सटाण्यात 2 उमेदवारांची माघार:इच्छुक उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी पडद्याआड घडामोडी
सटाणा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी बुधवारी (१९) माघारीच्या पहिल्या दिवशी जिजाबाई दोधा मोरे यांनी तर प्रभाग ७-अ मधन मंगला दादाजी खैरनार या दोघांनी माघार घेतली. तरीही नगराध्यक्ष पदासाठी नऊ तर नगरसेवक पदासाठी १५३ उमेदवार रिंगणात आहेत.इच्छुक उमेदवारांना माघारीसाठी समजूत काढण्यासाठी सर्वच पक्षासह पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी विविध पक्षासह अपक्ष असे दोन -दोन, तीन-तीन अर्ज दाखल करुन ठेवले होते. तर अनेक उमेदवारांना एकाच पक्षाच्या वतीने दोन दोन एबी फॉर्म दिल्याने ज्या उमेदवाराने प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केले ते उमेदवार वैद्य तर उशिराने दाखल झालेला पण पक्षाचा एबी फॉर्म असलेला उमेदवारही छाणनीत बाद करण्यात आले. मात्र पक्षाच्या उमेदवारीतून बाद झालेल्या अनेकांनी अपक्षही अर्ज दाखल करून ठेवले असल्याने अशा उमेदवारांची समजूत काढून त्यांची माघार करून घेणे सर्वच पक्षांच्या नेत्यांना जीकीरीचे झाले आहे. विशेषत: ज्यांना पक्षांच्या वतीने दोन-दोन एबी फार्म देण्यात आले आणि त्यांचे अर्ज बाद झाले, अशा उमेदवारांमध्ये जास्त नाराजी आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करणे त्यांना समजूत काढून काहीतरी लाभाचे पद देऊन नाराजी दुर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकीय पक्षांमध्ये खलबते मतविभागणी टाळण्यासाठी माघारीच्या अंतिम क्षणापर्यंत जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांची माघार करणे सर्वच पक्षासाठी चॅलेंज आहे. माघारीसाठी ठिकठिकाणी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या बैठका सुरू असून कोणता उमेदवार कुणासाठी नुकसानदायक ठरणार याबाबत खलबते सुरू आहेत.
शहरातील ऐतिहासिक डॉ. आंबेडकर विद्यार्थी आश्रम हे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेले स्थळ आहे. त्याचा सर्वांगीण विकास, संवर्धन आणि ‘प्रेरणाभूमी’ म्हणून सरकारी मान्यता मिळवून देणे ही आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. भीमराव आंबेडकर यांनी केले. शहरात १७ नोव्हेंबर १९५१ रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकारातून आणि दिवंगत आर. आर. पवार यांच्या प्रयत्नातून या आश्रमाची स्थापना झाली. त्या पवित्र भूमीचा दर्जा वाढवून तिला अधिकृत ‘प्रेरणाभूमी’ म्हणून घोषित करावे, तसेच १७ नोव्हेंबर हा दिवस ‘प्रेरणादिन’ म्हणून साजरा व्हावा, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रेरणाभूमी विकास कृती समिती सातत्याने सामाजिक लढा देत आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दिलीप पगारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. भीमराव आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास कुणाल कांबळे, अभिनेते व बुद्धधम्म प्रचारक डॉ. गगनजी मलिक, मौलिकराज श्रीमल्ली, अभिनेते प्रवीण डाळींबकर आदींची उपस्थिती होती. कुणाल कांबळे यांनी हा आश्रम समाजाचा आहे, कोणत्याही व्यक्तीची खाजगी मालकी नाही. हा आश्रम समाजासाठी उघडा झाला पाहिजे. त्यासाठी शासनापासून ते मंत्र्यांच्या दारीही जाण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.
सामाजिक बांधिलकीतून येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री हिरालाल हस्तीमल (जैन ब्रदर्स, जळगाव) तंत्रनिकेतनने मनमाड येथील शनि मंदिराला ‘नारळपाणी संकलन यंत्र’ भेट दिले. धार्मिक स्थळाच्या परिसरातील स्वच्छता आणि पाण्याच्या उपयुक्त पुनर्वापरासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. मनमाड शहरातील शनि मंदिर परिसरात मंगलमय वातावरणात या यंत्राचे अनावरण अरविंदकुमार भन्साळी व सुनिल बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंकज चोपडा, अक्षय भंडारी, आकाश जैन उपस्थित होते. चांदवड तंत्रनिकेतनमध्ये राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम तांत्रिक शिक्षणापुरता मर्यादित न राहता समाजोपयोगी संशोधन व उद्योगाभिमुख कौशल्याचा आदर्श ठरत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढून उद्योजकतेला चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करत भविष्यात अशाच प्रकल्पांतून समाज व उद्योग क्षेत्राच्या विविध गरजा पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व तंत्रनिकेतनचे शिक्षक उपस्थित होते.
अजिंठा- बुलढाणा राज्य महामार्गावरील शिवना येथील जिल्हा परिषद शाळा ते संत धोंडिबा महाराज मंदिरापर्यंत गतिरोधक नसल्याने अपघात वाढले आहेत. येथे सध्या दर चार दिवसांआड अपघात होत असून गत चार वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये ४५ किरकोळ, २७ गंभीर तर १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. असे असतानाही अद्याप प्रशासनाला जाग आली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला आहे. दुभाजके फोडून दुचाकी वळण घेण्यासाठी जागोजागी रस्ते तयार झाल्याने, तसेच बेभान होऊन राँग साइडने सुसाट धावणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी दोन दुचाकींच्या अपघातातील एक दुचाकी फुटबॉलसारखी उडाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले होते. यातील आशा रमेश काळे या विवाहितेचा उपचारादरम्यान बुधवारी ( १९ नोव्हेंबर) मृत्यू झाला. विदर्भ, खान्देश व मराठवाड्याच्या सीमा भेदून अलीकडेच अजिंठा-बुलढाणा राज्य महामार्ग (क्रमांक ७५३) महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. जागोजागी फोडलेले दुभाजक व गतिरोधक नसल्याने २०२१ पासून चार किमी अंतरात अपघातांची मालिका आजही सुरूच आहे. ^गाव परिसरातील कोणत्याच रस्त्यावर गतिरोधक नाहीत, अनावश्यक ठिकाणी दुभाजक फोडले, दुतर्फा बाजूने वाहनांची अवैध पार्किंग वाढली आहे. तसेच दुचाकीस्वार सुसाट गाड्या पळवतात. वेळ वाचवण्यासाठी राँग साइडने वाहन चालवणे, मोकाट जनावरांचा मुक्तसंचार, ग्रामपंचायत प्रशासनाकडून उपाययोजना नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याने अपघात वाढले आहेत. वेळीच उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करू. -विलास काळे, ग्रामस्थ. ^या मार्गावर जिल्हा परिषद व कै. लक्ष्मणराव पाटील या दोन शाळांत तब्बल १५०० हून अधिक विद्यार्थी पायी ये- जा करतात, या चिमुकल्या जीवांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. दर एक-दोन दिवसांआड अपघातातील जखमी उपचारासाठी आमच्याकडे येतात. वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसल्याने व रस्त्याचा अंदाज नसल्याने अपघात घडत आहेत. -डॉ. सुभाषचंद्र काळे, शिवना ^वाहने राँग साइडने चालवू नका, वळवताना दोन्ही बाजूंनी वाहने येत नसल्याची खात्री करूनच रस्ता क्रॉस करा. रस्त्यावर अवैध वाहने उभी करून स्थानिक व्यावसायिकांनी तसेच दुचाकी वाहनधारकांनी अडथळा निर्माण केला आहे, अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येईल. कुणीही रस्ते व वाहतूक नियम पायदळी तुडवू नये. - धम्मदीप काकडे, पोलिस निरीक्षक, अजिंठा रस्त्यावर वाहने उभी केल्यास कारवाई नेमके अधिकारी कोण? ठेकेदारांनी काम पूर्ण केलेले नाही, अजूनही बऱ्याच त्रुटी आहेत. हा रस्ता केंद्रीय रस्ते प्राधिकरण धुळे विभागाकडे वर्ग केल्याने त्यांच्याशी आजवर संपर्क होऊ शकलेला नाही. वेळीच उपाययोजनांची मागणी होत आहे. ...तर आक्रमक पवित्रा घेऊ
धार्मिक कार्यक्रमात साडीने पेट घेतला; महिलेचा मृत्यू:आठ दिवस मृत्यूशी झुंज, संभाजीनगरात झाला मृत्यू
आमठाणा गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान दुर्दैवी घटना घडली. साडीने पेट घेतल्याने जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दुर्गा कैलास दिवटे (३३) असे मृत महिलेचे नाव आहे. दुर्गा दिवटे यांच्या घरी मागील आठवड्यात धार्मिक कार्यक्रम सुरू होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पूजा करताना दिव्यावर साडीचा पदर पडला. त्यामुळे त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. त्या गंभीर भाजल्या. नातेवाइकांनी तत्काळ सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. तपास पोलिस हवालदार अनंत जोशी करत आहेत. या घटनेमुळे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गंगापूर तालुक्यातील एकलहरा/नांदेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या पन्नास महिलांनी नुकताच जरंडी गावाचा सहा तास अभ्यास दौरा केला. गावातील विकास पाहून महिलांनी आपल्या गावाचा विकास करण्याचा संकल्प केला. या अभ्यास दौऱ्यात महिलांनी जरंडी गावातील ज्येष्ठ नागरिक कक्ष, प्राथमिक शाळा, हुतात्मा स्मारक गार्डन, स्मशानभूमी घनवन गार्डन, ऑक्सिजन पार्क, सुसज्ज अभ्यासिका यांची पाहणी केली. गावात फेरफटका मारून स्थानिक महिलांशी संवाद साधला. जरंडीच्या सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांनी गावातील करवसुली, विकासकामे आणि उपक्रमांची माहिती दिली. गिरजामाता बचत गट, कुलस्वामिनी स्वयंसहायता समूह, लक्ष्मीमाता बचत गट, संभाजीराजे बचत गट, तुळजाभवानी बचत गट, श्रद्धामाता बचत गट, जगदंबा समूह बचत गट या सात गटांतील महिलांनी अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला होता. महिलांनी केंद्रीय प्राथमिक शाळेतील वर्गात डिजिटल शिक्षणाचे धडे घेतले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या विकासाची माहिती दिली. दौऱ्यात ग्रामपंचायत अधिकारी सुरेश चौधरी, उपसरपंच सुदाम अवसमल, सदस्य काकासाहेब जाधव, उद्धव अवसरमल उपस्थित होते. विकास पाहून ऊर्जा मिळाली : माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, अमृत राठोड, दिलीप पाटील यांनी गावातील विविध विकासकामांची माहिती दिली. संतोष पाटील, सतीश बाविस्कर, भास्कर निकम, अंबू राठोड यांनी पुढाकार घेतला होता. वैशाली गायकवाड यांनी सांगितले की, “गावात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. विकास पाहून सकारात्मक ऊर्जा मिळाली. आता आम्हीही कामाला लागणार.” कावेरी गांगुर्डे म्हणाल्या, “झाडांमुळे गावाचे सौंदर्य वाढले आहे. नदी पाहून मन भरून आले.”
सिल्लोड येथील ग्रामीण पोलिस ठाण्याचा दूरध्वनी बंद:नागरिकांचा संपर्क तुटला
सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचा दूरध्वनी मागील सहा महिन्यांपासून बंद असल्याने तालुक्यातील नागरिकांचा पोलीस ठाण्याशी संपर्क होत नाही. यामुळे अनेक घटना घडामोडींबाबत माहिती देण्यास विलंब होत आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे सहा महिन्यांपूर्वी सिल्लोड शहरात कार्यरत होते.त्यानंतर सदरील पोलीस ठाणे हे शहरापासून दीड किलोमीटर दूर असलेल्या नवीन वास्तूत स्थलांतरित झाले. तेव्हापासून या पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद आहे. ग्रामीण भागातील कुठल्याही नागरिकांना एखाद्या घटनेबाबत पोलिसांना सतर्क करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. याशिवाय जळगाव रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या दिशादर्शक फलकावर ग्रामीण पोलीस ठाण्याचा चुकीचा नंबर टाकण्यात आला आहे. याबाबतही अद्याप संबंधितांनी दखल घेतलेली नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अशा बेफिकीर कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक फलकावर चुकीचा छापण्यात आला आहे. सदरील फलक लावून सहा महिन्यांपेक्षा जास्त कार्यकाळ उलटला. तरी या फलकाची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे अनेक वेळा पोलिस ठाण्याशी काम पडते. विविध गुन्हे,घटनांबाबत माहिती देण्यासाठी दूरध्वनी सुरू असणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन पोलीस ठाण्याचा दूरध्वनी तात्काळ सुरू करून घ्यावा. व दूरध्वनी दुरुस्त करून घ्यावा जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही. अशी प्रतिक्रिया मोढा खुर्दचे माजी सरपंच देविदास पंडित यांनी व्यक्त केली आहे. इतक्या दिवसांपासून हा दूरध्वनी क्रमांक फलकावरुन काढण्यात यायला हवा, अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करतांना दिसत आहेत. लवकरच दूरध्वनी सुरू करण्याचे आश्वासन ^ नवीन वास्तुत स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी बीएसएनएलचे कनेक्शन उपलब्ध नसल्याने सदरील दूरध्वनी बंद आहे. याबाबत आम्ही संबंधितांशी पत्र व्यवहार केलेला असून लवकरच दूरध्वनी सुरू होईल. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांशी संपर्कासाठी मी माझा नंबर दिलेला असल्याने अनेक घटनांची माहिती मला मोबाईल वरून समजते. -रवींद्र ठाकरे, सपोनि, सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या दिशादर्शक फलकावर चुकीचा दूरध्वनी क्रमांक छापण्यात आला आहे. छाया: रवींद्र सोनवणे
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. बुधवारी सुवर्णकार समाजाने या घटनेचा तीव्र निषेध केला. तहसीलदार आणि पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार प्रशांत काळे आणि पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांना दिलेल्या निवेदनात आरोपीने केलेली कृती अमानवी आणि क्रूर असल्याचे नमूद करण्यात आले. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला जलदगती न्यायालयात फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्याय झालेल्या बालिकेला न्याय मिळावा यासाठी समाज एकवटला आहे. न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी कन्नड तालुका सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष संजीव सोनार, युवराज विसपुते, श्याम महाले, विनोद बागूल, गणेश विसपुते, अर्जुन जडे, शांताराम शेठ बिरारी, गोपाल वडनेरे, राहुल टाक, सागर महादाने, पवन पावटेकर, अनिल खराडकर, पंकज निकुंभ, धीरज अंबिलवादे, सतीश बुटे, भूषण पोद्दार, सोमनाथ जाधव, योगेश बाविस्कर, ज्ञानेश्वर बनसोड, रोहित दाभाडे, रमेश जाधव, गणेश सोनार, कृष्णा विसपुते, अशोक टाक, विशाल कुमावत, संजय वर्मा, संदीप सेठी, उमाकांत खरोटे, राजेंद्र सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कडेठाणच्या वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान देण्याची मागणी
पैठण तालुक्यातील कडेठाण परिसरात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. जमिनी खरडून गेल्या. विहिरी ढासळल्या. पिके सडली. तरीही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी अतुल तवार, उदयसिंह तवार, अभिजित गंगाधर तवार यांनी पैठण तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार ज्योती पवार यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले. कडेठाण बु. गावातील वंचित शेतकऱ्यांची अधिकृत यादी सादर करण्यात आली. यापूर्वी नोंद असूनही अनुदान न मिळालेल्यांची झेरॉक्स प्रतही देण्यात आली. एकूण १९३५ शेतकऱ्यांपैकी फक्त १२२० शेतकऱ्यांना अनुदान मिळाले. उर्वरित ७१५ शेतकरी अद्यापही वंचित आहेत. बागायत आणि जिरायत क्षेत्रांमध्ये तफावत असल्याचेही ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले. या निवेदनावर तहसिलदार ज्योती पवार यांनी देखिल सकारात्मक भूमिका दर्शवली.
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रा येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सरला कामे या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जागृती करत आहेत. गंगाराम आणि गंगूबाई या त्यांच्या बाहुल्यांच्या सहाय्याने त्या मनोरंजनात्मक पद्धतीने नागरिकांशी संवाद साधतात. वेगवेगळ्या वॉर्ड, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्या प्रथम मतदारांसह सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचे महत्त्व समजावतात. मतदानाचे नियम, केंद्रात मिळणारी मदत याची माहिती देतात. १०० टक्के मतदान व्हावे यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी मतदानाचा निश्चय केला आहे. सरला कामे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिवाय प्रचाराच्या रंगातही वेग येत आहे.
