बीएलओ सुरक्षेवरून ईसीआयला नोटीस
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये एसआयआर आणि बीएलओ यांच्या आत्महत्येसंबंधी एका प्रकरणावर सुनावणी केली. न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. याचिका सनातनी संसद संघटनेने दाखल केली होती. ज्यात एसआयआर प्रक्रियेनंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत बंगाल पोलिसांना निवडणूक आयोगाच्या अधीन ठेवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयात सांगण्यात आले की, […] The post बीएलओ सुरक्षेवरून ईसीआयला नोटीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण:10 ते 14 डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथे रंगणार
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. हा महोत्सव १० ते १४ डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडासंकुलात रंगणार असून, १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्याचे उद्घाटन होईल. या महोत्सवासाठी सुमारे ८ ते १० हजार संगीत रसिकांना सामावून घेणारा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली. महोत्सवासाठी येणाऱ्या रसिकांच्या दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीन्स आणि कलाकारांचा आवाज शेवटच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा सज्ज आहे. यासोबतच, अल्पोपहाराची सोय असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि पुरुष व महिलांसाठी अद्ययावत प्रसाधनगृहे मंडपाच्या मागील बाजूस उभारण्यात आली आहेत. पीएमपीएमएलतर्फे कार्यक्रम संपल्यानंतर संगीत रसिकांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही जोशी यांनी नमूद केले. यावर्षीच्या महोत्सवाची सुरुवात बुधवार, १० डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी ३ वाजता दिल्लीस्थित लोकेश आनंद यांच्या शहनाईवादनाने होईल. लोकेश यांनी त्यांचे वडील कालीचरण, पं. अनंतलाल आणि पं. दयाशंकर यांच्याकडून शहनाईवादनाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका डॉ. चेतना पाठक आपले गायन सादर करतील. डॉ. पाठक या स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत. यानंतर बनारस घराण्याचे गायक आणि पं. राजन मिश्रा यांचे सुपुत्र-शिष्य असलेल्या रितेश व रजनीश मिश्रा या मिश्रा बंधूंचे सहगायन संपन्न होईल. भारतरत्न पं. रविशंकर यांचे शिष्य असलेले पं. शुभेंद्र राव व त्यांच्या पत्नी विदुषी सास्किया राव-दे-हास हे सतार व चेलोचे सहवादन प्रस्तुत करतील. मूळच्या नेदरलँड्सच्या असलेल्या सास्किया यांनी पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संगीताची दीर्घकालीन साधना केली असून, 'भारतीय चेलो' या अद्वितीय वाद्याची निर्मिती करून त्यांनी पूर्व व पश्चिम संगीत परंपरांमध्ये नवे पूल बांधले आहेत. पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होईल.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या गड्ड्यांसह असलेला एक व्हिडिओ व्हायरल करताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवरून आता शिंदे गट आक्रमक झाला असून, हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आज अलिबागमध्ये उमटले, जिथे संतापलेल्या शिवसैनिकांनी अंबादास दानवे यांच्या प्रतिमेचे दहन करत जोरदार निदर्शने केली. अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी दानवे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राजा केनी यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा आहे. हिवाळी अधिवेशनात खळबळ उडवून देण्यासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी अंबादास दानवे यांनी हा बनावट व्हिडिओ तयार केला आहे. उद्या आम्ही पोलिस मुख्यालयात जाऊन दानवे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहोत. तसेच, नगरपालिका निवडणुकीतील टीका-टिप्पणीचा बदला घेण्यासाठी आणि दळवींना अडकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे षडयंत्र रचल्याचा आरोपही केनी यांनी केला. या व्हिडिओचा खरा 'बोलविता धनी' आम्ही शोधून काढूच, असे आव्हानही त्यांनी दिले. थोरवेंची चौकशी करा- सुरज चव्हाण दरम्यान, या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुरज चव्हाण यांनीही उडी घेतली आहे. चव्हाण म्हणाले, महेंद्र दळवी स्वतः सांगत आहेत की हा व्हिडिओ खोटा आहे. मात्र, प्रशांत थोरवे हा व्हिडिओ तटकरे यांनी दिल्याचे सांगत आहेत. याचा अर्थ थोरवे यांना या व्हिडिओच्या स्रोताबद्दल माहिती असू शकते. त्यामुळे आता थोरवे यांचीच सखोल चौकशी करायला हवी. काय म्हणाले होते अंबादास दानवे? अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुणे पुस्तक महोत्सवांतर्गत आयोजित 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' या उपक्रमाला पुणेकरांनी विक्रमी प्रतिसाद दिला. या उपक्रमात साडेसात लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला असून, या माध्यमातून 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये विश्वविक्रमाची नोंद करण्याची तयारी सुरू आहे. वाचन चळवळ सक्षम करण्याच्या आणि पुण्याला पुस्तकांची राजधानी बनवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. मंगळवारी सकाळी ११ ते १२ या एका तासाच्या कालावधीत ७० हजारांहून अधिक नागरिकांनी पुस्तक वाचन करून आपली छायाचित्रे वेबसाइटवर अपलोड केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १ लाख ३५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी यात भाग घेतला. या वाचन उत्सवात १७ ते २२ वयोगटातील तरुणाईचा सहभाग सर्वाधिक होता. पुरुषांपेक्षा महिलांची संख्या काही हजारांनी अधिक होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांनी आपल्या आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने पुणे पुस्तक महोत्सव २०२५ येत्या १३ ते २१ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. 'वाचन संस्कृतीचा कुंभमेळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रेल्वेस्थानके, बसस्थानके, मेट्रो स्थानके, धार्मिक स्थळे, सार्वजनिक वाचनालये, मदरसे, बसथांबे, पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाची कार्यालये, सरकारी व खासगी आस्थापने, रिक्षाथांबे, आयटी कंपन्या, उद्योग तसेच सामाजिक संस्थांच्या कार्यालयांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वाचन केले. नागरिकांनी पुस्तक वाचतानाचे छायाचित्र काढून ते पुणे पुस्तक महोत्सवाच्या लिंकवर अपलोड केले. सकाळी ११ ते १२ या वेळेत ७० हजार २३८ नागरिकांनी छायाचित्रे अपलोड केली. यात ३६ हजार ५२३ महिला आणि ३३ हजार ७१५ पुरुषांचा समावेश होता, ज्यामुळे महिलांनी वाचनात आघाडी घेतल्याचे दिसून आले. आता सर्व अपलोड केलेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून 'शांतता... पुणेकर वाचत आहेत' हे वाक्य तयार करून त्याची 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद केली जाईल, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी दिली.
इंडोनेशियात इमारतीला आग; २० जणांचा मृत्यू
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे मंगळवारी एका ७ मजली इमारतीला भीषण आग लागली. स्थानिक चॅनल कोम्पास टीव्हीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत २० लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. यात ५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यापैकी काहींचा मृत्यू गुदमरल्याने झाला. मीडिया रिपोर्टनुसार, काही लोक अजूनही इमारतीत अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरू आहे. […] The post इंडोनेशियात इमारतीला आग; २० जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
क्लबचे दोन्ही मालक थायलंडला पळाले
पणजी : गोव्यातील अर्पोरा गावात असलेल्या बिर्च बाय रोमियो लेन नाइटक्लबमध्ये ६ डिसेंबरच्या मध्यरात्री आग लागल्यानंतर काही तासांतच क्लबचे दोन्ही मालक सौरभ आणि गौरव लूथरा थायलंडला पळून गेले. पोलिसांनी घटनेनंतर एफआयआर नोंदवून दोघांचा शोध सुरू केला. ७ डिसेंबर रोजी दोघांविरुद्ध लुकआउट सर्कुलर जारी केले, परंतु इमिग्रेशन रेकॉर्डवरून असे दिसून आले की ते इंडिगो फ्लाइट ६ई […] The post क्लबचे दोन्ही मालक थायलंडला पळाले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
झेलेन्स्कींनी शांतता प्रस्ताव धुडकावला
कीव्ह : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी आपण केलेल्या शांतता प्रस्तावावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अद्याप सही केलेली नाही आणि तो स्वीकारण्यासही ते तयार नसल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. नुकतीच युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेच्या प्रस्तावावर युक्रेनच्या शिष्टमंडळाची तीन दिवस सुरू असलेली चर्चा संपली. यावर रविवारी ट्रम्प यांनी युक्रेन ही चर्चा पुढे नेण्यास फारसे […] The post झेलेन्स्कींनी शांतता प्रस्ताव धुडकावला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कंगाल पाकला पुन्हा आयएमएफकडून कर्ज
इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली असताना, आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणे निधीने अर्थात आयएमएफने पाकसाठी आपल्या तिजोरीचा दरवाजा उघडला आहे. पाकिस्तानात वाढत असलेली महागाई आणि कर्जात बुडालेल्या पाकिस्तानला यातून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी आयएमएफ बोर्डाने नव्या कर्जाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे आता पाकिस्तानला पुन्हा १.२ अब्ज डॉलरची रक्कम मिळणार आहे. आयएमएफच्या […] The post कंगाल पाकला पुन्हा आयएमएफकडून कर्ज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महामेळावा दडपण्याचा कर्नाटक प्रशासनाचा प्रयत्न
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित मराठी भाषिक महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. दडपशाही केली. तरी यास न जुमानता मराठी भाषिकांनी आपली अस्मिता दाखवीत पुन्हा एकदा लेले मैदान परिसरात एकत्रित येत कानडी दांडेलीचा निषेध केला. पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही म. ए. समितीने लोकशाही हक्काचा आधार घेत मेळावा […] The post महामेळावा दडपण्याचा कर्नाटक प्रशासनाचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सामान्य नागरिकांना त्रास होणारे नियम-कायदे नको
नवी दिल्ली : देशातील आघाडीची एअरलाइन इंडीगो मोठ्या संकटात सापडली असून हजारो फ्लाइट्स रद्द झाल्यामुळे देशभरातील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला असून हजारो प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर चिंता व्यक्त केली असल्याची माहिती केंद्रीय संसदीय व अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. एनडीए संसदीय दलाच्या […] The post सामान्य नागरिकांना त्रास होणारे नियम-कायदे नको appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बांगलादेशात पंतप्रधानपदासाठी चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत
ढाका : बांगलादेशमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आणि पंतप्रधान निवडण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय संसदेच्या ३०० जागांसाठी निवडणुका घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. शेख हसीना यांना सत्तेवरून हटवल्यानंतर बांगलादेशात हंगामी सरकार कार्यरत आहेत. पण आता नव्याने निवडल्या जाणा-या सरकारमध्ये चार जणांची नावे पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहेत. बांगलादेशात सरकार स्थापनेसाठी १५१ ही […] The post बांगलादेशात पंतप्रधानपदासाठी चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आईच्या जातीच्या आधारे आता मुलीला मिळणार एससी प्रमाणपत्र
नवी दिल्ली : शिक्षणाशी निगडीत गरज लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या आईच्या जातीच्या आधारे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयाचे परिणाम पुढील काळात दिसून येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात आधीपासून अनेक याचिका प्रलंबित आहेत, ज्यात प्रथा परंपरेच्या नियमांना आव्हान देण्यात […] The post आईच्या जातीच्या आधारे आता मुलीला मिळणार एससी प्रमाणपत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हॉटेल कर्मचाऱ्यांकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण:गेट उघडण्यास सांगितल्याने वाद, चार जणांवर गुन्हा दाखल
पुण्यात हॉटेल कर्मचाऱ्यांकडून एका डिलिव्हरी बॉयला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलचे गेट उघडण्यास सांगितल्याच्या रागातून हा प्रकार घडला असून, याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरी परिसरातील बेल्हेकर वस्ती येथील 'हॅपी द पंजाब' हॉटेलमध्ये ही घटना घडली. अरमान परी (२३) आणि इतर तीन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष सुनील भगत (२४, रा. मांजरी फार्म, तुपे पार्क, मांजरी हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आशिष भगत हे एका कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. ८ डिसेंबर रोजी रात्री ते त्यांच्या मित्रासोबत जेवण करण्यासाठी 'हॅपी द पंजाब' हॉटेलमध्ये गेले होते. रात्री दीड वाजता जेवण झाल्यावर ते घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांनी हॉटेलचे बंद झालेले गेट उघडण्यास सांगितले. याच कारणावरून भगत आणि हॉटेलमधील कामगारांमध्ये वाद झाला. यावेळी कामगारांनी भगत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, रॉडने त्यांच्या हातावर मारल्याने हात फ्रॅक्चर झाला आणि कड्याने डोक्यातही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर भगत यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गप्पा मारत थांबलेल्यावर हल्ला करणाऱ्या एकाला अटक धायरी येथील कोळेश्र्वर मंदिराजवळी गिरीजा हॉटेल समोर गप्पा मारत थांबलेलया तरूणाला काही एक कारण नसताना शिवीगाळ करून दगडाने व कुंडी डोक्यात घालून मारहाण करणाऱ्या एकाला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली. गौरव राजू घाडगे (19, रा. वडगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे साथीदार सोन्या हिवाळे, यश देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रसाद गणेश भोपकर (33, रा. शिवअपार्टमेंट, रायकरनगर धायरी) यांनी याबाबत नांदेडसिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पुणे विमानतळ रस्ता लवकरच वाहतूककोंडीमुक्त होणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या प्रकल्पामुळे हवाई मार्गाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना उत्तम दर्जाचा रस्ता उपलब्ध होईल आणि त्यांना शहराच्या समृद्ध वारसा, कला व संस्कृतीचे दर्शनही घडेल. नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा सध्याचा १२ मीटर रुंद रस्ता २४ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या रुंदीकरणासोबतच रस्त्याचे सुशोभीकरणही केले जाईल. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) हा प्रकल्प विकसित करण्यात येणार असून, त्याचे काम लवकरच सुरू होईल, असे मोहोळ यांनी सांगितले. लोहगाव येथे असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सध्या दररोज सुमारे २०० ते २२५ विमानांची उड्डाणे होतात. वार्षिक प्रवासी संख्या एक कोटींहून अधिक झाली असून, ती वाढतच आहे. यामुळे विमानतळ रस्त्यावर वर्षभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणी येतात. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक होते. मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः या रुंदीकरण आणि सुशोभीकरणाची संकल्पना मांडली. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, विमानतळ संचालक संतोष ढोके आणि हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन कुलदीप सिंग यांच्यासोबत बैठक घेतली होती. या बैठकीत रुंदीकरण आणि सुशोभीकरणाचा निर्णय घेण्यात आला. नागपूर चाळ ते विमानतळापर्यंतचा रस्ता हवाई दल आणि काही खासगी मालकीचा आहे. हवाई दलाकडून जागा ताब्यात येत नसल्याने रस्त्याचे रुंदीकरण दीर्घकाळ रखडले होते. मात्र, खासदार मोहोळ यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हवाई दलाने नागपूर चाळीपासून विमानतळापर्यंत रस्त्याच्या रुंदीकरणास मंजुरी दिली आहे. तसेच, खासगी जागा मालकांनीही भूसंपादनाला सहमती दर्शवली आहे. यामुळे नागपूर चाळ ते लोहगाव विमानतळपर्यंतच्या ३ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) विदर्भातील वर्धा जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. 'ऑपरेशन हिंटरलँड ब्रू' या कोडनेमखाली राबवलेल्या मोहिमेत डीआरआयने वर्ध्यातील जंगलात लपवून चालवल्या जाणाऱ्या मेफेड्रोन निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत तब्बल 128 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे 192 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. वर्ध्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कारंजा (घाडगे) या तालुक्यातील एका निर्जन भागात मेफेड्रोनची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी या भागावर पाळत ठेवली. हा परिसर पूर्णपणे झाडाझुडपांनी व्यापलेला होता. खात्री पटल्यानंतर पथकाने तिथे छापा टाकला. यावेळी तिथे पूर्ण क्षमतेने सुरू असलेला एक ड्रग्ज निर्मितीचा कारखाना आढळून आला. घटनास्थळावरून अधिकाऱ्यांनी 128 किलो तयार मेफेड्रोन आणि 245 किलो कच्चा माल (प्रिकर्सर केमिकल्स) जप्त केला आहे. यासोबतच ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे रिॲक्टर्स, मोठी भांडी आणि इतर उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत. मास्टरमाईंड स्वतःच केमिस्ट या प्रकरणी डीआरआयने तिघांना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी म्हणजेच 'मास्टरमाईंड' हा स्वतःच या प्रोजेक्टचा फायनान्सर आणि केमिस्ट (रसायनशास्त्रज्ञ) म्हणून काम पाहत होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून गावातील साध्या घरासारखी दिसणारी तात्पुरती शेड उभारून हा कारखाना चालवला जात होता. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही 'एनडीपीएस' (NDPS Act, 1985) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षातील पाचवी मोठी कारवाई सरकारच्या 'नशामुक्त भारत अभियाना' अंतर्गत डीआरआयने अमली पदार्थांच्या विरोधात कंबर कसली आहे. डीआरआयने या वर्षभरात उद्ध्वस्त केलेला हा पाचवा छुपा कारखाना आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत. मध्यप्रदेशातही 46 किलो गांजा जप्त दुसरीकडे, मध्य प्रदेशातील रायपूर बघेलान पोलिस ठाण्याच्या हद्दीतही मोठी कारवाई करण्यात आली. पंकज सिंह बघेल या व्यक्तीच्या घराजवळील टीनशेडजवळून पोलिसांनी 46 किलो 134 ग्रॅम गांजा जप्त केला. या गांज्याची बाजारातील किंमत सुमारे 9 लाख 22 हजार रुपये आहे. पोलीसांनी पंकज बघेलच्या घराची झडती घेतली असता, पेंढ्याच्या पोत्याखाली चार मोठे पोते लपवून ठेवलेला गांजा मिळाला. प्रत्येक पोत्यात 12 पाकिटे असून सर्व पाकिटांचे एकूण वजन 46 किलोपेक्षा अधिक होते. तपासात हा गांजा अनिल बागरी आणि सुहेलेंद्र सिंह रजावत यांच्याकडून मिळाल्याचे समोर आले असून, तिघांवरही NDPS कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
पक्षासाठी मी आजवर अनेकदा त्याग आणि बलिदान दिले आहे. आता मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी झालेला माझा अपमान मी आजही विसरलेलो नाही आणि कधीच विसरू शकत नाही, अशा शब्दांत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. एका बाजूला मी नाराज नाही असे सांगतानाच, दुसऱ्या बाजूला त्यावेळच्या तडजोडीबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला. बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी आज मुलुंड-कुर्ला तहसीलदार कार्यालयात ठिय्या मांडला होता. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी 2019 च्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. सोमय्या म्हणाले, मी देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट सांगितले आहे की, 2019 ची घटना मी विसरू शकत नाही. त्यावेळी केवळ उद्धव ठाकरे यांच्या हट्टापायी आणि जिद्दीमुळे मला भरसभेतून, पक्षाच्या मंचावरून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. भाजपच्या ज्या नेत्यांनी त्यावेळी उद्धव ठाकरेंशी समझोता केला, ते ठीक आहे. पण ज्यांनी मला प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढले, त्या भाजप नेत्याला मी कधीही माफ करू शकत नाही. यावेळी त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कार्यकर्ता हेच माझे पद पदाच्या नाराजीबद्दल विचारले असता सोमय्या म्हणाले, मला आता कोणत्याही पदाची गरज नाही. मी इतर कोणापेक्षाही हजारो पटीने पक्षासाठी काम करत आहे. भाजपचा सामान्य कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे पद आहे. मुंबईला बांगलादेशीमुक्त करण्यासाठी मी लढा देत आहे आणि घुसखोर मला घाबरत आहेत, हे माझ्या कामाचे यश आहे. दरम्यान, भाजपचे आमदार अमित साटम निवडणूक संचालक पदासाठी का हट्ट करत आहेत, याची मला कल्पना नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 2019 ला काय घडले होते? 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेना युतीची घोषणा करण्यासाठी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, जोपर्यंत किरीट सोमय्या तिथे उपस्थित आहेत, तोपर्यंत मी पत्रकार परिषदेला येणार नाही, असा आक्रमक पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. अखेर युती टिकवण्यासाठी भाजप नेत्यांनी सोमय्या यांची समजूत काढत त्यांना हॉटेलमधून निघून जाण्यास सांगितले होते. स्वतःच्याच पक्षाच्या कार्यक्रमातून अपमानित होऊन बाहेर पडावे लागल्याचे शल्य सोमय्यांच्या मनात आजही कायम असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले.
कवितेचा गौरव:कवी सुनील उबाळे यांच्या 'उलट्या कडीचं घर'ला मातोश्री हरणाबाई जाधव काव्य पुरस्कार जाहीर
छत्रपती संभाजीनगर येथील कवी सुनील उबाळे यांच्या 'उलट्या कडीचं घर' या काव्यसंग्रहाला मातोश्री हरणाबाई जाधव काव्य पुरस्कार जाहीर झालाय. येत्या २१ डिसेंबर रोजी त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झेप साहित्य संमेलन होत आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते कवी सुनील उबाळे यांचा गौरव करण्यात येणार आहे. झेप संमेलनात गौरव... छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ डिसेंबर रोजी साप्ताहित झेप तर्फे आयोजित २० वे झेप साहित्य संमेलन होत आहे. महात्मा गांधी भवन येथे हे संमेलन होईल. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते कवी सुनील उबाळे यांचा गौरव करण्यात येणार आहे, असे साप्ताहिक झेपचे संपादक डिंगाबर जाधव यांनी कळवले आहे. या पुरस्काराबद्दल सुनील उबाळे यांचे अभिनंदन होत आहे. करुणेचे बोट धरलेले... जगण्याच्या मुळाशी असलेली आदिम भूक हे सुनील उबाळे यांच्या कवितेचे सर्जनकेंद्र आहे. ही कविता प्रचंड संवेदनशील आहे. कामगार वर्गाचं एक अतिशय वेगळं जगणं ती आपल्यासमोर उभं करते. हे सारं करताना कवी आक्रस्ताळा होत नाही. तो करुणेचं बोट धरून वाटचाल करतो. सुनील उबाळे यांचा 'उलट्या कडीचं घर' या काव्यसंग्रहाला अनेक पुरस्कार मिळालेत. संबंधित वृत्त संडे पोएम:भाकर पाऱ्यासारखी निसटत राहिली आणि मी मोठा होत गेलो, तिला पकडता पकडता...आज कवी सुनील उबाळे यांची कविता!
राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे मतदान पार पडताच आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. नगरपालिकांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुखांची तातडीची बैठक घेत त्यांना महत्त्वाचे आदेश दिले. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचारात उद्धव ठाकरे सक्रिय दिसले नाहीत, मात्र आगामी निवडणुकांसाठी त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. आजच्या बैठकीत जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमधील पक्षाच्या ताकदीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून उमेदवार सर्वांना मान्य आहे का, याची चाचपणी करा. तसेच, संबंधित मतदारसंघात मनसेची ताकद किती आहे, याचाही अंदाज घ्या. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. त्या अनुषंगाने, उद्धव ठाकरेंनी सध्याच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. ग्राऊंड लेव्हलला काम करणारे निष्ठावंत पदाधिकारी कोण आहेत? सध्या किती शाखाप्रमुख कार्यरत आहेत आणि कोणत्या जागा रिक्त आहेत? तसेच, महापालिकेच्या प्रभागवार रचनेत पक्षाची स्थिती काय आहे? या सर्व बाबींचा सविस्तर अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे फर्मान ठाकरेंनी सोडले आहे. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाने स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवत प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी 30 हून अधिक सभा घेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही अखेरच्या दिवसापर्यंत प्रचाराचा धडाका लावला. मात्र, सत्ताधारी पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या प्रचारात कुठेही सक्रिय दिसून आले नाहीत, ज्यामुळे आता विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मंगळवारी पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंत्यविधीसाठी शैला आढाव, असीम आढाव, अंबर आढाव, माजी आमदार उल्हास पवार, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, अंकुश काकडे, सुषमा अंधारे, डॉ. अभिजीत वैद्य, बी.जी. कोळसे पाटील आणि नितीन पवार उपस्थित होते. डॉ. अभिजीत वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितले की, एखाद्या वृक्षाच्या फांद्यांवर अनेक पारंब्या आधार घेत आम्ही आतापर्यंत काम करत आलो आहोत. आमचा वटवृक्ष आज उन्मळून पडला आहे. बिकट काळात देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जे व्यक्ती काम करतात, ते गेल्यावर लोक सैरभैर होतात. पण सर्वांनी त्यांच्या विचाराने काम करणे आवश्यक असते, हीच बाबांना खरी श्रद्धांजली आहे. बाबांचे पुत्र असीम आढाव म्हणाले, बाबा आज शांतपणे आपल्यातून गेले आहेत. त्यांच्या कामाचा व्याप मोठा होता; ते खरे लोकांचे महात्मा होते. हजारो कार्यकर्ते त्यांचे काम आगामी काळात तेवत ठेवतील. आजारपणात बाबांची दिवस-रात्र काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांचे आम्ही आभार मानतो. दुसरे पुत्र अंबर आढाव यांनी सांगितले की, बाबांचे ९६ वर्षांचे समर्पित आयुष्य होते. शरीर कमकुवत झाले होते, पण शेवटपर्यंत त्यांनी असंघटित कामगार आणि वंचित घटकांसाठी आपले कार्य वाहिले. अनेकदा विविध आंदोलनांमध्ये त्यांना अटक झाली, तुरुंगात जावे लागले. ते थकले, पण खंबीरपणे उभे राहून काम करत राहिले. आपण सर्वांनी महात्मा फुले वाचले, पण फुले यांच्या विचाराने आयुष्यभर बाबा जगले. त्यांनी आम्हाला फार मोठी गोष्ट दिली असून, प्रेम करणारे मोठे कुटुंब दिले, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले की, आजचा प्रसंग कोणाच्या बाबतीत घडू नये. पण काळाच्या ओघात एखादा मनुष्य आपल्यातून जात असतो. वंचित आणि उपेक्षित लोकांसाठी बाबांनी आपले आयुष्य समर्पित केले. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कामगार संघटना या माध्यमातून त्यांनी सातत्याने काम केले. फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी नेहमी अंमलात आणली. संघर्ष योद्ध्याप्रमाणे त्यांनी आयुष्यभर काम केले. राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. दरम्यान, नितीन पवार यांनी माहिती दिली की, १२ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी चार वाजता बाबा आढाव यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.
कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथे शेतातून चारा का नेऊ देत नाही या कारणावरून एकास जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सात वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश टी. एस. अकाली यांनी मंगळवारी ता. ९ दिला आहे. याबाबत ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव येथील प्रल्हाद उर्फ बंडू नारायण तरटे यांना शेतातून चारा का घेऊन जाऊ देत नाही या कारणावरून सागर नामदेव हनवते याने ऊस तोडणीच्या कत्तीने गळ्यावर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रल्हाद गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी त्यांचे भाऊ जगदेवराव तरटे यांनी ता. ७ नोव्हेंबर २०१३ रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सागर हनवते याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. याप्रकरणात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद एेकल्यानंतर न्यायालयाने आरोपी सागर हनवते यास सात वर्ष सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या १० हजार रुपयांच्या रकमेपैकी सात हजार रुपये प्रल्हाद यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणात सरकारपक्षा तर्फे अॅड. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. सविता देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. एस. डी. कुटे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस कर्मचारी एस. जे. धनवे यांनी काम पाहिले.
चारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला आणि आशिया खंडातील सर्वात मोठा घोडे बाजार म्हणून ओळखला जाणारा नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील ‘चेतक फेस्टिवल’ सध्या जोरात सुरू आहे. दरवर्षी येथे घोड्यांच्या सौंदर्याच्या आणि कसब पणाला लावणाऱ्या स्पर्धा होतात. मात्र, यंदा या यात्रेत एक असा थरार घडला ज्याची चर्चा संपूर्ण राज्यभर होत आहे. यंत्र आणि प्राणी यांच्यात कोण श्रेष्ठ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘घोडा विरुद्ध बुलेट’ या अनोख्या शर्यतीत रक्तामांसाच्या घोड्याने आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या बुलेटला धूळ चारली. 'घोडा हाच वेगाचा राजा आहे', हे या शर्यतीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सारंगखेडा येथील तापी नदीच्या काठावर भरलेल्या या यात्रेत देशभरातून अश्वप्रेमी दाखल झाले आहेत. घोड्याचा नैसर्गिक वेग किती आहे, याची तुलना बुलेट मोटारसायकलच्या वेगाशी करून पाहण्याची इच्छा काही अश्व मालकांनी व्यक्त केली होती. त्यांच्या विनंतीवरून आयोजकांनी या अनोख्या शर्यतीचे आयोजन केले. ही शर्यत पाहण्यासाठी यात्रेकरूंनी आणि स्थानिकांनी रस्त्याच्या दुतर्फा तुफान गर्दी केली होती. ...अन् राणीने बुलेटला मागे टाकले शर्यत सुरू होताच एकीकडे बुलेटचा दणदणाट आणि दुसरीकडे घोड्याच्या टापांचा आवाज यामुळे वातावरण भारावून गेले. प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात स्पर्धेला सुरुवात केली. सुरुवातीला चुरशीच्या वाटणाऱ्या या लढतीत मध्य प्रदेशातील महेश्वर येथील यादव स्टड फार्मच्या ‘राणी’ नावाच्या घोडीने बुलेटस्वाराला मागे टाकले. वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या राणीने ही शर्यत जिंकताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. आपला घोडा जिंकल्याचा आनंद मालकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. 700 अश्वांची उपस्थिती आणि करोडोंची उलाढाल यंदाच्या सारंगखेडा यात्रेत पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून तब्बल 700 हून अधिक जातिवंत घोडे दाखल झाले आहेत. केवळ प्रदर्शनासाठी नव्हे, तर येथील स्पर्धा जिंकणे हे अश्व मालकांसाठी प्रतिष्ठेचे असते. या स्पर्धांमध्ये जो घोडा बाजी मारतो, त्याची किंमत रातोरात गगनाला भिडते. अनेकदा विजेत्या घोड्यांचे व्यवहार लाखो ते करोडो रुपयांत होतात. त्यामुळेच प्रत्येक मालक आपला घोडा जिंकावा यासाठी अतोनात मेहनत घेताना दिसत आहे. आगामी स्पर्धांची रंगत ही बुलेट आणि घोड्याची शर्यत म्हणजे या फेस्टिवलची केवळ सुरुवात होती. आता खऱ्या अर्थाने स्पर्धांना रंग चढणार आहे. आज घोड्यांची विशिष्ट चालण्याची ‘रेवाल चाल’ स्पर्धा, उद्या घोड्यांच्या नृत्याची आणि कलेची ‘अश्व नृत्य’ स्पर्धा, तर परवा दुर्मिळ अशा ‘नुकरा अश्व’ जातीची स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धांमुळे सारंगखेड्याच्या अर्थकारणाला मोठी गती मिळणार असून, पुढील काही दिवस हा घोडे बाजार अश्वप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
बॉम्बे उच्च न्यायालय (BHC) ने स्टेनोग्राफर, लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर आणि चालक या पदांसाठी भरती काढली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त पदांचा तपशील : शैक्षणिक पात्रता : पदानुसार 10वी उत्तीर्ण ते पदवीधर. शिपाई : मराठी वाचता-लिहिता येणे आवश्यक आहे. ड्रायव्हर : लघुलेखक निम्न श्रेणी : पदवी आणि 80wpm शॉर्टहँडसह 40wpm च्या गतीने टायपिंग येणे आवश्यक आहे. स्टेनोग्राफर लोअरसाठी पदवी, 100wpm च्या गतीने शॉर्टहँड आणि 40wpm च्या गतीने टायपिंग आवश्यक आहे. वयोमर्यादा : शुल्क : सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी : 1000 रुपये परीक्षेचे स्वरूप : निवड प्रक्रिया : पगार : असा करा अर्ज : ऑनलाइन अर्ज लिंक स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) भरती अधिकृत अधिसूचना लिंक स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) भरती अधिकृत अधिसूचना लिंक लिपिक भरती अधिकृत अधिसूचना लिंक कार चालक भरती अधिकृत अधिसूचना लिंक शिपाई, हमाल भरती अधिकृत अधिसूचना लिंक
रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असाच एक भीषण अपघात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कोंडमळा परिसरात उभ्या असलेल्या डम्परला मागून येणाऱ्या वाळूवरील डम्परने धडक दिली. या अपघातात 30 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत युवकाचे नाव अमित एकनाथ हुमणे (रा. आगवे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे असून तो कबड्डीपटू आणि महावितरणचा कर्मचारी होता. शनिवारी रात्री हा अपघात झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमित हुमणे या तरुणाने कबड्डीमध्ये अनेक बक्षिसे मिळवले आहेत. परंतु, त्याच्या मृत्यूने त्याच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे. अमितच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून आगवे गावात शोककळा पसरली आहे. अपघात नेमका कसा झाला? अपघाताबाबत चिपळूण सावर्डे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डम्पर चालक सुरेश दौलत हुमणे (50) हे अमित हुमणे यांच्यासह आगवेहून चिपळूणकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी कोंडमळा जवळ असलेल्या वळणावर आल्यानंतर समोर एक डम्पर महामार्गावरच उभा होता. हा डम्पर शौकद अली (50, रा. जयगड, रत्नागिरी) याने कोणतेही फलक अथवा इंडिकेटर किंवा सुरक्षात्मक उपाय न लावता थेट डाव्या लेनमध्ये उभा केला होता. वेगाने येणाऱ्या सुरेश हुमणे यांना हा डम्पर दिसला नाही आणि त्यांच्या वाहनाची समोर उभ्या असलेल्या डम्परला जबरदस्त धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की केबिनमध्ये बसलेल्या अमित हुमणेचा जागीच मृत्यू झाला. तर सुरेश हुमणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले की शौकद आली यांनी लावलेला डम्पर चुकीच्या पद्धतीने लावला होता त्यामुळेच हा अपघात झाला. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सावर्डे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
‘बोगस’ प्रमाणपत्रावर नोकरी मिळविणा-यांवर होणार कारवाई
नागपूर : प्रतिनिधी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्यात ३५९ कर्मचारी, अधिकारी आहेत ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. अहेरी येथील गणेश शहाणे यांच्याबाबत अवर सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाकडून कारवाई करण्याचे निर्देश आल्यावरही कारवाई का करण्यात आलेली नाही? असा कोणता राजकीय दबाव […] The post ‘बोगस’ प्रमाणपत्रावर नोकरी मिळविणा-यांवर होणार कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार!; मनसेकडून व्हीडीओ पोस्ट
मुंबई : मनसेने सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारावर एक व्हीडीओ बॉम्ब टाकला आहे. या व्हीडीओमध्ये बांधकाम विभागातील एक अभियंता शासनाकडून मिळणा-या निधीतील टक्केवारी स्वीकारताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा व्हीडीओ पोस्ट केला असून, शासकीय निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात आणि बोगस बिले काढली जातात, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पैसे हे […] The post सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार!;मनसेकडून व्हीडीओ पोस्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. विधानसभेत कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तरांचा तास घेण्यात आला. ज्यामध्ये भाजपा आमदार अमित साटम यांनी फलटण जिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामध्ये विजय वडेट्टीवार, प्रकाश साळुंखे, ज्योती गायकवाड, नाना पटोले यांनी प्रश्न विचारला. तर या प्रश्नाचे उत्तर […] The post हत्या नाही आत्महत्याच ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, सोमवारी दुपारी पुन्हा एकदा एका भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारला करमाडनजीकच्या लाहुकी फाट्यावर अपघात झाला. दुभाजकाला धडकल्यानंतर कारने काही क्षणातच पेट घेतला आणि बघता बघता कार जळून खाक झाली. सुदैवाने, कारमधील पाचही प्रवाशांनी वेळीच बाहेर निघण्यात यशस्वी झाल्याने मोठा अनर्थ टळला. 'दैव बलवत्तर म्हणून वाचलो', अशीच भावना या प्रवाशांनी व्यक्त केली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित कार (एमएच-१२) नागपूरकडून पुण्याच्या दिशेने जात होती. समृद्धी महामार्गावरून करमाडकडे उतरताना बनगाव-लाहुकी फाट्याजवळील चौकात कार आली असता, चालकाला तेथील गतिरोधकाचा अंदाज आला नाही. वेगात असलेली कार गतिरोधकावरून हवेत उडाली आणि थेट दुभाजकावर आदळली. या जोरदार धडकेनंतर कारने अचानक पेट घेतला. प्रवाशांचे प्रसंगावधान आणि बचाव अपघातानंतर कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच आतील प्रवाशांची गाळण उडाली. मात्र, प्रसंगावधान राखत अनिकेत झिरपे, दत्तात्रय झिरपे, केतकी झिरपे, कोमल गायकवाड आणि कल्पना गायकवाड या पाचही प्रवाशांनी तातडीने कारमधून बाहेर पडले. ते बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो पाहून अंगावर काटा येतो. अग्निशमन दलाने आग विझवली, पण तोपर्यंत कारचा कोळसा झाला होता. या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसरा अपघात : गतिरोधक की मृत्यूचा सापळा? समृद्धी महामार्ग आणि या महामार्गाव होणारे अपघात हा संशोधनाचा विषय बनला आहे. कारण छत्रपती संभाजीनगर जवळील लाहुकी फाट्यावरील हा तिसरा अपघात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या चौकातील गतिरोधक चालकांच्या लक्षात येत नसल्याने वाहने थेट दुभाजकावर धडकत आहेत. येथे दिशादर्शक फलक किंवा सूचना नसल्याने हा गतिरोधक अपघातांना आमंत्रण देत आहे. प्रशासनाने तातडीने येथे उपाययोजना करावी, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी मागणी नागरिक करत आहेत. हे ही वाचा... नर्तिकेच्या प्रेमसंबंधातून धाराशिवमध्ये तरुणाची आत्महत्या:किरकोळ वादातून उचलले टोकाचे पाऊल, देवदर्शनाहून परतत असताना झाला होता वाद सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथे नर्तिकेच्या नादातून युवकाने आपले जीवन संपवल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता धाराशिवमध्ये कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाल्याने एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अश्रुबा कांबळे असे या युवकाचे नावे आहे. सविस्तर वाचा...
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि बीड जिल्ह्यातील गेवराई येथे नर्तिकेच्या नादातून युवकाने आपले जीवन संपवल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता धाराशिवमध्ये कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाल्याने एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अश्रुबा कांबळे असे या युवकाचे नावे आहे. अश्रुबा कांबळे आणि नर्तिका दोघेही देवदर्शनासाठी एकत्र गेले होते. तिथून परत आल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि पुढे हा वाद चिघळला. यातूनच अश्रुबा या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नर्तिकेच्या नादात बीड जिल्ह्यातील युवकाने आपले आयुष्य संपवले होते. या घटनेबाबत अधिकची माहिती अशी की, धाराशिव येथील साई कला केंद्रात नृत्य काम करणाऱ्या महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा वाद झाला होता. या वादात अश्रुबा अंकुश कांबळे (25) या तरुणाने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. धमकी दिल्याच्या काही वेळातच या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. अश्रुबा कांबळे रुई ढोकी गावचा रहिवाशी असून गेल्या 5 वर्षापासून कला केंद्रातील नर्तिका आणि त्याच्यात अनैतिक प्रेम संबंध असल्याचे समजते. मृत तरुण आणि तरुणी शिखर शिंगणापूर येथे काल देवदर्शनाला गेले, देवदर्शन करून परतत असताना दोघांमध्ये वाद झाला. देव दर्शन करून येत असताना मृत प्रियकराच्या बायकोचा फोन आला म्हणून नर्तिका आणि अश्रुबा यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये वाद सुरू झाल्यावर अश्रुबा याने आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि तो तिथून निघून गेला. नर्तिकेने त्याच्या या धमकीकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळातच अश्रुबाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या नंतर धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी केली जात आहे.
‘आपला दवाखाना’ भ्रष्टाचाराचे कुरण
नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ यावर आता भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. हे आरोप दुस-या- तिस-या कुणी नाही तर सत्ताधारी भाजपच्या आमदाराने केले आहेत. ‘आपला दवाखाना’ हा भ्रष्टाचाराचे कुरण झालेय का असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केला. ते विधान परिषदेत बोलत होते. विधान […] The post ‘आपला दवाखाना’ भ्रष्टाचाराचे कुरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गळ्यात कापसाची माळ घालून विरोधक विधान भवनात
नागपूर : प्रतिनिधी सध्या नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नांवरून जोरदार आंदोलन करत सत्ताधारी सरकारला धारेवर धरले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून विधान भवनात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर तीव्र संताप व्यक्त […] The post गळ्यात कापसाची माळ घालून विरोधक विधान भवनात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात स्ट्राँग रूमबाहेर खडा पहारा
मुंबई : राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा २० डिसेंबर रोजी पूर्ण होईल. हायकोर्टाच्या निकालानंतर २१ डिसेंबरला एकदाच मतमोजणी होईल. तोपर्यंत मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांसोबतच कार्यकर्ते, नेते सुद्धा या स्ट्राँग रूमला खडा पहारा देत आहेत. तीन शिफ्टमध्ये सुरक्षा देण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुका पार पडलेल्या भागातील ईव्हीएम मशिन स्ट्राँग रूममध्ये […] The post राज्यात स्ट्राँग रूमबाहेर खडा पहारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही निवडणूक लढता येते, पण महाराष्ट्रात भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या पत्नी किंवा आईविरोधात उमेदवारी अर्जही भरता येत नाही, अशी भयावह स्थिती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना सुळे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला पैशांचा वापर, हिंसाचार आणि भाजपमधील वाढता 'परिवारवाद' यावर सडकून टीका केली. भाजपकडे एवढा पैसा आला कुठून? निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करताना सुळे म्हणाल्या, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपकडे एवढा पैसा आला कुठून? सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात नोटांच्या बंडलांनी भरलेल्या थैल्या सापडल्या. विशेष म्हणजे महायुतीमधीलच शिवसेनेचे नेते नीलेश राणे यांनीच भाजपचे पैसे पकडल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. निवडणुकीत पारदर्शकता हवी असून केवळ टीका न करता सुधारणांसाठी आम्ही येथे आलो आहोत, असेही त्या म्हणाल्या. प्राणामिकपणे निवडणूक व्हाव्यात एवढीच मागणी सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाने घटनात्मक असायला हवे. ७० वर्षांत सर्वांचेच योगदान आहे. 10 वर्षांत भाजप सरकारने देखील काही ना काही चांगले केले आहे. भाजपने 10 वर्षांत काय केले? मी असे कधीच विचारणार नाही. आपण फक्त चुका काढण्यासाठी इथे आलेलो नाहीत. निवडणूक सुधारणासाठी आपण सर्व विचार करू आणि देशासाठी, पुढील पिढीसाठी काहीतरी चांगले करू. यासाठीच याठिकाणी निवडून आलो आहोत. इथे केवळ एकमेकांवर टीका-टिपण्णी करण्यासाठी आपण आलेलो नाहीत. पारदर्शकतेने आणि प्राणामिकपणे निवडणूक व्हाव्यात एवढीच आमची मागणी आहे. परिवारवादी असल्याचा मला अभिमान परिवारवादाचे आमच्यावर खूप आरोप होतात. मी तर परिवारवाद आहेतच आणि मला त्याचा अभिमान आहे. मला त्यात काही गैर वाटत नाही. कारण आम्ही लोकांमधून निवडून येतो. आम्ही कॉपी करून पास होत नाही. सध्या आमच्यापेक्षा जास्त परिवारवाद भाजपमध्ये आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलताना केली. महाराष्ट्रात 20 ठिकाणी या निवडणुका झाल्याच नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका पारदर्शक आणि प्रामाणिक व्हाव्यात, अशी सगळ्यांची इच्छा असते. पण आमच्याकडे 20 ठिकाणी या निवडणुका झाल्याच नाहीत. विशेष म्हणजे, या 20 ठिकाणी निवडून आलेले सदस्य परिवावादातील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देखील कुणी ना कुणी उभा राहतो. सशक्त लोकशाहीत एक तरी विरोधक असायला पाहिजे. हेच तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवले आहे. संविधानातही तेच म्हटलेले आहे. विरोधक असावेत अशी मोदींचीही इच्छा आहे. सुप्रिया सुळेंनी वाचवून दाखवली यादी सुप्रिया सुळे यांनी यावेळी संसदेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी वाचून दाखवली. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात जामनेर नगर पालिकेत साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या आहेत. हे परिवारवाद प्रॉडक्ट आहे. साधना या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत. भुसावळमध्ये कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, खामगावमध्ये मंत्री अविनाश फुंडकर यांच्या भावजई अर्पणा फुंडकर, दोंडाईचा येथे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री, यवतमाळमध्ये मंत्री उके यांच्या कन्या प्रियदर्शनी उके, तर चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण बिनविरोध निवडून आल्या. 25 जण बिनविरोध कसे निवडून येतात? सुप्रिया सुळे म्हणाल्या, या सर्व ठिकाणी निवडणूक झालीच नाही. हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. शिवाय याठिकाणी हिंसाचार देखील झाला आहे. हे सर्व भाजपचे उमेदवार आहेत. कुणाला फॉर्म देखील भरू दिला नाही. यातील सर्व मंत्र्यांच्या पत्नी, बहीण, आई आणि भावजई आहेत. लोकशाहीत एक तरी विरोधक असावा. एक, दोन बिनविरोध निवडून आले, तर ते समजू शकतो. पण २५ उमेदवार बिनविरोध निवडून येतात. असे कसे होऊ शकते? आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.
