चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदही सोडले
भोंदूबाबा खरातला गुरू मानणे भोवले, निष्पक्ष चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरातला गुरू मानणा-या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे रुपाली […] The post चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदही सोडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
नैसर्गिक, पेट्रोलियम गॅससंदर्भात केली चर्चा मुंबई : वृत्तसंस्था आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेला इंधन तुटवडा, गॅस पुरवठा आणि इतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतली. युद्धजन्य परिस्थितीवर मोदींनी गेल्याच आठवड्यात संसदेत बोलताना चिंता व्यक्त केली होती. आज त्यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना नैसर्गिक आणि पेट्रोलियम […] The post पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत थांब्याची उद्घोषणा!
मुंबई: प्रतिनिधी ‘मुंबई लोकलमध्ये रेल्वे स्थानकांविषयीची उद्घोषणा होते किंवा फलकावर येणारे स्थानक दर्शवले जाते. तशा प्रकारे सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये पुढील थांब्याविषयी उद्घोषणा व्हायला हवी. जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली जाईल आणि धावत्या रेल्वेगाडीतून उतरण्याचे आणि जीव धोक्यात घालण्याचे प्रवाशांचे प्रकार कमी होतील, अशी महत्त्वाची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाला केली. त्यामुळे […] The post लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत थांब्याची उद्घोषणा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बीडमध्ये माय-लेकाचा होरपळून मृत्यू, सोलापुरात २ मित्रांचा बळी सातारा जिल्ह्यात आजोबा, नातीचा मृत्यू बीड/सोलापूर/सातारा : प्रतिनिधी बीड, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ््या अपघातांत ६ जण ठार झाले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कार अपघातानंतर कारने पेट घेतल्याने माय-लेकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात बोरामणी नाक्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील २ मित्र दगावले तर पंढरीला दर्शनासाठी जाणा-या […] The post ३ भीषण अपघातांत ६ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लडाखमध्ये हिमस्खलन; ७ मृत्युमुखी, ५ जखमी
महामार्ग बंद, अनेक वाहने बर्फाखाली अडकली लेह : वृत्तसंस्था लडाखमधील जोजिला भागात भीषण हिमस्खलन झाल्याने श्रीनगर-लेह मार्गावर मोठी दुर्घटना घडली. या हिमस्खलनामुळे बर्फात अडकून ७ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनाचा फटका अनेक वाहनांना बसला. अनेक वाहने कमी-अधिक प्रमाणात बर्फात अडकली. तसेच महामार्गही बंद झाला. शुक्रवारी दुपारी झालेल्या हिमस्खलनानंतर किमान १५ […] The post लडाखमध्ये हिमस्खलन; ७ मृत्युमुखी, ५ जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
होर्मुझ खुला करण्यासाठी भारत-फ्रान्सचा पुढाकार
परराष्ट्र मंत्र्यांसह नौदल प्रमुखांची चर्चा, इराणशी संपर्क पॅरिस : वृत्तसंस्था होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी भारत आणि फ्रान्सने हातमिळवणी केली आहे. गुरुवारी जी-७ देशांचे परराष्ट्रमंत्री पॅरिसच्या जवळ एकत्र आले. यामध्ये जी-७ च्या सहयोगी देशांपैकी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर देखील सहभागी झाले होते. यावेळी पश्चिम आशियातील संघर्ष कमी करण्यासाठी संवादाच्या संभाव्य मार्गांचा शोध घेण्यावर चर्चा झाली. जी-७ […] The post होर्मुझ खुला करण्यासाठी भारत-फ्रान्सचा पुढाकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप
रेणापूर : प्रतिनिधी येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी दि. २७ मार्च रोजी विविध विकासकामांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र, या बैठकीस खासदार व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व काही पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावण्यात आल्याने कॉग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्याच्या वतीने गटविकास अधिकारी सुमित जाधव यांना निवेदन देण्यात येऊन […] The post लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गव्हाण बॅरेजेसमध्ये तिरू मध्यम प्रकल्पातील पाणी सोडावे
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील गव्हाण परिसरात तीव्र उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या गव्हाणमधील बेरजेसमध्ये पाणीसाठा नाही. या कारणाने पाणीटंचाई निर्माण झाली असून, तिरू मध्यम प्रकल्पातील पाणी तिरु नदीपात्रात सोडावे, यामुळे गव्हाण येथील उच्च पातळी बंधा-यांमध्ये पाणी येईल व निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई कमी होईल. यामुळे गव्हाण येथील उच्च पातळी बंधा-यांमध्ये तात्काळ पाणी सोडावे […] The post गव्हाण बॅरेजेसमध्ये तिरू मध्यम प्रकल्पातील पाणी सोडावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिरकणी हाटमध्ये ७३ लाखांची उलाढाल
लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी आपल्या हस्तकला, खाद्यपदार्थ, सेंद्रीय शेती उत्पादने व गृहोद्योग वस्तूचे तसेच हाताने बनवून देणा-या ताज्या व्हेज तसेच नॉन व्हेज पदार्थाचे १०६ स्टॉल आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते. २१ ते २६ मार्च या पाच दिवसात हिरकणी हाट मध्ये ७२.८६ लाखाची विक्रमी उलाढाल झाली असून लातूरकर ग्राहकांनी उदंड […] The post हिरकणी हाटमध्ये ७३ लाखांची उलाढाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घडले दोन असे महारथी, दोघांची धुरंधर निती, एक शिवबा छत्रपती, दुसरे भीमराव घटनापती
लातूर : प्रतिनिधी दयानंद कला महाविद्यालयात ’कलातीर्थ २०२६’ वार्षिक स्रेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे करताना समारोप प्रसंगी लोककलावंत राजन सरवदे यांच्या घडले दोन असे महारथी, दोघांची धुरंधर नीती एक शिवबा छत्रपती, दुसरे भीमराव घटनापती अशा लोकसंगीताच्या गाण्यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवली. दयानंद कला महाविद्यालयात दोन दिवसीय ‘कलातीर्थ २०२६’वार्षिक स्रेहसंमेलनाची सांगता लोककलावंत राजन सरवदे यांच्या लोकसंगीताने व सुप्रसिद्ध […] The post घडले दोन असे महारथी, दोघांची धुरंधर निती, एक शिवबा छत्रपती, दुसरे भीमराव घटनापती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्व. प्रा. डॉ. आदमाने यांच्या कुटुंबाला कर्मचा-यांकडून १९ हजारांची मदत
लातूर : प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या लातूर येथील उप-केंद्रात कार्यरत असलेले तासिका तत्त्वावरील प्रा. डॉ. दत्तात्रय आदमाने यांचे नुकतेच वयाच्या ३८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. आदमाने हे येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्या निधनामुळे एका सुविद्य आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाला समाज मुकला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, […] The post स्व. प्रा. डॉ. आदमाने यांच्या कुटुंबाला कर्मचा-यांकडून १९ हजारांची मदत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हैदराबादच्या धर्तीवर उभे करावे
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य ७५ फूट उंचिचे स्मारक हैदराबाद येथील भव्य स्मारकाच्या धर्तीवरच उभे करावे, अशी एकमुखी मागणी समाज बांधवांकडून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधवांच्या वतीने लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांना निवेदन देण्यात आले. शहरातील डॉ. आंबेडकर […] The post डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हैदराबादच्या धर्तीवर उभे करावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय हालचाली
लातूर : प्रतिनिधी लातूर तालुक्यातील मौजे साई येथे फोफावलेली अवैध दारु विक्री आणि त्यामुळे ढासळलेली कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी तरुण कार्यकर्ते सुरज दत्तात्रय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे २५ मार्चपासून सुरू केलेले उपोषण, प्रशासनाच्या आश्वासनानंतर २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता मागे घेण्यात आले आहे. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय हालचाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१० वर्षांनंतर महापालिकेने रद्द केली गुंठेवारी
लातूर : प्रतिनिधी मौ. खाडगाव सर्वे नं. ४६/ब/क भूखंड क्र. ०५ व ०८ मधील क्षेत्र १४३.२३ चौरस मीटर गुंठेवारी क्र. एलएमसी/टीपी/८/जीयुएन/२५७/२०२५-२६: दि. २/९/२०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने गुंठेवारी प्रमाणपत्र निर्गमीत केले होते. याविरुद्ध काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील बसपुरे यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानूसार त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत निर्गमीत केलेल्या गुंठेवारी […] The post १० वर्षांनंतर महापालिकेने रद्द केली गुंठेवारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे किल्ले पन्हाळा येथे छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार शिवंशंभु प्रतिष्ठान आणि सरहद संस्थेने केला आहे. डॉ. पवार यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. डॉ. पवार यांनी पुण्यात गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज येथील रस्त्याला 'महाराणी ताराराणी पथ' असे नामकरण करण्याच्या समारंभात आणि त्यानंतरच्या भेटींमध्ये ही इच्छा बोलून दाखवली होती. महाराणी ताराराणींच्या ३५१ व्या जयंती वर्षात हे स्मारक व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना याबाबत आश्वासनही दिले होते. औरंगजेबाने मराठा स्वराज्य नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा महाराणी ताराराणींनी किल्ले पन्हाळ्याला आपली राजधानी बनवून मोगलांशी लढा दिला. १७०० ते १७०१ या काळात औरंगजेबाने पन्हाळ्याला वेढा दिला होता. महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला नऊ वर्षे (१६९२-१७०१) झुंजवला. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि धैर्यामुळे पन्हाळा किल्ला मराठा सत्तेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला. किल्ले पन्हाळ्यावर आजही महाराणी ताराराणींचा वाडा, सुसज्ज तटबंदी आणि अनेक ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. म्हणूनच पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे, असे डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने, त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता त्यांच्या निधनानंतर, त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार पुण्यातील शिवंशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम आणि सरहद परिवाराचे मयुर मसूरकर यांनी केला आहे. या स्मारकात छत्रपती महाराणी ताराराणींचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज आणि या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. महेश कदम आणि मयुर मसूरकर यांनी शासनाला या स्मारक उभारणीस विलंब न लावता परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे एकामागून एक उघडकीस येत असून, त्याने शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि त्याचे चित्रीकरण केल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील 100 हून अधिक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध झाल्या असून, केवळ शोषणच नव्हे तर धमकावून मोक्याच्या जमिनी बळकावल्याचेही आरोप त्याच्यावर होत आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हे व्हिडिओ नेमके बाहेर कसे आले, अशोक खरातला कशी अटक झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली असून या गोरखधंद्यांचे धागेदोरे आता अधिक खोलात तपासले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑफिस बॉयने कसे उघडकीस आणली व्हिडिओ? अशोक खरातचे काळे धंदे समोर येण्यामागे त्याच्याच ऑफिस बॉयने घेतलेला धाडसी पवित्रा कारणीभूत असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. खरातने ऑफिस बॉयच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, संतापलेल्या ऑफिस बॉयने खरातच्या विरोधात जात त्याचे काही पुरावे रेकॉर्ड केले होते. आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यास हे पुरावे समोर यावेत या उद्देशाने त्याने ते व्हिडिओ काही विश्वासू व्यक्तींकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर ज्यांच्याकडे हे व्हिडिओ होते त्यांनीही सुरक्षिततेसाठी ते पुढे इतरांकडे सोपवल्याने साखळी पद्धतीने हे सर्व व्हिडिओ आता सार्वजनिक झाले असून खरातचा खरा चेहरा समाजासमोर आला, अशी माहिती कर्णिक यांनी दिली आहे. पुढे बोलताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, आम्ही 65 ट्वीटर अकाऊंट तसेच काही फेसबूक व इन्स्टा अकाऊंटवर गुन्हे दाखल केले आहेत. काही व्हिडिओ मॉर्फ देखील केले आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे कर्णिक म्हणाले. बऱ्याच ठिकाणाहून अशोक खरातकडे लोक येत होते. महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून देखील येत होते. अशोक खरातच्या सगळ्या व्हिडिओंची संख्या खूप मोठी असल्याची माहिती कर्णिक यांनी डली आहे. अशोक खरातला कशी अटक झाली? पोलिस आयुक्त कर्णिक यांनी पुढे सांगितले की, अशोक खरातला पकडण्याचे ऑपरेशन हे अत्यंत गोपनीय होते, कारण आरोपीचे शिष्य, भक्तगण हे सर्वच क्षेत्रात पसरलेले आहेत. त्यामुळे, जर हे ऑपरेशन लीक झाले असते तर आरोपी पळून जाण्याची किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असता. आरोपीला कुठल्याही गोष्टी न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता त्याला अटक करणे महत्त्वाचे होते. पुढे बोलताना संदीप कर्णिक म्हणाले, त्यानंतर, महिला तक्रारदारास विश्वासात घेऊन तक्रार नोंद करुन घेणे गरजेचे असते. त्यामुळे, खरातच्या अटकेची प्रक्रिया किंवा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया ही पोलिस खात्यातल्या काहीच जणांना माहिती होती. तसेच, आधी महिलेची फिर्याद घेतली, त्यानंतर अशोक खरातच्या अटकेची कारवाई सुरू झाली. रात्री 11 वाजता आरोपी खरात घरी असल्याची खात्री केल्यानंतर अटक करण्याची कारवाई केली.
सज्जनगडावर पर्यटकांसमोरच थरार:हॉटेल कामगाराची 200 फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ
सज्जनगड येथे एका हॉटेल कामगाराने सुमारे 200 फूट उंच कड्यावरून दरीत उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माची पेठ येथील संदेश शंकर पडियार (वय 34) हे सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते एकटेच सज्जनगडावर आले. गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी गडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धाब्याचा मारुती मंदिराच्या दक्षिणेकडील कड्याकडे जाऊन कोणालाही न कळता दरीत उडी घेतली. ही घटना परिसरातील पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. स्थानिकांच्या मदतीने सुमारे 200 फूट खोल दरीत उतरून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात आले. मात्र, उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलिस हवालदार कर्णे, एएसआय वायदंडे तसेच होमगार्ड पलटण नायक शिंदे, सावंत व चव्हाण यांनी मिळून संबंधित व्यक्तीचा मृतदेह दरीतून बाहेर काढत रस्त्यापर्यंत आणला. त्यानंतर बलून स्ट्रेचरच्या सहाय्याने मृतदेह वाहनापर्यंत हलवण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश पडियार हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
धारावीतील झोपडपट्टीवासियांना प्रत्येकी 500 चौ.फू.चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजूनही देत नाही. धारावीतील झोपड्या एसआरए अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात अपात्र करीत आहे, या प्रमुख मुद्द्यांकडे राज्य शासन, एसआरए व अदानी कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी 'धारावी बचाव आंदोलन' या संघटनेतर्फे येत्या 5 एप्रिल नंतर व्यापक आंदोलन धारावीत सुरु करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक बुधवारी सायंकाळी धारावीत झाली. या बैठकीत अदानी कंपनी आणि राज्य सरकार विरोधात काढण्यात येणारे मोर्चे, करण्यात येणारी निदर्शने ,रास्ता रोको, जनसभा आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक निश्चितीबाबत चर्चा झाली. या बैठकीस 200 कार्यकर्ते उपस्थित होते. आता आगामी धडक, व्यापक आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी आणखी एक बैठक 5 एप्रिल रोजी धारावीत होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाचा धडाका सुरु होणार आहे. हुसकावून लावण्यासाठी अपात्र करण्याचा धडाका धारावी झोपडपट्टीवासियांना 500 चौ.फू.ची घरे देण्याची आमची मागणी ही पहिल्यापासूनच आहे. तसेच कोणालाही अपात्र न करता सर्व सव्वा लाख झोपडपट्टीवासियांचे धारावीतच पुनर्वसन करावे हीही मागणी सुरवाती पासूनची आहे. तसेच झोपडपट्टीवासियांच्या सर्व्हेक्षणाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. यात 100 झोपड्यांमागे 15/20 झोपड्या पात्र बाकीच्या 8085 झोपड्या अपात्र... हे असे येथील झोपडपट्टीवासियांच्या संतापाचे कारण आहे. येथील झोपडपट्टीवासियांना हुसकावून लावण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात अपात्र केले जात आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी केला आहे. सरकार हे झोपडपट्टीवासियांच्या मदतीसाठी आहे की अदानीच्या मदतीसाठी आहे असा प्रश्न सध्या येथील लोकांना पडलेला आहे. लोकांच्या मनातील या असंतोषाला मोकळी वाट करुन देण्यासाठी धारावीत 5 एप्रिलनंतर धरणे, मोर्चे, निदर्शने करण्यात येणार आहेत, असेही बाबुराव माने यांनी सांगितले. दरम्यान हे आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन चे कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत. हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरसेवक जोसेफ कोळी, टी.एम.जगदीश, दीपक काळे व नगरसेविका अर्चना शिंदे यांची भेट घेतली तेंव्हा या स्थानिक नगरसेवकांनीही या आगामी आंदोलनास पाठिंबा दिला असून तेही या आंदोलनात उतरणार असून तसे त्यांनी आश्वासन धारावी बचाव आंदोलनला दिलेले आहे. याच बरोबर या आंदोलनात खासदार अनिल देसाई, खासदार वर्षा गायकवाड, आमदार महेश सावंत, आमदार ज्योती गायकवाड हेही आपला सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे धारावी बचाव आंदोलनने म्हटले आहे. धारावी बचाव आंदोलनचे हे आगामी व्यापक आंदोलन अधिक यशस्वी करण्याच्या सूचना आमदार महेश सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे. खासदार, आमदार, नगरसेवक या आंदोलनात उतरणार असल्याने धारावी बचाव आंदोलनचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह हा दुणावलेला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन धारावीतील झोपडपट्टीवासियांना धारावीतच प्रत्येकी 500 चौ.फू.चे घर द्या, लोकांना अपात्र करण्याचा खेळ थांबवा, धारावीत छोट्या उद्योगांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र तयार करा, कुंभार बांधव, कोळी बांधव, गणेश मूर्तिकार यासारख्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे जागा देण्यात याव्यात आदी मागण्या धारावी बचाव आंदोलन च्या आहेत. या मागण्यांची पूर्तता लेखी स्वरुपात जो पर्यत अदानी कंपनी - राज्य सरकार करीत नाही तो पर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील, असा इशारा बाबुराव माने यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपाचा 22 कोटींचा वेतन घोटाळा!:एमआयएम आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 3 कंत्राटदार कंपन्याना तब्बल 22 कोटी 42 लाख रुपयांचे जादा दिल्याचा (अतिप्रदान) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे, ठेकेदाराचे बिल मंजूर होण्यापूर्वी फाइल मनपाच्या विविध 8 विभागांतील टेबलांवर तपासली जाते. लेखा विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतरच धनादेश निघतो. तरीही अनेक महिने डोळे झाकून कंत्राटदाराची बिले मंजूर होत गेली. या प्रकरणातील तांत्रिक घोळ महागाई भत्ता (डीए) वाढीमध्ये आहे. डीए हा मूळ वेतनावर देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न होता पूर्ण वेतनावरच डीए देण्याचा हिशेव करण्यात आला. त्यानंतर ही रक्कम कंत्राटी एजन्सींना दिली. 2024-25 मध्ये वर्षभरात दोनदा डीए वाढवण्यात येतो. दोन्ही वेळा अशाच प्रकारे पगार वाढण्यात आली. मात्र, ही बाब कुणाचाही लक्षात आली नाही. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात अतिप्रदान रक्कम कशी गेली, याबाबत कुठलीही चौकशीदेखील केली नाही. तीन कंपन्यापैकी महाराणा एजन्सीचे काम पीएफ आणि ईएसआयसीची रक्कम नियमित भरत नाही, असे कारण दाखवून थांबवण्यात आले. या कंपनीतील दोन हजार कर्मचारी हे गॅलेक्सी आणि अशोका एंटरप्रायेझेस या एजन्सीकडे वर्ग करण्यात आले. आता याच मुद्द्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी 22 कोटी कुठे गेले? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आहे. यामुळे झालेल्या गोंधळामुळे महापौरांना जनरल बॉडी तहकूब करावी लागली. त्यानंतर महापालिकेचे विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एमआयएमचे समीर बिल्डर म्हणाले, गुन्हा दाखल करून 22 कोटी परत घेण्यात यावे. याचसोबत लेखा विभागाचे ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत त्या अधिकाऱ्यांमुळेच तुमचे आणि आमचे टॅक्सचे पैसे भ्रष्टाचारात गेले. पुढे ते म्हणाले, जोपर्यंत आता कारवाई होत नाही, लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई होत नाही, तसेच महाराणा एजन्सीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे, या कारवाई होत नाहीत तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक जीबीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
