SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
... ...View News by News Source

२ अमेरिकन व एका ब्रिटिश प्राध्यापकास अर्थशास्त्रातील नोबेल

स्टॉकहोम : या वर्षीचा नोबेल पुरस्कार तीन अर्थशास्त्रज्ञांना देण्यात आला आहे: जोएल मोकिर (यूएसए), पीटर हॉविट (यूएसए) आणि फिलिप अघियन (यूके). नोबेल समितीने म्हटले आहे की या अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रमामुळे आर्थिक विकास कसा होतो हे दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलते आणि आपल्या सर्वांवर परिणाम करते. नवीन उत्पादने आणि उत्पादन पद्धती सतत जुन्या उत्पादनांची जागा घेतात […] The post २ अमेरिकन व एका ब्रिटिश प्राध्यापकास अर्थशास्त्रातील नोबेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:53 pm

पीएफ मधून आता १०० टक्के रक्कम काढता येणार

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या(ईपीएफओ) सदस्यांना आता त्यांच्या खात्यातील १०० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ईपीएफओच्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसंच विशेष परिस्थितीत रक्कम काढताना कारण सांगण्याची […] The post पीएफ मधून आता १०० टक्के रक्कम काढता येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:49 pm

80:20 नियम रद्द करण्यासाठी मेल नर्सेस समितीचा मोर्चा:पुरुष परिचारकांना 20% संधी; छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

छत्रपती संभाजीनगर: परिचारिका सेवा प्रवेश नियमातील ८०:२० टक्के आरक्षणाच्या विरोधात मेल नर्सेस बचाव समितीने छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढला. क्रांती चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चात समितीने हा नियम रद्द करण्याची मागणी केली. या नियमानुसार पुरुष परिचारकांना केवळ २० टक्के संधी मिळत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या ८०:२० नियमामुळे नर्सिंग व्यवसायात पुरुष उमेदवारांसाठी संधी कमी होते. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ ते १७ आणि २१ नुसार समानता, भेदभावास मनाई आणि संधीची समानता याची हमी दिली जाते. मात्र, हा नियम या तरतुदींच्या विरोधात असल्याने हजारो पुरुष नर्सिंग उमेदवारांना सरकारी सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया गुणवत्तापूर्ण असावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. वैद्यकीय संचालनालयाने ११ जून २०२५ रोजी हा नियम लागू केला आहे. या नियमामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी असून, त्याविरोधात सातत्याने आंदोलने केली जात आहेत. यावेळी समितीने ८०:२० हा नियम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. तसेच, संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि संवैधानिक पद्धतीने राबवण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली. मोर्चादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यात पुरुष आणि महिला परिचारिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 11:44 pm

‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान बंद नाही!:तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू; 2025-26 साठी 86.63 कोटींची तरतूद

'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानाला गेल्या दोन वर्षांत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे अभियान बंद झाल्याच्या माध्यमांतील वृत्तांवर शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे की, हे अभियान थांबलेले नाही. या अभियानाचा तिसरा टप्पा २०२५-२६ या वर्षाकरिता राबवण्याची तयारी सुरू आहे. या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात ८६.६३ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली असून, अभियानाच्या निकषांमध्ये सुधारणा करून ते नवीन उपक्रमांसह राज्यात राबवले जाईल. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त (शिक्षण) यांच्यामार्फत सुधारित निकषांसह अभियान राबवण्याचा सविस्तर प्रस्ताव २९ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाला प्राप्त झाला आहे. या प्रस्तावावर सध्या शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने' अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत ९५% शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले होते, ज्यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली होती. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानाचा तिसरा टप्पा २०२५-२६ या वर्षासाठी राबवण्याकरिता आयुक्त (शिक्षण) यांच्यामार्फत सुधारित निकषांसह सविस्तर प्रस्ताव २९ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम नवीन उपक्रमांसह लवकरच संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे राज्यातील शाळांच्या गुणवत्तेला आणखी प्रोत्साहन मिळेल. या अभियानाचा पहिला टप्पा शालेय शिक्षण विभागाने ३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने' अंतर्गत १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबवला होता. राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू असलेल्या या अभियानाला विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या अभियानात ९५ टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, तसेच यातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली होती. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानाचा दुसरा टप्पा २६ जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये २९ जुलै २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत काही नवीन उपक्रमांसह यशस्वीरित्या राबविण्यात आला. या अभियानाला २०२३-२४ च्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळाला, ज्यानंतर १८ नोव्हेंबर २०२४ व ९ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार ७३.८२ कोटी रुपयांची पारितोषिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. आता २०२५-२६ या वर्षाकरिता या अभियानाचा तिसरा टप्पा राबवण्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून, हे अभियान नवीन उपक्रमांसह लवकरच राज्यभर सुरू होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 11:42 pm

वंजा-यांचे २ टक्के आरक्षण काढा म्हणणा-यांना टक्क्यामध्येही ठेवणार नाही

अहिल्यानगर : हैदराबाद गॅझेटनुसार इतरांना फायदा मिळत असेल, त्यातील एका-एका शब्दाचा फायदा मिळत असेल तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळावा अशी मागमी माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली. वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण काढा म्हणणा-यांना टक्क्यामध्येही ठेवणार नाही असा इशाराही त्यांनी मनोज जरांगे यांचे नाव न घेता दिला. अहिल्यानगरमध्ये पार्थडी शेवगावात […] The post वंजा-यांचे २ टक्के आरक्षण काढा म्हणणा-यांना टक्क्यामध्येही ठेवणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:26 pm

अत्याधुनिक ओसीटी हृदय उपचार पध्दती यशस्वीपणे पडली पार

लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयामध्ये ओसीटी (ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी) मार्गदर्शित क्रिटिकल एलएडी अँजिओप्लास्टीचा प्रकार ही एक अत्याधुनिक हृदय उपचार पद्धत प्रथमच यशस्वीपणे पार पडली आहे, ज्यामुळे मराठवाड्यात हृदयरोग उपचार क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला आहे. यावेळी संस्थेचे अधिष्ठाता, डॉ. उदय मोहिते, उपअधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. सुनिल होळीकर, डॉ. निलिमा देशपांडे, […] The post अत्याधुनिक ओसीटी हृदय उपचार पध्दती यशस्वीपणे पडली पार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:10 pm

सर्वसाधारण पुरुषास मिळणार सभापती पदाची संधी

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून जि.प. गट, पंचायत समिती गण सदस्य पदांसह सभापतीपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या सोडतीत सभापती पद सर्वसाधारण (पुरुष) प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. तालुक्यातील येरोळ, साकोळ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय लातूर तर येरोळ, हिप्पळगाव, साकोळ, […] The post सर्वसाधारण पुरुषास मिळणार सभापती पदाची संधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:08 pm

अहमपदूर पंचायतीत महिला-पुरुषांना समान संधी

अहमदपूर : प्रतिनिधी या तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, यावेळी १२ गणांपैकी ६ जागा महिलांसाठी आणि ६ जागा पुरुष उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पंचायत समिती ही तालुकास्तरावरील स्थानिक स्वराज्य संस्था असून, ग्रामपंचायती व जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा म्हणून ती कार्य करते. समिती सदस्य गावक-यांच्या समस्या, विकास कामे, शासकीय […] The post अहमपदूर पंचायतीत महिला-पुरुषांना समान संधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:07 pm

निलंगा तालुक्यात १० पुरुष, १० महिलांना संधी मिळणार 

निलंगा : प्रतिनिधी निलंगा तालुक्यातील पंचायत समितीच्या वीस गणांचे आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. अनुसूचित जातीसाठी चार, यात दोन महिला, अनुसूचित जमातीसाठी केवळ एक महिला आरक्षण, ना. मा. प्रवर्गासाठी पाच जागा असून यात तीन महिलांना संधी मिळणार आहे. तसेच सर्वसाधारण दहा जागांवर आरक्षण असून यातील चार जागांवर महिलांची वर्णी लागणार आहे. एकूण वीस पैकी दहा […] The post निलंगा तालुक्यात १० पुरुष, १० महिलांना संधी मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:05 pm

वेळेच्या एक तास आधिच उरकली लातूर तालुक्याची आरक्षण सोडत

लातूर : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रीया तीन वर्षाच्या नंतर मार्गी लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालायाने रितसर सर्व पंचायत समिती सदस्य गण आरक्षण सोडत सकाळी ११ वाजता घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र लातूर तहसिल कार्यालयाने या वेळेत बदल करत ती वेळ दुपारी १२ वाजता केल्याचे जाहिर केले होते. मात्र सोमवारी प्रत्यक्षात आरक्षण सोडत ही […] The post वेळेच्या एक तास आधिच उरकली लातूर तालुक्याची आरक्षण सोडत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 11:04 pm

आयएएस पत्नीचा पोलिसांना जोरदार दणका

चंदिगड : हरियाणातील पोलिस महानिरीक्षक वाय. पूरन कुमार यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेक वरिष्ठ अधिका-यांची नावे घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यानुसार त्यांच्या पत्नी आयएएस अमनीत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. पण अमनीत यांनी त्यावर आक्षेप घेत एक महत्वपूर्ण कलम वाढविण्याची मागणी केली होती. अखेर […] The post आयएएस पत्नीचा पोलिसांना जोरदार दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 10:47 pm

अभाविप पुणे कार्यालयावर हल्ला, टाळे ठोकण्याचा प्रयत्न:मनविसेच्या कार्यकर्त्यांकडून राजकीय स्टंटबाजीचा अभाविपने केला निषेध

पुण्यातील टिळक रस्ता येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. वाडिया महाविद्यालयाबाहेर लावलेल्या विविध फलकांवरून सुरू झालेल्या वादामुळे हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या राजकीय स्टंटबाजीचा अभाविपने तीव्र निषेध केला आहे. अभाविप पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हाणकर यांनी सांगितले की, मनविसे स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असे प्रयत्न करत आहे.बाहेगव्हाणकर यांच्या मते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य महाराष्ट्रभर आणि देशभरात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ज्ञात आहे. पुण्यामध्ये ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अभाविपची अधिकृत सदस्यता स्वीकारली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयीन परिसरात कोणतीही समस्या उद्भवल्यास अभाविपचे कार्यकर्ते नेहमीच ती सोडवण्यासाठी कटिबद्ध असतात. मात्र, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी संघर्ष करणाऱ्या पक्षांनी चर्चेत राहण्यासाठी स्टंटबाजी करत अभाविप कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत मनविसेच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. या संपूर्ण प्रकरणात महाविद्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी अभाविपने केली आहे. ज्यांनी हे पोस्टर लावले त्यांच्यासह अभाविप कार्यालयात घुसखोरी करून हल्ला करू पाहणाऱ्या मनविसेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. राधेय बाहेगव्हाणकर पुढे म्हणाले, आमची संघटना मोठी करण्यासाठी आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत. इतरांची रेषा खोडण्याऐवजी आम्ही स्वतःची रेषा मोठी करणारे कार्यकर्ते आहोत. महाविद्यालयाबाहेर असलेल्या फलकांशी आमचा काडीमात्र संबंध नाही. अभाविप ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांची हक्काची विद्यार्थी संघटना आहे. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाशी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवावी लागते, यातूनच सर्वकाही सिद्ध होते, असेही त्यांनी नमूद केले. मनविसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या हल्ल्याचा आम्ही धिक्कार करतो आणि पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 10:35 pm

पं. स. सभापती पद आणि जि. प. सदस्यांचे आरक्षण जाहीर

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्ह्यातील […] The post पं. स. सभापती पद आणि जि. प. सदस्यांचे आरक्षण जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 10:26 pm

ईतवारी एक्स्प्रेसमध्ये सोन्याचे घबाड

नागपूर : ट्रेनमधून सोन्याचांदीच्या तस्करीचा डाव उधळून लावत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने साडेतीन कोटींचे सोन्याचांदीचे दागिने ताब्यात घेतले. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे सोन्या-चांदीची तस्करी करणा-यांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दपूम रेल्वेच्या सुरक्षा दलाचे आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी विशेष पथके नियुक्त करून प्रत्येक कोचची कसून तपासणी करण्याचे आदेश जारी केले होते. […] The post ईतवारी एक्स्प्रेसमध्ये सोन्याचे घबाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 10:21 pm

महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण धुळ्यात आढळला:सौदी अरेबियाहून आलेल्या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; आरोग्य प्रशासन सतर्क

जगात थैमान घालत असलेल्या मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात धुळे शहरात आढळून आला आहे. रुग्णाचे दोन्ही अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे आणि हिरे रुग्णालय प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने या रुग्णाला तातडीने स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करण्यासाठी महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ सूचित करण्यात आले आहे. हा मंकीपॉक्स बाधित रुग्ण 2 ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. तो गेली चार वर्षे सौदी अरेबियामध्ये राहत होता आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी धुळ्यात आला होता. मात्र, येथे आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी त्याने हिरे रुग्णालयात तपासणी केली, ज्यात त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सौदी अरेबियातून आलेल्या या रुग्णाने हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला. डॉक्टरांना तपासणीदरम्यान मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यामुळे महानगरपालिकेच्या पथकाने तातडीने रुग्णाचे रक्त नमुने घेतले. हे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवण्यात आले, जिथे त्याचा मंकीपॉक्सचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तरीही, शंकेचे पूर्ण निरसन करण्यासाठी डॉक्टरांनी त्याचे रक्त नमुने पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवले होते. महाराष्ट्रातील पहिलाच रुग्ण धुळ्यात आढळून आलेला मंकीपॉक्सचा रुग्ण हा महाराष्ट्रातील पहिलीच केस असून, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने यावर शिक्कामोर्तब केले आहे. मंकीपॉक्सच्या दोन प्रकारच्या व्हेरियंटपैकी, या रुग्णामध्ये क्लायड-I हा दुर्मिळ आणि अधिक संसर्गजन्य प्रकार आढळला आहे, ज्याचे भारतात आतापर्यंत केवळ 35 रुग्ण आढळले आहेत. या रुग्णाला मधुमेह असल्याने त्याला बरे होण्यासाठी थोडा अधिक वेळ लागत आहे. हा संसर्गजन्य आजार पसरू नये यासाठी, रुग्णालय प्रशासनाने तातडीने महापालिका व जिल्हाधिकारी यांना आवश्यक खबरदारी घेण्यासंबंधी सूचित केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 9:15 pm

जपानमध्ये इन्फ्लूएंझा महामारी जाहीर; ४ हजार रुग्ण दाखल

टोकियो : वृत्तसंस्था जपानने देशभरात इन्फ्लूएंझा महामारी जाहीर केली आहे. खरं तर, देशात फ्लूच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात ४,००० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि अनेक ठिकाणी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना खबरदारी म्हणून लवकरात लवकर लसीकरण […] The post जपानमध्ये इन्फ्लूएंझा महामारी जाहीर; ४ हजार रुग्ण दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:52 pm

कोल्हापूरचा ‘हर्षद मेहता’ राजू नेर्लेकर अखेर जेरबंद

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूरचा हर्षद मेहता अर्थात राजू नेर्लेकरच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. कोल्हापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत गेल्या दोन वर्षापासून चकवा देणा-या राजू नेर्लेकरला अटक केली. गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवत कोल्हापूरसह दक्षिण भारतात अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा राजू नेर्लेकरने घातला आहे. गेल्या दोन वर्षापासून तो कोल्हापूर पोलिसांना चकवा देत होता. राजूने […] The post कोल्हापूरचा ‘हर्षद मेहता’ राजू नेर्लेकर अखेर जेरबंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:51 pm

सोने अ‍ॅमेझॉनच्या मुळावर; १ लाख ४० हजार हेक्टर वर्षावनाची तोड

लिमा (पेरू) : वृत्तसंस्था सोन्याच्या विक्रमी दरवाढीचा फटका पेरूव्हियन ऍमेझॉनच्या जंगलास बसला आहे. सोन्याच्या किमतींचा फायदा घेण्यासाठी गुन्हेगारांच्या सशस्त्र टोळ्यांनी पेरूव्हियन ऍमेझॉनच्या जंगलात घुसखोरी करुन अवैधरित्या सोने खाणकाम केल्याने आतापर्यंत १,४०,००० हेक्टर वर्षावन (रेनफॉरेस्ट) तोडले गेले आहे. ‘मॉनेटरिंग ऑफ द अँडियन मेझॉन प्रोजेक्ट’ आणि त्यांची पेरूव्हियन भागीदार संस्था कंझर्व्हेशन मेझॉनिका यांनी एका अहवालाद्वारे हे निष्कर्ष […] The post सोने अ‍ॅमेझॉनच्या मुळावर; १ लाख ४० हजार हेक्टर वर्षावनाची तोड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:50 pm

अमेरिकेच्या महाकाय कर्जाचे जगावर संकट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची वाढती कर्जबाजारी जागतिक आर्थिक अस्थिरतेला निमंत्रण देऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. चीनसारख्या मोठ्या कर्जदार देशांनी अमेरिकन कर्जरोख्यांमधून (ट्रेझरी बाँड्स) आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे. यामुळे डॉलरच्या जागतिक वर्चस्वाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली असून आंतरराष्ट्रीय […] The post अमेरिकेच्या महाकाय कर्जाचे जगावर संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:47 pm

महिला अधिका-याची ‘हवाला’ डील फसली! पोलीसांनीच हडपले दीड कोटी; १० जण निलंबित

सिवनी (मध्यप्रदेश) : वृत्तसंस्था मध्य प्रदेशात पोलिसांच्या एका मोठ्या गैरकारभाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. सिवनी जिल्ह्यात हवाल्याचे पैसे जप्त केल्यावर, पोलिसांनीच त्यातील मोठा हिस्सा आपसात वाटून घेतला. गाडीत सापडलेल्या एकूण २.९६ कोटी रुपयांच्या रकमेपैकी सुमारे १.४५ कोटी रुपये गायब झाले. या चोरीच्या आणि गैरव्यवहाराच्या आरोपाखाली पूजा पांडे या वरिष्ठ महिला अधिका-यासह एकूण १० पोलीस […] The post महिला अधिका-याची ‘हवाला’ डील फसली! पोलीसांनीच हडपले दीड कोटी; १० जण निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:45 pm

कर्नाटकामध्ये संघावर बंदी घालण्याची तयारी? 

बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटकात आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक यांनी सिद्धरामय्या सरकारला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आणि देशाच्या एकता आणि अखंडतेला धोका निर्माण करण्यासाठी तरुणांना आणि मुलांना भडकवण्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आता कर्नाटक सरकार ऍक्शन मोडवर आले आहे. मुख्यमंत्री […] The post कर्नाटकामध्ये संघावर बंदी घालण्याची तयारी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:43 pm

ठाण्यात शिवसेना-मनसेचा मोर्चा:भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्तांची भेट, भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईची केली मागणी

ठाणे शहरात आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या वतीने विविध मुद्यांवरून भव्य मोर्चा काढण्यात आला. ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या वाढत्या प्रकरणांची चौकशी व्हावी, हा या मोर्चाचा मुख्य मुद्दा होता. या मोर्चातील शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, वातावरण चांगलेच तापले होते. शिष्टमंडळाने थेट महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन, अधिकारी सचिन बोरसे हे भ्रष्टाचारी असल्याचा थेट आरोप केला आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी अधिकारी सचिन बोरसे यांची बदली करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. या भेटीदरम्यान मनसे नेते अविनाश जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या उपस्थितीला तीव्र विरोध केला. माळवी हे जाधव यांना आयुक्तांच्या केबिनमध्ये घेऊन जात असताना, तुम्ही असाल तर आम्ही आत जाणार नाही, असे म्हणत अविनाश जाधव यांनी ठाम भूमिका घेतली, ज्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी बोलताना मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले, ठाणे म्हणजे बजबज पुरी. भाजप आमदार संजय केळकर देखील आवाज उचलत आहेत. टेंडर निघत आहे मात्र मिली भगत आहे. कमकुवत राजकारण झाले आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे फोटो लावायचे, मात्र भ्रष्टाचार सुरू आहे. भिवंडी नाशिक रोडवर वाहतूक कोंडी का होते. ब्रीजचे काम अर्धवट आहे. टेंडर काढत असताना पहिले पैसे बघतात. आम्हाला पालिका वाचवायची आहे. यासाठी ठाणेकरांना एकत्र यावे लागणार, असे आवाहन त्यांनी केले. हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे- जितेंद्र आव्हाड यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. ते म्हणाले, सर्व एकत्र कसे आले, दरोडेखोरांना पकडायला जसे गाव एकत्र येते तसे आम्ही एकत्र आलो. या ठाण्यात गब्बर सिंग कोण? चुकलेल्या धोरणामुळे ठाण्याची वाट लावली आहे. ठाण्यात म्हाडाच्या इमारतींमध्ये कोण राहत आहे? प्रकल्प बाधित लोकांना घरे नाहीत. संजय केळकर प्रामाणिक माणूस आहे. सत्तेत बसून कसे मोर्चे काढत आहे. मुख्यमंत्री यांना ठाण्यात लक्ष घालायचे नाही. आम्हाला ठाणेकरांच्या हितासाठी महापालिका वाचवावी लागेल. आता हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 8:41 pm

मुंबईसह इतर महापालिका स्वबळावर लढवाव्यात

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी म्हणून लढवण्याची इच्छा काही नेत्यांनी दर्शवली असली तरी, काँग्रेसमध्ये मात्र कार्यकर्त्यांकडून स्वबळाचा आग्रह धरला जात आहे. मुंबई महापालिका तसेच महाराष्ट्रात इतर ठिकाणीही स्वबळावर लढावे अशीच काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची भावना असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही स्पष्ट केले. मनसेला सोबत घेण्याची कोणतीही […] The post मुंबईसह इतर महापालिका स्वबळावर लढवाव्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:27 pm

परभणी जि. प. आरक्षण सोडत जाहीर

परभणी : परभणी जिल्हा परिषद अंतर्गत ५४ गटनिहाय आरक्षण सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीने कहीं खुशी कहीं गम असे चित्र पहावयास मिळाले. यापुर्वी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. परंतू सद्यस्थितीत राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते महायुतीत दाखल झाले आहेत. त्यामुळे भविष्यात जि. प. चे सूत्र […] The post परभणी जि. प. आरक्षण सोडत जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:17 pm

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर:12 वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून, तर 10 वीची परीक्षा 20 पासून; वाचा सविस्तर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या फेब्रु-मार्च 2026 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी आणि अभ्यासक्रमाचे योग्य नियोजन करता यावे, या हेतूने मंडळाने यंदाही परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, राज्यभरातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जातील. लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी मंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, बारावी बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होईल. यामध्ये माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षांचा समावेश असेल. दुसरीकडे, दहावी बोर्डाची लेखी परीक्षा शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, 18 मार्च 2026 या दरम्यान घेण्यात येईल. लेखी परीक्षांच्या आधी, बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी 2026 ते 09 फेब्रुवारी 2026 या दरम्यान होतील. तर, दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 02 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येतील. शिक्षण मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने हे वेळापत्रक जारी करण्यात आले असून, या परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक लवकरच मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागण्याचे आवाहन एकदा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर शिक्षकांनाही शालेय पातळीवर आपले नियोजन करता येते. अभ्यासक्रम कसा शिकवायचा? त्यासाठीची तयारी काय असायला हवी? विद्यार्थ्यांच्या सराव चाचण्या कशा आणि कधी घ्यायच्या? याचे शाळांना नियोजन करणे सोपे होते. त्यामुळेदेखील या सर्व बाबींचा विचार करूनच इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाते. आता विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 8:16 pm

राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेण्यास अनुकूल

मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याबाबत ठाकरे बंधूंमध्ये एकवाक्यता दिसत असली तरी मनसेला महाविकास आघाडीत असणार की नाही याबाबत अजूनही स्पष्टता नसताना खा. संजय राऊत यांनी आज स्वत: राज ठाकरे हे महाविकास आघाडीतील एक मोठा घटक असलेल्या काँग्रेसला सोबत घेण्यास अनुकूल असल्याचे वक्तव्य केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. राऊत यांच्या वक्तव्याबाबत मनसेने तीव्र […] The post राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेण्यास अनुकूल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:16 pm

बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २६ मध्ये घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षांच्या तारखांचे प्रकटन जारी करण्यात आले आहे. इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २६ पर्यंत चालणार आहे, तर इयत्ता १० वीची लेखी […] The post बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 8:04 pm

एसटी कर्मचा-यांना ६ हजार रुपये बोनस

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तथा एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी आणि अधिका-यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केला. तसेच कर्मचा-यांच्या वेतन वाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला सरकारकडून ६५ कोटी रुपये देण्याचे आणि पात्र कर्मचा-यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ […] The post एसटी कर्मचा-यांना ६ हजार रुपये बोनस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:59 pm

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!:कर्मचाऱ्यांना 6 हजार रुपये सानुग्रह अनुदान, 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार

राज्यभरातील 85 हजार पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 6 हजार रुपयांची दिवाळी भेट अर्थात सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम 12500 रुपयांची सण उचल देखील मिळणार आहे. इतकेच नव्हे तर वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर अनेक प्रलंबित मागण्यांसाठी 'चक्का जाम' आंदोलनाची घोषणा केली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता होती. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना 6000 रुपये दिवाळी भेट आणि 12,500 रुपयांची उचल देण्याचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर कर्मचाऱ्यांच्या वेतनातील फरक म्हणून सरासरी 7,500 रुपयांचा वेतनवाढ फरक हप्ता दर महिन्याला देण्याचेही मान्य करण्यात आले आहे. या निर्णयासाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देणार असून, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला स्थगिती एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील 16 संघटना आणि महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनांनी सोमवार, 13 ऑक्टोबर 2025 पासून चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत बहुतांशी मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, संघटनांनी 13 ऑक्टोबरच्या रात्रीपासून सुरू होणारे चक्का जाम आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत? 2018 पासून एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक देण्यात आलेला नाही. सन 2020 ते 2024 या कालावधीतील वेतनवाढ फरकाची रक्कम थकीत आहे. याशिवाय इतर अनेक रक्कमा थकीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची एकूण 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत रक्कम मिळालेली नाहीत. थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी एक वेळचा पर्याय म्हणून सरकारने ही रक्कम एसटीला दिली पाहिजे, अशी मागणीही कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 7:51 pm

एकत्र लढण्याबाबत आठवडाभरात महाविकास आघाडीचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. उद्या आघाडीच्या नेत्यांची बैठक होईल आणि येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत धोरण ठरवले जाईल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणान ५० […] The post एकत्र लढण्याबाबत आठवडाभरात महाविकास आघाडीचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:49 pm

अजित पवारांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास

पुणे : राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिक्षणावरून सध्या जोरदार वाद सुरु झाला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवरून बोचरी टीका केली. अजित पवार दहावी पास असून त्यांना अर्थकारण खरंच कळते का? असा सवाल अंजली दमानियांनी केला होता. […] The post अजित पवारांचा इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:38 pm

कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली : सुमारे साडे पाच वर्षांपूर्वी कोविड-१९ च्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. या विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगात लॉकडाऊन करावे लागले होते. दरम्यान कोरोनाच्या विषाणूंमुळे नर उंदरांच्या शुक्राणूंमध्ये बदल होत असल्याची आणि त्यामुळे त्यांच्या पुढील अपत्यांमध्ये चिंता वाढल्याची माहिती नव्या अध्ययनामधून समोर आली आहे. ही बाब कोरोनामुळे निर्माण झालेली दीर्घकाळापर्यंत चालणारी समस्या असू शकते. […] The post कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये मोठा बदल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:35 pm

भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे मालक

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीमध्ये झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे भारतीय कुटुंबांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य ३.८ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. हे देशाच्या जीडीपीच्या अर्थात एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या जवळपास ८८.८ टक्के इतके आहे. मॉर्गन स्टॅनलीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात याबद्दलची आकडेवारी मांडण्यात आली आहे. मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात म्हटले आहे की, सोन्याच्या मालकीमधून मिळणारा संपत्तीचे मूल्य […] The post भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे मालक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:33 pm

२३ मुलांचे बळी घेणा-या श्रेसन फार्माचा परवाना रद्द

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात २३ हून अधिक निष्पाप मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरप प्रकरणात आता कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी तामिळनाडूतील श्रेसन फार्मास्युटिकल्स कंपनीशी संबंधित मालमत्ता आणि चेन्नईतील सरकारी अधिका-यांच्या सात ठिकाणांवर छापे टाकले. तर तामिळनाडू सरकारने कंपनीचा कोल्ड्रिफ कफ सिरप तयार करण्याचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. […] The post २३ मुलांचे बळी घेणा-या श्रेसन फार्माचा परवाना रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:30 pm

पुण्याला 1000 ई-बसेस मिळण्याच्या प्रक्रियेला गती:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अवजड उद्योगमंत्र्यांशी चर्चा केली

पुणे शहरासाठी आवश्यक असणाऱ्या 1000 ई-बसेसच्या विषयासंदर्भात सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत सविस्तर चर्चा केली. 1000 बसेसच्या मागणीसंदर्भातील पीएमपीएमएलकडून अपेक्षित असणारा प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे दाखल झाला असून याबाबत पुढील प्रक्रिया वेगाने करण्यासंदर्भात कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्यावरण पुरक भक्कम करण्याच्या दृष्टीने एकीकडे मेट्रो मार्गांचा आपण विस्तारत करत असताना दुसरीकडे पीएमपीएमएलचे सक्षमीकरण हादेखील आपला प्रमुख अजेंडा आहे. या दृष्टीने या बसेससाठी आवश्यक असणारे पत्र राज्य सरकारने रिझर्व बँकेला प्रस्ताव पाठवावा, याबाबत नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली होती. या भेटीनंतर तातडीने तसा प्रस्ताव रिझर्व बँकेला राज्य सरकारकडून पाठवण्यात आले असून या प्रक्रियेचा पुढील भाग म्हणून पीएमपीएमएलकडून अधिकृत प्रस्ताव केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे. पुणे शहराला 1000 बसेस मिळण्याच्या दृष्टीने असणाऱ्या प्रक्रियेला आता गती आली असून ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने करण्याचा प्रयत्न आहे. या चर्चेवेळी कुमारस्वामी यांनी आपल्या प्रस्तावावर सकारात्मकता दर्शवत पुढील प्रक्रियेसंदर्भात सूचित केले आहे.त्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक लवकरच पर्यावरणपूरक आणि सक्षम होईल.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 7:29 pm

आर आर काबेलतर्फे इलेक्ट्रिशियनच्या मुलांसाठी १ कोटीची शिष्यवृत्ती:पुण्यातील 81 विद्यार्थ्यांसह देशभरातील 1 हजार मुलांना लाभ

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या 'काबेल स्टार शिष्यवृत्ती कार्यक्रम २०२५' मध्ये आर आर काबेलतर्फे इलेक्ट्रिशियनच्या ८१ मुलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. हा कार्यक्रम सीओईपी होस्टेलसमोरील फिरोदिया सभागृहात आयोजित करण्यात आला होता. दहावीची परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करणाऱ्या इलेक्ट्रिशियनच्या मुलांसाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येतो. मेहनती आणि हुशार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन व पाठबळ देण्यासाठी आर आर काबेल दरवर्षी १ कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करते. आतापर्यंत देशभरातील सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. या हुशार मुलांनी केवळ आर्थिक मदतच मिळवली नाही, तर त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यांच्या पुढील शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.आर आर ग्लोबलच्या संचालिका कीर्ती काबरा यांनी यावेळी सांगितले की, आमचे 'काबेल दोस्त' व्यवसायात नेहमीच भागीदारापेक्षा जास्त आहेत. ते आमच्या प्रवासाचा पाया आहेत. काबेल स्टार शिष्यवृत्तीमुळे आम्ही केवळ आर्थिक मदत देत नाही, तर पिढ्यांचे जीवन बदलतो. सन २०२२ मध्ये इलेक्ट्रिशियनच्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी 'काबेल स्टार शिष्यवृत्ती' हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या इलेक्ट्रिशियनना प्रेमाने 'काबेलदोस्त' म्हणून ओळखले जाते. हा उपक्रम सुरू झाल्यापासूनच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे, कारण यामुळे देशभरातील पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवली जात आहे. गेल्या काही वर्षांत या कार्यक्रमाचा विस्तार आणि महत्त्व दोन्ही वाढले असून, दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 7:28 pm

मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि भाजपावर मतचोरीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. राहुल गांधींच्या आरोपांमुळे देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. दरम्यान, या […] The post मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:28 pm

राज्य पातळीवर बोलत असताना जातिवाचक बोलू नका:शरद पवारांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सूचना, संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाचा केला निषेध

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवारांनी जाहीर केले आहे. तसेच यावेळी धर्मनिरपेक्षता जपण्याचे आवाहनही शरद पवारांनी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. बैठकीत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला आहे. ते म्हणाले, पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जाती-जातीत तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. जातीय सलोखा ठेवा, स्थानिक पातळीवर, राज्य पातळीवर बोलत असताना जातिवाचक बोलू नका, बोलताना प्रेमाची भाषा वापरा, आपण करत असलेल्या विधानामुळे जातोय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राजकारणात जाती धर्मावर राजकारण करण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. लोकांच्या लोकप्रियतेपेक्षा ते जास्त महत्वाचे आहे. वाचाळवीर वाढले आहेत, दुदैव आहे कोणी कोणाकडून काय खरेदी करावे यावर सरकार गप्प बसते? सरकारचा त्याला पाठिंबा आहे का? दरी निर्माण केली जात असल्याचे देखील पवार म्हणाले. राजकारणात तरुणांना संधी राजकारणात तरुणांना संधी देण्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, जास्तीत जास्त तरुणांना संधी कशा प्रकारे देता येतील यासाठी प्रयत्न करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आगामी काळात कशा प्रकारे युती करायची याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक पार पडणार असल्याची देखील माहिती बैठकीत देण्यात आली. येत्या आठवडाभरात स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत निर्णय करा, अशा सूचनाही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आपल्याकडे इच्छुकांची संख्या खूप आहे, काम करणाऱ्यांची संख्या खूप आहे. आज अल्पसंख्यांक समाजाचा निर्णय घेतला असेच युवक आणि युवतींचा निर्णय होणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले. अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकारकडून तुटपुंजी मदत महाराष्ट्रातील अतिवृष्टीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, अतिवृष्टी संदर्भात राज्य सरकार जी मदत करत आहे, ती तुटपुंजी आहे. केंद्रीय पथकाने येऊन पाहणी केली पाहिजे होती. आमच्या वेळेस केंद्रीय पथक येऊन पाहणी करून भरगोस मदत देत होते. नरसिंह राव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा ते राज्यात अतिवृष्टीच्या पाहण्यासाठी येणार होते. पण, तेव्हा मीच त्यांना पाहण्यासाठी येऊ नका असे म्हटले. कारण, शासकीय यंत्रणा तुमच्या दौऱ्यासाठी लागेल, त्यामुळे मदतही होणार नाही, असेही शरद पवार म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 7:26 pm

अशा पत्रांकडे ढुंकूनही पाहत नाही

बंगळूरू : कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून एक मोठा राजकीय वाद निर्माण झाला. राज्याचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी जागेत आरएसएसच्या कार्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. प्रियांक खरगेंच्या मागणीवरुन भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रियांक खरगेंचे वक्तव्य हे […] The post अशा पत्रांकडे ढुंकूनही पाहत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 7:23 pm

कफ सिरपमुळे 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!:यवतमाळमधील धक्कादायक घटना, संबंधित औषधांची विक्री व वितरण थांबवण्याचे शासनाचे आदेश

