श्री देशमुख महाराज फाऊंडेशनने देशी गायींवरील विविध पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून जागतिक विक्रम नोंदवला आहे. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद करण्यात आली. 'गौ-कथा सप्ताह' अंतर्गत 'भारतीय कामधेनू' हे पुस्तक सभागृहात उपस्थित सर्व गो-भक्तांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हा उपक्रम श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करणे आणि भारतीय सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपण्याचा या सप्ताहाचा उद्देश होता. पुण्यात प्रथमच वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे हा गौ-कथा सप्ताह आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमुर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे यांचा देशी गायींवरील संशोधनातील समर्पण आणि मानवकल्याणासाठीच्या योगदानाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वतीने गौरव करण्यात आला. गुरुदास देशमुख महाराज यांनी सांगितले की, जुन्या पिढीला गायीचे महत्त्व माहीत आहे, परंतु नव्या पिढीलाही ते कळावे यासाठी संस्थेने देशी गायींचे महत्त्व सांगणाऱ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. ही पुस्तके संस्थेतर्फे हजारो शाळांमध्ये वाटप केली जाणार आहेत. देशी गायींची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्था प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, पंचगव्य हे शुद्धीकरण, आयुर्वेदीय उपचार, पूजाविधी तसेच काही पारंपरिक औषधांमध्ये वापरले जाते. आज देशी गायींवर, म्हणजेच पंचगव्यावर अनेक संशोधन होत आहेत. त्याद्वारे विविध आजार बरे करण्याचे तसेच विविध औषधांची निर्मिती केली जात आहे. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रभाग क्र २५ मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज आरोग्यसेवा उभारून ज्येष्ठ नागरिकांना दूरवर जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सांगितले. प्रभाग मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मानकर बोलत होते. यावेळी बाप्पू मानकर यांच्यासह, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे उमेदवार उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. 'प्रभाग मध्ये शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई या भागात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना नियमित आरोग्य सुविधांसाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे या ज्येष्ठांना प्रभागातच सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्य्मातून आजवर ज्येष्ठांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न केला, यापूढेही ज्येष्ठांसाठी हा तुमचा मुलगा कायम सज्ज असेल', असे राघवेंद्र मानकर यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले. या मेळाव्यास माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले व सर्व भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात, सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक ९ (ड) मध्ये भाजपने दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात येणार असून, केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची या रॅलीला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होतील. ही दुचाकी रॅली मंगळवार, १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुस येथील भैरवनाथ मंदिरापासून सुरू होईल. दसरा चौक – पाण्याची टाकी, बालेवाडी येथे या रॅलीचा समारोप होईल. या रॅलीच्या माध्यमातून प्रभागातील विविध भागांतून जात भाजपचा प्रचार व्यापक स्वरूपात पोहोचवला जाईल. दरम्यान, लहू बालवडकर यांनी आतापर्यंत घरोघरी जाऊन प्रचार केला आहे आणि विविध सोसायट्यांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रभागात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या भेटींमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. बालवडकर सातत्याने नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडत आहेत. तरुणांचे रोजगार आणि क्रीडाविषयक प्रश्न, महिलांसाठी सुरक्षितता आणि सक्षमीकरण, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या नागरी अडचणी सोडवण्यावर त्यांचा भर आहे. या दुचाकी रॅलीचा मार्ग सुस भैरवनाथ मंदिर, शिवशक्ती चौक, सुतारवाडी भैरवनाथ मंदिर, तापकीर चौक, शिवनगर, साई चौक, बालाजी चौक, वाकेश्वर मंदिर, कोकाटे आळी, भैरवनाथ मंदिर, भाजी मंडई, बौद्ध विहार, निम्हण माळा, लमाण तांडा, संध्या नगर, सचिन दळवी कार्यालय, ग्रीन पार्क महाबळेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कटके शाळा, दत्त मंदिर, रघुनाना चौक, मुरकुटे गार्डन, वीरभद्र नगर, सर्विस रोड, सदानंद हॉटेल, महाळुंगे मनपा शाळा, चिव्हे आळी, हनुमान मंदिर, महाळुंगे स्टेडियम, राधा चौक, गणराज चौक, बालेवाडी फाटा, लक्ष्मी माता मंदिर, दसरा चौक – पाण्याची टाकी, बालेवाडी असा असेल. लहू बालवडकर यांनी स्थानिक नागरिकांना या दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या रॅलीमुळे प्रभाग ९ मधील निवडणूक प्रचाराला गती मिळण्याची शक्यता आहे.
भंडारा : प्रतिनिधी जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या परसोडी परिसरात आकाशातून दोन रहस्यमयी दगडाचे तुकडे पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, हे तुकडे ‘उल्का’ असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० ते ७:१५ वाजेच्या दरम्यान घडली. […] The post भंडा-यात उल्का वर्षाव? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोल्यातील अकोटमध्ये गेल्याच आठवड्यात भाजपने एमआयएम पक्षासोबत युती केली होती. यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर युती तोडण्यात आली. तर तिकडे अंबरनाथमध्येही भाजपने कॉंग्रेससोबत युती केली होती. या दोन्ही ठिकाणी भाजपने संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीचा दूसरा अंक सुरू झाल्याचे समोर आले आहे. अकोटच्या नगरपालिकेत आज स्वीकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत भाजप-एमआयएम युती वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळाली. एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचे नाव समोर आले होते, तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला नसल्याचे सांगितले. तसेच एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या जितेन बरेठिया यांना समर्थन दर्शवल्याने ही भाजप-एमआयएमची अप्रत्यक्ष युतीच असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अकोल्याच्या अकोटमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भाजप-एमआयएम युतीवर चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले. तसेच युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपने कारने दाखवा नोटीस पाठवली. या घटनेनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील अकोट विकास मंचातून बाहेर पडला होता. यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वतःचा गट स्थापन केला होता. मात्र, पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता काही दिवस शिल्लक असताना राज्यात विविध ठिकाणी घडामोडींना वेग आला आहे. प्रचारसभा, तसेच उमेदवारांची पळवापळवी देखील सुरू असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापुरात जोरदार झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील एका अधिकृत उमेदवाराने आज अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे शहरातील एका प्रभागातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांनी आज सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. सोलापूर महापालिकेसाठी येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पक्ष सोडल्यामुळे पक्षाच्या निवडणूक रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. भाजप, राष्ट्रवादी व ठाकरे गटात होती तिरंगी लढत प्रभाग क्रमांक 9 ड मध्ये यापूर्वी भाजपचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादीचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत होती. राष्ट्रवादीकडून जक्का यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पक्षाच्या प्रचारयंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. या पक्षांतरामुळे भाजपला मात्र मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले उमेदवार भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे भाजपची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेच्या ठाकरे गटापुढेही नव्या आव्हानांची निर्मिती झाली आहे. सोलापूरच्या निवडणुकीची राज्यभरात चर्चा सोलापूर महापालिकेची निवडणूक सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. एकीकडे भाजपमध्ये काही ठिकाणी अंतर्गत नाराजी आणि बंडखोरीचे सूर उमटताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीतही जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांत सकाळी एका पक्षात असलेले इच्छुक उमेदवार सायंकाळी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे चित्र सोलापुरात वारंवार पाहायला मिळाले. या सततच्या राजकीय उलथापालथींमुळे सामान्य मतदार मात्र गोंधळून गेला आहे. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, याबाबत मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या 102 जागांसाठी निवडणूक 102 सदस्यीय सोलापूर महापालिकेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने 49 जागा जिंकत सर्वाधिक यश मिळवले होते. त्यानंतर शिवसेनेला 21, काँग्रेसला 11, एमआयएमला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 4, बसपला 4 आणि माकपला 1 जागा मिळाली होती. त्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र स्थानिक समीकरणे, पक्षांतर्गत बंडखोरी, ऐनवेळी होणारे पक्षांतर आणि मतदारांचा बदलता कल यामुळे निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या भाजप प्रवेशामुळे अजित पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, सोलापूर महापालिकेचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
पुण्यात एका ६ वर्षांच्या मुलीला आठ महिने सतत खोकल्याचा त्रास होत होता. अनेक तपासण्या आणि उपचारांनंतरही आराम मिळत नव्हता. अखेर अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा केला, ज्याचे कारण तिच्या आईने वापरलेला परफ्युम ठरले. आर्या पाटील (नाव बदलले आहे) या मुलीला सतत खोकला, रात्री झोपेत खोकल्याची उबळ आणि घशात खवखव जाणवत होती. छातीचा एक्स-रे आणि इतर तपासण्या सामान्य आल्या होत्या. अनेक डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, ज्यामुळे तिचे पालक चिंतेत होते. एका फॉलोअप तपासणीदरम्यान आर्याची आई डॉक्टरांशी बोलत असताना, जवळ उभ्या असलेल्या परिचारिकेला अचानक तीव्र खोकला येऊ लागला. चौकशीअंती परिचारिकेने सांगितले की आर्याच्या आईने वापरलेला परफ्युम खूप तीव्र आहे आणि त्यामुळेच तिला खोकला येत आहे. या निरीक्षणामुळे डॉक्टरांना खऱ्या कारणाचा अंदाज आला. आई दररोज वापरत असलेल्या तीव्र परफ्युमच्या सुगंधामुळे आर्याच्या श्वसनमार्गाला त्रास होत होता. डॉक्टरांनी तात्काळ मुलीच्या आसपास परफ्युम वापरणे बंद करण्याचा सल्ला दिला. हा बदल केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत आर्याचा खोकला जवळजवळ पूर्णपणे बरा झाला. अंकुरा हॉस्पिटलचे बालरोग फुफ्फुसविकार व ॲलर्जी तज्ज्ञ डॉ. मौनीश बालाजी यांनी सांगितले की, तीव्र परफ्युम, एअर फ्रेशनर, अगरबत्ती आणि एरोसोल स्प्रे यामुळे काही मुलांना दीर्घकाळ खोकला येऊ शकतो. वैद्यकीय कारण आढळत नसल्यास पर्यावरणीय घटकांचाही विचार करणे आवश्यक आहे. एका साध्या बदलाने मुलीचे आरोग्य सुधारल्याने पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
आगामी २९ महापालिका निवडणुकांमध्ये पुणे हे एकमेव शहर आहे, जिथे भारतीय जनता पक्ष (भाजप) कमळाच्या चिन्हावर सर्व १६५ जागा स्वबळावर लढवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या महापालिकांमध्ये भाजपने जोरदार तयारी केली आहे. या भागात भाजपचे किमान सहा महापौर निवडून येतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी सांगितले की, मतदान आणि निकाल या दोन्ही टप्प्यांमध्ये भाजपला स्पष्ट आघाडी मिळेल. अनेक ठिकाणी भाजपचाच महापौर निवडून येईल, असा दावा त्यांनी केला. पुणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांनी घेतलेली मुलाखत शहरातील १०४ ठिकाणी थेट प्रक्षेपित करण्यात आली. या उपक्रमात सुमारे ५५ हजार नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्याने, शहरातील सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी एकात्मिक सांस्कृतिक धोरण राबवण्याची योजना भविष्यात तयार केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे पांडे यांनी नमूद केले. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता गोखलेनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजपने ‘घर चलो अभियान’अंतर्गत शहरातील २६०० बूथपर्यंत घरोघर जाऊन प्रचार केला आहे. विकासाचा अजेंडा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भाजपने भर दिला असून, आरोप-प्रत्यारोपांऐवजी विकास, भविष्यातील पुण्याची प्रगती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि फ्लेक्सवर कारवाई व्हावी, अशी मागणीही राजेश पांडे यांनी केली. भाजपने आपल्या पक्षाचे अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतरांनीही नियमांचे पालन करावे यासाठी मनपा आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्षांचे प्रचार सुरू झाले आहेत. मतदानासाठी जनजागृती देखील केली जात आहे. परंतु, मुंबईच्या जुहू भागातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईच्या जुहू परिसरातील जवळपास 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. जुहू परिसरात असलेल्या मिलिटरी रडारमुळे नागरिकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या 35 वर्षांपासून इथल्या 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडल्या आहेत. या इमारतींचे पुनर्विकास होऊ शकत नसल्याने जवळपास 35 हजार लोक धोकादायक इमारतींमध्ये भीतीच्या सावटाखाली राहतात असा दावा करण्यात आला आहे. येथील नागरिकांनी त्यांच्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. अनेकदा त्याचा पाठपुरावा करूनही यश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. बॅनरवर काय म्हटले आहे? जुहू परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकताना सर्वत्र बॅनर लावले आहेत. यावर असे लिहिले आहे की, एसआरओ 150 कायदा कालबाह्य आहे आणि त्यामुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत. 1939 च्या ब्रिटिश कायद्यांतर्गत आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आले आहे. सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून इथल्या 35 हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा. यापुढे खोटी आश्वासने आता चालणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी त्यांच्या प्रश्नावर निवडणुकीनंतर तोडगा काढणार असे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर कोणताहीह नेता मदत करत नसल्याचे सांगत येथील नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. ठाकरे बंधूंची भेट घालून तोडगा काढण्याचे आश्वासन जुहूच्या रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात मतदानावर बहिष्कार टाकल्याचे अनेक बॅनर दिसून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश सरदेसाई यांनी येथील नागरिकांची भेट घेतली. तसेच निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून, या प्रश्नाचा पाठपुरावा करू आणि योग्य तोडगा काढू, असे आश्वासन देण्यात आले आहे.
पैसे वाटपावरून सांगलीत जोरदार राडा
सांगली : प्रतिनिधी राज्यात २९ महापालिकांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. येत्या १५ जानेवारीला निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी निवडणुकांचे प्रचार सुरु असून उद्या या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. असे असले तरी पक्षापक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरूच आहे. अशातच आता सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप […] The post पैसे वाटपावरून सांगलीत जोरदार राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप मिरज येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, अजित पवार गटाने शरद पवार गटाचा आरोप फेटाळला आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगला आहे. मिरजेतही या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असल्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी दुपारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या निवासस्थानालगत पैसे वाटप होत असल्याचा संशयावरून शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे व आमदार नायकवडी यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार वादावादी झाली. दोन्ही गटांचे समर्थक या प्रकरणी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे व अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे सुपुत्र अतहर नायकवडी यांच्यात लढत आहे. सोमवारी दुपारी आमदार नायकवडी यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली होती. ते पाहून अभिजीत हारगे तिथे आले. त्यांनी तिथे मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या फिरत्या पथकासह पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर आमदार नायकवडी व श्वेतपद्म कांबळे यांचे कार्यकर्ते अभिजीत हारगे यांच्यावर अंगावर धावून गेले. प्रतिस्पर्धी गटाचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या अंगावर धावून आल्याचे पाहून अभिजीत हारगे यांचेही कार्यकर्ते पुढे सरसावले. यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांत धक्काबुक्की झाली. त्यानतंर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नायकवडी यांच्या घरी सुरू होते पैशांचे वाटप - हारगे अभिजीत हारगे यांनी यावेळी अजित पवार गटावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मतदाराना पैसे वाटप करण्यास आक्षेप घेतल्यामुळे आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते व अंगरक्षक माझ्या अंगावर धावून आले. तिथे पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप सुरू होते. मी त्याची तक्रार निवडणूक आयोगाचे अधिकारी व प्रशासनाकडे केली. पण एकही अधिकारी घटनास्थळी आला नाही. नायकवडी यांनी फेटाळला आरोप दुसरीकडे, आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले, आमच्यावर झालेले आरोप चुकीचे आहेत. आमचा मतदारांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे आमच्यावर कधीही पैसे वाटण्याची वेळ आली नाही. निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहे समजत नाही. त्यासाठी ते आमच्याकडे येतात. आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात. पण विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आमच्या घरापुढे येऊन उगीचच त्यांना दमदाटी केली.
अकोटमध्ये पुन्हा ‘भाजप-एमआयएम’ युती
अकोला : प्रतिनिधी अकोला येथील अकोटमध्ये झालेल्या ‘भाजप-एमआयएम’ युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’तून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता. पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज […] The post अकोटमध्ये पुन्हा ‘भाजप-एमआयएम’ युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चित्रकलेत विद्या विकास विद्यालयाचा १००टक्के निकाल
लातूर : प्रतिनिधी विद्याविकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कला संचनालय मुंबई तर्फे घेण्यात येणा-या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा २०२५ मध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. एलिमेंट्री ग्रेड परीक्षेत ३५ तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ४९, असे एकूण ८४ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश संपादन केले. त्यात ‘अ’ ग्रेड […] The post चित्रकलेत विद्या विकास विद्यालयाचा १००टक्के निकाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसमत तालुक्यातील कोर्टाफाटा शिवारात बँक कर्मचाऱ्याला लुटल्या प्रकरणात आंध्रप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या सहा आरोपींकडून पळविलेल्या ६.७० लाख रुपयांसह २० लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व कुरुंदा पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी २२ तासात तब्बल १६०० किलोमीटर प्रवास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. वसमत तालुक्यातील कोर्टा शिवारात चोंढी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर भोसले यांना वाहनाची धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ८ लाख रुपयांची रक्कम पळविली होती. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, रामदास निरदोडे यांचे पथक तयार केले होते. या पथकाने या गुन्हयातील तीन आरोपींना यापुर्वीच अटक केली आहे. त्यानंतर त्या आरोपींच्या चौकशीमध्ये आणखी सहा जणांचा यामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी तांत्रिक बाबी तपासल्यानंतर सहा जण आंध्रप्रदेशात पळाल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे, उपनिरीक्षक पंढरी गंधकवाड, उपनिरीक्षक कारामुंगे, जमादार गजानन पोकळे, भुजंग कोकरे, भगीरथ सवंडकर, संदीप टाक, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने बापटला रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकून महेंद्र कांबळे, बालाजी पानधोंडे, ओमकार गव्हाणे, बालाजी डाखोरे, नागेश खराटे यांच्यासह एकास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांचाकडून पळविलेल्या ८ लाख रुपयांच्या रकमेपैकी ६.७० लाख रुपये तसेच गुन्हयासाठी वापरलेली वाहने असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग आहे काय याची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तर गुन्हा दाखल होऊन तीन दिवसांत सर्व गुन्हा उघडकीस आणल्या बद्दल पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस पथकाचे अभिनंदन केले आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने लाखांदूर तालुक्यातील साखरा घाट परिसरात मध्यरात्री धाड टाकून अवैध रेती तस्करी करणारी १ जेसीबी, २ टिप्पर आणि १ ट्रॅक्टरसह सुमारे ७८ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असली, तरी स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास साखरा येथील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू होती. लाखांदूरचे नायब तहसीलदार दत्ता धकाते यांच्या फिर्यादीवरून, दिघोरी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाखांचा टिप्पर, १२ लाखांचा मिनी टिप्पर, ६.५ लाखांचा ट्रॅक्टर आणि ३० लाखांची जेसीबी असा एकूण ७८.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:टिप्पर (MH 36 F 7435): ३ ब्रास रेतीसह (३०.१८ लाख)मिनी टिप्पर (MH 36 AA 3919): २ ब्रास रेतीसह (१२.१२ लाख)ट्रॅक्टर व ट्रॉली (MH 36 AG 2830): १ ब्रास रेतीसह (६.५६ लाख)जेसीबी: (३० लाख)दिघोरी पोलिसांनी या प्रकरणी चेतन शामराव देशमुख, सतीश शंकर आगासे, कमलेश शामराव बावनकुळे, शंकर वामन मटे आणि राकेश धनु साळवे (सर्व रा. दिघोरी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास दिघोरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार विलास मातेरे करत आहेत. स्थानिक महसूल प्रशासन झोपले होते का? जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला कारवाई करावी लागते, यातच स्थानिक तालुका महसूल प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे दिसून येते. साखरा घाटातून रात्रंदिवस जेसीबीच्या साहाय्याने ओरबाडणारी रेती आणि धावणारे टिप्पर स्थानिक महसूल विभागाला का दिसले नाहीत? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. स्थानिक यंत्रणेचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष की तस्करांना दिलेले अभय? यामुळेच शासनाचा करोडोंचा महसूल बुडत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. वरिष्ठ पथकाने धाड टाकल्यावरच स्थानिक यंत्रणेला जाग येते का, असा रोखठोक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने 2 दिवस पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे. यामुळे त्याला या निवडणुकीत आपल्या पत्नीचा प्रचार करता येणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्याची पत्नी कोथरूड भागातून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. पण गजा मारणेवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्यावर जिल्हाबंदी घातली होती. यामुळे त्याला पत्नीचा प्रचार करता येत नव्हता. अखेर गजा मारणेने या बंदीविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाने आज त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना त्याला 15 व 16 जानेवारी असे दोन दिवस पुण्यात जाण्याची परवानगी दिली. पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही दिवस गजा मारणेला आपल्या कुटुंबीयांसोबत घालवता येणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गजा मारणे सध्या त्याच्या मुळशीतील घरात राहतो. त्याच्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ याच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पण निवडणुकीच्या तोंडावरच त्याला जामीन मंजूर झाला होता. पण त्यानंतर त्याला पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती. कोर्टाने गजा मारणेला कोणत्या घातल्या अटी गजा मारणेने पुण्यातील काही वैयक्तिक व कायदेशीर कारणांसाठी शहरात येण्याची परवानगी मागितली होती. त्याच्या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने पोलिसांच्या निगराणीखाली व कायदा सुव्यवस्थेला धक्का न लागण्याच्या अटीवर त्याला पुण्यात येण्यास हिरवा कंदील दाखवला. या कालावधीत गजा मारणेला कोणतीही सार्वजनिक सभा घेता येणार नाही. आपल्या समर्थकांशी संपर्क साधून शक्तिप्रदर्शन करता येणार नाही. त्याला वेळोवेळी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. राष्ट्रवादी, भाजपकडून गुंडांना तिकीट दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरसह, सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकरला तिकीट देण्यात आले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून गुंड शरद मोहोळच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. हे ही वाचा… कल्याण डोंबिवलीत भाजपकडून पैशाचे वाटप:पांढऱ्या पाकिटातून पाचशेच्या 6 नोटा, VIDEO व्हायरल; शिंदे गटासह विरोधकांची टीका मुंबईलगतच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात पांढऱ्या पाकिटातून मतदारांना पाचशेच्या 6 नोटा म्हणजे एकूण 3 हजार रुपये दिले जात असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर
राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
नवी दिल्ली : प्रतिनिधी महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून राज्याचं लक्ष तिकडे लागलं आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. अखेर, राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालायने […] The post राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिकीट वाटपात काही लोकांवर अन्याय
नागपूर : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या बंडखोरांसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. गडकरी यांनी जाहीर सभेतून तिकीट वाटपामध्ये काही लोकांवर अन्याय झाला हे मान्य केले. त्याची कारणेही त्यांनी यावेळी सांगितली. नऊ […] The post तिकीट वाटपात काही लोकांवर अन्याय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील मंगळवार पेठेत भाजपचे प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एका वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान घडली. आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांनी या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीममगर परिसरात रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी नीलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त १० जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोपी आणि भाजप उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर आरोपी सागर कांबळे यांनी उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सागर कांबळे यांना रोखले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम नामावडे आणि उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक चौगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एम. जी. रस्त्यावर दुकाने फोडणारे चोरटे गजाआड पुणे लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील वस्त्रदालनांचा दरवाजा उचकटून महागडे कपडे, तसेच अन्य वस्तुंची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महात्मा गांधी रस्त्यावरील एका वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून तीन लाख रुपयांचे कपडे चोरून नेण्यात आल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाईप, दोन दुचाकी, चोरलेला एक लॅपटॉप, कपडे असा तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी एम. जी. रस्त्यावरील तीन दुकानांमध्ये चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिस उपायुुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक राहुल घाडगे, महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदीप उकीरडे यांनी ही कामगिरी केली.
