SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

प्रचाराच्या सांगतेला शनिवार पेठेत भाजपचे 'शक्तिप्रदर्शन':प्रभाग 25 मध्ये विजयाचा गुलाल आमचाच!; राघवेंद्र बाप्पू मानकर यांचा ठाम विश्वास

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आयोजित बाईक रॅलीदरम्यान त्यांनी हे विधान केले. गेल्या दहा दिवसांत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे तसेच नागरिकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हा विश्वास वाढल्याचे मानकर यांनी सांगितले. मानकर यांच्या मते, भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद मोठी आहे. या ताकदीच्या जोरावर अवघ्या दहा दिवसांत पक्षाचे कार्यकर्ते घराघरांत पोहोचले. आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख आणि सर्व कार्यकर्त्यांनी या प्रभागात परिश्रम घेतले. प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखा पाषाणकर, उज्वला पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले उपस्थित होते. तसेच, सर्व भाजपा बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाप्पू मानकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:53 pm

ठाकरे बंधूंचे ‘मराठी कार्ड’ फोल ठरणार:मुंबईचा महापौर ‘हिंदू आणि मराठीच’ होणार, आचार्य पवन त्रिपाठी यांचा घणाघात

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबई भाजपाचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांनी ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) ‘मराठी कार्ड’वर जोरदार हल्ला चढवत भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. “मुंबईचा महापौर हा केवळ मराठीच नाही, तर प्रखर हिंदूच असेल,” अशा शब्दांत त्रिपाठी यांनी विरोधकांना ललकारले आहे. आचार्य पवन त्रिपाठी यांनी ठाकरे गटाच्या भावनिक राजकारणावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाराच मुंबईचा महापौर होईल. मराठीच्या गप्पा मारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारा दाऊद इब्राहिमही कोकणचा आणि मराठीच होता. मग ठाकरे बंधू दाऊदसारख्या दहशतवादी विचारसरणीच्या माणसाला महापौर करणार का? मुंबईची जनता हे कधीही सहन करणार नाही.” 25 वर्षांत शिवसेनेने काय दिले? त्रिपाठी यांनी शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या अडीच दशकात बीएमसीवर काबीज असलेल्या शिवसेनेला मुंबईसाठी केलेली पाच ठोस विकासकामेही सांगता येणार नाहीत. याउलट, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मेट्रोचे जाळे विणले, कोस्टल रोड उभारला आणि अटल सेतूच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर काम करून दाखवतो, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. काँग्रेस-वंचित युतीवर टीका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर निशाणा साधताना त्रिपाठी म्हणाले की, काँग्रेसकडे २२७ जागांवर उमेदवार उभे करण्याची ताकद उरलेली नाही. केवळ भाजपाच सर्व जागांवर ताकदीने लढत आहे. या मजबुरीच्या युतीचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:45 pm

बजाज पुणे ग्रँड टूरमुळे कृषी, पर्यटन क्षेत्राला चालना:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा विश्वास; रस्ते फायदेशीर ठरणार

पुणे शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातून १९ जानेवारीपासून सुरू होणारी बजाज पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा कृषी, लघुउद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना देईल, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला आहे. या स्पर्धेनिमित्त तयार करण्यात आलेले उच्च दर्जाचे रस्ते शेतकरी, पर्यटक आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरतील, असेही त्यांनी नमूद केले. पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पर्धा मार्गावरील विविध गावांतील नागरिकांशी संवाद साधला. रस्ते विकासामुळे शेतीमाल कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचेल आणि शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल, असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली. सासवड परिसरातील सेंद्रिय पद्धतीने विदेशी फळांची लागवड करणारे शेतकरी महेश पोमण यांनी सांगितले की, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी यांसारखी फळे आता कमी वेळेत पुणे बाजारात पोहोचवणे शक्य होईल. अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सासवड भागातील शेतकरी बाळासाहेब काळे आणि अशोक काळे यांनीही रस्त्यांमुळे वाहतूक सुलभ झाल्याने ताजा शेतमाल ग्राहकांपर्यंत जलद पोहोचत असल्याचे समाधान व्यक्त केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. मावळ परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, किल्ले, धरणे आणि अ‍ॅग्री टुरिझम रिसॉर्ट्सना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या स्पर्धेत ३५ देशांतील १७१ आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होणार आहेत. ही शर्यत दूरचित्रवाणीच्या माध्यमातून जगभर प्रसारित होईल. यामुळे भविष्यात परदेशी पर्यटक पुणे आणि मावळ परिसराकडे आकर्षित होतील, असा विश्वास पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला. स्पर्धेच्या तयारीमध्ये सहभागी झालेल्या स्थानिक कामगार आणि ग्रामस्थांनी या कामाकडे देशसेवेप्रमाणे पाहिले आहे. रस्त्यालगत सुरक्षेसाठी जाळी बसवणारे शहाजी पवार आणि शिवाजी शिंदे यांनी अशा आंतरराष्ट्रीय उपक्रमांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. सासवड रस्त्यावरील पन्नास वर्षांपासून कार्यरत असलेल्या गणेश सायकल मार्टचे मालक संजय शिवरकर यांनी या स्पर्धेमुळे सायकल संस्कृती पुन्हा बहरण्याची आशा व्यक्त केली. आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने लोक पुन्हा सायकलकडे वळत असून, बजाज पुणे ग्रँड टूरमुळे सायकलचा वापर आणखी वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:24 pm

राष्ट्रवादी काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत:काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा पुणे महापालिका निवडणुकीत आरोप

पुणे शहराचा विकास करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) कटिबद्ध असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवत आहेत. मात्र, मतांची विभागणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी वेगळी आघाडी उभारली आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होत असल्याचा आरोप काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी ठामपणे सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेले मत म्हणजे भाजपला दिलेले मत आहे.” या वेळी शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष गजानन थरकुडे, काँग्रेसचे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने काही गुंडांना परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे पुणेकरांमध्ये बदलाची अपेक्षा निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने प्रयत्नपूर्वक प्रचार केला असून शिवसेना (उबाठा) सोबत समन्वयाने प्रचार राबवण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दोन्ही पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते प्रचारात सक्रिय सहभागी झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) उल्लेखनीय कामगिरी करतील, असा दावा त्यांनी केला. भाजपला स्वतःच्या कामावर विश्वास असता, तर त्यांनी ४३ माजी नगरसेवकांची तिकिटे कापली नसती, असे शिंदे म्हणाले. अंतर्गत सर्वेक्षणात हे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे स्पष्ट झाल्यानेच ही कारवाई करण्यात आली, असेही त्यांनी नमूद केले. खासदार मुरलीधर मोहोळ ज्या-ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहेत, तेथे नागरिक जैन बोर्डिंग प्रकरणाबाबत प्रश्न विचारत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. भाजपने सत्तेत असताना शहराचा अपेक्षित विकास केला नाही. काँग्रेस काळातील योजनाच पुढे नेऊन केवळ त्यांची नावे बदलण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांनी मेट्रोची संकल्पना पुढे आणली होती. पुण्याच्या भौगोलिक विस्ताराचा विचार करता २०० किमी मेट्रो अपेक्षित होती, मात्र ती केवळ ३२ किमीपर्यंतच मर्यादित राहिली आहे. शहरातील विकासकामे महापालिकेमार्फत होणे अपेक्षित असताना भाजपचे नेते टेंडरमधील टक्केवारीत अडकले असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. कोथरूड भागातच १३४ कोटी रुपयांची कामे करून शहरातील इतर भागांवर निधीअभावी अन्याय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजना, २४/७ पाणीपुरवठा योजना आणि बीआरटी योजना भाजपने गुंडाळल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी गजानन थरकुडे म्हणाले की, शहरातील टेकड्या फोडणे आणि नदीपात्र सुधारण्याच्या नावाखाली नदीपात्रात भर टाकून ते अरुंद केले जात आहे, त्यामुळे पुण्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:08 pm

भारतीय हवाई दलात आता ‘अग्निवीरवायू’ भरती

नवी दिल्ली : अग्निवीर भरतीची तयारी करणा-या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी असून इंडियन एअर फोर्सने अग्निवीरवायु भरती २०२७ साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली असून अर्ज प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. देशसेवेची इच्छा असलेल्या तरुणांसाठी अग्निवीरवायु २०२७ ही भारतीय हवाई दलात प्रवेशाची सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून […] The post भारतीय हवाई दलात आता ‘अग्निवीरवायू’ भरती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 7:03 pm

राष्ट्रवादी उमेदवारावर गुन्हेगारी माहिती लपवल्याचा आरोप:बाबुराव चंदेरे यांचे नामांकन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

पुणे महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ९ (बाणेर-सूस-पाषाण) मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबुराव चंदेरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप करत, त्यांचे नामांकन रद्द करण्यासाठी भाजप उमेदवार गणेश कळमकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. गणेश कळमकर यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, चंदेरे यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गंभीर स्वरूपाच्या प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणांची माहिती जाणीवपूर्वक लपवून प्रशासन आणि मतदारांची दिशाभूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, चंदेरे यांच्यावर दोन गुन्हे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये दोषारोपपत्र दाखल झाले असून, काही गुन्ह्यांसाठी २ ते १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. कळमकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शपथेवर खोटे बोलणे किंवा माहिती लपवणे हा केवळ तांत्रिक दोष नसून तो गंभीर गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२९ नुसार खोटे पुरावे देणे हा दंडनीय अपराध आहे. यामुळे मतदारांच्या माहितीच्या अधिकारावर गदा येते. कळमकर पुढे म्हणाले, ही याचिका कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून निवडणूक प्रक्रियेची शुचिता, पारदर्शकता आणि प्रामाणिकता टिकवून ठेवण्यासाठी आहे. खोट्या माहितीच्या आधारे कोणालाही लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत सहभागी होऊ दिले जाऊ नये. तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक सुरु केंद्र शासनाचे तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा 2019 व नियम 2020 नुसार तृतीयपंथी समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे, या पोर्टलवर तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक – 14427 देण्यात आला आहे. या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे तृतीयपंथीयांना योजनाबाबतची माहिती, अर्ज प्रक्रिये संबंधी मार्गदर्शन, अडचणींचे निराकरण तसेच तक्रारी नोंदवण्यासाठी तृतीयपंथी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी तृतीयपंथीयांनी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण पुणे यांनी केले आहे

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 6:57 pm

आज प्रचार तोफा थंडावणार; छुपा प्रचार, वैयक्तिक भेटी..!

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडे आता केवळ काही तासांचाच अवधी शिल्लक राहिला असून, जाहीर सभा आणि रॅली संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात ‘घरोघरी’ जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच उमेदवारांचा भर असणार आहे. मंगळवारी जाहीर प्रचार संपल्यानंतर ख-या अर्थाने ‘गुप्त’ प्रचाराला सुरुवात होईल, १५ जानेवारीला मतदान होत असल्याने बुधवारचा पूर्ण दिवस हा छुप्या पद्धतीने मतदारांना आपल्याकडे […] The post आज प्रचार तोफा थंडावणार; छुपा प्रचार, वैयक्तिक भेटी..! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 6:07 pm

भरारी पथकाने वॉशिंग मशिननी भरलेला ट्रक पकडला

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशिन जप्त केल्या आहेत. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये […] The post भरारी पथकाने वॉशिंग मशिननी भरलेला ट्रक पकडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 6:07 pm

पुण्यात पाच वर्षांत ३५ हजार कोटींची कामे:आगामी काळात ४४ हजार कोटींची कामे हाती घेणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात मागील पाच वर्षांत ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाल्याचे सांगितले. आगामी काळात ४४ हजार कोटी रुपयांची नवीन कामे हाती घेण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. मनपा निवडणूक ही केवळ गल्लीतील दादा निर्माण करण्याची नसून, पुण्याच्या प्रगतीसाठी नेतृत्व देणारी निवडणूक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ओळखले जाते. ९० देशांतील नागरिक येथे विविध आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. चाकण आणि तळेगाव येथे ऑटोक्लस्टर विकसित झाले आहे. पुण्याच्या विकासासाठी एक ठोस आणि दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुण्यातील कुसाळकर पुतळा चौक, गोखलेनगर येथे आयोजित जाहीर प्रचार समारोप सभेत बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह प्रभाग क्रमांक ७, ८, १२ मधील भाजपचे उमेदवार उपस्थित होते. प्रचाराची सांगता शिवाजीनगर मतदारसंघात करण्याचे मी ठरवले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेला हा एकमेव मतदारसंघ असून, येथे सभा घेतल्यास भाजपला जनतेचा आशीर्वाद मिळतो, असे समीकरण असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुणे विकसित करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. देशातील पीपीपी तत्त्वावरील पहिला शिवाजीनगर ते हिंजवडी २३ किमी मेट्रो प्रकल्प यावर्षी सुरू होत आहे. मेट्रोलगत मल्टी मॉडेल हब निर्माण करण्यात येत आहे. काही लोकांनी विकासाच्या नावाखाली चुकीचे उड्डाणपूल आणि रस्ते बांधले, ज्यामुळे ते पाडून नवीन करावे लागत आहेत, अशी टीका त्यांनी केली. लहुजी वस्ताद साळवे यांचे ११५ कोटी रुपये खर्च करून दर्जेदार स्मारक उभारले जात आहे. तसेच, वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून, त्यातून चांगले उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मी या भागातील आमदार आणि १२ नगरसेवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या विकासासाठी जो निधी लागेल, तो देण्यात येईल. मेट्रो नेटवर्क विस्तारीकरण, बस संख्या वाढवणे, २३ उड्डाणपूल निर्मिती, रस्ते रुंदीकरण आणि भूमिगत रस्ते निर्मितीद्वारे वाहतूककोंडी कमी करण्यात येईल. पुण्याची संस्कृती टिकून राहावी यासाठी प्रेरणादायी स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 5:57 pm

अकोल्यात उमेदवाराकडून साड्यांचे वाटप

अकोला : राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना प्रचारासाठी सर्व राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या जात आहेत. कोणी सेलिब्रिटीच्या माध्यमातून प्रचार करत आहे तर कोणी मोठी नेतेमंडळीही प्रचाराच्या मैदानात उतरवत आहे. तर याच प्रचाराच्या विविध पद्धतीवरून चर्चेला उधाण येत आहे. अशीच एक मतं मिळण्याच्या आशेपोटी महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अकोल्यात साडी वाटण्याची युक्ती वापरण्यात आली […] The post अकोल्यात उमेदवाराकडून साड्यांचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 5:57 pm

निवडणुकांचा विद्यार्थ्यांवर परिणाम

पुणे/नागपूर : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान एका मागून एक होणा-या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होेत असून मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजल्याने ऐन दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी प्रचार रंगात येणार असल्याने गोंगाटामुळे […] The post निवडणुकांचा विद्यार्थ्यांवर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 5:56 pm

अजित पवारांचा महेश लांडगेंवर जोरदार हल्लाबोल:म्हणाले- भारंदाज डाव टाकून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही

पुण्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भोसरीच्या सभेत बोलताना अजित पवारांनी लांडगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भारंदाज डाव टाकून यांना फिरवून फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे थेट आव्हानच पवारांनी दिले आहे. अजित पवार म्हणाले, बिबट्या बरोबर आता लांडगेही आलेत. सगळे लांडगे एका माळीचे मणी नाहीत. एखादा आंबा नासका असतो. पण तो वेळीच काढला नाही तर तो अख्खी आळी नासावतो. पुण्यातला भ्रष्टाचार वाढलाय, पुणे शहराचे झालेले वाटोळे पाहून मला फार चीड येते, असेही पवार म्हणाले. काय होतास तू, काय झालास तू? पुढे बोलताना अजित पवार यांनी महेश लांडगे यांना उद्देशून म्हटले, काय होतास तू, काय झालास तू? जकात नाक्यावर काय उद्योग चालायचे? या भ्रष्टाचाराच्या रक्षासाला संपवा, अन्यथा भोसरीचे भविष्य अंधारात आहे. यांना भंगाराची उपमा देऊ की आणखी कशाची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच भारंदाज डाव घालून फिरवून फिरवून फेकून नाही दिला तर पवारांची औलाद सांगणार नाही. फक्त यांनाच डाव माहीत आहेत का? मी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष राहिलोय. मला घुटना चित कसे करायचे हे पण माहीत आहे. विकासाच्या नावाखाली खर्च केलेले 40 हजार कोटी कुठे गेले? पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या नावाखाली खर्च केलेले 40 हजार कोटी कुठे गेले? कुठे पाणी मुरले? कोणाची प्रॉपर्टी वाढली? राजगुरूनगर तालुक्यात कोणी जमिनी घेतल्या? नातेवाईकांच्या नावाने कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली, याची सगळी माहिती माझ्याकडे असल्याचे पवार म्हणाले. महेश लांडगेंचे नाव न घेत अजित पवार म्हणाले, यांचे अख्खे घर या कामात आहे. इथे यूपी-बिहार सारखी परिस्थिती झाली आहे. स्वतःच्या प्लॉटमध्ये घर बांधायचे म्हटले की आकाच्या धमक्या येतात. हे लोक खंडण्या जमा करतात. आता ही सत्ता जायलाच हवी. अन्यथा पुन्हा तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर अजित पवारांनी केलेल्या मोफत मेट्रोच्या घोषणेवर भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी टीका केली होती. यावर अजित पवार म्हणाले, मेट्रोमध्ये मोफत प्रवास देणार, हे मी सांगितले. तर कोणीतरी म्हटले याला कॅबिनेटची मान्यता लागते. अरे बाबा, यासाठी कॅबिनेटच्या मान्यतेची गरज नाही. मी जे मोफत देतोय त्याचा मी अभ्यास केला आहे, असा टोला पवारांनी लगावला. भाजपच्या जाहिरनाम्यावर टीका भाजपच्या जाहिरनाम्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना पीएमपीएल आणि मेटरी मोफत करणार म्हणाले. अरे 75 वयाचे किती ज्येष्ठ प्रवास करतात हे सांगा. आता काय 75 वय होईपर्यंत झुरून-झुरून वाट बघायची का? असा खोचक सवालही पवारांनी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 5:55 pm

अर्जुननंतर सचिन तेंडुलकरच्या लेकीचेही लग्न?

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या घरी लग्नीनघाई सुरू आहे. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे लग्न सानिया चांडोक हिच्यासोबत होत आहे. दोघे लहानपणीपासूनचे मित्र आहेत. सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर नक्की कोणासोबत लग्न करणार याबद्दल काही खुलासा होऊ शकला नाही. डिसेंबर महिन्यात सारा तेंडुलकर हिचे गोव्यातील काही फोटो व्हायरल होताना […] The post अर्जुननंतर सचिन तेंडुलकरच्या लेकीचेही लग्न? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 5:54 pm

पुण्यात भाजपला १२०-१२५ जागा मिळतील:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास; महापौर पदावरही सांगितला दावा

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला १२० ते १२५ जागा मिळतील आणि पक्षाचाच महापौर होईल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे. पुणे शहराला विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्याची साथ आगामी काळात मिळेल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेत बोलताना मोहोळ यांनी, भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि निवडणूक निकालानंतर इतर कोणत्याही पक्षाला सोबत घेण्याची गरज पडणार नाही, असे स्पष्ट केले. पुणेकरांच्या अपेक्षांनुसार काम करू, असे आश्वासन मोहोळ यांनी दिले. २०१७ नंतर पुण्यात 'ट्रिपल इंजिन' सरकार यशस्वी ठरले आहे. पुणे शहरात मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने विस्तारत आहे. प्रचारात आम्ही केवळ विकास केंद्रित मुद्दे मांडले, प्रचाराची पातळी सोडली नाही, असेही त्यांनी नमूद केले. प्रचाराची रणधुमाळी आज संपत असून, पक्षाने मागील १५ दिवसांत विविध माध्यमांतून प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रचारात सहभाग घेतला. आरपीआय प्रमुख रामदास आठवले यांनीही प्रचारात सहभाग नोंदवला. मी स्वतः पुण्यात २७ प्रभागांमध्ये रॅली केल्या, असे मोहोळ यांनी सांगितले. भाजप केवळ निवडणुकीपुरते काम करत नाही, तर वर्षभर विविध कार्यक्रमांमधून कार्यरत असतो. एका दिवसात तीन लाख घरांपर्यंत आम्ही पोहोचलो. पारंपरिक प्रचारासोबतच सोशल मीडियावरही आधुनिक पद्धतीने प्रचार करण्यात आला. मनपामध्ये आम्ही पाच वर्षांत केलेली विकासकामे लोकांसमोर मांडली आहेत, तसेच केंद्र आणि राज्याच्या विविध योजनाही राबवल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणेकरांनी आमच्यावर वारंवार विश्वास व्यक्त केला आहे. भविष्यात आम्ही काय काम करणार आहोत, याबाबत 'व्हिजन संकल्पपत्रा'तून मांडणी केली आहे. प्रचार काळात नागरिकांचा चांगला आणि उदंड प्रतिसाद आम्हाला मिळाला. पुणेकरांचा विश्वास आम्ही संपादन केला असून, भाजपला यावेळीही मतदार साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक आम्ही जिंकू आणि पुण्याचा महापौर भाजपचाच होईल. कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस अथक काम केले आहे. भाजपकडे दोन हजारपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज आले होते. काही तीन ते चार लोकांनी तिकीट न मिळाल्याने पक्ष सोडल्याचा प्रकार घडला, परंतु पक्षात बंडखोरी झाली नाही, असेही मोहोळ यांनी सांगितले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, रवींद्र साळेगावकर, अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 5:54 pm

नालासोपारा परिसरात रोकड जप्त

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नालासोपारा विधानसभा क्षेत्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या १५ जानेवारीला होणा-या मतदानापूर्वीच पैशांचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत १० लाख ९ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. त्यातच आता बहुजन विकास आघाडीने (बविआ) थेट […] The post नालासोपारा परिसरात रोकड जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 5:49 pm

मिनी मंत्रालय निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. जिल्हा परिषेदेच्या निवडणुकीसाठी १६ जानेवारी २०२६ रोजी सूचनेचे प्रकाशन होणार आहे. अर्ज दाखल करण्याची […] The post मिनी मंत्रालय निवडणुकीचा बिगुल वाजला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 5:34 pm

फडणवीस स्वतःच्या हिंमतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत:'बसलेला अन् बसवलेला यात फरक असतो' म्हणत राज ठाकरे यांची तिखट टीका

भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या हिंमतीवर झालेले मुख्यमंत्री नाही. बसलेला अन् बसवलेला यात मोठा फरक असतो, अशी अत्यंत तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना केली. गौतम अदानी उद्या देशालाही वेठीस धरतील:मुख्यमंत्र्यांनाही हे माहिती, पण सांगतील कुणाला? राज ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना टोला राज्यात मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. 15 तारखेला प्रत्यक्ष निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतःच्या हिंमतीवर मुख्यमंत्री झाले. पण देवेंद्र फडणवीस यांचे तसे नाही. साधी गोष्ट आहे. एक माणूस मुख्यमंत्री होता. निवडणूक संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवसेना फोडण्यात आली. मग निवडणूक झाली आणि संपली. मग एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यांनी ते स्वीकारले. एखादा बसलेला माणूस असता, ठाम असता तर त्याने नकार दिला असता. पण बसलेला व बसवलेला यात फरक असतो. भाजप जो आम्ही पूर्वीपासून पाहत आलो आहोत, तो आज उरलेला नाही. भाजपचे लोकही ही गोष्ट मान्य करतात, असे राज ठाकरे म्हणाले. आमची शहरे का बळकावता? राज ठाकरे यांनी यावेळी हिंदी सक्तीच्या मुद्यावरूनही भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, आपला मूळ देश असा नव्हता. आज ज्यांना आपण राज्य म्हणतो, ते कधीकाळी वेगवेगळे देशच होते. हा 1947 साली अस्तित्वात आलेला देश आहे. प्रत्येक राज्याची एक भाषा व संस्कृती आहे. वेगवेगळे सणवार आहेत. अहमदाबाद व गांधीनगर यांचा विकास मुंबईसारखा करा ना. आम्हालाही हेवा वाटेल. आनंदही वाटेल. आमची शहरे का बळकावता? खरी संपत्ती ही तुमची जमीन आहे. तुमची भाषा व जमीन विकली गेली तर तुमचे अस्तित्व संपेल, असे राज ठाकरे यावेळी मुंबईतील मराठी भाषिकांना इशारा देताना म्हणाले. राज ठाकरे पुढे म्हणाले, भाजपने नवी मुंबईतील जाहीरनाम्यात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. काय सांगायचे आहे त्यांना? हिंदुत्वाच्या नावाखाली माझे मराठीपण घालवू नका. तुमची राज्य तुम्ही सांभाळा. हिंदुत्वाच्या बुरख्याखालून लढू नका. काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे. अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जातात ते काय हिंदुत्त्वाच्या नावाखाली जातात का? बुलेट ट्रेनलाही केला कडाडून विरोध राज ठाकरे यांनी यावेळी बुलेट ट्रेनलाही कडाडून विरोध केला. ते म्हणाले, बुलेट ट्रेन अजिबात व्हायला नको. आपण जपानकडून पावणेदोन लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. 3 हजार रुपये तिकीट व अमुक एक फेऱ्या ठेवल्याशिवाय ही बुलेट ट्रेन परवडणार नाही. लांबचा पल्ला आहे तर ठीक आहे. तिथे बुलेट ट्रेन आणायची असते. मुंबई ते अहमदाबादला किती ट्रेन जातात? त्यातील 40 ते 50 टक्के ट्रेन रिकाम्या जातात. मग बुलेट ट्रेन आणून काय होणार आहे? असा सवालही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 5:24 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खदखद:म्हणाले- मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजितदादांनी ते पाळले नाही

महापालिका निवडणुकीला काही तास शिल्लक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी खदखद व्यक्त केली आहे. मी कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजित दादांनी ते पाळले नाही, असे फडणवीस म्हणाले. तसेच अजित दादांना दिल्लीत आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटायला जायचे असेल तर ते जाऊ शकतात. त्यांना विमान सुद्धा देण्याची व्यवस्था मी करेन, तिकीट सुद्धा काढून देईल. जोपर्यंत आमच्या वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी शब्द पाळणाऱ्यांपैकी आहे. मी आधीच सांगितले होते की आमची युती होणार नाही. मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. कोणाच्या विरोधात बोलणार नाही, पण अजित दादांनी ते पाळले नाही. अजित पवार माझ्याच वरिष्ठांकडे माझी तक्रार करणार ना. विरोधकांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न असेल, पुण्यात अजित पवार आमचे विरोधक होते. पुढे ते म्हणाले, हिंदीतील एक म्हण आहे, 'कब बाप मरेगा और कब बैल बटेंगे'. अजून काही झाले नाही, त्यावर इतके बोलणे योग्य नाही. दोन महाननगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. 27 महानगरपालिकेत विरोधात लढत आहेत. त्याच्यावर इतकी चर्चा का करायची? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यनगरी सातत्याने आम्हाला यश देते म्हणून सुरुवात आणि सांगता इथे करतो. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूरसह सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आम्हाला मत देणार अशी लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे कोणी काही बोलले, काही सांगितले तरी मानसिकता बदलणार नाही, असे फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती केली उद्धव आणि राज ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल मी पुराव्यासहित उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्ती कशी आणली, ते दाखवले आहे. राज ठाकरेंचे आता बंधूशी पटायला लागले त्यामुळे माझ्याशी बोलण्यापेक्षा बंधुंशी बोलायला पाहिजे. आपल्या भाषेवर संकट आणणारे तुमचे बंधू आहेत. त्यांच्याच सोबत युती करत आहेत. तसेच महाराष्ट्राच्या जनतेने मला तीन वेळा मुख्यमंत्री बनवले. जनता कोणाच्या बाजूने आहे हे निवडणुकीत कळले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना मी बसवलेला वाटत असेल तर त्यात हरकत नाही. उद्धाव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नगरसेवक चोरले उद्धव ठाकरे यांनी मत चोरीच्या संदर्भात बोलू नये, त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. राज ठाकरेंचे सगळे नगरसेवक चोरुन नेण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. चोरी करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल, लोकांच्या मताने निवडून आलेले नगरसेवक त्यांनी चोरायचे हे गंभीर आहे. लाडक्या बहिणीचा हप्त्यावरुन, आता काही लोकांच्या पोटात दुखत आहे. राज ठाकरेंनी इतके आरोप केले आहे की 15 तारखेनंतर त्यांच्याकडून यादी मागवून घेतो असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 5:22 pm

