दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा मालिका विजय
अखेरच्या सामन्यात तिलक-हार्दिकची फटकेबाजी अहमदाबाद : वृत्तसंस्था तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याच्या धमाकेदार फलंदाजीनंतर बुमराहने मोक्याच्या क्षणी क्विंटन डीकॉकची घेतलेली विकेट आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीची जादू याच्या जोरावर भारतीय संघाने अहमदाबादचे मैदान मारत ५ सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने खिशात घातली. टी-२० वर्ल्ड कपपासून चालत आलेला हा मालिका विजयाचा सिलसिला वर्षअखेरपर्यंत कायम राखण्यात टीम इंडिया यशस्वी […] The post दक्षिण आफ्रिकेविरोधात भारताचा मालिका विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादीला बदनाम करणारा AI-निर्मित बनावट व्हिडिओ उघड:एफएसएल अहवालाने केली बनावट असल्याची पुष्टी
आज सकाळपासून अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भातील एक एआय-निर्मित व्हिडिओ व्हायरल होत आहे. फॉरेन्सिक तपासात हा व्हिडिओ बनावट असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. तसेच, विरोधकांकडून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी दादा गटाने याचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एनसीपी दादा गटाकडून सांगण्यात आले की, आज सकाळपासून जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आलेल्या बनावट आणि एआय-निर्मित व्हिडिओचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून पक्षाची आणि पक्षनेतृत्वाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, विशेषतः माननीय अजित पवार यांच्या बारामती कार्यालयाला लक्ष्य करण्यात आले आहे. राजकीय विरोधकांनी हा व्हिडिओ मीडिया आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरवून तंत्रज्ञानाचा गैरवापर करत जनतेची दिशाभूल करण्याचा खालच्या थराला जाऊन प्रयत्न केला आहे. हा प्रकार लक्षात येताच एनसीपीने तत्काळ जबाबदारीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर फॉरेन्सिक तपासणीची मागणी करण्यात आली. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अहवालाने संबंधित व्हिडिओ बनावट असून तो एआयद्वारे तयार करण्यात आल्याची स्पष्ट पुष्टी केली आहे. पारदर्शकता राखण्यासाठी आणि सत्य निर्विवादपणे समोर आणण्यासाठी हा फॉरेन्सिक अहवाल सार्वजनिक करण्यात येत आहे. ही घटना राजकीय विश्वासार्हता आणि जनसमर्थन नसलेल्या लोकांकडून तंत्रज्ञानाचा वाढता गैरवापर दर्शवते. बनावट सामग्रीद्वारे कृत्रिम संताप निर्माण करणे हे खऱ्या राजकीय संवादाचे किंवा निवडणुकीतील ताकदीचे पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रकारामागे असलेल्या लोकांना स्पष्ट संदेश देतो—आम्हाला आव्हान द्यायचे असल्यास लोकशाही मार्गाने द्या. निवडणुकीत उतरा. जनतेचा कौल मिळवा. खोटेपणा, डिजिटल बनावटपणा आणि दिशाभूल यांचा अवलंब केल्यास तुमचीच विश्वासार्हता कमी होईल. एनसीपी हा विषय कायद्याच्या चौकटीत कठोरपणे पुढे नेईल. पक्ष किंवा पक्षनेतृत्वाला बदनाम करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाकडे गांभीर्याने पाहिले जाईल आणि दोषींवर योग्य कारवाई केली जाईल.
पुणे ग्रामीण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने गेल्या महिन्यात जामखेड येथे एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर पुणे जिल्ह्यात येऊन सासवडमध्ये दुसऱ्या खुनाचा गुन्हा केला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा रक्तरंजित प्रवास थांबवला. ९ डिसेंबर रोजी सासवड शहरातील न्यू आनंद वाईन्सच्या मागील बाजूस असलेल्या एका बांधकाम इमारतीत राजू दत्तात्रय बोराडे (वय ३८, रा. सासवड) यांचा गळा चिरलेला मृतदेह आढळून आला होता. या क्रूर हत्येने सासवडमध्ये खळबळ उडाली होती. मृताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर सासवड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी आरोपींना तात्काळ पकडण्याचे निर्देश दिले होते. पथकाने घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत व्यक्तीसोबत दोन अनोळखी व्यक्ती घटनास्थळाकडे जाताना दिसले. या फुटेजच्या आधारे तपास पथकाने कोंढवा, हडपसरसह विविध भागांत शोधमोहीम राबवली. सासवडमधील आनंद वाईन्स येथे दारू खरेदीसाठी आलेल्या एका संशयित व्यक्तीवर पोलिसांची नजर पडली. चौकशीत त्याने आपले नाव सुरज प्रकाश बलराम निषाद सांगितले. त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने सखोल चौकशी केली असता, त्याने साथीदार नीरज गोस्वामी याच्यासह बोराडे यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर गोस्वामीलाही ताब्यात घेण्यात आले. दारूच्या नशेत झालेल्या वादानंतर त्यांनी हा खून केल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान नीरज गोस्वामीने काही आठवड्यांपूर्वीच जामखेड येथे पैशांच्या वादातून विकास मधुकर अंधारे (वय २२) याचा खून केल्याची धक्कादायक माहिती दिली. जामखेड येथील घटनेनंतर तो पुणे जिल्ह्यात कामाच्या शोधात आला होता आणि सासवडमध्ये दारूच्या वादानंतर त्याने दुसऱ्या खुनाची घटना घडवून आणली. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक निरीक्षक वैभव सोनवणे यांच्यासह पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
दिल्लीमधील ३,००० उद्योग कायम बंद करण्याचा सल्ला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्ली सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, यावर उपाय शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून सल्ले दिले जात आहेत. आता चीनने दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एक जालीम उपाय सुचवला आहे. चीनच्या मते, दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ३,००० अवजड उद्योग कायमचे बंद केले पाहिजेत किंवा ते शहराबाहेर स्थलांतरित केले पाहिजेत, असे चीनने सुचविले आहे. […] The post दिल्लीमधील ३,००० उद्योग कायम बंद करण्याचा सल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरगुती साखरेच्या वापरात २० लाख टनांनी घट!
पुणे : प्रतिनिधी देशांतर्गत घरगुती साखरेचा वापर कमी होत आहे. हा वापर २० लाख टनांनी घटला असून ही बाब साखर उद्योगाच्या दृष्टीने चिंतेची असल्याचे मत राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने साखरेची निर्यात तसेच इथेनॉलसाठी साखरेचा वापर वाढावा, या दृष्टीने धोरण ठरविण्यात यावे, अशी […] The post घरगुती साखरेच्या वापरात २० लाख टनांनी घट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशातील ११ विमानतळ अदानींच्या ताब्यात शक्य
मुंबई : वृत्तसंस्था भारतीय आकाशात आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने कंबर कसली आहे. केंद्र सरकार खासगीकरणाच्या पुढच्या टप्प्यात जे ११ नवीन विमानतळ भाडेतत्त्वावर देणार आहे, त्या सर्वांसाठी अदानी समूह आक्रमक बोली लावणार आहे. पुढील पाच वर्षांत विमानतळ विस्तारासाठी ११ अब्ज डॉलर्स (सुमारे ९२,००० कोटी रुपये) खर्च करण्याचे उद्दिष्ट समूहाने […] The post देशातील ११ विमानतळ अदानींच्या ताब्यात शक्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बांगला देश आता दुस-या पाकिस्तानच्या मार्गावर! थरूर समितीच्या अहवालात धोक्याचे संकेत
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगला देशातील सत्ताबदलानंतर निर्माण झालेली स्थिती आणि शेख हसीना यांनी भारतात आसरा घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संसदीय समितीने चिंता व्यक्त केली आहे. ही घटना साधी नाही. बांगला देश दुसरा पाकिस्तान बनण्याच्या मार्गावर असल्याचे सूक्ष्मपणे सूचित केले आहे. शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारांवरील संसदीय स्थायी समितीच्या अहवालात ही धोक्याची घंटा देण्यात आली आहे […] The post बांगला देश आता दुस-या पाकिस्तानच्या मार्गावर! थरूर समितीच्या अहवालात धोक्याचे संकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कर्नाटकी ‘पॉलिट्रिक्स’मध्ये ‘डिनर डिप्लोमसी’चा फंडा
बेळगाव : वृत्तसंस्था कर्नाटक काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरू आहे. सरकारमधील मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री गटात मुख्यमंत्री बदलावरून जोरदार राजकीय कवायती सुरू आहेत. दरम्यान, सिद्धारामय्या आणि डी.के. शिवकुमार यांची नेतृत्वबदलावरून दिल्ली वारी देखील झाली. हायकमांडच्या निर्देशानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ‘ब्रेकफास्ट डिप्लोमसी’ देखील रंगली. मात्र आता सिद्धारामय्या यांच्या जवळचे समजले जाणारे सतीश जारकीहोळी यांनी गुरूवारी रात्री […] The post कर्नाटकी ‘पॉलिट्रिक्स’मध्ये ‘डिनर डिप्लोमसी’चा फंडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संभाव्य युतीचे संकेत मिळत असतानाच, भाजपने यावर जोरदार प्रहार केला आहे. भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी या युतीचा उल्लेख 'दोन शून्यांची बेरीज' असा केला आहे. युतीचा नारळ फुटण्यापूर्वीच दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतील अशी सद्यस्थिती आहे, असा खोचक टोला लगावत शेलार यांनी या युतीच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीबाबत बोलताना आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण सन्मान दिला जात असून ते आमचेही नेते आहेत. आगामी निवडणुकीसाठी भाजप, शिंदे गट आणि आरपीआय यांची बैठक झाली असून आम्ही 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. जागावाटपाबाबत बोलताना, आवश्यकतेनुसार योग्य वेळी जागा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करताना विचारले की, ठाकरेजी, तुमचा महापौर नेमका कोणत्या मोहल्ल्यातून येणार आहे? त्यांनी ठाकरे गटातील अंतर्गत मतभेदांवरही बोट ठेवले. उद्धव ठाकरेंना मानणारा आणि आदित्य ठाकरेंना मानणारा गट आता वेगळा झाला आहे, या वास्तवावर उद्धव जी किती काळ पांघरुण घालणार? असा सवाल करत त्यांनी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाच्या अस्तित्वावरच शंका उपस्थित केली आहे. दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अधिकृत प्रसिद्धीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
मृत्यूच्या दाढेतून बाळाची सुखरूप सुटका:ॲसिडमुळे अन्ननलिका भाजलेल्या चिमुरड्यावर पुण्यात यशस्वी उपचार
साताऱ्यातील एका दोन वर्षांच्या बाळाने खेळता खेळता नजरचुकीने ॲसिटिक ॲसिड गिळल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनमधील डॉक्टरांच्या टीमने यशस्वी उपचार करून या बाळाचा जीव वाचवला. ही घटना बालदिनाच्या दिवशी घडली. बाळाने पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत ठेवलेले ॲसिड गिळले होते. यामुळे त्याचे ओठ, तोंड, अन्ननलिका, छाती, जननेंद्रिय आणि जांघा गंभीर भाजल्या होत्या. ॲसिड गिळल्यानंतर बाळाला तात्काळ साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉ. घोरपडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलशी संपर्क साधला. डॉ. मिलिंद जंबगी यांच्या नेतृत्वाखालील टीमने विशेष रुग्णवाहिकेत व्हेंटिलेटर सपोर्टवर बाळाला सुरक्षितपणे पुण्यात आणले. अंकुरा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर करण्यात आलेल्या एंडोस्कोपिक तपासणीत बाळाच्या अन्ननलिकेला गंभीर इजा झाल्याचे समोर आले. बालरोग अतिदक्षता विभागात त्याला २४ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. व्हेंटिलेटर सपोर्ट, विशेष ड्रेसिंग आणि औषधोपचार करून श्वसनमार्गातील अडथळा आणि संसर्ग टाळण्यात डॉक्टरांना यश आले. डॉ. मिलिंद जंबगी यांनी सांगितले की, ॲसिड सेवन जीवघेणे ठरू शकते. या बाळाच्या बाबतीत, आम्हाला एकाच वेळी श्वसनमार्गातील जखमा व अडथळा, अन्ननलिकेला झालेली इजा आणि इतर बाह्य जखमा या तिन्ही समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही श्वसन, पोषण आणि जखमा भरून काढण्यावर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला नळीद्वारे, नंतर तोंडावाटे आहार दिला. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत बाळ व्हेंटिलेटरमुक्त झाले आणि त्याच्या जखमा भरू लागल्या. एका आठवड्यात बाळाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. डॉक्टरांनी पालकांना आवाहन केले आहे की, घरातील रसायने, ॲसिडयुक्त पदार्थ आणि औषधे मुलांच्या हाती लागणार नाहीत अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावीत.
पुण्यात शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात फसवले आहे. गेल्या काही महिन्यांत अशा १० वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण २ कोटी ४५ लाख ११ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये अज्ञात मोबाईल धारक आणि बँक खातेदारांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत. खराडी येथील ५८ वर्षीय नोकरदार विभु माणिकलाल नाग यांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ३८ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १५ जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान घडला असून, याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंदननगर परिसरातील ३३ वर्षीय सत्यतित महाकुट यांना शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाने ५ लाख ५१ हजार रुपयांना फसवले गेले. चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. ७९ वर्षीय वृद्ध नागरिक अवतार सिंग यांना १७ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार ७ जुलै ते १ ऑक्टोबर दरम्यान घडला. हडपसरमध्ये एका व्यक्तीला ३४ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याच परिसरात यासिन सय्यद यांना १९ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक झाली. यासिन यांच्या प्रकरणात १५ सप्टेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान हा घोटाळा घडला असून, काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोंढवा येथील ४९ वर्षीय प्रशांत श्रीकांत गंभीर यांना शेअर ट्रेडिंगच्या नावाने २८ लाख २० हजार रुपयांना गंडा घातला गेला. हा प्रकार ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात घडला. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन प्रकरणे नोंदवली आहेत. ३६ वर्षीय अभिनंदन मधुकर जाधव यांना ६ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाली, तर ३७ वर्षीय सागर सदाशिव गायकवाड यांना ३० टक्के नफ्याच्या आमिषाने १० लाख ३३ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. ज्येष्ठ नागरिक ६७ वर्षीय बाळकृष्ण विनायक थिटे यांना इंटरनॅशनल शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा मिळेल असे सांगून ३१ लाख ९७ हजार रुपयांना फसवले गेले. उत्थमनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल आहे. शेवटची घटना आयपीओ खरेदीच्या नावाने घडली, ज्यात ३३ वर्षीय सोनू भारत भिडवे यांना ५२ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक झाली. ही तक्रार सायबर पोलीस ठाण्यात नोंदवली गेली आहे. पुणे शहरात शेअर मार्केट संबंधित सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या लिंक्स किंवा ॲप्सवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांनी सांगितले आहे.
महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीवर ठाम:एकमत न झाल्यासच पर्यायी वाटचाल: शशिकांत शिंदे
आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका ठाम आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस यांच्यात एकमत न झाल्यासच दुसऱ्या पर्यायाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले. सध्या तरी महाविकास आघाडी हाच पहिला आणि प्राधान्याचा पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेससोबत एक-दोन फेऱ्यांच्या प्राथमिक चर्चा झाल्या आहेत. या चर्चांमध्ये सकारात्मक वातावरण असले तरी अंतिम धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावरच घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष, स्थानिक प्रतिनिधी आणि कोअर कमिटीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. “स्थानिक पातळीवर वातावरण अनुकूल असले तरी आघाडीचा अंतिम निर्णय हा राज्यस्तरीय नेतृत्वाकडूनच घेतला जाईल,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. याच संदर्भात काल खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन शिवसेनेची भूमिका मांडल्याचेही त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत एकमताने निर्णय घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष आणि कोअर कमिटीला याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, शनिवारच्या संध्याकाळपर्यंत शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडीच्या शक्यता, जागावाटप आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्या अहवालाच्या आधारे पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे ठामपणे सांगताना शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडी हाच आमचा पहिला आणि प्राधान्याचा पर्याय आहे. मात्र, जर आघाडीमध्ये एकमत झाले नाही, तरच दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागेल.” राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते. त्यामुळे आघाडी टिकवण्यासाठी शरद पवार प्रयत्नशील आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत दोन मतप्रवाह असल्याचेही त्यांनी मान्य केले. काहींचे मत आहे की प्रभागरचना आणि वार्डनिहाय परिस्थिती लक्षात घेऊन योग्य निर्णय न घेतल्यास पर्यायी मार्गाचा विचार करावा लागेल, तर दुसरा प्रवाह महाविकास आघाडीबरोबरच ठामपणे राहण्याचा आहे. आजची जिल्हास्तरीय बैठक ही या विविध मतप्रवाहांची भूमिका समजून घेऊन वरिष्ठ पातळीवर मांडण्यासाठी होती, असेही शिंदे यांनी सांगितले.
