विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्याच्या पोलिस आधीक्षकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सवाल उपस्थित केला की आम्ही सुरक्षित आहोत की नाही?
हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी, भगूरला जल्लोष:ढोल ताशांच्या गजरात लहानमुलांसह तरुणांनी जल्लोष साजरा केला
६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा ४-३ ने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेसमोर ढोल ताशांच्या गजरात लहानमुलांसह तरुणांनी जल्लोष साजरा केला. भविष्यात येथून अनेक गुणवंत मल्ल राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास पहिलवान गोरख बलकवडे यांनी व्यक्त केला.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे शंभर पेक्षा अधिक व्हिडिओ समोर येत आहेत. तसेच त्याचे अनेक कारनामे सुद्धा आता उघडकीस येताना दिसत आहेत. यावरून विरोधकांनी अशोक खरात तसेच त्याच्याशी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक फोटो शेअर करत खोचक टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या हातातील एकसारख्या 'रुद्राक्ष माळेच्या गंड्या'कडे लाल रंगाने मार्क करून लक्ष वेधण्यात आले असून, 'हा निव्वळ योगायोग आहे,' अशी उपरोधिक टिप्पणी अंधारे यांनी केली आहे. आधीच विविध शंका आणि चौकशीच्या मागण्या होत असताना, या फोटोंमुळे आता या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाडमधील एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सुनील तटकरे यांना माध्यम प्रतिनिधींनी अशोक खरात प्रकरण आणि रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातील वादावरून प्रश्न विचारला असता, ते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ही जागा बोलायची नाही, मला घटनेने अधिकार दिला आहे आणि मी योग्य वेळी बोलेन, असे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगत तटकरे यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले आणि तिथून निघून जाणे पसंत केले होते. अशोक खरातचा 'दैवी अवतार' पोलिसांनी उतरवला:'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणत लंगडत आला बाहेर दरम्यान, अशोक खरातने अनेक महिलांवर दैवी शक्ती असल्याचे सांगत उपचारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात अनेक व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. तसेच अशोक खरात स्वतःला दैवी अवतार देखील समजायचा. परंतु, त्याचा दैवी अवतार नाशिक पोलिसांनी चांगलाच उतरवल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अशोक खरातला नीट चालताही येत नाहीये, तसेच 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा वेदनादायी आवाजात देत असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला असून, त्याच्याविरोधात आता सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून मार्ग काढण्यासाठी आलेल्या एका विवाहित महिलेला तू मागील जन्मातील अप्सरा आहेस आणि तुझा घटस्फोट विधिलिखित आहे, असे सांगून खरातने तिचा विश्वास संपादन केला. स्वतःला त्रिकाळ ज्ञानी आणि अवतारी पुरुष भासवून त्याने या महिलेच्या वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेतला आणि तिला आपल्या जाळ्यात ओढले. धार्मिक विधी, भविष्यकथन आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली खरातने या पीडित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महिलेच्या मनात भविष्याबद्दल भीती आणि आमिषे निर्माण करून त्याने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. तांत्रिक विधींच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाच्या कृष्णकृत्यांचे एकामागून एक पदर आता नाशिक पोलिसांच्या तपासामुळे उलगडू लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शोषणादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली असता, खरातने तिला स्वतःच्या कार्यालयात बोलावून गर्भपाताची औषधे दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर माझ्या नशिबात दोन विवाह आहेत, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना सुखात ठेवेन असे आमिष दाखवून तो सातत्याने तिची फसवणूक करत होता. 2027 मध्ये लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने पीडितेच्या भावनांशी खेळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशोक खरातचा 'दैवी अवतार' पोलिसांनी उतरवला:'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणत लंगडत आला बाहेर नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर दैवी शक्ती असल्याचे सांगत उपचारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात अनेक व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. तसेच अशोक खरात स्वतःला दैवी अवतार देखील समजायचा. परंतु, त्याचा दैवी अवतार नाशिक पोलिसांनी चांगलाच उतरवल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अशोक खरातला नीट चालताही येत नाहीये, तसेच 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा वेदनादायी आवाजात देत असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
राष्ट्रीय लोक दालतमध्ये १०८ थकित कर्ज प्रकरणांचा झाला निपटारा:प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी
फुलंब्री | शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे भारतीय स्टेट बँकेच्या १०८ थकित कर्ज प्रकरणांमध्ये तडजोड करून निपटारा करण्यात आला. दरम्यान स्टेट बँकेच्या ३ करोडच्या थकित खात्यांचा समावेश असून ६०% रोख रक्कम वसूल करण्यात यश आले. नागरीकांच्या न्यायालयातील फेऱ्या वाचाव्यात आणि प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लागावीत हा उद्देश होता. न्यायालयात प्रलंबित असलेली तसेच दाखलपूर्व तडजोडपात्र प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी संबंधित खाते धारकांनी या लोकअदालतीचा लाभ घेतला. याप्रसंगी जिल्हा पॅनलवर प्रमुख न्यायाधीश डी. जे. कळसकर तसेच विधिज्ञ एच. एम शमशानी यांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले. तसेच स्टेट बँकेचे शाखा अधिकारी दीपक दलाल, मुख्य प्रबंधक लक्ष्मी सागर, राजकुमार बल्लाळ, कल्याणी वाजे उपस्थित होते.
प्रतिनिधी | उंडणगाव उंडणगाव येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात नुकतेच आयपीएस पदावर निवड झालेले भिकन जगन रोजेकर (जळगाव सपकाळ) तसेच एमपीएससीद्वारे पीएसआय पदावर निवड झालेले अनिकेत बाजीराव वाघ (खुल्लोड) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना आयपीएस भिकन रोजेकर यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची कहाणी सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “आज मी या पदापर्यंत केवळ शिक्षणाच्या जोरावर पोहोचलो आहे. निकालापूर्वीचा आणि निकालानंतरचा माझ्यातील बदल खूप मोठा आहे. सालगड्याचा मुलगा किंवा रिक्षाचालकाचा मुलगा आयपीएस-आयएएस होऊ शकतो, तर तुम्ही का नाही? मोठी स्वप्ने बाळगा आणि जिद्दीने अभ्यास करा,” असे त्यांनी सांगितले. पीएसआय अनिकेत वाघ यांनीही आपल्या साध्या परिस्थितीतून केलेल्या प्रवासाची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “माझी परिस्थिती सर्वसाधारण होती, पण मनात जिद्द होती. सातत्याने अभ्यास करत मी एकामागून एक परीक्षा उत्तीर्ण होत गेलो आणि तलाठी पदावरून आज एमपीएससीमार्फत पीएसआय पदावर माझी निवड झाली. तुम्हीही ठरवून जिद चिकाटीने अभ्यास केल्यास नक्की यश मिळवू शकता,” असे त्यांनी सांगितले. ओंकार पाटील, नानाभाऊ सनान्से, खुशालराव शिनगारे, नारायण अहिरे, भीमराव हिवाळे, पद्माकर कुलकर्णी, बाबूराव लांडगे, अजित पाटील, मुख्याध्यापक अनिल लांडगे, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघमोडे यांच्यासह दोन्ही शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन दायगाव (ता. गंगापूर) येथील आध्यात्मिक क्षेत्रात विणेकरी म्हणून परिचित असलेले लक्ष्मण पाटील बोरकर यांचे नुकतेच निधन झाल्याने बोरकर कुटुंबियांना भेट देवून खासदार संदीपान भुमरे यांनी सांत्वन केले. यावेळी लासूर स्टेशन येथील सराफा व्यापारी सुरेशशेठ वर्मा यांनी दिवंगत लक्ष्मण दगडू पाटील बोरकर यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीच्या शेड सावलीकरीता ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब पाटील माने, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, संदीप आढाव, विभाग प्रमुख नितीन कऱ्हाळे, लासूरचे शहरप्रमुख मयुर जैस्वाल व शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दायगाव येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सावलीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने लासूर स्टेशन येथील सुरेशशेठ वर्मा यांनी नगदी ५० हजार रुपये दिले. याप्रसंगी लासूरचे शहरप्रमुख मयुर जैस्वाल व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी येथील स्मशानभूमीच्या दुरवस्था संदर्भात शेडसह इतर सुविधांची कामे मंजूर असल्याची बाब खासदार भुमरे यांच्या लक्षात आणून दिले असता श्री. भुमरे यांनी स्वतः लक्ष घालून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यासाठी कल्याण बोरकर यांना पाठपुरावा करण्याचे सांगितले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
‘वैद्यकीय’साठी सामाजिक चळवळ उभी करावी:इंदिरा आयव्हीएफ सेंटरच्या संचालिका डॉ. रोहीणी पतंगे
प्रतिनिधी | कन्नड वैद्यकीय क्षेत्राला स्पर्धा, राजकीय धोरण यामुळे व्यावसायिक स्वरूप आले आहे. प्रत्यक्षात हे सेवाभावी क्षेत्र आहे. वैद्यकीय क्षेत्राला मानवी चेहरा देण्यासाठी सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इंदिरा आयव्हीएफ सेंटरच्या संचालिका डॉ. रोहीणी पतंगे यांनी केले. कृषिभूषण डॉ. सिताराम जाधव यांच्या पुढाकारातून कन्नड येथे वंध्यत्व निवारण शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ. पतंगे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक डॉ. रविराज जाधव यांनी केले. जाधव नर्सिंग होमच्या वतीने सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात, असे ते म्हणाले. आरोग्य साक्षरता वाढली तर नुकसान कमी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. शिबिरात डॉ. मेघा सूर्यवंशी, डॉ. प्रदीप गायकवाड यांनी रुग्णांची तपासणी केली. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे उपस्थित होते. अशी शिबिरे आरोग्यविषयक जनजागृती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे डॉ. प्रवीण पवार म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद, नगरसेवक अब्दुल जावेद, डॉ. सिताराम जाधव, बाजार समितीचे संचालक साईनाथ अल्लाड, शिवाजी थेटे, अॅड. किरण पाटील मगर, प्रकाश काचोळे, गोकुळ राठोड, शेख याकूब, सलमान शेख, नंदकुमार मोरे, डॉ. विलास पाटील, राजू शेख कमिटी उपस्थित होते.
प्रतिनिधी | आळंद फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे हजारो वर्षांपूर्वीचे आसरामातेचे हेमाडपंती मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून ४० ते ४५ फूट खोल चिऱ्यामध्ये हे पुरातन मंदिर उभारले आहे. जागृत देवस्थान असलेल्या आसरामाता देवीच्या यात्रेस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला आहे. ही यात्रा १३ दिवस चालते. यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर फुलंब्री-सिल्लोड या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीवर आळंद गाव वसलेले आहे. येथे जागृत आसरामाता पुरातन मंदिर आहे. राज्य व परराज्यांतूनही भाविक लाखोंच्या संख्येने येतात. मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आसरामातेच्या चरणी प्रार्थना करतात. आसरामाता देवस्थान पूर्ण पाषाणातून साकारलेले आहे. इतर मंदिरे जमिनीच्या वर आहेत. आसरामाता मंदिर जमिनीच्या आत गाभाऱ्यात साकारलेले आहे. देवस्थानामध्ये सात परकोट मणिदीप म्हणजे बारव आहे. पाषाणी पायऱ्या आहेत. त्यातच पाषाणरूपी मंदिर साकारलेले आहे. मात्र, त्यामध्ये मूर्ती नाही. येथे आल्यानंतर देवस्थान पाहून प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करतो. पूर्वी देवस्थानाचे नियोजन गावकऱ्यांकडून देखरेखीमध्ये केले जात होते. २०१२ पासून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पारदर्शक कारभारासाठी नोंदणी करण्यात आली. आसरामाता संस्थान आळंद या नावाने कामकाज सुरू झाले. विधिवत पूजापाठ, स्वच्छता, सोयीसुविधा यासाठीही व्यवस्था करण्यात आली. संस्थानच्या नियोजनामुळे परिसर स्वच्छ ठेवला जातो. देवस्थानचा समावेश तीर्थक्षेत्र विकासामध्ये झाल्याने संरक्षक भिंत, सिमेंट रस्ता, पथदिवे, परिसरातील सिमेंटीकरण अशी कामे पूर्ण झाली आहेत. भक्तनिवास, वृक्षलागवड, आकर्षक फुलझाडांमुळे परिसर सुंदर झाला आहे. परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे. भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्या संस्थानकडे जमा होतात. त्यातून विकासकामे केली जातात. आता विकासकामांना गती मिळणार लक्ष्मणराव चोपडे पाषाण दगडात कोरीव, अत्यंत आकर्षक असलेले हे बांधकाम कोणत्या काळात झाले याचा पुरावा नाही. नवरात्रोत्सवात मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. नवरात्रोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. काही दिवसांपूर्वी संस्थानला शासनाचा ब दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे, अशी माहिती अध्यक्ष लक्ष्मणराव चोपडे यांनी दिली.
प्रतीकची अंधत्वावर मात; भालाफेकमध्ये रौप्य:कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर अल्पावधीतच मिळविले यश
येथील २२ वर्षीय खेळाडू प्रतीक पाटील याने अंधत्वावर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. हल्ली मोबाइलसारख्या तंत्रज्ञान युगातही या खेळाडूने भालाफेक या मैदानी स्पर्धेत विशेष यश संपादन करत शिवन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दृष्टी कमी झाली तरी स्वप्न मोठी असली तर ती नक्की पूर्ण होतात, हे प्रतीक याने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. शिवना येथील गजानन विद्यालयात शिक्षण घेत असताना प्रतीक सुरुवातीला विद्यार्थी गटात कबड्डी खेळाडू म्हणून खेळला. दहावी-बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यास स्टारगार्ड हा दुर्मिळ डोळ्यांचा आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे त्यांची दृष्टी हळूहळू कमी होत गेली. अचानक आलेल्या या परिस्थितीने त्याचे आयुष्य बदलले, पण त्याने जिद्द सोडली नाही. दृष्टी कमी होत असतानाही प्रतीकने वैद्यकीय उपचारासोबत खेळाची आवड कायम ठेवली. पुढे त्याने पॅरा अॅथलेटिक्समधील एफ १३ जॅव्हलिन थ्रो (भालाफेक) या प्रकारात प्रवेश केला. कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर अल्पावधीतच तो कबड्डी ते भालाफेकफेकपटू झाला. शिक्षक असलेले वडील अमृतराव यांनीही प्रतीकला प्रोत्साहित केले. २०२५ मध्ये झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत प्रतीक पाटील याने रौप्यपदक पटकावले. त्यानंतर त्याच वर्षी झालेल्या खेलो इंडिया २०२५ स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकत आपली प्रतिभा सिद्ध केली. या वर्षी ८ ते १३ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा अथलेटिक ग्रँडप्रिक्स २०२६ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतीक पाटीलने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची कामगिरी ठरली आहे. आशियाई खेळाकडे लक्ष ^गल्लीपासून दिल्लीपर्यंत मैदानी खेळ गाजवला असून आता आशियाई (एशियाड) स्पर्धेसाठी निवड चाचणी मे महिन्यात हैदराबाद येथे होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणे व भारताचे प्रतिनिधित्व करणे हे ध्येय आहे. स्वप्नांना पंख मिळाले तर जिद्दीने उडाण भरायला वेळ लागत नाही. माझे पहिले पदक देशाच्या, आई-वडिलांच्या व ग्रामस्थांच्या चरणी अर्पण. -प्रतीक पाटील, भालाफेकपटू
शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत- आ. चव्हाण:फुलंब्रीत नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी
प्रतिनिधी | फुलंब्री तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रविवारी आ. अनुराधा चव्हाण, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात पाहणी केली. यावेळी अनुराधा चव्हाण यांनी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल वाघ, पंचायत समिती सदस्या सविता भगवान कोलते, तहसीलदार योगिता खटावकर, तालुका कृषी अधिकारी पंकज वाळके उपस्थित होते. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसान अहवाल लवकर सादर करण्यास सांगितले. केंद्र, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार चव्हाण म्हणाल्या.
