत.प्रश्न : शहराला पाणी वर्षाला की तीन महिन्यांत मिळेल?सावे : तीन महिन्यांत.प्रश्न : पाणी योजनेचे अपयश उद्धवसेनेचे की भाजपचे?सावे : अडीच वर्षे योजना प्रलंबित ठेवणाऱ्या उद्धवसेनेचे.प्रश्न : तिकिटे कुणी कापली? सावे, कराड की केणेकर?सावे : तिकिटाचा निर्णय एकाचा नसून ६ जणांच्या समितीचा आहे.प्रश्न : राजकीय वारस कोण? अजिंक्य, अनुराग की कार्यकर्ता?सावे : पक्षाचा कार्यकर्ताप्रश्न : युती कुणी तोडली? भाजप की शिवेसना?सावे : शिवसेनेनेप्रश्न : आपले नेतृत्व ओबीसी की सर्वसमावेशक आहे?सावे : सर्वसमावेशक.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत ‘तुझं माझं जमंना आणि तुझ्याविना करमंना’ हे आहे शिवसेना-भाजप युतीचं नातं. आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये आपण युती-आघाडीबाबत खूप माहिती घेतली. आता आपण महापौरपद मिळवण्यासाठीच्या वाटाघाटी समजून घेऊयात. महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष शिवसेना, त्यानंतर भाजप असाच आजवरचा इतिहास राहिला आहे. या आधी झालेल्या निवडणुकीत एमआयएमने तर भाजपचाही रेकॉर्ड तोडला. त्या विषयावर मी नंतर सांगेन. आता महापौरपद घ्यायचं तर संख्याबळानुसार. सुरुवातीला महापौरपद शिवसेनेकडे आणि उपमहापौरपद भाजपकडे हे सूत्र बदललं २००० पासून. तेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सांगितलं, ‘आम्ही जागावाटप करू, तुम्ही काळजी करू नका. परस्परांवर विश्वास ठेवा.’ त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते शांत झाले. मग संख्याबळानुसार एक वर्षासाठी भाजपला महापौरपद मिळालं. तेव्हा ते पहिल्या वर्षी घ्यायचं की नंतर हा मुद्दा चर्चेचा आला. अखेर पहिलं वर्ष भाजपला मिळालं. नंतर शिवसेनेला चार महापौर मिळाले. हीच गोष्ट पुढे कायम राहिली. २००५ मध्ये पहिलं एक वर्ष शिवसेना, मधली दोन वर्षे भाजप आणि राहिलेली दोन वर्षे शिवसेना. म्हणजे तीन विरुद्ध दोन वर्षे. त्यात भागवत कराड यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली. त्यामुळे सध्या तरी दुसऱ्यांदा महापौर होणारे भागवत कराड हे एकमेव आहेत. २०१० मध्ये भाजपने मोठी झेप घेत अडीच-अडीच वर्षे महापौरपद मागितलं. या संधीत विजया रहाटकर यांना अडीच वर्षांचा काळ मिळाला. हा काळ पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या महापौर आहेत. महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा करूनही या महापालिकेत त्याचे तुकडे केले जातात. सलग अडीच वर्षे महापौरपद विजया रहाटकर यांच्यानंतर नंदकुमार घोडेले यांच्या नशिबी आलं. घोडेले यांच्या पत्नी अनिता घोडेले या देखील एक वर्ष महापौर राहिल्या. त्यामुळे एका घरात सर्वाधिक काळ महापौरपद त्यांच्याकडे राहिले. आता या गोळाबेरजेचा विचार केला तर भाजपला पाच वर्षांपेक्षा जास्त काळ महापौरपद मिळालं असलं तरी शिवसेना सर्वाधिक काळ सत्तेवर राहिली. विशेषत: शेवटच्या निवडणुकीत म्हणजे २०१५ मध्येही शिवसेनेचाच बोलबाला राहिला. महापालिकेतील हा वाद वरिष्ठांकडे जायचा तेव्हा खैरे आणि हरिभाऊ बागडे एकमेकांवर टीका करायचे. एकदा तर बागडे यांनी थेट, ‘तुम्ही लोकसभेत लढवून दाखवा,’ असं थेट आव्हानच दिलं होतं. महापालिकेतील एका वादातून कराड यांनाही शिवसेनेनं चांगलंच धारेवर धरलं. वाद मिटल्यानंतर कराड म्हणाले, ‘हे आमचं घरातलं भांडण आहे. आता ते मिटलं.’ थोडक्यात काय तर या महापालिकेत निवडणुकीनंतर जे युद्ध सुरू होतं ते शिवसेना, भाजपमधील जागा पटकावण्याचं असतं.
बाॅम्बे महाराष्ट्राचे नाही, ते तर आंतरराष्ट्रीय शहर!:भाजप नेते अण्णामलाईंचे वक्तव्य, टीकेची झोड
भाजपचे स्टार प्रचारक, तामिळ नेते अण्णामलाईंनी “मुंबई महाराष्ट्राचे शहर नसून ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे’, असे विधान केले. त्यावर िवरोधकांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव उघड होत असल्याची टीका केली. शिंदेसेनेनेही या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपने अण्णामलाईंना नीट समजावून सांगावे, असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले. मुंबईतील वॉर्ड क्रमांक ४७ मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना अण्णामलाई असेही म्हणाले की, केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आणि मनपा भाजपचा महापौर असेल तरच विकास होईल. त्यावर खा. संजय राऊत फडणवीस-शिंदेंना उद्देशून म्हणाले की, “कुणीही लुंग्या-सुंग्या येतो आणि मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून आमच्या तोंडावर चप्पल मारून जातो. मग तुमचा स्वाभिमान कुठे गेला? अण्णामलाईवर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, संबंधित विधानाचा नेमका संदर्भ आणि बोलण्याचा रोख तपासून पाहावा लागेल.
शहरासाठी केवळ ५५ दिवसांत २०१९ मध्ये १६८० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. निविदा प्रक्रिया अंतिम होऊन कार्यारंभ आदेशही मिळाले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टक्केवारीसाठी फाइल मातोश्रीवर अडीच वर्षे प्रलंबित ठेवली. पाणीपुरवठा विभाग, पालकमंत्री ते मातोश्री अशी फाइल फिरत राहिली. अडीच वर्षे पाणीपुरवठा योजनेचे काम प्रलंबित राहिल्याने शहराला पाणी मिळू शकले नाही, असा आरोप राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला. भाजप-शिवसेना युतीचे सरकार २०२२ मध्ये आल्यानंतर नव्याने पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळाली. केंद्राचा एक हजार कोटींचा हिस्सा प्राप्त झाल्याने आता २७४० कोटींवर योजना गेल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहराला तीन महिन्यांत पाणी मिळणार असल्याचा पुनरुच्चारही केला. ‘दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित “नेताजी इन न्यूजरूम’ कार्यक्रमात अतुल सावे यांनी शनिवारी (१० जानेवारी) हजेरी लावली. विधानसभा निवडणूक २०१९ नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची वर्कऑर्डर थांबवली. संपलेली पाणीपुरवठा योजना फडणवीस यांनी पुन्हा सरकार आल्यानंतर नव्याने बैठक घेत युद्धपातळीवर सुरू केली. आता योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. ३७०० हॉर्स पॉवरची चाचणी यशस्वी झाली. शहराच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे सावे यांनी स्पष्ट केले. शहरासाठी ६५० कोटींचे रस्ते, २३० कोटी कचरा नियोजन आणि २७४० कोटी पाण्यासाठी प्राप्त झाले.
