लग्नसोहळा हा दोन कुटुंबांना जोडणारा आनंदाचा उत्सव मानला जात असला, तरी वर्धा जिल्ह्यात याच उत्सवाला भीषण वळण मिळाले आहे. लग्नाच्या वरातीत झालेल्या वादातून पुतण्याने आपल्याच काका आणि चुलत भावावर (बाप-लेक) चाकूने प्राणघातक हल्ला केला, ज्यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. किरकोळ वादाचे रूपांतर गंभीर गुन्ह्यात झाल्याने आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकात झाले असून, या धक्कादायक दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. लग्नसोहळ्याच्या उत्साहात आणि वाजतगाजत निघालेल्या वरातीत संपत्तीच्या वादातून रक्ताचा सडा पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हनुमान मंदिरातून वरात निघताच एका अल्पवयीन मुलाने आपले काका प्रभाकर भलमे आणि चुलत भाऊ रितेश भलमे यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला, ज्यात या बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बँड-बाजा आणि नाचगाण्यांच्या आनंदी वातावरणात घडलेल्या या धक्कादायक दुहेरी हत्याकांडामुळे लग्नाच्या मांडवात शोककळा पसरली असून, पोलिसांनी याप्रकरणी संबंधित अल्पवयीन पुतण्याला ताब्यात घेतले आहे. वर्ध्याच्या बरबडी येथे भलमे कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून संपत्तीवरून वाद सुरू होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वी या वादातून दोन्ही गटांत हाणामारी होऊन परस्पर गुन्हे दाखल झाले होते. तेव्हापासूनच अल्पवयीन आरोपीने काका आणि चुलत भावाचा काटा काढण्याचा कट रचला होता. या नियोजित हत्येसाठी त्याने ऑनलाईन माध्यमातून चाकू देखील मागवून ठेवला असल्याची खळबळजनक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. हा कौटुंबिक वाद लग्नाच्या मांडवापर्यंत पोहोचला आणि वरात सेवाग्राम मार्गावरील हनुमान मंदिराजवळ येताच आरोपीने संधी साधून काका व चुलत भावावर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या पूर्वनियोजित हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्याच्या प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील लाचखोरीचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांच्या स्वीय सहायकाला लाच घेताना अटक करण्यात आली होती, ती घटना ताजी असतानाच आता मंत्रालयातील एका बड्या माशावर 'एसीबी'ने (लाचलूचपत प्रतिबंधक विभाग) मोठी कारवाई केली आहे. अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना ६ लाख ३७ हजार रुपयांची भरभक्कम लाच स्वीकारताना खारघर परिसरात रंगेहाथ पकडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा प्रलंबित निधी मंजूर करून देण्यासाठी कक्ष अधिकारी विलास लाड यांनी लाचेची मागणी केली होती. लाचेची ही रक्कम ६ लाख ३७ हजार ५०० रुपये इतकी मोठी होती. नवी मुंबईतील खारघर परिसरात लाचेची ही रक्कम स्वीकारण्यासाठी लाड आले असता, एसीबीने रचलेल्या सापळ्यात ते अलगद अडकले. एका सामान्य माणसाचा वर्षाचा पगारही नसेल, एवढी मोठी रक्कम हा अधिकारी एकाच कामासाठी लाच म्हणून घेत होता, हे विशेष. प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ मार्च महिन्यात एसीबीने मंत्रालयात केलेल्या कारवायांच्या धडाक्यानंतर, प्रशासकीय वर्तुळात अशी चर्चा होती की ही केवळ 'मार्च एंडिंग'ची धावपळ आहे. मात्र, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विलास लाड यांच्यावर झालेली ही कारवाई पाहता, एसीबीने आपला मोर्चा आता कायमस्वरूपी मंत्रालयातील भ्रष्टाचाराकडे वळवल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयासारख्या उच्च सुरक्षा आणि जबाबदारीच्या ठिकाणी बसून खुलेआम चालणाऱ्या या व्यवहारांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ मंत्रालयात बसून सर्वसामान्यांच्या फाईली अडवून पैसे उकळण्याचा प्रकार नवीन नसला, तरी एका दिवसात एका वर्षाच्या पगारापेक्षा मोठी रक्कम लाच म्हणून घेण्याचे धाडस पाहून अधिकारी वर्गही अवाक झाला आहे. लाड यांच्या अटकेमुळे मंत्रालयातील अर्थ, नियोजन आणि ग्रामविकास विभागातील इतर संशयास्पद व्यवहारांचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खारघरमधील या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले असून, प्रशासनातील पारदर्शकता केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. सध्या आरोपी विलास लाड यांची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या संपत्तीचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.
लठ्ठपणा कमी करण्याच्या इंजेक्शनचा जीवघेणा धोका
नवी दिल्ली : लठ्ठपणा कमी करून परफेक्ट दिसण्याची जगभरात स्पर्धा लागली आहे. अशातच लठ्ठपण झटपट कसा व्हावा यासाठी नवनवे फंडे येत असून त्यात आता इंजेक्शनचीही भर पडली आहे. लठ्ठपणा कमी करण्याचे इंजेक्शन घेतल्याने झटपट वजन कमी होते असे भासवत असताना त्या इंजेक्शनमुळे केव्हाही आपला मृत्यू होऊ शकतो यांचे भान आज तरुणाईला नाही. दरम्यान भारतीय विवाहसोहळ्यांमध्ये […] The post लठ्ठपणा कमी करण्याच्या इंजेक्शनचा जीवघेणा धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या 'फूट डालो आणि राज करो' या कुटिल नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे, अशा जळजळीत शब्दांत लोढा यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विभाजनाचे राजकारण आणि लोकसंख्येची घटती आकडेवारी दक्षिण भारताचे उदाहरण देत लोढा यांनी धक्कादायक वास्तव समोर ठेवले. एकेकाळी दक्षिण भारतात २२ ते २३ टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ ३ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लीम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले, मात्र हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करून कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. जैन मुनींशी चर्चा; कायदेशीर प्रक्रियेचे संकेत हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरू असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे सूतोवाचही त्यांनी दिले आहे. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा 'आम्ही हिंदू' ही भावना प्रबळ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय अनागोंदी की राजकीय अजेंडा? पत्रकारांशी संवाद साधताना लोढा यांचा सूर केवळ धार्मिक नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारणारा होता. ज्या जैन समाजाने जगाला अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला, त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे करणे हा सांस्कृतिक द्रोह आहे, असे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. आता चेंडू जैन समाजाच्या आणि सरकारच्या कोर्टात असून, या विधानाचे पडसाद आगामी काळात उमटणार हे निश्चित आहे. जैन धर्मियांची सांस्कृतिक मुळे हिंदू धर्मातच जैन धर्मियांची पूजा पद्धती वेगळी असू शकते, पण सांस्कृतिक मुळे हिंदू धर्मातच रुजलेली आहेत. राजकीय फायद्यासाठी लादलेला 'अल्पसंख्याक' हा शिक्का आता पुसून टाकण्याची ऐतिहासिक वेळ आली आहे. — मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य.
२८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व सुपुत्र श्रीनिवास जोशी आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं. शौनक अभिषेकी यांच्या घराणेदार गायनाने संपन्न झाला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित हा तीन दिवसीय महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे ५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या विश्वस्त शिल्पा जोशी, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण आणि कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलाश्री व राधानंद संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाने झाली. यानंतर श्रीनिवास जोशी यांनी राग मारवा सादर केला, ज्यात त्यांनी ‘अब मिल आये...’ ही विलंबित एकतालातील बंदिश आणि ‘गुरु बिन ग्यान...’ हा तीनतालातील छोटा ख्याल गायला. त्यांनी संत तुकाराम यांचा राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला आणि पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेला ‘आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलीया...’ हा लोकप्रिय अभंग सादर करून आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना रमाकांत राऊत (तबला), गंगाधर शिंदे (संवादिनी), रवी पांचाळ, मंदार रत्नपारखी (तानपुरा) आणि गंभीर महाराज अवचार यांनी साथसंगत केली. यानंतर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे कुलसचिव आणि तबलावादक पं. विश्वास जाधव यांचे एकल तबलावादन झाले. पं. जाधव यांनी पेशकार, कायदे आणि रेला यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांच्या पारंपरिक बंदिशींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांना जीतेश जवार, वैभव कदम यांनी तबला आणि गंगाधर शिंदे यांनी संवादिनीवर साथ दिली. कलाश्री संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप पं. शौनक अभिषेकी यांच्या सुमधुर शास्त्रीय गायनाने झाला.
ज्येष्ठ लेखक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी नाशिकमधील खरात प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे प्रकरण महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेला काळीमा फासणारे असून, ज्यांनी ही परंपरा रुजवली, त्यांना शरमेने मान खाली घालावी लागेल, असे मत त्यांनी मांडले. मारुती प्रभाकर डोंगरे संचलित शिवप्रेमी, डोंगरे प्रतिष्ठानतर्फे आयोजित 'प्रबोधन सभे'च्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महाराष्ट्राला सर्व भोंदू बाबांपासून वाचवण्यासाठी आणि संतत्वाचा कलंक पुसण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अॅड. असीम सरोदे, डॉ. गीताली वि. मं., मिलिंद देशमुख, अॅड. रुपालीताई ठोंबरे पाटील आणि डोंगरे प्रतिष्ठानचे प्रमुख मारुती प्र. डोंगरे उपस्थित होते. डॉ. सबनीस म्हणाले की, अशोक खरातला 'कॅप्टन' संबोधणे तात्काळ थांबवले पाहिजे. ज्या राजकीय यंत्रणेने या भोंदूबाबाला पोसले, त्या यंत्रणेला जनतेने प्रश्न विचारणे आवश्यक आहे. या प्रकरणात सुमारे ३९ आमदारांची अनधिकृत नावे पुढे आली असून, असे लोक नेतृत्व करत असतील, तर महाराष्ट्राचे भवितव्य काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे प्रकरण म्हणजे संविधानाला अपेक्षित वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारून स्वार्थासाठी संविधानाशी गद्दारी करणाऱ्या राजकारण्यांच्या निर्लज्जपणाची हद्द आहे, असेही ते म्हणाले. अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले की, अशा भोंदू बाबांच्या प्रकरणांचे पितळ उघड पाडण्यात सामाजिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. केवळ कायदे करणे पुरेसे नसून, अशा भोंदूगिरीविरुद्ध सामाजिक जागृती होणे आवश्यक आहे. भारतीय समाजातील विविधतेमुळे संविधान कितपत झेपू शकेल, याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही शंका होती, मात्र ते आशावादी होते. सत्तेच्या लालसेपोटी अनामिका कापून घेतलेल्या ३९ आमदारांचे राजीनामे घेतले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. डॉ. गीताली वि. मं. म्हणाल्या की, लैंगिक संबंध आणि सुख याविषयी मोकळेपणाने बोलले पाहिजे. ज्या महिलेवर बलात्कार होतो, ती घरातून बाहेरही निघू शकत नाही, मात्र बलात्कार करणारा उजळ माथ्याने फिरतो, हे चित्र बदलले पाहिजे. बलात्कार म्हणजे मानसिक, लैंगिक आणि भावनिक अपघात आहे. अपघातातून सावरण्यासाठी जशी मदत लागते, तशीच मदत बलात्कार झालेल्या महिलांना सावरण्यासाठी करणे आवश्यक आहे.
राज्यातील तब्बल १,२५२ शाळा अपात्र
मुंबई/ पुणे : कायम विनाअनुदानित तत्त्वावर सन २००० मध्ये मान्यता दिलेल्या मात्र मूल्यांकनात वारंवार अपात्र ठरलेल्या राज्यातील १२५२ शाळा आणि ८२७ तुकड्या शासनाने कायमस्वरूपी अपात्र केल्या असून त्यांची मान्यता रद्द केली जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबतचा शासन निर्णय झाल्याने शिक्षकांचे भविष्य अधांतरी झाले आहे. राज्यातील जवळपास ६ हजारांवर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना […] The post राज्यातील तब्बल १,२५२ शाळा अपात्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारातील एका शेतात रान मांजराची दोन पिल्ले रविवारी ता. ५ दुपारी आढळून आली आहेत. सदर पिल्ले बिबट्याचीच असल्याची अफवा असून ही पिल्ले रान मांजराची असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी केले आहे. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव शिवारात प्रदीप बळवंते यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील काही क्षेत्रावर त्यांनी जनावरांसाठी चाऱ्याचे पिक घेतले आहे. आज दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास बळवंते हे जनावरांना चारा पाणी करण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांनी हिरवा चारा कापणी करतांना चारा पिकातून पिल्लांचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी चारा कापणी थांबवली. त्यांनी पिल्लांच्या आवाजाच्या दिशेने पाहणी केली असता दोन गोंडस पिल्ले दिसून आली. दरम्यान, या भागात बिबट्याचा वावर असल्याने सदर पिल्ले बिबट्याची असल्याची शक्यता घेऊन बळवंते यांनी तातडीने इतर शेतकऱ्यांना सतर्क केले. त्यानंतर वन विभागालाही या बाबत माहिती देण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिल्लांचे व्हिडीओ पाठविण्यात आले. त्यानंतर सदर पिल्ले बिबट्याची नसून रान मांजराची असल्याचे स्पष्ट झाले. वन विभागाच्या या माहितीनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, या संदर्भात वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी शेतकरी बळवंते यांच्या शेतातील पिल्ले रान मांजराची असून त्यांच्या पासून कुठलाही धोका नसतो. त्यामुळे शेतकरी व नागरीकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.
नागपुरातून दोन अल्पवयीन भाऊ बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी अभ्यासावरून रागावल्याने ते घरातून निघून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह चार पथके स्थापन करण्यात आली आहेत. आदित्य अमित मेश्राम (वय १७) आणि प्रथमेश अमित मेश्राम (वय १२) अशी बेपत्ता झालेल्या भावांची नावे आहेत. हे दोघेही सोमलवार हायस्कूल, खामला येथे शिकतात. त्यांची आई धुणीभांडी करते, तर वडील डेंटिंग-पेंटिंगचे काम करतात. शनिवारी आदित्य प्रथमेशला घेऊन घरी आला. त्यांनी बॅग भरली आणि सायकलने घराबाहेर पडले. रात्री ८.३० पर्यंत दोघेही घरी न परतल्याने आई विनीता अमित मेश्राम (वय ३९, दत्त मंदिर जवळ, भवन शाळेजवळ, त्रिमूर्ती नगर) यांनी प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ चार पथके तयार केली आहेत. एक पथक सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे, दुसरे नातेवाईकांकडे चौकशी करत आहे, तर तिसरे पथक परिसरात शोधमोहीम राबवत आहे. गुन्हे शाखाही या प्रकरणात समांतर तपास करत आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, मुलांकडे पैसे नसल्याने त्यांनी सायकल विकण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील भंगार विक्रेत्यांकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडासे यांनी दिली. या घटनेमुळे मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. दोन्ही मुलांचा सुरक्षित शोध लागावा यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. नागरिकांनाही काही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूरच्या प्रा. दीपश्री पाटील यांनी संगीत क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांनी सलग ८१ स्व-रचित बंदिशींचे सादरीकरण करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे नागपूरच्या संगीत परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे. सखे सोबती फाउंडेशन आणि सारस्वत संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. पाटील यांनी सुमारे ३६ विविध रागांमधील ८१ बंदिशी स्वतः रचून सादर केल्या. या सादरीकरणात त्यांच्या ४० विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला, ज्यामुळे ही मैफिल अखंडपणे सुरू राहिली. सलग सर्वाधिक स्व-रचित शास्त्रीय बंदिशी सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला प्राध्यापक ठरल्या आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, सादर केलेल्या सर्व ८१ बंदिशी प्रा. पाटील यांनी स्वतः रचल्या होत्या. तसेच, या संपूर्ण सादरीकरणात गायक, वादक आणि रचनाकार या तिन्ही भूमिकांमध्ये केवळ महिलांचा सहभाग होता. यातून महिला सशक्तीकरणाचा एक प्रभावी संदेश देण्यात आला. प्रा. दीपश्री पाटील यांचा हा दुसरा मोठा विक्रम आहे. यापूर्वी त्यांनी राग यमनमध्ये सर्वाधिक बंदिशी रचण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या कार्यक्रमाला डॉ. मनोज तत्ववादी, डॉ. निशा कुलकर्णी आणि डॉ. चित्राताई मोडक यांची विशेष उपस्थिती होती, तर श्रोत्यांनीही या सुरेल मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रा. दीपश्री पाटील यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे कला, संशोधन आणि महिला सशक्तीकरण यांचा सुरेल संगम साधला गेला आहे, ज्यामुळे नागपूरच्या सांगीतिक परंपरेला एक नवी ओळख मिळाली आहे.
अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त्यांनी समोर आणल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट तर अशी आहे अशा प्रकारचा सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तो फक्त जी काही तपास यंत्रणा आहेत, तपास करत आहेत, त्यांना तो अधिकार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्याविरोधात सबळ पुरावा असेल, त्यांच्या विरुद्ध कारवाई होईल. कोण कोणाशी बोलले, कोणी कोणाशी काय केले याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टीस सिस्टम चालत नाही. अशोक खरातने केलेल्या जी काहीह घानेरडी कामे आहेत, यात जर कोणी सामील असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही. सगळी पाळं मुळं खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरात प्रकरणातला संपूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्याने जे वेगवेगळे खाते उघडले आहेत, तेही आमच्या लक्षात आले आहे. त्याने जे ट्रान्सॅक्शन केले आहेत, तेही आमच्या लक्षात आले आहे. आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्याने ते स्वतः समोर येऊन माहिती देत आहेत. एसआयटीकडे भरपूर माहिती जमा झाली आहे. त्यामुळे सगळी पाळं मुळं खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, असे फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. एसआयटीवर सगळ्यांनी विश्वास ठेवावा एसआयटीचा तपास मंदावला आहे का? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की 12 गुन्हे दाखल झाली आहेत. रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता एसआयटी काय तपास करत आहे हे रोज सांगता येत नाही. एसआयटी योग्यवेळी त्या संदर्भातली माहिती सांगेल. मला असे वाटते की एसआयटीवर सगळ्यांनी विश्वास ठेवावा, ती योग्यप्रकारे काम करत आहे. खरातची ईडी चौकशी होणार का? अशोक खरातची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. ईडीने कारवाई सुरू केली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी निश्चित झाली की नियमानुसार योग्य कारवाई केली जाणार आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोन्ही नेत्यांत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप समोर आली नाही. पण त्यांच्यात बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा झाली असावी असा अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, काँग्रेसने यापूर्वीच बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पण आता सुनेत्रा पवारांनी स्वतः सपकाळ यांना फोन केल्यामुळे काँग्रेस कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभेसाठी येत्या 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे स्वतः सुनेत्रा पवार या मतदारसंघातून मैदानात उतरल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. हे दोन्ही पक्ष अजित पवारांना आदरांजली म्हणून या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नाहीत. पण काँग्रेसने मात्र या निवडणुकीत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी रविवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. सुनेत्रा पवार व हर्षवर्धन सपकाळ यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण सूत्रांनी या दोन्ही नेत्यांत बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याचा दावा केला आहे. परिणामी, काँग्रेस बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या आपल्या भूमिकेवर पुन्हा एकदा फेरविचार करण्याची शक्यता वाढली आहे. महादेव जानकरांशीही फोनवरुन चर्चा सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्याशीही फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे सुनेत्रा पवार यांनी शनिवारीच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून त्यांचा पाठिंबा मागितला होता. त्याला ठाकरेंनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवारांना 19 उमेदवारांचे आव्हान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारांची एक मोठी फळी उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे. यात हिंदुस्तान जनता पार्टीचे सतिश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घटुकडे, राष्ट्रीय किसान बहूजन पार्टीचे अरूण निटुरे यांच्यासह सागर भिसे, गजानन गवळी, त्रिशाला कांबळे, दिलीप अळोणी, दत्तात्रेय बेदरे, मिथून आटोळे, रजाक मुलाणी, संदीप खरात, विलास होळकर, अभिजीत बिचुकले, अनिल तुपे, संकेत गावडे, दादा थोरात आणि अभिजीत कांबळे असे अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीतील ही लढत बहुरंगी होणार असून मतदारांसमोर अनेक पर्याय उभे राहिल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाशिकचा भोंदू अशोक खरातचे एक एक कारनामे समोर येत असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महिलांसोबतचे लैंगिक संबंध असोत, किंवा जमीन घोटाळा असेल तसेच भोंदुगिरी, या सगळ्यामुळे खरातचा पाय चांगलाच खोलात अडकला आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. ते धाराशिवमध्ये आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते. सुनील तटकरे म्हणाले, खरात असो कोणीही असो, अशा विकृत मानसिकतेच्या आरोपीची सखोल चौकशी करून फाशीची शिक्षा द्यावी. जलद गती न्यायालयात टाकून जे काही फाशीची शिक्षा द्यायची आहे ती दिली जावी. सरकारने एसआयटीच्या मार्फत खोलवर तपास करावा आणि ज्यांचा ज्यांचा कळत नकळत संबंध आला असेल त्या सर्वांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तटकरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज सोलापूर दौऱ्यावर असून ते पंढरपूर, अक्कलकोट आणि तुळजापूर येथे देवदर्शन करणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने पक्षात नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा होती. या सर्व घडामोडींनंतर सुनील तटकरे पहिल्यांदाच सोलापुरात दाखल झाले असून रात्री उशिरा आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आजचा संपूर्ण दिवस ते धार्मिक दर्शनासाठी व्यतीत करणार असून, पत्रातील ओमीट केलेल्या नावांच्या वादंगानंतरच्या त्यांच्या या पहिल्याच दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धाच्या झळा आता भारतालाही बसत आहेत. इराणच्या हल्ल्यात ओमानच्या समुद्र किनाऱ्यालगत मुंबईच्या दीक्षित सोलंकी नामक तरुणाचा बळी गेला आहे. या घटनेला महिना लोटला तरी दीक्षितचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दीक्षित सोलंकी हे एमटी एमकेडी व्योम या तेल टँकरवर ऑयलर म्हणून कार्यरत होते. हे जहाज 1 मार्च 2026 रोजी ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळून जात होते. तेव्हा त्याच्यावर ड्रोन हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे इंजिन रुममध्ये मोठा स्फोट होऊन जहाजाला आग लागली. त्यात जहाजाचे मोठे नुकसान झाले. प्रारंभी या घटनेत दीक्षित सोलंकी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आले. पण दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह जहाजाच्या तुटलेल्या भागाजवळ आढळला. या हल्ल्यात जहाजावरील इतर 21 कर्मचारी सुखरुप आहेत. सोलंकी या युद्धात बळी पडलेले पहिले भारतीय ठरले. आपल्या याचिकेत काय म्हणाले पीडित कुटुंब? आज या घटनेला 1 महिना लोटला आहे. पण अद्याप दीक्षित सोलंकी यांचा मृतदेह भारतात आणण्यात आला नाही. त्यामुळे सोलंकी यांची बहीण मिताली सोलंकी व वडील अमृतलाल सोलंकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलाच्या मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्याची मागणी केली आहे. अमृतलाल सोलंकी आपल्या याचिकेत म्हणतात, माझा मुलगा दीक्षित सोलंकीचा 33 दिवसांपूर्वी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कधी येणार? याविषयी अधिकारी स्पष्ट उत्तर देत नाहीत. आम्हाला केवळ मृत्यूची बातमी दिली गेली. पण ही दुर्घटना कशी घडली त्याचे फोटो, व्हिडिओ किंवा तपास अहवाल काहीही देण्यात आला नाही. माझ्या मुलाला तिथे मरण्यासाठी सोडून दिले होते का? त्याला किती त्रास झाला असेल? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. दीक्षित सोलंकी यांचा मृतदेह मायदेशी परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने हस्तक्षेप करावा. त्यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व न्यायवैद्यक पुरावे व तपास अहवाल कुटुंबाला सोपवण्यात यावेत. संबंधित शिपिंग कंपनी व मंत्रालयाने प्रस्तुत प्रकरणात झालेल्या विलंबाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी या प्रकरणी परराष्ट्र मंत्रालय, बंदरे व जहाजबांधणी मंत्रालय आणि व्ही शिप्स इंडिया कंपनीला प्रतिवादी करताना म्हणालेत. याचिकेवर लवकरच होणार सुनावणी उल्लेखनीय बाब म्हणजे पश्चिम आशियातील लष्करी संघर्षामुळे सध्या त्या भागातील सागरी मार्ग असुरक्षित झालेत. या तणावामुळेच दीक्षित सोलंकी यांचे पार्थिव परत आणण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक व राजनैतिक अडचणी येत असल्याची माहिती आहे. तूर्त आपल्या लाडक्या मुलाचे अंत्यदर्शन करण्यासाठी सोलंकी कुटुंब सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. या प्रकरणाची सुनावणी पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
नाशिक : नाशिकचा भोंदू अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भोंदुगिरी आणि हवाला रॅकेट उघड झाले. आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले आहे. एका फिर्यादीची ६० लाख रुपये किमतीची जमीन केवळ २२ लाख रुपयांत बळकावल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून या फसवणुकीत एका […] The post भोंदू खरातचा जमीन घोटाळा उघड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही बारामतीची पोटनिवडणूक लढवणार नाही, अशी अधिकृत घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. शरद पवार आणि शशिकांत शिंदे यांच्यात आज झालेल्या बैठकीनंतर ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, अजितदादांचे निधन झाले तेव्हाच ही निवडणूक न लढवण्याचा विचार पक्षाने केला होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली होती, त्याला प्रतिसाद देत शरद पवार गटाने हा भावनात्मक निर्णय घेतला आहे. दरम्यान, काँग्रेसने या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली असून, त्याबाबत आमची त्यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. राहुरीबाबत चर्चा करत निर्णय बारामतीप्रमाणेच राहुरी पोटनिवडणुकीबाबतही आजच्या बैठकीत खल झाला. राहुरी संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली असून, आज शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुरीच्या जागेबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबाबतची भूमिका जाहीर केली जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. आमच्या कार्यकर्त्यांना 10 कोटींची ऑफर शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली. साताऱ्यात भाजपकडून सुरू असलेल्या राजकीय हालचालींवर टीका करताना ते म्हणाले की, आमच्या लोकांना फोडण्यासाठी 10 कोटी रुपये आणि सभापतीपदाचे आमिष दाखवले जात आहे. कर्णे आणि त्यांच्या पत्नीला अशा प्रकारची ऑफर देण्यात आली. तसेच, खरात प्रकरणातील सीडीआर (CDR) कोणी आणि का काढले, याचा खुलासा होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, जय पवार यांनी काल केलेल्या विधानावर भाष्य करण्यास शशिकांत शिंदे यांनी नकार दिला. बारामतीतून शरद पवार गटाने माघार घेतल्यामुळे आता ही निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार की काँग्रेस आपला उमेदवार मैदानात उतरवून रंगत वाढवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 34 कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी चक्क 'फ्लाय ॲश' (कोळशाची राख) आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विकासकामांच्या नावाखाली कंत्राटदार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संगनमताने जनतेच्या कराच्या पैशांची कशा प्रकारे उधळपट्टी केली जाते, याचा हा एक धक्कादायक नमुना असून या प्रकारामुळे रस्ते बांधकामाच्या दर्जावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखांदूर तालुक्यातील कराडला ते ढोलसर, मांडळ ते बोथली आणि मांडळ ते सरांडी या तीन महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 334 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सध्या प्रगतीपथावर असलेली ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून कंत्राटदार केवळ स्वतःचा खिसा भरण्यात मग्न असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांसह राजकीय नेत्यांनी केला आहे. कंत्राटदारावर कडक कारवाई करावी- शिवसेना ठाकरे गट या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे लाखांदूर तालुकाप्रमुख विनोद ढोरे यांनी कंत्राटदार आणि संबंधित प्रशासकीय विभागाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी राखेचा आणि दर्जेदार गिट्टीऐवजी वाळू मिश्रित चुऱ्याचा वापर होत असल्याचे त्यांनी उघडकीस आणले आहे. या निकृष्ट कामाचा रीतसर पंचनामा करून ढोरे यांनी संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. आरोपांवर प्राशनाकडून प्रतिक्रिया दरम्यान, या गंभीर आरोपांवर उपविभागीय अभियंता विजया सावरकर यांनी म्हटले की, रस्ता बांधकामाच्या कामात कुठलीही अनियमितता नसून अंदाजपत्रक नुसारच काम योग्य पद्धतीने होत आहे. रस्ता बांधकामासाठी जो डब्ल्यूएमएम थर गरजेचा आहे त्यानुसार काम ग्रेडेशन नुसार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुढे बोलताना सावरकर म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता बांधकाम असल्याने राज्य गुणवत्ता निरीक्षक हे राज्यातील कुठूनही येतात. रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता तपासात आणि हे तपासणी करत असतानाअंदाजपत्रकानुसार लेयरनुसार तपासणी करत असल्याने त्यात कुठलाही अपहार होऊ नये, या दृष्टीने आम्ही त्यावर नियंत्रण ठेवून आहोत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी फ्लॅशची राख होती. मात्र, ती कंत्राटदाराने स्वतःच्या कुठल्यातरी कामासाठी आणली असावी, असे मोघम उत्तर सावरकर यांनी दिले आहे.
