जळगाव जिल्ह्याचे राजकारण नेहमीच चर्चेत असते, मात्र यावेळी निमित्त ठरले आहे ते मंत्री गुलाबराव पाटील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाकयुद्ध. गुलाबराव पाटील यांनी नाथाभाऊंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते असूनही त्यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप पाटलांनी केला होता. त्यावर नाथाभाऊंनी 'खरं बोलायला काय हरकत आहे? होय, मी भाजपला मदत केली' असे म्हणत स्थानिक गणिते वेगळी असल्याचे स्पष्ट केले. गुलाबराव पाटील यांनी एका सभेत दावा केला होता की, नाथाभाऊंनी मला खूप त्रास दिला, त्याचीच फळं ते आता भोगत आहेत. यावर पलटवार करताना खडसे म्हणाले, मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं आहे, पण तो त्रास केवळ भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना आणि गुंडांना दिला आहे. अशा लोकांना जेलमध्ये टाकण्याचे काम मी केले आहे आणि पुढेही करत राहीन. गुलाबराव पाटील विसरले असावेत की त्यांच्या आमदारकीच्या काळात मी त्यांना मोठी मदत केली होती. ते अजून राजकीयदृष्ट्या खूप लहान आहेत. एकनाथ खडसेंची 'धक्कादायक' कबुली मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असूनही खडसेंनी भाजपचा छुपा प्रचार केल्याची चर्चा होती. गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा लावून धरला असता, खडसे यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. गुलाबराव एवढी वर्षे मंत्री आहेत, पण ते आपल्या गावची नगरपरिषद निवडून आणू शकले नाहीत, त्यांनी आधी आत्मचिंतन करावे. आणि हो, मी मुक्ताईनगरमध्ये भाजपला मदत केली, हे सत्य स्वीकारायला मला कोणतीही अडचण नाही, असे खडसे म्हणाले. वरणगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातील हा वाद सुरू असतानाच, गुलाबराव पाटलांनी खडसेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले राजेंद्र चौधरी यांचा पराभव झाला होता. त्यांना शिंदे गटाने स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने, त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकला. वरणगाव परिसरात खडसेंची मोठी पकड मानली जाते, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पक्षप्रवेशामुळे खडसेंसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच, धाराशिवमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांचे अधिकृत 'एबी फॉर्म' भाजप नेत्यांकडून वाटले जात असल्याचा गंभीर आरोप खुद्द शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच केला आहे. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप असून, संपर्कप्रमुख राजन साळवी आणि पदाधिकारी अविनाश खापे यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. येत्या ३ फेब्रुवारीला धाराशिव जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत फॉर्म (एबी फॉर्म) मिळणे अपेक्षित होते. मात्र, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील हे शिवसेनेच्या उमेदवारांना हे फॉर्म आणून देत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवसेनेचे निर्णय घेण्याचे अधिकार संपर्कप्रमुखांचे असताना भाजपचा हस्तक्षेप का? असा सवाल आता विचारला जात आहे. शिवसैनिक म्हणवून घेण्याची लाज वाटतेय व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये पदाधिकारी अविनाश खापे यांचा संताप स्पष्टपणे जाणवत आहे. त्यांनी राजन साळवी यांना थेट जाब विचारताना म्हटले की, दिवसभर आमच्यासोबत बैठका घेता आणि रात्री राणा पाटलांसोबत चर्चा करून त्यांचे सुपुत्र आम्हाला एबी फॉर्म वाटतात. या प्रकारामुळे आम्हाला आता शिवसैनिक म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली आहे. पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून भाजपच्या सांगण्यावरून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप या संभाषणातून समोर आला आहे. राजकारण सोडून घरात बसण्याची वेळ या गोंधळामुळे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते हतबल झाले आहेत. आम्ही तानाजी सावंत यांचे वैयक्तिक कार्यकर्ते नाही, पण जिल्ह्यासाठी ते गरजेचे आहेत. मात्र, सध्या जो गोंधळ सुरू आहे, त्यामुळे कार्यकर्ते रडत असून आता राजकारण सोडून घरात बसण्याची वेळ आली आहे, अशा तीव्र भावना खापे यांनी व्यक्त केल्या. धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असताना, पक्षाची ही स्थिती का झाली? असा संतप्त सवाल आता तळागाळातील शिवसैनिक विचारत आहेत. बालेकिल्ल्यात निकालावर होणार परिणाम? धाराशिव हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. इथला शिवसैनिक आक्रमक आहे, पण तो तितकाच स्वाभिमानीही आहे. जेव्हा मित्रपक्षाचा हस्तक्षेप वाढतो आणि स्वतःचे नेते हतबल दिसतात, तेव्हा निष्ठावंत कार्यकर्ता एकतर बंड करतो किंवा राजकारण सोडून शांत बसतो. तानाजी सावंत यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व जिल्ह्यात असतानाही, जर पक्षाच्या अंतर्गत व्यवहारात दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची 'मालकी' चालत असेल, तर आगामी निवडणुकीत मतपेटीतून या संतापाचा फटका बसण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
१० वीच्या विद्यार्थीची आत्महत्या
नागपूर : प्रतिनिधी राज्य महामंडळाची सर्वात महत्त्वाची मानली जाणारी इयत्ता १०वी आणि १२ वीची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जोमाने सुरू असून परीक्षेसाठी सज्ज होत आहेत. अशातच नागपुरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभ्यासाच्या तणावातून एका दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. मृत मुलीचे नाव रुद्राईंनी दीपक शेलकरी असे आहे. या घटनेनंतर […] The post १० वीच्या विद्यार्थीची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मकर संक्रांतीनंतर थंडी कमी झालेली पाहायला मिळते आहे. किमान तापमानात सतत होणा-या चढ उतारामुळे वातावरणातील गारठा काहीसा कमी झाला आहे. ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. २५ जानेवारी रोजी ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात मध्य […] The post राज्यातून थंडी गायब? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : प्रतिनिधी हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला जाताना २ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाग नदीवर झालेल्या भयंकर अपघातात दोघांचीही जागेवरच मृत्यू झाला. नागपूर-भंडारा महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अलिशा आणि मोनाली अशी अपघातात मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जाताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ […] The post नागपुरात अपघात; २ महिला ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दावोस दौऱ्यावरून राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यातील हजारो कोटींच्या सामंजस्य करारांवर (MoU) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नसल्याचे मान्य करतानाच, जर खरोखर 30 लाख कोटी रुपयांचे MoU झाले असतील, तर ती आनंदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, केवळ मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत, सत्य शेवटी समोर येतेच, असा इशाराही त्यांनी दिला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक आवश्यक असली, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले, किती गुंतवणूक आली आणि त्यातून किती रोजगारनिर्मिती झाली, याचा हिशोब सरकारने द्यावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मागील दावोस दौऱ्यात करण्यात आलेल्या MoU पैकी किती करार प्रत्यक्षात उतरले, यावर मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी, असे आवाहन करत, दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर स्थानिक उद्योगांशी करार करणे योग्य आहे का, यावरही त्यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना इव्हेंट नव्हे, तर पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रत्यक्ष रोजगार हवा आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. नेमके चव्हाणांची पोस्ट काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. मागील दावोस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दावोस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर डाव्होसमधेये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे.महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत.आत्तापर्यंतच्या डाव्होस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?
महाराष्ट्र कुणीही हिरवा करु शकत नाही. औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आला त्याने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला त्याने प्रयत्न केला, पण हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा महाराष्ट्र आहे, असे कितीही औरंगजेबाचे फॅन आले तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही, इथे औरंगजेब किंवा अफजल खान यांचा उदो-उदो चालणार नाही, इथे केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकारच चालेल हे जलील यांनी लक्षात ठेवावे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात बिहार भवन होत असेल तर संजय राऊत आणि कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच काम नाही. अयोध्येमध्ये आपले महाराष्ट्र भवन आहे. जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन सुरू होतंय, उद्या पाटण्यात ही महाराष्ट्र भवन सुरू होईल, संजय राऊत यांनी काळजी करू नये. ही सांस्कृतिक देवाण घेवाण नाही. भरत गोगावलेंनी भान ठेवावे नवनाथ बन म्हणाले की, काही स्थानिक नेत्यांनी युती केली नाही त्यामुळे शिवसेना-भाजप वेगवेगळे लढत आहे. जर भरत गोगावले असे म्हणत असतील की भाजपवर विश्वास नाही तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारले पाहिजे की भाजपवर विश्वास आहे का नाही. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आम्ही महायुतीम्हणून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहोत. भरत गोगावले यांच्या जिल्ह्यात विधानसभेच्या वेळी त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य केले होते.आमच्या कार्यकर्त्यांनी आपले काम केले त्यामुळे तुम्ही निवडून आला होतात. त्याच पद्धतीने शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांचे काम केले. एकमेकांना सहकार्य करण्याच्या विचारातून महायुती काम करते याचे भान भरत गोगावले आणि सर्वांनी ठेवले पाहिजे. मित्रपक्षावर कुणीही टीका करु नये नवनाथ बन म्हणाले की, निवडणूक आता संपलेली आहे त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप करणे काही योग्य नाही. प्रत्येकाने काम केल्याने महायुतीला राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी मोठे यश आले आहे.काही ठिकाणी थोड्या फार मताने पराभव होतो पण त्यामुळे कोणावर आरोप-प्रत्यारोप न करता आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. आता मागचा काळ पुन्हा येणार नाही. मुंबईकरांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. फडणवीस-शिंदे हे दोन्ही नेते महाराष्ट्राना पुढे नेत आहेत. राहुल गांधींकडून तरुणांचा अपमान नवनाथ बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये गेले तिथून मागच्यावेळी आणलेल्या गुंतवणुकीचे काम सुरू आहे, रोजगार निर्मिती झाली आहे. यावेळी देखील 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना याबद्दल आनंद वाटायला हवा. राहुल गांधी यांचे वक्तव्य काय करतात हे तुम्हाला माहिती आहे, ते तरुणांचा अपमान करतात त्याकडे चव्हाण यांनी लक्ष दिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात गुंतवणूक येत आहे.
मुंबईतील मध्यवर्ती असलेल्या परळ एसटी डेपोला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान डेपो परिसरात ठिकठिकाणी दारूच्या बाटल्या आढळल्याने मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. एसटी प्रवाशांच्या जिवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, दारू पिऊन कामावर आलात तर कोणाचीही गय न करता थेट निलंबन करण्यात येईल, असा जळजळीत इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला. एसटी डेपोतील पाहणी दरम्यान काही कर्मचारी नशेत असल्याचा संशय आल्याने सरनाईक यांनी प्रशासनाला कडक सूचना दिल्या. डेपोमध्ये तातडीने ब्रिथ अॅनालायझर मशीनचा वापर सुरू करावा आणि नशेत आढळणाऱ्या कर्मचाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत बसचे स्टेअरिंग हातात घेऊ देऊ नये, असे त्यांनी ठणकावून सांगितले. ड्रायव्हरची प्रकृती ठीक नसेल किंवा तो नशेत असेल तर अपघाताची शक्यता वाढते. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे, असे म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. स्वच्छतेच्या दुरवस्थेवर नाराजी डेपोमधील अस्वच्छतेवर बोलताना त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मंत्री येणार म्हणून केली जाणारी तात्पुरती स्वच्छता मला नकोय. प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत बिकट आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. डेपो परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे आणि प्रवाशांच्या सोयींसाठी बस फेऱ्या वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले असून, यावर प्रशासनाकडून लेखी उत्तरही मागवले आहे. संजय राऊतांवर टीका पाहणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राऊतांना रोज नवी स्वप्ने पडतात, त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीशांचे स्वागत करणे हा प्रोटोकॉलचा भाग असून त्यात गैर काहीच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. साळवींबाबत होणारे आरोप चुकीचे येणाऱ्या काळात आपण धाराशिव जिल्ह्याला प्रत्यक्ष भेट देणार असून, तिथे कोणतीही नाराजी नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राजन साळवी यांच्यावर होणारे आरोप चुकीचे असल्याचे सांगत, महायुतीच्या जागावाटपावरील चर्चा आता थांबवून सर्वांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष केंद्रित करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. हे ही वाचा… मालाड रेल्वे स्थानकात प्राध्यापकाची हत्या:धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून भोसकला धारदार चिमटा, CCTVच्या आधारे आरोपीला अटक मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान एका किरकोळ धक्क्याचे पर्यावसान प्राध्यापकाच्या हत्येत झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मालाड स्थानकातील फलाट क्रमांक १ वर शनिवारी रात्री विलेपार्ले येथील एन.एम. (NM) महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंह (३१) यांची हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपी ओंकार शिंदे (२७) याला वसई स्थानकातून अटक केली आहे. सविस्तर वाचा…
पूर्णा ते वसमत मार्गावर वाखारी शिवारात कालव्याच्या मार्गाने दुचाकीवर गांजा आणणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखा व वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन किलो 900 ग्राम गांजासह 1.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 24 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णा येथून एक तरुण त्याच्या दुचाकीवर गांजा घेऊन वसमतकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सदर तरुण मुख्य रस्त्याने न येता कालव्याच्या मार्गावरून येत असल्याचीही माहिती पोलिसांना होती. त्यावरून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार गजानन पोकळे, विजय उपरे, साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, आकाश टापरे, भुजंग कोकरे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे, शिवाजी चालमिरे यांच्या पथकाने पूर्णा ते वसमत मार्गावरील कालव्यावर ठिकठिकाणी दुचाकी वाहनांची तपासणी सुरु केली होती. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी एक दुचाकी थांबवली. दुचाकी वरील दोघांकडे असलेल्या साहित्याची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला. सदर गांजाचे वजन 3 किलो 900 ग्राम असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गांजा व दुचाकी वाहन असा 1.78 लाख रुपयांचा मु्द्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार गजानन पोकळे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात दुचाकी चालक आनंद गायकवाड, योगेश सुर्यवंशी (रा. पूर्णा, जि. परभणी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक बोराटे पुढील तपास करीत आहेत.
पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई परिसरात उघडकीस आली आहे. दागिने परत देण्याचा बहाणा करत पत्नीला भेटीस बोलावून पतीने तिच्यावर चाकूने वार करत तिचा खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला अटक केली आहे. नम्रता शैलेंद्र व्हटकर (वय 19) असे मृत विवाहितेचे नाव असून, शैलेंद्र प्रकाश व्हटकर (वय 30, रा. बकोरी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या हत्याप्रकरणी नम्रताचा मित्र शाहरुख दस्तगीर पठाण याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 2 वर्षांपूर्वी झाला होता विवाह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नम्रता आणि शैलेंद्र यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी नम्रता एका खासगी कंपनीत नोकरी करत असताना तिची ओळख शाहरुख पठाण याच्याशी झाली. पुढे या ओळखीचे जवळिकीमध्ये रूपांतर झाले. याची माहिती पती शैलेंद्रला मिळाल्यानंतर दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले. 2 महिन्यांपूर्वी सोडले घर या वादांना कंटाळून नम्रता गेल्या दोन महिन्यांपासून पतीचे घर सोडून शाहरुख पठाणसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र, तिचे सोन्याचे दागिने पती शैलेंद्रकडेच होते. दागिने परत मिळवण्यासाठी नम्रताने शैलेंद्रशी संपर्क साधला असता त्याने तिला वाडेबोल्हाई परिसरात भेटीस बोलावले. अन् त्याने वार केले 22 जानेवारी रोजी रात्री कामावरून परतल्यानंतर नम्रताने शाहरुखला दागिन्यांबाबतची माहिती दिली. त्यानुसार नम्रता, शाहरुख आणि त्यांचा मित्र हरिष हे तिघे रात्री साडेनऊच्या सुमारास वाडेबोल्हाई फाटा येथे पोहोचले. आरोपी शैलेंद्रने नम्रताला जोगेश्वरी शाळेच्या मागील बाजूस भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी शाहरुखला बाहेर थांबण्यास सांगून नम्रता एकटीच पतीकडे गेली. थोड्याच वेळात नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्याने शाहरुख त्या दिशेने धावला. त्यावेळी शैलेंद्र आपल्या पत्नीच्या गळ्यावर व चेहऱ्यावर चाकूने सपासप वार करत असल्याचे त्याने पाहिले. शाहरुखला पाहताच आरोपीने घटनास्थळी चाकू आणि स्वतःची दुचाकी टाकून तेथून पलायन केले. आरोपी पतीला अटक गंभीर जखमी अवस्थेत नम्रताला तातडीने वाघोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर लोणीकंद पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपी शैलेंद्र व्हटकर याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे वाडेबोल्हाई परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान एका किरकोळ धक्क्याचे पर्यावसान प्राध्यापकाच्या हत्येत झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मालाड स्थानकातील फलाट क्रमांक १ वर शनिवारी रात्री विलेपार्ले येथील एन.एम. (NM) महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंह (३१) यांची चाकू भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपी ओंकार शिंदे (२७) याला वसई स्थानकातून अटक केली आहे. प्राध्यापक आलोक सिंह हे शनिवारी रात्री विलेपार्ले येथून लोकल ट्रेनने मालाड येथे पोहोचले होते. मालाड स्थानकात गाडी थांबल्यावर उतरताना दरवाजाजवळ उभ्या असलेल्या ओंकार शिंदे याला त्यांचा चुकून धक्का लागला. या एका साध्या धक्क्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि ओंकारने संतापाच्या भरात आपल्याकडील चाकू काढून आलोक सिंह यांच्या पोटात खुपसला. सिंह रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीचा लागला पत्ता घटनेनंतर आरोपी ओंकार शिंदे तिथून पसार झाला होता. रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासचक्र फिरवले. स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपीची ओळख पटली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ओंकारला वसई रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. आरोपी ओंकार हा मालाड येथील कुरार व्हिलेजचा रहिवासी असून, त्याला सध्या बोरिवली पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. आरोपीकडे चाकू आधीपासूनच का होता? आणि हा वाद इतक्या टोकाला जाण्यामागे आणखी काही जुने वैमनस्य आहे का? या दिशेने आता पोलिस तपास करत आहेत. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर आता या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. यात आरोपी ओंकार हत्या केल्यानंतर पळून जाताना दिसत आहे. तो घाबरलेल्या अवस्थेत पळत आहे. त्या पाठीवर बॅग आहे. एवढ्या मोठ्या गर्दीत त्याने एका शिक्षकाची हत्या केली, तरीही त्याला कुणी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. याच फुटेजवरून पोलिसांनी आरोपी ओंकारचा माग काढला आणि १२ तासांच्या आत त्याला बेड्या ठोकल्या. रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण अवघ्या ३१ वर्षांच्या एका प्राध्यापकाचा अशा किरकोळ कारणावरून मृत्यू झाल्याने शैक्षणिक वर्तुळात आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी स्थानकावर अशा हिंसक घटना घडत असल्याने रेल्वे पोलिसांच्या गस्तीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