एक 2 वर्षांचा मुलगा वाजंत्ऱ्यांचा आवाज ऐकत बॅन्डवाल्यांच्या मागे मागे गेला. एका वाड्याच्या बाहेर तो आवाज ऐकत तिथेच ओट्यावर झोपी गेला. इकडे त्याचे वडील गावभर त्याला शोधून परेशान. शेवटी पोलिस ठाणे गाठत मुलगा हरवल्याची तक्रार करत असतानाच एक इसम तिथे लहान मुलाला कडेवर घेऊन आला. आमच्या वाड्याच्या बाहेर हा मुलगा वाजंत्र्यांच्या मागे मागे आला होता, हा कोणाचा मुलगा आहे? तेवढ्यात त्या मुलाचे वडील आपल्या मुलाला ओळखतात आणि पटकन कडेवर घेतात आणि म्हणतात, अरे हे माझेच पोर.. भीमसेन नाव याचे. पंडित भीमसेन जोशी...भारतीय परंपरेतील एक असा सत्त्वशील सूर, ज्याची जादू जगालाच नव्हे, तर संपूर्ण अवकाशाला व्यापून उरली आहे. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात भीमसेन जोशी यांनी त्यांच्या अपूर्व गायकीने सर्वोच्च स्थान प्राप्त केले. 'रागदरबार'च्या आजच्या भागात आपण पंडित भीमसेन जोशी यांच्या जीवनाविषयी तसेच त्यांनी भारतीय संगीतात दिलेल्या योगदानाबद्दल जाणून घेणार आहोत. भीमसेन जोशी यांचा जन्म कर्नाटकातील गदग येथे 4 फेब्रुवारी 1922 रोजी झाला. भीमसेन जोशी यांचे वडील गुरुराज जोशी हे संस्कृत पंडित होते. त्यांना वाटायचे की भीमसेनने संस्कृतचा अभ्यास करून पंडित व्हावे. भीमसेन यांचे प्राथमिक शिक्षण गदगमध्ये झाले. परंतु, त्यांना शालेय शिक्षणात कधीच रस आला नाही. लहान वयातच त्यांना संगीताचे वेड लागले होते. पंडित भीमसेन जोशी यांना संगीताची विशेषतः गायनाची प्रचंड आवड होती. आपण संगीताशिवाय राहूच शकणार नाही, अशी त्यांची भावना होती. जिथे कुठे वाजंत्री ऐकू येई, त्या दिशेने भीमसेन जोशी निघायचे. भीमसेन जोशींचे हे वागणे बघून वडिलांनी चक्क त्यांच्या सगळ्या शर्टवर 'जोशी गुरुजींचा मुलगा' असे लिहून ठेवले. जेणेकरून भीमसेन पुन्हा कुठे वाजंत्र्यांच्या मागे मागे गेले आणि हरवले तर लोकांना समजावे आणि घरी आणून सोडतील, असा त्या मागचा उद्देश. भीमसेन जोशी यांच्या डोक्यातून गाण्याचे वेड जायलाच तयार नव्हते. एकदा भीमसेन जोशी शाळेतून घरी आले आणि त्यांनी त्यांच्या आईला विचारले की हे ग्वाल्हेर कुठे आहे? त्यावर आईने सांगितले की ते इथून खूप लांब उत्तरेकडे आहे. हा प्रश्न विचारण्या मागची गोष्ट अशी होती की भीमसेन जोशींनी बाहेर कुठेतरी एक गाण्यातली चीज ऐकली होती आणि मास्तरांना विचारले असता ही ग्वाल्हेर घराण्याची चीज आहे. ती चीज भीमसेन जोशींना फार आवडली होती. त्यांनी मनाशी पक्क केले होते की आता ग्वाल्हेरला जाऊनच गाणे शिकायचे आणि वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी गुरूंच्या शोधात घर सोडले. सरावासाठी भीमसेन जोशी उस्ताद अब्दुल करीम खान, वझेबुवा, केसरबाई केरकर तसेच उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या रेकॉर्डिंग ऐकत रियाज करायचे. पु. ल. देशपांडे यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत सांगताना भीमसेन जोशी म्हणतात, खाँसाहेबांची पहिली रेकॉर्ड निघाली 'पिया बिन..' आमच्याकडे एक दुकानदार होता. तो नवीन रेकॉर्ड आली की जाहिरातीसारखी लावायचा. आतासारखे पेपरमध्ये वगैरे येत नव्हते. शाळा सोडून मी तिथे जाऊन बसायचो. ते इतक्या वेळेला ऐकले की असे वाटायचे, अशा प्रकारचे गाणे मला यायला पाहिजे. हा निश्चय मनात पक्का केला. भीमसेन जोशी घर सोडून गुरूंच्या शोधात गेले आणि इकडे सगळीकडे शोधाशोध सुरू झाली होती. त्यांच्या वडिलांना एवढी खात्री होती की संगीताच्या शोधातच आपला मुलगा भटकत असणार. खिशात पैसा आणि खायला अन्न नाही, अशा परिस्थितीत भीमसेन जोशी यांनी ग्वाल्हेर, लखनऊ, रामपूर अशी शहरे पालथी घातली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्यांनी विनातिकीट केला. याचाही एक किस्सा आहे.. भीमसेन जोशी गुरूच्या शोधात ग्वाल्हेरपर्यंत गेले. या प्रवासात त्यांच्या खिशातले पैसे संपले की ते रेल्वेत गाणं गायचे. लोकांना वाटायचे, हा भिकाऱ्याचा पोरगा लहान असून सुद्धा छान गातो. म्हणून जेवायला द्यायचे. कोणी पैसे द्यायचे असे. असे करत त्यांनी चतुराईने रेल्वेचा प्रवास केला. एकदा तर भीमसेन जोशींना एका पोलिस शिपायाने पकडले, तेव्हा देखील भीमसेन यांनी त्यांनाही गाणे ऐकवले आणि त्या शिपायाने सोडूनही दिले. इकडे भीमसेन जोशींच्या वडिलांनी शोधमोहीम सुरू केलीच होती. अखेर जालंधर येथे पंडित मंगतराम यांच्या घरी भीमसेन जोशी सापडले. तिथून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरी आणले. मुलाचे गाण्यासाठीचे विलक्षण वेड पाहता, वडिलांनी भीमसेन जोशींना त्यांच्या गावाजवळ कुंदगोळ गावी नेले. तिथे रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे भीमसेन जोशींनी शिकण्यास सुरुवात केली. परंतु, रामभाऊ कुंदगोळकरांकडे शिकणे काही सोपे नव्हते.. सूर चुकला आणि गुरुजींनी अडकित्ता फेकून मारला.. भीमसेन जोशींनी पंडित रामभाऊ कुंदगोळकरांकडे गुरू-शिष्य परंपरेने शिकण्यास सुरुवात केली. तिथे गुरूंनी घरच्या कामात चांगलेच जुंपले होते. रामभाऊ कुंदगोळकरांचे शिष्यत्व मिळवण्यासाठी त्यांना अथक परिश्रम घ्यावे लागले. एक-दीड किमी अंतरावरून पाणी आणावे लागायचे आणि तेव्हा मग गुरुजी त्यांना शिकवायचे. पु.ल. देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीत भीमसेन जोशींनी याविषयी सांगितले आहे की, 'रामभाऊ कुंदगोळकर गुरुजी परीक्षा बघायचे. कारण माझ्यासमोर दोन-चार माणसं गाणं शिकायला आली. तिथे पुण्याचा दुष्काळ होता. पाणी भरणे वगैरे बघून ती पळून गेली. हा खरा टिकणारा आहे की नाही, खरा शिकतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी वर्षभर आम्हाला शिक्षा दिली. दोन-दोन घागरी घ्यायच्या आणि विहिरीवरून पाणी आणायचे. तेव्हा त्या परीक्षेत मी पास झालो.' पुढे भीमसेन जोशी सांगतात, 'मी पहाटे चारला उठायचो. मग एक तासभर पाणी वगैरे भरायचे. 