काँग्रेस-वंचितच्या विजयी उमेदवारांशी आमदार अमित देशमुख यांनी साधला संवाद
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १७ जानेवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले मतदार, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस […] The post काँग्रेस-वंचितच्या विजयी उमेदवारांशी आमदार अमित देशमुख यांनी साधला संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचा उत्साह शिगेला; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची अभूतपूर्व गर्दी
लातूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे मोठे वातावरण असून, आगामी लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. दि. १७ जानेवारी रोजी विविध तालूक्यासह काँग्रेस भवन, लातूर येथे लातूर व रेणापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. जिल्हा भरातील विविध तालुक्यातून जवळपास ४५१ जणांनी काँग्रेस पक्षाकडे […] The post काँग्रेसचा उत्साह शिगेला; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची अभूतपूर्व गर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कॉटन सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्य व पर्यावरणासाठी आवश्यक : डॉ. जोशी
लातूर : प्रतिनिधी प्लास्टिक पॅड्स पर्यावरणासाठी घातक असून त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळून कॉटन पॅड्स वापरण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी यांनी केले. दयानंद कला महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने आणि प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार, ‘मासिक पाळीतील सॅनिटरी पॅड जनजागृती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […] The post कॉटन सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्य व पर्यावरणासाठी आवश्यक : डॉ. जोशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली भेट
लातूर : प्रतिनिधी लातूर महानगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने ४७ जागेवर ऐतिहासिक विजय संपादन केला असून याबद्दल शहरातील विविध प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शनिवारी आशियाना निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकाचे अभिनंदन करून दिलीपराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व […] The post माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे
लातूर : प्रतिनिधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणा-या अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय १२) हिचा ४ जानेवारी रोजी झालेला मृत्यू हा खूनाचा नाही असे प्राथमीक तपासात निदर्शनात येत आहे. या प्रकरणी राज्य शासनाने नांदेडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची एसआयटी नेमण्यात आली असून आजपासून आपण तपासाला सुरूवात करीत असल्याची माहिती […] The post नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी
चाकूर : प्रतिनिधी सीमा सुरक्षा दल, चाकूर (महाराष्ट्र)च्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर सीमा सुरक्षा दलातील ३३४ नवीन हवालदारांचा शपथविधी समारंभ परेड उत्साहात पार पडली. या शपथ परेडची सलामी विनीत कुमार, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, सीमा सुरक्षा दल, चाकूर यांनी घेतली. या नेत्रदीपक परेडचे नेतृत्व प्रशिक्षीत हवालदार अंबर पांडे यांनी केले. […] The post सीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
समसापूर येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
लातूर : प्रतिनिधी रेणापूर तालुक्यातील समसापुर येथील भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक सिद्धेश्वर तुकाराम गरड यांच्यासह नवनाथ वाघमारे, लहुकांत चव्हाण, विक्रांत भुजबळ, चंद्रकांत कोरनूळे, बाळु मुदामे व विशाल अंधारे यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीण मतदारसंघातील विकासकामे, […] The post समसापूर येथील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती महापालिका निवडणुकीत अपक्षांना सपशेल नाकारले:120 पैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही
अमरावती महापालिका निवडणुकीच्या शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ६६१ उमेदवारांपैकी १२० जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवारांना किमान २० ते कमाल दीड हजार मते मिळाली आहेत. महापालिकेच्या २२ प्रभागांमधील ८७ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये चुरस होती आणि अपक्षांनाही काही जागा मिळतील असा अंदाज होता, मात्र तो फोल ठरला. माघार घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण ६६१ उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. यापैकी ५४१ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे होते, तर १२० उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. या १२० अपक्ष उमेदवारांपैकी एकालाही मतदारांनी विजयापर्यंत पोहोचू दिले नाही. मतदारांनी अपक्षांना नाकारण्यामागे काही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवार निवडून आल्यास काही वेळा 'घोडेबाजार' होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मतदारांना नुकसान सोसावे लागते. तसेच, अपक्षांना राजकीय पाठबळ नसल्याने ते प्रभागाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांकडून पुरेसा निधी मिळवू शकत नाहीत, अशी मतदारांची धारणा आहे. महापालिका निवडणुकांमध्ये अपक्षांना नाकारण्याची ही भूमिका गेल्या काही वर्षांपासून अधिक दृढ होत आहे. दिव्य मराठीच्या आकडेवारीनुसार, १९९२ मध्ये मनपाची पहिली निवडणूक एक सदस्यीय निवड पद्धतीने झाली होती, ज्यात तब्बल २८ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर १९९७ मध्ये ही संख्या २५ पर्यंत खाली आली. २००२ मध्ये ५, २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये ८ आणि २०१७ मध्ये केवळ एक अपक्ष उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाला होता. यंदाच्या निवडणुकीत, तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या या मतदानात अमरावतीकर मतदारांनी एकाही अपक्ष उमेदवाराला निवडून न देण्याचा निर्णय घेतला.
नागपूर-मुंबई राजमार्ग बनला अपघाताचा मार्ग:अंजनगाव बारीत 1 किमी अंतरात गतिरोधक नाहीत; नागरिक त्रस्त
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी गावातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई राजमार्गावरील एक किलोमीटरच्या सिमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. यामुळे या मार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. सध्या या मार्गाचे सौंदर्यीकरण सुरू असून, या कामादरम्यान गतिरोधक बसवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर यापूर्वी अनेक किरकोळ आणि गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या रबरी गतिरोधकांची व्यवस्था केली होती. मात्र, हे गतिरोधक अवघ्या तीन महिन्यांतच खराब झाले. यामुळे आता दोन्ही बाजूंनी येणारी वाहने वेगाने धावत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. या मार्गावर बस थांबे, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर, आठवडी बाजार, स्मशानभूमी, भिवापूर तलाव आणि अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचारी आणि वाहनचालकांना मोठी गैरसोय होते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. या मार्गाच्या दुतर्फा झाडाझुडपांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे बसच्या खिडक्यांवर फांद्या आदळून प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे, तसेच इतर वाहनचालकांनाही गैरसोय होत आहे. सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून एक हजार मीटरपर्यंत रस्ता दुभाजक बांधून पथदिव्यांचे नियोजन केले आहे. मात्र, यासाठी जुने पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो. तालुका क्रीडा संकुलाचा परिसर वगळता, या राजमार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर मजबूत व टिकाऊ गतिरोधक, झाडाझुडपांची छाटणी आणि पथदिव्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार केली असून, विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, गतिरोधकांचा अभाव, बंद पथदिवे आणि वाढते अतिक्रमण यामुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. हा राजमार्ग अमरावतीहून अंजनगाव बारीमार्गे थेट वर्धा-नागपूर, यवतमाळ-हिंगणघाटला जोडतो. या मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा देखील सुरू झाल्या आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
चाकूर तालुक्यात ७४ नामनिर्देशन पत्रांची विक्री
चाकूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यात पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी ७४ नामनिर्देशन अर्ज घेल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. चाकूर तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण आहेत.जल्हिा परिषद तसेच पंचायत समितीच्या विविध गट व गणांसाठी निवडणूक […] The post चाकूर तालुक्यात ७४ नामनिर्देशन पत्रांची विक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिवसा शहरापासून काही अंतरावर असलेल्या वणी फाटा येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना १७ जानेवारी रोजी घडली. नागपूरमार्गे येणारी एम.एच. २७. डी.ई. ४२८२ क्रमांकाची बोलेरो गाडी इंडियन गॅस एजन्सी गोडाऊनकडून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाकडे येत होती. याचवेळी बोलेरोने एम.एच. २७. बी.आर. ०२२६ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीसह दोन्ही युवक महामार्गालगत काही अंतरावर फेकले गेले. या अपघातात वणी येथील रहिवासी असलेले दुचाकीचालक श्रीकांत सुधीर देशमुख (वय ३५) आणि मंथन बबन देशमुख (वय १८) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.
अमरावती महानगरपालिकेत 4 माजी महापौरांपैकी 3 विजयी:उपमहापौरांमध्ये मात्र एकालाच यश, तिघांचा पराभव
अमरावती पालिका निवडणुकीत ४ माजी महापौर आणि ४ माजी उपमहापौर रिंगणात होते. यापैकी तीन माजी महापौरांनी विजय मिळवला, तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला. याउलट, माजी उपमहापौरांमध्ये केवळ एकालाच यश मिळाले, तर तिघे पराभूत झाले. विजयी झालेल्या माजी महापौरांमध्ये काँग्रेसचे विलास इंगोले आणि भाजपचे चेतन गावंडे व संजय नरवणे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या चरणजीत कौर उर्फ रिना नंदा यांना मात्र पराभव पत्करावा लागला. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ४ माजी उपमहापौरांमध्ये भाजपचे चेतन पवार, कुसुम साहू आणि संध्याताई टिकले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार यांचा समावेश होता. यापैकी केवळ शेख जफर शेख जब्बार यांनाच विजय मिळवता आला, तर इतर तिघांना पराभवाचा सामना करावा लागला. साईनगर, प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांनी निवडणूक लढवली. या प्रभागात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने पूर्ण ताकद लावली होती आणि तुषार भारतीय यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, चेतन गावंडे आपला पारंपरिक गड राखण्यात यशस्वी ठरले. भाजपचे संजय नरवणे विलासनगर प्रभागातून विजयी झाले, तर विलास इंगोले यांनी अंबागेटच्या आतील जुन्या अमरावती शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. माजी उपमहापौरांच्या बाबतीत या निवडणुकीचा निकाल काहीसा नकारात्मक राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे प्रभाग क्रमांक १५, छायानगर-पठाणपुरा येथून विजयी झाले. पराभूत झालेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक १८ राजापेठचे चेतन पवार, प्रभाग क्रमांक ६ विलासनगर-मोरबागच्या कुसुम साहू आणि प्रभाग क्रमांक १० बेनोडा-भीमटेकडी येथील संध्याताई टिकले यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पराभूत झालेल्या माजी उपमहापौरांपैकी काहींना गेल्या सभागृहात सोबत काम केलेल्या उमेदवारांविरुद्धच निवडणूक लढावी लागली. भाजपचे चेतन पवार यांना शिवसेनेतून (उबाठा) युवा स्वाभिमान पक्षात गेलेले माजी नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी पराभूत केले. तसेच, कुसुम साहू यांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा तायवाडे यांनी हरवले, तर संध्याताई टिकले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार अर्चना पाटील यांनी पराभूत केले.
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमरावतीत भारतीय जनता पक्षामध्ये मोठा अंतर्गत स्फोट झाला आहे. भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी केली आहे. आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला. नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या शेवटच्या पाच दिवसांत उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार करून पक्षाशी गद्दारी केली, असा खळबळजनक आरोप या उमेदवारांनी केला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या ८७ जागांपैकी भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी भाजपला युवा स्वाभिमानी पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने भाजपसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या २२ उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात थेट नवनीत राणा यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला आहे. नेमके काय म्हटले पत्रात? 'भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी केली आहे. भाजपात राहून भाजपाचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केले आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपाचा गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेलवर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपाच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या पाच दिवसांत नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या, असा आरोप भाजपच्या २२ उमेदवारांनी पत्रात केला आहे. भविष्यात अमरावतीत पक्षाचा नायनाट करतील नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या. भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला, असा आरोपही या उमेदवारांनी केला. नवनीत राणांच्या गद्दारीने आमचा पराभव आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आ. रवी राणा यांच्यासाठी झोकून काम केलं.. पण नवनीत राणा यांनी जाहीरपणे आम्हालाच गद्दार ठरवून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलं. भाजपाच्या प्रभावक्षेत्रात भाजपाला मूठमाती देऊनच राणा दाम्पत्याने मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पत्नीला स्टार प्रचारक' भाजपा नेता दर्शवून भाजपा उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम राणा दाम्पत्याने केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात राणा दाम्पत्य फिरकले देखील नाही. तिथे भाजपा कमी करण्याची छुपी व्यूहरचना त्यांनी आखली. आम्ही हरलो. पराभव आम्हाला मान्य आहे. पण आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी गद्दारी करून केला, असेही या पत्रात म्हटले आहे. नवनीत राणा काय म्हणाल्या? या पत्रावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही मी भाजपसाठी काम करते, असे नवनीत राणा यांनी म्हटले. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. कोणी टीका केली ते समोर बोलले नाहीत, माझ्या पाठीमागे बोलले आहेत, पाठीमागे कोणीही टीका करते म्हणून मी त्या दिवशी म्हटलं तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला, असे त्या म्हणाल्या. … म्हणून रवी राणांनी उमेदवार उभे केले विकास करणारे व्यक्ती म्हणून रवी राणा यांची ओळख आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात मतदारांनी त्यांचे उमेदवार निवडून दिले आहेत. युवा स्वाभिमान यांच्या सोबत भाजपची युती तुटली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री बावनकुळे आमच्या सोबत होते. १६-१६ वर्ष सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी रवी राणा यांनी उमेदवार उभे केले होते, असे स्पष्टीकरण नवनीत राणा यांनी दिले. … तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते अमरावतीमधील ज्या उमेदवारांना निवडायचे होते त्यांनाच लोकांनी निवडून दिले. भाजपमध्ये तिकीट वाटपात थोडा घोळ झाला होता, त्यामुळे जागा कमी निवडून आल्या ही माहिती भाजपच्या नेत्यांना आम्ही देणार आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपचे तिकीट मिळाले असते तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर आता पक्षांतर्गत कलह उफाळून आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार भाई जगताप यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिकरित्या पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने भाई जगताप यांनाच 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे. बीएसी निवडणुकीपुर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आघाडीसाठी काँग्रेसकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे देखील सोबत येणार असल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. काल निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला असताना काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला असून वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर थेट सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नेतृत्वाचा अभाव अन् संघटनात्मक अपयश मुंबई महापालिकेचे निकाल काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक राहिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाई जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बीएमसी निवडणुकीचे आकडे काँग्रेसच्या इतिहासात दुर्दैवी आहेत. पक्षाची स्थिती यापूर्वी कधीही इतकी वाईट नव्हती. मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा तीव्र अभाव होता आणि संघटना ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती, तशी ती हाताळली गेली नाही, अशी तोफ त्यांनी डागली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली. भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस दरम्यान, भाई जगताप यांनी माध्यमांमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर केलेली विधाने ही पक्षाच्या नियमावली, शिस्त आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचं नमूद करत काँग्रेसकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये संघटनात्मक कामकाज, नेतृत्व आणि अंतर्गत मतभेद हे पक्षाच्या अंतर्गत मंचांवरच मांडले गेले पाहिजेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते, सामूहिक नेतृत्वाला धक्का बसतो आणि सध्या आवश्यक असलेल्या संघटनात्मक एकतेला बाधा पोहोचते, असा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. ७ दिवसांचा अल्टीमेटम नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश भाई जगताप यांना देण्यात आले आहेत. निर्धारित कालावधीत समाधानकारक उत्तर न दिल्यास, काँग्रेसकडून पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. काँग्रेससमोर मोठे आव्हान मुंबईत भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. काँग्रेसला आता आपल्या मुंबईतील अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशातच दोन बड्या नेत्यांमधील हा वाद चव्हाट्यावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, दिल्लीतील हायकमांड यावर काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ४ वर्षानंतर बुधवारी सुनावणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तब्बल चार वर्षांनंतर २१ जानेवारी रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी होणार आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये उत्साह संचारला असला तरी न्यायालयीन कामकाजाची रणनीती ठरविण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. याबाबत म. ए. समिती नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केले. परंतु, महापालिका निवडणुकीत गुंतलेल्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना अद्याप सवड मिळत नसल्याने मराठी भाषिकांतून संताप […] The post महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ४ वर्षानंतर बुधवारी सुनावणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रम्पना भारताची चपराक; अमेरिकी डाळींवर शुल्क! सिनेटर्सची व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील ‘व्यापार युद्ध’ आता एका अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारतीय वस्तूंवर लादलेल्या करांना आता भारताने ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताने अमेरिकन डाळींवर, विशेषत: पिवळ्या वाटाण्यांवर ३०% आयात शुल्क लावून अमेरिकेच्या कृषी क्षेत्राला मोठा धक्का दिला […] The post ट्रम्पना भारताची चपराक; अमेरिकी डाळींवर शुल्क! सिनेटर्सची व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वॉशिंग्टन/मॉस्को/बिजींग : वृत्तसंस्था जगाच्या नकाशावर उत्तर ध्रुवाजवळ असलेला पांढराशुभ्र ग्रीनलँड आता रक्तरंजित संघर्षाचे केंद्र बनण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड सुरक्षित करण्याच्या हट्टापायी थेट डेन्मार्क आणि नाटो देशांना आव्हान दिले आहे. पण हा संघर्ष केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर आर्क्टिक महासागरातून निर्माण होणा-या नवीन ‘समुद्री कॉरिडॉर्स’वर ताबा मिळवण्यासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, हे […] The post रशियाचे ५० लष्करी तळ सज्ज! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या शक्तिशाली देशांच्या समूहाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठीची अधिकृत वेबसाइट आणि लोगोचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताचा दृष्टिकोन ‘मानवता प्रथम’ आणि ‘लोककेंद्रित’ असल्याचे स्पष्ट केले. ब्रिक्स २०२६ चा लोगो हा […] The post ‘ब्रिक्स’च्या लोगोचे विमोचन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्या. वर्मांवर महाभियोग प्रक्रियेचा मार्ग मोकळा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. यशवंत वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला. लोकसभा अध्यक्षांच्या निर्देशानुसार त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोग प्रक्रिया आणि भ्रष्टाचार आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या संसद समितीच्या वैधतेला आव्हान देणारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. या निकालामुळे आता न्या. वर्मा यांच्याविरुद्धची चौकशी आणि महाभियोग प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती […] The post न्या. वर्मांवर महाभियोग प्रक्रियेचा मार्ग मोकळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रम्पच्या ‘ट्रेड डील’मुळे ११० डॉलर्सचा फटका?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका आणि तैवान यांच्यात नुकताच एक मोठा व्यापारी करार झाला आहे. हा करार ५०० अब्ज डॉलरचा आहे. या अंतर्गत तैवानच्या वस्तूंवर आकारला जाणारा कर (टॅक्स) २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. या बदल्यात, तैवान अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात २५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याव्यतिरिक्त, तैवान परदेशी गुंतवणुकीला पाठबळ देण्यासाठी […] The post ट्रम्पच्या ‘ट्रेड डील’मुळे ११० डॉलर्सचा फटका? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१ एप्रिलपासून होणार टोल नाका ‘कॅश फ्री’
