माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात पत्नी,मुलीची चौकशी
बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. २० एप्रिल रोजी ते बंगळुरू येथील त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते. दुपारी त्यांचे पत्नीशी भांडण झाले होते. भांडण सुरू असताना, त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर मिरची पावडर फेकली, यावेळी त्यांना बांधले आणि नंतर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा […] The post माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात पत्नी,मुलीची चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
मुंबई : प्रतिनिधी बहुचर्चित सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला पनवेल सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा तसेच २० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर, सहआरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तथापि, या दोघांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे या दोघांची सुटका करण्यात येणार […] The post मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला सुरक्षा आणि आत्मनिर्भरतेसाठी पिंक रिक्षा योजना महत्वाची आहे. महिलांना योग्य ती संधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. लाडक्या बहीण यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. त्यांचा विश्वास ढळू देणार नाही. त्यांना निधी देणे आम्ही बंद करणार नाही. आर्थिक दृष्ट्या महिला सक्षम होण्यासाठी त्यांना सन्मान निधी दिला जातो. कोणत्याही परिस्थिती ज्या महिला योजना लाभत बसतात त्यांना हा निधी कधी बंद होऊ देणार नाही. विरोधक आमच्याबाबत काही अफवा उठवतात, लाडकी बहीण योजना निधी बंद होणार, संविधान बदलले जाणार पण ही बाब योग्य नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. महिला आणि बालविकास विभाग आयोजित या वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ,राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर ,विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर , सुधांशू अग्रवाल, कायनेटिक ग्रीनचे रितेश मंत्री, महिला विभाग आयुक्त नयना गुंडे यावेळी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, राज्याचा सामाजिक परिवर्तन घडवण्याचा हा कार्यक्रम आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे यंदा त्रिशताबदी जयंती आहे त्यांचे चांगले स्मारक अहिल्याननगर मधील चौंडी येथे करण्यात येणार आहे. पुढील पिढीला पूर्वीचे जेष्ठ मान्यवर यांचे काम समजावे यादृष्टीने विविध स्मारक तयार करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक पूर्वी हा कार्यक्रम करायचा होता पण काही अडचणी आल्या. कायनेटिक ग्रीन माध्यमातून चांगल्या प्रकारे ई रिक्षा महिलांना देण्यात येणार आहे. योजना केवळ ई रिक्षा वाटप करण्याचे नाही तर महिलाना रोजगार संधी, सक्षम करणाऱ्या आहे. महिला सबलीकरण केवळ घरापुरते नको. त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केल्यास कुटुंबात बदल घडतो. समाजातील अनेक प्रेरणा स्तोत्र यामहिला ठरणार आहे. महिलांनी प्रवास करताना पिंक रिक्षा यास प्राधान्य द्यावे. पुरुष रिक्षात बसल्यावर त्याचा फोटो काढून घरी पाठवायचा. म्हणजे काही गडबड पुरुषाने केली तर पुरावा राहतो. प्रत्येक वेळी बहिणीचे फोटो काढू नका तिथे अडचण नाही. पुरुष यांना सांगायचे तुझी आठवण म्हणून मी फोटो काढत आहे. समाजात काही विकृत माणसे असून ही बाब गरजेची आहे. तटकरे म्हणाल्या, पिंक ई रिक्षा अजित पवार यांनी घोषणा केली. राज्यात दहा हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सुरवातीच्या टप्प्यात ५ हजार पिंक रिक्षा देण्यात येतील. राज्यातील महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे. त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे, रिक्षात जीपीएस बसविण्यात आले आहे.आज पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मिळून ६० पिंक रिक्षा देण्यात येत आहे. विमानतळ, मेट्रो स्टेशन येथे पिंक रिक्षा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांना या रिक्षातून प्रवास करताना सुरक्षित वाटेल. पर्यटन स्थळी आणि ओला, उबेर सोबत करार करून पिंक रिक्षा प्रवाशांना उपलब्ध होण्यासाठी काम करण्यात येत आहे. दररोज महिला सात ते आठ तास रिक्षा चालवू शकतील त्यातून उत्पन्न शाश्वती मिळेल. पुण्यात एक हजार चार्जिंग स्टेशन बनवण्यात येणार आहे.डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिलाना यामाध्यमातून रोजगार सोबत आत्मविश्वास देखील मिळू शकेल. महिला आज कोणत्या क्षेत्रात कमी नाही हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. लाडकी बहीण मुळे महायुतीला निवडणुकीत यश मिळाले आहे.
‘जीबीएस’चा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे
पुणे : शहरात जानेवारी महिन्यात उद्भवलेल्या गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने काढला आहे. या निष्कर्षामुळे पुणे महानगरपालिकेच्या जलशुद्धिकरण व क्लोरिनेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत अधिक संशोधन सुरू असून, लवकरच त्याचे अंतिम निष्कर्ष हाती येईल, अशी माहिती राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. […] The post ‘जीबीएस’चा उद्रेक कोंबड्यांच्या विष्ठेमुळे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. वारंवार होणाऱ्या पराभवामुळे राहुल गांधी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी करण्यापेक्षा जनतेत जाऊन त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणालेत. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी तिथे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मुदत संपल्यानंतर सायंकाळी 5.30 ते 7.30 पर्यंत तब्बल 65 लाख मतदारांनी मतदान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे भारतात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींचे विधान अत्यंत निंदनीय देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली. भारतीय लोकशाहीची बदनामी केली. भारतीय संविधानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लोकशाही संस्थांची बदनामी केली. ते सातत्याने अशा प्रकारची बदनामी करतात. ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. निवडणुकांत वारंवार पराभव झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. राहुल गांधी एका विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यानंतरही ते अशा प्रकारे परदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करत असतील, तर कुठेतरी त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो की, ते नेमका कुणाचा अजेंडा राबवत आहेत? त्यामुळे माझा त्यांना सल्ला आहे. त्यांनी जनतेत जाऊन काम केले पाहिजे. जगभरात फिरून भारताची बदनामी केल्याने त्यांची मते वाढणार नाहीत. जनतेत विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मते वाढतील. पण ते करण्याऐवजी भारताला बदनाम करण्याचे काम त्यांचे सुरू आहे. महाराष्ट्रात ते हरले, हरियाणात हरले, दिल्लीत हरले. आता मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप ते करत आहेत. अतिशय बाळबोध प्रकारचा हा प्रकार आहे. त्यांनी जनतेत जावे व भारताची बदनामी करणे बंद करावे, असे आमचे त्यांना आवाहन आहे, असे फडणवीस म्हणाले. अशा प्रकारे त्यांचीच उंची कमी होईल कोणताही देशभक्त अशा प्रकारे परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करत नाही. राहुल गांधी ज्या प्रकारे वर्तन करत आहेत, त्यामुळे त्यांच्याच चारित्र्यावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा गोष्टी करण्यापेक्षा त्यांनी जनतेत जावे. जनतेचा विश्वास जिंकावा. त्यातून त्यांना निवडूक जिंकता येईल. जगात जाऊन कितीही बदनामी केली तरी त्यांना निवडणूक जिंकता येणार नाही. यामुळे त्यांचीच उंची कमी होत जाईल, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले. आता पाहू काय म्हणाले राहुल गांधी? राहुल गांधी अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याचे दिसून आले. हे एक वास्तव आहे. मात्र निवडणूक आयोगाने आम्हाला संध्याकाळी 5.30 पर्यंत झालेल्या मतदानाचीच आकडेवारी दिली. त्यानंतर संध्याकाळी 5.30 ते 7.30 या कालावधीत जेव्हा मतदानाची वेळ संपलेली असते त्या कालावधीत ६५ लाख मतदारांनी मतदान केले. असे घडणे केवळ अशक्य आहे. कारण एका मतदाराला मतदान करायला साधारण तीन मिनिटे लागतात. जर ही वेळ लक्षातघेतली तर रात्री 2 वाजेपर्यंत मतदार रांगेत उभे होते आणि त्यानंतर पहाटेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली असा होतो. पण असे कुठेही घडल्याचे पाहण्यास मिळाले नाही.
पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश:ठोस चौकशी झालेली नाही- सुप्रीम कोर्ट
निलंबित वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आहे. जोपर्यंत पूजा खेडकर ही या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करेल तोपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण कायम असेल. आतापर्यंत पूजा खेडकरची ठोस चौकशी झालेली नाही असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान पूजा खेडकरला सकाळी 10.30 वाजता दिल्ली क्राइम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 21 मे रोजी होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे. नेमके कोर्टात काय झाले? सु्प्रीम कोर्टात पूजा खेडकर प्रकरणी सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरच्या कोठडीची मागणी केली. यावेळी खेडकरच्या वकीलाने कोठडीत चौकशी करण्याची काही आवश्यकता नाही, असा युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने पूजाची ठोस चौकशी झाली नाही असे मत नोंदवले आहे. आता या प्रकरणी पुढे काय होणार न्यायालय या प्रकरणी काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले की, पूजा खेडकर 12 वेळा परीक्षेला बसल्या. जरी त्या दिव्यांग असल्या तरीही 9 वेळा परीक्षा दिल्या जाऊ शकतात. त्यांनी नावे बदलली,12 वेळा त्यांनी परीक्षा दिली. युपीएससीचे वकील म्हणाले की, पूजा खेडकरच्या पाठीशी एक पॉवरफुल सिस्टम आहे. पूजा खेडकरचे वकील म्हणाले की, खेडेकर दिव्यांग आहेत आणि त्यासाठीचे प्रमाणपत्र तपासणी एम्सने केले आहे. यावर बोलताना न्यायमूर्ती म्हणाल्या की, पूजा खेडेकर या चौकशीसाठी यायला तयार नाही का? पूजा खेडकरला बोलवा. तयानंतर आरोपपत्र दाखल करा. पूजाला सहकार्य करावे लागेल. ती तपासाला सहकार्य करेल तो पर्यंत तिला अटकेपासून संरक्षण कायम राहील.
घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी माता-भगिनींना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय, हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणे. पाण्यासाठी जर जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरतावे लागत असेल तर हा कसला विकास असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, उत्सवांवर, कार्यक्रमांवर उधळपट्टी करायला पैसा आहे, पण लोकांना प्यायला पाणी देण्यासाठी नाही? नाशिकच्या बोरीचीवाडी गावातील महिलांना पाण्यासाठी खोल विहिरीत उतरावे लागते यावर बोलताना विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवारांचे ट्विट काय? विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे चित्र बघा! आपल्या भगिनी केवळ घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी जीव मुठीत घेऊन विहिरीत उतरत आहे. माता-भगिनींना पाण्यासाठी असा जीवघेणा संघर्ष करावा लागतोय, हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. हा कसला विकास? विजय वडेट्टीवार म्हणाले की, नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. उत्सवांवर, कार्यक्रमांवर उधळपट्टी करायला पैसा आहे, पण लोकांना प्यायला पाणी देण्यासाठी नाही? हा कसला प्राधान्यक्रम? हा कसला विकास? केवळ इव्हेंटबाजी करून जनतेची दिशाभूल थांबवा आणि लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर काम करा! आधी या गरीब कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करा, मग हजारो कोटींचे उत्सव साजरे करा!, असा टोला वडेट्टीवारांनी देवेंद्र फडणवीस सरकारला लगावला आहे. पाण्यासाठी 2 किमी लागते चालावे- उपसरपंच बोरीचीवाडी गावचे उपसरपंच यांनी सांगितले की, महिलांना पाण्यासाठी जवळजवळ 2 किलोमीटर चालावे लागते. जे प्रवास करू शकत नाहीत त्यांना थोडेसे पाणी मिळविण्यासाठी इतरांना 60 रुपये द्यावे लागतात. अनेकदा मुद्दा उपस्थित केला पण मदत नाही गावातील एक महिला म्हणाली की, उन्हात इतके अंतर चालल्यानंतरही आम्हाला फक्त एक भांडे पाणी मिळते. ते पुरेसे नाही. आम्ही पाणी उकळून पितर तरीही आमची मुले आजारी पडतात. आम्ही हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे, पण कोणतीही मदत मिळालेली नाही.
पनवेल सत्र न्यायालयाने सोमवारी बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. यामुळे लाकूड कापण्याच्या कटरने अश्विनीचे तुकडे करणाऱ्या कुरुंदकरचे उर्वरित आयुष्य गजाआड जाणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोर्टाने या प्रकरणातील कुंदन भंडारी व महेश पार्डीकर या इतर दोन आरोपींनाही प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. पण या दोघांनी शिक्षेचा कालावधी तुरुंगात काढल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे 11 एप्रिल 2016 रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याची पोलिस ठाण्यात भेट घेतली होती. या भेटीनंतर कुरुंदकरने त्यांची स्वतःच्या कारमध्ये गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्यांचे लाकूड कापण्याच्या कटरने तुकडे केले होते. हे तुकडे त्यांनी वसईच्या खाडीत फेकले होते. त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी कोर्टाने या प्रकरणी आपला निकाल देत कुरुंदकरला जन्मठेप व 20 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली आहे. कुंदन भंडारी, पार्डीकरला प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने या प्रकरणी कुंदन भंडारी व महेश पार्डीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली. पण या दोन्ही आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्याने कोर्टाने त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश लवकरच काढले जाणार आहेत. अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी या प्रकरणी आरोपींकडून नुकसान भरपाई घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तसे आदेश काढण्यात आले नाही. पण कोर्टाने सरकारला त्यांच्या पगाराची भरपाई देण्याचे आदेश दिलेत. विशेषतः या प्रकरणी ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला, त्यांच्यावर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिलेत. आता पाहू काय आहे संपूर्ण प्रकरण? अश्विनी बिद्रे-गोरे या नवी मुंबईतील कळंबोलीतून 15 एप्रिल 2016 पासून बेपत्ता झाल्या होत्या. पण त्या बेपत्ता झाल्या नसून वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनीच बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबाने केला होता. तपासात पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप सुरुवातीला अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. अश्विनी जयकुमार बिद्रे या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावच्या होत्या. 2005 साली त्यांचा विवाह हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्नाआधीपासूनच म्हणजे 2000 सालापासून त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षातच अश्विनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांना पोलीस उप-निरीक्षक पद मिळाले. पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. यादरम्यान त्यांची ओळख त्याच पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर 2013 साली अश्विनी बिद्रे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला आल्या. अभय कुरुंदकर तिथेही अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार यायचा. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजले होते. पण त्यानंतर काही दिवसांनी अश्विनी बिद्रे-गोरे बेपत्ता झाल्या आणि त्यांचा खून झाल्याचे अखेर उघड झाले. अभय कुरुंदकरचा बालमित्र असलेल्या महेश फळशीकरने अश्विनी यांच्या हत्येची कबुली दिली होती. धक्कादायक म्हणजे अश्विनी यांची हत्या करुन, लाकूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. त्यानंतर हे तुकडे वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले होते. लॅपटॉपमधून मिळाली महत्त्वपूर्ण माहिती अश्विनी बिद्रे यांच्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी चिंताग्रस्त होते. त्यांनी तक्रार देण्याच्या आधी अश्विनी बिद्रे यांची जिथे पोस्टिंग होती, त्या कळंबोली पोलिस ठाण्यात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यांना तिथे काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तसेच अश्विनी बिद्रे ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या, त्या फ्लॅटचं कुलूप तोडून मोबाईल व लॅपटॉपची तपासणी केली होती. या तपासणीतूनच अश्विनी बिद्रे आणि या हत्याकांडातील बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्या संबंधाबाबत आणि या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर आली होती. यानंतरच अश्विनी बिद्रे यांच्या जीवाचे काहीतरी बरे वाईट झाल्याच्या संशयावरून कळंबोली पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदवण्यात आली होती. या फिर्यादीत पोलीस निरीक्षक कुरुंदकर यांच्यासह राजू पाटील, महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, राजकीय संपर्कातून बिद्रे आणि गोरे कुटुंबीयांवर प्रचंड दबाव आणला गेला. तरीही हा दबाव झुगारून राजू गोरे यांनी दर आठवड्याला सुनावणीसाठी पनवेल आणि मुंबईत फेऱ्या मारल्या. इतकेच नव्हे तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांची आणि राज्यपाल यांची भेट घेऊन दादही मागितली होती. या प्रकरणाच्या तपासाबाबत न्यायालयानेही नाराजी नोंदवली होती. अभय कुरुंदकरने पदाचा गैरवापर करून गुन्हा दडवण्याचा प्रयत्न केला. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्यानंतर 1 जानेवारी 2017 ला या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वर्षभराने आरोपीला अटक झाली होती. तपासात समोर आलेले पुरावे सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे त्यांची हत्या होण्याच्या काही तास आधी या हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला ठाणे शहरात भेटल्या होत्या. संध्याकाळी दोघांनी ठाणे रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये एकत्र चहा घेतला होता. त्यानंतर एकाच कारने दोघे मीरा रोडला कुरुंदकरच्या घरी गेले होते, असे बिद्रे आणि कुरुंदकर या दोघांकडे असलेल्या MTNL च्या मोबाईल लोकेशनवरुन पोलिसांनी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले. अश्विनी बिद्रे यांची हत्या 11 एप्रिल 2016 च्या रात्री झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुंदन भंडारीने अश्विनी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकरला मदत केली होती, हे या सर्वांच्या MTNL मोबाईल सिम लोकेशनवरुन उघड झाले. तसेच इतर आरोपींचे लोकेशनदेखील याच परिसरामध्ये ट्रेस झाले होते. महत्त्वाचं म्हणजे अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतरही त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी कुरुंदकरने एक शक्कल लढवली. कुरुंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरुन चॅटिंग सुरू ठेवलं. याच चॅटिंगमधून अभय कुरुंदकरचा सहभाग समोर आला. अश्विनी यांच्या मोबाईलवरुन 'हाऊ आर यू' असा प्रश्न विचारण्यासाठी 'यू' लिहिताना अभय कुरुंदकरने 'वाय' (Y) हे अक्षर वापरले. हाच धागा पोलिसांनी पकडला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. अश्विनी 'यू' संबोधण्यासाठी कायम 'U' हे अक्षर लिहित असत. मात्र अचानक चॅटिंगमध्ये आलेलं 'Y' हे अक्षर पोलिसांनी हेरले. अभय कुरुंदकर अशाप्रकारे 'यू' साठी 'वाय' (Y) हे अक्षर वापरत असे. अभय कुरुंदकरचे नातेवाईक, मित्र अशा चार-पाच जणांकडून पोलिसांनी या गोष्टीची खात्री करुन घेतली. 'यू' म्हणण्यासाठी अभय कायम 'Y' वापरत असल्याचा दुजोरा पोलिसांना मिळाला, तर अश्विनी कधीच 'यू' म्हणण्यासाठी 'Y' वापरत नसल्याचंही तिच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांकडून स्पष्ट झाले. अश्विनी यांच्या मोबाईलवरुन मेहुणे अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअॅप मेसेज आला. मानसिक अस्वास्थ्यामुळे आपण (अश्विनी) उपचार घेण्यासाठी पाच ते सहा महिने उत्तरांचल किंवा हिमाचल प्रदेशला जाणार असल्याचा उल्लेख त्यामध्ये होता. पोलिसांकडे तांत्रिक पुरावे होतेच, मात्र अश्विनी बेपत्ता झाल्या, तेव्हाही अभय त्यांच्यासोबत होता. त्या जिवंत असल्याचं भासवण्यासाठी त्यांच्याच मोबाईलवरुन अभय चॅटिंग करत राहिला हे देखील चौकशीतून निष्पन्न झाले. तसेच याप्रकरणी पोलिस तपासात अभय कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट मारुन हत्या केल्याची कबुली कुरुंदकरचा मित्र महेश पळणीकरने पोलिसांना दिली होती. सायबर एक्सपर्ट रोशन बंगेरा यांनी अश्विनी बिद्रे यांच्या मोबाइलवरून आणि मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या मोबाइलवरून आणि फेसबुक, व्हॉट्सॲप, लॅपटॉप, सर्व सोशल ॲपमधून महत्त्वाचा डेटा रिकव्हर केला होता. रिकव्हर केलेला डेटा हा पुराव्याच्या दृष्टीकोनातून फार महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर या प्रकरणत मृतदेह आणि हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार सापडलेलं नसल्यामुळे तांत्रिक पुरावे महत्त्वाचे ठरले. त्यासाठी गुगल, अंडर वॉटर स्कॅनिंग, ओशनोग्राफी विभागाची मदत, सॅटेलाईट इमेज यासारख्या तांत्रिक गोष्टींची मदत घेण्यात आली.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. या दोन्ही भावांनी महाराष्ट्र व मराठीच्या हितासाठी याविषयी सकारात्मक संकेत दिलेत. त्यावर संमिश्र राजकीय प्रतिक्रिया येत असताना माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या दोन्ही भावांचे भांडण संपल्यामुळे महाराष्ट्र व मराठीचे प्रश्न सुटतील का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कपिल पाटील याविषयी विविध प्रश्नांची सरबत्ती करताना म्हणाले, ठाकरे नावाचं गारुड महाराष्ट्राच्या समाज मनावर आहे. नाकारण्याचं काहीच कारण नाही.पण दोन भावांचं भांडण संपल्याने, महाराष्ट्राचा, मराठीचा प्रश्न सुटेल का? मुंबई बाहेर फेकला गेलेला, बदलापूर - नालासोपारा - पनवेलला विस्थापित झालेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत येईल का? गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना मुंबईत घर मिळेल का? सत्ता असूनही गेल्या 25 वर्षात आजारी पडलेली बीएमसी हॉस्पिटलं बरी होतील का? पालिकेतली कंत्राटं मराठी माणसाला मिळतील का? शिंदे, राणे, भुजबळ का नकोत? ते पुढे म्हणाले, राज ठाकरे यांनी सर्वच पक्षातल्या मराठी जनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे आणि संदीप देशपांडे यांनी जी खंत व्यक्त केली आहे, त्याचे काय? मराठी माणूस म्हणजे फक्त ठाकरे आणि पवारच का? मान्य करा न करा, निवडणूकीत लोक मान्यता मिळालेले सामान्य बहुजन शिवसैनिकांचा चेहरा बनलेले एकनाथ शिंदे, कोकणी माणसाचे नारायण राणे, ओबीसींचा आवाज छगन भुजबळ, हे तर मूळ शिवसैनिकच. मग ते का नकोत? बौद्ध समाज मराठीच्या परिघात येत नाही का? मराठी बोलणारा मुसलमान, वसईचा ख्रिश्चन, जरांगे पाटलांचा गरजवंत मराठा आणि आंबेडकरांचा बौद्ध समाज हे सर्व मराठीच्या परिघात येत नाहीत का? तामिळनाडूत हिंदूच राहतात. पण हिंदुत्ववादी राजकारणाला त्यांनी थारा दिला नाही. म्हणून ते टिकले. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी राजकारणाने मराठी भाषिकांचं राजकारण आणि महाराष्ट्र धर्मही बुडवला. त्याचं काय? एकत्र येऊन या प्रश्नांना उत्तरं मिळणार असतील तर स्वागतच. अन्यथा मराठी तरुणांची डोकी फक्त फुटतील, असा इशाराही कपिल पाटील यांनी या प्रकरणी दिला आहे. आता पाहू काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे म्हणाले होते, 'प्रश्न असा आहे की, कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातील वाद आमच्यातील भांडणे हे अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे, वाद व इतर गोष्टी फार क्षुल्लक आहेत. अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे व एकत्र राहणे यात फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही. पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे. हा माझ्या काही एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहिला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केले पाहिजे असे मला वाटते.' वाचा सविस्तर उद्धव ठाकरेंनी काय दिला प्रतिसाद? राज यांच्या या मैत्रिच्या प्रस्तावाला सशर्त प्रतिसाद दिला. महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी माझीसुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे. पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कुणी येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, हे पहिल्यांदा ठरवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यात माझ्याकडून कोणतीही भांडणे नव्हतीच. होती, तर मी आजच ती मिटवून टाकली. चला हे ठरवा, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर हे ही वाचा...
शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र आले आहे. पुण्यातील साखर संकुलातील AI च्या वापराबाबत बैठकीच्या निमित्ताने शेजारीच बसल्याचे दिसून आले. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेले आहेत या संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तर गेल्या 15 दिवसांत ही तिसरी भेट असल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान रयत संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार हे अध्यक्ष तर मी ट्रस्टी म्हणून बैठकीला उपस्थित होतो. परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तिथे मी उपमुख्यमंत्री म्हणून बैठकीला उपस्थित नव्हतो, रयत संस्थेमध्ये जी बैठक झाली ती AI च्या संदर्भात झाली असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही महिन्यापासून अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे अजित पवारांचे पूत्र जय पवार यांच्या साखरपुड्याच्या सोहळ्यातही अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसून आले होते. तर रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीलाही ते एकत्र आले होते. राजकारणात सुरू असलेल्या ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चेनंतर आता पवार कुटुंबियांची वाढती जवळील ही देखील चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार नेमके काय म्हणाले? अजित पवार म्हणाले की, शरद पवार आणि माझ्यात भेटी झाल्या यात कुटुंबातील एक कार्यक्रम होता. परिवार म्हणून आपण एकत्र येतो ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही वर्षांनुवर्षे चालत आली आहे, त्यावर बाहेरच्या व्यक्तीने काही बोलू नये. हा पवार कुटुंबियांचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यात मी ट्रस्टी आहे. मी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही. तिथे सर्वपक्षीय नेते संस्थेचे सदस्य म्हणून बैठकीला येत असतात. अजित पवार म्हणाले की, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इतर मान्यवरांना बोलावतात, आणि चर्चा करतात. मुख्यमंत्री विरोधकांना बोलावून चर्चा करतात. काही विषय असे असतात की त्यामध्ये राजकारण आणायचे नसते, राजकारणाच्या पलीकडचे असतात. सर्वच गोष्टीमध्ये राजकारण आणायचे नाही. आता केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आम्ही जनतेला बांधील आहोत. त्यांची पूर्तता करण्यासाठी अनेकांचे अनुभवाचे बोल असतात त्यांच्याकडून माहितीची देवाण- घेवाण करणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला हे शिकवले आहे त्यातून मी तरी या बैठकीला हजर राहिलो आहे. राऊतांचे सूचक वक्तव्य संजय राऊत म्हणाले की, रोहित पवारांनी जे ट्विट केले आहे त्यात काय वेगळे आहे. अजित पवार- शरद पवार हे एकत्र आलेले आहेत. त्यांच्याकडे रयत शिक्षण संस्था, विद्या प्रतिष्ठाण, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या संस्था आहेत, तिथे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासारखे नेते एकत्र येतात आणि बंद दाराआड चर्चा होते. आमचे तसे नाही, आमच्याकडे अशा संस्था नाही, आमचे जे काही आहे ते स्पष्ट आहे, संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार-अजित पवार भेटीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रोहित पवारांचे सूचक ट्विट रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्णक्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे.
इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या मुद्यावरून महाराष्ट्रात चांगलेच महाभारत रंगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हिंदीचे समर्थन केल्यानंतर मनसेने त्यांना राज्यातील इंग्रजी शाळा बंद करण्याचे आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे. इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? असा खडा सवाल त्यांनी यासंबंधी मनसे व ठाकरे गटावर निशाणा साधत केला होता. त्यानंतर आता मनसेने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे सरकारमधील पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे. इंग्रजी शाळा बंद करून त्या जागी मराठी शाळा सुरू करा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पहिली माध्यम भाषा सक्तीची आहे. दुसरी मराठी भाषा सक्तीची आहे. पण तिसरी भाषा म्हणून हिंदी ही अनिवार्य असल्याचे कुठेही नमूद करण्यात आले नाही. यासंबंधी त्या - त्या राज्याला भाषा निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रात हिंदीची सक्ती का? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले, भाषेच्या मुद्यावर मनसेशी चर्चा करा. भाषा समितीशी चर्चा करा. तुम्ही सबका साथ, सबका विकास म्हणता, मग सर्वांसोबत चर्चा करता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीला विरोध करत असताना इंग्रजीला विरोध केला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. पण ते स्वतःच सरकारमध्ये आहेत. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन इंग्रजी शाळा बंद कराव्यात. आमचा त्याला विरोध नाही. त्यांनी हिंमत दाखवून इंग्रजी शाळा बंद करून त्या ठिकाणी मराठी शाळा सुरू करून दाखवावी. संदीप देशपांडे यांनी यावेळी राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या मुद्यावरही भाष्य केले. राज ठाकरे सध्या बाहेर गेलेत. ते परत आल्यावर या मुद्यावर आपली भूमिका मांडतील. या प्रकरणी मी आतापर्यंत आमची भूमिका मांडली. दरम्यान, मनसे मुंबई शहरातील समस्यांवर एक सर्वपक्षीय बैठक बोलावणार आहे. येत्या 26 तारखेला मुंबई पालिकेजवळील पत्रकार भवनात ही बैठक होईल. या बैठकीला सर्वच पक्षांतील प्रतिनिधींना बोलावले जाईल. त्यानंतर झालेल्या चर्चेतून या प्रकरणी योग्य तो तोडगा काढला जाईल, असेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले. आता पाहू काय म्हणाले होते फडणवीस? देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी हिंदीचे जोरदार समर्थन केले होते. मी या प्रकरणी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही कंपलसरी आहे. ती अनिवार्य आहे. सर्वांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती ही शिकता येते. मला कधीकधी आश्चर्य वाटते की, हिंदीला विरोध व इंग्रजीला का नाही? इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? त्यामुळे मराठीला कुणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही, असे ते म्हणाले होते. काँग्रेस, मनसेसह बहुतांश पक्षांचा आहे विरोध उल्लेखनीय बाब म्हणजे इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या धोरणाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेससह मनसेनेही विरोध केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणी हिंदीकरणाला आपला स्वच्छ विरोध असल्याचे सरकारला ठणकावून सांगितले आहे. सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, असे राज ठाकरे यांनी यासंबंधी म्हटले आहे.
शिंदे गटाचे नेते हे चु.. आहेत, त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. ते महाराष्ट्राच शत्रू आहेत. दोन्ही भाऊ एकत्र आले की त्यांच्या शुन्य नशीबी येणार आहे, त्यांना हे नको आहे. त्यांच्या मनात द्वेष भरलेला आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार अनेकदा सोबत आलेले आहेत. आम्ही तसे एकनाथ शिंदे सोबत तुम्हाला कधी दिसलो का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. आम्ही शिंदे गटाला भेटणार नाही. आमच्याकडे संस्था नाहीत, जेथे एकत्र आलो आणि बंद दाराआड बसलो, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला आहे. नेत्यांची भूमिका गांभीर्याने घ्यावी संजय राऊत म्हणाले की, दैनिक सामनामध्ये जे लिहले आहे, त्याच भावना आतापर्यंत महाराष्ट्राच्या होत्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत महाराष्ट्राची सूत्र हाती घ्यावी ही जनभावना आहे. हीच भावना ठाकरे बंधूंनी व्यक्त केली आहे. दोन प्रमुख नेते अशी भूमिका मांडतात तेव्हा आपण ती गांभीर्याने घेत पुढे जायला हवे. शेतावर अन् शाखेत जावे लागेल याची भीती संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे अनेकांना वेदना होणार. यांनी दोघांनी एकत्र राजकारण केले तर आम्हाला कायमचे शेतावर जावे लागेल किंवा संघ शाखेत जात संघ दक्ष हेच करावे लागेल. महाराष्ट्र हा ठाकरेंवर प्रेम करणारा आहे. महाराष्ट्राने सातत्याने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम केले आहे. महाराष्ट्रात हुकुमशाहीविरोधात एकत्र लढत दिली संजय राऊत म्हणाले की, ठाकरे कुटुंबियांवर राज्यातील जनतेचे असलेले प्रेम यामुळे अनेकांना भीती वाटत असेल त्यातून काहीच्या पोटातून मळमळ बाहेर पडत असेल, त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो. महाराष्ट्रात चांगले काही घडावे आणि राज्याने हुकुमशाहीविरोधात एकत्र लढत दिली आहे, हे विसरू नये. भूतकाळात न डोकावणे हे उत्तम राजकारण संजय राऊत म्हणाले की, कुणी काही बोलू द्या कितीही मागून-पुढून खाजवू द्या, आम्ही भूतकाळात पडणार नाही. जेव्हा उद्धवसाहेबांनी ठरवले आहे की एक पाऊल पुढे टाकायचे मागे काय झाले या कडे दुर्लक्ष करत पुढे जाणार आहोत. यापूर्वी काँग्रेससोबत नव्हतो तेव्हा त्यांच्यावर आम्ही अनेक टीका केल्या पण जेव्हा एकत्र यायचे ठरले तेव्हा आम्ही भविष्याचा विचार केला, मागे वळून पाहिले नाही. भूतकाळात न डोकावणे हे उत्तम राजकारण असते. आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केजली नसती, हे जर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कळत नसेल तर मी काय बोलणार. जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली तेव्हा आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला आहे.
दिव्य मराठी अपडेट्स:छत्रपती संभाजीनगरमध्ये कारने महिलेला चिरडले, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... छत्रपती संभाजीनगर: भरधाव कारने महिलेला चिरडले छत्रपती संभाजीनगरमधील पैठण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने एका महिलेला चिरडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर कार चालक फरार असल्याची माहिती आहे. महिला चक्क शंभर ते दीडशे फूट उंच आणि लांब हवेत उडाली आणि खाली आदळली. भाजपची राज ठाकरेंच्या घराच्या परिसरात बॅनरबाजी ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही तर भाषा जोडते असे भाजपचे बॅनर मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घराच्या परिसरात लागले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा असताना भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा छत्रपती संभाजीनगर: भरधाव कारने महिलेला चिरडले छत्रपती संभाजीनगरमधील पैठण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने एका महिलेला चिरडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर कार चालक फरार असल्याची माहिती आहे. महिला चक्क शंभर ते दीडशे फूट उंच आणि लांब हवेत उडाली आणि खाली आदळली. हिंगोलीत हनुमान मंदिरातील दानपेटी फोडली, 2 लाख लंपास हिंगोली शहरालगत खटकाळी हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अवघ्या वीस मिनिटात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रक्कम पळविली आहे. यावेळी तेथील रखवालदारास चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली तर सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला करून त्यांनी हे कृत्य केले. सविस्तर वाचा भाजपने राजकारणात विष पेरण्याचे काम केले- ठाकरे गट भाजपचे राजकारण हे ‘वापरा आणि फेका’ या वृत्तीचे आहे. मोदी, शहा, फडणवीस हे देशाचे नाहीत, तर महाराष्ट्र राज्याचे तरी कसे होतील? राजकारणात विष पेरण्याचेच काम त्यांनी केले असे म्हणत ठाकरे गटाने भाजपवर हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा महाराष्ट्रातील चंद्रपूर देशातील सर्वात उष्ण जिल्हा देशभरात उष्णतेची लाट सुरूच आहे. रविवारी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा 44.6 अंशांसह देशातील सर्वात उष्ण होता. राजस्थानमध्ये रविवारी सलग दुसऱ्या दिवशी तापमानात घट झाली, परंतु पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज आहे. सविस्तर वाचा सेन्सेक्स 500 अंकांनी वाढून 79,000 वर शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह 79,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्याच वेळी, निफ्टी देखील सुमारे 150 अंकांनी वाढला आहे आणि 24,000 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, एफएमसीजी आणि ऑटो शेअर्स दबावाखाली व्यवहार करत आहेत. सविस्तर वाचा
ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती, तोडत नाही तर भाषा जोडते असे भाजपचे बॅनर मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घराच्या परिसरात लागले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार ही चर्चा असताना भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. यामुळे मनसेशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने बॅनरबाजी करत त्यांच्या हिंदीच्या मुद्यावरुन मनसेला डिवचले आहे. दुसरीकडे शिवसेना नेते योगेश कदम यांनी राज ठाकरेंना आपुलकीचा सल्ला म्हणत उबाठाला स्वार्थ साधून झाला की रक्ताची नाती नकोशी होतात. हे राजसाहेबांना वेगळे सांगायची गरज नाही, जरा जपून, तुम्ही मनापासून हात पुढे करताल आणि ते पुढे तुमचेच पाय खेचतील. नेमके योगेश कदम काय म्हणाले? योगेश कदम म्हणाले की, सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला, उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे.स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते श्री. नारायणजी राणे, स्व.श्री. मनोहरजी जोशी, श्री. दिवाकरजी रावते, श्री. लीलाधर डाके, श्री. रामदासभाई कदम आणि श्री. एकनाथजी शिंदे यांना सुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको. त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो - जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील. विधानसभेला दोघांनाही बसला फटका 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला खातेही उघडता आले नाही. 288 जागांच्या विधानसभेत उद्धव ठाकरे यांचा पक्ष फक्त 20 जागांवर जिंकू शकला. ज्या शिवसेनेसाठी ते दोघे वेगळे झाले होते तीही आता हिसकावून घेण्यात आली आहे. यामुळे आता आगामी स्थानिक संस्थाच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंचे वक्तव्य काय? राज ठाकरे म्हणाले की, एकत्र येणे आणि एकत्र राहणे फार कठीण आहे असे मला वाटत नाही. प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. हा माझ्या वैयक्तिक इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते की आपण महाराष्ट्राचे मोठे चित्र पाहिले पाहिजे. माझा असा विश्वास आहे की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला पाहिजे. उद्धव ठाकरे काय म्हणाले? उद्धव ठाकरे म्हणाले की, अगदी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. महाराष्ट्राचे हित मग त्याच्या आड जो कुणी येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही त्याचे स्वागत करणार नाही हे आधी ठरवा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणे नव्हतीच पण जी काही होती ती मिटवून टाकली चला. त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राने ठरवायचे की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर.
सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम सुरू आहे. १९, २०, २१ रोजी आलेल्या लग्नतिथीमुळे सर्वसामान्यांची असलेली लालपरी (एसटी बस) प्रवाशांच्या गर्दीने हाऊसफुल्ल होत आहे. उन्हाचा पारा वाढलेला असला तरी सिल्लोड- घाटनांद्रा ते सिल्लोड- पाचोरा या मार्गावरील बसेस रोजच प्रवाशांच्या गर्दीने भरून जात असल्याचे चित्र घाटनांद्रा बसस्थानकावर पाहायला मिळत आहे. बसमध्ये सर्वाधिक संख्या ही अर्धे तिकीट असलेल्या महिलांची व ज्येष्ठ नागरिक यांचीच राहत आहे. लग्नसराई व लागणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे या मार्गावर लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने एसटी बसमध्ये प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे सर्वच मार्गावरील बसेस प्रवाशांनी भरून जात आहेत. बसची संख्या कमी असल्याने व एसटीमध्येही प्रवाशांची संख्या वाढल्याने नाइलाजाने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, वाढत्या तापमानामुळे वऱ्हाडी मंडळींना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. घाटनांद्रा परिसरातील उन्हाचे सरासरीचे तापमान हे ३८ ते ४० डिग्री सेल्सियसपर्यंत राहत असल्याने वऱ्हाडी मंडळींना व नातेवाइकांना उन्हाचा त्रास सहन करून लग्नसमारंभाला हजेरी लावावी लागत आहे. त्यामुळे बसला गर्दी होत आहे. पाचोरा, धुळे मार्गावरील बसची मागणी रविवारी दाट लग्नतिथी असल्याने सिल्लोड- पाचोरा व घाटनांद्रा या बससाठी घाटनांद्रा बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये उभा राहण्यासाठीही जागा नव्हती. अर्धेअधिक प्रवासी खालीच राहून गेले होते. सिल्लोड आगाराने लांब पल्ल्याच्या असलेल्या सिल्लोड- पाचोरा, सिल्लोड- धुळे, सिल्लोड अमळनेर या बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. त्याचा मोठा फायदा आगारालाही होणार आहे.
तालुक्यात ६ लाखांहून अधिक लोकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तालुक्यात ३३ गावांत ४० पेक्षा जास्त टँकरद्वारे ५८ खेपा सुरू आहेत. आणखी ११ गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढणार आहे. पारंडी, थेरगाव, दादेगाव, थापटी तांडा, दाभरूळ, देवगाव, एकतुनी, हिरापूर, गेवराई, आंतरवाली, डेरा, कोळीबोडखा, खादगाव, मुरमा, लिंबगाव, तुपेवाडी अशा ३३ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. काही गावांत लोकांना अजूनही पाणी विकत घ्यावे लागत आहे. योग्य नियोजनाचा अभाव तालुक्यात योग्य नियोजन होत नाही. त्यामुळे टँकर सुरू राहतात. नियोजन केले तर टंचाई जाणवणार नाही. मागणीप्रमाणे टँकर सुरू करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जितू परदेशी यांनी केली.
४०० केव्ही वीज सप्लाय करणारा ११० फुटांचा टॉवर शनिवारी (दि. १९) मध्यरात्री अचानक कोसळल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील आळंदवाडी शिवारात गट क्रमांक ४२१ मधील संजय बाबूराव खाकरे व नारायण तायडे यांच्या शेतात घडली. याचवेळी टॉवरच्या बाजूला अद्रक काढणीचे काम करणाऱ्या २८ मजुरांसह ६०० मेंढ्या घेऊन एक मेंढपाळ होता, पण सुदैवाने टॉवर विरुद्ध दिशेला पडल्याने अनुचित प्रकार टळला. रात्रीची वेळ असल्याने आपले सहकारी सुखरूप आहेत का, या भीतीने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून या टॉवरसाठी २०१६ मध्ये जमीन खरेदी करून टॉवरची उभारणी करण्यात आली होती. ६३ क्रमांकाचा हा टॉवर ४०० केव्ही विद्युत पुरवठा करणारा असून, वाळूज भुसावळ (दीप नगर) लिलो सर्किट वाहिनी घेऊन थापटीतांडा उपकेंद्रासाठी विद्युत पुरवठ्यासाठी बनविण्यात आला होता. मात्र, यात विजेचा प्रवाह नसल्याने मोठा अनर्थ ठळला. विशेष म्हणजे हे टॉवर जमिनीतून निखळून न पडता दोन फूट वरतून बाजूला झाले आहे. मजबूत पद्धतीने बांधणी केलेला टॉवर कोसळला कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या टॉवरला लागून नव्याने घेतलेले करवत पान व वायर बांधलेली दोरी आढळून आल्याने शेतकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. टॉवर पडल्याची घटना सकाळी गाव परिसरात समजताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. टॉवर पडल्याने संपूर्ण परिसरात केबल पडले आहे. या केबलची साईज ८ एमएम एवढी आहे. चोरीच्या प्रकरणातून घडली घटना ^कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसताना ही घटना घडली. आमचे काही अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून आले. त्यांना तिथे संशयास्पद वस्तू आढळून आल्या असून, पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. सदरील कंपनीकडून अजून टॉवर आमच्या ताब्यात देण्यात आलेले नाही. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. -अनंत पाठक, कार्यकारी अभियंता, राज्य विद्युत पारेषण आधी ५ मिनिटे टॉवर हालत होते दिवसभर काम करून रात्री टॉवरजवळ झोपलो होतो. रात्री ३ वाजता टॉवरजवळ जोराचा आवाज आला. टॉवर जवळपास ५ मिनिटे हालत होते, नेमके काय होतेय, काहीच सुचत नव्हते. नंतर काही क्षणात टॉवर कोसळले. घटनेनंतर टॉवरजवळ जाऊन बघितले, आसपास कुणी आहे का? मात्र कुणीही नव्हते. सुरुवातीला टॉवरमध्ये विद्युत प्रवाह आहे की नाही, हे आम्हाला माहीत नव्हते. त्यामुळे आम्ही बराच वेळ टॉवरजवळ गेलो नाहीत. या घटनेमुळे काहीवेळ थरकाप उडाला होता. -रुमालसिंग कोटवार, मजूर तार कट केली, पण.... टॉवरचे काम जवळपास २०१८ मध्ये पूर्ण झाले. त्यात आजपर्यंत विद्युत प्रवाह नाही. याची महिती अनेकांना आहे. विद्युत सप्लायसाठी वापरण्यात येणारी तार (केबल) जास्त किमतीची असल्याने चोरट्यांनी दोरी व करवतच्या साहाय्याने तार कट केली. बॅलन्स न सांभाळल्या गेल्याने टॉवर पडल्याचे बोलले जात आहे.
आचार्य देवनंदीजी गुरुदेव यांच्या संकल्पनेतून णमोकार तीर्थ आकार घेत आहे. (दि. ६ ते १३ फेब्रुवारी २०२६ रोजी णमोकार तीर्थावर आंतराष्ट्रीय पंचकल्याणक प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सव होणार आहे. त्यानिमित्त जोरदार तयारी सुरू आहे. तीर्थावर भगवान आदिनाथ, भगवान भरत व भगवान बाहुबली यांच्या भव्य ३१ फूट उंच प्रतिमा उभारल्या जाणार आहे. त्यापैकी भगवान आदिनाथ यांची भव्य प्रतिमा उभी राहिली आहे. भगवान बाहुबली व भगवान भरत यांच्या प्रतिमेसाठी १०९ टन वजन असलेल्या ३१ फुट उंच २ शिळा बैंगळुरु येथील खाणीतून ट्रकने येत आहे. या शिळांचे बैंगळुरु येथून १ एप्रिलला प्रवास करीत (दि. १६) एप्रिलला सोलापूर येथे स्वागत करण्यात आले. उस्मानाबाद, बीड, या जिल्ह्यांसह छत्रपती संभाजीनगर येथे शनिवार (दि. १९) एप्रिलबक स्वागत करण्यात आले. सोमवारी (दि. २१) या शिळांचे जिल्ह्यात आगमन होणार असून, ठिकठिकाणी स्वागत व पूजन करण्यात येणार आहे. भगवान आदिनाथांचे पुत्र भरत हे चक्रवर्ती होते, सहा खंडाचे राजा होते. त्यांच्या नावावरुनच आपल्या देशाला भारत नाव पडले. भगवान बाहुबली हे वीर पराक्रमी होते. त्यांची श्रवणबेलगोला येथे जगप्रसिध्द ५२ फुट प्रतिमा आहे. त्यानंतर येथील तीर्थावर साकारण्यात येणारी दोघांची सर्वात मोठी प्रतिमा ठरणार आहे, अशी माहिती णमोकार तीर्थाचे अध्यक्ष निलम अजमेरा यांनी दिली. फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या जागतिक महोत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहे. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळा अगोदर जैन समाजाचा हा महाकुंभ होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे प्रचार प्रमुख पारस लोहाडे यांनी दिली. ही प्रतिमा दोन सख्या भावांची आहे. हे एकतेचे प्रतिक आहे म्हणून, मालेगाव येथे ३१ भाऊ एकत्र येवून या पाषाणाचे पूजन करतील. शहरातील सर्वपक्षीय नेते, जैन समाजातील पुरुष-महिला मोठ्या संख्येने मालेगाव येथे उपस्थित राहणार आहे. अशी माहिती ग्लोबल महासभेचे सचिव आनंद काला यांनी दिली असून बुधवारी(दि. २३) सकाळी णमोकार तीर्थ येथे उपस्थित राहावे, असे आवाहन बालब्रम्हचारी वैशाली दीदी यांनी केले आहे. उद्या दि. २१ रोजी सकाळी ८ वाजता शिर्डी ज्ञानतीर्थ, ९ वाजता कोपरगाव, ११ वाजता येवला , सायंकाळी ५ वाजता मनमाड, दि.२२ रोजी सकाळी सकाळी ८ वाजता मालेगाव , १० वाजता उमराणा, सायंकाळी ५ वाजता चांदवड, दि. २३ ला सकाळी ८ वाजता णमोकार तीर्थ पोहोचणार असून सर्व ठिकाणी स्वागत व पूजन केले जाणार आहे.
