पोलिस पाटील संघटनेच्या इगतपुरी तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धोंगडे:जिल्हा उपाध्यक्षपदी कैलास फोकणे
गावकामगार पोलिसपाटील संघटना महाराष्ट्र राज्य इगतपुरी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. इगतपुरी तालुकाध्यक्षपदी कुऱ्हेगावचे पोलिसपाटील ज्ञानेश्वर धोंगडे पाटील यांची तर जिल्हा उपाध्यक्षपदी घोटी खुर्दचे कैलास फोकणे यांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्हाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके, जब्बार पठाण, विभागीय उपाध्यक्ष किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. इगतपुरी तालुकाध्यक्षपदी उपाध्यक्षपदी पंकज नवले, सीमा भोर, कार्याध्यक्षपदी सपना देहाडे, कार्यकारी अध्यक्ष गंगाधर पगारे, सचिवपदी रवींद्र पंडित यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी इगतपुरी तालुक्यातील बहुसंख्य पोलिस पाटील हजर होते. पोलिसपाटील संघटनेची नोंदणी, ध्येय धोरण, वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन राज्य उपाध्यक्ष अरुण बोडके व जब्बार पठाण यांनी केले. ११ डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनाच्या मोर्चासाठी तालुक्यातील पोलिसपाटलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. रवींद्र जाधव पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्र देऊन पोलिसपाटलांना मार्गदर्शन केले. तालुक्यातील सेवानिवृत्त पोलिसपाटलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
निफाड-उगाव-चांदवड रस्त्याचा काटेरी झुडुपांनी गुदमरला श्वास:सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
निफाड- उगाव- खडकमाळेगाव- चांदवड या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढल्याने वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करत प्रवास करावा लागत आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. निफाड-चांदवड मार्गावरून गेल्या काही दिवसांत वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. मालवाहू ट्रक, बसेस, स्थानिक वाहतुकीचे ट्रॅक्टर, टेम्पोसह मालवाहू वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर ठिकाणी खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा झाडे-झुडपांनी अतिक्रमण केल्याने साइडपट्ट्या झाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे वळणावर समोरील वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघाताही शक्यताही वाढली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने खड्ड्यांची दुरुस्ती करून झाडेझुडुपे हटवावेत, अशी मागणी प्रभाकर मापारी, अब्दुल शेख, दत्तात्रेय सुडके, प्रमोद क्षीरसागर, रामनाथ सांगळे आदींनी केली आहे.
सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे जागतिक मृदा दिन निरोगी माती, निरोगी शहरे’ या महत्त्वपूर्ण संकल्पनेनुसार कृषि विभागाच्या वतीने पाडळी येथे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीची थीम शहरीकरण, हवामान बदल आणि वाढत्या पायाभूत सुविधांमुळे मातीवर पडणारा ताण लक्षात घेऊन माती संवर्धन, पाण्याची शोषण क्षमता, कार्बन साठवण व तापमान नियमन यांसारख्या घटकांविषयी शेतकरी आणि नागरिकांना जागरूक करण्यावर केंद्रित आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे आणि मंडल कृषी अधिकारी ज्ञानेश्वर दुरगुडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी सहायक अर्चना चौधरी यांनी केले. शेतकरी, ग्रामस्थ तसेच कृषी मंडळातील अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात ‘ग्रामीण मातीइतकीच शहरी मातीही महत्त्वाची आहे.’ हा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. रस्ते व इमारतींच्या सिमेंटमुळे मातीची भौमितिक कार्यक्षमता कमी होते, ज्यामुळे पूर, उष्णतेच्या लाटा, प्रदूषण यांचा धोका वाढतो, हे उदाहरणासहित केले. शाश्वत शहर आणि शेती निर्माण करण्यासाठी हिरवळ वाढवणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, खुल्या जागांचे संवर्धन, वृक्षारोपण, सेंद्रिय शेती आणि पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन यांसारख्या उपायांची आवश्यकता सांगण्यात आली. संयुक्त राष्ट्रांनी २०१४ पासून जागतिक मृदा दिनाला अधिकृत मान्यता दिली असून २०२५ मध्ये ‘शहरांची सहनशक्ती वाढवण्यासाठी मातीचे महत्त्व’ अधोरेखित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाडळी गावातील कार्यक्रमात माती संवर्धन तंत्रज्ञान, माती आरोग्य तपासणी, सेंद्रिय पदार्थ वाढवण्याचे फायदे आणि सुरक्षित जमीन वापर नियोजनाबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास रामदास रेवगडे, कैलास शिंदे, चंद्रभान रेवगडे, गणेश रेवगडे, नंदू रेवगडे व शेतकरी उपस्थित होते. पावसाचे पाणी जिरवण्याबाबत माहिती कृषि सहाय्यक चौधरी यांनी शेतकऱ्यांना स्थानिक परिस्थितीनुसार माती संवर्धन पद्धती, माती नमुना तपासणी नुसार खत व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन, पावसाच्या पाणी जिरवण तंत्र तसेच शहर–गाव विकासात मातीच्या भूमिकेबद्दल माहिती दिली.
डिस्ट्रिक्ट ३०३० च्या महारक्तदान शिबिराच्या निमित्ताने रोटरी क्लब कळवणच्या वतीने येथील वाणी समाज मंगल कार्यालयात आयोजित शिबिरात ५५ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार होते. व्यासपीठावर रोटरीचे अध्यक्ष किरण निखाडे, सेक्रेटरी गणेश पाखले आदी उपस्थित होते. उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. हे सर्वमान्य असले तरी समाजातून रक्तदान करण्यासाठी बोटावर मोजता येणारे दाते पुढे येतात. रक्तदानाबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असून विविध उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लबने वेळोवेळी आयोजित केलेले रक्तदान शिबिर समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरोद्गार काढले. भूषण पगार यांनी रोटरी क्लबचे कार्य कौतुकास्पद असून रोटरीच्या उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आजच्या शिबिरात महिलांच्या इनरव्हील क्लबच्या पाच सदस्यांनी रक्तदान करत महिलांनी रक्तदानात सहभागी होण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी नागेश येवले यांनीही रक्तदान ही काळाची गरज असल्याचा संदेश दिला. या शिबिरात लोकनेते डॉ. जे. डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी, कळवण शहरातील रक्तदात्यांनी रक्तदान करत रोटरीच्या या शिबिरात आपला सहभाग नोंदवत सामाजिक कार्यात मोठा हातभार लावला. सूत्रसंचालन नीलेश भामरे यांनी केले. प्रास्तविक विलास शिरोरे यांनी केले तर संभाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. दीपक पाटील, मनोज बिरकुरे आणि टीमने संपूर्ण रक्तदान कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. रोटरी क्लबचे कार्य सामाजासाठी ठरतेय प्रेरणादायी रोटरी क्लब कळवण यांनी २६/ ११ च्या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. आज दहा दिवसांनी पुन्हा आयोजित केलेल्या शिबिरात ५५ दात्यांनी रक्तदान केल्याने फक्त १० दिवसात १०१ बाटल्या रक्त संकलन झाले. एवढ्या कमी दिवसात रक्तदान शिबिर यशस्वी केल्याने रोटरी क्लबचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक - पेठ - धरमपूर या प्रमुख रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सावळ घाटामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्यायी मार्ग मिळावा म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत चर्चा करत मागणीचे निवेदन सादर केले. पेठ आणि धरमपूर हे दोन्ही भाग आदिवासी आणि ग्रामीणबहुल असून, हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, डांबरीकरण उखडले आहे आणि पावसाळ्यात तर रस्त्यावर वाहतूक करणे जवळजवळ अशक्य होते. यामुळे प्रवासाला लागणारा वेळ वाढला आहे. तसेच लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. रुग्णवाहिकांना वेळेवर रुग्णालयात पोहोचणे कठीण होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर या रस्त्याचे काम तातडीने हाती घेतले गेले नाही, तर स्थानिक रहिवाशांना मोठे हाल भोगावे लागतील. आपण याकडे लक्ष देऊन नाशिकच्या या भागातील नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मंगरूळ, मोढा, रजाळवाडीसह सिल्लोड शहरातील परिसरात आनंद पार्क परिसरात वावर वाढला आहे. पकडण्यासाठी वन विभागाने दोन ठिकाणी पिंजरे लावले आहेत. पण, बिबटे हुलकावणी देत असल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. १५ दिवसांपूर्वी उंडणगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेले सुनील नरवडे यांनी आजही बिबट्या म्हटले तर अंगावर थरकाप येत असल्याची आपबीती सांगितली. साहेब, आमचा जीव महत्त्वाचा असून बिबट्याला आता तरी पकडा अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे. विशेष म्हणजे बिबट्याच्या भीतीमुळे मोढा शिवारातील शेतकरी जीव मुठीत धरून जगत आहेत. असे असताना वन विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची खास कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. काही अनुचित घटना घडल्यास यास वन विभागालाच जबाबदार धरले जाईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. यापूर्वी सिल्लोड तालुक्यातील मोढा, मंगरूळ आदी शिवारात बिबट्याने हरीण, शेळीसह इतर प्राण्यांची शिकार केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याशिवाय या परिसरातील बिबट्या इतरत्र गेल्याने कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथेही बिबट्याची पिल्ले आढळून आली आहेत. बिबट्याचा वेळीच बंदोबस्त केला जाईल, दोन ठिकाणी पिंजरे लावले असल्याची माहिती वनाधिकारी यशपाल दिलपाक यांनी दिली. मोढा बुद्रुक येथील शेतकरी वसंत सुरडकर म्हणाले, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या. परंतु यामुळे बिबट्या जेरबंद होऊ शकला नाही. या पिंजऱ्यात बकरी ठेवण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु, वन विभागाच्या वतीने आर्थिक तरतूद नसल्याने केवळ कोंबड्या ठेवल्याने बिबट्या जेरबंद होत नसल्याने शेतकरी भीतीच्या वातावरणात आहेत. यशपाल दिलपाक, वन अधिकारी माझ्यावर १५ दिवसांपूर्वी बिबट्याने केलेला हल्ला हा फक्त एक अपवाद नाही तर तो इशारा आहे. माझे प्राण केवळ कुत्र्यामुळे वाचले आहे. पण उद्या कुणाचे काय होईल सांगता येत नाही. गावकऱ्यांच्या जीवित सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने कारवाई करावी हाच माझा आग्रह आहे. शेतात गेल्यावर अजूनही माझ्या अंगाचा थरकाप उडतो.. त्या क्षणांची थरकाप उडवणारी आठवण माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. पण एवढ्या मोठ्या घटनेनंतरही वन विभागाची हालचाल अतिशय संथ आहे हे पाहून प्रचंड नाराजी आहे. गावातले लोक अजूनही भीतीच्या छायेत आहेत. रात्री तर कोणी घराबाहेर पडायलाही धजावत नाही. बिबट्या पुन्हा दिसल्याची चिन्हे मिळतायत तरीही जेरबंद करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत.
वैजापूर तालुक्यातील खंडाळा बसस्थानक परिसरात रस्त्यावर बेशिस्तीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होते. दररोज किरकोळ अपघात घडत आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर ७५२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग खंडाळा गावातून जातो. या मार्गावर जड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. खंडाळा येथील बाजारपेठ मोठी आहे. परसोडा, पानगव्हाण, भिवगाव, बोरसर, भिंगी, हिलालपूर, कोरडगाव, जानेफळसह दहा ते पंधरा गावांचा संपर्क येतो. त्यामुळे येथील बसस्थानक परिसरात सतत वाहनांची वर्दळ असते. परंतु, एकीकडे वाहनचालकांवर नियंत्रण दिसत नाही. दुसरीकडे, बसस्थानक परिसरात दिवसेंदिवस वाढत्या अतिक्रमणामुळे दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना रस्ता काढताना मोठी कसरत करावी लागते. याच महामार्गावर अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो. या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येमुळे येणाऱ्या काळात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेशिस्त वाहनांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच, बसस्थानक परिसरातील मुख्य चौकात सिग्नल बसवण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मुख्य चौकांत सूचना फलक नाहीत : रस्त्यावरील मुख्य चौकांत कोणत्याही प्रकारचे निर्देश दर्शवणारे सूचना फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकही वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याने अपघाताच्या लहान-मोठ्या घटना खंडाळा बसस्थानक परिसरात घडत आहे. खंडाळा बसस्थानक परिसरात रस्त्यावर बेशिस्तीने वाहने उभी असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होतात. रस्त्यावर बस थांबवण्यास मिळत नाही जागा ^खंडाळा बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात बेशिस्तीने वाहने उभी केली जातात. यामुळे महिलांसह विद्यार्थिनींना बसमध्ये चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या दरम्यान अस्ताव्यस्त वहानांमुळे चालकास बस थांबवण्यास जागा मिळत नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे थांबते. त्यामुळे महिलांना बस दुरवर जाऊन बस पकडणे शक्य होत नाही. -सतीश जेजुरकर, खंडाळा ग्रामस्थ.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या सलग पावसाने वैजापूर तालुक्यात मका आणि कपाशीची अर्ध्याहून अधिक पिके उद्ध्वस्त झाली. ७२,६०० हेक्टर मका आणि ३३,४०० हेक्टर कपाशीपैकी अर्धी पिके जमिनीत गाडली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच, पण दरवर्षी शेतीकामासाठी येणाऱ्या परप्रांतीय मजुरांचाही हंगाम हातातून गेला आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून दरवर्षी ५०० हून अधिक मजूर टोळ्या वैजापूर तालुक्यात येतात. यंदा मात्र पिके गेल्यामुळे कामच उरले नाही. त्यामुळे या मजुरांचे रोजगाराचे साधन बंद झाले. अनेक मजूर जोडपी मुलं सोडून गावातून आले होते. आता मात्र काम नाही, पगार नाही. त्यामुळे घरी पैसे पाठवणेही कठीण झाले आहे. हंगामात या मजुरांना रोज ६०० ते ८०० रुपये मिळतात. काही कामांवर एक हजार रुपयेही मिळतात. पण यंदा कामच नाही. त्यामुळे कमाई नाही. रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावोगावी फिरून काम शोधत आहेत. पण हाताला काही लागत नाही. उद्या ताटात काय, हा प्रश्न डोळ्यात घेऊन हे मजूर तालुक्यात फिरत आहेत. वैजापूरमध्ये कामासाठी येणाऱ्या ५०० मजूर टोळ्या रोज गावागावात फिरतात. पिकांचे नुकसान आणि अतिवृष्टीमुळे हातात काम नाही, पोटात भूक तरीही आज ना उद्या काम मिळेल, या आशेवर ते फिरत आहेत. ‘जिथे काम तिथे मुक्काम’ असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. तालुका कृषी अधिकारी व्यंकट टक्के म्हणाले, वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे मका-कपाशी पिकांची मोठ्या प्रमानात हानी झाली. त्यामुळे शेतकरी आणि मजुरांचे उत्पन्न ठप्प झाल्याने ग्रामीण अर्थचक्र बिघडले आहे. शिवाय पिके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्येही फारसे पैसै नाहीत, यामुळे काही ठिकाणी शेतकरी कामे कमी असल्यामुळे घरीच कुटुंबियांसह कामे करण्यास प्राधान्य देत आहेत. पोटासाठी भटकणे कठीण झाले, कामच मिळत नाही ^ जिथे जाऊ तिथे पिकांचे अवशेष आणि काम मात्र शून्य. मजुरीएवढं आमचं पोट, पण तीच थांबली आहे. गावागावांत चौकशी करत आहोत, पण उत्तर एकच कामच नाही. मजुरीचा दर वाढलाय म्हणे, पण कामच नसेल तर वाढलेल्या दराचं काय, तालुक्यात ५०० पेक्षा अधिक मजुरांच्या टोळ्या आहेत. यंदा मात्र पोटासाठी भटकणे कठीण झाले आहे. - पपू शेठ, मुकादम, बिहार
सुलतानाबाद येथे रोटरी क्लब आणि धनंजय ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने ५०० नारळाची झाडे मोफत वाटप करण्यात आली. प्रत्येक घराला दोन झाडे देण्यात आली. या झाडांचे संगोपन प्रत्येकाने मनापासून करावे, असे आवाहन धनंजय ऑटोच्या सर्वेसर्वा रागिनी कंदाकुरे यांनी केले. अहिल्यादेवी होळकर यांनी देखील घराघरात झाडे दिली होती. त्यांचा इतिहास विसरू नका, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात रोटरी क्लबचे चंद्रकांत चौधरी, धनंजय ग्रुपच्या डायरेक्टर रागिनी तुकाराम कंदाकुरे, वैदेही धनंजय कंदाकुरे, कौस्तुभ ट्रान्सपोर्टच्या राजश्री राहुल मोगले, माधव कंदाकुरे, सरपंच अनिता कारभारी गायके, शिल्लेगावचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस, गंगापूर साखर कारखान्याचे संचालक कारभारी गायके, उपसरपंच सोन्याबापू गायके, साईनाथ काळे आदी उपस्थित होते. रोटरी क्लबचे चंद्रकांत चौधरी, पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी गावकऱ्यांनी झाडांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. ग्रा.पं. सदस्य दत्तू गायके, गोरख धनुरे, माजी उपसरपंच विजू गायके, तंटामुक्ती अध्यक्ष कडूबा गायके, कैलास लबडे, सोपान शिंदे, सोमनाथ बुट्टे आदी होते. दिव्यांग विद्यार्थिनी सन्मान ः दिव्यांग सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनी उत्कर्षा भिकचंद कापडी आणि सार्थक काळे यांचा नारळाचे झाड देऊन विशेष सन्मान केला. शिक्षक दादासाहेब खैरे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक संजय बाहुले यांनी आभार मानले.
पोलिस पाटील गुरूवारी नागपूरमध्ये काढणार मोर्चा:निवृत्ती वय 65 वर्षांपर्यंत करण्यासह विविध मागण्या
महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलिस पाटील संघटनेच्या आवाहनावरून ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा यशवंतराव स्टेडियम येथून सकाळी १० वाजता सुरू होईल. मोर्चा थेट विधानभवनावर दुपारी १२ वाजता धडक देणार आहे. राज्यभरातील हजारो पोलिस पाटील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. खुलताबाद तालुक्यातील पोलिस पाटलांनी तहसीलदार स्वरूप कंकाळ व पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांना लेखी निवेदन दिले. नागपूर येथील मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी कळवले. तालुक्यात ७३ गावे आहेत. त्यापैकी केवळ ५० गावांमध्येच पोलिस पाटील नियुक्त आहेत. उर्वरित गावे पोलिस पाटीलशिवाय चालत आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कामकाज, कायदेशीर प्रक्रिया व शासनाच्या उपक्रमांवर परिणाम होत आहे. पोलिस पाटलांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. निवृत्ती वय ६० वरून ६५ वर्षांपर्यंत वाढवावे. पुनर्नियुक्तीची पद्धत रद्द करून सेवा सेवानिवृत्तीपर्यंत कायम ठेवावी. पोलिस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेम सुविधा द्यावी. प्रवास व दैनिक भत्ता वाढवावा. २०११ नंतर भत्त्यात वाढ झालेली नाही. २५ लाखांचा विमा उतरवावा. निवृत्तीनंतर मानधनाच्या ५० टक्के इतके निवृत्ती सन्मान मानधन मंजूर करावे. वेल्फेअर फंड स्थापन करावा. १६ ऑगस्ट २०२४ पूर्वी नियुक्त पोलिस पाटलांना लहान कुटुंबाची अट लागू करू नये. याशिवाय अनेक प्रलंबित मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी हा ऐतिहासिक मोर्चा आयोजित केला आहे. मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन जनार्दन पाटील उबाळे (अध्यक्ष, पोलिस पाटील खुलताबाद तालुका), सिंधूताई बढे पाटील, रमेश ढिवरे पाटील आदींनी केले आहे.
