मी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली. आता ते परळी सांभाळतात आणि मी माळाकोळी सांभाळेन, असे विधान भाजप नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट पंकजा मुंडे यांनी सोमवारी केले आहे. परळी विधानसभा मतदारसंघ हा पंकजा यांचा होता. पण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी तो ताब्यात घेतला. त्यानंतर पंकजा यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचे सातत्याने प्रयत्न केले. पण आता त्यांनी चक्क परळी धनंजय मुंडेंना देऊन टाकल्याचे सूतोवाच केल्याने त्यांच्या विधानाची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुका हा मुंडे कुटुंबीयांचा राजकीय गड म्हणून ओळखला जातो. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी येथूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि हा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्याकडे आला. त्यानंतर पंकजा यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्यांनी वेळोवेळी आपल्या मनातील सल बोलूनही दाखवली. पण आता राज्याच्या राजकारणातील बदलत्या स्थितीत त्यांनी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकल्याचे विधान केले आहे. मला माळाकोळीवर प्रेम करू द्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. पंकजा यावेळी बोलताना म्हणाल्या, मुंडे साहेबांनी माळाकोळीवर प्रेम केले. त्यामुळेच मी येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण करू शकले, कारण ते वचन साहेबांनी दिले होते. परळी एवढेच मी माळाकोळीवर प्रेम करते. आता परळीवर प्रेम धनुभाऊंना करू द्या. मी त्यांना ती देऊन टाकली आहे. मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. परळी हा धनंजय मुंडेंचा मतदारसंघ आहे. त्यांनी त्याच्यावर प्रेम करावे. मी माळाकोळीवर प्रेम करते. कदाचित माळाकोळी माझ्यावर परळीहून जास्त प्रेम करेल, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे माळाकोळी हा लोहा विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. हा मतदारसंघ परळी तालुक्याला चिकटूनच आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भविष्यात लोहा विधानसभा मतदारसंघातून लढणार का? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जात आहे. धनंजय मुंडेंना अडचणीत साथ दिली पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, धनंजय मुंडे अडचणीत असताना मी मागचे सर्वकाही विसरून त्याच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलेल्या त्यागाच्या भावनेतूनच मी व धनुभाऊ एकत्र आलो. ते डीएम आहेत, तर मी पीएम आहे. धनंजय मुंडे हे गोविंद केंद्रे यांचे मेहुणे आहेत. आज मेहुण्याचा चेहरा पाहून त्यांचाही चेहरा खुलला. पण केंद्रे यांनी मेहुण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे यांच्यावरील प्रेमाखातर त्यांनी नेहमीच त्यांची साथ दिली हे मी कधीही विसरू शकत नाही. गोपीनाथ मुंडेंना आपल्यातून जाऊन आज 12 वर्षे झाली. त्यानंतरही आज त्यांचा पुतळा उभारला जातो हे प्रेम पाहून मी भारावले. गोपीनाथ गड हा माझ्या एकटीच्या मालकीचा नाही. तो मुंडे कुटुंब किंवा धनंजय मुंडे यांच्याही मालकीचा नाही. तो तुमचा आहे. या गडाची प्रत्येक वीट तुमच्या खर्चाने रचली गेली आहे. तुम्हाला एक हक्काचे ठिकाण मिळावे या उद्देशाने गोपीनाथ गडाची उभारणी करण्यात आली आहे, असे पंकजा म्हणाल्या.
बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलेले असतानाच, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमाचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे? असा प्रतिसवाल भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद होते. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही बोचरी टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांना आता पूर्वीसारखी गर्दी होत नसेल, म्हणूनच ते आता मुंबईतील शिवसेना-मनसेच्या शाखांना भेटी देत फिरत आहेत, असे ते म्हणाले. महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरू आहेत. या बिनविरोध निवडीविरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांची देखील भेट घेत, त्यांच्यासमोर पुरावे सादर केलेत. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत, बिनविरोध निवडींचे समर्थन केले. नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? मुंबई आणि ठाण्यातील अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याच्या विरोधात मनसेने न्यायालयात धाव घेतली आहे. यावर बावनकुळे म्हणाले की, निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यापूर्वी राज्यात बिनविरोध सरपंच निवडून यायचे, तेव्हा आम्ही कधीच विरोध केला नाही. जनतेला विकास हवा आहे, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे ठरवले आहे. राज ठाकरेंनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याची गरज नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना उत्तर राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनातून भाजपवर 'दुटप्पी' भूमिकेचा आरोप केला होता. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुकांना विरोध करणारा भाजप महाराष्ट्रात त्याचे समर्थन कसे करतो, असा सवाल त्यांनी विचारला होता. याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, ज्याला जिथे जायचे आहे तिथे जाण्याचा अधिकार लोकशाहीत आहे. बिनविरोध निवडीमध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन झालेले नाही. मग यात आक्षेप घेण्यासारखे काय?. प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा सोलापूरच्या नेत्या प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. प्रणिती शिंदे कधीही भाजप नेत्यांच्या भेटीला आलेल्या नाहीत आणि त्या आमच्या संपर्कातही नाहीत. अफवा पसरवून उगाच एखाद्याचे राजकीय करिअर कशाला उद्ध्वस्त करता? असे म्हणत त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. हे ही वाचा... महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडी:अविनाश जाधवांनी घेतली राज्य निवडणूक आयोग आयुक्तांची भेट, पुरावे केले सादर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत 'बिनविरोध' निवडींचा जो धडाका सत्ताधाऱ्यांनी लावला आहे, त्याविरोधात मनसेने आता 'आरपार'ची लढाई पुकारली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील कथित गैरप्रकारांचे व्हिडिओ आणि पुरावे सादर केले. या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने ठाण्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. शिवाय मनसेने आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सविस्तर वाचा...
देशातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना भाजप नेत्या नवनीत राणा आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यातील वादाने नवे वळण घेतले आहे. काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना उद्देशून केलेले आवाहन मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. जर ते 19 मुलं जन्माला घालत असतील, तर आपणही किमान चार मुलं जन्माला घातली पाहिजेत, असे वक्तव्य त्यांनी केले होते. या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि त्यावरून देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या वक्तव्याने लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यांचा संगम असलेला वाद पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला. नवनीत राणांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी अमरावतीतील जाहीर सभेत जोरदार पलटवार केला. त्यांनी उपरोधिक शैलीत नवनीत राणांना डिवचत, तुम्ही चार नाही, तर आठ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काहीही देणंघेणं नाही, असे म्हटले. मात्र, ओवैसी यांचा रोख केवळ विधानावर नव्हता, तर त्या मागील राजकीय हेतूंवर होता. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे देशातील लोकांचे लक्ष महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरून हटवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. द्वेषाचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. ओवैसींच्या या टीकेनंतर आता नवनीत राणा यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी थेट असदुद्दीन ओवैसी यांच्या राष्ट्रनिष्ठेवर आणि घटनात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. डेमोक्रेसी बदलत चालली आहे, यावर ओवैसींनी बोलले पाहिजे. या देशात राहायचे असेल, तर संविधान मानावे लागते, असे म्हणत त्यांनी ओवैसींवर गंभीर आरोप केले. केवळ वक्तव्यापुरते न थांबता, त्यांनी ओवैसींचे नागरिकत्व रद्द करून त्यांना पाकिस्तानला पाठवावे, अशी थेट मागणी करत वादाला अधिक धार दिली. नवनीत राणा यांनी आपल्या वक्तव्यात ओवैसींवर अनेक मुद्द्यांवरून हल्ला चढवला. पाकिस्तानमध्ये जाऊन दहा नाही, तर वीस मुलं जन्माला घाला, असे म्हणत त्यांनी टोला लगावला. ओवैसींच्या मनात काय विचार चालले आहेत, हे आम्हाला माहिती आहे, असा दावाही त्यांनी केला. तुम्ही संसद सदस्य आहात, डेमोक्रेसीवर बोला. पण तुम्ही संविधानाला मानत नाही, भारत माता की जय म्हणत नाही, वंदे मातरम बोलत नाही, असे म्हणत त्यांनी ओवैसींच्या देशप्रेमावरच प्रश्न उपस्थित केला. मग तुम्ही या देशाला काय मानता? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. इतक्यावर न थांबता नवनीत राणा यांनी निवडणूक यंत्रणेलाही या वादात ओढले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करावी आणि ओवैसींना देशाबाहेर हाकलावे, अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा वाद आता केवळ शब्दयुद्ध न राहता घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. नवनीत राणा यांच्या या आक्रमक भूमिकेने भाजपच्या कठोर राष्ट्रवादी भूमिकेचे प्रतिबिंब असल्याचे समर्थक सांगत आहेत, तर विरोधक याला ध्रुवीकरणाचे राजकारण म्हणत टीका करत आहेत. दरम्यान, ओवैसी यांनी अमरावतीतील सभेत केलेल्या वक्तव्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांच्या लोकसंख्याविषयक वक्तव्याचा उल्लेख करत, एकीकडे मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, तर दुसरीकडे नवनीत राणा चार मुलांचा सल्ला देतात, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी उपहासाने तुम्ही आठ मुलं जन्माला घाला, असे म्हणत हा मुद्दा वैयक्तिक नसून राजकीय द्वेषातून उभा राहतो आहे, असा आरोप केला. वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता या घडामोडींमुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्यावर ओवैसी पुढे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा वाद येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, लोकसंख्या, धर्म, राष्ट्रवाद आणि संविधान या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष अधिक धारदार होताना दिसत आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत सामान्य जनतेचे प्रश्न पुन्हा एकदा बाजूला पडणार का, हा खरा प्रश्न राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनच्या मौल्यवान जमिनीवरून राज्याच्या राजकारणात मोठा वाद उभा राहिला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार यांनी ज्या इमारतीत नुकतीच पत्रकार परिषद घेतली, ती इमारतच संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, या संपूर्ण व्यवहारामागे नियोजनबद्ध पद्धतीने जमिनीचा गैरवापर झाल्याचा दावा विजय कुंभार यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणातील कागदपत्रे, नावे आणि व्यवहारांची साखळी उघड करत अनेक गौप्यस्फोट केले. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही संस्था 1936 साली स्थापन झाली असून साखर उद्योगातील संशोधन, तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षणासाठी ही संस्था महत्त्वाची मानली जाते. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात, जिथे पूर्वी बस स्थानक होते आणि सध्या मेट्रो स्टेशन आहे, त्या ठिकाणी संस्थेच्या मालकीची सुमारे 30 हजार स्क्वेअर फूट जागा आहे. संस्थेच्या समोरच्या भागात इमारत उभारण्यात आली, तर मागील बाजूची तेवढीच जागा मोकळी ठेवण्यात आली होती. पुढे संस्थेच्या आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत या जागेचा विकास करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आली. मात्र, ही परवानगी भाडेकरारासाठी असताना प्रत्यक्षात ती जागा विकली गेल्याचा गंभीर आरोप विजय कुंभार यांनी केला आहे. विजय कुंभार यांच्या म्हणण्यानुसार, संस्थेच्या विश्वस्तांनी कल्पवृक्ष प्लांटेशन या कंपनीला समोरच्या 30 हजार स्क्वेअर फूट पैकी 15 हजार स्क्वेअर फूट जागा साठ वर्षांच्या भाडेकराराने देण्याची परवानगी घेतली होती. धर्मादाय आयुक्तांचा स्पष्ट आदेश ‘लीज डिड’ म्हणजेच भाडेकरारासाठी होता. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात या जागेची थेट विक्री करण्यात आली. या जागेवर 13 मजली इमारत उभारण्यात आली असून, त्यातून सुमारे 63 हजार स्क्वेअर फूट कमर्शियल जागा निर्माण झाली आहे. या इमारतीच्या खालच्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय असून, वरचे मजले व्यावसायिक दराने विकले गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे या संपूर्ण व्यवहारासाठी साहिल प्रधान या व्यक्तीला पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. विजय कुंभार यांनी स्पष्ट केलं की, साहिल प्रधान हा तोच व्यक्ती आहे जो मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्यातील व्यवहाराचा साक्षीदार होता. अमेडिया ही कंपनी पार्थ पवार यांच्याशी संबंधित असल्याचा दावा याआधीही समोर आला होता. याच साहिल प्रधानला डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनकडून कल्पवृक्ष कंपनीसोबत व्यवहार करण्यासाठी अधिकार देण्यात आले, ही बाब संशय अधिक गडद करणारी असल्याचं विजय कुंभार यांनी सांगितलं. कल्पवृक्ष प्लांटेशन कंपनी आणि पवार कुटुंबातील संबंधांवरही विजय कुंभार यांनी बोट ठेवलं. कल्पवृक्ष कंपनीचे संचालक आणि सुनेत्रा पवार या काही कंपन्यांमध्ये एकत्र संचालक राहिले असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या व्यवहारात केवळ संस्था आणि बिल्डरच नाही, तर सत्ताधारी राजकीय नेतृत्वाचेही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचा संशय निर्माण होतो, असं कुंभार यांनी म्हटलं. विशेष म्हणजे, 2017 पासून या जागेच्या विकासासाठी हालचाली सुरू होत्या, मात्र कोणतीही ठोस कारवाई आजपर्यंत झाली नाही, यावरून भाजपही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेत एकत्र असल्यामुळेच कारवाई होत नाही, असा थेट आरोप त्यांनी केला. या वादग्रस्त व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनचा इतिहासही पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे शेठ लालचंद हिराचंद आणि वालचंद हिराचंद यांनी या संस्थेची स्थापना केली होती. ब्रिटिश काळात साखर उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान भारतात विकसित व्हावे, या उद्देशाने ही संस्था उभारण्यात आली. 1965 साली संस्थेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते, तर 2011 मध्ये उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज हीच संस्था व तिची जमीन वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण वाढण्याची शक्यता आहे. विजय कुंभार यांनी केलेल्या आरोपांवर आता सरकार, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि संबंधित संस्थेच्या विश्वस्तांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा केवळ जमिनीचा व्यवहार नसून, सत्तेचा गैरवापर, संस्थात्मक विश्वासघात आणि राजकीय संगनमताचा गंभीर आरोप असल्याने येत्या काळात या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
नवी मुंबईत सर्वपक्षीय घराणेशाही
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला दुस-यावर ‘घराणेशाही’चा आरोप करता येणे अवघड ठरणार आहे. कारण या निवडणूक रिंगणात सर्वच प्रमुख पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर नातेवाईक उमेदवार उतरलेले दिसून येत आहेत. महानगरपालिका निवडणुकीत तब्बल १२ दाम्पत्ये थेट रिंगणात असून, एकूण ४० हून […] The post नवी मुंबईत सर्वपक्षीय घराणेशाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ सुरू केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केला आहे. नगरपालिका निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला. आज मनपा निवडणुकीत तोच कित्ता गिरवला जात आहे. भाजप व त्याचे मित्रपक्ष अधिक बेशरम स्वरुपाचे चारित्र्य घेऊन निवडणुकीत उतरलेत. त्यांनी निवडणुकीपूर्वीच घोडेबाजार मांडला आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खूपसल्याचाही आरोप केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकारांना संबोधित केले. त्यात ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ सुरू केला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी तमाशा मांडला होता. त्यात पैसा फेक, तमाशा देख हा वग होता. आता शहरी भागात महापालिका निवडणुकीत त्यांनी केवळ वगाचे नाव बदलले आहे. तमाशा तसाच सुरू आहे. पण बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या हा नवा वग त्यांनी आणला आहे. निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करावे. हे संविधानाने दिलेला त्यांचा अधिकार आहे. भाजपने वग बदलला, पण तमाशा कायम सपकाळ म्हणाले, राजकीय पक्षांनी त्यांचा जाहीरनामा लोकांपुढे मांडायचा. त्यानंतर मतांचा जोगवा मागायचा. त्यानंतर सर्वाधिक मते ज्याला मिळतील तो माणूस विजयी होतो. त्यानंतर एकमेकांच्या हातात हात घालून पुढच्या कामाला लागायचे ही आजवरची परंपरा व संस्कार आहे. राजकीय पक्षांकडून अशा वर्तनाची अपेक्षा आहे. पण आता आपली ही परंपरा व संस्कृती गुंडाळून ठेवली जात आहे. गावगाडा चालवत असताना केवळ राजकीय पक्ष म्हणून पुढे जाता येत नाही. सर्व स्थानिकांना सोबत घेऊन व त्यांची मोट बांधूनच पुढे जावे लागते. पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या स्वरुपाला सध्या काळे फासले जात आहे. यांची सत्तेची भूक आता लोकशाही गिळंकृत करण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे लोकशाहीला वाचवण्यासाठी काँग्रेस लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला हाक देत आहे. ते पुढे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. आज त्याचाच कित्ता गिरवला जात आहे. भाजप व त्याचे मित्रपक्ष आता अधिक बेशरम स्वरुपाचे चारित्र्य घेऊन मनपा निवडणुकीत उतरलेत. लोकशाही विरोधात घोडेबाजार नावाचा शब्द वापरला जातो. निवडून आल्यानंतर घोडेबाजार मांडला जातो असे मानले जाते. पण यावेळी घोडेबाजार निवडून येण्याच्या अगोदरच माजला आहे. आम्ही भाजप व त्याच्या मित्र पक्षांच्या कृत्याचा तीव्र निषेध करतो. बिनविरोध निवडीवरही सडकून टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, बिनविरोध निवड ही आपोआप झाली नाही. एखादा उमेदवार फार लोकप्रिय आहे म्हणून त्याची बिनविरोध निवडणूक झाली नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात धाकधपट व पैसा वापरण्यात आला. या सर्व खेळाचा मूक साक्षीदार निवडणूक आयोग आहे. व्यवस्था देखील या गुंडागर्दीमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध झालो नाही, तर काळ आपल्याला माफ करणार नाही अशी साद काँग्रेस सर्वसामान्य जनतेला घालत आहे. बिनविरोध निवडणूक झाल्या असल्या तरी नोटांचा पर्याय अबाधित आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली त्या ठिकाणी नोटाचा पर्याय उपलब्ध असणारी ईव्हीएम ठेवून मतदान घ्यावे. लोकांनी नोटावर मतदान करून आपला निषेध नोंदवावा, असे ते म्हणाले. राहुल नार्वेकर संविधानाचे मारेकरी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देशात व राज्यात घटनात्मक प्रक्रियेला काळीमा फासण्याचे काम अनेक पातळीवर झाले. पण देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, विधानसभा व विधानपरिषदेचे सभापती याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात. त्यांनी संविधानाचे संरक्षणकर्ते म्हणून आपले कर्तव्य पार पडले पाहिजे. पण राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राची संस्कृती बुडवण्याचे काम केले. त्यांचे कर्तृ्व केवळ भाजपसाठी पोषक आहे. त्यांचे करंटेपण हे कायमस्वरुपी त्यांच्या कपाळावर गोंदले गेले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे एक काळे पान आहे. राहुल नार्वेकरांनी पहिल्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांना मदत केली. त्यांनी संविधानाच्या अनुसूची दहाच्या माध्यमातून संविधानाच्या छातीत सूरा खूपसण्याचे काम केले. अनुसूची 10 चा मर्डर केला. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली. हा भाजपचा अत्यंत बेशरमपणा व क्रूरपणा आहे. आता हेच राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला फासावर चढवण्याचे काम सर्वांच्या साक्षीने करत आहेत. आम्ही या प्रकरणी आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने सर्व ऐकूण घेतल्यानंतर आम्हालाच पुरावे सादर करण्याची सूचना केली. निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे. सर्वकाही उघडे असताना आयोगाने ही मागणी केली, असेही हर्षवर्धन सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नार्वेकरांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.
चार नव्हे आठ मुलांना जन्म द्या;ओवीसींचा नवनीत राणांवर हल्लाबोल
अमरावती : प्रतिनिधी संततीसंख्येवरून सुरू झालेल्या वादावरून ओवेसींनी राणांच्या वक्तव्याला थेट प्रत्युत्तर दिले आहे. अमरावतीत जाहीर सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की,तुम्ही चार नव्हे तर आठ मुले जन्माला घाला, आम्हाला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. अशा शब्दांत त्यांनी नवनीत राणा यांच्या आधीच्या वक्तव्यावर निशाणा साधला. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रीय नेत्यांच्या सभांमुळे […] The post चार नव्हे आठ मुलांना जन्म द्या;ओवीसींचा नवनीत राणांवर हल्लाबोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापुरातील मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणातील चार फरार संशयितांना साताऱ्यातील तळबीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर शनिवारी रात्री फरार संशयितांच्या अटकेचा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला. नाकाबंदी करून चारही आरोपींना पकडण्यात आले. मोटारीने साताऱ्याकडून कराडकडे जात असताना ते पोलिसांच्या सापडले. त्यांना सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. तासवडे (ता. कराड) टोलनाक्यावर नाकाबंदी करून तळबीड पोलिसांनी शंकर बाबू शिंदे, सुनील शंकर शिंदे, आलोक तानाजी शिंदे (सर्व रा. रविवार पेठ, सोलापूर) आणि महेश शिवाजी भोसले (रा. माळेवाडी, ता. माळशिरस) या फरार संशयितांना पकडले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारीच्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे (रा. जोशी गल्ली, जुना बोरामणी नाका) यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला चढवत तोडफोड केली होती. बाळासाहेब सरवदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करून विरोधकांना उमेदवारी जाहीर केली. त्या कारणावरून दोन गटांत खटके उडत होते. शुक्रवारी (२ जानेवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हत्येच्या घटनेनंतर सोलापुरातील तणाव निर्माण झाला होता. हल्लेखोर फरार झाले होते. सोलापूर शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही जणांना अटकही करण्यात आली. मात्र, चार जण फरार होते. सोलापूर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) त्यांच्या मागावर होती. फरार संशयित शनिवारी रात्री साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडे मदत मागितली. मात्र, संशयित आनेवाडीतून कराडकडे निघाल्याचे समजताच तळबीड पोलिसांना सतर्क करण्यात आले. सोलापूर एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे यांचे पथक मागावर असल्याची कुणकुण संशयितांना लागली होती. त्यामुळे चौघेही संशयित पोलिसांना गुंगारा देत होते. कराडकडे गेलेल्या संशयितांनी आपली मोटार पुन्हा साताऱ्याकडे वळवली. परंतु, तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर केलेल्या नाकाबंदीत सर्वजण अडकले आणि पोलिसांनी चौघांच्याही मुसक्या आवळल्या.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता अधिकृतपणे रंगत चढू लागली आहे. सोमवारपासून मुंबईत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा सुरू होत असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत न राहता, ती थेट राजकीय अस्तित्व आणि वर्चस्वाची चाचपणी ठरणार आहे. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जात असताना, दुसरीकडे भाजपने कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आपलाच महापौर बसवायचा, असा निर्धार केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी आपले संपूर्ण लक्ष मुंबईतील मराठी मतदारांवर केंद्रित केले आहे. मराठी अस्मिता, मुंबईवरील हक्क आणि स्थानिक प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असणार आहेत. गेल्या काही वर्षांत मुंबईतील लोकसंख्येचा आकृतिबंध बदलला असला, तरी मराठी मतदार अजूनही निर्णायक भूमिका बजावू शकतो, असा ठाकरे बंधूंचा विश्वास आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांची संभाव्य एकत्रित ताकद मराठी मतदारांमध्ये प्रभावी ठरू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या निवडणुकीसाठी वेगळीच आक्रमक रणनीती आखली आहे. मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय आणि इतर अमराठी मतदारांना मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचण्यावर महायुतीचा भर आहे. मुंबईतील अमराठी व्होटबँक ही भाजपची पारंपरिक ताकद मानली जाते आणि याच ताकदीच्या जोरावर भाजप-शिवसेना महायुती मुंबईत सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रचारात हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकासाचे मुद्दे ठळकपणे मांडले जाणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर AsceIndia या संस्थेने मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत केलेल्या सर्व्हेने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या सर्व्हेमध्ये मुंबईतील विविध समाजघटकांमध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान मिळू शकते, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार, मराठी मतदारांचा मोठा हिस्सा ठाकरे बंधूंच्या बाजूने झुकलेला असला, तरी एकूण राजकीय समीकरण पाहता मुंबईत भाजप-शिवसेनेचाच महापौर बसण्याची शक्यता अधिक असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. AsceIndia च्या सर्व्हेनुसार, मुंबईतील मराठी मतदारांमध्ये ठाकरे गट आणि मनसे यांना 44 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे, तर भाजप-शिवसेना महायुतीला 42 टक्के मराठी मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. काँग्रेसला केवळ 4 टक्के तर इतर पक्षांना 11 टक्के मराठी मतं मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावरून मराठी मतदारांमध्ये लढत अत्यंत चुरशीची असली, तरी ठाकरे बंधूंना मर्यादित आघाडी मिळू शकते, असे चित्र समोर येत आहे. मुस्लीम मतदारांबाबतच्या आकडेवारीतही महत्त्वाचे संकेत मिळतात. सर्व्हेनुसार, मुस्लीम मतदारांपैकी 41 टक्के काँग्रेसच्या बाजूने मतदान करतील, तर ठाकरे गट-मनसे यांना 28 टक्के मतं मिळू शकतात. भाजप-शिवसेना महायुतीला केवळ 11 टक्के मुस्लीम मतं मिळण्याचा अंदाज आहे, तर उर्वरित 20 टक्के मतं इतर पक्षांकडे जाण्याची शक्यता आहे. यामुळे मुस्लीम मतदारांचा कौल हा भाजपच्या विरोधात जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मात्र, या सगळ्या गणिताचा कळीचा मुद्दा म्हणजे अमराठी मतदार. AsceIndia च्या सर्व्हेनुसार, अमराठी मतदारांमध्ये भाजप-शिवसेना महायुतीला 53 टक्के मतदान मिळू शकते. ठाकरे गट-मनसे यांना केवळ 15 टक्के, तर काँग्रेसला 19 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित 13 टक्के मतं इतर पक्षांकडे जाऊ शकतात. अमराठी मतदारांचा हा मोठा पाठिंबा महायुतीसाठी निर्णायक ठरू शकतो आणि याच जोरावर भाजप-शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता बळावते. सर्व्हेने आधीच राजकीय वातावरण तापवले AsceIndia संस्थेचे संस्थापक अमिताभ तिवारी यांच्या मते, मुंबईतील 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत सुमारे 55 टक्के मतदान झाले होते आणि यंदाही मतदानाची टक्केवारी याच आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी फारशी बदलली नाही, तर अमराठी मतदारांचा कौल भाजप-शिवसेनेच्या बाजूने असल्याने महायुतीचे पारडे जड ठरू शकते. तरीही, ठाकरे बंधूंना किती जागा मिळतात आणि ते मुंबईतील आपले राजकीय अस्तित्व कितपत टिकवून ठेवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबईचा अंतिम कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल, मात्र सर्व्हेने आधीच राजकीय वातावरण तापवले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली दंगलीतील आरोप उमर खालिद व शर्जिल इमाम यांची जामीन याचिका धुडकावून लावली. यामुळे या दोघांनाही आता पुढील वर्षभर जामीन मिळवण्यासाठी कोणताही प्रयत्न करता येणार नाही. या घटनेची देशात खमंग चर्चा रंगली असताना भाजपने उमर खालिद व शर्जिल इमाम हे दोघेही उद्धव ठाकरे यांचे लाडके होते असा आरोप केला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, उबाठाचा नवा मंत्रः मेरे दो अनमोल रतन -एक उमर, दुजा शर्जिल. ‘भारत तेरे तुकडे होंगे ‘अशा घोषणा देणारा उमर खालिद व इथे महाराष्ट्रात येऊन हिंदूबद्दल अपशब्द वापरणारा शर्जिल इमाम हे ‘उबाठा’चे लाडके होते, हे तर वास्तव आहे. आदित्य व खालिद एका व्यासपीठावर येणार होते ज्यावेळी अनेक राज्यांत शर्जिल इमाम चा शोध सुरू होता त्याच वेळी महाराष्ट्रात शर्जिल इमाम येतो, जाहीर प्रक्षोभक भाषण देतो, व आरामात परत जातो.. कारण मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरे असतात. हे एकदा नाही, तर दोनदा घडते. शार्जिल इमाम प्रकरणात मोठा गदारोळ झाल्यानंतर जबाब घेण्यासाठी त्याला गुपचुप आणले जाते. त्याच्यावर कोणतीही जबरदस्तीने कारवाई करणार नाही असे पोलिस उच्च न्यायालयात सांगतात, कारण मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे असतात. उमर खलीद सोबत तर, युवराज आदित्य ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार होते, छात्रभारतीने आयोजित केलेल्या सीएए विरोधी परिषदेला आदित्य ठाकरे उपस्थित रहाणार असल्याचे त्यांच्या छायाचित्रासह निमंत्रण पत्रिकेवरच नमूद होते. आदित्य ठाकरे यांच्या संमतीशिवाय ते शक्य झाले असते का? या चूका नाही. हा योगायोगही नाही. ही जाणीवपूर्वक घेतलेली भूमिका आहे. देशविरोधी विचारांशी जवळीक ठेवून, वरून राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या गप्पा - मुंबईकर आणि महाराष्ट्र हे ओळखून आहेत. इतिहास आठवण करून देतोय, आणि वास्तव स्वतःच बोलतंय, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. जोहरान ममदानीवरूनही ठाकरेंवर निशाणा उल्लेखनीय बाब म्हणजे न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी उमर खालिदला लिहिले एक पत्र गत 2 जानेवारीला समोर आले होते. त्यावरून बरेच राजकारण रंगले होते. ममदांनी यांनी 1 जानेवारी महापौरपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे पत्र समोर आले. केशव उपाध्ये यांनी या मुद्यावरुनही ठाकरे गटावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, कुराणावर हात ठेऊन शपथ घेणारा ‘ममदानी’ मुंबईत हवा म्हणून लांगूलचालन सुरू झाले आहे. अशी लाचारी नको असेल आणि मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. धर्माचे नव्हे, विकासाचे राजकारण हवे. भाजपच्या राजकारणाला विकासाचा ध्यास आहे, तर उबाठाच्या राजकारणाला हिंदुद्वेषाचा वास आहे. ‘द्वेष’ हवा की ‘ध्यास’ हवा हे ठरविण्याची हीच ती वेळ! ‘हिजाब घालणारा महापौर का नाही’ विचारणाऱ्या एमआयएमची राज्यसभेत मदत घेणारी उबाठा, ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्याला उमेदवारी देणाऱ्यांना विरोध करण्याची हिंमत दाखवू शकेल? ‘देशातील संपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे’ असे उघडपणे मानणारी कॅाग्रेस इथल्या एखाद्या ममदानीला विरोध करू शकेल? धर्माच्या राजकारणाला बळी पडू नका… विकास आणि फक्त विकास हेच भाजपचे राजकारण, असे ते म्हणाले होते. खालिद, शर्जिल, 5 वर्षांपासून तुरुंगात दरम्यान, उमर खालिद, शर्जिल इमाम, गुलफिशा फातिमा, मीरान हैदर, शिफा उर रहमान, मोहम्मद सलीम खान व शादाब अहमद यांच्यावर दिल्ली दंगलीचा आरोप आहे. ते मागील 5 वर्षे 3 महिन्यांपासून तुरुंगात बंदिस्त आहेत. दिल्ली हायकोर्टाने त्यांचा जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांचा भ्रमनिरास झाला. सुप्रीम कोर्टाने खालिद व शर्जिल वगळता इतर 5 आरोपींना जामीन मंजूर केला. यामुळे खालिद व शर्जिलचे तुरुंगाबाहेर येण्याचा प्रयत्न असफल ठरला.
