SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

23    C
... ...View News by News Source

उपोषणाचा तिसरा दिवस:घोटी-त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात आंदोलन सुरूच; भूसंपादन अधिकारी, प्रांत अधिकाऱ्यांनी घेतली भेट

प्रतिनिधी | घोटी घोटी ते त्र्यंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० साठी भूसंपादन करू नये या मागणीसाठी इगतपुरी तालुका कृती समिती गेल्या महिन्याभरापासून शासकीय कार्यालयांत पाठपुरावा करत आहे. भूसंपादनावर शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर कुठलाही विचार न करता व शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता अधिसूचना प्रसारित केली आहे. प्रशासनाकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याने कृती समितीने आता आहुरली येथे साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता. शासनाने सिंहस्थाच्या नियोजनात घोटी - त्र्यंबकेश्वर मार्गाच्या चौपदरीकरणासाठी व रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, सचिव गोरख वाजे, सल्लागार सदस्य अरुण पोरजे, उपाध्यक्ष सपन परदेशी, विवेक कुटके, सहसचिव अॅड. भरत कोकणे तसेच प्रकल्पग्रस्त गावांतील शेतकरी उपोषणात सहभागी झाले आहेत. उपविभागीय अधिकारी पवन दत्ता, भूसंपादन अधिकारी रवींद्र भारती, नायब तहसीलदार धनंजय लचके, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी संतोष अहिरे, पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी उपोषण स्थळी भेट दिली. मात्र, प्रकल्पबाधित शेतकरी अजूनही भूमिकेवर ठाम आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उदय जाधव, भाजपचे भास्कर गुंजाळ, उत्तम भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस उमेश खातळे, अॅड. खातळे, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब धुमाळ तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी आणि आहुरली परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. ^विविध प्रकल्पासाठी इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सातत्याने संपादित होत आहेत. आता घोटी- त्र्यंबकेश्वर या राष्ट्रीय महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित होत असल्यामुळे व्यावसायिक व शेतकरी भूमिहीन होत आहेत. त्यामुळे शासनाने तालुक्यातील या शेतकऱ्यांचा विचार करून भू संपादन त्वरित थांबवावे, अशी आमची मागणी आहे. - नागेश गायकर, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:59 am

प्रभाग क्र. ३१ मध्ये विस्कळीत पाणीपुरवठा, नागरिक संतप्त:नागरिकांनी माजी नगरसेवक, इच्छुकांनाच धरले धारेवर‎

प्रतिनिधी | सिडको प्रभाग क्र. ३१ मधील नागरे मळा, सम्राट सिंपणी, समर्थनगरसह परिसरात ऐन दिवाळी सारख्या सणासुदीपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून या समस्येने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी माजी नगरसेवकांसह इच्छुकांनाच धारेवर धरत समस्यांची जाणीव करून दिली. नागरे मळासह या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी असतानाही केवळ पाणीपुरवठा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे या भागात कमी दाबाने पाणी येते. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तसेच या भागात इतर मूलभूत सुविधांची ही वाणवा असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहेत. घंटागाडी नियमित येत नाही. या भागातील महिलांनी समस्या सोडवण्यासाठी प्रभागाचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांच्यासह इच्छुकांना भेटून निवेदन देत जाब विचारला. यामध्ये पूजा तेलंग, ज्योती गायकवाड यांच्याकडे निवेदन दिले आहे. नागरे नगर मधील स्थानिक मंडळाचे संस्थापक बाळासाहेब नागरे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या समस्यांची माहिती देऊन तातडीने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. ही समस्या न सोडविल्यास ऐन पालिका निवडणूकीच्या तोंडावरच रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:57 am

सातपूर ब्राह्मण सभेच्या संमेलनात स्पर्धा:विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम

तुलसी विवाहानिमित्त सातपूर ब्राह्मण सभेचे स्नेहसंमेलन पार पडले. नाशिक ब्राह्मण सभा महिला अध्यक्ष सोनाली कुलकर्णी, सातपूर ब्राम्हण सभा अध्यक्ष नीलेश जोशी, मीनल कुलकर्णी, संदेश पाठक, अशोक देशपांडे यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मयूरेश हातवळणे, सुहास जगताप यानी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. या वेळी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:55 am

राजकीय भांडणात मतदारांचे प्रश्न हरवले, मूलभूत प्रश्नांवर होणार निवडणूक:खुलताबादेत शहराची हद्दवाढ, ट्रॉमा केअर सेंटर, रस्ते, पाणी, स्वच्छतेचा मुद्दा महत्त्वाचा;

खुलताबाद शहर हे सुफी संतांची भूमी आहे. पवित्र भद्रा मारुती तीर्थक्षेत्र आहे. या शहरात वयोवृद्धासाठी उद्यान नाही. शहरात एकही सार्वजनिक शौचालय नाही. शहरात वेळेवर व शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही. येथे तरुणासाठी रोजगार नाही. व्यायामशाळा तसेच क्रीडांगण नाही. राष्ट्रीय-आंतरराष्ट ्रीय स्पर्धे मध्ये टिकण्यासाठी जे साहित्य लागते ते उपलब्ध नाही. ट्रॉमा केअर सेंटर नाही. खुलताबाद हद्दवाढीच्या विषयाकडे अश्वासन देणारे राजकीय पुढारी वळून पाहत नाही. ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण झाले नाही. करोडो रुपये मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजना काम संथगतीने सुरू असून त्या कामाकडे कोणी लक्ष देत नाही. तटबंदी दरवाजे दुरुस्त झाले नाही असे अनेक प्रश्न खुलताबाद शहरात प्रलंबित आहेत. शहराची हद्दवाढ, अपूर्ण रस्ते, पाणी आणि स्वच्छता हे प्रश्न कायम आहेत. पाणीपुरवठा योजना मंजूर असूनही काम अपूर्ण असल्याने नागरिकांना आजही नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पाणीप्रश्न बुहुतांश भागात गंभीर आहे. आठवड्याला एकदाच नळाला पाणी येते. शहरात भूमिगत गटार योजनेसाठी सर्वत्र रस्ते फोडून पाइपलाइन टाकून अनेक दिवस लोटले आहे. मात्र शहरात अनेक भागात अद्यापही पूर्ण नव्याने अंतर्गत रस्ते झाले नाही. दरवाजांचे सुशोभीकरण नाही खुलताबाद शहरात शेकडो वर्षे जुने ऐतिहासिक ७ तटबंदी दरवाजे आहेत. नक्कार गेट वगळता इतर गेटची अद्यापपर्यंत दुरुस्ती किंवा सुशोभीकरण झाले नाही. खेळाचे मैदान, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नसणे, महिला स्वच्छतागृह नसणे, शासकीय दवाखान्यात सर्व आजारांवर उपचार उपलब्ध नसणे अशा अनेक समस्या आजही आहेत. पर्यटनस्थळाकडे दुर्लक्ष खुलताबाद शहर हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ व बहुधर्मीय धार्मिक शहर आहे. या शहरात भद्रा मारुती मंदिर असून प्रसिद्ध जरजरी जर बक्ष दर्गा यासह अनेक मंदिर- मशिदी व दर्गाह आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सतत दुर्लक्षामुळे जसा विकास व्हावा तसा विकास झाला नाही. निवडणुका होतात पण विकास नाही अनेक राजकीय लोक लोकांच्या मतांवर निवडून येतात. ५ वर्षे निघून जातात. पुन्हा राजकीय मंडळी येतात, आश्वासन देतात. विकास होऊ न होऊ पैशांच्या जीवावर, आमिषे दाखवून, साड्या, फराळ वाटप, होम मिनिस्टर स्पर्धा, लकी ड्रॉ स्पर्धा घेऊन मतदारांना भुलवले जाते. हेच चक्र वर्षानुवर्षे सुरू आहे. -अलका मोरे, रहिवासी या वस्त्यांना सुविधा नाहीत खुलताबाद शहरालगत राजीव गांधीनगर किमान २०० पेक्षा जास्त घरे असून शेकडो कुटुंबे या वस्तीमध्ये गेल्या २५ वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून राहत आहेत. शहराची हद्दवाढ झाली नसल्याने या वस्तीमध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. २१ कोटी योजनेचे काम संथगतीने खुलताबाद शहरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायम दूर होण्यासाठी २१ कोटींची नवीन पाण्याची योजना ३ वर्षांपूर्वी मंजूर झाली आहे. काम सुरू होऊन ३ वर्षे उलटली. सध्या संथगतीने काम सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:33 am

पाटेगाव येथील महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न:अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड

प्रतिनिधी| पैठण पाटेगाव येथील कौशल्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय खेळाडूंचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेखर पाटील, क्रीडा उपसंचालक छ. संजय गाढवे, जिल्हा क्रीडा अधिकारी जालना महेश खर्डेकर, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी परभणी यांनी उपस्थिती लावली. व्यासपीठावर क्रीडा शिक्षक प्रा. लक्ष्मण म्हस्के, सचिन सेवनकर, डॉ. सोमनाथ टाक, लक्ष्मण सपकाळ, गणेश भाकरे, कैलास वाघमारे, किशोर काटे, संदीप हंबर्डे उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेत सलग तीन वर्षे सिल्वर मेडल व एकदा गोल्ड मेडल मिळवणारी तृप्ती भवर, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सहभागी अमोल दत्तात्रय टेके व तुषार डांगे, किशोर गटातील पियुष गोरे, योगेश आघाव, पुणे कबड्डी असोसिएशनचे साईराज जाधव, कुस्तीपटू संकेत भवर, मैदानी स्पर्धेतील कुणाल राठोड यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारप्रसंगी खेळाडूंना मेडल, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देण्यात आले. कार्यक्रमाला बालाजी नलभे, नंदकिशोर पातकळ, स्वप्नजा पाटील, विजय सपकाळ, सोन्याबापू पालवे, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश कामडी, अमोल गायकवाड, निखिल पापुलवार, सतीश पवार, महेश गायकवाड, विठ्ठल त्रिभुवन यांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:30 am

लासूर स्टेशन येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्राचा झाला उत्साहात शुभारंभ:कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना अडचण‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा पहिल्यांदाच कापूस खरेदीसाठी पूर्णपणे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘कपास किसान’ अ‍ॅपवर नोंदणी करताना एकरी ११ क्विंटल १२ किलो कापसाची अट घालण्यात आली आहे. ही अट अनेक शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे बोंड काळे पडले. उत्पादन घटले. त्यामुळे अनेकांना ही अट पूर्ण करणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कापूस विकावा लागतो. मात्र, तिथे मनमानी दर दिले जात आहेत. सीसीआयकडून खरेदीसाठी लावलेल्या अटींमुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ‘कपास किसान’ अ‍ॅपवर आपली माहिती भरावी लागते. त्यासाठी २०२५-२६ ची अद्ययावत सातबारा, महसूल प्राधिकरणाने प्रमाणित केलेली पिक लागवडीची नोंद, आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो अशी अनेक कागदपत्रं लागतात. ही सर्व प्रक्रिया मोबाईलवर करावी लागते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सीसीआयच्या नियमानुसार एका हेक्टर सातबाऱ्यावर ११ क्विंटल १२ किलो कापूसच खरेदी केला जातो. त्यामुळे उत्पादन कमी असलेल्या शेतकऱ्यांना केंद्रावर कापूस विक्री करता येत नाही. शेतकऱ्यांना बाजार समिती प्रशासनाकडून आवाहन लासूर बाजार समिती अंतर्गत वैरागडजवळील रुद्रानी जिनिंग येथे मंगळवारपासून खरेदी सुरू झाली. पाच दिवसांत ६० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. कापसाला दर्जानुसार ७,८९८ रुपये आणि ७,८५८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सीसीआयच्या नियमात बसणारा कापूसच विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या वेळी सचिव संतोष पवार, सीसीआयचे ग्रेडर दीपक पाटोळे, उपसचिव अमोल नरोडे, संतोष दिवेकर, नकुल म्हस्के, शेतकरी शांताराम जाधव आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:30 am

शहीद सुभेदार सांडू दांडगे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा:त्यांच्या बलिदानाचा अभिमान आजही ग्रामस्थांच्या मनात

प्रतिनिधी| सारोळा मराठा बटालियनचे शूर सैनिक सुभेदार सांडू दांडगे यांच्या स्मृतीसाठी सारोळा गावात उभारलेल्या पुतळ्याचे लोकार्पण देशभक्तीच्या जयघोषात पार पडले. १७ जुलै २००५ रोजी जम्मू-काश्मीर सीमेवर लढताना त्यांनी प्राणार्पण केले. त्यांच्या बलिदानाचा अभिमान आजही ग्रामस्थांच्या मनात आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी सैनिक फेडरेशन, माजी सैनिक संघटना, तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “शहीद सुभेदार सांडू दांडगे अमर रहे” अशा घोषणा दिल्या. संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला. सुभेदार दांडगे यांच्या मागे तीन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांचा लहान मुलगा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तो देशसेवा करत आहे. या लोकार्पण सोहळ्यामुळे सारोळा गाव पुन्हा एकदा शौर्य, प्रेरणा आणि देशभक्तीने उजळले. ग्रामस्थांनी ठरवले की अशा वीरांच्या कार्याची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवायची. त्यामुळे प्रत्येक तरुणाच्या मनात “देश प्रथम” ही भावना रुजेल.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:28 am

लासूरगावामधील बदली झालेल्या शिक्षकांना निरोप:तीन शिक्षकांचा भावनिक वातावरणात निरोप

प्रतिनिधी | लासूरस्टेशन लासुरगाव येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्रशालेतून बदली झालेल्या तीन शिक्षकांचा भावनिक वातावरणात निरोप घेण्यात आला. मुख्याध्यापक सुरेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. श्रीमती हुरबानो पटेल, मच्छिंद्र बडोगे सर आणि श्रीमती विजया वट्टमवार यांनी अनेक वर्षे शाळेत सेवा बजावली. त्यांच्या जागी कैलास पवार, पांडुरंग गोरे आणि सुधीर भदाने यांनी नव्याने रुजू होऊन कार्यभार स्वीकारला. निरोप समारंभात शिक्षकांच्या शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा, विद्यार्थ्यांशी असलेल्या स्नेहसंबंधांचा आणि निष्ठेचा उल्लेख झाला. त्यामुळे वातावरण भावुक झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी प्रेम, आदर आणि आठवणी व्यक्त केल्या. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र देशमुख, उपाध्यक्ष वाल्मिक हरिश्चंद्रे, सदस्य प्रभू गोंडे, प्रभू कांगुणे, वैष्णवी आगवणे यांची उपस्थिती होती. महेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालनाचे मार्गदर्शन केले. कु. सृष्टी साबळे आणि आरती आगवणे यांनी सूत्रसंचालन केले. शाळेचे शिक्षक संभाजी धोंगडे, प्रदीप विसपुते, महेश खेडेकर, विकास भराडे, दिलीप घोडके, संजय हरणे यांनी परिश्रम घेतले. सौ. मीना भाले, पुनम गवांदे, स्वाती त्रिभुवन, सुप्रिया शेजुळ, शादाब देशमुख, संतोष डिगोळे, सुशिल वाघ आणि मावशी शारदा नवगिरे यांनी नियोजनात सहभाग घेतला. निरोप घेणाऱ्या शिक्षकांनी शाळेला सहा फूट उंचीची शिडी आणि फॅन भेट दिला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:28 am

उत्पादनक्षम गहू वाणांवर पोरगाव येथील चर्चासत्राला मिळाला भरघोस प्रतिसाद:पैठण तालुक्यातील ३०० हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग‎

प्रतिनिधी | पोरगाव पैठण तालुक्यातील पोरगाव येथे देहात कंपनी व पंचावतार कृषी सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गहू बियाण्यांवरील चर्चासत्र उत्साहात पार पडले. देहात कंपनीचे महाराष्ट्र राज्य डेप्युटी जनरल मॅनेजर विशाल राजेभोसले यांनी डीडब्ल्यूएस ५५५ व डीडब्ल्यूएस ७७७ या गहू वाणांची सविस्तर माहिती दिली. या वाणांना उत्कृष्ट चव व उच्च उत्पादनक्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी या वाणांची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. देहातचे मराठवाडा प्रमुख विशाल सोमदे यांनी संस्थेची शेतकरी-केंद्रित भूमिका स्पष्ट केली. बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी देहात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. कॅटेगरी लीड भूषण बोरसे यांनी देहातच्या नव्या मका वाणांची माहिती दिली. या चर्चासत्राला पैठण तालुक्यातील ३०० हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. देहातचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे व्यवस्थापक प्रताप तांदळे यांनी देहात वाणांपासून भरघोस उत्पादन घेतलेल्या दहा शेतकऱ्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशासाठी वैभव भोसले, भूषण शितोळे, गोपाळ पाटील, समाधान काकडे व प्रल्हाद आरगडे यांनी मेहनत घेतली. शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डीडब्ल्यूएस ५५५ या गहू वाणाचे वैशिष्ट्य डीडब्ल्यूएस ५५५ वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे लांब व चमकदार दाणा, गडद गव्हाळ रंग, उत्कृष्ट चव, ओंबी अवस्थेत न पडणारा व १००० दाण्यांचे वजन ४८ ग्रॅम आहे. डीडब्ल्यूएस ७७७ वाणाचा दाणा बुटका व ठोसर असून एमपी सिहोर शरबती दर्जाची चव, उत्तम उत्पादनक्षमता व १००० दाण्यांचे वजन ४६ ग्रॅम आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:27 am

शेती उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या:नुकसान भरपाईही मिळाली नाही

प्रतिनिधी | देवगाव रंगारी सततच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यात अतिवृष्टीमुळे उरलेले पीकही नष्ट झाले. नुकसान भरपाईही मिळाली नाही. या संकटाला कंटाळून देवगाव रंगारी येथील शेतकरी ठगण चिमाजी पगार यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.१६) घडली. ठगण पगार हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांची शिवूर शिवारात गट क्रमांक ७९० आणि ७९२ मध्ये दीड एकर शेती होती. त्यांनी उधारीवर पैसे घेऊन शेतीत गुंतवणूक केली होती. मात्र, मेपासून सुरू असलेल्या पावसामुळे पीक उध्वस्त झाले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:26 am

मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यक्रमात पीएमओ सचिव सांगणाऱ्या तोतयाला बॉडीगार्डसह अटक:तिसगाव येथे एका विवाह सोहळ्यातील प्रकार; पोलिस उपायुक्तांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात पीएमओ सचिव कार्यालयातील अधिकारी असल्याचा बनाव करून सत्कार स्वीकारणाऱ्या एका तोतयाला पोलिस उपायुक्तांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. विशेष म्हणजे या तोतयाचा एक बॉडीगार्डदेखील होता, त्यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना रविवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी एमआयडीसी वाळूज परिसरात घडली. अशोक भारत ठोंबरे (४५, रा. दिल्ली, मूळ रा. उंदरी, ता. केज, जि. बीड) असे तोतयाचे तर विकास प्रकाश पांडागळे (रा. पुणे) असे त्याच्या बॉडीगार्डचे नाव आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील तिसगाव येथे एका विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. विवाहस्थळी मंचावरून अशोक भारत ठोंबरे पीएमओ सिक्युरेटी असे नाव पुकारले गेले. याबाबत पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना नसल्याने उपआयुक्त पंकज अतुलकर यांच्या निर्देशानुसार ठोंबरेची पडताळणी केली. आधी पीएमओ, नंतर नीती आयोगाचा सदस्य पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी ठोंबरे यांना चौकशीसाठी बाजूला घेतले असता त्यांनी प्रथम स्वतःला पीएमओ सचिव, नंतर नीती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगितले. तोतयाच्या सुटकेसमध्ये असलेल्या दोन पाट्या, राष्ट्रध्वज जप्त ठोंबरेच्या सुटकेसमध्ये भारत सरकार अशी मराठी पाटी, इंग्रजी बोर्ड आणि एक छोटा राष्ट्रध्वज अशा वस्तू सापडल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. या साहित्याचा वापर करून तो सरकारी अधिकारी असल्याचे भासवत होता. ठोंबरे याने विकास पांडागळे याला बॉडीगार्ड म्हणून ठेवले होते. तोही या तोतयागिरीत सक्रिय होता.त्यामुळे दोघांवर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:24 am

कुत्रीच्या भुंकण्यामुळे मान वर करून पाहिले तर समोर बिबट्या उभा:दरेगावच्या साबळे दांपत्याने सांगितली भाकरीला जागलेल्या कुत्रीमुळे जीव वाचल्याची थरारकथा

“मी शेतात शेंगा, तर माझे पतीही जवळच गवत काढत होते. अचानक कुत्री जोरजोरात भुंकू लागली. मी वर पाहिले तर साधारण १५ फुटांवर तीन-साडेतीन फूट उंचीचा धिप्पाड बिबट्या होता. कुत्री त्यांच्या अंगावर भुंकत होती. मी घाबरून पटकन पतीजवळ पळत गेले. तेवढ्यात बिबट्या कुत्रीच्या अंगावर धावून गेला. कुत्री रस्त्यावर पळाली तसा बिबट्या आमच्याकडे वळून पाहू लागला. आम्ही दोघेही उभे राहून जोरजोरात ओरडू लागलो. त्यामुळे कदाचित तो मागे फिरला आणि शेताच्या बांधावरून शेजारच्या उसाच्या पिकात गेला. त्याच्या सोबत एक छोटा बछडाही होता..” सांगत होत्या कविता दीपक साबळे. चाळीसगाव तालुक्यातील दरेगावच्या कविता साबळे साधारण चाळिशीच्या घरातल्या. पती आणि त्या रोजच शेतात येतात आणि मजुरांबरोबर काम करतात. पण आजकाल बिबट्याच्या भीतीने मजूर शेतात यायलाच तयार होत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा त्या दोघांनाच शेतात काम करावे लागते. “खरे तर आमचा जीव ‘ज्युली’ने वाचवला,’ दीपक साबळे सांगत होते. ज्युली हे त्याच कुत्रीचे नाव, जी बिबट्याला पाहून भुंकायला लागली अन् त्यामुळे साबळे दांपत्य सावध झाले. ती भुंकली नसती तर दोघेही खाली वाकून काम करत होते आणि त्यांचा घास घेणे बिबट्याला सहज शक्य होते. ही ज्युली समोरच्या शेतात असलेल्या समाधान साबळेंनी पाळलेली. पण रस्ता ओलांडून ती रोज दीपक आणि कविता साबळेंच्या शेतात येते. कारण दुपारी जेवताना ते रोज तिला आपल्या शिदोरीतली भाकरी देतात. त्या भाकरीलाच ती जागली, असे कविता यांना वाटते. ही घटना घडल्यावर समाधान साबळेंनी ज्युलीच्या गळ्यात लोखंडाचा एक काटेरी पट्टा बांधून दिला आहे. दरेगाव, वरखेडे, लोंढे या परिसरात एक नाही अनेक बिबटे आहेत, असे सरपंच गिरीश पाटील सांगत होते. त्यांच्याच ग्रामपंचायतीत वाॅटरमन म्हणून काम करणारे योगेश सोनवणेंनीही महिनाभरापूर्वी असाच १० फुटांवरून बिबट्या पाहिला. ‘त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि माझी तर पाचावर धारण बसली. दरेगावापासून एक ते दीड किलोमीटरवर तो रस्ता ओलांडून एका बाजूला उभा होता. त्यानंतर काही दिवस तिकडे फिरकायची हिंमतच होत नव्हती,’ सोनवणे सांगत होते. त्यांना दिसल्यानंतर १० दिवसांनीच हरी साबळेंच्या मुलाला आणि सुनेला बिबट्या दिसला होता. ती मादी होती आणि आपल्या बछड्याला शिकारीचे प्रशिक्षण देत होती, असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. बिबट्याच्या रूपाने मृत्यू असा समोर आलेला पाहिल्यानंतर किती दिवस शेतात आला नाहीत? असे साबळे दांपत्याला विचारले. ते म्हणाले, न येऊन कसे चालेल! शेतात आधीच मजूर यायला तयार नसतात. जे तयार होतात त्यांना आम्हीही शेतात हवे असतो. मग आम्ही येताना ताट, चमचे, सुतळी बॉम्ब घेऊन येतो. आधी चारही बाजूला ताट वाजवून येतो. सुतळी बॉम्ब फोडतो आणि नंतर कामाला सुरुवात करतो. साबळे हे सांगत असतानाच एक जण सरपंचांना सांगायला आला की, धनगरवाड्यातील एका शेतात बिबट्याने गायीचे वासरू मारले. मग चार दिवसांपूर्वी कोणाच्या शेतात दिसला, सहा दिवसांपूर्वी कोणाच्या गोठ्यातले वासरू मारले असे एकेक किस्से आणि त्यामुळे निर्माण झालेली ग्रामस्थांच्या मनातली दहशत समाेर यायला लागली. संध्याकाळ व्हायला लागली तसे सर्वांनाच घरी जाण्याचे वेध लागले होते. साडेसहा, सातनंतर कोणी घराच्या बाहेर निघत नाही, अंगणाच्या कुंपणाला असलेले फाटक आणि घराची दारे बंद होतात, असे तिथे जमलेले इतरही ग्रामस्थ सांगत होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:15 am

एकरी 40 ऐवजी एआय तंत्रज्ञानाने िनघाला 95 टन ऊस:नवे युग- बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने 66 वर्षीय शेतकऱ्याने केली किमया

जेथे ऊस लागवडीसाठी एकरी ५७ ते ६० हजार रुपये खर्च येत हाेता तेथे बारामतीच्या अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राच्या साहाय्याने एआयच्या वापराने ४० ते ४२ हजार रुपये खर्च येऊ लागला आहे. तसेच एकरावर ४० टन ऊस येत होता. तेथे ९५ टन उसाचे उत्पादन घेतले. आर्थिक लाभही दीडपट वाढला. ही किमया प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली आहे बारामती तालुक्यातील निंबुत शिवारातील सुरेश जगताप या ६६ वर्षीय शेतकऱ्याने. त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पारंपरिक शेती अशा दाेन्ही पद्धतीने ऊस लागवड केलेले दोन स्वतंत्र प्लॉट तयार केले होते. त्यातून एआय तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या शेतीत ऊस उत्पादन ६० टक्क्यांपर्यंत वाढले तर खर्च आणि पाण्यातही ३० टक्क्यांची बचत झाली. जगताप यांनी शेतात एक व्हर्टिकल रचना केली. ज्यावर वारा, पाऊस, सौरऊर्जा, तापमान आणि आर्द्रता मापक यंत्रे आहेत आणि तळाशी आर्द्रता, आम्लता किंवा क्षारता, विद्युत चालकता आणि पोटॅशियम आणि हायड्रोजनसारखे पोषक घटक मोजण्यासाठी सेन्सर आहेत. यातील डेटा उपग्रह आणि ड्रोन प्रतिमा तसेच ऐतिहासिक डेटासह एकत्रित केला जातो आणि नंतर त्याचे विश्लेषण करून मोबाइल अॅपद्वारे ते उपलब्ध हाेते. माळरानावरील जमिनीवर नदीकाठच्या जमिनीसारखे उत्पादन जगताप यांनी सांगितले की, मी व माझे बंधू संभाजीचे (५७) कुटुंब शेतात राहते. माझा कृषी पदवीधर मुलगा तेजस एआय प्रणालीवर काम करताे. आमची जमीन माळरानावरील असल्याने आम्ही भाज्या आणि फळांचेच उत्पादन घेत आलाे आहाेत. गेल्या वर्षी ऊस लागवड काळात आम्ही प्रतापराव पवारांनी सुरु केलेल्या संस्थेच्या मदतीने एआय तंत्रज्ञान वापरत ऊस उत्पादनाचा प्रयाेग यशस्वी केला. नदी, कॅनॉलजवळील शेतीप्रमाणे आमच्या माळरानावरील जमिनीवर उत्पन्न घेतले. पिकावर रोगाचा रेड अलर्ट मिळतो पिकांवर राेग येणार असेल तर मोबाइलवर रेड अलर्ट मिळताे. जमिनीची आर्द्रता किती, खते कधी आणि किती द्यायची हे समजत हाेते. माझ्या ९५ टन उसाला साेमेश्वर कारखान्याकडून ३७०० ते ४ हजारांचा दर मिळून सुमारे दीड लाख रुपयांचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. माझी नवीन पिढीही शेतीच करणार आहे. -सुरेश साेपानराव जगतापपाण्यासह खते, कीटकनाशकाची बचत जगताप म्हणाले की, नव्या तंत्रज्ञानाच्या सूचनांनुसार आम्हाला ४२ कांडी ऊस मिळाला. कापणीच्या वेळी त्याचे वजन ३० ते ४० टक्के जास्त भरले. २० टक्के जास्त सुक्रोज मिळाले. पीक चक्र १८ महिन्यांऐवजी १२ महिन्यावर आले. पाण्याची बचत ५० टक्के, (अंदाजे ८०,००,००० लिटर) खतांची बचत ३१ टक्के झाली. कीटकनाशकही २५ टक्केच लागले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:12 am

काँग्रेसने स्पष्ट नकार दिल्यावर 24 तासांनी उद्धवसेनेचे स्वबळाचे संकेत:आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ; उद्धव ठाकरेंनी बजावले

मुंबई मनपात उद्ध‌वसेना, मनसेशी आघाडी करणार नाही, असे शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यानंतर २४ तासांनी उद्धवसेनेने स्वबळाचे संकेत दिले. रविवारी सकाळी काँग्रेसविषयी अतिशय जपून बोलत उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचा निर्णय घेण्यास ते (काँग्रेस नेते) समर्थ आहेत. आमचा निर्णय घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. दरम्यान, मुंबई मनपासाठी ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास मुंबईपुरती मविआची मोट तुटेल. मात्र, राज्यभरात ती सोयीनुसार अस्तित्वात असेल. उत्तर भारतीयांची मते राखण्यासाठी मनसेची संगत नको. म्हणून काँग्रेसने स्वबळाचा ठाम निर्णय घेतला. काही काही वॉर्डांमध्ये काँग्रेस समर्थक दलित, मुस्लिम मतांची उद्धव ठाकरे यांना आशा आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसविषयी सा‌वध भूमिका घेत भाजपवर तुफान टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांना उद्धवशैलीतील खास टोमणे मारणेही टाळले. बिहारच्या निकालाचे गणित अनाकलनीय उद्धव यांनी असाही सवाल केला की, तेजस्वी यादवांच्या सभेला गर्दी एआयची होती का ? ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या. त्यांचे सरकार आले. बिहारचे गणित अनाकलनीय आहे. भाजप प्रादेशिक पक्ष संपवायला निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बिहारच्या निकालावर जो जीता वही सिकंदर असे म्हटले होते. त्यावर उद्धव म्हणाले की, सिकंदर बनण्यामागचे रहस्य आजपर्यंत कोणी समजू शकलेले नाही. निवडणूक आयोग दुबार नोंदणी, बोगस पत्त्यांवर द्यायला तयार नाही असेही ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:10 am

उमेदवार पळवापळवी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची गोपनीय रणनीती:पैठणच्या जागेसाठी अनिल पटेल–उद्धव ठाकरे यांच्यात थेट चर्चा

छत्रपती संभाजीनगरात उबाठाने सातपैकी सहा नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढवण्याची तयारी पूर्ण केली आहे. महाविकास आघाडीत याबाबत तोडगा निघत नसल्याची सध्याची स्थिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून फुलंब्रीतून आनंदा ढोके, गंगापूरमधून ऋषिकेश पाटील, वैजापूरमधून संजय बोरनारे आणि सिल्लोडमधून समीर सत्तार यांची नावे अंतिम होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पैठणमध्ये स्वाती पाटील व विद्याभूषण कावसानकर यांच्या नावांची चर्चा असून लवकरच याची घोषणा केली जाणार आहे. उद्धवसेनेचे गंगापूरचे उमेदवार भाजपमध्ये गेल्यानंतर पुन्हा उद्धवसेनेत आले. मात्र, उमेदवारांच्या पळवापळवीमुळे उद्धवसेनेने उमेदवारांच्या नावाबाबत गुप्तता बाळगली जात आहे. विशेष म्हणजे, शनिवारी संध्याकाळी पैठण नगराध्यक्षपदावरून थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसच्या वतीने अनिल पटेल यांनी चर्चा केली. पण, तोडगा निघाला नाही. फुलंब्रीतून राजेंद्र ठोंबरे तर पैठणमधून अपर्णा गोर्डे उद्धवसेनेकडून, फुलंब्रीतून राजेंद्र ठोंबरे, गंगापूर अविनाश चव्हाण. उबाठाच्या वतीने फुलंब्रीतून राजेंद्र ठोंबरे यांचे नाव अंतिम केल्याचे कळते. पैठणमध्ये अपर्णा गोर्डे व राखी परदेशींपैकी अपर्णा गोर्डे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्यांना संधी दिली जाईल त्यांना निवडून आणणार असल्याचे शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांनी सांगितले. पैठणच्या नगराध्यक्षपदावरून थेट उद्धव ठाकरेंपर्यंत चर्चा पैठणमध्ये नगराध्यक्षपदावरून उद्धवसेना आणि काँग्रेस अडून बसली आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिल पटेल यांनी फोनवरून थेट उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून ही जागा काँग्रेसला सोडण्याची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनीच पैठणमध्ये ही चर्चा घडवून आणली. मात्र पैठणबाबत निर्णय झालेला नाही. काँग्रेसकडून दोन वेळा नगराध्यक्ष राहिलेले माजी नगराध्यक्ष सोमनाथ जोशी यांची सून सुनेती जोशी यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली. उद्धवसेनेकडून केवळ खुलताबादची जागा काँग्रेसला दिली आहे. चर्चा सुरू, तोडगा न निघाल्यास स्वतंत्र लढणार आम्ही नगरपालिकाबाबत भाजपसोबत चर्चा करत आहोत. महायुतीत निवडणूक लढवण्याची आमची इच्छा आहे. मात्र तोडगा न निघाल्यास आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. - संजय शिरसाट, पालकमंत्री. आम्ही नगराध्यक्षपद लढवणार पैठणमधून काँग्रेस निवडणूक लढवणार. पैठणची नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. विधानसभा निवडणुकीला आम्ही शिवसेनेला मदत केली होती. त्यामुळे शिवसेनेने उमेदवार दिल्यास काँग्रेसदेखील उमेदवार देणार आहे. - अनिल पटेल, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस. नाव अंतिमतेसाठी चाचपणीकन्नड मतदारसंघातून शहरप्रमुख विश्वनाथ त्रिभुवन यांचे नाव पक्षाकडून दिले आहे. पक्षाच्या पातळीवर याचा अंतिम निर्णय होईल, असे माजी आमदार उदयसिंह राजपूत यांनी सांगितले. सिल्लोडमध्ये सत्तार यांना धक्का देण्यासाठी रणनीती आखली जात आहे. वैजापूरमध्येदेखील शिवसेनेचे काही पदाधिकारी शिवसेना सोडण्याच्या चर्चा असल्यामुळे नाव अंतिम करण्याबाबत चाचपणी केली जात आहे.उद्धवसेना सहा ठिकाणी नगराध्यक्षपदी उमेदवार देणार छत्रपती संभाजीनगरात सातपैकी सहा ठिकाणी उबाठा नगराध्यक्षपदाचे उमेदवार देणार आहेत. खुलताबादमध्ये आम्ही काँग्रेसला सोडली आहे. आमची तयारी पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी उमेदवार सत्ताधाऱ्याकडून पळवले जात असल्यामुळे आम्ही उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. - चंद्रकांत खैरे, नेते, उबाठा.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:59 am

मध्यरात्री थरार:नांदेडला छतावरून पळणाऱ्या गुंडाने पिस्तूल रोखताच पोलिसांनी गोळी झाडून केले जखमी; कमरेत लागली गोळी, जखमी अवस्थेत रुग्णालयात