हातउसन्या पैशांच्या वादातून तिघांना मारहाण:पुण्यात पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी; दोघे अटकेत
पुण्यात हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तिघांना पिस्तूल रोखून मारहाण करण्यात आली. ही घटना शंकरशेठ रस्त्यावरील धोबी घाट भागात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कानिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या मारहाणीत नायडू आणि त्यांचे दोन भाचे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायडू आणि त्यांचे भाचे शंकरशेठ रस्ता परिसरातील धोबी घाट येथील स्मशानकाली मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी नायडू यांनी आरोपींना दिलेले हातउसने पैसे परत मागितले. यावरून आरोपींसोबत वाद झाला. त्यानंतर आरोपींनी नायडू यांच्या डोक्यावर शस्त्राने वार केला. नायडू यांच्यासोबत असलेल्या भाच्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एकूण सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कारागिराकडून ४० लाखांचे चांदीचे दागिने चोरी सराफी पेढीतील कारागिराने १७ किलो चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना गणेश पेठेत घडली. चोरलेल्या दागिन्यांची किंमत ४० लाख ८० हजार रुपये आहे. या प्रकरणी काारागिराविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत सराफ व्यावसायिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी कारागिर लालन अफजल मंडल (रा. पश्चिम बंगाल) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफ व्यावसायिकाची गणेश पेठेत सराफी पेढी आहे. आरोपी त्यांच्याकडे कारागिर म्हणून काम करतो. कारागिराने सराफी पेढीतील कप्त्यात ठेवलेले चांदीचे दागिने चोरून नेले. तो दागिने घेऊन पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफ व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.
पाकची भारताला पुन्हा पोकळ धमकी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा एकदा खुली धमकी दिली आहे. जर भारताने कुठलेही फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानचे प्रत्युत्तर कोलकात्यापर्यंत पोहोचेल. भारत आपल्याच लोकांच्या मृतदेहाचा किंवा ताब्यात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना वापर करून दहशतवादी हल्ला घडवण्याची योजना आखत आहे असा दावा ख्वाजा आसिफ यांनी सियालकोट येथे पत्रकारांशी बोलताना […] The post पाकची भारताला पुन्हा पोकळ धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संभ्रम अखेर दूर; इराणकडील पहिली खेप भारताकडे वळली
नवी दिल्ली : इराणकडून ७ वर्षांनंतर येणा-या पहिल्या तेलवाहू जहाजाबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. हे जहाज चीनकडे वळल्याच्या आणि पेमेंटच्या अडचणीच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, मात्र भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ६ लाख बॅरल कच्चे तेल घेऊन पिंग शुन हे जहाज भारताच्याच दिशेने येत […] The post संभ्रम अखेर दूर; इराणकडील पहिली खेप भारताकडे वळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या 'फूट डालो आणि राज करो' या कुटिल नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे, अशा जळजळीत शब्दांत लोढा यांनी प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विभाजनाचे राजकारण आणि लोकसंख्येची घटती आकडेवारी दक्षिण भारताचे उदाहरण देत लोढा यांनी धक्कादायक वास्तव समोर ठेवले. एकेकाळी दक्षिण भारतात २२ ते २३ टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ ३ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लीम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले, मात्र हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करून कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला. जैन मुनींशी चर्चा; कायदेशीर प्रक्रियेचे संकेत हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरू असल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचे सूतोवाचही त्यांनी दिले आहे. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा 'आम्ही हिंदू' ही भावना प्रबळ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय अनागोंदी की राजकीय अजेंडा? पत्रकारांशी संवाद साधताना लोढा यांचा सूर केवळ धार्मिक नव्हता, तर तो प्रस्थापित व्यवस्थेला जाब विचारणारा होता. ज्या जैन समाजाने जगाला अहिंसा आणि मानवतेचा संदेश दिला, त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे करणे हा सांस्कृतिक द्रोह आहे, असे सांगत त्यांनी डॉ. हेडगेवार यांच्या विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. आता चेंडू जैन समाजाच्या आणि सरकारच्या कोर्टात असून, या विधानाचे पडसाद आगामी काळात उमटणार हे निश्चित आहे. जैन धर्मियांची पूजा पद्धती वेगळी असू शकते, पण सांस्कृतिक मुळे हिंदू धर्मातच रुजलेली आहेत. राजकीय फायद्यासाठी लादलेला 'अल्पसंख्याक' हा शिक्का आता पुसून टाकण्याची ऐतिहासिक वेळ आली आहे. -मंगलप्रभात लोढा, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य.
नवी दिल्ली : राघव चड्ढा पंजाबचे प्रश्न संसदेत मांडण्यात अपयशी ठरले, असा आरोप करणा-या आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर राघव चड्ढा यांनी जोरदार पलटवार केला आहे. एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला असून आपमधील माझ्या सहका-यांसाठी, हा केवळ एक छोटा ट्रेलर आहे. खरे चित्र अजून समोर यायचे आहे असा इशाराही राघव चड्ढा यांनी दिला आहे. गेल्या काही […] The post पंजाब माझा आत्मा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने यापूर्वीच बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंही आपला उमेदवार देणार नाहीत. आता आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशीही संवाद साधून त्यांनाही ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करणार आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वाढली आहे. बारामती विधानसभेची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे रिक्त झाली आहे. या ठिकाणी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरतील. सुनेत्रा पवार यांनी शनिवारीच ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा करून निवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ठाकरे या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, खरगेंशीही बोलणार सुनील तटकरे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत. विशेषतः महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या पक्षाने उमेदवार देणार नाही असे यापूर्वीच घोषित केले आहे. आम्ही या प्रकरणी शरद पवार व सुप्रिया सुळेंचे आभारही मानलेत. उद्धव ठाकरे यांच्याशीही आमची चर्चा झाली. ते सुद्धा आपला उमेदवार देणार नाहीत. आता आम्ही काँग्रेसशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी आज आमचे बोलणे होईल. त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत. ज्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होणार आहे, ती महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक संवेदनशील बाब आहे. अजित पवारांनी गेली 40 वर्षे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यांनी महाराष्ट्राला गतिमान केले. विकासाभिमुख केले. सर्वसामान्य जनतेचा आवाज सातत्याने उंचावण्याचे काम केले. अशावेळी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची सर्वांचीच नम्रतेची विनंती आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी शरद पवारांना उपस्थित राहण्याची विनंती केली जाणार असल्याचेही सांगितले. जय पवारांची मागणी राष्ट्रवादीचीच उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी शनिवारी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्या अटकेची मागणी केली होती. सुनील तटकरे यांनी त्यांच्या या मागणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, जय पवार यांची जी मागणी आहे, तीच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. तपास शीघ्र गतीने झाला पाहिजे. तपासाच्या बाबतीत ज्या - ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत, त्याचाही तपासात समावेश करण्यात यावा. अनेक लोकप्रतिधिनिधींनीही या अपघाताविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. त्यासह तपास पूर्ण करण्यात यावा. या प्रकरणाचा अंतिम अहवाल लवकरात लवकर यावा. हा अहवाल देशाच्या व राज्याच्या जनतेपुढे यावा. मी स्वतः संसदेत जातो, तेव्हा दादांच्या निधनावर अनेकजण हळहळ व्यक्त करतात. जय पवार एक तरुण नेते आहेत. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करणे योग्य आहे. त्यांच्या भावना कार्यकर्ते व पक्ष संघटनेसाठी योग्यच आहेत, असे तटकरे म्हणाले.
नाशिकचा भोंदू अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भोंदुगिरी आणि हवाला रॅकेट उघड झाले. आता अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे थेट जमीन बळकावण्याच्या मोठ्या रॅकेटपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे आता विशेष तपास पथकाच्या रडारवर मोठे जमीन खरेदी-विक्री एजंट, नाशिक-पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी आले असून त्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. एका फिर्यादीची 60 लाख रुपये किमतीची जमीन केवळ 22 लाख रुपयांत बळकावल्याप्रकरणी अशोक खरात याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या फसवणुकीत एका एजंटची भूमिका कळीची ठरली आहे. संबंधित एजंटनेच खरात आणि फिर्यादीची ओळख करून दिली होती आणि खरातच्या भोंदूगिरीला खतपाणी घालत फिर्यादीची दिशाभूल करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे तपासात समोर आले आहे. अशोक खरातच्या या जमीन घोटाळ्यात केवळ खासगी एजंटच नव्हे, तर नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही महसूल अधिकारीही सामील असल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केल्याने प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. नियमांना बगल देऊन जमिनीचे फेरफार करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा कायदेशीर पळवाटा शोधून देण्यात या अधिकाऱ्यांनी खरातला नेमकी कशी मदत केली, या दृष्टीने आता एसआयटीने आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे. महसूल अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी एसआयटीने अशोक खरातच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता अनेक जमीन ब्रोकर्ससोबतचे मोठे संशयास्पद व्यवहार उघड झाले असून, या जमीन व्यवहारांचा वापर 'ब्लॅक मनी' पांढरा करण्यासाठी करण्यात आला असावा असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या घोटाळ्यात नाशिकसह इतर जिल्ह्यांतील एजंट आणि कोणत्या सरकारी महसूल अधिकाऱ्यांनी खरातला सहकार्य केले, तसेच अशाच पद्धतीने आणखी किती जणांची फसवणूक झाली, या दिशेने आता तपासाची चक्रे फिरत आहेत. त्यामुळे आगामी काळात जमीन खरेदी-विक्री करणारे एजंट आणि महसूल अधिकाऱ्यांच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘राजा शिवाजी’ जागतिक स्तरावर झळकणार
मुंबई : मराठी प्रेक्षकांसाठी आजचा दिवस खरोखरच खास ठरणार आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित भव्य चित्रपट ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर रविवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा ऐतिहासिक क्षण प्रेक्षकांना लोकप्रिय रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ मधून अनुभवता आला आहे. या शोचे होस्ट रितेश विलासराव देशमुख यांनी […] The post ‘राजा शिवाजी’ जागतिक स्तरावर झळकणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय शक्तींना विकले आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत सध्या सुरू असलेल्या भारताच्या परराष्ट्रीय धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, 8 जानेवारी 2025 रोजीच्या माझ्या निवेदनात, अमेरिकेतून 'तेजस' विमानांच्या इंजिनांच्या आयातीस झालेल्या दोन वर्षांच्या विलंबामुळे, या स्वदेशी विमानाचे उत्पादन वेळेवर होण्यास होत असलेल्या विलंबाकडे मी लक्ष वेधले होते. मी यावर जोर दिला होता की, हा आयातीतील विलंब अमेरिकेने हेतुपुरस्सर घडवून आणला आहे. 99 पैकी केवळ 6 इंजिन वितरित पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) तेजससाठी इंजिन वितरणास विलंब केल्याबद्दल जीई एरोस्पेसवर दंड आकारला. एचएएलने एकूण 99 इंजिनची मागणी केली होती, परंतु आतापर्यंत त्या 99 पैकी केवळ 6 इंजिन वितरित करण्यात आले आहेत. अमेरिकेचे राफेलवर नियंत्रण 20 फेब्रुवारी, 2026 रोजीच्या माझ्या दुसऱ्या निवेदनात, मी यावर प्रकाश टाकला होता की, राफेलसाठी तयार होणाऱ्या आणि भारतात निर्यात केल्या जाणाऱ्या भागांच्या भविष्यातील खरेदीमध्ये अमेरिकन सरकारने 'पडद्याआड' कसा प्रभाव मिळवला आहे. राफेल करारापूर्वी, अमेरिकेतील लोअर ग्रुपने फ्रान्सच्या एलएमबी एरोस्पेसचे अधिग्रहण केले होते, जी राफेलच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि रडारसाठी महत्त्वपूर्ण कूलिंग फॅन आणि मोटर्स बनवते. पूर्वी, एक फ्रेंच कंपनी असल्याने, तिच्या निर्यातीसाठी अमेरिकेच्या मंजुरीची आवश्यकता नव्हती. आता, अमेरिकेच्या मालकीखाली आल्यामुळे, हे भाग अमेरिकेच्या निर्यात नियंत्रणाखाली येऊ शकतात, ज्यामुळे अमेरिकेला राफेलच्या सुटे भागांवर आणि दुरुस्तीवर संभाव्य प्रभाव टाकण्याची संधी मिळेल, अशी चिंता प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. UAEने तडजोड केली नाही, पण मोदींनी केली तेजस विमानांच्या इंजिन पुरवठ्यात अमेरिकेने केलेला 'जाणूनबुजून' केलेला विलंब राफेलच्या बाबतीतही पुन्हा होण्याची दाट शक्यता असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते म्हणाले, काल फ्रान्सने यूएईला राफेल लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान देण्यास नकार दिल्यामुळे, यूएईने राफेलच्या एफ-5 व्हेरिएंटच्या विकासासाठी सुमारे 3.5 अब्ज युरोचा निधी देण्यापासून माघार घेतली. पण, मोदींनी राफेलच्या सोर्स कोडशिवायच फ्रान्ससोबत 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा 3.25 लाख कोटी रुपयांचा करार केला. यूएईने तडजोड केली नाही, पण मोदींनी केली, अशी टीका आंबेडकरांनी केली. भारतीय हवाई दलाला राफेलच्या सोर्स कोडमध्ये प्रवेश नाही पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 19 फेब्रुवारी 2026 रोजीच्या माझ्या निवेदनात, मी असा इशारा दिला होता की, भारतीय हवाई दलाला राफेलच्या सोर्स कोडमध्ये प्रवेश नसल्यामुळे, ते नवीन पाकिस्तानी किंवा चीनी रडार सिग्नेचरचा समावेश करण्यासाठी राफेलच्या थ्रेट लायब्ररी स्वतंत्रपणे अद्ययावत करू शकत नाही, जी अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानविरुद्ध एक गंभीर सामरिक अडचण होती. लढाऊ विमानांच्या 'चाव्या' परकीय राष्ट्रांच्या हाती या सर्वाचा अर्थ असा होतो की, भारत जो आतापर्यंत आपल्या सुरक्षेशी संबंधित निर्णय स्वतःच घेत आला आहे. त्याच्या लढाऊ विमानांच्या 'चाव्या' (म्हणजेच इंजिने, प्रमुख सुटे भाग आणि सोर्स कोड) परकीय राष्ट्रांच्या हाती असणे, ही भारताच्या लष्करी कारवायांच्या स्वायत्ततेसाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि सार्वभौमत्वासाठी एक अत्यंत गंभीर जोखीम असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मोदी 'राफेल' विमाने का खरेदी करत आहेत? प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी माझा प्रश्न पुन्हा उपस्थित करतो, मोदी 'राफेल' विमाने का खरेदी करत आहेत, रशियन बनावटीची 'Su-57E' विमाने का नाही? मोदींनी स्वतःला अमेरिकेच्या हाती विकून टाकले आहे. मोदींनी भारताचे सार्वभौमत्व परकीय सत्तांच्या हाती विकून टाकले आहे, असा घणाघात आंबेडकरांनी केला.
बारामतीची पोटनिवडणूक जर बिनविरोध झाली तर एक वेगळा मेसेज जाईल. ही प्रथा आणि संस्कृती सर्वांनी जपली तर हा वेगळा चर्चेचा विषय होणार नाही. काँग्रेसची काय अवस्था आहे हे जनतेला माहिती आहे, स्पष्टच बोलायचे झाले तर बारामतीमध्ये काँग्रेसचे अस्तित्व कधीच नव्हते. त्यांनी निवडणूक लढवली तरी नाममात्र लढवल्यासारखे होईल, त्याचा काही उपयोग होणार नाही, असे भाजप नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट केले जात आहे असे जय पवार यांनी म्हटले आहे, या प्रश्नावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, राजकारणामध्ये एकमेकांना टार्गेट करणे सुरूच असते त्यामध्ये काही नवीन नाही, असे त्यांनी जय पवारांनी राष्ट्रवादीला टार्गेट केले जाते असे म्हटल्याच्या प्रश्नावर बोलताना म्हटले आहे. या निवडणुकीत टार्गेट होण्याचा विषय येण्याचे काही कारण नाही. अहवाल आल्यानंतर कारवाई करावी अजित पवार विमान अपघात प्रकरणी VAR च्या मालकाना अटक व्हावी असे जय पवार यांनी म्हटले आहे त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, पहिले या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. चौकशीचा अहवाल पुढे आला पाहिजे. एकदम निष्कर्षाला येऊ नये.अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात यावी. देशामध्ये अनेक कंपन्या चार्टर्ड विमान सेवा देत आहेत, काळजी घेणं गरजेचे आहे, घाईने कारवाई करणे योग्य नाही. तो काँग्रेसचा अंतर्गत विषय अशोक चव्हाण म्हणाले की, बारामती निवडणुकीवर सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यावर वेगवेगळ्या नेत्यांचे वेगवेगळे वक्तव्य येत आहे. निवडणूक लढवायची का नाही, सपकाळ काय बोलतात, निर्णय घेतात हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय. बारामती पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ अशोक चव्हाण म्हणाले की, बारामती विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच शरद पवारांचा आणि नंतर अजित पवारांनी सांभाळलेला मतदारसंघ आहे. तिथल्या मतदारांचे अजित पवारांवर प्रेम आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबातीलच कुणाला तरी जबाबदारी मिळावी हे सर्वांची भूमिका असेल असे माझे मत आहे. सहानभुतीने मतदान होत असते. अजित पवारांनी केलेले काम त्यांच्या कुटुंबियांनी मिळणारी सहानुभूती हा निवडणुकीचा गाभा राहणार आहे.