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी 'बिनविरोध' निवडींचा जो धडाका लावला आहे, त्याविरुद्ध मनसेने कायदेशीर लढाई पुकारली आहे. ज्या ६८ जागांवर बिनविरोध निवडी झाल्या आहेत, त्यांचा निकाल चौकशी पूर्ण होईपर्यंत राखून ठेवावा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली आहे. या प्रक्रियेत पोलिस आणि निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा दावाही त्यांनी केला. अविनाश जाधव यांनी पुराव्यांचा दाखला देत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर स्वतः उभे राहून उमेदवारांना धमक्या देत असतील, तर आणखी किती पुरावे हवेत? असा सवाल त्यांनी केला. उमेदवार स्वतःहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरी चालत गेला नाही, तर एक पोलिस अधिकारी त्याला घेऊन गेला होता. तो उमेदवार पैशांच्या गंगेत आंघोळ करायला गेला होता का? तो निघून डायरेक्ट गेला आणि अर्ज मागे घेतला याचा अर्थ काय? नार्वेकर असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यांची टीम असतील, पोलिस अधिकारी असतील, आता एवढे सगळे प्रूफ दिल्यानंतरही जर म्हणत असाल की सगळे व्यवस्थित आहे तर कसे चालेल? अशी विचारणा अविनाश जाधव यांनी केली. मतदारांचा हक्क हिरावला जातोय बिनविरोध निवडींमुळे मतदारांचा हक्क हिरावला जात असल्याची टीका अविनाश जाधव यांनी केली. जर 'नोटा'चा पर्याय वापरला असता, तर प्रत्येक जागेवर किमान १० हजार मते सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पडली असती, असा दावा त्यांनी केला. जर तुम्हाला बिनविरोधच निवडी करायच्या असतील, तर मग निवडणुकीची एवढी मोठी प्रक्रिया राबवता कशाला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घटनेमध्ये आम्हाला प्रत्येक माणसाला मतदान करायचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारानुसार तिथे तो नगरसेवक निवडू शकतो. त्यांना हवा तो नगरसेवक निवडू शकतो, आमदार निवडू शकतो, पण ही प्रक्रिया जर पार पडणार नसेल, प्रक्रिया जर तुम्ही ढासळून टाकणार असाल तर मग काय अर्थ आहे? असेही अविनाश जाधव म्हणालेत. हायकोर्टाकडून निर्णय येण्याची अपेक्षा निवडणूक आयोग पूर्णपणे सरकारी यंत्रणेला सामील झाल्याचा आरोप करत जाधव यांनी आता न्यायालयावर विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही शेवटचा मार्ग म्हणून हायकोर्टात गेलो आहोत. आम्हाला खात्री आहे की, हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर न्यायालय प्रशासनावर कडक ताशेरे ओढेल, असे ते म्हणाले. ही लढाई केवळ एका निवडणुकीसाठी नसून पुढील पिढ्यांसाठी निवडणूक यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि संभाव्य 'राजशाही' रोखण्यासाठी असल्याचे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले.
सोलापूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी आलेल्या सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केल्याने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका जाहीर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी थेट आरोप करत म्हटले की, प्रणिती शिंदे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आधीच राजकीय तडजोड म्हणजेच ‘डील’ ठरलेली आहे. त्यांच्या मते, प्रणिती शिंदे या प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यातच भाजपमध्ये जाणार होत्या. मात्र, आगामी नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबण्यास सांगितले आहे. या दाव्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील कथित ‘छुप्या युती’वरही तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, वरवर पाहता हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक असल्याचे चित्र दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी त्यांच्यात आतून समन्वय सुरू असतो. एकीकडे भाजप आहे आणि दुसरीकडे भाजपसाठी काम करणाऱ्या प्रणिती शिंदे आहेत, असा टोला लगावत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला. सोलापूरच्या मतदारांना उद्देशून बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, जर खऱ्या अर्थाने भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आहे. काँग्रेसचा उमेदवार खासदार असला, तरी तो भाजपचेच हित जोपासत असेल, तर अशा पक्षावर विश्वास ठेवायचा कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या खासदार असल्या तरी त्यांची राजकीय भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप त्यांनी ठामपणे केला. आपल्या भाषणात त्यांनी राजकीय नेत्यांमधील कौटुंबिक आणि व्यावसायिक संबंधांवरही भाष्य केले. सुशीलकुमार शिंदे यांच्या नातीच्या लग्नाचा संदर्भ देत सुजात आंबेडकर यांनी सांगितले की, त्या कार्यक्रमात शरद पवार, गौतम अडाणी आणि देवेंद्र फडणवीस हे सर्व प्रमुख पाहुणे म्हणून एकत्र उपस्थित होते. हेच नेते जनतेसमोर रस्त्यावर संघर्ष करत असल्याचा आव आणतात, पण प्रत्यक्षात त्यांचे उद्योग, आर्थिक हितसंबंध आणि सामाजिक नातेसंबंध एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली. सुजात आंबेडकर यांच्या या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे काँग्रेस आणि प्रणिती शिंदे यांच्याकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे, तर दुसरीकडे भाजपकडूनही या दाव्यांवर मौन राखले गेले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा आरोपांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे एकूणच, सोलापूर महानगरपालिका निवडणूक प्रचारात सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्याने वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस-भाजपमधील कथित समजुती, संभाव्य पक्षांतर आणि नेत्यांमधील छुपे संबंध या मुद्द्यांवरून आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. आता या आरोपांवर प्रणिती शिंदे आणि काँग्रेस नेतृत्व काय भूमिका घेतात, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
पिसादेवी (ता. फुलंब्री) येथील आभाळ बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या वतीने शिक्षकांचा विशेष गौरव सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी संत गाडगेबाबा प्राथमिक आश्रम शाळा येथील ज्येष्ठ शिक्षिका सविता मुंडे - कराड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गौरव सोहळा राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊजी बागडे (नाना) यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी आभाळ बहुउद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सविता नामदेव कराड यांनी गेल्या २२ वर्षांपासून डोंगरदऱ्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत शिक्षणाच्या प्रवाहात जोडून ठेवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. विशेषतः मुला-मुलींच्या आरोग्य, आहार, शिक्षण व सर्वांगीण विकासाकडे त्यांनी सातत्याने लक्ष दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या गौरवाबद्दल पंडित दीनदयाल संस्था अंतर्गत संचलित संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सविता मुंडे कराड यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. कार्यक्रमास शिक्षणप्रेमी नागरिक, पालकवर्ग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर प्रभारी अध्यक्षपदी श्रीकांत विश्वनाथ पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, विशाल विलासराव तांबे यांची पुणे शहर निवडणूक समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. या नियुक्त्या माजी महापौर प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर झाल्या आहेत. मनपा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी होणार असल्याने जगताप यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. विशाल तांबे हे पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी माजी नगरसेवक आहेत. त्यांनी यंदा निवडणूक न लढवता पक्ष संघटनेत काम करण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे त्यांची शहर निवडणूक समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली आहे. मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात आघाडी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्यात एकूण ४३ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर अजित पवार गटाने १३८ उमेदवार उभे केले आहेत. आघाडीमुळे अनेक मतदारसंघांत एका पक्षाचे तीन उमेदवार असतील, तिथे चौथ्या उमेदवाराने त्या पक्षाचे चिन्ह घ्यायचे असे धोरण ठरले आहे. यामुळे काही प्रभागांमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्व उमेदवार 'तुतारी' चिन्हाचे आहेत, तर काही प्रभागांमध्ये दोन 'तुतारी' आणि दोन 'घड्याळ' चिन्हाचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक १६, हडपसरगाव, सातववाडी येथे मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त आघाडीचे 'घड्याळ' चिन्हावरील अधिकृत उमेदवार म्हणून वैशाली बनकर, कमलेश कापरे, वर्षा पवार आणि योगेश ससाणे यांना उभे करण्यात आले आहे. शरदचंद्र पवार यांच्या पक्षानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भाग्यश्री विक्रम जाधव आणि अविनाश काळे यांना आधी उमेदवारी दिली होती. परंतु दोन्ही पक्षांची संयुक्त आघाडी असल्याने त्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. त्यांनी अर्ज माघारी न घेतल्याने त्यांच्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराने भाजपवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यांत धमकी दिल्याचा आरोप केला आहे. शिवसेना ठाकरे व मनसेच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर असाच आरोप केला आहे. त्यामुळे या नव्या आरोपांमुळे मुंबईतील राजकारण अधिकच पेटण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या मानखुर्द भागातील प्रभाग क्रमांक 135 मधील अपक्ष उमेदवार लालू भाई वर्मा यांनी वरील आरोप केला आहे. या वॉर्डात त्यांचा सामना भाजप उमेदवार नवनाथ बन यांच्याशी होणार आहे. 2017 मध्येही लालू भाई वर्मा यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे त्यांची या भागात मोठी ताकद असल्याचे मानले जात आहे. वर्मा यांनी भाजप नेत्यांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकण्यासह जीवे मारण्याची व खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा आरोप केला आहे. याकामी पोलिसही भाजपला मदत करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. घरातून मध्यरात्री उचलून नेले लालू भाई वर्मा यांच्या दाव्यानुसार, भाजप नेते किरीट सोमय्या, मनोज कोटक व भाजप प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी रात्री उशिरा बोलावून घेतले. मला मध्यरात्री 12 वाजता घरातून उचलून नेण्यात आले. पोलिस आयुक्त, जॉइंट सीपी व डीसीपी यांचे नाव घेऊन मला धमकावण्यात आले. माझ्या घराचा दरवाजा रात्रभर वाजवण्यात आला. मी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, तर माझ्या गाडीत चरस, गांजा किंवा अफू ठेवून मला खोट्या गुन्ह्यांत अडकवले जाईल अशी धमकी देण्यात आली. साम, दाम, दंड, भेदाचा वापर लालू भाई व भाजप पदाधिकाऱ्यांत होणाऱ्या वादाचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात लालू भाई कमालीचे संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओ ते भाजप उमेदवार नवनाथ बन यांना उद्देशून म्हणत आहेत की, तुम्ही मुख्यमंत्र्यांचे नाव गेऊन आमचा मर्डर करा. माझ्या मुलाबाळांना संपवा. याहून अधिक काय कराल? किरीट सोमय्या यांनी मला मुंबईत राहू न देण्याची व धंदापाणी करू न देण्याची धमकी दिली आहे. हे सर्वकाही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार होत आहे. या व्हिडिओमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाचा पूर्ण जोमाने वापर होत असल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे. या आरोपावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मनसेची बिनविरोध निवडणुकीवर आगपाखड दुसरीकडे, मनसे बिनविरोध निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव या प्रकरणी बोलताना म्हणाले, देशाची निवडणूक यंत्रणा पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित राहावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय देशातील विविध निवडणुकांवर परिणाम करणारा असेल. नोटाचा पर्याय वापरला गेला तर आत्ताच्या घडीला सर्व जागांवर किमान 10 हजार मते यांच्याविरोधात पडतील. पण हे सर्व निवडणूक यंत्रणेला करायचे नाही. एक उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या घरी चालत गेला. एक पोलिस अधिकारी त्याच्यासोबत होता. तो पैशाच्या गंगेत आंघोळ करण्यास गेला होता का? तो निघून डायरेक्ट गेला. त्यानंतर त्याने अर्ज मागे घेतला. याचा अर्थ काय? तुम्ही बिनविरोध निवडणुका घ्यायचे ठरवले तर मग ही निवडणुकीची प्रक्रिया राबवताच कशाला? संविधानाने प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारानुसार जनता आपला नगरसेवक निवडू शकते. पण ही प्रक्रियाच पार पाडली जाणार नसेल तर मग या अधिकाराला अर्थच काय? असे जाधव संतापाच्या सुरात म्हणाले.
पुणे शहरात सायबर फसवणुकीचे दोन मोठे प्रकार उघडकीस आले आहेत. यात एका ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून १०.५५ लाख रुपये, तर दुसऱ्या एका व्यक्तीच्या खात्यातून ३.८० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरण्यात आले. दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऱ्हे येथील मानाजीनगरमध्ये राहणाऱ्या ६६ वर्षीय सेवानिवृत्त महिलेने याप्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करत चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून १० लाख ५५ हजार रुपये काढून घेतले. प्राथमिक तपासानुसार, चोरट्यांनी महिलेचा मोबाइल हॅक करून ही रक्कम लांबवली असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माराम शेटे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून एका व्यक्तीची ३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध येथील डीपी रस्त्यावर राहणाऱ्या ४८ वर्षीय तक्रारदाराला काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला खासगी गॅस पुरवठा कंपनीचे प्रतिनिधी भासवले आणि थकित देयक न भरल्यास गॅस पुरवठा तात्काळ खंडित करण्याची धमकी दिली. यानंतर चोरट्यांनी तक्रारदाराच्या बँक खात्याची माहिती मिळवून त्यातून ३ लाख ८० हजार रुपये काढून घेतले. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. शहरात गॅस किंवा वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे आणि कोणतेही देयक भरण्यापूर्वी संबंधित कंपनीशी खातरजमा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तुम्ही कितीही मुले जन्माला घाला, आम्हाला काय करायचंय?:अमरावतीत असदुद्दीन ओवेसींची नवनीत राणांवर टीका
अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एमआयएमने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. आज झालेल्या सभेत असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा दाखला देत, जर ते १९ मुलं जन्माला घालत असतील, तर आपणही किमान ४ मुलं जन्माला घातली पाहिजेत, असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना ओवेसींनी राणांवर सडकून टीका केली. तुम्ही ४ नाही तर ८ मुलं जन्माला घाला, आम्हाला काय देणंघेणं! असे म्हणत ओवेसी यांनी नवनीत राणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीची तारीख झाल्यानंतर सर्वच पक्ष प्रचाराला लागले आहेत. अमरावतीत उमेदवाराच्या प्रचारासाठी आता राष्ट्रीय नेत्यांच्या एन्ट्रीने राजकारण चांगलेच तापले आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली होती. आत एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली. या सभेतून ओवेसी यांनी नवनीत राणांच्या विधानाचा समाचार घेत, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. नेमके काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी? सभेत बोलताना ओवेसी म्हणाले की, मोहन भागवत म्हणतात मुलं जन्माला घाला, नवनीत राणा म्हणतात ४ मुलं जन्माला घाला. मी सांगतो तुम्ही ८ मुलं जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. पण तुम्ही केवळ द्वेषाचे राजकारण करत आहात. अशा प्रकारच्या वक्तव्यांनी जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून भरकटवले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अजित पवारांवर बोचरी टीका ओवेसींनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही शाब्दिक हल्ला चढवला. जे आपल्या काकांचे (शरद पवार) झाले नाहीत, ते तुमचे काय होणार? असा थेट सवाल त्यांनी मतदारांना केला. आता 'घड्याळाची' वेळ गेली असून 'पतंग' उडवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत त्यांनी एमआयएमच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. मी भाजपची बी-टीम नाही, अल्लाचा पुतळा वारंवार होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना ओवेसी म्हणाले की, लोक मला म्हणतात मी भाजपची बी-टीम आहे. पण मी कोणाची टीम नाही, मी तर अल्लाचा पुतळा आहे आणि लोकांसाठी काम करायला आलो आहे. एमआयएमची ही आक्रमक भूमिका अमरावतीच्या राजकीय मैदानात कोणाला फायदेशीर ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नेमके काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा? एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि 19 मुले आहेत. तो म्हणतो की मला 30-35 मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका 19 मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन-चार-चार मुले जन्माला घातली पाहिजे, असे राणा यांनी म्हटले आहे. मी सगळ्या हिंदू लोकांना सांगते की जर ते खुलेपणे सांगत असतील की 4 बायका आणि 19 मुले आहेत तर आपण किमान तीन-तीन चार-चार मुले जन्माला घातली पाहिजेत. त्यांचा विचार आपल्या हिंदुस्थानला पाकिस्तानला बनवायचा आहे. ते मोठ्या संख्येने मुलं जन्माला घालत आहेत, तर मग आपण एका मुलावर का संतुष्ट राहतो? आपणही तीन ते चार मुले जन्माला घातली पाहिजेत यामध्ये काही दुमत नाही, असेही नवनीत राणा म्हणाल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगरात चेंगराचेंगरी; ३ महिला बेशुद्ध
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात पाच हजाराची साडी ५९९ रुपयांत मिळणार या ऑफर्समुळे महिलांच्या झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत लहान मुलांची आईपासून ताटातूट आणि ३ जणी बेशुद्ध पडल्या. अखेर पोलिसांनी तातडीने दुकान बंद पाडल्यानंतर गर्दी कमी झाली. मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतींच्या ऑफर्समुळे रविवारी संभाजीनगर शहरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात थरार […] The post छत्रपती संभाजीनगरात चेंगराचेंगरी; ३ महिला बेशुद्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच मुकुंदनगर परिसरात कार्यकर्त्यांमध्येवाद पेटला आहे. एका युवकाने सोशल मीडियावर एका उमेदवाराच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने त्याच्या डोक्याला बंदूक लावून डोक्यात चॉपरने वार केल्याची घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात तणावनिर्माण झाला होता. या प्रकरणी सहा ते सातजणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्रार मुक्तार शेख (वय २३, रा.आलमगीर, भिंगार) असे जखमी युवकाचेनाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या जबाबावरून अफजल आसीर शेख (अफजलपैलवान) आणि अस्लम आसीर शेख (अस्लम पैलवान) या दोघांसह चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंदवला आहे. जखमी अब्रार याने एका उमेदवाराच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते. तो शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून मुकुंदनगर भागातून जातअसताना अल अमीन ग्राऊंडसमोर गर्दीमुळे थांबला. यावेळी जमावातील एकाने त्याला गाडीवरून खाली ओढले. त्यानंतरअफजल शेख आणि अस्लम शेख यांनीतिथे येऊन अब्रार यांना मारहाण केली.अफजल याने डोक्याला बंदूक लावून जीवेमारण्याची धमकी दिली. तर, अस्लम यानेचॉपरने डोक्यावर वार केल्याचे फिर्यादीतम्हटले आहे. घटनेनंतर मुकुंदनगर परिसरा ततणाव निर्माण झाला. दिव्य मराठी नॉलेज अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे, दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल करताना अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावली. यात खुनाचा प्रयत्न करणे, यासह आर्मॲक्ट या सारख्या गुन्ह्याचा समावेश आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहावर्षांपर्यंत किंवा जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच सत्ताधारी पक्षातील 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मतदान न होता उमेदवार थेट विजयी ठरणे हा लोकशाही प्रक्रियेवर गंभीर आघात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेषतः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील घडामोडींमुळे हा वाद अधिकच तीव्र झाला आहे. येथे शिंदे गट-भाजप महायुतीचे सर्वाधिक 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने निवडणूक ही केवळ औपचारिकता उरल्याचा आरोप विरोधक करत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा 61 आहे. मात्र मतदान होण्याआधीच शिंदे सेना आणि भाजपने 20 जागांवर बिनविरोध विजय मिळवल्याने त्यांच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोठ्या प्रमाणात सुकर झाला आहे. या 20 नगरसेवकांमध्ये भाजपचे 14 आणि शिंदे गटाचे सहा उमेदवार आहेत. त्यामुळे महायुतीने सुरुवातीलाच आघाडी घेतल्याचे चित्र दिसत असून, उर्वरित लढतींमध्येही त्यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बिनविरोध निवडींसाठी विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. उमेदवारांना माघार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप सातत्याने होत आहे. काही ठिकाणी दबाव, राजकीय सौदेबाजी आणि पडद्यामागील व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या सगळ्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, शिंदे-भाजपला मदत ही थेट ठाकरे गटातील काही नेत्यांकडूनच झाल्याचा आरोप आता उघडपणे पुढे आला आहे. ठाकरे गटाच्या कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष तात्या माने यांनीच आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगितल्याचा गंभीर दावा समोर आला आहे. हा आरोप कोण्या विरोधी पक्षाकडून नव्हे, तर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली पोटे यांनी केला आहे. प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवार असलेल्या वैशाली पोटे यांनी तात्या माने यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली असून, त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तात्या माने हे ‘निवडणुकीतून माघार घ्या, हा पक्षाचा आदेश आहे’ असे सांगताना ऐकू येतात. तसेच ‘वरुण सरदेसाई यांच्याशी बोलून घ्या’, ‘वरून आदेश येतात, तेव्हा आपल्याला ऐकावं लागतं’, अशा स्वरूपाची वक्तव्येही या क्लीपमध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे. या ऑडिओ क्लिपची अधिकृत खातरजमा झालेली नसली तरी ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गटातीलच काही नेते पक्षविरोधी भूमिका बजावत असल्याची शंका अधिक बळावली आहे. विशेष म्हणजे, एवढ्या दबावानंतरही वैशाली पोटे यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मतभेद आणि अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आले आहेत. या प्रकरणाचा थेट फटका ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीला बसू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. आता या घडामोडींवर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बिनविरोध निवडींमुळे निर्माण झालेला लोकशाहीविषयक वाद, आर्थिक व्यवहारांचे आरोप आणि पक्षांतर्गत ऑडिओ क्लिप प्रकरण यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूक राज्यातील सर्वात वादग्रस्त निवडणुकांपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. आगामी काळात या प्रकरणावर काय राजकीय भूकंप होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. हे प्रचारक मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित महायुतीच्या अजस्त्र प्रचार यंत्रणेचा नेटाने सामना करतील. दरम्यान, आज उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची विक्रोळीत मुंबई महापालिकेसाठी आज पहिली संयुक्त सभा होणार आहे. त्यात हे दोन्ही बंधू मुंबई महापालिकेचा गड कोणत्याही स्थितीत सर करण्यासाठी आसुसलेल्या भाजपवर जोरदार हल्ला चढवण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 तारखेला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणुकीच्या प्रचारासाठी आपल्या पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत उद्धव व आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, आमदार अनिल परब, भास्कर जाधव, अंबादास दानवे, अनिल देसाई, विनायक राऊत, सुषमा अंधारे, वरुण सरदेसाई, आनंद दुबे, आदेश बांदेकर आदी नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. या प्रत्येकावर एक विशिष्ट जबाबदारी देण्यात आली आहे. ठाकरे बंधूंची आज विक्रोळीत सभा दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिली संयुक्त सभा विक्रोळी येथे होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या जवळपास 7 ते 8 संयुक्त सभा होणार आहेत. त्यातील ही पहिली सभा असणार आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधू उद्धव व राज ठाकरे यांना एकत्रितपणे भेटीही देणार आहेत. उद्धव यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे व राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याही मुंबापुरीत 2 संयुक्त सभा होणार आहेत. खाली वाचा ठाकरे गटाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेसंजय राऊतचंद्रकांत खैरेभास्कर जाधवसुभाष देसाईअनंत गीतेअरविंद सावंतअनिल देसाईविनायक राऊतअनिल परबओमराजे निंबाळकरअंबादास दानवेसुषमा अंधारेराजन विचारेसुनील प्रभूआदेश बांदेकरवरुण सरदेसाईरवींद्र मिरलेकरनितीन पाटीलराजकुमार बाफनाप्रियंका चतुर्वेदीसचिन अहिरलक्ष्मण वाढलेमनोज जामसुतकरनितीन देशमुखसंजय जाधवज्योती ठाकरेजयश्री शेळकेजान्हवी सावंतशरद कोळीसुनील शिंदेहारुन खानसिद्धार्थ खरातवैभव नाईकआनंद दुबेअशोक तिवारीराम साळगावकरप्रियांका जोशीअनिश गाढवे ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर राज व उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपल्या युतीचा वचननामा जाहीर केला. या निमित्ताने राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात उद्धव यांच्यासोबत एकत्र आले. यावेळी उद्धव म्हणाले, तब्बल 20 वर्षानंतर आम्ही दोघे भाऊ शिवसेना भवनात एकत्र आल्याचा आनंद आहे. देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. मतचोरी पकडल्यानंतर साम, दाम, दंड, भेद, वापरून उमेदवारांची पळवा-पळवी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, पण राहुल नार्वेकर यांच्याकडे निपक्षपातीपणा नाही. त्यांना तत्काळ निलंबित करावे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. काही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करून मतदारांचा हक्क हिरावण्यात आला. निवडणूक आयोगाने अशा ठिकाणची निवडणूक प्रक्रिया रद्द करून तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी. मी सत्तेत असताना मराठी सक्तीची केली. पण तो आदेश महायुती सरकाने रद्द केला. हिंदू धोक्यात आला आहे. हा मागील 10 वर्षांतील परिपाक आहे. आम्ही हिंदी नाही, हिंदू आहोत. पंतप्रधान मोदी 10 वर्ष सत्तेत असताना हिंदू संकटात कसा? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. विशेषतः राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. दीर्घ काळानंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मराठी मतदार पुन्हा एकवटण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आणून स्वतःचा महापौर बसवायचा, असा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी रणनीती, आक्रमक प्रचार आणि जमिनीवरील ताकदीची कसोटी ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईतील लोकसंख्येचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदलले आहे. मराठी मतदारांची संख्या पूर्वीइतकी राहिलेली नसली, तरी ठाकरे बंधू एकत्र आल्याने हा वर्ग मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बाजूने वळू शकतो, असा अंदाज आहे. हाच धोका ओळखून भाजपने मुंबईतील अमराठी व्होटबँक अधिक भक्कमपणे आपल्या बाजूने उभी करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. मराठी मतांचे ध्रुवीकरण ठाकरे बंधूंकडे झुकल्यास, त्याला तोंड देण्यासाठी अमराठी मतदार निर्णायक ठरू शकतात, याची पूर्ण जाणीव भाजप नेतृत्वाला आहे. या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद थेट मैदानात उतरवणे. मुंबईत संघाच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज बूथ स्तरावर काम करणार असून, प्रत्येक प्रभागात भाजपच्या प्रचाराला संघाची साथ मिळणार आहे. याशिवाय, ब्रँड ठाकरेला थेट आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरणार आहेत. मुंबईत ते सहा मोठ्या प्रचारसभा घेणार असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ते मुंबईत तळ ठोकून राहण्याचीही शक्यता आहे. फडणवीसांच्या आक्रमक प्रचारातून भाजप आपली नेतृत्वाची छाप मतदारांवर पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपची सर्वात महत्त्वाची खेळी म्हणजे मुंबईतील अमराठी व्होटबँक एकत्र आणणे. अमराठी मतदारांमध्ये हिंदुत्वाचे मुद्दे प्रभावी ठरतात, हे लक्षात घेऊन नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्यांना मुंबईत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या भाषणांतून आणि प्रचारातून हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे पुढे रेटला जाणार आहे. याशिवाय, उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने खास पाच प्रभावी चेहरे मुंबईत बोलावले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार मैथिली ठाकूर, खासदार मनोज तिवारी, अभिनेता-खासदार रवी किशन आणि गायिका निरुहा हे मुंबईतील अमराठी बहुल भागांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरू शकते. दुसरीकडे, भाजपसोबत युतीत निवडणूक लढणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पूर्णपणे मायक्रो-प्लॅनिंगवर भर दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शाखाप्रमुखांना थेट आदेश देत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रचारासाठी ‘लक्ष्यवेध’ या अॅपचा वापर केला जात असून, कोणत्या घरात संपर्क झाला, कोण मतदार अनुकूल आहे, याची अचूक माहिती संकलित केली जात आहे. शिंदे गटाचा भर गाजावाजा कमी आणि प्रत्यक्ष संपर्क जास्त, अशा पद्धतीवर असल्याचे चित्र आहे. याशिवाय, मतदानाला येऊ न शकणाऱ्या वृद्ध मतदारांवरही शिंदे गटाची विशेष नजर आहे. या मतदारांची पोस्टल मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी ग्राऊंड लेव्हलवर विशेष पथकं काम करत आहेत. कोणते वृद्ध मतदार आहेत, त्यांची कागदपत्रे, प्रक्रिया आणि मतदान कसे होईल, यासाठी शिवसेना कार्यकर्ते थेट मदत करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे गट प्रत्येक मताला महत्त्व देत असल्याचे स्पष्ट होते. राज आणि उद्धव ठाकरे चार ते पाच शाखांमध्ये एकत्र फिरणार दरम्यान, ठाकरे बंधूंच्या प्रचाराला आता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे आजपासून मुंबईतील विविध शाखांना भेटी देणार असून, प्रचाराला खऱ्या अर्थाने रंग चढणार आहे. आज शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग परिसरातील प्रभाग क्रमांक 204 मधील शाखेला भेट देत ते प्रचाराची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर वरळीतील शाखेला ते भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे मुंबईतील एकूण 12 शाखांना भेट देणार असून, राज आणि उद्धव ठाकरे चार ते पाच शाखांमध्ये एकत्र फिरणार आहेत. आज विक्रोळीत दोघांची संयुक्त सभा होणार असून, या सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधूंची ही जोडी मुंबईच्या राजकारणात कोणता कलाटणी देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कुलाब्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा हिरव्या पडद्याने झाकल्याच्या घटनेवर राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. बाळासाहेबांची भीती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मनात बसली आहे, म्हणूनच पुतळा झाकला गेला आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच ठाण्यातील मनसे आणि शिवसेना (UBT) उमेदवारांना पोलीस बळाचा वापर करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी नेले जात असल्याचा व्हिडिओ मनसे नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे संजय राऊत म्हणालेत. संजय राऊत म्हणाले, ठाण्यामधील व्हिडिओ काल मनसे नेते अविनाश जाधव, शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी समोर आणला, हे अत्यंत गंभीर आहे. पोलिस मनसे किंवा शिवसेना उमेदवारांच्या घरात गेले, मग त्यांना पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणत आहेत. हे काम पोलिसांना दिले आहे आणि पोलिसही ते काम आपल्या वर्दीची शान न राखता इमाने इतबारे करत आहेत. किंबुहना पोलिसांचाही नाईलाज असेल, त्यांनाही चंद्रपूर, गडचिरोलीत पाठवण्याच्या धमक्या दिल्या असतील. परंतु, निवडणूक आयोगासमोर हे चित्र आल्यावर ते आता काय करणार? असा सवाल ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. आमचा पक्ष-चिन्ह चोरले, तरी आम्ही तुमच्यासमोर लढतोय उमेदवारांना अशाप्रकारे नेत आहात, म्हणजे सत्ताधारी शिवसेना किंवा मनसेला घाबरलेले आहेत. तुमच्यासमोर ते लढायला नको आहेत. तुम्ही मशाल, इंजिन याची भीती घेतलेली आहे. तुम्ही आमचे पक्ष आणि चिन्ह चोरलेले आहे, तरी आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत, तुम्हीही आमच्यासमोर लढा, असे थेट आव्हान संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले. एकनाथ शिंदे यांच्यात हिंमत आणि मर्दानगी असेल, तर ते असले उद्योग करणार नाहीत. पण त्यांनी आयुष्यभर असेच पाठीमागून खंजीर खुपसण्याचे उद्योग केलेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. उमेदवार पळवल्याने मतदारांवर फरक पडणार नाही ठाण्यातील प्रकारासंदर्भात निवडणूक आयोग काहीही करणार नाही. त्यामुळे आता न्यायालयात जाणे हा एकमेव मार्ग समोर आहे. न्यायालयात कुणी जात असेल, तर त्याचे स्वागत केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणालेत. उमेदवार पळवून, मताला १० ते १५ हजार रुपये वाटल्याने मुंबई, ठाण्यातील मतदारांवर फरक पडेल, असे तुम्हाला वाटत असेल, तर तो भ्रम आहे. विधानसभा आणि लोकसभेत जे झाले, ते महापालिका निवडणुकीत होणार नाही, याची मला खात्री आहे, अशी आशाही संजय राऊत यांनी व्यक्त केली. मराठी जनता बंडखोरांना मतदान करणार नाही मुंबईत अनेक प्रभागांमध्ये शिवसेना आणि मनसेचे बंडखोर कायम आहेत. याचा फटका निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या युतीला बसण्याची शक्यता आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. बंडखोरांवर कारवाई होईल. काही कारवाया झालेल्या आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, यावेळेला कोणत्याही शिवसेना किंवा मनसेच्या बंडखोराला लोक मतदान करणार नाहीत. ठाकरे बंधुंच्या उमेदवारांना मतदान करण्याचे लोकांनी ठरवले आहे. काहींनी स्वत:ला बंडखोर समजून घेतले असले, तरी ते गद्दार आहेत. पण मतदार गद्दारी करणार नाहीत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुंबईत ठाकरे बंधुंची एकच सभा होणार ठाकरे बंधुंची शिवतीर्थावर एकच सभा होणार आहे. इतर सभांना शक्ती लावण्यापेक्षा एकच दणदणीत सभा शिवतीर्थावर घेणे योग्य ठरले, असा निर्णय झालेला आहे. मुंबईबाहेर ठाण्यात आणि नाशिकमध्ये एक संयुक्त सभा होईल. कल्याण-डोंबिवली संदर्भात चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरला स्वत: उद्धव ठाकरे सभा घेतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. बाळासाहेबांच्या भीतीने त्यांचा पुतळा झाकला कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा हिरव्या पडद्याने झाकल्याचे समोर आले आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. बाळासाहेबांची भीती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या मनात जी बसलेली आहे, ते भले ही हिंदूहृदय सम्राटांचा विचार वगैरे बोलत असतील, पण मुळात त्यांची भीती तुमच्या मनात असल्याने तुम्ही त्यांचा पुतळा झाकला आहे. बाळासाहेब ठाकरे आता एका राजकीय पक्षाचे नेते राहिलेले नाहीत. त्यांना तुम्ही राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिलाय. तुम्ही गांधींजींचा पुतळा झाकलाय का? मुंबईतील अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे झाकलेत का? मग बाळासाहेब ठाकरेंचाच पुतळा का झाकला? याचे उत्तर कोण देणार? तुमची लायकी नसताना, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने अजुनही मते मागत आहात. मग बाळासाहेबांचा पुतळा का झाकत आहात? असा सवाल संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना केला.
कार्यालयीन प्रस्तावांमध्ये त्या प्रकरणाची पूर्व पिठीका माहिती होण्यासाठी त्यामध्ेय टिप्पणी लेखन महत्वाचा भाग असून त्यावरूनच प्रकरणाची संपूर्ण माहिती होते. त्यामुळे टिप्पणी लेखन मुद्देसूद अन परिपूर्ण होणे महत्वाचे असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी कर्मचारी प्रशिक्षणात व्यक्त केले. हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत सर्वच विभागातील कार्यालयाने कर्मचारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी यांना मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. यामध्ये कार्यालयीन व्यवस्थापन, पत्रलेखन, टिप्पणी लेखन या इतर विषयांवर माहिती दिली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी कार्यालयीन व्यवस्थापन कशासाठी त्याची आवश्यकता काय आहे याचे महत्व विषद केले. त्यातील महत्वाच्या मुद्यांवर माहिती दिली. लोकप्रतिनिधींचे पत्र व्यवहार, अर्धशासकिय पत्र यांची स्वतंत्र नोंद करणे आवश्यक आहे. या शिवाय पत्र लेखनामध्ये आवश्यक असलेले मुद्दे त्यातील संदर्भ नमुद करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयीन संचिका तयार करतांना त्यामध्ये टिप्पणी हा महत्वाचा भाग असून त्यातून त्या प्रकरणाची पुर्वपिठीका माहिती होतेे. त्यामुळे टिप्पणीवरूनच त्या प्रकरणाची इत्यंभूत माहिती मिळू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी टिप्पणी लेखन करतांना सर्व बाबी नमुद केल्या पाहिजे. टिप्पणी मुद्देसुद व कमी वाक्यांमध्ये असावी. त्यामध्ये महत्वाचे संदर्भही नमुद केले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय कार्यालयात स्वच्छता हा देखील महत्वाचा भाग असून प्रत्येकाने आपण बसतो त्या ठिकाणी स्वच्छता व निटनेटकेपणा ठेवला पाहिजे. त्यामुळे त्याचा कामावर सकारात्मक परिणाम होईल असे त्यांनी स्पष्ट केले. या शिवाय कार्यालयीन कामकाजाच्या् वेळेला महत्व दिले पाहिजे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसीय प्रशिक्षणामुळे आता कर्मचाऱ्यामधून समाधान व्यक्त होत असून कार्यालयीन कामकाजात गतीमानता येणार असल्याचे बोलले जात आहे.
प्रतिनिधी । अमरावती निवडणूक अधिकारी, मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामकाजाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मनपा कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित केली होती. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यावर त्यांनी विशेष भर देत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले. बैठकीदरम्यान आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचा सखोल आढावा घेतला. मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, मनुष्यबळ नियोजन, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, निवडणूक साहित्याचे वितरण व संकलन, मतमोजणीची तयारी, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. या वेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करण्याचे निर्देश देत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त दादाराव डोलारकर, सात झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी तसेच निवडणूक कामकाजाशी संबंधित अधिकारी व कर्मचारी ऑनलाइन उपस्थित होते. या आढावा बैठकीमुळे मनपातील सार्वत्रिक निवडणूक तयारीला अधिक गती मिळाली असून, निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
महर्षी वाल्मिकी आश्रमासह स्मारक अयोध्या येथे उभारावे:महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव समितीची मागणी
प्रतिनिधी | अमरावती अयोध्या धाम येथील श्रीराम जन्मभूमी परिसरात रामायणाचे आद्य रचयिता व आद्य गुरुदेव महर्षि वाल्मीकि यांच्या आश्रम व भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी भक्तगणांच्या वतीने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन ट्रस्टचे कोषाध्यक्ष पूज्य गोविंददेव गिरी महाराज यांना सादर करण्यात आले. गणेशदास राठी छात्रालय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी गोविंददेव गिरी महाराज अमरावती येथे आले असता, ओमप्रकाश लढ्ढा यांच्या साकेत बंगल्यावर आयोजित दर्शन सोहळ्याच्या प्रसंगी हे निवेदन देण्यात आले. महर्षि वाल्मीकि जयंती महोत्सव समितीचे सह आयोजक उमेश ढोणे यांनी प्रकाश दंदे, उन्मेष दंदे यांच्यासह भक्तगणांच्या वतीने ही मागणी मांडली. महर्षि वाल्मीकि यांचे श्रीराम चरित्रातील अतुलनीय योगदान, गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श तसेच वाल्मीकि रामायणाची प्रामाणिकता व आध्यात्मिक महत्ता यांचा गौरव अयोध्येत साकारावा, अशी भावनिक अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रस्तावित आश्रम व स्मारक सामाजिक समरसता, राष्ट्रीय एकता आणि सनातन संस्कृतीच्या मूल्यांना बळ देणारे ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या पवित्र कार्याच्या निमित्ताने महर्षि वाल्मीकि मठ संस्थान, ब वर्ग तीर्थक्षेत्राचे मठाधिपती संत ज्ञानेश्वर भांडे महाराज यांना निमंत्रित करण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महर्षि वाल्मीकि जयंती महोत्सवाचे पदाधिकारी व भक्तगण या उपक्रमासाठी एकत्र आले असून, केंद्र व राज्य पातळीवर पाठिंबा मिळावा यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री संबंधित प्रशासकीय यंत्रणांकडे निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत.
प्रतिनिधी | अमरावती ‘तरुणांनी क्षणिक भावना, उत्तेजनाला बळी न पडता शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल साधावा. विचारांवर आधारित कृतीच समाजाला योग्य दिशा देऊ शकते. समाजाच्या सकारात्मक परिवर्तनात तरुणांची भूमिका महत्त्वाची असून त्यांनी भावनेच्या भरात न वाहता विचारपूर्वक वाटचाल करावी,’ असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले. सायन्सकोर मैदान येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम घेतला. या वेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. या वेळी डॉ. कमल गवई, सिद्धनाक महार यांचे १२ वे वंशज मिलिंद इनामदार, मिरज येथील समशेर नदाब, पूनम गायकवाड, सतीश नाईक, शफी भाई, गौतम बनसोड, कृष्णराव वानखडे, बी.आर. धाकडे, अनिल हिरेकन, बी.एम. वानखडे, सुदेश वासनकर, धर्माजी वंजारी, अरुण आठवले, डॉ. लोंधे, राजू झोडापे, बन्सी भटकर, कपिल धवणे आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्हाधिकारी येरेकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे विवेक, समता आणि न्यायावर आधारित आहे. त्या विचारांचा अंगीकार केल्यास समाजात शांतता आणि प्रगती नक्की साधता येईल. भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम तरुणांमध्ये वैचारिक जागृती निर्माण करणारा ठरला, असेही जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नमूद केले. विशेष अतिथी मिलिंद इनामदार म्हणाले की, भीमा कोरेगावचा शौर्यदिन हा इतिहासाची आठवण करून देणारा नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देणारा आहे. आपण कोणत्याच क्षेत्रात कमी नाही, कमी असल्याची भावना मनात ठेवणे हेच पराभवाचे कारण ठरते. आत्मविश्वास, शिक्षण आणि संघटित प्रयत्नांच्या बळावर आपण कोणतीही उंची गाठू शकतो.भीमा कोरेगावनंतर एवढ्या व्यापक स्वरूपात शौर्य दिनाचा जागर अमरावतीत होत आहे, ही केवळ उत्सवाची नव्हे तर स्वाभिमानाची ओळख आहे. ही ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे, असेही इनामदार म्हणाले. तत्पूर्वी, समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच अजय देहाडे व कडूबाई खरात यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये नवा जोश निर्माण केला होता. या वेळी नागरिक उपस्थित होते. सायन्सकोर मैदान येथे भीमा कोरेगाव शौर्यदिन मानवंदना कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विचार व्यक्त केले. समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांचा केला सन्मान सामाजिक चळवळीत योगदान देणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमल गवई, सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना, डॉ.सुभाष गवई, अनाथांच्या आई कुमुदिनी इंगळे, धनंजय गुळदेकर, रमेश कटके, डॉ.पुष्पा थोरात, राजू डांगे, अनिल बागडे व मंदाकिनी बागडे, अशोकर खंडारे यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
‘राज्यामध्ये भाजप सरकार आल्यापासून जुलूम वाढले’:खासदार ॲड. असदुद्दीन ओवैसी
प्रतिनिधी | अमरावती ‘राज्यात भाजप नेतृत्वातील सरकार आल्यापासून अल्पसंख्यकांवरील जुलूम वाढले, अशी टीका एमआयएमचे हैदराबाद येथील खासदार ॲड. असदुद्दीन ओवैसी यांनी केली. या वेळी याविरुद्ध लढण्याची हिंमत केवळ आमच्यात पक्षात आहे. त्यामुळे या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांना कौल द्यावा,’ असे ते म्हणाले. एमआयएम उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार ओवैसी यांची रविवारी ४ जानेवारीला रात्री येथील वलगाव रोड स्थित ॲकडेमीक हायस्कूलच्या प्रांगणात सभा झाली. या वेळी एमआयएमचे पदाधिकारी, उमेदवार मंचावर उपस्थित होते. खासदार ओवैसी पुढे म्हणाले, केवळ एमआयएम हाच पक्ष जनतेसाठी ही निवडणूक लढतो आहे. याऊलट इतर पक्ष हे केवळ स्वत:ला विजयी करण्यासाठी लढत आहेत. त्यामुळे समाजाला बळकट करण्यासाठी एमआयएमला कौल मिळणे आवश्यक आहे, आणि हा कौल सुजाण अमरावतीकर देतील, अशी मला अपेक्षा आहे. त्यांच्या मते एमआयएमने गेल्या ७० वर्षात अनेक समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांना साथ दिली, परंतु राजकारणात या सर्वांनी धोका दिला. त्यामुळे एमआयएमने एकटे लढण्याचे ठरवले असून, माझा पक्ष हा आपल्याच मतांच्या आधारे विजयी होईल, हे मी या वेळी त्यांना ठणकावून सांगितले आहे. १० जानेवारीला पुन्हा येणार खासदार ओवैसी यांचे भाषण सुरु असतानाच शेजारच्या मशीद मधून अजान झाली. त्यामुळे ओवैसी यांनी भाषण थांबवले. त्यानंतर खासदार ओवैसी यांना अकोला येथे पोहोचून सभा घ्यायची असल्यानेही काही वेळानेच त्यांनी सर्वांचा निरोप घेत पुन्हा १० जानेवारी रोजी येणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत चिन्हांचे वाटप पूर्ण झाले असून प्रचाराने जोर धरला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या अधिकृत उमेदवार जयश्री भोंडवे यांच्या बाबतीत घडलेल्या एका प्रकराने संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आले आहे. अर्ज छाननीच्या वेळी त्यांचा पक्षाचा अधिकृत 'एबी फॉर्म' गहाळ झाल्याचे समोर आल्याने त्यांना प्रशासनाकडून 'अपक्ष' उमेदवार घोषित करण्यात आले होते. अखेर कायदेशीर लढाईनंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 'घड्याळ' हे अधिकृत चिन्ह बहाल करण्यात आले आहे. जयश्री भोंडवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननी प्रक्रियेदरम्यान त्यांचा महत्त्वाचा 'एबी फॉर्म' गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. तांत्रिक पुराव्याअभावी निवडणूक आयोगाने त्यांना अधिकृत उमेदवार न मानता 'अपक्ष' उमेदवारांच्या यादीत टाकले. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आणि कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. उमेदवाराची हायकोर्टात धाव जयश्री भोंडवे यांनी प्रशासकीय निर्णयाला आव्हान देत थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात त्यांनी फॉर्म जमा करतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण. अर्ज भरताना करण्यात आलेली अधिकृत व्हिडिओग्राफी. तसेच फॉर्म वेळेत सादर केल्याचे इतर महत्त्वाचे तांत्रिक पुरावे हायकोर्टासमोर सादर केले. पुराव्यांमधील तथ्य पाहून न्यायालयाने निवडणूक आयोगाला याप्रकरणी स्वतंत्र सुनावणी घेण्याचे आदेश दिले. आयुक्तांचा निकाल आणि 'घड्याळ' चिन्हाचे वाटप न्यायालयाच्या आदेशानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने सुनावणी घेतली. सादर केलेले तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर, जयश्री भोंडवे यांनी वेळेतच 'एबी फॉर्म' सादर केल्याचे स्पष्ट झाले. अखेर, आयुक्तांनी भोंडवे यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला. यामुळे अंतिम यादीत जरी त्या 'अपक्ष' म्हणून दिसत असल्या, तरी प्रत्यक्ष चिन्ह वाटपाच्या दिवशी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत चिन्ह 'घड्याळ' बहाल करण्यात आले आहे. या निकालामुळे जयश्री भोंडवे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पिंपरी-चिंचवडच्या निवडणूक रिंगणात आता 'घड्याळा'चा गजर अधिक जोरात होणार, हे स्पष्ट झाले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांसाठी निवडणूक दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण 128 जागांसाठी निवडणूक होत आहे. एकूण 32 प्रभागांपैकी महापालिकेच्या 17 प्रभागांमध्ये माजी नगरसेवक आणि सत्तारूढ पक्षनेते, माजी विरोधी पक्षनेते, पदाधिकारी समोरासमोर आले आहेत. त्यामुळे सामन्यांची रंगत वाढली आहे. त्या ठिकाणी काँटे की टक्कर होणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. सर्वच पक्षीयांनी 128 जागांवर उमेदवार दिले आहेत.