देशाचे मुख्य न्यायधीश यांच्याकडे शिवसेना कुणाची हा खटला 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. ते स्वत: तारीख देतात आणि दोन महिन्यांनी तारीख पुढे ढकलतात. या काळात शिंदे गटानेघटनाबाह्य पद्धतीने 4 निवडणूक लढवल्या आहेत. आता 21 तारखेचा तेच झाले. ते मुंबईत आले तर त्यांचे स्वागत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केले. त्यांचा खटला सुरू असलेले लोकं त्यांचे स्वागत करत आहेत हे संविधानाविरोधातील आहे, हे अनैतिक आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, देशाच्या न्यायव्यवस्थेवर असलेला लोकांचा विश्वास उडून जाईल. का आम्हाला न्याय देण्यात येत नाही हे काल सिद्ध झाले आहे. ज्यांचा खटला सुरू आहे त्यांच्याकडून सत्कार कसा स्वीकारला जाऊ शकतो. पाटण्यात महाराष्ट्रभवनसाठी जागा मागावी संजय राऊत म्हणाले की, बिहारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी आव्हानाची भाषा केलेली आहे. संविधानानुसार हा देश सर्वांचा आहे. प्रत्येकाला देशामध्ये कुठेही फिरणे, राहणे नोकरी करणे हे सर्व अधिकार दिलेले आहे हे आम्हाला माहिती आहे. मुंबईमध्ये बिहार भवन त्यांना कशासाठी बांधायचे आहे. पाटण्याचा आणि बिहारचा विकास त्यांनी केला पाहिजे. पण मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या लोकांची संख्या जास्त झालेली आहे, त्यामुळे त्यांना वाटते की इथे बिहार भवन उभारले पाहिजे. इतर राज्याची भवने मुंबई, नवी मुंबईत आहेत. मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी सरकारला त्यांना जागा द्यावी लागेल ना ती काही पाटण्याहून ते आणणार नाही. त्यासाठी सर्वपक्षांची एक बैठक घ्यावी लागेल, त्यात मुख्यमंत्र्यांनी सांगावे की मुंबईत बिहारभवनसाठी जागा देत आहोत. या बदल्यात त्यांनी बिहार सरकारकडे पाटण्यात 5 एकर जागा द्यावी तिथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मागणी करावी. मुंबईत जागा हवी असेल तर बाजारभावाने जागा घ्यावी. जर सरकारकडून हवी असेल तर पाटण्यात महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्यात यावी. मराठी माणसांचा अपमान करू नका संजय राऊत म्हणाले की, मुंबईची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. उगाच परिस्थिती बिघडेल अशी वक्तव्य कोणीही करू नये. गुलाबराव पाटील हे नकली शिवसेनेचे मंत्री आहेत त्यामुळे ते मराठी तरुणांबद्दल चुकीची भाषा वापरत आहेत. महाराष्ट्र जो घडवला आहे तो श्रमिक मराठी माणसांनी घडवला आहे. आज मुंबईमध्ये मराठी माणसाने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे मतदान केले आहे. आपल्या घामातून आणि रक्तातून त्यांनी मुंबई घडवली आहे. पण हे सर्वच नकली असल्याने त्याचे विचार सुद्धा नकली आहे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आहेत. त्यांच्या पक्षाच्या राज्याचे प्रमुख असलेल्या एकनाथ शिंदे यांना मराठी तरुण आळशी आहे, काम करत नाही हे मान्य आहे का? हे त्यांनी सांगावे मग आम्ही उत्तर देऊ. मराठी माणसांचा अपमान करू नका. लोढांनी टॉवरचे नाव बदलावे संजय राऊत म्हणाले की, मंगलप्रभाग लोढा यांच्याशी दावोसमध्ये जात एक एमओयू साइन केलेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की मुंबईतील केम रुग्णालय आहे, कंग एडवर्ड हा शब्द काढावा, ही भूमिका चांगली आणि राष्ट्रवादाची आहे. पण लोढा हे जगातील सर्वात मोठे बिल्डर आहेत ते ट्रम्प यांचे भागीदार आहेत. लोढा यांनी ट्रम्प टॉवर नाव बदलावे, त्यांचे नाव त्यांनी मोदी, बाळासाहेब ठाकरे, किंवा छत्रपती टॉवर करावे मग केमच्या विषयावर आम्ही चर्चा करू.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे अनेक दावे केले आहेत. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या (राज आणि उद्धव) युतीचे गुपित उघड केलेच, शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे भवितव्य अंधारात असल्याचे भाकीत वर्तवले आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत शिंदेंकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण राहणार नाही, त्यांच्या पक्षाचे शटर लवकरच डाऊन होईल, असे घाणाघाती विधान राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून ज्या भेटीची प्रतीक्षा होती, ती 'ठाकरे बंधूंची युती' नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने प्रत्यक्षात उतरली. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी एकत्रित ७१ जागा जिंकून महायुतीला तगडे आव्हान दिले. या ऐतिहासिक युतीची समीकरणे नेमकी कशी जुळली? यामागचा 'सुत्रधार' कोण? या सर्व प्रश्नांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सविस्तर आणि भावनिक भाष्य केले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची 'लव्हस्टोरी' ठाकरे बंधुंची युती घडवून आणण्यामागे आपला हात असल्याचा दावा संजय राऊत यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले, मी त्यांना एकत्र आणलं असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ठाकरे कोणाचंच ऐकत नाहीत. माझे दोघांशीही प्रेमाचे आणि आपुलकीचे संबंध आहेत. ती एका अर्थाने 'लव्हस्टोरी' आहे. जसा प्रेमात थोडा वेळ लागतो, तसंच या युतीचं झालं. दोघांच्याही मनात कौटुंबिक ओढ होती आणि शेवटी ती जुळली. युतीची सुरुवात नेमकी कुठून झाली? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा संपण्यासाठी राज ठाकरेंनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. एका मुलाखतीत राज ठाकरेंनी महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी मी दोन पावले मागे यायला तयार आहे, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. या विधानानंतर उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. मराठी माणसाला एकत्र पाहण्याची जनतेची इच्छा असल्याने हे चांगले संकेत असल्याचे मानून चर्चेची चक्रे फिरली. आधी मराठी माणूस, मग हिंदुत्व, या विचारावर दोन्ही भावांचे एकमत झाले. मराठीपण टिकले तरच हिंदुत्व टिकेल, या भावनेतून डिसेंबर महिन्यात युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. मराठी माणसाला एकत्र व्हायला पाहिजे, असे वाटत असताना आम्ही एकत्र आलो नाही, तर जनता आम्हाला माफ करणार नाही, याची जाणीव दोघांनाही होती. त्यामुळेच आज हे चित्र दिसत आहे, असे संजय राऊत म्हणाले. शिंदेंचा सत्तेचा अमरपट्टा लवकरच संपणार शिंदे गटावर टीका करताना संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर दावे केले. त्यांच्या मते, सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निकालानंतर निवडणूक आयोग 'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवेल. भारतीय संविधानातील १० व्या सूचीनुसार हे चिन्ह शिंदेंकडे राहू शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीशांना कितीही पुष्पगुच्छ दिले तरी त्याचा फायदा होणार नाही. अमित शाह यांनी त्यांना चालवायला दिलेल्या कंपनीचे शटर लवकरच डाऊन होईल. अशी स्थिती येईल की शिंदेंना आपला गट शेवटी भाजपमध्ये विलीन करावा लागेल. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही आणि २०२९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांच्याकडे पक्ष उरणार नाही, हे मी खात्रीने सांगतो. सुनावणी लांबणीवर पडण्यामागचे गौडबंगाल सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात असल्यावरही राऊत यांनी संशय व्यक्त केला. सुनावणीबाबत वारंवार तारखा दिल्या जात आहेत कारण त्यांना निकालाची भीती आहे. पण अखेर संविधानानुसारच निर्णय लागेल आणि शिंदे गटाला आपली ओळख गमवावी लागेल, असे राऊत यांनी निक्षून सांगितले. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी माणसाचे राजकारण बळकट झाले असून, भविष्यात हा 'ठाकरे ब्रँड' महाराष्ट्राचे राजकारण ठरवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मनसेने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या 'फोडाफोडीच्या बाजारा'बद्दल तीव्र शिसारी व्यक्त केली असताना, आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या युतीमागचे खरे गोम उघड केले आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणापासून आपले नगरसेवक वाचवण्यासाठी आणि पक्ष टिकवण्यासाठीच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपवर 'कपटी मित्र' अशी जहरी टीका केली आहे. राजू पाटील यांनी युतीचे समर्थन करताना भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, आमच्या नगरसेवकांना भाजपकडून सातत्याने फोन येत आहेत. खुलेआम फोडाफोडी सुरू आहे. माझे नगरसेवक फुटू नयेत आणि त्यांच्या राजकीय भवितव्याला न्याय मिळावा, ही माझी जबाबदारी आहे. भाजप आमचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महिला अध्यक्षांना फोडण्याचे काम करत असेल, तर हे ओळखण्यासाठी मी बालबुद्धीचा नाही. अशा कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधीही चांगला. सत्तेत नाही, केवळ बाहेरून पाठिंबा शिंदेसेनेशी केलेल्या युतीबाबत अधिक स्पष्टता देताना पाटील यांनी सांगितले की, आम्ही केवळ पाठिंबा दिला आहे, सत्तेत सहभागी झालेलो नाही. सत्तेत जायचे असेल तर स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो, तसे आम्ही काहीही केलेले नाही. हा निर्णय पूर्णपणे पक्षहितासाठी घेतला असून, याबाबत राज ठाकरे यांना आधीच कल्पना देण्यात आली होती. भाजपला मनसेच्या नैतिकतेवर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप प्रदेशाध्यक्षांना थेट टोला राजू पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. राजकारणात संधी सर्वांनाच मिळते, पण मैत्रीचे सोंग घेऊन पक्ष फोडण्याचे काम जे करत आहेत, त्यांना उत्तर देणे गरजेचे होते, असे त्यांनी ठणकावून सांगितले. केडीएमसीत मनसेच्या ५ नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे आता शिंदे गटाचे पारडे जड झाले असले, तरी या निमित्ताने भाजप आणि मनसेमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. राज ठाकरेंची 'ती' जळजळीत टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त षन्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर अत्यंत संताप व्यक्त केला होता. कल्याण-डोंबिवलीत जे काही सुरू आहे, त्याचा बाजार मांडला असून त्याची शिसारी येतेय. आज देशात आणि महाराष्ट्रात गुलामांचा बाजार भरला आहे. हे पाहून बाळासाहेब आज हयात नाहीत तेच बरे झाले, अन्यथा ते हे पाहून व्यथित झाले असते, अशा शब्दांत राज ठाकरेंनी फोडाफोडीच्या राजकारणाचा निषेध केला होता.
मनपा निवडणुकीत भाजपचे 102 पैकी 87 उमेदवार विजयी झाले. त्यापैकी 35 जण हे दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत. त्यामुळे आता महापौर, उपमहापौरपद, स्थायी समिती अध्यक्षपद, स्वीकृत नगरसेवकपदी आयात केलेल्यांची वर्णी लागणार की निष्ठावंतांना न्याय देणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांना पत्रकारांनी शनिवारीच हा प्रश्न विचारला असता त्यांनी आयाराम व निष्ठावंत असा भेदच राहिला नसल्याचे सुचित केले. गोरे म्हणाले, ‘आयाराम- गयाराम असा कुणाचाही उल्लेख करू नये. हे सर्व जण भाजपचे सदस्यत्व स्वीकारून निवडून आलेत. त्यामुळे त्यांच्याविषयी आदरपूर्वक बोलावे. साधन शुचिता पाळा.’ भाजपात आता महापौर, गटनेता निवडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी डफरीन चौकातील सारस्वत मंगल कार्यालयात नूतन नगरसेवकांची बैठक झाली. भाजपचे 87 नगरसेवक आहेत. मात्र शालन शिंदे या खून प्रकरणात सहभागाच्या संशयावरून कोठडीत आहेत. त्यामुळे 86 नगरसेवकच बैठकीस हजर होते. दोन्ही आमदार देशमुख मात्र या वेळी हजर नव्हते. नगरसेवकांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले,‘महापौर व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा निर्णय पक्ष पातळीवर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी या बाबत कुठेही प्रतिक्रिया देऊ नयेत. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व 86 नगरसेवकांना घेऊन जाऊन तिथे गटनोंदणी होणार आहे. बुधवारी(28 जानेवारी) रोजी दोन ट्रॅव्हल्समधून हे सर्व नगरसेवक एकत्रितच पुण्याला जातील व तिथे सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल,’अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, बुधवारीच भाजपचा गटनेता ठरेल व त्यांचे नाव आयुक्त कार्यालयात सादर केले जाईल. माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही आमदार देशमुख, किरण देशमुख गैरहजर... मनपा निवडणुकीत भरीव यश मिळाल्यानंतरही भाजपमधील अंतर्गत संघर्ष व मानापमान नाट्य संपलेले नाही. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, मनीष देशमुख हे प्रमुख नेते उपस्थित होते. शहरातील दोन ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख यांची मात्र गैरहजेरी होती. विशेष म्हणजे विजयकुमार देशमुख यांचे पूत्र व महापौरपदाच्या शर्यतीत असलेले नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली होती. घराणेशाहीचेही समर्थन... चांगला कार्यकर्ता असेल न्याय द्यावा लागेल घराणेशाहीच्या प्रश्नावर पालकमंत्री गोरे म्हणाले, ‘एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो चांगला कार्यकर्ता असेल, पक्षासाठी चांगले काम करत असेल तर त्याचे योगदान विसरून चालणार नाही. पण, डायरेक्ट अशा काही गोष्टी असल्यास ते पक्षाच्या शिस्तीत बसणारे नाही. आम्ही शक्यतो कार्यकर्त्यास न्याय देण्याचा प्रयत्न करतो’, अशी पुष्टीही गोरे यांनी जोडली. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपमधील घराणेशाही अशी... ‘आयाराम गयाराम’ शब्द 1967 पासून राजकीय चर्चेत, तो असंविधानिक नव्हे हरियाणातील गयालाल नामक एका आमदाराने 1967 मध्ये एकाच दिवसात तीन पक्ष बदलले होते. आधी ते काँग्रेसमधून राष्ट्रीय आघाडी पक्षात गेले. काही वेळात परत काँग्रेसमध्ये आले आणि नऊ तासांत पुन्हा राष्ट्रीय आघाडीत गेले. जेव्हा ते आघाडीतून काँग्रेसमध्ये आले होते तेव्हा काँग्रेसचे नेते राव वीरेंद्रसिंग हे गयालाल यांना पत्रकारांसमोर घेऊन आले आणि त्यांनी जाहीर केले की, ‘गयाराम आता आयाराम’ झाले आहेत. तेव्हापासून पक्षांतर करणाऱ्यांसाठी हा शब्द रुढ झाला आहे. मात्र हा शब्द असंविधानिक मानला जात नाही. गोरेंनी मोकळा केला कोंड्याल यांच्या महापौरपदाचा मार्ग मनपा निवडणुकीपूर्वी आमदार देवेंद्र कोठे व पालकमंत्री गोरे यांनी अनेक दिग्गज नेत्यांना भाजपात आणले. त्यापैकी 42 जणांना उमेदवारी दिली. 35 जण निवडून आले. या विजयी उमेदवारांमध्ये बहुतांश जण हे कोठे समर्थक आहेत. यापैकी एक विनायक कोंड्याल हे आमदार कोठे यांचे भाऊजी आहेत. चार वेळा नगरसेवक झाल्याने व यंदा सर्वाधिक लीडने निवडून आल्यामुळे महापौरपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र आयात नेत्यांना महापौर करायचे की निष्ठावंतांना? असा मतप्रवाह भाजपच्या प्रदेश पातळीपासून ते स्थानिक कार्यकर्त्यांपर्यंत चर्चेत आहे. कोठे यांचा कोंड्याल यांच्यासाठी आग्रह आहे. तर संघ परिवार व निष्ठावंतांकडून नरेंद्र काळे यांचे नाव पुढे केले जात आहे. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष निष्ठावंतांनाच न्याय देतील? अशी कार्यकर्त्यांना आशा आहे. मात्र पालकमंत्री गोरे यांनी आता कोंड्याल यांच्यावरील ‘आयाराम’चा शिक्का पुसून महापौरपदासाठी त्यांच्या पदरात आपले वजन टाकले आहे, असा राजकीय अर्थ काढला जात आहे.
नाशिकमध्ये स्वीकृतसाठी उद्धवसेनेत धुसफूस:सामान्य, निष्ठावान शिवसैनिकांऐवजी पदाधिकाऱ्यांतच चढाओढ
महापालिका निवडणूकीत उबाठा सेनेला 15 जागांवर यश मिळाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वाट्याला संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकाचे एक पद मिळणार आहे. हे पद सामान्य निष्ठावान शिवसैनिकाला मिळेल अशी अपेक्षा शिवसैनिकांमध्ये होती, प्रत्यक्षात मात्र हे पद पदरात पाडून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. मनपा निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या 10 टक्के या प्रमाणे स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती करता येते. यासाठी पक्षश्रष्ठी निर्णय घेत असतात. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत उबाठाला 15 जागा मिळाल्याने त्यांचा एक सदस्य स्वीकृत म्हणून येणार हे निश्चित झाले आहे. या पदासाठी निष्ठावान सैनिकांची नियुक्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून स्वीकृत नगरसेवकाचे पद आपल्याच पदरात पाडून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये व शिवसैनिकांमध्ये वाद सुरु झाले आहेत. या मुद्द्यावर पक्षाच्या अंतर्गत संघर्षामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यामुळे पदावरील नियुक्तीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे.आता हे पद कोणाला मिळेल यावर चर्चेला वेग आला असून महापौरपदाच्या निवडीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याने महापौर निवडीकडे लक्ष आहे. उबाठाचे 15 नगरसेवक विजयी झाले आहेत. निवडणूक प्रचारात केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा वगळता अन्य कोणी प्रचारासाठी फिरकले नाही. स्थानिक नेत्यांमध्येही जिल्हाप्रमुख स्वत:च उमेदवारी करीत असल्याने ते त्यांच्या प्रभागातच अडकले. तर उपनेते माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश यांच्या प्रचाराची संपूर्ण यंत्रणा राबवण्यात व्यस्त होते. त्यांनी काही उमेदवारांसाठी प्रचार फेऱ्यांमध्ये सहभाग घेतला असला तरी त्यांनाही पुरेसा वेळ देता आला नाही. त्यातच पक्षांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली होती. तशात उबाठाचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात एकट्या नाशिकरोड विभाागतच 10 नगरसेवक निवडून आले आहेत. उर्वरित शहरासह सिडकोतील आहेत. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद हे निष्ठावंत सैनिकाला ज्याने प्रचारात संपूर्ण यंत्रणा राबविली, प्रचारात सक्रीय भूमिका बजावली, अशांना द्यावे अशी मागणी होत आहे. तीन जणांचा दावा स्वीकृत नगरसेवक पदावर जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दावा केला आहे. त्यांच्या मते निवडणूक काळात त्यांनी पक्ष कामात स्वत:ला झोकून दिल्याने त्यांना प्रचारास वेळ मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी या पदावर दावा केला आहे. मुळात पक्षाने त्यांच्या सहत्यांच्या पत्नीला सिडकोतील प्रभाग क्रमांक 28 मधून उमेदवारी दिली होती. दुसरीकडे पक्षाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी स्वत:च्या मुलासाठी स्वीकृत नगरसेवक पदावर दावा केला आहे. गायकवाड यांनाही पक्षाने खासदारकीची उमेदवारी देत मोठी जबाबदारी सोपवलेली असतानाही त्यांचा दावा शिवसैनिकांना मान्य नाही. या भांडणात प्रभाग क्र. 13 मधून उमेदवारी केलेल्या संजय चव्हाण यांनीही दावा केला आहे. यासाठी त्यांनी थेट मातोश्रीवर सीए म्हणून काम बघणाऱ्यांवर धुरा सोपवल्याचे शिवसैनिकांमधूनच बोलले जात आहे. महापौर निवडीनंतरच स्वीकृत नगरसेवकावर चर्चा उद्धवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आल्याने त्यात 1 स्वीकृत नगरसेवक देता येईल. तूर्त या विषयावर पक्षांतर्गत कुठलीही चर्चा नसून महापौरपदाच्या निवडीनंतरच या विषयावर पक्षश्रेष्ठींनी बोलून निर्णय घेतला जाईल. - दत्ता गायकवाड, उपनेता
रेल्वे स्टेशन रोडवरील पदमपुरा भागातील तब्बल 150 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या प्राचीन हनुमान मंदिरात मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी मूर्तीवरील दागिन्यांसह रोकड लंपास केली. तर दागिन्यांची ओरबडताना मूर्तीचेही विद्रुपीकरण झाले. ही घटना शनिवारी (24 जानेवारी) उघडकीस आली. याप्रकरणी मंदिर विश्वस्त आणि लोकप्रतिनिधींनी मूर्तीची डागडुजी केल्यानंतर दुपारी 3 वाजता भाविकांच्या उपस्थितीत मंदिरात महाआरती पार पडली. यावेळी परिसरातील नागरिकांनी चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली. रेल्वे स्टेशन रोडवरील पदमपुरा भागात 150 वर्षे प्राचीन हनुमान मंदिर आहे. या मंदिराची देखरेख व स्वच्छतेचे काम लक्ष्मीबाई चक्रवार पाहतात. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्या मंदिराला कुलूप लावून घरी गेल्या. नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्या मंदिर उघडण्यासाठी आल्या असता त्यांना मंदिराच्या चॅनेल गेटचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बारवाल यांना माहिती दिली. बारवाल यांनी मंदिरात धाव घेतली असता, मूर्तीवरील सोन्याचा टिळा, चांदीच्या भुवया, पायातील चांदीचे कडे, डोळे आणि त्रिशूळ गायब असल्याचे दिसले. चोरट्यांनी दानपेट्या फोडून २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. घटेनची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. चोरीमागे चांदीचे वाढते दर गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने, मौल्यवान धातूंच्या चोरीसाठी हे कृत्य केल्याची चर्चा परिसरात आहे. चोरट्यांनी केवळ मूर्तीवरील सोन्या-चांदीच्या अलंकारांना लक्ष्य केल्याने आणि दानपेटीतील रोकड पळवल्याने, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा नियोजित कट असावा, अशी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. असा रचला चोरीचा कट पदमपुरा मंदिर चोरीचा तपास करताना चोरट्यांनी पद्धतशीर कट रचल्याचे समोर आले आहे. चोरटे रेल्वे स्टेशनकडून आले होते. संशय येऊ नये म्हणून त्यांनी मंदिरापासून 200 मीटर लांब वाहने उभी केली. प्रत्यक्ष चोरीसाठी दोन जण मंदिरात शिरले, तर उर्वरित टोळी पाळत ठेवून होती, पोत्यामध्ये ऐवज नेला. हातोडीच्या साहाय्याने काढले दागिने चोरट्यांनी मूर्तीवरील दागिने काढण्यासाठी छन्नी आणि हातोड्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. सोन्या-चांदीचे अलंकार मूर्तीमध्ये घट्ट बसवलेले असल्याने, ते काढण्यासाठी या हत्यारांनी प्रहार करण्यात आले. अलंकार काढल्यानंतर चोरटे पसार झाले. आयुक्तांना निवेदन; चार पथके रवाना या घटनेनंतर सर्व राजकीय नेत्यांनी आणि शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली. धार्मिक स्थळांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चोरट्यांना अटक करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने चोरट्यांच्या शोधासाठी चार विशेष पथके तैनात केली आहेत. देवाला सोडले नाही मी दररोज पहाटे स्वच्छतेसाठी येते, पण आज गेटचे कुलूप तुटलेले पाहून पाय लटलटले. आत पाहिले तर मारुतीरायांचे दागिने नव्हते, दानपेट्या रिकाम्या होत्या. हे पाहून खूप वाईट वाटले, चोरट्यांनी देवाला सुद्धा सोडले नाही. लक्ष्मीबाई चक्रवार, कर्मचारी. अर्ध्या तासात चोरी; 8 कॅमेऱ्यांत कैद मंदिरातील 8 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये कैद झाला आहे. पहाटे 3 ते 3:30 या अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी ही कृत्य उरकले. दोन चोरटे चोरी करून ऐवज गोण्यांमध्ये भरून पसार झाले. लोकप्रतिनिधींची धाव; महाआरतीने मंदिर दुमदुमले घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विकास जैन, नगरसेविका हर्षदा शिरसाट, नंदकुमार घोडेले, गजानन बारवाल यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. मूर्तीचे विद्रुपीकरण झाल्याने भाविकांमध्ये मोठा संताप होता. तातडीने मूर्तीची डागडुजी करण्यात आली आणि दुपारी ३ वाजता महाआरतीचे आयोजन करून चोरट्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते.
राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आज:राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनामध्ये आजपासून ग्राम गीतेचा जागर
अकोला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने रविवारी २५ व सोमवारी २६ जानेवारी दरम्यान १२ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन होणार आहे. शहरातील रिंग रोड स्थित जानोरकर मंगल कार्यालयात हे संमेलन होणार असून, परिसराला स्व. डॉ सुभाष सावरकर साहित्य नगरी हे नाव दिले आहे. विचार साहित्य संमेलनाचे तपपूर्ती वर्ष असल्यामुळे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक डॉ. रामेश्वर बरगट व स्वागतध्यक्ष प्रा. प्रकाश डवले, समितीचे अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी दिली. उद्घाटन सत्रानंतर सायंकाळी ६ वाजता साहित्य संमेलनातील मानाचा समजला जाणारा ग्रामगीता जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार भजनसम्राट स्व. रामभाऊ गाडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणार आहे. यासह विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व निबंध स्पर्धेचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. सामुदायिक प्रार्थना व प्रार्थनेच्या महत्त्वावर शिवदास महाराज शृंगारे यांचे चिंतन होणार आहे. त्यानंतर भजन गायक गोपाल सालोडकर यांची स्व. साहेबराव नारे स्मृतिप्रीत्यर्थ जनहृदय प्रवेशाचे महाद्वार भजन संध्या होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी २६ जानेवारी पहाटे योग प्राणायाम प्रशिक्षण शिबिर त्यानंतर सकाळी ६ वाजता सामुदायिक ध्यान यामध्ये चिंतन डॉ. गोवर्धन खवले यांचे राहणार आहे. सकाळी माऊली भजन मंडळ कौलखेड, श्री गुरुदेव भजन मंडळ निंबा, जगदंबा भजन मंडळ पुणे ते खुर्द श्री गुरुदेव भजन मंडळ चांदूर यांचे भजन गायन राहील. त्यानंता विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा होईल. हे होणार संमेलनात परिसंवादातून विचारवंत विचार मांडणार आहेत.त्यात राष्ट्रसंतांच्या साहित्यातील राष्ट्रीय सामाजिक विचारातील जडणघडण, शिक्षण व्यवस्थेमध्ये संस्कारांची जोड असणे काळाची गरज, साहित्यातून महिलांना उन्नत करण्यासाठीचे प्रयत्न यावर विचारवंत विचार मांडणार आहेत. वैचारिक प्रबोधनांमध्ये माध्यमांची भूमिका या विषयावर परिचर्चा होणार आहे. गायक पं. रघुनाथ करडीकर यानंतर सायंकाळी ७ ते ७.३० वाजता ‘दास घुसरकर म्हणे’, या घुसरकर महाराजांच्या भजनांचा कार्यक्रम होणार आहे. ‘माझा डेबू संत झाला’ सादरकर्ते कार्तिकी मनोहर सोनवणे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत तपपूर्ती वर्षानिमित्त संत आमले महाराज स्मृतिपित्यर्थ कवी संमेलन होईल.
भातकुलीत एपीएमसी स्थापनेचा मार्ग मोकळा:अमरावतीचे विभाजन संचालक मंडळ झाले बरखास्त
अमरावती व भातकुली तालुक्यासाठी संयुक्तपणे कार्यरत असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बहुप्रतीक्षित विभाजनाला वेग आला आहे. जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या कार्यालयाने त्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून भातकुली तालुक्यासाठी नवी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता होती. या निर्णयामुळे अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या राजवटीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या निर्णयानंतर दोन्ही बाजारपेठांमध्ये प्रशासकांनी पदभार स्वीकारला असून आज, शनिवारपासूनच रोजचे सर्व व्यवहार त्यांच्या नियंत्रणात सुरु झाले आहेत. विभाजनानंतर अमरावती कृऊबासच्या मुख्य प्रशासकाची सूत्रे उपनिबंधक सुधीर खंबायत यांच्याकडे सोपवण्यात आली असून सहकार अधिकारी अविनाश महल्ले व तालुका लेखा परीक्षक प्रशांत गुल्हाने हे दोन्ही अधिकारी त्यांना प्रशासक म्हणून मदत करणार आहेत. त्याचवेळी भातकुली कृऊबाससाठी सहकार अधिकारी अजहर खान सत्तार खान हे मुख्य प्रशासक असून भातकुली तालुक्याचे लेखा परीक्षक ज्ञानेश्वर जगताप हे त्यांना प्रशासक म्हणून सहाय्य करणार आहेत. प्रशासनाच्या मते भातकुली कृऊबास अंतर्गत भातकुली, आष्टी आणि खोलापुर येथील उपबाजारपेठेचा कारभार येणार असून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीकडे अमरावतीसह बडनेरा, शिराळा व माहुली या उपबाजारपेठेचा कारभार राहणार आहे. सहा महिन्यात होणार नव्याने निवडणुका अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त झाल्यानंतर भातकुलीसाठी नवी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन्ही समित्यांसाठी नवे संचालक मंडळ अस्तित्वात येतील. त्यासाठी आगामी सहा महिन्यात नव्याने निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आम्ही न्यायालयात जाऊ ^कार्यकाळ संपण्यापूर्वीच संचालकत्व बरखास्त केल्यामुळे सरकारचा निर्णय एकतर्फी वाटतो. विशेष म्हणजे पदाधिकारी या नात्याने सदर निर्णयाबाबत आम्हाला पूर्वकल्पना देणे अपेक्षित होते. परंतु तसे काहीही झाले नाही. थेट वृत्तपत्रातूनच संचालक मंडळ बरखास्त झाल्याचे कळले. त्यामुळे या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयाचे दार ठोठावणार आहोत. हरिश मोरे, सभापती, कृउबास, अमरावती.
महापौरांबाबत निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेणार:भाजपच्या गटनेता निवडीची उद्या शक्यता
अमरावती अमरावतीत आमच्या जागा कमी झाल्या हे खरं आहे, मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल आम्हालाच आहे. तरीही आमच्या ज्या जागा कमी झाल्या आहेत. त्याबाबत आम्ही चिंतन करु. नेमकी काय चूक झाली ते तपासणार आहे, पालकमंत्री म्हणून त्याचा अभ्यास करु, ज्या सुधारणा करता येईल त्या निश्चितच करण्यात येईल, जनतेच्या मनात काही गैरसमज असतील तर ते सुध्दा दूर करण्यात येणार आहे. असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. २४) सांगितले. महापौरांबाबत पालकमंत्री म्हणाले, राज्याचे आमचे पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेणार आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आम्ही आहोत, त्याबाबत निर्णय करु. भाजपला मोठा पक्ष म्हणून अमरावतीच्या मतदारांनी निवडले आहे, आम्हाला बहुमत मिळाले, महापौर बनवण्यासाठी जनतेचा कौल मिळाला आहे. आम्ही आता सर्वांसोबत चर्चा करणार आहे, जे आमच्या महापौराला साथ देईल, त्या सर्वांसोबत चर्चा करु, ज्यांनी ज्यांनी अमरावती मनपाच्या विकासासाठी आम्हाला मदत करण्याचा विचार केला असेल त्यांना आम्ही सोबत घेण्याचा विचार करु. भाजपचा महापौर बनविण्यासाठी ज्यांना ज्यांना यायचे आहे, ते येतील. आता निवडणूका संपल्या आहेत. आता शहराच्या विकासासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊ. अचलपूरमध्ये एमआयएमशी युती नाही अचलपूरात भाजपने एमआयएमसोबत युती केली नाही, तेथे आम्हाला नऊच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप वेगळाच आहे. तेथे वेगवेगळे गट तयार झाले. आमच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरच आहे. आम्ही युती केली नाही. असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. अमरावती मनपामध्ये निवडून आलेल्या भाजपाच्या २५ नगरसेवकांची पालकमंत्री बावनकुळे यांनी शनिवारी रात्री आठ वाजता भेट घेतली. त्यांना शुभेच्छा देवून त्यांच्यासोबत चर्चा केली. याचवेळी गटनेता निवडीबाबत सोमवारी अंतिम (दि. २६) निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच महापौर कोण? या प्रश्नावर तुर्तास स्थानिक पातळीवर पालकमंत्र्यांनी कोणतीही चर्चा केली नाही. कारण हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री आणि पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेणार असल्याचेही त्यांनी नवनियुक्त नगरसवेकांना सांगितले आहे.
भुसावळ विभागातील भुसावळ–बडनेरा रेल्वे विभाग अंतर्गत येणाऱ्या जलंब रेल्वे स्थानकावर डाउन लुप लाईनच्या विस्तारासह इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी यार्ड रिमॉडेलिंग आणि नॉन इंटरलॉकिंगचे कार्य हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रवासी गाड्यांच्या वेळेत तात्पुरते बदल, नियमन तसेच काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भुसावळ-बडनेरा मेमू, बडनेरा-नाशिकरोड विशेष एक्सप्रेससह वर्धा भुसावळ एक्सप्रेस ३० रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. तर नाशिक रोड ते बडनेरा एक्सप्रेस २९ रोजी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अजमेर पुरी व महाराष्ट्र एक्सप्रेस २ तास उशिरा धावणार आहे. या सर्वच रेल्वे गाड्या या बडनेरा स्टेशनवर थांबा घेत असल्याने अमरावतीकर प्रवाशांसाठी या सर्वच गाड्या महत्त्वाच्या आहेत. गाडी क्र. ६११०१ भुसावळ–बडनेरा मेमू, गाडी क्र.६११०२ बडनेरा–भुसावळ मेमू , गाडी क्र.१११२१ भुसावळ–वर्धा एक्सप्रेस, गाडी क्र.१११२२ वर्धा–भुसावळ एक्सप्रेस, गाडी क्र.०१२११ बडनेरा–नाशिक रोड विशेष ३० रोजी रद्द करण्यात आली असून गाडी क्र.०१२१२ नाशिक रोड–बडनेरा विशेष २९ जानेवारी रोजी रोजी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गाडी क्र.२०८२४ अजमेर –पुरी एक्सप्रेस विभागात २.३० तास उशिरा धावणार असून गाडी क्र.११०४० गोंदिया–कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस विभागात २ तास उशिरा धावणार आहे. २५ रोजी गणतंत्र दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी २५ जानेवारी रोजी धावणार आहे. गाडी क्र.०२१३९ विशेष गाडी शनिवार २५ रोजी सीएसएमटी येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दु.३.३० वाजता पोहोचेल.ही विशेष रेल्वे बडनेरा स्थानकावर दु. १२.१५ वाजता येईल. सीएसएमटी-नागपूर-सीएस एमटी विशेष गाडी
पोदार इंटरनॅशनल स्कूल, अमरावती येथे २० व २१ जानेवारी रोजी दोन दिवसांचा वार्षिकोत्सवास मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्ग, पर्यावरण संवर्धन आणि विश्व कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी कला, साहित्य, संगीत व मानवतेचा जागर घडवून आणला. पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये २० जानेवारी रोजी वार्षिकोत्सवाच्या पहिल्या दिवशी वर्ग पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी निसर्ग, जंगल साहस व पर्यावरण जागृती या थीमवर आधारित विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत व अभिनयाच्या माध्यमातून जंगलातील प्राणी, निसर्गाचे जतन व संवर्धन ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश प्रभावीपणे दिला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोदार शाळेचे महाव्यवस्थापक अमन टेंभुर्णे, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, विशेष शिक्षक कैलास कुलट, माजी मुख्याध्यापक एस. के. फुलमाळी, उपायुक्त माया गरकल, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल गीते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलन व रंगमंच पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. वार्षिकोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, २१ जानेवारी रोजी संपूर्ण दिवसभर रवींद्रनाथ टागोर स्मरणोत्सव या थीमवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विश्वकवी टागोर यांच्या साहित्यिक, सांगीतिक व मानवतावादी विचारांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांतून टागोरांचा भारतीय आत्मा व जागतिक दृष्टीकोन प्रभावीपणे अधोरेखित झाला. पालक व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे भरभरून कौतुक करत शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन सेजल लढ्ढा, पेहेल तलडा, गौरी नागतोडे, जागृती मनवरे, प्राप्ती जामदार व नमन जेठानी या विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले. मान्यवरांचे आभार शाळेचे उपप्राचार्य मुकुंद हुंबे व प्रशासकीय अधिकारी पंकज अकांत यांनी मानले. प्राचार्य नितीन कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. चिमुकल्यांचे सादरीकरण लक्षवेधी सांस्कृतिक कार्यक्रमांत वर्ग पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य, गाणी व कला सादर केली. वर्ग सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे ‘महाकाल’ नृत्य, बंगाली नृत्य ‘दुर्गा पूजा’, पोतराज, वर्ग सहावीचे ‘कांतारा’, ‘भूलभुलैया’ व ‘जोगवा’ ही सादरीकरणे विशेष आकर्षण ठरली. यासोबतच पालकांचे विशेष नृत्यही उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरले. कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, आत्मविश्वास व संघभावना दिसून आली.
प्रश्नाचे उत्तर न आल्याने संतप्त झालेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याला लोखंडी स्केलने अमानुष मारहाण करून जखमी केल्याची घटना पिंपळगावराजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली. या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पिंपळगावराजा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी पवन नारायण इंगळे (वय १०) याला शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी शिक्षक विलास चीम यांनी प्रश्न विचारला. मात्र, पवन याला त्या प्रश्नाचे उत्तर आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षक चीम यांनी लोखंडी स्केलने पवनच्या पाठीवर, मांडीवर व हातावर वर्गातील विद्यार्थ्यांसमोर अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत पवन जखमी झाला. या घटनेनंतर पवन याला तातडीने खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या प्रकरणी नारायण इंगळे यांची तक्रार व वैद्यकीय अहवालावरून पिंपळगावराजा पोलिसांनी आज, दि. २४ जानेवारी रोजी शिक्षक विलास चीम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हेड काँस्टेबल धीरज देशमुख करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि. २४) जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी सुमारे तासाभरात पालकमंत्र्यांसमोर ७४ नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद संबधी नागरिकांमध्ये मोठी नाराजी असल्याच्या तसेच जिल्ह्यात दगडाच्या अवैध खाणी सुरू आहे, मध्य प्रदेशमधून जिल्ह्यात चारशे ते साडेचारशे ट्रक येत आहेत. महसूल विभागाच्या सुध्दा तक्रारी आहेत, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. जनता दरबारात जिल्हा परिषद संबधी लोकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. महसूलच्या सुध्दा तक्रारी आहेत. याचवेळी नोंदणी विभागाच्याही तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच जि.प. सीईओेंना सांगणार आहे कि, ज्या प्रकारे नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी एक पॅनल तयार केले आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी जनता दरबार घेतले आहेत. त्याचप्रमाणे अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील महिनाभरात सर्व तालुक्यात जनता दरबार घ्यावेत, त्यामुळे तालुका स्तरावरच लोकांना जनता दरबार सारखे वातावरण अर्थात लोकशाही दिवस तालुक्यात जाऊन भरवावा. नागपूर जिल्हाधिकारी व नागपूर जिप सीईओंनी राबवलेल्या त्या उपक्रमामुळे नागपूरात एका दौऱ्यात १४०० तक्रारी निकाली निघाल्या आहेत. शहरातील शासकिय विश्रामगृह परिसरात या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस अधीक्षक विशाल आनंद उपस्थित होते. सुमारे पाच महिन्यानंतर पालकमंत्र्यांचा जनसंवाद अर्थात जनता दरबार आयोजित केला होता. त्यामुळे त्यांना निवेदन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी नागरिकांकडून पालकमंत्री यांना प्राप्त झालेले निवेदने त्यांनी संबंधित विभागाकडे देऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा, आरोग्य, बांधकाम या विविध विषयांवरील निवेदने प्राप्त झाली. अनेक नागरिक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसंवाद कार्यक्रमात आले. पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. प्रशासनातील विवीध कार्यालय व सिस्टिममध्ये होणाऱ्या त्रासाच्या अवघ्या तासाभरात पालक मंत्र्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी सर्वसामान्यांनी मांडल्या. असे कित्येक नागरीक आहेत कि, त्यांना तक्रार करण्यासाठी येथे येणे शक्य झाले नाही. यावरुन पालकमंत्री बावनकुळे यांना जिल्ह्यात प्रशासकिय व्यवस्था कशा पध्दतीने काम करत आहेत, याचा चांगलाच अंदाज आला आहे. तळागाळातील नागरिकांना त्रास होवू नये, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून पुढील महिन्यापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. तशा सुचना त्यांनी जिल्हाधिकारी, जिप सीईओ यांना दिल्या आहेत. पुढील महिन्यापासून प्रत्येक तालुक्यावर जनता दरबार
बाल नाट्य स्पर्धेची आजपासून बंपर फेरी:अमरावतीत 89 नाटकांचे सादरीकरण; सकाळी 10 वाजता उद्घाटन
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आज , रविवार, २५ जानेवारीपासून बाल नाट्य स्पर्धेची विभागीय पातळीवरील प्राथमिक फेरी सुरु होत आहे. या स्पर्धेत तब्बल ८९ अधिक नाटकांचे सादरीकरण होईल, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी स्थानिक मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. ही स्पर्धा डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या (पीडीएमसी) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह या आलिशान सभागृहातील रंगमंचावर होणार आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालेल. प्राथमिक फेरीच्या या स्पर्धेत सादरीकरण करणाऱ्या नाटकांमधून ५ उत्कृष्ट बाल नाट्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार आहे. दरम्यान जास्तीत जास्त नाट्य रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असा प्रयत्न राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे केला जात आहे. मराठी रंगभूमीतील नवोदित कलाकारांना मंच उपलब्ध करुन देणे, नाट्य चळवळीला नवसंजीवनी देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. आयोजकांच्या मते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या मध्यवर्ती संघटनेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी ‘गाडगेबाबा’ या भूमिकेला अजरामर करणारे वरिष्ठ नाट्यकर्मी प्रा. एम. टी. नाना देशमुख, ज्येेष्ठ रंगकर्मी विराग जाखड यांच्यासह नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील. स्पर्धा संयोजक विशाल फाटे आणि मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी असलेले त्यांचे इतर सहकारी या स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी प्रयत्नरत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही या नाट्य स्पर्धेच्या फेरीमुळे स्थानिक कलाकारांना नव्याने व्यासपीठ लाभले आहे. तसेच यातून त्यांच्या कलागुणांना चालना मिळण्यासाठी आयोजन पुढाकार घेत आहेत. ही आहे कलावंत घडवणारी खाण बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे आयोजन हे पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह (पीडीएमसी) या आलिशान सभागृहातील रंगमंचावर होत आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने मुलांमधील कलावंतांना आकार देणारी खाण आहे. गतवर्षी याच सभागृहात हौशी प्रौढांच्या नाटकांची विभागीय फेरी उत्तमपणे पार पडली. अलिकडे त्याच सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यहीा दोन दिवसीय एकांकिका स्पर्धा घेण्यात आल्या. येत्या काळात राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धाही तेथेच होणार असून त्यासाठी अ.भा. नाट्य परिषद या मध्यवर्ती संस्थेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे प्रयत्नरत आहेत.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली:‘ लोकशाही बळकट करा''चा संदेश, शेकडो विद्यार्थी सहभागी
भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या वतीने 'राष्ट्रीय मतदार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य जनजागृती रॅलीला विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तहसीलदार विनायक मगर यांनी राष्ट्रीय मतदार दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले, भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदारांमध्ये आहे. जेव्हा प्रत्येक नागरिक आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावेल, तेव्हाच लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी बनेल. आजचे विद्यार्थी हे उद्याचे राष्ट्रनिर्माते आहेत, त्यामुळे त्यांनी आतापासूनच मतदानाचे मूल्य समजून घेणे काळाची गरज आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार विजयकुमार गायकवाड, श्रीमंत सारणे, निवडणूक पर्यवेक्षक बसवराज गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी मी नक्की मतदान करीन अशी सामूहिक शपथ घेऊन लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. या उपक्रमामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये मतदानाविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसवराज गुरव यांनी केले, तर समीर मणियार यांनी आभार मानले. जागा व्हा, सजग व्हा, मतदान करा, अशा घोषणांनी दुमदुमला परिसर शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध फलक हातात घेऊन लोकशाहीचा जयघोष केला.माझा मतदानाचा हक्क- माझी लोकशाहीची ताकद, एक मत- अनेक बदल,जागा व्हा, सजग व्हा, मतदान करा, अशा घोषणांनी शहर परिसर दुमदुमून गेला होता.
राज्याच्या राजकारणात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलेला असताना, बार्शी विधानसभा मतदारसंघात मात्र एक वेगळाच 'राजकीय पॅटर्न' आकाराला आला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी आमदार दिलीप सोपल यांनी 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या उक्तीप्रमाणे दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांना एकत्र आणले आहे. हे केवळ जागावाटप नसून, राजेंद्र राऊतांच्या २० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा एक सुनियोजित डाव मानला जात आहे. बार्शीचे राजकारण नेहमीच 'सोपल विरुद्ध राऊत' या वैयक्तिक संघर्षाभोवती फिरले आहे. पक्षीय निष्ठांपेक्षा येथे स्थानिक गटांचे प्राबल्य जास्त असते. यावेळी सोपल यांनीस्वतःच्या ताकदीसोबतच शिंदे गट आणि अजित पवार गटाची रसद घेतल्याने, राऊत यांच्यासमोर प्रथमच एवढ्या मोठ्या व्यापक आघाडीचे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांवर टीकेची झोड उठवत आहेत, तर इकडे बार्शीत त्यांचे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून प्रचार करणार आहेत. हे चित्र विसंगत वाटत असले तरी, स्थानिक पातळीवर अस्तित्व टिकवण्यासाठी घेतलेली ही 'राजकीय अपरिहार्यता' आहे. भाजपला रोखण्यासाठी हे सर्व गट आपली मतविभाजन टाळण्याची रणनीती आखत आहेत. या निवडणुकीचे निकाल केवळ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची सत्ता ठरवणार नाहीत, तर आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी असतील. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर महाराष्ट्रातील इतर तालुक्यांतही स्थानिक पातळीवर अशा 'अनैसर्गिक' वाटणाऱ्या पण राजकीयदृष्ट्या फायदेशीर आघाड्यांचा फायदा होऊ शकते. सोपल यांची ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी जागावाटपावर नजर टाकल्यास दिलीप सोपल यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतल्याचे दिसते. ३ जिल्हा परिषद आणि ८ पंचायत समिती जागा देऊन सोपल यांनी या गटाची ताकद स्वतःच्या बाजूने वळवून घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांना सोबत घेऊन त्यांनी सत्तेचा आणि प्रशासकीय वजनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.