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणा-या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे ‘कॅशलेश’ होणार आहेत. याचाच अर्थ, १ एप्रिलनंतर टोल भरण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. केवळ ‘फास्टॅग’ आणि ‘युपीआय’ हे दोनच पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. केंद्रीय रस्ते वाहतूक […] The post १ एप्रिलपासून होणार टोल नाका ‘कॅश फ्री’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर पुणेकरांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असून, हा जनादेश आनंददायी असला तरी मोठी जबाबदारी आहे, असे फडणवीस म्हणाले. पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका ठरावी यासाठी प्रामाणिक आणि पारदर्शी कारभार करण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र व राज्य शासन पुणे महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही फडणवीस यांनी 'भावी नगरसेवक' असे संबोधून त्यांचे मनोबल वाढवले. फडणवीस म्हणाले की, पुण्यात आपण इतिहास रचला असून, त्याचे तुम्ही सर्व शिल्पकार आहात. गेल्या ३०-३५ वर्षांत पुणे महापालिकेत इतके मोठे बहुमत कोणीही मिळवले नव्हते. पुण्यातील लढत चुरशीची होईल अशी चर्चा होती, पण पुणेकरांनी ती एकतर्फी ठरवली. हा जनादेश जबाबदारीची जाणीव करून देतो. जनतेचा विश्वास सार्थ केल्यास पुढील पंचवीस वर्षे आपल्याला कोणीही हटवू शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी विजयानंतर लगेच पुढील पाच वर्षांचे नियोजन करतात, त्याचप्रमाणे आपल्यालाही पुढील पाच वर्षांच्या विकासकामांचे नियोजन करायचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पुण्यासाठी मांडलेल्या विकास योजनांमुळे पुणेकर आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. नियोजित केलेल्या योजनांचे प्रत्यक्ष काम दोन वर्षांत सुरू होईल, असे नियोजन करून काम करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. पुणे महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी झपाटून काम करावे. महापालिका हा सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा उपक्रम आहे, आपला व्यवसाय किंवा कमिशनचा धंदा नाही, असे स्पष्ट करत फडणवीस यांनी कठोर शब्दांत सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल, ती पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला तरी, कोणाचाही उन्माद किंवा गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विद्यार्थी साहाय्यक समिती आणि परांजपे कुटुंबीयांतर्फे वसुधा परांजपे स्मृती समाजसेवा पुरस्कार क्रांती फाऊंडेशनच्या संस्थापक सुनीताताई भोसले यांना, तर वसुधा परांजपे स्मृती शिक्षणसेवा पुरस्कार उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक मंगेशीताई मून यांना प्रदान करण्यात आला. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी सामाजिक कार्यासाठी ध्येयासक्त, समर्पित आणि सेवाभावी वृत्तीची गरज असल्याचे प्रतिपादन केले. हा पुरस्कार फर्ग्युसन रस्त्यावरील समितीच्या मोडक सभागृहात आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, मानपत्र व पुष्पगुच्छ असे होते. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ना. परांजपे आणि समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर व्यासपीठावर उपस्थित होते. अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, कुठल्याही गोष्टीचा ध्यास घेऊन समर्पण वृत्तीने सतत कार्यरत राहणे, हे महाराष्ट्राचे वेगळेपण आणि वैभव आहे. मंगेशीताई मून आणि सुनीताताई भोसले यांच्यासारख्या भगिनींच्या कार्यातून ही वृत्ती दिसून येते. हे वैभव वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते पुढे म्हणाले की, एकेकाळी भारत जगातले सर्वाधिक समृद्ध शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखला जात होता. तक्षशिला, नालंदा यांसारखी ज्ञानाची केंद्रे जगभरातील जिज्ञासूंना आकर्षित करत होती. मधल्या काळात ही परंपरा खंडित झाली. आता पुन्हा त्या प्राचीन समृद्ध ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चाणक्य मंडलच्या माध्यमातून कार्यकर्ता अधिकारी घडवण्याचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी नमूद केले. मंगेशीताई मून यांनी उमेद संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, रस्त्यावरच्या अनाथ मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य उमेद संस्थेच्या माध्यमातून केले जाते. ही मुले शिक्षणाच्या माध्यमातून जबाबदार समाजघटक बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मुले शिक्षण घेऊन उत्तम काम करत आहेत, तर काही क्रीडा क्षेत्रात चमकत आहेत. सुनीताताई भोसले यांनी फासेपारधी समाजातील आपल्या अनुभवांबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, जन्मतःच आम्हाला गुन्हेगार मानले जाते. आईमुळे शिक्षणाचे महत्त्व समजले आणि महापुरुषांचे चरित्र कळले. शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांचे कार्य उमगल्याने आता सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे येथील श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक माघी महोत्सव सोमवार, १९ जानेवारी ते शनिवार, २४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्काराचे वितरणही होणार आहे. यंदाचा श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार चेन्नईचे महामहोपाध्याय आर. मणि द्राविड शास्त्री आणि तिरुपतीचे डॉ. कुटुंब शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात पार पडेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही माहिती श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत आणि आशिष कुलकर्णी उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार, १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्री ब्रम्हणस्पती सूक्त पठण होईल. सायंकाळी ६ वाजता सुहास हिरेमठ यांचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता व्हायोलिन वादक राजस उपाध्ये आणि संतूर वादक निनाद दैठणकर यांची व्हायोलिन-संतूर जुगलबंदी सादर होईल. मंगळवार, २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्रीसूक्त पठण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. गुरुदास नुलकर ‘निसर्ग संवर्धन आणि स्व-सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान देतील. रात्री ८ वाजता सीए ऋषिकेश बडवे यांचे शास्त्रीय गायन होईल. बुधवार, २१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम ‘ज्योतीने तेजाची आरती’ या विषयावर व्याख्यान देतील. रात्री ८ वाजता वृषाली मावलंकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे सुगम व भक्तिसंगीताचे कार्यक्रम सादर होतील. गुरुवार, २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गणेशयाग होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. अंजली पर्वते यांचे ‘प्राचीन भारतातील तेजस्वी स्त्रिया’ या विषयावर व्याख्यान होईल. रात्री ८ वाजता राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरीवादन सादर केले जाईल. महोत्सवाचा समारोप शनिवार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाने होईल. हे सर्व कार्यक्रम सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहेत.
भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे आता क्विक कॉमर्सचेही केंद्र बनले आहे. ‘हाऊ इंडिया इन्स्टामार्टेड 2025’ या अहवालानुसार, देशातील सर्वात जलद आयफोन डिलिव्हरीचा विक्रम यंदा पुण्यात नोंदवण्यात आला. अवघ्या 3 मिनिटांत एका ग्राहकाला नव्या कोऱ्या आयफोनची डिलिव्हरी मिळाली. पुणेकरांची खरेदीची आवड केवळ वेगापुरती मर्यादित नसून, खर्च करण्याची त्यांची तयारीही मोठी आहे. शहरातील एका इन्स्टामार्ट ग्राहकाने वर्षभरात तब्बल 13 लाख रुपये खर्च करून सर्वाधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा मान पटकावला. या खरेदीमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून स्नॅक्स, लाइफस्टाइल उत्पादने आणि सणासुदीच्या खरेदीचा समावेश होता. विशेष म्हणजे, एका इन्स्टामार्ट अकाउंटवरून केवळ बटाटा चिप्ससाठीच 1.5 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. स्नॅक्सप्रमाणेच पुणेकरांचा फिटनेसकडेही ओढा वाढलेला दिसतो. 2025 मध्ये स्पोर्ट्स आणि फिटनेस या श्रेणीत 475 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे पुणे आरोग्य आणि वेलनेससाठी जागरूक शहर म्हणून पुढे आले आहे. स्विगीचे चीफ बिझनेस ऑफिसर हरी कुमार गोपीनाथन यांनी सांगितले की, “क्विक कॉमर्स आता केवळ तातडीच्या गरजांपुरता मर्यादित राहिलेला नाही. दैनंदिन वस्तूंपासून प्रीमियम खरेदीपर्यंत, इन्स्टामार्ट आधुनिक भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे.” रात्री उशिरा होणाऱ्या खरेदीत पुणेकर दही आणि मिनरल वॉटरला पसंती देतात. घरगुती स्वयंपाकासोबतच जागतिक चवींचाही प्रयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सणासुदीच्या ‘क्विक इंडिया मुव्हमेंट’ सेलदरम्यान मखाणा, कोरियन सॉसेस आणि नाचोजची विक्री लक्षणीय वाढली. 2025 मध्ये पुणे केवळ किराणा खरेदीपुरते मर्यादित न राहता इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, मेकअप आणि वाहन देखभाल अशा विविध श्रेणींमध्ये झपाट्याने पुढे गेले आहे. वेग, सोय आणि विश्वासार्हता यामुळे पुणे खऱ्या अर्थाने ‘इन्स्टामार्टेड’ झाले आहे.
'पुणे ग्रँड टूर' जागतिक सायकल स्पर्धेच्या स्वागत समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पुणे जागतिक स्तरावर खेळ आणि पर्यटन क्षेत्रात नावारूपास येईल. या स्पर्धेत ३५ देशांतील १७० आंतरराष्ट्रीय सायकलस्वार सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर आहे, तसेच ते आयटी हब आणि देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे. पश्चिम घाटातील अद्भुत निसर्गसौंदर्यही 'पुणे ग्रँड टूर' स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धकांना पाहता येईल. ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाईल, ज्यामुळे पुण्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर नवीन ओळख निर्माण होईल. ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान चार टप्प्यांत ४३७ किलोमीटर अंतरावर पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी पुणेकर उत्सुक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, क्रीडा आयुक्त शीतल तेली, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि विनाकुमार चौबे उपस्थित होते. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, 'पुणे ग्रँड टूर' स्पर्धेत ३५ देशांतील सायकलस्वारांचा सहभाग ही अभिमानास्पद बाब आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. ४३७ किलोमीटरचा हा रस्ता केवळ एक मार्ग म्हणून विकसित केला नसून, तो अल्पावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनवण्यात आला आहे, ज्यामुळे संबंधित भागातील उद्योगांनाही चालना मिळेल. हा केवळ एक उपक्रम नसून, पुढील १०० वर्षांपर्यंत लक्षात राहील अशा प्रकारे तो यशस्वी केला जाईल.
आयुर्वेदात अनेक चमत्कार असले तरी ते अजूनही सामान्य माणसांपर्यंत पोहोचलेले नाहीत. आयुर्वेदात अपार ताकद असून, त्याला कोणताही पर्याय नाही. केवळ भारतातच नव्हे, तर जगातही आयुर्वेद नंबर एक आहे. मात्र, त्यासाठी सामान्य माणसाने आयुर्वेदावर विश्वास ठेवून तो कृतीत उतरवला पाहिजे, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे यंदाचा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन वैद्यकीय पुरस्कार मुंबईचे वैद्य नरेंद्र भट्ट यांना प्रदान करण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्याचे हे ४१ वे वर्ष होते. याप्रसंगी वैद्य विनायक परशुराम वैद्य खडीवाले, संगीता विनायक वैद्य खडीवाले, वैद्य विवेक साने, वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. मुख्य पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे होते. आयुर्वेद, वनस्पती शास्त्र, रसशास्त्र, चिकित्सा इत्यादी विविध आयामांमध्ये महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वैद्यांना वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेतर्फे या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रशांत दामले यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवाविषयी सांगितले की, नाटकाच्या कामामुळे त्यांचा दिनक्रम निसर्गाविरोधी असतो, ज्यामुळे शरीरावर परिणाम दिसू लागले होते. मात्र, २००८ पासून सातत्याने आयुर्वेदाचे पालन केल्यामुळे त्यांना आजपर्यंत पित्ताचा त्रास झाला नाही. आयुर्वेदात संयम महत्त्वाचा असून, तात्काळ परिणामांची अपेक्षा न करता सातत्य ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. आज मेडिकल कॉलेजसाठी ६० ते ७० लाख रुपये खर्च येतो आणि डॉक्टर झाल्यानंतर तो खर्च वसूल करण्याची मानसिकता तयार होते. यामुळे आपण हॉस्पिटलच्या दृष्टचक्रात अडकतो. स्वतःची तब्येत स्वतः सांभाळणे गरजेचे आहे. आयुर्वेद आपल्याला स्वतःच्या शरीराची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकवतो, असे दामले म्हणाले. वैद्य नरेंद्र भट्ट यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आयुर्वेद पुनरुज्जीवित करायचा असेल, तर निसर्गाकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही. आयुर्वेद सांगतो की प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, प्रत्येक प्रकृती स्वतंत्र आहे. त्यामुळे एकसारख्या उपचारांची चौकट आयुर्वेदाला मान्य नाही. आयुर्वेद वाचवायचा असेल, तर आयुर्वेदाचे रुग्णही डॉक्टर झाले पाहिजेत, म्हणजेच समाजाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. आपली तंत्रे, आपली रचना, आपली संस्कृती आणि आपली शिक्षणपद्धती या सर्वांनी डॉक्टरांसारखा विचार केला पाहिजे. जर आपण सर्वांगीण आणि समग्र दृष्टिकोन ठेवला, तर एआयचा उपयोग आयुर्वेद आणि मानवतेच्या सेवेसाठी निश्चितच करता येईल. आयुर्वेद क्षेत्रातही गुंतवणूक अपरिहार्य असून, ती गुंतवणूक विश्वास आणि विकास या दोन पातळ्यांवर असली पाहिजे, कारण शेवटी ही गुंतवणूक रुग्णासाठी असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी 'पर्यावरण संतुलित पुणे' ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्याचा विश्वास व्यक्त केला. भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचा वसा जपण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंहगड रस्त्यावरील कलाग्राम, पु.ल. देशपांडे उद्यान येथे स्फूर्ती फाउंडेशनतर्फे आयोजित 'द बिग ग्रीन फेस्ट २०२६' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निसर्ग छायाचित्रकार डॉ. इराक भरुचा, गोखले इन्स्टिट्यूटमधील शाश्वत विकास केंद्राचे संचालक डॉ. गुरुदास नूलकर, सुहाना प्रवीण मसाले उद्योग समूहाचे आनंद चोरडिया, ज्येष्ठ उद्योजक सतीश मगर, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या पूर्वा केसकर आणि स्फूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅड. वंदना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेली 'द ग्रीन डिक्लरेशन' ही पुस्तिका मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. या पुस्तिकेत भविष्यातील पृथ्वी कशी असावी, याविषयी विद्यार्थ्यांचे विचार मांडले आहेत. या महोत्सवात शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल या विषयांवर विविध उपक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक संस्था आणि शाळा यामध्ये सहभागी झाल्या आहेत. 'हरित बगीचा', 'विरासत', 'इको निर्माण', 'वेस्ट की पाठशाळा', 'मंथन बॉक्स', 'सूर फॉर सस्टेनबीलीटी', 'द ग्रीन गुरूकुल', 'इको मार्केट प्लेस', 'चेंज मार्कर हब' अशा विविध उपशिर्षकांतर्गत प्रकल्प सादर करण्यात आले. पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वृत्तपत्रे, समाजमाध्यमे आणि तंत्रज्ञानामुळे आजची पिढी पर्यावरणाबाबत अधिक सजग आहे. पुणे शहरात पर्यावरणपूरक दृष्टिकोन रुजवण्यासाठी पुणे मनपा प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक दृढ केला जाईल. प्रभाग स्तरावर बालसभांचे आयोजन करण्यात येईल. लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून मनपा स्तरावर एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, जो चांगल्या संकल्पना सुचवेल. डॉ. गुरुदास नूलकर यांनी हवामान बदलाला एक मोठी समस्या म्हटले. आपल्या पिढीने केलेल्या निसर्गाच्या पिळवणुकीमुळे हा प्रश्न निर्माण झाला असून, यावर वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
छांगुरबाबा धर्मांतरण प्रकरणात नागपूर कनेक्शन उघड:फरार आरोपी इरदुल इस्लामला यू.पी. एटीएसने केली अटक
छांगुरबाबाच्या धर्मांतरण नेटवर्कचे नागपूर कनेक्शन समोर आले आहे. राजस्थान, लखनऊ, बलरामपूर आणि पुण्यानंतर आता नागपूरमध्येही या प्रकरणाची पाळेमुळे आढळली आहेत. आशी नगर येथील गवसीया मशीदजवळ राहणाऱ्या इरदुल इस्लाम वल्द गुलाम येजदानी याला उत्तर प्रदेश एटीएसने नागपूर एटीएस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. शनिवारी पहाटे ५.३० वाजता त्याच्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इरदुल इस्लाम हा छांगुरबाबा प्रकरणात फरार होता. त्याच्याविरोधात उत्तर प्रदेश एटीएसने अटक वॉरंट जारी केले होते आणि तेव्हापासून ते त्याच्या शोधात होते. इरदुल इस्लाम मूळचा नागपूरचा असून, तो गौसीया मशिदजवळ पत्नी, आई-वडील आणि लहान भावासह राहतो. इरदुल इस्लाम वल्द गुलाम येजदानी याचा सोलर पॅनेल इन्स्टॉलेशनचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या निमित्ताने तो भारतभर प्रवास करत असे. याच दरम्यान तो छांगुरबाबाच्या संपर्कात आला. छांगुरबाबाच्या आश्रमातील सोलर पॅनेल इन्स्टॉलेशनचे काम मिळाल्याने आपण संपर्कात आलो, धर्मांतरण प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, असे इरदुल इस्लाम येजदानीचे म्हणणे आहे. मात्र, इरदुल इस्लाम येजदानीच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. हा पैसा कुठून आला, याबाबत एटीएसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एटीएसला या व्यवहारांमागे धर्मांतरणासाठी वापरलेल्या पैशांचा संशय आहे. इरदुल इस्लाम नागपुरात येणार असल्याची माहिती नागपूर एटीएसला मिळाली होती. त्यानंतर दोन दिवसांपासून त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तो नागपूरला आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर एटीएस आणि जरीपटका पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास त्याला अटक करून लखनऊ एटीएसच्या ताब्यात देण्यात आले. लखनऊ न्यायालयाने त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट काढले होते. दुपारी त्याला न्यायालयात हजर करून ट्रान्झिट पी.सी. मिळवण्यात आला. छांगुरबाबा अनेक वर्षांपासून धर्मांतरणाचे सिंडिकेट चालवत होता. धर्मांतरासाठी त्याला आखाती देशांमधून कोट्यवधी रुपये मिळत असत. उत्तर प्रदेश पोलिसांनी जमालुद्दीन उर्फ छांगुरबाबा याच्यावर धर्मांतराचा आरोप लावला आहे. छांगुरबाबा हा बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला तहसीलमध्ये असलेल्या रेहरा माफी गावचा रहिवासी आहे. धर्मांतरण रॅकेट प्रकरणात सध्या तो आणि त्याची सहकारी नीत रोहरा उर्फ नसरीन यांना अटक करण्यात आली आहे. तरुणींना फूस लावून छांगुरबाबा त्यांचे धर्मांतर घडवून आणत असे. या नेटवर्कला परदेशातून १०० कोटी रुपयांची मदत मिळाल्याची माहिती उघडकीस आली आहे.
पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शहरात विजयी जल्लोष सुरू असतानाच गांधीनगर भागात राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्यांनी व दगडाने हल्ला झाल्याचे वृत्त आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया हे देखील याच प्रभागातून निवडणूक लढवत होते. तुमच्यामुळेच माझा पराभव झाला, […] The post पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चिकणी तांडा येथे मुलाकडून वडीलांचा दगड डोक्यात घालून खून
धाराशिव : प्रतिनिधी दुसरे लग्न केले तसेच पहिल्या पत्नी चे कुटुंब नियोजन ऑपरेशन केले नाही या कारणावरून जन्मदात्या वडीलांचा डोक्यात दगड घालून खून केला. हि खळबळजनक घटना तुळजापूर तालुक्यातील अणदूर शिवारात चि कणी तांडा येथील शेतात शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली . याप्रकरणी आरोपी मुलावर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे […] The post चिकणी तांडा येथे मुलाकडून वडीलांचा दगड डोक्यात घालून खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने दणदणीत विजय मिळवला असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे. या 'पानिपत'नंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी सर्व निवडणुका 'बॅलेट पेपर'वर घेण्याची मागणी केली आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा लागेल, असे मत मिटकरी यांनी व्यक्त केले. राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निकालांत भाजपला सर्वाधिक यश मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ अहिल्यानगरमध्ये चांगले यश प्राप्त झाले. मात्र, त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यातील यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी करत, विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या या मागणीमुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ईव्हीएमवरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पराभवावर आश्चर्य व्यक्त करताना मिटकरी म्हणाले, दोन्ही शहरांत प्रचंड काम करूनही आमचा पराभव कसा होऊ शकतो? ईव्हीएमचा फायदा काही ठराविक पक्षांनाच कसा होतो, हा मोठा प्रश्न आहे. सरकार आणि निवडणूक आयोगाला जनतेचा विश्वास टिकवून ठेवायचा असेल, तर बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. पवार कुटुंबियांच्या बैठकीवर स्पष्टीकरण दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीवर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ही बैठक दैनंदिन प्रक्रियेचा भाग होती. कुटुंब म्हणून पवार कुटुंब नेहमीच एक आहे, मात्र राजकीय एकत्रिकरणाचा निर्णय हा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हेच घेतील. २९ पैकी २४ महापालिकांवर महायुतीचा झेंडा शुक्रवारी (१६ जानेवारी) जाहीर झालेल्या महानगरपालिकांच्या निकालात भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एकूण २९ पैकी २४ महापालिकांवर भाजप-शिंदेसेना युतीने वर्चस्व मिळवले असून, ९ ठिकाणी भाजपने स्वबळावर सत्ता स्थापनेचा आकडा गाठला आहे. भाजप हा राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला असून, जवळपास सर्वच ठिकाणी त्यांच्या जागा वाढल्या आहेत. याउलट उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेला आपल्या जुन्या जागा टिकवण्यातही अपयश आले आहे.
दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने ‘लाडकी’चा संताप
भंडारा : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात महिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच […] The post दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने ‘लाडकी’चा संताप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
६ नगरसेवक सत्ताधा-यांना पुरून उरतील!
मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीत मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेला राज्यात सर्वाधिक यश हे मुंबईत मिळाले आहे. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेच्या ५ नगरसेवकांनी बाजी मारली आहे. नवी मुंबईमध्येही एक मनसैनिक निवडून आला आहे. या महापालिकांशिवाय अन्य महापालिकांमध्ये मनसेला खातेही उघडता आलेले नाही. मिनी विधानसभा समजल्या जाणा-या महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला अपेक्षित असे यश मिळाले […] The post ६ नगरसेवक सत्ताधा-यांना पुरून उरतील! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिन्यातून दोनदा बसस्थानकांत स्वच्छता मोहीम
मुंबई : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. यामुळे स्वत: परिवहन विभागानेच याबाबत कंबर कसली आहे. बसस्थानकांच्या संपूर्ण आवारात, तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये आता दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आता देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिक, तसेच एसटीचे अधिकारी व कर्मचा-यांच्या सहभागातून ही […] The post महिन्यातून दोनदा बसस्थानकांत स्वच्छता मोहीम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयच्या (CSMVS) चिल्ड्रन्स म्युझियमतर्फे ‘म्युझियम्स अॅज क्लासरूम्स: एक्सप्लोरिंग नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ या विषयावरची शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी नालंदा लर्निंग सेंटर, CSMVS पार पडली. ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट: अ स्टडी गॅलरी ऑफ इंडिया अँड द एन्शंट वर्ल्ड’ या अभ्यास दालनाच्या माध्यमातून संग्रहालयाला एक सजीव आणि प्रभावी वर्गखोली म्हणून नव्याने मांडण्याचा उद्देश या कार्यशाळेचा होता. परस्परसंवादी इतिहास, वस्तू आणि शिक्षणाच्या विविध शक्यतांचा शोध घेत या कार्यशाळेची सांगता झाली. कशासाठी आयोजन? मुंबईतले छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयतले चिल्ड्रन्स म्युझियम इतिहास, संस्कृती आणि आधुनिक शिक्षणपद्धतीला जोडण्याचे काम कारते. त्यासाठी विविध प्रदर्शन, कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करते. ही कार्यशाळा सुद्धा संग्रहालय आणि शाळांमधील सहकार्य बळकट करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण, चौकशी-आधारित शिक्षण अनुभव विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले वस्तू-आधारित (Object-based) आणि चौकशी-आधारित (Inquiry-led) शिक्षणपद्धतीवर भर देत, विद्यार्थ्यांना संग्रहालयातील वस्तूंशी प्रश्नोत्तर, अर्थलावणे, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे कसे जोडता येते, याचे प्रात्यक्षिक या प्रशिक्षणात दाखविण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) यानुसार अनुभवाधारित व कौशल्याधिष्ठित शिक्षण कसे राबविता येईल, यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. समज वाढवण्याची पद्धती कार्यशाळेत अनुभवाधारित व चौकशी-आधारित शिक्षणाची रचना, इतिहास, कला, भूगोल, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांचा आंतरशाखीय समन्वय, तसेच संग्रहालयातील वस्तूंचा प्राथमिक शिक्षणस्रोत म्हणून वापर करून संकल्पनात्मक समज वाढविण्याच्या पद्धती यांचा समावेश होता. याशिवाय NCF मधील इयत्तानिहाय कौशल्ये आणि अभ्यासक्रम विषयांशी संग्रहालय-आधारित शिक्षण कसे संलग्न करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यात आले. संग्रहालयांची भूमिका सांगितली दोन तासांच्या या कार्यशाळेत शिक्षक, अभ्यासक्रम विकासक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक अशा एकूण ३० सहभागी उपस्थित होते. ही कार्यशाळा वैदेही सावनल, सहाय्यक संचालक – प्रदर्शने, शिक्षण व सार्वजनिक कार्यक्रम, CSMVS यांनी मार्गदर्शित केली. यावेळी त्यांनी सहभागींसोबत संवाद साधत आधुनिक शिक्षणप्रक्रियेत संग्रहालयांची भूमिका अधोरेखित केली. कार्यशाळेबद्दल शिक्षक म्हणाले... प्राचीन इतिहासाशी संबंधित संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचवता येतील, यावर विचार करण्याची संधी या प्रशिक्षणामुळे मिळाली. हा अनुभव अत्यंत प्रेरणादायी ठरला.- आर्या घोटीकर, प्राध्यापिका, फर्ग्युसन कॉलेज, पुणे म्युझियम क्लासरूम’ ही संकल्पना अत्यंत प्रभावी आहे. इतिहास विद्यार्थ्यांना विविध आणि रंजक पद्धतीने शिकवता येतो, याची जाणीव या कार्यशाळेमुळे झाली.- धीरज जाधव, कला शिक्षक, पुणे आजची कार्यशाळा आमच्यासाठी अत्यंत अनोखा अनुभव ठरली. इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावी आणि सोप्या पद्धतीने कसा पोहोचवता येईल, याबाबत या प्रशिक्षणातून मोलाचे मार्गदर्शन मिळाले.- माया दिवाकर, शिक्षिका इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत नव्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने कसा पोहोचवता येईल, याबाबत येथे उपयुक्त माहिती मिळाली. ही कार्यशाळा अनुभवण्यासाठी सुरतहून येणे सार्थ ठरले.- सुखजित कौर रोहिल्ला, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ हे दालन विद्यार्थ्यांना इतिहास शिकवणे अधिक सोपे करते. प्राचीन भारताविषयी इतक्या व्यापक स्वरूपात माहिती मिळणे ही आमच्यासाठी पर्वणी आहे.- प्रिया चुघ, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत इतिहास अधिक रंजक आणि संशोधनात्मक पद्धतीने शिकविण्यासाठी येथे मिळालेले मार्गदर्शन आम्ही निश्चितच वर्गात वापरणार आहोत.- विनीथा गोविंदन, दिल्ली पब्लिक स्कूल, सुरत
राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग महाराष्ट्रातच EVM चा हट्ट का? व कोणाच्या फायद्यासाठी? असे प्रश्न मतदार विचारात आहेत. या जनभावनेचा आदर करत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणाले की, मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत VVPAT प्रणालीचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला, त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती. या साऱ्या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतीला पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लोकशाहीच्या कणा आहेत, या निवडणुकीबाबत जर संशय, अविश्वास आणि गैरव्यवस्थेचे वातावरण राहिले तर ते लोकशाहीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे आहे म्हणून जनभावनेचा विचार करून या निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असे नाना पटोले या पत्रात म्हणाले आहेत.
देवाच्या मनात असेल, मुंबई आपला महापौर होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. वरच्या देवाने ठरवले की, महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे आमचाच महापौर होईल, असे ते म्हणाले. तसेच महापौर कुणाला करायचे शिंदे आणि आम्ही मिळून ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशातील सर्वात श्रीमंत आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर अखेर 25 वर्षांनंतर ठाकरे कुटुंबाची एकहाती सत्ता संपुष्टात आली आहे. या बहुचर्चित निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने एकूण 118 जागांसह बहुमताचा 114 चा आकडा पार करत मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे आता मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुंबईचा महापौर कुणाला करायचे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त विधान केले. ते आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? देवाच्या मनात असेल, मुंबई आपला महापौर होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले होते. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, देवाच्या म्हणजे माझ्या की, वरच्या देवाच्या? असा मिश्किल प्रश्न केला. ते पुढे म्हणाले, वरच्या देवाने ठरवले की, महायुतीचा महापौर करायचा आहे. त्यामुळे आमचाच महापौर होईल. मुंबईचा महापौर कोण होणार? कधी होणार? किती वर्षे वाटून घ्यायचे? या सगळ्या गोष्टी शिंदे आणि मी, आणि आमचे दोन्हीकडील नेते मंडळी सगळे बसवून ठरवू. त्यात काही वाद येणार नाही. आम्ही दोन्ही पक्ष छान पद्धतीने मुंबई चालवून दाखवू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. संजय राऊत आणि शिंदे गटावर भाष्य मुंबईत भाजप युतीला ११९ जागा मिळालेल्या आहेत. जवळपास आमच्या १४ जागा अतिशय कमी मतांनी हारलो आहोत. एवढ्या जागा एकत्रित शिवसेनेला देखील कधी मिळाल्या नव्हत्या. त्यांच्या तीनही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे. पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलो आहोत. त्यामुळे कोण काय म्हणतं? गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी, असे म्हणणारे खूप लोक असतात. त्यावर फार काही बोलायचे नसते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. शिवसेना शिंदे गटाच्या निवडणुकीतील कामगिरीवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. आमच्यासारखेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या काही जागा कमी मतांनी गेल्या आहेत. मुंबईत पहिल्यांदाज तेही अशा पद्धतीने निवडणूक लढत होते. त्यामानाने त्यांना चांगले यश आले. अपेक्षा यापेक्षा जास्त होती, पण काही जागा या थोड्या मतांनी गेलेल्या दिसतायत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मनसे ही या निवडणुकीतील 'बिगेस्ट लूझर ठाकरे बंधुंच्या युतीमध्ये बिगेस्ट लूझर मनसे राहील, असे मला राजकीयदृष्ट्या दिसत होते. माझे भाकीत या निवडणुकीने स्पष्ट केले आहे. मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना झालेला दिसतोय, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना लगावला. अजितदादा कॅबिनेट बैठकीला गैरहजर का? उपमुख्यमंत्री अजित पवार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होते. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मतदानाच्या दिवशी रात्री अजित पवार माझ्याकडे येऊन गेले होते. त्यादिवशीच त्यांनी सांगितले होते की, माझ्याकडे राज्यपाल महोदय येणार आहेत. त्यामुळे मी मंत्रिमंडळाला बैठकीला येऊ शकणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने बहुमत मिळवत, २५ वर्षांपासूनची ठाकरेंची सत्ता उलथवून टाकली. याचदरम्यान AIMIM पक्षाने देखील चांगली कामगिरी करत, ८ नगरसेवक निवडून आणले. आता महापौरपदाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, AIMIM पक्ष कोणला पाठिंबा देणार? याबाबत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. मुंबई महानगरपालिकेत भाजप किंवा उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असताना, ओवेसी यांनी AIMIMच्या भूमिकेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. नेमके काय म्हणाले ओवेसी? मुंबईत एमआयएमचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय वैयक्तिक स्तरावर घेता येणार नाही, असे ओवेसींनी बजावले आहे. महापालिकेत कोणासोबत जायचे किंवा नाही, हा निर्णय सर्वस्वी पक्ष पातळीवर घेतला जाईल. जर एखाद्या नगरसेवकाने पक्षाची 'लाईन' सोडून स्वतंत्र निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील ओवेसी यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून इशारा एमआयएमचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही, असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले. जर कोणी आमच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला, तर पक्ष त्याविरोधात ठोस पावले उचलेल. कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेतला जाणार नाही. बिहारमध्येही आमचा पक्ष तोडण्याचे प्रयत्न झाले, पण जनतेने त्यांना धडा शिकवला आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. सर्व समुदायांचे मानले आभार आमच्या विजयात केवळ मुस्लीमच नव्हे, तर हिंदू बांधव, दलित आणि इतर समुदायांचेही मोठे योगदान आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे, असे म्हणत ओवेसी यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभागात उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकाने विजय मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. महाराष्ट्रात एमआयएमची मोठी झेप ओवेसी यांनी यावेळी महाराष्ट्रातील एमआयएमच्या कामगिरीचा आढावा मांडला. संपूर्ण महाराष्ट्रातून एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत ८, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३, तर अमरावती आणि अकोला येथेही पक्षाला चांगले यश मिळाले आहे, असे त्यांनी सांगितलै.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी, आमच्यात आणि भाजपमध्ये मूलभूत फरक आहे. त्यांना वाटतं कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत, असा खणखणीत टोला लगावला. भाजप आणि शिंदे गट जमिनीवर राहू शकत नाहीत, हेच त्यांचं अपयश असल्याचंही त्यांनी सूचित केलं. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असं म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचं संकेत दिले. मात्र, त्यांनी सत्तेच्या गणितांपेक्षा लढ्याच्या मूल्यांवर अधिक भर दिला. गद्दारी करून जो विजय मिळवला जातो, तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या पापाला मराठी माणूस कधीही माफ करणार नाही, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं कौतुक करत विजयाचं संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांनाच दिलं. या निकालाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त ठरलो, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा गौरव केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जो निकाल लागला, तो अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांचा दबाव आणि साम-दाम-दंड-भेद या सगळ्या गोष्टी असूनही शिवसैनिकांनी जिद्दीने लढा दिला, याचा आपल्याला अभिमान असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी गद्दारीच्या मुद्द्यावरही थेट हल्ला चढवला. गद्दार निघून गेले, पण ते आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. आपण सर्व शिवसैनिकांना मानाचा मुजरा करतो, कारण या लढाईनंतर प्रत्येकाची जबाबदारी अधिक वाढली आहे, असं त्यांनी नमूद केलं. सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण जिंकता येईल, असा गैरसमज काहींनी करून घेतला, पण निष्ठा आणि जिद्द पैशाने विकत घेता येत नाही, हे या निकालातून पुन्हा सिद्ध झालं, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी सांगितलं की, निवडणूक प्रचारादरम्यान आपण कार्यकर्त्यांना कोणत्याही विशेष सोयी-सुविधा देऊ शकलो नाही. आपल्याकडे तन-मन आहे, त्यांच्याकडे फक्त धन आहे, असं म्हणत त्यांनी संघर्षातील तफावत अधोरेखित केली. तरीही कार्यकर्त्यांनी केवळ शक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विरोधकांना घाम फोडला, असं त्यांनी सांगितलं. हीच ताकद भविष्यातही एकत्र ठेवा, कारण पुढच्या पिढीलाही तुमचा अभिमान वाटला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी विजयाचं श्रेय स्वतःकडे न घेता पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या चरणी अर्पण केलं. मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन हा विजय तुम्हालाच समर्पित करतो, असं भावनिक विधान त्यांनी केलं. ही लढाई अजून संपलेली नाही, तर ती केवळ एका टप्प्यावर आली आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. जिद्द हा सर्वात मोठा भांडवल असून ती कोणीही विकत घेऊ शकत नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. भविष्यातील राजकीय संघर्षाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. जिद्दीच्या जोरावर आणि निष्ठेच्या बळावर आपण पुन्हा जिंकू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. सत्ता येते-जात असते, पण शिवसेनेची ओळख ही जमिनीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांमुळे कायम आहे, असं सांगत त्यांनी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश दिला. मातोश्रीवर झालेल्या या भेटीतून ठाकरे गटाने पराभवानंतरही आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली, तर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभव स्वीकारावा लागला. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील 29 महापालिकांपैकी सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताच भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीही तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मुंबईतील सत्तांतरासाठी थेट एकनाथ शिंदेंना जबाबदार धरत अत्यंत जहाल शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते, तर भाजपच्या शंभर पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता, असा आरोप त्यांनी केला. मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवून त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवणाऱ्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या अवलादी असल्याचा घणाघाती हल्ला राऊतांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं असून भाजपकडून तत्काळ पलटवार करण्यात आला. या टीकेवर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असा आरोप केला होता. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, काहींना चंगेज मुलतानींच्या घशात घालणं चालतं, बुरखेवाली मानसिकता चालते; पण अदानींसारख्या उद्योगपतींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होतो, ते यांना मान्य नाही. मुंबईचा विकास करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं आम्हाला मान्य आहे, पण जिहादी विचारधारेच्या घशात मुंबई घालणं आम्हाला कधीही मान्य नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. राऊत यांनी शिंदे जयचंद नसते तर भाजपचा महापौर बसला नसता या विधानावरही नितेश राणे भडकले. त्यांनी ठाकरे बंधूंवर थेट गद्दारीचा आरोप करत ऐतिहासिक संदर्भांचा वापर केला. ज्या शिर्केने छत्रपती संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि संगमेश्वरला त्यांना पकडण्यात मदत केली, त्यांच्यात आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीच फरक नाही, अशी अत्यंत आक्रमक तुलना राणेंनी केली. या विधानामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर हिंदू समाजात फूट पाडण्याचाही आरोप केला. पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट मुंबईत वाचून दाखवण्याचं काम हे लोक करत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या, असं म्हणत त्यांनी राऊत आणि ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा ज्यांची दाढी कुरवाळत होते, त्यांनाच जाऊन उत्तर द्या, असा सल्लाही राणेंनी दिला. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा निकाल केवळ सत्तांतरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो मराठी अस्मिता, हिंदुत्व, विकास आणि राजकीय निष्ठा या मुद्द्यांभोवती केंद्रित होताना दिसत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या विजयानंतर ठाकरे गटाकडून भावनिक आणि आक्रमक प्रतिक्रिया येत असताना, भाजप नेतेही तितक्याच धारदार भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. यामुळे येत्या काळात विधानसभेपासून लोकसभेपर्यंत या वादाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. एकीकडे भाजप राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये सत्ता मिळवून आपलं वर्चस्व अधोरेखित करत असताना, दुसरीकडे ठाकरे गट आक्रमक भूमिकेतून राजकीय संघर्ष अधिक तीव्र करत असल्याचं चित्र आहे. राऊत आणि राणेंमधील शब्दयुद्ध हे केवळ दोन नेत्यांमधील संघर्ष नसून, मुंबई आणि महाराष्ट्राच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या दीर्घ राजकीय लढाईचं प्रतीक मानलं जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असले, तरी या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं ते वेगळ्याच कारणामुळे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, हे या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले. विशेष म्हणजे, दोघेही राज्यातच उपस्थित असतानाही त्यांनी बैठकीस हजेरी लावली नाही. एकनाथ शिंदे मुंबईत तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेटला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर निर्माण झालेली अस्वस्थता आणि नाराजी याचं प्रतिबिंब थेट प्रशासनावर पडतंय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील सत्तासमीकरणं ढवळून निघाली आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष, नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची सुरू असलेली ‘हॉटेल पॉलिटिक्स’ आणि त्याचवेळी कॅबिनेट बैठकीकडे दुर्लक्ष, या सगळ्या घडामोडी एकमेकांशी जोडल्या जात आहेत. निवडणुकीतील अपेक्षाभंगामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे का, महायुतीतील अंतर्गत समन्वयाला तडे गेलेत का, असे सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. एकीकडे सत्तास्थापन टिकवण्यासाठी आटापिटा सुरू असताना, दुसरीकडे सर्वोच्च प्रशासकीय बैठकीत गैरहजेरी ही बाब सरकारसाठी अस्वस्थ करणारी मानली जात आहे. 1 हजार 901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता दरम्यान, या सर्व राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1 हजार 901 पदांच्या आकृतीबंधास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या संचालनालयाचे नाव आता ‘अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय’ असे करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम तसेच नक्षलवाद विशेष कृती आराखडा कक्ष यांच्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नियोजन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अटल सेतूवरील पथकर सवलत आणखी एक वर्ष नगरविकास विभागाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकर सवलत आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा–2 (MUTP-2) साठी सुधारित खर्चास आणि शासनाचा हिस्सा उचलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी उलवे येथील दिलेल्या भूखंडाचे शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल (पश्चिम) येथील भूखंड देण्यास मान्यता देण्यात आली असून, तेथे मुख्यालय आणि बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी एक हजार ई-बस शहरी वाहतूक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवरही सरकारने भर दिला आहे. पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी एक हजार ई-बससाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता देण्यात आली आहे. पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून डायरेक्ट डेबिट मॅन्डेटद्वारे संबंधित कंपन्यांना थेट देयके अदा केली जाणार आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मल्टी-मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारण्यास मंजुरी ग्रामीण आणि कृषी क्षेत्रालाही मंत्रिमंडळाने प्राधान्य दिले. भाजीपाला निर्यातीसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगाव (ता. भिवंडी) येथे सर्वोपयोगी मल्टी-मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर 96.80 आर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. येथे व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लांट विकिरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे-भाजीपाला साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. दुसरीकडे, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4 हजार 775 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे पाच तालुक्यांतील 52 हजार 423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी गृह आणि कौशल्य विकास क्षेत्रातही मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबईतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45 हजार शासकीय निवासस्थाने उभारण्याच्या मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील पोलीस कर्मचाऱ्यांचा निवासाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. तसेच राज्यातील युवकांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशीलता आणि क्षमता संस्था’ म्हणजेच ‘महिमा’ स्थापन करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. ही संस्था प्रशिक्षित आणि कुशल युवकांना जागतिक रोजगार बाजाराशी जोडण्याचं महत्त्वाचं काम करणार आहे. अंतर्गत तणाव उघड की तात्पुरती नाराजी एकूणच, एकीकडे कॅबिनेट बैठकीत घेतलेले व्यापक आणि दूरगामी निर्णय सरकारची प्रशासनिक गती दर्शवतात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी आणि निवडणूक निकालानंतर सुरू असलेली अस्वस्थता राज्याच्या राजकारणात नवे प्रश्न उभे करत आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव उघड होतो आहे का, की ही केवळ तात्पुरती नाराजी आहे, याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
नाशिक : प्रतिनिधी सत्तेच्या अपेक्षेने महापालिका निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले. त्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ‘सर्व’ प्रयोग केले होते. मात्र जनतेने दिलेला कौल आता नवे प्रश्न निर्माण करणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागा मिळाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ठरविलेली रणनीती या निमित्ताने यशस्वी झाली. भाजपची सदस्य संख्या ५७ […] The post भुसेंचा फॉर्म्युला कोसळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपा नगरसेवकावर प्राणघातक हल्ला
अकोला : प्रतिनिधी महापालिका निवडणूक २०२६ च्या निकालानंतर अकोल्यात मोठा राजकीय वाद पेटला आहे. अकोल्यातील अकोट फैल भागात भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपाच्याच पराभूत उमेदवार गटाकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपा नगरसेवक शरद तुरकर हे निवडून आले. निकालानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. भाजपाच्या पराभूत उमेदवाराकडून हा हल्ला झाल्याची चर्चा सध्या […] The post भाजपा नगरसेवकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जालन्यात दोन गटांत तुफान राडा;मारहाणीत १५जण जखमी
जालना : प्रतिनिधी महापालिका निवडणूक २०२६ निकालानंतर दोन गटांत लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. काँग्रेसचे सय्यद रहीम आणि शिवसेनेचे शेख जावेद यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये ही घटना घडली आहे. या मारहाणीत १० ते १५ जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात […] The post जालन्यात दोन गटांत तुफान राडा;मारहाणीत १५जण जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौर निवडीपर्यंतची सत्ता-समीकरणं अधिकच तापली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केल्याचं चित्र समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व निर्वाचित नगरसेवकांना आज दुपारी 3 वाजता वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याच दिवशी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईत उपस्थित असतानाही, तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेट बैठकीला पोहोचले नाहीत. निवडणूक निकालांनंतर झालेल्या पराभवामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जात असून, त्याचा परिणाम थेट प्रशासकीय कामकाजावरही दिसून येत आहे. एकीकडे महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेली हॉटेल पॉलिटिक्स आणि दुसरीकडे कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी, यामुळे राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळत आहेत. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
पुण्याच्या प्रभाग नंबर 25 मधील माझा पराभव हा जनतेने केला नाही तर तो सत्ताधाऱ्यांनी आणि EVM आणि भ्रष्ट निवडणूक अधिकारी काळे यांनी केलेला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्याला पराभव मान्य नसल्याचे सांगितले आहे. पुणे येथे मनपा प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. न्यू इंग्लिश स्कूल येथे 17 ईव्हीएम बदलण्यात आल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला. त्यामुळे मतमोजणी दोन तास थांबून धरल्याने तणाव निर्माण झाला होता. रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मतदारांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाही. हे सत्ताधाऱ्यांनी बसवलेले नगरसेवक आहेत. मतमोजणीला कितीही वेळ लागला असता तर काही हरकत नव्हता. पण कसबा-विश्रामबागमधील अधिकारी हे पूर्ण मॅनेज होते. आमच्या EVM मशिनचे फुटेज आम्हाला देणं गरजेचे होते पण ते देण्यात आले नाहीत. आम्ही ते मान्य केले. मशीन बंद केले हे देखील आम्ही समजून घेतले. पण त्यासाठी लागणारी पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. मशीनमध्ये मेमरी कार्ड असते त्यावर सील असते. येणाऱ्या मशीनचे सील उघडे नव्हते.आम्हाला लीगल प्रत देऊन तु्म्ही मशीन बदलतात. मेमरी कार्ड ठेवून तुम्ही मतदान बदलून प्रभाग 25 आणि प्रभाग 27 मध्ये सत्ताधारी भाजपचे पॅनल निवडून आणले. मशीनमधील मेमरी कार्डचा नंबर आम्हाला देण्यात आला नाही. ब्राह्मण समाज अत्यंत सुज्ञ रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, प्रभाग 25 मधील पराभव मला मान्य नाही. कारण लोकांनी आम्हाला हरवलेले नाही. भाजपने EVM मध्ये घोटाळा करत, पोलिस यंत्रणा आणि अधिकारी हाताशी धरत त्यांनी आमचा पराभव केला आहे. तो आम्हाला मान्य नाही. आमच्या प्रभागात 30 टक्के ब्राह्मण समाज आहे तर 70 टक्के बहुजन समाज आहे, आमचा ब्राह्मण समाज हा अत्यंत शिकलेला आणि सुज्ञ आहे. काम करणाऱ्या लोकांना तो मतदान देतो. त्यांनी मतदान केले. त्यांनी मतदान भाजपला केलेले नाही. लोकांनी दिलेले मतदान ते मशीन बदलून देत असतील तर लोकांना पडलेले नाही, की सर्वांनी चालवले आहे का नाही हे बघायला. हा कौल माझ्या मतदारांचा नाही रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, आम्ही मतदारांना का बोलू? मतदारांना तेवढा वेळ आहे का? प्रत्येक मतदाराला विचारावे का कोणाला मतदान दिले. ही सर्व लोकं काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान देतात. हा कौल माझ्या मतदारांचा नाही, हा भाजपचा आणि अधिकाऱ्यांनी दिलेला कौल मला मान्य नाही. मी लोकांसाठी काम करत आली आहे आणि करत राहणार. माझ्या पराभवात मतदार बंधू-भगिणींचा यात कोणताही दोष नाही. त्यांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाहीत. तर भाजपचे नगरसेवक हे डोक्यावर बसवलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप - शिंदे गटाचा विजय झाला. तर ठाकरे बंधूंच्या युतीला अवघ्या 71 जागांवर समाधान मानावे लागले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीकेची झोड उठवली. धारावीच्या माध्यमातून अदानी अख्खी मुंबई गिळंकृत करण्याचा डाव रचत असल्याचा आरोप करत त्यांनी धारावीकरांना याविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्याला आता निवडणूक निकालात जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. धारावीतील 7 पैकी 6 जागांवर ठाकरे बंधू व काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. धारावीच्या वॉर्ड क्रमांक 185 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार टी एम जगदीश यांनी भाजपच्या रवी राजा यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रवी राजा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. ते मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते होते. ते सायन - कोळीवाड्यातून लढत होते. धारावी त्यांचा मूळ मतदारसंघ नव्हता. याऊलट जगदीश हे याच वॉर्डाचे माजी नगरसेवक असल्यामुळे त्यांचा मतदारांवर प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी आपल्या अचूक रणनीतीच्या जोरावर भाजप उमेदवार रवी राजा यांना अस्मान दाखवले. दुसरीकडे, वॉर्ड क्रमांक 186 मध्ये ठाकरे गटाच्या अर्चना शिंदे यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या नीला सोनवणे यांचा पराभव केला. अर्चना शिंदे यांना 6731, तर सोनवणे यांना 5690 मते मिळाली. वॉर्ड क्रमांक 187 मध्येही ठाकरे गटाचे जोसेफ कोळी विजयी झाले. त्यांना 7067 मते मिळाली. या ठिकाणी काँग्रेसच्या आयशा खान 5753 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. शिंदे गटाच्या उमेदवाराचा काठावर विजय वॉर्ड क्रमांक 189 मध्ये ठाकरे गटाच्या हर्षला मोरे यांनी भाजपच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार मंगला गायकवाड यांचा तब्बल 4479 मतांनी पराभव केला. हर्षला मोरे यांना 8081 मते मिळाली. उल्लेखनीय बाब म्हणजे वॉर्ड क्रमांक 185 व 189 मध्ये मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे निकाल लागण्यास काहीसा विलंब झाला. पण अखेरीस ठाकरेंच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचा 2 जागांवर विजय धारावीतील 2 मतदारसंघांत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. वॉर्ड क्रमांक 183 मध्ये आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा 1254 मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 184 मध्ये साजिदा बब्बू खान यांनी वर्षा नाकाशे यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. धारावीत महायुतीच्या केवळ एका उमेदवाराचा विजय झाला. वॉर्ड क्रमांक 188 मध्ये शिंदे गटाच्या भास्कर शेट्टी यांनी अवघ्या 460 मतांच्या फरकाने विजय मिळवला. ठाकरे बंधूंच्या सभेने बदलले होते वातावरण ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवतीर्थावर सभा झाली होती. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानींचे साम्राज्य मुंबीत कशा पद्धतीने वाढत आहे हे सांगितले होते. या प्रकरणी त्यांनी एक व्हिडिओही दाखवला होता. तसेच आपल्याला वाचवायला कोण आहे आहे? हे लक्षात ठेवून मुंबईकरांना मतदान करण्याचेही आवाहन केले होते. ठाकरे बंधूंच्या या सभेने मुंबईतील वातावरण पालटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे घरे गमावण्याची भीती, स्थलांतराची चिंता व भवितव्याची अनिश्चितता या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम येथील मतदानावर दिसून आला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे, ही कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या नातेवाइकाची असल्याने, या घटनेला राजकीय वळण मिळाले आहे. आरोपी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा थेट आरोप करण्यात आला असून, पोलिसांकडून मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक तपशील स्पष्टपणे दिसून येतात. एका अज्ञात व्यक्तीने आधी एका बाटलीतून ज्वलनशील द्रव थेट उभ्या असलेल्या कारवर फेकल्याचे या दृश्यांमध्ये स्पष्ट होते. त्यानंतर त्या व्यक्तीने काडेपेटीचा वापर करून क्षणार्धात कारला आग लावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही क्षणांतच संपूर्ण कारने पेट घेतल्याचे या व्हिडीओत दिसते. ही घटना इतकी नियोजित आणि थंड डोक्याने करण्यात आल्याचे चित्रण सीसीटीव्हीमधून समोर येत असून, त्यामुळे हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला जाळपोळ प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. निकालानंतर काही तासांतच अशी घटना घडल्याने ती निवडणूक निकालाशी संबंधित राजकीय आकसातून घडली का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आकाश बारणे यांनी थेट आरोप करत सांगितले आहे की, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवली आहे. या संदर्भात त्यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पुरावे दिसत असतानाही कार जाळण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात विलंब का केला जात आहे, असा सवाल स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळातून केला जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत का, असा संशयही व्यक्त केला जात आहे. निवडणूक निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना, अशा घटनांवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर थेरगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्यरात्री उभ्या असलेल्या वाहनाला अशा पद्धतीने आग लावली जाऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. निवडणुकीनंतर राजकीय वाद विकोपाला जाऊन हिंसक स्वरूप धारण करत असल्याचं चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसत असल्याने, नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय मतभेद हे लोकशाहीचा भाग असले तरी त्यातून जाळपोळ, हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान होणे अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निकालानंतरची राजकीय धुसफूस आता रस्त्यावर उतरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. एकीकडे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पुरावे समोर असताना दुसरीकडे पोलिसांकडून ठोस कारवाई न होणं, यामुळे प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का, आरोपीचा शोध घेतला जाणार का आणि राजकीय दबावाखाली तपास दडपला जाणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीनंतर शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासनावर असताना, अशा घटनांमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
बाणेरमध्ये भाजपला धक्का:अमोल बालवडकर यांचा विजय, कार्यकर्ता विरुद्ध नेता लढाईत कार्यकर्ता जिंकला
पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी प्रभागातील (क्रमांक ९) पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानंतर बालवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपचे लहू बालवडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे, असे मानले जात आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व यंत्रणांचा वापर केला होता. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल बालवडकर यांना पाठबळ दिल्याने ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती, ज्यात अमोल बालवडकर यांनी विजय मिळवला. पुणे शहरात भाजपला एकूण ११९ जागा मिळाल्या असल्या तरी, बाणेरमधील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. ही लढाई 'कार्यकर्ता विरुद्ध नेता' अशी होती आणि यात कार्यकर्ताच सरस ठरल्याची भावना अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली. आपल्या विजयानंतर बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, माझा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, कारण त्यांनी मागील १५ दिवसांत खूप मेहनत घेतली. भाजपच्या काही नेत्यांनी ऐनवेळी तिकीट नाकारल्याने मी निराश झालो होतो, परंतु पालकमंत्री अजित पवारांनी मला साथ दिली आणि मी निवडणुकीत उभा राहिलो. त्यांनी पुढे सांगितले की, जनतेने माझा संघर्ष पाहिला असून त्यांनाही या अन्यायाबद्दल चीड होती. बालवडकर यांच्या मते, माझी राजकीय हत्या झाली होती, पण अजित पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला. भाजपने मला फसवले नाही, तर काही नेत्यांनी मला दगा दिला. मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मोठ्या नेत्यांनी छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये, असा संदेश जनतेने दिला आहे, असेही ते म्हणाले.
सोसायटीच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला हटकल्याने ज्येष्ठाला मारहाण करण्यात आल्याची घटना वाघोली परीसरात घडली. या प्रकरणी आरोपी तरुणा विरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका तरणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील एका सोसायटीत राहायला आहेत. ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या आवारातून पायी जात होते. त्यावेळी सोसायटीच्या परिसरात आरोपी आणि त्याची मैत्रीण थांबली होती. दोघेजण अश्लील चाळे करत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाने पाहिले. ज्येष्ठ नागरिकाने आरोपी तरुणाला हटकले. सोसायटीच्या परिसरात अश्लील चाळे करु नका, असे ज्येष्ठ नागरिकाने तरुणाला सांगितले. या कारणावरुन तरुणाने त्यांना शिवीगाळ केली. काही वेळानंतर तरुणाने सोसायटीच्या आवारात प्रवेश केला. ज्येष्ठाला शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात हातातील लोखंडी कडे मारले. ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्याला दुखापत झाली. पसार आलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत. किरकोळ कारणावरुन भाजी विक्रेत्याला मारहाण पुणे किरकोळ कारणावरुन भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यात आल्यची घटना लोणी काळभोर परिसरात घडली.या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भाजी विक्रेता अक्षय अशोक चव्हाण (वय ३४, रा. जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका भाजीपाला विक्रेत्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चव्हाण यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात ते भाजी विक्री करतात. आरोपी भाजीपाला विक्री करतो. तक्रारदार भाजीपाला विक्रेत्याचे काका कडीपत्ता विक्री करतात. चव्हाण याच्या काकांनी आरोपीला कडीपत्याचे पाच बंडल देण्यास सांगितले होते. आरोपीने त्यांच्याकडे आणखी सात बंडल मागितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. चव्हाण आणि त्यांचा चुलतभाऊ प्रशांत यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. चव्हाण यांच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्यांना बांबूने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.