पुण्यातील ऐतिहासिक एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या अस्तित्वावर सध्या संकट निर्माण झाले आहे. शासनाच्या प्रस्तावित निर्णयामुळे या उद्यानाची सुमारे एक एकर जागा न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याला पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. दि ॲग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत गेल्या १३४ वर्षांपासून हे उद्यान जपले जात असून, संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार आणि सचिव सुरेश पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सचिव सुरेश पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गार्डनमधील सुमारे एक एकर जागा न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडून पुढे रेटला जात आहे. या निर्णयाला संस्थेने तीव्र विरोध दर्शवला असून, विविध स्तरांवर आंदोलने आणि निवेदने देऊन निषेध नोंदवला आहे. संस्थेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून शासन दडपशाहीचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संस्थेच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेवर ‘जैवविविधता उद्यान’ उभारण्याची योजना आहे आणि त्यासाठी आधीच शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही जागा बांधकामासाठी वापरल्यास येथील परिसंस्था धोक्यात येऊन जैवविविधतेचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील महत्त्वाचा ‘ग्रीन झोन’ नष्ट झाल्यास पुण्याच्या पर्यावरणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे, १८९२ पासून या उद्यानाच्या देखभालीसाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. तरीही संस्थेने लोकसहभागातून हे ठिकाण जपले आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली या ऐतिहासिक वारशावर गदा आणू नये, अशी मागणी संस्थेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेकरांनी आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी व्हावे आणि शहराच्या ‘फुफ्फुसां’चे संरक्षण करावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक सोशल फाउंडेशनने राईट टू एज्युकेशन (RTE) ॲक्ट, २००९ मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अनुदान, अंतर निकष आणि अल्पसंख्याक संस्थांना सध्या दिलेली सूट रद्द करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे. नागरिक सोशल फाउंडेशनचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे संचालक प्रीतम थोरवे आणि अमेय सप्रे उपस्थित होते. भारतीय संविधानातील कलम २१ए नुसार, ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क सर्वांना समानतेने मिळावा, अशी संस्थेची भूमिका असल्याचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले. शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याने, आरटीई कायदा कोणत्याही अपवादाशिवाय सर्व शैक्षणिक संस्थांवर, अल्पसंख्याक संस्थांसह, समानपणे लागू करावा, अशी प्रमुख मागणी फाउंडेशनने केली आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांना सध्या दिलेली सूट (कलम १(५)) रद्द करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एकसमान आणि न्याय्य धोरण लागू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आरटीई अंतर्गत शाळांना दिले जाणारे अनुदान वेळेत न मिळाल्यास, थकीत रकमेवर व्याजासह पेमेंट करण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली. सध्याचा १ किमी/३ किमी अंतर निकष शहरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा ठरत आहे. त्यामुळे, A+, A, B, C, D ग्रेडिंग प्रणालीवर आधारित नवीन निकष तयार करून ग्रामीण व शहरी भागांसाठी स्वतंत्र नियम निश्चित करावेत, असे फाउंडेशनने सुचवले आहे. समाजातील सर्व घटकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेत 'महाराष्ट्र राज्य दिव्यांग निधी' स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, या निधीसाठी प्रारंभी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे दिव्यांगांच्या हक्काधारित, सर्वसमावेशक आणि परिणामकारक सक्षमीकरणाला आर्थिक पाठबळ मिळणार असल्याचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले. सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मधील कलम 88 नुसार स्थापन होणारा हा निधी दिव्यांगांच्या हक्काधारित सक्षमीकरणासाठी आर्थिक पाठबळ देणार आहे. राज्य शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची पुनर्रचना करून त्याला ‘दिव्यांग सक्षमीकरण विभाग’ असे स्वरूप दिले असून, कल्याणकेंद्री दृष्टिकोनाऐवजी हक्काधारित व्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली आहे. नियमित योजनांबाहेरील उपक्रमांना प्राधान्य राज्य निधीच्या माध्यमातून नियमित योजनांच्या चौकटीत न बसणारे किंवा निधीअभावी अपूर्ण राहिलेले उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. पुनर्वसन, रोजगार व उपजीविका, कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य सेवा, सहाय्यक साधनांची उपलब्धता तसेच समुदायाधारित समावेशक विकास या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. 20 कोटींची प्रारंभिक तरतूद या निधीसाठी राज्य शासनाकडून 20 कोटी रुपयांची प्रारंभिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय व्यावसायिक सामाजिक दायित्व (सीएसआर) देणग्या, अनुदान तसेच इतर विविध स्रोतांमधून प्राप्त होणारा निधीही या निधीत समाविष्ट केला जाणार आहे. विशेषतः सीएसआरच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उभारण्यावर विभागाचा भर राहणार आहे. निधी व्यवस्थापनासाठी नियामक मंडळ निधीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (दिव्यांग सक्षमीकरण) यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळात वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत राहतील, तर आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण हे सदस्य-सचिव म्हणून निधीचे कार्यभार पाहतील. जिल्हा ते राज्यस्तरीय सुसूत्र प्रक्रिया निधीच्या विनियोगासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समित्यांकडून प्रस्ताव प्राप्त केले जातील. हे प्रस्ताव आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण यांच्याकडे सादर होऊन त्यांची सखोल छाननी करण्यात येईल. त्यानंतर अभिप्राय व शिफारशींसह प्रस्ताव दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत नियामक मंडळासमोर सादर केले जातील. नियामक मंडळाच्या मान्यतेनंतरच निधीचा अंतिम विनियोग करण्यात येणार असून, यामुळे निधीचा पारदर्शक, गरजाधारित आणि परिणामकारक वापर सुनिश्चित होणार आहे. मार्गदर्शक सूचना निधीच्या अंमलबजावणीसंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे तसेच निधी वितरणाची प्रक्रिया याबाबत स्पष्ट आणि सुस्पष्ट नियमावली निश्चित करण्यात येणार आहे ‘सर्वसमावेशक महाराष्ट्र – सक्षम महाराष्ट्र’कडे वाटचाल “सर्वसमावेशक महाराष्ट्र – सक्षम महाराष्ट्र” या संकल्पनेशी सुसंगत असलेला हा उपक्रम दिव्यांगांसाठी सामाजिक-आर्थिक समता, अडथळामुक्त पायाभूत सुविधा तसेच डेटा-आधारित धोरणनिर्मितीला चालना देणारा ठरणार आहे. हा निर्णय दिव्यांग सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले पाऊल असून, नियमित योजनांमधून वंचित राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना प्रभावी सहाय्य मिळवून देण्यात हा निधी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हवामानातील बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत म्हणजे बागायतदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही तुटपुंजी मदत अपुरी असल्याचे सांगत जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील आंबा बागायतदारांसाठी जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून, सरकारने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. कोकणाने तुम्हाला नेहमीच राजकीय पाठबळ दिले आहे, याची जाणीव ठेवा, असे सुनावत जाधव यांनी या मदतीचा तीव्र निषेध नोंदवला असून, सरकारविरोधात एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी आंबा बागायतदारांना केले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजूला कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवला असून सकृतदर्शनी फळबागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 1 लाख 24 हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. तर काजू पिकाखाली 1 लाख 75 हजार 140 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मागील वेळी आपण आंबा आणि काजू उत्पादकांना 15 हजार हेक्टरी मदत दिली होती, यावेळी ती हेक्टरी 22 हजार रुपये केली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील आंबा व काजू बागायतदारांसह धान उत्पादकांनाही बोनस देण्याची घोषणा केली असून, त्यासाठीची आवश्यक कार्यपद्धती सध्या निश्चित केली जात आहे. हवामानातील बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सेना ८०० किमी रेंजची ब्रम्होस क्रूझ-क्षेपणास्त्र खरेदी करणार
नवी दिल्ली : भारतीय सेना ८०० किमीपेक्षा जास्त पल्ल्याची ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत आहे. सध्या सैन्याकडे ४५० किमी पर्यंत मारक क्षमता असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे. संरक्षण अधिका-यांनी सांगितले की, सेना या नवीन आवृत्तीची मोठी ऑर्डर देण्याची योजना आखत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळू शकते. मे २०२५ मध्ये […] The post सेना ८०० किमी रेंजची ब्रम्होस क्रूझ-क्षेपणास्त्र खरेदी करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणच्या मदतीच्या नावावर बनावट मदत
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये इराणमधील युद्धग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली फसवणूक करणा-या बनावट चॅरिटी नेटवर्कचा खुलासा झाला आहे. इराणी दूतावासाने १४ मार्च रोजी युद्धबाधितांच्या मदतीसाठी निधीचे आवाहन केले होते. या नावाखाली घाटीमध्ये सुमारे १७.९१ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह सोने, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा करण्यात आल्या. मात्र, हा पैसा गरजूंपर्यंत पोहोचला नाही. या रकमेचा मोठा हिस्सा […] The post इराणच्या मदतीच्या नावावर बनावट मदत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी मंचर येथे रंगेहाथ पकडले. एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी शिंदे यांनी एका इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत ४८ वर्षीय तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे एका भागीदारी फर्मचे भागीदार असून, त्यांच्या फर्मने पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे एका प्लॉटवर इमारतीचे बांधकाम केले होते. इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर तक्रारदारांनी अंशतः पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. हा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर प्रांताधिकारी शिंदे यांनी तो स्वतःकडे राखून ठेवला होता. तक्रारदार चौकशीसाठी गेले असता, शिंदे यांनी अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर एसीबीने मंचर येथे सापळा रचला आणि गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली.
मोदी आणि मी कामे मार्गी लावतोच
वॉशिंग्टन : अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान मोदी युद्धविरामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अमेरिकेच्या माजी लष्कर अधिका-याने मोदींवर विश्वास व्यक्त करताच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मी असे व्यक्ती आहोत, जी कामे मार्गी लावतातच असे उद्गार ट्रम्प यांनी काढले […] The post मोदी आणि मी कामे मार्गी लावतोच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बालेन शाह बनले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान
काठमांडू : नेपाळच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. प्रसिद्ध रॅपर तथा इंजिनीअर बालेन शाह यांनी शुक्रवारी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले आहेत. विशेष म्हणजे, मदेश क्षेत्रातून या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या उपस्थितीत शीतल निवास येथे […] The post बालेन शाह बनले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राहुल यांच्यात कार्यकर्त्यांसारखी समज
तिरुवनंतपुरम : केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या आकलनशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने यावर तीव्र आक्षेप नोंदवला. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी असे प्रतिपादन केले की, राहुल गांधींची आकलनशक्ती एखाद्या सामान्य पक्षकार्यकर्त्याइतकीच असणे ही खरे तर एक सकारात्मक बाब आहे. कारण पक्षकार्यकर्ता हा जमिनीवरील वास्तवाशी खोलवर जोडलेला असतो. आम्हाला याचा अभिमान वाटतो असे त्यांनी नमूद केले. […] The post राहुल यांच्यात कार्यकर्त्यांसारखी समज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशात एलपीजी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढले
नवी दिल्ली : शुक्रवारी सरकारने स्पष्ट केले की, देशातील सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प (रिफायनरीज) १००% क्षमतेने कार्यरत आहेत. देशांतर्गत एलपीजी उत्पादनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या देशात लॉकडाऊनसारखी कोणतीही परिस्थिती नाही. १४ मार्चपासून आतापर्यंत ३०,००० व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सचा पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाच्या […] The post देशात एलपीजी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून तरुणावर शस्त्राने हल्ला:पुण्यात टोळक्याकडून हल्ला, तिघांना अटक
पुण्यात श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. हडपसर रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेत मुंढवा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अक्षय आनंद गवळी (वय ३०, रा. कात्रज) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षय रिक्षाचालक आहे. त्याचा भाऊ अजिंक्य आनंद गवळी (वय २७, रा. शक्तीनगर, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी काशीराम मोघे (वय ३०), अभिषेक मोघे (वय २७) आणि नंदू नवनाथ थोरात (वय २९, तिघे रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य गवळी यांचा मोठा भाऊ अक्षय हा श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी कात्रजहून आला होता. गुरुवारी (२६ मार्च) एका संघटनेने घोरपडी गाव परिसरातून मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत कार्यकर्त्यांची छायाचित्रे किंवा नावाचा वापर न करण्याचे ठरले होते, मात्र काशीराम मोघे याचा फलक लावण्यात आला होता. यावरून कार्यकर्त्यांच्या दोन गटांत वाद झाला होता. अक्षयने मिरवणुकीत फलक लावण्यास विरोध केला होता. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी नंदू थोरात याने अक्षयला शिवीगाळ करत 'तुला माज आला का?' अशी विचारणा केली. अक्षयला मारहाणही करण्यात आली. त्यावेळी मिरवणुकीतील इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मिरवणूक संपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास अक्षय आणि त्याचा मित्र अमित परदेशी हे मांजरीतील झेड कॉर्नर येथे निघाले होते. मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकात आरोपी काशीराम मोघे आणि नंदू थोरात यांनी अक्षयला पाहिले. त्यांनी पुन्हा अक्षयला शिवीगाळ केली. हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील जाधव वस्तीत रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी अक्षयला अडवले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्यासोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पसार झालेल्या इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी क्रीडा आणि कलागुणांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले. त्यांनी सर्वांना स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धांचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अपर आयुक्त रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, संतोष गोरड, अरुण जऱ्हाड, नीलम बाफना यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दैनंदिन जीवनात खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि निरोगी स्पर्धा वाढते, असे ते म्हणाले. आयुष्यात क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांची जोपासना आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त पापळकर यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्यातील गुणांचा विकास करण्यासाठी खेळण्याचे आवाहन केले. छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवण्याच्या जिद्दीने खेळण्याचे प्रोत्साहन त्यांनी दिले. तणावमुक्त जीवनासाठी क्रीडांगणावर सराव करून घाम गाळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. या स्पर्धांमधील विजेते खेळाडू आणि संघ विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी निवडले जातील. परभणी येथे ३ ते ५ एप्रिल दरम्यान या विभागीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची भीती दूर करण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने संवाद साधता यावा यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करण्यात आला आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली, फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे संचालक ॲड. मोहन कोरडे यांनी हा विशेष कोर्स सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी प्रास्ताविक करून स्पीकिंग कोर्सचे महत्त्व स्पष्ट केले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनीषा नगरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ॲड. मोहन कोरडे यांनी स्वतः मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन इंग्रजी भाषेची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजीतील वर्तमान काळाच्या संकल्पनेवर हसत-खेळत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून प्राथमिक चाचणी सोडवून घेण्यात आली. सहावी ते नववीचे विद्यार्थी आणि सर्व वर्गशिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. हे प्रशिक्षण तीन दिवस चालणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गुळवे यांनी केले. तेजस्विनी देसले, प्रकाश इंगळे, संगीता चौधरी, सूर्यमाला जाधवर, किरण पवार, रेखा माचेवार, हर्ष नरवडे, सचिन लवेरा आणि काकासाहेब जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने गेल्या सव्वा वर्षापासून केवळ आमदार म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली आहे. भायाळा येथील नारळी सप्ताहात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी 'जन्मापासूनच माझ्या पाठीशी संघर्ष आहे' असे सांगत, मंत्रिपद नसल्याची खंत व्यक्त केली. गेल्या सव्वा वर्षात अनेक सार्वजनिक कार्यक्रम आणि भाषणे टाळणाऱ्या धनंजय मुंडेंनी, 'माझ्या गप्प राहण्यातच जर एवढी ताकद असेल, तर बोलल्यानंतर काय होईल?' असा सूचक इशाराही यावेळी दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. जन्माला आलो 4 महीने डोळेच उघडले नाहीत यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, धार्मिक व्यासपीठावरून मी बोलणार नव्हतो, पण महंतांनी आदेश दिल्यानंतर पाळावा लागतो म्हणून मी बोलतो. पुढे ते म्हणाले, अनेक जणांनी माझ्या गेल्या सव्वा-दीड वर्षांपासून आलेल्या संकटांच्या बाबतीत आज आठवण काढली. धोंडे साहेब आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतोय, जसे जन्माला आलो तसे माझ्या पंथी संघर्ष आहे. जन्माला आलो 4 महीने डोळेच उघडले नाहीत. जन्मतःच लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकट आले, पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. गप्पा राहण्यातच एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल? पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, बोलणाऱ्यांना बोलू द्या, कोणी कितीही बोलले तरी मी सव्वा वर्ष गप्प राहिलो, अजिबात बोललो नाही. कारण, आपल्या गप्पा राहण्यातच एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, मी रथावर बसावे म्हणून एवढा आग्रह सगळ्यांचा होता, गाडीच्या आडवा झाला कार्यकर्ता. पण याला कसे सांगावे. अरे रथावर घोड्याच्या बसावे लागते, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचे दिले पण माझे नाव अर्जुनाच्या एका नावातले धनंजय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही- पंकजा मुंडे यावेळी कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भावनिक भाषण केले. त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, ही शपथ मी चितेवर खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
आईच्या उपचारासाठी पाठवले जाणारे 80 हजार रुपये चुकून दुसऱ्या फोन पे वर गेल्यानंतर हिंगोलीच्या सायबर सेलने तातडीने कारवाई करत 80 हजार रुपये परत मिळवून दिली आहेतअकोला जिल्हयातील जांब येथील अशोक सूर्यभान लठाड हे हिंगोली येथे कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी त्यांच्या आईच्या उपचारांसाठी वर्धा येथी आपल्या भावाच्या फोन पे नंबर वर 80 हजार रुपये पाठवले. परंतु फोन पे मोबाईल नंबरचा एक नंबर चुकल्यामुळे सदरचे 80 हजार हे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरातील एका महिलेच्या अकाउंट वर गेले. सदरची चूक कळल्यानंतर अशोक लठाड यांनी सदर महिलेशी संपर्क साधला. पण सदर महिलेने मोबाईल नंबर स्विच ऑफ करून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अशोक लठाड यांनी सायबर सेल हिंगोली येथे येऊन घटनाक्रम सांगितला. त्यांची अडचण लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे जमादार प्रदीप झुंगरे, मारुती काकडे, दत्ता नागरे, प्रणिता मोरे यांनी तातडीने माहिती घेण्यास सुरुवात केली या पथकाने सदर मोबाईलचे डिटेल्स घेतले असता सदरची महिलाही ठाणे जिल्ह्यातील कल्याण उल्हासनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेल हिंगोलीने तत्काळ कल्याण तालुका पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून सपोनि दत्तात्रय नलावडे कल्याण तालुका पोलीस स्टेशन यांच्यामार्फत उल्हासनगर येथील सदर महिलेचा पत्ता मिळवला. तसेच चुकून गेलेले 80 हजार रुपये तात्काळ परत करा, अन्यथा कायदेशीर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याबाबत बजावले. त्यानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांनी तक्रारदार अशोक लठाड यांचे 80 हजार रुपये तात्काळ परत केले. त्यानंतर लठाड यांनी आईच्या उपचारासाठी पैसे भरले. आईच्या हॉस्पिटलच्या कामासाठी पाठवलेले पैसे अचानक दुसऱ्या अकाउंट वर गेले व ज्यांच्या अकाउंट वर गेले त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अशोक लठाड यांच्यासमोर आईच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सायबर सेलच्या मदतीने तक्रारदार यांचे पैसे तात्काळ परत मिळून दिल्याने तक्रारदार अशोक लठाड यांनी हिंगोली पोलिसांचे आभार मानले.