मुंबईच्या लोकलमधली गर्दी पाहता, विशेषतः मध्य रेल्वेने प्रवास करताना दरवाजाजवळ उभे राहणे हे निष्काळजीपणाचे कृत्य मानता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. तसेच कल्याण डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमधून पडल्याने प्राण गमवावे लागलेल्या प्रवाशाच्या नातेवाईकांना 8 लाखांची नुकसान भरपाई देण्यात यावी, असे निर्देशही उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. 29 जानेवारी 2012 रोजी ठाकुर्ली ते डोंबिवली दरम्यान रेल्वे अपघातात प्राण गमावलेले सेल्समन बाळकृष्ण भंडारी यांच्या कुटुंबीयांना 8 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. 2019 मध्ये रेल्वे प्राधिकरणाने त्यांचा नुकसान भरपाईचा दावा फेटाळल्यानंतर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात रेल्वे व्यवस्थापन व आरपीएफने त्यांचा मृत्यू धावत्या लोकलमधून पडून झाल्याचे म्हटले होते, तर स्टेशन मास्टर व जीआरपीने त्यांना प्लॅटफॉर्मवर असताना ट्रेनने ओढल्याचा परस्परविरोधी अहवाल दिला होता. रेल्वेच्याच विविध विभागांच्या अहवालांमधील ही तफावत आणि मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत रेल्वेकडे असलेले अस्पष्ट स्पष्टीकरण लक्षात घेऊन न्यायालयाने भंडारी यांच्या वारसांना हा दिलासा दिला आहे. न्यायालयाने काय म्हटले? या अधिकाऱ्यांनी परस्परविरोधी अहवाल कसे दिले, हे मला समजत नाही; विशेषतः जेव्हा या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी उपलब्ध नाही, असे न्यायमूर्ती जैन यांनी निरीक्षण नोंदवले. तसेच कल्याणात्मक कायद्यांशी संबंधित आणि परस्परविरोधी पुरावे असलेल्या प्रकरणांमध्ये, 'संशयाचा फायदा' (benefit of doubt) हा पीडित व्यक्तीलाच मिळायला हवा, असा निर्णय न्यायालयाने दिला. मृत व्यक्तीचा मृत्यू धावत्या रेल्वेगाडीतून खाली पडून झाला, हे स्वीकारण्यावाचून या न्यायालयासमोर अन्य कोणताही पर्याय नाही आणि ही घटना म्हणजे एक 'दुर्दैवी घटना' ठरते, असेही न्यायमूर्तींनी म्हटले. विशेषतः न्यायालयाने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळ्यातील वस्तुस्थितीवर भर दिलाय. मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये जागा क्वचितच रिकाम्या असतात. अगदी गाडीच्या सुरुवातीच्या स्थानकावरही, जागा मिळवण्यासाठी लोकांना अक्षरशः उडी मारावी लागते. त्यामुळे, दरवाजाजवळ उभे राहणे हे निष्काळजीपणा मानले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले. भंडारी हे फलाटाच्या कडेला उभे होते, ही बाजू जरी ग्राह्य धरली, तरीही सदर घटना नुकसानभरपाईस पात्र ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेतील त्रुटींवरही बोट ठेवले न्यायालयाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सुरक्षेतील त्रुटींवरही बोट ठेवले आणि निदर्शनास आणून दिले की, पिवळी सुरक्षा रेषा अनेकदा पुसट झालेली असते व तिच्या उद्देशाबद्दल स्पष्ट संवाद साधला जात नाही. नियमितपणे पुन्हा रंगकाम करण्याची आणि धोक्याची क्षेत्रे दर्शवण्यासाठी लाल खुणांचा वापर करण्याची सूचना न्यायालयाने केली. प्रवाशांना सुरक्षा रेषेच्या मागे ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी घोषणा आणि अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असेही न्यायालयाने म्हटले. वर्तणुकीत बदलाचे आवाहन करताना, जपानी लोकांप्रमाणे आपल्यामध्येही 'सिविक सेन्स' रुजवण्याची गरज आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
बारामती विधानसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. संजय राऊतांना तसे वाटत नाही ते स्वत:ला उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे समजत आहेत. राऊतांना वाटते की तेच 'प्रतिपक्ष प्रमुख' समजतात, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. त्यामुळे बारामतीच्या निवडणुकीत उबाठाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा असे राऊतांना वाटते, तर उद्धव ठाकरेंना सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवड व्हावी. त्या दृष्टीने त्यांचा आणि सुनेत्रा पवार यांचा संवाद सुद्धा झाला आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत स्वत:ला उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे समजत असल्याने त्यांची काँग्रेसला पाठिंबा देण्याची इच्छा आहे. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीवरुन उबाठामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत उभे राहिल्याचे दिसून येत आहे. आता या वादात कोण जिंकणार हे पाहणं महत्तवाचे ठरणार आहे. राज्यसभेच्या जागेसाठी राऊत काँग्रेसच्या बाजूने बोलत आहेत. मविआमध्ये बिघाडी नवनाथ बन म्हणाले की, विधान सभेच्या निवडणुकीवरुन मविआमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा हे बघायला मिळत आहे. संजय राऊत काहीही दावा करत असले की मविा एकत्र आहे तर असे काहीही नाही. मविआत उद्धव ठाकरेंची वेगळी भूमिका आहे, शरद पवार गटाची वेगळी भूमिका आहे, तर काँग्रेस म्हणतंय की आम्ही दोन्ही निवडणुका लढवू ते सुद्धा तुम्हाला न विचारता हर्षवर्धन सपकाळ घोषणा करतात. काँग्रेसने तुम्हाला फाट्यावर मारले आहे. तुमचे तिघांचे तोंड वेगवेगळ्या दिशेला आहे. तुमची विधानसभेनंतर एकही बैठक झालेली नाही, जनतेने मविआला ओळखले आहे. जैन मुनींच्या बोलण्याचे समर्थन नाहीच नवनाथ बन म्हणाले की, छत्रपती शावाजी महाराज यांच्यासाखा राजा पुन्हा होणे नाही. जैन मुनी यांनी केलेल्या वक्तव्याचे कुणीही समर्थन करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही करू नये हे नीतेश राणे यांनी सुद्धा सांगितले आहे. तरीही संजय राऊत टीका करत आहेत. राऊत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागितले त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर बोलण्याचा अधिकारच गमावला आहे. तुम्ही आधी त्या विषयी माफी मागा आणि मगच दुसऱ्या विषयावर बोला.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे गत 2 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या एलएलबी 3 इअर सीईटी ऑनलाईन परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. भाजप आमदार राहुल कुल यांनी या प्रकरणी थेट सीईटी सेलच्या आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्षाने गत 2 एप्रिल रोजी LLB 3 Year सीईटी ही ऑनलाईन परीक्षा घेतली. या परीक्षेच्या सामान्य ज्ञान विभागात शिवाजीच्या मंत्रिमंडळाचे नाव काय होते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्यासारख्या थोर महापुरुषांचा उल्लेख एकेरी शब्दांत होणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या प्रकारामुळे शिवप्रेमी व विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी या प्रकरणी आमदार राहुल कुल यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानुसार, राहुल कुल यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई येथील आयुक्तांना पत्र लिहून प्रश्नपत्रिका तयार करणारी समिती व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राहुल कुल काय म्हणाले आपल्या पत्रात? राहुल कुल आपल्या पत्रात म्हणाले, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या LLB-3 Year CET परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान विभागांतर्गत 'शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते' असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख करताना अत्यंत अनादरपूर्वक 'शिवाजी' असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. ज्या राजांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली आणि ज्यांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते, अशा थोर महापुरुषाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे होणे ही खेदाची बाब आहे. यामुळे तमाम शिवप्रेमींच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे सदर प्रश्नपत्रिका संकलित करणाऱ्या समितीवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. CET सेलने या गंभीर चुकीबद्दल सार्वजनिकरीत्या माफीनामा प्रसिद्ध करावा. भविष्यात कोणत्याही शासकीय परीक्षेत महापुरुषांचा अवमान होणार नाही, याची नियमावली तयार करावी. इथून पुढे सर्व शैक्षणिक साहित्यात 'छत्रपती शिवाजी महाराज' असाच उल्लेख अनिवार्य करावा. तरी आपण या विषयाचे गांभीर्य ओळखून, LLB-3 Year CET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संबंधित दोर्षीवर कारवाई करण्याबाबत आपणाकडून संबधितांना आदेश व्हावेत, अशी मागणी राहुल कुल यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
अंजली दमानिया यांच्याकडे जर अशोक खरात प्रकरणी सीडीआर पोहोचला असता तर त्यांची पूर्ण कॉपी आली असती. एका हॉटेलच्या लेटर हेडवर काही गोष्टी इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांनी सुद्धा काल स्पष्ट केले की अज्ञात व्यक्तीने हे दिले आहे.अशा आरोपाने काही एकनाथ शिंदेंचे नेतृत्व कमकूवत होणार नाही. उलट जनतेला एकनाथ शिंदेंना जे ते भावतात ती जनतेमध्ये वाढत जाणार आहे. त्या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. उदय सामंत म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसाठी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी हीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. काँग्रेस कसे पुढे जाते आणि कसे मागे पडते यावर संजय राऊतांनी वक्तव्य केले आहे, त्यावर मी जास्त काही बोलणार नाही. साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काय झाले यावर कार्यकर्त्यांशी चर्चा केली, प्रत्येक गोष्ट माध्यमांसमोर सांगायची नसते.येणाऱ्या निवडणुकीत जनतेची भावना काय हे समजेल. एकनाथ शिंदे NDA मधील तिसऱ्या क्रमांकाचे नेते उदय सामंत म्हणाले की, अंजली दमानियांना हे कागदपत्रे कोणी दिले, याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे त्यातून या सर्व गोष्टी पुढे येतील. एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन बोलण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तो कागद पुरवठा करणारा कोण यावर चौकशी झाली पाहिजे. खरात प्रकरणी कोण कोणाला भेटले हे सर्व जनतेला माहिती आहे. एकनाथ शिंदे हे एनडीएमधील 3 नंबरचे नेते आहेत. त्यांचे काम निवडणुकीतून दिसून आले. अजितदादांनी अनेक वर्षे काँग्रेसचे नेतृत्व केले उदय सामंत म्हणाले की, अजित पवार यांनी अनेक वर्षे काँग्रेससुद्धा काम केले होते. राजकारणापेक्षा अजित पवार आपल्यात नाही आणि सुनेत्रा पवार ही निवडणूक लढवत असतील तर ती बिनविरोध करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तीच भूमिका शिवसेनेची आहे, आम्ही सुद्धा सर्वांना विनंती करतो की राजकारण करण्यापेक्षा आपले राजकीय संस्कार पुढे नेले पाहिजे. यातून महाराष्ट्र राजकीय संस्कार असलेले राज्य आहे असे संदेश देशभरात जाईल. म्हणून शरद पवारांची भेट घेतली उदय सामंत म्हणाले की, ओपस स्पेसमध्ये कशापद्धतीने वृक्षारोपन करता येईल त्यासंदर्भात आमची चर्चा झाली. नाट्य परिषदचे प्रमुख विश्वस्त शरद पवार आहेत त्यांच्याशी परिषदेच्या कामासंदर्भात आम्ही आज शरद पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांची भेट झाली नव्हती त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी अनेक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे, त्यांचे मार्गदर्शन लाभणं फार महत्त्वाचे आहे.
नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. त्यात त्याने अनेक महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे उघड झाल्याने अनेक महिलांची मानसिक स्थिती बिघडल्याचे समोर आले आहे. खरातच्या केबिनमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात अनेक महिलांचे चेहरे देखील दिसून आल्याने त्यांची ओळखही उघड झाली आहे. पोलिसांनी व्हिडिओ पोस्ट न करण्याचा इशारा देऊनही अनेक व्हिडिओ समोर आले. या सगळ्यात आता पीडित महिला मानसिक तणावात असल्याची माहिती आहे. अशोक खरातने ज्या महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे, त्यातील 8-9 महिला मानसोपचार तज्ञांकडून उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांना आपली बदनामी झाल्याने एकटे पडल्याची भावना भेडसावत आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण येऊ नये, तसेच त्यांना पूर्णपणे सुरक्षित ठेवण्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच या महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले आहे. अशोक खरात प्रकरणातील महिलांची ओळख उघड होऊ नये म्हणून या महिलांची चौकशी देखील अज्ञातस्थळी नेऊन केली जात आहे. अशोक खरात आणि महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर सातत्याने नजर ठेवली जात आहे. अशोक खरातचा मुलगाही फरार दरम्यान, अशोक खरात प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाला मोठा धक्का बसला आहे. अशोक खरातची पत्नी फरार आहेच, त्यात आता त्याचा मुलगाही फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. चौकशीनंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. मात्र, आता त्याचा मोबाइल नोट रिचेबल येत असल्याने तोही पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून तिचा शोध घेणे सुरू आहे.
राहुरीमध्ये आमच्याकडे 3 इच्छूक उमेदवार आहेत आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. राजकारणात कधी कोणावर निवडणूक लढण्याची जबाबदारी पडेल सांगता येत नाही, त्यासाठी तयार रहावे लागते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ जर त्यांचे उमेदवार ठरवून ठेवत असतील तर चांगलेच आह. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा राहुरीसाठी उमेदवारांशी चर्चा करत आहे. संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा का विषयावर सर्व नेत्यांशी चर्चा केली पण अजून या विषयावर कुठलाही निर्णय झालेला नाही. बारामतीमध्ये उमेदवार का देऊ नये? निवडणूक आहे. अजित पवार यांच्याबद्दल एक आदर आहे, हा विषय आहे. पण निवडणूक लढवायाच्याच नाही, बिनविरोधच झाल्या पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. यशंवतराव चव्हाण यांना सुद्धा निवडणुकीला सामोरे जावे लागले होते, लक्षात घ्या. चर्चा करत निर्णय घेऊ संजय राऊत म्हणाले की, भाजपवाले इतर सर्व निवडणुका लढतात, त्यासाठी मतं, नगरसेवक, आमदार फोडतात ना? निवडणूक काळात सरकारला मतदान करायचे नाही असा मोठा वर्ग असतो, बिनविरोध निवडणूक झाली तर त्यांनी काय करायचे? असा सवाल राऊतांनी केला आहे. शेतकरी, कष्टकरी ज्यांना सरकारचा राग आहे, त्यांना सरकारविरोधात मतदान करायचे आहे, बिनविरोध निवडणूक अन्याय आहे. दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीसंदर्भात मविआमध्ये चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल. राणेंनी मुनींना थांबवायला हवे होते संजय राऊत म्हणाले की, नीतेश राणेंची तुलना शिवरायांशी करणे अगदी चुकीचे आहे. त्यांनी जैन मुनींना थांबवायला हवे होते. मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर जे उत्तर दिले आहे ते अगदी योग्य आहे. आंध्र प्रदेशची राजधाणी कोणती हे ठरवण्याचा अधिकार त्या राज्याच्या आहे. उद्या मुंबई किंवा इतरा राज्याबद्दल असे काही करतील, हे चुकीचे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरातच्या CDR ची माहिती बाहेर काढल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी या प्रकरणी दमानियांचा उल्लेख उपरोधिकपणे रिचार्जवाल्या ताई असा केला आहे. राज्याचा गृह विभाग पोलिस महासंचालकांआधी किंवा गृहमंत्र्यांआधी तुम्हाला रिपोर्ट करतंय का? असा सवालही त्यांनी यासंबंधी अंजली दमानियांना केला आहे. अंजली दमानिया यांनी 2 दिवसांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा केला होता. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते, असे त्या म्हणाल्या होत्या. या प्रकरणी त्यांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील व आशिष शेलार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचेही नाव घेतले होते. या पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर रिचार्जवाल्या ताई म्हणत निशाणा साधला आहे. रिचार्जवाल्या ताई याची ऊत्तर देतील का? सूरज चव्हाण यांनी एका पोस्टद्वारे अंजली दमानिया यांना काही प्रश्न केलेत. तसेच त्यांना या प्रश्नांची उत्तरे देण्याची विनंतीही केली आहे. ते काय म्हणाले ते खाली वाचा जशास तसे... सूरज चव्हाण म्हणाले, रिचार्जवाल्या ताई याची ऊत्तर देतील का? 1) CDR कुठून मिळाला यावर उत्तर देताना अंजली दमानिया यानी दोन उत्तर दिली आहेत. 2) आधी ओळखत नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर पाठवली म्हणाल्या.. 3) नंतर आपण म्हणालात AI च्या माध्यमातून मिळाली. खरंच? कुठलं AI अॅप लोकांचे कॉल डिटेल्स काढून देतं याबद्दल तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्यावी. 4) CDR च्या स्टेटमेंट बदल का केला ? 5) एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या माहितीवर तुम्ही इतका पटकन कसा विश्वास ठेवला? ती वेरीफाय केली का? आणि केली असेल तर कशी केली? त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागली? 6) उद्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध राज्याच्या गृह विभागाने घेतला आणि ती माहिती खोटी निघाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का ? 7) तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती माहिती मा.मुख्यमंत्री आणि तेजस्वी सातपुतें यांना दिली. 8) राज्याचा गृह विभाग पोलीस महासंचालकांआधी किंवा गृहमंत्र्यांआधी तुम्हाला रिपोर्ट करतंय का ? भोंदू बाबा खरात प्रकरणात रिचार्जवाल्या ताई भोंदू बाबा वरून लक्ष विचलित करून कोणाचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न करत आहेत? ताईचा CDR तपासून नेमका कोणी रिचार्ज केला याची मिळाली पाहिजे. ‘रिचार्जवाल्या ताई’वरून वाद होण्याची शक्यता सूरज चव्हाण यांनी यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा पुन्हा एकदा ’रिचार्जवाल्या ताई’ असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. यापूर्वीही त्यांनी अशाच शब्दांत दमानिया यांच्यावर टीका केली होती, आणि आता पुन्हा त्याच उल्लेखाची पुनरावृत्ती केल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. हे ही वाचा… एकनाथ शिंदेंचे भोंदू खरातला तब्बल 17 फोन:रूपाली चाकणकरांचेही 177 कॉल; सुनील तटकरे, दीपक केसरकर, शेलारांचेही कॉल्स सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते. हे एवढे कॉल त्यांनी का केले होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर
तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रात येऊन पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रातील सर्व मदरसे बंद करण्याऐवजी ते उखडून टाका. कारण, दाऊद इब्राहिम व अजमल कसाब अशाच मदशांतून तयार झालेत. खुलताबाद येथील मुघल बादशहा औरंगजेबाची कबरही उखटून टाका. भविष्यात देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, तर आपल्याकडेही शस्त्र असावीत. त्यामुळे एका घरात किमान 5 बंदुका असाव्यात, असे ते म्हणालेत. आमदार टी राजा सिंह यांची शनिवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथे एक सभा झाली. त्यात बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, मंत्री नीतेश राणे यांनी मदरशांविषयी केलेल्या विधानाला माझे समर्थन आहे. महाराष्ट्रातील सर्वच मदरसे बंद करा. या मदरशांत देशविघातक शिक्षण दिले जाते. नीतेश राणेंना माझे निवेदन आहे की, त्यांनी हे अनधिकृत मदरसे बंद करण्याऐवजी कायमचे उद्धवस्त करावेत. हे मदरसे केवळ बंद केले, तर ते पुन्हा चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मदरशांवर थेट बुलडोझरच चालवा. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व अजमल कसाब सारखे अतिरेकी याच मदरशांत तयार झालेत. त्यामुळे नीतेश राणेंनी आपले बोल खरे करून दाखवावेत. ओरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटते का? टी राजा सिंह यांनी यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची भीती वाटत आहे का? असा थेट सवालही केला. ते म्हणाले, औरंगजेबाची कबर उखडून टाकल्यानंतर आपल्याला मतदान मिळणार नाही अशी भीती तुम्हाला वाटते. पण ते तुम्हाला मतदान करणारच नाहीत हे लिहून घ्या. मुख्यमंत्र्यांनी औरंगजेबाची कबर हटवून तिथे शौचालय बांधावे अशी महाराष्ट्रातील हिंदूंची इच्छा आहे. महाराष्ट्रात औरंग्याची कबर नको. त्याने आमच्या संभाजीराला हाल हाल करून ठार केले. त्यामुळे त्याची कबर हटवण्यासाठी मावळे हवे असतील, तर आम्ही लाखोंच्या संख्येने येऊ. घरोघरी किमान 5 बंदुका असाव्यात टी राजा सिंह यांनी यावेळी घरोघरी 5 बंदुका ठेवण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, हिंदूंनी आपल्या घरात शस्त्र ठेवले पाहिजे. देवाच्या गाभाऱ्यात शस्त्रे ठेवणे कायदेशीर आहे. पण ते बाहेर काढून हल्ला केला तर विषय वेगळा आहे. भविष्यात युद्ध झाले आणि शस्त्र नसतील तर तुम्ही काय करणार? कसे लढणार? धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. या प्रकरणी जिथे मदत लागेल ती आम्ही करू. पण प्रत्येक घरात किमान 5 बंदुका असाव्यात. देशद्रोही हल्ला करण्यासाठी आले, तर त्यांना गोळ्या घालण्यासारखी शस्त्रे आपल्याकडे असावीत, असेही ते म्हणालेत.