येरवडा कारागृहात कैद्यांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू:दोन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
येरवडा कारागृहात कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका कैद्याचा शुक्रवारी (१९ मे) ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत कैद्याचे नाव विशाल नागनाथ कांबळे (वय २६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे आहे. आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जयजवान नगर, येरवडा) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) या दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे, चंडालिया आणि रेड्डी हे तिघेही पोलीस दप्तरी नोंद असलेले गुन्हेगार आहेत. कांबळे २०१९ पासून एका खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता, तर चंडालिया एका खुनाच्या गुन्ह्यात आणि रेड्डी खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. स्थानिक वर्चस्वाच्या वादातून चंडालिया आणि कांबळे यांच्यात जुने वैमनस्य होते. कारागृहातही त्यांच्यात अनेकदा भांडणे झाली होती. त्यामुळे, चंडालियाने कांबळेचा काटा काढण्याचा कट रचला होता. शुक्रवारी सकाळी कारागृहातील बराक उघडल्यानंतर कैदी बाहेर आले. मात्र, कांबळे पुन्हा आत जाऊन झोपला. त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या चंडालिया आणि रेड्डी यांनी तो झोपेत असतानाच त्याच्यावर हल्ला चढवला. त्यांनी कांबळेच्या डोक्यात आणि कमरेवर अणकुचीदार फरशीच्या तुकड्याने वार केले. या प्रकारामुळे अन्य कैदी घाबरून पळाले. घटनेची माहिती मिळताच कारागृह रक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना कारागृहातून अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
राज्याची सुरक्षा यंत्रणा आणि कारागृह प्रशासनासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाच्या कडक बंदोबस्ताला सुरुंग लावत आतमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी झाल्याचे उघड झाले आहे. कारागृहातील मंडल क्रमांक 7 मध्ये कैद्यांकडून सुमारे 1 लाख 7 हजार 800 रुपये किमतीचे अमली पदार्थ आणि अमली पदार्थ सेवनासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या गंभीर घटनेमुळे नाशिक रोड पोलिस ठाण्यात 18 डिसेंबर रोजी दोन कैद्यांसह एका अज्ञात इसमाविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. घटनेचा तपशील असा की, 10 डिसेंबर रोजी सकाळी 9:40 च्या सुमारास कारागृह प्रशासनाकडून नियमित तपासणी सुरू होती. यावेळी मंडल क्रमांक 7 मधील यार्ड क्रमांक 1 आणि 4 मध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. तपासणी पथकाने जेव्हा बंदी दिलीप कचरू सोळुंके याची बारकाईने झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे असलेला अमली पदार्थांचा साठा पाहून अधिकारीही अवाक झाले. त्याच्याकडे 104 ग्रॅम चरस, 31.5 मिलीग्रॅम गांजा सदृश पदार्थ, 4 मिलीग्रॅम एम.डी. आणि अमली पदार्थांच्या सेवनासाठी लागणारे 15 रोलिंग पेपर असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, न्यायालयीन कोठडीत असलेल्या स्वप्नील दिनेश उनवणे याच्या सांगण्यावरून एका बाहेरील अज्ञात व्यक्तीने हे अमली पदार्थ अत्यंत बेकायदेशीर मार्गाने कारागृहाच्या आत पोहोचवले होते. कारागृहाच्या तटबंदी आणि चोख पहारा भेदून हे अमली पदार्थ आतमध्ये आलेच कसे, हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याप्रकरणी कारागृह हवालदार सुनील सोमा रोकडे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या तस्करीच्या मागे कारागृहातील अंतर्गत कोणाचे संगनमत आहे का? किंवा बाहेरून हे पदार्थ भिंतीवरून फेकले गेले की कच्च्या कैद्यांच्या माध्यमातून आत आले? याचा सखोल तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे नाशिक रोड कारागृहातील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले असून, वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
62 वर्षीय नागरिक हनीट्रॅपमध्ये अडकले:खंडणी उकळणारी टोळी अटकेत; 2 कोटींऐवजी 60 लाखांत ठरला सौदा
नागपूरमध्ये हनीट्रॅपद्वारे खंडणी उकळणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गुन्हे शाखा आणि घरफोडी विरोधी पथकाने कारवाई करत सात पुरुष आणि चार महिलांसह एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. एका ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला या टोळीने हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ६२ वर्षीय नागरिकाला या टोळीने लक्ष्य केले. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाचे खासगी चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. सुरुवातीला त्यांच्याकडून ऑनलाइन आणि रोख स्वरूपात १ लाख ७८ हजार रुपये उकळण्यात आले. त्यानंतर आरोपींनी थेट २ कोटी रुपयांची मागणी केली. अनेक वाटाघाटींनंतर अखेर ६० लाख रुपयांमध्ये हा सौदा निश्चित झाला होता. सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि घरफोडी विरोधी पथकाने १८ डिसेंबर रोजी एका हॉटेलमध्ये सापळा रचला. पोलिसांनी फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला ६० लाखांऐवजी ३ लाख रुपये घेऊन आरोपींना भेटण्यासाठी पाठवले. हॉटेलमध्ये अश्विन धनविजय, नितीन कांबळे आणि कुणाल पुरी यांनी फिर्यादीकडून ३ लाख रुपये स्वीकारले आणि उर्वरित ६० लाख रुपयांची मागणी करताच पोलिसांनी त्यांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी अश्विन विनोद धनविजय (वय ३९), नितीन सुखदेव कांबळे (वय ३८), कुणाल प्रकाश पुरी (वय ४२, सर्व अजनी), रितेश उर्फ पप्पू मनोहर दुरूगकर (वय ४१, नागपूर), आशिष मधुकर कावडे (वय ३६, गोंदिया), अविनाश हेमराज साखरे (वय ३५, गोंदिया), रविकांत कांबळे (नागपूर) यांच्यासह चार महिला आरोपींनाही अटक केली. आरोपींकडून एकूण १५०० रुपये रोख आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण १,५६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध कलम ३०८, (२), ६१ (२), ३ (५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी बौद्धिक संपदेचे (Intellectual Property - IP) संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी (MSME) आयपी आणि पेटंटची नोंदणी करावी, असे आवाहन केंद्र सरकारच्या MSME मंत्रालयाचे सहायक संचालक अभय दफ्तरदार यांनी केले. २०२१ ते २०२५ या कालावधीत एमएसएमई क्षेत्रातील बौद्धिक संपदा हक्क (IPR) नोंदणीमध्ये सुमारे ४० टक्के वाढ झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. 'एआयसी-पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम'तर्फे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित ही दोन दिवसीय यात्रा 'एआयसी-पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीप फोरम'ने आयोजित केली होती. या उद्घाटन सोहळ्याला एमएसएमई उद्योजक, स्टार्टअप्स, तंत्रज्ञान व्यावसायिक, कायदेविषयक तज्ज्ञ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला पेटंट्स अँड डिझाईन्स विभागाचे सहायक नियंत्रक प्रतिक हेंद्रे, आयपीआर तज्ज्ञ वेदांत पुजारी, मॅक्लियोड फार्माच्या मानसी पाध्ये, टाटा मोटर्सचे मोहम्मद फैजल, वरिष्ठ आयपी व्यावसायिक प्रियंका कुलकर्णी, एआयसी-पिनॅकल आंत्रप्रेन्युअरशीपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील धाडीवाल आणि व्यवस्थापक शादाब हुसेन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी तज्ज्ञांनी पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, औद्योगिक डिझाइन आणि उद्योगाभिमुख आयपी धोरणांवर मार्गदर्शन केले. दफ्तरदार यांनी नमूद केले की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) एमएसएमई क्षेत्राचा वाटा सुमारे ३० टक्के आहे, तर उत्पादन क्षेत्रात ४५ टक्के आणि निर्यातीत ३५ ते ४० टक्के योगदान आहे. या महत्त्वपूर्ण योगदानाच्या पार्श्वभूमीवर, नवोन्मेष, बौद्धिक संपदा संरक्षण आणि संशोधन-विकास यांच्या माध्यमातून एमएसएमईंना सक्षम करणे गरजेचे आहे. मंत्रालयाने एमएसएमईंना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आयपीविषयी जनजागृती, सुलभ नोंदणी प्रक्रिया आणि बौद्धिक संपदेच्या व्यापारीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे. ते पुढे म्हणाले की, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य महत्त्वाचे आहे. संशोधनातून निर्माण होणाऱ्या कल्पनांचे बाजाराभिमुख रूपांतर होणे आवश्यक आहे. बौद्धिक संपदा संरक्षणातूनच मूल्यनिर्मिती आणि उद्योगांची वाढ साध्य होऊ शकते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
डी.ई.एस. पुणे विद्यापीठाने जानेवारी २०२६ पासून दोन वर्षांचा पूर्णवेळ बी.एड. अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिक्षक-शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता, व्यावहारिक प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुखतेला प्राधान्य देण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या शिक्षक होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या घटत असली तरी, दर्जेदार शिक्षकांची मागणी अनेक संस्थांकडून सातत्याने होत आहे. ही तफावत लक्षात घेऊन आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करून विद्यापीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विकसित भारताच्या उभारणीत शिक्षण क्षेत्राचे मोठे योगदान असल्याने, नव्या आव्हानांचा वेध घेण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वतःच्या शाळांमध्ये (इयत्ता पहिली ते बारावी) प्रत्यक्ष सखोल सरावाची संधी मिळेल. चार सत्रांपैकी तीन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. या शाळांमधील अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांच्या छोट्या तुकड्यांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील. हा अभ्यासक्रम केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नसून, प्रत्यक्ष सराव, मानसिक क्षमता वर्धन, सामाजिक संवेदनशीलता, नागरिकता, मानवी हक्क व कर्तव्ये, पर्यावरण, लिंगसमता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रासमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करेल. स्वयंसेवी संस्थांबरोबर काम, सहभागी शिक्षण उपक्रम आणि त्यावर आधारित मूल्यमापन ही या अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील. यूजीसी आणि एनईपीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. या अभ्यासक्रमाचा कालावधी जानेवारी २०२६ ते जानेवारी २०२८ असा असेल. प्रवेशासाठी कोणत्याही पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याची बी.एड. प्रवेश परीक्षा किंवा विद्यापीठाची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. मागील वर्षी दिलेल्या प्रवेश परीक्षेचे गुण जानेवारी २०२६ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आणि संसाधने विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत. शिक्षण-शास्त्र विभाग हा विद्यापीठातील सहावा विभाग असेल. यापूर्वी अभियांत्रिकी, व्यवस्थापन, मानवता शास्त्र, डिझाइन व कला, तसेच विज्ञान व गणित हे विभाग कार्यरत आहेत. समाज अध्ययन आणि क्षमता संवर्धन केंद्र हा शिक्षण शास्त्र विभागाचा एक महत्त्वाचा आयाम असेल. या केंद्रातर्फे शिक्षण, सहकार, महिला आणि स्वयंसेवी संस्था अशा समाजाच्या विविध क्षेत्रांतील घटकांसाठी प्रशिक्षणाचे विविध अभ्यासक्रम राबवले जातील. संशोधन, प्रशिक्षण आणि प्रबोधन या त्रिसूत्रीद्वारे हे केंद्र संबंधित क्षेत्रातील धोरण निर्धारणालाही मदत करेल. या संपूर्ण उपक्रमाचे समन्वयन प्राध्यापक डॉ. दिशा राजाध्यक्षा यांनी केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या आणकी एका मंत्र्यावर राजीनाम्याची टांगती तलवार असल्याचा दावा केला आहे. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झाला. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहे. पण मुख्यमंत्री त्याच्यावर पांघरून घालत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे हा दुसरा मंत्री कोण? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटातील इनकमिंग वाढली आहे. आजही मुंबई व उपनगरासह छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा, डान्स बार, ड्रग्जचा व्यवहार आदी मुद्यांना स्पर्श करत सत्ताधारी महायुतीवर एकच हल्लाबोल केला. आज आपल्याकडे भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक येत आहेत. सध्या देशात आणि राज्यात जो काही अंदाधुंद कारभार चालला आहे, तो भयानक आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जे काही सुरू आहे, ते आपण पाहात आहात. मीडियामध्ये सखोलपणे गोष्टी येत नसल्या, तरी सत्य काही लपून राहत नाही. कालच एका मंत्र्याचा राजीनामा झाला आहे. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत. परंतु, मुख्यमंत्री त्यांना पांघरूण घालत आहेत, हे विचित्र आहे. एकनाथ शिंदेंवरही नाव न घेता निशाणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, तुम्ही ड्रग्जचा व्यवहार करणाऱ्यांना मत देणार का? अंमली पदार्थांचा धंदा करणाऱ्यांच्या हातात आपल्या मुलाबाळांचे आयुष्य देणार आहात का? राजकारणासाठी माणसे लागतात. पण ती माणसे कशी पाहिजेत? गुंड सुद्धा चालतील... ड्रग्जचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत. ... आणि ज्यांचे नाव याच्याशी जोडले जात आहे... तुमच्यापर्यंत बातमी आली ना. आता त्या भावालाही वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. अरे हे कोणते राज्य आहे? कुणासाठी राज्य आहे? याच्या आधी जे अधिवेशन झाले त्यावेळी विरोधकांनी डान्स बारचा विषय पुराव्यानिशी बाहेर काढला. सातारा ड्रग्ज प्रकरण पुराव्यानिशी बाहेर अवैध उत्खननाचे प्रकरण पुराव्यानिशी बाहेर काढले. आता सुद्धा हा जो काही ड्रग्जचा कारखाना आहे तो सुषमा ताईंनी कागदोपत्री पुराव्यानिशी जनतेसमोर आणला आहे. त्यानंतरही मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत. ते स्वतः गृहमंत्रीही आहेत. आ्ही अगदी केंद्रीय मंत्र्यांकडेही हे पुरावे व निवेदन देत आहोत. आता ते काय करतात ते बघायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, तुम्ही कोणत्याही जातीधर्माचे जातीधर्माचे असला तरी मी एक प्रश्न विचारतो. आपल्या महाराष्ट्राची मुले अंमली पदार्थांच्या आहारी जाणार असतील तरी देखील आपण त्यांना वाचवणाऱ्यांना आणि ते धंदे करणाऱ्यांना मत देणार आहोत का? आपल्या मुलाबाळांचे आयुष्य त्यांच्या हाती देणार आहोत का? हा ज्याचा त्याने विचार करायचा आहे.
सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील एका शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 45 किलो ड्रग्स साठा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे 145 कोटी रुपये आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. अमली पदार्थांच्या निर्मितीच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या जावळी तालुक्यातील 'हॉटेल तेज यश'मधून जेवण पुरवले जात असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित रिसॉर्ट हे कोयना धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या अत्यंत जवळ असून ते बेकायदेशीररित्या बांधण्यात आल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. ड्रग्स रॅकेट आणि सत्ताधारी कुटुंबाशी संबंधित हॉटेलचे नाव समोर आल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, आता केंद्रीय यंत्रणा यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार अरविंद सावंत यांनी पत्रात काय म्हटले? अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले असून या पत्रात ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सावरी गावात छापा टाकण्यात आला, जिथे एका दुर्गम भागात असलेले एक शेड आढळून आले आणि सुमारे 45 किलो एमडी अमली पदार्थ (अंदाजे 145 कोटी किमतीचे) जप्त करण्यात आले. या कारवाईत अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली. ही बाब आणखी गंभीर ठरते कारण हे शेड “तेज यश” नावाच्या रिसॉर्टपासून अवघ्या 1200 मीटर अंतरावर आहे. रिसॉर्टपासून थेट शेडपर्यंत रस्ता बांधण्यात आलेला असून, अशा प्रवेशमार्गामागील हेतूवर गंभीर प्रश्न निर्माण होतात, असे ते म्हणाले. तसेच संबंधित रिसॉर्ट कोयना धरणाच्या अत्यंत जवळ असल्याने ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आहे. प्रचलित नियमांनुसार मोठ्या जलसाठ्याच्या ठराविक अंतरात कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. अशा उल्लंघनाला परवानगी देणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका सखोल तपासणीस पात्र आहे, असा उल्लेख अरविंद सावंत यांनी पत्रात केला आहे. रिसॉर्टपासून थेट रस्ता का बांधण्यात आला? या पत्रात काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ साठवलेल्या ठिकाणी रिसॉर्टपासून थेट रस्ता का बांधण्यात आला? इतक्या मोठ्या प्रमाणावरील अमली पदार्थांची हालचाल असताना सातारा पोलिस यंत्रणेला याची माहिती कशी नव्हती? जर माहिती होती, तर राजकीय दबावामुळे कारवाई टाळण्यात आली का? असे सवाल या पत्रात अरविंद सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत एक लाखाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना फक्त दोन वर्षांची शिक्षा असल्याने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे कोर्टाने म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर उच्च […] The post माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे : प्रतिनिधी देशभरातील एकूण साखरेच्या उत्पादनाच्या तुलनेत बाजारपेठेतील मागणीच्या प्रमाणात घसरण होत असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना सांगितली.साखर उद्योगा समोरील विविध समस्या आणि आव्हाने लक्षात घेऊन आगामी दहा वर्षाचा रोड मॅप तयार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला […] The post साखरेच्या मागणीत घट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाण्याची टाकी फुटून ३ ठार; ८ जखमी
नागपूर : बुटीबोरी एमआयडीसी फेस २ येथील अवाडा सोलर प्लांटमध्ये आज सकाळच्या सुमारास भीषण दुर्घटना घडली. प्लांट परिसरातील पाण्याची मोठी टाकी अचानक फुटल्याने झालेल्या या अपघातात ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून ८ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा […] The post पाण्याची टाकी फुटून ३ ठार; ८ जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी परस्पर विरोधी लढणार आहेत. भाजपने आजवर केलेल्या कामाच्या जोरावर दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर या दोन महापालिकांमध्ये अजित पवार यांची साथ घेण्याची किंवा त्यांच्याशी युती करण्याची वेळ येणार नाही, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. […] The post निवडणुकीनंतर अजित पवारांशी युती नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी आपण हिंगोलीच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात चौफेर विकास करत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही भाजपला पसंती दिली, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी सोनिया व राहुल गांधी आजही आपल्यासाठी दैवत असल्याचेही स्पष्ट केले. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी काँग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षप्रवेशावर बोलणे टाळले. पण आज हिंगोलीत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपले मन मोकळे केले. त्या म्हणाल्या, मी फक्त हिंगोलीच्या विकासाच्या ध्यासापोटी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने मला दोनवेळा विधानपरिषदेची संधी दिली. त्यासाठी मी सोनिया गांधी व राहुल गांधी यांची आभारी आहे. हे दोघे आजही माझ्यासाठी दैवत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी आज आमचे आनंदाने स्वागत केले. त्यांचे आमच्या कुटुंबावर असणारे प्रेम पाहून मी भारावले. हिंगोलीचा विकास हाच आमचा एमकेव ध्यास आहे. काँग्रेसच्या आमदारकीवर पाणी का सोडले? यावेळी प्रज्ञा सातव यांना तुमच्या आमदारकीचा बराच मोठा कालावधी शिल्लक असताना तुम्ही त्यावर पाणी का सोडले? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, तुम्ही जिल्ह्यातील परिस्थिती पाहत असाल. आम्हाला विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे. शेतकऱ्यांच्या व सिंचनाच्या बाबतीतही विकास साधायचा आहे. आमचे बरेच कार्यकर्ते विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. देवाभाऊ राज्यभर चौफेर विकास करत आहेत. त्यांनी उभारलेल्या समृद्धी महामार्गामुळे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात मुंबईला पोहोचले. याच विकासाच्या कामात आम्हाला हातभार लावायचा आहे. सोनिया, राहुल गांधी माझे दैवत त्या म्हणाल्या, काँग्रेसने मला दोनवेळा विधानपरिषदेवर पाठवले. मी हे नाकारत नाही. मला सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यामुळे आमदारकी मिळाली. ते दोघेही माझ्यासाठी दैवत आहेत. राजीव सातव व रजनी सातव यांच्यासारखेच हे दोघेही माझ्या मनात कायम राहतील. ते माझे दैवत आहेत. मी भाजपमध्ये प्रवेश करताना देवेंद्र फडणवीस व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे कोणतीही मागणी केली नाही. मी स्वखुशीने या पक्षात आले. मी आता भाजप कार्यकर्ती म्हणून काम करणार आहे. सतेज पाटलांना विरोधीपक्षनेतेपद मिळू नये म्हणून भाजपच्या गळाला? सतेज पाटलांना विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून भाजपने मला गळाला लावले या चर्चेत तथ्य नाही. मला त्याविषयी काही माहितीही नाही. आत्ताच विधानपरिषदेचे अधिवेशन झाले. आमच्याकडे संख्याबळ असते तर याच अधिवेशनात विरोधी पक्षनेता दिसला असता, असे प्रज्ञा सातव म्हणाल्या.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात आज (शुक्रवारी, 19 डिसेंबर) दुपारी एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. येथील 'अवाडा' या सौर पॅनेल निर्मिती करणाऱ्या कंपनीत पाण्याचा टँक टॉवर अचानक कोसळल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अवाडा कंपनीमध्ये सध्या सौर पॅनेल निर्मिती आणि विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ज्या ठिकाणी हे काम सुरू होते, त्याच परिसरात पाण्याची एक मोठी टाकी उभी होती. शुक्रवारी दुपारी कामगार या टाकीच्या खालील भागात बांधकामात व्यस्त असताना अचानक हा अजस्त्र टॉवर कोसळला. टॉवरचा मोठा भाग आणि पाण्याचा प्रचंड दाब यामुळे तिथे काम करणाऱ्या मजुरांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. बचावकार्य आणि मदत घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 11 कामगारांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर सौर पॅनेल निर्मितीसारख्या मोठ्या प्रकल्पात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या होत्या का? हा टॉवर नेमका कशामुळे कोसळला? आणि बांधकामात काही तांत्रिक त्रुटी होत्या का? या दिशेने आता पोलिस तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे कंपनी परिसरातील कामगारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पानशेत धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वेल्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सद्दाम चांद व्हसुरे (वय ३०, रा. घुले कॉलनी, नांदेड सिटीजवळ, सिंहगड रस्ता) असे आहे. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम व्हसुरे आणि त्याचे मित्र रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे गेले होते. तेथून मोटारीने परत येत असताना, ते पानशेत धरण परिसरात थांबले. पानशेत धरणाच्या काठावर बसून भेळ खाल्ल्यानंतर सद्दाम धरणात पोहण्यासाठी उतरला. पोहत असताना त्याला अचानक दम लागला आणि तो पाण्यात बुडाला. त्याचे मित्र प्रकाश माळी, अनिल ओव्हाळ आणि राहुल गायकवाडे यांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. बेशुद्धावस्थेतील सद्दामला तातडीने वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते आणि हवालदार मोघे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, हवालदार एन. मोघे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी हिसकावली कात्रजमधील आंबेगाव परिसरात ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील ६० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे आंबेगाव परिसरात राहायला आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास ते जांभुळवाडी रस्त्यावर बसची वाट पाहत थांबले होते. दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. अंधारात चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
कारागिराने २१ लाखांचे चोरले दागिने:फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; पश्चिम बंगालचा कारागीर फरार
पुण्यात एका दागिने घडवणाऱ्या कारागिराने २१ लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि लगड चोरून पळ काढला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात कारागिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीचा दागिने घडवून देण्याचा व्यवसाय आहे. सराफ बाजारातील व्यावसायिक त्यांच्याकडे दागिने बनवण्यासाठी सोने देतात. या व्यावसायिकाकडे काम करणारा कारागीर मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. सराफ व्यावसायिकांनी दागिने घडवण्यासाठी दिलेली २१ लाख ६० हजार रुपयांची सोन्याची लगड आणि दागिने घेऊन हा कारागीर फरार झाला. कारागीर पसार झाल्याचे लक्षात येताच पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली. परसकरणा पोलिसठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिवराज हाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शहरात आणखी एका चोरीची घटना उघडकीस आली आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी तीन लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी स्वारगेट पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या बारामतीतील असून, त्या पतीसोबत कामासाठी पुण्यात आल्या होत्या. शिवाजीनगर भागातून त्या रिक्षाने स्वारगेट एसटी स्थानकाकडे जात असताना ही घटना घडली. महिलेने आपल्या पिशवीत एका डब्यात दागिने ठेवले होते. प्रवासादरम्यान त्यांच्या पिशवीतून दागिने चोरण्यात आले. स्वारगेट एसटी स्थानकावर रिक्षातून उतरल्यानंतर काही वेळाने त्यांनी पिशवी तपासली असता, दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत पुढील तपास स्वारगेट पोलिसकरत आहे.
पुणे येथे 'कॉईनेक्स पुणे २०२५' या दुर्मिळ नाण्यांच्या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रसिद्ध नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि नाशिकमधील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन न्यूमिस्मॅटीक स्टडीजचे संस्थापक डॉ. के.के. माहेश्वरी यांच्या हस्ते हे प्रदर्शन सुरू करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. माहेश्वरी यांनी सांगितले की, उत्सुकतेतून सुरू झालेला छंदाचा प्रवास संस्कृती जतनापर्यंत पोहोचतो. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स (आयसीएसआरआय) पुणेतर्फे आयोजित हे प्रदर्शन सोनल हॉल येथे २१ डिसेंबरपर्यंत पुणेकरांसाठी खुले राहणार आहे. या मोफत प्रदर्शनात दुर्मिळ नाण्यांचा संग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे. उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर जामखेडचे पोपटशेठ हळपावत, डॉ. दिलीप राजगोर, आयसीएसआरआय पुणेचे अध्यक्ष किशोर चांडक आणि इन्टॅक संस्थेचे अशोकसिंग ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमात यंदाचा जीवनगौरव पुरस्कार दिवंगत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. सत्येन वेलणकर यांनी त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. तसेच, मुंबईचे फारूख एस. तोडीवाला (तोडीवाला ऑक्शन), मुंबईचे डॉ. दिलीप राजगोर (राजगोर ऑक्शन) आणि जामखेडचे पोपटलाल हळपावत यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. फारूक तोडीवाला यांच्या वतीने मॅलकम तोडीवाला यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. दिलीप राजगोर, आशुतोष पाटील आणि मनीष मोरे यांच्या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. डॉ. के.के. माहेश्वरी यांनी पुढे सांगितले की, चार भिंतींच्या आत मिळणाऱ्या पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त छंदातून मिळणारे शिक्षण व्यक्तीला समृद्ध करते. आयसीएसआरआय पुणेच्या प्रोत्साहनामुळे संग्राहकांची संख्या वाढली असून, हा विषय केवळ छंद न राहता जागतिक स्तरावर विविध विक्रम प्रस्थापित करत आहे. नवीन पिढीही या क्षेत्रात उत्सुकता दाखवत असून, आयसीएसआरआय पुणेकडे सध्या ४७ लिम्का रेकॉर्ड होल्डर आणि दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहेत. इन्टॅक संस्थेचे अशोकसिंग ठाकूर यांनी यावेळी बोलताना नमूद केले की, नाण्यांच्या रूपात इतिहास आणि संस्कृतीचे जतन करणारा एक ज्ञानकोश इथे पाहायला मिळाला. खाद्य आणि वस्त्र यांसारख्या क्षेत्रातील आपली समृद्ध गौरवशाली परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत असून, तिचे जतन करणे आवश्यक आहे.