राज्याचे दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास दोन महीने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही या घटनेचा तपास सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे प्रकरणाच्या चौकशीसाठी अनेकांच्या भेटी घेत आहेत. तसेच कर्नाटकमध्ये जाऊन त्यांना एफआयआर निंदवावा लागला आहे. आता संसदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अपघाताच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी झीरो अवरमध्ये अजित पवारांच्या अपघाताचा विषय मांडला. याबाबत रोहित पवारांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, अजितदादांना न्याय मिळावा यासाठी आज खासदार सुप्रियाताई यांनी झीरो अवरमध्ये अत्यंत तळमळीने आणि प्रभावी शैलीत संसदेत या विषयांची मांडणी करून अजितदादांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती पवारांनी केली आहे. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? संसदेत झीरो अवरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या भावाला जाऊन आज दोन महीने पूर्ण झाले. 28 जानेवारी रोजी माझ्या भावाचे विमान क्रॅश झाले होते. दोन महीने झाले या गोष्टीला. एखाद्या घरातला कर्ता पुरुष जातो न त्याचे दुःख त्या कुटुंबालाच माहीत असते. आम्ही पण हे भोगले आहे. मग विमानात जाऊदे, रेल्वेमध्ये जाऊदे, सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाची झाली आहे. सुरक्षितता कशासाठी? तर माझ्या भावाचे प्लेन क्रॅश झाले. दोन महीने झाले, माझ्या कुटुंबाला कुठे नये मिळाला? माझा भाऊ डेप्युटी चीफ मिनिस्टर होता महाराष्ट्राचा. त्याला जर न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. एक एफआयआर करायला एवढी अडचण? पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहित पवारला एक एफआयआर दाखल करायला जंग-जंग करावी लागली. आमच्या राज्याने तर महाराष्ट्रात घेतलाच नाही. पण अनेक राज्यांमध्ये जाऊन त्याने विणवण्या केल्या, की एफआयआर दाखल करा आणि आमच्या काकांना न्याय मिळू द्या. एक एफआयआर करायला एवढी अडचण? या देशाच्या एवढ्या मोठ्या डेप्युटी चीफ मिनिस्टरचा जेव्हा एवढा मोठा अपघात होतो आणि त्याचा एफआयआर होत नाही, तर सर्वसामान्य लोकांनी जायचे कुठे? एवढा मोठा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. एवढ्या मोठ्या नेत्याचा एवढा मोठा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी हात जोडून भारत सरकारला विनंती आहे की पारदर्शक चौकशी व्हावी. सगळ्याच अपघातांची, मग तो अहमदाबादचा क्रॅश असू दे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बिपिन राऊत गेले ते असूदे, मध्ये एक एयर अॅम्ब्युलेन्स क्रॅश झाला झारखंडमध्ये किंवा अजित पवारांचे विमान पडलेले, न्याय हा समानच असला पाहिजे. सरकारने उत्तरे दिली पाहिजेत आधी आम्हाला सांगितले ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितले खराब झाला. रोहित पवारांच्या प्रयत्नांवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केले. माझी त्यांनाही विनंती आहे की टाइम बाउंड मॅनरमध्ये ही चौकशी झाली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. आणि अजित पवारांना जी केस झाली, त्या विमानातील पायलट असतील तसेच जे लोक त्या विमानात होते, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा ही भारत सरकारकडे विनम्र मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या सातारा जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला. सातारा पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. या संमेलनाच्या तयारीच्या निमित्तानं साताऱ्यातील युवा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सातारा जिल्ह्यातील विद्रोहीचे युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. या मेळाव्यास महाराष्ट्रासह देश विदेशात चर्चेत असलेले दंगलकार नितीन चंदनशिवे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक डॉ. भारत पाटणकर, विद्रोही संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके, सरचिटणीस अॅड. राजेंद्र गलांडे, संघटक डॉ प्रशांत पन्हाळकर, उपाध्यक्ष मंगला साठे,डॉ.विजय माने, डॉ. आनंद साठे, प्रा. गौतम काटकर, प्रा.डॉ. भरत जाधव उपस्थित होते. प्रबोधन गीतांच्या सादरीकरणानं मेळावा सुरु अमित कांबळे, पूजा भिसे, आरुष कांबळे, आस्तिका आगाशे, ऋतुजा बैले यांनी प्रबोधनाच्या गाण्यांचं सादरीकरण केलं. दोन्ही सत्रात प्रबोधनाची गीतं सादर करण्यात आली. दंगलकार नितीन चंदनशिवे यांची काव्य मैफिल दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी निर्धार मेळाव्यात कवितांचं सादरीकरण केलं.या वेळी त्यांनी भारताचे नागरिक म्हणून आणि माणूस म्हणून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. नितीन चंदनशिवे यांनी कवितेच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या सामाजिक स्थितीवर परखड भाष्य केलं. साताऱ्याचं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन महाराष्ट्राला नवा विचार देणारं ठरेल, असं ही त्यांनी म्हटलं. आरुष कांबळेंच्या पिगी बँकेचा निधी विद्रोही संमेलनाला विद्रोही साहित्य संमेलनाची आजवरची परंपरा लोकसहभागातून, कष्टकऱ्यांनी दिलेल्या पैशांच्या माध्यमातून एक मूठभर धान्य आणि एक रुपया या सूत्राद्वारे सुरु आहे. साताऱ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या तयारीसाठी छोटे शाहीर आरुष कांबळे यांनी पिगी बँकेतील निधी देत केली. आरुषच्या या निर्णयाचं सर्वांकडून कौतुक करण्यात आलं. विद्रोही साहित्य संमेलनाच्या तयारीचा वेग वाढवू : डॉ. भारत पाटणकर विद्रोही साहित्य संस्कृती संमलेनाच्या तयारीच्या निमित्तानं झालेल्या चर्चेत हणमंत सावंत, शिवराम ठवरे, डॉ. प्रशांत पन्हाळकर, मयूर खराडे, पूजा भिसे, प्रियांका गडदे यांनी सहभाग घेतला. डॉ. भारत पाटणकर यांनी विद्रोहीच्या युवा कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध मुद्यांवर त्यांनी मार्गदर्शन केलं. प्रतिसरकारच्या सातारा भूमीत होणारं संमेलन यशस्वी होण्यासाठी आता सुरु असलेल्या तयारीला आणखी वेगवान करुया, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर देण्यासाठी फडणवीस सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, याअंतर्गत 1 जानेवारी 2011 पर्यंत सरकारी जमिनीवर झालेली व सध्या अस्तित्वात असलेली अतिक्रमणे आता नियमानुकूल केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. तसेच यासाठीची पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, पात्र लाभार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, ज्यामुळे हजारो कुटुंबांच्या डोक्यावर कायमस्वरूपी हक्काचे छप्पर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील सुमारे 4,500 कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, येथील जुन्या सर्व्हे नंबर 369 मधील घरांना मालकी हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली विधानसभेत दिली होती. ज्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला या कुटुंबांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विधानसभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेत आहे. या अंतर्गत पुलगावमधील रहिवाशांना त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड, खासगी सनद आणि अधिकृत नोन अभिलेखित करून दिली जाईल. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामीण भागात यासाठी विशेष समित्या नेमून जुन्या चुकीच्या नोंदी रद्द केल्या जातील आणि सर्वसामान्यांना त्यांच्या घराचा अधिकृत मालकी हक्क मिळवून दिला जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी विधानसभेत बोलताना दिली होती.
‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या
मुंबई : वंदे भारत गाड्यांप्रमाणे सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षा सूचना (अनाऊन्समेंट) सुरू करण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला दिला. गाडी कोणत्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे, याची माहिती देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले. प्रवाशांनी चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे टाळावे असे न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निकालात म्हटले आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे […] The post ‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आदिवासी कामगारांच्या वेतनासाठी निधी का नाही?
मुंबई : कुपोषणामुळे हाडाचे सांगाडे दिसणा-या, धड चालताही न येणा-यांना अन्न देण्यासाठी, रुग्णांना रक्त पुरविण्यासाठी आणि मनरेगावर अवलंबून असलेल्या आदिवासी कामगारांना एक दिवसाचे वेतन देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, घरी बसणा-यांना पैसे (लाडकी बहीण योजना) देण्यासाठी सरकारकडे निधी आहे. ही स्थिती गंभीर आहे, अशी उद्विग्नता मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केली. जे जगण्यासाठी लढत आहेत, […] The post आदिवासी कामगारांच्या वेतनासाठी निधी का नाही? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक : भोंदू अशोक खरातचे कोट्यवधीचे आर्थिक उद्योग बघता आता त्याच्या मागे ईडी, विदेशी चलन (फॉरेक्स) आणि कस्टमचाही ससेमिरा लागण्याची चिन्हे आहेत. खरातच्या व्यवहाराची कागदपत्रे आता सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच त्याच्या विदेश दौ-यांची व विदेशी चलन व्यवहारांची फॉरेक्सकडून चौकशी होणार आहे, तर दुसरीकडे त्याने तुर्कस्तानमधून आणलेल्या फर्निचरप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर विदेशातून आणलेल्या […] The post खरात चौकशीच्या चक्रव्युहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील जीएसटी विवरणात ६,६६६ कोटींच्या विसंगती
नागपूर : राज्यातील जीएसटी प्रदान करणे व विवरण दाखल करण्याच्या पद्धतीत मोठी विसंगती असल्याची बाब समोर आली आहे. ११९ प्रकरणांमध्ये तब्बल ६ हजार ६६६ कोटींच्या विसंगती आढळल्या आहेत. कॅगच्या (भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक) अहवालात यासंदर्भात ठपका ठेवण्यात आला आहे. २०१९-१९ ते २०२०-२१ या वर्षासाठी जीएसटी प्रदान विवरणे दाखल करण्यासंदर्भात झालेल्या लेखापरीक्षणातून ही बाब स्पष्ट झाली […] The post राज्यातील जीएसटी विवरणात ६,६६६ कोटींच्या विसंगती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
झिरवाळांच्या व्हीडीओची सत्यता पडताळणार
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या एका कथित आक्षेपार्ह व्हीडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ एका गंभीर वादाच्या भोव-यात अडकले आहेत. एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा त्यांचा अश्लील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी आता झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी […] The post झिरवाळांच्या व्हीडीओची सत्यता पडताळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असतानाच आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिक पोलिस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. या परिषदेत त्यांनी विविध नेत्यांचे अशोक खरातसोबतचे फोटो सादर करत अनेक प्रश्न उपस्थित केले. या फोटोंमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून राजकीय वातावरण तापले आहे. पत्रकार परिषदेत सुषमा अंधारेंनी भाजप नेते अतुल सावे, शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे, तसेच मंत्री दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो दाखवले. एका भूमिपूजन कार्यक्रमात खरात पुजारी म्हणून उपस्थित असल्याचे फोटो त्यांनी सादर केले. हा भस्मासूर नेमका कोणी तयार केला? त्याला आर्थिक पाठबळ कोणी दिलं? असा थेट सवाल अंधारेंनी उपस्थित केला. या सर्व नेत्यांचे खरातशी संबंध काय होते, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. सिन्नर एमआयडीसीशी संबंधित एका कार्यक्रमातील फोटो दाखवत अंधारेंनी आणखी शंका उपस्थित केल्या. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा त्या कार्यक्रमाशी काय संबंध, तसेच रुपाली चाकणकर तिथे का उपस्थित होत्या, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्या कार्यक्रमात एमआयडीसीचा स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होता, हेही त्यांनी निदर्शनास आणले. चाकणकर यांनी सामाजिक उपक्रमासाठीच भेट झाली, असे स्पष्टीकरण दिले असले, तरी ते समाधानकारक नसल्याचे अंधारेंनी म्हटले. आरोप करणाऱ्यांनी या फोटोंचे उत्तर द्यावे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सुषमा अंधारेंनी विशेष तपास पथकाकडे (SIT) अधिकृत पत्र दिले आहे. दीपक केसरकर यांची चौकशी करावी, तसेच संबंधितांचे फोन रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहार तपासावेत, अशी मागणी त्यांनी केली. माझ्या नेत्यांवर आरोप करणाऱ्यांनी आता या फोटोंचे उत्तर द्यावे, असे आव्हान देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच आर्थिक गुन्हे शाखेलाही भेट देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही गंभीर दावे दरम्यान, अंधारेंनी काही गंभीर दावेही केले. अशोक खरातला 2012 मध्ये बंदुकीचा परवाना देण्यात आला आणि 2024 मध्ये त्याचे नूतनीकरण झाले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या काळात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यरत होते, मग खरातविरोधात कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी केला. तसेच ‘शिविका ट्रस्ट’ला पाणी देण्याचा निर्णय ग्रामसभेच्या ठरावानुसार झाला असल्याचे सांगत, त्या प्रक्रियेत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व आरोपांमुळे खरात प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
लॉकडाऊनबाबत अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई
मुंबई : सोशल मीडियावर देशात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा पसरवली जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारताच्या शेजारच्या देशात शटडाऊनची परिस्थिती आली आहे. मात्र, आपल्या केंद्र सरकारने उत्तम व्यवस्था केली आहे. लोकांनी विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. आपल्याकडे एक महिना पुरेल एवढा […] The post लॉकडाऊनबाबत अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणाऱ्या कथित व्हिडीओ प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात झिरवळ यांचा तातडीने राजीनामा घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दरवेळी आरोप झाले की राजीनामा घ्यायचा, ही पद्धत योग्य नाही, अशी भूमिका पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच झिरवळ यांचे काही कथित व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वातावरण तापले होते. या व्हिडीओमुळे झिरवळ यांच्यावर कारवाई होणार का, याबाबत तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने झिरवळ यांना अभय देत त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे. याआधी पक्षातील काही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याने या निर्णयाकडे विशेष लक्ष लागले होते. यापूर्वी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निकटवर्तीयांच्या अटकेनंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच, न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे झिरवळ यांच्या बाबतीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सध्याच्या प्रकरणात पक्षाने वेगळी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली बाजू मांडली आहे. काही व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एकत्र करून सादर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी झिरवळ यांना अधिकृत तक्रार करण्याचा सल्ला दिला असून, व्हिडीओंची सत्यता तपासली जाईल असे सांगितले आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करूनच पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांचे अशोक खरात प्रकरणावरही भाष्य याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरणावरही भाष्य करत कडक भूमिका घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, पीडित महिलांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवरही कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणात गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेशही त्यांनी दिला आहे.
नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक १६ नितीन जाधव यांच्या न्यायालयाने नकली चलन प्रकरणात दोन आरोपींना दोषी ठरवले आहे. जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम शेख यांना सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येकी ५०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त सहा महिने शिक्षा भोगावी लागेल. हे प्रकरण २८ नोव्हेंबर २०२५ रोजी उघडकीस आले. त्यावेळी तहसील पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पथक गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, मेयो हॉस्पिटल जवळील गार्ड लाईन परिसरात दोन तरुणांकडे नकली नोटा आहेत. पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपी जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम शेख (दोघेही रा. काली चौक, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल) यांना ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती आणि बॅगची तपासणी केली असता, त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या एकूण २४३ नकली नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटा हुबेहूब खऱ्या भारतीय चलनासारख्या दिसत होत्या, परंतु त्यात अनेक नोटांचे क्रमांक सारखेच होते. पंचांसमक्ष जप्ती पंचनामा तयार करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या नोटा नकली आहेत की खऱ्या, याची खात्री करण्यासाठी नाशिक येथील नोट छपाई प्रेसकडे अभिप्राय घेण्यात आला. अहवालात सर्व नोटा नकली असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस निरीक्षक रसूल शेख यांनी संपूर्ण तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले, ज्यात जप्ती पंच, चालू साक्षीदार आणि भारतीय चलनी मुद्रणालय प्रेसचा अहवाल हे प्रमुख पुरावे ठरले. सहाय्यक सरकारी वकील अॅड. अभय जिकार यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत आरोपींना दोषी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ झाला. एमआयएम (MIM) पक्षाच्या सदस्यांनी प्रशासनावर 'हिटलरशाही'चा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सभागृहातून सभात्याग केला. भाजप आणि शिवसेना सदस्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान घेतले जाते, त्याचप्रमाणे शहराच्या अस्मितेशी जोडलेल्या नामांतराच्या विषयावरही जनतेचे मत जाणून घ्यायला हवे होते. मुंबईत बसून दोन अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण शहरावर लादणे, ही सरळ सरळ 'हिटलरशाही' आहे. एमआयएम सदस्यांनी मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, शहराला सध्या नाव बदलण्याची किंवा पुतळ्यांची नव्हे, तर चांगले दवाखाने, दर्जेदार शाळा, रस्ते आणि पिण्याचे पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांची गरज आहे. प्रशासन भावनिक मुद्द्यांवर वेळ वाया घालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेच्या सुरुवातीला 'उबाठा' (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सदस्यांनी पाणी योजनेच्या श्रेयावरून गोंधळ घातला होता. त्यानंतर नामांतराच्या मुद्द्यावरून एमआयएम सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. वारंवार सूचना देऊनही गोंधळ थांबला नाही आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने सभागृहात मोठी खडाजंगी झाली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिलीच सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली. पाणी योजनेच्या श्रेयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या सदस्यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. यामुळे महापौर समीर राजूरकर यांनी आक्रमक भूमिका घेत 'उबाठा'च्या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच 'उबाठा' गटाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी शहराची पाणी योजना उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केली आहे, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्याचा ठराव संमत करा, अशी मागणी करत घोषणाबाजी सुरू केली. गटनेते गणेश लोखंडे, माजी महापौर रशीद मामू आणि सचिन खैरे यांच्यासह इतर सदस्यांनी सभागृहाच्या मध्यभागी येऊन गोंधळ घातला. महापौरांनी वारंवार सूचना देऊनही गोंधळ थांबला नाही. अखेर, मार्शलच्या मदतीने या सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. सभागृहाबाहेर काढल्यानंतर या सदस्यांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून आणि परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळामुळे सभेच्या सुरुवातीला व्यत्यय आला असला, तरी महापौरांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पुढे सुरू झाले. या सभेत महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या वाढीव खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. टीव्ही सेंटर येथील मजनूहिल परिसरात बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी सुधारित आराखड्यानुसार खर्च १.४९ कोटींवरून २.६७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी खरेदी केलेल्या 'पॉटहोल पॅचिंग मशीन'साठी ७० लाख ८६ हजार रुपयांच्या वार्षिक कराराचा प्रस्तावही चर्चेला आला. या प्रस्तावावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या बैठकीत शहरातील विविध रस्ते आणि चौकांच्या नामकरणाचा प्रस्तावही चर्चेला आला. प्रबोधनकार ठाकरे सभागृहात ११५ नगरसेवकांच्या उपस्थितीत ही सभा सध्या सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये स्थानिक प्रश्नांवरून मोठी चर्चा सुरू आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या नगरसेवक श्रीपाद छिंदमला सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर काढले. छिंदम याला सभागृहात बोलण्याचा व बसण्याचा अधिकार नाही. त्याला प्रवेश न देण्याचा ठराव करा, त्याला बाहेर काढा, असे म्हणत सर्व नगरसेवकांनी सभात्याग करण्याचा इशारा दिला. अंदाजपत्रकीय चर्चा सुरू असताना श्रीपाद छिंदम यांनी बजेटवरील चर्चेत सहभाग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संपत बारस्कर, गणेश भोसले, मयूर बांगरे, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, विकी जगताप यांनी त्याला सभागृहात बसण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. भाजपाचे नगरसेवक अमोल येवले यांनीही त्याला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे व ठाकरे गटानेही त्याला सभागृहातून बाहेर काढावे, अशी मागणी केली. संपत बारस्कर यांनी छिंदम याला सभागृहात न थांबता बाहेर जाण्याबाबत सांगितले. त्यानंतर काही नगरसेवकांनी आक्रमक होत त्याच्या दिशेने धाव घेतली. सर्वांनी मिळून त्याला सभागृहातून बाहेर काढले. ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्याला सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही. याबाबत कायदेशीर मार्गाने अजेंड्यावर विषय घेऊन निर्णय घ्यावा. यापूर्वीही त्याला त्याचे पद रद्द करून सभागृहातून काढून टाकले होते. याबाबत आता पुन्हा ठराव करण्यात यावा. पुढच्या सभेत हा विषय अजेंड्यावर नसेल, तर आम्ही सभागृहात थांबणार नाही, असा इशारा संपत बारस्कर व इतर नगरसेवकांनी दिला.