वन विभागाच्या पूर्व भागमधील दिंडोरी वनक्षेत्रातील ओझरखेड धरणाजवळ वन उद्यान तयार होत आहे. या वन उद्यानात सर्प, बिबट माहिती केंद्रासह फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जीमचा समावेश राहणार आहे. नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गालगत उद्यानाच्या प्रवेशद्वारावर माकड, वाघ, चित्ते, सांबर यांचे स्टॅचू बसवले आहे. हे स्टॅच्यू येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकालाच आकर्षित करत आहे. महामार्गालगत असल्याने सप्तशृंग गडावर जाणाऱ्या भाविकांसह व गुजरातच्या पर्यटकांना हे उद्यान निश्चितच आकर्षित करणार आहे. उद्यानाशेजारी रोपवाटिका असल्याने विविध प्रजातीच्या झाडांमुळे सौंदर्यात अधिक भर पडणार आहे. ओझरखेड रोपवाटिकेच्या शेजारी असणाऱ्या उद्यानात निरीक्षण मनोरा, पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या परिसराचा चांगला विकास होऊन या ठिकाणी पर्यटकांना व निसर्गप्रेमींना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच वनसंरक्षण व वन्यजीव संरक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी उद्यानाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार दोन कोटीच्या खर्चाच्या मंजुरी मिळाली असून उद्यानाचे ७० टक्के काम मार्गी लागले आहे. लवकरच हे उद्यान सर्वासाठी खुले होणार आहे. जागेत विविध प्रकारच्या बांबू प्रजातींची लागवड केलेली आहे. या उद्यानात वन्यजीवांची व वन संपत्तीची माहिती दर्शवणारे फलक जागोजागी लावण्यात येत आहेत. निसर्ग पायवाट, चिल्ड्रन पार्क, ग्रीन जीमची निर्मिती करत पर्यटकांसाठी सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रबोधनातून नवीन पिढीत निसर्ग संपत्तीविषयी आवड उत्पन्न करण्यासाठी नक्कीच यातून हातभार लागेल. हे उद्यान विकसित झाल्यानंतर स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे हस्तांतरित केले जाणार आहे. नाममात्र प्रवेश फी आकारत समिती या उद्यानाची देखभाल करेल. ओझरखेड परिसरातील फोपशी, करंजी देवस्थान, वणी भागात जंगल कमी झाल्याने वन्यजीव मनुष्यवस्तीकडे स्थलांतर करत आहे. परिणामी मानव वन्यप्राणी संघर्ष वाढल्याचे दिसत आहे. भविष्यात हा संघर्ष रोखण्यासाठी मानवास वन्यप्राण्यांसोबत सहजीवनाची कास धरावी लागणार आहे. वन उद्यानाच्या माध्यमातून मुलांना वन्यजीवांबद्दल माहिती मिळाल्यास सहानुभूती व संरक्षणाची भावना निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितले. या उद्यानाची उपयोगिता वाढावी यासाठी शाळांच्या सहली आयोजित कराव्यात. निसर्ग सौंदर्यात भर घालण्यासाठी ओझरखेड धरणालगत वन उद्यान उभारले आहे. तालुक्यातील नागरिक आणि पर्यटकांसाठी ओझरखेड वन उद्यान हे लवकरच खुले झाले पाहिजे. नागरिकांना नैसर्गिक सौंदर्यासह या उद्यानाचा मनमुराद आनंद लुटता येईल, अशी माहिती परिसराच्या वनपरिक्षेत्र अधिकारी रुपाली देवरे घुमरे यांनी दिव्य मराठीस सांगितले अडीच हेक्टर क्षेत्रात उभारलेल्या या वन उद्यानात प्राणिमात्रांचा अधिवास दाखवण्यात येणार आहे. बगीच्यात विविध खेळणी बसवण्यात आली आहेत. सापांच्या जातींची माहिती देण्यासाठी सर्प जाती माहिती केंद्र, मानव बिबट संघर्ष माहिती केंद्र, राखीव संवर्धन परिसंस्था, फुलपाखरू गार्डन, राशी वन, ग्रीन जीम, अंतर्गत सजावटीचे झाडे, मचाण आणि येथूनच सूर्याचे मावळते विहंगम दृश्य न्याहाळता येणार आहे. औषधी वनस्पतींचाही समावेश आहे.
सुरगाणा तालुक्यातील खुंटविहिर येथे श्री स्वामी बाबा यांच्या १०० जयंती निमित्त गुजरात राज्यातील श्री सत्यसाई सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली १०८ जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,आमदार नितीन पवार, आमदार मंंजुळा गावित, तहसीलदार रामजी राठोड, पोलिस निरीक्षक राहुल मोरे हे होते. यावेळी प्रत्येक जोडप्याला दोन खुर्च्या, आंब्याची दोन रोपे व संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. आदिवासी समाजात वर्षानुवर्षे गरिबी आहे. पावसाळ्यात कामे आटोपल्यानंतर त्यांना कामाच्या शोधात बाहेरगावी जावे लागते. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी घरदार सोडावे लागते. शहरात विवाह सोहळ्यात लाखो रुपये खर्च केले जातात. तेवढ्याच पैशात हजारो जोडप्यांचे विवाह पार पडतील, खर्च कमी करण्यासाठी आदिवासी समाजात सामुदायिक विवाह सोहळ्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन मंत्री झिरवाळ यांनी केले.
जायकवाडी धरणाला २०२३ मध्ये पाणी दिल्यामुळे, २०२३-२०२४ मधील हंगामात उजव्या कालव्यातून तीन आवर्तने झाली होती. परंतु २०२४ मधील पावसाळ्यात जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे, यंदा पाणी सोडण्याची आवश्यकता भासली नाही. उपलब्ध पाण्यातून उजव्या कालव्याचे चौथ्यांदा आवर्तन सोडण्यात येणार आहे. या कालव्यावरील सुमारे ७० हजार ६८९ हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा फायदा होईल. तर निळवंडे धरणातून मागील वर्षीच्या तुलनेत महिनाभर अगोदरच आवर्तन सोडले आहे. मुळा धरणात सद्यस्थितीत एकूण १२ हजार ७३ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. त्यापैकी ७५७३ दशलक्ष घनफूट हा उपयुक्त जलसाठा आहे. उपलब्ध पाण्यावर जलसंपदा विभागाने पिण्यासह सिंचनाच्या पाण्याचे नियोजन आखले. २०२३ मध्ये मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी १ सप्टेंबर २०२३ मध्ये खरीप, १५ जानेवारी २०२४ मध्ये रब्बी व ५ एप्रिलला उन्हाळी असे तीन आवर्तने सोडली होती. यंदा उजव्या कालव्याचे पहिले आवर्तन हे ओव्हर फ्लो च्या पाण्यातून १४ ऑगस्टला सोडण्यात आले होते, त्यानंतर १९ डिसेंबर २०२४ व १४ फेब्रुवारी २०२५ ही दोन रब्बीची आवर्तने झाली. तर आता याच उजव्या कालव्यावर चौथे आवर्तन आठ दिवसांत सोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मुळा पाटबंधारेकडून मागणी नोंदवण्यात येत आहे. निळवंडे धरणातून रविवारी सकाळी १० वाजता ५०० क्युसेक वेगाने आवर्तन सोड ण्यात आले. हे दुसरे आवर्तन असून पहिले आवर्तन जानेवारीत सोडले होते. संगमनेर, राहाता, राहुरी, सिन्नर या तालुक्यांतील तलाव व बंधारे भरण्यात येणार आहेत. उन्हाळी आवर्तनासाठी मागणी नोंदवत आहोत ^यंदा आपण पहिले आवर्तन ओव्हरफ्लोच्या पाण्यातून दिले होते. त्यानंतर दोन रब्बीचे आवर्तन झाली. त्यानंतर आता उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी आम्ही मागणी नोंदवत आहोत. मागणी नोंदवल्यानंतर कालवा सल्लागार समितीसमोर विषय ठेवला जाईल, त्यानंतर पाणी सोडणे बाबत निर्णय होईल. सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा. मुळा धरणात सध्या ७५७३ दलघफू उपयुक्त पाणीसाठा आहे. निळवंडे धरणातून दोन टीएमसी पाणी सोडणार ^ रविवारपासून आवर्तन सोडण्यात आले. मागलीवर्षी मे महिन्यात आवर्तन सोडले होते. यंदा एप्रिलमध्येच दुसरे सोडले. महिनाभरात या आवर्तनाद्वारे सुमारे दोन टीएमसी पाणी सोडण्यात येईल. सद्यस्थितीत ५०० क्युसेकने विसर्ग सुरू असून टप्प्याटप्प्याने तो वाढवण्यात येईल. याचा लाभ चार तालुक्यांत होणार आहे. प्रदीप हापसे, कार्यकारी अभियंता निळवंडे धरण.
अहिल्यानगर अमृत अभियानातून सुरू असलेल्या भुयारी गटार योजना व ५७ एमएलडी मलनि:स्सारण प्रकल्पाचे (एसटीपी) काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी बसवण्यात आलेल्या एक्सप्रेस फिडरचे कामही पूर्ण झाले आहे. त्याची चाचणीही यशस्वी होऊन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. . त्यामुळे मध्य शहरातील ड्रेनेजलाइनद्वारे सीना नदीत सोडला जाणारा मैला आता थेट पाइपलाइनद्वारे मलनि:स्सारण प्रकल्पात नेला जात आहे. शहरात अनेक वर्षांनंतर भुयारी गटार योजना मंजूर झाली. यातून शहरातील सीना नदीच्या प्रदूषणाचा मोठा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल, तसेच प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी सध्या भिंगार नाल्यात सोडले जाते. मात्र, हे पाणी वाकोडी परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. सीना नदीच्या प्रदूषणाबाबत राष्ट्रीय हरित लवादात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर प्राधान्याने शहरात भुयारी गटार व मलनिःसारण प्रकल्प शासनाकडून मंजूर करण्यात आला. त्यासाठी सुरुवातीला १३१.०७ कोटी व नंतर वाढीव ३२.४३ कोटी असा १६३.५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम सन २०१८ मध्ये हाती घेण्यात आले. शहरातील मैला प्रकल्पात वाहून नेणारी ड्रेनेज लाइन, पंपिंग स्टेशन, मलनि:स्सारण प्रकल्प, नाला इंटरसेप्टर आदी कामे पूर्ण झाली आहेत. सीनानदी पात्रातील ड्रेनेज लाइनद्वारे फुलसौंदर मळा येथील पंपिंग स्टेशन व तेथून प्रकल्पात मैला नेला जात आहे. प्रकल्पात प्रक्रिया झाल्यानंतर बाहेर पडणारे पाणी सध्या भिंगार नाल्यात सोडले जात आहे. मात्र, हे पाणी वाकोडी परिसरातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मध्य शहरातील ड्रेनेजलाइनद्वारे सीना नदीत सोडला जाणारा मैला आता थेट पाइपलाइनद्वारे मल:निस्सारण प्रकल्पात पोहचणार असल्याने व तेथे त्यावर प्रक्रिया होणार असल्याने नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. मलनि:स्सारण प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली आहे. आठ दिवसांत प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. येत्या आठ दिवसांत प्रकल्प कार्यान्वित होणार एक्सप्रेस फिडरही बसवले ^मलनिःसारण प्रकल्पाचे काम झालेले आहे. एक्सप्रेस फिडर बसवण्यात आले आहे. त्यामुळे प्रकल्पाची चाचणी घेण्यात आली आहे. चाचणी यशस्वी झाली असून, येत्या आठवडाभरात प्रकल्प कार्यान्वित होईल. सध्या प्रक्रिया केलेले पाणी भिंगार नाल्यात सोडले जात आहे. लवकरच वाकोडी परिसरातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. - यशवंत डांगे, आयुक्त, महापालिका
उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढत असताना, गर्भगिरी डोंगर परिसरातील पशु-पक्ष्यांच्या पाण्याच्या टंचाईपासून वाचवण्यासाठी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने वन विभागाच्या १० पाणवठ्यांत टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली आहे. आठवड्याला ५ टँकरद्वारे ५२ खेपा टाकल्या जातात. ही कृती या परिसरातील वन्यजीवांसाठी जीवनदायी ठरली आहे. वृक्षारोपणासह निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. पशु-पक्ष्यांना पाण्याअभावी मृत्यू ओढवू नये, यासाठी आम्ही दरवर्षी हे अभियान राबवले जाते. यंदाही हा उपक्रम नुकताच सुरु करण्यात आली. मागील वर्षी दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात होते. त्यात यंदा आणखी तीन टँकरची वाढ केली आहे. नुकतेच या उपक्रमाचा शुभारंभ बोईसर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, अनिल गर्जे, रोहिदास पालवे, ऋषिकेश पालवे, वैभव पालवे, यांच्यासह आजी-माजी सैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. भानुदास पालवे म्हणाले, जय हिंद फाउंडेशनचे कार्य हे निसर्ग संवर्धनाच्या दिशेने प्रेरणादायी आहे. उन्हाळ्यात जंगलातील पशु-पक्ष्यांना पाण्याची टंचाई भासते. हे पाणवठे त्यांच्या जगण्यासाठी महत्त्वाचे ठरतील. पर्यावरणाचा समतोल राखण्यासही हा उपक्रम आवश्यक आहे. शिवाजी पालवे म्हणाले, निसर्ग रक्षण ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. या वन्यजीवांना जीवदान कोल्हार घाट परिसरात हरीण, ससे, रानमांजरी, रानडुकरे, माळरानावर चरायला येणारी गोवंशीय जनावरे यांच्यासह बिबट्यांचाही वावर आहे. याशिवाय चिमण्या-कावळ्यांसह इतर पक्षांच्या प्रजातीही आढळून येतात. ऐन उन्हाळ्यात या प्राण्यांची तहान वन विभागाच्या पाणवठ्यांमुळे भागवली जात आहे. नगर तालुक्यातील आगडगाव रस्त्यावरील कोल्हार घाट परिसरात, डोंगर व जंगल भागातील ठिकाणी वन विभागाने सिमेंट काँक्रिटचे ९ ते १० पाणवठे बांधले आहेत. जय हिंद माजी सैनिक फाऊंडेशनने काही वर्षांपासून पाणवठ्यांत टँकरने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. स्वत:पासून सुरुवात व्हावी ^ पशु-पक्ष्यांना पाण्याअभावी मृत्यू ओढवू नये, यासाठी दरवर्षी हे अभियान राबवतो. प्रत्येकाने आपल्या घरी, अंगणात किंवा टेरेसवर पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्य ठेवावे. यामार्फत प्रत्येकजण या चळवळीचा भाग होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवस किंवा स्मृतिदिनानिमित्त पाण्याची सोय करु शकता. - शिवाजी पालवे, अध्यक्ष, जय हिंद फाऊंडेशन, अहिल्यानगर.
अहिल्यानगर-बीड जिल्ह्यातील गर्भगिरी डोंगररांग म्हणजे देवभूमी असून, त्याच्या मध्यभागी श्रीक्षेत्र मोहटा देवीचे स्थान आहे. देवस्थान समितीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व महाआरतीसाठी आपण नवरात्रीपूर्वी मोहटा देवस्थानला भेट देऊन अष्टमहासिद्धी व दशमहाविद्यांचे पूजन करणार आहे. संपूर्ण गर्भगिरी डोंगररांगेतील सर्वच स्थानांचा साखळी पद्धतीने (सर्कल टुरिझम) विकास करणार असून, नाथ व वारकरी सांप्रदायाचा वारसा जतन करीत, एकत्रित विकास आराखडा अंमलात आणण्याचा प्रयत्न राज्य शासन निश्चितच करील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातील घाटशीळ पारगाव येथे गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मोहटा देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, आमदार मोनिका राजळे, विश्वस्त अक्षय गोसावी, डॉ. श्रीधर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनाही देवस्थान समितीने मुख्यमंत्र्यांबरोबर भेटीचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांच्या विशेष सहकार्याने वन विभागाची सुमारे दहा एकर जमीन देवस्थान समितीला मिळाली आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा मंजूर झाला असून, त्याचा प्रारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते व्हावा, असा देवस्थान समितीचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्र्यांनी मोहटा देवस्थानला भेट देण्याचे मान्य केल्याने देवस्थान समितीचा उत्साह वाढला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड म्हणजे वारकरी संप्रदायाची जन्मभूमी असून, येथे गहिनीनाथांची संजीवन समाधी आहे. जवळच श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ, मढी येथे चैतन्य कानिफनाथ, तर येवलवाडी येथे चैतन्य जालिंदरनाथ यांची संजीवन समाधी आहे. याच रांगेत नाथ संप्रदायाची जन्मभूमी असलेले श्रीक्षेत्र वृद्धेश्वर आहे. राज्यातील प्रमुख शक्तीपीठांपैकी मोहटा देवस्थान असून, येथील दशमहाविद्या व ६४ योगिनींचे स्थान राज्यात मोहटादेवी येथे एकमेव आहे. देवीची महापूजा करण्याचे भाग्य लवकरच लाभावे, अशी आपली इच्छा आहे. देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी देवस्थानची व विकासकामांची माहिती दिली. यावेळी आमदार नमिता मुंदडा, जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे उपस्थित होत्या. जलसंधारणाबरोबर देणार पर्यटन विकासास प्राधान्य नगर व बीड जिल्ह्यात मिळून धार्मिक, निसर्ग पर्यटनाला असलेला मोठा वाव राज्याच्या सर्वांगीण प्रगतीतसुद्धा भर घालणारा ठरेल. ग्रामीण व उपेक्षित भागासाठी जलसंधारणाबरोबरच पर्यटन हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा ठरणार असल्याचे फडणवीस म्हणाले. सुमारे पंधरा मिनिटांचा वेळ मुख्यमंत्र्यांनी देवस्थान समितीला दिला.
राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेचे परिणाम रविवारी (२० एप्रिल) पारनेरमध्ये दिसून आला. पारनेरमध्ये रविवारी (२० एप्रिल) तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला. त्यातही वाऱ्याचा वेग गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी होता. त्यामुळे उष्णतेच्या तीव्र झळांनी पारनेरकर हैराण झाल्याचे चित्र होते. उन्हाच्या तिव्रतेमुळे नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले. त्याचा परिणाम पारनेरच्या आठवडे बाजारावर दिसून आला. एरवी सकाळी ११ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या बाजारतळाच्या आवारात तुरळक गर्दी असल्याचे चित्र दिवसभर होते. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर बाजारात स्थानिक नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली. मात्र, पारनेर पंचक्रोशीसह वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी आजच्या आठवडे बाजाराकडे पाठ फिरवल्याचेच दिसून आले. त्याचा फटका भाजीपाला, धान्य विक्रेत्यांना बसला. एरवी गर्दीमुळे अजिबात उसंत नसलेली हॉटेल व्यावसायिक,भेळ विक्रेतेही ग्राहकांच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र बाजारात होते. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे शहर परिसरासह पंचक्रोशीत भाजीपाल्याची लागवड अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे स्वतःच्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या कमी आहे. मात्र, भाजीपाला, फळांचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नजिकच्या अहिल्यानगर, शिरूर येथील बाजारपेठांमधून भाजीपाला, फळांची खरेदी करून आठवडे बाजारात विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या कोरोना संसर्गापासून, गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या विक्रेत्यांना उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. नेहमीपेक्षा ३० ते ४० टक्के व्यवसाय कमी झाल्याचे भाजीपाला व्यावसायिक उषा खेडेकर, अर्जुन ठुबे, तसेच गृहोपयोगी किरकोळ वस्तूंचे विक्रेते संजय कंदलकर यांनी सांगितले. प्रत्येक रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी पारनेरची मुख्य आणि नवी बाजारपेठ गर्दीने फुलून जात असते. मात्र, उन्हाच्या तिव्रतेमुळे रविवारी बाजारपेठांमध्येही शुकशुकाट जाणवत होता.
राहुरीचे ग्रामदैवत खंडेराया यात्रोत्सवानिमित्त राहुरी रेल्वे स्टेशन जवळील बीज गुणन प्रक्षेत्रावर जागेवर आयोजित बैलगाडा शर्यतीने हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या राहुरीकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संक्रापूर येथील रामा पांढरे यांच्या पाखऱ्याने बाजी मारत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ठेवलेल्या क्रमांक एकच्या ७१ हजार रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. चोंडी जळगाव येथील अशोक ढोणे यांच्या चिमण्याने क्रमांक दोनच्या ५१ हजारांचे व खंडेराया केसरी ढालीचे मानकरी ठरले. बैलगाडा शर्यतीत बारामती (सुपे) लोणीकर यांचा हारण्या, साकुरीचे दीपक आबा रोहम, वसंत भाऊके, अमोल जगताप यांचा गुरु व पिष्टन, सोन्याभाऊ कडलग सादतपुुर यांचा शंभू, विजय म्हस्के लोणी प्रवरा यांचा पुष्पा, रमन पवार, सोपान भिसे यांचा माऊली, उंबरे ता. राहुरी येथील पैलवान ग्रूप, शनी शिंगणापूर येथील साईनाथ पवार यांचा चित्र्या, नाशिक येथील संदीप लांडगे यांचा छोट्या व रावण, सोमनाथ जाधव व हमिदभाई यांचा वाघ्या व बादशहा यांनी शर्यतीत निकराची झुंज देत क्रमांक दोन ते सात बक्षीसाचे मानकरी ठरले. खंडेराया देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला बैलगाडा शर्यतीचा थरार कार्यक्रमात सातारा येथील मयूर तळेकर यांनी पहाडी आवाजातील निवेदनाने बैलगाडा चालक-मालकांसह प्रेक्षकात ऊर्जा निर्माण केली. झेंडा पंच म्हणून किरण तळेकर यांनी काम पाहिले. या शर्यतीत एकूण २३ फेऱ्या पार पडल्या. प्रत्येक फेरीतील विजेत्या बैलगाडा मालकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बैलगाडा शर्यतीसाठी श्रीखंडेराया यात्रा कमेटीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनामुळे अनेक जिल्ह्यातून राहुरीत आलेल्या बैलगाडा मालक-चालकांनी समाधान व्यक्त केले. बैलगाडा शर्यत यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे, सचिव सदाशिव शेळके, प्रतीक तनपुरे, यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष दादासाहेब तोडमल, उपाध्यक्ष अक्षय वराळे व वरुण तनपुरे, खजिनदार राजेंद्र शेळके, अमोल तनपुरे, आकाश येवले, सोन्याबापू जगधने, सुनील भुजाडी, राजेंद्र वाडेकर, शिवाजी वराळे, दत्तात्रय येवले आदींसह नागरिकांनी परिश्रम घेतले. बैलगाडा शर्यतीचे निवेदक मयूर तळेकर यांचा सन्मान बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक ७१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५१ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक २१ हजार रुपये, पाचवा क्रमांक ११ हजार रुपये, सहावा क्रमांक ७ हजार रुपये, आठवा क्रमांक ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. बैलगाडा शर्यतीच्या निवेदकाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल सातारा येथील बैलगाडा निवेदक मयूर तळेकर यांना उपस्थित शौकिनांनी बक्षिसे देऊन सन्मानित केले.
शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रागतिक विचार घेऊन आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आम्ही उपेक्षित घटकांचे प्रश्नसोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू, अशी खूणगाठ मनाशी बांधूनच काम करीत राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा सामाजिक विभगाचे राज्य प्रभारी माजी आमदार लहू कानडे यांनी केले. श्रीरामपूर येथील यशोधन कार्यालयात आयोजितमहाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाच्या उत्तर विभागीय बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनील मगरे, प्रदेश सरचिटणीस महेंद्र शिरसाठ, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अशोक कानडे, शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, सुधाकर बागूल, आनंद सैंदाणे, नीलेश भालेराव आदी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार लहू कानडे म्हणाले, आपण सताधारी वर्ग झालो पाहिजे, किमान पक्षी आपल्या विचारांची माणसे सत्तेत सहभागी झाली पाहिजे, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. आपण सर्वांनी सामाजिक न्याय विभाग या नावाला साजेसे संघटन राज्यभर उभे केले. कृती कार्यक्रम निश्चित करूनशिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्यापुरोगा मी विचारधारेवर काम करीत राहू, ही सर्वांनाच दिलासा देणारी गोष्ट आहे. सध्या देशात संकुचित विचाराचे राजकरण सुरू आहे, अशा एका पार्श्वभूमीवर आपल्याला आपला विचार पुढे घेऊन वाटचाल करावयाची आहे. त्यासाठी आपला अभ्यास, आपले संगठन आणि आपला संघर्ष अनाठायी जाणार नाही. त्यातूनचांगले फळ मिळेल. राजकारणाच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली म्हणजे एकमेंकाना जोडणे होय, असे ते म्हणाले. नीलेश भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव कानडे यांनी आभार मानले.
प्रतिनिधी | अहिल्यानगर शहरात व्यावसायिक इमारतींमध्ये असलेल्या पार्किंगच्या जागेत अतिक्रमणे करण्यात आल्याने रस्त्यावरच वाहने लावली जातात. प्रोफेसर चौकात ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे मार्ग शोधताना अनेक वाहने थेट दुभाजकावर जाऊन आदळत आहेत. दर आठवड्याला असे अपघात होत असून, यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेसह वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. प्रोफेसर चौकात व्यावसायिक आस्थापना मोठ्या प्रमाणात आहेत. महापालिकेच्या व्यापारी संकुलासह इतर इमारतींमध्येही व्यवसाय सुरू आहेत. येथे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. मात्र, या व्यावसायिक आस्थापनांनी पार्किंगच्या जागेत शेड उभारून त्याचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. तसेच, रस्त्यावरही अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा होतो. रस्त्यावरच वाहने लावली जात असल्याने अनेकवेळा वाहन चालकांना अंदाज न आल्याने वाहने थेट दुभाजकावर जाऊन आदळत आहेत. दर आठवड्याला असे अपघात होत आहेत. यामुळे वाहनांसह दुभाजकांचेही नुकसान होत आहे. ठेकेदाराकडून वसुलीच प्रोफेसर चौक परिसरात महापालिकेकडून पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे कर्मचारी वाहनचालकांकडून शुल्क वसुली करत आहेत. पे अँड पार्कमुळे पार्किंगला शिस्त येईल, असा दावा महापालिकेने केला होता. प्रत्यक्षात फक्त वसुली सुरू आहे. अन् थेट दुभाजकावर आढळला दुभाजक असलेल्या ठिकाणी व्यावसायिक आस्थापनाच्या समोर मोठ्या प्रमाणात वाहने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. वाहन चालकांना अंदाज न आल्याने तेथील दुभाजकावर जाऊन वाहने आदळतात. मागील महिन्यात शोरुममधून नवीन चारचाकी घेऊन निघालेल्या वाहन चालकाला अंदाज न आल्याने नवीन कार थेट दुभाजकावर अडकली. शनिवारी रात्रीही असाच अपघात झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांची वाढत चाललेली जवळीक जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी ढाकणे हे भाजप नगर जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्या काळात त्यांची भाजपमधील अनेक नेत्यांबरोबर मैत्री जमली, त्यापैकीच फडणवीस हे एक. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर त्यांची त्या काळी मैत्री गाजली होती. मागील आठवड्यात ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अहिल्यानगर येथे ढाकणे यांच्या निवासस्थानी अचानक भेट देत चर्चा केली. शनिवारी (१९ एप्रिल) दुपारी शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभास आले होते. भगवानगड व गहिनीनाथ गड असे दोन्ही गड ढाकणे कुटुंबांचे श्रद्धास्थान असून, प्रत्येक नारळी सप्ताहाला त्यांचे भरीव योगदान असते. मुख्यमंत्री व्यासपीठावर येताच, ढाकणे यांनी सर्वप्रथम त्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. ढाकणे यांनी नमस्कारासाठी हात जोडले असता, मुख्यमंत्र्यांनी ढाकणे यांच्याशी थेट हस्तोंदलन केले. व्यासपीठावर ओबीसी नेते माजी आ.भीमराव धोंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, पंकजा मुंडे यांच्या रांगेत बसत बीड जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबतही ओझरती चर्चा केली. त्यानंतर ढाकणे यांनी व्यासपीठावरच मुख्यमंत्र्यांबरोबर कानगोष्टी केल्या. केदारेश्वर कारखाना हा ढाकणे यांच्या अधिपत्याखाली असून, घाटशीळ पारगाव परिसरातील बहुसंख्य शेतकरी आपला ऊस देतात. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी ढाकणे यांना आवर्जून निमंत्रित केले होते. तेथील कार्यकर्ते प्रकाश खेडकर यांचे निवासस्थानी मान्यवरांची भोजन व्यवस्था होती. तेथेही मुख्यमंत्र्यांबरोबर ढाकणे यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. ॲड. ढाकणे यांनी वारंवार इन्कार केला असला, तरी त्यांनी भाजपमध्ये येऊन ओबीसी आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी भाजपमधील त्यांची समर्थक लॉबी प्रयत्नशील आहे.
वाखरी (ता. पंढरपूर) हद्दीतील बाजीरावची विहीर ते पालखी महामार्ग बाह्यवळण रस्ता या पालखी मार्गाचे रुंदीकरण करण्याचा घाट घातला जात असून या प्रस्तावित रुंदीकरणाला शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. मोहोळ-पंढरपूर - देहू-आळंदी या पालखी महामार्गाचे ६० मीटर्स एवढे रुंदीकरण नुकतेच करण्यात आलेले आहे. अद्याप या महामार्गाचे अधिकृत उद्घाटनही करण्यात आलेले नाही. पंढरपूर तालुक्यातील पालखी महामार्गाचे रुंदीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. असे असताना बाजीरावची विहीर रिंगण तळ ते पंढरपूर-मोहोळ बाह्यवळण मार्ग या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या पालखी महामार्गाचे पुन्हा एकदा रुंदीकरण करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झालेले आहे. मागील काही दिवसात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करीत आहेत. सध्या असलेल्या पालखी मार्गाच्या डाव्या बाजूने ४० ते ४० मीटर्स लांबीचा सेवा रस्ता करण्याचे नियोजित असल्याचे सांगितले जात आहे. बाजीरावाची विहीर ते बाह्यवळण रस्त्याचा उड्डाणपूल या दरम्यान सुमारे १३०० ते १४०० मीटर्स लांबीचा स्वतंत्र सेवा रस्ता करण्याचा प्राथमिक विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येत आहे. याला मंजुरी मिळाली तरच हे काम पुढे जाईल, आताच या संदर्भात ठोस काही सांगता येणार नाही. केशव घोडके, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्यासाठी नव्याने जमिनी संपादित केल्या जातात की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. २०२०-२१ वर्षात या पालखी मार्गासाठी भूसंपादनात झालेल्या शेतकऱ्यांना मिळालेले मोबदला त्यावेळच्या बाजारभावापेक्षाही कमीच होता. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेले शेतकरी योग्य आणि त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात गेलेले आहे. न्यायालयाने महामार्ग प्राधिकरणास वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भूसंपादनाचे संकट या भागातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहे. पालखी महामार्गासाठी आता आणखी जमीन सोडण्याची शेतकऱ्यांची तयारी नाही, त्यामुळे या सेवा रस्त्याच्या नावाखाली करण्यात येत असलेले संभाव्य रुंदीकरण थांबवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होऊ लागली आहे. बाजीराव विहीर रिंगण तळाजवळील बॅरिकेड्स ठरले पालखीसाठी अडथळा राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या धोरणामुळे बाजीराव विहीर येथील उड्डाण पुलाच्या पूर्व बाजूला रिंगण तळापासून सुमारे ३०० मीटर लांब लोखंडी पाईपचे बॅरिकेड्स बसवलेले आहेत. याच भागातून तिसंगी तलावाचा कालवा गेलेला असून या कालव्याच्या नाल्याव ही बॅरिकेड्स अडथळा ठरत आहेत. या बॅरिकेड्समुळे येथील रिंगण संपल्यानंतर अरुंद सर्विस रोडमुळे भाविकांची गर्दी पुढे जात नाही. त्यामुळे उड्डाण पुलाच्या पूर्वबाजूचे बॅरिकेड्स काढण्यात यावे. असा पर्याय शेतकऱ्यांनी सुचवला आहे.
सांगोल्यातील ब्रह्म ओढ्यावर परदेशी पक्षी:ओढ्यालगत असणारा शेतीचा भाग परदेशी पक्ष्यांसाठी उपयुक्त
सांगोला शहरानजीक सांगोला-पंढरपूर महामार्गाच्या बाजूस ब्रह्मओढा हा विस्तृत जलाशय आहे. विस्तीर्ण जलाशय, लहान-मोठ्या माशांची पुष्कळ उपलब्धता यामुळे खाद्य उपलब्ध असल्याने परदेशी पक्षी या परिसरात उतरले आहेत. ओढ्यालगत असणारा शेतीचा भाग हा अनेक स्थानिक व परदेशी पक्ष्यांसाठी उपयुक्त ठरतो आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने परदेशी पाहुण्या पक्ष्यांनी त्यांच्या परतीचा प्रवास सुरू केला आहे. पाण्याची पातळी खाली गेल्याने मात्र स्थानिक पक्ष्यांना तलावातील मासे पकडणे सहज सोपे झाले आहे. या कारणामुळे एप्रिल महिन्याच्या मध्यावर ऐन उन्हाळ्यामध्ये सकाळी व संध्याकाळी ब्रह्म ओढ्यावर स्थानिक पक्ष्यांची मांदियाळी पाहायला भेटत आहे. ओढ्या जवळील बाभळीच्या झाडांवर सुगरणीने विणकाम करून मोठ्या संख्येने घरटी उभी केली आहेत. सुगरणीकडून वापरात नसलेल्या या घरट्यांमध्ये शुभ्र कंठी मुनियांचे वास्तव्य आढळते. या लहान पक्षांच्या सोबतच आकाराने मोठे असणारे पक्षी यामध्ये चित्रबलाक व लोकरी मानेचा करकोचा हे मोठ्या संख्येने आढळतात. पक्ष्यांच्या ५० हून अधिक प्रजाती आढळतात सोलापूर जिल्हा हा पक्षांच्या जैविक विविधतेच्या दृष्टीने निसर्ग समृद्ध आहे. सांगोला तालुक्यातही विविध जलाशय, पाणथळेची ठिकाण, शेती परिसर व माळरान असल्याने पक्ष्यांच्या व सस्तन प्राण्यांच्या विविध प्रजाती येथे आढळतात. ब्रह्म ओढ्यावर पन्नासहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. या पक्ष्यांना परिसरातील मोठ्या संख्येने वाढलेल्या भटक्या कुत्र्यांकडून जखमी करणे किंवा मारून खाणे असे प्रकार घडत आहेत. या भटक्या श्वानांचा सांगोला नगरपरिषदेने तात्काळ बंदोबस्त करावा व पक्षांचे संरक्षण करावे. - प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, पक्षी व वन्यजीव अभ्यासक, सांगोला सांगोल्यातील पक्षी व वन्यजीव अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ब्रह्म ओढ्यावर पक्षी निरीक्षणावेळी किंगफिशर म्हणजेच खंड्या पक्षी याच्या सामान्य खंड्या, कवडा खंड्या व पांढऱ्या छातीचा खंड्या अशा तिन्ही प्रजाती आढळून आल्या. पानकोंबडी किंवा लाजरी आणि जांभळी पानकोंबडी, हळदी-कुंकू बदके तसेच वारकरी बदके, पानकावळे, पानलावा, धारीदार बगळा, चमचा पक्षी, राखी बगळा, भारतीय मोठा बगळा, ढोर बगळा, ढोकरी किंवा वंचक, ठिपकेवाला तुतारी, चिखल्या, शेकाट्या, लखलखता शिंजीर, राखी वटवट्या, शुभ्रकंठी, कवडा गप्पीदास, सुगरण, वेडा राघू, कोतवाल, स्थलांतर करून येणाऱ्या धोबी पक्ष्यांचा कवडा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी अशाप्रजाती आढळल्या.
नीरा देवघरचे पाणी माळशिरस तालुक्याच्या दक्षिण-पश्चिम भागात मिळावे म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याला मूर्त स्वरूप येऊ पाहतेय. माळशिरस तालुक्यातील १० गावांचा समावेश करण्यात आला होता. आता १२ गावांचा त्यात अंतर्भाव करून एकूण २२ गावांना पाणी मिळण्याची आशा बळावली आहे. गत विधानसभा निवडणुकीपासून या प्रश्नाने मान वर काढली असून, या पट्ट्यातील २२ गावांना पाणी देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक झाले आहे. तालुक्यात मात्र या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधकांत श्रेयाचे राजकारण सुरू आहे. तीन-चार महिन्यात सुप्रमा निघेल, असा दावा करण्यात आला आहे. नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील नातेपुते परिसरातील बराचसा भाग ओलिताखाली येणार असून, उजनी उजव्या कालव्यामुळे पूर्व भागाला पाण्याचा मोठा आधार झाला आहे. तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण कोपऱ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न पूर्वीपासून भेडसावत आहे. सन २०१९ मध्ये मोहिते-पाटील यांचे पक्षांतर झाले. त्याचवेळी पक्षाकडून आलेले लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर तर विधानसभेसाठी राम सातपुते यांनी मोहिते-पाटील यांच्या साथीने निवडणुका लढवताना या भागातील लाभार्थींनी हा प्रश्न पुन्हा उचलून धरला. तत्कालीन खासदार व आमदार यांनी आपल्या कालखंडाच्या उत्तरार्धात ही गावे नीरा देवघर प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र शासकीय पातळीवर ते त्यावेळी पूर्ण बदलले असले तरी राज्यांत त्यांचे सरकार असल्याने त्यांचे माजी खासदारांसह विद्यमान ग्रामविकास मंत्री यांच्या समवेत या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरूच आहेत. माजी खासदार निंबाळकर व माजी आमदार सातपुतेंचा या गावांसाठी करताहेत प्रयत्न कोथळे, कारुंडे, पिंपरी, फडतरी, लोंढे-मोहितेवाडी, लोणंद, गिरवी, भांब, रेडे, कन्हेर, मानकी, इस्लामपूर, गोरडवाडी, गारवड, मगरवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, जळभावी या गावांना अशा कुठल्या ही पाण्याची सोय नसल्याने ही गावे कायमच दुष्काळी राहिली आहेत.त्यांचा दुष्काळी हा कलंक पुसण्याचा प्रयत्न आहे. नुकतीच बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी विखे-पाटील यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या पर्यायानुसार या गावांना पाणी देण्यासंदर्भात तीन-चार महिन्यांत सुप्रमा निघेल. माजी खासदार निंबाळकर, माजी आमदार सातपुते यांनी भेट घेतली. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून या गावांचा समावेश मुळ निरा-देवघर मुळ प्रकल्पात विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील गिरवी, पिंपरी (कचरेवस्ती),लोणंद, कन्हेर, इस्लामपूर, रेडे, मांडकी, गोरडवाडी,भांबुर्डी,ध र्मपुरी, कारूंडे, मोरोची, नातेपुते, मांडवे, माळशिरस, मोटेवाडी, दहिगाव आदी गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. या गावांना लवकरात लवकर टेंडर काढून काम सुरू करण्याचे नियोजनही झाले. आमदर उत्तम जाणकर यांनी विखे-पाटील यांची भेट घेतली. या भागाच्या पाण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही राजेवाडी तलावातून पाणी उचलून कालव्याद्वारे पाणी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. त्याच दरम्यान नीरा-देवघर धरणाची निर्मिती झाली. मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नातून या धरणातील २.९८ टीएमसी पाणी माळशिरस तालुक्यासाठी नीरा उजवा कालव्याच्या ७७ चौकीपर्यंत आणण्याचे नियोजन झाले. त्यामुळे या कायमस्वरूपी दुष्काळी गावातील कोथळे, कारुंडे, नातेपुते या परिसराला पाणी मिळण्याचे दिसू लागले. तरीही पश्चिम व दक्षिण भागातील २२ गावांचा प्रश्न होताच. त्याच दरम्यान या २२ गावांचा नीरा देवघरचे लाभक्षेत्रात समावेश होण्याची मागणी वाढू लागली,या भागातील दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बचेरी येथील शिवराज पुकळे यांनी अनेक काही तरुणांना बरोबर घेऊन अनेक राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवले. मात्र यश आले नाही. नीरा देवघरचा माळशिरस तालुक्यासाठी असणारा खुला कालवा रद्द करून तो बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी आणून, ते माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी बचेरी, शिगोर्णी, सुळेवाडी, पिलीव, पठाणवस्ती, काळमवाडी, कोळेगाव, गारवाड, मगरवाडी, भांब, फडतरी, लोंढे-मोहितेवाडी, जळभावी, कोथळे, तरंगफळ, चांदापुरी या गावांना देण्याचा पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला. राम सातपुते यांनी तेव्हा विधिमंडळात मांडला प्रश्न नीरा देवघरच्या पाण्यासंबंधी राम सातपुते यांनी विधिमंडळात प्रश्न मांडला. नीरा देवघरमध्ये उर्वरित गावांचा समावेश करून नियमानुसार आरक्षित असलेले पाणी सोडण्याची मागणी त्यांनी विधिमंडळात केली होती. त्या वेळी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मिळाले होते. त्यामुळे गावांच्या समावेशाची शक्यत आहे.
औशात कठीण सुखी जीवनाचे मूल्य या विषयावर अध्यात्मिक प्रवचन
औसा प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय औसा येथील ज्ञान सिंधुभवांच्या भूमिपूजन सोहळ्याचे सोमवार दि २१ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय मुख्यालय माउंट आबू येथील वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी डॉ. उषा दिदी यांचे शिव परमात्मा द्वारा कठीण सुखी जीवनाचे मूल्य या विषयावर अध्यात्मिक प्रवचन होणार आहे. औसा नगरीच्या पावन भूमीत भाग्य निर्माण करणारा हा शुभप्रसंगी घडत असून शिव परमात्मा कठीण दिव्य ज्ञानाची अनुभूती करण्याची एक दिव्य संधी या सोहळ्यामध्ये मिळणार असून वरिष्ठ राजयोगी शिक्षिका डॉ. उषा दिदी या गेल्या ५५ वर्षापासून स्वयं व्यवस्थापन आणि भगवद््गीतेचा शतशार अशा अनेक विषयावर देश- विदेशात त्यांचे प्रवचन व ईश्वरीय ज्ञानाचे प्रसारण करीत आहेत, अशी माहिती ब्रह्माकुमारी नंदा बहिण यांनी औसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. याच सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध संगीत तज्ञ डॉ. राम बोरगावकर यांची ‘शिवचरणी एक भक्ती संध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कर्नाटक राज्यातील वरिष्ठ राजीव ब्रह्मकुमार प्रेम भाई यांचे आशीर्वचन होणार असून हिरेमठ संस्थांचे डॉ. लिंक शिवाचार्य महाराज, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, अर्चना पाटील चाकूरकर उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय औसा केंद्राच्या नियोजित ज्ञान सिंधू भवनच्या भूमिपूजन प्रसंगी बंधू, भगिनींनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.
मुलीच्या डोळ्यादेखत वडिलांवर चाकूने हल्ला व काठीने मारहाण करून पित्याची हत्या केल्यामुळे मुलीच्या मनावर प्रचंड मानसिक परिणाम झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला. ही घटना १९ एप्रिल रोजी खामगाव तालुक्यातील लासुरा जहांगीर परिसरात रात्रीच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे लासूर शिवारात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, लासुरा जहागीर येथील रहिवासी ईश्वर बाबाराव तायडे (वय ३९) हे मोटरसायकल क्रमांक एम २८ एई ७२९ ने शेतात जागलीसाठी गेलेल्या आपल्या वडीलांना डबा देण्यासाठी जात होते. यावेळी आपल्या आजोबाला आपल्या हाताने डबा देण्याचा आग्रह ईश्वर तायडे यांनी १० वर्षीय जान्हवीने केला. त्यामुळे तिला देखील ईश्वराने आपल्या सोबत दुचाकीवर घेतले. दरम्यान रात्री ९ वाजेच्या सुमारास ईश्वर व जान्हवीने बाबाराव तायडे यांना शेतात जेवणाचा डब्बा दिला व परत गावाकडे निघाले. यावेळी दोघेजण आपल्या मोटारसायकलने घरी परत जात असताना मार्गातील पळशी खुर्द शिवारातील शिवाजी अंभोरे यांच्या शेतात जवळ भारत झामू यादव रा. लासुरा जहागीर याने त्यांना अडवले. यावेळी जुन्या वादाच्या रागातून भारतने ईश्वर याला शिविगाळ करत खिशात लपवून आणलेला चाकू काढत त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यामुळे ईश्वर दुचाकीवरून खाली कोसळला. एवढ्यावरच भारतचा राग शांत झाला नाही, तर त्याने काठीने ईश्वरच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणीत ईश्वर तायडे रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा सर्व प्रकार मृतक ईश्वरची मुलगी जान्हवी पाहत व किंचाळत राहिली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हे पाहून आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला, मात्र जान्हवीच्या मनावर या घटनेचा मानसिक परिणाम झाल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांत बाबाराव तायडे यांच्या तक्रारीवरून आरोपी भारत यादव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी त्यांच्या हाती लागला नाही.