अपात्र लाभार्थ्यांनी लाटले ‘लाडकी’चे ३२ कोटी
नागपूर : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकीकडे महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असताना, दुसरीकडे तब्बल ३२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची कबुली सरकारने दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बोगस लाभार्थ्यांकडून राज्य शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांमुळे सरकारचे तब्बल ३२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. २६ लाख अपात्र महिला आणि १४ हजार २९७ […] The post अपात्र लाभार्थ्यांनी लाटले ‘लाडकी’चे ३२ कोटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भीमथडी जत्रा यंदा नव्या रूपात;सुनंदा पवार यांची माहिती
पुणे : प्रतिनिधी ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिका यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, या हेतूने सुरू करण्यात आलेली ‘भीमथडी जत्रा’ यंदा नव्या रूपात पुणेकरांच्या भेटीला येणार आहे. अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाऊंडेशन व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २० ते २५ डिसेंबर या कालावधीत सकाळी १० […] The post भीमथडी जत्रा यंदा नव्या रूपात;सुनंदा पवार यांची माहिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतामध्ये खाद्यतेलांच्या आयातीवर अद्याप मोठ्या प्रमाणावर अवलंबित्व कायम आहे. यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत असून, देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढविण्याची गरज कायम अधोरेखित होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, तेलबिया 2025 हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासोबतच भारतामध्ये तेलबियांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढविणे, जेणेकरून भविष्यात खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करता येईल. या कार्यक्रमांतर्गत विशेषतः सुधारित वाणांची लागवड, उत्पादकता वाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांपर्यंत उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे यावर भर दिला जात आहे. लातूर जिल्हा हा तेलबियांसाठी महत्त्वाचा प्रदेश असल्याने उन्हाळी तिळाची लागवड वाढवण्यासाठी 100 टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील निवडलेल्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 2.5 किलो प्रमाणित तीळ बियाणे विनामूल्य अर्थात पूर्ण अनुदानावर दिले जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यास या लाभासाठी किमान 0.20 हेक्टर आणि कमाल 1 हेक्टर क्षेत्र मर्यादा लागू आहे. शासकीय पुरवठादार संस्थांकडून उपलब्ध असणाऱ्या 500 ग्रॅम व 1 किलो या पॅकिंग साईजनुसारच बियाणे शेतकऱ्यांना दिले जाईल. मात्र, काही वेळा प्रत्यक्ष क्षेत्रानुसार लागणाऱ्या बियाण्यापेक्षा पॅकेट्स मोठे किंवा अतिरिक्त प्रमाणात लागू शकतात. अशा परिस्थितीत जादा बियाण्याचा खर्च शेतकऱ्याने स्वतःच्या स्वखर्चातून भरावा लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून अर्ज करताना स्वतःच्या क्षेत्राचा व बियाण्याच्या गरजेचा काळजीपूर्वक विचार करावा, असे कृषी विभागाचे आवाहन आहे. पहिले अर्ज करणाऱ्यास पहिले प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थी निवड या योजनेचा लाभ घेण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in या राज्य शासनाच्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. संबंधित वेबसाइटवर प्रमाणित बियाणे वितरण, प्रात्यक्षिके, फ्लेक्झी घटक, औषधे व खते या शीर्षकाखाली अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांची एग्रीस्टॅक प्रणालीवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. ही नोंदणी नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. शिवाय लक्षांक मर्यादित असल्याने ‘पहिले अर्ज करणाऱ्यास पहिले प्राधान्य’ या तत्त्वावर लाभार्थी निवड केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करण्यास उशीर करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी व डिजिटल सेवा केंद्रांची मदत घेता येईल. यामुळे शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया सुलभ होईल व लाभ त्वरित मिळण्याची शक्यता वाढेल. भविष्यात लातूर जिल्हा तिळाचा महत्त्वाचा पुरवठादार बनू शकतो उन्हाळी तिळाचे पिक कमी पाण्यावर, अल्प खर्चात आणि अल्प कालावधीत उत्पादन देते. यामुळे तिळाची लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. शिवाय तिळामध्ये तेलाचे प्रमाण इतर अनेक तेलबियांपेक्षा अधिक असल्याने खाद्यतेल उद्योगाला या पिकाचे विशेष महत्त्व आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियानामुळे तिळाच्या उत्पादनात वाढ होईल, शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावात विक्री करता येईल तसेच देशांतर्गत उत्पादन वाढून खाद्यतेल आयातीवर मर्यादा आणता येईल. त्यामुळे या अभियानाचा दुहेरी फायदा, शेतकरी उत्पन्न वाढ आणि राष्ट्राची आर्थिक बचत होणार असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. सुधारित वाणांचा प्रसार झाल्यास प्रति हेक्टर उत्पादन वाढेल आणि भविष्यात लातूर जिल्हा तिळाचा महत्त्वाचा पुरवठादार बनू शकतो. स्वावलंबी तेलउत्पादन मोहिमेत योगदान द्यावे या योजनेंतर्गत मिळणारे प्रमाणित बियाणे हे शास्त्रोक्त पद्धतीने विकसित झालेले असल्याने पेरणीतून अधिक उत्पादन मिळण्याची हमी आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे आणि आर्थिक लाभासोबत भारताच्या स्वावलंबी तेलउत्पादन मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे तिळाची लागवड क्षेत्र वाढेल, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि लातूरसह महाराष्ट्र देशातील तेलबियांच्या उत्पादनात अग्रस्थानी झेप घेईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पुढील योग्य वेळी संधी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यानंतर भाजपा नेतेे डॉ. मारोती क्यातमवार यांनी वसमत पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीचा नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आता भाजपाचेच काम करणार असल्याचे डॉ. क्यातमवार यांनी स्पष्ट केले आहे. वसमत येथे काँग्रेस पक्षातून शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या डॉ. क्यातमवार यांना पालिका निवडणुकीत शिंदेसेनेने नगराध्यक्षपदासाठी संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांनी त्यांची पत्नी सविता क्यातमवार यांचा भाजपाकडून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र पक्षाचा एबी फॉर्म वर दुसऱ्या क्रमांकावर नांव असल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढविण्याची तयारी चालवली होती. दरम्यान, वसमत विधानसभा मतदार संघात डॉ. क्यातमवार यांना मोठे पाठबळ आहे. या शिवाय शहरातही त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्यास त्याचा फटका भाजपाच्या उमेदवाराला बसणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवदास बोड्डेवार यांनी डॉ. क्यातमवार यांच्याशी चर्चा करून त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घडवूुन दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी डॉ. क्यातमवार यांच्याशी चर्चा केली. तुम्ही अभ्यासू व्यक्तीमत्व आहात. तुमच्या मार्गदर्शनाची स्थानिक पातळीवर गरज आहे. त्यामुळे यावेळी ऐका व पुढील योग्य वेळी संधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर डॉ. क्यातमवार यांनी त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज माघारीचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलतांना डॉ. क्यातमवार म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस तसेच महसुलमंत्री बावनकुळे यांच्या भेटीनंतर आपण पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला असून या निवडणुकीत भाजपाचेच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय प्रशासन सेवेतील नेहमीच चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी केल्यामुळे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंबंधी कृष्णा खोपडे यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंढेंची बाजू घेतल्याचे पाहायला मिळाले. नागपूरमधील स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित अनियमिततेवरून आमदार कृष्णा खोपडे यांनी तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप केलेत. सभागृहात बोलताना ते म्हणाले, 2020 मध्ये नागपूर महापालिकेत आल्यावर अवघ्या 7 महिन्यांत मुंढे यांनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पात हस्तक्षेप केला आणि कोट्यवधींची कंत्राटे मंजूर केली. या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवताच, मुंढेंच्या इशाऱ्यावरून मला धमक्यांचे फोन येत आहेत. एका लोकप्रतिनिधीला शासकीय अधिकाऱ्याची माणसे धमकावत असतील, तर हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत खोपडे यांनी हा अधिकारी कुठेच टिकत नाही, 20 वर्षांत यांच्या 24 बदल्या झाल्या आहेत, असे सांगत संताप व्यक्त केला. मुंढेंचे महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तन? भाजप आमदार प्रवीण दटके यांनीही या चर्चेत उडी घेत तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाच दिवसांचे बाळ असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला सक्तीने कामावर बोलावणे आणि नस्तीवर सही न केल्याने दुसऱ्या एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत सुनावणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत, असा आरोप दटके यांनी केला. हे प्रकरण महिला आयोगाकडे प्रलंबित असून शासनाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. नियम पाळणाऱ्या अधिकाऱ्याचा बळी नको -वडेट्टीवार एकीकडे सत्ताधारी आमदार आक्रमक असताना, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मात्र तुकाराम मुंढे यांची बाजू सावरली. कोणत्याही आमदाराला धमकी देणे चुकीचे आहे. हे सहन करता कामा नये. तुकाराम मुंढे यांची नियुक्ती नागपूर महापालिकेत झाली असताना त्यांच्या विरोधात चौकशी झाली होती. महिला आयोगाने मुंडे यांना क्लिन चिट दिली. ज्या महिलांनी तक्रार केली होती, त्यांनाच राष्ट्रीय महिला आयोगाने दंड ठोठावल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल तर त्याला दोष देता कामा नये. भ्रष्टाचार करणार्यावर कारवाई करावी. यातील वस्तुस्थिती, सत्यता तपासली पाहिजे. मात्र, आपल्या सोयीसाठी कोणी आरोप करत असतील तर चौकशी झाली पाहिजे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले. धमकी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणार - मुख्यमंत्री या गदारोळानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला आश्वस्त केले. तुकाराम मुंढे प्रकरणात कृष्णा खोपडे यांना आलेल्या धमकी प्रकरणाचा गांभीर्याने तपास करणार आहोत. धमकी देणारे कोण आहेत? त्यांच्या मागे कोण आहेत? कोणाच्या इशाऱ्यावरून धमकी दिली? या सगळ्याचा तपास होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर, मुंढे यांच्यावरील आरोपांबाबत सगळी माहिती घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
मुंबईतील पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत या प्रकरणावर माहिती दिली. लहान मुलांची सुखरूप सुटका करण्यासाठीच आर्याचे एन्काउंटर करण्यात आल्याचे भोयर यांनी सांगितले. आर्याने ऑडिशनच्या नावाखाली ७ ते १४ वयोगटातील २० मुला-मुलींना ओलीस ठेवले होते. त्याने माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. यापूर्वी त्याने केसरकर यांच्या घरासमोर उपोषणही केले होते. पोलिसांनी समयसूचकता बाळगत आर्याला ठार केले. बॅलिस्टिक रिपोर्टमध्ये त्याच्या गनमध्ये गोळ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलांच्या सुरक्षित सुटकेसाठीच हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. या लक्षवेधीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कमरेच्या खाली गोळी मारण्याचा नियम असताना थेट गोळी का मारण्यात आली? एन्काउंटरसाठी वाघमारे यांनाच का आणण्यात आले? आर्याने नाव घेतलेल्या मंत्र्यांची चौकशी झाली काय? आर्याची देयके सरकारकडे बाकी आहेत की नाही? असे सवाल वडेट्टीवार यांनी केले. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, सल्लागार असलेल्या आर्याने सीएसआरच्या माध्यमातून एक प्रकल्प आणला होता. त्याने परवानगी नसताना शाळांकडून पैसे गोळा केले होते. ते पैसे परत करण्यासाठी आर्याला नोटीस बजावण्यात आली होती. सीएसआर अंतर्गत केलेल्या दोन टप्प्यांचे ९ लाख ९० हजार रुपयांचे पेमेंट करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. नाना पटोले आणि दिलीप लांडे यांनीही या प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. ठेकेदाराचे पैसे थकत होते, पण आता सल्लागाराचेही पैसे थकले हा नवा प्रकार समोर आला आहे. हे प्रकरण हाताळण्यात सरकार दोषी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला. सखोल चौकशी करून अधिवेशनात अहवाल सादर करण्याची मागणी पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत माहिती दिली की, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात पान, तंबाखू तसेच अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर आता 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली जाईल. कायद्यात बदल करून अशा प्रकरणांमध्ये मोक्का लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती दिली होती की, अशा दुकानांना आणि पानटपऱ्या उद्ध्वस्त करण्याच्या सूचना सर्व महापालिका व नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत. प्रशांत ठाकूर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, तर अभिमन्यू पवार आणि अस्लम शेख यांनी उपप्रश्न विचारले. बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. याबाबत तीन महिन्यांत तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बापू पठारे यांनी हा प्रश्न विचारला होता, तर बबनराव लोणीकर आणि सुनील प्रभू यांनी उपप्रश्न विचारले. काही जिल्ह्यांमध्ये बोगस प्रमाणपत्रे आढळून आली असून, त्यावर कारवाई करण्यात आली आहे, असेही सावे यांनी स्पष्ट केले. राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ६२ वसतिगृहे भाडेतत्त्वावर सुरू करण्यात आली आहेत, तर दहा ठिकाणी कायमस्वरूपी जागा दुग्ध विकास विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली. मनिषा चौधरी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. मुंबई परिसरात भाडे दर वाढवून दिल्याने तिथेही लवकरच वसतिगृहे सुरू केली जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्वाही दिली की, इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्यात येतील. महसूल विभागाने अशा जागा ओबीसी विभागाला हस्तांतरित केल्या असून, केवळ चार जिल्ह्यांमध्ये जागा मिळणे बाकी आहे. यात आपण स्वतः लक्ष घालून त्या उपलब्ध करून देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनी सांगितले की, त्यांची विज्ञानाची शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही, अवांतर वाचन, अभ्यास आणि संशोधनाच्या त्रिसूत्रीने त्या चरित्रांमधून 'माणूस' उलगडण्याचा प्रयत्न करतात. पुणे येथे अक्षरधारा बुक गॅलरी आणि वॉल्डन पब्लिकेशनतर्फे आयोजित लेखक संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम त्यांच्या 'द्रष्टा' या हेन्री डेव्हिड थोरो यांच्या चरित्राच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अक्षरधारा बुक गॅलरीच्या रसिका राठीवडेकर उपस्थित होत्या. लेखिका योजना यादव आणि वॉल्डन पब्लिकेशनचे अभिषेक धनगर यांनी गवाणकर यांच्याशी संवाद साधला. गवाणकर यांनी हेन्री डेव्हिड थोरो यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. 'मला हवे तसे जगता आले पाहिजे' हे थोरो यांच्या जीवनाचे सूत्र होते, असे त्या म्हणाल्या. थोरो हे मातीशी नाळ जोडलेले, सच्चेपणा जपणारे आणि स्वतंत्र वृत्तीचे निखळ व्यक्तिमत्व होते. थोरो यांचे चरित्र लिहिण्यामागील प्रेरणा स्पष्ट करताना गवाणकर म्हणाल्या, माझा इंग्रजी साहित्याचा अभ्यास नसतानाही, थोरो यांचे 'वॉल्डन' वाचल्यानंतर मी त्यांच्यावर चरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला. अनेक टिपणे काढून 'द्रष्टा' हे पुस्तक साकारले. लेखन हा माझ्या अभ्यासाचा शेवटचा टप्पा असतो आणि माधव मनोहरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने मला पुढील लेखनासाठी प्रोत्साहन मिळाले. त्या पुढे म्हणाल्या की, कोणत्याही व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडल्याशिवाय तिच्याबद्दल लिहिता येत नाही. लेखकाने आधी संपादक असले पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त वाचन आवश्यक आहे. त्या अवांतर वाचन, संशोधन, समकालीन व्यक्तींची चरित्रे वाचणे आणि मुलाखती घेणे अशा विविध पद्धतींनी अभ्यास करतात. यातून त्यांना परिस्थिती, काळ आणि समकालीन व्यक्तींच्या विचारांचे संदर्भ मिळतात. थोरो यांची सत्याचा ध्यास, लोकनिंदेला न घाबरणे, परिस्थितीला शरण न जाणे आणि श्रम प्रतिष्ठेला महत्त्व देणारी मूल्ये त्यांना महत्त्वाची वाटतात. त्यांच्या मते, थोरो यांना प्रत्येक व्यक्तीचे विचार स्वातंत्र्य मोलाचे वाटत होते. त्यांनी लिहिलेल्या चरित्रांमध्ये शाश्वत मूल्ये, पर्यावरणाची ओढ आणि मातीशी जुळलेली नाळ हे समान धागे असल्याचे गवाणकर यांनी नमूद केले.
शाळकरी मुलीवर आमिष दाखवून बलात्कार:पुण्यातील संतापजनक घटना; आरोपीला बेड्या, गुन्हा दाखल
अल्पवयीन शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुनाकिब नासीर अन्सारी (वय १९, रा. संजय पार्क, विमाननगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय पीडित मुलगी एका शाळेत शिक्षण घेत आहे. आरोपी अन्सारीने मुलीला शाळेत सोडण्याचे आमिष दाखवून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला गाडीवर शाळेत सोडतो असे सांगून एका खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अन्सारीविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) आणि बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एल. माने या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या घटनेत पुण्यातच धमकावून एका १७ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आदित्य जनार्दन बेले (वय २०, रा. कलवड वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित युवतीने विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. बेले आणि युवतीची ओळख होती, मात्र युवतीने सुरुवातीला मैत्री करण्यास नकार दिला होता. आरोपी बेलेने युवतीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, त्याने युवतीची छायाचित्रे मोबाईलवर काढून ती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. बेलेच्या धमकीमुळे घाबरलेल्या युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. देवतळे पुढील तपास करत आहेत.
जेसीबी बकेट डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू:कोरेगाव पार्क येथे घटना, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात जेसीबीच्या लोखंडी बकेट डोक्यात पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेप्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत कामगाराचे नाव राहुल अनिल गोसावी (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी जेसीबी चालक अक्षय झोंबाडे (वय २५, रा. ऊरळी कांचन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गोसावी यांची आई कावेरी (वय ५८) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गोसावी कोरेगाव पार्क भागातील डम्पिंग ग्राऊंड परिसरात काम करत होता. काम करत असताना अचानक जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट त्याच्या डोक्यात पडली. यामुळे राहुल गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक एस. निमकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. रिक्षा उलटून चालकाचा मृत्यू भरधाव रिक्षा उलटून रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना पर्वती परिसरात घडली. लखन रामू अवघडे (वय २५, रा. भवानी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत पाेलीस हवालदार विवेक आदक यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक लखन अवघडे रात्री पर्वती गाव परिसरातून भरधाव वेगाने जात होता. श्रद्धा ऑप्टीकल दुकानासमोर भरधाव रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली. अपघातात रिक्षाचालक अवघडे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अवघडेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एन कोपनर तपास करत आहेत.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा असल्याचे विधान केले आहे. मनसेने त्यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया देत कोणत्याही स्थितीत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. सत्ताधारी शिवसेनेनेही वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन देण्याचा विषय येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या मुद्यावर भाजप व पर्यायाने सरकारची अडचण होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा ऐरणीवर आला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या मागासलेपणाचा दाखला देत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा उल्लेख केला. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाला हात घालून वेगळ्या विदर्भाची मागणी भाजपसाठी नेहमीच प्राधान्याचा विषय असल्याचे स्पष्ट केले. काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ हा काँग्रेसचा अजेंडा कधीच नव्हता. पण आता घाबरून जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा यासाठी काँग्रेस वेगळा विदर्भाचा मुद्दा काढत आहे. परंतु हा मुद्दा भाजपाचा आहे. वेगळा विदर्भ भाजपाचा अजेंडा आहे. या अजेंड्यावर आम्ही काम करत आहे. हा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही. आम्ही पहिल्यापासून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने काम करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायम वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपाची भूमिका वेगळ्या विदर्भाचीच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मनसेने घेतला बावनकुळेंचा समाचार मनसेने बावनकुळे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. मनसेने म्हटले आहे की, राज्याचे महसूल मंत्री, आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतंत्र विदर्भ हा भारतीय जनता पक्षासाठी कायमच प्राधान्याचा विषय आहे, अशा आशयाचं विधान केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे अनेक तुकडे करायचे अशी इच्छा तत्कालीन सत्ताधाऱ्यांची कायमच दिसते. मराठी म्हणून एकत्र येऊ शकणाऱ्या माहाराष्ट्राची शकलं का पाडायची आहेत, त्यामागचे मनसुबे काय आहेत हे त्यांनाच माहिती... पण याविरोधात राजसाहेबांनी कायमच कडक भूमिका घेत, हे असले मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही हे कायमच स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही हे निश्चित. यावर राजसाहेबांनी काही वर्षांपूर्वी मांडलेली भूमिका जरूर ऐका, असे मनसेने राज ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ पोस्ट करताना म्हटले आहे. वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देण्याचा विषयच नाही - शिरसाट दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनीही वेगळ्या विदर्भाच्या मागणीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थन देण्याचा विषयच नाही. आमची स्पष्ट भूमिका विदर्भाचा अनुशेष भरून काढण्याची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विदर्भाचे आहेत. याशिवायही अनेक मंत्री विदर्भाचे आहेत. या मंत्र्यांचे विदर्भाकडे लक्ष असते. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा या सर्वांनी विदर्भाचा विकास कसा होईल हे पाहिले पाहिजे. यापूर्वी वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी झाली होती. पण राज्य वेगळे करून विकास होत नाही हे आम्ही संबंधितांना समजून सांगितले. सर्वांनी मिळून महाराष्ट्र प्रगत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार? विजय वडेट्टीवार या प्रकरणी म्हणाले होते, राज्याच्या सत्तेत मराठा समाजाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. विदर्भात दलित, आदिवासी व ओबीसींची संख्या मोठी आहे. त्यामुळे या समाज घटकांना न्याय द्यायचा असेल तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वेगळे विदर्भ राज्य आवश्यक आहे. अधिवेशनानंतर आपण काही आमदारांना सोबत घेऊन दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेऊ. त्यांना याचे महत्त्व समजावून सांगू आणि वेगळ्या विदर्भासाठी मोहीम सुरू करू.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या किल्ल्यांकडे शासनाचे दुर्लक्ष वाढत असल्याची गंभीर बाब राज्यसभेत समोर आली आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी सभागृहात हा विषय जोरदारपणे मांडत, यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांवर व जागतिक ओळख मिळालेल्या ऐतिहासिक स्थळांवर मूलभूत सुविधांची अतिशय दयनीय अवस्था असल्याकडे लक्ष वेधले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या परंपरेचे स्मारक असलेले शिवनेरी, रायगड, राजगड आदी 11 किल्ल्यांना अलीकडेच जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाला आहे, तसेच यापूर्वी अजिंठा-एलोरा आणि एलीफंटा लेणींनाही ही आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली होती. शिवाय शनिवार वाडा यासारखे अनेक ऐतिहासिक स्मारक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे केंद्रबिंदू आहेत. पण एवढ्या मोठ्या वारशासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद बाब असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात देश-विदेशातून हजारो पर्यटक वर्षभर या ठिकाणी येतात, परंतु त्यांना भेटीदरम्यान थेट अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक स्थळांवर शौचालयांची दुर्दशा, प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग, पिण्याच्या पाण्याचा अभाव, माहिती देणारे फलक नसणे, तसेच डिजिटल गाईड प्रणाली नसल्याने पर्यटनाचा अनुभव अधुरा राहतो, असे मेधा कुलकर्णी यांनी निदर्शनास आणले. त्यांनी पर्यटकांना मूलभूत गोष्टी उपलब्ध नसल्याने महाराष्ट्राची जगभरात बदनामी होत असल्याचे सांगितले. याशिवाय दिव्यांग पर्यटकांसाठी कोणतीही स्वतंत्र सुविधा नसल्यानं त्यांना किल्ल्यांवर प्रवेश करणे देखील अवघड होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा हेतू कागदावर असला तरी प्रत्यक्षात तो विस्कळीत दिसत असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. कुलकर्णी यांनी राजगड किल्ल्यावरील स्वतःच्या अनुभवाचा उल्लेख करताना सांगितले की, तेथे शौचालये कचऱ्याने भरून वाहत होती, प्लास्टिक बाटल्या संपूर्ण परिसरात विखुरलेल्या होत्या. त्यात काही ठिकाणी हा कचरा जाळला जात असल्याने पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होतो, वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात येते. शिवाय महाराणी सईबाईंच्या समाधीची संपूर्ण उपेक्षा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. किल्ल्यावरील संजीवनी माचीसारख्या अद्वितीय वास्तूचा इतिहास सांगणारे सूचना फलक कमी असल्यामुळे पर्यटकांना त्याचे महत्त्व कळतच नाही. तर दुसरीकडे, रायगडावरदेखील आवश्यक सुविधा नसल्या कारणाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या गौरवाला न्याय मिळत नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. महाराष्ट्राचा हा अभिमानाचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहू नये म्हणूनच तातडीने मोठ्या प्रमाणात कामे करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी जोरदारपणे मांडले. हेरिटेज इन्फ्रा अपग्रेडेशन मिशन, हाती घ्यावे इतकेच नव्हे, तर त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे हेरिटेज इन्फ्रा अपग्रेडेशन मिशन, हाती घ्यावे, अशी मागणी केली. जागतिक वारसा स्थळांवरील अनधिकृत अतिक्रमणांचा तातडीने बंदोबस्त करणे, प्रत्येक किल्ल्याचा 3 महिन्यांच्या आत सविस्तर सर्वेक्षण करणे, पर्यटन सुविधांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, तसेच माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल पर्यटन मार्गदर्शन प्रणालीची उभारणी करण्याच्या ठोस मागण्या त्यांनी सभापतींच्या माध्यमातून शासनासमोर ठेवल्या. वारसा जतनाची जबाबदारी फक्त महाराष्ट्राची नाही तर संपूर्ण देशाची आहे व त्यामुळे केंद्राची मोठ्या निधीची मदत तातडीने मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. किल्ल्यांचा इतिहास म्हणजे हिंदवी स्वराज्याची रीढ मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास म्हणजे हिंदवी स्वराज्याची रीढ आहे. ही केवळ वास्तू नाहीत, तर आमच्या संस्कृतीचे प्रतीक, राष्ट्राच्या शौर्याचा ठसा आहेत. वारसा पर्यटन विकसित झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळतील, आर्थिक विकास साधला जाईल आणि जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्र भारताची अस्मिता अभिमानाने दाखवू शकेल. त्यामुळे महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्वतंत्र हेरिटेज इन्फ्रा पॅकेज जाहीर करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे ही आजची काळाची मोठी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यसभेत त्यांनी केलेल्या या ठाम सादरीकरणामुळे आता सरकार कोणती ठोस पावले उचलते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेच्या अंमलबजावणीवर खुद्द सत्ताधारी पक्षातूनच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. चांगल्या हेतूने सुरू झालेली ही योजना स्थानिक पातळीवर भ्रष्टाचाराचे कुरण झाली आहे का? असा तिखट सवाल भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत विचारला. ठाण्यातील एका केंद्रावर चक्क साडीचे दुकान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे डावखरे यांनी सभागृहात सांगितले. विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. यावेळी ठाणे-कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी 'आपला दवाखाना' योजनेतील अनागोंदीवर बोट ठेवले. ते म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४२ (किंवा ७००च्या व्यापक आकडेवारीमध्ये) ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - आपला दवाखाना’ व ४००+ (किंवा केंद्रिय निधीद्वारे २२३२) नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी किती केंद्रे प्रत्यक्षात चालू आहेत? काही केंद्रे बंद असल्याच्या तक्रारींवर काय उपाययोजना केली आहे? ठाणे महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या ‘आपला दवाखाना’ उपक्रमातील दवाखाना बंद आढळला का आणि तिथे साडीचं दुकान होतं का? असा सवाल भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी सभागृहात उपस्थित केला. अनेक ठिकाणी फार्मसी पदवीधर/पदवीधर नसेल म्हणून औषधपुरवठ्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे; या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेले स्पष्टीकरण अत्यंत अपूर्ण आणि असमाधानकारक होते. या अनियमिततेवर ठोस कारवाई करण्यात आली आहे का? केली असल्यास त्या बाबतची माहिती सभागृहात सादर करावी, अशी मागणी डावखरे यांनी केली. ‘आपला दवाखाना’ येथे रुग्णांच्या प्राथमिक वैद्यकीय चाचण्या केल्या जातात आणि नंतर पुढील रुग्णालयात रेफर केले जाते. परंतु रेफर केलेल्या रुग्णालयांमध्ये खरोखरच बेड्स आणि डॉक्टर उपलब्ध असतात का? अनेक ठिकाणी फक्त टेक्निशियन उपस्थित असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती व कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी ठोस कारवाई होणार का? असाही सवाल निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला. दोषींवर कारवाई करणार - मंत्री आबिटकर महायुतीतील मित्रपक्षाच्या आमदारानेच घरचा आहेर दिल्याने सरकारची कोंडी झाली. यावर उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले. मी माहिती घेतो. ठाणे मनपामध्ये ज्या त्रुटी असतील तर त्यामध्ये तात्काळ कारवाई करु, कोणालाही सूट देणार नाही. या योजनेमध्ये जो स्टाफ आहे, त्याबाबत आणखी सूचनांचं स्वागत करुन अंमलबजावणी करु. कारण मोहल्ला क्लिनिकसारख्या या योजनांमुळे गोरगरिबांना लाभ मिळतात, असे मंत्री आबिटकर सभागृहात म्हणाले. हे ही वाचा... व्हिडिओ मॉर्फ असल्यास महेंद्र दळवींनी पोलिसात तक्रार करावी:अंबादास दानवेंचे आव्हान, सुनील तटकरेंवरील आरोप फेटाळले विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राजकीय वर्तुळात 'कॅश बॉम्ब' फोडला आहे. या व्हिडिओमध्ये नोटांचे मोठे बंडल आणि शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवरून शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे संशयाची सुई वळवली आहे. मात्र, अंबादास दानवे यांनी हा आरोप फेटाळून लावत, व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल, तर दळवींनी पोलिसांत तक्रार करावी, असे आव्हान दिले. सविस्तर वाचा...