प्रतिनिधी | मूर्तिजापूर रस्त्यांवर सुरक्षित वाहने चालवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाहन चालवताना दक्ष राहून इतरांचे जीवन आपल्यामुळे धोक्यात येऊ नये, ही भावना मनात ठेवली तर कधीही अपघात होणार नाहीत. आपल्या वाहनांची तपासणी वेळोवेळी करून रस्त्यावर वाहन चालवताना दक्ष राहणे हाच उद्देश रस्ता सुरक्षितता अभियानाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत दरवर्षी पोहोचण्याचे कार्य एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात येते, असे प्रतिपादन मूर्तिजापूर येथील एस. टी. आगारात रस्ता सुरक्षितता अभियानाचे उद्घाटनप्रसंगी विलास नसले यांनी केले. अभियानाचे उद्घाटन दीपक अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक हेमंत चांदूरकर होते. याप्रसंगी दीपक अग्रवाल यांनी विचार व्यक्त केले. एस. टी महामंडळाच्या एकाही बसचा अपघात वर्षभरात घडला नसल्याचे व्यवस्थापक चांदूरकर यांनी सांगितले. रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास महत्वाचा भाग आहे. परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित वाहतूक सेवा करते. रा. प. बसेसचे अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडून नियमितपणे अपघात नियंत्रण उपाययोजना करण्यात येतात. कर्मचाऱ्यांचे प्रबोधन दरवर्षी जानेवारीत राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबवण्यात येते. सर्व आगारात चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करण्यात येते. याप्रसंगी पालक अधिकारी प्रशिस पळसपगार उपस्थित होते. सूत्रसंचालन सोपान विरोकार यांनी केले तर आभार संतोष घोगरे यांनी मानले. चालक म्हैसने व चव्हाण, गोरटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चालक, वाहक व तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.
अकोला | येथील खडकीतील माँ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित व्याख्यानात जिल्हा व सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रबंधक सुनील पाटील यांनी ‘चूल व मूल’ व्यवस्थेतून बाहेर पडत आजची स्त्री ही सरपंच ते राष्ट्रपती होत आहे. फुले दांपत्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अंगीकृत केल्याने महिलांच्या उत्थानाचा मार्ग मोकळा झाला, असे प्रतिपादन केले. यावेळी जिजाऊ वाचनालयाचे अध्यक्ष पंजाबराव वर, कोषाध्यक्ष सुनंदा वर, सभासद ओरा चक्रे, रत्नाकर भुजाडे, मीनाक्षी शेगोकार, कांताताई घोडे, मनुताई बदरखे, कोमल माहाले, विद्या अंभोरे, जयश्री झिने, मनीषा भुजाडे, ईश्वरी शगोकार, मंजिरी झिने आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी |अकोला केंद्रीय भूजल मंडळाच्या वतीने ‘भूजल स्त्रोत माहिती, उपयोग व नकाशांकन’ या विषयावरील कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. भूजलस्त्रोत नकाशांकनातून मिळणाऱ्या निष्कर्षांचा शाश्वत जलनियोजनासाठी प्रभावी वापर करता यावा, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील भूजल संसाधनांचे वैज्ञानिक नियोजन व शाश्वत व्यवस्थापनासाठी सर्व विभागांनी या डेटाचा व जलसाठे नकाशांकन अभ्यासाचा सक्रियपणे वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी केले. कार्यशाळेदरम्यान अकोला जिल्ह्याचा राष्ट्रीय जलस्त्रोत नकाशांकन अहवाल, कृत्रिम पुनर्भरण संरचनांच्या यशोगाथा यांचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. भूजल पुनर्भरण व व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचे दस्तऐवजीकरण व प्रसार करण्यासाठी उपक्रमाचा लाभ होईल. कराड यांनी राज्य शासनाच्या विभागांकडून भूजलाधारित प्रकल्प, जलसंधारण व सिंचन नियोजनाच्या टप्प्यावर तज्ज्ञांचे अहवाल व डेटासेट्स कसे प्रभावीपणे वापरता येतील, याचे मार्गदर्शन केले. कार्यशाळेला भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, जलसंधारण विभागाचे डॉ. अमोल डी. मस्कर यांच्यासह मृद व जलसंधारण, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे, जि. प. पाटबंधारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कृषी विभागातील विविध विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेच्या शेवटी संवाद सत्र घेण्यात आले. सहाय्यक भूजलशास्त्रज्ञ प्रकाशचंद्र महाराणा यांनी आभार मानले. या कार्यशाळेत विविध विभागांतील एकूण ६७ अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. केंद्रीय भूजल मंडळाने सखोल भूजल अहवाल तयार करून सुलभ डेटा पोर्टल्स विकसित केली आहेत. जलसंपदा व्यवस्थापनासाठी ती निश्चित उपयुक्त ठरतील, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांनी व्यक्त केला. तज्ज्ञ हितेश रामटेके यांनी कार्यशाळेचे बीजभाषण केले. यानंतर शास्त्रज्ञ निर्मलकुमार नंदा यांनी अकोला जिल्ह्याच्या राष्ट्रीय जलस्त्रोत नकाशांकन अभ्यासाचे सविस्तर सादरीकरण केले. भूजल क्षमता, पाण्याच्या गुणवत्तेचे पैलू आणि व्यवस्थापन धोरणे यांचा समावेश होता. त्यांनी ऑनलाइन डेटा प्लॅटफॉर्म्स-भूजल डेटा डाउनलोड पोर्टल यांची थेट प्रात्यक्षिके सादर करून त्याचा विविध विभागांकडून नियोजन, अंमलबजावणी व जलसंबंधित योजनांच्या देखरेखीकरिता कसा उपयोग करता येईल, हे स्पष्ट केले.
प्रतिनिधी | अकोला आज आपण भौतिक सुखाची अपेक्षा धनाच्या माध्यमातून करतो. धनाच्या माध्यमातून सुख प्राप्त होते, असा आपला समज असतो. मात्र हा समज तितका खरा नसून, भागवत श्रवण व प्रभू भक्तीच्या माध्यमातूनच खऱ्या व शाश्वत सुखाची प्राप्ती होत असते. त्यामुळे भगवंत भक्ती करून शाश्वत सुख प्राप्त करण्याचा हितोपदेश सीताराम शास्त्री यांनी केला. ते न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील माहेश्वरी भवन येथे सुरू असलेल्या भागवत कथेत बोलत होते. कथा श्रीमद भागवत सेवा समिती व संत श्री राधे राधे महाराज भक्त परिवाराच्या वतीने संत श्री राधे राधे महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आली आहे. कथास्थळी राधे राधे महाराज यांच्या चरण पादुकांचा मुख्य यजमान प्रा. लक्ष्मीनारायण शर्मा, दैनिक यजमान प्रसाद कोनेर, पाटील यांनी अभिषेक करून पूजन केले. यावेळी भक्तांनी राधे राधे महाराजांचा जयघोष करत पादुकांचे दर्शन घेतले. कथा प्रारंभी सीताराम शास्त्री यांचे स्वागत मुख्य यजमान प्रा. लक्ष्मीनारायण शर्मा, दैनिक यजमान प्रसाद कोनेर, अमरचंद जोशी, अरुण कोठारी, प्रदीप पांडे, किशोर टोंगळे, राजेश शर्मा, नंदकिशोर राठी आदींनी केले. या भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन ओमप्रकाश कासट, राधेश्याम अग्रवाल, हरीश मानधने, प्रा. विवेक बिडवाई, विनायकराव शेळके, श्यामसुंदर मालपाणी, गोपाळराव जाधव, प्रा. अनुप शर्मा, अमरचंद जोशी आदींनी केले आहे. असे आहे गीतेचे सार : भगवद्गीता ही सर्व पुराणवेदांचे सार असून या भगवद्गीतेचे सार म्हणजे भगवंतात आपले चित्त समाविष्ट करणे होय. हे गीतेचे सार असल्याचे त्यांनी सांगितले. भगवत गीतेत विचारण्यात आले की भगवंताच्या अवताराचे प्रयोजन काय? तर भक्तांचे कल्याण हेच भगवंताच्या अवताराचे मोठे कारण आहे. ते निर्माण, पालन व संहार हे तीन कार्य करत असतात. त्यांचे अवतार अनंत आहेत. ते अनंत असून आकार- निराकारात विराजमान असतात. त्याचप्रमाणे धर्म कोठे निवास करीत असतो? तर धर्म हा भागवत मध्ये आहे आणि भागवतात धर्म निवास करतो. त्याची व्याख्या भागवतात करण्यात आलेली आहे. संपूर्ण धर्म भागवतात आहे.भागवत हे अनादी आहे. वेदव्यासांनी त्यांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. भक्ती हाच मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग कथेत सीताराम शास्त्री यांनी मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग भक्ती नि भागवतात असल्याचे सांगत विचारलेल्या सात प्रश्नांची उकल केली. मनुष्याच्या कल्याणाचा मार्ग भक्ती हा असून या भक्तीची कास धरून प्रभप्राप्तीचा मार्ग हा खरा मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जीवनाचे अंतिम ध्येय आनंददायक परमात्म्याला प्राप्त करणे होय. तेच अंतिम स्थान आहे. आम्ही जीवनरुपी वाहनात तर बसलो आहोत, मात्र आपणास कुठे जायचे हे माहीत नसल्यामुळे जीवन चक्रात चालत आहोत. सर्व शास्त्राचे सार, यावर विवेचन करताना ते म्हणाले,
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सध्या विविध शाखांना भेटी देत आहेत. काल रात्री त्यांनी बोरिवली पूर्व येथील मागाठणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ च्या उमेदवार कविता राजेंद्र माने यांच्या निवडणूक कार्यालयाला भेट दिली. कविता माने या मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या 'शिवशक्ती' आघाडीच्या संयुक्त उमेदवार आहेत. माने यांच्या कार्यालयाला भेट देऊन उद्धव ठाकरे बाहेर पडत असतानाच ठाकरे गट-मनसे आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. उद्धव ठाकरे यांनी कविता माने यांच्या कार्यालयात उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या 'इंजिन' या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. मात्र, ठाकरे कार्यालयातून बाहेर पडत असतानाच त्याच ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या उमेदवाराची प्रचार रॅली धडकली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आणि दोन्ही बाजूंनी घोषणा युद्ध रंगल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. ठाकरेंच्या कारसमोर भाजप-शिंदे कार्यकर्त्यांचा डान्स उद्धव ठाकरे यांच्या ताफा थांबवून कारच्या समोर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी डान्स केला. या प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पांगवले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर उद्धव ठाकरे यांचा ताफा दुसरीकडे निघाला. दोन्ही गट आमनेसामने आल्याने काही काळ तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांच्या मध्यस्थींना मोठा राडा टळल्याचे पाहायला मिळाले. निवडणुकीची चुरस प्रभाग क्रमांक ११ मध्ये कविता माने यांच्याविरुद्ध महायुतीने आदिती खुरसुंगे यांना मैदानात उतरवले असून, या प्रभागात आता प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा आज विक्रोळी येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात दोन्ही नेत्यांच्या मिळून ७ ते ८ संयुक्त सभा होणार असून त्याची सुरुवात आज पूर्व उपनगरातून होत आहे. दोन्ही नेते केवळ सभाच घेणार नाहीत, तर शिवसेना आणि मनसेच्या विविध शाखांना एकत्रितपणे भेटी देखील देणार आहेत. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही मुंबईत दोन स्वतंत्र संयुक्त सभांचे नियोजन करण्यात आले आहे. हे ही वाचा... भिवंडीत प्रचारादरम्यान तुफान राडा:भाजप-काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने, दगडफेक अन् लाठ्या काठ्यांनी मारहाण; दोन गंभीर जखमी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना भिवंडीत शनिवारी सायंकाळी मोठा राडा झाला. प्रभाग क्रमांक २० मधील नारपोली भंडारी चौक परिसरात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठी हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्या, प्लास्टिक खुर्च्या आणि दगडांचा मुक्त वापर करण्यात आला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला असून परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
प्रतिनिधी | अकोला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून बुद्ध विहार समन्वय महासंघाच्या वतीने महिलांची धम्म परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेत संविधान पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे पार पडला. स्त्रीशक्ती, धम्म, समता व सामाजिक बांधिलकीचा जागर करणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर खोल ठसा उमटवणारा ठरला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. मुकुंदराव भारसाकळे, गजानन हरणे, सुभाषराव तायडे, देवराज अहिर, प्रल्हादराव इंगोले, रमा घरडे, झिंगुबाई बोलके, सुनीता इंगळे, लता सुखदिवे, रमा घरडे, पुष्पा पळसपगार, सुमन तिरपुडे, शोभा जोंधळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन साहेबराव मोरडे यांनी केले. मुख्य वक्ते धम्मबोधी डोंगरे, नाना किरतकार होते. प्रास्ताविक वसंतराव अवचार यांनी केले. स्वागताध्यक्ष मोतीराम गायकवाड होते. यावेळी पोलिस निरीक्षक रवी दामोदर, प्रेमकुमार शेंडे आदी उपस्थित होते. आभार बुद्ध विहार समन्वय महासंघाचे उपाध्यक्ष मनोहर वानखडे यांनी मानले. सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल : धम्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष गोरखनाथ वानखडे, समता सैनिक दलाचे डॉ. जगदीश वानखडे, डॉ. अजय सुरवाडे, एस. एस.मेश्राम, रवी जवजाळ, संदिप इंगळे यांनी सहकार्य केले. माता सावित्रीच्या विचारांना समर्पित, स्त्रीशिक्षण, आत्मसन्मान व धम्मसंस्कारांचा जागर करणारी ही परिषद सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. या परिषदेला एक हजारांपेक्षा जास्त महिलांची उपस्थिती होती. अॅक्शन प्लॅन तयार होणार बुद्ध विहार समन्वय महासंघाच्या वतीने सर्व उपासक-उपासिका, महिला संघटना व मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ही महिला धम्म परिषद सकाळी ११ वाजेपासून ५ वाजेपर्यंत चालली. परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. पुढील ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येऊन कार्यक्रमाचे नियोजन केले.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन:जप्त ४ लाख ५० हजार रुपयांचे २० मोबाइल रेल्वे पोलिसांनी केले परत
प्रतिनिधी |अकोला रेल्वे पोलिसांनी नागरिकांचे चोरी गेलेले व गहाळ झालेले मोबाईल जप्त केलेले असून रविवारी मोबाईल फिर्यादींना परत करण्यात आले. यासाठी आयोजित कार्यक्रमात ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे २० मोबाईल फोन परत करण्यात आले. रेल्वेत प्रवास करताना, रेल्वे स्थानकावर काही कामानिमित्त आलेल्यांचे मोबाईल फोन चोरी जातात. मोबाईल फोन चोरट्यांची टोळीच सक्रिय आहे. अनेक जण मोबाईल चोरीची तक्रारीही देत नाहीत. काही जणाचा मोबाईल चोरी गेल्यानंतरही तो गहाळ झाल्याची नोंद पोलिसांकडून होते. दरम्यान रेल्वे पोलिसांनी चोरीचे जप्त केलेले मोबाईल फोन संबंधितांनी परत केले. दरम्यान महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त २ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान लोहमार्ग नागपूर पोलिसांकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. अकोला रेल्वे पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोहमार्ग पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला रेल्वे पोलिसांकडूनही असे कार्यक्रम राबवण्यात येत असून रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांनी घ्यायची काळजी, नशा मुक्ती अभियान, फिर्यादींना मुद्देमाल परत करणे असे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
प्रतिनिधी | श्रीरामपूर शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ग्रामीण अर्थकारण टिकवून ठेवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. घरोघरी गाईचा आहार,गोठा व्यवस्थापन व औषध उपचार हे काम घरातील महिलाद्वारेच केले जाते असे सांगून नवीन आलेल्या सर्व तंत्रज्ञानांचा वापर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी करावा व त्यातून आपला उत्कर्ष साधावा असे आवाहन अध्यक्ष सारंगधर निर्मळ आणि किशोर निर्मळ यांनी केले आहे. किसान कनेक्टच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक विवेक निर्मळ उपस्थित होते. दूध संकलनाच्या पहिल्या टप्प्यात अकोले,संगमनेर,कोपरगा व, राहाता व श्रीरामपूर या तालुक्यांत गुणवत्ता पूर्ण दुधाचे संकलन असलेल्या विविध गावांत बल्क मिल्क कुलर बसवून किसान कनेक्ट क्वालिटी मिशन अंतर्गत विविध विस्तार सेवा शेतकऱ्यांना देत दूध संकलन व शितकरण सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी या पाचही तालुक्यांचा सर्वे केला जाणार आहे. त्यातून गावांची निवड केली जाणार आहे. किसान कनेक्टच्या मुंबई व पुणे येथील लाखो ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. अॅन्टीबायोटीक (प्रति जैविके) व अल्फाटॉक्सिन (चाऱ्यातील बुरशी मुळे तयार होणारा विषारी पदार्थ) विरहित दूध संकलन हा केंद्रबिंदू ठरणार आहे. यासाठी शेतकऱ्याला विशेष दर देण्याची तयारी असल्याचे विवेक निर्मळ यांनी सांगितले. या प्रकल्पाचे प्रमुख सल्लागार राजेश लेले म्हणाले, प्रभात डेअरी मध्ये निर्मळ कुटुंबाने पारदर्शक दूध संकलन व्यवस्था, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध विस्तार सेवा,कृत्रिम रेतन सेवा,मुरघास निर्मिती तंत्रज्ञान, शेतकरी प्रशिक्षण ही कामे केल्या मुळे दुध व्यवसायाला बळकटी मिळाली आहे. डॉ. शैलेश मदने यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी महेश गागरे, डॉ. संतोष वाघचौरे, नितीन वाळे, अजित व प्रविण देशमुख व विशाल आहेर हे उपस्थित होते. सूत्रसंचालन विशाल आहेर यांनी केले.
प्रतिनिधी|राहुरी निष्ठुर प्रशासन की शासन याचा सवाल करत असताना नगर मनमाड महामार्ग आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. या महामार्गाची दुरवस्था, रस्त्याची धूळधाण तसेच रस्त्यात मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे रस्त्यात कायमच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. रुग्णवाहिकांना अडथळा होतो. तसेच शालेय व महाविद्यालयीने विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. परंतु, या प्रश्नाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जनतेच्या भावना ओळखून आता या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे एवढेच आता महत्वाचे आहे. राहुरी शहरात दोन ते तीन दिवसांपूर्वी संपूर्णपणे वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. नगर–मनमाड रस्त्याचे काम एका बाजूने सुरू असताना पाण्याच्या टाकीजवळ व टीव्हीएस शोरूम परिसरात रस्त्याच्या मधोमध पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आल्याने शहरातील मुख्य रस्ता अक्षरशः कोंडला गेला होता. परिणामी संपूर्ण वाहतूक एकाच बाजूने कोंडली गेली आणि चक्क नगर मनमाड रस्त्यावरील वाहतूक राहुरी शहरातील नवी पेठ, शनि चौक, प्रगती विद्यालय रोड, मेनरोड या भागातून शहरात आली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिक अक्षरशः मेटाकुटीस आले होते. शिर्डी, नगर, मनमाडकडे जाणारी अवजड वाहने शहरातूनच जात असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. कृषी विद्यापीठापासून ते राहुरी महाविद्यालयापर्यंत दररोज ट्रॅफिक जाम, धुळीचे लोट आणि वैतागलेले नागरिक हेच चित्र ठरले आहे. रस्ता काम युद्धपातळीवर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र कासवगतीने काम सुरू आहे. ठेकेदारांवर कोणाचाच अंकुश नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. या समस्येकडे प्रशासनाचेही लक्ष नाही. दुपारी तीन वाजता सुटलेल्या शाळेतील विद्यार्थी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे तब्बल ६ वाजता घरी पोहचल्याचेही दिसून आले. या समस्येकडे प्रशासनाचेही लक्ष नाही. त्यामुळे समस्या वाढत चालली आहे. नगर मनमाड रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. नाशिक आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या गोष्टींचा विचार करुन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रतिनिधी|अहिल्यानगर शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे येथील प्रथम वर्ष बी फार्मसी व डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक जाणीव वाढविण्याच्या उद्देशाने अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यांतर्गत विद्यार्थ्यांनी औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच माऊली सेवा प्रतिष्ठान, मनगाव शिंगवेनाईक येथे भेट दिली. विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठातील औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्पात विविध औषधी वनस्पतींची लागवड, संवर्धन, प्रक्रिया व औषध निर्मितीतील उपयोग यांविषयी तज्ज्ञांकडून सखोल माहिती घेतली. फार्मसी शिक्षणाशी संबंधित प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक समृद्ध झाला. यानंतर विद्यार्थ्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान मनगाव येथे विद्यार्थ्यांनी समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत माहिती घेतली. मानसिक व सामाजिक आधार हरवलेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करताना विद्यार्थ्यांना सामाजिक भान व माणुसकीचे महत्त्व अधोरेखित झाले. येथील सेवाभावी कार्य, व्यवस्थापन पद्धती व पुनर्वसन प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव तसेच औषधी वनस्पतींच्या शास्त्रीय उपयोगाबाबत अनुभव मिळाला. हा अभ्यास दौरा कॉलेजचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे तसेच प्राध्यापक कांचन जाधव आणि शिवकन्या वणवे या शिक्षकांच्या मार्गदर्शनात पार पडला.
प्रतिनिधी|अहिल्यानगर मुलांनी कृतीच्या मागे लपलेले विज्ञान शोधावे. मोबाइलचा वापर करताना त्याचा योग्य वापर करा. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे त्याचा सुयोग्य वापर आपल्याला यशाचा मार्ग दाखवतो. त्यामुळे वेळेचे नियोजन करा, मोबाइलचा वापर गरजेपुरता करा आणि भरपूर अभ्यास करून मोठे व्हा. कामात सातत्य ठेवले आणि कृतीमागील विज्ञान शोधले तर आताचे विद्यार्थी भविष्यात शास्त्रज्ञ होऊ शकतात, असा विश्वास अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला. रेणावीकर विद्यालयमध्ये शहरस्तरीय विज्ञान गणित, पर्यावरण विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ हा प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन डांगे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्य) संध्या गायकवाड, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, आदी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले. या प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना, वैज्ञानिक प्रयोग, पर्यावरण संवर्धन, ऊर्जा बचत, जल व्यवस्थापन, आरोग्य व तंत्रज्ञान विषयांवरील नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व संशोधनवृत्तीचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी मनपा विषयतज्ञ अरुण पालवे, केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे, दादासाहेब नरवडे, महेश क्षीरसागर, काजल महांडुळे, सुखदेव नागरे, शारदा होशिंग, विजय गरड, बाबासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उपाध्ये यांनी केले. आभार नागरे सर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचा विचार करत प्रकल्प प्रदर्शनात मांडले होते. या विविध प्रकल्प आणि विद्यार्थ्यांचे कौशल्य यांची माहिती उपस्थित मान्यवरांनी घेतली. विद्यार्थ्यांनी प्रकल्प कसा तयार केला याची माहिती विद्यार्थ्यांकडून घेतली. तसेच त्यांच्या या उपक्रमाचे कौतुकही केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गणित विज्ञान प्रदर्शन विचार समृद्ध करण्याची शिडी जिल्हा परिषदेचे योजना विभागाचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले, विज्ञान , गणित पर्यावरण प्रदर्शन म्हणजे विचार समृद्ध करण्यासाठी शिडी आहे. तिचा वापर करीत चालावे. स्वतःमध्ये काही कमी आहे असे वाटत असल्यास स्वतःमधील कमीपणाला आपल्यातील न्यूनत्व न मानता, संधी मानायला शिका.
