SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

‘टॅरिफ’साहेब थंडावले!

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांना कलाटणी देणारी घडामोड घडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादण्यात आलेल्या आयात शुल्कात (टॅरिफ) मोठी कपात करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही घोषणा केवळ दोन देशांमधील चर्चेचा विषय नसून जागतिक बाजारपेठेवर दूरगामी परिणाम करणारा निर्णय मानला जात आहे. तरीही भारताने सावध रहायला हवे, कारण ट्रम्प यांची चालचलन […] The post ‘टॅरिफ’साहेब थंडावले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Feb 2026 12:04 am

भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कणसे काँग्रेसमध्ये दाखल

मुरुड : वार्ताहर भारतीय जनता पार्टीचे लातूर ग्रामीणमधील महामंत्री तथा मुरूड ग्रामपंचायतचे सदस्य अनंत कणसे यांनी आपले सहकारी रामकृष्ण कर्ण पुदाले, विनोद पुदाले, सुभान सय्यद, रंजित धाकतोडे, ईशाद तांबोळी, चंद्रकांत निचळे, अमोल पिंपरे, महाविर टिळक व शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मुरूड येथे आयोजित […] The post भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कणसे काँग्रेसमध्ये दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Feb 2026 12:02 am

कल्याण पाटील यांच्या नियोजनामुळे वाढवणा गटात पुन्हा काँग्रेसच!

उदगीर : प्रतिनिधी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या जि. प. व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत वाढवणा जि. प. गटात काँग्रेस पक्षाने स्थानिक उमेदवार असलेले जिल्हा परिषद गटाचे उमेदवार चिमनदरे नागारोव तर वाढवणा पंस गणाच्या सौ सविता दत्तात्रय बामणे. हंडरगुळी गणाचे उमेदवार माधवराव माने यांना उमेदवारी दिली असून या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा काँग्रेस पक्षाचे प्रदेश […] The post कल्याण पाटील यांच्या नियोजनामुळे वाढवणा गटात पुन्हा काँग्रेसच! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:58 pm

शेतकरी, महिला आणि युवक हेच माझे प्राधान्य

चाकूर : प्रतिनिधी शेतकरी, महिला आणि युवक हेच माझे प्राधान्य, शासनाच्या योजना थेट शेतक-यांच्या बांधापर्यत पोचतील, असे नियोजन करणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्य स्वयंपूर्ण करणे हाच खरा विकास आहे. कामाची संधी द्या, विकास करून दाखवतो, शेतरस्ते, आरोग्य, शिक्षण आणि जलसिंचन हाच खरा अजेंडा असल्याचे कॉग्रेस आघाडीचे उमेदवार अनिल चव्हाण […] The post शेतकरी, महिला आणि युवक हेच माझे प्राधान्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:57 pm

काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होणार

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी येरोळ येथे काँग्रेस पक्षाचे येरोळ गट उमेदवार शितल रमेश सोनवणे व येरोळ गण उमेदवार अहिल्याबाई प्रभाकर बंडगर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत बोलताना काँग्रेस नेते पुंडलिक महाके यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. महाके म्हणाले की, […] The post काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:56 pm

शक्तिपीठास जमीन घेताना शेतक-यांचा अन्त पाहू नका

भेटा : वार्ताहर भेटा परिसरातून जाणा-या शक्तीपीठ महामार्गास शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नाहीत आणि ते सक्तीने जमीन घेत आहेत. विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग बनवायचा असेल तर सहमती आवश्यक आहे. वारंवार नोटीसा, पोलिस, अधिकारी बोलावून शेतक-यांचा छळ कशासाठी सुरू आहे. शेतक-यांचा शेवट पाहू नका, असा इशारा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिला. औसा तालुक्यातील भेटा येथे […] The post शक्तिपीठास जमीन घेताना शेतक-यांचा अन्त पाहू नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:55 pm

सातारा क्राइम:‘ॲपल’च्या बनावट साहित्याचा मोठा साठा जप्त, 19 लाखांच्या मुद्देमालासह 4 जणांवर गुन्हा दाखल

सातारा शहरातील छ.शाहू स्टेडियम तसेच एसटी स्टँड समोरील मोबाईलच्या दुकानात अँपल कंपनीची बनावट ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एकूण १८ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे . याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मोबाईल ॲक्सेसरीज चा बनावट माल उत्पादन करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना समजल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी शाहू स्टेडियम आणि एसटी स्टँड परिसरातील मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकला.यावेळी त्यांच्याकडे अँपल कंपनीकडील कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना अँपल कंपनीचे चार्जर, अडँप्टर, चार्जर केबल, एअरपॅड, मोबाईल बॅक कव्हर, बॅक पॅनल, बॅटरी स्ट्रीप, कॅमेरा लेन्स इत्यादी अँपल कंपनीचे उत्पादनाचे हुबेहूब नक्कल रंगसंगती असलेली बनावट आर्टिस्टिक अँपल लोगो असलेली व कोणतेही मालकी हक्काचा कायदेशीर अधिकार नसलेली एकूण १८ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमालाचा साठा करून होलसेल आणि किरकोळ स्वरूपात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करताना पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी रोहित अशोक चोरगे (वय ३० वर्ष राहणार खिंडवाडी,सातारा) अजित रघुनाथ साबळे (वय ३३ वर्ष) दिनेश भगवानराम माळी (वय ४० वर्ष राहणार भुरके कॉलनी, सदर बाजार सातारा) दिनेश कुमार चौधरी (वय ३३ वर्ष राहणार शाहूपुरी सातारा) यांच्या विरोधात कुंदन गुलाबराव बेलोशी (वय ३८ वर्ष राहणार कल्याण पूर्ण, मुंबई) यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ढेरे करत आहेत. गोडोली शाहूनगर येथून बांधकामाच्या साहित्याची चोरी गोडोली शाहूनगर येथे बांधकामाच्या स्लॅबच्या ४२ हजार ५०० रुपये किमतीच्या लोखंडी प्लेटा अज्ञात चोरट्याने दिनांक २२ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास चोरून नेल्या असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे मल्लेश अर्जुन वसकोटी (वय ३६ राहणार सदर बाजार समाज कल्याण ऑफिस शेजारी सातारा) यांनी फिर्याद दिली आहे अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करत आहेत. राधिका रोड भोसले मळा येथून दुचाकीची चोरी राधिका रोड भोसले मळा येथील तुकाराम हाइट्स अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक (एम. एच ११ सी.एन ३३३५) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ३१ जानेवारी रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान दुचाकीची चोरी करण्यात आली असल्याची फिर्याद रामदास लक्ष्मण माने (वय ३५ राहणार तुकाराम हाइट्स राधिका रोड भोसले मळा सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 11:25 pm

सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी राजकारण

चाकूर : प्रतिनिधी जनतेच्या हक्कासाठी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवित असून सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी राजकारण असून शिक्षण, रस्ते , वीज आणि पाणी या मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य असेल, महिला सबलीकरण ते युवकांना रोजगार याला प्राधान्य देणार असून शासनाच्या सर्व योजना थेट जनतेपर्यत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या रोहीणा गटातील उमेदवार सुप्रिया सुधाकर शिंगारे यांनी मतदारसंघातील […] The post सत्तेसाठी नव्हे तर सेवेसाठी राजकारण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:19 pm

रामभाऊ तिरुके हे आरोग्य दूत, त्यांनी हजारोंचे जीव वाचवले : प्रा. मनीषा मुंडकर 

उदगीर : प्रतिनिधी मराठवाड्याचे आरोग्य दूत म्हणून हजारो लोकांचे जीव वाचवणारे रामभाऊ तिरुके हे कर्म धर्म संयोगाने वाढवणा जिल्हा परिषद सर्कल मध्ये उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. हे खरे तर आपल्या परिसरातील जनतेचे सौभाग्य समजावे. कारण जात, धर्म, पंथ या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता लातूर जिल्ह्यातील गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आणि विशेषत: कोणत्याही गोरगरिबाच्या घरातील […] The post रामभाऊ तिरुके हे आरोग्य दूत, त्यांनी हजारोंचे जीव वाचवले : प्रा. मनीषा मुंडकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:17 pm

शरद पवार व इतर ज्येष्ठ नेत्यांचा अनादर करणा-या भाजपच्या मंडळींचा अहंकार उतरवा

किल्लारी : प्रतिनिधी भूकंपग्रस्त किल्लारीला तालुक्याचा दर्जा देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांनी आश्वासन दिले होते ते आश्वासन ३३ वर्षानंतर मी दुसरा पवार पूर्ण करणार आहे, असे विधान औसा येथील स्थानिक आमदारांनी येथे केल्याचे मी ऐकले आहे, खरे तर हे सत्तेच्या अहंकारातून केलेले वक्तव्य आहे. हा वाढत चाललेला अहंकार उतरवण्याची संधी आपणाला जिल्हा परिषद आणि […] The post शरद पवार व इतर ज्येष्ठ नेत्यांचा अनादर करणा-या भाजपच्या मंडळींचा अहंकार उतरवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:16 pm

२३ हजार ५६६ वीज ग्राहकांनी स्वीकारला ‘गो-ग्रीन’ वीज बिलांचा पर्याय 

लातूर : प्रतिनिधी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ईमेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडणा-या लातूर परिमंडलातील २३ हजार ५६६ लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा लाभ घेतला आहे. या वीजग्राहकांना २८ लाख २७ हजार रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी होण्याची ऑनलाइन सुविधा व योजनेची सविस्तर माहिती […] The post २३ हजार ५६६ वीज ग्राहकांनी स्वीकारला ‘गो-ग्रीन’ वीज बिलांचा पर्याय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 11:15 pm

बंद अमरावती उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला केंद्र सरकारची मंजुरी प्रक्रिया सुरू:लोकसभेत रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी दिली माहिती

अमरावती शहरातील राजकमल आणि जयस्तंभ चौकातून रेल्वे स्टेशन तसेच काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या सर्वात जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचा विषय केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. शहरातील हा सर्वात जुना रेल्वे उड्डाणपूल गेल्या २५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे शहराच्या इतर रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम तत्काळ सुरू केले जावे, अशी मागणी समाजाच्या सर्वच घटकांकडून पुढे आली आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विषय तांत्रिकदृष्ट्या बडनेरा-अमरावती विभागातील किमी ६७१/१४-१५ येथे असलेल्या जुन्या रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) च्या पुनर्बांधणीसंदर्भातील आहे. हा दोन पदरी आरओबी सन १९६३ मध्ये बांधण्यात आला होता. राज्य प्रशासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेने केलेल्या संरचनात्मक सुरक्षा मुल्यांकन अहवालाच्या (स्ट्रक्चरल ऑडिट) आधारे, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गेल्या पंचवीस ऑगस्टपासून या उड्डाणपुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे. रेल्वे मंत्रालयाने या सर्वात जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम अजेंड्यावर घेतले असून ते सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला गती दिली जाईल. याच मुद्द्यावरून खासदार बळवंतराव वानखडे पुढील आठवड्यात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहेत. दरम्यानच्या काळात अमरावतीत रेल्वे स्टेशन सुमारे एक किलोमीटर पुढे नेण्याचा पर्याय पुढे आणण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावामागे रेल्वे स्टेशनची जमीन काही खाजगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचे लक्षात येताच, हा प्रस्ताव मागे घेण्यात आला. आता सरकारने पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्याने रेल्वे स्टेशनचे स्थानांतर जवळपास टळले आहे. खासदार बळवंतराव वानखडे यांनी त्यावेळीच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून याबाबतची हमी प्राप्त करून घेतली होती.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 11:03 pm

संबंधितांना खुटा उपटून मारेन:खराब रस्त्यावरून मंत्री गुलाबराव पाटलांचा संताप, भाजपवरही जोरदार टोलेबाजी

शिवसेना शिंदे गटाचे नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी खराब रस्त्यावरून चांगलाच संताप व्यक्त केला आहे. उद्या मी मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर मी खुटा उपटून मारेन, अशा शब्दात त्यांनी झापले आहे. तसेच सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेल्यांना या निवडणुकीतून फक्त पैसे कमवायचे असतात. म्हणून ते कोणीकडूनही तिकीट घेतात आणि पैसा वाटून निवडून येतात, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी आमदारांवर टीका केली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, लातूरमधील भाजप आणि कॉंग्रेस उमेदवार हे दोघेही दांडगे आहेत. त्यांना फक्त पैसा कमवायचे आणि वाटायचे आहेत. त्यामुळे दोघेपण एकमेकांना 'आय लव्ह यू' म्हणतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच कॉंग्रेसवाल्यांचा सत्यानाश होऊ द्या. जर मी उद्या मंत्री नसलो आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर मी खुटा उपटून मारेन, असे म्हणत त्यांनी कामखेड ते रेनापूर रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेवरून संताप व्यक्त केला. माझ्यावर केस झाली तरी परवा नाही या रस्त्याने या भागाच्या आमदाराला गावात पुन्हा येऊ देऊ नका, रस्ता दुरुस्त करा आणि मगच गावात या, असा सल्ला गुलाबराव पाटलांनी गावकऱ्यांना दिला आहे. या रस्त्याने प्रवास करताना प्रत्येकाला त्रास होत आहे. जर मी उद्या मंत्री राहिलो नाही आणि माझ्याकडे असा रस्ता असेल तर मी संबंधितांना मारेल, मग माझ्यावर केस झाली तरी परवा नाही, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमची मुले गुबगुबीत झाली की भाजप मांडीवर बसवून घेते पुढे बोलताना गुलाबराव पाटलांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, शिवसेना पक्षात कार्यकर्ते तयार होतात आणि तयार झालेली कार्यकर्ते भाजप, कॉंग्रेस यांसारख्या पक्षात घेतले जातात. त्यामुळे आम्ही मुले जन्माला घालायचे आणि मुले गुबगुबीत झाली की भाजपने मांडीवर बसवून घ्यायचे, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे हवाई उड्डाण रद्द दरम्यान, गुलाबराव पाटील यांचे लातूर्हून परतीचे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले. हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्याने त्यांचे लातूर येथून होणारे हवाई उड्डाण रद्द करण्यात आले आहे. 'एव्होसेट एव्हिएशन' कंपनीच्या सहा आसनी विमानाने साडेचार वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते, मात्र हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथील हवाई यंत्रणांकडून आवश्यक 'क्लिअरन्स' मिळण्यास विलंब झाला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही परवानगी न मिळाल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव वैमानिकाने विमान उड्डाणास असमर्थता दर्शवली. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 10:37 pm

सीईओ संजीता महापात्र यांनी धामणगाव रेल्वे येथे ऐकल्या तक्रारी:पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार तक्रार निवारण शिबिराचे आयोजन

अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी धामणगाव रेल्वे पंचायत समितीत नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या तक्रारी दोन आठवड्यांत निकाली काढण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करावे, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समिती (DPC) बैठकीत दिले होते. त्यानुसार, सीईओ महापात्र यांनी संपूर्ण आठवडाभराचा कृती कार्यक्रम निश्चित केला असून, त्याचा शुभारंभ आज धामणगाव रेल्वे येथून करण्यात आला. सीईओ संजीता महापात्र यांनी धामणगाव रेल्वे पंचायत समितीच्या सभागृहात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी घराजवळील अतिक्रमण, घरकुलासारख्या वैयक्तिक समस्यांसह गायरान जमिनीचा गैरवापर यांसारख्या सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवरही तक्रारी मांडल्या. सीईओ येणार असल्याची माहिती ग्रामसेवक व इतर कर्मचाऱ्यांमार्फत तालुक्यात आधीच पोहोचवण्यात आली होती. त्यामुळे कामनापूर घुसळी, बोरगाव धांदे, देवगाव आदी गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापात्र यांनी त्यांच्या अधिनस्थ अधिकाऱ्यांच्या समक्ष नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि दोन आठवड्यांत ते सोडवण्याचे निर्देश दिले. यावेळी धामणगाव रेल्वेचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल भोरखडे आणि पंचायत समिती स्तरावरील इतर अधिकारी उपस्थित होते. जनता दरबार आटोपल्यानंतर, सीईओ महापात्र यांनी अधिकाऱ्यांकडून विविध विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कावली वसाड आणि ढाकुळगाव येथे भेट देऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. तालुकास्तरावरील जनता दरबारचा आजचा शुभारंभ झाल्यानंतर, पुढील आठवड्यात मोर्शी, धारणी, चिखलदरा तसेच अमरावती पंचायत समिती स्तरावर जन तक्रार निवारण दिन आयोजित केला जाणार आहे. यासाठीचे दिवस निश्चित करण्यात आले असून, ते संबंधित पंचायत समिती प्रशासनामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 10:06 pm

चीनने ३ वर्षांत ३० हून अधिक जनरल हटवले

बीजिंग : चीनच्या सैन्यात गेल्या तीन वर्षांत असा बदल झाला आहे, जो देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ३० हून अधिक जनरल आणि अ‍ॅडमिरलना एकतर बडतर्फ केले आहे किंवा ते अचानक गायब झाले आहेत. जिनपिंग यांनी २०२३ मध्ये जी सेंट्रल मिलिटरी कमिशन स्थापन केली होती, त्यातही फक्त […] The post चीनने ३ वर्षांत ३० हून अधिक जनरल हटवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:28 pm

दक्षिण कोरियाची ९ फायटर जेट्स भारतीय हद्दीतून उड्डाण करणार होती

जामनगर : भारत हा कोणाच शत्रू नाही आणि कोणी शत्रूत्व घेतले तर त्याला सोडत नाही. रशिया, फ्रान्सच्या मदतीने भारतीय सैन्यदलांनी आपली ताकद जबरदस्त वाढविली आहे. आपल्याकडे धाडसी शूरवीर आहेत, परंतू त्यांना अधिक घातक डीआरडीओसारख्या संस्थांनी केले आहे. भारतीय सैन्याची ख्याती आता अवघ्या जगभरात झालेली आहे. याच सैन्याच्या हवाई दलाने आज पाहुणचार काय असतो हे अवघ्या […] The post दक्षिण कोरियाची ९ फायटर जेट्स भारतीय हद्दीतून उड्डाण करणार होती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:27 pm

विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग

कोलकाता : काठमांडूहून इस्तंबूलकडे झेपावलेल्या टर्किश एअरलाईन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे आगीचा थरार पाहायला मिळाला. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच एका इंजिनने पेट घेतल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत वैमानिकाने तत्काळ कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाचे कोलकाता विमानतळावर सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकाच्या या तत्परतेमुळे विमानातील शेकडो प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. […] The post विमानाचे कोलकातामध्ये इमर्जन्सी लँडिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:26 pm

संसदेत पुस्तकांवरून पुन्हा जुंपली

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या पुस्तकांवरून राजकीय महायुद्ध पेटले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता थेट नेहरू-गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकांपर्यंत पोहोचला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांच्या संबंधांवरील पुस्तकाचा उल्लेख करत गांधी परिवारावर सडकून टीका केली, ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ […] The post संसदेत पुस्तकांवरून पुन्हा जुंपली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:24 pm

देवस्थान ट्रस्ट उद्योग नाही

नवी दिल्ली : देवस्थान ट्रस्ट हे औद्योगिक विवाद कायद्याच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे अशा ट्रस्टला उद्योग मानले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एका लेखापालास विनाचौकशी सेवेतून कमी केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा निर्णय दिला असला, तरी संबंधित कर्मचा-याला १२ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी. […] The post देवस्थान ट्रस्ट उद्योग नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:24 pm

रशियाची भारताला ‘बंपर ऑफर’

मॉस्को : रशियाने पुन्हा एकदा भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये मोठी सूट देण्याची ऑफर दिली आहे, ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू असलेला कच्च्या तेलाचा पुरवठा हा सुरळीत सुरू राहावा असा रशियाचा उद्देश आहे. सध्या मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा प्रति बॅरेल जो रेट सुरू आहे, त्यापेक्षा प्रत्येक बॅरलवर १० डॉलरपेक्षाही जास्त सूट देण्याची ऑफर रशियाकडून भारताला देण्यात आली आहे. […] The post रशियाची भारताला ‘बंपर ऑफर’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:22 pm

गद्दाफीच्या मुलाची घरात घुसून हत्या

झिंटन : लिबियाचे माजी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी याचा मुलगा आणि एकेकाळचा त्यांचा उत्तराधिकारी सैफ अल-इस्लाम गडाफी याची मंगळवारी हत्या करण्यात आली. लिबियातील झिंटन येथील त्याच्या राहत्या घरी चार अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सैफ अल-इस्लामचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे निकामी केले. त्यानंतर कमांडो स्टाईलने घरात […] The post गद्दाफीच्या मुलाची घरात घुसून हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:21 pm

विधानसभेत रात्रभर राडा

बंगळूूरू : कर्नाटक विधानसभेत काल रात्री हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. उत्पादन शुल्क खात्यात कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राज्य उत्पादन शुल्क मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याची मागणी करत भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांचा मित्रपक्ष जनता दल (सेक्युलर) यांनी मंगळवारी रात्रभर विधानसभेत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विरोधी पक्षातील आमदारांनीरांनी विधानसभेच्या सभागृहातच रात्र काढली. भाजपने उत्पादन शुल्क विभागात […] The post विधानसभेत रात्रभर राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:20 pm

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी:एकनाथ शिंदेंकडून गंभीर दखल, विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा तयार करण्याचे दिले आदेश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत. गॅस टँकर उलटल्यामुळे ज्वलनशील प्रोपोलीन गॅसची गळती सुरू झाली होती. या गळतीमुळे धोका आणखी वाढून मोठे नुकसान झाले असते त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळवावी लागली. शिवाय एमएसआरडीसी आणि पोलिसांनी अथक 20 तास प्रयत्न करून गॅस गळती सुद्धा रोखली आहे असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, प्रवाशांना झालेला त्रास दुर्देवी आहे. त्यांना झालेल्या मनस्तापाची पूर्ण कल्पना आहे. पण एमएसआरडीसीने सुद्धा तातडीने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक मागवली. त्यांनीही प्रयत्न केले. मात्र हे काम खूप आव्हानात्मक होते. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, या दुर्घटनेत जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि रिलायन्स कंपनीच्या तज्ञांना बोलवण्यात आलं. या पथकांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान प्रवाशांना एमएसआरडीसी कडून मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी, बिस्किट्स देण्यात आले. सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर होते. एवढेच नाही तर पथकर वसुली करू नये म्हणून देखील निर्देश मी दिले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर येईपर्यंत या महामार्गावरील टोल वसूली थांबविण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून ते तातडीने पूर्ण करून हा टप्पा लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी विभागाला दिले. ही लिंक सुरू झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासातील अंतरही वाचेल त्याचप्रमाणे अशा घटना घडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गही कामाला येईल, असे सांगून शिंदे यांनी एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चाही केली आणि एक आपत्कालीन आराखडा तयार करण्यास सांगितले. एक लेन, हजारो गाड्या आणि अखंड प्रतीक्षा:गॅस गळतीने महामार्ग बंद आणि 24 तासांची कोंडी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यानंतर निर्माण झालेली भीषण वाहतूक कोंडी 24 तास उलटूनही कायम आहे. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे आठ तास पूर्णपणे ठप्प ठेवण्यात आली होती. गॅस गळती सुरू असल्याने प्रशासनाने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हजारो वाहनचालक महामार्गावर अडकून पडले आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:18 pm

ममता बॅनर्जी ३२ वर्षांनंतर वकील म्हणून सुप्रीम कोर्टात?