50-60 घागरी पाणी आणायचे. मग तंबोरा घ्यायचा. मग त्याने सुरुवात करायची. भैरव रागाचा रियाज सप्तकात करायचा. खर्ज वगैरे लावून. एकदा मी शिकत असताना माझा आवाज बसला होता. तरी सुद्धा गुरुजी रियाज करून घेत होते. पण मला त्याचा त्रास झाला नाही. मंद्रामध्ये रियाज करायला लावला जायचा. मध्य सप्तकात वगैरे नाही. विश्रांती देत-देत असा रियाज करत करत मग तो त्रास नाहीसा झाला.' एके दिवशी सराव सुरू असताना भीमसेन जोशींचा सूर चुकला. यावर त्यांच्या गुरूंनी हातात असलेला अडकित्ता त्यांना फेकून मारला आणि त्याची खूण भीमसेन जोशींच्या डाव्या डोळ्यावर आयुष्यभर राहिली, असाही एक किस्सा फार प्रचलित आहे. 16 तासांचा रियाज.. पंडित रामभाऊ हे सवाई गंधर्व म्हणून ओळखले जायचे. त्यांच्याकडेच भीमसेन जोशी यांनी सुरुवातीचे शिक्षण गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतले. सवाई गंधर्व हे किराणा या घराण्याचे गायक होते. सवाई गंधर्व हे अतिशय कडक शिस्तीचे गुरू होते. भीमसेन जोशी यांच्याकडून ते सुरुवातीला रोज 8 तास रियाज करून घ्यायचे. या काळात तोडी, पुरिया, मुलतानी या रागांवर मेहनत घेतली. हा रियाज पुढे जाऊन 16 तासांचा झाला. 1936 ते 1941 या काळात भीमसेन जोशी यांनी शास्त्रीय संगीत पूर्णपणे आत्मसात केले. त्यानंतर गुरूंच्या आज्ञेने भीमसेन जोशी पुण्याला आले. भीमसेन जोशींनी 1941 नंतर स्वतंत्र मैफिलींना सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय केवळ 19 वर्षे होते. 1950 ते 1970 या काळात तर भीमसेन जोशींचे नाव जगभर पसरले होते. 'आहे मनोहर तरी' या पुस्तकात लेखिका सुनीता देशपांडे लिहितात, भाई (पु.ल. देशपांडे), वसंता (वसंत देशपांडे) आणि भीमसेन, पुण्यात पंचविशीतील तरुण जवळचे मित्र होते. त्यांना एकमेकांच्या कलेचा खूप आदर होता. पण तरुणपणीचे रक्त...एका शनिवारी पु. ल. देशपांडेच्याच घरी वसंतराव गायले ते भीमसेनच्या वरचढ, म्हणजे आदल्या शनिवारी भीमसेन गायले होते, ते सर्व आणि शिवाय इतर थोडे जास्त. पहाटे सगळे घरी गेले, पण भीमसेन यांच्यातील कलावंताचा अहंकार दुखावला गेला असावा. पु. लं.च्या घराची बेल काही तासांतच वाजली. सुनीताबाई लिहितात…मला दुधवाला असेल असे वाटले, म्हणून दार उघडले, तर भीमसेन हजर! परत सर्व जमवाजमव केली आणि भीमसेनची एक उत्कृष्ट मैफिल झाली. घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल पण मांडीला खरचटणार नाही.. पंडित भीमसेन जोशींना गाड्या फार आवडायच्या. नुसत्याच आवडत नव्हत्या तर त्या भरधाव वेगाने पळवण्याचा जणू त्यांचा छंदच होता. या बाबतीतला एक किस्सा लेखक सुधीर गाडगीळ यांनी सांगितला आहे. ते सांगतात, 'पंडितजींना गाड्यांची खूप आवड होती. गाडी भरधाव चालवण्यात जसा त्यांचा हातखंडा होता तसाच गाडी दुरुस्त करण्यातही ते तज्ज्ञ होते. गाडीच्या इंजिनसह सगळ्या पार्टची माहिती त्यांना होती. बिघडलेली गाडी, काय केले तर दुरुस्त होईल आणि किती वेळात होईल, ही माहिती ते गॅरेजवाल्याला अगदी बिनचूक सांगायचे.' पुढे सुधीर गाडगीळ सांगतात, 'एकदा नगरला कार्यक्रमाला जायचे होते. पंडितजींनी नुकतीच नवीन मर्सिडीज घेतली होती. मी त्यांच्या घरी पोहोचताच त्यांनी मर्सिडीज काढली आणि म्हणाले बसा. गाडी अर्थातच पंडितजी चालवत होते. सवयीने त्यांनी ती फूल स्पीडमध्ये सोडली होती. तासाभरातच आम्ही कोरेगाव भीमाला पोहोचलो. समोर नदीवरचा पूल होता. पलीकडे एक ट्रक येताना दिसत होता. पूल तसा अरुंदच होता. पण पंडितजी काही वेग कमी करायला तयार नव्हते. मी जीव मुठीत धरून गाडीत बसलो होतो आणि ट्रक अगदी गाडीच्या शेजारून गेला पण धक्का न लागता.' गाडगीळांनी यावर न राहवून हुश्श केले. यावर भीमसेन जोशी त्यांना म्हणाले, घाबरू नका गाडगीळ, लुगडं फाटेल, पण मांडीला खरचटणार नाही.. भीमसेन जोशी यांना कारची आवड होतीच आणि जिथे कुठे कार्यक्रम असेल तिथे स्वतः गाडी चालवत ते जायचे. संपूर्ण भारत त्यांनी गाडी चालवत त्या काळी पालथे घातले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भीमसेन जोशींचे भारतभर कार्यक्रम होण्यास सुरू झाले होते. अनेकवेळा तर सलग 2 दिवस गाडी चालवून लगेच मैफिलीत गायलाही बसायचे आणि लगेच तिथून निघून गाडी चालवत दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रमाला हजर असायचे. थकवा आणि मरगळ हे शब्दच जणू त्यांच्या शब्दकोशात नव्हते. भीमसेन जोशींना चंबलच्या डाकूंनी आडवले... पंडितजींचा एक किस्सा तर फारच भन्नाट आहे. भीमसेन जोशींना प्रवासात असताना एकदा चंबलच्या डाकूने अडवले होते. झाले असे की, तो काळ होता 60 च्या दशकाचा. दिल्लीत भीमसेन जोशी गाण्यासाठी गेले होते. दिल्लीची मैफल संपवून ते मुंबईकडे परत निघाले होते. सवयीनुसारच पंडितजी गाडी चालवत होते. ग्वाल्हेर आल्यावर एका पेट्रोल पंपावर ते थांबले. तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. तेव्हा पेट्रोल पंपवाल्यांनी विचारले, 'तुम्ही कुठे चालला आहात?' त्यावर सांगितले की आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. तेव्हा पेट्रोल वाल्याने सांगितले की आता पुढे जाऊ नका. कारण पुढे चंबळच्या खोऱ्यात खतरनाक इब्राहीम डाकूचा एरिया आहे. तो कोणालाही जीवंत सोडत नाही. आज इथेच मुक्काम करा आणि पहाटे निघा. त्यावर भीमसेन म्हणाले, आम्ही गाणे बजावणे करणारे, आम्हाला कोण काय करणार? अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकतील ते भीमसेन कसले? पुढे गेल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास चंबळच्या खोऱ्यात दरोडेखोरांची टोळीच उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बंदुका होत्या. त्यांचे चेहरे मफलरने झाकले होते. त्यांनी गाडी अडवली आणि डिक्की उघडायला लावली. भीमसेन जोशी यांनी उघडली. तिथे वाद्य ठेवलेली होती. वाद्याची झिप उघडायला सांगितली. तिथे हार्मोनियम, तबला, ढोलकी अशी वाद्य होती. त्यावर त्या डाकूंचा मुखिया म्हणाला, आप तो कोई गाणे बजाने वाले कलाकार लगते है. त्यावर आप्पा जळगावकर म्हणाले, जी हां त्यावर मुखिया ने विचारले, कौन है गाने वाला? तेव्हा त्यांनी पंडितजींकडे बोट दाखवून सांगितले, भीमसेन जोशी! ते नाव ऐकल्यावर त्या डाकूने लोटांगण घातले आणि म्हणाला, भाईसाब, गलती हो गयी. आप तो माता सरस्वती के भक्त हो. असे म्हणून सन्मानाने त्यांनी त्यांना पाठवून दिले. भीमसेनजी ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर हसले