सध्या लहान मुलांच्या खोकल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कफ सिरप औषधांबद्दल देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मध्य प्रदेशमध्ये हे औषध घेतल्यानंतर अनेक मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने दोन वर्षांखालील लहान मुलांना हे औषध न देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीही, या औषधांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. याच प्रकारची एक संशयास्पद घटना आता यवतमाळमध्येही उघडकीस आली आहे. येथे एका सहा वर्षांच्या मुलाला खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने कफ सिरप देण्यात आले होते. सुरुवातीला त्याची प्रकृती सुधारल्यासारखी वाटली, मात्र नंतर त्याचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे, मुलाच्या मृत्यूमागे त्याला देण्यात आलेले औषध तर कारणीभूत नाही ना, अशी तीव्र शंका उपस्थित केली जात आहे. सरकारने या घटनेची त्वरित दखल घेतली असून, अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधित वैद्यकीय दुकानातून पाच औषधांचे नमुने जप्त केले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. नेमकी घटना काय? यवतमाळ येथील मृत 6 वर्षीय शिवमच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवमचे वडील सैन्यात असून बरेली येथे ते कर्तव्यावर आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने ते गावी आले असताना 4 ऑक्टोबर रोजी शिवमला ताप, सर्दी, खोकला झाला. त्याच्यावर यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचार सुरू केल्यावर त्याला दोन दिवस बरे वाटले. मात्र नंतर 6 तारखेला शिवमची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला पुन्हा त्याच खासगी रुग्णालयात नेले असता त्या रुग्णालयाने शासकीय रुग्णालयात जाण्यास सांगितले. शासकीय रुग्णालयात नेले असता शिवमला मृत घोषित करण्यात आले. औषध सुरू असतानाच शिवम अचानक बेशुध्द शिवमला जेव्हा सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाला तेव्हा सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातून काही औषधी लिहून देण्यात आली होती. ती औषधी घेऊन देखील काही फरक पडत नव्हता. त्यामुळे दोन दिवसांनी शिवमला पुन्हा त्या दवाखान्यात दाखवले. यावेळी पुन्हा काही औषधी लिहून देण्यात आली. हे औषध सुरू असतानाच शिवम अचानक बेशुद्ध पडला. शिवम बेशुद्ध पडल्यावर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी तिथल्या डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात नेल्यावर शिवमला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. पाच औषधांचे नमुने तपासणीसाठी केले जप्त या घटनेनंतर अन्न व औषध प्रशान विभागाने संबंधित मेडिकलमधून पाच औषधांचे नमुने जप्त करत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून या औषधाचा वापर आणि वितरण थांबवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद काळेश्वरकर यांनी तशी माहिती दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 6:53 pm

इंजिनिअरला लाजवेल असा अजित दादांचा अभ्यास:रुपाली चाकणकरांचे ट्विट; अर्थशास्त्राचा अभ्यास असणे आवश्यक, दमानियांचा पुन्हा पलटवार

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या शिक्षणावरून टीका केली होती. रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, अजित पवार दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नसल्याची टीका दमानिया यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत अजित पवारांची बाजू मांडली. वडिलांच्या निधनामुळे अजित दादांना शिक्षण सोडावे लागले होते. यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून अतिशय संवेदनशील घटना असल्याचे चाकणकर यांनी म्हटले होते. यावरून आता अंजली दमानिया यांनी पुन्हा ट्विट करत यावर प्रत्युत्तर दिले आहे. रुपाली चाकणकर यांच्या ट्विटला उत्तर देताना अंजली दमानिया उपहासात्मक टीका करत म्हणाल्या, मग अजित पवारांनी कृषिमंत्री जरूर व्हावे. अर्थ मंत्रालय, हा खूप महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर आहे. यातील सगळ्या बाबी समजण्यासाठी अर्थशास्त्राचा अभ्यास, ज्ञान असणे आवश्यक आहे, अशी खोचक टीका दमानिया यांनी केली आहे. पुढे अंजली दमानिया म्हणाल्या, स्वित्झर्लंड हा देश 41285 चौ. किमी आहे आणि महाराष्ट्र 307713 चौ. किमी आहे, म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य हे स्वित्झर्लंड या देशाच्या तुलनेत 8 पट मोठे आहे. स्वित्झर्लंडची जीडीपी 83,33,000 कोटी आहे आणि महाराष्ट्राची 42,67,000 कोटी आहे, म्हणजे अर्ध्याने. महाराष्ट्रावर कर्ज आता 9,32,000 कोटी आहे. ते कसे कमी होणार? काही ब्ल्यू प्रिंट आहे का? असा प्रश्न देखील अंजली दमानिया यांनी चाकणकर यांना उद्देशून विचारला आहे. रुपाली चाकणकर नेमके काय म्हणाल्या? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर अजित पवारांची बाजू मांडताना म्हणाल्या, आदरणीय अजित दादा पवार यांच्या वडिलांचे हृदय विकाराने दुःखद निधन झाले. त्या वेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते. वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडले. त्यामुळे कोणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे. शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरूवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिके घेतली. मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला. गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनिअरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत. त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्रात एआय वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत. त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टिकोनामुळेच, असे ट्विट चाकणकर यांनी केले होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 6:20 pm

शेती हा केवळ व्यवसाय नाही तर आपल्या संस्कृतीचा श्वास:कृषी पदवीधरांनी शास्त्रीय शेतीचा आदर्श निर्माण करावा - कृषिमंत्री भरणे

कृषी पदवीधरांनी केवळ शासकीय नोकरीच्या मागे न लागता शास्त्रीय पद्धतीने शेती करून समाजात स्वतःचे उदाहरण निर्माण करावे, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. शेती हा केवळ व्यवसाय नसून आपल्या संस्कृतीचा श्वास आहे, तो जिवंत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. 'ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५' च्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुगाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, ॲग्रीकॉस दिवाळी अंक संपादक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी आणि कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कृषीमंत्री भरणे यांनी यावेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवरही भाष्य केले. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने आज राज्यभरातील शेतकरी खचला आहे. त्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी एकतीस हजार सहाशे कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी कृषी विभागामार्फत ५० हून अधिक नवीन योजना राबविण्यात येत आहेत. या संकटाच्या काळात कृषी पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. 'ॲग्रीकॉस दिवाळी अंक २०२५' हा ॲग्रीकॉस आणि विनोद या विषयावर आधारित असून, शेती, ग्रामीण जीवन, नवकल्पना आणि विनोदी लेखन यांचा समतोल साधणारा आहे. हा अंक शेतकऱ्यांचे अनुभव, संशोधन आणि तरुणांची कल्पकता यांचा उत्सव आहे. शेखर गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यातील कृषी पदवीधरांना एकत्र आणून त्यांच्या संघटन शक्तीचा सकारात्मक वापर केला आहे, असे भरणे म्हणाले. याच कार्यक्रमात कृषी पदवीधरांची पहिली राज्यस्तरीय पतसंस्था 'स्टेट ॲग्रीकॉस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी' या नावाने उभारण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 5:39 pm

धर्मांतर घोषणेचा पाया 'येवला मुक्ती भूमी', तर 'नागपूर' कळस:मंत्री भुजबळांचे प्रतिपादन; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यात केली होती धर्मांतराची घोषणा

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती. त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेनंतर तब्बल 21 वर्षांनी 13 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर घोषणेची प्रतिज्ञापूर्ती केली होती. त्यामुळे नागपूर हा धर्मांतराचा कळस तर येवला मुक्ती भूमी धर्मांतराचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला मुक्ती भूमी धर्मांतर घोषणा दिनाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मुक्ती भूमी येथे भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, भगिनाथ पगारे, संजय पगारे, दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सुभाष गांगुर्डे, मकरंद सोनवणे, समाधान पगारे, सौरभ जगताप यांच्यासह पदाधिकारी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुक्ती भूमी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, येवला मुक्ती भूमी या स्थळाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लाभल्यामुळे हे स्थान अतिमहत्वाचे तीर्थस्थळ बनलेले आहे. त्यामुळे या ऐतिहासिक मुक्ती भूमीमध्ये 30 कोटी रुपये निधी खर्च करून या स्थळाचा परिपूर्ण विकास करण्यात आलेला आहे. सदरील जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पहिल्या टप्प्यात विश्वभूषण स्तुपाचे 13 कोटी किंमतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तर टप्पा 2 अंतर्गत येवला मुक्ती भूमी स्मारक परिसरात अंतर्गत प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, वाचनालय, कर्मचारी निवासस्थान, भिक्खू निवासस्थानांचे बांधकाम, प्रशासकीय कार्यालय, भिक्खू पाठशाला, पाली व संस्कृत संशोधन केंद्र, ग्रंथालय खोली, आर्ट गॅलरी खोली, दृकश्राव्य खोली, संरक्षण भिंत, अॅम्पीथिएटर, लँडस्केपिंग, अतिथिगृह यासह विविध विकास कामे करण्यात येऊन स्मारकाचा विकास करण्यात आला आहे. यापुढील काळातही विविध विकास कामे करून मुक्ती भूमी स्थळाचा विकास करण्यास आपले प्राधान्य असणार आहे असे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 5:38 pm

आमचे 2% काढणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही:धनंजय मुंडे यांचा मनोज जरांगे यांना इशारा; वंजारी समाज ST मध्ये असल्याचा पुनरुच्चार

वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही टक्क्यातही ठेवणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या या इशाऱ्यामुळे मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेला वाद अधिकच चिघळण्याची भीती निर्माण झाली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी - शेवगाव येथे वंजारी समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काही तरुणांनी उपोषण सुरू केले होते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी या तरुणांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यावेळी तरुणांनी धनंजय मुंडे यांच्याशी बोलणे करून देण्याचा आग्रह धरला. त्यावर ढाकणे यांनी थेट धनंजय मुंडे यांना फोन लावला. त्यानंतर मुंडे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मनोज जरांगे यांना आमचे दोन टक्के काढून घेण्याची वल्गना करणाऱ्यांना टक्क्याही ठेवणार नाही असा इशारा दिला. आमचे 2 टक्के काढणाऱ्यांना टक्क्यातही ठेवणार नाही धनंजय मुंडे म्हणाले, हैदराबाद गॅझेटियर समोर आले नसते, तर आपण वंजारी समाज केवळ पाथर्डीमध्येच नाही तर, बऱ्याच ठिकाणी, इतर राज्यांतही एसटीएमध्ये आहोत हे कळलेच नसते. आम्हाला अगोदरच माहिती होते की, आपण एसटीमध्ये आहोत. कारण, परळी हे तेलंगणाच्या सीमेजवळ येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे होते तेव्हापासून सर्वांना माहिती आहे की, आपले अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत आणि आपण इकडे व्हीजेएनटीमध्ये आहोत. पण आता हैदराबाद गॅझेटियरनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर आम्हालाही एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटियरमधील एकेका शब्दाचा कुणाला फायदा होत असेल, तर तो आम्हाला देखील झाला पाहिजे. कारण, आपले 2 टक्क्यांमध्ये बरे चालले होते. पण आता काहीजण हे दोन टक्के काढण्याची भाषा करत आहेत. जे लोक अशी भाषा करत आहेत, त्यांना सांगतो आम्ही तुम्हाला टक्क्यातही ठेवणार नाही. आता आम्हाला अनुसूचित जमातीमध्येच आरक्षण हवे आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. सरकार वंजारी समाजाच्या पाठिशी धनंजय मुंडे यांनी यावेळी सरकार आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही देत उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली. सरकार आपल्यासोबत आहे. ते आपले काहीही नुकसान करणार नाही. सरकारवर विश्वास ठेवा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही पाथर्डीत येऊन तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांचा व सरकारचा मान ठेवून आपले उपोषण स्थगित करा, असे ते म्हणाले. दरम्यान, उल्लेखनीय बाब म्हणजे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी वंजारी समाजाचे 2 टक्के आरक्षण काढून घेण्याची मागणी केली होती.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 5:33 pm

मंत्री संजय शिरसाट यांचा पाय खोलात!:सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल, लोकायुक्तांनी मागवला अहवाल

मंत्री संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच सारे नियम धाब्यावर बसवून ब्रिटिशांना मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईत 16 एकर जमीन दिली. हा 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. बिवलकर कुटुंबाने मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केली होती. त्याच कुटुंबाच्या वारसांवर मंत्री संजय शिरसाट यांनी या कोट्यवधींचा जमिनीची खैरात उधळल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला होता. आता या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, सिडकोची 5000 कोटींची जमीन बिवलकर यांच्या घशात घातल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असून लोकायुक्तांनी नगरविकास विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव तसेच सिडकोचे एमडी, रायगड विभागाचे उप वनसंरक्षक यांच्याकडून अहवाल मागवला असल्याचे समजत आहे. सरकार अजून किती दिवस पांघरून घालणार? पुढे रोहित पवारांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या या महापराक्रमी घोटाळ्याची चौकशी लोकायुक्त करत आहेत, स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी सरकारला फटकारले आहे. पण तरी सुद्धा झोपलेल्या सरकारला जाग येत नाही. अजून किती दिवस पांघरून घालणार? सरकारने कितीही पांघरून घातले तरी आम्ही शिरसाट यांचा पर्दाफाश करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देऊच, असे आश्वासन देखील रोहित पवारांनी दिले आहे. नेमके प्रकरण काय? संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच सारे नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईत 15 एकर जमीन दिली. हा 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. मराठा साम्राज्याविरोधात ब्रिटिशांना मदत केल्याप्रकरणी नवी मुंबई परिसरातील सुमारे 4 हजार एकरहून अधिक जमीन ब्रिटिशांनी बिवलकर नावाच्या कुटुंबाला दिली होती. नंतरच्या विविध कायदे, नियम आणि निकालानुसार ही जमीन सरकारजमा झाली, परंतु वेगवेगळ्या प्रकारे गोलमाल करून ही जमीन परत मिळवण्याचा बिवलकर कुटुंबाने सातत्याने प्रयत्न केला. त्यालाही त्या-त्या टप्प्यावर नकार मिळाला, पण 16 सप्टेंबर 2024 रोजी संजय शिरसाट यांची सिडकोचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यांनी 19 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला. आचारसंहिता 15 ऑक्टोबरला लागली. त्याच्या 25 दिवस अगोदर हा पदभार स्वीकारला. शिरसाट यांना 15 ते 20 दिवस मिळाले. यामध्ये त्यांनी तीन बैठक घेतल्या. पहिल्याच बैठकीत बिवलकर कुटुंबाला जमीन देण्याचा निर्णय घेतला. बिवलकर कुटुंबाला 61000 sq mt जमीन दिली. या जमिनीचे मार्केट पोटेन्शीअल 5000 कोटी आहे. 8000 sq mt वर TRIPARTY agreement सुद्धा झाले. हा पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, असा आरोप रोहित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी केला होता.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 5:23 pm

‘बालविवाहमुक्त’महाराष्ट्र क्षितिजावर

महाराष्ट्रात बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली असून, मागील तीन वर्षांत मुलींच्या बाबतीत ७० टक्के आणि मुलांच्या बाबतीत ७६ टक्के घट झाल्याचे ‘टिपिंग पॉईंट टू झिरो: एव्हिडन्स टुवर्ड्स अ चाइल्ड मॅरेज फ्री इंडिया’ या नव्या अहवालातून समोर आले आहे. हा अहवाल जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, महाराष्ट्रात बालविवाहाची प्रमुख कारणे म्हणजे […] The post ‘बालविवाहमुक्त’महाराष्ट्र क्षितिजावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 5:15 pm

हिंगोलीत दिग्गज राजकारण्यांचे गट आरक्षित:मिनी मंत्रालयात येण्याचे स्वप्न भंगले, कळमनुरी तालुक्यात ११ पैकी नऊ गट आरक्षित

हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची आरक्षण सोडत सोमवारी ता. १३ जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यात अनेक दिग्गजांचे गट आरक्षित झाल्याने मिनी मंत्रालयात येण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. विशेष म्हणजे एकट्या कळमनुरी तालुक्यात ११ पैकी ९ जिल्हा परिषद गट आरक्षित झाले आहेत. हिंगोली येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, आनंदकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत झाली. यामध्ये लोकसंख्येच्या नुसार गट आरक्षित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यातून महिला व पुरुष उमेदवारांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांचा बाभूळगाव गट, सभापती संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर, संजय दराडे, बाळासाहेब मगर, माजी सभापती संजय बोंढारे, शामराव जगताप यांचे गट आरक्षित झाले आहेत. तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील सावंत, शेवाळा येथील माजी सरपंच अभय सावंत यांचा शेवाळा गट आरक्षित झाला आहे. या शिवाय माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनिष आखरे, आंबादास भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्या मालती कोरडे, माजी सदस्या यशोदा दराडे यांना मात्र यावेळी पुन्हा एकदा निवडणुक लढविण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे कळमनुरी तालुक्यातील ११ गटांपैकी केवळ जवळापांचाळ सर्व साधारणसाठी सुटला असून इतर सर्व गट आरक्षित जाले आहेत. दरम्यान, आजच्या आरक्षण सोडतीमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गम पहावयास मिळाला असून आता इच्छूकांनी सुरक्षित गटाचा शोध सुरु केला आहे. तर काही राजकिय मंडळींनी या आरक्षण सोडतीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी चालवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 4:36 pm

स्मशानातून प्रेताची हाडे, कवटी गायब!