तपाेवनात साधूग्राम उभारण्यासाठी ५४ एकरावरील वृक्षांचे सर्वेक्षण करत १८०० हून अधिक झाडांवर महापालिकेने फुली मारली आहे. ही झाडे ताेडण्यात येणार असल्याच्या संतापातून पर्यावरणप्रेमींनी बुधवारी (दि. १९) वृक्ष आलिंगन आंदाेलन करत ‘हे रामा, ही १८०० झाडे तूच वाचव, प्रशासनाला सुबुद्धी दे’ असा संताप व्यक्त केला. या वृक्षताेडीविराेधात आतापर्यंत ४५० हरकती दाखल आहेत. त्यावर साेमवारी (दि. २४) सुनावणी हाेणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. तपाेवनात १२०० एकरावर साधूग्राम उभारण्यात येणार आहे. ५४ एकर जागा पालिकेच्या ताब्यात असून येथील वृक्षांचे सर्वेक्षण करत १८०० हून वृक्षांवर पालिकेने फुली मारली आहे. आवश्यकतेनुसार १० वर्षांपेक्षा कमी वयाचे वृक्ष ताेडले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केल्याने पर्यावरणप्रेमींनी बुधवारी ‘झाडे वाचवा.... तपाेवन वाचवा...’ अशा घाेषणा देत आंदाेलन केले. यावेळी राजू देसले, तल्हा शेख, रोहन देशपांडे, राजेंद्र बागूल, भारती जाधव आदी उपस्थित होते. रामानेच यांना सुबुद्धी द्यावी ही रामकालाची साक्ष आहे. त्या रामानेच ही वृक्षताेड थांबविण्यासाठी प्रशासनाला सुबुद्धी द्यावी. झाडे जपण्याची गरज आहे. - राजेंद्र बागूल, पर्यावरणप्रेमी सिमेंट जंगलात कुंभमेळा हरित कुंभ साकारण्याचा संदेश प्रशासनाने द्यायला हवा. सिमेंटचे जंगल करून कुंभमेळा साजरा करणार आहात का? - काॅ. राजू देसले साेमवारी सुनावणी घेणार वृक्षताेडीबाबत अनेक हरकती प्राप्त आहेत. यावर साेमवारी (दि. २१) पलुस्कर सभागृहात सुनावणी घेण्यात येणार आहे. - विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक ५४ एकरावरील वृक्षांचे सर्वेक्षण करून झाडांवर मारल्या पिवळ्या फुल्या
रामायणापासून नाशिकच्या आजच्या औद्याेगिक प्रगतीपर्यंतचा ‘मंत्रभूमी ते यंत्रभूमी’ प्रवास तब्बल ११०० ड्राेनच्या शाेद्वारे उलगडणार आहे. राज्यात नागपूरनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये हा प्रयाेग केला जाणार आहे. यापूर्वी देशात दिल्ली, अयाेध्या, नागपूर येथे असे माेठे ड्राेन शाे करण्यात आले आहेत. दिल्लीस्थित कंपनीकडून हा शाे ‘आयमा इंडेक्स’मध्ये २८ नाेव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता ठक्कर्स डाेम येथे नाशिककर बघू शकणार आहेत. अयोध्या येथे गतवर्षी मोठा ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये ११०० ड्रोनचा वापर करून रामायणाची थीम असलेले आकर्षक दृश्य साकारले हाेते. हा शो ‘राम की पैडी’ येथे आयोजित करण्यात आला होता. नाशिकमध्येही तसाच शाे अनुभवता येणार आहे. त्यासाठी ११०० ड्राेनद्वारे मंत्रभूमी ते यंत्रभूमीचा प्रवास आकाशात ड्राेन, चित्रांच्या माध्यमातून उलगडणार आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारचा विलाेभनीय प्रवास नाशिककरांची ‘याचि देही याचि डाेळा अनुभवण्याची ही संधी असून ठक्कर डाेमच्या मागील मैदानात त्याचे नियाेजन करण्यात आले आहे. नाशिककरांना हा आगळावेगळा शाे बघण्याचा आनंद विनामूल्य घेता येणार आहे. आजपर्यंत देशातील निवडक शहरांतच झाला शाे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब जगभरात हाेत असून ड्राेन आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असे ड्राेन शाे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. भारतात आतापर्यत दिल्ली, अयाेध्या, बंगळुरू, नागपूर अशा निवडक शहरांतच इतके भव्य ड्राेन शाे झाले आहेत, त्यात आता या शाेमध्ये नाशिकचा समावेश हाेणार आहे. राज्यातील दुसराच शाे नाशिकमध्ये ‘आयमा’ने यंदा ४० वर्षे पूर्ण केली असून आयमा इंडेक्सच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिककरांना या विलक्षण शाेची अनुभूती घेता येणार आहे. राज्यात नागपूरनंतर नाशिकमध्येच असा ड्राेन शाे हाेत असून आपले शहर हे या बाबतीत दाेन नंबरचे शहर ठरले. हा क्षण अनुभवावा. - ललित बूब, अध्यक्ष, आयमा आकाशातील रात्रीच्या कलाकृतींचे आकर्षण
गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत बंडखोरी करून शिंदेसेनेचे नेते, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना जेरीस आणणारे माजी उपमहापौर राजू शिंदे यांना भाजपने उद्धवसेनेतून पक्षात प्रवेश दिला. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा प्रवेश सोहळा झाला. त्यानंतर तातडीने राजू शिंदे यांनी ‘मी छत्रपती संभाजीनगरात दोन्ही सेना (शिंदेसेना,उद्धवसेना) संपवून टाकणार’ असे वक्तव्य केले.त्यावरून शिरसाट यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. त्यांनी संतापाचे स्वर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत पोहोचवले. शिंदेंनी नाराजीची धग मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसांना जाणवून दिली. अर्थात त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. इकडे स्थानिक पातळीवरही भाजपचे नेते, मंत्री अतुल सावे म्हणाले की, राजू शिंदेंना उद्धवसेनेतून प्रवेश दिल्याने महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. तर शिरसाट म्हणाले की, भाजपच्या डोक्यावर बसलेल्या राजू शिंदेंनी भाजप शिल्लक ठेवला तरी ते पुरेसे आहे. वारंवार पक्ष सोडून जाणाऱ्यांना परत घेण्याने भाजप निष्ठावंतांवरील परिणामाचा भाजप नेत्यांनी विचार करावा. मी तर फक्त संजय शिरसाटांच्या अहंकार, हुकूमशाहीविरुद्ध लढलो होतो: राजू शिंदे राजू शिंदे म्हणाले की, मी वारंवार पक्ष सोडलेला नाही. यापूर्वी मी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर पक्षाचा सरचिटणीस झालो. शिरसाटांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडून आणले. मात्र, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली नाही. मी या वेळी विधानसभेला त्यांच्या अहंकार, हुकूमशाहीविरुद्ध लढलो. लोकांनी माझ्यावरील विश्वासामुळेच मला मतदान केले. मी मनपा लढणार नाही. जेथे मला अधिक मतदान झाले, तेथे जिल्हा परिषद आणि इतर सदस्य निवडून आणायचे आहेत. राजू शिंदेंना मी फार महत्त्व देत नाही- शिरसाट प्र.: हा प्रवेशतुम्हालाचालेल का?याचायुतीवरपरिणामहोईल?उ.: राजू शिंदे हे माझ्या शेजारीनव्हे भाजपच्या डोक्यावर बसलेआहेत. त्याचा प्रवेश भाजपचाअंतर्गत प्रश्न आहे. युतीबाबतचानिर्णय एकनाथ शिंदे घेतील. राजूशिंदेंना मी फार महत्त्व देत नाही.पण वारंवार पक्ष सोडूनजाणाऱ्याला पुन्हा प्रवेश दिल्यानेभाजपच्या निष्ठावंतांवर कायपरिणाम होत असेल, याचात्यांच्या नेत्यांनी विचार करावा.प्र.: कुठलीच सेना शहरात राहूदेणार नाही असे राजू शिंदेम्हणतात.उ.: त्यांनी फक्त भारतीय जनतापक्ष शिल्लक ठेवला तरी पुरेसेहोईल. शिंदे लोकांचा विश्वास जिंकतील याची खात्री- सावे प्र.: शिंदेंच्याभाजपप्रवेशाचामहायुतीवरपरिणामहोईल?उ.: राजू शिंदे उद्धवसेनेतून भाजपतआले आहेत. शिंदेसेनेतून आलेलेनाहीत. यामुळे महायुतीवरकुठलाच परिणाम होणार नाही.त्यांच्या येण्याने उद्धवसेनेची मतेभाजपला मिळतील. महायुतीवरपरिणाम होणार नाही. भाजपयुतीचा धर्म पाळतो.प्र.: शिंदेंवर जनता कितपतविश्वास ठेवेल? त्यांना मनपातविधानसभेला तिकीट देणार ?उ.: ते लोकांचा विश्वास जिंकतीलयाची खात्री आहे. त्यांना मनपाततिकीट देण्याविषयी आत्ताच काहीसांगता येणार नाही. विधानसभेलाचार वर्षे बाकी आहेत. विधानसभेतभाजपने शिरसाटांचा प्रचार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षाच्यापरीक्षा पुढे ढकलल्या, परंतु याबदलामुळे नवा पेच निर्माण झालाआहे. आता पदवीच्या बदललेल्यातारखांनाच कॉस्ट अकाउंटंटचे पेपरहीआहेत. शिवाय बीपीएड, एमपीएडचेप्रथम वर्षाचे प्रवेश ऑक्टोबर महिन्यातझाले. त्यामुळे अभ्यासक्रमाचे ९०दिवस पूर्ण होत नाहीत. त्यामुळे पेपरकसा देणार, एकाच वेळी पेपरआल्याने एका परीक्षेला मुकावेलागणार, या चिंतेत विद्यार्थ्यांनी परीक्षाविभागात धाव घेतली आहे. परीक्षाविभागाने प्रशासकीय कारणामुळेकेलेल्या बदलाने नवा गोंधळ निर्माणझाला आहे. विद्यापीठाने आधी पदवी परीक्षांचेनियोजित वेळापत्रक जाहीर केल्यावरपरीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षाकेंद्र आणि विद्यार्थी संख्येचा ताळमेळबसवण्यासाठी परीक्षा पुढेढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे१८ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पदवीप्रथम वर्षाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा१५ डिसेंबरपासून घेणार असल्याचेजाहीर केले. महाविद्यालयांनाबदललेले वेळापत्रकही पाठवण्यातआले. मात्र आता या बदललेल्यावेळापत्रकातील १० ते १७ डिसेंबर यातारखांमध्ये बीकॉम पदवीच्यापरीक्षांसह दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे परीक्षांचेपेपर आहेत. कोणताही एक पेपरदिल्यास एका पेपरला मुकावे लागणार असल्याने त्यात बदल करावा, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरमधील आयसीएमएआयने केली आहे. चर्चेनंतर घेणार निर्णय परीक्षेतील एकाच वेळी येणाऱ्या तारखांमध्येबदल करण्यासाठी कुलगुरूंना विद्यार्थ्यांचीअडचणी सांगून सर्वांच्या चर्चेनंतरच निर्णयघेता येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचेसंचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी सांगितले. बीपीएड, एमपीएडअभ्यासक्रम अपूर्ण विद्यापीठाशी संलग्नित बीपीएड,एमपीएडची ७ महाविद्यालये आहेत.७०० विद्यार्थी बीपीएड आणि १२०एमपीएडचे आहेत. यांची प्रथमवर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरमध्येसंपली. तासिका सुरू होत नाहीततोच दिवाळी सुट्या लागल्या.त्यामुळे नियमानुसार ९० दिवसांचाकालावधी होत नाही. अभ्यासक्रमपूर्ण नाही. यामुळे यांच्या वेळापत्रकातबदल करावा, असे महाविद्यालयांनीम्हटले आहे. दरम्यान, विधी शाखेचेप्रवेशही सीईटी सेलमार्फत होतअसल्याने बीएएलएलबी,एलएलबीची परीक्षा पुढे ढकलून २पेपरमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवावे,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अकोला व यवतमाळ येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालये सरकारी खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. विधानभवनात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील ४ सुपरस्पेशालिटी रुग्णालये पीपीपी तत्त्वावर सुरू करण्याबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच चारही वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने १५० कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजीनगर, लातूर, यवमताळ, अकोला येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारली आहेत. ३१ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरात पहिल्यांदा आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सुपरस्पेशालिटीचे पीपीपी मॉडेल रद्द केले होते. त्यानंतर ८ महिन्यांतच तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून चालवण्यासाठी निविदा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर हे प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. अधिष्ठातांकडून घेतली माहिती बुधवारी विधानसभा उपाध्यक्षांनी चारही रुग्णालयांचा आढावा घेतला. उच्च न्यायालयाने संभाजीनगरमध्ये ‘पीपीपी’ तत्त्वावर हाॅस्पिटल चालवण्याबाबत काय आदेश दिले होते याचेही सादरीकरण उपाध्यक्षांसमोर करण्यात आले.
विद्यार्थ्याची आपबीती विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक एकमध्ये राहणाऱ्या आदर्श अजिनाथ गिते या विद्यार्थ्याला १७ नोव्हेंबर रोजी रात्री मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण करणारा विद्यापीठातील सुरक्षा रक्षक होता. त्या वेळी रात्री नेमके काय घडले हे त्याच्याच शब्दात... ‘मी एमएच्या पहिल्या वर्षात शिकतो. १७ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे मी आणि माझा मित्र नारायण भोसले होस्टेलच्या रूम क्रमांक ४६ मध्ये झोपलो होतो. रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक बाहेर गोंधळ, आरडाओरडा ऐकू आला. मी दरवाजा उघडला तर बाहेर मुलांचा मोठा घोळका दिसला. ‘शांत बसा, आम्हाला डिस्टर्ब होत आहे’ एवढेच मी सांगितले होते. त्यानंतर त्यातल्याच काही जणांनी मला शिवीगाळ सुरू केली. ‘शिवी का देताय?’ मी विचारत होतो. तेवढ्यात त्या तिघा-चौघांनी माझ्यावर हात उचलला. चापटा मारल्या, ढकलाढकली सुरू झाली. मला तर असे वाटले की हे दारू पिऊनच आले आहेत. मी तिथून पळत रूम क्रमांक ३४ कडे धाव घेतली. पण पाठीमागून त्यातील एकाने बॅट उचलली आणि माझा पाठलाग केला. रूमजवळ पोहोचत असतानाच त्याने माझ्या पाठीवर बॅटने जोरात प्रहार केला. कसेबसे रूममध्ये जाऊन आतून कडी लावली. ते माझ्या मागेच आले. लाथाबुक्क्यांनी, बॅटने दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करू लागले. काही वेळाने माझा मित्र कार्तिक शिंदेने बाहेरून आवाज दिला. ते गेल्याचे सांगितले. मी दरवाजा उघडला आणि मी थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी समजले की ते मारहाण करणारे दुसरे तिसरे कुणी नसून विद्यापीठातील सुरक्षा रक्षक आहेत...’ वसतिगृहात सीसीटीव्ही बसवणार माहिती समजताच पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. मुलांच्या वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. त्याचे टेंडर काढण्यात आले असून इमारतींचे काम करत सीसीटीव्ही बसवण्यात येईल. - डॉ. प्रशांत अमृतकर, कुलसचिव, विद्यापीठ तो सुरक्षा रक्षक कालपासून नाही विद्यार्थी रीडिंग रूममधून रात्री ११.३५ वाजता आले होते. घोळक्यातून अचानक आल्याने कोण होते ते समजले नाही. एजन्सीला यासंदर्भात कळवण्यात आले आहे. संबंधित सुरक्षा रक्षक कालपासून ड्यूटीवर नाही. - बाळू इंगळे, मुख्य सुरक्षा रक्षक
पैठण गेट परिसरातील मोबाइल बाजारावर बुधवारी मनपाने कारवाई केली. यात ११८ अधिक अनधिकृत दुकाने पाडण्यात आली. सब्जीमंडीचा रस्ता मोकळा करण्यात झाला असून खोकडपुरा रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. सर्वात जुना मोबाइलचा बाजार अखेर नेस्तनाबूत झाला आहे. या ठिकाणी मोबाइल रिपेअरिंगला टाकलेले नागरिक दुकाने पडल्याने भांबावलेले पाहायला मिळाले. पैठण गेटचा कॉर्नर असलेल्या सनी सेंटरला बांधकाम परवानगी आहे. मात्र भोगवटा प्रमाणपत्र नाही. वरचा मजला अनधिकृत आहे. त्यावर लावलेले होर्डिंग धोकादायक स्थितीत आहे. मात्र असे असले तरी मालकाने न्यायालयात याचिका दाखल केल्याने तूर्तास ही कारवाई टळली आहे. मागील आठवड्यात पैठण गेट परिसरात एका तरुणाचा खून झाला होता. त्यानंतर नागरिकांनी अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. मनपा प्रशासकांनी आदेश दिल्यानंतर नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण करून रस्त्यांची मोजणी केली. पैठण गेट ते क्रांती चौक ३० मीटर, पैठण गेट ते सब्जीमंडी ९ मीटर, पैठण गेट ते खोकडपूरा १२ मीटर रुंदीचे रस्ते असल्याचे स्पष्ट झाले. या मोजणीत ११० दुकाने अतिक्रमणात असल्याचे समोर आले. संबंधितांना नोटिसा देऊन तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. सुरुवातील काही नागरिकांनी विरोध दर्शवत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिक्रमण विभागाचे प्रमुख वाहुळे यांच्या आदेशाने पोलिस व नागरी मित्र पथकाने हा प्रयत्न फोल ठरवला. १९७५ चे नियोजन, कारवाई २०२५ मध्ये १९७५ च्या शहर विकास आराखड्यात आखलेले पैठण गेट परिसरातील रस्ते अतिक्रमणामुळे जवळपास ५० वर्षें कागदावरच अडकून होते. मात्र बुधवारी (१९ नोव्हेंबर) मनपाने मोठी मोहीम राबवत हा ऐतिहासिक अडथळा दूर केला. पैठण गेटचा संपूर्ण मोबाइल बाजार, पक्षी विक्री, फळ-ज्यूस सेंटर, अनधिकृत दुकानांच्या रागांवर जेसीबी आणि पोकलेन फिरवून परिसर मोकळा करण्यात आला. या कारवाईनंतर सब्जीमंडीचा रस्ता, खोकडपुरा कनेक्शन आणि क्रांती चौक दिशेचा मार्ग दशकांनंतर मुक्त झाला. दिवसभर चालेल्या या मोहिमेत ११८ अतिक्रमणे काढण्यात आली. तीन महिन्यांनंतर सुरू झालेल्या या मोहिमेसाठी पोलिसांसह क्यूआरटीचे पथक बोलावण्यात आले होते. गेल्या आठवड्यात पैठण गेट परिसरात झालेल्या तरुणाच्या खुनानंतर नागरिकांमध्ये रोष होता. यानंतर अतिक्रमणविरोधी कारवाईला निवडणुकीच्या पूर्वसंध्येला वेग आला. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्व्हे करून ९ ते १२ आणि ३० मीटर रुंदीचे मूळ रस्त्याचे मार्किंग केले. या मार्किंगमध्ये शंभरपेक्षा जास्त अतिक्रमणे उघड झाल्यानंतर ११० दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र केवळ चार ते पाच दुकानदारांनी कागदपत्रे दाखल केली. उर्वरित दुकानांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. खुनाच्या घटनास्थळापासून कारवाई सुरू कारवाईची सुरुवात खुनाच्या घटनास्थळापासून झाली. पहिल्याच दुकानाचा पाया पाडून मनपाने कठोर संदेश दिला. सकाळी सुरू झालेली कारवाई दुपारपर्यंत वेगाने सुरू राहिली. पैठण गेटच्या पार्किंगलगतचे ज्यूस सेंटर, पक्षी विक्री दुकाने, मोबाइल दुरुस्तीची दुकाने, तसेच बहुमजली इमारतीच्या अनधिकृत गॅलऱ्या हटवण्यात आल्या. अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. ‘सनी सेंटर’ कोर्टात, कारवाई थांबली ‘सनी सेंटर’ इमारतीवर कारवाईचे नियोजन होते, पण इमारत मालकाने कोर्टात धाव घेतल्याने पाडकाम तात्पुरते थांबले. इमारतीला बांधकाम परवानगी आहे, पण भोगवटा प्रमाणपत्र नाही, तसेच इमारत मालकाने पार्किंग स्लॉट सोडलेला नाही. इमारतीचा वरील मजला आणि होर्डिंग्ज धोकादायक असल्याने मनपा कारवाईवर ठाम आहे. पोलिस बंदोबस्तात पैठण गेट परिसरातील मोबाइल बाजारावर चालला जेसीबी नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्व्हे करून ९ ते १२ आणि ३० मीटर रुंदीचे मूळ रस्त्याचे मार्किंग केले. या मार्किंगमध्ये शंभरपेक्षा जास्त अतिक्रमणे उघड झाल्यानंतर ११० दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. दरम्यान, बुधवारी अतिक्रमित मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी मनपाला ५० वर्षे लागली, तरीही कारवाई शक्य का? सब्जीमंडीतील नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावरची बांधकामेही हटवली तीनमजली आरसीसी इमारतीची अनधिकृत गॅलरी पोकलेनने पाडण्यात आली. सब्जीमंडीचा रस्ता (दलालवाडी मार्गे खोकडपुरा) मोकळा करण्यात आला. पार्किंगच्या बाजूचे १२ मीटर रुंदीचे रस्ते मोकळे केले गेले. सब्जीमंडीतील नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यावरची बांधकामेही हटवण्यात आली, तसेच ज्यूस सेंटर, पक्षी विक्री आणि मोबाइल दुरुस्तीची दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईमुळे नागरिक धास्तावले आहेत. मात्र जे नियमात नसेल त्यावर कावाई होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरही अतिक्रमणावर धडक मोहीम सुरूच चार महिन्यांपासून थांबलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम निवडणुका जाहीर होताच पुन्हा सुरू करण्यात आली. या कारवाईमुळे नागरिकांचा रोष अंगावर येऊ शकतो याची कल्पना असताना ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उलट लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसमोर या कारवाईचे कौतुक करून रस्ते तयार करण्यासाठी निधीची मागणी करीत आहेत. पुन्हा सुरू झालेली ही कारवाई आगामी निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी सुरू झालेली आहे का, याचीसुद्धा शहरात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मनपाने १० रस्त्यांची यादी जाहीर केली आहे. त्याचा टोटल स्टेशन सर्व्हे करुन, मार्किंग काम सुरू करण्यात आले. त्यामुळे ही कारवाई अजून किती काळ चालेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी कारवाईदरम्यान प्रत्येक इमारतीचा परवाना काय आहे? आणि सद्य:स्थितीत त्या ठिकाणी काय अस्तित्वात आहे याबाबत माहिती विचारली. एका इमारतीच्या कारवाईदरम्यान नगररचना विभागाचे अधिकारी सांगत असलेली माहिती आणि प्रत्यक्षात तफावत आढळून येत होती. या वेळी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती सांगितली जात असल्याचे लक्षात येताच अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना जोरदार फैलावर घेतले. महापालिकेची अपूर्ण इमारतदेखील पाडली खोकडपुरा मार्गावरील मनपाचे अपूर्ण स्ट्रक्चर, ज्यात दुकाने आणि कुटुंबे राहत होती, तेही जमीनदोस्त करण्यात आले. मुकुंदवाडीतील खुनानंतर पोलिसांनी व मनपाने एकत्र येत मुकुंदवाडी ते चिकलठाणा रस्ता मोकळा केला होता. तोच पॅटर्न वापरून, खून झालेल्या पैठणगेट परिसरातही मोहीम सुरू झाली, ज्यात खुनाच्या ठिकाणचे दुकान भुईसपाट करून कारवाईला सुरुवात झाली. पोलिसांचा बंदोबस्त असल्याने नागरिकांचा विरोध लगेच मावळला. मनपाने मात्र दुकान मालकांना पूर्व सूचना व म्हणणे मांडण्याची मुदत दिली होती.