प्रतिनिधी | पाचोड धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी शिवारात एचपी पेट्रोल पंपासमोर अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात शनिवारी सायंकाळी घडली. यात कल्याण बापूराव कोळकर (५०, रा. वाकोळणी, ता. बदनापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. बप्पासाहेब पराडे (४५, रा. वाकोळणी, ता. बदनापूर) हे किरकोळ जखमी झाले. वाकोळणी येथील दोघे मित्र पाचोड येथे खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते दुचाकीने (एमएच २१ बीपी ६०३४) परत निघाले होते. भोकरवाडी शिवारातील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. महामार्गावर वळण घेत असताना समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिली. घटनेनंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेला माहिती दिली. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. दोघांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी कोळकर यांना मृत घोषित केले. पराडे यांच्यावर प्राथमिक उपचार झाले. पाचोड, मुरमा फाटा, आडुळ, रजापूर, जामखेड फाटा, रोहिलागड फाटा येथे वारंवार अपघात होतात. येथे स्पिड ब्रेकर उभारण्याची गरज आहे. तसेच काही ठिकाणी दिशादर्शक फळक तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा रात्री वाहनधारकांना अंदाज येत नाही. शिवाय रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविण्याच्या नादातही अनेकदा अपघात घडतात. खड्ड्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
तालुक्यातील अजिंठा डोंगरी भागात अवैध वृक्षतोड सुरू आहे. ग्रामीण भागात अवैध वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वृक्षतोडीनंतर या लाकडांची आरा मशीनवर कटिंग होऊन इतरत्र पाठवण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वन विभागाकडून नेमकी कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे दिवसा लाकूडतोड आणि रात्री वाहतूक केली जात आहे. ग्रामीण भागात डोंगरकपारीत व शेताच्या बांधावर मोठ्या प्रमाणात विविध जातीचे वृक्ष आहेत. याशिवाय परिसरात डोंगर व जंगल परिसर राखीव आहे. या परिसरातच मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली जात आहे. लाकडे ट्रॅक्टर व ट्रकमध्ये भरून रात्री-अपरात्री नेली जातात. केळगाव, अंभई, नाणेगाव, जांभई- हळदा, जळकी, वसई, पिंपळदरी, पिंपळदरी वाडा, रावताळा, कोंबडवाडी, खंडाळा, बोदवड या परिसरातील शेतशिवारात पूर्वी मोठमोठी झाडे पाहायला मिळत होती. अजिंठा वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष धोडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांच्या क्षेत्रातील वृक्षतोडीबाबत त्यांच्याकडून समजू शकले नाही. यशपाल दिलपाक, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिल्लोड वृक्षसंपदा वाढवण्यासाठी एकीकडे शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना ग्रामीण क्षेत्रात मात्र उलट चित्र दिसून येत आहे. शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षाने लाकूड तस्करांनी थैमान मांडले असून सर्रास विनापरवाना मोठमोठी झाडे तोडण्यात येत असल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. मागील काही वर्षांपासून वृक्षतोड झाल्यामुळे जंगले उजाड झाली आहेत. थेट प्रश्न - यशपाल दिलपाक, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिल्लोड Q. तालुक्यात अवैध वृक्षतोड सुरू असून, कारवाई का केली जात नाही? A. सिल्लोड वनपरिक्षेत्रात माझ्या माहितीप्रमाणे वृक्षतोड सुरू नाही. आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. Q वृक्षतोडीविरोधात यापूर्वी केव्हा व आता काय कारवाई करणार आहात? A. मागील तीन महिन्यांपूर्वी भराडी येथे अवैध वृक्षतोड करणाऱ्यावर वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. कुठे जर वृक्षतोड होत असल्यास नागरिकांनी माहिती द्यावी. Q आरा मशीनची व्हिजिट कशी व कधी करतात? A. सिल्लोड वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आरा मशीनची दर दोन महिन्याला तपासणी केली जाते. यापुढेही तपासणी सुरूच राहील. झाड तोडाल तर ५० हजार दंड शासनाच्या नव्या निर्णयानुसार आता विनापरवानगी वृक्षतोड केल्यास ५० हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. स्वमालकीच्या जागेवरील वृक्षतोड करण्यासाठीही परवानगी लागते. त्यासाठी अर्ज केल्यावर वनपाल, वनक्षेत्रपाल घटनास्थळी जाऊन वृक्षांचे मूल्यमापन करतात. त्यानुसार परवानगी दिली जाते.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर दैवी शक्ती असल्याचे सांगत उपचारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात अनेक व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. तसेच अशोक खरात स्वतःला दैवी अवतार देखील समजायचा. परंतु, त्याचा दैवी अवतार नाशिक पोलिसांनी चांगलाच उतरवल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अशोक खरातला नीट चालताही येत नाहीये, तसेच 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा वेदनादायी आवाजात देत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सखोल चौकशीनंतर, अशोक खरातला काल युनिट 1 च्या स्वाधीन करण्यात आले. अनेक बडे नेते आणि उद्योजकांना शक्तीवर्धक सिरपचे वाटप करणारा हा 'कॅप्टन' काल गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना पूर्णपणे हतबल दिसला. चौकशीच्या फेऱ्यामुळे त्याची अवस्था इतकी केविलवाणी झाली होती की त्याला साधे स्वतःच्या पायावर चालणेही कठीण झाले होते. यावेळी अशोक खरातला दोन पोलिसांच्या मदतीने चालत गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर यावे लागले. दोन्ही बाजूने दोन पोलिसांनी त्याला पकडले होते. अशोक खरात लंगडत आणि कण्हत चालत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या अवस्थेत अशोक खरातची वरातच काढली, जी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. यावेळी त्याने अत्यंत कष्टाने नाशिक पोलिसांचे ब्रीदवाक्य 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असे कसेबसे पुटपुटले आणि गाडीत बसतानाही स्वतःची मान शेजारच्या पोलिसाच्या खांद्यावर टाकून दिली होती. खरातची ही कमालीची हतबलता दर्शवणारा व्हिडिओ सध्या सर्वत्र जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. अशोक खरात प्रकरणात 100 नव्हे, 200 व्हिडिओ!:विजय वडेट्टीवार यांचा दावा, पटोले म्हणाले - विधिमंडळात 'स्थगन प्रस्ताव' आणणार दरम्यान, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशोक खरातचे 100 नव्हे तर 200 व्हिडिओ असून त्यातील 90 व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह आहेत, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून विधिमंडळात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरुद्ध ‘जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ लागू होऊन १३ वर्षे उलटली आहेत. या काळात राज्याने भोंदूगिरीविरुद्ध मोठी लढाई लढली असून आतापर्यंत सुमारे २ हजारहून अधिक भोंदूबाबा आणि मांत्रिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दशकात दरवर्षी सरासरी ७० ते १०० महिलांनी या भोंदूबाबांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत. आजार बरे करणे, गुप्तधनाचा मोह, अपत्यप्राप्ती किंवा कौटुंबिक कलह दूर करण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर ‘दैवी शक्ती’ किंवा ‘कोपा’ची भीती दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या काळात या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते, परंतु जनजागृतीमुळे तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. इनसाइट स्टाेरी - आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे अंधश्रद्धा केवळ ग्रामीण किंवा अशिक्षित भागात असते असे सहसा मानले जाते. परंतु, शहरातील उच्चशिक्षित लोकदेखील मानसिक ताण, करिअरमधील स्पर्धा आणि कौटुंबिक वादांमुळे ‘शॉर्टकट’ म्हणून भोंदूबाबांकडे वळत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषा ओळखून नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही बाबा-बुवांच्या आहारी न जाता कायद्याचा आधार घ्यावा. कायद्याचा धाक, पण शिक्षेचे प्रमाण कमी महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा २०१३ मुळे पीडितांना तक्रार करण्याचे बळ मिळाले आहे. मात्र, पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदार फितूर होण्यामुळे शिक्षेचे प्रमाण अजूनही आव्हानात्मक आहे. कायद्यात ६ महिने ते ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असली तरी सामाजिक भीतीपोटी आजही अनेक महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांची संख्या ही नोंदवलेल्या गुन्ह्यांपेक्षा ३ ते ४ पटीने जास्त असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिव्य मराठी एक्स्पर्ट - अॅड. मुक्ता दाभोलकर, सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे नियम झालेले नाहीत : महाराष्ट्रात जादूटोणा कायदा २०१३ रोजी तयार झाल्यानंतर अनेक केसेस उजेडात येत आहेत. मागील १२-१३ वर्षात जवळपास २ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिलांच्या शोषणाच्या गुन्ह्याचे प्रमाण मोठे आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे दररोज तक्रारी येत असतात. पण लोक तक्रार दाखल करायला तयार नसतात. या कायद्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. पण काही वेळा पोलिसदेखील तक्रारदार व्हायला तयार नसतात. महाराष्ट्रात नरबळी होतात हे कोणीच मान्य केले नसते, पण या कायद्याने समोर आले. कायदा झाला असला तरी कायद्याचे नियम झालेले नाहीत.
राज्यात घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आणि महारेराच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांविरुद्ध ( बिल्डर) आता राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. गृहखरेदीदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विकासकांच्या मालमत्तांचा लिलाव करणे, बँक खाती सील करणे आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे व इतर सदस्यांन परिषदेती विचारलेल्य तारांकित प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात हे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, महारेरा स्थापन झाल्यापासून (१ मे २०१७) घराचा ताबा न देणाऱ्या बिल्डरांविरुद्ध १,२९१ तक्रारदारांच्या बाजूने ७९२ कोटींच्या वसुलीचे आदेश डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत काढण्यात आले आहेत. यामध्ये जेव्हिपीडी (जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट) आणि मार्वेल ग्रुप सारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. मार्वेल ग्रुपविरुद्ध ३३ वॉरंटद्वारे ९८ कोटींच्या वसुलीचे आदेश होते. त्यापैकी २७ कोटी वसूल झाले असून, उर्वरित ३८ कोटींच्या वसुलीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई सुरू आहे. जुहू विलेपार्ले येथील या विकासकाच्या मालमत्तेचा लिलाव काढण्यात आला होता, मात्र सध्या न्यायालयीन स्थगितीमुळे ही प्रक्रिया थांबली आहे असे शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून लिलाव यशस्वी न होणे किंवा मालमत्ता न सापडणे अशा तांत्रिक कारणांमुळे वसुलीस विलंब होत होता. मात्र, आता हे वॉरंट गांभीर्याने राबवण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. घराचा ताबा वेळेवर न मिळाल्यामुळे व्याजासह परतावा मिळण्याच्या तक्रारींची संख्या अधिक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबई शहर, उपनगर, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये रेरा वॉरंट वसुलीसाठी ‘जिल्हा समन्वय अधिकारी’ आणि ‘समर्पित महसूल वसुली अधिकारी’ यांची नियुक्ती २२ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. जे विकासक दंडाची रक्कम किंवा परतावा देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे, बँक खाती सील करणे आणि मालमत्तांचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. क्षेत्रफळ कमी दिल्याच्या तक्रारींचे काय? करारानुसार कमी चटई क्षेत्र दिल्याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. मात्र, घराचा ताबा वेळेवर न मिळाल्यामुळे व्याजासह परतावा मिळण्याच्या तक्रारींची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले. इनसाइट स्टाेरी- मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांची लूट सामान्य माणूस आयुष्याची पुंजी, पीएफ मधील पैसे आणि बँकेचे कर्ज काढून ‘पै-पै’ जमा करतो. बिल्डर या भावनेचा फायदा घेऊन सुरुवातीला आकर्षक जाहिरातींद्वारे जाळ्यात ओढतात आणि नंतर ताबा देण्यास वर्षे न् वर्षे विलंब करून ग्राहकाला दुहेरी आर्थिक फटका देतात. करारात नमूद केलेले ‘कार्पेट एरिया’ प्रत्यक्षात देताना तांत्रिक नियमांच्या नावाखाली कमी दिले जाते. प्रत्येक चौरस फुटासाठी हजारो रुपये मोजणाऱ्या ग्राहकाची अशा प्रकारे लूट केली जाते.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एकअसलेल्या आई तुळजाभवानीचाचैत्र पौर्णिमा उत्सव ३० मार्च ते ३एप्रिल या कालावधीत साजराहोणार अाहे. या कालावधीत ३१मार्च ते २ एप्रिलदरम्यानतुळजाभवानीचे मंदिर ३ दिवसदररोज २२ तास दर्शनासाठी खुलेराहणार आहे. या तीन दिवसांतछबिन्याचे आकर्षण असणार आहे. तुळजाभवानी मातेच्या चैत्रपोर्णिमा उत्सव कालावधीतराज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश,तेलंगणा या राज्यातून १५ लाखभाविक दर्शनासाठी येणार आहेत.यंदा भाविकांची संख्या गतवर्षीच्यातुलनेत यंदा तीन लाखांची वाढहोण्याची शक्यता आहे. त्यानुषंगानेभाविकांसाठी पिण्याचे पाणी,सावलीची व्यवस्था करण्यात येतआहे. देवस्थानच्या वतीनेदिवसभराचे दर्शन झाल्यानंतररात्रीच्या वेळी परिसराची स्वच्छताकेली जाते. या शिवाय हळदी-कुंकू, खेळणी, पाळणीचे स्टाँललावण्यात येत आहेत. पौर्णिमाउत्सवादरम्यान उन्हाचा पारावाढण्याची शक्यता लक्षात घेतामंदिरात शेडनेट टाकून सावलीचीव्यवस्था करण्यात येत आहे.जागोजागी भाविकांना रांगेतचओआरएस उपलब्ध करुन दिलेजाईल. त्यासाठी स्वयंसेवकनियुक्त केले जाणार आहेत. उत्सवाच्या काळात २४ तास वीजपुरवठा दर्शनासाठी राज्यभरासह परराज्यातील भाविकांची मोठीगर्दी होणार आहे. त्यात २२ तास मंदिर दर्शनासाठी खूलेराहणार असल्याने २४ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचेआदेश प्रशासनाने महावितरणला देण्यात आले आहेत. शहराबाहेर वाहने लावून दर्शनाला जावे वाहतूक कोंडी व पार्किंगची होणारी अडचण लक्षात घेताघाटाच्या खालून वाहतूक बायपासने वळविण्यात येणारआहे. त्यामुळे भाविकांना शहराबाहेर वाहने लावूनदर्शनासाठी यावे लागणार आहे. उत्सवात असे असतीलदैनंदिन कार्यक्रम दोन लाखांपेक्षा अधिकभाविकांना ओआरएस चैत्र पोर्णिमा यात्रा उत्सव कालावधीतकिमान १५ लाख भाविक दर्शनासाठीयेणार आहेत. वाढणारा उष्मा पाहता पाचदिवस दररोज ४० हजार याप्रमाणे २ लाखभाविकांना ओआरएस देण्यात येणारआहे. त्यानुषंगाने प्रशासनाने नियोजनकेले आहे. या शिवाय भाविकांना थंडपाण्याचीही व्यवस्था करण्यात येईल.
आरक्षणाच्या पात्रतेसाठी आता केवळ सामाजिक मागासलेपण पुरेसे ठरणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या निकषांनुसार, मागास प्रवर्गात कोणत्याही जातीचा समावेश होण्यासाठी २५० गुणांपैकी किमान ५० टक्के म्हणजेच १२५ गुण मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत ३७ गुणांवरही समावेश केला जात होता. नव्या नियमामुळे मागास प्रवर्गात समावेशावर सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या ४६ प्रकरणांचा निकाल रखडू शकतो. अनेक जातींच्या समावेशाचा मार्ग खडतर होण्याची चिन्हे आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला. गेल्या वर्षभरात आयोगाच्या प्रशासकीय कामावर ३ कोटी ३७ लाख ७६ हजार ३५२ रुपये खर्च झाले, मात्र निकालाचा वेग मात्र कासवाच्या गतीने सुरू आहे. खर्च कोटींत, निकाल मात्र ८ आयोगाकडे सुनावणीसाठी एकूण ५४ प्रकरणे होती. त्यापैकी वर्षभरात केवळ ८ निकाली निघाली असून, ४६ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. यामध्ये कुणबी पोटजाती (झाडे, तिलोरी, खैरे), बंजारा, लबाना आणि मुस्लीम उपजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ प्रकरणांची क्षेत्रपाहणी रखडली आहे. दिव्य मराठी नॉलेज - न्यायालयात आव्हान शक्य पूर्वीच्या मागासवर्ग आयोग, समितीचे जात आरक्षणाचे निकष (खत्री आयोग- २० गुण, बापट आयोग - २५ गुण, गायकवाड आयोग- ३७ गुण) मर्यादित होते. नव्या २५० गुणांच्या पॅटर्नमध्ये सामाजिक (१००), शैक्षणिक (८०) आणि आर्थिक (७०) अशा तिन्ही स्तरांवर सूक्ष्म आकडेवारीची अट टाकण्यात आली आहे. यामुळे केवळ ‘हो-नाही’ या उत्तरावर गुण मिळणार नाहीत, तर ठोस पुराव्यांची गरज असेल. एकुणात १२५ गुणांची अट पार करणे आता तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक झाले असून यामुळे पात्रतेचा दर्जा उंचावला आहे. मात्र, २५० गुणांच्या निर्णयाला समानतेचे तत्त्व, मागील आयोगाचे निकष, आकडेवारी तसेच नैसर्गिक न्याय या मुद्द्यावर न्यायालयात आव्हान देता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एरवी साबणाचे बुडबुडे हा लहान मुलांचा मनोरंजनाचा खेळ म्हणून आपण सहज हवेत उडवून सोडून देतो. पण त्यालाही गणितीय परिमाणे असतात. महाराष्ट्राचे क्रियाशील संशोधक असलेले डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी साबणाच्या बुडबुड्यांना त्रिमितीय (३-डी) आणि विविध भौमितिक आकार देण्याचा अद्भुत शोध लावला. विशेष म्हणजे त्याचे पेटेंट त्यांनी आपल्या तीन वर्षीय चिमुकल्या कन्येच्या नावे नोंदवले. त्यामुळे त्यांची कन्या गोजिरी अजिंक्य कोत्तावार ही जगातील सर्वात लहान वयाची आंतरराष्ट्रीय पेटंटधारक बनली आहे. गोजिरी एकेदिवशी साबणाचे बुडबुडे हवेत उडवत असताना वडिलांनी बघितले. सहसा ते गोल आकाराचे असतात. मात्र तिच्या वडिलांनी संशोधक दृष्टीने लक्ष देऊन त्यात आकार शोधले. नंतर या संशोधनाचे पेटंट त्यांनी आपली मुलगी गोजिरीच्या नावे नोंदवले. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी जर्मनी सरकारकडून २० नोव्हेंबर २०२५ रोजी तिला अधिकृत पेटंट प्रदान करण्यात आले. त्याची “ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने देखील जागतिक विक्रम म्हणून नोंद घेतली आहे. डॉ. अजिंक्य कोत्तावार हे स्वतः नामवंत संशोधक आहेत. त्यांच्या नावावर तब्बल ४८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. शिक्षण आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे “पद्मश्री’ पुरस्कारासाठी देखील त्यांचे नामांकन झाले आहे. यवतमाळ येथे त्यांनी ‘ऊबुंटू’ नावाची प्रयोगशील शाळा सुरू केली असून तिथे मुलांना ‘प्रयोगातून शिक्षण’ दिले जाते. बुडबुडे गोल नाही, त्रिकोणी, चौकोनी आकार धारण करतात लहान मुलांना साबणाचे बुडबुडे उडवायला खूप आवडतात. मात्र, सहसा हे बुडबुडे गोल आकाराचेच असतात. गोजिरीच्या या संशोधनामुळे या बुडबुड्यांना थ्रीडी स्वरूप प्राप्त झाले आहे. या संशोधनात एक खास आकाराचा बेस तयार करण्यात आला. या बेसच्या साहाय्याने हवेत बुडबुडे सोडल्यास ते गोल न राहता विज्ञानातील थ्रीडी आकार धारण करतात.
