काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नाही. भाजप या प्रकरणी मुद्दा अफवा पसवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. बारामती विधानसभा मतदासंघात येत्या 23 तारखेला पोटनिवडणूक होत आहे. ही जागा अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येथून सत्ताधारी महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिला आहे. पण काँग्रेसने ही लढवण्याची घोषणा करत येथून आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पण आज अचानक काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तातडीने उपरोक्त स्पष्टीकरण दिली आहे. काँग्रेसशी भाजपच्या कोणत्याही नेत्याने संपर्क साधला नाही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी स्थिती स्पष्ट करताना सांगितले आहे. ‘झाडखाऊ’ म्हणत फडणवीसांवर निशाणा हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील वृक्षतोडीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी फडणवीसांचा उल्लेख 'झाडखाऊ' असा केला आहे. ‘झाडखाऊ’ची कुऱ्हाड आरे नंतर आता नाशिक वर, उद्या असेल संपूर्ण महाराष्ट्रावर, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात कुऱ्हाड असून, त्यांच्यापुढे तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसत आहेत. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. विजय वडेट्टीवारांचाही महायुतीवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाशिक येथील कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांना मलिदा गँगची उपमा दिली आहे. हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे वडेट्टीवार म्हणालेत.
नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी मोठी कारवाई करत विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (वय 55) यांना 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी देण्यात आले होते. या कंत्राटांतर्गत नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या चार महिन्यांचे सुमारे 3.16 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी 7 टक्के कमिशन म्हणून 22,176 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. ही लाचेची मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या मध्यस्थीने करण्यात आली होती. 25 मार्च रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीची 6 एप्रिल रोजी पडताळणी केल्यानंतर, 7 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे त्यांच्याच केबिनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचखोरीच्या या थेट कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लाच प्रकरणात अडकलेल्या याच राजेंद्र आहिरे यांनी फेब्रुवारी महिन्यात निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्यासह 19 जणांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अलिबाग आणि खोपोली येथील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला होता. यापूर्वीच्या तक्रारीत आहिरे यांनी 2018 पासून सुमारे 1.25 कोटी रुपयांच्या सरकारी वेतन अनुदानाचा अपहार झाल्याचा गंभीर दावा केला होता. मात्र आता ते स्वतःच लाचेच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागात मोठी चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कोण आहेत राजेंद्र अहिरे? राजेंद्र अहिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत असून, त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात मुंबई विभागात शिक्षण निरीक्षक म्हणून केली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी राज्य मंडळाच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या ते राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीचा लाभ मिळेल, असा महायुतीचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला असून, या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 55 उमेदवारांनी उडी घेतल्याने लढतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हान वाढले असून, ही लढाई आता अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाही. या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना शब्दही दिला असल्याचे समजते. भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील- मुख्यमंत्री राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना सोबत घेऊन सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा महत्त्वाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करेल, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी या भेटीदरम्यान दिली. 23 एप्रिल रोजी मतदान दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि आता त्यांनी या रिक्त जागेवरून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 55 उमेदवार उतरल्याने लढत अत्यंत रंगतदार होणार आहे. पार्थ पवारांची कॉंग्रेसवर टीका दुसरीकडे, काँग्रेसने या मतदारसंघात आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ही काँग्रेसच्या डाऊनफॉल सुरुवात आहे, असे आक्रमक वक्तव्य केले आहे. पार्थ पवार यांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या टीका-प्रतिटीकांमुळे बारामतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
स्मृती मानधना -पलाश मुच्छलचा पॅचअप ?
मुंबई : प्रतिनिधी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती मानधनाचे कुटुंबीय आणि पलाश मुच्छलचे कुटुंबीय एकत्र असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मृती आणि पलाश पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी […] The post स्मृती मानधना -पलाश मुच्छलचा पॅचअप ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला लागलेल्या आगीमध्ये संकलीत मूल्यमापन चाचणीचे तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाले आहेत. बुधवारी ता. ८ हा प्रकार घडला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पेपरची मागणी नोंदविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी सांगितले. राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची संकलीत मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. भाषा, गणित व इंग्रजी विषयाची हि परिक्षा असून ता. ११, ता. १५ व ता. २२ एप्रील रोजी हि परिक्षा होणार आहे. त्यासाठी परिषदेकडून सर्व जिल्हयांना पेपरचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातही पेपरचा पुरवठा झाला असून जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून केंद्रस्तरावर पेपर पाठविले जात आहेत. मागील तीन दिवसांपासून हे काम सुरु आहे. दरम्यान, औंढा नागनाथ गटसाधन केंद्रातून तालुक्यातील १३ केंद्रापैकी सात केंद्रांना पेपर वाटप झाले असून सहा केंद्रावर पेपर वाटप करण्याचे काम सुुर होते. मात्र आज सकाळी गटसाधन केंद्रातून धुर निघत असल्याचे कर्मचाऱ्याला दिसून आले. त्यानंतर कर्मचारी पांडूरंग सुर्यवंशी यांनी सदर प्रकार गटशिक्षणाधिकारी मोहम्मद तौफीक यांना कळविला. गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, गटशिक्षणाधिकारी तौफीक, विस्तार अधिकारी संजय मेथेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वसीम पठाण, शेख इकबाल, रवीकांत हरकाळ यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, या आगीमध्ये तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाले असल्याचे गटशिक्षणाधिकारी तौफीक यांनी सांगितले. शार्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यादृष्टीने पोलिसांनीही माहिती घेण्यास सुरवात केली आहे. परिषदेकडे पेपरची मागणी नोंदविली हिंगोलीच्या शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी या प्रकरणी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, सदर घटनेमध्ये १२ हजार पेपर जळाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच चाचणी सुरळीत पार पडावी यासाठी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवली आहे. पेपर प्राप्त झाल्यानंतर ठरवून दिलेल्या तारखेलाच परिक्षा होईल.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी 'लव्ह जिहाद'च्या बळी ठरलेल्या महिलांसाठी 'ऑपरेशन दुर्गा अभियान' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत समाजात जनजागृती करून पीडित महिलांना समुपदेशन, पुनर्वसन आणि आवश्यक मदत दिली जाईल. या अभियानासाठी लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या माध्यमातून पीडितांना त्वरित संपर्क साधता येईल. यावेळी त्यांनी सायली सुर्वे या महिलेच्या 'घरवापसी'चे यश नमूद केले. सायलीचा पती आतिफ तासे याच्यावर 28 गुन्हे दाखल असून, त्याला तातडीने अटक करून सायलीला घटस्फोट मिळावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. सायलीवर मानसिक दडपण असून, तिच्या चार मुलांना आणि आई-वडिलांनाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. सायली सुर्वेला 'घरवापसी'नंतरही पोलीस संरक्षण मिळाले नाही, यावर कुलकर्णी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक पोलिसांनी वेळीच संरक्षण दिले असते तर तिच्या सासरच्यांनी तिला बळजबरीने परत नेले नसते, असे त्या म्हणाल्या. सायलीच्या मानसिक स्थितीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. सायलीने सासू गुलशन तासे हिच्या विरोधात दबावाखाली दिलेला जबाब पोलिसांनी ग्राह्य धरू नये, असेही कुलकर्णी यांनी म्हटले. गुलशन तासेवर अनेक गुन्हे दाखल असून, तिच्या चार सुना हिंदू आहेत आणि काहींनी सासूविरोधात तक्रारीही केल्या आहेत. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचे कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र 'लव्ह जिहाद' सेल स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र सरकारने बळजबरीने धर्म बदलण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असल्याचा दावा करणाऱ्या खासदार पार्थ पवार यांच्यावर काँग्रेसचे बारामतीचे उमेदवार आकाश मोरे यांनी पलटवार केला आहे. पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियममध्ये शिकलेत. त्यामुळे ते काँग्रेसवर टीका करताना मराठी शब्द न सूचल्यामुळे डाऊनफॉल म्हणाले असतील, असे ते म्हणालेत. आकाश मोरे यांनी बारामती विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना आव्हान दिले आहे. त्यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना बारामती निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. तसेच बारामतीची पोटनिवडणूक लढवल्यामुळे राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल होईल अशी टीका करणाऱ्या खासदार पार्थ पवार यांचाही समाचार घेतला. त्यांच्या या टीकेमुळे बारामतीच्या निवडणुकीत अधिकच रंग भरला आहे. पार्थ पवार हायफाय इंग्लिश मीडियममध्ये शिकलेले आकाश मोरे म्हणाले, मी सेमी इंग्लिशमध्ये शिकलेला माणूस आहे. तरीही मला मराठीचे काही शब्द येत नाहीत. पण ते (पार्थ पवार) इंग्लिश मीडियम हायफायमध्ये शिकलेले आहेत. त्यामुळे त्यांना तेच म्हणायचे होते की, दम द्यायचा होता, काय करायचे होते हे मला माहिती नाही. पण मला असे वाटत आहे की, त्यांना मराठी शब्द सापडला नसेल. त्यामुळेच ते डाऊनफॉल म्हणाले असतील. काँग्रेस आपली भूमिका नेहमी मांडत असते. संविधान वाचवण्याची जबाबदारी एका माणसावर आली आहे. काँग्रेस ती जबाबदारी नेटाने पेलत आहे. आमच्या काँग्रेसचा एकेक कार्यकर्ता हजारांच्या बरोबर आहे. आमच्याकडे पैशाची बॅकिंग नाही की कसली पावरही नाही. अजित दादांविषयी एफआयआर नोंदवा, अर्ज मागे घेऊ ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आग्रही आहे. पण यासाठी काँग्रेसने काही अटी ठेवल्या आहेत. आमचे म्हणणे आहे की, राज्यातील भाजप प्रणित सरकारने अजितदादांचा घातपात आहे की अपघात आहे, याविषयी एफआयआर नोंदवावा. त्यांनी असे केले की आम्ही तत्काळ अर्ज मागे घेऊ. अन्यथा आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. अजितदादांना न्याय मिळावा, लोकशाही टिकावी, या राज्यातील सुसंस्कृत राजकारण पुनर्जीवित व्हावे अशी आमची इच्छा आहे. शरद पवार ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी सत्ताधारी व विरोधकांचा जसा समन्वय होता तो आता पूर्णः संपुष्टात आला आहे. असे राजकारण पुन्हा अस्तित्वात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विधान भवनात चांगला भाषण करणारा विरोधी आमदार असेल तर सत्ताधारी आमदार त्याला पाठीवर थाप देऊन त्याचे कौतुक करायचा. पण आता हाणामारी होते. ही लोकशाहीची अधोगती आहे. ही अधोगती ज्या पद्धतीने झाली त्याविरोधात मी एक प्रतिक म्हणून ही निवडणूक लढवत आहे, असे आकाश मोरे म्हणाले. वरिष्ठ सांगतील ते करणार मी पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष, राहुल गांधी व हर्षवर्धन सपकाळ यांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे ते जे काही आदेश देतील, त्याचे मी तंतोतंत पालन करेल. या सरकारने अजित पवारांच्या अपघाताविषयी काही सकारात्मक गोष्टी केल्या, चौकशी केली किंवा एफआयआर दाखल केला किंवा तसे संकेत दिसले तर आमच्या वरिष्ठांकडून जे सांगण्यात येईल, ते आम्ही करू, असेही आकाश मोरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड : प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याचा खळबळजनक दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदू बाबा अशोक खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांना धोका असल्याचे यात नमूद करण्यात […] The post सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकचा दूसरा भोंदू रवींद्र एरंडेच्या प्रकरणात देखील रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता एरंडेने त्याच्या टॅबमध्ये असलेल्या आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओबाबत पोलिसांसमोर धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडिओ टॅबमध्ये असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने खंडणीच्या फिर्यादीतही त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ साठवून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न एरंडे करत होता का? असा तपास पोलिसांकडून केला जात आहे. भोंदू अशोक खरातच्या पावलावर पाऊल ठेवत महिलांना विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या रवींद्र एरंडेचे काळे कारनामे उघड झाले असून, त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवड्यांसारखे साहित्य जप्त केले आहे. स्वतःवरील लैंगिक अत्याचाराचे आरोप लपवण्यासाठी एरंडेने आक्षेपार्ह व्हिडिओच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचा बनाव रचला होता. मात्र त्याच्याच ऑफिस बॉयने रचलेल्या सापळ्यामुळे त्याचे बिंग फुटले. सातपूर पोलिसांनी एरंडेला लैंगिक अत्याचार आणि ॲट्रोसिटीच्या गुन्ह्याखाली बेड्या ठोकल्या असून, सत्र न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आपल्या मालकाच्या अनैतिक कृत्यांचा भांडाफोड करत ऑफिस बॉयने 12 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता आणि एरंडेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांना अटकही केली होती. मात्र ही तक्रार दाखल करतानाच एरंडेने स्वतःच्या कृत्यांची एकप्रकारे कबुली दिली. मैत्रिणीसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ असलेला टॅब ऑफिसमध्ये ठेवला होता, असा उल्लेख त्याने फिर्यादीत केल्याने त्याचे गुपित उघड झाले आणि तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडीमध्ये त्याचे तब्बल 100 आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ आढळून आले आहेत. संशयित रवींद्र एरंडे हा वन्यजीवांचे अवयव आणि जादूटोण्याची भीती दाखवून, तसेच नोकरी-व्यवसायाचे आमिष देऊन गरजूंना शोषत असल्याचा संशय 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने व्यक्त केला आहे. याप्रकरणी 'अंनिस'ने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन एरंडेची सखोल चौकशी करण्याची आणि त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यासह वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झालेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात विलास लाड हा नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर तोंडसूख घेतले आहे. हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल, असे ते म्हणाले. सत्ताधारी बोके भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न विजय वडेट्टीवार या प्रकरणी म्हणाले, हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल. आता पाहू काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड म्हणत आहे की, आपल्याला खूप मोठे काम मिळाले आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या कामांचे बजेट आहे. त्यातील काही निधी केंद्राने दिलाय तर काही राज्याने. अकाउंटला निधी येऊन पडलाय. या कामांचे टेंडर मॅनेज करण्यात आले आहे. मंत्र्यांपासून ते क्लर्क पर्यंत प्रत्येकाचे कमिशन ठरले आहे. त्यामध्ये माझ्या वाट्याला 500 कोटींच्या कामाचा कोटा आला आहे. आपण स्वतः 700 तंबू उभारण्याचे तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडर घेतले आहे. या कुंभमेळ्यामध्ये नाश्ता आणि जेवणाचे टेंडर 18 कोटी रुपयांचे आहे. ते देखील आपल्याला मिळाले आहे. कुंभमेळा फक्त 40 दिवसांचा आहे. त्यामुळे एवढा खर्च येत नाही. त्यामुळे त्यातून मोठे कमिशन मिळणार आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही मॅनेज करुन टेंडर देऊयात. फक्त कुणाला सांगू नको म्हणावे, असे विलास लाड फोनद्वारे समोरच्या व्यक्तीला म्हणताना या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. ती मुदत संपल्यानंतर आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव या वेळीही त्याला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याची ओळख पटवण्यासाठी थेट त्याचे नाव विचारले. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय घेतला गेला. आजच्या सुनावणीत अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि वकील उपस्थित होते. आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात हजर होते, तर सरकारी बाजू मांडण्यासाठी शैलेंद्र बागडे उपस्थित होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनीही न्यायालयात हजेरी लावली. सुनावणीदरम्यान पुढील गुन्ह्यांमध्ये आरोपीचा ताबा मिळावा यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अशोक खरातला आता मध्यवर्ती कारागृहात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर विशेष तपास पथक (SIT) त्याचा पुन्हा ताबा घेण्याची प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक कायदेशीर औपचारिकता आजच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे तपास अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गंभीर स्वरूप पाहता न्यायालयीन प्रक्रियेला वेग सुनावणीनंतर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपीविरोधात दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असून तिसऱ्या गुन्ह्यात ताबा घेण्याचा अर्जही मंजूर झाला आहे. त्यामुळे उद्या पुन्हा अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील गंभीर स्वरूप पाहता न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख निलंबित
नांदेड : प्रतिनिधी आरोग्य विभागासाठी आलेला करोड रुपयांचा निधी नियोजना अभावी व्यापकत झाला होता याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांना तडका फडके निलंबित केले आहे.. त्यांच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी ही शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या यामुळे देशमुख यांचे विभागीय चौकशीही लावण्यात आले आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ […] The post नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती पोटनिवडणुकीत भाजपने मध्यस्थी करून निवडणूक बिनविरोध करावी, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची नाही, असे स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्ष मोठा असून, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. हा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचे समजते. काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांच्या प्रचारात प्रदेश स्तरावरील सर्वजण सहभागी होतील, असेही पाटील यांनी नमूद केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियान बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनोद सुलतानपुरी (आमदार, हिमाचल प्रदेश), माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सतेज पाटील यांनी अभियानाबद्दल माहिती देताना सांगितले की, देशभरात हे अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे लोकांचा जनमानस जाणून घेतला जात आहे. 17 ते 19 एप्रिल दरम्यान पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा घेतला जाईल. सर्वसमावेशक पदाधिकाऱ्यांना पक्षाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. हे अभियान सात ते आठ राज्यांमध्ये यशस्वी झाले असून, आता ते महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. पक्षाचे निरीक्षक विविध पदाधिकाऱ्यांना एकटे भेटून चर्चा करणार आहेत. नावे शिफारस करण्याबाबत त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. ज्यांना आपली भूमिका मांडायची आहे, त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर येऊन ती मांडावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. यावेळी बोलताना विनोद सुलतानपुरी म्हणाले की, पुण्यातील विधी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले असून, 20 वर्षांनी पुण्यात पुन्हा आल्याचा आनंद आहे. पुणे शहर ऐतिहासिक असून देशाला या शहराचे वेगळे महत्त्व आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी या अभियान माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील बांधकाम परवानग्यांच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेवकांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता यांना पत्र पाठवले आहे. पीएमआरडीएला 60 दिवसांसाठी बांधकाम परवानग्या देण्याचा शासनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे पत्र माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे आणि नागरी हक्क संस्थेचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी दिले आहे. 