कुख्यात गुन्हेगार रबज्योत सिंह ऊर्फ गब्या याला पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता अटक केली. संशयित रबज्योत सिंह हा भगतसिंह रस्त्यावरील निधानसिंह कॉलनीतील आपल्या घरी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी त्याच्या घराला वेढा घातला. पोलिसांना पाहून संशयित लपण्यासाठी छतावर पळाला. पोलिसांनी छतावर चढून त्याला शरण येण्याचा इशारा दिला. त्यानंतर त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखले. त्यामुळे पोलिसांनी बचावासाठी त्याच्यावर गोळी झाडली. कमरेला गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेऊन संशयिताला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वजिराबाद पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गब्याला अटक करण्यासाठी मध्यरात्री १२.३० वाजता पोलिसांचे पथक गेले होते. पथकाला पाहून गब्याने छतावर धाव घेतली. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांवरच पिस्तूल रोखून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिस अंमलदार गणेश धुमाळ यांनी बचावात्मक कारवाई करत त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी त्याच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली होती. मात्र बचावासाठी गब्या खाली वाकल्याने गोळी त्याच्या कमरेजवळ लागली. त्याच्यावर विष्णुपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर अंमलदार धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भारती करत आहेत. गब्यावर खंडणी वसुलीसह विविध गंभीर गुन्हा दाखल आहेत. अनेक गुन्हे, दीर्घकाळ फरारकुख्यात रबज्योत सिंहवर स्थानिकांना धमकावणे, खंडणी उकळणे, गुन्हेगारी टोळ्यांमार्फत वसुली, प्राणघातक हल्ला असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो दीर्घकाळापासून फरार होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:56 am

नाशकात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचे समुपदेशन केंद्र ठरले वरदान:जीवनाची लढाई हरलेल्या 50 जणांना आयुष्याची नवी दिशा

पोलिस दलातील निवृत्त सहायक आयुक्त डाॅ. सीताराम कोल्हे यांनी मनोचिकित्सकाची पदवी घेत नाशिकमध्ये समुपदेशन केंद्र सुरू केले. अायुष्याची लढाई हरलेल्या ५० हून अधिक जणांच्या अायुष्याला अवघ्या ८ महिन्यांत त्यांनी नव्याने जीवन जगण्याची उभारी दिली. त्यात ४ इंजिनिअर, ३ डॉक्टर, २ सीए तसेच ४ उद्योजकांचाही समावेश आहे. समुपदेशनानंतर नैराश्याला झटकून आयुष्याची नवी वाट सापडलेल्यांची कहाणी त्यांच्याच शब्दांत... अनुभव - ४ इंजिनिअर, ३ डॉक्टर, २ सीए, ४ उद्योजकांना सापडली वाट सीएला ६ वेळेस नापास, नैराश्य, ७ व्या प्रयत्नात बाजी सीए परीक्षेत ६ वेळा नापास झाले. नंतर परीक्षेला गेले की चक्कर येऊन पडायचे. परीक्षेच्या फोबियाने एकाकी जीवन जगत होते. नृत्यकलेत माहिर होते, मात्र कुटुंबीयांकडून साथ नव्हती. अपयशाने खचले. आयुष्य संपवण्याचा विचार करत होते. समुपदेशन घेतल्यावर भीती दूर झाली. ७ व्या प्रयत्नात सीए उत्तीर्ण. नैराश्य गेले, बरे केले त्यांना कोऱ्या चेकवर दिली सहीअभियांत्रिकी शिक्षण घेतले. लग्न झाले. एका मुलाचा बाप झालो. मात्र नोकरी नाही. बापाच्या जिवावर जगतो असे डिवचले गेले. वैफल्यग्रस्त झालो. कुटुंबीयांनी वेडे ठरवले. मानसोपचार थेरपीने अाज जिवंत अाहे. नोकरीला लागलो आहे. ज्यांनी बरे केले त्यांना मी कोरा चेक दिला आहे. तीच त्यांची फी. दवाखाना चालत नसल्याने नैराश्य, आज नामवंत डॉक्टर बीएएमएसनंतर क्लिनिक सुरू केले. दवाखाना चालत नसल्याने नैराश्यात गेले. नातेवाईक, मित्रांकडून हिणवले जात असल्याने प्रॅक्टिस सोडून एकाकी जीवन जगत होते. आत्महत्येचे विचार येत होते. समुपदेशन घेतल्यानंतर मला कठीण प्रसंगांशी झगडण्यासाठी बळ मिळाले.अाज मी नामवंत डॉक्टर अाहे. ‘दिव्य मराठी’ने तिघांशीही संवाद साधून त्यांच्या संघर्षाची कहाणी प्रत्यक्ष जाणून घेतली. गुन्ह्यांमागील मनाचे गूढ गुन्ह्यांची उकल करताना गुन्हेगारांची मानसिकता कशी असते याबद्दल खूप जिज्ञासा होती. त्यासाठी मनोचिकित्सेचा पाच वर्षे अभ्यास केला. गुन्हे घडण्यापूर्वीच मानसिकतेत बदल करून संबंधितांना रोखायचे असे ठरवले. निवृत्तीनंतर हे काम सुरू करायचे या निश्चयाने काम सुरू झाले. यशही मिळत आहे. - डॉ. सीताराम कोल्हे, मनोचिकित्सक

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:53 am

क्रिप्टोला मान्यता देण्याचा प्रस्ताव नाही, टेरिफचा परिणाम किरकोळ- गव्हर्नर:भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांची दैनिक भास्करसोबत विशेष बातचीत

डिसेंबरमध्ये कार्यकाळाचे १ वर्ष पूर्ण करणारे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​म्हणतात, जेव्हा त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली तेव्हा जग मंदी, भू-राजकीय तणाव आणि पुरवठा साखळी तुटण्यासारख्या आव्हानांशी झुंजत होते. आरबीआयने अर्थव्यवस्थेला बाह्य धक्क्यांपासून वाचवण्यासाठी परकीय चलन साठा मजबूत ठेवण्यापासून ते रेपो दरात १% कपातीपर्यंत अनेक पाऊल उचलले. अमेरिका, इतर देश क्रिप्टोकरन्सी स्वीकारत आहेत. आरबीआय यावर विचार करत आहे का? यावर ते म्हणाले-भारताचे धोरण इतर देशांत काय होत आहे यावर ठरत नाही. आरबीआय क्रिप्टोबद्दल सतर्क आहे. याला मान्यता देण्याचा प्रस्ताव नाही. टेरिफचा भारतावर परिणाम किरकोळ असेल. भास्करचे भीम सिंह आणि कृष्ण मोहन तिवारी यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या खास संभाषणातील मुख्य अंश खालीलप्रमाणे आहेत... बँक विलीनीकरण योजनेला पाठिंबा, चांगल्या सुविधा वाढतील जर सरकारने बँकांच्या विलीनीकरणाचा प्लॅन आणला तर आरबीआय याला पूर्ण समर्थन देईल. हे मजबूत बँकिंग प्रणालीच्या हिताचे राहील. भारतासारख्या देशात बँका मोठ्याही असू शकतात आणि त्यांची संख्याही जास्त असू शकते. या विलीनीकरणामुळे बँकिंग सेवा चांगल्या होऊ शकतात. मोठ्या बँकांचा खर्च कमी असतो. यामुळे ते थोडे स्वस्त कर्जदेखील देऊ शकतात. अशा बँका जास्त आणि चांगल्या सुविधा देण्यास सक्षम असतात. संसाधने अधिक असल्यामुळे त्यांची पोहोचही लहान बँकांच्या तुलनेत चांगली असते. ते देशांतर्गत आणि बाह्य आर्थिक धक्के सहन करण्यास अधिक सक्षम असतात. पण याचा अर्थ असा नाही की, लहान बँका अप्रासंगिक झाल्या आहेत. भारतासारख्या देशात लहान बँकांचे महत्त्वही नेहमी कायम राहील. किरकोळ महागाई दर फक्त ०.२५% राहिला आहे. हे आरबीआयच्या ४% लक्ष्यापेक्षा खाली आहे. व्याज दरांमध्ये कपात करण्याची शक्यता आहे का?महागाईतील घट ही खाद्यपदार्थांचे दर कमी झाल्याचा परिणाम आहे. भाज्या आणि धान्याच्या दरातील घट वगळली तर मूळ महागाई ४% च्या आसपास आहे, ज्यात काही प्रमाणात मौल्यवान धातूंचे योगदान आहे. तसे पाहिले तर धोरणात्मक दर निश्चित करण्यासाठी येणाऱ्या महिन्यांमधील महागाई अधिक महत्त्वाची असते. कारण पत धोरणाचा परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. आमचा अंदाज आहे की, पुढील वर्षी महागाई या खालच्या पातळीवरून वाढेल, परंतु नियंत्रणात राहील. जिथे धोरणात्मक दरांच्या निर्णयाचा सवाल आहे, हा एमपीसीवर अवलंबून आहे की उदयास येणारी व्यापक आर्थिक परिस्थिती आणि दृश्यांकडे लक्ष ठेवून निर्णय घ्यावा. तसे मागील बैठकीत एमपीसीने पॉलिसी स्पेस असल्याची चर्चा केली होती. डॉलरच्या तुलनेत रुपया ८८ च्या नीचांकी पातळीवर घसरला आहे, हे कसे पाहता? आमचा दृष्टिकोन सतत हाच राहिला आहे की, रुपयाची किंमत बाजाराला ठरवू द्यावी. आरबीआय कोणत्याही पातळीला किंवा मूल्य श्रेणीला लक्ष्य करत नाही. आमचे उद्दिष्ट अत्यंत चढ-उतार कमी करणे आहे. आम्ही या धोरणाचे पालन करणे सुरू ठेवू. साधारणपणे पाहिले तर दरवर्षी सरासरी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन ३ ते ३.५% राहिले, पण गेल्या ८ महिन्यांत ते ४.६% राहिले आहे. हे थोडे जास्त नक्कीच आहे, पण याचे कारण टेरिफ (आयात शुल्क), जिओ-पॉलिटिक्स यांसारखी बाह्य कारणे आहेत. अमेरिका व इतर देश क्रिप्टो स्वीकारत आहेत, तुम्ही यावर विचार करत आहात का? भारतासारख्या देशाचे धोरण दुसऱ्या देशांच्या धोरणांवरून ठरत नाही. क्रिप्टोकरन्सीला चलन म्हणून मान्यता देण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. क्रिप्टोबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन अजूनही सतर्क आहे. या प्रकरणात आम्ही सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) ला प्रोत्साहन देण्याच्या बाजूने ठाम आहोत. बेरोजगारी वाढत आहे, उत्पादन कंपन्यांचा नफा घटला आहे. आरबीआय कोणते ठोस पाऊल उचलत आहे का? मूल्य स्थिरता राखणे ही आमची जबाबदारी आहे, ज्यात आर्थिक विकासदेखील लक्षात घेतला जातो. आम्ही अर्थव्यवस्थेला समर्थन देण्यासाठी अनेक उपाययोजना (जसे की, मागणी वाढवण्यासाठी रेपो दरात कपात, बाजारात लिक्विडिटी वाढवणे) केल्या आहेत, ज्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्था आणि रोजगारावर पडत आहे. पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे (पीएलएफएस) च्या आकडेवारीनुसार, बेरोजगारी दर २०२३-२४ मध्ये ३.२% पर्यंत खाली आला आहे, जो २०१७-१८ मध्ये ६% होता. या वर्षी जुलै-सप्टेंबरमध्ये बेरोजगारी दर ५.२% राहिला, जो एप्रिल-जूनमध्ये ५.४% होता. बँकांत लाखो कोटी रुपये एनपीए बनतात. लोकांचे पैसे त्यांना वाचवण्यात लागतात. आरबीआय उत्तरदायित्व निश्चित करेल का? कर्जाचा काही भाग एनपीए बनणे, उधार देण्याच्या कोणत्याही प्रक्रियेचा एक भाग आहे. अलीकडच्या वर्षांत मालमत्तेच्या गुणवत्तेत व्यापक सुधारणा झाली आहे. मार्च २०२५ पर्यंत ग्रॉस एनपीए (जीएनपीए) कमी होऊन २.३% आणि नेट एनपीए ०.५% राहिला. मार्च २०१८ मध्ये हे अनुक्रमे ११.२% आणि ५.९६% होते. तेव्हापासून स्थापित ‘रिझॉल्युशन फ्रेमवर्क’चा उद्देश हे सुनिश्चित करणे आहे की, कर्ज मालमत्तेवर कोणत्याही प्रकारे तयार होणारा ताण वेळेत प्रभावीपणे हाताळला जावा.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:48 am

कर्ज फेडण्यासाठी बँक कर्मचाऱ्याची लूट; पत्नीच्या मोबाइल नंबरमुळे सूत्रधार जाळ्यात:25 लाखांच्या दरोड्याचा आठ तासांत पोलिसांकडून पर्दाफाश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यावर दगड मारून २५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या चार आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अवघ्या आठ तासांत अटक करून मोठ्या दरोड्याचा पर्दाफाश केला. ट्रॅक्टरचे कर्ज फेडण्यासाठी या टोळीने कट रचून हा गुन्हा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या चार आरोपींपैकी दोघे हे ग्रामपंचायत सदस्यांचे पुत्र असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. भारत राजेंद्र रूपेकर (३०, रा. नानेगाव, ता. पैठण, मुख्य आरोपी), विष्णू कल्याण बोधणे (२४, रा. नानेगाव), सचिन विठ्ठल सोलाट (२५, रा. राहुलनगर, जायकवाडी, ता. पैठण), विशाल दामोदर चांदणे (२४, रा. अखातखेडा, ता. पैठण). पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एक चारचाकी (कार), रोख रक्कम आणि ८ मोबाइल जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. ही घटना शनिवारी (१६ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता पाचोड-पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात घडली होती. पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पैठण शाखेतून दावरवाडी शाखेसाठी २५ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणारे सेवानिवृत्त कर्मचारी गणेश आनंद पहिलवान (६५) हे स्कूटीवरून जात असताना दुचाकीवरील दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरट्यांनी स्कूटीला कट मारून अपघात घडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दगड व लाथ मारून पहिलवान यांना खाली पाडून त्यांच्या हातातील २५ लाखांची बॅग हिसकावून घेतली आणि डेरामार्गे पसार झाले. २ आरोपी ग्रा.पं. सदस्यांचे पुत्र; चौघात वाटले २५ लाख आरोपी रूपेकरची संशयास्पद कृती दरोड्याचा मुख्य सूत्रधार भारत रूपेकर हा मागील दोन वर्षांच्या कालावधीनंतर दावरवाडी शाखेमध्ये गेला होता. त्याने बँकेत पैसे जमा करण्याची स्लिप भरली, पण त्यात पत्नीचा मोबाईल नंबर टाकला. रूपेकरचे स्वतःचे गाव नानेगाव असतानाही त्याने दोन वर्षांनी याच शाखेत व्यवहार का केला, या प्रश्नाने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून कसून चौकशी केली. याच संशयावरून पोलिसांनी रूपेकरला ताब्यात घेत तपास केला, तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नीचा मोबाइल नंबर ठरला कळीचा दुवा दरोड्याचा हा प्लॅन मुख्य आरोपी भारत रूपेकर याने पूर्ण आठ दिवस रेकी करून तयार केला होता. दरोड्याच्या दिवशी रूपेकरने बँकेत जाऊन पैसे जमा करण्याची स्लिप भरली. मात्र, त्याने स्वतःचा नव्हे, तर पत्नीचा मोबाइल नंबर स्लिपवर टाकला होता. रूपेकरच्या स्वतःच्या गावात बँक असतानाही त्याने याच शाखेत व्यवहार का केला, यावरून पोलिसांचा संशय बळावला. दरोड्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी त्यांच्या पथकासह तपास सुरू केला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज आणि सर्व व्यवहारांच्या स्लिप तपासल्या. स्लिपवरील पत्नीच्या नंबरवरून पोलिसांनी रूपेकरला तातडीने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिव्य मराठी इनसाइड - बँकेचा हलगर्जीपणा उघड; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर दिली होती जबाबदारी या घटनेमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा मोठा हलगर्जीपणा उघड झाला आहे. सेवानिवृत्त कर्मचारी गणेश पहिलवान यांच्यावर दररोज मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहतूक करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पहिलवान हे २५ लाख रुपयांची रोकड गोणीत भरून स्कूटीवर पायाजवळ ठेवून नेत होते. इतक्या मोठ्या रकमेची वाहतूक करताना कोणताही सुरक्षा कर्मचारी, वाहन किंवा मूलभूत सुरक्षा व्यवस्था नसणे ही बँकेची गंभीर हलगर्जी असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. ही यशस्वी कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे आणि विठ्ठल डोके यांच्या पथकाने पार पाडली. आणि अवघ्या आठ तासांत दरोड्याचा उलगडा झाला.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:40 am

प्रगतिशील शेतकरी:द्राक्षाच्या मांडवावर कारल्याची बाग, दीड एकरात महिना सहा लाखांचे उत्पन्न, कळंबवाडीच्या शेतकऱ्याचा प्रयोग

शेती हा जुगार बनत चालल्याची भावना बळावत आहे. पण येणाऱ्या संकटातून मार्ग काढत शेतीला नफ्यात आणणारेही काही निवडक लोक असतात. त्यापैकी एक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कळंबवाडीचे शेतकरी दीपक जाधव. ५ किमीवरून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी आणून त्याचे ड्रीपद्वारे नियोजन केले. पूर्णपणे शेणखत वापरून दीड एकरात कारल्याची बाग फुलवली. विशेष म्हणजे कारले उत्पादनाचा तुटवडा कधी निर्माण होतो, मागणी कधी वाढते यासंबंधी बाजारपेठेचा अभ्यास केला. परिणामी कारल्याच्या बागेतून महिना साडेपाच ते सहा लाखांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. दीपक जाधव यांच्याकडे एकूण २५ एकर शेती आहे. एकच पीक घेण्याऐवजी ते पिकांसंदर्भात विविध प्रयोग करत असतात. सध्या त्यांनी २ एकरवर कारल्याची बाग लावली आहे. अतिवृष्टीमुळे यातील अर्धा एकर क्षेत्रावरील बागेचे नुकसान झाले, पण उर्वरित दीड एकरात योग्य पाण्याचे नियोजन करून भरघोस उत्पादन घेणे सुरू आहे. द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यामुळे लावले कारले दीपक यांच्याकडे एकूण पंचवीस एकर शेती आहे. यात ४ एकरवर कांदा, १ एकरवर दोडका, दीड एकरवर कारले व इतर उर्वरित क्षेत्रावर गहू, ज्वारीचे पिक घेतले जाते. द्राक्ष बागेचे नुकसान झाल्यानंतर त्यांनी मांडव काढून टाकण्याऐवजी त्यावर आधी दोडके, भोपळा घेतला व त्यानंतर कारले लावले. हिवाळ्यात कारल्यावर किडीचा प्रार्दूभाव होऊन पिकाचे मोठे नुकसान होते. पण त्यांनी सुक्ष्म नियोजन करून स्वत:कडे असलेल्या गायींचे १० ट्रेलर शेणखत शेतात टाकले. ड्रीपद्वारे २४ तासांत ८ लिटर पाणी दिले. पाणी नेमक्या प्रमाणात मिळाल्याने चार एकर क्षेत्रावर जितके उत्पादन निघते तेवढेच उत्पादन अवघ्या दीड एकरात निघत आहे. खर्च-उत्पन्नाचे गणित असे जाधव यांनी सुरुवातीला २ एकर मांडवावर कारल्याची बाग लावली. पण अतिवृष्टीमुळे अर्धा एकर बागेचे नुकसान झाले. आधीचाच मांडव व ड्रीप असल्याने नव्याने ते टाकण्याची आवश्यकता भासली नाही. याचे तीन लाख वाचले. ६ हजारांना एक याप्रमाणे ६० हजारांचे १० ट्रेलर शेणखत त्यांनी टाकले. साडेसात हजारांचे मल्चिंग पेपर व किरकोळ खर्च असे एकूण ८० ते ८५ हजारांचा खर्च आला. लागवडीनंतर अडीच महिन्यांनी कारले तोडणीला येतात. सध्या दिवसाआड १५ किलोच्या ३० बॅगांत कारल्याचे ४५० ते ५०० किलो उत्पादन निघत असून याचे ३० हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. महिन्याला हे उत्पादन साडेचार ते पाच लाखांपर्यंत जाते. इतर कारल्याच्या तुलनेत किलोमागे १० रुपये अधिक म्हणजे ६० रुपयांचा दर मिळत असल्याचे जाधव यांनी दिव्य मराठी'ला सांगितले. (प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती. संपर्कासाठी मोबाइल क्रमांक - ७७७५९०७९८५)