सिल्लोड ग्रामीण विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षेचा अनुभव मिळावा, यासाठी पीएमश्री जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा, केऱ्हाळा यांनी अभिनव उपक्रम राबवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून जवाहर नवोदय विद्यालय अभिरूप चाचणी घेण्यात आली. परीक्षेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २०० हून अधिक शाळांमधील २८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पार पडली. परीक्षा संपताच निकाल जाहीर करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक शिक्षक रमेश पवार, श्रीनिवास जाधव, शेख चांद, सोमीनाथ राणे, वंदना साबळे, महानंदा राजपूत, रत्नकला इंगळे, विभा मेश्राम, सुनीता निभोरे, विद्या सरदार, स्वप्नजा पाटील, महेंद्र सूर्यवंशी, सदानंदी दोडके आदींनी पुढाकार घेतला होता. मुख्याध्यापक रामचंद्र मोरे यांच्या नेतृत्वात ही चाचणी पार पडली. स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख रमेश पवार यांच्या नियोजनातून परीक्षा यशस्वी झाली. तालुक्यातील व केंद्रातील अनेक शिक्षकांनी सहकार्य केले. सरपंच उषाताई पांढरे, शालेय अध्यक्ष अर्जुन वाघ, शिक्षणतज्ज्ञ सूर्यभान बनसोड, उर्दू शालेय अध्यक्ष साबेर शेख, अजिनाथ भिंगारे यांच्यासह गावकऱ्यांनी साथ दिली. जिल्हा शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी मार्गदर्शन व अभिनंदन केले. या परीक्षेमुळे आता आमच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण झाले आहे. परीक्षेविषयी मनामध्ये असलेली भीती आता दूर झाली आहे, अशी माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली. प्रेरणादायी, प्रशंसनीय उपक्रम ः रमेश ठाकूर गटशिक्षणाधिकारी रमेश ठाकूर यांनी सांगितले की, या उपक्रमामुळे ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी होईल. विद्यार्थी धीरोदत्तपणे परीक्षेला सामोरे जातील. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी घेतलेला हा उपक्रम आदर्श, प्रेरणादायी आणि प्रशंसनीय आहे. असेच उपक्रम नेहमी राबविले जावेत. केऱ्हाळा येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश अभिरूप चाचणी परीक्षेत सहभागी विद्यार्थी. यावेळी परीक्षेत चांगले गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
नाशिककरांसाठी महत्त्वाकांक्षी असलेला मुंबई-नाशिक लोकलचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. रेल्वे बोर्डाने मनमाड ते कसारा दरम्यान या मार्गावर १३१ किमीचे 2नवे रेल्वे मार्ग टाकण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे घाटातील चढ व उतार कमी होऊन विना बँकरची लोकल या मार्गावर धावू शकणार आहे. या मार्गांसाठी ५ तालुक्यात ४५ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार असून त्यासाठीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक २ नाशिक यांच्याकडे या संपूर्ण भूसंपादनाची जबाबदारी असेल. या नवीन रेल्वे लाईन्ससाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा केला होता. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही नवीन रेल्वे लाईनच्या मंजुरीनंतर आता प्रकल्प अंमलबजावणी वेगाने व्हावी, यासाठी आक्रमक पाठपुरावा राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी होणाऱ्या भूसंपादन (भूमिअधिग्रहण) प्रक्रियेत स्थानिक शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याचा प्रयत्न करणार आहे. - राजाभाऊ वाजे, खासदार नवीन रेल्वे लाईन्सचा फायदा वाढत्या प्रवासी संख्येचा भार वाहणार मुंबई, पुणे नंतर नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक मुंबईला रोज अप-डाऊन (ये-जा) करीत असल्याने अनेकांची पूर्वीपासून नाशिक-मुंबई लोकलची मागणी होती. मात्र कसारा घाटातील अरुंद बोगदे, चढ व उतार यामुळे लोकलचा प्रवास यशस्वी होत नव्हता. मात्र, वाढती प्रवासी संख्या तसेच नाशिकमधून होणारी मालवाहतूक लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार नवीन दोन रेल्वे लाईन्सला मंजुरी दिली आहे. तसेच, रेल्वे प्रशासनाकडून स्लॉट (वेळापत्रकात जागा) उपलब्ध नसल्याचा मुद्दाही सतत पुढे येत होता. वाजे यांनी अपुरी रेल्वे लाईनची क्षमता ओळखून मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने आता दोन्ही मार्गांवर नवीन दुहेरी रेल्वे लाईन उभारण्यास मान्यता दिली आहे. या नवीन 2 रेल्वेमार्गांची लांबी १३१ किलोमीटर आहे. त्यासाठी १८ नवीन बोगदे सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये करण्यात येणार आहेत. सध्या कार्यरत असलेल्या मार्गांच्या जवळच हे नवीन मार्ग उभाण्याचे प्रस्तावित असून त्याची निश्चिती लवकरच रेल्वे प्रशासनातर्फे केली जाणार आहे.
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या कुंभमेळ्याच्या (सिंहस्थ २०२७) कामांना खूप विलंबाने सुरुवात झाली आहे. सिंहस्थ प्राधिकरणात साधू-महंतांचे प्रतिनिधी नाहीत, तसेच शिखर समितीतही त्यांना स्थान नाही. साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या ५४ आणि ७० एकर जागेव्यतिरिक्त ठोस माहिती प्रशासनाकडून मिळत नाही. साधुग्रामसाठी किती जागा उपलब्ध होणार, तसेच शेतकऱ्यांशी सुरू असलेल्या चर्चेची खात्री नाही. अशा परिस्थितीत सिंहस्थ मेळा कसा होणार? अशी चिंता आणि तीव्र नाराजी साधू-महंतांनी व्यक्त केली. सिंहस्थ प्राधिकरणाच्या वतीने जिल्हा परिषदेत सोमवारी साधू-महंत आणि पुरोहितांची बैठक पार पडली. या बैठकीत साधू-महंत आणि पुरोहित संघाने समस्या मांडल्या. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी यापुढे प्रत्येक बैठकीपूर्वी आठ दिवस आधी माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी मगोहंत रामकृष्णदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, देवबाबा, गौरीश आदी उपस्थित होते. वृक्षतोडीच्या वादात आम्ही पडणार नाही... सध्या साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या जागेवरील झाडांवरून देशभरात चर्चा होत आहे. पण गत १२ वर्षांपूर्वी तपोवनात झाडे नव्हती, ती मनपाने लावली. लोक म्हणतात, “साधू येणार आणि त्यासाठी झाडे तोडायची का?” या वादात आम्हांला पडायचे नाही, त्यावर बोलायचेही नाही, असे स्पष्ट मत महंत भक्तीचरणदास महाराज यांनी व्यक्त केले. तसेच हा मुद्दा त्वरित सोडवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुरोहितांच्या या सूचना लागोपाठ ३ कुंभ, आम्ही येथे थांबणार नाही, तुम्ही वेग वाढवा आगामी काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर, उज्जैन आणि हरिद्वार असे तब्बल तीन कुंभांचे आयोजन होत आहे. आम्हांला त्या ठिकाणी जाऊनही नियोजन पाहावे लागते. त्यामुळे आम्ही दोन-तीन महिने येथे कामांची स्थिती पाहण्यासाठी राहू शकणार नाही, तरी प्रशासनाने कामांची गती योग्य ठेवावी. उज्जैनमध्ये कुंभ आठ महिन्यांनी असताना तेथील कामे खूप पुढे गेली आहेत, याची आठवणही साधूंनी करून दिली. प्रमुख समस्या व मागण्या स्थायी साधुग्राम :साधुग्रामसाठी जागा कायमस्वरूपी हवी आहे. जागा निश्चित नसल्याने यंदाच्या कुंभ आयोजनासाठी कसरत करावी लागत आहे, तर पुढील १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभाचे नियोजन कसे होणार?नियमित माहिती :प्रशासकीय स्तरावरील नियोजनाची नियमित माहिती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.प्रतिनिधित्व :सिंहस्थ प्राधिकरण आणि शिखर समितीत साधू-महंतांना स्थान मिळावे. साधू-महंतांकडून या सूचना
जायकवाडी धरणात १३५० मेगावॅट फ्लोटिंग सोलारचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एनटीपीसीच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. आता जायकवाडीनंतर मराठवाड्यातील सर्व मोठे प्रकल्प तसेच नगर आणि नाशिकमधील मोठ्या प्रकल्पांवर सोलार फ्लोटिंग प्रकल्प उभारले जातील. त्यासाठी आगामी महिनाभरात राज्य सरकारकडून स्वारस्यपत्र (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) मागवले जाणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प उभारण्यासाठीची प्रक्रियात्यानंतर सुरू होईल. जलसंपदा विभागाने गोदावरी पाटबंधारे महामंडळ आणि कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळही दोन्ही महामंडळे स्वायत्त करण्याच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी शासनाकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातील. हा होणार फायदा धरणांच्या जलाशयावरील सौरऊर्जाप्रकल्पांमुळे जमीन अधिग्रहणाची समस्या लागणार नाही. तसेच यामुळे कुठलेही प्रदूषण होणार नाही. थर्मलपॉवर प्रोजेक्टमधून वीजनिर्मिती केल्यानंतर वायुप्रदूषण होते. मात्र, हे प्रकल्प पर्यावरणपूरक मानले जातात.या ‘फ्लोटिंग सोलर'' तंत्रज्ञानाचासर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन कमीप्रमाणात होईल. आर्थिक सल्लागाराची शासनाने केली नियुक्ती शासनाने याबाबत आर्थिकसल्लागाराची नियुक्ती केली आहे. याआर्थिक सल्लागाराच्या माध्यमातूनमहामंडळाचे उत्पन्न कसे वाढवतायेईल यासाठी प्रयत्न करण्यात येणारआहेत. महामंडळाच्या वतीने आर्थिकउत्पन्न वाढवण्यासाठी आता मत्स्यपरवानेदेखील दिले जातील. तसेचजलपर्यटनासाठी काय करता येऊशकते याचेदेखील नियोजन करण्यातयेत आहे. जायकवाडीत १३५० मेगावॅटचा प्रकल्प जायकवाडीमध्ये पक्षीअभयारण्य असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या.मात्र, या अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. १३५० मेगावॅटचाहा प्रकल्प एनटीपीसीच्या (नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन)माध्यमातून उभारला जाणार आहे. याबाबत शासनासोबतएमओयू करण्यात येणार आहे. त्यामध्ये जलसंपदा विभाग, ऊर्जाविभाग आणि एनटीपीसी यांच्या माध्यमातून उभारणी होईल. मोठ्या धरणांवर सोलार बसवणार याबाबत गोदावरी पाटबंधारेमहामंडळाचे कार्यकारी संचालकसंतोष तिरमनवार यांनी सांगितलेकी, आपल्या महामंडळातजायकवाडीमध्ये सध्या फ्लोटिंगसोलार प्रकल्प बसवले जातआहेत. त्यानंतर माजलगाव,दुधना, ऊर्ध्व पैनगंगा, मांजरा,येलदरी, नगर जिल्ह्यातील मुळा,नाशिकमधील गंगापूर यासहअनेक प्रकल्पांमध्ये हे प्रकल्पहोणार आहेत. मराठवाड्यातअकरा मोठे प्रकल्प आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणातवीजनिर्मिती यामधून होईल. प्रकल्पामुळे वाढणार महामंडळाचे उत्पन्न महामंडळांना स्वायत्तता देण्याचा निर्णय जलसंपदाने घेतला आहे. यामुळे महामंडळाकडून आर्थिक पर्याय शोधलेजात आहेत. यात मोठ्या प्रकल्पांवर फ्लोटिंग सोलार उभारले जातील. एका महिन्यात स्वारस्य पत्र मागवले जातील.त्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. - संतोष तिरमनवार, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ.
पतंग व मांजा विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी प्रत्येक पतंग विक्रीचे नोंदणी रजिस्टर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच जनजागृतीचे पोस्टर दुकानाबाहेर लावावेत. एखाद्या विक्रेत्याने नायलॉन मांजाची विक्री केल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त प्रवीण पवारांनी दिला. सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्तालयात पतंग विक्रेत्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. चोरून होते मांजाची विक्री शहरात महाविद्यालयाची मुले चोरून मांजा विक्री करत असल्याचे उपस्थितांनी पोलिस आयुक्तांना सांगितले. त्यामुळे शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक दोन दिवसांत घेणार आहोत. त्याचबरोबर प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाविद्यालयात निरीक्षक जनजागृती करणार असल्याचे आयुक्त पवार यांनी सांगितले. खंडपीठाचे पोलिसांवर ताशेरे शहरातील एमजीएम रुग्णालयासमोर मोटारसायकलवरून जाणाऱ्या तीनवर्षीय मुलाचा मांजाने गळा कापल्याने त्याला २१ टाके द्यावे लागल्याचे दिव्य मराठीतील वृत्त मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. प्रशासनाकडून अशा घटना घडल्यानंतर केवळ कारवाई केल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्ष मुळापासून समस्येचे उच्चाटन होत नाही. अशी घटना घडल्यानंतर प्रशासन यंत्रणा जागी होणार आहे का? अशी विचारणा करण्यात आली. घटनेची गंभीर दखल घेत खंडपीठाने अनेक प्रश्न उपस्थित केले. मांजा येतो कुठून आणि त्याच्या मुळाशी का जात नाही? अशी विचारणा केली. पुरवठा करणाऱ्यापर्यंत पोलिस पोहोचत नाही हे यंत्रणेचे अपयश नाही का असा सवाल न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेनेगावकर यांनी केला. खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील बारा जिल्ह्यांत केलेल्या कारवाईचा अहवाल सर्व पोलिस अधीक्षक व पोलिस आयुक्तांनी १६ डिसेंबरपर्यंत खंडपीठात सादर करण्याचे आदेश दिले. खंडपीठाने विचारलेले प्रश्न समितीचे अध्यक्ष असलेल्या मनपा आयुक्तांनी याबाबत किती बैठका घेतल्या? नायलॉन मांजा येऊ नये यासाठी काय कठोर उपाययोजना केल्या? निर्मिती व पुरवठा करणाऱ्यांचा तपास केला काय? ऑनलाइन मांजा विक्री पोर्टलवर काय कारवाई केली?
महायुती सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ७५,२८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा प्रस्ताव विधानमंडळात मांडला. यात राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवास आणि त्यांच्या अनुषंगिक खर्चासाठी १४३ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद केली. हे १४३ कोटी जनतेकडून वसूल होणाऱ्या करातून खर्च होणार आहेत. दरम्यान, इंडिगो संकटामुळे सर्व आमदारांच्या हवाई प्रवासाची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांनी हवाई प्रवास मुंबईपुरता न ठेवता पुण्याला जाणाऱ्या आमदारांसाठीही ठेवा, असे सांगितले. त्यामुळे १४३ कोटींमधून आमदारांच्या विमानवारीचा खर्च होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे अधिवेशन संपताच चंद्रपूर, नागपूर वगळता सर्व मनपा निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हजारो कोटी रुपये खर्चून बांधलेला समृद्धी महामार्ग, वंदे मातरमसह इतर सुपरफास्ट रेल्वे उपलब्ध असताना आमदारांसाठी हवाई सेवेचा हट्ट कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महसूल व वन विभागाला सर्वाधिक १५,७२१.०८ कोटींचा निधी पुरवणी मागण्यांत नमूद आहे. नगर विकास (९,१९५.७६ कोटी), उद्योग, ऊर्जा (९,२०५,९० कोटी), कौशल्य विकास (६०९.७० कोटी), कृषी (६१६.२१ कोटी) सारख्या रोजगार व ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडलेल्या विभागांना तुलनेने कमी निधी आहे. महापालिका, जि.प.ची तयारी हिवाळी अधिवेशनानंतर( १५ डिसें.)मनपा, जिप निवडणूक आचारसंहिता लागेल. ५०%आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या नागपूर, चंद्रपूर मनपा तसेच २० जि.प वगळता अन्य जिल्हा परिषदांची निवडणूक २० जानेवारीला होईल. तर दुसऱ्या टप्प्यात मार्चअखेर नागपूर, चंद्रपूर मनपासह उर्वरित जि.पसाठी मतदान होऊ शकते. १० टक्के पुरवणी मागणीचा दंडक मोडीत पुरवणी मागण्या मूळ अर्थसंकल्पाच्या दंडक असलेल्या १० टक्क्यांऐवजी थेट १७.५२ टक्क्यांवर गेल्या आहेत. हा निधी आदिवासी विकास विभागासारख्या महत्त्वाच्या विभागाच्या मूळ बजेटमधील ५४९ कोटी काढून वापरला जात आहे. व्हीआयपी-केंद्रित उधळपट्टी ही अतिशय गंभीर बाब आहे. डिसेंबरमध्ये ‘लक्षणीय चढ-उतार’ जुलै २०२४ मध्ये ९४,८८९.०६ कोटी रुपयांची आजवरची सर्वात मोठी पुरवणी मागणी विधिमंडळात सादर करण्यात आली. दुसऱ्या क्रमांकावर मोठी असलेली मागणी डिसेंबर २०२५ मध्ये ७५,२८६.३७ कोटी इतकी होती. वित्तीय वर्षाच्या सुरुवातीस (जून, जुलै) आणि वर्षाच्या समाप्तीजवळ (डिसेंबर) मोठ्या मागण्या करण्याची प्रवृत्ती सातत्याने दिसून येते. विशेषतः, जुलै २०२४ (९४,८८९.०६ कोटी) आणि डिसेंबर २०२५ (७५,२८६.३७ कोटी) या मागण्या लक्षणीय आहेत. या तुलनेत, फेब्रुवारी २०२४ मध्ये सादर झालेली ८,६०९.१७ कोटी ही सर्वात कमी मागणी आहे.