30 जून 2021 रोजी 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. मात्र, 14 जुलै 2021 रोजी शासनाने पीएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, ती अद्याप प्रलंबित आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान,11 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने पीएमआरडीएचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द केला. त्यानंतर पुणे महापालिका नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत झाली. या प्रक्रियेत पीएमआरडीएकडील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, बांधकाम परवानग्यांसारख्या संवेदनशील विषयावर मार्गदर्शन मागत पीएमआरडीएने प्रस्ताव स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, कायद्यात स्पष्ट तरतूद नसतानाही दोन महिन्यांसाठी पीएमआरडीएला बांधकाम परवानग्या देण्याची मुभा देण्यात आली आहे. अधिकार नसताना दिलेल्या या परवानग्या वैध ठरणार का, असा सवाल पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्याची पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय बांधकाम परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणाला छेद देणारे निर्णय भविष्यात महापालिकेवर अतिरिक्त ताण आणू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 60 दिवसांची मुदत रद्द करून सर्व प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीएमआरडीए आणि महापालिकेतील शुल्क संरचनेतील तफावतही यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे. पीएमआरडीए रेडीरेकनरच्या 2 टक्के दराने विकास शुल्क आकारते, तर महापालिका 4 टक्के दराने शुल्क आकारते. या फरकामुळे होणारे आर्थिक नुकसान कोण भरून काढणार, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, पीएमआरडीएने कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी महापालिकेच्या नगर अभियंत्यांशी समन्वय साधावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील नियोजन प्रक्रियेत अधिक गोंधळ टाळण्यासाठी शासनाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील चौकशीप्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) उच्च न्यायालयात स्पष्ट केले की, वानखेडे यांनी तपास केलेल्या दोन प्रकरणांतील कथित अनियमिततेची चौकशी ही निनावी तक्रारींच्या आधारे सुरू करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झालेली नसल्याचा दावा एनसीबीने ठामपणे केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय आरोपांना नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठासमोर झाली. सुनावणीदरम्यान एनसीबीने आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात वानखेडे यांनी केलेल्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. दुसरीकडे, वानखेडे यांच्यावतीने वरिष्ठ वकील राजीव चव्हाण यांनी उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य करत पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. एनसीबीच्या प्रतिज्ञापत्रानुसार, वानखेडे यांनी तपास केलेल्या दोन प्रकरणांमध्ये अनियमिततेबाबत दोन स्वतंत्र आणि निनावी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या आधारेच प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत नवाब मलिक किंवा त्यांच्या कोणत्याही सूचनेचा संबंध नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले आहे. तसेच, अशा तक्रारींची पडताळणी करून त्यावर कारवाई करण्याचा अधिकार तपास यंत्रणेला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, एनसीबीने आणखी एक गंभीर आरोप केला आहे. वानखेडे यांनी 2024 पासून विविध याचिका आणि कायदेशीर प्रक्रिया वापरून चौकशीला विलंब करण्याचा प्रयत्न केला असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. तपास प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्यासाठी कायदेशीर मार्गांचा वापर केल्याचा दावा एनसीबीने आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील वाद अधिकच तीव्र झाला आहे. दरम्यान, एनसीबीने वानखेडे यांच्याविरोधातील चौकशी अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याचेही स्पष्ट केले आहे. त्यांना आपली बाजू मांडण्याची पूर्ण आणि निष्पक्ष संधी दिली जाईल, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. चौकशीसाठी नोटीस देण्यात येणे ही नियमित प्रक्रिया असल्याचे सांगत एनसीबीने आपली कारवाई योग्य असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरण आणि एका नायजेरियन नागरिकाच्या अटकेशी संबंधित तपासात अनियमितता झाल्याच्या तक्रारींमध्ये आहे. या संदर्भात एनसीबीकडे निनावी तक्रारी दाखल झाल्यानंतर वानखेडे यांच्याविरोधात प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली. त्यानुसार नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान त्यांना विशेष पथकासमोर उपस्थित राहण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष मात्र, वानखेडे यांनी या कारवाईला विरोध करत ही चौकशी सूडबुद्धीने सुरू करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दावा केला की, अमलीपदार्थ प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई केल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता एनसीबीच्या प्रतिज्ञापत्रामुळे या प्रकरणात नवा टप्पा निर्माण झाला असून, पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमात दिवंगत अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या प्रकरणी टीकेची झोड उठवत त्यांच्यावर त्यांच्या कथित कृतघ्नपणाचा निषेध केला आहे. या कृतीद्वारे प्रफुल्ल पटेल यांचे पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यातच सुनील तटकरे यांच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील बॅनरवर अजित पवारांचा फोटो नव्हता. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत घडला आहे. त्यांच्याही कार्यक्रमात अजित पवार यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले आहे. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे दिसताहेत शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, रायगड मध्ये तटकरेंना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भात तिरोडा येथील NCP पक्षाच्या अधिकृत बैठकीतील बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाहीच. फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब तुमच्या कृतघ्नपणाचा निषेध ! मात्र स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणारे त्यांच्या पक्षातील आमदार व पक्ष पदाधिकारी गप्प बसत असतील तर ते गुलाम असावेत किंवा ढोंगी असावेत. राम कृष्ण हरी, असे लवांडे यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरींचाही शरद पवार गटाच्या सूरात सूर दुसरीकडे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका पोस्टद्वारे म्हणाले, आदरणीय अजितदादा तुम्ही कुण्या बॅनरवर नसला काय असला काय? प्रसिद्धीचा तुम्हाला हव्यास होताच कुठे? तुम्ही मात्र गरिबांच्या घराघरात कायम आहात.. कोकण ते विदर्भापर्यंत तुमचा चाहता वर्ग विखुरलाय ..कदाचित तो तुम्हाला भेटलाही नसेल आयुष्यात कधी…. किंवा त्याला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नसेल. मात्र तो फाटका असला तरी देवासमान पुजतो तुम्हाला … कारण तो जाणत होता की तुम्ही महाराष्ट्राची गरज होता….तो फाटका, गरीब, पिचलेला, रडतोय आजही तुमच्यासाठी धाय मोकलून… कदाचित तुम्ही त्याला दिसणार नाही, आणि तो ही आता परत हसणार नाही… तुम्ही व तुमचे फोटो कायमचे कोरून गेलेत त्याच्या काळजात… तुम्ही बॅनर वर नसलात म्हणून काय झालं?? एकदिवस अबाल वृद्ध इथला डोंगर हलवतील ,आणी स्वाभिमानाने म्हणतील “आमच्याकडे बॅनर छापायला पैसे नसतील पण दादा तुमच्या बॅनर पेक्षा आमच्या काळजात कायम दिसतील.. तुमच बॅनर उद्या खतावर ,छतावर राहील ,पण आमच्या काळजातलं दादा आम्ही सरणावर जाईस्तो आमच्या फाटक्या हृदयात कायम राहील. घराघरात दादा मनामनात दादा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. रोहित पवारांनी तटकरेंवर साधला होता निशाणा राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ नुकताच रायगडमध्ये झाला होता. या कार्यक्रमाला सुनील तटकरे उपस्थित होते. पण या कार्यक्रमाच्या बॅनवर अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे फोटो नव्हते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, “मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा ७/१२ स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण…. जे आम्ही वारंवार बोलतोय…”
गेली 3 ते 4 दिवसांमध्ये नांदेडमध्ये ज्या खुनाच्या घटना घडल्या आहेत त्या अत्यंत वाईट आहेत. नांदेड शहरामध्ये अवैध हत्यारे आली आहेत. नांदेडमधील अनेक गुन्हेगार हे गुन्हे करतात आणि तेलंगणा किंवा कर्नाटकात पळून जातात, असे शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. नांदेडमध्ये गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही असे म्हणत पाटील यांनी गृहविभागाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड शहरात जर झडती घेतली गेली तर अवैध दीड ते 2 हजार पिस्तूलं सापडतील. त्यामुळे कोणाचाच वचक शहरावर राहिलेला नाही. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. त्यांना व्याजाने पैसे दिले जातात, त्यांचे लॅपटॉप आणि इतर वस्तु हिसकावल्या जातात. यामुळे नांदेडमध्ये पोलिस आयुक्तालय झाले पाहिजे. पोलिसांच्या सिंघम अशा प्रतिमा रंगावल्या जातात पण ते केवळ तोडपाणी करण्यात पुढे असतात, असा आरोप पाटील यांनी केला आहे. गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये हेमंत पाटील म्हणाले की, मुलींची छेडछाड, बलात्कार, चोरी असे गुन्हे दाखल असणाऱ्यांना कोणीही राजाश्रय देऊ नये. मध्यतंरी शहरातील व्यापाऱ्यांकडून शेकडो कोटी रुपयांच्या खंडण्या जमा उकळण्यात आल्या. त्यामुळे अनेक व्यापारी शहर सोडून गेले. सर्व पक्षीय लोकांनी गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये. सरकारी रुग्णालयात पोलिसांसमोर जर हत्या होत असेल तर असे पोलिस दल काय कामाचे. जे पोलिस तिथे उपस्थित होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे. कागदावर काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी हेमंत पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या 23 कोटी रुपये निधी परत जातो याला कोण जबाबदार आहे. मोठे अधिकारी छोट्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवतात. त्याचा तपास झाला पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणात निधी आला तर तो कामासाठी असतो केवळ कागदावर कामे होत असतील तर कारवाई झाली पाहिजे.
राज्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. त्यात खून, खंडणी तसेच मुली बेपत्ता होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत देखील मांडला होता. आता असाच बेपत्ता होण्याचा प्रकार बीडमध्ये झाला आहे. मात्र, यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधत एक पोलिस कर्मचारी पुण्यात आला होता. तपास पूर्ण केल्यानंतर तो परत बीडला गेला आणि मध्यरात्री 2 वाजता त्याने आपले आयुष्य संपवले. आता पुण्यात नेमके असे काय घडले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले 35 वर्षीय पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पुणे येथे गेलेले जायभाये हे संबंधित तपास आणि काम व्यवस्थित पूर्ण करून रात्री उशिरा घरी परतले होते. मात्र त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांनी ही आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यावरून तपास पूर्ण करून परतल्यानंतर अवघ्या काही वेळातच, पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. या हृदयद्रावक घटनेमुळे पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पुण्यात नेमके काय झाले? बेपत्ता झालेल्या मुलीच्या शोधात गेलेले पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांच्यासोबत पुण्यात नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. आता पोलिसांनी बाळकृष्ण जायभाये यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह दरम्यान, बीड जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या मुलीचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वी झाला होता आणि लग्नानंतरचे सुरुवातीचे सहा महिने ती सासरी वास्तव्यास होती, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली असून या प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलिस अधिक तपास करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात टंचाई उपायोजनासाठी विंधन विहीर अधिग्रहण किंवा टँकर सुरू करणे आवश्यक असणाऱ्या गावांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच योग्य ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना मंगळवारी (ता. 7) आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित उपअभियंते व कनिष्ठ अभियंते, तसेच टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर असल्याने यंदाच्या टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता भासू नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जल जीवन मिशनची कामे अपूर्ण असली तरी विहिरीचे काम पूर्ण झाले आहे आणि पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी स्टँडी बसवून पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच गावांतील सर्व पाणीस्रोतांची तपासणी करून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जोडण्यांसाठी लागणाऱ्या कोटेशनची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी 15 व्या वित्त आयोग निधीतून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पाणी टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 701 गावांसाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यामध्ये नळ योजनांची दुरुस्ती 5, विंधन विहिरींची दुरुस्ती 16, नवीन विंधन विहिरी व कुपनलिका 131 गावांत 158, खाजगी विहीर अधिग्रहण 302 गावांत 336, तसेच 22 गावांत 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का नाही हे सांगण्याचा अधिकार राऊतांना नाही. तुम्ही राज्यसभेवर कसे निवडून आलात. तुमच्याकडे केवळ 20 आमदार आहेत, तुमचे उमेदवार निवडून येतात का हे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनता निवडून देते आहे,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घरातून बाहेर निघण्याचा सल्ला द्या. राऊत हे भोंदू बाबा राऊत आहात. नवनाथ बन म्हणाले की, भारताची परिस्थिती उंदरासारखी झालेली नाही तर राऊतांची परिस्थिती सापासारखी झाली आहे. साप जसे आपलेच दुध पितो आणि फना वर काढून बसतो तसेच देशाचे मीठ खात देशाविरोधात फना काढण्याचे काम संजय राऊत करत आहेत. तुम्ही आपल्याच देशाविरोधी भूमिका घेत पाकिस्तानचे समर्थन करत आहात. तुम्ही पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचे काम करत आहात. पाकिस्तान अन् उबाठाची अवस्था सारखीच नवनाथ बन म्हणाले की, ज्या पाकिस्तानचे गुणगाण संजय राऊत गात आहे त्या देशामध्ये लोकांना पीठ मिळत नाही. पेट्रोल-डिझेल महाग आहे, गॅस मिळत नाही. साडेचारशे रुपयांनी पेट्रोल डिझेल मिळते. आपल्याकडे भाव वाढले नाही कारण मोदींचे नेतृत्व सक्षम आहे. संजय राऊत तुमच्या पाकिस्तानची अवस्था महाराष्ट्रात उबाठाची अवस्थेसारखी झाली आहे. दलाली करणे भारताचा धंदा नाही नवनाथ बन म्हणाले की, ज्यांच्या पक्षाची धाव आणि मजल उरणपर्यंत नाही असे संजय राऊत इराणच्या गप्पा मारत आहेत. इराण प्रकरणी काय करायला हवे होते यांचा सल्ला देतात त्यांनी उबाठामध्ये लक्ष दिले पाहिजे. देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. इराण-इस्रायल युद्धात काय झाले कुणी मध्यस्थी करायला हवी होती? कोणी दलाली केली हे जगाने पाहिले आहे. दलाली करणे भारताचा धंदा नाही. जे दलाली करतात आणि भारतात त्यांची प्रवक्तेगिरी करणाऱ्यांना दलाली लखलाभ असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे, म्हणून या युद्धाची झळ आपल्याला पोहोचली नाही. राऊतांचा दलालीचा धंदा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या उबाठा पक्षाची काय अवस्था झाली आहे याकडे तुम्ही लक्ष द्या. मनपामध्ये उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली याकडे लक्ष द्या. उरणपर्यंत पक्ष नसलेल्या लोकांनी इराणच्या गप्पा मारणे बंद केले पाहिजे. इराण-इस्रायल युद्धात ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून दलाली करण्याचे काम केले जात आहे आणि पाकिस्तानची दलाली भारतात करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. राऊत यांचा दलाली करण्याचा धंदा झाला आहे. पक्षामध्ये त्यांना काही काम उरलेले नसल्याने ते काही वेळ शरद पवार यांची दलाली करतात काही वेळ राहुल गांधी यांची दलाली करतात. आज तर त्यांच्याकडून पाकिस्तानचा उदोउदो केला जात आहे. हे दलालीचे धंदे बंद करा, यामुळेच तुमच्यावर ही पाळी आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांची प्रकृती आज अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आलेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुषमा अंधारे यांची प्रकृती आज सकाळी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुषमा अंधारे यांना नेमके काय झाले? हे अद्याप समजले नाही. पण त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला राहणार गैरहजर उल्लेखनीय बाब म्हणजे सुषमा अंधारे उद्या गुरुवारी विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला हजर राहणार होत्या. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आता या बैठकीला हजर राहता येणार नाही. यासंबंधीची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून थेट विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. सुषमा अंधारे ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या एक प्रमुख महिला नेत्या आहेत. आपल्या धारदार वक्तृत्वशैलीमुळे व विरोधकांवर थेट तिखट हल्ला चढवण्याच्या आपल्या खास शैलीमुळे त्या ओळखल्या जातात. त्या ठाकरे गटाच्या मुलूख मैदानी तोफ म्हणूनही ओळखल्या जातात. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी सामाजिक आणि प्रबोधनपर कामांमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. विविध सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेत त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीचेही काम केले. राष्ट्र सेवा दल आणि इतर प्रबोधनवादी विचारसरणीच्या संस्थांशीही त्यांचा संबंध आहे. तर्कवादी आणि प्रगतिशील विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिली व मोहिमा राबवल्या. भोंदू खरातवरून अंजली दमानियांवर साधला होता निशाणा दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी परवाच भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, अंजली दमानिया, तुम्ही आज रडून जे victim कार्ड खेळलं ते कमालीचं बालिश होतं. पण मूळ मुद्दा भरकटू नये म्हणून आज मी तुमच्यावर कमी फोकस केला आहे. कारण तुमच्याशी वितंड वादापेक्षाही खरात आणि सर्व गुन्हेगार गजाआड होणे जास्त गरजेचे आहे. पण माझ्या कुठल्याही आरोपाचा खंडन तुम्ही आजही करू शकलेला नाहीत. तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवणार होतात पण तुम्ही ते करून दाखवू शकला नाहीत. तुम्ही सगळीकडून अडचणीत आलेल्या आहात याची मला कल्पना आहे. कारण तुम्ही केलेली कृती breach of privacy आहे. पण तुम्ही रडल्याने आणि अमृता फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने माझं म्हणणं सिद्ध व्हायला अधिक मदत झाली. आभार. बाकी भाजप सोडून मुद्दे असतील तर तुम्ही जगात कुठेही असला तर प्रकट होतात यावर माझा विश्वास आहे जशा कोरेगाव पार्क प्रकरणात तुम्ही अमेरिकेतून अचानक लाईव आला होता अगदी तशा... ! तुम्ही कुणाठी काम करता हे तुम्ही आज स्वतःच्या कृतीतून सिद्ध केला आहे आणि तुम्हाला सीडीआर कसे मिळाले यावर तुम्ही जे दोन वेगवेगळे स्टेटमेंट तुम्ही खोटं बोलत आहात हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. लवकर खासदार व्हा, असे त्या म्हणाल्या होत्या.
मुंबईत शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवे कायदेशीर वळण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणात दोषमुक्तीची मागणी करत विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, या अर्जावर केवळ तांत्रिक मुद्द्यांवर नव्हे तर प्रकरणाच्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयासमोर केली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल सादर केला होता, जो विशेष न्यायालयाने स्वीकारला. याच मुद्द्यावर आधार घेत रोहित पवार आणि इतर 11 जणांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांचा दावा आहे की, मूळ गुन्हाच बंद झाल्याने त्यावर आधारित ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. मात्र, ईडीने या युक्तिवादाला विरोध करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने अहवाल स्वीकारला असला तरी, ईडीने यापूर्वी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाबाबतचा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आला असून तो अजून प्रलंबित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक असल्याचे ईडीने नमूद केले आहे. फक्त प्रक्रियात्मक कारणांवर आरोपींना दिलासा देऊ नये, असेही ईडीने स्पष्ट केले. ईडीच्या आरोपांनुसार, कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारखान्यावर सुमारे 80.56 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. हे कर्ज वसूल करण्यासाठी शिखर बँकेने 13 जुलै 2009 रोजी सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई करत मालमत्ता ताब्यात घेतली होती. यानंतर 30 ऑगस्ट 2012 रोजी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. मात्र, ईडीच्या मते हा लिलाव प्रक्रियेत अनियमितता करून करण्यात आला. एका कथित मूल्यांकन अहवालाच्या आधारे कारखान्याची किंमत कमी दाखवण्यात आली. बोली प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वाधिक बोलीदाराला तांत्रिक कारणांवर अपात्र ठरवण्यात आले, तर दुसऱ्या बोलीदाराचा बारामती अॅग्रो लिमिटेडशी संबंध असल्याचा आरोप आहे. तसेच त्या बोलीदाराकडे साखर कारखाना चालवण्याचा अनुभव किंवा आर्थिक क्षमता नसल्याचेही ईडीने नमूद केले आहे. न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार या सर्व पार्श्वभूमीवर आता न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित पवार आणि इतर आरोपींना दिलासा मिळणार की ईडीच्या भूमिकेमुळे त्यांच्यावरचे आरोप कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
चौकशीचा फास आवळताच अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला:आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार
नाशिकमध्ये अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात रोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अटकेनंतर सुरुवातीला पोलिसांशी उद्धटपणे वागणारा आणि त्यांनाच उलट शाप देण्याचा प्रयत्न करणारा खरात आता पूर्णपणे खचल्याचे चित्र दिसत आहे. तुम्ही पाप करत आहात, तुमच्यावर कोप होईल, अशा शब्दांत पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न करणारा हा भोंदू बाबा आता कोठडीत शांत झाला असून, त्याचा सगळा आव उतरल्याची माहिती समोर आली आहे. अटक झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात अशोक खरात अतिशय आत्मविश्वासाने वागत होता. आपल्या मागे मोठे राजकीय पाठबळ असल्याचा त्याला विश्वास होता. त्यामुळे तो एसआयटी अधिकाऱ्यांशीही वाद घालत होता. मात्र, तपासाचा फास हळूहळू आवळला जाऊ लागल्यानंतर आणि सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर त्याचा आत्मविश्वास ढासळला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच तो आता नरम पडला असून, दोन-तीन वेळा कोठडीत रडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, अशोक खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने पुढील कारवाईसाठी ही सुनावणी होणार आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या 12 गुन्ह्यांपैकी एका प्रकरणात त्याला सात दिवसांची कोठडी देण्यात आली होती. एका पीडित महिलेसोबत अत्याचार करून तिला गर्भवती केल्यानंतर गर्भपात केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याची मागणी एसआयटीने केली आहे. तपासादरम्यान आणखी 11 महिलांनी पुढे येत खरातविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी तो त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवत असे. तुझ्या पतीला किंवा मुलाला काहीतरी होईल, असे सांगून तो मानसिक दबाव निर्माण करायचा. त्यानंतर धार्मिक विधी, ऊर्जा उपचार आणि शरीरशांतीच्या नावाखाली त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे आरोप समोर आले आहेत. काही महिलांची मालमत्ता आणि जमीनही त्याने धमकावून बळकावल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. खरातच्या अडचणींमध्ये मोठी वाढ या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची काळजीपूर्वक छाननी केली जात असून, पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे. सध्या अशोक खरातविरुद्ध एकूण 12 गुन्हे दाखल असून, त्यामध्ये 8 महिला अत्याचार आणि 4 फसवणुकीचे गुन्हे आहेत. या सर्व प्रकरणांमुळे खरातच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्याचं भवितव्य अधिकच कठीण होत चालल्याचं दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीपासून उद्धवसेनेतील एका गटाने जिल्हा प्रमुख प्रा. अजय दासरी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘बजाओ बासरी... हटाओ दासरी...’ अशी मोहीम सुरू केली होती. त्यात त्यांना अखेर यश मिळाले आहे. पक्षाने आता जिल्हाप्रमुख पदावरून दासरी यांना डच्चू दिला आहे. त्यांच्याकडील जबाबदारी प्रताप चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उद्धवसेनेच्या संपर्क प्रमुख प्रा. सुषमा अंधारे यांनी बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नव्या कार्यकारिणी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झाली आहे. प्रा. दासरी यांच्याकडील शहर उत्तर व शहर मध्यच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आता माजी शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण, अक्कलकोटच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी शरणराज केंगनाळकर यांच्याकडे तर सोलापूर महानगर प्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची निवड झाली. लोकसभा प्रमुखपदी संजय पौळ यांची वर्णी जिल्हाप्रमुख - धनंजय डिकोळे (माढा, करमाळा), संभाजी शिंदे (सांगोला, पंढरपूर - मंगळवेढा), प्रताप चव्हाण (सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य), शरणराज केंगनाळकर (अक्कलकोट, दक्षिण सोलापूर), प्रवीण काकडे (बार्शी, मोहोळ, माळशिरस). लोकसभा प्रमुख - संजय पौळ (सोलापूर लोकसभा), हुकुमचंद राठोड (माढा लोकसभा), सोलापूर महानगरप्रमुख - महेश धाराशिवकर, सोलापूर महिला संघटिका - मंगल थोरात. विचित्र लोकांसोबत काम करणारच नाही जिल्हा प्रमुख हे महत्त्वाचे आणि पक्षप्रमुखांच्या जवळील पद आहे, अशा पदावरील व्यक्तीवर खालच्या पातळीवर आरोप करण्यात आले. पक्षासाठी प्रामाणिक काम करत असतानाही त्रास दिला. तरीही आपण पक्षासाठी काम केले. ज्यांनी पक्षप्रमुखांवर आरोप केले त्यांनाच पदे मिळाली याचे आश्चर्य आहे. यापुढील काळात या विचित्र लोकांत काम करण्याची मानसिकता नाही. पुढे पक्ष जी जबाबदारी देईल. ती पार पाडणार आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसैनिकांसोबत काम करणार आहे. प्रा. अजय दासरी, माजी जिल्हा प्रमुख.