हिंगोली जिल्ह्यात केवळ ध्वजवंदनासाठी येणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या घेतलेल्या ऑनलाईन बैठकांचे गुपित कायम आहे. जे नाशिकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे आता त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली तसेच निविदा न काढलेली कामे तातडीने रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून नरहरी झिरवाळ यांची निवड झाल्यानंतर पहिल्याच दौऱ्यापासून ते वादग्रस्त ठरले आहेत. वसमत येथील पहिल्याच भेटीत त्यांनी मागास जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून निवड केल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्रमांनाही त्यांनी पालकमंत्री या नात्याने हजेरी लावलीच नाही. त्यामुळे त्यांची नाराजी उघड झाल्याचे दिसून आले. दरम्यान, हिंगोली मागास जिल्हा, गरिब जिल्हा असे वक्तव्य करून रोष ओढून घेणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी टिका होऊ लागलाच यु टर्न घेतला अन गरिब जिल्हयात विकास कामे करता येतील असे आपले म्हणणे होते असे सांगत आपल्या वक्तव्यावर पांघरून घातले. मात्र हिंगोलीत ध्वजवंदन कार्यक्रमास उपस्थिती लावणाऱ्या पालकमंत्री झिरवळांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलीच नाही. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सुमारे तीन बैठका त्यांनी ऑनलाईनच घेतल्या. या बैठकानंतर जे नाशीकला पोहोचले त्यांचीच कामे मंजूर झाली अन इतरांच्या कामांना मात्र नंतर पाहूत असे सांगत बाजूला केल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे हिंगोलीकरांच्या नाशीकच्या वाऱ्या चांगल्याच वाढल्या होत्या. तर काही तथाकथीत कंत्राटदार देखील कामांचे प्रस्ताव घेऊन स्वतःच नाशीककडे जाऊ लागले होते. त्यामुळे झिरवाळांच्या कार्यपध्दतीवर रोष व्यक्त होऊ लागला होता. पालकमंत्री तुपाशी अन अधिकारी उपाशी अशी म्हण शासकिय कार्यालयांमधून विशीष्ट आर्थाने बोलली जाऊ लागली होती. दरम्यान, पालकमंत्री झिरवाळांच्या कथीत व्हिडीओने राज्यभरात खळबळ उडाली असली तर त्यांच्या या अफाट कर्तृत्वाने हिंगोलीचे नांव मात्र लयाला गेले आहे. यामुळे जिल्हाभरातून आता पालकमंत्री झिरवाळ यांच्या कार्यपध्दतीवर टिका होऊ लागली आहे. जिल्हा नियोजन समितीची मंजूर झालेली अन ज्या कामांच्या निवीदा काढलेल्या नाहीत ती कामे रद्दच करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. सदर कामे रद्द केल्यानंतर ऑनलाईन बैठकीचे गौडबंगाल उघड होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांची तपासणी केल्यानंतर १३ जणांकडे गुटखा व तंबाखुच्या पुड्या आढळून आल्या आहेत. तर हे कर्मचारी कार्यालयात काम करीत असताना गुटखाचे सेवन करीत असताना आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात गुटखा बंदी असतांनाही अनेक ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याने पोलिस विभागाने पानटपऱ्यांची तपासणी करून कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे चोरून लपून गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी चालकांचे धाबे दणाणले आहेत. दररोज तीन ते चार ठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त होत आहे. दरम्यान, गुटखा खाऊन शासकिय कार्यालयाचे कोपरे रंगत असल्याचे चित्र दिसू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे यांच्या पुढाकारातून शासकिय कार्यालयातून तपासणी केली जात आहे. त्यानुसार जिल्हा सल्लागार डॉ. किरण लोंढे, कुलदीप केळकर, आनंद साळवे यांच्या पथकाने जिल्हा परिषद कार्यालयात तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने जिल्हा परिषद अंतर्गत विविध कार्यालयातून कर्मचाऱ्यांची तपासणी केली. यामध्ये १३ कर्मचारी गुटखा व तंबाखू खात असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यांच्याकडे गुटखा व तंबाखूच्या पुड्या देखील आढळून आल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जिल्हयातील इतर शासकिय कार्यालयामधूनही लवकरच तपासणी मोहिम हाती घेतली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट् केले आहे. केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. या प्रकरणी खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकली किंवा व्हॉट्सएपच्या माध्यमातून फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ व अशोक खरात प्रकरणातही चौकशी अंती ठोस कारवाई करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहे. यामुळे पेट्रोल - डिझेलचे दर वाढण्याची शक्यता होती. पण इंधन दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम सरकारी तेल कंपन्या व भारत सरकार सहन करणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आता अधिकच्या दरात पेट्रोल - डिझेल घ्यावे लागणार नाही. मी याविषयी भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूंच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती ओढावली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांतील लोकांनी गॅस व पेट्रोलच्या तुटवड्यामुळे जवळपास कार्यालये व संस्था बंद केल्या आहेत. अशावेळी भारताने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल-डिझेलची कोणताही तुटवडा होऊ दिला नाही. घरगुती गॅसची कोणतीही कमतरता होऊ दिली नाही. पेट्रोल पंपांवर रांगा लावण्याची गरज नाही मी सर्व लोकांना विनंती करतो की, विनाकारण अफवेच्या आधारावर पेट्रोल - पंपांवर रांगा लावू नका. आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल - डिझेलचा पूर्ण स्टॉक आहे. पण विनाकारण रांगा लावून जास्तीचे पेट्रोल-डिझेल भरून घेतले तर त्यातून मागणी व पुरवठ्यावर ताण निर्माण होतो. कृत्रिम टंचाई निर्माण होते. अशा प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आपण नेहमी ज्या पद्धतीने पेट्रोल-डिझेल भरतो, तसेच पेट्रोल - डिझेल ग्राहकांनी भरावे, असे फडणवीस म्हणाले. केंद्राने लॉकडाऊन लागणार नाही हे जाहीर केले आहे. जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकणे किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सएपच्या माध्यमातून पुढे पाठवली तरी तो गुन्हा ठरेल. अशा गुन्ह्यांतील प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना स्पष्टपणे सांगतोय की, खोट्या अफवा पसरवू नका, नाही तर फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नरहरी झिरवाळांनी संपर्क साधून स्थिती स्पष्ट केली मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओवरही भाष्य केले. नरहरी झिरवळ यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधून हा व्हिडिओ 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तत्काळ त्या संदर्भात एक तक्रार दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा केली जाईल. एकूण उद्भवलेल्या परिस्थितीची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार व आम्ही योग्य तो निर्णय करू. मागच्या काळात जी घटना घडली त्याचे पूर्ण चौकशी झाली. त्याचा संबंध झिरवळापर्यंत आढळला नाही. पण आत्ता जी घटना घडली आहे, जे काही व्हिडिओ समोर आलेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे आहे. ते जर सत्य असेल तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी भोंदू अशोक खरात प्रकरणातही व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. भोंदू अशोक खरातचे कुणासोबत फोटो किंवा व्हिडिओ येतात त्यावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. त्यातील व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग आहे का? हे महत्त्वाचे आहे. त्यात कुणाचा सहभाग असेल तर कारवाई होईल. नसेल तर केवळ फोटो आहे म्हणून कारवाई होणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की, या प्रकरणात कुणालाही सोडण्याचे कारण नाही. सरकार अतिशय खोलवर जात आहे. अनेक नव्या गोष्टी पुढे येत आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई अजून काही एफआयआर होण्याची शक्यता आहे. काही पीडित अजून पुढे येत आहेत. काही महिला पुढे येत आहेत. आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीही पुढे येत आहेत. त्यांचेही एफआयआर लवकरच पाहायला मिळतील. या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेत. ते आम्ही काढून टाकलेत. पण ज्या - ज्या लोकांनी हे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. पीडितांना पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. यापुढेही ज्या महिला पुढे येतील त्यांना संरक्षण दिले जाईल. हे संरक्षण गोपनियतेचे आहे. काही जण ही गोपनियता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे फडणवीस म्हणाले. संजय राऊतांच्या पक्षाकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुंदोपसुंदी विशेषतः आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यातील कथित वादावरही भाष्य केले. संजय राऊत यांचा पक्ष आता एवढा छोटा झाला आहे की, तिथे काय चालते त्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे ते आपसात भांडो, मारामाऱ्या करो, एकमेकांच्या झिंज्या उपटो, एकमेकांचे कॉलर पकडो, त्यांचे त्यांना लखलाभ. आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे, असे ते म्हणाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्या संजय राऊतांनी पक्षासाठी अहोरात्र कष्ट केले, सर्वांच्या अंगावर गेले, त्यांच्याबद्दल जर पक्षात अशी भूमिका घेतली जात असेल, तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची नाराजी आणि २०२८ मध्ये संजय राऊत खासदार नसतील, अशा आशयाचे विधान आदित्य ठाकरे यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हस्के बोलत होते. ..तर हे त्या पक्षाचे दुर्दैव खासदार म्हस्के म्हणाले की, संजय राऊत यांनी कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत असतानाही पक्षासाठी काम करणे सोडले नाही. पक्षासाठी ते सर्वांशी भिडले. पण आज जर त्यांनाच बाजूला सारण्याची भाषा केली जात असेल, तर हे त्या पक्षाचे दुर्दैव आहे. चतुर्वेदींची तुलना राऊतांशी होऊ शकत नाही नरेश म्हस्के म्हणाले की, प्रियांका चतुर्वेदी असो किंवा इतर कोणी, त्यांची तुलना संजय राऊतांच्या संघर्षाशी होऊ शकत नाही. केवळ 'हाय-प्रोफाईल' लोकांसाठी जुन्या जाणत्या नेत्यांचा सन्मान राखला जात नसेल, तर उरल्या-सुरल्या शिवसैनिकांनी आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पक्षासाठी झटणाऱ्या नेत्यांची किंमत नाही? नरेश म्हस्के म्हणाले की, आदित्य ठाकरे खरंच असं बोलले आहेत का? याचे उत्तर खुद्द संजय राऊतांनीच दिले पाहिजे. ज्या अन्यायाविरोधात एकनाथ शिंदेंनी बंड केले, तशीच वेळ आता राऊतांवर आली आहे का? असा खोचक सवालही म्हस्केंनी उपस्थित केला.आम्ही जेव्हा हे सर्व सांगत होतो, तेव्हा आमच्यावर टीका झाली. पण आज तेच चित्र पुन्हा दिसत आहे. पक्षासाठी झटणाऱ्या नेत्यांची किंमत उरली नसेल, तर ते चिंताजनक आहे. राऊत, आदित्य ठाकरेंत मतभेद - म्हस्के हक्काची जागा पवारांच्या झोळीत टाकल्याने पक्षात संतापाची लाट आहे. एकेकाळी ज्यांना जायचे आहे त्यांनी जा असे ठणकावून सांगणारे ठाकरे आता माझा तुमच्यावर विश्वास आहे अशी आर्जवाची भाषा वापरत आहेत. प्रियांका चतुर्वेदींच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. त्यांच्यात मोठी खडाजंगी आणि शाब्दिक चकमक झाल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. शरद पवारांसाठी जागा सोडल्याने चतुर्वेदी ठाकरेंसमोरच संतापल्या ऑपरेशन टायगर’च्या दहशतीखाली असलेल्या ठाकरे गटात आता अंतर्गत बंडाळीचा वणवा पेटला आहे. मातोश्रीवर पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून अभूतपूर्व हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही जागा शरद पवारांसाठी सोडल्याने प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट शड्डू ठोकला. आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवर खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. संजय राऊत यांनी पवारांचे नाव का घेतले? मला माझा तीव्र निषेध नोंदवायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर उद्धव ठाकरे यांनी “पक्षप्रमुख मी आहे. निर्णय माझाच असेल,’ असे सुनावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादाची ठिणगी अधिकच भडकली. मराठवाड्यातील एका खासदाराने, चतुर्वेदींना 6 वर्षे संधी देऊन पक्षाला काय फायदा झाला? असा बोचरा सवाल केला.
सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. ट्रक आणि मोटरसायकलमध्ये झालेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका गंभीर होता की, दोघांनाही कोणतीही मदत मिळण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख सैपन पटेल आणि हुजूर पटेल अशी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक आणि दुचाकी यांच्यात जोरदार टक्कर झाली आणि त्यानंतर दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यातील दृश्ये अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान, अशाच प्रकारचा आणखी एक अपघात सातारा जिल्ह्यातील म्हसवडजवळ घडला. पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. धुळदेव गावाच्या हद्दीत अर्धवट रस्त्याच्या कामामुळे वाहन चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. साताऱ्यातील या रस्त्याच्या कामाबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असून, त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव या रस्त्यावर गेले असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पैसे परत मागितल्यामुळे मारहाण दरम्यान, नाशिकमध्येही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेकडून लाखो रुपये उकळल्यानंतर संशयितांनी तिलाच बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शिवाजीनगर परिसरातील या प्रकरणात महिलेने पैसे परत मागितल्यामुळे तिला मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी सर्व प्रकरणांचा तपास सुरू केला आहे.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात ही शुद्ध धूळफेक असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सरकारने पेट्रोल - डिझेलवरील उत्पादन शुल्कात केलेली 10 रुपयांची कपात शुद्ध धूळफेक आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही, असे ते म्हणालेत. मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. हे नवीन दर तत्काळ लागू झालेत. सरकारी तेल कंपन्या पेट्रोलवर 24 रुपये व डिझेलवर 30 रुपये प्रति लिटर तोटा सहन करत आहेत. त्यामुळे त्या इंधन दरवाढीचा विचार करत होत्या. पण सरकारने ऐनवेळी कर कपात करून या कंपन्यांना दिलासा दिला आहे. पण विरोधकांनी सरकारच्या या कर कपातीचा देशातील सर्वसामान्य जनतेला काडीचाही फायदा होणार नसल्याचा दावा केला आहे. सरकारने निवडणुकीमुळे रचला खेळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची करकपात ही शुद्ध धूळफेक असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात 10 रुपयांची केलेली कपात म्हणजे शुद्ध धूळफेक आहे. ही कर कपात नागरिकांसाठी नव्हे, तर इंधनाचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी करण्यात आली आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही. 4 राज्यांमध्ये होऊ घातलेला विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने हा खेळ रचला आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत 60-70 डॉलर प्रतिबॅरल असताना, काँग्रेसच्या पुण्याईने इराण व रशियाकडून सर्वांत स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असताना केंद्र सरकारने कर कमी केला असता. पण सरकारने स्वस्त इंधनाचा फायदा जनतेला न देता प्रचंड कर लावून जनतेची लूट सुरू ठेवली. मोदीजींच्या कृपेने त्यांच्या उद्योगपती मित्रांची नफेखोरी सुरू राहिली. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे मोदीजींच्या उद्योगपती मित्रांना तोटा होत आहे, म्हणूनच या मित्रांच्या कंपन्यांवरील करात कपात करण्यात आली आहे, असे ते म्हणालेत. राज्यांवर व्हॅट कमी करण्याचा दबाव केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्यानंतर आता राज्य सरकारांवरील आपला व्हॅट कमी करण्याचा दबाव वाढला आहे. राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली, तरच पेट्रोल पंपांवर ग्राहकांना 2 ते 5 रुपयांची थेट सवलत मिळू शकणार आहे. हे ही वाचा… सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 10-10 रुपये घटवली:क्रूड महागल्याने कंपन्या दर वाढवू शकत होत्या, हे रोखण्यासाठी घेतला निर्णय सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रत्येकी 10 रुपयांची कपात केली आहे. पेट्रोलवरील शुल्क 13 रुपये प्रति लिटरवरून 3 रुपये करण्यात आले आहे, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्य करण्यात आले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. अमेरिका-इस्रायलसोबत इराणच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 73 डॉलरवरून वाढून 105 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. यामुळे तेल कंपन्यांना तोटा होत होता. तोटा भरून काढण्यासाठी तेल कंपन्या दर वाढवू शकल्या असत्या. उत्पादन शुल्क कमी करून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. कपातीचा परिणाम 7 प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या…
शब्दाला जागला हार्दिक पांड्या!