नवी मुंबई विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ म्हणून केला जात आहे. विमानतळाच्या कुंपनाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. त्यामुळे हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावत चालला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सपकाळ यांनी सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, नवी मुंबईच्या विकासासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या व त्यावेळी भूमीपुत्राच्या हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी दिर्घ लढा दिला. १२.५ टक्के योजना ही दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळेच शक्य झाली आहे. दि. बा. पाटील यांची आमदार व खासदार अशी प्रदिर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. नवी मुंबईत, जेएनपीटी, नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विकसित होत असताना भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त आहे. सरकारने जनभावनेचा आदर केलाच पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांचा कावा सर्वांना माहिती आहे. ‘फडणवीसांचा कावा ना कळे ब्रम्हदेवा’, असा आहे, असे सपकाळ म्हणाले. विमानतळाच्या भिंतींवर एनएम अक्षरे कोरली ते पुढे म्हणाले, नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ असा केला जात आहे. विमानतळाच्या कुंपनाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावत चालला आहे. अहमबादच्या क्रिकेट स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे दिले आहे, पण असा कोणताही कावेबाज पणा भाजपा वा देवेंद्र फडणवीस यांनी करु नये. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे, राज्यसभेतही ही मागणी लावून धरली जाईल. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. माणिकराव कोकाटे यांना अटक का नाही? माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा होऊन तीन दिवस झाले पण अद्याप त्यांची आमदारकी रद्द केली नाही व अटकही केलेली नाही. लिलावती रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे, आणि चोराच्या दिमतीला पोलीस ठेवले आहेत. शिक्षा ठोठावताच तात्काळ कावाई केली पाहिजे होती पण कारवाई ही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच केली जाते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. एमडी ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा कारखाना उघड झाला असून ज्या जागेत हा काळा धंदा सुरु होता ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे. हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती. भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा करुन पैसा मिळवला जात आहे. या सरकारला जनाची तर नाहीच पण मनाचीही नाही. एवढे सर्व उघड होऊनही एकनाथ शिंदे यांचा एमडी ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा प्रकार अत्यंत गंभीर असून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते आर सी. घरत, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील, राजाभाऊ ठाकूर, फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा यांच्यासह नवी मुंबई ठाणे रायगड परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
थेट परदेशी गुंतवणूकीसाठी ‘इनव्हेस्ट महाराष्ट्र’ संस्थेची स्थापना
मुंबई : राज्यात अधिकाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी ‘इनव्हेस्ट महाराष्ट्र’ या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेला ३ हजार कोटींचे भागभांडवल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच नव्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरणाच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलर्सची करतानाच २७ लाख कोटींची गुंतवणूक आणि ५० लाख रोजगार निर्मितीचे लक्ष […] The post थेट परदेशी गुंतवणूकीसाठी ‘इनव्हेस्ट महाराष्ट्र’ संस्थेची स्थापना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सातारा ड्रग्ज प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या क्लीनचिटवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. साताऱ्यात सरकारच्या आशीर्वादाने ड्रग्जचा धंदा सुरू होता. पण मुख्यमंत्री कोणत्याही तपासाशिवाय स्वतःच क्लीनचिट देत आहे. ते स्वतःच तपास अधिकारी झालेत की काय? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर होणारे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध दुरान्वयेही आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप चुकीचे व निषेधार्ह आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या या क्लीनचिटवर जोरदार हरकत घेतली आहे. तसेच या सरकारच्या मंत्र्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे डाग लागत असल्याचा आरोप केला आहे. सरकारचे भ्रष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण अंबादास दानवे म्हणाले, माणिकराव कोकाटेंचे अजून सदस्यत्व रद्द झाले नाही. त्यांनी जनतेच्या दबावामुळे मोठ्या मुश्किलीने आपला राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यांनी दिला. यामुळे हे सरकार भ्रष्टाचार करणाऱ्यांना, सदनिकांचे गैरव्यवहार करणाऱ्यांना अशा पद्धतीने संरक्षण देते की काय? अशी स्थिती आहे. या राज्याच्या मंत्र्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने डाग लागत आहेत. भ्रष्टाचाराचे डाग लागत आहेत. तिकडे संजय शिरसाट यांच्या व्हिट्स हॉटेल प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. इकडे माणिकराव कोकाटे यांना पोलिसांना अटक करावीच लागेल. अशा प्रकरणात एखाद्या सर्वसामान्य माणसाला शिक्षा झाली असती तर पोलिस त्यांना कोर्टातूनच घेऊन जात असतात. परंतु कोर्टाने शिक्षा ठोठावल्यानंतर 3-4 दिवस झाल्यानंतरही माणिकराव कोकाटेंवर कोणतीही कारवाई झाली नाही, असे दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे अन् संजय शिरसाट यांच्यावर निशाणा भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक असल्याची टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी यावेळी त्यांचाही समाचार घेतला. रावसाहेब दानवे यांची शेवटची निवडणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शेवटच्या निवडणुकीची चिंता करू नये, असे ते म्हणाले. या प्रकरणी त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, आमची शेवटची असेल किंवा पहिली निवडणूक असेल. तुमचे काय खरे आहे? तुम्ही कोणत्या पक्षात आहात? उद्या अमित शहा सांगतील तिथे तुम्हाला जावे लागेल. उद्या तुमच्या पक्षाचा व चिन्हाचा सुप्रीम कोर्टात प्रश्न आहे. तुमचा पक्षच राहतो की नाही प्रश्न आहे. निवडणुका तर खूप लांबचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री दुरान्वयेही संबंध नाही असे कसे काय म्हणू शकतात अंबादास दानवे यांनी सातारा ड्रग्ज प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शरसंधान साधले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकीकडे माणिकराव कोकाटेंना वाचवत आहेत. तर दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी पुराव्यानिशी सत्य घटना सांगितली आहे. त्यांनी या प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावाचा समावेश असल्याचे पुरावे दिलेत. असे असताना दुरान्वयेही संबंध नाही असे मुख्यमंत्री कसे काय म्हणू शकतात. ड्रग्ज आढळले त्या ठिकाणी सातारा पोलिस पोहोचत नाहीत, थेट मुंबई पोलिस पोहोचतात याचा अर्थ काय घ्यायचा? साताऱ्यात सरकारच्या आशीर्वादाने ड्रग्ज व्यवसाय अंबादास दानवे म्हणाले, साताऱ्याचे पोलिस या सर्व ड्रग्ज व्यवसायाला सपोर्ट करत होते. तिथे ड्रग्ज व्यवसाय सुरू होता. तिथपर्यंत जाण्यासाठी 75 लाखांचा रस्ता बांधण्यात आला. तिथे लोकवस्तीही नव्हती. आपल्याकडे लोकवस्तीला अजून रस्ते नाहीत. पाणंद रस्त्याला एक रुपया मिळत नाही. पण जिथे लोकच राहत नाहीत, तिथे 75 लाख रुपयांचा रस्ता का होतो? याचा अर्थ हा ड्रगचा व्यवसाय सरकारच्या आशीर्वादाने सुरू होता. एकनाथ शिंदे यांच्या गावाजवळचे हे गाव आहे. त्यात त्यांच्या बंधूंचे नाव आले आहे. मुख्यमंत्री कोणत्याही तपासाशिवाय स्वतःच क्लीनचिट देत आहेत. मागे त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिली. आता शिंदेंना दिली. मुख्यमंत्री स्वतः तपास अधिकारी झाले की काय? हा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
निलंबनाची घोषणा मागे घेण्याची महसूलमंत्री बावनकुळेंवर नामुष्की
छत्रपती संभाजीनगर : आरेरावीची एकेरी भाषा आणि नाहक केलेले निलंबन यामुळे महसूल कर्मचा-यांमध्ये निर्माण झालेला असंतोष दूर करण्यात बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. पालघर आणि मावळमधील प्रकरणात विधिमंडळात जाहीर केलेले निलंबन मागे घेण्यात येतील असे आश्वासन देत महसूल कर्मचारी संघटनेसमोर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माघार घेतली. त्यामुळे महसूल महासंघाकडून पुकारण्यात आलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात […] The post निलंबनाची घोषणा मागे घेण्याची महसूलमंत्री बावनकुळेंवर नामुष्की appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोकाटेंकडील खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे
मुंबई : माणिकराव कोकाटेंच्या खात्याची जबाबदारी आता कोणाकडे दिली जाणार? असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्याची जबाबदारी सध्या अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […] The post कोकाटेंकडील खात्याची जबाबदारी अजित पवारांकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारांची धावपळ
मुंबई : राज्याचे क्रिडामंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारला. त्यानंतर राज्यपालांकडूनही त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. सध्या कोकाटे यांची सगळी खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे कोकाटेंच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदाच्या जागेवर राष्ट्रवादीच्या इच्छुक आमदारांकडून फील्डिंग लावली जात असून त्यासाठी आमदारांची पळापळ सुरु झाली आहे. सुरुवातीला […] The post कोकाटेंच्या रिक्त मंत्रिपदासाठी इच्छूक आमदारांची धावपळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वात महत्त्वाची आणि श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेकडे सर्वच पक्षांची नजर आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी मुंबईत आपली ताकद वाढवली असून मुंबई महापालिकेवर आपल्याच पक्षाचा महापौर बसवण्याचा निर्धार या पक्षांनी केला आहे. यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्या भेट घेतली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यापासूनच ठाकरे बंधूंच्या भेटी-गाठी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच आता अनिल परब यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या भेटीत मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या घोषणेबाबत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. तसेच जागावाटप होत नाही, तोपर्यंत युतीची घोषणा नाही, असे ठरले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे युतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात- नितीन सरदेसाई अनिल परब यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेत युती संदर्भात चर्चा केल्यानंतर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे आणि त्या पद्धतीने सगळ्यांचे काम सुरू आहे. युती संदर्भात ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्यासाठी या भेटी-गाठी सुरू राहणारच. युती कधी जाहीर होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि राज ठाकरे तुम्हाला याबाबतीत माहिती देतील. तसेच चांगल्या वातावरणात ही चर्चा सुरू आहे एवढे मी सांगू शकतो, अशी प्रतिक्रिया सरदेसाई यांनी दिली आहे. दरम्यान, महायुतीमध्ये मुंबई महापालिकेवरून अंतर्गत वाद असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन्ही पक्षात जागावाटपावरून मतभेद आहेत. सध्या 77 जागांचा निर्णय बाकी असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तसेच दोन्ही पक्षात 130 जागांवर एकमत झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
उद्या वसमत पालिकेसाठी ७२ मतदान केंद्रावर मतदान:५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार
वसमत पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी शनिवारी ता. १९ एकूण ७२ मतदान केंद्रावर सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान घेतले जाणार असून सुमारे ५९ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वसमत नगर पालिकेच्या नगराध्यक्षपद व १५ प्रभागातील ३० नगरसेवक पदासाठी निवडणुक होत आहे. यासाठी शनिवारी ता. १९ वसमत शहरातील ७२ मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेसाठी ५०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार असून उर्वरीत कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहे. वसमत शहरातील संवेदनशील मतदान केंद्रावर वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या शिवाय इतर ठिकाणीही पोलिस बंदोबस्त राहणार आहे. तसेच राज्य राखीव दलाचे जवानही बंदोबस्तासाठी तैनात ठेवले जाणार आहे. वसमत शहरातील ७२ मतदान केंद्रावर एकूण ५९८५५ मतदार मतदान करणार असून यामध्ये ३०००२ पुरुष तर २९८५३ महिला मतदारांचा समावेश आहे. एका मतदाराला नगराध्यक्षपदासाठी एक तर दोन नगरसेवक पदासाठी दोन असे तीन मतदान करावे लागणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. तसेच दिव्यांग, वृध्द तसेच गरोदर महिला मतदारांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही. त्यांना थेट मतदान करता येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप व विरोधी बाकावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी एका कवितेद्वारे ठाकरे गटावर निशाणा साधला. त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनीही कवितेतूनच त्यांना आरसा दाखवला. या दोन्ही नेत्यांच्या कविता सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर चिखलफेक करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच मुंबई महापालिकेवरून भाजप व ठाकरे गटात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांत दररोज कलगीतुरा रंगत आहे. आजही मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. पण यावेळी त्यांनी चक्क कवितेतून उद्धव ठाकरे व त्यांच्या हिंदुत्त्वाचा समाचार घेतला. 'मारली लाथ काँग्रेसने जोराची, आता उभे राष्ट्रवादीच्या (शप) दारात पसरुन पदर, म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर', असे शेलार यांनी म्हटले आहे. खाली वाचा आशिष शेलारांची काव्यमय टीका स्वतः केलेली कामे दुर्बीण लावून स्वतःच शोधत आहेतघरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेतकरुन दाखवलं चे गाताय जर गाणे,पॉकेट बुक मध्ये कशाला लावली मग द्वेषाची पाने? अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषातथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा मारली लाथ काँग्रेसने जोराचीआता उभे राष्ट्रवादी(शप) च्या दारात पसरुन पदरम्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदरयांनी काय केले..सजवली याकूब मेमनची कबर ज्यांच्या जगण्यात उरला नाही भगवान राम काय करणार हे मुंबईकरांसाठी काम ? दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आशिष शेलारांना जशास तसे काव्यमय प्रत्युत्तर दिले आहे. दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत, उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. खाली वाचा अंबादास दानवेंची कविता दुसऱ्याच्या कामावर आयत्या रेघोट्या मारत आहेत,उद्योजकांच्या दलालीची दुकाने मुंबईत थाटत आहेत.. 'करून दाखवलं' या शब्दाने तुम्हाला लागलाय अंगार, ठाकरेंच्या भीतीपोटी करतायेत नकलीपणाचा शृंगार.. मुंबईचा पैसे उडवून तरी मुंबईकर मतांची आशा, राज्य कर्जबाजारी करणारे करताहेत मुंबई वाचवण्याची भाषा.. हिंदी भाषा लादणारे ओढून बसलेत मराठीची चादर, आता हे ढोंगी शिकवणार ठाकरेंना हिंदुत्वाचा गजर.. सिकंदर बख्त, आरिफ बेग ज्यांचे संस्थापक नेते, अधून मधून देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचे खाज त्यांना येते..
तपोवनातील वृक्ष तोडीवरून सरकारला नोटीस
नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आणखी २ वर्षांनी, २०२७ साली ‘सिंहस्थ कुंभमेळा’ होणार असून त्यासाठी साधूग्राम बनवण्यासाठी नाशिकच्या तपोवन येथील १८०० झाडांची कत्तल करण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून वृक्षतोडीविरोधात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, नाशिक महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरणाला नोटीस […] The post तपोवनातील वृक्ष तोडीवरून सरकारला नोटीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिंदेंचे नाव जाणीवपूर्वक गोवल्या जातेय
मुंबई : साता-यातील महाबळेश्वर परिसरात असणा-या सावरी गावात काही दिवसांपूर्वी १४५ कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता. ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे […] The post शिंदेंचे नाव जाणीवपूर्वक गोवल्या जातेय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, कडाक्याच्या थंडीने संपूर्ण परिसर गारठून गेला आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव सातपुड्यावर स्पष्टपणे जाणवत असून, थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी वातावरण अधिक थंड होत असल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी तापमान इतके घसरले आहे की, दवबिंदू थेट गोठत असल्याचे दृश्य प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे. सातपुड्यासारख्या भागात सहसा अशा प्रकारची तीव्र थंडी क्वचितच अनुभवास येते. सातपुडा पर्वतरांगांतील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये थंडीचा प्रकोप अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. पहाटे उघड्यावर असलेल्या शेतांमध्ये पिकांवर साचलेले दव पूर्णपणे गोठल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. सकाळी शिवारात पांढऱ्या थराने झाकलेली भाताची पेंढी, हिरव्या पिकांवर पसरलेले गोठलेले दवबिंदू पाहून नागरिकांनाही आश्चर्य वाटत आहे. काही ठिकाणी हे दृश्य जणू काही बर्फाची पातळ चादर पसरल्यासारखे भासत आहे. सातपुड्यात सहसा बर्फवृष्टी होत नसली तरी, सध्याची परिस्थिती नागरिकांसाठी अनपेक्षित आणि थक्क करणारी ठरत आहे. मोलगी परिसरातील डाब आणि वालंबा या भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका विशेषत्वाने जाणवत आहे. आज सकाळी भाताच्या पेंढ्यावर साचलेले दवबिंदू पूर्णतः गोठलेले आढळून आले. हिरव्या पिकांवर पांढऱ्या रंगाचा थर दिसत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. काही भागांत दव गोठल्यामुळे भाजीपाला आणि चाऱ्याच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आधीच हवामानाच्या अनिश्चिततेला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकरी पहाटे लवकर शेतात जाणे टाळत असून, दिवस उगवल्यानंतरच शेतीकाम सुरू करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तापमानातील या तीव्र घसरणीचा सर्वाधिक फटका आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीचा जोर अधिक असल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक गावांमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवलेल्या दिसून येत असून, लहान मुले, वृद्ध आणि महिलांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. जनावरेही थंडीमुळे कुडकुडताना दिसत असून, गोठ्यातील जनावरांसाठी अतिरिक्त चाऱ्याची आणि उबदार व्यवस्थेची गरज निर्माण झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी कामकाजाच्या वेळा बदलल्याचेही दिसून येत आहे, जेणेकरून पहाटेच्या तीव्र थंडीपासून बचाव करता येईल. नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत सातपुडा परिसरात थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. थंडीचा हा असामान्य अनुभव सातपुड्यातील लोकांसाठी नवीन असला, तरी यामुळे शेती, जनजीवन आणि आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये अनुभवली जात असलेली ही कडाक्याची थंडी येत्या काही दिवसांत आणखी वाढते की हळूहळू ओसरते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असून सहकारी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून या सुनावणीच्या वेळी युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपस्थित होते. बीड न्यायालयात आज सकाळी 11 वाजता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली असून, सरकारी पक्षाच्या वतीने वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सुरुवातीचा युक्तिवाद मांडला. मात्र त्यानंतर वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे वगळता इतर आरोपींनी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे कारण देत त्यांना या खटल्यातून बाजूला करावे, असा अर्ज न्यायालयात सादर केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद झाला. विष्णू चाटेचे सुरुवातीच्या दोन एफआयआरमध्ये नाव नाही तसेच या पूर्वी त्याच्यावर कोणता गुन्हा नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला. तर विष्णू चाटेकडून वारंवार आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणीची मागणी करण्यात आली असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला आहे. तसेच विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय असल्याचे सरकारी पक्षाकडून सांगण्यात आले आहे. आरोपी सुदर्शन घुले चक्कर येऊन पडला सुनावणीदरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. न्यायाधीशांनी अर्जाबाबत माहिती दिल्यानंतर, निकम यांनी आपले म्हणणे मांडत हा अर्ज फेटाळण्याची मागणी न्यायालयाकडे केली. याच दरम्यान, जेव्हा न्यायाधीशांनी सुदर्शन घुले या आरोपीचे नाव पुकारले, तेव्हा तो अचानक न्यायालयात चक्कर येऊन पडल्याने काही काळ गोंधळ उडाला. पुराव्यांच्या तांत्रिक मुद्द्यांवरून जोरदार युक्तिवाद दुसऱ्या बाजूला, पुराव्यांच्या तांत्रिक मुद्द्यांवरून आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. घटनेचे व्हिडिओ आरोपींना आधी दिले जावेत आणि त्यानंतरच आरोप निश्चिती केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. 'जे व्हिडिओ ट्रायल कोर्टात नाहीत, ते उच्च न्यायालयात दाखवून वातावरण भावनिक केले जाते' असा आक्षेपही आरोपींच्या वकिलांनी नोंदवला. यावर सरकारी पक्षाने आजच हे व्हिडिओ फाईल्स आरोपींच्या वकिलांना देण्याचे मान्य केले आहे. दरम्यान, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्हमधील डेटाबाबत अर्धा तास चाललेल्या चर्चेत, आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईलमधील डेटा लॅपटॉपमध्ये कॉपी करून मूळ डेटा डिलिट केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. या सर्व घडामोडींमुळे अद्याप या प्रकरणात आरोप निश्चिती होऊ शकलेली नाही.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरात आघाडी घेतली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शहरातील ८ विधानसभा मतदारसंघातून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे असलेला इच्छुक उमेदवारांचा हा कल जनतेच्या मनातील कौल स्पष्ट करणारा आहे अशी भावना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी स्वबळावर देखील निवडणूक लढण्यासाठी आम्ही सज्ज आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत आम्ही हात मिळवणी करणार नाही. भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर बकाल करण्याचे काम केले असून कोणताही ठोस विकास त्यांना करता आलेला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे हे शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांशी आज संवाद साधून त्यांची मते देखील जाणून घेणार आहेत असे यावेळी जगताप यांनी सांगितले आहे. आ.बापूसाहेब पठारे, माजी.खा. वंदना चव्हाण, माजी.आ. अशोकबापू पवार, माजी. आ. जयदेवराव गायकवाड, अंकुशअण्णा काकडे, रवींद्रअण्णा माळवदकर, भगवानराव साळुंखे, डॉ. सुनील जगताप, निलेश निकम, विशाल तांबे, काकासाहेब चव्हाण, अश्विनी कदम, स्वाती पोकळे, उदय महाले, पंडित कांबळे यांच्यासह शहरातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत आहेत.