चौकशीचा ससेमिरा, अमाप संपत्तीचा पर्दाफाश होणार? नाशिक : प्रतिनिधी लैंगिक अत्याचार प्रकरणातील अशोक खरातच्या चौकशीत आता आयकर विभागाचीही एन्ट्री झाली आहे. त्याच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाचे स्रोत यांची सखोल चौकशी केली जात आहे. देणगीदार, भागीदार आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात येणार असल्याने यातून मोठा आर्थिक घोटाळाही समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात […] The post आयकर विभागाकडून खरातची चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
युद्धामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय
८८ हजार कोटी रुपये काढले नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका इतर देशांनाही बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला असून, भारतीय शेअर बाजारातूनही विदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. केवळ मार्च महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून ८८ हजार कोटी रुपये काढून घेतले. यामुळे शेअर […] The post युद्धामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचार गरजेचे
लातूर : प्रतिनिधी अनेक प्रख्यात साहित्यीकांनी, विचारवंतांनी, महापुरुषांनी आपल्या साहित्य संपदेतून पोक्त समाज निर्मिती व सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचारांची मांडणी केली आहे. सम्यक विचारधाराच सामाजिक विचारांचे व्यापकत्व प्रतीत करीत असते, असे प्रतिपादन प्रसिध्द समिक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. सम्यक साहित्य विचारमंच, लातूर यांच्यावतीने ‘साहित्य, समाज, सम्यक विचार आणि परितर्वन’ या विषयावर जाहीर व्याख्यानाच्या […] The post सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचार गरजेचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जि. प. सेसमधून २ बालकांवर कॉक्लीअरइम्प्लांट शस्त्रक्रिया
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. याअंतर्गत कर्णबधिर, दिव्यांग व्यक्तींना कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्थसहाय्य ही योजना राबविण्यात आली. सदर योजनेअंतर्गत लातूरच्या गोरे कान, नाक, घसा हॉस्पिटलमध्ये २ बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […] The post जि. प. सेसमधून २ बालकांवर कॉक्लीअरइम्प्लांट शस्त्रक्रिया appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवीन गुळ मार्केट येथे १०१ वृक्ष लागवड
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कृषि उत्पन्न बाजार समितीचे नविन गुळ मार्केट जनावर बाजार आवारात विविध प्रकारच्या १०१ वृक्षांची लागवड शनिवारी बाजार समितीचे सभापती जगदिशराव बावने यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील, युवराज जाधव, श्रीनिवास शेळके, आनंद […] The post कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवीन गुळ मार्केट येथे १०१ वृक्ष लागवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारावीनंतर करिअरची निवड करताना आवड, क्षमता, संधीचा संगम साधा
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी-निवडी, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन करिअरची निवड करणे अत्यावश्यक आहे. योग्य मार्गदर्शन, तज्ज्ञांचे सल्ले तसेच विविध क्षेत्रांबाबतची सखोल माहिती यांचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा निश्चित करता येते, असे प्रतिपादन एमआयटी करिअर गाईडन्स सेलचे प्रमुख बळीराम हांडगे यांनी केले. एमआयटी शिक्षण संस्था समूह, लातूर यांच्या […] The post बारावीनंतर करिअरची निवड करताना आवड, क्षमता, संधीचा संगम साधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्या या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे. हे सर्व सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिले गेले होते. उद्या सभागृहात निरोप दिला जाणाऱ्या सदस्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या निरोपामुळे शिवसेना (यूबीटी) ची विधानपरिषदेतील उपस्थिती आणि मांडणीत बदल होणार आहे. तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही कार्यकाळ संपत असल्याने, या रिक्त होणाऱ्या जागांवर आता कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्या निरोप देण्यात येणाऱ्या आमदारांमध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे. या नऊ आमदारांची निवड 14 मे 2020 रोजी करण्यात आली होती. उद्या निरोप दिले जाणारे विधानपरिषदेचे आमदार १) उद्धव ठाकरे - शिवसेना (UBT) २) नीलम गोऱ्हे - शिवसेना (शिंदे) ३) अमोल मिटकरी - राष्ट्रवादी (अजित पवार) ४) शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी (शरद पवार) ५) राजेश राठोड - काँग्रेस ६) संदीप जोशी - भाजप ७) दादाराव केचे - भाजप 8) रणजितसिंह मोहिते-पाटील - भाजप ९) संजय केनेकर - भाजप पुढील राजकीय वाटचाल कशी? येत्या १३ मे रोजी या सदस्यांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपल्यानंतर या ९ जागा रिक्त होतील. हे सर्व सदस्य विधानसभा कोट्यातून निवडून आलेले असल्याने, आगामी काळात विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार या जागांचे वाटप होणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक ४ जागा आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांची गणिते आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहेत.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशोक खरातचे १०० नव्हे तर २०० व्हिडिओ असून त्यातील ९० व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह आहेत, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून उद्या विधिमंडळात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ज्यांच्या हातात जनतेने विकासाची दोरी दिली, ते आज भोंदूबाबासोबत ज्योतिषाची दोरी ओढत आहेत. अशा प्रकारची भोंदूगिरी जोपासण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. या २०० व्हिडिओंमध्ये अनेक मंत्री आणि आयएएस (IAS) दर्जाचे अधिकारी अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर या सर्व दोषींची तातडीने गच्छंती झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. महिला असल्यानेच चाकणकरांना टार्गेट केले का? नाना पटोले यांनी या प्रकरणात लैंगिक भेदभावाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. रूपाली चाकणकर महिला असल्याने त्यांना टार्गेट केले जात आहे का? ज्या मंत्र्यांचे फोटो आणि संबंध समोर आले आहेत, त्यांचे राजीनामे सरकार कधी घेणार? असा सवाल पटोले यांनी विचारला. मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांचाही यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. तो' पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांनी का लपवला? नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागच्या अधिवेशनात मी नाशिकच्या एका मुद्द्यावर विधानसभेत एक पेनड्राईव्ह दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तो का लपवून ठेवला? जर तेव्हाच कारवाई झाली असती, तर आज महाराष्ट्र इतका बदनाम झाला नसता. अशोक खरात प्रकरणात कोणत्याही मागणीशिवाय सरकारने तातडीने एसआयटी (SIT) का स्थापन केली? हे प्रकरण दाबण्यासाठी तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी व्यक्त केली. उद्या सभागृहात रणकंदन होण्याची चिन्हे उद्या विधानसभेत या प्रकरणी 'स्थगन प्रस्ताव' आणून सरकारकडून सविस्तर खुलासा मागणार असल्याचे नान पटोले यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या भूमीत असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. गरज पडल्यास या नैतिक जबाबदारीवरून आम्ही सरकारचा राजीनामा मागू, असा थेट इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. अधिकारीच खरातला वाचवायचा प्रयत्न करताहेत दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अशोक खरात प्रकरणावरून अनेक मोठे दावे केलेत. राज्य सरकारमधील उच्च पदावर बसलेले अधिकारीच लिंगपिसाट अशोक खरातला वाचवायचा प्रयत्न करत आहेत, सर्व कायदेशीर मदत करत आहेत अशी माहिती समोर येत असल्याचे सपकाळ म्हणाले. तसेच त्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीची महाराष्ट्राचा एपस्टीन अशोक खरातच्या पत्नीबरोबर जमिनीत भागीदारी असल्याची ही माहिती असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. राज्य शासनातील अधिकारी असलेल्या व्यक्तिच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स, स्टार्टअप…आणि भोंदू बाबा अशोक खरात सोबत उघड भागीदारी. सत्तेत बसलेल्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य तरी आहे का? यांनी कागदपत्रांमध्ये दिलेला पत्ता ही ठाण्याचा आहे, हा खरंतर योगायोगच म्हणावा लागेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांचे ७ आरोप
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत विरोधी खासदारांनी नोटीस दिली आहे. लोकसभा-राज्यसभेत आणलेल्या नोटीसमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांवर ७ आरोप लावण्यात आले आहेत. ते सरकारच्या इशा-यावर काम करतात असे म्हटले आहे. ज्ञानेश कुमार यांनी रकफ द्वारे लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला, असा विरोधकांचा आरोप आहे. नोटीसमध्ये त्यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित […] The post मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांचे ७ आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे (वय ८९) यांचे रविवारी दिनांक २२ मार्च रोजी नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दत्ताजी मेघे हे विदर्भातील प्रभावी व दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत लोकसभा खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे भव्य रुग्णालयाची स्थापना केली. त्यांच्या कार्यकाळात विदर्भातील अनेक विकासकामांना गती मिळाली. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी करून ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आजही समाजसेवेचे कार्य करत आहेत. त्यामुळे ते केवळ राजकारणी नव्हे, तर समाजसेवक म्हणूनही जनमानसात लोकप्रिय होते. दत्ता मेघे यांचा स्वभाव साधा, लोकाभिमुख आणि कार्यपद्धती पारदर्शक होती. सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी ते ओळखले जात. त्यामुळे त्यांना सर्वपक्षीय आदर लाभला होता. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा राजकीय व सामाजिक वारसा आहे. त्यांच्या निधनाने विदर्भाने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जुळलेला नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत. शेवटचा ठरला पाडवा पहाट माजी खासदार दत्ता मेघे यांनी नववर्षाच्या स्वागतार्ह वर्ध्यातील सोशालिस्ट चौक येथे आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती आणि तीच उपस्थिती त्यांची शेवटची ठरली. तब्बल तीन तास त्यांनी संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे स्मारक लातुरात व्हावे
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, सुप्रसिद्ध साहित्यिक, नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी नांदेडच्या नरहर कुरुंदकर स्मारकाच्या धर्तीवर लातूर येथे त्यांचे स्मारक उभे राहिले पाहिजे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे, असा सूर लातूर येथे शुक्रवारी आयोजित डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवर […] The post डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे स्मारक लातुरात व्हावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप
लातूर : प्रतिनिधी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने १६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क करिता २ लाख ५३ हजार रुपयांचे धनादेश (चेक) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. संजय शिवपूजे, राजेश मित्तल, विजय पस्तापुरे, अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या […] The post लातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतातील दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट
नवी दिल्ली : भारतात गेल्या एका वर्षात दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट नोंदवली गेली आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६ च्या यादीत भारत १३ व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानांनी खाली आला आहे. यापूर्वी भारत ११ व्या स्थानावर होता. त्याचबरोबर, यादीनुसार दक्षिण आशिया सलग दहाव्या वर्षी दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित क्षेत्र राहिले आहे. पहिल्यांदाच […] The post भारतातील दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सध्या काही लोक केवळ साधूंच्या वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प. पू. रमेशभाई ओझा यांनी रविवारी ता. २२ येथे व्यक्त केले. येथील रामलिला मैदानावर गणराज गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथा वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना रमेश भाई ओझा म्हणाले की, संसारात दिसणारे सुख हे अनित्य आहे. परिवारात अशांतता, कलह आणि तणाव निर्माण होणे हीच संसाराची खरी ओळख आहे. तरीही माणूस या दुःखमय अवस्थेलाच सुख समजून त्यात अडकून राहतो. खरा आनंद हा बाह्य वस्तूंमध्ये नसून अंतर्मनात आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आहे. सद्गुरूच माणसाला योग्य दिशा दाखवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, कर्ममार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला सुख हवे असते, तर भक्तीमार्गातील व्यक्तीला ‘आनंद’ हवा असतो. स्वर्गातील सुख उच्च असले तरी तेही अनित्यच आहे, मात्र भक्तीतून मिळणारा आनंद नित्य आणि शाश्वत असतो. जीवनातील विषमता मांडताना त्यांनी एखादा माणूस झोपडीत जन्म घेतो तर दुसरा श्रीमंत घराण्यात का जन्म घेतो याचे याचे उत्तर देताना त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट करत प्रत्येकाच्या जीवनातील परिस्थिती ही त्याच्या कर्मांवर आधारित असल्याचे सांगितले. भागवत कथा हीच माणसाला योग्य मार्ग दाखवणारी आहे, असे सांगत त्यांनी प्रथम स्कंधातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे सविस्तर विवेचन केले. यावेळी मौनी बाबांच्या कथेद्वारे खोट्या साधूंचा पर्दाफाश करत त्यांनी सांगितले की, काही लोक केवळ वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भागवत कथेतून दिलेल्या या जीवनमूल्यांनी उपस्थित भाविकांना आत्मचिंतनाचा नवा दृष्टिकोन दिला. यावेळी हजारो भविकांनी कथेचा लाभ घेतला.
इराणच्या हल्ल्याने लिटिल इंडिया दिमोना हादरले
जेरुसलेम : या शहरातील गल्ल्यांमध्ये मराठीसह हिंदी शब्दही कानावर पडतात. येथेही क्रिकेटचे चाहते मोठे आहेत. येथील दुकानांमध्ये सोहनपापडी, गुलाबजाम, पापडी चाट आणि भेळपुरी सारखे भारतीय पदार्थ सहज मिळतात. हे वर्णन भारतातील एखाद्या शहराचे नसून इस्रायलमधील दिमोना शहराचे आहे. इस्रायलच्या अण्वस्त्र साठ्यापासून २० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या या शहरात भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी वस्ती आहे. शनिवारी […] The post इराणच्या हल्ल्याने लिटिल इंडिया दिमोना हादरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हर्षवर्धन सदगीर ठरला सातवा डबल महाराष्ट्र केसरी
पुणे : पुण्यातील वाघोली, तालुका हवेली येथे महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडला. हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाड याला ४-२ असे पराभूत केले. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी झाला. महेंद्र गायकवाड यानं पहिल्या हाफमध्ये १ गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर याने एक गुण मिळवत […] The post हर्षवर्धन सदगीर ठरला सातवा डबल महाराष्ट्र केसरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथे पार पडलेल्या ६६ व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपला दबदबा कायम राखत विजेतेपदावर नाव कोरले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह हर्षवर्धनने दुसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा उंचावत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवला. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील सातवा मल्ल ठरला आहे. महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यातील हा अंतिम सामना तांत्रिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा ठरला. सामन्याच्या सुरुवातीला महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेत १ गुण मिळवून आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर हर्षवर्धनने चपळाईने १ गुण मिळवत विश्रांतीपर्यंत धावसंख्या १-१ अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या सत्रात महेंद्रला 'ॲक्टिव्हिटी टास्क' देण्यात आला, मात्र तो गुण मिळवण्यात अपयशी ठरल्याने हर्षवर्धनला तांत्रिकदृष्ट्या १ गुण मिळाला. त्यानंतर हर्षवर्धनने पकड मजबूत करत आणखी २ गुण मिळवले आणि ४-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. शेवटच्या क्षणी हर्षवर्धन मॅटच्या बाहेर गेल्याने महेंद्रला १ गुण मिळाला, मात्र वेळ संपली तेव्हा ४-२ अशा फरकाने हर्षवर्धन विजयी झाला. अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम गदेसाठी 'माती' आणि 'गादी' अशा दोन विभागांतून विजेते मल्ल आमनेसामने आले होते. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने माती विभागाच्या अंतिम फेरीत हिंगोलीच्या तडाखेबंद सिकंदर शेखचा ३-० असा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नाशिकच्या हर्षवर्धनने मॅट (गादी) विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूर शहराच्या जय पाटीलचा १०-० अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हर्षवर्धनवर कौतुकाचा वर्षाव हर्षवर्धन सदगीरने यापूर्वीही महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. आता पुन्हा एकदा त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवल्याने नाशिकसह संपूर्ण कुस्ती वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाघोलीच्या मैदानावर जमलेल्या हजारो कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या 'डबल महाराष्ट्र केसरी'चे स्वागत केले.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी मध्यरात्री दरी पूल परिसरात तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जांभुळवाडी येथील दरी पूल परिसरात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. तीन ते चार वाहनांची धडक झाली, ज्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. किरकोळ जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. रात्रीची वेळ असल्याने बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी १३ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नवले पूल परिसरात एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक दिली होती. त्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता. ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी चंदननगर भागातील एका महिलेची तीन लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील. एका तारांकित हॉटेलला रिव्ह्यूज मिळवून द्यायचे आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या खात्यात परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. पैसे गुंतविल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही दिली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहे.