प्रतिनिधी | अहिल्यानगर नाताळच्या सलग सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताचा उत्साह, यामुळे शनिशिंगणापूर गेल्या आठ दिवसांत अक्षरशः भाविकांनी फुलून गेले. यंदा प्रथमच रात्रीचे दर्शन बंद असतानाही दिवसभर दर्शनासाठी लागलेली रांग, शिस्तबद्ध नियोजन आणि भाविकांचा संयम यामुळे परिसरात सातत्याने गर्दीचा ओघ पाहायला मिळाला. देवस्थान प्रशासनाच्या माहितीनुसार सुटीच्या कालावधीसह अवघ्या ८ दिवसांत तब्बल चार ते सव्वाचार लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. सायंकाळ होताच संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघत होता. मुख्य मंदिर, दर्शन मार्ग, तसेच पानसतीर्थ प्रकल्पातील शिल्पकलेवर केलेली कलात्मक रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. फुलांची रोजची सजावट मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर घालत होता. गेल्या शनिअमावस्येपासून सुरू झालेला प्रकाशोत्सव नववर्षापर्यंत कायम राहिला. नाताळच्या सुट्ट्यांनंतर लगेचच नववर्ष आल्याने शिर्डीमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक मोठ्या प्रमाणावर मुक्कामी थांबले. यापैकी सुमारे ४० टक्के भाविकांनी शनिशिंगणापुरात येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. विशेषतः शनिवार व रविवारी गर्दी नेहमीपेक्षा तीन पटीने वाढलेली दिसून आली. ही बाब लक्षात घेऊन देवस्थान प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी विशेष नियोजन राबवले होते. विभागीय आयुक्त, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत दर्शन व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना व वाहतूक नियंत्रणाबाबत आधीच आढावा बैठक घेण्यात आली होती. स्वयंसेवक, पोलीस प्रशासन आणि देवस्थान कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे भाविकांना सुरक्षित व सुरळीत दर्शन घेता आले. प्रकाशोत्सव, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भाविकांचा उत्साह ओसंडून राहिला. नाताळच्या सुट्ट्यांनंतर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार पूजेच्या साहित्याचे दर कमी केले आहेत. भाविकांना परवडतील असे १५१ रुपयांपासून ७५१ रुपयांपर्यंत पूजेच्या साहित्याचे दर निश्चित केले असून, हे दर १ जानेवारीपासून लागू झाले आहेत. दर कपातीमुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, देवस्थान प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
प्रतिनिधी |पाथर्डी ऊसतोड मजुरांची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐश्वर्य संपन्न श्रीक्षेत्र भगवानगडावर श्री संत भगवानबाबांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे १०० क्विंटल बुंदीचा व चिवड्याचा प्रसाद आलेल्या हजारो भाविकांना देण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी भगवानबाबा की जय.. अशा दिलेल्या घोषणांनी परिसर भक्तीमय झाला. यावेळी हेलिकॉप्टरमधून भगवानबाबांच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भगवानगडावर आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. गडाच्या पायथ्याशी वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व स्वयंसेवकांची विशेष नेमणूक करण्यात आली होती.भाविकांसाठी सुमारे १०० क्विंटल साखरेपासून बुंदी तसेच चिवड्याचा महाप्रसाद तयार करण्यात आला. या महाप्रसादासाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉल्यांचा वापर करण्यात येऊन,रांगेत उभ्या असलेल्या भाविकांपर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने प्रसाद पोहोचवण्यात आला. पहाटे संत भगवानबाबांच्या समाधीची महापूजा,अभिषेक व अन्य धार्मिक विधी पार पडले. समाधी दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक भाविकांनी उपवास,नवस व अभिषेक करून संत भगवानबाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. दुपारी गडाचे महंत न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाची भव्य महापंगत पार पडली.या महापंगतीत हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांच्याकडून हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांच्या समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. भगवानगड हे अध्यात्मिक क्षेत्रात विशेष मानाचे स्थान असून, ऊसतोड, शेतकरी, मजूर व कामगारांचे श्रद्धास्थान म्हणून ते ओळखले जाते.पुण्यतिथी महोत्सवासाठी ऊसतोडणी कामगारांनी उपस्थिती लावली होती. भगवानगडावर सुरू असलेले संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर,ज्ञानेश्वरी विद्यापीठ, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह, दररोजचे मोफत अन्नदान,धार्मिक व शैक्षणिक उपक्रम हे गडाच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहेत.या कार्यामुळे भगवानगड केवळ धार्मिकच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचेही केंद्र ठरत आहे. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी गडाचे प्रधानाचार्य नारायण स्वामी, येळेश्वर संस्थानचे रामगिरी महाराज,राधाताई सानप,भगवान दराडे,बाळासाहेब सानप, प्रदीप पाटील,प्रा.सुभाष शेकडे, प्रा. राजकुमार घुले आदी उपस्थित होते.जालना येथील उद्योजक शिवाजी बिहाणी परिवाराच्या वतीने महाप्रसादाची पंगत देण्यात आली.
मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. महायुतीकडून 'हिंदू महापौर' आणि महाविकास आघाडी-मनसेकडून 'मराठी महापौर' असा दावा केला जात असतानाच, आता एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी 'मुस्लिम महिला महापौर' पदाचा राग आळवला आहे. धारावी येथील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी भाजपवर कडक शब्दांत प्रहार करत, कलमा वाचणारी मुस्लीम महिला मुंबईची महापौर बनावी, असे आमचे स्वप्न आहे, असे विधान केले. धारावी येथील सभेत ते बोलत होते. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चुरस मुंबई महानगरपालिकेत पाहायला मिळत असून, मतदानापूर्वीच 'महापौर' पदावरून राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौर पदाबाबत केलेल्या विधानाला प्रत्युत्तर देताना एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी मुंबईचा महापौर मुस्लिम महिला का होऊ शकत नाही? असा सवाल केला आहे. नेमके काय म्हणाले वारिस पठाण? वारिस पठाण यांनी म्हटले की, जर मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतो, तर मग एक मुस्लिम महिला महापौर का नाही होऊ शकत? धारावीतील एका सभेला संबोधित करताना वारिस पठाण म्हणाले की, हे विधान संविधान आणि लोकशाही या दोन्हींच्या विरोधात आहे. आमचे एक स्वप्न आहे की, एक दिवस कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबईची महापौर बनेल. पुढे बोलताना वारिस पठाणने म्हटले, मला एक सांगा की, मी महादेवावर प्रेम करतो, असे म्हणणारी व्यक्ती महापौर होऊ शकते तर मग हिजाब घालणारी आणि कलमा पठण करणारी मुस्लिम महिला का महापौर होऊ शकत नाही? अगोदरच मनसे आणि भाजपामध्ये महापौर पदावरून वाद सुरू असतानाच त्यामध्ये आता एआयएमआयएम देखील या वादात उडी घेतल्याचे बघायला मिळत आहे निवडणुकीचे बदललेले समीकरण यावेळची मुंबई महापालिका निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरत आहे. पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येत निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र मैदानात उतरली आहे. 'मराठी महापौर' विरुद्ध 'हिंदू महापौर' असा सामना रंगलेला असतानाच आता वारिस पठाण यांनी या वादात उडी घेत मुस्लिम महापौर का होऊ शकत नाही, असा सवाल केला आहे. मुंबईच्या महापौर पदावरून सुरू झालेला हा वैचारिक आणि धार्मिक संघर्ष मतदानापर्यंत कोणत्या थराला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचे ७० नगरसेवक 'बिनविरोध' निवडून आल्याच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर आणि महायुती सरकारवर अत्यंत जळजळीत शब्दांत प्रहार करण्यात आला आहे. लोकशाहीचे हे 'माफियाकरण' असून महाराष्ट्राच्या नीतिमत्तेचे अधःपतन सुरू झाल्याची टीका यातून करण्यात आली आहे. न्यायालयाने निवडणुकांच्या मार्गातील सरकारी बेड्या तोडल्या असल्या, तरी सत्ताधारी मंडळी विधानसभेप्रमाणे येथेही गोलमाल करतील, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. सामनातील अग्रलेख जशाचा तसा... महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची मनमानी व यंत्रणांचा उन्माद टोकाला गेला आहे. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करून यापुढे निवडणुका घेऊच नका. 70 जागांवर एकही मत पडले नाही आणि तरीही तेथे सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी लोकशाहीचे हे माफियाकरण केले. जेथे मते चोरता आली नाहीत तेथे दहशत व पैशांनी विरोधी उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले. भारतीय लोकशाहीचे हे अत्यंत अपमानास्पद चित्र आहे. वेगवान मुंबईचे शिल्पकार ‘देवाभाऊ’ असल्याची होर्डिंग्ज सर्वत्र झळकली आहेत. वेगवान निवडणूक भ्रष्टाचाराचे ते शिल्पकार आहेत असे आता म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे, नीतिमत्तेचे अधःपतन वेगाने सुरू झाले आहे! राज्यातील महापालिका निवडणुका म्हणजे एक फार्स बनला आहे. विविध महापालिकांत जवळ जवळ 70 नगरसेवक बिनविरोध निवडून गेले व हे सर्व ‘बिनविरोध’ सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत. भाजप आणि शिंदे गटात बिनविरोध निवडून आणण्याची एक प्रकारे स्पर्धाच लागली आहे. हा किळसवाणा प्रकार म्हणजे लोकशाहीत निर्माण झालेली विकृती आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, जळगाव, पनवेल, भिवंडी, धुळ्यात जे लोक बिनविरोध निवडून आणले त्यांचे असे काय कर्तृत्व आहे? समोरच्या उमेदवारांच्या तोंडावर दोन-पाच कोटींची बंडले फेकून माघार घ्यायला लावून बिनविरोध विजयाची डबडी वाजवून नाचकाम करण्याचा प्रकार सुरू आहे. भाजप हा दुतोंडी गांडुळांप्रमाणे वळवळत आणि बोलत असतो. नीतिमत्तेच्या, चारित्र्याच्या गप्पा मारायच्या व सर्व घोटाळेबाजांना पक्षात घेऊन निवडणुका जिंकायच्या. कधी ईव्हीएम, कधी व्होट चोरी तर आता नवा ‘बिनविरोध’ फंडा त्यांनी आणला आहे. आम्ही भाजपला दुतोंडी गांडूळ का म्हणतो, ते यासाठीच. 2018 च्या पंचायत निवडणुकांमध्ये प. बंगालात तृणमूल काँग्रेसला सुमारे 34 टक्के जागांवर बिनविरोध विजय मिळाल्यावर याच भारतीय जनता पक्षाने थयथयाट केला होता. तृणमूल काँगेसने दहशतीच्या बळावर बिनविरोध निवडणुका जिंकल्या ही लोकशाहीची हत्या आहे, अशा शब्दांत निषेध नोंदवून प. बंगालात आंदोलन छेडले होते. भाजपचा आरोप होता की, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून राज्यात ठिकठिकाणी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना नामांकन अर्ज घेण्यापासून आणि दाखल करण्यापासून रोखले व निवडणूक आयोगाने ‘तृणमूल’ला मदत होईल अशी भूमिका घेतली. प. बंगालातील बिनविरोधबद्दल SCने आश्चर्य केले व्यक्त भाजपने लोकशाही हत्येविरुद्ध जी भूमिका प. बंगालात घेतली त्याच्या नेमकी तो पक्ष महाराष्ट्रात घेत आहे. प. बंगालात भाजप विरोधी पक्षात होता व महाराष्ट्रात तो सत्तेवर आहे एवढाच काय तो फरक. तृणमूलने 2018 साली जे प. बंगालात केले तेच जसेच्या तसे भाजपवाले ‘बिनविरोध’च्या नावाखाली महाराष्ट्रात करत आहेत व हे सर्व म्हणजे लोकशाहीची हत्या आहे असे त्यांना वाटत नाही. दुतोंडी गांडुळाप्रमाणे त्यांचे वर्तन आहे ते असे. प. बंगालातील संशयास्पद ‘बिनविरोध’ प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले. तब्बल 16 हजारांहून जास्त ग्रामपंचायत जागा बिनविरोध झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले होते. ही याचिका भाजपने दाखल केली होती व सर्वोच्च न्यायालयाने ‘बिनविरोध’ निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता भाजपने महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत असेच ‘प्रश्नचिन्ह’ उपस्थित करणारे ‘बिनविरोध’चे उद्योग केले आहेत. शहरांनुसार त्यांच्या खरेदी-विक्रीचा भाव ठरला या निवडणुकीत ज्यांनी माघार घेतली व सत्ताधाऱ्यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा केला ते सर्व लोक लफंगे आहेत. त्यांनी आपल्या निष्ठा विकल्या. शहरांनुसार त्यांच्या खरेदी-विक्रीचा भाव ठरला. ठाण्यात उमेदवारी मागे घेणाऱ्यांना 5 ते 8 कोटी, कल्याण-डोंबिवलीत 3 कोटी, पिंपरी-चिंचवड, पुणे 2 कोटी, पनवेल 30 लाख, भिवंडी 20 लाख, धुळे, जळगाव, अहिल्यानगरात हाच भाव 15 लाख होता. उमेदवारांनी माघार घेताच पैसे घरपोच झाले, पण ज्या पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, त्यांची साधी परवानगीही अर्ज मागे घेताना घेतली नाही. मुळात ज्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांचे लोक बिनविरोध निवडून आले तो मतदारांचा अपमान आणि फसवणूक आहे. एखाददुसऱ्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराच्या तांत्रिक चुकांमुळे निवडणूक बिनविरोध होऊ शकते, पण ज्या ‘घाऊक’ पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी बिनविरोध निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला तो सर्व प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. किळसवाण्या आणि विकृत पद्धतीने निवडणुका सुरू मुळात या स्थितीत कोणतीही निवडणूक बिनविरोध होऊ शकत नाही. कारण प्रत्येक मतपत्रिकेवर किंवा ईव्हीएमवर नोटाचे (Nota) बटण आहे. None of The Above म्हणजे या उमेदवारांपैकी कोणीच नाही. सब घोडे बारा टके असल्याने हजारो मतदार निषेध म्हणून ‘नोटा’चे बटण दाबतात. जर ‘नोटा’ पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या अधिक असेल तर ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते. त्यामुळे कायद्याचे पालन झाले तर निवडणूक आयोग बिनविरोध विजय फेटाळून लावेल. जे 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले त्यांना निवडणुकीत ‘नोटा’शी सामना करावा लागेल. त्यामुळे निवडणूक घ्यावीच लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात किळसवाण्या आणि विकृत अशा पद्धतीने महापालिका निवडणुका सध्या सुरू आहेत. ‘देवाभाऊ’ वेगवान निवडणूक भ्रष्टाचाराचे शिल्पकार निवडणूक आयोग, पोलीस प्रशासन, उमेदवार तर विकले गेले आहेतच, परंतु काही ठिकाणी मतदारांच्या भूमिकाही संशयास्पद म्हणाव्यात अशा दिसत आहेत. पैशांच्या वर्षावात मतदारदेखील वाहून गेले. महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची मनमानी व यंत्रणांचा उन्माद टोकाला गेला आहे. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करून यापुढे निवडणुका घेऊच नका. 70 जागांवर एकही मत पडले नाही आणि तरीही तेथे सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या. भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी लोकशाहीचे हे माफियाकरण केले. जेथे मते चोरता आली नाहीत तेथे दहशत व पैशांनी विरोधी उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले. भारतीय लोकशाहीचे हे अत्यंत अपमानास्पद चित्र आहे. वेगवान मुंबईचे शिल्पकार ‘देवाभाऊ’ असल्याची होर्डिंग्ज सर्वत्र झळकली आहेत. वेगवान निवडणूक भ्रष्टाचाराचे ते शिल्पकार आहेत असे आता म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे, नीतिमत्तेचे अधःपतन वेगाने सुरू झाले आहे!
गेली अनेक दशके आपल्या आक्रमक शैलीने राजकारण गाजवणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन नांदा सौख्यभरे, अशा शब्दांत त्यांनी आपली राजकीय निवृत्ती जवळ आल्याचे स्पष्ट केले. सिंधुदुर्गातील सभेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना इथून पुढे निलेश आणि नितेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. सिंधुदुर्गात नारायण राणेंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिलेत. नारायण राणे म्हणाले, वय वाढत चालल्याने आता शरीर थकत चालले असून विश्रांतीची गरज आहे. दोन्ही मुले आता राजकारणात पूर्णपणे सेट झाली आहेत, त्यामुळे आता कुणीतरी फॅमिली बिझनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे. राजकारणात कट कारस्थान केले जातेय, म्हणून ठरवले, आता घरी बसायचे. दोन्ही मुले राजकारणात चांगले काम करत आहेत. चांगल्याला जोपासा, आणि सेवा करून घ्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. माणुसकी हाच माझा खरा धर्म आपल्या साध्या राहणीमानाचा उल्लेख करताना राणे म्हणाले, मी आजही रस्त्यावर उतरून भाजी घेतो. अनेकांना हातात अंगठ्या आणि काळ्या काचेच्या गाड्या घेऊन फिरण्याची सवय असते, पण माझ्या गाडीला कधीच काळ्या काचा नसतात. माणुसकी हाच माझा खरा धर्म आहे. आपल्या राजकीय प्रवासात अनेकदा अडचणी आणल्या गेल्या, पण तरीही आपण डगमगलो नाही, अशी आठवणही त्यांनी करून दिली. कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राणे यांनी स्पष्ट शब्दांत बजावले की, पक्ष सांभाळा, स्वार्थ नको. पैशासाठी राजकारण करू नका, कारण असले पैसे कधीच पचत नाहीत. माझ्यानंतर निलेश आणि नितेश हेच विकासात्मक राजकारण पुढे नेतील, त्यांनी हाक दिली तर त्यांना साथ द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. कामाचा डंका आणि विरोधकांना इशारा राजकारणात जून महिना प्रत्येक निवडणुकीत दिसतो. कुणावर विश्वास ठेवावा असे लोक दिसत नाहीत. मी त्यावेळी मुख्यमंत्री झालो, मात्र आजही लोक नाव काढतात. लोकसभा जिंकलो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या प्रेमापोटी भारावून गेलो. द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, माझ्या रस्त्यात आला तर मी थारा देणार नाही. पक्ष सांभाळा, स्वार्थ नको. या जिल्ह्यात माझ्या अगोदर आणि माझ्या नंतर एखाद्या नेत्याने माझ्यासारखे काम केलेले दाखवा असेही नारायण राणे म्हणाले.
प्रतिनिधी । पैठण राज्यातील ५० पेक्षा जास्त दिव्यांगांनी ५४०० फूट उंचीच्या कळसुबाई शिखरावर चढाई करत थर्टी फर्स्टचा अनोखा अनुभव घेतला. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट मानल्या जाणाऱ्या या शिखरावर त्यांनी नववर्षाचे स्वागत केले. शिवुर्जा प्रतिष्ठान या दिव्यांगांच्या दुर्ग भ्रमण संवर्धन संस्थेच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून ही ऊर्जा मोहीम राबवली जाते. यंदाही ३१ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, बुलढाणा, सातारा, जळगाव, अकोला, हिंगोली, अमरावती, धुळे, लातूर येथून दिव्यांग आणि त्यांचे मदतनीस बारी गावात एकत्र आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि सचिव कचरू चांभारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी एक वाजता चढाईला सुरुवात झाली. खाचखळगे, झाडी, डोंगरदऱ्या, लोखंडी शिड्या, निसरड्या वाटा पार करत सर्वांनी एकमेकांच्या मदतीने पाच तासांत शिखर गाठले. ३१ डिसेंबरची रात्र त्यांनी कडाक्याच्या थंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्यात कापडी तंबूत घालवली. एक जानेवारीला सूर्योदय पाहून नववर्षाचे स्वागत केले. सकाळी दहा वाजता शिखर उतरण्यास सुरुवात झाली. तीन तासांत सर्वजण सुखरूप बारी गावात पोहोचले. बारी आणि जहागीरदारवाडी गावकऱ्यांनी या दिव्यांग वीरांचे स्वागत केले. बारीचे सरपंच वैशाली खाडे, उपसरपंच गणेश खाडे, सदस्य रोहिणी खाडे, जहागीरदारवाडीचे सरपंच पंढरीनाथ खाडे, उपसरपंच रुक्मिणी करटुले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी गाडे आणि सचिव कचरू चांभारे यांच्या हस्ते सर्व दिव्यांग आणि मदतनिसांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कळसुबाई शिखरावर नवीन वर्षाचे स्वागत करताना ५० दिव्यांग. छाया ः विनोद लोहिया.
फुले जयंतीनिमित्त केऱ्हाळ्यात प्रभात फेरी:गावात ‘लेकी सावित्री’चा गौरवही
प्रतिनिधी | पिंपळगाव पेठ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केऱ्हाळा गावात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते. महात्मा फुले युवा मंचच्या वतीने शनिवारी (दि. ३) जयंती उत्साहात साजरी झाली. सकाळी आठ वाजता बस स्टॉप येथून शाळकरी मुलांच्या लेझीम पथकासह प्रभात फेरी काढण्यात आली. घोषणांनी आणि लेझीमच्या तालात गावात सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला. यानंतर क्रांतीसूर्य महात्मा फुले प्रांगणात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष आणि समाजपरिवर्तनातील योगदान यावर विचार मांडले. कार्यक्रमाला आदर्श सरपंच मंगेश साबळे आणि व्याख्याते प्रा. राहुलकुमार ताठे उपस्थित होते. त्यांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी वाचन, शिक्षण आणि सामाजिक भान जपावे, असे प्रतिपादन सरपंच साबळे यांनी केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली स्वाती शेनफड बनसोड. ती केऱ्हाळा येथील शेतकऱ्याची मुलगी असून तिने एमबीबीएस व एमडी पदवी मिळवून डॉक्टर होण्याचा मान मिळवला. ‘लेकी सावित्रीच्या’ या संबोधनासह तिचा सन्मान करण्यात आला. तिचे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी ठरले. महात्मा फुले युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवून गंगापूरला सुंदर करू:नगराध्यक्ष जाधव यांची ग्वाही
प्रतिनिधी | गंगापूर गंगापूर व्यापारी महासंघातर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संजय जाधव आणि नगरसेवकांचा नागरी सत्कार गुरुवारी माहेश्वरी मंगल कार्यालयात झाला. यावेळी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी शहरातील पार्किंग, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, कुठलाही भेदभाव न करता शहराचा सर्वांगीण विकास करणार. नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी आपापल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवल्यास त्या लवकर सोडवू. पुढील तीन महिन्यांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून दोन दिवसाआड स्वच्छ पाणी देण्याचे नियोजन सुरू आहे. कार्यक्रमात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाळूसेठ गुंदेचा, नगरसेवक अमोल जगताप, संतोष अंबिलवादे, फैसल चाउस, योगेश पाटील, सुरेश नेमाडे, सोपान देशमुख, विशाल गायकवाड, नवनाथ कानडे, दिनेश गायकवाड, अख्तर सय्यद, अजित राजपूत, अनिस कुरैशी उपस्थित होते. नगरसेवक अमोल जगताप, संतोष अंबिलवादे, विशाल गायकवाड यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी दुवा म्हणून काम करू, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष वर्मा यांनी केले. आभार बाबासाहेब गायके यांनी मानले. प्रवीण सोमाणी, रामेश्वर नावंदर, कृष्णा मनाळ, भरत गांधी, श्रीनिवास सोमाणी, निलेश बजाज, विकास साबणे, पप्पूसेठ कटारिया यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी | कन्नड कन्नड ते हिवरखेडा-गौताळा अभयारण्य रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे. हा रस्ता कन्नड नागद राज्य मार्गावर आहे. मात्र रस्ता ऐकेरी आहे. रस्ता कामासाठी ३५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या रस्त्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, शासकीय आयटीआय, साधना पाटील विद्यालय, देवलोक स्मशानभूमी, कन्नड इंजिनिअरिंग कॉलेज, म्हाडा कॉलनी, त्रिशरण बुद्ध विहार, मदर इंडिया स्कूल, कृष्णा इंटरनॅशनल स्कूल, विविध कार्यालये आणि नागरी वसाहती आहेत. रस्त्यावर ऐतिहासिक गौताळा अभयारण्य आहे. त्यामुळे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. हिवरखेडा गावही कन्नड- हिवरखेडा रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांची कसरत होते. वेळीच रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे. दुसऱ्या अधिवेशनात मंजुरी मिळवणार ^हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिम अंतर्गत येतो. या हिवाळी अधिवेशनात या रस्त्यासाठी मंजुरी व निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. परंतु मंजुरी मिळू शकली नाही. दुसऱ्या अधिवेशनात ती मंजुरी मिळवू. देवगाव रंगारी, कन्नड,हिवरखेडा गौताळा ते नागद असा हा राज्य महामार्ग आहे. आमदार संजना जाधव यांनी एशियन डेव्हलपमेंट बँक, ऐबीडी अंतर्गत साडेतीनशे कोटी रुपयांचा प्रस्तावही शासनाकडे सादर केला आहे.त्यास मंजुरी मिळाली तर मोठा प्रश्न सुटणार आहे. - एन.डी. सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पश्चिम याच मार्गावर आहे. रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. त्यामुळे रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात नेणे कठीण झाले आहे. दुचाकी चालवणे धोकादायक झाले आहे. ऊसाच्या गाड्या आणि विद्यार्थी याच रस्त्यावरून जातात. रुग्णवाहिका वळू शकत नाही. रस्ता राज्य महामार्गाप्रमाणे रुंद करावा, अशी मागणी कृषीभूषण डॉ. सिताराम जाधव, संतोष निकम, आकाश बोलधने, शेषराव जाधव, डॉ. गौतम जाधव, किरण राठोड, किशोर मोरया यांनी केली आहे. दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोकुळ राठोड, इम्रान शेख, भरत अधाने यांनी दिला आहे.