माघ यात्रा सोहळा गुरुवार, (दि. २९ जानेवारी) रोजी संपन्न होत असून, या सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असलेने भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असलेने एकादशीच्या दिवशी पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविक यांच्याकरिता बाहेर पडण्यासाठी एकेरी रहदारीस खुला ठेवणेबाबत आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत. माघ यात्रा सोहळ्याकरिता लाखो भाविक पंढरपूर शहर व परिसरात येतात व एकादशी सोहळयादिवशी चंद्रभागा स्नान करून भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. तेव्हा महाद्वार घाट व आजूबाजूच्या रस्त्यामध्ये लाखो भाविकांची गर्दी असते. सदरची गर्दी नियंत्रणात आणणेसाठी पोलीस प्रशासनाला मानवी साखळीचा व रस्सीचा वापर करावा लागतो. पंढरपूर शहरातील भाविकांची संख्या व सुरक्षितता लक्षात घेता यात्रा सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. पश्चिमद्वार ते चौफाळा हा एकेरी मार्ग झाल्यास स्टेशन रोडकडून येणारे वारकरी, भाविक हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भादुले चौक ते नाथ चौक तांबडा मारूती चौक- महाद्वार चौकमार्गे नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. तसेच प्रदक्षिणामार्गे येणारे भाविक हे उत्पात गल्ली येथील रस्त्याने नामदेव पायरी येथे दर्शनासाठी जावू शकतात. माघ शुध्द एकादशी यात्रा कालावधीत पंढरपूर शहर तसेच वाखरी परिसरात दि. २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करणे यावर बंदी घालण्यात आल्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी निर्गमित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये पंढरपूर शहरातील तसेच वाखरी परिसरात मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्री करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दि.२९ जानेवारी रोजीचे सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी, भाविकांना बाहेर पडण्याचा एकेरी रहदारी मार्ग केल्यास गर्दीवर नियंत्रण करणे सुरक्षित होईल. त्यामुळे पश्चिमद्वार ते चौफाळा हा मार्ग वारकरी भाविकांसाठी बाहेर पडण्याचा एकेरी रहदारीसाठी होणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन , सदर आदेश पारीत केला आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध कारवाईस पात्र राहील. एकेरी रहदारी मार्ग केल्याने गर्दीवर नियंत्रण करणे शक्य
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा खालावणारा पोत आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मोहोळ तालुक्यात आता 'नैसर्गिक शेती'चा जागर सुरू झाला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत तालुक्यातील ५ गावांची निवड करण्यात आली असून, सुमारे ६२५ एकर क्षेत्रावर रसायनमुक्त शेती बहरणार आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना लवकरच सकस आणि आरोग्यदायी अन्नधान्य उपलब्ध होणार आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, रासायनिक खतांचा बेसुमार वापर, पिकांचे अवशेष जाळणे आणि शेणखताचा अभाव यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटून जमिनी नापीक होत आहेत. याचा परिणाम केवळ उत्पादनावरच नाही, तर मानवी शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवरही होत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रदुषणमुक्त जमीन, पाणी आणि शाश्वत उत्पादनासाठी 'नैसर्गिक शेती' हा उत्तम पर्याय म्हणून पुढे आला आहे. मोहोळ तालुक्यातील भोयरे, डिकसळ, अंकोली, औढी आणि तांबोळे या गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. नदीकाठची गावे आणि खतांचा वापर या निकषांवर ही निवड झाली असून, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सोलापूरचे डॉ. बी. के. खोत आणि तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. ^या अभियानाद्वारे मातीचे आरोग्य सुधारण्यासोबतच, कमी खर्चात देशी गाईवर आधारित शेती पद्धतीचा अवलंब करण्याबाबत जनजागृती केली जात आहे. भविष्यात या उत्पादनांचे ब्रँडिंग आणि प्रमाणीकरण करण्यावर आमचा भर असेल. सुहास ढवळे, तालुका समन्वयक (आत्मा), मोहोळ प्रत्येक गावातून १२५ शेतकरी, याप्रमाणे एकूण ६२५ शेतकरी सहभागी होतील. किमान १ एकर क्षेत्रावर नैसर्गिक शेती करणे बंधनकारक आहे. रासायनिक शेतीचे नैसर्गिक शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रति लाभार्थी, प्रति वर्ष ४ हजार रुपये अनुदान दोन वर्षांसाठी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना बाह्य रसायनांचा वापर न करता देशी गाईचे गोमूत्र आणि शेणापासून दशपर्णी अर्क, जीवामृत, निमास्त्र यांसारखी नैसर्गिक कीटकनाशके व खते तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले .
करंजीमार्गे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली अहिल्यानगर ते मनमाड तसेच अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर हा महामार्ग खराब झाल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अनेक प्रवासी गेल्या काही दिवसांपासून शेवगाव पाथर्डीकडून करंजी घाट मार्गे पुढील प्रवासाला मार्गस्थ होत असल्याने करंजीमार्गे वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच उसाचे ट्रक मोठ्या प्रमाणात याच रस्त्याने जा ये करत असल्याने या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. दम तोडतात. घाटातच अनेक ट्रकांमध्ये तांत्रिक बिघाड होऊन काही ट्रक रस्त्यावरच बंद पडतात. शनिवारी देखील असाच एक उसाने भरलेला ट्रक करंजी घाट चढत असताना घाटातील रस्त्याच्या मध्यावर एका धोकादायक वळणावर बंद पडला. रस्त्याच्या मध्येच हा ट्रक उभा राहिल्याने करंजी घाटात सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली. करंजी घाटातील धोकादायक वळणांची दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांमधून केली जात आहे. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधींसह राष्ट्रीय महामार्ग विभाग देखील डोळेझाक करत आहे. करंजी घाटाचे रुंदीकरण करण्याची देखील मोठी गरज आहे. देशात नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी मोठमोठे चार पदरी सहा पदरी महामार्ग तयार करण्याचे काम सुरू असताना करंजी घाटात मात्र एक धोकादायक वळण सुद्धा राष्ट्रीय महामार्ग अथवा लोकप्रतिनिधी दुरुस्त करता आलेले नाही.त्यामुळे या धोकादायक वळ णावर चार दिवसाला मोठमोठे अपघात होत आहेत. प्रतिनिधी |पाथर्डी कल्याण निर्मल या राष्ट्रीय महामार्गावरील करंजी घाटामध्ये एका उसाच्या ट्रकचा रस्त्यावरच बिघाड झाल्याने शनिवारी दुपारी तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे घाटात सुमारे पाच किमी अंतरापर्यंत वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस कर्मचारी वेळेत उपलब्ध न झाल्याने प्रवाशांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागला.काही वेळानंतर एक पोलीस कर्मचारी घाटात पोहोचला इतर प्रवाशांसह काही तरुणांनी देखील घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.त्यानंतर वाहतूक कोंडी फुटली. गेल्या काही दिवसापासून करंजी घाटमार्गे पाथर्डीकडून दौंडकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकांची संख्या मोठी वाढली आहे. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ऊस भरून नेला जात असल्याने अनेक ट्रक करंजी घाटात
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर शहरात पाच कोटी रुपये खर्चाचे इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी दिली. कै. माणिकराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अहिल्यानगर येथे आयोजित जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे, आयटीआयचे प्राचार्य खालीद. जहागीरदार, व्यवस्थापन समिती सदस्य चंद्रकांत काळोखे, अमित काळे, सागर भंडारी, उपप्राचार्य सोमनाथ जाधव, प्राचार्य अजय वाघ, उपप्राचार्य गणेश हडतगुणे, प्राचार्य मुकुंद महामुनी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, पालकमंत्री विखे यांचा विज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्य विकास या विषयांमध्ये विशेष रस आहे. या क्षेत्रातील उपक्रमांना ते सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या संकल्पनेतूनच जिल्हा नियोजन मंडळामार्फत अहिल्यानगर शहरात इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या केंद्रासाठीचा तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव सध्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडे असून, लवकरच प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर उभारणीस प्रारंभ होणार आहे. अहिल्यानगर येथील आयटीआयच्या प्रांगणात सुमारे पाच हजार चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत उभारण्यात येणार आहे. नाविन्यपूर्ण व अद्ययावत उपकरणांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या १२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दोन कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी कृषी विकास व सौरऊर्जेवर आधारित विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले आहेत. या प्रकल्पांना जिल्हा उद्योग केंद्र व एमआयडीसीतील उद्योजकांशी जोड दिल्यास भविष्यात सक्षम व कुशल तंत्रज्ञ निर्माण होतील. प्रास्ताविकात प्राचार्य खालीद जहागीरदार म्हणाले की. प्रदर्शनासाठी १४ तालुक्यांमधून ८४ प्रकल्पांची निवड करण्यात आली असून, या जिल्हास्तरीय प्रदर्शनातून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी प्रकल्पांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित ताठे यांनी केले. यावेळी परीक्षक म्हणून सागर भंडारी, अमित काळे, सोमनाथ जाधव, पूजा पतंगे यांनी काम पाहिले.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, जयपूर क्रिस्ट वेंचर्स लिमिटेड आणि ईव्ही फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) व सहाय्यक साहित्य वाटप शिबिराची सांगता करण्यात आली. हे शिबिर १९ ते २३ जानेवारी दरम्यान शिर्डीतील श्री साईनाथ रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी एकूण ७९० दिव्यांग बांधवांची नोंदणी झाली होती. त्यापैकी ७६९ गरजू दिव्यांगांना विविध प्रकारचे सहाय्यक साहित्य व जयपूर फूटचे मोफत वाटप करण्यात आले. यामध्ये २७० कृत्रिम पाय, ४७ कॅलिपर, ५० व्हीलचेअर, ६३ तीन चाकी सायकल, ५ इलेक्ट्रिक सायकल, ६१ क्रच, ७९ वॉकर, २० एल्बो, २० ट्रायपॉड, १०४ काठ्या व ५० कानाची मशीन यांचा समावेश होता. साहित्य मिळताच दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद सर्वांनाच भावून गेला. दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते श्री साईबाबांच्या मूर्तीचे पूजन व आरती करून शिबिराचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी नारायण व्यास प्रमुख उपस्थित होते. साहित्य व सायकल वाटपानंतर सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी स्वतः दिव्यांग बांधवांच्या सायकलींच्या मागे चालत त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. यावेळी नारायण व्यास यांनी शिर्डी येथे जयपूर फूट शिबिर आयोजित करण्याची संधी ही श्री साईबाबांचा आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली. शिबिरादरम्यान परिश्रम करणाऱ्या श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीच्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विविध वक्त्यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांगांच्या सामाजिक पुनर्वसनाचा आणि आत्मविश्वासाचा संदेश दिला. गाडीलकर यांनी दिव्यांग बांधवांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, समाज त्यांच्या कार्याची नक्कीच दखल घेईल, अस सांगितले. यावेळी लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक, डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, नजमा सय्यद, सुरेश टोलमारे उपस्थित होते. दिव्यांगांना मिळाला मोठा आधार या शिबिरात विविध ठिकाणांहून दिव्यांग आले होते. ७६९ गरजू दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर, तीन चाकी सायकल, श्रवणयंत्रांचा समावेश होता. साहित्य मिळाल्याने दिव्यांग बांधवांना आधार मिळाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
नगरमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत:बोरुडे मळा भागात बिबट्या झाला जेरबंद
अहिल्यानगर शहरातील बोरूडे मळा परिसरामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेल्या बिबट्याला वन विभाग सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणार आहे. शहराच्या केडगाव उपनगरात फेब्रुवारी २०२४ मध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर शहरालगत बिबट्याचा वावर असल्याचे वारंवार समोर आले. तपोवन परिसरातील बिबट्या व पिले काही दिवसांपूर्वी जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा वनक्षेत्रपाल अविनाश तेलोरे यांच्या निर्देशानुसार, उर्वरित पान ४ ^ नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. बोरूडे मळा परिसरातील सुमारे अडीच वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्याला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळे ठेवले जाईल. - अविनाश तेलोरे, वनक्षेत्रपाल अहिल्यानगर.
प्रतिनिधी | अहिल्यानगर संगमनेर शहरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री गनिमी काव्याने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ३३ लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये तब्बल ६ हजार किलो गोमांस आणि ९ जिवंत जनावरांचा समावेश आहे. मागील महिनाभरात ही चौथी मोठी कारवाई असून ५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. संगमनेरमधील जुना जोर्वे रोडवरील 'न्यू सेवा सॉ मिल'समोरील एका वाड्यात मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी आणि त्याचे साथीदार गोवंशीय जनावरांची कत्तल करत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. २३ जानेवारीच्या रात्री जेव्हा पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा आरोपी गोमांस वाहनांमध्ये भरत होते. मात्र, अंधाराचा फायदा घेत मुख्य आरोपींसह ५ जण तेथून पसार झाले. याप्रकरणी मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी, वाहीद अब्दुल करीम कुरेशी, अक्रम अहमद कुरेशी, शेहबाज गुलाम हुसेन शेख आणि आदित्य राजेंद्र जाधव या पाच जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियमाच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डीवायएसपी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किरणकुमार कबाडी, पीएसआय महादेव गुट्टे, गणेश लोंढे, विजय पवार, संतोष खैरे, बाळासाहेब गुंजाळ व संगमनेर विभागाच्या पथकाने केली आहे. अवैध कत्तलखाने समूळ नष्ट करेपर्यंत ही मोहीम थांबणार नाही, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले. महिनाभरात ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या एका महिन्यात (२५ डिसेंबर ते २३ जानेवारी) संगमनेर भागात कत्तलखान्यांविरुद्ध ही चौथी मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत १९ आरोपींवर गुन्हे दाखल केले असून एकूण ६३ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा तीस ते चाळीस वर्षांपूर्वीच्या आहेत. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या पाडण्यासाठी निर्लेखन प्रक्रिया राबवली जाते. पूर्वीची प्रक्रिया जटील व वेळखाऊ असल्याने वर्गखोल्या पाडण्यात दिरंगाई होत आहे. सद्यस्थितीत सुमारे १०२ वर्गखोल्यांचे निर्लेखन प्रक्रिया खोळंबली आहे. राज्य सरकारने आता ५० हजार घसारामुल्य असलेल्या शाळाखोल्या पाडण्याचे अधिकार पंचायत समितीस्तरावर दिले आहेत. त्यामुळे धोकादायक खोल्या पाडण्याच्या प्रक्रियेला काही अंशी गती मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा जुनाट व दगडी बांधकामाच्या आहेत. या शाळा पावसाळ्यात कोसळ्याची शक्यता आहे. वर्गखोल्यांना तडे गेले असून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. तालुकास्तरावर स्ट्रक्चर ऑडिट केल्यानंतर त्याचे प्रस्ताव जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवला जातो. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, आता राज्य सरकारने ५० हजारपेक्षा घसारामुल्य कमी असलेल्या खोल्या पाडण्यासाठी तालुकास्तरावरच अधिकार दिले आहेत. जिल्ह्यात ३०८ धोकादायक वर्गखोल्या पाडण्याची परवानगी होती, त्यापैकी १०२ खोल्या अद्याप पाडलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गखोल्यांमध्ये शिक्षण घ्यावे लागते. आता नवीन निर्णयामुळे खोल्या निर्लेखन प्रक्रियेला गती येईल. परंतू, गरज असलेल्या वर्गखोल्यांची संख्या जास्त असून निधी अपुरा पडेल. विद्यार्थी धोक्याच्या ठिकाणी बसवू नका ^ धोकादायक झालेल्या जुन्या वर्गखोल्या पाडण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. आता नवीन निर्णयानुसार या खोल्या पाडण्यास गती मिळणार आहे. आम्ही तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांना त्या खोल्या पाडण्याचे कळवले आहे. तसेच विद्यार्थ्यांना धोकादायक खोल्यांमध्ये न बसवता, पर्यायी जागेत बसवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. भास्कर पाटील, जिल्हाशिक्षणाधिकारी. जिल्ह्यातील या शाळा खोल्या पाडण्यास दिली मंजुरी तालुकानिहाय धोकादायक शाळाखोल्या पाडण्याची प्रक्रिया प्रलंबित आहे. अकोले ५, संगमनेर ४, कोपरगाव १४, राहाता ३, श्रीरामपूर २, राहुरी १४, पाथर्डी ४, शेवगाव १, श्रीगोंदे ३५, कर्जत १३ तर अहिल्यानगर तालुक्यातील ७ खोल्या मंजूर असूनही अद्याप पाडलेल्या नाहीत. पाडल्यानंतर नव्या खोल्या कशा बांधणार? जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २०२४-२०२५ या वर्षात निधीतून ४५ कोटी रुपये खर्चून ३८८ शाळा खोल्या बांधल्या. मंजूर निधीच्या दिडपट नियोजन केल्याने १० कोटी मागील दायित्व अर्थात पैसे देणे आहे. ही रक्कम २०२५-२०२६ मध्ये उपलब्ध झालेल्या २५ कोटीतून दिली जाणार आहे. त्यामुळे दायित्व वजा जाता, शाळा खोल्या बांधकामासाठी अवघे १५ कोटी रुपये उपलब्ध होतील. त्यातून अवघ्या १६५ शाळा खोल्यांचे बांधकाम होऊ शकेल. प्रत्यक्षात ३५२ नवीन वर्गखोल्यांसाठी निधीची जुळवाजुळव झालेली नाही. त्यात नव्याने पाडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या १०२ शाळा खोल्यांचीही भर पडणार आहे.
विंचूर ते लासलगाव या सुमारे पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेकडो वर्षे जुन्या झाडांची तोड सुरू करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष अडथळा न ठरणारी झाडे तोडू नयेत, अशी मागणी शहरातील हरित सेनेने केली आहे. चौपदरी रस्ता होणे आवश्यक असून त्यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि अपघात कमी होतील, हे हरित सेनेने मान्य केले आहे. मात्र, या विकासकामाच्या नावाखाली अनावश्यक उर्वरित पान ३ ^लासलगाव - विंचूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष जुने झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, ज्या झाडांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशी झाडे तोडण्यात येऊ नये. एकीकडे हरित सेनेच्या वतीने शहर हिरवेगार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल होते आहे याचं दुःख होत आहे. - संतोष पलोड, उद्योजक, सदस्य हरित सेना
येथील महिला बचत गट व ग्रामपंचायतीतर्फे हळदी -कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिलांना आरोग्य विषयक माहिती व हँड वॉश सॅनिटाइझरचे वाण म्हणून वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवला असून सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून बावात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. गुरुवारी (दि.२३)गावातील बचत गटाच्या महिला, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका, आरोग सेविका यांना महिला ग्राम संसद भवनात एकत्र करत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी एकमेकांना हळदी -कुंकू लावून औक्षण केल्यानंतर महिलांचे उखाण्याचा कार्यक्रम रंगला. ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित महिलांना ग्रामविकास अधिकारी योगेश राहाणे यांच्या हस्ते हँड वॉश सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पंचायत समितीकडून बचत गटांना अधिकाअधिक अर्थसहाय्य मिळून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन सरपंच अरुण वाघ यांनी महिलांना दिले. यासाठी सर्व महिनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक काळजी कशी, घ्यावी याची माहिती देण्यात आली. यावेळी महिला बचत गटाच्या सिआरपी भारती ओहळ, कुषी सहाय्यक दये, विजया कडवे, माया साबळे, सुरेखा आभाळे आदींसह आरोग्य अधिकारी सायली मेदगे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हळदी कुंकवाचा कार्यक्रम एक सामाजिक उपक्रम आहे. महिला बचतगट, आरोग्य सेविका, कुषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका महिलांनी एकत्र येत भोकणी ग्रामपंचायतीच्या महिला संसद भवन प्रांगणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. यावेळी आरोग्याबाबत घेण्यात येणाऱ्या काळजी संदर्भात विचारांची देवाणघेवाण केली. बचत गटाच्या माध्यमातून कुठले व्यवसाय सुरू करता येईल, या संदर्भात महिलांनी विचाराचे आदान प्रदान केले.
प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या २५ वर्षांच्या महिलेचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याच्या आरोप करत नातेवाइकांनी शनिवारी (२४ जानेवारी) उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. हर्षीन हिना खालेद चाऊस (२५, रा. शहा कॉलनी, पीरबाजार, उस्मानपुरा) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, यासंदर्भात संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शहा कॉलनी भागातील रहिवासी खालेद चाऊस यांनी पत्नी हर्षीन हिना यांना २१ जानेवारी रोजी प्रसूतीसाठी उस्मानपुरा येथील छाबडा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दुपारी १ वाजता त्यांचे सिझेरियन झाले आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर रक्तस्राव थांबत नसल्याने आणि प्रकृती खालावल्याने रुग्णाला नातेवाइकांना विश्वासात न घेता घाईघाईने अन्य रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारांबाबत संशय, मृत्यूमुळे धक्का २१ तारखेपासून २३ जानेवारीपर्यंत एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. मात्र, २३ तारखेला दुपारी अचानक हर्षीन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. हॉस्पिटलमधील सिझरदरम्यान झालेली चूक आणि त्यानंतर दोन्ही रुग्णालयांनी माहिती लपवून ठेवल्यानेच हा मृत्यू ओढवल्याचा आरोप पती, नातेवाइकांनी केला. नातेवाइकांचे सवाल { सिझरनंतर रक्तस्राव सुरू झाल्यावर तातडीने योग्य उपचार का झाले नाहीत? { रुग्णाला अन्य रुग्णालयात नेताना नातेवाइकांना विश्वासात का घेतले नाही? { तीन दिवस प्रकृतीची खरी माहिती का लपवून ठेवली? मृतदेह थेट पोलिस ठाण्यासमोर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास नातेवाइकांनी हर्षीनचा मृतदेह थेट उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर आणला. या वेळी नवनिर्वाचित नगरसेवक नवनीत ओबेराय, एमआयएमचे नगरसेवक हाजी इसाक खान यांच्यासह मोठा जनसमुदाय जमा झाला होता. दोषी डॉक्टरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली.