जळगाव: प्रतिनिधी जळगाव शहरात मानवी संवेदनांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर मृतदेहाच्या अस्थीसह अंगावरील दागिने चोरीस जाण्याच्या घटना वाढू लागल्या असून, केवळ एका आठवड्यात दुस-या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पाच दिवसांपूर्वी मेहरूण स्मशानभूमीत छबाबाई पाटील या महिलेच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या अस्थी आणि मान-पायाजवळील दागिने गायब झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता […] The post स्मशानातून प्रेताची हाडे, कवटी गायब! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 4:32 pm

पुण्यात तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू:कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागात घडल्या घटना

पुणे शहरात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका मोटारचालकासह तिघांचा मृत्यू झाला आहे. कोंढवा, पुणे-सातारा रस्ता आणि हडपसर भागात या घटना घडल्या आहेत. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर एका मोटारचालकाचा अपघातात मृत्यू झाला. भरधाव रिक्षाने मोटारीला धडक दिल्याने ही घटना घडली. मृत मोटारचालकाचे नाव प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी (वय २६, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद कुलकर्णी हे एनआयबीएम रस्त्याने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने त्यांच्या मोटारीला धडक दिली. यामुळे कुलकर्णी यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुलकर्णी यांच्या मित्राने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पंकज खोपडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पादचाऱ्याला पीएमपी बसने उडवले पुणे-सातारा रस्त्यावरील तावरे कॉलनी परिसरात बीआरटी मार्गातून रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव पीएमपी बसने धडक दिली. या अपघातात पादचारी विकी बसवराज कोतले (वय ३०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, पुणे-सातारा रस्ता) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी कोतले हे बीआरटी मार्ग ओलांडत असताना पीएमपी बसने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक नामदे या प्रकरणाचा तपास करत आहेत. फुरसुंगी भागात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात भरधाव वाहनाच्या धडकेत एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. गणेश रमेश बोराळे (वय २४, रा. भेकराईनगर, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलिस कर्मचारी निखिल पवार यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक विनोद पवार पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 4:28 pm

महिला पार्लर व्यावसायिकाची फसवणूक:निलंबित पोलिस हवालदारावर अडीच लाख आणि सोन्याची फसवणूक केल्याचा गुन्हा

पुणे येथे एका निलंबित पोलिस हवालदाराने महिला पार्लर व्यावसायिकाची अडीच लाखांहून अधिक रक्कम आणि सहा तोळे सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर, वाकड, पुणे) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखसागरनगर, कात्रज येथील ४३ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, जगताप यांचा त्यांच्याशी जुना कौटुंबिक परिचय होता. डिसेंबर २०१९ मध्ये जगताप यांनी पत्नीला कॅन्सर झाल्याचे आणि कुटुंबाला कोरोनाचा त्रास झाल्याचे कारण देत महिलेकडून एक लाख रुपये उधार घेतले. त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये आर्थिक अडचणीचे कारण देत त्यांनी महिलेच्या लग्नातील सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी घेतले. पुढे मुलीच्या शिक्षणासाठी फोनपेद्वारे १.५७ लाख रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. वारंवार मागणी करूनही पैसे किंवा दागिने परत न केल्याने महिलेने अखेर पोलिस आयुक्तालयाकडे आणि नंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. गणेश जगताप याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. जुलै महिन्यात चतुःशृंगी पोलिस ठाण्यात एका महिलेचे ७३ तोळे सोने आणि १७ लाख रुपये रोख घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंदवण्यात आला होता. २१ ऑगस्ट २०२४ रोजी त्याची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली झाली होती, परंतु तो हजर झाला नाही. या काळात त्याने औंध येथील एका सराफाला माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी करून गंडा घातला होता. या घटनेनंतर विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगतापला निलंबित केले होते. याशिवाय, २०२१ मध्ये राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी खोटे कागदपत्रे सादर करून सरकारने फसवणूक केल्याचा आरोपही जगतापवर आहे. या प्रकरणी पुणे पोलिस दलातील गणेश जगतापसह दोन लिपिकांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 4:22 pm

सुनील तांबे यांच्या 'मान्सून' पुस्तकाचे प्रकाशन:किशोर बेडकिहाळ म्हणाले, मान्सून बहुसांस्कृतिकता आणि एकसंधतेचे कारण

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुनील तांबे यांच्या 'मान्सून – जन, गण, मन' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांनी मान्सूनला भारतीय उपखंडाच्या बहुविध सांस्कृतिकतेचे आणि एकसंधतेचे महत्त्वाचे कारण म्हटले. मान्सून ही केवळ भौगोलिक घटना नसून, उपखंडाच्या जीवनाचा आधार असल्याचेही त्यांनी नमूद केले. राष्ट्र सेवा दल आणि मनोविकास प्रकाशन यांनी आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्याला लेखक सुनील तांबे, प्रसिद्ध साहित्यिक आसाराम लोमटे, हिंद मजदूर किसान पंचायत – महाराष्ट्रचे अध्यक्ष कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर, कवी आणि अभिनेते किशोर कदम तसेच मनोविकास प्रकाशनाचे संचालक आशिश पाटकर उपस्थित होते. बेडकिहाळ यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. बेडकिहाळ यांनी आपल्या भाषणात मान्सूनचा उपखंडातील आर्थिक, राजकीय, सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांवर कसा सखोल परिणाम झाला, याचे सविस्तर विवेचन केले. मान्सूनमुळे उपखंडात सहजीवन निर्माण झाले, असे ते म्हणाले. मध्य आशियापर्यंत पोहोचणारे व्यापारी काफिले मान्सूनच्या सुरुवातीला उपखंडात येत असत आणि परतीच्या मान्सूनसोबत परत जात असत.हा व्यापार खुष्कीच्या तसेच समुद्रमार्गाने होत असे, ज्यात हिंदू, मुस्लिम, गुजराती, सिंधी, इराणी, अरबी अशा विविध धर्म, पंथ, भाषा आणि वंशाचे लोक सहभागी होते. समाज म्हणून त्यांच्यात एकसंधता होती. आर्थिक, सामाजिक, सामरिक आणि सुरक्षेच्या मुद्द्यांनी त्यांना पिढ्यानपिढ्या एकमेकांसोबत बांधून ठेवले होते. आधीच्या हिंदुस्थानात अनेक राजसत्ता असल्या तरी, करभरणा वगळता येथील गावगाडा स्थिर आणि अबाधित होता. देशाची एकसंधता आणि बहुसांस्कृतिकता यातूनच निर्माण झाली आणि टिकली होती. मात्र, इंग्रजांनी हे बलस्थान ओळखले आणि त्यावरच आघात केला. त्यांनी उपखंडाच्या सामाजिक स्थैर्यावर हल्ला करत सामाजिक एकसंधतेमध्ये फुटीरतेची बीजे रोवली, ज्यामुळे संघर्षात्मक स्वरूप निर्माण झाले. मान्सून हा एकसंधतेचा आधार तुटला. भारतीयांची ओळख नष्ट करून विशिष्ट धर्म, जात, पंथ यावर आधारित ओळखी लादल्या गेल्या आणि नवे संघर्ष तयार झाले, असे बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले. लेखक सुनील तांबे यांनी मान्सून या ऋतूच्या माध्यमातून उपखंडातील या संघर्षाचे सूचन उत्तम पद्धतीने मांडले आहे, असेही ते म्हणाले.यावेळी बोलताना साहित्यिक आसाराम लोमटे म्हणाले की, मान्सून हा जिव्हाळ्याचा घटक आहे. हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेतही यावे, जेणेकरून मान्सूनचे हे जागरण भारतीय पातळीवर पोहोचेल. मान्सून या घटकाने आपली बहुसांस्कृतिक परंपरा सामावून घेतली आहे आणि लेखकाने मान्सूनचे सामाजिक, कृषीनिगडीत, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ इथे उलगडले आहेत. मान्सूनचा परिणाम भूप्रदेश, कृषी, पशुपालन, खाद्यसवयी, व्यापार, प्रवास अनेक घटकांवर होत असतो. मान्सूनच्या शास्त्रीय – वैज्ञानिक – भौगोलिक मांडणीसोबतच मान्सूनची सांस्कृतिक अंगाने त्यांनी केलेली मांडणी महत्त्वाची आहे. लोकपरंपरा, लोकसाहित्याचे अनेक संदर्भ त्यांनी दिले आहेत. पुस्तकाच्य २२ प्रकरणांतून वस्तुनिष्ठ माहिती तर आहेच, मान्सूनकडे जनसामान्य कसे पाहतात, याचाही वेध त्यांनी घेतला आहे.”

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 4:21 pm

महाराष्ट्रात उद्यापासून 4 दिवस वादळी पावसाची शक्यता:हवामान विभागाचा अंदाज, पिकांची काळजी घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात हवामान पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता नव्या अपडेट्सनुसार, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काढणी केलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो. पुढील चार दिवस कुठे-कुठे पावसाची शक्यता? हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 15 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 16 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन काढणी केलेली धान्य, कडधान्य आणि फळपिक सुरक्षित ठिकाणी ठेवातीत. शेतातील पीके झाकण्यासाठी ताडपत्री, प्लास्टिकचा वापर करावा, पिकांना झाडांना आधार द्यावा, पिकांचे वाऱ्यापासून संरक्षण करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. तसेच हवामान खात्याचे अपडेट्स नियमित तपासावेत आणि त्यानुसार पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामानात बदल का? अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात हा बदल होतो आहे. त्यामुळे नैऋत्य मान्सून संपला असला तरी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने अतोनात नुकसान दरम्यान, याआधी झालेल्या पावसाने संपूर्ण राज्यात विशेषत: मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात मोठा फटका बसला. अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरात-दारांत पाणी शिरले, पिके पाण्याखाली आली. पिकांसह शेतातील मातीही खरडून गेली. गुरे वाहून गेली, घर-संसार उघड्यावर केला. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं सांगण्यात आलं आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 4:20 pm

काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा : संजय राऊत

मुंबई : राज्यात काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवतील का, यावरही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना […] The post काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा : संजय राऊत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 4:10 pm

RSS सांस्कृतिक शक्ती, देशभक्त संघटना:मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका; स्थानिकच्या निवडणुकीत शक्य तिथे युती करण्याचे संकेत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती व देशभक्त संघटना आहे. त्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघावर बंदी घालण्यासंबंधी काँग्रेसने केलेली मागणी धुडकावून लावली आहे. केरळच्या तिरुवनंतपुरम येथील एका 26 वर्षीय अभियंत्र्याने 9 ऑक्टोबर रोजी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. तत्पूर्वी, एका सुसाईड नोटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात झालेल्या लैंगिक शोषणामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांक खरगे यांनी कर्नाटक सरकारकडे एका पत्राद्वारे संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी वरील शब्दांत ही मागणी धुडकावून लावली आहे. काँग्रेस अध्यक्षांच्या मुलावर निशाणा देवेंद्र फडणवीस म्हणाले, कर्नाटकचे नेते प्रियांक खरगे प्रसिद्धीसाठी असल्या गोष्टी करत असतात. त्यांना कोणताही आधार नाही. ते आपल्या वडिलांच्या भरवशावर राजकारण करणारे नेते आहेत. मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, यापूर्वी अनेकदा संघावर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला किंबहुना बंदीही घालण्यात आली. ज्या इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातली, त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे. एक देशभक्त संघटना आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानवनिर्मितीचे कार्य संघ करतो. त्यामुळे प्रसिद्धीसाठी पत्र लिहिणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूणही पाहत नाही. भाजप निवडणुकांसाठी सज्ज मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शक्य आहे तिथे महायुतीमधील मित्रपक्षांसोबत युती करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्रात विभागनिहाय आमचे दौरे लावलेत. राज्यात लवकरच महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी या बैठका लावण्यात आल्यात. आम्ही यापूर्वी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या 4 विभागांचा आढावा घेतला. आता अमरावती विभागाचा आढावा घेतला जात आहे. मुंबई विभागाचा आढावा पुढल्या आठवड्यात घेतला जाईल. एकूणच कार्यकर्त्यांची मानसिक तयारी चांगली आहे. निवडणुकीसाठी भाजप पूर्णपणे सज्ज आहे. युती करण्याचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर युती करण्याचा मुद्दा आम्ही खालच्या पातळीवर सोडला आहे. पण जिथे शक्य आहे, तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेत. विशेषतः एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्र पक्षांवर टीका करू नये अशी सूचना करण्यात आली आहे. माझ्या मते, महायुती म्हणून चांगले यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल. काही कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला आहे. पण अशी मागणी नेहमीच होत असते. पण त्या - त्या ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायचा असतो. केवळ सर्वांना निवडणूक लढता यावी म्हणून आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे. जिथे शक्य नाही तिथे समोरासमोर लढले जाईल, असे फडणवीस म्हणाले. यावेळी बोगस मतदान चालणार नाही अमरावती विभागात मागच्या निवडणुकीत 14 हजारांहून अधिक बोगस मतदान झाले आहे. पत्रकारांनी याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले, अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आली आहे. आमच्या लोकांनीही निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. आम्ही यावेळी लक्ष ठेवून आहोत. यावेळी अशी खोटी मते नोंदवून निवडणूक लढवता येणार नाही, असे ते ठणकावण्याच्या सूरात म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 4:09 pm

भंडा-यात प्रेशर कुकरचा स्फोट; १४ जण भाजले

भंडारा : प्रतिनिधी बाल उत्सव शारदा मंडळाच्यावतीने महाप्रसाद बनविताना प्रेशर कुकरचा स्फोट झाला. यात १४ जण भाजून गंभीर जखमी झाले आहेत. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना भंडारा शहरातील बाबा मस्तान शहा वॉर्ड येथे शनिवारी सायंकाळी घडली. जखमींमध्ये परवेज शेख, आशिष गणवीर, भावेश खंगार, रितेश साठवणे, […] The post भंडा-यात प्रेशर कुकरचा स्फोट; १४ जण भाजले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 3:45 pm

‘कवीकट्टा’ च्या प्रमुखपदी राजन लाखे

पुणे : प्रतिनिधी येत्या १, २, ३, ४ जानेवारी २०२६ रोजी सातारा येथे होणा-या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवीकट्टा’ च्या प्रमुखपदी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष, लेखक कवी राजन लाखे यांची निवड झाली आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापासून ते दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या साहित्य संमेलनापर्यंत त्यांनी ही […] The post ‘कवीकट्टा’ च्या प्रमुखपदी राजन लाखे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 3:41 pm

मंदिरे समाज परिवर्तनाची संस्कार केंद्रे:हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या बैठकीत गिरीश प्रभुणे यांचे मार्गदर्शन

ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी नुकतेच पुण्यात झालेल्या हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था, महाराष्ट्रच्या मासिक बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी 'मंदिरे ही केवळ उपासनेची स्थळे नसून समाज परिवर्तनाची संस्कार केंद्रे आहेत,' असे मत व्यक्त केले. प्रभुणे यांनी सनातन कार्याची गती आणि काळाच्या गरजा यांचा मेळ साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले. संघकार्य आणि अध्यात्म यांचा संगमच समाज परिवर्तनाचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यकर्त्यांना संघटितपणे, श्रद्धा आणि सेवाभावाने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीचे अध्यक्षस्थान कृष्णकुमार गोयल यांनी भूषवले. बैठकीच्या सुरुवातीला उपाध्यक्ष संजय भोसले यांनी प्रास्ताविक केले, तर उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल यांनी आगामी अन्नकूट कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी सीए यशस्वी अग्रवाल यांचा सत्कार आणि पुणे मर्चंट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांचा सन्मान करण्यात आला. बैठकीदरम्यान गिरीश शहा यांनी सेवाभारतीमार्फत पूरग्रस्तांसाठी साड्यांचे दान केले. या साड्या पूरग्रस्त भागातील महिलांना पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. यानंतर विविध विभागांनी महिनाभरातील कार्याचे निवेदन सादर केले. नवरात्रीदरम्यान सरस्वती विद्यालय आणि एनी एम एस शाळेत झालेल्या कन्यावंदन कार्यक्रमाची माहिती सोनिया श्रॉफ यांनी दिली. एस.पी.एम. शाळेत झालेल्या अशाच एका कार्यक्रमाचे कौतुक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी पत्राद्वारे केले होते. या उपक्रमाचे नियोजन एच.एस.एस.एफ. अध्यापक प्रशिक्षक रमा कुलकर्णी यांनी केले होते. कार्यनिवेदन सादर करणाऱ्यांमध्ये राजेश मेहता, अशोक रुकारी, अखिल झांजले, वैशाली लवांधे, अथर्व नौसारीकर, उदय कुलकर्णी, विक्रम शेठ, नितीन पहलवान आणि जयंत पवार यांचा समावेश होता. त्यांनी संपर्क, मठ-मंदिर, वारकरी समूह, युवा विभाग, आयटी, कोष आणि प्रशासकीय विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:41 pm

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी पुणे आर्टिस्ट ग्रुपचे महाचित्रप्रदर्शन:300 हून अधिक कलाकार सहभागी, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

पुणे आर्टिस्ट ग्रुपने पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी 'वाटा खारीचा सहभाग चित्रकारांचा' या उपक्रमांतर्गत एका महाचित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. हे प्रदर्शन बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ ते शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बालगंधर्व कलादालन, पुणे येथे भरवण्यात येणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनात राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांमधील तीनशेहून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांच्या कलाकृती विक्रीसाठी उपलब्ध असतील आणि सर्व चित्रांची किंमत नाममात्र ठेवण्यात आली आहे. विक्रीतून जमा होणारी संपूर्ण रक्कम मराठवाड्यातील पूरग्रस्त मुलांच्या शिक्षण साहित्यासाठी वापरली जाईल. या उपक्रमात सहभागी होणारे चित्रकार त्यांच्या कलाकृती देणगी स्वरूपात देत आहेत आणि यासाठी कोणताही मोबदला घेणार नाहीत. पुणे आर्टिस्ट ग्रुपचे चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांनी कलाप्रेमी आणि संवेदनशील पुणेकरांना या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शक्य असल्यास जास्तीत जास्त चित्रे खरेदी करून या सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पुणे आर्टिस्ट ग्रुपने यापूर्वीही सामाजिक जबाबदारीचे भान राखत कोल्हापूर-सांगली येथील पूरस्थितीत मदतकार्य केले होते. त्यावेळीही संवेदनशील कलाकारांनी देणगी स्वरूपात दिलेल्या कलाकृतींच्या विक्रीतून लाखो रुपयांची रक्कम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वापरण्यात आली होती. यंदा मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अधिक माहितीसाठी चित्रकार सुरेंद्र कुडपणे-पाटील यांच्याशी ९८८१२३२४२५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:39 pm

अशोक समेळ यांच्या 'द्रौपदी काल..आज..उद्या' कादंबरीचे प्रकाशन:आजच्या द्रौपदीला सन्मान द्या अन् उद्याची द्रौपदी घडवा - डॉ. माशेलकर

ज्येष्ठ लेखक अशोक समेळ यांच्या 'द्रौपदी काल..आज..उद्या‌' या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. याप्रसंगी बोलताना पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी 'कालची द्रौपदी ओळखा, आजच्या द्रौपदीला सन्मान द्या आणि उद्याची द्रौपदी घडवा,' असे आवाहन केले. आडकर फौंडेशनतर्फे पुणे येथे आयोजित या प्रकाशन सोहळ्यात वैशाली माशेलकर यांच्या हस्ते कादंबरीचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. डॉ. माशेलकर अध्यक्षपदावरून बोलत होते. ते म्हणाले की, ही साहित्यकृती केवळ मनोरंजक नसून स्त्री शक्तीचे अखंड चिंतन आणि तिच्या सामर्थ्याची, धैर्याची जीवंत प्रतिमा आहे. यातून समाजाला जागृत करण्यासोबतच समृद्ध करण्याचा संदेशही दिला गेला आहे. त्यांच्या मते, कादंबरीतील द्रौपदी ही स्वयंभू, स्थितप्रज्ञ, कुशल, बुद्धिमान, प्रगल्भ आणि सहनशीलतेचे दर्शन घडवणारी महानायिका आहे. आजची द्रौपदी अन्यायाकडून न्यायाकडे आणि दुर्बलतेकडून सबलतेकडे वाटचाल करत आहे. राष्ट्रपती भवन, अंतराळ, रणांगण अशा सर्व ठिकाणी ती आपले अस्तित्व ठामपणे दर्शवत आहे. यावेळी आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी समेळ, अंमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी आणि प्रसिद्ध अभिनेते संग्राम समेळ उपस्थित होते. डॉ. माशेलकर यांनी या साहित्यकृतीमागे प्रचंड संशोधन आणि मेहनत असल्याचे नमूद केले. लेखनाविषयी बोलताना अशोक समेळ यांनी सांगितले की, महाभारत घडवणारी स्त्रीशक्ती म्हणजेच 'अग्निशिखा' हिच्याविषयी लिखाण करण्याच्या हेतूने ही कादंबरी लिहिली आहे. महाभारताच्या आधीची द्रौपदी, वस्त्रहरणानंतर पांडवांचे षंढत्व नाकारणारी द्रौपदी आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी पांडवांना चेतवत राहिलेली द्रौपदी, या तिच्या विविध रूपांवर त्यांनी प्रकाश टाकला. समेळ यांनी पुढे म्हटले की, द्रौपदीचे अनेक गुण आजच्या स्त्रियांमध्येही दिसून येतात, यावरही कादंबरीत भाष्य केले आहे. डॉ. अविनाश जोशी यांनी महाभारत आणि रामायणातून समाजाला जगण्याची मूल्ये मिळतात, असे सांगत द्रौपदीचा विलोभनीय प्रवास या कादंबरीतून साकारल्याचे म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:37 pm

दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, सोन्यानेही गाठला उच्चांक

जळगाव : दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. मार्केटमध्ये चांदी शिल्लक नसल्याचे दरवाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट धोरण व अमेरिकन बँकांचे व्याजदार कमी झाल्याचा चांदीच्या दरात परिणाम झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जीएसटीसह चांदीचे दर हे १ लाख ८५ हजार आहेत, सोन्याचे भाव (जीएसटीसह) १ लाख २८ हजार […] The post दिवाळीआधी चांदीच्या दरात रेकॉर्डब्रेक वाढ, सोन्यानेही गाठला उच्चांक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 3:26 pm

अजितदादांचा दम अन् संग्राम जगतापांचा यू-टर्न:संगमनेरच्या सभेत वादग्रस्त वक्तव्य टाळले, डोक्यावरील 'भगवी टोपी'ही गायब

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे हिंदू जनआक्रोश सभेत ‘दिवाळी खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा’ असे विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आता सावध झालेले दिसत आहेत. पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः त्यांना फटकारल्यानंतर तसेच नोटीस बजावल्यानंतर जगताप यांनी अलीकडील सभेत आपली वादग्रस्त भाषा पूर्णपणे बदलल्याची दिसून आले. करमाळा येथील सभेत बोलताना संग्रमा जगताप यांनी “दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातूनच करा” असे म्हणत मुस्लिम समाजाविषयाची आपला रोष व द्वेष व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही चांगलीच चर्चा झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्या या विधानाची दखल घेत, त्यांना दम भरला होता. तसेच त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा आणि भूमिका यांचा दाखला देत अजित पवारांनी त्यांना खडे बोल सुनावल्याची चर्चा होती. संगमनेरमध्ये 'यु-टर्न', डोक्यावर भगवी टोपीही नाही! पक्षाच्या कारवाईनंतर आमदार जगताप यांनी आज सोमवारी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील हिंदू जनआक्रोश आंदोलनात चक्क 'यु-टर्न' घेतल्याचे दिसून आले. अजित पवारांनी नोटीस बजावल्यानंतर जगताप यांनी आजच्या भाषणात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करणे टाळले. विशेष म्हणजे, या आंदोलनात संग्राम जगताप यांच्या डोक्यावर भगवी टोपी दिसली नाही. त्यांनी भगवी टोपी न घालताच भाषण केल्याची चर्चा आंदोलकांमध्ये होती. आंदोलन संपल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी अजित पवारांनी बजावलेल्या नोटीससंदर्भात प्रतिक्रिया मागितली, तेव्हा जगताप यांनी एकही शब्द न बोलता अहिल्यानगरकडे रवाना झाले. रोहित पवारांचे जगतापांबाबत भाकित दरम्यान, संग्राम जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोठे भाकित केले होते. संग्राम जगताप 2029 साली राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवतील असे वाटत नाही. आगामी काळात ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील. संग्राम जगताप पक्षाच्या प्रमुखांचे देखील ऐकत नाहीत. त्यामुळे संग्राम जगताप यांनी आपला नेता बदलला आहे, असे सध्या दिसत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. हे ही वाचा... संदीप देशपांडेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांचा यु-टर्न:राज ठाकरेंना केला मेसेज, म्हणाले - माध्यमांत दाखवताय तसे काही बोललो नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे सांगून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक नवा बॉम्बगोळा फोडला. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुनावले. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतात, राज ठाकरे मांडतात. इतर कोणीही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार नाही, असे संदीप देशपांडे म्हणाले. दरम्यान, माध्यमांत दाखवताय तसे मी काहीही बोललो नाही, असा मेसेज संजय राऊत यांनी राज ठाकरेंना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सविस्तर वाचा... काँग्रेसच्या सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा विचार करा:त्यांच्याशी हातमिळवणी तुम्हाला साजेसी नाही, उदय सामंतांचा राज ठाकरेंना सल्ला

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:26 pm

पुण्यात किराना परंपरा कार्यक्रमाचे आयोजन:उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचा सांगीतिक जीवनप्रवास उलगडला

पुणे येथे आयोजित 'किराना परंपरा' या कार्यक्रमात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या सांगीतिक जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ही स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतील विशेष मालिकेतील पहिली कडी होती. शास्त्रीय संगीताचे अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी खाँसाहेबांचा जीवनप्रवास अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला. किराना घराण्याला सर्वोच्च स्थानी नेण्यात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे मोठे योगदान आहे. ते गायनात केवळ कोरडे पांडित्य नको, तर रंग भरणे अपेक्षित आहे असे मानत असत. अध्यात्माकडे नेणारे सूरमग्न गायन करणारे अंतर्मुख कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. माधुर्य आणि स्वरात रममाण होण्याची किराना घराण्याची परंपरा त्यांच्यामुळेच प्रवाहित राहिली. तालासह खेळताना ठोस रूपात लयकारी दर्शवणारे, गाणे आणि जीवन यात भेद न करणारे, तसेच स्वतःच्या प्रतिभेतून रागरूपाचा ठसा उमटवणारे चौमुखा गायक म्हणून ते प्रसिद्ध होते. युवावस्थेत ते सारंगी, बीन, तबला, पखवाज आणि ताशा वादनातही निपुण होते.तानपुऱ्याच्या झंकारात विरघळून जाणारी सूरप्रधान गायकी, परमोच्च सुरेलपण आणि सुरांच्या केंद्रबिंदूपर्यंत जात मध्य व तार सप्तकात सहज फिरणारा आवाज यामुळे उस्ताद अब्दुल करीम खाँ यांचे गायन दैवी बनले. त्यांनी कधीही अनैसर्गिक आवाज लावला नाही, तर प्रचंड मेहनत आणि रियाजाने त्यांनी सुरांची सिद्धी प्राप्त केली. त्यांनी जन्मजात मिळालेल्या आवाजाला रियाजाची जोड देत तानपुऱ्याच्या गुंजनात आपले गुंजन एकरूप करणे, गाताना केवळ 'आ'कार न लावता काव्यातील स्वरव्यंजने आणि शब्दांवर जोर देत रियाज करणे याला प्राधान्य दिले. कंठसाधनेवर विचार करत कुठल्या सुरांवर लक्ष केंद्रित करायचे, कंठसाधना कशी करायची, रागाचा सखोल विचार कसा करायचा आणि यातून गायन जास्तीत जास्त प्रभावीपणे सादर करणे यावर त्यांनी पुढील पिढीला मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्या आवाज, प्रयोग, निषाद, तंबोरे, रागविचार, गायनशैली, बंदिश, उच्चार, लयताल विचार, आलाप, बीन अंग, ताना आणि सरगम अशा विविध वैशिष्ट्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला. स्वरमयी गुरुकुलच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला शास्त्रीय संगीताच्या रसिकांसह अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या अभ्यासपूर्ण विवेचनात उस्ताद अब्दुल करीम खाँ यांनी रागदारी संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दाखविलेले मनाचे खुलेपण, जाहीर जलसे, त्यांची स्वरलिपी, गायन पद्‌धती तसेच त्यांनी स्थापन केलेल्या आर्य संगीत विद्यालयाचे महत्त्व अशा अनेक अंगांनाही डॉ. चैतन्य कुंटे आणि डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी स्पर्श करत विवेचन अधिकाधिक अभ्यासपूर्ण व रंजक केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:26 pm

दिवाळीचा फराळ पाठवा थेट परदेशात:नागपूर टपाल विभागाचा उपक्रम; चीन, रशिया, अमेरिकेसह 192 देशांत सुविधा उपलब्ध

परदेशातील नातेवाईकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा म्हणून फराळ त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर टपाल विभाग यंदाही सज्ज झाला आहे. दिवाळीनिमित्त नागपूर टपाल विभागाने फराळाचे पदार्थ नाममात्र किमतीमध्ये पॅकेजिंग करून माफक दरात परदेशात पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर विभागाचे सहायक निदेशक गजेंद्र जाधव यांनी दिली. दिवाळीचा फराळ करून तयार आहे पण, तो पाठविण्याचा मुहूर्त लागत नाही. तसेच आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयामध्ये येऊ शकत नाहीत, अशा नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थांचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील. १९२ देशात सेवा उपलब्धयुके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युएई, जर्मनी, इंग्लंड, चीन, रशिया अमेरिकासारख्या प्रमुख १९२ देशात सेवा उपलब्ध आहे. चिवडा, लाडु, करंजी, चकली, शेव यासारखे पारंपरिक पदार्थ पाठवता येणार आहे. पार्सलसेवा जवळच्या प्रमुख टपाल कार्यालयात उपलब्ध असून ग्राहकाला फक्त बुकींग करून पत्ता द्यावा लागणार आहे. नोंदणी, पॅकेजिंग आणि शुल्क एकाच ठिकाणी करता येणार आहे. विविध देशात फराळ पाठवण्याचे दर जर्मनी ५८७६, युके ६४५१, यूएई ३४९३, ऑस्ट्रेलिया ११,९१२, रशिया ६७५०, सिंगापूर ४३७८ रूपये लागतात. इंटरनॅशनल स्पीड स्पोट सेवादिवाळीचा फराळ विदेशात पाठवण्यासाठी इंटरनॅशनल स्पीड स्पोटची सेवा उपलब्ध आहे. नियमित उत्पादने विदेशात पाठवणाऱ्या कंपन्यांसाठी ३५ किलोचे पार्सल डाकघर निर्यात केंद्राद्वारे पाठवता येईल. या शिवाय डाक विभागाचे पीपीयू म्हणजे पार्सल, पॅकेजिंग यूनिट आहे. या यूनिटमध्ये विशिष्ट प्रकारचे पॅकिंग बॉक्स, रॅपिंग पेपर, सेलो टेप आदी सुविधा उपलब्ध आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:24 pm

मालगाडीच्या धडकेत वाघाचा मृत्यू:बल्लारशाह - गोंदिया रेल्वे मार्गावर यंदाची दुसरी घटना; आतापर्यंत १८ वाघ मृत्युमुखी

बल्लारशाह - गोंदिया रेल्वे मार्गावर ब्रम्हपुरी वनक्षेत्रात आलेवाही-सिंदेवाहीच्या मधात रात्री मालगाडीच्या धडकेत बिट्टु या पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला आहे. या वर्षातील वाघाचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. या मार्गावर आतापर्यत सुमारे १८ वाघ मृत्युमुखी पडले आहे. या अपघातामुळे या महारामार्गावर यंदाच्या वर्षात मृत्यू पावलेल्या वन्यजीवांचा संख्या आठ झाली आहे. दिवसागणिक हा रेल्वे मार्ग वन्यजीवांसाठी धोक्याचा ठरत असून वाघाचा मृत्यू झाल्यावरच वन विभाग जागे होणार आहे का, असा सवाल स्थानिक वन्यजीवप्रेमी करत आहेत. बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर यापूर्वी लोहार येथे सोमवार ८ सप्टेंबर रोजी सांबराच्या पिल्लाचा मृतदेह आढळला होता.बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग हा ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे. वाघांचा भ्रमण मार्गाचा एक भाग सुद्धा आहे. कावल अभयारण्य, उमरेड- कऱ्हांडला अभयारण्याच्या वन्यजीव भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो. हाच रेल्वे मार्ग पुढे बालाघाट- नैनपूर मध्य प्रदेशमधून जातो. त्याठिकाणी तिथल्या रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाय योजना म्हणून अंडर पासेस आणि ओव्हर पास बांधले आहे. मग महाराष्ट्रात रेल्वे प्रशासनाकडून वन्यजीवांसाठी उपाय योजना का करण्यात आलेल्या नाही, आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यावर रेल्वे प्रशासनाला जाग येणार आहे, असा प्रश्न कुंदन हाते यांनी उपस्थित केला आहे. २०१८ साली बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्यानंतर वन विभाग आणि रेल्वे प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर वनक्षेत्रामधून जाणाऱ्या रेल्वेचा वेग ४० किमी प्रति तास करण्यात आला. मात्र, याची अंमलबजावणी काही काळ झाली. सध्या या मार्गावरुन १०० तास प्रति किमी याच वेगाने रेल्वे धावते. त्यामुळे गव्यासारख्या मोठ्या प्राण्याचा देखील रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू होतो.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:21 pm

पती/पिता हयात नसलेल्या ‘लाडकी’ची पंचाईत?

मुंबई : प्रतिनिधी लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. काहींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे. पण ई-केवायसीतील एक मोठी अट काही लाडक्या बहिणींची काळजी वाढवणारी ठरली आहे. लाडक्या बहिणींचा सप्टेंबर महिना जमा होत असल्याने राज्यातील महिला आनंदून गेल्या आहेत. त्यांना आता नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करावी लागणार […] The post पती/पिता हयात नसलेल्या ‘लाडकी’ची पंचाईत? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 3:17 pm

RPI नेत्याच्या घरात आढळला गुप्त दरवाजा अन् भुयार:भुयारात 2 बेडरूम्स, शस्त्रास्त्रे अन् मद्याच्या बाटल्या; चित्र पाहून पोलिसही चक्रावले

नाशिक येथील रिपाइंच्या जिल्हाप्रमुखाच्या कार्यालयातील एका गुप्त दरवाजाच्या मागे एक भुयार आढळले आहे. या भुयारात 2 स्वतंत्र बेडरूम्स, शस्त्रास्त्रे व मद्याच्या बाटल्या आढळल्या आहेत. हा प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर येथील आयटीआय पुलालगत रिपाइंचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे संपर्क कार्यालय आहे. पोलिसांनी रविवारी या कार्यालयावर धाड टाकली. सकृतदर्शनी हे कार्यालय अतिशय सामान्य वाटत होते. कार्यालयात फर्निचरचे शोकेस होते. याच शोकेसच्या मागे एक गुप्त दरवाजा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी लोंढे यांना तशी विचारणा केली. त्यावर त्यांनी असा कोणताही दरवाजा अस्तित्वात असल्याचा त्यांनी इन्कार केला. अखेर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी तो दरवाजा उघडण्याची तयारी दर्शवली. शोकेसच्या मागे गुप्त दरवाजा अन् भुयार प्रकाश लोंढे यांनी एका शोकेसमधून एक गुप्त चावी काढली. त्यांनी ती दुसऱ्या शोकेसमध्ये लावून तो गुप्त दरवाजा उघडला. त्यानंतर पोलिसांसोबत ते आत गेले. त्यानंतर पोलिस तेथील चित्र पाहून चक्रावले. पोलिसांना या गुप्त दरवाजाच्या मागे दोन स्वतंत्र बेडरूम्स, महागड्या मद्याच्या बाटल्या तथा कुऱ्हाड, कांबी, चाकू, सुरे आदी विविध शस्त्रास्त्रे असल्याचे आढळले. त्यांनी येथून जवळपास 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या भुयाराचा वापर गुन्हेगारी कट कारस्थान रचण्यासाठी, गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा अवैध बैठका घेण्यासाठी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काय आहे प्रकाश लोंढेवर आरोप? उल्लेखनीय बाब म्हणजे प्रकाश लोंढे व त्यांच्या टोळीवर सातपूरच्या औरा बारमध्ये गोळीबार केल्याचा आरोप आहे. याशिवाय या टोळीवर खुटवडनगर येथील पुष्कर बंगला जबरदस्तीने बळकावल्याचाही आरोप आहे. यासंबंधीची तक्रार गरत 8 तारखेला अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिस चौकशीत लोंढे पिता-पुत्रांनी मूळ मालकाला धमकावून हा बंगला हडपल्याचे निष्पन्न झाले आहे. बंगल्याच्या कर्जाची अडचण व आर्थिक निकष यांचा गैरफायदा घेत या टोळीने मालकाची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात तथा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलिसांनी हा बंगला सील केला आहे. हे ही वाचा... खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली:मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल, दोन दिवसांपूर्वीच झाली होती तपासणी मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ खासदार संजय राऊत यांची आज सकाळी अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:16 pm

योजना बंद करणारे ‘चालू’ सरकार

छ. संभाजी नगर : प्रतिनिधी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे, निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू’ असे म्हणत टीकास्त्र सोडले आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोणत्या योजना बंद केल्या याची यादीच शेअर केली आहे. […] The post योजना बंद करणारे ‘चालू’ सरकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 3:01 pm

दीपक ठाकूर हिंदुजा रिन्यूएबल्स एनर्जीचे नवे MD आणि CEO:अक्षय ऊर्जेत 30 वर्षांचा अनुभव