जिल्ह्यात तीन मोठे सात मध्यम असे ३७ लघु प्रकल्प व चार कोल्हापुरी बंधारे आहेत. या बंधाऱ्यातील १७ एप्रिल रोजीचा एकूण उपयुक्त जलसाठा १२५.८२ आहे याची टक्केवारी २६.८८ आहे. गत चार वर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील मोठे लघु मध्यम व कोल्हापुरी प्रकल्पातील जलसाठा यंदा २०२५ मध्ये कमी आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प क्षेत्रात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत पावसाळ्यातील पाऊस व अवकाळी पाऊस चांगला बरसला यामुळे हे प्रकल्प पाण्याने तुडुंब भरून वाहत होते परंतु यंदाच्या म्हणजे २०२५ च्या उन्हाळ्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्याने अक्षरशः आग ओळखणे सुरू केल्याने या प्रकल्पातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन बाष्पीभवन होत आहे. हीच परिस्थिती विहिरीतील पाण्याची आहे जिल्ह्यातील बहुतांश आता पंपातील पाणी पूर्णपणे आटले आहे याचा त्रास विशेष करून ग्रामीण भागातील लोकांना होत आहे यंदा पाटबंधारे विभागाच्या या प्रकल्पातून सिंचनासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार त्यांना मार्च अखेर पर्यंत देण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पामधील जलसाठ्याने हळूहळू तळ गाठणे सुरू केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी खडकपूर्णा प्रकल्प एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आठवड्यातच कोरडा पडला आहे. या प्रकल्पामध्ये सध्या केवळ डेड स्टोरेजमध्ये जलसाठा आहे. त्या जल साठ्यातून अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढील काळात उन्हाच्या तीव्रतेची कमान अशी चढती राहिली तर प्रकल्पातील पाण्याच्या साठा झपाट्याने खोलवर जाईल वेळप्रसंगी जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड देत दिवस काढावे लागणार आहे. सन दलघमी टक्केवारी २०२० २०५.५४ ४३ .९१ २०२१ १४०.६० ३०. ४ २०२२ १७१.७६ ३६. ६८ २०२३ १७१.७६ २६. ८८ मध्यम प्रकल्पातील जलसाठा असा आहे ज्ञानगंगा १९. ६४ दलघमी टक्केवारी ५७. ५८ मस ४.८९ दलघमी टक्केवारी ३२.५१ कोराडी २.८६ दलघमी टक्केवारी १८.९२ , पलढग १.०६ टक्केवारी १४.११, मन १२ .८६ टक्केवारी ३४.९२, तोरणा ०. ६२ टक्केवारी ७. ८३, उतावळी ४.७६ दलघमी टक्केवारी २४.०५ जिल्ह्यातील मोठे प्रकल्पामध्ये नळगंगा ३१.३६ दलघमी टक्केवारी ४५ , खडकपूर्णा निरंक, पेनटाकळी २४.७२ टक्केवारी ४१.२१
समाजसेवेसोबत मुक्या प्राण्यांची सेवा सदोदित करावी- अंबिका हिंगमिरे
शहरात उन्हाचा पारा वाढतीवर असताना जीवाची लाही लाही होत आहेत,अशा परिस्थितीत मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी यासाठी अंबिका हिंगमिरे सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील सार्वजनिक ठिकाणी निःशुल्क जलहौद वाटप केले . रामनगर येथील भगतसिंग रोडलगत, सर्कस मैदान जवळ, पोद्दार बगीचा , गजानन नगर पिपरी मेघे, बोरगाव मेघे, आर्वी नाका येथील सार्वजनिक ठिकाणी जनावरांना पिण्याच्या पाण्याचे निःशुल्क जलहौद ठेवण्यात आले.अंबिका सोशल फाउंडेशनने आगळावेगळा सोशल उपक्रम सुरू केला आहे.आणखी शहरात आणि बोरगाव मेघे येथे आवश्यक अशा सार्वजनिक ठिकाणी जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून निःशुल्क जलहौद ठेवण्यात येणार असल्याचे अंबिका हिंगमिरे यांनी सांगितले.यावेळी अंबिका सोशल फाउंडेशनचे कांचन सुखदेवे, रविराज घुमे, होरेश्वर कोरडे यांच्यासह रामनगर परिसरातील गिरीश अग्निहोत्री, पोद्दार बगीचा येथे माजी नगरसेवक यशवंत झाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
वडाळीतील गुणवंत बाबा मंदिर परिसरामध्ये बिबट्या:सकाळी 10 ते दु. 3.10 पर्यंत पाइपमध्ये दडून होता
शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर असल्याचे रविवारी दिसून आले. वडाळी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या गुणवंत बाबा मंदिराजवळ पावसाचे पाणी महामार्गाच्या खालून निघून जावे यासाठी मोठे पाइप टाकले आहेत. पुलाखालील या पाइपमध्ये बिबट असल्याचे सकाळी १० च्या सुमारास प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आले. दुपारी शहरात उन्हाचा कहर असल्यामुळे उन्हापासून बचावासाठी तसेच अन्नपाण्याचा शोधात हा बिबट येथे आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी २.५० च्या सुमारास बिबट्या असल्याचे कळल्यामुळे गुणवंत बाबा मंदिरापुढे गर्दी झाली. गोंगाट वाढल्याने तेथून बिबट्याने धूम ठोकली. या बिबटाचा हा नेहमीचाच मार्ग आहे. आज तो दिसला, अशी माहिती वन विभागाद्वारे देण्यात आली आहे. वडाळी परिसर हा जंगलालगत आहे. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा संचार नित्याचीच बाब झाली आहे. अशात रविवारी सकाळी १० च्या सुमारास वडाळी परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या संत गुणवंतबाबा मंदिराजवळील पुलाखाली एक बिबट बसून असल्याचे काही नागरिकांना दिसून आले. त्यामुळे बिबट्याला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली. अंदाजे ४ वर्षे वयाचा मादी बिबट हा ५० फूट लांबीच्या मोठ्या पाइपच्या आत बसलेला होता. काही नागरिकांनी याबाबत वॉर संस्थेला माहिती दिली. माहिती मिळताच संस्थेचे नीलेश कांचनपुरे व अभिजित दाणी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेची माहिती वडाळी वन विभागाला देण्यात आली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, वनपाल बाबुराव खैरकर, वनरक्षक चंद्रकांत चोले, कैलास इंगळे, वनमजूर ओंकार भुरे, संदीप चौधरी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२.३० ते ३.१० या वेळेत रेस्क्यू ऑपरेशन राबवत तारेचे कुंपण कापून बिबट्याला यशस्वीरित्या जंगलात हुसकावून लावण्यात आले आहे.
प्रत्येक तालुक्यात एक कृषी उत्पन्न बाजार समिती या निकषानुसार येत्या काळात जिल्ह्यात दोन नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) स्थापन होणार आहेत. जिल्हा मुख्यालय, अमरावतीला लागून असलेल्या भातकुली तालुक्यात एक आणि चिखलदरा येथे दुसरी अशा या दोन नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील. दरम्यान दोन्ही नव्या बाजार समित्यांच्या स्थापनेचा प्रशासकीय प्रस्ताव पुढील आठवड्यात राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे पाठवला जाईल, असे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी सांगितले. त्यांच्या मते, राज्य सरकारने सहकार क्षेत्राचा विस्तार करून नागरिकांना अधिकाधिक सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली जाणार आहे. सध्या अमरावती बाजार समितीमध्येच भातकुलीचा समावेश असून तेथे याच बाजार समितीअंतर्गत उपबाजार भरवला जातो. तर चिखलदरा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीचा कारभार धारणीच्या एपीएमसीमधून चालवला जातो. आता तो स्वतंत्र होणार असून धारणीचे विभाजन होणार आहे. भातकुलीसाठी अमरावतीचेही विभाजन केले जाईल. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम २(१)(अ) च्या तरतुदीनुसार ही कार्यवाही केली जात आहे. कृषी मालाच्या व्याख्येत सर्व {उर्वरित. पान ४ राज्य शासनाचा असा आहे निर्णय सहकार क्षेत्रातील जाळे अधिक घट्ट करण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने १७ एप्रिलला एक क्रांतिकारी निर्णय घेतला. त्याला मुख्यमंत्री बाजार समिती योजना असे नाव देण्यात आले आहे. या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्या होणार आहेत. या बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा माल अधिक सुलभ पद्धतीने व हमी दरात विकण्याची संधी मिळणार आहे.
नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती येथील विद्यार्थ्यांनी मनपात शैक्षणिक भेट दिली. अर्थशास्त्र विषयाच्या अनुषंगाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मनपातील प्रत्येक विभागाचे नेमके कार्य कोणते, ते कशाप्रकारे केले जाते, त्यांचे वैशिष्ट्य काय, शहरवासीयांसाठी हे विभाग कसे महत्त्वाचे आहेत, याची माहिती मनपा अधिकारी व सहायक आयुक्त भूषण पुतसकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना शहरातील विविध कामे, योजनांचे मनपातून कशाप्रकारे संचालन केले जाते यासंदर्भात उत्सुकता होती. त्यासंदर्भात त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे समाधान करण्यात आले. या वेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री रायभोग, प्रा. सागर मेश्राम, प्रा. अमृता पदवाड, लघुलेखक सुनीता गुर्जर, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मनपातील संपूर्ण माहिती सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांनी दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनपातील विविध विभागांना भेट दिली. यामध्ये समाज विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, एनयूएलएम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरसचिव, शिक्षण, अग्निशमन, अतिक्रमण, सहायक संचालक नगर रचना विभाग, स्वच्छता विभाग तसेच इतरही विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच मनपातील समित्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या भेटी दरम्यान शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहायक आयुक्त दीपिका गायकवाड, सहायक नगर रचनाकार कांचन भावे, करण पारेख यांनीही माहिती दिली. प्रतिनिधी | दर्यापूर स्थानिक जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या पदवीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच, बँक ऑफ महाराष्ट्र, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप. बँक, जिजाऊ अर्बन को ऑप. बँक, तसेच एलआयसी कार्यालय, दर्यापूर येथे अभ्यास भेट दिली. विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचा उद्देश तेथील कार्यप्रणाली प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेणे हा होता. शहरातील विविध बँकेच्या शाखेच्या भेटीच्या निमित्ताने, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्ज सुविधा, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणारे कर्ज, सोने तारण सुविधा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्ज सुविधा, बचत सुविधा, लॉकर सुविधा, तेथील अत्याधुनिक ऑनलाइन कार्यप्रणाली, कॅशबुक, पासबुक, विविध व्यवहार करताना भराव्या लागणाऱ्या स्लीप याचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सोबतच एलआयसीच्या शाखेला दिलेल्या भेटीत आयुर्विमा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. तसेच एलआयसी एजंट बनून रोजगाराची संधी कशी उपलब्ध होऊ शकते याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली, ही अभ्यास भेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली. अभ्यास भेटीचे आयोजन, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा प्रमुख प्रा. डॉ. मंगलावती पाण्डेय यांनी केले. तर यासाठी मार्गदर्शन व सहकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांचे लाभले. प्रत्येकाने एक विषय घेऊन त्याची इतरांना पूर्ण माहिती द्यावी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना समूह चर्चा महत्त्वाची आहे. प्रत्येकाने एक विषय घेऊन त्या विषयाची माहिती समूह चर्चेत इतरांना दिल्यास त्यांच्याही ज्ञानात भर पडेल व संपूर्ण माहिती लक्षात राहील, अशा शब्दांत मनपातील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शहर अभियंता, सहायक आयुक्त, सहायक नगर रचनाकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दूरदृष्टीच्या राजमाता जिजाऊ समता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या- यश खोडके
नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किरणनगर अमरावती येथील विद्यार्थ्यांनी मनपात शैक्षणिक भेट दिली. अर्थशास्त्र विषयाच्या अनुषंगाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. मनपातील प्रत्येक विभागाचे नेमके कार्य कोणते, ते कशाप्रकारे केले जाते, त्यांचे वैशिष्ट्य काय, शहरवासीयांसाठी हे विभाग कसे महत्त्वाचे आहेत, याची माहिती मनपा अधिकारी व सहायक आयुक्त भूषण पुतसकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना शहरातील विविध कामे, योजनांचे मनपातून कशाप्रकारे संचालन केले जाते यासंदर्भात उत्सुकता होती. त्यासंदर्भात त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे समाधान करण्यात आले. या वेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री रायभोग, प्रा. सागर मेश्राम, प्रा. अमृता पदवाड, लघुलेखक सुनीता गुर्जर, शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मनपातील संपूर्ण माहिती सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांनी दिली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनपातील विविध विभागांना भेट दिली. यामध्ये समाज विकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, एनयूएलएम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरसचिव, शिक्षण, अग्निशमन, अतिक्रमण, सहायक संचालक नगर रचना विभाग, स्वच्छता विभाग तसेच इतरही विभागांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच मनपातील समित्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या भेटी दरम्यान शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहायक आयुक्त दीपिका गायकवाड, सहायक नगर रचनाकार कांचन भावे, करण पारेख यांनीही माहिती दिली. प्रतिनिधी | दर्यापूर स्थानिक जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या पदवीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच, बँक ऑफ महाराष्ट्र, डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को ऑप. बँक, जिजाऊ अर्बन को ऑप. बँक, तसेच एलआयसी कार्यालय, दर्यापूर येथे अभ्यास भेट दिली. विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याचा उद्देश तेथील कार्यप्रणाली प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेणे हा होता. शहरातील विविध बँकेच्या शाखेच्या भेटीच्या निमित्ताने, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्ज सुविधा, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मिळणारे कर्ज, सोने तारण सुविधा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कर्ज सुविधा, बचत सुविधा, लॉकर सुविधा, तेथील अत्याधुनिक ऑनलाइन कार्यप्रणाली, कॅशबुक, पासबुक, विविध व्यवहार करताना भराव्या लागणाऱ्या स्लीप याचे प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सोबतच एलआयसीच्या शाखेला दिलेल्या भेटीत आयुर्विमा संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. तसेच एलआयसी एजंट बनून रोजगाराची संधी कशी उपलब्ध होऊ शकते याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली, ही अभ्यास भेट विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली. अभ्यास भेटीचे आयोजन, वाणिज्य व व्यवस्थापन शाखा प्रमुख प्रा. डॉ. मंगलावती पाण्डेय यांनी केले. तर यासाठी मार्गदर्शन व सहकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांचे लाभले. प्रतिनिधी | अमरावती राजमाता जिजाऊ या समता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्या होत्या. छत्रपती शिवरायांना माँ जिजाऊंनी मोलाची शिकवण दिली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. माँ जिजाऊ शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या, असे प्रतिपादन यश संजय खोडके यांनी केले. राजमाता जिजाऊ यांच्या रथयात्रेचे स्वागत यश खोडके मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले. वेरुळ येथून १८ मार्चला निघालेली राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा १ मे रोजी पुण्यात पोहोचणार आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी या रथयात्रेचे शहरात आगमन झाले होते. या वेळी संत गाडगेबाबा मंदिर परिसरात यश खोडके व सहकाऱ्यांनी रथयात्रेचे स्वागत केले. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवले व त्यांना स्वराज्य स्थापन करण्यासह या सुराज्याचा विस्तार करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले, अशा राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला यश खोडके यांनी वंदन केले. ४५ दिवसीय या रथयात्रेचा उद्देश हा मराठा समाजात जागृती करणे, महिला, तरुण, शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळणे, आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या समजून घेत, सध्या समाजासमाजामध्ये निर्माण केले जात असलेले संशयाचे वातावरण दूर करून सर्व समाजात सामाजिक एकता व सद्भावना निर्माण करणे, हा आहे. याप्रसंगी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा उद्योजक कक्ष आदींसह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
महात्मा फुले कॉन्व्हेंटच्या उन्हाळी छंद शिबिरात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महात्मा फुले इंग्लिश पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत १९ एप्रिलपासून ते २५ एप्रिल या सात दिवसात निःशुल्क छंद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. छंद शिबिराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शाळेच्या सहशिक्षिका नेहा खान यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, योगासने व वेगवेगळे खेळाचे धडे दिले. तसेच शुभांगी पांडे यांनी विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तू प्लास्टिकच्या बाटल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवण्यास शिकवले. शिबिरात विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये केळाचे वाटप करण्यात आले. छंद शिबिराच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उत्साहाने मोठ्या संख्येत उपस्थित होते. तसेच या सात दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना पानांपासून विविध प्रकारचे तोरण बनवणे, क्ले वर्क, विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यास शिकवणे, विद्यार्थ्यांना भाषण कौशल्य तसेच सुंदर हस्ताक्षर या गोष्टी शिकवण्यात येणार आहेत. या छंद शिबिरासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना मोघे तसेच शाळेच्या सर्व शिक्षिका गायत्री आंडे, करुणा निभूरकर, मंजूषा अकर्ते, मेघा मोरे, हिमानी होले, वैभव सावरकर, वनिता वानखडे, माधुरी सुपले प्रयत्नशील आहेत.