पुण्यात पराभवानंतर कुटुंबाला शिवीगाळ:भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे महापालिका निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातून भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराच्या समर्थकाने एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, मंदार लडकत, प्रीतम बनकर, रोहित शिंदे आणि प्रज्ञा लडकत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या भवानी पेठ-कासेवाडी प्रभागातून गणेश लडकत यांचे चुलतभाऊ आणि भाजपचे उमेदवार संदीप लडकत यांचा पराभव झाला होता. तक्रारदाराच्या कुटुंबाने संदीप लडकत यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे त्यांचा पराभव झाला, असा आरोपींना संशय होता. याच रागातून आरोपी गणेश लडकत यांच्या घरात घुसले आणि त्यांनी लडकत तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अनोळखी चोरट्यांकडून घरफोडी पुणे शहरात धनकवडी परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत संजय सदाशिव दिघे (वय ५५, रा. राजमुद्रा सोसायटी, ओंकार पार्क इमारत, धनकवडी ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत राहायला आहेत. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. चोरट्यांनी दिघे यांच्या सदनिकेत प्रवेश केला. बेडरूम मध्ये कपाटावरील मोकळ्या जागेत दिघे यांनी एका बॅगेत एक लाखांची रोकड ठेवली होती. चोरट्यांनी कपाटावर ठेवलेली बॅग चोरून नेली. सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड तपास करत आहेत.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल भाजपचे कौतुक केले आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांना अतिशय चांगले यश मिळाले व इतरांचा पराभव झाला. पराभवाने खचायचे नसते. आपण आपले काम करत राहायचे असते, असे ते म्हणालेत. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड हाराकिरी झाली आहे. राज्यातील 29 महापालिकांत या पक्षाला केवळ 167 जागांवर समाधान मानावे लागले. विशेषतः पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीची युती असूनही त्यांना केवळ 30 जागांवर समाधान मानावे लागले. पिंपरी चिंचवडमध्येही त्यांना केवळ 37 जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपचे कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात अधिक जोमाने काम करेल असे स्पष्ट केले. मीडियासह आमचेही अंदाज चुकले अजित पवार म्हणाले, लोकशाहीत मतदार राजा हा फार महत्त्वाचा असतो. प्रयत्न करणे प्रत्येक राजकीय पक्षाचे काम असते. प्रत्येकांनी प्रयत्न केले. पण भाजपला अतिशय चांगले यश मिळाले. या प्रकरणी मी भाजपचे मनापासून अभिनंदन करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने या सगळ्या निवडणुका लढल्या. त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यात इतरांचा पराभव झाला. माझे स्वतःचे गणित असे आहे की, पराभवाने खचून जायचे नसते. पुन्हा आपले काम करत राहायचे असते. आज पहाटे 3 वाजेपर्यंत काही जागांवरील निकाल लागले. त्यानंतर आम्ही बसून कुठे काय झाले? याची माहिती घेऊ. मीडिया सुद्धा म्हणत होता की चांगले वातावरण आहे. आमचे अंदाज चुकले, तसे मीडियाचेही अंदाज चुकले. ठीक आहे. झेडपी निवडणुकीचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील अजित पवार म्हणाले, सध्या निवडणुकीची घाई आहे. आज 17 तारखेपासून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली. उद्या 18 तारखेला सुट्टी आहे. सुप्रीम कोर्टाने 31 तारखेच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यात आता 15 दिवसांची वाढीव मुदत मिळाली आहे. आता 50 टक्के आरक्षणाच्या आत केवळ 12 जिल्हा परिषदा आहेत. तेथील भौगोलिक व राजकीय परिस्थिती पाहून आमचे स्थानिक पदाधिकारी योग्य तो निर्णय घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना अधिकार दिले जातात. त्यानुसार ते लोक तेथील योग्य तो निर्णय घेतात. आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांत असे होते. तूर्त आम्ही महायुतीत काम करत आहोत. सध्या केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे. आमचे त्यांच्यासोबत काम सुरू आहे, असे ते म्हणाले. पवार कुटुंब एकत्रच राहील उद्योगपती गौतम अदानी नुकतेच बारामतीच्या दौऱ्यावर येऊन गेलेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत केंद्रात व राज्यात काय बदल दिसून येतील असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले, गौतम अदानी बारामतीला एआयच्या इमारतीच्या उद्घाटनाला आले होते. ते एक उद्योगपती आहेत. त्या उद्योगपतींचा व सरकारमध्ये बदल होण्याचा काय संबंध आहे? असे ते म्हणाले. पत्रकारांनी पुन्हा त्यांना पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न केला. त्यावरही अजित पवार म्हणाले, आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहूच ना. आम्ही सुखदुःखात एकमेकांना धावून जातोच. माझ्या दृष्टीने आत्ता कृषी प्रदर्शन खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. त्यामुळे शेतकरी जेवढे समाधानी ठेवू शकते, तेवढे ते आर्थिक सुबत्ता येण्यासाठी चांगले असते. त्यामुळे मी त्या कामाला जास्त प्राधान्य देतो, असेही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.
पुणे मनपा निवडणुकीत भाजपच्या 67 महिला विजयी:एकूण 8 महिला मनपा सभागृहात होणार सहभागी
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) 92 महिला उमेदवारांपैकी 67 महिलांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीमुळे एकूण 87 महिला नगरसेविका पुणे मनपा सभागृहात सहभागी होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता, तसेच आरपीआयच्या उमेदवारांनाही कमळाच्या चिन्हावर संधी दिली. एकूण 165 जागांपैकी तब्बल 92 जागांवर भाजपने महिलांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे महिलांना प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने संधी मिळाली. भाजपच्या 67 महिला उमेदवारांव्यतिरिक्त, विविध विरोधी पक्षांनी दिलेल्या उमेदवारीतून 20 महिलांनी विजय मिळवून नगरसेवक पद पटकावले आहे. पुणे मनपाच्या एकूण 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या, त्यामुळे राजकीय पक्षांना या जागांवर महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक होते. भाजपने केवळ आरक्षित जागांवरच नव्हे, तर सर्वसाधारण गटात चार आणि अनुसूचित जातीच्या गटात पाच महिला उमेदवारांना तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. निवेदिता एकबोटे, पल्लवी जावळे, रंजना टिळेकर, अर्चना जगताप, संगीता दांगट आणि वीणा घोष यांनी महिला आरक्षित नसलेल्या जागांवर विजय संपादन करत आपले कर्तृत्व सिद्ध केले. प्रभाग क्रमांक 12, 18, 20, 22, 23, 24, 25, 26 आणि 29 मध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक होते. याचा लाभ महिला उमेदवारांना मिळाला आणि त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. महिला उमेदवार यांनी पुरुषांच्या बरोबरीने निवडणुकीत प्रचारात हिरारीने सहभाग घेतल्याचे देखील यावेळी दिसून आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत असतानाच ,नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांमध्ये देखील ओळखीतील महिला उपयोगी पडू शकते असे देखील महिला उमेदवारांनी घरोघर जाऊन प्रचार केला.
पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार:कोंढवा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला
पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश पिल्ले (वय 19, रा. चिंचवड, पुणे) असे आरोपीचे नाव असून, पीडित तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपी पिल्ले यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत पिल्ले याने तरुणीला लग्नाचे वचन दिले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने या कृत्याला विरोध केला असता, पिल्ले याने तिला धमकावले. घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे करत आहेत. मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला धक्काबुक्की कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या एका महिलेला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव घाटोळे (रा. टिळेकनगर, कोंढवा बुद्रुक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने येवलेवाडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी घाटोळे तक्रारदार महिलेच्या दोन मुलींकडे पाहून शिट्टी वाजवून त्यांची छेड काढत असे. या प्रकाराबाबत महिलेने घाटोळेला जाब विचारला असता, त्याने महिलेला धक्काबुक्की केली आणि तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रसाद जाधव करत आहेत. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला मारहाण एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. समीर अकबर हाश्मी (वय 25, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित 19 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, आरोपी हाश्मी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीने त्याच्या प्रेमास नकार दिल्याने तो संतप्त झाला. आरोपी तरुणीच्या घरात शिरला आणि 'तू माझ्यावर प्रेम केले नाहीस, तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही,' अशी धमकी दिली. तरुणीने त्याला धक्का दिल्यानंतर तो अधिक चिडला आणि त्याने तिला मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नाळे करत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी अभिमानास्पद लढत दिल्याचा दावा केला आहे. ठाकरे बंधूंनी सगळीकडेच खूप चांगली लढत दिली. आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण भाजपने अमाप पैसे ओतून व माणसे चोरून निवडणूक जिंकली, असे त्या म्हणाल्यात. आम्ही उद्यापासून पक्षबांधणीच्या कामाला लागणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. मनसेच्या मुंबई विजयी उमेदवारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शर्मिला यांनी भाजप व शिंदे गटाचा विजय पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीने कल्याण डोंबिवली येथील आमच्या दिसतील त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना उचलून नेले. त्यानंतरही आमचे 5 उमेदवार तिथे निवडून आले. त्यांनी पैसे ओतले, माणसे चोरली, त्यानंतरही आम्ही नवी मुंबईत खाते उघडले. त्यामुळे मला अभिमान आहे. आमची अशीच घोडदौड सुरू राहील. सत्ताधाऱ्यांची एकमेकांवरच चिखलफेक त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष एकमेकांवरच आरोप - प्रत्यारोप करत आहेत. भाजपने पहिल्यांदा अजित पवारांच्या फायली आम्ही अजून बंद केल्या नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी त्यांनाही सोबत घेतले. लोकांनी डोळे उघडले पाहिजे. हे सत्ताधीश लोक निवडणुकीत एकमेकांविरोधात काय बोलत होते यावर लक्ष दिले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे तुमच्याविरोधात पुरावे आहेत, पण मी सत्ता उपभोगतो तोपर्यंत मी ते देणार नाही असा हा प्रकार आहे. आम्ही खूप चांगली लढत दिली शर्मिला ठाकरे म्हणाल्या, मी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे व आमच्या सर्वच नेत्यांचे अभिनंदन करेन. आमचे शून्य नगरसेवक होते. ठाकरे गटाचे त्यांनी 60-65 नगरसेवक पळवून नेले होते. त्यांच्याकडे केवळ 20 उरले होते. त्यानंतर आमचे आज 6 नगरसेवक निवडून आले, तर ठाकरे गटाचेही 65-66 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे आम्ही खूप चांगली लढत दिली आहे. सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवावे लागते. तेवढे धान्यच आम्ही पुरवले. याऊलट विरोधकांकडे मिसाईल्स असूनही चांगली लढत दिली. अरे तुम्ही तुमची माणसे तयार करा ना ठाण्यात मनसेची एकही जागा आली नाही. शर्मिला यांनी त्यावरही भाष्य केले. ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या काही उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले. तिथेही आमचेही उमेदवार पळवण्यात आले. शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष पळवले. अरे, तुमचे पक्ष एवढ्या वर्षांचे आहेत ना. तुम्ही तुमची माणसे का तयार करत नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते निर्माण करतो. आता आमचे हे नगरसेवक निवडून आलेत. उद्यापासून आम्ही आमची पक्षबांधणी सुरू करणार. आमच्याकडे पुढची फळी पुढे यायला तयार आहे. काम करायला. आम्ही ते तयार करणार आणि असेच लढणार, असे शर्मिला म्हणाल्या. महायुतीच्या पैशांपुढे आम्ही कुठेच नव्हतो अनेक ठिकाणी आमच्या जागा फार कमी मतांनी पडल्या. महायुतीकडे अमाप पैसा होता. त्या तुलनेत आम्ही कुठेही नव्हतो. कमळाच्या पाकिटातून पैसे वाटण्यात आले. शिंदे भाजपच्या लोकांना पकडत होते. भाजप शिंदेंच्या लोकांना पकडत होते. ते एकेका मताला 5 ते 10 हजार रुपये देत होते. आम्हाला तसे करायचे नाही. आम्हाला पैसे वाटून मतदान करायचे नाही, असेही शर्मिला ठाकरे यावेळी बोलताना म्हणाल्या.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. 25 वर्षांपासून शिवसेना आणि ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका अखेर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीकडे गेली. या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला. यामुळे मुंबईच्या सत्ताकेंद्रात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झालं असलं, तरी आता सर्वाधिक उत्सुकता आहे ती मुंबईचा महापौर नेमका कोण होणार, याकडे. निवडणुकीपूर्वीच मुंबईच्या महापौरपदावरून वातावरण तापलं होतं. ठाकरे बंधूंनी जाहीरपणे मुंबईचा महापौर मराठीच असेल, अशी भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर सुरुवातीला भाजपकडून महापौर हिंदू असेल, अशी भूमिका मांडली गेली होती. मात्र प्रचाराच्या उत्तरार्धात वाढता वाद पाहता भाजपलाही मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच होईल, असं स्पष्ट करावं लागलं. आता भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर या भूमिकेची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय तात्काळ होणार नाही. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात नगरविकास खात्याकडून महापौर पदासाठी सोडत काढली जाणार असून, या सोडतीनंतर साधारण दहा दिवसांनी महापौराची अधिकृत निवड होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत मुंबईच्या महापौरपदावर सस्पेन्स कायम राहणार आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपने 89 आणि शिंदे सेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान 114 जागांची आवश्यकता आहे. भाजप एकट्याला हा बहुमताचा आकडा गाठता येत नसल्यामुळे शिंदे गटाची साथ अपरिहार्य ठरणार आहे. यामुळेच महापौरपदावर भाजपचा नैसर्गिक दावा असला, तरी शिंदे सेनेचे काही नेतेही महापौरपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. सत्तास्थापन करताना महापौरपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. या निवडणुकीत मुंबईतील मतदारवर्गाचं चित्रही वेगळं पाहायला मिळालं. मराठीबहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीला तुलनेने यश मिळालं, तर अमराठी लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली. अमराठी मतदारांनी भाजपला एकगठ्ठा मतदान करत त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय आणि कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळे, अमराठी व्यक्ती महापौर झाल्यास त्यात गैर काय? असा युक्तिवादही काही राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. त्यामुळे भाजप खरंच अमराठी व्यक्तीला महापौरपदी संधी देणार का, हा प्रश्नही चर्चेत आहे. महापौर कोण? हा राज्यासाठी उत्सुकतेचा विषय दरम्यान, भाजपमध्येच महापौरपदासाठी अनेक इच्छुक नगरसेवक रिंगणात असल्याचं बोललं जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, शिंदे गट महापौरपदासाठी कितपत ताणून धरेल, यावर सत्तास्थापनेचं गणित ठरणार आहे. 25 वर्षांनंतर मुंबईच्या सत्तेत झालेल्या या मोठ्या बदलानंतर आता महापौर कोण होणार, हा प्रश्न मुंबईकरांसह संपूर्ण राज्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सर्व 29 प्रभागांच्या निकालांची सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल. या निकालात भाजप मोठा भाऊ ठरला असून, युती तोडणाऱ्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रयोग यशस्वी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. पाहा यादी…
छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शहरात विजयी जल्लोष सुरू असतानाच गांधी नगर भागात राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्यांनी सज्ज झालेल्या टोळक्याने जोरदार दगडफेक केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया हे देखील याच प्रभागातून निवडणूक लढवत होते. तुमच्यामुळेच माझा पराभव झाला, असा आरोप करत मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी जुन्या वादातून आणि निवडणुकीतील पराभवाच्या संतापातून बंटी चावरिया यांच्या घराला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय हा संपूर्ण हल्ला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओमध्ये काही तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन घराच्या दिशेने दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या दगडफेकीत घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून उभ्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 14 जणांवर गुन्हा दाखल या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे. बंटी चावरिया यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लू चावरिया यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात दंगल घडवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावणे या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी गांधी नगर परिसरात बंदोबस्त वाढवला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. अकोटमध्ये पराभवाच्या रागातून विजयी उमेदवारावर जीवघेणा हल्ला मनपा निवडणुकीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शरद श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. या भागात तोडफोड देखील झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. जखमी नगरसेवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक 2 ‘ब’मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला. भाजपचेच प्रभाग 2 ‘ड’गटातील पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि समर्थकांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पेटला आहे. अकोट फैल भागात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्याचा थेट उद्रेक भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाला. शनिवारी सकाळी संतप्त लाडक्या बहिणींनी मुंबई़़-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात महिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही वेळातच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसह खासगी वाहनेही अडकून पडली होती. या दृश्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलन करणाऱ्या महिलांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे खात्यात का जमा झाले नाहीत? असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला. महानगरपालिका निवडणुकीआधी दोन महिन्यांचे मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. तातडीने पैसे जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही काही महिलांनी दिला. दरम्यान, या योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या काही महिलांची नावे यादीतून गहाळ झाल्याचंही समोर आलं आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा माहिती अपलोडमध्ये झालेल्या चुका यामुळे काही लाडक्या बहिणींना मानधन मिळालं नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या कारणांमुळे महिलांच्या संतापात काहीही फरक पडलेला दिसून आला नाही. योजना आमच्यासाठी आहे, मग चुका आम्ही का भोगायच्या? असा सवाल आंदोलक महिलांनी केला. महिलांनी महामार्ग रोखल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित खात्याशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर पैसे खात्यात जमा केले जातील, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. तसेच ज्यांची नावे यादीतून वगळली गेली आहेत, त्यांची पुन्हा पडताळणी केली जाईल, असंही सांगण्यात आलं. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आणि वारंवार समजावणी केल्यानंतर अखेर महिलांनी आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. मात्र या आंदोलनामुळे अनेक तास महामार्गावर वाहतूक विस्कळीत राहिली आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनचालकांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांमध्येही असाच संताप उसळण्याची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. मात्र हप्ते वेळेवर न मिळणे, यादीतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणी यामुळे योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंडाऱ्यातील आंदोलनानंतर आता इतर जिल्ह्यांमध्येही असाच संताप उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने तातडीने या समस्यांकडे लक्ष देऊन सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा हक्काचा मानधन वेळेत मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.