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) खटल्याची बुधवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. या खटल्यावरून राजकीय वाद आहेत. तशातच सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आहेत. ममता बॅनर्जी यांची एक आगळीवेगळी प्रतिमा आहे. त्या मतदार यादीसाठी सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेविरुद्ध आवाज उठवत आहेत. त्यांनी यापूर्वी बिहारमध्ये एसआयआर प्रक्रियेला विरोध […] The post ममता बॅनर्जी ३२ वर्षांनंतर वकील म्हणून सुप्रीम कोर्टात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:18 pm

लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव देण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणीबाबत आम्ही एकत्र बसू आणि त्यावर काय करायचे याचा विचार करू असे सांगितले. यावेळी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलायचे काहीच नाही. केवळ खोटे आरोप […] The post लाडकी बहीण योजनेला अजितदादांचे नाव देण्याची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 9:08 pm

सातारा जिल्हा मतदानासाठी सज्ज!:दुर्गम भागातही पोहोचली मतदान यंत्रणा, 20 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणासाठी शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात ११ हजार ८२२ मतदान यंत्र तैनात करण्यात आले आहेत. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २१ लाख ९४ हजार ११० मतदार मतदान करणार आहेत. यासाठी वीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर, वाई ,कराड येथील काही अति दुर्गम व मागास भागातही मतदान यंत्रणा पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये आठ वर्षानंतर होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांतर्गतच तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांची कसोटी लागणार आहे. बऱ्याच अपेक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. स्थानिक जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे काही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून या निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्ह्यात अकरा लाख ८ हजार २०३ पुरुष व दहा लाख ८५ हजार८४७ महिला आणि इतर ६० मतदार नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यातील २,८७७ मतदान केंद्रावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खाजगी वाहनाने मतदान यंत्रणा व कर्मचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी सोय केली आहे. तर दुसऱ्या बाजूला परगावातील मतदारांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांनी वाहनांचे नियोजन केले आहे. खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्याबाबत शासकीय काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. प्रस्थापित उमेदवारांच्या प्रचारा निमित्त ग्रामीण भागात जेवणावळी सुरू आहे . अद्यापही एकाही ठिकाणी कारवाई झालेली नाही. निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्साह पूर्वी होता. आता सत्ताधाऱ्यांच्या समवेतच काही प्रशासकीय पक्षनिष्ठा व व्यक्तीनिष्ठांचा उद्रेक झालेला आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना प्रचाराची वाहने हिंडत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या सोबतच अनधिकृत व्यावसायिक प्रचारामध्ये उतरले आहेत . लेखी तक्रारीची गंभीर दखल घेतली नसल्याचा अनुभव आहे. याची सुद्धा उघडपणे चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत आहे आहे. सातारा जिल्ह्यात तालुका निहाय सातारा -३७१ कराड – ४८६ पाटण- ४०१ कोरेगाव२५३ – वाई- १८१ खंडाळा – ११४ महाबळेश्वर- १०९ जावळी- १५४ फलटण- २८२ माण – २१७ आणि खटाव– ३०९ अशी मतदान यंत्रणा आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या यंत्रणेची तपासणी करूनच मतदानाला सुरुवात करावी लागणार आहे. तसेच काही ठिकाणी तक्रार असेल तर त्या तक्रारीचे तातडीने जागेवरच निरसन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. भरारी पथकही सोबत असले तरी त्यांना सुद्धा मर्यादा येत आहेत. या निवडणुकीमध्ये अटीतटीची लढत असल्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच मतदान पत्रिका व त्यावरील राजकीय पक्षाचे चिन्ह खुलेआम छपाई करून आणलेले आहेत. या चिन्हाबाबत आता नियमावली करणे गरजेचे बनले आहे असे जेष्ठ नागरिकांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:07 pm

मानधनासाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक:सातारा जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन, स्वच्छ भारत मिशनचे काम ठप्प

जिल्हा परिषद स्तरावर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ व जल जीवन मिशनअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील मानधन प्रलंबित राहिल्याने प्रशासनासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी कृती समितीने बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी) पासून कामबंद आंदोलनाचा इशारा देऊन सातारा जिल्हा परिषदेच्या गेटसमोर बसून या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. याबाबत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये जिल्हा व तालुका स्तरावरील कंत्राटी कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ग्रामपंचायत स्तरावरील अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी, अहवाल सादरीकरण तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील नियोजन व देखरेखीचे काम या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच पार पडत असते. मात्र, त्यांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून रखडल्यामुळे हे कर्मचारी आर्थिक व मानसिक ताणतणावाखाली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर व मनोबलावर होत होत आहे. कृती समितीने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मानधन तातडीने अदा न झाल्यास जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सन २०२६-२७ चा वार्षिक कृती आराखडा सादर केला जाणार नसल्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे क्षेत्रीय तपासणी, ऑनलाईन नोंदी, अहवाल सादरीकरण, समन्वय व दैनंदिन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सदर परिस्थिती केवळ आर्थिक नसून मानवी व प्रशासकीय दृष्टीने संवेदनशील असल्याचे कृती समितीच्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन राज्य शासनास वस्तुस्थिती व संभाव्य परिणाम कळविणे तसेच कर्मचारी व प्रशासन यांच्यात समन्वय राखण्याची विनंती संबंधितांकडून करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:00 pm

मंत्री गुलाबराव पाटलांचे हवाई उड्डाण रद्द:आवश्यक क्लिअरन्स मिळण्यास विलंब; लातूरहून संभाजीनगरकडे रस्ते मार्गाने प्रस्थान

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर विमान प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह मंत्री विमान प्रवासाची विशेष काळजी घेताना दिसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे दुसरे हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याही विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरू असून, अनेक मंत्री हवाई मार्गाचा वापर करून दौरे पूर्ण करत आहेत. याच प्रचाराच्या धावपळीत तांत्रिक कारणामुळे राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर येथील हवाई उड्डाण रद्द करण्यात आले. 'एव्होसेट एव्हिएशन' कंपनीच्या सहा आसनी विमानाने साडेचार वाजता उड्डाण करणे अपेक्षित होते, मात्र हैदराबाद, बिदर आणि चेन्नई येथील हवाई यंत्रणांकडून आवश्यक 'क्लिअरन्स' मिळण्यास विलंब झाला. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही परवानगी न मिळाल्याने, सुरक्षिततेच्या कारणास्तव वैमानिकाने विमान उड्डाणास असमर्थता दर्शवली. लातूर विमानतळावर रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळी उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक यंत्रणा उपलब्ध नसल्याने या अडचणीत अधिकच भर पडली. अखेर हवाई उड्डाण शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांचे विमान उड्डाण अधिकृतपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आपला परतीचा प्रवास रस्तेमार्गाने कारने करावा लागला. त्यानुसार गुलाबराव पाटील चारचाकी वाहनातून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांचे लातूर दौऱ्यापूर्वी हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे समोर आले होते. टेकऑफ करण्यापूर्वीच पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी सकाळी साडे दहा वाजता निघार होते. त्यासाठी हेलिकॉप्टर विमानतळावरून टेकऑफ करणार होते. मात्र मला कळवण्यात आले मी जे काल हेलिकॉप्टर वापरले होते त्यात काही बिघाड आहे. मला कालही तसे वाटले होते. हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड आहे या टेक्निकल बाबतीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले होते. पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आहे आणि त्यांचे निधन झाले आहे. मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय त्यांनी अनुभवले असेल, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली होती.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 8:20 pm

विवाहित महिलेवर धमकी देत अत्याचार:आरोपींच्या दुकानावर थेट बुलडोझर चालवला; अकोल्यात महापालिकेची धडक कारवाई

अकोला येथील बलात्काराच्या गंभीर घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, गुन्हेगारांविरुद्ध 'बुलडोझर कारवाई'चा बडगा उगारला आहे. सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींच्या दुकानांवर अकोला महानगरपालिकेच्या तोडक पथकाने थेट बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त केली. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जातो, अगदी त्याच धर्तीवर अकोल्यातही ही कठोर कारवाई करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, डाबकी रोड परिसरातील एका विवाहित महिलेने आरोपींनी अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. या प्रकरणात रहमान ऊर्फ मोहम्मद मुस्तफा सलीम तेली, मोहम्मद इब्राहिम ऊर्फ बाबू सलीम तेली, इब्राहिम (गॅरेजवाला) आणि चंदू वानखेडे यांच्याविरुद्ध बलात्कारासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलत आरोपींच्या बेकायदेशीर बांधकामांवर ही धडक कारवाई पूर्ण केली. पीडित महिलेने दिलेलया तक्रारीनुसार, परी बिंदी घर' या दुकानात बलात्काराची घटना घडली. हे दुकान गांधी रोड, सीटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या मागे आहे. याच ठिकाणी पीडितेशी अश्लील वर्तन करत तिचा व्हिडिओ काढण्यात आला. त्यानंतर जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीटी कोतवाली पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींबाबत पुढील कारवाई सुरू आहे. तसेच हे प्रकरण संवेदनशील असून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पुढाकार घेतला आहे. दुकानावर बुलडोझर कारवाई अकोल्यातील गांधी रोडवरील सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या ‘परी बिंदी घर’ आणि त्यालगतच्या अवैध दुकानांवर महानगरपालिकेच्या तोडक पथकाने बुलडोझरच्या साहाय्याने मोठी कारवाई केली. जरी महानगरपालिका प्रशासनाने ही अधिकृतरीत्या अवैध अतिक्रमणाविरोधातील कारवाई असल्याचे स्पष्ट केले असले, तरी बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्याच मालमत्तेवर हा प्रहार झाल्याने शहरात प्रशासनाच्या आक्रमक भूमिकेची जोरदार चर्चा आहे. या कारवाईतून गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. स्थानिक नागरिकांनी या धाडसी कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, उत्तर प्रदेशातील बुलडोझर मॉडेलच्या धर्तीवर अकोल्यातही गुन्हेगारांविरुद्ध कठोर पवित्रा घेतला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये जरब बसली असून, समाजात प्रशासनाप्रती विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सिटी कोतवाली पोलीस या बलात्काराच्या प्रकरणाचा तांत्रिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून सखोल तपास करत असून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यादृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:23 pm

प्रफुल्ल पटेलांचे नाव अनावधानाने येतेच कसे?:भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना सवाल; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून वाद पेटला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता पक्षाच्या अध्यक्ष पदावरून जोरदार चर्चा रंगली आहे. त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ठरल्याचे म्हटले होते. त्यानंतर यावरून राजकारण काहीसे तापल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी देखील प्रतिक्रिया देत थेट सुनील तटकरेंना सवाल केला आहे. पियुष गोयल यांच्याकडून मुलाखतीत बोलताना प्रफुल्ल पटेल यांचे नाव अनावधानाने आल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. यावर भरत गोगावले यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, अनावधानाने नाव येतेच कसे? असा सवाल करत गोगावले यांनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रायगडमध्ये गोगावले आणि तटकरे यांचा वाद सर्वश्रुत आहे. अनावधानाने कसे नाव येते? भरत गोगावले म्हणाले, पूर्वकल्पी ठरलेले असताना असे अनावधानाने कसे नाव येते? अजित दादा निघून गेल्याला अजून 12 दिवस देखील झाले नाहीत. तोवरच सगळ्या पदांच्या नेमणूक सुरू झाल्या, असे म्हणत गोगावले यांनी टीका केली आहे. सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना पियुष गोयल यांच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव अनावधानाने आल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यावरून गोगावले यांनी टीका केली आहे. दरम्यान, पियुष गोयल यांनी केलेल्या विधानानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, राष्ट्रवादी कॉंग्रेस या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कोणीही पाटील असावा, पटेल नसावा, असे म्हणत त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली होती. सुनील तटकरेंची रायगडमध्ये सभा अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची रायगडमध्ये पहिली सभा संपन्न होत असून रायगडच्या इंदापूर येथे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा कामाला लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 6:39 pm

शरद पवार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी दाखल:सहयोग सोसायटीतील निवासस्थानी प्रतिभा पवारही उपस्थित; विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी निघाले असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील सहयोग सोसायटी येथे जाऊन शरद पवार सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच भेट असणार आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच या भेटीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्यापूर्वी हीच सहयोग सोसायटी राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू ठरले होते. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक बदल झाले. यावेळी सहयोग सोसायटी, गोविंदबाग आणि मुंबईतील देवगिरी बंगला येथील घडामोडी अत्यंत वेगाने घडल्याचे पाहायला मिळाले. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय अजित पवारांचे निधन झाल्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. अस्थीविसर्जनाच्या दिवशी शरद पवार नीरा नदीच्या पाहणीसाठी गेले होते. यावेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांकडून नदीतील दूषित पाण्याची माहिती घेतली होती. शरद पवार तसेच शरद पवार गटातील नेत्यांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याची इच्छा आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटातील नेत्यांनी आम्ही एनडीएसोबतच राहणार असल्याचा निर्धार केला आहे. तसेच छगन भुजबळ यांनी तर थेट म्हटले होते की दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल. यावरून देखील शरद पवारांनी आक्षेप घेत म्हटले होते की, राष्ट्रवादीबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. आता शरद पवार हे सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी सहयोग सोसायटीकडे जाण्यास निघाले आहेत. दोघांमध्ये काय चर्चा होते? विलीनीकरण होणार का? तसेच शरद पवार पुन्हा एकदा भाकरी फिरवणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. कौटुंबिक भेट तर दुसरीकडे ही कौटुंबिक भेट असल्याचे देखील बोलले जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यामुळे कौटुंबिक भेट झाली नव्हती म्हणून आज पवार कुटुंब सहयोग सोसायटी येथील निवासस्थानी जमले असल्याचे समजते.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 5:55 pm

विमानातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होते:आमदार अमोल मिटकरी यांचा दावा; स्थानिक सरपंचाने दिलेल्या माहितीचा दिला दाखला

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असताना त्यात मोठा स्फोट झाला, असे ते म्हणालेत. विमान अपघातात प्रथम 6 जण ठार झाल्याची माहिती देण्यात आली. पण घटनास्थळी पाचच मृतदेह सापडले. मग 6 वा व्यक्ती कोण? असा पुनरुच्चारही त्यांनी या प्रकरणी केला आहे. अजित पवार यांचे गत बुधवारी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या धक्क्यातून अद्याप सावरले नाहीत. आमदार अमोल मिटकरी यांचाही यात समावेश आहे. त्यांनी बुधवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघातावर एक नवा दावा केला. ते म्हणाले, अजित पवारांचा मृत्यू झाला त्या दिवशी मी सायंकाळी 5 वाजता घटनास्थळी गेलो होतो. तेव्हा तेथील सरपंचाने मला धक्कादायक माहिती दिली. विमान कोसळत असताना त्यातून कुणीतरी बाहेर पडण्याची धडपड करत होते. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही विमानाच्या दिशेने जात असताना अचानक स्फोट झाला हे मला त्यांनी सांगितले. सदर विमान अपघातात पहिल्यांदा 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. याचा अर्थ विमानात 6 जण होते. मग पाचच जणांचे मृतदेह कसे आढळले? तो सहावा व्यक्ती कुठे गेला? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी यावेळी केली. गोजुबावीच्या सरपंचाचा दावा काय? उल्लेखनीय बाब म्हणेज गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी अजित पवारांच्या विमानाचा अपघात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अपघातावेळी विमानाचा दरवाजा उघडा होता. एक निळी पॅन्ट घातलेला व्यक्ती बाहेर येतोय असे आधी वाटले, पण नंतर तसे काही दिसले नाही. हे विमान अजितदादांचे होते याची कल्पना आम्हाला नव्हती. ते एखाद्या उद्योगपतीचे असेल असे आम्हाला वाटले, असे त्यांनी अपघातानंतर सांगितले होते. सरपंच कल्याण आटोळे यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन त्यांनाही ही माहिती दिली. विमानाने कोसळण्यापूर्वी आकाशात 2 घिरट्या घातल्या. त्यानंतर खाली येत असताना हा अपघात झाला, असेही ते म्हणालेत. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 5:46 pm

स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी:मॉडेल महिलेने जाब विचारताच अंगावर घातली कार, मुंबईतील थरारक घटनेने खळबळ; VIDEO

मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 29 वर्षीय तरुणाने एका महिलेच्या अंगावर कार चढवत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. या प्रकरणी ओशिवारा पोलिसांनी आरोपी मोहम्मद शकील शेखवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लोखंडवाला परिसरातील अरीना बिल्डिंगच्या गेटवर रात्री 9.30 च्या सुमारास घडली. आरोपी मोहम्मद शेख याने मॉडेल असलेल्या मैत्रिणीला स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी दिली होती. या धमकीबाबत विचारणा करण्यासाठी या मॉडेल महिलेने आरोपीला तिच्या बिल्डिंगच्या गेटवर बोलावले होते. त्यानंतर रागाच्या भरात आरोपी तरुणाने त्याच्या स्कोडा कारने महिलेला जोरदार धडक देत काही अंतर फरफटत नेले. त्यानंतर तिथे उपस्थित दोन नागरिक महिलेच्या मदतीसाठी धावून गेले, तेव्हा आरोपीने त्यांच्याही अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेत महिला किरकोळ जखमी झाली असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बिल्डिंगच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दोघांमधील नेमका वाद काय? गेल्या 9 महिन्यांपासून, मोहम्मद शेख नावाचा आरोपी, एका मॉडेल असलेल्या पीडितेबद्दल तिच्या मित्र आणि कुटुंबियांमध्ये अफवा पसरवत होता, ज्यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ती मॉडेल आणि तिची मैत्रीण आरोपीने पसरवलेल्या अफवांबद्दल त्याला जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी गेल्या होत्या, पण त्याने दरवाजा उघडला नाही. तो बाहेर न आल्याने त्या दोन्ही मुलींनी मोठ्याने त्याचे नाव घेऊन त्याला हाका मारल्या. अहवालात पुढे म्हटले आहे की, दुसऱ्याच दिवशी पीडितेच्या मैत्रिणीला तिच्या स्नॅपचॅटवर अ‍ॅसिड हल्ला करण्याची धमकीचा संदेश आला. या धमकीच्या संदेशानंतर, आरोपीने मॉडेलवर गाडी घालून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 5:25 pm

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मोठी अपडेट:प्रकाश आंबेडकरांची थेट गृह खात्याच्या मंत्र्यांना कोर्टात बोलावण्याची मागणी; उद्या पुन्हा सुनावणी

शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांतर्फे युक्तिवाद करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी थेट गृह खात्याच्या मंत्र्यांना कोर्टात बोलावण्याची मागणी केली. बीएनएस 196 कायद्यानुसार पोलिस कोठडीतील मृत्यूनंतर मॅजिस्ट्रेट यांनी चौकशी केल्यानंतर पुढे काय करायचे? याविषयी कायद्यात कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. केंद्र किंवा राज्य सरकारने त्यात आजतागायत दुरुस्ती केली नाही, असा मुद्दा त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? प्रकाश आंबेडकर आजच्या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील हत्या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. पोलीस खात्याचे प्रतिज्ञापत्र, गृहखात्याचे मुख्य सचिव यांचे प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केले. बीएनएस 196 कायद्यानुसार पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर मॅजिस्ट्रेट यांनी चौकशी केल्यानंतर पुढे काय करायचे? या बाबतीत कायद्यामध्ये तरतूद नाहीये. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासनाने यामध्ये आजतागायत दुरुस्ती केली नाहीये. त्यामुळे न्यायालयाला आम्ही विनंती केली की, न्यायालयाने ज्यांना बोलावले आहे, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये, त्यांना फक्त धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढण्यासाठी, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी स्वतः कोर्टाने कायद्यातील त्रुटी भरून काढावी किंवा गृह खात्याच्या मंत्र्यांना कोर्टाने बोलवावे आणि हा अपूर्ण कायदा पूर्ण करणार की नाही? यावर त्यांना विचारणा करावी. न्यायालयाने हे प्रकरण उद्या सकाळी सुनावणीसाठी ठेवले आहे. काय आहे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण? परभणी शहरात गतवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापुढील संविधानाची विटंबना करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. आंदोलकांनी वाहनांची तोडफोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात 35 वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी यांचाही समावेश होता. नंतर सोमनाथ यांचा कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला होता. प्रारंभी सोमनाथचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा केला जात होता. पण पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये त्यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाचे देश पातळीवर संतप्त पडसाद उमटले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी परभणीत येऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली होती. तर प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी पीडितांची कोर्टात बाजू मांडून त्यांच्यामागे भक्कमपणे उभे राहिले आहेत. विजयाबाई सूर्यवंशी यांचा न्यायालयीन लढा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणी त्यांची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हायकोर्टाच्या आदेशांवर शिक्कामोर्तब करत त्यांची याचिका धुडकावून लावली. त्यानंतर आता या प्रकरणी पुढील सोपस्कार सुरू आहेत. या प्रकरणात विजयाबाई सूर्यवंशी यांच्यातर्फे स्वतः ॲड. प्रकाश आंबेडकर न्यायालयात युक्तिवाद करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 5:16 pm

पुण्याहून मुंबईला जाणा-या सर्व बसेस बंद

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुण्यावरून मुंबईला जाणा-या बस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे -मुंबई हायवेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आहे, त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळेच बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पुणे मुंबई महामार्गावर आडोशी […] The post पुण्याहून मुंबईला जाणा-या सर्व बसेस बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 5:06 pm

सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला याचा आनंद; शरद पवार

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बारामतीमधील विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर, अन्त्यसंस्कारावेळी संपूर्ण पवार कुटुंबीय हे एकत्र आले होते. पण, त्यांच्या निधनाच्या तिस-या दिवशीपासूनच राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. तसेच, या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा अजित पवारांनी केल्याचा दावाही काही नेत्यांनी केला. त्यामुळे, अनेक राजकीय चर्चा रंगू लागल्या होत्या. याचदरम्यान, दिवंगत अजित पवार […] The post सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला याचा आनंद; शरद पवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 4:56 pm

मनोज जरांगेंना गोळ्या घालणार; धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

बीड : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची भाषा केल्याची एक ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली आहे. कराड समर्थकाकडून ही मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे कॉलवर बोलताना समर्थकाने धनंजय मुंडे यांचेही नाव घेत धमकावल्याचे ऐकू येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या […] The post मनोज जरांगेंना गोळ्या घालणार; धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 4:54 pm

लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधांचा विषय थेट संसदेत:या गोळ्यांच्या अवैध विक्रीवर कारवाई करावी, खासदार अजित गोपछडेंची मागणी

यौन क्षमता वाढवणारी औषधे वैद्यकीय सल्ल्याशिवाय तसेच प्रिस्क्रिप्शनशिवाय सहजपणे विकल्या जात आहेत. अनेकदा अशी औषधे शरीरास हानिकारक ठरतात तसेच याच्या सेवनाने गंभीर परिणामही भोगावे लागतात. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार अजित गोपछडे यांनी थेट संसदेत लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. वैद्यकीय आणि मानसिकदृष्ट्या हे स्पष्ट आहे की, वैद्यकीय देखरेखीशिवाय या औषधांचे सेवन केल्याने हृदय व मानसिक आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते. त्यामुळे लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधांबाबत सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केली आहे. संसदेत बोलताना अजित गोपछडे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, ही औषधे एनडीपीएस अधिनियमांतर्गत येत नसून असामाजिक तत्वांकडून याचा दुरुपयोग केला जात आहे. सभापती महोदय, सर्वच राज्य आणि केंद्र सरकारने संबंधित गोळ्यांच्या, औषधांच्या अवैध विक्रीवर कारवाई करावी. तसेच औषधांबाबत मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी गोपछडे यांनी केली आहे. जे कॉंग्रेसला जमले नाही ते आमच्या सरकारने केले दरम्यान, संसदेत बोलताना अजित गोपछडे यांनी अर्थसंकल्पावरही सकारात्मक प्रतिक्रिया देत म्हणाले, सुट्टीच्या दिवशी अर्थसंकल्प सादर होतो आहे, आमचे सरकार एकही दिवस सुट्टी घेत नाही. तसेच पुढे ते म्हणाले, भारत-यूरोप ट्रेड डील हा देशाला पुढे नेणारा करार आहे. कॉंग्रेसच्या लोकांचा अभ्यास कच्चा आहे, आमच्या जेनेरीक औषधांना, लेदर मालाला मोठ्या प्रमाणावर निर्यात मागणी वाढेल. कॉंग्रेसच्या लोकांना जे जमले नाही ते आमच्या सरकारने करून दाखवले आहे. त्यामुळे कॉंग्रेसने अभ्यास करावा, असा खोचक सल्ला गोपछडे यांनी दिला आहे. लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्यांचे दुष्परिणाम लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिरिक्त सेवनाने डोके आणि छातीत दुखणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे, चेहऱ्यावर सूज येणे, श्वसनासंबंधी समस्या उद्भविणे, डोळे लाल होणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच, या गोळ्यांच्या अतिसेवनाने प्रिंपीसम हा आजरा होतो.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 4:53 pm

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. पी. विठ्ठल:नांदडेमधील श्री क्षेत्र गोरटे येथे 27 फेब्रुवारी रोजी आयोजन

श्री क्षेत्र गोरटे (ता. उमरी) येथील सहाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, कवी आणि कादंबरीकार प्रा. डॉ. पी. विठ्ठल यांची एकमताने निवड झाली आहे. आधुनिक महिपती संतकवी दासगणू महाराज यांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र गोरटे येथील वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात एका विशिष्ट प्रांतात उल्लेखनीय व सेवाभावी कार्य करणाऱ्या एका मान्यवर महिलेला प्रतिवर्षी काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येतो. यापूर्वी गोरठा येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. यशवंत पाठक, प्राचार्य सु. ग. चव्हाण, डॉ शिवाजी शिंदे, डॉ वृषाली किन्हाळकर आणि प्रभाकर साळेगावकर यांनी भूषविले आहे. यावर्षी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. विठ्ठल यांच्या नावाची घोषणा वरद प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आली आहे. नवदोत्तर पिढीतील एक आघाडीचे कवी, कादंबरीकार आणि समीक्षक असलेले डॉ. पी. विठ्ठल हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलात मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गोरटे येथील सहाव्या मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन सोहळ्यानंतर कथाकथन , कवीसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी श्रीक्षेत्र गोरठे येथील अशोक भाऊराव फुलारी यांच्या शिवारातील काशिवन या समाधी परिसरात संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच काशीबाई फुलारी स्मृती नारायणी पुरस्काराची घोषणा होणार असल्याचे वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने संयोजक विठ्ठल फुलारी यांनी कळवले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 4:39 pm

विमान अपघातावर प्रश्न विचारला तर भाजपला राग का?:सुषमा अंधारे यांचा सवाल; अजित पवार राज्याची संपत्ती असल्याचा केला दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. अजित पवार हे राज्याची संपत्ती होते. त्यामुळे त्यांच्या विमान अपघातावर प्रश्न विचारला तर भाजपला राग का येतो? असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील एका प्रचारसभेत बोलताना भजापवर उपरोक्त प्रश्नांची सरबत्ती केली. त्या म्हणाल्या, मी प्रचाराचे काही बोलणार नाही. कारण, सोन्यासारखा माणूस आपल्यातून निघून गेला. अजितदादा राज्याची संपत्ती होते. ते म्हणतात ना की, लाख जावो, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचा राज्यातील प्रत्येक माणसाला हक्क आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताची माहिती उड्डयण नियामक मंडळाने दिली पाहिजे. पण भाजपच वेगळी उत्तरे देत आहे. या प्रकरणी अनेक प्रश्न अुत्तरीत आहेत. कुणाकडूनही ठोस उत्तर मिळत नाही. अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याचा भाजपला राग का येत आहे? आंतरराष्ट्रीय उड्डाण नियामक मंडळाने वर्षभरापूर्वी बंदी घातलेले विमान अजित पवारांच्या प्रवासासाठी का वापरले? अजित पवार स्वतःची फार काळजी घेत होते, ते हे विमान कसे वापरतील? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. मंत्री जयकुमार गोरे गणपतीचीही बैठक घेतील सुषमा अंधारे यांनी यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रचारसंभांवरही निशाणा साधला. पालकमंत्री जयकुमार गोरे पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत असतील, तर गावच्या गणपती मंडळाच्या अध्यक्ष निवडीसाठीही ते बैठक घेतील, असे त्या म्हणाल्या. अस्थिकलशावरून पटेल, तटकरेंवर टीका उल्लेखनीय बाब म्हणजे सुषमा अंधारे यांनी अजित पवारांच्या अस्थिकलशावरून नुकतीच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. राख थंड होण्याच्या आधी पक्ष बळकवणारे लोक तुम्ही... संवेदना नावाची कुठलीच गोष्ट शिल्लक नाही पण जनाची नाही तर किमान मनाची... असे असंख्य अस्थिकलश तयार करून आता त्याचेही मार्केटिंग करणार आहात का? असा प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला होता. दरम्यान, अजित पवार यांचे गत बुधवारी झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या कथित विलीनीकरणाचा मुद्दाही आता थंड बस्त्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. हे ही वाचा... राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची मिस्ट्री:अजित पवारांच्या मृत्यूनंतर केवळ तर्कवितर्क; दादांची इच्छा काय होती? कुणालाच माहिती नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ भावनिक नाही, तर ती सत्तासमीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आधीपासून सुरू असलेल्या मतभेदांना या घटनेमुळे नवे वळण मिळाले आहे. विलीनीकरणाच्या कथित चर्चेमुळे राज्याचे राजकीय वातावरण अधिकच गूढ बनले आहे. अजित पवारांच्या इच्छेविषयी स्पष्ट माहिती नसल्याने या प्रकरणी सध्या केवळ तर्कवितर्कांचेच राज्य आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 4:08 pm

३ लाख ९६ हजारांहून अधिक उमेदवार नापास; महा-टीईटीचा धक्कादायक निकाल!

मुंबई : प्रतिनिधी उद्याच्या पिढीला घडवणा-या शिक्षकांची पात्रता ठरवणा-या महा-टीईटी परीक्षेचा २०२५ चा निकाल जाहीर झाला असून या निकालाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील लाखो उमेदवारांनी अपेक्षेने दिलेल्या या परीक्षेत केवळ ११.२८ टक्के उमेदवारच उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल 3 लाख ९६ हजारांहून अधिक उमेदवार नापास ठरल्याने ‘गुरुजीच नापास?’ असा सवाल उपस्थित […] The post ३ लाख ९६ हजारांहून अधिक उमेदवार नापास; महा-टीईटीचा धक्कादायक निकाल! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 3:43 pm

बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यापासून पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखले

बीड : प्रतिनिधी भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांना लातूर जिल्ह्यातील जानवळ गावातील ग्रामस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यापासून रोखल्याची घटना समोर आली आहे. सध्या राजकीय नेत्यांकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठीचा प्रचार जोरात सुरू आहे. याच प्रचाराच्या निमित्ताने भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी लातूरमध्ये आलेल्या पंकजा मुंडेंना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […] The post बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यापासून पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 3:36 pm

भारत-अमेरिका व्यापार करार शेतक-यांचे कंबरडे मोडणारा; राजू शेट्टींचा हल्लाबोल

कोल्हापूर : प्रतिनिधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा, बहुप्रतीक्षित भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा केली. याअंतर्गत भारतावर लादण्यात आलेला करही १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान आता भारत अमेरिकेकडून अनेक वस्तू खरेदी करणार आहे. दरम्यान, आता या करारावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली. ‘‘हा व्यापार करार मंजूर झाला, तर भारतातील […] The post भारत-अमेरिका व्यापार करार शेतक-यांचे कंबरडे मोडणारा; राजू शेट्टींचा हल्लाबोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 3:34 pm

राहुल गांधींचा केवळ चर्चेत राहण्याचा प्रयत्न:देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात विषय संपवला; मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने आक्रमक निदर्शने

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे गंभीर मुद्द्यांवर तथ्याधारित चर्चा करण्याऐवजी सातत्याने खोटे आरोप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींना बोलायचे नसून केवळ आरोप करायचे आहेत. आपल्या देशाला, आपल्या लष्कराला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी चढवला. असे आरोप करून ते फक्त चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीने राहुल गांधींना संसदेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत तीव्र निदर्शने करण्यात आली. सरकार आणि पंतप्रधान मोदी काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना घाबरत असल्याचा दावा या आंदोलकांनी केली आहे. या वेळी या आंदोलकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचेही पाहायला मिळाले. लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव राज्यातील लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. या विषयावर विविध स्तरांतून मागण्या येत असल्याचे मान्य करताना, कोणताही निर्णय घाईघाईने न घेता सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस म्हणाले. ही योजना राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असून तिच्याशी संबंधित कोणताही बदल हा चर्चेतून आणि सामूहिक निर्णयातूनच केला जाईल, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. बसून सविस्तर चर्चा करू लाडकी बहीण योजनेबाबत सध्या अनेक सूचना, मागण्या आणि अपेक्षा सरकारपुढे येत आहेत. काहींकडून योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी होत असताना, या मुद्द्यावर भावनिक किंवा राजकीय दबावाखाली निर्णय होणार नाही, असा स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिला. या संदर्भात बसून सविस्तर चर्चा करू. योजना कोणाच्या नावाने असावी, यापेक्षा तिचा लाभ महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतोय का, हा खरा मुद्दा आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी आपली भूमिका मांडली. विरोधकांकडून केवळ आरोपांचे राजकारण सुरू फडणवीस म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेशी आणि प्रतिष्ठेशी संबंधित विषयांवर राजकारण करणे योग्य नाही. राहुल गांधींकडून होणारी वक्तव्ये ही जबाबदार नेतृत्वाला साजेशी नसून ती देशहिताला धक्का पोहोचवणारी आहेत, असा आरोपही त्यांनी केला. एकीकडे लाडकी बहीण योजनेसारख्या सामाजिक योजनांबाबत सरकार संवेदनशीलतेने निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून केवळ आरोपांचे राजकारण सुरू आहे, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 3:28 pm

मनोज जरांगेंना ठार मारण्याची धमकी:मराठा समाजात खळबळ, चौकशीची मागणी; वाल्मीक कराड समर्थकाचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियात या प्रकरणी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. त्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचे नाव आल्यामुळे धमकी देणारा व्यक्ती कराड समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. दिव्य मराठी या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवले होते. या प्रकरणी त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचा मुद्दाही लावून धरला होता. या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला अटक झाली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या घटनाक्रमामु्ळे धनंजय मुंडे व मनोज जरांगे यांच्यातील राजकीय वितुष्ट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना फोनवरून कथित धमकी देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल आहे. सदर कॉल रेकॉर्डिंगमध्ये एक व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी संवाद साधताना थेट मनोज जरांगेंना गोळ्या घालून ठार मारण्याची भाषा करताना दिसून येत आहे. विशेषतः हा व्यक्ती पुन्हा धनंजय मुंडे व वाल्मीक कराड म्हणायचे नाही, अन्यथा तुलाही जीवे मारतो अशी धमकीही सदर व्यक्तीला देताना ऐकू येत आहे. खाली वाचा ऑडिओ क्लिपची ट्रान्सक्रिप्ट जरांगे समर्थक - पाटलांना काय करणार?कराड समर्थक - मनोज जरांगे यांना कधी गोळ्या घालायच्या. मी स्वतः गोळ्या घालतो. जरांगे समर्थक - तू गोळ्या घालणार आहेस का?कराड समर्थक - हो स्वतः गोळ्या घालतो.जरांगे समर्थक - काय करणार आहेस तू पाटलांना?कराड समर्थक - मी तर मनोज जरांगे यांना जीवेच मारतो.जरांगे समर्थक - बरं.. चालतंय.. बरं... या ऑडिओ क्लिपमध्ये धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे नाव घेऊन धमकावण्यात येत असल्याचेही निदर्शनास येत आहे. तुझ्या .... जर गोळ्या घातल्या नाही, तर मुंडे व वाल्मीक कराड पुन्हा म्हणायचे नाही, असेही हा धमकी देणारा व्यक्ती म्हणताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे मराठा समाजात एकच खळबळ माजली आहे. ऑडिओ क्लिपमधील या दोन व्यक्ती कोण? असा सवालही या प्रकरणी केला जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्यावर आपली सुपारी दिल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली होती. पण पुढे या प्रकरणात काहीही झाले नाही.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 3:14 pm

NCP च्या विलीनीकरणात अटी, शर्थींची एन्ट्री:धर्मरावबाबा आत्राम यांनी ठेवल्या 3 अटी; सुप्रिया सुळेंपुढे सुनेत्रा पवारांचे नेतृत्व मान्य करण्याची अट

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील विलीनीकरणाची कथित चर्चा रखडली आहे. पण आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विलीनीकरणासाठी शरद पवार गटापुढे 3 अटी ठेवल्या आहेत. यात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेविषयी संभ्रमावस्था ठेवत त्यांच्यापुढे सुनेत्रा पवारांचे नेतृत्व मान्य करण्याच्या अटीचा समावेश आहे. यामुळे विलीनीकरणाचा तिढा अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया स्थगित झाली आहे. शरद पवार गटाने ही चर्चा थेट अजित पवारांशी सुरू होती असे नमूद करत या चर्चेला हवा दिली आहे. पण अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पक्षाच्या बड्या नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती असे स्पष्ट करत शरद पवार गटाचा दावा फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विलीनीकरणासाठी आग्रही असणाऱ्या शरद पवार गटापुढे 3 अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य असतील तरच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल अन्यथा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. काय म्हणाले आमदार धर्मरावबाबा आत्राम? धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवारांनी विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यासोबत केव्हाही काढला नसल्याचा दावा केला आहे. अजित पवार विलीनीकरणाच्या मुद्यावर आमच्याशी केव्हाही बोलले नाही. विलीनीकरणाची 12 फेब्रुवारीची तारीख ठरली असती, तर त्यांनी तसे आ्हाला सांगितले असते. या प्रकरणी केवळ शरद पवार गटाकडून दावा केला जात आहे, असे ते म्हणाले. धर्मरावबाबा आत्राम यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणासाठी त्यांच्यापुढे 3 अटीही ठेवल्या आहेत. आत्रामांनी घातल्या 3 अटी दरम्यान, धर्मरावबाबा यांनी या अटींद्वारे एकप्रकारे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य असल्याचेच संकेत दिलेत. त्यामुळे आता या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 2:40 pm

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती:हिंगोलीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचा पुढाकार

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हिंगोलीत ता. ११ फेब्रुवारी पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सांस्कृतीक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. येथील रामलिला मैदानावर ता. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता क्रिकेट स्पर्धा होईल. सकाळी १० वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरात शिवचरित्रावर आधारीत ऑनलाईन परीक्षा होईल. ता. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात व्हॉलीबॉल स्पर्धा, तसेच ११.३० वाजता शिवचरित्रावर, ऐतिहासीक छायाचित्रावर विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल. त्यानंतर ता. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अ‍ॅड. पंडितराव देशमुख, क्रीडा संकुल अकोला रोड येथे लॉन टेनिस स्पर्धा , १४ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी ५.३० ते ७ छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात थॉयरॉईड, मधुमेहावर मार्गदर्शन होईल. ता. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात महिला व मुलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा तर रात्री ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती परिसरात कवि संमेलन होईल. १६ फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ८.३० वाजता स्टडी सर्कल पॉईट गुरुकुल येथे शिवचरित्रावर सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली जाणार आहे. दुपारी १२ वाजता आनंदनगरी, दुपारी चार वाजता होम मिनीस्टर स्पर्धा होईल. ता. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता बालगट व खुल्या गटात वेशभुषा, अभिनय, नृत्य स्पर्धा घेतली जाणार आहे ता. १८ फेब्रुवारी बुधवारी सकाळी १० वाजता वक्तृत्व स्पर्धा, दुपारी चार वाजता महिलांसाठी रांगोळी स्पर्धा होईल. सायंकाळी ६ वाजता दिपोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ७ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम व तीन दिवशीय स्पर्धांचा समारोप होईल. सदर सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात होणार आहेत. ता. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुर्णाकृती पुतळा परिसरात शिव अभिषेक होणार आहे. सकाळी ७ वाजता ध्वजारोहण, ८ वाजता शिव पाळणा, शिवपुजन व शिव गजर होणार आहे. १० वाजता रक्तदान शिबीर घेतले जाईल. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणुक काढली जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 2:09 pm

सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे:माझ्यासह इतर आमदारांनी त्यासाठी सह्या केल्यात- प्रताप पाटील चिखलीकर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर अजित पवार पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असलेले जिल्हेही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच पक्षातील काही आमदारांनी सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे. लोहा-कंदारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. नेमके काय म्हणाले चिखलीकर? आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचीच निवड व्हावी, असे निवेदन आमदारांनी दिले असून त्या निवेदनावर माझीही सही आहे. पक्षाचे विलीनीकरण करायचे की नाही, याचा निर्णयही त्यांनीच घ्यावा. तसेच विधिमंडळ पक्षाने गटनेते म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही- प्रफुल्ल पटेल गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांची निवड होणार, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र मंगळवारी (3 तारखेला) झालेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता आमदार आणि पक्षातील नेत्यांच्या मागणीनुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे अध्यक्षपद जाणार की अन्य कोणत्या नेत्याला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे स्पष्ट केले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. मात्र, मी या शर्यतीत नाही. पक्षात सध्या शोकाचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री पद जास्त काळ रिक्त ठेवता येत नसल्याने सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आहे. अध्यक्षपदाचा निर्णयही लवकरच घेतला जाईल.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 2:03 pm

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च वाढला; प्रकल्पाचा खर्च १ लाख १ हजार कोटींवर

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणा-या शक्तिपीठ महामार्गाचा खर्च १५ हजार कोटींनी वाढून तब्बल १ लाख १ हजार कोटींवर पोहोचला आहे. शेतक-यांच्या विरोधानंतर सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल केला आहे. या बदलामुळे हा खर्च वाढला आहे. शक्तिपीठ महामार्गाद्वारे राज्यातील साडेतीन शक्तिपीठांना जोडण्यात येणार आहे. पण कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील […] The post शक्तिपीठ महामार्गाचा खर्च वाढला; प्रकल्पाचा खर्च १ लाख १ हजार कोटींवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 1:39 pm

दादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स हटवले; रोहित पवारांचा प्रशासनावर घणाघात

मुंबई : प्रतिनिधी आजचे राजकारण हे किळसवाणे आणि घृणास्पद झाले आहे. या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरश: शून्य झाली… छक्के-पंजे करता येणे हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरेच राजकारणात रहावे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात घडलेल्या एका घटनेने राजकीय […] The post दादांच्या श्रद्धांजलीचे फ्लेक्स हटवले; रोहित पवारांचा प्रशासनावर घणाघात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 1:36 pm

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; थकीत ४५०० रुपये एकाचवेळी खात्यात

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना मोठा दिलासा देणारी माहिती महिला व बालविकास विभागाकडून समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे थकीत राहिलेले तीन महिन्यांचे हप्ते आता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे कळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपयांची […] The post लाडक्या बहिणींना मोठा दिलासा; थकीत ४५०० रुपये एकाचवेळी खात्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Feb 2026 1:28 pm

मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो तर...:शिंदे गटाच्या आमदाराचा भाजप नेत्यांना इशारा; ZP निवडणुकीचा प्रचार टोकाला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे. त्यांना जाऊन विचार मी कोण आहे? मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो तर काय होते ते विट्यात जाऊन पाहा, असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराचा धुरळा सुरू आहे. त्यात भाजप व शिवसेना या सत्ताधारी पक्षांतच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे दिसून येत आहे. खानापूर तालुक्यात भाजपच्या काही नेत्यांनी विशेषतः विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला बाबर यांनी करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी गावातील प्रचारसभेत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, एवढं सोप्पं नाही. राजकारण जेवढं म्हणतात तेवढं सोप्पं नसतं. आज आम्ही 242 फिरतोय त्यांच्या अवतीभवती. तुझा कोणताही नेता घेऊ जा व सुहास बाबर जाऊ दे नाही मला आत घेतले आणि तुझ्या नेत्याला बाहेर बसवलं, तर... तुझा तर संबंधच येत नाही. खानापूर- आटपाडीची भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मीच चालवतो. मी दिसतो शांत, पण कार्यक्रम करायला लागलो, तर बघ. विट्यामध्ये मी काय केले हे माहिती आहे का? असे सुहास बाबर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे भाजप व शिंदे गटातील कथित राजकीय वैमनस्य वाढण्याची शक्यता आहे. प्रभाकर पाटलांचा अर्ज मागे दुसरीकडे, सांगलीच्या तासगावात जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एक मोठी घडामोड घडली आहे. तासगावच्या चिंचणी जिल्हा परिषद गटातून माजी खासदार व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते संजयकाका पाटील यांचे सुपुत्र प्रभाकर पाटील यांनी माघार घेतली आहे. प्रभाकर पाटलांनी चिंचणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दाखल केली होती. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेतले. या ठिकाणी प्रभाकर पाटील यांच्या विरोधात त्यांचे नातलग अक्षय पाटील शरद पवार गटाकडून मैदानात उतरलेत. अक्षय पाटील यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रभाकर पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. एकनाथ शिंदेंचा वाळव्याच्या विकासाचा शब्द दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच वाळवा तालुक्यात प्रचारसभा घेतली होती. त्यात त्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत. त्यामुळे वाळव्यात पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती, सिंचन, उद्योग, शिक्षण व महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाईल, असे ते म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 1:12 pm

राऊत कुणाचे प्रवक्ते हे त्यांनी ठरवून घ्यावे:ते शरद पवारांचे दलाल झालेत का?, पाय राष्ट्रवादीत, हात काँग्रेसमध्ये; डोकं तरी उबाठात आहे का? – नवनाथ बन

उबाठाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी सकाळी सकाळी गांजा ओढून पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपबद्दल खोटे बोलणं आणि आरोप करणे हा त्यांचा धंदा झाला आहे, राऊत हे उबाठाचे प्रवक्ते होते की पवार कुटुंबियांचे प्रवक्ते होते की का काँग्रेसचे प्रवक्ते आहेत असा प्रश्न पडावा अशी पत्रकार परिषद त्यांनी घेतली, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. नको तिथे नाक खूपसणे आणि नको त्या गोष्टीवर बोलणं हा त्यांचा धंदा झाला आहे. त्यांनी कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते त्यांनी ठरवून घेतले पाहिजे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे पवार कुटुंबियांचे मुखिया झाले आहेत का? ते शरद पवारांचे दलाल झाले आहेत का माझा त्यांना सवाल आहे. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. राऊत शरद पवार गटाचे काही भाग आहात का हे महाराष्ट्राला सांगितले पाहिजे. तुम्ही राहतात उबाठात खातात शरद पवारांचे आणि प्रफुल्ल पटेलांबद्दल भूमिका मांडतात. शरद पवार हे अजित पवारांचा अपघात झाले म्हणाले असताना तुम्ही त्याबद्दल शंका उपस्थित करताय तुम्ही कुठल्या कुटुंबाचे मुखिया आहात हे तुम्ही स्पष्ट केले पाहिजे. त्यांना प्रवक्ते, मुखिया, दलाल म्हणून नियुक्त केले आहे का? असा खोचक सवाल बन यांनी केला आहे. राऊतांनी इतरांची प्रवक्तेगिरी बंद करावी नवनाथ बन म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. संजय राऊत यांचे दोन पाय राष्ट्रवादीत तर हात काँग्रेसमध्ये आहेत, त्यांचे डोकं तरी उबाठामध्ये आहे का हा माझा सवाल आहे. सातत्याने वेगवेगळ्या भूमिका घेणं हे त्यांचे काम झाले आहे, त्यांनी उबाठामध्ये डोकं तरी ठेवले आहे का? आपले डोकं त्यांनी डाव्याच्या बाजूला नेऊन ठेवले आहे का हे सांगितेल पाहिजे. इतरांची प्रवक्तेगिरी करणे राऊतांनी बंद करावे. त्यावेळी राऊतांच्या डोक्यात प्रकाश पडेल नवनाथ बन म्हणाले की, प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्राला पटेल अशीच भूमिका घेत आहेत. पण ज्यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती त्यावेळी तारीख अन्वर, अरुण गुजराथी, पी.ए.संगमा कोण होते? असा सवाल बन यांनी केला आहे. पटेल काही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झालेले नाही, त्यांच्या पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार याच करणार आहेत. राऊतांनी सामनाचे मागचे संपादकीय वाचावे मग तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 12:45 pm

मैत्रिणीला फोन केल्याने दोन मित्रांत वाद:एकाने दुसऱ्यावर कोयत्याने केला हल्ला, पुण्यातील अंगावर काटे आणणारी घटना; पाहा VIDEO

जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने सपासप वार केल्याची भयंकर घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात घडली आहे. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेचा एक अंगावर काटे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आरोपी कोयत्याने सपासप वार करताना दिसून येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 2 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली आहे. चेतन चव्हाण असे जखमी तरुणाचे नाव असून, आदित्य कांबळे असे त्याच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मैत्रिणीला फोन केल्याचा राग अनावर यासंबंधीच्या माहितीनुसार, आदित्य कांबळे व चेतन चव्हाण हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ते 2 फेब्रवारी रोजी सायंकाळी भारती विद्यापीठ परिसरातील एका ऊसाच्या गाडीजवळ उभे होते. गप्पा मारताना त्यांच्या एका जुन्या मैत्रिणीची आठवण निघाली. या मैत्रिणीला फोन करण्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद एवढा टोकाला पोहोचला की, आदित्य कांबळेने काही कळण्याच्या आत चेतनवर कोयत्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यात चेतनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अचानक घडलेल्या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात एकच धावपळ उडाली. काही प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती तत्काल पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी चेतन चव्हाणला रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल दुसरीकडे, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आरोपी आदित्य कांबळे जीवाच्या आकांताने पळणाऱ्या चेतन चव्हाणचा पाठलाग करताना दिसून येत आहे. चेतन चव्हाण एका घरात शिरण्याचा प्रयत्न करतो. पण दरवाजा बंद असल्यामुळे तो चेतनच्या तावडीत सापडतो. या ठिकाणी चेतन आदित्यवर कोयत्याने सपासप वार करताना दिसून येत आहे. पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारावर आदित्य कांबळेवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. हे ही वाचा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची मिस्ट्री:अजित पवारांच्या मृत्यूनंतर केवळ तर्कवितर्क; दादांची इच्छा काय होती? कुणालाच माहिती नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ भावनिक नाही, तर ती सत्तासमीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आधीपासून सुरू असलेल्या मतभेदांना या घटनेमुळे नवे वळण मिळाले आहे. विलीनीकरणाच्या कथित चर्चेमुळे राज्याचे राजकीय वातावरण अधिकच गूढ बनले आहे. अजित पवारांच्या इच्छेविषयी स्पष्ट माहिती नसल्याने या प्रकरणी सध्या केवळ तर्कवितर्कांचेच राज्य आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 12:42 pm

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची मिस्ट्री:अजित पवारांच्या मृत्यूनंतर केवळ तर्कवितर्क; दादांची इच्छा काय होती? कुणालाच माहिती नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी केवळ भावनिक नाही, तर ती सत्तासमीकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये आधीपासून सुरू असलेल्या मतभेदांना या घटनेमुळे नवे वळण मिळाले आहे. विलीनीकरणाच्या कथित चर्चेमुळे राज्याचे राजकीय वातावरण अधिकच गूढ बनले आहे. अजित पवारांच्या इच्छेविषयी स्पष्ट माहिती नसल्याने या प्रकरणी सध्या केवळ तर्कवितर्कांचेच राज्य आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्णायक व व्यवहारकुशल नेते होते. 2023 मध्ये त्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या सत्तासमीकरणांत मोठा बदल झाला. मात्र त्यांच्या निधनानंतर पक्षाच्या भविष्यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील का? हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शरद पवार गटाने केलेला दावा या वादाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विलीनीकरणाच्या संदर्भात अजित पवारांसोबत उच्च पातळीवर चर्चा सुरू होती. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ही चर्चा खरोखरच सुरू होती, तर ती किती पुढे गेली होती आणि अजित पवारांच्या त्यासंबंधीची भूमिका काय होती? हा प्रश्न या प्रकरणी उपस्थित झाला आहे. मात्र दुसरीकडे अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी हा दावा ठामपणे फेटाळला आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय अंतिम होता आणि सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नव्हती. गुप्त चर्चांची शक्यता नाकारता येत नाही या परस्परविरोधी दाव्यांमुळे राजकीय वातावरण अधिकच गोंधळलेले दिसते. एका बाजूला शरद पवार गटाचा दावा आहे की, चर्चा 'बंद दरवाज्याआड' झाली होती आणि त्यात मर्यादित नेते सहभागी होते. दुसरीकडे अजित पवार गटातील नेते या चर्चेचा पूर्णपणे इन्कार करत आहेत. यामुळे सत्य नेमके काय? हा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पडद्यामागील घडामोडींना महत्त्व राहिले आहे. त्यामुळे अशा गुप्त चर्चांची शक्यता नाकारता येत नाही, पण ठोस पुरावे समोर येत नसल्याने वाद अधिकच वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने वाद तापला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार गटाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने हा वाद आणखी तापला. त्यावर शरद पवारांनी दिलेले प्रत्युत्तर हे केवळ राजकीय प्रतिक्रिया नसून, राष्ट्रवादीच्या अंतर्गत मतभेदांचे संकेत देणारे होते. त्यांनी फडणवीस व काही अन्य नेते या चर्चेबाहेर होते असे सांगून राजकीय समीकरणातील रेषा अधिक स्पष्ट केल्या. यामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी गटांमधील तणावही वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेतृत्व कुणाकडे? हाच मोठा मुद्दा अजित पवारांच्या निधनानंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे नेतृत्वाचा. त्यांच्या जागी कोण पुढे येणार, हा मुद्दा पक्षासाठी अत्यंत संवेदनशील ठरला आहे. सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घटना मानली जात आहे. मात्र या शपथविधीबाबत शरद पवारांनी व्यक्त केलेले अनभिज्ञतेचे वक्तव्य कुटुंब आणि पक्षातील मतभेद अधोरेखित करणारे ठरले. राजकारणात कुटुंबीयांची भूमिका अनेकदा निर्णायक असते आणि राष्ट्रवादी काँग्रेसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या निवडीमुळे पुढील काळात पक्षातील अंतर्गत समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पार्थ पवारांना घाई न करण्याचा सल्ला पार्थ पवार यांच्या राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा हा या वादाचा आणखी एक पैलू आहे. भाजपने कथितपणे घाई न करण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेमुळे सत्ताधारी आघाडीतही सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. राज्यसभेची रिक्त झालेली जागा आणि त्यावर कुणाला संधी दिली जाते, यावरूनही पक्षातील ताकद आणि प्रभावाचे गणित स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठी कमतरता जाणवते ती म्हणजे स्पष्ट नेतृत्वाची. अजित पवार हे व्यवहारकुशल आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत नेते होते. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षातील विविध गटांचे संतुलन राखणे ही मोठी कसोटी ठरणार आहे. विलीनीकरणाच्या चर्चेची सत्यता काहीही असो, सध्या राष्ट्रवादी काँग्रेसपुढे सर्वात मोठे आव्हान हे आपली राजकीय दिशा निश्चित करण्याचे व कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आहे. राष्ट्रवादीची राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका राजकीय विश्लेषकांच्या मते, या वादामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना दीर्घकालीन रणनीती ठरवावी लागणार आहे. एकत्र येण्याचा पर्याय निवडायचा की स्वतंत्र मार्गाने पुढे जायचे, यावर पक्षाचे भविष्य अवलंबून असेल. विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीची नेहमीच निर्णायक भूमिका बजावत आली आहे. त्यामुळे या पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर राज्यातील इतर पक्षांचेही बारकाईने लक्ष आहे. अखेरीस अजित पवारांच्या इच्छेबाबत स्पष्ट माहिती समोर येईपर्यंत विलीनीकरणाची मिस्ट्री कायम राहण्याची शक्यता आहे. राजकीय वक्तव्ये आणि प्रतिवाद यामुळे वातावरण अधिकच धूसर झाले आहे. पुढील काही आठवडे किंवा महिने राष्ट्रवादीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. या काळात घेतले जाणारे निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवे चित्र ठरवू शकतात. तूर्त अनिश्चिततेच्या या काळात राष्ट्रवादीला स्थैर्य देणारे नेतृत्व व स्पष्ट भूमिका याच गोष्टींची सर्वात मोठी गरज आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 12:20 pm

सुनेत्रा पवारांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अयोग्य:विलीनीकरण कोणाचे आणि कुणात? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीला इतकी का घाई का झाली त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. तसेच विलीनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वी का सुरू करण्यात आली. का सतत मुलाखतीला फेरा सुरू ठेवण्यात आला? विलीनीकरणाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कसा संबंध येतो हे जर मला सांगितले तर मी माझी भूमिका मांडेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण असा काही मुद्दाच नव्हता. आमचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे, म्हणजे भाजपचा मित्रपक्ष आहे. आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारमध्ये मंत्रिपदे आम्हाला देण्यात आली आम्ही एकत्रित लोकसभेची निवडणूक लढवली, आणि आताही सत्तेत सोबत आहोत त्यामुळे आमच्या विलीनीकरणाबद्दल भाजपसोबत चर्चा करणे गरजेचे आहे. 2019 मध्ये मविआ स्थापन करत असताना सोनिया गांधींची परवानगी मागण्यात आलीच ना? कारण तो युपीएमधील महत्त्वाचा पक्ष आहे. युती-आघाडी करत असताना महत्त्वाच्या पक्षासोबत चर्चा करावी लागत असते. जनता, आमदारांच्या भावनेतून सुनेत्रा पवारांची निवड सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडतांना जनतेची आणि आमदारांची भावना लक्षात घेत आम्ही सुनेत्रा पवार यांची निवड केली आहे. त्यावर आशावेळी प्रश्न चिन्ह निर्माण करणे योग्य नाही. अजित पवार यांनी गेल्या 3 वर्षांत जो प्रचंड जनसंपर्क तयार केला त्यामुळे विधानसभेला जनतेने आम्हाला मोठी साथ दिली. आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे, कुणाला काहीही वाटो, असे तटकरे यांनी सुनेत्रा पवारांच्या निवडीबद्दल बोलताना म्हटले आहे. कोणता पक्ष विलीन करणार? सुनील तटकरे म्हणाले की, विलीनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार? असा सवाल मी गेले 2 ते 3 दिवस विचारतो आहे, पण त्यावर दुर्दैवाने कोणी काहीच बोलत नाही, त्यांचे कारण मला काही कळू शकलेले नाही. ही चर्चा कोण सुरू करणार हा प्रश्न आहे. गेली 8 ते 10 महिने मी म्हणतोय की आम्ही एनडीएमध्ये आहोत जे भाजपसोबत येण्यासाठी अनुकुल आहेत तेच या चर्चा करू शकतात, नाही तर चर्चा करण्याचे काही प्रश्नच नाही. माझा विलीनीकरणाला विरोध आहे की नाही हा मुद्दा काही महत्त्वाचा नाही. अजित पवार यांचा विश्वासू सहकारी म्हणून गेली 40 वर्षे मी काम करत आलो आहे. त्यामुळे माझ्यावर अनेक वेळा आक्षेप घेतले गेले आहेत. अजित पवारांचा निर्णय असता तर माझा त्याला विरोध असण्याचा काही मुद्दाच नव्हता. मी नेहमी अजित पवारांचे निर्णय मान्य केला आहे. योग्यवेळी राष्ट्रीय अध्यक्षांची निवड सुनील तटकरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय झाला ती माहिती अजित पवारांनी दिली होती. जिल्हा परिषद निवडणूक ही घड्याळीच्या चिन्हावर लढण्याचे ठरले होते त्यासंदर्भात आमचे बोलणे झाले. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विधीमंडळ पक्षनेता निवडणे गरजेचे होते. योग्यवेळी कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन आम्ही पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करू. 2019 मध्ये अजित पवारांची इच्छा होती की भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार व्हावे त्यावेळी त्यांच्या इच्छेकडे कोणी लक्ष दिले नाही.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 12:00 pm

लाडक्या बहिणींना मोठा दिलासा:थकीत 4500 रुपये एकाचवेळी खात्यात; ई-केवायसी अडचणीतून सुटका; सरकारचा आर्थिक दिलासा

राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना मोठा दिलासा देणारी माहिती महिला व बालविकास विभागाकडून समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचे थकीत राहिलेले तीन महिन्यांचे हप्ते आता एकत्रित स्वरूपात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा एकूण 4500 रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने त्रस्त झालेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. निवडणुकीत या योजनेचा महायुती सरकारला राजकीय लाभ झाल्याचेही चित्र दिसून आले. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थींना नियोजित वेळेत हप्ते मिळाले नाहीत, त्यामुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. काही महिलांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे महिलांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी तर लाभार्थी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आल्या. पैसे का येत नाहीत, याबाबत स्पष्टता नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढत होता. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम आणि अटी डावलून सादर झालेल्या अर्जांची पडताळणी सध्या सुरू आहे. यामुळे लाभार्थींची माहिती तपासून योग्य पात्र महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. या सर्व प्रक्रियेनंतर आता थकीत हप्ते एकत्र देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयानुसार पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 4500 रुपये जमा केले जाणार आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते थकले होते, त्यांना जानेवारीसह एकत्रित रक्कम दिली जाईल. तर काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले असल्यास, त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता देण्यात येणार आहे. या संदर्भातील वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे. या निर्णयामुळे लाभार्थी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने निर्माण झालेला तणाव कमी होणार असून, महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत वेळेत मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासन आणि लाभार्थी यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शक्यता दरम्यान, निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात या योजनेतील मासिक हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी यासंदर्भात संकेत दिले होते. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास राज्यातील लाखो महिलांना अधिक आर्थिक आधार मिळेल आणि लाडकी बहीण योजना अधिक प्रभावी ठरेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 12:00 pm

ऑपरेशन मुस्कान-14:मोहीममुळे हरवलेल्या मुलांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य; मानवतावादी भूमिकेतून पोलिसांची मोहीम

अपहरण, फसवणूक आणि रागातून घर सोडलेल्या मुला-मुलींच्या शोधार्थ पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान १४’ मोहीम सुरू केली आहे. हरवलेली मुले शोधून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्याकरिता पोलिसांकडून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जात आहे. यासाठी शहर पोलिस आयुक्तलयातील १३ पोलिस ठाण्यांत विशेष पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. ही मानवतावादी मोहीम असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगीतले. पोलिस ठाण्यात दाखल अपहरण, बेपत्ता बालकांचा शोध घेण्याकरिता ही विशेष मोहीम सुरू केली आहे. अपर पोलिस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सायबर पथक यांच्या संयुक्त प्रयत्नाने रेल्वे व बस स्थानक, धार्मिक स्थळ, औद्योगिक परिसर, रुग्णालये, हॉटेल्स व शहरातील संवेदनशील भागात विशेष शोधमोहीम राबवली जाणार आहे. तुटलेल्या कुटुंबियांना मिळणार दिलासा मुलं बेपत्ता झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब तुटून पडते. या कुटुंबांना पुन्हा जोडण्याकरता मानवतावादी मोहीम शहर पोलिसांनी सुरू केली आहे. १३ पोलिस ठाणेनिहाय स्वतंत्र पथक स्थापन केले असून उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. हरवलेल्या प्रत्येक मुलाला सुरक्षित घरी पोहोचवण्याचा निर्धार पोलिस यंत्रणेने व्यक्त केला आहे. पोलिस ठाणेनिहाय मिसिंग सेल सुरू नाशिक पोलिस आयुक्तालयातील १३ पोलिस ठाण्यात स्वतंत्र मिसिंग सेल स्थापन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावरील नोडल अधिकारी नियुक्त केले आहे. ते असे : पंचवटी : सहायक आयुक्त शेखर देशमुख, सरकारवाडा: सुधाकर सुरवाडकर, अंबड: सचिन बारी, नाशिकरोड : संगीता निकम.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 11:30 am

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च वाढला:देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढून 1 लाख 1 हजार कोटींवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढून तब्बल 1 लाख 1 हजार कोटींवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल केला आहे. या बदलामुळे हा खर्च वाढल्याचा दावा केला जात आहे. शक्तिपीठ महामार्गाद्वारे राज्यातील साडेतीन शक्तिपीठांना जोडण्यात येणार आहे. पण कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) भूसंपादनाला विरोध करणाऱ्या कागल व हातकणंगले तालुक्याचा एक मोठा भाग या महामार्गातून वगळला. याशिवाय नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व धाराशिव जिल्ह्यातही काही बदल करण्यात आले. प्रकल्पाच्या आरखड्यात सातारा जिल्हाही नव्याने जोडण्यात आला. यामुळे हा महामार्ग आता 12 ऐवजी 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या खर्चात 15 हजार कोटींची वाढ झाली आहे. यामुळे या प्रकल्पाचा खर्च 86 हजार कोटींवरून 1 लाख 1 हजार कोटींवर पोहोचला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रस्तावाची तपासणी करत आहेत. हा महामार्ग समृद्धी महामार्गासारखाच प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार महामार्गात येतो. त्यामुळे या महामार्गावरून वेगवान प्रवास शक्य असल्यामुळे वेळेची अधिकाधिक बचत होण्यास मदत होणार आहे. शक्तिपीठ महामार्गात कोणता बदल झाला? शक्तिपीठ महामार्ग करवीर, भुदरगड, आजरा, चंदगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याला जोडला जाईल. नव्या आराखड्यानुसार, हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतील जाणार आहे. महामार्गाच्या नव्या आखणीत सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा महामार्ग आता 350 गावांऐवजी आता 395 गावांतून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गासाठी 8 हजार 500 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. आधीच्या आराखड्यानुसार 802 किमीचा असलेला हा महामार्ग आता 856 किमीचा होणार आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनाचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे. यासाठी सरकार कर्ज घेणार आहे. आतापर्यंत 196 गावांमधील भूसंपादनाची मोजणी पूर्ण झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 11:30 am