हनुमान मंदिरात दानपेटी फोडून 2 लाखांची रक्कम पळविली:हिंगोलीच्या खटकाळीमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
हिंगोली शहरालगत खटकाळी हनुमान मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास अवघ्या वीस मिनिटात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रक्कम पळविली आहे. यावेळी तेथील रखवालदारास चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली तर सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला करून त्यांनी हे कृत्य केले. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहराचे ग्रामदैवत म्हणून ओखळल्या जाणाऱ्या खटकाळी हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दररोज मोठी गर्दी असते. रविवारी ता. 20 मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दोन चोरटे मंदिराच्या परिसरात आले. त्यांनी त्या ठिकाणी असलेले रखवालदार बबनराव यांना धमकावले. तु चुपचाप झोपून रहा, उठला तर पिस्टलने उडवून देईन अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या अंगावर पांघरून टाकून दिले. त्यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या परिसरातच लावलेला ध्वज काढून तोंडाला बांधला व मंदिराच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बाजूला वळविले. चोरट्यांनी त्या ठिकाणी राहात असलेल्या भगवानदास महाराज यांच्या खोलीच्या बाहेरून कड्या लाऊन घेतल्या. त्यानंतर मुख्य चॅनलगेट वाकवून मंदिरात प्रवेश केला. मंदिरातील दरवाजा तोडून मुख्य मंदिरात प्रवेश करून त्या ठिकाणी असलेली दानपेटी बाहेरील हॉल मध्ये आणली व त्या ठिकाणी पेटी फोडून त्यातील रक्कम पळविली. दरम्यान, सकाळी पाच वाजता जागे झालेल्या बबनराव यांनी भगवानदास महाराज यांच्या दरवाजाच्या कड्या उघडून त्यांना त्यांना घडलेली घटना सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आरती ग्रुपचे सर्व सदस्य घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हनुमान जन्मोत्सव व भंडाऱ्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी झाला. हनुमान जन्मोत्सवाच्या वेळी सुमारे वीस हजारपेक्षा अधिक भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. त्यामुळे दानपेटीत सुमारे 2 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा झाली होती असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मंदिर प्रशासनाने मागील तीन ते चार महिन्यापासून दानपेटीतील रक्कमही काढली नसल्याचे सांगण्यात आले. चोरट्यांनी अवघ्या वीस मिनिटात दानपेटी फोडून पलायन केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येत आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येचे क्षेत्र आणि जातीनिहाय वर्गीकरण करुन त्यांच्या गरजेनुसार येथे कोणत्या योजना आवश्यक आहेत, याचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. दिव्यांग हा महत्वाचा घटक असल्याने येत्या ४ महिन्यात मॅपिंग करावे, असे पालकमंत्र्यांचे निर्देश आहेत. सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर दोन्ही विभागांना वरील आदेश देण्यात आले. सामाजिक न्याय भवन येथे पार पडलेल्या या आढावा बैठकीला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, आमदार केवलराम काळे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, धारणीच्या प्रकल्प अधिकारी तथा एसडीओ प्रियंवदा म्हाडदळकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे यांनी अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या समस्या जाणून त्यानुसार योजना तयार कराव्यात. जिल्ह्याच्या दृष्टीने अमरावती हे शिक्षणाचे केंद्रबिंदू असल्याने या सर्व घटकांसाठी वसतिगृहे असावीत. यासाठी प्रस्ताव सादर करा, आपल्या मागणीनुसार निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येतील आणि आवश्यकतेनुसार इमारती तयार झाल्यास आगामी वर्षांपासूनच विद्यार्थ्यांची सोय होईल, असेही स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उच्च शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र (व्हॅलीडिटी) आवश्यक असल्याने कोणत्याही मध्यस्थाशिवाय प्रमाणपत्रांची पूर्तता करण्यात यावी, याकडेही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. विशेष घटक योजनेचा आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. यावर्षी प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश करावा. त्याचप्रमाणे विशेष घटक आणि आदिवासी विभागाच्या योजनांमधून महिलांच्या आरोग्याविषयी सुरक्षितता बाळगण्यासाठी उपाययोजना कराव्यात. शैक्षणिक सुविधांमध्ये शाळांमध्ये पाणी आणि विजेची सोय करण्यात यावी. यातून मॉडेल शाळा तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. उद्देशिकेचे व्हावे प्रत्येक घरी वाटप सामाजिक न्याय विभागातर्फे विविध २७ योजना राबवण्यात येत आहे. याचा लाभ नागरिकांना होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे. मेळघाट परिसरात असलेल्या आदिवासी समाजाच्या बोलीभाषा आणि संस्कृतीनुसार त्यांना योजनांची ओळख करून दिल्यास त्यांच्यापर्यंत लाभ सहजपणे पोहोचवणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्येक घरी संविधानाच्या उद्देशिकेचे वाटप करावे, जेणेकरून संविधानाबाबत नागरिकांमध्ये असलेला संभ्रम दूर होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, अशी आपल्या मराठीत एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीची प्रचिती नुकतीच सर्वांना अनुभवायला मिळाली. क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात नित्य अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. व्यायाम शाळेत झालेल्या जिल्हास्तरीय योग स्पर्धेत वीर वामनराव जोशी प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरीतील श्री विजय अनासाने या विद्यार्थ्याने भाग घेऊन सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकाना पछाडून स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप सदार यांनी शालेय समिती अध्यक्षा डॉ. माधुरी चेंडके यांचे मार्गदर्शनात उत्कृष्ट योगपटू असलेला श्री, त्याचे पालक,सहभागी विद्यार्थी व त्याला मार्गदर्शन करणारे त्याचे वर्गशिक्षक सुजित खोजरे या सर्वांना मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या आशीर्वाद घेण्याकरिता नेले असता चिरंजीव श्रीचा त्याच्या पालकांच्या उपस्थितीत पद्मश्रींनी प्रमाणपत्र व रौप्य पदक पुनर्प्रदान करून सन्मान केला. श्री चे वडील विजय अनासाने हे सराफा व्यावसायिक आहेत, तर आई मनपा मध्ये आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. दोघेही पालक आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासाकरिता अत्यंत जागृत असून त्याकरिता सतत धावपळ करीत असतात. तसेच त्याकरिता सातत्याने शिक्षकांच्या संपर्कात राहून त्यांचे यथोचित मार्गदर्शन घेतात. श्री जिम्नॅस्टिक व योगा सोबतच अभ्यासातही हुशार आहे. त्याला गणित विषयात विशेष रुची आहे. मंडळाच्या जिम्नॅस्टिकमध्ये तो अॅडव्हान्स ग्रुपमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सराव करीत आहे. यावेळी शालेय समिती अध्यक्षा माधुरी चेंडके, मुख्याध्यापक दिलीप सदार, मोनिका पाटील, ज्योती मडावी, आसावरी सोवळे, सुजित खोजरे, सचिन वंदे, मनीषा श्रीराव, विलास देठे, अमोल पाचपोर, यांच्यासह यश गुल्हाने, वरदान बिवाल, रोहित सावळे, भाग्य राऊत, मोहम्मद अदनान, मोहम्मद अयान, भावीन माहुरे, नाविन्य रामटेके, योगेश इंगोले, आश्रय राणे, नवीन पटेल, कृष्णा काळे, अनासाने, आरव राऊत, राजवीर कोरे, अनमोल नागरिकार, स्वरा मोहोड,दिव्यांश गजबे, सीमा बिवाल, मोहम्मद अन्सार, विजय अनासाने इत्यादी पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
विपरीत परिस्थितीत मिळवलेल्या यशाचा आनंद काही औरच असतो. पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या वझ्झर (ता. अचलपूर) येथील बालगृहात लहानाची मोठी झालेल्या अनाथ, जन्मांध असलेल्या माला शंकरराव पापळकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षेतून महसूल सहायक या पदासाठी निवड झाली आहे. तिची नियुक्ती नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. तिला या परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक अमोल पाटील यांनी मार्गदर्शन केले होते. दरम्यान या यशानंतर तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रख्यात लेखक व चित्रकार सुनील यावलीकर यांनी शंकरबाबा पापळकरांचे कार्य महात्मा फुलेंनी घालून दिलेल्या आदर्शांएवढे मोठे आहे, असे गौरवोद्गार काढले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मालाचे यश प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रा. अमोल पाटील म्हणाले, लहान-मोठ्या अपयशाने खचून न जाता किंवा आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता मालाचा आदर्श विद्यार्थ्यांनी ठेवावा. तसे केल्यास तुमचे अधिकारी बनण्याचे स्वप्न कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही ते सहज पूर्ण करु शकाल. सत्कार कार्यक्रमानंतर आपली सह विद्यार्थिनी असलेल्या दिव्यांग मालाने जिद्दीने मिळवलेल्या यशाचा आनंद विद्यार्थ्यांनी गुलाल उधळून साजरा केला. याप्रसंगी प्रा. अजय वानखडे, सुप्रिया पाटील, प्रदीप अरुण घिवे तसेच विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कर्तव्यपूर्तीचा आनंद देणारे यश : पाटील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षेत येथील अकादमीच्या एकूण ६७ विद्यार्थ्यांची महसूल सहायक पदासाठी अंतिम निवड झालेली आहे. ही एकप्रकारे कर्तव्य पूर्तीची पावती आहे, असे मतही अमोल पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या मानसकन्या मालाने मिळवलेले यश हे सर्वात जास्त कर्तव्यपूर्तीचाआनंद देणारे आहे, अशा प्रतिक्रिया आता सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:विकास कामांच्या निधीतून करावी लागणार पाणी योजनांची देखभाल
आर्थिक वर्षअखेर प्रादेशिक पाणी कर वसुली केवळ ३टक्केच झाली आहे. वर्षभरात ३९ काेटी ४५ लाख ८९हजार २९८ रुपये वसूल हाेणे अपेक्षित असताना १ काेटी१८ लाख ३६ हजार १६५ रुपयेच पाणीपट्टी म्हणून जमाझाले. पाणी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण हाेत नसल्यानेयाेजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी िवकास याेजनेचे पैसेवळते करावे लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ८४ आणि ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठायासारख्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठाकरण्यात येताे. मात्र पाणी पट्टी माेठ्याप्रमाणात थकलीआहे. पाणी सर्वांपर्यंत न पाेहाेचणे, देखभाल,वसुलीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसणे आदींमुळे पाणी पट्टीवसुली हाेत नाही. त्यामुळे िज.प.ला स्व-उत्पन्नातूनदेखभाल दुरुस्तीसाठी खर्च करावा लागताे. आता यंदाहीहीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. मार्च अखेरथकबाकीची रक्कम ३८ काेटी २७ लाख ५३ हजार १३३रुपयांवर पाेहाेचली आहे. सध्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यातीलग्रामस्थांना पाणी टंचाईचे चटके साेसावे लागत आहेत.काही िठकाणी तर २-३ कि.मी.पर्यंतही पायपीट करुनपाणी आणावे लागते. अनेक ठिकाणी तर पिण्याचे शुद्धपाणी विकत घ्यावे लागते. मजुरीसाठी फिरावे कीपाण्यासाठी भटकंती करावी, असा प्रश्न ग्रामस्थांनापडताे. खर्च गेला ‘पाण्यात’ प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीवरकाेट्यवधी रुपयांचा खर्च हाेताे. यापूर्वी झालेल्या १२काेटींच्या खर्चावरून सदस्य सभांमधून अनेकदाआक्रकमही झाले हाेते. मात्र ना कार्यवाही झाला ना नंतरगळती थांबली. परिणामी शेवटच्या गाव, ग्रामस्थांपर्यंतपाणी पाेहाेचत नसल्याचे दिसून येते. सुवर्णमध्य काढणे आवश्यक अनेक गावांमध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्यामाध्यमातून पाणी पुरवठा हाेताे. मात्र कुठे १० तर कुठे २०दिवसांपेक्षा जास्त दिवसांनी पाणी पुरवठा हाेत असल्याचेग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच अनेक गावांमध्ये तरशेवटच्या टाेकापर्यंत पुरेसे पाणीही मिळत नाही. परिणामीपाणीच मिळत नसल्याने पाणी कर तरी आम्ही का द्यावा,असा प्रश्न ग्रामस्थांना असताे. त्यामुळे आता प्रशासनानेसमन्वय साधून पाणी पुरवठा व्यवस्थित कसा हाेईल वग्रामस्थ पाणी पट्टी स्वत:हून कसे देतील, यासाठी व्यवस्थानिर्माण करण्याची मागणी या निमित्ताने हाेत आहे. ४० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या ग्रा.पं.चेसचिव, सरपंच यांच्यावर जबाबदारी निश्चितकरण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या एकासर्वसाधारण सभेत घेण्यात आला हाेता. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून हालचाली सुरूझाल्या हाेता. ९० पेक्षा जास्त सरपंच-सचिवांवरजबाबदारी निश्चित हाेण्याची शक्यता आहे.मात्र, त्यानंतर ही कार्यवाही थंड बस्त्यात पडली.
राजस्थानात माेबाइल पाणपाेई सेवा दिली जाते. त्यातूनप्रेरणा घेऊन जळगावातही जैन युवा फाउंडेशनने हीसंकल्पना राबवली. बाजारपेठ, रेल्वेस्थानक रस्त्यावरदरराेज थंड पाण्याचे २० लिटरचे १०० जार म्हणजेच दाेनहजार लिटर पाणी सुमारे पाच हजारांवर नागरिकांचीतहान भागवण्यासाठी लागते. राजस्थानातील वाळवंटातमैलांवरून डोक्यावर पाणी आणून लोक तहान भागवतात.शेतात, बाजारात पाणी वेळेवर न मिळाल्यास उन्हाचाफटका बसू शकताे. त्यामुळे तिथे मोबाइल पाणपोई हीसंकल्पना राबवली जाते. ती आता जळगावात सुरू आहे. फेब्रुवारी ते जूनपर्यंत जलसेवा शहरातील जैन युवा फाउंडेशनचे पदाधिकारीप्रवीण पगारिया, चंद्रशेखर राका व मनोजलोढा यांनी चार वर्षांपूर्वी राजस्थानात हीसंकल्पना पाहिली होती. जळगावातहीकष्टकरी लोकांची संख्या अधिक आणिउन्हाळ्यात तापमान जास्त राहत असल्यानेया लोकांना आहे त्या जागेवर शुद्ध व थंडपाणी मिळावे हा विचार त्यांनी फाउंडेशनच्यासदस्यांसमोर मांडला. यानंतर जैन युवाफाउंडेशनने फिरती पाणपोई सुरू केली.फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत ही सेवा पुरवली जाते. उत्सवातही सेवा उन्हाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, महावीरजयंती, वाल्मीक जयंतीच्या मिरवणुकीतही लोकांच्या मागणीनुसार पाणपोई सेवा पुरवली जाते. बाजारपेठ परिसर, रेल्वेस्थानक रस्त्यावर सकाळी ११ पासून सेवा शहरात कोर्ट चौक,गोलाणी, फुले मार्केट,सुभाष चौक, दाणाबाजार यावर्दळीच्या ठिकाणी याउपक्रमांतर्गत रणरणत्याउन्हात लोकांना जागेवरपाणी मिळते आहे.सुरुवातीला भाड्याच्याहातगाडीवरून ही पाणपोईसुरू केली. नंतर कमलाबाईजवरीलाल राका चॅरिटेबलट्रस्टने बंदिस्त हातगाडीचेसहकार्य केले. आनंदाचांदीवाल, प्रणव मेहता यांनीसहकार्य केले. या शिवायकाही ठिकाणी स्थायीपाणपोईही सुरू आहेत; परंतुमोबाइल पाणपोईला अधिकप्रतिसाद आहे, अशी माहितीप्रवीण छाजेड यांनी दिव्यमराठीशी बाेलताना दिली.
श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या ६० किलोमीटर मार्गावरील २०० देवस्थाने आता एकमेकांशी जोडली (कनेक्ट) जाणार आहेत. त्यासाठीच्या ‘सर्वज्ञ अष्टशताब्दी’ महामार्गाला २३४ कोटींची राज्य शासनाकडून तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. हा महामार्ग धोत्रे (ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) ते कायगाव (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असा असणार आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग काँक्रीटचा असणार आहे. सोबतच समृद्धी महामार्ग आणि प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर-पुणे एक्स्प्रेस-वेला जोडला जाणार असल्याने याची गती अधिक वाढणार आहे. श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने १२ व्या शतकात महानुभाव पंथाचा महाराष्ट्रात प्रसार झाला. राज्यात १,६५० तीर्थस्थाने आहेत. त्यापैकी २०० तीर्थस्थाने गोदावरीकाठी समृद्धी महामार्ग ते राष्ट्रीय महामार्गादरम्यान आहे. या तीर्थस्थानांना जोडण्यासाठी सर्वज्ञ अष्टशताब्दी महामार्ग ‘माइल्ड स्टोन’ ठरणार आहे. असा असेल महामार्ग धोत्रे गावाजवळील समृद्धी महामार्गापासून हिंगोणी-पुरणगाव-सावखेड (गंगा)-सरालाबेट-भालगाव-डाकपिंपळगाव-चांदेगाव-नागमठाण-हमरापूर-बाजाठाण-देवगाव-चेंडूफळ-हैबतपूर-नेवरगाव-कानडगाव-ममदापूर-बागडी-जामगाव-कायगाव (प्रवरासंगम) राष्ट्रीय महामार्गापर्यंत. -एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. २३४ कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मान्यता या महामार्गामुळे ८०० वर्षांपूर्वीच्या तीर्थस्थांना गतवैभव प्राप्त होणार आहे. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. यासाठी २३४ कोटींच्या निधीला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. -हरिहर पांडे, समन्वयक, महानुभाव स्थान महात्मे अभियान. प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर मागील ३ वर्षांपासून सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्गाची मागणी होती. या मार्गाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. २३४ कोटींच्या निधीची गरज भासणार आहे. अशी असतील महामार्गाची वैशिष्ट्ये
नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कोसे ले-आऊट परिसरात अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या छतावर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला. यामुळे छतावरील पॅराफिट वाॅलचा काही भाग तुटला. भिंतीला किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. मात्र, २० एप्रिल रोजी या घटनेने परिसरात खळबळ उडाली. अचानक स्फोटासारखा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली होती. अवकाशात उपग्रहांचे हजारो तुकडे फिरत असतात. त्यातील हा एखादा तुकडा असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. स्थानिकांनी सांगितले की, मोठा आवाज झाल्यानंतर आकाशातून काहीतरी भारी वस्तू खाली पडल्याचा अनुभव आला. नंतर तपासणी केल्यावर समजले की, अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर एक मोठा लोखंडी तुकडा कोसळला आहे. हा तुकडा सुमारे ५० किलो वजनाचा, १० ते १२ मिमी जाडीचा आणि सुमारे ४ फूट लांबीचा आहे. हा तुकडा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असून, त्यामुळे घराचे छत आणि भिंतीला किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अमेय यांनी तात्काळ उमरेड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी तपासणी केली. प्राथमिक तपासणीत या धातूच्या तुकड्यामध्ये कोणतीही स्फोटक सामग्री नसल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा तुकडा नागपूर फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अवकाश कचऱ्याचा भाग उमरेडजवळ पडलेला धातूचा तुकडा हा अवकाश कचऱ्याचा भाग असून एखाद्या रॉकेटचा तुकडा असावा, असे खगोल अभ्यासक व स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात दोन अवकाश मोहिमेच्या तुकड्यांचा वातावरणात प्रवेश झाला होता. त्यात २४ मार्च रोजी स्पेस एक्स क्रू-९ ड्रॅगन स्पेसक्रॉफट तसेच इसरोचे पोएम-४ एक्सपेरीमेंट मॉड्युल आणि पीएसएलव्ही रॉकेटचा समावेश होता. हे रॉकेट ४ एप्रिलला पडले होते. उमरेडजवळ पडलेला तुकडा इतरही रॉकेटचा असू शकतो. सविस्तर अभ्यास झाल्यानंतरच खरी स्थिती कळेल. इसरोच्या वैज्ञानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी हे तुकडे रॉकेटचे असावे, असे चोपणे यांनी सांगितले. हजारो तुकड्यांची सुरू आहे भटकंती चंद्रपूर जिल्ह्यात २ एप्रिल २०२२ रोजी रात्री चीनच्या रॉकेटचे ५ तुकडे पडले होते आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी ते नेले होते. अलीकडे अवकाशात असे उपग्रहांचे हजारो तुकडे भटकंती करीत असून ते समुद्रात आणि जमिनीवर पडत असतात. त्यात क्वचित जीवितहानी होत असते. शासनाने नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे चोपणे म्हणाले.
मुंबईतील वडाळा येथे दरवर्षी विश्व हिंदू परिषदेकडून रामनवमीनिमित्त स्वतंत्र शोभायात्रा काढली जाते. देशभर रामनवमी साजरी झाल्यावर वडाळ्यात दोन आठवड्यांनी शोभायात्रेचे आयोजन केले जाते. मात्र या वर्षीच्या शोभायात्राला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरीही तयारी सुरू असल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी वडाळा पोलिस ठाण्यासमोर ठाण मांडले होते. त्यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यात किमान सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाल आहे. त्यात असे दिसत आहे की, किमान आठश ते एक हजार कार्यकर्ते रविवारी वडाळा येथील पोलिस ठाण्यासमोर जमा झाले आहेत. त्यात प्रमुख निवेदक (त्याचा चेहरा दिसत नाही.) मोठमोठ्याने सांगत आहे की, आपण पोलिसांकडून परवानगी मागितली होती, पण त्यांनी ती दिलेली नाही. त्यामुळे आपल्याला कायद्यानुसार परवानगीसाठी या पोलिस ठाण्यासमोर ठाम मांडून बसायचे आहे. रीतसर परवानगी मागूनही नकार या शोभायात्रेसाठी पोलिसांकडे रीतसर परवानगी मागण्यात आली होती. पण पोलिसांनी त्यांना नेहमीच्या मार्गावरून परवानगी नाकारली. तरीही विश्व हिंदू परिषदेसह इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी पोस्टरबाजीही केली. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश होता. पण पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. वडाळा पोलिस ठाण्यात गर्दी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना रोखले होते. पोलिस आणि कार्यकर्त्यांमधील बाचाबाचीमुळे पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले होते. त्यामुळे वडाळा पोलिस ठाण्याबाहेर विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमले. या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांकडून ‘जय श्रीराम’च्या किमान दहा मिनिटे जोरदार घोषणा देण्यात आल्या. ओठ-अंगठा फाटला, कपाळातून वाहत होते रक्त वडाळा येथे लाठीमारानंतर पोलिसांनी विहिंपच्या कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये टाकले होते. तेथे या कार्यकर्त्यांचे काढलेले व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात दिसत आहे की, एका कार्यकर्त्याचा अंगठा तर दुसऱ्याचा ओठ फाटला आहे. एका मध्यमवयीन कार्यकर्त्याच्या कपाळातून लाठीच्या फटक्याने रक्त वाहत होते.
येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शटर तोडून चोरटे आतशिरले. मात्र तिजोरी कापण्यासाठी चोरांनी सोबतआणलेल्या गॅस कटरचा स्फोट झाला. त्यामुळे बँकेतआग लागल्याने फर्निचर व कागदपत्रे जळाली. वैजापूरशहरात रविवारी पहाटे ३ वाजता ही घटना घडली. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांना जागआल्याने चोरट्यांनी आपली स्विफ्ट (एमएच १४बीएक्स ७९८८) कार बँकेबाहेर सोडून पळ काढला.सुदैवाने या घटनेत स्ट्राँगरूममधील साडेचार लाख रुपयेआणि दागिने सुरक्षित राहिले, अशी माहिती बँकव्यवस्थापक बजरंगलाल ढाका यांनी दिली. घटनेनंतर बँकेपासून काही अंतरावर २ ते ३ जणपळताना दिसून आले. पोलिसांनी त्यांचा पाठलागकरण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेतचोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. वैजापूर शहरातील स्टेशन रोड परिसरात महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे.रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बॅँकेचेशटर वाकवून आत प्रवेश केला. यावेळी गॅस कटरचास्फोट झाल्याने बॅँकेला आग लागली. स्फोटाच्याआवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनीबँकेकडे धाव घेतली असता बॅँकेला आग लागलेलीहोती. बँकेपासून काही अंतरावरच पोलिस ठाणे आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या बंबाला पाचारण केले होते. व्यवहारांवर परिणाम नाही या घटनेतील आगीमध्ये बँकेचे संपूर्णफर्निचर, कागदपत्रे जळून खाकझाली आहेत. परंतु बँकेचे कामकाजऑनलाइन असल्याने बँकेकडेबॅकअप आहे. त्यामुळे डेटा सुरक्षितअसल्याने ग्राहकांना चिंता करण्याचीगरज नाही. बँकेच्या अन्य ग्राहकसेवा केंद्रातून सर्व खातेदारांचेव्यवहार सुरू राहतील, अशी माहितीबँकेचे जनरल मॅनेजर डी. एम.कावेरी यांनी सांगितली. सुरक्षा रक्षक नव्हता चोरट्यांना बॅँकेची स्ट्रॉँगरूमफोडण्यात यश आले नाही.यामुळे रोकड, दागिने आणि इतरमौल्यवान वस्तू सुरक्षित आहेत.बँकेत सुरक्षा रक्षक नव्हता तसेचसीसीटीव्ही यंत्रणादेखील आगीतजळाली आहे. १५ लाखांचे नुकसान बँकेतील ग्राहकांचे एटीएम कार्ड,चेकबुक, डीडी बुक, कर्जफाइल, कॅश व्हाउचर, संगणक,यूपीए, फर्निचर आणि दैनंदिनव्यवहारांची कागदपत्रे जळाल्याने१५ लाख रुपयांचे नुकसानझाल्याची फिर्याद बँक मॅनेजरबजरंगलाल ढाका यांनी दिली.परिसरातील सीसीटीव्हीकॅमेऱ्यांचे फुटेज पाहून पोलिसचोरट्यांचा माग काढत आहेत. कारमध्ये कोयता, कटर,दोन बनावट नंबर प्लेट बँकेसमोर उभ्या असलेल्याचोरट्यांच्या स्विफ्ट कारमध्ये टॉमी,कोयता, स्क्रू ड्रायव्हर, इलेक्ट्रिककटर आणि (एमएच ०४ डीएच४५११) (एमएच १८ एयू ४३१६) यादोन नंबर प्लेटही मिळाल्या.
नांदेडमधील बोरगावची घटना; तिसरा भाऊ जखमी:वादळात मंडपाचा तारेला स्पर्श; दोघे चुलतभाऊ ठार
लोखंडी लग्न मंडपाला पडदे बांधत असताना अचानक आलेल्यावादळामुळे मंडप उडाला. त्यामुळेवर असलेल्या उच्चदाबवीजवाहिनीला मंडपाचा स्पर्शझाला. या घटनेत मंडप बांधण्याचेकाम करणाऱ्या ५ कामगारांपैकीतिघांना विजेचा धक्का लागून तेखाली पडले. त्यातील दोघा चुलतभावांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला. जखमीवरहदगाव येथील उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी (२० एप्रिल)मध्यरात्री १ वाजेच्या सुमारासबोरगाव (ता.हदगाव) येथे घडली.या घटनेत पांडुरंग भट्टेवाड (२४)आणि साईनाथ भट्टेवाड (२३) यांचामृत्यू झाला, तर शिवप्रसाद भट्टेवाडयाच्यावर उपचार सुरू आहेत. बोरगाव (ह) येथील प्रकाश शिंदेयांच्या मुलीचे रविवारी लग्न होते.लग्नासाठी लोखंडी पाइपांचा मंडपटाकण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरूहोते. त्याचवेळी अचानकसोसाट्याचा वारा सुटल्याने अर्धवटअवस्थेत बांधलेला मंडप उचललागेला. वर असलेल्या उच्चदाबवीजवाहिनीला मंडपाचा स्पर्शझाला. त्यामुळे मंडपाला पकडूनठेवणाऱ्या ५ जणांना शॉक लागला.सर्वांना तातडीने रुग्णालयातहलवले, दोघांना मृत घोषित केले. दोघांचे मृतदेह आणले महावितरण कार्यालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह संतप्तनातेवाइकांनी महावितरणच्याकार्यालयात आणले. ग्रामपंचायतकार्यालयाने अनेकवेळा ठरावघेऊनही गावातील ११ केव्ही क्षमतेचीउच्चदाब वीजवाहिनी ग्रामपंचायतआणि सोसायटीच्या प्रांगणातूनमहावितरणने हटवली नाही, असाआरोप केला.
विविध शाळांमध्ये अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडीच्या आधारे वेतनासाठी पात्र ठरवून शासनाची काेट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याच्या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील संस्थाचालक आरोपी राजू केवळराम मेश्राम (५९) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भा. न्या. सं. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४७२, ४०९, १२० ब, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला भंडारा पोलिसांनी नागपूर येथून रात्री २ वाजता ताब्यात घेऊन अटक करण्यात केली. या प्रकरणात उद्या सोमवारी आणखी किमान ४ ते ५ जणांना अटकेची शक्यता सायबर क्राइमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे. यापूर्वी नागपूर शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे यांच्यासह नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली होती. यापाठोपाठ शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आणखी तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याने अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांचाही समावेश या घोटाळ्यात माेठे अधिकारीही गुंतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात वेतन पथक अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करून पहिली कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. २०१९ पासून नियुक्त्या नागपूर जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये २०१९ पासून बाेगस प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याची माहिती समाेर आली हाेती. सध्या नागपूर जिल्ह्यात जवळपास ५८० अशा बाेगस कर्मचाऱ्यांच्या नावाने वेतनाची उचल केली आहे.