वृक्षतोडीच्या मुद्यावरून पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले असतानाच महापालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभारही समोर आला आहे. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार दर 5 वर्षांनी वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. पालिकेने 2018 नंतर अद्याप नव्या वृक्षगणनेचा अहवालच जाहीर केलेला नाही. विशेष म्हणजे, 2024 मध्ये 8 कोटी रुपये खर्चून नवीन गणनेचे काम सुरू करण्यात आले होते. तरी, मात्र 8 वर्षांपासून शहराच्या हरितसंपदेची नेमकी स्थिती काय, हे उद्यान विभागाने समोरच आणलेले नाही. 2017-18 मध्ये झालेल्या वृक्षगणनेत शहरात 47,95,387 झाडे आढळली होती. यात 257 प्रजातींची नोंद झाली होती. मात्र, यात चिंतेची बाब म्हणजे 45 टक्के झाडे ही विदेशी गिरिपुष्प (ग्लीरिसिडीया) प्रजातीची होती. त्याशिवाय बाभूळ 18 टक्के आणि सुबाभूळ 13 टक्के असे प्रमाण होते. तेव्हाच्या अहवालात एकूण 1528 वारसा वृक्षांची नोंद करण्यात आली होती, ज्यात पिंपळ, वड आणि आंब्याचा समावेश होता. मात्र, गेल्या 7 वर्षांत या शिफारशींवर नक्की काय कार्यवाही झाली आणि किती नवीन झाडे लावली गेली, याबाबत पर्यावरणप्रेमींनी सवाल उपस्थित केला आहे. जिओ-टॅगिंग प्रणालीचा वापर करून वृक्षांच्या आरोग्याची नोंद ठेवण्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्षात अहवालच नसल्याने पालिकेच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकारी : न्यायालयासमोर वृक्षतोड, पुर्नरोपणाचे वास्तव मांडू रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांमुळे आतापर्यंत 35 हून अधिक नागरिकांचा बळी गेलेला आहे. आम्ही रस्त्यातील धोकादायक व रुंदीकरणाला अडथळा ठरणारी जुनी वृक्षे काढून त्यांचे दुसऱ्या जागेत पुर्नरोपण करत आहोत. हरित लवादाने स्थगिती दिल्याने आता न्यायालयासमोर परिस्थिती मांडणार आहोत. लेखी आदेश दुपारपर्यंत तरी मिळालेले नव्हते. दुसरे म्हणजे वृक्षगणनेचा आदेशही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. - विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक मनपा, नाशिक याचिकाकर्ते : अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करु राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी दुपारी 11:45 वाजता स्पष्ट आदेश दिले होते. 28 एप्रिलपर्यंत या वृक्षतोडीला पूर्णपणे स्थगिती देण्यात आली होती. मुळात या वृक्षतोडीला उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती दिलेली आहे. तरीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या नियमांची पायमल्ली केली. हे कृत्य निव्वळ बेजबाबदारपणाचे नसून, न्यायालयाचा अवमान करणारे आहे. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याला न्यायालयात खेचणार आहे. -ॲड. श्रीराम पिंगळे, याचिकाकर्ते पालिकेवर होऊ शकते दंडात्मक कारवाई हरित लवादाने दिलेल्या आदेशाला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच महत्त्व असते. त्यातही अशा दाव्यांमध्ये जर वकील उपस्थित असतील तर त्यांनी तत्काळ आपल्या आशीलाला सदर आदेशाची माहिती देणे महत्त्वाचे असते. जर सरकारी विभागाकडून किंवा अधिकाऱ्याकडून आदेशाचे उल्लंघन झाले, तर संबंधित विभागप्रमुखावर कारवाई केली जाते. त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागते आणि वैयक्तिकरित्या दोषी धरले जाऊ शकते. दंडात्कम कारवाई देखील होऊ शकते. दिव्य मराठी एक्स्पर्ट ॲड. रवींद्र निकम, विशेष सरकारी वकील हरित लवादाचा लेखी आदेशच वैध राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिल्यानंतर त्याबाबतचे लेखी आदेश महापालिकेला प्राप्त होणे गरजेचे आहे. लेखी आदेशच वैध मानला जातो. मात्र, जर त्या ठिकाणी पालिकेची बाजू मांडणारे वकील उपस्थित असतील तर लवादाने दिलेल्या स्थगितीबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यायला पाहिजे होती. वृक्षलागवड वाऱ्यावर 2017-18 मध्ये झालेल्या वृक्षगणना अहवालात शहरात नैसर्गिक साखळी समृद्ध करण्यासाठी बहावा, वड, पळस, अर्जुन, कदंब आणि करंज यांसारख्या स्थानिक वृक्षांच्या लागवडीची शिफारस करण्यात आली होती. गुन्हा दाखल करण्याची धमकी झाडे तोडणे थांबवले असले तरी तणाव निवळलेला नाही. उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी आक्रमक पवित्रा घेत, दुपारी 4 वाजेपर्यंत स्थगितीची अधिकृत ऑर्डर न दाखवल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू, अशी धमकीच वृक्षप्रेमींना दिल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. वृक्षगणनेची आठ वर्षांपासून प्रतीक्षाच पर्यावरणप्रेमी श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 6) सुनावणी होणार होती. मात्र, सोमवार सकाळपासूनच महापालिकेने जुन्या, डेरेदार वृक्षांचा बळी घेणे सुरू केले. ही सुनावणी मंगळवारवर (दि. 7) गेल्याने पालिकेला आणखीच वेळ मिळाला आणि सुनवाणीपर्यंत पालिकेने तब्बल 22 झाडांचा बळी घेतला. या कामादरम्यान सोमवारी झाडे तोडण्याला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि रस्त्याच्या मध्यावरच असलेल्या झाडांमुळे माणसांचा जीव जातो म्हणत झाडे तोडण्याचे समर्थन करणाऱ्यांची आंदोलनेही झाली. ती दोन्ही झुगारुन पालिकेने मंगळवारी सुनावणी झाल्यानंतरही वृक्षतोड सुरूच ठेवल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी (दि. 7) दुपारी 12 वाजता 28 एप्रीलपर्यंत नाशिकमध्ये कोणतीही वृक्षतोड करु नये, असे आदेश दिले. मात्र, ही स्थगिती मिळेपर्यंत गंगापूररोडवरील 44 पैकी 22 वृक्षांचा बळी गेला होता. जेहान सर्कल ते गोवर्धन या पट्ट्यातील रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने वृक्षतोडीचा सपाटा लावला होता. ही बाब कळताच पर्यावरणप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काम थांबवण्याची विनंती केली. मात्र, ‘ऑर्डरची प्रत दाखवा’ असे म्हणत यंत्रणेने काम सुरूच ठेवले. यामुळे अधिकारी आणि वृक्षप्रेमींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर दुपारी 1 वाजता महापालिकेकडून काम थांबविण्यात आले.
कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून, समरजीत घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी ‘घरवापसी’ करत पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात त्यांचा अधिकृत प्रवेश होणार असून, या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समरजीत घाटगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, ते आपल्या मूळ पक्षात परतत आहेत आणि यामुळे कोणालाही अडचण निर्माण होणार नाही. त्यांनी सांगितले की, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असलेला दीर्घकालीन वाद आता संपुष्टात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यानच दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा निर्माण झाला होता. या बदलामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. घाटगे यांनी पुढे सांगितले की, भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून येत पक्षाशी जवळीक वाढवली होती. प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच त्यांनी हा निर्णय अंतिम केला. पुन्हा पक्षात येताना समाधान आणि अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही भावना व्यक्त करताना त्यांना मोठ्या भावासारखे संबोधले. पक्ष सोडल्यानंतरही त्यांनी फडणवीसांचा आदर कायम ठेवला होता, असेही त्यांनी सांगितले. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात महायुतीतील सर्व नेत्यांसोबत समन्वयाने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयापूर्वीच घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितले की, हा निर्णय त्यांनी कोणालाही न सांगता घेतलेला नसून, सर्व संबंधित नेत्यांना माहिती देऊनच पुढे पाऊल टाकले आहे. त्यामुळे या निर्णयाला राजकीय पारदर्शकतेची जोड मिळाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील स्थानिक राजकारणात घाटगे आणि मुश्रीफ यांची एकत्रित आघाडी यापूर्वीच प्रभावी ठरली होती. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत या आघाडीने सर्व 23 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. नगराध्यक्षपदी सविता माने यांची निवड झाली होती. या विजयामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्रित ताकदीला मतदारांनी मोठा पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले होते. कोल्हापूरमध्ये महायुती अधिक बळकट होण्याची शक्यता मात्र, दुसरीकडे मुरगुड नगरपालिकेत या आघाडीला धक्का बसला होता. त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. आता घाटगे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनामुळे कोल्हापूरमध्ये महायुती अधिक बळकट होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. पूर्वीप्रमाणे निकाल निश्चित असल्याची भावना असली तरी यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याबाबत चर्चा सुरू होताच उलट उमेदवारांची संख्या वाढल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सध्या या मतदारसंघात 53 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. या 53 उमेदवारांपैकी जवळपास निम्मे उमेदवार बारामतीबाहेरील असल्याचे विशेष लक्षवेधी ठरले आहे. स्थानिक आणि बाहेरील उमेदवारांमुळे निवडणुकीची समीकरणे अधिक क्लिष्ट बनली आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या माघारीवर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे अवलंबून असले तरी इतर उमेदवारांचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळे बिनविरोधीची शक्यता अनिश्चिततेत अडकलेली दिसते. विशेष म्हणजे, बाहेरील उमेदवारांमध्ये काही चर्चित नावेही समोर आली आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरत निवडणुकीत रंग भरला आहे. या उमेदवारांना माघार घ्यायला राजी करणे हेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 55 जणांनी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर छाननी प्रक्रियेत दोन अर्ज बाद झाल्यामुळे अंतिम आकडा 53 वर आला. या 53 उमेदवारांमध्ये 23 उमेदवार हे बारामतीतील स्थानिक आहेत, तर उर्वरित 30 उमेदवार बाहेरील आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे शहर, दौंड, हवेली आणि इंदापूर या भागांमधून एकूण 27 उमेदवार आहेत. तर उर्वरित 26 उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिकच नव्हे तर राज्यभरातील राजकीय लक्ष वेधून घेत आहे. याआधी 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात उमेदवार होते. त्या वेळी 46 जणांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार अर्ज बाद झाले आणि नऊ जणांनी माघार घेतली. त्यामुळे अंतिमतः 23 उमेदवार रिंगणात राहिले होते. मात्र यावेळी सुरुवातीपासूनच उमेदवारांची संख्या जास्त असल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी होत चालल्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत सध्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत आहे. या मुदतीत किती उमेदवार माघार घेतात, यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात एकूण 3 लाख 83 हजार 767 मतदार असून, त्यांच्या मतांवरच अंतिम निकाल ठरणार आहे. त्यामुळे बारामतीची ही पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण करत आहे.
अवकाळीचा कहर ओसरला, पण उन्हाचा तडाखा वाढणार:हवामान विभागाचा इशारा; शेतकऱ्यांना दिलासा की नवा संकट?
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतर आता वातावरणात बदल होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला असून शेतकरी अजूनही सावरलेला नाही. मात्र, बुधवारी म्हणजे 8 एप्रिलपासून हवामानात काहीसा बदल जाणवू लागला आहे. पावसाचा जोर ओसरत असला तरी संपूर्ण दिलासा मिळालेला नाही. भारतीय हवामान विभाग ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात आज पावसाचा कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान राहू शकते. पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात हवामानात स्पष्ट बदल जाणवत आहेत. आर्द्रतेसह उष्णता वाढल्याने वातावरण दमट आणि त्रासदायक होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी सूर्याचा तडाखा तीव्र जाणवत असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेतच आवश्यक कामे उरकावीत, तसेच पाण्याचे प्रमाण वाढवून आरोग्याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्णतेचा धोका वाढत असल्याने सतर्क राहणे आवश्यक हवामान तज्ञांच्या मते, उत्तर भारतात सुरू असलेल्या या घडामोडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये हवामान साफ होण्यास सुरुवात झाली असून, पुढील दोन दिवसांत इतर भागातही सुधारणा होईल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर बिहार, ओडिशा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्येही हलक्या सरी पडू शकतात. एकंदरित, राज्यात अवकाळी संकट ओसरत असले तरी उष्णतेचा धोका वाढत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३० टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित असून, त्यांना तातडीने अर्थसाहाय्य देण्यात यावे, अशी मागणी आझाद फाउंडेशनने केली आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) दोन हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यांत, प्रति वर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेही ही योजना सुरू केली. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत बाळापूर तालुक्यातील ३० टक्के लाभार्थी वंचित असल्याचे आझाद फाउंडेशनने कृषी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार राबवत असलेल्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थींना अनेक तांत्रिक कारणांमुळे अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे आझाद फाउंडेशनने निवेदनात नमूद केले आहे. तालुक्यातील जवळपास ३० टक्के लोकांना सीएम किसान निधी मिळाला नसल्यामुळे याची तात्काळ योग्य ती दखल घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. असे आहेत लाभार्थी : काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ कालावधीतील २२ व्या हप्त्याच्या वितरणाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी रुपये जमा होत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सीमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. लाभ मिळण्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थींना थेट अर्ज करावा लागतो. अशी आहे राज्याची योजना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार रुपये अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थींना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.
कृउबात आठ हजार क्विंटल तुरीची आवक:मंगळवारी सर्वाधिक आवक; शनिवारी मिळाला सर्वाधिक 8270 रुपये दर
जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तुरीचे पीक काढले असून महिनाभरापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक होत आहे. मंगळवारी येथील बाजार समितीत २२०० क्विंटल तुरीची आवक झाली. यात शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८०९५ दर मिळाला. तर सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. गत सहा दिवसात अकोला बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. सोमवारी बाजार समितीत १३०९ क्विंटल तुरीची आवक झाली. शेतकऱ्यांच्या तुरीला क्विंटल मागे सरासरी ८२५५ रुपये दर मिळाला. कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त आठ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीत शनिवारी शेतकऱ्यांनी सुमारे १६७४ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८३५० रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८२७० रुपयांचा दर मिळाला आहे. तर ३ एप्रिल रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी १२४५ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. दरात चढ- उतार शुक्रवारी क्विंटल मागे शेतकऱ्यांना ६५०० ते ८४५५ रुपयांचा दर मिळाला तर सरासरी ८२०० रुपयांचा दर मिळाला आहे. तसेच बुधवारी (दि.१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५८१ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. यावेळी तुरीला कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त ८२३५ रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८१५० रुपयांचा दर मिळाला आहे. तालुका क्षेत्र (हेक्टर) अकोट ५१५० तेल्हारा ६१०० बाळापूर ११४०३ पातूर ५६४० अकोला १०९०० बार्शीटाकळी ९३०० मूर्तिजापूर ११२६९ एकूण ५९,७६२ {गेल्या सहा दिवसात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्यातील तुरीचे एकूण क्षेत्र अधिक पेरणीमुळे आवक सुरू ^बाजार समितीत मंगळवारी २२०० क्विंटल तूर आली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. जिल्ह्यात यावर्षी एकूण क्षेत्राच्या सरासरी ९९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले असून अजूनही बाजार समितीत आवक सुरू आहे. - सुनील मालोकार, सचिव, बाजार समिती, अकोला.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत दिल्याने राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेत ‘जे काम करतील तेच टिकतील’ असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला असून, आगामी काळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात नुकतीच शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यातूनच शिंदेंचा कडक इशारा स्पष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे स्वतः पक्षातील मंत्री, आमदार, खासदार, संपर्क प्रमुख, विभाग प्रमुख तसेच महिला आघाडी आणि जिल्हा-शहर प्रमुखांच्या कामाचा तपशीलवार आढावा घेणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक पदाधिकारी आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे का, याचे परीक्षण करण्यात येणार आहे. पदावर असूनही काम न करणाऱ्यांना हटवले जाईल, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर मोठी हालचाल सुरू झाली आहे. शिंदेंनी पक्षवाढीवर भर देत पुढील तीन वर्षे निवडणुका नसल्याने संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील 43 हजार गावांपर्यंत शिवसेना पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. संपर्क प्रमुखांना केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता इतर जिल्हे आणि लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. त्यांच्या कामाचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे. त्यामुळे पक्षात कामकाजावर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. याचबरोबर ‘फक्त निधीसाठी येणाऱ्यांना दूर ठेवले जाईल’ असा स्पष्ट संदेश देत शिंदेंनी गुणवत्ता महत्त्वाची असल्याचे अधोरेखित केले आहे. पक्षात केवळ सक्रिय आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनाच मोठी पदे दिली जातील, असेही त्यांनी सूचित केले आहे. भाजपच्या कामकाजाच्या पद्धतीप्रमाणेच संघटन उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. मतदार याद्यांवर काम, प्रत्येक बीएलएपर्यंत पोहोचणे आणि भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेसाठी तयारी ठेवणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही मंत्र्यांबाबत शिंदे नाराज दरम्यान, अलीकडील जिल्हा परिषद निवडणुकांतील कामगिरी पाहता काही मंत्र्यांबाबत शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. विशेषतः दोन मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने शिंदेंनी यापूर्वीच फेरबदलाचे संकेत दिले होते. मात्र, त्यावेळी परिस्थिती पाहता निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र पक्षात मोठ्या बदलांची शक्यता अधिक बळावली असून, ‘भाकरी फिरवण्याची’ तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे चित्र दिसत आहे.