नंदुरबारमध्ये आजही बाण, बांबू आणि ब्लेडने प्रसूती केल्या जात असल्याच्या ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वत:हून दखल घेतली. ८ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेले वृत्त सुमोटो जनहित याचिकेच्या स्वरूपात दाखल करण्यात आले आहे. तसेच नंदुरबारसह मराठवाड्यातील किनवट या आदिवासी परिसरातील आरोग्य यंत्रणेची सखोल माहिती १६ डिसेंबर रोजी सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला देण्यात आले. न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेनेगावकर यांनी शासकीय आरोग्य यंत्रणा, परिसरात उपलब्ध संसाधने, मनुष्यबळ यांचा आढावा संबंधित विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी शपथपत्रासह दाखल करण्याचे निर्देश दिले. ‘दिव्य मराठी’ने नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील शेकडो बाळंतपणे करणाऱ्या पुरुष दाईंचे वृत्त प्रकाशित केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या वृत्ताची दखल घेत मुख्य सरकारी वकिलांना प्रकाराबद्दल विचारणा केली. शासनाने सुरक्षित मातृत्वाच्या विविध योजना आणल्या तरी असे प्रकार का घडत आहेत? असा सवाल करुन संबंधित वृत्ताच्या आधारे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांना नंदुरबारसह नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची माहिती घेण्याचे निर्देश दिले.
महाराष्ट्रातील समाजवादी विचारवंत, शेतमजूर, हमाल व असंघटित कामगारांच्या हक्कासाठी लढणारे डॉ. बाबा आढाव (९५) यांचे सोमवारी रात्री ८.३० वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंगळवारी सकाळी १० वाजता हमाल भवन येथे ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शीला, चिरंजीव असीम, अंबर व नातवंडे असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढाव यांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शनिवारी त्यांची विचारपूस केली होती. आढाव यांच्या जीवनकार्याविषयी दोन खंड लिहिणारे ज्येष्ठ लेखक अरुण खोरे यांनी आढाव यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत. महात्मा फुलेंच्या विचारांनी सामाजिक चळवळी उभ्या करणारे आणि सत्यशोधक विचारांच्या आधारे सर्व महाराष्ट्रभर त्या चळवळी नेणारे कर्ते समाजसुधारक म्हणून बाबांची नोंद भारताच्या सामाजिक इतिहासात करावी लागेल. सामाजिक-परिवर्तनवादी चळवळीत संघर्षशील लढ्याचे नेतृत्व करत हमाल पंचायत, म. फुले समता प्रतिष्ठान या संस्था - संघटनांचे संस्थापक म्हणून त्यांचे योगदान महान आहे. सामाजिक चळवळी उभ्या करताना केवळ संघर्ष नव्हे, तर प्रबोधनाचा पाठ त्यासोबत असला पाहिजे याची काळजी बाबांनी घेतली. भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासात त्यांनी केलेले प्रबोधन आणि महात्मा फुले यांची नवी मांडणी ही अतिशय अभूतपूर्व आहे. वैद्यकीय पेशा सोडून पूर्णपणे समाजकारणात उतरण्याचा निर्णय बाबांनी १९६० मध्ये घेतला. पण त्या आधीची ५ वर्षे लक्षात घेतली तर एकुणात सुमारे ७० वर्षे बाबांच्या सामाजिक चळवळीचा कालखंड होता. त्यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्था-संघटना यांची यादी खूप मोठी आहे. याबाबतीत त्यांनी म. फुलेंचा आदर्श समोर ठेवला होता. त्यामुळेच महात्मा फुले समता प्रतिष्ठान ही संस्था त्यांनी फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या शताब्दी वर्षात स्थापन केली. त्यापाठोपाठ वर्षभरात प्रतिष्ठानचे मुखपत्र म्हणून ‘पुरोगामी सत्यशोधक’ हे त्रैमासिक सुरू केले. या दोन्ही संस्थांची पन्नाशी यंदा पूर्ण होत आहे. ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रैमासिकाच्या अंकातून गेल्या पाच दशकांतील महाराष्ट्रातील ठळक सामाजिक प्रश्नांचा आणि त्याला जोडलेल्या आर्थिक व सांस्कृतिक पैलूंचा ठळक इतिहास समोर येतो. एक संपादक म्हणून आणि समर्पित भावनेतून काम करणारा संघटक म्हणून बाबांनी प्रतिष्ठान आणि या त्रैमासिकाचे कार्य ज्या पद्धतीने पुढे नेले ते विशेष लक्षणीय आहे. बाबांनी काही लेखनही केले. एक गाव एक पाणवठा, सुंबरान आणि संघासंबंधीच्या काही टीकात्मक भूमिकेचे पुस्तक ही त्यांची लेखनसंपदा आहे. गेल्या पाच दशकांत पुरोगामी सत्यशोधकसाठी बाबा सातत्याने संपादकीय टिपण लिहीत होते. त्यातून समकालीन सामाजिक प्रश्नांवर त्यांचे भाष्य वाचायला मिळते.
मुख्यमंत्री कार्यालयातील क्लास वन अधिकारी असल्याचे भासवून मुंबईतील एका नामांकित ज्वेलर्सला २ कोटी ८० लाख रुपयांचा चुना लावणाऱ्या एका ३२ वर्षीय तोतयाला सोमवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. वैभव परेश ठाकर असे त्या भामट्याचे नाव असून न्यायालयाने त्याला १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्या या बतावणीने पोलिस यंत्रणाही चक्रावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव ठाकर याने फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान ज्वेलर्सला “कस्टम विभागाने जप्त केलेले सोने’ ७ टक्के कमी दरात लिलावात मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून ज्वेलर्सने १.१५ कोटी रुपये थेट आरोपीची पत्नी प्रियांका ठाकर हिच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या गोल्ड ट्रेडिंग करणाऱ्या फर्मच्या खात्यात ट्रान्सफर केले. फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात केला प्रवेश, गाडीवर लावला पिवळा दिवा पोलिस तपासात आरोपीच्या धक्कादायक कृत्यांचा उलगडा झाला आहे. आरोपी ठाकरकडे बनावट सरकारी ओळखपत्र आढळले. तसेच पिवळ्या दिव्याची गाडी वापरत होता. विशेष म्हणजे त्याला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातही प्रवेश होता. त्याने मागील वर्षीच्या राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा प्रवेश पासही मिळवला होता. तसेच त्याने एका आमदाराचा स्वीय सहायक असल्याचेही भासवले होते. आरोपीची पत्नी प्रियांका आणि या गुन्ह्यात सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम (कॅस) अंतर्गत स्थाननिश्चिती आणि पदोन्नती प्रक्रिया राज्य शासनाने आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवत थांबवली. परिणामी १ हजाराहून अधिक प्राध्यापकांची अपेक्षापूर्ती लांबणीवर पडली आहे. यापैकी ७० टक्क्यांवर प्राध्यापक सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांचे पदोन्नतीचे स्वप्न भंग पावणार असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविरोधात राज्यभरातील प्राध्यापक संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता प्रक्रिया राबवली जात आहे. राज्य सरकारने हेच कारण पुढे करत प्राध्यापकांचे एक हजाराहून अधिक पदोन्नती प्रस्ताव थांबवून ठेवले आहेत. यामुळे प्राध्यापक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कॅस प्रक्रिया ही नव्याने भरती नसून सेवा अधिकारांवर आधारित पदोन्नती असल्याने निवडणूक आचारसंहितेचे कारण दाखवून प्रक्रिया थांबवणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य व अन्यायकारक असल्याचे अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे महासचिव प्रा. डॉ. वैभव नरवडे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणीही शिक्षकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत निर्णय घेते ते पाहावे लागणार आहे. प्राध्यापकांची सेवा वरिष्ठता, वार्षिक वेतनवाढीवरही परिणाम होणार आठ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार कॅस लाभ पात्र प्राध्यापकास मुलाखतीच्या तारखेपासून लागू होतो. पदोन्नती प्रक्रिया थांबवल्याने प्राध्यापकांची सेवा वरिष्ठता, वार्षिक वेतनवाढ, निवृत्ती लाभ, पेन्शन रक्कम यावर थेट परिणाम होऊन मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ...ही तर सन्मानाची लढाई केवळ पदोन्नतीच नव्हे, तर शिक्षकांच्या सन्मानाची ही लढाई असून शासनाने स्थगित केलेली कॅस प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, नसता राज्यभरातील सर्व सहसंचालकांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन केले जाईल. - दिलीप अर्जुने, प्रांत सहमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष महासंघाचे महासचिव प्रा. डॉ. वैभव नरवडे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणीही शिक्षकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे. त्यामुळे आता सरकार याबाबत निर्णय घेते ते पाहावे लागणार आहे. शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम कॅस थांबवल्याने शिक्षकांचे हक्क बाधित होण्यासोबतच गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासदेखील मोठा फटका बसतो. हा निर्णय शिक्षण प्रणालीची पीछेहाट करणारा आहे. एक हजाराहून अधिक प्रलंबित प्रस्तावांना तत्काळ मंजुरी देऊन पात्र प्राध्यापकांना न्याय द्यावा. -डॉ. प्रदीप खेडकर, अध्यक्ष, अ. भा. शैक्षिक महासंघ
गोव्यात अर्पोरा परिसरात शनिवारी उशिरा एका नाईट क्लबमध्ये झालेल्या सिलिंडर स्फोटात २५ जणांचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून आठवडाभरात त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. या प्रकरणी ‘बर्च बाय रोमिओ लेन क्लब’चा व्यवस्थापक आणि अन्य ३ […] The post गोव्यात अग्निकांड! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्ह्यासह अन्य ठाण्यांच्या हद्दीतील २३ घरफोड्या उघड
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या व चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती. या गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानीय गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास पद्धती वापरून घरफोड्या करणा-या आंतर जिल्हा कुख्यात व सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. दि. ६ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लातूर-बार्शी […] The post जिल्ह्यासह अन्य ठाण्यांच्या हद्दीतील २३ घरफोड्या उघड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जवान सेप यांच्यावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील केंद्रीय राखीव पोलीस दलात असणारे व सध्या लातूर येथील सीआरपीएफ केंद्रात कार्यरत आसणारे सीआरपीएफ जवान प्रशांत सेप यांचा प्रशिक्षण केंद्रातून घराकडे येत आसताना लातूर शहराबाहेर दि.७ डिसेंबर रोजी अपघात झाला होता. या अपघातात त्यांंची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शासकीय इतमामात दि.८ डिसेंबर रोजी दुपारी २. वा. बोरगाव खुर्द […] The post जवान सेप यांच्यावर शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
७० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कार्ड वितरण
लातूर : प्रतिनिधी प्रभाग क्रमांक ३ मधील महात्मा गांधी कुष्ठधाम येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध शासकीय योजनांचा सर्वसमावेशक कॅम्प आयोजित करण्यात आला. नागरिकांचा सरकारी योजनांमध्ये अधिकाधिक सहभाग वाढविणे आणि पात्र लाभार्थ्यांना योजनांचे लाभ घरपोच मिळवून देणे हा या कॅम्पचा प्रमुख उद्देश होता. कॅम्पमध्ये आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना केवायसी, तसेच […] The post ७० लाभार्थ्यांना प्रत्यक्ष कार्ड वितरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अधिका-यांचे सामूहिक रजा आंदोलन
लातूर : प्रतिनिधी घरकुल व मनरेगा योजनांच्या कामांची जबाबदारी निश्चित करून तातडीने शासनाने शासन निर्णय काढावा, या मागण्यासाठी लातूर जिल्हा परिषद, जिल्हयातील सर्व पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख आदी महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील २३ अधिकारी यांनी गुरूवार दि. ४ व ५ डिसेंबरला सामूहिक रजा आंदोलन केले होते. मागण्या मान्य न झाल्याने सोमवार पासून […] The post अधिका-यांचे सामूहिक रजा आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विलासराव देशमुख फाऊंडेशनतर्फे ५६ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान
लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने महापूर येथे सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणा-या ५६ महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि ट्वेंटीवन अॅग्री लि. च्या संचालिका सौ. […] The post विलासराव देशमुख फाऊंडेशनतर्फे ५६ महिलांना शिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन
पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी आणि कामगार नेते बाबा आढाव यांचे सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजार होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले […] The post ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांसह अचलपूर, धारणी, वरुड या तीन नगरपालिकांमधील आणि धारणी नगरपंचायतीमधील एकूण २११ उमेदवारांची निवडणूक २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, या २११ उमेदवारांपैकी केवळ तीन उमेदवारांनाच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी मिळणार असल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. यामुळे सर्वसाधारणपणे असा समज आहे की, कोणत्याही इच्छुक उमेदवाराला या काळात माघार घेता येईल. अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी अपक्ष उमेदवारांशी संपर्क साधून आपल्या उमेदवारांचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन आपली इच्छाही व्यक्त करत आहेत. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, ही संधी केवळ न्यायालयीन लढाई जिंकलेल्या तीन उमेदवारांसाठीच आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी येथील नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवारासह तेथीलच नगरसेवकपदाच्या एका महिला उमेदवाराचा आणि दर्यापूर येथील काँग्रेसतर्फे अर्ज दाखल करून आता अपक्ष निवडणूक लढणाऱ्या एका उमेदवाराचा समावेश आहे. या तिघांचेही उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान रद्द झाले होते, ज्याला त्यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान देऊन विजय मिळवला. याशिवाय, अचलपूर आणि धारणी येथील प्रत्येकी दोन, तसेच वरुड आणि अंजनगाव सुर्जी येथील प्रत्येकी एका उमेदवारानेही याच कारणास्तव न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या. या सर्व घडामोडींमुळे राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन प्रक्रियेतील सर्वच प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली आणि त्यासाठी नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या नवीन कार्यक्रमानुसार, १० डिसेंबरपर्यंत माघार, ११ डिसेंबरला चिन्ह वाटप आणि २० डिसेंबरला मतदान, तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाईल. मात्र, ही बाब संबंधित प्रभागांमधील सर्व उमेदवारांना लागू होत नाही. ही संधी केवळ न्यायालयीन लढाई जिंकलेल्या त्या तीन उमेदवारांसाठीच आहे. इतर सर्व उमेदवारांची निवडणूक ज्या टप्प्यावर थांबली होती, त्यात कोणताही बदल न होता ती केवळ तेथून पुढे ढकलण्यात आली आहे. अंजनगाव सुर्जी येथे नगराध्यक्षपदासाठी ७ तर नगरसेवकपदासाठी १७३ उमेदवार असल्याने एकूण १८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अचलपूरमध्ये १७, वरुडमध्ये २, दर्यापूरमध्ये ६ आणि धारणी नगरपंचायतीमध्ये ६ उमेदवार आहेत, ज्यामुळे एकूण २११ उमेदवार निवडणुकीत आहेत.
अचलपूर येथील शहीद भगतसिंग प्रभाग क्रमांक १९ ब चे उमेदवार अनिल बारकाजी माहुरे आणि त्यांच्या पत्नी यांची नावे दोन वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये समाविष्ट झाली आहेत. प्रशासकीय चुकीमुळे घडलेल्या या प्रकारामुळे अनिल माहुरे यांना स्वतःचे मत स्वतःला देता येणार नाही. न्यायालयीन प्रकरणामुळे अचलपूरच्या १० ‘अ’ आणि १९ ‘ब’ या दोन प्रभागांतील मतदान २ डिसेंबर रोजी ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. हे मतदान आता २० डिसेंबर रोजी घेतले जाणार आहे. या दोन प्रभागांच्या निवडणुकीसाठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येथे एकूण १७ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या दोन्ही प्रभागांची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने मतदान झालेल्या प्रभागांसह नगराध्यक्षांसाठीची मतमोजणीही थांबविण्यात आली आहे. आता सर्वच मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबर रोजी होणार आहे. प्रभाग क्रमांक १० ‘अ’ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या प्रभागात एकूण ९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. विशाल भारत थोरात यांनी कल्पना पंजाब गवई आणि शंतनु तेलमोरे यांच्या नामनिर्देशनांवर आक्षेप घेतला होता, मात्र न्यायालयाने २३ नोव्हेंबर रोजी हे आक्षेप फेटाळत उमेदवारांच्या बाजूने आदेश दिला. दुसरीकडे, प्रभाग क्रमांक १९ ‘ब’ हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. येथे ८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेनेच्या वतीने अर्थव संजय देंडव यांना ‘ब’ गटासाठी एबी फॉर्म देण्यात आला होता, तर शिवसेनेच्या उमेदवार अनिता कुऱ्हेकर यांनीही ‘ब’ गटातच अर्ज दाखल केला होता. मात्र, एबी फॉर्म ‘अ’ गटाचा लावण्यात आल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती, पण त्यांची मागणीही न्यायालयाने फेटाळली. या दोन्ही प्रभागांतील न्यायालयीन प्रकरणांमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर, पती-पत्नीचे नाव दोन वेगवेगळ्या प्रभागात नोंदल्या गेल्याने प्रभाग क्रमांक १९ ब ची निवडणूक चर्चेत आली आहे. प्रशासकीय चुकीमुळे हा घोळ झाला आहे. परिणामी, उमेदवाराला स्वतःच स्वतःचे मत देता येणार नाही. याउलट, त्यांची पत्नी मात्र याच प्रभागाची मतदार असल्याने त्यांना आपला निर्णय घेता येईल. निवडणूक आयोगाच्या जुन्या कार्यक्रमानुसार अचलपूर पालिकेतील नगराध्यक्ष आणि ३९ नगरसेवकांची निवडणूक प्रक्रिया गेल्या २ डिसेंबर रोजी पूर्ण झाली होती, मात्र प्रभाग क्रमांक १० ‘अ’ आणि १९ ‘ब’ त्यातून वगळण्यात आले होते. या दोन प्रभागांसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, संपूर्ण मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील घरकुल योजनेत कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. करार पद्धत रद्द करून कायमस्वरूपी नोकरी मिळावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून सुरू झालेल्या या आंदोलनात दररोज एकेका जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होणार आहेत. हे आंदोलन महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र देवरे, कार्याध्यक्ष दीपाली जवळे, उपाध्यक्ष प्रवीण मानेदेशमुख आणि सचिव जितेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आंदोलकांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सीएससी ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेडसोबतचा करार रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामविकास विभाग किंवा जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती देणे, वयाच्या ५८ वर्षांपर्यंत नोकरीची हमी देणे, तसेच उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन यांसारख्या योजनांमधील कर्मचाऱ्यांप्रमाणे एचआर नियम लागू करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा, राज्य शासनाच्या सर्व भरती प्रक्रियेत राखीव जागा, वेज कोड-२०१९ नुसार समान काम समान वेतन तत्त्वावर मानधन आणि महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन अदा करणे या मागण्याही आंदोलकांनी केल्या आहेत. घरकुल योजनेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १० ते १५ वर्षे सेवा दिली असून, त्यांनी आपला उमेदीचा काळ या योजनेला दिला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या आंदोलनात खजिनदार ऋषिकेश पालवे, उपकोषाध्यक्ष दयानंद अहिर यांच्यासह वैजनाथ माने, पंकज मुळे, सुगत वाघमारे, कपूर जांभुळकर, नंदकिशोर गमे, चंद्रकांत पाटील, श्रीराम पाटील, अरबाज शेख, निखील धंदरे, रणजित डोंगरे, जगदीश गवई, पल्लवी सुर्वे आदी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहेत. मंगळवारी राज्याचे प्रसिद्धीप्रमुख भूषण उमक यांच्या नेतृत्वात अमरावती येथील चमू या आंदोलनात सहभागी होणार आहे.