मनपा निवडणुकीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शरद श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. या भागात तोडफोड देखील झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. जखमी नगरसेवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक 2 ‘ब’मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला. भाजपचेच प्रभाग 2 ‘ड’गटातील पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि समर्थकांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पेटला आहे. अकोट फैल भागात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. या प्रभागात तीन जागा //एआयएमआयएम'' ने जिंकल्या, तर एकाजागेवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला. प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांनी काँग्रेसचे उमेदवाराचा दोन हजार 200 मतांनी पराभव केला.या विजयामुळे प्रभागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. त्यातूनच भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांची अकोट फैल भागातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रभागात असताना नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नगरसेवक शरद तुरकर हे सत्कार स्वीकारण्यासाठी एका ठिकाणी जात असताना त्यांच्यावर भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊत यांच्याकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान, यावेळी वाद चिघळल्याने दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आले होते. यावेळी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती आहे. शरद तुरकर हे हल्ल्यात जखमी झाले असून,त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप - शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने या दोन्ही पक्षांवर उपहासात्मक टीका केली आहे. गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनही त्यांना मुंबईत साधे शतकही काढता आले नाही, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे केवुळ 20-25 नगरसेवक होते. आज त्यांचा आकडा 65 वर पोहोचल्याचे एक वेगळे गणितही त्यांनी या प्रकरणी मांडले आहे. मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालाने सूप वाजले. त्यात मुंबई महापालिकेतील ठाकरेंची जवळपास 25 वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन तिथे भाजप- शिंदे गटाचा झेंडा फडकला. त्यानंतर आता या निकालाचे राजकीय पक्षांचे नेते आपापल्या दृष्टिकोनातून विश्लेषण करत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंबईत भाजपच्या केवळ 4 जागा वाढल्याचे गणित मांडले आहे. सुषमा अंधारेंनी काय मांडले आहे गणित? सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये भाजप व शिंदे गटाला खोचक टोला हाणताना म्हणाल्या, गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाही. कोट्यावधींचा पाऊस पाडून फक्त 4. शिवसेना UBT चे 20/25 नगरसेवक होते. आज 65 आहेत. मनसेचे 6 नगरसेवक हा फायदा वेगळाच. शाहसेनेचे 53 नगरसेवक होते. आज 28 आहेत. भाजपाचे 84 नगरसेवक होते. ते 4 ने वाढले. 27 महापालिका आम्ही जिंकू म्हणणारी भाजपा प्रत्यक्षात फक्त 9 ठिकाणी स्वबळावर तर 15 ठिकाणी कुबड्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करतेय. काय भक्तुल्यानो, कळलं का? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांच्या या टीकेवर भाजपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काय आहे मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल उल्लेखनीय बाब म्हणजे 227 सदस्यीय मुंबई महापालिकेत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्यात. तर शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावे लागले आहे. याऊलट ठाकरे गटाला 65, मनसेला 6, काँग्रेसला 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 10 जागांवर इतर उमेदवार निवडून आलेत. हे ही वाचा… सर्व 29 महापालिकांचे निकाल एका क्लिकवर:भाजप, महायुतीचा डंका; NCP ची हाराकिरी, ठाकरेंची BMC गेली, पण मराठी मते शाबूत राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांचे निकाल काल हाती आले. त्यात सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने मुंबईसह बहुतांश महापालिका आपल्या खिशात घातल्या. यात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी व त्यांना साथ देणाऱ्या शरद पवार गटाची पुरती हाराकिरी झाली. या निवडणुकीत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या युतीची हार झाली. पण त्यांची तेथील मराठी मते शाबूत असल्याचे सिद्ध झाले. पण आता तिथे भाजपसमोरील विरोधी बाकावर बसावे लागेल. या बातमीत आपण राज्यातील सर्व 26 महापालिकांतील पक्षीय बलाबल पाहूया… वाचा सविस्तर
राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांचे निकाल काल हाती आले. त्यात सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने मुंबईसह बहुतांश महापालिका आपल्या खिशात घातल्या. यात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी व त्यांना साथ देणाऱ्या शरद पवार गटाची पुरती हाराकिरी झाली. या निवडणुकीत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या युतीची हार झाली. पण त्यांची तेथील मराठी मते शाबूत असल्याचे सिद्ध झाले. पण आता तिथे भाजपसमोरील विरोधी बाकावर बसावे लागेल. या बातमीत आपण राज्यातील सर्व 26 महापालिकांतील पक्षीय बलाबल पाहूया… मुंबई महापालिका (227/227) पुणे महापालिका (165/165) नागपूर महापालिका (151/151) छत्रपती संभाजीनगर (115/115) पिंपरी चिंचवड महापालिका (128/128) ठाणे महापालिका (131/131) नाशिक महापालिका (122/122) नवी मुंबई महापालिका (111/111) कोल्हापूर महापालिका (81/81) सांगली मिरज कुपवाड महापालिका (78/78) सोलापूर महापालिका (102/102) लातूर महापालिका (70/70) अहिल्यानगर महापालिका (68/68) अमरावती महापालिका (87/87) नांदेड वाघाळा महापालिका (81/81) जळगाव महापालिका (75/75) जालना महापालिका (65/65) चंद्रपूर महापालिका (66/66) वसई विरार महापालिका (115/115) मालेगाव महापालिका (84/84) अकोला महापालिका (80/80) पनवेल महापालिका (78/78) मिरा-भाईंदर महापालिका (91/95) धुळे महापालिका (74/74) परभणी महापालिका (65/65) उल्हासनगर (78/78) भिवंडी निजामपूर महापालिका (90/90) इचलकरंजी महापालिका (65/65) कल्याण डोंबिवली महापालिका (122/122)
हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर डिग्र फाटा येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनीच अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले आहे. याप्रकरणी महसूल विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हयातील कयाधू, पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी महसूल व पोलिस विभागाची पथके कार्यरत ठेवली आहे. या पथकाकडून दररोज वाहनांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सेनगाव, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यात महसूल व पोलिस पथकाकडून कारवाईचा धडका सुरु झाला असून मागील आठ दिवसांत तब्बल 15 पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी वाहन चालकासह वाहन मालकावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे त्यांच्या पथकासह शुक्रवारी ता. 16 हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरून जात होते. यावेळी डिग्रस फाट्या जवळ एक टिप्पर दिसून आले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी टिप्पर थांबवून तपासणी केली असता टिप्पर मध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. यावरून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी टिप्पर चालकाची चौकशी केली. यामध्ये त्याने वाळू वाहतूकीच्या पावत्या तसेच परवाना नसल्याचे स्पष्ट केले. यावरून सदर टिप्पर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्राामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे महसूल विभागाच्या पथकाने सांगितले. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
महापालिका निकालांवर संजय राऊतांची तोफ:एकनाथ शिंदे नसते तर भाजपचा महापौर अशक्यच; जयचंदाचा शिक्का
महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकारण अधिक तापले असून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका करत अनेक राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. मुंबई महापालिकेतील सत्ता परिवर्तन, एकनाथ शिंदे यांची भूमिका, मनसेचा निकाल, तसेच काँग्रेसची रणनीती यावर भाष्य करत राऊतांनी आक्रमक शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. विशेषतः मुंबईत भाजपचा महापौर होण्यामागे एकनाथ शिंदे कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे शिवसेनेचे ‘जयचंद’ झाले नसते, तर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर कधीच झाला नसता. मराठी जनतेने शिंदेंना इतिहासात जयचंदच्या भूमिकेतच लक्षात ठेवावं लागेल, अशी टीका त्यांनी केली. शिंदेंमुळेच मराठी माणसाची सत्ता मुंबईतून गेली, असा आरोप करत राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात या निर्णयामुळे प्रचंड संतापाची लाट असून, भविष्यात शिंदेंना मोकळेपणाने फिरणंही अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मनसेच्या कामगिरीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी थेट अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किमान 10 ते 12 जागा मिळणं आवश्यक होतं. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढणाऱ्या पक्षाला यापेक्षा जास्त यश मिळायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं. निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने मराठी मतांचे विभाजन झाल्याचं चित्र समोर आलं असल्याचंही त्यांनी सूचित केलं. तरीही, सत्तेबाहेर असताना लढाईला वेगळीच धार आणि रंग असतो, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षांच्या संघर्षाचं महत्त्व अधोरेखित केलं. सत्ता नसतानाची लढाई अधिक प्रामाणिक आणि आक्रमक असते, असं मत राऊतांनी स्पष्टपणे मांडलं. सत्ता हातात असताना मर्यादा येतात, पण सत्तेबाहेर राहून लढताना जनतेशी थेट संवाद साधता येतो, असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हीच खरी संघर्षाची वेळ असल्याचं ते म्हणाले. महापालिका निवडणुकांचे निकाल हे अंतिम सत्य नसून, पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा संकेतही त्यांनी दिला. काँग्रेसच्या भूमिकेबाबत बोलताना संजय राऊत यांनी तुलनेने सकारात्मक भूमिका घेतली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसची स्ट्रॅटेजी योग्य होती, असं मत त्यांनी व्यक्त केलं. काही ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी पक्षाने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली, ती राजकीयदृष्ट्या योग्य दिशेने होती, असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे पुढील राजकीय लढाईची दिशा ठरवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सूचित केलं. एकूणच, संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेने महापालिका निकालांनंतरच्या राजकीय संघर्षाला अधिक धार दिली आहे. एकनाथ शिंदेंवर केलेले गंभीर आरोप, मनसेच्या निकालावरची अपेक्षा, सत्तेबाहेरच्या संघर्षाचं महत्त्व आणि काँग्रेसच्या रणनीतीवर दिलेली दाद, या सगळ्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण अधिक आक्रमक आणि संघर्षमय होण्याचे संकेत मिळत आहेत.
स्वामी विवेकानंद जनसेवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक प्रा. दादाराव पाथरीकर तसेच जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष गजानन हरणे यांनी डी. एम. के. सेवा मंडळ व निर्भय बनो जन आंदोलन' यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे यांना त्यांच्या विविध सामाजिक कार्याबद्दल स्वामी विवेकानंद जनसेवा प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इलना, सिफा व किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांना राष्ट्रीय डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समाज हितासाठी कार्य करणाऱ्या धनंजय मिश्रा, दिवाकर गावंडे, अक्षय राऊत, प्रा. डॉ. ममता इंगोले, दत्तात्रेय निघाने वैशाली राऊत, डॉ. अर्चना देशमुख, ललिता पात्रीकर भारती पात्रीकर, शंकरराव बोर्डे, प्रदीप गावंडे , सिद्धार्थ तायडे सुरेश पात्रीकर, डॉ. चंद्रशेखर गोंधळ, बळवंतराव कडू, बाळाभाऊ पात्रीकर यांच्यासह विविध समाजसेवकांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जनसेवा पुरस्कार बहाल करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोटचे अध्यक्ष ह. भ. प. वासुदेवराव महल्ले पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते प्रकाश पोहरे, माजी प्राचार्या प्रतिभा पाथरीकर, किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे, प्रख्यात समाजसेवक धनंजय मिश्रा, प्रख्यात लेखिका प्रा. डॉ. ममता इंगोले, पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बोर्डे, माजी सैनिक प्रभू इंगळे उपस्थित होते.कार्यक्रमास भानुदास कराळे, दीपक आखरे, संदीप देशमुख, सुरेश महल्ले, नंदकुमार गावंडे प्रभाकर चेहे, डॉ. कृष्णकांत वक्ते तन्मय हरणे यांचे सह इतरही प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन हरणे यांनी केले. असा झाला सोहळा सर्वप्रथम अतिथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रारंभी युगेश्वरी हरणे यांनी जिजाऊ वंदना व स्वागत गीत सादर केले. प्रा. दादाराव पाथरीकर यांनी प्रास्ताविक करून पुरस्कार वितरणाचा हेतू विशद केला. याप्रसंगी प्रकाश पोहरे, ममता इंगोले, अक्षय राऊत, प्राचार्य प्रतिभा पात्रीकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपकडून जल्लोष साजरा:मिठाईचे वितरण; पक्ष कार्यालयाबाहेर ढाेल ताशांचा गजर
सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून शुक्रवारी संध्याकाळी जल्लोष करण्यात आला. पक्ष कार्यालयाबाहेर आतषबाजी करीत मिठाईचे वितरण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील २४ नगरपालिकेमध्ये महायुतीला यश मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. महानगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भरघोस यश मिळाल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह, जयप्रकाश नारायण चौकात विजयोत्सव साजर करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे, आ. वसंत खंडेलवाल, निवडणूक प्रमुख विजयअग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत मसणे, संतोष शिवरकर, किशोर पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा आदी होते. विश्वासाला तडा नाही मूलभूत सुविधांसह अकोलेकरांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. विकासावर लक्ष केंद्रीत करून भाज प आणि महायुती काम करेल असे आ. रणधीर सावरकर म्हणाले. महायुतीचा महापौर करण्यासाठी जनतेने पाठिंबा दिला. अकोलेकरांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भाजपा लोकप्रतिनिधी पार पाडतील, असे खासदार अनुप धोत्रे म्हणाले. भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस अकोला महाविकास आघाडीला कौल दिला आहे. जनतेने दाखवलेला विश्वास आणि त्यांची ताकद ही विकासासाठी प्रेरणा देत असल्याची प्रतिक्रिया जयंत मसने यांनी व्यक्त केली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मिशन शक्ती सखी वन स्टॉप सेंटर आणि एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहमुक्त भारत- १०० दिवस संकल्प अभियानांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषद शाळा रेल व धारेल येथे जनजागृती करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बालकल्याण समिती सदस्य प्रांजली जैस्वाल, सखी वन स्टॉप केंद्राचे प्रशासक ॲड. मनीषा भोरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर, एन्करेज एज्युकेशनचे महेंद्र गणोदे, पॅरामेडिकल स्टाफ प्रिया इंगळे उपस्थित होते. १०० दिवस संकल्प अभियान अंतर्गत विद्यार्थी व उपस्थितांकडून बालविवाह मुक्त भारताची प्रतिज्ञा घेण्यात आली. दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली. बालकांचे हक्क, बालविवाहाचे दुष्परिणामावर प्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व अधिकार, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, चाइल्ड हेल्पलाइन १०९८, बाल विवाहाचे दुष्परिणाम, माझे आरोग्य या विषयांवर सविस्तर व मार्गदर्शक माहिती देण्यात आली. बालविवाह कायद्याने गुन्हा असून तो समाजासाठी घातक आहे, याबाबत उपस्थितांमध्ये प्रबोधन करण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली भावनिक पण ठाम भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी खचून न जाता नव्या जोमाने उभं राहण्याचा निर्धार राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे. मराठी माणूस, मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यांची लढाई हीच मनसेचं अस्तित्व असल्याचं ठणकावून सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा कामाला लागण्याचं आवाहन केलं आहे. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्ते आणि समर्थकांशी थेट संवाद साधला आहे. सस्नेह जय महाराष्ट्र, अशा शब्दांत आपल्या पोस्टची सुरुवात करत त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन केलं. यावेळची निवडणूक सोपी नव्हती, अचाट धनशक्ती आणि सत्तेच्या बळाविरुद्ध ही लढाई होती, असं स्पष्ट करत त्यांनी या परिस्थितीतही कार्यकर्त्यांनी दिलेल्या झुंजीचं कौतुक केलं. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये या निवडणुकीचं स्वरूप स्पष्टपणे मांडलं आहे. ही लढाई म्हणजे धनशक्ती आणि सत्ताशक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती, असं सांगत त्यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मैदान सोडलं नाही, यावर भर दिला. अशा कठीण लढाईत मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेलं धैर्य आणि चिकाटी कौतुकास्पद असल्याचं त्यांनी नमूद केलं. निकाल काहीही असले तरी कार्यकर्त्यांनी दिलेली झुंज ही पक्षासाठी मोठी ताकद असल्याचा संदेश त्यांनी दिला. मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही, याचं दुःख असल्याचं राज ठाकरे यांनी मान्य केलं. मात्र, पराभवामुळे खचून जाण्याची मनसेची परंपरा नाही, हेही त्यांनी ठामपणे सांगितलं. जे नगरसेवक निवडून आले आहेत, ते आपल्या-आपल्या क्षेत्रात सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विशेषतः मराठी माणसाच्या विरोधात काहीही घडत असल्याचं दिसल्यास, हे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील, असं ठाम आश्वासन त्यांनी दिलं आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या लढ्याचं मूळ अधोरेखित करत सांगितलं की, ही लढाई केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्र यासाठीची ही दीर्घकालीन लढाई आहे. अशा लढाया दीर्घ काळ चालतात आणि त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक असतं, याचं भान कार्यकर्त्यांना असल्याचं त्यांनी नमूद केलं. मनसेचं अस्तित्वच या लढ्याशी जोडलेलं आहे, असं स्पष्ट करत त्यांनी पक्षाची वैचारिक भूमिका पुन्हा अधोरेखित केली. निकालानंतर काय चुकलं, कुठे कमी पडलं आणि पुढे काय करायला हवं, याचं विश्लेषण आणि कृती सगळे मिळून करू, असं सांगत राज ठाकरे यांनी आत्मपरीक्षणाचाही संकेत दिला. मात्र त्याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना इशारा देत म्हटलं की, एमएमआर परिसर असो वा संपूर्ण राज्य, मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे मराठी माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं हीच मनसेची भूमिका राहील, असं त्यांनी ठासून सांगितलं. नव्या सुरुवातीचा निर्धार आपल्या पोस्टचा शेवट करताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं. निवडणुका येतील आणि जातील, पण आपला श्वास मराठी आहे, हे विसरायचं नाही, असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या मूळ भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं. लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया आणि नव्याने आपला पक्ष व संघटना उभारूया, अशा शब्दांत त्यांनी नव्या सुरुवातीचा निर्धार व्यक्त केला. मनपा निकालानंतर आलेल्या या पोस्टमधून पराभव स्वीकारतानाच पुढील लढाईसाठी सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा... सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया ! ! ! आपला नम्र राज ठाकरे
येथील सिल्वर सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यासह तालुकापरिसरातील जनतेच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधेसह नवीन आय सी यू सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सुविधायुक्त नूतन आयसीयूचे उद्घाटन शनिवारी १७ जानेवारी रोजी राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते व नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपर्णा सागर फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. खामगाव येथे दहा वर्षांपूर्वी सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटरची सुरुवात झाली आहे. जागतिक स्तरावरील अत्याधुनिक उपकरणे व उत्कृष्ट उपचार पद्धती अत्यंत माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णांना सोयीचे झाले आहे. मागील दहा वर्षात अत्यंत अत्यावस्त व किचकट रुग्णावर आयसीयूमध्ये उच्च दर्जाचे उपचार करण्यात आले. वाढत्या रुग्णसंखेमुळे नवीन आधुनिक वैद्यकीय उपकरणे व रुग्णांच्या दैनंदिन प्रगतीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अतिदक्षता विभागाची गरज भासू लागली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा विचार करून अत्याधुनिक सुविधेसह नवीन आयुष्याचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. अशी माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.अशोक बावस्कर यांनी दिली. ते असेही म्हणाले की, अनेकदा रुग्णांना आयसीयू सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत होती. यासाठी त्यांनी जास्तीचे पैसे देखील मोजावे लागत होते. परंतू सिल्वरसिटीमध्ये ही अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांची पायपीट थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक डॉ. पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव लढ्ढा, संचालक डॉ. प्रशांत कावडकर, डॉ. भगतसिंग राजपूत, डॉ. निलेश टीबडेवाल, डॉ. गणेश महाले, डॉ. मनीष अग्रवाल, डॉ. गौरव गोयनका, डॉ. आनंद राठी यांची उपस्थित होती.