आणि म्हणाले, मी म्हणालो होतो ना. डाकू आम्हाला काय करणार? भीमसेन जोशी यांचे नाव तेव्हा कॅसेट आणि रेडिओच्या रूपाने त्या डाकूपर्यंत देखील पोहोचले होते आणि त्यातूनच त्यांनी त्यांची सुटका केली, असा किस्सा आप्पा जळगावकर यांनी सांगितला. आप्पा जळगावकर भीमसेन जोशींच्या सोबत हार्मोनियमच्या साथीसाठी नेहमी असायचे. पंडित भीमसेन जोशींची कीर्ती आता जगभर पसरली होती. त्यांचे भारतात मैफिली तर होत होत्याच, परदेशातही त्यांच्या मैफिली चांगल्याच गाजल्या. भीमसेन जोशी हे लखनऊआकाशवाणी केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार झाले होते. या काळात त्यांना थिरकवाजींचा तबला मनसोक्त ऐकायला मिळाला. बिस्मिल्लाह खान यांच्याशी तर अगदी मैत्रीचे नाते तयार झाले होते. भीमसेन जोशी यांच्या गायकीचे वैशिष्ट्य म्हणजे आक्रमकता, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासून पकड घेणारी होती. नाटक चित्रपटातील योगदान भीमसेन जोशी यांनी अनेक नाटक तसेच चित्रपटांमध्येही मोठे योगदान दिले आहे. 'धन्य ते गायनीकळा' ह्या नाटकाचे त्यांनी संगीत-दिग्दर्शन केले (1968). गुळाचा गणपती, बसंतबहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे ह्या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. संतवाणी हा अभंगांचा व रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार, बालमुरलीकृष्णन् ह्या दाक्षिणात्य संगीततज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबतचे ध्वनिमुद्रण, भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात (1997) संसदेत सादर केलेले वंदे मातरम्, मिले सूर मेरा तुम्हारा ह्या राष्ट्रैक्याच्या बहुभाषिक गीतातील प्रमुख सहभाग ही त्यांची मैफलींशिवायची गानविविधता आहे. पुण्यातील रामेश्वर राममंदिरातर्फे भीमसेन जोशींना 'पंडित' या उपाधीने 1954 साली सन्मानित करण्यात आले, तर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे 'गायनाचार्य' उपाधी मिळाली. भीमसेन जोशी यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, पद्मश्री (1972), पद्मभूषण (1985), पद्मविभूषण (1999) ह्या व 2008 मध्ये ‘भारतरत्न’ ह्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्यांव्यतिरिक्त संगीतरत्न (1971), संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (1976) इत्यादी सन्मान त्यांना लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांनी त्यांना सन्मान्य डी. लिट पदवी प्रदान केली. अभंगांच्या नव्या पर्वाचा उदय पंडित भीमसेन जोशी यांनी 'संतवाणी'च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना एक सुखाद धक्का दिला. संगीतकार राम फाटक यांनी 'स्वरचित्र' उपक्रमाद्वारे पंडितजींकडून संतवाणी गाऊन घेतली आणि तिथूनच भावस्पर्शी अभंगांच्या एका नव्या पर्वाचा उदय झाला. 'ज्ञानियाचा राजा', 'माझे माहेर पंढरी', 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल', 'इंद्रायणी काठी देवाची आळंदी' आणि 'रूप पाहता लोचनी', ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘टाळ बोले चिपळीला’, ‘बिजलीचा टाळ नभाचा मृदंग’ यांसारख्या शेकडो अजरामर रचनांमुळे त्यांच्या प्रत्येक मैफलीत संतवाणीचा आग्रह होऊ लागला. 1968 पासून लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या या भक्तिपर गीतांनी विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, आजही 'संतवाणी'च्या ध्वनिमुद्रिका रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसेच भीमसेन जोशी यांना ख्यालगायकीचा राजा म्हणून ओळखले जाते. गुरुजींच्या स्मरणार्थ 'सवाई गंधर्व महोत्सवा'ची सुरुवात 1952 मध्ये सवाई गंधर्वांच्या निधनानंतर, त्यांचे जावई नानासाहेब देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी 1953 मध्ये पुण्यात 'सवाई गंधर्व पुण्यतिथी संगीत महोत्सवा'ची मुहूर्तमेढ रोवली. काळाच्या ओघात या महोत्सवाचे रूपांतर एका राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित सोहळ्यात झाले असून, नामवंत दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणासह पंडितजींच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. पंडित भीमसेन जोशी यांचा असा विश्वास होता की, खरा कलाकार तोच असतो जो कौतुकासाठी प्रेक्षकांकडे पाहत नाही, तर आधी स्वतःच्या सादरीकरणाचा आनंद घेतो आणि नंतर प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा विचार करतो. जर एखादा कलाकार आपल्या सर्जनशील प्रयत्नाने समाधानी असेल, तर त्याला खात्री बाळगता येते की प्रेक्षकही त्याच्या संगीताचे कौतुक करतील. भीमसेन जोशींचे वैवाहिक जीवन पंडित भीमसेन जोशी यांचे दोन विवाह झाले होते. पहिले लग्न त्यांच्या मामे बहीण असलेल्या सुनंदा यांच्याशी झाला, तर दुसरा विवाह नाटकाच्या निमित्ताने आयुष्यात आलेल्या वत्सला यांच्याशी झाला. दुसरे लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नीकडे तसेच पहिल्या पत्नीपासून झालेल्या अपत्यांकडे भीमसेन जोशींचे काहीसे दुर्लक्षच झाले. पुण्यात वास्तव्यास असताना भीमसेन जोशी त्यांच्या दुसरी पत्नीसह व मुलांसह मोठ्या बंगल्यात राहायचे. तर तिथेच त्यांची पहिली पत्नी व पहिल्या पत्नीची मुले वाड्यात एका खोलीत राहत होते. पहिल्या पत्नीवर आपण मोठा अन्याय केला आहे, याचा गंड मनात असल्याने भीमसेन जोशी पहिल्या कुटुंबाला जमेल तशी मदत करत असत. भीमसेन जोशी यांचे पहिले पुत्र राघवेंद्र यांनी त्यांच्या पुस्तकात याविषयी सविस्तर लिहिले आहे. स्वरभास्कर कायमचा मावळला वत्सला बाईंच्या मृत्यूनंतर भीमसेन जोशी एकाकी राहायला लागले होते. तसेच त्यांच्यावर नऊ शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती देखील काहीशी अस्वस्थ होती. भरलेल्या संगीत दरबारात अचानक सतारची तार तुटावी आणि सर्वत्र गंभीर वातावरण व्हावे, अगदी तसे 24 जानेवारी 2011 रोजी झाले. भीमसेन जोशी यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले आणि स्वरभास्कर कायमचा मावळला. परंतु, त्या भास्कराचे सूर अजूनही अजरामर आहेत आणि राहतील.