पैसा, धन, अलंकार, भूमी इत्यादी स्थूल वस्तू मंदिरासाठी दान करणाऱ्या दात्यांची अनेक उदाहरणे आहेत. पण सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील व्यावसायिक श्रीधर एकनाथ काळे यांनी १४ वर्षांत १४ मंदिराला भेट म्हणून दान पेटीचे वाटप करण्याचा आगळावेगळा भक्ती मार्ग जोपासला आहे. येथील ग्रामदैवत आई शिवाई देवी मंदिराला २०११ साली त्यांच्या संकल्पनेतील पहिली दानपेटी स्वखर्चातून दिली होती. नंतर तीन जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर स्थळी दानपेटी भेट म्हणून देण्याचा त्यांचा भक्ती मार्ग आजही तसाच आहे. इतकेच नाही तर आपला व्यवसाय सांभाळून प्रत्येक धार्मिक कार्यात त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोठा सहभाग आहे. २०११ साली येथील ग्रामदैवत आई शिवाई देवी मंदिरातील दानपेटी अज्ञातांनी फोडली, त्यातील रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. लोखंडी पेटीतून लोह चुंबकाच्या साहाय्याने दानपेटीत देणगी स्वरूपात जमा झालेली नाणी चोरण्याच्या घटनेतही नंतर वाढ होत राहिली. हा प्रकार थांबावा, दानपेटीतील दान मंदिराच्या कामी यावे म्हणून काळे यांनी मजबूत धातूची दानपेटी स्वखर्चातून भेट म्हणून दिली. याच संकल्पनेतून गेल्या चौदा वर्षांत १४ दानपेट्या वेगवेगळ्या मंदिराला भेट म्हणून दिल्या आहेत. ज्या मंदिरातील दान पेट्या मजबूत नाहीत, त्याठिकाणी पुढील काळात प्रत्येक वर्षाला एक दानपेटी भेट म्हणून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. शिवाई देवी संस्थान (शिवना), मर्दडी माता (दुधा, जि. बुलढाणा), संत धोंडिबा महाराज मंदिर (शिवना), जय हनुमान मंदिर (आमसरी), हनुमान मंदिर (मादणी), महाकाली माता मंदिर (मासरूळ), पंच ऋषी शनेश्वर महाराज मंदिर (किन्हे, शिवना), गहिनीनाथ महाराज मंदिर (सारोळा, जि. संभाजीनगर), श्री भगवती माता मंदिर (जळगाव सपकाळ), महादेव मंदिर (कोदा जि. जालना), चौंडेश्वरी माता मंदिर आदी ठिकाणी दानपेठी भेट दिली.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील आगाठाण (ह.मु. लासूर स्टेशन) गावातील जयेश मच्छिंद्र बडोगे यांची आयआयटी कानपूरच्या सीथ्रीआय हबमध्ये सायबर सिक्युरिटी रिसर्चर पदावर निवड झाली. जयेश हे शेतकरी कुटुंबातील असून ग्रामीण भागातून थेट राष्ट्रीय स्तरावरील संशोधन क्षेत्रात पोहोचणारे पहिले युवक ठरले आहेत. जयेश यांचे वडील मच्छिंद्र बडोगे हे शेतकरी आणि आदर्श शिक्षक आहेत. जयेश यांचे प्राथमिक शिक्षण मराठी व इंग्रजी माध्यमातून झाले. महाविद्यालयीन शिक्षण लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मराठी माध्यमातून पूर्ण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सायबर सिक्युरिटी आणि डिजिटल फॉरेन्सिक या विषयात पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी जयेश यांची निवड राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ, अहमदाबाद येथे झाली. कठीण इंटर्नस परीक्षेतून त्यांची निवड झाली. तेथे त्यांनी एमएससी डिजिटल फॉरेन्सिक व सायबर सिक्युरिटी हे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्येच कॅम्पस निवड प्रक्रियेतून त्यांची आयआयटी कानपूरमध्ये निवड झाली. ही निवड पूर्व परीक्षा आणि थेट मुलाखतीतून झाली.
प्रतिनिधी | वेरूळ वेरूळ येथील एका रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या हैदराबादच्या पर्यटकाचे एक लाख रुपये रोख व महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट हरवले होते. कैलास लेणी पाहण्यासाठी आलेल्या या पर्यटकाचे पाकीट चुकून रिसॉर्टमध्येच राहिले. लक्षात आल्यानंतर पर्यटक चिंतेत पडला. मात्र रिसॉर्टचे मालक उदय खरोटे यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. पाकीट सापडल्यानंतर त्यांनी कोणताही गैरवापर न करता थेट पर्यटकाशी संपर्क साधला. पाकीट पैसे व कागदपत्रांसह सुरक्षित परत दिले. या कृतीमुळे पर्यटक श्री. श्री. के. संतोष यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “मी खूप चिंतेत होतो. पाकीट सापडल्याचे कळताच आम्ही हैदराबादहून परत आलो. उदय खरोटे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा आणि माणुसकी शब्दांत मांडता येणार नाही. लोकांवरचा विश्वास अधिक वाढला.” या घटनेमुळे वेरूळ परिसरातील माणुसकी, प्रामाणिकपणा आणि ‘अतिथी देवो भवः’ची भावना अधोरेखित झाली. उदय खरोटे यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कपडे धुण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात मृत्यू:शिक्षणासाठी मृत आला होता बिहारहून वेरूळला
प्रतिनिधी | वेरूळ खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे शनिवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली. टाका स्वामी आश्रमाजवळील तलावात बुडून १९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आदर्श संतोष पांडे असे मृताचे नाव आहे. तो मूळचा बिहारमधील गया येथील रहिवासी होता. आदर्श हा वेरूळ येथील महर्षी वेद विज्ञान विद्यापीठ, टाका स्वामी आश्रम येथे शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो आश्रमातच राहत होता. रविवारी आश्रमाला सुट्टी होती. आदर्श आपल्या १६ वर्षीय लहान भावासोबत कपडे धुण्यासाठी तलावावर गेला होता. कपडे धुत असताना त्याचा तोल गेला. तो पाण्यात पडून बुडाला. काही वेळातच ही घटना लक्षात आली. स्थानिक नागरिकांनी आणि तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक अधिकारी विनायक कदम यांच्या नेतृत्वाखाली वसीम पठाण, रावसाहेब जाधव, रावसाहेब वाकले, विशाल गरडे, रितेश कसुरे, अतुल बनकर यांनी शोधमोहीम राबवली. काही वेळाच्या प्रयत्नानंतर आदर्शचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते मसीओद्दीन सौदागर यांच्या रुग्णवाहिकेतून त्याला वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन न करता मृतदेह मूळ गावी मृताच्या पालकांनी फोनवरून शवविच्छेदन न करता मृतदेह थेट मूळ गावी पाठवण्याची विनंती केली. त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह लहान भाऊ आणि सहकाऱ्यांसोबत बिहारला पाठवण्यात आला. या घटनेमुळे टाका स्वामी आश्रम परिसरासह वेरूळ शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांनी आदर्श पांडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
प्रतिनिधी | वरुड खुर्द येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. बालिका दिनाचे औचित्य साधून प्राथमिक पदवीधर शिक्षिका विजया चापे यांनी शाळेला २५ फायबर कुंड्या भेट दिल्या. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी मुलींनीच घेतली. नियोजन, आयोजन, सूत्रसंचालन, अध्यक्षपद आणि आभार प्रदर्शन या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनीच पार पाडल्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून झाली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय होता. आठवीच्या वैष्णवी शिवाजी मिरगे हिने अध्यक्षपद भूषविले. सहावीचा स्वराज्य गजानन गायकवाड याने सूत्रसंचालन केले. आठवीच्या सृष्टी एकनाथ थोरात हिने मान्यवरांचे आभार मानले. विजया चापे आणि अनिता बोळेगावे यांनी मार्गदर्शन केले. तांत्रिक साहाय्य आणि बैठक व्यवस्थेसाठी सुनील जाधव यांनी मदत केली. कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील खंबाट, शिक्षणप्रेमी कृष्णा पाटील गाडेकर, सदस्य संदीप थोरात, सुनीलभाऊ जोगदंडे, गणेश पाटील मिरगे, भागीनाथ पाटील गाडेकर, आकाश वाळके, विमलताई मिरगे, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक, शा.व्य. समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.
प्रतिनिधी | घाटनांद्रा घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवारी (दि. ३) आनंदनगरी’ मेळावा उत्साहात पार पडला. केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना व्यावहारिक जगाचे धडे मिळावेत या हेतूने आयोजित या उपक्रमात ९० विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे ४५ स्टॉल लावून ३५ हजार रुपयांची उलाढाल केली. शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. आनंदनगरीत विविध खाद्यपदार्थांच्या झालेल्या विक्रीतून विद्यार्थ्यांना व्यवसाय, व्यवहार, नियोजन आणि ग्राहक संवाद याचे महत्त्व प्रत्यक्ष शिकायला मिळाले. या कार्यक्रमाला समिती अध्यक्ष हरुण तडवी, माजी जि.प. सदस्य कौतिकराव मोरे, सुनील निकम, एकनाथ सुलताने, संतोष बिसेन, नथ्थू मोरे, विनायक मोरे, शेख मुसा, रफिकमिया देशमुख, शेख इब्राहिम यांच्यासह पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांच्यासह ईश्वर तांगडे, सुनील इंगळे, विजय पानतावणे, गुंफा आंदे, वाल्मीक घुगे, शुभम शिंदे, मनोज खैरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. हा मेळावा आम्ही खूप आनंदात साजरा केला’ अशी भावना बालविक्रेत्यांनी व्यक्त केली. घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आनंदनगरी मेळाव्यात खाद्यपदार्थ खरेदी करताना विद्यार्थी. छाया : राम जोशी व्यावहारिक शिक्षणाचे धडे या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, हिशेब, नियोजन आणि ग्राहक संवाद शिकवणे हा होता. प्रत्यक्ष विक्री करताना पैशांचा हिशेब कसा ठेवावा आणि ग्राहकांशी कसे बोलावे, याचे अनुभवजन्य शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. खाद्यपदार्थांची मेजवानी आणि ग्राहकांचा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी स्टॉलवर लावलेल्या इडली, डोसा, कचोरी, आलुवडा, समोसे, कॅटलिस, गुलाबजाम, भेळ, लिंबू सरबत, पाणीपुरी, पोहे, साबुदाणा वडे, सोयाबीन कटकी अशा विविध पदार्थांची पालकांनी आणि पाहुण्यांनी खरेदी करून चिमुकल्यांना चांगला प्रतिसाद दिला. परिसरातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनीही या मेळाव्यास भेट देत खाद्यपदार्थ खरेदी केले.
ऑरिक सिटीमध्ये औद्योगिक महाकुंभाची जय्यत तयारी:1528 स्टॉल्ससह ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो सज्ज
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (मसिआ) आयोजित बहुप्रतिक्षित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो आता अवघ्या ४ दिवसांवर आला आहे. ऑरिक एमआयडीसी, शेंद्रा येथे ८ ते ११ जानेवारी दरम्यान हा सोहळा रंगणार असून, डोम उभारणीसह इतर तांत्रिक कामांनी आता वेग घेतला आहे. यंदाच्या प्रदर्शनाने भव्यतेचे सर्व विक्रम मोडले आहेत. २९ एकरच्या विस्तीर्ण जागेत ३ महाकाय डोम आणि पॅगोडा उभारण्यात आले आहेत. २०२३ मध्ये ६५० स्टॉल्स होते. मात्र यंदा ही संख्या १५२८ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये ऑटोमोबाइल, आयटी, कृषी, स्टार्टअप्स आणि एनर्जी क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. भेट देणाऱ्यांच्या सुलभतेसाठी क्षेत्रांनुसार डोमचे वर्गीकरण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी क्यूआर कोड : केवळ उद्योग प्रदर्शनच नव्हे, तर नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी हा एक्स्पो हक्काचे व्यासपीठ ठरणार आहे. प्रदर्शनाच्या ठिकाणी ठिकठिकाणी ‘क्यूआर कोड’ लावले जाणार आहेत. इच्छुकांनी हा कोड स्कॅन करून आपला बायोडाटा अपलोड केल्यास, तो थेट संबंधित उद्योगांकडे वर्ग केला जाईल. यामुळे कुशल मनुष्यबळ आणि उद्योजक यांच्यात दुवा साधला जाणार आहे.
ऐतिहासिक सोनेरी महाल आता खऱ्या अर्थाने सोनेरी झळाळीने न्हाऊन निघणार आहे. महालाला यापूर्वी देण्यात आलेला रासायनिक पिवळा रंग पूर्णपणे काढून पुरातन आणि नैसर्गिक पद्धतीने जतन-संवर्धन सुरू आहे. यासाठी पळसाची फुले, चुना आणि शंखाच्या पुडीपासून तयार केलेला अस्सल नैसर्गिक रंग वापरला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार हे काम हाती घेण्यात आले असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने २६ जून २०२४ रोजी या कामासाठी ४ कोटी ५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भोपाळ येथील ‘आधारशिला कन्स्ट्रक्शन’ या संस्थेमार्फत गेल्या दीड वर्षापासून हे काम सुरू असून यापूर्वी सिमेंट आणि वाळूचा वापर करून केलेले चुकीचे संवर्धन पाडून आता पूर्णपणे दगड आणि चुन्याचा वापर केला जात आहे. जतन-संवर्धनातील महत्त्वाचे बदल राजस्थानचा चुना आणि विशेष दगड वापरून नैसर्गिक पद्धतीने प्लास्टर केले जात आहे. प्लास्टर पूर्ण झाल्यानंतर त्यावर पारंपरिक आणि बारीक नक्षीकाम केले जाणार आहे. हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. असा तयार होणार महालासाठी सोनेरी रंग महालाचे ऐतिहासिक स्वरूप जपण्यासाठी रंगाची प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक ठेवली आहे. पळसाची फुले सात दिवस गरम पाण्यात भिजवून त्यातून नैसर्गिक रंग काढला जाईल. या अर्कात चुन्याची क्रीम, दही, शंखाची पूड आणि दगडाची पूड मिसळून गोल्डन शेड तयार केली जाईल. सध्या दोन रंगांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, त्यातील एका अंतिम रंगाची निवड केली आहे. एका वर्षात काम पूर्ण सिमेंट व वाळूचा वापर करून केलेले जुने जतन-संवर्धन पाडून टाकण्यात आले असून, आता नैसर्गिक पद्धतीने सोनेरी महालाचे संवर्धन सुरू आहे. चुन्याचे छत, नव्याने उभारलेली छत्री, चुन्याचे प्लास्टर आणि रासायनिक रंगाऐवजी नैसर्गिक रंग देण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. -नर्सीलाल सैनी, कर्मचारी, जयपूर, आधारशिला कन्स्ट्रक्शन. छत : मेथी, उडीद अन् बेलफळाचा वापर महालाच्या छताचे काम अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे. चुन्याच्या छताला अधिक मजबुती देण्यासाठी त्यात मेथी, ताग, उडीद डाळ, बेलफळ, गूळ आणि डिंकाची (गोंद) भेसळ करण्यात आली आहे. हे सर्व नैसर्गिक घटक भोपाळ आणि राजस्थानमधून मागवण्यात आले आहेत. तसेच, महालावर कोसळलेली “छत्री’ राजस्थानच्या विशेष दगडांतून पुन्हा नव्याने कोरण्यात आली आहे.
जागा कमी असल्यामुळे ॲम्ब्युलन्स येत नाही, इथं घंटागाडीही येत नाही. त्यामुळे कचरा नाल्यात फेकतो. ड्रेनेजच पाणी मिक्स होऊन येतं. पुलाचे पाणी आमच्या भागात येत असल्यामुळे छाती इतके पाणी साचते. इथं रहायचं तरी कसं? असा प्रश्न पडतो. दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा'मध्ये प्रभाग क्रमांक 15 मधल्या नागरिकांनी पोटतिडकीने आपल्या समस्या मांडल्या. ना रस्ते, ना जागा, ना पाणी...आम्हाला हे सारे प्रश्न कधी सुटतील असे वाटते. आम्हाला हा प्रश्न सोडवणारा नगरसेवक हवाय. चार-चार पिढ्यांपासून येथे असलेले रहिवासी सांगतात की, 'पूर्वीचा आमचा भाग चांगला होता आता मोकळा परिसर बघायलाच मिळत नाही.' या लोकांना कोणत्या समस्यांना सामोर जावं लागतं, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून... परिसरात छाती इतके पाणी साचते प्रभाग १५ मधील अनेक ठिकाणी नाले उघडे आहेत. तसेच पावसाळ्यात जेव्हा हे नाले भरतात तेव्हा सगळ घाण पाणी नागरिकांच्या घरापर्यंत जाते. यावर बोलताना भागातील दलालवाडी गुलमंडी परिसरातील रहिवासी शुभम थोरात म्हणतो, 'जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आमच्याकडे छाती इतके पाणी साचते. जे मध्यचे आमदार आहेत. ते सरकारी पक्षात असताना सुद्धा त्यांनी एकही काम केलेलं नाहीये. आमच्याकडे जो पूल आहे. त्याच पाणी सगळं आमच्याकडे येत. हा प्रश्न केवळ आमच्याच घराचा नाही तर जवळजवळ ४० घरांचा प्रश्न आहे. महापालिकेला अनेकदा तक्रार केली तर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचे काम करत नाहीत मग आम्ही त्यांना निवडून का द्यायचं. हे राजकारणी स्वतः उभे राहतात. काम करत नाहीत. त्यांच्या मुलांना उभे करतात ते तरी काय काम करणार.' असा सवाल या तरुणाने उपस्थित केला. पैसे घेता तसे पाणी पण द्या... प्रभागातील नाथगल्ली मधील रहिवासी लक्ष्मीकांत मुंडलीक म्हणतात की, 'आमच्याकडे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. तब्ब्ल १०-१२ दिवसानंतर पाणी येत. तेवढा पाणी साठा आम्हाला पुरत नाही. त्यामुळे आम्हाला टँकरने पाणी आणाव लागत. एकतर खूप दिवसांनी पाणी येत. आलं तर फक्त १ ते १:३० तास पाणी राहत त्यातलही आर्धा तास दूषित पाणी येत. आम्ही महापालिकेचा टॅक्स भरतो काही फुकट पाणी घेत नाही. आमच्याकडून पैसे घेता तसे आम्हाला पाणी पण द्या.' प्रभागातील अनेक भागात पाण्याची लाईनच पोहोचलेली नाहीये. असं येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मोठ्या गाड्यांना बंदी घाला प्रभागातील रहिवासी आझम खान यांनी सांगितले की, 'आमच्याकडे ट्राफिकची खूप मोठी समस्या आहे. रस्ते अरुंद आहेत. अतिक्रमण खूप सार आहे. त्यामुळे रस्त्यावरून गाडी सुद्धा जाण मुश्किल होत. जर इथल्या रस्त्यावर मोठ्या गाड्यांची रहदारी बंद केली तर जे होणारे अपघात आहेत ते कमी होतीन आणि आम्हाला पायी चालायला जागा राहील.' घराच्या बाजूला नाला... प्रभागात राहणारे लोक जागा नसल्यामुळं इतके परेशान आहेत की, प्रभागात राहणारी रितिका रिडलॉन म्हणते 'रस्ते एवढे छोटे - छोटे झाले आहे की, आमच्या भागात जर कोणाला इमर्जन्सी आली तर आमच्याकडे ॲम्ब्युलन्ससुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे लोक मरणाच्या दारात असतात पण इथे गाडी येऊच शकत नाही.' या भागात केवळ जागेचा नाही तर पावसाळयात येथील नागरिकांच्या घरात गुडघ्या इतके पाणी शिरते. यावर बोलताना रितिका म्हणते 'आम्ही इथे खूप वर्षांपासून राहतो. यामुळं जो भाग वाढला आहे तो वरच्या भागात गेलाय आणि आमच्या घरासमोर सगळा उतार करून टाकला आहे. त्यामुळं जेव्हा - जेव्हा पाणी येत किंवा पावसाळा सुरू होतो तेव्हा सगळं ड्रेनेजच पाणी आमच्या दारात येतं. त्याचा एवढा वास सुटतो की, आम्ही तो सहनच करू शकत नाही. घराच्या बाजूलाच नाला आहे. त्यामुळे तिथला सुद्धा वास. म्हणजे समोरून, पाठीमागून नुसती दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे जो कोणी निवडून येईल त्याने एवढा रस्ता नीट करावा आणि इथले अतिक्रमण हटवावे. घंटागाडी येत नाही, कचरा नाल्यात... अंगुरी बागेजवळ असलेल्या भागात राहणारे श्याम मोईम म्हणतात की, 'आमच्याकडे घंटा गाडी येत नाही. त्याचं कारण म्हणजे पूर्वी आमच्याकडे जागा खूप मोठी होती. पण आता अतिक्रमण एवढं वाढल आहे की, आमची टू - व्हीलरसुद्धा काढायला त्रास होतो. मग घंटागाडीवाले कसे येणार? ते येतात मुख्य रस्त्यावर, आम्ही राहतो आतल्या भागात. त्यामुळं गाडी कधी आली, कधी गेली काही समजत नाही. म्हणून मग आमच्याकडं काहीच पर्याय उरत नाही. आम्हाला पाठीमागच्या नाल्यात कचरा फेकावा लागतो. त्यात आमचा काय दोष आहे. आम्ही अनेकदा महानगरपालिकेत फोन केले, तक्रार दाखल केली. त्यांनी काही ॲक्शन घेतली. मात्र, अजूनही इथले रस्ते छोटे - छोटे होत चालले आहेत.'येणाऱ्या नगरसेवकांकडून हीच अपेक्षा आहे की, त्यांनी एकदा यावं बघावं की आम्ही कसे राहतो.' खड्ड्ड्यांमुळे पाणी तुंबते भागात राहणाऱ्या शमीम बेगम म्हणतात की, 'आमच्या भागाला १०-१५ दिवसाला, तर कधी २० दिवसाला पाणी येते. जेव्हा पाणी येतं, तेव्हा पहिलं १५-२० मिनिट इतकं घाण पाणी येत की त्याचा वास सुद्धा सहन होत नाही. तेच पाणी आम्हाला प्यावं लागतं. रस्त्यावर चढ - उतार असल्यामुळं सगळं पाणी जिथे जिथे खड्डे तयार झाले आहेत तिथे तुंबतं. सगळं ड्रेनेजेच पाणी आणि पिण्याचं पाणी मिक्स होऊन आमच्यापर्यंत पोहोचतं. आमची लेकरं त्या साचलेल्या पाण्यात खेळतात. आलेल्या घाण पाण्यामुळे पोटदुखीसारखे आजार होऊ नयेत म्हणून आम्ही पाण्यात औषध टाकून टाकून त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो.' अशी आहे प्रभागाची रचना प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नारळीबाग, सिटी चौक, कुंभारवाडा, मछली खडक, दिवान देवडी, केळी बाजार, खाराकुँवा, अंगुरी बाग, राजाबाजार, कुआरफल्ली, जाधवमंडी भाग,लक्कडमंडी, मोतीकारंजा, किराणा चावडी,सराफा, शहागंज भाजीमंडी, नवाबपुरा, धावणी मोहल्ला, न्यू मोंढा, कबीर मंदिर, काली मस्जिद, बारुदगर नाला, गुलमंडी भागशः, पानदरीबाग, गांधीनगर, खोकडपूरा भागशः या भागांचा समावेश होतो. या भागाची एकूण लोकसंख्या 41796 एवढी आहे.
सौर पॅनलची स्वच्छता मोठे जिकीरीचे व किचकट काम आहे. आता सौर पॅनल स्वच्छ करणे सोपे झाले. तुम्ही आॅफिसला, बाहेर गेले असाल वा देशात कुठेही असाल आणि वायफायशी जुळलेले असले तर तिथून घरच्या सौर पॅनलची स्वच्छता करू शकाल. एस. बी. जैन इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंगमधील सहायक प्राध्यापक राहुल पेठे व त्यांचे सहकारी रोहित शहाणे, वृषभ गिलारकर आणि हर्ष सूर्यवंशी यांनी ८ किलोवॅटची प्रगत सौर पॅनलसाफसफाई प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या प्रत्यक्ष वापराची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. विश्वसनीय कार्यक्षमता, प्रभावी डिटर्जंट-आधारित स्वच्छता आणि सातत्यपूर्ण परिचालन कार्यक्षमता प्रदर्शित केली. सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंडांनी निर्धारित मानकांची पूर्तता केली आहे. सौर पॅनलवर फोटोव्होल्टेइक पॅनलवर धूळ व घाण साचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेची हानी होऊ शकते. धूळयुक्त व उच्च-तापमानात वापरण्यासाठी डिझाइन केलेली प्रणाली, कमी ऊर्जा वापरून नियमित, सुरक्षित आणि कार्यक्षम स्वच्छता करते. मानवी श्रम कमी करणे, देखभालीचा खर्च कमी करणे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाची एकूण कार्यक्षमता सुधारणे हा यामागचा उद्देश आहे असे पेठे यांनी सांगितले. पॅनल स्वच्छतेसाठी मोबाइलमध्ये फ्री अॅप पॅनेल स्वच्छतेसाठी मोबाइलमध्ये फ्री अॅप दिले आहे. त्याद्वारे सौर पॅनेलची स्वच्छता केली जाते. वायफायशी जोडलेले असाल तर कुठूनही घरावरील सौर पॅनेलची स्वच्छता करता येते. या अॅपमध्ये फक्त डिटर्जंट, फक्त पाणी आणि संपूर्ण स्वच्छता असे पर्याय दिले आहे. वायफाय सिस्टिम कनेक्टेड राहण्यासाठी हार्डवेअर तयार केले आहे. त्यात एक साॅफ्टवेअर प्रोग्रामिंग कोड दिले आहे. ते वायफायसोबत कनेक्ट राहिल. वायफाय सुरू असेल तर ५ होल्टचा सप्लाय लागतो. मोटर दीड मिनिटांसाठी सुरू असते. सौर पॅनल स्वच्छ झाल्यानंतर स्प्रिंकलर आॅटोमॅटिक बंद होते, असे पेठे यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी ६ किलोवॅटचे १२ स्प्रिंकलर सौर पॅनेल स्वच्छतेसाठी ६ किलो वॅटचे १२ स्प्रिंकलर लागेल. स्वच्छता करता यावी यासाठी वरून खाली अशी सौर पॅनलची रचना केलेली असते. वरच्या आणि खालच्या पॅनलच्या मध्ये स्वच्छतेसाठी जागा सोडलेली असते. या जागेत दोन्ही पॅनलच्या मध्ये क्लिनिंगसाठी सोलोनाइट वाॅल लावण्यात येते. त्यावर १२ स्पिंस्क्रलर लावलेले असतात. पॅनेलच्या स्वच्छतेसाठी पहिले ३० सेकंदासाठी पाणी मारून ओले करण्यात येते. नंतर अर्ध्या सेकंदासाठी डिटर्जंट लिक्विड फोम सोडले जाते. नंतर १ मिनिटांसाठी पाणी येऊन स्वच्छ करण्यात येईल.