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 5:17 am

आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारताचा पराभव

दोहा : वृत्तसंस्था आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजी अपयशी ठरली. वैभव सूर्यवंशी एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरी गाठली. भारताने १९ षटकांत सर्व गडी गमावून १३६ धावा केल्या आणि विजयासाठी १३७ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले […] The post आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारताचा पराभव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:19 am

नागपूरजवळ खाजगी बसला भीषण आग

चालकाचे प्रसंगावधान, ५० प्रवाशांचा जीव वाचला नागपूर : प्रतिनिधी नागपूर-उमरेड महामार्गावर आज रविवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसला अचानक भीषण आग लागल्याने काही क्षणासाठी घटनास्थळी भीती पसरली होती. मात्र, चालकाच्या तात्काळ निर्णयक्षमतेमुळे बसमध्ये प्रवास करणा-या सुमारे ४० ते ५० प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास चक्री घाटाजवळ घडली. ही खाजगी […] The post नागपूरजवळ खाजगी बसला भीषण आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:17 am

भाजपची शक्य तिथेच युती

अन्यत्र मैत्रीपूर्ण लढत होईल, महायुतीचीच सत्ता येणार : मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज छत्रपती संभाजीनगर दौरा होता. यावेळी त्यांनी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची शक्य तिथे युती होणार आहे आणि जिथे युती होणार नाही, तिथे महायुतीत युती होईल आणि राज्यात स्थानिक […] The post भाजपची शक्य तिथेच युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:14 am

स्फोटाचा सूत्रधार अटकेत

एनआयएने आवळल्या आमिरच्या मुसक्या, आमिर आय २० कारचा मालक डॉ. उमरसोबत रचला होता कट नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली ब्लास्ट प्रकरणी एनआयएने आज मोठी कारवाई केली असून, बॉम्बस्फोटात वापरलेली आय २० कार विकत घेणा-या आमिर राशिद अलीला अटक करण्यात आली. आमिर राशिद अलीला दिल्लीतून अटक करण्यात आली. आमिर अलीने हल्लेखोरासोबत कट आखला होता. तो जम्मू-काश्मीरमधील […] The post स्फोटाचा सूत्रधार अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:13 am

सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील गॅस पुरवठा खंडित मुंबई : प्रतिनिधी सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे सीएनजीवर धावणा-या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, घरगुती पीएनजी ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार असल्याचे […] The post सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:09 am

लालूप्रसाद यादव यांच्या ३ मुलींनीही सोडले घर

पाटणा : वृत्तसंस्था लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात झालेल्या वादानंतर लालूप्रसाद यांच्या तीनही मुली पाटणा सोडून गेल्या आहेत. तिघीही कुटुंब आणि मुलांसह दिल्लीला रवाना झाल्या आहेत. रागिणी, राजलक्ष्मी आणि चंदा यादव दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान, लालूंची दुसरी कन्या रोहिणी आचार्यने थेट कुटुंबांवर नाराजी व्यक्त करीत देश सोडला असल्याचे समोर आले आहे. रोहिणी काल संध्याकाळी पक्ष […] The post लालूप्रसाद यादव यांच्या ३ मुलींनीही सोडले घर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:07 am

यंदा १५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने देशातील सर्व साखर कारखान्यांचा निर्यात कोटा जाहीर केला असून, यंदाच्या ऊस गळीत हंगामात देशातून १५ लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून ४ लाख ८८ हजार ४६७ टन तर उत्तर प्रदेशातून ५ लाख ७ हजार ९० टन साखरेची निर्यात होणार आहे. यंदा पावसामुळे राज्यातील गळीत हंगाम […] The post यंदा १५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:04 am

दर्यापुरात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी, यंत्रणेची करडी नजर:प्रमुख मार्गांवर स्थिर पथकांकडून वाहनांची तपासणी सुरू

दर्यापूर येथे आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक यंत्रणेने शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) तैनात केली असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणुकीदरम्यान विविध जिल्ह्यांमधून वाहनांद्वारे संशयास्पद अनाधिकृत रोकड, मद्य आणि अंमली पदार्थांची ने-आण केली जाण्याची शक्यता असते. यावर प्रतिबंध घालणे हा या तपासणीचा मुख्य उद्देश आहे. दर्यापूर-मुर्तीजापूर मार्गावरील स्थिर पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या काळात हे पथक कायम कार्यरत राहणार असून, यामुळे अनुचित प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. या स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये रवी कुटेमाटे, पोलीस अंमलदार धीरज इंगळे आणि मयूर ठाकूर आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, तीन प्रमुख मार्गांवर ही पथके नेमण्यात आली असून, २४ तास सतर्क राहून वाहनांची तपासणी मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:13 pm

मेळघाटमध्ये महायुतीत पक्षांतर:चिखलदरा नगराध्यक्ष, धारणी उपनगराध्यक्ष भाजपमध्ये; शिवसेना (उबाठा), राकाँला फटका

अमरावती, मेळघाटमध्ये आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटकपक्षांमध्ये पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. चिखलदरा नगरपालिकेचे दीर्घकाळ नगराध्यक्ष राहिलेले राजेंद्र सोमवंशी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. तसेच, धारणी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनीही शिवसेना (उबाठा) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोन्ही पक्षांना मेळघाटात मोठा धक्का बसला आहे. हे पक्षांतर केवळ वैयक्तिक नसून, सोमवंशी आणि चौथमल यांच्यासोबत त्यांच्या पक्षांतील इतर कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, पक्षांतरानंतर हे दोन्ही नेते अनुक्रमे चिखलदरा आणि धारणी येथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील. या पक्षप्रवेशामुळे भाजपने संपूर्ण मेळघाट काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले असून, आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल काय असेल, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. राजेंद्र सोमवंशी हे १९९२ पासून सक्रिय राजकारणात आहेत. नगरसेवक ते नगराध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आरक्षणामुळे त्यांना संधी मिळाली नसताना, गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांच्या पत्नी विजया सोमवंशी यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. सोमवंशी कुटुंबाने गेल्या ३० वर्षांपासून चिखलदऱ्याची सत्ता राखली आहे. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेले सोमवंशी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (एनसीपी) दाखल झाले. आमदार संजय खोडके यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे सोमवंशी, एनसीपीमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) मोठा फटका बसला आहे. चिखलदऱ्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी आणि धारणीचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांच्या पक्षप्रवेशासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार केवलराम काळे आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी विशेष प्रयत्न केले. या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी थेट मुंबईतून हालचाली झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामाकडील कुटुंबातील एक सदस्य चिखलदरा येथे राहतात. त्यांच्या संस्थेची तेथे शाळाही आहे. लहानपणी फडणवीस या शाळेच्या निमित्ताने चिखलदऱ्याला भेट देत असत. विदर्भाचे नंदनवन म्हणून त्यांना या शहराबद्दल विशेष आकर्षण असून, त्याचा चेहरा-मोहरा बदलण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:13 pm

आगामी काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल:देवेंद्र फडणवीस यांचे श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना, आगामी काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षण, उपचार आणि संशोधनात चालना दिल्याचे त्यांनी नमूद केले. सातार तांडा भागातील या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य डॉ. भागवत कराड, श्रीयश प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे, सचिव संगिता मंगरुळे, रुग्णालय अधीक्षक डॉ. परेश देशमुख आणि अधिष्ठाता स्वाती इटगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी बसवराज मंगरुळे यांच्या कार्याचे कौतुक केले. फडणवीस यांनी आयुर्वेदाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, ही उपचार पद्धती भारतीय जीवनशैलीशी सुसंगत असून निसर्गाशी साधर्म्य साधते. वेदांमध्ये 'आयुर्वेद' या नावाने तिचा उल्लेख आहे. आयुर्वेदात केवळ आजाराच्या लक्षणांवर उपचार न करता, त्याच्या मुळाशी जाऊन शाश्वत उपचार केले जातात. जगभरात या उपचार पद्धतीचा वापर वाढत असून, अनेक परदेशी नागरिक भारतात आयुर्वेदिक उपचारांसाठी पर्यटक म्हणून येत आहेत. कोविड-१९ महामारीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला, असेही फडणवीस यांनी नमूद केले. केंद्र सरकारने या उपचार पद्धतीला विविध मार्गांनी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. प्रशिक्षित वैद्य तयार करणे हा त्यातीलच एक महत्त्वाचा भाग असून, त्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांना चालना दिली जात आहे. आगामी दशकात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०२४७ पर्यंत आर्थिक महासत्ता होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. मराठवाड्यातही उद्योगांना चालना दिली जात असून, छत्रपती संभाजीनगर हे इलेक्ट्रिक व्हेईकलचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:12 pm

तिवसा येथे भीषण अपघात, एकाचा मृत्यू:दुचाकीच्या धडकेने ५३ वर्षीय व्यक्तीचा बळी, गाडी जळून खाक

तिवसा येथे रविवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. भरधाव दुचाकीने धडक दिल्यानंतर दुचाकीने पेट घेतला आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात दुचाकीवरील एक मुलगी गंभीर जखमी झाली असून, दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव संजय नामदेव पाटील (रा. शेंदुरजना माहोरा, ता. तिवसा) असे आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय लक्ष्मी चौरागडे (रा. नागपूर) हिला तातडीने अमरावती जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दुचाकीस्वार १८ वर्षीय राजेंद्र मोरे (रा. अमरावती) याला किरकोळ दुखापत झाली आहे. राजेंद्र मोरे आणि लक्ष्मी चौरागडे हे दुचाकीने अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जात होते. तिवसा बसस्थानकासमोर महामार्ग ओलांडत असताना संजय पाटील यांना दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे संजय पाटील यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे दुचाकीने अचानक पेट घेतला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच संजय पाटील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. लक्ष्मी चौरागडे हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून दुचाकीला लागलेली आग विझवली. आगीमुळे दुचाकीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. या घटनेमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तिवसा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:07 pm

लोकरंग लोककलेचा नवअध्याय, नवकिरण देणारा ठरला 

लातूर : प्रतिनिधी लातूरच्या मातीत वाढलेल्या भूमिपुत्रांनी लोककलेचे संवर्धन व्हावे, तिचे सौंदर्य नव्या पिढीत पोहोचावे, या सुंदर ध्येयाने ‘लोकरंग’ या भव्य लोककला महोत्सवाची अप्रतिम निर्मिती केली आहे. गणगवळण, भूपाळी, वाघ्या-मुरळी, जागरण, लावणी, अभंग यांसारख्या लोकसंगीताच्या विविध छटांनी नटलेला हा कार्यक्रम केवळ करमणूक करणारा नसून लोककलेला नवे तेज देणारा, मनाला स्पर्श करणारा आणि विचारांना उजाळा देणारा […] The post लोकरंग लोककलेचा नवअध्याय, नवकिरण देणारा ठरला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 10:36 pm

जिल्ह्यातील २२ लाख ६० हजार १७३ नागरिकांची केली जाणार तपासणी

लातूर : प्रतिनिधी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत लातूर जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध आशा व स्वयंसेवक यांच्या पथकामार्फत घेतला जाणार आहे. हे पथक घरोघरी भेटी देऊन तपासणी करणार आहे. यासाठी जिल्ह्यात १ हजार ७४३ पथके तयार करण्यात आलेली आहेत. अभियान कालावधीत […] The post जिल्ह्यातील २२ लाख ६० हजार १७३ नागरिकांची केली जाणार तपासणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 10:35 pm

गुंड आणि मोका लावलेल्यांच्या हाती ईश्वरपूर देऊ नका:जयंत पाटलांचा महायुतीवर अप्रत्यक्ष निशाणा, गुंडगिरीचा इतिहास असणाऱ्यांना उमेदवारी दिल्याचा केला आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगलीच्या उरुण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीतील प्रचार शुभारंभप्रसंगी बोलताना गुंड आणि मोका लागलेल्या लोकांच्या हातात शहर देऊ नका, असे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी महायुतीकडून उरुण ईश्वरपूर नगर परिषदेसाठी गुंडगिरीचा इतिहास असलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंदराव मलगुडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, त्यावेळी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पार पडला. याप्रसंगी बोलताना जयंत पाटलांनी महायुतीच्या उमेदवारी धोरणांवर जोरदार टीका केली. दिवंगत माजी नगराध्यक्ष अशोकराव पाटील यांचे सुपुत्र महेश पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक विक्रम पाटील यांचे बंधू तसेच माजी नगरसेवक विजय कुंभार यांनी भाजपला रामराम ठोकत, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. भाजपच्या या दोन निष्ठावान कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे ईश्वरपूर शहराचे राजकारण कमालीचे बदलल्याचे चित्र आहे. जयंत पाटील म्हणाले, शहराच्या भविष्याविषयी काळजी असलेले हे लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत ही आनंदाची बाब आहे. ईश्वरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला अनेक स्वप्न होती. त्या स्वप्नांची पूर्तता करायला हे शहर अधिक गतिमान झाले पाहिजे. या शहरातल्या रखडलेल्या कामांना अधिक वेगाने पुढे नेले पाहिजे. शहरातल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या इतर शहरांसारख्या सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हाव्यात हा माझा प्रयत्न राहणार आहे. आमच्यावर विश्वास ठेवून अजूनही काही लोक प्रवेश करणार आहेत, असे पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या ईश्वरपूरमध्ये त्यांच्या विरोधात महायुती एकवटल्याचे चित्र असून, भाजपने यासाठी मोठ्या प्रमाणात ताकद लावली आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी महायुतीवर टीका करताना, ईश्वरपूर शहराला गुंड आणि मोका लागलेल्या लोकांचा विळखा पडू नये, याची खबरदारी ईश्वरपूरकर नक्की घेतील, असा विश्वास व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 10:22 pm

उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले शहराचे प्रश्न:औद्योगिक रस्ते, हवाई सुविधा, कौशल्य विकास आणि आयटी पार्कसाठी जागेची मागणी

छत्रपती संभाजीनगर: शहरातील औद्योगिक विकासाशी संबंधित तातडीच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव मच्छर आणि मानद सचिव मिहीर सौंदलगेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, हवाई कनेक्टिव्हिटी, औद्योगिक सुविधा आणि पायाभूत विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. उद्योजकांनी बिडकीन–चितेगाव मार्गासह छत्रपती संभाजीनगर–पुणे रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात आणून दिली आणि त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी केली. शहरातून हवाई प्रवास अधिक सुलभ करणे, तसेच एअर कार्गो सेवा सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सीएमआयएच्या कौशल्य विकास केंद्रासाठी १० एकर जागा आणि आयटी प्रकल्प आकर्षित करण्यासाठी प्लग-अँड-प्ले सुविधेसह स्वतंत्र १० एकर औद्योगिक जागेची मागणीही संस्थेने केली. यावेळी ऑरिक–शेंद्रा-बिडकीनला जोडणाऱ्या हायवेच्या कामांना गती देण्याची तसेच हॉटेल व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ‘इंडस्ट्रियल’ टॅरिफ वर्गीकरण कायम ठेवण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी चितेगाव–बिडकीन तसेच वडगाव कोल्हाटी, साजापूर आणि कारोडी मार्गांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. उद्योगवाढीसाठी आवश्यक सर्व बाबींवर उचित आणि जलद कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला ओबीसी विकास मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर भागवत कराड उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 10:17 pm

लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धेचे आज उद्घाटन 

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील हौशी रंगकर्मी आणि चोखंदळ नाट्य रसिकांना प्रचंड ओढ असलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे लातूर केंद्रावर आज दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता उद्घाटन होणार आहे. शहरातील एकुण नाट्य वर्तुळात प्रचंड उत्साह असल्याचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. शहरातील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात ही […] The post लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धेचे आज उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 10:13 pm

‘आएमए’च्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ. कल्याण बरमदे यांची निवड

लातूर : प्रतिनिधी येथील ख्यातनाम स्त्रीरोग, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. कल्याण बलभीमराव बरमदे यांची आयएमएच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड वर्ष २०२५ -२६ या वर्षासाठी केली गेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. कल्याण बरमदे यांच्या या निवडीचे स्वागत होत आहे. शनिवारी सोलापूर येथे आयएमएच्या नूतन पदाधिका-यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. […] The post ‘आएमए’च्या राज्य उपाध्यक्षपदी डॉ. कल्याण बरमदे यांची निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 10:12 pm

मांजरा साखर कारखान्याच्या गाळपास प्रत्यक्षात सुरूवात

विलासनगर : प्रतिनिधी शेतकरी हितासाठी कायम कार्यरत असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या प्रत्यक्षात गाळपास दि. १६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली असून विद्यमान गळीत हंगामात ९ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट कारखान्याने निश्चित केले आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी केले आहेत. मोठ्या […] The post मांजरा साखर कारखान्याच्या गाळपास प्रत्यक्षात सुरूवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 10:11 pm

काँग्रेस स्वबळावर!