लाचेच्या गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या फौजदाराविरुद्ध वरच्या कोर्टात अपील न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. यासाठी वकिलाने २ लाखांची मागणी केली होती. त्याला ५० हजारांची लाच घेताना बुधवारी (१९ नोव्हेंबर) पकडले. शरद बन्सी बांगर (४३) असे लाचखोर सरकारी वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवला आहे. एसीबीच्या पथकाने आरोपी बांगर याच्या कार्यालय व निवासस्थानाची झडती घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या अंगझडतीवेळी एक मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. प्रकरणात जालना एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला २०२२ मधील लाचेच्या गुन्ह्यात न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील दाखल न करण्याच्या बदल्यात सरकारी वकील बांगरने २ लाखांची लाच मागितली होती. त्यातील दीड लाखांची रक्कम बांगर याने आधीच घेतली होती, तर उर्वरित ५० हजार रुपये सेवानिवृत्तीनंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर बांगर याने त्याचा असिस्टंट अॅड. अभिमान करपे याच्या फोनवरून वारंवार संपर्क साधत ५० हजारांसाठी तगादा लावला होता. त्याचा जाच वाढल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने पडताळणी केली असता बांगर याने तडजोड करत ३० हजार रुपये स्वीकारणे मान्य केले. संशय आल्याने कार्यालयातच आला नाही एसीबीच्या पथकाने १७ नोव्हेंबर रोजी सापळा रचला. मात्र बांगर याला संशय आल्याने तो कार्यालयात गेलाच नाही. त्याने त्याचा मित्र वकील सरताळे याला तक्रारदाराकडे पाठवले. १८ नोव्हेंबर रोजी पुन्हा तक्रारदाराला पैसे देण्यासाठी पाठवले असता आरोपी बांगर याने लाच स्वीकारण्यास नकार देत तुमच्या वकिलांना भेटा असे सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने पुन्हा एसीबीकडे तक्रार दिली होती. निरीक्षक कोमल शिंदे, जमादार गजानन घायवट, गणेश चेके, गजानन कांबळे, मनोहर भुतेकर, शिवलिंग खुळे, अमोल चेके आदींनी ही कारवाई केली.
राज्यातील आगामी ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट वापरण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने स्पष्ट केले की, ईव्हीएमसोबत व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) वापरण्याची कोणत्याही स्थानिक संस्था कायद्यात तरतूद नाही, सध्या तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नाही आणि इतक्या कमी वेळेत ते लागू करणे अशक्य आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुढे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने न्यायालयाला विनंती केली आहे की, निवडणूक आयोगाला कागदी मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्याचे निर्देश द्यावेत किंवा प्रत्येक ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट अनिवार्य करावेत. त्यावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
दिल्लीश्वरच एकनाथ!:भाजपच्या फोडाफोडीविरुद्ध शिंदेंची अमित शाहांकडे तक्रार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिंदेसेनेचे कट्टर विरोधक तसेच काही समर्थकांची जोरदार फोडाफोडी सुरू केली. त्यामुळे एकनाथ शिंदे संतप्त झाले. त्यांच्या मंत्र्यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाबही विचारला. त्यावर फडणवीसांनी तर्कशुद्ध उत्तरे देत त्यांना शांत केले. त्यानंतर भाजप, शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी वाद नव्हताच अशी सारवासारव केली. मात्र, बुधवारी फडणवीस, अजित पवारांसोबतच्या कार्यक्रमाला दांडी मारून शिंदे दिल्लीत अमित शाहांना भेटले. बिहार निकालाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती, असे सांगण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील भाजपचे काही नेते सकारात्मक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी थेट तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता केली, असे सूत्रांनी सांगितले. महायुतीच्या विजयात अडथळे येण्याचा शिंदेंचा इशारा फोडाफोडीमुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत. दुसरीकडे भाजपने राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी फोडूनही अजित पवार फडणवीसांच्या बाजूने ठामपणे उभे असल्याचे दिसून आले. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार अाहे, असे ते म्हणाले. त्यांनी प्रफुल्ल पटेलांना घेऊन बुधवारी तासभर वर्षा बंगल्यावर फडणवीसांशी खलबते केली. पार्थ यांची भूखंड घोटाळ्यातून सुटका करून घेण्यासाठी ही भेट होती, अशी चर्चा आहे. गायकवाडांनी दिले काँग्रेस - शरद पवार गट आघाडीचे संकेत काँग्रेसच्या खासदार, मुंबई अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्या म्हणाल्या की, उद्धवसेनेने मनसेला सोबत घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. संजय राऊत यांनी दोन महिन्यांपूर्वीच स्वबळाचा नारा दिला होता. राष्ट्रवादी शरद पवार गट आमचा नैसर्गिक मित्रपक्ष असल्याने त्याच्याशी आघाडी करण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी शरद पवारांशी चर्चा केली. साताऱ्यात आधी महिला राखीव जागेवर पुरुषाचा अर्ज वैध, नंतर केली दुरुस्ती सातारा नगरपालिकेत प्रभाग ३ मध्ये महिला राखीव जागेवर पुरुषाचा अर्ज वैध ठरवण्यात आला. तक्रारीनंतर दुरुस्ती करण्यात आली. राहाता नगर परिषदेत तपासणी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने अचानक नियम बदलून अर्ज बाद केले, असा आरोप उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाईंनी पत्रकार परिषदेत केला. अजित पवारांविषयी मुलाचे वक्तव्य; माजी आमदार पाटलांचा माफीनामा अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यावर माजी आ. राजन पाटील (मूळ अजित पवार समर्थक, महिनाभरापूर्वी भाजपत) यांच्या मुलाने अजित पवार कोणाचाही नाद करायचा, पण अनगरच्या पाटलांचा नाद करायचा नाय, असे वक्तव्य केले. त्याबद्दल राजन पाटील यांनी अजित पवारांची माफी मागितली. शिंदे मंत्री, आमदारांसाठीचा विकासनिधी मिळवू शकतात सूत्रांनी सांगितले की, भाजपच्या महाराष्ट्रातील नेतृत्वावर एकनाथ शिंदेंनी फोडाफोडीचे खापर फोडले. मात्र, काही दिवसांपूर्वी शाह मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनीच विरोधक दुर्बिणीतूनही दिसता कामा नये, असे म्हटले होते. शाहांच्या नजरेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिंदेसेनाही विरोधक आहेच. त्यामुळे ते शिंदेंच्या तक्रारीची कितपत गांभीर्याने दखल घेतील याविषयी शंका आहे. म्हणून शिंदेंपुढे फोडाफोडी सहन करण्याशिवाय पर्याय सध्यातरी नाही. सहन करण्याच्या मोबदल्यात ते मंत्री, आमदारांच्या विकासकामासाठी निधी मिळवून घेऊ शकतात.
सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटेच झाली हाेती. सिन्नरच्या पंचाळेतील मुख्य चाैकातील सर्व दुकाने बंद हाेती, रस्त्यांवर शुकशुकाट हाेता. चाैकातील देऊळ मात्र उघडे हाेते आणि आतील मारुती सगळीकडे लक्ष ठेवून हाेता. तिथून पुढे तर खडांगळीतही हेच चित्र, देवपूर, निमगाव, चाेंडी, मेंढी, साेमठाण्यात अशी भयाण शांतता... दिवस-रात्र जीव मुठीत, संध्याकाळ हाेताच गावांतील बाजार, चाैक शुकशुकाटात गुडूप हाेतात. भीती एकच... कुठूनही येईल बिबट्या, लाेक म्हणत हाेते ‘त्याला मारूनच टाकायला हवे’.., आम्ही किती दिवस दहशतीत जगू..? सिन्नरच्या पंचाळेत सारंग थाेरात आणि गाेलू शिंगाडे या दाेन चिमुकल्यांचा बिबट्याने जीव घेतला. आजही बिबट्या कधी तलावाच्या काठावर दिसताे तर कधी मक्यात बसलेला... कधी पाटावर तर कधी झाडांत पळून गायब हाेताे... पंचाळेतील आया-बहिणी, बाबा-बापडे जेव्हा हे सांगत हाेते तेव्हा आपसूकच आमचीही नजर आसपास ‘कुठून तरी बिबट्या येणार नाही ना..’ या भीतीत भिरभिरत हाेती. सारंगच्या घरी त्याची आई मेघा पाणावल्या डाेळ्यांनी, खिन्न नजरेने उभी हाेती. ‘माझा एकुलता एक पाेरगा गेला, अजून काेनत्याबी माउलीचा जायला नकाे मारून टाका बिबट्यांना’ असे ती माउली रडवेल्या स्वरांत म्हणत हाेती. तर सारंगची आजी लक्ष्मीबाई म्हणाल्या की, ‘भाऊ पाेरगी मधी झाेपेल आसंल तरी चार यळा उठून बघिताे, यवडी भीती वाटती...’, ज्ञानेश्वर आजाेबांनी तर आम्हाला थेट लगतच्या मळ्याजवळच नेले... आमच्यापासून १० फूट अंतर दाखवत ते म्हणाले ‘परवाच इथं बशेल व्हता बिबट्या’ सारंगचे वडील गणेश सांगत हाेते का भाऊ आम्ही संध्याकाळ झाली का भायेर पडतच नई.. जरा आवाज झाला का खिडक्यांच्या जाळ्यातून बघताे. आता घराला जाळ्यांच कंपाउंडचं काम सुरू हाेईल. तेवढ्या शेजारचे गणेश आले अन् त्यांनी सायंकाळचे दूध वाटपही बंद झाले आहे. एवढी बिबट्याची दहशत असल्याचे त्यांनी मांडले. पुढे खडांगळी, मेंढी, चाेंडीतही ग्रामस्थ संतप्त हाेते. बिबट्याला मारून टाकायला हवे हीच मागणी प्रत्येकजण करत हाेता. संध्याकाळचे दूध घालणे बंदकंपन्यांमध्ये रात्री जाणारे भयभीत आहेत. संध्याकाळचे दूध घालणे बंद झाले. बिबट्याने वासरं, कुत्रे किती खाल्ली याची तर गणतीच नाही. - जयश्री गिते, सरपंच, मेंढी बिबट्यांना मारून टाका सरळ ज्यांचा पाेटचा गाेळा जाताे त्यालाच कळतं. एक धरून नेला तर दुसरा बिबट्या येताे. नसबंदीच करा बिबट्यांची. मारून टाकायला पाहिजे. मेघा थाेरात, मृत सारंगची आई दुकाने बंद, जगण्याचाच प्रश्नदिवसभर बिबट्याची भीती असतेच. अंधार पडू लागला की भीती वाढू लागते. दुकाने बंद करावी लागतात. बिबट्यांचा कायमचा बंदाेबस्त करा. - दिनकर आसळक वन विभाग-माणूस संघर्ष कमी हाेईल संध्याकाळ हाेताच शुकशुकाट हाेताे. शासनाने बिबट्याचा त्वरित निर्णय घेतला तर बिबट्याच नव्हे तर वन विभाग अन् माणूस असा संघर्षही कमी हाेईल. - नवनाथ थोरात, पंचाळे खिन्न नजरेने उभी हाेती. ‘माझा एकुलता एक पाेरगा गेला, अजून काेनत्याबी माउलीचा जायला नकाे मारून टाका बिबट्यांना’ असे ती माउली रडवेल्या स्वरांत म्हणत हाेती. तर सारंगची आजी लक्ष्मीबाई म्हणाल्या की, ‘भाऊ पाेरगी मधी झाेपेल आसंल तरी चार यळा उठून बघिताे, यवडी भीती वाटती...’, ज्ञानेश्वर आजाेबांनी तर आम्हाला थेट लगतच्या मळ्याजवळच नेले... आमच्यापासून १० फूट अंतर दाखवत ते म्हणाले ‘परवाच इथं बशेल व्हता बिबट्या’ सारंगचे वडील गणेश सांगत हाेते का भाऊ आम्ही संध्याकाळ झाली का भायेर पडतच नई.. जरा आवाज झाला का खिडक्यांच्या जाळ्यातून बघताे. आता घराला जाळ्यांच कंपाउंडचं काम सुरू हाेईल. तेवढ्या शेजारचे गणेश आले अन् त्यांनी सायंकाळचे दूध वाटपही बंद झाले आहे. एवढी बिबट्याची दहशत असल्याचे त्यांनी मांडले. पुढे खडांगळी, मेंढी, चाेंडीतही ग्रामस्थ संतप्त हाेते. बिबट्याला मारून टाकायला हवे हीच मागणी प्रत्येकजण करत हाेता. या गावांत दहशत पंचाळे, देवपूर,निमगाव, वडांगळी, खडांगळी, मेंढी, चोंडी, सांगवी, सोमठाणे, शहा, पिंपळगाव (धनगरवाडी), श्रीरामपूर(शिंदेवाडी), रामपूर, मीठसागरे, विघनवाडी, झापेवाडी यांसह सिन्नरच्या सर्वच गावांमध्ये तर दुसरीकडे इगतपुरी, दिंडाेरी, निफाडच्या गावांमध्येही बिबट्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
‘वकिली व्यवसाय करणाऱ्या किंवा त्यात येऊ पाहणाऱ्या तरुणांचा स्वत:वर विश्वास असायलाच हवा, परंतु हा आत्मविश्वास फाजील नसावा. सत्य सांगण्याचा प्रयत्न करावा. मात्र सत्य सांगताना राजा हरिश्चंद्र होऊ नये. देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा येणार नाही, गुन्हेगारांचे प्रमाण वाढणार नाही याचीही काळजी वकिलांनी घेतली पाहिजे,’ असा सल्ला विशेष सरकारी वकील, राज्यसभा खासदार अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिला. मसापतर्फे शिवछत्रपती रंगभवन येथे बुधवारी त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. माधवराव देशपांडे यांनी त्यांना “माझा जीवनप्रवास जळगाव ते दिल्ली व्हाया मुंबई’ या विषयावर बोलते केले. पद्मश्री निकम यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दांत... माझे बालपण कडक शिस्तीत गेले. वडील बॅरिस्टर, आजोबा पंढरपूरचे वारकरी. आई स्वातंत्र्यसैनिक होती. मी डॉक्टर व्हावे अशी आईची इच्छा पण वडिलांमुळे मी वकिली क्षेत्राकडे वळलो. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे माझे पाय नेहमीच जमिनीवर असतात. डोक्यात कधीच उन्माद येऊ दिला नाही. मी १९७३ ला लॉची पदवी घेतली, १९७७ ला पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर १९७८ ला जळगाव गाठले. लग्न झाले नव्हते. काही काळातच प्रथितयश वकील म्हणून नावारूपाला आलो. जळगावमध्ये २८ वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले. लोकसभेला मी उभा राहणारच नव्हतो माझ्या आयुष्यावर सहा महिन्यांत एक चित्रपट येतोय. अभिनेता राजकुमार राव माझी भूमिका करतोय. लोकसभेला उत्तर मध्य मुंबईच्या निवडणुकीत हरलो. पण ती माझी चूक होती, असे मी मानत नाही. खरे तर मी उभाच राहणार नव्हतो. पण पक्षाने माझे समुपदेशन केले. माझ्यासाठी मतदारसंघ नवा होता. अवाढव्य शक्ती प्रतिस्पर्धी होत्या, असेही त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष पदासाठी ५८ उमेदवार रिंगणात
लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा नगरपालिकेची आणि रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी अता शिगेला पोहोचली आहे. चार नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी ९५ अर्ज दाखल झाले होते. अर्जांच्या छाननीत ३७ अर्ज बाद झाल्याने आता ५८ उमेदवार नगराध्यक्षपदाच्या निवडणुक रिंगणात असून सदस्य पदाच्या ११३७ अर्जांपैकी ४१४ अर्ज बाद झाले. त्यामुळे आता ७२३ सदस्य […] The post नगराध्यक्ष पदासाठी ५८ उमेदवार रिंगणात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरमध्ये उद्यापासून इंटर कॉलेजिएट कबड्डीचा थरार
लातूर : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्या अधिपत्याखाली विलासराव देशमुख फाउंडेशन, स्कूल ऑफ फार्मसी, लातूरतर्फे मुला-मुलींच्या इंटर कॉलेजिएट कबड्डी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ व २२ नोव्हेंबर रोजी विलासराव देशमुख फाउंडेशन स्पोर्ट्स ग्राउंड, न्यू. एमआयडीसी, एअरपोर्ट रोड, लातूर येथे होणार आहे. डीबीएटीयू अंतर्गत असलेल्या सर्व संलग्न महाविद्यालयांचा या […] The post लातूरमध्ये उद्यापासून इंटर कॉलेजिएट कबड्डीचा थरार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा येथे गुत्तेदारी, भ्रष्टाचार, कामांचा निकृष्ट दर्जा कळीचे मुद्दे ठरणार
औसा : संजय सगरे औसा नगरपालिकेत गेल्या अनेक वर्षापासून अफसर शेख आहेत. यातील बहूतांश कालावधी हा त्यांच्या सत्तेचा होता. येणा-या निवडणूकीत पुन्हा एकदा पालिकेची सत्ता मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. आजवरच्या निवडणूका अफसर शेख यांच्यासाठी सोप्या होत्या. परंतू यावेळच्या निवडणूकीत त्यांच्या समोर भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी मोठे आव्हान उभे केलेले आहे. या निवडणूकीचा […] The post औसा येथे गुत्तेदारी, भ्रष्टाचार, कामांचा निकृष्ट दर्जा कळीचे मुद्दे ठरणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे निलंबित
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी यांनी बीड जिल्हयात माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत असताना त्यांच्या विरोधात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्फत केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्याकडून कांही प्रकरणी अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले असून सदर चौकशीचा अहवाल चौकशी समितीने शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे […] The post लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ढाबे राज्य उत्पादन शुल्कच्या रडारवर
लातूर : विनोद उगीले राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडावर सध्या लातूर शहरातील ढाबे रडावर असून बुधवार दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री अचानक जागृत झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या जवळपास पाच ते सहा पथकांनी लातूर शहरातील पीव्हीआर चौक ते छत्रपती चौक जाणा-या रिंग रोडवरील अनेक ढाब्यांवर अचानक धाडी टाकल्याने एकच खळबळ उडाली. […] The post ढाबे राज्य उत्पादन शुल्कच्या रडारवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मूलभूत सुविधांसाठी नूतन नगरसेवकांकडून अपेक्षा
निलंगा : लक्ष्मण पाटील निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी याकरिता कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने एकमत यूट्यूब चॅनलच्या वतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यावेळी नागरिकांनी सत्ताधा-यांनी केलेल्या विकासाचा आलेख सांगत त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून विकास काय असतो हे आम्हाला नव वर्षांमध्ये पाहायलाच मिळाले नसल्याची खंत व्यक्त करीत नूतन नगरसेवकांकडे निदान […] The post मूलभूत सुविधांसाठी नूतन नगरसेवकांकडून अपेक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँगे्रस पक्षाच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवार दि १९ रोजी येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीची आरती व महेबूब सुभानी दर्गा येथे शहरातील कॉग्रेस पक्षातील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यानंतर शहरात पदयात्रा काढून चौका चौकातील विविध मंदिरात श्रीफळ वाढविण्यात आले […] The post काँगे्रस पक्षाच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-पाकिस्तान युद्ध कधीही होऊ शकते