बहुमत नसल्यानेच राष्ट्रवादी-शिवसेनेचा रडीचा डाव:साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पलटवार
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपवर फोडाफोडीचे राजकारण आणि पोलिसांच्या मदतीने अडवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावत बहुमत नसल्यानेच विरोधकांनी मतदानावर बहिष्कार टाकून पळ काढला आहे, राष्ट्रवादी व शिवसेनेच्याच सदस्यांचा आम्हाला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न होता, अशी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली. जिल्हा परिषद सभापती निवडीच्या प्रक्रियेत सत्ताधारी भाजपने पोलिसांचा वापर करून सदस्यांना रोखले, असा आरोप करत राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद ठेवणे आणि अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ न देणे, असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी-शिवसेनेकडून रडीचा डाव या सर्व घडामोडींवर भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून आपली बाजू मांडताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अर्ज भरण्यासाठी 10 ते 12 असे दोन तास देण्यात आले होते. केवळ 15 मिनिटे वेळ दिला, हा आरोप चुकीचा आहे. सर्व प्रक्रिया प्रसारमाध्यमांसमोर पार पडली आहे. मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्याकडे बहुमत नाही, याची पूर्ण कल्पना होती. स्वतःची नामुष्की टाळण्यासाठी त्यांनी बहिष्काराचा 'रडीचा डाव' खेळला आहे. सीसीटीव्ही बंद असल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, निवडीनंतर आम्ही सभागृहात गेलो होतो, त्यामुळे कॅमेरे बंद करण्याचा आमचा प्रश्नच येत नाही. अध्यक्षांनी हवी तर चौकशी समिती नेमावी, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी दिले. सदस्य फोडले असे म्हणणे गैर- गोरे यावेळी उपस्थित असलेले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. सीसीटीव्ही चालू असते तरी निकालात काहीही बदल झाला नसता, असे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गोरे म्हणाले, पुढची पाच वर्षे राज्यकारभार कसा करायचा, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. ज्यांना स्वतःचे सदस्य सांभाळता येत नाहीत, त्यांनी आमच्यावर फोडाफोडीचे आरोप करणे हास्यास्पद आहे. जे लोक स्वतःच्या इच्छेने आमच्याकडे आले आहेत, त्यांना 'फोडले' म्हणणे चुकीचे आहे. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. साताऱ्यातील या राजकीय संघर्षाने जिल्हा परिषदेच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी मध्ये सुद्धा भाजपचे फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळाले .पोलिसांनी केलेली अडवणूक, काढून घेतलेले मोबाईल या घटनेचा राष्ट्रवादीच्या व शिवसेनेच्या सदस्यांनी निषेध करत मतदानावर बहिष्कार टाकला या वादा नंतर पालकमंत्री शंभूराजे देसाई व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेऊन भाजपच्या दहशतीच्या रणनीतीला चोख उत्तर देऊ. सभापती निवडी म्हणजे राजकारणाची इतिष्री नव्हे अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. आगे आगे देखो होता है क्या असा सूचक इशारा दिला या पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यात आली. शंभूराजे देसाई म्हणाले जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा कालावधी सभापती निवडीनंतर संपला असे नाही कालावधी पाच वर्षाचा आहे आम्ही जे बोलतो ते करूनच दाखवतो यापुढे आम्ही काय करू तुम्ही फक्त बघत रहा .त्यांनी आमचे सदस्य फोडले त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते असे सूचक वक्तव्य त्यांनी केले . मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे म्हणाले राजकारणामध्ये जय पराजय हे होत असतात आज आमचे सदस्य जरी फोडले तरी ही वेळ त्यांच्यावर येऊ शकते आम्ही काल राजकारणात आलेलो नाही हे तुम्ही समजून घ्या माझ्या कुटुंबात गेली 50 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणाचा वारसा आहे आम्ही या प्रकरणाचे 100% उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही . दरम्यान राष्ट्रवादीच्या सदस्यांना पोलिसांनी मतदान प्रक्रियेसाठी जाताना चार चार वेळा तपासणी केल्याने वादावादीचे प्रसंग घडले त्यांचे मोबाईल काढून घेण्यात आले.सदस्य उशिरा सभागृहात कसे पोहोचतील असा प्रयत्न सातारा पोलिसांचा पुन्हा दिसून आला त्याचा निषेध राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दंडाला काळ्याफिती लावून केला आणि या दहशतीच्या राजकारणाचा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध करत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर पायरीवर बसून धरणेआंदोलन केले. अनिल देसाई व संदीप मांडवे यांनी सातारा जिल्हा परिषदेत पुन्हा लोकशाहीचा खून झाला अशी कडवट टीका केली .
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार स्वतः या निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांच्याविरोधात आतापर्यंत 19 उमेदवारांनी आपले शड्डू ठोकलेत. काँग्रेसही आज किंवा उद्या आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. बारामती विधानसभेची जागा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे रिक्त झाली आहे. या ठिकाणी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उद्या सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बडे नेते हजर राहण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच या निवडणुकीसाठी तब्बल 19 उमेदवारांनी आपले अर्ज भरलेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सुद्धा ही निवडणूक लढवणार आहेत. पण ते एखाद्या पक्षाच्या निशाणीवर लढणार की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. काँग्रेस आज उमेदवार देणार? दुसरीकडे, काँग्रेसनेही या निवडणुकीत आपला उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. पण त्याचवेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आपला उमेदवार दिला तर त्याला पाठिंबा देण्याचाही निर्णय घेतला आहे. पण शरद पवार गटाने यापूर्वीच सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्यामुळे शिवसेनेचा ठाकरे गटही या निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका पाहता देशातील हा सर्वात जुना पक्ष आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा आजच करण्याची जास्त शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीची पोटनिवडणूक ही एकतर्फी होण्याची जास्त शक्यता आहे. पण या निवडणुकीत 20 किंवा त्याहून अधिक उमेदवार मैदानात उतरणार असल्यामुळे त्यात काहीशी चुरस वाढण्याची शक्यता आहे. खाली वाचा कोण-कोण आहे मैदानात? बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवारांची एक मोठी फळी उभी राहिल्याचे चित्र दिसत आहे. यात हिंदुस्तान जनता पार्टीचे सतिश कदम, न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे राघू घटुकडे, राष्ट्रीय किसान बहूजन पार्टीचे अरूण निटुरे यांच्यासह सागर भिसे, गजानन गवळी, त्रिशाला कांबळे, दिलीप अळोणी, दत्तात्रेय बेदरे, मिथून आटोळे, रजाक मुलाणी, संदीप खरात, विलास होळकर, अभिजीत बिचुकले, अनिल तुपे, संकेत गावडे, दादा थोरात आणि अभिजीत कांबळे असे अनेक अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे बारामतीतील ही लढत बहुरंगी होत असून मतदारांसमोर अनेक पर्याय उभे राहिल्याने निवडणूक अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
सर्व महामानव, संत, साधू यांना महिलेनेच जन्म दिला आहे. त्यामुळे त्या सत्कर्म करणाऱ्या व्यक्तींच्या माता झाल्या आहेत. त्या प्रसंगी दुर्गा सुद्धा झाल्या आहेत. त्यामुळे महिला नेहमीच महान आहेत, असे मत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा नलिनी सौन्दणकर यांनी महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केले. महिला सक्षमीकरण, सामाजिक जागरूकता आणि संघटन बळकटीकरण या उद्देशाने राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने प्रमिलाताई ओक हॉल येथे महिला मेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रीय प्रवक्ता रविंद्र राजुस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मीना भागवत,ॲड. सागर श्रीकांत चौथे, महाराष्ट्र निरीक्षक गजानन भटकर, मंगल चंदन,अकोला जिल्हा अध्यक्ष प्रवीण चोपडे, रामाभाऊ उंबरकर, बुलडाणा येथील ज्ञानदेव इंगळे यांची उपस्थिती होती. तसेच अकोला जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संज्योती मांगे, शहराध्यक्ष छाया इंगळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून लिना चिम (प्रदेश उपाध्यक्ष) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता पांडुरंग वाडेकर होते. यावेळी देशात नीट परीक्षेत ४५ वे स्थान मिळवणाऱ्या मानस शेगोकार, आधीपरिचारिका सीमा गव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात झटपट प्रश्नोत्तरे, सांस्कृतिक सादरीकरणे, विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे वातावरण उत्साही झाले. नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक ॲड. सागर चौथे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात महिलांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना कांबळे, मधुमती लोखंडे, वनिता गवई, प्रमिला वानेडकर, छाया पटके ,वर्षा चिमकर, मंदा रेवस्कर, संगीता ठोसरे, गीता डामरे, संगीता थोटे, शांताबाई वाडेकर अनिता पद्मने, दुर्गा तायडे, निवेदिता बेलुलकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भटकर यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. निवेदिता बेलूरकर यांनी केले. आभार छाया इंगळे यांनी मानले. महिलांना सन्मान मिळायला हवा समाजाची प्रगती शोधायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली? यावर अवलंबून असते, असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते. त्यांच्या आवाहनानुसार आजही महिलांना दुय्यम वागणूक मिळते आहे. त्यामुळे महिलांना सन्मान मिळणे आवश्यक आहे, असे मत मीना भागवत यांनी व्यक्त केले. कुटुंबाला सुरक्षित करा : अॅड. चौथे अकोला शहरासह राज्यातील अल्पवयीन मुली आत्महत्याचा मार्ग शोधत आहे. मुलींना सुरक्षित करण्यासाठी तिला दुर्लक्षित करू नका. तिला विश्वासात घेऊन तिच्या सोबत नाळ जोडून ठेवा. तिचा आवाज बना. तरच घर, घरातील महिला आणि समाज सुरक्षित करता येईल, असे मत मनसोपाचार तज्ञ अॅड. सागर चौथे यांनी उपस्थित महिलांसोबत संवाद साधताना व्यक्त केले.
भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली असताना नवी मुंबईतही असाच एक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नामक भोंदूने काळी जादू करण्याच्या नावाखाली काही महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी 2 महिलांनी त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, भोंदू अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा लोकांना तत्त्वज्ञान सांगायचा. अल्लाहचे महत्त्व पटवून देत त्यांचा विश्वास संपादन करायचा. कधी गोड बोलून, कधी संमोहित करून, तर कधी काळ्या जादूची भीती दाखवून महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तो त्यांना आर्थिक, सामाजिक, शारीरिक, वैवाहिक समस्या दूर करण्याचे आमिषही दाखवायचा. त्यातूनच त्याने एका विवाहितेवर अत्याचार केला. एवढेच नाही तर सांताक्रूझ येथे आई व तिच्या मुलीवर बलात्कार करून त्या दोघींनाही जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणांत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. काय होती गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी? भोंदू बाबाजान हा महिलांना तुमच्यावर झालेली काळी जादू काढून देण्याच्या बहाण्याने एकट्याने बोलवायचा. खालापूर येथील एका निर्जनस्थळी बांधलेल्या फार्महाऊसवर तो महिलांना नेत होता. त्यानंतर मध्यरात्री काळ्या जादूच्या बहाण्याने तो महिलांच्या अंगावरील वस्त्रे काढून त्यांना पूजेला बसवायचा. काही महिला विवस्त्र होण्यास नकार देत. तेव्हा तो विरोध केल्यास जादूटोणा व जिवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा. कळंबोली स्थित घरीही सुरू होती फसवणूक भोंदू बाबाजान खालापूरसह कळंबोली येथील आपल्या घरीही तो महिलांना भेटण्यासाठी बोलावत होता. आपल्या समस्या सुटतील या आशेपोटी अनेकजण त्याला भेटण्यासाठी येत होते. लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे कळंबोली येथील सोसायटी सदस्यांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबासह तेथून पळ काढला. अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा गेल्या अनेक वर्षापासून लोकांची फसवणूक करत होता. त्यातून अनेकांकडून त्याने पैसे उकळले. सध्या दोन महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली असली, तर अजून बऱ्याच महिला त्याच्या फसवणुकीला बळी पडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा पुढाकार उल्लेखनीय बाब म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाने पीडित महिलांना भोंदू अब्दुल रशीद उर्फ बाबाजान विरोधात पोलिसांत तक्रार देण्यासाठी प्रोत्साहित केले. सर्वच धर्मांमध्ये भोंदूबाबांची कीड लागलेली आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांनी अशा लोकांना मदत करू नये, असे आवाहन या मंडळाने केले आहे.
शहरातील कौलखेड भागातील एसटी रिजनल वर्कशॉपसमोरील श्रद्धानगर ३ मध्ये जुन्या वादातून दिवसाढवळ्या गुंडगिरीची घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या तरुणांच्या एका टोळक्याने परिसरातील तीन रहिवाशांवर चाकू लोखंडी पाइपने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाच्या पोटात चाकू भोसकल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्या प्रकरणातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना चार तासात ताब्यात घेतले आहे. इतर तीन आरोपीचा शोध सुरू आहे, असे खदान पोलिसांनी सांगितले. ‘धुरंदर टू’ चित्रपट बघून आल्यानंतर शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नशेखोर युवकांची परिसरात चाकू, लोखंडी पाईपच्या बळावर दहशत केल्याची ही घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी कौलखेड भागात घडलेल्या नशेखोर तरुणांनी केलेल्या हल्ल्यात अभिलाष अरविंद हिंगे (वय ३२, रा. न्यू खैतान नगर कौलखेड, अकोला),रवी शंकर उर्फ छोटू गजानन ठाकरे (वय २६, रा. कौलखेड चौक) आणि हरिभाऊ रमेश रोटे (वय २६, रा. संतोषनगर मलकापूर खडकी अकोला) यांना धारदार शस्त्र व लाट्याकाठ्याच्या साह्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याबाबत तीन गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमी अभिलाष अरविंद हिंगे याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे पथक, खदान व स्थानिक गुन्हे शाखेचे पथके आरोपीच्या अटकेसाठी परिसरात रवाना केले होते. यातील दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना खदान पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले असून, इतर तीन आरोपी यांचा खदान पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथके कसून शोध घेत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे, असे खदान पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी सांगितले. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस, एलसीबीचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. धुडगूस घालणारे आरोपींमध्ये काही अल्पवयीन होते. सर्व मोटारसायकलवरून आले होते. १५ ते २० वयोगटातील आरोपींपैकी दोघा अल्पवयींनाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कौलखेड परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला. दिवसा घडलेल्या या गोंधळामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे.
येथील जिल्हा परिषदेच्या ‘वॉल ऑफ फेम’वर मार्च महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तीन नव्या कर्मचाऱ्यांची छायाचित्रे झळकली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक शरद चहाकार, मुख्यालयातील बीम्स प्रणाली सांभाळणारे स्वप्नील बेंडे आणि बांधकाम विभागाच्या दर्यापुर येथील कार्यालयात कार्यरत उपअभियंता मंगेश पुनसे यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालयातील कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत सीईओ संजीता महापात्र यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट कामकाजासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा व्हावी, यासाठी सीईओ महापात्र यांच्या संकल्पनेतून जि.प. प्रशासनाने जानेवारी २०२६ पासून हा उपक्रम सुरु केला आहे. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे तीन कर्मचारी ‘वॉल ऑफ फेम’चे पहिले मानकरी ठरले होते. तेव्हापासून दरमहा ही वॉल ऑफ फेम पुढे-पुढे सरकत आहे. सदर ‘वॉल ऑफ फेम’ ही सीईओंच्या दालनाबाहेर दर्शनी भागात उभी करण्यात आली असून ती जिल्हा परिषदेत ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सहजच दृष्टीस पडते. त्यामुळे गेल्या महिन्यात कुणी उत्कृष्ट काम केले, त्याचा विभाग कोणता आणि जबाबदारी कोणती, याची माहितीसुद्धा जनमानसांपर्यंत पोहोचते. गेल्या महिन्यात सर्वच विभागांमध्ये मार्च एन्डींगची घाई होती. त्यामुळे प्रत्येकच विभाग आपापल्या कामात गर्क होता. तरीदेखील आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून चहाकार, पुनसे आणि बेंडे यांनी आपल्या कर्तव्यात वेगळा ठसा उमटवला. वाल ऑफ फेमसाठी जिल्ह्यातील सर्वच खातेप्रमुखांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती मागविण्यात आली होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा करुन सदर तिघांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर तिघांनाही मुख्यालयी पाचारण करुन सीईओ संजीता महापात्र यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मंगेश पुनसे हे काही अपरिहार्य कारणास्तव या कार्यक्रमाला उपस्थित राहु न शकल्याने त्यांच्यावतीने कनिष्ठ अभियंता जगदीश पानसे यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी अतिरिक्त सीईओ विनय ठमके, जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आणि इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शरद महादेवराव चहाकार हे शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी खाजगी शाळा आस्थापनांचे अभिलेखे संगणकीकृत केले. वाल ऑफ फेमचे दुसरे मानकरी स्वप्नील बेंडे यांनी बीम्स प्रणालीवर उद्दिष्टानुसार शंभर टक्के ध्येयप्राप्ती केली, तर मंगेश पुनसे हे दर्यापुर येथील बांधकाम विभागात उप अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात रस्ते आणि बांधकामसंबंधी समस्यांचे निवारण करण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली.
मेळघाटाच्या खारी गावातील आगीत चार घरे जळून खाक:चार कुटुंबातील 20 जणांच्या निवाऱ्याचा प्रश्न समोर
धारणी तालुक्यातील खारी गावात शुक्रवारी ( दि.३) रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. या घटनेत संसारोपयोगी साहित्यासह घरातील धान्यही जळून राख झाल्याने चारही कुटुंबांतील २० सदस्यांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी रात्री अचानक खारी गावात आग लागली. काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत सुरेश जीवन घुले, युवराज प्रकाश धुर्वे, माया किशोर ताईड आणि शैलेश सुरेश घुले या चार नागरीकांची घरे पूर्णपणे भस्मसात झाली. घटनेची माहिती मिळताच धारणी नगर पंचायतीचे अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने सर्वस्व गिळंकृत केले होते. घटनेची माहिती मिळताच धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी तातडीने दखल घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक तलाठी यांनी घटनास्थळी पोहोचून नुकसानीचा पंचनामा केला. तसेच मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्यात आला आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी जंगलापेक्षा मानवी वस्त्यांमध्ये आगी लागण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, कुडाच्या किंवा गवत आणि लाकडाच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. चार दिवसांपुर्वी घराला लागलेल्या आगीत वृद्धेचा झाला मृत्यू: चिखलदरा तालुक्यातील वाकी या गावात बुधवारी (दि. १) रात्री एका घराला आग लागली होती. या आगीमुळे घर पुर्णत: जळाले. याचवेळी घरात झोपलेल्या वृध्द महिलेचा जळाल्याने मृत्यू झाला होता. या घराशेजारी अन्य एका घरालासुध्दा आग लागली होती.
जनसामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक घटकातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करून जनसंघापासून भाजपचे देशासाठी असलेले अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी केले. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत खामगाव मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण वर्गास शुक्रवार, दि. ३ मार्च रोजी सुरुवात झाली. केंद्र आणि राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. अनेक गरजू व्यक्तींना या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळावा व योजना कशा आहेत याची माहिती नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक वंचित गोरगरीब नागरिकाला या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचा आणि जो ज्या योजनेत बसत असेल त्यासाठी पुढाकार घेऊन मदत करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अनेक कल्याणकारी कार्य आपले सरकार समाजातील प्रत्येक घटकासाठी करत आहे, याची माहिती प्रचार - प्रसार करून प्रत्येकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले. या प्रशिक्षण वर्गात सहसंयोजक सागर फुंडकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, जिल्हा सचिव संजय शिनगारे, तालुका सरचिटणीस वैभव डवरे, शेखर कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर, संतोषराव देशमुख, सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजना, पीएम किसान योजना, कौशल्य विकास योजना, जलजीवन योजना अशा अनेक योजनांमार्फत शेतकरी आणि इतर सर्व घटकातील नागरिकांना लाभ मिळत आहे. विद्यार्थी, नोकरदार किंवा इतर क्षेत्रातील प्रत्येकासाठी चांगल्या लाभाच्या योजना सरकारने आणल्या आहेत. आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा योजनेमार्फत कोट्यवधी रुग्णांना लाभ होत आहे, असे ॲड. फुंडकर यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवा
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ६२० हेक्टरवरील शेतिपिकांची मुख्यत्वे गहू, भुईमूग, भाजीपाला व फळपिकांची नासाडी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याशिवाय झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन दिवसात एक गोठा व ३४ घरांचीही पडझड झाले. सलग सुट्यांमुळे कृषी आणि महसूल विभागातील मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात फिल्डवर उपलब्ध नसल्याने नुकसानाचा नेमका आकडा पुढे आला नाही. परंतु याआकड्यात वाढ होण्याची दाट शक्यता यंत्रणेने वर्तविली आहे. दरम्यान आज, सोमवारी दुपारी चिखलदरा तालुक्यात पुन्हा एकदा गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांच्या चिंतेतही वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारनंतर झालेला वादळी पाऊस व गारपीटच्या नुकसानाची इत्यंभूत माहिती अद्याप अप्राप्त आहे. परंतु गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या नुकसानाचा अहवाल तयार करण्यात आला असून तो विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. आपत्ती निवारण विभागाच्या निकषांनुसार लवकरच शेतीपिके व पडझडीच्या उर्वरित. पान ४ गेल्या तीन-चार दिवसांतील अवकाळी पावसानंतर उद्या, रविवारपासून जिल्ह्याचे वातावरण कोरडे राहणार आहे. जिल्ह्यातील चौदा पैकी काही तालुक्यात तुरळक सरी कोसळू शकतात. परंतु अवकाळी पाऊस किंवा गारपीट होणार नाही. प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ झाड पडून एकाचा मृत्यू यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार ३१ मार्चच्या अहवालात झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सदर व्यक्तीचे नाव जावेद अली मीर अली कहार असून ते चांदूर बाजार तालुक्यातील खराळा येथील रहिवासी होते. कृषी व महसूल यंत्रणेने केलेल्या संयुक्त पंचनाम्यात तशी नोंद करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांना देय असलेल्या मदतीची मागणीही शासनाकडे करण्यात आली. आज वातावरण कोरडे ३५ घरांची पडझड गेल्या तीन दिवसांतील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे एका गोठ्यासह ३५ घरांची पडझड झाली. ३० मार्चच्या अवकाळी पावसामुळे चार तालुक्यातील २६ गावच्या १४ घरांची पडझड झाली. त्यानंतर ३ एप्रिलला पुन्हा चार तालुक्यातील ६ गावांमध्ये अवकाळीने कहर केला. त्यात २१ घरांची पडझड झाल्याची नोंद आहे. सदर नुकसानाचा अहवाल शासनाकडे पोहोचला आहे.
मित्रासोबत फिरायला गेलेल्या अठरा वर्षीय तरुणीवर भानखेड -वडाळी जंगल परिसरात २८ मार्चला रात्री एकाने अमानुष अत्याचार केला. त्याचवेळी इतर चौघांनी या तरुण-तरुणीला मारहाण केली व त्यांच्याकडील १२० रुपये जबरीने हिसकले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता मागील तीन ते चार महिन्यांपासून ही टोळी वारंवार या जंगल परिसरात जाऊन फिरायला येणाऱ्या तरुण-तरुणींना सावज बनवून त्यांच्याकडून रोख रक्कम लुटण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी ३ ते ४ युगूलांकडून रक्कमसुद्धा घेतल्याचे पोलिसांना सांगितले. ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (वय ३४), दिवाकर श्रीकृष्ण मरसकोल्हे (वय २५), प्रमोद नारायण वाघाडे (वय ३१), शुभभ उर्फ सोमेश्वर नारायण वाघाडे (वय २८) आणि उमेश बेनिराम भोयर (वय ४७, सर्व राहणार भानखेडा) यांना पोलिसांनी २९ मार्चला अटक केली आहे. हे पाचही आरोपी आता न्यायालयीन कोठडीत रवाना झाले आहे. दरम्यान या प्रकरणात ३ एप्रिल रोजी ओळख परेड झाली आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील व गंभीर असल्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या दृष्टीने पोलिसांनी आरोपींच्या नावाबाबत ओळख परेड होईपर्यंत गोपनीयता ठेवली असल्याचे शनिवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी सांगितले आहे. हे पाचही आरोपी ही घटना घडली तेथून जवळच असलेल्या भानखेडा येथील रहिवासी आहे. शिवाय ते शेतमजुरी व इतर मजुरीचे काम करतात. सकाळी नऊ ते पाच या काळात ते कामासाठी घराबाहेर असतात. सायंकाळी कामावरून घरी गेल्यानंतर सहा वाजताच्या सुमारास ते घरातून बाहेर पडतात. त्यानंतर वडाळी, भानखेड व परिसरात असलेल्या जंगल भागात ते आवर्जून उपस्थित राहतात. पोलिसांनी तपास केला असता मागील काही ३ ते ४ महिन्यात तीन ते चार युगुलांकडून त्या टोळक्याने रक्कम लुटली तसेच एका तरुणीची छेडसुद्धा काढली, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. मात्र या घटनेतील पिडीचा वगळता इतर कोणीही या आरोपींविरुध्द तक्रार केली नाही. या पाच जणांमध्ये उमेश भोयर हा वयानी सर्वात मोठा आहे. तोच या टोळीचा मुखिया असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी ईश्वर मरसकोल्हे या नराधमाने तरुणीवर अत्याचार केला. त्यावेळी उमेश भोयरने व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी पीडित तरुणी व तिच्या मित्राला दिली होती. दरम्यान आरोपींनी खरोखरच व्हिडिओ काढला का? याबाबत तपास करत आहे. आरोपींनी व्हिडिओ काढला का?