चांगल्या व्यक्तीने राजकारणात रहावं का? रोहित पवारांचा भावनिक सवाल:श्रद्धांजलीचे फ्लेक्स हटवले; रोहित पवारांचा प्रशासनावर घणाघात

आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय... छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे राजकारणात राहवे का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नसल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात घडलेल्या एका घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ नागरिकांनी लावलेले श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीकडून हटवण्यात आल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटत असताना कर्जतमधील ही घटना विशेष चर्चेत आली आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने उभारलेले श्रद्धांजलीचे बॅनर हटवण्यामागचे कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला होता. 29 जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये, गावांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बॅनर, पोस्टर आणि फ्लेक्स लावले होते. कर्जत शहरातही अशाच प्रकारे भावनिक वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. मात्र नगरपंचायतीकडून हे फ्लेक्स हटवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत ही कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, ही घटना केवळ अजित पवारांचा अवमान करणारी नाही, तर नागरिकांच्या भावनांनाही धक्का देणारी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांत केली. रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. श्रद्धांजलीचे फ्लेक्स काढण्यामागे प्रशासनाचे नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही नागरिकांनीही यावर नाराजी व्यक्त केली असून, श्रद्धांजलीसारख्या भावनिक बाबतीत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवायला हवी होती, अशी भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे कर्जतमधील या निर्णयावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या अस्थींचे विसर्जन सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या संगमावर करण्यात आले. बारामतीहून अस्थिकलश सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी करून अंतिम दर्शन घेतले. त्यानंतर विधीपूर्वक अस्थींचे विसर्जन करण्यात आले. फ्लेक्स हटवण्याच्या घटनेने वाद या कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना श्रद्धांजली वाहिली. सांगलीतील या कार्यक्रमानेही अजित पवारांविषयी असलेली जनभावना स्पष्ट झाली. राज्यभरात विविध ठिकाणी श्रद्धांजलीचे कार्यक्रम पार पडत असताना कर्जतमधील फ्लेक्स हटवण्याच्या घटनेने मात्र वेगळाच वाद निर्माण केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 11:25 am

पुण्यात भाजप नेत्यांच्या आईला कारची धडक:पूनावाला कुटुंबीयांचा सुनियोजित हल्ल्याचा आरोप, कार चालकाचा शोध सुरू

पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला हल्ला असल्याचा आरोप शहजाद पूनावाला यांनी केला असून, संबंधित कार चालकाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. या घटनेचा CCTV व्हिडिओ तहसीन पूनावाला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक पांढरी कार थेट त्यांच्या आईला धडक देताना आणि त्यानंतर चालक घटनास्थळावरून पळ काढताना स्पष्ट दिसत आहे. जाणूनबुजून अंगावर कार घातली शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर लिहिले की, काही तासांपूर्वी एका घृणास्पद व्यक्तीने जाणूनबुजून माझ्या आईच्या अंगावर कार घातली. त्या गंभीर जखमी झाल्या असून लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. कार चालक पळून गेला. कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा.या प्रकरणात त्यांनी पुणे पोलिसांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग करत, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, पूनावाला यांच्या आई ड्रायव्हर आणि सहाय्यकासोबत बाहेर गेल्या होत्या. गॅस भरण्यासाठी त्या एका ठिकाणी थांबल्या असताना, एका कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि चालक फरार झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या CCTV फुटेजवरून हा प्रकार अपघात नसून मुद्दाम केलेला हल्ला असल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे. पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय तहसीन पूनावाला यांनी सांगितले की, आई ज्येष्ठ नागरिक आहे. गॅस भरताना ती बाजूला उभी होती, तेव्हा कारने तिला धडक दिली. हे सर्व मुद्दाम केल्यासारखे वाटते. त्यांनी आईचा एक्स-रे रिपोर्टही शेअर केला असून, त्यामध्ये हाड मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. आईवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून आयुष्यभरासाठी रॉड टाकावी लागेल. त्यांनी पोलिस सहआयुक्त आणि उपायुक्तांशी संपर्क साधला असून, हा प्रकार पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांकडून तपास सुरू दरम्यान, पुणे शहर पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासले जात आहेत. आरोपी कार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 11:15 am

जळगाव‎ जिल्ह्यात पक्षांतरे होण्याची शक्यता ‎म्हणत ‘जमावबंदी’ आदेश केले जारी‎:शासकीय कार्यक्रम, अंत्ययात्रा वगळता 5 व्यक्तींना एकत्र येता येणार नाही‎

जळगाव जिल्ह्यात पक्षांतरं होतील ‎आणि त्यामुळे सार्वजनिक शांतता‎ धोक्यात येणार आहे, याचा सुगावा ‎जिल्ह्याच्या पोलिस यंत्रणेला ‎लागला आहे. त्यामुळे 14 ‎फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी ‎आदेश जारी करण्यात आला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद‎निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही‎ पक्षांतरे होतील, अशी शक्यता ‎पोलिस प्रशासनाला वाटते आहे.‎जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेची ‎निवडणूक कधी होणार आहे, याचा‎ अंदाज अजून निवडणूक‎ आयोगालाही आला नसेल; पण‎ जिल्हा पोलिस यंत्रणेने तो अंदाज ‎‎घेतला आहे, हे आश्चर्याचे मानले ‎जाते आहे. पोलिस प्रशासनाने‎ दिलेल्या या अहवालाप्रमाणे जिल्हा ‎‎दंडाधिकारी कार्यालयानेही तीच‎‘री’ ओढत तातडीने जमावबंदी‎ आदेश लागू केले आहेत. मुंबई‎ पोलिस अधिनियमातील कलम 37(1) आणि (3) अन्वये हे‎ आदेश जारी करण्यात आले असून‎ 14 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत‎ते लागू राहाणार आहेत. त्यानुसार‎या काळात लग्न कार्य, धार्मिक‎ कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम किंवा‎ अंत्ययात्रा वगळता पाच किंवा‎ त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र ‎येता येणार नाही. अपर जिल्हा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎दंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी हे‎ आदेश जारी केले आहेत. दरम्यान,‎आदेश काढला त्या दिवसापासून‎ त्याची अंमलबजावणी केली जाते‎ आहे. आदेशाचे उल्लंघन होणार‎ नाही याची दक्षताही घेतली जाते ‎आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट ‎म्हणजे त्यातील पक्षांतराची शक्यता‎ अधिक चर्चेची ठरू पाहते आहे.‎ विशेष असे कारण नाही दर 15 दिवसांनी अशा प्रकारचा‎आदेश पोलिसांतर्फे काढला जातो ‎आहे. त्यात राजकीय हालचाली ‎आणि पक्षांतर या शब्दांचे विशेष ‎असे काही कारण नाही.‎ डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक‎‎‎

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 11:01 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:जळगाव ते इंदूर विमानसेवा एप्रिलपासून, सव्वा ते दीड तास लागणार, भाडे 2500 रु.‎

जळगाव शहर देशातील तीन राज्यातील पाच ‎शहरांशी विमानसेवेने जोडले गेले आहे. आता ‎इंदुरसाठी एप्रिलपासून विमानसेवा सुरु होणार ‎आहे. मात्र, ही सेवा व्यावसायिक तत्वावर‎ असेल. जळगावहून इंदूर पोहचण्यासाठी सव्वा‎ते दीड तासांचा वेळ लागेल.‎ ‘फ्लाय 91’ कंपनीने त्यांच्या संकेतस्थळावर‎ जळगाव-इंदूर विमानसेवा ‘लवकरच सुरु होत‎ आहे’ असे जाहीर केले आहे. कंपनीकडे सध्या‎ 6 एअरक्रॉफ्ट आहेत. कंपनीतर्फे आणखी 3 ‎नवीन फ्रान्समधून 10 फेब्रुवारीपर्यंत येणार होते.‎ते आता 20 ते 25 तारखेच्या पुढे भारतात दाखल ‎होतील. ते आल्यानंतर कंपनीतर्फे देशात पाच ‎नवीन रुट सुरु करण्यात येणार आहे. त्यात ‎हैदराबाद-जळगाव- इंदूर रूटचा समावेश आहे.‎ उत्तर भारतासाठी सेवा द्या‎ जळगाव शहर हे राज्याची आर्थिक‎ राजधानी असलेले मुंबई आणि‎ सांस्कृतिक राजधानी पुणे यासह ‎गोवा, अहमदाबाद (गुजरात),‎हैदराबाद (आंध्र प्रदेश) या तीन‎ राज्यांशी विमान सेवेने जोडले गेले ‎आहे. लवकरच इंदूर (मध्य प्रदेश)‎या चौथ्या राज्याशी जळगाव‎ कनेक्ट होईल. त्यासोबत उत्तर‎ भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या ‎मोठ्या प्रमाणाता वाढलेली आहे.‎ दिल्ली, जयपूर या शहरांसाठी ‎विमान सेवा सुरु करावी, अशी‎ अपेक्षा ‘कॅट’ व्यापारी संघटनेचे‎ राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम‎ टावरी यांनी व्यक्त केली आहे.‎ भोपाळमार्गे रेल्वेने सुमारे 8 तास‎ जळगाव ते इंदूर शहराचे अंतर सुमारे 275 किलोमीटर आहे. त्यासाठी रेल्वेने भोपाळमार्गे‎ गेल्यास 8 ते 10 तास, बसने 7 ते 8 तास तर‎कार किंवा टॅक्सीने 5 ते 6 तासांचा अवधी‎ लागतो. त्या तुलनेत विमानाने अवघ्या सव्वा ते ‎दीड तासात जळगावहून इंदूरला पोहचता ‎येईल. ही सेवा व्यावसायिक झाल्यास किमान‎ 2500 रुपयांवर एका सीटचे तिकीट राहू शकते.‎ व्यावसायिक असेल विमानसेवा जळगावातून गोवा, पुणे, अहमदाबाद, मुंबई,‎ हैदराबाद या पाच शहरात आरसीएसअंतर्गत ‎(रिजनल कनेक्टीव्ही सर्व्हीस ) विमानसेवा ‎सुरु आहे. नव्याने सुरु होणारी जळगाव-इंदूर‎सेवा मात्र व्यावसायिक तत्वावर असण्याची ‎शक्यता कंपनीच्या सूत्रांकडून वर्तवली.‎‎

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 10:50 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:मॉरिशसमध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी अन् हनुमानाची मूर्ती, सर्व सणही हाेतात साजरे‎- चैतन्य ‎गोस्वामी महाराज

मॉरिशस हा एक छोटा भारतच आहे.‎आमचे पूर्वज भारताचे होते.‎मॉरिशसच्या प्रत्येक घराबाहेर तुळशी‎ आणि घरात हनुमानाची मूर्ती आहे.‎आमच्या इथे एक गंगा तलाव नावाचे‎ तीर्थक्षेत्र आहे. या ‌तलावात भारतातून‎ गंगेचे थोडे पाणी आणून टाकले असून‎ तो तलावच आमच्यासाठी गंगा आहे.‎ महाशिवरात्रीला त्या तलावातील पाणी‎ आणून आम्ही घरातील शिव पिंडीवर‎अभिषेक करतो. तसेच होळी,‎दिवाळी, जन्माष्टमी, रामनवमी असे ‎सर्व भारतीय उत्सव जल्लोषात साजरे ‎करीत असल्याचे इस्कॉनचे‎ आंतरराष्ट्रीय प्रचारक सुंदर चैतन्य ‎गोस्वामी महाराज यांनी सांगितले. ते ‎इस्कॉनच्या प्रचारानिमित्ताने भारतात‎ आले असून एका कार्यक्रमानिमित्त ‎जळगावात आल्यानंतर ‘दिव्य‎मराठी’ने त्यांची मुलाखत घेतली. या‎वेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद ‎साधला. तो त्यांच्या शब्दात...‎ साधूंनी आध्यात्मिक चर्चा करावी,‎लोकांप्रती दया भावना असावी.‎व्यापार, राजकारणात साधूने पडू नये.‎जेव्हा ते खऱ्या धर्मापासून परावृत्त‎होतात तेव्हाच ते अशा मार्गाकडे‎ वळतात. साधूंनी इतर साधूंचा संघ ‎धरायला हवा, गुरू करायला हवे,‎शास्त्र वाचायला हवे सर्वांनी भगवंत ‎सेवा हाच उद्देश ठेवायला हवा तरच ‎त्यांच्यावर चुकीचे आरोप होणार नाही.‎ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य ‎हे धर्माचे पालनही करतात आणि‎ लोकांची काळजीपण करतात, असे ‎देखील सुंदर चैतन्य गोस्वामी महाराज‎यांनी सांगितले.‎ यामुळे श्रीकृष्णाची भक्ती‎ 33 कोटी देव-देवता आहेत.‎यात प्रत्येक देव-देवता या ‎वेगवेगळ्या समूहाचे‎ प्रतिनिधित्व करतात. (इंद्र-‎पाणी, सरस्वती- विद्या,‎लक्ष्मी- संपत्ती) आम्ही‎ सर्वच देवांचा आदर करतो;‎ मात्र श्रीकृष्ण हे स्वयं‎ भगवान आहे. आम्ही‎यासाठी देखील कृष्णाची‎ भक्ती करतो की, कृष्णच ‎भक्ती व मुक्ती देऊ‎ शकतात. भगवान कृष्णांनी‎ गीतेच्या 18 व्या ‎अध्यायातील 66 व्या‎ श्लोकात ‘तू सर्व धर्मांचा त्याग करून माझ्याकडे ये’‎असे सांगितले आहे म्हणून‎ आम्ही कृष्णाकडे जातो.‎ आपण देवतांकडे काही न ‎मागता केवळ निर्मळ मनाने ‎सेवा करावी. जीवनात सुख नसेल तर शांती‎ कशी मिळेल. सध्या आपली‎ तांत्रिक प्रगती झाली असली तरी‎ मन:शांती नाही. मन:शांतीही मन:‎मंत्रापासून मिळेल. मंत्र म्हणजे ‎भगवंताचे नामस्मरण ते करू‎ तेव्हाच आपल्याला मन:शांती‎ मिळेल. टेक्नॉलॉजीला आम्ही‎ टाळू शकत नाही पण ते केवळ‎ साधन आहे. यावर भगवंताचे नामस्मरण हाच उपाय आहे.‎ असे सोडवा मुलांचे मोबाइलचे व्यसन‎ टेक्नॉलॉजिला एक चांगली व दुसरी वाईट अशा दोन‎बाजू आहे. डॉक्टर व गृहिणींच्या हातात चाकू आला तर‎ते शस्त्रक्रिया, भाजी कापण्यासाठी उपयोगात आणतील.‎तोच जर गुंडाच्या हातात गेला तर तो वाईट कृत्य करेल.‎ सध्या मुले खूपच मोबाइलच्या आहारी गेली आहेत.‎त्यांना जर चांगल्या गोष्टीत गुंतवले तर ते मोबाइलचे ‎व्यसन सहज सोडतील. तसेच एखाद्या गोष्टीच्या ‎आहारी जाणाऱ्याला जर आपण भगवद्भावना, भक्ती,‎नामस्मरण, नृत्य, कीर्तन, सेवा आणि ग्रंथ वाचनाकडे ‎वळवले तर ते नक्कीच वाईट सवयी सोडून चांगल्या‎ व्यक्ती बनतील असेही महाराज यांनी सांगितले.‎‎

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 10:45 am

मोदी-फडणवीसांना सांगितलेच पाहिजे, हा हट्ट कशासाठी?:संजय राऊत संतापले; अनावश्यक चिडचिड करू नये, म्हणत पटेलांना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कडाडून टीका करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला. अजित पवारांनी भाजपसोबत जाताना स्वतःचे विचार खुंटीला टांगले नाहीत; ते पक्ष चालवत होते, असे ठामपणे सांगत राऊतांनी पटेलांवर थेट निशाणा साधला. त्यांच्या मते, अजित पवारांचा पक्ष हा पवार कुटुंबाचा होता, तो कोणाच्याही छायेखाली चालणारा नव्हता. त्यामुळे पटेल यांनी अनावश्यक चिडचिड करू नये, असा टोला त्यांनी लगावला. याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत प्रत्येक गोष्ट मोदी-फडणवीसांना सांगितलीच पाहिजे, हा हट्ट कशासाठी? असा सवाल उपस्थित केला. राऊतांनी उपरोधिक शैलीत विचारले, पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का? त्यांच्या वक्तव्यातून प्रफुल पटेल यांच्याबाबतची नाराजी स्पष्ट दिसून आली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत होते, त्यामुळे भाजपची परवानगी घेण्याचा प्रश्नच नव्हता, असे ते म्हणाले. दोन पक्षांत चर्चा झाली, तर त्याची माहिती सर्वांना असलीच पाहिजे हा अनाठायी आग्रह का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पटेल हे मोदी-शाह यांचे भक्त असल्याचा आरोप करत, महाराष्ट्राला पटेल असंच करा, असा हल्लाबोल त्यांनी केला. सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, त्यांचे एक पाय नव्हे, तर दोन्ही पाय भाजपत आहेत. या विधानाने त्यांनी राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर भाजपच्या जवळीकतेचा आरोप केला. पुढे ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष अमित शाह यांनी स्थापन केला आहे, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे शेअरहोल्डर आहेत, असे म्हणत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. चंद्रपूरमधील राजकीय तिढ्यावरही राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट असल्याचे दिसून आले. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. करारामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही भारत-अमेरिका व्यापार करारावरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यांच्या मते, आपलं काहीतरी उघडं पडेल या भीतीपोटी मोदींनी अमेरिकेच्या पायाशी आणून ठेवलं आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. या करारामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ठरवत आहेत, असा दावा करत त्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले राऊतांच्या या वक्तव्यांनी राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर एकाच वेळी हल्लाबोल करत त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. त्यांच्या या विधानांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंधांबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील काही दिवसांत या वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 10:41 am

नाशिकमध्ये भाजपविरोधात उबाठा रिंगणात:महापौरपदासाठी हिमगौरी आडके, उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे जाहीर

नाशिक महापौरपदाच्या शुक्रवारी (6 फेब्रुवारी) होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपच्या हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे मंत्री गिरदश महाजन यांनी जाहीर केली. दरम्यान, उबाठाने या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात उडी मारली असून ठाकरेंच्या आदेशानंतर सीमा पवार यांनी अर्ज भरला. एका खासगी हॉटेलमध्ये मंगळवारी सकाळी 10 वाजता भाजपच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर मंत्री महाजन यांनी आडके आणि सानप यांच्या नावांची घोषणा केली. महिला खुला प्रवर्ग यासाठी घोषित महापौरपदासाठी भाजपतर्फे 16 नगरसेविका पात्र होत्या. त्यापैकी 5 जणी अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. दरम्यान शिंदेसेनेतर्फे उपमहापौरपदासाठी उपनेते विलास शिंदे, शहरप्रमुख प्रवीण तिदमे आणि नुकतेच काँग्रेसमधून आलेले राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले. वरिष्ठ पातळीवर सत्ता सहभागाच्या निर्णयाची शक्यता लक्षात घेऊन उपमहापौरपदाचा अर्ज भरल्याचे उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. कुणाला पुढील टर्मचे आश्वासन, तर कुणाला समितीचा दिला शब्द भाजपतर्फे भामरे यांच्यासोबतच दीपाली गिते,दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे यादेखील महापौरपदासाठी इच्छुक होत्या. यापैकी काहींना पुढील अडीच वर्षानंतर महापौरपदाचे तर काहींना सध्याच्या टर्ममध्ये अन्य समित्यांचे अध्यक्ष, सभापतीपदांचे शब्द दिल्याचे कळते. खासगी हॉटेलमध्ये अडीच तास या वाटाघाटी चालल्या. त्यानंतर महाजन यांनी बाहेर येऊन आडके आणि सानप यांची नावे घोषित केली. 6 फेब्रुवारीला मतदान अधिकृत घोषणेसाठी 50 तास बाकी उबाठा सेनेला 79 पैकी फक्त 15 जागा मिळाल्या. दुसरीकडे भाजपला 72 जागांवर एकहाती बहुमत मिळाले. त्यामुळे विरोधकांकडून सर्व शस्त्रे म्यान करण्यात आली होती. दरम्यान उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शेवटच्या टप्प्यात आदेश आल्याने सीमा पवार यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. शुक्रवारी भाजपच्या हिमगौरी आडके विरुद्ध उबाठाच्या सीमा पवार यांच्यात लढत होईल. महापौरपदी हिमगौरी आडके यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या पदासाठी स्पर्धेत असलेल्या भाजपच्या नगरसेविका स्वाती भामरे यांना बैठकीतच अश्रू अनावर झाले. मंत्री महाजन यांना बाजूला घेत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यावर महाजन यांनी पुढील टर्ममध्ये तुमचा विचार केला जाणार असल्याचे सांगून त्यांची नाराजी दूर केली उपमहापौरपदासाठी शिंदेसेनेचे तिघे उद्या आणि परवा या दोन दिवसांत वरिष्ठ पातळीवर भाजप आणि शिंदेसेना यांच्यात सत्ता सहभागाबद्दल बोलणी होतील. त्यानुसार शिंदेसेनेला उपमहापौरपद दिले जाऊ शकते. तसे झाल्यास भाजपचे मच्छिंद्र सानप यांचा अर्ज मागे घेतला जाईल. शिंदेसेनेनतर्फे विलास शिंदे, प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. ज्येष्ठतेच्या निकषावर विलास शिंदे उपमहापौर होऊ शकतात.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 10:35 am