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटात राडा:नगरपालिकेच्या बाहेरच कार्यकर्ते भिडले, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नगरपालिकेच्या बाहेर जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अंबरनाथमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत येथील महायुतीमधील समीकरणे बदलले. शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादीने एकत्र येत बाजी मारली आणि राष्ट्रवादीचे सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. या पराभवामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन आघाड्यांमध्ये लढत झाली होती. भाजपच्या अंबरनाथ विकास आघाडीला 28 मते मिळाली, तर अंबरनाथ शिवसेना महायुती विकास आघाडीला (शिंदे गट आणि अजित पवार गट) 32 मते मिळाली. दरम्यान, सदा मामा पाटील यांची उपनगराध्यक्ष पदावर निवड होताच पालिकेच्या बाहेर दोन्ही बाजूच्या गटातील जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी सदा मामा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते संतापले. या घोषणाबाजीचे रूपांतर नंतर थेट धक्काबुक्कीमध्ये आणि हाणामारीमध्ये झाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. काही काळ येथे तणावाचे वातावरण बघायला मिळाले. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे 16, तर शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. पण भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रथम काँग्रेससोबत आघाडी केली. पण वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्यानतंर भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यानंतर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. पण भाजपच्या या खेळीमुळे शिंदे गट दुखावला गेला. परिणामी, त्याने भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटून टाकण्याची धूर्त राजकीय खेळी खेळली. अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शहरातील भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत देखील चव्हाट्यावर आला आहे. या घटनेमुळे आगामी निवडणुकीकर कसा परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 4:53 pm

पैसे वाटपाची यादी व्हायरल; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आज (१३ जानेवारी) प्रचाराची सांगता आहे. तत्पूर्वी प्रचार रॅली, सभांना वेग आला आहे तसेच पडद्यामागूनही ब-याच हालचाली सुरू आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील एक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. ही घटना आहे पैसे वाटप करण्याच्या यादीची. ही यादी समाज […] The post पैसे वाटपाची यादी व्हायरल; छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 3:56 pm

मतदानाआधी राज्यातील राजकीय वातावरण तापले 

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी ठिकठिकाणी राडे आणि पैशांच्या वाटपाचे आरोप होत आहेत. त्यातच डोंबिवली पूर्वेकडील तुकारामनगर परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. तर दुसरीकडे जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ […] The post मतदानाआधी राज्यातील राजकीय वातावरण तापले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 3:47 pm

मुख्यमंत्र्यांनी बुलेट चालवत केला रोड-शो, बाईक रॅली:प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सभा, मेळाव्यांनी गाजला मंगळवार

महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवार, १३ रोजी सायंकाळी थंडावला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भव्य रोड-शो आणि बाईक रॅली काढण्यात आली. याव्यतिरिक्त, विविध सभा आणि महिला मेळाव्यांनीही मंगळवारचा दिवस प्रचाराने भरलेला होता. मुख्यमंत्र्यांच्या रोड-शोला भारतमाता चौकातून सुरुवात झाली. हा रोड-शो तीन नळ चौक, शहीद चौक, टांगा स्टॅण्ड चौक, गांधी पुतळा, बडकस चौक आणि महाल चौकातून फिरून गांधी गेट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वर्षांनी बुलेट चालवली. मुख्यमंत्र्यांच्या रोड-शोचा संपूर्ण मार्ग भगव्या पताका, तोरणे आणि रंगीत फुग्यांनी सजवण्यात आला होता. शंखनादासह ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी मतदारांना उमेदवार न पाहता कमळाला मतदान करण्याचे आवाहन केले. जनतेच्या मनात महायुती असून, ती सर्व २९ महापालिकांमध्ये प्रचंड मतांनी निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांच्या प्रभागात रॅली आणि रोड-शोद्वारे मतदारांशी थेट संवाद साधला. शहरातील प्रमुख भागांत पोस्टर, बॅनर आणि सामाजिक माध्यमांवर प्रचाराची जोरदार मोहीम राबवण्यात आली. भाजपचे नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर उमेदवारांनीही प्रचार सभांवर भर दिला. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने, सर्वपक्षीय उमेदवारांनी दुपारपर्यंत सभा आणि बैठका आयोजित केल्या होत्या. पदयात्रा, रॅली आणि प्रचार सभांमुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 3:31 pm

321 मतदान केंद्रे संवेदनशील:16 जानेवारी रोजी सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी; ईव्हीएमसाठी 20 आणि पोस्टल बॅलेटसाठी 4 टेबलची व्यवस्था

नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी करण्यात येणार असून, शहरात ३२१ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मनपा आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित चौधरी यांनी ही माहिती दिली. मतमोजणीसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ईव्हीएमसाठी २० आणि पोस्टल बॅलेटसाठी ४ टेबलची व्यवस्था असेल. एकूण २५५ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे लक्ष ठेवले जाईल. मतमोजणीसाठी ४००९ कंट्रोल युनिट्स आणि १०९२८ बॅलेट युनिट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या कामासाठी ५२५ बसेस उपलब्ध करून दिल्याने १४ जानेवारी रोजी शहरातील बस वाहतूक पूर्णपणे बंद राहील. १५ जानेवारी रोजी, म्हणजेच मतदानाच्या दिवशी, शहर बस सेवा ठराविक मार्गांवर पहाटे ५ ते रात्री उशिरापर्यंत कमी प्रमाणात सुरू राहील, अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ३८ प्रभाग आहेत, ज्यात ३७ चार सदस्यीय आणि १ तीन सदस्यीय प्रभाग आहे. एकूण १५१ सदस्य निवडले जातील. शहरात एकूण २४,८३,११२ मतदार आहेत, ज्यात १२,२६,६९० पुरुष, १२,५६,१६६ महिला आणि २५६ इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण ३००४ मतदान केंद्रे असून, त्यापैकी ३२१ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २०,९३,३९२ मतदार होते. यामध्ये १०,७०,९२८ पुरुष, १०,२२,४०१ महिला आणि ६३ इतर मतदारांचा समावेश होता. त्यावेळी एकूण ११,२४,६३१ मतदान झाले होते, ज्याची टक्केवारी ५३.७२ होती. २०१७ च्या निवडणुकीत एकूण ११३५ उमेदवार रिंगणात होते. यात भाजपचे १०८, काँग्रेसचे २९, बसपाचे १०, शिवसेनेचे २ आणि २ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 3:29 pm

गौतम अदानी उद्या देशालाही वेठीस धरतील:मुख्यमंत्र्यांनाही हे माहिती, पण सांगतील कुणाला? राज ठाकरेंचा CM देवेंद्र फडणवीसांना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. टाटा, अंबानी, बिर्ला, हिंदुजा सारख्या उद्योगपतींना इथपर्यंत येण्यासाठी 50 ते 100 वर्षे लागली. पण केंद्राच्या रेड कार्पेटमुळे गौतम अदानींनी अवघ्या 10 वर्षांतच या उद्योगपतींना मागे टाकले. या एकाच उद्योगपतीला सर्वकाही देण्यात आले, तर एक दिवस हा माणूस अवघ्या देशाला वेठीस धरेल, असे ते म्हणालेत. राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील सभेद्वारे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण काही अदानींचे वकील नसल्याचे नमूद करत त्यांच्यावर पलटवार केला होता. त्यानंतर आज राज ठाकरेंनी पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा गौतम अदानी व फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले, अंबानी, टाटा, बिर्ला, हिंदुजा आदी उद्योगपतींना इथपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः 50 ते 100 वर्ष लागली. पण यांच्याही पलिकडे एक माणूस जातो आणि तो अवघ्या 10 वर्षांतच मोठा होतो. माझा हा विषय आहे. उद्या तुमच्या सिमेंट, स्टिल, पोर्ट, एअरपोर्ट, वीज आदी सर्व गोष्टींची मोनोपॉली एका माणसाकडे आली, तर तो माणूस या देशाला वेठीस धरू शकतो. केंद्र सरकार या माणसाला सर्व गोष्टी पुरवण्यासाठी विशेषतः कुठेही जा आणि काहीही करा यासाठी रेड कार्पेट अंथरत आहे. माझा त्यावर आक्षेप आहे, असे राज ठाकरे म्हणाले. टाटा, अबांनींनी स्वतःचे व्यवसाय स्वतः उभे केले ते पुढे म्हणाले, उद्या उद्योगधंदे वाढले. उद्योगपती वाढले, तर रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण झाल्यानंतर घरे उभी राहतात. मुले - मुली उभी राहतात. त्यांच्या त्यांना नोकऱ्या मिळतात. त्यांचे संसार उभे राहतात. त्यामुळे उद्योगाला विरोध आहे, असा मूर्खपणा माझ्या बोलण्यात कधीही नव्हता, नाही आणि येणारही नाही. परंतु, एक गोष्ट मी नमूद करेन की, अंबानी, टाटा, बिर्लांसारख्या उद्योगपतींनी स्वतःचे साम्राज्य स्वतः उभे केले आहे. त्यांनी त्यांचे उद्योग स्वतः उभे केलेत. पण आज केंद्राने 7 ते 8 विमानतळ एकट्या गौतम अदानीला दिली आहेत. यातील केवळ नवी मुंबईचे विमानतळ सोडले तर एकही विमानतळ गौतम अदानींनी बांधले नाही. ते दुसऱ्यांनी बांधले आहेत. पोर्ट्सच्या (बंदर) बाबतीतही असेच आहे. एक मुंद्रा पोर्ट सोडले तर जेवढी बंदरे आज गौतम अदानींच्या हातात आहेत त्यातील एकही पोर्ट अदानींनी बांधले नाही. ते दुसऱ्यांचे पोर्ट्स होते. त्यांच्या कानशिलावर बंदू ठेवून त्यांच्याकडून हे पोर्ट्स विकत घेतले आहेत. गौतम अदानी सिमेंटच्या व्यवसायात 10 वर्षांत क्रमांक दोनवर राज ठाकरे म्हणाले, सिमेंटच्या व्यवसायात गौतम अदानी कधीही नव्हते. पण त्यांनी अल्ट्राटेक, अंबुजा इतर कंपन्या विकत घेऊन हा माणूस आज या व्यवसायात क्रमांक दोनचा झाला आहे. आज बिर्ला एक नंबरला आहे आणि हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या 10 वर्षांत एक माणूस सिमेंटच्या व्यवसायात दोन नंबरला जातो. दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून, दुसऱ्यांचे व्यवसाय हातात घेऊन. त्यांचे पॉवर, स्टिलसह अनेक उद्योग तसेच आहेत. मला मुख्यमंत्र्यांना फक्त एवढेच सांगायचे आहे की, हा विषय कुणाच्या ग्रोथच्या नाही, तर ग्रोथ कशी होत आहे, उद्योगपती वाढ कशी होत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे. अदानी उद्या देशही वेठीस धरेल राज ठाकरे पुढे म्हणाले, हा एकच माणूस (गौतम अदानी) उद्या या देशाला वेठीस धरू शकतो. याचे उत्तम उदाहरण हे इंडिगोचे आहे. इंडिगोने संपूर्ण देश अक्षरशः वेठीस धरला. आज एकट्या इंडिगोकडे विमान प्रवासाचा 65 टक्के वाटा आहे. या एका विमान कंपनीने व्यवसाय बंद केल्याने किंवा सेवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल झाले हे सर्वांनी पाहिले. हा धोका सर्वाधिक आहे. हा धोका मुख्यमंत्र्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांना समजणे गरजेचे आहे. अर्थात त्यांना समजले असेलही, पण ते सांगतील कुणाला? ही गोष्ट लोकांपुढे जाणे गरजेचे होते. गौतम अदानींना हे उद्योग उभे करताना अर्थसहाय्य कुठून झाले? कोणकोणत्या बँकांना व वित्तीय संस्थांना यांना अर्थसहाय्य करायला लावले? कारण उद्या अशा प्रकारच्या गोष्टी कोलॅप्स झाल्या, तर नोकऱ्या जातील. देश बरबाद होईल. संपूर्ण देश ठप्प होईल. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे. तुम्ही हे टूल वापरून महाराष्ट्रातील शहरे काबिज करण्यासाठी जात आहात हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा धोका आहे. मी त्यावर भाष्य केले होते, असे राज ठाकरे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 3:13 pm

‘अकोट पॅटर्न’ हाच भाजपचा जनमताचा आदर

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजप व एमआयएमच्या अकोट येथील युतीवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे व आतून मात्र सत्तेसाठी अकोट पॅटर्न राबवायचा हा भाजपच्या लेखी जनमताचा आदरच ठरतो, असे ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र […] The post ‘अकोट पॅटर्न’ हाच भाजपचा जनमताचा आदर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 3:09 pm

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अलर्ट:हॉल तिकिट वाटपाला सुरुवात, हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही नाही? तर परीक्षेला मुकण्याचा धोका

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षांबाबत महत्त्वाची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. मंडळाच्या निर्णयानुसार, यंदाच्या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या लेखी परीक्षेला 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात होणार असून या परीक्षा 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मंडळाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकिटांचे वाटप सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हॉल तिकिटांची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र, केवळ ऑनलाईन डाउनलोड केलेले हॉल तिकिट ग्राह्य धरले जाणार नसून, संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्याची प्रिंट काढून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंडळाने सर्व महाविद्यालयांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, विद्यार्थ्यांकडून हॉल तिकिटाच्या प्रिंटसाठी कोणतेही शुल्क आकारू नये. हॉल तिकिट वाटप पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय आपले हॉल तिकिट वेळेत मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हॉल तिकिटाबाबत मंडळाने आणखी एक महत्त्वाची अट घातली आहे. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही आणि अधिकृत शिक्का असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याचा फोटो असलेल्या हॉल तिकिटावर खाली मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का नसल्यास ते हॉल तिकिट अवैध मानले जाईल. अशा परिस्थितीत संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाऊ शकतो, असा इशाराही मंडळाने दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हॉल तिकिट मिळाल्यानंतर त्यावरील सर्व तपशील नीट तपासून, मुख्याध्यापकांची सही आणि शिक्का घेतल्याची खात्री करूनच परीक्षा केंद्रावर जाणे आवश्यक आहे. बारावीची परीक्षा देण्यासाठी हॉल तिकिट हा अत्यावश्यक दस्तऐवज आहे. कोणत्याही परिस्थितीत हॉल तिकिटाशिवाय विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. यंदाच्या वर्षी राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, लातूर, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या सर्व विभागांतील महाविद्यालयांनी वेळेत हॉल तिकिट वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षांसोबतच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावीच्या परीक्षेची हॉल तिकिटेही लवकरच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे दहावीचे विद्यार्थी आणि पालकांनीही हॉल तिकिटाबाबत सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी मंडळाकडून सर्व स्तरांवर तयारी केली जात आहे. दहावीचे 31 आणि बारावीचे 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त घेण्यासाठी शिक्षण मंडळाने कठोर पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीचे 31 आणि बारावीचे 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईत सर्वाधिक परीक्षा केंद्रांची मान्यता छत्रपती संभाजीनगर विभागातील असल्याची माहिती समोर आली आहे. कॉपी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश मंडळाने दिला आहे. भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली कॉपीमुक्त अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यभर भरारी पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर अचानक तपासण्या, कडक देखरेख आणि नियमभंग करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. याशिवाय, अनेक परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, नियमांचे पालन करून शांततेत आणि प्रामाणिकपणे परीक्षा द्याव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 2:30 pm

अजित पवारांनी भाजप उमेदवाराचा काढला बाप:म्हणाले - मी मोठ्या काकाचा पुतण्या, तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा; पुणे तापले

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुण्यात चक्क भाजप उमेदवाराचा बाप काढला. मी मोठ्या काकांचा पुतण्या आहे. माझा काका तुझ्या बापापेक्षा खूप मोठा आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे दोस्तीत कुस्ती करणाऱ्या भाजप व राष्ट्रवादीतील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी, आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. पुणे महापालिकेचा गड सर करण्यासाठी भाजप व राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आक्रमक रणनीती आखली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज वेगवेगळ्या प्रभागांना भेटी देऊन मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी पुण्यात रोड शोही केला. त्यात त्यांनी भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांच्यावर वरील शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, मी शब्दांचा पक्का आहे. उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला कुणाला तरी मत द्यायचे आहे. तुम्ही मागे अनेकांना मतदान केले. पूर्वी ते घड्याळावर निवडून आले. तुम्ही आम्हाला सत्ता द्या. या भागातील टँकर माफियांचे कंबरडे मोडले नाही, तर अजित पवार नाव नाही सांगणार. मी मोठ्या काकाचा पुतण्या अजित पवार यांनी यावेळी भाजपच्या नेत्यांवरही त्यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, गजर कशासाठी वाजतो. माणसांना जागे करण्यासाठी. एकदा घड्याळाचे बटण दाबून बघा मी काय करतो. आम्हाला येथील ड्रग्ज वगैरेचे अवैध धंदे बंद करायचेत. येथील प्रभाग 4 मधील विरोधी उमेदवार टँकर माफिया असल्याची माहिती माझ्या कानावर आली आहे. इथे कुणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही पण काही कच्चे नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेले तर आम्हीही सोडणार नाही. मी मोठ्या काकांचा पुतण्या आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे, असे ते भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांना निर्वाणीचा इशारा देताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, सुरेंद्र पठारेंचे वडील तुतारीचे आमदार आणि सून व मुलगा भाजपचा उमेदवार आहेत. अशी ही बनवा बनवी सुरू आहे. हे मतदारांना ग्रहित धरत आहेत. आम्ही काय दुधखुळे आहोत का? मी तो शब्द वापरत नाही. पण आम्हाला काय ... समजता का? आता म्हणतात विकास करू. एवढे दिवस काय केले? मी चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करणार. आम्ही शरीफ आहोत. कुणाशीही लढत नाही. शरीफ आहोत म्हणून तुमच्यासोबत राज्यात व केंद्रात आहोत. पण आता इथे तुम्ही ठेवलेली माणसे चुकीची आहेत. पुण्यात सत्ता मिळाल्यास मेट्रो, पीएमपीएल मोफत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर मी मेट्रो व पीएमपीएल फुकट करणार आहे. विरोधक दोन्ही बाजूने बोलत आहेत. हा फुकट करायला निघालाय याच्या घरचे आहे का? माझ्या घरचे नाही, तर पालिकेच्या घरचे आहे. रिक्षा चालकांच्या पोटावर पाय येऊ देणार नाही. मी घोषणा केल्यानंतर अनेकांनी कॅबिनेटने निर्णय घेतला का? असा प्रश्न विचारला. हा काय कॅबिनेटने घ्यायचा प्रश्न आहे का? मला काहीतरी अक्कल असेल ना. का उगीच राज्याचा अर्थसंकल्प मांडतो? राष्ट्रवादी काँग्रेस ज्या योजना आणत आहे, त्याचा सर्वांना फायदा होणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 2:26 pm

आता चुकाल, तर मुंबईला मुकाल!:मुंबई आपली, तिला आपल्याच ताब्यात ठेवा, उद्धव ठाकरे यांनी मुंबईकर मतदारांना घातली साद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधत मुंबईकर मतदारांना मुंबई आपल्याच म्हणजे मराठी माणसांच्याच ताब्यात ठेवण्याचे आवाहन केले. मुंबई आपली आहे, तिला आपल्याच ताब्यात ठेवा. आता चुकाल तर मुंबईला मुकाल, असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून मला आपलाच विजय असल्याची खात्री पटली आहे. पण गेल्या एक-दोन दिवसांत पैशांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू झाल्यामुळे सावधगिरी बाळगा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई विमानतळ परिसरातील शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. त्यात त्यांनी आपल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी व नंतर काय काळजी घ्यायची? यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर करण्याचा आरोप केला. तसेच निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, गत निवडणुकीत येथील आमच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी त्यांचा दणदणीत विजय होणार हे निश्चित आहे. गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी विजय हवा ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कसे जगायचे? हे शिकवले. पण शिवाजी महाराजांचा झाकलेला पुतळा पाहून आपण ही निवडणूक कुणाविरोधात लढवत आहोत हे दिसून येत आहे. आज आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत. आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याला भाषेवर आक्रमण होत आहे. मग आता तुम्ही विचाराल आपल्या विरोधात कोण आहे? आपल्या विरोधात कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. तो गद्दार आहे हा भाग वेगळा. पण ती जी वृत्ती आहे, ही वृत्ती गद्दारीची आहे. मला या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला येथील माझ्या उमेदवारांचा विजय हवा आहे. दोन दिवसांपासून पैशांचा धुमाकूळ उद्धव म्हणाले, निवडून आलेले गद्दार होऊ शकतात. पण जे निवडून देतात ते गद्दार होऊ शकत नाहीत ही दाखवून देणारी ही निवडणूक आहे. तुमच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून मला आपलाच विजय आहे याची खात्री पटली आहे. मात्र गेल्या एक-दोन दिवसांपासून पैशांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. हे एवढे निर्लज्ज व गद्दार लोक आहेत की, त्यांनी ठाण्यातील आपल्या व मनसेच्या उमेदवारांना 5-5 कोटींचे आमिष दाखवले होते. त्यांनी त्यांच्यापुढे उमेदवारी मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही आमची कामे घेऊन मतदारांना सामोरे जात आहोत. याऊलट ते पैशांचे आमिष दाखवून आमच्या उमेदवारांना माघार घेण्याचा इशारा देत आहे. यावरून त्यांनी आपल्या काळात कोणतेही काम केले नसल्याचे स्पष्ट होते. काम केले असते तर त्यांच्यावर असे करण्याची वेळच आली नसती. पैसे वाटणाऱ्यांचे बेलाशक काय करायचे ते करा उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप व शिंदे गटाकडे सांगण्यासारखे काही नाही, पण वाटण्यासारखे बरेच काही आहे. आता त्यांना पैसे वाटतानाही पराभवाची भीती वाटत आहे. आजची रात्र व उद्याची रात्र कुणी पैसे वाटताना दिसला, तर बेलाशय काय करायचे ते करा. मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजले असेल. संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्या. आता हे हजार दोन हजार रुपये वाटत असतील, पण तुम्ही तुमचे आयुष्य विकू नका. आता कर्तव्याला चुकू नका. आता जर चुकाल, तर मुंबईला मुकाल. ही मुंबई आपली आहे. आपल्या ताब्यात ठेवा. तुम्ही ती ठेवाल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 1:58 pm

लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा:संक्रांतीआधी महिलांना 1500 रुपयांचा आर्थिक दिलासा; आचारसंहितेतून वाट मोकळी

राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला असून, यंदाच्या महिन्यातील 1500 रुपयांचा हफ्ता आजपासून त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होऊ लागला आहे. सकाळपासूनच अनेक महिलांच्या मोबाईलवर बँक मेसेज येऊ लागल्याने या योजनेचा लाभ प्रत्यक्षात सुरू झाल्याचे चित्र आहे. राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना, निवडणूक आयोगाने नियमित लाभ देण्यास परवानगी दिल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, एकरकमी तीन हजार रुपये देण्याच्या चर्चांना आयोगाने स्पष्टपणे मज्जाव केल्याने या निर्णयाला राजकीय तसेच प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात कोणत्याही नव्या योजना, नवीन लाभार्थी किंवा मतदारांना आकर्षित करणाऱ्या घोषणा करण्यास मनाई असते. याच कारणामुळे ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट नकार दिला. मात्र, आधीपासून सुरू असलेल्या आणि नियमित स्वरूपातील लाभ देण्यास आयोगाने परवानगी दिली. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हफ्ता आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मकर संक्रांतीच्या निमित्ताने 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा होणार, अशा आशयाच्या बातम्या आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या दाव्यांच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी दाखल झाल्या. काही राजकीय पक्ष आणि नागरिकांनी हा प्रकार आचारसंहितेचा भंग ठरतो का, असा सवाल उपस्थित केला. याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने थेट मुख्य सचिवांकडे याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात महत्त्वाची बाब स्पष्ट करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहितेबाबत एकत्रित आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रत्यक्ष सुरू झालेल्या विकासकामे व योजना आचारसंहिता काळात सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, त्या योजनांचा लाभ अग्रिम स्वरूपात देणे, नवीन लाभार्थी निवडणे किंवा लाभाच्या रकमेबाबत बदल करणे हे आचारसंहितेच्या विरोधात ठरते. हीच भूमिका निवडणूक आयोगाने ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत घेतली. योजनेचा नियमित लाभ मात्र अग्रिम लाभ देता येणार नाही या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले की, योजनेचा नियमित लाभ देता येईल; मात्र अग्रिम लाभ देता येणार नाही आणि कोणत्याही नव्या लाभार्थीची निवडही करता येणार नाही. त्यामुळे, तीन हजार रुपयांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले असले तरी किमान 1500 रुपयांचा नियमित हफ्ता तरी वेळेत मिळणार असल्याने कोट्यवधी लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाली करत आजपासून रक्कम थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली. 15 जानेवारी रोजी मतदान राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील काही घटकपक्षांच्या उमेदवारांकडून सोशल मीडियावर 14 जानेवारीपूर्वी तीन हजार रुपये खात्यात जमा होणार असल्याचे दावे करण्यात येत होते. यामुळे विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला होता. मकर संक्रांतीच्या दिवशी निधी वितरित करणे म्हणजे निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही का? असा थेट सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळेच निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत स्पष्ट भूमिका घेतली. 1500 रुपयांचा हफ्ता वेळेत मिळाल्याने समाधान अखेर आचारसंहितेच्या कात्रित अडकलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला मर्यादित का होईना, पण मोकळा श्वास मिळाला आहे. तीन हजार रुपयांची अपेक्षा पूर्ण न झाली असली तरी, नियमित 1500 रुपयांचा हफ्ता वेळेत मिळाल्याने अनेक महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी सुरू झालेल्या या निधीवितरणामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार आली असली, तरी निवडणूक आयोगाच्या स्पष्ट आदेशांमुळे हा वाद तात्पुरता तरी शांत झाल्याचे दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 1:50 pm

आयाराम-गयाराम प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक

नागपूर : प्रतिनिी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकीय प्रवाहांवर स्पष्ट आणि परखड भाष्य करत आयाराम-गयाराम संस्कृतीवर अचूक निशाणा साधला आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत असून, आयाराम-गयारामांची सत्ताधा-यांकडे झुकण्याची ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका गडकरी यांनी केली आहे. गेल्या दोन वर्षांत इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश झाले असल्याचे […] The post आयाराम-गयाराम प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:46 pm

मतदानाआधी भाजपचा मोठा दणका; नाशिकमध्ये माजी महापौरांसह 54 जणांची हकालपट्टी:नाशिक भाजपचे इतिहासातील सर्वात मोठे ‘क्लीनअप’

नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असतानाच भाजपने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी आणि इतिहासात नोंद होईल अशी कारवाई केली आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत अपक्ष किंवा इतर पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या माजी महापौरांसह 54 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपने थेट पक्षातून हकालपट्टी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कठोर कारवाईमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण आणखी तापले असून, भाजपने पक्षशिस्तीबाबत कोणतीही तडजोड न करण्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे चित्र आहे. भाजपने पक्षविरोधी कारवायांवर कठोर भूमिका घेत ही कारवाई केली असून, यामध्ये 20 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या यादीत नाशिकचे माजी महापौरही असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात थेट निवडणूक लढवणे, अपक्ष किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारणे हे गंभीर पक्षशिस्तभंग असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. नाशिक भाजपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी हकालपट्टी मानली जात असून, यामुळे बंडखोर गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. नाशिक महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने यंदा ‘शंभर प्लस’चा नारा दिला होता. या उद्दिष्टासाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर इतर पक्षांतील प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात घेतले. अनेक इच्छुकांना उमेदवारीची आश्वासने देण्यात आली होती. 122 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 1,077 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात केवळ 122 उमेदवारी उपलब्ध असल्याने सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. याच पार्श्वभूमीवर महायुती होणार की नाही, याबाबतही मोठा संभ्रम होता, ज्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली होती. अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केल्यानंतर भाजपने नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपने 118 उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र त्यानंतर एबी फॉर्म वाटपात मोठा गोंधळ उडाला. काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर काहींना शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली नाही. यामुळे नाराजी अधिक तीव्र झाली. भाजपकडून इतर पक्षांतून आलेल्या 33 जणांना उमेदवारी दिल्याने जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आणि बंडखोरीची ठिणगी पेटली. ही बंडखोरी इतकी वाढली की, प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी थेट पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यांना गाजर देत संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेमुळे भाजपची मोठी नामुष्की झाली होती. त्यानंतर पक्षाने बंडखोरांना थांबवण्यासाठी समेटाचे अनेक प्रयत्न केले, चर्चा केल्या, नाराजांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही अनेक बंडखोर माघार घेण्यास तयार नसल्याने अखेर भाजपने कठोर पाऊल उचलत हकालपट्टीची कारवाई केली. या संदर्भात भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे, अपक्ष किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारणे ही गंभीर पक्षशिस्तभंगाची बाब आहे. अशा कारवाया पक्ष कदापि सहन करणार नाही. त्यामुळे संबंधितांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे पक्षातील शिस्त अबाधित ठेवण्याचा आणि इतर बंडखोरांना इशारा देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आणखी रंगतदार झाला हकालपट्टीच्या कारवाईत माजी महापौर अशोक मुर्तडक, माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सतीश सोनवणे, कमलेश बोडके, माजी गटनेते दिलीप दातीर, अनिल मटाले, माजी नगरसेवक पुनम सोनवणे, मिरा हांडगे, सुनीता पिंगळे, अंबादास पगारे, अलका अहिरे, रुची कुंभारकर, मुकेश शहाणे, पंडित आवारे, दामोदर मानकर, कन्हय्या साळवे, वंदना मनचंदा, शीला भागवत, नंदिनी जाधव, बाळासाहेब पाटील, राजेश आढाव, जितेंद्र चोरडिया, सचिन मोरे, अमित घुगे, ज्ञानेश्वर काकड, ज्ञानेश्वर पिंगळे, चारुदत्त आहेर, तुषार जोशी, सचिन हांडगे, प्रकाश दीक्षित, रतन काळे, ऋषीकेश आहेर, ऋषीकेश डापसे, कैलास अहिरे, सतनाम राजपूत, गणेश मोरे, किरण गाडे, मंगेश मोरे, शाळिग्राम ठाकूर, कल्पेश ठाकूर, मनोज तांबे, शरद शिंदे, शरद इंगळे, प्रभा काठे, स्मिता बोडके, योगिता राऊत, बाळासाहेब घुगे, शंकर विधाते, प्रेम पाटील, रत्ना सातभाई, सविता गायकर, राहुल कोथमिरे, शीतल साळवे आणि एकनाथ नवले यांचा समावेश आहे. मतदानाआधीच झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे नाशिक महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आणखी रंगतदार झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 1:34 pm

राष्ट्रवादी काँग्रेस 2029 पर्यंत भाजपसोबत राहणार:एक हाती सत्तेचे दिवस संपले- खासदार सुनील तटकरे

पुणे, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्याचे दिवस आता संपले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एकत्र निवडणूक लढवत आहेत. तटकरे म्हणाले की, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने 2014 मध्ये भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2022 मध्ये एकनाथ शिंदे सत्तेत आल्यावर1, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामूहिक निर्णय घेऊन एनडीए सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यावेळी 43 आमदार आमच्यासोबत होते. आम्ही 202९ पर्यंत भाजपसोबत एकत्र राहणार असून, आगामी निवडणुकाही एकत्र लढणार आहोत. आम्ही घेतलेला हा निर्णय जनतेला आवडला असून, त्यांनी विविध निवडणुकांमध्ये पक्षाला साथ दिली आहे. शरद पवार यांच्या पक्षातील नेते आमच्या पक्षात विलीनीकरणाबाबत निर्णय घेतील, असेही तटकरे यांनी नमूद केले. मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरताना एकाच पक्षाची हवा असल्याची जी स्थिती होती, त्यात आता निश्चितपणे बदल झाला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते. तटकरे यांनी सांगितले की, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार करण्यात आला. कोरोना, सत्ता बदल आणि आरक्षणासारख्या कारणांमुळे निवडणुका वेळेत न होता लांबल्या. नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले असून, 90 टक्के जनता आमच्यासोबत राहिली. मनपा निवडणुकीत महायुती काही ठिकाणी एकत्रितपणे, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढत आहे. मी राज्याचा संपूर्ण प्रचार दौरा केला असून, राज्यात महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुकूल वातावरण आहे. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांवर प्रचारात पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. पक्ष या शहरांमध्ये चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. एकेकाळी ही दोन्ही शहरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होती, जिथून अनेक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. 2010 मध्ये मेट्रो कामाची सुरुवात आम्ही केली होती, ज्याला नंतर भाजपने गती दिली. काँग्रेसचे नेतृत्व आज दिशाहीन झाले असून, त्यांची शक्ती कमी झाली आहे. निवडणूकपूर्व या दोन शहरांमध्ये जे वातावरण होते, त्यात सकारात्मक बदल झाला आहे. अजितदादांनी विविध प्रचार साधनांचा अवलंब केल्याने आम्हाला अनुकूल वातावरण आहे. आम्ही मेट्रो आणि बस सेवा मोफत देण्याची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी करू. लाडकी बहीण योजना राबवताना वर्षाला 40 हजार कोटी रुपये दिले जात आहेत, परंतु यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 1:31 pm

‘अदाणी’वरून ठाकरे बंधू -भाजपमध्ये जुंपली?

मुंबई : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अदाणी समूहाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी पार्क येथे आयोजित संयुक्त सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजपा) अदाणी समूहाच्या फायद्यासाठी जमिनी हडपण्यास मदत केल्याचा आरोप केला. गेल्या १० वर्षांत या उद्योगसमूहाची अभूतपूर्व प्रगती झाली असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. त्याला उत्तर […] The post ‘अदाणी’वरून ठाकरे बंधू -भाजपमध्ये जुंपली? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:29 pm

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:पुणे-अहिल्यानगर मार्गावरील घटना, वाघोली पोलिसांत डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्रराम शेट्टी (वय ४०, रा. कल्पतरु पार्क, बकोरी रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत शेट्टी यांचा भाऊ मंजुनाथ (वय ३५) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार देवेंद्र हे पुणे-अहिल्यानगर मार्गावरुन जात होते. केसनंद फाटा परिसरात भरधाव डंपरने दुचाकीस्वार देवेंद्र यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या देवेंद्र यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी केसनंद फाटा परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू पुढील तपास करत आहेत. दहशत माजवण्यासाठी टोळक्याकडून तोडफोड पुणे शहरातील कोंढवा परिसरात टोळक्याने दहशत माजविल्याची घटना नुकतीच घडली. टोळक्याने नागरिकांना शिवीगाळ करुन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल नवाज शेख उर्फ पठाण (वय २५). सादिक शेख (दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी सूरज शुक्ला यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यात आरोपी सोहेल, सादिक आणि त्यांच्याबरोबर असलेले दहा ते बारा जण दुचाकीवरुन आले. आरोपींनी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. ‘आम्ही या भागातील दादा आहोत. गंभीर गुन्हा करुन कारागृहातून बाहेर पडलो आहेत. आमच्या नादाला लागला तर खून करू’, अशी धमकी आरोपींनी दिली. आरोपींनी परिसरात दहशत माजवून धारदार शस्त्रांचा धाक दाखवून परिसरातील नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिली. पसार झालेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 1:12 pm

लाडक्या बहिणीची संक्रांत गोड; बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरु

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची संक्रात गोड झाली आहे. नुकतेच पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु त्यावर काँग्रेसने आयोगात धाव घेतली होती. त्यानंतर आयोगाकडून स्पष्ट भूमिका घेण्यात […] The post लाडक्या बहिणीची संक्रांत गोड; बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरु appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:11 pm

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठी कारवाई:दुसऱ्या आरोपीच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे पोलिसांनी खोपोलीतील शिवसेनेच्या नगरसेविकेचे पती मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणात फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अरबाज उर्फ अरमान अल्लुद्दीन शेख (वय २६, रा. आदर्शनगर, ऊरळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, पुणे) असे आहे. यापूर्वी, हडपसर भागातील हांडेवाडी परिसरातून मंगेश काळोखे खून प्रकरणातील मुख्य आरोपी खलिद खलील कुरेशी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर, पुणे) याला अटक करण्यात आली होती. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, राजकीय वैमनस्यातून काळोखे यांचा सुपारी देऊन खून करण्यात आला होता. कुरेशी याने काळोखे यांच्या खुनासाठी २० लाख रुपयांची सुपारी घेतली होती. त्याने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने काळोखे यांचा खून केला होता. आरोपी अरबाज शेख हा हडपसरमधील काळेपडळ परिसरात झालेल्या एका गंभीर गुन्ह्यातही पसार होता. तो विश्रांतवाडीतील पीएमपी थांब्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस कर्मचारी नासीर देशमुख यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने काळोखे खून प्रकरणात सामील असल्याची कबुली दिली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस कर्मचारी नासीर देशमुख, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, अमर चव्हाण, गणेश माने आणि परमेश्वर कदम यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 1:09 pm

बनावट आरटीओ चलन पाठवून अडीच लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) दंडात्मक कारवाईचे बनावट ई-चलन पाठवून एका नागरिकाची २ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील खोपडेनगर भागात राहणाऱ्या तक्रारदाराच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी आरटीओच्या नावाने दंडात्मक कारवाईचे बनावट चलन एपीके फाईलद्वारे पाठवले होते. तक्रारदाराने ही फाईल उघडताच, चोरट्यांनी त्यांच्या आधारकार्ड आणि बँक खात्याची गोपनीय माहिती चोरली. या माहितीचा गैरवापर करून बँक खात्यातून २ लाख ६० हजार रुपयांची रोकड काढून घेण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. ऑनलाइन गेमच्या आमिषाने 36 लाखांची फसवणूक दरम्यान, अशाच एका दुसऱ्या घटनेत ऑनलाइन गेमच्या आमिषाने एका तरुणाची ३६ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. वाघोली येथील एका ३० वर्षीय व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी ऑनलाइन गेममध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. गेल्या वर्षी त्याच्या मोबाईलवर गुंतवणुकीबाबत संदेश पाठवून त्याला एक लिंक पाठवण्यात आली होती. या लिंकद्वारे ऑनलाइन गेम खेळल्यास चांगले पैसे मिळतील असे सांगून तरुणाला जाळ्यात ओढण्यात आले. गेल्या आठ महिन्यांत तरुणाने ऑनलाइन गेमच्या नादात ३६ लाख ७४ हजार रुपये वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच वाघोली पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत. ऑनलाइन गेमच्या नादात अनेक तरुणांनी पैसे गमावले आहेत. त्यामुळे ऑनलाइन गेमचे आमिष दाखवणाऱ्या जाहिराती किंवा लिंक्सना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 1:07 pm

पालिका निवडणुका- आज प्रचार थांबणार, 15 जानेवारीला मतदान:29 महानगरपालिका, 15000 उमेदवार रिंगणात; शिंदे म्हणाले- मराठी माणसाच्या दुर्दशेला उद्धव जबाबदार

महाराष्ट्रात बीएमसीसह २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीत १५ हजारांहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. एकट्या बीएमसीमध्ये एकूण २२७ प्रभाग आहेत, जिथे १७०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदानाचा निकाल १६ जानेवारीला लागणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच सोमवारी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना मराठी माणसाच्या दुर्दशेसाठी जबाबदार धरले. शिंदे यांनी विचारले की, गेल्या २५ वर्षांपासून बीएमसीमध्ये त्यांची सत्ता असताना त्यांनी काय केले? विशेष म्हणजे, दोन गटांमध्ये विभागणी होण्यापूर्वी शिवसेनेने १९९७ ते २०२२ पर्यंत बीएमसीवर नियंत्रण ठेवले होते. उद्धव आणि राज ठाकरे, जे २० वर्षांच्या अंतरानंतर नागरिक निवडणुकांसाठी एकत्र आले आहेत, त्यांनी मराठी अस्मिता (अभिमान) हा आपला मुख्य निवडणूक मुद्दा बनवला आहे. मुंबईत 32 जागांवर भाजप-शिंदे सेना आणि ठाकरे सेना-मनसे यांच्यात थेट लढत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 32 जागांवर भाजप-शिवसेना युती आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)-महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात थेट लढत होणार आहे. ही परिस्थिती यासाठी निर्माण झाली आहे कारण काँग्रेस-बहुजन वंचित आघाडी (वंचित बहुजन आघाडी) युतीने या जागांवर कोणताही उमेदवार उभा केलेला नाही. काँग्रेसने मुंबईत 143 उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडी 46 जागांवर निवडणूक लढवणार आहे आणि डाव्या पक्षांना आणि राष्ट्रीय समाज पक्षासह इतर मित्रपक्षांना सहा जागा देण्यात आल्या आहेत. म्हणजेच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युतीने 195 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामुळे 32 जागा तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांशिवाय राहतात, ज्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही. BMC निवडणूक प्रतिष्ठेचा प्रश्न का ------------- ही बातमी देखील वाचा... आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप:व्हिडिओ व्हायरल; माजी शाखाप्रमुखाचाच आरोप; वरळी प्रभागात शिवसेनेची कोंडी मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, प्रचार संपण्याच्या काही तास आधी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावणार असतानाच, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून पैसे वाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पूर्ण बातमी वाचा…..

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 12:58 pm

राजकारणात एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढले:भाजप प्रवेश पार्टी ठरत असतानाच नितीन गडकरींनी खडसावले; आयाराम-गयाराम संस्कृतीवर वार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकीय प्रवाहांवर स्पष्ट आणि परखड भाष्य करत आयाराम-गयाराम संस्कृतीवर अचूक निशाणा साधला आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटासह विविध पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल होत असतानाच, गडकरींनी या ‘प्रवेश पर्वा’कडे उपरोधिक शैलीत पाहिले. सत्ता जिथे तिथे जा आणि सत्ता बदलली की पुन्हा दुसरीकडे वळा, हे राजकारणातलं एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढलं आहे, असे म्हणत त्यांनी या प्रवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजप ‘राष्ट्रीय प्रवेश पार्टी’ ठरत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. गेल्या दोन वर्षांत इतर पक्षांच्या तुलनेत भाजपमध्ये सर्वाधिक प्रवेश झाले असल्याचे निरीक्षण गडकरींनी नोंदवले. राज्यागणिक प्रदेशाध्यक्षांमध्ये पक्षप्रवेशांची जणू स्पर्धाच लागल्याचे चित्र असल्याचेही त्यांनी सूचित केले. मात्र, या वाढत्या प्रवेशांमागील हेतू आणि निष्ठेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आयाराम-गयाराम प्रवृत्तीवर थेट बोट ठेवले. सत्ताधाऱ्यांकडे झुकण्याची ही मानसिकता लोकशाहीसाठी घातक असल्याचे सूचक विधान करत, त्यांनी या प्रवाहाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. गडकरींच्या या वक्तव्याने भाजपसह इतर पक्षांतीलही ‘पक्षांतर’ संस्कृतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या मुलाखतीत गडकरींनी आपली वैयक्तिक बाजू आणि नागपूरशी असलेली भावनिक नाळही उलगडली. नागपूर माझी जन्मभूमी आहे. इथल्या लोकांच्या सहवासात राहूनच मी काम शिकलो. नागपूरची जनता हा माझा परिवार आहे, असे सांगत त्यांनी शहराबद्दलचा अभिमान व्यक्त केला. आपल्या आरोग्याबाबत मिश्किल टिप्पणी करताना त्यांनी खाण्याची आवड कमी झाली नसल्याचे सांगितले, मात्र 43 किलो वजन घटल्याची माहिती दिली. दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी नाश्ता आणि जेवणाच्या वेळचे किस्से सांगताना, येणाऱ्या प्रत्येकासाठी अन्न तयार असते, अशी आठवण त्यांनी शेअर केली. दिल्लीतील मोठ्या बंगल्यात शेती केली जाते आणि त्यामुळे तिथे मोरही येतात, असे सांगत त्यांनी आपल्या साध्या जीवनशैलीचे दर्शन घडवले. राजकारणातील सुरुवातीच्या संघर्षांची आठवण सांगताना गडकरींनी जुन्या दिवसांचा आढावा घेतला. आम्ही ज्या काळात काम केलं, तेव्हा ऑटोरिक्षातून घोषणा करत प्रचार करायचो. तेव्हा मानसन्मान नव्हता, पण काम करण्यात वेगळाच आनंद होता, असे ते म्हणाले. त्या काळात आंदोलन करताना लाठीचार्जलाही सामोरे जावे लागल्याची आठवण त्यांनी सांगितली. आजच्या राजकारणात सत्ता आणि सोयीच्या गणितावर आधारित निर्णय घेतले जात असताना, त्या जुन्या संघर्षांची आठवण करून देत गडकरींनी अप्रत्यक्षपणे सध्याच्या राजकीय वास्तवावर भाष्य केले. नागपूर महापालिका निवडणुकीबाबत बोलताना गडकरींनी मोठा दावा केला. या निवडणुकीत आम्हाला 101 टक्के बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये पूर्वी पाण्याची तीव्र टंचाई होती आणि नगरपालिकेच्या बैठका महाल परिसरात होत असताना मटका घेऊन जावे लागायचे, असे ते म्हणाले. त्या काळातील संघर्षांमधूनच आजचा विकास घडून आला, असे सांगत त्यांनी नागपूरच्या परिवर्तनाचा प्रवास अधोरेखित केला. त्यांच्या या दाव्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची भूमिका अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. नागपूरच्या विकास आराखड्याबाबत बोलताना गडकरींनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करून त्यावर स्कूटर, मोटार आणि बसेस चालवण्याचा प्रयोग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी नागपूरची परिस्थिती अशी होती की अनेक घरांमधील तरुण मुंबई-पुण्यात नोकरीसाठी गेले होते, याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर उपाय म्हणून नागपूरमध्ये ‘सिंबायोसिस’सारख्या शैक्षणिक संस्थांना आणल्याचे सांगत, स्थानिक विद्यार्थ्यांना 15 टक्के सवलत दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ उपक्रमातून गेल्या काही वर्षांत गुंतवणूक वाढल्याचा दावाही त्यांनी केला. नागपूरच्या विकासाचे मोठे व्हिजन गडचिरोलीसारखा आर्थिकदृष्ट्या मागास जिल्हा आणि आदिवासीबहुल भागात उद्योग सुरू होत असल्याचे सांगत गडकरींनी विदर्भाच्या विकासाचा व्यापक दृष्टिकोन मांडला. वर्धा रोडवर जागतिक दर्जाचा बर्ड पार्क उभारण्याची योजना असून, त्यात जगभरातील पक्षी आणले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करत त्यांनी शहराला जागतिक नकाशावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला. एकीकडे राजकारणातील ‘एक्सपोर्ट-इम्पोर्ट’वर टीका, तर दुसरीकडे नागपूरच्या विकासाचे मोठे व्हिजन मांडत गडकरींनी या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर ठसठशीत भूमिका मांडली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 12:39 pm

वेळीच उपचार न मिळाल्याने नगरसेविकेचा मृत्यू:शाहूताई कांबळे यांच्या निधनाने अहमदपूर शोकाकुल, आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

अहमदपूर शहरातून हृदयद्रावक घटना समोर आली असून, नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेविका शाहूताई कांबळे यांचे वेळेवर उपचार न मिळाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मंगळवारी पहाटे शाहूताई कांबळे यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. नातेवाइकांनी त्यांना तातडीने अहमदपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पहाटेच्या वेळेत अनेक रुग्णालये बंद असल्याने उपचार मिळू शकले नाहीत. जवळपास तासभर उपचारासाठी धावपळ झाल्यानंतर त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाल्याने उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. 15 ते 20 मिनिटे आधी उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते, अशी हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे अहमदपूरमधील आपत्कालीन आरोग्य सेवा आणि रुग्णालयांच्या उपलब्धतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 2017 मध्ये झाला होता पराभव मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य असलेल्या शाहू ताई कांबळे या त्यांच्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या साठी कायम रस्त्यावर उतरलेल्या दिसायच्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. 2017 च्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या 12 मतांनी पराभव झाला होता; मात्र जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास कायम राहिला. यावेळी बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या विजयासाठी विशेष प्रयत्न केले होते. मंत्री पाटील यांनी व्यक्त केले दु:ख दरम्यान, त्यांच्या निधनाची बातमी समजताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. हा माझ्यासाठी आणि पक्षासाठी मोठा धक्का आहे. शाहूताईंच्या अचानक जाण्याने संपूर्ण प्रभाग शोकसागरात बुडाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनानंतर शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रभागातील महिलांनी मोठा आक्रोश केला. अहमदपूर शहरात शोककळा पसरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 12:38 pm

NCP च्या 4 उमेदवारांची निवडणुकीतून माघार:अजित पवारांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाला दिलासा; नाशिकमध्ये 'दुबई वॉर्ड' चर्चेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 उमेदवारांनी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे याठिकाणी राष्ट्रवादीची युती असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. पण काही प्रभागांमध्ये या दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. यामुळे त्यांची मोठी गोची झाली होती. अखेर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक अधिकृत पत्रक काढून पक्षाच्या 4 उमेदवारांच्या माघारीची घोषणा केली. त्यानुसार, वंदना महाले (1 अ), विजय अहिरे (11 अ), जीवन रायते (11 ड) व शेखर देवरे (13 क) या 4 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यांनी आता शिंदे गटाच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दिला. विशेष म्हणजे उमेदवारी मागे घेण्याची तारीख केव्हाच निघून गेली आहे. त्यामुळे या चारही उमेदवारांची नावे ईव्हीएमवर येतील. पण प्रत्यक्षात हे चारही उमेदवार आपल्या मित्रपक्षाचा म्हणजे शिंदे गटाचा प्रचार करताना दिसून येतील. या माघारीमुळे या चारही प्रभागांमध्ये शिंदे गट - राष्ट्रवादीच्या युतीचा खरा उमेदवार कोण? हा प्रश्न आता निकाली निघाला आहे. आता या ठिकाणी शिंदे गटाचे उर्मिला निरगुडे (प्रभाग 1अ), योगेश गांगुर्डे (11अ), धीरज शेळके (11ड), दीपक डोके (13 क) हे 4 उमेदवार भाजपविरोधात मैदानात असतील. नाशिक महापालिकेचा दुबई वॉर्ड चर्चेत दुसरीकडे, नाशिक महापालिकेत दुबई वॉर्ड नामक एक प्रभाग चांगलाच चर्चेत आला आहे. या वॉर्डात एकूण 46 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 23 जण अपक्ष आहेत. भाजपने निवडणुकीपूर्वी आपल्याकडे सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याची ताकद असल्याची बढाई मारली होती. पण प्रत्यक्षात 14 क्रमांकाच्या या वॉर्डात भाजपला उमेदवार मिळाला नसल्याची चर्चा आहे. भाजप वगळता या ठिकाणी शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार), आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. हा वॉर्ड अजूनही एक वेगळेपण जपून आहे. ते म्हणजे येथे शहरातील सर्वाधिक 52 तृतीयपंथी मतदार आहेत. या वॉर्डाचा दुबईशी कोणताही संबंध नाही. पण त्यानंतरही मुस्लिम मतदारांची असणारी सर्वाधिक लोकसंख्या व त्यांच्या श्रीमंतीमुळे या वॉर्डाला दुबई वॉर्ड म्हणून ओळखले जाते. या वॉर्डात गरीब मतदार नाहीत अशी गोष्ट नाही, पण इथे वर्चस्व श्रीमंतांचेच आहे. राजकीय पक्षही श्रीमंत व्यक्ती पाहूनच उमेदवारी देतात. त्यामुळेही त्याला दुबई वॉर्ड म्हटले जाते. दरम्यान, दुबई वॉर्डात सध्या अ गटात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अमायरा शेख, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागृती गांगुर्डे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय साबळे, ब गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बुरारा शेख, शरद पवार गटाचे समीना मेनन, काँग्रेसचे नाझिया अत्तार, क गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शबाना पठाण, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रशिदा शेख, काँग्रेसचे समिया खान, ड गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्फान हाश्मी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुजाहिद शेख तर काँग्रेसचे सुफी जीन यांच्यात लढत आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 12:29 pm

ठाकरे गटाचा भाजप - MIM युतीला टोला:वरवर एकमेकांवर तुटून पडायचे अन् आतून अकोट पॅटर्न राबवायचा हाच भाजपचा जनमताचा आदर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजप व एमआयएमच्या अकोट येथील युतीवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे व आतून मात्र सत्तेसाठी अकोट पॅटर्न राबवायचा हा भाजपच्या लेखी जनमताचा आदरच ठरतो, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. राज्यात सध्या मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक उरला असताना प्रचार टोकाला पोहोचला आहे. त्यातच अकोट नगरपालिका निवडणुकीनंतर स्थानिक पातळीवर भाजप व एमआयएमची कथित युती झाली आहे. यामुळे हिंदुत्त्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपला विरोधकांच्या प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. भाजपने अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी एमआयएम व इतर पक्षांना सोबत घेऊन अकोट विकास मंच स्थापन केला. यावरून ठाकरे गटाने भाजपवर टीकेची झोड उठली आहे. काय म्हणाले अंबादास दानवे? ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे कौतुक करताना म्हटले आहे की, भाजप + एमआयएम = अकोट पॅटर्न. भाजपच्या माजी नगराध्यक्षांच्या मुलाला नगरसेवक करण्यासाठी थेट 'एमआयएम'च्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या खांद्याला खांदा लावला. 'राष्ट्रभक्तीचा' नवा अध्याय लिहिणाऱ्या या 'फेव्हीकॉल' युतीसाठी अभिनंदन. वरवर एकमेकांवर तुटून पडण्याचे नाटक करायचे आणि आतून मात्र सत्तेसाठी 'अकोट पॅटर्न' राबवायचा, हा भाजपच्या लेखी 'जनमताचा आदरच' ठरतो नाही का? असा त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे अकोट नगरपालिकेच्या 35 पैकी 33 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. त्यात भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या. यात भजापच्या माया धुळे यांना नगराध्यक्षपद मिळाले. या निवडणुकीत भाजपने एमआयएमवर टीकेची झोड उठवली. पण निवडणुकीनंतर अकोटच्या विकासाच्या नावाखाली भाजपने शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार व एमआयएमशी हातमिळवणी केली. हे सर्व पक्ष वेगवेगळ्या विचारधारांचे असताना विरोधक भाजपविरोधात चवताळून उठलेत. या प्रकरणी राजकीय अडचण होत असल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी आपली नाराजी व्यक्त केली. काँग्रेस व एमआयएमसोबत भाजपची युती केव्हाच होऊ शकत नाही. हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असे ते स्थानिक नेत्यांचे कान टोचत म्हणाले. हे ही वाचा… नतेच्या प्रेमाचं कर्ज विकासाने फेडणार:‘वेळ काय मागताय? मी तर 24 तास जनतेसाठीच रेडी,’ एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला “मी टिपिकल राजकारणी नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांना भिडणारा शिवसैनिक आहे. छत्रपती संभाजीनगर हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर आहे. ही निवडणूक म्हणजे माझ्यासाठी ‘ऋणफेडीची संधी’ आहे. या शहराने शिवसेनेला दोन आमदार आणि एक खासदार दिले आहेत. आता या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची वेळ आहे. दिलेली वचने पूर्ण करण्याची ही वेळ. शहराच्या विकास आराखड्याबाबत अनेक वर्षे झालेला गोंधळ निस्तरून एक सुसूत्र नियोजन करायचे आहे. भविष्यातील किमान २० वर्षांचा विचार करून काम करायचे आहे, संभाजीनगरच्या विकासासाठी शिवसेना स्वतंत्रपणे कशी शड्डू ठोकून तयार आहे, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरविषयी भावना व्यक्त करताना सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही विशेष मुलाखत… वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 12:05 pm