मुंढव्यातील केशवनगर भागात मित्रांना पिस्तूल दाखवताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना १८ मार्च रोजी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. १८ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे आणि एक अल्पवयीन युवक मुंढव्यातील केशवनगर भागातील गुरुकृपा सोसायटीजवळ मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. ते एकमेकांना पिस्तूल दाखवत होते आणि हाताळत होते. यावेळी जखमी अल्पवयीन मुलानेही पिस्तूल हाताळले. त्यानंतर आरोपी मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीन मुलाच्या दिशेने रोखले. पिस्तूलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि ती अल्पवयीन मुलाच्या कमरेत शिरली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. याबाबत एका अल्पवयीन मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमित सुजित बर्णवाल (वय २१, रा. मांजरी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक निरीक्षक पिंगुवाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. दहशत माजवण्यासाठी सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल बाळगले जाते. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील उमराटी गावात छापा टाकून देशी बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. उमराटीतून मध्यस्थांमार्फत पुण्यात पिस्तुले विक्रीसाठी पाठवली जात असल्याचे तपासात उघड झाले होते. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये उमराटीतील देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणी देशी बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे आणि यंत्रसामग्री जप्त केली होती.
नाशिकचा स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, आता त्याच्या समर्थनासाठी सामाजिक क्षेत्रातील मोठी व्यक्तिमत्त्वे पुढे येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हिवरे बाजारचे सरपंच आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचा खरातसोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून, खरातच्या 'ओशनोलॉजी' या तथाकथित शास्त्राला वैज्ञानिक आधार असल्याचे प्रमाणपत्रच पवारांनी दिले आहे. विशेष म्हणजे, खरात सध्या गजाआड असताना त्याचे कुटुंबीय हिवरे बाजारात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पोपटराव पवार आणि अशोक खरात यांचे संबंध २०११ पासूनचे आहेत. हिवरे बाजार येथील मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने खरात तेथे तीन दिवस मुक्कामास होता. गावात पाणी येण्यासाठी खरात यांनी काही उपाय सांगितले होते. गावच्या देवीची पूजा केल्यानंतर मोठा फरक पडला, असे खळबळजनक वक्तव्य पवारांनी या व्हिडिओमध्ये केले आहे. खरातच्या 'ओशनोलॉजी'चा वापर युरोपमधील पोलीस तपासासाठी करतात, असा अजब दावाही त्यांनी यावेळी केला. खरातच्या कुटुंबाला हिवरे बाजारात आश्रय? अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर नाशिकमध्ये त्याच्याविरुद्ध संतापाची लाट आहे. अशा परिस्थितीत खरातचे कुटुंबीय सध्या हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या आश्रयाला असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ आश्रयच नव्हे, तर खरातला लागणारी कायदेशीर मदत आणि आर्थिक रसद देखील पोपटराव पवार पुरवणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच म्हणून देशभरात ओळख असलेल्या पोपटराव पवारांसारखी व्यक्ती एका भोंदू बाबाच्या चमत्कारांचे समर्थन कशी करू शकते? असा सवाल आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. खरातच्या 'अध्यात्मिक' जाळ्यात केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर ग्रामीण विकासाचे मॉडेल उभे करणारे नेतृत्वही अडकल्याने या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर आहे, हे स्पष्ट होत आहे. हे ही वाचा… अशोक खरात प्रकरण:अजितदादांना सत्य माहीत होते, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला; पण तटकरेंनी थांबवला - रूपाली ठोंबरे नाशिकच्या भोंदू 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाने आता केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय क्षेत्रालाही हादरवून सोडले आहे. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आता थेट चाकणकर यांच्यावर अशोक खरातच्या 'सेक्स रॅकेटच्या मास्टरमाईंड' असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. पण सुनील तटकरेंनी तो थांबवला, असा मोठा दावाही ठोंबरे पाटील यांनी केलाय. सविस्तर वाचा…
हिंगोली तालु्क्यातील सागद ते पातोंडा मार्गावर धानापूर शिवारात दोन दुचाकीच्या धडकेमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. २२ सायंकाळच्या सुमारास घडली आहे. बासंबा पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्हयातील खंडाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी अरविंद भिमराव पवार (४०) हे आज दुपारच्या सुमारास खंडाळा पोलिस ठाण्यात कामकाज करून दुचाकीवर सिरसम मार्गे हिंगोलीकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली तालुक्यातील सागद ते पातोंडा मार्गावर धानापूर शिवारात आले असतांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात अरविंद हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, नामदेव हाके, कैलास गुंजकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने अरविंद यांना रुग्णवाहिकेद्वारे हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाख केल. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, मयत पोलिस कर्मचारी अरविंद पवार हे सन २००७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आयआरबी गटात भरती झाले होते. त्या ठिकाणावरून त्यांची बदली हिंगोलीच्या राज्य राखीव दलात झाली होती. राखीव दलात कार्यरत असतांना त्यांनी महाराष्ट्रासह बाहेर राज्यातही निवडणुक, सण, उत्सव बंदोबस्त केले. तर नक्षलग्रस्त भागातही त्यांनी बंदोबस्त केला आहे. सुमारे एक वर्षापुर्वीच त्यांनी यवतमाळ जिल्हा पोलिस दलात बदली झाली होती. त्यानंतर त्यांना खंडाळा पोलिस ठाणे देण्यात आले होते. सहा महिन्यापासून ते खंडाळा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. या शिवाय महत्वाचे गुन्हे निकाली काढण्यात त्यांनी महत्वाची भुमीका बजावली होती. त्यांच्या अपघाती निधनाने खंडाळा पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. मयत अरविंद यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पत्नी हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत बासंबा पोलिस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
इस्लामाबाद : जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही कोणताही विचार न करता भारत, मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करू. आम्ही त्यांना सोडणार नाही, पुढे काय होईल ते नंतर पाहू अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी गरळ ओकली आहे. एकीकडे पाकिस्तानचे शेजारील देश अफगाणिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना बासित यांच्यासारख्या व्यक्तीने भारतातील महत्त्वाच्या शहरांवर […] The post …तर मुंबई, दिल्लीवर हल्ला करू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शत्रु राष्ट्रे वगळता होर्मुझ सर्वांसाठी खुले
तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. या इशा-यानंतर काही तासांतच इराणने आपली भूमिका मवाळ केली आहे. शत्रू देशांशी (प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल) संबंधित जहाजे वगळता इतर सर्व जहाजांसाठी हा जलमार्ग खुला राहील असे इराणच्या वरिष्ठ प्रतिनिधीने स्पष्ट […] The post शत्रु राष्ट्रे वगळता होर्मुझ सर्वांसाठी खुले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वांधिक काळ प्रमुखपद भूषवणारे मोदी ठरले पहिले नेते
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक काळ प्रमुख म्हणून पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. सत्तेच्या सर्वोच्च पदावर आज त्यांचे ८,९३१ दिवस पूर्ण झाले आहेत. या कामगिरीसह पंतप्रधान मोदींनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा सर्वाधिक काळ प्रमुखपद भूषविण्याचा(८,९३० […] The post सर्वांधिक काळ प्रमुखपद भूषवणारे मोदी ठरले पहिले नेते appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका
नवी दिल्ली : इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागात एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे. विल्सन यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्यपूर्वेतील […] The post इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार
जिंतूर : प्रतिनिधी जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपुर शिवारात रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ४ जागीच ठार झाले असून अन्य २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ५० ते ६० फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या कारचा चुराडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, […] The post भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोहा : मध्यपूर्वेत सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. या भागातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कतारमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रविवारी पहाटेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात […] The post हेलिकॉप्टर अपघातात ६ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट
बीजिंग : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य तणावाचा सर्वाधिक तडाखा आता जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब असलेल्या चीनला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मॉडर्न डिप्लोमसीच्या ताज्या अहवालानुसार कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कच्च्या मालाची टंचाई यामुळे चीनच्या उत्पादन क्षेत्राची कंबर मोडली आहे. यामुळे चीन कॉस्ट-पुश इन्फ्लेशन म्हणजेच उत्पादन खर्च वाढल्यामुळे येणा-या महागाईच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त होत […] The post चीनच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीन देणार भारतीय व्यापा-यांना पक्की दुकाने
नवी दिल्ली : चीनने भारतीय व्यापा-यांना मोठे सरप्राइज दिले असून आपल्या अधिपत्याखालील तिबेट भागातील तकलाकोट येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, चीनने भारतीय व्यापा-यांसाठी पक्की दुकाने तयार केली आहेत. यामुळे, आता भारतीय व्यापा-यांना इतिहासात पहिल्यांदाच अशा पक्क्या आणि सुसज्ज दुकानांमध्ये बसून व्यापार करण्याची संधी मिळेल. सीमावर्ती भागातील स्थानिक व्यापा-यांना चीनच्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. […] The post चीन देणार भारतीय व्यापा-यांना पक्की दुकाने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ ठार
जिंतूर : प्रतिनिधी जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपुर शिवारात रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ३ जागीच ठार झाले असून अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ५० ते ६० फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या कारचा चुराडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, […] The post भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी खरातचे धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी जोडले असून, यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या निवासास्थानाजवळ झालेली अघोरी पूजा आणि त्यांचा अपघात यांचा काही संबंध आहे का? असा खळबळजनक सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, अशोक खरातचे कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणारे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अजितदादांच्या निवासस्थानाजवळ आणि कार्यालयाजवळ अघोरी पूजा करण्यात आली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात 'करंगळी कापण्याचा' एक प्रकार झाला होता, जो अघोरी कृत्यांचाच भाग होता. या सर्व घटना आणि दादांचा अपघात यात काही साम्य आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. खरातला ज्या तत्परतेने अटक केली, तशीच तत्परता अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीत का दाखवली जात नाही? असा सवालही त्यांनी केला. अशोक खरातच्या संपत्तीचा स्रोत काय? अशोक खरातच्या अवाढव्य मालमत्तेवर बोट ठेवत अमोल मिटकरी म्हणाले, एका साध्या भोंदू बाबाकडे २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती येते कुठून? यामागे कोणते अधिकारी आणि मंत्री आहेत, हे आता समोर आले पाहिजे. खरातचे एका व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबतही संबंध असल्याचा संशय असून, यामध्ये अनेक साक्षर लोक आणि अधिकारी आहारी गेले आहेत, हे राज्याचे दुर्दैव आहे. पोलिसांना मिळालेले व्हिडिओ ५७ नाहीत, तर ५०० पेक्षा जास्त असू शकतात, असा आमचा अंदाज आहे. ज्यांना दादांनी मोठं केलं, ते अधिवेशनात गप्प का? पक्षांतर्गत आणि महायुतीमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. अजितदादा हे शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे नेते आहेत, मात्र त्यांना संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांच्या अपघाताच्या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. ज्यांना दादांनी मोठे केले, ते आज मूग गिळून गप्प का आहेत? असा टोला त्यांनी स्वपक्षीय आणि मित्रपक्षातील नेत्यांना लगावला. अंनिस आणि सरकारी भूमिकेवर प्रश्न राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही असे प्रकार उघडपणे कसे घडतात, यावर अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरातला कोणाच्या काळात पाणी आरक्षित करून मिळाले आणि त्याला कोणकोणत्या मंत्र्यांचे सहकार्य लाभले, याची सखोल चौकशी व्हावी. महायुती असो वा महाविकास आघाडी, जो कोणी दोषी असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही, असा मला विश्वास आहे, अशी आशाही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.
भोंदूबाबा अशोक खरात याचे एन्काऊंटर होणार?
मुंबई : प्रतिनिधी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता असून अशोक खरातला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो. २४ मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करताना एन्काऊंटर होण्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण […] The post भोंदूबाबा अशोक खरात याचे एन्काऊंटर होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मानवतच्या पेठ मोहल्ल्यात दोन दुचाकी जाळल्या
परभणी : मानवत येथील पेठ मोहल्ला परिसरातील नगरेश्वर मंदिरासमोर उभ्या असलेल्या दोन स्प्लेंडर मोटारसायकली दि. २१ मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सातत्याने होणा-या वाहन जाळपोळीच्या मालिकांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मानवत येथील नागेश्वर मंदिरासमोर राहणारे पुरुषोत्तम शिवाजी भायेकर […] The post मानवतच्या पेठ मोहल्ल्यात दोन दुचाकी जाळल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित
परभणी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्ह्यातील पहिल्या महिला नवजात शिशूतज्ञ डॉ.संजीवनी मगर यांना दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे, डॉ.अमित केले, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आशा पाटील, मिस इंडिया अश्विनी […] The post दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन
जालना : ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज निधन झाले. जालना येथील राहत्या घरी आज दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर ओबीसी नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात असून ओबीसी चळवळीच्या आठवणी जागवल्या जात आहेत. सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी […] The post ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पतीला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता आणखी एक नवीन गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाणे येथे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना ‘पूजा विधी’च्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार […] The post पतीला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे!
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘सोसायटी अचिव्हर्स’ यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीसह त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. ‘देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर इथिकल लीडरशिप’ या शब्दांत त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाचा गौरव करण्यात आला आहे. मॅग्झिनची स्पेशल एडिशन यंदा प्रकाशित झाली असून […] The post ‘सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका
नागपूर : विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा आणि गोंदियासह अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. परिणामी, अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपासूनच अनेक ठिकाणी वातावरणात बदल जाणवत होता. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी सुरुवातीला पाऊस व गारपीट सुरू झाली. चांदूर रेल्वे येथे वीज कोसळली. हवामान […] The post विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोल्हापुरात विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
कोल्हापूर : प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून या नोटमध्ये आई-वडिलांसाठी भावनिक संदेश लिहिला आहे. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत असून मृत मुलीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इशिता मधुसुदन सावंत असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. […] The post कोल्हापुरात विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकच्या भोंदू 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाने आता केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय क्षेत्रालाही हादरवून सोडले आहे. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आता थेट चाकणकर यांच्यावर अशोक खरातच्या 'सेक्स रॅकेटच्या मास्टरमाईंड' असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. पण सुनील तटकरेंनी तो थांबवला, असा मोठा दावाही ठोंबरे पाटील यांनी केलाय. एबीपी माझाशी संवाद साधताना रूपाली ठोंबरे पाटील यांनी अशोक खरात प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला. त्या म्हणाल्या, मी ही मागणी केवळ राजकीय नेत्या म्हणून नाही, तर एक वकील म्हणून करत आहे. अशोक खरात चालवत असलेल्या लैंगिक शोषणाच्या जाळ्याच्या मुख्य सूत्रधार रूपाली चाकणकर आहेत. अनेक महिलांनी खरातच्या विरोधात तक्रारी केल्या होत्या, मात्र चाकणकर यांनी आपल्या संविधानिक पदाचा गैरवापर करून ही सर्व प्रकरणे दडपून ठेवली. अजित पवार आणि सुनील तटकरेंबाबत मोठा खुलासा रूपाली ठोंबरे यांनी यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांचा संदर्भ देत खळबळ उडाली. या प्रकरणातील सर्व 'कटू सत्य' अजित दादांना माहीत होते. दादांनी यापूर्वीच रूपाली चाकणकर यांचा राजीनामा मागितला होता, मात्र सुनील तटकरे यांनी मध्यस्थी करून तो राजीनामा रोखून धरला, असा मोठा दावा त्यांनी केला. अजित दादा आज आपल्यात असते तर त्यांनी अशा भोंदूगिरीला आणि त्यांना साथ देणाऱ्यांना छडीच्या तालावर सरळ केले असते. दादांना त्यांच्या शेवटच्या काळात कोणी कोणी त्रास दिला, हे मी लवकरच नावानिशी जाहीर करेन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. हायकोर्टात याचिका दाखल करू पुण्यातील एका ब्लॅकमेलिंग प्रकरणाचा उल्लेख करत रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, अशोक खरातला दोन मुले ब्लॅकमेल करत होती आणि त्या व्यवहारातही तडजोड करण्यात आली होती. एसआयटीने या प्रकरणातील सामाजिक कार्यकर्त्यांची आणि सूत्रधारांची नावे जाहीर केली नाहीत, तर आम्ही उच्च न्यायालयात 'रिट याचिका' दाखल करू. देवेंद्र फडणवीस कोणालाही वाचवणार नाहीत, याची मला खात्री आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वादाचे केंद्रबिंदू असलेले 'ते' फोटो रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातसाठी छत्री धरल्याचा आणि त्यांची पाद्यपूजा केल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या फोटोंनी खरात आणि चाकणकर यांच्यातील घनिष्ठ संबंध अधोरेखित केल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे. चाकणकर यांच्या काळात राज्य महिला आयोग खरोखर कोण चालवत होते? असा प्रश्न आता या आरोपांमुळे उपस्थित झाला आहे.