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात षटकारांचा पाऊस पाडणारा हार्दिक पांड्या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या विजयानंतर हार्दिकने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीने सिद्ध केले आहे की, तो केवळ एक अष्टपैलू खेळाडूच नाही, तर शब्दाला जागणारा माणूसही आहे. वानखेडे स्टेडियमच्या त्या पडद्यामागच्या नायकांसाठी हार्दिकने आपले वचन पूर्ण करत एक खास भेट दिली आहे. टी-२० वर्ल्डकपच्या […] The post शब्दाला जागला हार्दिक पांड्या! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डेटिंगच्या अफवांवर मलायकाला हसू
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री डान्सर आणि मॉडेल मलायका अरोरा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असल्याची बघायला मिळते. अलिकडेच मलायका एका कॉन्सर्टमध्ये मिस्ट्री बॉयसोबत स्पॉट झाल्याने चांगलीच चर्चेत आली होती. अरबाज खानसोबत घटस्फोट आणि नंतर अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आयुष्यात पुढे गेल्याचं पाहायला मिळालं.मात्र, अभिनेता सोराब बेदीसोबत […] The post डेटिंगच्या अफवांवर मलायकाला हसू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसांत सर्वच लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 अर्थसहाय्य जमा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण साधण्याचा सरकारचा हेतू आहे. गत अनेक दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याचा लाभ केव्हा मिळणार? असा सवाल महिला वर्गातून केला जात होता. त्यानुसार, आता फेब्रुवारीच्या निधी वितरणासाठी आवश्यक असलेली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे? मंत्री अदिती तटकरे याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील 2-3 दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे. महिलांना मोठा आर्थिक दिलासा उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना या योनजेमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मिळणारा हा सन्मान निधी त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरत आहे. अनेक लाभार्थी महिलांनी या योजनेवर समाधानही व्यक्त केले आहे. शासनानेही लाभार्थ्यांना याविषयी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक असून, खात्याचा तपशीलही अचूक असणे अनिवार्य आहे. या प्रकरणी कोणतीही अडचण आल्यास संबंधित बँक किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही. ते महिलांच्या सन्मान आणि स्वावलंबनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे सरकारचे मत आहे. येत्या काळातही ही योजना अधिक प्रभावीपणे राबवली जाईल आणि राज्यातील महिलांच्या विकासासाठी नवीन उपक्रम हाती घेतले जातील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरातच्या पापाचा पाढा वाचला जात आहे. यातच अनेक राजकीय नेत्यांचे खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहे. यातच आता नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे हे या भोंदूबाबासमोर हात जोडून बसल्याचे आणि खरात त्यांचे भविष्य सांगत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महिलांच्या शोषणाचे आरोप असलेल्या या बाबाचे राजकीय धागेदोरे आता चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे व्हिडिओमध्ये? व्हायरल होत असलेल्या या चित्रफितीत अशोक खरात हा एखाद्या सिद्ध पुरुषाप्रमाणे माजी खासदार हेमंत गोडसे यांचा हात पाहून त्यांच्या आगामी काळातील घडामोडींवर भाष्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, खरात सांगत असलेले भविष्य गोडसे अत्यंत गंभीर मुद्रेने आणि श्रद्धेने ऐकत असल्याचे चित्रात स्पष्ट होत आहे. महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असलेल्या अशा व्यक्तीच्या संपर्कात बडे लोकप्रतिनिधी असल्याने आता जनमानसातून संताप व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आपल्या राजकीय भविष्याबद्दल आणि निवडणुकीतील यशापयशाबद्दल खात्री करून घेण्यासाठीच गोडसे यांनी या भोंदूबाबाच्या दरबारात हजेरी लावली होती का? अशी चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आणि कधीचा आहे, याबाबत गोडसे यांच्याकडून किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. खरात आधीच घ्यायचा ग्राहकांची माहिती तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या ग्राहकांविषयी आधीच माहिती गोळा करत होता. त्यासाठी त्याने स्वतंत्र नेटवर्क तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ग्राहक कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण, आयुष्यातील समस्या काय आहेत, मित्र-शत्रू कोण-अशा अनेक गोष्टींची माहिती आधीच मिळवून तो लोकांसमोर अचूक भविष्य, सांगत असे. त्यामुळे लोक त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवत आणि त्याच्या जाळ्यात अडकत. खरातचा HIV रिपोर्ट समोर तपासादरम्यान अशोक खरातची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. या तपासणीमध्ये विविध चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात HIV चाचणीचाही समावेश होता. पोलिसांनी पीडित महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने ही तपासणी केली होती. आता समोर आलेल्या अहवालानुसार, अशोक खरातचा HIV टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कुणावरही जबरदस्ती केली नाही- खरात तपासादरम्यान अशोक खरातने केलेला सर्वात वादग्रस्त दावा म्हणजे महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर मी कुणावरही जबरदस्ती केली नाही असेही त्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी लोकांचं भलं केलं, पण तेच माझ्यावर उलटलं, असे म्हणत त्याने आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, आता मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकेन, असेही तो म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. या विधानांमुळे तपास यंत्रणाही सावध झाल्या आहेत.
भोंदू अशोक खरातला तब्बल 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का घेतले जाते? मी फक्त एकदाच ईशान्येश्वर मदिरात पूजा केली. त्यामुळे केवळ ओळख असल्यामुळे एका व्यक्तीविषयी काहीतरी बोलणे साफ चुकीचे आहे, अशा शब्दांत सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दीपक केसरकर यांना भोंदू अशोक खरातशी असणाऱ्या त्यांच्या संबंधांवरून टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी उपरोक्त शब्दांत स्पष्टीकरण देत आपला संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मी देवभक्त आहे. मी न चुकता शिर्डीला येतो. ते जे ईशान्येश्वर मंदिर आहे, ते शिर्डीच्या येण्याच्या रस्त्यात आहे. मी लहान असल्यापासून दर सोमवारी दर्शनासाठी शिव मंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर कोणत्या महादेव मंदिरात जायचे? तर मग ईशान्येश्वर मंदिरात जाणे झाले. त्या निमित्ताने अशोक खरातशी ओळख झाली. आता ओळख झाली म्हणजे त्याच्या कोणत्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असे नाही. त्याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल, तर मी दोषी आहे. पण त्याच्याकडून जे चुकीचे कृत्य घडले आहे, त्यासाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. खरातच्या भोंदूपणाची जराही कल्पना आली नाही पत्रकारांनी यावेळी दीपक केसरकर यांना अशोक खरातच्या भोंदूपणाविषयी तुम्हाला जराही कल्पना का आली नाही? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले. मी मंत्री असतानाही येथे येत होतो तेच दुर्दैव आहे. पण तेव्हा माझ्यासोबत पोलिसही असायचे. त्यांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती. अन्यथा त्यांनी मला सांगितले असते. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या काही भक्तांमध्ये अनेक शिक्षक होते. त्यांच्यासाठी मी खूप काम केले आहे. ते नेहमी मला सांगायचे की, तुम्ही शिक्षणासाठी जेवढे काम केले, तेवढे कोणत्याही शिक्षण मंत्र्यांनी केले नाही. मग त्यांना या गोष्टीची कल्पना असती तर त्यांनीही मला सावध केले असते. माझ्या खात्याशी खरातचा संबंध नव्हता केसरकर म्हणाले, अशोक खरातच्या वैयक्तिक जिवनाची कुणालाही काही कल्पना नाही. ईशान्येश्वराच्या भक्तीपोटी माझी त्यांच्याशी ओळख झाली. ओळख झाल्याचा एखादा फोटो निघाला तर त्याविषयी काहीही बोलणे चुकीचे आहे. एका वृत्तपत्रात असे छापून आले की, मी ऑफिसला जायचे की नाही हे ही ते मला सांगायचे. हे खूप चुकीचे आहे. श्रद्धा असते, पण अंधश्रद्धा कधीही नसते. माझ्या खात्याशी त्याचा काहीही संबंध नाही. माझी व त्यांची ओळख केवळ ईशान्येश्वर मंदिराच्या निमित्ताने झाली. ते महादेवाचे मंदिर आहे. त्यामुळेच मी तिथे गेलो. मुख्यमंत्रीही स्वतः येऊन गेले. अनेक मंत्री येऊन गेले. पण त्यापैकी कुणालाही या गोष्टीची सुतराम कल्पना नव्हती. अशी कल्पना असती तर आम्ही कुणीच त्या ठिकाणी गेलो नसतो. त्यांच्याशी कोणते संबंधही ठेवले नसते. त्यामुळे मला त्याच्या अघोरी पूजेची काहीही माहिती नाही. हे माहिती असण्याचे कोणते कारणही नाही. कारण मी एवढा वेळ त्याच्या संपर्कात राहिलो नाही. ईशान्येश्वरमध्ये फक्त एकदाच पूजा केली मी फक्त एकदा ईशान्येश्वरमध्ये पूजा केली. त्यानंतर कोणतीही पूजाअर्चा केली नाही. त्यामुळे केवळ ओळख असल्यामुळे एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी बोलणे साफ चुकीचे आहे. एवढे जण भेटून गेले, जवळपास 39 आमदार भेटून गेले. मग माझेच नाव का? हा प्रश्न मला पडला आहे, असेही दीपक केसरकर यावेळी बोलताना म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. शहरातील मुरेडोंगरी भागातील मोहनमळा परिसरात ही घटना घडली असून, सकाळी स्थानिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे संपूर्ण कणकवली तालुक्यात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुशांत दळवी यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम आढळून आली आहे. ही जखम बंदुकीच्या गोळीमुळे झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी काही अंतरावर रक्ताचे डागही दिसून आले असून, त्यामुळे हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा ताबा घेत पंचनामा सुरू केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, ते घटनास्थळी पुरावे गोळा करत आहेत. मृतदेहाची स्थिती आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता तपास यंत्रणा प्रत्येक शक्यता तपासत आहे. दरम्यान, सुशांत दळवी हे कणकवलीतील परिचित बांधकाम व्यावसायिक असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, व्यावसायिक व्यवहार आणि अलीकडील घडामोडींचा पोलिसांकडून सखोल तपास केला जाण्याची शक्यता आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जाणार असून, घटनास्थळी कोणी संशयास्पद हालचाल केली का याचा शोध घेतला जात आहे. सध्या तरी हा प्रकार नेमका अपघात आहे की हत्या, याबाबत स्पष्टता आलेली नसली तरी डोक्यावरील जखम आणि रक्ताचे डाग यामुळे घातपाताचा संशय अधिक गडद होत आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, पुढील काही तासांत या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेने कणकवली परिसर हादरून गेला असून, नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. कामगार नदीपात्राकडे जात असताना मृतदेह आढळला हा प्रकार जुन्या वैमनस्यातून झालेल्या खुनाचा असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाजही वर्तवला जात आहे. शहरातील मुडेश्वर मैदानासमोरील गणेश नगर परिसरात एका ठेकेदाराचे कामगार नदीपात्राकडे जात असताना त्यांना वाटेत दळवी यांचा मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ याची माहिती कणकवली पोलिसांना दिली. प्राथमिक पाहणीत दळवी यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी लागल्याचा संशय व्यक्त होत असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पुण्यात प्रवासी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू:बस चालक पसार, गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू
पुण्यात संगमवाडी येथील बस थांब्यावर एका खासगी प्रवासी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. रज्जू निषाद (वय 39, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. बुधारु रामजी निषाद (वय 35, सध्या रा. हिंजवडी) यांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बुधारु हे मृत रज्जू यांचे भाऊ आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रज्जू निषाद हे संगमवाडी परिसरातून जात असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बस चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या निषाद यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पसार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. विभुते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संगमवाडी परिसरात अनेक खासगी प्रवासी वाहतूकदारांचे (ट्रॅव्हल्स) थांबे आहेत. संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर यापूर्वीही प्रवासी बसच्या धडकेत पादचारी आणि दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मोबाइलवरील गेम जिंकल्याने भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून फसवणूक दरम्यान, मोबाइलवरील गेम जिंकल्याने भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनकवडी भागात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइलवरील गेम जिंकल्याने महागडा मोबाइल आणि चामड्याची पिशवी अशा भेटवस्तू पाठवण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांखाली चोरट्यांनी त्यांना भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एन. लोंढे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
भोंदू अशोक खरातने 50 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पण आता अभिनेत्री ममता कुलकर्णीने या पीडित महिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या महिला अशोक खरातकडे गेल्या, तेव्हा त्यांची बुद्धी कुठे गेली होती? त्यांना स्वतःची मर्यादा ठावूक नव्हती का? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. भोंदू खरातचे अनेक नेते व अधिकाऱ्यांशी साटेलोटे आढळले आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी प्रस्तुत प्रकरणात भोंदू खरातकडे जाणाऱ्या महिलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या महिला अशोक खरातकडे गेल्या तेव्हा त्यांची बुद्धी कुठे गेली होती? या सर्व महिला एवढ्या मूर्ख होत्या का? की अशोक खरात त्यांना स्पर्श करत असताना नक्की काय घडत आहे हे त्यांच्या लक्षातच आले नाही? एखाद्या व्यक्तीने त्यांना आपल्या बेडरूममध्ये बोलावले, तर त्या तिथे सरळ चालत जातील का? त्यामुळे या प्रकरणी त्यांचाही दोष आहे. आजच्या काळात धर्माच्या नावाखाली प्रत्येकानेच ढोंगाचा आधार घेतला आहे. मी स्वतः माझ्या शरीराला अत्यंत कठोर शारीरिक कष्टांच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून काढून तपश्चर्या केली. पण आजकाल प्रत्येकजण धर्माच्या नावाखाली लोकांची लूट करत आहे. या तथाकथित धर्मगुरूंच्या भरवशावर राहणे थांबवा व तुमची भक्ती थेट ईश्वरावरच केंद्रित करा, असे ममता कुलकर्णी यांनी टीव्ही 9 शी बोलताना म्हटले आहे. त्यांना स्वतःची मर्यादा माहिती नव्हती का? त्या पुढे म्हणाल्या, अशोक खरातला आपण अवतार असल्याचा भ्रम झाला आहे. त्याने त्या निर्दोष बायकांना फसवले. अशा महिलांच्या पतीने आपल्या पत्नीला समजून घेतले पाहिजे. हे नालायक लोक आहेत. तुम्ही त्या महिलांनाही विचारा. काय माहिती त्यांचाही त्यात सहभाग असू शकतो. मी तर त्या महिलांना दोषी मानत नाही. त्या निर्दोष आहेत. त्यांना क्षमा असावी. पण त्या खरातकडे ज्योतिषासाठी गेल्या होत्या की, अन्य काही करण्यासाठी गेल्या होत्या? त्यांना स्वतःची मर्यादा माहिती नव्हती का? तो मर्यादा ओलांडत होता तर त्यांनी त्याला लाथ घालून बाहेर पडण्याची गरज होती. त्याला फटके देण्याची गरज होती. हे तुम्ही काय करत आहात असा जाब विचारण्याची गरज होती, असे त्या म्हणाल्या. अशोक खरात 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत दुसरीकडे, नाशिक सत्र न्यायालयाने भोंदू अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. खरात हा महिलांना एक विशिष्ट पाणी प्यायला द्यायचा. त्यानंतर तो आपण सिद्ध पुरुष असल्याचे सांगत त्यांच्यावर अत्याचार करायचा. त्याने 5 नरबळी दिल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. कारण, त्याच्या फार्महाऊसवर गोळीबार करण्यात आलेल्या काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या आढळल्या आहेत. त्याने ही काडतुसे कुठे वापरलीत याचा तपास पोलिस करत आहेत.
नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, सध्या विशेष तपास पथक (SIT) त्याची सखोल चौकशी करत आहे. या तपासादरम्यान खरातने लोकांना फसवण्यासाठी वापरलेल्या युक्त्या आणि तंत्रांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तो लोकांच्या मनाचा अभ्यास करून अगदी पहिल्या काही मिनिटांतच त्यांचा विश्वास जिंकत असे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात आपल्या ग्राहकांविषयी आधीच माहिती गोळा करत होता. त्यासाठी त्याने स्वतंत्र नेटवर्क तयार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ग्राहक कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण, आयुष्यातील समस्या काय आहेत, मित्र-शत्रू कोण-अशा अनेक गोष्टींची माहिती आधीच मिळवून तो लोकांसमोर अचूक भविष्य, सांगत असे. त्यामुळे लोक त्याच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवत आणि त्याच्या जाळ्यात अडकत. यासाठी खरात ‘कोल्ड रिडिंग’ आणि ‘हॉट रिडिंग’ या दोन तंत्रांचा वापर करत होता. ‘हॉट रिडिंग’मध्ये ग्राहकाबद्दल आधीच माहिती मिळवून ती समोर मांडली जाते, तर ‘कोल्ड रिडिंग’मध्ये काही सामान्य प्रश्न विचारून समोरच्याच्या प्रतिक्रिया पाहून अंदाज बांधला जातो. मानसशास्त्र, चेहऱ्यावरील भाव (फेस रीडिंग) आणि संवाद कौशल्य यांचा वापर करून तो लोकांना भ्रमित करत होता. या तंत्रामुळे लोकांना तो खरोखरच चमत्कारिक असल्याचा भास निर्माण होत होता. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरगाव पोलिस ठाण्यात राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीड जिल्ह्यातील संदीप गरजे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पीडित महिलांची ओळख उघड करणारे कोणतेही व्हिडीओ किंवा माहिती शेअर केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. प्रशासनाकडून शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया याशिवाय, तपासादरम्यान अशोक खरातकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्र परवान्याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी त्याला शस्त्र परवाना देण्यात आला होता आणि 1 जानेवारी 2024 रोजी त्याचे नूतनीकरण झाले होते. त्याच्या फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी 5 वापरलेली असल्याचे आढळले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी झाला, याचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाकडून त्याचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्रीवरील निर्बंध मागे:जिल्हा पुरवठा विभागाचा निर्णय
हिंगोली जिल्हयात पेट्रोल व डिझेल विक्रीवरील निर्बंध मागे घेण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यातून पेट्रोलपंपावरील गर्दी कमी करण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर जिल्हयात मुबलक इंधनसाठा उपलब्ध करून नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे. हिंगोली जिल्हयात मागील चार दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा साठा संपत असल्याबाबत अफवा पसरू लागल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी होऊ लागली होती. त्यातून वादाचे प्रकार देखील घडू लागले होते. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाने पेट्रोल पंपावरून कोणालाही कॅन किंवा बाटल्यांमधून पेट्रोल देऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. या शिवाय चार चाकी वाहनांसाठी 2 हजार रुपये तर दुचाकी वाहनांमध्ये दोनशे रुपयांचेच इंधन देण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना देण्यात आल्या होत्या. मात्र या निर्बंधामुळे वाहन चालकांमधून गैरसमज निर्माण होऊन गर्दी कमी होण्या एेवजी गर्दीमध्ये वाढच झाली होती. त्यातच गर्दीला रोखणे कठीण होत असल्याने जिल्हा पुरवठा विभागाने थेट पोलिस अधिक्षक कार्यालयास पत्र देऊन जिल्हयातील शहरी भागातील पेट्रोल पंपावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त द्यावे असे पत्रात नमुद केले होते. या शिवाय जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधून इंधन भरलेली वाहने तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार जिल्हयात इंधन उपलब्ध करण्यात आले आहे. त्यानुसार आता जिल्हयातील 84 पेट्रोलपंपावर 3.88 लाख लिटर पेट्रोल तर 5.74 लाख लिटर डिझेलसाठा उपलब्ध असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले. दरम्यान, पेट्रोलपंपावरील गर्दी टाळण्यासाठी पेट्रोल व डिझेल विक्रीच्याबाबतीत लावण्यात आलेले निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. वाहनधारकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नये, वाहनधारकांनी आवश्यकतेनुसारच वाहनांमध्ये इंधन भरण्याचे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हयात मदत व संपर्कासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हयात इंधनाबाबत मदत व संपर्काबाबत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये औंढा तालुक्यासाठी नायब तहसीलदार प्रविण ऋषी, हिंगोली अनिल घुगे, कळमनुरी अमोल घुगे, सेनगाव विशाल लोहटे, वसमत पांडूरंग हांडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.
पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा पुरेसा साठी आपल्याकडे आहे हे केंद्र सरकारने सांगितले आहे. विरोधक लोकांना पॅनिक करत जास्तीच इंधन खरेदी करण्यास भाग पाडत आहेत. संजय राऊतांनी सुद्धा सांगितले आहे की नॅचरल गॅसची पाईप लाईल असूनसुद्धा मला गॅस सिलिंडर हवे आहे, असे करत ते लोकांना पॅनिक करत आहेत, म्हणून आपण रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे,असे नवनाथ बन यांनी म्हटले आहे. हिंदुत्ववाद काय आहे हे राऊतांनी सांगू नये कारण ते काँग्रेसचे तीर्थ पित आहेत. तुम्ही काँग्रेसच्या तीर्थाचा विचार करा. नवनाथ बन म्हणाले की, खरात प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. खरातला बेड्या ठोकल्या आहेत, एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. राऊतांकडून केवळ राजकीय धुळफेक करण्याचे काम सुरू आहे. राऊत कुणाची नावे घेत आहेत पण राऊतांच्या दबावाखालीच खरातच्या आश्रमाला पाणी दिले. ते कुणाच्या दबावाखाली दिले हे सरकारने सांगितले पाहिजे. देशात 2 महिने पुरेल इतका इंधनसाठा जनाब संजय राऊत हे अफवा पसरवत आहे, त्यामुळेच जनता पॅनिक होत रांगेत उभे राहू लागलेत. आपल्या देशात दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा आहे. तर होर्मुझ खाडीतून इंधन आयात करण्यासाठी भारताला परवानगी आहे. भारताचा तिरंगा बघत आपली सर्व जहाजे सोडली जात आहे. संजय राऊतांकडून मु्द्दाम लोकांना पॅनिक करण्याचे काम सुरू आहे. त्यांना वाटते की देशामध्ये अराजकता निर्माण व्हावी. पण मोदींच्या सक्षम नेतृत्वात देशातील परिस्थिती खराब होणार नाही. राऊत लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नवनाथ बन म्हणाले की, हिंदुत्व आणि शिवसेनेसाठी आपला जन्म झाला असा दावा संजय राऊत करतात. तुमचे हिंदुत्व उरले कुठे तुम्ही सोनिया गांधी, राहुल गांधी यांची गुलामी करत आहात. नाव उद्धव ठाकरेंचे घेत राहुल गांधीचा प्रचार करण्याचे तुमचे काम सुरू आहे. खासदाराकी मिळावी यासाठी काँग्रेसचा अजेंडा रेटण्याचे काम तुम्ही करत आहात. हे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी ओळखले आहे. काँग्रेसच्या सांगण्यावर ते अफवा पसरवत आहेत कारण त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आहे. ते लवकरच काँग्रेस प्रवेश करतील. ठाकरे गटात अंतर्गत संघर्ष वाढला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटात सध्या अंतर्गत संघर्ष वाढला असून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याविरोधात वातावरण तयार करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. स्वतःची राजकीय स्थिती कमजोर होत असल्याने राऊत गटातून बदनामीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेसाठी राऊत कुठल्याही थराला जाऊ शकतात.