मुंबई: हिंदुजा ग्रुपचा एक भाग असलेल्या हिंदुजा रिन्यूएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (HREPL) ने दीपक ठाकूर यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 1 ऑक्टोबर 2025 पासून नियुक्ती केली आहे. त्यांना अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा, औद्योगिक उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये तीन दशकांहून अधिक काळ वैविध्यपूर्ण कामाचा अनुभव आहे. दीपक यांनी महिंद्रा ग्रुप, रिलायन्स, स्टर्लिंग अँड विल्सन, एल अँड टी, हनीवेल आणि थर्मॅक्स या अनेक संस्थांमध्ये नेतृत्वाच्या भूमिका सांभाळल्या आहेत. त्यांचा अनुभव सौर, पवन, स्टोरेज आणि हायब्रिड प्रणालींमध्ये प्रकल्प विकास, EPC, OM, अपस्ट्रीम तंत्रज्ञान, उत्पादन आणि InvITs द्वारे मालमत्ता पुनर्वापर या सर्व अक्षय ऊर्जा मूल्य साखळीमध्ये विस्तारलेला आहे. ते सुमित पांडे यांचे उत्तराधिकारी असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दीपक यांच्या नियुक्तीवर भाष्य करताना HREPL चे अध्यक्ष शोम हिंदुजा म्हणाले, “अक्षय ऊर्जा क्षेत्रात आघाडीची कंपनी होण्याच्या आमच्या आकांक्षेवर आम्ही काम करत असताना दीपक यांचा अनुभव आणि नेतृत्व आमच्या आगामी प्रवासात महत्त्वपूर्ण ठरेल. मंडळावर दीपक आमच्यासोबत असल्याचा आम्हाला आनंद आहे आणि हिंदुजा रिन्यूएबल्स एकत्रितपणे उभारण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. तसेच मी सुमित यांचे हिंदुजा रिन्यूएबल्ससाठीच्या मूलभूत योगदानाबद्दल आभार मानतो आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.” दीपक ठाकूर म्हणाले, “हिंदुजा ग्रुपचा भाग होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. समूहाची अक्षय ऊर्जेसाठीची सखोल बांधिलकी भारताच्या ऊर्जा परिवर्तनाशी घट्टपणे जोडलेली आहे आणि या प्रभावी आणि वाढीच्या प्रवासाचा भाग होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.” स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वतता या क्षेत्राचे खंदे समर्थक असलेल्या दीपक यांनी 2009 मध्ये नॅशनल सोलर थर्मल पॉलिसी तयार करण्यात योगदान दिले. त्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा दृष्टीकोनाची पायाभरणी करण्यात मदत झाली. त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील बॅचलर पदवी आणि सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 3:00 pm

मी फार - फार तर मोदींपर्यंत जाईल:दादा भुसे अन् महाजन डोनाल्ड ट्रम्पकडे जातील, नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भुजबळांचा टोला

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी महायुतीत पुन्हा एकला कलगीतुरा रंगला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना टोला हाणला आहे. मी फार फार तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊ शकतो. पण हे नेते या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार असल्याचे मी ऐकले आहे, असे ते म्हणालेत. नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे येथील पालकमंत्रिपदाला फार महत्त्व आले आहे. या प्रकरणी छगन भुजबळ, दादा भुसे व गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री दादा भुसे यांना छेडले असता त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा विषय आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे न्यावा लागेल असे वाटते असे विधान केले. त्यानंतर पत्रकारांनी हा विषय मंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे उपस्थित केला. त्यावर शांत बसतील ते महाजन कसले. ते थेट म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प व दादा भुसे यांचे घनिष्ठ संबंध असतील. कदाचित ते त्यांच्याशी बोलून प्रश्न सोडवतील. काय म्हणाले छगन भुजबळ? आत्ता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी महाजन व भुसे या दोघांनाही उपरोधिक टोला हाणला आहे. पत्रकारांनी आज नाशिक येथे बोलताना जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी महाजन व भुसे हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार आहेत का? असा प्रश्न केला. त्यावर भुजबळ म्हणाले, गिरीश महाजन व दादा भुसे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे जाणार असल्याचे मी ऐकले आहे. पणी मी काही एवढ्या लांब जाऊ शकत नाही. मी आपला अजित पवार, देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. आणि फारच झाले तर मोदी साहेबांकडे जाईल. यापेक्षा लांब मी जाणार नाही. ती मंडळी जाऊ शकते. सर्वच ठिकाणी युती होणे अशक्य भुजबळांनी यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वच जागांवर महायुतीमधील घटकपक्षांची युती होईल याची काहीही शाश्वती नसल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक ठिकाणी तिन्ही पक्षांची युती होईल असे काहीही नाही. तेथील परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल. काही ठिकाणी भाजप बाजूला असेल आणि शिंदे व अजित पवारांची युती होईल. तर काही ठिकाणी भाजप व अजित पवारांची युती होईल, तिथे शिंदे बाजूला असतील असेही होऊ शकते. स्थानिक पातळीवर काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले. आनंदाचा शिधा यंदा अडचणीत आहे पत्रकारांनी यावेळी त्यांना यंदाच्या दिवाळीला आनंदाचा शिधा का नाही? असा थेट प्रश्न केला. त्यावर भुजबळांनी आनंदाचा शिधा यावेळी अडचणीत असल्याचे स्पष्ट केले. आनंदाचा शिधा यावेळी काहीसा अडचणीत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी यंदा सुमारे 45 हजार कोटींचा खर्च झाला. आता नैसर्गिक संकटामुळे शेतकरीही अडचणीत सापडलेत. त्यांना 32 हजार कोटी वाटायचे आहेत. त्यामुळे काही योजना अडचणीत आहेत. पण पुढच्या वेळी नक्की विचार करू, असे भुजबळ यांनी या प्रकरणी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 2:51 pm

संदीप देशपांडेंनी सुनावल्यानंतर संजय राऊतांचा यु-टर्न:राज ठाकरेंना केला मेसेज, म्हणाले - माध्यमांत दाखवताय तसे काही बोललो नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे सांगून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी एक नवा बॉम्बगोळा फोडला. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुनावले. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतात, राज ठाकरे मांडतात. इतर कोणीही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार नाही, असे संदीप देशपांडे म्हणाले. दरम्यान, माध्यमांत दाखवताय तसे मी काहीही बोललो नाही, असा मेसेज संजय राऊत यांनी राज ठाकरेंना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आगामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय युती होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत मोठे विधान केले. राज ठाकरेंची 'काँग्रेस'ला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे संजय राऊत म्हणालेत. त्यांच्या विधानानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकर यांनी माध्यमांसमोर येत, मनसेची भूमिका मांडली. नेमके काय म्हणाले संदीप देशपांडे? उद्या निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मनसे, शिवसेना ठाकरे गट, भाजप, शिवसेना शिंदे गट, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांना पत्र पाठवलेले होते. निवडणूक प्रक्रियेतील दोष दुरुस्त करण्यासंदर्भात जसे सर्वांना पत्र पाठवले, तसेच काँग्रेसलाही पाठवले होते. यामध्ये महाविकास आघाडीचा काही संबंध नाही. हा फक्त उद्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटीपूरताच मर्यादित आहे. आमच्या पक्षाची भूमिका आम्हीच मांडतो, आमचे प्रवक्ते मांडतात, राज ठाकरे मांडतात. इतर कोणीही आमच्या पक्षाची भूमिका मांडणार नाही, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना सुनावले. आम्ही काँग्रेसला प्रस्ताव पाठवलाच नव्हता काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यास नकार दिला आहे. याबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले, मुळात आम्ही काँग्रेसकडे युतीसंदर्भात कुठलाही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ नाही. आम्ही एखादा प्रस्ताव पाठवला, मग हर्षवर्धन सपकाळ बोलले, तर गोष्ट वेगळी आहे. पण आमच्याकडून असा कोणता प्रस्तावच गेलेला नाही, त्यामुळे त्याविषयी बोलण्याची गरज नाही. ECला भेटणाऱ्या शिष्टमंडळाचा मविआसोबत संबंध नाही लोकशाहीत निवडणूक पारदर्शक व्हावी, असे केवळ विरोधकांनाच नाही, तर सत्ताधाऱ्यांनाही वाटायला हवे. यंत्रणा चांगली असावी, ही केवळ महाविकास आघाडी किंवा विरोधकांची जबाबदारी नाही. या मोहिमेत सत्ताधारी पक्षांनीही सहभागी व्हावे. उद्या निवडणूक आयोगाकडे जे शिष्टमंडळ जाणार आहे, त्याचा महाविकास आघाडीसोबत काहीही संबंध नाही.आम्ही सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिले आहे. पण कोण येते ते उद्या कळेल, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले. मी तसे बोललोच नाही, राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज दरम्यान, संजय राऊत यांनी राज ठाकरेंची 'काँग्रेस'ला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे विधान केल्यानंतर, राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुनावल्यानंतर संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंना मेसेज केला. माध्यमांत दाखवताय तसे मी काहीही बोललो नसल्याचे संजय राऊत मेसेजमध्ये म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसेच्या प्रवक्त्यांनी राऊतांच्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांच्या मेसेजबद्दल सांगितले गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 2:49 pm

बालेकिल्ल्यातच शिंदेंना मोठा धक्का!

ठाणे : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. बदलापूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाली आहे. बदलापूरसोबतच अंबरनाथमध्येही भाजप आणि राष्ट्रवादी यांची युती होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आगामी निवडणुकांत एकनाथ […] The post बालेकिल्ल्यातच शिंदेंना मोठा धक्का! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 2:39 pm

निधी वाटपात भेदभाव; विजय वडेट्टीवार कडाडले

मुंबई : महायुती सरकारने सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला, मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी? जर ओबीसींच्या पीएचडी विद्यार्थ्यांना निधी देताना सारथी, बार्टीला दली. मात्र महाज्योतीची फाईल पडून आहे. त्या विद्यार्थ्यांनी काय केले? असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान, अण्णासाहेब पाटील महामंडळाला १३ हजार कोटीचा करत आहात. इकडे ओबीसी […] The post निधी वाटपात भेदभाव; विजय वडेट्टीवार कडाडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 2:37 pm

दिवाळी यंदा चार दिवस:पंचांगकर्ते दाते म्हणाले - 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी, 21 ला करा लक्ष्मीपूजन, जाणून घ्या सारे मुहूर्त एका क्लिकवर

दिवाळीत मंगळवारी व बुधवारी गुरुपुष्यामृत योग आहे. सोमवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपासून अमावस्येला सुरुवात होत आहे. यंदा २० ऑक्टोबरला सायंकाळी ५.४२ ते ८.१४ वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन मुहूर्त असल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. यापूर्वी पहिल्यांदा २८ ऑक्टोबर १९६२, १७ ऑक्टोबर १९६३ या दोन्ही वर्षी अमावास्या लक्ष्मीपूजनापूर्वी संपली होती. १ नोव्हेंबर २०२४ आणि २१ ऑक्टोबर २०२५ ला असाच योग आला आहे. मागील ६३ वर्षांत चौथ्यांचा असा संभ्रम निर्माण झाला आहे. प्रदोष काळात अमावस्या दाते पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले की, 'नरकचतुर्दशीला प्रदोष काळात अमावस्या असून दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून सायंकाळपर्यंत अमावास्या राहील. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन धर्मशास्त्र संमत असून मंगळवारीच सायंकाळी व प्रदोष काळात (सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे कालावधीत) लक्ष्मीपूजन करा. दाते पंचांगसह अन्य कॅलेंडरमध्ये २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे. त्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.' वसुबारस, १७ ऑक्टोबर रोजी यंदा वसुबारस शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी आलीय. या दिवशी महिला एकवेळ जेवण करून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह गाईचे पूजन करतात. गोपूजनाने दिवाळीची सुरुवात होते. धनत्रयोदशी, १८ ऑक्टोबर रोजी यंदा धनत्रयोदशी शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी यमदीपदानही आहे. यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी यम दीपदान केले जाते. सोने-नाणे स्वच्छ केले जाते. नरकचतुर्दशी, २० ऑक्टोबर रोजी यंदा नरकचतुर्दशी २० ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये, असा वर दिला. लक्ष्मी-कुबेर पूजन, २१ ऑक्टोबर रोजी यंदा लक्ष्मीपूजनाचे दोन मुहूर्त आहेत. मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी व्यापाऱ्यांसाठी अश्विन अमावस्या शुभ आहे. या दिवशी घर, दुकान सुशोभित केले जाते. सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होते. लक्ष्मीपूजनाचा २२ ऑक्टोबर रोजीही मुहूर्त यंदा बुधवार २२ ऑक्टोबर रोजी सुद्धा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. या दिवशी दुपारी ३ ते ४.३० आणि रात्री १०.३० ते १२.०० पर्यंतचा मुहूर्त आहे. या विषयी सविस्तर माहिती दाते पंचांगातील पान नंबर ८६ वर दिलेली आहे. बालिप्रतिपदा, २२ ऑक्टोबर रोजी यंदा दिवाळी पाडवा २२ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी व्यापारी वर्षास सुरुवात असून वही, दुकान पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नी पतीस ओवाळते. यमद्वितीया, भाऊबीज, २३ ऑक्टोबर रोजी यंदा यमद्वितीया आणि भाऊबीज गुरुवार २३ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करायचा, अशी पुराणात गोष्ट आहे. त्यामुळे या दिवशी बहिण भावाला जेवायला बोलावून त्याला ओवाळते.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 2:32 pm

पुणे गुंडाचे माहेरघर : राऊतांची जोरदार टीका

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर युतीतील भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात थेट आरोप करत आहेत. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकरांची रविवारी (१२ ऑक्टोबर) भेट घेत त्यांना महायुतीत दंगा नको, असा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे नाशिकमध्ये पोलिस आयुक्त गुंडांवर कारवाई करताना दिसत आहेत. त्यामुळे आता शिवसेना […] The post पुणे गुंडाचे माहेरघर : राऊतांची जोरदार टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 2:28 pm

हिंगोलीकरांना तीन दिवस निर्जळी:पाणी पुरवठा योजनेचा नॉनरिटर्न वॉल नादुरुस्त; आत्ता थेट गुरूवारी येणार नळाला पाणी

हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचा नॉन रिटर्न वॉल नादुुरस्त झाल्यामुळे शहराला सोमवारपासून ता. १३ तीन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले असून नागरीकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हिंगोली शहराला सिध्देश्‍वर धरणावरून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील सर्व सतरा प्रभागांमधून योग्य दाबाने व नियमितपणे पाणी पुरवठा होण्यासाठी पालिका प्रशासनाकडून दक्षता घेतली जाते. प्रत्येक प्रभागात रोटेशननुसार मुबलक पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, हिंगोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सिध्देश्‍वर धरणाजवळील पाणी पुरवठा योजनेचा नॉन रिटर्नवॉल नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे पाण्याची गळती वाढली असून शहरातील जलकुंभ भरण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे. त्यातून पाणी योजनेच्या विद्युतपंप नादुरुस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवारी ता. १३ सदर प्रकार लक्षात आल्यानंतर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या सुचनेवरून पालिकेचे अभियंता साहेब भुरके, नगर अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, यांच्यासह पालिकेचे पथक आज दुपारीच तातडीने सिध्देश्‍वर येथे रवाना झाले असून पालिकेच्या पथकाकडून दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दरमयान, सदर दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार असून त्यामुळे बुधवारपर्यंत (ता.१५) शहराला पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरीकांनी पाणी जपून वापरावे. गुरुवारपासून ता. १६ शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 2:27 pm

उबाठाने राज ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतलीये का?:भाजप नेत्याचा हल्लाबोल, हर्षवर्धन सपकाळांची जनरल डायरशी केली तुलना

विरोधी पक्षांनी राज्यात गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरले असतानाच, भाजपने जोरदार पलटवार केला आहे. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या आरोपांना उत्तर देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यातून गुंडगिरी पूर्णपणे संपवेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच राज ठाकरे मविआसोबत जाण्याच्या चर्चांवरून उबाठाने राज ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतलीये का? असा सवाल बन यांनी केला. ते आज माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत यांनी नाशिकमधील गुंडगिरी मोडून काढल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले, संजय राऊत आज 'देवा भाऊं'ची प्रशंसा करत आहेत की त्यांनी गुंडगिरी संपवली. गुंड भाजपच्या पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली. यापुढे पुणे, ठाणे किंवा राज्यातील इतर कुठलीही गुंडगिरी संपवण्याचे काम देवा भाऊ करतील. धंगेकरांनी आत्मपरीक्षण करावे पुण्यातील गुन्हेगारीवरून रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरले होते. यावरून नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावरही निशाणा साधला. धंगेकर यांनी आत्मपरीक्षण करावे. गुंडांना भाजपचे समर्थन नाही. भाजपचा कुणीही असो, त्यावर कारवाई करण्याची धमक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आहे,'' असे बन म्हणाले. धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांचे कथित हस्तक समीर पाटील यांच्यावर मोक्का लागल्याचा आणि गैरकारभार केल्याचा आरोप केला होता. यावर भाजपने थेट उत्तर दिले नाही, मात्र फडणवीस गुंडगिरी संपवतील, असे नमूद केले. ठाकरे गटावर टीका मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत बन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “काँग्रेसकडून सुपारी घेऊन उबाठा गटाला संपवण्यात आले. उद्धव ठाकरे मराठी आणि हिंदुत्वापासून दूर गेले आहेत. आता त्यांनी राज ठाकरे यांची सुपारी घेतली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “आक्रमक हिंदुत्ववादी राज ठाकरे काँग्रेससोबत जाणार नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत ते कधीही हातमिळवणी करणार नाहीत. राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट ठेवणारे आणि कट्टर हिंदुत्ववादी आहेत.” ते पुढे म्हणाले, उबाठा गट सोनिया गांधींची बेनामी शाखा आहे. राज ठाकरेंना सोबत घ्यायचे की नाही, हा निर्णय राहुल गांधी हिरवा कंदील दाखवत नाहीत तोवर होऊ शकत नाही, हे राहुल गांधींनी ठाकरेंना सांगितले आहे.'' शिवसेनेच्या ‘सामना’च्या अग्रलेखावर निशाणा साधताना बन म्हणाले, “संजय राऊत यांनी धर्मांतर केलं आहे. ‘सामना’मधील अग्रलेख ठाकरेंचे आहेत की काँग्रेसचे, हे समजत नाही. ज्यांनी आपला पक्ष सोनिया गांधींच्या पायाशी अर्पण केला, त्यांनी बोलू नये.” आजोबांचा इतिहास पाहण्याचा रोहित पवारांना सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी योजना बंद होणार असल्याच्या केलेल्या टीकेवर बन यांनी जोरदार पलटवार केला. आधी आजोबांचा इतिहास बघा आणि मग फडणवीसांवर बोला. निवडणूक काळातही योजनांबाबत अशाच अफवा पसरवल्या गेल्या होत्या. जनहिताच्या योजना बंद होणार नाहीत. 'माझी शाळा' योजनेबद्दल ते म्हणाले, विद्यार्थी हिताचे हे सरकार आहे आणि असे काहीही होणार नाही. ठाकरेंनी थांबवलेल्या योजनांची आमच्याकडे यादी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सरकारकडून बंद करण्यात आलेल्या योजनांची यादी दाखवत 'चालू सरकार' अशी टीका केली होती. टीकेला उत्तर देताना बन म्हणाले, अडीच वर्षांत उद्धव ठाकरेंनी मुंबई मेट्रो कारशेड, कोस्टल, समृद्धी महामार्ग, वॉटरग्रीडसारख्या असंख्य योजना रोखल्या आणि 50 योजना बंद केल्या. त्याची यादी आमच्याकडे आहे. हर्षवर्धन सपकाळांची तुलना जनरल डायरशी हर्षवर्धन सपकाळांच्या ट्विटवर उत्तर देताना बन म्हणाले, “माध्यमांची मुस्कटदाबी म्हणजे काय, हे आणीबाणीच्या काळात पाहिलंय. इंदिरा गांधींनी माध्यमांचं स्वातंत्र्य संपवलं होतं. आज काँग्रेस त्याच वाटेवर चालली आहे.” सपकाळांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरही त्यांनी पलटवार केला, “मी सपकाळांची जनरल डायरशी तुलना करतो. त्यांनी सर्वसामान्यांवर गोळ्या झाडल्या होत्या, आणि तुम्हीही त्याच दिशेने चाललात. महात्मा गांधींचे नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही,” असे बन म्हणाले. गोपीचंद पडळकरांच्या विधानाचे समर्थन पत्रकार परिषदेच्या शेवटी नवनाथ बन यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यानगर येथील सभेत केलेल्या विधानाचे समर्थन केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्माबाबत काय लिहिले आहे, हे वाचले पाहिजे. पडळकरांनी दिलेला संदर्भ योग्य आणि तार्किक असल्याचे बन म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 1:57 pm