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बोलण्याचा देवेंद्र फडणवीसांना अधिकार काय?:शरद पवारांचा थेट सवाल; अमेरिका करारावरही इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल मला आनंद आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री फडणवीस त्या चर्चेत सहभागी नव्हते. मग त्याबद्दल बोलण्याचा त्यांना काय अधिकार होता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराबाबत सावधगिरीचा इशारा दिला. कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची तरतूद या करारात असण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली. ही बाब देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते, असे त्यांचे मत होते. या पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही भाष्य केले. संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो, मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळे यावेळी दिल्लीला जाता आले नाही, असे त्यांनी सांगितले. सभागृहात थेट उपस्थित राहून अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार काही मुद्दे लक्षात येतात, असे ते म्हणाले. सामान्य नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकलेला नाही, ही बाब समाधानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तथापि, अर्थसंकल्पातून विकासाला अधिक चालना देणाऱ्या ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, असे पवार यांनी नमूद केले. केवळ करसवलती किंवा कर न वाढवणे यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अधिक ठोस निर्णय आवश्यक होते, अशी त्यांची भूमिका होती. विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक असलेले काही निर्णय अर्थसंकल्पात दिसून आले नाहीत, असे ते म्हणाले. स्थानिक उत्पादकांवर परिणाम भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत बोलताना पवार यांनी अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या वस्तूंवरील करांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. मात्र या कर कपातीसोबतच कृषी क्षेत्रात अमेरिकेला भारतात निर्यात करण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अमेरिका हा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देश असल्याने त्यांच्या उत्पादनांचा इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्यास स्थानिक उत्पादकांवर त्याचा परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे आवश्यक भारतीय कृषी क्षेत्रावर तसा परिणाम होऊ नये, ही अपेक्षा व्यक्त करत पवार म्हणाले की, कराराचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतरच सविस्तर भाष्य करणे योग्य ठरेल. सध्या ज्या बाबी जाहीर झाल्या आहेत, त्यावरून शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घेणे आवश्यक आहे, हे मात्र निश्चित आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने अशा कोणत्याही निर्णयाचा परिणाम व्यापक असतो, याची जाणीव ठेवून पुढील पावले उचलली जावीत, असे त्यांनी सुचवले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 10:29 am

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी, 15 तास मार्ग ठप्प:आडोशी बोगद्याजवळ भीषण परिस्थिती; एकाच लेनवरून वाहतूक सुरू

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण आठ तास पूर्णपणे ठप्प राहिली. मध्यरात्रीपर्यंत परिस्थिती धोकादायक असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता. गॅस गळती सुरू असल्याने प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी हजारो वाहनचालक महामार्गावरच अडकून पडले. मध्यरात्रीनंतर धोका काही प्रमाणात कमी झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर तिसऱ्या लेनवर हलवण्यात आला. त्यानंतर मुंबईच्या दिशेने केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वाहतुकीचा वेग अत्यंत मंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा कायम आहेत. सुमारे 15 तासांपासून या परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप पूर्णपणे थांबलेली नसल्याने खबरदारी म्हणून हालचालींवर बंधने ठेवण्यात आली आहेत. या कोंडीमुळे अनेक प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. काही वाहनचालक पहाटे चार वाजल्यापासून तर काही जण रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले आहेत. दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेकांची नियोजित फ्लाइट चुकल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासाच्या नियोजनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला असून लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. महामार्गावर इतक्या दीर्घकाळ अडकून पडल्याने प्रवाशांचा संयम सुटू लागल्याचे दिसून आले. या दरम्यान काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. पाणी, अन्न आणि शौचालयांच्या सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागला. आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची भावना वाहनचालकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे. वेगाने पावले उचलावीत घटनेनंतर वाहनचालकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन प्रसंगी महामार्ग इतका वेळ बंद का राहतो? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तातडीने प्रभावी उपाययोजना करून महामार्ग पूर्णपणे मोकळा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. एकाच लेनवर सुरू असलेली वाहतूक अपुरी असल्याने कोंडी कमी होण्यास वेळ लागत आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अधिक वेगाने पावले उचलावीत, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:51 am

अजितदादांचा शेवटचा संदेश उघड:8.37 ला फोन, 8.46 ला अपघात; विमानातला अखेरचा कॉल बारामतीत गाजला, अजित पवारांचा शेवटचा आवाज ऐकवला

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्या दिवशी सकाळी ते मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी 8.46 वाजता विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आणि त्यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या अकस्मात घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली. सर्वपक्षीय नेते, लाखो समर्थक आणि चाहत्यांच्या उपस्थितीत 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर आज बारामतीमध्ये अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी अपघातापूर्वी अजित पवारांशी झालेल्या शेवटच्या संभाषणाची ध्वनिमुद्रिका प्रसारमाध्यमांसमोर ऐकवली. या रेकॉर्डिंगमधून अजित पवार अपघातापूर्वी नेमक्या कोणत्या विषयावर बोलत होते, याची माहिती त्यांनी दिली. लँडिंगआधी नेटवर्क उपलब्ध होताच अजित पवारांनी स्वतः श्रीजीत पवारांना फोन केल्याचे त्यांनी सांगितले. श्रीजीत पवारांच्या मते, त्यांनी सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी अजित पवारांना एका विषयासंदर्भात मेसेज केला होता. विमान प्रवासात असल्याने नेटवर्क नसल्यामुळे तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, विमान बारामतीच्या हद्दीत येताच नेटवर्क मिळाल्यानंतर अजित पवारांनी स्वतः कॉल करून त्या मेसेजला उत्तर दिले. हा कॉल सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी आला आणि काही मिनिटे दोघांमध्ये संभाषण झाले. त्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांत म्हणजे 8.46 वाजता विमान अपघाताची घटना घडली. या शेवटच्या कॉलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीच्या संदर्भात चर्चा झाली होती, असे श्रीजीत पवारांनी स्पष्ट केले. सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका अजित पवारांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. आपण सर्वांना न्याय देण्याचं काम करू, असे शब्द त्यांनी फोनवर उच्चारल्याचे श्रीजीत पवारांनी सांगितले. तसेच, माळी समाजाला जिल्हा परिषद उमेदवारी दिल्याचा उल्लेखही अजित पवारांनी या संभाषणात केला होता. इतर पक्षांनी अशी उमेदवारी दिलेली नसताना आपण ती दिली असल्याचे ते म्हणाले होते. श्रीजीत पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा कॉल विमानात असतानाच आला होता. अजित पवार बोलत असताना विमान बारामतीत उतरण्याच्या तयारीत होते. 8.37 पर्यंत संभाषण सुरू होते आणि त्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटना घडली. या वेळांच्या उल्लेखामुळे हा कॉल अपघातापूर्वीचा शेवटचा संवाद ठरल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी ही ध्वनिमुद्रिका उपस्थितांना ऐकवून त्या संभाषणाचा संदर्भ स्पष्ट केला. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्यभरातून दुःख व्यक्त करण्यात आले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत सर्वसमावेशकतेवर दिलेला भर या शेवटच्या संभाषणातूनही दिसून येतो, असे श्रीजीत पवारांनी सांगितले. जिल्हा परिषद उमेदवारीसारख्या स्थानिक राजकारणातील विषयावरही त्यांनी सर्व समाजघटकांचा विचार करण्याची भूमिका घेतल्याचे या कॉलमधून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अपघाताच्या अवघ्या नऊ मिनिटांपूर्वी झालेला संवाद बारामतीत झालेल्या या पत्रकार परिषदेमुळे अजित पवारांच्या निधनापूर्वीच्या शेवटच्या काही मिनिटांबाबत नवी माहिती समोर आली आहे. अपघाताच्या अवघ्या नऊ मिनिटांपूर्वी झालेला हा संवाद आणि त्यातील आशय यामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. अजित पवारांनी शेवटच्या क्षणांपर्यंत राजकीय आणि सामाजिक बांधिलकी जपल्याचे या खुलाशातून अधोरेखित झाले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:37 am

एक लाख लोकसंख्येच्या अकोटमध्ये नाल्या तुंबल्याने अस्वच्छता:नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर, लाखो रुपये खर्चूनही स्वच्छतेचा बोजवारा

एक लाख लोकसंख्येच्या अकोट शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अस्वच्छ परिसर, तुंबलेल्या नाल्या, अनियमित साफसफाईमुळे कर देणारे सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला प्रश्न विचारत आहेत. प्रशासकराज असताना अनेकांनी कचऱ्याचा ठेकेदारीतून भक्कम माया जमवल्याचे बोलले जाते. मात्र निवडणुकीनंतर लोकनियुक्त प्रशासन असतानाही संबंधित ठेकेदारावर वचक नसल्याचे दिसते. नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी केवळ आश्वासन करत असल्याचे बोलले जात आहे. पालिकेत रुजू झाल्यापासून कर्मचाऱ्यांसोबत बैठकांमागे बैठका सुरू आहेत. परंतु कृती शून्य दिसून येत आहे. सततच्या बैठकांमुळे कर्मचारी देखील वैतागल्याची पालिकेत दबक्या आवाजात चर्चा आहे. प्रशासक असताना पाच ते सहा वर्षांत अकोट शहरात विकासकामांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. मात्र तरीही स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते आदी मूलभूत प्रश्न आजही कायम असल्याचे दिसत आहे. शहरातील क्रीडा संकुल, शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अतिक्रमण, भाजी मार्केट, उद्याने, क्रीडांगण, गटारी, स्वछतागृह, दिवाबत्ती आदी प्रश्न कायम आहेत. याबाबत गत पाच वर्षांत कोणत्याच उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शहरातील साफसफाईसाठी वर्षाला लाखो रुपये कंत्राटदारास अदा केले जातात. परंतु, पैसा खर्च करुनही अनेक भागात अस्वच्छता दिसून येत आहे. शहरात रस्ते व गटारीची कामे करण्यात आली. परंतु, त्यातील बहुतांश कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. शहरातून जाणारे अनेक लहान मोठे नाले आजही कचऱ्यामुळे तुंबलेले आहेत,गेल्या कित्तेक महिन्यांपासून नाले सफाई होत नसल्याने झाडे झुडपे वाढलेली आहे, वस्त्यांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात,काही ठिकाणी नाल्यात वाहून आलेला कचरा काठावर काढल्यानंतर तो तसाच ठेवून दिला जात आहे. शहरात महिलांसाठी अद्याप एकही स्वछतागृह नाही. त्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराची स्थिती दयनीय झाली आहे. पालिकेत अकोट शहर विकास मंच गट स्थापन करण्यात आला आहे. शहर विकासाकरिता नवे कारभारी निवडले आहेत. प्रशासकराज संपुष्टात येऊन लोकनियुक्त नगरसेवकांनी शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवाव्या, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्वच्छतेसाठी अकोट नगरपरिषद महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करते. यासाठी १७ घंटागाड्या, ८ ट्रॅक्टर, एक जेसीबी (भाडे तत्त्वावर) याकामी ठेवण्यात आले आहे. आरोग्य निरिक्षण आणि ४ मुकादमांसह १५२ कर्मचारी स्वच्छतेच्या कामी असतात. तरीही नाल्या तुंबल्या असून वेळेवर साफसफाई केली जात नाही. पार्किंगची समस्येमुळे वाहतूक कोंडी वाढते शहरीकरण पाहता अकोट शहरात कोठेच पार्किंगची व्यवस्था नाही. वाहने मिळेल त्या ठिकाणी उभी करत वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात येत आहे. अनेकदा रस्त्यावर उभ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. फुटपाथवर विक्रेत्यांचा ठिय्या, रस्ते झाले अरुंद शहरात हातगाडी लागून व्यवसाय करणाऱ्या फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी फुटपाथवर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन चालणे कठीण झाले आहे. शहरात दररोज कचरा संकलित केला जात असला तरी गल्लीबोळात ही व्यवस्था अपुरी पडत आहे. काही ठिकाणी कचरा तसाच पडून असला तरी तो गोळा केला जात नाही. दररोज शहरामधून कचरा संकलन नावालाच ^विविध प्रभागात घाणीचे साम्राज्य आहे, दररोज कचरा संकलन नावालाच आहे. शहरात महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह नाही. स्वतंत्र भाजी मार्केट नाही. गत पाच वर्षांपूर्वी जे प्रश्न होते, ते आजही कायम आहेत. - विजय ढेपे, सामाजिक कार्यकर्ते.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:28 am

निवडणुकीचा खर्च न देणाऱ्या शंभरावर उमेदवारांना नोटीस:राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हाेणार कारवाई‎

निकाल लागल्यापासून महिनाभराच्या आंत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर केला नसल्याने नगरपालिका व नगरपंचायतीच्या शंभरावर उमेदवारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे पाऊल उचलण्यात आले असून त्या-त्या नगरपालिकांनी नोटीस बजावताना संबंधितांना आठवडाभराची मुदत दिली आहे. या नोटीसनंतरही संबंधित उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब सादर केले नाही तर तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त होणार असून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना नोटीस धाडल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी घोषित झाला. त्या तारखेपासून महिनाभराच्या आंत सर्व उमेदवारांना आपापल्या निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब त्या-त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करावयाचे होते. परंतु अजूनही शंभरावर उमेदवारांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे त्यांना नोटीस धाडण्यात आल्या आहेत. या निवडणुकीत अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड व शेंदुरजनाघाट या १० नगरपालिकांसह नांदगाव खंडेश्वर आणि धारणी या दोन नगरपंचायतींचे नगराध्यक्ष (एकूण १२) आणि २७८ नगरसेवक निवडून द्यावयाचे होते. त्यानुषंगाने नगराध्यक्षांसाठी ६४ आणि नगरसेवकांसाठी १०४८ उमेदवार मैदानात होते. यापैकी बहुतेक उमेदवारांनी प्रचारासह निवडणुकविषयक केलेला एकूण खर्च निवडणूक विभागाकडे सादर केला आहे. परंतु अद्यापही शंभरावर उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित नगरपालिका प्रशासनाने त्यांना नोटीस धाडल्या असून आठवडाभराची मुदत दिली आहे. या मुदतीत खर्च सादर न झाल्यास जिल्हाकचेरीतून पुन्हा नोटीस धाडल्या जाणार आहे. ...तर ६ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय या दोन्ही यंत्रणांमार्फत धाडल्या जाणाऱ्या नोटीसनुसार कृती न केल्यास संबंधित उमेदवारांचा तपशिल थेट राज्य निवडणूक आयोगाला कळविला जाणार आहे. या तपशिलातच जिल्हाधिकारी संबंधितांवर कारवाईची शिफारस करणार आहेत. त्या शिफारसीनुसार राज्य निवडणूक आयोग संबंधित उमेदवारांवर ६ वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घालणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:25 am

अर्थखातं घेताच फडणवीसांचा धडाकेबाज आदेश:15 फेब्रुवारीपासून खरेदीवर टाळेबंदी; फर्निचरपासून सेमिनारपर्यंत खर्च बंद

राज्यातील विविध सरकारी विभागांकडून होणाऱ्या अनावश्यक आणि मनमानी खरेदीवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णायक पावले उचलली आहेत. अर्थखात्याची सूत्रे स्वतःकडे घेतल्यानंतर त्यांनी नव्या निविदा काढण्यावर तसेच खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर तातडीची बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. वित्त विभागाकडून सर्व प्रशासकीय यंत्रणांना कळवण्यात आले आहे की, 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही प्रकारच्या खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार नाही आणि नव्या निविदा प्रक्रियेलाही विराम दिला जाईल. या निर्णयामुळे वर्षअखेरच्या काळात होणाऱ्या खर्चाच्या पद्धतीवर मोठा परिणाम होणार आहे. या आदेशाच्या कक्षेत फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, संगणक व इतर उपकरणे, सुटे भाग खरेदी, कार्यालये भाड्याने घेणे, सेमिनार, भौतिक कार्यशाळा अशा अनेक खर्चांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच नियमित प्रशासकीय गरजांच्या नावाखाली होणाऱ्या विविध खरेदींना तात्पुरता ‘ब्रेक’ लावण्यात आला आहे. मात्र, औषध खरेदीला या निर्बंधातून वगळण्यात आले असून आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला आवश्यक औषधसाठा खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय केंद्र पुरस्कृत योजना, त्याअंतर्गत राज्य हिस्सा आणि बाह्य सहाय्यित प्रकल्पांतील खरेदी प्रस्तावांना देखील या बंदीतून सूट देण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या टप्प्यावर अनेक विभागांकडून उपलब्ध निधी खर्च करण्यासाठी घाईघाईने खरेदी केली जाते, असा आरोप अर्थ विभागाकडून करण्यात आला आहे. केवळ मंजूर निधी परत जाऊ नये, या उद्देशाने वर्षअखेर अनावश्यक वस्तूंची खरेदी होते, असा निष्कर्ष वित्त विभागाच्या आढाव्यातून समोर आला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक ताण निर्माण होतो. ही प्रवृत्ती रोखण्यासाठीच हा कठोर निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थखात्याचा सखोल आढावा घेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. हा आदेश सर्व प्रशासकीय विभाग, त्यांच्या अधिनस्त कार्यालये, शासकीय महामंडळे, अनुदानित संस्था तसेच नागरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही लागू असेल. त्यामुळे राज्यातील प्रशासनाच्या सर्व स्तरांवर या निर्णयाचा परिणाम दिसून येणार आहे. कार्यालयीन सोयीसुविधा, प्रशिक्षण कार्यक्रम, उपकरणे दुरुस्ती यांसारख्या नियमित खर्चांनाही या निर्बंधाचा फटका बसणार आहे. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडू नये याची काळजी घेत औषध खरेदीसारख्या बाबींना सूट देण्यात आली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढलेल्या ताणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतुदी लागणाऱ्या योजनांमुळे खर्चाचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक ठरले आहे. त्यातच वर्षअखेरचा काळ असल्याने विभागांकडून होणाऱ्या खर्चावर अंकुश ठेवणे गरजेचे असल्याचे वित्त विभागाचे मत आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत सरकारी यंत्रणांमध्ये खरेदीविषयक प्रक्रिया पूर्णपणे मंदावलेली दिसण्याची शक्यता आहे. अर्थ आणि नियोजन खाते फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळात अर्थखातं त्यांच्याकडे होते. त्याचबरोबर क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास ही खातीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती त्यांच्याकडे देण्यात आली. मात्र, अजित पवारांकडे असलेले अर्थ आणि नियोजन खाते सध्या त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे. 6 मार्च रोजी मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करणार येत्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2026-27 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वीच खर्चावर नियंत्रण आणण्याच्या उद्देशाने खरेदी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. पुढील काळात अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहील, अशी माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र, सध्या तरी अर्थखात्याची सूत्रे फडणवीसांच्या हाती असल्याने त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या आर्थिक शिस्तीबाबत सरकारचा स्पष्ट संदेश गेला आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय प्रशासनात आणि राजकारणातही चर्चेचा विषय ठरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:24 am

अजब पेच.. न्यायालय म्हणते, सुधारणा करा:सरकारतर्फे मात्र बजेटमध्ये कपात, आरोग्य विभागातर्फे 136.10 कोटींची मागणी, सरकारी तरतूद 72 कोटींची‎

मेळघाटच्या आरोग्य सेवेतील उणीवांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने अलिकडेच जिल्ह्याच्या आरोग्य विभागासह राज्य सरकारला धारेवर धरले. त्यानुषंगाने जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने काही नव्या उपाययोजना हाती घेत डीपीसीच्या (जिल्हा नियोजन समिती) माध्यमातून शासनाकडे १३६ कोटी १० लाख रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी शासनाने आखून दिलेल्या बजेटच्या तुलनेत ६४ कोटी रुपयांनी अधिक आहे. परंतु आर्श्चयाची बाब अशी की शासनाने अतिरिक्त रक्कम तर सोडाच, गतवर्षीच्या तरतुदीपेक्षाही १७ कोटी रुपयांनी कमी केवळ ७२ कोटी रुपयाला मंजुरी दिली आहे. या विचित्र व्यवहारामुळे आरोग्य विभाग चक्रावून गेला असून, उपाययोजना करायच्या तरी कशा, असा अजब पेच अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. जिल्हा परिषदेचे डीएचओ कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक (सीएस) यांनी संयुक्तपणे आरोग्य सेवा संबंधिचा सन २०२६-२७ चा आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेने ७७ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली असून उर्वरित मागणी ही जिल्हा शल्य चिकित्सक उर्वरित. पान ४ डॉ. श्यामसुंदर निकम, निवृत्त सीएस, अमरावती. पुरेशा निधीअभावी कामे कशी करणार तोकडे मनुष्यबळ, भौगोलिक स्थितीच्या मर्यादा, निसर्गदत्त अडसर, आदिवासींच्या चालीरिती अशा वेगवेगळ्या अडथळ्यांवर मात करीत मेळघाटात आरोग्य विभागाला काम करावे लागते. त्यामुळे बरेचदा पुरेशा प्रमाणात आरोग्य सेवा पुरविणे शक्य होत नाही. परिणामी मेळघाटची आरोग्य व्यवस्था वारंवार चर्चेत येते. या पार्श्वभूमीवर तेथे अतिरिक्त उपाययोजना सुचवल्या जातात. परंतु जे शासन या उपाययोजना सूचविते, तेच शासन पुरेशा प्रमाणात रक्कम पुरवणार नसेल तर अधिकारी कामे कशी करणार, असा प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे. तीन प्रधान सचिवांनी मेळघाटात पोहोचून जाणून घेतली वास्तविकत: मेळघाटमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ही नेहमीची डोकेदुखी बनली आहे. सरकार ज्या पद्धतीने कागदोपत्री बोलते, ती वास्तविकतः नसते म्हणून पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, ‘महान’चे डॉ. आशिष सातव आणि ‘खोज’संस्थेचे ॲड. बंड्या साने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने राज्य शासनाला चांगलेच फटकारले होते. त्यानुसार अलिकडेच तीन प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष मेळघाटात पोहोचून तेथील वास्तविकत: जाणून घेतली. त्यानंतर न्यायालयाने काही उपाययोजना सुचवल्या आहेत. आता त्या कधीपूर्ण होणार याकडे तेथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:24 am

अजित पवार यांच्या अस्थींचे अस्थीकुंडात विसर्जन:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळी आ. संजय खोडके यांची उपस्थिती‎

महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यतत्पर, शिस्तप्रिय व जनसामान्यांशी नाळ जपणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून अजितदादा पवार यांचा अस्थीकलश सोमवारी दिवसभर अमरावतीत ठेवल्यानंतर आज, मंगळवारी सकाळी गुरुकुंज मोझरी येथील अस्थीकुंडात विसर्जीत करण्यात आला. विसर्जनापूर्वी राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार संजय खोडके व अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांच्या अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयात सोमवारी या अस्थीकलशाचे अनेकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर आज पहाटे या कलशाचे आमदार संजय खोडके यांच्या हस्ते राष्ट्रसंतांचे महासमाधीस्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे विसर्जन करण्यात आले. पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी ध्यानसाधनेच्या वेळी प्रार्थना मंदिरात अत्यंत श्रद्धाभावाने काही काळ हा अस्थीकलश ठेवण्यात आला. ‘सप्रेम जयगुरुदेव’च्या घोषाने संपूर्ण गुरुकुंज परिसर भक्तिमय व शोकाकुल वातावरणाने भारावून गेला होता. याप्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळून गेले. अनेकांच्या मनातही कृतज्ञतेची भावना दाटून आली होती. दिवंगत अजितदादा पवार यांचे नेतृत्व, प्रशासकीय अनुभव, सामाजिक बांधिलकी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असलेली तळमळ यांचा उपस्थित मान्यवरांनी यावेळी भावपूर्ण शब्दांत उल्लेख केला. या भावपूर्ण कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस पद्मश्री जनार्दनपंत बोथे, डॉ. राजाराम बोथे, जिल्हा परिषदेच्या सुरेखाताई ठाकरे, राकाँचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, कार्याध्यक्ष प्रवीण भुजाडे, अविनाश मार्डीकर, निखिल ठाकरे, नवनियुक्त नगरसेवक प्रमोद महल्ले, डॉ रघुनाथ वाडेकर, भोजराज काळे, विशाल खोडके, राहुल मानकर,प्रकाश मक्रमपुरे, नगरसेवक योगेश सवई, यश खोडके, माजी अध्यक्ष भूषण यावले, तालुकाध्यक्ष दिलीप भुयार, कार्याध्यक्ष प्रकाश पडोळे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:24 am

जि.प. क्रीडा महोत्सवात धारणीच धुरंधर‎:सांस्कृतिक स्पर्धेतही मिळाले उपविजेतेपद, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा माेठ्या संख्येने प्रतिसाद

गेल्या तीन दिवसांपासून येथे सुरु असलेल्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पीयनशीप) धारणी पंचायत समितीच्या चमूने जिंकल्यामुळे ही चमू धुरंधर ठरली. गतवर्षीही याच संघाचा दबदबा होता. दरम्यान यावर्षीच्या सांस्कृतिक स्पर्धांमध्येही धारणीच्या संघाने उपविजेपद पटकावून सर्व १४ तालुक्यांवर छाप सोडली आहे. येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि किरण नगरातील नरसम्मा हिरय्या महाविद्यालच्या मैदानात जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या, तर सांस्कृतिक समारंभ विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात पार पडला. पहिल्या दोन दिवसांच्या सायंकाळी सांस्कृतिक स्पर्धा तर सतत तिन्ही दिवस क्रीडा स्पर्धा असे हे आयोजन होते. यामध्ये जिल्हाभरातील सर्व १४ तालुक्यांच्या १४ आणि जिल्हा परिषद मुख्यालयाची एक अशा एकूण १५ चमू सहभागी झाल्या होत्या. या सर्वांवर मात करुन धारणीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. सुमारे ३ हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या क्रीडा स्पर्धेत धारणीच्या संघाने सांघिक आणि वैयक्तीक क्रीडा स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावले. कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन, जलतरण आणि धावस्पर्धेत या खेळाडूंनी अव्वल पुरस्कार प्राप्त केले. त्यामुळे धारणीला सर्वसाधारण जेतेपद देण्यात आले. मेळघाटचे नाव उज्वल करणाऱ्या धारणीने गेल्यावर्षीही क्रीडा स्पर्धेतील दबदबा कायम ठेवला होता. विजेत्या चमूला सीईओ संजीता महापात्र, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डेप्युटी सीईओ श्रीराम कुळकर्णी, बाळासाहेब बायस, विलास मरसाळे, शिक्षणाधिकारी सतिश मुगल, योजना शिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, बिडीओ स्नेहल शेलार, स्वप्निल मगदुर, अभिषेक कासोदे, सुधीर अरबट, तुषार दांडगे, विनोद खेडकर, प्रफुल्ल भोरखडे व विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, संदीप बोडखे, विनोद गाडे, पंकज गुल्हाने आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर मान्यवरांनी धारणीच्या सर्व खेळाडू आणि कलावंतांचा सत्कारही केला. प्रारंभी तीन दिवसीय क्रीडा महोत्सवातील सांघिक खेळ, वैयक्तीक खेळ, दिव्यांग खेळाडू, सांस्कृतिक कार्यक्रमातील कलावंत यांना चषक, प्रमाणपञ देण्यात आले. प्रास्ताविक श्रीराम कुळकर्णी, सुञ संचालन मनिष काळे व शैलेन्द्र दहातोंडे यांनी केले. आभार उपशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता विविध समित्यांचे प्रमुख, उपप्रमुख, सदस्य तसेच प्रसिद्धी विभागाचे पदाधिकारी विनोद गाडे, राजेश सावरकर, विनायक लकडे, शरद गढीकर, हेमंतकुमार यावले, पुनम उके यांनी परिश्रम घेतले सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वसाधारण जेतेपद नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीने पटकावले, तर धारणीच्या चमूला उपविजेतेपद देण्यात आले. भक्तीगीत स्पर्धेत श्रीकांत मुंडेकर चांदुर बाजार विजयी, किरण बुल उपविजयी ठरले. सिनेगीत/युगलगीतमध्ये सविता मेश्राम नांदगाव खंडेश्वर विजयी, डॉ. अनिल माकोडे चिखलदरा उपविजयी ठरले. एकलनृत्यमध्ये योगिता चव्हाण नांदगाव खंडेश्वर विजयी, अमृता नायसे वरुड उपविजयी, समुहनृत्यात नांदगाव खंडे विजयी तर अमरावतीची चमू उपविजयी ठरली. कराओकेमध्ये स्मिता शिरवाने चिखलदरा विजयी, शेख बिसमिल्लाह अचलपूर उपविजयी ठरले असून हास्यजत्रा प्रकारात तिवसा विजयी आणि धामणगावचे कलावंत उपविजयी ठरले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्वसाधारण जेतेपद नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीने पटकावले

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:23 am

गुणवत्ता वाढीसाठी ‘शिवाजी’चे ‘स्कूल कनेक्ट’:मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या पुढाकाराने भानखेडा येथे पहिला प्रयोग‎

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) जनजागृती अभियानाचा एक भाग तसेच गुणवत्ता वाढ हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेऊन येथील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने ‘स्कुल कनेक्ट’ अभियान सुरु केले आहे. संस्थेच्या मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षांतर्गत सुरु करण्यात आलेल्या या अभियानाचा पहिला प्रयोग भानखेडा (बुद्रुक) येथील शाळेत करण्यात आला. महाविद्यालयाच्या आयक्यूएसी व इंग्रजी विभागाने त्यासाठी पुरेपूर श्रम उचलले आहेत. या कार्यक्रमाला श्री शिवाजी हायस्कूल, भानखेड़ाचे मुख्याध्यापक सतीश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि रोपे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचे महाविद्यालयाच्यावतीन े प्रा. डॉ. सविता ठाकरे यांनी स्वागत केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि गुणवत्ता वाढीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० म्हणजे काय, त्याची गरज, या धोरणांतर्गत विद्यार्थ्यांना विषय निवडीसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधी आणि भविष्यात विविध क्षेत्रांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्ये आत्मसात केली पाहिजे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. सपना राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार वऱ्हाडे यांनी मानले. मुख्याध्यापक पाटील यांनी आपल्या भाषणात वक्त्यांचा परिचय करून दिला आणि भविष्यात अशा जनजागृती कार्यक्रमांची गरज असल्याचे अधोरेखित केले. मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या एका सुंदर प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. इंग्रजी विभागाच्या प्रीती जवंजाळ आणि महाविद्यालयाचे विद्यार्थीही या वेळी उपस्थित होते. विद्यार्थी, शिक्षकही झाले व्यक्त या वेळी विद्यार्थ्यांसाठी एका संवाद सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचे निरसन करुन घेतले. व्याख्यान आटोपल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभिप्राय सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि शिक्षकांनीही आपली मते मांडली.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:22 am

मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना आणि कायद्याची जाण असावी:वासूद येथे महिला सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता विषयावर कायदेविषयक शिबीर‎

मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. मुली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना व कायद्याची जाण असावी, असे प्रतिपादन न्यायाधीश ए.ए.पाटील यांनी केले. ते वासूद येथील कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमा पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाकरीता सांगोला विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. एस.बी.दिवसे, विधिज्ञ संघाच्या महिला प्रतिनिधी ॲड. एस. व्ही. बोत्रे, सांगोला विधिज्ञ संघाच्या महिला सदस्या ॲड. एच. डी. मेनकुदळे, सांगोला विधिज्ञ संघाच्या महिला सदस्या ॲड. एन.एम.जवंजाळ, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. या कायदेविषयक शिबिराचा मुख्य उद्देश महिला व मुलींचे सक्षमीकरण हा होता. मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आदेशित केल्याप्रमाणे बेटी बचाओ, बेटी पढाओ ही संकल्पना घेवून या विशेष कायदेविषयक शिबिराचे आयोजन करणेत आले होते. या शिबिरातील पहिला विषय बेटी बचाओ, बेटी पढाओ हा होता. या विषयावर सांगोला विधिज्ञ संघाच्या महिला सदस्या ॲड. एच.डी.मेनकुदळे - घोंगडे यांनी मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शनपर भाषणात ॲड. एच.डी.मेनकुदळे- घोंगडे यांनी अनेक उदाहरणांचा संदर्भ देताना बेटी बचाओ, बेटी पढाओ याचे महत्व उपस्थितांना समजावून सांगितले. आपले अध्यक्षीय भाषणात आपले विचार व्यक्त करताना सह दिवाणी न्यायाधीश ए.ए.पाटील साो, यांनी मुली व महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. मुलगी शिकली, प्रगती झाली याचे महत्व त्यांनी त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सर्वांना समजावून सांगितले. तसेच मुली व महिला सक्षमीकरणाकरीता बनविणेत आलेले अनेक कायदे, अनेक शासकीय योजना व त्यांची उपयोगिता ही उदाहरणासह सर्वांना अतिशय प्रभावीपणे कळवून दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगोला विधिज्ञ संघाचे सदस्य ॲड. जी.एम.खटाकळे यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षकडी.टी. घोरपडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करणेकरीता सांगोला न्यायालयाचे अधीक्षक ए. एस. बमनळ्ळी, सहा अधीक्षक डी. डी. मायभाटे, विधी सेवा समितीचे वरिष्ठ लिपिक डी.एम.डोईफोडे, पी.एल.व्ही. पी.एच.पवार व सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे ज्यूनिअर कॉलेज, पर्यवेक्षक व्यवहारे तसेच संस्थेमधील सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले. या शिबिरातील दुसरा विषय सुकन्या समृध्दी योजना हा होता. या विषयावर सांगोला पोस्ट ऑफिस मधील डी.एम. इंगळे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. आपले मार्गदर्शनपर भाषणात महिला सक्षमीकरणाकरीता भारतीय पोस्ट विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सुकन्या समृध्दी योजना तसेच पोस्ट विभागातील इतर सर्व योजनांची माहिती सादर केली. या शिबिरातील तिसरा व महत्वाचा विषय मुलींना सक्षमीकरण व न्यायाची उपलब्धता हा होता. महिला सक्षमीकरण व संरक्षणाकरीता तयार करणेत आलेले अनेक कायदे, कायद्यांची निर्मिती, कायद्याची गरज, अंमलबजावणी व दैनंदिन जीवनात होणारे अनेक फायदे याचे महत्व समजावून सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:12 am

विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून करिअर शोधावे:बार्शी येथील व्याख्यान कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचे प्रतिपादन‎

बार्शी स्वतःच्या बुद्धिमत्तेची ओळख करून घ्या. स्वतःच्या ध्येयावर प्रेम करा आणि स्वतःला ओळखा त्यातूनच आपले करिअर शोधा, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी तथा वक्ते इंद्रजीत देशमुख यांनी केले. रविवारी (दि.१) श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे संस्थापक, संवर्धक व प्रेरणास्त्रौत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त देशमुख यांचे प्रेरक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे तथा जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी देबडवार, खजिनदार तथा सांस्कृतिक प्रमुख जयकुमार शितोळे उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले की, मोबाइलपासून दूर रहा संवेदनशीलता जोपासा अध्ययनशील रहा आई वडिलांचा आदर करा. राष्ट्रप्रेम जागृत ठेवा. तसेच डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या कार्य कर्तृत्वावर बोलताना देशमुख म्हणाले कर्माचे भान असणारा तो कर्मवीर. म्हणूनच कर्मवीर मामांचे विचार दैनंदिन जीवनात जोपासा व करुणेला कृतीची जोड द्या. प्रास्ताविक पी.टी पाटील यांनी केले. प्रेरक व्याख्यात्त्यांचा परिचय जयकुमार शितोळे यांनी करून दिला. आभार प्राचार्य डॉ. दीपक गुंड यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती डमरे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेतील पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. अध्यक्षीय समारोपात डॉ. यादव यांनी कर्मवीर जयंती सोहळा या विषयी माहिती दिली. संस्थेच्या वतीने सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते, अशा प्रकारच्या प्रेरक व्याख्यातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 9:11 am

सूर्यनमस्कार हा केवळ व्यायाम नसून सशक्त जीवनाचा आधार:श्रीपाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन, दास नवमी उत्सवानिमित्त श्री समर्थ प्रशालेत सूर्यनमस्कार स्पर्धा उत्साहात‎

आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. सूर्यनमस्कार हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो शरीर, मन आणि विचार यांचा समतोल राखणारा जीवनमार्ग आहे. विद्यार्थ्यांनी रोजच्या दिनक्रमात सूर्यनमस्काराचा समावेश केल्यास आत्मविश्वास वाढेल, आरोग्य सुदृढ राहील आणि सकारात्मक विचारांची जडणघडण होईल, असे प्रतिपादन दास नवमी उत्सव समिती प्रमुख श्रीपाद कुलकर्णी यांनी केले. दास नवमी उत्सवानिमित्त सावेडीतील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहरातील विविध भागांतील तब्बल ३५ संघांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेला प्रतिसाद दिला. दास नवमीच्या पर्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व नैतिक विकासावर भर देण्यात आला. सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, एकाग्रता व सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्याचा उद्देश या स्पर्धेतून साध्य करण्यात आला. सहभागी संघांनी एकसंध, तालबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार सादर करत उपस्थितांची विशेष दाद मिळवली. संपूर्ण परिसर योगमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला होता.यावेळी शालेय समितीचे चेअरमन ॲड. किशोर देशपांडे, सेक्रेटरी सुरेश शिरसागर, संस्थेचे कार्यकारणी सदस्य स्वप्निल कुलकर्णी, सुनील जोशी, संध्या कुलकर्णी, संजय कुलकर्णी, प्राचार्या वसुधा जोशी, मुख्याध्यापक सुनील कानडे, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक अजय महाजन, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन संकेत शिंदे यांनी, तर आभार क्रीडा शिक्षक लोंढे यांनी मानले. या सूर्यनमस्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांत योगाभ्यासाची आवड निर्माण होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 8:56 am

धर्म, जात अन् संस्कृती पाळा-तिचे जतन करा- प्राचार्य लांडगे:सोनई कृषी महाविद्यालयाच्या रासेयो'' शिबिराचा बेल्हेकरवाडी येथे समारोप‎

धर्म, जात आणि संस्कृती पाळा तीचे जतन करा. स्वच्छतेचा धर्म सर्वांनी पाळा आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करा. विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल करताना अणुशासन, शिस्त आणि कौशल्य या त्रिसूत्री चा वापर करावा. त्याचे फलित म्हणून आज आपणास कृषिचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवताना दिसतात, असे प्रतिपादन भेंडे येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा साहित्यिक डॉ. शिरीष लांडगे यांनी केले. सोनई कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप बेल्हेकरवाडी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हरी मोरे होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थी कल्याण तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप तांबे यांनी प्रास्ताविकेत सात दिवस राबवलेल्या विविध कामाची व उपक्रमाची माहिती दिली. विशेष श्रम संस्काराच्या शिबिरातून स्वयंसेवकांना नवनवीन काम करण्याची ऊर्जा मिळत असते कारण तो नेहमी नवनवीन शोधत असतो असे प्रतिपादन सकाळचे पत्रकार तथा पसायदान आनंदचे उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ.हरी मोरे म्हणाले, शिस्त आणि सारखेपणा यातून स्वयंसेवक घडत असतो. विशेष श्रमसंस्कार शिबिरातून घडणारे स्वयंसेवक आपल्या कामाने स्वतःची छाप समाजावर पाडत असतात. भूषण भगत आणि मनीष चव्हाण या स्वयंसेवकांनी आपले सात दिवसातील आलेले अनुभव सांगितले. उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सुरज जाधव व प्रणाली मिसाळ यांची निवड करण्यात आली. त्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, ट्रॉफी व बुके देऊन सन्मान करण्यात आला तर अनुराग लांडगे याचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी गावात स्वयंसेवकांनी सकाळी प्रभात फेरी काढली. ऋषिकेश वाघोले, समीक्षा ढोबळे व महादेव मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले तर ऋतुजा दहिफळे हिने आभार मानले. कार्यक्रमासाठी कानिफनाथ येळवंडे, मच्छिंद्र दरंदले, दत्तात्रय बेल्हेकर, नितीन काकडे, संगीता आंधळे, प्रा. प्रवीण इंगोले व ५२ स्वयंसेवक उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे यश हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी खासदार ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या संकल्पनेतील वृक्षारोपण संकल्पना, महाविद्यालयाची खेळातील प्रगती, एम एसस्सीच्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत मिळवलेले यश हे संस्थेसाठी आणि महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 8:55 am

विषय समित्या निवडीने शहर विकासाला चालना‎, येवला:मनमाड, नांदगाव, इगतपुरी, सटाणा नगरपालिकांत अविराेध निवडी; सत्ताधाऱ्यांनी राखले सभापतिपद

नगरपरिषदेच्या सहा विषय समित्यांवरील सभापती व सदस्य तसेच स्थायी समितीच्या सदस्यांची निवड मंगळवारी नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा पिठासिन अधिकारी तथा मालेगावचे उपविभागीय अधिकारी नितीन सद्गीर यांच्या अध्यक्षतेखाली, तर मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सभेस नगराध्यक्षांसह एकूण ३२ सदस्य उपस्थित होते. नगरपालिकेत शिवसेना-रिपाइं-भाजप युतीकडे २६ नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने सत्ताधारी महायुतीच्या दहा सदस्यांची स्थायी समितीवर अविरोध निवड झाली. उबाठा गटाचे चार व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पाच सदस्य असूनही आवश्यक संख्याबळ नसल्याने स्थायी समितीवर त्यांचा एकही सदस्य निवडून येऊ शकला नाही. दरम्यान, सहा विषय समित्यांच्या सभापतीपदी सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांची निवड करण्यात आली असून काही समित्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सदस्यपद देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी आमिन शेख (पटेल) यांची निवड करण्यात आली. या समितीत विरोधी उबाठाचे दीपक दराडे यांना सदस्यपद देण्यात आले. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीत पूजा लोकेश साबळे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली. विरोधी दीपक दराडे यांना सदस्यपद देण्यात आले. शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीत सभापतीपदी डॉ. सुहास जाधव यांची निवड करण्यात आली. तर विरोधी राष्ट्रवादीचे संतोष आहिरे यांना सदस्यपद देण्यात आले. पाणीपुरवठा जलनिःस्सारण समिती सभापतीपदी विशाल राजेंद्र आहिरे यांची निवड करण्यात आली. तर विरोधी राष्ट्रवादीचे संतोष आहिरे यांना सदस्यपद देण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पूजा लालसरे यांची निवड करण्यात आली. तर विरोधी उबाठाच्या रेखा संजय कटारे यांना सदस्यपद देण्यात आले. नियोजन व विकास समितीचे पदसिध्द सभापती म्हणून उपनगराध्यक्ष मुकूंद गौतम एळींजे हे राहणार आहेत. तर विरोधी उबाठाच्या रेखा संजय कटारे यांना सदस्यपद देण्यात आले. प्रतिनिधी | नांदगाव नगरपरिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्य निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. शिवसेनेचे येथे एकोणीस सदस्य आहेत. एकमेव अपक्ष व शिवसेनेला पाठींबा देणारे सदस्य काशिनाथ देशमुख यांची सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी तहसीलदार सुनील सैंदाने होते. निवड झालेल्या सभापतींचे मुख्याधिकारी शामकांत जाधव यांनी अभिनंदन केले. प्रतिनिधी | येवला नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांवर सदस्यांचे नामनिर्देशन, समिती सभापतींची निवड तसेच स्थायी समितीची गठिती करण्यासाठी मंगळवारी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सभेस मुख्याधिकारी तुषार आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते दीपक लोणारी, शिवसेना शिंदे गटाचे गटनेते गणेश शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे गटनेते डॉ. संकेत शिंदे उपस्थित होते. सभेदरम्यान नगरपरिषदेच्या प्रशासन व शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सर्व विषय समित्यांची रचना करण्यात आली. सर्व समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड एकमताने व अविरोध करण्यात आली. नगरपरिषदेची महत्त्वाची निर्णयप्रक्रिया राबविणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांची एकमताने निवड करण्यात आली. विविध विषय समित्यांवर प्रवीण बनकर, दीपक लोणारी, जावेद मोमीन, अमजद शेख, गणेश शिंदे, तृप्ती राजपूत, एजाज शेख, नसमुसर अन्सारी, जयाबाई जाधव, पद्माताई शिंदे, समीर समदडिया, कुणाल परदेशी, मीनाक्षी अलगट, सुरय्या मोमीन, छाया क्षीरसागर, महेश काबरा, लक्ष्मी साबळे, लक्ष्मीबाई जावळे, प्रवीणबानो शेख, अरबाज अन्सारी, संकेत शिंदे आदींची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या समिती रचनेमुळे शहरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. प्रतिनिधी | सटाणा नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड मंगळवारी (दि. ३) करण्यात आली. नगरपरिषद सभागृहात तहसीलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजाला गती देण्यासाठी या समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. स्थायी समिती - सभापती : नगराध्यक्ष सागर हिरे, सदस्य : काशीनाथ देशमुख, रूपाली पाटील, राजेश शिंदे, सईद शेख, विद्या कसबे. सार्वजनिक बांधकाम समिती - सभापती : काशीनाथ देशमुख, सदस्य : पृथ्वीराज पाटील, किरण देवरे, स्वाती नावंदर, योगिता खरोटे. स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती - सभापती : रूपाली पाटील, सदस्य : बाळू शेवरे, काका सोळसे, स्नेहल पाटील, दत्तराज छाजेड. नियोजन आणि विकास समिती - सभापती : राजेश शिंदे, सदस्य : वंदना कवडे, खान जुबेदाबी गफ्फार खान, दीपक पांडव, राखी जाधव. पाणी पुरवठा आणि जलनिःस्सारण समिती- सभापती : सईद रशीद शेख, सदस्य : वाल्मीक टिळेकर, गायत्री शिंदे, स्वाती नावंदर, किरण देवरे. महिला व बालकल्याण- सभापती : विद्या कसबे, सदस्य : शोभा कासलीवाल, योगिता खरोटे, गायत्री शिंदे, कल्पना जगताप. स्थायी समिती- सभापती : हर्षदा पाटील, सदस्य : सुमित वाघ, मुल्ला रुफीक खलिल शाह, चेतन मोरे, सोनाली बैताडे, भूषण सोनवणे, कल्पना सोनवणे. सार्वजनिक बांधकाम समिती - सभापती : मुल्ला रुफीक खलिल शाह, सदस्य : रोशन सोनवणे, विलास दंडगव्हाळ, मनीषा पाकळे, चेतन रौदळ. शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती- सभापती : चेतन मोरे, सदस्य : महेश सोनवणे, सीमा सोनवणे, सुनीता देवरे, मनीषा पाकळे. स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती- सभापती : सोनाली बैताडे, सदस्य : अनिल पाकळे, हर्षवर्धन सोनवणे, लताबाई बच्छाव, संगीता सोनवणे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती- सभापती : भूषण सोनवणे, सदस्य : मंगेश खैरनार, राहुल पाटील, अलका बारसे, शेख हुमेरा यासीर. नियोजन व विकास समिती - सभापती : सुमित वाघ, सदस्य : हर्षवर्धन सोनवणे, सुनीता देवरे, प्रतिभा खैरनार, महेश सोनवणे. महिला व बालकल्याण समिती- सभापती : कल्पना सोनवणे, उपसभापती : तनुजा नांद्रे, सदस्य : हुमेरा शेख, मनीषा पवार, सुनीता देवरे. स्थायी समिती व विषय समित्यांचे सभापती व सदस्य नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांचे नवनिर्वाचित सभापती व सदस्य असे स्थायी समिती व विषय समितीचे सभापती सार्वजनिक बांधकाम समिती : शंकर मांजरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : चैताली शिंदे, महिला व बालकल्याण समिती : शीतल शिंदे, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती : पारुल गुजराती, नियोजन व विकास समिती : पुष्पा गायकवाड, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती : शेख वकील, स्थायी समिती : राजेंद्र लोणारी स्थायी समितीतील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य स्थायी समिती - सभापती : नगराध्यक्ष योगेश पाटील, सदस्य : मुकुंद एळींजे, आमिन पटेल, पूजा साबळे, डॉ. सुहास जाधव, विशाल आहिरे, पूजा लालसरे, नामनिर्देशित सदस्य : महेंद्र शिरसाठ, अमजद रशीदखाँ पठाण, रेश्मा पगारे