राजधानी दिल्ली देशात सर्वाधिक प्रदूषित शहर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील वार्षिक सरासरी पीएम १० चे प्रमाण (प्रदूषणाचे १० मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाचे सूक्ष्म कण-पर्टिक्युलेट मॅटर) २०२५ मध्ये देशात सर्वाधिक असून, ते १९७ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतके नोंदले गेले. हे प्रमाण राष्ट्रीय मानक असलेल्या ६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपेक्षा जवळपास तीनपट अधिक असल्याचे एका विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. ऊर्जा आणि स्वच्छ हवा संशोधन केंद्राने […] The post राजधानी दिल्ली देशात सर्वाधिक प्रदूषित शहर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्र प्रथमचा विसर, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल छ. संभाजीनगर : प्रतिनिधी महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा पुढच्या ३ दिवसांनी थंड होणार आहेत. मतदानासाठी ५ दिवस शिल्लक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरला गेले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जावून भर प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चॅलेंज दिले. यावेळी त्यांनी मला शल्य […] The post भाजपचे आता भ्रष्टाचार प्रथम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साता-यात कारवाई, ३० लाखांचा मुद्देमाल जप्त सातारा : प्रतिनिधी जावळीतील ड्रग्जनिर्मिती कारखान्यावरील धाडीनंतर खटाव तालुक्यात कृषी विभाग आणि पोलिसांनी संयुक्त धाड टाकून बनावट खत निर्मिती करणा-या कारखान्याचा पर्दाफाश केला. कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) वडूज (ता. खटाव) येथे टाकलेल्या धाडीत लाखो रूपये किंमतीची बनावट खते आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली. तसेच कारखाना सील […] The post बनावट खत कारखान्याचा पर्दाफाश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोदींविरुद्ध पोस्ट केल्याने अटक
विदेशातून येताच डॉ. पाटील यांच्यावर कारवाई, १५ तास चौकशी मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह टीका केल्याचा ठपका ठेवत भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक डॉ. संग्राम पाटील यांची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. शनिवारी पहाटे त्यांना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. डॉ. संग्राम पाटील यांची तब्बल १५ तासांनंतर मुंबई पोलिसांनी सुटका […] The post मोदींविरुद्ध पोस्ट केल्याने अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जनसेवा माथाडी व श्रमिक कामगार संघटनेचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक २०२५-२६ मधील काँग्रेस व वंचित बहुजन अघाडीच्या सर्व उमेदवारांना विविध सामाजिक संघटन कडून जाहिर पाठिंबा मिळत आहे. जनसेवा माथाडी व श्रमिक कामगार संघटनेकडून द. ९ जानेवारी रोजी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांना बाभळगाव निवासस्थानी लेखी पत्र सुपूर्द करीत लातुर शहर महानगरपालिका निवडणुकीतील शहरातल्या काँग्रेस व […] The post जनसेवा माथाडी व श्रमिक कामगार संघटनेचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओबीसी बहुजन आघाडीचा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन आघाडी पक्षाकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या उमेदवारास जाहीर पाठिंबा देण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विचारधारा लोकशाही मूल्य व भारतीय संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्य यांचे रक्षण करणे तसेच महाराष्ट्रातील ओबीसी बहुजन भटके आदिवासी दलित अल्पसंख्यांक अशा सर्वांना सोबत घेऊन जाण्याची […] The post ओबीसी बहुजन आघाडीचा काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपाची कुटनिती ओळखा; मतांचे विभाजन रोखा
लातूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीच्या वादळाने भाजपाचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता भाजपाच्या कमळाने घड्याळाला सोबत घेत दलित, अल्पसंख्यांकांच्या मतांचे विभाजन करण्याची कुटनिती सुरु केली आहे. सुजान मतदार बंधू-भगिणींनी भाजपाची कुटनिती ओळखून मतांचे विभाजन रोखावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहुजन […] The post भाजपाची कुटनिती ओळखा; मतांचे विभाजन रोखा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सत्तेचा, पैशांचा जोर दाखवणा-यांचा माज उतरवा
लातूर : प्रतिनिधी अलीकडच्या काळात पैसा, जातीभेद व दमदाटी करुन निवडणुका जिंकल्या जात आहेत. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकल्यावर सत्तेत आलेले मनमानी कारभार करत आहेत. याचा फटका सर्व समान्यांना बसत आहे. यासाठी आपल्या मताची ताकत न विसरता आपल्या मतातून सत्तेच्या व पैश्यांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचे मनसुबे बाळगणा-याचा माज उतरवा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा […] The post सत्तेचा, पैशांचा जोर दाखवणा-यांचा माज उतरवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस-वंचितला साथ देऊन विकासाचा रथ गतिमान करा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेची निर्मिती झाली तेव्हापासून या महानगरपालिकेचे प्रतिनिधीत्व काँग्रेस पक्षानेच केले आहे. एक अपवाद वगळला तर आतापर्यंत जे जे महापौर झाले ते सर्व काँग्रेस पक्षाचे होते. या सर्वानी लातूर शहर महापालिकेचा चौफेर विकास केला आहे. विकासरत्न विलासराव देशमुख यांचा वारसा घेऊन आज माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव […] The post काँग्रेस-वंचितला साथ देऊन विकासाचा रथ गतिमान करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फिरत्या तारांगणातून उलगडले ब्रह्मांडाचे रहस्य
अहमदपूर : प्रतिनिधी येथील यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘फिरते तारांगण’ या अनोख्या उपक्रमातून ब्रह्मांडातील अद्भुत रहस्यांचा रोमांचक अनुभव घेतला. कला व भूगोल विभागाच्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा भक्कमपणे रुंदावल्या. हवा भरून उभे केलेल्या विशेष डोममध्ये बसून विद्यार्थी जणू आकाशगंगेतच प्रवेश करतात असा भास होतो. पाहताना चंद्र, सूर्य, तारे आपल्या अगदी जवळ असल्याचा […] The post फिरत्या तारांगणातून उलगडले ब्रह्मांडाचे रहस्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फातिमा शेख यांच्या कार्याचा प्रशासनास विसर
शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जोडीने स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेणा-या फातिमा शेख यांचे स्त्री शिक्षणात उल्लेखनीय काम आहे मात्र ज्या स्त्री शिक्षणासाठी त्या आग्रही होत्या त्या शालेय मुलींना आज त्यांची साधी ओळख ही नसणे हे अनाकलनीय आहे. फातिमा शेख यांच्या कार्याचा प्रशासनास विसर पडला असून शासन स्तरांवर ही आद्य शिक्षिका फातिमा […] The post फातिमा शेख यांच्या कार्याचा प्रशासनास विसर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
लातूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेला आणि विकासाभिमुख धोरणांना समर्थन देत भारतीय जनता पक्षाचे पानगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात हालचाल निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. या प्रवेश प्रसंगी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख […] The post शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंजा आपला नव्हता, घड्याळ मोदींसोबत अन् पाना जोडीदार:अमरावतीत ओवेसींचा प्रस्थापित पक्षांवर घणाघात
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शनिवारी अमरावती येथे जाहीर सभा घेत धर्मनिरपेक्ष पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. वलगाव रोडवरील ॲकडेमीक हायस्कुलच्या प्रांगणात झालेल्या या सभेत ओवेसी म्हणाले की, जुलमी सत्ताधाऱ्यांशी लढण्याची क्षमता धर्मनिरपेक्ष पक्षांमध्ये उरलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पाठिशी उभे राहण्यात काहीच अर्थ नाही. ओवेसी यांनी यावेळी 'कमळ', 'पाना', 'हात' आणि 'घड्याळ' या चिन्हांना मत देणे म्हणजे मतांचा अपव्यय असल्याचे म्हटले. काँग्रेस अनेक वर्षे सत्तेत होती, मात्र त्याच काळात अल्पसंख्याकांवर अनेक हल्ले झाले आणि त्यांना तुरुंगात डांबण्यासाठी कायदे केले गेले. 'युएपीए'सारखा कायदा काँग्रेस नेते पी. चिदंबरम गृहमंत्री असतानाच करण्यात आला, त्यामुळे 'पंजा' कधीच आपला नव्हता, असे ते म्हणाले. 'घड्याळ' सध्या मोदींच्या समर्थनार्थ उभे आहे, तर युवा स्वाभिमान पक्षाचा 'पाना' देखील त्यांचाच जोडीदार असल्याने त्यालाही मत देणे योग्य नाही, असे ओवेसींनी स्पष्ट केले. खासदार ओवेसींच्या मते, अल्पसंख्याकांना योग्य नेता न मिळाल्याने आतापर्यंत त्यांचा सर्वांनी वापर केला. त्यामुळे त्यांना सजग करण्याचे काम मी करत आहे. यासाठी अनेक जण माझा द्वेष करतात, पण मला त्याची पर्वा नाही. मी कोणालाही घाबरत नाही. आतापर्यंत मिळालेल्या प्रत्येक मंचावर मी माझी बाजू भक्कमपणे मांडली आहे. 'डरेगे तो मरेंगे' असे म्हणत त्यांनी उपस्थितांना धीट होण्याचा सल्ला दिला. या जगात फक्त अल्लाहला घाबरले पाहिजे, इतर कोणालाही नाही, असेही ते म्हणाले. आपल्या ३४ मिनिटांच्या भाषणात ओवेसींनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. शेतकरी, दलित, बेरोजगार आणि अल्पसंख्याकांवरील दुष्टचक्र कायम असून ते दिवसेंदिवस वाढत आहे. अमरावतीसह राज्यात शाळांची स्थिती वाईट आहे, दवाखाने योग्य स्थितीत नाहीत आणि पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. हे सर्व बदलायचे असेल तर जनतेसाठी लढणारा पक्ष सत्तेत आला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. ओवेसींनी केंद्र सरकारच्या चीन धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या केंद्र सरकार चीनला पायघड्या घालत आहे आणि 'आमच्या देशात या आणि गुंतवणूक करा' असे म्हणत आहे. मात्र हाच चीन भारताविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्या पाकिस्तानला मदत करतो आहे. चीनने भारताची सुमारे १५ हजार चौरस किलोमीटर जमीन हस्तगत केली असून त्यावर सैनिकी चौक्या बसविल्या आहेत. भारताच्या नाकावर टिच्चून भारतावरच हल्ले करणाऱ्या चीनला देशात गुंतवणुकीसाठी आमंत्रण देणे हा देशभक्त म्हणवणाऱ्या भाजप-संघाचा देशद्रोह नव्हे का, असा सवालही ओवेसींनी विचारला.