साखरपुडा झालेला, ५ मे रोजी विवाह दोघांच्याही मनात वैवाहिक जीवनाचे स्वप्न, भावी जोडीदारासोबत जोडीने खंडोबाला रविवार दर्शनाला निघालेले. मात्र, रेशीमगाठी जुळण्याआधीच अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना लोहारा तालुक्यातील दस्तापुरजवळ घडली. टँकरच्या धडकेत रविवारी दोघांचा मृत्यू झाला. लोहारा तालुक्यातील जेवळी (पूर्व) तांड्यातील बबन गोपा पवार (२४) व येथील रोहिणी बाबू राठोड (२३) नळदुर्ग येथील श्री खंडोबा देवस्थानात यात्रा असल्याने दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून लोहारा तालुक्यातील दस्तापूरजवळ टँकरने (एमएच ४२, एओ ६७९६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात बबन, रोहिणी ठार झाले. घटनेची माहिती मिळताच येणेगूर पोलिस दूरक्षेत्र चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. साखरपुडा झाला, मे महिन्यात होणार होता विवाह रोहिणी व बबन यांचे ६ महिन्यांपूर्वी लग्न जमले होते. साखरपुडाही झाला होता. ५ मे रोजी विवाह होता. मात्र, अपघातात दोघांचा मृत्यू झाला. रोहिणीची बहीण नळदुर्ग येथेच राहते. बहिणीचे पती कपिल पवार नळदुर्ग पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्याकडे दोघांनी रात्री मुक्कामही केला. दुसऱ्या दिवशी अपघात झाला. बबन याचे डीफार्मसी शिक्षण झाले असून रोहिणीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले.
सोलापूर येथील तरुणीचा अक्कलकोटमध्ये गळा चिरून खून झाल्याची घटना रविवारी घडली. तरुणानेही स्वतःचा गळा कापून घेतला. अक्कलकोट येथील बासलेगाव रोड, लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. स्नेहा श्रीकांत बनसोडे (२०, रा. रामवाडी, सोलापूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. आदित्य रमेश चव्हाण (रा. नागूरतांडा, ता. अक्कलकोट) असे जखमी तरुणाचे नाव आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना झाली ओळख मुलीच्या आईचे माहेर मैंदर्गी (ता. अक्कलकोट) आहे. मुलीचे मामा मैंदर्गीत राहतात. तेथे स्नेहा बारावीपर्यंत होती. येथे मैंदर्गीजवळ नागूरतांड्यावरील आदित्यशी तिची ओळख झाली. तो स्नेहास मोबाइलवरून ‘तुझ्यासोबत लग्न करणार,’ असे म्हणायचा. ‘तू तिच्याशी बोलू नको, परत घराकडे फिरकू नको, तुझ्यासोबत लग्न लावून देणार नाही,’ मुलीच्या असे कुटुंबीयांनी त्याला सांगितले. तरीही दोघे संपर्कात होते. प्रेमप्रकरणातूनच प्रकार घडल्याचा संशय आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
चार दिवसात ७ ते ८ लाख साहित्यप्रेमींनी हजेरी लावून गर्दींचा विक्रम केल्याचा दावा करीत अनेक वैशिष्ट्यांनी चर्चेत आलेल्या एेतिहासिक सातारा नगरीतील शतकपूर्व साहित्य संमेलनाचा समाराेप रविवारी तेवढ्याच उत्साहात पार पडला. संमेलनातील व्यासपीठावरील साहित्यिक आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कंदी पेढ्याच्या हाराने झाले. समाराेपावेळी नाट्यसंमेलन घेण्याचा मनाेदय व्यक्त झाल्यानंतर आता नाट्य कलावंतांच्या गर्दीने सातारा पुन्हा लवकरच फुलून जाण्याचे वेध लागले आहेत. सातारा येथील साहित्य संमेलनात चार दिवसांत मुख्य व्यासपीठावर झालेल्या उद्घाटन, समाराेपासह विविध कार्यक्रमातील सहभाही साहित्यिक आणि प्रमुख पाहुण्यांना साताऱ्यातील प्रसिध्द कंदी पेढ्यांचे हार घालून स्वागत करण्यात आले. पाहुण्यांच्या गळ्यात घातलेल्या एका हारात ७५ पेढे हाेते. त्याचे वजन एक किलाे इतके तर किंमत १२०० ते १५०० रुपये हाेती. साताऱ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मिठाई म्हणून कंदी पेढे प्रसिध्द आहेत. हा कंदी पेढ्याच्या हाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संमेलनातील सर्व मान्यवर भारावून गेल्याचे दिसून आले. घरी घेऊन जाईपर्यंत साधारण तीन ते चार दिवस हा हार टिकताे. सातारी कंदी पेढ्याचे हार बनवण्याची परंपरा २००९ पासून आम्ही २००९ पासून परंपरा सुरू केली. हे हार गणेशाेत्सासह विविध उत्सवात वापरले जात हाेते. ते आता नेत्यांच्या गळ्यातही घातले जात आहेत. अमिताभ बच्चनपासून ते राज्यातील मान्यवरांपर्यंत पाेहाेचले आहेत. साहित्य संमेलनात जवळपास ५० हार बनवून दिले. याला आर्टिफिशियल झेंडू, फुलांनी सजवण्यात आले. या पेढ्याची किंमत ८०० रुपये किलाे तर हाराची किंमत १२०० ते १५०० रुपये आहे. -याेगेश गुरुचरण माेदी(पेढे व्यावसायिक) आता वेध नाट्य संमेलनाचे साहित्य संमेलनाला चार दिवसांत ७ ते ८ लाख लाेकांची उपस्थिती हाेती, असा दावा स्वागताध्यक्ष तथा, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भाेसले यांनी केला. शनिवारी तर हास्यजत्रा कार्यक्रमावेळी गर्दी आटाेक्यात आणण्यासाठी प्रवेशद्वार बंद करावे लागले हाेते. उत्स्फूर्त प्रतिसाद हाेता. त्यानंतर भाेसले यांनी शासनाकडे नाट्य संमेलन साताऱ्यातील भरवण्याची मागणी केली आहे. त्याचे वेध आता सातारकरांना लागले आहेत.
शहराच्या विकासाचा आरसा दाखवणाऱ्या आणि नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ देणाऱ्या दिव्य मराठी ॲपच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या खास मालिकेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 15 मध्ये भेट दिली असता, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लक्ष्मीनारायण बाखरीया यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत, किती वर्षांपासून प्रशासक आहे याचीही माहिती नाही, असा टोला शिवसेनेच्या महिला उमेदवारांना लगावला. यावेळी माजी नगरसेविका प्रीती तोतला यांनी नालेसफाईची कामे आम्ही केल्याचा दावा केला असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय चावरिया यांनी त्या कामाचे श्रेय घेऊ नका, ती कामे मीच केली असल्याचे स्पष्ट केले. नालेसफाईचे काम अजय चावरियांनीच केले असून त्या कामासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यामुळे त्याचे श्रेय त्यांनाच मिळाले पाहिजे, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना ऋषिकेश जैस्वाल म्हणाले की, महायुतीचे नगरसेवक असल्यामुळेच ही कामे शक्य झाली. दरम्यान, अजय चावरिया यांनी आमदारांच्या मुलाला उमेदवारी देण्यावर प्रश्न उपस्थित करत, विकास कामांसाठी आमदारांकडे स्वतंत्र निधी आणि पद असताना नगरसेवक पदाची गरज काय, असा सवाल केला. टक्केवारीसाठीच हे सर्व सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच परिसरातील पुलाच्या कामासाठी आपण आमदार प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांना अनेकदा फोन केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जलील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी मदत केल्याचेही चावरिया यांनी सांगितले. या वक्तव्यावर ऋषिकेश जैस्वाल यांनी आधी हे काम कोणत्या पक्षाचे आहे ते ठरवावे, अशी प्रतिक्रिया दिली. तर गणेश इंगळे यांनी आमदारांसाठी काम केले, आता त्यांच्या मुलासाठी आम्ही काम करायचे का, असा सवाल उपस्थित करत, टक्केवारी घेऊनच कामे केली जात असल्याचा आरोप केला. उमेदवारी न मिळाल्यामुळेच पक्ष सोडावा लागल्याचे सांगत त्यांनी स्थानिक आमदारांवरही जोरदार टीका केली. सत्ताधारी नेत्यांनी शहराचे वाटोळे केले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजय चावरिया म्हणाले की, 25 ते 30 वर्षांपासून मनपामध्ये सत्ता असणाऱ्या नेत्यांनी शहराचे वाटोळे केले आहे. आम्ही रस्ते, हाँकर्स झोन यासाठी काम करणार आहे. रस्त्यावर नेत्यांची घरे आहेत त्यामुळे रस्ते मोठे होत नाही, ते अतिक्रमण तोडू देत नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. आमच्याकडे ड्रेनेज आणि रस्ते झालेले आहेत, यानंतर आम्ही आता अतिक्रमण आणि हाँकर्स झोनसाठी प्रयत्न करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी घरात बसून ऑनलाईन पद्धतीने लोकांशी संवाद साधला आहे. पाण्याचा मुद्दा आला कारण आले फारोळ्यात लाईट गेली तर शहरातील पाण्याचे प्रेशर येत नाही. आमच्याकडे नाल्याची सफाई स्वत: करुण घेतली आहे. पाण्याच्या प्रश्नावर काय केले खैरेंना विचारले पाहिजे शिवसेनेच्या उमेदवार ऋषिकेश जैस्वाल म्हणाले की, आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या ही सार्वजनिक शौचालयाची आहे. आमच्या प्रभागातील काही भागात ओपन स्पेस विकसित केलेले नाहीत. नो पार्किंगचा मोठा विषय आहे. नागरिकांना पाणी कसे देता येईल याकडे आमचे लक्ष असणार आहे. पाणी येण्याची डेडलाइन प्रशासकाकडून देण्यात येते. पण जर विचार केला तर आज 99 टक्के पाइपलाइनचे काम पूर्ण होणार असून येत्या काही महिन्यात 24 तास पाणी येणार आहे. यापूर्वी प्रभागात काय झाले काय नाही मला काही देणघेणं नाही मी निवडून आल्यावर काय बोलणार आहे यावर मी बोलणार आहे. रस्ते, साफसफाई, पाण्याच्या प्रश्नावर काय करु शकतो यावर मी प्रयत्न करणार आहे. आमच्या प्रभागात जी जी समस्या बाकी असेल ती सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. पाण्याच्या प्रश्नावर काय केले हे खैरे यांना विचारले पाहिजे. आम्ही योजना पूर्ण केली आहे. येत्या 3 महिन्यात ही योजना पूर्ण होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी काय काम केले. प्रभागात वाहतूक कोंडीची समस्या ठाकरे गटाचे उमेदवार सचिन खैरे म्हणाले की, आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या ही महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नाहीत. यापूर्वी असणारे शौचालय तोडण्यात आले आहे. हिरकणी व्हॅन सारखी व्यवस्था आम्ही करणार आहोत. आमच्या प्रभागात वाहतूक कोंडीची समस्या आहे, पण कुणाचे अतिक्रमण नाही. लोकांची 150 ते 200 वर्षांपासून इथे मालमत्ता आहे हे काही अतिक्रमण नाही. काही लोक म्हणता अतिक्रमण आहे पण काहीही नाही. आता सर्वांनी मिळून यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. आमच्यावर आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात ठेवावे की उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात अजित पवार देखील मंत्री होते.ते झोपलेले होते का? असा सवाल सविन खैरे यांनी केला आहे. पाणी योजनेचे बजेट दिवसेदिवस वाढत चालले आहे. इथे कोणीही काही बोलू शकत नाही प्रत्येक जण सत्तेत होता. भाजपचे लोकं केवळ आश्वासने देतात पण कामे करत नाहीत ठाकरे गटाचे उमेदवार लक्ष्मीनारायण बाखरीया म्हणाले की, आमच्या प्रभागात विविध समस्या आहेत. पण आमच्या राजाबाजार वॉर्डात केलेल्या विकासाच्या मुद्दा घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. आमच्या वॉर्डातध्ये 180 कचरा कुंड्या साफ आहेत. आमच्या प्रभागात 10 ते 12 दिवस पाणी येत नव्हते, कधी दुषित पाणी येत होते हा प्रश्न आम्ही सोडवला आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे त्यांनी दुषित पाण्याच्या विषयावर काय काम केले आहे? आम्ही नगरसेवक म्हणून काम करणारच आहोत. प्रशासकांचे राज्य आहे त्यांच्या काळात काय कामे झाली आहेत? प्रशासकांच्या कार्यकाळात आमदार-खासदार निवडून आले? हिंदूंच्या मतावर तुम्ही निवडून आले पण त्यानंतर तुम्ही काय कामे केली असा सवाल बखोरिया यांनी केला आहे. आज नागरिकांना 12 दिवसांनी पाणी येते? लाडकी बहीण योजना सुरू केली पण महिलांच्या पाण्याचा प्रश्न काही सोडवला नाही. उद्धव ठाकरेंनी आणलेली 1600 कोटी रुपयांची पाणी योजना 2700 कोटीची झाली पण पाणी ती अजून पूर्ण का झाली नाही? ऑक्टोबरपर्यंत पाणी देणार होते ते अजून का दिले नाही असा सवाल बाखरिया यांनी केला आहे. महिलांना पाण्यासाठी रात्री 3 वाजता उठावे लागते ही वेळ बदलणे गरजेचे आहे. आम्ही विकासावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. आम्ही महिलांसाठी राजाबाजारमध्ये इ टॉयलेट आणले आहेत. तिथे शौचालय सुद्धा सुरू केले आहेत. गांधीनगरमध्ये ड्रेनेज लाईन फुटते तिथे कोणत्या पक्षाचे नगरसेवक होते? असा सवाल बाखरिया यांनी केला आहे. भाजपचे लोकं केवळ आश्वासने देतात पण कामे करत नाहीत. पाण्याच्या प्रश्नावर काय केले हा सवाल जैस्वाल यांना विचारायला हवा असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ठाकरे सरकारच्या काळात काम थांबले भाजपचे उमेदवार बंटी चावरिया म्हणाले की, प्रभाग 15 मध्ये गांधीनगर वॉर्डामध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात आला आहे. रस्ते, पाणी आणि ड्रेनेज हे सर्व मु्द्दे लक्षात घेत निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून गांधीनगरमध्ये अनेक कामे करण्यात आलेली आहेत. माजी नगरसेवक हे भाजपचे होते, आमच्या परिसरात ड्रेनेज लाईनचे काम झालेले आहे, पाण्याची लाइन झालेली आहे, रस्त्याचे काम झालेले आहे. ड्रेनेजची जुनी लाइन झाली आहे ती फुटत असणार हे खरे आहे, ती बदलण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. अडीच वर्षे उद्धव ठाकरेंचे सरकार होते त्यावेळी पाण्याच्या योजना थांबवण्यात आली यावेळी आम्ही हांडा मोर्चा काढला. आम्ही सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासकामे केली आहेत. गेल्या 9 वर्षांपासून मनपाची निवडणूक झालेली नाही, स्थानिक नगरसेवकाने तिकडे लक्ष घालणे गरजेचे होते. पण निवडणूक न झाल्याने काही मुद्याकडे लक्ष दिले गेले नसेल पण सत्ता आल्यावर आम्ही सर्व समस्या सोडवणार आहोत. गांधीनगरचे माजी नगरसेवक एकदाही तिथे गेले नाहीत ठाकरे गटाचे संजय रिडलॉन म्हणाले की, गेली 5 वर्षे मनपामध्ये प्रशासक होते त्यांनी कामे केली नाहीत. नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम प्रशासकांचे होते. नगरसेकव नसताना आम्ही 24 तास जनतेसाठी रस्त्यावर आहोत. समाजसेवा आणि विकासकामे यावर आम्ही भर दिलेला आहे. जनसंपर्क आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गांधी नगरच्या विकासासाठी आम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करुण घेतलेल आहेत. तिथे गडूळ पाणी येते. गांधीनगरच्या माजी नगरसेवक एकदाही तिथे गेले नाहीत. कोरोना काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी केलेल्या कामाची दखल जगभरातील देशांनी घेतली आहे. दिवान देवडीमध्ये पावसाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद नरवडे म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून सत्ताधारी लोकांनी हे शहर भकास केले आहे. आपले शहर हे झपाट्याने वाढले आहे, गेल्या 30 वर्षांमध्ये सर्व नेत्यांनी शहराच्या विकासाच्या केवळ गप्पा मारल्या आहेत. शहराचा सर्व भकास केला आहे. दिवान देवडीमध्ये पावसाळ्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचते. कुणाला जर पोहता येत असेल तर त्यांना त्यातून पोहत जावे लागेल इतके पाणी आमच्या परिसरात साचलेले असते. आमच्या प्रभागात सर्वात मोठा प्रश्न हा ड्रेनेजचा आहे, त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर महिलांसाठी या परिसरात सार्वजनिक शौचालय असायला हवा. गुलमंडीवर ही व्यवस्था नाही. महिला सुरक्षेचा विषय अत्यंत महत्त्वाचा ठाकरे गटाच्या उमेदवार सोनल जैस्वाल म्हणाल्या की, महिला सुरक्षेचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक चौकामध्ये सीसीटीव्ही लावले गेले पाहिजेत, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या प्रभागात पाण्याची मोठी समस्या आहे ती आम्ही स्वत: उभे राहून सोडवून घेतली आहे, आम्ही याच केलेल्या कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. 8 दिवसानंतर आमच्याकडे पाणी येते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निशिगंधा गणेश इंगळे म्हणाल्या की, आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची आहे. 8 दिवसानंतर आमच्याकडे पाणी येते. 1 तास येणाऱ्या पाण्याचा विचार केला तर त्यातील अर्धा तास खराब पाणी येते. 8 दिवस लागणारे पाणी अर्धा तासात आम्हाला पाणी कसे भरता येईल. यासाठी आम्ही आंदोलन केलेले आहे. लोकांसाठी सार्वजनिक शौचालय नाही शिवसेनेच्या उमेदवार प्रीती तोतला म्हणाल्या की, आमच्या प्रभागात अरुंद रस्ते, पिण्याचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. आमच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे. त्यांच्यासाठी आणि येणाऱ्या लोकांसाठी सार्वजनिक शौचालय नाही. महिलांसाठी सुलभ शौचालय झाले पाहिजे. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नाणी पार्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नगरसेवक नसल्याने वॉर्डातील कामे झालेली नाहीत शिवसेनेच्या उमेदवार प्राजक्ता परदेशी म्हणाल्या की, प्रभागात फिरत असताना आम्हाला सर्व नागरिक एकच सांगत आहेत की आम्हीला पाणी येत नाही. नागरिकांना वेळेवर आणि मुबलक पाणी आले पाहिजे. आता 10 दिवसांना पाणी येते हे आम्ही मान्य करतो. पण आमच्या कार्यकाळात गतीने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. मनपाची निवडणूक होऊन 8 ते 10 वर्षे झाली आहेत. नगरसेवक नसल्याने वॉर्डातील कामे झालेली नाहीत. प्रशासकांकडे कारभार असल्याने ही अडचण आलेली आहे. शहरात सर्वच ठिकाणी पाण्याची लाइन आलेली आहे. फक्त मुख्य कनेक्शन जोडणी बाकी राहिली आहे. काही समस्या तशाच राहतात भाजपच्या उमेदवार जयश्री व्यास म्हणाल्या की, आमच्या प्रभागात अनेक समस्या सोडवल्या आहेत. पण कितीही समस्या सोडवल्या तरी काहीना काही समस्या तशाच राहतात. सर्वांनी मिळून कामे केली आहेत. लोकांना माहिती आहे कुणी कामे केली आहेत, पण आम्हाला ते मांडता येत नाही. ड्रेनेज, पाण्याचा जो विषय होत राहतो अपक्ष उमेदवार अमोल भावसार म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे तरी सुद्धा यांना मुलभूत सुविधा देता येत नाहीये. त्यांना मुद्देच कळालेले नाही. गुलमंडी परिसरात अनेक वेळा मोठी गर्दी होत असते. पण या ठिकाणी सार्वजनिक शौचलय दिसून येत नाही. ड्रेनेज, पाण्याचा जो विषय आहे तो होत राहतो पण आम्ही या मुद्द्याकडेच लक्ष घालणार आहोत. अशी आहे प्रभागाची व्याप्ती छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्र 15 चा विचार केला तर हा मतदारसंघ नारळीबाग, सिटी चौक, कुंभारवाडा, मछली खडक, दिवान देवडी, केळी बाजार, खाराकुँवा, अंगुरी बाग, राजाबाजार, कुआरफल्ली, जाधवमंडी भाग, लक्कडमंडी, मोती कारंजा भाग, किराण चावडी, सराफा, शहागंज भाजीमंडी, नवाबपूरा, धावणी मोहल्ला, न्यु मोंढा, कबीर मंदिर, काली मस्जिद, बारुदगर नाला, गुलमंडी भागशः पानदरीबाग, गांधी नगर, खोकडपूरा भागशः असा पसरलेला आहे. या परिसराचा विचार केला तर 41 हजार नागरिक या या आहेत प्रमुख समस्या अरुंद गल्ल्यांमुळे या भागातील बहुतांश रहिवाशांना वाहन पार्किंगसाठी थेट रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. परिणामी रस्त्यांवर सतत वाहतुकीची कोंडी निर्माण होते. जाफर गेट आणि जुना मोंढा परिसरात दिवस-रात्र अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून स्वच्छतेचाही प्रश्न कायम आहे. कुंवारफल्ली, केळीबाजार, मछली खडक, सिटी चौक आणि जाफर गेट परिसरात अधिकृत पार्किंगची सुविधा नसल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने लावतात, त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढते. सिटी चौकात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहन पार्किंगसाठी औरंगपुरा येथील नाथ मंदिरासमोरील जागेचा आधार घ्यावा लागतो. दरम्यान, जुन्या शहरातील नारळीबाग, खोकडपुरा आणि नवाबपुरा या भागांतील जलवाहिन्या व ड्रेनेज व्यवस्था अत्यंत जुनी झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या व ड्रेनेज लाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या प्रभागात 8 ते 10दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा होतो. अनेक ठिकाणी ड्रेनेज फुटल्यामुळे दूषित पाणी जलवाहिनीत मिसळते आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे रविवारी सकाळी १० वाजता शेतात न्याहारी करत असलेल्या गोरख लक्ष्मण जाधव (४३) या शेतमजुरावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. या वेळी झटापटीदरम्यान कठडा नसल्याने मजूर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले. दोघांचाही चाळीस फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेतातील महिलांनी आरडाओरड केल्याने इतर मजूर विहिरीभोवती जमले. त्यांनी विहिरीत पाहिले तेव्हा बिबट्या विद्युत पंपाच्या फाउंडेशनवर बसून होता. त्यामुळे बुडणाऱ्या मजुराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. वन विभागाने दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले. मात्र, बिबट्याला ठार मारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर दुपारी साडेतीन वाजता गोविंद तुपे यांनी विहिरीत उतरून जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला.यादरम्यान पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्याने नाकातोंडात पाणी जाऊन बिबट्याचाही मृत्यू झाला. फर्स्ट पर्सन - पाण्यातही बिबट्याने जाधव यांची मान सोडली नव्हती मी धावत आलो तेव्हा विहिरीतील फाउंडेशनचा आधार घेत बिबट्याने जाधव यांची मान सोडलेली नव्हती. पंजेही मारणे सुरूच ठेवले हाेते. काही वेळाने पकड ढिली झाल्याने जाधव पाण्यात बुडाले. - गणपत चव्हाणके, शेतमालक इनसाइड स्टाेरी- दाेन बालकांवरही याच बिबट्याने केला होता हल्ला शिवडे परिसरात याच बिबट्याने सकाळी दोन बालकांवरही हल्ला केला होता. त्यामुळे “आधी बिबट्याला ठार मारा, मगच मृतदेह बाहेर काढा,’ अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पेंचमधील वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात सोडला बुलडाणा | पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या ३ वर्षांच्या नर वाघास मध्यरात्री ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले. शिकारी कौशल्य आत्मसात केल्यामुळे वनाचा अधिवास लाभावा यासाठी हे पाऊल उचलले. वनाचा अधिवास लाभताच या पट्टेदार वाघाने रेड्याची शिकार केल्याचे समोर आले. या वाघाचे नामकरण पीकेटी/ सीपी १ ठेवण्यात आले असून हा मूळ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आहे. ६ महिन्यांचा असतानाच त्याची आई मृत पावली होती.