काँग्रेसची मुंबईत ठाकरेंसोबत जाण्यास नकारघंटा:BMC ची निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा; स्थानिक नेत्यांची हायकमांडकडे मागणी

काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत न लढवता स्वबळावर लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेसने ही निवडणूक ठाकरे बंधूंसोबत मिळून लढली तर त्याचा फायदा केवळ ठाकरेंना होईल. त्यामुळे काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढावी, असे या नेत्यांनी म्हटले आहे. आता काँग्रेस या प्रकरणी कोणता निर्णय घेते हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सोमवारी सांताक्रूझच्या गॅलेक्सी हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली. त्यात प्रामुख्याने एकला चलो रे च्या भूमिकेवर विचारमंथन करण्यात आले. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रस्तुत बैठकीत राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवरही सल्लामसलत करण्यात आली. त्यात राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यास कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः या प्रकरणी काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडशी अनुकूल चर्चा सुरू आहे. पण राज्यातील नेते मनसेसोबत जाण्यास फारसे अनुकूल नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेनेच्या ठाकरे गटाला फायदा होतो. पण त्यांची मते काँग्रेसकडे ट्रान्सफर होत नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत युती केली किंवा ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली तर त्याचा फटका काँग्रेसला बसेल आणि फायदा ठाकरेंना होईल, असा सूर या नेत्यांनी आळवला. काँग्रेसने मुंबईत कोणत्याही जागेवर मैत्रिपूर्ण लढत लढू नये. ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढावी, असा सल्लाही या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला. त्यामुळे काँग्रेस आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणता निर्णय घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे विधान केले आहे. ते म्हणाले, स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसला सुद्धा आपल्यासोबत घेणे गरजेचे आहे. ही राज यांची एक भूमिका आहे. पण त्याचा अर्थ त्यांनी तसा निर्णय घेतला आहे असा नाही. या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे. जसे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवारांचे व डाव्या पक्षांचे आहे, तसेच स्थान काँग्रेसचेही आहे. काँग्रेसही महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचाही शिष्टमंडळात समावेश असणे गरजेचे आहे. ही राज ठाकरेंसह सर्वांचीच भूमिका आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 1:32 pm

सोयाबीनची खरेदी हमीभावाने करा

मुंबई : प्रतिनिधी सोयाबिनला ५४०० रुपये हमीभाव असताना बाजारात मात्र ३२०० ते ३७०० रुपये दराने खरेदी केले जात आहे, ही शेतक-यांची फसवणूकच असून हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करणा-यांवर कठोर कारवाई करावी नाहीतर सरकारनेच हमीभावाने शेतक-याचे सोयाबीन खरेदी करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे. सरकारने जर हमीभावाने सोयाबीन खरेदी नाही केले तर एकाही मंत्र्याला राज्यात […] The post सोयाबीनची खरेदी हमीभावाने करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Oct 2025 1:29 pm

EC च्या मतदार यादीत अनियंत्रित संशयास्पद वाढ:जितेंद्र आव्हाड यांचा आरोप; 'व्होट चोरी'चा मुद्दा उपस्थित करत केल्या 5 मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांमध्ये मतदारांची अनियंत्रित व संशयास्पद वाढ झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी व्होट चोरीचा मुद्दा उपस्थित करत या प्रकारावर अंकुश लावण्यासाठी आयोगाकडे 5 मागण्या केल्या आहेत. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषद आणि नगर पंचायती निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीकडे सखोल निरीक्षण केल्यास, सरासरी मतदारसंख्येमध्ये अनियंत्रित आणि संशयास्पद वाढ झाल्याचे दिसून येते. या वाढीचा अधिकृत टक्केवारी दर आजतागायत जाहीर करण्यात आलेला नाही, तसेच मतदारयादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची संख्या, कारणे आणि वगळणीसाठी वापरलेले निकष देखील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत. ही माहिती मतदार पारदर्शकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, ती राज्य निवडणूक आयोगाने तातडीने जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच, नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांपैकी किती जणांनी स्वतःहून ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्जाद्वारे नाव नोंदवले आहे, याची माहिती संबंधित BLO डायरीत उपलब्ध आहे का, याबाबत आयोगाकडून कोणताही स्पष्ट खुलासा करण्यात आलेला नाही. हे मतदार यादीच्या प्रामाणिकतेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करते. मतदार यादी तपासण्याची लिंक अनुपलब्ध ते पुढे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने “महा सर्व” या पोर्टलमार्फत नवीन मतदार नोंदणीसाठी कायदेशीर प्रक्रिया, पडताळणी आणि तांत्रिक सत्यापनाच्या बाबींचा उल्लेख केला असला, तरी प्रत्यक्षात त्या प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात आल्या आहेत का, याबाबत गंभीर शंका निर्माण होत आहे. याव्यतिरिक्त, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या दिनांक 09 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेली मतदारयादी तपासणीसाठीची अधिकृत लिंक (दुवा) सध्या कार्यरत नाही किंवा अनुपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब लोकशाही पारदर्शकतेच्या मूलभूत निकषांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तातडीने पुढील बाबी स्पष्ट कराव्यात व आवश्यक कार्यवाही करावी. मतदार नोंदणी ही लोकशाहीतील पारदर्शकतेचा पाया आहे. त्यात किंचितही शंका, अपारदर्शकता किंवा माहिती दडविणे हे राज्य निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेस गंभीर तडा देणारे ठरते, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 1:08 pm

काँग्रेसच्या सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा विचार करा:त्यांच्याशी हातमिळवणी तुम्हाला ठरणारी नाही, उदय सामंतांचा राज ठाकरेंना सल्ला

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना अधिक वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना थेट सल्लाच दिला आहे. युतीचा निर्णय घेण्यापूर्वी राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या भूमिकेचा नक्कीच विचार करावा, असे उदय सामंत म्हणालेत. 'काँग्रेस'ला सोबत घेण्याची इच्छा राज ठाकरे यांची इच्छा आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे असल्याची राज यांची भूमिका असल्याचे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. याबाबत उदय सामंत यांना विचारले असता, त्यांनी राज ठाकरेंना उपरोक्त सल्ला दिला. नेमके काय म्हणाले उदय सामंत? पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, राज ठाकरे यांनी कोणत्याही युतीचा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीच्या भूमिकेचा गांभीर्याने विचार करावा. सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्या पक्षासोबत हातमिळवणी करणे हे हिंदुत्ववादी विचारांचे नेतृत्व करणाऱ्या राज ठाकरे यांना साजेसे ठरणार नाही. काँग्रेस स्वयंभू झालाय, कोणालाच मानत नाही उदय सामंत यांनी यावेळी काँग्रेसवर आणि काँग्रेसशासित कर्नाटक सरकारवरही तीव्र शब्दांत हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्नाटकात सत्तेवर असलेल्या काँग्रेस सरकारकडून सीमाभागातील मराठी लोकांवर अन्याय होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसकडून हिंदुत्वाच्या मूल्यांना धक्का पोहोचतो. त्यामुळे हा पक्ष कोणालाच मानत नाही, एवढा तो स्वयंभू झालेला आहे. राज ठाकरे युतीचा निर्णय घेणार? सावरकरांसह कोणालाच न मानणाऱ्या पक्षासोबत युती करू पाहणाऱ्या नेत्यांनी या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यांच्याबरोबर युती करण्यासाठी काही लोक पुढे येत असतील, तर त्याचा विचार त्यांनी नक्की करावा, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. यामुळे राज ठाकरे खरोखरच या युतीकडे पाऊल टाकतात का? आणि त्यात काँग्रेसचाही सहभाग असणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 12:42 pm

खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली:मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल, दोन दिवसांपूर्वीच झाली होती तपासणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ खासदार संजय राऊत यांची आज सकाळी अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहेत. खासदार संजय राऊत सोमवारी सकाळी पत्रकारांशी नियमित संवाद साधला. त्यावेळी त्यांचा आवाज काहीसा दमल्यासारखा वाटत होता. त्यानंतर तासाभरातच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, संजय राऊत यांना सध्या घशाचा त्रास होत आहे. आज अस्वस्थ वाटत असल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयात संजय राऊत यांची नियमित तपासणी झाली होती. त्यात त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यानंतर आज लगेचच त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2020 मध्ये झाली होती अँजिओप्लास्टी उल्लेखनीय बाब म्हणजे 2020 मध्ये संजय राऊत यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 स्टेन टाकण्यात आले होते. तत्पूर्वी, त्यांच्या हृदयात 2 ब्लॉकेज आढळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी अँजिओप्लास्टी केली होती. तेव्हापासून ते डॉक्टरांच्या सल्लानुसार सातत्याने तपासणी करत आहेत. या स्थितीतही ते आपल्या पक्षाची भूमिका ठामपणे जनतेपुढे मांडतात. या प्रकरणी मध्यंतरी त्यांच्यावर तुरुंगात जाण्याचीही वेळ आली. पण ते मागे हटले नाही. उलट त्यांच्या टीकेची धार अधिकच वाढली. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामागेही संजय राऊतच असल्याची चर्चा आहे. संजय राऊत ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ संजय राऊत हे शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून संजय राऊत ठाकरे गटाची बाजू अत्यंत दमदारपणे मांडत आहेत. ठाकरे गटाचा अजेंडा प्रभावीपणे मांडून सत्ताधाऱ्यांना पळताभूई थोडी करण्याचे काम ते नित्यनियमाने करत असतात. आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज ठाकरे यांची काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा असल्याचे सांगून एक नवा बॉम्बगोळा फोडला. यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील हा मुद्दा निकाली निघाला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत राज ठाकरे महाविकास आघाडीत आल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही. हे ही वाचा... राज ठाकरेंची 'काँग्रेस'ला सोबत घेण्याची इच्छा:संजय राऊत यांचे मोठे विधान, पुण्यातील गुंडगिरीवरून अजित पवारांवर गंभीर आरोप मुंबई - महाराष्ट्रातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडवणारा संकेत आता समोर आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाविकास आघाडीत काँग्रेसलाही सोबत घेण्याची इच्छा असल्याचे संजय राऊत म्हणालेत. राज ठाकरे यांना वाटते की काँग्रेस हा महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक आहे आणि आघाडी मजबूत करायची असेल, तर काँग्रेसला सोबत घेणे आवश्यक आहे, असे राऊत यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी पुण्यातील गुंडगिरीवर भाष्य करताना अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 12:35 pm

ठाकरे बंधूंच्या युतीचा काडीचा फायदा नाही:भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला; भाजपवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीचा भाजपसह आगामी निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा भाजप नेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज व उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र आल्यामुळे मुंबई महापालिकेत ठाकरे गट व मनसेचाच वरचष्मा राहील असा दावा केला जात आहे. पण भाजपने हा दावा फेटाळून लावला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सोमवारी याविषयी बोलताना ठाकरे बंधूंच्या भेटीगाठीचा आगामी निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. प्रवीण दरेकर म्हणाले, ठाकरे बंधूंच्या भेटीचा आगामी निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला. मुंबईत महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आलेत. सध्या मुंबई झपाट्याने बदलत आहे. मेट्रो रेल व कोस्टल रोड प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईत मोठी प्रगती होत आहे. महायुतीच्या काळात मुंबईचा चेहरामोहरा बदल आहे. जनतेने ठाकरेंना 30-35 वर्षांपासून पाहत आहे. त्यांनी ना बाळासाहेबांची विचारसरणी जोपासली ना मुंबई व मराठी माणसांवर त्यांचे प्रेम आहे. त्यामुळे राज व उद्धव ठाकरे यांच्या भेटींना राजकीयदृष्ट्या फार महत्त्व देण्याची गरज नाही. महाराष्ट्राला युत्या, आघाड्या नव्या नाहीत दरेकर पुढे म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र येण्यात काहीही आश्चर्य नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही युती व आघाड्या झाल्या. दोन भाऊ एकत्र येणे स्वाभाविक आहे. दोन पक्ष व दोन नेते आहेत. त्यांची युती होणे ही लोकशाहीतील एक प्रक्रिया आहे. सत्ताधारी महायुतीतही तीन व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतही 3 पक्ष आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याने काहीही वेगळे घडणार नाही. मागील 20 वर्षांपासून त्यांचे कुटुंब एकत्र नव्हते. आता ते एकत्र येत आले असतील किंवा एकत्र येणार असतील तर त्याचा राजकीयदृष्या काडीचाही परिणाम होणार नाही. राज व उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्यावर एकत्र उल्लेखनीय बाब म्हणजे राज व उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्यावरून सध्या एकत्र आलेत. या दोन्ही कुटुंबीयांच्या भेटीगाठी सध्या चांगल्याच वाढल्या आहे. राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या घरी गेले होते. मागील पंधरवड्यात जवळपास अर्धा डझनवेळा या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना भेटलेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेचच मनसे व ठाकरे गटाच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा... महायुतीच्या तिन्ही पक्षांनी पुणे वाटून घेतले:सीपी भाजपचा, मनपा आयुक्त शिंदेंचा अन् कलेक्टर दादांचा; रोहित पवार यांचा आरोप पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील वाढत्या गुंडगिरीच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुतीवर सडकून टीकाी केली आहे. गुंडांकडून पुण्याची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे. तिन्ही सत्ताधारी पक्षांनी सुलतान मिर्झाने गुंडांमध्ये मुंबई वाटली तसे पुणे वाटून घेतले आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 12:25 pm

लेखकांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये:साहित्यिक विश्वास पाटील यांचे अभिजात मराठी शब्दोत्सवात मत

लेखकांनी आपली सृजनशीलता आणि अभिव्यक्ती कोणत्याही बाह्य दडपणाशिवाय मुक्तपणे मांडली पाहिजे, असे मत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे आयोजित 'अभिजात मराठी शब्दोत्सव' या ६०७ व्या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हे तीन दिवसीय ग्रंथ प्रदर्शन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाला राजहंस प्रकाशनाचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे, अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका राठिवडेकर आणि 'अक्षरधारा' दिवाळी अंकाच्या संपादिका स्नेहा अवसरीकर उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर लेखक आणि पत्रकार प्रशांत दीक्षित यांनी विश्वास पाटील यांची प्रकट मुलाखत घेतली. आपल्या मताचे स्पष्टीकरण देताना विश्वास पाटील यांनी १९५० मधील एक प्रसंग सांगितला. पंडित जवाहरलाल नेहरू प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही शायर-कवी मजरूह सुलतानपुरी यांनी कवितेतून त्यांच्यावर टीका केली होती. माफी मागितल्यास संभाव्य त्रास टळू शकला असता, मात्र सुलतानपुरी यांनी कोणतीही तडजोड न करता 'मी माझ्या शब्दांशी प्रामाणिक राहील' अशी भूमिका घेतली आणि दीड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा भोगली, असे पाटील म्हणाले. 'महानायक' कादंबरी लिहिताना म्यानमारमधील नाजूक परिस्थितीचा अनुभव त्यांनी सांगितला. सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून सुभाषचंद्र बोस यांचा प्रवास जाणून घेताना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. तिथला लष्करी नियम अतिशय कडक असल्याने एक-दोन वेळा त्या नियमांमध्ये अडकता अडकता थोडक्यात बचावलो, असेही त्यांनी नमूद केले. लेखकाच्या अंगी एखाद्या विषयाचे झपाटलेपण असल्याशिवाय त्या विषयाला न्याय मिळत नाही, असेही ते म्हणाले. लेखकाने कथा-कादंबरीच्या प्रक्रियेसाठी लेखनासोबतच पुनर्लेखनावरही भर देणे आवश्यक आहे. स्तुतीपाठक मित्रांऐवजी वेळप्रसंगी कान धरणारे आणि अधिकची अपेक्षा करणारे वाचक व प्रकाशक असणे महत्त्वाचे असते. राजहंस प्रकाशनाकडे त्यांनी एक गाजलेली कादंबरी दिली असता, ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उतरली नसल्याने संपादकीय मंडळ नाराज होते. त्यावेळी त्यांनी प्रकाशकांकडून सहा महिन्यांचा अधिक कालावधी मागून घेऊन कादंबरीला अंतिम रूप दिले, असा अनुभवही त्यांनी सांगितला. यावेळी विश्वास पाटील यांनी 'पानिपत', 'महानायक', 'लस्ट फॉर लालबाग' अशा विविध कादंबऱ्यांची निर्मिती कथा उलगडली. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक योगदानावर भाष्य केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 12:13 pm

संवेदनशील समाजामुळे आनंदी जगण्याची उमेद मिळते:उमेद फाउंडेशनच्या प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात चंद्रकांत पाटलांचे प्रतिपादन