इस्लामाबाद : गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत. खासकरून पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानातील १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होती. अशातच आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा भारज पाकिस्तान युद्ध सुरू होणार असल्याचे विधान केले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री […] The post भारत-पाकिस्तान युद्ध कधीही होऊ शकते appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात
गोंदिया : आंतरराज्यीय घरफोड्या टोळीवर अखेर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने १९ नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली. मध्यप्रदेशातून कार्यरत असलेल्या या टोळीने गोंदिया जिल्ह्यातील एकूण सात घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. देवरी येथील सुरभी चौक रहिवासी फिर्यादी […] The post घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी गोंदिया पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनने पुन्हा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला
बीजिंग : शांघाय सहकार्य संघटनाच्या शिखर परिषदेनंतर भारत आणि चीनमधील संबंध आता हळुहळु सुधारत असल्याचे पहायला मिळत आहे. याचदरम्यान आता अमेरिकन काँग्रेसची सल्लागार असलेल्या एका संस्थेकडून चीन आणि पाकिस्तानसंदर्भात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली होती, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे ठिकाणे उद्ध्वस्त […] The post चीनने पुन्हा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन २७ टक्क्यांनी घसरला
न्यूयॉर्क : गेल्या सहा आठवड्यांत क्रिप्टोकरन्सीच्या जगात भूकंप आला आहे. या सहा आठवड्यांत गुंतवणूकदारांचे तब्बल $१.१५ ट्रिलियन डॉलर्स(भारतीय चलनानुसार सुमारे १०० लाख कोटी रुपये) स्वाहा झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांवर अक्षरश: डोके फोडून घ्यायची वेळ आली आहे. या तडाख्यापासून अगदी बिटकॉइन आणि इथेरिअम सारख्या क्रिप्टोकरन्सीही वाचू शकल्या नाहीत. कॉइनमार्केटकैपच्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी क्रिप्टोकरन्सीचे मार्केट कॅप […] The post क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन २७ टक्क्यांनी घसरला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आजारपणामुळे गेली तीन महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये परतले आहेत. कराडमध्ये दाखल झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचा त्यांनी दोन दिवस आढावा घेतला. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्वी सक्रिय होतोच, पण आता जास्त काळ मुंबईत सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामानानुसार दिल्लीलाही जाईन. कारण, माणूस जिवंत परत आला तर नशीब! इतकं दिल्लीचं हवामान वाईट आहे. प्रदूषणामुळे श्वास घेता येत नाही, अशी गंभीर परिस्थिती असल्याचं त्यांनी सांगितलं. कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करणे शक्य झाले नसल्याने कराडमध्ये काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल. तर, मलकापुरात मात्र, निवडणूक न लढवता समविचारी उमेदवारांना मदत करेल अशी काँग्रेसची भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. काँग्रेसचे माजी कराड दक्षिण तालुकाध्यक्ष आणि मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे भाजपवासी झाल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. प्रकृतीच्या कारणास्तव काहीकाळ मुंबई, दिल्लीत उपचार घेवून दोन दिवसांपूर्वी कराडमध्ये आलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांकडून पालिका निवडणुकांतील नेमक्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती. आपली तब्येत ठीक नसल्याने अनेक तपासण्या कराव्या लागल्या. आता प्रकृती सुधारत असल्याचे सांगताना, भाजपचा वारू रोखण्यासाठी समविचारींना सहकार्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः सभा घेणार आहे. प्रत्येक प्रभागात जाणे शक्य नसले तरी मोठ्या सभांद्वारे प्रचाराला वेग देताना, महाविकास आघाडीतील तसेच समविचारी उमेदवारांनाही आम्ही हातभार लावणार आहोत. कराडमध्ये महाविकास आघाडी शक्य न झाल्याने काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरली असून, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव यांनी नगराध्यक्ष आणि विविध प्रभागांत नगरसेवकपदासाठी १५ उमेदवार दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचाही एक उमेदवार असून, त्यांचाही आम्ही प्रचार करणार आहे. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतही समविचारी उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
एक टन ई-कच-यातून २०० ग्रॅम सोने काढले
छत्रपती संभाजीनगर : ‘कचरा’ म्हणजे केवळ समस्या नव्हे, तर तो हजारो कोटींचा ‘खजिना’ असू शकतो, हे छत्रपती संभाजीनगरमधील एका मराठमोळ्या संशोधिकेने जगाला दाखवून दिले. शासकीय विज्ञान संस्थेतील प्राध्यापिका डॉ. पूजा सोनवणे यांना त्यांच्या ई-कचरा व्यवस्थापनावर केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पुरस्काराने गौरवण्यात आले. देवभूमी उत्तराखंड विद्यापीठात दि. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यानझालेल्या ६६ […] The post एक टन ई-कच-यातून २०० ग्रॅम सोने काढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, जरांगे यांनी स्वतःचे पोलिस संरक्षण नाकारले असून, आपले संरक्षण तातडीने काढून घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. आज जालन्यात पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे जरांगे यांचे सहकारी किशोर मरकड यांनी अर्ज देऊन ही अधिकृत विनंती केली आहे. जालना पोलिस अधीक्षकांना सादर केलेल्या अर्जामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी थेट आरोप केला आहे की, आपल्या घातपाताच्या कटाचे मुख्य सूत्रधार आमदार धनंजय मुंडे हेच आहेत. याच अर्जात त्यांनी, मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोपही केला आहे. त्यामुळे सध्या दिलेले पोलिस संरक्षण तत्काळ काढून घेण्यात यावे, अशी स्पष्ट विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे. काय आहे प्रकरण? मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा तब्बल अडीच कोटी रुपयांत कट रचल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. यानंतर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पोलिस अधीक्षकांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून तातडीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एक जण जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण कटामागे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा थेट आरोप जरांगे पाटील यांनी केला होता. याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले होते, माझ्या खुनाचा कट रचला गेला हे सत्य आहे. कट शिजला गेला, यात शंका नाही. यासंदर्भात पोलिस अधीक्षक स्वतः लक्ष घालून आहेत. तपासात दूध का दूध पाणी का पाणी होईल. जरांगे यांनी मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अचानक दिल्लीला भेट देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांविषयीची आपली नाराजी अमित शहांना कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे 50 मिनिटे चर्चा झाल्याचे समजते आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः पत्रकारांशी संवाद साधला असून भेटी संदर्भात माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, दिल्लीमधून बिहारला आता मी निघणार आहे. त्यामुळे मी बिहारच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. चांगली चर्चा त्यांच्यासोबत झाली. बिहारमध्ये दैदीप्यमान यश मिळाले आहे त्यामुळे जाताजाता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो, असे शिंदे यांनी म्हटले आहे. रडणारा एकनाथ शिंदे नाही महाराष्ट्रात एनडीए आपापसात भांडताना दिसत आहे याची तक्रार करण्यासाठी अमित शहा यांची भेट घेतली का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता शिंदे म्हणाले, तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही. हा रडणारा नाही लढणारा आहे आणि आपण ते पाहिले आहे वेळोवेळी. या छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो आणि खरे म्हणजे बिहारमध्ये एनडीएमध्ये पाच पक्ष एकत्र होते त्यामुळे तिथे मोठे यश मिळाले. तसेच बिहारच्या जनतेला पूर्वीचे जंगलराज नको होते, विकास राज पाहिजे होते. महाराष्ट्रात देखील विधानसभेच्या निवडणुकीत आपण बघितले की एकजुटीचे बळ काय असते आणि जनतेने महायुतीला यश मिळाले. महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर तुम्ही अमित शहा यांना भेटला, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, हे सगळे तुमचे कल्पना विलास आहे, हे तुम्ही पतंग उडवत असता. आतमध्ये मी बसलो आहे आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत. मी एवढे सांगतो की ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्याचे जे काही प्रश्न आहेत हे राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांसोबत बसलो, चर्चा केली. त्यातून एवढेच ठरले की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हा विषय संपला आहे. हा विषय इथे दिल्लीत नव्हताच मुळात. रवींद्र चव्हाण यांच्याविषयी काय म्हणाले एकनाथ शिंदे? रवींद्र चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, यावर काय म्हणाल? असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबतीत त्यांचे जे काही पक्ष श्रेष्ठी आहेत ते निर्णय घेतील. आणि हा विषय काल संपला आहे. त्या विषयाला मी गांभीर्याने घेत नाही. मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि मी शिवसेनेचा नेता आहे आम्ही आमच्या नेत्यांना सूचना देण्याचे काम केले आहे. महायुती मजबुतीने निवडणुकांना सामोरे जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा चांगले यश मिळणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत अमित शहांना भेटले:50 मिनिटे झाली चर्चा, नाराजी नाट्यानंतरच्या भेटीने चर्चांना उधाण राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी साप्ताहिक बैठक झाली. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भाजपवर फोडाफोडीचे आरोप करत या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दस्तुरखुद्द एकनाथ शिंदे हजर होते. पण फडणवीसांनी शिंदें पुढेच त्यांच्या मंत्र्यांची खरडपट्टी काढली. या घटनेनंतर शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका व्यासपीठावर एकत्र येणे टाळले. यामुळे एकनाथ शिंदे भाजपवर नाराज झाल्याचा दावा केला जात आहे. वाचा सविस्तर
चांदुर रेल्वेत काँग्रेससमोर स्वपक्षाचेच आव्हान:नगराध्यक्षपदासाठी पूजा वाघ यांची अपक्ष उमेदवारी
चांदुर रेल्वे नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला स्वपक्षातूनच आव्हान निर्माण झाले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते हर्षल वाघ यांच्या पत्नी पूजा हर्षल वाघ यांनी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामुळे काँग्रेससमोर एक पेच निर्माण झाला आहे. हर्षल वाघ हे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय असून सहकार क्षेत्रात त्यांची मजबूत पकड आहे. त्यांनी त्यांच्या पत्नी पूजा वाघ यांच्यासाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने ती दिली नाही. यानंतर त्यांनी बंडखोरी करत पूजा वाघ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे, हर्षल वाघ स्वतः प्रभाग क्रमांक चारमधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रभावामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चांदुर रेल्वे नगरपालिकेत एकूण २० नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची निवड होणार आहे. दहा प्रभागांसाठी ही निवडणूक होत असून, नगराध्यक्षपदासाठी सहा तर नगरसेवकपदासाठी ९९ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. काँग्रेस, भाजप, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा) आणि आम आदमी पार्टीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे केले आहेत. अपक्ष उमेदवार पूजा हर्षल वाघ यांनी या लढतीत आव्हान निर्माण केले आहे. नगरसेवक पदासाठी कोणत्याही पक्षात बंडखोरी झाली नसली तरी, गेल्या तीन दिवसांत काही पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सद्यस्थिती पाहता, चांदुर रेल्वे नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट आहे.
अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नियोजनातील त्रुटी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपने दोन उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म दिले होते, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटला. प्रभाग १२ (ब) साठी सचिन रमेश जायदे आणि अजय हरीवल्लभ पसारी या दोघांना भाजपने एबी फॉर्म दिले होते. एकाच जागेसाठी दोन अधिकृत उमेदवारांना फॉर्म मिळाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले होते. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी केली. तपासणीनंतर सचिन रमेश जायदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अजय हरीवल्लभ पसारी यांची उमेदवारी कायम राहिली. अजय पसारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज सचिन जायदे यांच्या अर्जाच्या एक दिवस आधी दाखल केला होता. जरी पसारी यांनी सुरुवातीला अर्जासोबत एबी फॉर्म जोडला नसला तरी, उमेदवारी दाखल केल्यानंतर एबी फॉर्म सादर करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत मुभा असते. या नियमानुसार, पसारी यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. याउलट, सचिन जायदे यांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला होता, परंतु निवडणूक नियमांनुसार एका जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज वैध ठरतो. त्यामुळे जायदे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. या घटनेमुळे भाजपच्या अंतर्गत समन्वय आणि नियोजनावर स्थानिक पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे भाजपला धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
'गरीबांचा दवाखाना' म्हणून ओळख असलेले अंबादेवी ट्रस्ट रुग्णालय आता अंबादेवी मंदिराजवळील किर्तन सभागृह व ग्रंथालयाच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. हा दवाखाना अत्यंत नाममात्र दरात वैद्यकीय सेवा पुरवतो आणि येथे शहरातील नामवंत वैद्यकही आपली सेवा देतात. पूर्वी हे रुग्णालय राजकमल चौक ते अंबादेवी मंदिर रस्त्यावरील जोशी ट्रस्टच्या इमारतीत होते. ती इमारत जीर्ण झाल्यामुळे दवाखाना नव्या जागेत हलवण्यात आला आहे. येथे सर्व प्रकारच्या पॅथोलॉजीकल चाचण्या, रक्त व थुंकी तपासणी, एक्स-रे, सोनोग्राफी आदी सुविधा उपलब्ध आहेत. या रुग्णालयात रक्ताचे डझनभर घटक तपासणारे विशेष यंत्र आहे, जे शहरातील निवडक रुग्णालयांमध्येच उपलब्ध आहे. या सर्व सेवा नाममात्र दरात उपलब्ध असल्याने 'गरीबांचा दवाखाना' अशी याची ओळख आहे. याच इमारतीत सुसज्ज किर्तन हॉल आणि प्राचीन व अद्ययावत पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालयही आहे. आगामी २१ नोव्हेंबरपासून अंबादेवी मंदिरात तीन दिवसीय संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विश्वस्तांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. यावेळी श्री अंबादेवी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे, कोषाध्यक्ष विलास मराठे, ग्रंथालय विभागाच्या प्रमुख दीपा खांडेकर, विश्वस्त अशोक खंडेलवाल, भक्त निवासचे प्रमुख ॲड. राजेंद्र पांडे, व्यवस्थापक सूर्यकांत कोल्हे, सह व्यवस्थापक सुरेंद्र बुरंगे, मकूंद घड्याळपाटील, प्रदीप अंदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री अंबादेवी संस्थानतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा संगीत सेवा समारोह शुक्रवार, २१ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी पुण्याचे पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन आणि कोलकाता येथील रागेश्री दास यांची संगीत मैफल होईल. २२ नोव्हेंबरला धारवाडचे पं. कुमार मरडूर यांचे गायन तर पं. पूर्वायन चटर्जी यांचे सतारवादन होईल. समारोपीय कार्यक्रमात २३ नोव्हेंबरला जुळ्या बहिणी रजनी व गायत्री यांचे गायन आणि अनुव्रत चटर्जी यांचे तबलावादन होईल.
‘एआय’च्या साहाय्याने होणार धरणांचे संशोधन!