बिहार निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला तर काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला. याचे परिणाम आता राज्याच्या राजकारणावर होताना दिसत आहेत. वेगवेगळ्या स्तरांवर याबाबत चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पडसाद उमटताना दिसत आहेत. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत एकत्र न लढता स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी पदाधिकारी, […] The post काँग्रेस स्वबळावर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 10:02 pm

नगराध्यक्षासाठी ५, नगरसेवक पदासाठी ६१ उमेदवारी अर्ज दाखल

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी रविवारी (दि. १६ )उमेदवारांचा उत्साह वाढताना दिसत असून निवडणूक विभागात दिवसभर चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी ५ व नगरसेवक पदासाठी ६१ विविध प्रभागांमधून उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्याने सोमवारी दि १७ रोजी मोठी गर्दी […] The post नगराध्यक्षासाठी ५, नगरसेवक पदासाठी ६१ उमेदवारी अर्ज दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 10:00 pm

स्त्री अत्याचार विरोधात उदगीर येथे रॅली

उदगीर : प्रतिनिधी फलटण येथील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीना शिक्षा झाली पाहिजे या मागणीसह महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व इनरव्हील क्लबसह अन्य सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून रॅली काढण्यात आली. उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये रोटरी क्लब […] The post स्त्री अत्याचार विरोधात उदगीर येथे रॅली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 9:58 pm

दिल्ली स्फोट प्रकरण : डॉक्टरांचे फोन बंद; मोठे नेटवर्क उघडकीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीला हादरवणा-या बॉम्बस्फोट प्रकरणी तपास यंत्रणांना मोठा आणि धक्कादायक सुगावा लागला आहे. अटक करण्यात आलेला संशयित डॉक्टर मुजम्मिल याच्या मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड्सच्या तपासणीतून डॉक्टरांचे एक मोठे आणि संघटित नेटवर्क उघडकीस आले, ज्याचे धागेदोरे थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहेत. दिल्लीतील स्फोट झाल्यापासून तब्बल १२ हून अधिक डॉक्टरांचे मोबाईल फोन […] The post दिल्ली स्फोट प्रकरण : डॉक्टरांचे फोन बंद; मोठे नेटवर्क उघडकीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 9:13 pm

कर्नाटकात कुरघोडीचे डाव; मंत्रिमंडळात होणार फेरबदल

बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात या पदावरून रस्सीखेच सुरू आहे. दोघांतील वाद काही लपलेले नाहीत. शिवकुमार यांच्या गटानुसार, २०२२ मध्ये राज्यात काँग्रेस बहुमताने निवडून आली. त्यावेळी मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे दोन्ही नेत्यांकडे देण्याचे ठरले होते. म्हणजे सुरुवातीला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावर सिद्धरामय्या असतील […] The post कर्नाटकात कुरघोडीचे डाव; मंत्रिमंडळात होणार फेरबदल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 9:11 pm

पुराणातील १,००० टन सोने चीनमध्ये आढळले!

शिनजियांग : वृत्तसंस्था मानवाला पुढच्या कित्येक पिढ्या पुरून उरेल एवढी खनीजसंपत्ती भूगर्भात आहे. सोने, चांदी यासारखे मौल्यवान धातू तर भूगर्भात जगभरात सापडतात. सध्या असाच एक चमत्कार समोर आला आहे. वैज्ञानिकांना पुराण कथेत नमूद असलेला तब्बल १,००० टन सोन्याचा साठा सापडला आहे. वैज्ञानिकांना मिळालेले हे सोन्याचे भांडार चीनमधील शिनजियांग उइगर या भागात चीनच्या पश्चिम सीमेत कुनकुल […] The post पुराणातील १,००० टन सोने चीनमध्ये आढळले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 9:00 pm

मेक्सिकोत भ्रष्टाचाराविरूद्ध जेन-झेड आंदोलन भडकले! १०० पोलिसांसह १२० जखमी; २० जण अटकेत

मेक्सिको सिटी : वृत्तसंस्था वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचार, हिंसाचारासाठी शिक्षा न होणे आणि सार्वजनिक सुरक्षेचा अभाव या विरोधात मेक्सिकोमध्ये हजारो जेन-झेड कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या राष्ट्रीय राजवाड्याच्या सुरक्षा भिंती ‘जेन-झेड’ने तोडल्या. निदर्शकांनी दगड, हातोडा, फटाके, काठ्या आणि साखळ्यांनी पोलिसांवर हल्ला केला, यात १०० पोलिसांसह १२० जण जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर […] The post मेक्सिकोत भ्रष्टाचाराविरूद्ध जेन-झेड आंदोलन भडकले! १०० पोलिसांसह १२० जखमी; २० जण अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 8:55 pm

‘नीट’ विरोधी विधेयकाला स्थगिती; सुप्रीम कोर्टात दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत तामिळनाडू सरकारने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी, तामिळनाडू सरकारने एक विधेयक मांडले होते ज्यामुळे पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘नीट’ची आवश्यकता रद्द झाली असती. तथापि, राष्ट्रपतींनी या विधेयकाला स्थगिती दिली. तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, आणि हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या अस्थिर आणि घटनात्मकदृष्ट्या अन्याय्य […] The post ‘नीट’ विरोधी विधेयकाला स्थगिती; सुप्रीम कोर्टात दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 8:52 pm

गर्भधारणेच्या जनुकीय ‘स्विच’चे रहस्य उलगडले!

नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतीय शास्त्रज्ञांनी गर्भधारणेच्या प्रक्रियेत क्रांतिकारी शोध लावला आहे. गर्भाशयाच्या भिंतीत असणारा एक जनुकीय ‘स्विच’ (बटण) गर्भधारणेची सुरुवात कशी होते हे ठरवतो, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. या शोधामुळे वंध्यत्व, पुन:पुन्हा होणारे गर्भपात आणि ‘आयव्हीएफ’ उपचारांतील यशाचा दर वाढवण्यासाठी नवे मार्ग खुले होतील, असा विश्वास डॉ. गीता सचदेव यांनी व्यक्त केला […] The post गर्भधारणेच्या जनुकीय ‘स्विच’चे रहस्य उलगडले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 8:49 pm

'राधा' म्हशीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद!:जगातील सर्वात बुटकी म्हैस; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शेतकरी त्रिंबक बोराटे यांचा सन्मान

जगातील सर्वांत बुटकी म्हैस म्हणून मलवडी (ता. माण) येथील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या ‘राधा’ नावाच्या पाळीव म्हशीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याबद्दल सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या मलवडी येथील निवासस्थानी भेट देऊन या ठेंगण्या- ‘राधा’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये मध्ये नोंद झाल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सन्मान केला. शेतकरी हे निसर्गाच्या आव्हानांवर मात करून, कठोर परिश्रम आणि चिकाटीने पशुधनाच्या मदतीने शेती करतात, ज्यामुळे सर्वांसाठी अन्न उपलब्ध होते, म्हणून ते नेहमीच कौतुकास्पद आहेत. विविध कारणांमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, तरीही ते आपलं काम चिकाटीने करत राहतात. शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांनी या वेगळ्या अशा राधा या म्हशीचा योग्य प्रकारे सांभाळ करून तिला संपूर्ण जगामध्ये एक वेगळं स्थान मिळवून दिल आहे ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याबद्दल शेतकरी त्रिंबक बोराटे व त्यांचे चिरंजीव अनिकेत बोराटे यांचा देखील या सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला. त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुऱ्हा म्हशीच्या पोटी जून २०२२ मध्ये ‘राधा’चा जन्म झाला. ‘राधा’ दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीत बदल होत नसल्याचे बोराटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने ‘राधा’ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा ‘राधा’ने सहभाग घेतला. अन् ‘राधा’चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी, कर्नाटकातील निपाणी यांसह एकूण १३ कृषी प्रदर्शनांत खास आकर्षण म्हणून ‘राधा’ला निमंत्रित करण्यात आले. २४ जानेवारी २०२५ रोजी राधा ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत बोराटे यांनी राधाच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न सुरू केले २८ ऑक्टोबर २०२५ रोजी राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम, युवानेते सिद्धार्थ गुंडगे, मलवडी गावचे मा.सरपंच दादासाहेब जगदाळे, परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम, उद्योजक दुर्योधन सस्ते, माजी पंचायत समिती सदस्य कुमार मगर, दशरथशेठ बोराटे, दादा सुरेश जगदाळे यांच्यासह आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:53 pm

इंदापुरात राष्ट्रवादीत बंडखोरी!:प्रदीप गारटकरांनी दिला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घेतली भूमिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच राजकीय पक्षांनी गाठीभेटी व दौरे सुरू केले आहेत. राज्यातील मुख्य राजकीय गट, महायुती आणि महाविकास आघाडी, यांनी काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे. या सर्व परिस्थितीत, इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याचे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते उद्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पक्षाला दोन दिवसांपूर्वी इशारा देऊनही त्यांच्या सूचनांचा विचार न झाल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. गारटकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, पक्ष संघटनेला त्यांची गरज वाटत नाही आणि ज्या उमेदवाराला नगराध्यक्षपदाचे तिकीट दिले आहे, त्याचा अद्याप पक्षात प्रवेशही झालेला नाही. मी 100 टक्के निवडून येणार प्रदीप गारटकर म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण संधी देऊ असे मत पक्षाने मांडले होते. परंतु, तरी देखील भरत शहा यांना उमेदवारी दिली. त्यावरून आता लोकांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढणार आहे. तसेच पक्ष सोडताना गारटकर यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला पक्षश्रेष्ठींनी तुम्हाला हे देऊ ते देऊ असे सांगितले, परंतू, मी सर्वसामान्य कार्यकर्ते टिकवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी राजीनामा द्यायचा ठरवले आहे. मला राष्ट्रवादी शरद पवार गट, भाजप आणि शिवसेनेचा पाठिंबा आहे. मी 100 टक्के निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 7:11 pm

कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे:जागावाटपात उदारमतवादी भूमिका घ्यायला हवी होती, बिहार निवडणुकीवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

बिहार निवडणुकीच्या निकालांवर देशभरात चर्चा सुरू असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळ, चुकीचे अंदाज आणि अपयशी रणनीतीवर थेट बोट ठेवले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना चव्हाण यांनी पक्षाला आरसा दाखवणारे वक्तव्य केले असून, त्यांनी काँग्रेसच्या सल्लागारांच्या निर्णयक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी बिहारला गेलो नाही, पण संपूर्ण राज्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. तसेच कॉंग्रेसच्या सल्लागारांनी दिलेले अंदाज वास्तवापासून दूर होते. आपल्याकडे 19 जागा होत्या, त्या 21 किंवा 22 झाल्या असत्या, अगदी 17-18 झाले असते तरी ठीक, पण निवडक 30 जागा लढल्या असत्या आणि राजदला 40 जागा देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. तसेच जागावाटपात उदारमतवादी भूमिका घेतली असती तर जास्त जागा मिळू शकल्या असत्या, असेही चव्हाण यांनी म्हटले. विचारांची लढाई एक-दोन दिवसात संपत नाही पुढे बोलताना पृथ्वीराज म्हणाले, मी काँग्रेस पक्षाबद्दल काहीतरी सांगू शकतो, तेही, जे मी थोडे पाहिले आहे. आपण काँग्रेस पक्षाचे आत्मपरीक्षण करत आहोत. जेव्हा जेव्हा विचारांची लढाई असते तेव्हा ती एक-दोन दिवसात संपत नाही. महात्मा गांधींना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी, आंबेडकरांना त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी किती वेळ लागला हे तुम्हाला माहिती आहे. तो काळ देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा होता. कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करणे गरजेचे विचारांची लढाई खूप वेदनादायक आहे. चढ-उतार असतात. याचे मूल्यांकन करताना, मला कदाचित एकच गोष्ट वाटेल, दूरवरून, काँग्रेस पक्षाचे सल्लागार जे मतांचे आरक्षण करत होते, त्यांनी कदाचित योग्य आकडे दिले नसतील. आपण निवडक 30 जागा घेत उर्वरित 40 जागा राजदला दिल्या असत्या तर एक चांगला संदेश गेला असता आणि कदाचित जागांची संख्या काहींनी वाढली असती. आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे, काँग्रेस काय करत आहे याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:36 pm

अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा:शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे केले अनावरण, म्हणाले- महाराजांसाठी अनेक केसेस अंगावर घेणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर असताना, नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण अनेक महिन्यांपासून झाले नसल्याचे आणि महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाहताच अमित ठाकरेंनी स्वतः पुतळ्याचे अनावरण केले. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि पोलिस व मनसे सैनिकांमध्ये झटापट झाल्याचे चित्रही दिसले. या कृतीबद्दल बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, जर माझ्यावर याबद्दल कारवाई झाली, तर ती माझ्या आयुष्यातील पहिली केस असेल. पण वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेईन, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. पुतळ्यावर धूळ जमत असल्याचे मला बघवले नाही अमित ठाकरे म्हणाले, मी शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी या भागात आलो होतो. दरम्यान मला असे कळले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपूर्वीच तयार झालेला आहे. त्यावर आता धूळ साचात आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून लोकांसाठी झाला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसत आहे. पुतळ्यावर धूळ जमत असल्याचे मला बघवले नाही. म्हणूनच मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. पहिली केस असेल ती महाराजांसाठी असेल पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, मला असे वाटते माझ्यावर याबाबत कारवाई केली जाईल. मात्र या कारवाईचा मला आनंद आहे. माझ्या राजकीय जीवनातील जी कुठली पहिली केस असेल ती महाराजांसाठी असेल आणि त्याचा मला आनंदच असेल, असे ठाकरे यांनी यावेळी माध्यमांना बोलताना सांगितले. अमित ठाकरे म्हणाले की, गेल्या चार महिन्यांत अनेक नेते आणि मंत्री, अगदी पंतप्रधान मोदी विमानतळाच्या उद्घाटनासाठी तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दहीहंडी व पक्ष प्रवेशाच्या वेळी नवी मुंबईत येऊन गेले. मात्र ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो त्या छत्रपतींसाठी त्यांना वेळ मिळत नसेल, तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. महाराजांना कपडा बांधून ठेवलेले आम्हा मनसे सैनिकांना आणि नवी मुंबईकरांना बघवले नाही, म्हणूनच आज आम्ही पुतळ्याचे अनावरण केले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 6:14 pm

ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४० जणांची तोफ धडाडणार

मुंबई : आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४० स्टार प्रचारकांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, […] The post ठाकरेंच्या शिवसेनेकडून ४० जणांची तोफ धडाडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 5:59 pm

आता लोकांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसतोय:कोणाच्याही मनावर ताबा राहिलेला नाही, अनिल बोंडेंना हैदराबादमधून धमकीचा मेल; काय आहे प्रकरण?

अमरावतीमध्ये तीन दिवसांपूर्वी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याचे प्रकरण समोर आले होते. या बॅनरविरोधात आवाज उठवल्यानंतर, भाजप खासदार अनिल बोंडे यांना धमकीवजा इशारा देणारा ई-मेल हैदराबादमधून आला आहे. मुख्य चौकांमध्ये इस्लामच्या प्रचाराचे फलक लागतेच कसे, असा सवाल खासदार बोंडे यांनी पोलिसांना विचारला होता. त्यानंतर शनिवारी रात्री हा धमकीचा मेल आल्याने, बोंडे यांच्या कार्यालयाकडून अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, यामुळे शहरातील वातावरण तापले आहे. धमकीवजा इशारा मेलमध्ये म्हटले की, अस्सलामअलेकुम डॉ. साहेब, अशी या ई-मेलची सुरुवात आहे. इस्लामिक इन्फॉर्मेशनच्या विरोधात आपण जे शब्द वापरले, त्यांनी हैदराबादच्या मुसलमानांच्या मनात अशी आग लावली आहे की येथील वातावरण आता अतिशय तंग आणि तापलेले आहे. आपल्या बोलण्याने आमच्या मजहबी गैरतला जेवढा धक्का पोहोचला, तो राग आता लोकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. वृद्ध, तरुण, युवक, कुणाच्याही मनावर आता ताबा राहिलेला नाही. आपण जी आग लावली तिचा धूर आता खूप दाट झालाय पुढे असे म्हटले की, आपण समजून घ्या डॉ. साहेब, ही सामान्य नाराजी नाही, हा तो राग आहे जो एका ठिणगीवर वणवा बनू शकतो. आपण आमची ओळख, आमचा दिन, आमची तालीम या सगळ्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे धाडस केले आणि त्यामुळे संपूर्ण समुदायाच्या भावना जखमी झाल्या. आज हैदराबादच्या महोल्ल्यांमध्ये आपल्या वक्तव्यामुळे अशी बेचैनी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे, की लोक आपला त्रास आणि आपला राग लपवूही शकत नाहीत. आम्ही तुम्हाला एवढेच सांगतो. आपण जी आग लावली, तिचा धूर आता खूप दाट झाला आहे. आपल्या प्रत्येक हावभावात येथील मुस्लिम समाजाला एक उघड्या जखमेप्रमाणे वेदना जाणवत आहे. पुढे मेलमध्ये असे म्हटले की, म्हणूनच आपल्या जिभेवर आणि आपल्या विधानांवर संयम ठेवा. कारण, डॉ. साहेब, यावेळी आवरणे खूप अवघड झाले आहे. एक चुकीचा शब्दही वातावरण बिघडवण्यासाठी पुरेसा आहे. असा या ई-मेलमध्ये म्हटले आहे. हैदराबादची नाराज मुस्लिम बिरादरी म्हणून ई-मेलच्या अखेरीस उल्लेख आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 5:56 pm

तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे नेतृत्व : डॉ. धन्या प्रमोद

पुणे : प्रतिनिधी येत्या काळात तंत्रज्ञान आणि संगणकीय क्षेत्रात महिला जगाचे नेतृत्व करतील. भविष्यातील तांत्रिक प्रगतीमध्ये अनेक महिला आदर्श म्हणून उदयास येतील. एआय एक सर्जनशील जग निर्माण करू शकते, परंतु ते मानवी भावनांची प्रतिकृती बनवू शकत नाही. महिला जिथे जिथे संस्था किंवा विद्यापीठांचे नेतृत्व करतात तिथे यश स्वाभाविकपणे येते. भविष्य मजबूत एआय-एमएल धोरणांद्वारे आकारले जाईल, […] The post तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचे नेतृत्व : डॉ. धन्या प्रमोद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 5:53 pm