अमरावती कॉटन मार्केटमधील फळ बाजारात आग:पपईसह अनेक फळे जळून खाक, मोठे नुकसान
अमरावती येथील जुन्या कॉटन मार्केटमधील फळ बाजारात शनिवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत पपईसह अनेक फळे जळून खाक झाली, ज्यामुळे पाच ते सात फळ उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या शेडमध्ये ही घटना घडली. येथे ठेवलेल्या पपईच्या ढिगाला आग लागली. बहुतेक फळ उत्पादकांनी आपली फळे येथे ठेवली होती, ज्यात पपईचा सर्वाधिक भरणा होता. कागदात गुंडाळलेली आणि प्लॅस्टिकच्या कॅरेटमध्ये ठेवलेली अनेक फळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीच्या ज्वाळा दिसताच तेथील दुकानदारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या बंबाने आग लवकर आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील मोठा धोका टळला.
नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी: नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे पिके चांगली बहरली होती, मात्र वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांचे चांगले उत्पादन घेण्याचे स्वप्न भंगले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून रानडुक्कर, हरिण आणि नीलगाय यांसारखे वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेतात घुसून तुरीचे उभे पीक फस्त करत आहेत. अनेक ठिकाणी पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरले असून, त्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकरी स्वतः रात्री जागून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु वन्य प्राण्यांची वाढती संख्या पाहता परिस्थिती नियंत्रणात आणणे कठीण झाले आहे. एका रात्रीत होणाऱ्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, कर्जफेड आणि दैनंदिन खर्च भागवणे त्यांच्यासाठी आव्हान बनले आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी केली आहे. ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनीही संबंधित विभागाशी चर्चा करून प्रभावी उपाययोजना राबवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तुरीच्या उत्पादनावर अनेक शेतकऱ्यांचा वर्षभराचा महसूल अवलंबून असतो, त्यामुळे हे नुकसान त्यांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणार आहे. महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस अशोक सोनारकर यांनी यावर उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यांच्या मते, ग्रामीण भागात वनविभागाचे पहारेकरी नियुक्त करणे, प्रकाशयोजनेचे जाळे वाढवणे, इलेक्ट्रिक फेंसिंगची सोय उपलब्ध करून देणे आणि संरक्षण भिंत उभारणे यांसारख्या उपायांची गरज आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे जलदगतीने करून त्यांना उचित नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. मंगरूळ चव्हाळा येथील शेतकरी अनिकेत शिरभाते यांनी सांगितले की, वन्य प्राण्यांच्या सततच्या वाढत्या हालचालीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून नुकसानभरपाई आणि संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबविल्यास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकतो. शिवाय पुढच्या त्रासालाही आळा बसेल. कृषीतज्ञांच्या मते, अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा आणि प्रभावी पिकसंरक्षणाची आवश्यकता आहे. वन्य प्राण्यांच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा काढल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
अट्टल चोरटा जेरबंद, अनेक गुन्ह्यांची कबुली:कुऱ्हा पोलिसांनी 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
कुऱ्हा पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला अटक केली आहे. गस्तीवर असताना संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याने अनेक चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गजानन फकीरा मोहिते (वय ३०, रा. बागापूर, ता. चांदूररेल्वे) असे आहे. कुऱ्हा ते चांदूररेल्वे मार्गावरील अप्पर वर्धाच्या पडीक क्वॉटरजवळ दुचाकी (एमएच ४० बीएस ९१४८) घेऊन जात असताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. त्यावेळी त्याने दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली आणि त्याच्याजवळ वायर कटरही सापडले. आरोपीकडून ४ पाणबुडी मोटर (किंमत ३२ हजार रुपये), ५ किलो तांब्याची तार (किंमत ५ हजार रुपये) आणि ६ नोझल (किंमत ५ हजार रुपये) असा एकूण ४२ हजार रुपयांचा चोरीचा माल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध यापूर्वी ४ ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ठाणेदार अनुप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय योगेंद्र लाड, जमादार उमेश वाघमारे, अनिल निंघोट आणि सागर निमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या सरकारच्या हालचालींना काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. हे पैसे निवडणुकीनंतरच वितरित करावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून टीका केली असून, काँग्रेसचा माता-भगिनींबद्दलचा द्वेष पुन्हा एकदा उघड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अगदी आदल्या दिवशी १ कोटीहून अधिक महिला मतदारांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा करणे, हा मतदारांना प्रभावित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ही कृती म्हणजे एक प्रकारची 'सामूहिक सरकारी लाच' असून यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. आमचा या योजनेला विरोध नाही, मात्र निवडणुकीच्या निष्पक्षतेसाठी हे पैसे मतदानानंतरच दिले जावेत, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे. नात्यात विष कालवणारी काँग्रेस - बावनकुळे काँग्रेसच्या या पत्रावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. आमच्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेस नेत्यांना बघवत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार संक्रांतीच्या पर्वावर बहिणींच्या संसाराला हातभार लावण्यासाठी ही रक्कम देत असताना, त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही काँग्रेसची 'जहरी विचारधारा' असून राज्यातील महिला त्यांना कधीही माफ करणार नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले. संक्रांतीच्या मुहूर्तावर राजकारण तापले महायुती सरकार संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना दोन महिन्यांचा हप्ता एकत्रित देण्याच्या तयारीत आहे. मात्र, निवडणुकीच्या तारखा आणि या वितरणाची वेळ यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने यापूर्वीही या योजनेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याची आठवण करून देत बावनकुळे यांनी काँग्रेसवर 'महिला विरोधी' असल्याचा शिक्का मारला आहे. आता या प्रकरणावर राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आणि १० लाखाहून अधिक महिलांना मतदानापूर्वी हे पैसे मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बरड (ता. फलटण) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यास आफ्रिकेतील दक्षिण सुदान या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. जवान गावडे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच फलटण तालुक्यासह त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. जवान विकास गावडे हे भारतीय लष्कारातील ११५ - इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नायक या पदावर सेवा बजावत होते. परदेशातील सैन्यांना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शांतीसेना असलेल्या मोहिमेत ते कार्यरत होते.त्यांची नियुक्ती सध्या आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेसाठी करण्यात आली होती.तिथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. जवान विकास गावडे हे बरड (ता. फलटण ) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते 22 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झाले.