पंढरपुरातील रिंगण, दिल्लीत झाला डंका:राष्ट्रीय ''चित्रांजली'' छायाचित्र स्पर्धेत रिंगण द्वितीय
आषाढी वारीतील अश्व रिंगण सोहळ्याचे विलोभनीय रूप आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या पंढरपूरच्या धनराज कडलख यांनी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘चित्रांजली' छायाचित्र स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत धनराज यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवत राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून तब्बल ६ हजारांहून अधिक छायाचित्रे आली होती. यामध्ये धनराज यांनी पंढरपूरच्या वारीतील रिंगण सोहळ्याचे टिपलेले अद्भूत छायाचित्र परीक्षकांच्या पसंतीस उतरले. यावेळी देशातील नामवंत व्यक्तींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महंत कमलनयन दास महाराज (अयोध्या), सुरेश जोशी, उपमुख्यमंत्री श्रीमती दिया कुमारी, जम्मू काश्मीर उपराज्यपाल मनोज सिन्हा, खासदार अशोक वाजपेयी, राम बहादूर राय, डॉ. सच्चिदानंद जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे धनराज कडलख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. श्रद्धा, शिस्तीचे दर्शन वारीतील श्रद्धा, ऊर्जा आणि शिस्त दर्शवणाऱ्या या फोटोची ६ हजार छायाचित्रांमधून निवड झाली. ही पंढरपूर करांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथीनिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवास आज मोठ्या भक्तिभावाने सुरूवात करण्यात आली. या धर्मसंकीर्तन महोत्सवातील पहिले पुष्प आज नाशिकच्या गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिकांच्या भक्तीसंगीत गायनाने फुलले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी गायिका मीरा कुलकर्णी व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. पुढे या भक्ती संगीत गायन सेवेत गायिका मीरा कुलकर्णी व सहगायिका अर्चना कुलकर्णी, वीणा देशपांडे यांनी एकल व संमिश्र गायन सेवेतून भक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, बाळासाहेब सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले बहुसंख्य स्वामी भक्त उपस्थित होते. यामध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, शंभू शिवशंकर, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, निघालो घेऊनी दत्ताची पालखी, तारकमंत्र आदींसह अनेक भावगीते गाऊन श्री चरणी सेवा समर्पित केली. या गायन सेवेत त्यांना तबल्यावर जगदीश सोनवणे, हार्मोनियमवर ओंकार पाठक, टाळावर अक्षय सरदेशमुख या संगीतकारांनी गायिका मीरा कुलकर्णी आणि सहकाऱ्यांना संगीताची साथ केली.एकल व संमिश्र गायन सेवेतून भक्त श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
पंढरीत सत्ताधारी- विरोधकात समन्वय पालिका कारभाऱ्यांच्या कामाला वेग
गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत असलेल्या पंढरपूर नगरपालिका प्रशासनाची मरगळ आता झटकली गेली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर पालिकेत लोकप्रतिनिधींचे नवे वारे वाहू लागले असून, नूतन कारभाऱ्यांच्या एन्ट्री मुळे प्रशासकीय कामकाज कमालीचे गतिमान झाले असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. यावेळीच्या निवडणुकीत पंढरपूरच्या मतदारांनी चोखंदळपणे कौल दिला आहे. नगराध्यक्षपद एका गटाला, तर सभागृहात बहुमत दुसऱ्या गटाला देऊन नागरिकांनी सत्तेचा राजकीय समतोल राखला आहे. सध्या भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहर विकासाच्या कामात सक्रिय झाल्याचे दिसते. कोणताही प्रशासकीय अनुभव पाठीशी नसताना नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी अल्पावधीतच पालिकेच्या कामकाजावर आपली पकड बसवली आहे. सुरुवातीच्या काळात काहीसा संभ्रम दिसत असला, तरी आता त्या आत्मविश्वासाने सभागृह चालवत आहेत. कॉरिडॉर विषयावर सभागृहात एकमत शहर विकासाची झाली दिशा स्पष्ट विशेष म्हणजे, विरोधी बाकांवरील भाजप नगरसेवकांनीही नगराध्यक्षांच्या पदाचा मान राखत कामकाजात सहकार्याची भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेली सर्वसाधारण सभा आणि अर्थसंकल्पीय सभा पाहता, किरकोळ शाब्दिक चकमकी वगळता कामकाज अत्यंत संयमाने आणि समन्वयाने पार पडले. विशेषत: कॉरिडॉर सारख्या संवेदनशील विषयावर सभागृहात एकमत झाल्याने शहर विकासाची दिशा स्पष्ट झाली आहे.पालिकेच्या सर्वच विभागात आता नीटनेटकेपणा आणि कामाचा वेग वाढला आहे. आव्हाने मोठी, तरी देखील आशादायी असल्याचे चित्र शहरातील धूळ, खड्डे, कचरा आणि अतिक्रमणे यासारखे मूलभूत प्रश्न एका रात्रीत सुटणारे नाहीत, याची जाणीव सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही आहे. मात्र, दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी दाखवलेला हा समन्वय आणि शहर विकासाचे ध्येय जर भविष्यातही कायम राहिले, तर पंढरपूरच्या चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. राजकीय संघर्षापेक्षा जनहित महत्त्वाचे मानून सुरू असलेला हा नवा कारभार पंढरपूरकरांसाठी नक्कीच सुखद धक्का ठरत आहे.
यमाई तलावात हजारो माशांचा मृत्यू:गंभीर घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी
पंढरपूर येथील निसर्गरम्य यमाई तलावात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तलावाच्या काठावर मृत माशांचा मोठा खच साचला असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी समाजसेवक गणेश अंकुशराव यांनी केली आहे. महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव आणि समाजसेवक बापू शिंदे यांनी यमाई तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांना मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत तरंगताना आणि काठावर पडलेले आढळले. एवढ्या मोठ्या संख्येने माशांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शनिवारी नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह यमाई तलावाची पाहणी केली. तलावातील पाणी, मृत पडलेले मासे यांची पाहणी करुन आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभागाला तलावातील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी, मासे कशामुळे मृत पावले आहेत याची चौकशी करून तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. तलावात कोणी विषारी पदार्थ तर मिसळले नाहीत ना, याची तातडीने प्रयोगशाळेत तपासणी व्हावी. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करावे. या प्रकरणात मानवी हस्तक्षेप किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करून सत्य समोर आणावे, अशी मागणी कर्ज. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला. ^यमाई तलाव हा पंढरपूरकरांसाठी पर्यटनाचे आणि विरंगुळ्याचे केंद्र आहे. या ठिकाणी विविध पक्षी आणि प्राण्यांचा राबता असतो. माशांच्या मृत्यूमुळे तलावातील पाणी दूषित झाले असण्याची शक्यता असून, याचा धोका येथील जैवविविधतेसह सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनाही होऊ शकतो. गणेश अंकुशराव, अध्यक्ष, महर्षी वाल्मीकी संघ तलावात पाणी दूषित
वाढत्या उन्हामुळे मुळा धरणातून मार्चमध्ये तब्बल १८२ दशलक्ष घनफूट पाण्याची वाफ झाली. अहिल्यानगर शहराला दररोज लागणाऱ्या १०० एमएलडी पाण्याचा विचार करता, केवळ एका महिन्यात उडून गेलेल्या या साठ्यात संपूर्ण शहराची ५१ दिवस तहान भागली असती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ दलघफू अतिरिक्त पाणी केवळ एका महिन्यात वाफेच्या स्वरूपात उडून गेले आहे. मार्च २०२६ मधील सरासरी तापमान हे मार्च २०२५ च्या तुलनेत जास्त उष्ण राहिले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत मुळा धरणातून ५ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाण्याची वाफ झाली. उन्हाळा अधिक तप्त राहिल्यास बाष्पीभवनाचा वेग वाढू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मुळा धरणाची साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफूट आहे. त्यापैकी ४ हजार ४९९ दशलक्ष घनफूट इतका मृत जलसाठा आहे. तर प्रत्यक्षात उपयुक्त साठा २१ हजार ४९७ दशलक्ष घनफूट आहे. सद्यस्थितीत १० हजार ९१२ दलघफू जलसाठा आहे. मुळा उजवा कालव्याद्वारे सुमारे ८०,००० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होतो. यात राहुरी, नेवासा, शेवगाव आणि पाथर्डी या चार तालुक्यांचा समावेश होतो. तर डाव्या कालव्याद्वारे सुमारे ५ ते ६ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ मिळतो. अहिल्यानगर शहर, एमआयडीसी, महात्माफुले कृषी विद्यापीठाला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या धरणातील जलसाठ्यावर जिल्ह्याचे अर्थकारण व स्थैर्य अवलंबून आहे. धरणाच्या जलसाठ्या वाढत्या तापमानाचा थेट परिणाम होतो. अॅक्युवेदर या संकेतस्थळावरील माहितीनुसार यंदाच्या मार्चमध्ये (२०२६) तापमानाचा पारा ३९ ते ४० अंशापर्यंत पोहोचला. तर मागील वर्षी (२०२५) सरासरी तापमान ३७ ते ३९ अंशापर्यंत राहिले. त्यानुसार मार्च २०२५ मध्ये एकूण १७७.८९ दलघफूचे बाष्पीभवन नोंदवले, तर यंदा केवळ मार्च महिन्यात १८२ दशलक्ष घनफूट पाण्याची वाफ झाल्याची नोंद झाली. त्यातून पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याचा निष्कर्ष समोर आला. उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता. मुळा धरणातून यंदा मार्चमध्ये प्रचंड बाष्पीभवन होत आहे. बाष्पीभवनाची स्थिती अशी वाढत्या तापमानासह बाष्पीभवन वेग वाढतो, परंतु मागील वर्षीच्या तुलनेत सद्य:स्थितीत बाष्प होण्याचे प्रमाण कमी आहे. २०२३ मध्ये दररोज सरासरी ६.८८ दलघफू पाण्याचे बाष्प झाले. तर २०२४ मध्ये दररोज ५.६८ दलघफू पाण्याचे बाष्प झाले. तर यंदा मार्चमधील दैनंदिन बाष्पाची स्थिती २०२६ सुमारे ६.१० दशलक्ष घनफूट राहिली. आरक्षणावर थेट असा परिणाम नाही यंदा मार्चमध्ये तापमान ३८ ते ४० अंशापर्यंत पोहोचले. त्या-त्या महिन्याच्या कालखंडातील हे तापमान जास्त आहे. परिणामी बाष्पीभवनाचा वेग वाढून त्याचा जलसाठ्यावर परिणाम होतो. टंचाई स्थितीत बाष्पीभवनाचा वेग वाढल्यास चिंता वाढते. ५१ दिवस पुरेल इतके पाणी ३० दिवसांत उडून गेले. परंतु, यंदा टंचाई नाही. त्याचा थेट परिणाम सिंचन अथवा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर होणार नाही.
शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचे केंद्र आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाच्या माध्यमातून शाळेचे नाव उंचावले, हीच शाळेची खरी संपत्ती आहे. स्नेहमेळावा हा केवळ आठवणींना उजाळा देणारा नसून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो. माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी नाळ कायम ठेवून भविष्यात शाळेच्या विकासात सहभाग घ्यावा, असे आवाहन दुर्गादेवी विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्षा लता सानप यांनी केले. तालुक्यातील जाटदेवळे येथील दुर्गादेवी विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या वर्गखोल्यांना भेट देत आठवणींना उजाळा दिला. सन २००० ते २०२६ या २६ वर्षांच्या कालावधीत शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या संस्थापक अध्यक्षा लता सानप होत्या. यावेळी मुख्याध्यापक राजाराम नाकाडे, बाबासाहेब डोंगरे, राजू शेख, महादेव दौंड, सीमा राठोड, अविनाश नेहुल, मंगेश उदमले, निलेश रुईकर, अजिनाथ शिरसाट, अर्जुन पालवे, सखाराम भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत सध्या कार्यरत असलेल्या नोकरीचे ठिकाण सांगितले. त्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांचा परिचय करून घेतला. भाषणे, मनोरंजन, गायन, आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नकला, शालेय जीवनातील गंमतीजंमती याच्या आठवणींनी वातावरणात हशा पिकला. सत्कार सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी मेळाव्याची रंगत आणखी वाढली. शालेय जीवनातील मजा, मस्ती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मिळालेली शिस्त यामुळेच आपण घडलो अशा भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. शिक्षकांचे मार्गदर्शन अन् शिस्तीनेच घडलो भाषणे, मनोरंजन, गायन, आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या नकला, शालेय जीवनातील गंमतीजंमती याच्या आठवणींनी वातावरणात हशा पिकला. सत्कार सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी मेळाव्याची रंगत आणखी वाढली. शालेय जीवनातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मिळालेली शिस्त यामुळेच आपण घडलो अशी भावना माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
कर्करोगावरील उपचारासाठी प्रत्येक तालुक्यात उपकेंद्र हवे:खासदार नीलेश लंके यांची संसदेत मागणी
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील मुख्य कर्करोग उपचार केंद्राचा विस्तार करून प्रत्येक तालुक्यात कर्करोग उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी लोकसभेत बोलताना केली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मिळणारी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत कर्करोगासारख्या गंभीर आजारासाठी अपुरी ठरत आहे. त्यामुळे स्वतंत्र ‘कर्करोग सहायता निधी’ निर्माण करावा आणि आर्थिक मदतीची मर्यादा वाढवण्याची गरज असल्याचे खासदार लंके म्हणाले. खासदार लंके यांनी लोकसभेमध्ये कर्करोग रुग्णांच्या गंभीर समस्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली. सरकारने प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर कॅन्सर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली असली, तरी ती प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गरीब रुग्णांचा जीव घोषणांवर नव्हे, तर वेळेवर आणि परवडणाऱ्या उपचारांवर वाचतो. त्यामुळे सरकारने तातडीने ठोस निर्णय घेऊन ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांना दिलासा द्यावा, असे आवाहन खासदार लंके यांनी केले.
संतांनी चंद्रभागेच्या वाळवंटात काला करून समाजातील भेदभाव दूर करत एकात्मतेची शिकवण दिली. त्याच परंपरेचा वारसा जपत आपण सीनामाईच्या वाळवंटात काला करत आहोत. त्यामुळे वारूळाचा मारुती हे ठिकाण केवळ धार्मिक नसून सामाजिक एकात्मतेचे केंद्र बनले आहे. काला हा केवळ धार्मिक विधी नसून तो समाजाला एकत्र आणणारा आणि समानतेचा संदेश देणारा संस्कार आहे, असे मत हभप सिद्धिनाथ मेटे महाराज यांनी व्यक्त केले. नालेगाव येथील वारूळाचा मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भक्तिमय वातावरणात काल्याच्या कीर्तनाने झाली. कीर्तनकार सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी आपल्या प्रभावी निरूपणातून काला म्हणजे एकात्मतेचे प्रतीक आहे असा संदेश देत उपस्थित भाविकांना संतपरंपरेतील अभेद, समता आणि भक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक शाम नळकांडे, महेश लोंढे, अभिजीत बोरुडे आदीसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्ताहादरम्यान संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीची अखंड धारा वाहत होती. पहाटे काकडा भजन, दिवसभर हनुमान चालीसा, विष्णू सहस्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी हरिपाठ आणि सायंकाळी कीर्तन व संगीत भजन असे विविध उपक्रम पार पडले. दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला. कीर्तन साथ हभप दत्तात्रय खांदवे महाराज, ओम महाराज गांगर्डे, सचिन महाराज श्रीराम, सागर महाराज पांडुळे यांनी कीर्तनास साथ दिली. महिला भजनी मंडळाने टाळांची साथ करत वातावरण भारावून टाकले, तर कृष्णा महाराज महाडिक यांनी मृदंग वादनाने कार्यक्रमात रंगत आणली. मधुकर टोणे यांनी चोपदार सेवा बजावली आणि भीमराज कातोरे यांनी वीणा साथ केली. हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हभप बाळुकाका वाघ, मनेष रोहोकले, अमन जगताप, गंगा रोहोकले, सुभाष रोहोकले, सागर वाघ, दीपक रोहोकले आदींसह स्थानिक तरुण मंडळीने परिश्रम घेतले.
पूर्वीची स्त्री घराच्या राहाटात अडकलेली होती आज तीच स्त्री शिक्षणामुळे समाजाला दिशादर्शक भूमिका बजावत आहे. समाजाचे बंधन तोडून आजची स्त्री समाजात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे, असे प्रतिपादन कवी नारायण सुमंत यांनी केले. कल्पना हिरालाल महानुभाव यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याच्या दिवशी त्यांनी लिहिलेल्या पोस्टर पैलवान या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात सुमंत बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते चिन्मय उदगीरकर तर अध्यक्ष म्हणून गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे उपस्थित होते. अभिनेते चिन्मय उदगीरकर म्हणाले, आजचे तरुण कोणतेही लेखन करताना दिसत नाही. मोबाइलने सगळे लेखन संपवून टाकले आहे. त्याचप्रमाणे लोकांचा वाचनाचा छंद संपला आहे. साहित्य परंपरा संपली तर मराठी भाषा व साहित्याची गंगा पुढे वाहणार कशी याची जास्त काळजी वाटते. मात्र महानुभाव यांचे पोस्टर पैलवान कथासंग्रह समाजाला दिशादर्शक ठरणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. हिरालाल महानुभाव, कल्पना महानुभाव, राजेंद्र जाधव, कैलास ठोळे, आदिनाथ ढाकणे, ऐश्वर्या सातभाई, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे आदी उपस्थित होते.
मोबाइलचे वाढते व्यसन कमी करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक व गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी त्यांनी विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथर्डी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड होते. कळमकर यांनी आपल्या विनोदी शैलीत दूरदर्शन मालिका आणि मोबाइलवरील संवादांमुळे पाल्यांकडे होणारे दुर्लक्ष ही भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले. पालकांनी जागरूक राहून मुलांमध्ये वाचनाची सवय आणि मैदानावरील खेळांची आवड निर्माण करावी, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांनी मुलांचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षण मातृभाषेतून झाले पाहिजे, यासाठी मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक लोकधारा सादर करत विविध नृत्य, गीते आणि नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. ‘देश नावाचं घर’ या गीतावर उपस्थितांनी ठेका धरला. पालकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शेषराव पाखरे यांनी केले. यावेळी नाथबाबा देवस्थानचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जायगुडे, बाळासाहेब मारकळी, दिलीप गायकवाड, नेत्रा लॉन्सचे अनिल डोले, धनुभाऊ काशीद, रामेश्वर चोपडे, राजेंद्र जायभाय, राजेंद्र मुंगसे, सिताराम सावंत, रवींद्र कडू, विठ्ठल कांगुणे, बाळासाहेब गोल्हार आदींसह तसेच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष भांबरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रंगनाथ गुंजाळ, रतनबाई महांडुळे, प्रणिता कुलकर्णी, यमुना वासाल, मंदाकिनी हडप आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुभाष चव्हाण यांनी केले.
पारोळा तालुक्यातील शेळावेसह परिसरातील चिखलोद, मोहडी, दगडी सबगव्हाण, खेडी, रत्नापिप्री आणि भोकरबारी या भागात गेले दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे काढणीला आलेल्या मका, हरभरा, बाजरी आणि ज्वारी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, सोसाट्याचा वारा आणि पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मका आणि ज्वारीचे पीक जमिनदोस्त झाले आहे. तर हरभरा पिकाचेही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांसोबतच कापणी करून ठेवलेल्या पिकांचीही पावसामुळे माती झाली आहे. या भागातील नुकसानग्रस्त पिकांचे कृषी विभाग आणि महसूल विभागाने तात्काळ संयुक्त पंचनामे करावेत, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत. शासनाने विलंब न लावता भरपाई देण्याची मागणी आहे. आठ गावांमधील शेकडो हेक्टरवरील पिके बाधित आधीच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत होता, त्यात आता या अवकाळी पावसाने उरलीसुरली आशाही संपवली आहे. शेळावे व परिसरातील सात-आठ गावांमधील शेकडो हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यामुळे बी-बियाणे, खते आणि मशागतीचा खर्चही निघणे कठिण आहे.
भगवान महावीरांनी विश्वशांती आणि सुखी संसारासाठी धर्म आणि मोक्ष या पुरुषार्थांचे महत्त्व सांगितले आहे. मानवाने नीती आणि न्यायाच्या मार्गानेच जीवन जगले पाहिजे. महावीरांनी दिलेली अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह ही पाच तत्वे अंगीकारल्यास मानवी जीवन सुखी व समृद्ध होईल, असा उपदेश आचार्य विद्यानंद महाराज यांनी केला. येथील गुजराथी गल्लीतील जैन उपाश्रयात भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित मंगल प्रवचनात ते बोलत होते. आचार्य विद्यानंदजी महाराज यांनी आपल्या प्रवचनात वीर आणि महावीर यांमधील सूक्ष्म फरक स्पष्ट केला. जो बाह्य समृद्धीसाठी युद्धात विजय मिळवतो तो वीर असतो; परंतु जो राग, द्वेष, मोह, माया आणि लोभ यांसारख्या अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवतो, तोच खरा महावीर म्हणून ओळखला जातो, असे त्यांनी नमूद केले. महावीरांनी कठोर तपश्चर्या आणि आत्मसंयमातून केवलज्ञान प्राप्त करून जगाला दया, आणि शांततेचा संदेश दिला.
उमराणे येथे कला-सांस्कृतिक स्पर्धा:उमराणे येथे कला-सांस्कृतिक स्पर्धा
येथील स्व. रंगनाथ देवरे प्रणित ग्रामहितवादी युवक संघटनेतर्फे आयोजित कला-सांस्कृतिक स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या चुरशीच्या स्पर्धेत छत्रपती विद्यालय (उमराणे) आणि के.बी. पाटील स्कूल (उमराणे) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत यंदाचा मानाचा रामेश्वर कला सन्मान आपल्या नावावर केला. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी आणि युवक-युवतींच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघटनेमार्फत दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी आपला कलाविष्कार सादर केला. बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती प्रविण दामू देवरे होते. महाकृषक फार्मर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक उज्ज्वल पांडुरंग देवरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी सुभाष गायकवाड, प्रकाश ओस्तवाल, प्रविण बाफणा, विनोद पाटणी, उत्तम देवरे, प्रकाश देवरे यांच्यासह अनेक मान्यवरांकडून विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. लहान गट: प्रथम- विजया पगारे व किंजल गायकवाड, द्वितीय- रामेश्वर ग्रुप व प्रफुल्ल जमदाडे, तृतीय- अर्णवी पवार व अर्जुन देवरे ग्रुप. मोठा गट: प्रथम- ऋतुजा जगताप, द्वितीय- आदिवासी ग्रुप व अवि गायकवाड ग्रुप, तृतीय- कांतारा ग्रुप.