मेळघाटमध्ये जलजीवन फसले; आंदोलनानंतर यंत्रणेला साकडे:ठिकठिकाणी आंदोलनानंतर चौकशीची केली मागणी
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासीबहुल मेळघाटमध्ये अनेक विकास कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र यातील काही कामे कागदावरच असून इतर कामांचा दर्जा अगदीच निकृष्ट आहे. त्यामुळे युवक काँग्रेसने हे जलजीवन मिशन मेळघाटात फसल्याचा आरोप केला असून त्यासाठी यंत्रणेला साकडे घातले आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्यामते ‘हर घर-नल से जल’ या पंतप्रधानांच्या नावे सुरु करण्यात आलेली योजना याठिकाणी सपशेल अयशस्वी ठरली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट व गरजधारी येथे पाणी वितरणासाठी एक ते दीड मीटर जलवाहिनी दाखवून त्यावर लाखो रुपये खर्च दर्शविण्यात आला. परंतु वास्तविक पाहता ती पाइपलाइन जमीनीवरच आहे. खोदकाम करुन ती जमीनीच्या आत दाबलीच गेली नाही. याऊलट प्रत्येक गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून मोठाली बिले मात्र काढली गेली. त्याचप्रमाणे मेळघाटमधील जलजीवन मिशन मध्ये जुन्याच जलकुंभांना रंगरंगोटी करुन मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची रक्कम हडप केली गेली. चिखलदरा तालुक्यातील चिलाटी येथील ग्रामीण पुरवठा योजनेंतर्गतची जुनी टाकी २०१२-१३ मध्ये बांधली गेली. ती टाकी पूर्णपणे हालते. एवढेच नव्हे तर तिला गळतीही लागली आहे. त्या टाक़ीची रंगरंगोटी करुन २०२२-२३ मध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण पाणी पुरवठा अजूनही बंदच आहे. सुमिता येथेही असाच प्रकार करण्यात आला असून तेथील खर्चाची उचलही करण्यात आली आहे. सध्यस्थितित तेथील आदिवासी बांधवांना डोक्यावर घागर ठेऊनच पाणी आणावे लागत आहे. रुईपठारला नवीन टाकी बांधली. त्यात डोमीवरून पाईपलाईन टाकून पाणी आणले. परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी नाही. लोकं आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात. डोक्यावर पाणी आणावे लागते. मग नवीन टाकी बांधून उपयोग काय, असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे. कुहीला दोन टाकी आहेत, तरी पाणी पुरवठा होत नाही. लोकांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. सिमोरी येथे टाकी बनविली, तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही. ३ किलोमिटर अंतर चुर्णीच्या रहिवाशांसाठी तीन किलोमीटर अंतरावरुन पाइपलाईन घेतली आहे. आहाड, मेनघाट, ग़रज़धारी आदी गावे जलजीवन मिशन मध्ये असून तेथील जुने जलकुंभ पडण्याच्या मार्गावर आहेत. भुलोरी, बारूगव्हान, चोबिता, हिलड़ा, बोरधा, कोहाना, हतरु, दहेंद्री येथेसुद्धा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. सीईओ सरपंचांशी विषयांवर बोलणार जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याच्या युवक काँग्रेसच्या तक्रारीनुसार सीईओंनी प्रत्येक गावच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी मेळघाटच्या दोन्ही तालुक्यातील बीडीओंना पत्र देण्यात आले असून ही ऑनलाईन बैठक लवकरच घेतली जाणार असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले.
पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती शिकण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच गुजरात राज्याची शैक्षणिक सहल केली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ''स्टॅच्यू ऑफ युनिटी''ला भेट देत विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उत्तुंग कार्याचा आढावा घेतला. तसेच साबरमती आश्रमात महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसेचे धडे गिरवले.या शैक्षणिक सहलीमध्ये ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसा जवळून पाहता यावा, या उद्देशाने या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.केवळ पर्यटन म्हणून नव्हे, तर इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी ही सहल मैलाचा दगड ठरली. याशिवाय अहमदाबाद शहरातील इतर शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांनाही भेटी देण्यात आल्या. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची मोठी सहल आयोजित केल्यामुळे पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून शाळेचे कौतुक होत आहे. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यासक सहलीचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी कौतुक केले. आयोजन गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, उपसभापती सुमती ढोके, नगरसेविका शारदा खोंडे, नगरसेवक संजय गव्हाळे यांचे योगदानातून तसेच उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात पार पडली. मुख्याध्यापक प्रशांत नालसे व शिक्षक शीला डांगे, सीमा शिरभाते, किरण नालिंदे, वैशाली बुटे, हर्षा दिवे, पुष्पा कोरडे, सोनाली चापके, किरण शेंडे, शिरीष फसाटे व पालक यांच्या सहकार्याने करण्यात आले. साबरमतीत गांधीजींच्या विचारांचा वारसा सहलीच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. महात्मा गांधींचे साधे जीवन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान पाहून विद्यार्थी भारावून गेले. चरख्यावर सूत कताईपासून ते मिठाच्या सत्याग्रहापर्यंतच्या घटनांची माहिती देणारी चित्रे आणि वास्तू विद्यार्थ्यांनी आस्थेने पाहिल्या.
विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात मेरिटमध्ये येण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि पालकांचा ठाम पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सेंच्युरी गाठण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे,” असे प्रा. संदीप मुर्तडकर यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या निकालात आदर्श विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रांत मेरिटमध्ये येतील. यासाठी कार्यशाळांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यापासूनच विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही प्रमुख वक्ते प्रा. मुर्तडकर यांनी दिली. शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘मेरिट मेकर प्रोजेक्ट’ अंतर्गत २०२६-२७ साठी आयोजित करण्यात आलेली ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांची विशेष पालक सभा ६ एप्रिल रोजी कृषी भवन येथे उत्साहात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व शाळा समिती सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, शाळा तपासणी अधिकारी व्ही. डब्ल्यू. गावंडे, मेरिट मेकरचे संचालक प्रा. संदीप मुर्तडकर, शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. देशमुख, उपमुख्याध्यापक एस. बी. ठाकरे, शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे, माध्यमिक प्रभारी पी. एम. काळे, जुनिअर कॉलेजचे प्रा. पि. डी. गावंडे, आदर्श स्वयंअर्थसहाय्यित शाळेचे मुख्याध्यापक धनंजय गावंडे, शिक्षकेत्तर प्रतिनिधी प्रदीप भारसाकळे, ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख, पालक शिक्षक समितीचे सदस्य मंगला पातूर्डे, सुरेश सपकाळ यांची मंचावर उपस्थिती होती. प्रमुख अतिथी सुनील गावंडे यांनी आपल्या भाषणात शेतकरी व त्यांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वैयक्तिक पातळीवर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सदैव तत्पर राहू, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून अभ्यासात मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोज देशमुख यांनी केले. संचालन व उपस्थित मान्यवरांचा परिचय शिक्षक गजानन घटाळे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे यांनी केले. लाईव्ह प्रक्षेपणाचे काम नरेश इसळ यांनी पाहिले. एनएमएमएस परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य केशवराव गावंडे यांनी आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी अभिनंदन केले. या यशामध्ये मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिकावृंद यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काळातही अशाच प्रकारे तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करून अधिकाधिक कार्यशाळांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
14 पुरस्कारांचा मानकरी, पण फीसाठी संघर्ष:शैक्षणिक खर्चासाठी विवंचनेत अडकला विहिगावचा सोहम नेसनेसरकर
तालुक्यातील विहिगाव येथील सोहम मोहन नेसनेसकर या अवघ्या सात वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवला आहे. व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक प्राप्त केले. मात्र सोहम, त्याचे कुटुंबीय, आता शैक्षणिक खर्चाच्या विवंचनेत अडकले आहेत. सोहमने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत जपान, मलेशिया, यजमान व्हिएतनामसारख्या बलाढ्य देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सुवर्णपदकावर दावा ठोकला होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सध्या सोहम हा येथील ओम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. भविष्यात सोहमला दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी मदतीचे आवाहन केले आहे. योग्यवेळी सहकार्य मिळाल्यास हा चिमुकला भविष्यात देशाचे नाव आणखी उंचावेल, अशी आशा अनेकांकडून व्यक्त होत आहे. मात्र ती खरी ठरवण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. सोहम वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाभ्यास करत आहे. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याच यशाच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोहमच्या या जागतिक यशाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली उर्वरित. पान ४ आतापर्यंत १४ राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याचा सन्मान महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. ‘अँटी हिरमण फाउंडेशन’ आणि केंद्र सरकारच्या ‘नीती आयोगा’मार्फतही त्याच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. आतापर्यंत सोहमला ‘महाराष्ट्र गौरव’, ‘राष्ट्र गौरव’, ‘क्रीडा शिरोमणी’सह एकूण १४ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
एक्सक्लुझिव्ह:विमानतळावर डीव्हीओआर यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण, अथाॅरिटीकडून परवान्याची प्रतीक्षा
रात्री विमान उतरवताना धावपट्टीचा अचूक अंदाज यावा, विमानापासूनचे अंतर, उंची, दिशा कळावी यासाठी मार्गदर्शक प्रणाली डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज (डीव्हीओआर) बेलोरा विमानतळावर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता रात्री बेलोरा विमानतळावरून विमानोड्डाण तसेच विमान उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी डीजीसीए व भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून मिळणारी परवानगी व परवान्याची प्रतीक्षा आहे. डीव्हीओआर यंत्रणेमुळे रात्री वैमानिकाला विमानाचे लॅण्डींग, टेकऑफ करण्यासाठी संपूर्ण सहकार्य, मार्गदर्शन मिळत असते. जोवर ही यंत्रणा कोणत्याही विमानतळावर उभारली जात नाही. तोवर त्या विमानतळावरून रात्री विमानोड्डाण व विमान उतरवणे शक्य नसते. अमरावती हे विभागाचे मुख्यालय असल्यामुळे येथे दररोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचे, मंत्र्यांचे आगमन होत असते. जिल्ह्यासह शहरातील उद्योजक, नेते, आमदारांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. त्यांनाही वेळ, पैसा, इंधन खर्च करून नागपूरला जावे लागते. अमरावतीला बहुतेक नेते हे खासगी कंपनीच्या विमानाने येतात. सायंकाळ झाली की, या विमानांना विमानतळावरच उभे राहावे लागत होते. कारण, विमानोड्डाण शक्य नव्हते. परिणामी अनेकदा नेत्यांना अमरावतीत मुक्काम करावा लागला आहे. दिशादर्शक लाईट्स बसवण्याचे काम यंत्रणेकडून झाले पूर्ण विमान उतरताना धावपट्टी उंचीवरून व लांबून दिसावी यासाठी बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीवर दिशादर्शक लाईट्स बसवण्यात आले आहेत. लाल, हिरवे, पांढरे असे हे लाईट्स असून त्यांच्या प्रखरतेमुळे ते उंचीवरून तसेच लांबूनही सहज दिसतात. विमानातील रडार व डीव्हीओआर यंत्रणा विमानाला या धावपट्टीचे अंतर, दिशा, उंची याबाबत सतत माहिती देत असते. त्यामुळे हे लाईट्स बसवणे आवश्यक असते. ते धावपट्टीचा नेमका आकार, लांबी कळण्यासाठी सहायक ठरतात.
इथून पुढे ३ वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे उमेदवारीसाठी नाही, मला कोणतेही पद नको त्यामुळे पद मिळावे म्हणूनही नाही, तर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विकास कामे व्हावीत, कार्यकर्त्यांची स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणारी अडवणूक थांबावी यासाठी आपली सर्वांची संमती असेल तर सत्तेसोबत जावे लागेल, अशी साद श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना घातली. यावर कार्यकर्त्यांनी हात उंचावून एकमताने भालके घेतील त्या निर्णयास संमती असल्याचे सांगितले. यानुसार येत्या दि. १२ एप्रिल रोजी भगीरथ भालके यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनीही शिवसेना प्रवेशाचे सूतोवाच केल्याने या दोन्ही नेत्यांचा सेना प्रवेश निश्चित झाला आहे. भगीरथ भालके गटाने काँग्रेस पक्षाला हात दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी भालके यांनी पंढरपूर येथे कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव यांच्यासह मोठ्या संख्येने विविध गावचे सरपंच, आजी, माजी पदाधिकारी, शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या २ वर्षात स्थानिक लोक प्रतिनिधींनी आपल्या ग्रामपंचायतींचा निधी अडवला आहे, त्या गावातील विकास कामे ठप्प केली आहेत, पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो. नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक दिले ^४ महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पंढरपूरच्या नागरिकांनी आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर विश्वास टाकून नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक निवडून दिले. मात्र विकास कामे करण्यासाठी, निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सत्तेसोबत जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे, तसेच लागेल तर मदत करणे, सर्व ताकद पाठीशी उभा करू असा शब्द देतानाच त्यांच्याकडील नगरविकास खात्यामधून विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे. भगीरथ भालके, माजी अध्यक्ष
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीवर मोठा परिणाम झाला. वेळेवर वापसा न मिळाल्याने ज्वारीची पेरणी उशिरा झाली आणि त्यामुळे एकूण लागवड क्षेत्रही घटले. परिणामी, ज्वारीपासून मिळणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाले असून याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. सध्या कडब्याच्या दरांनी उच्चांक गाठला असून प्रति शेकडा सुमारे ३००० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव पोहोचले आहेत. परगाव व इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने दर अधिकच वाढले आहेत. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांना कडबा खरेदी करणे कठीण होत आहे. या परिस्थितीत शेतकरी कडब्याला पर्याय म्हणून मका पिकाचा वापर करत आहेत. हिरवा चारा म्हणून मक्याची लागवड करून, आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने त्याची कुट्टी करून मुरघास (सिलेज) तयार केला जात आहे. सध्या मका २७०० ते २८०० रुपये प्रति टन या दराने उपलब्ध असून, त्यापासून तयार होणारा मुरघास हा स्वस्त आणि पोषक पर्याय ठरत आहे. पशुपालकांच्या मते, मका मुरघासामुळे जनावरांच्या दूध उत्पादनातही वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात कडब्याऐवजी हिरव्या चाऱ्यासाठी मक्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा बाजारात आहे, मात्र त्याची किंमत गगनास भिडलेली आहे. सध्या हिरव्या चाऱ्याचे दर खूप वाढलेले आहेत. हिरव्या चाऱ्याची पेंड ३० ते ३५ रुपये झाली आहे. दूध देणाऱ्या जनावरांसाठी दिवसाला आठ ते दहा पेंड्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. त्यामुळे दिवसाला जवळपास साडेतीनशे रुपये या जनावरांसाठी खर्च करावा लागत आहे. तसेच या जनावरांकडून मिळणारे दुध आणि होणारा खर्च याचा मेळ देखील बसत नाही आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे पशू पालक अत्यंत अडचणीत आला आहे. ^ शेतकरी संपत कुंभार (पांडे) यांनी सांगितले की कडब्याचे दर परवडत नसल्यामुळे आम्ही मका मुरघासाचा पर्याय स्वीकारला असून तो अधिक फायदेशीर ठरत आहे. संपत कुंभार, शेतकरी, पांडे ज्वारीच्या पेरणीमध्ये ६७६३ हेक्टर पेरा कमी ^सन २०२५- २६ या वर्षी प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी कारणाने ज्वारीच्या पेरणीमध्ये सुमारे ६७६३ हेक्टर पेरा कमी झाला आहे. गुरांना चाऱ्यासाठी ज्वारीच्या पिकांपासून मिळणारा कडबा अत्यंत महागलेला आहे. त्यामुळे शेतकरी मक्याच्या मुरघासाकडे वळाला आहे. दत्तात्रय गायकवाड, उप.तालुका कृषी अधिकारी, करमाळा कडब्याचे दर परवडत नाही
मध्य शहरात पाणीपुरवठा विस्कळीत:40 वर्षे जुन्या जलवाहिनीला गळती; उपनगरात निर्जळी, अमृत'ने तारले
अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४० वर्षे जुन्या ११०० एमएम व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला नांदगाव शिवारात मंगळवारी सकाळी मोठी गळती लागल्याने काल उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. महापालिकेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा पाणी उपसा सुरू केला. सुमारे दहा ते बारा तास पाणी उपसा बंद राहिल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, अमृत योजनेतील नव्या जलवाहिनीमुळे शहराच्या उर्वरित भागात नियमित पाणीपुरवठा करण्यात आला. नांदगाव शिवारातील देवनदीजवळ जाधव यांच्या शेतामध्ये हवेच्या आणि पाण्याच्या दाबाने जलवाहिनीच्या जॉईंटला गळती लागली. यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने मुळानगर येथून होणारा पाणी उपसा तातडीने थांबवण्यात आला. त्यामुळे पाणी वितरण व्यवस्थेच्या टाक्या निर्धारित वेळेत पूर्ण क्षमतेने भरता आल्या नाहीत. परिणामी, बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील पाईप लाईन रोड, ढवणवस्ती परिसर आणि वैदूवाडी या भागास पाणी पुरवठा होऊ शकला नाही. या भागाला आज (बुधवारी) पाणी दिले जाणार आहे. महापालिकेने मंगळवारी सायंकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण केले. पाणी वितरणाच्या टाक्या भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, दहा तासांपेक्षा अधिक काळ उपसा बंद राहिल्याने, आज शहर व उपनगरात उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. शहरातील या भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत आज रोटेशननुसार पाणीवाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात पाणीपुरवठा विस्कळीत राहील.