तब्बल ५ हजार कोटींच्या गुलाबी नोटा अद्याप गायब!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२३ मध्ये रिझर्व्ह बँकेने रद्द केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अद्यापही पूर्णत: बँकेकडे जमा झाल्या नाहीत. २०२५ च्या शेवटच्या दिवसाचा डेटा आरबीआयकडून जारी करण्यात आला. आरबीआयच्या अहवालात ५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या गुलाबी नोटा अजूनही परत येण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नोटा नेमक्या कुठे गेल्या आणि […] The post तब्बल ५ हजार कोटींच्या गुलाबी नोटा अद्याप गायब! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल
उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास लातूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी तडजोड केली नाही. डॉ. आंबेडकर यांचा विचार आणि संविधानाला मानणा-या काँग्रेस पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली. या निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल, असा […] The post काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर येथे पहिले तालुका स्तरीय जनगणना प्रशिक्षण
रेणापूर : प्रतिनिधी भारताची जनगणना २०२७ च्या अनुषंगाने पहिला टप्पा एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २७ या कालावधीत पूर्ण करावयाच्या असल्याने पहिल्या टप्प्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण रेणापूर तालुका जनगणना अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत थोरात व गटविकास अधिकारी सुमित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले. यावेळी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सर्व […] The post रेणापूर येथे पहिले तालुका स्तरीय जनगणना प्रशिक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा येथे राज्यातील प्रथमच शिक्षकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा
औसा : प्रतिनिधी औसा शिक्षक पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने शिक्षकांचे वैयक्तिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी राज्यात प्रथम मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या मान्यता असलेल्या इ. १ ते १२ पर्यंतच्या जिल्हा परिषद, खाजगी, माध्यमिक, आश्रम शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थ सहाय्य शाळा, सर्व माध्यमांतील ३१२ शिक्षकांनी या मॅरेथॉनम स्पर्धेत […] The post औसा येथे राज्यातील प्रथमच शिक्षकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंग्यातील बसस्थानक दहा महिन्यांतच बंद
निलंगा : प्रतिनिधी मोठा गाजावाजा करत उदघाटन झालेले ७ कोटींचे पंचतारांकित बसस्थानक अवघ्या दहा महिन्यात का बंद पडले असा प्रश्न मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी शासन प्रशासनाला विचारत बसस्थानकाचा स्पॉट पंचनामा केला. बसस्थानाकाचे बसवाहतुक होणा-या प्लॅटफॉर्मवरील सिमेंट उखडले असून चक्क स्टील उघडे पडले आहे. प्रवास्यांना बस आली-गेली की धुळीचे लोट उठतात. बसस्थानकामधील फरशीही उखडली […] The post निलंग्यातील बसस्थानक दहा महिन्यांतच बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दृष्टी दिव्यांगानी कला कौशल्य विकसित करावी
लातूर : प्रतिनिधी लुई ब्रेल यांनी दृष्टी दिव्यांगासाठी सहा टिंबाची ब्रेल लिपी शोधून काढली आणि त्यांच्या ज्ञानाचीद्वारे खुली केली. ब्रेल लिपीच्या माध्यमातून दृष्टी दिव्यांगाच्या जीवनामध्ये नवसंजीवनी निर्माण झाली. त्यामुळेच आज दृष्टी दिव्यांग व्यक्ती आपला शैक्षणिक विकास साध्य करीत आहे परंतू शिक्षणासोबत आपल्यामधील कला कौशल्यांनासुद्धा विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, लातूर […] The post दृष्टी दिव्यांगानी कला कौशल्य विकसित करावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेची निवडणूक लातूरच्या भवितव्याची
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित सामोरे जायचे आहे. ही निवडणूक लातूरच्या भवितव्याची व लातूरच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायची या संदर्भातील ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव […] The post महापालिकेची निवडणूक लातूरच्या भवितव्याची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा:52 लाखांच्या दागिन्यांची चोरट्यांकडून लुटमार
पुण्यातील हडपसरमधील शेवाळवाडी भागात शनिवारी सायंकाळी एका सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून ५२ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महावीर ज्वेलर्सचे मालक महेंद्रसिंह सोलंकी (वय ३७) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोलंकी यांच्या सराफी पेढीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते एकटेच होते. त्यावेळी खरेदीच्या बहाण्याने चार चोरटे पेढीत शिरले, तर त्यांचा एक साथीदार बाहेर थांबला होता. चोरट्यांनी सोलंकी यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पेढीतील दागिने एका पिशवीत भरले. दागिने लुटल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी सुरू आहे. आरोपी नेमके कोणत्या मार्गाने पसार झाले, त्यांचे इतर साथीदार कोण होते याबाबत तपास करण्यात येत आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस देखील या घटनेचा समांतर तपास करत आहेत. विशेष म्हणजे, आठवड्याभरापूर्वी खडकवासला-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील एका सराफी पेढीवरही भरदिवसा दरोडा टाकून चोरट्यांनी सव्वा कोटी रुपयांचे दागिने लुटले होते. त्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन चोरट्यांसह एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आज आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून हा केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत. ही युती करप्शन आणि कन्फ्यूजनची- फडणवीस तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आज जो वचननामा आला आहे, त्यात वचनही नाहीये आणि नामाही नाहीये. मला कोणीतरी म्हणालं कार्टूननिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी म्हणालो असं म्हणणं योग्य नाही. मग मला कोणीतरी असं म्हटलं की, कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी त्यांना म्हटलं हे देखील योग्य नाही. कारण कोणाचा व्यवसाय काहीही असू शकतो, ही जी युती झाली आहे ती युती करप्शन आणि कन्फ्यूजची झाल्याची टीकादेखील फडणवीस यांनी केली आहे. खोटं बोलायचं तर वचननामा आईच्या चरणी कशाला ठेवायचा? आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचूननामा आहे. पण त्यांनी काय वाचलं हे त्यांनाही माहिती नाही. याचं कारण आपण बघाल, एका वाहिनीने 2017 सालच्या यांच्या आश्वासनासंदर्भातील एक फॅक्टचेक केला, आणि त्या फॅक्टचेकमध्ये असं दिसलं की यांनी त्यावेळी जे पाच वचनं दिले होते, त्यातील एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही. मला आश्चर्य वाटतं जर आपल्याला खोटंच बोलायचं आहे तर तो वचननामा आईच्या चरणी कशाला ठेवायचा? फडणवीसांची शेरोशायरी मला असं कळलं की हे जेव्हा वचननामा करायला बसले, तेव्हा ते आपापसात काही तरी बोलत होते. मग मी त्याची माहिती काढली तर ते त्या ठिकाणी काय बोलत असतील? ‘झुटोने -झुटोसे कहा सच बोलो, अरे भाई दो भाईओ का ऐलान हुआ सच बोलो. घर के अंदर झुटो की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो’ अशी शेरोशायरी करत फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजीही केली. ..याचंही उत्तर आम्हीच द्यायचं का? दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील निशाणा साधला. आता बघा ते दोन युवराज त्या ठिकाणी कुठला तरी शो करत होते. राहुल गांधींसारखी स्क्रिन लावली होती, राहुल गांधींसारख्या येरझऱ्या मारत होते, काही तरी बोलत होते, आणि मला कोणीतरी सांगितलं की त्यांनी असं म्हटलं, मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाहीत. आता हे आम्हाला का विचारता, घरी जाऊन काकांना किंवा बाबांना विचारा. 25 वर्षांमध्ये मुंबईत शौचालय देखील का तयार झाले नाहीत? याचं उत्तर आम्ही द्यायचं, की बाबा आणि काकांनी द्यायचं?
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज रविवारी ठाकरे बंधूंनी शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणा-या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला. पाळणाघरे, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टी आहे, हा वचननामा या महानगरपालिका निवडणुकीत गेमचेंजर ठरणार का, अशी चर्चा सुरू आहे. […] The post शब्द ठाकरेंचा वचननामा जारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : विनायक कुलकर्णी राज्यात हिंदी भाषा सक्ती केली जाणार नाही, याचा पुनरुच्चार करून यापुढील काळात मराठीचा सन्मान वाढविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून येथे सुरु असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. […] The post मराठीचा सन्मान वाढविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या राजकीय संन्यासाचे संकेत दिले आहेत. आता घरी बसायचे ठरवले आहे, दोन्ही मुलांना सांगेन… नांदा सोख्यभरे, असे नारायण राणे म्हणाले. माझ्यानंतर विकासात्मक राजकारण निलेश आणि नितेश करतील, त्यांनी हाक दिल्यावर ओ द्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. […] The post आता ठरवलेय, घरी बसायचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, पुणे शहरात मागील पाच वर्षांत ७३ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, मात्र त्या प्रमाणात पुण्याचा विकास झालेला नाही. हा निधी कुठे गेला, हे तपासण्याची वेळ आली आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यात नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या त्रिमूर्तीने अनागोंदी कारभार चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे शहर जगात चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित आणि वाहतुकीची कोंडी असलेले शहर बनले आहे, ही शरमेची बाब आहे. पुण्यात १२ हजार ३५० लोक रोज स्वच्छतेचे काम करण्यासाठी आहेत, तरीही शहर स्वच्छ का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इंदूर शहर देशात स्वच्छतेत पहिले येऊ शकते, तर पुणे का नाही, असेही त्यांनी विचारले. पुण्याचा कारभारी बदलल्यास शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ग्वाही पवार यांनी दिली. प्रशासनावर आपली पकड असून, नियोजनबद्ध विकासकामे कशी करायची याचा प्रदीर्घ अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना उमेदवार अमोल बालवडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मागील ११ वर्षे भाजपच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दिली. काही राजकीय महत्त्वाकांक्षाही होत्या, मात्र भाजपच्या दोन नेत्यांनी माझा राजकीय घात केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या आई-वडिलांसमोर समजूत काढली होती, असे बालवडकर म्हणाले. बालवडकर यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांचा मान ठेवून मी थांबलो होतो. मात्र, आता पुढील चार वर्षांत माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या मंत्र्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध अहंकारी नेता अशी आहे. चंद्रकांत पाटील यांनी केवळ चॉकलेट वाटण्याची कामे केली, कोणतीही विकासकामे केली नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
पुण्यात ३२ कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित वस्तूंवर कारवाईसाठी कठोर आदेश दिल्यानंतर आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही याचा आढावा घेतला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादना विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. याच कारवाई अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील […] The post पुण्यात ३२ कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील हळद व्यापाऱ्याची १४.७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुजरात राज्यातील तीन हळद व्यापाऱ्यांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. ४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील किशोर पारडे हे हळद खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. गुजरात राज्यातील तीन व्यापारी हळद खरेदीसाठी ता. १८ जुलै २०२५ रोजी शिरडशहापूर येथे आले होते. त्यांनी किशोर यांच्या दुकानावर जाऊन त्यांच्याकडून ३७,४२ लाख रुपये किंमतीची २७ टन पॉलीश हळद खरेदी केली होती. सदर हळदीच्या खरेदी पोटी तिघांनी २२.६८ लाख रुपये दिले होते. उर्वरीत १४.७४ लाख रुपये नंतर देतो असे सांगून त्यांनी वाहनात हळदीचे पोते भरून नेले. दरम्यान, काही दिवसानंतर किशोर यांनी त्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी ता. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आणखी १८ टन हळद पाठवून देण्याबाबत कळविले. मात्र पूर्वीचे पैसे दिल्यानंतरच १८ टन हळद पाठवून दिली जाईल असे किशोर यांनी स्पष्ट केले. पण, त्यानंतर त्यांनी किशोर यांच्याशी संपर्कच केला नाही. याप्रकरणात किशोर यांनी त्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून पैसे पाठविण्याबाबत वारंवार विनंती केली असतांनाही त्यांनी पैसे पाठवलेच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर यांनी आज औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून औंढा नागनाथ पोलिसांनी अंजूम सय्यद (रा. सुरत, गुजरात), मोहम्मद आसीफ अब्दूल वाहिद मलीक, अन्नवर अब्दूल वाहिद मलीक (दोघे. रा. अहमदाबाद , गुजरात) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक वाघमारे, जमादार रवीकांत हरकाळ पुढील तपास करत आहेत.
बांगलादेशचा भारतात न येण्याचा निर्णय
मुंबई : बीसीबीने बांगलादेशला टीमला भारतात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील वाद उफाळल्यानंतर बीसीबीने हा निर्णय घेतला. बीसीबीने याबाबत आयसीसीला पत्र लिहिले आहे. बीसीबीने या पत्राद्वारे बांगलादेशच्या सामन्यांचे आयोजन हे श्रीलंकेत करण्यात यावे, अशी विनंती केली आहे. आता आयसीसी बीसीबीच्या या विनंतीवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. […] The post बांगलादेशचा भारतात न येण्याचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
द्वारकाशारदापीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या भव्य शोभायात्रेने पुण्यात श्रीमद् भागवत कथा ज्ञानसत्राचा प्रारंभ झाला. फुलांच्या पायघड्या, शंखनाद, भगव्या पताका, तुतारी आणि मृदुंगाच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त वेदभवन श्रीकृष्ण नगरी येथे १२ जानेवारीपर्यंत या ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीमद् भागवत सेवा समितीचे अध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज, वेदभवनचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि विश्वेश्वर घैसास उपस्थित होते. पौड रस्त्यावरील शृंगेरी शारदा मठापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. श्रीरामाचा जयघोष करत ही शोभायात्रा पुढे सरकली. शोभायात्रा मार्गावर फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि सुवासिनींनी औक्षण केले. शृंगेरी मठात जगद्गुरुंचे स्वागत करण्यात आले. शंकराचार्यांच्या हस्ते शृंगेरी मठातील देवतांचे पूजन करून ते भागवत ग्रंथासह भव्य रथात आरूढ झाले. आचार्य गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेस प्रारंभ झाला. सनई चौघडा वादन, बॅन्ड पथक, आळंदी येथील वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांची दिंडी, वैदिक शास्त्री आणि कोथरूड भागातील सनातन धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. ही शोभायात्रा पौड रस्त्यावरून वेदभवन श्रीकृष्णनगरी येथे समाप्त झाली. वेदभवन श्रीकृष्णनगरी येथे स्वामीजींचे स्वागत झाल्यानंतर त्यांनी आशीर्वचन दिले. यावेळी मार्गदर्शन करताना शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले की, वेदांचे रक्षण होणे आवश्यक आहे, कारण सनातन धर्म वेदांमुळेच सुरक्षित आहे. वेद हे सनातन धर्माचा प्राण आहेत आणि भागवत कथा हे वेदरूपी वृक्षाचे परिपक्व फळ आहे. भागवत कथा सर्वांची तृष्णा भागवू शकते आणि त्यातून आनंद प्राप्त होतो.
पुण्यात ‘मकोका’ कारवाईतील फरार गुन्हेगाराने लष्कर भागात आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) एका माजी नगरसेवकासह काही जणांची नावे आढळली आहेत. माजी नगरसेवकाने फरार आरोपीकडे ५० लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुक यासीन इनामदार, अफान फारुक इनामदार, जहूर महंमद सय्यद (तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) आणि तन्वीर इब्राहिम मणीयार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपूर यांचा मुलगा साजीद (वय २७) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असल्याची माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर याचे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत कार्यालय आहे. कपूर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. शनिवारी सायंकाळी त्याने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सादिक कपूर याने आत्महत्या करण्यापूर्वी ३० ते ३५ पानी चिठ्ठी लिहिली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. सादिक कपूर यांचा मुलगा साजीद याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 'माजी नगरसेवकाने वडिलांकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा आणि साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली.' या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यदनगर परिसरात टिपू पठाण याची दहशत आहे आणि त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सादिक कपूर हा पठाणच्या टोळीचा सदस्य होता. त्याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आल्यानंतर तो फरार झाला होता.
व्यवसायिकाची 51 लाखांची फसवणूक:कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने लुबाडले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात एका व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी बँक कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आदित्य मोहन रेळेकर (वय ३४, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), करण विजय इजंतकर (वय ३२, रा. मेट्रो ग्रीन सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज-काेंढवा रस्ता) आणि श्रीनिवास पांडुरंग बकरे (वय ४७, रा. गुलाबनगर, धनकवडी, मूळ रा. देवाळी, ता. माणगाव, जि. रायगड) यांचा समावेश आहे. एका व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचे शुक्रवार पेठेत दुकान आहे. गेल्या वर्षी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची आर्थिक फसवणूक, कर्ज मंजुरी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या नावाखाली आरोपींनी व्यावसायिकाकडून वेळोवेळी ५१ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक एन. व्हटकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मंदिरातून चांदीचा मुकुट चोरी मंदिराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजारांचा चांदीचा मुकुट चाेरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात मांढरदेवी काळूबाई मंदिर आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजित बढे करत आहेत.
पुण्यात 'एफडीए'ची मोठी कारवाई:31 कोटींचा 'निकोटीन'चा साठा जप्त, अवैध हुक्का माफियांचे धाबे दणाणले
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील प्रतिबंधित वस्तूंच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर विभागाने राज्यभर जोरदार मोहीम सुरू केली असून, याच धडक कारवाईअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मावळमधील टाकवे येथील 'मे. सोएक्स इंडिया प्रा. ली.' या कंपनीवर छापा टाकून तब्बल 31 कोटी 67 लाख 21 हजार 987 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादनावर बडगा उगारत प्रशासनाने कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंत्र्यांच्या कडक भूमिकेमुळे आणि सातत्याने होणाऱ्या आढाव्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची ही कारवाई अधिक तीव्र झाली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 2 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. यापूर्वी 1 डिसेंबर 2025 रोजी या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार, या नमुन्यांमध्ये 'निकोटिन' पॉझिटिव्ह आढळले. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून महाराष्ट्र सरकारने 16 जुलै 2025 रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले. एकूण किंमत 31 कोटी 67 लाख 21 987 रुपये (31.67 कोटी) रुपयांचे विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा साठा जप्त करून कंपनीच्या दारांना सील ठोकले आहे. या प्रकरणी अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), असिफ फाजलानी (संचालक), फैजल फाजलानी (संचालक), मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. (कंपनी) या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 3(5), 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 च्या विविध कलमांनुसार (कलम 30, 26, 27, 59) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमुळे अवैध हुक्का माफियांचे धाबे दणाणले प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि हुक्का माफियांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर मोठी मोहीम उघडली असून, भिवंडीतील एका मोठ्या कारवाईचा धागा पकडून पुण्यापर्यंतची साखळी उद्ध्वस्त केली आहे. भिवंडीतील दापोडे येथील 'मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी' या गोदामावर 30 डिसेंबर 2025 रोजी छापा टाकून तब्बल 19 कोटी 45 लाख 76 हजार 320 रुपये किमतीचा 'अफजल' ब्रँडचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनाच्या नमुन्यांमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असणारे निकोटिन आढळल्याचे अन्न विश्लेषकांनी घोषित केले होते. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख करत असून, या कारवाईमुळे अवैध हुक्का माफियांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरही मोठी कारवाई दुसरीकडे, जळगाव जामोद येथील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरही वनविभागाने सतर्कता दाखवत मोठी कारवाई केली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तपासणी नाक्यावर मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा 75 लाख रुपये किमतीचा 'विमल' गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. राज्यात मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी असतानाही छुप्या मार्गाने होणारी ही तस्करी रोखण्यासाठी प्रशासन आता अधिक आक्रमक झाले आहे. भिवंडी, पुणे आणि जळगाव अशा विविध ठिकाणी झालेल्या या कारवायांमुळे गुटखा आणि हुक्का तस्करांचे मोठे जाळे उघडकीस आले आहे.
दारी सीमा भाग जमला, भिक वाढा हो मराठी, दडपशाही सहन करूनी, बोलतो मराठी, असे लिहिलेली पत्रके वाटत आणि बेळगाव निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा लिहिलेली महाराष्ट्र एकीकरण समितीची नाव असलेली टोप्या घातलेल्या सीमा भागातील मराठी जनतेने आज 99 व्या साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी मुख्य मंडपाच्या बाहेरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत असताना दारातच घोषणाबाजी केली आणि पत्रके वाटली. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या घोषणाबाजीमुळे एकच गोंधळ माजला आणि सर्व माध्यम प्रतिनिधी आणि पोलिस यंत्रणा तेथे जमा झाली. एकनाथ शिंदे हे साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशद्वारा जवळ येताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर निनादून सोडला. आम्हाला महाराष्ट्रात कधी घेताय? आमच्यावर अन्याय होत असतानाही आम्ही तेथे मराठी बोलतोय, किती सहन करायचे? असे सांगत भीक वाढा हो मराठी असेही या आंदोलनकर्त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्र्यांचे भाषण झाले आणि ते लगेच निघून गेले. त्यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात घाई होती. मात्र येथे मराठी माणूस अन्याय सहन करूनही सीमा भागातील मराठी भाषीक मराठी बोलत आहे. त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना वेळ नव्हता अशीही प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांवर बुक्का फेकणाऱ्याला सहा तारखेपर्यंत पोलिस कस्टडी सातारा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर बुक्का टाकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संदीप जाधव यास आज सातारा येथील न्यायालयात उभे केले असता येत्या सहा जानेवारीपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे. जेएमएफसी न्यायमूर्ती आव्हाड यांच्यापुढे आज दुपारी संदीप जाधव यास हजर केले असता सरकारी वकीलांनी आरोपीला आठ दिवसाची पोलिस कस्टडी मागितली. साहित्य संमेलनाच्या परिसरातील या घटनेच्या वेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे दोन दिवसापासून बंदच असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले असता न्यायाधीश यांनी त्यांना फटकारले. संदीप जाधव यांच्या वतीने एडवोकेट पायल गाडे या काम करत आहेत त्यांनी पोलिस कस्टडीला विरोध केला आणि त्याच्याकडे कोणतेही हत्यार सापडलेले नाही किंवा अन्य काही केमिकल युक्त बुक काही नाही हा बनाव असल्याचे सांगितले.
‘फास्टॅग’ची केवायव्ही प्रक्रिया फेब्रुवारीपासून रद्द
नवी दिल्ली : देशातील फास्टॅग वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या नवीन वर्षांत गुड न्यूज दिली आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून नवीन फास्टॅग घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘केवायव्ही’ (नो यूअर व्हेईकल)ही प्रक्रिया आता एनएचएआयने रद्द केली आहे. त्यामुळे लाखो वाहनचालकांना होणार मनस्ताप कमी होणार आहे. चारचाकी वाहन अर्थात कार, जीप किंवा व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेत असताना ‘नो […] The post ‘फास्टॅग’ची केवायव्ही प्रक्रिया फेब्रुवारीपासून रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बुलढाणा-खामगाव महामार्गालगत वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या वनवैभवात आज मोठी भर पडली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या 'PKT7CP-1' नावाच्या तीन वर्षीय नर वाघाला आज, रविवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अभयारण्यात मुक्त करण्यात आले. या नव्या पाहुण्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. या वाघाचा प्रवास रंजक आहे. 2023 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात हा वाघ अवघ्या चार महिन्यांचा असताना सापडला होता. त्यानंतर त्याचे संगोपन पेंच व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले. शनिवारी रात्री पेंचमधून विशेष वाहनाद्वारे सलग 15 तासांचा प्रवास करून या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आले. पहिल्या 4 तासांतच केली शिकार वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाघाला तूर्त अभयारण्यातील बोरखेड-देव्हारी परिसरातील एका विस्तारित जाळीच्या बंदिस्त क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नवीन वातावरणात आल्यानंतर अवघ्या चार तासांतच या वाघाने त्याच्यासाठी सोडलेल्या एका रेड्याची शिकार केली. यावरून हा वाघ येथील वातावरणाशी लवकरच जुळवून घेईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. 205 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य साग आणि अंजन वृक्षांच्या हिरवाईने नटलेले आहे. येथे आधीच बिबट, अस्वल, तडस, नीलगाय आणि 150 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती वास्तव्यास आहेत.
भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील निवडणूक कचेरीचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले की, निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून, संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी उमेदवारांवर असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि परिश्रम आहेत. याच भावनेतून प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीरा पावगी, ज्योत्स्ना सरदेशपांडे, रमेश परचुरे आणि किरण सरदेशपांडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ आणि श्रेयस लेले यांची उपस्थिती होती. या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून महागड्या गाड्यांची चर्चा सुरू असताना, प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या नावावर केवळ एक रुग्णवाहिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा
टोकियो/सोल : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करत त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतलेले असताना दुसरीकडे उत्तर कोरियाने खळबळ उडवून दिली आहे. रविवारी पहाटे उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून जपानच्या समुद्रात संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या अनपेक्षित चाचणीमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा देण्यात आला असून दोन्ही देशांचे […] The post जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आंबेडकरांची आज सभा पार पडली. या सभेत बोलताना कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. इतके दिवस तुम्ही शरद पवारांच्या नादी लागलात, म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली, असे म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे. सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कॉंग्रेसकडे आता मतदार उरला नाही. केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिला आहे. तुम्ही इतके दिवस शरद पवारांच्या नादी लागलात म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली आहे. बाबाजाणी यांनी खतीब यांचा उपयोग करून घेतला आणि आता ते कॉंग्रेसचीच वाट लावायला निघालेत, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसचे बाबाजाणी दुर्राणी यांच्यावर केली आहे. शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, इथल्या मुस्लिमांना आवाहन आहे, काँग्रेसकडे आता काही राहिले नाही, फक्त मुस्लिम मतदार उरला आहे. काँग्रेस शरद पवारांच्या नादी लागल्याने असे झाले आहे. शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच आहेत. आता काँग्रेसकडे मतदार नाही, तेव्हा उद्याच्या व्यवस्थेमध्ये संविधान टिकले पाहिजे असे वाटत असेल तर मुस्लिमांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे. हुकुमशाहीला सुरुवात झाली परभणी येथील सभा पार पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना बिनविरोध नगरसेवक निवडून येत असल्याच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेडकर म्हणाले, हुकुमशाहीला सुरुवात झाली आहे. आमदारांनी उमेदवारांना दमदाटी करून पळवले आहे. काही ठिकाणी विकत घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याची सिस्टिम आता बंद केली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. तरच लोकशाही टिकेल असे आम्ही मानतो. भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत महायुतीतील पक्ष काही ठिकाणी वेगळे लढत आहेत, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत. इलेक्शन निमित्ताने आपल्याला यांना संपवता येईल असे त्यांना वाटत आहे. म्हणून त्यांनी युती केली नाही. सत्ता आली नाही की पक्ष संपतात अशी परिस्थिती आहे. सगळीकडे अजित पवार युतीतून वेगळे लढत आहेत. मुस्लिमांचे विभाजन करण्याचे ते बघत असल्याचे मत आंबेडकरांनी दिले आहे.

30 C