SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

संभाजीनगरात विश्वासघाताचा कळस!:प्लॉटिंगमधील रस्ता विकून 2.89 कोटींची फसवणूक; सातबारा दाखवून स्टॅम्प ड्युटी भरत केली विक्री

आधीच प्लॉटिंग झालेल्या जागेतील रस्त्याच्या जागेचा‎७/१२ दाखवून त्याचा खरेदीखत, स्टॅम्प ड्यूटी भरून‎विक्री केली. मात्र मूळ जागा मालकाने सर्व कागदपत्रे‎समोर मांडल्यावर हा फसवणुकीचा प्रकार समोर‎आला. यात भाजपच्या बीड येथील शहराध्यक्ष अशोक‎चांदमल लोढा (६१, रा. गणेश हाउसिंग सोसायटी,‎जालना रोड, जि. बीड) यांची २ कोटी ८९ लाख ८९‎हजार ४२० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी‎सातारा पोलिस ठाण्यात मंजिरी आलोक चौधरी, स्वप्ना‎विद्याधर बडीगणवार, मोहिनी दिलबागसिंग, जावेद‎नूरखाँ पठाण, सुरेश सीताराम इंगळे, बद्रीनारायण‎नागोराव करे, साहेबराव कचरू घुगे, बाबुराव‎आनंदराव ताठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.‎ लोढा यांच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये सातारा‎परिसरातील गट नंबर २० मधील १०३.५५ आर जमीन‎विक्री होत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांची‎आरोपींशी भेट झाली. त्यांच्यात ११ जुलै २०२३ रोजी‎नोटरीद्वारे करार झाला. यात प्रतिएकर २ कोटी ४० लाख‎रुपये प्रमाणे खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार २०‎जुलै रोजी आरोपींनी मैत्रेय प्लॉटिंग सेंटर या फर्मच्या‎नावाने इसार पावती करून दिली. त्यावेळी एकूण ५०‎लाख रुपये देऊन १० लाख रुपये मोजणीसाठी दिले होते.‎ तीन वेगवेगळे खरेदीखत करत‎३५.५४ लाख स्टॅम्प ड्यूटी भरली‎ लोढा यांनी १८ एप्रिल २०२४ रोजी आठही‎आरोपींच्या ताब्यात असलेल्या मौजे‎साताऱ्यातील जमिनीचे तीन वेगवेगळे‎खरेदीखत करण्यात आले. यात ३३.५५ आर, ३५‎आर व ३५ आर असे भाग करण्यात आले होते.‎यासाठी एकूण १ कोटी ६१ लाख ०९ हजार ७२०‎रुपये चेकच्या माध्यमातून देण्यात आले होते.‎तसेच स्टॅम्प ड्यूटीसाठी ३५ लाख ५४ हजार‎७०० रुपये व दस्तऐवज शुल्क २५ हजार‎रुपयेदेखील भरण्यात आले.‎ तार कुंपण करताच मूळ‎मालकाने केले उद्ध्वस्त‎ खरेदीखत पूर्ण झालेले असल्याने आता तुम्ही‎जमिनीचा ताबा घेऊ शकता असे आरोपींनी‎सांगितले. त्यामुळे १५ लाख खर्च करून संपूर्ण‎जमिनीचे सपाटीकरण करून त्याच्याभोवती‎वॉल कंपाउंड करण्यात आले. त्यानंतर २६ मार्च‎२०२५ रोजी जमिनीचे मूळ मालक राजीव‎खेडकर यांनी व त्यांचा वॉचमन पवन दिलीप‎सोनवणे यांनी जमिनीवरील पत्र्याची रूम पाडून‎टाकली. तसेच फिर्यादीने ठेवलेल्या ‎वॉचमनलाही हाकलून लावले.‎ प्रकार उघडकीस आल्यावर दुसऱ्याला विकण्याची ऑफर‎ संबंधित जमीन खेडकर यांनी १९८४ सालीच‎खरेदी केली असल्याचे समोर आले. याची‎पूर्ण शहानिशा केल्यावर लोढा यांनी‎आरोपींना याचा जाब विचारला. त्यावर‎त्यांनीच घोटाळा केला असावा अशी शंका‎निर्माण केली.‎ तुमचे पैसे परत करण्यासाठी आता जमीन‎तिसऱ्या माणसाला विक्री करून देण्याची‎ऑफरदेखील फिर्यादीला आरोपींच्या वतीने ‎देण्यात आली आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 11:17 am