संभाजीनगरमध्ये मतदानापूर्वीच 'कॅश फॉर व्होट'चा राडा!:पैसे वाटपाच्या कथित यादीवरून बेगमपुऱ्यात गोंधळ; संतप्त नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा पवित्रा

संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यापूर्वी त्यांची यादी व्हायरल झाली आहे. यामुळे बेगमपुरा परिसरात मोठा गोंधळ झालेला आहे. यामध्ये नाव असलेल्या नागरिकाचे घर स्थानिक नागरिकांनी शोधले आहे. नेमके ही यादी कुणी तयार केली याबद्दल काही माहिती कळू शकलेली नाही. या यादीचे बॅनर लावण्यात आले आहेत. यावर बोलताना स्थानिक महिला म्हणाल्या की, आमच्या मुलांना काही राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणत आहे की तुमचा कहार समाज काही करु शकत नाही, तुम्हाला विकत घेतलेले आहे. आम्ही कुणाकडूनही पैसे घेतलेले नाही. आम्ही पैसे घेत नाही म्हणूनच आम्ही विरोध करत आहोत. कुणी पैसे घेतले माहिती नाही. आमच्या समाजाच्या लोकांच्या नावाची यादी करण्यात आली आहे, यामध्ये मृतांच्या नावाचा देखील समावेश असल्याचे महिलांनी म्हटले आहे. 10 ते 15 वर्षांपूर्वी निधन झालेल्या लोकांची नावे यामध्ये देण्यात आली आहेत. आम्ही एकही रुपया कुणाचा घेतलेला नाही. ही यादी कुणाच्या घरी तयार करण्यात आली हे माहिती नाही. काल आमच्या मुलांनी बैठक आयोजित केली आणि त्यावेळी ही गोष्ट आम्हाला समजली. आम्ही कुणालाही मतदान करणार नाही मतदानावर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. कारण जर आम्ही नगरसेवकांकडे गेलो तर ते म्हणतील तुम्ही पैसै घेतले तुमचे काम आम्ही का करावे? असा सवाल ते आम्हाला करतील असे म्हणत एका स्थानिक महिलेने आम्ही मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. प्रभागाची परिस्थिती अतिशय दयनीय एकूणच, छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. येत्या काळात तरी महापालिकेने या भागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. अशी आहे प्रभागाची रचना प्रभाग क्रमांक ३ मध्ये बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, विद्युत कॉलनी, हनुमान टेकडी, साफल्य नगर, पेठे नगर, भावसिंगपूरा भागशः, भीम नगर भागशः, कानिफनाथ कॉलनी, जयसिंगपुरा कुतुबपुरा, पराक्रम कॉलनी भागशः, गणेश कॉलनी भागशः, एन-12, चाऊस कॉलनी, हिमायत बाग यांचा समावेश होतो. या भागात एकूण 43062 लोकवस्ती आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 12:02 pm

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या किती खाणी? किती ट्रक चालतात?:बच्चू कडूंचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ; 16 नंतर खुलासे

प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय गंभीर आणि स्फोटक आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. बावनकुळे यांच्या नावावर अनेक खाणी असून त्या खाणींवरून जगदंबा ट्रॅव्हल्सचे किती ट्रक चालतात, याची चौकशी करण्याचे थेट आव्हान बच्चू कडूंनी दिले आहे. ही केवळ आरोपांची सुरुवात असून, येत्या 16 तारखेच्या मतमोजणीनंतर बावनकुळे यांच्याशी संबंधित सर्व पुरावे सार्वजनिक करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, भाजपची कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडूंनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप मोठ्या प्रमाणात पैसा वापरत असल्याचा आणि तो खुलेआम वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडे एवढा पैसा कुठून आला, हा खरा प्रश्न आहे. नोटाबंदीमध्ये भाजपने लूट केलीच आहे. त्यांनी कशात लूट केली नाही ते तरी सांगा, असा थेट सवाल कडूंनी उपस्थित केला. भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी एकही क्षेत्र असे नाही जिथे भाजप पैसे खात नाही, असा घणाघाती दावा केला. या वक्तव्यामुळे भाजपविरोधी राजकीय वातावरण अधिकच आक्रमक होताना दिसत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आरोप करताना बच्चू कडूंनी विशेषतः खाणी आणि वाहतूक व्यवसायाचा मुद्दा उपस्थित केला. बावनकुळे यांच्या किती खाणी आहेत आणि त्या खाणींवरून किती ट्रक चालतात, याची माहिती बाहेर यायला हवी, असे सांगत त्यांनी जगदंबा ट्रॅव्हल्स कंपनीचा उल्लेख केला. या कंपनीचे ट्रक नेमके किती आहेत आणि ते कुठे-कुठे काम करतात, याची चौकशी करण्याचे आव्हान त्यांनी माध्यमांमार्फत दिले. या सर्व बाबींचे पुरावे आपल्या जवळ असल्याचा दावा करत, योग्य वेळ आल्यावर सर्व गोष्टी जनतेसमोर आणू, असेही कडूंनी स्पष्ट केले. बच्चू कडूंनी भाजपच्या तिकीट वाटप पद्धतीवरही जोरदार टीका केली. कार्यकर्त्याला ना तिकीट द्यायचं, ना पैसे द्यायचे, पण प्रभू रामचंद्रांच्या नावावर मतं मात्र मागायची, असा आरोप करत त्यांनी भाजपच्या धोरणांवर बोट ठेवले. एखादा कार्यकर्ता 40 वर्षे प्रामाणिकपणे काम करतो, तरी त्याला उमेदवारी दिली जात नाही, तर केवळ पैसा असणाऱ्यांनाच तिकीट दिले जाते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. भाजपने निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून धनदांडग्यांना पुढे केल्याचा आरोप करत कडूंनी पक्षाच्या अंतर्गत राजकारणावरही प्रहार केला. आपली सत्ता केंद्रात आणि राज्यात असती तर आपण सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानी नेले असते, असा दावा बच्चू कडूंनी केला. आमची सत्ता असती तर आम्ही रिक्षावाल्यांनाही महापौर बनवण्याची ताकद दाखवली असती, असे म्हणत त्यांनी भाजपवर मर्दानगी संपल्याचा आरोप केला. भाजपने सत्तेचा वापर केवळ पैसा आणि ताकद वाढवण्यासाठी केला असून, सामान्य माणसाचा आवाज दाबला जात असल्याचे कडूंनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रहार पक्षाची ‘सामान्यांच्या बाजूची’ भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. वक्तव्याच्या पुढील टप्प्यात बच्चू कडूंनी अतिशय तीव्र आणि आक्रमक भाषा वापरत भाजपवर निशाणा साधला. एक दिवस लोक प्रभू रामचंद्राचं धनुष्य घेऊन यांच्याच खोपडीत घालतील, आणि तेही हिंदूच घालणार, असे विधान करत त्यांनी भाजपविरोधात जनतेत प्रचंड संताप साचत असल्याचा दावा केला. भविष्यात अशी वेळ येईल की भाजप म्हटलं की लोक त्यांना रस्त्यावर मारतील, सोडणार नाहीत, असा खळबळजनक दावा करत कडूंनी भाजपच्या भविष्यासंदर्भात गंभीर इशारा दिला. या वक्तव्यामुळे त्यांच्या भाषेवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शेवटी, बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा पुनरुच्चार केला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत. इतरांचेही पुरावे मिळाले की तेही जाहीर करेन. निकाल लागल्यानंतर सर्व काही जनतेसमोर मांडणार, असे स्पष्ट करत त्यांनी राजकीय स्फोटाची नांदी दिली आहे. आता 16 तारखेनंतर बच्चू कडू नेमके कोणते पुरावे जाहीर करतात आणि भाजप त्यावर कसा प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 11:43 am

मुख्यमंत्र्यांचे मराठीपेक्षा हिंदीवर जास्त प्रेम:यूपी–एमपीत जाऊन निवडणूक लढवा, संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांना एवढं हिंदीवर प्रेम असेल तर त्यांनी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात जाऊन निवडणूक लढवावी. तिकडून मुख्यमंत्री व्हावे. त्यांना मोदी कुठेही मुख्यमंत्री करू शकतात, जम्मू काश्मीर लदाखलाही मुख्यमंत्री करु शकतात, आपल्या मुख्यमंत्र्यांनाच मराठी विषयी प्रेम नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठी संदर्भात किती खोटे बोलत आहे. काल नवी मुंबईच्या जाहीर नाम्यात भाजपने हिंदी सक्तीची करु असे सांगितले आहे. नवी मुंबईची भाषा मराठी नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. नवी मुंबई हे शहर आग्री, कोळी मराठी भाषिकांनी वसवलेले शहर आहे. तो संपूर्ण भाग मराठी आहे, तिथले आमदार आमचे नसले तरी मराठी आहेत, बाहेरची काही लोकं तिथे कामधंद्यासाठी आली आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठीत भाषण न करणे हे अगदी चुकीचे संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वसई-विरारला मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले आणि तिथे त्यांनी हिंदीमध्ये भाषण केले. विरारची भाषा हिंदी कधी झाली. तो मराठी माणसांचा परिसर आहे. तिथे काही बाहेरची लोकं आली असतील पण मुख्यमंत्र्यांनी मराठीत भाषण न करणे हे अगदी चुकीचे आहे. त्यांच्याकडून हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. वसई-विरार हे चिमाजी अप्पाचे आहे फडणवीसांनी किमान पेशव्यांचा तरी मान राखायला हवा होता. चिमाजी अप्प्पाचा प्रभाव असणाऱ्या ठिकाणी तुम्ही हिंदीमध्ये भाषणे करतात? अशाच प्रकारे मुंबई महाराष्ट्रबाहेर काढण्याचे यांचे कारस्थान हे यशस्वी करत आहेत. आमचे राज्यकर्ते षंढ संजय राऊत म्हणाले की, अण्णामलई काल म्हणाला आमच्या तोंडात बॉम्बे बसले आहे, अरे भ..व्या तुझ्या तोंडात जर ते बसले आहे तर जा ना चैन्नईला इथे कशाला आहे. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या भावनांशी खेळत आहेत. याचा एकही सत्ताधारी निषेध व्यक्त करत नाही. त्याला कोण ओळखते, त्यांच्या राज्यातही त्याला कुणी ओळखत नाही. तो मराठी माणसांना इथे येऊन आव्हान देतो. तू तिकडे जाऊन बोल की चैन्नई तुमचे नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. तिथे बोलण्याची काही हिंमत नाही यांच्यामध्ये. आमचे राज्यकर्ते हे षंढ आणि गां.. आहे. बॉम्बे नाही तर मुंबई म्हणावे लागेल संजय राऊत म्हणाले की, भाजपचे आमदार हे अण्णामलाईची बाजू कशी घेऊ शकतात.तुम्हाला मराठी माणसानेही मतदान केले आहे ना? तुम्हाला बॉम्बे नाही तर मुंबई म्हणावे लागेल. रवींद्र चव्हाण यांना पुढच्या वेळी केरळ किंवा तामिळनाडूमध्ये निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यांनी लुंगी घालून प्रचार सुरू केला आहे. ही लोकं मराठी माणसांना ग्राह्य धरत आहेत. या लोकांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. भाजपमधील मराठी माणसांनी आमच्यासोबत एकत्र आले पाहिजे. मराठी अस्मिता जिवंत असणाऱ्यांनी अण्णामलाईच्या मागे उभे न राहता मनसे-शिवसेनेसोबत यावे. राज ठाकरे यांच्याकडे ही लोकं अनेक वेळा गेली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 11:23 am

संभाजीनगरमध्ये मनपाची ‘व्होटर-बोट’ सेवा सुरू:9764831111 या क्रमांकावर ‘Hi’ पाठवा अन् घरबसल्या मिळवा तुमची मतदार पावती, अशी करा प्रक्रिया

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदारांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाचा मोठा आधार घेतला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी ‘सीएसएमसी व्होटर बोट’ ही व्हॉट्सॲप सेवा कार्यान्वित केली आहे. यामुळे आता मतदारांना रांगेत उभे राहून किंवा केंद्रावर जाऊन नाव शोधण्याची गरज भासणार नाही. मतदार पावती मिळवण्यासाठी अशी करा प्रक्रिया ‘डमी मतदान’ करून पाहा आणि संभ्रम दूर करा मतदारांना अडचण येऊ नये म्हणून Csmcvotekar.com या वेबसाइटवर प्रात्यक्षिकाची सोय करण्यात आली आहे. नाव शोधणे : वेबसाइटवर मतदार यादीत नाव, बूथ आणि ठिकाण शोधण्याची सविस्तर माहिती दिली आहे.मतदानाचे प्रशिक्षण: एका मतदाराला चार उमेदवारांना कसे मतदान करायचे याची फोटोसह माहिती यात आहे. १२ ओळखपत्रे : मतदानासाठी आवश्यक असलेल्या १२ अधिकृत ओळखपत्रांची यादी येथे पाहता येईल. असा करा मतदानाचा सराव: प्रात्यक्षिक बटणवर क्लिक करून आपला प्रभाग निवडल्यास प्रत्यक्ष मशीनवर (बॅलेट युनिट) मतदान कसे करायचे याचा अनुभव घेता येईल. चार ठिकाणी मतदान पूर्ण केल्यावर ‘बीप’ आवाज येईल, ज्यामुळे मतदारांना प्रत्यक्ष मतदानाची सवय होईल. मतदारांना काय काय माहिती मिळणार? या सुविधेमुळे मतदाराला त्याचा प्रभाग क्रमांक, मतदान केंद्राचे नाव व पत्ता, मतदान कक्ष क्रमांक, अनुक्रमांक आणि कोणत्या खोलीत मतदान करायचे आहे याची अचूक माहिती मिळणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायं. ५.३०मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत पार पडणार आहे. ‘व्होट कर, छत्रपती संभाजीनगर’ या मोहिमेअंतर्गत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी ही डिजिटल सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक नागरिकाने या सुविधेचा वापर करून आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 11:17 am

जप्त केलेली वाळू नेण्यास विरोध करणाऱ्या पोलिस पाटलास मारहाण:नवखा येथील घटना, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील नवखा येथे जप्त केलेली वाळू नेण्यास विरोध करणाऱ्या पोलिस पाटलास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या येडूद (ता. औंढा) येथील एका व्यक्ती विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 12 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नवखा येथे महसूल विभागाच्या पथकाने काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळे जवळ 16 ब्रास वाळू जप्त केली होती. सदर वाळू पोलिस पाटील सतीष पातळे यांना सांभाळण्यासाठी त्यांच्या हवाली करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी ता. 12 सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येडूद (ता.औंढा नागनाथ) येथील विजय घुगे तेथे आला. त्याने सदर वाळू मला न्यायची आहे असे म्हणत वाहनामध्ये वाळू भरण्यास सुरवात केली. मात्र पोलिस पाटील सतीष यांनी त्याला रोखले. सदर वाळू जप्त केलेली असून आपणास सांभळण्यासाठी दिली आहे. त्यामुळे वाळू नेता येणार नाही असे सांगत वाळू नेण्यास विरोध केला. यावरून विजय याने त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. तू जर मधे आडवा आलास तर गाडीच्या चाकाखाली चिरडून टाकील तसेच तुझ्या घरच्यांनाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन शासकिय कामात अडथळा आणला. त्यानंतर पोलिस पाटील सतीष हे घरी जात असतांना त्यांच्या घरा समोर जाऊन पुन्हा धक्काबुक्की केली तसेच त्यांच्या आईला शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिस पाटील सतीष यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय घुगे याच्या विरुध्द शासकिय कामात अडथळ आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार आशिष उंबरकर, बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 10:22 am

मुलगा होत नसल्याने छळ; महिलेची आत्महत्या‎:केजमधील घटना; तिन्ही मुलीच झाल्याने पती, सासू, सासऱ्याकडून त्रास, गुन्हा दाखल‎

तुला तीनही मुली झाल्या, आमच्या‎वंशाला दिवा नाही, असे म्हणत पती,‎‎सासू, सासऱ्याकडून‎‎ मुलगा होत नसल्याच्या‎‎ कारणावरून होत‎‎ असलेल्या शारीरिक‎‎आणि मानसिक ‎‎छळास कंटाळून एका‎ ‎२५ वर्षीय महिलेने ‎‎राहत्या घरी फॅनला ‎साडीने गळफास घेऊन आत्महत्या‎ केल्याची घटना उंदरी (ता. केज) येथे ‎घडली. अरुणा ठोंबरे असे त्या महिलेचे‎नाव आहे. आजरखेडा (जि. लातूर)‎ येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी‎अरुणा हिचा विवाह उंदरी (ता. केज) ‎‎येथील उद्धव ठोंबरे याच्यासोबत १६ ‎ऑगस्ट २०१९ रोजी झाला होता. लग्नानंतर ‎‎त्यांना राजनंदीनी (वय ५) आणि आर्या व ‎‎अपूर्वा (वय ४) या दोन जुळ्या मुली‎झाल्या. तिला तीन ही मुली झाल्याने‎अरुणा हिचा पती उद्धव ठोंबरे हा दारु‎पिऊन सतत शिवीगाळ व मारहाण करीत ‎‎होता. तर सासू इंदूबाई उत्तम ठोंबरे व‎सासरे उत्तम रघुनाथ ठोंबरे हे देखील तिला ‎‎सतत शिवीगाळ करीत होते. अरुणाचा‎भाऊ गोविंद सूर्यवंशी यांनी दिलेल्या ‎‎तक्रारीवरून पती उद्धव ठोंबरे, सासू इंदुबाई ‎‎ठोंबरे, सासरे उत्तम ठोंबरे यांच्यावर गुन्हा ‎‎दाखल करण्यात आला.‎ इनसाइड स्टोरी‎: आई-वडील, भाऊ, बहिणीने काढली होती समजूत‎ सासरी होत असलेल्या छळाची माहिती अरुणा ठोंबरे ही तिच्या‎आई-वडील, भाऊ व मोठ्या बहिणीस नेहमी सांगत होती. तिने या त्रासाला‎कंटाळून नांदायला न जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र माहेरच्या‎लोकांनी तिची समजूत काढून तिला धिर देत सासरी पाठविले. शेवटी‎सासरी होत असलेला छळ असाह्य झाल्याने अरुणा ठोंबरे हिने टोकाची‎भूमिका घेऊन १० जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उंदरी येथील‎राहत्या घरी फॅनला साडीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.‎ ३ चिमुकल्या झाल्या पोरक्या अरुणा ठोंबरे या महिलेने‎गळफास लावून आत्महत्या केल्याने तिच्या मुली राजनंदिनी ( ५), आर्या‎व अपूर्वा (४) या तिन्ही चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या आहेत. या‎घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 10:21 am

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप:व्हिडिओ व्हायरल; माजी शाखाप्रमुखाचाच आरोप; वरळी प्रभागात शिवसेनेची कोंडी

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, प्रचार संपण्याच्या काही तास आधी एक खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावणार असतानाच, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून पैसे वाटपाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वरळी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी महिलांना बैठकीच्या नावाखाली बोलावून थेट पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवारांसह शिवसेना (शिंदे गट) च्या नेत्यांनी हे आरोप केले असून, यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अशा प्रकारे पैसे वाटपाचे आरोप झाल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाला अधिक राजकीय वजन मिळण्याचं कारण म्हणजे हे आरोप करणारे सूर्यकांत कोळी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख आहेत. प्रभाग क्रमांक 193 मधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या सूर्यकांत कोळी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनीच हे व्हिडिओ सार्वजनिक केले आहेत. माजी शाखाप्रमुखाचाच पक्षातील उमेदवाराविरोधात थेट आरोप केल्याने शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातही चर्चा रंगली आहे. मात्र, या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, ही घटना एकटी नाही. गेल्या दोन दिवसांत मुंबईबाहेरही अशाच स्वरूपाच्या गंभीर घटना घडल्या असून, तरीही पोलिसांकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 29 मध्ये रविवारी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तीन ते चार जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या प्रकरणानंतरही परिस्थिती शांत झाली नाही. सोमवारी रात्री पुन्हा एकदा तुकाराम नगर परिसरात भाजपच्या उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर आणि इतर दोघेजण पैसे वाटपासाठी आल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारांनी केला. यानंतर शिवसेना उमेदवार आणि भाजप उमेदवाराचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या झटापटीत दोन्ही गटांचे कार्यकर्ते जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही इतक्या गंभीर घटना घडूनही अद्याप कोणत्याही प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने संशय अधिक गडद होत आहे. दोन दिवसांत पैसे वाटपाचे आरोप, थेट हाणामारी आणि जखमी कार्यकर्ते अशी परिस्थिती असतानाही पोलिसांकडून केवळ गुन्ह्याची प्रक्रिया सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलिस गुन्हे दाखल का करत नाहीत? यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पोलिसांची भूमिका आणि संभाव्य राजकीय दबावावर प्रश्न उपस्थित होत आहेत. गंभीर घटना घडूनही पोलिस गुन्हे दाखल का करत नाहीत? एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहिली जात आहे का? की पोलिसांवर राजकीय दबाव आहे? असे थेट प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा आरोपांची मालिका सुरू राहिल्यास, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येईल, अशी भीती राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 10:20 am

दिव्य मराठी इनसाइड स्टोरी:सोलापूरकरांना मतदानाच्या दिवशी बिनपाण्याची शिक्षा, गुरुवारी सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद

महापालिका निवडणुकीच्या राजकारणात सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा कळीचा मुद्दा बनला आहे. सध्या शहरात चार ते पाच दिवसाआड पाणी येत आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडले आहे. तर नवीन ८९२ कोटींच्या योजनेतून पुढील पाच वर्षांच्या आत सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा केला जाईल, असे दावे भाजपचे नेते करत आहेत. पाण्याच्या मुद्द्यावर जनतेत आधीच असंतोष असताना आता त्यात महापालिकेनेही ‘तेल’ ओतले आहे. १५ जानेवारी रोजी महापालिकेसाठी मतदान होत आहे. त्याच दिवशी शहरात पाणीपुरवठा केला जाणार नाही, असा अजब फतवा महापालिकेने काढला आहे. सोलापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. यातून विरोधकांच्या हाती आयता मुद्दा मिळाला असून जनताही मतदानातून रोष व्यक्त करु शकते. त्यातून सत्ताधारी पक्षाची अडचण होण्याची शक्यता असल्याने मनपाला हा निर्णय मागे घ्यायला लावला जाऊ शकतो. सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी यासंदर्भात सोमवारी एक पत्रक काढून निर्णय जाहीर केला. ‘महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच सिद्धरामेश्वर यात्रेमुळे पाणीपुरवठा वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले. त्यानुसारच गुरुवारी १५ जानेवारीला मतदानाच्या दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ पर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. निवडणूक कार्यक्रमामुळे निर्माण होणाऱ्या व्यवस्थात्मक कारणांमुळे उजनी व भवानी पेठ पंप हाऊसवर अवलंबून असलेल्या परिसराचा तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा १५ जानेवारीपासून एक दिवसाने पुढे ढकलण्यात येणार आहे. हा बदल रोटेशन पद्धतीने लागू राहणार आहे, असे चौबेंनी म्हटले आहे. दिले यात्रेचे कारण, पण रोष वाढल्यास निर्णय बदलावा लागेल मनपाने मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने पाणीपुरवठा बंद राहील असे एक कारण दिले आहे. त्यासोबतच सिद्धरामेश्वर यात्रेचेही कारण दिले. यात्रेतील धार्मिक विधीअंतर्गत मंगळवारी १३ जानेवारी रोजी अक्षता सोहळा होईल. नंदीध्वज मार्गावर रांगोळी काढण्यात येणार असल्यामुळे, पर्सिव्हल टाकीवरून होणारा सकाळचा नियोजित पाणीपुरवठा दुपारनंतर सुरू केला जाणार आहे, असे स्पष्टीकरण महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे. मतटक्का घटू नये म्हणून खबरदारी, हेच खरे कारण शहरात अनियमित व अपुरा पाणीपुरवठा हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. त्याविरोधात जनतेने सातत्याने आंदोलने केली. मात्र फारसा फरक पडला नाही. ज्या दिवशी नळाला पाणी येते त्या दिवशी ते भरणे हाच नागरिकांचा प्राधान्यक्रम असतो. त्यासाठी प्रसंगी नोकरीत रजा टाकली जाते किंवा प्रवासाचे बेतही पुढे ढकलले जातात. मतदानाच्या दिवशी पाणीपुरवठा झाला तर मतदार त्यातच अडकून पडतील, मतदानासाठी बाहेर पडणार नाहीत, अशा अटकळी काही राजकीय पक्षांकडून लावल्या जात आहेत. विधानसभेच्या वेळीही या कारणामुळे काही भागात मतदान कमी झाल्याची उदाहरणे दिली जातात. आता त्याच कारणामुळे मतदानाच्या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवून एक दिवस पुढे ढकलण्याची शक्कल लढवली. नेत्यांसाठी पाणी किती महत्त्वाचे सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात दररोज पाणीपुरवठा हाच मुख्य मुद्दा बनवलेला आहे.मुख्यमंत्र्यांनी परवाच्या भाषणात रोज पाणी पुरवठ्यासाठी भाजप कटिबद्ध असल्याचा शब्द दिला.पालकमंत्री जयकुमार गोरे यांचाही रोज पाण्यासाठीच ८९२ कोटींची नवी योजना आणल्याचा दावा.दररोज पाणी देऊ शकलो नाही तर आमदारकीला मते मागणार नाही, अशी प्रतिज्ञा आ. देवेंद्र कोठेंनी केली. ४५ टक्के भागात पुरवठा नाही शहराच्या ४० ते ४५ टक्के भागात नाही पाणी केगाव, बाळे, पुणे रोड, चौपाड, कस्तुरबा मंडई, बाळीवेस, दयानंद महाविद्यालय, रेल्वे लाईन, रामवाडी, सेटलमेंट, भद्रावती पेठ, सिव्हील चौक, साखर पेठ, विजापूर वेस, बेगम पेठ, कन्ना चौक, कोंतम चौक, राजेंद्र चौक, जोडबसवण्णा चौक, लोधी गल्ली, सिध्देश्वर पेठ आदी परिसरात मतदानाच्या दिवशी दिवसभर पाणीपुरवठा होणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 9:55 am

कपातीच्या रकमेतील 27 लाखांच्या संशयीत अपहाराची माहिती मिळेना:सेनगाव पंचायत समितीमधील प्रकार, प्रशासन हतबल