सांगली जिल्ह्यातील एका नामकरण सोहळ्यात खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांची वाढती उपस्थिती आणि भविष्यातील 33 टक्के महिला आरक्षण याचा उल्लेख करताना त्यांनी पुढील निवडणुकीत आपण खासदार राहू की नाही, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त होत असतानाच राजकीय अर्थ काढले जाऊ लागले आहेत. खानापूर तालुक्यातील मौजे मेंगाणवाडी या गावाचे नाव बदलून ‘मौजे शिवशिवापूर’ असे करण्यात आले. या नामकरण सोहळ्यात विशाल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर तसेच काँग्रेसचे मनपा नगरसेवक हर्षवर्धन पाटीलही उपस्थित होते. या सोहळ्याला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून, विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती पुरुषांपेक्षा अधिक होती. याच मुद्द्यावर भाष्य करताना पाटील यांनी महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले. आपल्या भाषणात विशाल पाटील म्हणाले की, पूर्वी अशा कार्यक्रमांमध्ये महिलांची उपस्थिती कमी असायची, पण आता मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होत आहेत. 33 टक्के महिला आरक्षणामुळे भविष्यात अधिक महिला आमदार आणि खासदार होतील. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत आम्ही असू की नाही, याची खात्री देता येत नाही. त्यांनी हे वक्तव्य हलक्या फुलक्या अंदाजात केल्याने सभागृहात हशा पिकला, मात्र या विधानामागे राजकीय वास्तवाची झलक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विस्ताराबाबतही भाष्य केले. मतदारसंघ खूप मोठा आहे. प्रत्येक गावात पोहोचणे शक्य होत नाही. सहा महिने एखाद्या गावात काम केलं, तरी पाच वर्षांत सर्व गावांपर्यंत पोहोचता येत नाही, असे ते म्हणाले. तसेच, मी दिल्लीतून आलो असून विश्वजित कदम यांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला आला. पुढील लोकसभा निवडणुकीचा प्रचार मी आत्तापासूनच सुरू केला आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. त्या वेळी महाविकास आघाडीत जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाद झाला होता. अखेरीस पाटील यांनी अपक्ष उमेदवारी देत चंद्रहार पाटील यांचा पराभव केला. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला होता आणि प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आता त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरेंमध्ये कसले मतभेद आहेत, या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. मी शिवसेनेमध्ये जन्मापासून आहे. पक्षात काही राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मी आलो नाही, मंत्री होण्यासाठी आलो नाही. बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्रात नेण्यासाठी काम करतो, मी स्वत:ला एक शिवसैनिक मानतो, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, एखाद्या पदाचा केव्हा तरी निरोप घ्यावा लागतो. त्यांची मानसिक तयारी आपण ठेवली पाहिजे. आम्हाला वाटले होते उद्धव ठाकरे अजून 15 वर्षे मुख्यमंत्री असावे पण तसे झाले नाही. आमच्या पक्षावर जे संकट आहे फोडाफोडीचे आमचा पक्ष वाढवण्याचे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. उद्धव ठाकरे 2019 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार नव्हते हे समजून घेतले पाहिजे. 2029 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी उबाठा कधीही सोडणार नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार संजय राऊत म्हणाले की, नामवंत लोकं बुआबाजीला प्रतिष्ठा देण्याचे काम करतात. सामान्य माणूस बुआबाजीला प्रतिष्ठा देत नाही. उद्योगपती, आमदार, खासदार, सत्ताधारी, मंत्री हे लोकं त्यांना प्रतिष्ठा देतात, ते पुजा आणि अघोरी कृत्य करतात. पण यासाठी एका पक्षाला दोष देऊन काही फायदा नाही, हा सर्वपक्षीय अत्याचार आहे. भोंदू गिरी, बुआबाजीवर मी कधी बोलत नाही संजय राऊत म्हणाले की, भोंदू गिरी, बुआबाजी यावर मी कधी बोलत नाही. राज्यकर्त्यांनी अशा भोंदू बाबाच्या नादाला लागू नये असे माझे मत आहे. सध्या दिसतंय की खरातला महान बनवण्यासाठी आताच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातील मंत्र्यांचा वाटा आहे. जे संविधानिक पदावर आहेत त्यांनी अशा गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे. आपण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरता त्यांनी अशा भोंदूगिरीला नेहमीच दूर ठेवले आहे, असे म्हणत शिंदेंवर निशाणा साधला. रॉकेल हे अंधभक्तासाठी तीर्थच संजय राऊत म्हणाले की, आपल्या देशाचे जे मित्र होते ते मित्र आपण गमावले आहेत. अशावेळी मोदींना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावे लागत आहे. पण त्यासाठी 27 दिवस का लागले, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करत आहे. दुसरीकडे जनता रॉकेलच्या रांगेत उभी आहे. या बैठकीतून काय होणार याकडे पाहावे लागेल. 3 लीटर रॉकेल हे अंधभक्तासाठी तीर्थच आहे. ते काही सरकारवर टीका करणार नाही. देशावर ही अवकाळा मोदींच्या चुकलेल्या निर्णयामुळे आली आहे. दिल्लीत एक आठवड्याचा सुद्धा साठा नाही पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, खरात तर जेलमध्ये आहे, पण दुसरे कोणी महाराज असतील तर सरकारचा हात दाखवून राज्यात काय सुरू आहे हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेतले पाहिजे, असा उपहासात्मक टोला लगावला आहे. देशभरातील लोकं पेट्रोल-डिझेलसाठी रांगेत उभी आहेत, ही भीती मोदींनी निर्माण केली आहे. 3 लीटर रॉकेल देणार म्हणून लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. चीन-फ्रान्ससारख्या देशात साधारण 4 महिन्याचा पेट्रोल-डिझेल साठा आहे.आपल्याकडे दिल्लीत एक आठवड्याचा सुद्धा साठा नाही. हे जनतेला सांगू नये. केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले ही चांगली गोष्ट आहे.
मध्य रेल्वेने रेल्वे भरतीच्या परीक्षेतून मराठी भाषा हद्दपार केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन मुंबईहून उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ न देण्याचा इशारा दिला आहे. 2023 पर्यंत रेल्वेच्या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे? असा खडा सवाल मनसेने या प्रकरणी रेल्वे खात्याला विचारला आहे. मनसेने गत काही दिवसांपासून रेल्वे विभागाविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर - रत्नागिरी ही पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्याचा इशारा दिला होता. ही रेल्वे 15-20 दिवसांत सुरू झाली नाही तर उत्तर प्रदेश व बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंच्या या पक्षाने भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार केल्याच्या मुद्यावरून रेल्वे खात्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले अमित ठाकरे? राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे या प्रकरणी म्हणालेत की, 2008 साली राज साहेबांनी व महाराष्ट्र सैनिकांनी रेल्वे भरतीमध्ये मराठी भाषेचा आणि भूमिपुत्रांचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यानंतर 2017, 2019 व अगदी 2023 पर्यंत या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे? मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या 'GDCE 01/2026' या अधिसूचनेत Computer Based Test (CBT) परीक्षेचे माध्यम केवळ 'हिंदी आणि इंग्रजी' ठेवले आहे. मराठी भाषेला या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक हद्दपार करण्याचा हा घाट घातला जात आहे. रेल्वे प्रशासनाला आमचे काही थेट सवाल आमचा स्पष्ट इशारा आहे, त्वरीत या अधिसूचनेत बदल करून 'मराठी' भाषेचा सन्मानाने समावेश करा. अन्यथा, या अपमानाचा जाब विचारायला आणि मराठी कामगारांच्या हक्कासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' मैदानात उतरेल. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असे अमित ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे.
आखाती देशांमधील युद्धामुळे देशभरात घरगुती व व्यावसायिक गॅसची टंचाईचे चटके बसत आहेत. गॅस एजन्सीबाहेर भर उन्हात रांगा लागल्या आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्र सरकारने जिथे उपलब्धता आहे तेथील ग्राहकांनी 3 महिन्यात पीएनजी कनेक्शन घेण्याची सक्ती केली आहे. सोलापूर शहरात 30 हजार घरांना पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस (पीएनजी) पुरवण्याच्या प्रकल्पाचे काम गेल्या 5 वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. आयएमसी कंपनी आणि महापालिकेतील वादामुळे आतापर्यंत फक्त जुळे सोलापुरातील 550 घरांतपर्यंतच ही सुविधा पोहोचली आहे. मात्र आता केंद्राने कडक पाऊले उचलल्यामुळे कंपनीने पीएनजी कनेक्शन वाढवण्यासाठी धावधावा सुरु केली आहे. दरम्यान, शहरात एकूण 11 हजार घरांपर्यंत कनेक्शनचे पाईप व मीटर लावण्यात आले आहेत. पुढील 2 महिन्यात त्यापैकी 4 हजार घरांमध्ये गॅस जोडणी केली जाईल, असा कंपनीचा दावा आहे. सोलापूरमध्ये पीएनजी पुरवण्याचे काम चेन्नईच्या आयएमसी कंपनीला देण्यात आले. त्यांनी गेल्या 5 वर्षांत 30 पैकी 11 हजार घरांना मीटर लावले आणि फक्त 550 घरांपर्यंत गॅस पोहोचवला आहे. उर्वरित कामासाठी महापालिकेने आता परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपनीनेही उर्वरित 29,450 घरांपर्यंत गॅस पोहचवण्याचे काम हाती घेतले आहे. 14 किलो एलपीजी 920 रुपयांना, तेवढाच पीएनजी फक्त 672 रुपयांत पीएनजी हा पाइपलाइनद्वारे घरगुती व औद्योगिक ग्राहकांना पुरवला जाणारा वायू आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी एलपीजीच्या तुलनेत हा गॅस स्वस्त मिळतो. या गॅससाठी प्रति क्यूबिक मीटर 48 रुपयांचा दर आकारला जातो. 14.2 किलोचे एक एलपीजी सिलिंडर 920 रुपयांना मिळते. तर तेवढाच पीएनजी वापरला तर फक्त 672 रुपयेच मोजावे लागतात. म्हणजे तुलनेने 248 रुपयांची बचत होते. त्यामुळे पीएनजीला मागणी वाढत आहे. मनपा व कंपनीच्या वादामुळे रखडले काम पीएनजी पाईपलाईन टाकण्याच्या कंपनीला खोदकाम करावे लागते. त्यासाठी मनपाची परवानगी घ्यावी लागते. या कामासाठी आयएमसी कंपनीने महापालिकेला 1 कोटी 25 लाख भरले होते. पण, कंपनीला वेळेत काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे मनपाने रस्ते खोदल्याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये दंड केला. या वादामुळे कंपनीने डिसेंबरपासून काम बंद ठेवले होते. महापालिकेने आता पीएनजी जोडणीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपनीने काम सुरु केले आहे. गेल्या महिनाभरात जुळे सोलापुरातील आणखी 50 घरांत पुरवठा सुरु केला. 2 महिन्यांत 4 हजार घरांपर्यंत गॅस पुरवण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. कंपनी म्हणते.. केंद्र सरकार सूचना देते पण प्रशासनाचे सहकार्य मिळत नाही पीएनजी गॅस पुरवठ्याच्या प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आले आहे, याची माहिती घेऊन केंद्र सरकारकडून रोजच आढावा घेतला जात आहे. त्याबाबत आवश्यक त्या सूचनाही दिल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मिशन मोडवर हे काम करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. शासन केवळ सूचना देते. मात्र प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नाही. त्यामुळेच घरगुती गॅसच्या जोडणीत अडचणी येत असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एलपीजी टंचाईमुळे मड्डी वस्तीतील गॅस एजन्सीसमोर रांगा. तर सुधीर एजन्सीसमोर 14 मार्चच्या बुकिंगचे वितरण सुरु असल्याचा फलक.
नाशिकमध्ये अंधश्रद्धा आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, सामाजिक आणि पोलिस यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) तपासाची गती वाढवली आहे. दरम्यान, खरातच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल समोर आला असून, त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे. तपासादरम्यान अशोक खरातची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यासाठी त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. या तपासणीमध्ये विविध चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात HIV चाचणीचाही समावेश होता. पोलिसांनी पीडित महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने ही तपासणी केली होती. आता समोर आलेल्या अहवालानुसार, अशोक खरातचा HIV टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट झाला असला, तरी गुन्ह्यांचे गांभीर्य मात्र कायम आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने महिलांना विविध आमिषे दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. भविष्य सांगण्याच्या नावाखाली किंवा घरातील अडचणी दूर करण्याचा दावा करून तो महिलांना विश्वासात घेत असे. काही प्रकरणांत भीती दाखवून, तर काही ठिकाणी संमोहनासारख्या पद्धतींचा वापर करून तो महिलांचे शारीरिक शोषण करत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. या संदर्भात अनेक महिलांनी पुढे येत पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे, तर काही महिला अजूनही भीतीमुळे समोर येण्यास कचरतात. आतापर्यंतच्या तपासात अशोक खरातने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा विचार करून न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास अधिक सखोल करण्यासाठी आणि जास्तीत जास्त पीडित महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ही कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. SIT सध्या या प्रकरणातील सर्व पैलू तपासत असून, गुन्ह्यांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता याचबरोबर तपास यंत्रणा खरातच्या आर्थिक व्यवहारांवर आणि त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींवरही लक्ष केंद्रीत करत आहेत. गुन्ह्यात वापरलेली ठिकाणे, आर्थिक देवाणघेवाण आणि संबंधित व्यक्ती यांचा शोध घेतला जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्यभरात या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील देवी जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, संत रामराव बापू मंदिर सेवा आश्रमात मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम भगवान यांचा जन्मोत्सव पाळणा गीत, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जय श्रीराम, जय सेवालाल, जय रामराव बापू यांच्या नावाच्या जयघोषाने पोहरादेवी नगरी दुमदुमून गेली होती. देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान बहुजन, बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे दरवर्षी रामनवमीनिमित्त यात्रा महोत्सव हर्ष उल्हासात साजरा केला जातो. यावर्षी गुरुवारी दि. २६ मार्च रोजी रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमी दिनी मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव दुपारी १२ वाजता संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरात महंत कबिरदास महाराज यांच्या हस्ते व संत डॉ रामराव बापू सेवा आश्रमात धर्मगुरू या बाबुसिंग महाराज व देवी बापू भक्त शेखर महाराज यांच्या हस्ते पाळणा, भोग भंडारा, आरदास व महाआरती करून लाखो सेवा भक्तांच्या साक्षीने साजरा करण्यात आला. रामनवमी यात्रा महोत्सवानिमित्त आदल्या दिवसांपासूनच श्रीराम जन्मोत्सव व देवी, संताचे आशीर्वाद व यात्रा महोत्सवासाठी देशभरातील महाराष्ट्र नव्हे कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली आदीसह लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. नांदेड, परभणी, मंठा, जालना आदीसह इतर भागातून पायदळ दिंडीद्वारे हजारो सेवा भक्त दर्शनासाठी दाखल झाले होते. मंदिर संस्थानच्यावतीने महंतांनी स्वागत करून सत्कार केला. या वेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, तेलंगणा व कर्नाटकचे आजी माजी मंत्री, समाजातील प्रतिष्ठीत नागरीक व मान्यवर यांनी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावून देवी जगदंबा माता व संताच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. बारीने रांगेत उभे राहून हजारो भाविकांची दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रामनवमी उत्सवाच्या निमित्ताने पोहरादेवीत समाज बांधवांच्यावतीने सामाजिक, सांस्कृतिक विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. यात्रा महोत्सवात प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा यात्रा महोत्सवात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधिक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवला होता. यात्रा महोत्सवात प्रशासनाच्या वतीने आरोग्य विषयक सुविधा, पिण्याचे आणि आदींची व्यवस्था केली होती. अनेक स्वयंसेवी संस्थांनी भाविक भक्तांना अन्नदान राबवून सेवा दिली.
मोबाइल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस अधीक्षक ईशानी आनंद यांनी केले. कुंभारीतील जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोहळा रंगला. लोकनेते स्व. प्रा. तुकारामभाऊ बीडकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या प्रेरणा पंधरवड्यानिमित्त आयोजित ज्ञान, कला व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष नारायण गावंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलिस अधीक्षक ईशानी आनंद, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट, डॉ. नारायणराव बीरकड, श्रीकृष्ण बीरकड, प्रकाश बिरकड, इब्राहिम भाई, प्राचार्य डॉ. सूर्यभान नागुलकर, केंद्रप्रमुख किशोर वानखेडे, संतोष घोगरे, मुख्याध्यापक संतोष देशमुख, कोकिळा झाडोकार, सरपंच ऋषिकन्या अतकरे, माजी सरपंच बाळासाहेब अतकरे आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक ईशानी आनंद म्हणाल्या की, मोबाइल व सोशल मीडियाच्या आहारी न जाता ध्येय निश्चित करा. पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन हाच यशाचा आधार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासह शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून दिले. क्रीडा गुण जोपासण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात प्रा. श्रीराम पालकर यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. अशोक भराड व बबलू तायडे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. सूर्यभान नागुलकर मानले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. उल्लेखनीय कार्यासाठी प्रेरणा पुरस्कार प्रदान ज्ञान, कला व क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संतोष बाईस्कर, मोहन भातकर, गजानन गाडगे, संतोष देशमुख, कोकिळा झाडोकार, माजी प्राचार्य विलास इंगळे, प्रमोद मुरुमकार, राज्य पुरस्कारप्राप्त प्राचार्य डॉ. सूर्यभान नागुलकर, बबलू तायडे, बजरंग गावंडे, राष्ट्रीय खेळाडू रोहिणी फड, अंजली तायडे, तसेच स्काऊट राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सय्यद रसूल अली सय्यद तुफेल अली आदींना जय बजरंग परिवाराच्या वतीने ‘प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
तालुक्यातील कावसा बु. व कावसा खु. या गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारूविक्री तसेच वरली (जुगार) अड्ड्यांविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. गावातील सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या या अवैध धंद्यांवर तत्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, कावसा बु. व कावसा खु. येथे काही व्यक्तींमार्फत बेकायदेशीररित्या दारू विक्री व वरली जुगार अड्डे चालविले जात असून त्यामुळे गावातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत. याचा परिणाम म्हणून कुटुंबांमध्ये वारंवार वाद, भांडणे, मारहाण तसेच कौटुंबिक तणाव वाढत असून सामाजिक स्थैर्य धोक्यात आले आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी ६ मार्चला १८ मार्चला ८ वाजेच्या सुमारास निला उमेश वानखडे या महिलेने पतीच्या व्यसनाला कंटाळून विहिरीत उडी घेतल्याची गंभीर घटना घडली. पोलिसांना फोनद्वारे माहिती देऊनही ठोस कारवाई होत नाही. बिट जमादार व ठाणेदारांना वारंवार माहिती देऊनही अवैध धंदे सुरूच आहेत. अवैध दारूविक्री व जुगार अड्ड्यांवर बंदी घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. अन्यथा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला. निवेदनासोबत ग्रामपंचायत कावसा बु. व कावसा खु. यांचा दारूबंदी ठराव, महिला बचत गटाचा ठराव, ग्रामस्थांच्या सह्यांची प्रत, संबंधित एन.सी.ची नक्कल जोडली. निवेदनावर रमाई महिला संघ, त्रिरत्न प्रबोधन मंच, बुद्धविहार समन्वय महासंघ अकोला, राष्ट्रीय लोक आंदोलन आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. प्रकरणाची प्रत उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट, तहसीलदार अकोट व उपविभागीय अधिकारी अकोट यांना देण्यात आली. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य उषा वानखडे, सुमित्रा वानखडे, वेणू वानखडे, यमुनाबाई वानखडे, विशाखा वानखडे, पद्मा वानखडे, मनोरमा वानखडे, सुशीला पोहरकार, अलका वानखडे, अन्नपूर्णा वानखडे, दीपाली उमाळे समाजसेवक गजानन हरणे आदी निवेदन देताना उपस्थित होते.