शिवतीर्थावरून पुन्हा वाद:संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका; म्हणाले - एकनाथ शिंदेंचा पक्ष अमित शहांचे 'टेस्ट ट्यूब बेबी'

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगता सभेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार शब्दांत टीका केली. शिवतीर्थावर सांगता सभा करण्याचा अधिकार फक्त शिवसेनेलाच असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, आतापर्यंत शिवतीर्थावर निवडणुकीच्या सुरुवातीची आणि सांगता सभा केवळ शिवसेनाच करत आली आहे. त्यामुळे आता महापालिकेची सांगता सभा करण्यासाठी काही जणांना बुडबुडे, येत असल्याचा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटाचा शिवतीर्थाशी नेमका काय संबंध आहे, असा सवाल उपस्थित केला. तुमचा पक्ष अमित शहांनी ताब्यात घेतला आहे. तुम्ही अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी आहात, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंवर आणि त्यांच्या गटावर टीका केली. शिवसेनेच्या परंपरा, इतिहास आणि संघर्षाचा वारसा शिवतीर्थाशी जोडलेला असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा राऊत यांनी केला. त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात वादाची ठिणगी पडली असून, आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत....

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 11:06 am

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश ठरला?:काँग्रेसला तगडा झटका; प्रज्ञा ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी

काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. प्रज्ञा सातव ह्या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. त्या सध्या विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेणे निश्चित केले असेल तर तो काँग्रेससाठी एक जबर झटका ठरेल. यासंबंधीच्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपाच्या गळाला लागला आहे. पुढील काही दिवसांतच त्या नेत्यासह कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी संबंधित नेत्याने त्यांच्या मोजक्याच कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा बडा नेता म्हणजे आमदार प्रज्ञा सातव असल्याचे सांगण्यात येत आहे. गत 4 महिन्यांत हिंगोलीत मोठी उलथापालथ उल्लेखनीय बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील 4 महिन्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेसेनेला सेनगाव व हिंगोली तालु्क्यात मोठे बळ मिळाले. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या शिवाय शरद पवार गटाचेच जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिंगोलीहून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना त्यानंतर आता हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचा एक चेहरा भाजपाच्या गळाला लागला आहे. त्यासाठी मुंबईत राजकीय हालचाली सुरु झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपमध्ये जाणाऱ्या या नेत्याने त्यांच्या काही निवडक कार्यकर्त्यांना मुंबईत पोहोचण्याचे संदेश पाठविले आहेत. त्यानुसार काँग्रेसचे काही कार्यकर्ते बुधवारी ता. 17 मुंबईकडे रवाना झाले आहेत. आता या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच नेत्याचा भाजपा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांतच पक्षप्रवेश मुंबईकडे रवाना झालेल्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याला नेत्याने मुंबईत बोलावल्याचे स्पष्ट केले. पण त्यांचा भाजपा प्रवेश आहे किंवा नाही याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तूर्तास या पक्ष प्रवेशाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. पण पुढील काही दिवसांतच हा पक्ष प्रवेश होईल अशीही खात्रीलायक माहिती आहे. या चर्चेमुळे आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 10:53 am

पोलिस भरतीसाठी तरुणींना महापालिका देणार 'ट्रेनिंग':क्लासचे शुल्क भरणे अशक्य असल्याने मनपाचा पुढाकार, संभाजीनगरात राज्यातील पहिलाच उपक्रम