सेनगाव पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेमधील संशयीत अपहाराची २७ लाख रुपयांची माहितीच मिळत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला पत्र देऊन सोपस्कार पूर्ण केले जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त होऊ लागले आहे. सेनगाव पंचायत समितीच्या लेखा विभागातून कपातीच्या रकमांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये मागील पाच वर्षात कपात झालेली रक्कम व त्याचे धनादेश याची चौकशी झाली. यामध्ये जीएसटी, कामगार विमा व इतर कपातीच्या रकमेची धनादेश संबधित विभागाकडे न देता परस्पर वैयक्तिक नांवावर वटविल्याचे स्पष्ट झाले होते. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या लेखा विभागातील पथकाने सविस्तर अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये ४३.७७ लाख रुपयांचे धनादेश वैयक्तिक नावांवर वटवून अपहार केल्याचे नमुद केले होते. या शिवाय २७ लाख रुपयांचा संशयीत अपहार असल्याचे नमुद करून सदर रकमेच्या धनादेशाची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाकडून घेण्याबाबतही अहवालात नमुद केले होते. दरम्यान, पंचायत समितीच्या ४३.७७ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर संशयीत अपहाराची माहिती अद्यापही प्रशासनाला मिळालीच नाही. त्यामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे. तर ग्रामपंचायत कडून माहिती मिळत नसल्याचे सांगत प्रशासनाकडून हातवर केले जात आहेत. त्यामुळे सदर अपहाराबाबत माहिती का घेतली जात नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. दोन धनादेश हिंगोलीच्या एका बँकेत वटल्याची चर्चा पंचायत समितीच्या संशयीत अपहारातील धनादेश ग्रामपंचायतींनी सेनगाव तालुक्यातील बँकेत वटविणे अपेक्षीत आहे. मात्र त्यातील दोन धनादेश हिंगोलीतील एका बँकेत वटविल्याची जोरदार चर्चा सुरु झाली असून यासाठी लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याचा पुढाकार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये एका धनादेशाची रक्कम २.९० लाख रुपये तर दुसरा धनादेश सुमारे ९० हजार रुपयांचा असल्याचीही चर्चा आहे. धनादेशाची माहिती मागविण्यासाठी पत्र दिले संशयीत अपहाराचे धनादेश ग्रामपंचायतीचे आहेत. त्यामुळे सदर माहिती पंचायत समितीने ग्रामपंचायतीकडून मागविणे अपेक्षीत आहे. त्यासाठी पंचायत समितीला पत्रही देण्यात आले आहे. आता पुढील कार्यवाही पंचायत समितीकडून झाली पाहिजे. - दिगंबर माडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 9:55 am

हे प्रेमाचं कर्ज विकासाने फेडणार- उपमुख्यमंत्री:‘वेळ काय मागताय? मी तर 24 तास जनतेसाठीच रेडी,’ एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला

“मी टिपिकल राजकारणी नाही, तर सामान्यांच्या प्रश्नांना भिडणारा शिवसैनिक आहे. छत्रपती संभाजीनगर हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते शहर आहे. ही निवडणूक म्हणजे माझ्यासाठी ‘ऋणफेडीची संधी’ आहे. या शहराने शिवसेनेला दोन आमदार आणि एक खासदार दिले आहेत. आता या शहराचा चेहरामोहरा बदलण्याची वेळ आहे. दिलेली वचने पूर्ण करण्याची ही वेळ. शहराच्या विकास आराखड्याबाबत अनेक वर्षे झालेला गोंधळ निस्तरून एक सुसूत्र नियोजन करायचे आहे. भविष्यातील किमान २० वर्षांचा विचार करून काम करायचे आहे, संभाजीनगरच्या विकासासाठी शिवसेना स्वतंत्रपणे कशी शड्डू ठोकून तयार आहे, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरविषयी भावना व्यक्त करताना सांगितले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली ही विशेष मुलाखत… प्रश्न : युवकांसाठी काही करण्याचा उल्लेख केला, त्याबद्दल काही सांगणार ?शिंदे : युवक आणि क्रीडा माझ्या अजेंड्यावर आहेत. युवा वर्गाला रोजगार - स्वयंरोजगार मार्गदर्शनासाठी शिवसेनेतर्फे नियमित मार्गदर्शन शिबिरे आयोजित होतील. हा झाला एक भाग, दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगर औद्योगिक दृष्टीनं वेगानं विकसित होत आहे. लवकरच ही मोठी उद्योगनगरी होणार अशावेळी स्थानिकांना रोजगार देण्याचा आमचा निर्णय आहे. इथल्या उद्योगांशी महानगरपालिका सामंजस्य करार करेल आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. स्वयंरोजगार मिळावा यादृष्टीने काही छोटे प्रकल्प घेऊ जेथे अनेक कौशल्ये शिकता येतील. हे महापालिकेचे स्कील डेव्हलपमेंट सेंटर असेल. क्रीडा क्षेत्र विकास आणि उद्यानांमधून ज्येष्ठांसाठी ट्रॅक हे काही विषय असतील.प्रश्न : दोन दिवसांपूर्वी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभाही घेतली, काय म्हणतंय वातावरण?शिंदे : मी टिपिकल राजकीय उत्तर देणार नाही. शिवसेना परमुखांवर ज्या शहराने प्रेम केलंय, त्या वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपत असताना मलाही तेच प्रेम मिळत आले. खासदार आणि दोन आमदार या शहराने शिवसेनेला दिले. शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नपूर्तीची संधी यानिमित्ताने मला मिळाली आहे. जनतेने एवढे प्रेम केलंय की हे ऋण आता फेडण्याची संधी आहे आणि मी फेडणार ते विकास कामातून. बघाल तुम्ही, येत्या काही वर्षांत शहराचा कायापालट करून दाखवू. जनतेच्या प्रेमाचे कर्ज फेडण्यासाठी यापेक्षा चांगली संधी येणार नाही.प्रश्न : आश्वासनं हा निवडणूक प्रचाराचा भाग असतो, सगळेच पक्ष सांगतात, मोठी स्वप्नं दाखवतात...?शिंदे :..एक मिनिट! हा एकनाथ शिंदे इतरांसारखा नाही. ते इतर कोण हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण हा शब्द आहे माझा, वचन देतोय, आज माझे शिवसैनिक, माझे नगरसेवक त्यांचे प्रभाग आणि माझा महापौर या शहराच्या विकासासाठीच काम करेल. त्याचं प्रगती पुस्तक मी नियमित मागवणार. केलेल्या कामांची माहिती घेत राहणार आणि विकास दिशा कशी पाहिजे यासाठी टीम असेल. सगळ्या प्रकारचं प्लॅनिंग माझा प्रांत आहे. शिवाय नगरविकास माझ्याकडे आहे. या शहराला काहीही कमी पडू देणार नाही.प्रश्न : काय कारण आहे याचं? म्हणजे तुम्हाला का वाटतं की तुमची कामगिरी चांगली राहील?शिंदे : दोन गोष्टी आहेत एक तर छत्रपती संभाजीनगरने शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर प्रेम केलं, कधीकाळी भरभरून दिलं. मधला काळ सोडून द्या, आता पुन्हा तो वारसा धनुष्यबाणासह आहे. ती दिशा इथे आहे हा एक भाग. दुसरं म्हणजे मी भावनिक मुद्द्यांना समोर न ठेवता प्रगतीचा, विकासाचा विचार घेऊन प्रचारात आलो आहे. मला कुठेही हा फोकस ढळू द्यायचा नाही. कारण छत्रपती संभाजीनगर एका मोठ्या महानगरात बदलायचं असेल तर ठाम निर्णय घेणारे माझ्यासारखे शिवसैनिक पाहिजेत. ज्यांच्यात ही धमक आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की इथली जनता त्यांच्या हक्काच्या माणसांना निवडून देणार जे त्यांच्या शहरासाठी दिन रात एक करतील.प्रश्न : आपल्या संकल्पनेतील विकासकामे कोणती ?शिंदे : माझ्या सभेत मी शहराला दिलेला वचननामा हे माझा संकल्पचित्र आहे. मी शब्द दिला तो पाळण्यासाठी. माझ्याकडे संकल्पना आहेत सोबत त्या पूर्ण करण्याची जिद्द आहे. येत्या पाच वर्षांत काही गोष्टींना प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे.प्रश्न : प्राधान्यक्रम काय राहणार ?शिंदे : मी आधी म्हणालो तसं नगरविकास खाते माझ्याकडे आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरने भविष्यातील नगर नियोजन बाबतीत निःशंक राहावं. त्यांच्या अपेक्षेला आम्ही पूर्णपणे खरे उतरू. शहराच्या विकास आराखड्याबाबत अनेक वर्षे झालेला गोंधळ निस्तारून एक सुसूत्र नियोजन करायचे, भविष्यातील किमान २० वर्षांचा विचार करून काम करायचे. त्यामुळे अजेंड्यावर विकास आराखडा, वाढीव चटईक्षेत्र मागणीचा विचार, गुंठेवारीचा थोडाबहुत गुंता दिसतोय तो सोडवून जनतेला दिलासा देऊ.प्रश्न : छत्रपती संभाजीनगर कितीतरी वर्षांपासून पाण्यासाठी झगडत आहे...?शिंदे : अहो, हा मुद्दा आता माझ्या दृष्टीनं सुटलेला प्रश्न आहे. कारण पूर्वीच्या तुमच्या स्थानिक लोकांनी योजनेला स्पीड देण्यापेक्षा खीळ घालण्याचे उद्योग केले. मधल्या अडीच वर्षांत सुद्धा तेच झाले. योजना येत्या चार महिन्यांत पूर्ण होईल आणि प्लॅनिंग करत संपूर्ण शहराला पाणी देऊ...इतकी वर्षे मृगजळ होतं आता नाही. टप्प्यात आलीय योजना. मी काळजी घेईन ती योजना अंतर्गत जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या याची पूर्तता लवकरात लवकर करणार.प्रश्न : राज्यात लाडक्या बहिणींसाठी तुम्ही योजना आणली तसं मनपासंदर्भात काही संकल्प आहेत का?शिंदे : हो नक्कीच! शिवसेनाप्रमुख कायम आपल्या भाषणाची सुरुवात माता-भगिनींनो म्हणून करायचे. तोच माझाही स्वभाव आहे. माझ्या राज्यातील माता-भगिनींना समाधानी बघणं ही माझी भावना. म्हणून तर मी लाडकी बहीण योजना आणली. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जोमाने काम करणार आहे. यावेळी माझ्यासमोर माता भगिनी आणि युवक हे विकास कामाचे केंद्र राहणार आहेत. बहिणींना सक्षम करणं या उद्देशाने संकल्प आहेत. ते लवकरच दिसतील. माझ्या वचननाम्यामध्ये मी म्हटले त्याप्रमाणे महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार, स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रांना सुरुवात करतोय. मुख्य बाजारपेठ आणि सर्वच शहरात वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी, शहरात सगळ्या भागात सुनियोजित भाजीमंडई असेल. मुख्यतः वर्किंग वुमनचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काही ठोस उपक्रम हाती घेतले जातील. कारण ही संख्या भविष्यात वाढणार. शहर बस सेवेत त्यांना सवलत तर देऊतच पण विशेष महिला चालक - वाहक बस त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न असेल. महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून स्त्रीला कम्फर्ट वाटेल असे वातावरण देण्याचा प्रयत्न असेल.प्रश्न : वाहतूक समस्या वाढली यावर उपाय काय असावा?शिंदे : हे बघा ! या शहराचा आम्ही खूप बारकाईने अभ्यास केलाय. इथल्या नागरी प्रश्नांवर चर्चा झाल्या आहेत. ठोस वाहतूक धोरण आणि काळजीने रस्त्यांची कामे झाली तर हा प्रश्न सुटू शकतो. वाहतूक धोरण ठरवणं, त्याची अंमलबजावणी प्रभावी करणे गरजेचे आहे. सार्वजनिक पार्किंग तळांचा विचार आम्ही केला आहे. सोल्यूशन आहेत तुम्ही बघाल. आमच्या पदाधिकारी व आमदारांना सांगितलं की यावर तुमच्या स्तरावर काही मुद्दे द्या. मुद्दे आलेत आणि माझी यासाठीची टीम येऊन गेली. वाहतूक नियोजनात तुमचे उड्डाणपूल हा गंभीर विषय आहे. पण मार्ग काढू! अखंड उड्डाणपुलाची मागणी होतेय, त्यावर सर्वेक्षणअंती निर्णय घेऊ. व्यवहार्य असेल आणि नागरिकांना ज्यामुळे अडचण होणार नाही, असेच निर्णय होतील.प्रश्न : इतरही काही मुद्दे तुमच्या वचननाम्यात आहेत त्यापैकी तुम्हाला कोणता महत्त्वाचा वाटतो ?शिंदे : कोणता म्हणजे? अहो ! सगळे महत्त्वाचे आहेत म्हणून तर घेतले. शिवसेनेचा वचननामा आहे, माझा शब्द आहे. कमिटमेंट आहे आणि एकदा कमिटमेंट दिली की दिली.. मग आर या पार लढाई असते आमची. इथले पर्यावरण असो किंवा पर्यटन मी मागे हटणार नाही. “ ये बाज की नजर है’प्रश्न : छत्रपती संभाजीनगर शहरासाठी आपण आणखी कोणत्या विषयाला प्राधान्य देताय ?शिंदे : प्राधान्यक्रमाचा विचार करताना मला दिसते ते पर्यटन राजधानीचे भविष्यातील चित्र आणि सांस्कृतिक दृष्टीने संपन्न वारसा असलेल्या या ऐतिहसिक शहराच्या संस्कृतीचे - वारशाची जपणूक. हा एकनाथ वारसा जपण्यात कमी नाही, जिथे चांगले आहे ते राखून ठेवले पाहिजे. कोत्या मनोवृत्तीने कधी काम करत नाही, देताना हातचे राखत नाही आणि म्हणून पर्यटनवाढीसाठी मुबलक योजना आहेत. महानगरपालिकेच्या पर्यटन विभागाला अद्ययावत सक्षम करण्याला प्राधान्य दिले जाईल. कारण ही पर्यटनाची राजधानी आहे आणि अजिंठा-वेरूळसह शहरातील पर्यटनाला येणाऱ्या जनतेला सुविधा देणे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पहिले कर्तव्य. त्यामुळे टुरिस्ट बस सेवा असेल किंवा मागर्दर्शन केंद्र असेल, ही सोय करणे इथले दरवाजे, अनेक ऐतिहासिक स्थळांची दुरुस्ती हा माझ्यासाठी गंभीरपणे बघण्याचा विषय राहील. सांस्कृतिक दृष्टी म्हणालो तेव्हा माझ्या डोक्यात आलं ते हे की, कोणत्याही शहराची ओळख होते ती तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी नव्याने शहरात येणाऱ्यांना दिसले पाहिजे काही चांगले घडत आहे. मनपाच्या वतीने नियमित उपक्रम राबवले जातील. शहरातील नाट्यगृहांसाठी अनुदान विषय असेल किंवा गरज भासल्यास नवीन नाट्यगृह असेल या सगळ्यांना प्राधान्य देऊ.प्रश्न : छत्रपती संभाजीनगरबाबत आपलं वचन सांगतायं, या वचनाला जनता कसा प्रतिसाद देणार ते लवकरच कळेल. शेवटी एकच मोठा भाऊ होण्याची तुमची इच्छा आहे का...?शिंदे : एक सांगू का? लोकांना कोण मोठा कोण छोटा भाऊ यात इंटरेस्ट नसतो. यापेक्षा कोण दिखाऊ आणि कोण रोडवर उतरून काम करू शकतो हे जनता बघेल, कोण खऱ्या भावाच्या मायेने उपयोगी आहे हे जनतेला कळतं, माझ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे कोणता भाऊ कामाचा आहे. यंदा एक दिवस आधी संक्रांतीचे वाण लुटले जाणार आहे, दुसऱ्या दिवशी मतदान आहे. माता भगिनींना आपल्या माध्यमातून एकच विनंती करेन, हा सच्चा लाडका भाऊ तुमच्यापर्यंत आलाय तो तुमच्या शहराला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी, तुम्हाला सुविधा देण्यासाठी आणि सुखद शहर कसं असतं हे सिद्ध करून दाखवण्यासाठी ! माझा धनुष्यबाण या शहरासाठी प्रगतीचं वाण घेऊन आलाय. जो विश्वास छत्रपती संभाजीनगरने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत टाकला तोच विश्वास आताही आहे... राहणार! जय महाराष्ट्र!

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 9:26 am

निवडणुकीआधी मोठी कारवाई:शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या घरी छापा, अनिल शिंदेंची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; प्रशासनावर दडपशाहीचा आरोप

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडाली असून, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी अचानक पोलिस प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकल्याने वातावरण तापले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनिल शिंदे यांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचा आरोप करण्यात येत असून, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने शहरातील आनंद ऋषीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रशासन आणि विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी नेमका कोणत्या कारणासाठी छापा टाकण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. छाप्यात नेमकं काय सापडलं, याबाबतही प्रशासनाकडून मौन पाळण्यात आलं आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर अचानक झालेल्या या कारवाईमुळे अनिल शिंदे यांची प्रकृती खालावल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांच्या पत्नी शीला शिंदे यांनी हा प्रकार केवळ मानसिक त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप करत, प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. अनिल शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती स्थिर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, निवडणुकीच्या काळात उमेदवारांवर अशा प्रकारे दबाव टाकला जात असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणूक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, शिवसेना चांगले यश मिळवेल या भीतीपोटीच प्रशासनाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपांमध्ये महायुतीतील मित्र पक्षांचाही समावेश असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेने केला आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच अशी दडपशाही सुरू असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना संपर्क प्रमुख संजीव भोर यांनी प्रशासनाच्या कारवाईवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत आमचे जिल्हाप्रमुख आणि उमेदवार अनिल शिंदे यांच्या घरी पहाटे साडेपाचच्या सुमारास मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. घराची अगदी किचनपर्यंत झाडाझडती घेण्यात आली. मात्र, या कारवाईत पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. अचानक झालेल्या या छाप्यामुळे अनिल शिंदे यांचा रक्तदाब प्रचंड वाढला आणि त्यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे त्यांनी सांगितले. संजीव भोर यांनी पुढे आरोप करताना सांगितले की, पोलिस आणि प्रशासन शिवसेनेच्या उमेदवारांवर तसेच सर्वसामान्य नागरिकांवर दडपशाही करत आहेत. विशिष्ट नेत्यांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई होत असल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी पत्रके वाटण्यास अडथळे आणले जात आहेत. शिवसेनेच्या पुरस्कृत उमेदवारांच्या मागे गुंड पाठवले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला, तर या सगळ्या प्रकाराकडे पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवसेनेच्या उमेदवाराबाबत प्रशासन वेगळ्या निकषांनी वागते या प्रकरणात प्रशासनाच्या पक्षपाती भूमिकेवरही संजीव भोर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनिल शिंदे यांच्या घरासमोर दुसऱ्या उमेदवाराचे घर असून, तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असतानाही कोणतीही चौकशी करण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला. मात्र शिवसेनेच्या उमेदवाराबाबत प्रशासन वेगळ्या निकषांनी वागत असल्याचे त्यांनी म्हटले. अहिल्यानगरमध्ये यापूर्वीही प्रशासनाचा वापर करून दडपशाही करण्याचे प्रकार झाले असून, अशा वेळी मतदार शिवसेनेकडे झुकतो, हा इतिहास अनिल भैय्या राठोडांपासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराची माहिती पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याचेही संजीव भोर यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 9:25 am

नगरसेवकांच्या आवाजाचे ‘कंट्रोल’ महापौरांकडे:6 कोटी रुपयांचा खर्च करून 135 सदस्यांच्या सभागृहात बैठक व्यवस्थेचे काम अंतिम टप्प्यात

महापालिकेला १६ जानेवारी रोजी नवीन नगरसेवक मिळणार आहेत. त्यांना बसण्यासाठी आणि सर्वसाधारण सभा घेण्यासाठी असलेल्या सभागृहाचे नूतनीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. महापौर, सभापती आणि नगरसेवकांसाठी मनपा प्रशासनाने सुमारे ६ कोटी रुपये खर्चून एक स्मार्ट आणि हाय-टेक दरबार असणआर आहे. नूतनीकरणानंतरचे हे सभागृह, दालने कॉर्पोरेट ऑफिसप्रमाणेच असतील. विशेष म्हणजे प्रत्येकाचा माइक बंद आणि सुरू करण्याची सुविधा महापौर यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे कोणाला बोलू द्यायचे, कोणाची बोलती बंद करायची हे महापौर ठरवणार आहेत. सभागृहाची क्षमता १३५ जणांची आहे. या ठिकाणी आता खुर्च्या न लावता ४० सोफा सेट टाकण्यात आला आहे. या सोफ्यासमोर कोरियन सीट असलेले टेबल बनवण्यात आले आहे. या टेबलवर सुमारे १५ हजारांचा एक असे ११५ माइक असणार आहेत. या माइकचा कंट्रोल महापौर यांच्याकडेदेखील असणार आहे. भविष्यात या टेबलवर टॅब किंवा लॅपटॉप लावता येईल, अशी डिजिटल सोय करण्यात आली आहे. सभागृहात प्रवेश करणाऱ्यांसाठी ‘फेस रिकग्निशन सिस्टिम’ बसवण्यात येणार आहे, त्यामुळे ज्यांना परवानगी आहे त्यांनाच प्रवेश मिळणार आहे. वंडर कन्स्ट्रक्शन आणि न्यू इरा यांनी हे काम घेतले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. गोंधळ घालणाऱ्यांना राजदंड पळवणे अवघड एखादा मुद्दा पेटला की नगरसेवक महापौर यांच्यासमोर ठेवलेला राजदंड पळवत होते. नवीन सभागृहात ते आता अवघड असणार आहे. महापौरांचा टेबल ५ ते ६ फूट उंच असून त्यावर काच आहे. त्यामुळे राजदंडापर्यंत हात पोहोचणार नाही. एखाद्याने प्रयत्न केला तरी राजदंड ठेवल्या जाणाऱ्या स्टँडला कुलूपमध्ये लॉक असेल. बोलणाऱ्या प्रत्येक नगरसेवकावर असणार फिरता कॅमेरा ११५ नगरसेवकांसाठी स्वतंत्र माइक, ८ बाय ४ आकाराच्या ४ स्क्रीन बसवण्यात येत आहेत. एका स्क्रीनची किंमत सुमारे १७ लाख रुपये आहे. सोबतच २२ सीसीटीव्हीची नजर असणार आहे. बोलणाऱ्या नगरसेवकाला झूम करून दाखवण्यासाठी ३ अद्ययावत कॅमेरे बसवण्यात आले आहेत. एका कॅमेऱ्याची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे. दरवाजावर फिरणारा कॅमेरा, ६५ इंच टीव्ही आदी सुविधा असणार आहे. सभापतींच्या दालनांचेही नूतनीकरण झाले पूर्ण सभागृहात शिरताच नगरसेवकांना ‘फाइव्ह स्टार’ अनुभव येईल, असे इंटेरिअर आणि पूर्णतः वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापौर आणि अन्य चार अशा पाच जणांसाठी १८ फुटांचा टेबल असणार आहे. बाजूलाच १६ अधिकारी बसण्याची सुविधा असणार आहे. वरच्या बाजूला प्रेस गॅलरी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी पत्रकारांसह २ नगरसेवकांनी शिफारस करून महापौर यांनी अनुमती दिलेले प्रेक्षक बसू शकणार आहेत. केवळ मुख्य सभागृहच नाही, तर महापौर, उपमहापौर आणि विविध समिती सभापतींच्या दालनांचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. नवीन फर्निचर, अद्ययावत केबिन आणि अभ्यागतांसाठी प्रशस्त प्रतीक्षालय यामुळे पालिकेच्या मुख्यालयाचे रूप पालटले. सभागृहात प्रत्येकी १७ लाख रुपयांचे ४ स्क्रीन बसवणार

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 9:14 am

दोन्ही ढोलक्या वाजवणाऱ्यांना मतदारांनी योग्य जागा दाखवावी:खा. डाॅ. बोंडे यांचे टीकास्त्र; भुलथापांना बळी पडू नका- पालकमंत्री‎

दोन्ही ढोलक्या वाजवणाऱ्यांना मतदारांनो योग्य जागा दाखवा, सावध व्हा. ते रोड शोदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या गाडीत बसतात, हात वर करतात व नंतर उतरून जातात, अशा शब्दांत भाजपाचे राज्यसभा खा. डॉ. अनिल बोंडे यांनी प्रभाग क्र. १९ साईनगरच्या साईरत्न लॉनमध्ये दु. २ वाजता आयोजित भाजपा उमेदवारांच्या प्रचार सभेत भाजपाच्या स्टार प्रचारक माजी खा. नवनीत राणा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टिकास्त्र सोडले. सोमवार १२ रोजी साईनगर प्रभागात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभा झाली. पालकमंत्र्यांच्या सभेतच आधी डॉ. बोंडे यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्या दुटप्पी भुमिकेचा खरपूस समाचार घेतला. एकिकडे त्या भाजपाच्या स्टार प्रचारक म्हणून मिरवतात तर दुसरीकडे घरचा पक्ष असलेल्या युवा स्वाभिमानच्या उमेदवारांसाठी मतं मागतात. या त्यांच्या भुमिकेवरून शहरात राजकीय गदारोळ सुरू आहे. विशेषत: भाजपातील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच नाराज आहेत. याबाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार सभेत थेट कोणताही वक्तव्य करण्याचे टाळले. त्यामुळे प्रचार सभेला उपस्थित मतदार आश्चर्य व्यक्त करीत राहिले. पालकमंत्र्यांनी भाजपाचा महापौर बनल्यानंतर मतदारांचा कसा फायदा होणार यावरच सर्वाधिक प्रकाश टाकला. बहुतेक सर्वच सभांमध्ये ते याबाबत बोलत असल्यामुळे त्यांचे सर्व चेंडू हे मतदारांच्या दृष्टीने वाईड ठरले. ही निवडणूक साईनगर प्रभागातील उमेदवार तुषार भारतीय, चेतन गावंडे, लता देशमुख व सरिता मालानी यांच्यासाठी महत्त्वाची आहे. युवा स्वाभिमानने मित्र पक्ष असतानाही येथे त्यांनी ब वार्ड वगळता अ, क व ड वार्डात उमेदवार दिले आहेत. त्यातही ड वार्डात भाजपाचे माजी सभागृह नेते तुषार भारतीय यांच्या विरोधात युवा स्वाभिमानने उमेदवारी दिली आहे. हा प्रभाग सध्या शहरात ‘हॉटस्पॉट' आहे. खा. डॉ. अनिल बोंडे मतदारांना भुरळ घालण्यासाठी कोणी भुल थापा देतील. मात्र, ताई तिकडे लक्ष देऊ नका, अशी कोपरखळी पालकमंत्र्यांनी मारली. साईनगर प्रभागातील ब वार्डात सरिता मालाणी उभ्या असून त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमानने येथे उमेदवार दिला नाही. त्यांना उद्देशून पालकमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. सोबतच अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी कमळावर बसणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच पैसेही न घेता या प्रभागातील घरांची नि:शुल्क मोजणी करून पीआर कार्ड देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘हॉटस्पॉट' साईनगर प्रभागात पालकमंत्री गुगली, फिरकी, यॉर्कर टाकतील, अशी मतदारांची अपेक्षा होती, तशा प्रतिक्रियाही त्यांनी दिल्या. परंतु, पालकमंत्री एकाच टप्प्यावर संथपणे गोलंदाजी करीत राहिले. युवा स्वाभिमानबद्दल ते अवाक्षरही बोलले नाहीत. केवळ काँग्रेसने लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका असे पत्र पाठवले. त्यांना धडा शिकवा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. सोबतच महिलांसाठी लखपती दिदी योजना आणणार असल्याचे ते म्हणाले. उमेदवारांच्या नशिबाची नव्हे तर खुद्द मतदारांच्याच नशीबाची निवडणूक ठरणार आहे. पालकमंत्र्यांच्या अखत्यारितील विविध योजनांचा सहज लाभ मिळणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. अमरावतीला पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर शहर बनवायचे असून येथे रिंग रोड, आणखी ८ उड्डाणपुलं उभारली जाणार आहेत. माझ्या ७८५ कोटी निधीतून मी जास्तीत जास्त साईनगरला देईन, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले. दर्यापूरातील बनोसास्थित विक्रम ज्वेलर्समध्ये ९ मे २०२५ रोजी अशाचप्रकारे धाडसी चोरी करुन चोरट्यांनी तब्बल ३५० ग्रॅम सोने लंपास केले होते. या प्रकरणातील चोरट्यांना एलसीबीच्या पथकाने काही आरोपींना त्यावेळी अटक केली होती. पालकमंत्र्यांकडून पूर्ण झाली नाही यॉर्करची अपेक्षा