‘एमआयएम’ची कामगिरीत सुधारणा:वंचित बहुजन आघाडीची यशस्वी ‘एन्ट्री'
महानगर पालिका निवडणुकीत २०१७ मध्ये ४५ उमेदवारांसह बहुमत मिळवणाऱ्या भाजपला ‘धक्का' देत युवा स्वाभिमानने (वायएसपी) यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. भाजपाचे यंदा २५ उमेदवार निवडून आले. २०१७ मध्ये युवा स्वाभिमानचे ३ उमेदवार विजयी झाले होते. यंदा त्यांचे १५ उमेदवार विजयी झालेत. गेल्या वेळच्या तुलनेत वायएसपीचे १२ उमेदवार वाढले आहेत. आश्चर्याची बाब अशी की, भाजपाने निवडणुकीच्या चार दिवस आधी वायएसपीसोबत युती तोडली होती. दोन्ही पक्षांची युती असतील तर दोघांचे एकूण ४० उमेदवार विजयी झाले असते. येथे भाजपाचा डाव त्यांच्याच अंगलट आला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाने यंदा प्रथमच निवडणुकीत सर्वाधिक ८५ उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचे ११ उमेदवारच निवडून आले आहेत. मात्र, या पक्षाच्या जिल्ह्यातील पक्षनेतृत्त्वाने २३ ते २५ उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ती फोल ठरली. विशेष बाब अशी की, यंदा मतदारांनी सर्वच अपक्षांना नाकारले तर एमआयएमने गेल्या वेळच्या कामगिरीत सुधारणा करीत १२ उमेदवार निवडून आणले. उर्वरित.पान४
जनसामान्यांप्रती विशेष आस्था स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांना होती. त्यांनी सामान्य माणसाच्या कामाला व भावनेला नेहमीच महत्व दिले. आजही त्यांचे स्मरण या परिक्षेत्रातील प्रत्येक घटकाला होते. याचे कारण ते जनसामान्यांना कवटाळणारे व त्यांना हृदयात ठेवणारे नेते होते. असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित स्व. बाबासाहेब सांगळुदकर यांच्या पुण्यस्मृतिनिमित्त आयोजित व्याख्यानमाला व वार्षिकोत्सव उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाध्यक्षा म्हणून हर्षवर्धन देशमुख बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार गजानन लवटे तसेच प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. जयवंत पुसदेकर, केशव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा.सुभाष बनसोड, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे, महाविद्यालय विकास व शाळा समितीचे सदस्य अण्णासाहेब रेचे, डॉ.वसंतराव टाले, प्रा. प्रभाकर कोलखेडे, शिवाजी देशमुख, नरेशचंद्र लढ्ढा, प्रदीप देशमुख, शेषराव काळे, कांता मुळे, प्राचार्य डॉ.अतुल बोडखे, समन्वयक डॉ.मिलिंद भिलपवार, प्राचार्य डॉ.अविनाश चोखंडे व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना संस्था अध्यक्ष देशमुख यांनी स्वर्गीय बाबासाहेब सांगळूदकर व कोकीळाबाई गावंडे यांच्या अनेक आठवणी व प्रसंग वर्णन केले. भविष्याची आव्हाने पेलण्यासाठी आजच्या तरुणाईने स्वतःला सक्षम बनवण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा पूर्ण उपयोग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणावर सुद्धा प्रकाश टाकला. डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या संस्थेत शिकून गोरगरीब, वंचित तथा बहुजनांच्या विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन आपल्या आयुष्याच सोनं करावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्यात. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात आमदार गजानन लवटे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करून महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. व भविष्यात विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयाला लागणाऱ्या अनेक बाबींमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाविद्यालयाच्या अस्मिता वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी महाविद्यालय विकासाचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र माने यांनी केले तर आभार प्रा.डॉ. वृषाली देशमुख यांनी मानले. स्वागत गीत व गौरव गीत डॉ.सुरेंद्र शेजे, डॉ.राजेश उमाळे व संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केले.महाविद्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या स्व.राधाबाई शामराव देशमुख शिष्यवृत्ती प्रत्येकी ५ हजार रुपये अनुराधा थोरात, पायल गोतरकर व श्रुतिका अरबट यांना यावर्षी प्रदान करण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून कल्याणी मेहेर व उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून श्रेया गायगोले तसेच महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा विविध शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला. पीएचडी प्राप्त प्राध्यापक डॉ.मनीष होले, डॉ.वैशाली चोरपगार, डॉ.हिमांशू जयस्वाल, संशोधन कार्यासाठी डॉ.संतोष उके, डॉ.देवल देशमुख तथा डॉ.सुरेंद्र शेजे व प्रा. इर्शाद अहमद तसेच पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सुरवातीला श्रद्धांजली सुरुवातीला सकाळी स्व. बाबासाहेब सांगळूदकर व स्व. श्रीमती कोकिळाबाई गावंडे यांच्या समाधीस्थळी उपस्थित मान्यवरांकडून पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे आजीवन सभासद, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक व कर्मचारी, माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश चौखंडे व तेथील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
या.द.व.देशमुख वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आयक्यूएससी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.यादवराव उपाख्य अण्णाजी देशमुख यांची ११५ वी जयंती तथा स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती संयुक्त पणे साजरी करण्यात आली. महाविद्यालयीन अभ्यास मंडळ उद्घाटन, महाविद्यालय विद्यार्थी परिषद उद्घाटन कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत आर. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना युवा दिनाचे महात्मा समजावून सांगितले तसेच युवकांना सतत उद्योगी राहण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांनी डिग्री आहे, पण दिशा नाही, या विषयावर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न दाखविले आणि ते पूर्ण करण्यासाठी महाराजांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे युवकांना संदेश, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे युवकांना संदेश याबाबत माहिती देऊन देशातील बेरोजगारीचे भयावह चित्र विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश बोके यांनी अण्णासाहेबांची दानवृत्ती यावर प्रकाश टाकला. त्यांनी महाविद्यालयाच्या इतिहासाबद्दल विस्तृत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य रमेश बोके उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रा. भरत गोंजारे यांच्या संकल्पनेतून बँक प्रतिकृती उद्घाटन कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना बँकेचा कारभार याबाबत माहिती दिली आणि स्वतः बँकेमध्ये करिअर म्हणून निवड करेल.अशी शाश्वती दिली. महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतून अभ्यास मंडळाची स्थापना करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान युवा दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाला शंतनु देशमुख, बापूराव देशमुख, सुरेंद्रराव देशमुख, गोपाल देशमुख, इब्राहिम खान, मधुकर केचे, डॉ. सावरकर आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. कुसुमेंद्र सोनटक्के यांनी केले. संचालन प्रा.खुशबू कुथे यांनी तर आभार डॉ. गणेश खेकाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर बाजार समितीतर्फे नुकतीच दोन दिवशीय विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भातील ३३ भजन मंडळानी या भजन स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेच्या निकालाअंती प्रथम क्रमांक संत बिरबलनाथ महाराज भजन मंडळ गिंभा ता.मंगरूळ जिल्हा वाशिम यांनी पटकवीला, द्वितीय क्रमांक गुरुदेव मित्र भजन मंडळ वरवट खंडेराव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांनी पटकाविला, तृतीय क्रमांक गुरुदेव सेवा भजन मंडळ साखरी अचलपूर, चतुर्थ क्रमांक माऊली गुरुदेव सेवा भजन मंडळ आमंतवाडा, पाचवा क्र. श्री गुरुदेव भजन मंडळ वस्तापूर चिखलदरा, सहावा क्र. श्री गुरुदेव भजन मंडळ कंजरा मूर्तिजापूर यांनी पटकवीला आहे. यावेळी उत्कृष्ट गायक म्हणून किशोर धुमाळे दोनोडा, उत्कृष्ट तबलावादक गौरव खातखेडे गोपालखेड, उत्कृष्ट हार्मोनियम वादक दिपक खडके बोरी, उत्कृष्ट खंजिरी वादक अजय येवतकार मागरूळ कांबे, उत्कृष्ट कोरस जगेश्वर भजन मंडळ कंजरा, शिस्तबद्ध मंडळ चंपा माता भजन मंडळ माळेगाव यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमास उद््घाटक म्हणून खासदार बळवंत वानखडे, तर अध्यक्षस्थानी सुधाकर भारसाखळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरंग अरबट, दिनकरराव गायगोले, बाजार समिती सभापती सुनील गावंडे, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, खरेदी विक्री अध्यक्ष गजाननराव जाधव, संजय बेलोकार, प्रदीप देशमुख, बाजार समिती उपसभापती राजु कराळे, खरेदी विक्री उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे उपस्थित होते. दरम्यान दुसऱ्या सत्रात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, बाळासाहेब टोळे, विलास टाले, गजानन देशमुख, संजय कोल्हे, किशोर गणोरकर, दिनकर देशमुख, दिलीप गावंडे तसेच सर्व बाजार समितीचे संचालक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाटील तर संयुक्तरीत्या संचालन बाजार समितीचे संचालक अनिल भारसाखळे व गणेश साखरे यांनी केले.
अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज, शुक्रवारी अनेकानेक राजकीय घडामोड़ी झाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार, याबाबत अनिश्चितता असताना अखेर भाजपाच्या प्रियंका शंकर मालठाणे यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) च्या नगरसेवकांनीच पक्षादेश झुगारत भाजपाला साथ देत स्वतःच्याच उमेदवाराचा पराभव केला. अंजनगाव सुर्जीचे आमदार गजानन लवटे हे शिवसेना (उबाठा) पक्षाचे असल्यामुळे या निवडणुकीबाबत उत्सुकता ताणली गेली होती. सभागृहातील संख्याबळ पाहता अंजनगाव सुर्जी नगरपालिकेत महाविकास आघाडीचाच उपनगराध्यक्ष होणार, असे जवळपास निश्चित मानले जात होते. काँग्रेसचे ९, शिवसेना (उबाठा) चे ७, समाजवादी पक्षाचे २ आणि १ अपक्ष नगरसेवक असे आघाडीचे भक्कम संख्याबळ होते. मात्र, स्थानिक पातळीवर घडलेल्या घडामोडींनी हे गणित पूर्णपणे उलटे केले. स्थानिक आमदार गजानन लवटे आणि खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शेवटच्या क्षणी शिवसेना (उबाठा) भाजपाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. प्रारंभी उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना (शिंदे गट) अशा चारही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र समन्वय होत नसल्याचे लक्षात येताच काँग्रेसचे उमेदवार शोएब खान युसुफ खान यांनी शिवसेना (उबाठा) चे उमेदवार सुयोग खाडे यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे लढत अधिकच चुरशीची झाली. अखेर प्रियंका शंकर मालठाणे (भाजप) यांना १५, सुयोग खाडे (शिवसेना उबाठा) यांना ११ आणि राम आवंडकर (शिवसेना शिंदे गट) यांना ३ मते मिळाली. स्वीकृत सदस्यांची निवड : याच बैठकीत तीन स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून संतोष वर्मा, शिवसेना (उबाठा) कडून पंकज मोदी, काँग्रेसकडून अब्दुल कलिम अब्दुल कलाम यांची निवड करण्यात आली आहे. अभद्र युतीला जबाबदार कोण? या निकालानंतर अंजनगाव सुर्जी शहरात भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील तथाकथित ‘अभद्र युती’ जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना (उबाठा) चे ६ नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे २ नगरसेवक भाजपाच्या बाजूने वळल्याने संपूर्ण चित्र बदलले. या राजकीय उलथापालथीमागे आमदार गजानन लवटे यांच्या मुलाचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ‘मनी फॅक्टर’ने मोठी भूमिका बजावल्याचा संशयही नागरिकांकडून व्यक्त केला जात असून, या युतीमुळे राजकारणाची पातळी घसरल्याची टीका होत आहे.
मनपा निवडणुकीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शरद श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. या भागात तोडफोड देखील झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. जखमी नगरसेवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला. भाजपचेच प्रभाग २ ‘ड’ गटातील पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि समर्थकांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. उर्वरित पान ४
माझं घर तोडणारे आज सत्तेतून बेदखल झाले, या शब्दांत सिनेअभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट हिनं बृहन्मुंबई महापालिकेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताकाळात आपल्या घरावर झालेल्या कारवाईची आठवण काढत, बीएमसीमधील सत्ता परिवर्तन म्हणजे आपल्याला मिळालेला न्याय असल्याचं कंगनानं ठामपणे म्हटलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने इतिहास घडवत जोरदार मुसंडी मारली असून, 25 वर्षे सत्तेत असलेला उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला पहिल्यांदाच ढासळला आहे. या निकालामुळे मुंबईतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले असून, आता भाजपचा महापौर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे गटाची शिवसेना भाजपला साथ देणार असल्याने, मुंबई महापालिकेवर पहिल्यांदाच भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन होणार आहे. या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर देशभरातून प्रतिक्रिया येत असताना, खासदार आणि अभिनेत्री कंगना रनोटची प्रतिक्रिया सर्वाधिक चर्चेत आली आहे. बीएमसी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला मोठा फटका बसला असून, हे दोन्ही पक्ष मिळूनही सुमारे 75 जागांपर्यंतच मजल मारू शकले आहेत. याउलट भाजपने आघाडी घेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. या निकालावर आनंद व्यक्त करत कंगना रनोट हिने सोशल मीडियावरून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. माझं घर तोडणारे आता सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत, असं म्हणत तिनं हा निकाल म्हणजे जनतेने दिलेला स्पष्ट संदेश असल्याचं म्हटलं आहे. कंगना रनोट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद राज्याला नवा नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली होती. त्या कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत, ती द्वेषपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला होता. याच पार्श्वभूमीवर बीएमसीतील सत्ता बदलाकडे कंगनानं वैयक्तिक न्यायाच्या दृष्टीने पाहिलं आहे. ज्यांनी मला शिव्या घातल्या, धमक्या दिल्या, माझं घर पाडलं आणि महाराष्ट्र सोडण्याची भाषा केली, आज महाराष्ट्रानेच त्यांना सोडलं, अशी जहरी प्रतिक्रिया कंगनानं दिली आहे. या निकालानंतर कंगनानं भाजपच्या विजयाचं स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली विकासाला प्राधान्य मिळेल, असा विश्वासही तिनं व्यक्त केला. महिलांचा द्वेष करणारे, धमक्या देणारे आणि माफियागिरी करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली, असं म्हणत कंगनानं ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे कठोर शब्दांत टीका केली आहे. तिच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, बीएमसी निकालानंतर सोशल मीडियावर कंगनाचा 2020 मधील एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्या काळातील आहे, जेव्हा तिच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली होती. त्या व्हिडिओमध्ये कंगनानं उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं होतं की, आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वाचं घर खाली होईल. काळाचं चक्र आहे, ते फिरल्याशिवाय राहत नाही. आजच्या निकालानंतर हा व्हिडिओ पुन्हा चर्चेत आला असून, अनेक जण त्याला सध्याच्या घडामोडींशी जोडून पाहत आहेत. एकीकडे भाजपच्या विजयामुळे मुंबईच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होत असताना, दुसरीकडे कंगना राणौतच्या प्रतिक्रियेमुळे जुने राजकीय वाद पुन्हा समोर आले आहेत. बीएमसीमधील सत्ता परिवर्तन हे केवळ राजकीय पराभव-विजयापुरते मर्यादित न राहता, अनेकांच्या दृष्टीने प्रतीकात्मक न्याय आणि काळाच्या बदलत्या प्रवाहाचं उदाहरण ठरत असल्याचं चित्र सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
पंढरपूर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या उद्देशाने शेळवे येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा बुधवार दि. १५ जानेवारी रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन, तांत्रिक व अवतांत्रिक पुस्तकांचे वाचन, पुस्तक परीक्षण तसेच थोर शास्त्रज्ञ व साहित्यिकांच्या ग्रंथांचे व पुस्तकांचे प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथालयाचा वापर वाढला असून वाचनसंस्कृतीला चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले. वाचन पंधरवडा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील, प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस.एम.लंबे, डॉ. एस. व्ही. एकलारकर, डॉ. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकलस्वारांनी घेतले स्वामींचे दर्शन:येवला ते अक्कलकोट भक्तीसाठी केला 565 कि.मी.चा प्रवास
समाजातील तळागाळातील सामान्य जनतेला कायद्यांबद्दल जनजागृती, तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याचा नाविन्य पूर्ण ध्यास घेतले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील तरुण सायकल स्वारांनी विधी साक्षरतेसह स्वामी भक्तीचा ध्यास घेतला. येवला ते अक्कलकोट सायकल स्वार यात्रेकरू येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन स्वामी चरणी नतमस्तक झाले. यावेळी सायकल यात्रेतील सातारा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, सातारा येथील ९ व्या न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. संगीता आव्हाड, संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, गणेश भोरकडे आदींसह विविध क्षेत्रातील सायकल स्वरांचा वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सत्कार केला. यावेळी महेश इंगळे बोलत होते. याप्रसंगी पिंपळगाव जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने न्यायमुर्ती डॉ. विक्रम आव्हाड यांनी नगरसेवक महेश इंगळे यांचा संस्थेचे सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार केला. ^जीवन जगत असतांना बऱ्याच वेळा कळत न कळत आपल्या हातून कायद्याचा भंग होतो, आणि कायद्याची सर्व सामान्यांना माहिती नसल्याने न्यायालयाचे द्वार ठोठावे लागतात. तसेच जर असा प्रसंग ओढवलाच तर विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्व सामान्य जनतेला कायद्याच्या चौकटीत राहून कशी व कोणती मदत मिळू शकते. याबाबतची जनजागृती व स्वामी दर्शनाचा संकल्प या सायकल यात्रे दरम्यान पूर्ण केलेली आहे. डॉ.विक्रम आव्हाड, न्यायमूर्ती, जिल्हा न्यायालय ^येवला, तुळजापूर, अक्कलकोट असा ५६५ कि.मी सायकल प्रवास करीत असताना, महाविद्यालय व न्यायालय परिसरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर केले. बालविवाह प्रतिबंध कायदा , गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, निसर्ग जोपासना व संवर्धन, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, सायकलचा जास्तीत जास्त वापर म्हणजे प्रदूषणाला आळा, पतंग नायलॉन मांजाचा वापरास प्रतिबंध इत्यादी विषयासंदर्भात सायकलला फलक लावून जनजागृती करण्यात आली. विजय भोरकडे, अध्यक्ष, जय भवानी संस्था सायकल यात्रे दरम्यान स्वामी समर्थांच्या दर्शनाचा संकल्प पूर्ण निसर्ग जोपासना आणि संवर्धन फलक लावून जनजागृती
मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद ६ तर पंचायत समिती १२ अशी सदस्य संख्या आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मोहोळ तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र विक्रीच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद साठी ६१ तर पंचायत समितीसाठी ५१ अशी एकूण ११२ नामनिर्देशन पत्राची विक्री झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ते इच्छुक असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांना घाम पुसण्याची वेळ येणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.नामनिर्देशन पत्र विक्री शुक्रवार दि.१६ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. नामनिर्देशन अर्जाच्या विक्रीच्या पहिल्याच दिवशी एकूण ११२ नामनिर्देशन पत्राची विक्री झाल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची धावपळ होणार आहे. त्यामुळे प्रचारापेक्षा मनधरणी करण्यासाठी नेत्यांना अधिक ताकद खर्ची घालावी लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान भाजपाकडून एबी फॉर्म अचानक काही मिनिटापूर्वी देण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली होती. याच पद्धतीने मोहोळ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पुनरावृत्ती करण्याची वेळ येईल काय? असा प्रश्न बेडसावत आहे. पक्षाकडून उमेदवारी मागत असताना सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपल्या कार्याचा स्वतः आढावा घेऊन उमेदवारी मागितली ताण तणाव कमी होण्यास मदत होईल.