पुण्यात विश्वविक्रमासाठी वाचनोत्सव:42 हजार नागरिक एकाच वेळी पुस्तक वाचणार
पुणे पुस्तक महोत्सव २०२५ च्या निमित्ताने मंगळवारी (९ डिसेंबर) सकाळी ११ ते १२ या वेळेत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हा अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. या माध्यमातून एकाच वेळी ४२ हजारांहून अधिक नागरिक पुस्तक वाचून नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, ग्रंथालये, रेल्वे स्थानके, मेट्रो स्टेशन्स, बसस्थानके, रिक्षा थांबे, गृहनिर्माण सोसायट्या, सरकारी-खासगी कार्यालये, कारागृहे आणि धार्मिक स्थळे अशा सर्वच सार्वजनिक ठिकाणी पुणेकर आपापल्या आवडीचे पुस्तक वाचतील. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर एक हजाराहून अधिक विद्यार्थी सामूहिक वाचन करणार असून, हा या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रम असेल. वाचन करतानाचा फोटो https://photoupload.pbf25.in या वेबसाइटवर किंवा दिलेल्या QR कोडद्वारे अपलोड करणे आवश्यक आहे. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या प्रायोजकत्वाखाली हा विश्वविक्रमाचा प्रयत्न होत आहे. मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सर्व पुणेकरांना यात उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, समर्थ युवा फाऊंडेशन यांच्यासह लायन्स क्लब, रोटरी क्लब आणि विविध उद्योग समूह या उपक्रमाला सक्रिय साथ देत आहेत. पुणे महापालिकेच्या सर्व शाळा, प्राथमिक-माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांचाही यात मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी, डॉ. महेश पालकर आणि उपायुक्त वसुंधरा बारवे यांनी सर्व शाळा-महाविद्यालयांना सक्रिय सहभागाच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची ही पूर्वतयारी आहे. वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या या स्तुत्य उपक्रमात पुणेकर मोठ्या उत्साहाने सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
मांजरा साखर कारखान्याकडून ऊस बिलापोटी पहिल्या हप्त्याची रक्कम अदा
लातूर : प्रतिनिधी राज्यांतील सहकार क्षेत्रांत नावलौकिक असलेल्या मांजरा परिवारातील मेरुमणी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ चा चालु गळीत हंगाम मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या जोमाने सुरू असून दि. ३० नोव्हेंबरअखेर कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसासाठी प्रति मॅट्रिक टन २७५० रुपये प्रमाणे उसाच्या […] The post मांजरा साखर कारखान्याकडून ऊस बिलापोटी पहिल्या हप्त्याची रक्कम अदा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील भीष्मपितामह, कष्टकरी, शेतकरी आणि कामगारांचा बुलंद आवाज, तसेच 'एक गाव एक पाणवठा' चळवळीचे प्रणेते डॉ. बाबा आढाव यांचे आज (सोमवारी) रात्री दुःखद निधन झाले. पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा एक लढवय्या आणि पुरोगामी आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बाबा आढाव वार्धक्य आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त होते. प्रकृती अधिक खालावल्याने 10 ते 12 दिवसांपूर्वी त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. ‘एक गाव एक पाणवठा’ची उभारली चळवळ बाबा आढाव यांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित आणि वंचितांसाठी वेचले. 1970 च्या दशकात पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली होती. समाजवादी पक्षाचे सदस्य असलेल्या बाबांनी हमाल, रिक्षाचालक आणि कष्टकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी 'रिक्षा पंचायत' आणि 'हमाल पंचायत'च्या माध्यमातून मोठे काम उभे केले. विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी राबवलेली ‘एक गाव एक पाणवठा’ ही मोहीम महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात अजरामर ठरली आहे. 93 व्या वर्षीही रस्त्यावर उतरणारा लढवय्या वयोमान वाढले तरी बाबांमधील कार्यकर्ता कधीच थकला नाही. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर, बिघडलेल्या राजकीय संस्कृतीविरोधात वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. सध्याचे राजकारण केवळ सत्तेच्या भुकेने बरबटले असून, सकाळी एकीकडे आणि संध्याकाळी दुसरीकडे अशी नेत्यांची अवस्था झाली आहे. आता 140 कोटी जनतेनेच ठरवावे, असे परखड मत त्यांनी मांडले होते. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. त्या पाठोपाठ आता बाबा आढाव यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि समाजवादी चळवळीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ म्हणाले, डॉ. बाबा आढाव यांचे पुणे शहरासाठी अत्यंत मोलाचे योगदान होते. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि रिक्षाचालक, हमाल, मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा पुण्यावर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव राहिला आहे. असंघटित मजुरी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा दिला. हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम कामगार, बाजार समित्यांमधील कामगार यांना संघटित करून या श्रमिकांच्या हक्कांसाठी बाबांनी लढा दिला. ‘माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ’ ही प्रणाली उभी राहण्यामागे त्यांचे निर्णायक नेतृत्व होते. पुण्यातील असंघटित मजुरांना ओळखपत्र, वेतन संरचना, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या निधनाने पुणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. मी नगरसेवक, महापौर असताना विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, मार्गदर्शनही मिळाले होते. पुण्याचा खासदार या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मंत्री माधुरी मिसाळ यांचा श्रद्धांजली संदेश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, श्रमिकांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढा देणारे बाबा आढाव यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. साधेपणा, तत्त्वनिष्ठा आणि न्यायासाठीच्या अविचल संघर्षामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या कार्यातून उभारलेली सहकार आणि श्रमिक चळवळ ही आपल्या समाजाची अमूल्य संपदा आहे. त्यांच्या निधनाने श्रमिक चळवळीचे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला- अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून सोयाबीन थेट लातुरात
लातूर : प्रतिनिधी अतिवृष्टीचा जबरदस्त फटका बसलेल्या शेतकरी आता कसाबसास सावरत असतानाच केंद्र सरकारने शेतक-यांपुढे आणखी एक संकट उभे केले आहे. चक्क दक्षिण आफ्रिकेतून मराठवाड्यातील लातूर, धाराशिव जिल्ह्यांत सोयोबीन आयात केले जाणार असून लातूरच्या बाजारपेठेत पहिला आयात सौदाही पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता शेतक-यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळणे अशक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सोयाबीनचा दर वाढवून […] The post दक्षिण आफ्रिकेतून सोयाबीन थेट लातुरात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
'धर्मवीर 2' या चित्रपटावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चा आणि वादांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे विधान केले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे कार्य एवढे महान आहे की ते एक-दोन चित्रपटांत सामावू शकत नाही. मात्र, भविष्यात जर 'धर्मवीर 3' आला, तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल. कारण त्यानंतर पुढे नेमके काय घडले, हे फक्त मलाच माहिती आहे, असे वक्तव्य शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी चित्रपट, सरकारची कामगिरी आणि विरोधकांची अवस्था यावर भाष्य केले. 'धर्मवीर 2' चित्रपटामध्ये आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे दाखवण्यात आले होते. यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत राजकीय हेतूने इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, दिघे साहेबांचे काम खूप मोठे आहे. तिसऱ्या भागाची कथा मी लिहीन असे म्हणत त्यांनी एकप्रकारे आनंद दिघे यांच्या पश्चात शिवसेनेत घडलेल्या घडामोडींवर आणि बंडावर प्रकाश टाकण्याचे संकेत दिले आहेत. सरकारला 100 पैकी 100 गुण आपल्या साडेतीन वर्षांच्या सत्ताकाळाबद्दल बोलताना एकनाथ शिंदे यांनी सरकारला 100 टक्के गुण दिले. ते म्हणाले, आम्ही तिघेही तीन शिफ्टमध्ये काम करणारे लोक आहोत. आम्हाला जो विजय मिळाला आहे, ती जनतेने आमच्या कामाला दिलेली पोचपावती आहे. नगरपालिका निवडणुकांमध्ये विरोधक कुठेच दिसले नाहीत, यावरून त्यांना स्वतःच्या पराभवाचा 'कॉन्फिडन्स' असल्याचे दिसून येते. विरोधकांचा समाचार घेताना शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. विरोधकांना मैदानात उतरून लढता येत नसेल, तर किमान फेसबुक लाईव्हवरून तरी सभा घ्यायच्या होत्या, असा खोचक टोला त्यांनी लगावला. काही ठिकाणी स्थानिक समीकरणामुळे मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्या तरी एनडीए मजबूत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. कणकवलीसारख्या काही ठिकाणी युतीमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी होत असतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत असून त्यांचे हात बळकट करणे हेच आमचे ध्येय आहे, असेही त्यांनी शेवटी नमूद केले.
मुंडेंच्या पापात सहभागी होऊ नका
पुणे : मराठे सोपे नाहीत, जीवाला जीव देणारे मराठे आहेत. धनंजय मुंडे यांच्या पापात अजित पवार आणि फडणवीस यांनी सहभागी होऊ नये. फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात मराठे गेले, तर २०२९ हातातून जाऊ शकते. काँग्रेस पक्ष समुद्रासारखा होता, त्यांची सत्ता गेली आणि भाजपाची सत्ता आली. त्यामुळे फडवणीस यांनी गर्वात राहायचे नाही. ते असे करत […] The post मुंडेंच्या पापात सहभागी होऊ नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दक्षिण आफ्रिकेतून १ लाख टन सोयाबीनची आयात
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आयात करण्यात येणार असल्याची माहिती आहे. १ लाख टन सोयाबीन मराठवाड्यात आयात करण्याचा सौदा पूर्ण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा निर्णय राज्यातील शेतक-यांची चिंता वाढवणारा आहे. कारण सोयाबीन आयात केल्याने राज्यातील सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता […] The post दक्षिण आफ्रिकेतून १ लाख टन सोयाबीनची आयात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान मोदींनी लोकसभेत वंदे मातरम दीडशे वर्ष झाल्याच्या निमित्ताने चर्चा सुरू केली. या चर्चेत सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही. या सभागृहात आपल्या सर्वांसाठी वंदे मातरम देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा देणारा आणि प्रेरणा देणारा आणि त्याग आणि तपश्चर्येचा मार्ग दाखवणारा मंत्र असून, वंदे मातरमचे स्मरण करणे हे मोठे भाग्य आहे. वंदे […] The post वंदे मातरमवरून खडाजंगी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्रातील युनेस्को मानांकन असलेल्या किल्ल्यांवर आणि जागतिक वारसास्थळांवर मूलभूत सुविधांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधले. स्वच्छता, पायाभूत सुविधा, माहितीफलक आणि डिजिटल गाईड यांसारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने, त्यांनी या ठिकाणी तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. यासाठी विशेष 'हेरिटेज इन्फ्रा पॅकेज' उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी सोमवारी राज्यसभेत केली. प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या वारशाचे प्रतीक असलेले महाराष्ट्राचे ११ किल्ले युनेस्कोच्या ४७व्या जागतिक वारसा समितीत समाविष्ट झाले आहेत. यामध्ये शिवनेरी, राजगड, रायगड यांसारख्या इतिहासप्रसिद्ध दुर्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अजिंठा-वेरूळ, घारापुरी (एलिफंटा लेणी) आणि पुण्यातील शनिवारवाडा यांसारख्या ठिकाणांनाही यापूर्वीच जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. या वारसास्थळांवर इतिहास जाणून घेण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र, त्यांना स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, डिजिटल माहितीचा अभाव, गाईड वा मार्गदर्शकाची अनुपलब्धता, कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण आणि आगीमुळे पर्यावरणाची हानी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच, दिव्यांगांसाठी सुविधांचा अभाव असल्यानेही पर्यटकांना अडचणी येतात, असे त्यांनी नमूद केले. राजगड किल्ल्यावरील त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, किल्ल्यावरील स्वच्छतागृह कचऱ्याने भरलेले होते, प्लास्टिकच्या बाटल्या आणि रॅपर्सचे ढीग होते. काही ठिकाणी हा कचरा जाळला जात असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचते आणि वन्यजीवांनाही धोका निर्माण होतो. महाराणी सईबाईंची समाधी पूर्णपणे दुर्लक्षित असून, संजीवनी माचीसारख्या अद्वितीय वास्तु-संकल्पनांना पुरेसे माहितीफलक नसल्याने पर्यटकांना त्याचे महत्त्व समजत नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले. रायगड हा महाराष्ट्राचा भावसंपन्न आणि ऐतिहासिक केंद्रबिंदू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा विस्तार आणि भव्यतेसाठीही विशेष पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील किल्ले आणि गड-किल्ल्यांचा वारसा हा केवळ राज्याचा नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि जागतिक प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे तेथील विकासासाठी विशेष पॅकेज आणि 'हेरिटेज मिशन'ची मागणी त्यांनी यावेळी पुन्हा केली.
बीड : प्रतिनिधी बीड जिल्हा परिषदेतील सुमारे ४०० कर्मचा-यांच्या दिव्यांगाची आता थेट रुग्णालयांमध्ये तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे बनावट दिव्यांग किंवा कमी दिव्यांग असताना अधिक प्रमाणाचे प्रमाणपत्र मिळविलेल्या कर्मचा-यांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेतील १८ कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्ताचा पदभार घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या […] The post ४०० दिव्यांगांवर टांगती तलवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आज 'वंदे मातरम'चे गोडवे गाणाऱ्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षे आपल्या कार्यालयावर कधीही तिरंगा फडकवला नाही किंवा राष्ट्रगीत गायले नाही. ज्यांना इतिहासाचा विसर पडला आहे, त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात 'वंदे मातरम'चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्यावा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. संसदेत 'वंदे मातरम'वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला. स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेचा समाचार घेताना अरविंद सावंत यांनी देशातील संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारत असले, तरी आज देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग यांसारखी कोणतीही संस्था खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर' राहिलेली नाही. त्यांच्यात 'आत्मभान' उरलेले नाही. संविधानाच्या मूळ ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ले होत आहेत. त्यामुळे 'वंदे मातरम'चा खरा जयघोष करण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी देशाला आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल. सीमाभागातील अन्यायाकडे वेधले लक्ष महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत सावंत यांनी सीमावासियांच्या वेदना मांडल्या. एकीकडे मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तर दुसरीकडे बेळगाव-कारवार-निपाणी भागात मागील 60 वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांना अटक केली जात आहे. हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केवळ कार्यालयांची नावे बदलून विकास होत नसतो, 'सेवा मंदिरा'चे दरवाजे जनतेसाठी बंद झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. खऱ्या 'वंदे मातरम'साठी बलिदान 'वंदे मातरम'चा खरा इतिहास सांगताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील बलिदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, 1942 च्या आंदोलनात नंदुरबार येथील अवघ्या 14 वर्षांच्या शिरीष कुमारने हातात तिरंगा घेऊन 'वंदे मातरम'चा नारा दिला आणि तो इंग्रजांच्या गोळीला हसत हसत सामोरा गेला. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सर्व नेत्यांना अटक झाली असताना, अरुणा असफ अली यांनी धाडसाने तिरंगा फडकवत 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय'चा नारा दिला होता. हा देशाचा खरा इतिहास आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.
आम्ही आता सहन करणार नाही. जर मुंबईत कुठल्याही मारवाड्याला धक्का लागला किंवा मारहाण झाली, तर आता 'जशास तसे' उत्तर दिले जाईल. मोदींनी सांगितले होते 'बटोगे तो कटोगे', मी सांगतोय 'तुम बटोगे तो पिटोगे', अशा शब्दांत जैन मुनी निलेशचंद्र यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. तसेच, मुंबईतील प्रत्येक वॉर्डात गोरक्षकांच्या धर्तीवर आता 'कबूतर रक्षक' नेमणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी केली आहे. भाषावाद, कबूतर खानी आणि मारवाडी समाजावरील हल्ले या मुद्द्यांवरून जैन मुनी निलेशचंद्र यांनी सरकार आणि राजकीय नेत्यांवर तोफ डागली आहे. कबुतरांच्या मुद्द्यावरून बोलताना मुनी निलेशचंद्र म्हणाले की, आता प्रत्येक बिल्डिंग आणि टॉवरमध्ये जाऊन आम्ही पशू-पक्ष्यांसाठी जनजागृती करणार आहोत. ज्याप्रमाणे गोरक्षक आहेत, त्याच धर्तीवर आम्ही आता प्रत्येक वॉर्डात 'कबूतर रक्षक' तयार करत आहोत. राज्य आणि केंद्र सरकारने कबुतरांना दोन तास खाद्य टाकण्याची परवानगी दिली आहे, मग दादरच्या कबूतरखान्याला ही परवानगी का नाही? जोपर्यंत दादरमध्ये दोन तास खाद्य टाकण्याची मुभा मिळत नाही, तोपर्यंत आमची ही जनजागृती मोहीम सुरूच राहील. भाषावाद फक्त राज ठाकरेच संपवू शकतात राज्यातील भाषावादावर भाष्य करताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केले. भाषावादामुळे समाजात दरी निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर जर महाराष्ट्रावर कुणी मनापासून प्रेम करत असेल, तर ते राज ठाकरे आहेत. हा भाषावाद केवळ तेच संपवू शकतात. त्यांनी आमच्या जैन समाजाशी संवाद साधावा, ते सांगतील तसे आम्ही वागायला तयार आहोत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही त्यांनी राज ठाकरे आणि यशवंत जाधव यांच्या भूमिकांचे समर्थन केले. जय महाराष्ट्र आणि जय जिनेंद्र मराठी आणि मारवाडी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न व्होट बँकेसाठी केला जात असल्याचा आरोप मुनींनी केला. ते म्हणाले, जेवढा सन्मान तुम्ही मराठी भाषेचा करता, त्यापेक्षा जास्त आम्ही करतो. राजस्थान आमची जन्मभूमी असली, तरी महाराष्ट्र आमची कर्मभूमी आणि 'मोठी आई' आहे. यापुढे प्रत्येक फ्लॅटवर 'जय महाराष्ट्र, जय जिनेंद्र' असा नारा असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांचे फोटो एकत्र असतील. मारवाडी समाजाला एकतेचे आवाहन बाहेरून आलेल्या प्रवाशांची आणि आमची तुलना करू नका, असे सांगतानाच त्यांनी मारवाडी समाजाला संघटित राहण्याचे आवाहन केले. कुणी मारवाडीला मारहाण करत असेल आणि कुणी फोटो काढू नका असे सांगत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. आता आम्ही संघटित होऊन जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र यांनी दिला आहे.