ढाका : १२ डिसेंबर रोजी डोक्यात गोळी झाडून मारण्यात आलेले नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार उसळला आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे विरोधक नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हिंसाचार भडकला आहे. गुरुवारी रात्री उशिरा आंदोलकांनी देशातील सर्वात मोठे वृत्तपत्र डेली स्टार आणि प्रोथोम आलो यांच्या कार्यालयात जबरदस्तीने घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली. […] The post बांगलादेशात प्रचंड हिंसा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. आमच्याकडेही दादा आहेत. पण आम्ही बायकांच्या लफड्यात कधी पडत नाही. आम्ही थेट पुरुषांशी लढतो. फलटणमध्ये मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने यावे लागले. किती वाईट वेळ आहे, असे शिंदे गटाने म्हटले आहे. फलटण पालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी दुपारी जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्र पक्षांवर टीका करणे टाळले. पण त्यानंतर सायंकाळी उशिरा झालेल्या एका सभेत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा दाखला देत भाजपवर कडाडून हल्ला चढवला. आमच्याकडे पाण दादा आहेत. पण आम्ही बायकांच्या लफड्यात पडत नाही. आम्ही पुरुषांशी लढतो, असे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी कुणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख या प्रकरणी अडचणीत आलेल्या भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे. कुठल्या मुलीने, सुनेने आत्महत्या केल्याच्या गुन्ह्यात माझे कधी नाव आले नाही. फलटणमध्ये प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना बोलवावे लागले. मुख्यमंत्र्यांनाही नाईलाजाने यावे लागले. किती वाईट वेळ. आय लव्ह यू मुख्यमंत्री. मुख्यमंत्री आले म्हणून आम्ही पण चार जण आलो. चारजण कशासाठी असतात? असा सवाल तकर आम्ही खांदेकरी आहोत. राम बोलो भाई राम, बजा दिया काम, असेही गुलाबराव यावेळी बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मंत्री शंभूराज देसाईंचाही भाजपवर निशाणा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही यावेळी भाजपला सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, आम्ही शांत असलो तरी कुणी आरे केले तर त्याच्या दहा पट आवाजात कारे करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे. फलटणमध्ये काही झाले तर रामराजे तुम्ही नुसती हाक मारा. सगळ्या जिल्ह्यातील शिवसैनिक फलटणमध्ये आणू. शिवसेना कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा. पालकमंत्री दम देत नाही. मात्र, कुणी अंगावर आला तर पाठ दाखवून पळ काढणे, ही शिवसेनेची कार्यपद्धती नाही. दहा पावलं पुढे जाऊन चाल करण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, या सभेला रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष पदाचे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर व पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. हे ही वाचा... बड्या उद्योगपतीने फडणवीसांचा केला पंतप्रधान म्हणून उल्लेख:'स्लीप ऑफ टंग'ने स्वतः मुख्यमंत्रीही झाले आश्चर्यचकित; कुठे घडला प्रसंग? काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात नेतृत्व बदल होऊन भाजपचा एक मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला आहे. त्यातच एका बड्या उद्योगपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क पंतप्रधान म्हणून केला. त्यांनी बोलण्याच्या ओघात हे भाष्य केले असले तरी त्याची खमंग चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर
शहरातील दुचाकीधारकांना आता आपल्या वाहनाच्या देखभालीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. औरंगाबाद टू-व्हीलर मेकॅनिक संघटनेने आयोजित केलेल्या मराठवाडा विभागीय मेळाव्यात दुचाकी सर्व्हिसिंगचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २६ जानेवारीपासून शहरात दुचाकी सर्व्हिसिंगसाठी ३०० रुपयांऐवजी ४०० रुपये आकारले जाणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष सय्यद चाँद यांनी केली. तापडिया नाट्यमंदिरात पार पडलेल्या या मेळाव्यात मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतील सुमारे २२०० मेकॅनिक उपस्थित होते. या वेळी नागपूरचे अध्यक्ष निशिकांत पोहनकर यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार मेकॅनिक्सनी स्वतःला अपडेट करण्याचे आवाहन केले. आगामी काळात इलेक्ट्रिकल वाहनांच्या दुरुस्तीवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असून, तालुक्याच्या ठिकाणी विशेष ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा आणि मेकॅनिक्सचा ग्रुप इन्शुरन्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या मेळाव्यात घेण्यात आला. ४०० रुपयांत या सुविधा
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपची पहिली महत्त्वाची बैठक पार पडली असून, या बैठकीने स्थानिक राजकारणात मोठी हालचाल निर्माण केली आहे. महायुतीच्या तयारीसाठी ही बैठक निर्णायक मानली जात असताना, या चर्चेला शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना बोलावण्यात न आल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले. अनेकांनी याचा अर्थ अंतर्गत नाराजी, सत्तासमीकरणे किंवा जागावाटपातील मतभेद असा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या चर्चांवर आता स्वतः रवींद्र धंगेकर यांनी स्पष्ट भूमिका मांडून पडदा टाकला आहे. या घडामोडींच्या समांतर, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आपल्या निवासस्थानी भाजपच्या सर्व आमदारांसह शहर निवडणूक प्रमुखांची विशेष बैठक बोलावली. ही बैठक केवळ औपचारिक नसून, आगामी महापालिका निवडणुकीसाठीची रणनीती ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीला भाजपचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यांनी पुणे जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये महापालिका निवडणुकीची तयारी, प्रभागनिहाय स्थिती, कार्यकर्त्यांचे मनोबल, शिवसेनेसोबतची युती, जागावाटपाची दिशा आणि विजयासाठीची रणनिती यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मुंबईत नुकतीच युतीची बैठक पार पडल्यानंतर पुढील तीन ते चार दिवसांत जागावाटपाची प्राथमिक यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यामुळे पुण्याचे राजकारण तापले आहे. दरम्यान, पुण्यात झालेल्या महायुतीच्या बैठकीत रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण न दिल्याने विविध चर्चा रंगल्या. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा चार दशकांचा गड हादरवणारे नेते म्हणून धंगेकर यांचे नाव अजूनही पुण्यात प्रभावी मानले जाते. त्यामुळे त्यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले का, याबाबत अनेक राजकीय अंदाज बांधले गेले. मात्र, या चर्चांना उत्तर देताना रवींद्र धंगेकर यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार आहे, याबाबत कोणताही संभ्रम नाही. जरी मला त्या बैठकीसाठी बोलावण्यात आले नसले, तरी मी नाराज नाही. पक्षाचा जो आदेश असेल, तो मला मान्य आहे. शिवसेनेला पुण्यात किती जागा मिळणार, याबाबत आज आमची स्वतंत्र बैठक होत असून, त्यानंतर पुन्हा भाजपसोबत चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अंतर्गत नाराजीच्या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाल्याचे दिसते. आम्ही भाजपसाठी प्रचार करू आणि भाजपकडूनही तशीच अपेक्षा - धंगेकर धंगेकर यांनी यावेळी आणखी काही मुद्द्यांवरही भूमिका मांडली. मंत्री उदय सामंत काल रात्री पुण्यात आले होते आणि त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केल्याचे धंगेकर यांनी सांगितले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेनेला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, तसेच कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुरलीधर मोहोळ यांच्यावर आपली कोणतीही नाराजी नसून, जैन हॉस्टेलच्या जागेचा प्रश्न सुटला आहे आणि तो विषय तिथेच संपला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही भाजपसाठी प्रचार करू आणि भाजपकडूनही तशीच अपेक्षा आहे, असे सांगत त्यांनी युतीतील समन्वयावर भर दिला. निवडणूक पक्षीय ताकदीची नव्हे, तर युतीतील समन्वयाचीही कसोटी एकूणच, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणूक लढवणार, हे स्पष्ट असले तरी जागावाटप, स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांचे संतुलन हे मोठे आव्हान ठरणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या डिनर डिप्लोमसी पासून ते रवींद्र धंगेकर यांच्या संयत भूमिकेपर्यंत, सर्व घडामोडी एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, पुण्यातील निवडणूक ही केवळ पक्षीय ताकदीची नव्हे, तर युतीतील समन्वयाचीही कसोटी ठरणार आहे. पुढील काही दिवसांत जागावाटप स्पष्ट झाल्यानंतरच या राजकीय गणिताचे खरे चित्र समोर येणार असून, पुण्याच्या राजकारणात आणखी कोणते वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात नेतृत्व बदल होऊन भाजपचा एक मराठी माणूस पंतप्रधान होईल असा दावा केला आहे. त्यातच एका बड्या उद्योगपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख चक्क पंतप्रधान म्हणून केला. त्यांनी बोलण्याच्या ओघात हे भाष्य केले असले तरी त्याची खमंग चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईत आज जागतिक हिंदू आर्थिक फोरमची वार्षिक परिषद झाली. या परिषदेत बोलताना उद्योगपती सज्जन जिंदाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख पंतप्रधान म्हणून केला. त्यांनी भाषणाच्या ओघात फडणवीसांचा उल्लेख पंतप्रधान असा केला. पण गडबड लक्षात येताच त्यांनी सॉरी म्हणत आपली चूक दुरुस्त केली. ते म्हणाले, पंतप्रधान मला बोलले, आपल्याला 500 दशलक्ष टन स्टीलची निर्मिती करायची आहे. आपल्याला 300 दशलक्ष टनांवर थांबायचे नाही. आपण चीनहून कमी नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीत स्वावलंबी व्हायचे आहे. तोंडातून निघालेला शब्द खरा ठरो आपल्याला जगासाठी स्टीलची निर्मिती करायची आहे. देशांतर्गत उत्पादन वाढवायचे आहे. मी तुमचा फार वेळ घेणार नाही. कारण, आज आपण पंतप्रधानांना ऐकण्यास आलो आहोत, असे जिंदाल म्हणाले. पण बोलण्याच्या ओघात आपली जीभ घसरल्याचे लक्षात येताच त्यांनी पंतप्रधान शब्द वगळून मुख्यमंत्र्यांना ऐकायला आलोय, असे स्पष्ट केले. माझ्या तोंडातून चुकीने शब्द निघाला, पण एक दिवस ते पंतप्रधान होतील. आपल्या हिंदू संस्कृतीत असे म्हटले जाते की, एखादा शब्द तोंडातून निघाला असेल तर ते प्रत्यक्षातही घडते. आपल्या जीभेवर सरस्वती विराजमान असते, असे जिंदाल म्हणाले. निव्वळ योगायोग की खरेच काहीतरी घडतंय उल्लेखनीय बाब म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांनी देशातील नेतृत्व बदलाविषयी केलेले विधान आणि त्यानंतर सज्जन जिंदाल यांच्या तोंडातून पंतप्रधान म्हणून झालेला देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हा केवळ योगायोग आहे की, इतर काही घटना घडणार आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होणार? अशी चर्चा रंगते तेव्हा प्रामुख्याने फडणवीसांचे नाव घेतले जाते. फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेत. ते नागपूरचे आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात मधील अडीच वर्षे सोडली भाजपची सलग तिसऱ्यांदा सत्ता आली. ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. त्यामुळे त्यांचे नाव अमित शहा व योगी आदित्यनाथ यांना मागे टाकून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी आले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण? 19 डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल. ती व्यक्ती भाजपचीच असू शकते, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. त्यांनी यासाठी अमेरिकेत सार्वजनिक होणाऱ्या एपस्टीन फाईल्सचा दाखला दिला होता. या फाईल्स आज सार्वजनिक होणार आहेत. त्यात काही भारतीय नेत्यांची नावे येण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारताच्या केंद्र सरकारमध्ये मोठा हल्लकल्लोळ माजण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची उघडकीस आले आहे. हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. घराच्या वाटणीच्या वादातून हा भयंकर प्रकार घडला असून हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलिस ठाणे गाठत आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने हुपरी शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजयमाला नारायण भोसले (70) आणि नारायण गणपतराव भोसले (78, रा. महावीर नगर, अल्फालाइन गल्ली, हुपरी) या दाम्पत्याचा जन्मदात्या मुलाने अत्यंत थंड डोक्याने व अत्यंत निर्घृणपणे खून केला आहे. या दुहेरी हत्ये प्रकरणी त्यांचा मुलगा आरोपी सुनील नारायण भोसले (48) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पहाटेच्या सुमारास केली हत्या या घटनेसंदर्भात हुपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील भोसले गेल्या काही महिन्यांपासून घरवाटणीच्या मागणीवरून आई-वडिलांशी सतत वाद घालत होता. तसेच घराच्या वाटणीला आई-वडिलांनी विरोध केला होता. आई वडिलांनी घराची वाटणी नाकारल्याने वैतागलेल्या सुनीलने शुक्रवारी पहाटे साधारण साडेपाचच्या सुमारास आपल्या आई वडिलांची हत्या केली. आईच्या हाताची नस कापली पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात असे दिसून आले की, पहाटेच्या सुमारास सुनीलने झोपलेल्या वडिलांच्या डोक्यावर आधी काठीने वार केला त्यानंतर दगडाने जोरदार प्रहार केला. त्यानंतर खिडकीची काच फोडून त्यांच्या हाताची नस कापली. या हल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तेवढ्यात घरात प्रवेश करत असलेल्या आई विजयमाला यांच्या डोक्यातही काचेच्या तुकड्याने घाव घातला तसेच आईच्याही हाताची नस कापली. त्यामुळे त्यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सुनील थंड डोक्याने घराच्या बाहेर आला आणि त्यानंतर त्याने हुपरी पोलिस ठाणे गाठले. इथे त्याने पोलिसांसमोर आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुनील भोसलेची सखोल चौकशी सुरू पोलिस निरीक्षक एन.आर. चौखंड, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक विभागाच्या तज्ञांनी घटनास्थळी पोहोचून ठसे, शस्त्र, रक्ताचे नमुने आणि काचेचे तुकडे व इतर पुरावे संकलित केले. दोघांच्याही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच सुनील भोसलेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून त्याने हत्या नेमकी कशी केली तसेच त्यामागे कोणते कौटुंबिक व सामाजिक कारण होते का, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, भोसले कुटुंब हे येथील परिसरात सर्वसामान्य आणि शांत स्वभावाचे कुटुंब म्हणून ओळखले जात होते. या दाम्पत्याला तीन आपत्ये असून थोरला मुलगा चंद्रकांत आणि संजय हे सराफी व्यवसायात कार्यरत असून दोघेही बाहेरगावी वास्तव्यास आहेत. आरोपी सुनील विवाहित असून त्याला मुलगा आणि मुलगी आहेत. पत्नीशी मतभेद असल्याने गेल्या काही वर्षांपासून तो आई-वडिलांसोबत राहत होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होणारे आरोप जोरकसपणे फेटाळून लावलेत. प्रस्तुत प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा कोणताही संबंध दुरान्वयेही आढळला नाही. त्यामुळे त्यांच्यावर होणारे आरोप चुकीचे व निषेधार्ह आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंना क्लीनचिट देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. न्यायव्यवस्थेचा आदर राखा, कोण चूक कोण बरोबर ठरवू नका, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सर्वप्रथम मी पोलिस विभागाचे अभिनंदन करतो. त्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेल्या धंद्याचा पर्दाफाश केला. त्याच्यावर मोठी कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणात जाणिवपूर्वक राजकीयदृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो चुकीचा आहे. तो निषेधार्ह आहे. या प्रकरणात आतापर्यंत हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये त्यांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणताही संबंध दुरान्वयेही आला नाही. त्यामुळे मला असे वाटते की, कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीने संबंध जोडणे योग्य नाही. यासंदर्भात सरकार पूर्ण चौकशी करत आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुंबई महापालिकेतील शिवसेना - भाजप युतीचे जागावाटप योग्यपणे सुरू असल्याचेही स्पष्ट केले. महायुतीचे जागावाटप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आमचे दोन्हीकडले नेते नीट महायुतीचे जागावाटप करत आहेत. हे जागावाटप 2 दिवसांत पूर्ण होईल असे वाटते, असे ते म्हणाले. न्यायव्यवस्थेचा आदर राखा, कोण चूक कोण बरोबर ठरवू नका - सुषमा अंधारे दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदेंना क्लीनचिट देण्याच्या मुद्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्या म्हणाल्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी आज माध्यमांना बोलताना उपमुख्यमंत्र्यांना क्लीन चीट देण्याचा पुन्हा एकदा धाडसी प्रयत्न केला आहे. ( आपल्याला त्यांची खरेच किती काळजी आहे हे मी पुन्हा कधीतरी स्पष्ट करेल). तूर्तास माझी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, कृपया न्यायव्यवस्थेचा आदर राखा. कोण चूक कोण बरोबर हे ठरवण्याचा अधिकार आपला नाही, तो न्यायव्यवस्थेचा आहे. अशा पद्धतीची वक्तव्य करून आपण तपास यंत्रणा प्रभावित करत आहात. शिंदे गुन्हेगार हे कुठेही म्हणाले नाही सुषमा अंधारे म्हणाल्या, एकनाथ शिंदे हे गुन्हेगार आहेत असे माझे वक्तव्य कुठेही नाही. मात्र प्रकाश शिंदे याची चौकशी झाली पाहिजे यावर मी आजही ठाम आहे आणि प्रकाश शिंदे यांची चौकशी राजकीय शक्तींनी प्रभावित करू नये यासाठी त्यांचे सख्खे भाऊ म्हणून एकनाथ शिंदे यांनी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहावे. त्यांचे भाऊ निर्दोष झाल्यानंतर त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री काय अगदी मुख्यमंत्री सुद्धा व्हावे. अभिनंदनचा पुष्पगुच्छ घेऊन मी स्वतः येईल. पण मुख्यमंत्र्यांनी जरा गांभीर्याने विचार करावा. जात धर्म आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी महाराष्ट्रातल्या १४ कोटी जनतेच्या भविष्यासाठी लढत आहे कृपया आपण माझा लढा Demoralise करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे या प्रकरणी आज पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
संसदेच्या दोन्ही सभागृहात ‘व्हीबी-जी राम जी विधेयक’ मंजूर
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. अधिवेशनाची सुरुवात १ डिसेंबर रोजी झाली होती. यादरम्यान अधिवेशनात वंदे मातरम, निवडणूक सुधारणांसारख्या मुद्यांवर चर्चा झाली. यापूर्वी शुक्रवारी रात्री १२.३० वाजता राज्यसभेतूनही ‘व्हीबी-जी राम जी विधेयक’ मंजूर झाले. विरोधी खासदारांनी जोरदार गोंधळ घातला आणि विधेयक मंजूर होण्यापूर्वी खासदार राज्यसभेतून सभात्याग करून गेले. विपक्षाची मागणी […] The post संसदेच्या दोन्ही सभागृहात ‘व्हीबी-जी राम जी विधेयक’ मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ऑपरेशन सिंदूरमध्ये पहिल्याच दिवशी भारताचा पराभव झाल्याचा दावा करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचा व्हिडिओ पाकिस्तानी माध्यमांनी उचलून धरला आहे. त्यात चव्हाणांच्या दाव्याची री ओढत पाकने भारताला अर्ध्या तासातच पाणी पाजल्याचा दावा केला जात आहे. भाजपने पाक माध्यमांचा हा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते बोलतात पाकिस्तानची भाषा आणि काँग्रेसला पाकच्या मदतीची आशा, असे भाजपने म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यात त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकने भारताचा पराभव केल्याचा धक्कादायक दावा केला होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानामुळे राज्यासह देशात एकच खळबळ माजली होती. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. विशेषतः भाजप नेत्यांनी त्यांच्या माफीची मागणी केली होती. पण त्यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी माध्यमांत त्यांच्या या दाव्याची चर्चा सुरू झाली आहे. काय म्हणाले भाजप प्रवक्ते? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी चव्हाणांच्या विधानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात एक पाकिस्तानी वृत्तवाहिनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाचा दाखला देत पाकने भारताला अर्ध्या तासाच्या लढाईतच पाणी पाजल्याचा दावा करताना दिसून येत आहे. उपाध्ये यांनी या व्हिडिओवर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, काँग्रेस नेते बोलतात पाकिस्तानचीच भाषा, पाकिस्तानच्या मदतीची कॉंग्रेस नेत्यांना आशा. मणिशंकर अय्यर, राहुल गांधी यांच्यापासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंतपाकिस्तानला दिलासा देणारी विधाने हीच काँग्रेसची ओळख बनली आहे. ताजं आणि धक्कादायक उदाहरण: पृथ्वीराज चव्हाण यांचं. “भारत OperationSindoor पहिल्या दिवशी हरला” हे वक्तव्य पाकिस्तानच्या मीडियात साजरं केलं जात आहे. सोबतची व्हीडीओ क्लीप पाहा. वास्ताविकतः भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी OperationSindoor मध्ये पाकिस्तानला झालेल्या नुकसानाचा तपशील सांगितला आहे. त्यांच्या मते, भारताच्या हल्ल्यात पाकचे एकूण 4 ठिकाणचे रडार नष्ट झाले, 2 कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, 2 हवाई तळांवरील धावपट्ट्या, तीन वेगवेगळ्या स्टेशन्सवरील 3 हॅन्गर्सचे नुकसान, एक C-130 क्लासचे विमान नष्ट, 4-5 लढाऊ विमाने, बहुधा F-16 विमानांचे नुकसान, एक लांब पल्ल्याचे विमान (AEWC किंवा SIGINT) 300 किमी पलीकडील हल्ल्यात नष्ट, 5 अत्याधुनिक लढाऊ विमाने (F-16 किंवा JF-17 क्लास) नष्ट, 1 सरफेस टू एअर मिसाईल (SAM) प्रणाली नष्ट झाली. पण भारत जिंकत असताना, कॉंग्रेसला पराभवच का दिसतो? कारण त्यांचा विश्वास ️भारतीय सैन्यावर नाही, भारतीय अधिकाऱ्यांवर नाही, सत्यावर नाही. त्यांचा विश्वास आहे, पाकिस्तानच्या कथनावर. देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांपेक्षा शत्रूच्या प्रचाराला जास्त वजन देणं हे फक्त राजकारण नाही, ही धोकादायक मानसिकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. पण या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 मे रोजी अर्ध्या तासातच आपली काही विमाने पाडण्यात आली. हे लोकांनी मान्य करो किंवा न करो, पण हेच सत्य आहे. पाकने भारताचा पाडाव केला हेच खरे आहे. पहिल्या दिवशी भारताची विमाने पाडल्यानंतर भारतातील लष्कराची सर्व विमाने उतरवण्यात आली. त्या दिवशी कुठेही विमाने उडली नाही. ग्वाल्हेर, भटिंडा असेल किंवा सरसा येथील हवाई तळावरूनही एकही विमान झेपावले नाही. ते असेही म्हणाले होते की, यापुढच्या काळात युद्ध हे हवाई युद्ध होणार आहेत. अशावेळी इतक्या मोठ्या सैन्य दलाचा उपयोग होणार नाही. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाहिले की, लष्कराची एक किलोमीटरचीही हालचाल झाली नाही. दोन ते तीन दिवस चाललेल्या या युद्धात केवळ हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र डागण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारे युद्ध लढली जातील. अशावेळी 12 लाखांचे सैन्य दल आपण बाळगावे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये काय झाले? याची चौकशी केली जावी. तसेच ऑपरेशन सिंदूरची खरी माहिती बाहेर यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती.
३ इडियट्सच्या सीक्वलचे शीर्षक असेल ४ इडियट्स
मुंबई : आमिर खानच्या ३ इडियट्स या क्लासिक कल्ट कॉमेडी चित्रपटाचा सीक्वल आता कन्फर्म झाला आहे. आमिर खान आणि राजकुमार हिराणी पुन्हा एकदा या सीक्वलवर एकत्र काम करण्याची तयारी करत आहेत. २०२६ मध्ये या चित्रपटाचे काम सुरू होईल. मात्र या चित्रपटाचे तात्पुरते शीर्षक समोर आले असून यामध्ये एका नवीन मुख्य अभिनेत्याची एन्ट्री होऊ शकते, अशी […] The post ३ इडियट्सच्या सीक्वलचे शीर्षक असेल ४ इडियट्स appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवण्याचे प्रकार नवीन नाहीत. वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक वाहनचालक सर्रास नियम तोडताना दिसतात. विशेषतः दुचाकीस्वारांकडून फुटपाथवरून वाहन चालवण्याची बेशिस्त प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र सांगवी परिसरातील रक्षक चौकात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले आहे. या ठिकाणी वाहतूक कोंडीतून पुढे जाण्यासाठी फुटपाथवरून दुचाकी हाकणाऱ्या नागरिकांना थेट परदेशी नागरिकांनी अडवले आणि त्यांना नागरी शिस्तीचा धडा दिला. विशेष म्हणजे ही कृती इतक्या ठामपणे आणि शांतपणे करण्यात आली की, ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. सांगवी येथील रक्षक चौक हा पिंपरी-चिंचवडमधील अत्यंत वर्दळीचा आणि कायम वाहतूक कोंडीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या चौकात रोजच वाहनांची गर्दी होते आणि याच गर्दीचा गैरफायदा घेत अनेक दुचाकीस्वार पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवरून आपली वाहने चालवतात. या प्रकारामुळे वृद्ध, महिला, लहान मुले आणि दिव्यांग नागरिकांना चालताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या दिवशीही असेच दृश्य पाहायला मिळाले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या परदेशी पर्यटकांनी हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला. त्यांनी केवळ मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करून थांबण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरून दुचाकीस्वारांना अडवले आणि हा रस्ता चालण्यासाठी आहे, गाडीसाठी नाही, असे ठामपणे सांगितले. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे परदेशी नागरिक अत्यंत संयमाने, पण स्पष्ट शब्दांत दुचाकीस्वारांना समज देताना दिसत आहेत. त्यांनी कोणताही वाद न घालता, कोणत्याही आक्रमक भाषेचा वापर न करता, केवळ नागरी शिस्तीची आठवण करून दिली. काही दुचाकीस्वार सुरुवातीला गोंधळले, तर काहींच्या चेहऱ्यावर लाज स्पष्टपणे दिसत होती. अखेर अनेकांनी आपली वाहने फुटपाथवरून खाली उतरवून मुख्य रस्त्यावर घेतली. या घटनेनंतर तेथील काही नागरिकांनी परदेशी पाहुण्यांचे कौतुक केले, तर काहींनी आपल्या शहरातील नागरिकांवर टीका केली. बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांना आपल्याला शिस्त शिकवावी लागते, ही खरोखरच लाजिरवाणी बाब आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थेवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेटकऱ्यांनी वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इतक्या महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही आणि पोलीस यंत्रणा कार्यरत असतानाही फुटपाथवरून वाहने कशी काय चालवली जातात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काहींनी असेही म्हटले की, केवळ पोलिसांवर दोष ढकलण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहून नियम पाळणे अधिक गरजेचे आहे. पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथ हा त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे, तो वाहनचालकांच्या सोयीसाठी नाही, ही साधी बाब समजून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. पिंपरी-चिंचवडकरांना आरसा दाखवण्याचे काम रक्षक चौकातील या घटनेने पिंपरी-चिंचवडकरांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे. परदेशी पाहुण्यांनी कोणतीही जबाबदारी नसताना दाखवलेली सामाजिक जाणीव आणि नागरी शिस्त अनेकांसाठी विचार करण्यास भाग पाडणारी आहे. हा व्हिडिओ केवळ एक क्षणिक व्हायरल कंटेंट न राहता, शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी एक इशारा ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी नियम पाळले, वाहतूक पोलिसांनी अधिक कठोर अंमलबजावणी केली आणि पादचाऱ्यांच्या हक्कांचा सन्मान झाला, तरच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. अन्यथा, आपल्याला शिस्त शिकवायला परदेशी लोकच का लागतात? हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होत राहील.