पुणे पोलिसांना मिळाल्या १०० 'डोमिनार ४००' दुचाकी:आपत्कालीन प्रतिसाद आणि गस्त क्षमतेत होणार वाढ
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात १०० अत्याधुनिक ‘डोमिनार ४००’ मोटरसायकलींचा ताफा दाखल झाला आहे. बजाज ऑटो लिमिटेडने निर्मित या मोटरसायकली सोमवारी अधिकृतपणे पोलिस दलात समाविष्ट करण्यात आल्या. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होऊन आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला गती मिळेल. या शक्तिशाली मोटरसायकलींमुळे पोलिसांची गस्त क्षमता, हालचाल आणि आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ लक्षणीयरीत्या सुधारेल. ३७३.३ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन, ड्युअल चॅनल एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांमुळे या मोटरसायकली उच्च जोखमीच्या परिस्थितीतही सुरक्षित आणि प्रभावी ठरतील. ‘डोमिनार ४००’ च्या पोलिस मॉडेलमध्ये एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन, सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम यांसारख्या विशेष सुविधा आहेत. तसेच, मोबाईल आणि वॉकी-टॉकी चार्जिंगसाठी विशेष पॉइंट्स देण्यात आले आहेत. प्रत्येक मोटरसायकलमध्ये प्रथमोपचार किट, आवश्यक कागदपत्रे आणि फॉरेन्सिक साहित्य वाहून नेण्यासाठी लॉक करता येणारे साइड पॅनियर्स व टॉप बॉक्स बसवण्यात आले आहेत. या मोटरसायकलींचा वापर प्रथम १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ च्या ४३७ किलोमीटरच्या मार्गावर गस्तीसाठी केला जाईल. त्यानंतर, दैनंदिन कायदा अंमलबजावणीसाठी तिन्ही पोलिस विभागांमध्ये त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील पुणे पोलिस मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय चौबे आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांच्या हस्ते या मोटरसायकली स्वीकारण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
सहावा पुणे पर्यटन महोत्सव १६ ते १८ जानेवारीला:लोकल ते ग्लोबल सहलींचे अनेक पर्याय उपलब्ध
भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने सहावा पुणे पर्यटन महोत्सव १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत हॉटेल सेंट्रल पार्क, डेक्कन, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे. संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रथमेश कुलकर्णी, खजिनदार हेमंत जानी, संचालक संतोष माने, सजेश पिल्ले, आशिष हिंगमिरे, अमित कुलकर्णी आणि चंदन पठारे आदी उपस्थित होते. प्रवीण घोरपडे यांनी सांगितले की, महोत्सवाचे उद्घाटन १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर आणि पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांच्या हस्ते होईल. या महोत्सवात ७० हून अधिक नामांकित पर्यटन कंपन्या त्यांच्या सहलींचे विविध पर्याय सादर करतील. याशिवाय, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कॉर्पोरेट ट्रॅव्हल अँड टुरिझम मीट, तसेच काश्मीर पर्यटन, महाराष्ट्र पर्यटन आणि मानसरोवर यात्रा यावर चर्चासत्रे आयोजित केली जातील. डॉ. राधा मंगेशकर यांचे 'एकटीचा सफरनामा' हे अनुभवकथनही ऐकायला मिळेल. या महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन संचालनालय, पर्यटन मंत्रालय, पुणे विमानतळ प्रशासन, पुणे रेल्वे स्टेशन, पासपोर्ट कार्यालय, मेट्रो प्रशासन, पीएमपीएल प्रशासन, ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन्स, हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन्स, रिसॉर्ट्स असोसिएशन, कृषी पर्यटन असोसिएशन, लोकल टूर गाईड्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट आदी विभागांतील पदाधिकारी व अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध मान्यवर या महोत्सवात चर्चा करतील. या महोत्सवात देश-विदेशातील सहलींचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असतील. कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंतच्या असंख्य सहलींचे नियोजन येथे करता येईल. तसेच, महोत्सव कालावधीत बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना खास सवलती दिल्या जातील.
पुण्यातील पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावरील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. ही घटना नुकतीच घडली असून, याप्रकरणी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या मजुराचे नाव अनिल उमाशंकर यादव (वय २५, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आहे. तो लव्हिन्स अटायना टॉवर, लेबर कॅम्प, पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावर राहत होता. या घटनेनंतर सिमेंट मिक्सर चालक दीपककुमार उपेंद्र यादव (वय २२, रा. चांदे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहप्रकल्पाच्या आवारात काम सुरू असताना सिमेंट मिक्सर मागे घेत असताना अनिल यादव त्याच्या चाकाखाली सापडला. अपघातानंतर मिक्सर चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत महंमद सद्दाम अन्वर (वय २८, रा. चांदे, ता. मुळशी) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू कात्रज घाटात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठाची ओळख पटलेली नाही. कात्रज घाटातील जुन्या बोगद्याजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाची ओळख पटलेली नाही. ज्येष्ठ नागरिकाचे वय अंदाजे ६५ वर्ष आहे. याबाबत पोलीस शिपाई अविनाश रेवे यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीराज थोरात तपास करत आहेत.
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका तरुणाची ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरी खुर्द येथील रहिवासी असलेल्या या तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्याला एका गुंतवणूक ॲपमध्ये सहभागी होण्यास सांगितले. सुरुवातीला तरुणाने काही रक्कम गुंतवली. चोरट्यांनी त्याला परताव्यापोटी काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली. यामुळे तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने चोरट्यांच्या खात्यात एकूण ४६ लाख ३३ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत. दरम्यान, शहरात 'ऑनलाइन टास्क'च्या आमिषाने फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी चार लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी या तरुणाशी संपर्क साधून घरातून ऑनलाइन काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला एका कामाचे पैसे त्याच्या खात्यात जमा करून विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक परताव्याचे आमिष दाखवून त्याला जाळ्यात ओढले. तरुणाने पैसे जमा केल्यानंतर त्याला कोणताही परतावा मिळाला नाही.
राज्यातील महिलांच्या रजोनिवृत्ती काळात उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर वेळेवर व शास्त्रीय उपचार मिळावेत, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी ता. १४ या क्लिनीकची सुरुवात होणार असून यापुढे दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या मासीक पाळीच्या समस्यांमध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन होणार आहे. महिलांच्या रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे शारिरातील उष्णता वाढ, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, वजन वाढणे, हृदयविकाराचा धोका अशा विविध समस्या आढळून येत आहेत. मात्र महिलांकडून या समस्यांकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्यांना पुढील काळात गंभीर समस्यांना सामोरो जावे लागले. या काळात महिलांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व औषधोपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने महिलांसाठी स्वतंत्र ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्य्च्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात दर बुधवारी विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरु केला जाणार असून बुधवारपासून ता. १४ या क्लिनीकला सुरवात केली जाणार आहे. या क्लिनिकमध्ये महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार उपचार, समुपदेशन, आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच मानसिक आरोग्य समुपदेशन, कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी संदर्भातील उपचार आणि आवश्यक तपासण्यांविषयी माहिती दिली जाणार आहे. दर बुधवारी होणाऱ्या या विशेष बाह्यरुग्ण तपासणीचा महिलांनी घ्यावा, रजोनिवृत्ती काळातील लक्षणांबाबत संकोच न ठेवता पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. ‘मेनोपॉज क्लिनिक’मुळे महिलांचे दीर्घकालीन आरोग्य सुदृढ राहण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
मुंबईलगतच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात पांढऱ्या पाकिटातून मतदारांना पाचशेच्या 6 नोटा म्हणजे एकूण 3 हजार रुपये दिले जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. निवडणुकीला अवघे काही तास उरल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला असताना विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप केला आहे. मनसे नेते राजू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवारांना पांढऱ्या पाकिटात पाचशेच्या नोटा मिळाल्याचे दिसून येत आहे. महिला स्वतःहून त्यांना मिळालेली पांढरी पाकिटे फोडून दाखवत आहेत. त्यात 500 च्या 6 नोटा दिसत आहेत. त्यांच्या हातात भाजपचे पाम्पलेटही दिसून येत आहे. डोंबिवलीत पैसा अन् गुंडगिरीचा वापर - मनसे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाचे गांधी प्रेम. सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट 3000/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट 5000/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे. सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे. भ्रष्टाचाराच्या नोटांना पाय फुटले - रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हा पैसा भ्रष्टाचार व कमिशनचा असल्याचा दावा करत भाजपवर निशाणा साधला आहे. corruption आणि commission च्या नोटांना पाय फुटायला सुरवात झाली. पण हे फक्त निवडणुकीपुरतंच दिसेल, नंतर पाच वर्षे कुणी ढुंकूनही बघणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले शिंदे गटाचे उमेदवार? शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील याविषयी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हणाले की, गत महिन्यापासून मी भाजपची सर्व पोलखोल केली आहे. त्यामुळे भाजपला जिंकण्यासाठी असे नको ते धंदे करावे लागत आहेत. भाजप कार्यकर्ते दशरथ भवनमध्ये पैसे वाटत होते. त्यांनी पाकिटातून 3 हजार रुपये दिले. भाजपचे बिनविरोध निवडून आलेले विषू पेंडणेकर यांचे कार्यकर्ते मतदारांना पैशांची पाकिटे वाटत होते. ते प्रत्येकाच्या घरात पाकिटे नेऊन टाकतात. ते आम्हाला सरळ मार्गाने हरवू शकत नाहीत. त्यामुळे असे धंदे करत आहेत, असे ते म्हणाले. भाजपने काय दिले स्पष्टीकरण? डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती आहे. पण प्रभाग क्रमांक 29 मध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. येथील शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनीही भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. पण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाचा आरोप खोट आहे. आमचे कार्यकर्ते त्या भागात पत्रके वाटण्यास गेले होते. त्यांच्या खिशात पैसे कोंबून त्यांना मारहाण करण्यात आली. आम्ही ही दादागिरी, दडपशाही खपवून घेणार नाही, असे ते म्हणालेत. प्रभाग क्रमांक 29 मध्ये कुणामध्ये सुरू आहे लढत? कल्याम डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 अ मधून भाजपच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेचे रवी पाटील उभे टाकले आहेत. सध्या सर्वच उमेदवारांचा प्रचार टोकाला पोहोचला आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून, अवघे तीन दिवस शिल्लक असताना प्रचार अधिकच आक्रमक झाला आहे. जळगावमध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत करुणा मुंडे यांनी सरकारवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. आपल्या भाषणातून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणुकीच्या तोंडावरच वातावरण तापवले. विशेषतः ‘लाडकी बहिण’ योजनेवर केलेली टीका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून, त्यांच्या वक्तव्यामुळे जळगावसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करताना करुणा मुंडे यांनी या योजनेची वास्तवातील स्थिती मांडली. लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये दिले जातात, पण त्याच बहिणीसाठी शौचालयही नाही, ही परिस्थिती आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. पंधराशे रुपये मिळवण्यासाठी महिलांना रांगेत उभं राहावं लागतं आणि त्यामुळे रोजंदारीचा तोटा होऊन हातात प्रत्यक्षात हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम उरते, असे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत, मी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पत्नीला हजार रुपये देते, त्यांनी त्या पैशांत घर चालवून दाखवावं, असे जाहीरपणे म्हटले. करुणा मुंडे यांनी यावेळी आर्थिक गैरव्यवहारांवरही गंभीर आरोप केले. चांगल्या लोकांच्या हातात तिजोरीची चावी द्या. चोरांच्या हातात तुम्ही आधीच चावी दिली आहे, असा टोला लगावत त्यांनी 70 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याचा उल्लेख केला. सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत, ज्यांनी एवढा मोठा घोटाळा केला, त्यांच्या हातातच तिजोरीची चावी आहे, असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी आपली वैयक्तिक वाटचाल आणि संघर्ष मांडत सत्तेच्या दडपशाहीवर भाष्य केले. माझे सासरे मंत्री होते, माझे पती मंत्री होते आणि माझी ननंदही मंत्री आहे. तरीसुद्धा मला दारोदार भटकावं लागत आहे, असे त्या म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलल्यामुळे आपल्याला तीन वेळा जेलमध्ये टाकण्यात आले, असा आरोप करत त्यांनी सत्तेचा माज किती आहे, हे अधोरेखित केले. मात्र, या सगळ्याला न घाबरता आपण सत्ताधाऱ्यांच्या छातीवर उभं राहून राजकारण करायचं ठरवलं आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना करुणा मुंडे यांनी उमेदवारी वाटपावरही प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांनी गुंडांना, ड्रग्स माफियांना तिकीट दिले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणुकीत पैसा वाटून मतं विकत घेतली जात असल्याचा दावा करत त्यांनी, मतदानाचे पैसे घेणे म्हणजे आपल्या भूमातेचा सौदा करण्यासारखे आहे, असे परखड मत मांडले. अनेक ठिकाणी उमेदवारांना बिनविरोध जिंकवून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. बिनविरोध निवडून आणण्यासाठी पैसा खर्च शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना करुणा मुंडे यांनी सरकारवर आणखी एक हल्ला चढवला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, पीक विमा देण्यासाठी पैसे नाहीत, पण आमदार खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची प्राथमिकता काय आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगरसेवकांना विकत घेऊन बिनविरोध निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेत आपल्या जुन्या 'लाव रे तो व्हिडिओ' या शैलीत पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली. २०१४ पूर्वी देशात मर्यादित अस्तित्व असलेल्या अदाणी समूहाला भाजपच्या सत्ताकाळात मुंबई आणि महाराष्ट्रात कशा प्रकारे जमिनी आणि प्रकल्प दिल्या गेले, याचा सविस्तर व्हिडिओ राज ठाकरे यांनी सादर केला. मात्र, या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने राज ठाकरे यांना 'दुटप्पी' ठरवत त्यांच्याच निवासस्थानी झालेल्या गौतम अदाणींच्या भेटीचे फोटो व्हायरल केले आहेत. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर एका नकाशाच्या माध्यमातून अदाणी समूहाच्या २०१४ नंतरच्या विस्ताराची 'क्रोनोलॉजी' मांडली. त्यांनी दावा केला की, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ आधीच अदाणींच्या ताब्यात गेले असून वाढवण येथील प्रस्तावित विमानतळही त्यांनाच देण्याचा घाट घातला जात आहे. अदाणी समूह पूर्वी सिमेंट क्षेत्रात नव्हता, मात्र गेल्या १० वर्षांत तो देशातील दुसरा मोठा उत्पादक बनला असून सरकारी कामात त्यांचेच सिमेंट वापरले जात आहे. धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईची मोक्याची जागा एकाच उद्योगपतीच्या घशात घातली जात असल्याचा आरोप राज यांनी केला. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एकाच व्यक्तीला अशा पद्धतीने मोठे करणे मला मान्य नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. भाजपचा पलटवार: हा तर दुटप्पीपणाचा कळस राज ठाकरेंच्या या आरोपांना भाजपने तातडीने उत्तर दिले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर 'ढोंगी' आणि 'दुटप्पी' असल्याची टीका केली. काही वर्षांपूर्वी गौतम अदाणी स्वतः राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी गेले होते. या भेटीचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. फोटोंमध्ये राज ठाकरेंचे कुटुंब गौतम अदाणींच्या कुटुंबासोबत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत राज ठाकरेंनी गौतम अदाणींचा हात आपल्या हातात घेतला असून, त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करताना दिसत आहेत. अमित साटम यांनी या फोटोंवरून ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राजकीय चर्चेला उधाण मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राज ठाकरे यांनी थेट भाजपच्या धोरणांवर प्रहार केला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात 'मनसे विरुद्ध भाजप' असा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या रणांगणात ठाकरे बंधूंच्या प्रचाराची दिशा आणि फोकस चुकत असल्याचा दावा केला आहे. उद्धव व राज ठाकरे यांच्या प्रचाराची दिशा चुकत असल्याचे मी वारंवार सांगत आहे. मी फार लहान माणूस आहे. मी त्यांना सल्ला देणार नाही. पण त्यांची पार्टी किंचित - किंचीत होत चालली आहे, असे ते म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी ठाकरे बंधूंसह विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करत आहेत. त्यांना विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे. राज व उद्धव यांना मी वारंवार सांगतो की, ते चुकत आहेत. त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकत आहे. प्रचाराचा फोकस चुकत आहे. या पद्धतीने त्यांनी अनेकदा मतदान मागितले. पण काहीच मिळाले नाही. आता विकासावर बोलले तरच मतदान मिळते. मी या यंत्रणेतील फार लहान व्यक्ती आहे. मी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना सल्ला देणार नाही. पण त्यांची पार्टी किंचित - किंचित होत चालली आहे. मुंबईत ठाकरेंची अधोगतीच होईल ठाकरेंचा पक्ष लहान होण्याचे कारण असे आहे की, त्यांच्या प्रचाराची दिशाच चुकत आहे. त्यांनी निवडलेले विषय चुकत आहेत. त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकत आहे. त्यामुळेच त्यांची अधोगती होत आहे. माझ्या मते, मुंबईच्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाची अधोगती दिसून येईल. कारण, ते निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर चालणार आहे. विकास म्हणजे फडणवीस व फडणवीस म्हणजे विकास हे लोकांना माहिती आहे. लोकं आता या विषयाला घेऊन मतदान करणार नाहीत. ठाकरे प्रत्येकवेळी मुंबई तोडण्याचे भूत उभे करतात. पण त्याचे काहीच होत नाही. आता म्हणतात मराठी अस्मिता. पण मतदार त्यांचे काहीही ऐकत नाहीत, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे व फडणवीसांची बरोबरी होऊ शकत नाही उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंशी चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले आहे. पत्रकारांनी याविषयी बावनकुळेंना छेडले असता ते म्हणाले, लोकांनी अडीचवर्षे आदित्य ठाकरेंना पाहिले व फडणवीसांनाही पाहिले. त्यांनी विकासावर न बोललेले बरे. विकास हा असा नसतो. विकास हा जन्मापासूनच जनतेच्या सेवेत आपले आयुष्य द्यावे लागते. सोन्याच्या चमचाने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासावर बोलूच शकत नाहीत. त्यांना मुंबई व महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे कळत नाही. आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी कशी करणार? महाराष्ट्राच्या व मुंबईच्या जनतेला तरी हे मान्य आहे का? आदित्य ठाकरेंनाही हे मान्य आहे का? काहीतरी पोकळ गप्पा मारून विषय भरकटवायचा असा हा प्रकार आहे, असे बावनकुळे म्हणाले.