१७ नोव्हेंबर रोजी लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील हौशी रंगकर्मी आणि चोखंदळ नाट्य रसिकांना प्रचंड ओढ असलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे लातूर केंद्रावर दि. १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता उद्घाटन होणार आहे. शहरातील एकुण नाट्य वर्तुळात प्रचंड उत्साह असल्याचे वातावरण सर्वत्र दिसून येत आहे शहरातील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात ही स्पर्धा […] The post १७ नोव्हेंबर रोजी लातूर केंद्रावरील राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 5:29 pm

हिंगोली नगरपरिषद निवडणूक:विनापरवाना रॅली काढणे उमेदवाराला पडले महागात, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

हिंगोली शहरामध्ये नगरपालिका निवडणूक निमित्ताने एका उमेदवाराने विनापरवाना रॅली काढल्याने हिंगोली शहर पोलिसात आदर्श आचारसहिता भंग केल्याच्या आरोपावरून रविवारी तारीख 16 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली, कळमनुरी वसमत नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांसोबतच अपक्ष उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असल्यामुळे इच्छुक उमेदवाराकडून अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत आहे. त्यातही अनेक ठिकाणी उमेदवाराकडून शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. तर कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून तीनही ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे. दरम्यान हिंगोली शहरामध्ये राज्य वस्तू व सेवा कर विभागाचे कर निरीक्षक मनीष जाधव, पोलिस कर्मचारी संजय तोडेवाले, अशोक धामणे, संजय मार्के, संतोष करे,गणेश लेकुळे, गणेश वाबळे यांच्या पथकाकडून पाहणी केली जात आहे. दरम्यान रविवारी तारीख 15 दुपारी शेख जुबेर उर्फ मामू यांनी रविवारी ता 15 शासकीय विश्रामगृह समोरील रस्त्यावरून रॅली काढली. 100 ते 200 महिला व पुरुषांचा सहभाग होता. मात्र सदर रॅलीसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे एका तपासणीमध्ये स्पष्ट झाले. यावरून भरारी पथकातील प्रमुख मनीष जाधव यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विनापरवाना रॅली काढणे तसेच जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे आरोपावरून शेख जुबेर उर्फ मामू ( रा हिंगोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार पोटे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 5:18 pm

सुनील तटकरेंची भरत गोगावलेंवर टोलेबाजी:म्हणाले- मी जाड भिंगाचा चष्मा लाऊन पाहिले, पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यावर नाव न घेत टीका केली आहे. हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लाऊन पाहिली, दुर्बिण लाऊनही शोधली. पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही, अशा शब्दांत तटकरे यांनी टोला लगावला आहे. महाड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल केला. तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत त्यांच्यासमोर खूप महत्त्वाचे अजेंडे आहेत, विशेषतः गेल्या चार वर्षांपासून शहरात स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने निर्माण झालेल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. सुनील तटकरे म्हणाले, मी अनेकांचे वक्तव्य ऐकतो की, महाड शहरात काही हजार कोटी रुपयांचा निधी आणला. शहरामध्ये मी फिरलो. दुर्बिण लावून बघितले. जाड भिंगाचा चष्मा लावला. पण मला तसं काही कुठे दिसले नाही. प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था पाहिली. ते पाहिल्यानंतर कुठे नेऊन ठेवलाय महाड? अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळत आहे. महाड शहरात अनेक विकास कामे रखडली असून यावर बोलायला खूप वेळ आहे, असे म्हणत तटकरे यांनी गोगावले यांच्यावर टीका केली आहे. महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद सतत वाढत आहे. महाड येथे माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या वक्तव्यांचा जोरदार समाचार घेतला. तटकरे म्हणाले की, दळवींनी केलेली वक्तव्ये निंदनीय आहेत आणि जो कोणी माझ्यावर टीका करत आहे, ती माणसे न्यूनगंड आणि भयगंडाने पछाडलेली आहेत. त्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना इशारा देत स्पष्ट केले की, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन नेटाने काम करतील. दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात असलेल्या महाडमध्ये, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले. महाड नगरपालिकेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली असून, ते शिंदे गटाच्या शिवसेनेला शह देण्यासाठी जोरदार तयारीने रणांगणात उतरले आहेत. या युतीनुसार, राष्ट्रवादी 15 जागांवर तर भाजप 5 जागांवर निवडणूक लढवणार असून, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. भाजपने राष्ट्रवादीसाठी हातमिळवणी केल्यामुळे, शिंदे सेनेला कोंडीत पकडण्याचा खासदार सुनील तटकरे यांचा डाव यशस्वी होतो का, हे पाहणे यंदाच्या चुरशीच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 5:15 pm

वजीराबाद पोलिसांकडून वॉन्टेड गुंड गब्यावर गोळीबार

नांदेड : प्रतिनिधी नांदेड शहरातील कुख्यात गुंड रबजोत सिंग उर्फ ‘गब्या ’खंडणी, जीवघेणे हल्ले, शस्त्रास्त्र कायदा अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला आरोपी याला अखेर पोलीसांनी डाव्या कमरेवर गोळी लागेल असा कंटेनमेंट ऍक्शन घेत जखमी अवस्थेत पकडले. प्राप्त माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे १२:३० वाजता, वजीराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला भगतसिंग रस्त्यावर गब्या दिसला. […] The post वजीराबाद पोलिसांकडून वॉन्टेड गुंड गब्यावर गोळीबार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 5:05 pm

बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का:योगेश क्षीरसागरांचा सपत्नीक भाजपमध्ये प्रवेश, आमदार बंधुविरोधात मैदानात उतरणार

नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांची साथ सोडून थेट भाजपचा हात धरला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. आता योगेश क्षीरसागर हे भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावरून बीड नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत. पक्ष सोडण्यामागे काही कारणे अजित पवारांच्या पक्षाची साथ सोडण्यामागील कारणे सांगताना योगेश क्षीरसागर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणे होती, आता मात्र मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे, असे ते म्हणाले. या विधानामुळे बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आधीपासूनच तयारी करत होतो. आता आपण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. दरम्यान, योगेश क्षीरसागर हे आता कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुती झाली नाही, तर योगेश क्षीरसागर हे आमदार बंधू संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात राजकीय मैदानात दिसण्याची शक्यता आहे. बीडच्या राजकारणात नवीन चुरस नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने योगेश क्षीरसागर यांनी वेळ न दवडता भाजप प्रवेशाची घोषणा केली. त्यांच्या कुटुंबाची बीड नगरपालिकेवर दीर्घकालीन पकड राहिलेली असून त्यांचे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता येथे जवळपास निर्विवाद मानली जाते. त्यामुळे योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे बीडमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो. नगरपालिका निवडणूक जवळ येत असताना झालेल्या या प्रवेशामुळे बीडमधील राजकारणात नवीनच चुरस निर्माण झाली आहे. हे ही वाचा... ठाणे महापालिकेसाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी खेळी:पत्नी ऋता यांना मैदानात उतरवणार, नगरसेवक फोडणाऱ्या शिंदे गटाला तगडे आव्हान ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (शप) पक्षाची होत असलेली पडझड थांबवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात थेट आव्हान उभे करण्यासाठी, आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 5:04 pm

भारताचा पराभाव!

कोलकाता : वृत्तसंस्था भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेच्या गोलदांजांनी १०० रन्सच्या आत टीम इंडियाचा गाशा गुंडळला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ३० धावांनी विजय मिळवला. भारत दुस-या डावात […] The post भारताचा पराभाव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 4:57 pm

कळमनुरीच्या नगराध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीत तिढा:काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच, दोन्ही पक्षांचा पदावर दावा

हिंगोली जिल्ह्यात कळमनुरीच्या नगराध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीचे घोडे आडले असून, काँग्रेस व ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदावर दावा केला जात आहे. त्यामुळे आता आघाडीचा तिढा कधी सुटणार याची प्रतीक्षा कार्यकर्त्यांना लागली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली सह कळमनुरी व वसमत नगरपालिकेची निवडणूक होत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महायुती मधील तीनही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या नेत्यांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असून दुसरीकडे मात्र मैत्रीपूर्ण लढत असल्याचे सांगितले जात आहे. भाजप व शिंदे सेनेच्या आरोप प्रत्यारोपामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) मात्र सावध भूमिकेमध्ये आहे. दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये तूर्तास हिंगोली व वसमतच्या नगराध्यक्ष पदाच्या जागेवर एक मत झाले असले तरी कळमनुरीच्या नगराध्यक्ष पदाच्या तिढा अद्यापही कायम आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये हिंगोलीचे नगराध्यक्ष पद ठाकरे गटाला तर वसमतची नगराध्यक्ष पद काँग्रेसला सोडण्यात आले आहे. या दोन्ही पालिकेमध्ये महाविकास आघाडी निवडणूक लढविणार आहे. मात्र कळमनुरीच्या नगराध्यक्ष पदावर ठाकरे गटाने दावा सांगितला असून या सोबतच काँग्रेसनेही नगराध्यक्ष पदावर दावा सांगितल्याने महाविकास आघाडीमध्ये कळमनुरीच्या जागेवरून वादाला तोंड फुटले आहे. मागील वेळी नगराध्यक्ष ठाकरे गटाकडे होते. त्यामुळे काँग्रेसने ठाकरे गटाला कळमनुरीचे नगराध्यक्ष पद सोडावे अशी मागणी ठाकरे गटाची जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत केली. तर दुसरीकडे काँग्रेसनेही कळमनुरीच्या नगराध्यक्ष पदाची जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे अद्यापही नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे कळमनुरीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार का यावर संभ्रम निर्माण व्यक्त होत आहे. तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते देखील संभ्रमात सापडले आहेत. लवकरच तिढा सुटणार : ठाकरे गट जिल्हाप्रमुख महाविकास आघाडीचे वसमत व हिंगोली येथील नगराध्यक्ष व नगरसेवकाच्या जागेवर एकमत झाले आहे. कळमनुरीचा तिढा देखील लवकरच मार्गी लागणार असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बैठकास सुरू आहेत. सोमवारी तारीख 17 महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 4:01 pm

एसटी बसमध्ये बसविणार ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’

मुंबई : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पुढील वर्षात दाखल होणा-या नव्या बसमध्ये चालकाजवळ ब्रेथ अ‍ॅनालायझर यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्रामुळे चालकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास बसचे इंजिन सुरू होणार नाही, म्हणजेच चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यास बस सुरू होणार नाही. या निर्णयाचे प्रवाशांकडून अन् प्रवासी संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच मंत्री प्रताप सरनाईक यांनी, […] The post एसटी बसमध्ये बसविणार ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:44 pm

मुलीचे लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार : इंदुरीकर

अहिल्यानगर : प्रतिनिधी मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले. ‘बोलण्याप्रमाणे वागले नाहीत’ अशी टीका त्यांच्यावर होत असताना, संतप्त इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार असल्याचे म्हणत या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हीडीओ चर्चेत होते. आपल्या कीर्तनातून […] The post मुलीचे लग्न साखरपुड्यापेक्षा टोलेजंग करणार : इंदुरीकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:36 pm

सलमान खान-तमन्ना भाटियाचा रोमँटिक परफॉर्मन्स

मुंबई : प्रतिनिधी कतारची राजधानी दोहा येथे ही दबंग रिलोडेड टूर आहे. सलमानसोबत तमन्ना भाटिया, जॅकलीन फर्नांडिस, सुनील ग्रोव्हर, मनीष पॉल, स्टेबिन बेन हे देखील या टूरवर आहेत. दोहा येथे कलाकारांचे परफॉर्मन्स आता व्हायरल होत आहेत. विशेषत: सलमान खान आणि तमन्ना भाटियाची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. दोघांनी एकत्र सिनेमा करावा असे चाहते प्रतिक्रिया […] The post सलमान खान-तमन्ना भाटियाचा रोमँटिक परफॉर्मन्स appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:34 pm

तेजस्वींच्या सभेतील गर्दी AI ची होती का?:बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे - उद्धव ठाकरे; आयोगाच्या भूमिकेवरही सवाल

मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तेजस्वी यादवांच्या प्रचार सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती, ती एआयची होती का? असा सवाल करत, बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे आहेत, असे म्हणत निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालाच्या 'गणितावर' प्रश्न उपस्थित केले. बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले, पण त्याचवेळी आपला संभ्रमही व्यक्त केला. ठाकरे म्हणाले, आमदार चषक स्पर्धेत बिहारचाही संघ खेळायला येणार आहे. जो जिता वही सिकंदर. पण सिकंदर बनण्याचे गुपित कोणी समजू शकले नाही. जे जिंकले त्यांचे अभिनंदन. तेजस्वींच्या प्रचारसभेची गर्दी एआयची होती का? निकालातील अनाकलनीयतेबद्दल बोलताना त्यांनी तेजस्वी यादव यांच्या सभांमधील गर्दीचा मुद्दा उपस्थित केला. निवडणुकीत तेजस्वीच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होती. ती खरी होती की एआयची होती हे कळायला मार्ग नाही. ज्याच्या सभेला अलोट गर्दी असते, त्याचं सरकार येत नाही. पण ज्यांच्या सभेत खुर्च्या खाली होत्या, त्यांचं सरकार येतं, हे कळण्याच्या पलिकडचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. बहुमतानंतरही नेता निवडायला वेळ लागतो बिहारमध्ये एनडीएला बहुमत मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यासाठी विलंब होत आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी यावरून भाजपला टोला लगावला. बहुमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही. महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर (मागील निवडणुकीत) नेता निवडायला त्यांनी काही वेळ घेतला होता, असे ते म्हणालेत. दहा हजार रुपये दिल्यामुळे काही फरक पडला असेल, पण लोक रोज जे भोगत आहेत ते त्यांच्या मनातून अजून जात नाही, असे मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह : 'लोकशाही मानायची का?' बिहारमधील निकालासोबतच, ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळल्याच्या जुन्या मुद्द्याची आठवण करून दिली. हे अनाकलनीय गणित आहे. त्यावेळी (मागील काळात) मुद्दा उचलला होता की मतदार यादीतून ६५ लाख नावं वगळली. ती परत घेतली की नाही माहीत नाही. आम्ही मोर्चा काढला. दुबार नोंदणी, बोगस पत्त्यावर आम्ही बोललो. पण निवडणूक आयोग काही बोलत नाही. ढिम्म आहे. त्यामुळे या प्रक्रियेला लोकशाही मानायची का? आमचा निवडणुकीला विरोध नाही. निवडणूक लोकशाहीचा जीव आहे. पण असा प्रकार मानायचा का? निवडणूक आयोग काही उत्तर द्यायला तयार नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 3:28 pm

वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर परवानगी घेऊन दारूपार्टी सुरू असल्याचा आरोप अखिल चित्रेंनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हीडीओ त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तर ऐतिहासिक वास्तूवर दारूपार्टीची परवानगी मिळतेच कशी, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला आहे. मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर दारूपार्टी सुरू असल्याचा व्हीडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे […] The post वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:27 pm

शाळांच्या सहलीसाठी मिळणार ‘एसटी’च्या नव्या बसेस

मुंबई : प्रतिनिधी शालेय सहली हा विद्यार्थीजीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय माफक दरात विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो. ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा […] The post शाळांच्या सहलीसाठी मिळणार ‘एसटी’च्या नव्या बसेस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:24 pm

डिसेंबरपर्यंत भाजीपाला महागच

नवी मुंबई : प्रतिनिधी परतीचा पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका राज्यातील शेतमालाला बसला असून परिणामी गेल्या आठवड्यापासून शेतमालाची आवक ३० ते ४० टक्क्यांनी घटली. यातून किरकोळ बाजारात भाजीपाला सरासरी ६० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. कोथिंबीर जुडी २० रुपयांवरून ५० रुपयांवर गेली आहे. १५ डिसेंबरपर्यंत म्हणजेच महिनाभर भाजी बाजारात हीच स्थिती राहील, अशी माहिती […] The post डिसेंबरपर्यंत भाजीपाला महागच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:20 pm

गूळ कारखाने आणणार कायद्याच्या कक्षेत

मुंबई : प्रतिनिधी साखर कारखान्यांप्रमाणे आता गूळनिर्मिती करणा-या कारखान्यांवरही निर्बंध आणून या उद्योगाला कायद्याच्या कक्षेत आणले जाणार आहे. गूळ कारखान्यांसाठी कायदा करताना यामध्ये शेतक-यांना ‘एफआरपी’, कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि किमान वेतन, स्वच्छता यासंबंधीचे नियम लागू केले जाणार आहेत. शिवाय, गु-हाळघरे चालू करण्यासाठी ऊस कारखान्यांप्रमाणे गूळ कारखान्यांनाही परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने साखर आयुक्तांना […] The post गूळ कारखाने आणणार कायद्याच्या कक्षेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:17 pm

जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जादूटोण्याची भीती दाखवत एका भोंदू बाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. धक्कादायक म्हणजे याशिवाय या पीडित महिलेकडून ५० लाख उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश जगताप असे या भोंदूबाबाचे नाव असून सदर […] The post जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:14 pm

पूर्व विदर्भात शिवसेना स्वबळावर

नागपूर : प्रतिनिधी पूर्व विदर्भातील ५६ नगरपंचायत, नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १३०० एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे भाजपची वाट न पाहता शिवसेना विदर्भात स्वबळाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी याची तशी पुष्टी देखील केली आहे. महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी व्हावी, हा आमचा प्रयत्न शेवटपर्यंत राहणार आहे. मात्र […] The post पूर्व विदर्भात शिवसेना स्वबळावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 3:08 pm

हिंगोलीतील 15 कोटींचा भुयारी मार्ग खुला:आचारसंहितेमुळे उद्घाटनाला विलंब, नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन कंपनी कर्मचाऱ्यांनीच फोडले नारळ