मुंबई लगतच्या मीरा-भाईंदरमध्ये आज सकाळीच एक बिबट्या इमारतीत शिरल्यामुळे एकच खळबळ माजली. या बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 3 जण जखमी झाले आहेत. सध्या या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, मीरा भाईंदरमधील तलाव रोड परिसरातील पारिजात इमारतीत सकाळी 8 च्या सुमारास बिबट्या शिरला. त्याने दार उघडे असलेल्या एका घरात प्रवेश केला. तेव्हा एक 25 वर्षीय तरुणी व तिच्या कुटुंबातील इतर 3 सदस्य घरात होते. बिबट्याने या सर्वांवर हल्ला चढवला. त्यात तरुणीसह 3 जण जखमी झाले. त्यांचा आरडाओरडा ऐकूण इमारतीमधील इतर नागरीक सावध झाले. तसेच परिसरातील इतर नागरीकही गोळा झाले. त्यांनी जखमींना तत्काळ लगतच्या रुग्णालयात दाखल करत घटनेची माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेत. वन विभागाचे कर्मचारीही थोड्या वेळाने घटनास्थळी पोहोचले. सध्या बिबट्याला एका रुममध्ये बंद करून ठेवण्यात आले आहे. वन विभागाचे कर्मचारी त्याला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तूर्त तरी त्यांना यश आले नाही. सध्या गनद्वारे बिबट्याला शुद्ध हरपण्याचे इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागपूर व पुण्यातही बिबट्याचा हैदोस उल्लेखनीय बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच नागपुरातील एका वसाहतीत बिबट्या शिरला होता. त्यातही काहीजण जखमी झाले होते. तत्पूर्वी, पुण्याच्याही शहरी भागात हा प्राणी शिरला होता. पुण्याच्या केशवनगरातील कोणार्क रिवा व एल्कोन सिल्व्हर लीफ सोसायटीच्या पार्किंगमध्येही बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामुळे प्रशासनाने येथील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली. पण बिबट्या सापडला नाही. मात्र पाण्याच्या टाकीजवळ त्याच्या पायांचे ठसे आढळले. हे ही वाचा... हॉटेल कावेरीच्या मालकावर गोळीबार:रोहित पवारांचे सभापती राम शिंदेंच्या सहकाऱ्याकडे बोट; सार्वजनिक केले फोटो अन् व्हिडिओ अहिल्यानगर येथील हॉटेल कावेरीच्या मालकावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी एक नवा खुलासा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. या प्रकरणी त्यांनी राम शिंदे व त्यांच्या एका सहकाऱ्याचा फोटो व व्हिडिओ सार्वजनिक करत जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोसतंय? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे. वाचा सविस्तर
हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागातून ई ऑफीसचा शंभर टक्के वापर करण्यासाठी ता. ३१ डिसेंबरची डेडलाईन पाळावी अशा सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी ता. १८ दिल्या आहेत. येथील जिल्हा परिषद कार्यालयात आयुक्त पापळकर यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अप्पर आयुक्त दादासाहेब वानखेडे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र अहिरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे, प्रभारी शिक्षणाधिकारी आसावरी काळे, आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी आयुक्त पापळकर यांनी जिल्हा परिषदेच्या परिसरात पाहणी केली. यावेळी परिसर स्वच्छता व कार्यालयीन स्वच्छता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अहवाल वाचन केले. या शिवाय जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेच्या प्रशासकिय कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद अंतर्गत विभागांमधून ई ऑफीसचा वापर केला जात आहे. मात्र सर्वच विभागांनी त्यांचे प्रस्ताव ई ऑफीसद्वारेच पाठवावेत. डिसेंबर अखेर पर्यंत सर्व विभागातून ई ऑफीसचा शंभर टक्के वापर झाला पाहिजे याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची जनजागृती करून त्याचा गावपातळीवर लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूूचनाही त्यांनी यावेळी केल्या आहेत.
हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यासाठी आम्ही युतीचा प्रस्ताव भाजपकडे दिला. पण, त्यांच्याकडून योग्य सन्मान मिळालेला नाही. भाजप नेत्यांनी भ्रमात राहू नये. तसे झाल्यास फसतील. भाजपकडे इच्छा व्यक्त केलेले 500 लोक आमच्या संपर्कात आहेत. संपूर्ण 26 प्रभागांत 102 उमेदवार देऊ, तशी आमचीही तयारी आहे. आम्ही कमकुवत आहोत असे समजू नये, असा इशारा शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिला. शिवस्मारक सभागृहात इच्छुकांची बैठक झाली. जिल्हा संपर्कप्रमुख संजय कदम त्याला उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली. जिल्हा संपर्कप्रमुख कदम म्हणाले, ‘महायुती नाही झाली तरी लढायचे आहे. नेत्यांनीच निवडणूक लढवावी. मजबूत उमेदवार देण्याचाही प्रयत्न करू. किंगमेकर कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पक्षात एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली जाईल.’ जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, ‘आपल्यासमोर बलाढ्य शक्ती आहे. भाजपचे 3 आमदार सत्तेचा वापर करून माणसे पक्षात घेत आहेत. 1200 इच्छुकांचे अर्ज आल्याचे सांगत आहेत. पण, त्यापैकी 500 जण आमच्या संपर्कात आहेत. त्यांना मस्ती आली. आम्ही मागे हटणार नाही.’ भाजपकडून अजून प्रतिसाद नाही शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. त्यामुळे ताकद मोठी आहे. शिवाय तब्बल 1200 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा महापालिका ताब्यात घेण्याचे उद्दिष्ट घेतले. त्यासाठी स्वबळावर लढण्याचीच तयार सुरू केली. शिंदेसेनेने दिलेला 25 जागांचा प्रस्ताव मान्य नसल्याचे संकेत दिले. त्यामुळेच शिंदेसेनेनेही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली. युतीसाठीही हात पुढे केले. महायुतीसाठी चर्चेची दुसरी फेरी आज राष्ट्रवादी अजित पवार गट येण्याची शक्यता शुक्रवारच्या महायुती चर्चेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारीही सहभागी होतील. त्यांनी ‘अब की बार 75 पार’ असा नारा देऊन ‘एकला चलो रे...’ ची भूमिका घेतली होती. परंतु वरिष्ठ स्तरावरूनच महायुती करण्याचे संकेत मिळाले. त्यानंतर गुरुवारी भाजप-शिंदेसेना एकत्र येऊन प्राथमिक चर्चा केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नव्हते. शुक्रवारच्या बैठकीला मात्र त्यांचे पदाधिकारी येतील. त्यांना किती जागा हव्यात, कोणत्या प्रभागात त्यांचा प्रभाव आहे, याची चर्चा होईल. त्यानंतर त्यांच्यासोबतही जागा वाटपसंदर्भात चर्चा होईल, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे. बंडखोर शिंदेसेनेला मिळण्याच्याभीतीने भाजप महायुतीसाठी तयार भाजपकडे 1200 पेक्षा अधिक इच्छुक आहेत. तिकीट वाटपातून सुमारे 900 जण नाराज होतील. ते शिंदेसेनेला मिळतील. त्याचा फायदा शिंदेसेनेला होऊ शकतो. त्यामुळे भाजपा महायुती करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. शिंदेसेनेतील काही निवडक मंडळी युती करून स्वत:ची जागा सुरक्षित करून घेण्याचा डाव आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले तरी त्यांचे ते दबावतंत्र असल्याचेही मानले जाते. इनसाइड महापालिका निवडणूक प्रक्रिया काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना, महायुती करण्यासाठी गुरुवारी घटक पक्षांची प्राथमिक चर्चा झाली. भाजपच्या शहराध्यक्षा रोहणी तडवळकर, शशी थोरात, शिवसेनेकडून संजय कदम, प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, मनीष काळजे आदी या चर्चेसाठी गुरुवारी एका हॉटेलमध्ये एकत्र आले होते. कोण आणि कोणत्या जागेवर दावा करणार, याबाबत दोन्ही पक्षांनी अहवाल तयार करून पुन्हा जागा निहाय चर्चा करण्याचे ठरले. त्यातून नेमकी संख्या समोर येईल. त्यावर जागावाटप होऊ शकेल, अशी समाधानकारक ही चर्चा होती, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी शिवसेना समन्वय समितीच्या बैठकीत जागानिहाय चर्चा होईल, असेही सूत्र म्हणाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार नव्हते. त्यावेळी महापालिका निवडणुकीत 25 जागा देण्याचे ठरले होते. त्यानुसार भाजपने सन्मानाने 25 जागा द्याव्यात, असा प्रस्ताव शिंदेसेनेने ठेवलेला होता. परंतु त्याला भाजपने दाद दिली नाही. योग्यतेनुसार जागा मिळतील, असे सांगून हिणवले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन भाजपवर तुफान फटकेबाजी केली. बैठकीत आक्रमक भूमिका मांडून स्वबळाचा नारा दिला आमच्या मनात आजही महायुती आहे. ती भाजपच्याही मनात असायला हवी. जर भ्रमात राहाल तर फसाल. पालिकेत शिवसेनेच्या 50 जागा निवडून येतील. निवडणूक रणांगणात आम्ही उतरलो तर रक्ताचे पाणी करू. उत्तमप्रकाश खंदारे, माजी मंत्री
अहिल्यानगर येथील हॉटेल कावेरीच्या मालकावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी एक नवा खुलासा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. या प्रकरणी त्यांनी राम शिंदे व त्यांच्या एका सहकाऱ्याचा फोटो व व्हिडिओ सार्वजनिक करत जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोसतंय? असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला आहे. अहिल्यानगरच्या जामखेड - बीड रस्त्यालगत हॉटेल कावेरी आहे. या हॉटेलचे मालक रोहित अनिल पवार (27) यांच्यावर काही गुंडांनी गोळीबार केला होता. त्यात एक गोळी त्यांच्या पायातून आरपार निघून गेली होती. त्यामुळे ते जबर जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड केली आहे. परस्पर वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर 2 आरोपींना माग काढला आहे. रोहित पवारांनी राम शिंदेंना धरले जबाबदार आमदार रोहित पवार यांनी या घटनेसाठी नाव न घेता सभापती राम शिंदे यांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, जामखेडमधील हॉटेल कावेरीचे मालक रोहित अनिल पवार यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला ते हे आहेत जामखेडमधील उल्हास विलास माने. याआधीही त्यांच्यावर डबल मर्डरचे गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या पाठीशी कोण आहे, हे तुम्हीच या फोटोंमध्ये बघा. गल्लीतलं भांडण विधिमंडळात नेणारेही हेच आहेत, ज्यांना केवळ माझे विरोधक आहेत म्हणून भाजपाने विविध पदे दिली. आता एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असेल तर जामखेडमधील या गुंडांमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सामान्य माणसांचे मुडदे पाडण्याची हिंमत का येणार नाही? आणि जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोसतंय? याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं, असे ते म्हणालेत. रोहित पवारांनी या प्रकरणी काही फोटो व एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झालेला उल्हास विलास माने हा व्यक्ती सभापती राम शिंदे यांच्या बाजूला बसल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर एका व्हिडिओत राम शिंदे त्याचे कोडकौतुक करतानाही दिसून येत आहेत. सुरुवातीला रोहित पवारांवरच गोळीबार झाल्याची अफवा उल्लेखनीय बाब म्हणजे या घटनेत प्रथम आमदार रोहित पवार हेच जखमी झाल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे मोठी खळबळ माजली होती. पण रोहित पवारांनी गुरुवारी रात्री एका पोस्टद्वारे स्थिती स्पष्ट केली. बातमीमधील नामसाधर्म्याने घोळ झाला. जामखेडमधील गोळीबारात मी नाही तर हॉटेलमालक रोहित अनिल पवार हे जखमी झाले आहेत. पण प्रत्येक व्यक्ती मीच आहे असं समजून त्यांना न्याय मिळण्यासाठी मी कायम लढतो आणि लढत राहील. काळजीपोटी अनेकांनी फोन केले, त्या सर्वांचे मनापासून आभार, असे त्यांनी सांगितले. आता पाहू काय घडली होती घटना? पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री कावेरी हॉटेलवर हॉटेल मालक रोहीत अनिल पवार हे आपल्या ग्राहकांना सेवा देत होते. तेव्हा मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास 7-8 जणांच्या टोळीने अचानक हॉटेलवर हल्ला केला. त्यांनी हॉटेलची तोडफोड केली. तसेच हॉटेल मालक रोहीत अनिल पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने ते या घटनेत गंभीर जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी हॉटेल मालकाची चारचाकी गाडीची तोडफोड केली. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. आरोपी हल्ला करुन पळून गेल्यानंतर हॉटेल मालकाला नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबईतील घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील ऊपरी डोंगराळ भागात अखेर नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी आपला दीर्घकाळाचा अनोखा संकल्प पूर्ण केला. डोंगरवस्तीत पाणी येईपर्यंत केस कापणार नाही, असा शब्द त्यांनी नागरिकांना दिला होता आणि हा शब्द पाळत त्यांनी केस कापले. राजकारणात आश्वासनांची पूर्तता होत नसल्याचे आरोप वारंवार होत असताना, राम कदम यांच्या या कृतीने वेगळाच संदेश दिला आहे. या प्रसंगी ते समाधान आणि आनंद व्यक्त करताना दिसले. मुंबई भाजपमधील प्रमुख नेते आणि पक्षाचे अधिकृत प्रवक्ते असलेल्या राम कदम यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. राम कदम यांनी सांगितले की, घाटकोपर पश्चिम भागातील अनेक डोंगराळ वस्त्यांना वर्षानुवर्षे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असे. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या भागात दोन कोटी लिटरपेक्षा अधिक क्षमतेचे पाण्याचे टाकी प्रकल्प उभारण्यात येत असून, भांडुप येथून नवीन जलवाहिनी जोडण्यात आली आहे. तीन फूट रुंदीची आणि सुमारे चार किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले आहे. तसेच तीन मोठ्या पाण्याच्या टाक्यांचे कामही सुरू झाले असून, जुन्या आणि गळती होणाऱ्या पाईपलाईन बदलण्यात आल्या आहेत. या सर्व कामांमुळे परिसरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आपला संकल्प पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना राम कदम म्हणाले की, माझ्यासाठी हा केवळ वैयक्तिक निर्णय नव्हता, तर नागरिकांशी दिलेला शब्द होता. आज तो शब्द पूर्ण झाला, याचा मला आनंद आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांच्या मतदारसंघात राबवलेले हे पाणीपुरवठ्याचे मॉडेल इतर आमदार आणि खासदारांनीही अभ्यासावे. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासकीय समन्वय ठेवल्यास मोठ्या शहरांतील अवघड भागातही मूलभूत सुविधा पोहोचवता येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाणी हा राजकारणाचा मुद्दा नसून लोकांच्या जीवनाशी संबंधित प्रश्न आहे, याची जाणीव प्रत्येक लोकप्रतिनिधीने ठेवली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. राम कदम यांचा राजकीय प्रवासही तितकाच लक्षवेधी आहे. घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ 2008 च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आला. 2009 मध्ये राम कदम पहिल्यांदा येथून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सलग विजयाची मालिका कायम ठेवली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उमेदवार संजय भालेराव यांचा 12,971 मतांनी पराभव केला. विशेष बाब म्हणजे राम कदम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून केली होती. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सलग तीन निवडणुका भाजपच्या तिकिटावर जिंकल्या आहेत. सध्या ते मुंबई भाजपचे प्रवक्ते म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राम कदम सोशल मीडियावरही सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामाजिक उपक्रमांवर भर देणारे राम कदम सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. त्यांनी स्वतःला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड धारक असल्याचे नमूद केले असून, आतापर्यंत सुमारे 60 हजार बहिणींना विविध स्वरूपात मदत केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या उपक्रमांमुळे मतदारसंघात त्यांची प्रतिमा एक कार्यरत आणि लोकांशी जोडलेला नेता अशी निर्माण झाली आहे. डोंगरवस्तीत पाणी पोहोचवण्याच्या प्रकल्पासह केस न कापण्याचा संकल्प पूर्ण केल्यामुळे, राम कदम यांनी केवळ विकासकामेच नव्हे तर राजकारणात विश्वास आणि वचनपूर्ती किती महत्त्वाची आहे, हेही दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या कृतीकडे केवळ एक प्रतीकात्मक घटना म्हणून न पाहता, लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.
उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू होताच भाजपमधील सुंदोपसुंदी समोर आली आहे. निवडणूक प्रमुख म्हणून आ. राहुल ढिकले यांना जबाबदारी देण्यात आली होती. मात्र एका कार्यक्रमात त्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना आस्मान दाखविण्याचे केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. यामुळे त्यांच्याकडून निवडणूक प्रमुखपद काढून घेत आता आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे पक्षाने ती जबाबदारी दिली आहे. गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये आ. ढिकले यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी दिली होती. त्यानंतर ढिकले, शहराध्यक्ष सुनील केदार यांनी सहाही प्रभागातील मंडल अध्यक्ष, बूथप्रमुख, माजी नगरसेवक, इच्छूकांची भेटी घेतल्या. तब्बल 966 इच्छूकांच्या मुलाखती घेऊन प्रदेश कार्यालयाकडे अहवाल सोपविला. मात्र आता त्यांची नियुक्ती अचानक रद्द केल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहे. दरम्यान ढिकलेंनी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर फरांदेंना मिळालेल्या जबाबदारीचे पत्रही त्याच तीव्रतेने व्हायरल करण्यात आल्याने पक्षातील दोन गट स्पष्ट दिसून आले. 100 प्लस हेच लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पालिका निवडणूकीत 100चा आकडा पूर्ण करू. - प्रा. देवयानी फरांदे, आमदार मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसावंद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्षांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असेल. त्यांच्या आदेशानुसार मला जी जबाबदारी देण्यात येईल, त्याचे पालन मी आधीही केले आहे. आताही करेल. आणि महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. - अॅड. राहूल ढिकले, आमदार एकाचे वक्तव्य, एकाला मिळालेले पत्र व्हायरल शहरातील मराठा चेहरा, ताकदवान नेता म्हणून इतर दोघा वरिष्ठ आमदारांऐवजी ढिकलेंना स्थान मिळाले. यामागे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना संधी मिळाली होती. मात्र, दोनच दिवसांपूर्वी पंचवटीत कार्यक्रमात आ. ढिकले यांनी ‘विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी आजारी असताना माझ्या विरोधात पक्षातीलच मंडळींनी काम केले, माझी रॅली अडवली. त्यांना ‘ठाक’ लावून अस्मान नाही दाखल तर ढिकले नाही, असा इशारा पक्षांतर्गत विरोधकांना जाहीर व्यासपीठावरून दिला होता. त्याचीच परिणिती त्यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात झाली. एरवी विरोधकांनाचाही समाचार अत्यंत शांत आणि संयमाने घेणाऱ्या ढिकेलेंनी थेट जाहीर व्यासपीठावरुन असे वक्तव्य केल्याने शहरातील राजकीय वर्तुळातही उलट-सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
कुख्यात गुन्हेगार रितेश कुऱ्हाडेऊर्फ कांचा याने एकासाथीदारासोबत बंबाटनगर येथून दुचाकी चोरी केली. तिचा शोध घेत निघालेल्या दोघांना दुचाकी दिसल्याने त्यांनी जाब विचारताच त्यांच्यावर ‘मी डॉन आहे’ म्हणत स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (16डिसेंबर) सकाळी विश्रांतीनगर भागात घडली. फिर्यादी अमोल अशोक रुडे (39,रा. बंबाटनगर) यांच्या तक्रारीनुसार,ते सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.मंगळवारी सकाळी आठ वाजता ड्यूटीवरून घरी आले तेव्हा गल्लीतील लोकांनी रात्री चोर आले होते. त्यांनी तुमचे भाडेकरू प्रकाश चव्हाण यांची दुचाकी चोरून नेली आहे. त्यामुळे रुडे आणि चव्हाणदोघेही दुचाकी शोधत मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे निघाले.विश्रांतीनगर येथे चव्हाण यांची दुचाकी उभी दिसली. तिथे आरोपी रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा आणित्याचा साथीदार उभे होते. चव्हाणयांनी ही दुचाकी माझी आहे, कोणी आणली? असे विचारले. तेव्हाकांचाने ‘मी डॉन आहे’ म्हणत चव्हाण यांना मारहाण सुरू केली.रुडे मध्यस्थीसाठी जाताच त्यांच्या हातावर स्क्रू ड्रायव्हरने मारून जखमी केले. गोंधळ पाहून लोक जमा होताच दोघेही मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनकडे पळून गेले. तलवार नाचवूनही बाहेर रितेश कुऱ्हाडे ऊर्फ कांचा याने मे महिन्यात मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन भागात तलवार बाजी करत चार रिक्षांच्या काचा फोडल्या होत्या.एका रिक्षा चालकाच्या मानेवर वार केला होता. तलवारीने मुंडके उडवण्याची धमकी दिली होती.तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, अल्पवयीन असल्याने तो बाहेर आला. आता त्याच्या मुसक्या आवळण्याची संधी आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील दोन प्रमुख घटक असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या जागावाटपाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागांवर ठाम दावा केला. मात्र, भाजपने ही मागणी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. भाजपने 2017 मध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या सर्व 84 जागा यंदाही शिंदे गटाला देण्यास नकार दिल्याने महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी एकत्र लढण्याची घोषणा जरी करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष जागावाटपाच्या चर्चेत दोन्ही पक्षांमधील मतभेद तीव्र होत असल्याचे चित्र आहे. या बैठकीआधीच शिंदे गटाला मुंबईत केवळ 52 जागा देण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी अशा कोणत्याही आकड्यावर चर्चा झाल्याचे नाकारले होते. तरीही, प्रत्यक्षात शिंदे गटाला हव्या असलेल्या जागांवर भाजपकडून अनास्था दाखवली जात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. जागावाटपाच्या दुसऱ्या बैठकीनंतर शिवसेना-भाजप यांच्यात 150 जागांवर एकमत झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार, यावर ठोस सहमती झालेली नाही. विशेषतः शिंदे गटाने मागणी केलेल्या पारंपरिक शिवसेना प्रभाव असलेल्या प्रभागांबाबत भाजपची भूमिका कठोर असल्याचे दिसत आहे. भाजपने शिंदे गटाच्या 84 जागांच्या मागणीला नकार देताना एक नवी राजकीय मांडणी पुढे केली आहे. 2017 साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या या जागांपैकी अनेक प्रभागांमध्ये आता ठाकरे गट मजबूत झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात थेट लढत झाली, तर त्याचा फटका महायुतीला बसू शकतो, अशी भीती भाजपकडून व्यक्त केली जात आहे. शिंदे-ठाकरे थेट संघर्षात शिंदे गटाच्या उमेदवारांच्या पराभवाची शक्यता अधिक असल्याचे भाजपचे आकलन आहे. त्यामुळे, शिंदे गटाची संघटनात्मक ताकद जिथे ठोस आहे, अशाच जागा शिवसेनेसाठी सोडण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. यामुळेच 2017 मधील सर्व 84 जागा देण्यास भाजप अनिच्छुक आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अदलाबदलीद्वारे शिंदे गटाची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न दरम्यान, या तणावावर तोडगा काढण्यासाठी भाजपने एक पर्यायी फॉर्म्युला सुचविल्याची चर्चा आहे. भाजपने 2017 मध्ये जिंकलेल्या 82 प्रभागांपैकी काही मराठीबहुल आणि शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघांमध्ये मोडणाऱ्या जागांची अदलाबदल शिंदे गटासोबत करण्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगितले जात आहे. या अदलाबदलीद्वारे शिंदे गटाची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र, या प्रस्तावावर शिंदे गटाची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. एकनाथ शिंदे या संपूर्ण घडामोडीकडे कसे पाहतात आणि भाजपच्या भूमिकेला ते कितपत स्वीकारतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. युतीच्या एकसंघतेवर परिणाम होण्याची शक्यता दरम्यान, भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपली तयारी अधिकृतपणे सुरू केली असून, निवडणूक समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत एकूण 20 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, त्यात अनेक वजनदार नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, माजी मंत्री आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि अतुल भातखळकर यांसारख्या प्रमुख नेत्यांचा समितीत समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून भाजप मुंबईत आक्रमक रणनीती राबवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, महायुतीतील जागावाटपाचा तिढा वेळेत सुटला नाही, तर आगामी निवडणुकीत युतीच्या एकसंघतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. “शहरात आता भाजपच मोठा भाऊ आहे,” असे विधान मंत्री अतुल सावे यांनी केल्याने राजकीय वातावरण तापले असून याला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडणूक प्रमुख अतुल सावे यांनी गुरुवारी (18 डिसेंबर) पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सावे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजघडीला जिल्ह्यात आणि शहरात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल.” शिरसाट यांनी भाजपच्या दाव्यावर कुणी काय दावा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र अंतिम निर्णय चर्चेतूनच होईल,” तिढा सोडवण्यासाठी 19 डिसेंबर रोजी महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी वेळ काढूपणाची भूमिका भाजप सध्या बंडखोरी रोखण्यासाठी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचे दिसते. भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने एकाला तिकीट दिले की दुसरे बंड करतील अशी स्थिती आहे. अशा बंडखोरांना उबाठा गट आपल्याकडे खेचण्यासाठी तयार आहे. मतांचे विभाजन झाले तर त्याचा थेट फटका युतीला बसू शकतो. त्यामुळेच मुलाखतींचा फार्स करून कार्यकर्त्यांना गुंतवून ठेवले जात असल्याची चर्चा आहे. शुक्रवारी होणारी बैठक ही केवळ जागावाटपासाठी नसून एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. असे मुलाखतींचे नियोजन भाजपने 500 पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती पूर्ण घेतल्या. यासाठी आठ पॅनल तयार करण्यात आले असून शुक्रवारी उर्वरित इच्छुकांच्या मुलाखती पार पडतील. या प्रक्रियेतून सक्षम उमेदवार शोधण्याचा प्रयत्न पक्ष करत आहे. माजी महापौर विमल राजपूत शिंदेसेनेत; उद्धवसेना सोडणाऱ्या आठव्या महापौर महायुतीमधील चर्चा आणि जागावाटपाचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. यामागे एक मोठी रणनीती दडलेली आहे. उमेदवारांना लवकर तिकीट दिले तर नाराज झालेले इच्छुक उमेदवार उबाठा किंवा इतर पक्षांकडे जाऊ शकतात. ही भीती टाळण्यासाठी उमेदवारीचे बी फॉर्म अगदी शेवटच्या काही तासांतच दिले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ज्या प्रभागांमध्ये शिंदेसेनेकडे ताकदवर उमेदवार नाहीत तिथे भाजपचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढताना दिसू शकतात. हा विधानसभेसारखाच पॅटर्न मनपा निवडणुकीत राबवला जाण्याची चिन्हे आहेत. मनपाच्या राजकारणात धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या माजी महापौरांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर आतापर्यंत शिवसेनेच्या तिकिटावर महापौरपद भूषवलेल्या 9 पैकी 8 माजी महापौरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. गुरुवारी (18 डिसेंबर) माजी महापौर विमल राजपूत यांनीही शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेल्या 9 माजी महापौरांपैकी 8 जण आता शिंदे गटात सामील झाले आहेत. विकास जैन यांच्यापासून सुरू झालेली ही प्रवेशाची साखळी आता विमल राजपूत यांच्यापर्यंत पोहोचली आहे. राजपूत यांनी गुरुवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती कार्यालयात पक्षप्रवेश केला.
राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढले. त्यामुळे प्रचार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी झाली. त्यांना प्रचाराची स्ट्रॅटेजी बदलावी लागली. मित्रपक्षच आमने-सामने असल्याने टीका टाळत सकारात्मक मत मागण्यासाठी आलो असल्याचे फडणवीसांना सांगावे लागले. साताऱ्यातील फलटणमध्ये त्याचीच प्रचिती आली. फलटण नगरपालिका निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होत आहे. या ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) विरूद्ध भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), अशी लढत होत आहे. गुरुवारी फलटणमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, फलटण हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्याच नव्हे, तर प्रभू श्रीराम यांच्या इतिहासाशीही जोडलेले शहर आहे. अशा ऐतिहासिक शहरात मोठे आणि सकारात्मक परिवर्तन घडवणे, हे आमचे ध्येय आहे. मी जे करून दाखवले आणि करणार आहे, ते सांगतो. मी कुणावर टीका करण्यासाठी आलेलो नाही. मला निगेटिव्ह मत नको. सकारात्मक मत हवंय. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, आमच्याकडे विकासाचा ठोस कार्यक्रम आहे. म्हणूनच आम्ही सकारात्मक मत मागत आहोत. समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी यापूर्वी विरोधी पक्षनेते म्हणून फलटणकर जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले आहेत. आता त्यांना नगराध्यक्ष करण्याची सुवर्णसंधी फलटणकरांच्या हाती आहे. विरोधक चिखलफेक करतील, पण कमळावर कोणत्याही चिखलाचा परिणाम होत नाही. कारण कमळ हे चिखलातच उमलते. त्यामुळे येत्या 20 तारखेला भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा. तुमचे मत फलटण शहराला सातारा जिल्ह्यातील सर्वात आधुनिक शहर बनवू शकते. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येशी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा कसलाही संबंध नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या प्रकरणातील सर्व टेक्निकल पुरावे मिळाले आहेत. आरोपींना कठोर शिक्षा होईल आणि पीडितेला न्याय मिळेल. तिच्या कुटुंबीयांना देखील आम्ही मदत करणार आहोत. परंतु, अशा घटनेचं राजकारण करून कुणाला तरी टार्गेट करणे शोभत नाही, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील गंभीर अनियमितता समोर आली असून, काँग्रेसने सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर 'संघटित मतचोरी'चा खळबळजनक आरोप केला आहे. अस्तित्वात नसलेल्या इमारतींमध्ये शेकडो मतदारांची नोंदणी आणि चक्क कोरी 'एपिक' कार्ड्स (मतदार ओळखपत्र) वाटप करून निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्याचा डाव असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत या पुराव्यांसह या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. यावेळी प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, माजी नगरसेवक बब्बू खान आणि निजामुद्दीन राईन उपस्थित होते. म्हात्रे यांनी सांगितले की, वॉर्ड क्रमांक १ मधील आयसी कॉलनी येथे 'भागडालाने' नावाची इमारत कागदोपत्री दाखवून तिथे १४३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष जमिनीवर अशी कोणतीही इमारत अस्तित्वात नाही. 'ब्लँक चेक' प्रमाणे कोरी ओळखपत्रे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रशासनाकडून अशा मतदान पत्रांचे वाटप झाले आहे ज्यावर केवळ 'एपिक' क्रमांक आहे, मात्र मतदाराचे नाव आणि पत्ता गायब आहे. हे कोरे ओळखपत्र म्हणजे 'ब्लँक चेक' सारखे असून, याद्वारे बोगस मतदानाची मोठी तयारी सुरू आहे, असा थेट आरोप म्हात्रे यांनी केला आहे. काँग्रेसने प्रारूप मतदार यादीच्या वेळीच अधिकृत हरकती नोंदवल्या होत्या. त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले, मात्र अंतिम यादीत या त्रुटी तशाच ठेवण्यात आल्या आहेत. आता नाव वगळता येणार नाही, असे सांगून अधिकारी हात झटकत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक 2026 जवळ येत असताना राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मुंबईतील राजकीय डावपेच नव्याने आखण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी जवळीक वाढवण्याचे संकेत देत, राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुंबईतील सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीकडे मुंबईसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठीची दिशा याच बैठकीत निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बैठक खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असून, मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चौकटीत पक्षाला किती जागा मिळाव्यात, याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष राखी जाधव यांच्याकडून पक्षाचा अधिकृत प्रस्ताव या बैठकीत मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे, रविवारी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक होणार असल्याने, त्याआधीच राष्ट्रवादीने आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे ही बैठक केवळ अंतर्गत स्वरूपाची नसून, आगामी राजकीय वाटाघाटींसाठीची तयारी मानली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सध्या मुंबई महापालिकेसाठी 22 जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, पक्षातील अनेक नेते आणि पदाधिकारी यापेक्षा अधिक जागांची मागणी करण्याच्या भूमिकेत आहेत. काही नेत्यांनी किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असून, त्यानुसार जागांची संख्या वाढवण्याचा आग्रह धरला जात आहे. इतकेच नव्हे तर, काही आक्रमक नेत्यांकडून 50 जागांची मागणी करण्याची भूमिका घेतली जाऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत. तथापि, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच कमी जागांवर लढून जास्त यश मिळवण्याचा म्हणजेच स्ट्राइक रेट वाढवण्याचा पक्षाचा धोरणात्मक विचार असल्याचेही बोलले जात आहे. पक्षातील कल हा स्पष्टपणे उद्धवसेना आणि मनसेसोबत जाण्याकडे दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अंतर्गत बैठकीत काँग्रेससोबत युती करण्याबाबत काहीशी साशंकता व्यक्त होत असल्याचे चित्र समोर आले आहे. बुधवारी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबईतील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनसेसोबत निवडणूक लढवण्यास अधिक पसंती दर्शवली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पक्ष बैठकीतही कार्यकर्त्यांकडून ठाकरे बंधूंशी जवळीक साधण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. मुंबई युथ विंगचे अध्यक्ष अमोल मातेले यांनीही याबाबत माहिती देताना सांगितले की, काँग्रेसकडून युतीबाबत विचारणा होत असली तरी, पक्षातील कल हा स्पष्टपणे उद्धवसेना आणि मनसेसोबत जाण्याकडे झुकलेला आहे. किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीचा अनुभवही यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रणनीतीत महत्त्वाचा ठरणार आहे. त्या निवडणुकीत एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आले होते. सध्या पक्षाचा दावा आहे की, मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये राष्ट्रवादीची पकड तुलनेने मजबूत आहे. याच ताकदीच्या आधारावर आगामी महापालिका निवडणुकीत किमान 25 ते 30 नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. आजच्या बैठकीत केवळ जागावाटपच नव्हे, तर संघटनात्मक मजबुती, स्थानिक प्रश्न, उमेदवारांची निवड आणि युतीचे अंतिम स्वरूप यावर सखोल चर्चा होणार आहे. विशेषतः उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडे नेमकी किती जागांची मागणी केली जाणार, यावरच पुढील राजकीय गणित ठरणार असल्याने, येत्या एक-दोन दिवसांत याबाबत मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ गावाच्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून मंजूर असूनही प्रत्यक्षात सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रस्त्याच्या कामाला अकारण नाट लागल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी गावकऱ्यांची जाणीवपूर्वक उपेक्षा करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. गावाचा मुख्य रस्ता पूर्णतः उखडलेला असून येथून वाहनांची वाहतूक करणे अत्यंत अवघड झाले आहे. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्याचा फटका स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांनाही बसत आहे. खराब रस्त्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प होत असून ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चार वर्षांच्या कालावधीत संबंधित ठेकेदाराने केवळ दोन वेळा रस्त्याच्याकडेला खडी टाकण्याचे काम केले. तेही तात्पुरते आणि दर्जाहीन असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शहरी भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी नसल्याचे कारण ग्रामस्थांना मान्य नसल्याचे चित्र आहे. मालेगाव शहरापासून १९ किलोमीटर आणि मुंबई–आग्रा महामार्गापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलओहोळ गावाच्या मुख्य रस्त्याकडे दुर्लक्ष होणे हे तालुक्यातील विकास अपयशाचे उदाहरण असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. मागील महिन्यात सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला खडी टाकून काम सुरू केले. मात्र कामाची पद्धत आणि दर्जा पाहून ग्रामस्थांनी अंदाजपत्रकानुसार आणि टिकाऊ रस्ता करण्याची मागणी केली. त्यामुळे निवडणुकांमध्ये मतदान बहिष्काराचा निर्णय घ्यावा का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते वैभव देशमुख यांनी उपस्थित केला आहे. गाव रस्ते विकासापासून अद्यापही कोसो दूर गावात ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील बारीच्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्या सोबतच या भागातील रस्ते कामाला प्राधान्य देण्याची नितांत गरज आहे. आजरोजी या मार्गावर खडी, प्रचंड धूळ, खड्डे यांचे साम्राज्य आहे. गाव रस्ते विकासापासून कोसो दूर असल्याचे भावना गावात बाहेर गावाहून येणारे पाहुणेमंडळी व्यक्त करतात. यामुळे ग्रामस्थांना शरमेने मान खाली घालण्याची नामुष्की ओढवत असल्याचा आरोप होत आहे. रस्ता काम नाही तर मतदानही करणार नाही गावाच्या मुख्य रस्त्याची धूळधाण आमच्या व्यवसायांना बाधक ठरत आहे. रस्त्याची दुर्दशा बघून पाहुणे मंडळी गावात येणे टाळतात, हे दुर्भाग्य आहे. वारंवार मागणी करूनही रस्ता का होत नाही? हेच समजत नाही. रस्ता नाही तर मतदान नाही. - प्रसाद अहिरराव, चिखलओहोळ
शहरातून जाणाऱ्या साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२जी वरील काँक्रिटीकरणाचे काम दीर्घकाळापासून प्रलंबित असल्याने हा महामार्ग नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. शहरात दिवसभर दाट धूळ, वाहतूक कोंडी, मोठे खड्डे आणि प्रदूषण यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या आठ दिवसांत काम सुरू न केल्यास शुक्रवारी (दि. २६)‘रस्ता रोको’ आंदोलनासह उपोषण छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संयुक्तपणे दिला आहे. यासंदर्भात माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक योगेश पाटील तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले. ताहाराबाद रस्ता ते बसस्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर बसस्थानक ते जिजामाता उद्यानापर्यंतचा महत्त्वाचा टप्पा अचानक थांबवण्यात आला आहे. याच मार्गावर शहरातील मुख्य वाहतूक अवलंबून असून, काम बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून धुळीमुळे दुकाने, घरे, रुग्णालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडत आहे. श्वसनाचे विकार, डोळ्यांची ऍलर्जी आणि त्वचारोगांच्या तक्रारी वाढल्या आहेत. धुळीमुळे व्यापाऱ्यांचा माल खराब होत असून व्यवसायावर परिणाम झाला आहे. सकाळ व सायंकाळच्या वेळेत वाहतूक तासन्तास ठप्प राहत असून रुग्णवाहिकादेखील अनेकदा कोंडीत अडकत आहेत. शहरातील प्रत्येक नागरिक या रखडलेल्या कामामुळे त्रस्त असून, आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, केशव मांडवडे, भारत काटके, मनोज सोनवणे, दिनेश सोनवणे, फईम शेख, अशोक भामरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. २ वर्षांपासून प्रलंबित या रस्त्याचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत अनेकदा रास्ता रोको आंदोलन झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात तरुणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी पोलिस प्रशासन, तहसीलदार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लेखी व तोंडी आश्वासन देऊन आंदोलन मोडीत काढले गेले परंतु, रस्ताकाम झालेच नाही.
नेवासे तालुक्यातील श्रद्धास्थान शनिशिंगणापूर येथे या वर्षातील अखेरच्या शनिअमावस्येनिमित्त शुक्रवारी रात्रीपासूनच भाविकांचा मोठा ओघ सुरू होणार आहे. यंदा अमावस्येचा पर्वकाळ शनिवारी सकाळी ७ तास १२ मिनिटांचा असला, तरी शनिवारचे औचित्य साधत ४ ते सव्वाचार लाख भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, दर्शनबंदीच्या निर्णयानंतर तब्बल १९२ दिवसांनी भाविकांना पुन्हा रात्री शनिदर्शनाचा लाभ मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या अलीकडील निर्णयानुसार विश्वस्त मंडळाने गुरुवारी दुपारी पुन्हा देवस्थानचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी प्रशासनासह नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. यापूर्वी २३ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शनिअमावस्येला सुमारे ४ लाख भाविकांनी शनिदर्शन घेतले होते. यंदाही पर्वकाळ कमी असतानाही तितकीच किंवा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सोयीसाठी तीन ठिकाणी मोफत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे - घोडेगाव मार्गाने येणाऱ्या वाहनांसाठी शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाजवळ ३ एकर जागा, मनमाड महामार्गाने येणाऱ्यांसाठी मुळा कारखाना परिसरात सव्वादोन एकर जागा, छत्रपती संभाजीनगर - कांगोणी मार्गाने येणाऱ्यांसाठी देवस्थानची ३ एकर जागा उपलब्ध आहे. याशिवाय मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पार्किंगही वापरता येणार आहे. वृद्ध व दिव्यांग शनिभक्तांसाठी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध असून, गावात ठिकठिकाणी ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने चहा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात ९० पोलिसांचा बंदोबस्त सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय माळी व शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शेळके यांच्या नेतृत्वाखाली २ निरीक्षक, ५ उपनिरीक्षक, ७० पोलिस कर्मचारी, होमगार्ड तैनात असणार आहेत. यासोबतच एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदतही घेतली जाणार आहे. { मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे : 35 { संवादासाठी वॉकीटॉकी : 15 { रस्ता सुरक्षा वायरलेस सेट : 5 { दर्शन रांगेजवळ रुग्णांसाठी बेड : 15 { रुग्णवाहिका : 5 { देवस्थान सुरक्षा रक्षक : 50
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. राज्याचे क्रीडामंत्री म्हणून कार्यरत असलेले कोकाटे मंत्रिपदावरून पायउतार झाले. याआधी कृषीमंत्रीपदावरून त्यांची उचलबांगडी झाली होती. त्यामुळे एका कार्यकाळात दुसऱ्यांदा वादात अडकल्याने कोकाटेंना थेट मंत्रिपदच गमवावे लागल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. न्यायालयीन निकालामुळे त्यांच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सत्ताधारी युतीवरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. राजकीय वर्तुळातील माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घेण्याच्या बाजूने नव्हते. उच्च न्यायालयात अपील होईपर्यंत थांबावे, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंसारख्या दोषी ठरलेल्या आणि कलंकित नेत्याला मंत्रिमंडळात ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शवला. सरकारची नैतिकता आणि प्रतिमा जपण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे फडणवीसांनी ठामपणे मांडल्याचे समजते. त्यामुळे अजित पवार यांचा नाईलाज झाला आणि अखेर कोकाटेंना राजीनामा द्यावा लागला. या घडामोडीमुळे सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि दबावाचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अलीकडेच धनंजय मुंडे यांनी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळे कोकाटेंच्या जागी मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळू शकते, असे संकेत दिले जात होते. मात्र, वाल्मिक कराड प्रकरणाशी संबंधित कनेक्शनमुळे मुंडेंचे पुनरागमन सोपे नसल्याचेही स्पष्ट केले जात आहे. तरीही सध्या उपलब्ध पर्यायांमध्ये धनंजय मुंडे हे सर्वाधिक प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दुसरीकडे, अजित पवार ऐनवेळी जातीय आणि राजकीय समीकरणांचा विचार करून वेगळा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता देखील नाकारता येत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक तात्काळ होणार नसून, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत क्रीडा व अल्पसंख्याक खात्यांचा कार्यभार स्वतः अजित पवारांकडेच राहणार आहे. मंत्रिपदाच्या वाटपात प्रादेशिक आणि जातीय संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे निवडीची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची ठरणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही निर्णय घेताना राजकीय नुकसान होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसते. मराठा समाजातून नवा प्रतिनिधी की इच्छुकाला संधी दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या नेत्यांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे यांची नावे पुढे येत आहेत. याशिवाय, मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल का, यावरही चर्चा सुरु आहे. मराठा समाजातून नवा प्रतिनिधी देण्याचा विचार झाला, तर प्रकाश सोळंखे, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर केवळ एक मंत्रिपद रिक्त झाले नसून, अजित पवारांसमोर राजकीय तोल सांभाळण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता या रिक्त जागेसाठी कोणता चेहरा निवडला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
लुसी', जंजीर'च्या मदतीने इमारतीची 90 मिनिटांत तपासणी:जिल्हाधिकारी कार्यालयउडवण्याची धमकी अफवाच
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला गुरुवारी सकाळी ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने केलेल्या तपासणीत काहीही आढळून आले नाही, त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर कार्यालयाचे कामकाज सुरळीत झाले. धमकीनंतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना तातडीने बाहेर पाठवण्यात आले. पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकातील ‘लुसी' व 'जंजीर'च्या मदतीने ६ मजली इमारतीची ९० मिनिटांत तपासणी पूर्ण केली. दुपारी १२.५८ हे अहिल्यानगर व शिर्डी येथील पथक आले होते. २.३० ला तपासणी पूर्ण झाली. जिल्हाधिकारी कार्यालयास धमकीचा ईमेल प्राप्त होताच प्रशासनाने तातडीने पोलीस विभागाला याची माहिती दिली. खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी संपूर्ण कार्यालय परिसर रिकामा केला. बॉम्ब शोधक पथकातील 'लुसी' व 'जंजीर' या श्वानांच्या मदतीने तसेच अत्याधुनिक बॉम्ब शोधक यंत्रणेद्वारे कार्यालयाच्या सहा मजली इमारतीची तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व मजले, जिने, लिफ्ट, पार्किंग व संपूर्ण परिसराचा समावेश होता. या शोधमोहिमेत अग्निशमन दल व एसआयडी पथकाचा समावेश होता. या सखोल शोधमोहिमेत संशयास्पद वस्तू अथवा स्फोटके आढळून आली नाहीत. परिसराची सुरक्षितता सुनिश्चित केल्यानंतर दुपारी कार्यालयाचे दैनंदिन कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आले.या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस सायबर सेलच्या माध्यमातून करत आहेत. सुरेश आघाव, स्वीय सहाय्यक, जिल्हाधिकारी सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेल बॉम्बस्फोटाच्या धमकीचा मेल आला होता. कार्यालयात आल्यानंतर १०.२० वाजता हा मेल पाहिल्यानंतर तो मेल पोलिस अधिक्षक, कंट्रोल रुमला फॉरवर्ड केला. या मेल माहिती जिल्हाधिकारी यांना देखील देण्यात आली. त्यानंतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना बाहेर पाठवण्यात आले. त्यानंतर यंत्रणांकडून तपासणी सुरु करण्यात आली. हा मेल मराठीतून होता. त्यात ‘तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच ४ आरडीएक्स बॉम्बस्फोट होणार’ असल्याचे म्हटले होते. संबधित मेल मुस्तफा अलि सय्यद या नावाने आला होता.यात आयएसआयचा उल्लेख होता.