अकोट तालुक्यातील उमरा परिसरात बहुतांशी शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड करतात. मात्र येथील कांदा टिकाऊ व चवदार असल्याने त्याला स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असते. त्यामुळे शेतकरी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र गेल्या दोन दिवसात दिवसभर ढगाळ हवामान सकाळी दाट धुके पडत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कांदा पिकावर करपा, मावा, पिवळ्या, मानमोडी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कांदा पिकाला सुरूवातीच्या दिवसांत चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली. सुरुवातीच्या काळात चांगले वातावरण राहिल्याने कांद्याची वाढ जोमदार झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने कांदा पिकावर विपरीत परिणाम होऊन करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. कांद्याची पातही पिवळी पडू लागली. पिकांचे शेंडे जळाल्याप्रमाणे झाले आहेत. रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी औषधांची फवारणी करीत आहेत. बदलत्या हवामानामुळे उत्पादन तर कमी झालेच आहे. अशा परिस्थितीत सध्या बाजारपेठेत सुरू असलेल्या कांद्याच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. त्यामुळे गरजेनुसार विक्री केल्यास ८०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कांदा विक्री लागत आहे. एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी अशा दुहेरी संकटामुळे कांदा उत्पादकांचा खर्चाचा ताळमेळ बसणे अवघड झाले आहे. आधीच उत्पादनात घट अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठ अथवा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने कांदा पिकास अंशतः अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी सौरभ रंदे यांनी केली आहे. दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी वातावरण बदलामुळे कांदा पिकावर करपा, रोगांचा प्रसार झाला आहे. हे रोग मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. तसेच पुढील फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कराव्या वरील फवारणी करून करपा, मर रोग आटोक्यात येऊ शकतो, असे मंडळ कृषी अधिकारी पवन सुलताने यांनी सांगितले.
नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. सध्या विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, अशोक खरात याला न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौकशीदरम्यान खरातने केलेले काही दावे अत्यंत धक्कादायक असून, स्वतःला वाचवण्यासाठी तो विविध कारणे देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान अशोक खरातने केलेला सर्वात वादग्रस्त दावा म्हणजे महिलांसोबत केलेली कृती ही विधीचाच एक भाग असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याचबरोबर मी कुणावरही जबरदस्ती केली नाही असेही त्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी लोकांचं भलं केलं, पण तेच माझ्यावर उलटलं, असे म्हणत त्याने आपल्यावरचे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला, आता मी फक्त माझ्या मेंदूचे ऐकेन, असेही तो म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. या विधानांमुळे तपास यंत्रणाही सावध झाल्या आहेत. दरम्यान, तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा खरातचा मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केला आहे. या मोबाईलमधील डेटा पुनर्प्राप्त (रिकव्हर) करण्याचे काम सुरू असून, त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात नाशिकमधील सरकार वाडा पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास अधिक भक्कम करण्याचा SIT चा प्रयत्न आहे. यामुळे खरातच्या कथित गैरप्रकारांचा संपूर्ण तपशील उघड होण्याची शक्यता आहे. संस्थेची बँक खाती सील याचबरोबर खरातच्या शिवानिका संस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरही तपास सुरू आहे. संस्थेची बँक खाती सील करण्यात आली असून, त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे. राज्यभरातील जमीन, घरे आणि दुकाने यांचा तपशील नोंदणी विभागाकडून मागवण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती कशी जमवली याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. बंदुकीच्या परवान्याबाबतही चौकशी तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अशोक खरातकडे सापडलेल्या बंदुकीच्या परवान्याबाबतही चौकशी सुरू आहे. 2012 मध्ये मंजूर झालेला हा परवाना 2024 मध्ये नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून, त्यापैकी काही वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी झाला याचा तपास सुरू आहे. दररोज समोर येणाऱ्या नव्या माहितीमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गंभीर होत असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहर पोलिस दलातील क्युआरटीला (जलद प्रतिसाद पथक) कार्यरत एका ३२ वर्षीय जवानाने जवळ असलेल्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना पोलिस आयुक्त कार्यालयाच्या तळमजल्यावरील क्यूआरटी जवानाच्या विश्रांती कक्षात घडली आहे. हा धक्कादायक प्रकार गुरूवारी (दि. २६) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडला असून काही वेळातच समोर आला आहे. विजय दिलीपराव नागापुरे (३२, रा. धामणगाव काटसूर, ह. मु. प्रिया पार्क परिसर, अमरावती) असे मृतक पोलिस जवानाचे नाव आहे. विजय हे बारा वर्षांपुर्वी शहर पोलिस दलात रुजू झाले होते. २०२१ पासून ते क्यूआरटी पथकात कार्यरत होते. बुधवारी रात्री ते व त्यांचे सात सहकारी असे एकूण आठ जण रात्रपाळीत ड्युटीला होते. गुरूवारी सकाळी उठल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांसह त्यांनी मुख्यालयाच्या मैदानावर व्यायाम केला तसेच क्रिकेटसुद्धा खेळले. त्यानंतर सर्व जवान पोलिस आयुक्तालयाच्या तळमजल्यावर उर्वरित. पान ४ विजय नागापुरे यांनी ज्या पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. ते ग्लॉक्स ९ एमएम आहे. हे पिस्टल ऑस्ट्रीया आणि युएसए या देशामध्ये बनवले जाते. मुंबईतील २६ / ११ हल्ल्यानंतर राज्याच्या पोलिस दलातील फोर्स वन, क्यूआरटी जवानांना असे अद्यावयत शस्त्र देण्यात आले होते. या पिस्टलची विशेषत: म्हणजे त्याची ॲक्युरसी फार जास्त असून एकावेळी १५ राऊंड साठवता येवू शकते. तसेच जुन्या पिस्टलच्या तुलनेत ही वापरण्यासाठी अधिक सोईची व सोपी आहे. विजय यांनी याच पिस्टलातून एक गोळी फायर करुन घेतली आहे. विजय नागापुरे हे अविवाहीत आहेत. ते भावंडापैकी दुसऱ्या क्रमांकाचे असून श्याम थोरले आहेत. वयाने लहान असूनही विजय हे बारा वर्षांपुर्वीच तर मोठे बंधू श्याम तीन वर्षांपुर्वी पोलिसात लागले. विजय यांनी आत्महत्येपुर्वी चिठ्ठी किंवा मोबाईलवर मॅसेज लिहून ठेवला नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आर्थीक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्यामुळे पोलिसांकडून त्यांची गुगल खात्याची हीस्ट्रीसुद्धा तपासली जाणार आहे. ^आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र विजय नागापुरे यांना आर्थीक अडचण होती, अशी माहीती समोर येत आहे. त्याबाबतही सखोल तपास सुरू आहे. - गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त विजय नागापुरे आर्थीक विंवचनेतून निर्णय घेतल्याची चर्चा आत्महत्येसाठी वापरलेले पिस्टल प्रचंड अद्यावत पोलिस बंधूसोबत ९.११ वाजता शेवटचा कॉल विजय नागापूरे यांचे मोठे बंधू श्याम हे सुद्धा शहर पोलिस दलातील आरसीपीला कार्यरत आहेत. घटनेच्या काही वेळापुर्वीच सकाळी ९.११ मिनीटांनी त्यांचा श्याम यांच्यासोबत संवाद झाला. त्यावेळी ते दहा सेकंद बोलले, मी पेट्रोल भरण्यासाठी जातो असे विजय यांनी श्यामला सांगितले होते. तत्पुर्वीसुद्धा ते त्यांच्या इतर काही नातेवाईकांसोबत बोलले होते मात्र विजय असे काही पाऊल उचलणार असे बोलण्यातून जराही जाणवले नसल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी इतिहासाचा तेजस्वी अध्याय हा शहीद दिन (२३ मार्च) आहे. या दिवशी शहीद भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांनी आपल्या प्राणांची आहुती देत शोषणमुक्त समाजव्यवस्थेचा मार्ग दाखविला. आदी अनेक विचार निबंध स्पर्धेच्या पुरस्कार वितरणादरम्यान पुढे आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एम. एस. दास होते. तर अतिथी म्हणून नगरसेविका सुमती ढोके, कुबेटकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली घाटोळ, छाया वानखडे, जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक मंगेश गावंडे, संजय गुल्हाने, राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद चौधरी, राधाकृष्ण विद्यालयाचे संस्थापक सतिष माहोरे आदी उपस्थित होते. शहीद दिनानिमित्त आयोजित या निबंध स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम महावीरनगर येथील कालिका क्रीडा मैदानावर सायंकाळी पार पडला. “महान क्रांतिकारी शहीद भगतसिंग यांचे जीवन व कार्य” या विषयावर घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेला शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या लेखनातून देशभक्ती, सामाजिक जाणीव, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेची आकांक्षा प्रभावीपणे मांडली. अनेक विद्यार्थ्यांनी शहीदांच्या विचारांचे सखोल विश्लेषण करत आजच्या सामाजिक परिस्थितीशी त्यांची सांगड घातली. स्पर्धेमध्ये ३८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व शंभर विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित परीक्षक कपिल शृंगारे यांनी आपल्या मनोगतातून शहीदांच्या त्याग, धैर्य व राष्ट्रनिष्ठेचा गौरव केला. तसेच क्रांतिकारी गीत सादर केल्याने वातावरण क्रांतीमय झाले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन नवजागरण मनीषी व क्रांतिकारी स्मरण समिती यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान अशा आयोजनाला सदैव मदत करणारे समितीचे अभिजित भोजे व समितीच्या कार्यक्रमासाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे इंद्रजित नागदिवे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व त्यांच्या बलिदानाला अभिवादन करून क्रांतिकारी घोषणा देत करण्यात आली. संचालन समितीचे अध्यक्ष गणेश मुंधरे यांनी केले. प्रास्ताविक समितीचे वरिष्ठ सदस्य सूरज मोने यांनी केले.
परिसरात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या वडगाव माहोरे येथील नागरिकांनी अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाविरोधात चक्काजाम आंदोलन केले. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. गिट्टी, मुरूम वाहतूक करणारी सर्व वाहने यावेळी रोखण्यात आली होती. यामुळे बराच वेळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. शेवटी एसडीओ अनिल भटकर यांनी घटनास्थळी पोहोचून कारवाईचे आश्वासन देत नागरिकांना आश्वस्त केले. अठरा फेब्रुवारी रोजी पालकमंत्र्यांच्या तक्रार निवारण मेळाव्यात सादर केलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला होता. आरोग्याशी तडजोड नाही' अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख संजय पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाने प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांचे सातत्याने उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. यावर तातडीने कारवाई करत संबंधित प्रकल्प बंद करण्याचा प्रस्ताव मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अमरावतीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अनिल भटकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. प्रदूषण विभागाने दाखवलेल्या नियमभंगाच्या आधारे विभागामार्फत स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्प बंद करण्याचे परिपत्रक काढले जाईल,' असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तसेच, नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन देत प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधला जाईल, असे स्पष्ट केले. या आंदोलनात अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्यासह वडगाव माहोरे येथील युवा नेते अक्षय चव्हाण, प्रशांत किटूकले, ऋषी पडोळे, राहुल नेमाडे, चंद्रशेखर दारोकार, नंदू गौरकर, हरीश मेश्राम यांच्यासह भवानी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनांनंतर आंदोलन केले स्थगित प्रशासनाकडून मिळालेल्या ठोस आश्वासनांनंतर नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केले असले तरी, जोपर्यंत प्रकल्प पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील,' असा इशारा आंदोलकांनी दिला.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे चांदूर बाजार तालुक्यात स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कर्जमाफी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी आंदोलक शेतकऱ्यांची बियाणे आणि लाडू तुला करून गौरव करण्यात आला. बियाण्यांच्या तुलनेतून शेतीचे आणि शेतकऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले, तर लाडू तुला करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात अशोक नारायण तायडे यांची लाडूतुला करण्यात आली, तर दिलीपराव भाकरे यांची बिजतुला करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तुला करण्यात आलेले बियाणे विधवा महिलांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जनार्दन राऊत यांना पूर्ण कपडे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनांच्या आठवणींना उजाळा दिला. उपोषण, मोर्चे आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवण्यासाठी केलेला संघर्ष आठवत अनेक शेतकरी भावूक झाले. “हा निर्णय आमच्या संघर्षाचा विजय आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनामुळेच शासनाला हा निर्णय घ्यावा लागला, असे सांगत त्यांचे आभारही मानले. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढेही अशीच एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. या कार्यक्रमाला चांदूर बाजारच्या नगराध्यक्ष मनिषा नांगलिया, चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन सुनिल मोहोड यांनी केले. हा लढा इथेच संपलेला नाही, आता सुरु झाला ^शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, ही आमच्या लढ्यातील प्रमुख मागणी आहे. तसेच आज दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी झाली असली तरी जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांनाही दोन लाखांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही पुढेही प्रयत्नरत राहणार आहोत. - बच्चू कडू.
आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या कामकाजात सुधारणा पाहीजे:मनपाच्या कामात कार्यक्षमता वाढवण्यावर लक्ष देणार
आयडब्ल्यूएमएस प्रणालीचा मुख्य उद्देश महानगरपालिकेच्या कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवणे आहे. यामुळे प्रकल्प व्यवस्थापन, देखभाल, संसाधन व्यवस्थापन, कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे आणि तांत्रिक अहवाल तयार करणे यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठा बदल होणार आहे. या प्रणालीचा योग्य वापर करून नागरिकांना जलद, कार्यक्षम आणि पारदर्शक सेवा देऊ शकतो, असे मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे हे शहरवासीयांना उत्कृष्ट सुविधा देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला भविष्याच्या दृष्टीने अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. आयडब्ल्यूएमएस प्रणालीद्वारे कामकाज अधिक जलद, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल, तसेच विविध विभागांमधील समन्वय सुधारेल, असेही आयुक्त म्हणाल्या. मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली इंटीग्रेटेड वर्क मॅनेजमेंट सिस्टिम (आयडब्ल्यूएमएस) प्रणालीसंबंधी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही प्रशिक्षण कार्यशाळा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झाली. याप्रसंगी उपायुक्त नरेंद्र वानखडे तसेच विविध विभागांचे अभियंते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी उपस्थितांना आयडब्ल्यूएमएस प्रणालीचे उद्दिष्ट, फायदे आणि कार्यान्वयनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत उपस्थित अभियंत्यांना प्रणालीचे तांत्रिक तपशील, डेटा एन्ट्री, मॉड्युल्सची कार्यपद्धती, अहवाल तयार करणे, तसेच प्रकल्प व्यवस्थापनाची नवीन पद्धत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, उपस्थितांना कार्यशाळेतून प्रत्यक्ष अॅप्लिकेशनवर प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. नव्या तंत्रज्ञानाचा समावेश प्रशिक्षणादरम्यान उपस्थित अभियंत्यांनी प्रणालीबाबत विचारणा केली, अनुभव व अडचणी मांडल्या आणि त्यावर प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. या संवादात्मक सत्रामुळे प्रशिक्षण अधिक परिणामकारक ठरले आणि सहभागी अभियंत्यांना प्रणालीबाबत स्पष्टता मिळाली. उपायुक्त वानखडे यांनीही या चर्चेत सक्रिय सहभाग घेत, विविध अडचणी व सूचना नोंदवल्या. उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनीही याबाबत आपल्या समाधान व्यक्त करून कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.अशा प्रकारच्या प्रशिक्षणांमुळे अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासनात नव्या तंत्रज्ञानाचा समावेश वाढेल आणि नागरिकांना उच्च दर्जाची सेवा देणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.
शहरातील आठवडी बाजार गल्लीबोळात भरत असून आठवडी बाजारातील ओटे मात्र रिकामे आहेत. शासनाने लाखो रु. खर्च करून हे ओटे बांधले. तरी त्याचा भाजी, फळे व इतर वस्तू विक्रेत्यांना कोणताही फायदा मिळेनासा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आठवडी बाजार हा मंगळवारीच भरत असतो. मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून आठवडी बाजारातील लहान-मोठ्या दुकानदारांना दुकाने लावण्याची नगरपालिकेने कोणतीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत आठवडी बाजार हा चिखलात भरत होता. त्यामुळे बाजारात खरेदी करण्याकरिता आलेल्या ग्राहकांना व दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. आठवडी बाजार चिखलात भरत असल्यामुळे स्थानिक पत्रकारांनी ही बाब उचलून धरली. त्यानंतर २०२४ मध्ये तत्कालीन आ. डॉ. अनिल बोंडे यांनी आठवडी बाजारातील ओटे बांधकामाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी मोर्शी नगर परिषदेला प्राप्त करून दिला. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा दारुण पराभव झाला. अपक्ष निवडून आलेल्या आमदाराच्या कार्यकाळात मोर्शी नगरपालिकेच्या वतीने निविदा काढण्यात आली. आठवडी बाजारात सिमेंटचे ओटे व रस्ते तयार करण्यात आले. नगरपालिकेच्या बुद्धिमान अभियंत्याने आठवडी बाजारातील ओट्याची रचना केली होती. त्या अनुषंगाने आठवडी बाजारातील ओटे व सिमेंट रस्ते तयार करण्याचा कंत्राट संबंधितांना देण्यात आला होता. कंत्राटदारातर्फे आठवडी बाजारात मोठे-मोठे ओटे बांधून तयार करण्यात आले. शहरात भरणारा हा आठवडी बाजार मोठा असल्यामुळे तालुक्यातील तसेच मध्यप्रदेशातील अनेक मजूरवर्ग बाजारहाट करण्याकरिता येत असतात. आठवडी बाजारात दुकाने मांडण्याकरिता जागा उपलब्ध नसल्यामुळे अनेक भाजीपाल्याचे दुकानदार आपली दुकाने गल्लीबोळात लावतात. बाजारातील ओटे उंची, आकाराने मोठे मागील पाच वर्षांपासून आठवडी बाजारातील एकाही दुकानदाराने आपली दुकाने ओट्यावर लावलेली दिसून येत नाहीत.कारण, बांधकाम करण्यात आलेले ओटे उंचीने व आकाराने मोठे असल्यामुळे दुकानदार व ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे.परिणामी अनेक दुकानदार आपली दुकाने आठवडी बाजाराच्या दिवशी रस्त्यावर लावत असतात.