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील सीडब्ल्यूपीआरएस (मध्यवर्ती जल तथा विद्युत संशोधन केंद्र) आणि डीआयएटी (संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था) यांनी सामंजस्य करार करून एका महत्त्वाच्या शैक्षणिक आणि संशोधन भागीदारीला सुरुवात केली. सीडब्ल्यूपीआरएस चे संचालक डॉ. प्रभात चंद्र आणि डाएटचे कुलगुरू डॉ. नारायण मूर्ती यांनी या करारावर स्वाक्ष-या केल्या. धरणांचे प्रगत इन्स्ट्रूमेंटेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र-अध्ययन, हायड्रॉलिक संशोधन, […] The post ‘एआय’च्या साहाय्याने होणार धरणांचे संशोधन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १० पट वाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील वाहनधारकांना मोठा धक्का बसला आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या फिटनेस टेस्टच्या शुल्कात मोठा बदल केला असून काही वाहनांसाठी ही फी पूर्वीच्या तुलनेत तब्बल १० पट वाढली आहे. हा बदल सेंट्रल मोटर व्हेइकल रुल्सच्या फिफ्थ अमेंडमेंट अंतर्गत करण्यात आला असून तो तात्काळ लागूही झाला आहे. पूर्वी १५ वर्षांपेक्षा जुनी […] The post वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १० पट वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकमध्ये इम्रान खानच्या बहिणींना रस्त्यावर ओढले
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तुरुंगात असलेले इम्रान खान यांच्या बहिणींना रावळपिंडी पोलिसांनी मारहाण केली. त्यांना रस्त्यावरून ओढत नेण्यात आले आणि जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले. इम्रान खान यांच्या अलिमा आणि उज्मा नुरीन या दोघी बहिणी साप्ताहिक भेटीसाठी आदियाला तुरुंगात पोहोचल्या होत्या, परंतु त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली नाही. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयने […] The post पाकमध्ये इम्रान खानच्या बहिणींना रस्त्यावर ओढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतास हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही : भागवत
गुवाहाटी : वृत्तसंस्था ज्याला भारताचा गर्व आहे, अभिमान आहे, तो (व्यक्ती) हिंदू आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. हिंदू धर्म केवळ धार्मिक नव्हे तर तो एक सभ्यतावादी आहे, अशा शब्दांत भागवत यांनी हिंदू धर्माचे वर्णन केलं. भारत आणि हिंदू हे एकच आहेत, ते समानार्थी शब्द आहेत. मोहन भागवत यांनी […] The post भारतास हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही : भागवत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘आयटी’ संकटात; ३०-४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित
पुणे : प्रतिनिधी नोकरी जाण्याची सततची भीती, मध्यमवयीन कर्मचा-यांवरील वाढता दबाव, सरकारी संरक्षणाचा अभाव आणि संशोधन-नवकल्पनांवरील अपुरी तजवीज या प्रमुख आव्हानांचा सामना करणारे ‘आयटी’ क्षेत्र सध्या संकटात असल्याचे चित्र आहे. पुण्यालगतच्या हिंजवडी परिसरातील आयटीयन्स सध्या या ताण-तणावांना सामोरे जात आहेत. अनुभवी कर्मचा-यांच्या जागी कमी पगारातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याने ३० ते ४५ वर्षे वयोगट सर्वाधिक असुरक्षित […] The post ‘आयटी’ संकटात; ३०-४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दहशतवादी थंडीने कुडकुडले; निधीसाठी ‘जैश’ने हात पसरले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लाल किल्ला स्फोटाच्या चौकशीदरम्यान सापडलेल्या पुराव्यांवरून जैशच्या नेत्यांनी सदापे नावाच्या पाकिस्तानी अॅपसह डिजिटल माध्यमातून निधी मागितला होता. ते महिलांच्या नेतृत्वाखालील हल्ल्याचा कट रचत असल्याचे समोर आले आहे. ही संघटना आपल्या लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे गोळा करत आहे. कोणी ‘मुजाहिद’ म्हणजेच लढाऊ व्यक्तीला हिवाळी कपडे पुरवतो तो स्वत: ‘जिहादी’ मानला जाईल. त्याचप्रमाणे, […] The post दहशतवादी थंडीने कुडकुडले; निधीसाठी ‘जैश’ने हात पसरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती नगरपंचायत निवडणुकीत राडा
बारामती : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेगाने सुरू झाली असून काही ठिकाणी वादाच्या घटना समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील नगरपंचायत निवडणुकीनंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतही राजकीय वादाची ठीणगी पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. दरम्यान, बारामती नगर परिषदेच्या […] The post बारामती नगरपंचायत निवडणुकीत राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नितीश कुमार १.३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
पाटना : गुरुवारी दुपारी १:३० वाजता गांधी मैदानावर नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. पंतप्रधान मोदीदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जदयूचे कार्यवाहक अध्यक्ष संजय झा यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारी, मुख्यमंत्री भवनात जदयू विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. बैठकीत नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. बैठकीनंतर, भाजपने सम्राट चौधरी यांची विधिमंडळ […] The post नितीश कुमार १.३० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेगाने सुरू झाली असून, काही ठिकाणी वादाच्या घटना समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील नगरपंचायत निवडणुकीनंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतही राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना समोर आल्याने बारामतीच्या ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अखेर सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सातव यांना घड्याळाच्या चिन्हावर उमेदवारी देण्यात आल्याने बारामती शहराचे राजकीय नाट्य संपुष्टात आले आहे. सचिन सातव हे बारामती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष असून, यापूर्वी त्यांनी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. एकीकडे बारामती शहराचे चित्र स्पष्ट झाले असताना, माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत झालेला हा राडा मात्र चर्चेचा विषय ठरला आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध- सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीची निवडणूक लढवत असल्याचा राग मनात धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढवणे हा नागरीकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करुन नागरीकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. माझी शासनाला विनंती आहे की कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. नितीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. मारहाणीचे कारण अस्पष्ट माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना मारहाण होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारहाणीनंतर तावरे पोलिस ठाण्यात गेले असता, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ, असे पोलिसांनी सांगितले आहे. तथापि, नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या राजकीय वैमनस्यातूनच ही मारहाण झाली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जागतिक पातळीवर अत्यावश्यक डिजिटल पायाभूत सुविधा पुरवणारी आघाडीची कंपनी व्हर्टिव्हने पुण्यातील विमाननगर येथील आपल्या इंटिग्रेटेड बिझनेस सर्व्हिसेस केंद्रात ‘व्हर्टिव्ह ट्रेनिंग अकॅडमी’ आणि ‘टेक्नॉलॉजी एक्सलन्स सेंटर’चे औपचारिक उद्घाटन केले. डेटा सेंटर क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने उभारलेल्या या सुविधा भारताला एआय-युगातील डेटा सेंटर तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरतील. ट्रेनिंग अकॅडमीमध्ये कोलोकेशन, क्लाउड, एंटरप्राइझ, कम्युनिकेशन नेटवर्क तसेच औद्योगिक डेटा सेंटर क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रत्यक्ष यंत्रणांवर प्रशिक्षण मिळणार आहे. येथे प्रगत कूलिंग डिस्ट्रीब्यूशन युनिट्स, पॉवर स्विचगियर, यूपीएस मॉड्यूल्स आणि थर्मल मॅनेजमेंट सोल्यूशन्सची लाइव्ह डेमो सुविधा उपलब्ध आहे. पाच प्रशिक्षण बे असलेल्या या अकॅडमीत ऊर्जा व्यवस्थापन, कूलिंग आर्किटेक्चर आणि मॉनिटरिंग तंत्रज्ञानावर हँड्स-ऑन प्रशिक्षण दिले जाईल. दुसरीकडे, टेक्नॉलॉजी एक्सलन्स सेंटरमध्ये ऊर्जा व कूलिंग उपायांसाठी स्वतंत्र संशोधन-विकास प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यामुळे नवीन उत्पादनांची चाचणी, प्रमाणीकरण आणि ऑप्टिमायझेशन जलद गतीने होईल, अशी अपेक्षा आहे. व्हर्टिव्ह इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुभाषीस मजुमदार यांनी सांगितले की, “एआयमुळे डेटा सेंटरमधील ऊर्जा-घनता आणि गुंतागुंत वाढत आहे. पुण्यातील ही अकॅडमी अभियंते व ग्राहकांना उच्च-घनतेच्या डेटा सेंटर्ससाठी आवश्यक कौशल्य देईल.” व्हर्टिव्ह ग्लोबल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष रायन जार्विस म्हणाले, “भारत आमच्या जागतिक सेवा जाळ्याचा कणा आहे. या केंद्रामुळे जगभरात एकसमान उत्कृष्टता देण्याची आमची ताकद वाढेल.” पुणे हबचे वरिष्ठ संचालक डेव्हिड याओ यांनी नमूद केले की, “लाइव्ह यंत्रणा, प्रगत प्रयोगशाळा आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण यामुळे डेटा सेंटर क्षेत्रातील पुढची पिढी येथूनच घडेल. पुणे आता जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान प्रतिभेचे केंद्र बनत आहे.” व्हर्टिव्हच्या जागतिक सर्वोत्तम पद्धतींनुसार तयार केलेले अभ्यासक्रम आणि सुसज्ज सुविधा भारताला डेटा सेंटर तंत्रज्ञानात आत्मनिर्भर बनवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए केतन सैय्या यांनी बुधवारी सांगितले की, पाचवी ते दहावीच्या शालेय अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाचा समावेश करण्यासाठी 'आयसीएआय' प्रयत्नशील आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेण्यात आली असून, त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच, सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ५०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 'डब्ल्यूआयआरसी'च्या उच्चपदस्थ अधिकारी शिष्टमंडळाने बुधवारी पुण्यातील विविध संस्थांना भेटी दिल्या. त्यानंतर 'आयसीएआय'च्या बिबवेवाडी येथील पुणे शाखेत संस्थेच्या वतीने सीए सभासद व विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कौन्सिलचे उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, सचिव सीए जीनल सावला, खजिनदार सीए फेनील शहा, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, विभागीय समितीचे सदस्य सीए अभिषेक धामणे, सीए रेखा धामणकर आणि सीए राजेश आगरवाल उपस्थित होते. सीए केतन सैय्या यांनी सांगितले की, 'आयसीएआय'ने राज्याच्या शिक्षण विभागाकडे शालेय पाठ्यपुस्तकात वाणिज्य विषयाला समर्पित पाठ समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या मागणीला शिक्षणमंत्र्यांसह संबंधित उच्चपदस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञ सनदी लेखापालांची समिती स्थापन करण्याच्या सूचना मिळाल्या असून, यामुळे नवीन अभ्यासक्रमात वाणिज्य विषय समाविष्ट होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील सीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने ५०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची तरतूद केली आहे, असे सीए केतन सैय्या यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांच्या आत आहे, त्यांना कुठल्याही अटींशिवाय ही शिष्यवृत्ती दिली जाते. अभ्यासक्रम आणि व्यावसायिक गरजा यांचा मेळ घालण्यासाठी विशेष ऑनलाइन अभ्यासक्रम आयोजित केले जातात. सैय्या यांनी सांगितले की, सतत बदलणारे तंत्रज्ञान आणि वाढती स्पर्धा ही सीए व्यावसायिकांसमोरची प्रमुख आव्हाने आहेत. मात्र, मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी सीए अभ्यासक्रमाची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिप्स दिल्या जातात आणि शैक्षणिक संस्थांमधून कॅम्पस सिलेक्शन केले जाते. सीए अभ्यासक्रमात काळानुरूप योग्य बदल वेळोवेळी केले जातात. हा अभ्यासक्रम आव्हानात्मक असला तरी, विद्यार्थ्यांना वर्षातून तीन वेळा परीक्षा देता येते. अभ्यासक्रमात बदल करताना ते व्यवसायाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित असतील याची काळजी घेतली जाते, असेही मिणियार यांनी नमूद केले.
स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच त्यांच्या नवीन महत्त्वाकांक्षी मालिकेची घोषणा केली आहे. 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले' ही मालिका येत्या 5 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, विशेष म्हणजे या मालिकेद्वारे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे बऱ्याच वर्षांनी पुन्हा मालिकांमध्ये पुनरागमन करत आहेत. डॉ. कोल्हे या मालिकेत 'जोतिराव फुले' यांची महत्त्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका साकारणार आहेत. तर, 'सावित्रीबाई फुले' यांच्या भूमिकेत 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर दिसणार आहे. या दोन दिग्गज कलाकारांमुळे मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी यापूर्वी 'छत्रपती शिवाजी महाराज' आणि 'छत्रपती संभाजी महाराज' यांच्यासारख्या ऐतिहासिक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक भूमिका हा त्यांचा हातखंडा मानला जातो. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर, आता या मालिकेच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा एका आगळ्यावेगळ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अमोल कोल्हेंना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता- सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांच्या या भूमिकेचे तसेच या मालिकेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी कौतुक केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत मालिकेविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीमाई आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु होत आहे. या मालिकेत खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले यांची भूमिका साकारली आहे. तर प्रख्यात अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर या सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. डॉ कोल्हे यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजरामर भूमिका साकारल्या आहेत. त्यांना महात्मा फुले यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. या मालिकेसाठी त्यांना तसेच त्यांच्या संपूर्ण टीमला खुप शुभेच्छा. एक चांगली मालिका रसिकांच्या भेटीस आणत असल्याबद्दल धन्यवाद...! ही मालिका पाहण्यासाठी मी उत्सुक- जयंत पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास घराघरात पोहोचवणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून आता आणखी एक थोर प्रयत्न होत आहे तो म्हणजे ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका. ही मालिका केवळ कथानक नसून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या असामान्य कार्याचा, समाजजागृतीच्या ज्वालामुखीचा आणि परिवर्तनशील विचारांचा गौरव करणारा भव्य प्रयत्न आहे. फुले दांपत्यांनी दिलेला पुरोगामी विचार प्रत्येक घरात पोहोचेल, याबद्दल पूर्ण विश्वास आहे. अमोल कोल्हे जी, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा! ही मालिका पाहण्यासाठी मी उत्सुक आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मिळाली- अमोल कोल्हे या मालिकेच्या विषयी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, कलाकार म्हणून माझे भाग्य आहे की वेगवेगळ्या लार्जर दॅन लाईफ भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. महात्मा जोतीराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारणे हे एक वेगळे आव्हान आहे. विचारांची धगधगती मशाल म्हणजे महात्मा जोतीराव फुले. व्यवस्थेला प्रश्न विचारायची सुरुवात महात्मा फुलेंनी केली. अशा क्रांतीकाराचे विचार पोहोचवणे ही मोठी जबाबदारी आहे. स्टार प्रवाहसोबतचे नाते खूप खास आहे. माझ्या आयुष्याला ज्या भूमिकेने कलाटणी दिली ती राजा शिवछत्रपती मालिका मी स्टार प्रवाहसोबत केली. जवळपास 17 वर्षांनंतर आता स्टार प्रवाहसोबत फक्त अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून देखिल काम करणार आहे. मी या मालिकेसाठी प्रचंड उत्सुक आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजाप्रती जे योगदान आहे ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. आज उंबरठ्याबाहेर पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा जर कुणी असतील तर त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत. त्यामुळे सावित्रीबाईंचा इतिहास मालिकेतून साकारणे माझ्यासाठी अत्यंत भावनिक गोष्ट आहे. आभाळा एवढे व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणे मोठी जबाबदारी- मधुराणी गोखले सावित्रीबाई फुले यांचे भूमिका साकारणाऱ्या मधुराणी गोखले आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या, सावित्रीबाई फुले युगस्त्री होत्या. इतके आभाळा एवढे व्यक्तिमत्त्व साकारायला मिळणे मोठी जबाबदारी आहे. आज आपण मुक्तपणे शिकत आहोत, आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रात काम करत आहोत, अभिमानाने मिरवत आहोत. पण त्यासाठी दीडशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने इतका मोठा संघर्ष केला. मला सगळ्यांच्या वतीने सावित्रीबाईंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय याचा आनंद आहे. उत्सुकता, हुरहूर आणि दडपण अश्या संमिश्र भावना आहेत. प्रेक्षकांनी साथ द्यावी हीच अपेक्षा आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना वाघ यांनी, जर समोर असता तर उभा कापून काढला असता, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबासोबत संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे आणि आरोपीला कायद्याच्या चौकटीत राहून फाशीची शिक्षा होईल, असा विश्वास वाघ यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी चित्रा वाघ यांच्यासमोर टाहो फोडताच, चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर झाल्याचे हृदयद्रावक दृश्य यावेळी पाहायला मिळाले. यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, कुठल्या शब्दाने सांत्वन करू, तीन-साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर राक्षसी प्रकार झाला. या घटनेमुळे प्रत्येक आईचे काळीज रडत असेल, अत्याचार करुन राक्षसी पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. मी एक आई, एक महिला आणि या राज्याची मुलगी म्हणून सांगते कायद्यात तरतूद राहिली असती तर त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता. मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे प्रचंड जनप्रक्षोभ आहे, या हरामखोराला फाशी व्हायला हवी. घटना घडल्याच्या दिवसापासून मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. एकही छोट्यातल्या छोटा पुरावा सुटता कामा नये, या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहोत. यांना ठेचून काढणे ही काळाची गरज आहे. अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे. पालक म्हणून आपणही जागरूक राहणे आवश्यक आहे. त्याला फाशीच होणार, हा देवा भाऊंच्यावतीने मी शब्द देते, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच चांगल्या वकिलाकडे ही केस द्यावी यासाठी मी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जे काही याच्यात करता येईल ते सगळे प्रशासन, पोलिस करत आहेत. लवकरच चार्जशीट दाखल केली जाईल, असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या अमानुष कृत्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत असून, आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे येथे येऊन पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यात येईल, असे आश्वासन चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबीयांना दिले. कुटुंबीयांनी वाघ यांच्याकडे न्यायाची मागणी करीत हंबरडा फोडताच, घरातील विदारक परिस्थिती पाहून चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर झाले होते.