पुढील दोन दिवसांत उकाडा वाढणार; हवामान खात्याचा अंदाज
पुणे : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, उकाड्यात देखील चांगलीच वाढ झाली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल होणार असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. […] The post पुढील दोन दिवसांत उकाडा वाढणार; हवामान खात्याचा अंदाज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
पुणे : प्रतिनिधी रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या पत्रामध्ये हा आरोप केला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या पत्रात हा गंभीर आरोप आहे, ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. नाशिकचा भोंदूबाबा […] The post चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईचे आराध्य दैवत आणि जगप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात एका कर्मचाऱ्यानेच दानपेटीवर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजेंद्र पेंडुरकर (वय ५७) असे या आरोपीचे नाव असून, सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र पेंडुरकर हा लोअर परळ परिसरातील रहिवासी असून तो मंदिरातच कर्मचारी म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी मंदिरातच काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पेंडुरकर संशयास्पदरीत्या दानपेटीतून पैसे काढताना दिसले. हा प्रकार त्यांनी तात्काळ मंदिर ट्रस्टच्या वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर ट्रस्टने गेल्या ८ ते १० दिवसांचे रेकॉर्डिंग तपासले असता, आरोपी वारंवार दानपेटीतील पैशांवर डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले. १० हजारांची कबुली, पण संशय मोठ्या रकमेचा मंदिर ट्रस्टने दिलेल्या तक्रारीनंतर दादर पोलिसांनी राजेंद्र पेंडुरकरला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने दानपेटीतून सुमारे १० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली आहे. मात्र, तो गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चोरी करत असल्याने, चोरलेली एकूण रक्कम ही मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चोरीच्या कृत्यात मंदिरातील इतर काही कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, या दिशेने आता पोलिस सखोल तपास करत आहेत. कडेकोट सुरक्षेला कर्मचाऱ्याकडूनच सुरुंग सिद्धिविनायक मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत आणि हाय-प्रोफाईल मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दररोज हजारो भाविकांसह राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावतात. नुकताच टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ट्रॉफीसह याच मंदिरात दर्शन घेतले होते. अशा कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्हीचे जाळे असलेल्या मंदिरात खुद्द कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याने मंदिर प्रशासनाच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या दादर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीने ही रक्कम कुठे खर्च केली किंवा त्याचे इतर कोणाशी लागेबांधे आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.
खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला
मुुंबई : प्रतिनिधी सध्या संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. खरात प्रकरण गंभीर असून या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला […] The post खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील हॉटेल, ढाबे व उपहारगृह चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार व्यावसायिक गॅसचा पुरवठ्यात 20 टक्क्यांची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिली. यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे सरकारने व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर निर्बंध घातले होते. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने 21 मार्च रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार यापूर्वी राज्याला केवळ 30 टक्के एलपीजी वाटप मंजूर होते. आता 23 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त 20 टक्के वाटप वाढवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण गॅस पुरवठा हा संकटपूर्व पातळीच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. या वाढीव 20 टक्के गॅस पुरवठ्यात हॉटेल्स, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टिन, अन्न प्रक्रिया उद्योग व दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टिन, कम्युनिटी किचन्स तसेच स्थलांतरित मजुरांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. 'प्रस्तुत निर्णयामुळे व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व अन्नपदार्थ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल. पण गॅस मिळवण्यासाठी त्यांना तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी करणे व पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणे आवश्यक असणार आहे', असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. केरोसिन वितरणाप्रकरणी महत्त्वाचे निर्णय दुसरीकडे, सरकारने राज्यातील केरोसिन वितरणासंबंधीही काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. त्यानुसार, प्रलंबित परवाने आपोआप नुतनीकरण झाल्याचे मानण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय परवाने वारसांच्या नावाने तत्काळ वर्ग करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. ज्या गावांमध्ये किरकोळ केरोसिन परवानाधारक उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी रास्तभाव दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना किरकोळ केरोसिन परवानाधारक म्हणून मान्यता देऊन परवाना देण्याचे निर्देश देण्यात आलेत. सरकारने 20 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या शासनपत्रातही या संदर्भातील कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सर्व निर्णयामुळे राज्यातील इंधन पुरवठ्याला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… IG दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठिशी घातले:तृप्ती देसाई यांचा आरोप; भोंदू खरातचे प्रकरण गतवर्षीपासून दाबले जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. वाचा सविस्तर
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची यादी अधिकच भयावह होत चालली आहे. आधीच अनेक महिलांच्या शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या खरातविरुद्ध आता नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला गरोदर असताना तिच्यावर 'पूजा विधी'च्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. नव्याने समोर आलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना अशोक खरातने तिला विधी करण्याच्या बहाण्याने बोलावले होते. यावेळी महिलेसोबत आलेल्या तिच्या पतीला कार्यालयाबाहेर बसवून त्याने आतमध्ये 'उपचार' आणि 'धार्मिक विधी'चे नाटक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या कृत्याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडितेला दिली होती. या नवीन तक्रारीमुळे अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. नकली साप अन् वाघाच्या कातड्याचा धाक विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात खरातच्या कार्यालयातून धक्कादायक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. भाविकांमध्ये आपली 'दैवी शक्ती' सिद्ध करण्यासाठी आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी अशोक खरात नकली साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करत असे. या अघोरी साहित्याद्वारे तो विधी करत असल्याचे भासवत असे. या कृत्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता खरातवर 'महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्या'सह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(१), ७४ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता अशोक खरातचे पाप उघड झाल्यानंतर आता आणखी तीन महिलांनी धैर्याने पुढे येत तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. 'एसआयटी'ने या महिलांचे जबाब अत्यंत गोपनीय पद्धतीने नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या महिलांच्या साक्षीमुळे खरातविरोधातील कायदेशीर बाजू अधिक भक्कम होणार आहे. यापूर्वीच खरातच्या डिजिटल उपकरणांमधून १०० हून अधिक संशयास्पद व्हिडिओ मिळाल्याने खळबळ उडालेली असताना, आता प्रत्यक्ष समोर येणाऱ्या पीडितांच्या संख्येमुळे तपास यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. तपासाचा फास आवळला विशेष तपास पथक आता अशोक खरातच्या संपर्कातील इतर संशयित आणि त्याला मदत करणाऱ्यांची कसून चौकशी करत आहे. खरातने अंकशास्त्राच्या आणि भविष्याच्या नावाखाली किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, याचा पूर्ण भांडाफोड करण्यासाठी पोलिस आता तांत्रिक पुराव्यांसोबतच प्रत्यक्ष जबाबांवर भर देत आहेत. हे ही वाचा… ज्याला मूल-बाळ नाही त्यांनाही व्हायचे:मिरगावातील ग्रामस्थाने सांगितले अशोक खरातचे किस्से, म्हणाले- बाबा जे सांगतो ते होतेच महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या खरातच्या नादी लागल्याने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता अशोक खरातबद्दल स्थानिक लोकांकडून काही माहिती समोर यायला लागली आहे. बाबाकडे गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतेच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले असल्याचे स्थानिकाने सांगितले आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या खरातच्या नादी लागल्याने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता अशोक खरातबद्दल स्थानिक लोकांकडून काही माहिती समोर यायला लागली आहे. बाबाकडे गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतेच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले असल्याचे स्थानिकाने सांगितले आहे. मिरगावमध्ये अशोक खरातचे मोठे घर आहे. याच गावातील काही लोकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी एका इसमाने सांगितले की, बाबाकडे (अशोक खरात) गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले होते. ज्याला मूल-बाळ होत नाही, त्याला सांगितल्यानंतर मूल-बाळ झाल. असे किस्से परिसरात ऐकले आहेत. त्या माणसाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. बाहेरचे अनेक लोक त्यांच्याकडे येत होते. बाबांनी असे करायला नको होते. परिसरात त्यांचे खूप मोठे नाव होते. आता गावाचे नाव बदनाम झाले असल्याचे येथील ग्रामस्थाने 'मुंबई तक'शी बोलताना सांगितले आहे. पुढे बोलताना त्या ग्रामस्थाने सांगितले की, आमचा साहेबांशी (अशोक खरात) 9-10 वर्षांपासून परिचय आहे. आम्ही मूळचे इथलेच आहोत. त्यामुळे जाणे-येणे अगदी जवळून आहे. येथील शंकराचे मंदिर गावाची शानच आहे. मंदिरासाठी लोकांचा विरोध राहणार नाही. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकांचा त्यांना विरोध असेल. मीडियासमोर हे प्रकरण समोर आले. आम्हाला याची माहिती असती तर आमचे आणि त्यांचे संबंध वाईटच असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक लोकांना प्राधान्य दिले नाही ग्रामस्थाने पुढे सांगितले की, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या वेटिंगमुळे आम्ही कधी त्यांच्याकडे थांबलो नाही. ते स्थानिक लोकांना कधी प्राधान्य देत नव्हते. बाहेरचे लोक शनिवार-रविवारी भरपूर असायचे. आम्ही घरातील समस्या घेऊन जाणार होतो. पण आम्हाला त्याने वेळ न दिल्याने नंतर परत जाणे झाले नाही. आमचा घरगुती प्रॉब्लेम होता. वेळ न दिल्याने आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. राजकीय नेत्यांना त्यांच्याबद्दल माहिती असते तर तेही इथे आले नसते. या व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गावाचे नाव बदनाम झाले आहे. पैशांची मागणी व्हायची पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही बाहेरच्या लोकांना कधीच विचारले नाही, तुम्ही कशासाठी येता? आणि का येता? आमच्या समस्येचे निवारण करण्यासाठी त्यांनी आम्हाला नाशिकला बोलावले होते. मात्र, आमच्या मनातच नव्हते नाशिकला जायचे.. कारण तिथे पैसे मागतात, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्याकडे काय पैसे नव्हते.
ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे ओबीसी चळवळीचा एक बुलंद आवाज हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनावर मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. शब्बीर अहमद अन्सारी हे गत काही महिन्यांपासून आजारी होते. काल त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत ईद साजरी केली. त्यानंतर आज दुपारी 12.30 वा. त्यांनी जालना येथील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या्ंच्यावर आज रात्रीच उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शब्बीर अन्सारी यांनी सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी खंबीर लढा दिला. त्यांनी ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आपले उभे आयुष्य ओबीसींच्या न्याय हक्कासाठी समर्पित केले. त्यांनी नुकत्याच झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातही सहभाग घेतला होता. छगन भुजबळांनी व्यक्त केला शोक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शब्बीर अन्सारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस आणि ऑल इंडिया ओबीसी मुस्लिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या जाण्याने ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावला आहे. शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबती होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी आणि बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही गेली अनेक दशके खांद्याला खांदा लावून संघर्ष केला आहे. शब्बीरभाई यांनी जात आणि वर्ग यातील फरक अचूक ओळखून मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची जी कायदेशीर आणि सामाजिक मोहीम हाती घेतली होती, ती यशस्वी करून दाखवली. मुस्लिम ओबीसी समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. 'मंडलनामा' या त्यांच्या ग्रंथामधून त्यांनी स्वतःचा आणि मुस्लिम ओबीसी संघटनेचा जो खडतर प्रवास मांडला आहे, तो सामाजिक चळवळीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून, येणाऱ्या पिढ्यांना आपल्या हक्कासाठी सदैव प्रेरणा देत राहील. या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले होते, ही माझ्यासाठी नेहमीच स्मरणात राहणारी बाब आहे. अन्सारी साहेबांनी मांडलेली भूमिका आणि त्यांनी दिलेला लढा हा केवळ मुस्लिमांसाठी नसून तो संपूर्ण वंचित घटकांसाठी होता. स्व. विलासराव देशमुख, शरद पवार साहेब यांच्यापासून ते युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढला. त्यांच्या जाण्याने समता परिषदेची आणि माझी वैयक्तिक मोठी हानी झाली आहे. एक सच्चा आणि लढवय्या नेता आज आपल्यातून निघून गेला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अन्सारी परिवाराच्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे भुजबळांनी म्हटले आहे. मंडल आयोग चळवळीचा शिलेदार हरपला - लक्ष्मण हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही शब्बीर अन्सारी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, शब्बीर अन्सारी यांच्या निधनाने मनाला खूप वेदना झाल्या. मंडल आयोग लागू करण्यासाठी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील चळवळीचा शिलेदार हरपला. मंडल आयोग ओबीसी चळवळ आणि देश पातळीवरची ओबीसीची चळवळ जगलेला, अवलिया आज आपल्यातून निघून गेला. शब्बीर अन्सारी यांना आज भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलवल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच पक्षांतर्गत नाराजी असल्याचे देखील बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असल्याचे समजते. दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती मिळत असून, यावेळी खासदारांनी थेट वरिष्ठ नेत्यांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना पुरेसा वेळ देत नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून अपेक्षित असलेले पाठबळ किंवा मदत मिळाली नाही, अशा शब्दांत खासदारांनी आपली उघड नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या बैठकीत खासदारांनी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे समजते. जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत? असा सवालही खासदारांनी विचारला होता. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. आता या बैठकीतून सध्यातरी सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका विधवा महिलेशी वर्षभर लैंगिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या एका कथित मठाधिपतीच्या नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिला ज्या व्यक्तीला गुरू माणून श्रद्धेने शरण गेली, अखेर त्यानेच तिचा घात केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित विधवा महिला मे 2025 मध्ये पहिल्यांदा नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील एका मठात गेली होती. तिथे तिची ओळख हरिगिरी महाराज यांच्याशी झाली. पीडिता दर गुरूवारी मोठ्या श्रद्धेने या मठात दर्शनासाठी येत होती. तिने हरिगिरी महाराजांना आपले गुरू मानले होते. पण या भोंदू महाराजाची तिच्यावर वाईट नजर होती. तो सतत तिला फोन करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्यात त्याला यश आले. वाढदिवसाच्या दिवशीच केला बलात्कार हरिगिरी महाराजांचा 14 जुलै 2025 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने तो स्वतः पीडित महिलेच्या घरी गेला. तिथेच त्याने पहिल्यांदा महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कुणालाही न सांगण्यासाठी त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. पण त्यानंतर महिलेने लग्नाचा तगादा लावताच तो तिला टाळू लागला. मी संन्यासी असल्यामुळे लग्न करू शकत नाही, असे म्हणत आपले हात वर करू लागला. यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर तत्काळ तिने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर झालेल्या चौकशीत पोलिसांनी भोंदू हरिगिरी महाराजाच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर नांदेडमध्ये हे प्रकरण समोर आल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. काय आहे अशोक खरात प्रकरण? नाशिकच्या अशोक खरात नामक भोंदू बाबाने महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. या प्रकरणी सध्या अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नुकताच या प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला आहे. हे ही वाचा… IG दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठिशी घातले:तृप्ती देसाई यांचा आरोप; भोंदू खरातचे प्रकरण गतवर्षीपासून दाबले जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. वाचा सविस्तर
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार या खरातने केले असल्याचे समोर आले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो व्हिडिओ अशोक खरातसोबत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. या भोंदुगिरीच्या प्रकरणांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत. अंबादास दानवे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व तसेच समाजधुरिण यांना उद्देशून म्हटले की, महाराष्ट्र हे देशातील एक अत्यंत पुरोगामी, विचारी आणि स्वाभिमानी प्रवृत्ती जपणारे राज्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाने या मातीला विचारांचे खतपाणी घातले. या महान नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही अंधभक्तीला, बुवाबाजीला किंवा ढोंगीपणाला थारा दिला नाही. उलट, त्यांनी सामान्यांमध्ये तार्किक विचार आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी केली. एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष प्रहार पुढे अंबादास दानवे म्हणाले, आज मात्र राज्याची सद्यस्थिती आणि विशेषतः नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात यांसारखी प्रकरणे पाहिल्यावर मनात दाटून येणारा प्रश्न हाच आहे की, हा खरोखर तोच महाराष्ट्र आहे का? जिथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेबांसारखा अंधश्रद्धा मुळापासून उपटून टाकणारा आणि थोतांडावर आसूड ओढणारा क्रांतीकारी नेता जन्माला आला, त्याच नेत्याचे भक्त म्हणवणारे आज सत्ता आणि स्वार्थासाठी खरात सारख्या भोंदू प्रवृत्तींची संगत आवडीने पसंत करत आहेत? ज्या प्रवृत्तींवर शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर प्रहार केले, आज त्याच प्रवृत्तींच्या मांडीला मांडी लावून माननीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बसलेले पाहून मनात या ढोंगीपणाची चीड उत्पन्न होते, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. तुमचे 'आक्रोश मोर्चे' कुठे गेले? पुढे अंबादास दानवे म्हणाले, नाशिकमधील या तथाकथित 'कॅप्टन'ने ज्या प्रकारे जनता, बायकांची फसवणूक केली आणि त्याला ज्या पद्धतीचे राजकीय अभय मिळत गेले, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. भाजपचे सो कॉल्ड मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांसारखे नेते जे दरवेळी हिंदुत्वाचा आव आणून गळे काढत असतात, त्यांना आज माझा एक सवाल आहे— आता तुमचे 'आक्रोश मोर्चे' कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना? मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवला आहे? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? माझ्या आईने मला नेहमीच एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे. ते मी पाळतो आणि पाळत राहणार. महाराष्ट्र हा कायम देशाला राजकारण आणि समाजकारणात दिशा देणारा अग्रगण्य प्रांत ठरला आहे. राजकारणाची झालेली अभूतपूर्व वाताहत अख्ख्या देशाने पाहिलीच आहे, पण आता समाजकारणातही आपण अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? हे एकदा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला नक्की विचारून पहा, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले आहे.