स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी असते. प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही विषयाची आवड असते. ती आवड शिक्षणासोबत जोपासली पाहिजे. कला क्षेत्रातही मोठ्या संधी आहेत. शिक्षणासोबत अंगी असलेल्या कला विद्यार्थ्यांनी विकसित कराव्यात, असे प्रतिपादन कवी रवी कोरडे यांनी केले. फुलंब्री येथील संत सावता माळी गुरुकुल विद्यालयात दोन दिवसीय स्नेहसंमेलन गुरुवारी उत्साहात पार पडले. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव निवृत्ती गावंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील अधिव्याख्याता आणि कवी रवी कोरडे उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक योगेश मिसाळ, रावसाहेब दांडगे, कर्मचारी पतसंस्था अध्यक्ष सोमनाथ मेटे, प्राचार्य सुभाष टकले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. आठवीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल योगेश मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘वंदे मातरम आणि भारतीय संस्कृती’ या विषयावर गीतांची रचना करण्यात आली. मुख्याध्यापिका कल्पना उरणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी ही गीते तयार केली. सूत्रसंचालन सुनील चौधरी यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व परिचय प्रशांत मिसाळ यांनी केला. गीत व नाटिकांचे निवेदन दहावीचे विद्यार्थी कर्णराज केमधरे आणि तेजस सरोदे यांनी केले. आभार रेखा बागडे यांनी मानले. या वेळी ग्रंथपाल गणेश कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कल्पना उरणकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आप्पासाहेब चव्हाण, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धूम्रपान, मोबाइल व्यसनमुक्तीवर नाटिका विद्यार्थ्यांनी धूम्रपान, मोबाइल व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन यावर जनजागृती नाटिका सादर केल्या. मैत्रीचा संदेश देणारी गीते, देशभक्तीपर गीत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि शिवरायांच्या कार्यावर आधारित सादरीकरण झाले.
जायकवाडीत 32745 पाणपक्षी आढळले:रशिया, चीन, मंगोलिया, कझाकस्तान पक्ष्यांचा समावेश
जायकवाडी पक्षी अभयारण्यात आशियाई पाणपक्षी गणना २०२६ पार पडली. छत्रपती संभाजीनगर वन्यजीव विभागाने ही गणना केली. उपवनसंरक्षक रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. जायकवाडी अभयारण्याच्या ३३,९७९ हेक्टर क्षेत्रातील ४१ ठिकाणी गणना झाली. त्यातील सहा ठिकाणी बोटीद्वारे जलाशयाच्या आत जाऊन निरीक्षण झाले. छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील पक्षिमित्र, वनाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. एकूण ७९ प्रजातींच्या ३२,७४५ पाणपक्ष्यांची नोंद झाली. ३२७४५ पाणपक्ष्यांची नोंद झाली. यामध्ये रशिया, चीन, मंगोलिया, कझाकस्तान व मध्य आशियातील स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होता. याशिवाय सुमारे ३० प्रकारचे भू-पक्षीही जलाशय परिसरात आढळले. जायकवाडीत स्थलांतरित व स्थानिक पाणपक्ष्यांची मोठी उपस्थिती असल्याने हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पक्षिमित्र प्रा. संतोष गव्हाणे यांनी सांगितले. गणनेदरम्यान लिटल ग्रेब, ग्रेट व लिटल कॉर्मोरंट, इंडियन शॅग, ग्रे व पर्पल हेरॉन, इंडियन पॉन्ड हेरॉन, ग्रेट, मीडियन, लिटल व कॅटल एग्रेट, पेंटेड स्टॉर्क, एशियन ओपनबिल, बार-हेडेड गूज, ब्राम्हिणी शेल्डक, नॉर्दर्न पिंटेल, स्पॉट-बिल्ड डक, कॉमन पोचार्ड, पर्पल स्वॅम्फेन, कॉमन मूरहेन, कॉमन कूट, ब्लॅक-विंग्ड स्टिल्ट, रेड वॉटल्ड लॅपविंग, लिटल रिंग्ड प्लोव्हर, रिव्हर टर्न, व्हिस्कर टर्न, कॉमन शॉव्हलर, वायर-टेल्ड स्वॅलो, किंगफिशर, ब्लॅक-नॅप्ड व ग्लॉसी आयबिस, रोझी स्टार्लिंग, ऑस्प्रे, गार्गेनी आदी पाणपक्षी मोठ्या संख्येने दिसले. उपक्रमात सहायक वनसंरक्षक प्रमिला मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ, मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक, डॉ. मनीष मालानी, डॉ. सुधाकर गायकवाड, डॉ. प्रशांत पाळवदे, प्रा. संतोष गव्हाणे, अर्जुन कुचे, प्रतीक जोशी, दिलीप भगत, सुनील पायधन, कृष्णा चव्हाण, किरण गाडेकर, बाबासाहेब घाटे आदींनी सहभाग घेतला होता. ३० प्रकारचे भू-पक्षीही दिसले
पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या कोणत्याही विश्वस्तास दोन टर्मपेक्षा (१२ वर्षे) अधिक म्हणजेच तिसरी टर्म नियमानुसार करता येणार नाही, असा निर्णय सहधर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. यामुळे आता नव्याने नियुक्त काही विश्वस्तांच्या निवडीवरही आक्षेप घेतला जात आहे. जिल्हा न्याय दंडाधिकारी काळाराम मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर उर्वरित दहा विश्वस्तांची निवड केली जाते. यात विद्यमान विश्वस्त मंडळातून तीन, पुजारी वर्गातून तीन व अन्य चौघांची निवड धर्मदाय सहआयुक्त करतात. विशेष म्हणजे संस्थांनच्या घटनेनुसार एक विश्वस्त फक्त दोन टर्म म्हणजे १२ वर्षे कार्यरत राहू शकतो. ६ वर्षांपूर्वी पुजारी वर्गातर्फे उमेश पुजारी यांचे नाव विश्वस्त पदासाठी दिले होते. मात्र त्यांनी तत्पूर्वी दोन टर्म पूर्ण केल्यामुळे तत्कालीन अध्यक्षांनी पुजारी वर्गास पर्यायी नाव सुचवण्यास सांगितले. पूजारी वर्गाने नरेश पुजारी यांचे नाव सूूचवले. याविरोधात पुजारी यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे एकतर्फी फेरफार अर्ज केला होता. याविरोधात ट्रस्टने सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. यावर निकाल देताना सहधर्मादाय आयुक्तांनी पुजारी तसेच अन्य पुजारी यांना फेरफार अर्ज दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत सदर अर्ज रद्दबातल ठरवला. नियम कायम ठेवला पुजारी यांच्या अर्जाविरोधात ट्रस्टने ‘रिव्हिजन अर्ज’ दाखल केला होता. यावर निकाल देताना सहधर्मादाय आयुक्तांनी स्पष्ट केले की पुजारी यांना असा फेरफार अर्ज दाखल करण्याचा कोणताही वैधानिक अधिकार नाही. तसेच दोन टर्म पूर्ण झालेल्या व्यक्तीला तिसऱ्यांदा संधी देता येणार नाही, हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.
महापालिकेची निवडणूक तब्बल आठ वर्षांनंतर पार पडली असून, आता सर्वांचे लक्ष महापालिकेतील सर्वोच्चपदाकडे अर्थात महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे लागले आहे. महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर झाले आहे. मात्र, या निवडीपूर्वीच महापालिका प्रशासनाने नव्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची आणि सुविधेची तयारी पूर्ण केली आहे. नव्या महापौरांसह, उपमहापौर, स्थायी समिती सभापतींच्या दिमतीला प्रत्येकी ३२ लाखांची एक नवीकोरी कार असणार आहे. महापालिकेत तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असून आता पुन्हा एकदा महापौर आणि स्थायी समिती सभापती ही पदे कार्यान्वित होणार आहेत. या नवीन पदाधिकाऱ्यांचा कामकाजाच्या दृष्टीने पालिकेच्या यांत्रिकी विभागाने नवीन वाहने खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापती यांच्यासाठी प्रत्येकी ३२ लाख रुपये किमतीची नवीन वाहन खरेदी केली जाणार आहे. या खरेदीबाबत पालिकेच्या यांत्रिकी विभागाने संपूर्ण आराखडा तयार केला आहे. लवकरच यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडणार असून, त्यामध्ये वाहन खरेदीच्या प्रस्तावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर नवीन महापौरांच्या पदग्रहणापूर्वी ही वाहने महापालिकेच्या ताफ्यात समाविष्ट करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता लक्ष लागले आहे ते या पदावर कोण येते याकडे. महापौरपदाची निवड झाल्यानंतर इतर पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. सध्या इतर पदांसाठी तसेच स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. यातून नवीन पदाधिकारी महापालिकेत निवडले जातील. पूर्वतयारी म्हणून पालिका प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीचे नियोजन सुरू आहे. विरोधी पक्षनेता, प्रभाग सभापतींना चारचाकी पालिकेच्या वतीने विरोधी पक्षनेत्यासह प्रभाग सभापतींना देखील १० ते १२ लाखापर्यंतची चारचाकी देण्यात येणार आहे. तसेच गटनेत्यांनाही पालिकेच्या वतीने चारचाकी वाहन देण्यात येणार असून त्यादृष्टीने पालिकेकडून नियोजन केले जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शहरातील सिडको भागातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सोबत राहणाऱ्या मैत्रिणीनेच एका तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ चोरून चित्रित केले आणि ते आपल्या प्रियकराला पाठवले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर स्वराज धालगडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुणी या अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेतात आणि गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात एकत्र राहत आहेत. १९ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास आरोपी तरुणी आपल्या प्रियकराशी फोनवर संशयास्पद बोलत होती. “कसे वाटले फोटो आणि व्हिडिओ? हॉट आहेत का? असे ती विचारत असताना पीडितेने तिला रंगेहाथ पकडले. संशय बळावल्याने पीडितेने तिचा मोबाइल हिसकावून घेतला आणि पासवर्ड विचारून तपासणी केली. स्नॅपचॅटवर उघड झाला डाव पीडितेने मोबाइलमधील गॅलरी आणि स्नॅपचॅट तपासले असता तिला मोठा धक्का बसला. १८ जानेवारी रोजी ती खोलीत कपडे बदलत असताना आरोपी मैत्रिणीने तिचे चोरून चित्रीकरण केले होते. हे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तिने स्वराज धालगडे याला पाठवल्याचे स्पष्ट झाले. पीडितेचे धाडस आणि पोलिस कारवाई या मानसिक त्रासाला न जुमानता पीडितेने अत्यंत धाडसाने ही बाब वसतिगृहाच्या वॉर्डन आणि आपल्या पालकांना सांगितली. पालकांच्या पाठिंब्यानंतर तिने सिडको पोलिस ठाण्यात धाव घेतली. ...अन् आत्महत्येची धमकी आपले पितळ उघड झाल्याचे लक्षात येताच आरोपी तरुणीने कांगावा सुरू केला. सुरुवातीला माफी मागणाऱ्या तरुणीने प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार असल्याचे समजताच पीडितेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. “जर तू तक्रार केलीस, तर मी माझ्या जिवाचे बरे-वाईट करून घेईन आणि त्याला तूच जबाबदार असशील,’ अशी धमकी तिने पीडितेला दिली.
महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरी अद्याप एकाही राजकीय पक्षाने आपल्या गटनेत्याची अधिकृत नियुक्ती केलेली नाही. विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतर महापालिकेने सर्व पक्षांना गट नोंदणीचे आवाहन केले असले तरी पक्षांतर्गत खलबते आणि वशिलेबाजीमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. गटनेता नेमण्यावरून सर्वच प्रमुख पक्षांमध्ये सध्या कमालीची ओढाताण सुरू असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या कामकाजात गटनेत्याची भूमिका कणा मानली जाते. आपल्या पक्षाच्या नगरसेवकांचे नेतृत्व करण्यासोबतच सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीत पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. महत्त्वाच्या विषयांवर व्हीप लागू करण्याचे अधिकारही गटनेत्याकडेच असतात. त्यामुळे आपला गटनेता अभ्यासू, एकनिष्ठ आणि नेतृत्वाच्या विश्वासातील असावा यासाठी प्रत्येक पक्ष सावध पावले उचलत आहे. कडक नियमावलीचा अडसर यंदा गटनेता नोंदणीची प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे. पूर्वी केवळ नगरसेवकांच्या सह्यांनी काम होत असे, मात्र आता आठ प्रकारची कागदपत्रे बंधनकारक आहेत. यात गटनेत्याच्या निवडीचे शिफारसपत्र, बैठकीचे ठराव, सदस्यांच्या बैठकीची पोच, गटाचे नियम, निवडणूक आयोगाचे मूळ प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि छायाचित्रे अशा तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. या कागदपत्रांच्या जंजाळामुळे आणि अंतर्गत राजकीय समीकरणे जुळत नसल्याने प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. राजकीय गणिते अन् सुरू आहे वर्चस्वाची लढाई गटनेत्यांच्या निवडीत होणारा हा विलंब केवळ प्रशासकीय नसून पूर्णतः राजकीय आहे. गटनेता हा महापालिकेतील पक्षाचा चेहरा असतो. भविष्यातील स्थायी समिती, विषय समित्या आणि विशेषतः महापौर निवडणुकीत गटनेत्याची भूमिका कळीची ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या नियंत्रणात राहणारा आणि भविष्यातील गणिते सांभाळणारा चेहरा शोधत आहे. सुशिक्षित आणि अनुभवी नगरसेवकांकडून वरिष्ठांकडे फील्डिंग लावली जात असल्याने आगामी काळात हे अंतर्गत राजकारण अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीतील घटकपक्षांना चांगलीच गळती लागली आहे. ही गळती न.प., मनपा निवडणुकीनंतर आता तर जि.प. निवडणुकीपर्यंत कायम आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना पक्षात घेण्यासाठी सत्त्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. १४ महिन्यांत अशा तब्बल ७८ “रनर अप्सनी’ सत्ताधारी महायुतीत प्रवेश केल्याचे ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आले. सर्वाधिक ४१ जण भाजपत, २१ अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, तर १५ उमेदवारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. याशिवाय ६ जण अन्य पक्षांत गेलेत. त्यामुळे ही संख्या ८४ पर्यंत पोहचली आहे. या कोलांटउड्यांमुळे नगरपरिषद अन् महानगरपालिका निवडणूकांत सत्ताधाऱ्यांना चांगलाच फायदा झाला. २०२४ च्या लोकसभेत मविआला चांगले यश मिळाले होते. पण ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणूकीपर्यंत मविआ नेत्यांना यश टिकवता आले नाही. दरम्यान १० वर्षांपासुन प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचा अंदाज आल्याने विरोधी पक्षातील उमेदवारांनी नवीन घर शोधण्यास सुरूवात केली आहे. महायुतीनेही अशा नेत्यांना सहज केजच्या संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. नंतर मागे घेऊन राष्ट्रवादी शपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्याच पक्षात प्रवेश केला. आता त्या शिंदेसेनेत आल्या आहेत.
‘हम मुंब्रा को हरा बना देंगे’ या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच मुंब्रा येथील एमएमआयच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर युनूस शेख यांनी पोलिस ठाण्यात लेखी माफीनामा सादर केला. परंतु सहर शेख यांच्या भेटीसाटी मुंब्रा येथे आलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या वादात उडी घेत आगीत तेल ओतले. “आम्ही फक्त मुंब्राच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू,’असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत इम्तियाज भगवे उपरणे घालून हजर होते. त्या वेळी त्यांनी माझ्यावर कारवाई करून दाखवा, अशा शब्दांत इम्तियाज यांनी भाजप आणि शिंदे गटाला थेट आव्हान दिले. यावेळी इम्तियाज यांनी किरीट सोमय्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, सहर शेखचे वक्तव्य हीच पक्षाची भूमिका आहे. तिच्यावर कोणत्या कायद्यान्वये ही नोटीस बजावली ? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला. भगवे उपरणे घालून इम्तियाज म्हणाले, महाराष्ट्र हिरवा करू भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना बीएनएसच्या कलम १६८ अन्वये नोटीस बजावली होती. सहर यांनी शुक्रवारी दिलेल्या जबाबात कबूल केले की, त्यांच्या विधानामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्या लेखी स्वरूपात जाहीर माफी मागत आहेत. तसेच ‘आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू’ असे म्हणत त्यांनी आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ न काढण्याचे आवाहन केले. हिरव्या-भगव्याच्या वादातून पक्षविस्ताराची रणनीती विरोधाभासाची रणनीती एमआयएम धर्मनिरपेक्ष असल्याचे दर्शवण्यासाठी भगव्यासह निळे उपरणेही परिधान करून भगवा रंग यावर कुणाची मालकी नाही,असे इम्तियाज म्हणाले. प्रतिमेची मलमपट्टी : एमआयएमच्या तिकिटावर हिंदू उमेदवारही निवडून आल्याचे दाखले देत पक्षावरील ‘जातीयवादी’ शिक्का पुसत सर्वसमावेशी चेहरा दाखवण्याचा प्रयत्न. विस्ताराचे टायमिंग : १२५ नगरसेवक जिंकल्याने वाढलेला विश्वास व मुंब्रा येथील वादाचे निमित्त साधून राज्यात पक्षविस्तारासाठी हे विधान ‘लाँचपॅड’ म्हणून वापरले जात आहे. ठाणे जिल्हा भगवा- एकनाथ शिंदे सहर शेख यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्हा हा भगवा आहे आणि मुंब्रा हा त्यातलाच एक भाग आहे, हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा गड आहे. सहर यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे, जनता त्यांना उत्तर देईल.
नांदेडमध्ये प्रियकराच्या मदतीने केला सासूचा खून:अनैतिक संबंधाला अडसर; 4 जण ताब्यात
हदगाव तहसील कार्यालयात शिपाईम्हणून नोकरीला असलेल्या कमलबाई क्षीरसागरे यांचा त्यांच्या सुनेने, तिच्या भावाने आणि प्रियकराने मिळून संगनमताने खून केला. या प्रकरणी पोलिसांनी काही तपासाचा छडा लावून गुन्ह्याची उकल केली. यातील चारही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हदगाव तहसील कार्यालयामध्ये पतीच्या निधनानंतर अनुकंपातत्त्वावर शिपाई पदावर नोकरी करणारी विधवा महिला कमलबाई क्षीरसागरे ही महिला शहरातील गौतमनगरमध्ये राहते. कमलबाई यांना एकुलता एक मुलगा होता. त्याला दारूचे व्यसन होते. या दारूमुळे त्याचे लिव्हर खराब झाल्याने त्याचा दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला होता. मुलाच्या व्यसनामुळे या महिलेचे इतरत्र सुत जुळाले असल्याची चर्चा होती.कमलबाई व तिच्या सुनेचे याच कारणावरून वारंवार वाद होत असत. दरम्यान, सासू कमलाबाई गंगाधर क्षीरसागरे (५४) ही गाढ झोपेत असताना संशयित आरोपी सुनीता व तिचा प्रियकर परमेश्वर किशन वानखेडे (२६) (रा.वटफळी ता. हिमायतनगर) या दोघांनी कमलबाईचा स्कार्फने मरेपर्यंत गळा आवळला. दरम्यान, या प्रकरणी मृताचा नातू सतीश वाघमारे यांनी दिलेल्या अर्जावरून १३ जानेवारी रोजी हरवल्याची नोंद दाखल करण्यात आली होती. दोन तासानंतर पोलिसांना अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. हा खुनाचा गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यावर तपासाची चक्रे फिरवली. मृताच्या फोनचे कॉल डिटेल्स काढून योग्यदिशेने तपास केल्यावर वरील संशयित आरोपी निष्पन्न झाले.
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहिदी सोहळ्यानिमित्त शनिवारी नांदेडनगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ‘बोले सो निहाल... सत श्री अकाल’चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात भव्य ‘नगरकीर्तन’ सोहळा पार पडला. असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात श्री गुरुग्रंथसाहिबांचे अत्यंत भक्तिमय व मंगल वातावरणात विधिवत विराजमान झाले. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दुपारी मुख्य कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. तत्पूर्वी त्यांनी ऐतिहासिक तखत सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबजी गुरुद्वारा येथे ‘बोले सो निहाल’च्या जयघोषात पवित्र गुरू ग्रंथसाहिबजीसमोर माथा टेकला. शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या बलिदानास ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शनिवार व रविवार असे दोन दिवस ‘हिंद-दी-चादर’ सोहळा भव्य दिव्य स्वरूपात होत आहे. या ऐतिहासिक नगरकीर्तनाला (दि. २४) सकाळी ८ वाजता तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिबजी येथून प्रारंभ झाला. चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शहिदी कार्यक्रमाच्या स्थळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीने उभारण्यात आलेल्या जनकल्याण चिकित्सा शिबिराचा नागरिक मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. या शिबिरात पहिल्या दिवशी भाविकांची उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग यांसह विविध आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात येत आहेत. तसेच औषधे, काठ्या, कृत्रिम अवयव व चष्म्यांचे वाटप करण्यात येत असून हजारो नागरिक या सुविधांचा लाभ घेत आहेत. या शिबिरात श्री गुरुग्रंथसाहिब सेवा संस्थेच्या गुरू का लंगर डोळ्याचा दवाखानाच्या वतीने भरीव सहभाग देऊन योगदान देत आहेत. या शिबिराचा सुमारे साडेपचार हजार जणांनी लाभ घेतला. श्री गुरुग्रंथसाहिबजींच्या दर्शनाने भक्तीचा महासंगम, लंगरची व्यवस्था आयोजकांच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली असून स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांचे सहकार्य मिळत आहे. भव्य लंगरची व्यवस्था केली असून भाविक याचा लाभ घेत आहेत. गुरुद्वारातर्फे भाविकांसाठी अखंड कीर्तन सुरू आहे. श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांचा त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचे स्मरण या शहिदी समागमाच्या माध्यमातून करण्यात येत असून या कार्यक्रमातून समाजात बंधुता व एकतेचा संदेश पोहोचत आहे. श्री गुरुग्रंथसाहिबजींच्या दर्शनासाठी भाविकांनी महासागरासारखी गर्दी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून ४ किमीपर्यंत स्वागत गेट क्रमांक १ ते मोदी मैदान या अंदाजे चार किलोमीटरच्या मार्गावर एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरुग्रंथसाहिबजींचे दर्शन घेतले. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक ‘गतका’ प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘लेझीम’ नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात ‘मानवता की सच्ची मिसाल’ आणि ‘हिंद-दी-चादर’ असे फलक घेऊन सामाजिक संदेशही या वेळी दिला.
कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक गेल्या आठवड्याभरापासून मोबाइल बंद करून बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांनी पळवून नेल्याचा संशय ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी व्यक्त केला असून याप्रकरणी त्यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठाकरे गटाचे ११ नगरसेवक विजयी झाले आहेत. महापालिकेचा निकाल लागल्यानंतर नगरसेवक ॲड. कीर्ती ढोणे आणि मधुर म्हात्रे यांनी आपले संपर्क क्रमांक बंद केले. त्यानंतर स्वप्नाली केणे आणि राहुल कोट हेदेखील पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कातून बाहेर झाले. या चारही नगरसेवकांनी पक्षाशी आणि मतदारांशी प्रतारणा केल्याची भावना आता शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे. हे नगरसेवक ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांच्या जीविताची आणि संरक्षणाची जबाबदारी पक्षाची आहे असेही पाटील यांनी सांगितले. या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बेपत्ता नगरसेवकांचे ‘मिसिंग’ पोस्टर कल्याण-डोंबिवलीत लावणार असून ते भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यालयांवर चिकटवू, असा आक्रमक पवित्रा ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे. पक्षांतर केल्यास कारवाईचा बडगा आठवडा उलटूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येत आहे. या नगरसेवकांनी पक्षांतर करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची तयारीही ठाकरे गटाने केली आहे.
अंजली दमानिया यांचा संताप, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आरोप मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ््यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत असून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली भूमिका मांडली. छगन भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना कुठलीही क्लीनचीट […] The post भुजबळांविरुद्ध कोर्टात जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यायाधीशांच्या बदलीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप!
माजी सरन्यायाधीश गवईंची कबुली, न्यायमूर्तींची उघड टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या कार्यकाळात घेतलेल्या कॉलेजियमच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कॉलेजियम व्यवस्थेत कार्यकारी यंत्रणेच्या हस्तक्षेपावर त्यांनी उघड टीका केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अतुल श्रीधरन यांची बदली केंद्र सरकारच्या विनंतीवरून अलाहाबाद […] The post न्यायाधीशांच्या बदलीत केंद्र सरकारचा हस्तक्षेप! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतावरील २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ रद्द?
रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याने दिलासा? नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी २५ टक्के आणि त्यानंतर रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने अतिरिक्त २५ टक्के असे एकूण ५० टक्के टॅरिफ भारतावर लादला होता. आता भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याने अमेरिकेने सकारात्मक संकेत देत नरमाईची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. […] The post भारतावरील २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ रद्द? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बांगलादेश क्रिकेट संघाला आयसीसीची दणका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी बांगलादेशला थेट बाहेरचा रस्ता दाखविला असून, या संघाच्या जागी स्कॉटलंडला स्थान दिले आहे. टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये बांगलादेश क गटात होता. आता स्कॉटलंड बांगलादेशच्या जागी गट क मधून खेळेल. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचे कारण देत त्यांचे सामने श्रीलंकेत स्थलांतरित करावेत, अशी मागणी केली होती. […] The post बांगलादेश क्रिकेट संघाला आयसीसीची दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजीव गांधी पॉलिटेक्निक विभागीय स्पर्धेत प्रथम
लातूर : प्रतिनिधी अंतरमहाविद्यालयीन अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटनेच्या (आय. डी. एस. एस. ए.) गट क्रमांक दोनच्या विभागीय क्रीडा स्पर्धेत श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित राजीव गांधी अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत वेटलिफ्टिंग ६२ किलो वजन गटात शिंदे ओमकार याने प्रथम क्रमांक पटकावला, तर ५८ […] The post राजीव गांधी पॉलिटेक्निक विभागीय स्पर्धेत प्रथम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन हिंगोलीत
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय अधिवेशन व वार्षिक आमसभा दि. २६ व २७ जानेवारी रोजी हिंगोलीतील रामलिला मैदानासमोरील महावीर भवन येथे होणार आहे, अशी माहीती महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विके्रता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर वर्धा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून यासाठी शेकडो वृत्तपत्र विक्रेते उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे उद्घाटन २७ […] The post महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन हिंगोलीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिरंग्यानी सजली लातूरची बाजारपेठ
लातूर : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाला अवघा एक दिवस उरला असताना लातूरच्या बाजारामध्ये मोठया प्रमाणावर तिरंग्याचे विविध साहित्य विक्रिसाठी उपलब्ध झाले आहेत. यामध्ये तिरंगा झेंड्याची विक्री मोठया प्रमाणावर होत आहे. तसेच बाजारामध्ये अनेक नवीन वस्तू पाहायला मिळत आहे. यामध्ये खादीसह तिरंगी दुपट्टा, टी-शर्ट, हातातील माळ, टोपी अशा विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत तर खरेदी करण्यासाठी […] The post तिरंग्यानी सजली लातूरची बाजारपेठ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त आज बैठक
लातूर : प्रतिनिधी लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षी महाशिवरात्रीचे औचित्य साधत यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी १५ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सव सुरु होणार असून या महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी आज दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीचे औचित्य साधून लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर व […] The post श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त आज बैठक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आणि तर्क-वितर्क लढवले जात होते. अखेर खुद्द संजय राऊत यांनीच या मौनाला पूर्णविराम दिला आहे. मला पोटाचा कॅन्सर झाला होता, असा धक्कादायक पण तितकाच धाडसी उलगडा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वैयक्तिक लढाईतून ते आता यशस्वीपणे बाहेर पडत असून, त्यांनी पुन्हा एकदा राजकीय मैदानात पूर्ण ताकदीने एन्ट्री केली आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत संजय राऊत यांनी त्यांच्या आजारपणाचा सविस्तर प्रवास मांडला. ते म्हणाले, गेल्या वर्षी दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी मला कॅन्सरचे निदान झाले. माझे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी माझे रक्त तपासले होते, त्यातून हे निष्पन्न झाले की मला पोटात कॅन्सर आहे. हे निदान झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र मी खचलो नाही. शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू संजय राऊत यांच्यावर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून ते काही दिवस रुग्णालयातही उपचार घेत होते. मध्यंतरी त्यांचा मास्क लावलेला फोटो समोर आल्याने समर्थकांमध्ये धाकधूक वाढली होती. त्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, काही सर्जरी झाल्या आहेत आणि काही अजून बाकी आहेत. त्या होतीलच. आपण राजकारणात अनेकांच्या 'सर्जरी' करतो, ही तर आपल्या शरीरातील सर्जरी आहे. मी त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय आणि जेव्हा जेव्हा शक्य झाले, तेव्हा मी लोकांसमोर उभा राहिलो आहे. स्वपक्षीयांसह विरोधकांकडूनही विचारपूस संजय राऊत यांच्या आजारपणाची बातमी समजताच महाराष्ट्रातील राजकीय कटुता बाजूला ठेवून अनेक बड्या नेत्यांनी त्यांची विचारपूस केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जुन्या मैत्रीच्या नात्याने राऊतांच्या आरोग्याबद्दल काळजी व्यक्त केली होती. तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सतत त्यांच्या संपर्कात होते. लढवय्या वृत्तीचे दर्शन कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे निदान होऊनही संजय राऊत यांनी आपली लेखणी थांबवली नाही. आजाराच्या काळातही त्यांनी 'सामना'तून आपली भूमिका मांडणे सुरूच ठेवले होते.
जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात हा महोत्सव भरवला जाईल. या स्पर्धेत सुमारे ३ हजार अधिकारी आणि कर्मचारी विविध खेळांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण सादर करतील. दैनंदिन कामकाजातून कर्मचाऱ्यांना थोडी उसंत मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने हे आयोजन केले आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील १४ तालुक्यांचे १४ संघ आणि मुख्यालयाचा एक संघ असे एकूण १५ संघ सहभागी होणार आहेत. या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होईल. तर, समारोप आणि बक्षीस वितरण १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. क्रिकेट वगळता सर्व सांघिक स्पर्धा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात खेळवल्या जातील. कबड्डीचे सर्व सामने पारंपरिक पद्धतीने मातीच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. यामध्ये खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल पासिंग, व्हॉलीबॉल स्ट्रोक्स, फुटबॉल, बॅडमिंटन (एकेरी, दुहेरी, ४५ वर्षांवरील), टेबल टेनिस (एकेरी, दुहेरी), टेनिक्वॉईट (एकेरी, दुहेरी) आणि कॅरम (एकेरी, दुहेरी) या खेळांचा समावेश आहे. वैयक्तिक स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, १५०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे (४५ वर्षांवरील), १५०० मीटर धावणे (४५ वर्षांवरील), रिले रेस ४x१००, लांब उडी, उंच उडी, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, ५० मीटर आणि १०० मीटर जलतरण (सामान्य व ४५ वर्षांवरील) तसेच बुद्धिबळ या खेळांचा समावेश आहे. सर्व स्पर्धा सकाळी ९ वाजता सुरू होतील. दरम्यान, क्रिकेट स्पर्धा २८ जानेवारीपासून मोतीनगर येथील नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवल्या जातील. जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीराम कुलकर्णी आणि क्रीडा संयोजक तथा उपशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.
अमरावती येथे राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत बाल नाट्य स्पर्धेची विभागीय पातळीवरील प्राथमिक फेरी आजपासून (रविवार, २५ जानेवारी) सुरू झाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या (पीडीएमसी) छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते झाले. या फेरीत तब्बल ८९ हून अधिक बाल नाटकांचे सादरीकरण होणार आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, प्राथमिक फेरीत सादर होणाऱ्या नाटकांपैकी ५ उत्कृष्ट बाल नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. मराठी रंगभूमीला नवोदित कलाकार मिळवून देणे, नाट्य चळवळीला प्रोत्साहन देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा समृद्ध करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. एम. टी. नाना देशमुख, ज्येष्ठ रंगकर्मी विराग जाखड आणि नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले हे मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा संयोजक विशाल फाटे आणि मराठी नाट्य परिषदेचे पदाधिकारी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेचे आयोजन पहिल्यांदाच पीडीएमसीच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होत आहे. एकाचवेळी ८९ नाटकांचा समावेश हा अमरावतीसाठी एक विक्रम ठरला आहे. ही स्पर्धा मुलांमधील कलावंतांना घडवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून पाहिली जात आहे. यापूर्वी याच सभागृहात हौशी प्रौढांच्या नाटकांची विभागीय फेरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एकांकिका स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
ॲड. मानसी चव्हाण यांनी भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 'भारतीय संविधान आणि आपण : ओळख, अर्थ आणि पाया' या त्यांच्या नव्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या उपक्रमाद्वारे त्यांनी प्रत्येक घरात, प्रत्येक कार्यालयात आणि प्रत्येक वर्गखोलीत संविधानावर आधारित किमान एक तरी पुस्तक असावे, असा प्रभावी संदेश दिला आहे. ॲड. चव्हाण यांच्या मते, संविधान ही केवळ कायद्याची किंवा न्यायालयांची संकल्पना नसून ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली आहे. मात्र, संविधानाची भाषा, अर्थ आणि उपयोग याबाबत सामान्य नागरिकांसाठी सुलभ व व्यवहार्य माहिती सहज उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. हे पुस्तक केवळ वकील किंवा संविधानतज्ज्ञांपुरते मर्यादित नाही. विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, कुटुंबे, शेतकरी, कामगार, गृहिणी तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसाठीही ते उपयुक्त ठरेल, असे ॲड. चव्हाण यांनी स्पष्ट केले. ॲड. मानसी चव्हाण या कार्यरत वकील आणि संविधानिक कायद्याच्या संशोधक आहेत. त्या नागरी शिक्षण आणि सार्वजनिक कायदेविषयक जनजागृतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मते, संवैधानिक साक्षरता केवळ वर्गखोल्या, न्यायालये किंवा औपचारिक भाषणांपुरती मर्यादित न राहता, मूल्यांची जडणघडण होणाऱ्या घरांमध्ये, निर्णय घेतले जाणाऱ्या कार्यालयांमध्ये आणि नागरिकत्वाची पायाभरणी होणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचली पाहिजे. या अनुषंगाने, प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण समारंभांमध्ये या पुस्तकाची ओळख करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालये, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संघटना, तसेच स्थानिक सभा व नागरी मंचांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे केवळ प्रतीकात्मक उत्सव साजरा न करता, लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी अधिक अर्थपूर्ण पद्धतीने अधोरेखित करण्याची संधी मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर आता सत्तेच्या समीकरणांनी वेगळेच वळण घेतले आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील तीव्र गटबाजीमुळे पक्षाची सत्ता अडचणीत आली आहे. याच संधीचा फायदा घेत भाजपने सत्तेसाठी हालचाली सुरू केल्या असून, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष असे एकूण १० नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले आहेत. हे नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याने चंद्रपुरात मोठा राजकीय उलटफेर होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमध्ये महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या वादाला कंटाळून शिवसेना ठाकरे गटाचे ६, वंचित बहुजन आघाडीचे २ आणि २ अपक्ष नगरसेवकांनी मुंबईची वाट धरली आहे. या १० नगरसेवकांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली असून, आता ते मुंबईत दाखल होत आहेत. काँग्रेसकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने हे नगरसेवक भाजपला साथ देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सत्तेचे गणित: भाजप बहुमताच्या जवळ? चंद्रपूर महापालिकेत बहुमतासाठी ३४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीतील आकडेवारी पाहता भाजप मोठी झेप घेताना दिसत आहे. भाजपकडे २३, ठाकरेंची सेना ६, वंचित बहुजन आघाडी २, अपक्ष २ यांसह शिंदे गट १, बसपा १ या सर्वांची बेरीज झाल्यास भाजप ३४ चा मॅजिक फिगर गाठून काँग्रेसला महानगरपालिकेतील सत्तेपासून दूर ठेवू शकते. काँग्रेसमध्ये 'गृहयुद्ध'; प्रदेशाध्यक्षांची मध्यस्थी काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी दोन्ही गटांनी स्वतंत्र दावे सादर केल्याने गोंधळ उडाला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केल्यानंतर वडेट्टीवार यांनी काहीशी नमती भूमिका घेत धानोरकर यांना सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करण्यास सांगितले. खासदार धानोरकर यांनी ३१ नगरसेवक आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात १० नगरसेवक मुंबईकडे गेल्याने त्यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसणार - परिणय फुके भाजप आमदार परिणय फुके यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना आत्मविश्वासाने सांगितले की, चंद्रपुरात १०० टक्के भाजपचीच सत्ता येईल. काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे त्यांचे नगरसेवक अस्वस्थ आहेत आणि शहराला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसचा एक गट फुटून आमच्याकडे येऊ शकतो. विरोधकांच्या या अस्वस्थतेचा फायदा भाजपला मिळेल, असा ठाम विश्वास फुकेंनी व्यक्त केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजप-महायुतीचा 'बिनविरोध' पॅटर्न पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत आज महायुतीने विरोधकांना मोठा धक्का दिला असून, तब्बल ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे १० आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. सिंधुदुर्ग हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मूळ जिल्हा असून, येथे खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा मोठा प्रभाव आहे. राणे पिता-पुत्रांच्या राजकीय व्यूहरचनेमुळे जिल्ह्यातील अनेक जागांवर विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत असली तरी, त्यापूर्वीच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित झाला आहे. विशेषतः कणकवली आणि देवगड या बालेकिल्ल्यांमध्ये विरोधकांनी चक्क 'नांग्या' टाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या कोणत्या जागा बिनविरोध? जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर ५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये खारेपाटणमधून भाजपच्या प्राची इस्वलकर, देवगड तालुक्यातील पडेलमधून सुयोगी रवींद्र घाडी, बापर्डेमधून अवनी अमोल तेली आणि बांदा मतदारसंघातून प्रमोद कामत या भाजप उमेदवारांनी बाजी मारली आहे, तर जानवली जिल्हा परिषद गटातून शिंदे सेनेच्या रुहिता राजेश तांबे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पंचायत समितीत भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध पंचायत समिती गणांमध्येही महायुतीने सहाही जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असून, हे सर्व उमेदवार भाजपचेच आहेत. यामध्ये कणकवली तालुक्यातील बिडवाडी गणातून संजना संतोष राणे आणि वरवडे गणातून राजेश (सोनू) सावंत यांचा समावेश आहे. देवगड तालुक्यात पडेलमधून अंकुश यशवंत ठूकरूल, नाडणमधून गणेश सदाशिव राणे आणि बापर्डे गणातून संजना संजय लाड यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तसेच वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे गणातून साधना सुधीर नकाशे या देखील बिनविरोध निवडून आल्या आहेत. या सर्व जागांवर विरोधकांनी दिलेले आव्हान माघारी घेतल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. २७ जानेवारीला आणखी धक्के बसणार? पालकमंत्री आणि स्थानिक नेत्यांनी उर्वरित ४५ जागांवरही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. हा विजय म्हणजे जनतेचा राणे कुटुंबीयांवरील विश्वास आणि महायुतीच्या कामाची पावती आहे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारी रोजी आणखी काही ठिकाणी विरोधक माघार घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताचे ५३ वे सरन्यायाधीश सूर्य कांत हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई उच्च न्यायालयातर्फे आयोजित सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्यातील एका फोटोवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि न्यायव्यवस्थेच्या विलंबावर कडक शब्दांत टीका केली आहे. धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला! न्यायदेवते त्यांना क्षमा कर!, अशा आशयाची पोस्ट करत राऊतांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर न्यायमूर्ती सूर्य कांत यांचा मुंबई उच्च न्यायालयात भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांनी सरन्यायाधीशांना गणेशाची मूर्ती देऊन त्यांचे अभिनंदन केले. याच भेटीचा फोटो संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. राऊत यांनी केवळ फोटो शेअर केला नाही, तर त्यावर अत्यंत जळजळीत भाष्यही केले. धनुष्यबाण आणि घड्याळाचा निकाल लागला! न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम!, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे या भेटीमुळे न्याय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी सुद्धा एकनाथ शिंदेंनी विमानतळावर जाऊन सरन्यायाधीशांचे स्वागत केल्यावर राऊतांनी म्हणून तीन वर्ष तारीख पे तारीख! असा टोला लगावला होता. चिन्हांच्या सुनावणीचा पेच कायम संजय राऊत यांच्या संतापामागे प्रलंबित असलेल्या न्यायालयीन सुनावण्यांचे मोठे कारण आहे. शिवसेनेतील फुटीनंतर 'धनुष्यबाण' आणि पक्षाचे नाव निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे, तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 'घड्याळ' आणि पक्षाचे नाव अजित पवार गटाला मिळाले आहे. या दोन्ही निर्णयांविरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या प्रकरणावर अंतिम निकाल लागलेला नाही. विशेष म्हणजे, बुधवारपासून (२१ जानेवारी) या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार होती, मात्र ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. एका बाजूला सुनावणी लांबणीवर पडणे आणि दुसऱ्या बाजूला सरन्यायाधीशांच्या दौऱ्यात सत्ताधारी नेत्यांची जवळीक दिसणे, यामुळे ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. निकालाचा कौल आधीच निश्चित झाला आहे का? असा सूचक सवाल संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.