भाजीपाल्याची उच्चांकी आवक; दर कोसळले
पुणे : प्रतिनिधी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये संक्रांतीमुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. बाजारात गेल्या दोन दिवसांत गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा, रताळी, वाटाणा व हिरव्या मिरचीची उच्चांकी आवक झाली. येथील पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व पालक भाजीची आवक वाढून भावात मोठी घसरण झाली. पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक यांचे दर […] The post भाजीपाल्याची उच्चांकी आवक; दर कोसळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नार्वेकरांच्या संपत्तीत १,८६८ टक्के वाढ
मुंबई : प्रतिनिधी एखाद्या उमेदवाराच्या संपत्तीत किती वाढ व्हावी, याचा ठोकताळा कुणीही मांडू शकत नाही. मकरंद नार्वेकर यांचेही असेच आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू असलेले मकरंद नार्वेकर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उभे आहेत. मकरंद नार्वेकर आणि त्यांच्या पत्नी यांची मालमत्ता तब्बल १२४.४ कोटी रुपयांची असून ते मुंबईतील उमेदवारांमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तत्पूर्वी यापूर्वी […] The post नार्वेकरांच्या संपत्तीत १,८६८ टक्के वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई महाराष्ट्राची नसल्याचे विधान करून भाजपची अडचण करणाऱ्या के अन्नामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबई महाराष्ट्रापुरते मर्यादित शहर नाही. ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही, असे ते म्हणालेत. मला धमकावणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण? असा सवालही त्यांनी या प्रकरणी केला आहे. मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून प्रचाराला लागलेत. त्यातच तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अन्नामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान करून भाजपची अडचण केली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा या मुद्याला हात घालत एकप्रकारे आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचाच दावा केला आहे. एवढेच नाही तर मी मुंबईला येतोय, माझे पाय तोडून दाखवा, असे आव्हानही त्यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे. मला धमकावणारे राज ठाकरे कोण? के अन्नामलाई आज सकाळी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, मला धमकी देणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलावली होती. मलाही माहिती नव्हते की, मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असे लिहिले आहे की, मी मुंबईत आल्यानंतर माझे पाय छाटले जातील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येतो. माझे पाय छाटण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. मी धमक्यांना घाबरणारा असतो, तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की, कामराज हे भारताच्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो की, ते तामिळ राहिले नाहीत. त्यानुसारच जर मी म्हणालो की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, तर त्याचा अर्थ असा होतो का की, महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही? हे सर्व अज्ञानी लोक आहेत, असे ते म्हणालेत. आत्ता पाहू मुंबईविषयी काय म्हणाले होते अन्नामलाई? भाजप नेते अन्नामलाई गत आठवड्यात मुंबईत भाजपच्या प्रचाराला आले होते. तिथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते, मुंबईतील लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. मुंबई हे देशातील एकमेव असे शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट 75 हजार कोटी आहे. ही लहान रक्कम नाही. चेन्नईचे बजेट 8 हजार कोटी आहे. बंगळुरूचे बजेट 19 हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील.
मातोश्रीचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावे की, ते दार मी नाही तर त्यांनीच बंद केले होते. मी वारंवार फोन करत होतो, पण त्यांनी फोन घेण्याचेही सौजन्य दाखवले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदेंनाही जाते:प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना कसले श्रेय? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी युती तुटली तेव्हाच्या अनेक खळबळजनक बाबींचा खुलासा केला. २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही पाच वर्षे सोबत होतो, एकत्र निवडणूक लढलो. तरीही तुम्हाला जर फारकत घ्यायची होती, तर किमान 'देवेंद्रजी, माझे आता तुमच्यासोबत जमणार नाही' असे सांगण्याची माणुसकी तरी दाखवायला हवी होती. मी फोन करत होतो, पण ते फोनवर बोलायला तयार नव्हते. याचे साक्षीदार स्वतः एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर आहेत. बदनामी मी नाही, त्यांच्या लोकांनी केली मातोश्रीची बदनामी थांबवा, या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, इतक्या वर्षात मी मातोश्रीची कोणती बदनामी केली. मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता असताना आदित्य ठाकरेंवर मला विचारलं गेलं. मी एकमेव विरोओधी पक्षनेता होतो, मी म्हटलं मला असं वाटत नाही. त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्या पत्नीची बदनामी केली फडणवीस पुढे म्हणाले, मी त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्याविरोधात माझ्या पत्नीविरोधात खालच्या स्तरावर जाऊन बदनाम केले. आमच्याबद्दल अश्लील लिहिले. पुरावे आहेत. तरीही मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडलेत उद्धव ठाकरे आता म्हणतात की दारे उघडी आहेत, पण आता मला कोणत्याही दरवाजाची लालसा उरलेली नाही. माझ्यासाठी आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडले आहेत आणि तीच माझी ताकद आहे, असे म्हणत फडणवीसांनी आता 'मातोश्री'शी पुन्हा सख्य होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार द्यायचा का? या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत उमेदवारांच्या निवडीबद्दल सांगितले. तसंच त्यांनी याच मुद्यावरून विरोधकांनाही घेरले. “या निवडणुकीमध्ये फक्त आमचे उमेदवार निवडून हे म्हणणे चुकीचे आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही उमेदवार निवडून आलाय. अपक्षांची काय ताकद असते? पण तोही आला ना? किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने, उबाठाने, शरद पवारांनी उमेदवार दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्यापुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले,” असे फडणवीस म्हणालेत. उद्धव ठकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली, आता त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही. आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत: आणून उभे करायचे का? असा सवाल फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या मोफत मेट्रोच्या घोषणेवर टीका केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याला खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचा अनुभव असेल, म्हणूनच अशा घोषणा कशा करायच्या हे त्यांना माहिती असेल, असा टोला लगावत सुळेंनी फडणवीसांच्या टीकेला पलटवार केला. शब्दांपेक्षा काम महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीचा दाखला दिल्याने, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विशेषतः पुणे महानगरपालिका निवडणूक केंद्रस्थानी आली आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेले पक्षच या निवडणुकीत वेगवेगळ्या आघाड्यांमधून लढत असल्याने, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यामुळे ही राजकीय लढाई आणखी तापली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मेट्रो सेवा मोफत करण्याची मोठी घोषणा केल्यानंतर, त्यावरून सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच शब्दयुद्ध सुरू झाले आहे. या घोषणेवर भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट टीका करत अजित पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, मोफत मेट्रोची घोषणा ऐकून त्यांनाही एक कल्पना सुचली होती. मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट दिलं पाहिजे. अनाउन्स करायला काय जातंय? अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय, असे विधान करत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. केवळ घोषणा करणं सोपं असतं, मात्र त्या प्रत्यक्षात शक्य आहेत का, याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राजकीय जीवनात अनेक वेळा निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी वाटू लागली की काही नेते लोकांना भुलवण्यासाठी अवास्तव जाहीरनामे काढतात. काहीही सांगितलं तरी चालेल, अशी मानसिकता असते. पण किमान जनतेचा विश्वास बसेल, अशा गोष्टी तरी सांगायला हव्यात, ज्या प्रत्यक्षात करता येतील, असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार फक्त बोलतात, माझं काम बोलतं, असा थेट हल्ला चढवत, आतापर्यंत आपण संयम राखला होता, मात्र आता परिस्थिती बदलत असल्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी, कदाचित हा त्यांचा अनुभव असेल. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार होते ना? त्यामुळे मोफत घोषणांचा अनुभव त्यांनाच जास्त असावा, असा उपरोधिक टोला लगावला. आमचा अनुभव कामाचा आहे, असे सांगत सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले शब्द नेहमीच पाळले आहेत. सरसकट कर्जमाफीसाठी 70 हजार कोटी रुपयांची योजना आम्ही राबवली होती, मात्र सत्ताधाऱ्यांनी दिलेले शब्द आजही पूर्ण केलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. दोन भाऊ काय करतात, यापेक्षा देशासमोरचे प्रश्न जास्त गंभीर सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावरही भाष्य केले. आजकाल भाषणं कमी आणि इंटरव्यू जास्त झाले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक वृत्तवाहिनीवर तेच चेहरे दिसत आहेत. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र, राज्यातील राजकीय नेते कोण काय बोलत आहेत, यापेक्षा देशासमोर उभ्या असलेल्या मोठ्या आव्हानांवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोण बहीण-भाऊ काय करत आहेत किंवा दोन भाऊ काय करतात, यापेक्षा देशासमोरचे प्रश्न जास्त गंभीर आहेत, असा सूचक टोला त्यांनी लगावला. पुणे महानगरपालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुणे महानगरपालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये पुणेकरांसाठी मेट्रो आणि बस सेवा मोफत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामागील गणित स्पष्ट करत सांगितले की, पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे दररोज साडे सात कोटी रुपये पेट्रोलवर खर्च होतात. वार्षिक हिशोब केला तर हा खर्च सुमारे दहा हजार आठशे कोटी रुपयांपर्यंत जातो. हेच पैसे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्यास नागरिकांना दिलासा देता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.
कोंढव्यातील एका चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर दाम्पत्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रकाश मुंडे (वय ५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (वय ४८) अशी मृतावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत. मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागात असलेल्या एका चाळीत राहायला होते. मुंडे दाम्पत्याचा मुलगा गणेश(वय २३) हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. सकाळी तो रात्रपाळीवरुन घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. गणेशने दरवाजा वाजविला. मात्र, प्रतिसाद देण्यात आला नाही. गणेशने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा वडील प्रकाश आणि ज्ञानेश्वरी हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. मुंडे दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. ‘ज्ञानेश्वरी यांना ब्रेन ट्यूमर होता. वर्षभरापासून त्या आजारी होत्या. प्रकाश हे चालक म्हणून काम करायचे. पोलिसानी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली. दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व सोसायटी, नऱ्हे रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दांगट याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी राजमाता उद्यानाजवळ एक जण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दांगट याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. चौकशीत त्याने दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली दिली.
शिवसेनेचा पुणे भयमुक्त करण्याचा संकल्प:डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जनतेला दबावाला बळी न पडण्याचे आवाहन
पुणे महानगरपालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा शिवसेनेने निर्धार केला असून, जनतेने कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे मतदान करावे, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्यांनी नागपूर चाळ येथे आयोजित प्रचारसभेत हे वक्तव्य केले. डॉ. गोऱ्हे फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागातील शिवसेना उमेदवार डॉ. रिंकू मोरे, विजयकुमार ढाकणे, सविता नाईक आणि विपुल दळवी यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या. यावेळी गायत्री भागवत, शैलेंद्र मोरे, डॅनियल मगर, भानुदास बावस्कर, राजकुमार ढाकणे, सुजित परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याच सभेत रेश्मा शेख, अलिशा शेख, प्रगती दोडके आणि अर्चना लोखंडे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'लाडकी बहीण' योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे. महिलांचा सन्मान हा त्यांचा अधिकार आहे, ही भूमिका शिवसेनेने नेहमीच घेतली आहे. शिवसेना सत्तेत आल्यास दोन लाख महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योगभवन उभारले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, नोंदणीकृत महिला बचत गटांना महानगरपालिकेतर्फे दरवर्षी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुढील १० वर्षांत सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून प्रत्येक झोपडीधारकाला ५५० चौरस फुटांचे मोफत घर देण्याचेही त्यांनी जाहीर केले. शिक्षण क्षेत्रातही सुधारणा करण्याचे आश्वासन देत डॉ. गोऱ्हे यांनी मनपा शाळांमध्ये कॉम्प्युटर आणि एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली. मुलींना मोफत शिक्षण, ई-लर्निंग शाळांची वाढ आणि पीएमपीएमएल बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट भाडे यांसारख्या योजनाही त्यांनी मांडल्या. यावेळी त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण आणि फळा चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
समृद्धी महामार्गाची संकल्पना माझी होती, तर त्यासाठी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी परिश्रम घेतले, त्यामुळे समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदे यांना देखील जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा सुरुवातीपासून विरोध होता, ज्याच्या विरोधात त्यांनी सभा घेतल्या, त्यांना त्याचे श्रेय कसे मिळेल? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी समृद्धी महामार्गाबद्दल बोलताना एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. तर श्रेयवादावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पामागची क्रोनोलॉजी सांगितली. ते म्हणाले, मी शिंदेंना एमएसआरडीसी दिले, तेव्हा ते त्यांना नको होते. उद्धवजींना या खात्यात काहीच नाही, म्हणून एमएसआरडीसी शिंदेंना दिले. त्यामुळे शिंदे फार नाराज होते. त्यावेळी हे खाते आपण मोठे करून दाखवू, तुम्ही काळजी करू नका, असे शिंदेंना सांगितले. निधीची जुळवाजुळव आणि शिंदेंचे कष्ट फडणवीस पुढे म्हणाले, त्यानंतर मी समृद्धी पीडब्ल्यूडीला दिला. त्यावर काम सुरू होते. तो पीडब्ल्यूडीकडून काढून एमएसआरडीसीला दिला. त्याही वेळेत शिंदेंना सुरुवातीच्या हा प्रकल्प होईल, असे वाटत नव्हते. कारण एवढे पैसे येणार कुठून? असा प्रश्न त्यांना होता. मी पहिल्यांदा जमिनीचे अधिग्रहण हातात घेतले. जमीन अधिग्रहणासाठी कुणी अर्थसहाय्य करत नाही. मी मुख्यमंत्री असताना एमआयडीसी, एमएमआरडी यांच्याकडून उधार घेऊन पैसे उभे केले. त्यानंतर शिंदेंनी गावात जाऊन एका दिवसात सगळ्या रजिस्ट्र्या केल्या. त्यामुळे मी कधीच एकट्याचे श्रेय घेतले नाही. समृद्धी महामार्ग हा माझ्यामुळे आणि शिंदे साहेबांमुळे झाला. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांना श्रेय कसे? दरम्यान, समृद्धी महामार्ग झाला, तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरे गटात होते, त्यामुळे ते ठाकरेंचे श्रेय झाले का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. त्यावर ते म्हणाले, त्यावेळी शिंदे हे ठाकरे गटात असतील, पण समृद्धीचे श्रेय त्यांचे नाही. कारण ठाकरेंनी त्यांना वाळीत टाकले होते. मरी गाय बम्मण को दान, या म्हणीप्रमाणे ठाकरेंनी शिंदेंना मरी गाय (काहीच नसलेले एमएसआरडीसी खाते) देऊन टाकली होती. त्याला जिवंत करण्याचे काम शिंदेंनी केले, असे फडणवीस म्हणालेत. ज्या प्रोजेक्टला उद्धव ठाकरेंचा विरोध होता. हा प्रोजेक्ट होऊ नये, यासाठी सभा घेतल्या, त्यांना त्याचे श्रेय कसे मिळेल? असा सवालही फडणवीस यांनी केला.
सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या तयारीवरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, साधू-संतांच्या निवासव्यवस्था आणि धार्मिक विधींसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे सुरू आहेत. मात्र, या प्रक्रियेत तपोवन परिसरातील काही झाडे छाटली जात असल्याचा आरोप होत असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केल्यानंतर आता या वादाने अधिक आक्रमक वळण घेतले आहे. गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मोठी झाडे तोडण्याचा कुठलाही प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही मोठी झाडे तोडणार नाही, ही ग्वाही आम्ही अनेकदा दिली आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. आतापर्यंत आंध्र प्रदेशातून सात ते आठ हजार झाडे आणून लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित झाडांची लागवडही सुरू असून, पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या नव्याने लावलेल्या झाडांकडे एकही तथाकथित वृक्षप्रेमी फिरकलेला नसल्याचा टोला त्यांनी लगावला. या वादात राज ठाकरे यांनी आपल्याला ‘लाकूडतोड्या’ संबोधल्यावर महाजन यांनी त्यावरही उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. मी स्वतः 20 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करतोय. तरीही केवळ टीआरपीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी झाडाला मिठी मारल्याचा उल्लेख करत, त्यांना आता उशिरा जाग आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरे हे सतत काहीही बोलत राहतात, मुख्यमंत्र्यांवरही टीका करतात, मात्र मला लाकूडतोड्या म्हणतात तर बोलू द्या, ते मोठे आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या सभेत बोलताना गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खोचक शैलीत हल्ला चढवला होता. संजय राऊत म्हणतात तसं, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नव्हता, असे म्हणत त्यांनी थेट टोला लगावला. यावरही न थांबता, हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत, असा आरोप करत राज ठाकरे यांनी भाजपच्या पक्षवाढीवरही अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे तपोवनातील झाडतोड आणि कुंभमेळा तयारीचा मुद्दा राजकीय केंद्रस्थानी आला. राज ठाकरे यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी गोदाघाटावर आयोजित भाजपच्या सभेत आपली भूमिका ठामपणे मांडली. तपोवन परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-संतांच्या पारंपरिक निवासासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा ते बारा वर्षांत नैसर्गिकरीत्या उगवलेल्या छोट्या-मोठ्या झाडांवरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणप्रेमी असल्याचा आव आणणारे काही लोक धार्मिक कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, हे सर्व डाव्या विचारसरणीचे लोक असल्याचा थेट आरोपही महाजन यांनी केला. याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर बोलतात, असा आरोप केला जातो. मात्र, ते विकासाशिवाय काहीही बोलत नाहीत, असे ते म्हणाले. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी मुद्दे उरलेले नसल्याने निवडणुका जवळ आल्या की, ते पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करायला लागतात, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच नाशिकचे राजकारणही तापले महाजन यांनी पुढे जात ठाकरे ब्रँड आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेतील 25 वर्षांचा सत्ताकाळ, कोरोना काळातील कथित घोटाळे आणि सलग निवडणूक अपयशाचा दाखला देत त्यांनी मविआवर टीका केली. ठाकरे असोत, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस, महाविकास आघाडी एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. लोकांचा विश्वास भाजप महायुतीवर असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्येही तो स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषणाचा समारोप केला. या संपूर्ण वादामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच नाशिकचे राजकारणही अधिकच तापल्याचे चित्र दिसून येत आहे.
परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दत्ता पवारला 4 दिवसांपूर्वीच या प्रकरणात जामीन मिळाला होता. त्यानंतर आज त्याने आपल्या घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परभणीसह महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. दत्ता सोपान पवार याच्यावर परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची विटंबना केल्याचा आरोप होता. त्याचे तीव्र पडसाद परभणी शहरात उमटले होते. देशपातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली होती. या प्रकरणी दत्ता पवारला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून 13 महिन्यांनंतर तो तुरुंगातच होता. अखेर 4 दिवसांपूर्वी त्याला सशर्त जामीन मिळाला. तो मिर्झापूर या आपल्या गावी परतला होता. तिथे दोन-तीन दिवस राहिला. त्यानंतर आज सोमवारी सकाळी त्याने आपल्या शेतातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याची माहिती दत्ता पवारच्या कुटुंबीयांना दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता पवारची पत्नी व दोन्ही मुले पुण्यात राहतात. तर इतर नातेवाईक जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात. पोलिसांनी या सर्वांना दत्ता पवारच्या आत्महत्येची माहिती दिली आहे. त्यानंतर आता ते सर्वजण मिर्झापूरच्या दिशेने निघालेत. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत झाला होता मृत्यू? परभणी हिंसाचारानंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी नामक तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने या प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली होती कुटुंबाची भेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गतवर्षी 23 डिसेंबर रोजी परभणीला भेट दिली होती. त्यांनी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. राहुल गांधी यांनी दावा केला होता की, सोमनाथ हे दलित असल्याने आणि संविधानाचे रक्षण करत असल्याने त्यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली. त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही या वेळी टीका केली होती.
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी चक्क विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिला डॉक्टरने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी मध्यरात्री १२:१५ च्या सुमारास पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र स्कूलजवळ घडली. प्रभाग २१ मधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराच्या निवासस्थानी जाऊन दहशत निर्माण केली. स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे आणि इतर काही जणांनी संगनमत करून हा हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आमच्या विरोधात उभे राहिलात तर संपवून टाकू तक्रारदार महिला डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय घरात प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस कसे काय केले? तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी आरोपींनी दिली. या गोंधळात आरोपींनी तक्रारदार महिलेशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच, मध्यस्थीसाठी आलेल्या दिराला धक्काबुक्की केली आणि वयोवृद्ध आजेसासूलाही ढकलून दिले. सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे सादर आरोपींनी केवळ घरात घुसून धिंगाणाच घातला नाही, तर घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, फिर्यादीने हे व्हिडिओ पुराव्यादाखल पोलिसांकडे सोपवले आहेत. निवडणुकीच्या दहशतीपोटी हा प्रकार करण्यात आला असून आम्ही सुरक्षित नाही, अशी भीती पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या कथित कृत्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. हे ही वाचा… जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार?:राज्य निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज, मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या भवितव्याबाबत आज, १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे. या निर्णयावर राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे गणित अवलंबून आहे. सविस्तर वाचा…
ठाण्यात होणाऱ्या ठाकरे गटाच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक हे शिंदे गटातील भ्रष्टाचाराबाबत जाहीरपणे बोलत असल्याने नवी मुंबई-ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी गणेश नाईकांचे कौतुक करत, नाईक आज जे बोलत आहेत, ते फडणवीसांना हवं तेच आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच या लोकांना तुरुंगात जावंच लागेल, असे बोलत असतील आणि त्यांना शांत केलं जात नसेल, तर सत्ताधाऱ्यांची अंतर्गत स्थिती काय आहे, याचं ते द्योतक असल्याचं राऊत म्हणाले. राऊतांनी पुढे जात गणेश नाईक यांचा जाहीर सत्कार करण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात नवा स्फोट घडवून आणला. भ्रष्टाचार कसा सुरू आहे, हे एक मंत्री बेधडकपणे सांगतोय, यासाठी जनतेने त्यांचा सत्कार करायला हवा, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी हायकमांडने परवानगी दिली तर टांगा पलटी करेन, असे विधान केल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांचा टांगा पलटी करायला कुठल्याही हायकमांडची गरज नसते. तुमचा अंतरात्मा पुरेसा आहे. शिवसेना, शरद पवार यांच्यासोबत काम केलेल्या गणेश नाईकांकडे ही ताकद आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणल्याचे श्रेय घेतल्यावर राऊतांनी त्यावरही जोरदार प्रतिवाद केला. फडणवीसांनी स्वतःविषयी गैरसमज करून घेऊ नये. ठाकरे बंधू एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज होती आणि मराठी माणसांनी ते केलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एकोपा आधी सांभाळावा, असा सल्ला देत राऊत म्हणाले की, भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे, हा संदेश ठाकरेंनी महाराष्ट्राला दिला, म्हणून सभेला एवढी गर्दी झाली. मतं विकत घ्यावी लागणार नाहीत, मात्र शिंदे गटाकडून पैशांचा वापर होत असल्याचे व्हिडीओ पुढे येतील, असा दावाही त्यांनी केला. अजित पवार थापा मारत असतील, तर त्यांना आवर घालावा याचबरोबर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले. पुण्यात मोफत बससेवेचं आवाहन केवळ पुण्यापुरतं का, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. अजित पवार थापा मारत असतील, तर त्यांना आवर घालावा, असे आवाहन राऊतांनी फडणवीसांना केले. तसेच अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून भाजपवर टीका करत, भाजप बाहेरून लोक आणून चाचपणी करते, हे आमच्यावर फेकलेले मुंगळे आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ठाण्यातील सभेपूर्वीच राऊतांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
केंद्र सरकारने राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिलेल्या अधिकारांवर मोठी कात्री लावत १ जानेवारी २०२६ पासून मॅन्युअल वाहन फिटनेस चाचण्या व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ज्या जिल्ह्यांच्या शेजारी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) कार्यरत आहेत, त्याच जिल्ह्यातील आरटीओंना आता वाहन फिटनेस चाचण्या घेता येणार नाहीत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे अवर सचिव मृत्युंजय कुमार यांनी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला अधिकृत पत्र पाठवले आहे. या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फिटनेस चाचण्यांना पूर्णविराम मिळणार असून, आता अत्याधुनिक यंत्रणांवर आधारित एटीएस केंद्रांमध्येच वाहनांची चाचणी होणार आहे. यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशात सुधारणा करत ज्या जिल्ह्यांमध्ये स्वतः एटीएस उपलब्ध नाही, पण शेजारील जिल्ह्यात एटीएस आहे, अशा ठिकाणच्या आरटीओंचे अधिकारही रद्द करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा-आरटीओ मॅपिंगची सुधारित यादीही जोडण्यात आली आहे. परिणाम कोणावर? सर्व लहान मोठे वाहनधारक, आरटीओ कार्यालये, व्यावसायिक वाहनचालक, खासगी बस व ट्रक मालकया सर्वांना एटीएस केंद्रावरच वाहन फिटनेस चाचणीसाठी जावे लागेल. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. हा होईल फायदा या निर्णयामुळे पारदर्शकता वाढेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा दर्जा उंचावेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील या आरटीओ कार्यालयांचा समावेश महाराष्ट्रात नाशिक येथील एटीएस केंद्राशी संलग्न धुळे, भाडगाव, चाळीसगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, श्रीरामपूर, ठाणे, कल्याण, वाशी, न्यू मुंबई, पालघर आदी जिल्ह्यांतील अनेक आरटीओंवर याचा थेट परिणाम होईल. कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला राज्यात नव्या एटीएस केंद्रांच्या उभारणीसाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात आणखी आरटीओंचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय या आराखड्याच्या आधारे घेतला जाईल. महत्त्वाचे मुद्दे > १ जानेवारी २०२६ पासून अंमलबजावणी > आरटीओंचे मॅन्युअल फिटनेस अधिकार रद्द > फक्त एटीएस केंद्रांमध्येच फिटनेस चाचणी > नाशिक व छत्रपती संभाजीनगर एसटीएसशी संलग्न अनेक जिल्ह्यांवर परिणाम > राज्य सरकारला एटीएस विस्ताराचा आराखडा सादर करण्याचे आदेश
मुंबईतील शिवाजी पार्कवर रविवारी पार पडलेल्या मनसेच्या जाहीर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देशातील मोठ्या उद्योगसमूहांबाबत थेट आणि आक्रमक भूमिका घेतली. गेल्या दहा वर्षांमध्ये अदानी समूहाने देशभरात, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात कशाप्रकारे आपला प्रभाव वाढवला, यावर त्यांनी सादर केलेला व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लाव रे तो व्हिडीओ, या त्यांच्या खास शैलीत राज ठाकरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून 2014 नंतर अदानी समूहाला मिळालेल्या प्रकल्पांचा, जमिनींचा आणि सत्ताकाळातील वाढत्या प्रभावाचा आढावा सभेत मांडला. या सादरीकरणानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपण उद्योगपतींच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकाच उद्योगसमूहाला सातत्याने मोठे केले जात असल्याचे चित्र दिसत असल्याने चिंता व्यक्त केली. देशात उद्योग वाढले पाहिजेत, रोजगार निर्माण झाला पाहिजे, याला आपला विरोध नसल्याचे सांगत त्यांनी सत्तेचा आणि उद्योगाचा अतिशय जवळचा संबंध असल्याचा आरोप केला. मुंबईसारखे आर्थिक राजधानीचे शहर हळूहळू एका विशिष्ट गटाच्या ताब्यात दिले जात असल्याचा दावा करत त्यांनी याचा थेट संबंध आगामी महापालिका निवडणुकांशी जोडला. त्यामुळे ही सभा केवळ राजकीय आरोपांची नव्हे, तर मुंबईच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे चित्र निर्माण झाले. राज ठाकरे यांच्या या सभेनंतर अवघ्या काही तासांत भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत ठाकरे बंधूंना थेट लक्ष्य केले. ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतो, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईकरांनी सावध राहावे, असा सूचक इशाराही त्यांनी या ट्विटमधून दिला आहे. नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, हा मुद्दा केवळ अदानी समूहापुरता न राहता थेट ठाकरे बंधूंवरील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. राज ठाकरे यांनी या व्हिडीओतून 2014 पूर्वी आणि 2014 नंतरचा कालखंड ठळकपणे वेगळा करत तुलना मांडली. भाजप सत्तेपूर्वी देशात फारसे नाव नसलेले अदानी समूह कसा देशातील सर्वात प्रभावशाली उद्योगसमूहांपैकी एक बनला, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वर्षानुवर्षे कशाप्रकारे अदानी समूहाला विविध प्रकल्प मिळत गेले, याचे नकाशे आणि आकडेवारी सभेत दाखवण्यात आली. विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात मिळालेल्या मोठ्या प्रकल्पांवर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामध्ये मुंबई विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करत मुंबईतील मौल्यवान जमिनी एका उद्योगसमूहाकडे जाण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या औद्योगिक विस्ताराचे उदाहरण देत सिमेंट उद्योगाचा उल्लेख केला. कधीही सिमेंट उद्योगात नसलेला अदानी समूह अवघ्या दहा वर्षांत देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक कसा झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या देशातील अनेक सरकारी प्रकल्पांमध्ये अदानी समूहाच्या सिमेंटचा वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ अदानींच्या ताब्यात गेल्याचे सांगत, वाढवण येथे प्रस्तावित असलेले विमानतळही भविष्यात त्यांच्याच ताब्यात जाण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा सर्व विस्तार नैसर्गिक उद्योगवाढ आहे की सत्तेच्या आश्रयामुळे घडलेली प्रक्रिया, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी एकूणच, शिवाजी पार्कवरील सभेत दाखवलेला अदानी समूहाचा व्हिडीओ, त्यातून मांडलेले आरोप आणि त्यानंतर भाजपकडून करण्यात आलेला थेट हल्ला यामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाली आहे. मुंबईचे प्रकल्प, जमीन आणि विकास कोणाच्या हातात जाणार, हा प्रश्न निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होत चालला आहे. येत्या काळात हा वाद अधिक चिघळणार की राजकीय पातळीवर शमणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मी महापालिका बोलतेय... आतापर्यंत मी आपल्याला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील कुरघोडीचं राजकारण सांगितलं. शिवसेना, भारतीय जनता पक्षातील संघर्षही आपण पाहिला, पण मला आता आठवते ती गोष्ट आहे शिवसेनेतील अंतर्गत वादाची. शिवसेनेचे विकास जैन महापौर असताना घडलेलं हे प्रकरण. सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्ट्याच्या मुद्द्यावरून आणि इतर काही ठरावांवरून शिवसेनेमध्ये हा वाद पेटला. उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव आला होता. हा मुद्दा केवळ एक निमित्त ठरला. खरंतर तेव्हा पाणीपट्टी वाढलीच नाही, पण वाद या मुद्द्यावर असल्याचं वरवर दाखवण्यात आलं. सभागृह नेते अंबादास दानवे यांनी विकास जैन यांची कोंडी केली. त्यांना सुदाम सोनवणे यांचीही साथ होती. बरेच दिवस त्यांच्यातील संघर्ष मिटला नाही. ‘त्यांना म्हणजे दानवे आणि सोनवणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असं जैन उघडपणे बोलले होते. त्यावर ‘हा पक्षातील अंतर्गत विषय आहे. आम्ही त्यातून तोडगा काढू,’ असं सोनवणे यांनी सांगितलं होतं. स्थानिक पातळीवर वाद मिटंना. अखेरीस प्रकरण थेट उद्धव ठाकरे यांच्याकडं गेलं. त्यांनी तिघांनाही मुंबईला बोलवून घेतलं. मुंबईत जाताना त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी नगरसेवकही होते. कुणी काय बोलायचं हे सर्व ठरलेलं होतं. मात्र, ऐनवेळी ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे अंतर्गत धुसफूस ‘मातोश्री’वर उघड झाली. दानवे आणि सोनवणे यांना स्थानिक नेत्यांनीही साथ दिली नाही. पक्षानं दोघांनाही राजीनामा द्यायला सांगितलं होतं. विशेष म्हणजे पक्षाने राजीनामा घेतलेले हे पहिले दोन नगरसेवक. त्यानंतरच्या काळातही शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद होतच राहिले. मात्र, सोनवणे आणि दानवे यांना झालेली शिक्षा लक्षात घेता बऱ्याच जणांनी स्थानिक पातळीवरच वाद मिटवण्यात धन्यता मानली. दानवे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांची शिवसेनेतून पीछेहाट सुरू होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांनी जिल्हाप्रमुख पद मिळवलं आणि ते कायम आपल्याकडं ठेवत ही चर्चा फोल ठरवली. नंतर तर ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही झाले. सध्याच्या निवडणुकीची सूत्रं दानवे यांच्याकडंच आहेत. महत्त्वाचे म्हणजे दानवे आणि सोनवणे यांचे राजीनामे कोणत्या कारणामुळे घेतले हे गुलदस्त्यातच आहे. मनपात सर्वात प्रभावी काम करणारे प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष त्यांनी कधी उघड होऊ दिला नाही. अंतर्गत वादात न पडता नंदकुमार घोडेले यांनी मात्र दोन वेळा महापौरपद मिळवलं. शिवसेनेनं आमदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर प्रदीप जैस्वाल अपक्ष म्हणून लढले. पुढं यांनी शहर विकास आघाडी स्थापन करत मनपा निवडणूक लढवली. त्यांनी काही नगरसेवक निवडूनही आणले. या शहरात स्वतःच्या बळावर काही नगरसेवक निवडून आणणारे ते एकमेव स्थानिक नेते म्हणावे लागतील. एकूणच काय तर वेळप्रसंगी संघर्ष करावा, पण राजकारणात टिकून राहावं हा संदेश महापालिकेच्या राजकारणातच मिळतो. मग ते उदाहरण दानवेंचं असो किंवा जैस्वाल यांचं...
प्रतिनिधी । दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दर्यापूर पोलिसांनी अकोट–दर्यापूर मार्गावर वाहतूक नियंत्रण व रस्ते सुरक्षा मोहीम राबवली आहे. शुक्रवारी याच मार्गावर अवैध व बेशिस्त ऑटोमुळे अनियंत्रित होऊन दुचाकी चालक प्राचार्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून भविष्यात असे दुर्दैवी अपघात घडू नयेत, यासाठी ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवून संपूर्ण मार्ग मोकळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावर बेवारस, बेशिस्त व चुकीच्या पद्धतीने उभी असलेली वाहने पोलीसांकडून हटवण्यात आली.तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घालणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, रस्त्यावर वाहन उभे करून अडथळा निर्माण करणे, तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंड आकारण्यात आला. पुढील काळातही नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे यामुळे वाहनचालक व नागरिकांनी थोडे समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य वाहन चालकांनी व नागरिकांनी नियमाचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे. अति घाई संकटात नेई याप्रमाणे रस्त्याचे नियम पाळणे नागरिक हिताचे मानले जाते. तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा सुजान नागरिक म्हणून सहकार्य करणे महत्वाचे असून यापुढेही पोलीस प्रशासनाची कारवाई व खाकीचा धाक असणे महत्त्वाचे आहे,अशी प्रतिक्रीया अॅड. अनुप गोमाशे यांनी दिली.
प्रतिनिधी | अमरावती शिक्षण, रोजगार आणि शहरी जीवनात इंग्रजी आणि हिंदीचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत चालल्यामुळे मराठीच्या वापरावर परिणाम होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळे मराठीचा भाषिक आणि सांस्कृतिक पाया कमकुवत होत आहे. पुढील पिढ्या मातृभाषेपासून दूर जात आहेत. वाढत्या आधुनिकीकरणामुळे माणसाच्या जीवनशैली व विचारांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. बोली भाषेचे मूळ स्वरूप बदलत आहे. ज्यामुळे मराठीची उपेक्षा होत आहे. त्याचा परिणाम मराठी भाषेच्या पारंपारिक स्वरूपावर होत आहे. शिक्षक साहित्य संमेलनातून मराठीचा जागर होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. असे विचार संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ. गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले . शिवाजी शिक्षण महाविद्यालय, तथा शिक्षक साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य व मासिक शिक्षकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी येथे घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साहित्यिक प्रा.डॉ.गणेश चव्हाण, हर्षवर्धन देशमुख, ॲड.जे.व्ही. पाटील (पुसदेकर), ॲड. गजानन पुंडकर, प्रा. वसंत पुरके, आमदार धीरज लिंगाडे, डॉ.श्रीकांत तिडके, हेमंत डोणगावकर, डॉ. पूनम चव्हाण, प्राचार्य डॉ.विनय राऊत, जयदीप सोनखासकर, शरदचंद्र बिडकर प्रा.अरुण बुंदेले, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.डॉ.किशोर क्षत्रीय आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी मातोश्री विमलाबाई देशमुख व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संमेलनाचे उद्घाटन उद्घाटक हर्षवर्धन देशमुख यांनी दीप प्रज्वलित करून केले. स्वागत गीत व जिजाऊ वंदनेचे छाया पाथरे यांनी गायन केले. अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी भाऊसाहेब या स्वरचित वंदन गीताचे गायन केले. प्रास्ताविक जयदीप सोनखासकर यांनी केले. शिक्षक मतचे प्रकाशन; साहित्यिक उपस्थित शिक्षकमत या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच ह.बा.खंडारे, प्राचार्य डॉ. अतुल ठाकरे, ना.शी.उर्फ भारतभूषण चाफेकर, प्रा.सुशीला मळसने या लेखक व कवींच्या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. या साहित्य संमेलनाला प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, शिक्षक साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी नागपूर, लातूर, संभाजीनगर, वर्धा, नांदेड, बुलढाणा येथील पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील साहित्यिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.
राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या भवितव्याबाबत आज, १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे. या निर्णयावर राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे गणित अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासकीय अडचणी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने आयोगाने १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज या अर्जावर सुनावणी होणार असून, न्यायालय ही मुदतवाढ देणार की ३१ जानेवारीच्या डेडलाईनवर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाचा पेच आणि नवीन याचिका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दा कळीचा ठरला आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्या येथे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने त्यांच्या निवडणुका घेण्यास तांत्रिक अडचण नाही. २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्याने त्यांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच ५० टक्के मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीचे महत्त्व आजच्या सुनावणीत दोन प्रमुख गोष्टींवर निर्णय अपेक्षित आहे. पहिला म्हणजे निवडणूक घेण्यास मुदतवाढ. निवडणूक आयोगाला १० फेब्रुवारीपर्यंत वेळ मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. दुसरा म्हणजे, ५० टक्क्यांच्या आतील आणि बाहेरील अशा सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी होणार की टप्प्याटप्प्याने? याकडे लक्ष असणार आहे. या निकालावर राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींची दिशा ठरणार आहे. महापालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच आता 'जिल्हा परिषद निवडणुकां'चा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात आहे. हे ही वाचा… मुंबई मनपाचा निकाल यंदा लांबणीवर?:मतमोजणीच्या नियमात मोठा बदल, उमेदवारांची धाकधूक वाढली; नियमात बदल करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान कोण चढणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच, निकालासाठी आता उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत 'एकापाठोपाठ एक' असा नवा बदल केल्याने निकालाचा गुलाल उधळण्यासाठी मध्यरात्र किंवा दुसरा दिवस उजाडू शकतो, अशी चिन्हे आहेत. या नव्या नियमामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, यावर तोडगा काढण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी आयोगाची राजकीय पक्षांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. सविस्तर वाचा…
बोरगाव मंजू | बोरगाव मंजू येथील लक्ष्मीनगरातील संत गजानन महाराज मंदिरातून पालखी सोहळा रविवारी शेगावकडे मार्गस्थ झाला. टाळ मृदंगाच्या गजरात श्री गजानन महाराजांचा जयघोष करत वारकरी हरिनामात दंग झाले. पाच दिवस चालणाऱ्या सोहळ्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. असा राहणार प्रवास पालखी सोहळ्याला रविवारी बोरगाव मंजू येथून प्रारंभ. अकोला येथे मुक्काम करून सकाळी निघून रात्री गायगाव येथे पालखी सोहळा मुक्कामी असेल. सकाळी गायगाव नागझरीकडे वारकरी मार्गस्थ होतील. रात्री श्री क्षेत्रे रात्री गोमाजी महाराज, नागझरी येथे मुक्काम राहणार आहे. मंगळवारी सकाळी संतनगरी शेगावकडे पालखी सोहळा निघणार आहे. (छाया : देवानंद मोहोड) असा झाला प्रारंभ सोहळ्यात ५०० भाविक सहभागी झाले आहेत. रविवारी सकाळी श्रींच्या चरणी महापूजेसह जलाभिषेक करून पालखी सोहळ्याचा श्रीगणेशा झाला. पालखी मार्गावर भाविकांनी स्वच्छतेसह रांगोळी काढून श्रींच्या चरणी मनोभावे सेवा अर्पण केली. या पालखी सोहळ्यात पांढरा शुभ्र वस्त्र व डोक्यावर टोपी, महिला सेवाधारी हातात टाळ मृदंगाच्या गजरात जयघोष करत मार्गस्थ झाले.
प्रतिनिधी | अकोला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा ‘सुपर संडे' शहरातील मतदारांना अनुभवायला मिळाला. मतदान अवघ्या दोन दिवसावर आल्याने विविध प्रभागांमध्ये प्रचार रॅली, पदयात्रा, सभा व कोपरा बैठका यांच्या माध्यमातून सर्वच पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. रविवारी सुटी असल्याने उमेदवारांच्या प्रचार रॅलीत नागरिकांचाही सहभाग दिसून आला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, मौलाना हारुण नदवी, शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड, भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या गल्ली बोळांमध्ये प्रचार रॅलींमुळे शहरातील विविध भागांतील प्रभागांत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असल्याने उमेदवारांनी प्रचाराची ताकद पणाला लावली असून, महानगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे. रविवारी जास्तीत जास्त सभा घेण्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भर दिला आहे. त्यामुळे विविध शहरांत राजकीय पक्षांबरोबरच कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली. रिंगणातील उमेदवारांकडून विकासकामे, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा यांवर भर देत मतदारांना साद घातली जात आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा १३ जानेवारी रोजी थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचाराला अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने रविवारपासून शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांतून आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. या सभांमधून नेतेमंडळी आपले निवडणुकीचे मुद्दे मांडत असून, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे निवडणुकांची रंगत आणखी वाढली आहे. रविवार सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई सुटीच्या निमित्ताने घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची भेट घेण्यासाठी उमेदवारांनी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे रविवार सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई झाल्याचे पाहायला मिळाली. या प्रचार धडाक्यात रविवारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार रणधीर सावरकर यांच्या शहरात विविध प्रभागात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा झाल्या. १२ जानेवारीपासून दोन दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर शहरात प्रचारासाठी येणार आहेत. रविवारी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा झाल्या. शहराच्या विविध प्रभागात विविध राजकीय पक्षांच्या निघालेल्या प्रचार रॅलींमुळे सर्वत्र निवडणुकमय वातावरणाची धामधूम पाहायला मिळाली.
प्रतिनिधी|चांदा चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालयामध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५९ पासून ते २०२५ पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. माजी विद्यार्थी व पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोपानराव शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था कार्यकारिणी सदस्य नानासाहेब अंबाडे, डॉ. दीपक शिंदे, संभाजी दहातोंडे, विनोद गुंदेचा, अमृत गांधी, प्रा. किसन अंबाडे, आसाराम कर्डिले, मच्छिंद्र थिटे, आर.डी. गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे आदी उपस्थित होते. यावेळी संभाजी दहातोंडे, संस्था कार्यकारिणी सदस्य नानासाहेब अंबाडे, डॉ. दीपक शिंदे, प्रा. अशोक चौधरी, प्रा. किसन अंबाडे, प्रा.रावसाहेब राशिनकर, किशोर रक्ताटे, संतोष कानडे, किशोर शिंदे, कार्तिक पासलकर, ज्योती जावळे, जनार्धन पटारे, विनोद गुंदेचा यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाच्या प्रगतीसाठी व आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शक्य तितकी मदत देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थी महासंघाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. विनोद गुंदेचा यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी तर विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन वाकचौरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
प्रतिनिधी | नेवासे फाटा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने आपली वाटचाल केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताना येणारे विविध आव्हाने समाजातील दैनंदिन जीवन जगाताना वेगवेगळ्या आव्हानांना कसे सामोरे जावे, विद्यार्थी जीवनात शिस्त किती महत्वाची आहे, हे आपले दैनिक वेळापत्रकच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनवायला हवे, असे आवाहन नेवासे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. नेवासे तालुक्यातील हंडीनिमगाव येथे पुणे विद्यापीठ व ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे, बाळासाहेब पिसाळ, किरण जाधव, संकेत वाघमारे, कुणाल पिसाळ, प्रा. डॉ. एन. डी शेख, प्रा. डॉ. कार्तिकी नांगरे आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यास, शारिरीक कसरत आणि संस्कार या त्रिसूत्रीवर आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास निश्चितच तुम्ही समाजासाठी आदर्श नागरिक बनताल. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ आगळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशनंदगिरी महाराज यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, श्रमदान, आईवडिलांचा आदर व सामाजिक जबाबदारी राखावी असे आवाहन केले. विद्यार्थ्यांपैकी अजित चौरे, अनुष्का सदाफळ, वेदांत बोलके, भारती दारूंटे, विशाल हपसे, सलमान शेख यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे, बाळासाहेब पिसाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांनी भाषणात समसंस्कार शिबीराचे कौतुक केले. शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते.
प्रतिनिधी | संगमनेर अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही, त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाळा आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा. तुमचं आयुष्य अपयश हे तुमच्यामुळे तुमच्या विचारांमुळे अडतं इतरांमुळे नाही. तुम्ही जितकं कमी ठेवालं तेवढे जग तुम्हाला कमी देईल. त्यामुळे तुम्हाला अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा असे उद्गार व्याख्याते, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी काढले. मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर, संगमनेर आणि अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकथन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अरविंद गाडेकर यांनी कथेतून अनेक थोर व्यक्तिमत्वांची बालपणातील शिक्षण, नापास होण्याची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली. या कथेतून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा आणि विद्यार्थ्यांमधील नापास होण्याची भीती दूर व्हावी यासाठी प्रबोधन केले. यावेळी काही निवडक व्यंगचित्र सादर करून विद्यार्थ्यांना हसविले आणि मार्मिक चिमटेदेखील काढले.अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर या संस्थेविषयी संस्थेचे सदस्य मनोज साकी यांनी माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील काढणे, पवार दौलत आणि शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांना मिळाले ऊस पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान:पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
प्रतिनिधी| शनिशिंगणापूर सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नेवासे तालुक्यातील खेडलेकाजळी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार करत कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कृषिदूत विद्यार्थ्यांनी ऊस पिकावरील संपूर्ण व्यवस्थापन या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. अतुल दरंदले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावात राहून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेता येतात. पिकांवरील कीड व रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचे शास्त्रीय मार्ग विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी कांदा व ऊस पिकांवर येणाऱ्या प्रमुख कीड व रोगांची ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीटकनाशकांचा सूज्ञ वापर, जैविक व रासायनिक उपाय, कीड नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर, जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणा यावर प्रा. राहुल गडाख यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सूत्रसंचालन कृषिदूत पृथ्वीराज चौधरी यांनी तर आभार माजी सरपंच बाळासाहेब कोरडे यांनी मानले.
प्रतिनिधी | पाथर्डी श्री आनंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन व पाण्याच्या बचतीबाबत पाणी वाचवा, जीव वाचवा या विषयावर सादर केलेल्या पथनाट्याला नागरिकांनी भरभरून दाद देत दैनंदिन जीवनात पाणी बचतीचे उपाय अंमलात आणण्याचा संकल्प केला. श्री आनंद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबीर तालुक्यातील मोहटादेवी गडावर चालू आहे. शिबिराचे उद्घाटन मोहटा देवस्थानचे विश्वस्थ श्रीकांत लाहोटी यांचे हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे खजिनदार सुरेश कुचेरिया, प्राचार्य डॉ. शेषराव पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज भावसार, डॉ. जयश्री खेडकर आदीसह मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या कालावधीमध्ये शिबिरार्थींनी पाणी या विषयावर लक्ष केंद्रित करत पाणी बचतीसाठी पथनाट्याबरोबर रॅली काढत पाण्याचे महत्व पटवून दिले. मोहटादेवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसमोर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. भाविकांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले. पथनाट्याची संकल्पना डॉ. जयश्री खेडकर यांची होती. तसेच परिसर स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वच्छता हीच सेवा या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी केली. या सर्व उपक्रमामुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे नॉट मी बट यू हे ब्रीद वाक्य केवळ शब्दात न राहता प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थांनी आत्मसात केले.
मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान कोण चढणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच, निकालासाठी आता उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत 'एकापाठोपाठ एक' असा नवा बदल केल्याने निकालाचा गुलाल उधळण्यासाठी मध्यरात्र किंवा दुसरा दिवस उजाडू शकतो, अशी चिन्हे आहेत. या नव्या नियमामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, यावर तोडगा काढण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी आयोगाची राजकीय पक्षांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईत २२७ वॉर्डांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या ५ ते ६ वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी वेगवेळ्या टेबल्सवर सुरू व्हायची. यामुळे दुपारपर्यंत कल स्पष्ट व्हायचे. मात्र, आता एका निवडणूक अधिकाऱ्याच्या अखत्यारीत असलेल्या वॉर्डांपैकी प्रथम एकाच वॉर्डाची मोजणी पूर्ण केली जाईल. त्याचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतरच दुसऱ्या वॉर्डाची मतमोजणी सुरू होईल. उदाहरणार्थ जर एखाद्या विभागात वॉर्ड क्रमांक २०७ ते २२७ असे वॉर्ड असतील, तर २०७ चा निकाल लागल्याशिवाय २०८ ची मशिन उघडली जाणार नाही. गोंधळ टाळणे आणि पारदर्शकता राखणे हा आयोगाचा उद्देश असला तरी, यामुळे निकालाची प्रक्रिया संथ होणार आहे. आयोगाचा तर्क आणि राजकीय आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीदरम्यान होणारा गोंधळ आणि गोंधळातून निर्माण होणारे संशयाचे वातावरण टाळण्यासाठी हा पारदर्शकतेचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय पक्षांनी याला 'वेळेचा अपव्यय' संबोधले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात २२७ वॉर्डांची मोजणी अशा पद्धतीने केल्यास निकालासाठी प्रचंड वेळ लागेल, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा पक्षांनी केला आहे. आजची बैठक ठरणार निर्णायक या तांत्रिक पेचप्रसंगामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या प्रक्रियेत बदल करून जुन्याच पद्धतीने (Simultaneous Counting) मोजणी करावी, अशी मागणी सर्वच प्रमुख पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) होणाऱ्या बैठकीत निवडणूक आयोग आपला निर्णय मागे घेणार की 'एकापाठोपाठ एक' मोजणीवर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी|सोनई येथे श्री संत हभप महंत भगवानबाबा व श्री संत हभप महंत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात पार पडला. आज झालेल्या हभप राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या कीर्तनाला माजी पंचायत समिती सभापती सुनिता गडाख उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत अशा अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सद्भावना, एकोपा व संस्कार वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले. कथा व पारायण सोहळ्यामुळे मनुष्याला आत्मिक ऊर्जा मिळते तसेच जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. सोनई परिसर ही अध्यात्मिक भूमी असून येथे सातत्याने धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होत असल्याचेही सांगण्यात आले. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी सोनई व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी |अहिल्यानगर सध्या मोबाइलचा अतिरेक वाढत असून त्याचा लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याद्वारे सायबर गुन्हेगारी व आर्थिक फसवणूक वाढत आहे. पालकांनी स्वतः जागरूक राहून मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे तसेच सुरक्षित इंटरनेट वापराचे धडे द्यावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यांनी केले. लिटिल स्कॉलर्स प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित पालक आणि मान्यवरांची मने जिंकली. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, स्नेहालयचे सहसंचालक संजय चाबुकस्वार, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दौलत येवले, संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ जाधव, एकनाथ शिंदे, शाळेच्या प्राचार्या संगीता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व नृत्य सादर केले. त्यानंतर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दौलत येवले यांनी सांगितले, मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि संस्कारक्षम विकास घडवून आणण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पाल्य कोणत्या वातावरणात वावरतो, तो काय शिकतो, कोणत्या सवयी अंगिकारतो याकडे पालकांनी बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यास मुलांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ जाधव यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्या संगीता जाधव यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेत पालकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम जाधव, अथर्व औताडे, प्रणव जाधव, स्मिता थोरात, नम्रता गोळे, मंगेश आहेर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी ढेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद जाधव यांनी मानले. मुलांचा भावनिक विकासही महत्वाचा स्नेहालयचे सहसंचालक संजय चाबूकस्वार यांनी सांगितले, मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाचा सखोल अभ्यास करून पालकांनी त्यानुसार त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर मुलांचा भावनिक विकासही तितकाच महत्त्वाचा असून त्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, असे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका निवडणुकींच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नथुराम गोडसेबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. नथुराम गोडसे माणसात नव्हता, त्यालाही कपडे पाहण्याचा नाद होता. त्याच्याच या औलादी आहेत., अशा शब्दांत ओवैसींनी विरोधकांवर प्रहार केला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. परभणी आणि जालना महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांसाठी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची काल सभा पार पडली. या सभांमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, आमच्या बरबादीची दास्तान हे लोक लिहितात आणि सांगतात आम्ही सेक्युलर आहोत. मात्र नथुराम गोडसे हा टुई होता. इथे नाही बोलता येत, त्यालाही कपडे पाहण्याचा नाद होता. त्याच्याच या औलादी आहेत. त्यांचेच विचार हे लोक घेवून आलेत. ओवैसींच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या 'बी-टीम' आरोपाचा घेतला समाचार परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी रविवारी दर्गाह रोडवरील मैदानावर असदुद्दीन ओवैसी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या 'बी-टीम'च्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. मोदी तीनवेळा पंतप्रधान झाले, ते काय मुस्लिमांमुळे झाले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले, तुम्हाला भाजपला हरवता येत नाही आणि नाव माझे घेता. बिहारमध्ये आम्ही केवळ ५ जागा मागितल्या होत्या, त्या तुम्ही दिल्या नाहीत. स्वतः ६० जागा लढवून फक्त ५ जागा जिंकलात; मग उरलेल्या जागांवर कोण जिंकले? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. नेहरू ते मनमोहन सिंग... अन्यायाचा पाढा वाचायला तयार असदुद्दीन ओवैसी यांनी केवळ भाजप-काँग्रेसवरच नाही, तर राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि इतर पक्षांवरही तोफ डागली. नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचायला मी तयार आहे. मला फक्त दोन मिनिटे द्या, तुम्हाला चुल्लूभर पाण्यात जीव द्यावा लागेल, अशा जहाल शब्दात त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. तरुणांची मोठी उपस्थिती या सभेला मुस्लिम बांधवांसह मोठ्या संख्येने तरुण-तरुणींची उपस्थिती होती. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर असदुद्दीन ओवैसींनी थेट गोडसेचा उल्लेख करत भावनिक आणि राजकीय मुद्द्यांना हात घातल्याने आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी अधिकच तीव्र होण्याचे शक्यता आहे.
नशिराबाद येथे आजपासून पीर यासीन मिया कादरी यांचा उरूस:१२६ वा उरूस सोहळा साजरा होणार
प्रतिनिधी | नशिराबाद पीर यासीन मिया कादरी यांच्या उरुसाला १२ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यंदा हा १२६ वा उरूस सोहळा साजरा होणार आहे. या उरुसानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल नशिराबाद येथे पाहायला मिळणार आहे. उरूस सोहळ्याची सुरुवात १२ रोजी संदल मिरवणुकीने होणार असून, १३ रोजी मेहंदी व चादर अर्पण करण्यात येणार आहे. याच दिवशी उकाब एज्युकेशन सोसायटीतर्फे ऑल इंडिया मुशायरा (कविसंमेलन) होणार आहे. १५ रोजी पारंपरिक कुस्ती स्पर्धा होईल. याच दिवशी रात्री कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार आहे. मैफलीत मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल अंजुम बानू, कव्वाल जावेद अख्तर (मुंबई) आपल्या दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकणार आहे. उरूस शेख अजित शेख युसूफ, आबीद शेख मजिद, सैय्यद बरकत अली युसूफ अली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. पीर यासीन मिया कादरी यांचा दर्गा.