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:57 am

विद्यार्थ्यांनी राजमाता माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा:अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन‎

महापुरुषांचे विचार नवीन पिढीला दिशा दर्शक असतात. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचार व कार्यापासून विद्यार्थ्यांनी आदर्श घेवून आपल्यातील कला, कौशल्य व व्यक्तीमत्व विकसित करावे, असे प्रतिपादन मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन विभागाच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात करण्यात आले, उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजक तथा आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा डॉ. मोना चिमोटे यांनी केली. त्या पुढे म्हणाल्या, स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांसारखा महान सुपूत्र घडविला. सर्वगुण संपन्न शिवराय आज आम्हां सर्वांचे आदर्श आहेत. महाराजांना राजमाता जिजाऊंनी सर्व कौशल्ये व विद्यांमध्ये पारंगत केले. त्यांनी आपल्या राज्य कारभारात स्त्रियांचा सन्मान केला, त्यांना समान संधी दिली. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांचे स्मरण जयंतीप्रसंगी होत आहे. स्वामी विवेकानंद यांनी दिलेले विचार हे युवकांसाठी प्रभावी असून त्यातूनच युवक बलशाली होवू शकतो. विद्यार्थ्यांमधील कलागुण व व्यक्तीमत्व विकसित व्हावे, यादृष्टीने आयोजित वक्तृत्व स्पर्धा निश्चितच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार असून आपल्यातील उपयुक्तता या स्पर्धेच्या निमित्ताने युवक सिद्ध करतील, असे सांगून त्यांनी जयंतीदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. तसेच प्रमुख अतिथी डॉ. नितीन कोळी म्हणाले, सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. हा उपदेश राजमाता जिजाऊ यांनी दिला. त्यांनी राज्य कारभार करतांना सर्वांना समानतेची वागणूक दिली. सर्व जाती-धर्म-पंथांच्या लोकांना समान मानले आणि म्हणूनच शिवाजी महाराज इतिहास घडवू शकले, आदर्श राजा झाले आणि त्यांचा आदर्श आजही आम्हाला प्रेरणा देत आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती प्रसंगी जिजाऊ लेक’ हा पुरस्कार देवून महिलांचा सन्मान केल्या जातो, ही खरोखरच गौरवास्पद बाब आहे. त्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्यात. प्रास्ताविकतेतून संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धा आयोजनामागील भूमिका विषद केली. विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. राजमाता जिजाऊ, संत गाडगे बाबा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेकरीता असलेले परीक्षक डॉ. वैभव म्हस्के, प्रा. अभिजित इंगळे, प्रा. पुजा अलोणे, डॉ. मनिषा इंगलकर, श्री प्रफुल्ल कुबडे तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. संचालन प्रा. आदित्य पुड यांनी, तर आभार प्रा. अनघा देशमुख यांनी मानले. प्रा. रोहिणी वावरे यांनी डॉ. स्वाती शेरेकर यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर यांचा आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे यावर्षी जिजाऊ लेक’ हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. प्रभारी कुलसचिव डॉ. नितीन कोळी व अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी गौरव प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून त्यांना सन्मानित केले. याप्रसंगी बोलतांना डॉ. स्वाती शेरेकर म्हणाल्या, पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल व पुरस्काराने मला सन्मानित केल्याबद्दल सर्वांचे आभार मानते. विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी दिलेले विचार पुढे न्यावेत आणि त्यांचा आदर्श सदैव आपल्या मनात ठेवावा, असे सांगून त्यांनी इन्क्युबेशन सेंटरद्वारे चालविल्या जाणारे विविध उपक्रम, मिळालेले अनुदान आदींची माहिती दिली. स्टार्टअप सुरु करण्याकरीता विद्यार्थ्यांनी सेंटरला भेट द्यावी व आपले स्टार्टअप सुरु करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:55 am

मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- के.बी. नायक:विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची मतिमंद मुलांच्या शाळेला भेट‎

मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनासोबतच समाजानेही सक्रीय भूमिका घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन डॉ. के. बी. नायक यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अमरावती शहरातील निवासी मतिमंद मुलांच्या शाळेला भेट दिली. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. डॉ. नायक यांनी मतिमंद मुलांसाठी विशेष योजना राबविण्याची आवश्यकता असून त्यांच्या शिक्षण, आरोग्य, पुनर्वसनासाठी अधिक व्यापक धोरणांची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे नमूद केले. तसेच मतिमंद मुलांच्या विविध समस्यांसंदर्भात संशोधनात्मक दृष्टिकोन ठेवून विद्यापीठ स्तरावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे . त्या माध्यमातून मतिमंद मुलांच्या विकासाकरिता नवीन संधी उपलब्ध करून देता येतील, जेणेकरुन अशा विद्याथ्र्यांना समाजामध्ये प्रतिष्ठेने जीवन जगण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले. शाळेचे मुख्याध्यापक उमेश धुमाळे यांनी मतिमंद मुलांना भेडसावणा-या विविध शैक्षणिक, मानसिक व सामाजिक समस्यांची माहिती उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना दिली. तसेच शाळेतील अध्यापकांनी वस्तीगृह व शाळेमधील सुविधांची माहिती दिली. शाळा व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. संचालन संशोधक विद्यार्थीनी निर्मल काळबांडे, तर आभार डॉ. रोहिणी देशमुख यांनी मानले. याप्रसंगी समाजशास्त्र विभागातील डॉ.के.यु. राऊत, डॉ. प्रशांत भगत, डॉ. रोहिणी देशमुख, प्रा.साधना इंगोले, प्रा. सुनिता इंगळे, संशोधक विद्यार्थी राजकुमार सरयाम, रमेश पवार, गोपाल वानखडे, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रवीण गडलीनकर, प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक नारायण पवार तसेच शिक्षकवृंद अनिल वाळके, श्रध्दा काळबांडे, प्रेरणा बाहे, निखिल बारबुध्दे, विशाल शिवाने, मुकुंद बडगे, अजय कराड उपस्थित होते. मतिमंद विद्यार्थ्यांसमवेत खेळ यावेळी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मतिमंद विद्यार्थ्यांसोबत नृत्य, गाणे यासारखे मनोरंजनात्मक उपक्रम राबवून शाळेतील मुलांचा आऩंद व्दिगुणित केला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फळ व खाऊचे वाटप करण्यात आले. ही शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव वाढविणारी व मतिमंद मुलांच्या जीवनातील अडचणी समजून घेण्यास उपयुक्त ठरली.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:55 am

शेतकऱ्यांचे कटपुतली आंदोलन; चांदूर बाजार तहसीलवर एल्गार:प्रहारच्या नेतृत्वात शेतकरी आक्रमक, शासन योजनांचा कागदी दिलासा‎

तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा-निराधार लाभार्थी व बांधकाम कामगार यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाने दुर्लक्ष आहे. या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.१२ ) तहसील कार्यालय, चांदूरबाजार येथे कटपुतली आंदोलन’ करण्यात आले. अतिवृष्टी, नापिकी, वाढते उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि शासन योजनांचा केवळ कागदी दिलासा या सगळ्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही शासन व प्रशासनाची भूमिका निष्क्रीय आणि संवेदनाहीन असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केवायसी करूनही मदत नाही, त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने मदतीची घोषणा करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितली. अनेक शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया पूर्ण केली असतानाही आजपर्यंत त्यांच्या खात्यात मदत रक्कम जमा झालेली नाही. बँकेत गेलो तर फाईल नाही, कार्यालयात गेलो तर पुढच्या तारखा, अशी तक्रार सांगत शेतकरी संतप्त झाले होते. पीक विमा योजना केवळ नावापुरती आहे. पीक विमा भरताना शेतकऱ्यांकडून वेळेवर हप्ते घेतले गेले. मात्र नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्या आणि प्रशासन दोघेही गायब झाल्याचे चित्र आहे. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेला शेतकऱ्यांची फसवणूक असे संबोधले. तूर–हरभऱ्याची खरेदी नाही, तूर व हरभरा हंगाम संपत असतानाही तालुक्यात शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी आपला हक्काचा माल कमी दरात खासगी व्यापाऱ्यांना विकण्यास मजबूर झाला आहे. सरकार खरेदी करत नाही आणि दलाल आमची लूट करत आहेत. असा आरोपही आंदोलनस्थळी केला. तसेच १ जानेवारीपासून कृषी पंपांना रात्री वीज देण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेक प्रश्न प्रलंबित संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनांचे अनुदान केवायसी करूनही नियमित मिळत नसल्याने वयोवृद्ध, दिव्यांग व निराधार लाभार्थीही आंदोलनात सहभागी झाले होते. इमारत व इतर बांधकाम कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांचेही प्रश्न प्रलंबित असल्याचे आंदोलनात अधोरेखित करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:54 am

क्रीडा संकुल नवसारी मतमोजणी केंद्र सुसज्ज:नियोजनबद्ध मांडणी अन् अत्याधुनिक व्यवस्था, आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची सखोल पाहणी, विभागातील अनेक अधिकाऱ्यांची उपस्थिती‎

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी मतमोजणी प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी मनपा प्रशासनाने अत्यंत काटेकोर व बहुस्तरीय तयारी केली आहे. या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त सौंम्या शर्मा यांनी सोमवार १२ रोजी क्रीडा संकुल (स्पोर्ट कॉम्प्लेक्स) नवसारी येथील मतमोजणी केंद्राची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान आयुक्तांनी मतमोजणी कक्ष, स्ट्राँग रूम, मीडिया सेंटर, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश–निर्गमन मार्ग, वाहतूक व पार्किंग नियोजन, तसेच आपातकालीन सेवा यांचा सविस्तर आढावा घेतला. मतमोजणी केंद्रात येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी व इतर अधिकृत व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन गेट ठेवण्यात आले असून गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी नियोजनबद्ध मांडणी करण्यात आली आहे. मनपाच्या सातही झोनसाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनचा निकाल स्वतंत्रपणे आणि अचूकरित्या मांडता यावा यासाठी अत्याधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीदरम्यान निकाल थेट एलईडी स्क्रीनवर प्रदर्शित होणार असून त्यामुळे नागरिक व माध्यम प्रतिनिधींना त्वरित व पारदर्शक माहिती उपलब्ध होणार आहे. मतपेट्या व ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूममध्ये बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त व प्रवेश नियंत्रण प्रणालीमुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याची दक्षता घेतली जात आहे. तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी व एजंट यांच्यासाठी स्वतंत्र, सुव्यवस्थित बसण्याची व निरीक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधींकरिता सुसज्ज मीडिया सेंटर उभारण्यात आले असून त्याठिकाणी इंटरनेट, वीजपुरवठा, माहिती फलक व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १५ व १६ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान पत्रकारांना निकालांची माहिती वेळेवर मिळावी, यासाठी स्वतंत्र समन्वय यंत्रणा कार्यरत राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणा, होमगार्ड व सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्रुटी टाळण्यासाठी काळजी मतमोजणी ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नागरिकांचा जनादेश अचूक व पारदर्शक पद्धतीने प्रतिबिंबित व्हावा, यासाठी प्रशासनाने प्रत्येक स्तरावर दक्षता घेतली आहे. कोणत्याही प्रकारची त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:53 am

अधिकृत बस थांब्यावर नव्हे, तर 300 मीटरवर थांबते एसटी:पासधारक विद्यार्थ्यांसह प्रवाशांना करावी लागते पायपीट‎

अमरावती ते दर्यापूर राष्ट्रीय मार्गावर खोलापूर बस थांबा हा एक मुख्य थांबा आहे. परंतु या थांब्यावर एसटी बसेस थांबत नसून त्या ३०० मीटर दूरवर जाऊन थांबतात. त्यामुळे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांना पायपीटसह अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. खासकरुन पासधारक विद्यार्थी भरडले जातात. खोलापुर येथून परिसरातील व खेड्यापाड्यातील अनेक विद्यार्थी, कर्मचारी व रोजंदारीची कामे करणारे युवक वेगवेगळ्या गावांचा प्रवास करतात. सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान या थांब्यावर मोठी गर्दी असते. एसटी महामंडळ‌ प्रशासनाच्या लेखी खोलापूर थांबा हा लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा मुख्य थांबा आहे. खोलापुरसह नावेद, वाठोडा शुक्लेश्वर, हरताळा, खालकोणी, हातोटी, बोरखडी, काकरखेडा आदी गावांतील विद्यार्थी या थांब्यावरुन अमरावती आणि दर्यापूर येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. परंतु सकाळी नऊ ते अकराच्या दरम्यान बस थांब्यावर गाडी थांबत नसल्याने विद्यार्थी वर्गाला मोठा फटका बसत आहे. एका माहितीनुसार या ठिकाणाहून दररोज तीनशे विद्यार्थी हे अमरावतीला जातात. त्यांनी एसटीच्या पासेस काढल्या आहेत. परंतु पासेससाठी पैसे मोजल्यानंतरही त्यांना योग्य ठिकाणाहून बसमध्ये बसता येत नाही. त्यासाठी उगाच धावपळ करावी लागते. हा त्रास थांबविण्यासाठी येथील नागरिकांकडून अनेक वेळा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आलीत. परंतु एसटी चालकांमध्ये काहीही बदल दिसून आला नाही. येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. किमान आतातरी महामंडळाने आमच्या निवेदनाची दखल घेऊन एसटी बसेस बस थांब्यावरच थांबवाव्या, अशी पालक वर्गाची मागणी आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:52 am

बैठकीसाठी मंगळवार, शनिवारची निश्चिती:शिक्षकांची पुरेपूर राहणार उपस्थिती अन् अध्यापनाचे कार्यही पुरेशा प्रमाणात होणार‎

जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांनी प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षण विभागातील निम्नस्तरीय अधिकाऱ्यांना काहीसा आवर घातला आहे. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांना यापुढे आठवड्यातील शनिवार व मंगळवार या दोनच दिवशी बैठकी घेता येतील. मुळात शनिवार हा साप्ताहिक सुटीचा दिवस आहे. परंतु त्या दिवशी शाळांना सुट्या नसतात. त्यामुळे त्या दिवशी शिक्षणाधिकारी कार्यालय वगळता निम्नस्तरीय अधिकारी असलेल्या केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक यांच्या कार्यालयातील बैठकी घेता येतील, असा जि.प. प्रशासनाचा तर्क आहे. शालेय कामकाजाच्या दिवशी बैठकांचे आयोजन केल्यास संबंधित शिक्षकांना अध्यापन करता येत नाही. त्यामुळे त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सीईओंनी हा निर्णय घेतला आहे. सीईओ यांच्या संकल्पनेतून शाळा आणि जि.प.च्या कनिष्ठ महाविद्यालयांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम लागू करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचा प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाच्यादृष्टीने अधिक प्रगत व प्रगल्भ व्हावा, हा या उपक्रमांमागचा उद्देश आहे. परंतु प्रत्यक्षात पुरेसे अध्यापनच होणार नसेल, तर विद्यार्थी प्रगत व प्रगल्भ होणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागासाठी सीईओंनी ही नवी आचारसंहिता लागू केली आहे. या नव्या आचारसंहितेनुसार शिक्षकांना यापुढे कोणत्याही दिवशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाचारण करण्यात येणार नाही. एवढेच नव्हे तर मुख्याध्यापक अथवा कोणत्याही शिक्षकाला शाळा सोडून इतर कामासाठी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडे जायचे असेल तर त्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. दरम्यान अशाप्रकारे चाळणी लावल्यामुळे आता बहुतेक शाळांमध्ये शिक्षकांची पुरेपूर उपस्थित दिसून येणार आहे. एवढेच नव्हे तर अध्यापनाचे कार्यही पुरेशा प्रमाणात होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:51 am

आमच्या नादी लागू नका!, मंत्री नितेश राणे:नाव न घेता राणांवर टीका‎

देवेंद्र फडणवीस केवळ आमचे आहेत. तुम्हाला कोणी त्यांचे व्हिडीओ दाखवत असेल तर ते ‘चायनीज’ मॉडेल आहेत. कारण खरा भारतीय जनता पक्ष येथे बसलेले आहेत. बाकी फक्त आमचे व्हिडीओ वापरणारे आहेत. त्यांना विचारा तुमचा पाना तर मुख्यमंत्र्यांनीच ठिक केला आहे, आता तुम्ही कुठे पाना चालवणार आहे. आम्ही थोडा पाना ढिला केला तर तुमची गाडी सुद्धा बंद पडणार आहे. उगाच नका आमच्या नादी लागू. कारण आम्ही जोवर नीट आहे, तोवर ठिक आहे. असा इशारा मंत्री नितेश राणे यांनी आमदार राणा यांचा नामोल्लेख न करता दिला आहे. मंत्री राणे सोमवारी (दि. १२) सायंकाळी शहरातील जयसियारामनगर येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते. यावेळी राज्यसभा सदस्य डॉ.अनिल बोंडे, आमदार संजय कुटे, आमदार राजेश वानखडे, माजी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील,‎निवडणूक प्रभारी जयंत डेहनकर,‎माजी शहराध्यक्ष किरण पातूरकर,‎सिद्धार्थ वानखडे उपस्थित होते. ना.‎राणे पुढे म्हणाले, भाजप ही राष्ट्रभक्त‎संघटना आहे. महापालिकेत केवळ‎हिंदू महापैारच बसू शकतो व‎त्यासाठी भाजपाला साथ देण्याची‎गरज आहे, नाही तर तुमच्यावर‎पश्चातापाची वेळ येईल.‎एमआय़एमचे राष्ट्रीय अध्यक्ष‎खासदार असुदुद्दीन ओवैसी यांच्यावर‎टीका करतांना ना. राणे म्हणाले,‎ओवेसी हे संविधान मानतात की‎कुराण हे त्यांनी स्पष्ट करावे. दरम्यान‎मंत्री राणे यांच्या भाषणापुर्वी खासदार‎डॉ. बोंडे यांनी भाषण केले. त्यांनी‎आमदार व्दय खोडके दाम्पम्यांवर‎टिकास्त्र सोडले तसेच भाजपच्या‎नेत्या नवनीत राणा व आमदार रवी‎राणा यांच्यावर डबल ढोलकीवाले‎अशी टीका केली.‎

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:51 am

समृद्धी सुकन्या योजनेअंतर्गत 35 मुलींच्या नावे खाते:जिजाऊ व विवेकानंद जयंतीनिमित्त बार्शीतील जय शिवराय प्रतिष्ठानचा 500 रुपये भरुन अभिनव उपक्रम‎

माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त येथील जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने समृद्धी सुकन्या योजना अंतर्गत ३५ मुलींच्या नावाने प्रत्येकी ५०० रुपये भरून खाते सुरू करत सदर खात्यांचे प्रमाणपत्र संबंधितांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गरजी गरजू मुलींच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी हे खाते सुरू करण्यात आले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक गरजू मुलींची परिस्थिती बाबत माहिती घेण्यात आली. पात्र ठरलेल्या ३५ गरजू मुलींचा या योजनेत समावेश करत सर्व कागदपत्रांची पूर्तता संघटनेच्या माध्यमातून पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक खात्यात ५०० रुपये जमा करून खाते सुरू करण्यात आले. माँसाहेब जिजाऊ व थोर महापुरुषांच्या विचारांचा वारसा या कार्याच्या माध्यमातून समाजात रुजवण्याचे संघटनेचे उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट समोर ठेवून भविष्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात या योजनेमध्ये मुलींचा सहभाग घेतला जाईल असे संघटनेच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, नगरसेवक विजय राऊत, उपनगराध्यक्ष, रोहित पाटील, प्रशांत कथले,डॉ.शितल बोपलकर ॲड .राजश्री डमरे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जय शिवराय प्रतिष्ठानच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. माजी आमदार राऊत यांच्या हस्ते पासबुक वाटप प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माँ साहेब जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले पासबुक तसेच माहितीपत्रक वितरण करून कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी थोर महापुरुषांचा विचार जय शिवराय प्रतिष्ठानच्या कार्याप्रमाणे समाजात रुजवला पाहिजे असे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:43 am

सोलापूर ते जेऊर महामार्गाच्या कामाला गती:आतापर्यंत 12 किमीचे काम पूर्ण, 34 किमी रस्त्यासाठी डिसेंबर 2024 मध्ये 173 कोटी मंजूर‎

सोलापूर ते जेऊर सिमेंट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत १२ किमीपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. होटगीपर्यंत हा रस्ता चौपदरी असून त्यानंतर जेऊरपर्यंत दुहेरी आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वेळेची आणि आर्थिक बचत होणार आहे. सोलापूर ते जेऊर या रस्त्याला डिसेंबर २०२४ मध्ये मंजूरी मिळाली. १७३ कोटीच्या या सिमेंट रस्त्याच्या कामाला महिला हॉस्पिटलपासून सुरूवात झाली आहे. होटगीपर्यंत कामाची प्रगती झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत सोलापूर ते जेऊर हा ३४ किमी रस्ता होत आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून ग्रामीण भागाचा विकास साधणार आहे. ग्रामीण भागाच्या दळणवळण सुविधा सुधारणार आहे. सोलापूर स्मार्ट सिटीच्या दृष्टीने हा रस्ता महत्वाचा मानला जात आहे.सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. या महामार्गामुळे अक्कलकोट स्टेशन, कडबगांव, नागणसूर,गौडगांव, जेऊरवाडी, करजगी, शावळ, घुंगरेगांव,जेऊर, इंगळगी, आदि गावच्या शेतकरी,नागरीक, नोकरदार, यांना फायदा होणार आहे. पूर्वी या भागातील नागरिकांना अक्कलकोट मार्गे सोलापूरला जावे लागत होते. या महामार्गामुळे १५ ते २० किमी अंतर कमी होणार असून वेळेची व आर्थिक पण बचत होणार आहे. या कामाचे टेंडर गंगामाई कन्स्ट्रक्शन प्रा. लि छत्रपती संभाजी नगर यांनी घेतले असून २०२७ पर्यत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र स्टेट इंफान्स्ट्रक्चर कॉर्पोरेशन अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी १७३ कोटी निविदा मंजूर आहे. होटगी गांव ते महिला हॉस्पिटल सोलापूरपर्यंत चार पदरी असून होटगी स्टेशन ते जेऊर पर्यंत दुहेरी सिमेंट रस्ता मंजूर आहे. हे काम डिसेंबर २०२४ साली मंजूर असून जून २०२७ साली, म्हणजे अडीच वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण करण्याचे आदेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:42 am

कुस्तीगीरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट‎:अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचा उपक्रम, अक्कलकोट तालुक्यातील 77 पैलवानांनी मानले समाधान

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत न्यासाकडून जानेवारी महिन्यातील ७७ कीटचे वाटप रविवारी करण्यात आले. तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी आहेत अशा कुस्तीगरांसाठी न्यासाकडून गत मकर संक्रांतीच्या दिवशी (जानेवारी महिन्यात) सदरचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रारंभी ५० जणांना किट देण्यात आले होते. गेली ३८ वर्षे अविरतपणे अन्नदानाचे स्वामीकार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे न्यास संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या कार्यास झळाळी प्राप्त झाली आहे. अन्नछत्र मंडळात दररोज लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. याबरोबरच “समर्थ महाप्रसाद” सेवे बरोबरच आता तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी श्रींचा प्रसाद रुपी खुराकात या जीनंसांचा समावेश आहे. तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ७७ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान याकामी महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, पै.महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सचिव शामराव मोरे, मनोज निकम, प्रवीण देशमुख, प्रवीण घाटगे, सनी सोनटक्के, निखील पाटील, यांच्यासह सेवेकरी, भक्तगण उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:41 am

जाहीर प्रचारासह राजकीय कुरघोड्या; शक्तिप्रदर्शाने गाजणार आजचा दिवस:मनपा निवडणुकीसाठी जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार‎

महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेला उमेदवार व राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार आज थंडावणार आहे. जाहीर प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस असल्याने भाजप व राष्ट्रवादी युतीसह महाविकास आघाडी, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांद्वारे शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, मध्य शहरासह काही भागात प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांकडून प्रतिस्पर्ध्यांविरोधात तक्रारी वाढल्या आहेत. या राजकीय कुरघोड्यांमुळे प्रशासनाचीही धावपळ सुरू झाली आहे. गेल्या ११ दिवसांपासून शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उपनगर भागात केडगाव, कल्याण रोड व मुकुंदनगर परिसरात व मध्य शहरातील प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. मध्य शहरात विशेषतः शिवसेना व युतीच्या उमेदवारांमध्ये अधिक चुरस पहायला मिळत आहे. मुकुंदनगर भागात काँगेस व एमआयएममध्ये थेट लढत होत आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी युतीकडून शहरात प्रचार फेरी काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडूनही सांगता सभेची तयारी सुरू आहे. जाहीर प्रचारानंतर रात्रीच्या वेळी राजकीय घडामोडी, बैठका वाढल्या असून त्यादृष्टीने पोलिसांसह भरारी पथकांनी रात्रीच्या वेळीही विविध भागातील हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे. परस्परविरोधी तक्रारी,अन् तपासण्या सुरू निवडणुकीसाठी अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या विरोधात पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलिस प्रशासनाकडूनही तक्रारीनुसार घटनास्थळी जाऊन पाहणी केली जात आहे. उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसाठी सुरू असलेल्या जेवणावळींवरही लक्ष ठेवले जात आहे. मध्य शहरात गल्ली बोळामध्ये कार्यकर्त्यांचा वावर वाढला आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:29 am

लोहार समाज हा व्यावसायिक, व्यापारी नव्हे, तर कौशल्य असलेला उत्पादक:मुंबई विद्यापीठाचे भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. कोठे यांचे प्रतिपादन‎