राज्यामध्ये १५ हजार ६३१ पदांसाठी पोलिस भरती होत आहे. यामध्ये साडेचार हजारांपेक्षा अधिक जागा मुलींसाठी राखीव आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील जास्तीत जास्त महिलांची निवड व्हावी यासाठी मनपाच्या महिला व बालविकास विभागाकडून शहरातील १८ ते ३३ वयोगटातील मुली व महिलांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. मनपा हद्दीतील रहिवासी, किमान १० वी उत्तीर्ण असलेल्या मुली व महिलांना या प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी छत्रपती संभाजीनगर ही पहिलीच महापालिका असल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने या उपक्रमाद्वारे महिलांना सुरक्षित, सक्षम व स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रशिक्षणादरम्यान शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, मुलाखत या सर्व स्तरांवर मार्गदर्शन केले जाईल. अर्जासोबत रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे जमा करावी लागतील. निवड झालेल्या उमेदवारांना नाममात्र १० टक्के (२,५०० हजार रुपये) शुल्कासह नियोजित ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी येत्या २२ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर, तसेच विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. त्याासाठी २२ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे. पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रांकडून २५ ते ३० हजार रुपये शुल्क आकारले जात आहे. यामुळे अनेक गरीब विद्यार्थिनी भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने हा उपक्रम सुरू केल्याचे मनपाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस भरतीत राज्यात सर्वाधिक महिला शहरातील असतील - जी. श्रीकांत, आयुक्त, मनपा शहरात पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गरीब कुटुंबातील मुलींना खासगी क्लासेसचे २५ ते ३० हजार रुपये शुल्क भरणे अशक्य असल्याचे जाणवले. त्यामुळेच अशा मुलींसाठी आम्ही पोलिस भरतीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले असून लेखी व मैदानी चाचणी घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यामुळे राज्यात होणाऱ्या भरतीमध्ये सर्वाधिक मुलींची संख्या ही आपल्या शहरातून असावी असा आमचा प्रयत्न आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 10:52 am

राज्यात महापालिकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचाही बिगुल:आयोगाची हालचाल वाढली, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष

महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता जिल्हा परिषद निवडणुकांचाही धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांची अधिसूचना राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील 14 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत जाहीर होऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याची जबाबदारी आयोगावर असून, त्या पार्श्वभूमीवर आयोगाची यंत्रणा वेगाने हालचाल करत असल्याचे चित्र आहे. एकीकडे महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू असताना, दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने राजकीय पक्षांसह प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ शकतात, याबाबत स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर अशा एकूण 14 जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक घेण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षणाची स्थिती कायदेशीर चौकटीत बसत असल्याने निवडणूक प्रक्रियेला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात याच 14 जिल्हा परिषदांमध्ये मतदान घेण्यात येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या उर्वरित 18 जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक घेण्याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 18 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय वर्धा जिल्ह्यातील याचिकेवर अंतिम निर्णय देणार असून, याच निकालावर उर्वरित जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने कोणता निर्णय दिला, यावर निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यात येतील की सर्व जिल्हा परिषद निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जातील, हे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 31 जानेवारी 2026 या अंतिम मुदतीमुळे राज्य निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास प्रचंड मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त आणि प्रशासकीय व्यवस्था लागणार असल्याने आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुदतवाढ मागितली जाईल का, याबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन टप्प्यांत निवडणुका घेण्याचा पर्याय अधिक व्यवहार्य मानला जात असून, आयोग कोणता निर्णय घेतो याकडे राजकीय पक्ष बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सर्व महानगरपालिका निवडणुका न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन दरम्यान, राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया देखील वेगात सुरू झाली आहे. बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह राज्यभरातील एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास शासनाला मर्यादा आल्या आहेत. तथापि, नैसर्गिक आपत्ती किंवा अत्यावश्यक मदतीच्या बाबतीत आचारसंहितेची अडचण राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व महानगरपालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राबविण्यात येणार असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांमुळे राज्यात निवडणुकीचा महाअखाडा रंगणार बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार असून, उर्वरित 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केली जाणार आहे. संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पार पाडणार आहेत. सर्व महानगरपालिकांसाठी मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी निश्चित करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात तसेच त्या क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही घोषणा किंवा कृतींवर बंदी असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आचारसंहितेच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत, एकीकडे महापालिका तर दुसरीकडे संभाव्य जिल्हा परिषद निवडणुकांमुळे राज्यात निवडणुकीचा महाअखाडा रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 10:31 am

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदावर निर्णय:अजित पवारांसोबतच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष; कोकाटेंच्या शिक्षेमुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी

वादग्रस्त वक्तव्ये, अधिवेशनादरम्यान सभागृहात रमी खेळल्याचा आरोप आणि त्यातून गमावलेले कृषीमंत्रीपद, अशा घटनांमुळे आधीच चर्चेत असलेले अजित पवार गटाचे नेते व सध्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा मोठ्या राजकीय संकटात सापडले आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल कायम ठेवत कोकाटेंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा मंगळवारीही कायम ठेवली. या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, माणिकराव कोकाटेंना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार का, यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून, या भेटीत त्यांच्या मंत्रिपदाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माणिकराव कोकाटेंभोवतीचे वाद हे काही नवे नाहीत. याआधी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात बसून रमी खेळत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर मोठा दबाव आणण्यात आला होता. त्या वेळी अजित पवार यांनी राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न करत माणिकराव कोकाटेंकडील कृषी खाते काढून घेतले आणि त्यांना क्रीडामंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद वाचले होते. मात्र, आता न्यायालयाने गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. न्यायालयीन निर्णयामुळे नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मंत्रिपदावर राहणे योग्य आहे का, याबाबत सत्ताधारी वर्तुळातही कुजबुज सुरू झाली आहे. सद्यस्थितीत माणिकराव कोकाटेंसमोर दोन मार्ग खुले आहेत. एक म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणे आणि शिक्षेला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करणे. दुसरा म्हणजे पक्षश्रेष्ठींसमोर आपली बाजू मांडून राजकीय पाठिंबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे. अजित पवारांसोबतच्या भेटीत कोकाटे याच मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आपण वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे सांगून अजित पवारांकडून दिलासा मिळावा, अशी भूमिका माणिकराव कोकाटे घेऊ शकतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट अंतर्गत वर्तुळातही कोकाटेंवर तात्काळ कठोर कारवाई करावी, असा ठोस सूर नसल्याचे दिसते. त्यातच महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्यास त्याचे राजकीय पडसाद उमटू शकतात, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. चुकीची माहिती आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप दरम्यान, ज्या प्रकरणात माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाली, ते प्रकरण सुमारे तीन दशकांपूर्वीचे आहे. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर या उच्चभ्रू परिसरात 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून वाटप करण्यात आले होते. माणिकराव कोकाटे, त्यांचे भाऊ विजय कोकाटे, तसेच पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी निर्माण व्ह्यू अपार्टमेंट, या इमारतीत अशा सदनिका मिळवल्या होत्या. मात्र, सदर सदनिका मिळवताना उत्पन्न व मालमत्तेबाबत चुकीची माहिती आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करण्यात आला. तत्कालीन राज्यमंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी सुरू केली होती. या चौकशीनंतर गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात गेले. प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार या निकालाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. मात्र, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत शिक्षेत कोणताही बदल केला नाही. त्यामुळे कोकाटेंच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. आता कायदेशीर बाबींबरोबरच राजकीय निर्णयही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. अजित पवार यांची भूमिका या संपूर्ण प्रकरणात निर्णायक ठरणार असून, ते कोकाटेंना पुन्हा एकदा पाठीशी घालतात की त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगतात, याकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन निकाल, नैतिक दबाव आणि निवडणुकांचे राजकारण, या तिन्ही घटकांच्या छायेत माणिकराव कोकाटेंचे भवितव्य सध्या अधांतरी लटकलेले दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 10:17 am

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक:शिवसेनेचा 55, भाजपचा 65 जागांवर दावा; मात्र पहिल्या बैठकीत चर्चा नाही, काँग्रेसचा ‘वंचित’सोबत आघाडीचा प्रस्ताव