अकलूज निमगाव या गावाची पर्यटन विकास उपक्रमांतर्गत सांस्कृतिक व ऐतिहासिक आकर्षण म्हणून निवड झाल्यानंतर विकास मगर यांच्या शेतावर प्रथमच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल व हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गावकरी, शासकीय अधिकारी यांच्यासह २१० विद्यार्थी सहभागी झाले होते. नुकतेच निमगाव हे गाव सांस्कृतिक व ऐतिहासिक आकर्षण म्हणून निवडले गेले असून गावातील अशी अनेक स्थळे त्यादृष्टीने विकसीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून तेथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निघालेली ही सहल महादेव मगर यांच्या केळी बागेची तसेच अशोक मगर यांच्या द्राक्ष बागेची प्रत्यक्ष माहिती घेत खंडोबा मंदिरात आली,तेथे दर्शन घेउन मंदिराचे महात्म्य, पूजा विधी, यात्रा उत्सव याविषयीची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर तेथेच वनभोजनाचा अनुभव घेतला. खंडोबा छबिना पालखी मार्गाने शिवारफेरी करत या विद्यार्थ्यांनी ऊस शेती, मका शेती, ओढा प्रणाली, विविध झाडे, वनस्पती व त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले. यल्लम्मा देवी मंदिरा नजीकच्या विकास मगर यांच्या बोरीच्या बागेत विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बोरे तोडून खाण्याचा आनंद घेतला. याठिकाणी विद्यार्थ्यांना उकडलेली मका कणीस वाटप करण्यात आले. यावेळी गावातील नागरीक , प्रशासकीय अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सखी प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद माणदेशी फाउंडेशनच्या शेती व माती परीक्षण केंद्राच्या वतीने सॉईल सखी प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. याठिकाणी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत सादर केली, अंकांचा खेळ खेळला. शेवटी या सहलीतील विद्यार्थ्यांना साजूक तुपातील शिरा, चिवडा तसेच सर्व पाहुणे व विद्यार्थ्यांसाठी दही, चटणी, वांग्याचे कालवण, ज्वारी, बाजरी व मकेची भाकरी, ठेचा, भात, वरण असे शुद्ध शाकाहारी जेवण मिळाल्याने चिमुकली व पाहुणे खुश होउन आनंदात परतले.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने सर्वाधिक ५२ जागांवर यश मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आमदार जगताप यांच्या एकहाती नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या. तर, राष्ट्रवादीची भक्कम साथ मिळाल्याने यंदा प्रथमच भाजपाने २५ जागांवर विजय मिळवला. महायुतीतून बाहेर पडत स्वबळावर लढलेल्या शिवसेनेला १० जागांवर यश मिळाल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. दरम्यान, प्रमुख विरोधक समजल्या जाणाऱ्या व खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरलेल्या महाविकास आघाडीला अवघ्या तीन जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मनपात अस्तित्वही टिकवता आले नाही. काँग्रेसला दोन, तर ठाकरे सेनेला अवघी एक जागा मिळाली. महापालिका निवडणुकीत ६८ जागांपैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. राहिलेल्या ६३ जागांसाठी २८३ उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी (१५ जानेवारी) सुमारे ६५.३४ टक्के मतदान झाले. काल (शुक्रवारी) एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी झाली. दुपारी साडेबारा वाजता प्रभाग सातचा पहिला अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर टप्प्या टप्प्याने प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर झाला. मनपात भाजप व राष्ट्रवादी युतीच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या असल्या तरी युतीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. पालकमंत्री विखे, आ. जगताप व सुजय विखे यांनी महायुतीचाच महापौर होईल, भाजपचा की राष्ट्रवादीचा हे ठरले नसल्याचे म्हटले आहे. मात्र, सर्वाधिक जागा असल्याने महापौरपद राष्ट्रवादीकडेच जाण्याची शक्यता आहे. भाजपला राष्ट्रवादीपेक्षा अवघ्या दोनच जागा कमी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी महापौर पद घेऊन त्या बदल्यात भाजपला उपमहापौर पद व स्थायी समितीचे सभापतिपद देऊ शकते. मात्र, भाजपकडूनही महापौर पदावर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे व त्यानंतर अडीच वर्षे भाजपला महापौर पद अशी वाटणी होऊ शकते. मात्र, अद्याप महापौर पदाचे आरक्षण शासनाकडून काढलेले नसल्याने महापौर पदासाठी इच्छुकांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला विरोधी पक्ष नेते पद द्यावे लागणार आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेला २४, एकत्रित राष्ट्रवादीला १८, भाजपला १४, काँग्रेसला ५, बहुजन समाज पक्षाला ४, समाजवादी पक्षाला १ व अपक्ष २ असे बलाबल होते. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी फुटली. अजित पवार राष्ट्रवादीने यंदा २७ जागा जिंकून ९ वाढीव जागा खेचून आणल्या. भाजपने ११ वाढीव जागा घेत २५ उमेदवार निवडून आणले. यंदा शिंदे सेनेला १० व ठाकरे सेनेला १ जागा मिळाली. दोन्ही सेना मिळून १३ जागांचे नुकसान झाले. काँग्रेसला अवघ्या २ जागा मिळाल्या. त्यांचे ३ जागांचे नुकसान झाले. बहुजन समाज पक्षाला १ जागा मिळाल्याने त्यांचे तीन जागांचे नुकसान झाले. मनपात पहिल्यांदाच एमआयएमची दोन जागा जिंकून एन्ट्री झाली आहे. मनपा निवडणूकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा विजयोत्सव आ.संग्राम जगताप व माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी साजरा केला.यावेळी गुलमोहर रोडवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत दुचाकीवरुन रॅली काढली. छाया : सिद्धार्थ दीक्षित निवडणुकीतील प्रमुख पराभूत नगरपालिका व महापालिका मिळून तब्बल नऊ वेळा नगरसेवक झालेले नज्जू पहेलवान उर्फ नजीर अहमद शेख, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख प्रमुख सचिन जाधव, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांच्या सूनबाई दीप्ती गांधी, शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांचे सुपुत्र ओंकार सातपुते, राष्ट्रवादीतून एमआयएममध्ये गेलेले समद खान, मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव यांचा प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे.
महानगर पालिकेच्या निकालापूर्वीच विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी गुलालाचे नियोजन आखले होते. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना, पहिला कल समोर येताच कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा अन् गुलालाची उधळण केली. यंदा गुलाबीपेक्षा भगव्या रंगाचा गुलाल अधिक दिसून आला. विजयी जल्लोषात कार्यकर्त्यांनी तब्बल २५ टन गुलालाची उधळण केल्या अंदाज गुलाल विक्रेत्यांनी व्यक्त केला. महानगर पालिकेच्या ६४ जागांसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जय्यत तयारी केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपयुतीने सुक्ष्म नियोजनात केलेली मोर्चेबांधणी यशस्वी ठरली. मोजणीला सुरूवात झाल्यानंतर हळूहळू कल स्पष्ट होत गेला. दुपारी बारा वाजेनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरूवात केली. फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी अन् गुलालाची उधळण झाली. शहरातील उपनगरात व मध्यशहरात कार्यकर्ते भगव्या गुलालात रंगल्याचे पहायला मिळाले. गुलाल विक्रेत्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी निवडणूक कालावधीत सुमारे २५ टन गुलालाची विक्री झाली. सुमारे अडीच लाखांचा गुलाल ^ शहरात यंदा सुमारे २५ टन गुलालाची उधळण झाल्याचा अंदाज आहे. त्यात भगवा गुलाल मोठ्या प्रमाणात दिसून आला. प्रतिकिलो दहा रुपये दराने गुलाल उपलब्ध होतो. त्यानुसार सुमारे अडीच लाख रुपयांची उलाढाल गुलाल विक्रीतून झाल्याचा अंदाज आहे. भगव्याबरोबरच, गुलाबी रंगाचाही गुलाल उपलब्ध आहे. सुनील छाजेड, व्यापारी.
जीवन यशस्वी करण्यासाठी भूगोल विषय महत्त्वाचा:कळवण कॉलेजात उपप्राचार्य पगार यांचे प्रतिपादन
आजच्या युगात भूगोल विषय शिक्षणापुरता मर्यादित नसून मानवाचे जीवन यशस्वी करण्यासाठी भूगोल हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उपप्राचार्य एस. एम. पगार यांनी केले. येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भूगोल दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. पगार होते. डॉ. व्ही. एम. पगार प्रा. पुनम वाघेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पगार म्हणाले की, नवीन संशोधन व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूगोल विषयाचे स्वरूप बदलून मानवासाठी उपयुक्त ठरले आहे. जीपीएस तसेच उपग्रहामुळे जगाच्या प्रगतीत मोठा हातभार लागला आहे. वाहतूक, शेती, व्यापार, पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा अंदाज, नैसर्गिक समस्या, पावसाचा अंदाज, तापमान, आरोग्य, वाढती लोकसंख्या यासाठी भूगोलाचे महत्व अफाट आहे. मानव व वित्तहानी थांबविण्यासाठी भूगोलाची योगदान मोठे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी भूगोल हा विषय आत्मसात करून अभ्यास करावा, हा या भूगोल दिनामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. बी. एस पगार यांनी पर्यावरणाचा समतोल बिघडला असून त्याला मानव जबाबदार आहे. आज मानवाने भारतातील सर्व नद्या दूषित केल्या. एक काळ त्या नदीतून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असत. वृक्षांचे प्रमाण कमी करून अनेक प्राणी नामशेष होत चालले आहेत. पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून त्यासाठी तरुण पिढीने पुढे येऊन जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमास डॉ. एच.व्ही.धाडे, प्रा. पी. व्ही नंदनवरे, प्रा. वाय. ए. गांगुर्डे आदींसह विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला बळी न पडला वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगावा, असे प्रतिपादन डॉ. किशोर पवार यांनी केले. चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात जयकर व्याख्यानमाला पार पडली. यावेळी ते बोलत होते. डॉ. पवार यांनी ‘चमत्कारामागील विज्ञान (सप्रयोग)’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी विज्ञानवर आधारित प्रयोग करून दाखविले. यातून अंधश्रद्धा कशी बळावली जाते, याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रमुख वक्ते मोतीवाला एज्युकेशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील बी. निर्मल यांच्या व्याख्यानाने गुंफण्यात आले. त्यांनी ए आय सारख्या प्रगत तंत्रज्ञानातील विविध टूल्सविषयी माहिती दिली. तिसरे व्याख्यान सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डॉ. प्रसाद जोशी यांच्या ‘जग जिंकू या संवादाने’ या विषयावर झाले. त्यांनी प्रभावी संवादातून आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.माधव देवरे होते. प्रास्ताविक बहि:शाल शिक्षण मंडळ समन्वयक प्रा. मनीषा चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.तेजस्विनी वालझाडे यांनी तर प्रा. प्रवीण आहेर यांनी आभार मानले.
तालुक्यातील नरूळ आश्रम शाळेत इयत्ता बारावीत शिकत असलेली अहिवंतवाडी येथील तनुश्री दगु गायकवाड हिचा ताप आल्याने नाशिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आश्रमशाळा व्यवस्थापनाने वेळीच उपचार न केल्याने मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (दि.१६) अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या दालनात दुपारी ठिय्या मांडला. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. बुधवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास तनुश्रीला ताप आला होता. आश्रमशाळा व्यवस्थानपाने तिला लगेच दवाखान्यात दाखल न करता तापाचे औषध दिले. गुरुवारी (दि. १५) दुपारी तनुश्रीला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे तिची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या सगळ्या घडामोडी दरम्यान मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांनी आम्हाला काहीही कळवले नाही. व तिच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यास विलंब केला, असा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या कार्यालयात आंदोलन केले. त्यावेळी पावरा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची कमेटी नेमून चौकशी करण्याची ग्वाही दिली. यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत कळवण पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खरसे यांच्याशी संपर्क साधला अससता यांनी घडलेल्या घटनेची वरीष्ठ व शालेय स्तरावर चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दि. ८ सप्टेंबर २०१५ रोजी चणकापूर आश्रमशाळेच्या इयत्ता तिसरीच्या रोहित विलास बागुल या विद्यार्थ्याचा उपचारासाठी निष्काळजीपणा झाल्याने मृत्यू झाला होता . त्यामुळे सगळ्याच शाळांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.
येथील रेल्वे स्थानकाला रेल्वेचे महाप्रबंधक आणि उच्चपदस्थ अधिकारी शनिवारी (दि.१७) भेट देणार आहेत. सकाळी दोन तास भेटीसाठी वेळ निश्चित करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे पथक येथील सुरक्षितता मानकांसह रेल्वेशी संबंधित सर्व विभागाची पाहणी करणार असल्याने रेल्वे स्थानकासह संपूर्ण परिसराची साफसफाई आणि रंगरंगोटीचे कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. तुंबणाऱ्या पाण्यामुळे शहरवासीयांना कमालीचा अडचणीच्या ठरलेल्या येथील अंडरपासच्या भिंतींनाही नवा रंग देण्याची लगबग अंतिम टप्यात आली आहे. भिंतीचे उजळलेले रुप पाहून प्रभावित झालेले नांदगावकर तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी करत आहे. कोविड काळात नांदगाव रेल्वे स्थानकावरील काही प्रवासी गाड्यांचे तांबे तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. हे तांबे पूर्ववत करण्यात यावे तसेच येथे शालिमार एक्सप्रेस व हुतात्मा एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांना थांबे द्यावे, अशी मागणी प्रवासी संघटना महाप्रबंधकांकडे करणार आहे.
सटाणा उपनगराध्यक्षपदी भाजपचे वाघ:स्वीकृत नगरसेवकपदी नगरसेवक दीपक सोनवणे, अनिल पाकळे यांची निवड
येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे सुमित वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली. स्विकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे गटनेते चेतन रौदळ यांनी ॲड दीपक सोनवणे व अनिल पाकळे यांची नावे दिली होती. त्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्याने त्यांच्या नावांची स्वीकृत नगरसेवकपदी सभागृहात घोषणा करण्यात आली. पालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक नगराध्यक्ष हर्षादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्य पदासाठी सुमित वाघ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी उपनगराध्यक्ष पदाची घोषणा केली. निवडीनंतर नगराध्यक्ष पाटील यांनी नवनिर्वाचित उपधगराक्ष सुमित वाघ यांचा सत्कार केला. नगराध्यक्ष हर्षदा पाटील म्हणाल्या की, यशवंत नगरीच्या विकासासाठी मतदारांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिले आहे.राजकीय मतभेद सभागृहाबाहेर ठेवून लोकहिताचे निर्णय घेवून सर्वजण एकत्रित कामकाज करू, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. उपनगराध्यक्ष वाघ यांनी माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांचे विचार व शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी राजकारण विरहीत काम करेन, अशी ग्वाही दिली. याप्रससंगी शिवसेनेचे गटनेते राहुल पाटील, अपक्ष गटनेते ॲड मणिषा पवार व नगरसेवक उपस्थितीत होते.
ग्रामीण खेळाडूंमध्ये देशासाठी खेळण्याची ताकद- सिरसाट
प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, लांब उडी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोत्यात पळणे, दोरीवर उड्या, रिले, रस्सीखेच, गोळा फेक अशा स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब सिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. विद्यार्थ्यांनी मशाल घेऊन संचलनाद्वारे पाहुण्यांना सलामी दिली. स्पर्धा अग्नी हाऊस, पृथ्वी हाऊस, आकाश हाऊस आणि जल हाऊस या गटांमध्ये पार पडल्या. डॉ. सिरसाट यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये देशासाठी खेळण्याची ताकद आहे. शालेय जीवनात खेळांना महत्त्व दिल्यास हे खेळाडू देशाचं नाव उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सचिव प्रमोद महाजन, वंदना चव्हाण, भाग्यश्री नरोडे, वंदना कैतके, सोनाली लबडे, शीतल नरोडे, किरण राजपूत, प्रियांका काळवणे, समीर शेख, दत्तू काळवणे, योगेश देवबोने, शिवनाथ चव्हाण, गजानन राऊत यांनी मेहनत घेतली. सिध्दनाथ वाडगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. यात धावताना मुली.
शहरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका तरुण झीरो वायरमनला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी घडली. शास्त्रीनगर भागात विद्युत खांबावर काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. सोमनाथ आसाराम पानडघळे (२९, रा. आघूर, ता. वैजापूर) असे मृताचे नाव आहे. वैजापुरात काही काम करण्यासाठी महावितरणकडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज बंदीचे परमिट घेण्यात आले होते. यामुळे सोमनाथ खांबावर काम करीत होता. दरम्यान, वीजपुरवठा अचानक सुरू झाल्याने सोमनाथचा पोलवरच मृत्यू झाला. महावितरणचे अभियंते व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांकडून केला जात आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी व स्थानिक नागरिकांनी महावितरण कार्यालयाबाहेर गर्दी करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी अभियंते व कर्मचारी कार्यालयाला कुलूप ठोकून मोबाइल ‘नॉट रिचेबल’होत गायब झाल्याने संताप अधिकच वाढला. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांकडून केली जात आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नव्हती. अभियंते नॉट रिचेबल : शहर अभियंता चेतन लिहे तसेच उपकार्यकारी अभियंता दीपक पांडव हे घटनेनंतर संपर्काबाहेर गेले. नागरिक व नातेवाइकांनी वारंवार फोन करूनही दोघांचे मोबाइल ‘नॉट रिचेबल’ लागले. घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी महावितरण कार्यालयासमोर टाहो फोडला. दोषी अभियंतांवर गुन्हे दाखल करा, अशी आर्त मागणी केली जात असताना कार्यालयाला कुलूप लावून मोबाइल ‘नॉट रिचेबल’ करत अभियंते गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. न्यायासाठी रडणाऱ्या कुटुंबासमोर प्रशासनाची असंवेदनशीलता उघडी पडली. या घटनेनंतर महावितरणचे अनेक कर्मचारी गायब झाल्याने वैजापूर शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक झालेल्या विजेच्या खंडामुळे नागरिकांचे हाल झाले असून संताप व्यक्त केला जात होता. रात्री उशिरापर्यंत अनेक अनेक भागांमधील वीज गायबच होती. नागरिकांनी अंधारात रात्र काढली. रात्रभर काही भाग अंधारात

24 C