मराठी माणूस संवाद कौशल्यात मागे पडतो म्हणून आपण वाचनाचा सराव केला पाहिजे, त्याचबरोबर इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असायला हवे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी शाळेत धडा शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आधीच घरी त्याचे वाचन करावे असे प्रतिपादन संदीप महाजन यांनी केले. येथील रुपीबाई बोरा न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी भरविण्यात आलेल्या कला, कार्यानुभव, रांगोळी, गणित-विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सल्लागार भूषण भंडारी, ॲड. गौरव मिरीकर, संजय बोरा यांनी विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कौतुक केले. या संमेलनात महाजन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संध्याकाळी संस्थेच्या डॉ. आर. बी. मोने कला मंदिरात स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वेदांत दिंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. दुसऱ्या दिवशी आठवी ते बारावीच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संदीप महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया, गौरव फिरोदिया, प्रकाश गांधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया यांनी केले. त्यांनी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच कला व विविध क्षेत्रांतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पहिल्या दिवशीच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. वेदांत दिंडोरे यांनी एकत्रित कुटुंबाचे अनेक फायदे असतात हे पालकांना सांगितले. तसेच याच विद्यालयात शिकलेले डॉ. दिंडोरे यांनी शालेय जीवनात विविध क्षेत्रांमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे माझे भविष्य उज्वल होत गेले असे प्रतिपादन केले. तसेच भविष्यात कधीही आपले विद्यार्थी व पालकांना सहकार्याची गरज भासली तर त्यांनी हक्काने सांगावे अशी सहकार्याची भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथींचे स्वागत घोषपथकाच्या माध्यमातून करण्यात आले. विद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी पाहुण्यांना मानवंदना दिली.
डिजिटल युगात इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रेसिडेन्शियल हायस्कूल येथे “ऑपरेशन सायबरसूत्र – धोक्याची ओळख, सुरक्षिततेचा मार्ग” या सामाजिक उपक्रमांतर्गत सायबर फसवणूक व डिजिटल सुरक्षितता जनजागृती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथील बीए एलएलबी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी जयदीप आगरकर यांना मुख्य अतिथी व वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. इयत्ता ८वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले हे सत्र सुमारे ४५ ते ५० मिनिटांचे असून ते संवादात्मक, माहितीपूर्ण आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत सादर करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार, बनावट लिंक व ऑनलाइन स्कॅम, सोशल मीडियाचा गैरवापर, डिजिटल स्टॉकिंग, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व डीपफेक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारे गंभीर धोके याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मोबाइल फोन सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व, मजबूत पासवर्ड वापरणे, वैयक्तिक माहिती व फोटो शेअर करताना घ्यावयाची काळजी यांवर विशेष भर देण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जयदीप आगरकर यांना त्यांच्या स्वयंसेवी टीमचे भरीव सहकार्य लाभले. या टीममध्ये निशांत सोनावणे, आदित्य रोकडे, अंबरीश थावरे, कृष्णा घालमे आणि यश लव्हे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षक व शाळा प्रशासनाकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. ऑपरेशन सायबरसूत्र’ सारखे उपक्रम शाळा स्तरावर राबविल्यास विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिस्त, सजगता आणि सुरक्षिततेची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सायबर सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना माहिती सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ काय करावे व तक्रार कशी दाखल करावी, याविषयी मार्गदर्शन केले . कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख व त्यांची टीम उपस्थित होती. विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
सामाजिक व वैश्विक शांतीसाठी आध्यात्माचा मार्ग उत्तम:सभापती प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन
साईबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये ‘शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम’ हा उपक्रम केवळ एक स्थापत्य प्रकल्प नसून भक्ती व ज्ञान यांचा अनोखा संगम आहे. आजच्या धकाधकीच्या काळामध्ये सर्वांनाच मन:शांतीची गरज आहे. खरी मनाची शांती भौतिक बाबीत नसून ती आध्यात्मात आहे. हे जाणून साईबन कृषी पर्यटन क्षेत्रात हा प्रकल्प कार्यान्वीत झाला आहे. आतापर्यंत अनेक क्रांती आपण पाहिल्या परंतू सध्या आध्यात्मिक क्रांतीची जगाला गरज आहे. सामाजिक व वैश्विक शांतीसाठी आध्यात्माचा मार्ग उत्तम आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. साईबन कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये ‘शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम’ प्रकल्पाचे उद्घाटन सभापती प्रा. शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जगदंबा भवन पुणे येथील राजयोगी दशरथ भाई, मिरा सोसायटी केंद्राच्या संचालिका राजयोगिनी उषा दिदी, अहिल्यानगर सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगीनी राजराजेश्वरी दिदी, बी के डॉ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया उपस्थित होते. शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम अंतर्गत बेलपानाने बनवलेले भव्य, सुंदर आकर्षक ज्योर्तिलिंग (महादेवाची पिंड) यांचे अनावरण करण्यात आले. टॉवर ऑफ पीस-शांती स्तंभ तसेच परमात्मा शिवाचा यथार्थ परिचय (गीता ग्रंथाच्या आधारावर), राजयोगा मेडिटेशनची माहिती सांगणारे पोस्टर प्रदर्शन दालनाचे उद्घाटनही झाले. बी के दशरथ भाई म्हणाले, काळ बदलतो आहे, अनेक प्रकारच्या समस्या आज आपल्या समोर उभ्या आहेत. ऋतुचक्र बदलत चालले आहे. वैज्ञानिक व सामाजिक तज्ञ मंडळी पण विनाशाचा इशारा देत आहेत. अशा वेळेस धैर्य व आत्मिक उन्नतीसाठी फक्त आध्यात्मच आपल्याला तारू शकेल म्हणूनच हे स्थान समाजाचे कल्याण करणारे, व्यक्तीला मन:शांती प्रदान करणारे आदर्श व उत्तम स्थान आहे. राजयोगीनी उषा दिदी म्हणाल्या, या सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून १०८ समर्पित ब्रह्माकुमारीज् उपस्थित आहेत. हा केवळ योगायोग नसून एक सुवर्णयोग आहे. राजयोगीनी ब्रह्माकुमारी राजराजेश्वरी दिदींनी ‘शिव-परमात्मा : ज्ञान-भक्ती संगम’ प्रकल्पा सोबतच मेडिटेशनची टेकडी, पीस पार्क, सृष्टी चक्र, मेडिटेशन हट, नक्षत्र उद्यान, शाश्वत यौगिक खेती, कल्पतरूह प्रकल्प, बोटींग, पपेट शो, राजयोगा मेडिटेशनची प्रदर्शनी आदिंचा ही लाभ पर्यटकांना मिळणार आहे. संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. २७ वर्षांपूर्वी खडकाळ असलेल्या या जमिनीचे एमआयडीसीचे सांडपाणी वापरून पडिक जमिनीचा विकास करण्यात आला. त्या बद्दल महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारही साईबनला प्रात्प झाला आहे. सुत्रसंचालन मनिषा यंगल, बी के नरेश भाई यांनी, तर आभार डॉ. प्रकाश कांकरिया यांनी मानले.
श्रीरामपुर शहरात मोकाट श्वानांचा सुळसुळाट झाला आहे. रात्री अपरात्री नागरिकांवर हल्ले करणे,अंगावर धावून जाणे, पाळीव प्राण्यांना जखमी करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.या सर्व घटना लक्षात घेता भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी नगरपालिकेने भटके श्वान पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोकाट कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात ठेवले जात आहे.पंचवीस श्वानांचा लॉट झाला की पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यांना बोलावून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येणार आहे. न्यायालयाने सुरुवातीला भटक्या श्वाणांना सार्वजनिक ठिकाणांहून काढण्याचा आदेश दिला होता, परंतु नंतर त्यात सुधारणा केली. आता त्यांची नसबंदी आणि लसीकरण करून त्यांना त्यांच्या मूळ ठिकाणीच परत सोडणे बंधनकारक आहे. रेबीज किंवा आक्रमक कुत्रे वगळता इतर कुत्र्यांवर ही प्रक्रिया लागू होते. तालुक्याच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात शहरी भागातून रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून टेम्पोतून आणून भटक्या श्वानांना सोडून देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बेलापूर श्रीरामपुर सह तालुक्यातील अनेक भागांत अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, श्वानांच्या वाढत्या आक्रमकतेमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांचे रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे.केवळ ग्रामीण भागच नव्हे, तर पालघर नगरपरिषद क्षेत्रातही श्वानदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी चालणे किंवा दुचाकीने प्रवास करणे भयावह झाले आहे. श्वान रात्रीच्या वेळी दुचाकीचालकांचा पाठलाग करून चावा घेण्याचा प्रयत्न करत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. नगरपरिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करणे गरजेचे असताना, या कामात उदासीनता दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आतापर्यंत १०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण नगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार श्रीरामपुर शहरात अंदाजे एक ते दीड हजार भटके श्वान असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.त्यापैकी अलीकडच्या काळात आतापर्यंत सुमारे १०० कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. बिबट्यांचा मोर्चा शहराकडे ऊस तोडणीमुळे ऊसाचे क्षेत्र उजाड होऊ लागले आहे.त्यामुळे लपण्यासाठी बिबट्यांना अधिवास राहिला नाही.शिवाय खाद्यही मिळेनासे झाले.त्यामुळे बिबट्यांनी श्वानांच्या शिकारीसाठी आपला मोर्चा शहरासह मानवी वस्तीकडे वळवला आहे.
टाटा पॉवर व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.१६) नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ऊर्जा मेळाव्यात लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेने तृतीय पारितोषिक पटकावत देशपातळीवर उल्लेखनीय यश संपादन केले. या प्रदर्शनात सास्तूर शाळेने कार्बनचे शुद्धीकरण आणि त्यापासून उपयुक्त उपउत्पादने (शाई आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कार्बन) तयार करणे या प्रयोगाचे सादरीकरण केले. टाटा पॉवर डीडीएल लर्निग सेंटर, रोहिणी सेक्टर ११, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय ऊर्जा प्रदर्शनात १५ राज्यांमधून १००० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत ओडिसाच्या प्रकल्पाला प्रथम, चेंबूर (मुंबई) येथील प्रकल्पाला द्वितीय तर धाराशिव जिल्ह्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेच्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाला. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्रालय येथील उपमहानिदेशक, एनसीसी ब्रिगेडियर अतुल्य बामझई हे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नवी दिल्ली येथील शिक्षण विभागाचे उपसंचालक प्रमोद कातियार हे विशेष पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. टाटा पॉवरच्या वरिष्ठ नेतृत्वातील द्विजदास बसाक, हिमाल तिवारी, पंकज कुमार सिंह, भारत छाबरा आणि किरण गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उद्देशपूर्ण नेतृत्व, नवकल्पना आणि जबाबदारीच्या भावनेतून स्वच्छ ऊर्जेचे पुढील पिढीतील दूत घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या यशाबद्दल शाळेच्या वतीने प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “अभिनंदन बाळांनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. एका ग्रामीण भागातील दिव्यांग मुलांच्या शाळेने राष्ट्रीय पातळीवर असे यश संपादन करणे दुर्मिळच आहे. मात्र दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही ही कामगिरी केली आहे,” असे गौरवोद्गार काढले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास या यशामध्ये समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्रशालेतील विज्ञान शिक्षिका लक्ष्मीबाई घोडके–मुंडकर, अभिनव संकल्पनांना राष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणारे अगस्त्याचे इग्नेटर चेतन गायकवाड, निशांत सावंत, संजय शिंदे, माधव मुंडकर, तसेच मार्गदर्शनानुसार मेहनत घेणाऱ्या विद्यार्थिनी ममता गोटमुखले आणि प्रणव अडसूळ यांचे विशेष योगदान मोलाचे ठरले आहे. सास्तूरच्या या निवासी दिव्यांग शाळेने मिळवलेले हे यश केवळ संस्थेचे नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण भागासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. यशस्वी संघाचे यांनी केले कौतुक या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी.आर.बदामे, टाटा पॉवरचे विश्वासराव सोनवळे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देवदत्त गिरी, दिव्यांग विभागाचे वै.सा.का.सच्चिदानंद बांगर, प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, श्री शांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे व्यवस्थापकीय अधीक्षक बी.एम.बालवाड, प्रशालेतील माजी दिव्यांग विद्यार्थी समितीचे अध्यक्ष शौकतअली मासूलदार यांनी यशस्वी संघाचे अभिनंदन केले आहे.
यंदा थंडी उशिरा दाखल झाल्याचा परिणाम रब्बी पिकांवर दिसून येत असून, हरभऱ्याच्या ताज्या भाजीला सध्या चांगला दर मिळत आहे. ग्रामीण भागात आवडीने खाल्ली जाणारी हरभऱ्याची भाजी आठवडी बाजारात दाखल झाली असून, प्रति किलो ८० ते १०० रुपये दराने विक्री होत आहे. गत आठवड्यापासून बाजारात आवक सुरू झाली आहे. हिरवीगार, कोवळी व चविष्ट असल्याने हरभऱ्याची भाजी घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. हंगामात ही भाजी आवर्जून घेतली जाते. ताजी भाजी वापरल्यानंतर उर्वरित भाजी वाळवून साठवण्याची पद्धतही ग्रामीण भागात प्रचलित आहे. थंडी वाढू लागल्यास हरभऱ्याच्या पिकाची वाढ जोमाने होते.योग्य पाण्याचा ताळमेळ राखल्यास पिकाला भरपूर टहाळ येतात. हरभऱ्याचे कोवळे शेंडे खुडल्याने झाडांना डेरे फुटतात आणि फुल-फळधारणा वाढते. त्यामुळे उत्पादनातही वाढ होते. शेंडे खुडताना मुळाला धक्का बसू नये म्हणून हे काम अत्यंत कौशल्याने, अंगठ्याच्या सहाय्याने केले जाते. यामुळे अनेक शेतकरी भाजी खुडण्यास प्राधान्य देत आहेत. दरम्यान, हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने किटकनाशक फवारणी केली जात आहे. फवारणी केलेली भाजी खाणे टाळावे, अन्यथा विषबाधा होऊ शकते, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बाजारपेठेत उशिरा आगमन साधारणतः ऑक्टोबरपासून थंडी जाणवते; मात्र बदलत्या हवामानामुळे यंदा थंडीचे दिवस अनियमित ठरले. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी वाढल्याने रब्बी पिकांची वाढ उशिरा झाली. परिणामी हरभऱ्याची भाजीही उशिरा बाजारात आली असून, पुढील एक महिनाभर उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र स्त्री मुक्ती चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण होत असली तरी आजही महिला आपल्या अस्तित्व, हक्क आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करत आहेत. या परिस्थितीत स्त्री मुक्ती चळवळ महिलांच्या हक्कांची जाणीव करून देणारी व संघर्षासाठी प्रेरणा देणारी प्रभावी ऊर्जा असल्याचे मत प्रा. सुनिता चावला-रेणके यांनी व्यक्त केले. स्त्री मुक्ती चळवळीच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त उमरगा येथील कन्हैया मंगल कार्यालयात “नैसर्गिक व सामाजिक विषमतेच्या चक्रात अडकलेले स्त्री जीवन” या विषयावर जिल्हास्तरीय महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी ॲड. शीतल चव्हाण, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, एकल महिला संघटनेच्या महानंदा चव्हाण, अणदूर हॅलो फाउंडेशनच्या वासंती मुळे, सामर्थ्य संस्थेच्या रंजिता पवार, राजू बटगीरे आदी उपस्थित होते. परिषदेत रंजिता पवार यांनी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन परिस्थितीचा महिलांवर होणारा परिणाम मांडला. नुकसानग्रस्त महिला शेतकरी व महिला मजुरांचे आपत्कालीन वास्तव स्पष्ट करताना, विशेषतः अतिवंचित समुदायातील महिलांवर होणारे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक दुष्परिणाम त्यांनी अधोरेखित केले. वासंती मुळे व महानंदा चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्या येत्या २० ते २२ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्त्री मुक्ती परिषदेत मांडण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या परिषदेला सुनंदा माने, सरिता उपासे, वैशाली जाधव, बबिता राठोड यांच्यासह धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथील कार्यकर्त्या, महिला बचत गट सदस्य, भटक्या समुदायातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा राठोड यांनी केले, तर आभार गिरीजा राठोड यांनी मानले. हिंदू कोड बिल : महिलांच्या हक्कांचा आधार ॲड. शीतल चव्हाण यांनी बदलत्या जातीय, धार्मिक व सामाजिक वास्तवाचा स्त्रियांवर होणारा परिणाम विशद केला. धर्म व वर्णव्यवस्थेच्या नावाखाली महिलांची होणारी पिळवणूक, धार्मिकतेच्या आड होणारे अत्याचार आणि त्यामुळे महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर होणारा अमानवीय परिणाम याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. संविधानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना दिलेल्या हक्कांची माहिती देत हिंदू कोड बिलाचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केले.
गुंजोटी परिसरात ऊस लागवडीची तयारी:मुबलक जलसाठ्यामुळे यंदा उमरग्यात ऊसाचे क्षेत्र वाढणार
उमरगा तालुक्यातील गुंजोटी, औराद, कसगी, कसगीवाडी व गुंजोटीवाडी भागात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीची तयारी सुरू केली आहे. अंदाज आहे की येत्या जानेवारी ते फेब्रुवारी अखेरपर्यंत या भागात ऊस लागवड होईल. गतवर्षी पावसाच्या कमतरतेमुळे ऊस लागवडीचे क्षेत्र कमी झाले होते, परंतु यावर्षी पाणीसाठा भरपूर असल्याने शेतकरी आर्थिक नियोजन करून लागवडीसाठी सज्ज होत आहेत. शेतकऱ्यांना बेणे आणणे, खते घेणे, ठिबक सिंचन लावणे आणि रान भिजवून माती तयार करणे यासारखी कामे करण्याची गरज आहे. जकापूर साठवण तलाव आणि गुंजोटी परिसरातील इतर तलाव सध्या तुडुंब भरल्यामुळे शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. त्यामुळे ऊस हे या भागातील हमखास उत्पन्न देणारे पीक ठरत आहे. विशेषतः औराद शिवारात दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होत असून, यावर्षी पावसामुळे क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, गुंजोटीत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ऊस लागवडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळण्याचीही अपेक्षा आहे.
पोलिस पाटलांनी गावात काम करत असताना नागरिकांचा संपर्क दैनंदिन ठेवणे महत्त्वाचे असून पोलिस पाटलांनी संवेदनशील माहिती कळविल्यास गंभीर गुन्हे रोखता येईल, असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांनी व्यक्त केले. पोलीस पाटील दिनानिमित्त मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक विजय पिसे, पोलीस हेड कॉ. यादव, श्रीमंत पवार, मपो हेड कॉ. घोडके आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे म्हणाले , मी वर्धा येथे काम करीत असताना दोन गटात मारामारी झाली होती. त्यामध्ये पोलीस पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली जखमीना तात्काळ रुग्णाला दाखल केले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचले, तसेच याच गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा लागली ,त्यामुळे पोलीस पाटील हाच महत्त्वाचा दुवा आहे असे सांगितले. यावेळी डॉ शिवपुजे यांनी त्यांच्या घराच्या कर्तव्याबाबत माहिती देऊन सर्व पोलीस पाटील यांनी आपापल्या गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याबाबत सूचना दिले. पो. नि. बोरीगिड्डे यांनी पोलीस पाटील यांनी कशा पद्धतीने काम करणे गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले. आभार गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे यांनी मानले.
विठ्ठल रुक्मिणी मूर्ती संवर्धनाबाबत सर्वेक्षणाचा अहवाल शासनाकडे सादर
श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या पवित्र मूर्तींच्या सुरक्षितता व दीर्घकालीन संवर्धनाच्या दृष्टीने श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या वतीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआयI), छत्रपती संभाजीनगर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी माहे फेब्रुवारी २०२५ मध्ये श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर लेखी अहवाल सादर केला आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून प्राप्त झालेल्या या अहवालास श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरे समितीची मंजुरी घेऊन, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सदर अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. सन २०२० मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींवर वज्रलेपाची संवर्धन प्रक्रिया करण्यात आलेली असून, सध्या दोन्ही मूर्ती पूर्णतः सुरक्षित स्थितीत आहेत. तथापि, भविष्यात मूर्तींची कोणतीही झीज अथवा नुकसान होऊ नये, या उद्देशाने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने सुचविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना शासनाच्या मंजुरीनंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत. श्रींच्या मूर्तीं संरक्षण व संवर्धनासाठी शासन, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयाने कार्यवाही सुरू असल्याचे औसेकर यांनी सांगितले.
कुर्डुवाडी चार वर्षापूर्वी दुमजली नव्या व्यापारी गाळ्याचे सुरु झालेले काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असून नुकत्याच झालेल्या पावसाळ्यामध्ये या अपूर्ण असलेल्या तळघरातील व्यापारी गाळ्यात सर्वत्र पाणी शिरले होते. त्यामुळे अपूर्ण असले तरी प्रथमदर्शनी हे व्यापारी गाळे सदोष असल्याची चर्चा नागरिकांतून होताना दिसत आहे. शंभरहून अधिक गाळे रिकामी तरीही नवीन गाळे बांधण्याचा प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी अशी चर्चा नागरिक करत आहेत. कुर्डुवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नगरपालिका कार्यालयाच्या अगदी समोर असलेल्या व्यापारी गाळ्यांमुळे नगरपालिकेची सुसज्ज अशी इमारत दृष्टीस पडत नाही व इतर काही कारणांमुळे सदर गाळे काढून या गाळ्यातील व्यापाऱ्यांना नगरपालिकेच्या शेजारी इमारतीच्या बाजूस दुमजली गाळ्यांची निर्मिती करून त्या गाळ्यांत या व्यापाऱ्यांना व्यापारासाठी जागा द्यायची असे काही प्रयोजन होते. गेली चार वर्षे हे गाळे अर्धवट स्थितीत पडले असून सदर दुमजली गाळ्यांचे स्लॅब व जीनाही पूर्ण झाला आहे. मात्र पावसाळ्यात या गाळ्यांध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. हे व्यापारी गाळे अगदी रोड लगत व नगरपालिका कार्यालयाजवळ चिटकून असल्यामुळे रोडवरील पावसाचे पाणी हे थेट गाळ्यांत शिरणारच असे काही तज्ज्ञांचे मत आहे. दर गाळ्यांचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेण्यासाठी ठेकेदाराने मुदत वाढ मागितली असल्याचे समजते पण नगरपालिकेने मुदत वाढ दिली का, सदर कामाची काही बिले काढलीत का, नसेल तर यावर कोणती कार्यवाही होणार आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. महापालिकेच्या धर्तीवर अनामत रक्कम व दुकान भाडे इथल्या व्यापा-यांना परवडणार नाही. मुलभूत बांधकाम तत्त्वानुसार तळघरात अशी इमारत उभी करताना बेसमेंटच्या खाली एक खड्डा घेऊन टाकी केली जाते बाहेरच्या सर्व बाजूने डांबराचे कोटींग असते. पॉलीथीन शीट असते. जे इथे दिसत नाही.पाणी ज्यावेळी मातीतून भिंतीकडे येते. त्याशीट मध्ये हेक्सागोनल किंवा ट्रँग्युलर पॅटर्न असतो.त्यातून पाणी झिरपत झिरपत भिंतीत न जाता खाली सरकते.खाली तळाला एक पाईप असतो त्याला छिद्र असताता तिथ दगडं टाकली जातात कारण माती त्यातून न जाता पाणी फिल्टर होऊन त्या पाईपातून पुढे टाकीला जाते. टाकीत एक मोटर बसवलेली असते. पाणी एका विशिष्ट लेवलला आल्यानंतर बाहेर फेकत असते, अशा प्रकारचे प्रयोजन अंडरग्राउंड गाळ्यांसाठी केले जाते. या गाळ्यांबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी नगरपालिका अभियंता यांची प्रत्यक्ष कार्यालयात भेट न झाल्यामुळे फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. नागरिकांचा पैसा उधळला जात असल्याचा आरोप ^शहरात शंभरहून अधिक गाळे रिकामी पडून आहेत. त्यामुळे नगरपालिका हे गाळे कशासाठी उभारतात हे सामान्य नागरिकांना समजेना झाले आहे. केवळ नागरिकांचा पैसा दोन्ही हाताने उधळायचा इतकेच यातून दिसत आहेत. न.पा. यापेक्षा नागरिकांच्या सोयी-सुविधांवर भर द्यावे. -अजित पूर्वत, नागरिक अशी असेल अंडर ग्राऊंड इमारतीची निर्मिती कामाची काही बिले काढलीत का, नसेल तर यावर कोणती कार्यवाही होणार आदी प्रश्न अनुत्तरित आहेत. क वर्ग नगरपालिकेअंतर्गत व्यापारी गाळ्यांना महानगरपालिकेच्या धर्तीवर अनामत रक्कम व दुकान भाडे आकारल्यामुळे येथील निमशहरी भागातील व्यापाऱ्यांना ते परवडण्याजोगे नाही. त्यामुळे सुमारे शंभरहून अधिक गाळे रिकामे धूळ खात पडून आहेत. त्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सदर अनामत रक्कम व भाडे कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे .ते होताना दिसत नाही.मात्र नवीन गाळे निर्मितीकरुन नागरिकांच्या खिशावर मात्र डल्ला मारला जात असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.