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना, भारतीय जनता पक्ष यांच्या युती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी (16 डिसेंबर) युतीच्या चर्चेची प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत कोणत्याही जागेबाबत चर्चा झाली नाही. केवळ प्रभागातील आरक्षण आणि बदललेले स्वरूप यावर चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान, मुस्लिमबहुल वगळता 95 पैकी 65 जागांवर भाजपचा व शिंदेसेनेचा 55 जागांवर दावा आहे. मात्र, पहिल्याच बैठकीत वाद नको म्हणून दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांची संख्या उघड केली नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला, काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत संभाजीनगरच्या शहराध्यक्षांनी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचा पर्याय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर मांडला आहे. काँग्रेसची उद्धवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही. शिवसेना, भाजप यांच्यात झालेल्या पहिल्या बैठकीला शिंदेसेनेकडून आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवा सेनेचे ऋषिकेश जैस्वाल, तर भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी महापौर बापू घडमोडे, समीर राजूरकर, प्रशांत देसरडा हे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पहिल्या बैठकीत वाद टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जागांचा प्रस्ताव दिला नाही. यावेळी केवळ कोणत्या प्रभागात काय स्थिती आहे, कसे बदल झाले आहेत, हिंदुबहुल प्रभागातील स्थितीबाबत चर्चा करण्यात आली. भाजप आणि शिवसेनेसाठी 25 प्रभाग महत्त्वाचे आहेत. यातील 8 प्रभागांमध्ये भाजप आणि शिवेसना या दोन्ही पक्षांकडून दावा केला जाणार आहे. युती होत असली तरी भाजपसाठी जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याचा विचार केला जाईल, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसची उद्धवसेनेसोबत अद्याप चर्चाही नाही महापालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेसने मुंबईत शहराध्यक्षांची बैठक आयोजित केली होती. शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव तेथे मांडला आहे. उद्धवसेनापेक्षा ही आघाडी कशी फायदेशीर ठरणार आहे याचे गणितही मांडण्यात आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेससोबत आमची कुठलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे ते स्वतंत्र निवडणूक लढवत असल्यास आमचीही तयारी आहे, असे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले. शिवसेना-भाजप युतीचे अंतिम जागावाटप मंत्री निश्चित करणार युतीच्या बैठकांच्या आणखी 4 ते 5 फेऱ्या होणार आहेत. जागावाटपातील तोडगा 23 तारखेपर्यंत, अर्थात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काढण्याचे युतीचे नियोजन आहे. 21 डिसेंबर रोजी नगर पालिकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यांचे पडसाद जागावाटपाच्या चर्चेवर होण्याची शक्यता आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्यातील चर्चेअंती होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामाजिक स्थिती पाहता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मते काँग्रेसच्या उमेदवाराला मिळत नाहीत. पूर्व विधानसभा मतदारसंघात हा अनुभव काँग्रेसला आला. ‘मध्य’, ‘पश्चिम’ जागांवर शिवसेना लढल्यामुळे काँग्रेसला पक्षवाढीसाठी संधी मिळाली नाही. उद्धवसेनेसोबत आघाडी केल्यास हिंदुबहुल भागात काँग्रेसला स्थान मिळणार नाही. त्यामुळे वंचितसोबत आघाडीचा पर्याय ठेवला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 10:06 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:‘मला आई बनवा अन् 25 लाख मिळवा’; घरबसल्या कमाईच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा प्रेग्नन्सी फ्रॉड