मी पोलिस आयुक्तांच्या कामावर समाधानी नाही. शहरात ड्रग्जचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. २२ वर्षांची पिढी बरबाद होत आहे. पडेगाव मुकुंदवाडी, नारेगाव, ब्रिजवाडीत ड्रग्जचा व्यापार वाढला आहे. कोणताही दोन नंबरचा धंदा पोलिसांना विश्वास घेतल्याशिवाय करता येत नाही, असा माझा ठाम दावा आहे. पोलिसांनी सर्वांना असेच सोडले तर हे लोण घराघरात येईल. पोलिसांचेदेखील कुटुंब आहे असे सांगत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले. शहरातील ‘बेसिक’ सुविधांचा विकास झाला पाहिजे. त्यावर शिवसेनेचे लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. पक्षांतील गटबाजीचे राजकारण, शहरातील शांतता, भारतीय जनता पक्षाबरोबर युतीची फिसकटलेली चर्चा या सर्व विषयांवर शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनमोकळी उत्तरे दिली.... प्रश्न : मुख्यमंत्री म्हणतात, भाजपची शिवसेनेमुळे युती तुटली. त्यांच्यात दोन गट आहेत...? शिरसाट : निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. आमच्या युतीच्या १० बैठका झाल्या. मुलगी पाहिल्यानंतर हो की नाही २-३ बैठकांत सांगता येते. मात्र, आमच्यात शेवटपर्यंत निर्णय झाला नाही. सुरुवातीला ५० टक्क्यांचा फॉर्म्युला, मग ‘छोटा भाऊ की मोठा भाऊ’ असे करत ५० टक्क्यांवरून आम्ही ३९ वरून ३६ वर आलो. मात्र, त्यामध्येही पुन्हा चुका केल्या. रात्री दहा वाजले तरी कळवले नाही. शेवटी त्यांचाच निरोप आला, आमचे काही ठरले नाही. मी स्पष्टपणे सांगितले की, मला नऊ वाजेपर्यंत फोन नाही आल्यास मी घोषणा करणार. मुख्यमंत्र्यांना या लोकांनी मिसगाइड केले. ही त्यांची रणनीती होती का याची माहिती नाही. प्रश्न : शिवसेनेत दोन गट आहेत. त्यामुळे युती तुटली का? शिरसाट : भाजपमध्ये दोन गट नाही काय? भागवत कराड, अतुल सावे गळ्यात गळे घालून फिरतात का? संजय केणेकर सोबत असतात का? प्रश्न : पोलिसांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? शिरसाट : मी पोलिस आयुक्तांवर समाधानी नाही. मी आयुक्तांना काही नावे दिली. कुठे धंदे चालतात मी त्यांना सांगितले आहे. ड्रग्जचे धंदे करणाऱ्यांना धरा आणि त्यांची धिंड काढा. पोलिसांचा धाक लोकांना कळू द्या. देवगिरी कारखान्यापासून पुढे गेल्यावर ड्रग्ज विक्रेते दिसतील. नारेगाव, ब्रिजवाडी येथे २० ते २२ वर्षांची मुले बरबाद होत आहेत. ड्रगमाफिया पोलिसांसोबत ‘कनेक्ट’ असतो. कोणताही दोन नंबरचा धंदा पोलिसांना विश्वासात घेतल्याशिवाय करता येत नाही. खून करणारे इतके निर्ढावले आहेत की त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही लवलेश नसतो. पोलिस मारताना ते आरोपी किती मारले ते मोजत असतात. पोलिसांनाच भीती वाटते. प्रश्न : पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पोलिसांविषयी सांगूनही हे जाणीवपूर्वक होत आहे का? शिरसाट : जाणीवपूर्वक नाही. काही सवयी मोडायला वेळ लागतो. आम्ही राज्यकर्त्यांनी अनेक सवयी लावलेल्या आहेत. एखाद्या पत्त्याचा अड्डा असला तर दुर्लक्ष कर. मग आणखी दोन अड्डे नवीन तयार होतात. मग एकाचे तीन होतात. दारूचेदेखील तसेच आहे. मग त्यानंतर हे उदरनिर्वाहाचे साधन बनतात. प्रश्न : पालकमंत्री तुम्हीच. अधिकारीही तुमचेच सगळे. तुम्हाला माहिती आहे. मग ही परिस्थिती सुधारणार कधी? शिरसाट : मी पोलिसांना दोष देत नाही. मला वाटते मी आयुक्तालयात जाऊन काही सांगतो तेव्हा माझे ऐकले नाही तर मी माझ्या पद्धतीने करेन. शासनाचे ऐकले पाहिजे. जबाबदारी झटकता येणार नाही. प्रश्न : भाजपचे लोक जर्मनीतल्या शहरासोबत तुलना करतात आणि तुम्ही हिंदू-मुस्लिम करतात... शिरसाट : मला ते कोणते जर्मनीतील शहर बनवायचे नाही. मी लहानपणी नांदेडला लंडन करणार असे ऐकले होते. त्याची मी आजही वाट पाहतो, मुंबईला सिंगापूर होण्याची वाट मी पाहत आहे. बेसिक गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. इथून लोक परदेशात जातात. आपला देश १०० वर्षे मागे आहे, असे सांगतात. दुबई कोणाच्या जिवावर उभी आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग आहे. बेसिक गोष्टी चांगल्या झाल्या तर विकास होईल. या शहरामध्ये ‘ग्रोथ’ होण्यासारखी जागा आहे. त्याचा वापर करायची गरज आहे. उद्योगासोबत अडीच ते तीन लाख लोकसंख्या वाढणार आहे. त्यांच्यासाठी बेसिक सुविधा आहेत का, त्यावर ‘फोकस’ केले पाहिजे. त्या असतील तर विकास होत जाईल. प्रश्न : कोणताही नेता आला की तुमचा बंगला, व्हिट्स हॉटेल, एमआयडीसीतील प्लॉटवरून तुमच्यावर टीका करतो... शिरसाट : माझे मोठेपण सिद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे. जे आहेत ती वस्तुस्थिती आहे. माझ्या बंगल्यावर आता तर कपडा टाकता येणार नाही. व्हिट्सबाबत गुन्हे दाखल करा. ‘रिट पिटिशन’ दाखल करा ना. मी सडेतोड, स्पष्टपणे उत्तरे देतो म्हणून हे लोक टार्गेट करतात. प्रश्न : शहराच्या विकासाबाबत अनेक समस्या आहेत... शिरसाट : काही वेळा मी स्पष्ट बोललो की काही राज्यकर्त्यांनी सोयीनुसार निर्णय घेतला. उड्डाणपूल पाहिले तर याला सी-सॉ म्हणतात. यामध्ये कोणाचे इंटरेस्ट होते हे तपासून बघा. कोणत्याही शहरात देशात क्रांती चौकासारखा पूल पाहायला मिळणार नाही. तो पूल जिल्हा न्यायालयासमोर न्यायला हवा होता. आज काय होते तर रोज ती धूळ महाराज सहन करत आहेत. प्रश्न : पाण्याच्या बाबतही तसेच झाले आहे का? उत्तर : पाण्याच्या प्रश्नाबाबत एजन्सीला जाऊन विचारले. ‘मातोश्री’वर कोण गेलो होते? चार्टर्ड िवमान घेऊन कोण आले होते? ती एजन्सी कोणाची होती? तर राज्यसभा सदस्याची होती. याची विचारणा केली की सगळे माहिती होते. प्रश्न : महापौरपदी कोण, हर्षदा शिरसाट की आणखी कोणी? शिरसाट : महापौर शिवसेनेचा होणार आहे. महापौर कोण होणार हे सांगण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे, मला नाही. प्रश्न : सततच्या प्रक्षोभक भाषणामुळे अशांत वातावरणामुळे आपण २० वर्षे मागे चाललो आहोत का?शिरसाट : ‘ग्रीन बेल्ट’मध्ये भाषणाची सुरुवात विकासावर करण्यापेक्षा ‘मुस्लिम महिलांचे नकाब काढले तर हात छाटून टाकू,’ इथून सुरू होते. मग ‘शेर आया रे शेर आया, शेर भागा रे शेर भागा...’ शहरात मारामारी त्यांच्यात झाली. त्यात माझे, सावे यांचे नाव घेतले. तुम्ही दलाली केली नसती तर लोक चिडले नसते हे त्यांनी विसरू नये. प्रश्न : इम्तियाज यांनी आरोप केला की दंगलीत त्यांनी राम मंदिर वाचवले, तुम्ही घरी होतात... शिरसाट : कदीर मौलाना यांची मुले मारायला आली होती. त्यामुळे राम मंदिरात आश्रय घेतला. शरणागती घेतली. तिथे ते वाचले, अन्यथा कदीर मौलानाच्या मुलांनी मारून टाकले असते. आजही राम मंदिरातल्या ट्रस्टीसोबत जाऊन चर्चा करा. हा काय राम मंदिर वाचवणार? हा स्वत:ला वाचू शकत नाही. असे धर्मात्मा नको आम्हाला. रॅपिड फायर १. सत्तेसाठी उबाठा, एमआयआयचा पर्याय खुला आहे का ?उत्तर : बिलकुल नाही२. वारसदार कोण, हर्षदा, सिद्धांत की कार्यकर्ते?उत्तर : विचार कार्यकर्त्यांनी चालवला पाहिजे३. महापालिकेचा प्रचारात हिंदुत्व की विकास ?उत्तर : हिंदुत्व आणि विकास४. गटबाजी कोण करते, जंजाळ, भुमरे की शिरसाट?उत्तर : हे पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण५. उद्धवसेनेतील स्थानिक कोणता नेता आवडतो, खैरे की दानवे?उत्तर : संजय राऊत
राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच 'लाडकी बहीण' योजनेच्या हप्त्यावरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या दाव्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना आज (सोमवारी) सकाळी ११:०० वाजेपर्यंत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे कडक आदेश दिले आहेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी शनिवारी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून खळबळजनक दावा केला होता. राज्य सरकार आचारसंहितेचा भंग करून मतदानाच्या बरोबर आदल्या दिवशी महिलांना प्रलोभन देण्यासाठी दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणार आहे, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा प्रकार लोकशाहीला मारक असून आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून सरकारला रोखावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. आयोगाचा सरकारला 'अल्टिमेटम' काँग्रेसच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रविवारी रात्री उशिरा मुख्य सचिव राजेश कुमार यांना पत्र पाठवले. सरकार खरोखरच १४ जानेवारीला दोन महिन्यांचे एकत्रित पैसे लाभार्थींच्या खात्यात जमा करणार आहे का? याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? अशी विचारणा आयोगाने केली आहे. यावर आज सकाळी ११ वाजेपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योजनेला विरोध नाही, टायमिंगला आक्षेप काँग्रेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भूमिकेवर अधिक स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा अजिबात विरोध नाही. मात्र, १५ तारखेला मतदान असताना १४ तारखेलाच हे पैसे देणे, हा थेट आचारसंहितेचा भंग आहे. हे एक प्रकारचे प्रलोभन आहे. आमचा विरोध केवळ या वेळेला (टायमिंगला) आहे, योजनेला नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण पुन्हा केंद्रस्थानी निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे राज्य सरकार आता काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर आयोगाला हे उत्तर समाधानकारक वाटले नाही, तर मतदानापूर्वी पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
हिंगोली शहरालगत औंढा रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका वाहनातून ३ लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर सोमवारी ता. १२ पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून अन्य एकाचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसायाचे उच्चाटण करण्यासाठी पोलिस विभागाने मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये गुटखा, जुगार अड्डे, मटका अड्डे यांची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. दरम्यान, औंढा नागनाथ मार्गावरून एका कार मध्ये गुटख्याचे पोते आणले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, जमादार शेख जावेद, महादू शिंदे, किशोर सावंत, सतिष जाधव यांच्या पथकाने रविवारी ता. ११ रात्री आकरा वाजल्या पासून औंढा नागनाथ मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली होती. दरम्यान,रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास एक कार आल्यानंतर पोलिसांनी कार चालकाला थांबवून चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांना पाहताच कार चालकाला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये खाकी रंगाच्या सहा पोत्यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला तसेच दुसऱ्या सहा पोत्यांमध्ये व्हि एक तंबाखूचे पुडे असा २.९० लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याची पोती व कार असा ७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार महादू शिंदे यांच्या तक्रारीवरून मोहम्मद नदीम (रा. देगलुर नाका नांदेड), शेख सिकंदर शेख मुजीब (रा. महादेववाडी हिंगोली) यांच्या विरुध्द सोमवारी ता. १२ गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मोहम्मद नदीम यास ताब्यात घेतले असून शेख सिकंदर याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, शंकर ठोंबरे यांच्या पथकाने शोध मोहिम सुरु केली आहे. नांदेड मार्गे आणला जात होता गुटखा पोलिसांनी कार चालक मोहम्मद नदीम याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने शेख सिकंदर याच्या संगण्या्वरून नांदेड येथून गुटखा आणल्याची माहिती दिली आहे. नांदेड, औंढा मार्गे हा गुटखा हिंगोलीत आणला जात होता. त्यामुळे पोलिसांचे पथक लवकरच नांदेडला रवाना होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
शिवराईत आनंदनगरी:१६ हजारांची उलाढाल
प्रतिनिधी | हतनूर कन्नड तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी ‘आनंदनगरी’ उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्यांची रुजवणूक करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आणि खेळांचे स्टॉल्स लावले. पाववडा, सँडविच, गुलाबजाम, समोसे, कांदेपोहे, पाणीपुरी, चटपटीत शेंगदाणे, घरगुती पौष्टिक पदार्थ अशा चविष्ट पदार्थांनी स्टॉल्स गजबजले होते. विद्यार्थ्यांनी वस्तूंची विक्री करताना नफा-तोटा, हिशेब आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात केले. ‘चला या, ताजे साबुदाणा वडे घेऊन जा’, ‘केवळ पाच रुपयांत आरोग्यदायी नाष्टा’ अशा घोषणांनी परिसरात उत्साह निर्माण झाला. पालकांनी स्टॉल्सना भेट देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ‘मुलांना शाळेतच व्यवहारज्ञान मिळत आहे हे पाहून समाधान वाटले,’ अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी १६ हजारांहून अधिक रुपयांची उलाढाल केली. सर्वाधिक नफा कमावणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनी शाळेतर्फे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ या सेल्फी पॉइंटवर पालकांनी फोटो काढत आनंद व्यक्त केला. विविध खेळांचे स्टॉल्सही पालकांचे मनोरंजन करून गेले. उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते झाले. सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक देशपांडे, सहशिक्षक सोनवणे, नवघडे, नलावडे, डोंगरे, घोडमारे यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.
बाभुळगाव येथील आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद:रासेयोअंतर्गत शिबिरास गावकऱ्यांचा सहभाग
प्रतिनिधी | लासुर स्टेशन गंगापूर तालुक्यातील बाभुळगाव नांगरे येथे राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभाग विशेष शिबिराअंतर्गत शनिवारी आरोग्य तपासणी शिबिरास गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, वृध्द नागरिक, महिलांसह तीनशेहून अधिक नागरिकांची या मोफत शिबिराद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि छत्रपती शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर अंतर्गत गेल्या आठवड्यापासून बाभुळगाव नांगरे येथे एनएसएस विशेष शिबिर सुरू आहे. या शिबिरामध्ये सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करून मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, सर्दी, ताप, डोकेदुखी, गुडघेदुखी, मनकेदुखी, त्वचाविकार इत्यादी आजारांची तपासणी करून औषधी देऊन योग्य तो पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल धाबे, डॉ. विशाल उईके, डॉ. प्राची पाटील, डॉ. नदीम, डॉ. दत्ता पाटील, डॉ. ऋतुजा पाटील, डॉ. संतोष जाधव यांच्यासह ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील सर्व डॉक्टरांचे पथक सहकारी सहभागी झाले होते. प्राचार्य बाळासाहेब पवार व सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जिवनासोबतच व्यावहारिक ज्ञानदेखील मिळावे म्हणून नारायण जिवरग यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी ३६ स्टॉल उभारले होते. दिवसभरात विविध पदार्थाच्या विक्रीतून १७ हजार ५०० रुपयांची कमाई केली. निमखेडा गावाचे सरपंच नामदेव खेत्रे व संस्तेचे आध्यक्ष नारायण जिवरग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणेदेखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून श्री शिव छत्रपती विद्यालयात आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणून शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी सरपंच ज्ञानेश्वर वाहटुळे उपसरपंच कौतिक जिवरग, माजी सरपंच परमेश्वर जिवरग, गावकरी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, या आनंदनगरीमुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळाले. बाजारपेठेचा अनुभव मिळाला.
प्रतिनिधी | नागापूर गणित विषय विद्यार्थ्यांना अवघड असला तरी नागापूर तालुका कन्नड येथील नागेश्वर विद्यालयाचे गणिताचे शिक्षक दत्तात्रय महाजन यांनी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना बँक व सरळ व्याज या पाठाविषयी जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयी भीती घालवली. सहावीच्या विद्यार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत नेऊन बँकेचे प्रत्यक्ष कामकाज दाखवले. गणित विषयाच्या बँक व सरळ व्याज या पाठाविषयी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान व्हावे तसेच विद्यार्थ्यांना बँकेच्या विविध योजना, विविध प्रकारचे फॉर्म, चलन कसे भरावे, पैशांचा व्यवहार कसा करावा, बँकेत खाते उघडण्यासाठी फॉर्म कसा भरावा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे यासह बँकेच्या व्यवहाराची इत्थंभूत माहिती व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. शाखा मॅनेजर अबेद सय्यद, लिपिक जयाभाऊ राजपूत यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मंगेश तायडे, संचालक अमोल तायडे, मुख्याध्यापक शशिकांत जोशी तसेच सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी दत्तात्रय महाजन यांचे कौतुक केले.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींमुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शाळा–महाविद्यालयांच् या सहलींसाठी हे उद्यान प्रमुख आकर्षण ठरत असून या दहा महिन्यांतच दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. मध्यंतरी तब्बल पाच वर्षे बंद असलेले हे उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमुळे पुन्हा खुलं झाले, सध्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने सहली येत असल्याने रोज उद्यानात तीन हजारहून अधिक पर्यटक येत असुन उद्यानाची वेळ संध्याकाळी ५ची सुरू होण्याची आहे. ही वेळ दुपारी १२ ची करण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे. नाथसागर परिसरातील ३१० एकर क्षेत्रात वसलेल्या या उद्यानात विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यटन व मनोरंजनाचा एकत्रित अनुभव मिळत आहे. रंगीत व संगीत कारंजे, हिरवळ, फुलांचे ताटवे आणि मोकळी जागा यामुळे सहलींसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दररोज दोन हजारहून अधिक पर्यटक येत असून सध्या मोठ्या प्रमाणात शालेय व महाविद्यालयीन सहली येत असल्याचे अभियंता तुषार विसपुते यांनी सांगितले. उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी १३१ कोटींचा विशेष निधी प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात २७ कोटींच्या कामांतून २१ प्रकारची रंगीत व संगीत कारंजे सुरू करण्यात आली आहेत. आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून ही कामे पूर्ण झाली. पुढील टप्प्यात अंतर्गत रस्ते, वाहनतळ, बगिचे, मुलांसाठी खेळणी तयार करण्यात येत आहे तर अॅडव्हेंचर पार्क लवकर खुले होणार आहे. पैठणला जगातील पर्यटक येतील : आमदार भुमरे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले की, पैठणला जगभरातील पर्यटक येतील असे नियोजन करण्यात येत असून सध्या पहिल्या टप्प्यात उद्यान सुरू आहे, सर्व कामे झाल्यावर येथे येणाऱ्या पर्यटकाची संख्या प्रचंड वाढेल, मी पैठणकर म्हणून आपण शहराच्या विकासात भर टाकण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करण्यात येतील. अध्यात्म, शिक्षण व पर्यटनाचा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या सहलींसोबतच नाथ मंदिर व समाधिस्थळी दर्शनासाठी येणारे भाविकही उद्यानाला भेट देत आहेत. त्यामुळे अध्यात्म, शिक्षण व पर्यटन यांचा सुंदर संगम येथे घडत आहे. वाढलेल्या पर्यटकांमुळे पैठणच्या अर्थकारणालाही चालना मिळाली आहे. हॉटेल, उपाहारगृहे, रिक्षा, खेळणी दुकाने, हातमाग साड्या व इतर व्यवसायांना लाभ झाल्याची माहिती व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून उद्यानातील रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, रमेश लिंबोरे, बाळू आहेर, रमेश शेळके, बजरंग काळे यांनी केली आहे.
लाडगावला भाजपचा कार्यकर्ता मेळावा:श्रीराम शेळकेंचा सत्कार
प्रतिनिधी | करमाड भाजपचा कार्यकर्ता मेळावा लाडगाव येथे उत्साहात झाला. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीराम शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नुकतीच त्यांची छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. सत्कार दानवे यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक दामोदर नवपुते, माजी सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामू शेळके, माजी उपाध्यक्ष अशोक पवार उपस्थित होते. दानवे म्हणाले, राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले. तशीच एकजूट संभाजीनगर महापालिका निवडणुकीत दिसत आहे. त्यामुळे १६ जानेवारीला मनपात भाजपचा भगवा झेंडा फडकताना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रीराम शेळके हे दिलदार कार्यकर्ते आहेत. पक्षाने त्यांना योग्य न्याय दिला. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी अधिक जोमाने काम करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला. यावेळी अनुराधा चव्हाण, रामू शेळके, श्रीराम शेळके यांनीही भाषणे केली. सूत्रसंचालन सुदाम ठोंबरे यांनी केले. प्रकाश चांगुलपावे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन सावंगी येथील श्री भैरवनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त रविवारी पंचक्रोशीतील सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी भैरवनाथ बाबा मंदिरात नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत लासूर स्टेशन येथील स्थानिक व्यापारी वर्ग, महिलांची दर्शनासाठी ये-जा सुरूच होती. यंदा प्रथमच गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून तब्बल दोन कोटी रुपयांचे भैरवनाथ बाबांचे मंदिर बांधल्याने यात्रेचा उत्साह अधिकच वाढला आहे. रविवारी यात्रेमुळे सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. पूर्वी भैरवनाथ बाबांचे छोटेसे मंदिर असल्याने भाविकांना रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागायचे, आता गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीने दोन वर्षांत येथील परिस्थिती बदलली अन् भलेमोठे आलिशान मंदिर बांधण्यात आले. मंदिराला चोहोबाजूने संरक्षण भिंत तयार केलेली असून येथे नवीन मुख्य प्रवेशद्वारचे काम देखील प्रगतिपथावर आहे. दरम्यान, सावंगी चौकापासून ते भैरवनाथ बाबाच्या मंदिरापर्यंतचा रस्ता रविवारी भाविकांच्या गर्दीने फुलून निघाला होता. लासूर स्टेशन पंचक्रोशीतील ५० ते ६० खेड्यापाड्यातील हजारो भाविकांच्या हजेरीने मंदिर परिसर दुमदुमला होता. विशेष म्हणजे एका दिवसाची भरणारी ही यात्रा जुन्या काळापासून चालत आलेली आहे. यंदा तीन दिवस यात्रा भरवण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केलेला आहे. लासूरला दर रविवारी भरणारा सर्वात मोठा आठवडी बाजारदेखील यात्रेमुळे सावंगी येथेच भरवला जातो, ही परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे. मंदिराच्या प्रांगणासह रस्त्यांच्या दुतर्फा नारळ महाप्रसादाची दुकाने भांडी, कटलरी, खेळणी, रहाटपाळणे, खाऊ, हॉटेल, रसवंती अशा विविध दुकानातील स्टॉलवर भाविकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. कुस्त्याच्या आखाड्याने मंगळवारी होणार सांगता यात्रेच्या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी रोडग्यांचा नैवेद्य करून पाहुण्यांना खाऊ घातला. दरवर्षीप्रमाणे मंगळवारी कुस्ती आखाडा ठेवण्यात आलेला असून पंचक्रोशीतील पहिलवानांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे. या तीनदिवसीय भैरवनाथ बाबांच्या यात्रेची सांगता कुस्त्याच्या आखाड्याने होणार आहे. शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पीआय सलीम चाऊस यांनी दोन फौजदारांसह ३० पोलिस कर्मचारी मंदिरासह भैरवनाथ बाबाच्या प्रवेशद्वारापर्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे. गावातील ४०-५० युवक स्वयंसेवक म्हणून यात्रेत काम करीत आहेत.
ढोरकीनच्या विद्यार्थ्यांची पोलिस ठाण्याला भेट:विद्यार्थ्यांनी मेहनतीने यश मिळवावे-ईश्वर जगदाळे
प्रतिनिधी | ढोरकीन यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नसतो. मेहनतच यशाचं गुपित आहे. शालेय जीवनातच भविष्य ठरते. देश घडवण्यासाठी आणि स्वतःला यशाकडे नेण्यासाठी आतापासूनच मेहनत करा. आत्मनिर्भरतेची तयारी करा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी केले. महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त ढोरकीन येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी ईश्वर जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक श्रीमती जगताप, पोलिस कर्मचारी कृष्णा उगले, करतारसिंग सिंघल, दिनेश दाभाडे, दिलवाले, रहाटवाड, साळवे, पंडीत, ढोरकीन बिटप्रमुख राहुल महोतमल, संदीप कोलते यांनी विद्यार्थ्यांना एसएलआर गन, रायफल, गॅसगन यांची माहिती दिली. तक्रार कशी घेतली जाते, वायरलेस विभाग, पुरावे, साठा, तुरुंग, आरोपी, फिंगरप्रिंट, दस्तऐवजांची आवक-जावक, वाहतुकीचे नियम, दंड याविषयी माहिती देण्यात आली. सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने सोशल मीडियावरील फसवणूक, नोकरीचे आमिष, गेम डाउनलोड, फ्रॉड कॉल, खाते हॅक, एटीएम व बँक सुरक्षा, फोनपे व्यवहार, फ्रॉड झाल्यास १९३० / १९४५ हेल्पलाइन नंबर, https://cybercrime.g ov.in याबाबत माहिती देण्यात आली. एनसीसीआरबी पोर्टल, डायल ११२, नवीन कायदे, गुड टच, बॅड टच याविषयीही माहिती देण्यात आली. पुस्तकी ज्ञानाबाहेरचं प्रत्यक्ष जग विद्यार्थ्यांनी अनुभवले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी औटी, शिक्षक सिराज पठाण, श्रीमती आगे, श्रीमती वाघमारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी | वैजापूर वैजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राज्य सरकारने शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल झाला आहे. हा निर्णय केवळ वैजापूरसाठी नव्हे, तर तालुक्याच्या राजकीय इतिहासातही महत्त्वाचा मानला जातो. कारण माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या निधनानंतर ५६ वर्षांनी वैजापूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराला हा मान मिळाला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पीछेहाट सहन करावी लागली. विशेषत नगराध्यक्षपदासाठी बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव हा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण करणारा ठरला. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी नगराध्यक्षासह १६ नगरसेवक जागा जिंकून नगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवले. आता मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने आमदार बोरनारे यांचा पक्षातील आणि शासनातील प्रभाव निश्चितपणे वाढणार आहे. हा दर्जा आता पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच वैजापूर मतदारसंघाच्या विकासकामांसाठी कितपत उपयोगी ठरेल याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.
सावध व्हा, शहराचे नाव बदलणारे महापौर होतील:एमआयएम नेते अकबरूद्दीन ओवैसी यांचा इशारा
“लोकसभेला आपण हरलो, आता तुम्हाला शहराचे महापौरपदही गमवायचे आहे का? तुम्ही सावध झाला नाहीत, तर शहराचे नाव बदलणारे लोक महापौर होऊन बसतील. तुम्हाला आपला भाऊ महापौर होताना पाहायचा नाही का?’ अशा शब्दांत आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाचे नेते आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी मतदारांना आवाहन केले. मनपा निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशात मुस्लिम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर करण्यात आला आहे. प्रत्येक सरकारने आम्हाला मागे ठेवण्याचेच काम केले. आज शिक्षण नाही, रोजगार नाही आणि साधी कारकूनची नोकरीही मिळत नाही. देशात आम्हाला योग्य हिस्सा दिला असता, तर ‘एमआयएम’ला प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज पडली नसती,’ असे त्यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचाही आपण निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी “१५ तारखेला १५ मिनिटं काढून या,’ असा सूचक उल्लेख केला. मतदारांना भावनिक साद “मी आज तुमच्याकडे झोळी घेऊन भिकारी म्हणून आलो आहे. माझी झोळी भरून टाका, तुमची भीक घेऊन मी तुमची सुरक्षा करेन. दुश्मन पूर्ण तयारीने येत आहे, आताही समजले नाही तर संपवून टाकतील. त्यामुळे एक व्हा,’ अशी भावनिक साद त्यांनी घातली. आम्हाला अंधारात ठेवले मुस्लिम समाजाच्या स्थितीवर भाष्य करताना ओवेसी म्हणाले, “आम्हाला मुसलमान असल्याचा गर्व आहे, पण आज सरकारी योजनांमध्ये मुस्लिमांचे स्थान काय आहे? डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ अशा सर्वच क्षेत्रात मुस्लिम समाज शेवटी आहे. हा अन्याय नाही का? आम्हाला जाणीवपूर्वक अंधारात ठेवले गेले. तेलंगणामध्ये आम्ही काम करून दाखवले आहे.’
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात झाला. अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दाेन जणांचा जागीच मृत्यू झाला असून वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगळुरूवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका ट्रकला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बडतर्फ आयएसएस पूजा खेडकरच्या बंगल्यात दरोडा:आई-वडिलांना गुंगीचे ओैषध देऊन लूट
बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडेकरच्या बाणेरमधील बंगल्यात मध्यरात्री दरोडा घालण्यात आला. दहा दिवसांपूर्वी कामाला आलेला नेपाळी स्वयंपाकी व साथीदारांनी दरोडा घातल्याची प्राथमिक माहिती आहे. खेडकरच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे ओैषध दिले. रात्री एकच्या सुमारास पूजा खेडकर बंगल्यात आली. तेव्हा बेशुद्धावस्थेत आई-वडिलांना पाहिले. नेपाळी कामगाराने खेडकरचे हात पाय चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर कामगार व त्याच्याबरोबर असलेले साथीदार दागिन्यांची लूट करुन पसार झाले. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेल्या नेपाळी कामगार आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. चतु:शृंगी पोलिसांची घटनास्थळी पाहणी नेपाळी कामगार आणि साथीदारांनी सोन्याचे दागिने, तसेच मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर नेपाळी कामगार व साथीदार पसार झाले. रात्री दीडच्या सुमारास चिकटपट्टीने बांधलेले हातपाय पूजाने सोडविले आणि तिने आई-वडील, नोकराला जागे करण्याचा प्रयत्न केला. पूजाने चतु:शृंगी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ठाण्याचे निरीक्षक उत्तम भजनावळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका इमारतीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला प्रभाग क्रमांक ५… पण इथे राहणाऱ्या जय भीमनगरमधील नागरिकांसाठी विकास आजही केवळ कागदावरच आहे. दिव्य मराठी डिजिटलच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या शोमध्ये आम्ही जेव्हा या वस्तीत पोहोचलो, तेव्हा समोर आलेले वास्तव अस्वस्थ करणारे होते. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर दिव्य मराठी ऍपने सुरु केलेल्या 'लढाई मनपाची , मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. ‘आमच्याकडे पाणी नाही, ड्रेनेज तुंबलेली आहे, गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की रुग्णवाहिकाही आत येऊ शकत नाही’ हे सांगताना नागरिकांचा आवाज भरून येत होता. याच अरुंद गल्लीत रुग्णवाहिका वेळेत पोहोचू न शकल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना त्यांनी सांगितली. ही केवळ एक घटना नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचा जिवंत पुरावा आहे. महानगरपालिका इतकी जवळ असतानाही या परिसरात ना नियमित पाणीपुरवठा आहे, ना नीट रस्ते, ना स्वच्छ ड्रेनेज व्यवस्था, ना कचरा उचलण्याची यंत्रणा. नागरिकांनी सांगितले की, २०१६ नंतर या प्रभागाचा नगरसेवक वस्तीत फिरकलाही नाही. निवडणुकीच्या वेळी मात्र पाच किलो गहू आणि पाचशे रुपये घेऊन येतात, मतदान मागतात, पण नंतर पुन्हा या वस्तीकडे पाठ फिरवली जाते. असा संतापही नागरिकांनी व्यक्त केला. या सगळ्यात सर्वाधिक अस्वस्थ करणारे दृश्य म्हणजे काही अपंग महिला. डोक्यावर हंडे घेऊन, ओबडधोबड रस्त्यांवरून, पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत होत्या. २१व्या शतकात, शहराच्या मध्यभागी, महिलांना आणि अपंगांना अशा परिस्थितीत जगावे लागत असेल, तर विकास नेमका कोणासाठी झाला, हा प्रश्न उपस्थित होतो. कोणी मरून पडलं तर गाडीसुद्धा येत नाही जय भीम नगरमधील रहिवासी ऋतुजा सागर साबळे म्हणतात की, ‘आमच्याकडे रस्ते एवढे घाण आहेत की, त्यावरून नीट चालता सुद्धा येत नाही. जर कोणी मरून पडलं ना तर गाडीसुद्धा येत नाही. जागा खूप कमीये. छोटे - छोटे रस्ते आहेत. त्यामुळे रिक्षावाला म्हणतो की आम्ही तुमच्याकडे येत नाही आमच्या गाड्या पलटतात. त्यामुळे आजारी माणसाला आम्हाला झोळीत टाकून रस्त्याने न्याव लागत. नगरसेवक तर काहीच कामाचे नाहीत. असूनही ते नसल्यासारखे आहेत. त्यांना काही सांगावं तर ते हो हो म्हणतात आणि काहीच करत नाहीत. आम्हाला ते कवडीमोल समजतात. ते फक्त स्वतःचेच घर भारतायेत. आमच्या गल्लीत मोटारीचा चार जणांना शॉक लागलेला आहे. तरीही कोणी बघायला आले नाही. हे आमच्या कामाला येत नाही तर काय कामाचे असले नगरसेवक? त्यामुळे यावेळी तर आम्ही मतदान करण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत.’ पाच किलो गहू आणि पाचशे रुपये घेऊन मतदान करा प्रभागातील सुमनबाई पाटोळे म्हणतात, 'फक्त एक तास पाणी येत. त्यातही ड्रेनेजचे पाणी आर्धा तास. आम्हाला नवीन पाईपलाईन हवी आहे. पाणी इतकं घाण येत की ते हातात सुद्धा घ्यावंसं वाटत नाही. आम्हाला ते पाणी प्यावं लागत. काँग्रेसवाले आले आणि म्हणाले की, आम्ही तुम्हाला पाचशे रुपये आणि पाच किलो गहू देतो तुम्ही आम्हालाच मतदान करा. यासाठी आम्हाला बिल्ले देऊन गेले आहेत. आम्ही काय म्हणून त्यांना मत द्यावं. आमची एकदा हालत येऊन बघावं म्हणा. आमचं जे काम करेन त्यांनाच आम्ही मतदान करू.' मतदानासाठी हाता पाया पडतात रहिवासी छाया साळवे म्हणाल्या की, 'गेली ११ वर्ष झाले आम्ही इथे राहतोय. पण कुठल्याही प्रकारचा विकास आमच्याकडे नाहीये. ना पाणी आहे , ना रस्ता आहे. पाणी आलं तर दूषित येत. कितीवेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो होतो. आम्ही गल्लीतल्या बायका मिळून तिथे गेलो होतो. मात्र तुम्ही पुढे जा आम्ही येतो असं म्हणतात आणि कोणीच येत नाही. फक्त मतदान आलं की ते मिळवण्यासाठी मग हाता पाया पडतात. आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या... असं म्हणतात. त्यानंतर काय काहीच नाही. आम्ही काय म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा.' हंड्याने पाणी आणावे लागते प्रभागातील रहिवासी रुंजाजी साळवे म्हणाले की, ‘गेली ३० वर्ष झाले आम्हाला पाणी नाहीये. आज आम्ही पाणी विकत आणतो. नाहीतर हंड्याने मागच्या गल्लीतून आणतो. आम्ही शहरात आहोत की खेड्यात तेच समजत नाही. खेड्यातले लोक आमच्यापेक्षा सुखी आहेत. इतकी भयंकर परिस्थिती आहे आमची. आमच्याकडे भागवत कराड येऊन गेले, मोठं मोठे लोक येऊन गेले. मात्र कोणीच येऊन काहीच फायदा नाही. चार - पाच वर्षांपूर्वी नुसते पाईप टाकले होते. त्याच्यानंतर काहीच नाही. फक्त यांना हात जोडायला लावा मतदानासाठी. ते त्यांच्याकडून खूप छान आणि वेळेवर होत. आम्ही थकलो आता ४० वर्ष झाले आम्ही इथे असून. काही एक उपयोग नाही.’ महानगरपालिकेच्या गेट पर्यंत पाणी जात रहिवासी तुषार मिसाळ म्हणतात, 'पाणी आम्हाला १५ दिवसातून एकदा येत. आम्ही मोटार जरी लावली तरी पाणी येत नाही. ते उपसू उपसू काढावं लागत. आमच्या रस्त्यावर तुम्हाला जागा कमी आणि मोटर आणि पाईपच जास्त दिसतेन. ड्रेनेज लाईन सगळ्या फुटलेल्या आहेत. इथे काहीच व्यवस्थित नाहीये. आम्ही गल्लीतले लोक मिळून दर पंधरा दिवसाला पालिकेत चकरा मारतो. पण त्यांना काहीच फरक पडत नाही. एवढंच नाही तर आमच्या ड्रेनेजचे पाणी त्यांच्या गेट पर्यंत जात. पण तरीही काहीच फरक नाही पडत. हे सगळे लोक निगरगट्ट झाले आहेत. त्यांना काही घेणं देणं नाहीये कोण जगेल आणि कोण मरेन. फक्त यांना यांचे खिसे भरायचे आहेत.' जय भीमनगरमधील ही कहाणी केवळ एका वस्तीची नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उदासीनतेची आणि राजकीय उपेक्षेची जिवंत साक्ष आहे. ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या माध्यमातून नागरिकांनी मांडलेला हा आक्रोश आता ऐकला जाणार की पुन्हा दुर्लक्षित राहणार हा खरा सवाल आहे. या आहेत प्रभागातील समस्या दाट वस्तीत स्ट्रीट लाइट बंद, रस्त्यावर अनधिकृत पार्किंग व फेरीवाल्यांचा ताबा यामुळे रात्री वाढलेले अपघात व गुन्हे. रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे, वाहणारे ड्रेनेजचे पाणी आणि उघड्या नाल्यातील उग्र वासाचा हा त्रास प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांना कायम सहन करावा लागतो. आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, बुढीलेन, कबाडीपुरा, गरमपाणी, ज्युबिली पार्क, जयभीमनगर, भडकल गेट, ग्रीन व्हॅली, टाऊन हॉल, आनंदनगर भागांत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. खराब रस्ते, ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर, कचऱ्याचे डोंगर यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रभागात रस्ते झाले नाही. रहदारी वाढली. मात्र, रस्ते रुंद केले नाही. खड्डे, दुकानासमोर उभी राहत असलेली वाहने, अतिक्रमण यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. रस्त्यालगत कचरा साठलेला असतो.नागरिक, व्यावसायिक, हॉटेलचालक रस्त्यावरच कचरा टाकतात. जलवाहिन्या जुन्या झाल्याने वारंवार गळती प्रभागात जुन्या शहराचा बहुतांश भाग आहे. जलवाहिनीदेखील जुनी झाली. यामुळे ती वारंवार फुटते. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रभागाची व्याप्ती आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, बुढीलेन, कबाडीपुरा, गरमपाणी, ज्युबिली पार्क, जयभीमनगर, भडकल गेट, ग्रीन व्हॅली, टाऊन हॉल, आनंदनगर, नेहरू भवन, मध्यवर्ती बसस्थानक, पोलिस मुख्यालय वसाहत, मोगलपुरा, कोहिनूर कॉलनी, बुऱ्हाणी कॉलनी, सिद्धार्थ उद्यान, रशीदमामू कॉलनी.