ई-केवायसीसाठी शेवटचे १० दिवस शिल्लक
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेच्या तिस-या टप्प्यातील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. ३१ मार्चपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. तर अपात्र महिलांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४५ लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. अटी आणि नियमांचे पालन न करणा-या लाडक्या बहिणींवर कडक कारवाई देखील करण्यात येत […] The post ई-केवायसीसाठी शेवटचे १० दिवस शिल्लक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. तृप्ती देसाई टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, अनेक बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. त्यांच्यात आर्थिक संबंधही होते. आमदार, खासदार, आयएएस अधिकारी आदी सर्वांचेही खरातशी संबंध होते. या सर्वांची नावे पुढे येऊ नयेत म्हणून एकच मार्ग उरतो. तो म्हणजे खरातला संपवण्याचा. त्यामुळे अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा डाव उधळवून लावण्याचे आवाहन केले आहे. हे रॅकेट पूर्णतः उद्धवस्त करण्याची गरज आहे. या प्रकरणात जे कुणी अधिकारी, नेते आहेत, त्यांच्यावर मकोका अंतर्गत झाली पाहिजे. अशोक खरातला शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्याच्याशी संबंध असलेल्यांवरही कारवाई झाली पाहिजे. गतवर्षीच प्रकरण उजेडात येणार होते तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, गतवर्षी मार्च महिन्यात श्रीरामपूरच्या एका दैनिकात अशोक खरातशी संबंधित एक बातमी आली होती. तेव्हा मला फोन आला होता. कॅप्टन म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरातचे काही व्हिडिओ आमच्याकडे येणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दबाव आणला. जे लोक पेनड्राईव्ह देणार होते, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळेच त्या लोकांनी ते व्हिडिओ देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर गत 5 मार्च रोजी काही लोक तो पेनड्राईव्ह घेऊन आले. त्यानंतर अशोक खरात परदेशात पळून जाणार होता. पण मी त्या लोकांना पोलिसांकडे पाठवले आणि पुढे कारवाई झाली. आयजी दत्तात्रय कराळेंवर गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी यावेळी आयजी दत्तात्रय कराळेंवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, आयजी दत्तात्रय काळेंनी अशोक खरातला वारंवार पाठिशी घातले. त्यामुळे त्याची हिंमत वाढली. आयजीच खरातला गुरू मानत असतील, तर ते त्यांच्यावर कशी कारवाई करणार? यामुळे हे प्रकरण गतवर्षी उघड झाले नाही. पोलिसांचा दबाव वाढला होता. आयजी कराळे यांची या प्रकरणात मोठी चूक आहे. चाकणकरांचा प्रकरण दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न रुपाली चाकणकरांनी पीडित महिलांसाठी एकही फोन केला नाही. पण त्यांनी त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घातले. त्यामुळे त्याच याला जबाबदार आहेत. त्यांनी पत्रकारांवर दबाव टाकला. त्यांना नोटीसा पाठवल्या. त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे. चाकणकरच नाही तर या प्रकरणात जे-जे दोषी आढळतील, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करतो हे चाकणकरांना गतवर्षीच माहिती झाले होते. पण त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे अशोक खरातच्या कृत्यांची मला माहिती नव्हती हे त्यांचे म्हणणे साफ चुकीचे आहे. चाकणकर अशोक खरातला गुरू मानत होत्या.आता अशोक खरातला अटक झाली आहे. त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे. सरकारसाठी महिलांची प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे पुढे काय कारवाई होते हे पहावे लागेल, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
हिंदू रक्षा समितीने बडकस चौकात सामूहिक रामरक्षा पठन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला. देव, देश आणि धर्माच्या कल्याणासाठी हा सत्यसंकल्प करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार टोळीचे सदस्य मुकुल कानिटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. श्रीरामरक्षा स्तोत्र हे श्रीरामरूपी पुरुषार्थाने सीताशक्तीच्या साहाय्याने श्रीहनुमंतासारखा पराक्रम करण्यासाठी आचरणात आणण्याचा सुमार्ग आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. व्यासपीठावर नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि समितीचे संयोजक सुनील काबरा उपस्थित होते. मातृशक्ती जागरणाच्या या अभिनव उपक्रमाचे हे एकोणविसावे वर्ष होते. 2006 साली द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त याची सुरुवात झाली होती. रामरक्षेचे सामूहिक आवर्तन म्हणजे देव, देश आणि धर्माच्या कल्याणासाठी केलेला सत्यसंकल्प आहे. कानिटकर म्हणाले की, जगातील जवळपास 56 देश सध्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष युद्धाच्या छायेत असले तरी भारतीय जनमानस शांत, स्थिर आणि विकसित राष्ट्राच्या प्रगतीसाठी आत्मबलाने अग्रेसर आहे. ही रामरक्षेचीच प्रचिती आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामजन्मभूमीवर साकारलेले राष्ट्रमंदिर आपण सगळे पाहू शकलो. तसेच, 200 वर्षानंतर देवव्रत रेखे यांसारखा युवक दंडक्रमविक्रमादित्य होऊ शकला, हे वैदिक मंत्रातील संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे. त्यांनी मातृशक्तीला फॅशनच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादापासून सावध राहण्याचा सल्लाही दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर हजारो महिलांनी सामूहिक रामरक्षा पठन केले. यावेळी पंडित बच्छराज व्यास चौकातील वातावरण राममय झाले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इतवारी भाग संघचालक संजय शिरपूरकर, दक्षिणामूर्ती नगर संघचालक दिनेश वंडलकर, नगरसेवक सुधीर राऊत, भारतीय शिक्षण मंडळाचे महानगर मंत्री डॉ. भालचंद्र हरदास, श्रीपाद रिसालदार, चंदू पेंडके, माजी नगरसेविका श्रद्धा पाठक, प्रतिभा दटके, मोहिनी खोत, राखी जामकर, माधुरी मांजरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चारुता हरदास यांनी केले आणि महाआरतीने सांगता झाली.
पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेचा आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अवघ्या काही तासांत महाराष्ट्राला नवा 'महाराष्ट्र केसरी' मिळणार असून, या मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार याकडे संपूर्ण कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. यंदा माती विभागाच्या अंतिम फेरीत हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख आणि सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार असून, या दोन्ही दिग्गज मल्लांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दुसरीकडे, गादी विभागातून नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटील यांच्यात अंतिम झुंज रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात जय पाटीलने माजी विजेता पृथ्वीराज मोहोळला अवघ्या 36 सेकंदात चितपट करून सर्वांना थक्क केले, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत हर्षवर्धन सद्गीरने 2020 मधील आपली लय कायम राखत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलवर 6-2 अशा गुणफरकाने मात करून अंतिम फेरीत धडक मारली. आता या चारही मल्लांपैकी 2026 चा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी कोण ठरणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. माती विभागाच्या पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत 'भारंदाज' डावाच्या जोरावर सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तर दुसऱ्या अटीतटीच्या उपांत्य लढतीत हिंगोलीच्या 'चपळ चित्त्या'ने म्हणजेच सिकंदर शेखने अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचा 4-3 अशा निसटत्या गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामुळे आता माती विभागाच्या अंतिम झुंजीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड या दोन दिग्गज मल्लांमध्ये कुस्तीचा थरार पाहायला मिळणार आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत माती विभागाच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख आणि सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड आमनेसामने ठाकले असून, या 'रि-मॅच'मुळे कुस्ती शौकिनांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी 2023 च्या स्पर्धेतही हे दोन्ही तुफानी मल्ल माती विभागाच्या अंतिम लढतीत भिडले होते, मात्र त्यावेळी पंचांच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदरला पराभव स्वीकारावा लागून महेंद्र गायकवाड विजयी ठरला होता, ज्यावर राज्यभरात मोठी टीका झाली होती. त्यानंतर महेंद्रला मुख्य अंतिम फेरीत शिवराज राक्षे कडून पराभूत व्हावे लागले होते. आता त्याच ऐतिहासिक वादाच्या पार्श्वभूमीवर, चपळाई विरुद्ध बलदंड शरीरयष्टी अशा या अटीतटीच्या झुंजीत कोण मैदान मारणार आणि 2023 च्या त्या वादाचा वचपा निघणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
भोंदू बाबा अशोक खरात यांच्याकडे विरोधी पक्षातील कोणकोणते नेते जात होते याचे मी पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे सर्वांत जास्त पुरावे आहेत, पण ते पोलिसांकडे आहेत, ते पोलिसांचे काम आहे, खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचे यात सहभाग असेल तर कारवाई होईल, पण केवळ भेटलंय म्हणून कारवाई करायला लागलो तर कोणी त्यांना 40 किमी पाण्याची लाईन दिली हे सर्वांना समजले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भोंदू बाबा प्रकरणी हवेत बोलण्याला काही अर्थ नाही. खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे, त्या प्रकरणाचा भांडाफोडा आम्हीच केला आहे. या प्रकरणात महिला लाजेखातर पुढे येत नाही, पण पिडीत महिलांना त्यांच्या कुटुंबियांना धीर देत पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात काही महिला प्रतिसाद देत आहेत. प्रकरणाकडे लक्ष घालण्याच्या सूचना मी डीजींना दिल्या आहे ते या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. एसआयटी आणि नाशिक सीपी मिळून हे काम पूर्ण करत आहेत. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. फोटो कुणाचेही असू शकतो देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खरात प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो नक्की आणून द्यावा त्यावरही कारवाई होईल. पण विनाकारण प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये. सरकार आणि पोलिस जे करायचे ते करत कठोर कारवाई करतील. फोटो कुणाचेही असू शकतो, पण ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून 40 किलोमीटरची पाइपलाइन वळवून अशोक खरातच्या संस्थेला पाणी दिले, त्या मंत्र्यांबाबत विरोधक गप्प का आहेत? केवळ फोटोवरून राजकारण करणाऱ्यांनी या धोरणात्मक निर्णयावर का मौन पाळले आहे? महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला राजकारणात नाही तर महिलांच्या प्रतिष्ठेत इंटरेस्ट आहे. महिलांवर जे अन्याय झालेत त्यासंदर्भात आधी चौकशी होईल, प्रत्येक महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, महिलांना न्याय देण्यासाठी चौकशी करणार.
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, विशेष तपास पथकाने शनिवारी अशोक खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांची समोरासमोर बसवून चौकशी केली असता, पोलिसांदेखतच दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या नाट्यमय घडामोडीसोबतच नीरज जाधवच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्ये (सीडीआर) तब्बल 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या नव्या धाग्यादोऱ्यांमुळे एसआयटीच्या हाती लवकरच ठोस पुरावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष तपास पथकाने नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्डची सखोल तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याने या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. 'फोकस प्रॉपर्टी' येथे ऑफिसबॉय म्हणून काम करत असताना नीरज या महिलांच्या सतत संपर्कात राहून त्यांना अशोक खरातचे निरोप पोहोचवत असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या खुलाशामुळे नीरज जाधवच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची दाट शक्यता असून, या भोंदूबाबाची सर्व काळी कृत्ये आणि गुन्हेगारी कुंडली लवकरच उघड होणार असल्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणातील तपासाचा वेग कायम असून, आज रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही एसआयटीचे अधिकारी हिमांशू चौकशीसाठी पोलिस क्लब येथे दाखल झाले आहेत. खरातची आज पुन्हा एकदा एसआयटीमार्फत कसून चौकशी केली जाणार असून, या चौकशीतून नवीन आणि महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. आयकर विभागाची प्रकरणात उडी या प्रकरणाला आता आर्थिक वळण मिळाले असून, एसआयटीच्या जोडीला आयकर विभागाने देखील या तपासात उडी घेतली आहे. खरातच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्ता, संशयास्पद व्यवहार, उत्पन्नाचे स्त्रोत आणि प्राप्तिकर विवरणपत्रांची आता सखोल पडताळणी होणार आहे. विशेष म्हणजे, त्याला आर्थिक मदत करणारे देणगीदार आणि त्याचे व्यावसायिक भागीदारही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून, खरातच्या मोठ्या आर्थिक जाळ्याचा लवकरच पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.