अघोरी विधी आणि फसवणुकीच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात याच्या कारवायांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) हेल्पलाईनवर तक्रारींचा अक्षरशः ओघ सुरू झाला आहे. अवघ्या काही दिवसांत शेकडो नागरिकांनी संपर्क साधत खरातने केलेल्या फसवणुकीची आणि अत्याचारांची माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, खरातने केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर राजकीय नेते आणि काही सेलिब्रिटींनाही कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची माहिती पुढे येत आहे. एसआयटीने माहिती संकलनासाठी दोन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केल्यानंतर आतापर्यंत 100 हून अधिक फोन कॉल्स प्राप्त झाले आहेत. नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या भागांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या आहेत. विशेषतः अनेक महिलांनी पुढे येत खरातने अघोरी विधींच्या नावाखाली केलेल्या शोषणाबाबत माहिती दिली आहे. या तक्रारींमुळे तपासाला नवे धागेदोरे मिळत असून पोलिस अधिक पुरावे गोळा करण्याच्या तयारीत आहेत. तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने चमत्कारी रत्न आणि मौल्यवान खडे, देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली. बाजारात केवळ 50 रुपयांना मिळणारे खडे तो लाखोंच्या किंमतीत विकत असे. लोकांच्या अडचणी, भीती आणि भविष्याबाबतच्या चिंतेचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना लाखो रुपयांचा फटका दिला. अशा प्रकारे शेकडो लोकांना गंडा घालून त्याने मोठी आर्थिक माया जमवली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणातील आणखी एक गंभीर बाब म्हणजे, खरातच्या जाळ्यात अनेक बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटी अडकले होते, अशी माहिती समोर आली आहे. राजकीय यश, पदोन्नती किंवा संकट टाळण्यासाठी अनेक जण त्याच्याकडे जात असत. अशा लोकांकडूनही त्याने मोठ्या रकमा उकळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे या प्रकरणाचे राजकीय परिणामही मोठ्या प्रमाणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही काळापूर्वी अर्धांगवायूचा झटका दरम्यान, तपासादरम्यान खरातच्या आरोग्याबाबतही काही माहिती समोर आली आहे. काही काळापूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. उत्तेजक औषधांच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या त्याच्या शरीराच्या एका भागाची हालचाल मर्यादित असल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, वैद्यकीय अहवाल आणि आर्थिक व्यवहारांचा तपास अधिक सखोलपणे करण्याची तयारी तपास यंत्रणांनी सुरू केली आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनी भारावून मंत्री पंकजा मुंडे यांनी भायाळा गावातील कार्यक्रमात अत्यंत भावनिक भाषण केले. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, ही शपथ मी त्यांच्या चितेवर घेतली आहे, असे सांगताना त्या भावूक झाल्या. माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी तुमचे ऋण फेडता येणार नाही, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमात उपस्थितांनाही भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर पंकजा मुंडे बीड दौऱ्यावर होत्या. दिवसभरात त्यांनी श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली. त्यानंतर पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडावर आयोजित नारळी सप्ताह कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी आपल्या राजकीय आणि वैयक्तिक प्रवासातील अनेक अनुभव सांगितले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही कार्यकर्त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतल्याची वेदनादायक बाब त्यांनी व्यक्त केली. तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की ते शब्दांत मांडता येणार नाही, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना प्रतिसाद दिला. तसेच भगवानगड येथे उभारल्या जाणाऱ्या माऊली मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या भाविकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या पदराने दृष्ट काढत त्यांचा सन्मान केला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी भविष्यातील आयुष्याबाबतही मोठं विधान केलं. राजकारण संपल्यानंतर मीही हरिभक्त पारायणात सहभागी होणार आहे, असे त्या म्हणाल्या. समाजात एकोपा आणि प्रेम टिकवण्याचं आवाहन करत त्यांनी उपस्थितांना एकमेकांच्या साथीनं राहण्याचा संदेश दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये वेगळीच भावना निर्माण झाली. धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दरम्यान, परळीतील काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवातही पंकजा मुंडे सहभागी झाल्या. दुपारी बारा वाजता प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी स्वतः पाळणा हलवून अभिवादन केले. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजऱ्या झालेल्या या सोहळ्यात पंकजा मुंडे यांनी रामराज्याची संकल्पना परळीत साकारावी, अशी प्रार्थना व्यक्त करत धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
अवकाळीचा तडाखा:शेतकऱ्यांवर अवकळा; पापरी, वैराग, पानगाव भागात गारपीट, 15 मिनिटात पिके आडवी
जिल्ह्यातील पापरी, वैराग, पानगावसह अनेक गावांत बुुधवारी रात्री उशिरा झालेल्या सोसाट्याच्या वारा,अवकाळी पाऊस व गारांच्या माऱ्याने ऊस, केळी, आंबा या नगदी पिकांसह चारा पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. पापरी (मोहोळ) परिसरातील मका, गहू, हरभरा आदी ३६५ हेक्टर तर आंबा, केळी,पेरू आदी ९० शेतकऱ्यांचे फळबागांचे ६५ हेक्टरचे नजर अंदाज गुरुवारी समजून आलेले नुकसान असून यात माहिती उपलब्धते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून होत आहे. गेली आठवडाभर तालुक्यात तापमान खूप वाढले होते, फेब्रुवारी अखेरीस तापमानाने चाळिशी गाठली होती,दिवसभर व रात्री उशिरापर्यंत प्रचंड उकाडा व पहाटे थंडी जाणवत होती. सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक हवेत बदल झाला, विजांचा गडगडाट त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुरू झाला, त्यापाठोपाठ छोट्या छोट्या गारांचा तडतडाट सुरू झाला. अगदी १५/२० मिनिटात तो थांबला, मात्र पुन्हा रात्री १०.३० चे सुमारास पुन्हा सुरू झालेल्या पावसाने व गारपिटीने ऊस, केळीची पाने चिरली असून वाऱ्याने काढणीस आलेले गहू, चारा पिके असणारी मका, कडवळ ही पिके जमीनदोस्त झाली. पापरी | परिसरात बुधवारी रात्री झालेल्या गारपीटने द्राक्षे बागांना जोरदार फटका बसला असल्याचे दिसत आहे. बार्शी तालुक्यातील वैराग भागातील हात्तीज परिसरामध्ये केळींचे मोठे नुकसान झाले आहे.
भगवान श्री रामाचा जन्मोत्सव पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील विविध गावच्या राम मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी १० ते १२ या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विठ्ठलास सकाळी ११ महानैवेद्य नंतर पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून दुपारी १२ वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडला, या शिवाय ग्रामीण भागातही विविध गावात रामलल्लाचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न झाला. श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये श्रीराम जन्माचे विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले किर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सन्माननीय सदस्या शकुंतला नडगिरे, सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक संदेश भोसले, व कर्मचारी वृंद उपस्थित होते. याशिवाय, रामनवमी जन्मोत्सवा निमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. प्रतिनिधी | बार्शी श्रीराम नवमी निमित्त येथील श्रीराम मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने गुरुवारी (दि.२६) सायंकाळी ५ वाजता भगवंत मंदिर मार्ग येथील पुरातन श्रीराम मंदिर येथून जय श्रीरामाच्या जयघोषात फुलांनी आकर्षकरित्या सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भगवान श्रीरामाची देखणी ९ फूट उंचीची भव्य उत्सव मूर्ती ठेवून शोभा यात्रेची सुरूवात केली. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य बार्शी कृषी उत्पन्न उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विजय गरड पंचायत समिती उपसभापती संतोष निंबाळकर माजी नगरसेवक प्रशांत कथले शिरीष जाधव, नगरसेवक विजय राऊत, रवी राऊत, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व श्रीराम नवमी मध्यवर्ती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व राम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास श्री राम मंदिर भगवंत मंदिर मार्ग येथून सुरू झालेली शोभायात्रा पुढे महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, ऐनापुर मारूती चौक, आरएसएम हाईट, शिवाजी आखाडा, स्टँड चौक,पोस्ट चौक, मार्गाने मिरवणूक निघाली. पंढरपूर शहरातील महाद्वारात असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या वाड्यातील राम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या हस्ते श्रीराम, सीता यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याच बरोबर सुमारे १०० वर्षे जुन्या भडगावकर राम मंदिरात ही राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुढीपाडवा ते हनुमान जयंतीपर्यंत रोज विविध भजन सेवा सुरू आहे, संध्याकाळी सात वाजता वेद पठण आणि आरती करण्यात येत आहे. गुरुवारी जन्मोत्सव निमित्त पुणे येथे वास्तव्यास असलेले वसंतराव खर्डीकर आणि विद्याताई खर्डीकर यांचे कीर्तन संपन्न झाले. आज शुक्रवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राम भक्त रविकुमार कुलकर्णी यांनी दिली. शोभा यात्रेच्या अग्रभागी सुमारे ७ फुट उंचीची आकर्षक अशी रामभक्त हनुमानाची उत्सव मूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आली होती. शोभा यात्रेचे हे पाचवे वर्ष असून शहरातील प्रमुख मार्गाने शिस्तबद्धरीतीने दोन रांगेमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभा यात्रेत रामभक्तानी पांढरा शर्ट व डोक्यावर भगवी टोपी तर महिलांनी पारंपरिक पोषाख साडी परिधान केली होती. ‘जय श्रीराम, हर हर महादेव, भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करीत शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले शोभायात्रा पाण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. श्रीराम व हनुमानाची उत्सव मूर्ती हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते. रामभक्तांना पांडे चौक येथे सरबताचे वाटप करण्यात आले.
समाजातील काही लबाड पुरुषांच्या फसवणुकीमुळे पुण्यात महिलांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली होती. आत्महत्या रोखण्यासाठी राहत्या घरात बालकाश्रम काढून गर्भवतींचे बाळंतपण आणि बालकांचा सांभाळ करुन आरोग्य सेवेचा नवआदर्श निर्माण केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या ख-या वारसदार गाव खेड्यात काम करणा-या स्त्री परिचर आहेत. तीन वरुन ६ हजाराचे मानधन झाले याचा आनंद आहे, भविष्यात पूर्णवेळ कर्मचारी मान्यतेसाठी लालबावटा युनियन कायम लढत राहील, असा आशवाद कॉ. तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केला. आयटक संलग्न अंशकालीन आरोग्य स्त्री परिचर संघटनेच्या जिल्हास्तरीय सोलापुरातील विजयी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. निलेश दातखिळे (पुणे), कॉ. एम.डी.कुलकर्णी, यशवंत फडतरे, लहू आगलावे, राजू करली, उषा कांबळे, श्रीकांत कांबळे, अनिरुध्द नकाते आदी उपस्थित होते. विजयी मेळाव्या निमित्ताने प्रातिनिधीक महिलांचा गौरव करण्यात आला. शासनाने तीन हजाराचे मानधन सहा हजार केले, याचा आपणास आनंद आहे. आपण आनंद साजरा करत आहोत. परंतु एकीकडे समाजात मिंधेपणा निर्माण करुन मतपेटी शाबूत करण्यावर भर दिला जात आहे. तुम्ही खेड्यापाड्यात महिलांच्या, मुलांच्या आरोग्यासाठी अल्प मानधनावर काम करत आहात. गावात दवाखाना आहे, पण डॉक्टर नाहीत, तुम्हीच त्यांची काम करत आहात. परंतु शासन तुम्हाला पूर्ण कर्मचारी मानत नाही. संघटन शक्तीच्या जोरावर आपण हक्क मिळवून घेऊ, असे ठोंबरे म्हणाले. प्रास्ताविक भाषणात प्रविण मस्तूद यांनी संघटनेच्या चळवळीचा आढावा घेतला. मेळाव्यासाठी राजेंद्र करली, अनुराधा बोडरे, राधा खरात, पूजा पारसे, सविता कुलकर्णी, मुमताज शेख, शेखर बिनगुंडी आदींनी परिश्रम घेतले. गेल्या तीस वर्षांपासूनच्या लढ्याचा मागोवा घेताना काही संघटना श्रेय लाटण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु लालबावटा व इतरांच्या कृती समितीच्या लढ्यामुळेच संघटनेच्या पदरात सहा हजार रुपयांचे मानधन मिळाले आहे. शासनाने हे परिपत्रक काढण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सचिव मंगेश शिंदे व हजारे ताई यांनी कसे प्रयत्न केल्याचे निलेश दातखिळे यांनी सांगितले.
श्री रामनवमीच्या उद्देशाने जय श्रीरामचा नारा देत चेहऱ्याविना एकवटलेल्या तरुणाईने यंदाही आपल्या कार्यात सातत्य राखून कुर्डुवाडी व परिसरातील पंचक्रोशीतील लोकांसाठी सप्ताहभर संगीतमय रामकथेची आयोजन करुन अवघा रंग एक झाला म्हणत संपूर्ण पंचक्रोशी राममय करण्यात या तरुणाईचा मोठा वाटा आहे. श्रीरामनवमीनिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात टेंभुर्णी रोड गावदेवी मंदिरापासून ते रेल्वे कॉलनी श्रीराम मंदिरापर्यंत शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून श्रीरामाचा जयघोष करत दुचाकी रॅली काढण्यात आली. माढा तालुका सकल हिंदू समाज या नावाने एकवटलेल्या तरुणाईला आजही कोणता चेहरा नाही याचे नेतृत्व संपूर्ण सकल हिंदू समाज करत आहे. विशेष म्हणजे शहरातील नागरिकांनाही ही संकल्पना आवडल्याने नागरिकही मोठ्या प्रमाणात या तरुणाईच्या कार्याला हातभार लावून या धार्मिक उत्सवाला यथाशक्ति असे योगदान देत आहेत. मागील तीनवर्षापूर्वी जय श्रीराम चा नारा देत ही तरुणाई एकवटली होती. आजही याग्रुपचे सातत्य कायम आहे. विशेष म्हणजे यातील तरुण विविध पक्ष, संघटना याचे पदाधिकारी तसेच विचारधारेचे आहेत. मात्र या श्रीरामनवमी उत्सवात हे सर्व पदाधिकारी आपला पक्ष बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त सकल हिंदू समाजाच्या नावाने एकवटतो. याला कोणत्याही राजकीय पक्षाची अद्याप तरी किनार लागलेली नाही. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या तरुणाईच्या कार्यावर खुष आहेत. प्रतिनिधी | अक्कलकोट संपूर्ण ब्रम्हांडात ईश्वराने सर्वात बुद्धिवान प्राणी म्हणून मनुष्य प्राण्याची निर्मीती केली आहे. मनुष्य प्राण्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रचंड भौतिक सुख सुविधा निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराने सर्वांना जशी समान बुद्धी दिलेली आहे. तशी कमी जास्त प्रमाणात सर्वांना द्वेश, मत्सर, संपत्ती, अहंभावही दिले आहे. या अहंभावातून जो अहंकार निर्माण होतो त्यातून शांती व स्थैर्याला बाधा होते, अगदी अश्मयुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग ते आता कलियुगापर्यंत कालचक्राचा हा एक अविभाज्य असल्याचे भावोद्गार प्रथमेश इंगळे यांनी काढले. आपल्या आध्यात्म व धार्मिक संस्काराच्या शिकवणीमुळे संपूर्ण जगात भारताकडे विश्वशांतीचा संदेश देणारा राष्ट्र म्हणून पाहिले जात आहे. कारण भारत ही संतांची भुमी व देवभूमी म्हणूनही प्रचलीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीलाही अहंकारच कारणीभूत आहे. या अहंकाराला शांती मार्गाने शांत करण्याचे कसब केवळ भारताकडेच आहे हे संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. संपूर्ण जगाच्या या मानसिकतेला बळ देण्यासाठी भारतातील प्रत्येकाने विश्वशांती व मनःशांतीसाठी प्रभू श्रीरामांची जीवनशैली व विचार सारणी आत्मसात करून अहंकाराचा त्याग करावा, असे भावोद्गार प्रथमेश इंगळे यांनी काढले. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या आधिपत्त्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने भक्तिभावाने पारंपारीक भजन सोहळा संपन्न झाला. दुपारी १२ वाजता देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या व उपस्थित भक्तांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या पाळण्यावर गुलालपुष्प वाहण्यात आले. यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ व समर्थ नगर भजनी मंडळाच्या पाळणा गीताने श्रीराम जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचालित स्टेशन रोडवरील श्रीराम मंदिरात व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात आज रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्ती भावात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतिबा मंडपात जालना जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गोंदीचे कीर्तनकार योगीराज महाराज गोंदीकर यांची श्रीराम कथेवर आधारित कीर्तनसेवा पार पडली. या कीर्तन सेवेत योगीराज महाराज गोंदीकर यांना तबल्यावर सोलापूरचे सुप्रसिद्ध तबला वादक नितीन दिवाकर व हार्मोनियमवर पाठक यांनी साथ संगत केली. रामाच्या मूर्तीस सकाळी ६ वाजता देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने नगरसेवक इंगळे यांच्या हस्ते रुद्राभिषेक केले. दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी हिंदू देवालय संस्था श्रीराम मंदिराचे हे शतकमहोत्सवी वर्ष असून रामनवमी निमित्त मंदिराला फुलांनी सजविण्यात आले होते.आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली होती. गुढीपाडवा ते रामनवमी असा हा उत्सवाचा कार्यक्रम असतो.या दिवसात मंदिरात कीर्तन, भजन व प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज स. १० वा नारदीय कीर्तन व दुपारी १२ वा ३३ मि. रामजन्मोत्सव व प्रवचन झाले. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. श्रीराम कथेवर आधारित कीर्तनसेवा
चैतन्य व्हनकळस ठरला सुवर्णपदकाचा मानकरी:राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव
बार्शी राहुरी कृषी विद्यापीठात एमएस्सी हॉर्टीकल्चर मध्ये व्हेजिटेबल सायन्स या विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बार्शीच्या चैतन्य निहालकुमार व्हनकळस याला बीएसएस सुरेश अग्रवाल सुवर्णपदकाने गौरवण्यात आले. राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पदवीदान कार्यक्रमात चैतन्य याला सुवर्णपदकाने गौरविण्यात आले. चैतन्य याचे पहिली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण बार्शीतील कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक संकुलात झाले आहे. बारामती येथील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर मधून त्याने बीएस्सी अँग्री पदवी घेतल्यानंतर तेथेच त्याने एमएस्सी हॉर्टीकल्चर - व्हेजिटेबल सायन्स या विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. एमएस्सी प्रथम वर्षात त्याने कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कॉलेजमध्ये टॉप केल्याने त्याचा गेल्यावर्षी प्रतिभा पवार गोल्ड मेडलने सन्मान झाला होता. त्यानंतर एमएस्सी द्वितीय वर्षातही त्याने उत्कृष्ठ यश मिळवले. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत एमएस्सी (हॉर्टीकल्चर) व्हेजीटेबल सायन्स या विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला बीएसएस सुरेश अग्रवाल सुवर्ण पदक प्रदान करण्यात येते. राहुरी कृषी विद्यापीठात व्हेजीटेबल सायन्स या विषयात चैतन्य याने प्रथम क्रमांक पटकावल्याने तो बीएसएस सुरेश अग्रवाल सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. राहुरी कृषी विद्यापीठात ३९ वा पदवीदान समारंभ नुकताच झाला. या समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत चैतन्यचा सुवर्णपदक देवून गौरव करण्यात आला. खडतर परिस्थितीत चैतन्यचे यश चैतन्यची घरची परिस्थिती बेताची आहे. वडील निहालकुमार रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. चैतन्य हा सुरूवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने आईवडिलांनीही उच्च शिक्षणाचा ध्यास घेत त्याला शिकवले. चैतन्य यानेही आई रोहिणी, आजी कस्तुरबाई, वडील निहालकुमार व भाऊ प्रविण यांच्या कष्टाचे चीज करत दैदिप्यमान यश मिळवले. या यशाबद्दल चैतन्य व त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन होत आहे.

27 C