जालना ते नांदेड या १७९ किमीच्या समृद्धीमहामार्गाच्या कामाला गती आली आहे. यामहामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील ११गावांमध्ये १२०० शेतकऱ्यांची १७५ हेक्टर आरक्षेत्र संपादित केले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना१९१ कोटी २४ लाखांचा मोबदला यापूर्वीदेण्यात आला आहे. उर्वरित पांगरी भागातील१.८६९३ हेक्टर आरचे भूसंपादन झाले असूनकामाला सुरुवात झाली आहे. पुढील ३०महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदतआहे. अर्थात, जुलै २०२८ मध्ये महामार्गाचेकाम पूर्ण होऊन तो वाहनांसाठी खुला होईल,अशी माहिती सूत्रांनी दिली. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नांदेड ते छत्रपती संभाजीनगर हे२५७ किमीचे अंतर ३ तासांत कापता येईल. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाप्रमाणेच जालना ते नांदेड हा एक्स्प्रेस-वे अाहे. समृद्धी महामार्गाचा या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नांदेड शहराची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. एक्सप्लेनर समृद्धी महामार्गाचा नांदेडपर्यंत विस्तारझाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना आपला शेतमाल कमीकालावधीत मुंबईपर्यंत नेता येईल. तसेचनांदेड ते छत्रपती संभाजीनगर हे अंतरएक्स्प्रेस रेल्वेने कापण्यासाठी ४ तासांचाअवधी लागतो. मात्र, समृद्धीमहामार्गामुळे हे अंतर केवळ ३ तासांतकापणे शक्य होईल. प्रशासकीयकामकाज आणि उपचारांसाठी नांदेडहूनकमी वेळात छत्रपती संभाजीनगर गाठतायेईल. आंध्र प्रदेशातून मुंबईला होणाऱ्यामालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंतसोयीचा ठरेल. त्यामुळे नांदेड हेमालवाहतुकीच्या दृष्टीने भविष्यातमहत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल. या भागात भूसंपादन जालना- नांदेड समृद्धीमहामार्गासाठी नांदेड तालुक्यातीलजैतापूर, रहाटी बु., नाळेश्वर,पिंपळगाव कोरका, बोरगाव तेलंग,कल्हाळ, विष्णुपुरी, पांगरी,गुंडेगाव, बाभूळगाव, तुप्पा वकाकांडी या बारा गावांमधीलशेतजमिनी संपादित करण्यातआल्या आहेत.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त असूनही प्रशिक्षणास आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या, सोमवारपासून थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. निवडणूक कर्तव्यात टाळाटाळ करणाऱ्या एकूण ६ हजार ८७१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी २ हजार ३५० कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत पुन्हा सहभागी झाले आहेत. मात्र, वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षणास आणि प्रत्यक्ष कामावर हजर न राहणाऱ्या उर्वरित ४ हजार ५२१ कर्मचाऱ्यांविरुद्ध आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश या कारवाईच्या कचाट्यात केवळ महापालिकेचेच नव्हे, तर राष्ट्रीयीकृत बँका, बेस्ट, बीएसएनएल, रेल्वे, एमटीएनएल, म्हाडा, एलआयसी, टपाल खाते आणि आरसीएफ यांसारख्या विविध शासकीय व निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये गुन्हा नोंदवणे, दंड आकारणे आणि विभागीय कारवाई यांचा समावेश असेल. मुंबईत १ कोटींवर मतदार मुंबईत सुमारे १ कोटी ३ लाख ४४ हजार मतदारांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या मोठ्या प्रक्रियेसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासन कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन करणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत.
चाळीसगाव तालुक्यात एक अशी बँक आहे, जिथे पैशांऐवजी शेळ्यांचे व्यवहार होतात. या ‘गोट बँके’ने ३०० हून अधिक गरीब, विधवा, परित्यक्ता व भूमिहीन महिलांना स्वावलंबी बनवले आहे. ही बँक पुण्याच्या ‘सेवा सहयोग फाउंडेशन’मार्फत चालवली जाते. येथे कर्ज घेण्यासाठी आलेल्या महिलेला आधी शेळीपालनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर एक पूर्ण वाढ झालेली शेळी मोफत दिली जाते. अट असते की, ६ ते ९ महिन्यांनंतर जेव्हा शेळीची पिल्ले मोठी होतात, तेव्हा त्या महिलेला त्यातील एक करडू बँकेत ‘डिपॉझिट’ म्हणून परत करावे लागते. हेच करडू मोठे झाल्यावर दुसऱ्या एखाद्या नवीन सदस्य महिलेला स्वयंरोजगारासाठी दिले जाते. महिलांसाठी ‘एटीएम’ बनल्या शेळ्या बँकेकडून मिळालेल्या शेळीचे महिला संगोपन करत आहेत. त्यातून वर्षाला त्यांना ३ ते ४ करडे मिळतात. एक करडू त्या बँकेला परत करतात. उर्वरित करडे विकून ३०,००० रुपयांपर्यंत कमाई करतात. ही शेळी त्यांच्यासाठी ‘एटीएम’च आहे. महिलांनी ‘गिरणा परिसर महिला पशुपालक उत्पादक कंपनी’ स्थापन केली आहे. आमच्या या उपक्रमाशी ३०० हून अधिक महिला जोडल्या. या माध्यमातून महिला आता स्वतःहून शेळ्या परत करत आहेत. - गुणवंत सोनवणे, सेवा सहयोग फाउंडेशनशेळी बँकेमुळे मला रोजगाराचे नवीन साधन मिळाले असून त्यातून चांगली कमाई होत आहे. आता मी परिसरातील इतर महिलांनाही या व्यवसायात येण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. - वैशाली राठोड, सुंदरनगर, चाळीसगाव
मातृभाषेचा विसर पडू नये म्हणून अमेरिकेत मराठी शाळा उघडली:स्थायिक मराठी भाषिकांकडून मोफत अध्यापन
अमेरिकेत स्थायिक भारतीय मुले आपली मातृभाषा विसरत आहेत. त्यांना आपली भाषा शिकवण्यासाठी आणि संस्कृतीशी जोडण्यासाठी मराठी भाषिक भारतवंशीय अभियंत्यांनी अमेरिकेतील मिल्वाकी शहरात एक मराठी शाळा सुरू केली आहे. तेथे मराठी भाषिक भारतीय अभियंतेच मराठी भाषा शिकवतात. येथे कोणतेही शुल्क घेतले जात नाही. बीएमएम स्तरावरील पुस्तके दिली जातात. त्यासाठी केवळ १०० रुपये आकारले जातात. या शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंत इतर विषयांसह मातृभाषा मराठीचे धडे गिरवले जातात. ही शाळा धुळे जिल्ह्यातील कौठळ गावातील प्रफुल्ल पाटील या तरुणाच्या प्रयत्नातून उघडण्यात आली. ते एका अमेरिकन कंपनीत अभियंता आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकन प्रशासनाकडून औपचारिक परवानगी घेतली. ते शाळेचे मुख्याध्यापकही आहेत. डॉ. नीरज अग्रवाल, शौनक ठुसे, मीनल कानडे, तेजस्विनी शुभचिंत आणि सायली हेडे अध्यापनाचे काम करतात. ही शाळा बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संबंधित मिलवॉकी मंडळाच्या मदतीने सुरू आहे. सर्व खर्चदेखील मंडळामार्फत भारतीय वंशाचे लोक करतात. बृहन्महाराष्ट्र मंडळांतर्गत १०० हून अधिक मराठी शाळा सुरू आहेत. अमेरिका-कॅनडातील ६० मंडळे त्याच्याशी जोडलेली आहेत. या शाळेत शिकणारी आराध्या इंगोले म्हणते - अमेरिकेत सर्वत्र इंग्रजी भाषेचे वातावरण आहे. या शाळेमुळेच मला अमेरिकेत मराठी शिकायला मिळत आहे. एका विद्यार्थ्याचे वडील अमिनेश जाधव म्हणाले - येथे मराठी शाळा सुरू झाल्यापासून दुसरीत शिकणारी माझी मुलगी आयुषी मराठी वाचू, लिहू आणि बोलू शकते. प्रयत्न... ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड कॅनडा, सिंगापूरमध्येही वर्ग विविध देशांतील मराठी तरुणांसाठी त्यांच्या मुलांना मातृभाषेचे ज्ञान देणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मदतीने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये मराठी शिकवणीचे वर्ग आयोजित केले जात आहेत. हे वर्ग तेथील हिंदू मंदिरांमध्ये आयोजित केले जातात. तेथे राहणारे मराठी भाषिक भारतीय तरुण हे वर्ग मोफत घेतात. यश... विद्यार्थ्यांचे परदेशी मित्रही मराठी गिरवू लागले... मिलवॉकी येथील या मराठी शाळेत २५ हून अधिक मुले शिकतात. त्यांचे मित्रही त्यांच्यासोबत मराठी शिकण्यासाठी शाळेत येऊ लागले. येथील शिक्षक त्यांना मोफत मराठी शिकवतात. अमेरिका, कॅनडातील मंदिरांतही मराठी भाषेचे वर्ग घेतले जात आहेत. बहुतेक विद्यार्थी हे भारतवंशीय आहेत. ते अमेरिकेत जन्मले.त्यांनी इंग्रजीला पहिली भाषा म्हणून स्वीकारले आहे.परदेशात नोकरीनंतर लोक मायदेशी परततात तेव्हा त्यांच्या मुलांना मातृभाषा यायला हवी. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने ही शाळा सुरू करण्यात आली. स्थानिक पातळीवर या शाळेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. - प्रफुल्ल पाटील, अभियंता, अमेरिका
पहिल्याच संयुक्त सभेत राज ठाकरे यांचा जोरदार घणाघात मुंबई : प्रतिनिधी वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात. विजयाचे तंत्र माहीत असते, तेव्हा सत्तेचा माज येतो. भाजपचे सध्या तसेच सुरू आहे. यांनी मुंबई, महाराष्ट्र, देश विकायला काढला. हे मनाला वाटेल ते करायला लागले आहेत. आली कुठून हिंमत, कुणाला विचारायचे नाही, जनता नाही, काय नाही. आम्हाला वाटले म्हणून […] The post भाजपने देश विकायला काढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लंडनमध्ये राहणारे, मूळचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि सोशल मीडियावरून आपले विचार मांडणारे डॉ. संग्राम पाटील यांना शनिवारी (१० जानेवारी) मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. लंडनहून मुंबईत उतरताच पहाटे २ वाजता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली ही चौकशी करण्यात आली असून १५ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. भाजपच्या […] The post दडपशाहीविरुद्धचा ‘संग्राम’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खडी उघडी पडल्याने अपघाताच्या घटनांत वाढ
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शहरातून नागेवाडी, कारेवाडी, धामणगाव, बोळेगाव या मार्गावरुन जाणा-या डांबरी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात घडण्याच्या घटनामध्ये वाढ झाली असून या रस्त्यावरील खड्डे बुजवून उखडलेला रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. शिरुर अनंतपाळ, चाकूर यांसह उदगीर लातूर या प्रमुख […] The post खडी उघडी पडल्याने अपघाताच्या घटनांत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भ्रष्ट कमाईतून परत सत्ता मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न
लातूर : प्रतिनिधी जिल्हा निर्मितीपासून ते आजतागायत काँग्रेस पक्षाने लातूचा विकास केला, असे असताना ही २०१७ च्या महानगरपालिका निवडणूकीत लातूरच्या जनतेने विकासाच्या नावाखाली मते मागणा-या भाजपाला संधी दिली. पण या संधीसाधू लोकांना संधीच सोन करता आल नाही. या संधी साधू लोकांनी मागील काळात कमावलेल्या भ्रष्ट पैशातून आता परत महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या […] The post भ्रष्ट कमाईतून परत सत्ता मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस
लातूर : प्रतिनिधी मागील काळात आपन सर्वानी काँग्रेस पक्षाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत. त्याच आशिर्वादाचे सोने करीत काँग्रेस पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेचा चौफेर विकास केला आहे. मात्र भाजपच्या लोक महानगरपालिकेत सत्ता हाती घेऊन लातूर शहराच्या विकासाची गती थाबली. आज आपण पाहतो लातूर शहरात मोठ्या प्रमाणात घन कचरा, स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न असताना भाजप सरकार […] The post भाजप सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोरोना काळात तत्कालिन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे ख-या अर्थाने पालकत्व निभावले
लातूर : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या जागतिक संकटादरम्यान राज्याचे तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि लातूर जिल्ह्राचे पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याची विशेष काळजी घेतली. महामारीच्या काळात पहिल्या लाटेच्यावेळी ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ लातूरमध्ये थांबून नागरीकांना कोरोना उपचार व इतर सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून […] The post कोरोना काळात तत्कालिन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे ख-या अर्थाने पालकत्व निभावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपा, राष्ट्रवादीच्या डावपेचाला बळी पडू नका
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत घड्याळाला मत म्हणजे कमळाला मत आणि पतंगला मत म्हणजे कमळला मत, असे गणित आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभावाचा, गांधी, आंबेडकरांचा विचार जोपासणा-या तमाम मतदार बंधु-भगिनींनी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या डावपेचाला बळी न पडता काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या उमद्या उमेदवारांना प्रचंड बहूमतांनी विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित […] The post भाजपा, राष्ट्रवादीच्या डावपेचाला बळी पडू नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांशी संवाद साधला. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले. पुण्यात आगामी काळात सरकार काय उपाययोजना राबवणार याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पुणे हे माझे आवडते शहर असल्याचे म्हटले आहे. मुलाखतीदरम्यान 'देवाभाऊ काय म्हणतायत?' या प्रश्नावर फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, देवाभाऊ काही म्हणत नाहीत, देवाभाऊंचे काम बोलते. अजित पवार यांच्याकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रबळ पक्ष असल्याने आम्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. मी संयम पाळला आहे, पण सध्या दादांचा संयम ढळलेला दिसतोय. १५ तारखेनंतर (मतदानानंतर) ते काही बोलणार नाहीत. सध्या आम्ही एकमेकांविरोधात लढत असलो, तरी प्रचारात मर्यादा पाळणे आवश्यक आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर टिप्पणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीवर बोलताना फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंदच आहे. राज ठाकरेंनी यासाठी मला क्रेडिट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दोन भाऊ एकत्र यावेत हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. त्यांनी प्रयत्न केले पण ते एकत्र आले नाहीत, मात्र माझ्यामुळे (राजकीय परिस्थितीमुळे) ते एकत्र आले. यासाठी बाळासाहेब मला आशीर्वादच देतील. पण आता दोन भाऊ-बहीण एकत्र येणार का, हे मला माहीत नाही, ते १५ तारखेनंतर कळेल. पुणेकरांना फुकट नको, उत्तम सेवा हवी अजित पवार यांनी महिलांना मेट्रोतून मोफत प्रवासाचे आश्वासन दिले होते, त्यावर फडणवीस यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, मी तर आज जाहीर करणार होतो की पुण्यातून उड्डाण करणाऱ्या महिलांना विमानातून मोफत प्रवास मिळेल! घोषणा करायला काय जाते, पण ते पटले पाहिजे. मेट्रो ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त मालमत्ता आहे, तिचे दर 'फेअर सिस्टम' ठरवते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याची आश्वासने देणे चुकीचे आहे. पुणेकरांना मोफत काहीही नको आहे, त्यांना रिलायबल, डिपेंडेबल आणि उत्तम सेवा हवी आहे. ही आश्वासनं पुणेकरांना नीट समजली आहेत. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर 'पाताळ लोक'चा उतारा पुण्याच्या भविष्यातील विकासावर बोलताना फडणवीस यांनी ३२ हजार कोटी रुपयांचा भव्य आराखडा मांडला. पुण्यात खाली आणि वर कुठेही जागा उरली नसल्याने आता आम्ही 'पाताळ लोक' म्हणजेच टनेल (बोगदे) तयार करणार आहोत. येरवडा ते कात्रज, पाषाण, कोथरूड, औंध आणि संगमवाडी अशा ५४ किलोमीटरच्या टनेलचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच पुण्यात २३ नवीन उड्डाणपूल उभारले जातील, त्यापैकी ८ पुलांचे काम सुरू झाले असून उर्वरित १५ पुलांचे काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल. हे पूल असे असतील की पुढील २५ वर्षे ते तोडावे लागणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. नागपूरकरांनी आपल्याला सहा वेळा निवडून दिले असले, तरी पुणे हे आपले अत्यंत आवडते शहर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. उद्धव ठाकरेंच्या 'इगो'मुळे मेट्रोचा खर्च वाढला या मुलाखतीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. मुंबई मेट्रोच्या आरे कारशेड वादावर बोलताना ते म्हणाले की, मेट्रो कामाला लोकांचा विरोध नव्हता, तर आमचे मित्र उद्धव ठाकरे यांनाच अडचण होती. आरेची जागा राखीव जंगल नाही, असा स्पष्ट अहवाल असूनही केवळ इगोसाठी त्यांनी कामाला स्थगिती दिली. यामुळे साडेतीन वर्षांचे काम तीन वर्षे पुढे गेले आणि प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला. आम्ही दहापट झाडे लावून ती मोठीही केली, पण ठाकरेंच्या हट्टामुळे जनतेच्या पैशांचे नुकसान झाले, असा आरोप त्यांनी केला.
अमरावती जिल्ह्यातील ५५७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ १५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. निवडणुकांची प्रक्रिया सुरू न झाल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी काही सरपंच संघटनांनी केली आहे. राजकीय जाणकारांनुसार, ग्रामपंचायत निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे त्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा विचार करत आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. विधी अभ्यासकांच्या मते, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ नुसार प्रशासकाला सरपंचाचे सर्व अधिकार मिळतात. मावळत्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून प्राधान्य दिल्यास गावातील विकासकामे थांबणार नाहीत आणि प्रशासनही सुरळीत चालेल, असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सर्व पंचायत समित्यांना पत्र पाठवून १ जानेवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही माहिती प्रपत्र–१ व प्रपत्र–२ मध्ये भरून सॉफ्ट व हार्ड कॉपी स्वरूपात दोन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या कार्यरत सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे राष्ट्रीय प्रधान मुखिया संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची अनेक कारणे आहेत. निवडणुका घोषित करण्यापूर्वी प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती आणि मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली आहे. तसेच, मार्चमध्ये शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांमुळे मतदान केंद्रे व शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, तर जूनपासून पावसाळा सुरू झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबवणे कठीण होईल. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या काळातच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमरावती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी तालुक्याने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम पुरस्कार पटकावला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोर्शी पंचायत समितीने, तर निदर्शनांमध्ये अंजनगाव सुर्जी पंचायत समितीने अव्वल स्थान प्राप्त केले. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. यावेळी तिन्ही विजेत्यांना गौरवून पुरस्कृत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने व रजनी शिरभाते, ओपन लिंक फाउंडेशनच्या (ओएलएफ) राज्य समन्वयक चित्रा खन्ना, विस्तार अधिकारी संगीता सोनोने तसेच जिल्ह्यातील बहुतेक पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवात धारणीच्या खेळाडूंनी प्राथमिक विभागात कबड्डी (मुली), लंगडी (मुली) आणि खो-खो (मुली) मध्ये अजिंक्यपद मिळवले. तसेच, माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी (मुली) आणि खो-खो (मुले-मुली) मध्येही धारणीच्या विद्यार्थ्यांनी अव्वल यश संपादन केले. वैयक्तिक खेळांमध्येही धारणीच्या विद्यार्थ्यांनी शंभर मीटर धावणे, उंच उडी, गोळा फेक यांसारख्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोर्शीच्या विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणातून उत्कृष्ट कामगिरी बजावली. तर निदर्शनांमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार प्रदर्शन केले. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना त्यांच्या संबंधित प्रकारात प्रथमांक देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी केले. मनीष काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रसिद्धी समितीचे विनोद गाढे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले, पूनम उके आदी उपस्थित होते.
तिवसा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री एका मालवाहू ट्रकला भीषण आग लागली. टायर फुटल्याने ही घटना घडली असून, प्लास्टिकचे दाणे भरलेला ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेमुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जाणारा हा ट्रक दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळून जात असताना त्याच्या मागील चाकाचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्याने मोठा आवाज झाला आणि टायरजवळ असलेले लायनर घासल्याने ट्रकला खालून आग लागली. ट्रकमध्ये प्लास्टिकचे दाणे असल्याने आगीने त्वरित रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणातच संपूर्ण ट्रक जळून कोळसा झाला. आगीची घटना निदर्शनास येताच दोन्ही बाजूंनी येणारी वाहने थांबवण्यात आली. घटनेची माहिती तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. वृत्त लिहिपर्यंत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
तिजोरी ही जनतेच्या पैशातून तयार होते. सत्तेवर येणाऱ्यांनी त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य यासाठीच व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे, असे थोरात यांनी नमूद केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर आणि सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते. प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसत नसली तरी, काँग्रेस लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध अमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले, त्यामुळे आज भाजपामध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून, काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली तरी पक्षाची ताकद कायम आहे, असे थोरात यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी थोरात यांनी केली. भाजपाने सर्व नियम मोडीत काढून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, गुन्हेगारी आणि पाण्याची भीषण समस्या यावर सत्ताधारी ठोस भूमिका घेत नाहीत. सत्ता मिळवून भ्रष्टाचार करणे हे भाजपाचे धोरण आहे. केवळ प्रगतीच्या गप्पा मारून काहीही साध्य होणार नाही. सुसंस्कृत, विचाराधिष्ठित आणि निकोप महाराष्ट्र घडवण्यासाठी मतदारांनी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन थोरात यांनी शेवटी केले.

29 C