पुणे येथे त्यांनी सैन्य दलातील अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. ते भारतीय सैन्य दलात निष्ठेने सेवा बजावत होते.सध्या ते आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेत कार्यरत होते. संयुक्त राष्ट्राच्या शांति सेनेमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. त्यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच फलटण तालुका व त्यांचे मूळगाव असलेल्या बरड येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ, पत्नी,दोन वर्षांची छोटी मुलगी असा परिवार आहे.त्यांचे पार्थिव उदया रविवारी (ता. 11) रोजी सकाळी त्यांच्या मूळ गावी येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण प्रचंड तापले असून वरळी मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. वरळी हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे, असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. आम्ही देखील तीन-तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो आणि ही निवडणूक काही लहान मुलांबरोबर वाद घालण्याची नाही, अशा बोचऱ्या शब्दांत भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडले. आदित्य-अमित बेरोजगार होतील, म्हणून ठाकरे बंधू एकत्र आलेत, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर टोला लगावताना नितेश राणे म्हणाले, आपण एकत्र आलो नाही तर दोघेही बेरोजगार होऊन जातील, या भीतीने हे दोन भाऊ आता एकत्र आले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, जसा नेता आहे तसाच इथला त्यांचा उमेदवार आहे. हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आठवण करून देत राणे यांनी उबाठा गटावर विखारी टीका केली. बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज पक्षामध्ये कोणाला घेतले जात आहे? बॉम्बस्फोटाचे आरोपी आणि 'हिरव्या सापांना' पक्षात स्थान दिले जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर अशांचे वाभाडे काढत त्यांना पक्षात स्थान दिले नसते, अशा शब्दांत नीतेश राणे यांनी समाचार घेतला. मराठी टक्का का घसरला? मुंबईतील मराठी माणसाच्या प्रश्नावर बोलताना राणे यांनी विचारले की, तुमच्या सत्तेत मुंबईतील मराठी माणसाचा टक्का का घसरला? जर चुकून यांची पुन्हा सत्ता आली, तर मुंबईत आपली मंदिरेही सुरक्षित राहणार नाहीत. ही निवडणूक केवळ राजकीय नसून आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे त्यांनी नागरिकांना पटवून दिले. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी जे जे आवश्यक आहे, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. कलानगरमध्ये फटाके वाजवणार मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत नितेश राणे यांनी ठाकरेंना थेट आव्हान दिले. माझी इच्छा आहे की एकदा आमने-सामने व्हायला हवे, मग बघू आवाज कुठून निघतो, अशा शब्दांत त्यांनी थेट चॅलेंज दिले. तसेच, महायुतीचा उमेदवार निवडून आल्यावर आपण स्वतः विजयाची मिरवणूक काढू आणि फटाक्यांची एक माळ 'कलानगर'मध्ये (ठाकरे निवासस्थान) जाऊन लावू, असा टोलाही त्यांनी लगावला. उत्तर भारतीयांना भाजप-शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही दरम्यान, नितेश राणे यांनी वसई विरार येथील सभेत बोलताना देखील मोठे विधान केले. उत्तर भारतीयांना सुरक्षा हवी असेल तर त्यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला मतदान करावे असं आवाहन करत त्यांनी उद्धवसेना-मनसेलाही थेट धमकी दिली आहे. वसई विरारमध्ये राहणाऱ्या उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिकांना सुरक्षा हवी असेल तर त्यांना भाजपा आणि शिंदेसेनेशिवाय पर्याय नाही. कोणीही तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला जागा दाखवण्याचं काम आमच्या खांद्यावर तुम्ही टाका हा विश्वास मी तुम्हाला देतो. इतर जे पक्ष आहेत ते केवळ राजकारण करायला येतील परंतु उद्धवसेना असेल, राज ठाकरेंच्या मनसेचे लोक तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहतात तेव्हा तुम्हाला कुणी वाचवायला येत नाही. तुमच्यासाठी जर कुणी उभा असेल, तुम्हाला ताकद देत असेल तर ते फक्त भाजपा आणि शिंदेसेनेचे लोक आहेत असं त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) मधील भाजपच्या उमेदवारीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे तिकीट कापून लहू बालवडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर अमोल बालवडकर यांनी पक्षावर अन्याय झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अमोल बालवडकर यांचे तिकीट कापण्यामागील कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, अमोल बालवडकर यांचे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृह खात्यामार्फत या संदर्भात संवेदनशील माहिती मिळाली होती. जर अमोल बालवडकर यांना तिकीट दिले असते आणि निवडणुकीदरम्यान हे व्हिडिओ समोर आले असते, तर पक्षाची प्रतिमा मलिन झाली असती. त्यामुळे वेळेत निर्णय घेऊन तिकीट कापण्यात आले. ते पुढे म्हणाले की, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने एकूण ४२ माजी नगरसेवकांची तिकीटे कापली आहेत आणि प्रत्येक निर्णयामागे ठोस कारणे होती. आमच्या पक्षात मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची परंपरा नाही. योग्य माहितीच्या आधारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळेत निर्णय घेतला, असे स्पष्ट करत त्यांनी पक्षशिस्तीचा मुद्दा अधोरेखित केला. या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी निलेश घायवळसोबत फोटो किंवा व्हिडिओ असलेल्या इतर व्यक्तींविरोधातही माहिती गोळा करून ती मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे जाहीर केले. गरज पडल्यास चौकशीची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन प्रकरणी ऑक्सफर्ड विद्यापीठासह संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या शैलीत आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार आणि प्रदेश कार्याध्यक्ष उत्तम कामठे यांनी पत्रकार परिषदेत दिला. जेम्स लेनच्या घृणास्पद व देशद्रोही लिखाणाला आता २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने आता माफी मागणे म्हणजे गुन्ह्याची कबुलीच असल्याचे ब्रिगेडचे म्हणणे आहे. कामठे म्हणाले की, २००३ मध्ये छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पत्र पाठवले होते. दोन दशके त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर आता अचानक माफी मागणे ही नैतिकतेतून किंवा इतिहासप्रेमातून आलेली नाही. ही माफी न्यायालयीन कारवाईतून सुटका मिळवण्यासाठी रचलेला डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. पवार यांनी यावेळी भांडारकर संस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेम्स लेनला संशोधनासाठी मदत करणाऱ्या, बदनामीकारक मजकुराला वैचारिक आधार देणाऱ्या आणि भारतीय इतिहासाचा अपमान करणाऱ्या भांडारकर संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर सरकारने आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. हा सरकारी संरक्षणवाद नाही तर काय आहे, असा सवाल त्यांनी केला. प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी विचारले की, २२ वर्षे ज्यांची तोंडे बंद होती, त्यांना आज अचानक माफी कशी सुचली? जर गुन्हा केला नव्हता तर माफी कशासाठी? आणि माफी म्हणजे गुन्ह्याची कबुली नाही का? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर कारवाई होणार की नाही? जेम्स लेनला मदत करणाऱ्यांना सरकारी संरक्षण दिले जात आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जर सरकार गप्प राहिले आणि आरोपींची सुटका झाली, तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून न्यायालयात लढेल आणि जनतेत सत्य मांडेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे, मध्य जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, ज्योतिबा नरवडे आणि शहराध्यक्ष अविनाश मोहिते उपस्थित होते.