जगभरातील टेक कंपन्यांमध्ये लेऑफची लाट
नवी दिल्ली : २०२५ हे वर्ष जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचा-यांसाठी अत्यंत आव्हानात्मक वर्ष राहिले आहे. जागतिक बाजारपेठेवर ‘रिस्ट्रक्चरिंग रिसेशन’चे व्रण खोलवर उमटले आहेत. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत जगभरातील कंपन्यांनी ११.७ लाखांहून अधिक कर्मचा-यांच्या कपातीची घोषणा केली आहे. २०२० मधील महामारीच्या काळातील २२ लाख कपातीनंतरचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. २०२४ च्या तुलनेत त्यामध्ये ५४ टक्क्यांनी […] The post जगभरातील टेक कंपन्यांमध्ये लेऑफची लाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय वस्तू ४० ऐवजी २४ दिवसांत रशियात पोहोचतील
नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये चेन्नई-व्लादिवोस्तोक ईस्टर्न कॉरिडॉरबाबत चर्चा झाली. हा कॉरिडॉर फक्त १०,३७० किमी लांब असेल, ज्यामुळे भारतीय जहाजे सरासरी २४ दिवसांत रशियाला पोहोचू शकतील. सध्या भारताकडून रशियाच्या सेंट पीटर्सबर्गपर्यंत माल पाठवण्यासाठी जहाजांना सुमारे १६,०६० किमीचा लांब प्रवास करावा लागतो, ज्याला सुमारे ४० दिवस लागतात. म्हणजेच हा […] The post भारतीय वस्तू ४० ऐवजी २४ दिवसांत रशियात पोहोचतील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला
बँकॉक : थायलंड आणि कंबोडिया यांच्यात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. सोमवारी सकाळी थायलंडने कंबोडियाच्या ठिकाणांवर हवाई हल्ला केला. थायलंडचे म्हणणे आहे की त्यांनी केवळ त्या लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ला केला आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे, जेव्हा काही महिन्यांपूर्वीच दोन्ही देशांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत शांतता करार झाला होता. त्यावेळी पाच […] The post थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कर्नाटकात मराठी नेत्यांची धरपकड
बेळगाव : कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तणावाचे वातावरण झाल्याने […] The post कर्नाटकात मराठी नेत्यांची धरपकड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इंडिगो प्रकरणात तातडीने सुनावणी नाही
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमानसेवा कंपनी असलेल्या इंडिगो सध्या प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीमुळे मोठ्या अडचणीत सापडली आहे. देशभरातील विमानतळांवर इंडिगोच्या अनेक विमानांची उड्डाणे पूर्वसूचना न देता रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. या गैरसोयीबद्दल हस्तक्षेप करण्याची मागणी करणा-या एका याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. भारताचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत […] The post इंडिगो प्रकरणात तातडीने सुनावणी नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुख्यात २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
गोंदिया : सरकारच्या नक्षलविरोधी मोहिमेला आज मोठे यश मिळाले आहे. काल आणि आज, अशा दोन दिवसांत छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील २२ कुख्यात नक्षलवाद्यांनी आत्मसर्पण केले आहे. यामध्ये नक्षल कमांडर आणि सेंट्रल कमिटी मेंबर (सीसीएम) रामधेर मज्जी याचाही समावेश आहे. यासह महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड (एमएमसी झोन) नक्षलमुक्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामधेर मज्जी हा […] The post कुख्यात २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केरळमध्ये ‘ब्रेन इटिंग अमीबा’चे थैमान
कोच्ची : केरळ आणि आता पश्चिम बंगालमध्ये एका अत्यंत धोकादायक आजाराने चिंता निर्माण केली आहे. हा आजार प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस (पीएएम) म्हणून ओळखला जातो, ज्याला सामान्य भाषेत ‘ब्रेन ईटिंग अमीबा’ म्हटले जाते. थेट मानवी मेंदूवर हल्ला करतो आणि उपचारानंतरही जगण्याची शक्यता खूप कमी असते. डॉक्टरांच्या मते, हा परजीवी बहुतेकदा उबदार तलाव, नद्या आणि तलावांमध्ये आढळतो. […] The post केरळमध्ये ‘ब्रेन इटिंग अमीबा’चे थैमान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिंदे गटातील २२ आमदार भाजपमध्ये जाणार
नागपूर : प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज सत्तेतील एका पक्षात दोन गट पडले असून, त्यातील २२ आमदारांचा एक गट भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला. यामुळे ब्रेकिंग न्युज सुरू झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही शक्यता नाही, शिंदे शिवसेना ही आमचा मित्र पक्ष आहे. त्यांचे आमदार आमच्याकडे येण्याचा प्रश्नच उद्भवत […] The post शिंदे गटातील २२ आमदार भाजपमध्ये जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत असून आमची त्याबाबतची भूमिका कायम आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. त्यामुळे या विषयावर आमचा अजेंडा आजही कायम आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या विदर्भाच्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिले. नागपुरात आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्याचवेळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची जोरदार मागणी करून सरकारला धारेवर धरले होते. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विदर्भाच्या मागणीकडे पुन्हा लक्ष वेधले गेल्याने अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास अशक्य- विजय वडेट्टीवार वेगळ्या विदर्भासंदर्भात बोलताना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, विदर्भाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर 'वेगळा विदर्भ' हाच एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणे कठीण आहे, अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवारांनी मांडली आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील जनता आणि विविध संघटना वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. मात्र, अनेकदा या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जातो. आता खुद्द महसूलमंत्र्यांनीच 'आम्ही काम करत आहोत' असे सांगितल्याने विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली. पुणे महापालिका निवडणूक लवकरच होणार असून, विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत प्रचाराची कामे सुरू केली आहेत. पुण्यात भाजपचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक असल्याने, पक्षाकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून २ हजार अर्जांची मागणी करण्यात आली, ज्यामुळे भाजपला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजप समोर देखील उमेदवारी देताना आता अडचण निर्माण होणार आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सोमवारी कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत महायुतीतून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात महत्त्वाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. पक्षाने इच्छुक उमेदवारांना निर्धारित सर्व माहिती अचूकपणे भरून नियोजित वेळेत अर्ज जमा करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीला शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, बाबूराव धाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, शहर महिला अध्यक्षा हिमाली कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देशातील सर्वात मोठे 'किसान' कृषी प्रदर्शन पुण्यात:10 ते 14 डिसेंबर दरम्यान पीआयईसीसी मोशी येथे आयोजन
देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान २०२५’ येत्या १० ते १४ डिसेंबर दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र (पीआयईसीसी), मोशी येथे भरत आहे. किसान मालिकेतील हे ३३ वे प्रदर्शन ३० एकरांवर पसरले असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले राहील. या प्रदर्शनाचे उद्घाटन १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. ते शेतीतील नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, बी-बियाणे, खते, संरक्षित शेती, पशुधन, जैविक खत आणि सौरऊर्जा आदींचे प्रदर्शन करतील. आयोजकांनी दिलेल्या अंदाजानुसार, देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी व उद्योजक या प्रदर्शनाला भेट देतील. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग तसेच अनेक मान्यवर संस्थांचा या प्रदर्शनाला सहभाग लाभला आहे. यंदा ‘मातीमोल’ (मातीच्या आरोग्यावर जनजागृती), ‘मनाची मशागत’ (शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आयपीएच सोबत विशेष उपक्रम) आणि ‘किसान जागर’ असे तीन विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रदर्शनाची पूर्वनोंदणी मोबाईलद्वारे करता येते. आतापर्यंत ३० हजार हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ही संख्या १ लाख ओलांडण्याची शक्यता आहे. ‘किसान’ मोबाईल ॲपवर सर्व प्रदर्शकांची उत्पादने व सेवांची माहिती उपलब्ध असून, या माध्यमातून देशभरातील १० लाख शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल पद्धतीने पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हेच ‘किसान’ प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
सत्ताधाऱ्यांना शर्म वाटली पाहिजे की ते अधिवेशन समोर रेटत आहेत. अधिवेशन कमी काळाचे आहे आणि विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीची थट्टा असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 10 टक्के निकष हा कुठलाही संकेत नाही किंवा संवैधानिक स्वरूपात त्याचा उल्लेख नाही. वरच्या सभागृहात कॉंग्रेसचे 10 टक्के सदस्य आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रस्ताव सादर केलेला आहे, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, लोकशाहीची पायमल्ली न करता संविधानाचे पुरोगामित्व जोपासले जावे अशी अपेक्षा आहे. विरोधक आवश्यक आहेत. तुकाराम महाजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे तो सरकारने जोपासावा. अर्धा वेळ सत्ताधारी आणि अर्धा वेळ विरोधकांनी चर्चा करावी तेवढा वेळ त्यांना द्यावा. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्याचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा. तसेच जर असे ते करत नसतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असा अर्थ असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री पदावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, उपमुख्यमंत्री पद हे निश्चितच असंवैधनिक आहे. जे संवैधानिक आहे विरोधी पक्षनेते पद ते आपण देत नाही. या संविधानाला सभ्यतेला आणि महाराष्ट्र धर्माला दाखवलेल्या वाकोळ्या आहेत. खालच्या सभागृहात शिवसेनेचे जास्त सदस्य आहेत. शिवसेनेने मागील विधानसभेत त्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. प्रस्ताव नसेल तर पुन्हा पाठवता येईल, खोळंबा करण्याची आवश्यकता नाही. स्वामिनाथन आयोग शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांसाठीच्या स्वामिनाथन आयोगावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, स्वामिनाथन आयोग विदर्भातील शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा होता. नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे, हे निर्णय शासनाने घेतले पाहिजे अशी अपेक्षा या अधिवेशनात असल्याचे सपकाळ म्हणाले.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र देण्यात आले असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मात्र, सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन, असेही भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे. भास्कर जाधव म्हणाले, दहा टक्के आमदार असलेल्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिले जाते. जेव्हा पक्षाच्या गटनेतेपदी माझी निवड झाली तेव्हा हे शक्य आहे असे मला वाटले. मी सचिवांना पत्र लिहले. विरोधी पक्ष नेतेपद निवडीसंदर्भात कायद्यात तरतूद काय याची माहिती लिखित द्यावी अशी मागणी केली. त्यावेळी अशी 10 टक्के सदस्यसंख्येची अट नाही, अशी माहिती सचिवालयाने दिली. तसेच या सरकारमधील भ्रष्टाचाराची जी प्रकरणे बाहेर येत आहेत ते हिमनगाचे एक टॉक आहे. हे लोक एकमेकांचे पाय ओढत आहेत. विरोधी पक्षनेत्याची घोषणा झाली तर सरकारमधील लोक विरोधी नेत्याला माहिती देऊन एकमेकांना अडचणीत आणतील अशी त्यांना भीती आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जर ठरवले तर विरोधी पक्षनेतेपद देणे शक्य पुढे बोलताना भास्कर जाधव म्हणाले, आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांची भेट घेतली. उद्धव साहेब विधानसभा अध्यक्षांना भेटले, त्यांनीही मागणी केली होती. दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. मंत्र्यांना पीएस कोण द्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जर ठरवले तर विरोधी पक्षनेतेपद देणे शक्य आहे. मात्र ते एकमेकांवर टोलवत आहेत, असे जाधव म्हणाले. सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यात कुरबुरी भास्कर जाधव म्हणाले, एक वर्ष सत्ता स्थापनेला पूर्ण झाली. वेगवेगळ्या अभ्यासकांनी जी मतं दिली त्यात कुणी त्यांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क दिले नाहीत. मी या सरकारला साडे तीन मार्क देतो. हे सरकार अनपेक्षितपणे तयार झालेले सरकार आहे. 45 खासदार आम्ही निवडणून आणू अशा प्रकारच्या वल्गना करत होते, त्यांना 16 च्या पुढेही जाता आले नाही. विधानसभेत हेच होणार असे वाटत होते. शिंदेंच्या मार्फत वारेमाप आश्वासन दिली गेली. त्यांना मुख्यमंत्री करू असे खासगीत आश्वासन दिले अशी माझी माहिती आहे. पण तसे झाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसांपासून त्यांच्यात कुरबुरी सुरू आहेत. सत्ता आल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर क्लेम करायला तोंड राहिलेले नाही. जर शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले नसते तर भाजप सत्तेत आले नसते. सत्ता आल्यानंतर शिंदे हे उपमुख्यमंत्री पद घेण्यास तयार नव्हते. पण मुख्यमंत्रीपद भाजपने काढून घेतल्यानंतर ते कुठल्या तोंडाने बोलणार? असेही भास्कर जाधव म्हणाले. मी जे सत्य असेल तेच बोलतो, खोटे बोलत नाही भास्कर जाधव नाराज असल्याच्या बातम्या नेहमीच येत असतात. यावर बोलताना ते म्हणाले, मी माझ्या राजकीय जीवनात कुठल्याही कारणासाठी नाराजी व्यक्त केलेली नाही. जे सत्य असेल तेच बोलतो, खोटे बोलत नाही. मी एकदा शब्द दिला की मी तो पूर्ण करण्यासाठी काहीही किंमत मोजायला तयार असतो. माझ्या 43 वर्षाच्या राजकीय प्रवासात मी कधी कुणाकडे कुठलीही गोष्ट मागितली नाही. जर चुकीचे काही असेल तर मी त्या विरोधात बोलताना कुणताही मुलाहिजा राखत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मंत्रिमंडळात माझा समावेश झाला नाही. तेव्हा मी भावना बोलून दाखवली होती. ठाकरेंची शिवसेना संपणार नाही कोकणातील स्थितीचे वास्तव स्वीकारले पाहिजे, त्या ठिकाणी शिवसेनेत दोन भाग झाले. भाजप सोबत होते तेव्हा त्यांनी पण शिवसेनेला पोखरले. विरोधकांचे रोज पक्ष प्रवेश होत आहेत तरी ठाकरेंची शिवसेना संपणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने निकाल लागेल, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
संविधानिक पद रिक्त ठेऊन कामकाज करणार का?
नागपूर : प्रतिनिधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत. जाणुनबुजून सरकार विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाहीत तो अधिकार विधिमंडळाचे अध्यक्ष, सभापतींचा आहे असे सत्ताधा-यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे […] The post संविधानिक पद रिक्त ठेऊन कामकाज करणार का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डुकरांना‘आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू’
राहाता : प्रतिनिधी शहराशेजारील साकुरी गावातील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू आढळला आहे. गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू आढळून आल्याने जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले आहे. साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. गावातील काही जागरूक नागरिकांनी यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही […] The post डुकरांना‘आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात घरकुल योजना व हमी योजनेमध्ये जबाबदारी निश्चित करणारा अध्यादेश जारी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांनी सोमवारपासून ता. ८ सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्व विभागातील प्रस्ताव स्वाक्षरी अभावी धुळखात पडले आहेत. राज्यात घरकुल व हमी योजनेमध्ये जबाबदारी निश्चित करणारा अध्यादेश स्पष्ट झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घरकुल योजनेत ग्रामसभेने निवडलेला लाभार्थी नंतर अपात्र ठरणे, लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम न करता तसेच जुने घर दाखवून लाभ मिळविणे, घरकुल योजनेत प्रत्येक तालुक्यात मंजूर घरकुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून प्रत्येक काम गटविकास अधिकाऱ्यांना पाहणे शक्य नाही त्यामुळे केवळ डीजीटल स्वाक्षरीच्या आधारावर गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. त्यामुळे या सर्व बाबींसाठी गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरू नये. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये देखील अशीच परिस्थिती असून त्यामुळे या दोन्ही योजनेमध्ये जबाबदारी निश्चित करणारा अध्यादेश जारी करणे आवश्यक आहे. या मागणी संदर्भात यापुर्वी शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये मागणी मान्य न झाल्यास सोमवारपासून (ता.८) सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज जिल्हा परिदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, संजय कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, अमितकुमार मुंडे, सुरेश कांबळे, गोपल कल्हारे, गणेश बोथीकर, सुनील अंभुरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत विविध विभागांमध्ये कामे सुरु असली तरी अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी अभावी प्रस्ताव धुळखात पडले आहेत.