निफाड तालुक्यात गुरुवारी (दि.२) झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना जबर फटका बसला आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील रुई, धानोरे, खेडलेझुंगे, कोळगाव, कानदळ, देवगाव, शिरवाडे वाकद, नांदगाव तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या दरम्यान वातावरणात अचानक बदल झाला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या सुरुवातीलाच झालेल्या गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या काढणीच्या टप्प्यावर असलेल्या द्राक्षबागा, कांदा, गहू, मका व डाळिंब पिकांवर गारांचा मारा झाल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. द्राक्ष घडांना तडे जाणे, कांदा पिके आडवी होणे व गव्हाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिकांच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी रुई येथील शेतकरी ज्ञानेश्वर तासकर यांनी केली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. नुकसानीची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे नेते कुणाल दराडे यांनी नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत संपूर्ण शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करा. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करा, म्हणजे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशी विनंती केली. यावेळी लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक विजय सदाफळ व शेतकरी उपस्थित होते. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे दोन एकरावरील मका जमीनदोस्त झाला आहे. एकरी ३५ ते ४० हजार रुपये केलेला खर्च वाया गेला आहे. नुकसान मोठे असल्याने शासनाने तातडीने पंचनामे करत उत्पादन खर्चाच्या तुलनेत नुकसान भरपाई द्यावी. - छाया कानदळकर, शेतकरी, धानोरे
सामोपचाराने पानंद रस्त्याची वाट मोकळी:आखतवाडे येथील शेतकऱ्यांचा तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला पानंद रस्ता वादाचा प्रश्न अखेर सामोपचाराने मार्गी लागला आहे. तहसीलदार कैलास चावडे यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, दोन्ही बाजूंच्या शेतकरी बांधवांनी वादावर पडदा टाकत आपल्या शेतातून रस्ता खुला करण्यास लेखी संमती दर्शवली आहे. आखतवाडे येथील दादाजी देसले आणि केशव देसले यांनी नवीन रस्त्यासाठी कलम १४३ अंतर्गत तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या प्रस्तावामध्ये मधुकर शिंदे, जितेंद्र शिंदे, नंदू शिंदे, रेखा जगन्नाथ भामरे, सुमनबाई देवरे आणि माणिक शिंदे यांच्या शेतातून रस्ता जाणे प्रस्तावित होते. जमिनीचा तुकडा आणि रस्त्याचा हक्क यावरून हा विषय तांत्रिक पेचात अडकला होता. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार, महसूल विभागातील प्रलंबित प्रश्न सामोपचार आणि संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार तहसीलदार चावडे यांनी आपल्या दालनात दोन्ही पक्षकारांची संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत वादापेक्षा सहकार्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे पटवून देण्यात आले. सातबाऱ्यावर होणार रस्त्याची नोंद यावेळी यशवंतराव महाराज यांच्या मूर्तीला साक्षी ठेवून दोन्ही पक्षांनी अत्यंत सामंजस्याने रस्ता देण्यास लेखी संमती दिली. विशेष म्हणजे, या नवीन रस्त्याची नोंद शासन निर्णयानुसार संबंधित सातबारा उताऱ्यावर घेण्यासही दोन्ही पक्षांनी मान्यता दिली आहे. या संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेत ॲड. प्रकाश वाघ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
चापानेरमध्ये सप्ताहाची सांगता:प्रभू राम यांच्या आदर्शाचे अनुकरण करावे- धर्मगुरू अमृतनाथ स्वामी
ज्ञान कर्मात उतरते तेव्हा राम घडतो. प्रभू रामचंद्रांच्या आदर्शाचे अनुकरण जगाने करावे, असे आवाहन बीड येथील धर्मगुरू अमृतनाथ स्वामी बीड यांनी केले आहे. कन्नड तालुक्यातील चापानेर येथे शुक्रवारी अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. यावेळी काल्याच्या कीर्तनात त्यांनी उपस्थित भाविकांनी उपदेश दिला. धर्मगुरू अमृतनाथ स्वामी पुढे म्हणाले की, अमेरिका, इराण या देशांनी शांतता, संयम, मर्यादा अमलात आणाव्या. आजच्या युद्धामुळे जग महागाईने भरडले जात आहे, याचेही भान ठेवावे, असेही ते म्हणाले. समाजात माणुसकी, संयम जपला तर खऱ्या अर्थाने कल्याणकारी रामराज्य होईल. बदलत्या समाजात मानवी मूल्यांचा ऱ्हास होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. साधू, संत, सत्य, संयम, सुमार्गावर चालण्याचा उपदेश जीवनात तंतोतंत पाळा, असा संदेश त्यांनी दिला. यानिमित्त आठ दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण झाले. श्री शिव महापुराण कथा झाली. साधु संतांच्या अमृतव णीतून प्रवचन झाले. गावकरी, पंचक्रोशीतील स्त्री-पुरुषांनी भक्तिमय वातावरणात आनंद घेतला. दररोज पहाटे काकडा भजन झाले. सकाळी ११ ते ३ हनुमंत चरित्र कथा, सायंकाळी हरिपाठ झाला. रात्री ९ ते १२ नामांकित कीर्तनकारांचे हरि कीर्तन झाले. यात शिवानंदप ्रगिरीजी महाराज, दत्तात्रय महाराज, श्रावण महाराज, ज्ञानेश्वर महाराज, चंद्रकांत महाराज, ज्ञानेश्वर महाराज तांबे सहभागी झाले. दररोज सात दिवस विविध कार्यक्रम झाले. समस्त ग्रामस्थांतर्फे दिला महाप्रसाद यावेळी दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद उपस्थित भाविकांना वाटप करण्यात आला. यानंतर गावकरी, पंचक्रोशीतील भाविकांसाठी हनुमान भक्त मंडळ, समस्त ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाची चोपदाराची भूमिका श्रीहरी गुंजाळ, शिवाजी दिवंगे यांनी सांभाळली. सप्ताहासाठी हनुमान मंडळ, नवयुवक तरुण मंडळींनी पुढाकार घेतला.
सिल्लोड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन आठवडे उलटले तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. ६ एप्रिलपर्यंत सदरील पंचनामे पूर्ण करून अहवाल प्रशासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील महिन्यापासून तीन वेळा तालुक्यात अतिवृष्टी व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील आमठाणा मंडळमधील १२ गावे, याशिवाय अंभई, पिंपळगाव, केळगाव, शिरसाळा, गोळेगाव (खुर्द), गोळेगाव (बुद्रुक),पानस, काजीपूर आदी गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यात गहू, मका, कांदा सीड, हरभरा व भाजीपाला पिकांचा समावेश आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाल्यावर तहसीलदार संजय देवराये, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार व तालुका कृषी अधिकारी संदीप गायकवाड यांनी तत्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना सदरील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार कृषी सेवक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांनी सदरील नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली. सोमवारपर्यंत (दि. ६) सदरील पंचनामे सादर करण्याबाबतचे आदेश तहसीलदार संजय देवराये यांनी दिले. तालुक्यातील जवळपास ३५ गावांमधील ३५२ जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. यात १२०० पेक्षा जास्त शेतकरी बाधित असून ३३ % नुकसान असल्यास शासकीय मदतीसाठी शेतकरी पात्र ठरणार आहे. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुक्ताराम पाटील गव्हाणे म्हणाले, आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शासनाला सादर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी नसता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यात येईल. सिल्लोड तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप म्हणाले, तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे करण्याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. लवकरच सदरील पंचनामाचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात येईल. नुकसानग्रस्तांचे पंचनामे केली जातील. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन बराच कालावधी उलटला. अतिवृष्टी होताच अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला मदतीचे आश्वासन दिले, परंतु अद्याप पंचनामे करण्याबाबत संबंधित यंत्रणेने केलेली दिरंगाई शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली दिसते. कारण आता पंचनामे करताना झालेले नुकसान दिसेल असे वाटत नाही. प्रशासनाचे वरातीमागून घोडे मदत द्या, अन्यथा आंदोलन करू ः मुक्ताराम गव्हाणे ३५ गावांमधील १२०० हून अधिक शेतकरी बाधित
शेंद्रा कमंगर (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील प्रसिद्ध मांगीरबाबांच्या यात्रेला रविवारी (दि. ५) मध्यरात्री महाआरतीने सुरुवात होणार असून ही यात्रा सलग चार दिवस चालणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसरात उत्साहाचे वातावरण असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मांगीरबाबांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यांतील भाविक लाखोंच्या संख्येने यात्रेत सहभागी होतात. यात्रा काळात नियमित रेल्वे थांबा नसतानाही भाविकांच्या सोयीसाठी किमान तीन दिवस रेल्वे गाड्यांना येथे थांबा दिला जातो, हे या यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते. यात्रेच्या तयारीसाठी मागील पंधरवड्यापासून ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या वतीने विविध सोयी-सुविधांची कामे जोमात सुरू आहेत. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, वीज पुरवठा तसेच वाहतूक व्यवस्था यांचे नियोजन करण्यात आले आहे. सरपंच पुष्पा कचकुरे, उपसरपंच सर्जेराव कचकुरे, ग्रामविकास अधिकारी नामदेव चव्हाण, देवस्थान समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे व सचिव सुरेश नाईकवाडे हे या कामात पुढाकार घेत आहेत. यात्रेच्या नियोजनासाठी नुकतीच शेंद्रा येथे तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीस गटविकास अधिकारी मीना रायताळे, पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती तसेच महावितरणचे अधिकारी उपस्थित होते. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन सतर्क राहणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडील विद्यमान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह देवस्थान समितीच्या वतीने अतिरिक्त कॅमेरे बसविण्यात आले असून विविध ठिकाणी ध्वनिक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली. उष्णतेची तीव्रता, काळजीचे आवाहन : उष्णतेची तीव्रता अधिक असल्याने भाविकांनी यात्रेला येताना छत्री, पांढरे रुमाल, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व आवश्यक साहित्य सोबत ठेवावे, असे आवाहन ग्रामपंचायत व देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रेदरम्यान भाविकांनी स्वतःची काळजी घेत सुरक्षित दर्शन घ्यावे.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण व लोकार्पण सोहळा ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीदिनी पैठणमध्ये होणार आहे. या निमित्ताने बीडकीन ते पैठण अशी ऐतिहासिक, भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी स्वखर्चातून खुलताबाद येथे या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे पूर्णाकृती पुतळे तयार करून घेतले आहेत. समाजप्रबोधनाच्या या कार्यामुळे शहरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. मिरवणुकीची सुरुवात सकाळी बीडकीन येथून होणार आहे. ढोरकीन, धनगाव, जैन स्पिनर, पिंपळवाडी, राहूलनगर, कातपूर मार्गे मिरवणूक सायंकाळी सह्याद्री चौक, पैठण येथे भव्य स्वरूपात दाखल होईल. विविध गावांमध्ये नागरिकांकडून मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत होणार आहे. सायंकाळी ८ वाजता हुतात्मा स्मारक, कोर्ट रोड, पैठण येथे पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण होईल. अध्यक्षस्थानी खा. संदीपान भुमरे असतील. उद्घाटन आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते होईल. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे आदी उपस्थित राहतील. अशी माहिती दिलीप जगताप यांनी दिली आहे.
खरातचे ऑपरेटर हिंगे अन् आवारेची 15 तास चाैकशी:पाेलिसांना गुंगारा देत मुलगा नाशिकमधून गायब
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एसआयटीने खरातचे ऑपरेटर समजले जाणारे कथित पीए रमेश हिंगे आणि जगदंब पतसंस्थेचा संस्थापक नामकर्ण आवारे यांची शनिवारी (४ एप्रिल) १५ तास कसून चौकशी केली. दोघांनीही खरातसोबतच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध नसल्याची उत्तरे दिली असली तरी त्यांना दोन दिवसांत पुन्हा चौकशीला बोलवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, खरातचा मुलगा नाशिकमधून गायब झाल्याने तपासात अडचण वाढली असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, शिर्डीतील महिलेच्या माध्यमातून खरातनेच नीरज जाधवला अडकवण्याचा सापळा रचल्याचे तपासात पुढे येत आहे. १८ फेब्रुवारीला शिर्डीत खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवविरोधात एका महिलेने ब्लॅकमेलिंगची तक्रार केली. मात्र, त्याच्या मोबाइलमध्ये फोटो वा व्हिडिओ आढळून आले नसल्याचे कळते. ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीपासून सुरू झालेला हा तपास पतसंस्थांमधील संशयास्पद आर्थिक व्यवहारांपर्यंत पोहोचला. ज्यामुळे नीरजला अडकवायला गेलेले अशोक खरात अन् त्याचे दोघे ऑपरेटरच आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. व्यवस्थापकही रडारवर जगदंब पतसंस्थेत खरातने उघडलेल्या ३२ खात्यांसंदर्भात व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांचीही शिर्डी पोलिसांनी चार तास चौकशी केली. खातेदार असलेल्या एकाही व्यक्तीचा आजपर्यंत संस्थेची संपर्क आला नाही. सर्व खात्यांची कागदपत्रांची पूर्तता खरातनेच केल्याचे त्यांनी सांगितले. जाधवला अडकवण्याचा सापळा रचल्याचे तपासात पुढे येत आहे. १८ फेब्रुवारीला शिर्डीत खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधवविरोधात एका महिलेने ब्लॅकमेलिंगची तक्रार केली. मात्र, त्याच्या मोबाइलमध्ये फोटो वा व्हिडिओ आढळून आले नसल्याचे कळते. ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीपासून सुरू झालेला हा तपास पतसंस्थांमधील संशयास्पद आर्थिक व्यवहारांपर्यंत पोहोचला. ज्यामुळे नीरजला अडकवायला गेलेले अशोक खरात अन् त्याचे दोघे ऑपरेटरच आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.
शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या गँगवॉरमध्ये तिघे ठार झाले. ही घटना कॅनॉल रोडवर घडली. धुरंधर चित्रपट पाहून दुचाकीवर जाणाऱ्या तिघांवर विरुद्ध टोळीतील गुंडांनी हल्ला केला. त्यात एका टोळीतील अर्जितसिंग चव्हाण (२५) याचा मृत्यू झाला, तर हल्ला करणाऱ्या टोळीतील मोहंमद अरबाज (२३) आणि सय्यद आवेज (२७) हे जखमी झाले. रस्त्यावरील वादात ठार झालेल्या अर्जितसिंगच्या धाकट्या भावाने बदला घेण्यासाठी ताबडतोब सरकारी रुग्णालय गाठले आणि आपल्या भावाचा खून करणाऱ्या मोहंमद अरबाज व सय्यद आवेज यांच्यावर चाकूहल्ला करत त्यांना ठार केले. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कॅनॉल रोड परिसरात दोन टोळ्यांमध्ये वाद झाला. अर्जितसिंग चव्हाण हा धुरंधर-२ चित्रपट पाहून अन्य दोघांसह दुचाकीने घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहंमद अरबाज व इतर काही हल्लेखोरांनी तलवार व खंजीरने हल्ला केला. त्यात अर्जितसिंग चव्हाणचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या साथीदारांनी प्रतिकार केल्याने मोहंमद अरबाज व सय्यद आवेज हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले. दोन्ही टोळ्यांत वर्चस्वातून धुसफूस काही महिन्यांपासून दोन्ही टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद सुरू होता. यापूर्वीदेखील दोन्ही टोळ्यांचे सदस्य समोरासमोर आले होते, परंतु त्यांच्यात खुनी हल्ला टळला होता. चव्हाण याच्यावर अत्यंत नियोजनपूर्वक हल्ला झाल्याने या कटात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. चाकू घेऊन सरकारी रुग्णालयात हल्लेखोरांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची बाब मृत अर्जिंतसिंगचा धाकटा भाऊ राजेशला समजली. तो सरकारी रुग्णालयातील अपघात विभागात गेला. त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख चाकूने वार करत मारले. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बारामती पोटनिवडणूक:बिनविरोधला विरोध, सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार देण्यावर काँग्रेस ठाम
बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक पॉवर गेम पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामतीत बिनविरोध निवडणूक व्हावी, असा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. महाविकास आघाडीतील शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही बिनविरोधची भूमिका घेतली. मात्र, काँग्रेसने त्याला धक्का दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट उद्धव ठाकरे, शरद पवारांच्या वर्चस्वाला आव्हान देत उमेदवार उभा करण्याची भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. विशेष म्हणजे सपकाळांच्या भूमिकेला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विरोध दर्शवला आहे. २३ एप्रिल रोजी ही निवडणूक होत असून सोमवारी सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे. काही राजकीय जाणकार असेही सांगत आहेत की, वरकरणी शरद पवारांनी बिनविरोधला पाठिंबा दिला असला तरी ते आतून काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करून सुनेत्रा यांच्या पराभवासाठी डाव रचू शकतात. सुनेत्रा पवार : मतदारसंघावर पकड निर्माण करण्याची संधी अजित पवारांच्या निधनांतर सुनेत्रा पवार तसेच जय आणि पार्थ पवार यांची ही पहिलीच निवडणूक आहे. ती बिनविरोध झाली, तर सुनेत्रा यांचे नेतृत्व कौशल्य अधिक प्रभावीपणे समोर येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांचा प्रभाव असलेल्या बारामती विधानसभेवर पूर्ण पकड निर्माण करता येईल. हर्षवर्धन सपकाळ : विधान परिषदेतील एकमेव जागा खेचण्यासाठी मोर्चेबांधणी राज्यसभा निवडणुकीत उद्धवसेना, शरद पवारांविरुद्ध माघार घ्यावी लागली. आता त्या दोघांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेऊन विधान परिषदेतील एकमेव जागा खेचण्याची मोर्चेबांधणी दिसते. बारामती विधानसभा निवडणूक २०२४ उमेदवार एकूण मते टक्केवारी (%)अजित पवार १,८१,१३२ ६६.१३%युगेंद्र पवार ८०,२३३ २९.२९% विधान परिषदेत परीक्षा होईल शरद पवार हेच मविआचे आधारस्तंभ आहेत. ते बारामती बिनविरोधवरून मविआत फाटाफूट होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतील. अर्थात त्याची खरी परीक्षा येत्या विधान परिषदेत निवडणुकीतच होईल. देवेंद्र फडणवीस : राज्यात प्रभावी नेतृत्वाचा संदेश विरोधकांतही आपले नेतृत्व प्रभावी, असे फडणवीसांना दाखवून द्यायचे आहे. म्हणूनच ते आर. आर. आबांच्या निधनानंतर भाजपने निवडणूक बिनविरोध केली होती, अशी आठवण काँग्रेसला करून देत आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष पटोले त्यांच्या बिनविरोध आवाहनाला पाठिंबा देत आहेत. शरद पवार : दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाचा मार्ग मोकळा ही निवडणूक माझ्यामुळेच बिनविरोध होत आहे, असे शरद पवार दाखवून देऊ इच्छितात. यातून सुनेत्रा पवारांशी दुरावलेले संबंध सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाचा मार्ग बिनविरोधमुळेच सुकर होईल, असे त्यांना वाटत असावे. उद्धव ठाकरे : मराठा समाजाला संदेश देणे आणि स्वत:च्या आमदारकीसाठी पायाभरणीसुनेत्रा पवारांना पाठिंबा दिल्यास मराठा समाजात चांगला संदेश जाईल. तसेच विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने विरोध केल्यास सुनेत्रांचा पाठिंबा मिळेल, असे उद्धव ठाकरेंचे गणित आहे.
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता:डोंगरी प्रदेशात बर्फ; मैदानी भागात पाऊस
महाराष्ट्रात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात रविवारी ठिकठिकाणी पाऊस, वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. 6 एप्रिलपासून तापमानात वाढ सुरू होईल. दुसऱ्या आठवड्यात उन्हाचा कडाका वाढू शकतो. राज्यातील अवकाळी पावसाचे दिवस संपले असून 6 एप्रिलपासून राज्यात पुन्हा उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेले आठ दिवस राज्यातील विजांच्या कडकडाटासह गारपीट अन् पाऊस सुरू होता. 6 एप्रिलपर्यंत विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ या भागातच हलक्या पावसाचा अंदाज आहे. उर्वरित भागातून पाऊस पूर्ण कमी झाला आहे. त्यामुळे 7 एप्रिलपासून पुन्हा उकाड्यात वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला. देशात वादळी पावसाचे आणखी दोन टप्पे येणार, 15 एप्रिलनंतर हळूहळू तापमान वाढेल पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतात हवामानाचा मिजाज बदलला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये शनिवारी बर्फवृष्टी झाली. भूस्खलनामुळे श्रीनगर-लेह आणि जम्मू-श्रीनगर महामार्ग अनेक ठिकाणी बंद झाला आहे. उत्तराखंडमध्ये 3 दिवसांपासून केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीमध्ये हलकी ते मध्यम बर्फवृष्टी होत आहे. यामुळे चारधाम यात्रेच्या तयारीवर परिणाम होत आहे. मैदानी भागातही पाऊस झाला. हवामान विभागानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील 10 दिवसांत आणखी दोन वेळा वादळ, पाऊस आणि गारपिटीचा फेरा येईल.6 एप्रिलपासून तापमानात वाढ सुरू होईल. आज पंजाब, हरियाणात वादळी पावसाची शक्यता
ठाणे जिल्ह्याच्या शिवसेनेच्या इतिहासावरून आणि नेतृत्वाच्या वर्चस्वावरून महायुतीमधील दोन बड्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शौर्याला गणेश नाईकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, त्यांनी स्वतःच्या निष्ठेचा प्रवास तपासावा,’ अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते गणेश नाईक यांना सुनावले आहे. नाईक यांनी शिवसेनेच्या जुन्या इतिहासाचा दाखला देत शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याने हा वाद उफाळला आहे. इतिहासाचा आधार की वर्तमानाचे वर्चस्व? : गणेश नाईक यांनी पालघरमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची क्रीडावली मांडताना आनंद दिघे यांच्याआधी आपले नाव असल्याचे सांगून राजकीय ज्येष्ठत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, “काही लोक स्वतःला वाचवण्यासाठी पदे बदलतात,” या त्यांच्या विधानाने शिंदे गट आक्रमक झाला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी नाईकांच्या विधानाचा उपरोधिक समाचार घेताना त्यांना थेट “रुग्णवाहिका’ पाठवण्याचा सल्ला दिल्याने वादात तेल ओतले गेले आहे. शिंदेसेना गटाचे जशास तसे उत्तर आतापर्यंत संयम राखणाऱ्या शिंदे गटाने आता जशास तसे उत्तर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निष्ठेवर बोट ठेवल्याने कोअर कमिटीने आक्रमक पवित्रा घेतला असून उदय सामंत आणि नरेश म्हस्के यांची विधाने हा त्याच रणनीतीचा भाग मानला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत हा वाद पेटण्याची शक्यता आहे.