आजची सभा ही अभूतपूर्व आहे. सत्ताधाऱ्यांकडे सत्तेची मस्ती, पैशांची मस्ती, पण माझ्याकडे जनतेची मस्ती आहे. आज मला शिवसेना प्रमुखांची आठवण आली आज मी नवीन शिवसेनेला पुन्हा सुरुवात करतोय. आज कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आले आहेत. रावसाहेब दानवे हे पडलेले खासदार रावसाहेब दानवे हे पडलेले खासदार आहेत. ते पडले तरीही त्यांची मस्ती नाही उतरत आहे. त्यांच्या ताटात सर्व पक्षी जेवण करून गेलेत असे दानवे म्हणालेत मग आजही तुम्ही आमच्या ताटातलं का खात आहात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. रावसाहेब दानवे आम्ही तुमच्या ताटात जेवलेलो नाही, तर शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला जगवलेलं आहे. मी मुख्यमंत्री असतांना जी कामे सुरू संभाजीनगरमध्ये केली होती, ती बंद केलेली पाहून मला निराशा होत आहे. आपलं सरकार जर या गद्दारांनी पाडलं नसतं तर मी आज तुम्हाला पाणी देऊन दाखवलं असतं. मी केवळ पैसे दिले नव्हते, तर योजना पूर्ण करून देणार होतो. मी मुख्यमंत्री असतांना या पाणी योजनेची एक दोन वेळेस पाहणी केल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. …अस्तित्वाची लढाई आहे का? प्रेम जर नसतं तर माझ्याकडे काहीही नसतांना एवढी गर्दी जमली नसती. पण एवढी गर्दी जमल्यानंतरही जर पैश्यांची मस्ती निवडणूक फिरवणार असेल. तेव्हा मग ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे का? असे विचारले जाते. पण ही आमच्या नाही, तर जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. नशामुक्ती करण्यापेक्षा पाणी द्या- ठाकरे गद्दारांना काहीही कारभार कळलेला नाही. पण अजित पवारांच्या बॅनरखाली संभाजीनगर नशामुक्त करू असे पाहिले. तुमची सत्ता असतांना जर तुम्ही संभाजीनगर हे नशामुक्त करू शकत नसाल तर मनपा ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही शहर दारूमुक्त करणार हे कशावरून असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला. ज्या शहरात तुम्ही सर्वत्र दारूविक्री करतांना दिसत आहे. तर त्या शहरात तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था अजून तुम्हाला करता आलेली नाही. संभाजीनगरचं नाव हे आम्ही केल्याचा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी केलं. जर तुमच्यात हिंमत असेल तर मोदींनी अहमदाबादचं नाव बदलून दाखवावं, असे आव्हानही ठाकरेंनी संभाजीनगरात बोलतांना केले. 'गुंड प्रथम, भ्रष्टाचार प्रथम'हे भाजपचं ब्रीदवाक्य पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाली होती. या हत्याकांडातील आरोपी असलेल्या व्यक्तींनाच भाजपने प्रवेश दिला. यात एक तर तुम्ही आरोप करतात तो तरी खोटा आहे किंवा तुम्ही दोगले आहात. गुंड प्रथम, भ्रष्टाचार प्रथम, बलात्कारी प्रथम हेच आता भाजपचं ब्रीदवाक्य झालेलं आहे. निष्ठावंताच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे असल्याचे म्हणत जयंत पाटलांनी केलेल्या शेरोशायरीचा उल्लेख करत ठाकरेंनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. या भाषणानंतर कोणीतरी देवाभाऊकडे दोन हजार घ्यायला जावे. आज उद्धव ठाकरे हे विकासावर बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कचऱ्याचा, पाण्याचा, रस्त्यांचा प्रश्न आमच्या काळात सुधारला होता की नाही. मला दोन हजार देण्यापेक्षा पावसाने होरपळलेल्या माझ्या शेतकरी बांधवांना मदत करा, असे आवाहनही ठाकरेंनी केले. अधिकाऱ्यांची मस्ती घेऊन तुम्ही निवडणूक उमेदवारांना माघार घ्यायला लावली जात आहे. सगळीकडे पैशाची मस्ती चालणार नाही. असेच सुरू राहिले तर जे काल परवा पश्चिम बंगालमध्ये झालं, तसेच लोक महाराष्ट्रातही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांच्या घोटाळा खरा की खोटा? ठाकरे म्हणाले की, अजित पवार म्हणतात की, ज्या लोकांनी त्यांच्यावर सत्तर हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांच्यासोबत सत्तेत जाऊन बसले आहेत. तसे ते माझ्याही काळात सत्तेत माझ्यासोबत होते. पण आज ज्या लोकांनी त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्यासोबत आज ते सत्तेत बसले आहेत. अजित पवारांच्या घोटाळ्याबाबत ठिगभर पुरावे कोण घेऊन गेले होते? त्यांच्यावर गुन्हा दाखल कुणी केला होता? मग आता त्यांना सत्तेत का घेतले? जर त्यांच्यावर केलेले आरोप खरे असतील तर कारवाई करा अन्यथा त्यांची जाहीर माफी मागा. घराण्याची परंपरा पुढे घेऊन चाललोय- ठाकरे मी आमच्या घराण्याची परंपरा सोबत घेऊन चाललो आहे. ठाकरे घराण्याची ही परंपरा आहे. ज्या लोकांना आमची लाज वाटते, त्यांनी माझ्या वडिलांचे नाव का लावायचे? असा प्रश्नही ठाकरेंनी केला.
औंढा नागनाथ तालुक्यातील नागरीकांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या औंढा नागनाथ तालुका प्रमुखावर प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या घरकुल योजनेमध्ये काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता काही जणांना दुसरा देण्यात आला. या अनुदानामुळे लाभार्थ्यांनी त्यांची कच्ची घरे पाडून पक्की घरे बांधण्यास सुरवात केली. मात्र मागील काही दिवसापासून अनुदानाचा हप्ताच देण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीरीचे, जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मागील सहा ते आठ महिन्यापासून त्यांचेही अनुदान वाटप झाले नाही. दरम्यान, लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने वाटप करावे या मागणीसाठी ठाकरे गटाचे औंढा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर झटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुरुवारी ता. ८ गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून मिरवणुक काढली होती. त्यानंतर प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. औंढा तालुक्यात झालेले हे आंदोलन गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांच्या जिव्हारी लागले असून तालुका प्रमुख झटे यांनी केलेले आंदोलन राजकिय स्टंट असल्याचा आरोप केला. या शिवाय झटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून झालेला संवादही समाज माध्यमावर व्हायरल केला. या प्रकरणात प्रशासनाची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशावरून पंचायत समितीचे कनिष्ठ आरेखक राजेश सवनेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ९ अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान,या प्रकरणात झटे यांनीही गटविकास अधिकाऱ्यांशी झालेल्या संपूर्ण संवादाची रेकॉर्डींग पत्रकाराकडे पाठवली आहे. त्यात गटविकास अधिकारी कल्हारे यांच्याकडून आंदोलन न करण्याची विनंती केली जात असल्याचे दिसून येत आहे.
अन्.. ख-या प्रेमासाठी आणा ‘रोमिओ-ज्युलियट’ कलम! ‘पॉक्सो’मध्ये सुधारणेचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला
नवी दिल्ली : प्रतिनिधी किशोरवयीन मुला-मुलींच्या ख-या प्रेमासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रेमळ’ भूमिका मांडत, अशा जोडप्यांवर पॉक्सोतील कडक कलमांमुळे गुन्हेगारीचा शिक्का बसू नये म्हणून कायद्यात सुधारणेची सूचना केंद्र सरकारला केली. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पॉक्सो) ‘रोमिओ-ज्युलियट कलम’ समाविष्ट करण्याचा मुद्दा केंद्र सरकारपुढे मांडला आहे. कायद्याचा गैरवापर टाळा : न्यायमूर्ती संजय करोल आणि एन. कोटिश्वर सिंग […] The post अन्.. ख-या प्रेमासाठी आणा ‘रोमिओ-ज्युलियट’ कलम! ‘पॉक्सो’मध्ये सुधारणेचा सुप्रीम कोर्टाचा सल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुलांच्या सिरपमध्ये विष; ‘अल्मोंट-किड’वर बंदी
हैदराबाद : वृत्तसंस्था तेलंगणा औषध नियंत्रण प्रशासनाने मुलांना दिल्या जाणा-या ‘अल्मोंट-किड’ सिरपच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या सिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’ नावाचे अत्यंत विषारी केमिकल आढळल्याचे विभागाने एका अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे. कोलकाता येथील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या लॅब रिपोर्टनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बिहारमधील ‘ट्रिडस रेमेडीज’ या कंपनीने उत्पादित केलेल्या बॅच […] The post मुलांच्या सिरपमध्ये विष; ‘अल्मोंट-किड’वर बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणमध्ये महिला शक्तीचा संतप्त उद्रेक!
तेहरान : वृत्तसंस्था इराणमध्ये सध्या सत्तेविरुद्धच्या असंतोषाचा लाव्हा उफाळून आला आहे. गेल्या काही दिवसांत तेहरानच्या रस्त्यांवरून अशी काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये इराणी महिला अत्यंत निर्भयपणे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या जळणा-या फोटोंवरून सिगारेट पेटवताना दिसत आहेत. हे केवळ एक कृत्य नसून, दशकांपासून चाललेल्या […] The post इराणमध्ये महिला शक्तीचा संतप्त उद्रेक! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

30 C