बोगस दिव्यांग ४०० कर्मचा-यांना प्रशासनाचा दणका
मुंबई : प्रतिनिधी तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्ताचा पदभार घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचा-यांच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी ४०० कर्मचा-यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. बीड जिल्हा परिषदेतील सुमारे ४०० कर्मचा-यांच्या दिव्यांगात्वाची आता थेट रुग्णालयांमध्ये तपासणी केली जाणार आहे. […] The post बोगस दिव्यांग ४०० कर्मचा-यांना प्रशासनाचा दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध:नशा विरोधी अभियानाची कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
वादग्रस्त ठरलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यावर्षी गोवा आणि अन्य ठिकाणांवरून हद्दपार झाल्यानंतर १९ ते २१ डिसेंबर दरम्यान मुंबईतील शिवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक अस्मितेला धक्का पोहोचवणारा तसेच व्यसनाधीनता वाढवणारा हा कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी नशा विरोधी संघर्ष अभियानाचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राचे मार्गदर्शक हभप भानुदास वैराट महाराज, अधिवक्ता मुग्धा बिवलकर, हिंदुत्वनिष्ठ ऋतुजा माने आणि हिंदु जनजागृती समितीच्या युवा संघटक प्राची शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. चंद्रकांत वारघडे म्हणाले , सनबर्न फेस्टिव्हलमुळे युवा पिढीच्या आरोग्य व सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तातडीने तक्रारही दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीच्या उत्सवांमध्ये अमली पदार्थांचे सेवन व वितरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. याशिवाय, वर्ष २००९, २०१४ आणि २०२० मध्ये फेस्टिव्हल आयोजकांनी गोवा सरकारचा तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांचा कर बुडवला होता. त्या प्रकरणात सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘सनबर्न फेस्टिव्हल’ची १ कोटी १० लाख रुपये सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्याचा आदेश दिल्याचे संघटनेने सांगितले. या पार्श्वभूमीवर, करचुकवेगिरी करणाऱ्या आणि तरुण पिढीला नशेकडे ढकलणाऱ्या अशा कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी का दिली? असा सवालदेखील संघटनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा कार्यक्रम तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
विदर्भाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर 'वेगळा विदर्भ' हाच एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणे कठीण आहे, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, ओबीसी समाजावरील अन्याय आणि निधी वाटपातील तफावतीवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सामाजिक समीकरणांचा आधार वेगळ्या विदर्भाची मागणी करताना विजय वडेट्टीवार यांनी सामाजिक समीकरणांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, या बहुजन समाजाला सत्तेत पुरेशी संधी मिळालेली नाही. सत्ताधाऱ्यांमध्ये जोपर्यंत या घटकांचा थेट सहभाग वाढत नाही, तोपर्यंत या भागाचा विकास खुंटलेलाच राहील. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ होणे ही काळाची गरज असून ती आमची ठाम मागणी आहे. राज्यात सुव्यवस्था नाही, तर कुव्यवस्था राज्य सरकारच्या कामगिरीचा समाचार घेताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारला पासिंग मार्क्स मिळणेही कठीण असल्याचे सांगितले. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था नसून केवळ 'कुव्यवस्था' असल्याचे चित्र आहे, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे लक्ष कदाचित दिल्लीकडे लागले असावे, त्यामुळेच त्यांचे महाराष्ट्राकडे आणि विशेषतः विदर्भाकडे दुर्लक्ष होत आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही येथील तरुणांना आजही नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा हैदराबादची वाट धरावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. तसेच राज्यातील महामंडळांना देण्यात येणाऱ्या निधीवरून विजय वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. 'सारथी', 'बार्टी', 'तार्टी' आणि 'महाज्योती' या संस्थांना मिळणाऱ्या निधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ओबीसी समाजाला कमी निधी विजय वडेट्टीवार यांनी आकडेवारी मांडताना सांगितले की, राज्यात 40 ते 45 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाला (महाज्योती) 300 कोटी मिळतात. दुसरीकडे, 16 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजासाठी (सारथी) तेवढेच 300 कोटी आणि 13 टक्के व 9 टक्के प्रमाण असलेल्या अनुसूचित जाती-जमातींसाठीही 300 कोटींची तरतूद केली जाते. लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला मिळणारा हा निधी कमी असून हा सरळसरळ अन्याय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळावर वर्चस्व नाही मुख्यमंत्री जरी विदर्भाचे असले तरी मंत्रिमंडळात त्यांचे प्राबल्य नसल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. मंत्रिमंडळावर मराठा समाजाचा प्रभाव अधिक असून, विदर्भाच्या अनुशेषासाठी मिळणारा निधी आणि 'महामुंबई' प्रोजेक्टसाठी दिला जाणारा निधी यात मोठी तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज सकारात्मक चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच प्रतिनिधीमंडळासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी जमीनदर व मोबदला निश्चिती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पबाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये जमिनीचा दर व मोबदला, घरांसाठी जागा, मोबदल्यावर आयकरातून सूट, पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत, प्रकल्पग्रस्त व भूमिहीन प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र, वाढीव एफएसआय (FSI) आणि पीएआरडीए (PARDA) मार्फत भूखंड विकासाचे नियोजन या मागण्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, परिसरातील पायाभूत सुविधा आराखडा, विमानतळ परिसरातील विकसित भागांना महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव, शेती पिकांचे मूल्यांकन, भूमिपुत्रांना विमानतळात कायमस्वरूपी नोकरीची संधी, भूखंडात आरक्षण, हक्काची घरे, व्यवसाय व रोजगारासाठी कर्ज व्याजदरात सवलत आणि शैक्षणिक शुल्कात सवलत यांसारख्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांतील सुमारे तीन हजार एकर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. या प्रक्रियेस शेतकऱ्यांनी वेळोवेळी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी नमूद केले. संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने राबवली जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, सर्व प्रकल्पग्रस्त नागरिकांना भूसंपादन आणि पीक सर्वेक्षणाबाबतची माहिती नियमितपणे दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी व ग्रामस्थांना कौशल्यविषयक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. एकही प्रकल्पबाधित नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेईल, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कांदा पिकावर औषध फवारणी करताना एक हृदयद्रावक घटना घडली. ट्रॅक्टरचलित ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून २७ वर्षीय माधुरी सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे दोन चिमुकल्या मुलींनी आई गमावली. नाशिक जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येवला तालुक्यातील कातरणीजवळ रविवारी दुपारच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. […] The post पंख्यात केस अडकून महिला ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाने त्यांचा हा दावा फेटाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणी ठाकरे गटाला खडेबोल सुनावलेत. उद्या कुणी आदित्य ठाकरेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे म्हटले तर काय होईल? शिंदेसेनेचे आमदार आमचेच आहेत, काहीही म्हटल्याने काही होत नाही, असे ते म्हणालेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होणार असल्याची चर्चा सुरू झाली. आदित्य यांनी पत्रकारांशी बोलताना ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे 20 आमदारच कुठेतरी (भाजप) जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. उद्या कुणी असेही म्हणेल की, आदित्य ठाकरेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागलेत. असे उगीच काहीतरी म्हटल्याने काहीही होत नाही. आम्हाला शिंदेसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? ते आमचेच आहेत. शिंदेसेना आमचा मित्रपक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे मित्रपक्षांना पक्षात घेण्याचे कारण नाही. आम्ही तसे राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. निश्चितपणे भविष्यात आमची महायुती अजून मजबूत होताना दिसेल. मुख्यमंत्र्यांनी यावेळी वंदे मातरममध्ये काँग्रेसने काटछाट केल्याचाही दावा केला. वंदे मातरमवर कधी बंदी लागली नाही. वंदे मातरवर जे काही आघात व कुठाराघात झाले त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव पारित करून वंदे मातरममध्ये काटछाट केली. अर्धेच वंदे मातरम म्हटले जाईल असे सांगितले. त्याच काँग्रेसच्या गळ्यात गळा घालून आदित्य ठाकरे रोज फिरतात. त्यामुळे त्यांनी वंदे मातरमविषयीचा प्रश्न भाजपला नव्हे तर काँग्रेसला विचारला पाहिजे. भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरमचा केवळ सन्मान झाला आहे. कोणतीही बंदी घालण्यात आली नाही, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारने वंदे मातरमवर बंदी घातल्याचा आरोप केला होता. फडणवीस त्याविषयी बोलत होते. आत्ता पाहू काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य यांनी ही पेरलेली बातमी असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकले आहे, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का? - आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांचा एक गट कथितपणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. पण शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी जोरकसपणे त्यांचा हा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का ते? त्यांचे आमदार किती राहिलेत? त्यांचे वीसच राहिलेत ना. त्यामुळे त्यांनी नको त्या विषयात हात घालू नये. त्यापेक्षा त्यांनी एखाद्या विधायक सामाजिक मुद्यावर चर्चा करावी. नको त्या विषयात म्हणजे जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.
राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपचे आमदार अधिवेशनात लक्षवेधी मांडून त्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंढे यांच्याविरोधात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्याच्या तयारीत असलेले भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. आम्ही मुंढे समर्थक आहोत, तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा अज्ञातांनी खोपडे यांना फोनवरून दिला आहे. नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात भाजप आमदार आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारभाराविरोधात आणि त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विशेष लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे वृत्त माध्यमांत आले होते. हे वृत्त प्रसारीत होताच, आमदार खोपडे विधानभवनात प्रवेश करत असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन केले. फोन करणाऱ्यांनी स्वतःला तुकाराम मुंढे यांचे समर्थक असल्याचे सांगत तुम्हाला बघून घेऊन अशी धमकी दिल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. मराठवाड्यातून हा धमकीचा फोन केल्याचेही खोपडे यांनी सांगितले. पोलिसांत तक्रार करणार या धमकीच्या फोनप्रकरणी आमदार खोपडे हे विधिमंडळ सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला रीतसर माहिती देणार असून, संबंधित धमकी देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आमदारांचे मुंढेंवरील आरोप काय? तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, शासनाकडून अधिकृत नियुक्ती नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने 'स्मार्ट सिटी प्रकल्पा'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा प्रभार स्वतःकडे घेतला होता, असा भाजपचा मुख्य आरोप आहे. या पदावर असताना त्यांनी आपल्या मर्जीतील काही कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले. तसेच, काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत. या दोन्ही प्रकरणी त्यावेळी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल झाले होते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा भाजपचा दावा आहे. आता ही प्रकरणे पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पटलावर मांडून त्यांच्यावर कारवाईसाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. मुंढेंच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात 24 बदल्या तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वश्रुत आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि नियमबाह्य कामांना नकार देण्याच्या त्यांच्या भूमिकमुळे ते कोणत्याही सत्ताधाऱ्यांना फारसे पचनी पडत नाहीत. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. परिणामी, एका पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना, मुंढे यांची सरासरी वर्षभरातच उचलबांगडी केली जाते. गेल्या 20 वर्षांच्या सेवेत त्यांची तब्बल 24 वेळा बदली झाली आहे, जो प्रशासकीय सेवेतील एक विक्रमच मानला जातो. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आता हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या 'डॅशिंग' अधिकाऱ्यासमोर नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित 'किराना परंपरा' या मालिकेतील तिसरे पुष्प नुकतेच सादर झाले. यात किराणा घराण्याचे युगप्रवर्तक कलाकार उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांच्या गायकीचे मर्म उलगडण्यात आले. संगीत शास्त्राचे अभ्यासक डॉ. केशव चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य, गायक डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी या विषयावर सविस्तर मांडणी केली. उस्ताद अब्दुल वहीद खाँ हे समर्पण वृत्तीने रागाला शरण जाऊन त्याची सिद्धी प्राप्त करण्याचा विचार जपणारे कलाकार होते. छोटा ख्यालपेक्षा बडा ख्याल गाण्याची आवड जपत रागविस्तार करण्याची भूमिका मांडणारे युगप्रवर्तक कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या गायन तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. हा कार्यक्रम स्वरमयी गुरुकुल सभागृह, संभाजी उद्यानासमोर, पुणे येथे पार पडला. 'सरताज-ए-मौसिकी' अशी पदवी प्राप्त झालेल्या उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांच्या गायकीच्या विविध पैलूंवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. किराणा घराण्याच्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे कार्यकर्तृत्व उलगडून दाखवणारी 'किराना परंपरा' ही विशेष कार्यक्रम मालिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. या मालिकेचे डिजिटल स्वरूपात दस्तावेजीकरण करण्यात येत आहे. सुरांचा दर्जा आणि लगाव ही वैशिष्ट्ये जपत उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांनी किराणा घराण्याच्या अतिविलंबित गायकीच्या परंपरेला सुरुवात केली. मंद्र सप्तकाचा वापर, तान फिरतीचे वेगळेपण, सरगममध्ये गमकचा प्रयोग आणि मेरुखंडाने प्रभावित आलापी अशी त्यांची शैली होती. त्यांनी राग-बंदिशींची संख्या वाढविण्याऐवजी ठराविक रागांचा सातत्याने रियाज करत उच्च दर्जाचे गाणे आत्मसात केले. त्यांच्या गायनाला आध्यात्मिक बैठक होती. दीर्घ व विस्तृत आलापचारी हे अब्दुल वहीद खाँच्या गायकीचे प्रधान अंग होते. खंडमेरूचा स्वरप्रस्तार करत, धिम्या लयीत शिस्तबद्ध व पद्धतशीरपणे विस्तार करीत गाणे ही त्यांची खासियत होती. आलापचारीबरोबरच गुंतागुंतीची तनैयत करण्यातही ते पारंगत होते. कार्यक्रमात उस्ताद अब्दुल वहीद खाँ आणि उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्याविषयी तौलनिक विश्लेषणात्मक माहिती देण्यात आली. त्यांच्या शिष्यांविषयी माहिती देत आणि त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये उलगडत त्यांच्याच आवाजातील राग पटदीप आणि मुलतानी यांचे ध्वनिमुद्रण ऐकविण्यात आले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आयोजित १९ वी भीमथडी जत्रा २० ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत पुण्यात होणार आहे. या जत्रेत यंदा ३२० स्टॉल असतील, ज्यात राज्यातील २४ जिल्ह्यांसह देशातील १२ राज्यांतील कारागीर आणि महिला बचत गट सहभागी होणार आहेत. संस्थेच्या वतीने गेली १८ वर्षे ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. आयोजक सुनंदा पवार यांनी सांगितले की, ही जत्रा हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असून त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. पवार यांच्या माहितीनुसार, यंदाच्या भीमथडी जत्रेत एकूण ३२० स्टॉल असतील, त्यापैकी ९० स्टॉल खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी आहेत. मागील वर्षी भीमथडीला पावणेदोन लाख लोकांनी भेट दिली होती आणि सात कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. या वर्षीच्या भीमथडीची थीम भारतातील स्थानिक फुले अशी आहे, ज्यामुळे देशातील स्थानिक वनस्पतींच्या जतनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अर्बन/किचन गार्डनिंगमध्ये कमी जागेत, कमी खर्चात विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी कसा पिकवता येतो, याचे प्रात्यक्षिक पुणेकरांना पाहता येणार आहे. पाणी बचत आणि कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर यावरही भर दिला जाईल. या वर्षी भीमथडी जत्रेत प्रवेश करताना ग्राहकांचे मुगल बागेच्या सौंदर्यावर आधारित फुलांनी सजवलेल्या भव्य प्रवेशद्वारावर स्वागत केले जाईल. महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवणारे कलाकार आणि त्यांच्या कलाकृतींचे रेखाटन असलेल्या भव्य व सुंदर रांगोळ्या स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून साकारण्यात येतील. यात गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल यांसारख्या पारंपरिक कलांचा समावेश असेल. भीमथडी प्रदर्शनामध्ये मिलेट उत्पादनांसह विषमुक्त भाजीपाला, भौगोलिक मानांकन (जीआय) असलेले पदार्थ तसेच महिला सबलीकरणाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणचे, मिलेट चिवडा, मातीची भांडी यासह विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील.
पुणे शहरात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू:खराडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. खराडी भागात टँकरच्या धडकेत एका सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाला, तर हडपसर भागात रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ पादचारी महिलेला पीएमपी बसने धडक दिली. या दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खराडी येथील अपघातात सुनीता गजानन ताठे (वय ३४, रा. थिटे वस्ती, खराडी) या सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाला. त्यांचे पती गजानन ताठे (वय ४०) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टँकरचालक गणेश ज्ञानोबा कांगणे (वय २३, रा. काळूबाईनगर, थिटे वस्ती, खराडी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताठे दाम्पत्य नांदेड जिल्ह्यातील टाकळगावचे रहिवासी असून, ते थिटे वस्ती परिसरात भाड्याने राहत होते. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सुनीता ताठे सायकलवरून खराडी परिसरातून जात असताना, झेन्सार आयटी पार्कसमोर भरधाव टँकरने त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. आवारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, हडपसर भागात पीएमपी बसच्या धडकेत सोजर भीमराव कुंभार (वय ७२, रा. जगताप चाळ, हडपसर) या पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंभार यांची विवाहित मुलगी धनश्री सोमनाथ कुंभार (वय ४०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोजर कुंभार या रविवारी सकाळी अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील १५ नंबर चौकातून जात होत्या. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुंभार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एन. कवळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका ज्येष्ठाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी खडकीतील लोहमार्गाजवळील झाडीत टाकून पसार झालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने त्या ज्येष्ठाचा मृत्यू झाला होता. बाणेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पाच महिन्यांनंतर आरोपीला जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, सध्या रा. महिपालपूर, दिल्ली, मूळ रा. नौनेर, अमरोही, उत्तर प्रदेश) असे आहे. ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकात घडली होती. रस्ता ओलांडत असताना एका ज्येष्ठाला भरधाव रिक्षाने धडक दिली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालक गुर्जर याने ज्येष्ठाला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जातो, असे भासवून नागरिकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र, त्याने ज्येष्ठाला रुग्णालयात दाखल न करता, गणेशखिंड रस्त्यावरून खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेले आणि लोहमार्गाजवळील दाट झाडीत जखमी अवस्थेत सोडून तो पसार झाला. ज्येष्ठ नागरिक घरी परतले नाहीत म्हणून त्यांच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी खडकीतील लोहमार्गाजवळ त्या ज्येष्ठाचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बालेवाडी फाटा येथे रिक्षाने धडक दिल्याने ते जखमी झाल्याचे आणि चालकाने त्यांना रुग्णालयात नेण्याचे नाटक केल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरू असताना, तो दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बाणेर पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आणि आठ दिवस शोध घेतल्यानंतर गुर्जरला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, रायकर, पोलीस कर्मचारी गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रीतम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवतिरक यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या नामफलकावरून हटवण्यात आलेले उर्दू नाव पुन्हा लिहिण्यात यावे, या मागणीसाठी 'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया' (SDPI) या संघटनेने आज (सोमवारी) आक्रमक पवित्रा घेत 'रेल रोको' आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच रोखल्याने पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले होते. आंदोलकांनी दिलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नामफलकावर शहराचे नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे, मात्र नामांतर प्रक्रियेनंतर येथील उर्दू नाव वगळण्यात आले आहे. हे नाव पुन्हा सन्मानाने लावले जावे, यासाठी एसडीपीआयने प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज संघटनेने रेल रोकोची हाक दिली होती. रेल्वे बोर्डाला जीआर लागू होत नाही आंदोलकांनी आपली भूमिका मांडताना रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहराचे नाव बदलल्यानंतर रेल्वेने जीआरचे कारण देत उर्दू नाव हटवले, मात्र रेल्वेला हा जीआर लागू होत नाही. २०१७ च्या रेल्वे कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ज्या भागात विशिष्ट भाषिकांची लोकसंख्या जास्त आहे, तिथे त्या भाषेत नाव असणे बंधनकारक आहे. उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा नसून ती हिंदुस्थानची भाषा आहे. मराठवाड्यातील इतर आठ जिल्ह्यांच्या रेल्वे स्थानकांवर उर्दूत नावे आहेत, मग छत्रपती संभाजीनगरमध्येच का नाही? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला. भाजपकडून उर्दू भाषा संपवण्याचा प्रयत्न भाजप सरकार उर्दू भाषा संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. भाजप पदाधिकारी संजय केनेकर यांच्या मुलाच्या सांगण्यावरून हे नाव हटवण्यात आल्याचा गंभीर दावा आंदोलकांनी केला. यातून उर्दू ही एका समुदायाची भाषा असल्याचा संदेश सरकार देत असल्याचे आंदोलक म्हणालेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात उर्दू वृत्तपत्रांचे योगदान असून, पूर्वजांनी याच भाषेच्या माध्यमातून लढा दिला होता, याची आठवणही यावेळी आंदोलकांनी करून देण्यात आली. 'छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक' नावाला केंद्राची मंजुरी दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या 'छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक' अशा नामांतराला २५ ऑक्टोबर २०२५ मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या रेल्वेस्थानकाच्या नावापुढील 'औरंगाबाद' हे नाव मिटवून 'छत्रपती संभाजीनगर' हे नाव लिहिले जात आहे. केंद्राने 2022 मध्ये औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या स्थानकाचा नवीन स्टेशन कोड CPSN आहे. रेल्वेनुसार, महाराष्ट्र सरकारच्या शिफारशी व गृह मंत्रालयाच्या मान्यतेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेशनचे छत्रपती संभाजीनगर हे नवे नाव मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बदलानंतर, स्टेशनशी संबंधित सर्व माहिती आणि तिकिटे प्रवाशांना नवीन नावाने दिली जातील. रेल्वेने यासंबंधीची आवश्यक ती सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता, रेल्वेस्टेशनवरील उद्घोषणाही छत्रपती संभाजीनगर या नव्या नावानेच होईल.
संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसणा-या खेळाडूचा लिलावात नको
मुंबई : प्रतिनिधी आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट लीग मानली जाते. या लीगला पुरेसा मान-सन्मान न देणा-या परदेशी खेळाडूंवर आता भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कडक शब्दांत टीका केली आहे. आगामी आयपीएल २०२६ साठी काही परदेशी खेळाडू फक्त काही मॅच खेळणार असल्यामुळे गावस्कर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. गावस्कर […] The post संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसणा-या खेळाडूचा लिलावात नको appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ
मुंबई : प्रतिनिधी सिनेसृष्टीत सध्या एकच चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. ‘धुरंधर’. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे केवळ तब्बल तीन दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाइड भक्कम कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या तीन दिवसांतील वर्ल्डवाईड गल्ला पाहता या चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल […] The post बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न
मुंबई : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मुंबई उपनगरच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडांगणावर दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवत जिद्द, क्षमता व क्रीडाप्रतिभा प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मनोगतात त्यांनी दिव्यांग व्यक्तींना समाजातील सर्व क्षेत्रात […] The post दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१० ते १४ डिसेंबर मोशी येथे ‘किसान’कृषि प्रदर्शन
पुणे : प्रतिनिधी भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’ येत्या दि १० ते १४ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मोशी येथे आयोजित करण्यात आले आहे. सुमारे ३० एकरावर किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन […] The post १० ते १४ डिसेंबर मोशी येथे ‘किसान’कृषि प्रदर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘लाडकी’चा नोव्हेंबर हप्ता रखडला
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये अद्याप जमा झालेले नाहीत. राज्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागू शकतात. त्यामुळे महायुती सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे ३००० रूपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकले जाऊ शकतात. नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये ७ डिसेंबर पर्यंत खात्यावर येतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण अद्याप […] The post ‘लाडकी’चा नोव्हेंबर हप्ता रखडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केवळ 3-4 दिवसांचे अधिवेशन व्हायचे असे सांगत त्यांची मागणी टोलवून लावली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अल्प अधिवेशनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे एकत्रिकरण झाल्यानंतर नागपुरात किमान 2 महिन्यांचे अधिवेशन व्हावे असे निश्चित करण्यात आले. आमचे मित्र विरोधी पक्षात असताना एक महिना अधिवेशन चालायचे. ठीक आहे. पण आज सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडत आहे. सरकारला एवढी घाई का आहे? असे ते म्हणाले. संशयाचे वातावरण निर्माण करू नका - भास्कर जाधव पटोलेंनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भाचे असल्याने ते विदर्भ करारानुसार व्हावे अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यावर तुम्ही निर्णय देणार, हे ठीक आहे. पण तुम्ही असा संदेश पाठवला की, आम्ही तिथे या गोष्टींना परवानगी दिली होती. आम्ही तिथे आमचे मत मांडले होते. आम्ही 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशन व्हावे असा आग्रह धरला होता. अधिवेशनाचा कालावधी एखाद्या आठवड्याने वाढवण्याची आमची मागणी होती. निर्णय झाला ठीक आहे, पण तुम्ही आमच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण करू नका, असे भास्कर जाधव म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे कोरोना काळातील अधिवेशनांकडे बोट त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांच्या मागणीला उत्तर दिले. ते म्हणाले, नाना पटोले यापूर्वी पीठासीन अधिकारी होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण पुरवणी मागण्या सादर करतो, जी विधेयके पारित करायची आहेत त्याची ओळख पहिल्या दिवशी करून दिली जाते हे त्यांना ठावूक असावे. विशेषतः अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवण्याचा नियम आहे. मागील 25-30 वर्षांतील अधिवेशनांच्या पहिल्या दिवसाची माहिती काढली तर यापेक्षा वेगळा अजेंडा दिसणार नाही. अधिवेशन अधिकाधिक दिवसांपर्यंत चालावे अशी आमचीही भावना आहे. मागील 25 वर्षांत नागपूरमध्ये सर्वाधिक काळ अधिवेशन हे मी मुख्यमंत्री असतानाच चालले. ते पुढेही चालेल. पण आता आचारसंहिता सुरू आहे. पुढे कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पहिला आठवा व आणखी 2 दिवस एवढे अधिवेशन चालवण्याचे आपण निश्चित केले. आता अधिवेशनाचे उर्वरित दिवस पुढच्या वर्षीच्या अधिवेशनात समायोजित करून टाकू. पण मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. नाना पटोले यांचा अधिवेशनासाठी कितीही आग्रह धरला तरी ते अध्यक्ष असताना विधिमंडळाची मुंबईतील अधिवेशनेही 3 व 5 दिवसांची झाली होती. इतर राज्यांत अधिवेशने सुरुळीत सुरू होती. तिथे कोरोना नव्हता का? बाकी राज्यांत 15-20 दिवस अधिवेशने चालायची. पण महाराष्ट्रात केवळ 3-4 दिवस कामकाज चालायचे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषिकांच्या मेळाव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (MES) नेत्यांची कर्नाटक पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या दडपशाहीचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले असून, कोल्हापुरात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. या संघर्षात खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी आंतरराज्य बससेवा तात्पुरती स्थगित केली असून, हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. बेळगावात आजपासून (सोमवार) हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या वेळी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सीन डेपो मैदानावर 'महामेळावा' आयोजित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्नाटक प्रशासनाने याला परवानगी नाकारत सकाळपासूनच कारवाईचे सत्र सुरू केले. माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, नेते आर. एम. चौगुले, प्रकाश मरगाळे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले. व्हॅक्सीन डेपो परिसराला पोलिसांनी छावणीचे स्वरूप दिले असून, मेळावा उधळून लावण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीही, “रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में!” अशा घोषणा देत कार्यकर्ते ठाम आहेत. कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक कर्नाटकातील दडपशाहीविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्नाटकच्या बसेस रोखण्यात आल्या. काही कार्यकर्त्यांनी बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहून आपला निषेध नोंदवला. बससेवा बंद, प्रवाशांचा खोळंबा या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांच्या भीतीने दोन्ही राज्यांच्या परिवहन महामंडळांनी बससेवा थांबवली आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसेस निपाणी आगारातच थांबवण्यात आल्या असून, पुढे महाराष्ट्रात पाठवण्यात आलेल्या नाहीत. तर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सीमेवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे आकांडतांडव कर्नाटक नवनिर्माण सेना श्री रामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावाच्या अथनी शहरात महाराष्ट्राच्या बस थांबवून निषेध नोंदवला आहे. तत्पूर्वी कोल्हापूरमध्ये शिवसेना नेत्यांनी कर्नाटक परिवहन बस थांबवली होती. कर्नाटक बस थांबवल्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक नवनिर्माण सेनेनेही संताप व्यक्त केला आहे. कन्नड वेदिकेचा उद्दामपणा कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा उद्दामपणा सुरूच आहे. कर्नाटकातील अथनी येथील एसटी बसवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी 'जय कर्नाटक' लिहिल्याने वाद चिघळला आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसवर जय 'महाराष्ट्र लिहिल्याने' अथनीत त्याचे पडसाद उमटले आहेत.
छत्रपती संभाजीनग येथील विवेकानंद कॉलेजमध्ये २७ डिसेंबरपासून प्रगतिशील साहित्य संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ ग्रामीण कथाकार तथा कादंबरीकार उत्तम बावस्कर हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले असून, स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोदे हे असतील. माजी संमेलनाध्यक्ष ॲड. मिर्झा अस्लम यांची प्रमुख उपस्थिती राहील. मुंबई येथील प्रसिद्ध लोककवी तथा गीतकार प्रशांत मोरे हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाशिक येथील प्रसिद्ध कादंबरीकार तथा प्रगतिशील लेखक संघाचे राज्य महासचिव राकेश वानखेडे हे समारोपाचे प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ विज्ञान लेखिका प्रा. सुनीती धारवाडकर आणि प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनात उद्घाटन समारंभ आणि समारोप समारंभ याशिवाय 'माध्यमे आणि लोकशाही प्रजासत्ताकात विचार स्वातंत्र्याची आवश्यकता' या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात वेगवेगळ्या माध्यमांच्या अनुषंगाने डॉ. किशोर शिरसाट, रोशनी शिंपी, दत्ता कानवटे, अनिकेत मोहिते भाष्य करतील. 'संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा' या विषयावर ॲड. अभय टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली खुली चर्चा होणार असून, संविधान अभ्यासक अनंत भवरे हे संवाद साधणार आहेत. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर आत्माराम पाटील यांच्या शाहीरीवर आधारित 'अजिंक्य शाहीरी' हा कार्यक्रम शाहीर अजिंक्य लिंगायत आणि संच सादर करणार आहे. समारोपानंतर कवयित्री उर्मिला चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक खुल्या कवी संमेलनात मान्यवर कवींसह नवोदित कवींना एकत्रित सहभागी करून घेतले जाणार आहे. संमेलनाचे आयोजन प्रगतिशील लेखक संघ, छत्रपती संभाजीनगर ही संस्था विवेकानंद महाविद्यालयाच्या सहकार्याने करीत आहे. प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शहरात सातत्याने लोकवर्गणीतून साहित्यिक उपक्रम चालविले जाते. साहित्य रसिकांनी व श्रोत्यांनी या संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, विवेकानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा मराठी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय डुंबरे, प्रगतिशीलचे उपाध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, सचिव डॉ. समाधान इंगळे, सहसचिव आशा डांगे, मराठवाडा संघटक सुनील उबाळे, कोषाध्यक्ष डॉ. सोमनाथ वांजरवाडे, सदस्य डॉ. सविता लोंढे, चक्रधर डाके, माधुरी चौधरी, डॉ. नवनाथ गोरे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जातात. शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर समतेचे संस्कार करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होत असतानाच, यवतमाळ जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयत्ता आठवीच्या ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिकेत चक्क ‘उच्च जातीचे नाव काय?’ असा प्रश्न विचारण्यात आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल सुधारावा, यासाठी एका खासगी संस्थेमार्फत ('टार्गेट पीक अप्स') सराव मोहीम राबवली होती. याअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेपर सोडवण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र, आठवीच्या दुसऱ्या सराव प्रश्नपत्रिकेत जातीवर आधारित प्रश्न विचारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनातून जातीभेद नष्ट करण्याचे धडे दिले जात असताना, अशा प्रश्नांमुळे जातीयवादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. एकीकडे आम्ही विद्यार्थ्यांना संविधानाची आणि समतेची शिकवण देतो, तर दुसरीकडे प्रशासनच प्रश्नपत्रिकेतून जातीचा शोध घेते का? असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. विनापरवाना परीक्षा आणि मॉडरेशनचा अभाव राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे अधिकार केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आहेत. जिल्हा परिषदांना स्वतंत्रपणे अशा परीक्षा घेण्याचे आदेश नाहीत. तरीही यवतमाळ जिल्हा परिषदेने खासगी संस्थेमार्फत हा घाट घातला. विशेष म्हणजे, कोणतीही परीक्षा घेताना विषय तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका तपासणे (मॉडरेशन) गरजेचे असते. मात्र, या प्रक्रियेत तज्ज्ञांकडून तपासणी झाली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच असा आक्षेपार्ह प्रश्न प्रश्नपत्रिकेत आला, असे बोलले जात आहे. कठोर कारवाईचे संकेत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न न करता प्रशासनाने कारवाईचे संकेत दिले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संस्थेकडून प्रश्नाची रचना आणि भाषा चुकीची वापरली गेली आहे. यासंदर्भात त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला असून, त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मनात जात बिंबवणे हा गुन्हा : दानवे दरम्यान, या प्रकरणावर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वात आधी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. आपण हिंदुस्थानात राहतो. आपल्या घटनेत सर्वांना समान लेखलेले आहे. आपण जातपात मांडायलाच नको. जात मानत असाल तरी कोणती जात उच्च आणि कोणती जात कनिष्ठ हे बिलकुल होऊ शकत नाही. त्यामुळे असा प्रश्न विचारणे आणि विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न रुजवणे हे समाजाच्या दृष्टीने अतिशय चुकीचे असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. कोणती जात उच्च हा काही प्रश्न होऊ शकतो का? सगळ्या जाती सारख्याच आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात जात बिंबवणे हा गुन्हा आहे, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाने तापलेल्या नागपूरमध्ये, कोकणातील ज्येष्ठ नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख आमदार भास्कर जाधव व शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अनपेक्षित भेटीने नवे राजकीय वादळ उभे केले आहे. विधानभवन परिसरात ही भेट झाली, आणि काही क्षणांचा संवाद कॅमेऱ्यात टिपला गेल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटात नाराजी वाढल्याच्या राजकीय चर्चांदरम्यान ही भेट घडल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. विशेषतः विरोधी पक्षनेतेपद जाधवांना नाकारले जाण्याच्या चर्चेनंतर, या भेटीने ठाकरे गटातील वरिष्ठ नेते दुसऱ्या दिशेला वळतायत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. प्रताप सरनाईक यांनी मात्र या भेटीमागे कोणताही राजकीय डाव नसल्याचे स्पष्ट केले आहे. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात एसटी सेवांबाबत काही अडचणी आहेत. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. आमदार हा जनतेची कामं घेऊन मंत्र्याकडे जात असतो; पक्ष पाहून नाही, असे ते म्हणाले. परंतु त्याच वेळी, ऑपरेशन टायगर सुरू आहे, अशी त्यांनी कबुली दिल्यानंतर या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. कारण विरोधकांचे स्पष्ट मत आहे—शिंदे गटाचे लक्ष्य अजूनही ठाकरे गटातील उरलेले शिलेदार आपल्या बाजूला खेचणे आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी नुकताच दावा केला होता की, उद्धव ठाकरे कधीच भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते होऊ देणार नाहीत. सामंत यांच्या वक्तव्यानेच ठाकरे गटातील नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. आता या भेटीनंतर जाधव कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकणात आपला प्रभाव वाढवण्यासाठी शिंदे गट प्रयत्नरत असल्याच्या चर्चा आधीच आहेत, आणि त्यामुळे ही भेट अधिक चर्चेचा विषय ठरतेय. अंतर्गत तणावाची जाणीव या आरोप-प्रत्यारोपात ठाकरे गटही मागे राहिला नाही. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हटले की, भास्कर जाधव हे पदलालसेचे राजकारण करणारे नेते नाहीत. जनतेशी त्यांची नाळ घट्ट आहे. ते उदय सामंत यांच्यासारखे खुर्ची पाहून धावणारे नाहीत. ठाकरे गटाने जरी ही भेट साधी-सोपी म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असला तरी, अंतर्गत तणावाची जाणीव त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होते. शिवसेनेतील सत्ता संघर्ष अजून संपलेला नाही सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे सत्ता, संख्या आणि नेतृत्वाचा प्रभाव टिकवण्याच्या शर्यतीत अडकले आहे. एका बाजूला सत्तेसह शिंदे गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे कमी आमदारसंख्येतही नेतृत्व टिकवण्याचा उद्धव ठाकरे यांचा संघर्ष, या संपूर्ण पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये घडलेली ही भेट केवळ धागा नसून, राजकीय संकटाचा नवीन टप्पा असल्याचे विश्लेषकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या भेटीचे खरे राजकीय परिणाम उलगडतील. शिवसेनेतील सत्ता संघर्ष अजून संपलेला नाही, उलट तो आता निर्णायक वळणावर पोहोचत आहे, हेच या भेटीचे मुख्य संकेत आहेत.
मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या एका निलंबित तहसीलदाराने आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार व अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख कशी आली? असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. हा सरळ सरळ मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचे ते म्हणालेत. पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले. त्यांच्या अमेडिया कंपनीवर 1800 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही जमीन अमेडियाला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी नामक महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच सूर्यकांत येवले यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरल्याचे समोर आले आहे. विजय कुंभार यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे हा मुद्दा उजेडात आणला आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांने कुटुंबियांची पतसंस्थेची थकबाकी ₹85.50 लाख रोख भरले. मुंढवा प्रकरण सुरू असतानाच ही रक्कम भरली गेलीय. एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख रक्कम आली कुठून? हा सरळ सरळ भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंगचा प्रकार दिसतो! ED व सरकारने तात्काळ चौकशी करून दोषींना अटक करावी, असे ते म्हणालेत. कुंभार यांनी या प्रकरणी अंजली दमानियांसोबत प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी या प्रकरणाच्या चौाकशीची मागणी केली आहे. खाली वाचा त्यांचे निवेदन जशास तसे विजय कुंभार व अंजली दमानिया म्हणतात, पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख आरोपी पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत गुलाबराव येवले यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची कर्ज खाती नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बावडा, ता. खंडाळा, जि. सातारा येथे आहेत. 1) चंद्रकांत गुलाबराव येवले, मु. पो. भोगाव, ता. वाई, जि. सातारा - कर्ज खाते क्र. 195/99 थकबाकी - 52.50 लाख 2) बाळकृष्ण जगू जाधव, मु. पो. खानापूर, ता. वाई, जि. सातारा - कर्ज खाते क्र. 295/132. थकबाकी - 33 लाख. वरील दोन्ही खात्यांना आरोपी सूर्यकांत येवले हे जामीनदार आहेत. दोन्ही खात्यांची एकूण थकबाकी 85 लाख 50 हजार एवढी होती. दैनिक पुढारी व 7/12 यावरूनही सूर्यकांत येवले यांच्या दोन्ही मिळकतींवर जप्ती आदेशाने नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा बोजा असल्याचे दिसते. आमच्या माहितीनुसार, दिनांक 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सूर्यकांत येवले यांनी एकूण 85.50 लाख इतकी संपूर्ण रक्कम रोख स्वरुपात नागरी सहकारी पतसंस्थेत जमा केली असल्याचे दिसून येते. या संदर्भात गंभीर शंका निर्माण करणारे मुद्दा पुढीलप्रमाणे - एका सामान्य शासकीय अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम रोख स्वरुपात कशी जमा केली?सहकारी पतसंस्था एकाच व्यक्तीकडून एवढी मोठी रोख रक्कम कायद्याने स्वीकारू शकते का? ही रक्कम मुंढवा जमीन घोटाळ्यातील गैरव्यवहारातून आली असण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. अशा स्वरुपातील व्यवहार काळा पैसा पांढरा करण्याचा (मनी लाँड्रिंग) गंभीर प्रयत्न असण्याची शक्यता आहे. म्हणूनच आमची आपणास विनंती आहे की, सूर्यकांत येवले यांनी जमा केलेल्या 85.50 लाखांच्या मूळ स्त्रोताची अतिशय सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. या व्यवहारात सहभागी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, तिचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेची चौकशी करावी. हा व्यवहार मुंढवा जमीन घोटाळ्यातील पैसे वळवण्यासाठी वापरला गेला का? याची स्वतंत्र चौकशी आर्थिक गुन्हे शाखा/ अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत केली जावी. सदर व्यवहारातील कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित आरोपी, जामीनदार, तसेच संस्थेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकणातील आर्थिक बाबींमागे प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचा ठोस व स्पष्ट संशय निर्माण होत आहे. त्यामुळे तत्काळ व प्रभावी कारवाई होणे अत्यावश्यक आहे. आपण याबाबत त्वरीत चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही विनंती, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावरून आता राजकारण तापले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी दमानिया यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अंजली दमानिया या सुपारी घेऊन काम करत असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करणाऱ्या 'मास्टरमाइंड'च्या इशाऱ्यावर चालत आहेत, असा गंभीर आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. नागपूर येथील विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना अनिल पाटील यांनी दमानियांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. आमच्या नेत्याचा राजीनामा मागणाऱ्या अंजली दमानिया या कोण? त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवाल पाटील यांनी केला. कधी अजित पवार, तर कधी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायचे; ज्यांची सुपारी घेतली असेल, त्यांचा राजीनामा मागायचा, हाच यांचा उद्योग आहे, अशी तिखट टीका पाटील यांनी केली. सुपारी सोडून समाजकार्याकडे लक्ष द्यावे पार्थ पवार यांच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की, या प्रकरणात दोन समित्या नेमण्यात आलेल्या आहेत. चौकशी सुरू असून, कारवाई देखील झालेली आहे. इतके सगळे केल्यानंतर, केवळ अजित पवारांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसे बदनाम करता येईल, याची सुपारी अंजली दमानिया यांना दिलेली आहे. त्या सुपारीला सोडून समाजकार्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा खोचक टोला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी अंजली दमानिया यांना लगावला. अंजली दमानिया दुसऱ्याच्या डोक्याने चालतात अंजली दमानिया या स्वतःच्या बुद्धीने चालत नसून त्या दुसऱ्या कुणाच्या तरी डोक्याने चालत आहेत, असा दावा पाटील यांनी केला. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यांना 'ॲलर्जी' किंवा भीती वाटते, असा कुणीतरी 'मास्टरमाइंड' यामागे आहे. हा मास्टरमाइंड कोण हे शोधणे गरजेचे असून तो लवकरच जनतेसमोर उघडा पडेल, असेही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा... तुकाराम मुंढेंविरोधात भाजप आमदार आक्रमक:हिवाळी अधिवेशनात करणार निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात नेहमीच आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार मुंढे यांच्या विरोधात विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांच्या थेट निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेतील त्यांच्या जुन्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णय आता पुन्हा उकरून काढले जाणार असल्याने विधिमंडळाचे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा...
अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदेंनी कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण झाडेही जगली पाहिजे. सरकारने नवीन झाडे लावण्याचा दाखला देत फसवणूक करू नये, असे ते म्हणालेत. नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यानिमित्ताने तपोवनात साधूसंतांसाठी साधूग्राम बांधले जाणार आहे. पण त्यासाठी तेथील तब्बल 1800 झाडे तोडली जाणार आहेत. या झाडांची ओळखही पटवण्यात आली आहे. पण अभिनेते सयाजी शिंदेंसह अनेकांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही या प्रकरणी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सयाजी यांनी सोमवारी राज यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर सयाजी शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला. त्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला. त्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. तपोवनातील झाडे कशी वाचली पाहिजेत? यावर त्यांच्याशी चर्चा झाली. भविष्यातही अशी झाडे वाचावीत यावरही त्यांच्यासोबत उहापोह झाला. या प्रकरणी झाडे इकडून तिकडे लावण्याने काही होत नाही. 15 फुटी झाडे लावण्याचा मुद्दा तर निव्वळ मजाक आहे. ज्या जागी झाडे आलीच नाही, त्या ठिकाणी ही झाडे कशी येतील? वनराई फुलली पाहिजे तिथे मातीच तशी नसेल. पाणीही नसेल. त्यामुळे आहे ती झाडे कशाला तोडायची? सरकारने आहे ती झाडे तोडू नये. कुंभमेळा झाला पाहिजे. परंपरेनुसार सर्वकाही झाले पाहिजे. आमचा त्याला विरोध नाही. आम्ही त्याचा आदरच करतो. पण ही नवीन झाडांच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये. महाराष्ट्रातील वनराई, देवराई कशी टिकली पाहिजे, फुलली पाहिजे, नवीन कशी तयार झाली पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील वृक्षतोडीला राजकीय हेतूने प्रेरित पर्यावरणवादी विरोध करत असल्याची टीका केली होती. त्यांचा रोख सयाजी शिंदेंकडेच होता. पत्रकारांनी या प्रकरणी सयाजी यांना छेडले. पण त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. मला झाडांशिवाय असले काही कळत नाही. त्यामुळे त्यावर काय व्यक्त व्हावे हे मला कळत नाही. हा आपला प्रांत नाही, असे ते हसत म्हणाले. सरकार आमचे शत्रू नाही. आम्ही झाडांसाठी आंदोलन केले. आम्हाला झाडे हवी आहेत. ती आपली आई-वडील आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एकत्र येणारे सर्वचजण आमचे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झाडांसाठी घेतलेली भूमिका पाहून मला खूप चांगले वाटले. या प्रकरणी सर्वच अभिनेत्यांनी या प्रकरणी पुढे येऊन बोलले पाहिजे असे काही नाही. त्या सर्वांचे मत असे आहे की, झाडे वाचली पाहिजेत. पण काही पर्यावरणवादी झाडे वाचली नाही पाहिजे असे म्हणत असतील तर त्यांचा विचार करावा लागेल. पण वृक्षतोड व्हावी असे कुणालाच वाटत नाही, असेही सयाजी शिंदे या प्रकरणी बोलताना म्हणाले. तपोवनातील वृक्षतोडीवर आज नाशकात बैठक तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात आज नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक होणार आहे. पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत या मुद्यावर योग्य तो निर्णय होईल असे सांगितले जात आहे. कुंभमेळानिमित्ताने साधुग्राम तयार करण्यासाठी तपोवनात वृक्षतोड करावी लागणार, ही मनपा प्रशासनाची ठाम भूमिका आहे. पण पर्यावरणवाद्यांचा त्याला विरोध आहे. तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सोमवारी ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर यंदा फक्त आठच दिवसांचे कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना यात किती न्याय मिळेल, याविषयी जनतेला जशी शंका आहे, तशी लोकप्रतिनिधींनाही शंका आहे. सोलापूरमधील सत्ताधारी चार एकूण १५२ प्रश्न विचारले आहेत, मात्र त्यापैकी ९० टक्के प्रश्न फेटाळले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक आमदाराचे फक्त ३ ते ५ प्रश्न स्वीकारले जातील, त्यापैकी चर्चेला किती येतील विषयी अनिश्चितता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आ. सुभाष देशमुख यांचे ४८, शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांचे ४४, मध्यचे आमदार १० व अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वाधिक ५० तारांकित प्रश्न विचारले आहेत. कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघात सोलापूर शहराचाही काही भाग येतो. हे चारही आमदार सत्ताधारी भाजपचे आहेत. त्यांचे किती प्रश्न चर्चेला येतील, याविषयी या आमदारांनाच शंका आहे. नियमानुसार प्रत्येक आमदाराचे ५ प्रश्न स्वीकारले जातात, म्हणजेच कोठेंचा अपवाद वगळता इतरांचे ९०% प्रश्न फेटाळले जाण्याचीच शक्यता आहे. ‘सीव्हीसी’ घोटाळ्याचा प्रश्न आ. देशमुखांनी पुन्हा मांडला १. जिल्हाधिकारी कार्यालयात बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने १६ कॉमन सर्व्हिस सेंटरच्या आकडेवारीत ट्रॅन्झेंक्शन घोटाळा झाला, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई विलंब का? २. महा- ई- सेवा केंद्रांसह व इतर ऑनलाइन केंद्रांवर विद्यार्थ्यांची लूट होतेय. तक्रारी असूनही प्रशासनाची कारवाई का नाही? ३. गरीब रुग्णांच्या खिशावरील औषधांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने २०२३ मध्ये झीरो प्रिस्क्रिप्शन योजनेची घोषणा केली. त्याचे काय झाले? ४. सोलापूर बसस्थानकावरील गाड्यांची वर्दळ पाहता जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बस स्थानकाचे विस्तारीकरण कधी होणार आहे? ५. सोलापूरमध्ये प्लाझ्माची वाहतूक करणारे वाहन पकडले. गुजरामध्ये त्याची तस्करी करणाऱ्यावर काय कारवाई? ६. गेंट्याल चौकात अपघातात जखमी झालेल्या एका मुलाला सिव्हिलमध्ये वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याबाबत काय कारवाई झाली? आ. देवेंद्र कोठे यांचे प्रमुख प्रश्न... गुंठेवारीवर काय कार्यवाही? १. सोलापुरातील गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर काय कार्यवाही ? २. शेळगी, विडी घरकुल, अक्ककोट रोड, वसंत विहार, सोरेगाव, नीलम नगर या भागातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले होते, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काय? ३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील रिक्तपदांची भरती कधी? ४. अदिला नदीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी कारवाई काय? नदीच्या पुनरूज्जीवनासाठी प्रशासनाला काही सांगितले आहे काय? त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणार काय? कोणाचे किती प्रश्न? १. आ. सचिन कल्याणशेट्टी -५०२. आ. सुभाष देशमुख - ४८३. आ. विजयकुमार देशमुख - ४४४. आ. देवेंद्र कोठे - १० विधिमंडळाचे निवृत्त सचिव अनंत कळसे म्हणाले - आमदारांनी कितीही प्रश्न विचारले, तरी कार्यवाही होते पाच प्रश्नांवरच Q अधिवेशनात आमदारांचे प्रश्न मोजकेच चर्चेला येतात. बाकी प्रश्नांचे काय होते? A अधिवेशनासाठी आमदारांची ५ गटात विभागणी होते. त्यात मंत्र्यांचाही समावेश असतो. एकूण ३५ विभाग आहेत. सोमवार ते शुक्रवार या काळात ते ५ विभागात हे गट विभागले जातात. प्रत्येक गटात आमदारांना पाचच प्रश्न विचारता येतात. असा नियम आहे. Q लेखी उत्तरे दिली जातात, ती आमदारांपर्यंत पोहोचतात का? A आमदारांनी विचारलेले ५ पैकी ३ प्रश्नच यादीत येऊ शकतात. त्यांना लेखी उत्तरे मिळतात. आमदारांनी १०० - २०० असे कितीही प्रश्न विचारले तरी ५ प्रश्नांवर प्रक्रिया होते. विधिमंडळाचा तसा नियमच आहे. त्यात बदल होत नाही. Q लेखी उत्तरांवर कार्यवाही होते? A लेखी उत्तरांची यादी प्रिंट होते. ती आदल्या दिवशी आमदारांना दिली जाते. एका आमदाराचे जास्तीत जास्त ३ स्वीकृत प्रश्न त्या यादीत राहतात. लेखी उत्तरांवर कार्यवाही होते. रोज एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास असतो. त्यात जास्तीत जास्त ५- ६ प्रश्न चर्चेला येतात. उरलेल्या लेखी उत्तरावर कार्यवाही दिलेली असते. Q काही प्रश्न मतदारसंघाबाहेरील असतात, असे चालते का? A कोणतेही आमदार महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न उपस्थित करू शकतात. वेळेअभावी बहुतांश वेळा ते चर्चेलाच घेतले जात नाहीत. Q किती प्रश्न विचारण्याचा अधिकार? A मर्यादा नाही. पण पाचच प्रश्न स्वीकृत होतात. इतर लॅप्स होतात.
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेना-शिंदे गटात वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये एक वेगळेच दृष्य समोर आले. ज्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना नवी दिशा दिली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना-शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे, या दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. विधानभवन परिसरात त्यांनी एकमेकांना गळाभेट दिली, हसतखेळत संवाद साधला. या भेटीनंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये ज्या आरोप-प्रत्यारोपांची खळबळ होती, त्यात एक प्रकारची शांतता निर्माण झाल्यासारखी अवस्था दिसली. मात्र हा शांति नाही, तर पुढील राजकीय रणनीतीसाठी सुरुवात आहे, असा अंदाज अनेकांचा आहे. ही भेट इतकी अनपेक्षित होती कारण मागील काही दिवसांपासून मालवणमध्ये नेमक्या प्रश्नांवर कटु राजकीय वाद रंगला होता. 26 नोव्हेंबर रोजी, नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी, नीलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पैसे वाटपाचा आरोप करून एक प्रकारचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यांच्या दाव्यानुसार, भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या निवासी पत्त्यावर गेल्यावर तिथे बेहिशोबी रोख 25 लाख रुपये सापडले. या रोख रक्कमेसह हिरव्या पिशवीत पैसे असल्याचे आणि हा प्रकार पैसे वाटपाच्या पद्धतीतून निवडणुकीसाठी चालत असल्याचे राणेंनी आरोप केला. त्यांनी म्हटले की, भाजपचे नाव येते तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळा रंग मिळतो; पैसे वाटपाचा आणि दबावाचा वातावरण तयार होते, अशी तक्रार त्यांनी केली. या आरोपांमुळं राज्यभरात वाद वाढला आणि भाजपने हे आरोप फेटाळले. किनवडेकर यांनी मालवण पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा नोंदवला होता. त्यांनी नीलेश राणे यांनी बेकायदेशीररित्या त्यांच्या घरात घुसून हे स्टिंग केल्याचा दावा केला. या गुन्ह्यानुसार राणेंवर आरोपपत्र झाल्याचे सांगितले जाते. मात्र, आज नागपूरमध्ये त्यांची ही भेट काहींसाठी प्रकरण मिटवण्यात आल्याचे संकेत असल्याचे मनले जात आहे. नीलेश राणे यांनी मीडिया समोर स्पष्ट केले की, रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, आणि जे काही झाले ते फक्त निवडणुकीपुरते होते, असे त्यांनी सांगितले. भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी तणाव निवळल्याचे संकेत मालवण नगरपरिषद निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना-शिंदे गट यांच्यात निर्माण झालेला तणाव आज नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात नरम पडल्याचे चित्र दिसले. शिवसेना-शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधानभवन परिसरात हसतखेळत भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना गळाभेट देत जे काही वाद होते ते निवडणुकीपुरतेच होते, अशी प्रतिक्रियाच दिली आहे. या भेटीला महत्त्व आहे कारण काही दिवसांपूर्वीच नीलेश राणेंनी मालवणमध्ये भाजप नेते विजय किनवडेकर यांच्या घरी धाड टाकून हिशोबबाह्य 25 लाख रुपये आढळल्याचा दावा केला होता. त्यांनी चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचे राजकारण केल्याचा थेट आरोप करत स्टिंग ऑपरेशनही केले होते. यानंतर किनवडेकर यांनी राणेंवर बेकायदेशीरपणे घरात घुसल्याचा गुन्हा दाखल केला होता. या घटनांनी महायुतीत तणाव वाढवला होता. पण अधिवेशनातील झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी तणाव निवळल्याचे संकेत दिले. आता ही भेट खरोखर वादाची अखेर ठरणार की पुढील राजकीय डावपेचांची सुरुवात? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे अपघाती निधन
गडचिरोली : प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली असून त्यांच्या अचानक जाण्याने गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. गीताताई हिंगे या रविवारी ७ डिसेंबर रोजी खाजगी कामानिमित्त नागपूरला […] The post राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे अपघाती निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात
अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगरमध्ये खासगी बसला भीषण अपघात झाला. बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. अहिल्यानगर -पुणे महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये बसच्या चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अहिल्यानगर पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात […] The post अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवले पुलावर पुन्हा अपघात, २ जखमी
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाहीय. ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. सकाळी स्कूल बसने पंच कारला जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नवले पुलाच्या ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणी झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळते. […] The post नवले पुलावर पुन्हा अपघात, २ जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेचे पेव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फुटले आहे. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्याला हवा देत शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे गटाने त्यांना त्यांच्याकडे केवळ 20 आमदार राहिल्याची आठवण करून देत त्यांचा हल्ला परतावून लावला. आदित्य ठाकरे यांनी नको त्या विषयाला हात घालू नये. आपली ताकद नाही त्या विषयात बोलू नये, असे शिंदे गटाने म्हटले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा आतापर्यंत अनेकदा फेटाळली आहे. पण या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. त्यातच आता शिंदे गटाचे 20 हून अधिक आमदार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. यामुळे शिंदे गटात खळबळ माजली असताना आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा या विषयाला हात घातला आहे. एका गटाचे 20 आमदार दुसरीकडे जाणार आहेत - आदित्य ठाकरे पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य यांनी ही पेरलेली बातमी असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकले आहे, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का? - आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांचा एक गट कथितपणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. पण शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी जोरकसपणे त्यांचा हा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का ते? त्यांचे आमदार किती राहिलेत? त्यांचे वीसच राहिलेत ना. त्यामुळे त्यांनी नको त्या विषयात हात घालू नये. त्यापेक्षा त्यांनी एखाद्या विधायक सामाजिक मुद्यावर चर्चा करावी. नको त्या विषयात म्हणजे जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे यांनी केला होता दावा उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दाखला देत शिंदेंचे 20 आमदार भाजपत जाणार असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, शिंदे गटाचे आमदार भाजपत जाणार असल्याच्या बातम्यांमुळे शिंदे नाराज झालेत. त्यांचे 20 आमदार मागेच त्यांना सोडण्यासाठी तयार झाले होते. माझ्या मते ते भाजपमध्ये जाण्यासाठी शिवसेना सोडतील. मला त्यांचे काही लोक भेटले. तेव्हा समजले. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबाला सोडले, आता तुमच्यासोबतही असेच होईल. ही नाराजी अशीच सुरू राहील. पुढे जाऊन त्यात आणखी भर पडले. त्यानंतर महिना-दोन महिन्यात चित्र खूप बदललेले दिसेल. राजकारणात कोणतीही उलथापालथ होऊ शकते. भाजप या सर्वांना सरळ करेल. त्याची सुरुवात आता झाली आहे. शिंदेंचे नाराज आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात. पण फडणवीस त्यांना कोणताही थारा देत नाहीत. मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याने मला ही माहिती दिली. कुणीही गेले तरी फडणवीस त्याचे काम करत नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदारांना भरभरून द्यायचे. त्यावेळी त्यांना भाजपला देताना हात आखडता घेतला. आता फडणवीस तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना देत आहेत, असे ते म्हणाले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध करत आदित्य यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणालेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा व विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी सरकारवर हे पद हेतुपुरस्सर रिक्त ठेवण्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाही, तर विधिमंडळाचे अध्यक्ष व सभापतींकडे असल्याचे सांगत हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचे नाव पुढे केले आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना 2019 चा अनुभव येईल पण आज अचानक राजकीय वर्तुळात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे भास्कर जाधव दुखावले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी आदित्य यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. ते याविषयी बोलताना म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवणे हे 2019 च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिंमडळाच्या रचनेसारखे झाले. सरकार बनवताना उद्धव ठाकरे यांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितले की, मला तुमच्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री करायचाय. त्यानंतर मुख्यमंत्रीचा मुद्दा आला तेव्हा त्यांनी स्वतःचे नाव सुचवले. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर त्यांनी स्वतःच्या मुलालाही कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे येत असेल तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला, तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी फेटाळली चर्चा दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मला विरोधी पक्षनेतेपद देण्याची बातमी पेरलेली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणालेत. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 1980 मध्ये भाजपाचे 14 आमदार होते, 1985 मध्ये 16 आमदार होते. पण तेव्हाही विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. पण नियत नसेल तर त्याला काही बोलू शकत नाही. हे सरकार घटनात्मक पद रिक्त ठेऊन कामकाज करत आहे. हा मनमानी कारभार आहे. तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद नियुक्त करायला काय दुखणे आहे, आम्ही नाव दिले आहे. जो काही असेल तो निर्णय घ्या. लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचे नसेल तर त्यांना संविधानाप्रमाणे सरकार चालवायचे नाही असा अर्थ होतो. रेटून कारभार करत जनतेला न्याय द्यायचा नसेल. सरकारच्या गैरप्रकारावर कुणी अंकुश ठेवू नये असं वाटत असेल तर त्यांनी करू नये, असे ते म्हणाले.

24 C