उन्हापासून बचावासाठी गरजुंना वाटल्या टोप्या:स्नेहबंध सोशल फाउंडेशनचा शहरामध्ये उपक्रम
यंदा मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक असते. गोरगरीब, रस्त्यावर कचरा वेचणाऱ्यांचे उन्हापासून आपले संरक्षण करता यावे म्हणून यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शहराच्या विविध भागात गरीब नागरिकांना टोप्या वाटप केल्या. या उपक्रमातून स्नेहबंधने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. शहरातील सावेडी, सिव्हिल हॉस्पिटल, दिल्लीगेट, माळीवाडा, स्वस्तिक चौक, मार्केट यार्ड, आनंदधाम, स्टेशन रोड परिसरात उन्हात फिरणाऱ्या गरीबांना टोप्या देण्यात आल्या. यावेळी माजी प्राचार्य एकनाथ जगताप, प्रतिक डहाळे, स्वयंम बास्कर, प्रथमेश राठोड आदी उपस्थित होते. डोक्यावर संरक्षणासाठी अनपेक्षितपणे टोपी मिळाल्याने नागरिकांनी हात जोडून स्नेहबंधचे आभार मानले. उन्हापासून बचाव होण्यासाठी टोपी वापरावी, शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
समाजातील अगतिकता आणि असुरक्षिततेचा फायदा घेऊन भोंदू बाबा स्वतःचे साम्राज्य उभे करतात. सध्या गाजत असलेल्या खरात' प्रकरणाने या विकृतीचा पर्दाफाश केला असला, तरी अशा घटना रोखण्यासाठी पत्रकारांनी केवळ वार्तांकन न करता समाज शिक्षक' म्हणून भूमिका बजावणे काळाची गरज आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे यांनी केले. अहिल्यानगरमधील पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या पत्रकार कट्टा' या उपक्रमाच्या दुसऱ्या अंकात समाजातील अंधश्रद्धा अन् माध्यमांतील वार्तांकन' या विषयावर ते बोलत होते. सीएसआरडी' संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर सीएसआरडीचे वरिष्ठ प्रा. डॉ. सुरेश मुगुटमल उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. गोराणे म्हणाले की, खरातच्या करामतींमागे समाजाची विस्मरणाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या बाजारातील काळा बाजार आहे, अशा शब्दांत त्यांनी बुवाबाजीवर प्रहार केला. खरात प्रकरणात एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू असला, तरी भविष्यात असे 'खरात' निर्माण होऊ नयेत यासाठी माध्यमांनी विवेकपूर्ण लेखनाची कास धरावी, असा संदेश त्यांनी दिला. सूर्यकांत नेटके यांनी आभार मानले. कार्यक्रमात डॉ. गोराणे यांनी स्पष्ट केले की, देवदासींसारख्या अनिष्ट प्रथा केवळ पत्रकारांच्या जागरूकतेमुळेच बंद झाल्या. खरातसारख्या प्रकरणांमध्ये जेव्हा लैंगिक किंवा आर्थिक शोषण होते, तेव्हा पत्रकारांनी पुराव्यांसह आणि कायद्याच्या चौकटीत राहून सडेतोड लिहायला हवे. शिक्षणातून केवळ पदव्या न मिळवता वैज्ञानिक दृष्टी विकसित होत आहे का, याचे निरीक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ज्या भाषेला अनेकजण कठीण मानतात, त्याच संस्कृत भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून सलग १७ वर्षे दहावीचा निकाल शंभर टक्के लावणाऱ्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील (महात्मा फुले कृषी विद्यापीठ) शिक्षिका गौरी बळवंत कुलकर्णी या सेवानिवृत्त झाल्या. निवृत्तीच्या या क्षणी आपल्या गुरुजनांचे स्मरण करत त्यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी धनादेश सुपूर्द करून 'शिक्षक' कधीच निवृत्त होत नाही, हे आपल्या दातृत्वातून सिद्ध केले. प्राचार्य अरुण तुपविहीरे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात निरोप समारंभ झाला. या सोहळ्यात जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यापीठ शाखेच्या व्यवस्थापक शोभा पाटोळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, प्राचार्य योगिता आठरे, पत्रकार अनिल देशपांडे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, प्रा. जितेंद्र मेटकर, बाबासाहेब शेलार, के.के. पवार, संतोष जाधव, मनीषा कदम आणि पर्यवेक्षक मनोज बावा यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवर म्हणाले, गौरी कुलकर्णी यांनी केवळ संस्कृत व्याकरण शिकवले नाही, तर त्या भाषेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले. सातत्याने संस्कृत विषयाचा इयत्ता दहावीचा निकाल खूपच चांगला लागला.संस्कृत भाषेची चांगली सेवा घडली. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, माझ्या शिक्षकांनी- रुपाली कापरे, विमल लेले आणि चंद्रशेखर गोस्वामी सरांनी मला या विषयाची गोडी लावली, तीच मी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याच कृतज्ञतेतून त्यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. सूत्रसंचालन संगिता नलगे यांनी केले.
आजचे युग डिजिटल असले तरी अनेकवेळा तांत्रिक गुंतागुंत सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरते. अशाच एका तांत्रिक अडचणीमुळे हतबल झालेल्या वृद्ध महिलेसाठी केडगाव टपाल कार्यालयाचे पोस्टमन सुनील जाधव देवदूतासारखे धावून आले. केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील नागरिक म्हणून त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका वृद्धेचे रखडलेले काम मार्गी लागले. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जात असताना पोस्टमन जाधव यांना टपाल कार्यालय परिसरात एक वृद्ध महिला उन्हात थकलेल्या अवस्थेत बसलेली दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर हतबलता आणि चिंता जाणवत होती. जाधव यांनी जवळ जाऊन आस्थेने विचारपूस केली असता, संबंधित महिलेचे बँक खाते तांत्रिक कारणामुळे केवायसी बंद असल्याचे समजले. कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, हे न समजल्याने त्या अनेक दिवसांपासून त्रस्त होत्या.जाधव यांनी आजींच्या आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक) कार्डची तपासणी केली, आवश्यक कागदपत्रे जुळवून दिली आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. एवढेच नाही, तर डिजिटल व्यवहार सोप्या भाषेत कसे करावेत, याबाबतही त्यांना सांगितले. काम पूर्ण होताच त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. हातातील कामाचा पेच सुटल्याने त्यांनी भरल्या डोळ्यांनी जाधव यांना दिलेले आशीर्वाद कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानाच्या काळात नियम महत्त्वाचे आहेतच, पण एखाद्याची असहाय्यता पाहून त्याला मदतीचा हात देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, असे पोस्टमन सुनील जाधव म्हणाले.
इंग्रजी माध्यमाच्या झगमगाटाकडे वळलेली पालकांची पावले आता पुन्हा मायबोली मराठी आणि जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागली आहेत. श्रीरामपूर तालुक्यात शिक्षण विभागाने घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे यंदा १ एप्रिल रोजीच इयत्ता पहिलीमध्ये ७८५ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला असून, विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचे वर्गही सुरू झाले आहेत. तालुक्यातील शिक्षण विभागाने १ एप्रिलपूर्वीच नियोजनबद्ध सर्वेक्षण केले होते. गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे प्रबोधन केले.तालुक्यात इयत्ता पहिलीमध्ये पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेतला. या सर्वेक्षणातून तालुक्यात एकूण १ हजार ४३२ विद्यार्थी पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र असल्याचे समोर आले. पालकांच्या भेटी घेऊन मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. ग्रामीण भागात ६८३, तर नगरपालिका क्षेत्रात १०२ अशा एकूण ७८५ विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला. निमगाव खैरी (११२), टाकळीभान (१०७) आणि पढेगाव (१०२) या केंद्रांनी प्रवेशात बाजी मारली आहे. शिक्षक आणि पालकांच्या समन्वयामुळे मराठी शाळांचे अस्तित्व पुन्हा उजळले आहे. १ एप्रिलपासून वर्ग सुरू करण्याचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, यांनी सांगितले. पालकांची बदलती मानसिकता कोरोना काळानंतर मराठी शाळांकडे पालकांचा कल लक्षणीय वाढला आहे. केवळ पाचवी किंवा आठवीतच नव्हे, तर आता पहिलीपासूनच पालक मराठी माध्यमाला पसंती देत आहेत. विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी पालक पुन्हा जिल्हा परिषद शाळांवर विश्वास दाखवत असल्याचे चित्र आहे. स्वागत आणि नवा उत्साह १५ जूनची वाट न पाहता १ एप्रिललाच शाळा सुरू करण्याचा हा प्रयोग राज्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. कुठे ढोल-ताशांच्या गजरात, तर कुठे शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आपले असे जंगी स्वागत पाहून चिमुरडेही भारावून गेले होते.
शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सारसनगर, भवानीनगर, विनायकनगर आणि बुरुडगाव रोड परिसरात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. वारंवार तक्रारी करूनही चोरटे गजाआड होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, चोरी रोखण्यात अपयशी ठरलेले कोतवालीचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी प्रेरणा प्रतिष्ठानचे वैभव ढाकणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन दिले. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानने यापूर्वीही कोतवाली पोलिस स्टेशनला चोऱ्यांच्या वाढत्या घटनांबाबत निवेदने दिली आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. अद्याप एकही चोर पकडला न गेल्याने पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक चोरट्यांना पाठीशी घालत आहे की काय? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रेरणा प्रतिष्ठानचे पदाधिकारी वैभव ढाकणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या निष्क्रियतेमुळेच या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांची बदली करून त्या ठिकाणी एखाद्या सक्षम आणि कामाप्रती तत्पर असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करून नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा. पोलिस प्रशासनाने तातडीने चोऱ्यांच्या घटना थांबवण्यासाठी ठोस आणि शाश्वत उपाययोजना न केल्यास, प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील नागरिकांसह तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मंगेश खताळ, मळू गाडळकर, अमित औसरकर व सनी कांबळे उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील श्री काळभैरवनाथ महाराजांच्या यात्रेचा समारोप पारंपरिक जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने झाला. लाल मातीच्या आखाड्यात अनेक कुस्ती पट्टू मल्लांनी आपले कौशल्य, डावपेच आणि मर्दानी जोर दाखवत उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.दिवसेंदिवस लाल मातीतील कुस्ती कमी होत असताना,अशा यात्रांच्या माध्यमातून या प्राचीन खेळाला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र दिसले. कुस्ती आखाड्यात शिंगोरीचा १६ वर्षीय हर्षद केशव चेमटे विशेष आकर्षण ठरला. त्याने आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या राघूहिवरे येथील २० वर्षीय प्रताप कुऱ्हे याला अवघ्या काही मिनिटांत खांद्यावर उचलून घेत चितपट केले. हर्षदच्या या 'अचूक डावा'वर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शिरसाटवाडी ग्रामस्थांच्या प्रयत्नाने ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव न राहता,सांस्कृतिक आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनाचे केंद्र बनली आहे.अशा पारंपरिक आखाड्यांमुळे मातीतील कुस्तीचा वारसा जिवंत राहण्यास मदत होत आहे.यावर्षीच्या यात्रेत लाखो रुपयांच्या बक्षिसांसह विविध वयोगटातील कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या.लहान बालकांपासून ५८ वर्षीय वृद्धांपर्यंत पैलवानांनी आखाड्यात उतरून प्रेक्षकांना रोमांचित केले. शेवटची कुस्ती शिरसाटवाडी गावचा सुपुत्र ओम शिरसाट यांच्यात आणि कृष्णा पवार (ढोरजळगाव) मात्र बरोबरीत सोडण्यात आली.ग्रामस्थांनी या खेळाला यात्रेत महत्त्वाचे स्थान दिले असून, विजेत्या पैलवानांना देवस्थान ट्रस्टतर्फे रोख पारितोषिके देण्यात आली. कुस्तीचे पंच म्हणून शहादेव शिरसाट, संजय शिरसाट, प्रा.सचिन शिरसाट आणि प्रा. अजय शिरसाट यांनी काम पाहिले. यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी सदस्य सुभेदार गोरक्ष शिरसाट,मेजर भानुदास शिरसाट,मेजर किशोर शिरसाट,भीमराज शिरसाट,मेजर बाबू कुटे,संजय शिरसाट, रामनाथ खाडे तसेच देवस्थानचे अध्यक्ष गोरक्ष मामू शिरसाट,जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती अर्जुन शिरसाट,जनार्दन शिरसाट,अनंत कराड,भाऊसाहेब शिरसाट आदींनी विशेष प्रयत्न केले.
नाशिकच्या सिन्नरमध्ये पार पडलेल्या ७३ व्या राज्य निवड चाचणी व अजिंक्यपद पुरुष कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगरच्या संघाने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. सलग तीन वेळा हुलकावणी देणाऱ्या अजिंक्यपदाला अखेर यंदा नगरच्या वाघांनी गवसणी घातली. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या तगड्या संघाचा ४४-३३ अशा गुणांच्या फरकाने पराभव करत अहिल्यानगरने मानाची ट्रॉफी उंचावली आहे. अहिल्यानगरच्या संघाने या स्पर्धेत पाचव्यांदा अंतिम फेरीत मजल मारून एक नवा इतिहास रचला. सिन्नर (नाशिक) येथे २ ते ६ दरम्यान आयोजित ७३ व्या राज्य निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेत नगरच्या संघाने साखळी सामन्यात गटातील सर्व सामने जिंगत बादफेरीत प्रवेश मिळवला होता. बादफेरीत ठाणे, रायगडला हरवून अंतिम सामन्यात धडक मारली होती. साखळी सामन्यांपासूनच संघाने आपला दरारा कायम राखला होता. बाद फेरीत ठाणे आणि रायगड सारख्या दिग्गज संघांना लोळवत नगरने अंतिम फेरीत धडक मारली. कोल्हापूरविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चढाईपासूनच नगरच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर पकड मिळवली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या यशाबद्दल जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, प्रकाश बोरूडे, संतोष घोरपडे, विनायक भुतकर आदींनी संघाचे अभिनंदन केले आहे. अहिल्यानगरचे हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार संघाच्या या ऐतिहासिक विजयात डावी चढाईपटू आदित्य शिंदे, शिवम पटारे, उजवा कोपरा रक्षक शंकर गदई आणि डावा मध्य रक्षक अजित पवार यांनी अष्टपैलू खेळ केला. ठाण्याविरुद्ध ६०-२६ आणि रायगडविरुद्ध ५३-२७ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून नगरने आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. माजी क्रीडा अधिकारी अजय पवार आणि प्रशिक्षक शंतनू पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केले.
येथील श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मंगळवारी (दि. ७) जागतिक होमिओपॅथी सप्ताह आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत चांदवड शहरातून भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. नेमिनाथ संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक नंदकिशोर ब्रम्हेचा, डॉ. सुनिलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा आदींच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी काढण्यात आली. महाविद्यालय परिसरातून सुरू झालेली ही रॅली चिंचबन, संत गाडगे महाराज चौक, श्री नेमिनाथ जैन संस्था परिसर मार्गे पुन्हा महाविद्यालयात विसर्जित झाली. यामध्ये तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. अजय डहाड यांनी यावेळी सुरक्षित औषध, अचूक उपचार, होमिओपॅथीच खरी आरोग्याची साथ असल्याचा संदेश दिला. या रॅलीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांना सरबत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ. संगीता दोशी व डॉ. अमित जगझाप यांनी नियोजन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी फलक आणि बॅनरद्वारे विविध आजारांविषयी जनजागृती केली. होमिओपॅथी उपचारांचे लाभ, कर्करोग, मधुमेह, व्यसनाधीनता यासह सकस आहार, व्यायाम व दिनचर्येचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर करण्यात आली. मूळापासून आजार बरा, होमिओपॅथीचा मार्ग स्वीकारा, आरोग्यम् धनसंपदा, माझे आरोग्य, माझा हक्क, अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही डिजिटल पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली.
कळवण शहरातील मेनरोडवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी (दि.७) पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली; मात्र व्यावसायिकांनी नोटीस न देता कारवाई केल्याचा आक्षेप घेत घेराव घातल्याने मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली. मोजणी करून हद्द निश्चित केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. मेनरोडवर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११ नंतर शिवस्मारक परिसरापासून कारवाई सुरू झाली. पुढे जितेंद्र ज्वेलर्ससमोर कारवाई होताच व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत हरकत घेतली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. काही बांधकामे शंभर वर्षांपासून अस्तित्वात असून ती पक्की आहेत. महसूल विभाग व पोलिस ठाण्याच्या भिंतीची हद्द समान असताना अतिक्रमण म्हणून कारवाई कशी, असा सवाल त्यांनी केला. तसेच रस्त्याची मोजणी टपऱ्यांच्या पुढील बाजूपासून केल्याचा आरोप करत आधी अचूक मोजणी करूनच कारवाई करावी, अशी मागणी केली. चर्चेनंतर मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली. यावेळी प्रल्हाद शिवदे, जितेंद्र विसपुते, गणेश कोठावदे, राजू मेणे, अनिल पवार, फिरोज शहा आदी व्यापारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक व्यापारी व मालमत्ताधारक यांच्या सांगण्यानुसार त्यांची हद्द रस्त्यापर्यंत आहे. त्यामुळे कार्यालयामार्फत भूमी अभिलेख कार्यालयाशी पत्रव्यहार करून मोजणी करण्यात येणार आहे. मोजणीनंतर अतिक्रमण मोहीम राबविली जाईल. - जे. एम. वाघ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम आमच्या मालमत्ता जुन्या आहेत. आम्ही अतिक्रमण केलेले नाही. रस्त्याचे करताना संबंधित एजन्सीने रस्त्याचा मध्य काढलेला नाही. फक्त काम करताना कोणाचा विरोध होऊ नये म्हणून काम करून घेतले आहे. बांधकाम विभागाने मोजणी नकाशाप्रमाणे हद्द दाखवावी आम्ही अतिक्रमण काढून घेऊ. - प्रल्हाद शिवदे, स्थानिक मालमत्ताधारक. अतिक्रमण मोहीम राबवू
मंगरूळ फाट्यावर बूच पांगारा फुलला आहे. लाल-भगव्या मखमली फुलांनी झाड सजले आहे. पळस आणि पांगारा भावकीची झाडे आहेत. आधी पळस लाल भडक रंगात फुलतो. या फुलांना सुगंध नाही. निसर्गाने ही उणीव रंगात, मकरंदात भरून काढली आहे. हा बूच पांगारा सुमारे २८ प्रजातींच्या पक्ष्यांना मकरंद पुरवतो. शिंजीर, जांभळा शिंजीर, शृंगराज, राखी वटवट्या, रानभाई, रान चिमणी, तांबट, कवड्या सुतार, पळस मैना, कुंटुक, लालबुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल, हळद्या, जंगली मैना, भांग पाडी मैना, किर पोपट यांचा यात समावेश आहे. किर पोपट, रान चिमणी या फुलांच्या पाकळ्या आवडीने खातात. गाय कावळा, कुंटुक, काळटोप कस्तूर, कवड्या सुतार हे पक्षी काटेरी फांद्या घरटी बांधण्यासाठी वापरतात. मंगरूळ फाट्यावर लालभडक रंगात फुललेला बूच पांगारा. झुडुपवर्गीय झाड देते शीतल सावली पूर्वी बारी समाजबांधव पांगाऱ्याची दुसरी प्रजाती असलेल्या पांगाऱ्याची पानं मळ्यात लावगड करत. पानवेल त्यावर चढवली जात असे. हे झुडुपवर्गीय झाड थंड, शीतल सावली देते. चैत्राच्या उन्हात हा वृक्ष पाखरं, फुलपाखरं, मधमाशा यांना मध, मकरंद पुरवतो. वसंताच्या, चैताच्या अखेरीला सकाळी सकाळी उगवता सूर्य काटेरी फांद्यांत अडकला आहे असे भासते.
सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा जि.प. शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून एकच शिक्षक आहे. तेही कधी तरी येतात. कधी शाळेचे हुशार विद्यार्थी, तर कधी त्या शिक्षकांच्या कारचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने त्रस्त ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी १ वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चिंचखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. शिक्षक वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, शाळेत कार्यरत असलेल्या बदर या शिक्षकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वाहनाचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा पाढा काही विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यासमोर वाचला. शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शालेय ^चिंचखेडा शाळेतील प्रकाराबाबत शालेय समितीची तक्रार आली आहे. मात्र दोन्ही शिक्षकांचा अपघात झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकशी करून कार्यवाही करू. - गटशिक्षणाधिकारी रमेश ठाकूर, सिल्लोड ६ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांनाच शिक्षक बनून वर्ग चालवावा लागला. नियुक्त असलेले शिक्षक कधी येतात, तर कधी नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत वाणी यांनी सांगितले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत वाणी यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी रमेश ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांनीच शिक्षक बनून वर्ग चालवला चौकशी करून कार्यवाही करणार
सिल्लोड शेंदूर टोप मिरवणुकीने ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली. दुपारी १२:३० वाजता मिरवणुकीचे आगमन श्री म्हसोबा महाराज मंदिरात झाले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात भव्य अभिषेक पार पडला. चार-पाच वर्षांतील गर्दीचा रेकॉर्ड यंदा तुटला. पहिल्या दिवशी दिवसभरात दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी महिषासुराचे दर्शन घेतले. मंगळवारी पहाटेपासून भाविकांची मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक भाविकांनी आपले नवस फेडले. सकाळपासून भाविकांचे अभिषेक सुरू झाले. दुपारी नवसाच्या बारा गाड्या ओढून लहान मुलांचे नवस फेडताना भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोकळ्या जागेवर तगतराव व बारा गाड्यांचा कार्यक्रम झाला. रात्री दहा वाजता दशावतारी संघांचा कार्यक्रम झाला, तर बुधवारी पहाटे चार वाजता श्री म्हसोबा महाराजांची स्वारी निघते. बुधवारी कुस्त्या होणार आहे. सिल्लोड येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त झालेली भाविकांची मोठी गर्दी.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा कमंगर येथे दरवर्षीप्रमाणे भरवण्यात येणाऱ्या मांगीरबाबा यात्रेला भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. रविवारी मध्यरात्री यात्रेची सुरुवात होताच परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (७ एप्रिल) हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जवळपास अडीच ते तीन लाख भाविकांनी हजेरी लावली. कडक उन्हाची पर्वा न करता ‘मांगीरबाबा की जय’च्या जयघोषात भाविकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पहाटेपासूनच नवस फेडण्यासाठी आलेले महिला-पुरुष अनवाणी पायाने मंदिराकडे जाताना दिसून आले. ढोल-ताशांच्या गजरात, रेवड्यांची उधळण करत आणि पारंपरिक वेशभूषेत भक्तांनी दर्शन घेतले. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. प्रशासनाचा चोख बंदोबस्त यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्यासह करमाड पोलिस व वाहतूक शाखेच्या पथकाने कडेकोट व्यवस्था केली आहे. वाढत्या उन्हाचा फटका; तरीही भक्तांची होती उपस्थिती भाविकांनी दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नवस फेडले : यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नवस फेडण्याची परंपरा पार पडली. मंगळवारी ९५० बोकड आणि ४१८ कोंबड्यांचा बळी देऊन भाविकांनी आपला नवस फेडला. २०१९ या वर्षापासून बंद करण्यात आलेली गळटोचणी प्रथा यंदाही पूर्णपणे बंद राहिली असली तरी बोकड व कोंबड्यांच्या बळीची परंपरा मात्र कायम असल्याचे दिसून आले. १९९९ नंतर शेंद्रा एमआयडीसीमुळे परिसरात झपाट्याने शहरीकरण झाले आहे. यामुळे पूर्वी असलेली झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून सावलीअभावी भाविकांना उन्हात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नवस फेडण्यासाठी मोकळी जागा कमी पडत असल्याने भाविकांना दूरवर जावे लागत असल्याचे चित्र आहे. {या वर्षी वाढत्या तापमानाचा काही प्रमाणात परिणाम भाविकांच्या संख्येवर झाल्याचे चित्र दिसले. सोमवारी उन्हाच्या तीव्रतेमुळे तुलनेने कमी गर्दी होती. मात्र मंगळवारी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या. {कपाळावर मळवट, हातात कट्यार आणि मुखी बाबांचा जयघोष करत अनेक भाविक जालना महामार्गापासून अर्धा किलोमीटर अंतर चालत मंदिरात पोहोचले. कडक उन्हापासून बचावासाठी काहींनी झाडांचा आसरा घेतला, तर सामाजिक संस्थांकडून शिरा, खिचडीचे वाटप करण्यात आले.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सततच्या पाठपुराव्याने सुरू झाले आहे. तब्बल २९ कोटींहून अधिक निधीतून पहिल्या टप्प्यात उद्यान सुरू झाले आहे. दररोज पाचशेहून अधिक पर्यटक उद्यानाला भेट देत आहेत. बुधवार, दि. ८ एप्रिल रोजी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी येथील संतपीठ येथे कालवा समितीच्या बैठकीसाठी येत आहेत. ते उद्यानाचीही पाहणी करणार आहेत. उद्यानाच्या इतर कामांसाठी तब्बल १०९ कोटींचे टेंडर होणार आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने त्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी १९७५ मध्ये या उद्यानाचे भूमिपूजन झाले. १९८६ पासून ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. सुमारे ३१० हेक्टर क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात काश्मीरमधील निशांत-शालीमार बागांप्रमाणे फलोद्यान आहे. हरियाणातील पिंजोर गार्डनच्या धर्तीवरील रचना आहे. म्हैसूरच्या वृंदावन गार्डनसारखे रंगीत कारंजे आहेत. सूरतालावर आधारित म्युझिकल फाउंटन हेही प्रमुख आकर्षण आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान जागतिक दर्जाचे करुन येथे जगभरातील पर्यटक येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नव्याने अनेक कामे उद्यानात होणार आहेत. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. -विलास भुमरे, आमदार पैठण उद्यानाच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे १०९ कोटी रुपयांच्या विविध कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याचे उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, रमेश शेळके, पवन लोहिया, रमेश लिंबोरे, बाळू आहेर, बजरंग काळे यांनी सांगितले. दरम्यान, उद्यानातील पाच एकरमध्ये अॅडव्हेंचर पार्क उभारण्यात आले आहे. मात्र हे काम निकृष्ट झाले असून अद्याप हा पार्क पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नाही. भव्य प्रवेशद्वार, विठुरायाची आकर्षक मूर्ती, सेंट्रल गार्डन- लेझर शो, संगीतमय कारंजे, किड्स प्ले एरिया आणि गेम झोन, ॲक्वा स्केपिंग रोझ गार्डन, टुरिस्ट हाऊस-सेंट्रल व्हिस्टा, वॉटर वे, सोबतच लॅण्डस्केप गार्डन, मिनी ट्रेन-जांभूळवनाचे सुशोभीकरण-उद्यानाजवळ च बोटिंग सुविधा-मनोरंजन झोन-नाथसागर आणि परिसराचा विकास-भव्य वाहन पार्किंग आदी विकासकामे होणार आहेत. दरम्यान, उद्यान सुरू झाल्याने येथे राज्यभरातून व छत्रपती संभाजीनगरातून पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
पेपर देऊन घरी परतणाऱ्या बहीण-भावाचा अंत:परभणी-सेनगाव मार्गावर काळाचा घाला, वटकळी गावावर शोककळा
आई बाबा माझी परीक्षा झाली दादा सोबत घरी येण्यासाठी परभणीहून निघाले आहे दोन तासात घरी पोहोचू असा संदेश देणाऱ्या शितल आणि तिचा भाऊ राम यांचा मृतदेह सायंकाळी घरी पोहोचला. या अपघातामुळे वटकळी गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी ता 7 रात्री दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे महादेव व्यवहारे यांचे एकमेव घर गावात आहे. व्यवहारे यांना पत्नी चार मुली व दोन मुले असा परिवार आहे. गावात असलेल्या सुमारे 40 एकर शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. महादेव व्यवहारे यांची पत्नी तसेच मुलगा राम हे शेती करतात. दोन मुलींचे लग्न झाले असून शितल ही परभणी येथे बीटेक च्या अभ्यासक्रमाला होती. बी टेक च्या द्वितीय वर्षाचा शेवटचा पेपर सोमवारी तारीख सहा संपला. त्यानंतर शितल व तिचा भाऊ राम दोघेही परभणी येथे बहिणीकडे मुक्कामी थांबले. आज सकाळी बहिणीकडे दोघांनी नाश्ता केला. वटकळी हे गाव जिंतूर, येलदरी मार्गे सेनगांव येथून जवळ आहे. त्यामुळे सकाळी नाश्ता झाल्यानंतर शितल व राम यांनी वटकळी येथे आई-वडिलांशी संपर्क केला. आम्ही दोघेही दुचाकी वाहनावर निघालो असून अवघ्या दोन तासात गावात पोहोचतो असे त्यांनी सांगितले. मुलगी व मुलगा दोघेही घरी येणार असल्यामुळे आज व्यवहारे दांपत्य शेतात गेलेच नाही. सकाळी निघालेले बहिण भाऊ अकरा वाजेपर्यंत आली नसल्यामुळे त्यांना चिंता लागली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या अपघाताची वार्ता घरी पोहोचली. दोघेही बहिण भाऊ ठार झाल्याची माहिती सुरुवातीला त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलीच नाही. मात्र जसजशी वेळ होत गेली तसतसे व्यवहारे कुटुंबामध्ये चलबिचल सुरू झाली. सायंकाळी दोगाही बहिण भावाचे मृतदेह पोहोचल्यानंतर व्यवहारी कुटुंबाने टाहो फोडला. अतिशय मनमिळावू असलेल्या व्यवहारे कुटुंबाच्या दुःखात गावकरी सहभागी झाले. गावात एकही नातेवाईक नसलेल्या व्यवहारे कुटुंबाला गावकऱ्यांनीच सावरले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर श्लोक कडा पसरली असून गावामध्ये चुलही पेटली नाही.दरम्यान मंगळवारी ता .7 रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंन्नास वर्षातील पहिलाच अपघात- भारत शिंदे वटकळी मागील पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये गावातील एकाही व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला नाही. पहिल्याच झालेल्या या अपघाती मृत्यूमध्ये नियतीने बहीण भावाला हिरावून घेतल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातामुळे गावात चुलही पेटली नाही
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट शेती क्षेत्राला बसू लागला असून प्लास्टिकसह शेतीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सिल्लोड तालुक्यातील केळगाव-आमठाणा परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून मिरची लागवडीच्या सुरुवातीलाच खर्चाचा मोठा बोजा वाढला आहे. युद्धामुळे उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी पीव्हीसी पाइप, मल्चिंग पेपर यांसारख्या साहित्यांच्या दरात तब्बल ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ठिबक सिंचन संचाच्या किमतीतही ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाली असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ठिबक सिंचनासाठी प्रतिएकर सुमारे ५ ते ६ हजार रुपयांची अतिरिक्त वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी सुमारे १३०० रुपयांना मिळणारा मल्चिंग पेपर आता थेट १८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खतांच्या दरातही सातत्याने वाढ होत असल्याने लागवडीचा एकूण खर्च प्रचंड वाढला आहे. दरवाढीचा परिणाम बाजारावरही दिसून येत असून अनेक शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी पुढे ढकलली आहे. त्यामुळे कृषी साहित्य विक्रेत्यांनाही फटका बसत असून बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिसरात मिरची लागवडीला सुरुवात झाली असली तरी वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. उत्पादन खर्च वाढल्यामुळे भविष्यात मिरचीच्या बाजारभावावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांची मागणी दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्लास्टिक साहित्य व खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवावे, तसेच ठिबक सिंचन व इतर साहित्यावर अनुदान वाढवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरवाढीमुळे खरेदी कमी झाली, लागवड कमी होणार सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे प्लॅस्टिक व इतर कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पीव्हीसी पाईप, मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन साहित्य महाग झाले असून शेतकऱ्यांवर खर्चाचा मोठा बोजा पडत आहे. दरवाढीमुळे खरेदी कमी झाली असून बाजारात मंदीचे वातावरण आहे. -कृष्णा सोमासे, विक्रेता, आमठाणा
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे कृषी अवजारे केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या महापुरुषांच्याअवैध पुतळे निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणीमुख्य सूत्रधार बाळराजे आवारे याला अटक करण्यात आली असून,त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणातील कारखान्याचा व्यवस्थापक आणि कायदेशीर सल्लागारालाही ताब्यात घेतले आहे. प्रशासनाने कारखाना सील केला आहे. संभाजी आघाव (२६ रा. महाकाळा) व ॲड. पंडीत उर्फ प्रणित डिकळे(वय ३०,रा.तांदुळवाडी, परांडा) यांना ताब्यातघेतले. महाकाळा येथील बाळराजे रामरावआवारे पाटील (वय ३७) याने २०२३ मध्येचुर्मापुरी येथे कृषी अवजारे सेवा केंद्र सुरू केले होते. मात्र, डिसेंबर २०२५ पासूनया केंद्रात शेती अवजारांऐवजीमुंबईतून फायबर मागवून या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे तयार केले जात होते.तसेच काही पुतळे छत्रपती संभाजीनगरयेथील चिकलठाण्यातील एकाकारखान्यातूनही मागविले जात. आवारेयाचा हा कारखाना बंद करण्याचेआदेश उपविभागीय अधिकारी उमाकांतपारधी यांनी अंबडच्या तहसीलदारांनादिले आहेत. एका पुतळ्याला ७० किलोफायबर लागत होते. कमी किमतीततयार होणारा पुतळा जास्त रकमेतविकला जात होता. उत्तर प्रदेशातील कामगार या कारखान्याचे व्यवस्थापन पाहण्यासाठी आवारे याने संभाजी शिवाजी आघाव याची नियुक्ती केली होती, तर कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी ॲड. पंडित उर्फ प्रणित डिकळे हा वकील म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे, पुतळे घडवण्यासाठी उत्तर प्रदेशातील १६ कामगारांची फौजया ठिकाणी तैनात होती. कारखान्यातून आतापर्यंत विविध जिल्ह्यात ५७०महापुरुषांचे पुतळे उभारल्याचे एका चित्रफितीत आवारे याने सांगितले आहे. फायबरपासून पुतळे तयार करण्याचाकारखाना थाटला होता. याने याव्यवसायाचे मोठे जाळे विणले होते.महापुरुषांचा पुतळा एकदा बसवलाकी तो सहजासहजी काढला जातनाही, या भावनेचा फायदा घेत त्यानेअनधिकृतपणे पुतळे बसवण्याचासपाटा लावला होता. प्रशासनानेयापूर्वीच या केंद्रावर बंदी घातली होती.बीएनएसएस कलम १६३ अन्वयेपुतळ्यांची निर्मिती, साठवणूक आणिवाहतुकीवर ६० दिवसांसाठी बंदीघालण्यात आली आहे. आदेशाचेउल्लंघन केल्यास कठोर फौजदारीकारवाई केली जाणार आहे.कारखानाहटवण्यासंदर्भात आदेश आले आहेत,परंतु उपविभागीय अधिकारी वतहसीलदार यांच्या आदेशानुसार हीकारवाई होणार आहे. सध्या याबाबतसांगता येणार नाही, अशी माहितीगोंदी पोलिसांनी दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धीमहामार्गावर गुंडेवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता गॅस टँकरमधून अमोनियम नायट्रेटची गळती झाली. रात्रभरगॅस गळती सुरूच राहिल्याने मंगळवारीसकाळी समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली. यामुळे या मार्गावरअवजड वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगालागल्या. भर उन्हात वाहने ५ तास कोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. २४ तास उलटूनही गॅसचीगळती मंगळवारी उशिरापर्यंत सुरूच होती. मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्याटँकरमधून (जीजे १२ बीवाय ८४००)सोमवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास एका रसायनाची गळती सुरू असल्याचे लक्षातआले. मंगळवारी सकाळी वाहतूक वळवली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टँकर रस्त्याखाली, वाहतूक सुरळीत जड वाहने वगळता इतर सर्ववाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. जड वाहने खाली उतरू शकत नसल्यानेसमृद्धीवरच होती. आता टँकर रस्त्याच्या खाली उतरवण्यात आला असून सध्यावाहतूक सुरळीत सुरू आहे. -रुपाली दरेकर, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक गळती न थांबल्याने वाहने वळवली टँकरमधील अमोनियम नायट्रेट उष्णतेमुळे गरमहोऊन द्रव पदार्थ बाहेर पडत होता. तेव्हा समृद्धीमहामार्ग येथील अग्निशामक दलाने थंड पाण्याचाफवारा मारून टँकरची उष्णता कमी करण्यासाठीप्रयत्न केले. कंपनीच्या मुंबई येथीलव्यवस्थापकांशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी रात्रीचेवातावरण थंड झाल्यावर थंडावा निर्माण होईल,असे सांगितले. परंतु सोमवारी रात्रभर गळती नथांबल्याने मंगळवारी वाहतूक वळवली. वाहतुकीचा मार्ग असा होता नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहनेसिंदखेड राजा येथून खाली उतरवण्यातआली. जालना येथून पुन्हा समृद्धीमहामार्गावर घेण्यात आली. मुंबईकडूननागपूरकडे जाणारी वाहने जालना येथूनखाली घेऊन सिंदखेड राजामार्गे पुन्हासमृद्धी महामार्गावर सोडण्यात आली.काही काळ एका लेनवरूनच वाहतूकसुरू ठेवण्यात आली होती. मंगळवारीसकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंतवाहतूक प्रभावित झाली होती. सुरक्षा अधिकारी, बंब तैनात होते मंगळवारी सायंकाळीही टँकरमधून गॅस गळती होतहोती, परंतु टँकर रस्त्याच्या खाली उतरवण्यातआल्याने वाहतुकीला कोणताही धोका नव्हता.घटनास्थळावर अनुचित प्रकार घडू नये म्हणूनअग्निशामक दल व सुरक्षा अधिकारी तैनात होते. अमोनियम नायट्रेट ज्वलनशीलनाही, संपर्काने मळमळ, डोकेदुखी अमोनियम नायट्रेट हे एक रासायनिक संयुगआहे. ते पाण्यात अतिशय सहज विरघळते.उष्णतेच्या प्रभावाने विघटन होण्याचीशक्यता असते. हे स्वतः ज्वलनशील नसलेतरी इतर पदार्थांना जळण्यास मदत करते.याच्या संपर्कात आल्यास खसा खवखवणे,मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास होतो.तसेच रक्तदाबही कमी होऊ शकतो.
गेल्या ३-४ वर्षांपासून स्वतःच्या खिशातून पैसा लावून विकासकामे करणाऱ्या आणि हक्काच्या पैशांसाठी सरकारी उंबरठे झिजवणाऱ्या कंत्राटदारांचा संयम आता सुटला आहे. राज्यभरातील विविध शासकीय विभागांकडे कंत्राटदारांची तब्बल १ लाख ७ हजार कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. वारंवार निवेदने देऊनही सरकार दखल घेत नसल्याने आता संतप्त कंत्राटदार संघटनांनी १५ एप्रिलपासून ‘चक्का जाम’चा थेट अल्टिमेटम दिला आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) नाशिक शाखेने पत्रकार परिषद घेत सरकारला १३ एप्रिलची अल्टीमेटम दिला आहे. या मुदतीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा न काढल्यास, १५ एप्रिलपासून ज्या रस्त्यांची आणि पुलांची बिले मिळालेली नाहीत, ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले जातील. तसेच, नवीन शासकीय इमारतींचा वापर रोखून प्रगतीपथावरील सर्व कामे तत्काळ थांबवली जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी वारंवार ई-मेल करून आणि वेळ मागूनही ते भेटत नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. गंभीर...शासकीय कामांसाठी कमिशनचे ‘दरपत्रक’ उघड ज्या आमदारांना एरवी ५-१० कोटींची कामे मिळतात, त्यांना विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २००-३०० कोटींचा निधी वाटण्यात आला आहे. यातून केवळ ‘पार्टी फंड’ गोळा करण्याचे काम झाले असून, आमदारांनी काम देतानाच आपले १० टक्के कमिशन आधीच वसूल केल्याचा अत्यंत गंभीर आरोप कंत्राटदारांनी केला आहे. कोणतेही काम मिळवण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या टक्केवारी कमिशनचे ‘दरपत्रक’च त्यांनी जाहीर केले: आमदारांसह अभियंत्यांवरही आरोपआमदार १० ते १५%वर्कऑर्डरसाठी १ ते २ %कार्यकारी अभियंता १ %अधीक्षक अभियंता १ %मुख्य अभियंता १ %एफ.डी. (वित्त विभाग) २ % कोणत्या विभागाकडे किती थकबाकी?जल जीवन मिशन व मजीप्रा ३५,००० कोटीसार्वजनिक बांधकाम २९,००० कोटीआदिवासी विकास (रस्ते-पूल) १०,००० कोटीजलसंपदा विभाग ९,००० कोटीग्रामविकास व जलसंधारण ६,५०० कोटीनगरविकास २,१०० कोटीपर्यटन, गृह, आरोग्य १,७५० कोटी मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देत नाहीत मुख्यमंत्री महोदय चर्चेसाठी वेळ द्यायला तयार नाहीत. आता आरपारची लढाई लढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. - मनोज खांडेकर, बी.ए.आय. आंदोलनाला ‘या’ संघटनांचे बळ : आंदोलनात ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’सह महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व मजूर सहकारी संस्था सहभागी होत आहेत. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल आहेत. पत्रकार परिषदेला मनोज खांडेकर, सचिव अविनाश आव्हाड, राजू पानसरे आदी होते.
भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत असून, आता त्याने स्वाध्याय परिवाराच्या तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जागेवरच अघोषित ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत उघडकीस आला आहे. कर्मयोगी नगर येथील खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याला लागून असलेल्या या जागेचा वापर तो आणि त्याचे कुटुंबीय स्वतःच्या खासगी मालमत्तेसारखा करत असल्याचे उजेडात आले आहे. नाशिक शहरातील त्याच्या बंगल्याशेजारील तब्बल ४७७ वार भूखंडावरही त्याची वक्रदृष्टी पडल्याचे दिसत आहे. ही जागा मूळची एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाची असून, त्यांनी परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य या नात्याने चार वर्षांपूर्वी ती तत्त्वज्ञान विद्यापीठाला दिली आहे. सातबारा उताऱ्यावरही तशी अधिकृत नोंद आहे. या जागेवर भावफेरी आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी चारही बाजूंनी कुंपण घालून दाट वृक्षारोपण करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराचीही आता ‘एसआयटी’कडून देखील चौकशी केली जाणार असल्याचे समजते. परिवारातील सदस्य अनभिज्ञ; कठोर कारवाई व्हावी या प्रकाराबाबत स्वाध्याय परिवारातील ज्येष्ठ सदस्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. “ही जागा निश्चितपणे स्वाध्याय परिवाराचीच आहे. येथे नियमित स्वच्छता ठेवतो आणि मोठ्या कार्यक्रमांसाठीच ती वापरली जाते. खरात कोणाच्या परवानगीने या जागेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतोय, हे माहीत नाही. त्याचा हा बेकायदेशीर ताबा आणि वावर अयोग्य आहे. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी सदस्यांनी केली आहे.
बोगस शालार्थ आयडी तयार करून झालेल्या राज्यव्यापी शिक्षक भरती घोटाळ्याची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पासवर्ड आणि युजर आयडी इतरांच्या हाती लागल्याने हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला होता. यापुढे अशा घोटाळ्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने आता ई-ऑफिस प्रणालीचा वापर सक्तीचा केला असून, प्रणालीत लॉगिन करण्यासाठी प्रत्येक वेळी ओटीपी अनिवार्य केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विश्वासाचा गैरफायदा; बनावट सह्यांचा सुळसुळाट यापूर्वी कामाच्या व्यस्ततेमुळे वरिष्ठ अधिकारी विश्वासाने आपले पासवर्ड आणि युजर आयडी संबंधित लिपिकांकडे देत असत. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत हे पासवर्ड हस्ते-परहस्ते अनेकांपर्यंत पोहोचले. परिणामी, त्यातून शिक्षक नियुक्तीचे अनेक बोगस शालार्थ आयडी तयार झाले. धक्कादायक बाब म्हणजे, शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून नियुक्तीच्या प्रस्तावांना परस्पर मान्यता देण्यात आली. ४२४ नियुक्त्या ठरल्या अवैध; २० जणांना बेड्या : आतापर्यंत तपासणी पूर्ण झालेल्या ४३१ पैकी तब्बल ४२४ नियुक्त्या अवैध ठरल्या आहेत. कागदपत्रे अचूक असल्याने केवळ ७ शिक्षकांचे पगार सुरू करण्यात आले आहेत. इतर १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुनावणी पूर्ण होऊन निर्णय येणे बाकी आहे, तर उर्वरित कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अशी होते संपूर्ण प्रक्रिया
मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात व एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांमध्ये २ लाख ५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, अशी प्राथमिक माहिती कृषी विभागाने मंगळवारी दिली. दरम्यान, पंचनाम्यांना वेग देऊन या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. राज्यात सलग तिसऱ्या वर्षी रब्बी हंगामाला हवामान बदलाचा तडाखा नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान, राज्यात २.५ लाख ते ३ लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिके अवकाळी व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाली. २०२४-२५: या वर्षात अवकाळी व गारपिटीमुळे ४८.८८ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले, ज्याचा फटका ६८.४० लाख शेतकऱ्यांना बसला. शासनाकडून यासाठी ६,९४८ कोटींची मदत मंजूर केली. २०२५-२६ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळीमुळे ८९ लाख ८३,५४१ शेतकऱ्यांना फटका बसला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८,४४५ हेक्टर पिकांचे नुकसान अवकाळीने कांदा, गहू, द्राक्षांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्चअखेर जिल्हानिहाय हेक्टरमध्ये नुकसानीचे क्षेत्र असे : नाशिक (२९,८१२), अहिल्यानगर (२३,६३३), जळगाव (२२,३६१), धुळे (१४,८३२), बुलढाणा (८,५०७) व छत्रपती संभाजीनगर (८,४४५ हेक्टर).
शहरातील सातारा परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये अंगावर काटा आणणारे गौप्यस्फोट होत आहेत. या मृत्यूच्या खेळाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) टीव्ही सेंटर भागात राहणारा डॉ. सुनील राजपूत असल्याचे तपासात पुढे आले आहे. तो मागील ७ ते ८ वर्षांपासून हे सिंडिकेट चालवत आहे. या प्रकरणात तो तुरुंगातून बाहेर आला की पुन्हा हाच प्रकार करायचा. या वेळी त्याच्यावर चौथा गुन्हा दाखल होणार आहे. दरम्यान, गर्भ पाडण्यासाठी महिलेला पाठवून द्या यासाठी “पार्सल पाठवा” हा कोडवर्ड होता. काढलेला गर्भ महिलेच्याच हाती कॅरीबॅगमध्ये देऊन नष्ट करण्याची जबाबदारी सोपवली जात होती. हा सर्व खेळ बीएचएमएसचे शिक्षण घेतलेला डॉ. सुनील राजपूत मागील आठ वर्षांपासून चालवत असल्याचे उघड झाले आहे. या सर्व बाबी पोलिसांनी तपासातून उघड केल्या. थिएटरची गंभीर साधने जप्त ज्योती पवारच्या घरावर टाकलेल्या छाप्यात केवळ औषधे व सलाइनच नव्हे, तर प्रत्यक्ष ऑपरेशन थिएटरमध्ये वापरली जाणारी अत्यंत गंभीर साधनेही मिळाली आहेत. यात गर्भपातासाठी लागणारा वाकडा चिमटा आणि योनीमार्ग फाकवण्यासाठी असलेला चिमटा जप्त करण्यात आला आहे. दोघींमध्ये लाखोंचे व्यवहार वर्षा आणि ज्योती या दोघींमध्ये लाखोंचे व्यवहार निष्पन्न झाले आहेत. वर्षाने गेल्या महिनाभरातच ३ ते ४ गर्भपात केले होते. ज्योतीने इतर मैत्रिणींच्या माध्यमातूनही अनेक गर्भपात केल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. नोकरी न करता ज्योती पवारचे आलिशान जीवन डॉ. राजपूतने प्रसूती विभागातील जीएनएम शिक्षण झालेल्या परिचारिकांना (नर्स) आपल्या रॅकेटमध्ये सामील केले. यात वर्षा जाधव, तिची फरार मैत्रीण ज्योती पवार यांचा समावेश आहे. ज्योतीला एका नामांकित रुग्णालयांतील प्रसूती विभागातील गर्भपाताच्या मोठ्या अनुभवाचा यात वापर झाला. पोलिसांची दोन पथके फरार झालेल्यांच्या मागे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार डॉ. सुनील राजपूत आणि परिचारिका ज्योती पवार हे दोघेही अद्याप फरार आहेत. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सातारा पोलिसांची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यांच्या अटकेनंतर या सिंडिकेटचे आणखी मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. क्रूर पद्धतीचा मातेच्या जिवाला मोठा धोका ‘उघड झालेली ही अत्यंत क्रूर पद्धत आहे. ती वैद्यकीय नियमावलीला धरून नाही. यामुळे मातेच्या जिवाला धोका होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रात अशा पद्धतीने कधीच गर्भपात केला जात नाही.” - डॉ. कमलाकर मुखेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक सिल्लोड कनेक्शन : डॉ. आहेरची धक्कादायक कबुली. राजपूतने सिल्लोड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील डॉक्टरांशी संधान बांधले होते. दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सिल्लोडचा डॉ. विकास आहेर (सध्या अटकेत) याची राजपूतशी भेट झाली. राजपूतने त्याला या रॅकेटमध्ये ओढले. अटकेत असलेल्या डॉ. आहेरने आतापर्यंत १५ ते २० महिलांची बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे. आरेाग्य यंत्रणेची दिशाभूल करण्यासाठी कधी घरपोचही द्यायचे सेवा 1 सांकेतिक भाषेचा (कोडवर्ड) वापर: आपले संभाषण लपवण्यासाठी ही टोळी “पेशंट पाठवले”, “उपचार” आणि गर्भ काढण्यासाठी “पार्सल पाठवा” अशा कोडवर्डचा सर्रास वापर करत असे. यामुळे या टोळीवर आजपर्यंत संशयाने पाहिले गेले नाही.2 घरपोच सेवा व वाढीव दर: वाय-फायवर चालणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि प्रोब घेऊन राजपूत थेट महिलांना घरपोच सेवा देत होता. ७ वर्षांपूर्वी एका तपासणीसाठी ३ हजार रुपये घेणारा राजपूत आता १५ हजार रुपयांपर्यंत दर वसूल करत होता.
बारामतीवर अधिराज्य गाजवणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या श्रीमंतीचे अनेक किस्से सांगितले जातात. त्यातील काही आकडे समोर आले आहेत. त्यानुसार शरद पवारांपेक्षा त्यांच्या सूनबाई म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुप्पट धनवान आहेत. अर्थात यात दिवंगत पती अजित पवारांच्या संपत्तीचाही समावेश आहे. शरद पवारांकडे ६१ कोटी तर सुनेत्रांकडे १२२ कोटींची संपत्ती आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून हा तपशील समोर आला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे वडील आणि वहिनींपेक्षा धनाढ्य आहेत. त्यांच्याकडे १६७ कोटींची संपत्ती आहे. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाची (दिवंगत पती अजित पवार व इतर) एकत्रित संपत्ती सुमारे १२१.७९ कोटी रुपये आहे. सुनेत्रांची खरी ताकद त्यांच्या जमिनींमध्ये आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या नावे ६७.६७ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यात बारामतीतील मौल्यवान शेतजमीन आणि व्यावसायिक इमारतींचा मोठा वाटा आहे. कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता ८७ कोटींहून अधिक आहे. राज्यसभा, बारामती पोटनिवडणुकीत दाखल प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड वाहन : शरद पवारांकडे स्वतःची गाडी नाही. सुनेत्रांकडे टोयोटा कॅमरी (३७.६५ लाख), इनोव्हा (३८.३९ लाख), ५-६ ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स आहेत. त्यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य २३.२५ कोटी रु. आहे. १६.५३ कोटींचे कर्जही आहे. शरद पवार: ८६ वर्षीय शरद पवारांनी जमिनीपेक्षा शेअर्स आणि मुदत ठेवींत जास्त गुंतवणूक केली. ४४.७१ कोटी रु.ची ‘जंगम’ मालमत्ता आहे. पत्नी प्रतिभा यांच्या नावे २७.७७ कोटी गुंतवणूक आहे. पवारांवर ४९ लाखांचे कर्ज आहे.
दैवीशक्तीच्या नावाने लैंगिक शोषण
सातपुतेंची माहिती, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर नाशिक : प्रतिनिधी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करीत आहे. दैवीशक्ती असल्याचे भासवून आरोपी खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मंदिर परिसरात हातचलाखीचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवायचा. कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत असल्याचे समोर आले. या प्रकरणात ३० […] The post दैवीशक्तीच्या नावाने लैंगिक शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेची इराणला थेट भीषण हल्ल्याची धमकी
इराण संस्कृती संपविणार, जगभरात धाकधूक वाढली वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा गंभीर इशारा देत आजची रात्र इराणसाठी काळरात्र असून इराणच्या संस्कृतीचे नामोनिशाण मिटवू, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आता पश्चिम आशियाच नव्हे तर संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे. इराणच्या बाबतीत असे काही घडावे, […] The post अमेरिकेची इराणला थेट भीषण हल्ल्याची धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे धनगर समाजाच्या देवस्थान परिसरात बाळू आवारेने कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय रात्रीतून पुतळा बसवला होता. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन त्याचे रूपांतर दगडफेक आणि दंगलीत झाले होते. या प्रकरणात दोन्ही गटांतील अनेकांवर आणि मुख्य सूत्रधारावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी केंद्राच्या नावाखाली पुतळा निर्मितीचा बनाव जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे बाळू आवारेचा हा कारखाना सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय गायरान जमिनीवर 'कृषी अवजारे सेवा केंद्र' असल्याचे भासवून एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे पुतळ्यांची निर्मिती केली जात होती. अंबडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकून तो सील केला आहे. सहकाऱ्याला सीमेवरून अटक बाळू आवारेला तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता त्याचा सहकारी संभाजी आघाव याला सोलापूर-धाराशिव सीमेवरून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. गंभीर गुन्ह्यांची नोंद बाळू आवारेवर केवळ माढाच नव्हे, तर करमाळा तालुक्यातील पुनावर येथेही अशाच प्रकारे विनापरवाना पुतळा बसवल्याचा आरोप आहे. त्याच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर भाषणे देणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे ही वाचा… मुंबईकरांचा प्रवास सुसाट!:दहिसर-काशिगाव मेट्रोचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; मिरा-भाईंदरच्या 'त्या' वादग्रस्त उड्डाणपुलावरही दिले स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान धावणारी ही नवी मेट्रो मार्गिका बुधवारपासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असून, यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलाच्या वादग्रस्त रचनेवरही भाष्य करत प्रशासनाची बाजू मांडली. सविस्तर वाचा…
कावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा
सर्वजण उमरी ग्रामीण रुग्णालयात, आरोग्य यंत्रणा सतर्क उमरी : कैलास सोनकांबळे उमरी तालुक्यातील कावलगुडा (बु) येथे मंदिरात आयोजित सामूहिक भोजन कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न विषबाधेची घटना घडली. या घटनेत सुमारे २५० ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी गावातील मंदिरात आंबील व वरण,भाताचा कार्यक्रम आयोजित […] The post कावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
“पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद ही केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक मजबूत करत शेती क्षेत्रासाठी ठोस दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून घेतलेले निर्णय थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देतील,” असे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. ते आज जयपूर येथे आयोजित पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेत बोलत होते. देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय परिषदांच्या मालिकेची सुरुवात आज जयपूर येथे पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेद्वारे झाली. या परिषदेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा राज्यांचे कृषी मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकार व कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेले महाविस्तार अँप, अॅग्रिस्टॅक व एआय धोरण यांचे या परिषदेत अनेकांनी कौतुक केले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत केंद्र-राज्य समन्वय बळकट करणे, विविध कृषी योजनांचा आढावा घेणे तसेच आगामी खरीप हंगाम 2026 साठी धोरण निश्चित करणे यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना अॅग्रिस्टॅक अंतर्गत 1.32 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि निर्यात क्षेत्रातील आघाडीचा उल्लेख केला. मात्र, 2025-26 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहितीही देण्यात आली. सुमारे 136 लाख शेतकरी आणि 105 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून राज्य सरकारने 20,196 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार त्यानी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसत 29 जिल्ह्यांतील 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडेही अतिरिक्त मदतीची मागणी करण्यात आली आहे,असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप 2026 साठी राज्याने 158.92 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून बियाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीबीएफ तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,“केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे खरीप हंगाम 2026 यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू राहील.” तसेच त्यांनी पुढे असेही नमूद केले,“अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे. शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असून, तातडीने मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे शेती अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे.” या परिषदेमुळे आगामी काळातील कृषी धोरणांना दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह जी चौहान साहेब, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा साहेब, केंद्रिय कृषी राज्यमंत्री श्री.भगीरथजी चौधरी साहेब, राजस्थानचे कृषी मंत्री श्री.डॉ.किरोड़ी लाल मीना जी, गुजरातचे कृषी मंत्री श्री.जितुभाई सवजीभाई वाघानी जी, मध्य प्रदेशचे कृषी मंत्री श्री.ऐदल सिंह कंसाना जी, गोव्याचे समाज कल्याण मंत्री श्री.सुभाष उत्तम पाल देसाई जी, कृषी विभागाचे केंद्रिय प्रधान सचिव श्री.अतिश चंद्रा यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
मेळघाटमधील सेमाडोहजवळील आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले भूमका बाबा देवस्थान चैत्र महिन्यात नेहमीप्रमाणे खुले राहणार आहे. वन विभागाने यावर्षी पूजा-अर्चा थांबवण्याचा घेतलेला निर्णय खासदार बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. हे देवस्थान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाने येथे पूजा आणि महाप्रसाद करण्यास मनाई केली होती. या निर्णयामुळे आदिवासींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती, कारण हे देवस्थान त्यांची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे केंद्र आहे. आदिवासी बांधवांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे तक्रार करून चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर खासदार वानखडे यांनी तातडीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी आणि उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला मेळघाटमधील आदिवासी प्रतिनिधी आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांशी झालेल्या चर्चेअंती, भूमका बाबा देवस्थानच्या यात्रेवरील बंदी स्थगित करण्याचा आणि चैत्र महिन्यात हे क्षेत्र खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सकारात्मक चर्चेमुळे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले. भूमका बाबा देवस्थान हे अमरावती, बैतुल आणि खंडवा (मध्यप्रदेश) येथील आदिवासी व गैरआदिवासी बांधवांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक मन्नत मागण्यासाठी येतात. या बैठकीला माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्रसिंग गैलवार, राजेश सेमलकर, विलास बोरेकर, पंकज मोरे, राहुल येवले, गोलू मुंडे आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भूमका बाबा देवस्थान आठवड्यातून केवळ एक दिवस दर्शनासाठी खुले केले जात होते. आता चैत्र महिन्यात ते पूर्णपणे खुले राहणार आहे.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासीबहुल मेळघाटमध्ये अनेक विकास कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र, युवक काँग्रेसने हे जलजीवन मिशन मेळघाटात पूर्णपणे फसल्याचा आरोप केला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या मते, 'हर घर-नल से जल' ही पंतप्रधानांच्या नावाने सुरू करण्यात आलेली योजना याठिकाणी सपशेल अयशस्वी ठरली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट आणि गरजधारी येथे पाणी वितरणासाठी एक ते दीड मीटर जलवाहिनी दाखवून त्यावर लाखो रुपये खर्च दर्शविण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात ती पाइपलाइन जमिनीवरच आहे; खोदकाम करून ती जमिनीत दाबण्यात आली नाही. याउलट, प्रत्येक गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून मोठी बिले काढली गेली. त्याचप्रमाणे, मेळघाटमधील जलजीवन मिशनमध्ये जुन्याच जलकुंभांना रंगरंगोटी करून मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची रक्कम हडप केली गेल्याचा आरोपही युवक काँग्रेसने केला आहे. अनेक ठिकाणी जुन्या टाक्यांची दुरुस्ती न करता केवळ रंगरंगोटी करून निधी लाटण्यात आला. चिखलदरा तालुक्यातील चिलाटी येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गतची जुनी टाकी २०१२-१३ मध्ये बांधली गेली होती. ती टाकी पूर्णपणे हलते आणि तिला गळतीही लागली आहे. तरीही, २०२२-२३ मध्ये त्या टाकीची रंगरंगोटी करून लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण, पाणीपुरवठा अजूनही बंदच आहे. सुमिता येथेही असाच प्रकार करण्यात आला असून, तेथील खर्चाची उचलही करण्यात आली आहे. सरवारखेडा येथे एका टाकीत एकही दिवस पाणी गेले नाही, तरीही दुसरी नवीन टाकी बांधली गेली. आता दोन्ही टाक्यांमध्ये एकही थेंब पाणी जमा झाले नाही. सद्यस्थितीत तेथील आदिवासी बांधवांना डोक्यावर घागर ठेवूनच पाणी आणावे लागते. रुईपठारला नवीन टाकी बांधली, त्यात डोमीवरून पाइपलाइन टाकून पाणी आणले, परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी नाही. लोक आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात आणि डोक्यावर पाणी आणावे लागते. कुहीला दोन टाक्या आहेत, तरी पाणीपुरवठा होत नाही. लोकांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. सिमोरी येथे टाकी बनविली, तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही. चोबिता आणि चुर्णीचा पाणीपुरवठाही बंद आहे. पीपल्या येथील पाणीपुरवठा बंद असून, नळाला पाणी येत नाही. कारादा येथेही हीच स्थिती आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठित करणे आवश्यक असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहिगाव येथील सात वर्षीय सोहम मोहन नेसनेसकर याने व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र, आता त्याला पुढील दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सोहमने या स्पर्धेत जपान, मलेशिया आणि यजमान व्हिएतनामसारख्या देशांतील स्पर्धकांना मागे टाकून हे यश मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि सुवर्णपदकाचा समावेश होता. सध्या सोहम ओम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. त्याला भविष्यात उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यायचे आहे. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत मर्यादित असल्याने त्याच्या पालकांनी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. सोहमने वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाभ्यास सुरू केला. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याच यशाच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोहमचे वडील फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले असून, लकवाग्रस्त रुग्णांची मालिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत मर्यादित उत्पन्नातून ते घरखर्च सांभाळत सोहमच्या शिक्षणासाठीही बचत करत आहेत. व्हिएतनाम येथे स्पर्धेला जाण्यासाठी त्यांना सुमारे १ लाख ८० हजार रुपये खर्च आला होता. या खर्चापैकी कर्नाटक टीमने ५० हजार रुपये, तर काही सामाजिक संस्था, शाळा, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले होते. दर्यापूर येथील रोहिणी फाउंडेशनने ३० हजार रुपयांची मदत केली. उर्वरित रक्कम वडिलांनी जुळवली होती, परंतु वारंवार उद्भवणाऱ्या खर्चासाठी त्यांना अशी जुळवाजुळव करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोहमला आतापर्यंत ‘महाराष्ट्र गौरव’, ‘राष्ट्र गौरव’ आणि ‘क्रीडा शिरोमणी’सह एकूण १४ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला होता.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र निदर्शने केली. खरातवर कठोर कारवाई करण्यासोबतच त्याच्या संपर्कात असलेल्या ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बस स्टॉपसमोर हे आंदोलन केले. माकपच्या मते, अशोक खरात याने बुवाबाजीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. राज्यातील ३९ आमदार खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील झाले असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. या आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी आणि त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी माकपने केली आहे. तसेच, पीडित महिलांचे समाजमाध्यमांवर व्हायरल होणारे व्हिडिओ त्वरित हटवण्यात यावेत, अशी विनंतीही करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करून ते तातडीने कार्यान्वित करावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात तहसीलदारांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात आणि संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता, उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याचे उल्लंघन आहे, असे माकपने म्हटले आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे तंत्र-मंत्र, जादू-टोणा यांसारख्या अंधश्रद्धांना राजमान्यता मिळते आणि सामान्य जनता भोंदू बाबांच्या फसवणुकीला बळी पडते. भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच त्यांना समर्थन देणारे, त्यांच्याकडे शरण जाणारे आणि आपल्या अनुयायांना अशा बुवा-बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. हे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटवण्याची कारवाई राज्य सरकारने करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात माकपचे तालुका सचिव शाम शिंदे, अशोक केसारखाने, विजय पाटील, योगेश महल्ले, दीपक अंबाडरे, राजेंद्र राऊत, प्रभाकर खडसे, दिलीप महल्ले, शत्रुघ्न नगर, लक्ष्मण झिमटे, रामदास मते, नारायण सोनोने, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती बंड, विशाल शिंदे, किशोर शिंदे, लालचंद इंगोले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त खोलापूर येथे विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेच्या वतीने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीद्वारे स्वच्छता, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. शाळेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गाव – निरोगी गाव”, “आरोग्य हेच धन आहे” आणि “हात धुवा, रोग टाळा” अशा घोषणा देत संपूर्ण गावातून फेरी काढली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांच्या हातात आरोग्यविषयक संदेश देणारे फलक होते. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या रॅलीमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तिका आणि आशा वर्कर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्वच्छता, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी नियमित व्यायाम, स्वच्छता आणि संतुलित आहारावर भर देण्याचे आवाहन केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले. या यशस्वी रॅलीमुळे गावात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये लखनसिंग जाधव, आशिष भुयार, कविता भेले, मंगेश ढाकर आणि मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अमरावतीत 'स्वर ताल उत्सव' संगीत सोहळा पडला पार:विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन
अमरावती येथील वैभव कॉलनी-दस्तूर नगर येथील कला वैभव संगीत अकॅडमीतर्फे 'स्वर ताल उत्सव-२०२६' या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फरशी स्टॉप येथील नरहरी मंगल कार्यालयात हा उत्सव पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, तसेच रंगमंचावर सादरीकरणासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरु आणि शिष्यांच्या अनेक जोड्यांसह बालकलाकार व ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेतला. या संगीत महोत्सवात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, व्हायोलिन, हार्मोनियम वादन आणि तबला वादन अशा विविध माध्यमांतून दर्जेदार कला सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी भक्तीरसावर आधारित सुमारे ३६ भक्ती रचना सादर केल्या. यावेळी महेश मूलचंदानी, डॉ. अमित वडुरकर आणि पुणे येथील मिलिंद दलाल हे अतिथी म्हणून उपस्थित होते. साथसंगत करणाऱ्या कलाकारांमध्ये हार्मोनियमवर डॉ. संदीप दलाल, कीबोर्डवर नागेश तायडे, तर तबल्यावर तारक दलाल, सर्वज्ञ दलाल, नंदन वसु, सुजल कोहळे, दीप हरणे, केशव राठी आणि राम बजाज यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. श्रीमती ठाकरे, श्रीमती सावदेकर आणि वैष्णवी बावस्कर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. डॉ. संदीप दलाल, निलिमा दलाल, रोहिणी वारेकर, अनिता दलाल आणि संगीत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कला वैभव संगीत अकॅडमीने केवळ भारतातच नव्हे, तर रशिया, चीन आणि युरोपसह विविध देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार केला आहे. संगीततज्ज्ञ अरविंद दलाल, पंडित वामनराव धावंजेवार, उस्ताद लड्डू मियां खा साहेब, डॉ. देवेंद्र यादव आणि गुरुवर्य मुकुंद सराफ यांनी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुणे येथे भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता संमेलनात राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देशातील शेतकरी आंदोलन परदेशी शक्तींच्या मदतीने घडवले जात असून, स्थिर सरकार पाडण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनांना काँग्रेसकडून समर्थन मिळत असल्याचेही शिव प्रकाश म्हणाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या संमेलनात शिव प्रकाश यांनी 'राष्ट्र के विकास में भाजपा की भूमिका' या विषयावर मार्गदर्शन केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर शहराध्यक्ष धीरज घाटे व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यापूर्वीच त्यांना मदत करत असतानाही आंदोलन घडवून आणले जात आहे, असे शिव प्रकाश म्हणाले. भाजप देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. देश सुरक्षित राहिला तरच विकास शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या अणुचाचणीच्या निर्णयामुळेच आज भारत संरक्षण क्षेत्रात मजबूत झाला असून, अनेक देशांना शस्त्र निर्यात करत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंदूर ऑपरेशननंतर भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढला आहे, असेही ते म्हणाले. समान नागरी कायद्याबाबत बोलताना शिव प्रकाश यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याला पाठिंबा दिला आहे. उत्तराखंडसह काही राज्यांत तो लागू झाला असून, लवकरच संपूर्ण देशात लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजपच्या प्रवासाचा आढावा घेताना शिव प्रकाश म्हणाले की, जनसंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास संघर्षाचा आहे. १९८४ साली फक्त दोन खासदार असलेल्या पक्षाची टिंगल झाली होती, मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी 'एक दिवस कमल खिलेगा' असा दिलेला विश्वास आज सत्यात उतरला आहे. १९९८-९९ मध्ये बहुमताने सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने स्थिर सरकार दिले आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेले, असे त्यांनी सांगितले. आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत, अशी टीकाही शिव प्रकाश यांनी केली.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविरोधात दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज पुढील चौकशीसाठी अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु अधिकारक्षेत्रानुसार तो गुजरात येथील पोलिसांना हस्तांतरित करण्यात आला आहे. हा अर्ज बीड येथील वाजेद खान (बीडकर) यांनी दाखल केला होता. यामध्ये हार्दिक पांड्याने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप आहे. भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर झालेल्या जल्लोषादरम्यान हार्दिक पांड्याने आपल्या प्रेयसीसोबत मैदानावर आनंद व्यक्त करताना राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांना हार्दिक पांड्या (रा. खार पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाचे अवलोकन केल्यानंतर, संबंधित घटना अहमदाबाद (गुजरात) येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार अहमदाबाद पोलिसांकडे येतो, असे शिवाजीनगर पोलिसांनी स्पष्ट केले. यामुळे, शिवाजीनगर पोलिसांनी हा तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्त, अहमदाबाद यांच्याकडे वर्ग केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारदार वाजेद खान यांना समजपत्र देऊन माहिती दिली आहे. काय घडलेला प्रकार टी २० विश्वचषक विजयाच्या जल्लोषा दरम्यान खेळाडूंकडून आनंदोत्सव साजरा केला जात होता. याच दरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओ मध्ये हार्दिक पांड्या याने भारतीय राष्ट्रीय ध्वज हाताळताना अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता.राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप वकील वाजेद खान बिडकर यांनी करून पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारताकडे सध्या ६५ दिवस पुरेल इतका धोरणात्मक ऊर्जासाठा उपलब्ध आहे. संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी ऊर्जा सुरक्षेच्या लढ्यात प्रत्येक भारतीयाने सजग राहून योगदान देण्याचे आवाहन केले आहे. ब्रिगेडीअर महाजन एरंडवणे परिसरातील सेवा भवन येथे आयोजित ‘भारत आणि मध्यपूर्व संघर्ष’ या विशेष व्याख्यानात बोलत होते. यावेळी तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कल्याण कुलकर्णी, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. महाजन यांनी सांगितले की, जगाच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित स्थितीत आहे. देशाची तेल शुद्धीकरण क्षमता तिप्पट असून, भारत युरोपलाही शुद्ध तेलाची निर्यात करतो. गरज पडल्यास निर्यात थांबवून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यांनी नागरिकांना ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सध्या देशाला बाह्य संकटापेक्षा अंतर्गत दुष्प्रचार आणि अपप्रचाराचा धोका अधिक असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी 'देश प्रथम' ही भावना ठेवून अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अमेरिकेच्या स्थितीवर बोलताना महाजन म्हणाले की, अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहे, कारण त्यांची वायूसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर खर्ची पडली आहे. दुसरीकडे, इराणच्या सॅटलाईट गायडन्स आणि एअर डिफेन्स सिस्टीममध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. इस्रायल अत्यंत केंद्रित असून, हिजबुल्ला आणि हुतींचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी विक्षिप्त राज्यकर्त्यांशी कसे वागायचे, हे शिकणे आवश्यक असून, त्यासाठी अभ्यासक्रमात वेगाने बदल करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केले. यावेळी तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कल्याण कुलकर्णी यांनी इराणच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. इराणचा इतिहास लढाऊ वृत्तीचा असून, झोराष्ट्रीयन धर्म सनातन धर्मातून प्रभावित होता. इस्लामसोबतच्या लढाईतही त्यांनी सहजासहजी शरणागती पत्करली नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या मते, इराणची भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव खलिफांवरही राहिला आहे. इराणने नेहमीच योद्ध्यांची भूमिका बजावली आहे. या व्याख्यानाचे आयोजन व्हीएसके पुणे फाउंडेशन आणि प्रज्ञा प्रवाह यांच्या वतीने करण्यात आले होते.
विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त
अहमदपूर : प्रतिनिधी या तालुक्यातील हडोळती येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातून परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो. मुख्यमंत्री महोदयांनी बोलल्याप्रमाणे शेतक-यांना दिवसा थ्री फेज वीज देणे अपेक्षित असताना, हडोळती उपकेंद्रातून मात्र वीज पुरवठा सलग ८ तास न देता तो मनमानीपणे सकाळ-संध्याकाळ केला जात असल्याने शेतकरी व व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. […] The post विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘ताक’ या पारंपरिक पेयाबद्दल सूक्ष्म जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून जनजागृती
लातूर : प्रतिनिधी दयानंद शिक्षण संस्था संचलित, येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दि. ६ एप्रिल रोजी मायक्रोबायॉलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ताक’ या भारतीय पारंपरिक पेयाबद्दल सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्टिकोनातून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या मोहिमेचा मुख्य उद्देश हा, ताक या भारतीय पारंपरिक पेयाबद्यल आध्यात्मिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व सांगणे आणि पटवून देणे […] The post ‘ताक’ या पारंपरिक पेयाबद्दल सूक्ष्म जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून जनजागृती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलावी
लातूर : प्रतिनिधी राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी ११ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत पॅट परीक्षेसह ९वी व ११वीच्या परीक्षांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्यावतीने शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शाळांची […] The post शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ध्वनी प्रदूषणाविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई
लातूर : प्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील महिन्यात मोहीम राबविण्यात आली होती. मोहिमेमध्ये […] The post ध्वनी प्रदूषणाविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य शासनाने आज (७ एप्रिल २०२६) प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, यामध्ये जळगाव, नाशिक, पुणे आणि मंत्रालयातील विविध महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची नियुक्ती आता मुंबईतील महत्त्वपूर्ण अशा 'पोकरा' प्रकल्पाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. तर श्वेता सिंघल यांनी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बदली करण्यात आली आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये नवीन नेतृत्व मीनल करनवाल (२०१९ बॅच): जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची बदली आता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई या महत्त्वाच्या पदावर झाली आहे. करिश्मा नायर (२०२१ बॅच): नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून त्यांची नियुक्ती आता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव म्हणून करण्यात आली आहे. अमित रंजन (२०२२ बॅच): यवतमाळमधील पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी पदावरून त्यांची पदोन्नती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली आहे. मंत्रालयातील फेरबदल आणि इतर महत्त्वाच्या नियुक्त्या श्वेता सिंघल (२००९ बॅच): यांची नियुक्ती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. गीतांजली बाविस्कर (२०१५ बॅच): खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची बदली सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय येथे झाली आहे. डॉ. दिलीप जगदाळे (२०१५ बॅच): महावितरण (कल्याण) च्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची बदली सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय येथे करण्यात आली आहे. पुणे आणि कल्याणमधील बदल राहुल रंजन महिवाल (२००५ बॅच): महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (पुणे) च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची नियुक्ती आता सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे म्हणून करण्यात आली आहे. रुचेश जयवंशी (२००९ बॅच): यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे या पदावर झाली आहे. कान्हूराज बगाटे (२०११ बॅच): यांची नियुक्ती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण म्हणून करण्यात आली आहे.
४ वर्षांपासून फेरीवाला धोरणाचे भिजत घोंगडे
लातूर : प्रतिनिधी शहरातील फेरीवाले व पथविक्रेत्यांना लातूर शहर महापालिका प्रशासनाने अधिकृत पथविक्रेता परवाने जानेवारी २०२२ मध्ये दिले. मात्र गेल्या ४ वर्षांपासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून झालेली नाही. महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत खुप कमी आहे. फेरीवाला धोरण हे एक उत्पन्नाचे चांगले स्त्रोत असताना महापालिका प्रशासनाकडून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या खुप मोठ्या […] The post ४ वर्षांपासून फेरीवाला धोरणाचे भिजत घोंगडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालातर्फे गिरीश कुबेर यांच्याशी संवाद
लातूर : प्रतिनिधी स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या ‘कस्तूर-कांचन सभागृहात, विख्यात लेखक आणि ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. जगाचं राजकारण हे इतिहास आणि वर्तमान रक्तरंजित करणा-या ‘तेला’ भोवती फिरत आहे, याचे सखोल विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केले आहे. […] The post स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालातर्फे गिरीश कुबेर यांच्याशी संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जलसंपदा विभागातील कर्मचा-याची आत्महत्या
लातूर : प्रतिनिधी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर कार्यालयात कार्यरत असलेल्या एका चतुर्थश्रेणी कर्मचा-याने रविवार या सुटीच्या दिवशी कार्यातलयात विष प्राशन करून आतमह्त्या केल्याची चर्चा आहे. जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर कार्यालयात डेपोटेशनवर कार्यरत असलेल्या राम पंडू सुर्यवंशी याने रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यातलयात विष प्राशन […] The post जलसंपदा विभागातील कर्मचा-याची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बु-हाणनगरमध्ये पाण्याची व्यवस्था; आश्वासनाची पूर्तता
लातूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणुकीत महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटातील बु-हाणनगर भागातील रहिवाशांना पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. नव नियुक्त जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के यांनी बु-हाणनगरमध्ये बोअर पाडून पाण्याची व्यवस्था करुन आश्वासनाची पूर्तता केली आहे. महाराणा प्रतापनगर जिल्हा परिषद गटातील ब-हाणनगरमधील स्थानिकांना गेल्या ३ ते ४ वर्षांपासून पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर […] The post बु-हाणनगरमध्ये पाण्याची व्यवस्था; आश्वासनाची पूर्तता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात विविध साहित्य दाखल
लातूर : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे गतवर्षाप्रमाणे विविध साहित्याचे स्टॉल अभारण्यात आले आहे. या स्टॉलवरून अनुयायी मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह म्हणजे एक आनंदाचा पर्वच असतो. त्यानिमित्ताने शहरात […] The post डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात विविध साहित्य दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
४० माओवाद्यांसह ‘पीएलजीए’च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे
गडचिरोली : तेलंगणा व छत्तीसगड सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीचे साम्राज्य निर्माण करणा-या नक्षलवादी चळवळीचा पाया आता पूर्णपणे हादरला आहे. नक्षल्यांच्या पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) चा जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ मल्ला याने आपल्या ४० सहका-यांसह पोलिसांसमोर ७ एप्रिल रोजी शरणागती पत्करली. यामुळे माओवाद्यांचे बटालियन विखुरले असून सीमावर्ती भागात हिंसक चळवळीला ओहोटी लागल्याचे […] The post ४० माओवाद्यांसह ‘पीएलजीए’च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एल निनोचा प्रभाव, यंदा पाऊस कमी पडणार!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. २०२६ मध्ये सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत मान्सून पर्जन्यमान सरासरीच्या ९४ टक्के असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हंगामाच्या दुस-या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता […] The post एल निनोचा प्रभाव, यंदा पाऊस कमी पडणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

28 C