पोलिस संरक्षणास जरांगेंचा नकार
जालना : माझ्या घातपाताचा कट रचणा-या मुख्य सूत्रधारालाच सरकार चौकशीपासून आणि अटकेपासून वाचवत असेल तर मला अशा सरकारचे पोलीस संरक्षण नको अशा अत्यंत कठोर शब्दांत मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. जरांगे यांनी बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी अर्ज देऊन जालना पोलिस अधीक्षकांकडे आपले पोलिस संरक्षण तात्काळ […] The post पोलिस संरक्षणास जरांगेंचा नकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील अग्रगण्य आरोग्यसेवा संस्था रुबी हॉल क्लिनिकने इमोहा एल्डरकेअरसोबत धोरणात्मक भागीदारी जाहीर केली आहे. या करारामुळे पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांना रुग्णालय ते घरापर्यंत अखंड, वैद्यकीयदृष्ट्या देखरेखीखालील आणि करुणामयी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. सध्याच्या जागतिकीकरणामुळे अनेक कुटुंबे परदेशात स्थायिक होत आहेत, ज्यामुळे भारतात एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. या ज्येष्ठांना दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन, पडण्याचा धोका, औषधांचे वेळेवर सेवन आणि एकाकीपणामुळे येणारे नैराश्य अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, रुबी हॉल क्लिनिक आणि इमोहा यांच्या सहयोगातून प्रशिक्षित परिचारक, सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख, पुनर्वसन सेवा, नियमित फॉलो-अप आणि भावनिक साथ यांचा समावेश असलेली एक व्यापक प्रणाली उपलब्ध होईल. ही प्रणाली ज्येष्ठांच्या सर्वसमावेशक काळजीची खात्री देईल. या उपक्रमामुळे परदेशात राहणाऱ्या मुलांना पुण्यातील त्यांच्या पालकांची काळजी घेण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ मिळेल. इमोहा ॲपद्वारे सक्रिय आरोग्य मूल्यांकन, आपत्कालीन प्रतिसाद आणि समुदाय सहभागाच्या सुविधा उपलब्ध होतील. यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होऊन ज्येष्ठांचे जीवनमान उंचावेल. या कार्यक्रमाला रुबी हॉल क्लिनिकचे विश्वस्त तथा फिजिशियन डॉ. सायमन ग्रँट, मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोदाई, डॉ. विराज राव कोरे आणि डॉ. प्राची साठे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. सायमन ग्रँट यांनी सांगितले की, ज्येष्ठ रुग्णांना रुग्णालय सोडल्यानंतर घरी पुरेसा आधार न मिळाल्यास अनेकदा गुंतागुंत वाढते. ही भागीदारी वैद्यकीय सातत्य आणि भावनिक काळजी यांचा परिपाठ उभारेल. इमोहाचे सीईओ सौम्यजित रॉय म्हणाले, ज्येष्ठांना केवळ वैद्यकीय सेवा नव्हे, तर आदर, संवाद आणि जिव्हाळा हवा असतो. रुबी हॉलसोबतच्या या सहकार्यातून आम्ही शारीरिक, मानसिक आणि दैनंदिन सुरक्षिततेची त्रिवेणी साधू. हा उपक्रम पुण्यातील वाढत्या ज्येष्ठ लोकसंख्येसाठी भविष्यसज्ज आणि करुणामयी आरोग्यसेवेचा एक नवीन मानदंड प्रस्थापित करणारा ठरेल, असे आयोजकांनी सांगितले.
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना १३ दिवसांची ईडी कोठडी
नवी दिल्ली : दिल्लीतील न्यायालयाने बुधवारी अल फलाह विद्यापीठाचे प्रमुख आणि संस्थापक जवाद अहमद सिद्दीकी यांना १३ दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवले आहे. केंद्रीय तपास संस्थेने दावा केला आहे की, जवाद यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची फसवणूक करून तब्बल ४१५ कोटी कमावले आहेत. इतकेच नाही तर, त्यांच्या कुटुंबाचे आखाती देशांमध्ये संबंध असल्यामुळे ते पळून जाण्याचीदेखील शक्यता […] The post अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना १३ दिवसांची ईडी कोठडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
होय, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले
इस्लामाबाद : भारताने मागील काही वर्षापासून पाकिस्तानवर दहशतवादाचा आरोप केला आहे. हे आरोप पाकिस्तानी अधिका-यांनी ते सातत्याने नाकारले आहेत. आता, एका नेत्यानेच याबाबत उघड-उघड कबुली दिली आहे. पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी उघडपणे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतात हल्ले केले आहेत असे म्हटले आहे. हक हे पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरचे माजी […] The post होय, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुधवारी स्पष्ट केले की, शिवसेना चिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो अंतिम असेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती असली तरी ते न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, असे त्यांनी नमूद केले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना राजकारणात सक्रिय करण्यासाठी आणि त्यांना सत्तेच्या परिघात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आंबेडकरी कार्यकर्ते सत्तेत दिसतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या युतीअंतर्गत १० टक्के जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. ज्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेची ताकद आहे, तिथे त्यांना उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली असून, ते आपल्या ताकदीनुसार निवडणूक लढवणार असल्याचेही आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. सत्तेतील पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने मतांची चोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेसारख्या प्रगत देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होत असतील, तर भारतात का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारतातील जातीय व्यवस्थेमुळे देशाची परिस्थिती शेजारील राष्ट्रांसारखी नाही. सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थित सत्ता राबवावी, अन्यथा देशात 'सिव्हिल वॉर' होण्याची भीतीही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली. काळ आणि वेळ आली की एकत्र येऊ सध्या ठाकरे बंधू सातत्याने एकत्र येताना पहायला मिळत आहे. आत्ता ठाकरे बंधू काळाची गरज आहे. म्हणून एकत्र आले. तसेच दोन्ही पवार देखील एकत्र येण्याच्या चर्चा आहे. प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळ यावी लागते. त्यामुळे आमच्यात देखील अशी परिस्थिती निर्माण झाली की, काळ आणि वेळ आली की प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येऊ असे आंबेडकर यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळीच्या ऐक्याचा विषय हा अत्यंत जुना झाला असून लोकांच्या मनातून हा विषय आत्ता बाद झाला आहे. बरेचशे गट हे देखील नामशेष झाले आहे. आत्ता रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे असे आंबेडकरी जनतेला देखील वाटत नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. देशामध्ये काही इंडस्ट्रियल मंडळी श्रीमंत होत आहेत. तरुणाई बेरोजगार आहे. पुढे पैशाच्या जोरावर हेच आमदार, खासदार ठरवतील. मध्य प्रदेश, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. बिहारमध्ये दहा हजार रुपये खात्यात ट्रान्सफर केले. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. ज्या पद्धतीने राजकारण सुरु आहे. त्या पद्धतीने व्होटिंग पॅटर्न अनुभवायला येत आहे, अशी खंतही आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केली.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार स्वबळावर मैदानात उतरले असतानाच, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा लखन सावंत भोसले यांच्यावर मराठी भाषा येत नसल्याबद्दल होत असलेल्या टीकेवरून राजकीय वातावरण तापले आहे. सावंतवाडीच्या खेम-सावंत राजे घराण्यातील आणि उच्चशिक्षित असलेल्या श्रद्धा सावंत भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर लगेचच दिलेल्या पहिल्या मुलाखतीमध्ये त्यांना अस्खलित मराठी बोलता न आल्याने त्या ट्रोल होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनी श्रद्धा सावंत-भोसले यांच्या बचावासाठी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. श्रद्धा सावंत-भोसले मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असून, लग्न करून सावंतवाडीत आल्यानंतर त्या सावंतवाडीकर झाल्या आहेत आणि येथील संस्कृती शिकत आहेत, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले. निवडणुका येतील आणि जातील, मात्र आमच्या जिल्ह्यातील माता-भगिनींची अशा प्रकारे बदनामी कोणी करू नये. या गोष्टी आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देत नितेश राणे यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. सावंतवाडीकर याचे उत्तर 2 तारखेला देतील, असे म्हणत त्यांनी श्रद्धा यांची बाजू मांडली. त्या मराठी भाषा शिकत असून, त्या चांगल्या मराठी बोलतात, असेही राणे यांनी ठामपणे सांगितले. राजघराण्यावर कोणीही टीका केलेली नाही- दीपक केसरकर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा सावंत भोसले यांना मराठी बोलता येत नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. श्रद्धा सावंत भोसले यांना मराठी बोलता येत नाही, हे त्यांनी दिलेल्या व्हिडिओतून पाहायला मिळते. त्यांना मराठी बोलता येत नसल्यामुळे त्या कमी बोलत असतील, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले. तसेच, राजघराण्यावर कोणीही टीका केलेली नाही, नितेश राणे यांना कोणीतरी चुकीची माहिती पुरवली आहे, असा खुलासाही त्यांनी केला. श्रद्धा यांना मराठी किंवा कोकणी बोलता येत नाही, असा उल्लेख फक्त एकदाच जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी केला होता, असेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा द्यावा पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, नितेश राणेंकडे भाजपसोबत युती करण्यासाठी मी अनेकवेळा गेलो होतो. भाजप शिवसेनेची युती व्हावी ही माझी इच्छा होती. त्यामुळे युती कोणामुळे झाली नाही हे भाजपने पहावे. श्रद्धा भोसले यांना आमच्याकडून उमेदवारी देण्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही ठेवला होता. सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत अजूनही युती होऊ शकते. त्यांनी आपले 10 उमेदवार मागे घ्यावे, आम्ही आमचे 10 उमेदवार मागे घेतो. आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा सुशिक्षित आहे. तो सर्वसामान्यांना भेटू शकतो. तो मराठी चांगलं बोलू शकतो. त्यामुळे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव यावेळी दीपक केसरकर यांनी ठेवला. माजी मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केलेल्या युतीच्या प्रस्तावाला माझा आजही पाठिंबा आहे आणि यासंदर्भात मी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती, असे स्पष्ट मत दीपक केसरकर यांनी मांडले. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका युतीने एकत्र सामोरे जाऊन लढवाव्यात, अशी अपेक्षाही केसरकर यांनी व्यक्त केली. यापूर्वी सावंतवाडी नगरपालिकेत शिवसेनेने 17-0 असा मोठा विजय मिळवला होता आणि यावेळी निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊन 21-0 असे यश मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको, असा आत्मविश्वासही केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि महायुतीतच झुंजी सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपकडून शिवसेनेलाच हादरे दिले जात असल्याच्या मुद्यावरून न शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीवरच बहिष्कार टाकला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कानावरही हे सगळे टाकले. पण, अद्यापही शिवसेनेच्या मनासारखा तोडगा निघाला नसल्याची स्थिती दिसत आहेत. कारण अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिल्ली […] The post महायुतीचा वाद दिल्लीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील निवडणुकीवर टांगती तलवार
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ५० टक्के आरक्षण मर्यादा वादावरुन टांगती तलवार कायम आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीत काही ठिकाणी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मात्र, काही मुद्यांवर अधिक स्पष्टता आवश्यक असल्यामुळे ही सुनावणी आता मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही नव्या निवडणुकांची घोषणा […] The post महाराष्ट्रातील निवडणुकीवर टांगती तलवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातून देवपूरकडे जाण्यासाठी निघालेल्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने मोठा अपघात झाला. नियंत्रण सुटलेली बस थेट फलाटावर चढल्याने झालेल्या धडकेत सिन्नर तालुक्यातील दापूर येथील नऊ वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची आई आणि अन्य काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सिन्नर बस स्थानकात एकच गोंधळ उडाला. सिन्नर आगारातून देवपूरसाठी ही बस सकाळी 11 वाजता सुटणार होती. सकाळी सुमारे 10:45 च्या सुमारास चालक बस फलाटावर लावत असताना अचानक बसचे ब्रेक नादुरुस्त झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थांबण्याऐवजी वेगाने थेट फलाटावर चढली. बसची वेळ झाल्यामुळे काही प्रवासी फलाटावर बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करून थांबले होते. फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांना या बसने जोरदार धडक दिली. यामध्ये गौरी बोऱ्हाडे (30) आणि तिचा मुलगा आदर्श बोऱ्हाडे (9, रा. दापूर), तसेच विठाबाई भालेराव आणि ज्ञानेश्वर भालेराव (रा. तामकटवाडी) यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले. बसची धडक बसल्याने आदर्श बोऱ्हाडे या बालकाला गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच आदर्शचा मृत्यू झाला. गौरी बोऱ्हाडे यांच्यासह अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू अपघातानंतर तातडीने सिन्नर पोलिसांनी बस स्थानक गाठत बसचालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी भाजपचे उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जमावाला शांत करत रुग्णवाहिका जाऊ देण्याची विनंती केली. महामंडळाकडून मदतीची घोषणा राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने मृताच्या वारसास 10 लाख रुपये मदत तसेच सर्व जखमींच्या उपचाराचा खर्च करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ब्रेक नादुरुस्त झालेल्या बसला सेवेत का ठेवले गेले, याबाबत चौकशीची मागणी प्रवाशांकडून होत आहे. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज
कागल नगरपालिकेत मंत्री मुश्रीफांच्या स्नुषा सेहरनिदा यांची बिनविरोध निवड
कागल : कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांची युती झाल्याने मोठी उलाथापालथ झाली. दरम्यानच आज, बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी प्रभाग नऊमधील दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या. सेहरनिदा या मंत्री हसन मुश्रीफ […] The post कागल नगरपालिकेत मंत्री मुश्रीफांच्या स्नुषा सेहरनिदा यांची बिनविरोध निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कळमनुरी तालुक्यातील जवळापांचाळ येथे शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत मोजणीसाठी गेलेल्या पथकाला बुधवारी ता. १९ शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर या हे पथक पंचनामा करून माघारी परतले. पवनार ते पत्रादेवी या ८०२ किलोमिटर अंतराचा शक्तिपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्यातून जात आहे. या महामार्गासाठी सुमारे २१ गावांतील जमीन संपादित केली जाणार आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध दर्शविला आहे. या महामार्गासाठी जमीन संपादित केल्यास शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना उदरनिर्वाहाचे साधन राहणार नाही. या शिवाय या भागातील जमिनीवर बागायती पिके घेतली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत कळमनुरी व वसमत तालुक्यात भूसंपादनासाठी मोजणी करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांनी प्रत्येकवेळी विरोध केला आहे. तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले आहे. या शिवाय हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही करण्यात आली आहेत. दरम्यान, आज कळमनुरी तालुक्यातील जवळापांचाळ शिवारातील सर्वे नंबर १४४, १४३, १४६, ११८, ११५, ११६, १०३, १०१, ९८ या भागात महसूल विभागाच्या पथकासोबतच मोजणी पथक दाखल झाले होते. यावेळी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व पोलिस कर्मचारीही उपस्थित होते. या पथकाने या सर्वेनंबर मधील जमिनीची मोजणी करण्यास सुरवात केली असता शेतकऱ्यांनी मोजणी करण्यास विरोध दर्शविला. कुठल्याही परिस्थितीत या मार्गासाठी जमीन संपादित होऊ देणार नाही तसेच जमीन देणार नाही, अशी भूमिका ठाकरे गटाचे शेतकरी आघाडीचे पदाधिकारी पराग अडकिणे व शेतकऱ्यांनी घेतली. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे या पथकाला मोजणी करता आलीच नाही. त्यानंतर मोजणी पथकाने शेतकरी आवेज पठाण, आयुबखाँ पठाण, नदीम पठाण, भास्कर सोनोने, मन्मथ सरांगिरे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. मोजणीसाठी शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे मोजणी करता आली नाही असे या पंचनाम्यात नमुद करण्यात आले. त्यानंतर सदर पथक परत गेले. भुसंपादनास विरोध करणार : पराग अडकिणे या भागातील शेतकऱ्यांचा या महामार्गास जमिनी देण्यास तीव्र विरोध आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधाची दखल घेऊन महामार्ग रद्द करावा. तसेच लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या भावना शासनाकडे मांडून महामार्ग रद्द करण्यास भाग पाडावे. महामार्ग रद्द न झाल्यास भूसंपादनाला विरोध कायम राहणार आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार
अमरावती : सौदी अरेबियातील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांचे अंत्यसंस्कार मक्का आणि मदिनाजवळ केले जाणार आहेत. सौदी अरेबियामध्ये आता मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू झाली आहे. सौदी सरकार सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करेल. सौदी अरेबियाच्या नियमांनुसार धार्मिक यात्रेदरम्यान जर एखाद्या भाविकाचा मृत्यू झाला, तर त्याचा मृतदेह हा त्याच्या मायदेशी पाठवला जात नाही. आता बस अपघातातील मृतांवर […] The post अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र व मुंबईच्या हितासाठी जे योग्य असेल तसेच संविधानाच्या चौकटीत बसणारे असेल त्याच भूमिकेला आमची नेहमी साथ राहील व यापुढेही राहील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. काँग्रेस नेत्यांनी आज मुंबई महापालिकेच्या मुद्यावर आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार गटापुढे मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा प्रस्ताव ठेवला. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी या बैठकीत नेमके काय घडले? याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, काँग्रेसचे शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र व मुंबईतील अनेक प्रश्नांवर चर्चा केली. आम्ही या प्रकरणी पुढच्या आठवड्यातही भेटून सविस्तर चर्चा करणार आहोत. आमची व काँग्रेसच्या नेत्यांची अत्यंत बारकाईने चर्चा झाली. आम्ही आतापर्यंत नेहमीच काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. ती यापुढेही राहील. एका आठवड्यात यासंबंधीचे पूर्ण चित्र स्पष्ट होईल. पण आम्ही महाराष्ट्र व मुबंईच्या हितासाठी जी भूमिका योग्य असेल त्यासोबत कायम राहू. संविधानाच्या चौकटीत असणाऱ्या कोणत्याही भूमिकेला आमचा पाठिंबा असेल व यापुढेही राहील. सुळेंचे पुण्यातील गुन्हेगारीवरही भाष्य सुप्रिया सुळे यांनी यावेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, लोकसंख्या वाढ, वाहतुकीचा गोंधळ, ड्रग्जचे प्रकरण, तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता व प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे पुण्यात गुन्हेगारीचा ग्राफ वाढला आहे. शहरात कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे. गुन्हे रोखण्यासाठी अधिक व्यवस्थात्मक पाऊले उचलली पाहिजेत. याशिवाय पीपीपी मॉडेलऐवजी सीएसआर निधीतून रुग्णालये चालवण्याचा पर्यायही अधिक उपयोगी ठरेल, असे त्या म्हणाल्या. शरद पवारांशी सकारात्मक चर्चा - वर्षा गायकवाड उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने आज शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी त्यांच्यापुढे बीएमसीची निवडणूक एकत्र लढवण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, मुंबई महापालिका निवडणुकीत याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे. लोकशाही आणि संविधान मानणारे आम्ही पक्ष यावेळी एकत्र निवडणूक लढवावी ही आमची अपेक्षा आहे. याबाबत आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे.पुढच्या आठवड्यात पुन्हा याबाबत चर्चा होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही इथल्या नागरी समस्या जसे ट्रॅफिक, खराब रस्ते, शिक्षण, पाणी, प्रदूषण ,महापालिकेतील भ्रष्टाचार या विषयांवर झाली पाहिजे. ही निवडणूक धर्म, जात, भाषा यावर नको. कारण मुंबई हे असे शहर आहे जिथे देशातील सगळ्या राज्यातून लोक येतात. सगळ्यांचा या शहरातील विकासात हातभार आहे. आमची आज खूप चांगली चर्चा झाली. आमची नैसर्गिक आघाडी आहे. आम्ही सर्वजण संविधानाचा धागा मानतो. आम्ही लोकशाही मानतो. या देशात समता, बंधूता, न्याय, स्वातंत्र्य राहिले पाहिजे. मुंबईची एकता कायम राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांच्यापुढे मांडली आहे, असे त्या म्हणाल्या.