लोहार समाजाच्या रक्तात बुद्धीत उत्पादन कसे करावे याचे ज्ञान आहे. आपल्या आजूबाजूला होणारे स्थित्यंतरे ओळखून उत्पादन करणारा लोहार समाज हा उत्पादक आहे व्यावसायिक अन् व्यापारी नव्हे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण कोठे यांनी केले. अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्याननगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांतर्फे रविवारी शहरातील लक्ष्मी नारायणमंगल कार्यालयात आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हीजेएनटी ओबीसीचे राज्याचे जॉईंट डायरेक्टर संतोष हराळे हे होते. व्यासपीठावर अखिल लोहार समाज विकास संघाचे अध्यक्ष संदीप थोरात, लोहार युथ फाउंडेशनचे राज्याध्यक्ष किशोर सोनवणे, मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रा. हर्षल आगळे, महसूल अधिकारी राजेंद्र लाड, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे, सोमनाथ हरेर, प्रा. प्रभाकर लाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात आदी उपस्थित होते. भटके विमुक्त अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. कोठे म्हणाले, भटके विमुक्तांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापीठात भटके विमुक्त संशोधन अध्ययन केंद्र स्थापन झाले आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यातील लोहार कुटुंबांचा अभ्यास केला जाणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील समाजाचा अभ्यास व्हावा यासाठी १३ हजार ५०० कुटुंबांचा सर्वे करण्यात येणार आहे. यातून समाजाचा जिल्हा निहाय अभ्यास होईल. त्यातून समाजाचे खरे स्वरूप मिळेल त्यातून आपल्या समाजाचे काय प्रश्न आहे, शासनाला काय मागायचे आहे हा अभ्यास यातून महत्त्वाचा ठरेल. आपल्या जवळ कौशल्य आहे याचा पुरेपूर वापर आपण करून घ्यायला पाहिजे. आपण जोपर्यंत बदल घडून आणू शकत नाही तोपर्यंत आपले प्रगती होऊ शकत नाही. प्रास्ताविक मेळाव्याचे निमंत्रण सोमनाथ हराळे यांनी केले. त्यांनी या मेळाव्याचा उद्देश सांगितला. पाहुण्यांचा परिचय स्वागताध्यक्ष हर्षल आगळे यांनी केले. ते म्हणाले, राहुरी अधिवेशनानंतर लोहार समाजाची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली. अशीच सुरुवात आपल्याला आता नगर जिल्ह्यातून पुन्हा करायचे आहे. सुरुवात विश्वकर्मा जयंती पासून करूया. लोहार युथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर सोनवणे म्हणाले, हा मेळावा समाजाला नवीन दिशा देणारा आहे. हा मेळावा वेगळ्या विचारांनी चालणाऱ्या दोन संघटनांनी आयोजित केला. लोहार समाजाचा फायदा झाला पाहिजे याचा विचार करून या संघटना एकत्र आल्या. त्यामुळे हा मेळावा यशस्वी झाला. लोहार युथ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील तरुणांना व्यवसाय करिअर याबाबत मार्गदर्शन केले जाते. अखिल लोहार समाज विकास संघाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी मेळाव्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाज बांधवांचे आभार मानले. व्हीजेएनटी ओबीसीचे राज्याचे जॉईंट डायरेक्टर हराळे म्हणाले, विवाह जुळवताना आर्थिक परिस्थितीचा विचार न करता मुलगा होतकरू निर्व्यसनी संस्कारी असावा हे पहावे. या मेळाव्यात समाजासाठी काम करणाऱ्यांचा जीवनगौरव समाज भूषण तसेच रंगनाथराव हरेर, बन्सी गाडेकर यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन मुख्याध्यापक संजय इघे, बाळासाहेब इघे यांनी तर आभार सुधाकर कौसे यांनी मानले. मेळावा यशस्वी होण्यासाठी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, समाज बांधवांनी परिश्रम घेतले. रेशीमगाठ' स्मरणिकेचे प्रकाशन करताना संतोष हराळे, डॉ. सत्यनारायण कोठे, संदीप थोरात, प्रा. हर्षल आगळे, सोमनाथ हारेर, राजेंद्र लाड, किशोर सोनवणे व अन्य. मेळाव्याला समाजबांधवांचा मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद जिल्ह्यात बऱ्याच वर्षांनंतर झालेल्या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, सातारा, जालना तसेच इतरही जिल्ह्यांतून सुमारे १५०० वर समाजबांधव उपस्थित होते. संपूर्ण कार्यालय भरगच्च भरलेले होते. विशेष म्हणजे ही गर्दी सकाळपासून मेळावा संपेपर्यंत कायम होती. मेळाव्यात लोहार समाजातील उपवर वधू-वरांची माहिती असलेल्या 'रेशीमगाठ' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रवेशद्वारावर व व्यासपीठाजवळ शेवगाव येथील शिक्षक विनायक सुरसे व अनिता सुरसे यांनी आकर्षक लेखन केलेल्या रांगोळीचे आलेल्या सर्वांनीच कौतूक केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:29 am

सामाजिक भावभावनांचे वास्तववादी चित्रण म्हणजे साहित्य:साहित्यिक डॉ. संजय कळमकर; लेखक-वाचक संवाद कार्यक्रमात रंगली गप्पांची मैफल‎

साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असतो. त्यामुळे त्यात सामाजिक भावभावनांचे चित्रण जितके वास्तववादी असेल तितके ते साहित्य सकस आणि वाचकांच्या पसंतीस उतरणारे असते. त्यासाठी लेखक सजग आणि सामाजिक बांधिलकी असणारा असावा. त्यासाठी आपल्या भोवतालाचे सूक्ष्म निरीक्षण व भान आवश्यक असते. सध्याच्या जगात सामाजिक समता टिकवण्यासाठी म्हणून साहित्यिकांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्याचेच चित्रण आणि सामाजिक समस्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारे लेखन केले पाहिजे असे मत प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले. ज्ञानकौशल्य ट्रस्टतर्फे आयोजित लेखक-वाचक संवाद कार्यक्रमात साहित्यिक गप्पांची मैफल रंगली. त्यात निमंत्रित लेखक म्हणून डॉ. कळमकर यांनी संवाद साधला. सावेडी येथील जिल्हा वाचनालयाच्या सभागृहात हा साहित्यिक संवाद कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाट्य अभिनेते प्रा. रविंद्र काळे होते. हभप सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी सूत्रसंचालन केले, ट्रस्टचे अध्यक्ष व लेखक सचिन मोहन चोभे यांनी प्रास्ताविक तर आत्मनिर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव गवळी यांनी आभार मानले. यावेळी पत्रकार विठ्ठल लांडगे, लेखक रामदास कोतकर, अशोकराजे निंबाळकर, दीपक कांबळे, पांडुरंग ससे, सुदर्शन शिंदे, संदीप कोकाटे, मारुती खडके, वाचनवेल पुस्तक भिशीच्या संस्थापिका रूपाली सोनवणे, ट्रस्टच्या सचिव माधुरी चोभे आदी उपस्थित होते. डॉ. कळमकर म्हणाले, नवीन लेखकांनी बहुश्रुत व्हावे, चिंतन करावे, समाजातील व्यक्ती व घडामोडी यांचे सूक्ष्म निरीक्षण करावे. लेखकाने पुरस्कार किंवा कोणाकडून कौतुक होईल यासाठी नाही तर आपल्या समाधानासाठी लिहीत राहावे. लेखकांनी लिहिण्यासह समाजाशी संवाद ठेवला पाहिजे. त्यातूनच सकस साहित्याची निर्मिती होते. प्रा. काळे म्हणाले की, साहित्यात विविध रस लक्षात घेऊन कोणताही लेखक आपली भावना कागदावर उतरवत असतो. त्यामुळे हास्यरसासह मानवी भावभावनांची अशी सुरेख सरमिसळ तयार होते. असे साहित्य वाचकांना आवडते. त्यातून साहित्यिकांचे वाचकांशी भावनिक नाते तयार होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:28 am

50 टक्के सवलत देऊनही, 254 कोटींपैकी 61 कोटी रुपये वसूल:शेवटच्या 5 दिवसांत गर्दी वाढल्याने इच्छा असूनही थकबाकी भरता आली नाही‎

मुख्यमंत्री पंचायतराज अभियनांनातर्गत थकबाकी भरणाऱ्यांना ५० टक्के सवलत देण्यात आली होती. जिल्हाभरातील ग्रामपंचायतींचे करदात्यांनी पाणीपट्टी व घरपट्टीपोटी चालू व थकीतसह २५४ कोटी वसूल करण्याचे उद्दिष्ट होते. १३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधीत अवघे ६१ कोटीच वसूल होऊ शकले. हे प्रमाण एकूण वसुलीच्या सुमारे २४ टक्के आहे. अनेक दिवसांपासून थकीत राहिलेली रक्कम वसूल होण्यास सुरूवात झाली असली, तरी मुदतवाढ दिल्यास आकडा वाढू शकतो. महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर २०२५ मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत थकबाकीदारांसाठी सवलत योजना जाहीर केली होती. ग्रामपंचायतींची थकबाकी वसूल करून विकासकामांना चालना या योजनेमुळे मिळणार आहे. जर एखाद्या मालमत्ताधारकाने १ एप्रिल २०२५ पूर्वीची त्याची सर्व थकबाकी व २०२५-२६ या चालू वर्षाचा संपूर्ण कर एकरकमी भरला, तर त्याला मूळ थकबाकीच्या रकमेवर ५० टक्के थेट सवलत दिली जाणार होती. जर एखाद्याची जुनी थकबाकी १०,००० रुपये असेल, तर त्याला थकबाकीचे पन्नास टक्के म्हणजेच ५ हजार रुपये भरण्याची संधी होती पण त्याबरोबर चालू कर पूर्ण भरण्याची अट निश्चित केली. ही मोहिम ११ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबवली. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर फलक लावले होते. परंतु, नेहमीप्रमाणे मुदत संपण्याच्या शेवटच्या आठवड्यात करदात्यांनी ग्रामपंचायतीत गर्दी केली. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था कोलमडल्यासारखी स्थिती होती. रात्री उशिरापर्यंत भरणा करूनही, अखेरच्या दिवसापर्यंत अनेकजण वंचित राहिले. आता या योजनेचे महत्व पटले असून, मुदतवाढीची मागणी थकबाकीदारांकडून होत आहे. पण त्याचवेळी नियमीत करदात्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या करदात्यांना चालू करांत सवलत मिळावी, असाही सूर अळवला जात आहे. यावर राज्यसरकार कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागले आहे. दडलेले थकबाकीदार उघड ग्रामपंचायतींची दाखवली जात असलेली थकबाकी ही कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी विशेष मोहिम राबवून फेरपडताळणी केली. त्यात सुमारे दुपटीने थकबाकीचा आकडा वाढला. त्यामुळे दडलेली बाकी समोर येऊन, चालूसह एकुण मागणी २५४ कोटींवर पोहोचली. त्यानंतर राबवलेल्या वसुली मोहिमेमुळे काही ग्रामपंचायतींना बुस्टर डोस मिळाला. मुदतवाढ देण्याबाबत वरिष्ठांना कळवले ^ ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल झाली आहे. शेवटच्या टप्प्यात करदात्यांनी भरणा करण्यासाठी गर्दी केली होती. स्थानिक पातळीवरून ५० टक्के सवलतीला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांना कळवले आहे. - दादाभाऊ गुंजाळ, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:27 am

श्रीरामपूर उपनगराध्यक्षपदी सानप:चार स्वीकृत सदस्यांचीही निवड

श्रीरामपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी कांचन सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेसकडून अंजुम शेख, डॉ. दिलीप शिरसाट व गोपाल लिंगायत, तर भाजपकडून श्रीनिवास बिहाणी यांची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप उपस्थित होते. सभेत नगरपरिषद अधिनियमानुसार उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी कांचन सानप यांचे दोन अर्ज दाखल झाले होते. अन्य कोणताही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. स्वीकृत सदस्यांची नावे काँग्रेस व भाजप पक्षाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार काँग्रेसकडून अंजुम शेख, डॉ. दिलीप शिरसाट व गोपाल लिंगायत, तर भाजपकडून श्रीनिवास बिहाणी यांची निवड करण्यात आली. सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या.यावेळी काँग्रेसचे गटनेते मुजफ्फर शेख, भाजपच्या गटनेत्या वैशाली चव्हाण यांच्यासह नवनिर्वाचित सर्व नगरसेवक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:26 am

310 वधूवरांची नोंदणी:अशिक्षितही चालेल, पण आई-वडील सांभाळणारी अन् सुगरण हवी, लोहार समाज मेळाव्यात तरुणांना हवी सुशिक्षित, संस्कारी, तर मुलींना हवा अनुरुप

आई-वडिलांचा सांभाळ करणारी, सुशिक्षित, संस्कारी, इंजिनिअर, उच्चशिक्षित, तसेच अशिक्षितही चालेल पण सुगरण वधू हवी, अशा अपेक्षा उपवरांनी, तर मुलगा समजुतदार, शासकीय नोकरीवाला, इंजिनिअर, डॉक्टर, निर्व्यसनी, महिलांचा, पत्नीचा आदर करणारा, समजून घेणारा, अशी अपेक्षा उपवधुंनी व्यक्त केल्या. निमित्त होते. लोहार समाजाच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे.अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या वतीने शहरातील लक्ष्मी नारायणमंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा झाला. गेल्या दोन महिन्यांपासून मेळाव्याची तयारी सुरू होती. मेळाव्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, बीड, सातारा, सांगली, जालना या जिल्ह्यातील डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, शेती, उद्योजक, व्यावसायिक आदी क्षेत्रातील २५० मुलांनी तर ६० मुलींनी नोंदणी केली. तर यातील काही जणांनी आपला परिचय देत जोडीदाराबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या.मेळाव्यात मुलींनी आपल्याला अनुरुप, समजून घेणारा, महिलांचा आदर करणारा, निर्व्यसनी, कुटुंबाला धरुन चालणारा असावा, आई-वडिलांना स्वत:च्या पालकांसारखे वागवणारा असावा, अशी अपेक्षा व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मुलांनी मुलगी आई-वडिलांना सांभाळ करणारी, त्यांना समजून घेणारी, सुदंर, मनमिळावू, सुसंस्कृत सुगरण,असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ब्रॅण्डेड शेतकरी, उत्पन्न महिन्याला दीड लाख या मेळाव्यात एका तरुण शेतकरी उपवराने आपण ब्रॅण्डेड शेतकरी असून दुधाचा व्यवसाय आहे. त्यातून महिन्याला दीड लाख रुपये कमावत आहे. मला आई व वडिलांचा सांभाळ करणारी जोडीदार हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:24 am

जलवाहिनीचे काम ठरतेय डोकेदुखी:एरंडाेल शहरातील ठिकठिकाणी केलेल्या खाेदकामामुळे नागरिकांचे हाल‎

शहरात काही प्रभागांमध्ये नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याकामामुळे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. हे अतिशय संथ गतीने सुरू आहे. सुरुवातीला पाइप टाकले जातात नंतर ती माती टाकून बुजली जाते. नंतर पुन्हा पंधरा दिवसांनी पाइपलाइन पासून पाणी वितरणाचा नळ घरापर्यंत लावण्यासाठी पुन्हा खोदकाम केले जाते. हे खोदकाम सात-आठ दिवस त्याच अवस्थेत राहते. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान काही भागांमध्ये खोदकाम केलेल्या जागी क्राँक्रीटीकरण सुरू असल्यामुळे तेथील रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे वेगळा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. पूर्वी प्रशासक राज होते. मात्र आता नगराध्यक्ष व नगरसेवक आहेत. परंतु या समस्येकडे अजून कोणीही लक्ष देत नाही. अशी नाराजी जनतेतून व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:04 am

वाढीव घर व पाणीपट्टीस सेना नगरसेवकांचा विरोध

प्रशासक काळात नगरपरिषदेने घेतलेल्या वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीच्या निर्णयास शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवत स्थगिती देण्याची मागणी मुख्याधिकारी दिनेश सिनारे, नगराध्यक्ष वैभव बागूल यांच्याकडे केली आहे. शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. प्रशासन काळात नगरपरिषदेने वाढीव घरपट्टी व पाणीपट्टीचा जाचक निर्णय घेतला आहे. नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कर आकारले गेले आहेत. कराचा मोठा आर्थिक बोजा जनसामान्य व गोरगरीब जनतेवर पडत आहे. त्यामुळे वाढीव करपट्टीच्या निर्णयास तात्काळ स्थगिती देऊन तो रद्द करावा व नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच नवीन करप्रणाली आकारण्यात यावी. जोपर्यंत नागरिकांना मूलभूत सुखसुविधा पूर्णपणे उपलब्ध करून दिल्या जात नाही, तोपर्यंत हा निर्णय घेऊ नये, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेवक सुधीर कबाडे, प्रमोद बनकर, राजू बागवान, पल्लवी मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख नीलेश ढगे आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदिप उगले यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 8:00 am

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात केल्यास भविष्य उज्ज्वल:धोडंबे विद्यालयात मुख्याध्यापक एस. एम. वंजारी यांनी व्यक्त केले मत‎

राजमाता जिजाऊंनी शिवराय घडवले ते केवळ तलवारीने नव्हे, तर संस्कारांनी. स्वामी विवेकानंदांनी युवकांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. आजचा युवक जर या दोन विचारांचा संगम आपल्या जीवनात आणेल, तर भारताचे भविष्य निश्चितच उज्ज्वल होईल. विद्यार्थीदशेतच ध्येय निश्चित करून मेहनत, शिस्त आणि मूल्ये जपली तर प्रत्येक विद्यार्थी स्वतःचा आणि समाजाचा विकास साधू शकतो, असे विचार मुख्याध्यापक एस. एम. वंजारी यांनी व्यक्त केले. धोडंबे येथील कर्मवीर काकासाहेब वाघ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या प्रसंगी ह.भ.प. विशाल गोसावी व संदीप शिंदे यांनी काव्यात्मक शैलीतून प्रेरणादायी मनोगत व्यक्त करत राजमाता जिजाऊंचे मातृत्व, संस्कारशील विचार आणि स्वामी विवेकानंदांचे युवकांसाठीचे तेजस्वी विचार प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांमधून साई रकिबे, स्वरा उशीर, श्रुती रकिबे, श्वेता धनाईत, पल्लवी तांदळे, साक्षी फापाळे, प्रतिक्षा जाधव, श्वेता काळे, स्वराली निरभवणे यांनी मनोगते व्यक्त करत देश, समाज व स्वतःच्या जबाबदाऱ्यांविषयी आपले विचार मांडले. काही विद्यार्थिनी राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी झाल्याने कार्यक्रमास विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता ७ वी ‘ब’ मधील कु. मानसी काळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पलक जाधव व आभार प्रदर्शन कु. ज्ञानेश्वरी धनाईत यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक समिती प्रमुख कवी सुभाष पवार यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:57 am

उमराणेत विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव:माजी केंद्रप्रमुख रावबा मोरे यांच्या हस्ते सर्वांना ‘शिवचरित्र'' भेट‎

राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती येथे जाणता राजा मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. संभाजी सुर्यवंशी हे होते. चिंतामण राजाराम देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून छत्रपती संभाजीराजे चौकात जन्मोत्सवास प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिलीप देवरे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याचे औचित्य साधून क्षेत्रातील विविध गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रकाश कांतीलाल ओस्तवाल, सुनील सुदाम देवरे, संगीता सुभाष बाफना, सर्वेश संदीप पगारे, अक्षरा पंढरीनाथ देवरे, दीपक प्रकाश पगारे आणि सौरभ वसंत देवरे यांचा समावेश होता. माजी केंद्रप्रमुख रावबा मोरे यांच्या हस्ते या सर्वांना ‘शिवचरित्र' भेट देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक नंदन देवरे यांनी केले. याप्रसंगी सुभाष देवरे, चिंतामण मगर, पुंडलिक गायकवाड, योगेश शिरुडे, साहेबराव देवरे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:57 am

मनमाड प्रीमियर लीग चषक 2026 क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ:उद्घाटन सामन्यात आयबीएम संघाचा थरारक विजय‎

मनमाड प्रिमियर लीग क्रीडासम्राट आमदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात आयबीएम संघाने एस. ए. चॅलेंजर संघावर २ गुणांनी मात करत विजयी सलामी दिली. अटीतटीच्या या सामन्यामुळे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी क्रिकेट रसिकांना मोठा थरार अनुभवायला मिळाला. मनमाड शहर शिवसेना व कै. मुरलीधर श्रीपत जाधव कला व क्रीडा सामाजिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय सिझन–६ एम.पी.एल. मनमाड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर उत्साहात पार पडले. उद्घाटन सामन्यात एस. ए. चॅलेंजर आणि आयबीएम या संघांमध्ये चुरशीची लढत झाली. अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात आयबीएम संघाने संयमी खेळ करत विजय मिळवला. उद्घाटन समारंभाला मुख्य संयोजक व निमंत्रक राजेंद्र जाधव यांच्यासह मयूर बोरसे, साईनाथ गिडगे, सुनील हांडगे, महेंद्र शिरसाठ, सूरज अरोरा, दिलीप तेजवाणी, कैलास गवळी, फिरोज शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुहास कांदे, समृद्धी बँकेच्या अध्यक्षा अंजुम कांदे व फरहान खान यांच्या सहकार्याने ही स्पर्धा होत असून शहरातील क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राजेंद्र जाधव यांनी केले. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले असून विजेत्यांना ७१ हजार, ६१ हजार, ५१ हजार, ४१ हजार रुपये, टू-व्हिलर व इतर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. सिझन–६ मधील मानाचा क्रीडासम्राट आमदार चषक आमदार सुहास कांदे, अंजुम कांदे व फरहान खान यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:55 am

उंबरठाणजवळ 4 लाखांचे मद्य जप्त:राज्य उत्पादन शुल्कची कारवाई; कारसह 10 लाख 79 हजारांचा मुद्देमाल जप्त‎

परराज्यातून अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती बोरगाव येथील विभागाच्या पथकाला मिळाली होती. नाशिक विभागाचे अधीक्षक संतोष झगडे व उपअधीक्षक अ. सु. तांबारे मार्गदर्शनाखाली १२ जानेवारीस सुरगाणा - उंबरठाण रस्त्यावरील आंबाठा शिवारात वाहनतपासणी सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान चारचाकी वाहनाची (जीजे १५ सीके १४२३) थांबवत तपासणी केली असता महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्याचे ३७ बॉक्स आढळले. या प्रकरणी वाहनचालक सुनील रामजीवन खिलेरी (१९, रा. पवारोकी ढाणी, जि. बारमेर, राजस्थान) तसेच इतर साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत ४ लाख १५ हजाराच्या मद्यासह संशयितांकडील चारचाकी वाहनासह मोबाइल जम्त करण्यात आला. विभागाने एकूण १० लाख ७९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत कळवण विभागाचे निरीक्षक सी. एच. पाटील, बोरगावचे दुय्यम निरीक्षक विठ्ठल बाविस्कर, दुय्यम निरीक्षक महेंद्र कोडे, सुनील पाटील, गोरख गरुड, अजय बगर, तेजस कसबे यांनी भाग घेतला. या गुन्ह्याचा तपास विठ्ठल बाविस्कर करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:53 am

225 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड:चांदवड येथील जैन तंत्रनिकेतनमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मिळाले आकर्षक वेतन‎

येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री हिरालाल हस्तीमल (जैन ब्रदर्स, जळगाव) तंत्रनिकेतनातील एकूण २२५ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक वेतनासह निवड झाली आहे. तंत्रनिकेतनातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षातील (शैक्षणिक वर्ष २०२५-२६) विद्यार्थ्यांसाठी दि. ७ व ९ जानेवारी २०२६ रोजी तंत्रनिकेतन महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजाज ऑटो लिमिटेड, पुणे तसेच जे. के. मैनिई प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड, रेमंड ग्रुप कंपनी, सिन्नर-मालेगाव एमआयडीसी, नाशिक या नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. दि. ७ जानेवारी रोजी आयोजित जे. के. मैनिई प्रिसिजन टेक्नॉलॉजी लिमिटेड या कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ४८ विद्यार्थ्यांची तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील १० विद्यार्थ्यांची आकर्षक वेतनसह निवड झाली. दि. ९ जानेवारी रोजी आयोजित कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये बजाज ऑटो लिमिटेड, आकुर्डी (पुणे), चाकण (पुणे) व संभाजीनगर कंपन्यांसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ७३ तसेच इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील ५० विद्यार्थ्यांची आकर्षक वेतनसह निवड करण्यात आली. याबरोबरच या शैक्षणिक वर्षामध्ये जी.ई. एरोस्पेस इंडिया, पुणे या नामांकित कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील एकूण २२५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये झालेली निवड ही संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचे कौशल्य अधोरेखित करणारी ठरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:51 am

गल्लेबोरगावात छापा; 13 जुगारी, 11 वाहने ताब्यात:डीवायएसपींच्या पथकाने केली धडक कारवाई‎‎

खुलताबाद गल्लेबोरगाव परिसरातील शेतात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर सोमवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली. पोलिस उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. खुलताबाद पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे व त्यांच्या पथकाने या कारवाईत १३ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून ७० हजार रुपये रोख, १३ मोबाईल फोन, ११ मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एक जण शेतात खुलेआम जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खात्री केल्यानंतर सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पोलिसांनी शेतात छापा टाकला. छाप्यावेळी जुगाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अंकुश सरोदे यांच्या तक्रारीवरून खुलताबाद पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. अवैध धंद्यांची माहिती द्या या कारवाईमुळे गल्लेबोरगाव व परिसरातील अवैध जुगारधंद्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अशा कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला. नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन निरीक्षक धनंजय फराटे यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:30 am

फुलंब्री न.पं.च्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे जमीर पठाण यांची निवड:स्वीकृत नगरसेवकपदी आसेफ पटेल व मनोज मुळे यांना मिळाली संधी‎

फुलंब्री नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे जमीर पठाण यांची निवड झाली. नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या विशेष सभेनंतर त्यांनी ही घोषणा केली. सभेत उपनगराध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भाजपकडून योगेश मधुकर मिसाळ, महाविकास आघाडीकडून जमीर पठाण आणि हिना मुद्दस्सीर पटेल यांनी अर्ज दिले. हिना पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर हातवर करून मतदान झाले. जमीर पठाण यांना १२ मते मिळाली. योगेश मिसाळ यांना ५ मते मिळाली. त्यानुसार जमीर पठाण यांची उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गट आणि भाजप असा तीन गटांमध्ये विभाग झाला. शिवसेना गटनेत्या अर्चना दुतोंडे यांनी आसेफ अशपाक पटेल यांच्या नावाची शिफारस केली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपचे संख्याबळ सारखे असल्याने चिठ्ठीद्वारे निवड झाली. त्यात भाजपचे मनोज मुळे यांची चिठ्ठी निघाली.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:29 am

संक्रांतीआधी तिळाचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले‎:उत्पादनात 90 टक्के घट झाल्यामुळे बाजारात आवक घटली ; उच्च दर्जाच्या तिळाचा तुटवडा

पिंपळदरी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तिळाच्या बाजारात मोठी दरवाढ पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा तिळाच्या पिकाला फटका बसल्याने यंदा उत्पादनात तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे बाजारात उच्च दर्जाच्या तिळाचा तुटवडा निर्माण झाला असून, दरात प्रतिकिलो २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. येत्या काही महिन्यांतही तिळाचे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे खरीप हंगामात देशात पांढऱ्या तिळाचे उत्पादन अडीच लाख टनांच्या आसपास असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा अवकाळी पाऊस, एकरी उत्पादनातील घट आणि अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे २०२५ च्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी तिळाच्या पेरणीकडे पाठ फिरवली. याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला असून, यंदाचे उत्पादन केवळ २५ ते ३० हजार टनांपर्यंतच मर्यादित राहिले आहे. त्यातही उच्च दर्जाचा माल केवळ १० टक्के इतकाच उपलब्ध असल्याने दिवाळीपासूनच तिळाच्या दरात वाढ सुरू झाली आहे. संक्रांत जवळ येत असताना चांगल्या प्रतिच्या तिळाची कमतरता अधिक तीव्र झाली आहे. उन्हाळी पीक मे-जूनमध्येच बाजारात येणार असल्याने, तोपर्यंत दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या काळात दर्जानुसार तिळाचे दर प्रतिकिलो १८० रुपयांदरम्यान होते. मात्र, सध्या घाऊक बाजारात हेच दर १५० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. तिळाची विक्री करताना व्यापारी दिसत आहेत. पांढऱ्या, काळ्या, लाल तिळाला मागणी पांढरा, काळा आणि लाल असे तिळाचे प्रकार गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, आंध प्रदेश, महाराष्ट्रात उत्पादित होतात. संक्रांतीसाठी प्रामुख्याने पांढऱ्या तिळाला मागणी असते, तर आयुर्वेदिक उपयोग व विविध पदार्थांसाठी काळा तीळ, आणि धार्मिक पूजेसाठी लाल तीळ वापरला जातो. अमेरिकेतील टॅरिफ वाढीचा तिळाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. भारतातून हलके ते मध्यम दर्जाचे तीळ अमेरिका, युरोप, आखाती देश तसेच पूर्व आशियातील विविध देशांत निर्यात केले जातात. ऑइल मिल क्रशिंगसाठी लागणाऱ्या तिळाची मागणीही लक्षणीय वाढली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:28 am