स्वत:ला देवाचा अवतार सांगून महिलांचे शोषण करणारा भोंदूबाबा 'कॅप्टन' अशोक खरात सध्या गजाआड आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून, यात अनेक बडे नेते आणि हस्तींचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती करत समाजाला आरसा दाखवला आहे. अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला पहिलाच प्रश्न काळजाला भिडणारा आहे. ते विचारतात, एखादा बाबा पकडला गेला कीच त्याला 'भोंदू' का म्हणायचे? त्याआधी तो काय असतो? आणि जे कधीच पकडले जात नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न केवळ खरातपुरता मर्यादित नसून, गल्लीबोळात उभे राहिलेल्या स्वयंघोषित महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. अंध होण्याला कारणीभूत कोण? अतुल कुलकर्णी म्हणाले की, जेव्हा एखाद्या महाराजाचे काळे कारनामे चव्हाट्यावर येतात, तेव्हा त्याचे अनुयायी स्वतःला 'पीडित' मानतात. पण , हे भक्त नेमके कोण असतात? भागीदार, पीडित, अंधळे, अंधश्रद्धाळू की मूर्ख?अंध होण्याला कारणीभूत कोण? फसवणारा की स्वतःहून फसणारा? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं, तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का? ज्याप्रमाणे आपण डोळे मिटून एखाद्या बाबावर विश्वास ठेवतो, तसाच विश्वास आपण राजकीय नेत्यांवरही ठेवतो का? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. तटकरे साहेब, तुमच्या बोटाच्या जखमेचे रहस्य काय?- लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाचे रहस्य काय? भोंदू अशोक खरातच्या नादी लागू कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? असा तिखट सवाल शरद पवार गटाने या प्रकरणी सुनील तटकरेंना केला आहे. भोंदू अशोक खरात व त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची शरमेने मान खाली गेली आहे. या प्रकरणी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदू खरातच्या सांगण्यानुसार अनामिका कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर असेच आरोप केलेत. सुनील तटकरेंनी आपल्या हाताचा अंगठा अशोक खरातच्या सूचनेनुसार रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापला होता का? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. वाचा सविस्तर नाशिकच्या भोंदूबाबाचा एन्काउंटर होऊ शकतो? महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या नाशिकच्या हायप्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागले आहे. अशोक खरातचे बड्या राजकारण्यांशी आणि मंत्र्यांशी संबंध असल्याने त्यांचे नाव समोर येऊ नये, यासाठी खरातचा एन्काऊंटर करण्याचा कट रचला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाचे रहस्य काय? भोंदू अशोक खरातच्या नादी लागू कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? असा तिखट सवाल शरद पवार गटाने या प्रकरणी सुनील तटकरेंना केला आहे. भोंदू अशोक खरात व त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची शरमेने मान खाली गेली आहे. या प्रकरणी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदू खरातच्या सांगण्यानुसार अनामिका कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर असेच आरोप केलेत. सुनील तटकरेंनी आपल्या हाताचा अंगठा अशोक खरातच्या सूचनेनुसार रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापला होता का? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. कुणी तर्जनी, तर कुणी अंगठा कापून घेतला विकास लवांडे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, अहो सुनील तटकरे साहेब तुमच्या फोटोमध्ये बोटाच्या जखमेचे रहस्य काय आहे? लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरातच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? कुणी तर्जनी कुणी अंगठा कापून घेतला आहे. काय भानगड कळत नाही. जरा खराखुरा खुलासा होऊ द्या साहेब. आपण ज्येष्ठ नेते आहात बिनधास्त बोला साहेब. त्या अशोक खरातची कॅप्टन फाईल असली तरी तुम्हाला कसली भीती? तुम्ही खरं खरं बोलाच. महाराष्ट्र वाट बघतोय. हिंदूत्ववादी संघटनांवरही साधला निशाणा विकास लवांडे यांनी यावेळी अशोक खरातच्या मुद्यावर मौन बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांवरही निशाणा साधला. लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात ज्याने हिंदू धर्मातील अनेक महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले , फसवणूक केली. अशोक खरात हा एकमेव नाही असे अनेक भोंदू बाबा महाराष्ट्रात आणि देशात आहेत जे सर्वसामान्य लोकांचे आणि महिलांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण करत असतात. मात्र या विषयावर आरएसएस परिवारातील तथाकथित हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, भिडेंचे धारकरी आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार नितेश राणे,आमदार संग्राम जगताप हिंदू जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहात की नाही? फक्त आरोपी परधर्मीय असेल तरच मोर्चे काढणार? उघडा डोळे बघा नीट, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर केले होते असेच आरोप दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर असेच आरोप केले होते. त्या एका पीडितेचा दाखला देत म्हणाल्या होत्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. त्याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे, असे अंधारे म्हणाल्या.
देशाच्या अर्थव्सवस्थेचे आणि रुपयांचे काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते, त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनता आमच्यासोबत उभी राहील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, ज्या पद्धतीने मविआचे सरकार महाराष्ट्रात अडीच वर्षे अन्याय करत होते, त्यांच पद्धतीने पश्चिम बंगालमधील सरकार सर्वसामान्य लोकांवर अन्याय करते. त्यामुळे यावेळी तिथे आमचे सरकार येणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची अवस्था ही उबाठासारखी होणार आहे. मंत्र्यांना सहआरोपी करा नवनाथ बन म्हणाले की, भोंदू बाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा अशी मागणी संजय राऊत करतात. हाच न्याय लावायचा असेल तर याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारे मविआ सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहआरोपी करायचे का? कारण त्यांनी दुष्काळाच्या काळात लोकांना पाणी नसताना या भोंदू बाबासाठी जीआर काढत भोंदू बाबासाठी पाणी उपलब्ध केले. 2003 मध्ये जर भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर 15 वर्षांनी मविआचे सरकार आले त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हा या भोंदूबाबावर कारवाई करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. पण देवाभाऊंचे सरकार आल्यावर या भोंदू बाबावर कारवाई करण्यात आली आहे. मिलींद नार्वेकर, उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे का? या प्रश्नाचे राऊतांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे. ..म्हणून राऊत बैठकीपासून दूर नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे सामना जोरात सुरू आहे. यामुळेच आज उबाठा गटाच्या खासदारांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आलेली असताना राऊत त्या बैठकीपासून दूर राहत दांडी मारणे पसंत केले आहे. कारण राऊत VS आदित्य ठाकरे सामना जोरात सुरू आहे. हे सुरू असताना राऊत आमदार आणि खासदारांच्या निधीबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. उबाठा गटात सुद्धा दोन गट पडले आहेत.तुमची सत्ता असताना आमच्या 105 आमदारांना निधी देण्यात येत नव्हता. 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले त्यामुळे राऊतांनी निधीबद्दल बोलूच नये.
श्रद्धेच्या नावाने महिलांच्या अब्रुशी खेळणाऱ्या ढोंगी अशोक खरात विषयी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या लबाड अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक केली. त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका विवाहित विद्यार्थिनीने या भोंदू बाबाच्या कू कृत्याचा पर्दाफाश केला आहे. या 24 वर्षीय विद्यार्थिनीने जे सांगितले ते अक्षरशः अंगावर शहारे आणणारे आहे. पीडित विद्यार्थिनीने एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ती आपल्या पतीसोबत भोंदू अशोक खरातचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेली होती. तिथे अशोक खरातने तिचे दोन्ही हात पाहून तिच्या लग्नाला कुणाची तरी नजर लागल्याचे सांगून ती काढण्याची गरज व्यक्त केली. असे केले नाही तर सदर महिलेच्या जिवाचे काही बरेवाईट होऊ शकते अशी पुस्तीही त्याने जोडली. त्यामुळे सदर दाम्पत्य घाबरले. त्यांनी खरातकडे यावर उपाय सांगण्याची विनंती केली. त्यानुसार, खरातने त्यांना प्लास्टिकच्या एका बाटलीत पाणी देऊन ते 3 दिवस बेडरूममध्ये ठेवण्यास सांगितले. या 3 दिवसांत हे पाणी काळे झाले तर नजर दूर होईल असे समजा असे तो म्हणाले. जेवढे पाणी पिले तेवढा जास्त फायदा इतरांकडून अशोक खरातविषयी चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर, त्या जोडप्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर, बाबांनी त्या महिलेच्या पतीला खोलीबाहेर पाठवले आणि त्या महिलेला दरवाजा बंद करण्यास सांगितले. मग त्यांनी तिला एका तांब्याच्या भांड्यातून पिण्यासाठी पाणी दिले. त्या पाण्याची चव खारट व कडवट होती. ते पाणी पिल्यानंतर त्या महिलेला चक्कर येऊ लागली. मळमळल्यासारखे वाटू लागले. तिने तशी गोष्ट खरातला सांगितली. त्यावर तो तिला म्हणाला की, ती जितके जास्त पाणी प्राशन करेल, तेवढेच अधिक चांगले परिणाम मिळतील. त्यानंतर, त्याने त्या महिलेला डोक्यावर एक काचेचा ग्लास ठेवून व डोळे बंद करून गायत्री मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्या महिलेने त्याने सांगितले तसे केले. मात्र, त्याच क्षणी भोंदू अशोक खरातने खोलीतील लाईट बंद केली. त्यानंतर त्याने सदर विद्यार्थिनीला मागच्या बाजूने पकडून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. मी भगवान श्रीकृष्णाचा अवतार, तर तू 'राधा' आहेस असे सांगत, त्याने तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक कृत्य केले. पती-पत्नीचा जीव घेण्याची दिली धमकी या घटनेनंतर भोंदू खरातने त्या विवाहितेला धमकावले आणि सक्त ताकिद दिली की, तिने कुणाकडेही याबद्दल वाच्यता केली, तर तो तिचा व तिच्या पतीचाही जीव घेईल. त्यानंतर भोंदू बाबाच्या भीतीमुळे आणि लोकांच्या त्याच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे त्या महिलेने ही बाब दीर्घकाळापर्यंत गुप्तच ठेवली. त्यानंतर, त्या महिलेने एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. अशोक खरातने तिला सांगितले होते की, प्रत्येक परीक्षेपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी त्याला भेटणे अनिवार्य आहे; अन्यथा, तो तिचे सर्व गुपित तिच्या पतीला सांगेल आणि त्याला ठार मारून टाकेल. याच भीतीपोटी, ती विवाहित विद्यार्थिनी प्रत्येक वेळी त्याला भेटण्यास जात राहिली. 2-23 ते डिसेंबर 2025 या कालावधीत भोंदू खरातने तिला अनेकदा आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. चालू महिन्यात विवाहितेच्या एका नातेवाईकाने तिला सांगितले की, अशोक खरात हा एक ढोंगी बाबा असून, तो नेमक्या याच पद्धतीने महिलांचे शोषण करतो. सुरुवातीला ती महिला खूपच भयभीत झाली होती; मात्र, आपल्या नातेवाईकाच्या पाठिंब्यामुळे तिला धीर मिळाला. तिने पुढे येण्याचे धाडस केले आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर, 17 मार्च रोजी त्या महिलेने नाशिक शहर पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आणि त्याच आधारावर पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 29 एप्रिल रोजी निकाल घोषित केला जाईल. संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगचा नवीन कारभारी कोण असेल, याकडे आता संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. राजकीय हालचाली पाहता, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सध्या गावात सक्रिय असून, त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध करून गावकऱ्यांकडून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहिली जाणार, की त्यांच्या वारसदारा विरोधात अन्य कोणी उमेदवार उभा राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, 7 ते 13 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार असून, 15 एप्रिल रोजी या अर्जांची छाननी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी 17 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली असून, या सर्व प्रशासकीय प्रक्रियेनंतर 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडेल आणि 29 एप्रिल रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन गावाचा नवा कारभारी कोण, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुखांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. एका कंपनीकडून होणाऱ्या खंडणी वसुलीला विरोध केल्यामुळेच ही हत्या झाल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 27 फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा न्यायालयात 1200 हून अधिक पानांचे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केले असून, यामध्ये देशमुख यांची हत्या आणि त्याशी संबंधित अन्य दोन प्रकरणांचा तपशीलवार समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, मेष केदार, सिद्धार्थ सोनावणे, सुधीर सांगले आणि प्रतीक घुले या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
महाराष्ट्राची भूमिका ही कायम पुरोगामी राहिलेली आहे. राज्यात जर अशी भोंदूगिरी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असेल तर त्या भोंदू बाबांच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी केली पाहिजे, त्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, अशोक खरातांचे काय प्रकरण होते हे आम्हाला माहिती नाही हे सांगणे म्हणजे त्या प्रकरणातून पळवाट काढणे आहे. या प्रकारचा पहिला गुन्हा त्यांच्यावर 2003 मध्ये दाखल झाला आहे. एका वृत्तपत्राने यार बातम्या केल्या तर त्या पत्रकारांना धमक्या देण्यात आल्या. 2003 मध्ये गुन्हा दाखल झाला 2005 मध्ये माहिती समोर आली तरीही मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे जात असतील, पायावर डोके ठेवत पुजा करत असतील तर त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे. नाशिक पोलिस आयुक्तांवर विश्वास संजय राऊत म्हणाले की, खरात प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णे हे सक्षम अधिकारी आहेत. या प्रकरणात कुणाचेही नाव आले तर त्यांना सोडण्यात येणार नाही, मला नाशिक पोलिस आयुक्तांवर खात्री आहे. अन् तो गट आमच्यातून बाहेर पडला संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकर यांच्यावर विश्वास ठेवू नका. ते आमच्या सरकारमध्ये होते ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये पळून गेले हे जरी खरे असले तरी या गोष्टीचा छंद असणाऱ्या लोकांचा एक गट तयार झाला आणि ते आमच्या पक्षातून बाहेर पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करता यावा म्हणून राष्ट्रपती शासन लावण्याचे प्रयत्न करत आहेत. युद्धात आपले प्रचंड नुकसान संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात आतापर्यंत हजारो बॉम्ब पडले आहेत. त्यातून धुराचे, आगीचे लोळ निघाले. तेल विहिरी जाळण्यात आल्या. त्यातून तेहरानचे आकाश काळेकुट्ट झाले व अॅसिडचा पाऊस पडू लागला. हे विषारी काळे ढग भारताच्या आकाशात पोहोचतील अशी भीती आहे. बॉम्ब न पडताही आपले प्रचंड नुकसान त्यात होईल!
मुंबईनाक्यावरील भाभानगरला 16 जुलै 2000 रोजी उभारण्यात आलेल्या 10 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभातून वितरीत होणाऱ्या पाण्याच्या वाहिन्यांना, व्हॉल्व्हला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यामुळे जलकुंभाच्या खालीच अत्यंत गलिच्छ असे डबके साचले आहे. त्याच घाण पाण्यता व्हॉल्व्ह असून, तोच सोडल्यानंतरच परिसरातील 10 हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. अत्यंत दूषित पाणी पोहोचत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आहे. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. जलकुंभाजवळ पिण्याचे पाणी सोडण्यासाठी आठ ठिकाणी व्हॉल्व्ह आहेत. शेजारीच महिला रुग्णालयाचे काम सुरू असून, तेथेही पाण्याच्या तळ्याखाली मोठा व्हॉल्व्ह गेलेला आहे. जलकुंभाच्या वाहिन्या व व्हॉल्व्हच्या गळतीमुळेच तेथे तळे साचले आहे. या साचलेल्या पाण्यात मद्याच्या रिकाम्या बाटल्या, चपला, जुने कपडे, प्लास्टिक आणि सडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच पडला आहे. हेच दुर्गंधीयुक्त पाणी जलवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. आजार वाढले या पाण्यामुळे कॉलरा, टायफॉइड आणि गॅस्ट्रोसारख्या जलजन्य आजार जडण्याची भीती वाढलेली असतानाही महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग या गंभीर प्रकाराबाबत पूर्णपणे ‘अनभिज्ञ’ असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांना पाणी पाजणार अधिकारी अद्यापही प्रशासकीय राजवटीतून बाहेर पडलेले नाहीत. महापालिकेने तातडीने या ठिकाणची स्वच्छता करून व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत अन्यथा त्यांना तेच पाणी पाजणार. - सीमा पवार, नगरसेविका थेट प्रश्न रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, मनपा Q : व्हॉल्व्हमधून गळती होतेA- व्हॉल्व्हच्या वाहिन्यांना मोठा प्रेशर असतो. त्यामुळे तेथे पाणी गळती होतेच आणि पाणी बाहेर साचते.Q : पण भाभानगरच्या जलकुंभाखाली डबकं झालंयA- व्हॉल्व्हमधून बाहेर आलेले पाणी पुन्हा जलवाहिन्यांमध्ये जात नाही. साचलेले पाणी स्वच्छच असते.Q : दूषित पाणी पुरवठा होतोय?A- तशा तक्रारी आलेल्या नाहीत.
अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदानंतर आता चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले? रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्वाच्या बाबी मला माहित असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे: 1) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरूद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे. 2) दि.29/12/2025 रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे. 3) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली चाकणकर यांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून मत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.
देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत 25 व्या स्थानावरून थेट टॉप-10 मध्ये झेप घेण्याचे उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने ठेवले असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. इंदूर आणि सुरतसारख्या शहरांच्या तुलनेत संभाजीनगरचे कचरा संकलन आणि वर्गीकरण 60 ते 70 टक्क्यांवर अडकले आहे. प्रशासनाने कचरा प्रक्रियेत 60% यश मिळवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात तो केवळ खतनिर्मितीपर्यंत मर्यादित आहे. इंदूरसारखे उत्पन्न देणारे बायो-सीएनजी किंवा सुरतसारखे वेस्ट-टू-एनर्जी (शुद्ध करून पाणी विक्री) प्रकल्प अद्यापही शहरात कार्यान्वित झालेले नाहीत. शहरात दररोज सुमारे 400 मेट्रिक टन कचरा जमा होतो, मात्र त्यापैकी 60 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते. प्रकल्पांतून खतनिर्मिती केली जाते. दुसरीकडे, इंदूर आणि सुरतसारखी शहरे कचऱ्यापासून वीज, इंधन आणि पेव्हर ब्लॉक बनवून वर्षाला 100 कोटींहून अधिक महसूल मिळवत आहेत. जोपर्यंत शहरात एमआरएफ सेंटर आणि सांडपाणी पुनर्वापराचे मोठे प्रकल्प उभे राहत नाहीत, तोपर्यंत केवळ कागदी घोडे नाचवून टॉप 10 चे स्वप्न पूर्ण होणे कठीण आहे. शहरात उघड्यावर कचरा दिसणार नाही मनपा पदाधिकारी, प्रशासन आणि नागरिक या सर्वांनी संयुक्तपणे शहर स्वच्छता मनावर घेणे अत्यावश्यक आहे. मागील सर्वेक्षणात आपण ज्या ठिकाणी कमी पडलो होतो त्याची पूर्तता करत आहोत. येत्या काळामध्ये शहरात उघड्यावर कचरा दिसणार नाही. कचरा प्रोसेसिंगमधून उत्पन्न कसे मिळेल याकडे आपली वाटचाल सुरू आहे. -जी. श्रीकांत, मनपा आयुक्त. लीगसी वेस्ट पूर्णपणे नष्ट करणे गरजेचे शहरासह नारेगाव, पडेगाव आदी जुन्या कचरा डेपोंवर साचलेला वर्षांनुवर्षांचा कचरा 100% नष्ट करणे आवश्यक आहे. टॉप 10 मध्ये येण्यासाठी शहरात कुठेही कचऱ्याचा डोंगर दिसता कामा नये. लोकसहभाग, वर्तणूक बदल करणे गरजेचे “माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे स्वीकारत नाही तोपर्यंत केवळ मनपाच्या यंत्रणेवर टॉप 10 मध्ये येणे कठीण आहे. थुंकणे, उघड्यावर कचरा टाकणे यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची गरज आहे. कृष्णा भोगे, माजी मनपा आयुक्त सार्वजनिक, वैयक्तिक स्वच्छतकडे लक्ष द्यावे शहर हागणदारीमुक्त असले तरी प्रसाधनगृहांची स्वच्छता, देखभाल आणि गुगल मॅपवर त्यांचे लोकेशन अपडेट असणे याला सर्वेक्षणात महत्त्व आहे. शहराला 7-स्टार कचरामुक्त मानांकन मिळवणे उद्दिष्ट ठेवावे. लोकसहभागातूनच शहर टॉप टेनमध्ये आणणे शक्य 100% वर्गीकरण : टॉप टेनमधील शहरांमध्ये नागरिक स्वतःहून कचरा 6 वेगवेगळ्या प्रकारांत (ओला, सुका, घातक, इलेक्ट्रॉनिक, सॅनिटरी आणि कचरा) विभागतात. संभाजीनगरमध्ये अनेक भागांत ओला आणि सुका कचरा संकलित करताना तो एकत्रित होतो. प्रत्येक घरातून 100% वर्गीकरण करून घेणे हे आव्हान आहे. सांडपाणी प्रक्रिया स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य आहे. शहरातील पूर्ण क्षमतेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणे आणि प्रक्रिया केलेले पाणी विकून उत्पन्न मिळवणे हे एक तांत्रिक आव्हान आहे. मनपाने छोटी प्रक्रिया केंद्रे जागोजागी सुरू केली आहेत, त्याचा किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कचऱ्यातून उत्पन्न इंदूर आणि सुरतसारखी शहरे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून कोट्यवधींचे उत्पन्न मिळवतात. संभाजीनगर शहरात खतनिर्मिती होते, परंतु बायो-सीएनजी किंवा वेस्ट-टू-एनर्जी, सी अँड वेस्ट सारखे मोठे प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक आहे. मनपाने सी अँड डी वेस्ट सारखे उभारणी सुरू केली आहे. याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे.
अवैध गर्भपात:यूट्यूबवर शिकून वॉर्डबॉयने केली लिंगनिदानाची चाचणी, डॉ. सोनवणेचे दोन खास हस्तक अटक
नारेगाव भागात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी शनिवारी (21 मार्च) पिसादेवी भागात सापळा रचून मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे याच्या दोन खास हस्तकांना अटक केली. राहुल माणिकराव झोंड (28, रा. मयूर पार्क), सोमनाथ परसराम बारसे (31, रा. कमळापूर, वाळूज) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी राहुल केवळ बारावी उत्तीर्ण असून, तो यूट्यूबवरून लिंगनिदान करण्याचे शिकला होता. या टोळीतील सदस्य व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात होते. एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सेामनाथ जाधव, सहायक निरीक्षक कैलास लहाने यांनी सापळा रचला. पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला डमी पेशंट बनवून आरोपींशी संपर्क साधला. गर्भपात करायचा आहे, असे आरोपींना सांगितले. त्यावर आरोपीने 14 हजार रुपयांत तपासणी करण्यात येईल, असे सांगितले. पोलिसांनी होकार देताच आरोपी पिसादेवीला आले अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकले. आरोपी राहुल झोंड आणि सोमनाथ बारसे शनिवारी कारमधून येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडले. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी ‘प्रोब’ आणि एक टॅब आणि एक कार जप्त कोली आहे. ही कारवाई गणेश डोइफोडे, देविदास काळे यांच्या पथकाने केली. डॉ. सोनवणे, सपकाळच्या मागावर पोलिस या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे आणि महालॅब कर्मचारी महिलेचा पती सपकाळ हे दोघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सपकाळ हा या साखळीतील महत्त्वाचा दुवा असून तो आणि डॉ. सोनवणे मिळून हे रॅकेट चालवत होते. पोलिस आता या दोघांच्या मागावर असून त्यांच्या अटकेनंतर शहरातील अनेक बड्या रुग्णालयांचे आणि लॅबचे धाबे दणाणले आहे. रॅकेटचा मास्टरमाइंड डॉ. सोनवणे, महालॅब कर्मचाऱ्याचा पती पसारच मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणेच्या टोळीत आरोपी राहुल झोंड आणि सोमनाथ बारसे हे दोघे काम करत होते. सोनवणेला पोलिसांनी अटक केली आणि हर्सूल जेलमध्ये पाठवले. त्या वेळी या दोघांनी त्याच्याकडे असलेले ‘प्रोब’ स्वत:कडे घेतला. बाहेरील काम पाहण्यासाठी त्याच्याकडे विदेशी ‘प्रोब’ सोपवला. राहुल झोंड शहरातील एका नामांकित रुग्णालयात वॉर्डबॉय आणि ओटी असिस्टंट म्हणून काम केल्याने त्याला वैद्यकीय क्षेत्राची जुजबी माहिती होती. उर्वरित ज्ञान त्याने यूट्यूबवरून मिळवले. सोमनाथ बारसे दहावी उत्तीर्ण असून तो डॉ. सोनवणेचा जुना चालक आहे. टॅब हाताळणे आणि लोकेशन शोधण्यात तो पटाईत आहे.
जायकवाडी प्रकल्पाची सिंचन क्षमता 1 लाख 84 हजार हेक्टर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सिंचनात घट झाली आहे. 2024-25 वर्षातील खरीप, रब्बी आणि उन्हाळी सिंचनाच्या अहवालातून जायकवाडी प्रकल्पासंदर्भातील वास्तव समोर आले आहे. या अहवालानुसार, केवळ 54,592 हेक्टर क्षेत्रापर्यंतच (30 टक्के) नाथसागराचे पाणी पोहोचले आहे. कालव्याची दुरवस्था, नादुरुस्त झालेल्या वितरिका, अपुरे मनुष्यबळ आणि सिंचन व्यवस्थापनाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फटका शेतीला बसला आहे. कालव्यांची दुरवस्था झाल्यामुळे गेल्या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जायकवाडीत सुमारे 32 टक्के उपयुक्त साठा वापराविना शिल्लक होता. जायकवाडीचा डावा कालवा 208 किमीचा असून, त्याद्वारे 1 लाख 42 हजार हेक्टर सिंचन होते. डाव्या कालव्याच्या 1,350 किमीच्या चाऱ्या 90 टक्क्यांपर्यंत खराब झाल्याचे अहवालात उघड झाले आहे. 750 कोटींचा कालवे दुरुस्तीचा प्रस्ताव लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे महामंडळाने पाठवला असून अद्याप त्यासाठी निधी मिळालेला नाही. 14 दिवसांची पाणीपाळी 30 दिवसांवर जायकवाडीच्या कालव्याच्या केलेल्या सर्वेक्षणात कालव्यांच्या पीसीबी (प्लेन सिमेंट काँक्रीट) लायनिंग सुमारे 90 टक्के उखडल्या आहेत. त्यामुळे पाणी सोडताना वहनव्यय 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने 14 दिवसांची पाणीपाळी 30 दिवसांवर गेली आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्याची क्षमता 3600 क्युसेक आहे. प्रत्यक्षात सध्या 1800 क्युसेक पाणी वाहून नेले जाते. कालव्यामुळे 40 % नुकसान कालवे खराब झाल्यामुळे 40% नुकसान होत आहे. कालवा, चारी नादुरुस्तीमुळे सिंचन घटले आहे. कालवे दुरुस्तीचा 750 कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. - संतोष तिरमनवार,कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ दुर्लक्षाचा फटका डावा कालवा पूर्णपणे खराब झाल्यामुळे, व्यवस्थापनाकडे सतत दुर्लक्षामुळे सिंचन 30 टक्क्यांवर आले आहे. कालवा, वितरिकांची दुरुस्ती गरजेची आहे. त्याचबरोबरच कालवा आधुनिकीकरण गरजेचे आहे. त्यामुळे धरणात पाणी उपलब्ध असूनही सिंचन क्षेत्राला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यासाठी एकूण 3,500 कोटींचा पूर्ण प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. - जयसिंह हिरे, जल अभ्यासक सिंचन नियोजनाचा परिणाम गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी सांगितले की, पाण्याचे वाटप करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी पाणी भरल्यानंतर ते योग्य प्रमाणात वितरित झाले की नाही हे पाहण्यासाठी योग्य नियोजन अपेक्षित आहे. मात्र ते होत नाही. सिंचन अहवालातील स्थिती (2024-25)डावा कालवाखरीप 506रब्बी 18,540उन्हाळी 10,867दुहंगामी 2,984बारमाही 16,117एकूण सिंचन 49,114उजवा कालवासिंचन 5,478
अशोक खरात सारख्या भोंदूंवर आरोप सिद्ध झाले तर भर चौकात गोळ्या घालाव्यात, असे विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीसाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. अशोक खरात हा किती विकृत होता याची संपूर्ण माहिती आता उघड झाली आहे. तसेच त्याच्या नावावर असलेली बेनाम संपत्ती देखील समोर आली आहे. तसेच महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सर्वच स्तरातून होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकरांशी संवाद साधत असताना कालीचरण महाराज यांना धर्माच्या नावावर पैशांचा बाजार सुरू असल्याबद्दल विचारणा केली, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, बाजार सगळीकडे आहे. वकील पैसे घेतात, डॉक्टर पैसे घेतात, मजूर पैसे घेतात. मग धर्माचे कार्य करणाऱ्यांनी पैसे घेऊ नये, असा काही नियम आहे का? धर्माचे कार्य करणाऱ्यांनाही मानधन दिले जाते. त्यात दोष नाही. दोष तेव्हा निर्माण होतो जेव्हा लोकांना ठगले जाते. जो लोकांना ठगतो तो नरकात जाणार आहे. जे लोक कूकर्म करत आहेत ते नरकात जाणार आहेत. त्यांना शासकीय दंडही मिळणार, असे त्यांनी म्हटले आहे. भर चौकात गोळी मारली पाहिजे पुढे बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, स्वयंघोषित कोणताही महाराज नाही. लोक त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा. लोकांनी महाराज केलेला आहे. लोकांनी पूजनीय पदावर बसवले असेल आणि त्या पदावरुन दुरोपयोग होत असेल, कूकर्म होत असेल, किंवा धर्म कलंकीत केले जात असेल तर ते लोक महापापी आहेत. जे लोक अशा कूकर्मात अडकले आहेत, त्यांचे गुन्हे सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात गोळी मारली पाहिजे, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांना नरकात भोगावे लागेल पैशांची लूटमार, भीती दाखवून लुटणे असेल, लैंगिक शोषण, अत्याचार असेल हे कूकर्म आहेत. त्यांना नरकात भोगावे लागेल आणि राजाकडूनही दंड मिळेल, असे कालीचरण महाराज म्हणाले. पुढे ते म्हणाले की, जे प्रतिष्ठित साधू, संत आहेत, ज्यांमागे खूप मोठा जनसमुदाय आहे. अशा साधूच्या मागे लागलो तर त्यांचे शिष्य आपल्याला मतदान करतील, असे राजा लोकांना वाटते. राजाची ही सामान्य इच्छा आहे. प्रत्येक सामान्य राजाला असे वाटते. अशा साधू लोकांना राजा लोक सन्मान देतात. पण तो भ्रष्ट निघाला तर राजा लोक त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या 5 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याने भाजपला सत्ता मिळाली आहे. यात भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष. त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री कालपासून विनाकारण आकांडतांडव करत आहेत. मागेपुढे पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि पोलिसांची हरेसमेंट करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. चौकात पोलिस दिसला नाही तर त्याला सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जातात. साक्षात पोलिस अधीक्षकांशी बोलताना सुद्धा ते एखाद्या घरगड्याशी बोलल्यासारखे वागतात, हे अत्यंत निंदनीय आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांची ही निवडणूक होती, त्यात पालकमंत्र्यांना आत जाण्याची काय गरज होती? जिलहा परिषदेच्या इतिहासात आजवर कधीही अशा पद्धतीने बैठक लागली नव्हती, मग कालच ती कशी लागली? असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, ज्या सदस्यांवर 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांना पालकमंत्री स्वतः हाताला धरून आत कसे घेऊन जाऊ शकतात? हा गुन्हा कोणी दाखल केला आहे, हे मीडियाला त्यांनी का सांगितले नाही? जर तुमचं तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता, तर त्यांना 45 दिवस डांबून का ठेवले होते? गाडीतून उतरवून त्यांना जबरदस्ती हाताला धरून नेणे ही लोकशाही आहे का? असे अनेक प्रश्न जयकुमार गोरे यांनी उपस्थित केले. पाटण आणि वाईमध्ये काय चालले आहे हे जनतेला माहीत आहे. लक्षात ठेवा, जे पेरले ते कधीतरी नक्कीच उगवते, असा थेट इशारा गोरे यांनी शंभूराज देसाई तसेच मंत्री मकरंद पाटील यांना दिला आहे. दरम्यान, सातारा जिलहा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे 27 सदस्य विजयी झाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 20, शिवसेना शिंदे गटाचे 15, कॉंग्रेसचा एक, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्य विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष विजयी झाला होता.
जिल्ह्यात शनिवारी ठिकठिकाणी रमजान ईद उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि धार्मिक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. समाजात प्रेम, शांतता आणि बंधुत्व टिकवण्याचा संदेश दिला. रमजान ईदनिमित्त विविध सािहत्याने बाजार पेठ फुलली. नवीन कपडे, सुगंधी अत्तर, शेरवानी कुर्ते, महिलांसाठी हिजाब, पारंपरिक पेहराव खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थही तयार करण्यात आले. दरम्यान इद २१ मार्च रोजी साजरी होणार असल्याचे कच्छी मस्जिद, अकोलाचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सकाळपासून महानगरातील सर्व मशिदी आणि ईदगाहांमध्ये नमाजासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि सर्वत्र ईदचा आनंद दिसून आला. मुस्लिम समाजात ईद-उल-फितरचा सण धार्मिक उत्साह आणि बंधुत्वाच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्व मशिदी आणि ईदगाहांमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून अल्लाहचे आभार मानले. बोरगाव मंजू | येथे मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फितर उत्साहात (रमजान ईद) साजरी केली. राष्ट्रीय एकात्मता तथा बंधुभावाच्या वातावरणात पार पडली. जगात शांती व अमन रहावे, यासाठी प्रार्थना केली. मौलाना सय्यद शफकत यांनी इस्लामी शिकवणीवर विचार व्यक्त केले. मौलाना जहीर यांच्या इमामतीखाली सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे ईदची नमाज अदा केली. तसेच देशात शांतता, सलोखा व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर मौलाना जहीर साहेब यांनी खुतबा देत आपसी ऐक्य, बंधुभाव आणि गरजूंची मदत करण्याचा संदेश दिला. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांच्या गळाभेटीने ईदच्या शुभेच्छा देत प्रेम व सौहार्दाचा संदेश दिला. प्रसंगी शहरातील नागरिकांनी आपल्या घरात पारंपरिक पदार्थ जसे सेवई, शीरखुर्मा इत्यादी पदार्थ स्वाद घेऊन सणाचा आनंद साजरा केला. ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दोन वेळा झाली जमात अकोल्यातील ऐतिहासिक कच्छी मशिदीत ईद-उल-फितरच्या दोन नमाज आयोजित करण्यात आल्या. पहिली जमात सकाळी ८.४५ वाजता मुफ्ती मोहम्मद सादिक अख्तर रझवी मरकझी यांच्या इमामतीत झाली, तर दुसरी जमात सकाळी ९.४५ वाजता नायब इमाम मौलाना आरिफ रजा यांच्या इमामतीत पार पडली. गरजंूना मदत करावी कच्छी मशिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी सर्व नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देत सांगितले की ईद-उल-फितर हा सण संयम, त्याग, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देतो. सर्वांनी धर्म, जात आणि पंथ यापलीकडे जात गरजूंना मदत करावी. तसेच समाजात एकता दृढ करावी.

29 C