मुंब्र्यातील राजकीय वातावरण सध्या तापले असून महायुती सरकारमधील भाजपचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि जैन मुनी नीलेशचंद्र महाराज यांच्या आक्रमक विधानांनी नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुंब्र्यात झालेल्या एका जाहीर सभेत मंत्री राणे यांनी “मुंब्र्याचे नाव बदलून मुंबादेवी करू’ असा निर्धार व्यक्त केला, तर दुसरीकडे जैन मुनींनी राणेंची तुलना थेट महापुरुषांशी केल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. राणे हिंदुत्वाचे रक्षक आहेत : नीलेशचंद्र जैन मुनी नीलेशचंद्र महाराज यांनी नितेश राणे यांचे गुणगान करताना त्यांना “हिंदुत्वाचा रक्षक’ आणि “वाघ’ संबोधले. “जेव्हा जेव्हा पृथ्वीवर राक्षस जन्माला येतात तेव्हा नितेश राणेंसारखे नेते जन्म घेतात,” असे विधान करत त्यांनी राणेंची तुलना थेट महापुरुषांशी केली. इतकेच नव्हे तर “नितेश राणे हे मुख्यमंत्री व्हायला हवेत,” अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर टीका करताना, “तुझा बाप मुंब्र्यात आलाय,” अशी अत्यंत तिखट टिप्पणी मुनींनी केली. मुंब्रा हे कुणाच्या अब्बाचे नाही : राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंब्र्यात आयोजित सभेत बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “मुंब्रा कुणाच्या अब्बाचे नाही, ही मुंबादेवीची भूमी आहे,’ अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. इस्लामपूरचे नामांतर ज्याप्रमाणे “ईश्वरपूर’ झाले त्याच धर्तीवर मुंब्र्याचे नामांतर “मुंबादेवी’ करण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
पुणे मनपाकडून अनधिकृत ओव्हरहेड केबल्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेक भागांत इंटरनेट सेवा विस्कळीत झाली असून, ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आयटी अभियंत्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे कामकाज ठप्प होण्याच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, एआयमुळे आधीच नोकरी गमावण्याची टांगती तलवार असताना त्यात इंटरनेट बंद झाल्याने कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. सातारा रस्ता, पुण्याईनगर आणि धनकवडी परिसरात अतिक्रमण, अग्निशमन व विद्युत विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दोन ट्रकभर केबल जप्त केल्या. या कारवाईनंतर काही वेळातच संबंधित भागातील इंटरनेट सेवा खंडित झाली. अंडरग्राउंड केबल टाकण्यासाठी प्रतिकिलोमीटर १ ते दीड कोटी खर्च येत असल्याची माहिती आहे. केबलचे गणित असे प्रति किलोमीटर खर्च: सुमारे १ ते १.५ कोटी रुपयेरस्ता खोदाई शुल्क: १२,५०० रुपये (प्रतिमीटर)महापालिकेच्या अटी: किमान ५० मीटर खोदाई बंधनकारक, काम केवळ रात्रीच करणे अनिवार्य.सध्या पुणे मनपाकडून केबल काढण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांची दुहेरी कोंडी सध्या आयटी आणि इतर क्षेत्रांमध्ये “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मुळे आधीच नोकऱ्या कपातीची टांगती तलवार आहे. अशातच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे इंटरनेट अचानक बंद पडल्याने कामे ठप्प झाल्याने दुहेरी कोंडी झाली आहे.
भारताच्या मध्यभागी ग्वाल्हेर नावाचे एक शहर वसलेले आहे. या शहरात महान गायक तानसेनची समाधी आहे. तानसेन आजवर होऊन गेलेल्या महानतम संगीतकारांपैकी एक होते. तानसेनच्या सुंदर कोरीवकाम केलेल्या दगडी समाधीशेजारीच एक चिंचेचे छोटेसे झाड उभे आहे. अशी श्रद्धा आहे की, या झाडाचे एक पान खाल्ल्याने आणि समाधीला स्पर्श केल्याने, एखाद्या गायकाचा आवाज अधिक सुमधुर होऊ शकतो. जर हे एखाद्या जादूसारखे वाटत असेल, तर तानसेनची जीवनकथाही तितकीच जादुई आहे. आजही, अनेक प्रसिद्ध संगीतकार तानसेनने निर्माण केलेल्या संगीतशैलीचे अनुसरण करतात. हीच गायन शैली पुढे 'ग्वाल्हेर घराणा' म्हणून ओळखली जाऊ लागली. आजच्या रागदरबारात आपण तानसेनबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांनी कसे दीप राग गाऊन दीप प्रज्वलित केले याची कहाणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.. सुमारे 500 वर्षांपूर्वी, ग्वाल्हेरजवळील एका गावात मुकुंद पांडे नावाचे एक धनवान कवी आणि त्यांची पत्नी राहत होते. त्यांचे दुःख हे होते की, त्यांना कोणतीही संतती नव्हती. एका मित्राच्या सल्ल्यावरून, पांडे ग्वाल्हेरला गेले. तिथे त्यांनी प्रसिद्ध संत आणि संगीतकार मोहम्मद गौस यांचे आशीर्वाद घेतले. मोहम्मद गौस यांनी पांडेंच्या हातावर एक पवित्र धागा बांधला आणि म्हटले, 'ईश्वर तुम्हाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देवो.' आणि तसेच घडले. एका बाळाचा जन्म झाला आणि त्याचे नाव 'रामतनू' ठेवण्यात आले. जे पुढे तानसेन या नावाने ओळखले जाऊ लागले. तानसेन जसजसे मोठे होऊ लागले, तसतसे त्यांच्या वडिलांनी लिहायला-वाचायला शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली. मात्र, तानसेनला अभ्यासापेक्षा जंगलात जाऊन वेळ घालवण्यात अधिक रस होता. तिथे ते पक्षी आणि प्राण्यांच्या आवाजांची हुबेहूब नक्कल करत असत. लहानग्या तानसेनने वाघाचा आवाज काढून घाबरवले एकदा गायकांचा एक गट अरण्यातून प्रवास करत होता. तानसेनने झुडपांमध्ये लपून वाघासारखी गर्जना केली. तो आवाज इतका हुबेहूब होता की, ते गायक भयभीत झाले. जेव्हा तो मुलगा समोर आला, तेव्हा त्या गटाच्या प्रमुखाने त्याच्या वाघासारख्या गर्जनेचे कौतुक केले. त्यामुळे प्रोत्साहित होऊन, तानसेनने आणखी काही प्राणी आणि पक्ष्यांचे आवाज काढले. तानसेनच्या या सादरीकरणाने ते प्रमुख अत्यंत प्रभावित झाले. हे प्रमुख म्हणजेच प्रसिद्ध संगीत शिक्षक, हरिदास होते. हरिदासांनी तानसेनला आपला शिष्य म्हणून स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्याच्या अंगी संगीताची प्रचंड प्रतिभा आहे, असे हरिदास तानसेनच्या वडिलांना म्हणाले. अत्यंत जड अंतःकरणाने, तानसेनच्या आईने आपल्या एकुलत्या एक मुलाला हरिदासांकडे शिक्षण घेण्यासाठी वृंदावनला पाठवण्यास संमती दिली. गुरु हरिदासांकडे संगीताचे धडे जवळपास दहा वर्षे तानसेनने हरिदासांकडे संगीताचा अभ्यास केला. 'सा, रे, ग, म, प, ध, नि, सा' या मूलभूत स्वरांपासून सुरुवात करून, तानसेनने गायन आणि तानपुरा वादनाची मूलतत्त्वे आत्मसात केली. तानसेनने भारतीय संगीतातील विविध रागांची माहिती घेतली आणि प्रत्येक राग कशा प्रकारे एक वेगळाच भाव निर्माण करतो, हे समजून घेतले. एखादा राग तुम्हाला इतका आनंदी करू शकतो की तुम्हाला नाचण्याची इच्छा व्हावी, किंवा एखादा राग तुम्हाला इतका उदास करू शकतो की तुमच्या डोळ्यांत अश्रूही तरळून जातात. तानसेन यांचा गुरु हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे शिक्षण सुरू होते आणि अचानक एके दिवशी घरून असा निरोप आला की, तानसेनचे वडील खूप आजारी आहेत. जेव्हा तानसेन घरी पोहोचला, तेव्हा त्यांना त्याचे वडील अंथरुणाला खिळलेले दिसले. गुरु शिष्य परंपरेचे घडवले दर्शन तानसेनला बघून त्याचे वडील म्हणतात, तू एक संगीतकार बनलास, याचा मला आनंद आहे. जा आणि मोहम्मद गौस यांना भेट, आणि हे शब्द त्यांचे अखेरचे शब्द ठरले. तानसेन आपल्या आईची सेवा करण्यासाठी घरीच थांबला होता. परंतु एका वर्षाच्या आतच आईचेही निधन झाले. आता तानसेन आपल्या वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यास, म्हणजेच मोहम्मद गौस यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेण्यास मुक्त झाला होता. परंतु, भारतीय परंपरेचे पालन करत, नवीन गुरूंकडे शिक्षण घेण्याची परवानगी घेण्यासाठी तो सर्वप्रथम आपले पहिले गुरू हरिदास यांच्याकडे गेला. हरिदास यांनी तानसेनला वडिलांची इच्छा पूर्ण करण्यास सांगून आशीर्वाद दिला. तानसेनने मोहम्मद गौस यांच्याकडे तीन वर्षे संगीताचा अभ्यास केला आणि आपली संगीत-प्रतिभा अधिकच विकसित केली. त्याच काळात, मोहम्मद गौस यांनी तानसेनची ओळख ग्वाल्हेरच्या राजा रामचंद्रशी करून दिली. त्या दोघांची चांगली मैत्री जमली आणि तानसेन वारंवार राजवाड्यात जाऊ लागला. तिथे त्याला इतर संगीतकारांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळत असे. 'हुसैनी'च्या प्रेमात आणि लग्नही राजवाड्याला दिलेल्या भेटींच्या दरम्यान, तानसेनची भेट 'हुसैनी' नावाच्या एका तरुणीशी झाली. ती राजाच्या सेवेत असलेल्या दासींपैकी एक होती. तिच्या नावाचा अर्थ 'सुंदर' असा होतो आणि खरोखरच हुसैनी अत्यंत सुंदर होती. तानसेन तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी विवाह केला. रेवा नरेश रामचंद्र यांच्या दरबारात तानसेनची राजगायक म्हणून नियुक्ती काही वर्षांनंतर मोहम्मद गौस यांचे निधन झाले. त्यांनी आपली सर्व मालमत्ता आणि धन तानसेनच्या नावे केले. तानसेन मोहम्मद गौस यांच्याच घरात स्थायिक झाले. एके दिवशी ग्वाल्हेरजवळच्या रेवा दरबारातून एक दूत आला. त्या दूताने ती हस्तलिखित गुंडाळी उलगडली आणि वाचले, रेवा नरेश रामचंद्र यांची अशी इच्छा आहे की, तुम्ही त्यांच्या दरबारात संगीतकार म्हणून रुजू व्हावे. हा एक मोठा सन्मान होता आणि तानसेनच्या कीर्तिशिखराकडे होणाऱ्या वाटचालीतील पहिले पाऊल होते. राजा रामचंद्र तानसेन यांच्या गायनाचे खूप कौतुक करत असत आणि त्यांनी त्याला अनेक मौल्यवान भेटी दिल्या. एकदा तर त्यांनी त्याला एक हजार सुवर्णमुद्रा भेट म्हणून दिल्या. पुढे एके दिवशी सम्राट अकबर यांनी रेवाला भेट दिली. आपल्या या शाही पाहुण्याचे मनोरंजन करण्याची जबाबदारी राजा रामचंद्र यांनी तानसेनवर सोपवली. तानसेनच्या संगीताने सम्राट अकबर अत्यंत प्रभावित झाले आणि रेवाहून परतल्यानंतर काहीच काळात, त्यांनी राजा रामचंद्र यांना निरोप पाठवून तानसेनला आपल्या दरबारात पाठवून देण्याची विनंती केली. बादशाह अकबराच्या दरबारी राजा रामचंद्र यांना तानसेनला स्वतःपासून दूर करायचे नव्हते. परंतु, त्या अकबराची नाराजी ओढवून घेणे त्यांना परवडणारे नव्हते. शेवटी, अकबर हे संपूर्ण हिंदुस्थानचे सम्राट होते, तर राजा रामचंद्र हे अकबराच्या विशाल साम्राज्यातील एका छोट्या राज्याचे केवळ राजे होते. म्हणूनच, जड अंतःकरणाने का होईना, राजा रामचंद्र यांनी तानसेनला एका दरबाराकडून दुसऱ्या दरबाराकडे जाणारी एक 'शाही भेट' म्हणून, आपल्याच माणसांच्या संरक्षणाखाली अकबराकडे पाठवून दिले. आग्रा या राजधानीच्या शहरात तानसेनचे शाही स्वागत करण्यात आले. तानसेनच्या संगीताने अकबर इतके प्रभावित झाले की, त्यांनी तानसेनला आपल्या साम्राज्यातील सर्वोच्च सन्मानाने गौरवले. तानसेनचा समावेश अकबराच्या 'नवरत्नां'मध्ये करण्यात आला. म्हणजेच शाही दरबारातील नऊ सर्वात असाधारण आणि प्रतिभावान व्यक्तींच्या समूहात करण्यात आला. दरबारात गायन करण्याव्यतिरिक्त, तानसेन अनेकदा केवळ सम्राटासाठीच एकांतात गायन करत असे. रात्रीच्या वेळी तो असे राग गात असे, ज्यामुळे सम्राटाच्या मनाला शांतता लाभे आणि त्यांना शांतपणे झोप लागण्यास मदत होई. तर सकाळी अकबर उठण्याच्या वेळी तानसेन असे विशेष राग गात असत, ज्यामुळे दिवसाची सुरुवात प्रसन्न व उत्साही व्हायची. तानसेनच्या संगीतातील सामर्थ्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. असे म्हटले जाते की, जेव्हा तानसेन गात असे, तेव्हा त्यांचे गायन ऐकण्यासाठी पक्षी आणि प्राणीही तिथे जमायचे. चवताळलेल्या हत्तीलाही तानसेनच्या गायकीने शांत केले एकदा, एका शिकारी मोहिमेदरम्यान, सम्राट अकबराला एक पांढरा हत्ती दिसला, जो त्याला स्वतःसाठी हवा होता. त्या हत्तीला पकडून राजवाड्यात आणण्यात आले. मात्र, तो हत्ती अत्यंत उग्र आणि रानटी होता. तो कोणत्याही प्रकारे माणसाळायला तयार नव्हता. जेव्हा तानसेनला ही गोष्ट समजली, तेव्हा तो त्या हत्तीकडे गेला. तो हत्ती साखळदंडांनी बांधलेला होता आणि धडपड करत होता. तानसेनने तानपुऱ्यासह गाणे गायला सुरुवात केली. आणि आश्चर्य म्हणजे तो हत्ती काही काळाने शांतही झाला. त्यानंतर अकबरने त्याच्यावर स्वार होऊन त्याची सवारी केली. तसेच सम्राट अकबराने तानसेनचा मोठा सन्मान केला आणि अनेक बक्षिसे दिली. तानसेनला राजवाड्याच्या अगदी जवळच एक घरही देण्यात आले. अकबरने दिलेला हिऱ्यांचा हार चोरीला.. एके संध्याकाळी, सम्राट अकबराने तानसेन यांना भेटायला जाण्याचे ठरवले. जेव्हा सम्राट तिथे पोहोचले, तेव्हा तानसेन गात होता. सम्राट व्हरांड्यात शांतपणे बसले आणि गाणे ऐकू लागले. तानसेनच्या गायकीने सम्राट इतके प्रसन्न झाले की, गाणे संपल्यानंतर त्यांनी आपल्या गळ्यातील हिऱ्यांचा हार काढला आणि तो तानसेनला भेट म्हणून दिला. बादशाह अकबरला तानसेनबद्दल वाटणाऱ्या आदराचा काही दरबाऱ्यांना खूप मत्सर वाटू लागला. त्यांनी तानसेनच्या पतनाचा कट रचायला सुरुवात केली. तानसेनने बादशहाने दिलेला हिऱ्यांचा हार चोरला आणि त्यांना सांगितले की त्याने हार मोठ्या किमतीला विकला आहे. जेव्हा तानसेनला राजदरबारात बोलावून हार सादर करण्यास सांगितले, तेव्हा तानसेन सादर करू शकला नाही. अकबर प्रचंड संतापले आणि म्हणाले, जोपर्यंत तू हा हार घालून हजर होत नाहीस, तोपर्यंत तुला दरबारातून हद्दपार केले जाईल. तानसेनची नाचक्की झाली होती. त्याला मदतीसाठी कोणीही नव्हते. अखेरीस त्याला राजा रामचंद्राची आठवण झाली आणि तो रेवाकडे निघाला. रामचंद्राने आपल्या पूर्वीच्या दरबारी संगीतकाराचे स्वागत केले. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर राजा म्हणाला, काळजी करू नकोस. फक्त माझ्यासाठी गा. तानसेनने राजासाठी दोन सुंदर राग गायले. तुझे गाणे आता अप्रतिम झाले आहे. तू मला खूप आनंद दिला आहेस, असे रामचंद्र म्हणाले. आणि बक्षीस म्हणून, त्यांनी तानसेनला आपल्या रत्नजडित पादुका भेट दिल्या. तानसेनने घाईघाईने आग्रा गाठले आणि त्याने त्या रत्नजडित पादुका बादशहासमोर ठेवल्या. महाराज, कृपया यातील हिरे घ्या आणि मला क्षमा करा. त्या रत्नजडित पादुका हारापेक्षा खूपच अधिक मौल्यवान होत्या. बादशहाच्या लगेच लक्षात आले की त्याने तानसेनबद्दल चुकीचा अंदाज बांधला होता आणि तो म्हणाला, माझ्यासाठी तुझे संगीत हिऱ्यांपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. मी तुझ्यावर कधीही शंका घ्यायला नको होती. तू माझा राजगायक म्हणून दरबारात परत येऊ शकतोस. तानसेनची कीर्ती सर्वत्र पसरली. लोक म्हणू लागले की, गेल्या हजार वर्षांत जन्माला आलेला तानसेन हाच सर्वश्रेष्ठ गायक आहे. तानसेनचे शत्रू पुन्हा एकदा त्याच्याबद्दल मत्सर बाळगू लागले आणि त्यांनी त्याच्या अधःपाताचा कट रचण्यास सुरुवात केली. त्यांनी बादशहाला अशी सूचना केली की, त्यांनी तानसेनला आपल्यासाठी 'दीपक राग' गाण्याचा आदेश द्यावा. दीपक रागाचा 'तो' किस्सा जो आजही ऐकवला जातो दीपक राग हा गाण्यासाठी सर्वात कठीण रागांपैकी एक होता. शिवाय, या रागाचे जर अगदी अचूक सादरीकरण केले, तर त्यातून इतकी प्रचंड उष्णता निर्माण होत असे की, केवळ दिवेच प्रज्वलित होत नसत, तर खुद्द गायकाचे शरीरही जळून खाक होत असे. जेव्हा अकबराने तानसेनला दीपक राग गाण्यास सांगितले, तेव्हा तानसेनने विनंती केली, महाराज, दीपक रागामुळे खुद्द गायकाचे शरीरही जळून खाक होऊ शकते. परंतु बादशहाने त्याचे काहीच ऐकले नाही. जर तुम्ही या देशातील सर्वश्रेष्ठ गायक असाल, तर तुम्ही हे आव्हान स्वीकारलेच पाहिजे, असा आग्रह बादशहा अकबराने धरला. दीपक राग गाणे धोकादायक आहे हे तानसेनला ठाऊक होते. परंतु त्याला हेही माहित होते की, जर त्याच वेळी पाऊस पाडणारा 'मेघ राग' गायला गेला, तर तो आगीच्या प्रकोपापासून वाचू शकेल. पण मी हे दोन्ही राग एकाच वेळी कसे गाऊ शकेन? आपल्या घराच्या बागेत फिरत असताना तानसेनने चिंतेने स्वतःशीच विचार केला. अचानक त्याला एक युक्ती सुचली. कदाचित हरिदासाची एक निष्ठावान शिष्या असलेली रूपा त्याच्यासोबत गाऊ शकेल. हरिदासाची परवानगी घेऊन, रूपाने गाण्यास संमती दर्शवली. रूपा ही आधीच एक अत्यंत कुशल गायिका होती. अकबराने तयारीसाठी दिलेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीचा उपयोग तानसेनने तिला प्रशिक्षण देण्यासाठी केला. दोन आठवड्यांच्या अखेरीस, रूपाने मेघ रागाच्या गायनात पूर्ण प्रभुत्व मिळवले होते. तानसेनच्या सादरीकरणाचा दिवस उजाडला. राजदरबार दरबारी आणि राजमान्य पाहुण्यांनी खचाखच भरलेला होता. तानसेनला सर्व रागांमधील सर्वात कठीण असा 'दीपक राग' गाताना ऐकण्यासाठी लोक दूरदूरहून आले होते. भिंतींवर न लावलेले दिवे ठेवण्यात आले होते. तानसेन हातात तानपुरा घेऊन सज्ज होता आणि जसे सम्राट दरबारात आले व सिंहासनावर विराजमान झाले, तसा त्या महान गायकाने 'आलाप' गाण्यास सुरुवात केली. जसा तानसेन गात पुढे सरकला, तशी सभोवतालची हवा अधिकाधिक उष्ण होऊ लागली. उपस्थित श्रोत्यांना घाम फुटू लागला. बागेतील पाने आणि फुले सुकून जमिनीवर गळून पडली. कारंज्यांमधील पाणी उकळू लागले. पक्षी जीव वाचवण्यासाठी उडून गेले. दिवे आपोआप प्रज्वलित झाले आणि हवेत आगीच्या ज्वाला दिसू लागल्या. लोक भीतीने राजदरबारातून पळून जाऊ लागले. जेव्हा अकबर आपल्या आसनावरून उठून उभे राहिले आणि अचंबा वाटून ते गाणे ऐकत राहिले, तेव्हा त्यांच्या हातात असलेले गुलाबाचे फूल कोमेजले आणि सुकूनही गेले. आता तानसेनचे शरीर अत्यंत उष्ण झाले होते आणि त्याला दरदरून ताप चढला होता. तरीही दीपक राग गाण्यात पूर्णपणे तल्लीन झालेला तानसेन देह भान हरपून गातच राहिला. तानसेनची ही अवस्था पाहून रूपा चिंतेत पडली आणि तिला गाण्यास सुरुवात करता येईना. मग हळूहळू सुरुवातीला जरी तिचा आवाज थोडा थरथरत असला तरी तिने 'मेघ राग' गाण्यास सुरुवात केली. जसा तिचा आवाज अधिक खंबीर झाला आणि वरच्या स्केलवर पोहोचला, तसे आकाश ढगांनी व्यापून काळेकुट्ट झाले. हळुवार पावसाला सुरुवातही झाली आणि त्याचे रूपांतर मुसळधार पावसात झाले. श्रोत्यांपैकी अनेकजण पावसाच्या स्पर्शाने उष्ण झालेले शरीर शांत करण्यासाठी धावतच बाहेर पडले. लवकरच सर्व काही पूर्ववत झाले. लोकांनी तानसेनच्या प्रतिभेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. सम्राट अकबर अत्यंत प्रसन्न झाले असले, तरी त्यांना एक मोठा धक्का बसला होता, तो म्हणजे, आपल्याच संगीतकाराच्या संगीताच्या आगीमुळे आपण त्याला गमावणार होतो. तानसेनने दीपक राग गाऊन आपल्या जादुई आवाजाची प्रचिती सर्वांना दिलीच होती. मात्र दीपक राग गायल्याने शरीरात निर्माण झालेल्या उष्णतेने तानसेनला आजारी पाडले. तानसेन आजारी पडला आणि त्यांना दरबारात परतण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. तानसेनने सम्राट अकबराच्या दरबारात अनेक वर्षे गायन केले आणि संगीत शिकवले. ते केवळ एक संगीतकारच नव्हते, तर एक कवीही होते. त्यांनी आपल्या संगीतासाठी शब्दरचना केल्या आणि अनेक नवीन रागांची निर्मिती केली. तानसेनचे सूर आजही अजरामर जेव्हा तानसेन यांचे निधन झाले, तेव्हा अकबर त्यांच्या अंथरुणापाशी उपस्थित होते. अकबराचे मन अतीव दुःखाने भरून आले होते. त्यांना जाणीव होती की, भारताने आपला महानतम संगीतकार आणि गायक गमावला आहे. परंतु, तानसेन यांचे संगीत आजही जिवंत आहे आणि ते गुरु-शिष्य परंपरेद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत आले आहे आणि तानसेनचे सूर अजूनही या जगात अजरामर आहेत आणि राहतील.