प्रत्येकाची वेळ असते. एकेकाळी नक्षली भारी पडत होते. आता पोलिसांची वेळ होती आणि आहे. २००८ पासूनच पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात नक्षली मरत होते. पण, ते २ ते ८ या संख्येत होते. नक्षली पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होते. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. नक्षल्यांनी केलेल्या गोळीबारात वा घातपातामध्ये फक्त पोलिस आणि सी-६० चे जवान शहीद होत होते. गडचिरोली जिल्ह्याचा पोलिस अधीक्षक अभ्यास करून नक्षल्यांची चारही बाजूंनी कोंडी करणारी चक्रव्यूह पद्धत आणली. यात पळण्याच्या सर्व वाटा बंद करून चारही बाजूंनी घेराव घालण्यात येतो. परिणामी आज नक्षल चळवळ संपुष्टात आली आहे, असे नक्षलवादविरोधी अभियायाचे महानिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. परिणामी नक्षली नेता अभय याने माघार घेत चर्चेची तयारी दाखवली. पण, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी “शरण या आणि मुख्य प्रवाहात सहभागी व्हा,’ असे खडसावले आहे. या आक्रमक धोरणामुळे चक्राकार पद्धतीमुळे नक्षल्यांना पहिल्यांदा हादरा बसला बोरिया कसनासूर येथे. २२ एप्रिल २०१८ रोजी सर्च आॅपरेशदरम्यान पोलिसांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात ३४ नक्षली ठार झाले. इथून नक्षल्यांचा पाया खचण्यास सुरुवात झाली. मधल्या काळात ५-६, ५-६ नक्षली मरणे सुरूच होते. २१ मे २०२१ रोजी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात १३ नक्षली, १३ नोव्हेंबर २०२१ रोजी २७ नक्षली ठार झाले. १७ जुलै २०२४ रोजी १२ नक्षली ठार झाले. पहिले दर आठवड्याला चकमक होत असे, पण नक्षली पळून जात होते. म्हणावे तसे यश मिळत नव्हते. नक्षल्यांचे पळून जाण्याचे मार्ग बंद केले पाहिजेत हे लक्षात आल्याने चारही बाजूंनी कोंडी केली. त्याचे रिझल्ट आता दिसत आहे. नक्षली मरण्याची संख्या वाढली. ४ वर्षांत १२० नक्षली मारले गेले. हीच पद्धत पुढे इतर नक्षल प्रभावित राज्यांत केंद्राने सुरू केली. एकेकाळी संपूर्ण गडचिरोलीत फक्त आणि फक्त नक्षलवाद्यांची दहशत होती. आता ती संपुष्टात आलेली आहे. आतापर्यंत मन्नेराजाराम, पिपली बुर्गी, वांगेतुरी, गर्देवाडा, पेनगुंडा व नेलगुंडा येथे मॅकवेल पद्धतीने पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. नक्षलवादविरोधी अभियान व गडचिरोली पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे नक्षल दलम संपत आहे. सध्या दक्षिण गडचिरोलीत ४ दलम आहे, तर ११ दलम पूर्णपणे संपलेले आहे. केंद्रीय समिती सदस्य ते कमांडरपर्यंत ४१ नक्षली मारले गेले आहेत. आज गडचिरोलीत गुंतवणूक येत आहे. स्थानिकांना रोजगार मिळत आहे. गडचिरोलीत टप्प्याटप्प्याने २५,००० कोटींची गुंतवणूक होऊन हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. लाॅयड स्टीलचे एम. डी. बालकृष्णन प्रभाकरन यांच्याकडून तब्बल १००० कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. काम करणारे कर्मचारी कंपनीचे मालक झाले आहेत. यात कंपनीत काम करीत असलेल्या ४७ आत्मसमर्पित नक्षल्यांचाही समावेश आहे. गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यू उद्योग समूहाने ३ लाख कोटींचे गुंतवणूक करार केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांत १० हजार रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट लॉइड मेटल्सतर्फे गडचिरोली जिल्ह्यात दोन वर्षांत १० हजार रोजगार निर्माण करण्यात येणार आहे. लाॅयडला गडचिरोलीत ३४० हेक्टर लोह खनिजाचा पट्टा ३० वर्षांच्या लीजवर मिळाला आहे. प्रारंभी ५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येत आहे. दोन वर्षांत ही गुंतवणूक २० हजार कोटींपर्यंत जाऊन २० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. गडचिरोलीतील लोह खनिजाचा ग्रेड ६४ टक्के असल्याने पोलादाचे उत्पादन वाढणार आहे. तणावमुक्त राहण्यासाठी हे करतात 1 नियमित योग आणि ध्यानधारणा करतो. त्याने व्यक्तिमत्त्वात बदल होतो.2 शारीरिक आरोग्य राखण्यासाठी : सूर्यनमस्कार, योगासने व प्राणायाम करतो.3 कुटुंबासाठी : रोज सायंकाळी १ तास देतो. आणीबाणीचा प्रसंग नसेल तर रविवार कुटुंबासोबत घालवतो.4 सुटीचा सदुपयोग : “छावा’ सारखा हिट सिनेमा कुटुंबासोबत पाहतो. कुटुंबात पत्नी, सरस्वती पूजेच्या दिवशी जन्म झालेली मुलगी ज्ञानमुद्रा आहे.5 दिनचर्येतील विशेष : शिस्त पाळतो. निर्व्यसनी आणि निरोगी आहे.
शाळा, शिक्षकांना आता आयडॉल दर्जा मिळणार
पुणे : प्रतिनिधी राज्यभरातील गुणवत्तापूर्ण अध्यापन करणा-या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयडॉल शिक्षक, आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आयडॉल शाळांची बँक करण्यात येणार आहे. आयडॉल शिक्षक आणि शाळांना शिक्षण विभागाच्या कामकाजात सहभागी करून घेतले जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला. गुणवत्तापूर्ण […] The post शाळा, शिक्षकांना आता आयडॉल दर्जा मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उकाड्याने नागरिक त्रस्त, नागपुरात उच्चांकी नोंद मुंबई : प्रतिनिधी राज्यात सगळ््याच भागात तापमान वाढले असून, उष्णतेचा पारा टोक गाठत असल्याचे चित्र आहे. आज २० एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा प्रचंड तापला. बहुतांश ठिकाणी ४०-४५ अंश सेल्सिअसच्या तापमान नोंदले गेले. आयएमडीने नोंदवलेल्या कमाल तापमानानुसार आज राज्याच्या उपराजधानी नागपुरात तब्बल ४४.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. हे राज्यातील सर्वाधिक […] The post मराठवाडा, विदर्भ तापला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कर्नाटकच्या माजी डीजीपीची हत्या
बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची हत्या करण्यात आली आहे. रविवारी (२० एप्रिल) संध्याकाळी बेंगळुरूमधील एचएसआर लेआउटमध्ये ही घटना घडली. त्यांची पत्नी पल्लवीनेच त्यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे. कौटुंबिक वादातून पत्नीने त्यांची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पत्नीने स्वत: पोलिसांना याबाबतची माहिती दिली. राज्य पोलिस विभागाचे प्रमुख असलेल्या […] The post कर्नाटकच्या माजी डीजीपीची हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार!
टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोबाईलचे रिचार्ज महागले आहेत, अशी तक्रार नेहमीच केली जाते. मात्र आजकाल मोबाईलशिवाय कोणतेही काम होणे जवळपास अशक्य आहे. काहीही झाले तरी लोक रिचार्ज करतातच. रिचार्जचा दर हा कमी केला पाहिजे, अशी अपेक्षा नेहमीच व्यक्त केली जाते. असे असतानाच आता टेलकॉम कंपन्या पुन्हा एकदा आपल्या […] The post मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिघांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत, शेकडो लोकांचे स्थलांतर श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून, पावसाची संततधार आणि ढगफुटीच्या घटनेने भीषण स्थिती निर्माण झाली. पुरामुळे २ चिमुकल्यांसह तिघांचा मृत्यू झाला. भारतीय लष्कर आणि प्रशासकीय पथकांनी बचाव कार्य सुरू केले असून १०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे वाहतुकीलाही […] The post जम्मू-काश्मिरात ढगफुटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदेडमध्ये फर्निचरचे दुकान जळून खाक
लाखोंचे साहित्य जळाले नांदेड : प्रतिनिधी माळटेकडीजवळ असलेल्या एका फर्निचरच्या दुकानास रविवारी दुपारी अचानक आग लागली. सायंकाळपर्यत ही आग ४ वाहनांच्या मदतीने विझवावी लागली. या आगीत दुकानातील लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. माळटेकडीजवळील नूर चौकात फर्निचरचे मोठे दुकान आहे. या दुकानास रविवारी दुपारी अचानक आग लागली. काही वेळातच आगीचा भडका उडाला. त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन […] The post नांदेडमध्ये फर्निचरचे दुकान जळून खाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नी माझे व्हावे मिलन’ असे एक गीत आहे. फुलांचा गंध संपण्याची वेळ आली, फुले कोमेजून जाऊ लागली; परंतु मिलन काही होत नाही. महाराष्ट्रातील दोन नेत्यांची, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची अशीच प्रतिकात्मक स्थिती झाली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार […] The post तुझे नी माझे व्हावे मिलन..! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच्या सराफा बाजारात दराची मोठी उसळी
लातूर : सिध्देश्वर दाताळ मागील काही दिवसापाून शहरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. सोन्याच्या भावा बरोबरच चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर चांगलेच भडकले असल्याने सोने-चांदीच्या वाढ होत असल्याचे व्यापरी हाणमंत वाघ यांनी एकमतशी बोलताना सांगीतले. सराफा बाजारातील इतर व्यापा-यांच्या मते […] The post लातूरच्या सराफा बाजारात दराची मोठी उसळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरकरांची लाहीलाही, तापमानाचा पारा ४० पार
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. रविवारी तापमानाचा पारा जवळपास ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. उष्मा अन उकाड्याने लातूरकर व जिल्हावासीयांचा दिवसाचा आराम व रात्रीची झोप उडाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. लातूर शहरासह जिल्ह्यावर गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्यान शनिवार […] The post लातूरकरांची लाहीलाही, तापमानाचा पारा ४० पार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-अमेरिका व्यापार करारासाठी १९ अटी!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि अमेरिकेने प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारासाठी अंतिम केलेल्या अटींमध्ये वस्तू, सेवा आणि सीमा शुल्क सुलभता यासारख्या सुमारे १९ मुद्द्यांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. काही मुद्द्यांवरील मतभेद दूर करून या प्रस्तावित कराराची चर्चा पुढे नेण्यासाठी भारतीय शासकीय शिष्टमंडळ पुढील आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार आहे. भारताचे मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी […] The post भारत-अमेरिका व्यापार करारासाठी १९ अटी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार यांचे हेलिकॉप्टर बिघडले; राष्ट्रवादीचा मेळावा रद्द
नाशिक : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये (दि. २०) मेळावा होणार होता. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे पवारांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे अजित पवार गटाचा मेळावाही रद्द करण्यात आला. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाने जिल्ह्यात कार्यकर्त्यांसाठी एकही कार्यक्रम घेतला नव्हता. त्यातच माजी मंत्री विद्यमान छगन भुजबळ यांना मंत्रिपद […] The post अजित पवार यांचे हेलिकॉप्टर बिघडले; राष्ट्रवादीचा मेळावा रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हैदराबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात ब्लॅकआऊटचे आयोजन
हैदराबाद : वृत्तसंस्था शनिवारी रात्री ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने हैदराबादेत एका सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. याला ‘एआयएमआयएम’नेही पाठिंबा दिला. दरम्यान, ३० एप्रिल २०२५ रोजी ब्लॅकआउट निषेध करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. या ब्लॅकआऊट दरम्यान रात्री ९ वाजता घरातील सर्व दिवे बंद करण्यात येतील. हैदराबाद येथील एआयएमआयएमचे मुख्यालय दारुस्सलाम येथे आयोजित वक्फ वाचवा, […] The post हैदराबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात ब्लॅकआऊटचे आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; भाजप संधीसाधू पक्ष! बक्सरच्या प्रचारसभेत खर्गेंची टीका
बक्सर : वृत्तसंस्था बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपसह काँग्रेसने राज्यात विविध ठिकाणी प्रचारसभा सुरू केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बक्सरमधील एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या जेडीयू आणि भाजप युतीला संधीसाधू म्हटले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बक्सर येथील […] The post मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; भाजप संधीसाधू पक्ष! बक्सरच्या प्रचारसभेत खर्गेंची टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘आरसीबी’ने वचपा काढला; पंजाब ७ विकेटने पराभूत
मुल्लानपूर : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आजच्या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून थेट तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. तर पंजाब किंग्सची तिस-या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. गुणतालिकेत आता पाच संघाचे १० गुण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची होणार आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आज (रविवारी) आमनेसामने आले होते. […] The post ‘आरसीबी’ने वचपा काढला; पंजाब ७ विकेटने पराभूत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. यावर आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे. नाना पटोले संग्राम थोपटे यांना उद्देशून म्हणाले, ज्या पक्षाने तुम्हाला मोठ केले, नावारुपाला आणले त्याच्यावर आरोप करायचे नसतात. जिकडे तुम्ही जाऊ पाहता तिकडे फार अंधार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, 22 एप्रिल रोजी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा 22 एप्रिल रोजी मुंबईत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्षात आपल्याला अनेकदा डावलण्यात आले असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून मी आणि माझ्या वडिलांनी देखील काम केले आहे. त्यामुळे दुःख वाटत आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संग्राम थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी कोणाच्याही दबावाला कधी बळी पडलो नाही. लोकसभा निवडणुकीत देखील तुम्ही पाहिले असेल की, भोर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत देखील महा विकास आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले होते. महा विकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही महा विकास आघाडीचे काम केले. आम्ही काम केले म्हणजे कोणावर उपकार केले नाहीत. मात्र, जे केले ते सांगायला काही हरकत नसल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे. इतरही अनेक जबाबदारी मला पक्षाने दिली. त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या असल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे. हेही वाचा
विदर्भात उन्हाचा कहर:चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४४.६ अंश तापमान; नागपूर ४४ अंशांवर
विदर्भात उन्हाची तीव्रता वाढली आहे. रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक ४४.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नागपुरात पारा ४४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला. सकाळी ९ वाजल्यापासूनच कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. दुपारी १२ ते ४ या कालावधीत नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. विदर्भातील इतर शहरांमध्येही उष्णतेची लाट जाणवत आहे. ब्रम्हपुरी आणि अमरावतीत ४४.४ अंश, वर्धा येथे ४४.०, अकोला येथे ४४.३, यवतमाळ येथे ४३.६, गडचिरोली येथे ४२.६, गोंदिया येथे ४२.२ आणि वाशिम येथे ४२.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. बुलढाणा मात्र तुलनेने थंड राहिले असून तेथे ३९.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. शनिवारी नागपूरमध्ये ४४.७ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले होते. त्याच दिवशी अकोला येथे ४४.३ अंश, तर वर्धा आणि चंद्रपूर येथे ४४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
जमिनीच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली. याप्रकरणी सराईत गुन्हेगार आरोपी विरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुभम सुभाष चव्हाण असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सराईत गुन्हेगार अमर साकोरे याच्यासह तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम आणि आरोपी अमर यांच्यात एका जमिनीच्या जागेवरुन आर्थिक वाद होता. शुभम रविवारी पहाटे कात्रजमधील संतोषनगर भागातून जात होता. त्यावेळी आरोपी अमर आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला जबरदस्तीने अडविले. आरोपींनी त्याला शिवीगाळ करून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींच्या तावडीतून वाचण्यासाठी शुभम तेथून कसाबसा पळाला. आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला बांबूने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पसार झालेले आरोपी अमर साकोरे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. एटीएमधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक एटीएमधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची चोरट्याने ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक धनकवडी भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावर असलेल्या एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या पाठोपाठ एक चोरटा एटीएममध्ये शिरला. एटीएममधून पैसे निघत नाहीत, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली. एटीएममधून पैसे काढून देण्यास मदत करतो, अशी बतावणी करुन चोरट्याने त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडील एटीएम कार्ड स्वत:कडे ठेवले. एटीएम वापराचा सांकेतिक शब्द चोरट्याने त्यांच्याकडून घेत फसवणूक केली.
अमरावती जिल्ह्यात लवकरच दोन नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांची (एपीएमसी) स्थापना होणार आहे. भातकुली आणि मेळघाटातील चिखलदरा येथे या समित्या उभारल्या जाणार आहेत. जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी सांगितले की, या दोन्ही बाजार समित्यांच्या स्थापनेचा प्रशासकीय प्रस्ताव पुढील आठवड्यात राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे पाठवला जाईल. राज्य सरकारने सहकार क्षेत्राचा विस्तार करून नागरिकांना अधिक सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भातकुली क्षेत्र अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येते. तर चिखलदरा क्षेत्राचा कारभार धारणी एपीएमसीमधून चालवला जातो. आता या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन होणार आहेत. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ नुसार ही कार्यवाही केली जात आहे. कृषी मालामध्ये सर्व प्रकारची धान्ये, भाजीपाला, फळे, पशुधन, मधमाशी पालन, मत्स्य व्यवसाय आणि वन उत्पादनांचा समावेश आहे. सहकार खात्याचे उपसचिव संतोष देशमुख यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या शासन आदेशानुसार, प्रत्येक तालुक्यात एक कृषी उत्पन्न बाजार समिती असणे आवश्यक आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालय पुढील आठवड्यात या नवीन समित्यांची रचना आणि इतर माहितीसह प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील शिक्षकांनी शासनाच्या संचमान्यता निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून १९३ शिक्षकांनी याचिका दाखल केली आहे. शासनाने १५ मार्च २०२४ रोजी नवीन संचमान्यतेचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे पटसंख्येवर आधारित निकषांमध्ये बदल झाला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर शिक्षकांची सुमारे ५० टक्के पदे अतिरिक्त ठरणार आहेत. अमरावती जिल्ह्यात या आदेशामुळे ८०० पदवीधर शिक्षक, १६० उपशिक्षक आणि ६ मुख्याध्यापक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. एकूणच जिल्ह्यात सुमारे १००० शिक्षक अतिरिक्त ठरू शकतात. या निर्णयामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार आहे. इयत्ता १ ते ५ च्या शाळांमध्ये चार-पाच वर्गांसाठी केवळ दोन शिक्षक तर इयत्ता १ ते ८ च्या शाळांमध्ये सहा-सात वर्गांसाठी दोनच शिक्षक राहणार आहेत. प्रत्येक वर्गाला आठवड्यात ४८ तासिका अध्यापन आवश्यक असताना एका शिक्षकाला दोन-तीन वर्ग सांभाळणे अशक्य आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाविरोधात जुलै २०२४ मध्ये मोर्चे काढले आणि मार्च २०२५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली. शिक्षणमंत्र्यांना विद्यार्थ्यांची पत्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे ठराव, ग्रामपंचायतींचे ठराव आणि लोकप्रतिनिधींची पत्रे देण्यात आली. मात्र, शासनाने निर्णय बदलला नाही. त्यामुळे शेवटी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
जन्मांध मालाचे यशस्वी आयुष्य:पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या मानसकन्येची महसूल सहायक पदी निवड
अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या बालगृहातील जन्मांध माला शंकरराव पापळकर हिने मोठे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची महसूल सहायक पदावर नियुक्ती झाली आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात तिची नियुक्ती करण्यात आली आहे. युनिक अकादमीचे अमोल पाटील यांनी तिला परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. या यशानिमित्त युनिक अकादमीने तिचा विशेष सत्कार आयोजित केला. सत्कार समारंभात प्रख्यात लेखक आणि चित्रकार सुनील यावलीकर यांनी शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याची तुलना महात्मा फुले यांच्या कार्याशी केली. मालाचे यश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मालाच्या जिद्दीतून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. अपयश किंवा परिस्थितीपुढे न डगमगता ध्येय गाठल्यास यश निश्चित मिळते, असा संदेश त्यांनी दिला. युनिक अकादमीच्या ६७ विद्यार्थ्यांची महसूल सहायक पदासाठी निवड झाली आहे. त्यातील मालाचे यश सर्वांत अधिक आनंददायी असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहेत. सत्कार कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीने अमरावती शहरातील मंडळ अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. मुंबई प्रदेश कार्यालयातून कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहा मंडळांसाठी अध्यक्षांची नावे घोषित केली. मात्र बडनेरा मंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. नव्याने निवड झालेल्या अध्यक्षांमध्ये संत गाडगेबाबा मंडळासाठी अभिजित वानखडे, कॉटन मार्केट मंडळासाठी सचिन नाईक आणि विद्यापीठ मंडळासाठी प्रफुल बोके यांची निवड करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद मंडळाचे अध्यक्षपद संतोष कावरे यांना देण्यात आले आहे. अंबा मंडळाचे नेतृत्व मनीष चौब यांच्याकडे सोपवण्यात आले असून साई मंडळाच्या अध्यक्षपदी भारती गुहे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही नावे अंतिम करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपच्या संघटन पर्व अभियानांतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. स्थानिक पातळीवर झालेल्या बैठकांमध्ये निवडलेल्या नावांना मुंबई प्रदेश कार्यालयाने अंतिम मान्यता दिली आहे. सर्व नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचे भाजपा अमरावती शहर जिल्हा आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना पिंक ई- रिक्षा वाटप करण्याचे उद्दीष्ट दिलेले असुन पुणे जिल्हयात २० ते ५०वर्षे वयोगटातील ३ हजार २३० इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने 1 हजार ७२६ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ६० लाभार्थी महिलांना २१ एप्रिल २०२५ रोजी, दुपारी १ वाजता कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ६० कायनेटिक ग्रिन कंपनीचे पिंक ई- रिक्षा वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोडर्डीकर, महिला व बाल विकास विभाग सचिव डॉ. अनुपकुमार यादव , विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त महिला व बाल विकास नयना गुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित राहणार आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आठ जिल्हयातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई- रिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
नागपूर येथे बनावट शालार्थ आयडी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील संस्थाचालक राजू केवळराम मेश्राम (५९) यांना नागपुरातून अटक करण्यात आली. त्यांच्यावर फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आधीच पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर शिक्षण विभागाचे वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षक नीलेश वाघमारे आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा समावेश आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तीन कर्मचारी - माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक निलेश मेश्राम, शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि वरिष्ठ लिपीक सुरज नाईक यांनाही अटक करण्यात आली आहे. सायबर सेलने शिक्षण उपसंचालक कार्यालयाची तपासणी केली असता बोगस शालार्थ आयडीचा डेटा मिळाला. नागपूर जिल्ह्यात सुमारे ५८० बोगस कर्मचाऱ्यांचा डेटा आढळून आला आहे. २०१९ पासून विविध शाळांमध्ये बोगस प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. शालार्थ पोर्टलवरील त्रुटींच्या आधारे केलेल्या तपासणीत हे प्रकरण उघडकीस आले. या रॅकेटमधून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर क्राईमचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळीराम सुतार यांनी आणखी ४-५ जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवली आहे.