हिंगोली येथे रेल्वे उड्डाणपुलालगत सुमारे 15 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे उद्घाटन कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी तारीख 16 झाले. या भुयारी मार्गामुळे दुचाकी व चारचाकी वाहनचालकांची मोठी सोय झाली आहे. हिंगोली येथील खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यानंतर दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना या रेल्वे उड्डाणपूलावरूनच वाहतूक करावी लागत होती. रेल्वे उड्डाणपूल अरुंद असल्यामुळे अनेक वेळा या उड्डाणपुलावर अपघात झाले आहेत. दरम्यान या रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूलाच रेल्वे विभागाच्या वतीने भुयारी मार्गाचे बांधकाम केले. सुमारे 310 मीटर लांबीच्या या भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी तब्बल 15 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामध्ये दोन विद्युत पंप देखील बसविण्यात आले असून पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यास तातडीने विद्युत पंपाने पाणी उपसा करून वाहतूक सुरळीत ठेवली जाणार आहे. विशेष म्हणजे विद्युत पंप स्वयंचलित चालू बंद होणार आहे. दरम्यान मागील चार ते पाच महिन्यापूर्वी या भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र या मार्गाचे उद्घाटन झाले नसल्यामुळे भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. त्यामुळे खटकाळी बायपास कडून हिंगोली शहरात येणाऱ्या सर्व वाहनांना रेल्वे उड्डाण पुलावरूनच यावे लागत होते. सदरील भुयारी मार्ग तातडीने सुरू करावा अशी मागणी केली जाऊ लागली होती. मात्र आता पालिका निवडणूक व त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमुळे भुयारी मार्गाचे उद्घाटन आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले. दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची होणारी गैरसोय लक्षात घेता रविवारी तारीख 16 सकाळी कंपनीकडूनच भुयारी मार्गाचे नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी गुलाब घुगे, साहेबराव बांगर, शंकर पुरी, अशोक मार्कड, महेंद्रसिंग राजपूत, अनुभाई कुशवाह, शेख जमील यांची उपस्थिती होती. भुयारी मार्ग सुरू झाल्यानंतर उत्साही नागरिकांनी वाहतूक सुरू केली. अनेकांनी पहिला वाहतूकदार म्हणून सेल्फी देखील काढली. भुयारी मार्ग सुरू झाल्यामुळे दुचाकी व चार चाकी वाहन चालकांची मोठी सोय झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 2:40 pm

आव्हाडांची पत्नी निवडणुकीच्या मैदानात

ठाणे : प्रतिनिधी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने जितेंद्र आव्हाडांचे कट्टर समर्थक फोडले. कळव्यातील मिलिंद पाटील यांच्यासह ९ माजी नगरसेवक शिंदेंसोबत गेले. मिलिंद पाटील हे आव्हाडांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल जात. त्यामुळे प्रभाग क्रमांक २३ मध्ये तगडा उमेदवार देत यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची रणनीती जितेंद्र आव्हाड यांनी आखली आहे. त्यामुळे खुद्द त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड […] The post आव्हाडांची पत्नी निवडणुकीच्या मैदानात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 2:39 pm

राज्यातील अडीच लाख शेतकरी वगळले

पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे २० व्या हप्त्याच्या तुलनेत २१ व्या हप्त्यावेळी देण्यात येणा-या लाभार्थ्यांमध्ये तब्बल अडीच लाख शेतक-यांना वगळले आहे. केंद्र सरकारने यासाठी आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबांची सदस्य संख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ही घट दिसून येत असल्याचे […] The post राज्यातील अडीच लाख शेतकरी वगळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 2:35 pm

हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली:मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, स्थानिकच्या निवडणुकांतही 'माती' होण्याचे भाकीत

विरोधक हे सातत्याने आरोप करतात, पण कोर्ट जेव्हा त्यांना पुरावे मागते, तेव्हा ते देत नाहीत. निवडणूक आयोग देखील त्यांना पुरावे मागतो, पण एक पुराव देखील विरोधक देऊ शकत नाहीत. हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, मात्र अजुनही ते सुधरले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांची अशाच प्रकारची माती होणार असल्याचे भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती संभाजीनगर शहरात आज भाजपच्या कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय मराठवाडा विभागासाठी असणार आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. मी विशेष उल्लेख आणि अभिनंदन मंत्री अतुल सावे यांचे करू इच्छितो. त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कार्यालय उभारताना अतिशय मोलाची भूमिका बजावली. जमीन शोधण्यापासून ते कार्यालयाची इमारत उभी राहण्यापर्यंत सातत्याने येणाऱ्या अडचणींचा सामना अतुल सावे यांनी केला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाजन, मुंडे स्वर्गातून आशीर्वाद देत असतील आपले नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरवर प्रचंड प्रेम होते. भाजपच्या वाटचालीत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, वसंतराव भागवत या सगळ्या लोकांनी सातत्याने आपली कार्यालये झाली पाहिजेत, पक्षाला स्थैर्य आले पाहिजे, यासाठी त्या काळात खूप प्रयत्न केले. त्याकाळची आपली परिस्थिती आणि पद्धतीनुसार जसे मिळतील तसे कार्यालये त्या काळात उभे केले आणि पक्षाला चालवले. कुठे नाही उभे राहू शकले, तर किरायाच्या जागेवरून पक्ष चालवला. पण आपली कार्यालये चांगली असली पाहिजेत, असे त्याकाळी आपले स्वप्न होते. आता प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद देत असतील, असे फडणवीस म्हणाले. प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय व्हावे ही शहांची इच्छा देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, २०१४ साली आपले सरकार आल्यानंतर देशामध्ये अमित शहा यांनी भाजपची जबाबदारी घेतली. त्यावेळी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे प्रशस्त कार्यालय झाले पाहिजे, अशी इच्छा अमित शहांनी बोलून दाखवली आणि त्यासाठी प्रयत्न सुरू करा, असे अमित शहांनी आम्हाला सांगितले, असे फडणवीस म्हणाले. तेव्हापासून प्रत्येक जिल्ह्यात जमीन खरेदी करणे, प्लॅन मंजूर करणे, कार्यालय उभे करण्याचे आपले कार्य सुरू आहे. कुठेही सरकारी जमिनी घ्यायच्या नाहीत, अनधिकृत बांधकाम करायचे नाही, शंभर टक्के परवानग्या घेऊनच भाजपचे कार्यालय तयार झाले पाहिजे, हे तत्त्व आपण पाळले. भाजपचे विभागीय कार्यालय कसे आहे? छत्रपती संभाजीनगर येथील शहर आणि जिल्ह्याचे कार्यालय असले, तरी ते विभागाचे देखील कार्यालय असणार आहे. या कार्यालयात वेगवेगळ्या प्रकारे काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या केबिन्स आहेत. माध्यमांसाठी सुसज्जित हॉल आहे. दोन मोठे हॉल आहेत. छत्रपती संभाजीनगरला प्रदेश कार्यकारणी करायची असेल, तर या कार्यालयात होऊ शकते, एवढी व्यवस्था या कार्यालयात आहे. विभागीय बैठकी या ठिकाणी होऊ शकतात. या ठिकाणी बोर्ड रूम देखील आहे. सर्व सुविधांनी युक्त अशा प्रकारचे उत्तम कार्यालय तयार केले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 1:48 pm

हातमागाची किमया:भंडाऱ्यातील 15 दिवसांत विणली जाणारी करवत साडी मराठी फॅशन वीकमध्ये चमकली

मुंबई येथे आयोजित मराठी फॅशन वीकमध्ये भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील सिल्क करवत साडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शनिवारी अंधेरी पश्चिम येथे झालेल्या फॅशन शोमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गोपीचंद निनावे यांनी हातमागावर विणलेली ही साडी सादर केली. या कार्यक्रमात विविध मॉडेल्सनी वेशभूषा सादर केली. यात 'ग्रीष्मा हँडलूम्स'चे गोपीचंद निनावे यांनी तयार केलेली टसर सिल्कची करवती साडी विशेष ठरली. फॅशन शोच्या सुरुवातीलाच या साडीचे सादरीकरण झाले, त्यानंतर कापसे पैठणीसह महाराष्ट्रातील विविध वेशभूषा सादर करण्यात आल्या. मराठी कलावंत या शोचे 'शो स्टॉपर' होते. आंधळगाव येथील निनावे यांच्याकडे तयार होणारी टसर सिल्क करवत साडी हातमागावर विणली जाते. ही साडी बनवण्यासाठी किमान 15 दिवस लागतात. हातमागावरील वस्त्रनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी या फॅशन वीकचे आयोजन करण्यात आले होते. विणकर गोपीचंद निनावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिल्क करवत साडीचे वजन 600 ते 650 ग्रॅम असते आणि यासाठी 400 ते 450 ग्रॅम सिल्क लागते. या साडीची किंमत 15 हजार रुपये आहे. निनावे यांच्या मते, ही साडी नातेवाईकांमार्फत अमेरिका, दुबई आणि आफ्रिकेपर्यंत पोहोचते. निनावे प्लेन साडी, कुर्ता आणि शर्टचे कापडही विणतात, जे 600 ते 1000 रुपये प्रति मीटर दराने उपलब्ध आहे. त्यांच्याकडे सध्या 20 ते 25 कारागीर काम करतात. करवत साडीसाठी किमान दोन ते तीन महिन्यांचे 'वेटिंग' असते, असे निनावे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 1:42 pm

कोपरगावातील नरभक्षक बिबट्या अखेर ठार

अहिल्यानगर : प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील ऊसतोड कामगाराच्या मुलीवर आणि येसगाव येथील वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. याच नरभक्षक बिबट्याला आता वन विभागाने मोठ्या प्रयत्नांनंतर ठार केले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याने हैदोस घातला […] The post कोपरगावातील नरभक्षक बिबट्या अखेर ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 1:27 pm

आता प्राण्यांसाठीही स्मशानभूमी; राज्यात पहिला उपक्रम

मुंबई : प्रतिनिधी ठाणे शहरात पाळीव प्राणी म्हणजे घरातल्या सदस्यांसारखेच असतात. आता त्यांच्या अखेरच्या प्रवासासाठी ठाण्यात एक चांगले आणि सन्मानाचे ठिकाण तयार झाले आहे. आजार, अपघात किंवा म्हातारपणामुळे हे निष्ठावान साथीदार वारल्यास, त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची जी अडचण होती, ती आता संपली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने माजीवडा (ठाणे) येथे महाराष्ट्रातील […] The post आता प्राण्यांसाठीही स्मशानभूमी; राज्यात पहिला उपक्रम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 1:23 pm

बुलडाण्यात भीषण अपघात; २ ठार, तीन जण जखमी

बुलडाणा : प्रतिनिधी बुलडाण्यात भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडील आणि मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत असून ट्रक चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरुन पळ काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील कवडगाव […] The post बुलडाण्यात भीषण अपघात; २ ठार, तीन जण जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Nov 2025 1:20 pm

एसटी महामंडळाचा विद्यार्थ्यांसाठी निर्णय:शालेय सहलीसाठी 'एसटीच्या' नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

'स्वस्त आणि सुरक्षित' प्रवासाचा आनंद घेण्यासाठी यंदा शाळा-महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळ नवीन बसेस उपलब्ध करून देणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टी संपली की, शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सहलीचे वेध लागतात. शालेय सहली हा विद्यार्थी जीवनातील अतिशय संस्मरणीय असा अनुभव असतो. राज्य शासन एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय सहलीसाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये ५०% टक्के सवलत देते. त्यामुळे अतिशय मापक दरामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांना भेट देणे शक्य होते. तो त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील एक उपक्रम असतो. अर्थात, यंदा एसटीकडे असलेल्या नवीन बसेस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्यभरात असल्या एसटीच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १००० बसेस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जातील. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. मागील वर्षी १९ हजार ६२४ बसेस दिल्या मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा- महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९ हजार ६२४ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा (प्रतिपुर्ती रक्कमेसह ) महसूल प्राप्त झाला होता. यंदा देखील प्रत्येक आगारातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळा-महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात बाबत आवाहन करण्यात येत आहे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा -महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 12:44 pm

मनसेला आमच्या भूमिकेवर बोलण्याचा अधिकार नाही:बदमाशीने जिंकलेली निवडणूक टिकत नाही; जनतेचा रोष उसळतोय– विजय वडेट्टीवार

मनसेच्या संदर्भात आम्हाला काहीही बोलायचे नाही. ते काही आमच्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीत काय भूमिका आहे ती ठेवावी, आमच्या पक्षाच्या भूमिकेवर बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. आमचा निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ. कोण बदमाशी करत निवडणूक जिंकल्याने काही फरक पडत नाही, जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे, त्याला सत्ताधाऱ्यांना समोरे जावे लागेल, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इंडिया किंवा महा विकास आघाडीचा विषय येत नाही. स्थानिक ठिकाणी जो निर्णय योग्य वाटत असतो तो घेऊन आघाडी केली जाते. जिथे जमेल तिथे जमवले जाते जिथे नाही तिथे जमत नाही. अंबादास दानवेंनी एक बोट आमच्याकडे दाखवत असताना 4 बोट त्यांच्याकडे आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे हे समजून घेतले पाहिजे, आणि मग दुसऱ्यावर बोट दाखवावे. सरकारला रोषाला सामोरे जावे लागणार विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकार स्थापनेसाठी EVM आणि बोगस मतदार यादीचा वापर केला जात आहे.त्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. सध्या जे निवडणुकीचे निकाल बदलले जात आहे यावर एक ना एक दिवस सरकारला रोषाला सामोरे जावे लागणार आहे. पावित्र्य नष्ट करण्याचा उद्देश विजय वडेट्टीवार म्हणाले की, ऐतिहासिक स्थळांवर दारु पार्टी केली जाते त्याला परवानगी दिली जाते हे अती होत आहे. किल्ल्यावर जर असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर लगेच कारवाई झाली पाहिजे. पावित्र्य नष्ट करण्याचा उद्देश यामागे आहे असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. तर पैसे देऊन ही परवानगी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ..तर बिबट्यांना मारले पाहिजे विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात बिबट्याचे हल्ले वाढले आहे. ऊस लागवडीच्या ठिकाणी ही संख्या वाढलेली दिसून येत आहे. वन विभागाने जंगली प्राण्याचे सेन्सस करावे. त्यांच्याकडे आकडा नाही म्हणणे म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असा त्याचा अर्थ आहे. वन विभाग आणि वनमंत्री यांनी याकडे लक्ष घातले पाहिजे. जिथे जिथे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत तिथे पकडले पाहिजे आणि त्यांना हलवले पाहिजे. जर गरज असेल तर त्यांना मारले पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 12:44 pm

हेरिटेज बांद्रा किल्ल्यावर मध्यरात्री दारू पार्टी:ठाकरे गटाचा सरकार, BMC सह भाजपवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन

बांद्रा किल्ल्यावर मध्यरात्री झालेल्या दारूपार्टीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या, संरक्षित हेरिटेज स्थळांपैकी एक असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूसह पार्टी झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला असून, या प्रकरणावरून सरकार, बीएमसी आणि उत्पादन शुल्क विभागावर तीव्र टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर करत राज्य सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर सवाल उपस्थित केले आहेत. चित्रे यांनी या घटनेमागे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे 'ढोंगी हिंदुत्व' आणि 'लबाड संस्कृती' असल्याचा घणाघात केला आहे. हेरिटेज किल्ल्यावर पार्टीला परवानगी दिलीच कशी? अखिल चित्रे यांनी 'एक्स' समाज माध्यमावर पोस्ट करत ही घटना १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असल्याचे सांगितले. स्थानिकांनीच ही पार्टी चित्रित केल्याचा त्यांचा दावा आहे. चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रशासनाला थेट जाब विचारला आहे: महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेला आणि मराठा इतिहासाची साक्ष देणारा बांद्रा किल्ला या हेरिटेज स्थळी दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्पादन शुल्क विभाग आणि BMC परवानगी देतातच कशी? इतकेच नाही तर, या पार्टीच्या आयोजनात 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग देखील सामील असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 'ढोंगी हिंदुत्व' अन् लबाड संस्कृत या घटनेवरून चित्रे यांनी भाजपच्या राजकीय धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही, तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे. हेच भाजप आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व आणि लबाड संस्कृती आहे. सांस्कृतिक मंत्री शेलार कुठे आहेत? या प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी विचारले, नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called 'सांस्कृतिक मंत्री' आशिष शेलार? मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून, यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. मी या पार्टीचा व्हिडिओ पाहिलेला नाही. मला याबाबत लोकांनी सांगितले आहे. पण पार्टीला परवानगी दिली असेल, तर नक्कीच कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ऐतिहासिक वारसास्थळावर झालेल्या या गैरप्रकारामुळे इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. या गंभीर आरोपांनंतर आता राज्य सरकार, पर्यटन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग यावर काय स्पष्टीकरण देते आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 12:35 pm

स्थानिक निवडणुकीचा निर्णय स्थानिक स्तरावर:विखे पाटील शरद पवारांवर बोलले कारण आमचे नाणे मार्केटमध्ये चालते – सुप्रिया सुळे

सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे.राधाकृष्ण विखे पाटील हे माझ्यापेक्षा वयाने, पदाने मोठे आहेत पण एवढे असताना त्यांना शरद पवारांचे नाव घेत टीका करावी लागते म्हणजे आमचे नाणं मार्केटमध्ये चालते आहे. जर असे नसते तर विखे पाटील शरद पवारांवर बोललेच नसते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाला युती आघाडीबद्दल जे योग्य वाटेल तो निर्णय घेतलेला आहे. पक्षाने त्यासाठी सुट दिली आहे. त्या पद्धतीने सर्व काम सुरू आहे. मंगळवारी पक्षाचे किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे स्पष्ट होईल. बिहार विजयाचे श्रेय नितीशकुमारांचे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आशिष शेलारांनी टीका केली ती त्यांची बोलायची स्टाईल आहे. लोकशाहीमध्ये फार काही कुणाचे मनावर घ्यायचे नसते. आम्ही राज्याची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांशी आमचे चांगले संबंध आहेत त्यांच्या कुटुंबात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती नाही. बिहार निवडणुकीचे श्रेय हे नितीशकुमारांचे श्रेय आहे. आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. दमानिया अभ्यासपूर्वक आरोप करतात सुप्रिया सुळे म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामुळे तिथे युती, आघाड्या बदलतात हे काही नवीन नाही. अनेक वेळा अशा गोष्टी होत असतात. अंजली दमानिया या अभ्यासपूर्वक आरोप करत असतात. त्यांना कोर्टात जाण्याचा अधिकार दिलेला आहे. ईडी ही स्वायत्त संस्था आहे. पण ईडीच्या मागे एक अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे. हा आरोप मी करत नाही कोर्टाने त्यांना फटकारले आहे. ईडीने अनेकांवर आरोप केले पण त्यात तथ्य नव्हते त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले होते. संस्था चांगली असली तरी त्यामागील अदृश्य शक्तीमुळे हे सर्व होत असेल असे मला वाटते. तुम्ही काय मेसेज देतात? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणत्या किल्ल्यावर दारु पिण्याचे मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण तुळजापूर जे आपले श्रद्धास्थान आहे. तिथे ड्रग्ज तस्करी होते ज्यांना त्यांच्यामध्ये अटक झाली त्याला सत्ताधारी पक्षात प्रवेश देण्यात आला तुम्ही काय मेसेज देत आहात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. ड्रग्ज विरोधात मतभेद बाजूला ठेवत काम केले पाहिजे. त्यासाठी सरकार काही करत असेल तर आम्ही सरकारबरोबर उभे राहू. निवडणूक हा काही व्यवहार नाही प्रफुल्ल पटेल यांचे राजकारण काय आहे मला माहिती नाही, पण मी एक नाही चार वेळी निवडून आले आहे. पैसे दिल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असे मला तरी वाटत नाही. निवडणूक हा काही व्यवहार नाही ही एक सेवा आहे, असे मी समजते. ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहले पारदर्शक निवडणूकीसाठी अनेकांनी आपले योगदान दिले त्याची खिल्ली उडवणारी ही पटेलांची विचारधारा आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:57 am