मुंबई मनपा निवडणूक महायुतीमध्येच लढणार:भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत, आमदार राजहंस सिंह यांचा दावा
मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी 15-16 तारखेला आचासंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा आता होत राहील. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येत ही निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. यात कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या यावर चर्चा झाली. मुंबई मनपावर आमची महायुतीची सत्ता येणार आहे, असे भाजप आमदार राजहंस सिंह यांनी म्हटले आहे. आमदार राजहंस सिंह म्हणाले की, आम्ही युतीमध्येच लढणार आहोत. मुंबईमध्ये भाजपने मोठे काम केलेले आहे. आमची ताकद जास्त असल्याने महायुतीमध्ये आमचाच पक्ष मोठा राहणार आहे, असे म्हणत मुंबई मनपासाठी भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत राहणार हे आमदार राजहंस सिंह यांनी स्पष्ट केले आहे. भाजपचा झेंडा फडकणार राजहंस सिंह म्हणाले की, मुंबई मनपावर भाजपचा झेंडा फडकवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तर अधिवेशन काळात आमचे मुंबई अध्यक्ष, आणि प्रदेशाध्यक्ष यांच्यासह मित्रपक्षाचे नेते इथे उपस्थित आहेत त्यामुळे इथेच जागा वाटप होईल, असे राजहंस सिंह यांनी म्हटले आहे. जागा वाटपाचा निर्णय नेते घेतील दरम्यान शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली यामध्ये त्यांनी मुंबई मनपा निवडणूक महायुतीमध्ये लढण्याची भूमिका पूर्वीपासून आहे हे स्पष्ट केले आहे. जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे हे घेणार आहेत त्यावर मी बोलून काहीही फायदा नाही. ..अन्यथा स्वबळावर महापौर करू- आमदार संजय गायकवाड मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची महायुती गरजेची आहे, कारण जर युती झाली नाही तर त्याचा फटका महायुतीच्या जागांना बसेल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असे मत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. पालिका निवडणुकीत झालेला अनुभव लक्षात घेऊन, दोन्ही पक्षांचे नेते युतीची काळजी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, युती होऊन जास्त जागा आल्यास त्यांचाच महापौर होईल, पण जर महायुती झाली नाही, तर आमचे संख्याबळ जास्त असल्यास आम्ही आमचा महापौर करू, असे स्पष्ट मतही आमदार गायकवाड यांनी मांडले.
बीडमध्ये भररस्त्यात आईसह मुलाला बेदम मारहाण
बीड : प्रतिनिधी जमिनीच्या किरकोळ वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील सांगवी गावात उघडकीस आला आहे. गावगुंडांनी संबंधित महिलेला आणि तिच्या मुलाला भर रस्त्यात अमानुष मारहाण केली. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अमानुष मारण्याचा व्हीडीओ मोबाईल कॅमे-यात कैद झाला […] The post बीडमध्ये भररस्त्यात आईसह मुलाला बेदम मारहाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : प्रतिनिधी नागपूरमध्ये महिला कबड्डीपटूने आत्महत्या केल्याची घटना घडली. कीटकनाशक प्राशन करून कबड्डीपटूने आयुष्य संपवले. सावनेरमध्ये ही घटना घडली असून आर्थिक अडचणी, नोकरीचे आमिष आणि लग्नात झालेली फसवणूक या सर्व त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सावनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किरण सूरज दाढे असे आत्महत्या […] The post महिला कबड्डीपटूची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी (९ डिसेंबर) विविध मुद्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर एक व्हीडीओ बॉम्ब टाकला आहे. या व्हीडीओमध्ये पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करीत आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. सरकारकडे शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळे ओक्के आहे! विशेष म्हणजे अधिवेशनात आता […] The post दानवेंचा व्हीडीओ बॉम्ब! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बुलडाणा : प्रतिनिधी जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेत मोठ्या प्रमाणात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा भांडाफोड झाला आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातील ६५ एसटी बसेसच्या तपासणीत प्रवाशांकडून तब्बल ७५ बोगस दिव्यांग तसेच, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच, यापुढे अशी फसवणूक करताना दिसून आल्यास थेट गुन्हे नोंदवण्याचा इशारा देण्यात […] The post बोगसगिरीला एसटीचा दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रत्येक गोष्टीशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संबंध जोणाऱ्या भाजपच्या एका आमदारावर चांगलेच संतापले. प्रत्येक गोष्टी लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल, असे ते म्हणाले. त्याचे झाले असे की, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी आज सभागृहात अवैध दारू विक्रीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, अवैध दारू विक्रीवर मी मागील सरकारमध्ये एक आणि आता एक लक्षवेधी मांडली. आपल्या दालनामध्येही तीन बैठका झाल्या. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. हा ग्रामीण भागातील प्रत्येक आमदाराचा विषय आहे. त्यांना रोज काय त्रास होतो? हे त्यांना विचारा. लाडक्या बहिणींवर आपण नेहमी बोलतो. पण लाडक्या बहिणींचे दुःख काय असेल, तर अवैध दारू विक्रीवर आळा घालावा हे आहे. अभिमन्यू पवारांचे गृह खात्याकडे बोट पवार पुढे म्हणाले, या प्रकरणी कायद्यात योग्य ती दुरुस्ती करण्याची गरज आहे. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षंनी बैठक घेतली. आपण उत्पादन शुल्क, गृह विभाग तथा अन्न व औषध प्रशासन विभागालाही निर्देश दिले. अध्यक्षांनी निर्देश दिल्यानंतरही काही कारवाई होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे, असे अभिमन्यू पवार म्हणाले. या माध्यमातून त्यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील गृह खात्याकडे बोट दाखवले. अभिमन्यू पवार यांच्या या विधानावर मुख्यमंत्री चांगलेच संतापले. ते संतापाच्या सूरात म्हणाले, मी सदस्यांना पुन्हा सांगतो. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका. अन्यथा आपल्याला घरी बसावे लागेल. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण - लाडकी बहीण करणे योग्य नाही. लाडक्या बहिणींचे पैसे चालूच राहतील. ती योजना सुरूच राहील. त्या योजनेची दुसऱ्या योजनांशी तुलना करता येत नाही, असे ते म्हणाले. काँग्रेस आमदारानेही केला होता लाडकी बहीण योजनेचा उल्लेख तत्पूर्वी, काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणावर सभागृहात बोलताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेक केला होता. लाडक्या बहिणींना 1500 रुपये नको, सुरक्षा द्या, असा सूर त्यांनी आळवला होता. त्यावरही फडणवीसांनी कोणत्याही गोष्टी लाडकी बहीण योजनेला जोडू नका, असा सल्ला दिला. त्यानंतर काही मिनिटांतच अभिमन्यू पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केल्याने फडणवीसांचा पारा चढला. हे ही वाचा... फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण:60 दिवसांत आरोपपत्र दाखल होणार, हातावरील हस्ताक्षरही डॉक्टरचेच - मुख्यमंत्री फडणवीस नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर निवेदन केले. प्रस्तुत प्रकरणात 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या न्यायवैद्यक तपासात महिला डॉक्टरच्या हातावर आढळलेली नोट तिनेच लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हे गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रकरण असल्याचेही स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. वाचा सविस्तर
भेंडी, गवार, टोमॅटोचे दर वाढले
पिंपरी : प्रतिनिधी भेंडी गवार, टोमॅटोसह पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे; तसेच भेंडी, मटाराच्या दरही वाढलेलेच आहेत. ऐन हिवाळयात आवक घटल्याने गत आठवड्यापेक्षा भाज्यांच्या दरात १० ते ३० रुपये वाढ झाली होती. पिंपरी येथील लाल बहादूर शास्त्री मंडईत गाजर, वांगी अधिक प्रमाणात विक्रीस आले आहे. तर, इतर फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. यामध्ये दुधी भोपळा, […] The post भेंडी, गवार, टोमॅटोचे दर वाढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे सहकारी सूर्यकांत मोरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला. त्यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात सभागृहाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सूर्यकांत मोरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती व सभागृहाच्या सदस्यांविषयी कथितपणे आक्षेपार्ह विधान केले होते. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी या प्रकरणी त्यांच्याविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग दाखल केला. ते म्हणाले, सूर्यकांत मोरे यांनी सभापती व सभागृहाच्या सदस्यांचा अवमान करणारे विधान केले आहे. त्यांनी पंचायत समितीच्या सभापतीला जे अधिकार आहेत, ते अधिकारही विधानपरिषदेच्या सभापतींना नाहीत असे वक्तव्य केले. त्यांचे हे विधान अत्यंत आक्षेपार्ह व सभापतींचा अवमान व उपमर्द करणारे आहे. सभापतींची प्रतिमा जाणिवपूर्वक मलीन करणारे आहे. सभापतींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकर म्हणाले, सूर्यकांत मोरे सभापतींपुढे विधिमंडळात 288 सदस्य बसत नाहीत, केवळ 70-75 सदस्य बसतात असेही म्हणाले. अशा प्रकारे सभापतींविषयी त्यांच्या घटनात्मक पदाविषयी तसेच ते विधानपरिषदेचे सभापती म्हणून पार पाडत असलेल्या संसदीय व घटनात्मक कर्तृव्याबद्दल अतिशय प्रतिकूल टीकाटिप्पणी करत त्यांची सभापती म्हणून जनमाणसात असलेली प्रतिमेची हानी केली. या सभागृहाचा अवमान केला. सूर्यकांत मोरे यांनी सभापतींविषयी असेही म्हणाले की, सभापती हे कायदे बनवत नाहीत. त्यांच्याविषयी व वरिष्ठ सभागृहाच्या कायदे बनवण्याची एकूणच प्रक्रिया व सभागृहाची अधिकारिता याबद्दल असे विधान करणे हा सभागृहाचा अवमान आहे. सभापती हे संपूर्ण सभागृहाचे प्रतिनिधित्व करतात. सभागृहाची कायदे बनवण्याची स्वतंत्र अधिकारिता असताना असे वक्तव्य करणे हे सभापती व सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार हनन आहे. यात अजून आक्षेपार्ह असे की, केवळ विधानसभेतून संमत होऊन आलेल्या विधेयकावरच विधानपरिषदेत मतदान होते, असेही मोरे म्हणाल्याचे प्रवीण दरेकर म्हणाले. विधानपरिषदेच्या रचनेवरही केला होता सवाल दरेकर पुढे म्हणाले, विधानपरिषदेची रचना लाल रंगात असून, विधानसभेची रचना हिरव्या रंगात आहे. विधानपरिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतीक आहे. अशा प्रकारे एकूणच विधानपरिषदेच्या रचनेवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करून त्या रचनेला दुष्काळाचे प्रतीक ठरवून विधानपरिषद सभागृहाचा अवमान व विशेषाधिकार हक्कांचा भग झाला आहे. त्यामुळे सूर्यकांत मोरे यांनी सर्व सदस्य व सभापती, विधानपरिषद सभागृह यांच्या कर्तव्याबद्दल व कामकाजाविषयी आक्षेपार्ह विधान करून सर्वांचा अवमान केला आहे, असेही दरेकर यावेळी हक्कभंग दाखल करताना म्हणाले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (CSMT) प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यावरून निर्माण झालेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. केंद्राने दिलेल्या नकारात्मक उत्तरामुळे हा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे विधानसभेत लावून धरला होता. यावर उत्तर देताना, केंद्राने दिलेले उत्तर हे जुन्या आराखड्यानुसार असून, स्थानकाच्या पुनर्विकासाच्या नव्या आराखड्यात शिवरायांच्या पुतळ्याचा समावेश आहे, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या आवारात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात मागील अधिवेशनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलेले उत्तर आणि काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांनी हा पुतळा उभारता येणार नाही असे लेखी उत्तर संसदेतील ठाकरे गटातील गटनेते खासदार अरविंद सावंत यांना दिल्याने संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून शासनाला वस्तुस्थितीची विचारणा केली. नेमके काय म्हणाले भास्कर जाधव? सीएसटी स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव झाले आणि त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करावा, असा प्रस्ताव सभागृहात मांडला. तो विषय बीएससीमध्ये ऐकून घेतला. त्यानंतर सभागृहात मुख्यमंत्री हजर असताना, तो विषय सभागृहात उपस्थित केला. आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले. त्यांनी दिलेले उत्तर आपल्याकडे रेकॉर्डमध्ये आहे. जुने व्हिटी स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नामकरण झाले. त्या ठिकाणी भव्य पुर्नविकास सुरू आहे. त्या माध्यमातून आयकॉनिक स्टेशन तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याचा एक भाग म्हणून सदर ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सभागृहात आता वेगळा ठराव करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी सांगितल्याचे भास्कर जाधव म्हणाले. परंतु, ठाकरे गटाचे गटनेते अरविंद सावंत यांना लोकसभेत रेल्वे राज्य मंत्री यांनी लिखित स्वरूपातचे पत्र दिले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम हे आमच्या अखत्यारित नाही, तर रेल्वेच्या अखत्यारित येते. म्हणून तो विचार शासनाच्या विचाराधीन नाही, असे उत्तर दिल्याचे भास्कर जाधव यांनी विधानसभेत सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे सीएसएमटीच्या आवारात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा उभा करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून, त्यांच्याकडून राहिलेल्या उणीवा दूर करून, आपण हा पुतळा उभारण्याकरता पुढाकार घ्यावा, अशी विनंती भास्कर जाधव यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून लोकसभेत केली. रेल्वे राज्यमंत्र्यांचे उत्तर जुन्या आराखड्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भास्कर जाधव यांनी मागच्याही काळात सीएसएमटीच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असला पाहिजे, हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मी देखील त्यासंदर्भातील आराखडा तयार झाल्याचे उत्तर सभागृहात दिले होते. तथापि लोकसभेत प्रश्नउत्तराच्या एका लेखी उत्तरामध्ये सीएसएमटीच्या आवारात अशाप्रकारचा पुतळा उभारण्याचा कुठलाही विचार नाही किंवा अशाप्रकारचे उत्तर आल्याचे बातमी मी देखील वाचली. यासंदर्भातील एक प्रेझेंटेशन रेल्वेमंत्र्यांनी माझ्यासमोर स्वत: केले होते. त्या प्रेझेंटेशनमध्ये पुतळा कसा असेल? त्याची जागा कुठे असेल? हे सगळे दाखवले होते. हा मुद्दा आल्याबरोबर मी स्वत: रेल्वे मंत्र्यांशी संपर्क केला. राज्यमंत्र्यांनी लोकसभेत जे उत्तर दिलेले आहे, ते जुन्या आराखड्याच्या संदर्भात दिले आहे. नवीन तयार झालेल्या आराखड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा हा सीएसएमटीवर तयार करण्यात येणार आहे. त्या आराखड्यांची अंतिम मंजुरी आता होत आहे. त्यामुळे रेल्वे राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिलेले उत्तर हे जुन्या आराखड्यावरून आलेले आहे. नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून प्रचंड पैसा वाटण्यात आला. इतका पैसा आहे तो शेतकऱ्यांना दिला असता तर शेतकरी कर्जमाफी झाली असती. कर्जमाफी न करता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यासाठी प्रचंड प्रमाणात कर्ज काढण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा आम्ही निषेध करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, आम्ही कितीही खुलासे केले तरी सरकार एवढे निर्भीड झाले आहे की ते कोणतीही चौकशी करणार नाही, कारवाई करणार नाही. वॉशिंगमशीनमध्ये सगळं संगळं साफ केले जाणार आहे. राज्याची कायदा-सुव्यवस्था, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर सरकारला घेरणार आहोत. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यासाठी 10 टक्क्याचा निकष ही काढलेली पळवाट आहे. विरोधी पक्षनेता असला पाहिजे, तो देत नाही याचा अर्थ लोकशाही राहिलेली नाही. शशिकांत शिंदे म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही आवाज उठवत आहोत. दुर्दैव असे आहे की आजही 75 हजार कोटी रुपयांचे पुरवणी मागण्या आल्या आहेत. किती लोकांनी सरकारविरोधात आंदोलन केले यापेक्षा कोणत्या भावनेने आंदोलन केले हे महत्त्वाचे आहे. म्हणून आम्ही आज सरकारविरोधात आंदोलन केले आहे. शहाजीबापूवर धाड हे दबावतंत्र शशिकांत शिंदे म्हणाले की, अंबादास दानवे यांनी जे कॅश बॉम्ब काढला आहे तसे अनेक बॉम्ब आम्ही पण काढले आहेत, महायुतीमधील सत्ताधारी मित्रपक्षाने देखील काढले आहेत पण काहीही झालेले नाही. जिथे विरोधी पक्षाची लोकं आहेत त्यांच्यावर चौकशी आणि धाडी टाकण्यात आल्या.आमच्यावर धाडी टाकल्या तिथे पर्यंत कबूल होते पण आता मित्रपक्षाच्या नेत्यांवरदेखील धाडी टाकण्यात आल्या. शहाजीबापू असोत की अन्य नेत्यावर धाडी टाकण्यात आल्या. महायुतीमध्ये हा क्रॉस गेम सुरू आहे. नीलेश राणे यांनी त्यांच्या मतदारसंघात पैसे पकडून दिल्यावर शहाजीबापूवर धाड पडते हे सहज होत नाही, हे दबावतंत्र आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी शशिकांत शिंदे म्हणाले की, खूर्चीसाठी महायुतीमधील लोक एकमेकांच्या विरोधात जाणार नाही. ते केवळ सत्तेसाठी सोबत आहेत.नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण भेटीनंतर आमच्यात वाद नव्हता या वक्तव्यावर त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टीका केली आहे. नगरपालिका निवडणूक झाली त्यामध्ये लोकशाही कुठे होती? निवडणूक आयोगाच्या समोर तिथे पैसे वाटले जातात, मारामारी होते, उमेदवारी अर्ज दबाव आणत मागे घ्यायला लावले जातात. महाराष्ट्रात असे वातावरण कधीच नव्हते, त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. त्यानंतर आम्ही भूमिका काय हे सांगू शशिकांत शिंदे म्हणाले की, वेगळ्या विदर्भासंदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे समजले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. आज त्यांची भूमिका काय हे समजले यानंतर आम्ही आमची भूमिका काय हे सांगू.
अहेरी नगरपरिषदेत मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे झाली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आल्यानंतरही कारवाई का होत नाही? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्यात 359 कर्मचारी, अधिकारी आहेत ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवली आहे. अहेरी येथील गणेश शहाणे यांच्याबाबत अवर सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाकडून कारवाई करण्याचे निर्देश आल्यावरही कारवाई का करण्यात आलेली नाही? असा कोणता राजकीय दबाव आहे की या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही? असा सवाल वडेट्टीवर यांनी सभागृहात उपस्थित केला. मंत्री सावे यांचे तीन महिन्यांत कारवाईचे आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे. अहेरीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्यासह संशयाच्या घेऱ्यात असलेल्या 359 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषी आढळणाऱ्यांवर पुढील तीन महिन्यांच्या आत कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात दिले. वडेट्टीवारांनी मांडली शेतकऱ्यांची दयनीय अवस्था दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी सभागृहाबाहेर बोलताना विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था देखील मांडली. ते म्हणाले, विदर्भात अधिवेशन आहे. पण कापूस, सोयाबीनसह इतर शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सरकारने आता तरी जागे व्हावे, एवढीच आमची अपेक्षा आहे. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. कापसाला फक्त 7 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळत आहे. सोयाबीनलाही भाव नाही. कुठला हमीभाव आहे? कुठे कापसाला दर आहे? सध्या कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. कापूस शेतकऱ्याला केवळ 15 क्विंटल हेक्टरी मदतीची घोषणा केली जात आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याला 10 ते 15 क्विंटल कापूस येत असेल तर तो विकणार कुठे? सरकारलाव शेतकऱ्यांप्रती कोणतीही आस्था नाही. राज्यकर्त्यांना लाज वाटत नाही. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा, असे ते म्हणालेत. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या रुपाने संसदीय लोकशाहीचा एक खंदा समर्थक हरवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका विस्तृत पोस्टद्वारे त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ समाजसेवक आणि कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेल्या बाबा आढावांचं निधन झालं. महाराष्ट्राने या देशांत समाज प्रबोधनाचा सज्जड पाया घातला आणि सामाजिक कार्यकर्यांच मोहोळ तयार केलं. त्यातलं एक अत्यंत महत्वाचं नाव बाबा आढाव. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का? बाबा आढाव हे पेशाने डॉक्टर. पण डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात ढकलून घेतलं. महाराष्ट्राचं हे एक वैशिष्ट्य की, सामाजिक क्षेत्रांत उत्तुंग कार्य केलेली माणसं, उच्चशिक्षित आणि जर त्यांनी त्यांच्या क्षेत्रांत करिअर करायचं ठरवलं असतं तर तितकीच मोठी कारकीर्द घडवू शकले असते अशी माणसं सामाजिक क्षेत्रांत आली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला आकार दिला. हल्ली अशी माणसं तयार होत आहेत का ? माहित नाही. हल्ली सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवणारे, स्वतःचे तशा नावाचे फ्लेक्स लावणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. असो, पण रिक्षा पंचायत असो, हमाल पंचायत असो की १९७२ साली एक गाव एक पाणवठासाठी उभी केलेली चळवळ असो, की १९६९ ला राज्यात मंजूर झालेला महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा असो, हे बाबांचं मोठं योगदान. ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केले बाबा आढावांनी संपूर्ण आयुष्य कष्टकरी, असंघटित कामगार आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा केला. आर्थिक उदारीकरणाच्या नंतरच्या काळात कामगारांचं आणि श्रमिकांच शोषण करणारी एक नवी व्यवस्था आता जन्माला आली आहे. आणि जिला सरकारचं समर्थन आहे. सध्या तर सरकारं ही उद्योगशरण आहेत आणि कामाचे तास, वेळा याबाबत सरकार उद्योगजगताला शिस्त देखील लावू शकत नाही, हे नुकत्याच विमान कंपनीच्या उदाहरणातून दिसलं. यामुळे संघटित असो की असंघटित कामगार किंवा नव्याने उदयाला येत असलेला ज्याला 'गिग वर्कर' म्हणता येईल असे सगळेच असुरक्षतितेच्या गर्तेत सापडले आहेत. बाबा आढावांची एकूणच समाजकारणाकडे बघण्याची भूमिका व्यापक होती आणि त्यामुळेच ईव्हीएमच्या विरोधात वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. हे खरं समाजकारण जे एनजीओ संस्कृती उदयाला येण्याच्या आधीच्या काळातलं, जिथे प्रत्येक विषयात मतं होती आणि ठोस भूमिका होती. बाबा आढावांसारखी माणसं परत या राज्यात कधी होतील ? माहित नाही, पण ती घडवण्याची शक्ती या भूमीत नक्की आहे, त्यामुळे अशी माणसं पुन्हा घडावीत हीच इच्छा. बाबा आढावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, असे राज ठाकरे म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी एका लॉजच्या खोलीत आत्महत्या केली होती. या प्रकरणी आतापर्यंत पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींव्यतिरिक्त या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास करण्यासाठी न्यायाधीशामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तरावरील चर्चेदरम्यान दिली. मृत डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावर थेट सुसाईड नोट आढळली होती. ही सुसाईड नोट त्यांच्या स्वतःच्या अक्षरात लिहिलेली असून, पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने फसवणूक करून त्यांचे शारीरिक शोषण केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अनेक अटक प्रकरणांमध्ये आरोपींना अटक करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मुंडे यांनी ते 'अनफिट' असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले, असे गृहमंत्र्यांनी सांगितले. आमदार अमित साटम यांनी संपदा मुंडे खून प्रकरणाचा तपास किती दिवसांत पूर्ण होईल, असा प्रश्न उपस्थित केला. यावर गृहमंत्र्यांनी सांगितले की, महिलांशी संबंधित प्रकरणांमध्ये 90 ऐवजी 60 दिवसांत आरोपपत्र सादर करण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकरणात आरोपपत्र लवकरच दाखल होईल. सध्या एका महिला आयपीएस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी महिला डॉक्टरवर 'अनफिट'चे प्रमाणपत्र टाकण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप केला. यावर गृहमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणी डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे उपलब्ध आहेत. महिला डॉक्टर मुंडे त्यांच्या खोलीत जाईपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. प्रकाश सोळंके यांनी कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळेल का, असा प्रश्न विचारला. यावर गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले की, महिला डॉक्टर 11 महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने नोकरीवर होत्या, त्यामुळे अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येणार नाही. मात्र, पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे प्रयत्न केले जातील. ज्योती गायकवाड यांनी मकोका (MCOCA) लावणार का आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक आणणार का, असे प्रश्न उपस्थित केले. त्यांनी 'लाडकी बहीण' योजनेत मिळणाऱ्या 1500 रुपयांपेक्षा सुरक्षा महत्त्वाची असल्याचे म्हटले. यावर गृहमंत्र्यांनी सांगितले की, या संदर्भात सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. काही जणांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून एखाद्याला लक्ष्य करणे योग्य नाही, तसेच सातत्याने सगळ्या गोष्टी 'लाडकी बहीण' योजनेशी जोडणेही चांगले नाही.
व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या ठाकरे सेनेवाले त्यांना सांगा त्यांच्या मालकाच्या कर्जतमधील फार्म हाऊसवर किती कॅश ठेवली आहे. जरा जाऊन बघा, विचाराना. कॅशच्या बाबतीमध्ये आरोप ठाकरे सेनेच्या आमदार किंवा कार्यकर्त्यांनी करतात हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य आहे. पत्रकार बांधवानी माझ्यासोबत कर्जतच्या फार्म हाऊसवर चला जमीनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना विचारा, असे भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी असे म्हटले आहे. मंत्री नीतेश राणे म्हणाले की, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कॅशच्याबाबतीमध्ये काही बोलूच नाही. कर्जतच्या फार्महाऊसवर सर्च ऑपरेशन केले की मग कशी पळापळ होईल, असे नीतेश राणे यांनी म्हटले आहे. ठीक आहे अंबादास दानवे यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे त्यांची सत्यता तपासली जाणार आहे. अजूनही असे व्हिडिओ दिसतील यानंतर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही आणि सत्ताधारी आमदार असे पैशाचा बँग घेऊन फिरतात. यापूर्वीही असे व्हिडिओ समोर आले होते अजूनही दिसतील. आता सर्व ठिकाणी हेच सुरू आहे. ते जे हेलिकॉप्टरमध्ये ज्या बँगा घेऊन फिरत आहात आणि हे जे आनंदाच्या शिधाचे वाटप सुरू आहे ते कुणाचे आहे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. निवडणुकीत याच पैशाचा वापर विजय वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीत जो पैशाचा वापर झाला हा याच खोक्याचा वापर झाला आहे हे कुठेही लपून राहिलेले नाही. इतका पैसा कमावला गेला आणि सरकारची तिजोरी खाली केली गेली. तिजोरी ओरबडून खाल्ली आहे. राज्यात असा धिंगाना कधीच पाहिला नाही. दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये चूक काहीही नाही. सत्तेतून भ्रष्टाचार सुरू नाना पटोले म्हणाले की, सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि त्यातून पुन्हा सत्ता हा या महायुतीचा खेळ आहे. त्यामुळे हा खेळ आपल्याला वारंवार पाहायला मिळणार आहे.ज्या पद्धतीने राज्य लुटण्यासाठी यांना सत्ता पाहिजे म्हणून ते स्थानिक स्वराज्य संस्थादेखील सुटत नाही.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राजकीय वर्तुळात 'कॅश बॉम्ब' फोडला आहे. या व्हिडिओमध्ये नोटांचे मोठे बंडल आणि शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओवरून शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे संशयाची सुई वळवली आहे. मात्र, अंबादास दानवे यांनी हा आरोप फेटाळून लावत, व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल, तर दळवींनी पोलिसांत तक्रार करावी, असे आव्हान दिले. अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ कॉल सुरू असल्याचे दिसते. यात आमदार महेंद्र दळवी आणि समोर एक लाल टी-शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. तसेच नोटांची मोठी बंडलेही व्हिडिओत स्पष्ट दिसत आहेत. यावरून सभागृहात आणि बाहेर उद्धव सेना व शिंदे सेनेत जोरदार वाकयुद्ध रंगले. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले, हा व्हिडिओ मला या लोकांशी संबंधित एका व्यक्तीनेच पाठवला आहे. व्हिडिओ एखाद्या घरातला वाटतोय. घरातला व्हिडिओ बाहेरील व्यक्ती काढू शकत नाही. संजय शिरसाटांच्या वेळीही असाच व्हिडिओ आला होता. आता या व्हिडिओतील ती लाल टी-शर्ट घातलेली मुख्य व्यक्ती कोण, हे पोलिसांनी तपासावे. राजीनामा नको, फक्त सत्य बघा या प्रकरणावर आमदार दळवींचा राजीनामा मागणार का? असे विचारले असता दानवे यांनी सावध भूमिका घेतली. ते म्हणाले, मी कोणाचाही राजीनामा मागण्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला नाही. आम्ही जेव्हा 'पन्नास खोके एकदम ओके' म्हणायचो, तेव्हा यांना राग यायचा. आता हे खोकेच दिसत आहेत. सत्ता आणि संपत्तीचा यांनी कसा हैदोस घातलाय, हेच मला महाराष्ट्राच्या जनतेला दाखवायचे आहे. तटकरेंचा संबंध नाकारला आमदार महेंद्र दळवी यांनी दानवे यांना सुनील तटकरे यांनी पुरवल्याचा आरोप केला होता. त्यावर दानवे यांनी संताप व्यक्त केला. तटकरे आणि माझा जवळपास काहीच संवाद नाही. आधी जेंव्हा एकत्र होतो तेंव्हा बोलण व्हायचं आता आमच बोलणं होत नाही, असा खुलासा दानवे यांनी या आरोपांवर केला आहे. महेंद्र दळवी आहे तसेच समोर लाल शर्ट वाली एक व्यक्ती दिसतेय, मला तर वाटत ती मेन व्यक्ती आहे. व्हीडिओत महेंद्र दळवी दिसतायत आणि समोरचा व्यक्ती पोलिसानी शोधावा. मी समोरच्या व्यक्तिलाही ओळखतो म्हणूनच व्हिडिओ ट्विट केलाय. चेहरा दिसत नाही तर तो मी न्हवेच असे म्हणणार ते पोलिसानी शोधावं, असे आवाहन दानवे यांनी केले. हे ही वाचा... अंबादास दानवेंचा धंदा ब्लॅकमेलचा:महेंद्र दळवींचा पलटवार; म्हणाले- व्हिडिओ मॉर्फिंगची सुपारी कोणी दिली? तटकरेंकडे संशयाची सुई व्हायरल झालेला वादग्रस्त व्हिडीओ हा केवळ योगायोग नसून, त्यामागे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे विरोधी नेते अंबादास दानवे यांचे संगनमत असल्याचा थोरवे यांनी संशय व्यक्त केला आहे. सुनील तटकरे सातत्याने रायगडमधील शिवसेना आमदारांना अडचणीत आणण्याचे भूमिगत राजकारण करतात. आम्ही घरातच शत्रू वाढवला आहे, अशी बोचक टिप्पणीही त्यांनी केली. सविस्तर वाचा...
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संपूर्ण मंत्रिमंडळ आपल्या लवाजम्यासह नागपुरात दाखल झाले आहे. त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी शेकडो कोटींचा चुराडा करण्यात आले आहे. त्यातच नागपूरच्या एका अधिकाऱ्याने आपल्या टेबलावर 'मी माझ्या पगारात समाधानी आहे' अशी पाटी लावली आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने झालेला खर्च व या अधिकाऱ्याची नेमप्लेट याची खमंग चर्चा सध्या नागपुरात रंगली आहे. नागपुरात सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी मंत्री, आमदार ते राज्याच्या मुख्य सचिवांपासून इतर प्रमुख अधिकारी या निमित्ताने नागपुरात डेरेदाखल झालेत. या अधिवेशनात सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चासह कथित भ्रष्टाचाराच्या मुद्यावरही उहापोह होतो. विरोधक या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवतात. या स्थितीत नागपूरच्या एका अधिकाऱ्याने आपल्या टेबलावर मी माझ्या पगारावर समाधानी आहे, अशी प्लेट लावून भ्रष्टाचाराला आपल्याकडे थारा नसल्याचे दाखवून दिले आहे. अतिरिक्त आयुक्त म्हटले की... यासंबंधीच्या माहितीनुसार, राजेश खवले असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त (महसूल) म्हणून कार्यरत आहेत. अतिरिक्त आयुक्त हे पद विभागीय आयुक्तांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. त्यांच्यापुढे विविध सरकारी प्रकल्पांसाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीच्या आक्षेपांवरील सुनावण्या होत असतात. त्यामुळे या पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचे किस्से प्रशासकीय वर्तुळात रंगवून सांगितले जातात. अतिरिक्त आयुक्त म्हटले की, त्यांच्याकडे 'पैशांच्या' नजरेतून पाहिले जाते. पण राजेश खवले त्याला अपवाद ठरलेत. ते आपल्याकडे तक्रार किंवा समस्या घेऊन येणाऱ्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात. तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांनी आपल्याविषयी इतरांसारखा गैरसमज करून घेऊ नये यासाठी त्यांनी आपल्या कक्षात एका टेबलावर नेमप्लेटवजा फलक लावला आहे. या फलकावर त्यांनी लिहिले आहे, मी माझ्या पगारावर समाधानी आहे. याचा अर्थ कुणीही मला लाच देण्याचा प्रयत्न करू नये. नेमप्लेट प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय अलीकडच्या काळात लाच देणे व घेणे फार सामान्य गोष्ट झाली आहे. सरकारी कार्यालयातील साधा कारकूनही लाच घेतल्याशिवाय आपल्या टेबलावरील फाईल पुढे सरकवत नाही, अशी ओरड केली जाते. हे अधिकारी आपण स्वच्छ निष्कलंक चारित्र्याचे असल्याचे दावे करतात. पण टेबलाखालून त्यांचा व्यवहार सुरूच असतो. त्यातच राजेश खवले यांनी आपण आपल्या पगारात समाधानी असल्याचा फलक लावण्याचे धाडस दाखवून आपल्या निष्कलंक चारित्र्याची ग्वाही दिली आहे. त्यांची नेमप्लेट सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
मध्य महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्राला जाेडणाराबहुचर्चित नाशिक-पुणे ‘हायस्पीड’ रेल्वे अातासंगमनेर,नारायणगाव (पुणे) एेवजी थेट नाशिकहूनशिर्डी, पुणतांबा, निंबळक, अहिल्यानगर मार्गे पुणे(चाकण) ला जाणार अाहे. या हायस्पीड रेल्वेचेसंगमनेर तालुक्यातील ७० किमी अंतर आहे. त्यासाठीया तालुक्यातील २६ गावांतील २९३ हेक्टर जमिनीसंपादित केली जाणार हाेती. त्यातील काही गावांमधील१९ हेक्टर क्षेत्रावरील जमिनी २ वर्षांपुर्वीच संपादितकरुन २९ काेटींचा माेबादला देखील देण्यात अालाहाेता. ९० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या २७५ हेक्टर क्षेत्रावरील जमिनींच्या सात-बारा उताऱ्यांवर ‘महारेल’चे नाव देखील लागले हाेते. अाता मात्र या ‘हाय स्पीड’ रेल्वेचा मार्गच बदल्याने भुसंपादित करण्यात अालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींच्या प्रश्नावर अाता संभ्रमाचा पेच उभा राहिला अाहे. केंद्रातील ‘यूपीए’सरकारच्या कालावधीत तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी २००९ मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील ५५ नवे रेल्वे मार्ग मंजूर केलेहाेते. यात नाशिक-पुणे हाय स्पीड रेल्वेचा देखीलसमावेश हाेता. नाशिक ते पुणे हा थेट रेल्वे मार्ग तयारकेला जाणार हाेता. त्यासाठी सर्वेक्षण हाेऊन प्रत्यक्षातज्या भागातून ही रेल्वे जाणार हाेती,त्या भागातीलजमिनीचे क्षेत्र देखील निश्चित केले हाेते. केंद्रीयरेल्वेमंत्री अाश्विनी वैष्णव यांनी नाशिक-पुणे ’हायस्पीड’ रेल्वे प्रकल्पाबाबत सभागृहात निवेदन सादर करताना ही हायस्पीड रेल्वे शिर्डी, पुणतांबा, निंबळक,अहिल्यानगर मार्गे पुणे (चाकण) लाजाणार असल्याचे सांगितले हाेते. याअगाेदर ही रेल्वे नाशिक, सिन्नर,संगमनेर, नारायणगाव, मंचर या मार्गेजाणार हाेती. जीएमआरटी (जायंटमीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) कारण पुढेकरुन या रेल्वेचा मार्गच बदलण्यातअाल्याने या रेल्वेसाठी संगमनेरतालुक्यात संपादित करण्यात अालेल्याशेतकऱ्यांच्या जमिनीबाबत माेठा संभ्रमउभा राहिला अाहे. या रेल्वेसाठी संगमनेरत तालुक्यातील२६ गावांतील २९३ हेक्टर क्षेत्र संपादितकेले जाणार हाेते,त्यापैकी कुरण, पाेखरीहवेलीसह अन्य गावांतील १९ हेक्टरक्षेत्राच्या जमिनीचे भूसंपादन देखीलकरण्यात अाले हाेते. त्या जमिनीच्यासातबारावर उताऱ्यांवर ‘महारेल’ चे नावदेखील लागले हाेते. गेल्या १७ वर्षापासूनसुरु असलेल्या या हायस्पीड रेल्वेचाअचानकच ट्रॅकच बदलून ताे शिर्डी मार्गेपुण्याला टाकला अाहे. त्यामुळे ज्याशेतकऱ्यांच्या जमिनीं या प्रकल्पासाठीगेल्या, माेबादला मिळाला, त्याशेतकऱ्यांसमाेर अाता संभ्रमाचा पेच उभाराहिला अाहे. याबाबत ४ डिसेंबरला‘दिव्य मराठी’ ने नाशिक-पुणे ‘हायस्पीडरेल्वे’ अाता अहिल्यानगर मार्गे पुण्यालाजाणार, ८,९७० काेटींचा नवा मार्गे असेवृत्त प्रसिध्द केले हाेते. या बातमीनंतर हीरेल्वे संगमनेर तालुक्यातून घेऊन जावी,यासाठी ५ डिसेंबरला अामदार सत्यजिततांबे यांनी संगमनेरमध्ये बैठक घेऊनजनअांदाेलन उभा करण्याचा निर्णयघेतला हाेता. रेल्वे गेली असती तर मुलांनानाेकरी मिळाली असती- बाळासाहेब रुपवते, शेतकरी, कुरणहाय स्पीड रेल्वेसाठी माझी भावजयी अनितारुपवते यांची दीड एक बागायती जमीनगेली,त्यावर डांळिबाची, पेरुची बाग हाेती, त्याजमिनीच्या सातबारावर रेल्वेचे नाव देखीललागले अाहे. जमिन रेल्वेसाठी गेली असलीतरी अाम्ही या जमिनीवर अजुनही शेती करताे,या भागातून जर अशी रेल्वे गेली असती तरकिमान माझ्या मुलांना राेजगार मिळालाअसता, दळवळण वाढले असते. माेबदला मिळाला,पण रेल्वेचजात नसेल तर जमीन परत करा- कैलास अागळे, शेतकरी, पाेखरी हवेलीहाय स्पीड रेल्वेसाठी अामच्या तीघाभावडांची २९ गुंठे जमिन गेली, ९० हजार रुपयेगुंठे या प्रमाणे अाम्हाला माेबादला देखीलमिळाला,सरकारी काम अाहे म्हणून अाम्हीअामची जमिन दिली, सात-बारा उताऱ्यांवररेल्वेचे नाव देखील लागले पण अाता रेल्वेचजाणार नाही तर सरकारने अामची जमीनपुन्हा अाम्हाला द्यावी जेणे करुन त्याजमिनीवर अामचे नाव लागेल,शेती करतायेईल. दिव्य मराठी एक्सपर्ट: हिरालाल पगडाल, रेल्वे अभ्यासक रस्ते मार्गावरील काेंडी कमी करण्यासाठीरेल्वे मार्ग हाच एकमेव पर्याय‘ नाशिक-पुणे-मुंबई’ हा महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचापट्टा अाहे. सध्या नाशिक-पुणे, मंुबई शहरात सध्यावाहनांची प्रचंड वाहतूक काेंडी हाेते, त्यामुळे अपघातहाेतात,हे कमी करण्यासाठी हा प्रकल्प संगमनेरहून जाणेअावश्यक अाहे. कारण दाेन शहराच्या मध्यभागी संगमनेरअाहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांच्याकार्यकाळात या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यातअाला हाेता. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेचा १० वर्षांपुर्वीचाप्रकल्प १७०० काेटींचा हाेता. संगमनेर मार्गे ही हायस्पीडरेल्वे जाणार हाेती, त्याचा फायदा केवळ संगमनेरच नव्हेतर जुन्नर, अांबेगाव या भागांना फायदा हाेणार अाहे.यारेल्वेचा सर्वात माेठा फायदा उद्याेगांबराेबरच मुलींच्याशिक्षणासाठी हाेणार अाहे.तांत्रिक कारण पुढे करुन रेल्वेमार्ग बदलणे चुकीचे अाहे. पुढे काय? पहिला प्रकल्प खर्चिक, अाता तयार केले जाणार दाेन नवे रेल्वे मार्गनाशिक-पुणे थेट रेल्वे मार्गासाठी नाशिकहूनथेट पुण्यापर्यंत नव्याने रेल्वे मार्ग तयार करावा लागणार हाेता. हा प्रकल्प खर्चिक असल्यानेकमी खर्चात नाशिक-पुणे ‘हायस्पीड’ रेल्वेनाशिकराेडहून शिर्डी व तेथून काही प्रमाणाततयार झालेल्या व नव्या रेल्वे दुहेरी मार्गावरुनपुण्याला नेणे शक्य असल्याने या रेल्वेचा रुटबदलला. नव्या अाराखड्याप्रमाणे नाशिकराेडते शिर्डी व अहिल्यानगर ते चाकण हे दाेनच नवेरेल्वे मार्ग तयार करावे लागणार अाहे.
अंबादास दानवे यांनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे. आता कुणीही एआयच्या मदतीने असे व्हिडिओ तयार करतात. यापुढे कोणत्याही आमदाराचा असा व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो. माझाही असाच व्हिडिओ तयार करण्याचा बालिशपणा करण्यात आला होता, या गोष्टीला कसे सामोरे जायचे हा प्रश्न आम्हा लोकप्रतिनिधींना पडला आहे, असे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही महायुतीमध्ये आहोत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघे मित्र आहेत. परंतू काही ठिकाणी लोकलचे राजकारण वेगळे असते तिथे आरोप-प्रत्यारोप होत असतात. त्यांची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत असतात. अस सांगताना त्यांनी रायगडमधील तटकरे VS शिवसेना या वादावर बोलताना म्हटले आहे. नेमके शिरसाट काय म्हणाले? संजय शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा एआयचा वापर करत मॉर्फ करत तयार केलेला आहे. यावर आमदार दळवी यांनी स्पष्टीकरण देतानाच पुरावे दाखवले तर आमदारकीचा राजीनामा देईल असे चॅलेज अंबादास दानवेंना दिले आहे. ही लोकं एआयचा वापर करत कुणाचाही फोटो दाखवू शकतात. हे लोकं सर्व आमदारांचे असे व्हिडिओ तयार करु शकतात. अंबादास दानवेंकडून शिंदेंच्या आमदारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर मी बोलणं योग्य नाही संजय शिरसाट म्हणाले की, आमदार थोरवे यांनी काय वक्तव्य केले हे मी ऐकलेले नाही. पण अशा पद्धतीने एखाद्याला बदनाम करण्याचा कट असेल तर माझ्याही मागे असा एक व्हिडिओ केला होता हे सर्व बालिशपणाचे प्रकार सुरू आहे असे म्हणत उबाठावर टीका केली आहे. आम्ही लोकप्रतिनिधींना या सर्व गोष्टींना कसे सामोरे जायचे हा प्रश्न आहे. आमदार महेंद्र थोरवे यांची बदनामी होत आहे, त्यांच्या होणाऱ्या बदनामीला त्यांनी प्रतिउत्तर देत अंबादास दानवेंवर टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यावर मी बोलणं योग्य नाही. अंबादास दानवेंचा आरोप काय? या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी म्हटले की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?' असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.
वसमत येथे पालिका निवडणुकीत विरोधात प्रचार का करता या कारणावरून दोघांना लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करणाच्या तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. ९ पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. वसमत येथील पालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून जोरदार प्रचार सुरु करण्यात आला आहे. विशेष म्हणजे वसमत पालिका निवडणुकीची प्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांना पुन्हा एकदा मतदारांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे वसमत शहरातील राजकिय वातावरण चांगलेच तापले असून पालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. लोखंडी रॉड व विटांनी मारहाण दरम्यान, वसमत येथील शहरपेठ भागातील सुरेश डरांगे व त्यांचे भाऊ सोमवारी ता. ८ रात्री घरासमोर उभे होते. यावेळी टिल्लु सांडे, बाळा सांडे, दिलीप सांडे हे तिघे तेथे आले. त्यांनी सुरेश यांच्या भावास तु आमच्या विरोधात प्रचार का करतो अशी विचारणा करून शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेला अन तिघांनी सुरेश व त्यांच्या भावाला लोखंडी रॉड व विटांनी मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे दोघेही प्रतिकार करू शकले नाही. या मारहाणीत दोघेही जखमी झाले. त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींचा शोध सुरु या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक साहेबराव कसबेवाड, जमादार काशीनाथ भोपे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सुरेश यांच्या तक्रारीवरून टिल्लु सांडे, बाळा सांडे, दिलीप सांडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार भोपे पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विरोधी पक्षनेतेपदाबाबत जी बातमी वृत्तपत्रामध्ये आली आहे त्याबाबत मला काही माहिती नाही. आम्ही भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांचे नाव सभापती आणि अध्यक्षांकडे दिले आहे. माझे आणि अनिल परबांचे नाव कुठून आले आणि ही चर्चा आणि वृत्तपत्रातील बातमीचा नेमका काय सोर्स आहे माहिती नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी मविआचे नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट ही दोन्ही पदे लवकरात लवकर भरावी अशी चर्चा केली. त्यानंतर विरोधीपक्षनेते पदाबाबत मी कुणाशीही चर्चा केलेली नाही.मग हा विषय आला कूठून? माझ्या नावासाठी एकनाथ शिंदे सकारात्मक आहे अशी मी बातमी वाचली. माझ्यावर प्रेम का हे मुख्यमंत्र्यांना विचारावे लागेल. वृत्तपत्रातील बातमीचा सोर्स काय आहे हे कळाले तर मला बोलता येईल. दानवेंनी ट्विट केलेल्या फोटो कुणाचा हे माहिती विजय वडेट्टीवार म्हणाले की, अंबादास दानवे यांनी जे काही ट्विट केले आहे तो फोटो कुणाचा आहे हे माहिती आहे. आता हा सगळा नोटांचा कारभार आहे.खोके, पेट्या असे नाव देऊन महाराष्ट्राची लुट सुरू आहे. यातून निवडणूक जिंकायची आणि पुन्हा महाराष्ट्राला लुटायचे हे सर्व सुरू आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यांच्याकडे पैसे नाही पण आमदारांकडे बराच पैसा दिसून येत आहे. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशीची गती मंदावली विजय वडेट्टीवार म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजून पकडला गेलेला नाही. तो मेला की जिवंत आहे याबद्दल काहीही माहिती नाही. तो कुठे लपला हे माहिती नाही. हा सर्व प्रकार मुख्य आरोपी आणि आकाला वाचवण्यासाठी तर नाही ना अशी शंका आहे. कारण त्याच दृष्टीने चौकशीची गती मंदावली आहे. आम्ही सरकारला प्रश्न विचारणार आहोत की चौकशी कधी पूर्ण होणार आहे.
भविष्यात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पुढे गेलात नेता, अधिकारी, उद्योगपती किंवा पत्रकार झालात, तरी संविधानिक मूल्यांचे भान ठेवून काम केलात तर देशाचा विकास निश्चित आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्यावतीने आयोजित 51 व्या संसदीय अभ्यास वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात शिंदे यांनी भारतीय लोकशाहीची ताकद, लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्या आणि विद्यार्थी तरुणाई समोर असलेल्या संधींचे अत्यंत प्रभावी वर्णन केले. ते म्हणाले की, भारतीय लोकशाही म्हणजे फक्त प्रतिनिधिक नाही तर सहभागी लोकशाही आहे. देशातील 140 कोटी नागरिक विविध धर्म, भाषा, जाती असूनही शांततेने एकत्र राहतात हे लोकशाहीचे अद्वितीय सामर्थ्य आहे. लोकशाही आपल्याला अधिकार देते पण त्या अधिकारांसोबत कर्तव्यांची जाणीव करून देते, असेही त्यांनी नमूद केले. विधिमंडळातील प्रत्येक निर्णय लाखो लोकांच्या जीवनाला दिशा देतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी संसदीय प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. पुस्तकातील मजकूर आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात जमीन-आसमानाचा फरक आहे, तो या अभ्यासवर्गातून स्पष्ट जाणवेल, असे शिंदे म्हणाले. पदे ही लोकांनी दिलेली जबाबदारी ते पुढे म्हणाले की आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे नेते, अधिकारी, उद्योगपती किंवा पत्रकार आहेत आणि संविधानाचे भान ठेवून काम केले तर देश निश्चितच प्रगती करेल. आपल्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की ते थेट लोकांमध्ये उतरून अनुभवातून शिकत शिकत या स्थानापर्यंत पोहोचले. पदे ही लोकांनी दिलेली जबाबदारी आहेत; त्यांचा वापर सामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठीच केला पाहिजे, असे ते म्हणाले. समान न्याय मिळणे हे लोकशाहीचे महत्वाचे तत्व विधानसभाध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे आणि इतर मान्यवरांचे कौतुक करत त्यांनी सांगितले की, सभागृह शिस्तीत चालणे आणि सत्ता–विरोधक दोघांना समान न्याय मिळणे हे लोकशाहीचे महत्वाचे तत्व आहे. शेवटी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की अभ्यासवर्ग तुम्हाला सजग नागरिक बनवेल आणि भविष्यातील नेतृत्वाला नवी दिशा देईल. 51 व्या अभ्यासवर्गाचा उद्घाटन सोहळा विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा आणि लोकशाहीविषयी आदर दृढ करणारा ठरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर निवेदन केले. प्रस्तुत प्रकरणात 60 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या न्यायवैद्यक तपासात महिला डॉक्टरच्या हातावर आढळलेली नोट तिनेच लिहिल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच हे गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रकरण असल्याचेही स्पष्ट झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. भाजप आमदार अमित साटम यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, महिला डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. एक महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केली. त्यातून समाजात खूप मोठ्या प्रमाणात संतापाची लाट निर्माण झाली. सरकारने यासंदर्भात एसआयटी व ज्यूडिशिअल इन्क्वायरीही नेमली. आतापर्यंतच्या तपासासंदर्भात सदस्याने 3 मुद्दे उपस्थित केले. त्यात न्यायवैद्यक पथकाच्या रिपोर्टमध्ये त्या महिला डॉक्टरच्या हातावर आढळलेली नोट तिनेच लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरा विषय त्यांनी आरोपींनी दबाव आणला का? असा मांडला. तर मुळात या सगळ्या केसमध्ये पोलिस अधिकारी गोपाळ बदने यांनी डॉक्टरची फसवणूक करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातून मग लग्नाचे आमिष दाखवणे आदी सगळ्या गोष्टी लक्षात येतात. त्यानंतर या बदनेंनी वेगळी भूमिका घेतली. पीएसआय बदनेने लैंगिक शोषण केले मुख्यमंत्री म्हणाले, मृत महिला ही मेडिकल ऑफिसर होती. एखाद्या आरोपीला अटक होते तेव्हा तो अटकेसाठी फिट आहे की नाही यासंबंधीचा रिपोर्ट घ्यावा लागतो. अशा प्रकारचे काही रिपोर्ट त्या डॉक्टर महिलेने अनफिट दिले. त्यामुळे पोलिसांनी एक मोठे पत्र त्यांच्या वरिष्ठांना दिले होते. हे सर्व आरोपी अत्यंत महत्त्वाच्या गुन्ह्यांतील गुन्हेगार आहेत आणि त्यांना अनफिटचे प्रमाणपत्र दिले जात आहे, अशी बाब त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांची चौकशी झाली. त्यांनीही आपली बाजू मांडली. पण हा घटनाक्रम 5 महिने अगोदरचा आहे. तपासात दोन गोष्टी झाल्या स्पष्ट आत्ता जी काही सुसाईड आपल्याला दिसत आहे, त्यात एकीकडे बदनेंनी केलेली फसवणूक आहे आणि दुसरीकडे त्या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन जो दुसरा आरोपी आहे, त्या आरोपीनेही एकप्रकारे तिची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या दोघांचे नाव लिहून त्या ठिकाणी या महिलेने आत्महत्या केली. यात आत्तापर्यंतचे जे काही रिपोर्ट आहेत, त्यात दोन गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. एक, ही गळफास लावून केलेली आत्महत्या आहे आणि दोन, हातावर जे काही लिहिलेले आहे ती अक्षरे त्या महिलेचीच आहेत. हा तपास अजून संपला नाही. याचे आरोपपत्र लवकरच दाखल होईल. पण समांतरपणे अनेक गोष्टी या प्रकरणी सांगण्यात आल्या. त्यामुळे त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यासाठी आपण न्यायाधीशांची समिती नियुक्त केली आहे. ते ही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या प्रकरणी पोलिसांचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विजय वडेट्टीवारांनी विचारले दोन प्रश्न काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी डिजिटल, तांत्रिक व न्यायवैद्यक पुरावे काही संकलित करण्यात आलेत का? व दोन आरोपींशिवाय इतर आरोपी आढळलेत का? असा प्रश्न केला. आरोपीला फिट अनफिट दाखवण्यासाठी सातत्याने सदर महिला डॉक्टरचीच ड्यूटी लावण्यात येत होती. तिच्यावर दबाव टाकला जात होता. या प्रकरणीही चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणी सर्व न्यायवैद्यक पुरावे आहेत. व्हॉट्सअॅप चॅट प्राप्त झाले आहेत. सदरहू महिला डॉक्टर हॉटेलमध्ये आल्या आणि आपल्या रूममध्ये गेले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहे. त्यामुळे तिथे कोण आले कोण गेले त्याची सर्व माहिती उपलब्ध आहे. या प्रकरणी नव्या कायद्यानुसार फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आलेत. त्याचे विश्लेषण केले जात आहे. अशा गुन्ह्यात आपण 60 दिवसांत आरोपपत्र दाखल करतो. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या व्यक्तिरिक्त या प्रकरणात वरील 2 आरोपींशिवाय इतर कुणाचा हात आहे का? हे तपासण्यासाठीच आपण न्यायिक चौकशी समिती नेमली आहे, असे ते म्हणाले. पीडित कुटुंबाला नोकरीची मागणी दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
मुंबईतील सायन परिसरातील सुमारे दोन एकर भूखंड, जो पूर्वी मोकळा बीएमसीचा जमीन म्हणून नोंद होता. तो आता एका धार्मिक-सामाजिक संघटनेला भाड्याने दिल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने, 4 डिसेंबरच्या शासन आदेशाद्वारे, ही जमीन 30 वर्षांसाठी विश्व हिंदू परिषद या संघटनेला भाडेपट्ट्यावर देण्यास मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, या भूखंडावर अवघे 10,186 रुपये सवलतीच्या दराने भाडे आकारले जाणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी, या भाड्याव्यतिरिक्त बीएमसीकडून एकरकमी 9.7 कोटी रुपयांचे प्रिमियम देखील माफी दिले गेले आहेत. वास्तविक, या जमीन भूखंडाची बाजारभावानुसार किंमत आज सुमारे 247 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत केवळ नाममात्र भाड्यात आणि प्रिमियम माफीसह हा भूखंड एका संघटनेला देणे, म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेचा मोठा आर्थिक बळी होणे, असे काही राजकीय विरोधक व सामाजिक तज्ज्ञ मानत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन निवडक धर्म-संस्थेला दिली जात असल्याचे दिसते. या निर्णयावर राज्यातील विरोधक तसेच समाजातून तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. विशेषतः मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हटले की, महानगरपालिका निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने एक पूर्वनिर्धारित रणनीतीनुसार भाजपसोबत जवळीक असलेल्या संघटनांना शहरातील मोक्याच्या जागा वाटप करणे सुरू केले आहे. गेल्या वर्षी वडाळा येथील मोठ्या भूखंडाचे भूखंड विभाजन करून आणि त्यावर एका धर्मनिष्ठ ट्रस्टला जागा दिली होती, असे त्यांनी सांगितले. आता हेच प्रकार सार्वजनिक धनाचा वापर करून पक्षीय किंवा धर्मीय स्वार्थपूर्तीसाठी होतोय का? असा प्रश्न त्यांनी उभा केला. 500 बेड क्षमता असलेले केंद्र सुरू केले दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेद्वारे या जागेवर चालू असलेल्या सामाजिक-वैद्यकीय कामांची बाजूही दिली जात आहे. संघटनेचे प्रकल्प व्यवस्थापक शंभू पांडे म्हणाले की, ही जमीन 1984 मध्ये संघटनेला वाटप झाली होती, पण 2013 पासून त्यांनी तिचा विकास सुरू केला आहे. आतापर्यंत त्या परिसरात सुमारे 270 लोक रहातात; ज्यात कॅन्सर रुग्ण व गरीब भागातील परिसरातील घरे आहेत. येथे त्यांनी 500 बेड क्षमता असलेले केंद्र सुरू केले असून, ज्यात रुग्णांसाठी जेवण, नाश्ता, प्राथमिक आरोग्य सुविधा, तसेच शिक्षण, संगणक वर्ग, शिलाई मशीन वर्ग यांसारखे कार्यक्रम चालू आहेत. पांडे म्हणाले की, हा प्रकल्प कोणत्याही राजकीय गटाचा नाही, तर सर्व समाजासाठी आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर दुपारचे 3 वाजलेले...विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलावाशेजारील रेल्वेपुलावरील वाहतूक रोखण्यासाठी बॅरिकेड्स घातलेले. जुना विजापूर नाका आणि पलीकडे पत्रकार भवन चौक येथूनच वाहतूक वळवण्यात आली. त्याची सूचना देण्यासाठी दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिस थांबलेले. पाहता पाहता, वाहनांच्या रांगा लागल्या. पर्यायी मार्ग असतानाही मिळेल त्या मार्गाने वाहनधारक घुसले. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारक अडकून पडले. प्रशासनाने केलेल्या पर्यायी मार्गांचे नियोजन अपेक्षेप्रमाणेच कोलमडले. कारण, त्या नियोजनात अनेक त्रुटी दिसून आल्या. त्यात बेशिस्त वाहनधारकांची भर पडली आणि नियोजनाचा फज्जा उडाला. विजापूर रस्त्यावरील रेल्वेपुलाखाली तांत्रिक कामामुळे दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला होता. दोन दिवस हे काम चालणार आहे. परंतु पहिल्याच दिवशी मिळालेल्या या धड्याने दमाणी नगर येथील रेल्वेपुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय एक दिवस पुढे ढकण्यात आलेला आहे. सोमवारी रात्री बारानंतर दमाणी नगरकडे जाणारा रस्ता बंद करण्याचे ठरलेले होते. परंतु विजापूर रस्त्यावरील मार्ग सोमवारी बंद केल्यानंतर वाहतूक नियोजनाचा पूर्णत: फज्जा उडाला आणि त्यातून यंत्रणेने धडा घेतला. त्यातून एक दिवस पुढे ढकलण्यात आला. सोमवारी विजापूर रस्त्यावरील वाहतूक दुपारी बंद झाल्यानंतर होटगी रस्त्यावर त्याचा मोठा ताण पडला. सर्वत्र वाहनांच्या रांगा होत्या. रात्री दहापर्यंत हेच चित्र होते. त्यात अँब्युलन्स, एसटी बस, स्कूलबस सारेच अडकून पडलेले होते. ही कोंडी फोडण्यासाठी यंत्रणेचा प्रयत्न केविलवाणा होता. कारण बेशिस्त वाहनधारक स्वत:चा हेका सोडत नव्हते. मिळेल त्या जागेतून वाहने दामटण्याच्या प्रयत्नात प्रचंड कोंडी झाली होती. रेल्वेपुलाचे काम रात्री आठपर्यंत चालणार होते. परंतु वाहतुकीची कोंडी पाहून 7 वाजून 45 मिनिटांनीच रस्ता खुला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. होटगी रस्त्यावर, प्रचंड कोंडी छत्रपती संभाजी तलावाच्या मागच्या बाजूचा रस्ता, आयटीआय समोरून भारती विद्यापीठ, अत्तार नगर रस्ता या तिन्ही रस्त्यांच्या माध्यमातून आसरा पुलावर वाहतूक आली. पुलावर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. तिन्ही रस्ते जाम झाले होते. डी-मार्ट चौकपर्यंत आल्यानंतर आसरा पुलावर वाहने अडकून पडली. पुलाच्या दुरुस्तीमुळे हा पुल अरुंद झाला आहे. त्यामुळे तब्बल अर्ध्या तासानंतर पुलावरून वाहनधारकांची सुटका झाली नव्हती. प्रचंड धुळीतून पडले बाहेर आसरा रस्त्यावरील वाहतुकीतून बाहेर पडण्यासाठी काही वाहने पोपटानी हॉस्पिटलच्या बाजूने आसरा पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर वळले. हा रस्ता कच्चा आणि खडकाळ आहे. त्याने प्रचंड धूळ उडाली. त्यातून मार्ग काढत आसरा पुलावर आले. तिथे पुन्हा अडकून पडले. त्यामुळे वाहनधारक प्रचंड वैतागलेले होते. वाहनांमध्ये रिक्षांची संख्या अधिक होती. वाहतूक बुधवारपासून बंद करण्याचा निर्णय विजापूर रस्त्यावरील रेल्वपुलाखाली मंगळवारी काम होणार आहे. त्यामुळे दमाणी नगर रेल्वेपुलावरील वाहतूक बुधवारपासून बंद करण्याचा निर्णय झाला. सुधीर खिरडकर, पोलिस उपायुक्त वाहतूक शाखा नोकरदार, रिक्षांमधील प्रवासी, विद्यार्थी अडकून पडले होते सायंकाळी साडेपाचला शाळा सुटल्या, सहाला नोकरदार मंडळी बाहेर पडली. त्यामुळे सहानंतर वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडली. अडकलेल्या रिक्षांमध्ये प्रामुख्याने महिला होत्या, स्कूल बस अडकून पडल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला आलेला होता. धुळीने खोकत होते. अर्ध्या तासानंतर त्यांची सुटका झाली.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
“माझं खरं तर कुणी नाही. मला शिक्षणातून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. म्हणूनच मी एमसीएला प्रवेश घेतला आणि कर्ज काढून, काम करून फी भरली, पण महाविद्यालयाने फी भरल्याची कोणतीही पावती आम्हाला दिली नाही. परीक्षेसाठी काय लागते,’ असे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारले तर त्यांनी ‘काहीच लागत नाही, फक्त अर्ज भरा आणि शुल्क द्या’ असे सांगितले. आम्ही शुल्क भरले, पण इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आले, तेव्हा आमचे हॉलतिकीट आले नाही. आम्ही वाट पाहिली, महाविद्यालय टाळाटाळ करत राहिले. पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत आम्हाला हॉलतिकीट मिळेल, अशी आशा होती, पण पेपरच्या वेळी समजले की, महाविद्यालयास विद्यापीठाची संलग्नता नाही, त्यामुळे आता पेपर होणार नाहीत. आमचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती आहे. मी पार्टटाइम काम करून शुल्क भरले. पोलिसांनी विद्यापीठाशी पत्रव्यवहार सुरू चिकलठाणा येथील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर मधील 133 विद्यार्थी परीक्षेला मुकल्याच्या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी विद्यापीठाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. नेमक्या कोणाच्या चुकीमुळे ऐनवेळी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले हे पोलिस शोधत आहेत. त्यासाठी पोलिसांनी विद्यापीठाच्या उपकुलसचिवांची भेट घेऊन त्यांना प्रश्नावली दिली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे वर्ष वाचवा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे हे स्पष्ट आहे. अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणीतून त्यांनी फी भरली. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. या विद्यार्थ्यांचे वर्ष कोणत्याही परिस्थितीत वाया जाता कामा नये. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून यावर तोडगा काढावा. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात फी आकरण्यात आली. परीक्षेच्या आदल्या दिवशी हॉलतिकीट मिळाले नाही, ही चूक कुणाची? - अमोल तांबे, शहर जिल्हा उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा.
175 रुपयांच्या नफ्यासाठी शहरात अक्षरशः ‘मृत्यूचा बाजार’ सुरू आहे. नायलॉन मांजाचा प्रत्येक गट्टू विकला जातो तेव्हा त्या धाग्याने कुणाचा गळा केव्हा चिरला जाणार, कुणाचे लेकरू रक्तबंबाळ होणार, कोणत्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार याचा किंचितही विचार न करता हा काळाबाजार शांतपणे सुरू आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट्सवरून ‘इंडस्ट्रियल युज’च्या नावाखाली येणारा हा जीवघेणा मांजा शहरातील गल्लीबोळात 700 रुपयांना विकला जातो आणि विक्रेत्याला मिळणारा साधा 175 रुपयांचा नफा... पण किंमत? नागरिकांचे कापलेले गळे, जखमी पक्षी आणि प्रत्येक माणसावर लटकत असलेला मृत्यूच्या सावलीचा धागा. हा सगळा कारभार किती रुपयांच्या नफ्यासाठी होतो हे ‘दिव्य मराठी’ने शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. 700 रुपयांना एक गट्टू विकल्यानंतर दुकानदाराला 175 रुपयांचा नफा मिळतो. विशेष म्हणजे सोमवारी (8 डिसेंबर) गुन्हे शाखेने सातारा, जिन्सी भागात छापा मारत 51 चकऱ्या जप्त केल्या. त्यांच्या तपासातही हीच बाब पुढे आली आहे. नायलॉन मांजा विक्री वाढते आणि गंभीर अपघात घडतात. यालाच थेट गुन्हेगारी कृत्य घोषित करत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. हा धागा नेमका कुठे वापरतात? नायलॉन मांजावर इंडस्ट्रियल युज असे लेबल लावले जाते. अशा प्रकारचे नायलॉन किंवा मेटॅलिक मिश्र धागे प्रत्यक्षात फॅब्रिक कटिंग, मशीन बेल्ट, ऑटो पार्टस, ग्राइंडिंग किंवा विशेष औद्योगिक कामासाठी वापरले जातात. हा धागा पतंगासाठी अजिबात नसतानाही तोच धागा ‘इंडस्ट्री’ या नावाखाली खुलेपणाने ऑनलाइन मागवता येतो. त्यामुळे पोलिसांना त्यावर थेट पतंग धागा म्हणून बंदी आणणे कठीण जाते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. मांजा विकत असल्यास मला कळवा शहरातील 17 पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन स्पष्ट आदेश दिले आहेत. कुणीही नायलॉन मांजा विकत असल्याचे आढळताच थेट पोलिस आयुक्तांना व्हॉटस्ॲपवर कळवावे. 9226514001 या क्रमांकावर कळवा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्ण गोपनीय ठेवण्यात येईल. ऑनलाइन पुरवठ्यावर नियंत्रण केले का? ऑनलाइन पद्धतीने शहरात मांजा येऊ नये म्हणून आम्ही ऑनलाइन शॉपिंग साइट कंपनीला मेल केले आहेत. त्याच बरोबर पोलिसांनी कुरियर चालकांना सूचना देऊन स्कॅनिंग मशीनच्या माध्यमातून पोलिस कुरियरदेखील तपासणार. कारवाईत सातत्य राहील का? हो, त्यासाठी विशेष पथक नेमले आहे. संरक्षणासाठी काय उपयायोजना केल्या? नागरिकांच्या सहभागाशिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही. माहिती देणाऱ्या नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही, याची 100% काळजी घेतली जाईल. माहिती देणाऱ्यांचे नाव, फोन नंबर किंवा पत्ता कोणत्याही कारवाईच्या कागदपत्रांवर नमूद केला जाणार नाही. रविवारी निजामगंज कॉलनीतील दोन जणांच्या घरातून साठा जप्त करण्यात आला. यामध्ये 51 गट्टू जप्त केले. सातारा भागातही एकाला ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना थेट पोलिस कोठडी सुनावली. विशेष म्हणजे रविवारी रात्रीच संजयनगर भागात पोलिसांनी छापा मारला असता रिझवाना नावाची महिला आणि याच भागातील शेख फिरोज हबीब शेख (42) इस्माईल शेख ऊर्फ आदिल हाजी शेख (32) हे मांजा विक्री करत असल्याचे समोर आले. दोघांना अटक करण्यात आली. मात्र महिला असल्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी सकाळी ताब्यात घेण्यात येणार होते. तशी नोटीसदेखील दिली. मात्र सोमवारी ती पसार झाली. सेफ्टीसाठी बांबूगल्लीत दिले जाणार मोफत गार्ड नायलॉन मांजामुळे जखमी होऊ नये यासाठी बांबू व्यावसायिक शीतल कूपर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एका युवकाने मांजापासून बचावासाठी दुचाकीला दोन लोखंडी सळयांचे आवरण लावल्याचे बघितले. त्यामुळे कमी खर्चात बांबूपासून असे गार्ड बनवता येतील अशी कल्पना त्यांना सुचली. त्यांनी आधी स्वतःच्या दुचाकीला हे गार्ड बसवून बघितले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांनी आता शहरातील प्रत्येक नागरिकासाठी असे गार्ड मोफत बसवून देणार असल्याची तयारी दर्शवली आहे. नायलॉन मांजाने जखमी झालेल्यास नुकसान भरपाई संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेतनातूनच वसूल करावी का : खंडपीठ बायजीपुरा आणि संजयनगर भागात ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने स्वतः व्यापारी म्हणून नायलॉन मांजा विकत घेण्याचा प्रयत्न केला. प्रथम दुकानदाराने ठाम नकार दिला, ओळख पडताळणी सुरू केली, ‘कुठून आला, कुणासाठी हवा’ अशी चौकशी केली. त्यानंतर होलसेल दरात एका गट्टूची किंमत 700 रुपये असल्याचे सांगितले. 50 रुपये आगाऊ ठेवून उर्वरित 175 रुपयांच्या नफ्यात विक्री करण्याचा व्यवहार निश्चित झाला. ‘मी 50 ठेवतो, 175 रुपये राहतील“ असा स्पष्ट हिशेब दुकानदाराने दिला. यावरून नायलॉन मांजा शहरात छुप्या पद्धतीने, पण व्यवस्थित दररोजच्या व्यवहाराने विकला जात असल्याचे उघड झाले.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. आज दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर निवेदन केले. त्यात त्यांनी या प्रकरणाचा सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याची ग्वाही दिली. यावेळी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, आज सभागृहाबाहेर विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्यांवर सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहुया विधिमंडळ कामकाजाशी संबंधित इत्यंभूत वृत्त....
राज्यातील हिवाळी अधिवेशन सुरु असताना आज राजकीय वातावरणाला नवीन कलाटणी देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. शिंदे गटातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे टेबलावर ठेवलेल्या जाडजूड नोटांच्या बंडलांची मोजणी करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि थेट सरकारवर हल्लाबोल केला. शेतकरी कर्जमाफीला राज्याकडे पैसा नाही म्हणणाऱ्या सरकारकडे इतकी रोख कुठून आली? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित करताच राजकारणात खळबळ उडाली आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही प्रत्यक्षात दळवीच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. व्हिडीओमध्ये स्क्रीनवर व्हिडीओ कॉल सुरु असल्याचे तसेच लाल रंगाचा टी-शर्ट घातलेली व्यक्ती बॅगेतून सतत रोख बाहेर काढून टेबलावर एकापाठोपाठ एक बंडली रचत असल्याचा दावा आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतरच सोशल मीडियावर चर्चांचा भडिमार झाला. सरकारचे जनप्रतिनिधीच जर नोटांची एवढी अफाट मोजणी करत असतील, तर यामागचा स्रोत काय? हे पैसे कुठून आले? या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे सत्ताधारी अडचणीत आले असल्याचे चित्र दिसले. तथापि, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार महेंद्र दळवी यांनी संपूर्ण व्हिडीओ बनावट आणि बदललेला असल्याचा दावा केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, हा व्हिडीओ माझ्याशी संबंधित नाही. अंबादास दानवे यांनी माझा चेहरा दिसेल अशा स्वरूपात संपूर्ण व्हिडीओ दाखवावा. जर मी त्या व्हिडीओमध्ये कुठेही दिसलो, तर मी कोणत्याही क्षणी आमदारकीचा राजीनामा देईन. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. तर उलट अंबादास दानवे यांनाच सवाल करत म्हणाले की, या व्हिडीओमध्ये लाल टी-शर्ट घातलेला व्यक्ती कोण आहे? दानवे यांनीच सांगावे. कोणत्या व्यक्तीने त्यांना सुपारी दिली ते सांगावे दळवी यांनी अंबादास दानवे यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण आणखी तापले आहे. अंबादास दानवे यांच्याकडे काही काम नाही. त्यांना पक्षात कोणी विचारत नाही. ब्लॅकमेल करणे हा त्यांचा व्यवसायच झालाय. त्यांनी व्हिडीओ मॉर्फ केला आहे. कोणत्या व्यक्तीने त्यांना यासाठी सुपारी दिली ते त्यांनी सांगावे, असे दळवी यांनी तिखट शब्दांत म्हटले. दानवे यांना सुपारीबाज नेता म्हणत त्यांनी शिवसेना उद्धव गटावर तोफ डागली. विरोधकांनी केलेला राजकीय डाव आहे का? या सगळ्या घडामोडीत सत्य काय आणि फसवणूक कोणती, हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहे. व्हिडिओ खरा असेल तर या पैशांची उगमस्थाने काय आहेत? जर व्हिडिओ बनावट असेल, तर सत्ताधारी आमदारांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा हा विरोधकांनी केलेला राजकीय डाव आहे का? अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या या नाट्यमय व्हिडिओमुळे विरोधकांना सरकारवर निशाणा साधण्याची मोठी संधी मिळाली आहे. पुढील काही तासांतच या प्रकरणाची दिशा कोणत्या बाजूला वळते, हे निश्चित होणार आहे. पण एक गोष्ट स्पष्ट, महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा नोटांच्या बंडलांवर अडकले आहे.
यावर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील काटेपूर्णा व वान धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि शेतीच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. अकोला शहराचा पाणीपुरवठाही काटेपूर्णा धरणावरच अवलंबून आहे. सध्या अकोला शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बी व उन्हाळी पिकांसाठी पाण्याची सोय झाली आहे. जिल्ह्यात एकूण मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून २९ प्रकल्प आहेत. त्यांची एकूण साठवण-क्षमता ३५१.७७ दलघमी आहे. काटेपूर्णा धरणात शुक्रवार-अखेर (५ डिसेंबर) ९१,१३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा काटेपूर्णा धरणात दोन टक्के अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी यावेळी काटेपूर्णा धरणात ८०,१९ टक्के जलसाठा होता. काटेपूर्णा धरणात ५ डिसेंबरअखेर एकूण ९०.०१ दलघमी तर उपयुक्त जलसाठा ७८.६९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. आता धरणांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि शेतीच्या पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. अकोला शहराचा पाणीपुरवठाही काटेपूर्णा धरणावरच अवलंबून आहे. वान धरणात ८१ दलघमी पाणी मृत पाणीसाठा - १.५१ दलघमी. उपयुक्त ८१.९६ दलघमी. एकूण साठा - ८३.४६ दलघमी. आजचा उपयुक्त जलसाठा- ७९.५७. आजचा एकूण साठा- ८१.०८ दलघमी. उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी - ९७.०८ टक्के. गतवर्षी याच दिवशी - ९५.५३ टक्के पाणीसाठा होता. विभागातील सर्व प्रकल्पात सध्या ४४१३ दलघमी पाणी- अमरावती विभाग - आजचा एकूण पाणीसाठा - ४४१३.५२ दलघमी. टक्केवारी - ९३.१९ टक्के. गतवर्षी याच तारखेला - ८७.४२ टक्के.
राज्यात काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवायला लागली आहे. सकाळी आणि रात्रीच्या वेळेस हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. सोमवारी कमाल ३०.८ एवढे नोंले गेले तर किमान तापमानाचा पारा १०. ६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. दरम्यान अकोला शहरासह जिल्ह्यात आजपासून, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार असून, ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातही थंडीची लाट कायम असून, अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडाऱ्यात पारा १० अंशाच्या खाली गेला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार १२ डिसेंबरपर्यंत देशभरात थंडीची लाट कायम राहील. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, थंडी वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह बालकांच्या आरोग्याच्या वाढल्या तक्रारी वाढल्या आहेत. शासकीय रुग्णालये, दवाखान्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. उर्वरित, पान-४ सर्वांत नीचांकी १०.६ अंश तापमानाचा पारा घसरला आहे. आज अकोल्यामध्ये १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वांत नीचांकी तापमान मानलं जात आहे. तापमानामध्ये प्रचंड घट झाल्यामुळे अकोलेकरांना चांगलीच हुडहुडी देखील भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट जाणवत असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने तापमानामध्ये घट होत आहे.
महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकेच्या दृष्टीने महायुतीने मोठे आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. रात्री उशिरा झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने राज्यभरातील सर्व पालिका निवडणुका एकत्रित पद्धतीने लढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीपूर्वी काही महापालिकांमध्ये स्वतंत्र लढण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र हा निर्णय झाल्यानंतर आता महायुतीची निवडणूक रणनीती एकसंघ आणि अधिक आक्रमक असेल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे, मुंबई आणि ठाणे या दोन्ही महत्त्वाच्या पालिकांमध्येही महायुतीच उमेदवार उतरतील, हे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पालिका सध्या महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने निर्णायक मानल्या जात असल्याने, या निर्णयाचे महत्त्व अधिक वाढले आहे. या महत्त्वाच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दीड तास बंद दाराआड उपस्थिती चर्चा केली. निवडणुकीतील अनेक संवेदनशील मुद्दे, स्थानिक समीकरणे तसेच जागावाटपाची प्राथमिक चौकट यावर त्यांनी सविस्तर मंथन केले. राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण तापत असताना सत्ता टिकवण्यासाठी आणि विरोधकांच्या रणनीतीला जोरदार उत्तर देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. सध्या महाविकास आघाडीही मजबूतपणे या निवडणुका लढवण्याच्या तयारीत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमुळे बदललेले समीकरणही महायुती सावधपणे विश्लेषण करत आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी प्रदेशाध्यक्ष तसेच ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती विशेष होती. राज्यभरात भाजपची संघटनात्मक शक्ती वाढवताना शिवसेना शिंदे गटासोबतची राजकीय जुळवाजुळव सुलभ करण्याचे काम या दोन्ही नेत्यांकडे आहे. त्यामुळे जागावाटपासह उमेदवारीची तयारी, प्रचारयोजना आणि स्थानिक स्तरावरील समन्वय वाढवण्यासाठी त्यांची भूमिका पुढील काळात अधिक निर्णायक ठरणार आहे. शिवाय, स्थानिक पातळीवरील नेतृत्व विकसित करून त्यांना निवडणुकीत महत्त्वाची संधी मिळावी, यावरही चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करू नये, अशी सहमती याच बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे, युतीतील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या पक्षात प्रवेश करू नये, अशी सहमती मिळाली आहे. मागील काही महिन्यांतील राजकीय विभाजन, फुट आणि प्रवेशामुळे तणावाची स्थिती वेळोवेळी निर्माण झाली होती. परंतु आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत कलह रोखणे आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेली संशयाची भावना दूर करणे महायुतीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप-शिवसेना शिंदे कार्यकर्ते एकत्र प्रचार करतील आणि स्थानिक पातळीवरील कोणतीही घुसखोरी किंवा गोंधळ रोखण्यासाठी पक्षांनी स्पष्ट निर्देश देण्याची तयारीही सुरू आहे. जागावाटपाची आणि प्रचाराच्या आराखड्याची प्राथमिक प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या पातळीवर जागावाटपाची आणि प्रचाराच्या आराखड्याची प्राथमिक प्रक्रिया सुरू होईल. प्रत्येक शहराचे समाजगट, स्थानिक प्रस्थापित नेते, नवे चेहरे, आणि निवडणुकीतील जिंकण्याची क्षमता या सर्व मुद्द्यांवर विचार करून उमेदवार निश्चित केले जातील. महायुतीसाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत आणि सत्ता स्थिर राहावी यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा प्रतिकार करण्याबरोबरच, मतदारांपर्यंत महायुती सरकारच्या योजनांचा आणि निर्णयांचा संदेश पोहोचवणे हेही महत्त्वाचे आव्हान असेल. त्यामुळे या निर्णयानंतर महाराष्ट्रातील महापालिकांच्या राजकारणात मोठी चक्र फिरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
मागील दोन दिवसांपासून हंगामातील सर्वात नीच्चांकी तापमानाची शहर व जिल्ह्यात नोंद झाली आहे. रविवारप्रमाणेच सोमवारी (दि. ८) पहाटे शहरात किमान तापमान ९ अंश नोंदवल्या गेले आहे. सलग दोन दिवसांपासून पारा नऊ अंशावर असल्यामुळे रात्री सोबतच दिवसाच्यावेळीसुध्दा नागरिकांना थंडी जाणवत आहे. याचवेळी विदर्भाच्या नंदनवनात कुडकुडणाऱ्या थंडीचा सामना चिखलदरवासियासंह पर्यटक करत आहेत. डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर अधिक असतोच मात्र यंदा नोव्हेंबर महिन्यापासूनच जिल्ह्यात थंडी जाणवत आहे. नोव्हेंबर महिन्यात थंडीची लाट आली होती. त्यानंतर आठ ते दहा दिवस तापमानात वाढ झाली होती आता मात्र मागील दोन दिवसांपासून पुन्हा थंडीची लाट आली असून पारा नऊ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. सध्या किमान तापमानासोबत कमाल तापमानातही घट आली असून ३१ अंश नोंदवल्या गेले आहे. चिखलदरा हे राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. मात्र सध्या चिखलदरा येथे तापमान नोंद करण्यासाठी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही. एका खासगी महाविद्यालयाकडून या ठिकाणी यापुर्वी तापमान नोंद केले जायचे मात्र त्या ठिकाणी असलेली तापमापक यंत्रणा मागील काही महिन्यांपासून बंद पडलेली आहे. असे असनाही मात्र जिल्हा प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नाही. थंड हवेच्या ठिकाणीच नेमके तापमान किती, हे नोंद करण्याची कोणतीही सोय नाही. सध्या शहरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून तापमान ९ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गरम कपड्यांचा वापर करीत आहेत. बस स्थानकावर एसटीची वाट बघणाऱ्या युवती, महिला, पुरुष स्वेटर, जर्कीन, पायात मोजे, शूज घालून आहेत. चिखलदरा येथे आयएमडीचे केन्द्र नाही. त्या ठिकाणी आयएमडीचे (इंडीअन मेट्रोलीजिकल डिपार्टमेंट) केन्द्र राहिल्यास तापमान तसेच पावसाळ्यात पावसाच्या नियमीत नोंदी घेतल्या जाऊ शकतात. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आयएमडीसोबत पत्र व्यवहार झाल्यास ते शक्य आहे. मात्र अलीकडे अमरावती जिल्हा प्रशासनाकडून चिखलदऱ्यात आयएमडीचे केन्द्र असावे, अशा आशयाचे पत्र प्राप्त नसल्याची माहीती नागपूर आयएमडीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. ‘आयएमडी’सोबत पत्र व्यवहार केल्यास केंद्र होण्याची शक्यता
महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. समाज नोकरी आणि व्यवसायामुळे विखुरला गेला आहे. त्यामुळे दूर गेलेल्या समाजाला उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र करण्याचे कार्य संस्था करीत आहे. तसेच महात्मा फुले भवन निर्माण होत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाकरिता खासदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी देणार आहे, असे आश्वासन खासदार बळवंत वानखडे यांनी दिले. महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचा दहावा बहु. राज्यस्तरीय माळी समाज उपवर युवक-युवती परिचय मेळावा आणि विवाह बंधन परिचय पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, उद््घाटक माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते नीळकंठ यावलकर, महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर घाटोळ, महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष दिलीप लोखंडे, सिपना कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खेरडे, महात्मा फुले बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरडे, अंजली लांडे, प्रशांत लांडे, सुभाष बनसोड, संजय बेले, पुरुषोत्तम कळमकर, नाना आमले, डॉ. किरण बेलसरे, महेंद्र भातकुले, अश्विनी पेटकर, दिलीप लोखंडे, माजी सहाय्यक आयुक्त डॉ. राधेश्याम बहादुर, संजय बेलोकार, सुधीर रसे, अतुल भिरडे आदी मान्यवर विचार पीठावर उपस्थित होते. यामध्ये प्रभाकर घाटोळ, प्रकाश लोखंडे, दीपक लोखंडे, केशव झाडे, दिवाकर फरकाडे, संजय गणोरकर, प्रविण पेटकर, प्रा. रूपेश फसाटे, डॉ. अनिल कळमकर, अनिल वन्हेकर, बाबाराव ठाकरे, पंजाब फरकाडे, संतोष मालधुरे, नीलिमा लोखंडे, विजयश्री गणोरकर आदी उपस्थित होते. असे मेळावे होणे, ही काळाची गरज : आ. सुलभा खोडके वधू-वर परिचय मेळाव्यामुळे समाजाचा पैसा व वेळ दोन्ही वाचतो. यातून योग्य वधू-वरांची निवड करण्यास पालकांना मदत होते. तेव्हा असे मेळावे होणे ही काळाची गरज आहे. महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या निर्माणाधीन महात्मा फुले भवन व महात्मा फुले वसतिगृहाला भरीव निधी देणार असल्याचे आमदार सुलभा खोडके यांनी आश्वासन दिले. सर्व संचालकांचा गौरव विवाह बंधन उपवर युवक-युवती परिचय पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच मानवतेचा आधारवड नीळकंठ या पुस्तकासह महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. मेळाव्याचे प्रास्ताविक महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे संजय गणोरकर यांनी केले. यावेळी मेळाव्यात २०० युवक-युवतींनी आपला परिचय दिला. सलग दहा वर्षे संस्थेसाठी कार्य करणाऱ्या सर्व संचालकांचा गौरव करण्यात आला.
उर्दू विद्यार्थ्यांचा ‘शिक्षण हक्क’ प्रश्न हिवाळी अधिवेशनात घुमणार का ?