संवेदनशील वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांमुळे समाजातील दुःखितांना जगण्यात आनंद मिळण्याची उमेद मिळते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आनंदाने जगण्यासाठी आर्थिक नव्हे, तर मनाची आणि दातृत्वाची संपत्ती अधिक गरजेची असते, असेही त्यांनी नमूद केले. उमेद फाऊंडेशन संचालित दिव्यांग मुले व त्यांच्या पालकांसाठीच्या बालक-पालक प्रकल्पाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक सुहास हिरेमठ, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके, उमेद फाऊंडेशनचे राकेश सणस, लीना देवरे, प्रकाश पारखी, प्रतिभा केंजळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग आणि मतिमंद पाल्यांना घडवणाऱ्या डॉ. रितेश व उल्का नेहेते (पुणे), चिंतामणी व राजेश्वरी राशीनकर (पुणे), अभिमन्यू पोटे (कोल्हापूर), अमृता भिडे (रत्नागिरी) या पालकांना 'प्रेरणा पुरस्कार' प्रदान करण्यात आले. वैद्यकीय सेवेतील योगदानाबद्दल डॉ. प्रदीप देशपांडे, इमारत उभारणीतील योगदानाबद्दल शशिकांत नागरे आणि उमेद फाऊंडेशनला जागा देणारे राजेंद्र रसाळ यांना 'सेवा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात 'आक्रंदन' या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, समाजावर श्रद्धा ठेवून काम केल्याने स्नेहालयचे कार्य यशस्वीपणे पुढे नेता आले. सामाजिक संस्थांच्या पाठीशी उभे राहिल्यास समाजातील अनेक समस्या सोडवण्यासाठी मदत होते. 'उमेद'सारख्या संस्थांना आर्थिक सहयोगाबरोबरच सेवाभावी कार्यकर्त्यांचीही गरज असते, त्यामुळे दानशूर आणि संवेदनशील व्यक्तींनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.रवींद्र वंजारवाडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजात मदतीचा हात देणारी अनेक माणसे आहेत. सेवा हे आपले कर्तव्य असून, प्रत्येकाने अवतीभवतीच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. स्नेहालय आणि उमेद फाउंडेशनसारख्या संस्था समाजातील दुःखितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे महत्त्वाचे काम करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 12:11 pm

तुळशीबागेत महिलेच्या बॅगमधून रोकड चोरी:दोन महिलांना अटक, विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल

पुण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या बॅगमधून रोकड चोरणाऱ्या दोन महिलांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तुळशीबागेत घडली असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनीसा सोहेल शेख (वय ४०) आणि मेहराज सोहेल शेख (दोघी रा. पद्मजी पोलिस चौकीजवळ, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी एका ३८ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला १२ ऑक्टोबर रोजी दुपारी तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. दिवाळीनिमित्त तुळशीबागेत मोठी गर्दी होती. गणपती चौक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन आरोपी शेख यांनी महिलेच्या पिशवीची चेन उघडून साडेसात हजार रुपयांची रोकड चोरली. चोरीचा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला. गर्दीतून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही महिलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिस हवालदार पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले पुण्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याचे समोर आले आहे. वारजे आणि प्रभात रस्ता परिसरात या घटना घडल्या आहेत. वारजे भागात किराणा माल विक्री करणाऱ्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेच्या पतीचे वारजे येथील सिप्ला फाऊंडेशनजवळ असलेल्या पूजा हायलँड सोसायटीत किराणा दुकान आहे. दुकानात दूध खरेदीच्या बहाण्याने दोन चोरटे शिरले आणि महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झाले. सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पटारे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.दुसऱ्या एका घटनेत, प्रभात रस्ता परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून नेले. ही ज्येष्ठ महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४ परिसरातून जात असताना चोरट्याने दुचाकीवरून येऊन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि पसार झाला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 12:08 pm

महिलेची जमीन बळकावून 25 लाखांची मागणी:गुंड टिपू पठाणवर खंडणीचा गुन्हा दाखल, बँक खातीही गोठावली

हडपसर भागातील सय्यदनगर येथे एका महिलेची जमीन बेकायदेशीरपणे बळकावून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गुंड टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जमिनीचा ताबा सोडण्यासाठी ही खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी एका ३१ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गणी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इरफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख आणि मतीन हकीम सय्यद (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची सय्यदनगर भागात जमीन आहे. गुंड टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी या जागेवर बेकायदेशीरपणे पत्र्याची शेड बांधली. त्यांनी जागेचा ताबा घेऊन ती एका व्यक्तीला भाड्याने दिली होती आणि त्यातून दरमहा भाडे वसूल करत होते. महिलेने जागेचा ताबा सोडण्यास सांगितल्यावर पठाणने २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यासच जागेचा ताबा सोडेल आणि पुन्हा या भागात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील करत आहेत. दरम्यान, पठाण आणि त्याच्या साथीदारांची बँक खाती नुकतीच गोठवण्यात आली आहेत. काळेपडळ पोलिसांनी पठाणसह साथीदारांच्या घरांची झडती घेतली. यावेळी जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, एक महागडी मोटार, तीन दुचाकी आणि गृहोपयोगी वस्तू जप्त करण्यात आल्या. यापूर्वी, काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने पठाणच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई केली होती. यात त्याचे कार्यालय आणि इतर बेकायदा बांधकाम पाडण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण आणि त्याच्या दहा साथीदारांच्या घरावर छापा टाकून पंखे, दूरचित्रवाणी संच, धुलाई यंत्र, महागडे फर्निचर असा सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 12:04 pm

माझ्यावर मोक्का लावण्याचे समीर पाटीलचे षडयंत्र:माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप, तुम्ही माझ्यावर का घसरता? भाजपला सवाल

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला गुंडाचा वावर असून ते पुणे शहराचे नाव बदनाम करत आहे. निलेश घायवळ याचा आणि माझा कोणता संबंध नाही. पुण्यात गुन्हेगारी वाढली असून पुणे शहर भयमुक्त झाले पाहिजे. समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता याबाबत मी जरा माहिती काढली तर, सांगली मध्ये त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून ते मोक्का मधील देखील आरोपी होता. मोक्का एका केसवर दाखल किंवा सज्जन माणसावर लागत नाही. गुन्हेगारी चालविण्याचे काम तो करत आहे. आर.आर.पाटील यांच्या काळात देखील मानसपुत्र म्हणून तो फिरुन गैरकारभार करत आहे. समीर पाटील याची ढवळाढवळ गुन्हे दाखल करणे आणि कोणाला लक्ष्य करण्यात आहे. माझ्यावर मोक्का लावण्याचा प्रयत्न देखील करण्यात येत आहे. माझ्या कार्यालयात देखील स्टिंग ऑपरेशन केले गेले. त्यामुळे याबाबत पाटील यांनी खुलासा करावा मी मागणी केली. तर,भाजपचे लोक माझ्यामागे लागत आहे, असा आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. धंगेकर म्हणाले, मी भाजपच्या विरोधात कोणतेही वक्तव्य केले नाही. पुणे शहर गुन्हेगारी मुक्त हवे म्हणून मागणी केली आहे. पोलीस खात्यात माझे अनेक हितचिंतक असून त्यांच्याकडून देखील समीर पाटील याच्या हस्तक्षेपाबाबत अनेक माहिती मला मिळाली आहे. तो जे सांगेल त्याप्रमाणे पुणे पोलीस वागत आहे. १०० कोटीचा मालक तो कसा झाला याची चौकशी करण्यात यावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील भेटून मी त्यांना सर्व गोष्टी सांगितली. त्यांनी मला काही विषय समजावून सांगितले. मात्र, मी चंद्रकांत पाटील यांना केवळ समीर पाटील याच्या गैरकारभार विरोधात प्रश्न विचारला आहे. परंतु सोशल मीडियावर माझ्या बदनामीचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची तयारी रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, माझा मुलगा २१ वर्षाचा असून तो शिक्षण घेत आहे. त्याचे देखील फोटो व्हायरल करुन राजकारण करण्यात येत आहे. त्याच्या हातातील बंदुक ही खेळण्यातील आहे. गुंड गजा मारणे याच्यासोबत त्याचा फोटो हा सहजरित्या काढला गेला असून तो मारणेबाबत पाठपुरावा करण्यास कुठे गेला नाही. लोकप्रतिनिधींच्या कुटुंबियांना राजकारणात ओढणे राज्यातील राजकारणाची संस्कृती नाही. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची तयारी असून त्याबाबत मी गप्प बसणार नाही, असा इशारा धंगेकर यांनी दिला. कोणतेही राजकीय हल्ले परतावून लावण्यास मी समर्थ गुन्हेगारीमुळे पुण्याची नाचक्की झाली असून एकनाथ शिंदे यांनी देखील परिस्थिती सुधारली पाहिजे हेच सांगितले आहे. पुण्यातील गुन्हेगारीवर प्रश्न विचारणे माझे काम असून सर्वसामान्य आज सुरक्षित नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेऊन मी शिवसेना पक्षात आलो आहे. निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलीसांची नाचक्की झाली आहे. पुण्यात ७० गुन्हेगारी टोळ्या कार्यरत आहे. राजकारणाचा कोणताही भाग न आणता गुन्हेगारीचा बिमोड झाला पाहिजे. कोणतेही राजकीय हल्ले परतावून लावण्यास मी समर्थ आहे, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 11:53 am

महायुतीच्या तिन्ही पक्षांनी पुणे वाटून घेतले:सीपी भाजपचा, मनपा आयुक्त शिंदेंचा अन् कलेक्टर दादांचा; रोहित पवार यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील वाढत्या गुंडगिरीच्या मुद्यावरून सत्ताधारी महायुतीवर सडकून टीकाी केली आहे. गुंडांकडून पुण्याची राखरांगोळी झाली तरी चालेल, पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे. तिन्ही सत्ताधारी पक्षांनी सुलतान मिर्झाने गुंडांमध्ये मुंबई वाटली तसे पुणे वाटून घेतले आहे, असे ते म्हणालेत. पुण्यातील गुंडगिरीचा मुद्दा सध्या चांगलाच ऐरणीवर आला आहे. या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गँगस्टर नीलेश घायवळ याच्या भावाला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर हा वाद अधिकच टोकाला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. महायुतीच्या नेत्यांनी पुणे वाटून घेतले रोहित पवार म्हणाले की, गुंडांकडून पुण्याची राखरांगोळी झाली तरी चालेल पण महायुतीत दंगा नको ही तिन्ही राज्यकर्त्यांची भूमिका आहे. सुलतान मिर्झाने गुंडांमध्ये कशी मुंबई वाटली तसंच पुणे देखील या तिन्ही पक्षांनी वाटून घेतले आहे, सीपी भाजपच्या पसंतीचा, मनपा आयुक्त शिवसेना शिंदे गटाच्या पसंतीचा तर कलेक्टर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पसंतीचा अशी ही वाटणी आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद, स्थानिक नेत्यांचे मार्गदर्शन आणि गुंडांचा उपयोग ही त्रिसूत्री वापरून पुण्याचे वाटोळे केल जात आहे. असो, केवळ सत्ता आणि सत्ता हेच उद्दिष्ट असलेल्या राज्यकर्त्यांकडून दुसरी अपेक्षा तरी करायची काय? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. महायुतीच्या नेत्यांची धोरणे गुंडांचे मनोबल वाढवणारी रोहित पवार यांनी सत्ताधारी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी गुंडगिरीच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेवरूनही महायुतीवर निशाणा साधला आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासारखा सामान्य पणेकर कसलीही भीडभाड न ठेवता गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी लढत आहेत. पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्यांच्या मार्गात अडचणी उभ्या करत आहेत. आपण कुठल्या पक्षात आहोत आणि त्यांच्या बॉसशी बोलू असली बेजबादार वक्तव्ये या मोठ्या नेत्यांना शोभतात का? त्यांच्या बॉसशी बोलणार अशी धमकी देण्यापेक्षा गृहमंत्री या नात्याने धंगेकरांशी बोलून गुंन्हेगारीचा नायनाट करायला काय हरकत आहे? असे ते म्हणालेत. मोठ्या नेत्यांच्या या प्रतिक्रिया ऐकून गुंडांचं मनोबल वाढणार नाही तर काय? हे असंच चालू राहिलं तर पुण्याच्या बरबादीला सरकारला जबाबदार का धरू नये? सोबत पुण्याच्या गुन्हेगारीची आकडेवारी देत असून ही आकडेवारी बघून तरी या नेत्यांचे डोळे उघडतील, ही अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ओल्या दुष्काळात तेराव्या महिन्यासारखे धोरणे राबवू नका रोहित पवार यांनी अन्य एका ट्विटद्वारे पणन मंत्र्यांना उडीद खरेदी केंद्र सुरू करण्याचेही आवाहन केले आहे. आदरणीय पणन मंत्री महोदय, अतिवृष्टीने अगोदरच शेतकरी उध्वस्त झाला असून शेतातल्या उरल्या-सुरल्या उत्पन्नाला तरी हमीभाव मिळावा, ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र अजूनही उडीद खरेदी केंद्र सुरू झाली नसल्याने खुल्या बाजारात अत्यंत कवडीमोल भावाने उडदाची खरेदी होत आहे. शेतकऱ्यांचा माल विकल्यानंतर व्यापाऱ्यांकडून खरेदी व्हावी यासाठी खरेदी केंद्र उशिरा सुरू करणार आहात का? ओल्या दुष्काळात तेराव्या महिन्यांसारखी धोरणे राबवू नका, तत्काळ खरेदी केंद्रे सुरू करा, ही विनंती, असे ते म्हणालेत .

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 11:13 am

यंदाचा पाडवा ना बारामतीत, ना काटेवाडीत:पवार कुटुंबाचा दिवाळी पाडवा रद्द; कुटुंबाच्या परंपरेतील अपवाद ठरणार, नेमके कारण काय?

दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पवार कुटुंब बारामतीत दिवाळीचा सण साजरा करत असते. पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात, कार्यकर्ते आणि चाहत्यांची गर्दी होते, तसेच राज्यभरातील राजकीय नेते शुभेच्छा देण्यासाठी बारामतीकडे रवाना होतात. मात्र, यंदा हा पारंपरिक जल्लोष दिसणार नाही. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबाने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. पवार कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे बारामतीतील पारंपरिक पाडवा उत्सव रद्द झाला आहे. दरवर्षी गोविंदबागेत शरद पवारांच्या उपस्थितीत मोठा सोहळा होत असतो, तर अजित पवार आपल्या काटेवाडीतील निवासस्थानी वेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना भेटतात. पण या वर्षी कोणताही कार्यक्रम होणार नाही, अशी अधिकृत माहिती पवार कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी राज्यभरातील राजकीय नेते, आमदार, खासदार, उद्योगपती आणि सामान्य नागरिक बारामतीत येऊन पवार कुटुंबाला शुभेच्छा देतात. बारामतीतील गोविंदबागेत पवारांचे पारंपरिक स्वागत केले जाते आणि याच दिवशी अनेक राजकीय चर्चाही रंगतात. परंतु यंदा भारती पवार यांच्या निधनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पवार कुटुंबीयांच्या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत करत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे अनेक नेत्यांनी म्हटले आहे. मागील वर्षीचा दिवाळी पाडवा मात्र राजकीय दृष्ट्या विशेष ठरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाडवा साजरा केला होता. शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत झाला, तर अजित पवारांचा काटेवाडीत. त्यामुळे पवार घराण्यातील मतभेद आता सणांपर्यंत पोहोचले अशी चर्चा राज्यभर रंगली होती. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती आणि दोन्ही कार्यक्रमांचे राजकीय महत्त्व अधोरेखित झाले होते. पाडव्याचा कोणताही कार्यक्रम न होण्याची घोषणा यंदा मात्र पाडव्याचा कोणताही कार्यक्रम न होण्याची घोषणा होताच, बारामतीतील राजकीय वातावरण शांत झाले आहे. पवार कुटुंबाने शोककाळात सण साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्येही संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारती पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंब शोकमग्न आहे, आणि त्यामुळे बारामतीत या वर्षीचा दिवाळी पाडवा न साजरा होणे हे पवार कुटुंबाच्या परंपरेतील एक अपवाद ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 10:58 am

सतीश ‘खोक्या’ भोसलेच्या कुटुंबावर हल्ला:दहा ते पंधरा जणांविरोधात ॲट्रॉसिटी आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपींचा शोध सुरू

सतीश भोसले उर्फ खोक्या भाई यांच्या कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिरूर पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी तसेच पॉस्को कायद्यान्वये दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हल्ल्यानंतर कुटुंबातील चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेदरम्यान एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचेही पीडित कुटुंबाचे म्हणणे असून, तिची वैद्यकीय चाचणी आज करण्यात येणार आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे. घटनेचा प्रकार काल (12 ऑक्टोबर) मध्यरात्री घडला. शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये सतीश भोसले यांच्या कुटुंबावर 10 ते 15 जणांच्या अज्ञात टोळक्याने हल्ला चढवला. दांडगे, कोयते आणि कुऱ्हाडींनी सज्ज असलेल्या टोळक्याने महिलांवर बेछूट मारहाण केली. महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, मदतीसाठी हाक मारली, मात्र हल्लेखोरांनी कोणतीही दया दाखवली नाही. डोक्यावर, पाठीत आणि पायांवर जबर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सर्व महिला रक्तबंबाळ झाल्या. जखमींनी कसाबसा पोलिस ठाण्याचा रस्ता धरला आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परिसरात तणावाचे वातावरण प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी का राहता? असा सवाल करत टोळक्याने भोसले कुटुंबाला धमकावले आणि त्यानंतर हल्ला चढवला. या हल्ल्यामागचे कारण स्थानिक वाद, वैर किंवा एमपीडीए अंतर्गत झालेल्या कारवाईशी संबंधित असू शकते, अशी चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे आणि पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भोसलेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी गावचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो स्थानिक राजकारणात सक्रिय होता आणि भाजप आमदार सुरेश धस यांचा तो जवळचा सहकारी म्हणून ओळखला जातो. भोसलेवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून काही महिन्यांपूर्वी समाजमाध्यमांवर त्याचे दहशत पसरवणारे व्हिडिओ व्हायरल झाले होते. वनविभागाच्या कारवाईदरम्यान घरातून सापडलेल्या साहित्यामुळे खोक्या भाईची चर्चा बीड जिल्ह्यात आणि राज्यभर झाली होती. भोसले एमपीडीए अंतर्गत कारवाईमुळे कारागृहात अलिकडेच बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणावर बॅटने बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात सतीश भोसलेला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, तो सध्या एमपीडीए अंतर्गत कारवाईमुळे कारागृहात आहे. त्याच्या अनुपस्थितीत झालेल्या या हल्ल्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, हल्ल्यामागे सूडबुद्धीचा हेतू असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनंतर सतीश भोसलेच्या समर्थकांमध्ये संताप व्यक्त होत आहे, तर पोलिसांकडून आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Oct 2025 10:37 am