स्वामींच्या सेवेचे मूल्यकायमच असे अनमोल:अभिनेत्री श्रेया यांचे अक्कलकोट येथे प्रतिपादन
अक्कलकोट अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज जगाच्या कल्याणासाठी या भूतलावर अवतरलेले आहेत. अशा या अवलियाची सेवा करणे हे मानवी जीवनाचे परमभाग्य असते, स्वामी कृपेने ही सेवा मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या जीवन कार्यास लाभलेली आहे. जीवनातील कोणत्याही सात्विक सेवेपेक्षा स्वामी सेवेचे हे कार्य खूप महान आहे, म्हणून स्वामी सेवेचे मूल्यमापन कोणत्याही सेवेशी करता येत नाही, असे प्रतिपादन मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांची आरती करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी अभिनेत्री श्रेया बुगडे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन सन्मान केला. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे बोलत होत्या. याप्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, व्यंकटेश पुजारी, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, संतोष जमगे, खाजप्पा झंपले, सागर गोंडाळ, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते. ^आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. विनोदी मराठी मालिकांमधून श्रेया बुगडे हे नाव अल्पावधीत घराघरांत पोहोचलं. तब्बल १० वर्षे त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या पुढेही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे त्यांचे हे काम अविरतपणे सुरु रहावे, याकरीता श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व आमच्या शुभेच्छा. -प्रथमेश इंगळे, वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान
माळशिरस नगर पंचायतीने दलीत वस्तीचा निधी खर्च केला नाही, आपण अनुसूचित जाती प्रवर्गांमधून निवडून आलेलो असल्याने दलित वस्तीचा निधी प्राधान्याने त्याच प्रभागांना द्यायला पाहिजे, मात्र तसे न करता सत्ताधाऱ्यांनी दलित बांधवांना विकासापासून सत्ताधाऱ्यांनी वंचित ठेवल्याचा आरोप नगरसेवक कैलास वामन यांनी केला आहे. नगर पंचायतीतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्यांनी गुरुवारी नगर पंचायतीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पुढे बोलताना त्यांनी दलीत वस्तीचा निधी खर्च न केल्याबद्दल जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, तसेच कमळमळा येथील जय तुळजाभवानी मंदिराच्या सभा मंडपाचा वळवलेला निधी परत घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असाही इशारा त्यांनी दिला. यावेळी बोलताना माजी नगरसेविका रेशमाताई टेळे यांनी माजी आमदार राम सातपुते यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळा व सुशोभीकरण यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केला होता. या कामाचा कार्यारंभ आदेश होऊन सुद्धा फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम सुरू आहे. अन्य काम रखडलेले आहे. एक महिन्यात जर या महापुरुषांच्या स्मारकाचे काम सुरू नाही झाले याच ठिकाणी पुन्हा आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. माळशिरसचे माजी सरपंच विकास धाईंजे यांनीही नगरपंचायतमध्ये दलित वस्तीसाठी आलेला निधी जर अन्य ठिकाणी वळवला तर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल असा इशारा दिला. यावेळी माजी नगरसेवक सुरेश वाघमोडे, पांडुरंग वाघमोडे, अनिल सावंत, सोमनाथ वाघमोडे, शामराव वाघमोडे, संदीप वाघमोडे, मोहन टेळे, आप्पासो वाघमोडे आदी उपस्थित होते. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर दोन कोटी, छत्रपती शिवाजी महाराज एक कोटी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ७५ लाख, महात्मा ज्योतिबा फुले ५० लाख, राजे नरवीर उमाजी नाईक ५० लाख असे निधी मंजूर केलेले होते.
अकोला करजगाव येथील श्री शंकरराव शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुल परिसरात नुकत्याच झालेल्या स्पर्धेत श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित बाभुळगाव अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चार संघांनी स्पर्धेत बक्षिस प्राप्त करत यश संपादन केले. पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या मातोश्री स्व. निर्मलाताई पांडुरंग भटकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे यांनी मांडलेल्या मामाच्या गावाला जाऊया’ या अभिनव उपक्रमात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे सीईओ आनंद यादव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कृती मॉडेल स्पर्धेतील चार बक्षिसे श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयाने मिळवली. यात अ- श्रेणीत निखिल गोलाईत (आयओटी बेस गोवरी बनवण्याचे यंत्र), ड श्रेणीत धनश्री कचकुरे, नकुल माहुलीकर, नीलेश गिले (फार्मकार्ट), ई- श्रेणीत अमन कुकसवाडिया, संस्कृती कंकाल, मयूर रेचक, शिवानी वानरे, वैष्णवी धानोरकर, चैताली भेंडे (एलपीजी गॅस डिटेक्शन) आदी विविध विभागातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्राचार्य डॉ. प्रशांत थोरात यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यरत कृती मॉडेल स्पर्धेचे परीक्षण डॉ. मंदार देशमुख, डॉ. पंकज अर्डक, डॉ. रश्मी टाले, डॉ. दुर्गेश वेले, डॉ. अमित गावंडे, प्रा. जयंत इंगोले, शशिकांत ठाकरे, प्रा. महेश पुंडकर, प्रा. दुश्यन झामरे, प्रा. अक्षय काळमेघ, प्रा. राहुल वातीले व प्रा. स्वप्नील बोबडे यांनी केले. समारोपीय समारंभ तथा बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे तथा व्यवस्थापन सदस्य भैय्यासाहेब मेथकर, श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, सावित्री फुले विद्यापीठ पुणे येथील प्रा. दीपाली मालखेडे, शंकरराव शिक्षण संस्था करजगाव अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप सोनार यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, गौरवचिन्ह तथा प्रमाणपत्र याद्वारे गौरवण्यात आले. पर्यावरण संदेश दिंडीने तथा पुरस्कार वितरण समारंभाने या कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन प्रा. गजानन भारसाकळे, प्रास्ताविक डॉ. आशिष सोनार तथा आभार प्रदर्शन प्रा. गजानन पदमने यांनी केले. स्वतः डॉ. विजय भटकर यांची संपूर्ण कार्यक्रमात असलेली उपस्थिती कार्यक्रमाचे वैशिष्ट ठरले. कृती मॉडेल स्पर्धेतील बाभूळगावचे श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार बक्षिसांचे मानकरी ठरले.
तालुक्यातील कंचनपूर येथे ५० वर्षांपासून एक गाव एक देवी' व एक गाव एक गणपती'ची परंपरा आहे. गावातील सर्वधर्मीय बांधव एकत्र येत उत्सव साजरे करतात. यातूनच गावातीलच एकतेचे दर्शन घडते. गावात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला आहे. तसेच गावात जिनिंग फॅक्टरी असून त्यातूनही रोजगार निर्मितीसह गावातील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होत आहे. गावात २० वर्षांपूर्वी कापसाच्या पऱ्हाट्या, तुरीच्या तुराट्या व कुटारापासून व्हाइट कोल बनवण्याचा कारखाना उभारण्यात आला आहे. यातून गावातील ५० जणांना रोजगार मिळत आहे तसेच आर्थिक उलाढाल वाढण्यासह मदत झाली आहे. कंचनपूर गावात राधास्वामी सत्संग डेरा आहे. येथे प्रत्येक रविवारी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमात ग्रामस्थ स्वेच्छेने सेवा करतात. तसेच गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात २५ वर्षांपासून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या मंदिरात दरवर्षी वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्यात येतो. त्यात सर्व ग्रामस्थ सहभागी होतात. तसेच ७० वर्षांपासून गावात दरवर्षी भागवत सप्ताह घेण्यात येतो. यात दररोज अन्नदान करण्यात येते. समारोपाला काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद देण्यात येतो. यात ग्रामस्थांसह परिसरातील गावांतील ग्रामस्थही उपस्थित राहून लाभ घेतात. पऱ्हाट्या, तुराट्यांतूनही शेतकऱ्यांचे अर्थाजन कंचनपूर हे २१०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील विठ्ठलराव चोरे यांनी व्हाइट कोल बनवण्याचा कारखाना सुरू केला आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतातील पऱ्हाट्या, तुरीच्या तुराट्या व कुटार हा कच्चा माल वापरण्यात येतो. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी शेतातील पऱ्हाट्या, तुराट्या व कुटार कारखाना २५०० रुपये क्विंटलने विकत घेतो. शेतकऱ्यांना शेतपिकासह वाया जाणाऱ्या पऱ्हाट्या व तुराट्यांमधूनही आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र कायम ठेवणार:विद्यार्थी संख्येच्या निकषाबाबत लवचिक धोरण
यावर्षी फेब्रुवारी, मार्च २०२६ च्या बोर्ड परीक्षा व मूल्यांकनासंदर्भात समस्यांबाबत विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संगवे यांच्या अध्यक्षतेत शिक्षण मंडळाचे अधिकारी तथा विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. अरविंद मंगळे, प्रा. रमेश खाडे व पदाधिकाऱ्यांशी सहविचार सभेत दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र विद्यार्थी संख्येबाबत लवचिक धोरण ठेवत ती केंद्र कायम ठेवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. विभागीय शिक्षण मंडळाकडे शालार्थबाबत येणारे प्रस्ताव पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आल्यास आठवड्याच्या आत व इतर प्रस्ताव १५ दिवसात निकाली काढण्यात येतील. अनेक वर्षापासुन परीक्षा केंद्र असलेल्या केंद्रांवर सर्व सुविधा एकाच वर्षात उपलब्धतेच्या आग्रहाबाबत लवचिकता. पर्यावरण विषयासाठी बहिःस्थ परीक्षक नेमणे. परीक्षा विषयक कार्यासाठी शाळा, महाविद्यालयांना परीक्षेच्या आधी ८ दिवस आगाऊ रक्कम देणे, केंद्रातील अंतर बदल केलेल्या शिक्षकांना तातडीने टी. ए. ,डी. ए. देण्याबाबत प्रस्ताव राज्य बोर्डाला पाठवणार, कोणत्याही केंद्रावर क्षमतेपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थी न देणे. तपासलेल्या उत्तरपत्रिका संकलन केंद्रे पुरेशा प्रमाणात राहतील, शिक्षकांनी जमा केलेल्या देयकांमध्ये अकारण कपात करू नये, आदींवर चर्चा झाली. याप्रसंगी प्रा. रंगराव लांजेवार, प्रा. अनिल काळे, प्रा. प्रवीण ढोणे, प्रा. संतोष अहिर, प्रा. रमेश जोल्हे, प्रा. संतोष कुटे, प्रा. किशोर काकडे, डॉ. आनंद देशमुख, प्रा. प्रदीप शेवतकर, प्रा. पंकज वाकोडे, प्रा.सुधीर भाटे, प्रा. श्रीराम पालकर, प्रा. राजाराम वामन आदी पदाधिकारी उपस्थित होते. परीक्षा केंद्र बदल नाही परीक्षकांना २०० व नियामकांना एक हजार पेक्षा अधिक उत्तरपत्रिका मूल्यांमापनासाठी न देणे, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना मूल्यांकन कार्यात सहभागी करणार, विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र शिक्षण मंडळाकडून परस्पर बदल होणार नाही,
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र व गाठभेटीवर भर दिला आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसने गुरुवारी १२५ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींकडे निर्णयासाठी पाठवली. तर शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही गट तसेच वंचित बहुजन आघाडीतर्फे इच्छुकांकडून अर्ज स्वीकारणे सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने युती करुन महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय जाहीर केला. महापालिका निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुती तर शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या राजकीय पक्षांची महाविकास आघाडीबाबत अजून काही स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकत्रित लढण्याच्या केवळ वावड्या प्रसारमाध्यमावर उठल्या. मात्र त्याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे उर्वरित पान ४ महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती जवळपास निश्चित झाली आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १२ ते १४ जागा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाच्या वतीने त्यांच्या पक्षातर्फे इच्छुकांची यादी भाजपच्या जिल्हास्तरावरील पक्षश्रेष्ठींकडे दिली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने युती करुन महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय जाहीर केला. प्राथमिक माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाने मनसेला आठ जागांचा प्रस्ताव दिला आहे. तो मनसेने गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्य केला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढतील याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती उभय पक्षांच्या जिल्हाप्रमुखांनी दिली. जागांच्या आणि उमेदवारीबाबत काही तडजोडी असतील त्या एकत्र बसून सोडवू, असेही त्यांनी सांगितले. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची युती जवळपास ‘फायनल'? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला मनसेला ८ जागांचा प्रस्ताव; लवकरच निर्णय
जिल्हा परिषद अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ३९२ प्राथमिक शाळा चालवल्या जातात. इंग्रजी माध्यमाचे पालकांमध्ये वाढते आकर्षण असताना अद्यापही ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा आपले स्थान टिकवून आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढावी, यासाठी मागील वर्षभरापासून मुख्य कार्यकारीअधिकारी गुलाब खरात हे प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी सुद्धा नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रयत्न सुरू केले आहेत. या वर्षीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील लहान वस्ती वाड्यांमध्ये असणाऱ्या ३२ जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दहा पेक्षा कमी अथवा आसपास असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विकास पाटील यांनी या शाळेत कार्यरत असलेल्या ३२ शिक्षकांसोबत चाय पे चर्चा घडवून आणली. एक कप चहा हातात घेता, क्षणभर थांबा उकळत्या पाण्यात विरघळतो अहंकार, चिंता वाफ होऊन उडून जाते, दूर अंतरा दु:ख गोड साखरेसारखे मिसळते, हळूवार आणि चहापत्तीच्या रंगात जीवन होई रंगदार, या काव्यपंक्तीप्रमाणे उपस्थित शिक्षकांसोबत घटलेल्या पट संख्येची कारणमीमांसा करण्यात आली. सोबतच सुरू शैक्षणिक सत्रासोबतच पुढील वर्षाच्या दृष्टीने काय करता येईल, याची रूपरेषा ठरवण्यात आली. तब्बल दोन तास चाललेल्या या मंथनानंतर सहभागी शिक्षकांनी दीर्घ उसासा घेत पूर्वानुभवाच्या अनामिक भीतीमुळे मनात निर्माण झालेल्या अनेक अस्वस्थता व शंका दूर झाल्याची भावना व्यक्त केली. म्हणूनच चहा च्या एका घोटात थकलेल्या मनाला मिळते नव ऊर्जा, प्रत्येक घोटात दडलेली आशेची जादूगिरी समजा, जसे चहा शांततेने उकळतो धीराने, तसे आयुष्याच्या वादळात तूही उभा राहा न डगमगता, कधी कटू, कधी गोड, पण नेहमीच गुणकारी,चहाचा हा कप शिकवतो संघर्षातही हसत राहा. पडझडीनंतर नवे पान फुटते झाडावर, नव्या स्वप्नांचा उदय, फक्त एक घोट घे, आणि पुढे चालत राहा, साधे जीवन जगा असा संदेश दिला. शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचा उपक्रम जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या बाबतीत केला आणि तब्बल दोन तास पटसंख्या वाढीच्या उपाय योजनांवर जि.प.च्या शिक्षकासोबत चर्चा केली.
जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका असलेल्या अचलपुरच्या नगराध्यक्षपदाचा निकाल हा तेथील मतमोजणीच्या २० व्या फेरीअखेर कळणार असल्याने दुपारी ३ वाजताच्या दरम्यान तेथील नवे नगराध्यक्ष कोण, हे माहित होईल. त्याचवेळी सर्वात कमी प्रत्येकी तीन फेऱ्यांमध्ये नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे आणि शेंदुरजनाघाटची मतमोजणी आटोपणार असल्याने तेथील नगराध्यक्ष हे दुपारी १२ च्या दरम्यान स्पष्ट होतील, असा अंदाज आहे. जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या २ डिसेंबर रोजी पार पडल्या, तर अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची निवडणूक २० डिसेंबरला होत असून सर्व बाराही नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरला घोषित होत आहे. त्यामुळे अगदी दोन दिवसांवर आलेल्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निकालाबद्दल नागरिकांची उत्सुकता बरीच ताणली आहे. अचलपुर ही जिल्ह्यातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिका आहे. येथील नगरसेवकांची संख्याही सर्वाधिक ३९ आहे. मतमोजणीचा क्रम नगरसेवक आधी आणि नगराध्यक्ष नंतर असा ठरला असल्याने प्रत्येक फेरीअखेर दोन नगरसेवकांचा निकाल घोषित होईल. अशाप्रकारे २० व्या फेरीअखेर सर्व ३९ नगरसेवकांची घोषणा होणार असून या निकालानंतर तेथील नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार कोण, हे माहित होईल. जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीनुसार शेवटून दुसऱ्या क्रमांकावर म्हणजेच दुपारी २ च्या सुमारास चांदूर रेल्वेचा निकाल घोषित होईल. या ठिकाणी ८ फेऱ्या होणार आहेत. तर दर्यापुरात सातव्या आणि अंजनगाव सुर्जी व चांदूरबाजार येथे सहाव्या फेरीअखेर निकाल घोषित होईल. धारणी व चिखलदऱ्यात पाचव्या फेरीअखेर, तर मोर्शी व वरुड येथे चौथ्या फेरीअखेर तेथील नवे नगरसेवक आणि नगराध्यक्ष कळतील. मतमोजणीसाठी तीन ठिकाणी नगरपालिका कार्यालयांची निवड करण्यात आली असून चार ठिकाणी तहसील कार्यालयांची निवड करण्यात आली आहे. नांदगाव खंडेश्वर येथील मतमोजणी तेथील शासकीय आयटीआयमध्ये होणार असून अचलपुरची मतमोजणी कल्याण मंडपम येथे केली जाणार आहे. नगरपालिका/नपं मतदान टक्के अचलपूर ६९.७३ वरुड ६४.०७ दर्यापूर ६८.६६ मोर्शी ६५.७८ चिखलदरा ८५.२३ शेंदुरजना घाट ७३.५३ चांदूर रेल्वे ६८.४९ चांदूर बाजार ६७.१३ धामणगाव रेल्वे ६७.२१ धारणी नपं. ६४.४३ नांदगाव खंडेश्वर नपं. ७३.३० एकूण ६८.३८ नगरपालिका टेबल फेऱ्या अचलपूर १२ २० अंजनगाव सुर्जी १० ६ दर्यापूर ६ ७ वरुड १४ ४ चांदूर रेल्वे ७ ८ चिखलदरा २ ५ चांदूर बाजार ६ ६ शेंदुरजना घाट ७ ३ धामणगाव रेल्वे ७ ३ मोर्शी १२ ४ नांदगाव खं. (न.पं.) ६ ३ धारणी (न.पं.) ४ ५ मतमोजणीची व्यवस्था ही झालेल्या मतदानाच्या संख्येनुसार करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे सर्वात कमी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी केवळ दोन टेबल ठेवण्यात आले आहे. त्यामुळे एका फेरीत केवळ दोन इव्हीएममधील मतांची नोंदणी केली जाईल. अशाप्रकारे पाच फेऱ्यांअखेर येथील नगराध्यक्षांचा निकाल कळेल. चिखलदऱ्यात सर्वात कमी टेबल संख्या आज अंजनगावात मतदान ^न्यायालयीन निकालामुळे पुढे ढकलण्यात आलेली अंजनगाव सुर्जीची निवडणूक आगामी शनिवारी २० डिसेंबरला होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळांत मतदान होईल. ही ब वर्ग नगरपालिका असून येथे एक नगराध्यक्ष व २८ नगरसेवकांसाठी मतदान घेण्यात येत आहे. - डॉ. विकास खंडारे, सहायक आयुक्त, नगरपालिका प्रशासन. कोणत्या शहरात मतमोजणीच्या किती फेऱ्या?
वडिलांच्या डोळ्यादेखतच वाहून गेला 21 वर्षीय तरुण:हातपाय धुण्यासाठी उतरला होता कालव्यात
वडिलांसोबत कामासाठी आलेला २१ वर्षीय मुलगा हातपाय धुण्यासाठी कालव्याजवळ गेला. तो हातपाय धूवत असतानाच वडिलांच्या डोळ्यादेखत कालव्याच्या वाहत्या पाण्यात तो वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरूवारी (दि. १८) तिवसा नजीकच्या आनंदवाडीजवळ घडली. गुरूवारी सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती मात्र मुलगा सापडला नव्हता. ओम अरविंद सहारे ( २१, रा.दंडे प्लॉट, अमरावती) असे वाहत गेलेल्या मुलाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी ओमचे वडील अरविंद सहारे हे तिवसा परिसरात बांधकामाच्या साईडवर आले होते. त्याचवेळी अमरावतीवरुन ओमसुध्दा आज त्यांच्यासोबत आला होता. त्यांनी काही साईडवरील कामांचे फोटो काढले. त्यानंतर ओम हात पाय धुण्यासाठी जवळच असलेल्या कालव्यावर गेला. दरम्यान पाय धुवत असतानाच अचानक त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला. हा कालवा मोठ्या स्वरुपाचा असून त्यामधून सद्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. त्यामुळे अगदी काही वेळातच तो वाहत गेला. यावेळी ओमचे वडील अरविंद यांच्यासमोरच हा घटनाक्रम झाला. यावेळी मुलगा पाण्यात वाहून जात असल्याचे पाहताच अरविंद सहारे हे कालव्यावरुन सैरावैरा धावत निघाले मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलगा क्षणात वाहत गेला. या घटनेनंतर अरविंद सहारे यांनी कालव्यावर मदतीसाठी काही नागरीकांना हाक मारली, नागरीक पोहचले मात्र तत्पुर्वीच ओम पाण्यात वाहून गेला होता. ही माहिती तिवसा पोलिस, तहसील प्रशासन व अप्परवर्धा कालवे विभाग तसेच जिल्हा आपत्ती व बचाव पथकाला देण्यात आली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता तिवसा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. गुरूवारी सायंकाळपर्यंत शोध पथकाने ओमचा शोध घेतला मात्र त्याचा पत्ता लागला नव्हता. अंधार झाल्यामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली.

25 C