ठाणे महापालिकेसाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी खेळी:पत्नी ऋता यांना मैदानात उतरवणार, नगरसेवक फोडणाऱ्या शिंदे गटाला तगडे आव्हान

ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (शप) पक्षाची होत असलेली पडझड थांबवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागात थेट आव्हान उभे करण्यासाठी, आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रभाग क्रमांक २३ मधून महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ठाणे शहरातील शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, राष्ट्रवादी (शप) पक्षातून झालेल्या पक्षांतराला प्रत्युत्तर देण्यासाठी आव्हाडांनी ही 'मास्टरस्ट्रोक' खेळी केल्याचे मानले जात आहे. नऊ नगरसेवकांच्या पक्षांतराला देणार प्रत्युत्तर गेल्या वर्षभरात ठाणे महापालिकेमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा राजकीय धक्का दिला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शप) पक्षाच्या तब्बल नऊ माजी नगरसेवकांना फोडून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातील हा भाग असल्याने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडले होते. हाच बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी आणि गमावलेले संख्याबळ परत मिळवण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही 'फॅमिली एन्ट्री' घडवून आणली आहे. ऋता आव्हाड यांनी राष्ट्रवादी शप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्याकडे इच्छुक उमेदवारीसाठी अर्ज सादर केला आहे. जे नऊ माजी नगरसेवक पक्षांतर करून गेले आहेत, त्यांना ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीमुळे मोठा धक्का दिला जाणार आहे, असा विश्वास जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी व्यक्त केला. जनसंपर्काच्या जोरावर शिवसेनेला आव्हान प्रभाग क्रमांक २३ हा राष्ट्रवादी (शप) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी तगडा उमेदवार देण्याची गरज असताना, ऋता आव्हाड यांचे नाव पुढे आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याप्रमाणेच ऋता आव्हाड यांचा कळवा आणि मुंब्रा परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. त्यांनी विशेषतः कळवा परिसरातील महिला सक्षमीकरणासाठी मोठे काम केले आहे. 'संघर्ष (महिला)' संस्थेच्या माध्यमातून त्या घरोघरी पोहोचलेल्या आहेत. आत्तापर्यंत सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलेल्या ऋता आव्हाड यांनी प्रथमच थेट राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. ऋता आव्हाडांमुळे शिवसेनेला नमवणे शक्य जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी स्पष्ट केले की, आमदार आव्हाड यांनी कळव्याचा कायापालट केला आहे. विकासकामांच्या जोरावरच त्यांचे मताधिक्य वाढत आहे. या विकासकामांना ऋता आव्हाड यांच्या जनसंपर्काची जोड मिळाल्यास शिवसेनेला नमवणे शक्य होईल. एकंदरीत, नऊ माजी नगरसेवकांच्या पक्षांतराने बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादी (शप) पक्षाने ऋता आव्हाड यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून 'विकेट टू विकेट' लढत देण्याची तयारी केली असून, आता ठाणे महापालिकेची ही निवडणूक अधिकच लक्षवेधी ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:40 am

बिहार निवडणुकीतील उमेदवार स्थानिक नेत्यांच्या निर्णयानुसार:आम्ही प्रचारात सहभागी नव्हतो- प्रफुल्ल पटेल; गोंदिया-भंडाऱ्यात स्वबळावर लढणार

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काही उमेदवार उभे केले होते, परंतु सर्वांचेच डिपॉझिट जप्त झाले. बिहारमध्ये निवडणूक लढवू नये असे मी सांगितले होते, पण प्रफुल्ल पटेल यांनी उमेदवार दिले असे अजित पवारांनी म्हटले होते. यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने निवडणूक लढविण्याचा आग्रह केला नव्हता. निवडणूक लढवावी, असा आमचा आग्रह नव्हता. मी प्रचारालाही गेलो नाही हा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, स्थानिक स्तरावर काही जणांची इच्छा असते की आपल्या पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे. हा निर्णय पूर्णपणे स्थानिक नेतृत्वाने घेतलेला होता. आमच्या पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाकडून यावर काही विशेष लक्ष दिलेले नव्हते.बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देण्याचे अंतिम आदेश अजित पवार यांनी दिलेले नव्हते, तरीही स्थानिक स्तरावर पक्षाच्या संघटनांनी उमेदवार उभे केले. बंगालमध्ये येऊ शकते भाजप सरकार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, बिहारमधून गंगा नदी पश्चिम बंगालपर्यंत जात असल्याने हे ममता बॅनर्जी यांना एक प्रकारे इशारा आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणाचा परिणाम शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान होणाऱ्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी चांगली राहणार आहे. या निवडणुकीत जास्त उमेदवार निवडून येतील कदाचित सरकार सुद्धा येईल. त्यामुळे गंगा ते गंगा सागर असा पंतप्रधानांचा नारा योग्य आहे. गोंदियात स्वबळावरच लढणार प्रफुल्ल पटेल म्हणाले, महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची उत्सुकता खूप जास्त आहे. 9 वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना न्याय देणे महत्त्वाचे आहे. तिन्ही पक्ष एकत्र लढले, तर काही वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्थानिक निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा लागतो. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील निवडणुका आम्ही स्वबळावरच लढत आहोत, आणि आवश्यक असल्यास काही ठिकाणी तडजोड करू.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 11:20 am

उरण नगरपरिषद निवडणूक:राजकारणात एवढा गर्व ठेवू नये, सूरज निकलात है, तो डुबता भी है; जितेंद्र आव्हाडांचे शेलारांना प्रत्युत्तर

उरण नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असून या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी थेट आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल करत “राजकारणात एवढा गर्व ठेवू नये… सूरज निकलता है तो रात को डुबता भी है” अशा शब्दांत तीव्र टीका दिली. उरण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी “महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजणार” अशी टीका केली होती. यालाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शब्दांत प्रत्युत्तर देत राजकीय वातावरण तापवले आहे. नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? महाविकास आघाडीच्या वतीने उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर देताना, आशिषजी, गर्विष्ठाचे घर नेहमी रिकामे होते. राजकारणात एवढा गर्व ठेवू नये. घर नेहमी खाली होते. सूरज निकलता है तो रात को डुबता भी है, हे लक्षात ठेवा, असा पलटवार केला. महायुतीचेही अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन दरम्यान, उरण नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना, भाजप–महायुतीनेही उरणमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी एकूण 22 अर्ज दाखल करण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी शोभा कोळी–शहा या प्रथमच मैदानात उतरल्या असून, या निमित्ताने गणपती चौक ते नगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे वातावरण उत्साहपूर्ण होते. यावेळी शेलार यांनी “या निवडणुकीत भाजप-महायुतीची मते दुप्पट होतील आणि विरोधकांचे तीन तेरा वाजतील” असा विश्वास व्यक्त केला. उरण नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार यंदाच्या उरण नगरपरिषद निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे एकीकडे आव्हाड–शेलार यांच्यातील वाकयुद्ध आणि दुसरीकडे दोन्ही पक्षांची ताकद दाखविणाऱ्या रॅल्या—या घडामोडींमुळे उरणची निवडणूक यंदा अधिकच चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 10:58 am

शरद पवारांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात:कार्यकर्तेच नसल्याने अजित पवारांकडे येण्याशिवाय पर्याय नाही, राधाकृष्ण विखे पाटील यांचा घणाघात

शरद पवार यांच्या पक्षात जर कार्यकर्तेच राहिले नाहीत तर त्यांना अजित पवारांसोबत येण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. त्यांच्या पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. शरद पवारांनी इतके वर्ष जे राजकारणात पेरले त्यांचे आता प्रायश्चित करण्याची वेळ आता आली आहे, असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अजित पवार आणि शरद पवार येतील का नाही याचे उत्तर शरद पवार हेच देऊ शकतील. कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आहेत. या सर्व युत्या राष्ट्राचे व्यापक हित पाहून झाल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची याबाबत स्थानिक पातळीच्या नेत्यांना मोकळीक दिल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी सांगितले. याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, त्यांनी शरद पवारांना हा टोला लगावला आहे. काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याचीही वेळ राहिलेली नाही बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर जोरदार शब्दांत टीका केली. विदेशात जाऊन लोकशाहीचे धडे देणाऱ्या काँग्रेसला आता आत्मपरीक्षण करण्याची देखील वेळ राहिलेली नाही, असा घणाघात करत विखे पाटील म्हणाले की, बिहारमध्ये विरोधकांचा सुपडा साफ झाल्यानंतर काँग्रेसचे अस्तित्वच संपुष्टात आल्याचे दिसत आहे. काँग्रेससोबत जाण्यास कुणी तयार नाही महाराष्ट्रात काँग्रेस ‘एकला चलो रे’ म्हणत आहे, कारण त्यांच्यासोबत जाण्यास कोणी तयार नाही, असे विखेंनी टोलेबाजी केली. बिहारमध्ये काँग्रेसचे नेते नदीत पोहण्याचे प्रदर्शन करत होते, जनतेने त्यांना त्याच नदीत राजकीय गटांगळ्या खायला लावल्याची टीका त्यांनी केली. राज्यात ठाकरे बंधू, जाणते राजे आणि इतर नेत्यांनी ‘वोट चोरी’च्या मुद्द्यावर मोर्चे काढले होते, त्यावर निशाणा साधत विखेंनी म्हटले, लोकांनी यालाच मतपेटीतून योग्य उत्तर दिले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यात राजकीय अटकळींना उधाण आले आहे. ही भेट पार्थ पवार यांच्यावर झालेल्या आरोपांच्या संदर्भात महत्त्वाची मानली जात असताना, याबाबत विचारले असता विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अजित पवार–अमित शहा यांच्या भेटीबाबत मला काहीही माहिती नाही. काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात, असे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 10:25 am

काँग्रेसचा इतिहास सर्वांना ठाऊक; गायकवाडांनी तोंडाला आवर घालावा:देशपांडेंचा काँग्रेसवर घणाघात; आम्ही युतीचा प्रस्ताव दिलाच नाही

काँग्रेसचा इतिहास काय आहे हे सर्वांना माहिती आहे, मला त्याबद्दल जास्त बोलायचे नाही. काँग्रेसने कुणाला मारलं, कुणाला झोडले, कुणाला ठेवले हा सर्व काँग्रेसचा इतिहास आहे, त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी तोंडाला आवर घालावा, यापेक्षा जास्त मी बोलणार नाही त्या जे मुंबई मनपा एकट्या लढणार आहेत त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की, आम्ही काँग्रेसला कधीही कुठल्या युतीचा प्रस्ताव दिलेला नव्हता ना त्यांनी आम्हाला युतीचा प्रस्ताव दिला होता, काही लोकांमध्ये सुरू असलेल्या चर्चा या वायफळ आहेत त्यांना काही अर्थ नाही. मनसेची मुंबई मनपा निवडणुकीसाठी बैठक पार पडली यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी असे म्हटले आहे. दादागिरी सहन करणार नाही संदीप देशपांडे म्हणाले की, परप्रांतीय लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुंबई आणि महाराष्ट्र सर्वप्रथम मराठी माणसाचा आहे.इथे मराठी माणसाचीच दादागिरी चालणार बाहेरच्याची दादागिरी सहन केली जाणार नाही. काँग्रेसने आत्मचिंतन करावे संदीप देशपांडे म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीत काँग्रेस ज्या पद्धतीने आपटली आहे त्यानंतर त्यांनी आत्मचिंतन करावे. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना आपण कुठे कमी पडत आहोत यावर लक्ष दिले पाहिजे. बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागून काही फार वेळ झाला नाही, थोडा वेळ जाऊ दिला तर सत्य काय हे बाहेर येईल. काँग्रेस मनसे सोबत जाणार नाही म्हणत आहे पण त्यांना आमंत्रण दिले कुणी असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे. स्वत:च चिंता करायची स्वत:च आमंत्रण करायची आणि स्वत:च नाही म्हणायचे ह्या गोष्टीला काही अर्थ नाही. आम्ही त्यांना प्रस्ताव दिला नाही त्यामुळे आमचा काही विषय नाही, असे म्हणत मुंबई निवडणुकीत मारहाण करणाऱ्या पक्षासोबत जाणार नाही या काँग्रेसच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 9:36 am

औंढा नागनाथ परिसरात वाळू माफियांना चाप:दोन टिप्पर पकडले, 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौघांवर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यात वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन टिप्पर पोलिसांच्या पथकाने पकडले असून 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 15 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वाळूची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी महसूल व पोलिस प्रशासनाकडे केल्या जात होत्या. दिवसा व रात्रीच्या वेळी वाळूची वाहतूक केली जात असून रात्री वाळू घाटावर वाळू उपसा केला जात असल्याचेही तक्रारीत नमुद केले जात होते. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलिस विभागाचे पथक स्थापन केले. या पथकाकडून वाळू घाटावर तसेच वाळू वाहतूक होणाऱ्या मार्गावर तपासणी केली जात आहे. दरम्यान, औंढा तालुक्यातील चिमेगाव मार्गावर धारफाटा येथे पोलिसांनी एक टिप्पर थांबवून तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. चालकास वाळूबाबत समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर जप्त करून औंढा पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी जमादार इकबाल शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक पंढरी लोंढे (रा. लाख) व मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या सोबतच ब्राह्मणवाडा गावाजवळ औंढा पोलिसांच्या पथकाने एक टिप्पर पकडले. या प्रकरणी उपनिरीक्षक दत्ता कानगुले यांच्या तक्रारीवरून चालक कुमार आवारे (रा. माळेगाव, जि. वाशीम) याच्यासह टिप्पर मालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी मिळून एकूण 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपनिरीक्षक कानगुले, जमादार रविकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 9:02 am

गीत फुलोरा संगीतमय शैक्षणिक कार्यक्रमाचे 21 व्या वर्षात पदार्पण....:गीत फुलोराच्या कवितांमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी धरला ठेका

स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी, पुनावळे आणि वाकड यांच्या निर्मितीतील ‘गीत फुलोरा’ या संगीतमय शैक्षणिक काव्यगायन कार्यक्रमाने यंदा 21व्या वर्षात पदार्पण केले. बालदिनाचे औचित्य साधत एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी येथे हा कार्यक्रम भव्य उत्साहात सादर झाला. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या ओठांवर शालेय अभ्यासातील कविता सहजपणे चढवणारा ‘गीत फुलोरा’ हा एकमेव संगीतमय शैक्षणिक उपक्रम आहे. अभय–अर्पिता तसेच त्यांच्या मुलांनी—अथर्व आणि भाग्यदा—कविता, संगीत आणि प्रस्तुती यांचा सुंदर संगम घडवत या कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कवितांच्या तालावर ठेका धरत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 2004 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाने 20 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करत आता 21व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेकांना आपल्या बालपणीच्या कविता पुन्हा आठवल्या. चौथीतील विद्यार्थिनी भाग्यदाने ‘आई’ आणि ‘चांदोमामा’ या कविता मैफिलीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेऊन कार्यक्रमाला अधिक रंगत भरली. ‘शाळा’, ‘माझ्या मराठीची गोडी’, ‘आर्जव’, ‘या बालांनो या रे या’, ‘एक झाड लावू’ अशा अनेक लोकप्रिय कवितांची मनमोहक प्रस्तुती करण्यात आली. सर्व कवितांना अभय–अर्पिता यांनी संगीतबद्ध केले असून विद्यार्थ्यांनी उत्साहाने साथ दिली. “‘गीत फुलोरा आहे संगतीला, कविता गायन करायला चला’” या ओळींवर मुलांनी ताल धरत काव्यसंगीताचा मनमुराद आनंद लुटला. ‘या बालांनो या रे या’ या कवितेला तर विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र फेर धरून रंगत आणली. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नित्यनवीन उपक्रम राबवत असते. अकॅडमीमधील विद्यार्थी—आर्यन पावसे, प्रिशा जोशी, वीरा सुरते, राजवी पटेल, अश्वि नाकाडे—यांनी सहगायन केले. तर अर्जुन नेटके, वंशराज वरखडे, विकास शिंदे, आलोक पाटोळे, नयन शिवरकर, हर्ष, वैभव यांसह वाद्यवृंदाने सुरेल साथ देत कार्यक्रमात पाहुणचार केला. मुख्याध्यापिका जयश्री वेंकटरामन यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला. “मुलांमध्ये कविता आणि साहित्याविषयी आवड निर्माण करणारा असा उपक्रम प्रत्येक शाळेने आयोजित करावा,” असे मत त्यांनी व्यक्त केले. उपमुख्याध्यापिका लक्ष्मीजी, मधुमिता देव, हेमराज थापा, विजय नेलगे, भोसले, सोनल श्रीवास्तव तसेच शिक्षक–विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीत, कविता आणि बालमैत्रीपूर्ण सादरीकरण यांच्या सुंदर संगमात पार पडलेला ‘गीत फुलोरा’ कार्यक्रम बालदिन संस्मरणीय करून गेला.

दिव्यमराठी भास्कर 16 Nov 2025 8:56 am