वैद्यकीय विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो, परंतु हा विकास खेड्यापाड्यातील, दरी खोऱ्यातील आदिवासी पाड्यापर्यंत आजही पोहोचला नाही. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न कसे सोडविणार. वसुधैव कुटुम्बकम असे आपण म्हणतो परंतु त्या कुटुंबाचे आपण काय करायचे. देश धर्म आणि संस्कृती सुस्थितीत राहण्यासाठी समाज सुदृढ असायला पाहिजे, असे मत पद्मश्री भिकू रामजी इदाते यांनी व्यक्त केले. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पदग्रहण समारंभ टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणेचे संचालक डॉ.नवीन कुमार, संघटनेच्या मावळत्या अध्यक्ष डॉ.शुभदा जोशी, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुनिल भुजबळ, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत- मेहता तसेच विविध वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सन २०२५ - २०२६ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. सुनिल भुजबळ, उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब काकडे, खजिनदार डॉ.संदीप निकम, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, डॉ.राजेश दोशी, सहसचिव डॉ.दीपक गांधी, डॉ.सिद्धार्थ शिंदे यांची निवड झाली आहे. डाॅ. नवीन कुमार म्हणाले, कोविड-१९ नंतर जगात अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झाले आहेत. आज २०२५ मध्ये १५ हजारपेक्षा अधिक विषाणू आहेत आणि २३४ विषाणू कुटुंबांची नोंद आहे, आणि प्रत्येक वर्षी तीनशे ते चारशे नवीन विषाणू निर्माण होत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी सारख्या ४ इन्स्टिट्यूट भारताच्या विविध भागात स्थापन करण्यात येणार आहेत. जर आपण देशात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण आणायचे ठरवले तर ते शक्य नाही, यासाठी एकत्रित आणि एकसूत्री दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. आपण विषाणूंना प्रतिबंध करू शकत नाही, परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी च्या माध्यमातून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण तयार आहोत. डॉ. सुनिल भुजबळ म्हणाले, आजारांना प्रतिबंध करा, संरक्षण करा आणि आरोग्य संस्कृतीला प्रोत्साहन द्या, हे ब्रीदवाक्य घेऊन यंदाच्या वर्षी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन काम करणार आहे. डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी यासोबतच सामाजिक आरोग्य जनजागृतीसाठी शिबिरे यांसह विविध सामाजिक उपक्रम यंदा राबविण्यात येणार आहेत.
आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत दोन वेगवेगळ्या ठिकाणी रविवारी ता 20 दोन अनोळखी मृतदेह आढळून आले असून दोन्ही मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत कामठा फाटा शिवारातील कालव्यामध्ये एका गेटला मृतदेह अडकला असल्याची माहिती पोलिसांना आज सकाळी मिळाली होती. त्यावरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार शेख अन्सार, राजेश घोंगडे, राजीव जाधव, शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सदर मृतदेह कालव्याबाहेर काढला. सदरील मृतदेह दहा ते बारा वर्षीय मुलाचा असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी आता परिसरातील बेपत्ता मुलाचा शोध सुरू केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाची ओळख पटली नव्हती. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यदेह आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजार भागात आढळून आला. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. मृतदेहाच्या अंगावर केवळ एक धोतर असून सदर मृतदेह भिक्षेकर्याचा असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदरील मृतदेहाची ही ओळख पटली नाही. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम चालविले असून त्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यासाठी विदर्भातील पोलीस ठाण्यांमधून बेपत्ता मुलाची माहिती घेतली जात असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
नव्या पिढीतील आश्वासक गायक गंधार देशपांडे, प्रसिद्ध संवादिनी वादक सुधीर नायक आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी पद्माताई देशपांडे यांच्या बहारदार आणि सुश्राव्य सादरीकरणाने रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवातील पहिला दिवस संगीत रसिकांसाठी आनंददायी ठरला. ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 24व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे आयोजन कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयातील राजमाता जिजाऊ माँसाहेब बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले आहे. महोत्सवाला युवा रसिक, कलाकारांसह ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सुरुवातीस धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काका चव्हाण, संचालक अनिकेत चव्हाण, डॉ. पंडित संजय गरुड, रागिणी गरुड, कॉसमॉस बँकेचे माजी संचालक मिलिंद पोकळे, सुभाष चाफळकर, ह. भ. प. विजय महाराज जगताप, माजी कामगार आयुक्त विकास पनवेलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित डॉ. राम देशपांडे यांचे सुपुत्र आणि शिष्य गंधार देशपांडे यांच्या गायनाने झाली. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात धानी रागातील रचनेने केली. विलंबित आणि द्रुत तालावर आधारित भगवान शंकरांवरील पंडित राम देशपांडे यांनी रचलेली ‘शंभो महोदव’ ही बंदिश तयारीने सादर केली. त्यानंतर भगवान शंकरांच्या तांडव नृत्याचे वर्णन करणारी ‘डम डम डमरू बाजे’ ही रचना सादर करून शास्त्रीय संगीतावरील आपली पकड दर्शविली. ‘गाओ विद्या गुणी सम’ ही रचना सादर करून ‘अबिर गुलाल उधळीत रंग’ हे सुप्रसिद्ध भजन सादर करत रसिकांची मने जिंकली. रसिकांशी संवाद साधताना गंधार देशपांडे म्हणाले, पुण्यातील उपनगरात पहिल्यांदाच गायनसेवा करीत आहे. पंडित संजय गरुड यांनी या परिसरात भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याचा आनंद आहे. दुसऱ्या सत्रात पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य प्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुधीर नायक यांचे एकल संवादिनी वादन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग पूरिया कल्याण सादर करून केली. त्यानंतर गुरू पंडित तुळशीदास बोरकर यांची झपतालातील एक रचना ऐकविली. पंडित रामाश्रय झा रचित बंदिश सादर करून तिलक कमोद रागातील रचना ऐकविली. कार्यक्रमाची सांगता पिलू रागातील ठुमरीने केली. संवादिनीच्या सप्तकावर सहज फिरणारी बोटे आणि गायकी अंगाने सादर केलेले वादन हे वैशिष्ट्य रसिकांना विशेष भावले. शुभदा गायकवाड (स्वरमंडल), ऋषिकेश जगताप (तबला) यांनी साथसंगत केली.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यापुढील काळात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एआय मुळे रोजगाराच्या संधी जातील अशी भीती व्यक्त केली जाते; परंतु हे खरे नाही. यामुळे रोजगारांच्या संधी, संकल्पना यामध्ये बदल होणार आहे. नव अभियंत्यांनी नोकरी च्या मागे धावण्याऐवजी स्टार्टअप सुरू करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे गुगल डेव्हलपर ग्रुपच्या पुणे विभागाचे प्रमुख महावीर मुथा यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे नेक्स्ट जनरेशन डेव्हलपमेंट क्लब च्या सहकार्याने 'देव कार्निवल'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी कुशल विजय, साज्ञिक घोष, रॉबिन बंटा, तरुण अभिचंदानी, अमोल निटवे, देवेंद्र यादव, पीसीसीओईआर प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, सेंट्रल प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, संगणक शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्चना चौगुले, प्रा. डॉ. महेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. 'देव कार्निवल'मुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांना ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. भविष्यात विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आयटी, ऑटोमेशन, औद्योगिक क्षेत्रात कसे बदल होत आहेत आणि होणार आहेत याची माहिती मिळेल. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे, यामुळे तुमच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावत जातील असे डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी सांगितले. यानंतर झालेल्या चर्चासत्र मायक्रोसॉफ्टचे कुशल विजय यांनी जनरेटिव्ह एआय आणि त्याचा वापर करून करिअर कसे घडवायचे याविषयी मार्गदर्शन केले. वॉर्कहॅटचे सह-संस्थापक आणि सीईओ साज्ञिक घोष यांनी नो-कोड डेव्हलपमेंट याची माहिती दिली. एसएएसआर अँड डीचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर देवेंद्र यादव यांनी गिटऑप्स आणि त्याचे व्यावहारिक अनुप्रयोग याची माहिती दिली. टीसीएसचे सायबर सिक्युरिटी युनिट - डिलिव्हरी पार्टनर रॉबिन बंटा यांनी सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. गुगलचे वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण अभिचंदानी यांनी औद्योगिक जगातील संधीची माहिती दिली. इव्हॉल्व्हिंगएक्सचे संस्थापक आणि सीईओ अमोल निटवे, एक्सप्लोरव्हीआरचे सह-संस्थापक आणि मियावाकी एक्सप्रेस यांनी उद्योजकतेबद्दलची माहिती सांगितली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
वैद्यकीय क्षेत्रात वरचेवर होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे मनुष्याचे आयुर्मान वाढत असून या वाढत्या आयुर्मानापुढील विविध आजारांची आव्हाने पेलण्यासाठी पॅलेटिव्ह केअर अर्थात परिहार सेवा आवश्यक असून ही ही संज्ञा भारतात रूजणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ युरोलॉजिस्ट डॉ. अरुण जामकर यांनी व्यक्त केले. डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी लिखित आणि राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘सोबत सांजवेळची’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. अरुण जामकर बोलत होते. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर प्रसिध्द अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी, राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे आणि लेखिका डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. अरुण जामकर म्हणाले की, एखाद्या दुर्धर आजारासमोर ज्यावेळी रुग्ण आणि नातवाईक दोघेही हतबल होतात. त्यावेळी कोणाच्यातरी आधाराची नितांत आवश्यकता असते. अशावेळी पॅलेटिव्ह केअर अर्थात परिहार सेवा देणारा चमु बरोबर असल्यास त्यांचा मोठा आधार होतो. सेवाभाव हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. तसेच एकत्र कुटुंब व्यवस्था आणि फॅमिली डॉक्टर हे कधीकाळी आपल्या समाजाचे बलस्थान होते. मात्र, काळाच्या ओघात या दोन्ही संकल्पना नामशेष होण्याच्या टप्प्यावर आल्या आहेत. रूग्ण आणि डॉक्टर यांच्यात स्पर्शासह विविध माध्यमातून होणारा संवाद हरवत चालल्याने तसेच रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासाचा धागा कमकुवत होत चालल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. पॅलेटिव्ह केअर ही केवळ रूग्णासाठी आवश्यक नसून ती त्याच्या कुटुंबियांसाठी देखील महत्त्वपूर्ण असते. सहहृदयता, सहवेदना आणि करूणा या भावना डॉक्टरांनी बाळगणे आवश्यक आहे. भारताच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये ही संज्ञा चांगल्या प्रकारे रूजली असून नागरिकांकडून सुमारे १४ टक्के कर आकारून सरकार रूग्णांची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेते. तसेच पॅलेटिव्ह केअरच्या क्षेत्रात अनेक स्तरांवर संशोधन झाले असून औषधांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी बोलताना प्रसिध्द अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या की, आपल्या जवळच्या लोकांना आयुष्याच्या संध्याकाळी होणारा वेदनादायी मृत्यू हा आपल्याला आतून-बाहेरून हालवून टाकतो. आपला कुटुंबिय रुग्णालयात दाखल असताना वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या स्पेशलायझेशनच्या संकल्पनेमुळे एकाही डॉक्टरांकडून व्यवस्थित संपूर्ण माहिती मिळत नाही. अशावेळी आपण कितीही खंबीर असलो, तरी आता नक्की काय करायचे, अशी आपली अवस्था होऊन जाते. मृत्यू हा अटळ असला तरी त्या मृत्यूला सामोरे जाण्याची प्रगल्भता किंवा हिंमत पॅलेटिव्ह केअर टेकर्स आपल्यात निर्माण करीत असतात. वेदनेने ग्रस्त रुग्णांमध्ये सकारात्मकता पेरण्याचे काम पॅलेटिव्ह केअरच्या माध्यमातून केले जाते.
बदलत्या जीवनशैलीत तरूणांध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार या शारीरिक व्याधींसह अनेक मानसिक व्याधींनी शिरकाव केला आहे. या सगळ्या व्याधींवर नियंत्रण आणि विजय मिळवण्यासाठी हास्य व्यायाम हा रामबाण उपाय आहे. हास्य व्यायाम हे केवळ ज्येष्ठांसाठी असतात असा गैरसमज असून यासाठी ज्येष्ठांप्रमाणे तरूणांमध्ये हास्य चळवळ रूजली पाहिजे, असे मत पुण्यातील हास्य क्लबचे प्रणेते आणि नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी व्यक्त केले. पुण्यातील हास्य क्लबचे प्रणेते आणि नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी हास्य चळवळीच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. हास्य चळवळीतील त्यांच्या त्रिदशक वाटचाली निमित्त विदिशा विचार मंचतर्फे विठ्ठल काटे यांचा सन्मान कोहिनूर ग्रुपचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी विठ्ठल काटे बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा, जयराज ग्रुपचे चेअरमन प्रसिध्द उद्योगपती डॉ. राजेश शहा आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विठ्ठल काटे म्हणाले की, पुण्यामध्ये प्रारंभी ही हास्य चळवळ सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. हास्य व्य़ायाम हा केवळ शरीराच्या आरोग्यासाठी नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठी देखील महत्वाचा असून त्याविषयी शास्त्रीय संशोधन झाले असून विज्ञानाचा आधार प्राप्त झाला आहे. या संदर्भात समाजात जागृती केल्यानंतर हास्य चळवळीला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आता पुण्यातील विविध भागांमध्ये आमच्या नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे शेकडो हास्य क्लब आज कार्यरत आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील सदस्य संख्या विभागली गेली असून व्यक्ती-व्यक्तींमधील संवाद कमी झाला आहे. तसेच मानसिक ताणांचे प्रमाण वाढले आहे. या सगळ्यावर हास्य व्यायाम ही मात्रा महत्त्वाचे काम करते. वयाच्या ८८ व्या वर्षी मी उत्साहाने कार्यरत असण्यामागे हास्य व्यायामाचा मोलाचा वाटा आहे. कृष्णकुमार गोयल म्हणाले की, हास्य हा जगण्याचा गुरूमंत्र आहे. रोजच्या जगण्यात ताणतणाव खूप असून मोकळेपणाने हासणे हे देखील आता कठीण झाले आहे. हास्य क्लबमध्ये घालवलेला एक तास हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो, एवढी ताकद त्यामध्ये आहे. या हास्य चळवळीने हजारोंच्या जीवनात सकारात्मकता आणि उमेद पेरली आहे.
महाराष्ट्रात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरू आहे. हिंदीच्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र देखील पाठवले आहे. या पत्रातून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर तोडगा काढण्याची देखील मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी भाषा कुठेही लादली जात नाहीये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मराठीच्या ऐवजी हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही. तीन भाषा शिकणे अनिवार्य आहे. त्यातील दोन भारतीय भाषा असल्या पाहिजेत. आता आपल्याकडे दोन भाषा कोणत्या तर एक मराठी आहेच त्यासोबत आपण हिंदी भाषा घेतली आहे. मल्याळम किंवा इतर अशा भाषा ठेवल्या तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तसेच कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असेल तर आम्ही त्याची सोय करू. 20 च्या वर विद्यार्थी असतील तर शिक्षक दिला जाईल, कमी असतील तर ऑनलाईन पद्धतीने भाषा शिकवली जाईल. पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. मला एका गोष्टीचे वाईट वाटते, आपण आपल्या देशाच्या हिंदी भाषेला विरोध करतो आणि इंग्रजी भाषेचे गोडवे गातो, अशी खंत देखील यावेळी बोलताना फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. जिथे पाण्याचे स्त्रोत स्वतंत्र नाहीत अशा ठिकाणी टंचाई जास्त तसेच महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाण्याच्या टंचाईचे संकट उभे राहिले आहे. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळातच आपल्याला कल्पना आहे की एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. विशेषतः जिथे पाण्याचे स्त्रोत स्वतंत्र नाहीत अशा ठिकाणी ही टंचाई जास्त असते. आपण यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करतो. जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याच्या टंचाईसंदर्भात मॅपिंग करून ज्या भागात टंचाई जास्त जाणवते तिथे वेगवेगळ्या स्त्रोततून पाणी गेले पाहिजे, ही व्यवस्था करायची असते. आताही आम्हाला काही तक्रारी मिळाल्या आहेत तर आम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतो आणि टंचाई दूर करण्याचा प्रयत्न करतो.
रेल्वेवर फेकलेला दगड लागून चिमुकलीचा मृत्यू
सोलापूर : विजयपूर रायचूर पॅसेंजरमधून सोलापूरला येत असताना अज्ञात इसमाने पॅसेंजरवर फेकलेला दगड लागून एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दि. 20 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. शिवानी उर्फ आरोही अजित कारंगे असे त्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. एप्रिल महिन्यात लच्याण येथे यात्रा असल्याने कारंगे कुटुंबीय लच्याणला गेले होते. यात्रा […] The post रेल्वेवर फेकलेला दगड लागून चिमुकलीचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रातील 10 हजार गरजू महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केले जाणार आहे. नागपूर येथून दिनांक 20 एप्रिल रोजी गरजू महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 8 जिल्ह्यांमध्ये 10 हजार पिंक ई रिक्षा वाटप केले जात आहेत. यात नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. पिंक रिक्षाच्या एकूण किमती पैकी 20 टक्के अनुदान राज्य सरकार देणार असून 10 टक्के रक्कम लाभार्थी महिलांना द्यावे लागणार आहे. तर उर्वरित 70 टक्के रक्कम सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेच्या शुभारंभावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पिंक इ-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्याचा वितरण नागपुरात करतो आहे, याचा आनंद आहे. नागपुरात 2000 महिलांना पिंक रिक्षा दिल्या जातील. राज्यातील दहा हजार महिलांना रोजगार देण्याचा उद्दिष्ट तर या योजनेमागे आहेच. सोबतच शहरात महिलांना सुरक्षित सार्वजनिक वाहतूक तिचे साधन मिळावे, रात्री अपरात्री महिला या पिंक इ-रिक्षाच्या माध्यमातून सुरक्षित फिरू शकतील, असे उद्दिष्टही या योजनेमागे असल्याचे फडणवीस म्हणाले. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाडकी बहीण योजनेसारखीच ही पिंक इ रिक्षा योजना आहे. या माध्यमातून महिलांना पायावर उभा राहता आले पाहिजे असा उद्देश आहे. तसेच कामकाजी महिलांना प्रवासात सेफ, सुरक्षित वातावरण मिळावे, म्हणून महिलाद्वारे चालवल्या जाणाऱ्या इ-रिक्षा उपलब्ध करून देण्याचा उद्दिष्ट आहे. महिलानी महिलांसाठी अशी ही रिक्षा असणार आहे. मात्र यात पुरुषांनी बसू नये, असा त्याचा अर्थ नाही. जसे महिला त्यांच घर संसार चांगले चालवतात, तशीच इ-रिक्षा ही चांगली चालवा, सर्वांना सुरक्षित ठेवा. सर्व लाभार्थी महिलांना शुभेच्छा, असे फडणवीस म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्य साधून ‘मायनॉरिटी युथ पार्लमेंट’ अर्थात युवा अल्पसंख्याक संसद या भव्य कार्यक्रमाचे आयोजन रविवारी पुण्यातील गणेश कला क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडले. अल्पसंख्याक समाजातील युवकांच्या सशक्तीकरणासाठी नोकरी, शिक्षण आणि रोजगार अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर कार्यक्रमात सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात देशभरातील नामवंत नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरू यांनी उपस्थिती लावून उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये बिहारचे खासदार पप्पू यादव, कश्मीरचे खासदार मोहीबुल्लाह नदवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, कार्य साहब मुस्लिम धर्मगुरू, मोहन जोशी, माजी अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी अरफात शेख, ख्रिश्चन धर्मगुरू आणि समाजसुधारक बिशप थॉमस डाबरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, ख्रिश्चन नेते पीटर डिसूजा, अॅड. अमीर शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते पाहत अहमद व उमेश चव्हाण, रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन हाजी जुबेर मेमन, लुकास केदाती, सत्यवान गायकवाड, अॅड. सुलतान फतेह अली खान, फिरोज महसूलदार, बलिक नोमानी आणि फरीद खान यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमात विविध विषयांवर सत्र घेण्यात आले असून, युवा अल्पसंख्याकांचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी धोरणात्मक दृष्टिकोन मांडण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध भागांतील युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला.|
आर्सेनिकची पातळी वाढल्यास भाताद्वारे कर्करोग बळावणार!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भातामध्ये आर्सेनिकची पातळी वाढू शकते. त्यामुळे आशियाई देशांतील लोकांमध्ये कर्करोग आणि आरोग्यविषयक धोके वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती ‘द लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, २ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानवाढ आणि कार्बन डायऑक्साईडचे वाढते […] The post आर्सेनिकची पातळी वाढल्यास भाताद्वारे कर्करोग बळावणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई येथील वडाळा येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये जोरदार राडा झाल्याचे समोर आले आहे. पोलिस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. पोलिसांनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचा देखील आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक कार्यकर्ते जखमी देखील झाल्याचे समजते. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले आहे. परवानगी नसताना ही रॅली काढण्यात आल्याने हा राडा झाल्याचे बोलले जात होते. अखेर चर्चेनंतर या रॅलीला परवानगी देण्यात आली आहे. रामनवमी निमित्त विश्व हिंदू परिषदेकडून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांची परवानगी नसताना देखील ही शोभायात्रा विश्व हिंदू परिषदेकडून काढण्यात आली. त्यामुळे पोलिस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांच्यात तणाव निर्माण झाला होता. तसेच यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचाही आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणावर बोलताना विहिंपचा एक कार्यकर्ता म्हणाला, बांबूच्या काठीने आम्हाला मारण्यात आले. हे असेच सुरू राहिले तर सगळे संपून जाईल. आम्ही यात्रेची तयारी करत होतो. पण पोलिसांनी आम्हाला परवानगी नाकारली. आम्ही त्यांना म्हटले शोभायात्रेची वेळ सायंकाळी चारची आहे, तरी आम्हाला परवानगी द्यावी. मात्र जेवढे कार्यकर्ते उपस्थित होते त्या सगळ्यांना पोलिसांनी घेराव घातला. यावेळी आम्ही फक्त घोषणा देत होतो. यावेळी पोलिसांनी सांगितले आत चालायला, तसे आम्ही निघालो, मग त्यांनी लाठीचार्ज का केला? असा सवाल संतप्त कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणी बजरंग दल, तसेच इतरही हिंदुत्ववादी संघटना जमल्या असून येथील परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे समजते. मंत्री व भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती. मात्र कुठलीही प्रतिक्रिया न देता गेल्याचे समजते. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
ट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अनेक नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमांच्याविरोधात आता अमेरिकेत ट्रम्प यांच्या विरोधात लोकांचा रोष उफाळून आला आहे. पुन्हा एकदा हजारो निदर्शकांनी अमेरिकेत निषेध रॅली काढली, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा तीव्र विरोध केला. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागो सारख्या शहरांमध्ये ५ एप्रिल रोजी झालेल्या निदर्शनांपेक्षा कमी […] The post ट्रम्प विरोधात हजारो लोक रस्त्यावर, देशभर निदर्शने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .