SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

असा असतो का ‘इमानदार राजा’?

मुंबई : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी, मनसे आणि राज्यातील इतर राजकीय पक्षांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिका-यांची भेट घेतली. यावरून भाजपा नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी आचार्य चाणक्य यांचे एक वाक्य ट्वीट केले होते. शेलार यांनी म्हटले होते की, जब सारा विपक्ष एक हो जाए, तब समझो राजा इमानदार है. […] The post असा असतो का ‘इमानदार राजा’? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:47 pm

मुख्यमंत्री वगळता गुजरातमध्ये सर्व मंत्र्यांचे राजीनामे

गांधीनगर : दिवाळीच्या अगदी तोंडावर गुजरात मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोडून सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री पटेल यांनी मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावले आहे. नवीन मंत्र्यांचा शपथविधी उद्याच १७ ऑक्टोबर रोजी सकाळी गांधीनगर येथील महात्मा मंदिरात भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होतील. सध्याच्या […] The post मुख्यमंत्री वगळता गुजरातमध्ये सर्व मंत्र्यांचे राजीनामे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:43 pm

कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

पुणे : प्रतिनिधी जग वेगाने बदलत असून प्रत्येक क्षणाला नवा विचार,नवी व्यवस्था, नवे तंत्रज्ञान समोर येत असताना या अनिश्चित जगात कौशल्य मदतीला येऊ शकते.त्यामुळे सर्वांनी मिळून कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज आहे.असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या सहाव्या पदवीदान समारंभात ते बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात […] The post कौशल्याच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याची गरज : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:43 pm

एकाच वेळी २२ तृतीयपंथीयांचा आत्महत्येचा प्रयत्न

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. इंदूर शहरातील नंदलालपुरा भागात बुधवारी संध्याकाळी २२ तृतीयपंथीयांनी एकाच वेळी फिनाईल पिऊन सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर चार जणांनी एमवाय हॉस्पिटलबाहेर स्वत:वर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आणि बाटल्या जप्त केल्या. सध्या, फिनाईल प्यायलेल्या सर्व तृतीयपंथीयांना एमवाय […] The post एकाच वेळी २२ तृतीयपंथीयांचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:41 pm

ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी:वॉटर डिस्पेन्सरच्या खोक्यात निघाले प्लायवूडचे तुकडे अन् बंद पडलेले स्पिकर

अ‍ॅमेझॉन या बहुराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन मागविण्यात आलेल्या वॉटर डिस्पेन्सरच्या खोक्यात चक्क प्लायवूडचे तुकडे, बंद पडलेले स्पिकर व कचरा आढळून आला आहे. या प्रकारामुळे फसवणूक झाल्याची तक्रार वंचित बहूजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी गुरुवारी ता. १६ केली आहे. या संदर्भात वंचितचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांनी सांगितले की, त्यांनी कळमनुरी येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुका संपर्क कार्यालय सुरू केले आहे. नागरीक त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी घेऊन येतात. त्यानंतर आम्ही अडचणींचा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना थंड पाणी मिळावे या उद्देशाने आम्ही वॉटर डिस्पेन्सरची ऑनलाईन ऑर्डर दिली. ॲमेझॉनवरून देण्यात आलेल्या ऑर्डरनुसार आज त्यांना एका कंपनीचे वॉटर डिस्पेंन्सरचा पुरवठा करण्यात आला. या साहित्याचे त्यांनी १० हजार ५०० रुपयांचे पेमेंटही दिले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी पॅकिंग फोडले असता त्यांना चांगलाच धक्का बसला. या पॅकिंगमध्ये वॉटर डिस्पेन्सर ऐवजी चक्क प्लायवूडचे तुकडे, कार्टूनचे पुठ्ठे, बंद पडलेला स्पिकर तसेच कचरा आढळून आला. या संदर्भात आम्ही पार्सल देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. आम्ही खबरदारी म्हणून या वस्तूची पॅकिंग उघडत असतानाचे छायाचित्रीकरणही केले आहे. पण झाल्या प्रकाराने आमची फसवणूक झाली, असे ते म्हणाले. राजू कांबळे यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने कळमनुरी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान, नागरिकांनी ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 5:39 pm

ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना फटका!:एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांचीही होतेय परेशानी

एसटी बसच्या प्रवाशांना ऐन दिवाळीत नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने गावी प्रवास कसा करायचा असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने याचा एसटी महामंडळाला देखील फटका बसत असल्याचे दिसत असून या नवीन प्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले असल्याचे बोलले जात आहे. एसटी आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये दोन वर्षांपूर्वी महामंडळाने बदल केला होता. त्या माध्यमातून जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणण्यात आली. पण नवीन आरक्षण प्रणाली जास्तच किचकट असल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावरच ही प्रणाली बंद पडली असल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसण्याचे शक्यता आहे. नव्या प्रणालीमुळे खर्चात वाढ एसटी आरक्षणाच्या नव्या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांना मेमो देणे, मशीन इश्यू करणे यासाठी पूर्वी एका गाडीसाठी आरक्षण मेमो प्रिंट काढताना एक कागद लागत होता. आता एकाच मेमोची प्रिंट काढण्यासाठी तीन कागद लागत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचा खर्चही वाढला असल्याचे दिसून येत आहे. तसेच आधीची आरक्षण प्रणाली चांगली आणि सोयीस्कर होती. पण आता जी आरक्षण प्रणाली आहे ती अतिशय अवघड आणि खूप किचकट करण्यात आली असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे असल्याचे समजते. त्यामुळे केवळ प्रवासीच नव्हे तर एसटीचे कर्मचारी देखील या नव्या प्रणालीला वैतागले असल्याचे समजते. दिवाळीनिमित्त एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजारांचे सानुग्रह अनुदान दरम्यान, राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येणार आहे. तसेच 12 हजार रुपयांची उचल देखील देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. तसेच राज्य सरकारकडून 48 हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांची 2200 कोटी रुपयांची रक्कम देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 5:37 pm

महाविकास आघाडीत मीठाचा खडा?

मुंबर्द : प्रतिनिधी महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीवर केवळ शिक्कामोर्तब होणं शिल्लक असतानाच या युतीमुळे महाविकास आघाडीत मीठाचा खडा पडेल असे चित्र दिसत आहे. यामागील कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे […] The post महाविकास आघाडीत मीठाचा खडा? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:29 pm

विकास बेद्रेचे रोहित पवारांकडून कौतुक

मुंबई : मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने डॉक्टरकीचं कसलंही प्रशिक्षण घेतलं नसताना एका महिलेची प्रसुती केली. जो प्रसंग घडला तेच थ्री इडियट्स चित्रपटातील रँचोने केले होते. ख-या आयुष्यातील तोच रँचो हिरो ठरला असून त्याचे नाव विकास बेद्रे असे आहे. या तरुणाची जिकडे तिकडे चर्चा होते. आता याच विकासचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे […] The post विकास बेद्रेचे रोहित पवारांकडून कौतुक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:24 pm

बुलडाण्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदार;

बुलडाणा : प्रतिनिधी जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्तींची नावे, तसेच स्थानांतरित अधिका-यांची नावे देखील अद्याप यादीत असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे, निवडणूक आयोग बोगस नावे काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास एक लाखाहून […] The post बुलडाण्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदार; appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:22 pm

हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी आमचा उत्तम संवाद:संजय राऊत यांची स्पष्टोक्ती; काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याचा दावा फेटाळला

आमचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी उत्तम संवाद आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर त्यांच्या केंद्रातल्या नेत्यांना बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या मुद्यावर सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याला कथितपणे हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नाराज झालेल्या संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट दिल्ली स्थित काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुरूवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला असताना आता स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांपुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सपकाळ आमचे मित्र, त्यांच्याशी उत्तम संवाद संजय राऊत याविषयी बोलताना म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते आमचे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. आमचे उत्तम मित्र आहेत. त्यांच्याशी आमचा उत्तम संवादही आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर त्यांच्या केंद्रातल्या नेत्यांशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे. महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्यांच्यासोबत शिष्टमंडळात जायचा असेल, तर त्यांना ते त्यांच्या हायकमांडला कळवावे लागते. पण आमच्याकडे तसे नाही. आमचे हायकमांड महाराष्ट्रात आहेत. ते निर्णय घेते. हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंबंधी काही चर्चा केली असेल, तर ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी ही भूमिका मांडली की, आम्हाला केंद्रात विचारावे लागेल. त्यानुसार त्यांनी केंद्रात चर्चा केली. मला वाटते, त्या दिवशी हर्षवर्धन सपकाळ यांना दुसऱ्या बैठकीला दिल्लीत जायचे होते. त्यामुळे केंद्राने त्यांच्या हायकमांडने बाळासाहेब थोरात यांना शिष्टमंडळात पाठवले. त्यानुसार थोरात व वर्षा गायकवाड शिष्टमंडळात सहभागी झाल्या. हा विषय एवढ्यावरच आहे. तुम्ही हे प्रकरण उगीचच रंगवत आहेत. त्यात काही अर्थ नाही. महाराष्ट्रात अत्यंत भ्रष्टाचारी मंत्री बसलेत दादर येथे दरवर्षी मनसेकडून दीपोत्सव साजरा केला जातो. यंदा उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. पत्रकारांनी याविषयी संजय राऊत यांना छेडले. ते म्हणाले, आत्ता आकाश बदलले आहे. यावेळी दोन भाऊ एकत्र आल्यामुळे दिवाळीचा आकाशकंदिल अधिक तेजस्वी होईल. गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे दिलेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण असा बदल महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अत्यंत भ्रष्टाचारी मंत्री बसले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. मुख्यमंत्री अक्षरशः हतबल आहेत. अशा प्रकारचे पत्ते पिसण्याचे काम महाराष्ट्रात झाले, तर त्याचे महाराष्ट्र स्वागत करेल. राज ठाकरे यांच्या 19 तारखेच्या मेळाव्याचे निमंत्रण ठाकरे गटाला मिळाले का? असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी आपल्याला त्याची कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. योग्यवेळी योग्य घोषणा होत असतात, असे नमूद करत संजय राऊतांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची लवकरच घोषणा होणार असल्याचेही स्पष्ट केले. हे ही वाचा... मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा विरोध?:संजय राऊत यांनी हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती; काँग्रेसच्या वर्तुळात नाराजी मुंबई - राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज झालेत. त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण पुढील काही दिवसांत चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 5:16 pm

विदर्भात तब्बल २० हजार कोटींचा भ्रष्टाचार?

नागपूर : प्रतिनिधी महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भात राबवत असलेल्या धाडसत्रांमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच महसूल विभागाच्या अखत्यारित येणा-या भूखंड खरेदी-विक्रीची नोंदणी करणा-या सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयात एका अधिका-याच्याच ड्रॉव्हरमध्ये रोख रक्कम आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अशातच आता विदर्भातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून विदर्भात […] The post विदर्भात तब्बल २० हजार कोटींचा भ्रष्टाचार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 5:07 pm

महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी खोट्या मतदारांची नोंदणी:डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव असलेले आधार कार्ड! रोहित पवारांचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मतदार यादी तसेच मतचोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावेळी प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत दिसले. त्यानंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी स्क्रीनवर मतदारांची खोटी नावे टाकण्यात आल्याचे सांगत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्या नावे देखील आधार कार्ड असल्याचे दाखवले. रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सर्व नेते व त्यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब हे निवडणूक आयोगाकडे गेले होते. जी काही यादी आहे त्यावर आमचा आक्षेप आहे. काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा काढला होता. आता तुम्हाला यातील काही तांत्रिक बाबी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 2024 च्या लोकसभेचा जो काही निकाल एनडीएच्या विरोधात लागला होता. केंद्रात सत्ता आणण्यासाठी त्यांना बरीच समीकरणे जुळवावी लागली होती. मग महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी त्यांनी खोट्या मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप पवारांनी केला. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघात म्हणजे कर्जत जामखेड मतदारसंघात लोकसभा 2024 ते विधानसभा 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीत एकूण 14 हजार 113 मतदार वाढले. त्यानंतर 31 ऑगस्ट 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रति महिना 4891 मतदार वाढले. त्यामुळे निवडणूक आयोग लोकशाहीला मारते की काय असा प्रश्न आम्हाला पडला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आधार कार्ड यावेळी रोहित पवारांनी प्रात्यक्षिक दाखवत मतदारसंघातील पत्ता टाकला, यात त्यांनी 'पांढरा बंगला' असा कर्जत मधला पत्ता टाकायला सांगितला, त्यानंतर संपूर्ण तपशील भरायला सांगितला. तारीख 1825 मधली टाकली. त्यानंतर त्यांनी फेटा असलेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो अपलोड केला आणि लगेच डोनाल्ड तात्या ट्रम्प या नावाने संपूर्ण आधार कार्डच तयार झालेले प्रात्यक्षिक स्क्रीनवर दाखवले. यावरून खोटी माहिती कशी टाकली जाते ते रोहित पवार यांनी दाखवले. पिंपरीत 54000 मतदारांचा घोळ पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे 10230 नावे आहेत. वडगाव शेरीत 11064, खडकवासला येथून 12330, पर्वती मतदारसंघात 8238, हडपसर मतदारसंघात 12798 असे 54000 नावे वाढवली आहेत. आमचे कार्यकर्ते तिथे माणसे शोधायला गेली. पण एक सुद्धा माणूस तिथे सापडली नाहीत. अशोक पवार यांनी जसे सांगितले की, बसने तिथे लोक आणली. तिथे मतदान करुन घेतल्यानंतर परत त्यांना बसने पाठवले. पैसे देऊन लोकांना मतदानासाठी आणले. मतदान करुन घेतले आणि परत त्यांच्या मतदारसंघात पाठवले. मी पिंपरीचे उदाहरण दाखवले. तिथे 54000 मतदारांचा घोळ झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्ता संस्थेचे इंटरनेट आणि त्यांची वेबसाईट सांभाळण्याची जबाबदारी देवांग दवे नावाच्या व्यक्तीला निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सर्व माहिती असते. दवे भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवे यांच्याकडे सर्व माहिती होती. यादीत कुणाचे नाव घ्यायचे आणि कुणाचे नाव काढायचे हे दवेंनी त्या त्या मतदारसंघाच्या आमदारांना विश्वासात घेऊन केले, असे आमचे ठाम मत असल्याचे रोहित पवार म्हणाले. मतदार यादीचे विश्लेषण आम्हाला दिले पाहिजे पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, एवढी मोठी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्याला वेबसाईटच्या माध्यमातून मिळत असेल, आम्ही जेव्हा मागतो तेव्हा आम्हाला सांगितले जाते की देत नाही. आमच्या नेत्यांना सांगितले जाते की, ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मतदार यादीचे विश्लेषण आम्हाला दिले पाहिजे. अचानक वाढलेले मतदार होते कुठले आणि कसे आले याची माहिती आम्ही मागवली आहे. आम्हाला लेखी स्वरुपात स्ष्टपणे माहिती दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. डिजीटल मतदार याद्या देण्यात याव्यात. बीएलोच्या डायरी नोंदी कशा झाल्या याची माहिती मिळायला हवी. तसेच येणाऱ्या निवडणुकीत ते कसे होणार आहे, याची देखील माहिती आम्हाला हवी आहे. मतदानाच्या दिवसाचे सीसीटीव्ही हवे आहेत. शेवटच्या तासात 68 लाख लोकांनी मतदान केले. मग ते कोण होते ते आम्हाला बघायचे आहे, असेही यावेळी रोहित पवार यांनी म्हटले आहे. विधानसभेत सर्वात जास्त मतदार पनवेलमध्ये वाढले लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या काळात सर्वात जास्त मतदान हे पनवेलमध्ये वाढले आहे. इथे 65000 मतदार वाढले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये 57000 मतदार वाढले. भोसरीत 56000, मीरा भाईंदर 53000, नालासोपारा 50000, चिंचवड 45000, हडपसर 43000 अशा संख्येत सहा महिन्यांत मतदार वाढले आहेत, असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 5:04 pm

गुणरत्न सदावर्ते मुंबई ST बँकेतील हाणामारीवर संतप्त:आदिवासी महिलेला बेअब्रु करण्याचा आरोप; शिंदेंच्या शिवसेनेसोबत वाद वाढणार

मुंबई एसटी बँकेतील बैठकीत झालेल्या राड्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या संचालकांवर बैठकीला उपस्थित आदिवासी महिलांना कथितपणे बेअब्रु करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाची दाहकता वाढली आहे. मुंबई एसटी बँकेत बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत वकील गुणरत्न सदावर्ते व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदराव आडसूळ यांच्या संचालकांत वादावादी झाली होती. या वादावादीचे रुपांतर नंतर प्रत्यक्ष हाणामारीत झाले. संचालकांनी एकमेकांवर माईक फेकले. त्यात 2-3 संचालक जखमी झाले. या प्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी महिला संचालकांपुढे अश्लील हावभाव केल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा केला आहे. महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले सदावर्ते म्हणाले, कालच्या घटनेप्रकरणी आम्ही कुणाचेही नाव घेणार नाही. कारण, कायद्यात तसे नमूद आहे. पण कालच्या बैठकीत आमच्या महिलांविषयी अपशब्द वापरण्यात आले. आमची एक बहीण वंजारी समाजाची होती. त्या बहिणीविषयी अपशब्द वापरण्यात आले. विशाखा गाईडलाईन्सनुसार याचा समावेश महिला अत्याचारात होतो. पण या लोकांनी ते ही करून पाहिले. आमची दुसरी एक बहीण आदिवासी समाजाची होती. हे लोक त्या बैठकीत कसे व्यक्त झाले? हे सुद्धा आता पुराव्यानिशी कायदेशीर सत्य आहे. आदिवासी महिलेला बेअब्रु करण्याचा प्रयत्न या प्रकरणी काल एफआयआर दाखल झाला आहे. त्यातील तथ्य हे अत्यंत गंभीर आहेत. हे लोक कशाप्रकारे वर्तन करत होते हे त्यात आले. आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रु करण्याचा प्रयत्न केला. हे त्या एफआयआरमध्ये आले. या एफआयआरमध्ये विनयभंगाचा मुद्दा आला. आदिवासी महिलेवरील अॅट्रोसिटीच्या घटना रेकॉर्डवर येत नाहीत. पण कालची वस्तुस्थिती बोलकी आहे. दिसती आहे. मुंबई महानगरात घडली आहे. ते सुद्धा रेकॉर्डवर आले आहे. पोलिसांनी अत्यंच सचोटीने कालचा एफआयआर त्या लोकांविरोधात नोंदवला आहे. 7 वर्षे ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद मला त्या लोकांना सांगायचे आहे की, त्यांच्याविरोधातील कलमांतर्गत त्यांना 7 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. असे गंभीर कलमे त्या लोकांविरोधात पोलिसांनी काल नोंद केले आहेत. त्याचे पुरावे पोलिसांनी अत्यंत काळजीने एकत्रित केले आहेत. त्यामुळे या लोकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आमच्या संचालकांविरोधात एक थातूरमातूर तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात दंडाधिकारीस्तरीय शिक्षा होण्याचीही तरतूद नाही. किंबहुना आम्हाला पोलिसांपुढे जाऊनच त्या केसचा निपटारा करता येईल. त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी झाले आहे, असे सदावर्ते म्हणाले. हे ही वाचा... मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा विरोध?:संजय राऊत यांनी हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती; काँग्रेसच्या वर्तुळात नाराजी मुंबई - राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज झालेत. त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण पुढील काही दिवसांत चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 3:59 pm

ठाकरे गटाचे नेते भारत कोकाटेंचा भाजपात प्रवेश:निवडणुका एकत्र लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय - प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती काही ठिकाणी एकत्र लढणार तर काही ठिकाणी वेगवेगळी लढणार आहे, असे सांगितले जात आहे. यावर भाजपचे प्रदेशा, रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका एकत्र लढवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. भाजपचा कार्यकर्ता हा शिस्तप्रिय आहे. पक्ष जो निर्णय देतील, त्यावर ते काम करतील, असे रवींद्र चव्हाण म्हणाले. ठाकरे गटाचे नेते भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. नेतेमंडळी आपल्या सोईनुसार पक्षांतर करत असतानाच, आता उद्धव ठाकरे यांना पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारत कोकाटे यांचा पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेश सोहळ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नेमके काय म्हणाले रवींद्र चव्हाण? मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला निश्चितच बळ मिळेल, याची मला खात्री आहे. मी भारत कोकाटे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे भाजपमध्ये स्वागत करतो. उत्तर महाराष्ट्रातील सर्व संघटनात्मक जिल्ह्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या अनुषंगाने, रिकाम्या असलेल्या नगर पंचायती, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये निवडणुकीच्या संदर्भात संघटनात्मक रचना निश्चित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेण्याच्या दृष्टीकोनातून आजची बैठक घेतली, असे चव्हाण यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीत संपूर्ण आढावा सादर केला. एकत्र लढण्यावर वरिष्ठ पातळीवर निर्णय आगामी निवडणुकांत महायुतीच्या एकत्र लढण्यावरही रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे निर्णय घेतील, असे ते म्हणाले. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढल्या पाहिजेत, प्रत्येक कार्यकर्ता आपल्याला निवडणुका लढता याव्यात, यासाठी काम करत असतो. त्यामुळे त्यासंदर्भातील आचारसंहिता दिवाळीनंतर घोषित होईल. निवडणुका जवळ येतील, तेव्हा ते निर्णय वरीष्ठ पातळीवर तिनही नेते घेतील, असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. तसेच भाजपचा कार्यकर्ता हा अतिशय शिस्तप्रिय आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेतील, त्या निर्णयाबरोबर राहण्याची कार्यकर्त्यांची भूमिका राहील, असे चव्हाण यांनी सांगितले. मतदार याद्यांच्या मुद्यावर विरोधकांवर टीका मतदार याद्यांमधील कथित गोंधळावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मतदार यादीसंदर्भात एक प्रक्रिया असते. मतदार नोंदणी करणे, आक्षेपार्ह मतदारांवर आक्षेप घेणे, यासाठी निवडणूक आयोग कार्यक्रम देत असते आणि ही प्रक्रिया जाहीरपणे सुरू असते. निवडणूक घोषित होण्यापर्यंत मतदार नोंदणी आणि त्यात नावे टाकणे या सगळ्या प्रक्रिया सुरू असता. त्यानंतर त्यावर आक्षेप घेणे, आक्षेप घेण्यासाठी सुद्धा वेळ दिलेला असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहीत आहे. या गोष्टी जाहीरपणे होत असतात. प्रत्येक उमेदवार मतदारयादीचा अभ्यास करत असतो. त्यामुळे तो जो आक्षेप घेतो, तो तेथील निवडणूक अधिकाऱ्याने ग्राह्य धरला पाहिजे. विरोधकांकडून एक 'फेक नरेटिव्ह' तयार करण्याचा प्रयत्न आजपासून केला जात आहे. यासंदर्भातील सर्व अधिकार निवडणूक यंत्रणेकडे असतात आणि ते याबाबत योग्य निर्णय घेतात, असे कालही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले, असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना खोडून काढले. तसेच यासंदर्भातले सर्वच्यासर्व अधिकार निवडणूक यंत्रणेकडे असतात. ते याबाबत योग्य निर्णय घेतात, असे कालही देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 3:58 pm

नाशिकच्या कारागृहात ‘गांजापार्टी’

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी सुरु केलेली ‘कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम राज्यभरात चर्चेत आहे. पोलिसांच्या धाकाने एकीकडे अनेक गुन्हेगार बिळात लपून बसले आहेत. तर दुसरीकडे नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडून कायदा धाब्यावर बसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडून गांजासह अमली पदार्थांचे सेवन करतानाचे […] The post नाशिकच्या कारागृहात ‘गांजापार्टी’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 3:39 pm

आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई मागे; ‘एफडीए’ कडून‘क्लीन चिट’

मुंबई: प्रतिनिधी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचा-याला मारहाण केल्यामुळे चर्चेत आलेल्या आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने ‘एफडीए’ परवाना निलंबित केलेल्या आमदार निवासातील कॅन्टीनवरील (अजिंठा केटरर्स) कारवाई अवघ्या महिनाभरातच मागे घेण्यात आली आहे. कॅन्टीनमध्ये कोणतेही अवैध खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत, असे कारण देत ‘एफडीए’ ने उपाहारगृहाला ‘क्लीन चिट’ दिली आहे. शिवसेनेचे आमदार संजय […] The post आमदार निवासातील कॅन्टीनवरील कारवाई मागे; ‘एफडीए’ कडून‘क्लीन चिट’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 3:35 pm

आंघोळीनंतर उलट्या होऊन श्वानाचा मृत्यू:पेटशॉप मालकासह तिघांवर गुन्हा दाखल, कल्याणी नगरातील घटनेची पोलिसांनी घेतली नोंद

कल्याणीनगर येथील एका पेटशॉपमध्ये श्वानाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पेटशॉप मालकासह तिघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणी वेटीक पेटशॉपचे मालक, कर्मचारी इस्माइल शेख आणि राज उर्फ प्रदीप दास यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एका तरुणीने याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तक्रारदार तरुणीने 'डॅश' नावाचा श्वान पाळला होता. कल्याणीनगरमध्ये असलेल्या वेटीक पेटशॉपमध्ये श्वानांची देखभाल आणि निगराणी केली जाते. तरुणीने २८ सप्टेंबर रोजी तिच्या श्वानाला या पेटशॉपमध्ये पाठवले होते. श्वानाला आंघोळ घातल्यानंतर त्याला उलटी झाली आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पेटशॉपमधील कर्मचाऱ्यांनी श्वानाला योग्य पद्धतीने आंघोळ घातली नाही आणि त्यांच्या बेजबाबदारपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानुसार, प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम कलम ११ सह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस पाटील करत आहेत. लॅपटॉप चोरी करणार्‍याला अटक बेकायदेशिररित्या कंपनीतून दोन लॅपटॉप चोरी करून नेल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. हा प्रकार देवाची उरूळी येथील क्राऊन पाईप्स कंपनीमध्ये घडला. ऋषिकेश संपत गांधी (38, रा. घोरपडी पेठ, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रसाद राहु यशवंत (20, रा. बाळुमामा मंदीरा शेजारी, वडकी, हवेली) याला अटक करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 3:07 pm

अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाने रसिक मंत्रमुग्ध:'कला अनबॉक्स' अंतर्गत मैफलीचे द बॉक्स येथे आयोजन

तंतुवाद्यातील वैशिष्ट्यपूर्ण समजल्या जाणाऱ्या सरोद वादनातून उमटलेले राग शामकल्याणचे बोल, राग जोग आणि राग किरवाणी यांच्या सादरीकरणातून रसिकांची सायंकाळी सुरमय झाली. निमित्त होते पुण्यातील सुप्रसिद्ध सरोद वादक अनुपम जोशी यांच्या वादन मैफलीचे. कला अनबॉक्स या अंतर्गत या मैफलीचे आयोजन कर्वे रोड येथील द बॉक्स येथे करण्यात आले होते. अनुपम जोशी यांनी आपल्या वादनाच्या सुरुवातीस मैहर अंगाने जाणाऱ्या शाम कल्याण रागाचे वैशिष्ट्य दर्शवित आलाप, जोड, झाला प्रस्तुत करून रसिकांना मोहित केले. त्यानंतर तंतुवाद्य प्रकारात वाजविली जाणारी मासिदखानी गत सादर केली. यात सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांनी साडेचार मात्रांचा मुखडा असलेली अनोखी पद्धत मांडली आहे. ती दर्शविताना अनुपम जोशी यांनी राग जोगमधील तीन तालातील विलंबित व मध्यलयीतील सुमधुर रचना ऐकवली. सरोद वाद्याचे जनक समजल्या जाणाऱ्या रबाबच्या अंगाने राग किरवाणी सादर करून त्यांनी मैफलीची सांगता केली. बोलकारी पद्धतीने प्रभावीपणे केलेले सादरीकरण ऐकून रसिक अचंबित झाले. अनुपम जोशी यांना पुण्यातील प्रसिद्ध तबला वादक अनिरुद्ध शंकर यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पोरवाल यांनी केले. पूरग्रस्त नागरिकांसाठी अवामी महाज,आझम कॅम्पसची मदत महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'अवामी महाज' सामाजिक संघटना,महाराष्ट्र कॉसमोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट आणि डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ या संस्थांतर्फे पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नधान्य,भांडी,ब्लँकेट्स, कपडे,पिण्याचे पाणी, स्वच्छता साहित्य आणि वैद्यकीय मदत यांचे वितरण करण्यात आले. ही मदत मोहीम डॉ. पी.ए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार आणि संस्थेच्या उपाध्यक्षा आबेदा पी. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर, बीड,नांदेड,लातूर,उदगीर या परिसरात पार पडली.यासाठी तयार करण्यात आलेल्या संचात (किट)मध्ये ६० पेक्षा अधिक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.या कार्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्रातील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये जाऊन मदत पोहोचवली.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 3:02 pm

सलमानचे वडील सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला:शिवतीर्थाच्या बालकनीत रंगल्या गप्पा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेट असल्याची चर्चा

बॉलिवूडमधील दिग्गज पटकथालेखक आणि अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनी गुरुवारी सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे, त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि सलीम खान हे तिघेही ‘शिवतीर्थ’च्या बाल्कनीत हसत-गप्पा मारताना दिसले. सलीम खान आणि राज ठाकरे यांच्या या अचानक झालेल्या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या दोघांमधील भेटीमुळे राजकीय आणि सिनेसृष्टीतील वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. या भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी सलीम खान यांना 'शिवतीर्थ' निवासस्थान दाखवून दिले. राज ठाकरे आणि सलीम खान यांच्यातील संबंध हे फक्त राजकीय किंवा औपचारिक नाहीत, तर जुने मैत्रीपूर्ण नाते असल्याचे म्हटले जाते. काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनीही सलमान खानच्या निवासस्थानी भेट देऊन संवाद साधला होता. त्यामुळे या भेटीचा सूर सदिच्छा आणि आपुलकीचा असल्याचे म्हटले जात आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट? राज ठाकरे आणि सलीम खान यांच्या भेटीचा नेमका उद्देश स्पष्ट न झाल्याने अनेकांनी ही भेट दिवाळीपूर्व सदिच्छा भेट असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. दोघेही अनेक वर्षांपासून कलाक्षेत्राशी आणि समाजकार्याशी जवळून जोडलेले आहेत. राज ठाकरे हे स्वतः कलाप्रेमी आणि सिनेमा रसिक असल्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्याशी संपर्कात असतात. राज ठाकरेंच्या कार्यालयात आणि निवासस्थानी कलाविश्वातील व्यक्तिमत्त्वांचे सतत येणे-जाणे असते. सलीम खान यांची ही भेट त्याचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. सलीम खान मनसेच्या दीपोत्सवातला हजेरी लावणार? दरम्यान, राज ठाकरे यांचे चित्रपट प्रेम मनसेच्या दीपोत्सवातही पाहायला मिळते. मनसेच्या दीपोत्सवाला चित्रपटसृष्टीतील दिग्गज हजेरी लावत असतात. यावर्षी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवातचे उद्घाटन होणार आहे. सलीम खान यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने मनसेच्या या वर्षाच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंसोबत सलीम खान देखील उपस्थिती लावणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 2:59 pm

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद?

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना बंद केल्या जात असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावत कोणतीही योजना बंद केली नसल्याचे म्हटलं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या १० योजना बंद करण्यात आल्या आहेत. […] The post पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 2:28 pm

हिंगोलीत जनावरे चोरणाऱ्या तिघांना पकडले:४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली व सेनगाव तालुक्यातील जनावरे चोरणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहनांसह जनावरे विक्रीतून आलेली ४.५० लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. त्यांनी तीन ठिकाणी जनावरे चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली व सेनगाव तालुक्यात मागील काही दिवसांत जनावरे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. रात्रीच्या वेळी गावालगत असलेल्या गोठ्यातील तसेच शेतातील आखाड्यावर बांधलेली जनावरे चोरीला जात होती. त्यामुळे पशुपालकांमधून चिंतेचे वातावरण निर्माण झाले होेते. तर गुन्हा दाखल होऊनही चोरटे हाती लागत नव्हते. दरम्यान, या प्रकरणात पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार पांडूरंग राठोड, संदीप जाधव, नितीन गोरे, बालाजी मुंढे, धनंजय क्षिरसाग९र, शिवाजी इंगोले, निरंजन नलवार यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने अधिक माहिती घेतल्यानंतर हिंगोली ते कळमनुरी मार्गावरून रवी राऊत (रा. सेनगाव) यास अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने इतर दोघांसोबत जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी शेख इलियास, वेदांत शिंदे (रा. सेनगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून जनावरे चोरीसाठी वापरली जाणारी दोन चारचाकी वाहने तसेच चोरीची जनावरे विक्रीतून मिळालेली रक्कम असा ४.५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी सवड, हत्तापाटी व माझोड येथील जनावरे चोरीची कबुली दिली असून जिल्हयातील आणखी गुुन्हे उघडकीस येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 2:28 pm

उद्धव ठाकरेंचे अवसान अचानक का गळाले?:भाजपचा सवाल; हात फैलावून निवडणुका घेण्याचे आव्हान दिल्याची करून दिली आठवण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतदारयाद्या दुरुस्त होईपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या मागणीवरून सत्ताधारी भाजपने उद्धव ठाकरे यांना टोला हाणला आहे. गोळा करून जमवलेल्या गर्दीपुढे हात फैलावून निवडणुका घेण्याचे आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाचे अवसान असे अचानक कशाने गळून गेले? असा सवाल भाजपने या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना केला आहे. मतदारयाद्यांचे कारण पुढे करून विरोधक या निवडणुकांची चातकासारखी प्रतिक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचा आरोपही भाजपने यासंबंधी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदारयाद्या दुरुस्त होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांबणीवर टाकण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे व विरोधकांवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. ते म्हणाले, निमित्त मतदारयाद्यांच. काम निवडणूक टाळण्याच. कार्यकर्त्यांवर अन्यायाच. महाराष्ट्रातील ‘कार्यकर्त्यांच्या निवडणुका’ टाळण्याचा हा डाव! विधानसभेप्रमाणेच महापालिका - जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत पानिपत होणार यांचा अंदाज असल्यानेच मतदार यादीचे निमित्त करून उबाठा, काँग्रेस व शरद पवार गट यांनी संगनमत करून महाराष्ट्रातील ‘कार्यकर्त्यांच्या निवडणुका’ होऊ द्यायच्या नाहीत, असा खटाटोप सुरू केला आहे, हेच खरे सत्य आहे! निवडणुका पुढे ढकलणे हा कार्यकर्त्यांवर अन्याय उपाध्ये पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे लाखो कार्यकर्ते या निवडणुकांची चातकासारखी वाट पहात आहेत, अशा वेळी या निवडणुका पुढे ढकलण्याची नेत्यांची भूमिका मविआच्या कार्यकर्त्यांना सुध्दा पटणारी नाही. जनतेवर अन्याय करणारी ही मंडळी आता आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवरही अन्याय करायला मागेपुढे पहात नाहीत, हेदेखील यानिमित्ताने दिसत आहे. मतदार यादी निर्दोष झाली पाहिजे याबद्दल दुमत नाही. मग निवडणूक आयोगाने बिहार प्रमाणे देशभरात मतदार यादी संशोधन करण्याचे जाहीर करताच महाराष्ट्रातील याच राजकीय पक्षांनी त्या विरोधात का सूर लावला? बिहार मध्ये मतदार विशेष संशोधन मोहीमेला विरोध करणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात ही मागणी मान्य आहे का? विरोधकांनी भाषणबाजीशिवाय दुसरे काहीच केले नाही कोरोना पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. आधी कोरोना आणि मग याच विरोधकांनीच न्यायालयात घेतलेली धाव यामुळे निवडणुका सतत पुढे जात राहिल्या. या निवडणूका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे निवडणुका पुढे जाणे शक्य नाही हे माहिती असतानाही अशी मागणी मविआचे नेते करत आहेत. भाषणबाजीशिवाय मविआतील तिन्ही पक्षांनी प्रत्यक्षात लोकांत जाण्याचे कामच केले नाही, याउलट महायुती आपल्या कामाच्या जोरावर निवडणुकीला तयार आहे. पराभवाचे रडगाणे आधीच तयार करून ठेवण्याचे काम यानिमित्ताने मविआ करीत आहे, असे ते म्हणाले. ठाकरेंचे अवसान अचानक का गळाले? केशव उपाध्ये यांनी अन्य एका ट्विटद्वारे गोळा करून जमविलेल्या गर्दीसमोर हात फैलावून निवडणुका घेण्याचे आव्हान देणाऱ्या उबाठाचे अवसान असे अचानक कशाने गळून गेले? असा सवालही उद्धव ठाकरेंना टोला हाणताना उपस्थित केला आहे. शिवाजी पार्कवरील हसरा मेळावा आणि छत्रपती संभाजीनगरातील फसला मोर्चात पराभवाचे प्रतिबिंब पाहायला मिळाल्याने निवडणूक पुढे ढकलण्याची नौटंकी सुरू झाली. त्यासाठी सुद्धा, बंदूक मात्र राज ठाकरेंच्या खांद्यावर! वा रे मावळ्या, असे ते म्हणाले. ठाकरे बंधूंची युती काँग्रेससाठी अपशकुन भाजपच्या मु्ख्य प्रवक्त्यांनी महाविकास आघाडीच्या कालच्या पत्रकार परिषदेचा एक फोटो पोस्ट करत ठाकरे बंधूंची युती काँग्रेससाठी मुंबईत अपशकुन असल्याचाही आरोप केला. हा स्वबळ वाढविण्याचा मंत्र की कॉंग्रेसच्या अवसानघाताचे षडयंत्र? महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सामावून घेण्याचे उबाठा आणि राऊतांचे मनसुबे म्हणजे मुंबईत कॉंग्रेसला अपशकुन करण्याचे तंत्र आहे. हे माहीत असल्यामुळेच उबाठा आणि मनसेच्या मनोमीलनाच्या मध्ये कॉंग्रेसचा एक ‘थोर हात’ भक्कम भिंतीसारखा बसलाय!! एक फोटो हजार शब्दांचं काम करतो, ते असं! बाकीचं हायकमांड बघून घेईल, पण ये जो पब्लिक है, वो सब जानती है!, असे ते म्हणाले. दरम्यान, केशव उपाध्ये यांनी पोस्ट केलेल्या फोटोत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे उद्धव व राज ठाकरे यांच्या मध्यभागी बसल्याचे दिसून येत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 2:23 pm

भाजपने करार मोडला:त्यांच्या माजी नगरसेवकांची आमच्याकडेही मोठी यादी; युतीधर्मावरून आमदार बालाजी किणीकरांचा इशारा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे सत्र सुरू असून, अनेक नेते व पदाधिकारी आगामी निवडणुकीच्या तिकिटाच्या राजकारणात आपले गणित जुळवू पाहत आहेत. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षातील कार्यकर्ते सत्ताधारी गोटात सामील होताना दिसत असले, तरी अंबरनाथमध्ये मात्र मित्रपक्षांमध्येच परस्पर धुसफूस, आरोप-प्रत्यारोप आणि वादाचं नवीन पर्व सुरू झालं आहे. अलीकडेच अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2015 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव नंतर शिवसेनेत सामील झाले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत थेट भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये अप्रत्यक्ष आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. आमदार बालाजी किणीकर यांची तीव्र प्रतिक्रिया या घटनाक्रमानंतर अंबरनाथचे आमदार आणि शिवसेन नेते बालाजी किणीकर यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपने सुरेंद्र यादव यांना पक्षात घेऊन युतीधर्माचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी ठरले होते की युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षात घेतले जाणार नाही. मात्र, भाजपने हा करार मोडला आहे, असा थेट आरोप किणीकरांनी केला. त्यांनी पुढे स्पष्ट इशारा देत म्हटले, जर भाजप युतीधर्माचे पालन करणार नसेल, तर आमच्याकडेही भाजपच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी आहे. त्यांनाही आम्ही आमच्या पक्षात घेऊ शकतो. भाजप मौनात, युतीत तणाव वाढण्याची शक्यता किणीकर यांच्या या वक्तव्यामुळे अंबरनाथमधील महायुतीतील एकजूट धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. भाजपकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही औपचारिक प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर सत्ता वाटप, नगरसेवक उमेदवारी आणि संघटनात्मक भूमिका यांवर या घटनेचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युतीतील समन्वयासाठी वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबरनाथमधील समीकरणांवर परिणाम अंबरनाथ पालिका निवडणुका लक्षात घेता भाजप आणि शिंदे गटाने आतापर्यंत एकत्रितपणे मोर्चेबांधणी केली होती. मात्र, यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून, पक्षांतरांच्या या मालिकेमुळे युतीतील विश्वासाचे समीकरण ढासळू लागल्याचे जाणकारांचे मत आहे. आगामी काही दिवसांत या वादावर तोडगा न निघाल्यास, अंबरनाथ हे महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकते.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 2:11 pm

पुजा खेडकरच्या वडिलांना हायकोर्टाचा दिलासा:ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

एका ट्रक क्लीनरच्या अपहरण प्रकरणात अटकेपासून फरार असलेले निवृत्त आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. रस्ते अपघातानंतर ट्रक चालकाचे अपहरण केल्याचा आरोप खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकावर आहे. नवी मुंबईतील मुलुंड-आयरोली रस्त्यावर 22 वर्षीय ट्रक क्लीनर प्रल्हाद कुमार यांच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने चुकून दिलीप खेडकर यांच्या लँड क्रूझर गाडीला धक्का लागला. त्यानंतर रागाच्या भरात खेडकर आणि त्यांच्या अंगरक्षकाने ट्रक क्लीनरला मारहाण करून त्याला गाडीत बसवले आणि पोलिस ठाण्यात घेऊन जात आहोत या बहाण्याने अपहरण केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. कोर्टाने आधी जामीन फेटाळला, आज मंजूर 14 सप्टेंबरच्या सकाळी पोलिसांनी दिलीप खेडकर यांच्या घरातून अपहरण झालेला प्रल्हाद कुमार याला सुरक्षित सोडवले. या प्रकरणात दिलीप खेडकर 13 सप्टेंबरपासून फरार होते. त्यांचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज 6 ऑक्टोबरला न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, 16 ऑक्टोबरला बॉम्बे हायकोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पत्नी मनोरमा खेडकरवरही आरोप दरम्यान, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. त्यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यापासून अडथळा निर्माण केला आणि पतीला अटक टाळण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नवी मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, मनोरमा यांना घरी नोटीस बजावूनही त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. जेव्हा त्यांच्या वकिलांमार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, तेव्हा त्यांनी आपल्या अशिलाशी कोणताही संपर्क नसल्याचे सांगितले. पोलिसांनी न्यायालयाला कळवले की, मनोरमा खेडकर चौकशीसाठी सायंकाळी 6 वाजल्यानंतर हजर झाल्या. महिलांना सूर्यास्तानंतर चौकशीसाठी बोलवण्यास कायद्याने मनाई असताना, त्यांनी जाणीवपूर्वक चौकशीसाठी उशीर केला आणि तपासात सहकार्य केले नाही, असा आरोप पोलिसांनी केला होता. परस्पर अटकपूर्व जामीन मिळवला दरम्यान, या प्रकरणात मनोरमा खेडकर यांनाही 15 दिवसांपूर्वी अटकपूर्व जामीन मिळाला आहे. नवी मुंबईतील स्थानिक न्यायालयाने हा जमीन मंजूर केला. विशेष म्हणजे, मनोरमा या न्यायालयात हजर झाल्याची माहिती पोलिसांकडे नव्हती, अशी कबुली स्वतः पोलिसांनीच स्पष्ट केल्याचे समोर आले आहे. मनोरमा खेडकर यांचे वादाशी जुने नाते मनोरमा खेडकर यांचा हा वाद काही नवा नाही. यापूर्वी पुण्यातील चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात बनावट कागदपत्रांद्वारे जमीन व घराचा ताबा मिळवण्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी अनेक वेळा शासकीय अधिकाऱ्यांशी उर्मटपणे वागल्याच्या तक्रारीही नोंदवल्या गेल्या आहेत. त्यांच्या वर्तनामुळे परिसरात दहशत निर्माण झाल्याचे आरोप शेजाऱ्यांनी केले होते. वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर स्वतःही निलंबनानंतर चर्चेत असतानाच त्यांच्या आईचे असे कृत्य उघड झाल्याने पुन्हा एकदा खेडकर कुटुंबीय चर्चेत आले आहेत. सदर प्रकरणी खेडकर यांचा काही संबंध आहे का? ही कार खेडकर यांच्या घरी कशी आली? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत. या प्रकरणाचा तपास रबाळे पोलिस करत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणातून कोणती अधिक माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 2:10 pm

आरएसएस विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत केरळमधील तरुण आयटी इंजिनिअर आनंदू अजि यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनच्या परिसरात तीव्र आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा सरकारविरोधात घोषणा दिल्या. युवक […] The post आरएसएस विरोधात युवक काँग्रेस आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 2:08 pm

यंदा दिवाळी साजरी करणार नाही; पवार कुटुंबियांचा निर्णय

बारामती : प्रतिनिधी दिवाळीच्या सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारी सुरु असून बाजारपेठा सजल्या आहेत. राजकीय नेते देखील मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करत असतात. राज्यात पवार कुटुंबियांची दिवाळी ही नेहमी राजकीय चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया […] The post यंदा दिवाळी साजरी करणार नाही; पवार कुटुंबियांचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 2:06 pm

३१ लाख शेतकरी होणार बाद?

मुंबई : प्रतिनिधी पीएम किसान योजनेत मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. शेतकरी सध्या २१ व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. पण त्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३१ लाख शेतक-यांवर आसमानीच नाही तर सुलतानी संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. अर्थात केंद्र सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही. याविषयीच्या चर्चा मात्र जोरदार सुरू आहे. […] The post ३१ लाख शेतकरी होणार बाद? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 2:02 pm

बुलडाण्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदारांची नावे:सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

बुलडाणा जिल्ह्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. मृत व्यक्तींची नावे तसेच अनेक वर्षांपूर्वी स्थानांतरित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे अजूनही यादीत कायम असल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने या बोगस नोंदी काढून टाकण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोग बोगस नावे काढण्यास टाळाटाळ करत आहे, त्यामुळे मतदार यादीची पारदर्शकता धोक्यात आली आहे, असे गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. गायकवाड म्हणाले की, बुलडाणा जिल्ह्यातील मतदार यादीत सुमारे एक लाखाहून अधिक बोगस नावे कायम आहेत. अनेक व्यक्तींचा मृत्यू होऊन पंधरा वर्षे झाली तरी त्यांची नावे अद्याप यादीत आहेत. एवढेच नव्हे, तर पंधरा वर्षांपूर्वी बुलडाण्यात कार्यरत असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांची नावेही अजून यादीत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चार हजार मतदारांची यादी दिली आहे, ज्यांची नावे दोन ठिकाणी आढळली आहेत. मात्र, प्रशासनाने या संदर्भात अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही निवडणूक आयोगाला या बोगस नोंदींबाबत कळवले असता, त्यांनी उलट बोगस नावे काढू नका, अशी भूमिका घेतली. ही अत्यंत गंभीर आणि लोकशाहीविरोधी बाब आहे, असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. मतदारांची नावे ग्रामीण आणि शहरी, दोन्ही मतदार यादींमध्ये याचबरोबर, दुहेरी नोंदणी या प्रकारालाही गायकवाड यांनी वाचा फोडली. अनेक मतदार हे मूळ ग्रामीण भागातील रहिवासी असून ते देखील शहरी भागातील निवडणुकांमध्ये मतदानासाठी आपली नावे तिथे नोंदवतात, असा त्यांनी दावा केला. अशा मतदारांची नावे ग्रामीण आणि शहरी, दोन्ही मतदार यादींमध्ये असल्याने दुहेरी मतदानाचा प्रकार घडतो. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात येत आहे, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. त्यांनी जिल्हा प्रशासनाला अशा दुहेरी नोंदींची सखोल चौकशी करून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली. राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आमदार गायकवाड यांनी महायुतीच्या तयारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, राज्यात तिन्ही पक्षांची, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अशी महायुती व्हावी, अशी सर्व नेत्यांची इच्छा आहे. बुलडाणा जिल्ह्यातही युती करण्याचा कल स्पष्ट आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्षांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर घेतला जाईल. या वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. संजय राऊत ही एक विध्वंसक प्रवृत्ती याच पत्रकार परिषदेत आमदार गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत ही एक विध्वंसक प्रवृत्ती आहे. त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला आणि आता आघाडीतील पक्ष संपवण्याचे काम करत आहेत, असा थेट आरोप गायकवाडांनी केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेसला ते मान्य होणार नाही, हे आधीच स्पष्ट असल्याचे ते म्हणाले. एका मतदारापर्यंत तीन वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका गेल्या तर तो मतदार गोंधळतो आणि विश्वास हरवतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. प्रश्न निवडणूक यंत्रणेकडे बोट दाखवणारे यावरुन स्पष्ट होते की, बुलडाणा जिल्ह्यातील मतदार यादीतील त्रुटी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी केलेले आरोप केवळ प्रशासनावर नव्हे, तर संपूर्ण निवडणूक यंत्रणेकडे बोट दाखवणारे आहेत. येत्या काळात निवडणूक आयोग या आरोपांवर कोणती भूमिका घेतो आणि स्थानिक प्रशासन यावर काय कारवाई करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 1:59 pm

मनसेला सोबत घेण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा विरोध?:संजय राऊत यांनी हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती; काँग्रेसच्या वर्तुळात नाराजी

राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचे चित्र आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज झालेत. त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण पुढील काही दिवसांत चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा कळसाला पोहोचली आहे. हे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेत. त्यानंतर आता ते मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनाही संयुक्तपणे सामोरे जाण्याची शक्यता आहे. पण आता ठाकरे गटाकून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केल्याचा दावा केला जात आहे. त्यावर संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट दिल्ली स्थित काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती आहे. काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? उल्लेखनीय बाब म्हणजे मनसे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवार व बुधवार असे सलग 2 दिवस राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. विरोधकांच्या या शिष्टमंडळात सुरुवातीला हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव होते. पण ऐनवेळी त्यांना दिल्लीला जावे लागल्यामुळे त्यांना या शिष्टमंडळासोबत जाता आले नाही. पण आता त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागे संजय राऊत यांचे पत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण सपकाळ यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. ते या घटनाक्रमाविषयी बोलताना म्हणाले, निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेले शिष्टमंडळ हे मनसेला सोबत घेण्यासंदर्भात नव्हते. हे शिष्टमंडळ निवडणुकीतील घोटाळ्याविषयी निवडणूक आयोगाला भेटले. त्यात आघाडी किंवा युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आमचे लोक त्यात सहभागी झाले होते. मी सुद्धा या शिष्टमंडळासोबत जाणार होतो. पण मला ऐनवेळी दिल्लीतून बोलावणे आल्यामुळे मला तिकडे जावे लागले. मी पक्षाच्या कामासाठी दिल्लीला गेलो. आमचे नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाच्या मुद्यावर आपली विस्तृत भूमिका जाहीर केली आहे. आत्ता कुणाला आघाडीत घ्यायचे किंवा कुणाला घ्यायचे नाही याचा निर्णय दिल्लीत होईल. संजय राऊत आमच्या इंडिया आघाडीचे नेते आहेत. त्यांच्यासोबत संवाद साधण्यास मला कोणतीही समस्या नाही. मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देईन, असे ते म्हणाले. काँग्रेसचे राज्यातील नेते संजय राऊतांवर नाराज? दुसरीकडे, राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर आतापर्यंत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मूळात त्यांचे राजकारणच त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीत घेतले तर आपले हिंदी भाषिक मतदार दूर जातील अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यातच संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट हायकमांडकडे तक्रार केल्यामुळे काँग्रेसचे राज्यातील नेते नाराज झाल्याची माहिती आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 1:44 pm

अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला:म्हणाले - कुणी माझी मिमिक्री केल्याने माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस!

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मिमिक्री'द्वारे केलेली टीका धुडकवून लावली आहे. कुणी माझी मिमिक्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाही. मी काम करणारा माणूस आहे. काम करतच राहणार, असे ते म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यात त्यांनी मतदार यादीतील गैरसोयीची नावे काही तासांतच गायब केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या भेटीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री करून त्यांच्यावर निशाणा साधला होता. पत्रकारांनी याविषयी अजित पवारांना छेडले असता त्यांनी आपल्याला अशा प्रकारच्या मिमिक्रीमु्ळे काहीही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले. माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत - अजित पवार अजित पवार म्हणाले, कुणी माझी मिमिक्री केल्यामुळे माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील. पण मी काम करणारा माणूस आहे. मी काम करत राहीन. सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मिमिक्री कोण करते? मग मला त्यात पडायचे नाही. मी उत्तर दिल्यानंतर तुम्ही राज ठाकरे यांना प्रश्न विचारणार की, अजित पवार तुम्हाला असे म्हणत होते. मला या सगळ्यात पडायचे नाही. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? निवडणूक आयोगाच्या भेटीच्या निमित्ताने राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत दिसून आले. पत्रकारांनी याविषयी त्यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, मी 2017 मध्येही यांच्यासोबत दिसलो होतो. आता निवडणूक कशी होणार? हे महत्त्वाचे आहे. कुणासोबत होणार हे महत्त्वाचे नाही. 2017 च्या पत्रकार परिषदेतही मी हेच बोलत होतो. त्यावेळी काँग्रेससुद्धा होती. तसेच अजित पवारही होते. खरेतर त्यांनी आज आमच्यासोबत यायला हवे होते. कारण, त्यावेळी ते खूप तावातावाने बोलत होते. ते सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगत होते, असे राज ठाकरे अजित पवारांची नक्कल करताना म्हणाले. विरोधकांची मतदारयाद्या दुरुस्त करण्याची मागणी विरोधकांनी काल राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे व मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेऊन मतदारयाद्या दुरुस्त करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार यादीमधील अनंत चुका पुराव्यानिशी दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील या प्रकरणी म्हणाले, मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत. काही मतदार नोंद असलेल्या पत्त्यावर राहत नाही. घर क्रमांक चुकीचे आहेत. बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवले गेले आहेत. नाशिकमध्ये एकच घरात 813 मतदारांची नोंद आढळली. नालासोपारा मतदारसंघातील सुषमा गुप्ता या महिलेचे नाव 6 वेळा वेगवेगळ्या EPIC ID सह असल्याचे 12 ऑगस्ट रोजी विविध न्यूज चॅनलच्या बातम्यांमध्ये पुराव्यासह प्रसिद्ध केले गेले. त्यानंतर ते नाव हटवले गेले. हे नाव कोणी हटवले? हे नाव हटवण्याची तक्रार कोणी केला? आत्ता आमचा असा समज झाला आहे की, राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरा कुणीतरी चालवतो. निवडणुकीत मतदान झाल्यावर किती पुरुषांनी आणि महिलांनी मतदान केलं या याद्या दर तासाला जाहीर होतात. पण विधानसभेला ही सिस्टीम मोडण्यात आली. कोणी किती मतदान केलं हे दोन दिवसानंतर जाहीर करण्यात आले. हे पारदर्शक प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे ते म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 1:08 pm

धनत्रयोदशीआधी सोने प्रतितोळा १ लाख २८ हजार

जळगाव : प्रतिनिधी मागील काही आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत सोन्याची किंमत आवाक्यात येण्याची गुंतवणूक दारांची आशा धुळीस मिळाली. १६ ऑक्टोर रोजी सराफा बाजार उघडल्यानंतर सोने-चांदीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधी सोन्याची किंमत एक लाख २८ हजारांवर पोहचली आहे. अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि इतर भू-राजकीय तणाव यामुळे चांदी […] The post धनत्रयोदशीआधी सोने प्रतितोळा १ लाख २८ हजार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 1:06 pm

तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर नात्यातील ज्येष्ठ व्यक्ती अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ५९ वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मुलीची शाळा सुटल्यानंतर आरोपी तिथे जायचा. तिला आमिष दाखवत सोबत न्यायचा आणि तिच्यावर अत्याचार करायचा. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर शहरातील […] The post तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Oct 2025 1:03 pm

शुभपर्व : यंदा दिवाळी चित्रा नक्षत्रात; 12 राशींवर सकारात्मक परिणाम:लक्ष्मीपूजनासाठी 2 तासांचा मुहूर्त, जाणून घ्या पूजेचे मुहूर्त

यंदाची दिवाळी केवळ एक सण नाही, तर शुभ संधी, संपत्ती आणि समृद्धीचा सुवर्णकाळ घेऊन येत आहे. २१ ऑक्टोबरला होणारे लक्ष्मीपूजन यंदा चित्रा नक्षत्रात येत आहे. तूळ राशीत रवी-बुध एकत्र आल्याने 'बुधादित्य' नावाचा अत्यंत प्रभावशाली राजयोग तयार होत आहे. यामुळे जमीन आणि वाहन खरेदीला चालना मिळेल. राजकीय क्षेत्रात मोठे बदल संभवतात. १२ राशींसाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. धनलाभाच्या नवीन संधी घेऊन येत आहे. लक्ष्मीपूजनासाठी खास दोन तासांचा शुभ मुहूर्त उपलब्ध आहे. अवघ्या दोन दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. १७ ऑक्टोबरला वसुबारस, १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी, तर २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असल्याचे दाते पंचांगकर्त्यांनी सांगितले. असे आहेत पूजेचे मुहूर्त... धनत्रयोदशी (१८ ऑक्टो.) लक्ष्मीपूजन (२१ ऑक्टो.) पाडवा बारा राशींनी काय अर्पण करावे प्रदोष, गोरज मुहूर्त शुभ कार्यासाठी लाभदायकप्रदोष काळ आणि गोरज मुहूर्त शुभ कार्यासाठी फलदायी आहे. प्रदोष काळ संध्याकाळी ६.११ ते ७.४५ दरम्यान असून या वेळी पूजन आणि उपासना विशेष फलदायी ठरेल. - अनंत पांडव गुरुजी, ज्योतिषी

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 12:57 pm

वसतिगृहाकडे दुर्लक्ष करणे भोवले:येडशी तांडाच्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह तिघे निलंबित, अधीक्षकाला बेड्या

कळमनुरी तालुक्यातील येडशीतांडा येथील भोजाजी नाईक संस्थेच्या वतसीगृहाकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी ता. १५ रात्री उशिरा काढण्यात आले. संस्था प्रशासनाने हा निर्णय घेतला असून त्याबाबतची माहितीही इतर समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्याकडे देण्यात आली आहे. कळमनुरी तालुक्यातील येडशीतांडा येथे भोजाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळा असून याच शाळेला वसतिगृह देखील जोडण्यात आले आहे. या वसतिगृहामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी राहतात. वसतीगृहामध्ये तीन दिवसापुर्वी अनुचित प्रकार घडला होता. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १५ एका शिक्षकासह वसतीगृहाच्या अधीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, सदर प्रकरणात पालकांचा तसेच इतर गावकऱ्यांचा संस्था प्रशासनावरच रोष व्यक्त होऊ लागला आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आश्रमशाळा व वसतीगृहाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही केला जाऊ लागला आहे. पालकांचा वाढता रोष लक्षात घेता संस्था प्रशासनाने मुख्याध्यापकासह एक शिक्षक व एका अधीक्षकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. वसतिगृहाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गुठ्ठे तसेच शिक्षक महालिंग पटवे, अधीक्षक मोहन जाधव यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश काढून त्याची माहिती इतर मागास व बहुजन कल्याण विभाग हिंगोली यांना कळविली आहे. एकाच वेळी तिघांवर कारवाई झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांच्या पथकाने येडशीतांडा शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यानंतर याबाबत लवकरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. वसतिगृह अधीक्षकाला अटक येडशी तांडा वसतिगृहातील छेडछाड प्रकरणात फरार असलेल्या महालिंग पटवे व अधीक्षक मोहन जाधव यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार शेख बाबर, शिवाजी पवार यांच्या पथकाने बुधवारी ता. १५ रात्री मोहन जाधव यास अटक केली आहे. तर महालिंग पटवे याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 12:50 pm

गोकुळ दूध संघासमोर तणाव:आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट; डिबेंचर मुद्यावरून दूध उत्पादकांचा संघर्ष पेटला

राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी दूध संघांपैकी एक असलेल्या गोकुळ दूध संघावरून आता शेतकरी, संस्था चालक आणि प्रशासन यांच्यात तीव्र संघर्ष उभा ठाकला आहे. गोकुळ दूध संघाने दूध संस्थांच्या डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्याचा आरोप करत आज दूध उत्पादक शेतकरी आणि संस्था चालकांनी जनावरांसह जवाब दो मोर्चा काढला.दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या मुख्य कार्यालयापर्यंत हा भव्य मोर्चा निघाला. या आंदोलनात भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही सहभाग घेत अग्रभागी भूमिका बजावली. मोर्चाच्या नेतृत्वात असलेल्या शौमिका महाडिक यांनी स्पष्ट केले की, हा संघर्ष गोकुळ दूध संघाच्या विरोधात नसून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी आहे. गेल्या काही महिन्यांत संघाने डिबेंचरच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हक्काची मोठी रक्कम थकवली आहे. ती तातडीने परत मिळावी किंवा दूध दरामध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चाच्या शेवटी शेतकऱ्यांनी गोकुळ प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या मागण्या लेखी स्वरूपात सादर केल्या. शेतकऱ्यांनी दिवाळी आमची गोड करा, शेतकऱ्यांचा हक्क परत द्या, अशा घोषणा देत प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. डिबेंचर कपातीने संताप उसळला गोकुळ दूध संघाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दूध उत्पादक संस्थांना डिबेंचर स्वरूपात बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वर्षीच्या रकमेमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 40 टक्के कपात करण्यात आल्याचा आरोप संस्था चालकांनी केला आहे. गोकुळ प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या कपातीमागे बाजारभावातील चढउतार आणि खर्चवाढीचे कारण आहे. मात्र, शेतकरी आणि संस्था चालकांना हा निर्णय मान्य नाही. महागाई आणि उत्पादन खर्च वाढत असताना शेतकऱ्यांचा बोनस कमी करणे म्हणजे थेट अन्याय आहे, असे मत अनेक संस्थाचालकांनी व्यक्त केले. शौमिका महाडिक आक्रमक भूमिकेत गेल्या काही दिवसांपासून गोकुळ दूध संघातील कार्यपद्धती आणि आर्थिक निर्णयांबाबत विरोधी गट आक्रमक झाला आहे. चार दिवसांपूर्वीच शौमिका महाडिक आणि संस्था प्रतिनिधींनी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांना थेट घेराव घालून प्रश्न विचारले होते. त्यावेळीही डिबेंचर कपातीबाबत संतप्त चर्चा झाली होती. शौमिका महाडिक यांनी यावेळी संघावर प्रेम आहे, पण शेतकऱ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, असे ठामपणे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे गोकुळ संघाच्या आतील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. गोकुळ प्रशासनाकडून बचावात्मक भूमिका दरम्यान, गोकुळ दूध संघ प्रशासनाने या आरोपांना उत्तर देताना बचावात्मक भूमिका घेतली आहे. डिबेंचर कपातीचा निर्णय हा संघाच्या आर्थिक स्थितीचा आणि बाजारातील परिस्थितीचा विचार करून घेतला गेला आहे. शेतकऱ्यांचे हित आमच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आहे, असे कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की, संघाने गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या दुधाचे दर आणि बोनस यामध्ये स्थैर्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही गैरसमज निर्माण झाले असतील, तर ते संवादातून मिटवू. मात्र, शेतकरी आणि संस्था चालकांच्या भूमिकेत आक्रमकता पाहता, हा संघर्ष पुढील काही दिवसांमध्ये आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 12:41 pm

राजनाथ सिंह यांच्यापूर्वी मंचावर आला साप:संरक्षण मंत्र्यांच्या सिम्बॉयसिस येथील कार्यक्रमापूर्वी घडली घटना; मुख्यमंत्रीही हजर

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमापूर्वी व्यासपीठावर साप आल्यामुळे सुरक्षा यंत्रणांत एकच खळबळ माजली आहे. आता हा साप थेट व्यासपीठावर कसा आला? याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात असून, तपास यंत्रणा त्याचा तपास करत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. ते सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला हजर राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसह यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यक्रम स्थळी तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिथे प्रमुख पाहुणे बसणार होते, तिथेच एक साप आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची एकच धावपळ उडाली. हा साप दिसल्यानंतर तो व्यासपीठाखाली गेला. त्यानंतर मंत्री महोदय मंचावर येण्यापूर्वी त्याला तेथून हटवण्याचे आव्हान यंत्रणांपुढे उभे टाकले होते. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला होता. त्यावेळी तो साप मान्यवर बसणार असलेल्या व्यासपीठाखाली जाऊन बसला होता. त्यानंतर तो पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या हा कार्यक्रम सुरू असून, व्यासपीठावर राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित आहेत. या प्रकरणी सर्पमित्राला बोलावून सापाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माधुरी मिसाळ यांचा अवमान? या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळही उपस्थित राहिल्या. त्या विद्यापीठात दाखल झाल्या त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी गेटवर कुणीही आले नाही. त्यामुळे माधुरी मिसाळ चांगल्याच संतापल्या. त्यांनी सिम्बॉयसिस प्रशासनावर राज्यमंत्रिपदाच्या प्रोटोकॉलचा अवमान केल्याचा आरोप केला. या घटनाक्रमामुळे विद्यापीठ परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही पालकांनाही कार्यक्रमस्थळी जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. यामुळे त्यांनी सभागृहाबाहेर गोंधळ घातला. फडणवीसांनी विद्यार्थ्यांना काय केले मार्गदर्शन? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सिम्बॉयसिसने स्किल डेव्हलपमेंटमध्ये अग्रेसर होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पण इथे एयक स्किल मिसिंग आहे. ते म्हणजे आनंदी राहण्याचे व आनंदी जगण्याचे. याची पहिली स्टेप टाळ्या वाजवण्याची आहे. माझ्यासाठी किंवा इंतरांसाठी नव्हे, तर स्वतःसाठी टाळ्या वाजवा. भारताला महाशक्ती बनवायचे असेल तर कौशल्य विकासावर भर देणे काळाची गरज आहे. त्यामुळे मोठे व्हा. प्रगती करा. पण पुढे जाताना मागे वळून पाहा. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हे लक्षात ठेवून आपले योगदान द्या, असे फडणवीस म्हणाले. हे ही वाचा... मुंबईच्या रँचोने रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती:महिला डॉक्टरने VIDEO कॉलवरून केले मार्गदर्शन; 'थ्री इडियट्स'चा थरार प्रत्यक्षात मुंबई - मुंबईतील एका तरुणाने महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवरून केलेल्या सूचनांचे पालन करून एका महिलेची रेल्वेस्टेशनवर प्रसूती केल्याची विस्मयकारक घटना मुंबईत घडली आहे. आमीर खान अभिनित 'थ्री इडियट्स' चित्रपटात असाच एक प्रसंग दाखवण्यात आला होता. या प्रसंगाची साक्षात परिचिती या घटनेद्वारे मुंबईत आली असून, या खऱ्याखुऱ्या रँचोची सर्वत्र वाहवा होत आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 12:25 pm

नाशकात अजित पवार गटाला भाजपकडून धोबीपछाड:मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे भाजपत; ठाकरेंनाही धक्का

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातही महत्त्वाची राजकीय हालचाल सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा राजकीय धक्का बसला असून, त्यांचे सख्खे बंधू भारत कोकाटे हे आज भाजपत प्रवेश करणार आहेत. नाशिकमध्ये भाजपकडून सुरू असलेल्या पक्षबांधणी मोहिमेत या प्रवेशामुळे नव्या समीकरणांना चालना मिळाली आहे. अजित पवार गटासाठी हा धक्का ठरण्याची शक्यता असून, सिन्नर तालुक्यातील राजकीय हवामान पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. नाशिक महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने आक्रमक तयारी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवरील संघटन मजबूत करण्यावर आमचे पूर्ण लक्ष आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि माजी पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होण्यासाठी उत्सुक आहेत. भारत कोकाटे यांच्या प्रवेशामुळे सिन्नर तालुक्यात भाजपचा पाया अधिक मजबूत होईल, असा पक्षाचा दावा आहे. या प्रवेश सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. भाजपचे लक्ष्य फक्त नाशिकपुरते मर्यादित नसून, अजित पवार गटाचे वर्चस्व असलेल्या प्रदेशांमध्ये थेट प्रवेश करून राजकीय समीकरणे बदलण्याची रणनीती आखली गेली आहे. भारत कोकाटे यांचा स्थानिक स्तरावर त्यांचा चांगला प्रभाव भारत कोकाटे हे सिन्नर तालुक्यातील सोमठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. त्यांनी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी अशा विविध पदांवर काम केले आहे. स्थानिक स्तरावर त्यांचा चांगला प्रभाव असून, ते दीर्घकाळापासून ग्रामीण विकास आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांपासून माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या कुटुंबात मतभेद निर्माण झाले होते. या मतभेदांमुळे दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्या. विधानसभा निवडणुकीत या मतभेदांचा परिणाम माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारावर झाल्याची चर्चा होती. भारत कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता. सिन्नरमध्ये त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली होती, ज्याचा चांगला परिणाम मतदानावर झाल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. अजित पवार गटाला दुहेरी फटका भारत कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे अजित पवार गटाला एकाच वेळी दोन स्तरांवर फटका बसला आहे. एकीकडे नाशिक जिल्ह्यातील त्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे सिन्नरमध्ये भाजपच्या रूपाने नव्या प्रतिस्पर्ध्याचा उदय झाला आहे. अजित पवार गटासाठी सिन्नर तालुका महत्त्वाचा मानला जातो, कारण येथील ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे मुळ संघटन मजबूत आहे. मात्र, आता कोकाटे बंधूंच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका या संघटनेत गोंधळ निर्माण करू शकतात. भाजपनेही या संधीचा फायदा घेत अजितदादांना त्यांच्या गडातच शह देण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, पुण्यानंतर आता भाजपने नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटासाठी थेट धोबीपछाड देण्याचे धोरण स्वीकारले असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपसाठी नवी ताकद, ठाकरे गटालाही धक्का भारत कोकाटे यांच्या प्रवेशामुळे केवळ अजित पवार गटच नव्हे, तर शिवसेना ठाकरे गटासाठीही अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी ठाकरे गटासाठी काम केले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाने सिन्नरमधील विरोधी पक्षांचे एकत्रीकरण कमकुवत होण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर झालेल्या या घडामोडीमुळे राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. दरम्यान, भाजपकडून अजून काही स्थानिक नेते, माजी सरपंच आणि कार्यकर्ते पक्षात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात भाजप आणि अजित पवार गटातील संघर्ष अधिक तीव्र होणार हे निश्चित दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 12:20 pm

मराठवाड्यात 35 दिवसांत फक्त 27 कुणबी दाखले मंजूर:बबनराव तायवाडेंनी दाखवली आकडेवारी, मनोज जरांगेंना धक्का?

2 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे. तायवाडे यांच्या मते, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले, आणि त्यापैकी फक्त 27 अर्ज मंजूर झाले आहेत. बबनराव तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसणार आहे. ऑगस्टच्या अखेरीस 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाची घोषणा केली होती. या उपोषणात लाखो मराठा कार्यकर्ते सहभागी झाले. या उपोषणामुळे मुंबईतील वाहतूक जाम झाली होती आणि काही लोकांनी ही बाब हायकोर्टात नेली. हायकोर्टानंतर लगेचच राज्य सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या. अखेर 2 सप्टेंबर 2025 शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर मंजूर केल्यानंतर मनोज जरांगेंचे उपोषण सुटले. आता बबनराव तायवाडे यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. नेमके काय म्हणाले बबनराव तायवाडे? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी एका वृत्तवाहिनी संवाद साधताना मराठवाड्यात कुणबी जात प्रमाणपत्रासाठी किती अर्ज आले आणि किती प्रमाणपत्रे वितरीत झाली याची आकडेवारी दिली. ते म्हणाले, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत 2 सप्टेंबर ते 7 ॲाक्टोबर या कालावधीत फक्त 73 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी 27 अर्जच मंजूर झाल्याचा दावा डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला. 2 तारखेच्या जीआनंतर 35 दिवसांत मराठवाड्यात फक्त 27 अर्ज मान्य झाले. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचा सरकारी पुरावाच तायवाडे यांनी सादर केला. बबनराव तायवाडे पुढे म्हणाले, जर सरसकट ओबीसी प्रमाणपत्र मिळाले असते तर रांगा लागल्या असत्या. ओबीसी नेत्यांनी अभ्यास करुन वक्तव्य करावे. बेजबाबदारपणे वक्तव्य करु नये. ओबीसी तरुणांनी केलेल्या आत्महत्यांसाठी आरक्षण संपले म्हणणारे जबाबदार असल्याचा आरोप तायवाडे यांनी केला. 2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसी समाज आक्रमक हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर सातारा गॅझेटवरही लवकरच निर्णय अपेक्षित आहे. या जीआरवर मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार आणि इतर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ओबीसी समाजाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात तयारी केली आहे. मात्र, ओबीसी नेत्यांच्या या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बबनराव तायवाडे यांनी सादर केलेल्या आकडेवारीने मात्र खळबळ उडवून दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 12:11 pm

​​​​​​​नाशिकरोड कारागृहात कैद्यांचे अमली पदार्थांचे सेवन:मोबाईल वापरताना फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैद्यांनी कारागृहाच्या आत अमली पदार्थांचे सेवन करतानाचे आणि मोबाईल वापरतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये काही कैदी मोबाईलवर रील्स बनवताना दिसत आहेत, तर काहीजण तंबाखू आणि अन्य पदार्थांचे सेवन करताना स्पष्ट दिसत आहेत. या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर, तसेच अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्यातील सर्वाधिक सुरक्षित मानले जाणारे हे कारागृह वारंवार अशा घटनांमुळे चर्चेत येत आहे. या व्हायरल क्लिप्स नेमक्या कोणत्या कालखंडातील आहेत, आणि त्या खरोखरच नाशिकरोड कारागृहातीलच आहेत का, याबाबत चौकशी सुरू आहे. कारागृह प्रशासनाने प्राथमिक प्रतिसाद देताना या क्लिप्स जुन्या असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी योग, ध्यान, व्यावसायिक प्रशिक्षण आणि मानसिक आरोग्यविषयक सकारात्मक उपक्रम सुरू आहेत. काही असंतुष्ट व्यक्तींनी हे प्रयत्न कमी लेखण्यासाठी जुने व्हिडीओ पुन्हा व्हायरल केले आहेत, असे कारागृह अधीक्षकांनी स्पष्ट केले. मात्र, व्हिडीओमधील काही दृश्यांवरून ही घटना अलीकडील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासणी सुरू केली असून, व्हिडीओ तयार करण्यामागे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, हेही पाहिले जात आहे. पूर्वीही सुरक्षेचा भंग, पण धडा घेतला नाही नाशिकरोड कारागृहात यापूर्वीही मोबाईल वापर, ड्रग्ज, तंबाखू आणि बाहेरील संपर्क यासारख्या प्रकरणांचा भडका उडाला होता. विशेषतः 2016 मध्ये सलग काही दिवसांमध्ये अनेक मोबाईल जप्त झाले होते. 24 नोव्हेंबर 2016 रोजी सात मोबाईल सापडले, तर 23 डिसेंबर रोजी आठ मोबाईल जप्त करण्यात आले. 26 डिसेंबर रोजी तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, आणि दुसऱ्याच दिवशी अधिकृत नोंदीनुसार आणखी मोबाईल सापडले. या घटनांनंतर कारागृहातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्याचे आदेश देण्यात आले होते. संशयित कैद्यांना इतर कारागृहात हलवण्यात आले, पण काही वर्षांत पुन्हा त्याच समस्या उघड झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अनेक वेळा उघड झालेले प्रकार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. अमली पदार्थ कारागृहात कसे पोहोचतात? सुरक्षेच्या कडेकोट व्यवस्थेत असूनही कारागृहात अमली पदार्थ पोहोचण्याचे मार्ग अद्याप गूढच आहेत. काही कैदी सुटीवर जाऊन परतताना तंबाखू, गुटखा, ड्रग्ज किंवा इतर नशेचे पदार्थ प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवून आणतात, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. हे पदार्थ मातीच्या चिलीम किंवा साध्या कागदात लपवून सेवन केले जातात. तसेच, काही वेळा भेटीस आलेल्या व्यक्तींमार्फतही बाहेरील वस्तू आत पोहोचवण्याचे प्रकार घडतात. या संदर्भात कारागृह कर्मचाऱ्यांच्या शिथिलतेकडे बोट दाखवले जात आहे. मोबाईल वापर किंवा चार्जिंगसाठी आतून मदत मिळत असल्याची शक्यताही तपासात व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण सुरू केल्याचे सांगितले आहे. कैद्याचा शिपायावर हल्ला, वातावरण तणावपूर्ण या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी कारागृहात आणखी एक धक्कादायक घटना घडली. बंदीवान बिलाल अली हुसेन शेख या कैद्याने कारागृहातील शिपाई भाईदास भोई यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. या घटनेत शिपाई जखमी झाले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षेतील त्रुटी, शिस्तभंगाचे प्रकार आणि आता वाढत चाललेले हल्ल्याचे प्रकार, या सर्वांमुळे कारागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता अशा घटनांवर अंकुश ठेवणे आवश्यक आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 12:04 pm

ठाणे जिल्ह्यात भाजप–शिवसेनेत रंगला कलगीतुरा:महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या पदाधिकाऱ्यांची स्वबळाची तयारी

महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या गोटात पुन्हा एकदा अस्वस्थता वाढताना दिसत आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली असताना, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून ठाणे महापालिकेत शिवसेना स्वबळावर लढली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे महायुतीतील दोन प्रमुख घटक, भाजप आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आता उघडपणे दिसू लागला आहे. आनंद आश्रमात खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत ठाण्यातील शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आयोजित करण्यात आली होती. मात्र, बैठकीचा सूर भाजपविरोधी ठरला. या बैठकीत अनेक नगरसेवकांनी भाजपकडून ठाण्यातील विकासकामांमध्ये अडथळे आणले जात असल्याची तक्रार केली. काही पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भाजपचे नेते ठाण्यातील प्रकल्पांमध्ये हस्तक्षेप करत आहेत आणि शिवसेनेचे श्रेय हिसकावून घेत आहेत. पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिकेत शिवसेनेनेच वर्चस्व राखले पाहिजे, अशी मागणी खासदार मस्के यांच्याकडे केली. मस्के यांनी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला असला तरी नाराज पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला हादरतोय का? ठाणे हा एकनाथ शिंदेंचा राजकीय जन्मभूमी मानला जातो. आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांनी या शहरात आपला राजकीय पाया रचला आणि ठाण्याला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवले. मात्र, आता त्याच ठाण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाल्याने शिंदेंना आव्हान उभे राहिले आहे. भाजपने गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महापालिकेत आपली ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नगरसेवकांच्या संपर्क मोहिमा, विविध प्रभागांतील प्रकल्पांवर आपली छाप सोडण्याचे प्रयत्न, या सर्वांमुळे शिवसेना शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील नाते सत्तेसाठीच आहे. स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षात स्पर्धा टोकाला पोहोचली आहे. ठाणे हा शिंदेंचा अभेद्य गढ मानला जात असला तरी भाजप तेथे आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचा आत्मविश्वास वाढतोय भाजपने ठाण्यासह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या शहरी भागांत स्वबळाची तयारी सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यात मंत्री गणेश नाईक यांनी शिंदे गटावर केलेल्या टीकांनी वातावरण आणखी तापवले आहे. नाईक यांनी शिंदे पिता–पुत्रांवर सडकून प्रहार करत ठाणे आणि नवी मुंबई भाजपची पुढची प्रयोगभूमी असेल असे म्हटले आहे. त्यामुळे महायुतीतील ताणतणाव आता सार्वजनिक पातळीवर पोहोचले आहेत. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, भाजपला ठाणे महापालिकेत शिंदे गटावर अवलंबून राहायचे नाही, तर स्वतंत्र शक्ती म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपने ठाण्यात आपली संघटनात्मक ताकद वाढवली आहे आणि अनेक माजी नगरसेवकांना आपल्या गोटात ओढून घेतले आहे. नवी मुंबईतही महायुतीला तडा ठाण्याबरोबरच नवी मुंबईतही महायुतीत मतभेद उघड होत आहेत. नवी मुंबईत नुकतीच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिक नेत्यांनी स्पष्टपणे मांडणी केली की, नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर व्हायला हवा. या बैठकीत महायुती टिकवायची की नाही, याबद्दलचा निर्णय स्थानिक नेत्यांना घेण्यास सांगण्यात आला. फडणवीस यांनीही सूचक पद्धतीने नवी मुंबईसारख्या शहरात भाजपला नेतृत्व द्यायला हवे, असे मत मांडल्याची चर्चा आहे. ही भूमिका शिंदे गटाला धक्का देणारी ठरली आहे, कारण नवी मुंबई ही गणेश नाईक आणि शिंदे गटातील वैचारिक संघर्षाची नवी रंगभूमी ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 11:25 am

मुंबईच्या रँचोने रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती:महिला डॉक्टरने VIDEO कॉलवरून केले मार्गदर्शन; 'थ्री इडियट्स'चा थरार प्रत्यक्षात

मुंबईतील एका तरुणाने महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवरून केलेल्या सूचनांचे पालन करून एका महिलेची रेल्वेस्टेशनवर प्रसूती केल्याची विस्मयकारक घटना मुंबईत घडली आहे. आमीर खान अभिनित 'थ्री इडियट्स' चित्रपटात असाच एक प्रसंग दाखवण्यात आला होता. या प्रसंगाची साक्षात परिचिती या घटनेद्वारे मुंबईत आली असून, या खऱ्याखुऱ्या रँचोची सर्वत्र वाहवा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानंतर या घटनेची वाच्यता झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, विकास बेंद्रे असे महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या धाडसी तरुणाचे नाव आगहे. तो सुपे, तालुका कर्जत येथील रहिवासी आहे. तो बुधवारी मध्यरात्री मुंबईतील लोकलने प्रवास करत होता. रस्त्यात राम मंदिर रेल्वे स्टेशनवर एक महिला त्याला प्रसूती वेदनेने विव्हळत असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर त्याने आपला प्रवास तिथेच संपवत त्या महिलेच्या दिशेने धाव घेतली. तो तिथे पोहोचला तेव्हा महिलेचे मूल अर्धे बाहेर व अर्धे पोटात होते. महिला अवघडलेल्या स्थितीत होते. त्याने अनेक डॉक्टरांना फोन केले. पण रुग्णवाहिका तिथपर्यंत पोहोचण्यात विलंब होत होता. यामुळे महिलेचे प्राणही संकटात सापडण्याची भीती होती. तत्पूर्वी, महिलेच्या कुटुंबीयांनी तिला एका लगतच्या रुग्णालयात नेले होते. पण तिथे तिची प्रसूती करण्यास नकार देण्यात आला होता. अखेर विकासने आपल्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला. त्यानंतर तिने केलेल्या मार्गदर्शनानुसार त्याने त्या महिलेची यशस्वी प्रसूती केली. सध्या बाळ व बाळंतीन दोघेही सुखरूप आहेत. विकासच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार याविषयी बोलताना म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील सुपे (ता.कर्जत) येथील विकास बेंद्रे या तरुणाने कोणताही अनुभव नसताना एका अडलेल्या गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली. मुंबईत लोकलने प्रवास करत असताना राम मंदिर रेल्वे स्टेशन वर एक महिला प्रसूती वेदनेनं विव्हळत असल्याचं त्याला दिसलं. जवळ कुणी डॉक्टर नव्हता आणि संबंधित महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ॲम्बुलन्सही उपलब्ध होत नव्हती. परंतु प्रसूती वेदनेने विव्हळणाऱ्या या महिलेची अवस्था न पहावल्याने विकासने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन तिच्या सूचनेप्रमाणे यशस्वीपणे प्रसूती केली आणि वेदनांमधून त्या आईची सुटका केली. इथं जात-धर्म न पाहता माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे त्याने दाखवून दिलं. त्याच्या या धाडसाचं आणि त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं मनापासून कौतुक वाटतं. या कामाबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. हे ही वाचा... फडणवीसांचे शिंदेंना धक्क्यांवर धक्के:'नमो' नावाच्या 10 योजना बंद; शिंदेंना दैवत बदलण्याच्या अटीवरच चिन्ह, नाव दिल्याची दानवेंची टीका मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या तब्बल 10 योजना बंद केल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी हा दावा केला आहे. 'महाशक्ती'ने शिंदे गटाला बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते, अशी टीका त्यांनी या प्रकरणी केली आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 11:22 am

दिव्य मराठी अपडेट्स:सलमान खानचे वडील ज्येष्ठ अभिनेते सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 11:21 am

सदोष मतदार यादीवर निवडणूक म्हणजे तमाशा:भाजपची घोटाळे करण्याची फॅक्टरी, निवडणूक आयोग सत्य ऐकण्यास तयार नाही - संजय राऊत

निवडणूक मतदारयाद्यांच्या संदर्भात घोळ आणि घोटाळे केलेले आहेत, त्यावर काल निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. निवडणूक याद्याच जर गुन्हेगारी स्वरुपाच्या आणि सदोष असतील, तर त्या निवडणुकीला अर्थ काय? लोकशाहीमध्ये एक-एक मत महत्त्वाचे आहे, ते एक मतच चुकीच्या पद्धतीने जाणार असेल, तर निवडणुकीला अर्थ काय? ही सर्व भूमिका उदाहरणासह मांडल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. भाजप आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष कशाप्रकारे निवडणूक याद्यांमध्ये बसून २४ तास घोटाळे करतात, याचे पुरावे दिले. लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमध्ये घोटाळे करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फॅक्टरी उघडलेली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. राहुल गांधींसह आम्ही सगळे यावर आवाज उठवतोय. पण निवडणूक आयोग सत्य ऐकायला, पाहायला आणि आमच्या प्रश्नांवर उत्तर द्यायला तयार नाही, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आधी निवडणूक याद्या दुरुस्त करून निर्दोष करा, मग निवडणुका घ्या, अशी आमची भूमिका असेल, तर त्यात काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. अशा निवडणुका म्हणजे फार्स आणि तमाशा ठरतात, असेही संजय राऊत म्हणाले. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत...

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 11:09 am

फडणवीसांचे शिंदेंना धक्क्यांवर धक्के:'नमो' नावाच्या 10 योजना बंद; शिंदेंना दैवत बदलण्याच्या अटीवरच चिन्ह, नाव दिल्याची दानवेंची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू केलेल्या तब्बल 10 योजना बंद केल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी हा दावा केला आहे. 'महाशक्ती'ने शिंदे गटाला बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते, अशी टीका त्यांनी या प्रकरणी केली आहे. राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या काही योजना यापूर्वीच बंद केल्या आहेत. यात आनंदाचा शिधा याच्यासह इतर काही योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आलेल्या आर्थिक भारामुळे या योजना बंद केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या प्रकरणी सरकारला विरोधकांच्या चौफेर टीकेला सामोरे जावे लागत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने एकनाथ शिंदे यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेल्या तब्बल 10 योजना बंद करण्याचे धाडस दाखवले आहे. 'नमो' नावाने सुरू होणाऱ्या 10 योजना बंद अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने नमो महिला सशक्तीकरण योजना, नमो कामगार कल्याण योजना, नमो शेततळे अभियान, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना, नमो ग्राम सचिवालय योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना, नमो दिव्यांग शक्ती योजना, नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना, नमो शहर सौंदर्यीकरण योजना व नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना बंद केल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या योजना घोषित केल्या होत्या. असो! विषय हा आहे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन जन्मदिवस शिंदेंनी (घटनाबाह्य) मुख्यमंत्री म्हणून साजरा केले. तेव्हा या कटप्रमुखांना अशा योजना घोषित कराव्या वाटल्या नाहीत? का बरं? शिंदे गटाला 'महाशक्ती'ने बहुदा दैवत आणि देवघर बदलण्याच्याच अटींवर चिन्ह आणि नाव दिले होते, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दानवेंनी महाराष्ट्र बाळासाहेबांचा व भाजपची बी टीम, असे म्हणतही एकनाथ शिंदे यांना हिणवले आहे. यापूर्वी 8 योजनांवर मारली होती बंदची फुल्ली तत्पूर्वी, अन्य एका ट्विटद्वारे त्यांनी राज्य सरकारने शिंदेंच्या आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, रुपयात पीकविमा, स्वच्छता मॉनिटर, १ राज्य १ गणवेश, लाडक्या भावाला अपरेंटीसशिप, योजनादूत योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजना बंद केल्याचा दावा केला होता. सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील. योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असे दानवे या प्रकरणी म्हणाले होते. योजना बंद, पण देवाभाऊचे सरकार मात्र चालू उल्लेखनीय बाब म्हणजे दानवेंनी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला वाटप करण्यात आलेला भूखंड रद्द करण्यावरूनही सरकारवर निशाणा साधला होता. प्रहार संघटनेच्या ऑफिसची जागा सरकारने काढून घेतली. हे देवेंद्र फडणवीसांच्या एका फोनवर गुवाहाटीच्या विमानात बसल्याचे ओमप्रकाश कडू यांना मिळालेले रिटर्न गिफ्ट आहे! शिंदेंच्या काळातील योजना बंद, शिंदेंनी दिलेले पक्षाचे ऑफिस बंद, देवाभाऊचे सरकार मात्र चालू, असे ते याविषयी म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:58 am

संत्र्याबाबतचे सरकारी धोरण कुचकामी;‎बदल घडवण्यासाठी उठावाची गरजेचा‎:संत्रा उत्पादक परिषदेचा निर्णय दोन खासदार, आंध्र प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती‎

प्रतिनिधी | अमरावती संत्र्याबाबतचे सरकारी धोरण हे अत्यंत कुचकामी आहे. ते बदलण्यासाठी उठाव करावाच लागेल. त्यासाठीच्या तयारीला आतापासून लागण्याचे आवाहन आज, बुधवारी पार पडलेल्या संत्रा उत्पादक परिषदेत करण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वातील अखिल भारतीय किसान सभेच्या अमरावती जिल्हा शाखेने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित परिषदेचे उद्घाटन स्व. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी केले. मंचावर अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे, वर्ध्याचे खासदार अमर काळे, किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष हिरालाल परदेशी, आंध्र प्रदेशचे पुढारी व्ही. व्ही. प्रसाद, ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तुकाराम भस्मे, संत्रा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष ॲड. धनंजय तोटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय मंगळे, प्रा. महेंद्र मेटे, शाहीर धम्मा खडसे, प्रा. अरविंदराव वानखडे उपस्थित होते. परिषदेच्या उद्घाटन सत्रात राजन क्षीरसागर आणि व्ही. व्ही. प्रसाद यांचे बीजभाषण झाले. त्यांनी संत्रा उत्पादकांसोबतच शेतकऱ्यांची एकूणच दुरवस्था मांडली. कृषी प्रधान देश असला तरी देशभरात कृषीची कशी वाताहत झाली आहे, याचा आलेख त्यांनी यावेळी मांडला. दोघांच्याही मांडणीतून पेरणीपासून ते कापणीपर्यंतचे आणि शेती मशागतीपासून ते शेतीपिकांच्या बाजारपेठेपर्यंतचे मुद्दे स्पष्ट झाले. पीक विमा कंपन्यांनी केलेले घोळही त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. महाराष्ट्रात संत्रा उत्पादकांची जशी स्थिती आहे, तशीच विदारक अवस्था आंध्र प्रदेशात आंब्याची आहे. त्यामुळे सर्व फळपिक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी एकसंघ होऊन हा लढा पुढे नेला पाहिजे, असे मत व्ही. व्ही. प्रसाद यांनी मांडले. उद्घाटनपर भाषण करताना ॲड. हेलोंडे यांनी आपले विचार मांडले. संत्रा उत्पादकांसह सर्व शेतकऱ्यांची होत असलेली वाताहत लक्षात घेता किसान सभेने संघर्षाची धार अधिक तीव्र करावी, असे आवाहन भस्मे यांनी केले. त्यात सक्रीय सहभागाची हमीही दिली. स्वागतपर भाषणात प्रा. साहेबराव विधळे यांनी देशपातळीवर संघर्षाशिवाय पर्याय नाही, हे बिंबविले. संचालन प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी केले. प्रास्ताविक किसान सभेचे सरचिटणीस अशोक सोनारकर यांनी केले. ठरावांबाबत खासदारांची हमी खासदार बळवंतराव वानखडे यांनी परिषदेने पारित केलेल्या ठरावांशी सहमती दर्शवून आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान संत्रा उत्पादकांची बाजू मांडण्याचे अभिवचन दिले. त्याचवेळी खासदार अमर काळे यांनी किसान सभेच्या प्रतिनिधीमंडळाची देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:38 am

शिक्षकांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन:थकीत हप्ते खात्यात जमा करा; चंद्रशेखर भोयर

प्रतिनिधी | अमरावती शिक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व मागण्या संदर्भात शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक चंद्रशेखर भोयर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालत निवेदन सादर केले. प्रलंबित वाढीव टप्पे मंजूर करावेत आणि वेतन आयोगाचे थकीत हप्ते थेट शिक्षकांच्या खात्यात जमा करावे, अशी महत्त्वपूर्ण मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भोयर हे वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, जालना जिल्ह्यांतील शिक्षक संवाद दौऱ्यावर असताना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या संवादांमध्ये सैनिकी अंशतः अनुदानित शाळांना २०१९ पासून प्रलंबित असलेले वाढीव टप्पे तत्काळ मंजूर करावेत. तसेच जीपीएफ, एनपीएस, डीसीपीएस खाते नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ६ वा व ७ व्या वेतन आयोगाचे थकित हफ्ते थेट त्यांच्या वेतन खात्यात जमा करण्यात यावेत, असे दोन महत्त्वाचे मुद्दे शिक्षकांनी ठळकपणे उपस्थित केले. शिक्षक बांधवांच्या या न्याय्य मागण्यांची तत्काळ दखल घेत चंद्रशेखर भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अधिकृत निवेदनाद्वारे दोन्ही प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:37 am

डॉॅ. भाऊसाहेबांना अपेक्षित शिक्षण आणि विद्यार्थी सर्वगुण संपन्न असावा- काळमेघ:श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता‎

प्रतिनिधी | अमरावती ‘डॉ.भाऊसाहेबांना अपेक्षित शिक्षण व विद्यार्थी सर्वगुण संपन्न असावा,’ असे प्रतिपादन उद्घाटक हेमंतराव काळमेघ यांनी केले. येथील श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात बीएड प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यकारणी सदस्य शिवाजी शिक्षण संस्था हेमंत काळमेघ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय राऊत तर विचारपीठवर परिचय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समन्वयक ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख, जेष्ठ प्रा. डॉ. वनिता काळे, डॉ. अंजली ठाकरे हे उपस्थित होते. काळमेघ पुढे म्हणाले की, शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळताना सर्व शिक्षक आशावादी विद्याभासी दृढनिश्चय आरोग्यदायी व सकारात्मक असणे गरजेचे आहे. तसेच आजचा शिक्षक काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर करणारा असावा, याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता करून घ्यावा, असेही काळमेघ म्हणाले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक प्रा.डॉ अंजली ठाकरे, तर संचालन ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. आभार प्रा. डॉ. वनिता काळे यांनी केले. तसेच दुसरे पूष्प पर्यावरण आणि आपण व स्पर्धा परीक्षेची तयारी विषयावर प्रेरणादायी वक्ते पांडुरंग वऱ्हाडे यांनी गुंफले. प्रास्ताविक प्रा.डॉ. विनय राऊत संचालन ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख यांनी तर आभार डॉ. वनिता काळे यांनी केले. तसेच तिसरे पूष्प मानसिक स्वास्थ विषयी मार्गदर्शन केले. शिवाजी कुचे यांनी मानसिक स्वास्थ्य कल्याण या विषयावर केले. या प्रसंगी दुर्दम इच्छाशक्ती, सकारात्मक विचार असेल तर असाध्य ते साध्य होईल, असे मत त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांनी खचून न जाता टार्गेट ओरिएंटेड असावे. आत्मविश्वास असावा. तसेच एक ध्यान साधना रोज करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख संचालन रोशन गायगोले यांनी तर आभार डॉ. अंजली ठाकरे व सचिन काळबांडे यांनी केले. सहा दिवसीय या परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग डॉ. वनिता काळे, डॉ. किशोर क्षत्रिय, डॉ अंजली ठाकरे, डॉ. संगीता बिहाडे, ग्रंथपाल डॉ. माधुरी देशमुख, डॉ. वैशाली कडू, सुकेसिनी घोडेस्वार, डॉ. शिल्पा येळणे, राजू जामणीक, सुनीता गावंडे यांनीही महाविद्यालयाच्या विविध विभागांची बीएड् अभ्यासक्रमाची व उपक्रमांची माहिती प्रवेशित झालेल्या बीएडच्या नूतन विद्यार्थ्यांना करून दिले. परिचय प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व अतिथी पाहुण्यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन डॉ. विनय राऊत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे संजय बोबडे, प्रतीक वानखडे, आयुष धनवटे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास बीएड प्रथम व द्वितीय वर्षाच्या सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थिनींना दिले आरोग्य, संरक्षणाचे धडे ः गाडगेनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षण विजया पंधरे यांनी विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे व पोलिस हेल्पलाइन क्रमांक माहिती या विषयावर विचार व्यक्त केले. तसेच सामान्य जागरूकता निर्माण करून महिलांच्या आरोग्यास सक्षम बनवणे या विषयावर डॉ. दीपाली गुडधे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. संतोष बनसोड यांनी ‘७५ वर्षांचा संविधान प्रवास आणि यापुढील आव्हाने’ या विषयावर पुष्प गुंफले. संविधान भारतीय लोकशाहीचा आत्मा असून, त्याला अबाधित ठेवण्यासाठी तर शिक्षकांची भूमिका जागृतीसाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:30 am

लक्ष्मीच्या मूर्तींना विदर्भासह परराज्यात मागणी:अमरावती शहरात दरवर्षी तयार करतात ७० हजारांवर मूर्ती‎

प्रतिनिधी । अमरावती रेखीव चेहरा, आकर्षक कलाकुसर आणि उत्तम रंगसंगतीमुळे शहरात निर्मित श्री लक्ष्मींच्या मूर्तींना लक्ष्मीपूजनाला पूजा करण्यासाठी विदर्भासह परराज्यातही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नवरात्रोत्सव आटोपला की, लक्ष्मीच्या मूर्तींची सजावट सुरू होते. माती व काही प्रमाणात पीओपीपासून निर्मित या मूर्तींवर अंतिम हात फिरवला जातो. लक्ष्मीचा हसरा चेहरा व बैठकीतील मूर्ती मोठ्या प्रमाणात तयार केली जाते कारण तिलाच सर्वाधिक मागणी असते, असे मूर्तीकार प्रमोद जावरे यांनी सांगितले. शहरात लक्ष्मीच्या सुबक मूर्ती ५०० रु.पासून ते ३ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. या मूर्तींना साडी, चोळी घातली जाते. तसेच नाकात नथ, गळ्यात कृत्रिम हार, डोक्यावर ओढणी, कृत्रिम खडे, मोत्यांनी सजावट केली जाते. घरात पुजेसाठी अर्धा ते दीड फुटापर्यंत मूर्ती नागरिक खरेदी करतात. अनेकजण त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार मूर्तीची खरेदी करीत असतात. अगदी सुबकपणे तयार केलेली मूर्ती सर्वांच्या पसंतीस उतरते. एक मूर्ती सजवण्यासाठी किमान चार ते पाच तास लागतात. या देखण्या मूर्तींना जबलपूर, इंदूर, नागपूर, चंद्रपूर, धुळे, पुणे येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अमरावतीकर पुण्यात मोठ्या प्रमाणात स्थायिक झाल्यामुळे जर दिवाळीत त्यांना गृहनगरात येणे शक्य नसेल तर ते पुण्यातील घरीच लक्ष्मीच्या मूर्तीची पूजा करतात. त्यामुळे दरवर्षी अमरावतीतून मूर्ती मागवली जाते. तिला व्यवस्थित पॅक करून पार्सल केले जाते. पुण्यासह नागपुरातही अमरावतीत तयार झालेल्या अनेक मूर्ती दरवर्षी विक्रीसाठी मागवल्या जातात. अमरावती हे विदर्भातील कलेचे माहेरघर असून, येथे तीन कुंभारवाडे आहेत. येथे दरवर्षी श्री गणेश तसेच नवरात्रोत्सवात दुर्गा देवी, महाकाली, शारदा देवीच्या मूर्ती घडवल्या जातात. त्याचप्रमाणे दिवाळीतही लक्ष्मी देवीच्या मूर्ती तयार केल्या जातात. मूतीच्या चेहऱ्याची रंगरंगोटी हीच महत्त्वाची बाब असते. डोळे, नाक, ओठ जर सुबक असेल तर मूर्ती देखणी दिसते. चेहरा हसरा दिसावा यासाठी कलावंतांद्वारे विशेष परिश्रम घेतले जातात. यात अनुभवी असलेल्या पुरुष, महिला कलावंतांकडे चेहरा रंगवण्याचे काम असते. त्याचप्रमाणे मूर्तीची सजावट करण्यासाठीही विशेष कलावंत लागतात. या सर्वांच्या परिश्रमातून लक्ष्मी देवीची उत्तम मूर्ती घडते, असे मूर्तीकारांनी सांगितले. अमरावतीत दरवर्षी ६० ते ७० हजार लक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्या जातात. सर्वाधिक मागणी ही हसरा चेहरा व कृत्रिम दागिणे, साडी, चोळीने सजलेल्या मूर्तीला असते. यासाठी भाविक ३ ते ४ हजार रुपये देण्यास तयार असतात. अनेकजण वर्षभर या मूर्तीची पूजा करतात. विशेषत: प्रतिष्ठानांमध्ये अशा मूर्ती लक्ष्मी पूजनाला पूजेसह नियमित पूजेसाठी खरेदी केल्या जातात, अशी माहितीही मूर्तीकार प्रमोद जावरे यांनी दिली. अमरावती शहरात दरवर्षी तयार करतात ७० हजारांवर मूर्ती

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:29 am

बासलापुरात शेतकऱ्याचा रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू:कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंब मोठ्या अडचणीत

प्रतिनिधी | चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापूर येथील शेतकरी पंकज वसंतराव झाडे (वय ४२) यांचा बुधवारी रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाला. घरचा कर्ता पुरुष गमावल्याने त्यांचे कुटुंब मोठ्या अडचणीत आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार बासलापूरचे रहिवासी पंकज झाडे हे शेतात रोटावेटर चालवत होते. रोटावेटर चालवताना त्याच्या खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वीच त्यांनी नवीन रोटावेटर आणले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर रेल्वे पोलिस करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:28 am

विषारी कफ सिरफमुळे नागपूरमध्ये आणखी एक बळी:साडे वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान अंत, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

विषारी कफ सिरपमुळे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मुलांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. या सिरपमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी सकाळी छिंदवाडा जिल्ह्यातील चौरई परिसरातील आणखी एक साडेतीन वर्षांची निष्पाप बालिका, अंबिका विश्वकर्मा, हिचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूमुळे मध्य प्रदेशात विषारी सिरप प्रकरणामुळे बळी पडलेल्या मुलांचा आकडा आता 26 वर पोहोचला आहे. सध्या आणखी दोन मुले नागपूरच्या रुग्णालयांमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. एक महिन्यापासून नागपुरात उपचार सुरू मिळालेल्या माहितीनुसार, चौरई तालुक्यातील ककई बिल्वा गावची रहिवासी असलेली अंबिका विश्वकर्माची तब्येत सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला बिघडली होती. स्थानिक पातळीवर उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने कुटुंबीयांनी तिला 14 सप्टेंबर रोजी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणीत तिचे मूत्रपिंड निकामी झाल्याची पुष्टी केली होती. सुमारे महिनाभरापासून तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी उपचारादरम्यान अंबिकाने अखेरचा श्वास घेतला. नागपुरात मृत्युमुखी पडलेली ही 18 वी केस असून, सर्व मृत बालके मध्यप्रदेशातील आहेत. आतापर्यंत 26 निष्पाप जीवांचा बळी अंबिकाच्या मृत्यूमुळे राज्यात या विषारी सिरपमुळे बळी पडलेल्या मुलांची एकूण संख्या 26 झाली आहे. यापूर्वी, परासिया येथील मोरडोंगरी येथील रहिवासी असलेल्या एक वर्षाच्या गर्विक पवार याचाही नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अशा प्रकारे सतत होणाऱ्या या मृत्यूंमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. WHO कडून आरोग्यविषयक सूचना जारी दरम्यान, भेसळयुक्त कफ सिरपमुळे घडलेल्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने नुकतीच एक आरोग्यविषयक सूचना जारी केली आहे. या सूचनेद्वारे डब्ल्यूएचओने भारतात उत्पादित केलेल्या कोल्ड्रिफ (Coldrif), रेस्पीफ्रेश टीआर (Respifresh TR) आणि रीलाइफ (Relife) तीन खोकल्याच्या सिरपचा वापर आणि वितरण तातडीने थांबवण्याचा सल्ला दिला आहे. ही औषधे अनुक्रमे स्रिसन फार्मास्युटिकल्स, रेडनेक्स फार्मा, आणि शेप फार्मा यांनी तयार केली होती. या सिरपच्या काही बॅचच्या तपासणीत, डायथिलीन ग्लायकॉल (Diethylene Glycol - DEG) हे विषारी रसायन निर्धारित प्रमाणापेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळले आहे. हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. DEG मुळे मूत्रपिंडाचे गंभीर नुकसान होऊ शकते, ते मेंदूवर विपरीत परिणाम करते आणि विशेषतः लहान मुलांमध्ये मृत्यूचा धोका निर्माण करू शकते. डब्ल्यूएचओची जागतिक आरोग्य संस्थांना विनंती या गंभीर धोक्यामुळे, डब्ल्यूएचओने जागतिक आरोग्य संस्थांना आणि तज्ज्ञांना विशेष विनंती केली आहे की, या कंपन्यांनी डिसेंबर 2024 नंतर तयार केलेल्या सर्व औषधांची कठोर तपासणी करण्यात यावी. तसेच, तपासणी पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही औषधे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:28 am

जि. प. मतदारयादीतून ५ तालुक्यातील गावेच गायब; ७ तालुक्यामधून तक्रारी:निवडणूक विभागाचा अजब कारभार; २० हजार मतदारांत रोष‎

जि. प., पं. स. निवडणुका होणार असतानाच मतदार यादीतून गावेच्या गावे गायब झाल्याचे समोर आले आहे. प्रारुप मतदार यादीवर आक्षेपाची शेवटची तारीख मंगळवार, १४ ऑक्टोबरला संपली. या दरम्यान मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व वरुड तालुक्यात तक्रारी दाखल झाल्या असून, सुमारे २० हजार मतदारांवर मतदानापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. जि. प., पं. स. प्रारुप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रकाशित झाली. ही यादी १ जुलैला असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या याद्यांना विभाजित करुन तयार केली. याच यादीवर अनेक राजकीय पक्षांचे आक्षेप असताना तीच आधारभूत मानून यंत्रणेने आणखी एक घोळ केला आहे. त्यामुळे ज्या गावांतील नागरिकांची नावे यादीतून गायब झाली आहेत, त्यांच्यात रोष निर्माण झाला असून, ठिकठिकाणच्या नागरिकांनी तेथील तहसीलदारांकडे तक्रारी केल्या. या तक्रारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांपर्यं त पोहोचल्या असून, यंत्रणेच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अंजनगाव सुर्जीच्या मतदार यादीत सर्वाधिक घोळ झाला. या तालुक्यातील टाकरखेडा मोरे, अहमदपूर, धनेगाव, रौंदळपूर, पोही, रत्नापूर (पोही), जवळा बुद्रूक, जवळा खुर्द, औरंगपूर, सैदापूर, डोंगरगाव (तुरखेड), मलकापूर बुद्रूक, अडगाव खाडे, नवापूर, मासमापूर, मूर्तिजापूर, घोंगर्डा, हसनापूर, पार्डी, शिरजगाव, कारला, निमखेड आड, जवर्डीं, धुळकी आदी गावांतील नागरिकांची नावे मतदार यादीत नाहीत. असाच प्रकार दर्यापूर तालुक्यातही घडला. या तालुक्यात जि.प.चे येवदा, खल्लार, थिलोरी, पिंपळोद असे चार मतदारसंघ आहेत. उर्वरित. पान ४ अमरावती जि.प.त ५९ मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील १४ पं. स. मतदारसंघांची एकूण संख्या १०८ आहे. या मतदार संघांची रचना यापूर्वीच घोषित झाली. प्रत्येक मतदारसंघांचे आरक्षणही लोकांपर्यंत गेले आहे. मतदार यादीचा कार्यक्रम घोषित झाला असून, तो २७ ऑक्टोबरला पूर्णत्वास जाणार आहे. आता निवडणुकीच्या तारखांची घोषणा शिल्लक आहे. येत्या काळात त्याचाही खुलासा होणार आहे. आता प्रतीक्षा निवडणुकांच्या तारखांची मतदारयादी दुरुस्त करण्याचे काम सुरू ^मतदार याद्यांमधून गावे गायब होणे, ही नवी मतदार यादी तयार करताना झालेली बाब आहे. त्याला चूक म्हणता येणार नाही. विधानसभेची यादी विभाजित करताना मनपा, नगरपालिका, नगर पंचायतीचे क्षेत्र वगळावे लागते. काही गावे ग्रामपंचायत क्षेत्रातून नगरपालिका, नगरपंचायतींतसमाविष्ट झाली आहेत. त्याचेही अवलोकन करावे लागते. हे करताना महसूल यंत्रणेतील लेखनिकां कडून अशा बाबी घडणे याला चूक नव्हे तर नजरचुकीचा भाग म्हणता येईल. मात्र आम्ही तो दुरुस्त करणे सुरु केले. ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी, जि.प., पं. स निवडणूक विभाग, अमरावती. यासंदर्भात निवडणूक आयोग काय म्हणतो ? जि.प., पं.स. च्या मतदार याद्या तयार करताना विधानसभेचीच मतदार यादी कायम ठेवली जाणार आहे. त्यात असलेली मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातील. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे आदी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाणार नाही. मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतील.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:27 am

बनावट चलनी नोटांचा रहाटगावात गोरखधंदा:तिघे ताब्यात, एक फरार, पोलिसांची कारवाई‎

प्रतिनिधी । नांदगाव पेठ रहाटगाव चौक परिसरात काही इसम बनावट चलनी नोटा दैनंदिन व्यवहारात वापरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत तीन संशयितांना पकडले. त्यांच्याकडून या कारवाईत २६,५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. मुख्य सुत्रधार फरार असल्याचे समोर आले आहे. मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या प्रकरणी आणखी खुलासा होण्याची शक्यता आहे. पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना रहाटगाव परिसरात बनावट चलनी नोटांचा वापर होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिस पथकासह उपलब्ध पंचांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. रहाटगाव येथील वृंदावन कॉलनी परिसरात बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार काही व्यक्ती अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेला बसलेले दिसून आले. पोलिसांनी शासकीय वाहन थोड्या अंतरावर उभे करून शिताफीने सापळा रचला व तीन संशयितांना जागीच पकडले. आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना नाव विचारले असता त्यांची नावे संचित अरविंद चव्हाण (वय १९, रा. मिलिंदनगर, रहाटगाव प्लॉट), दीपक बाबुलाल खंडारे (वय ३२, रा. पंचशिल नगर, रहाटगाव) आणि संघरत्न राजेंद्र मोटघरे (वय ३६, रा. जुनी वस्ती, मशीदजवळ, रहाटगाव) अशी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात याआधी बनावट नोटांची दोन प्रकरणे गेल्या वर्षी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बँकेत ५०० रु.च्या २० नोटा आढळल्या होत्या. ५ ते ६ महिन्यांआधी चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतही १०० रुपयांच्या बनावट चलनी नोटा आढळल्या होत्या. त्यानंतर आता रहाटगाव येथे २६,५०० रु.च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:27 am

फटाक्यांच्या किमतीत १० ते १५ टक्के वाढ:जीएसटीच्या सवलतीतून यंदा फटाक्यांना वगळले तरीही किमती वाढल्या‎

प्रतिनिधी| खामगाव केंद्र सरकारने जीएसटीचे दर कमी केल्यामुळे यंदा फटाक्यांच्या किंमती कमी होतील, असे नागरिकांना वाटले होते. परंतु फटाक्याच्या किंमती कमी होण्याऐवजी किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना महागाईच्या काळात अधिकचे पैसे मोजून फटाके खरेदी करावे लागणार आहेत. दिवाळी सण आला की,लहान मुलांना फटाके खरेदी करण्याचे आकर्षण असते. फटाक्याच्या विक्रीतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदानावर चिल्लर फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे आकाशात उडणारे रॉकेट, लहान मोठ्या फुलझाड्या, पेन्सिल फुलझड्या, सद्दाम, ललकार, चॅम्पियन या कंपनीसह वेगवेगळ्या कंपनीचे बॉम्ब, झाड, आकाशात जाऊन फुटणारे माइन्स व मल्टि कलर शॉर्टचे रॉकेट, दोरीचा फटाक्यांसह विविध प्रकारचे व विविध कंपन्यांचे फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. दिवाळीच्या सणाला अवघे ४ ते ५ दिवसांच्या कालावधी शिल्लक असताना ग्राहकांकडून फटाक्यांची पाहिजे त्या प्रमाणात मागणी दिसून येत नाही. काही लोक लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी फटाक्यांची खरेदी करतात. कारण फटाके हे ज्वलन शील असल्याने जास्त दिवस हे फटाके घरात ठेवण्याची भीतीदायक असते. ही भीतीदायक बहुतांश लोक घेण्यास तयार होत नाही. जसजसे दिवाळीचे दिवस जवळ येतील, त्याप्रमाणे फटाक्यांच्या विक्रीत वाढ होईल, असे एका फटाका विक्रेत्याने सांगीतले. फटाक्याच्या विक्रीतून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. फटाके फोडताना नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याची गरज आहे. {लहान मोठ्या, फुलझड्या १० ते १५० {ॲटम बॉम्ब ५० ते १०० {विविध रंगातील चक्री ५० ते २०० {पेन्सिल फुलझड्या ५० ते १०० {आकाशात जाऊन फुटणारे १०० ते १५० {आवाज करणारे रॉकेट २५० ते ८०००

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:24 am

कोल्हापूरच्या जंगलात सापडली केसाळ गोगलगायींची नवी प्रजाती:जपानी ॲनिमेटरच्या नावावरून शास्त्रीय नामकरण, तेजस ठाकरेंचा शोध

पश्चिम घाटातील जैवविविधतेला पुन्हा एकदा नव्या शोधाने समृद्ध करणारी कामगिरी ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील सदाहरित जंगलात केसाळ गोगलगायींच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. या प्रजातीला शास्त्रीय नाव ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ (Lagocheilus hayaomiyazakii sp. nov.) देण्यात आले आहे. जपानी अॅनिमेटर आणि स्टुडिओ घिबलीचे सह-संस्थापक हायाओ मियाझाकी यांच्या निसर्गप्रेमातून प्रेरणा घेत या गोगलगायीचे नामकरण करण्यात आले आहे. या संशोधनाचा अहवाल 14 ऑक्टोबर रोजी ‘जर्नल ऑफ कॉन्कॉलॉजी’ या ब्रिटन आणि आयर्लंडमधील कॉन्कॉलॉजिकल सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. संशोधनाच्या मागे वाईल्डलाईफ फाऊंडेशनची टीम या शोधामागे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक अमृत भोसले, तेजस ठाकरे, स्वप्निल पवार, अक्षय खांडेकर आणि श्रीलंकेतील राजराटा विद्यापीठाचे डॉ. दिनारझार्ड रहीम या संशोधकांची मेहनत आहे. संशोधक अमृत भोसले यांनी सांगितले, “ही गोगलगाय कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी येथील अर्धसदाहरित जंगलात आढळते. या छोट्या गोगलगायी जंगलातील पानांच्या ढिगाऱ्यांत, ओलसर खडकांमध्ये आणि शेवाळयुक्त झाडांवर सापडतात. मियाझाकी यांच्या चित्रपटांप्रमाणेच ही प्रजातीही माणूस आणि निसर्ग यांच्यातील सूक्ष्म नात्याचे दर्शन घडवते. या शोधामुळे आपल्या जंगलातील लपलेले चमत्कार समोर आले आहेत.” पश्चिम घाटात प्रथमच ‘लॅगोकाईलस’ प्रजातीची नोंद या संशोधनानुसार, ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ ही प्रजाती उत्तरी पश्चिम घाटातील या प्रजातीची पहिली नोंद आहे. आतापर्यंत ही प्रजात दक्षिणेकडील भागात मर्यादित असल्याचे मानले जात होते. पण या नव्या प्रजातीमुळे त्याचा विस्तार तब्बल 540 किलोमीटर उत्तरेपर्यंत वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. संशोधकांच्या मते, पश्चिम घाटातील गोगलगायींवर आतापर्यंत तुलनेने कमी संशोधन झाले आहे आणि हा शोध त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. गोगलगायीची प्रजात विलुप्ततेच्या उंबरठ्यावर या संदर्भात तेजस ठाकरे म्हणाले, “या गोगलगायींचे निवासस्थान अत्यंत मर्यादित आहे. जंगलातील आग आणि वृक्षतोडीमुळे त्यांचे अधिवास झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जैवविविधतेसाठी या प्रजाती अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा परिसंस्थेतील सहभाग समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.” निसर्गाच्या नाजूक संतुलनाचे प्रतीक या संशोधनातून केवळ नवीन प्रजातीच सापडली नाही, तर पश्चिम घाटातील सूक्ष्म जीवसृष्टीकडे लक्ष वेधणारा नवा दृष्टिकोन समोर आला आहे. ‘लॅगोकाईलस हायाओमियाझाकी’ ही गोगलगाय निसर्गातील नाजूक संतुलनाचे प्रतीक मानली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:06 am

शिक्षणाच्या जोरावर कलाम राष्ट्रपती बनले- डॉ. नालट:डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा‎

प्रतिनिधी |अकोला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म रामेश्वरम् येथे एका अत्यंत गरिब कुटुंबात झाला. मी स्वतः त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. त्यांनी सर्व अडचणींवर मात करत शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य दिले. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी शिक्षणाच्या बळावर ते राष्ट्रपती झाले. त्यांनी जगाला दाखवून दिले की, शिक्षणच माणसाला उंचीवर नेते, असे प्रतिपादन डॉ. धनंजय नालट यांनी केले.अशोक नगर, पिंपळ फाईल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात, भारताचे माजी राष्ट्रपती आणि सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. धनंजय नालट बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक रामटेके यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. धनंजय नालट यांचे स्वागत केले. सुरुवातीला डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अशोक रामटेके यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजेच १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते .अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणे मराठी भाषेचा सुगंध चारही दिशेने दरवडण्याकरिता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे वाचन संस्कृती टिकेल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आज अत्यंत गरजेचे आहे, असे विचार अशोक रामटेके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला आशा रामटेके, शुभम रामटेके, अनिल महाजन, दीपा महाजन, नरेंद्र माने, सुनील रामटेके ,संगीता रामटेके, जयाली गजभिये , मनस्वी गजभिये तसेच सभासद, नागरिक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:01 am

घरकुल योजनेअतंर्गत भूखंडाचे पट्टे देण्यात यावे:शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी‎

प्रतिनिधी | अकोला प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत लाभार्थ्यांना भूखंडाचे पट्टे देण्यात यावेत, अशी मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी सादर केले. अनेक गरजू, गरीबांकडे हक्काचे राहते घर नसून, कडक ऊन असो किंवा कडाक्याची थंडी; पावसाळ्यातही त्याची प्रचंड धांदल उडते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने महत्वाचे धोरण राबवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) जिल्ह्याला उद्दिष्ट प्राप्त झाले. मात्र आता जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून झोपडपट्टी आहे. झोपडपट्टीधारांना प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत लाभ मिळावा, यासाठी जागेचा भाडेपट्ठा नियमानाकुल करणे आवश्यक आहे. मात्र मनपाकडून अद्याप ही कार्यवाही झालेली नाही. शिवसेना वसाहत, लोकमान्य नगर, गुरुदेव नगर, जयरामसिं प्लॉटचा खालचा भाग, रमाबाई नगर, भोई पुरा आदी भागातील झोपडपट्टी धारकांकडे जागेचे पट्टे नाहीत. त्यांना तातडीने पट‌्टे देण्याची मागणी शिवसेने निवेदनात केली. यावेळी माजी नगरसेवक गजानन चव्हाण, शरद तुरकर, योगेश गिते, देवा गावंडे, प्रफुल्ल मंडलीक, दीपक डाखोरे आदी होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:01 am

रोग निदान शिबिर परोपकारी कार्य:गोपाळ महाराजांचे प्रतिपादन; शिबिरात १२० जणांची तपासणी‎

प्रतिनिधी | बाळापूर मराठा पाटील संघटना बाळापूरतर्फे हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर अनेक नागरिकांना जीवनदान ठरणारे आहे. कार्य परोपकारी असल्याचे प्रतिपादन गोपाळ महाराज उरळकर यांनी याप्रसंगी केले. अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल अमरावती व मराठा पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन गोपाळ महाराज उरळकर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून संदीप पाटील, रेखा राऊत, संजय राऊत, अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी दिगंबर उपस्थित होते. डॉ. अनुप डोंगरे, डॉ. पूनम जयस्वाल, डॉ. शुभम बादुकले, प्रज्ञा मनवर, प्राजक्ता वाडेकर, रवीना मोहोळ, वैष्णवी गोडाणे, निशा जामूनकर, प्रतीक्षा वाघमारे, प्रिया छापाने, विशाखा खैरे, कपिलदेव वर्मा, सागर धर्माळे, मुकेश ठाकूर यांनी तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दरोकर, डॉ. शुभांगी घुगे, डॉ. चेतना केळकर, डॉ. सिद्धांत इंगळे यांनी सहकार्य केले. शिबिराला मांचितराव पोहरे, प्रा. बाळासाहेब पोहरे, चंद्रकांत माळी, धनंजय नेमाडे, पद्माकर माळी, रवींद्र पोहरे, हिंमतराव मेटांगे, पुरुषोत्तम पाटील, शिवाजीराव म्हैसने, गोपाल पोहरे आदी होते. सूत्रसंचालन सहसचिव वसंतराव पोहरे यांनी तर आभार मराठा पाटील संघटनेचे अध्यक्ष शरद वानखडे यांनी मानले. या शिबिरात १२० रुग्णांनी तपासणी करून घेतली. शिबिरात नऊ रुग्णांना अँजिओग्राफी तर तीन रुग्णांना अँजिओप्लास्टी करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांनी सांगितले. या सर्व रुग्णांचा विनामूल्य उपचार अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मार्डी, अमरावती येथे करण्यात येणार आहे

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:00 am

माहेश्वरी ज्येष्ठ नागरिक प्रकोष्ठची क्रीडा स्पर्धा:सुरेश माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न

प्रतिनिधी |अकोला माहेश्वरी ज्येष्ठ नागरिक प्रकोष्ठच्या वतीने महेश भवनात क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रकोष्ठ अध्यक्ष सुरेश माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून अमरावती येथील अनिल राठी होते. तर वरिष्ठ उपाध्यक्ष प्रवीण मोहता, सचिव राजीव मुंदडा, माजी अध्यक्ष प्रा. गोपीकिसन कासट, सल्लागार भगवानदास तोष्णीवाल, रमण लाहोटी, माहेश्वरी समाज ट्रस्ट अध्यक्ष विजय पनपालिया आदी उपस्थित होते. सुरुवातीला दिवंगत सदस्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. अनिल राठी यांचा सत्कार करण्यात आला. प्रकोष्ठचे अध्यक्ष सुरेश माहेश्वरी यांनी त्रैमासिक सभेचे विवरण व आगामी कार्यक्रमांची रुपरेखा मांडली. कार्यक्रमात नवीन सदस्यांचा परिचय करण्यात येऊन राजेश चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध पदावर बहुमान प्राप्त रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी ब्रिजमोहन चितलांगे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले रमेश बाहेती, सचिव पदी नियुक्त झालेले सुरेश मुंदडा तर कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त झालेले रमेश डागा यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर संगीत खुर्ची, बुद्धिबळ, जलद चालणे आणि राउंड पासिंग स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यात संगीत खुर्चीतील विजेते रमण लाहोटी, पुरुषोत्तम राठी, नंदकिशोर राठी यांना पुरस्कार देण्यात आले. याचे पुरस्कर्ते रमण लाहोटी होते. बुद्धिबळाचे विजेते अनुप राठी, रमेश मुंदडा,भगवानदास तोष्णीवाल घोषित करण्यात आले. याचे पुरस्कर्ते राजेश चांडक होते. जलद चालणे या स्पर्धेत सत्तर वर्षावरील गटात चंपालाल जाजू, ओमप्रकाश चांडक, ठाकूरदास गांधी हे ठरले तर प्रोत्साहन पुरस्कार भगवानदास तोष्णीवाल यांना देण्यात आला. याचे पुरस्कर्ते चंपालाल जाजू होते. सूत्रसंचालन सहसचिव राजेंद्र चितलांगे यांनी तर आभार चंपालाल जाजू यांनी मानले. ज्येष्ठांनी मारली बाजी साठ वर्षांवरील जलद चालणे गटात बालकिसन सारडा, नवल अजमेरा, राजेश चांडक घोषित करण्यात आले याचे पुरस्कर्ते सुभाष लड्डा होते. राऊंड पास स्पर्धेत विजय राठी, रमणभाई लाहोटी, ओमप्रकाश चांडक मांजरीवाले यांना घोषित करण्यात आले. विजेत्यांना प्रकोष्ठच्या वतीने पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 10:00 am

कस्तुरी व्याख्यानमाला:आत्मशोध, कर्तव्य, सेवा ही तीन चाके; यात संतुलन साधल्यास जीवन धावते- प्रा. डॉ. आशय रोकडे यांनी गुंफले तिसरे पुष्प‎

प्रतिनिधी | अकोला जीवनात आत्मशोध, कर्तव्य आणि सेवा ही तीन चाके आहेत. यात संतुलन साधले की जीवन महामार्गावर नीट धावायला लागते. संत तुकाराम महाराज म्हणतात आपुला हाची धर्म परोपकारा.' स्वतःसाठी जगणे स्वाभाविक आहे पण दुसऱ्यांसाठी जगणं, हेच माणुसकीचे सार आहे. आपण सर्व या जीवन नावाच्या महामार्गावर प्रवासी आहोत. कुणी धावते, कुणी चालत आहे आणि आणि कुणी अजूनही रस्ता शोधत आहे; पण आपण कधी थांबून स्वतःला विचारतो का... मी नेमका कुठे चाललो आहे, माझ्या या प्रवासाचा हेतू काय आहे? आपल्याला मोबाईलचा रस्ता माहित असतो पण जीवनाचा जीपीएस बहुतेक हरवलेला असतो. त्यामुळे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे. आत्मशोध ते समाजनिर्मिती हा प्रवास म्हणजेच जीवनाचा महामार्ग आहे, असे प्रतिपादन अमरावती येथील प्रा. डॉ. आशय रोकडे यांनी केले. ते प्रमिलाताई ओक सभागृहात आयोजित कस्तुरी व्याख्यानमालेत', जीवनाचा महामार्ग..आत्मशोध ते समाजनिर्मिती' या विषयावर दुसरे पुष्प गुंफतांना प्रमुख वक्तs म्हणून बोलत होते. आत्मशोध म्हणजे प्रवास आहे प्रश्नांचा, अनुभवांचा आणि बदलांचा. स्वामी विवेकानंद म्हणतात उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. शिवाजी महाराजांनी स्वतःचा आत्मशोध केला व स्वराज्याचा विचार जन्माला आला. आपणास जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. आत्मशोध जर फक्त स्वतःपुरता राहिला तर तोअधुरा ठरतो; कारण प्रत्येक व्यक्ती समाजाशी जोडलेली असते, असेही प्रा. रोकडे म्हणाले. कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी आणि वै. सुनंदाताई शांताराम बुटे वारकरी शिक्षण विद्यालय , आपातापा यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर कर्मयोग परिवार चे अध्यक्ष व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शांताराम बुटे, कस्तुरीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले, अकोला जिल्हा पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती व प्रमुख वक्ता प्रा. डॉ. आकाश रोकडे, अमरावती उपस्थित होते. व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्या डॉ. सत्यनारायण बाहेती यांनी भूषवले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन अंधारे यांनी केले तर आभार प्रदर्शन कस्तुरीचे सचिव संजय ठाकरे यांनी केले. प्रा. अश्विनी ठाकरे यांच्या पसायदानाने व्याख्यानसत्राची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी घनश्याम चांडक, संजय गायकवाड, अनिल पालवे, गोविंदसिंह गहलोत, अतुल कुलकर्णी, किशोर बांधवकर, दामोदर नुपे, मीरा देशपांडे, यांनी विशेष परिश्रम घेतले. समाजाला हवीत संवेदनशील माणसं आज आपल्याकडे मोबाईल, इंटरनेट, भौतिक सुखसोयी सगळं आहे पण मन शांत नाही. आत्मशोध म्हणजे मनाचं चार्जिंग आहे. स्वतःच्या भावनांचं, मूल्यांचं संवेदनांचं पुनर्जागरण आहे. समाजाला केवळ बुद्धिवान नव्हे तर संवेदनशील माणसं हवीत. आत्मशोध हा अंतर्मुख प्रवास आहे समाज निर्मिती हा बाह्यमुख प्रवास आहे दोन्ही मिळाले की माणूस पूर्ण होतो असेही प्रा. डॉ. रोकडे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:59 am

महिलांना साडी, नवीन कपडे, मिष्ठान्न, फटाक्याचे वाटप:कस्तुरीचा सुगंध मेळघाटातील रुईपाठा गावी दरवळणार; ग्रामस्थांसोबत साजरी करणार दिवाळी‎

प्रतिनिधी | अकोला माणुसकीची प्रकाशमय ज्योत सातत्याने तेवत ठेवत कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी या सेवाभावी संस्था यंदा धनतेरसच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी, १७ ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण मेळघाट परिक्षेत्रातील रुईपाठा येथील आदिवासी बांधवांसोबत साजरा करणार आहे. तेथील लहान मुलांना कपड्यांसह गावास मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे. यानिमित्ताने आदिवासी बांधव-भगिनी, चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात येणार आहे. यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या रुपाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. अनेकांच्या घरातही पुराचे पाणी घुसले. परिणामी गृहपयोगी साहित्य वाहून गेले. घरातील धान्याची नासाडी झाली. शैक्षणिक साहित्यही भिजले. अतिवृष्टीमुळे मेळघाटतही नुकसान झाले. आधीच शहरांच्या तुलनेने मुलभूत सुविधांची वाणवा मेळघाटात असून त्यात नैसर्गिक संकटाची भर पडली. त्यामुळे दिवाळी सारख्या सणात त्या भागातील ग्रामस्थांच्याही जीवनात आनंद निर्माण व्हावा, यासाठी नाही कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक दायित्व निभावण्याच्या भावनेतून मेळघाट परिक्षेत्रातील रुईपाठा गावात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामस्थांना साहित्याचे वितरण होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कस्तुरीचे संस्थापक प्रा. किशोर बुटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी सदस्य तथा प्रकल्प प्रमुख संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत संजय ठाकरे, यशवंत देशपांडे, डॉ. कुसुमाकर घोरपडे, राजेश्वर पेठकर, अनिल पालवे, गोविंदसिंह गहिलोत, प्रा. रिता घोरपडे, मीरा देशपांडे, चेतना आनंदानी, ज्योती सुलताने, सुधीर नितनवरे, गोपाल घाटे यांचा समावेश आहे. हे साहित्य देणार भेट सणांचा राजा दिवाळी. घरादाराची रंगरंगोटी- खरेदीची लगबग असते. नवे कपडे, मिष्टान्न असे बरेच काही असते. मात्र, महानगरातील झगमगाटात हरवलेले बरेच जण दुर्गम भागात राहत असून, त्यांच्याही जीवनात दिवाळी सण साजरा होण्यासाठी धनतेरस च्या पूर्वसंध्येला शुक्रवार रुईपाठा गावात कस्तुरीकडून मदतीचा हात देण्यात येणार आहे. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत असणारे अतिदुर्गम व सर्व सुखसोयींपासून वंचित आहे. दिवाळीनिमित्त तेथील लहान मुलांना नवीन कपडे, फटाके, महिलांना भाऊबीज भेट म्हणून नवीन साडी व मिष्टान्न भोजन देण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:58 am

हिंगोलीत राष्ट्रवादीची ताकद उभी करण्यासाठी आवश्‍यक सहकार्य करणार:प्रवेश सोहळ्यात अजित पवार यांची ग्वाही

हिंगोली जिल्हयातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्याचा आनंद होत असून हिंगोली जिल्ह्यात पक्षाची ताकद उभी करण्यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी ता. १५ पुणे येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात दिले आहे. हिंगोलीचे राष्ट्रवादीचे (शरद पवारगट) जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी राजिनामा देऊन पुणे येथे अजित पवार गटात प्रवेश घेतला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, उपनगराध्यक्ष बिरजू यादव, शेख निहाल, माजी शिक्षण सभापती आमेर अली, ॲड. स्वप्नील गुंडेवार, शेख शकील यांच्यासह माजी नगरसेवकांचा समावेश आहे. यावेळी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजेश नवघरे यांची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. मागील वीस ते पंचेविस वर्षापासून राजकिय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पक्षात प्रवेश घेतल्यामुळे आनंद होत असल्याचे सांगितले. त्यांच्या मुळे पक्षाला मोठे पाठबळ मिळणार आहे. त्यांच्यामुळे आता जिल्ह्यात ताकद उभी करता येणार आहे. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे त्यासाठी आवश्‍यक सहकार्य करण्यासाठी आपण सदैव पाठिशी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरखळ्या मारून उपस्थितांना मनमुराद हसविले. तर दादांचे पाठबळ मिळाल्यामुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे संघटन अधिक मजबूत होईल असा विश्‍वास उपस्थित माजी नगरसेवकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत हिंगोली जिल्हयात राष्ट्रवादीला चांगले दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:40 am

नेवासेत चौथीच्या विद्यार्थ्यांनी साकारला प्रतापगड किल्ला:महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक

प्रतिनिधी | नेवासे दिवाळीचे आगमन होताच नेवासा शहरातील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उत्साहाचा प्रत्यय ‘प्रतापगड किल्ला’ या आकर्षक उपक्रमातून सर्वांना आला. वर्गशिक्षिका श्रीमती अर्चना बोकारे (उर्फ गुब्रे मॅडम) यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी वाळू, दगड, कागद आणि नैसर्गिक साहित्य वापरून अत्यंत सुंदर असा प्रतापगड किल्ला साकारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेल्या या किल्ल्याचे सौंदर्य पाहून संपूर्ण शाळेतील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक आनंदित झाले. यावेळी मुख्याध्यापक आसिफ शेख सर्वच शिक्षक आणि राजू बाबा पवार हे उपस्थित होते. दिवाळीच्या निमित्ताने किल्ले बनविण्याची परंपरा विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जावी, यासाठी बोकारे मॅडम यांनी स्वतःही विद्यार्थ्यांसोबत हातभार लाऊन प्रोत्साहन दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, ऐतिहासिक अभिमान आणि टीमवर्कची भावना विकसित झाली आहे. उपक्रमात विद्यार्थी श्रेयस निलेश रेनिवाल,, रोहित जालिंदर गवळी, समर्थ उमेश शिंदे, धृव संजय गवळी, ज्ञाना विक्रम जगताप, संचित संदेश ठोळे, सोफियान वसिम पटेल, ओम प्रमोद मेथे, जय अरुण कोल्हे, कैवल्य किशोर आरले, हरीश सुरज परदेशी, शोएब खाजा पिंजारी, आरीश अख्तर बागवान यांसह इयत्ता चौथी ‘ब’चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:37 am

उताऱ्यांवर शासन नोंदी करण्याचे आदेश:१ नोव्हेंबरपर्यंत श्रीरामपूर बस स्थानकाचे काम चालू करण्याचे सरनाईक यांचे आदेश

प्रतिनिधी | श्रीरामपूर श्रीरामपूर येथील एसटी महामंडळाची जमीन ही शासनाची आहे. यासंबंधी ७/१२ आणि ८ अ वर काही नोंदी राहिल्या असतील, तर त्या १ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचे काम तातडीने चालू करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहे. आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर येथील बस स्टँडच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच काही लोकांनी या जागेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शहरातील बसस्थानकाशेजारील जागेचा ताबा घेण्यासाठी काही लोक आले होते. याची माहिती मिळताच एस.टी.च्या अधिकाऱ्यांनी आ. ओगले यांच्याशी संपर्क साधला. ते तातडीने तेथे पोहोचले; त्यांनी तेथूनच पोलिस विभागातील वरिष्ठांना याबाबत कळवल्याने पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक यांनीही सोमवारी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस राज्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक, जिल्हा भुमी लेख अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप व ठेकेदार उपस्थित होते. बैठकीत आमदार ओगले यांनी मंत्री सरनाईक यांना निदर्शनास आणून दिले की, श्रीरामपूर येथे बसस्थानकाचे काम मंजूर आहे. परंतु जागेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले आहे. त्यावर मंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा भूमिलेख अधिकारी यांना जागेच्या संदर्भातील उताऱ्यांवर शासन नोंदी करण्याचे आदेश दिले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:35 am

आगामी निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये मोठ्या हालचालींना वेग:प्रदेशाध्यक्षांकडून मंत्र्यांना कडक समज, पालकमंत्र्यांना जिल्ह्यात सक्रीय राहण्याच्या सूचना

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपमध्ये संघटनात्मक स्तरावर मोठी सक्रियता वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी भाजपच्या मंत्र्यांसोबत बैठक घेतली. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि भाजप नेत्यांची दुसरी एक बैठक पार पडली. रवींद्र चव्हाण यांनी मंत्र्यांसोबतच्या बैठकीत पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू आहे, असा इशारा दिला. कामाचे मूल्यांकन सुरू, पक्षाकडे लक्ष द्या रवींद्र चव्हाण आणि शिवप्रकाश यांनी मंत्र्यांसोबत बैठक घेऊन त्यांना थेट इशारा दिला आहे. 'पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू आहे,' असे स्पष्ट शब्दांत मंत्र्यांना सांगण्यात आले आहे. या बैठकीत मंत्र्यांना त्यांच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक सक्रिय राहण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून, निवडणुकीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचे आणि लोकांची कामे करण्यावर अधिक भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या कामांमध्ये दिरंगाई नको या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काही मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आपले सरकार असूनही अनेक ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची कामे वेळेत होत नाहीत. कामांमध्ये होणारा हा विलंब योग्य नाही. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याने पक्षाची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रभावी व्यवस्था तयार करावी, असे आदेश चव्हाण यांनी दिले आहेत. संघाकडून संघटनात्मक कार्यावर भर देण्याचा संदेश दरम्यान, मुंबईतील यशवंत भवन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि भाजप नेत्यांची दुसरी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाच्या विचाराने पुढे जाण्यावर चिंतन करण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक पातळीवर आपले कार्य अधिक वाढवावे आणि त्या दिशेने कृतीशील राहावे, असा स्पष्ट संदेश संघाच्या बाजूने देण्यात आला आहे. बैठकांना वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती या दोन्ही महत्त्वाच्या बैठकांना भाजप आणि संघाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांचा समावेश होता.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:34 am

शिर्डीतील मोकळ्या प्लॉटच्या स्वच्छतेसाठी स्थानिक आक्रमक:शिर्डीत पार्किंच्या जागेत गांजाची झाडे सापडल्याने उडाली एकच खळबळ‎

प्रतिनिधी | शिर्डी साईबाबांच्या पवित्र नगरीत व्यसनाधीन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची वाढती संख्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनत आहे. नवीन पिंपळवाडी रोडवरील साई संस्थानच्या मालकीच्या वाहनतळ परिसरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पती आढळून आल्या. या प्रकाराने शिर्डी नगरपालिका व प्रशासनाचे दुर्लक्ष पुन्हा अधोरेखित केले आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून दररोज हजारो भाविक येथे येतात. मात्र, शहरात सध्या व्यसनी, गुन्हेगार, गंजेडी आणि भिकारी यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः साई संस्थान आणि शिर्डी नगरपरिषदेच्या ताब्यातील मोकळ्या ओपन स्पेस आणि पार्किंगच्या जागा दुर्लक्षित असल्याने, त्या ठिकाणी काटेरी झुडपांचे जंगल तयार झाले आहे. या ठिकाणांचा फायदा घेत नशेखोर रात्रीच्या वेळी येथे गांजा सेवन करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रविवारी नगरपालिकेच्या पथकाने केलेल्या कारवाईत साईसंस्थानच्या ताब्यातील एका मोकळ्या प्लॉटवर लाल कोराच्या जातीची तब्बल पंधरा गांजाची झाडे सापडली. ही झाडे पाच ते सहा फूट उंच वाढलेली होती. लाल कोराच्या जातीचा गांजा अधिक नशादायक असल्याने व्यसनी लोक त्यालाच प्राधान्य देतात. शहरातील ओपन स्पेसची नियमित देखभाल करण्याची गरज आहे. साई संस्थानकडील तसेच नगरपरिषदेच्या खुल्या जागांची स्वच्छता, झुडपांची तोड आणि प्रकाशयोजना केल्यास अशा अड्ड्यांना आळा बसू शकतो. शिर्डीत मोकळ्या प्लॉटवर गांजाची झाडे आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिकाम्या प्लॉटची स्वच्छता करणार ^ नवीन पिंपळवाडी रोडनजीक संस्थान पार्कींगसाठी असलेल्या जागा तातडीने झाडी झुडपी काढून ती स्वच्छ करण्यात येणार आहे . तसेच शहरात संस्थानची असलेल्या रिकाम्या प्लॉटचीही स्वच्छता करण्यात येत आहे. - गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी,श्री साईसंस्थान शिर्डी. साईनगरीत भिकारी आणि गंजेडींचा उच्छाद वाढला शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सध्या भिकारी आणि नशेडींच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरात, रस्त्याच्या कडेला तसेच विश्रांतीस्थळांवर भिकारी मोठ्या प्रमाणात असून काही जण भाविकांच्या हाताला धरून त्यांना त्रास देत पैसे मागतात. प्रशासनाने वेळोवेळी कारवाई करूनही त्याचा फारसा परिणाम होत नाही. शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये पसरली प्रचंड नाराजी शिर्डी परिसरातील काही मोकळ्या जागा आणि काटेरी झाडीमध्ये गंजेडींचे अड्डे निर्माण झाले आहेत. हे नशेडी तिथेच गांजा सेवन करतात आणि बीजं टाकून देतात. त्यामुळे त्या जागी नैसर्गिक गांजाची झाडी उगवली आहेत. भाविकांत भीतीचे वातावरण आहे. या प्रकारामुळे शिर्डीची आध्यात्मिक प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:33 am

पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज-संगीता जोशी:समर्थ शाळेत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांनीही घेतली शपथ‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. विद्यार्थी जर अशा पद्धतीने पुढाकार घेत असतील, तर समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास समर्थ विद्यामंदिर प्रशालेच्या मुख्याध्यापक संगिता जोशी यांनी व्यक्त केला. सावेडीतील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेत दिवाळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी फटाके न फोडता आणि फक्त आकाशकंदील लावून दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. प्रदूषणमुक्त आणि शांत दिवाळी साजरी करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. शाळेत इको क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे, प्रदूषणविरहित सण साजरे करण्याची सवय लावणे आणि हरित जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे. क्लबमार्फत वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पुनर्वापर यांसारखे उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांनी हस्तनिर्मित आकाशकंदील तयार करून शाळेच्या परिसरात सजावट केली. फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायू प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी एकमताने फटाके मुक्त आणि हरित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्वच्छ दिवाळी – हरित दिवाळी – सुरक्षित दिवाळी या घोषवाक्याने वातावरण दुमदुमविले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे समाजात पर्यावरणाबाबत जागरूकतेचा संदेश पोहोचला. या कार्यशाळेसाठी एल. एम. कुलकर्णी, अनुराधा शास्त्री, विवेक भारताल, मनीषा अंबाडे, संकेत शिंदे, सुनील रायकर, स्वाती घुले यांनी मार्गदर्शन केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:33 am

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम'च्या मुलींचा विजय:विजेता संघ जिल्ह्याचे नेतृत्व करणार

प्रतिनिधी | कोपरगाव जिल्हास्तरीय मुलींच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडली. गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या १४ वर्षाखालील संघाने स्पर्धेत आपले वर्चस्व राखून ही स्पर्धा जिंकली. स्पर्धेत खेळतांना गौतमच्या मुलींनी उपांत्यपूर्व सामन्यात कर्जत संघाचा सरळ सेटमध्ये २५-१३ असा पराभव केला तर उपांत्य सामन्यात नेवासा तालुका संघाचा सरळ सेटमध्ये २५-१२, २५-१६ असा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात राहाता संघाचा सरळ सेट मध्ये २५-१८, २५-११ सामना जिंकून स्पर्धा ही जिंकली. इंदापूर येथे १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शालेय विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलचा विजेता संघ जिल्ह्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या विजेत्या हॉलीबॉल संघाचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे,आ.आशुतोष काळे, सचिव चैताली काळे,छबुराव आव्हाड, सर्व संस्था सदस्य, संस्था इन्स्पेक्टर नारायण बारे व शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या संघांना शाळेतील शिक्षकांचेही मार्ग दर्शन मिळाले. यानंतर आता १५ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथे व्हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:32 am

तुळजाभवानी मातेचा जयघोष अन्‎ महाआरतीने पालखी यात्रेची सांगता‎:बुऱ्हाणनगर येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, महाप्रसादाचे केले वाटप‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर संबळाचा कडकडाट, देवीच्या नावाचा जयघोष, महाआरती, महाप्रसाद अन् हजारो भाविकांच्या उपस्थितीत बुऱ्हाणनगर येथे तुळजाभवानी माता पालखी यात्रेची सांगता करण्यात आली. दसऱ्याच्या दिवशी बुऱ्हाणनगरच्या भगत कुटुंबियांकडून देवीला नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्याची गाठ सोडण्याचा आणि पालखी यात्रेची सांगता करण्यात आली. यावेळी पालखीचे मुख्य मानकरी सुदाम भगत, ज्ञानेश्वर भगत, शिवराम भगत, संतोष भगत, देविदास भगत, सागर भगत, दीपक भगत, मंगेश भगत, वसंत भगत, निलेश भगत आदींसह भगत कुटुंबीय यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळजापूरला नवरात्रोत्सवात दसऱ्याला सीमोल्लंघनाला ज्या पालखीत देवीला नेले जाते ती तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखी एक महिना नगरजवळील अनेक गावांत गेल्यावर त्या गावात यात्रा भरली जाते. कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या अनेक वर्षांपासून बुऱ्हाणनगरच्या भगत परिवाराकडे आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठात तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचे महत्त्व आहे. तुळजापूर येथील नवरात्र उत्सव काळात मूर्तीला पालखीमधून सीमोल्लंघन केले जाते. संबळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदो-उदोच्या गजरात दसऱ्याला पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा नगरच्या पालखीत बसून पार पडतो. यावेळी कुंकवाची मुक्त हस्ते उधळण करण्यात येते. यावेळी प्रदक्षिणा मार्गावर पिंपळाच्या पारावर तुळजाभवानी माता काही काळ विसावली. यावेळी पारावर देवीला भगत कुटुंबियांच्यावतीने नैवेद्य दाखवून मानाच्या आरत्या करण्यात येतात त्या नैवेद्याची गाठ सोडण्याचा उपक्रम आज नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगरला भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नवरात्रोत्सव काळात नगर शेजारील बुऱ्हाणनगर येथील मंदिरात मोठी गर्दी झाली होती. नवरात्रीच्या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची वर्दळ वाढली होती. या काळात ट्रस्टच्यावतीने भाविकांची काळजी घेण्यात येत होती. बुऱ्हाणनगर प्रमाणेच केडगाव येथील रेणुकामाता मंदिरातही गर्दी होती. या ठिकाणी यात्राही भरली होती. पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी येथे तर मोठी गर्दी झाली होती. जिल्हाभरातून भाविक गडावर दाखल होत होते. या भाविकांसाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था केली होती. नगर शहरातील पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौकातील देवीच्या मंदिरात या काळात गर्दी होती. या मंदिर ट्रस्टकडून योग्य नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांना कोणत्याही अडचणी जाणवल्या नाहीत.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:27 am

भक्तीभाव:१८५ ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेली छत्री श्री साईबाबांच्या चरणी अर्पण

प्रतिनिधी | शिर्डी चेन्नई येथील साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांप्रती असलेला भक्तीभाव व्यक्त करत श्री साईबाबांच्या चरणी अनोखी भेट अर्पण केली. त्यांनी १५ किलो वजनाची आणि १८५ ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली. ही छत्री श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. आज सकाळी ही छत्री श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर प्रतिष्ठापित करण्यात आली. या नव्या छत्रीमुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. याच साईभक्ताने यापूर्वीही श्री साईबाबा संस्थानला चेकद्वारे तब्बल २३ लाख रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती दराडे यांनी दिली. साईभक्त जितेंद्र उमेडी यांच्या या दानाबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दराडे यांनी त्यांचे मत मांडले.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 9:26 am

रिपाइं नेते लोंढे यांच्या बेकायदा इमारतीवर हातोडा:नाशिक मनपा अन् पोलिसांची संयुक्त कारवाई, प्रशासनाचा गुन्हेगारांना स्पष्ट इशारा

नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आणि महापालिकेने आता धडक मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, सातपूर परिसरात गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अनधिकृत बांधकामावर नाशिक महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त करून गुन्हेगारांना स्पष्ट इशारा देण्याचा प्रशासनाचा हेतू आहे. प्रकाश लोंढे याच्या आयटीआय पुलालगत असलेल्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेतर्फे नोटीस चिटकवून पाच दिवसांत अतिक्रमण काढण्याचा अल्टिमेटम संपत असल्याने महापालिकेतर्फे सदरहू अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. या अतिक्रमण प्रकरणी लोंढे याच्यावर गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढण्यासाठी येणारा सर्व खर्च लोंढेकडून वसूल करण्यात येणार आहे. प्रशासनाचा गुन्हेगारांना स्पष्ट इशारा नंदिनी नदीच्या पूररेषेत अंदाजे तीन-चार वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली ही अनधिकृत इमारत (25 बाय 15 मीटरचा तळमजला आणि पहिला मजला) पाडली जाणार आहे. या इमारतीत भाडेकरू ठेवून भाडे वसूल केले जात होते. गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाईला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी लोंढे यांच्या आणखी एका इमारतीत भुयार आढळून आल्याने खळबळ माजली होती. त्यामुळे, नंदिनी नदीच्या पूररेषेत बांधलेल्या इमारतीचा वापर गुन्हेगारी कारणांसाठी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या कारवाईतून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांना कडक इशारा दिला जात आहे. भुयारात 2 बेडरूम्स, शस्त्रास्त्रे अन् मद्याच्या बाटल्या दरम्यान, नाशिकच्या सातपूर येथील आयटीआय पुलालगत रिपाइंचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे संपर्क कार्यालय आहे. पोलिसांनी रविवारी या कार्यालयावर धाड टाकली. सकृतदर्शनी हे कार्यालय अतिशय सामान्य वाटत होते. कार्यालयात फर्निचरचे शोकेस होते. याच शोकेसच्या मागे एक गुप्त दरवाजा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्या दरवाज्यामागे गेल्यानंतर पोलिस तेथील चित्र पाहून चक्रावले. पोलिसांना या गुप्त दरवाजाच्या मागे दोन स्वतंत्र बेडरूम्स, महागड्या मद्याच्या बाटल्या तथा कुऱ्हाड, कांबी, चाकू, सुरे आदी विविध शस्त्रास्त्रे असल्याचे आढळले. त्यांनी येथून जवळपास 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या भुयाराचा वापर गुन्हेगारी कट कारस्थान रचण्यासाठी, गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा अवैध बैठका घेण्यासाठी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काय आहे प्रकाश लोंढेवर आरोप? प्रकाश लोंढे व त्यांच्या टोळीवर सातपूरच्या औरा बारमध्ये गोळीबार केल्याचा आरोप आहे. याशिवाय या टोळीवर खुटवडनगर येथील पुष्कर बंगला जबरदस्तीने बळकावल्याचाही आरोप आहे. यासंबंधीची तक्रार गरत 8 तारखेला अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिस चौकशीत लोंढे पिता-पुत्रांनी मूळ मालकाला धमकावून हा बंगला हडपल्याचे निष्पन्न झाले आहे. बंगल्याच्या कर्जाची अडचण व आर्थिक निकष यांचा गैरफायदा घेत या टोळीने मालकाची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात तथा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलिसांनी हा बंगला सील केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 8:36 am

इलेक्ट्रिक दिव्यांच्या आधुनिक नव्या बाजारात पारंपरिक कुंभारांची व्यथा:परिश्रम, वेळ आणि कष्ट , तरीही उत्पादन खर्च निघणेही अशक्य‎

प्रतिनिधी | खुलताबाद दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. प्रकाशाचा सण उजळवताना पारंपरिक कुंभाराकडील मातीच्या पणत्यांचा वापर करून स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कुंभार समाज जिल्हा संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे. दिवाळी म्हटले की, समोर उभे राहते लक्ष्मीपूजन व पूजेसाठी लागणारे साहित्य. जसे की, पणती ,बोळकी इत्यादी. मात्र हे बनवणाऱ्या कुंभाराला दसक, पंचक,माती तसेच इतर साहित्य बाहेर गावावरून आणावे लागते. त्यात घोड्याची लीद, राख आदी मिश्रण करून त्याचा चिखलाचा गोळा करावा लागतो. यंदा बोळकी मोठय़ा प्रमाणात बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या 2500 रुपयांत हजार, असा मातीच्या बोळक्यांचा दर आहे. तो किरकोळ बाजारात थोडासा वाढू शकतो. या भावात परिश्रम, कष्ट आणि संपूर्ण कुटुंबाचा हातभार लागत असल्याने उत्पादन खर्च सुटत नाही. कारण तयार केलेला सर्वच माल विकला जाईल की नाही, याची शास्वती नाही. त्यामुळे उरलेला माल अंगावर पडतो. कुंभार समाजातील कारागिरांनी मेहनतीने तयार केलेल्या विविध आकारांच्या आणि आकर्षक रंगसंगतीच्या मातीच्या पणत्या, दिवे, कंदील बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र, प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक दिव्यांच्या वाढत्या वापरामुळे पारंपरिक मातीच्या पणत्यांना मागणी कमी होत चालली आहे. लोकांनी देशी मातीच्या पणत्या विकत घेतल्या तर पारंपरिक व्यवसाय टिकून राहील आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळेल.दिवाळी पर्यावरणपूरक आणि स्वदेशी बनवण्यासाठी “एक दिवा मातीचा लावा” असा संदेश दिला. दिवाळीत मातीच्या पणत्यांनाच प्राधान्य द्या आणि स्थानिक कारागिरांना साथ द्या. असे आवाहन कुंभार समाज संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा भाजपा नेते संजय जोरले ज्येष्ठ नेते उमाजी सुर्यवंशी, मनोहर तांगडे, मनोहर मरकड, ज्ञानेश्वर महस्के ,रविंद्र पवार, सोमनाथ पवार सोशल मीडिया सरचिटणीस, जिल्हा अध्यक्ष रामदास इंगळे आदींनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:39 am

शाळांपासून ते चहाच्या टपरीपर्यंत होतेय वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृती मोहीम:कन्नड प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांचा अभिनव उपक्रम‎

प्रतिनिधी | कन्नड वन्यजीव संवर्धनासाठी लोकजागृती करण्याचा नवा मानदंड प्रस्थापित करत कन्नड प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शाळांपासून चहाच्या टपरीपर्यंत’ हा नाविन्यपूर्ण जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत वन्यप्राण्यांविषयी संवेदनशील दृष्टिकोन रुजविण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांशी संवादातून या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक गुरुकृपा वस्ती शाळा, केंद्र चिकलठाण येथे झाली. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधताना टोम्पे यांनी वानर, हरीण, माकड यांसारख्या वन्यप्राण्यांना घरगुती अन्न देण्याचे दुष्परिणाम आणि बिबट्या अधिवासात नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी शरद वेताळ, संगीता पसारे यांचे विशेष सहकार्य लाभले.शाळेच्या परिसरात जनजागृती माहितीपत्रके लावण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी ती माहिती पी. डी. एफ. स्वरूपात पालकांच्या व्हाट्सअॅप गटांवर शेअर केली, ज्यामुळे संदेश घराघरात पोहोचला. फक्त शाळेतच नव्हे, तर डोणगाव, बहिरगाव, भोकणगाव, चिकलठाण, जैतखेडा तांडा, भारंबा तांडा आणि भारंबा या गावांतील ग्रामपंचायत कार्यालये, शाळा परिसर आणि दर्शनी ठिकाणी जनजागृती पोस्टर्स लावण्यात आले. वनकर्मचारी अशोक आव्हाड व भाऊसाहेब वाघ यांनी जनतेशी संवाद साधत वन्यप्राणी संरक्षणाचा संदेश दिला. वनविभागाने ग्रामीण पातळीवर संवाद साधण्यासाठी ‘चाय पे चर्चा, जनजागृती का परचा’ हा एक वेगळा उपक्रम राबवला. भारंबा तांडा येथील चहाच्या टपरीवर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांशी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांनी संवाद साधला. या वेळी बिबट्या अधिवासात सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी, पिक नुकसान भरपाईची प्रक्रिया, तसेच वन्यप्राण्यांना अन्न न देण्याचे महत्त्व या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. परिसरात जनजागृती पत्रके लावून ती व्हाट्सअॅप गटांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवली. विद्यार्थी, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य , स्थानिक नागरिकांनी या जनजागृती मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि संरक्षणाची भावना समाजात दृढ होत आहे. वन्यजीव संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी उपक्रमांचा उद्देश स्पष्ट करताना शिवाजी टोम्पे म्हणाले की,वन्यजीव आपल्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे रक्षण करणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. संवाद आणि जनजागृतीद्वारेच आपण माणूस आणि निसर्ग यांच्यातील संतुलन राखू शकतो.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:38 am

सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरात अवैध वाळूचा उपसा:सततच्या अवैध वाळू उपशामुळे नदीपात्र खडकाला टेकले, नैसर्गिक संपत्ती धोक्यात

प्रतिनिधी | सारोळा सिल्लोड तालुक्यातील पालोद परिसरातील खेळणा नदीपात्रात दिवसाढवळ्या चालणारा बेसुमार वाळू उपसा हा पर्यावरणाचा आणि कायद्याचा उघड मर्डरच आहे. शेकडो ट्रॅक्टरद्वारे रोजच्या रोज वाळू बाहेर नेली जात असताना महसूल आणि पोलिस प्रशासन मात्र संशयास्पद शांततेत आहे. या बेफिकिरीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दररोज रात्री उशिरापर्यंत ट्रॅक्टरांची सुसाट वर्दळ सुरू असते. नदीपात्रात खोल खड्डे पडले असून परिसरातील शेतरस्ते, स्मशानभूमीचा रस्ता आणि विहिरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून काहींना शेतात जाण्यासाठी रस्ताच उरलेला नाही. ‘प्रशासन आमचा आक्रोश ऐकत नाही. उलट वाळूमाफियांना संरक्षण मिळतेय’ अशा शब्दांत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वाळूमाफिया आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमधील संगनमतामुळे हा काळाबाजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सरकारी महसूल कोट्यवधींनी बुडत असताना अधिकाऱ्यांच्या गाड्या मात्र नव्या होत आहेत, हा योगायोग मानावा का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. नदीचा हा जीवघेणा उपसा थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याऐवजी मौन बाळगले आहे. परिणामी खेळणा नदीचा कणा मोडत चालला आहे, भूमिगत पाणीपातळी घटते आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. नदीचा तट नष्ट झाला आहे. दरम्यान, काही शेतकरी थोड्या पैशांच्या मोहात स्वतःच्या जमिनीशेजारील वाळू विकून निसर्गाशी गद्दारी करत असल्याचेही समोर आले आहे. अशा लोकांनाही प्रशासनाने जबाबदार धरून कठोर शिक्षा आवश्यक आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:37 am

चॅम्पियन जिजाई महाविद्यालयाचा‎खो- खो संघ राज्य स्पर्धेसाठी पात्र‎:विभागीय स्पर्धेत अजिक्य; रायगड येथे राज्य स्पर्धेत खेळणार‎

प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील मनूर येथील जिजाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या १९ वर्ष वयोगटाखालील खो-खो संघाने मोठे यश मिळवले. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झालेल्या विभागीय खो-खो स्पर्धेतील अंतिम सामन्यात बीड संघाचा मोठ्या गुणांच्या फरकाने पराभव करत विभागीय स्पर्धेत चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. जिजाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या १९ वर्ष वयोगटाखालील खो-खो संघाने आधी तालुका स्तरावर विजय मिळवला. त्यानंतर जिल्हा स्तरावर संघाने उत्तम कामगिरी करत अजिंक्य पद मिळवले. त्यानंतर संघाने विभागीय पात्रता फेरीत प्रवेश मिळवला होता. वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील मनूर येथील संघाने विभागीय पात्रता फेरीमध्ये उत्तम कामगिरी केली. बीड जिल्ह्यातील गेवराई येथे बुधवारी, दि. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या विभागीय स्तरावरील साखळी सामन्यात परभणी संघाचा पराभव केला. उपांत्य सामन्यात संभाजीनगर शहरी संघाला हरवत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. त्यानंतर विभागीय स्तरावरील खो-खोच्या अंतिम सामन्यात वैजापूर तालुक्यातील मनूर येथील जिजाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने बीड येथील संघाचा ७ विरुद्ध १४ अशा फरकाने पराभव करून विभागीय स्तरावर अजिंक्य पद मिळवले. बीड येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या मनूर येथील जिजाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या खो-खो संघाचा पुढील राज्यस्तरीय सामना रायगड येथे होणार आहे. विजयासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गोकुळ दौंगे यांनी मेहनत घेतली. संघातील सर्व विद्यार्थ्यांचे सचिव रामहरी जाधव, रुपाली बोडखे, गोकुळ दौंगे, प्राचार्य संदीप जगताप, सरपंच नितीन साळुंखे, राजू साळुंखे, शिक्षक इघे, कोते, विसपुते, गायके, सातपुते, चौधरी यांनी अभिनंदन केले आहे. या विजयासाठी गोकुळ दौंगे यांनी मनापासून प्रयत्न केले. यामुळे संघाने घवघवीत यश संपादन केल.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:20 am

नगर- मनमाड रस्त्यावरील जड वाहतुकीला तिसऱ्यांदा मुदतवाढ:२० पर्यंत राहणार सुरू

प्रतिनिधी | गंगापूर अहिल्यानगर ते मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम पूर्ण न झाल्याने गंगापूर- वैजापूरमार्गे वळवण्यात आलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीस तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. २० ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहनांचा त्रास गंगापूर, वैजापूरकरांना सहन करावा लागणार आहे. अहिल्यानगर ते मनमाड या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १२ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. २१ सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण होईल असे अपेक्षित असल्याने अहिल्यानगरच्या पोलिस अधीक्षकांनी निवेदन प्रसिद्ध करून या रस्त्यांवरील जड वाहनांची वाहतूक गंगापूर-वैजापूरमार्ग े वळवली होती. परंतु २१ सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण न झाल्याने पुन्हा ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, तोपर्यंतही पूर्ण न झाल्याने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या मनात ही वाहतूक आणखी किती दिवस सुरू राहणार याबद्दल शंका होती. त्यामुळे अहिल्यानगर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क केला असता त्यांनी २० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक राहिल असे सांगितले. मोठमोठ्या वाहनांमुळे गंगापूर- कायगाव रस्त्याची चाळणी झाली आहे. भेंडाळा- गंगापूरमार्गे वाहने येत असल्याने या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. महिनाभरात या रस्त्यावर ५ पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. माजी नगराध्यक्षांनी जड वाहनांची वाहतूक तत्काळ बंद करण्यासाठी १३ रोजी रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. २० ऑक्टोबरनंतर पुन्हा वाहतूक वळवण्यास मुदतवाढ देऊ नये नसता पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:19 am

विचारपूस केल्याचा राग;‎नागदमध्ये एकाचा खून‎:चार संशयित आरोपी गजाआड, तिघांचा शोध सुरू‎

प्रतिनिधी | नागद टोळक्याने सोबत आलेल्या लोकांकडे विचारपूस केली असता त्यांनी धारदार शस्त्राने २४ वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नागदमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक केली आहे. शुभम रणवीर परदेशी (२४) असे मृताचे नाव आहे. शुभम हा सुसंस्कृत व सुशिक्षित घरातील होता. कुणाशीही वैर नव्हते. घराच्या परिसरात आलेल्या अमोल निकम व इतरांना शुभमने विचारपूस केली होती. याच रागातून अमोल निकम, ऋषी निकम, अविनाश निकम, सतीश राजपूत, शंकर निकम, सचिन निकम, बंडू राजपूत या सात जणांनी संगनमत करून शुभमवर हल्ला केला. कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोल निकम व ऋषी निकम यांना तिडके, अविनाश निकमला रामपुरा, सतीश राजपूतला मालखेडा येथून अटक केली. सचिन निकम पसार झाला. मृताचा भाऊ मंगलसिंग राजपूत, सोनू महाजन, जीवन राजपूत, अनिल पाटील, संजय राजपूत, भोला महाजन, समय जैन, आकाश हजारी, नरेंद्र गडवे, राजेंद्र निकम व ग्रामस्थांनी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार व एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना निवेदन दिले. मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. बुधवारी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला. दुपारी एक वाजता मृतदेह ॲम्ब्युलन्समधून बस स्टँडवर आणण्यात आला. आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. तणाव निर्माण झाला होता. नंतर पोलिस ठाण्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:18 am

पैठणमध्ये ६७०० मतदारांचे आक्षेप;‎पथकांकडून डोअर टू डोअर तपासणी‎:घरोघरी जाऊन १५ अधिकाऱ्यांकडून मतदार याद्यांची प्रत्यक्ष तपासणी‎

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पैठण नगर परिषद निवडणुकीकरिता मतदार तयार करण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे. ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध झाली आहे. या यादीतील मतदारांनी लेखी स्वरूपात ६,७०० हून अधिक आक्षेप दाखल केले आहेत. याची छाननी करणे व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून तो मतदार सदर प्रभागात राहतो की नाही, याचा शोध घेण्यासाठी पैठणमध्ये १५ जणांची टीम तयार करण्यात आली आहे. हे कर्मचारी बुधवारपासून ‘डोअर टू डोअर' जाऊन तपासणी करत आहेत. मतदान यादीमधील गोंधळ पाहता मतदान यादीवरील आक्षेप व सूचना घेण्यासाठी तारीख वाढविण्यात आल्याचे मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी सांगितले. प्रारूप मतदान यादीवरील हरकती व सूचना आता १७ ऑक्टोबरपर्यंत मांडता येतील. अंतिम प्रभागनिहाय यादी ३१ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. मतदान निहाय यादी ५ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सध्या ६,७०० च्यावर आक्षेप आले आहेत. शहरातील ३६,४३३ मतदारांची नावे यादीत असून, अनेकांची नावे चुकीच्या प्रभागात गेली आहेत. काही कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. काही नागरिकांची नावे एकाच वॉर्डमध्ये दोन वेळा आली आहेत. काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या नागरिकांची नावेही यादीत आहेत, यावर आक्षेप दाखल झाले आहेत. अहवालानंतर अंतिम यादी होईल प्रसिद्ध ^मतदान यादीमधील आक्षेपांवर काम करण्यासाठी १५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच ी टीम तयार केली आहे. ही टीम प्रत्येक प्रभागात जाऊन नोंद घेत आहे. याबाबतचे कामकाज बुधवारपासून सुरू झाले आहे. आक्षेप घेण्याची तारीख वाढली आहे. तसेच नियुक्त पथकाच्या अहवालानंतर अंतिम यादी तयार होईल. -पल्लवी अंभोरे, मुख्याधिकारी, पैठण पहिल्या दिवशी १२ प्रभागांत तपासणी दाखल झालेल्या आक्षेपांची तपासणी करण्यासाठी तयार केलेल्या पथकाने बुधवारी शहरातील १२ प्रभागांत भेटी दिल्या. या वेळी पथकाने आक्षेप असलेल्या घरी प्रत्यक्षात तोच मतदार आहे का, त्याची नोंद तेथेच आहे का याची तपासणी व पाहणी केली, अशी माहिती या टीममधील कर्मचारी सागर डोईफोडे, खंडुभाऊ वीर यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:17 am

मैत्रिणीच्या वादातून चिरला मित्राचा‎ गळा; 12 तासांमध्ये खुनाचा उलगडा‎:एसएफएस मैदानावरील प्रकरणात खुनातील आरोपी अटकेत‎

जालना रोडवरील एसएफएस‎मैदानावर मंगळवारी मध्यरात्री‎तरुणाचा गळा चिरलेला अवस्थेत‎मृतदेह आढळला होता. या खुनाचा‎गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२‎तासांत उलगडा केला आहे.‎मैत्रिणीवर झालेल्या वादातून‎जिवलग मित्रानेच सुरेश भगवान‎उंबरकर याची हत्या केल्याचे समोर‎आले आहे. यात सचिन ऊर्फ जंगली‎मच्छिंद्र जाधव (२४, रा. जुना‎बायजीपुरा) असे आरोपीचे नाव‎असल्याची माहिती गुन्हे शाखेचे‎निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.‎ आरोपी सचिन व मृत सुरेश हे‎दोघे पूर्वी एकाच गल्लीत राहायचे.‎त्या दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री होती.‎सचिन हा नेहमी जवाहर कॉलनी ‎‎रोडवरील सुरेशच्या प्रिन्स अंडा ‎‎ऑम्लेटच्या गाडीवर जायचा. तसेच ‎‎दिवसभर दोघे एकमेकांच्या सोबत ‎‎राहायचे. मंगळवारी सुरेशने त्याची‎गाडी आणली नव्हती. तो दिवसभर ‎‎सचिनसोबत होता. त्यांनी शहरातील ‎‎वेगवेगळ्या भागात भटकंती केली.‎रात्री दोघेही एसएफएस मैदानावर‎गेले होते. त्या वेळी त्यांच्यात एका‎मुलीवरून किरकोळ वाद झाला.‎त्याच्यातून संतापलेल्या व नशेत‎असलेल्या सचिनने त्याच्याशी‎जोरजोरात वाद घालण्यास सुरुवात‎झाली. त्यांच्यात चांगलीच हाणामारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎झाली. त्यानंतर आरोपीने धारदार‎शस्त्राने सुरेशचा गळा चिरत हत्या‎केली. आपलाच मित्र रक्तबंबाळ‎अवस्थेत त्या ठिकाणी पडलेला‎दिसल्याने त्याने तिथून पळ काढला.‎काही वेळाने लघवी करण्यासाठी‎गेलेल्या एका व्यक्तीला तिथे मृतदेह‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पडलेला दिसल्याने त्याने पोलिसांना‎ही घटना कळवली. त्यानंतर गुन्हे‎शाखेचे निरीक्षक संभाजी पवार,‎सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक‎निर्मला परदेशी व उपनिरीक्षक‎प्रवीण वाघ यांच्या पथकाने पुढील‎कार्यवाही केली.‎ अंगावरील जखमांवरून पटली आरोपीची ओळख‎ ‎सुरेशची हत्या करूनदेखील काहीच न घडल्याच्या‎‎अाविर्भावात सचिन वावरत होता. बुधवारी पहाटे तो‎‎कैलासनगर येथील मोकळ्या मैदानात बसलेला होता.‎‎पथकातील पोलिस पोहोचताच कुठलीही हालचाल न‎‎करता तो पोलिसांना सामोरे गेला. त्याच्या अंगावर‎‎ओरखडे असल्याचे दिसल्याने पथकाला हाच आरोपी‎असल्याचे कळले. पोलिस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.‎त्याच्यावर जिवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत.‎

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:15 am

दीपोत्सवाचे वाटसरू- कोवळे हात वेचतात तुमच्यासाठी फुले:दुपारी शाळा सुटली की त्यांच्या हाती येते फुलं वेचणीची टोपली

१२ वर्षांचा नैतिक आठवीत, तर ९ वर्षांची प्रांजल पाचवीत शिकते. शाळा करून दुपारी चारनंतर त्यांची ‘सेकंड शिफ्ट’ सुरू होते. या वेळी त्यांच्या हातात असते फुलं वेचण्यासाठी पिशवी. हाताला काटेही टोचतात. शेतात सापही असतात, पण भीती बाळगून चालत नाही... चारही भिंती पत्र्याच्या, वर पत्र्याचं छप्पर. पावसाळ्यात पत्रे गळतात. उन्हात उकाड्यानं घरात बसणं अवघड होतं. हिवाळ्यात थंडी पत्र्यांना गारठवते. अंगात हुडहुडी भरते. फुलशेती करणाऱ्या झोलेगावच्या (ता. वैजापूर) जाधव कुटुंबाचं हे घर. दीपोत्सवात घरोघरी फुलांची आकर्षक सजावट करता यावी म्हणून पहाटेच त्यांचा दिवस सुरू होतो. फुलासारखी मुलंही मोठ्यांच्या बरोबरीनं तोडणीच्या कामासाठी गुंतून जातात. तुमच्या-आमच्या घरांना सजावटीसाठी फुलं मिळावीत म्हणून कोवळ्या हातांनाही फुलतोडणीचं काम करावं लागतं. छत्रपती संभाजीनगरपासून ३५ किलोमीटरवर झोलेगाव येथील कैलास जाधव आणि त्यांच्या पत्नी कोकिळा फुलशेतीतून संसाराचा गाडा हाकतात. जाधव यांचे शिक्षण बी.ए. अॅग्रिकल्चरलपर्यंत झालेलं आहे. वडिलोपार्जित ४ एकर शेतीत रोज जगण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पहाटे चारच्या सुमारास गाव गाढ झोपेत. त्या वेळी कैलास यांच्या शेतात फुलतोडणीची लगबग सुरू असते. पहाटेच्या विंचू-काटा, साप यांची तमा न बाळगता चंद्राच्या उजेडातच अत्यंत नाजूक असलेल्या गलांडा (गुलछडी) आणि निशिगंधाची (रातराणी) फुलं तोडण्याचं काम सुरू होतं. तोडणीसाठी लागणारी अचूकता आणि वेळ यांचा ताळमेळ साधताना जाधव दांपत्याची दमछाक होते. ‘शेतकऱ्यांच्या आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही,’ असे कैलास सांगतात. शाळेनंतर हाती टोपली जाधव यांचा १२ वर्षांचा नैतिक आठवीत, तर ९ वर्षांची प्रांजल पाचवीत शिकते. दिवसाची शाळा करून दुपारी चारनंतर त्यांची ‘सेकंड शिफ्ट’ सुरू होते. या वेळी त्यांच्या हातात पुस्तकं नव्हे, तर असते फुलं तोडण्यासाठी लागणारी छोटी टोपली आणि पोतं. संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात ते आई-वडिलांना फुलं तोडण्यास मदत करतात. अशा वेळी हाताला काटेही टोचतात. जगण्यापुढं शेतातल्या सापांची भीतीही त्यांना वाटत नाही. नदी ओलांडून येतात शहरात कैलास जाधव सांगतात, उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणासाठी फुलशेती करतो. कामासाठी मजूर मिळत नाहीत, म्हणून आदल्या दिवशी झेंडू आणि शेवंतीची फुले तोडावी लागतात. फुले बाजारात आणण्यासाठी शिवना नदीतील गुडघ्याभर पाण्यातून यावे लागते. दररोज ३५ किलोमीटर मोटारसायकलवरून येतो. आपल्या दिवाळीसाठी त्यांचे कष्ट... घराघरांत दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून असंख्य हात कष्ट उपसत असतात. त्यांच्या कष्टाच्या गाथा, संघर्षाच्या कथा कधी आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. दिवाळीनिमित्त या श्रमाचा कहाण्या आजपासून ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी...

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 7:10 am

मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना धमक्या‎ दिल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल‎:मुखत्यारपत्र नाकारल्यानंतर न्यायदान कक्षात शिरुन मोबाइलद्वारे चित्रण‎

गैरन्यायिक तसेच मुखत्यारपत्रावर ‎शपथपत्र तयार करून देण्यास नकार‎ दिल्याने दोन जणांनी सहायक‎ अधीक्षकाला धमक्या दिल्या. विशेष‎ म्हणजे मुख्य न्याय दंडाधिकारी‎यांच्या न्यायदान कक्षात शिरून ‎दोघांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना‎ही धमक्या दिल्या. तसेच मोबाइलने ‎न्यायमूर्तींचे चित्रण करण्याचा प्रयत्न ‎केला. हा प्रकार २३ सप्टेंबर रोजी‎ दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान‎ घडला.‎ जानकीराम गजभरे आणि सुरेंद्र‎ दिगंबर गजभरे (रा. गुलमंडी) अशी‎ न्यायदान कक्षात धमक्या देणाऱ्यांची ‎नावे असून त्यांच्या विरोधात‎वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला आहे. ‎प्रकरणात पठाण मोहंमद आवेज‎ खान गुलाम दस्तगीर (५३, रा.‎नागसेन कॉलनी, रोशन गेट) यांनी ‎‎फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी हे‎ मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ‎‎सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत ‎‎आहेत. २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४ ‎‎वाजेच्या दरम्यान ते आस्थापना ‎कक्षात दैनंदिन कामकाजात करत ‎होते. त्या वेळी जानकीराम गजभरे‎ आणि सुरेंद्र गजभरे असे दोघे त्यांच्या ‎‎कक्षात आले. त्यांनी या कागदावर ‎‎आम्हाला शपथपत्र करून द्या, अशी ‎‎मागणी केली. हे बाँड मुखत्यारपत्र व‎ गैरन्यायिक कागदपत्र असल्याने‎ शपथपत्र करता येणार नाही, असे ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पठाण यांनी सांगितल्यावर ते दोघे‎ संतापले. नंतर दोघांनी त्यांच्या ‎कक्षातच गोंधळ घातला होता.‎ कक्षातच दोघांनी गोंधळ घालण्यास‎ सुरुवात केली. त्यामुळे पठाण मुख्य‎ न्यायदंडाधिकारी यांच्या कक्षात गेले.‎ मात्र काही क्षणांतच दोघे जण‎न्यायदान कक्षात शिरले. यानंतर ‎त्यांनी मोबाइलने न्यायदान कक्षाचे ‎चित्रण करण्याचा प्रयत्न केला. या‎वेळी तेथे उपस्थित असलेल्या कोर्ट‎ पैरवी शिंदे व केरे यांनी त्यांना‎ समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ‎त्यांनी हे पोलिस ठाणे नाही असे‎ म्हणत त्यांनाही अरेरावीची भाषा‎ केली. त्यांना पोलिसांनी बाहेर नेले.‎

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 6:40 am

अनैतिक संबंधात अडसर; पत्नीनेच‎ प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले‎:दीड महिन्याने उलगडा; दारू पाजल्यानंतर पुलावरून पैनगंगा नदीत ढकलले‎

जिल्ह्यातील किनवट तालुक्यात २९ ऑगस्टला एका ‎व्यक्तीचा मृतदेह पैनगंगा नदीत तरंगताना आढळला ‎होता. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद ‎केली होती. मात्र, या घटनेने वेगळेच वळण घेतले. ‎अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा ‎पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा ‎धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने ‎दारू पाजून प्रेयसीच्या पतीला नदीत ढकलून दिले. ‎विनोद भगत (५२ ) असे मृताचे नाव आहे. ‎ या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी प्रियंका आणि ‎‎तिचा प्रियकर शेख रफिक यांना ताब्यात घेतले. ‎दोघांवर खून आणि अॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये ‎गुन्हे दाखल केले. किनवट शहराच्या मथुरानगर ‎येथील रहिवासी विनोद भगत यांचे प्रियंका यांच्याशी ‎२००३ मध्ये लग्न झाले होते. त्यांना १ मुलगा व १ ‎मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. पत्नीच्या ‎प्रेमप्रकरणाची कुणकुण लागल्याने पती-पत्नीमध्ये ‎‎नेहमी भांडणे होत. शेवटी पतीचा काटा काढण्याचा ‎‎निर्णय प्रियंका आणि तिच्या प्रियकराने घेतला. ‎दोघांनी मिळून कट रचला. २९ ऑगस्टला रोजी ‎‎संशयित आरोपी शेख रफिक याने विनोदला घेऊन ‎‎मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा ‎‎नदीच्या खरबी पुलावर पोहाेचला. त्यानंतर ‎आरोपीने विनोदला दारू पाजून पुलावरून नदीत ‎‎ढकलून दिले होते. ‎ पती ४ दिवसांपासून बेपत्ता असल्याचा बनाव‎घटनेच्या ४ दिवसांनंतर म्हणजेच ३ सप्टेंबर रोजी पत्नी प्रियंका ही‎किनवट पोलिस ठाण्यात गेली. पती ४ दिवसांपासून गायब‎असल्याचा तिने बनाव केला. याचदरम्यान पोलिसांना पैनगंगा‎नदीत त्याचा मृतदेह आढळून आला. इकडे मृताच्या बहिणीने‎घातपात असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता.‎ कॉल डिटेल्समुळे‎फुटले दोघांचे बिंग‎ तपासादरम्यान पोलिसांनी ‎प्रियंका व तिचा प्रियकर शेख‎ रफिक यांचे कॉल डिटेल्स‎तपासले. प्रियंकाच्या‎मोबाइलवरून संशयित‎रफिकसोबत नेहमी संवाद होत‎असल्याचे त्यातून समोर‎आले. पोलिसांनी दोघांना‎ताब्यात घेऊन कसून चौकशी‎केली. खाकी वर्दीचा धाक‎दाखवताच दोघांनी खुनाची‎कबुली दिली. अनैतिक‎संबंधात अडथळा ठरत‎असल्याने विनोद यांचा काटा‎काढल्याचे दोघांनी सांगितले.‎ संशयास्पद हालचालींमुळे दोघे अडकले जाळ्यात‎ मृत विनोद भगत यांना दारू‎ पाजल्यानंतर त्यांना संशयितांनी नदीत‎ढकलून दिले. दारूच्या नशेत नदीत‎पडल्यामुळे बुडून मृत्यू झाला असावा,‎असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज‎होता. त्यामुळे दोघे संशयित गुन्हा‎लपवण्यात जवळपास यशस्वी झाले‎होते. मात्र, दोघांच्या हालचाली मृत‎विनोद भगत यांच्या नातेवाईकांना‎संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे‎घातपाताचा संशय व्यक्त करण्यात‎आला. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात‎प्रियंका व रफिक यांना ताब्यात घेऊन‎चौकशी करताच खुनाच्या गुन्ह्याचे‎वास्तव समोर आहे.‎ इनसाइड स्टोरी‎ - प्रियकराच्या मदतीने विकले घर‎ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय परिसरातील‎अशोकनगरात मृत विनोद भगत यांच्या‎मालकीचे ४ खोल्यांचे घर होते. हे घर‎विनोद यांची पत्नी प्रियंका भगतने शेख‎रफिक शेख रशीद याच्या मदतीने ३०‎लाखांना विकले होते. याच व्यवहारातून‎शेख रफिक याने प्रियंका भगत हिच्याशी‎जवळीक साधली. पैशांच्या कारणावरून‎विनोद, प्रियंका या पती-पत्नीमध्ये वाद‎होत असे. रफिक व प्रियंकाच्या‎ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याची‎कुणकुण विनोद यांना लागली होती.‎त्याचा या दोघांना विरोध होता. त्यामुळे हे‎हत्याकांड घडल्याचे समोर आले.‎

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 6:36 am

दुचाकीवरील चोरांनी पळवली ‎अडीच तोळे सोने ठेवलेली पर्स‎:माहूरहून परतणाऱ्या बीडच्या भाविकांसोबत नांदेडमध्ये घडला प्रकार‎

दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर‎थांबलेल्या वाहनातून महिलेची पर्स पळवल्याची‎घटना अर्धापूर येथे घडली. पर्समध्ये अडीच तोळे ‎‎सोने, ४० हजार रोख व दोन मोबाईल असा १ लाख‎१९ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना‎सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. माहूर येथे ‎‎रेणुकामातेचे दर्शन घेऊन परत येणाऱ्या बीडच्या ‎‎भाविकांसोबत हा प्रकार घडला.‎ महादेव नागेंद्र गिरी हे (रा. शिंदेवाडी ता.‎माजलगाव जि.बिड) हे दर्शनासाठी कुटुंबियांसह‎गेले होते. दर्शन घेऊन परत येताना छोटा हत्ती‎वाहनातून (एम.एच.४२ बी.एफ. २३२९) सर्वजण‎गावाकडे जात होते. वाटेत अर्धापूर येथे चहा‎घेण्यासाठी थांबले. त्यावेळी चोरीची घटना घडली.‎ तक्रार घेण्यास पोलिसांचा विलंब‎या प्रकरणात केवळ ४० हजार रुपये व २ मोबाईल‎चोरांनी लांबवल्याची नोंद एफआयआरमध्ये‎घेण्यात आली.अडीच तोळे सोने पर्समध्ये‎असल्याचा उल्लेख पोलिसांनी सुरुवातीला‎टाळला. दुसऱ्या दिवशी सकाळी ही नोंद घेतली.‎

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 6:32 am

वसई-विरारचे माजी आयुक्त पवारांची अटक बेकायदा:हवाला प्रकरणात उच्च न्यायालयाचा ईडीला दणका, सुटका करण्याचे दिले आदेश

वसई-विरार मनपा हद्दीतील खासगी व सरकारी ६० एकर जागेवर ४१ इमारतींच्या अवैध बांधकामाच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात मोठा धक्का बसला. या खटल्याशी संबंधित हवाला प्रकरणात माजी आयुक्त अनिल पवार यांची अटक न्यायालयाने बुधवारी अवैध ठरवली आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीही रद्द करत पवारांच्या तत्काळ सुटकेचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ईडीकडे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम १९ अंतर्गत अनिल पवार यांच्या अटकेसाठी आवश्यक कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने म्हटले. ईडीचा संपूर्ण खटला काही वास्तुविशारद आणि विकासकांच्या जबाबावर आधारित आहे,’ असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. त्यामुळे जिल्हा कोर्टाचा आदेश रद्दबातल झाला. भ्रष्टाचारप्रकरणी तिघेजण न्यायालयीन कोठडीत वसई-विरार मनपा हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव खासगी व सरकारी ६० एकर जमिनीवर ४१ बेकायदा इमारतींच्या बांधकामाशी संबंधित हे प्रकरण आहे. या बांधकामांकडे पवारांसह वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्यासाठी मोठी लाच घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे. पवार आणि इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला दाखल करण्यात आला, त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली. याप्रकरणी आतापर्यंत तिघे अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहेत. १६९ कोटींची बेहिशेबी संपत्ती... अनिल पवारांनी लाचखोरीतून तब्बल १६९ कोटींची बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोपही ईडीने केला होता. ताज्या कारवाईत ईडीने पवार व अन्य एका आरोपींची सुमारे ७१ कोटींची संपत्ती जप्त केली. याप्रकरणी आतापर्यंत १६१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीने दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Oct 2025 6:30 am

मिमिक्री केली म्हणून माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत

पुणे : येथे आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या मिमिक्रीवर उत्तर दिले आहे. ते म्हणाले उद्या तू जरी माझी मिमिक्री केली तरी माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत. मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील मी कामाचा माणूस आहे. मी काम करत राहील. मी माझ्या शेतक-यांकरता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मिमिक्री कोण करतय हे आपण […] The post मिमिक्री केली म्हणून माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Oct 2025 11:57 pm

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले:मतदार यादीतील त्रुटींवरून विरोधक आक्रमक, वडेट्टीवारांच्या आरोपांवर देवांग दवे यांचे प्रत्युत्तर

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मतदार यादीतील गंभीर त्रुटी निदर्शनास आणल्या. जोपर्यंत या त्रुटी दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणूक सहा महिने पुढे ढकलावी, अशी मागणी विरोधकांनी आयोगाकडे केली आहे. 'मीडिया हँडलिंग'वरून मोठा आरोप या मागणीच्या वेळीच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एका भाजप कार्यकर्त्यावर गंभीर आरोप करत नवा वाद निर्माण केला. वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, निवडणूक आयोगाचा मीडिया हँडलिंगचा भाग भाजपचा कार्यकर्ता असलेले देवांग दवे कसे सांभाळत आहेत? तसेच, मतदार यांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला होता. देवांग दवे यांचे आरोप फेटाळत जोरदार प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांनंतर देवांग दवे यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत, हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी भाजपमध्ये घराघरात पोहोचून काम करतो, हा विषय नवीन नाही, असे स्पष्ट करत त्यांनी महाविकास आघाडी दिशाभूल करत असल्याचा दावा केला. दवे यांनी आठवण करून दिली की, 2019 मध्येही साकेत गोखले नावाच्या व्यक्तीने असेच आरोप केले होते. देवांग दवे म्हणाले, त्यावेळी या प्रकरणाची चौकशी झाली होती आणि माझा आणि निवडणूक आयोगाचा काहीही संबंध नसल्याचं आढळून आल्यानं मला क्लिनचिट मिळाली आहे. २०१९ नंतर विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप केले आणि आता ते व्होट चोरीचा आरोप करत आहेत. हे सर्व 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्याचे काम आहे, असे दवे यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना देवांग दवे यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, विरोधकांमध्ये गोंधळ आहे, त्यांनी आधी आपसात चर्चा करून तो दूर करावा. बिहारमध्ये निवडणुकांना विरोध करायचा आणि महाराष्ट्रात निवडणुका लवकर घेण्याची मागणी करायची, आणि आता पुन्हा युटर्न घ्यायचा. त्यांना त्यांचा पराभव दिसत आहे, त्यामुळे त्यांनी पुढील रणनीती काय असावी, यावर विचार करावा, असा टोला दवे यांनी लगावला आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Oct 2025 11:57 pm

आयपीएस पूरन कुमार यांच्या पत्नी अडचणीत

रोहतक : हरयाणा पोलिस अधिकारी संदीप कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी रोहतक सदर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या एफआयआरमध्ये चार लोकांची नावे आहेत. आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांचे गनमॅन सुशील, कुमार यांच्या पत्नी पी अवनीत कौर भटिंडा ग्रामीणचे आमदार अमित रत्ना आणि आणखी एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. […] The post आयपीएस पूरन कुमार यांच्या पत्नी अडचणीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Oct 2025 11:44 pm

शमीचे एका षटकात ३ बळी

मुंबई : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याचा विचार केला गेला नाही. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दौ-यातही त्याची निवड केली नाही. मुख्य निवडकर्ते आगरकर यांनी उत्तर दिले होते की, शमीच्या तंदुरुस्तीबाबत आमच्याकडे काही माहिती नाही. मोहम्मद शमी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बंगालकडून खेळत आहे. त्याने […] The post शमीचे एका षटकात ३ बळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Oct 2025 11:17 pm

दिवाळीत पुन्हा पाऊस?

राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल दिसून येत असून हवामान विभागाने पुढील एक-दोन दिवसांत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा […] The post दिवाळीत पुन्हा पाऊस? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Oct 2025 11:02 pm

औराद शहाजानी येथे होणार शेतकरी भवन

निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार येथे नवीन शेतकरी भवन बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मंजूरी दिली असून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नाने शेतकरी भवनासाठी १ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतक-यातून समाधान व्यक्त केले जात आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल घेऊन आलेल्या शेतक-यांना मुक्कामाची […] The post औराद शहाजानी येथे होणार शेतकरी भवन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Oct 2025 10:59 pm

राणी अंकुलगा येथील उपसरपंचपदी चित्रकला काकडे यांची निवड

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यातील अंकुलगा राणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सौ. सुलोचना गणेश गुराळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या विशेष सभेत सौ. चित्रकला अरूण काकडे यांची उपसरपंचपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. शोभा रामदास साकोळे यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी चित्रकला अरुण काकडे यांची निवड करण्यात आली. यासाठी […] The post राणी अंकुलगा येथील उपसरपंचपदी चित्रकला काकडे यांची निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Oct 2025 10:57 pm