चांदूर रेल्वे शहरात ११ वी आणि १२ वीच्या उर्दू माध्यमातील महाविद्यालयीन शिक्षणाची तातडीने सुरूवात करावी, अशी मागणी स्थानिक मुस्लिम समाजातर्फे काही महिन्यांपूर्वीच आ. प्रताप अडसड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या मागणीला पुन्हा उफाळा आला आहे. सोमवारपासून नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात चांदूर रेल्वेतील उर्दू महाविद्यालयाचा मुद्दा मांडला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासन धोरण घोषित करते. परंतु, चांदूर रेल्वे तालुक्यातील उर्दू माध्यमातील विद्यार्थी आजही महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. शहरातील सुमारे दोन हजारांहून अधिक मुस्लिम लोकसंख्येचा प्रश्न हा फक्त निवडणुकीतील चर्चेपुरता न राहता प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारा झाला आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून चालवली जाणारी मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा दहावीपर्यंतचे मर्यादित असून, अकरावी-बारावीचे वर्ग नाहीत. परिणामी, अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे बाहेरील शहरांमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत.आश्वासनांचेच डोंगर, कृती शून्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली असून, या हिवाळी अधिवेशनात कोणता लोकप्रतिनिधी हा मुद्दा ठामपणे मांडणार, याकडे लक्ष लागले आहे. तीन तालुक्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान धामणगाव मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांत उर्दू माध्यमातील विज्ञान महाविद्यालय नसल्याने, चांदूर रेल्वेत असे महाविद्यालय झाल्यास तिन्ही तालुक्यांना दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात पूर्वी नगरपरिषदेमध्ये ठरावही झाला होता. मात्र, अंमलबजावणीचा प्रश्न अद्याप धूसर आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत या प्रश्नावर वेगवेगळ्या पक्षांनी आश्वासने दिली. विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनीही उर्दू महाविद्यालय लवकरच सुरू होईल असा शब्द दिला होता.
सुरक्षा भिंती नसल्याने पन्नालाल नगरचा नाला खचला:रस्ता बंद, तब्बल 25 लाखाचा निधी मंजूर पण काम रखडले
पन्नालाल नगर येथील मोठ्या नाल्याला सुरक्षा भिंती नसल्याने तो खचला आहे. ४५ वर्षांपासून येण्या-जाण्यासाठी नाल्यालगत असलेला मुख्य रस्ता बंद झाला आहे. परिणामी, शेकडो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, युवकांना वळसा देत पर्यायी रस्त्याने आवागमन करावे लागत आहे. त्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी नाल्यात उतरून आक्रमक आंदोलन केले होते. सातत्याने आक्रमक पाठपुरावा केल्यामुळे मनपाने पन्नालालनगर येथील सोजतीया यांच्या घरापासून ते गहलोद यांच्या घरापर्यंत सुरक्षा भिंत बांधली. पण, त्यापुढील गहलोत ते शेंडे यांच्या घरापर्यंत खचलेला नाला दुरुस्त केला नाही. त्यामुळे लोडेड ट्रक नाल्यात कोसळला. त्यामुळे पन्नालालनगरचा रस्ता पुन्हा बंद झाला. बांबल स्थायी समिती सभापती असताना २०१६-१७ मध्ये शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यासाठी आमसभेत आणि स्थायी समितीमध्ये ठराव पारित करून शहरातील १६ मोठे नाले व १८ उपनाले यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधण्यासाठी पुण्याच्या युनिटी कंसल्टंट कंपनीने ३७५ कोटी ८० लाखांचा डीपीआर तयार केला होता. नाल्याला सुरक्षा भिंत बांधून नागरिकांचा येण्या-जाण्याचा पन्नालालनगर रस्ता सुरू करण्यात यावा या मागणीसाठी बांबल यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर गहलोत ते शेंडे यांच्या घरापर्यंत नाल्याला सुरक्षा भिंत बांधण्यासाठी २४ लाख ८० हजार रुपये मंजूर झाले. तसे लेखी पत्रही मनपाने दिले. परंतु, अद्याप कामाला सुरुवात झाली नाही. तरी या कामाला प्राधान्याने सुरुवात करावी. अन्यथा ३१ डिसेंबर रोजी नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा आयुक्तांच्या कक्षापुढे ठिय्या आंदोलन करू, असा इशारा अध्यक्ष बांबल यांनी मनपा आयुक्त सौंम्या शर्मा तसेच अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शहर अभियंता रवींद्र पवार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. यावेळी अनिल काळे, लक्ष्मणराव थेटे, निरज खेरडे, दीपक अनासने, संतोष सहारकर, शुभम बांबल, अविनाश मालोदे उपस्थित होते. संघर्ष युवक संघटना आक्रमक शहरातील साफसफाई व्यवस्थित होत नाही. राजापेठ ते पन्नालालनगर ते एचव्हीपीएमपर्यंत १७०० मीटर लांबीच्या मोठ्या नाल्याला दोन्ही बाजूंनी सुरक्षा संरक्षण भिंती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. तसेच लहान मुलांच्या स्मशानभूमी परिसरात लाईटची व्यवस्था नाही. शारदा नगर, गणेश कॉलनी, पन्नालाल नगर, कुसुंबा विहार, लक्ष्मी विहार, देवरनकर नगर, मुधोळकर पेठ, अंबापेठ, नमुना प्रभात कॉलनी, जनार्दन पेठ, स्व. वसंतराव नाईक नगर परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. पे ॲन्ड पार्किंग नको. गणेश कॉलनी उद्यानाचे सौंदर्यीकरण रखडल्याने संघर्ष युवक संघटना आक्रमक झाली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती व सरस्वती कला महाविद्यालय दहीहांडा अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ६ डिसेंबर या कालावधीत झालेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धेत अमरावतीच्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. श्री शिवाजी महाविद्यालयाने अंतिम लढतीत डिपीसीए महाविद्यालयाचा पराभव केला. या स्पर्धेमध्ये अमरावती विद्यापीठांतर्गत येणारे ३४ संघ सहभागी झाल्यामुळे त्यांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली होती. या स्पर्धेत श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती तसेच एचव्हीपीएमचे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन दोन्ही गटात विजेते ठरले. परिणामी उभय संघादरम्यान अंतिम सामना खेळवण्यात आला. डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती येथे झालेल्या अंतिम लढतीत श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या संघाने अमरावती एचव्हीएमच्या डीसीपीई संघावर चुरशीच्या सामन्यात मात करून जेतेपदावर ताबा मिळाला.खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल व केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सचिव ,यांनी शुभेच्छा देऊन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय कोषाध्यक्ष इंगोले यांच्या हस्ते व श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष प्र. गावंडे यांच्या उपस्थितीत संघाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या स्पर्धेत देशपातळीवर राज्याचे, अमरावती जिल्ह्याचे व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे नावलौकिक करेल असा विश्वासही याप्रसंगी दिलीपबाबू इंगोले यांनी व्यक्त केला. प्रत्येक गुणांसाठी चढाओढ श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय व डीसीपीई हे दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक गुणासाठी चढाओढ होती. उभय संघ मध्यंतरापर्यंत बरोबरीत होते. एकमेकांच्या गोलवर सातत्याने आक्रमक खेळत धडक देत होते. त्यामुळे त्यांचे गुण या अंतिम सामन्यात सुरुवातीपासून बरोबरीत होते. आक्रमण आणि बचावात दोन्ही संघ एकमेकांना तोडीस तोड टक्कर देत होती. परंतु, अंतिम क्षणांत श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने आक्रमणाची धार वाढवत आघाडी घेतली व जेतेपदावर ताबा मिळवला.
लाडक्या बहीणींसाठी पुन्हा निधी वळवला:सामाजिक न्याय विभागाकडून 671.35 कोटी; महायुतीची डोकेदुखी वाढली
राज्यातील सामाजिक न्याय व महिला-बाल विकास, आदिवासी विकास अशा महत्त्वाच्या विभागांनी पुन्हा एकदा माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. सोमवारी विधानसभेत सादर झालेल्या पुरवणी मागणीप्रमाणे, या योजनेसाठी विविध विभागांकडून एकत्रितपणे हजारो कोटींची रक्कम घेण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक न्याय विभागाकडून 671.35 कोटी, महिला व बाल विकास विभागाकडून 4882.56 कोटी, आणि आदिवासी विकास विभागाकडून 549.29 कोटी रुपये योजनेसाठी नवा निधी म्हणून राखीव ठेवण्यात आले आहेत. माझी लाडकी बहीण योजना, मुख्य उद्देशाने महिलांना सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक बळकटी देण्याचा असून, त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये समान संधी व सशक्तीकरणाची दिशा ठरवली जाते. सरकारचे मत आहे की, या निधीमुळे योजनेला नव्या जागतिक पातळीवर उभारता येईल आणि मोठ्या प्रमाणावर महिलांचा सामाजिक समावेश वाढेल. आर्थिक तरतूद निश्चित झाल्यामुळे शासनाकडे योजनेसाठी लागणारी संसाधने आणि तयारी यांचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. सामाजिक न्याय विभागावर ताण सामाजिक न्याय विभाग हा राज्यातील दुर्बल घटकांसाठी अनेक योजना राबवतो. पण आता त्याच विभागाच्या निधीचा वापर इतर योजनांसाठी होत असल्याने विभागीय पातळीवर नाराजीचे वातावरण असल्याचे समजते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या काही महत्त्वाच्या योजनांसाठी निधी अपुरा आहे. त्यामुळे भविष्यात लाभार्थ्यांच्या हप्त्यांमध्ये विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या आधी देखील याच विभागाचा निधी वळवण्यात आल्याने महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला होता. लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या घटली राज्य सरकारने गेल्या काही महिन्यांत या योजनेच्या निकषांमध्ये काटेकोरपणा आणला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. सरकारने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली असून, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे बंधनकारक केले आहे. लाभार्थी महिलांच्या वडिलांचे आणि पतीचे उत्पन्न तपासले जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लाभार्थ्यांची नावे आपोआप वगळली जातील. त्यामुळे पुढील काही महिन्यांत योजनेचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे. ई-केवायसीला सध्या मुदतवाढ देण्यात आली असली तरी पुढील काळात यामुळे लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा एकदा खळबजनक आरोप केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पैशांच्या भल्या मोठ्या गड्यांसह दिसत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओतील पैशांसह दिसणारा व्यक्ती हा आमदार असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नगापूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्याच दिवशी दानवे यांनी केलेल्या या आरोपामुळे अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची ही विरोधकांना चांगली संधी मिळाली आहे. या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी म्हटले की, 'या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?' असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, अंबादास दानवे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून राज्य सरकारवर आणि एका आमदारावर धक्कादायक आरोप केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या रोख पैशांच्या बॅगांसह दिसत असल्याचे, आणि तो व्यक्ती आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या आरोपांनंतर विधानसभेत आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण काही आमदारांकडे रोख रक्कमेचे गड्डे आहेत, असा आरोप दानवे यांनी केला. या व्हिडीओनंतर आता अधिवेशनात यावरुन विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी मिळाली आहे. विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला दानवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे व्हिडीओ सार्वजनिक करा आणि सर्वांना समजेल की काही आमदार पैशांच्या गड्ड्यांसह राजकीय बंदोबस्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे आमदार हे कोण आहेत आणि किती पैशांच्या बॅगांसह फिरत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावरून विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवला आहे, आणि हे प्रकरण कायदेशीर तपासामध्ये जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा व्हिडीओ सत्य आहे की केवळ राजकीय खेळ हे येणाऱ्या तपासात स्पष्ट होईल. मात्र, यावरुन सरकारवर दबाव वाढू शकतो.
समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे प्रस्ताव वेळेत सादर न करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा इशारा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांनी सोमवारी ता. 8 दिला आहे येथील सहायक आयुक्त समाज कल्याण सभागृहात सोमवारी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक मुख्याध्यापक यांची कार्यशाळा झाली. यावेळी सहायक आयुक्त गीता गुट्टे, अभिषेक राऊत, दीपक भगत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत गुठ्ठे यांनी मार्गदर्शन केले. समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेचे विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मुदतीत सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठीअर्ज कसे भरावेत, व्हाट्स ऍप नोंदी कशा भराव्यात याबाबत मुख्याध्यापकांना माहिती दिली. सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी सदरील माहिती अचूक भरावी. जिल्ह्यात शिष्यवृत्ती पासून एकही विद्यार्थी वंचित राहता कामा नये. त्यासाठी मुख्याध्यापकांनी नियोजनपूर्वक काम करावे. विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती एकत्रित करून सदर माहिती सादर करावी. वेळेत माहिती न देणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे मुख्याध्यापक व समाज कल्याण विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधावा अशा सूचनाही त्यांनी केल्या. या कार्यशाळेत 265 पेक्षा अधिक मुख्याध्यापक सहभागी झाले होते. मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापकांची तालुकानिहाय कार्यशाळा राबविण्यात येणार आहे. जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (इ. 5 वी ते 10 वी), अनुसूचित जातीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्ती योजना (इ. 10 वी), माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना (इ. 9 वी व 10 वी) तसेच अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना इत्यादी मॅट्रीकपूर्व योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. प्रत्येक पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तालुकानिहाय कार्यशाळांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. औंढा नागनाथ तालुक्यासाठी बुधवार, दि. 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे, सेनगाव तालुक्यासाठी गुरुवार, दि. 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, सेनगाव येथे तर वसमत तालुक्यासाठी शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता, पंचायत समिती, वसमत येथे कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत.
वसमत शहरातील एका भागात महिलेच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केला तसेच तिच्या पतीस शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 8 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा शहरातील शुभम मंडले हा मागील दोन महिन्यापासून पाठलाग करीत होता. मात्र त्या महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्यानंतरही तो सतत महिलेच्या पाठीमागेच लागत होता. दरम्यान, सोमवारी ता. 8 सायंकाळी सदर महिला घरात काम करीत असतांना शुभम याने त्या भाऊ संकेत याच्यासह महिलेच्या घरात प्रवेश केला. या प्रकारामुळे सदर महिला घाबरून गेले. यावेळी शुभमने त्या महिलेचा विनयभंग केला तसेच अश्लिल वर्तन केले. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडा ओरड केली असता महिलेचा पती आला. यावेळी त्यांनी महिलेच्या पतीला शिवीगाळ केली अन तेथून निघून गेले. त्यानंतर त्या महिलेने कुटुंबियांसह वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शुभम मंडले, संकेत मंडले यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक प्रणिता ढोरे, जमादार शेख नय्यर, काशीनाथ भोपे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली असून उपनिरीक्षक प्रणिता ढोरे पुढील तपास करीत आहेत.
वसमत तालुक्यातील गणेशपुर येथे नापिकी व कर्जाला कंटाळून 43 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोमवारी ता. 8 वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपुर येथील शेतकरी सखाराम वाघमारे (43) यांना त्यांच्या नावे 72 गुंठे शेत आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. या शेतीवर त्यांनी वसमत येथील भारतीय स्टेट बँक शाखेतून सुमारे 80 हजार रुपयांचे पिककर्ज काढले होते. या शिवाय बचतगटाची काही रक्कम देखील उचलली होती. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतातील पिके खरडून गेली. त्यामुळे आता पिककर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना सतावत होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे याबाबत ते नेहमीत घरी बोलत होते. दरम्यान, घरची सर्व मंडळी शेतात गेली असतांना त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची पुतणी शाळेतून घरी आल्यानंतर तिला हा प्रकार लक्षात आला. तिने तातडीने आरडा ओरड करून मदत मागितली तसेच शेतातील कुटुंबाला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. एम. कांबळे, आंबादास विभुते, विजयकुमार उपरे यांच्य पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत सखाराम वाघमारे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या प्रकरणी ओमकार वाघमारे यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 8 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कांबळे पुढील तपास करीत आहेत.
पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथे दत्तजयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दत्तजयंती महोत्सवाचे हे ४२ वे वर्ष होते. या महोत्सवाची सांगता डॉ. विकासनंदजी मिसाळ महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. या महोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहात दररोज कीर्तन, हरिपाठ व काकडा भजन झाले. गावकऱ्यांच्या गर्दीने भरलेला मंडप आणि दररोज प्रबोधन करणारी कीर्तनाने या सप्ताहार रंगत आली. ५ डिसेंबरला सकाळी ८ वाजता ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर डॉ. विकासनंदजी मिसाळ महाराज (सकाळी ९.३० ते ११.३०) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसाद वाटप झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहाजापूर ग्रामस्थ व शहाजापूर प्रगती विकास मंच प्रयत्नशील होते. तब्बल ४२ वर्षांची परंपरा शहजापूर येथील सप्ताह परिसरात प्रसिद्ध आहे. या सप्ताहात कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील गावातील पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील विविध प्रगवर्गातील ११ जोडप्यांच्या हस्ते भगवान दत्तात्रेयांना समर्पित एक महत्त्वपूर्ण यज्ञ-अनुष्ठान दत्तयाग करण्यात आला. दत्तयागामुळे आध्यात्मिक उन्नती, संकटमुक्ती आणि मनोकामना पूर्तीसाठी केला जातो. हा गुरुतत्त्वाशी एकरूप होण्याचा विधी आहे. यामध्ये गणपती पूजन, दत्तात्रेयांची स्थापना, संकल्प आणि आहुतींचा समावेश असतो. ज्याद्वारे भक्त आध्यात्मिक ज्ञान व मार्गदर्शन मिळवून जीवनातील अडथळे दूर करतात.
जुन्नरहून सुरु होणाऱ्या ‘बिबट्या संकटाच्या’ नवनवीन कहाण्या आता माणिकडोह बिबट निवारा केंद्रालाही ग्रासू लागल्या आहेत. फक्त ४५ बिबट्यांची क्षमता असलेल्या या केंद्रात तब्बल ११३ प्रौढ बिबट्यांची गर्दी आणि जागेअभावी दोन प्रौढ बिबटे एकाच २५० चौरस मीटरच्या कुंपणात. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांना सरळसरळ छेद देणारी ही स्थिती प्रशासनापुढे डोकेदुखी ठरली आहे. निवाऱ्यात जागेची टंचाई इतकी गंभीर झाली आहे की काही बिबट्यांना हालचालीसाठी मर्यादित जागा असलेल्या तात्पुरत्या लहान पिंजऱ्यांत ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तणाव, आक्रमकता आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा धोका वाढत चालला आहे, अशी कबुली वनाधिकारी देतात. अलीकडे शहरी आणि ग्रामीण पट्ट्यात बिबट्यांच्या वारंवार भेटी, उसाच्या शेतांत निर्माण झालेले नैसर्गिक आश्रय आणि गावकऱ्यांचा दबाव यामुळे मानव-बिबट्या संघर्ष झपाट्याने वाढत आहे. पुढील काही महिन्यांत पकडलेल्या बिबट्यांची संख्या आणखी वाढू शकते, असा इशारा विभागाने दिला आहे. सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस सांगतात,“आम्ही दररोज दोन ते तीन बिबटे पकडतो. फक्त दोन आठवड्यांत २५ बिबट्यांना पकडावे लागले.अशी आकडेवारीच परिस्थिती किती हाताबाहेर गेली आहे, हे सांगण्यासाठी पुरेशी आहे. प्रत्येक बिबटा रोज तीन किलो कोंबडी खातो. दररोजची खर्चाची रक्कम ३० हजार रुपयांपेक्षा अधिक. जे या केंद्राला परवडणारे नाही. जुन्नर,आंबेगाव,शिरूर परिसरात उसाच्या शेतांत बिबट्यांना मिळणारे नैसर्गिक आश्रय, वाढती पकड, वाढता संघर्ष या सर्वांची साखळी तोडण्यासाठी राज्यस्तरीय दीर्घकालीन धोरणाची गरज असल्याचे वनाधिकारी सांगतात. या संख्येसह काम करणे अशक्य होत चालले आहे. शाश्वत उपाय हवेत, अशी प्रतिक्रिया विभागाने दिली. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र. ४० नवीन कुंपण उभारणीचा प्रस्ताव प्रलंबित या गर्दीवर उतारा म्हणून देशभरातील विविध प्राणी संग्रहालयांना पत्र पाठवण्यात आले होते. त्याला चार ठिकाणांहून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच १० बिबट्यांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. माणिकडोह येथे ४० नवीन कुंपणांच्या उभारणीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. कामाचा आदेश दिलेला असला तरी १५ कोटी निधीचे वाटप आजतागायत झालेले नाही. त्यामुळे विस्तारकाम रखडले आहे आणि निवाऱ्यातील तणाव दररोज वाढत आहे. बिबट्यांच्या वाढीवर उपाययोजना हव्यात जुन्नर तालुक्यात २००० मध्ये बिबट्यांची समस्या सुरू झाली. त्यावेळी उप वनसंरक्षक अशोक खडसे यांनी बिबट्यांच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली उपाययोजना योग्य होती. त्यामुळे माणिकडोह बिबट निवारा प्रकल्पावर ताण नव्हता. मात्र त्यानंतर वन विभागाकडून बिबट्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ती कार्यवाही झाली नसल्याने बिबट्यांची संख्या वाढली आणि माणिकडोह बिबट निवारा प्रकल्पावर ताण आला,आता वन विभागाने सक्षमपणे काम करून बिबट्यांची समस्या सोडवणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच व्यवहारकुशलता, सृजनशीलता आणि सेवा वृत्ती जोपासली पाहिजे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते, असे प्रतिपादन प्राचार्य दिलीप भुजबळ यांनी केले. येथील महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, श्रीगोंदे येथे बाल आनंद मेळावा तसेच स्काऊट अंतर्गत खरी कमाई सेवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पीटर रणसिंग होते. त्यांनी विद्यार्थ्यांना खरी कमाई महोत्सवासाठी शुभेच्छा तसेच मानसिंग वाकडे यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. मंचावर दत्तात्रय खेतमाळीस, अनिता आमले, श्रीपाद कुलकर्णी, गौतम जगताप, संपत वाळुंज उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी कलाकुसरीच्या वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, विज्ञानावर आधारित मॉडेल्स, हस्तकला साहित्य, खेळणी, पुस्तकांचे स्टॉल अशा विविध उपक्रमांची आकर्षक मांडणी केली. सर्वच स्टॉल्सला पालक, विद्यार्थी व शिक्षकांचा प्रतिसाद लाभला. मेळाव्याचे नियोजन प्राचार्य भुजबळ, विभाग प्रमुख सुवर्णा शेलार व स्काऊट विभाग प्रमुख विकास लोखंडे उद्यम विभाग प्रमुख लालकृष्ण मुळे यांनी केले. विद्यार्थ्यांची तयारी, साहित्य व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, सेवा कार्य आणि मेळाव्याची संपूर्ण आखणी शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. ‘खरी कमाई सेवा महोत्सवा‘ अंतर्गत विद्यार्थ्यांनी कष्टातून मिळणाऱ्या कमाईचे महत्त्व जाणून घेतले. तसेच त्यातील काही रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्याचा संकल्पही केला. या आनंद मेळ्यात १ लाख ९ हजारांची विक्री झाली. मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे परिसरात सणासारखे वातावरण निर्माण झाले. शिक्षक व पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस, प्रशांत दरेकर यांनीही मेळाव्यास भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. बाल आनंद मेळावा , सक्षम कार्यक्रम आणि खरी कमाई सेवा महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या कलेला, कल्पनाशक्तीला आणि सेवाभावाला सुंदर असे व्यासपीठ मिळाले आणि कार्यक्रम सफलतेने पार पडला. प्रास्ताविक विलास दरेकर यांनी, सूत्रसंचालन सुधीर साबळे यांनी, तर आभार सचिन झगडे यांनी मानले.

29 C