पैठणच्या धार्मिक भूमीला स्वच्छ, सुंदर ठेवण्याला प्राधान्य- विद्या कावसानकर:उप नगराध्यक्षपदी शिवसेनेचे तुषार पाटील यांची बिनविरोध निवड‎

पैठण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्या भुषण कावसानकर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पैठण हे संत एकनाथ महाराजांसह अनेक संतांची भूमी आहे. हे शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन नगराध्यक्षा विद्या कावसाणकर यांनी दिले. कार्यक्रमाला आमदार विलास भुमरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पासाहेब निर्मळ, जितू परदेशी, पवन लोहिया, भुषण कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, नगरसेवक बजरंग लिंबोरे, नंदू काळे, सोमनाथ परदेशी, विद्यार्थी, महिला व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार भुमरे यांनी सांगितले की, सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे. जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहावे. कोणत्याही नगरसेवकाच्या डोक्यात पदाची हवा जाणार नाही, अशी शिस्तबद्ध टीम शहराला लाभली आहे. जुन्या शहरातील समस्या सोडवणे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाईल. शहराचा विकास आराखडा तयार आहे. त्याच धरतीवर कामे राबवली जातील. पैठणसारख्या ऐतिहासिक शहराचा कायापालट करण्याची संधी विद्याताईंना मिळाली आहे. पर्यटन विकास, पाणी समस्या आणि कचरा निवारणावर त्यांनी काम करावे, असेही आमदारांनी सांगितले. उप नगराध्यक्षपदी शिवसेनेचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न विद्या कावसानकर यांनी सांगितले की, मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी बालउद्यान व ओपन स्पेस विकसित करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यावर भर राहील.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:27 am

विधानावर मी ठामच:मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटा; अण्णामलाईंचे ठाकरे बंधूना आव्हान, मला धमकावणारे राज ठाकरे कोण?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान करून भाजपची अडचण करणाऱ्या के. अण्णामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबई महाराष्ट्रापुरते मर्यादित शहर नाही. ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही, असे ते म्हणाले. मला धमकावणारे राज ठाकरे व आदित्य ठाकरे कोण, असा सवालही त्यांनी याप्रकरणी केला आहे. मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा, असे आवाहन त्यांनी ठाकरे बंधूंना दिले. मुंबईतील वॉर्ड क्रमांक ४७ मध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना अण्णामलाई असेही म्हणाले की, केंद्रात मोदी, राज्यात फडणवीस आणि मनपा भाजपचा महापौर असेल तरच विकास होईल. त्यावर खा. संजय राऊत फडणवीस-शिंदेंना उद्देशून म्हणाले की, “कुणीही लुंग्या-सुंग्या येतो आणि मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून आमच्या तोंडावर चप्पल मारून जातो. मग तुमचा स्वाभिमान कुठे गेलाय?’ तर माझ्या गावात लपून बसलो असतो मी धमक्यांना घाबरणारा असतो, तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की, कामराज हे भारताच्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो की, ते तामिळ राहिले नाहीत. त्यानुसारच जर मी म्हणालो की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, तर त्याचा अर्थ असा होतो का की, महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही? हे सर्व अज्ञानी लोक आहेत, असे ते म्हणाले. आता यावर ठाकरे बंधूची काय प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागणार आहे. ‘मला शिवीगाळ करण्यासाठीच सभा’ अण्णामलाई सोमवारी म्हणाले की, मला धमकी देणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलावली होती. मलाही माहिती नव्हते की, मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असे लिहिले आहे की, मी मुंबईत आल्यानंतर माझे पाय छाटले जातील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येतो. माझे पाय छाटण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा, असे आव्हान त्यांनी या वेळी दिले. अण्णामलाई भाजपचा खरा चेहरा : आदित्य आदित्य ठाकरे म्हणाले की, “अण्णामलाई हे भाजपचा खरा चेहरा आहेत. भाजपला फक्त महाराष्ट्राचा अपमान करायचा आहे आणि मुंबई लुटायची आहे, हे त्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. “तामिळनाडूमध्ये ते स्वतःची अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत, तिथे ते “झीरो’ ठरले आहेत. ज्यांना स्वतःच्या राज्यात स्थान नाही, ते महाराष्ट्राला शिकवत आहेत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची प्रशंसा : अण्णामलाईंची तुलना करताना आदित्य ठाकरेंनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे कौतुक केले. स्टॅलिन तामिळनाडूला प्रगतिपथावर नेत आहेत, तर अण्णामलाईंसारखे लोक फक्त शिवीगाळ आणि वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:20 am

आरोप:किशोरी पेडणेकर यांनी गुन्ह्यांची माहिती लपवली, शिंदेसेनेची याचिका दाखल

शिवसेनेच्या (ठाकरे) उमेदवार आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती लपवली आहे, असा आरोप करणारी याचिका सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. शिवसेनेच्या (शिंदे) प्रवक्त्या सुशी शहा यांनी ही याचिका केली. मात्र, निवडणूक तीन दिवसांवर आल्याने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे पेडणेकर यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. शहा यांनी पेडणेकर यांच्या उमेदवारी अर्जाला आव्हान दिले आहे. दरम्यान, याबाबत पेडणेकर यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. पेडणेकर यांनी त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती हेतुपुरस्सर दडपल्याचा आरोपही याचिकेत केला आहे. शहा यांचे वकील कल्पेश जोशी यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सोमवारी ही याचिका सादर केली व याचिकेवर तातडीच्या सुमावणीची मागणी केली. तथापि, निवडणूक गुरुवारी होणार असल्याकडे लक्ष वेधून न्यायालयाने याचिकेवरील तातडीच्या सुनावणीला नकार दिला. तसेच, निवडणुकीनंतर याचिकेवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले. पेडणेकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १९९ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, पेडणेकर यांनी त्यांच्या अर्जात त्यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्याची माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे, त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला बेकायदेशीर, अवैध आणि अयोग्य घोषित करून फेटाळण्याचे आदेश देण्याची मुख्य मागणी शहा यांनी केली. पेडणेकरांविरोधात अनेक प्रकरणे प्रलंबित याचिकेनुसार, पेडणेकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांसारखी महत्त्वाची माहिती हेतुपुरस्सर दडपली आहे. पेडणेकर यांच्याविरुद्ध अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात कोरोना काळातील कथित फसवणुकीच्या प्रकरणाचा समावेश आहे. पेडणेकर यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांची माहिती लपवली आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:18 am

6 महिने निवडणूक पुढे अन् फडणवीस नगरसेवक:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास थक्क करणारा आहे. फडणवीस लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर मंत्री नितीन गडकरींसह त्या वेळच्या भाजप नेतृत्वाने फडणवीस यांना महापालिकेत रामनगर वॉर्डातून उमेदवारी दिली. त्या वेळी त्यांना २१ वर्षे पूर्ण करायला सहा महिने बाकी होते. दरम्यान, महापालिका निवडणुका सहा महिने पुढे ढकलली गेल्या आणि फडणवीस निवडणूक लढण्यास पात्र झाले. हे सर्वांना माहिती आहे. परंतु त्या वेळी देवेंद्र यांच्या आधी त्या वेळचे रामनगर वॉर्डाचे भाजपध्यक्ष बाळासाहेब नारळे यांच्या नावाचा विचार सुरू होता. मग २१ वर्षे ६ महिने पूर्ण केलेल्या देवेंद्र यांना उमेदवारी कशी मिळाली, हे त्या वेळचे एक साक्षीदार व रामनगर शोभायात्रेचे संयोजक व मार्गदर्शक रवी वाघमारे यांनी देवेंद्र यांच्याविषयी ही रोचक माहिती सांगितली. २३ जानेवारी १९९२ रामनगर मैदानात मी (रवी वाघमारे) व इतर मित्र उभे असताना एक तरुण मुलगा आला. वाकून नमस्कार करून म्हणाला, “मी देवेंद्र, मला रामनगर वॉर्डमधून भाजपच्या तिकिटावर महापालिकेचे इलेक्शन लढायचे आहे.’ रामनगर वॉर्ड म्हणजे रामनगर, गोकुळपेठ, टिळकनगर असा फार तर ५००० ते ५५०० मतांचा. आम्ही रामनगरमधून भाजप वॉर्ड अध्यक्ष बाळासाहेब नारळे यांच्या नावाचा विचार केला होता. म्हणजे नारळे यांना उमेदवारी देण्याचे पक्के होत होते. पण, दरम्यान देवेंद्र फडणवीसांचे नाव पुढे आले. बाळासाहेब नारळे व देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे एकमेकांचे चांगले मित्र होते. मित्राच्या मुलासाठी म्हणून नारळे यांनी कुरकुर न करता आनंदाने जागा सोडली. पुढे देवेंद्र फडणवीस हे नागपूर मनपाचे महापौर बनले. देवेंद्र यांना हजारच्या वर मते अन् ते आले निवडून २५ फेब्रुवारीचे मतदान होते. मोहन जावडेकर, संजय बंगाले, हर्षू आर्वीकर, राम डोहकर, सचिन नारळे, मनीष बगळकोटे व असे बरेच सगळे बच्चे होते. तेव्हा काँग्रेकडून आमचाच टिळकनगरचा मित्र रमेश गिरडे व प्रसन्नराजा तिडके विरोधात उभे होते. देवेंद्रला हजारच्या वर मते मिळाली व तो निवडून आला. मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. तरुण तडफदार नगरसेवक, पुढे लक्ष्मीनगर मधून उभा राहिला व महापौर झाला. मग पश्चिम नागपूरचा आमदार आणि आता हक्काचा लहान भाऊ आता सर्वांचा देवाभाऊ हा महाराष्ट्राची शान आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:16 am

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक:रस्त्यावरील भाजीमंडईमुळे कायम कोंडी, जुने गाव, झोपडपट्टीत गुन्हेगारीचे प्रमाण जास्त

सिडको अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी विकसित केलेल्या वसाहती, मोठ्या प्रमाणावर वीस बाय तीस गुंठेवारी, झोपडपट्टी आणि काही ठिकाणी विकसित वसाहती अशा मिश्र स्वरूपाचा प्रभाग म्हणजे २४ क्रमांकाचा आहे. अशा मिश्र वसाहतीमध्ये गुन्हेगारी रोखणे हे मोठे आव्हान आहे. मुकुंदवाडी या गावची जमीन विमानतळ, सिडको, म्हाडा, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीने संपादित केली आहे. संपादित केलेल्या जमिनीचा वाद अद्याप सिडको कार्यालयात प्रलंबित आहे. ड्रेनेजलाइनची समस्या गंभीर आहे. त्याचबरोबर अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर या प्रभागाची एक समस्या आहे. विशेष म्हणजे रस्त्यावर भरणारी भाजीमंडई या भागातील कायम डोकेदुखी ठरलेली समस्या आहे. या बाजारामुळे कायम वाहतूक कोंडी होते. क्र. २४ : अंबिकानगर, मुकुंदवाडी, ज्ञानेश्वर कॉलनी, संजयनगर २०१५ : नगरसेवक, पक्ष, मतदान वॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान८२ भाऊसाहेब जगताप,काँग्रेस २६४६८३ कमल नरोटे-भाजप १०८१८४ कमलाकर जगताप-उबाठा ११८६८५ सुनीता चव्हाण, बसपा २०६१ प्रभागाची व्याप्ती मुकुंदवाडी, राजीव गांधीनगर, न्यू एसटी कॉलनी, मुकुंदवाडी गाव, जयश्री कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, सिडको एन-२ चा काही भाग, संघर्षनगर, रामनगरचा काही भाग

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:09 am

मी महापालिका बोलतेय...:नगरसेवक पुढे आमदार, मंत्री, खासदार झाले; पण मूलभूत प्रश्न कायम

महापालिका सभागृहातून राजकीय झेप घेणाऱ्यांची नावे बघितली तरी कळतं ही निवडणूक राजकारणाचे प्रवेशद्वार आहे. महापालिकेच्या राजकारणातून पुढं आलेले नेते आमदार, खासदार, मंत्री झाले. वेगवेगळ्या समित्यांवर त्यांची वर्णी लागली. मात्र, आजही पाणी, ड्रेनेज, रस्ते, खड्डे याच विषयांभोवती मनपाची निवडणूक फिरते. एकदा तर सिनेकलावंत नाना पाटेकर यांनी शहरवासीयांना प्रश्न केला होता, ‘तुम्ही कसं काय हे सहन करू शकता? कमाल आहे बुवा तुमची.’ पाटेकर यांच्या विधानासंदर्भात पहिल्या महापालिकेपासूनचे नेते पाहू. मोरेश्वर सावे आधी महापौर आणि खासदार झाले, चंद्रकांत खैरे नगरसेवकाचे थेट आमदार झाले, मंत्री झाले. प्रदीप जैस्वाल महापौरानंतर खासदार म्हणून निवडून आले. नंतर आमदारही झाले. याच सभागृहातील गंगाधर गाडे पुढे राज्यमंत्री झाले. इतकेच काय गजानन बारवाल, विकास जैन या महापालिकेच्या राजकारणातून आलेल्यांनाच निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. अर्थात त्यात जैन पराभूत झाले. सध्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवललेले अंबादास दानवे याच सभागृहातील. विधान परिषद सदस्य संजय केणेकर, किशनचंद तनवाणी यांचाही महापालिकेच्या राजकारणाशी थेट संबध आला. तनवाणी महापौर, तर केणेकर उपमहापौर होते. इतकंच काय केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झालेले कराड हेही महापालिकेच्या राजकारणातूनच पुढे आले. अपवाद वगळता सर्वच आमदार आधी पालिकेत आलेले आहेत. किंबहुना पराभूत उमेदवारही पालिकेच्या राजकारणात यशस्वी झालेलेच आहेत. याशिवाय महिलांनाही संधी देणारे हे सभागृह आहे. आतापर्यंत सात महिला महापौर झाल्या. त्यात सुनंदा कोल्हे, शीलाताई गुंजाळ, विमलताई राजपूत, रुक्मिणीताई शिंदे, विजया रहाटकर, अनिता घोडेले आणि कला ओझा यांचा समावेश आहे. रहाटकर यांनी तर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. दलबीरसिंग जबिंदा हे नांदेडच्या गुरुद्वारा मंडळाच्या खूप महत्त्वाच्या पदावर होते. सुरजितसिंग खुंगर ऑल इडिया एसटीजी पीसीओधारक संघटनेचे अध्यक्ष होते. काही पत्रकारही महापालिकेत आले. त्यात माणिक साळवे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एकूणच महापालिकेचे सभागृह म्हणजे हिंदू, मुस्लिम, दलित आणि इतरही समाजांच्या प्रतिनिधित्वाचं आणि त्यांच्या हितसंबंधांना जोपासणारं सभागृह म्हणावं लागेल. या सभागृहामुळे बाहेर कितीही ताणतणाव निर्माण झाला तरी सभागृहातील एकी वेळोवेळी दिसून येते. तिथं त्यांचे आर्थिक हितसंबंध असतात. त्याऐवजी जनहितासाठी ती एकी असावी, नाही तर रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आपण बोंबलत बसतो.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 7:06 am

पाठपुराव्याअभावी 6 गुन्ह्यांत संभाजीनगर पोलिस पडले तोंडघशी:500 कोटींचे ड्रग्ज, क्रिप्टोकरन्सी, तांदूळ घोटाळ्याच्या गुन्ह्यांनी देशात गाजले होते संभाजीनगर शहर

२ वर्षांत ६ प्रमुख गुन्ह्यांच्या तपासात छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी खूप गाजावाजा केला होता. पण ते तडीस नेण्यात पोलिसांना अपयश आले आहे. तपासात त्रुटी, तंत्रज्ञानाचे अज्ञान अन् पाठपुराव्यातील सातत्याचा आभाव ही त्याची ३ कारणे आहेत. ऑनलाइन गेमिंग, रेशनिंग राइस, क्रिप्टोकरन्सी, ५०० कोटींचे ड्रग्ज बनवणाऱ्या ४ कारखान्यांवरील गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमुळे पोलिस तोंडघशी पडलेत. बहुतांश गुन्ह्यांतील आरोपी मोकळे फिरत आहे आहेत. गुन्ह्यांचे तपासच भरकटलेत शहरात घडलेल्या, देशात गाजलेल्या गुन्ह्यांचा तपास भरकटल्यासारखा वाटतो.कारण तंत्रज्ञानाची माहिती नसणे, न्यायालयीन दृष्टीने पुरावे न आणणे, तपासात सातत्य न ठेवणे, तपासी अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे प्रकरणे न्यायालयात टिकत नाहीत. पोलिस तोंडघशी पडत आहेत.ॲड. अभयसिंह भोसले, कायदेतज्ज्ञ थेट सवाल रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमली पदार्थांच्या कारवाईचे प्रमाण वाढवले हे सकारात्मकमहत्त्वाच्या गुन्ह्यांत पोलिस तोंडघशी पडताय?-पोलिस तपास प्रामाणिकपणे करतात, पण इतर घटकही महत्त्वाचे असतात.ड्रग्जचे गुन्हे सिद्ध होत नाहीयेत.- एखादा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह असेल. पण बाकी गुन्ह्यात कारवाई होतेय. अमली पदार्थांच्या कारवाईत वाढ झाली हे उत्तमच.क्रिप्टो, ऑनलाइन गुन्ह्यातही तसेच झाले.-माहिती घेतो. प्रत्येक गुन्ह्याची माहिती मला नाही. काही गुन्हे मी येण्यापूर्वी घडले आहेत. 1. क्रिप्टो प्रकरणात समन्सही नाहीतगुन्हा : ११ सप्टेंबर २०२४ । आरोपी : ९ । सर्वांना जामीनघटना : आरोपींनी शहरातील २०० जणांच्या बँक अकाउंटवर दरमहा १० हजारांचे अामिष देऊन बँक खाते भाड्याने घेतले. इंटरनेट बँकिंगद्वारे क्रिप्टोच्या बदल्यात भारतीय पैसे आणले. त्याचा हा गुन्हा आहे. 2. मायलॉनप्रकरणी बी समरी दाखलगुन्हा : २४ जून २०२५ । आरोपी : ५ । सर्वांना जामीनघटना : ‘एनडीपीएस’ने १.२३ कोटींचे १ किलो ड्रग्ज वाळूजला पकडले. स्पॉट टेस्टमध्ये ड्रग्ज आढळले.त्रुटी : छापा टाकल्यावर ३ दिवसांनी गुन्हा नोंदवला. स्टेट फॉरेन्सिक लॅबने सर्व २० सँपलमध्ये ड्रग्ज नसल्याचे स्पष्ट केले. सद्य:स्थिती : बी-समरी दाखल. 3. तांदूळ घोटाळ्याचे आरोपी बाहेरगुन्हा : १ फेब्रुवारी २०२५ । आरोपी : २० । सर्वांना जामीनघटना : तिसगावात साई ॲग्रोच्या गोडाऊनमध्ये एफसीआयचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा आरोप. महिला व बालकल्याणचा पोषण आहाराचे धान्य असल्याचा दावा. त्रुटी : मिलिंगसाठी शासनानेच तांदूळ दिले. सद्य:स्थिती : आरोपी बाहेर आहेत. 4. ऑनलाइन गेमिंगमध्ये जामीनगुन्हा : १९ नोव्हेंबर २०२५ । आरोपी : ९ । सर्वांना जामीनघटना : ऑनलाइन गेमिंगवर गुन्हे शाखेची धाड. सूरज पचलोरेला आरोपी केले. southbook.in वेबसाइटद्वारे १२ भाषांत जुगार. ५२ बँक खात्यांतून व्यवहाराचा दावा.सद्य:स्थिती : सर्वजण जामिनावर, तपास अपू्र्ण 5. तीन महिन्यांपासून तपासच सुरू आहेगुन्हा : २८ ऑक्टो. २०२५ । आरोपी : ११६ । जामीन : ०घटना : चिकलठाण्यातील बोगस कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांच्या फसवणुकीचा आरोप. ११६ जणांना अटक. सद्य:स्थिती : आरोपी न्यायालयीन कोठडीत, गुन्ह्यातील तपास अजूनही सुरूच आहे. 6. पाचशे कोटींचा ड्रग्ज कारखानागुन्हा :२१ ऑक्टोबर २०२३ । आरोपी : ५ । जामीन : ४घटना : चार कारखान्यांत ५०० कोटींची ड्रग्जनिर्मिती. कोकेन, केटामाइन,मेफेड्रोन जप्त. त्रुटी : पुण्याच्या सीएफएसएलने ३६ पैकी ३४ सँपल फेटाळले आहेत.सद्य:स्थिती : आरोपपत्र दाखल, पण आरोपी बाहेर.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 6:57 am

बेकायदेशीर फ्लेक्सची भाजप तक्रार करणार:निवडणूक आयोगाने कारवाई करावी- राजेश पांडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बेकायदा फ्लेक्स लावणार नाहीत. तसेच, शहरात सध्या काही राजकीय पक्षांकडून बेकायदा फ्लेक्स लावत राजकीय प्रचार करण्यात येत असून त्यावर निवडणूक आयोगाकडून तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहरात ‘अलार्म वाजतोय’ ही फ्लेक्सची कॅम्पेन केली आहे. भाजपच्या ‘कोर एरिया’मध्ये पाणी, कचरा या समस्यांच्या आडून ‘राष्ट्रवादी’ने केलेली फ्लेक्सबाजी भाजपच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. फडणवीस यांनी रविवारी पुणेकरांशी संवाद साधताना बेकायदा फ्लेक्सद्वारे सुंदर पुण्यनगरीचे विद्रुपीकरणाचा मुद्दा छेडला होता. या पार्श्वभूमीवर पांडे यांनी भाजप कार्यकर्त्यांना बेकायदा फ्लेक्स काढून टाकण्याची सूचना केली. सध्या शहरात काही राजकीय पक्षाकडून बेकायदा फ्लेक्सबाजी करत प्रचार करण्यात येत आहे. हा शहर विद्रूपीकरणाबरोबरच आचारसंहिता भंगाचा विषय आहे. राज्य निवडणूक आयोगाने यावर तातडीने कारवाई करावी अशी सूचना पांडे यांनी केली. याबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व महापालिका जिंकणार पांडे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकेच्या सर्व निवडणुका भाजप तसेच महायुती जिंकेल तसेच सर्व ठिकाणी भाजपचा महापौर बसेल. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा दबदबा राहणार असून कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सोलापूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा दावा पांडे यांनी केला. प्रचाराची सांगता मुख्यमंत्र्यांच्या सभेने पुण्यातील भाजपच्या प्रचाराची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने मंगळवारी होणार आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील गोखलेनगर परिसरात ही सभा होणार आहे. मुख्यमंत्री ही सभा दुपारी एकच्या सुमारास घेणार असून त्यानंतर ते नागपूरला रवाना होतील, अशी माहिती प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 6:53 am

तुकडा तांदळापासून इथेनॉल निर्मितीने मका उत्पादकांना फटका:2026 वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तांदळाला झुकते माप

तुकडा तांदळापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याचा मका उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. कमी किमतीत मका विकावा लागत आहे. सरकारच्या आवाहनानंतर मका उत्पादन वाढवलेल्या शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आली आहे. २०२४-२५ च्या हंगामात मक्याला प्रति क्विंटल २,२२५ रूपये इतका हमीभाव होता. तर २०२५-२६ च्या हंगामासाठी २४०० रुपये प्रति क्विंटल जाहीर झाला आहे. म्हणजे मागील हंगामापेक्षा १७५ रुपये वाढ दिली आहे. २६ डिसेंबर २०२६ रोजीच्या माहिती नुसार मक्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा ३० टक्क्यांपर्यंत कमी होता. तर हमीभावाने खेरदी वेग आलेला नाही. राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून केवळ दोन जिल्ह्यांमध्येच प्रत्यक्ष खरेदी सुरू आहे. आतापर्यंत फक्त ६२६ टन मका खरेदी झाली आहे. जगातील मका उत्पादनाच्या तुलनेत २०२४-२५ या हंगामात मक्याच्या उत्पादनात घट झाली होती. २०२३ मध्ये १२,२८१ लाख टन मका उत्पादन असताना २०२४-२५ मध्ये १२,२०५ लाख टन एवढेच मका उत्पादन झाले. २०२५-२६ पर्यंत २०% इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी तुकडा तांदळापासून इथेनॉल निर्मितीला पाठिंबा दिला आहे. इथेनॉल उत्पादनासाठी तुकडा तांदळाची राखीव किंमत वाढवून (उदा. २३२० रुपये प्रति क्विंटल) उत्पादकांना प्रोत्साहन दिले जात आहे. अन्न महामंडळाकडून अतिरिक्त तांदूळ (५.२ दशलक्ष टन) इथेनॉल उत्पादनासाठी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राईस मिलिंग ट्रान्सफॉर्मेशन स्कीम अंतर्गत, तुकडा तांदूळ वेगळा करून तो इथेनॉल कंपन्यांना ई-लिलावाद्वारे विकला जात आहे. मका जास्त भरवशाचा, चलन वाचवतो हवामान बदलाचा मोठा फटका तांदळाला बसू शकतो. पण मका हे पीक हवामान बदलाला एवढे संवेदनशील नाही. त्यामुळे इथेनॉल उद्याोगालाही तांदळापेक्षा मका हे पीक जास्त भरवशाचे आहे. देशाच्या एकूण इथेनॉल उत्पादनात मक्यापासून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलने ४५ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. एकीकडे मका देशाचे परकीय चलन वाचवत पर्यावरणाचे रक्षण करीत असून अन्नसुरक्षाही निश्चित करत आहे. असे वाढत गेले महाराष्ट्रात मका लागवडीचे क्षेत्र १९६०-६१ मध्ये खरीपात मक्याचे क्षेत्र २७००० हेक्टर, उत्पादन हेक्टरी १९००० टन, उत्पन्न प्रति हेक्टरी ६९७ किलो होते. २०२३-२४ खरीपात क्षेत्र ९,०९,००० हेक्टर, उत्पादन प्रति हेक्टरी १४,४१००० टन, उत्पन्न प्रति हेक्टरी १५८४ किलो होते. २०२४-२५ ला क्षेत्र ११,१६००० हेक्टर, उत्पादन प्रति हेक्टरी २९,९०,००० टन, उत्पन्न प्रति हेक्टरी २६८० किलो होते. २०२५-२६ च्या हंगामामध्ये खरीपामध्ये मक्याचे क्षेत्र १४,३९००० हेक्टर इतके होते. उत्पादन प्रति हेक्टरी ४२,८१,००० टन होते. तर उत्पन्न प्रति हेक्टरी २९७४ किलो इतके होते. - विजय जावंधिया, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक उत्पादन वाढवणे गुन्हा आहे काय? ऊस, भाताच्या तुलनेत मका लागवडीत कमी पाणी वापरले जाते. त्यामुळेच सरकारने मका पिकाला प्रोत्साहन देऊन हमीभावाने खरेदी केली पाहिजे. इथेनॉल निर्मितीसाठी सरकारने एफसीआय गोडावूनमधील तांदुळ सबसिडीची गरज नव्हती. २०२४-२५ च्या हंगामात कुठल्याही शेतीमालाला हमीभाव मिळत नव्हते. तेव्हा मक्याला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाले होते. मका आयात केला होता. म्हणून यावर्षी मक्याच्या पेरा वाढला. सरकार ७१ रुपये लिटरने इथेनॉलची गॅरंटी देते तर २४०० हमीभावाने मका विकत घेण्याची गॅरंटी का देत नाही? इथेनॉलसाठी ६० लाख टन वापर सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी इथेनॉल तयार करण्यासाठी सुमारे ६० लाख टन मक्याचा वापर झाला. तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ साठी सुमारे ८३७ कोटी लिटर इथेनॉलचे वाटप केले. यात मक्याचा सर्वाधिक वाटा ५१.५२ टक्के (सुमारे ४३१.१कोटी लिटर) आहे. आता केंद्राने ऊस, भात, मक्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रमाण ठरवून दिल्याने मका उत्पादक रडवेला झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Jan 2026 6:51 am