ट्रम्प यांनी इराणला दिला ४८ तासांचा अल्टिमेटम
होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली करा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला ३६ दिवस झाले आहेत. मात्र, अमेरिका किंवा इराण मागे हटण्यास तयार नाही. या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने दिलेल्या वेळेत होर्मुझची सामुद्रधुनी सुरू न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर पोस्ट करून […] The post ट्रम्प यांनी इराणला दिला ४८ तासांचा अल्टिमेटम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुनेत्रा पवारच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष
राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना निवडणूक आयोगाची मान्यता पटेल, तटकरे यांना मोठा धक्का मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत रचनेत गेल्या २ महिन्यांत मोठे फेरबदल झाले असून, आता पक्षाची धुरा अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहे. १६ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाच्या नव्या ठरावांना आणि कार्यकारिणीला मान्यता […] The post सुनेत्रा पवारच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओरियन कॅप्सूलने आता पृथ्वीची कक्षा सोडली
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था आर्टेमिस-२ मोहीम आता चंद्राच्या दिशेने निघाली आहे. एक दिवस आधी शुक्रवारी पहाटे ५:१९ वाजता ओरियन कॅप्सूलने आपले थ्रस्टर्स सुरू केले आणि पृथ्वीची कक्षा सोडली. आता पुढील ४ दिवस ते अंतराळातून प्रवास करेल आणि जिथे आजपर्यंत केवळ २४ मानव पोहोचले, त्या ठिकाणी पोहोचेल. पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी इंजिन सुरू करण्याच्या प्रक्रियेला […] The post ओरियन कॅप्सूलने आता पृथ्वीची कक्षा सोडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदेडमध्ये गँगवॉर, तिहेरी हत्याकांड
रस्त्यावर एकाला, रुग्णालयात दोघांना संपविले, जिल्हा हादरला नांदेड : प्रतिनिधी नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री गँगवारचा थरार घडला. या गँगवॉरमधून तिहेरी हत्याकांडाची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका गँगमधील एकाची रस्त्यावर घेरून हत्या करण्यात आली तर मयत युवकाच्या भावाने दुस-या गँगमधील जखमी दोघांची खून का बदला खून म्हणत शासकीय रूग्णालयात जाऊन चाकूने वार करून हत्या […] The post नांदेडमध्ये गँगवॉर, तिहेरी हत्याकांड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महंत प. पू. मधुसूदन भारती यांचे निधन
भारती माहूरगडाचे महंत, आज अन्त्यसंस्कार नांदेड : प्रतिनिधी तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या श्री दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज (९९) यांना शनिवारी सायंकाळी देवाज्ञा झाली. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उद्या रविवारी दुपारी ३ वाजता माहूरगडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूरगडावर शोककळा पसरली असून भाविकांनी दु:ख व्यक्त केले. सन १९७८ पासून ते […] The post महंत प. पू. मधुसूदन भारती यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. अशोक पोद्दार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
लातूर : प्रतिनिधी येथील प्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अशोक पोद्दार यांचा ५५ वा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, मोफत हाडांचा ठिसूळपणा तपासणी शिबिर आदी विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. डॉ. पोद्दार अॅक्सिडेंट अॅण्ड ट्रॉमा केअर सेंटरच्या वतीने मागील २८ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत जिल्हाभरात आतापर्यंत १७० मोफत आरोग्य शिबिरे […] The post डॉ. अशोक पोद्दार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे चला : डॉ. संदीपान जगदाळे
लातूर : प्रतिनिधी ऐकू किंवा बोलता येत नसले तरी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो. दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जावे असे आवाहन प्रा. डॉे. संदीपान जगदाळे यांनी केले. रोटरी क्लब लातूरच्या वतीने सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मूकबधीर विद्यालय, सिग्नल कॅम्प, लातूर येथील विद्यार्थीनींसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी सायंकाळी करण्यात आले […] The post न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे चला : डॉ. संदीपान जगदाळे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर शहराचा पाणीप्रश्न अखेर निकाली
लातूर : प्रतिनिधी भर उन्हाळ्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे लातूरकरांवर ओढवलेले पाणीसंकट लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या युद्धपातळीवरील कामामुळे अवघ्या काही तासांत दूर झाले आहे. मागील ३-४ दिवसांपासून खंडित झालेला पाणीपुरवठा शुक्रवारी दुपारी ४ वाजता पुन्हा सुरळीत झाला असून लातूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वादळी वा-याने आणि अवकाळी पावसाने धनेगाव येथील मांजरा धरणावरून […] The post लातूर शहराचा पाणीप्रश्न अखेर निकाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दररोज १६० मेट्रिक टन कच-याचे संकलन
लातूर : प्रतिनिधी मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणा-या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर ‘टाकाऊ पदार्थ’ सुद्धा मौल्यवान स्त्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा -हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. […] The post दररोज १६० मेट्रिक टन कच-याचे संकलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP-SP) प्रवेश केलेले समरजीत घाटगे आता पुन्हा एकदा 'स्वगृही' परतणार आहेत. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात घाटगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असून, यामुळे कागलसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समरजीत घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने घाटगे यांनी शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आपण स्वगृही परतणार असल्याचे स्वतः समरजित घाटगे यांनी सांगितले आहे. नेमके काय म्हणाले समरजित घाटगे? समरजीत घाटगे म्हणाले, भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. विशेषतः नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भविष्याचा विचार करून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चंद्रकांत दादांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. आपल्या मूळ पक्षात परत आल्याचे मला मोठे समाधान आणि अभिमान वाटत आहे. फडणवीसांचे 'थोरले बंधू' म्हणून संबोधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करताना समरजित घाटगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी केवळ नेते नाहीत, तर ते माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. पक्षातून बाहेर पडल्यानंतरही मी नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. शरद पवारांना भेटूनच घेतला निर्णय पक्ष सोडताना कोणतीही कटुता ठेवणार नसल्याचे संकेत देत समरजित घाटगे यांनी सांगितले की, मी डिसेंबर महिन्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महापालिका निवडणुकीनंतर मी माझी स्पष्ट भूमिका त्यांना मांडली होती. शरद पवारांना पूर्वकल्पना देऊनच मी ही पुढची पावले उचलली आहेत. राजकीय परिणाम समरजीत घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढणार आहे. कागल विधानसभा मतदारसंघात आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात घाटगे यांची मोठी पकड असून, त्यांच्या घरवापसीमुळे महाविकास आघाडीला, विशेषतः शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
नक्षलवादाच्या प्रश्नावर केंद्र सरकार श्रेय घेत असल्याबाबत काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांना “बालिश, अहंकारी आणि हास्यास्पद” असे संबोधले आहे. माओवादी-नक्षलवादाच्या खात्म्याचे श्रेय केवळ विद्यमान सरकारला देणे चुकीचे असून, पूर्वीच्या काँग्रेस-प्रणीत सरकारांचे योगदान अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. गोपाळ तिवारी म्हणाले की, नक्षलवादाविरोधातील लढा हा अनेक दशकांपासून सुरू आहे. काँग्रेसच्या काळातही अनेक नेत्यांनी जीवाची आहुती दिली. नंदकुमार पटेल, विद्याचरण शुक्ला आणि महेंद्र कर्मा यांसारख्या नेत्यांचा नक्षलवादी हल्ल्यांत मृत्यू झाला, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच झिरम घाटी हत्याकांड प्रकरणात दोषींना शिक्षा देण्यात अपयश आल्याचाही आरोप त्यांनी केला. तिवारींनी दिला आकडेवारीचा दाखला गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचा दाखला देत तिवारी म्हणाले की, २००४ ते २०१३ या कालावधीत २१६० नक्षलवादी ठार झाले, तर २०१४ ते २०२५ दरम्यान २०८८ नक्षलवादी मारले गेले. यावरून पूर्वीच्या सरकारांनीही प्रभावी कारवाया केल्या असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विद्यमान सरकारने केवळ श्रेय घेण्याऐवजी सातत्याने चालत आलेल्या धोरणांची कबुली द्यावी, असे त्यांनी म्हटले. नक्षलवाद कमी होण्यामागे केवळ लष्करी कारवाया नव्हे, तर सामाजिक व विकासात्मक उपाय महत्त्वाचे ठरले. यूपीए सरकारने आदिवासी भागात रस्ते, शाळा, आरोग्य सेवा, वीज व मोबाईल नेटवर्क यांचा विस्तार केला. तसेच फॉरेस्ट राइट्स ॲक्ट २००६ आणि जमीन अधिग्रहण कायदा २०१३ यांसारख्या कायद्यांद्वारे आदिवासींचे हक्क मजबूत करण्यात आले. या उपायांमुळे नक्षलवादाबद्दलची सहानुभूती कमी झाली, असा दावा तिवारी यांनी केला. याउलट, विद्यमान सरकारवर त्यांनी आदिवासींचे हक्क कमकुवत करून संसाधने कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळवण्याचा आरोप केला. छत्तीसगड, ओडिशा व इतर राज्यांतील खाण प्रकल्पांमुळे स्थानिकांचा विरोध वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. “विकास हा कोणासाठी आणि कोणत्या किमतीवर” हा प्रश्न उपस्थित करत, आदिवासींच्या संमतीशिवाय होणारा विकास हा अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद पूर्णतः संपल्याचा दावा अतिशयोक्तीपूर्ण असून अजूनही अनेक जिल्हे प्रभावित आहेत, असेही त्यांनी सांगितले. अर्बन नक्षलवाद देखील २०१४ पूर्वी कुठे दिसून येत नव्हते, मात्र भाजपच्या काळात अर्बन नक्षलवाद वाढल्याचे दिसून येते हे अपयश भाजपचेच आहे. आदिवासी सक्षमीकरण आणि समावेशक विकासाशिवाय नक्षलवादाचा कायमस्वरूपी अंत शक्य नाही, असा इशाराही काँग्रेसने दिला.
महावितरणने बायजीपुरा उपकेंद्रातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवली आहे. महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते शनिवारी रात्री 10 एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला. यामुळे परिसरातील सुमारे 15 ते 20 हजार वीजग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. बायजीपुरा उपकेंद्रात यापूर्वी 10 एमव्हीए आणि 5 एमव्हीए क्षमतेचे प्रत्येकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर होते. या उपकेंद्रातून जवळपास 15 ते 20 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जात होता. मात्र, वाढती ग्राहकसंख्या आणि विजेच्या मागणीमुळे सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0 अंतर्गत 5 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून तो 10 एमव्हीए करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला शनिवारी सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. सकाळी 8 वाजल्यानंतर वीजपुरवठा बंद करून जुना 5 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर काढण्यात आला. त्यानंतर सुमारे 11 टन वजनाचा 10 एमव्हीए क्षमतेचा महाकाय ट्रान्सफॉर्मर काळजीपूर्वक बसवणे हे आव्हानात्मक काम होते. महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी 10 तास अथक परिश्रम घेऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर यशस्वीरित्या बसवला. सुरक्षिततेसाठी उपकेंद्रातील सर्व वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर सायंकाळी 8 वाजता विद्युतभारित करण्यात आला आणि त्यानंतर सर्व वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता 20 एमव्हीए झाली आहे. यामुळे जिन्सी परिसर, रोशनगेट, शहाबाजार, जुना बाजार, शहागंज, बांबू मार्केट, जाफरगेट, जुना मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा, संजयनगर आणि बायजीपुरा परिसरातील ग्राहकांना प्रामुख्याने लाभ होणार आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या कार्यान्वित प्रसंगी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्ष नेते समीर साजेद, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, रवींद्र गायकवाड, सहायक अभियंता अनिल बनसोडे, संतोष कोल्हे, प्रदीप श्रेष्ठ, राहुल चव्हाण, मनीष डिघुळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर येथील चितेगाव परिसरात महावितरणच्या दोन तंत्रज्ञांनी धाडसी कामगिरी करत २० फूट खोल खदानीतील पाण्यात पोहून तुटलेली ११ केव्ही वीज वाहिनी जोडली. वादळी वाऱ्यामुळे तुटलेली ही वाहिनी दुरुस्त करून औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तंत्रज्ञ योगेश जाधव आणि शंकर करताडे यांनी हे जिकिरीचे काम यशस्वी केले. शुक्रवारी दुपारी चितेगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाला होता. औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा करणारी ११ केव्ही इंडस्ट्रियल वाहिनी तुटून रमानगरमागील एका खदानीच्या २० फूट खोल पाण्यात पडली. या बिघाडामुळे एकूण ६६ औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. बिघाडाची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, रमानगरमागील खदानीत तार तुटून पडल्याचे आढळले. तातडीने ५५ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला. मात्र, त्याच वेळी परिसरातील ३३ केव्ही वाहिन्यांतही बिघाड झाल्याने प्रथम त्या दुरुस्तीस प्राधान्य देण्यात आले. उर्वरित ११ औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. शनिवारी (४ एप्रिल) सकाळपासून उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला थर्माकोलच्या तराफ्याच्या साहाय्याने पाण्यात उतरून तार जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला. ग्राहकांना विजेविना जास्त काळ थांबावे लागू नये यासाठी अखेर तंत्रज्ञ योगेश जाधव आणि शंकर करताडे यांनी स्वतः पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट पाण्यात पोहत जाऊन तुटलेली तार बाजूला काढली. त्यानंतर एका 'फेज'ची नवीन तार पाण्यात नेऊन ती जोडण्याचे अत्यंत कठीण काम यशस्वीपणे पूर्ण केले. या धाडसी प्रयत्नामुळे खंडित झालेला औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत झाला.
अमरावती जिल्ह्यात महिलांच्या उन्नतीसाठी 'गोट प्रोड्युसर कंपनी'मार्फत एक पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) राबवला जाणार आहे. राज्य शासनाच्या कृषी व पशुपालन विभागाने जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि परंपरागत शेती व्यवसाय लक्षात घेता, येथे बकरीपालनाला मोठा वाव असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट महिलांना सक्षम करणे हे आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत चांदूर रेल्वे, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांमध्ये बकरीपालन केले जाईल. जिल्ह्यात सध्या ३ लाख ४० हजार ६८१ शेळ्या असून, विशेषतः या चार तालुक्यांमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता राज्य शासनाला वाटते. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने यासाठी डीआरडीए मार्फत स्थापन झालेल्या महिला बचतगटांची निवड केली आहे. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्रा यांनी या प्रकल्पाची संपूर्ण आखणी केली आहे. त्यांनी सध्याच्या व्यवसायातील उणिवा दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा तयार केली आहे. शासनाच्या निरीक्षणानुसार, जिल्ह्यात शेळ्यांचे प्रजनन पुरेसे असले तरी बाजाराची उपलब्धता नाही. तसेच, पशुपालकांना पशुसेवा आणि आरोग्य व्यवस्थापनाची पुरेशी माहिती नाही. बहुतेक पशुपालक हा व्यवसाय वैयक्तिक पातळीवर करतात, ज्यामुळे त्यांचे आकलन मर्यादित राहते. या मर्यादांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. 'गोट प्रोड्युसर कंपनी' बाजारात स्थिरता आणि मागणी निर्माण करणे, शेतकऱ्यांसाठी आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, पुनरावृत्तीयोग्य मॉडेल तयार करणे आणि मूल्यसाखळी विकसित करणे यावर काम करेल. या कंपनीचे सर्व भागधारक महिला बचतगटाचे सदस्य असतील. सीईओ संजीता महापात्रा यांनी या व्यवसायामुळे जिल्ह्यात येत्या काळात एक वेगळी क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त केला. या पायलट प्रोजेक्टसाठी भूमिहीन, अल्पभूधारक आणि पशुधन आधारित उपजीविका असलेल्या कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (मुंबई) आणि आजीविका (एनआरएलएम - दिल्ली) यांचे सहकार्य मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असून, त्यासाठी भागीदार जोडण्याचे काम सुरू झाले आहे.
मोर्शी येथे संत साईबाबा व हनुमान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साई जन्मोत्सवानिमित्त भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यामुळे मोर्शी नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. कॉलनी परिसरातील महिलांनी डोक्यावर घागरी घेऊन टाळ-मृदुंगाच्या गजरात नाचत-गाजत शोभायात्रेत सहभाग घेतला. शोभायात्रेच्या मार्गावर महिलांनी सडा-सारवण, पाणी व रांगोळी काढून रस्ता सुशोभित केला होता. 'जय श्रीराम, जय जय श्रीराम' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या शोभायात्रेचा समारोप साई मंदिर परिसरात करण्यात आला. शोभायात्रेदरम्यान, श्री संत साईबाबा व हनुमान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोर्शी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, नगरसेवक रवींद्र गुल्हाने, अमन गायकी, अंकुश घारड, नगरसेविका प्रीतीताई देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, मंदिराच्या कार्यासाठी योगदान देणाऱ्या शीलाताई निस्वादे आणि अन्नदाते साहेबराव वानखडे यांचाही शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. साई उत्सवादरम्यान, प्रगती व अंकित लेव्हलकर यांच्या हस्ते तीर्थस्थापना करण्यात आली. दैनंदिन हरिपाठ, अभिषेक, आरती, साई कॉलनी महिला भजन मंडळाचे भजन, तसेच मातोश्री महिला मंडळ व शारदा महिला भजन मंडळाचे सुंदरकांड असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गोपाल काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष विजय लेव्हलकर, उपाध्यक्ष राजेंद्र ठाकरे, सचिव विनायक खाडे, सहसचिव सदाशिव बोकडे, कोषाध्यक्ष रवींद्र जाणे, सदस्य अशोक धोटे, संदीप सोनलकर, प्रवीण चौधरी, जयभारत देशमुख, वैभव सोलव, संजय ढोंगे, श्रीकांत चांडक, सिंधुताई ठाकरे यांच्यासह अविनाश गुल्हाने, रमेशराव धुर्वे, प्रदीप खेरडे, श्रीधर लबडे, देवानंद वानखडे, सुधीर कोहळे, अंकित लेव्हलकर, मेघराज लालानी, डॉ. तेजस सोनलकर, लाभेश लीखीतकर, प्रमोद बाखडे, सुमनताई बोबडे, कल्पनाताई खेरडे, पल्लवी काळमेघ, प्रगती चोरे, शीलाताई निस्वादे, प्रगतीताई लेव्हरकर, छायाताई बोकडे, मंजुळाताई ठाकरे, सुशीलाताई अनवने इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. साई जन्मोत्सव समितीने धार्मिक कार्यक्रमांसोबतच आरोग्य सेवेचेही भान राखले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. ज्या नागरिकांना अधिक तपासण्यांची गरज होती, त्यांना तसा सल्ला देण्यात आला आणि त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही समितीने दिली.
अंजनगाव बारी येथे महारुद्र हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित संगीतमय भागवत सप्ताह आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. या सात दिवसीय कार्यक्रमात झी टॉकीज फेम ह.भ.प. प्रियंकाताई भोसले (राजगड, जि. पुणे) यांच्या रसाळ वाणीने श्रीमद भागवत कथेचे निरूपण केले. या सप्ताहात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रियंकाताई भोसले यांच्या अमृतमय वाणीने कथेला विशेष रंगत आणली. त्यांची मंचावरील उपस्थिती, शास्त्रवाचन आणि बालकृष्णाच्या वेशातील लहान मुलाला घेतलेल्या प्रेमळ दर्शनामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक तेज प्राप्त झाले. संपूर्ण अंजनगाव बारी गावात आठवडाभर भक्तिमय वातावरण होते. कथा सुरू होताच गावातील मंडपात भाविकांची प्रचंड गर्दी उसळत होती. महिलांचे कीर्तन, आरत्या, भक्तिरसांनी भरलेली दिंडी आणि सौंदर्यपूर्ण सजावट यामुळे मंडप आकर्षक दिसत होता. गावातील सर्वच वयोगटातील भक्तांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. महिलांची मोठी उपस्थिती, मुलांची सांस्कृतिक मिरवणूक आणि भाविकांच्या टाळ-मृदूंगाच्या निनादाने उत्सव अधिकच वैशिष्ट्यपूर्ण बनला. कथेमध्ये श्रीकृष्ण जन्म, गोवर्धन लीला, रासलीला यांसारख्या प्रसंगांचे वेगवेगळ्या चित्ररथांमधून सुंदर सादरीकरण करण्यात आले. स्थानिक महिला व बालिकांनी साकारलेल्या कृष्ण-राधा, गोपी, देव-देवतांच्या वेशभूषा विशेष आकर्षण ठरल्या. या झाक्यांना उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. समारोपाच्या दिवशी ह.भ.प. प्रियंकाताईंनी भगवद्भक्ती, कर्तव्य, माता-पित्यांचा सन्मान आणि सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शेवटी, रामगीर महाराज देवस्थान मठाधिपती ह.भ.प. शंकरगीरी महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन झाले. शुक्रवारच्या महाप्रसादाने या संगीतमय भागवत सप्ताहाची सांगता झाली.
नवे सीईओ सत्यम गांधी पदभार स्वीकारणार:अमरावती जिल्हा परिषदेत सोमवारी रुजू होणार
अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी सोमवारी, ६ एप्रिल रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या रुजू होण्याने जिल्हा परिषदेला नवा प्रशासकीय प्रमुख मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी रविवारी रात्री शहरात दाखल होतील आणि सोमवारी सकाळी १० वाजता पदभार स्वीकारतील. सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्याकडे सीईओपदाचा तात्पुरता कार्यभार आहे, त्यांच्याकडूनच गांधी सूत्रे स्वीकारतील. यापूर्वीच्या सीईओ संजीता महापात्र यांची शासनाने सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. त्यांच्या बदलीमुळे अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओपद रिक्त झाले होते. महापात्र रजेवर गेल्याने ठमके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. सत्यम गांधी यापूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ते अमरावती जिल्हा परिषदेची जबाबदारी सांभाळणार आहेत. दरम्यान, अमरावती महापालिकेतही सोमवारी नव्या आयुक्त रुजू होणार आहेत. प्रसूती रजेवर गेलेल्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या सुटीकाळात वरिष्ठ सनदी अधिकारी वर्षा लढ्ढा यांच्याकडे मनपाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. वर्षा लढ्ढासुद्धा सोमवारीच आपली नवी जबाबदारी स्वीकारतील. अमरावतीत येण्यापूर्वी वर्षा लढ्ढा पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेच्या सदस्य सचिव होत्या. 'दिव्य मराठी'ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बदली झालेले दोन्ही नवे अधिकारी येत्या एक-दोन दिवसांत आपापल्या नव्या जबाबदाऱ्या सांभाळतील असे भाकीत केले होते. जिल्हा परिषदेचे नवे सीईओ सत्यम गांधी आणि महापालिकेच्या नव्या आयुक्त वर्षा लढ्ढा हे दोन्ही अधिकारी सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याने हे भाकीत खरे ठरले आहे.

30 C