पुण्यात भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचे एक अनोखे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने हे दोन दिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने आयोजित हे प्रदर्शन २५ आणि २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत जय गणेश प्रांगण, बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरासमोर पुणेकरांसाठी खुले राहील. या प्रदर्शनात भारतीय पायदळ, नौदल आणि हवाईदलासाठी लागणारी विविध प्रकारची शस्त्रास्त्रे, दारुगोळा आणि युद्धसज्जतेसाठी आवश्यक साधनांची मॉडेल्स ठेवण्यात येणार आहेत. ग्रेनेड, लढाऊ विमानातील बॉम्ब, रॉकेटचे विविध प्रकार, तोफांसाठी लागणारा दारुगोळा, विविध प्रकारचे ड्रोन, मल्टी बॅरेल लॉन्च सिस्टिम, बुलेट्स, हँड ग्रेनेड, अँटी सबमरीन रॉकेट आणि एरियल बॉम्ब यांसारखी शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी मिळेल. सैन्यदलातील जवान या प्रदर्शनाच्या नियोजनात सहभागी असून, ते प्रत्येक शस्त्राविषयी तात्काळ माहिती देतील. गेल्या १५० वर्षांपासून पुण्यामध्ये देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकटी देणारी अभेद्य शस्त्रास्त्रे म्युनिशन्स इंडिया लिमिटेडद्वारे साकारली जात आहेत. ही शस्त्रास्त्रे भारतासह विविध देशांमध्ये निर्यात केली जातात. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, भारतीय संरक्षण व्यवस्था जगातील चौथी सर्वात शक्तिशाली सैन्यशक्ती आहे. पुणे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA), सीएमई (CME) आणि डीआरडीओ (DRDO) सारख्या संस्थांमुळे देशाचे एक महत्त्वाचे संरक्षण केंद्र आहे. म्युनिशन्स इंडिया लिमिटेड संपूर्ण देशाला शस्त्रास्त्रे पुरवते. हे प्रदर्शन विनामूल्य असून, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत समविचारी साहित्यप्रेमींनी एकत्र येत ‘साहित्य संवर्धन आघाडी’ची स्थापना केली आहे. ही आघाडी आगामी निवडणूक लढवणार असून, परिषदेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तिची स्थापना करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या आघाडीच्या वतीने योगेश सोमण अध्यक्षपदासाठी, प्रदीप निफाडकर कोषाध्यक्षपदासाठी, तर डॉ. स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाहपदासाठी निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय, व्याखाने व स्मृतिदिन विभागासाठी सुनील महाजन, ग्रंथनिवड विभागासाठी हेमंत मावळे, पारितोषिके विभागासाठी सुनेत्रा मंकणी, ग्रंथालय विभागासाठी प्रसाद मिरासदार, परीक्षा विभागासाठी कुणाल ओंबासे, वास्तू देखभाल विभागासाठी नितीन संगमनेरकर आणि वर्धापन पारितोषिके विभागासाठी डॉ. गणेश राऊत असे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. संदीप तापकीर यांना पुणे जिल्हा प्रतिनिधी पदासाठी पॅनलच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. यावेळी बोलताना योगेश सोमण म्हणाले की, “दहा वर्षांनंतर ही निवडणूक होत असून परिषदेमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आमचा जाहीरनामा आगामी दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाईल. राज्यभरात सुमारे १६ हजार मतदार असून, प्रत्येक मतदारापर्यंत मतपत्रिका पोहोचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अधिकाधिक मतदान व्हावे, ही आमची भूमिका आहे.” सोमण यांनी पुढे सांगितले की, “सातारा साहित्य संमेलनाच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांचा हिशेब सर्वांसमोर आणून आवश्यक ती चौकशी केली जाईल.” कोषाध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर म्हणाले, “निवडून आल्यावर आम्ही कोणती कामे करणार आहोत, याची सविस्तर माहिती मतदारांना दिली जाईल. १४० वर्षांची परंपरा असलेल्या या संस्थेचे कामकाज पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने चालावे, यासाठी आमचा लढा आहे. यापूर्वीच्या कार्यकाळातील अनेक बाबी प्रसारमाध्यमांतून उघडकीस आल्या आहेत. पुणे हे सांस्कृतिक शहर असून, महाराष्ट्र साहित्य परिषद ही त्याची शान आहे.” निफाडकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवरही बोट ठेवले. ते म्हणाले, “निवडणूक प्रक्रियेत दबाव, मतपेटी पळवणे, मतपत्रिका गायब होणे, आमिषे दाखवणे असे प्रकार घडले आहेत. ही लढाई धमकी विरुद्ध विनंती, लालुच विरुद्ध प्रतिष्ठा अशी आहे. मतदार यादी सदोष असून, ती पारदर्शक करण्याचा आमचा मानस आहे. सध्याची निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार होत नसल्याचा आमचा आरोप आहे.”
पुणे शहरातील कोंढवा भागात सराफी पेढीतून दोन लाख ६८ हजार रुपयांचा सुवर्णहार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी ही चोरी केली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा खुर्द येथील एका सराफी पेढीच्या मालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. दोन महिला बुरखा परिधान करून दुकानात आल्या आणि त्यांनी कर्मचाऱ्याला सुवर्णहार दाखवण्यास सांगितले. कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून त्यांनी दोन लाख ६८ हजार रुपये किमतीचा सुवर्णहार चोरला. चोरी लक्षात येताच दुकानदाराने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, फरार झालेल्या महिलांचा शोध सुरू आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन थोरात या प्रकरणाचा तपास करत आहेत. मेट्रो स्थानकावरून केबल चोरी दरम्यान, पुणे शहरातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेवरील बाणेर मेट्रो स्थानकाच्या आवारातून ५० हजार रुपयांची केबल चोरीला गेल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेट्रोच्या कर्मचाऱ्याने याबाबत फिर्याद दिली आहे. बाणेर रस्त्यावरील महाबळेश्वर हॉटेलजवळ असलेल्या मेट्रो स्थानक परिसरात एका टेम्पोतून उतरलेल्या चोरट्यांनी ही केबल चोरून नेली. केबल चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक शैला पाथरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना यापूर्वीही मेट्रोचे साहित्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
पुणे-सोलापूर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अभियंत्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी मांजरीतील शेवाळवाडी पीएमपी बस आगार परिसरात घडली. याप्रकरणी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयातील उपअभियंता राहुल रामकृष्ण कुलकर्णी (वय ५२) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी परिसरात पीएमपीचे आगार आहे. या आगाराच्या परिसरात खासगी बस लावण्यात आली होती. ही जागा शासकीय असल्याने महामार्ग प्राधिकरणाचे पथक, ज्यात अभियंता अतुल सुर्वे आणि संभाजी लाखे यांचा समावेश होता, तेथे कारवाईसाठी गेले होते. पथकातील कर्मचाऱ्यांनी खासगी बसचे छायाचित्र काढले, तेव्हा कारवाई सुरू झाली. कारवाई सुरू असताना आरोपी महिला आणि तिचे साथीदार घटनास्थळी आले. महिलेने पथकाला, तुम्ही या जागेत पाऊल कसे ठेवले? ही जागा माझी आहे, येथून चालते व्हा, अशी धमकी दिली. यानंतर महिलेसोबत असलेल्या एका साथीदाराने खासगी बसमध्ये ठेवलेले दांडके आणून उपअभियंता कुलकर्णी यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी गोंधळ घालत जाणीवपूर्वक सदर ठिकाणी तणाव निर्माण करण्याची परिस्थिती केली. आरोपींनी कुलकर्णी यांना तुला संपवून टाकेन, तुझी नोकरी घालवेन. पोलिसांकडे तक्रार करून जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन. मी अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची नोकरी घालवली आहे, अशी धमकी दिल्याचे कुलकर्णी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मांजरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश कवळे करत आहेत.
राज्याचे सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधक दीपक तावरे यांनी म्हटले आहे की, बँकेचे मूल्यांकन केवळ आकडेवारीत न करता सामाजिक कार्यातूनही व्हायला हवे. पुणे पीपल्स को-ऑप बँक लि. च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित बोधचिन्ह अनावरण आणि पुणे पीपल्स पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. बँकेची सुरुवातीची ओळख 'रिक्षावाल्यांची बँक' अशी असली तरी, आजही त्यांच्या विविध कार्यातून सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट दिसतो, असे तावरे यांनी नमूद केले. हा विशेष कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडला. पुणे पीपल्स बँक अमृतमहोत्सवी (७५ व्या) वर्षात पदार्पण करत असल्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक संजय कुमार, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढेरे, राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे, सहकारी संस्था पुणे चे विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष श्रीधर गायकवाड, उपाध्यक्ष बिपीनकुमार शहा, व्यवस्थापकीय समिती अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्यही यावेळी उपस्थित होते. मनोरुग्ण महिलांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अहिल्यानगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे यांना 'पुणे पीपल्स पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख १ हजार रुपयांचा धनादेश, पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे होते. डॉ. पराग काळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जीवनात जे काही मिळते ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. डॉ. धामणे दांपत्याने हे कार्य प्रत्यक्षात उतरवले असून, बँकेने त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. सहकार चळवळीने समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास साधला पाहिजे, हे पुणे पीपल्स बँकेने सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले. डॉ. राजेंद्र धामणे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, संस्थेचा विश्वस्त असणे म्हणजे 'ते माझे नाही' हे समजून काम करणे होय. सहकार क्षेत्रात ही भावना अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक कार्य हे मानवतावादी दृष्टिकोनातून व्हायला हवे. सामाजिक व्रतस्थतेचा आमचा यज्ञ सुरू असून, या पुरस्कारामुळे आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले. बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त उपस्थितांसाठी 'संकर्षण व्हाया स्पृहा' या विशेष मनोरंजनपर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या 28 जानेवारी रोजी पुण्यात होणार आहे. भारतीय विद्या भवनच्या नातू सभागृहात दुपारी 4 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. एस. हसबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, आचार्य सम्प्रसाद विनोद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, कौशलम् न्यास, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, कॉसमॉस फाउंडेशन आणि नागरी लिपी परिषद यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली होती. आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत? या विषयावर शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक अशा तीन विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. मराठी, हिंदी, संस्कृत आणि तेलगू या चार भाषांमध्ये निबंध सादर करण्यासाठी सुमारे 900 स्पर्धकांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 300 निबंध निवडले गेले. प्रत्येक विभागात प्रथम तीन आणि उत्तेजनार्थ अशा एकूण 35 स्पर्धकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या संयोजिका लीना मेहेंदळे आणि भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी ही माहिती दिली. मेहेंदळे यांनी सांगितले की, भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना, देश आदर्श आणि समर्थ असणे आवश्यक आहे. या दृष्टीने योजनाबद्ध कार्य व्हावे आणि त्या दिशेने विचार व्हावा, या उद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशासमोरचे हे ध्येय साध्य करण्यासाठी काही निकष असावेत आणि त्यांचा वेळोवेळी आढावा घेतला जावा, या हेतूने स्पर्धेचा विषय निकष आणि मोजमापाशी संबंधित निश्चित करण्यात आला होता. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन मिळावे आणि त्यांचा उत्साह वाढावा, यासाठी अनुभवी व्यक्तींचे विचार @nibandhkaushalam या यूट्यूब चॅनेलवर संकलित केले होते. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, लेफ्टनंट जनरल बक्शी आणि माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची विशेष व्याख्याने यासाठी उपयुक्त ठरली. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण www.kyps.in या वेबसाईटवरून पाहता येईल. अधिक माहितीसाठी 8888234444 किंवा 8805455093 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (ACB) आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) केसमध्येही मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. छगन भुजबळांवरील सर्व प्रकरणे संपलेली नाहीत, त्यांना कोणतीही क्लीन चिट मिळालेली नाही. आम्ही या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच फडणवीस सगळ्या भ्रष्टाचारांना घेऊन पुढे जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना अंजली दमानिया यांनी भुजबळांविरुद्धच्या कायदेशीर लढाईचा पाढा वाचला. त्या म्हणाल्या, “2014 साली मी छगन भुजबळांविरोधात जनहित याचिका दाखल केली. एकूण 11 घोटाळ्यांचा त्यात उल्लेख होता. त्यातून तीन गुन्हे दाखल झाले. त्यापैकी दोन प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला असला, तरी एक महत्त्वाचं प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. कोर्टासमोर संपूर्ण व योग्य माहिती मांडली गेली नाही, त्यामुळे असे निर्णय झाले असावेत.” कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरण अजून प्रलंबित अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं की, कलिना सेंट्रल लायब्ररी प्रकरण अजूनही प्रलंबित आहे. “या प्रकरणामुळे भुजबळ यांना अद्याप पूर्ण दिलासा मिळालेला नाही. या संपूर्ण प्रकरणावर मी मुख्य न्यायमूर्तींसह देशाचे सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहिणार आहे,” असंही त्यांनी सांगितलं. ठाकरे अन् फडणवीस सरकारांवर गंभीर आरोप दमानिया यांनी यावेळी सत्ताधारी आणि माजी सरकारांवरही गंभीर आरोप केले. “महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळ यांना आधी उद्धव ठाकरे सरकारने वाचवलं आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारने वाचवलं. एसीबीने या प्रकरणात अपील करणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालं नाही. सगळे एका माळेचे मणी आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी सांगितलं की, 31 मार्च 2022 रोजी ठाकरे सरकारने अपील संदर्भातील शासन निर्णय रद्द केला होता. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये पुन्हा अपील करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. तरीही महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं प्रकरण पूर्णपणे संपलेलं नाही, असा दावा त्यांनी केला. फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात आहेत अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. “भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा नारा देणारे फडणवीस आज भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन पुढे जात आहेत. भाजपची हीच मोडस ऑपरेंडी आहे. आधी आरोप करा, तपास यंत्रणा लावा आणि नंतर त्यांनाच पक्षात सामावून घ्या,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे म्हटलं की, “ईडीच्या आरोपपत्रात सगळे पुरावे आहेत, जबाब नोंदवलेले आहेत. तरीही असा निर्णय येणं दुर्दैवी आहे. सध्या राज्यात केवळ बोली लावण्याचं राजकारण सुरू आहे. फडणवीस यांनी याचं उत्तर महाराष्ट्राला द्यावं.” एसीबीचे आरोप काय होते? या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने असा आरोप केला होता की, सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी कोणतीही निविदा न मागवता ‘के. एस. चामणकर एंटरप्राइजेस’ या कंपनीला कंत्राट दिलं. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी अहवालात चुकीची माहिती दिली आणि बनावट ताळेबंद तयार केल्याचा आरोप एसीबीने केला होता. एसीबीच्या मते, संबंधित विकासकाला 1.33 टक्के नफा होणार असल्याचं दाखवण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात हा नफा तब्बल 365.36 टक्के असल्याचा दावा करण्यात आला होता.
सोलापूर : लवकरच गटनेता आणि महापौर निवडला जाईल. सोलापूरचा चेहरा, सोलापूरचा नागरिक आणि सोलापूरचाच नगरसेवक महापौर होईल, असे मिश्किल उत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी दि. 24 जानेवारी रोजी दिले. गटनेता आणि महापौर निवडीबाबत दि. 24 जानेवारी रोजी बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांना याबाबत माहिती देताना पालकमंत्री गोरे बोलत होते.गटनेता निवडीबाबत चर्चा झालेली आहे. पार्टीच्या सूचना […] The post महापौरपदी सोलापूरचाच नगरसेवक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएमच्या (AIMIM) नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या विधानावरून सुरू झालेला राजकीय गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उडी घेतली असून, त्यांनी सहर शेख यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. सहर शेख यांचे विधान हे केवळ त्यांचे वैयक्तिक मत नसून ती पक्षाचीच अधिकृत भूमिका आहे, असे म्हणत जलील यांनी येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्र 'हिरवा' करणार, असे ते म्हणाले. सहर शेख या सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे चांगल्याच चर्चेत आहेत. या वक्तव्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर सहर शेख यांनी माफी देखील मागितल्याचे समोर आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर एआयएमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज मुंब्य्रात जाऊन नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एआएमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार देखील केला. भगवी शॉल घालून जलील यांची पत्रकार परिषद इम्तियाज जलील मुंब्र्यात आले असता, कार्यकर्त्यांनी त्यांचे भगव्या रंगाची शॉल घालून स्वागत केले. भगवी शॉल गळ्यात ठेवूनत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. याकडे सर्वांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, या देशाला रंगांमध्ये वाटले गेले आहे. रंग कोणत्याही एका जातीचा नसतो, पण विशिष्ट मानसिकतेमुळे रंगांना धर्माशी जोडले जाते. आमचा पक्ष सर्वधर्मीयांना सोबत घेऊन चालणारा आहे. पोलिसांचा कायदा फक्त आमच्यासाठीच का? सहर शेख यांना पोलिसांनी दिलेल्या नोटीसवरून जलील यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ प्ले केला. नितेश राणे जेव्हा मशिदीत घुसून मारण्याची भाषा करतात, तेव्हा त्यांना नोटीस का दिली जात नाही? कायद्याचे निकष फक्त आमच्यासाठीच वेगळे आहेत का? किरीट सोमय्या येतात म्हणून आमच्या नगरसेविकेवर कारवाई होते, हे पोलिसांचे वागणे चुकीचे आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. किरीट सोमय्यांना थेट इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मुंब्रा दौऱ्याचा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनी थेट इशारा दिला. किरीट सोमय्यांना माझे चॅलेंज आहे की, जर त्यांना वाटत असेल की भाजपची सत्ता आहे म्हणून ते काहीही करतील, तर त्यांनी पुन्हा मुंब्र्यात येऊन दाखवावे. ते पुन्हा आले तर त्यांचे जुने व्हिडिओ मी चौकात लावून लोकांना दाखवेन, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला. सहर शेख यांचे विधान आता मागे पडले आहे. आता इम्तियाज जलील विधान देऊन जातोय. त्या तोतल्याला सांगून जातोय की, तू एका मुलीविरोधात कारवाई करत होतास, तर आता माझ्याविरोधात काय कारवाई करायची ती कर, असे थेट आव्हानही इम्तियाज जलील यांनी किरीट सोमय्या यांना दिले. संविधान वाचवणे हीच आमची प्राथमिकता भाजप सत्तेत आल्यापासून 'हिंदू राष्ट्र' करण्याच्या गप्पा मारत असून हे केवळ सत्तेसाठी सुरू आहे, अशी टीका जलील यांनी केली. त्यांनी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचीही निंदा केली. असदुद्दीन ओवेसी यांच्यापेक्षा मोठा घटनातज्ज्ञ नेता या देशात नाही. आम्ही जातीवादी नाही, तर संविधान वाचवण्याची भाषा करणारे लोक आहोत, असे त्यांनी निक्षून सांगितले. एमआयएमचे हिंदू उमेदवारही विजयी! एमआयएमवर होणाऱ्या जातीयवादाच्या आरोपांना उत्तर देताना जलील यांनी पक्षाच्या सर्वसमावेशकतेचा दाखला दिला. आम्ही नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये १२५ जागा जिंकून मोठी झेप घेतली आहे. आमचे हिंदू बांधव विजय उबाळे आणि मयूर सारंग हे मुस्लिम बहुल भागातून एमआयएमच्या तिकिटावर निवडून आले आहेत. आमच्या १२५ विजयी उमेदवारांपैकी अनेक जण हिंदू आहेत. केवळ पराभवाच्या धास्तीने विरोधक आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
स्वत:च्या चुकांवर काम करा; यश निश्चित मिळेल; ऑलिम्पियन मुष्टियोद्धा विजेंदर सिंह
पुणे : प्रतिनिधी जीवनात अनेकदा गोष्टी आपल्याला हव्या तशा, मनाप्रमाणे होत नाहीत. कुठल्याही खेळाडूच्या आयुष्यात यश-अपयश ही न टाळता येणारी गोष्ट आहे. यशाने हरखून न जाणे आणि अपयशाने न खचणे हीच आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट खेळ आपल्याला शिकवतो. त्यामुळे कुठलाही खेळ निवडा, तो सातत्य, चिकाटी आणि स्वत:तील सर्वोत्तम देऊन खेळा. अपयशासाठी कोणालाही दोष न देता […] The post स्वत:च्या चुकांवर काम करा; यश निश्चित मिळेल; ऑलिम्पियन मुष्टियोद्धा विजेंदर सिंह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील सध्याचे राजकारण शिसारी आणणारे आहे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केले होते. या विधानाचा जिवंत प्रत्यय सध्या सोलापूरच्या बार्शी तालुक्यात पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने बार्शीत चक्क दोन्ही शिवसेना (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट) एकत्र आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, त्यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादींनीही हातमिळवणी केल्याने बार्शीत एक 'अजब' महाआघाडी आकाराला आली आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीदरम्यान काही धक्कादायक युती पाहायला मिळाल्या आहेत. अंबरनाथ नगर पालिकामध्ये भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती. पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधात एकत्र लढताना दिसले. इतर काही ठिकाणी भाजप आणि एमआयएमचीही छुपी किंवा उघड आघाडी झाल्याची चर्चा आहे. आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींचे 'फ्यूजन' पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या आमदाराने केले आघाडीचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाआघाडी झाल्याचे आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या एका पत्रकाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या पत्रकात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यात शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्र पक्षांच्या वतीने 'महाआघाडी' करण्यात आली आहे. मशाल आणि धनुष्यबाण: एकाच पत्रकावर! या मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर जे पाहायला मिळाले, त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. या पत्रकावर शिवसेनेचे 'धनुष्यबाण' आणि 'मशाल' ही दोन्ही चिन्हे शेजारी-शेजारी छापण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, एकाच बॅनरवर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो एकत्र झळकत आहेत. राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे हे नेते बार्शीत मात्र 'महाआघाडी'च्या नावाखाली एकत्र आल्याचे चित्र आहे. भास्कर जाधवांच्या आवाहनानंतर हालचालींना वेग? शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी नुकतेच एकनाथ शिंदे यांना आवाहन केले होते की, हिंमत असेल तर मुंबईत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन दाखवा. तसेच परभणीचे खासदार संजय जाधव यांनीही दोन्ही शिवसेना पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बार्शीत झालेली ही हातमिळवणी म्हणजे दोन्ही शिवसेना पक्षांमधील 'पुनर्मिलन' आहे की केवळ स्थानिक सोयीचे राजकारण? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करणा-यांवर बसणार चाप
मुंबई : प्रतिनिधी बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र (यूडीआयडी) वापरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवास सवलतीचा लाभ घेणा-या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करून बनावट ओळखपत्र जप्त करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना पत्र पाठवून दिले आहेत. बनावट […] The post बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करणा-यांवर बसणार चाप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी मुंबई : प्रतिनिधी थंडीचा हंगाम सुरू होताच बाजारात शेवग्याच्या शेंगांना मोठी मागणी वाढली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने शेवग्याच्या शेंगांचे दर चांगलेच वधारले आहेत. सध्या किरकोळ बाजारात शेवग्याच्या शेंगा तब्बल २०० रुपये किलो, तर पाव किलोसाठी ५० रुपये मोजावे लागत आहेत. महागाई असूनही शेवग्याच्या शेंगांना ग्राहकांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. मुंबईच्या बाजारात […] The post शेवग्याची आवक घटली, दर वाढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी स्मृती-पलाश लग्न प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. स्मृतीचा मित्र विज्ञान मानेने लग्नाच्या वेळी नेमकं काय घडलं, याचा खुलासा केला आहे. मित्राने सांगितल्याप्रमाणे, लग्नात पलाश एका दुस-या मुलीसोबत रंगेहाथ पकडला गेला. हे दृश्य खूपच भयानक होते. तसेच हे सर्व पाहिल्यावर स्मृतीने पलाशला मारहाण देखील केली. तसेच तिच्या मैत्रिणींनी देखील पलाशला खूप मारले. […] The post पलाशनेच दिला स्मृतीला धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पेचावरून भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. चंद्रपुरात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापित करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे. वडेट्टीवारांची सध्या नाचता येईना अंगण वाकडं अशी अवस्था आहे, असे परिणय फुके म्हणालेत. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले. चंद्रपूर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला सत्ता काबीज करता आली नाही, यावरून फुकेंनी काँग्रेसच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वडेट्टीवारांवरही निशाणा साधला. नाचता येईना अंगण वाकडं अशी सध्या वडेट्टीवारांची अवस्था आहे. वडेट्टीवार हे ना स्वतःच्या पक्षश्रेष्ठींचे ऐकतात, ना त्यांचे नगरसेवक त्यांचे ऐकतात, असा टोलाही त्यांनी लगावला. मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापन करता न येणे, हे काँग्रेससाठी अत्यंत लाजिरवाणे आहे, असे परिणय फुके म्हणालेत. विरोधकांना झोपेतही भाजप दिसतंय काँग्रेसमधील आपापसातील भांडणांमुळेच जनता त्यांना नाकारत आहे. निवडणूक हरल्यानंतर ईव्हीएम किंवा भाजपवर दोष देण्याची त्यांना सवयच झाली आहे. विरोधकांच्या घरात माशी जरी शिंकली, तरी त्याचा दोष ते भाजपलाच देतात; कारण त्यांना झोपेतही आता भाजपच दिसू लागला आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. चंद्रपुरात भाजपचाच महापौर बसणार! चंद्रपूरच्या राजकारणाबाबत भाष्य करताना फुकेंनी ठाम दावा केला की, चंद्रपुरात १०० टक्के भाजपचीच सत्ता येईल आणि भाजपचाच महापौर होईल. काँग्रेसमध्ये सध्या मोठे गट-तट पडले असून, शहराला स्थिर सरकार देण्यासाठी काँग्रेसचा एक गट फुटून भाजपकडे येऊ शकतो, असे सूचक संकेतही परिणय फुके यांनी यावेळी दिले. भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक पूर्णपणे अस्वस्थ झाले असून, आगामी निवडणुकांतही जनता भाजपलाच कौल देईल, असा विश्वास परिणय फुके यांनी व्यक्त केला. शरद पवारांबाबत मोठे भाष्य शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत फुकेंनी मोठे विधान केले. ते म्हणाले, शिवसेना (उबाठा) आणि महाविकास आघाडी हे आता एक 'बुडते जहाज' आहे. शरद पवार हे अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. ते अशा बुडत्या जहाजात जास्त काळ बसतील असे मला वाटत नाही. भविष्यात ते महायुतीत सहभागी होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये येण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यात अद्याप ठोस तथ्य नसले, तरी राजकारणात वेळेनुसार बदल नक्कीच घडतील, असेही फुके यांनी नमूद केले. भुजबळांच्या 'क्लीन चिट'वर स्पष्टीकरण छगन भुजबळ यांना मिळालेल्या क्लीन चिटबाबत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांनाही फुकेंनी चोख प्रत्युत्तर दिले. ही क्लीन चिट भाजप किंवा राज्य सरकारने दिलेली नाही, तर ती न्यायालयाने दिली आहे. मांडलेली तथ्ये आणि पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला असून, यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिख धर्माचे ९ वे गुरु, श्रीगुरु तेग बहादूरजी साहिब यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शहरात विद्यार्थ्यांनी भव्य कवायत, संचलन व मानवी साखळी करून त्यांना अनोखी मानवंदना दिली. या उपक्रमातून श्रीगुरु तेग बहादूरजींच्या महान बलिदानाचे स्मरण करत सामाजिक ऐक्य, एकोपा आणि सहिष्णुतेचा संदेश देण्यात आला. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी दत्तराव नांदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील विविध नामांकित शाळांमधील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी या भव्य संचलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक भव्य मानवी साखळी तयार करून गुरु तेग बहादूरजींच्या शहिदी दिनानिमित्त मानवंदना अर्पण केली. या उपक्रमात जिल्हा परिषद कन्या प्रशाला, सेक्रेड हार्ट इंग्लीश स्कूल, सरस्वती विद्या मंदिर, मौलाना आझाद स्कूल, भारती विद्या मंदिर, खाकीबाबा विद्यालय, सरजूदेवी कन्या विद्यालय व माणिक स्मारक विद्यालयातील ५५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मानवी साखळी तयार करण्यासाठी तब्बल दीड तासाचा वेळ लागला. श्रीगुरु तेग बहादूरजींनी धर्म, मानवता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. त्यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी निमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणारा आणि प्रेरणादायी आहे,” असे मत उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख शेषराव असोले, आर. एम. व्यवहारे, रमेश गंगावणे, अंभोरे, शेख रिझवान, गजानन गीते व विजय बांगर यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमामुळे संपूर्ण हिंगोली शहरात देशभक्ती, श्रद्धा आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.
राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोजगाराच्या मुद्द्यावरून बिहारी तरुणांचे कौतुक करत मराठी तरुणांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मराठी तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही, या पाटलांच्या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला असून, ज्या मराठी माणसाच्या जीवावर मोठे झालात, त्याला सत्तेच्या लाचारीसाठी दुय्यम समजू नका, अशा शब्दांत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी गुलाबराव पाटलांना खडेबोल सुनावले आहेत. गुलाबराव पाटलांच्या या विधानाचा समाचार घेताना अविनाश अभ्यंकर यांनी थेट शिवसेना फुटीच्या घटनेचा संदर्भ देत बोचरा वार केला. गुलाबराव पाटील गेली अनेक वर्षांपासून मराठी माणसाच्या जीवावर जगत आहेत. सत्तेच्या लाचारीकरिता इतके मराठी माणसाला दुय्यम समजू नका. तुम्ही सत्तेल आलेला आहात, पण तुमच्या ४० लोकांचे कर्तृत्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेले आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. सत्तेचा अमरपट्टा कुणीही आणलेला नाही अविनाश अभ्यंकर यांनी या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. शिंदेंनी योग्यवेळी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंती अभ्यंकर यांनी केली. तुम्ही आज सत्तेत आहात, परंतु सत्तेचा अमरपट्टा कुणीही घेऊन येत नाही. तुम्ही मराठी माणसाला दुय्यम दर्जा द्यायचा प्रयत्न केलात, किंवा मराठी मुले काम करत नाहीत, असे म्हणालात तर याचे परिणाम महाराष्ट्रातील जनता तुम्हाला दाखवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी दिला. नेमके काय म्हणाले होते गुलाबराव पाटील? मंत्री गुलाबराव पाटील शनिवारी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले, आपल्या तरुणांकडे आता नोकरी करण्याची मानसिकता उरली नाही. बिहारी माणूस येथे येऊन आपले पोट भरतो. पण आपण बिहारींवर टीका करतो. कशाला टीका करता? आपल्या तरुणांमध्ये काम करण्याची वृत्तीच उरली नाही हे सत्य आहे. तरुणांना माझ्या बोलण्याचा राग आला तर आला. आता 4 वर्षांनी निवडणुका आहेत. तेव्हा पाहू, असे ते हसत म्हणाले होते. आता त्यांच्या या विधानावर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी पलटवार केलाय. दरम्यान, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावरही संतापाची लाट असून, ऐन राजकीय घडामोडींच्या काळात या 'बिहारी' प्रेमामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आधी अवघा ९ टक्के असलेला महाराष्ट्राचा दोषसिद्धी दर आज ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. याचवेळी, कोल्हापूरच्या बहुप्रतीक्षित सर्किट बेंचला त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण बेंचचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्याय अधिक जलद आणि सुलभपणे मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय, संविधान आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित भारताच्या न्यायव्यवस्थेचा गौरव केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणारे आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या शौर्यपरंपरेचा उल्लेख करत शिंदे यांनी दोन्ही भूमींच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर भाष्य केले. देश आज सुरक्षित आहे, कारण आपल्या सीमांवर जवान डटून उभे आहेत आणि शेतकऱ्यांच्या श्रमातून समृद्धी निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठेच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत मजल मारल्याचे नमूद करत, शिंदे यांनी त्यांच्या जीवनप्रवासाला प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरवले. धारा ३७० रद्द करण्याचा निर्णय, वन रँक वन पेन्शन योजना, मतदार याद्यांशी संबंधित महत्त्वाचे आदेश, महिलांसाठी आरक्षणासंदर्भातील निर्देश तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत दिलेले ठाम निर्णय यांचा उल्लेख करत त्यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या न्यायनिष्ठेचे कौतुक केले. “आपल्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,” असे ते म्हणाले. पर्यावरणपूरक विकासावर भर देताना शिंदे यांनी चारधाम प्रकल्पासारख्या निर्णयांचे उदाहरण दिले. “विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हीच आजची खरी गरज आहे. पर्यावरण संवेदनशील विकासाची दिशा आपल्या निर्णयांतून स्पष्टपणे दिसते,” असे शिंदे यांनी नमूद केले. राज्यातील न्यायव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, २०२२ पासून राज्यात ३२ नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून त्यात १४ अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी नव्या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दोषसिद्धी दराबाबत बोलताना शिंदे म्हणाले, या आधी महाराष्ट्राचा कन्विक्शन रेट केवळ ९ टक्के होता. आज तो ४५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, येथेच न थांबता तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वाढवण्यावर सरकार भर देत आहे. लोकशाहीतील न्यायपालिकेच्या महत्त्वावर भाष्य करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाबाबतचे विचार उद्धृत केले. “संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक न्यायप्रिय असतील, तरच लोकशाही अधिक बळकट होते,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या उत्तम आरोग्य आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री. चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ......
महापालिका निवडणुकीनंतर आता भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 उमेदवार बिनविरोध जिल्हा परिषदेवर पोहोचलेत. यामुळे भाजपचे निवडणुकीपूर्वीच खाते उघडले आहे. महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे जवळपास 70 नगरसेवक निवडून आले होते. त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणी त्यांनी भाजप बिनविरोध उमेदवार निवडून आणून संसदीय लोकशाहीच संपवत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही भाजपने आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आपले 2 उमेदवार बिनविरोध निवडून आणून विजयाचे खाते उघडले आहे. भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजपने खारेपाटण जिल्हा परिषद गटातून प्राची इस्वलकर यांच्या माध्यमातून पहिली बिनविरोध निवड केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या येथील उमेदवार मीनल तळगावकर यांनी आज अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे प्राची इस्वलकर यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे, बांदा जिल्हा परिषद गटातून भजाप उमेदवार तथा माजी सभापती प्रमोद कामतही जिल्हा परिषदेवर बिनविरोध पोहोचलेत. या गटात अपक्ष उमेदवार सुशांत पांगम यांनी माघार घेतल्यामुळे कामत बिनविरोध निवडून आलेत. 27 जानेवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची शेवटीच मुदत 27 जानेवारीची आहे. त्यामुळे त्याच दिवशी या निवडणुकांचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पण तोपर्यंत भाजप प्रतिस्पर्धी उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडून या निवडणुकीतही सर्रासपणे बिनविरोध पॅटर्न राबवताना दिसून येत आहे. दरम्यान, राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांसाठी येत्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा काय? प्रस्तुत निवडणुकीत 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाख, तर त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 6 लाख रुपये खर्च मर्यादा आहे. तसेच 61 ते 70 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार, तर त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे. याशिवाय 50 ते 60 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्चाची मर्यादा राज्य निवडणूक आयोगाने आखून दिली आहे.
काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीत येणार असल्याचा संजय राऊत यांचा दावा फेटाळला आहे. अजित पवार 4 वर्षांची सत्ता सोडून पुन्हा महाविकास आघाडीत परततील असे वाटत नाही, असे ते म्हणालेत. महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत दिसतील असा दावा करत खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी उपरोक्त विधान केले आहे. अजित पवार 4 वर्षांची सत्ता सोडतील असे वाटत नाही सतेज पाटील म्हणाले, अजित पवार यांच्याकडे सध्या अत्यंत महत्त्वाचे अर्थ खाते आहे. त्यांना सत्तेचा खरा अर्थ समजलेला आहे. त्यामुळे त्यांचा राजकीय अनुभव पाहता ते सत्तेपासून दूर जातील असे मला वाटत नाही. पण तसे झाले तर स्वागतच असेल. अजित पवार महाविकास आघाडीत आले तर मविआ आणखी मजबूत होईल. पण अजून 4 वर्षे सत्ता बाकी आहे. ही 4 वर्षांची सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता अजित पवारांची असेल असे मला वाटत नाही. पण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने त्यांचा केलेला अपमान व त्यांच्याविषयी केलेली विधाने पाहता स्वाभिमानी अजित पवारांनी निर्णय घ्यायला काही हरकत नाही. आत्ता पाहू काय म्हणाले होते संजय राऊत? संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी अजित पवार लवकरच महाविकास आघाडीत परततील असा दावा केला. ते म्हणाले, मी असा विचार करतो की, शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. कारण, शरद पवार हे आमच्यासोबत आहेत. त्याचा पक्ष महाविकास आघाडीत आहे. याऊलट अजित पवार महायुतीत आहेत. त्यानंतरही त्यांनी महाविकास आघाडीसोबत पाट लावलेला आहे. अशा वेळी त्यांच्यावर तिथे कारवाई होईल. मला अशी खात्री आहे की, भविष्यात शरद पवार व अजित पवार हे दोघेही महाविकास आघाडीत एकत्र दिसतील. पत्रकारांनी यावेळी संजय राऊतांना अजित पवार सरकारमधून बाहेर पडतील का? असा थेट प्रश्न केला. त्यावर राऊत म्हणाले, त्यांना बाहेर पडावेच लागेल. एकाचवेळी दोन दगडांवर पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावे लागेल किंवा काहीतरी एक स्वीकारावे लागेल.
अन्नाच्या शोधात आलेल्या चितळाचा दुर्दैवी अंत:लाखांदूर शहरातील घटना; वन विभागाने केली योग्य ती कारवाई
जंगलातील अन्नाचा शोध घेत मानवी वस्तीत शिरलेल्या एका निष्पाप चितळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज शनिवारी (ता.२४) लाखांदूर शहरात घडली. निसर्गाच्या साखळीतील हा सुंदर प्राणी अन्नाच्या शोधात थेट शहरात पोहोचला, मात्र त्याचे नशीब बलवत्तर नव्हते. शनिवारला सकाळी ११ वाजेच्या सुमारास लाखांदूर शहरातील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये ही घटना उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक रहिवासी मुक्ताबाई रमेश देसाई यांच्या घरासमोरील अंगणात एक चितळ मृतावस्थेत पडून असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. भर वस्तीत चितळ मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी विलंब न करता लाखांदूर वन विभागाला पाचारण केले. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत चितळाचा पंचनामा करून देह ताब्यात घेतला आणि पुढील प्रक्रियेसाठी वन विभागाच्या कार्यालयात नेले. या प्रकरणाचा सखोल तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चितळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तो नैसर्गिक आहे की अन्य काही कारणाने, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. शहरात वन्यप्राणी आल्याची आणि त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे मृत चितळाला पाहण्यासाठी वॉर्ड क्रमांक १२ मध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अन्नाच्या शोधात या मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा मार्ग अजूनही पूर्णपणे मोकळा झालेला नाही. भाजपने 89 जागा जिंकत सर्वाधिक संख्याबळ मिळवलं असलं, तरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह महापौरपदावर अद्याप एकमत न झाल्याने राजकीय तणाव वाढला आहे. महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. मात्र, महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. फक्त ‘महायुतीचा महापौर होईल’ एवढंच सांगितलं जात असताना, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आता थेट आणि स्पष्ट भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. मुंबईच्या महापौरपदावर भाजपने ठाम दावा केला असून, शिंदे गटाच्या शिवसेनेनेही महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदावर आपला हक्क सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्या तरी त्यातून अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. या सगळ्या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया रखडलेली आहे. अशातच सुधीर मुनगंटीवार यांनी महापौरपदाबाबत आक्रमक भूमिका मांडत स्पष्ट शब्दांत सांगितले की, उबाठा गटाचा महापौर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. महापौर होईल तर तो भाजपचाच असेल, अन्यथा भाजप विरोधी पक्षात बसायला तयार आहे. त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटाला थेट इशाराच दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुनगंटीवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा महापौर बसवण्यात भाजपच्या नगरसेवकांना कोणतीही रुची नाही. भाजप हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष असून जनतेने दिलेल्या कौलाचा आदर ठेवला गेला पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असताना महापौरपद सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असा सूर त्यांनी लावला. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला असून, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. या सगळ्या राजकीय रस्सीखेचीत महापौर निवड प्रक्रियेवरही परिणाम झालेला दिसतो आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महापौर निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासनाने यापूर्वी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 31 जानेवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गटनोंदणी आणि राजकीय एकमताचा अभाव पाहता हा कार्यक्रम पुढे ढकलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. परिणामी, मुंबईला नवीन महापौर फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीनंतर 27 जानेवारी रोजी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार होते. तसेच 31 जानेवारी रोजी महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारीही प्रशासनाकडून सुरू होती. मात्र, रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती समोर आली. गटनोंदणी पूर्ण न झाल्याने महापौर निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात एकत्रित गट स्थापन होणार की स्वतंत्र गट राहणार, यावर अद्यापही स्पष्टता नसल्याने सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुंबई महापालिकेतील महापौरपद ही केवळ औपचारिक बाब नसून, प्रशासनावर प्रभाव टाकणारे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळेच भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष या पदावर आपला हक्क सोडायला तयार नाहीत. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने नैतिक आणि राजकीयदृष्ट्या महापौरपद आपल्यालाच मिळायला हवे, अशी भूमिका आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाला सत्तेत समान वाटा हवा असल्याने तेही दबाव वाढवत असल्याचे चित्र आहे. भाजपने माघार न घेण्याचा स्पष्ट संदेश दिले एकीकडे महायुतीची सत्ता असली, तरी मुंबई महापालिकेतील हा वाद पुढील काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपने माघार न घेण्याचा स्पष्ट संदेश दिले आहे. आता शिवसेना शिंदे गट काय भूमिका घेतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच महापौर निवडीची प्रक्रिया पुढे सरकणार असल्याने, मुंबईच्या सत्ताकेंद्रातला हा संघर्ष अजून काही काळ रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसने भिवंडी - निजामपूर महापालिकेचे महापौरपद मिळवण्यासाठी भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. या आघाडीत काँग्रेससह समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा समावेश आहे. यामुळे भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. त्यानंतर आता या ठिकाणी महापौर पदाच्या निवडीसंदर्भात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी युत्या व आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी सप - काँग्रेस - राष्ट्रवादी (शरद पवार) या 3 पक्षांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची घोषणा केली आहे. भिवंडी पूर्वचे सप आमदार रईस शेख हे या फ्रंटचे संयोजक आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार रशीद मोमीन हे अध्यक्ष, तर शरद पवार गटाचे सोहेल गुड्डू हे सहसंजोयक आहेत. सेक्युलर फ्रंटकडे स्पष्ट बहुमत 90 सदस्यीय भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी 46 हा जादुई आकडा आहे. त्यामुळे सेक्युलर फ्रंटकडे सध्या काँग्रेसचे 30, शरद पवार गटाचे 12 व सपचे 6 असे एकूण 48 नगरसेवक आहेत. त्यामुळे याच आघाडीचा महापौर होईल हे स्पष्ट आहे. या आघाडीची माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, भिवंडीच्या जनतेने धर्मनिरपेक्ष पक्षांना कौल दिला आहे. त्याचा आदर करत आम्ही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. एकता, बंधूभाव व विकास हा आमच्या फ्रंटचा मुलाधार असले. भिवंडीत आता एकही नगरसेवक विकला जाणार नाही याची खात्री आम्ही देऊ. भिवंडी सेक्युलर फ्रंटला सपचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शरद पवार गटाचे स्थानिक खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे समाजवादी पार्टीने स्थानिक पातळीवर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार रईस शेख यांना दिले आहेत. तसे पत्र अबू आझमी यांनी प्रसिद्ध केले आहे. सेक्युलर फ्रंटचाच महापौर होईल - आमदार रईस शेख भिवंडी - निजामपूर महापालिकेत धर्मनिरपेक्ष आघाडीचा महापौर बसवणे हे आमच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटचे उद्दीष्ट आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वसमावेशक विकास यासाठी आमची आघाडी कटिबद्ध आहे. भिवंडीकरांनी आम्हाला ऐतिहासिक कल दिला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमचा फ्रंट कायम प्रयत्नशील असेल, असेही रईस शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरण : गोगावलेंच्या मुलाच्या अडचणीत वाढ
मुंबई : प्रतिनिधी महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेले शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्या शरणागतीनंतर पोलिसांनी तब्बल सहा तास त्यांची चौकशी केली असून, त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने […] The post महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरण : गोगावलेंच्या मुलाच्या अडचणीत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिक्षकाकडून चिमुरड्याला अमानुष मारहाण; प्रकृती चिंताजनक
बुलडाणा : प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणा-या शिक्षकानेच क्रूरतेची सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यातील खामगावमधील पिंपळगाव राजा येथे उघडकीस आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केवळ गणित सुटले नाही, या कारणावरून एका चौथीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केली. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. १३ डिसेंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील […] The post शिक्षकाकडून चिमुरड्याला अमानुष मारहाण; प्रकृती चिंताजनक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नर्सरीमध्ये अग्नितांडव; महिलेचा मृत्यू
सांगली : प्रतिनिधी सांगलीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगली शहरातील धामणी चौक येथे असणा-या मयूर नर्सरीला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे आगीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या भीषण आगीत नर्सरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस कसून तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, […] The post नर्सरीमध्ये अग्नितांडव; महिलेचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

30 C