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 8:25 am

लासलगाव–विंचूर रस्त्याची उंची वाढू नये, व्यापारी:गाळेधारकांची मागणी; शिष्टमंडळ घेणार मंत्री भुजबळ यांची भेट‎

लासलगाव–विंचूर रस्त्याच्या प्रस्तावित चौपदरीकरणाच्या कामात रस्त्याची उंची वाढल्यास पावसाळ्यात शहरातील अनेक दुकानांना मोठा फटका बसण्याची शक्यता असून, ही अडचण दूर करण्यासाठी काम सुरू होण्यापूर्वीच सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचा निर्णय सोमवारी (दि. २) झालेल्या बैठकीत घेतला. चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वपक्षीय नेते, व्यापारी व गाळेधारकांची बैठक भगरीबाबा मंदिर येथे पार पडली. या बैठकीस माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समिती सभापती डी. के. जगताप, सुवर्णा जगताप, सरपंच योगिता पाटील, उद्योजक संतोष पलोड, संजय पाटील, सचिन होळकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सध्या चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र रस्त्याची अंतिम रुंदी, मध्यभागी दुभाजक असणार की नाही, तसेच रस्त्याची पातळी किती उंचावली जाणार याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रस्त्याची उंची वाढल्यास पावसाळ्यात पाणी दुकानांत शिरून मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे दर्जेदार चौपदरीकरण व्हावे, मात्र रस्त्याची पातळी वाढवू नये, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. यासंदर्भात येत्या आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळ मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन मागण्या मांडणार आहे. तसेच येवला प्रमाणे लासलगाव येथेही नियमित आढावा बैठक घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीस प्रवीण कदम, अनिल वाघ, डॉ. कैलास पाटील, राजेंद्र चाफेकर, संदीप उगले, राजेंद्र कराड, गोकुळ पाटील, प्रमोद पाटील, दिलीप पानगव्हाणे आदी उपस्थित होते. बैठकीस ठेकेदार आणि अधिकारी अनुपस्थित लासलगाव–विंचूर रस्ता चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी परमपूज्य भगरी बाबा मंदिरात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी आयोजित या बैठकीस ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र संबंधित विभागाचा ठेकेदार अथवा बांधकाम विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 8:23 am

‘एसएनजेबी फेस्टिवल’ने चांदवडकरांना सांस्कृतिक मेजवानी:शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून विविध कार्यक्रमांचे सादरीकरण

येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेत ‘एसएनजेबी फेस्टीवल-२०२६’ उत्साहात साजरा झाला . संस्कृती आणि कलेचा सुंदर मिलाफ ठरलेल्या या कार्यक्रमात इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायिका रागिणी शिंदे हिच्या सुमधुर गीतांनी आणि संस्थेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बहारदार सादरीकरणांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात सलग नवव्या वर्षी ‘एसएनजेबी फेस्टीवल’चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मंगल नवकार मंत्राने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंडियन आयडॉल टॉप-५ मधील विजेती रागिणी शिंदे व तिचा परिवार उपस्थित होता. तसेच चांदवडचे नगराध्यक्ष वैभव बागूल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मालेगाव येथील न्यायमूर्ती धपाटे, न्यायमूर्ती लटके, न्यायमूर्ती खराडे, संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा आदी उपस्थित होते. यावर्षीचा ‘एसएनजेबी फेस्टीवल’ संस्थेच्या विविध शैक्षणिक शाखांतील शिक्षक-शिक्षकेतर सेवकांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आला होता. उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या सहभागी कलाकारांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. सोनतारा भन्साळी ट्रस्ट, कोपरगाव आणि सुमल इंडिया, नाशिक यांच्या वतीने उत्कृष्ट कार्यक्रमांसाठी अनुक्रमे रुपये ५००१, २१००, ११०० आणि ५०१ अशी रोख बक्षिसे प्रदान केली . प्रास्ताविक झुंबरलाल भंडारी यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. डॉ. मुकेश पारेवाल यांनी केले, तर आभार डॉ. आकाश जैन यांनी मानले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर, डॉ. गोटन जैन, सर्व विभागांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या फेस्टीवलमध्ये गीतगायन, समूह नृत्य, समूहगायन, मिमिक्री अशा विविध प्रकारातील एकूण १७ दर्जेदार आणि लक्षवेधी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवली. प्रमुख अतिथी रागिणी शिंदे हिने आपल्या सादरीकरणातून हिंदी व मराठीतील १२ निवडक गाणी सादर करत कार्यक्रमाला विशेष उंची दिली. तिच्या प्रत्येक गीताला टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 8:22 am

जोशी कुटुंबाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

खंडाळा गावचे पहिले सरपंच कै. एकनाथराव जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. अरुण जोशी यांच्या वतीने शाळेच्या नावे एफडी काढण्यात आली आहे. या एफडीवर मिळणाऱ्या व्याजातून गेल्या पाच वर्षांपासून दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आजीवन बक्षिसे दिली जातात. मार्च २०२५ मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेत खंडाळा केंद्रात श्रेया कमलेश पवार हिला प्रथम क्रमांक मिळाला. तिला ४०१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. प्राची नवनाथ वेळंजकर हिला द्वितीय क्रमांकासाठी ३०१ रुपये, तर ईश्वरी ज्ञानेश्वर बहाळस्कर हिला तृतीय क्रमांकासाठी १०१ रुपयांचे बक्षीस मिळाले. बक्षीस वितरण सोहळ्यात प्रशालेचे मुख्याध्यापक अल्लाउद्दीन शेख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष एस. एस. बागुल, उपाध्यक्ष शफिक शेख, मेजर मिलिंद बागुल, केंद्रप्रमुख बबनराव तगरे, मुख्याध्यापक मनोज गव्हाणे, मुख्याध्यापक सुनिल प्रधान आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी सुरेश बर्डे, ईश्वर खेडकर, कल्पना गवारे, मनीषा कुमावत, रेखा भालेकर, आसाराम जाधव, गोविंद त्रिभुवन, ज्ञानेश्वर बहाळस्कर, अशोक दारवंटे, विक्रम पठारे, भास्कर घायवट, जोशना बकाल आणि विद्यार्थी उपस्थित होते. गेल्या पाच वर्षांपासून जोशी कुटुंबाकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची परंपरा आजही सुरू आहे. या उपक्रमाची परिसरात चर्चा आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:56 am

गोळेगाव येथील तारादेवी यात्रा उत्साहात; भाविकांची प्रचंड गर्दी:यंदा गोळेगाव खुर्दला देण्यात आला वगदी मिरवणुकीचा मान‎

गोळेगाव (ता. सिल्लोड) येथील श्री तारादेवीची वार्षिक यात्रा भक्तीमय वातावरणात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली. गावात उत्सवाचे वातावरण होते. सोमवारी दुपारी तीन वाजता देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. परंपरेनुसार गोळेगाव खुर्द व गोळेगाव बुर्द या दोन्ही गावांत वगदी काढण्यात आली. गोळेगाव खुर्दला वगदी मिरवणुकीचा मान देण्यात आला. त्यानंतर दोन्ही गावांच्या मिरवणुका एकत्र आल्या. तारादेवी मंदिरास तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या. मिरवणुकीदरम्यान रेवड्या व फुलांची उधळण झाली. मंदिर परिसरात हजारो नारळांची विक्री झाली. यात्रेच्या निमित्ताने गावात मोठी गर्दी झाली होती. सोमवारी वगदीनंतर यात्रेची सांगता झाली. या यात्रेला जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. बदलत्या काळातही परंपरा जपली गेली आहे. ग्रामस्थांनी यात्रेच्या चालीरीतींमध्ये कोणताही बदल होऊ दिलेला नाही. वगदीसाठी गोळेगावसह खंडाळा, बोदवड, धोत्रा, पानवडोद, उंडणगाव, लिहा खेडी, पानस आदी गावांतून भाविक आले होते. यात्रेदरम्यान विविध धार्मिक विधी, अभिषेक व आरती कार्यक्रम पार पडले. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. मंदिर परिसरात फुलांच्या व विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती. यात्रेच्या काळात लहान-मोठ्या व्यावसायिकांनी दुकाने थाटली असून खेळणी, मिठाई व खाद्यपदार्थांची रेलचेल होती. ग्रामपंचायत व स्वयंसेवकांनी स्वच्छता, पाणीपुरवठा व वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष नियोजन केले होते. यात्रेमुळे गावातील सामाजिक एकोपा व भक्तीभाव अधिक दृढ झाल्याची भावना ग्रामस्थ व परिसरातील भाविकांनी व्यक्त केली. यात्रेमध्ये रेवड्या उधळण्याची धार्मिक परंपरा रेवड्या उधळण्याची परंपरा आजही धार्मिक विधी म्हणून साजरी केली जाते. उधळलेल्या रेवड्या प्रसाद म्हणून मिळवण्यासाठी भाविकांमध्ये चुरस होती. नोकरी व व्यवसायानिमित्त गावाबाहेर असलेले ग्रामस्थही यात्रेसाठी खास परतले होते. अजिंठा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून शांतता राखली.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:55 am

दोन्ही कालव्यांतून दुसरी पाणीपाळी;‎रब्बीचे दीड लाख हेक्टर ओलिताखाली‎:गहू, हरभरा आणि उसाच्या क्षेत्रात वाढ, विहिरींत पाणी वाढले‎

पैठण जायकवाडी धरणात सध्या ९५ टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मागील दीड महिन्यापासून रब्बी हंगामासाठी पाणी सुरू आहे. त्यामुळे गहू व उसाचे क्षेत्र वाढले आहे. उन्हाळ्यादरम्यान आणखी एक पाणी पाळी रब्बीसाठी देण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. मागील दीड महिन्यापासून कालव्यात पाणी सोडल्याने विहिरींमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. एक पाणीपाळी २१ दिवस चालते. अतिवृष्टीमुळे यंदा खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची आस आता रब्बीच्या पिकावर आहे. रब्बीचा पेरा वाढला आहे. सध्या कालव्या लगत गव्हाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. उसाची लागवड वाढली असल्याचे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले. पैठण । डाव्या कालव्यातून सध्या सुरू असलेले पाणी. छाया : रमेश शेळके. तीन पाणीपाळी सोडण्याचे प्रशासनाचे आहे नियोजन विहिरींची पातळी वाढणार उन्हाळ्यातही मुबलक पाणी द्यावे : शेतकरी कातपूरचे शेतकरी दीपक मोरे यांनी सांगितले की, जायकवाडी धरणातून यंदा मुबलक पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. या पाण्यामुळे आमचे पिक दमदार आले आहेत. उन्हाळ्यात देखील मुबलक पाणी देण्यात यावे. धरणातून ३०० क्युसेकने पाणी सुरू जायकवाडी धरणाचा डावा कालवा २०८ किलोमीटर, तर उजवा कालवा १३२ किलोमीटर लांबीचा असून मराठवाड्यातील शेतीसाठी हा पाणीस्रोत जीवनवाहिनी ठरत आहे, सध्या दोन्ही कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सुरू आहे. प्रशांत संत, अभियंता पाटबंधारे विभाग सध्या जायकवाडीच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडले जात आहे, आणखी एक पाणी पाळी रब्बीसाठी असणार आहे व उन्हाळ्यात एक पाणी पाळी देण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून या पाण्याचा योग्य वापर करावा. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. डाव्या कालव्यातून १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर, तर उजव्या कालव्यातून ४१ हजार ६८२ हेक्टर, असे एकूण १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यंदा रब्बी हंगामासाठी तीन पाणीपाळी सोडण्याचे नियोजन असून सध्या दुसरी पाळी सुरू आहे. यामुळे रब्बी पिके दमदार आली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:54 am

फर्दापूरजवळील जीप आणि दुचाकी अपघात, एकाचा मृत्यू:जळगाव-संभाजीनगर महामार्गावर घडली घटना‎

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील फर्दापूरजवळील सोयगाव फाट्यावर मोटारसायकल व क्रूझर जीप यांच्यात भीषण अपघात होऊन यात पळसखेडा येथील सबदर मन्सूर तडवी (५२, रा. पळसखेडा, ता. सोयगाव) यांचा मृत्यू झाला आहे. सबदर तडवी हे सकाळी फर्दापूरकडून पळसखेड्याच्या दिशेने जात असताना, महामार्गावरून सोयगावकडे वळण घेणाऱ्या क्रूझर जीपसोबत त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यात ते गंभीर जखमी झाले. दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघात धडक जोरदार झाल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. सबदर यांच्या डोक्याला जबर मार लागला. यामुळे ते जागेवरच पडून होते. घटनास्थळी उपस्थित राजू नामदेव साळवे यांनी त्यांना जखमी अवस्थेत तातडीने ग्रामीण रुग्णालय, सोयगाव येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासुन त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद फर्दापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक निलेश लोखंडे करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:53 am

श्री क्षेत्र सावखेडमध्ये 150 मुला-मुलींनी घेतले युद्धकला अन् स्वसंरक्षणाचे धडे:श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर प्रांगणात लाठी-काठी प्रशिक्षण शिबिर‎

गंगापूर तालुक्यातील सावखेडा येथे श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर प्रांगणात गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा समारोप प्रात्यक्षिकाच्या प्रदर्शनाने झाला. यात विविध वयोगटातील १५० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुषमा विष्णू मुळे, सरपंच ग्रा. पं. सावखेडा, होत्या. संदीप शिंगाडे, पोलिस पाटील सावखेडा; सुरेश विधाटे, मुख्याध्यापक ग्रीनलँड ग्लोबल स्कूल; राजू रामभाऊ मुळे, सहशिक्षक नेहरू विद्यालय सावखेडा; व माता-पालक आदींची उपस्थिती होती. सावखेडा येथील नृसिंह युवा मंच यांच्या संकल्पनेतून मुला-मुलींना स्वसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी १९ जानेवारीला हे प्रशिक्षण सुरू झाले. या शिवकालीन युद्धकला व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात १५० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. यात सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ५ ते ९ या वेळेत हे प्रशिक्षण देण्यात आले होते.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:52 am

मतदान केंद्रांवर ज्येष्ठांसह दिव्यांगांना योग्य सुविधा द्याव्या‎:निवडणूक पारदर्शक अन् निर्भय वातावरणामध्ये घेण्याचे दिले जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश‎

खुलताबाद आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद तालुक्याचा दौरा केला. त्यांनी निवडणूकपूर्व तयारीचा सखोल आढावा घेतला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय, खुलताबाद येथील निवडणूक विभागाची पाहणी केली. त्यांनी मतदार याद्या, मतदान केंद्रांवरील सुविधा, संवेदनशील मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्था तसेच आचारसंहिता अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली. मतदार याद्यांच्या संदर्भात बोलताना जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम वेळेत व अचूक पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कोणताही पात्र मतदार नाव नोंदणीपासून वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मतदान केंद्रांवरील किमान आवश्यक सुविधांवर भर देताना त्यांनी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी उतार मार्ग, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा तसेच स्वच्छतागृहांची उपलब्धता प्रत्यक्ष तपासून त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यानंतर जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे भेट दिली. त्यांनी मतपेटी व निवडणूक साहित्य साठवण कक्ष, साहित्य कक्ष तसेच संगणक कक्षाची पाहणी केली. निवडणूक साहित्याची सुरक्षितता, संगणकीय व्यवस्थेची तयारी व साठवण कक्षाची क्षमता समाधानकारक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या आढावा बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गुट्टे, प्रकाश नाईक यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन त्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त, बंद पथकांद्वारे निरीक्षण तसेच सतत नजर ठेवण्याचे नियोजन करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. निवडणूक आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी भ्रमण पथके व स्थिर नियंत्रण पथकांनी आतापासूनच सतर्क राहून काम करावे. आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हाधिकारी यांनी खुलताबादेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जबाबदारी नीट पार न पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:51 am

छत्रपती संभाजीनगर महापौर निवडणूक:शिवसेनेलाही पाठिंबा देऊ- इम्तियाज; पाठिंबा घेणार नाही, देणार नाही- शिरसाट

महापौरपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमिनने (एमआयएम) घेतला आहे. भाजपच्या विरोधात सर्वजण एकत्र येत असतील तर शिंदेसेनेलाही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. मात्र, एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही आणि देणारही नाही, अशी भूमिका शिवसेनेचे नेते, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली आहे. भाजपचे ५७ नगरसेवक आहेत. बहुमतासाठी केवळ एका जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपविरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत वंचित बहुजन आघाडीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. १८ नगरसेवकांविरुद्ध अपात्रतेची तक्रार, त्यात १६ ‘एमआयएम’चे छत्रपती संभाजीनगर| सरकारी जागेवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम, दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या १८ नगरसेवकांविरोधात तक्रारी मनपा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक १६ तक्रारी या एमआयएमच्या विरोधात असून शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी एका नगरसेवकाविरोधात आहेत. तीन नगरसेवकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम केल्याच्या, तर एकाने खोटे जात प्रमाणपत्र सादर केल्याची तक्रार मनपाच्या निवडणूक विभागाकडे आली आहे. शपथपत्रात कमी संपत्ती दाखवल्याच्याही तक्रारी आहेत. १० पेक्षा अधिक नगरसेवकांविरोधात दोनपेक्षा अधिक अपत्ये असल्याच्या तक्रारी मनपाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येतो. त्यावर विभागीय आयुक्त निर्णय घेतात. शहराला धर्मनिरपेक्ष चेहरा हवा शहरात धर्मनिरपेक्ष महापौर होणे गरजेचे आहे. पाठिंबा दिल्यास मी लढण्यास तयार आहे. शिंदेसेनेला एमआयएमची अडचण असल्यास मी नेतृत्व करण्यास तयार आहे. - नवीन ओबेराय, नगरसेवक, राष्ट्रवादी (शरद पवार) मुंगेरीलाल के हसीन सपने शिवसेनेला सोबत घेत एमआयएम संभाजीनगरचा महापौर बनवणार ही बाब म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहे. असे स्वप्न रंगवणाऱ्याचे हसू येते. - संजय केणेकर, प्रदेश सरचिटणीस, भाजप आम्ही एमआयएमविरुद्ध लढलो आम्ही एमआयएमच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आम्ही एमआयएमचा पाठिंबा घेणार नाही, तसेच त्यांनी आम्हाला दिला तरी आम्ही घेणार नाही. - संजय शिरसाट, पालकमंत्री, शिंदेसेना राष्ट्रवादी, वंचितला पाठिंबा देऊ महापौरपदासाठी आकडे जुळत नाहीत. मात्र भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा, वंचित बहुजन आघाडीचा महापौर होत असेल तर पाठिंबा देऊ. - अंबादास दानवे, नेते, उबाठा भाजपविरोधात आमची चाचपणी सुरू भाजपच्या विरोधात ५८ लोक आहेत. आम्ही आमची चाचपणी सुरू केली आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेला पाठिंबा द्यायलाही तयार आहोत. - इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष, एमआयएम तिसऱ्या आघाडीसाठी काँग्रेस सकारात्मक भाजपच्या विरोधात तिसरी आघाडी होत असेल तर काँग्रेसचा त्याच्या पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर नेत्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. - युसूफ शेख, शहराध्यक्ष

दिव्यमराठी भास्कर 4 Feb 2026 7:48 am