पुणे शहरातील शैक्षणिक संकुले सुरक्षित ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे, असे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले. 'सिक्युर होरायझन इन एज्युकेशन २०२५' या कार्यक्रमात ते बोलत होते, जो बुधवारी पुणे पोलिसांनी शहरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित केला होता. पुण्याला विद्येचे माहेरघर मानले जाते, जिथे देशातून आणि परदेशातून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, मागील काही गुन्हेगारी घटनांमध्ये शैक्षणिक परिसरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला आहे. यामध्ये पोर्श केस, खराडी ड्रग पार्टी केस, वाडिया केस आणि कोंढवा केस यांसारख्या प्रकरणांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला सिम्बायोसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, ज्येष्ठ वकील एस. के. जैन, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, मनोज पाटील, पंकज देशमुख आणि सिम्बायोसिसच्या उपकुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर उपस्थित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चिंता व्यक्त केली की, काही ठिकाणी कोचिंग क्लासेसचा वापर खासगी हेतू साध्य करण्यासाठी विद्यार्थी आंदोलनांमध्ये केला जात आहे. खासगी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या पार्ट्यांसाठी प्रवृत्त करणारे काही दलाल कार्यरत आहेत. तसेच, विद्यार्थी सोशल मीडियाचा नेमका कसा वापर करतात, यावर लक्ष ठेवणेही महत्त्वाचे आहे. शाळा आणि महाविद्यालयांजवळील पानटपऱ्यांमध्ये तंबाखू, गुटखा किंवा अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्यास, त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन त्यांनी केले. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात हॉटेल्स आणि खानावळींची वाढ झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, महाविद्यालयांच्या कॅन्टीनची व्यवस्था योग्य असावी आणि विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांची तपासणी करावी, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ वकील एस. के. जैन यांनी सांगितले की, विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती केवळ ४० टक्के असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय शिस्तबद्धता साध्य होणार नाही. पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांना आवडेल अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण दिले पाहिजे. अस्तित्वात नसलेली महाविद्यालये कोणती आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, तीन टक्के तरुण अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे तरुण अंमली पदार्थांकडे का वळतात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जे पब चालक शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना ग्राहक म्हणून हेरतात आणि त्यांना पार्ट्यांमध्ये जाण्यासाठी उद्युक्त करतात, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही जैन यांनी केली.
मुंबईत वाढताहेत डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण
मुंबई : प्रतिनिधी शहरात गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. बदलत्या वातावरणामुळे हा आजार पसरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हवामानातील आर्द्रता, धूळकणांची वाढ, तसेच पावसाळ्यानंतर अचानक वाढलेले तापमान यांमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. शहरातील अनेक नागरिकांना डोळे लाल होणे, खाज येणे, पाणी वाहणे आणि सूज, अशी लक्षणे जाणवत आहेत. मुंबई […] The post मुंबईत वाढताहेत डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाचा मेगा प्लॅन; तब्बल ११ कोटी खर्च करणार
पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि उत्तर पुणे परिसरात बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बिबट्या आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारसह वन विभागाने तात्काळ उपाययोजना करण्याचा मेगा प्लॅन तयार केला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी बिबट मादीची नसबंदी, नरभक्षक बिबट्यांना ठार करणे, तसेच मानवी वस्तीत वावरणा-या बिबट्यांना जेरबंद करणे […] The post बिबट्यांना पकडण्यासाठी वन विभागाचा मेगा प्लॅन; तब्बल ११ कोटी खर्च करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नयनकुवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड
धुळे : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतदानाआधीच भाजपने गुलाल उधळला आहे. भाजपचा पहिला नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आला आहे. खान्देशात भाजपाने विजयी सुरुवात केल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने धुळे जिल्ह्यामध्ये खाते उघडले आहे. दोंडाईचा पालिकेत नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपाच्या बाजूने लागला आहे. नगराध्यक्षपदी भाजपाच्या नयनकुवर रावल यांची बिनविरोध निवड झाली आहे. नयनकुवर […] The post नयनकुवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले. सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (लॉ कॉलेज) प्रथम वर्षाच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. वकिली करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायदेविषयक पुस्तक वाचनाची सवय लावून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित या महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा स्वागत समारंभ 'सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि उपाध्यक्ष व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 'सूर्यदत्त'च्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित या कार्यक्रमाला न्यायमूर्ती पाटील यांच्या पत्नी, जेजुरीतील मार्तंड देवस्थानचे विश्वस्त ऍड. पांडुरंग थोरवे, प्राचार्या केतकी बापट, डॉ. मोनिका सेहरावत यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यायमूर्ती राजेश पाटील यांनी यावेळी आपल्या आयुष्यातील काही हृदयस्पर्शी प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला चांगले आणि वाईट असे दोन पैलू असतात आणि तुम्ही कोणत्या पैलूचा स्वीकार करता, यावर तुमच्या जीवनाचा प्रवास ठरतो. सुरुवातीच्या काळात वकिली व्यवसायाकडे गांभीर्याने पाहिल्यानेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, असेही त्यांनी नमूद केले. सध्याच्या पिढीतील विद्यार्थी भाग्यवान असून, त्यांना फारसा संघर्ष करावा लागत नाही. पालक त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन यशस्वी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचे आहे. वकिलीशी संबंधित पुस्तकांसोबतच अवांतर वाचनही करावे. यामुळे तुमचा दृष्टीकोन, समज आणि वैचारिक भूमिका अधिक व्यापक होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या 'अग्निपंख' या पुस्तकातील विचारांचा संदर्भ न्यायिक बाजू मांडताना उपयोगी पडतो, असे उदाहरण त्यांनी दिले. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी यावेळी बोलताना सांगितले की, न्यायमूर्ती राजेश पाटील यांची कोणतीही कायदाविषयक पार्श्वभूमी नसताना ते या पदावर पोहोचले आहेत. त्यांच्या कुटुंबातील ते पहिलेच वकील असून, सध्या न्यायमूर्ती म्हणून सेवा देत आहेत. त्यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असे चोरडिया म्हणाले.
ग.दि. माडगूळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानतर्फे रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित गदिमा स्मृती समारोहात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गदिमा पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजता विविध पुरस्कारांचे वितरण त्यांच्या हस्ते केले जाईल. याप्रसंगी प्रतिष्ठानचे विश्वस्त शिवराम कोल्हटकर आणि प्रा. प्रकाश भोंडे उपस्थित होते. याच कार्यक्रमात आनंद माडगूळकर लिखित 'माझ्या खिडकीतून गदिमा' या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा 'गृहिणी सखी सचिव' पुरस्कार 'नादब्रह्म' संस्थेसाठी रवींद्र गांगुर्डे यांच्यासोबत योगदान देणाऱ्या वंदना रवींद्र गांगुर्डे यांना प्रदान केला जाईल. या पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह आहे. 'चैत्रबन' पुरस्कार प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला असून, त्यात ५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह यांचा समावेश आहे. स्वर्गीय विद्याताई माडगूळकर आणि त्यांच्या कन्या प्रज्ञा उदय पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'विद्या प्रज्ञा' पुरस्कार यंदा तरुण प्रतिभावंत गायिका मुग्धा वैशंपायन यांना दिला जाईल. या पुरस्कारात ५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, गदिमांच्या आयुष्यावर आणि साहित्यावर पहिला प्रबंध सादर करणारे सांगली जिल्ह्यातील जत येथील डॉ. श्रीपाद जोशी यांचा प्रतिष्ठानतर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात येईल. गदिमांचे कनिष्ठ बंधू आणि ज्येष्ठ कवी अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ 'स्वरानंद प्रतिष्ठान'चे कलाकार 'वंद्य वंदे मातरम' हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आनंद माडगूळकर, शिवराम कोल्हटकर आणि प्रा. प्रकाश भोंडे यांनी केले आहे.
सहकार भारतीचे वसंत देवधर यांचे निधन:अनेक बँकांना आर्थिक अडचणीत काढले होते बाहेर
सहकार भारतीचे संस्थापक सरचिटणीस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि जनसेवा सहकारी बँकेचे पहिले कार्यकारी संचालक वसंत नारायण देवधर (वय ९१) यांचे बुधवारी पुण्यात राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते अनेक नागरी सहकारी बँकांचे सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पुतणे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पूर्व राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, आनंद देवधर आणि विवेक देवधर असा परिवार आहे. देवधर यांनी महाराष्ट्रातील अनेक बँकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले होते. महाराष्ट्राव्यतिरिक्त त्यांनी आसाममध्येही नागरी बँक सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष वादनामध्येही त्यांचा विशेष हातखंडा होता. घोषाच्या भारतीय रचना असाव्यात यासाठी ते आग्रही होते. संघकार्य आणि सहकार चळवळीशी संबंधित असंख्य पुस्तके, अहवाल आणि जुने रेकॉर्ड त्यांनी जतन करून ठेवले होते. विविध सामाजिक संस्थांच्या जडणघडणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. 'फोरम ऑफ ऑप्थल टीचर्स' चे ९ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन 'फोरम ऑफ ऑप्थल टीचर्स ऑफ इंडिया' चे ९ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन दि.१० व ११ जानेवारी २०२६ रोजी स्वस्ति प्लाझा भुवनेश्वर (ओडिशा) येथे आयोजित करण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी (पुणे) चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर यांची अधिवेशनाच्या उदघाटकपदी निवड करण्यात आली आहे. अधिवेशनाचे उद्घाटन ते अतिथी म्हणून करणार आहेत. डॉ. केळकर यांना त्यांच्या नेत्रविज्ञान,प्रशिक्षण क्षेत्रातील आदर्श व आजीवन समर्पित अध्यापन कारकिर्दीच्या गौरवार्थ उद्घाटन सत्रात उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.या अधिवेशनात फोरम तर्फे नेत्रविज्ञानातील अध्यापन व प्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. नामनिर्देशन सर्वांसाठी खुले असून, पुरस्कारार्थींनी ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जेबीएम समूहाने राष्ट्रनिर्मितीमध्ये दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. पुणे येथे आयोजित 'सर्वोत्कर्ष' कार्यक्रमात ते बोलत होते. जेबीएम समूहाने रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान, नवोपक्रम, स्वच्छ ऊर्जा, ऑटोमोबाईल उत्पादन आणि सामाजिक उत्तरदायित्व यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे, असे राज्यपाल म्हणाले. या कार्यक्रमाला जेबीएम समूहाचे अध्यक्ष सुरेंद्रकुमार आर्य, उपाध्यक्ष निशांत आर्य, आर्य समाजाचे प्रतिनिधी विनय आर्य, डॉ. संजय कुलकर्णी, कमलेश गुप्ता आणि सुशील बिंदल यांच्यासह समूहाचे अन्य सदस्य उपस्थित होते. राज्यपाल देवव्रत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वदेशी' आणि 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनांना जेबीएम समूहाने बळ दिले आहे. समूहाने देशात ६० आणि परदेशात १७ उद्योग संस्था स्थापन करून हजारो तरुणांना रोजगार दिला आहे. पर्यावरणपूरक बसेसची निर्यात करून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) वाढ करण्यासही समूह मदत करत आहे. त्यांनी महर्षी दयानंद सरस्वती आणि आर्य समाजाच्या कार्याची प्रशंसा केली. आर्य समाजाने भारतीय संस्कृती, मूल्ये, नशामुक्ती अभियान, महिलांना सन्मान आणि शिक्षणाच्या अधिकाराला प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा व बालविवाह यांसारख्या कुप्रथांना आळा घालून समाजात मोठे परिवर्तन घडवले. स्वातंत्र्याच्या लढ्यातही आर्य समाजाचा सक्रिय सहभाग होता, असे राज्यपाल म्हणाले. महर्षी दयानंद सरस्वतींच्या प्रेरणेने जेबीएम समूह 'सर्वांच्या कल्याणातून आपले कल्याण' या वृत्तीने सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे समाजसेवा करत आहे, असे सांगत त्यांनी समूहाला देश आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करत राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमापूर्वी राज्यपाल देवव्रत यांच्या हस्ते 'हॉट स्टॅम्पिंग' प्रकल्पाची पायाभरणी आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या (सर्व्हायकल कॅन्सर) तपासणीसाठी एका रुग्णवाहिकेचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते झाले. या रुग्णवाहिकेद्वारे मुलींच्या कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे. राज्यपालांनी जेबीएम उद्योग समूहातील उत्पादनांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेल्या निधीमुळे शैक्षणिक उपक्रम बळकट होतील: मंत्री संजय शिरसाट
परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवलेले मूल्य अजूनही मार्गदर्शक आहेत. शिक्षण हे समाज सुधारण्याचे आणि विकासाचे प्रमुख साधन आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेल्या निधीमुळे या ठिकाणचे महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम आणखी बळकट होतील असा विश्वास मंत्री संजय शिरसाट यांनी नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना व्यक्त केला. परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात सह्याद्री फाउंडेशन, परभणी आयोजित भव्य […] The post पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेल्या निधीमुळे शैक्षणिक उपक्रम बळकट होतील: मंत्री संजय शिरसाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राची राजधानी मुंबई, पुणे आणि ठाणे या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधींच्या उलाढालीमुळे वाढणारी गुन्हेगारी पुन्हा एकदा उघड झाली आहे. मुंबईतील कांदिवली-चारकोप परिसरात भरदिवसा एका तरुण बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्रेंडी दिलीमा भाई असे जखमी बिल्डरचे नाव आहे. राज्यात बिल्डर्स लॉबीचा प्रभाव वाढत असून, बांधकाम क्षेत्रातील आर्थिक व्यवहार धमक्या, खंडणी आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांना प्रवृत्त करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मुंबईसारख्या महानगरात दिवसाढवळ्या घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या चारकोप परिसरात बंदर पाखाडी येथील गरुडा पेट्रोल पंपासमोर बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तरुण बिल्डर फ्रेंडी दिलीमा भाई हे त्यांच्या कारमध्ये बसले असताना, अचानक दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी, अज्ञातांकडून दिलीमा भाई यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर करण्यात आले. यातील दोन गोळ्या फ्रेंडी यांच्या पोटात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोर गोळीबार करून तात्काळ घटनास्थळावरून पळून गेले. गोळीबारानंतर जखमी फ्रेंडीभाई यांना तातडीने बोरिवली येथील ऑस्कर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून कसून तपास सुरू दिवसा गोळीबार झाल्याची माहिती मिळताच, चारकोप पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि डीसीपी यांच्यासह पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून गोळीबाराचे पुरावे जमा केले आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडून या घटनेमागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण आहेत, याचा तपास सुरू केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीनंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाई नगरपरिषद निवडणुकीतही बिनविरोध निवड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोंडाई येथे भाजप नेत्या आणि राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून येणार असल्याचे अधिकृतपणे निश्चित झाले आहे. कारण, महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयू भावसार यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आला. याचबरोबर दोंडाई नगरपरिषदेसाठी भाजपचे सात उमेदवारही कोणतीही स्पर्धा न राहता बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे दोंडाई नगरपरिषद पूर्णपणे भाजपच्या ताब्यात जाणार हे निश्चित झाले आहे. दोंडाई नगराध्यक्षपदासाठी भाजपची उमेदवारी नयन कुवर रावल यांच्या नावाने दाखल करण्यात आली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शरयू भावसार यांनी उमेदवारी दाखल केल्याने दोन्ही गटात थेट सामना अपेक्षित होता. मात्र छाननी दरम्यान शरयू भावसार यांचा अर्ज तांत्रिक त्रुटीमुळे अवैध ठरवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी याबाबत माहिती देत, अर्जातील तांत्रिक कारणास्तव तो ग्राह्य धरता येत नसल्याचे स्पष्ट केले. परिणामी नयन कुवर रावल यांची बिनविरोध निवड जवळपास आपोआप निश्चित झाली आणि भाजपला आणखी एक मोठे यश मिळाले. शरयू भावसार यांचा न्यायालयाचा निर्णय मात्र या संपूर्ण प्रकारावर नाराजी व्यक्त करत शरयू भावसार यांनी न्यायालयाचा मार्ग धरला आहे. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध धुळे जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. अर्ज अवैध ठरण्यासाठी देण्यात आलेले कारण स्वीकारार्ह नसून तांत्रिक कारणे दाखवून निवडणुकीतून दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भावसार कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवताना शरयू भावसार यांच्या कुटुंबातील घरपट्टीची थकबाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. हीच बाब छाननीवेळी अर्ज बाद होण्याचे महत्त्वाचे कारण ठरल्याचे दिसते. अनगरमध्येही प्रथमच 60 वर्षांनंतर निवडणूक होणार होती दोंडाईतील परिस्थिती जशी आहे, तशीच सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीतही पाहायला मिळाली. तेथे प्रथमच 60 वर्षांनंतर निवडणूक होणार असे दिसत होते. माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. मात्र छाननी प्रक्रियेत उज्ज्वला थिटे यांचा अर्जही अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अनगर नगरपंचायतीतही बिनविरोध निवड होऊन भाजपच्या उमेदवाराचा मार्ग सुकर झाला. सलग दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज छाननीवेळी बाद झाल्यानंतर दोन्ही निवडणुका बिनविरोध होणे ही राज्यातील राजकीय चर्चेची नवी दिशा ठरत आहे. निवडणूक प्रक्रियेवर न्यायालयीन लढाईचा परिणाम दोंडाई आणि अनगर या दोन्ही ठिकाणी झालेल्या घडामोडींमुळे बिनविरोध निवडणुकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्पर्धा असताना ती छाननी प्रक्रियेत थांबणे, विरोधी उमेदवारांचे अर्ज विविध तांत्रिक कारणांनी बाद ठरणे, त्यावर न्यायालयीन लढाई उभी राहणे, या सर्व घटनांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दोंडाईतील परिस्थिती पाहता, नगरपरिषद पूर्णपणे भाजपच्या नियंत्रणात जाणार आहे, आणि याचा परिणाम पुढील नगरविकास आणि सत्तेच्या समीकरणांवर होणार आहे. आता शरयू भावसार यांच्या न्यायालयीन लढाईला काय निकाल लागतो आणि त्याचा निवडणूक प्रक्रियेवर पुढे काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली दहशत कमी होताना दिसत नाही. कोपरगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांचा जीव घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला शार्प शूटर पथकाने नुकतेच ठार केले असताना, टाकळी फाटा परिसरात बिबट्याचा धोका अजूनही कायम असल्याचे काल रात्री सिद्ध झाले. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा बिबट्याने रस्त्यावरून जात असलेल्या एका दाम्पत्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचा थरकाप उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवार रात्री सायंकाळच्या सुमारास माहेगाव देशमुख परिसरात घडली. कोळपेवाडी येथील रहिवासी असलेले भाऊसाहेब वाघडकर हे आपल्या पत्नीसह दुचाकीवरून कोपरगावकडे येत होते. मारुती मंदिराजवळ असलेल्या दाट झुडपांमध्ये एक बिबट्या दबा धरून बसला होता. वाघडकर दाम्पत्य जवळ येताच या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात पती-पत्नी जखमी बिबट्याच्या या अकस्मात हल्ल्यामुळे पती-पत्नी दोघेही दुचाकीसह खाली कोसळले आणि बिबट्याने त्यांना लक्ष्य केले. हल्ल्यात दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तालुक्यातील सर्व बिबटे नरभक्षक बनले का? तालुक्यात एकापाठोपाठ एक हल्ले होत आहेत. त्यामुळे आता कोपरगावमधील सर्वच बिबटे नरभक्षक झाले आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. वन विभागाने या बिबट्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अन्यथा रस्त्यावरून प्रवास करणेही धोकादायक ठरेल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वर्षभरात अहिल्यानगरमध्ये ११ बळी दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मागील तीन वर्षांत १९ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल १३६ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात चालू वर्ष २०२५ मध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात या वर्षात बिबट्याने आठ जणांचा बळी घेतला आहे, तर विदर्भात चालू वर्षात एकाचा बळी घेतला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नरसह काही वनपरिक्षेत्रातही बिबट्यांची संख्या वाढलेली असून बिबट्याकडून ग्रामस्थांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. बिबट्या नरभक्षक झाल्यास गोळ्या घालणार दरम्यान, राज्यात बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा. तसेच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-१ मधून वगळून शेड्यूल-२ मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नरभक्षक बिबट्यांवर नियंत्रणासाठी आवश्यक ठिकाणी पिंजरे बसवावेत, असेही निर्देश त्यांनी मंगळवारी मंत्रालयातील बैठकीत दिले. दरम्यान, नरभक्षक बिबट्यांना यापुढे गोळ्या घालून ठार करण्याचा प्रस्ताव असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.
नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया; मूलभूत सुविधा पुरविण्याच्या नागरिकांनी व्यक्त केल्या नूतन नगरसेवकाकडून अपेक्षा लक्ष्मण पाटील- निलंगा ( प्रतिनिधी ) : निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी याकरिता कंबर कसली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने एकमत youtube चॅनलच्या वतीने नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या .यावेळी नागरिकांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासाचा आलेख सांगत त्यांनी विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगून विकास […] The post सत्ताधाऱ्यांनी केलेला विकास व विकासाकडे झालेले दुर्लक्ष, निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एकमतने घेतला ग्राउंड रिपोर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ड्रग्ज प्रकरणावरून आ. राणाजगजितसिंह यांचे खा. सुळे यांना सडेतोड प्रत्युत्तर
धाराशिव : प्रतिनिधी तुळजापूर येथील भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद गंगणे हे शहरात गाजलेल्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर भाजपचे तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी (दि. १९) आक्रमक पण मुद्देसूदपणे खा. सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे आ. पाटील हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे माजी […] The post ड्रग्ज प्रकरणावरून आ. राणाजगजितसिंह यांचे खा. सुळे यांना सडेतोड प्रत्युत्तर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे : प्रतिनिधी राज्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे आता राज्य सरकार आणि वन विभाग पूर्णपणे सज्ज झाले आहेत. बिबट आणि माणूस यांच्यातला संघर्ष थांबवण्यासाठी नसबंदीपासून रेस्क्यू सेंटरपर्यंतच्या उपाययोजना राबवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, या मोहिमेत वन विभागापुढे मोठी आव्हाने उभी आहेत. राज्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना, बिबट-माणूस संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने ‘ऑपरेशन लेपर्ड’व्यापक […] The post वनविभागाचे ‘ऑपरेशन लेपर्ड’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
परिणीती-राघवने ठेवले लेकाचे नाव
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडची अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचे पती राघव चड्ढा यांनी ऑक्टोबर महिन्यात ते आई-बाबा झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी परिणीतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता अखेर एक महिन्यानंतर परिणीतीने आपल्या बाळाची पहिली झलक चाहत्यांना दाखवत बाळाचे नाव ‘नीर’ असे ठेवले आहे. परिणीती आणि राघव यांनी […] The post परिणीती-राघवने ठेवले लेकाचे नाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ, बिबट्यांची दहशत
अमरावती : प्रतिनिधी जंगलच नव्हे, तर मानवी वस्तीत येणा-या वाघ, बिबट्यांपासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागाकडे केवळ ९,७८५ वनरक्षक असून, महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज आहे. १४ वन विभागामध्ये प्रादेशिकचे ४८ विभाग, ३७८ परिक्षेत्र आणि ५,६१३ बीट असून, वन्यजीव विभागांचे १३ विभाग व […] The post राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ, बिबट्यांची दहशत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा नगर पालिका निवडणूकीत विकास व भ्रष्टाचार कळीचे मुद्दे ठरणार
औसा ग्राऊंड रिपोर्ट (संजय सगरे) औसा नगर पालिका निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे .या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप – शिवसेना युतीचे डाॕ .ज्योती महादेव बनसुडे व राष्ट्रवादी काॕग्रेसच्या परवीन नवाबोद्दीन शेख यांच्यात प्रमुख लढत होत आहे . ही निवडणूक प्रातिनिधीत्व स्वरुपात ओबीसी महिलासाठी असली तरी खरी लढत ही भाजपा आमदार अभिमन्यू पवार व […] The post औसा नगर पालिका निवडणूकीत विकास व भ्रष्टाचार कळीचे मुद्दे ठरणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात मुस्लिम संस्था आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्र सरकारला निवेदन दिले आहे. उम्मीद पोर्टलवर वक्फ मालमत्तेचा डेटा अद्ययावत करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. तसेच, सरकारने पूर्वी जमा केलेला वक्फ डेटा आणि सरकारी सर्वेक्षणातून मिळालेली माहिती वापरावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व ॲडव्होकेट समीर शेख यांनी केले. यावेळी जमीयत उलेमा-ए-हिंदचे पुणे अध्यक्ष मुफ्ती शाहिद कास्मी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे जाहीद भाई, हाजी नवेद, ॲडव्होकेट सुफियान शेख, ॲडव्होकेट साजिद शेख, रिजवान बागवान, मौलाना वसीम, मौलाना शहबाज आणि इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारने वक्फ मालमत्तेमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी 'उम्मीद' (Unified Minority Empowerment and Economic Development) हा उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत देशभरातील सर्व वक्फ मालमत्तांची ऑनलाइन नोंदणी करणे आणि त्यांचे अद्ययावत डिजिटल रेकॉर्ड तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेक वक्फ संस्थांना तांत्रिक अडचणी आणि आवश्यक कागदपत्रांच्या अभावामुळे हा डेटा अपलोड करताना समस्या येत आहेत. यामुळे निर्धारित वेळेत माहिती अद्ययावत करणे त्यांना शक्य होत नाहीये. या पार्श्वभूमीवर, शिष्टमंडळाने उम्मीद पोर्टलवर डेटा सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सर्व वक्फ मालमत्तांची नोंद व्यवस्थित पूर्ण करता येईल. ॲडव्होकेट समीर शेख यांनी सांगितले की, वक्फ मालमत्तेचे योग्य रक्षण आणि व्यवस्थापन ही मुस्लिम समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी सर्व वक्फ संस्था आणि मुतवल्लींना आवाहन केले की, त्यांनी आपल्या मालमत्तांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करून कायदेशीर संरक्षण सुनिश्चित करावे.
पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांना धमकावून लूटमार करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे. मालधक्का परिसरात केलेल्या या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जानमोहम्मद नसरुद्दीन शेख (३२, रा. पीर वस्ती, वडकी, सासवड रस्ता), सतीश ज्ञानेश्वर शिरोळे (३५), खुट्टाराज अंजीलप्पा विभुती (१९), शिवप्रकाश कुमार (२३) आणि चौपाट्या उर्फ राजेश मंगल मंडल यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई शरद गायकवाड यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी फिरस्ते असून, पुणे रेल्वे स्टेशन आणि स्वारगेट परिसरात त्यांचा वावर असतो. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना धमकावून त्यांच्याकडील मोबाईल संच आणि रोकड हिसकावून घेण्याचे गुन्हे त्यांनी केले आहेत. बंडगार्डन पोलिसांना पुणे स्टेशन येथील मालधक्का रस्त्यावर चोरट्यांची टोळी थांबली असून, प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे, मिरची पूड आणि दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक नीळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तडीपार गुन्हेगारावर कारवाई दरम्यान, तडीपारीत शहरात वावरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. उमेश भारत ननवरे (२४, रा. नुराणी मस्जिद, येरवडा, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. ननवरे याला येरवडा येथील भारत बेकरीजवळील मोकळ्या जागेतून ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.
सुपर मास्टर्स गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशन या राष्ट्रीय संस्थेतर्फे पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २७ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, समारोप ३१ जानेवारी २०२६ रोजी होईल. देशभरातून पाच हजार पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी दिली. या स्पर्धेत कबड्डी, हॉकी, हँडबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि टेनिस बॉल यांसारख्या सांघिक स्पर्धांचा समावेश आहे. तसेच ॲथलेटिक्स, तिरंदाजी, बुद्धिबळ, पोहणे, पंजा लढत, बॅडमिंटन, डार्ट गेम, ज्युडो, कराटे, वेटलिफ्टिंग, टेबल टेनिस, लॉन टेनिस, योगा, एअर पिस्तूल आणि एअर रायफल यांसारख्या वैयक्तिक स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. तीस वर्षांवरील स्त्री-पुरुष खेळाडू या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात. पिंपरी चिंचवड शहरातील क्रीडा संकुले, जलतरण तलाव आणि स्टेडियममध्ये हे सामने खेळवले जातील. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंह संघा, सचिव शैलेश फुलसुंगे आणि उपाध्यक्ष चंद्रशेखर कुदळे उपस्थित होते. यावेळी विनोद कुमार यांच्या हस्ते स्पर्धेचे बोधचिन्ह शुभंकर - शेकरू चे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी www.mastersgames.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, तर ऑफलाइन नोंदणीसाठी संस्थेचे सरचिटणीस शैलेश फुलसुंगे (९७६४९२९१७१) यांच्याशी संपर्क साधावा. सुपर मास्टर्स गेम्स अँड स्पोर्ट्स फेडरेशनची स्थापना २०१७ मध्ये संस्थापक अध्यक्ष डॉ. अनमोल रतन सिद्धू आणि संस्थापक सरचिटणीस विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली झाली. २०१७ मध्ये पहिली मास्टर्स गेम्स स्पर्धा चंदीगड येथे आयोजित करण्यात आली होती, ज्यात १० विविध स्पर्धांमध्ये २००० स्त्री-पुरुष स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यापूर्वी डेहराडून, बडोदा, तिरुवनंतपुरम, वाराणसी, गोवा आणि धर्मशाळा यांसारख्या विविध राज्यांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या असून, त्यात ३३,००० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. एप्रिल २०२५ मध्ये धर्मशाळा, हिमाचल प्रदेश येथे झालेल्या स्पर्धेत पंजाबमधील १०२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक जगीर सिंग यांनी १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि नातू यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला होता. नागरिकांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट (VVPAT) वापरण्याची मागणी धुडकावून लावली आहे. यासाठी आयोगाने स्थानिक संस्था कायद्यात अशी कोणतीही तरतूद नसल्याचा दाखला दिला आहे. स्थानिक संस्था कायद्यात व्हीव्हीपॅट वापरण्याची तरतूद नाही. तांत्रिकदृष्ट्या ते सध्या शक्य नाही आणि इतक्या कमी वेळेत ते लागू करणे अशक्य आहे, असे आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुढे पाटील यांनी 'स्थानिक'च्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापर करण्याची मागणी करणारी एक याचिका दाखल केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाला कागदी मतपत्रिका वापरून निवडणुका घेण्याचे किंवा प्रत्येक ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट अनिवार्य करण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने आज प्रतिज्ञापत्र दाखल केले. निवडणूक आयोगाने काय म्हटले प्रतिज्ञापत्रात? राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सिंगल-पोस्ट ईव्हीएम वापरल्या जातात. मात्र, महाराष्ट्रातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच प्रभागातून दोन ते चार सदस्य निवडले जातात, ज्यासाठी बहु-पोस्ट ईव्हीएम आवश्यक आहेत. अशा बहु-पोस्ट ईव्हीएमसाठी अद्याप कोणतेही मंजूर व्हीव्हीपॅट डिझाइन विकसित झालेले नाही, तसेच भारतीय निवडणूक आयोगानेही अशी मशीन विकसित केलेली नाही. आयोगाने 2017 मधील नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीतील पायलट प्रकल्पाची आठवण करून दिली. त्यावेळी केवळ 31 बूथवर व्हीव्हीपॅट वापरण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता आणि अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. सध्या, राज्य निवडणूक आयोगाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरता येईल असा एकही व्हीव्हीपॅट उपलब्ध नाही. सर्वोच्च न्यायालयाने 16 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशात महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. इतक्या कमी कालावधीत लाखो व्हीव्हीपॅट किंवा मतपत्रिकांसाठी लाखो मतपेट्या तयार करणे शक्य नाही. त्यामुळे, याचिकाकर्त्याने केलेली मागणी व्यवहार्य किंवा अंमलात आणण्यासारखी नाही, असे आयोगाने म्हटले आहे. व्हीव्हीपॅटशिवाय ईव्हीएम वापरून निवडणुका घेणे हा कायदेशीर आणि व्यावहारिक निर्णय असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्याकडे केवळ भीती व संशय प्रतिज्ञापत्रात असेही नमूद केले आहे की, याचिकाकर्त्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसून केवळ भीती आणि संशय आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी २०१७ मध्ये अशीच एक याचिका फेटाळली होती. त्यामुळे, निवडणूक आयोगाने ही याचिका सुरुवातीलाच फेटाळण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे वकील निहालसिंग राठोड आणि पवन डहाट यांनी बाजू मांडली, तर राज्य निवडणूक आयोगातर्फे वकील अमित कुकडे उपस्थित होते.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसने आता आपला जुना मित्रपक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकरणी खासदार वर्षा गायकवाड यांनी आज शरद पवारांशी चर्चा केली आहे. त्यांनी ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचा दावा केल्यामुळे पवार काँग्रेससोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे झाले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे एकटे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी गत आठवड्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही घोषणा केली. त्यानंतर आता काँग्रेस आपली पुढील रणनीती ठरवण्यात व्यस्त आहे. या अंतर्गत काँग्रेस खासदार तथा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे बीएमसीची निवडणूक एकत्र लढवण्याचा प्रस्ताव ठेवला. शरद पवारांशी अत्यंत सकारात्मक चर्चा त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, मुंबई महापालिका निवडणुकीत याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे. लोकशाही आणि संविधान मानणारे आम्ही पक्ष यावेळी एकत्र निवडणूक लढवावी ही आमची अपेक्षा आहे. याबाबत आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे.पुढच्या आठवड्यात पुन्हा याबाबत चर्चा होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही इथल्या नागरी समस्या जसे ट्रॅफिक, खराब रस्ते, शिक्षण, पाणी, प्रदूषण ,महापालिकेतील भ्रष्टाचार या विषयांवर झाली पाहिजे. ही निवडणूक धर्म, जात, भाषा यावर नको. कारण मुंबई हे असे शहर आहे जिथे देशातील सगळ्या राज्यातून लोक येतात. सगळ्यांचा या शहरातील विकासात हातभार आहे. आमची आज खूप चांगली चर्चा झाली. आमची नैसर्गिक आघाडी आहे. आम्ही सर्वजण संविधानाचा धागा मानतो. आम्ही लोकशाही मानतो. या देशात समता, बंधूता, न्याय, स्वातंत्र्य राहिले पाहिजे. मुंबईची एकता कायम राहिली पाहिजे अशी भूमिका आम्ही त्यांच्यापुढे मांडली आहे, असे त्या म्हणाल्या. मनसेसोबत जाण्यास पुन्हा नकार वर्षा गायकवाड यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा देत काँग्रेसची मनसेसोबत जाण्याची इच्छा नसल्याचा पुनरुच्चार केला. संजय राऊत यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. यासाठी त्यांनी ही निवडणूक स्थानिक पातळीवरील असल्याचा दावा केला होता. आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण आमची त्यांच्याशी आघाडीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही दडपशाही करणाऱ्या व कायदा हातात घेणाऱ्याबरोबर निवडणुकीत एकत्र जाऊ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विशेषत: पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण, तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तसेच पक्षांतर आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांची अनुपस्थिती अशा विविध विषयांवर त्यांनी थेट सरकारला प्रश्न विचारले. यावेळी त्या नुकत्याच शस्त्रक्रिया झालेल्या वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या भेटीला जाऊन आल्याचेही त्यांनी सांगितले. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी काही सूचनांसह त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारणा झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका तपशिलात मांडली. या प्रकरणावर माझ्या भावना मी आधीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या होत्या. एक जबाबदार आई म्हणून, नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी योग्य ते करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपासून या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश आणि त्यांच्यावर असलेले आरोप यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे. या संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुळेंना खुले पत्र लिहून त्यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पत्राला उत्तर देताना सुळे यांनी ठाम भूमिका घेतली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कोणतेही पत्र माझ्याकडे आलेले नाही, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी टोला लगावत सांगितले की, जर त्यांना पत्र लिहायचंच असेल तर ते मला न लिहिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या प्रकरणाचा मागोवा घेत असलेल्या अंजली दमानिया यांना लिहावे. कारण मी फक्त माझ्याकडे आलेली माहिती मुख्यमंत्री महोदयांना दिली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे या वादात नवा राजकीय रंग भरल्याचे चित्र आहे. पत्रकार परिषदेत सुळे यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दाही ठळकपणे मांडला. लोकसंख्या वाढ, वाहतुकीतील गोंधळ, ड्रग्जचे प्रकरण, तरुणांचे वाढते व्यसनाधीनता आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे पुण्यात गुन्हेगारीचा ग्राफ झपाट्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पोलिसांवर प्रचंड ताण आहे. गुन्हे रोखण्यासाठी अधिक व्यवस्थात्मक पावले उचलली पाहिजेत, अशा शब्दांत त्यांनी शासनाला सूचना केल्या. याचबरोबर पीपीपी मॉडेलऐवजी सीएसआर निधीतून रुग्णालये चालवण्याचा पर्याय अधिक उपयोगी ठरेल, असेही त्यांनी मत व्यक्त केले. मंत्री उपस्थित नसतील तर निर्णयप्रक्रियेत अडथळे शेवटी, मंत्रिमंडळ बैठकीला काही मंत्र्यांची अनुपस्थिती हे देखील राज्याच्या प्रशासनासाठी योग्य संकेत नसल्याचे म्हणत सुळेंनी सरकारवर टीका केली. महत्त्वाच्या बैठकीत मंत्री उपस्थित नसतील तर निर्णयप्रक्रियेत अडथळे येतात, आणि त्याचा फटका थेट जनतेला बसतो, असे त्यांनी सांगितले. कालांतराने विविध पक्षप्रवेश, ड्रग्ज प्रकरणे, आरोप-प्रत्यारोप यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. सुळे यांच्या पत्रकार परिषदेने या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी टीकेला एक नवीन दिशा दिल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संबंधित खालील बातमी देखील वाचा.... राणाजगजितसिंह पाटील यांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र:मनात शंका असतील तर वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची तयारी

22 C