‘मला आई बनवण्यासाठी मदत करा, त्यासाठी मी 25 लाख रुपये द्यायला तयार आहे,’अशा आशयाचे मेसेज पाठवून पुरुषांना जाळ्यात ओढले जाते. या आमिषाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी मुले, कामगार आणि आंबटशौकीन तरुण बळी पडत आहेत. महिनाभरामध्ये शहरात असे 6 प्रकार उघडकीस आले असून याप्रकरणी सायबर ठाण्यात तक्रारी दाखल आहेत. सोशल मीडिया अकाउंटवर तरुणांना भुरळ पडेल अशा महिलांचे फोटो अपलोड केले जातात. त्यांची श्रीमंत महिला म्हणून प्रोफाइल तयार केली जाते. ‘खूप दिवसांपासून अपत्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गर्भधारणा होत नाही. त्यामुळे मला आई बनायचे आहे,’ असा मेसेज तयार करून तरुणांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर तरुणांना निवडीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करायला लावतात. समोरच्या व्यक्ती व्हिडिओवरून छायाचित्रे काढतात. त्याचबरोबर या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा व पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होतो, असे पोलिसांनी सांगितले.. केस 1 : कंपनीतील अकाउंटंट वाळूजच्या एका कंपनीतील 26 वर्षांच्या अकाउंटंट तरुणाला ‘प्रेग्नन्सी जॉब’चे आमिष दाखवण्यात आले. त्याने रजिस्ट्रेशनसाठी 8,000 रुपये भरले. त्याला 40,000 महिना पगार देण्याचे ठरले, परंतु पैसे घेऊन फसवणूक करण्यात आली. केस 2 : स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका ग्रामीण भागातील युवकाने टेलिग्रामवर नोंदणीसाठी 15,000 रुपये भरले. पार्टटाइम जॉबचे प्रलोभन देऊन पैसे घेण्यात आले, पण कोणताही जॉब दिला गेला नाही. सायबर कायद्यानुसार आरोपींवर दाखल कलमे, शिक्षेचे स्वरूप सायबर फसवणूक (प्रेग्नन्सी फ्रॉड) करणाऱ्या झारखंडमधील टोळीवर भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत खालील प्रमुख कलमे दाखल होऊ शकतात. ही कलमे गंभीर स्वरूपाची असून त्यांच्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. फसवणुकीच्या पायऱ्या अशा मुलींचे फोटो वापरून तरुणांना ओढतात जाळ्यात मुलांना फसवण्यासाठी मुलींची छायाचित्रे वापरली जातात. अनेक मुलींना नकळत त्यांचे फोटो चोरून या टोळ्या वापरतात. या चॅटिंगमध्ये अश्लील कृत्ये करून घेतली जातात, त्याचे फोटो आणि व्हिडिओ नंतर ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जातात. अनेक वेळा तर मुलांना गुन्हेगारीत ओढले जाते. पोलिसांनी सांगितले की काही प्रकरणांत तर मुलांना धमकावून पैसे उकळले जातात. अशी घ्या खबरदारी, नाही तर फसवणूक निश्चित सोशल मीडियावर आलेल्या कोणत्याही आर्थिक प्रस्तावांवर विश्वास ठेवू नका. अनैतिक किंवा गोपनीय संबंधाबाबत मिळणाऱ्या ऑफर्स खोट्याच असतात. रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन किंवा जीएसटी अशा नावाखाली पैसे मागितले तर त्वरित सावध व्हा अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हिडिओ कॉलला प्रतिसाद देऊ नका मॉडेल्सचे फोटो, फेक प्रोफाइल्स आणि परदेशी क्रमांक असलेले संपर्क क्रमांक त्वरित ब्लॉक करा. फसवणूक झाल्यास हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा. नातेवाइकांना पाठवतात स्क्रीनशॉट पैसे घेतले अन् ब्लॉक केले फेसबुकवरील एका व्हिडिओतील आश्वासनावर विश्वास ठेवून मी प्रेग्नंट जॉब नावाच्या कंपनीच्या नावाखाली बोलणाऱ्या धर्मेंद्र पटेल व ज्योती शर्मा यांच्या संपर्कात आलो. ओळखपत्र, जीएसटी, टीडीएस, मशीन चार्ज अशा विविध कारणांनी त्यांनी माझ्याकडून सलग रकमेची मागणी केली. मी माझ्या स्टेट बँक व युनियन बँक खात्यातून पैसे पाठवले. दरम्यान, आरोपींनी माझा नंबर ब्लॉक केल्यानंतर माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. -एक पीडित. प्रतिसाद देऊ नये सामाजिक, आर्थिक आणि लैंगिक भावनांचा गैरफायदा घेऊन सायबर चोरटे पुरुषांना जाळ्यात ओढत असल्याचे प्रकार घडत आहेत. अशा मेसेजला कोणत्याही परिस्थितीत प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकारच्या ऑफर्सना कोणतेही कायदेशीर अस्तित्व नाही. त्यामुळे पुरुषांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. फसवणूक केल्यास तत्काळ सायबर पोलिस किंवा 1930 वर संपर्क करा. -रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त.‎‎

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 10:02 am

ठाकरे बंधूंची महाशक्तिप्रदर्शनाची रणनिती:राज-उद्धव पुन्हा एकाच व्यासपीठावर; युतीची घोषणा, जाहीरनामांसह उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याचीही शक्यता

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची ठोस माहिती समोर आली आहे. ही घोषणा एका भव्य संयुक्त मेळाव्यातून होणार असून, याच व्यासपीठावर ठाकरे बंधू पहिल्यांदाच निवडणूक युतीचा नारा देतील. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने, त्याआधीच म्हणजे येत्या सोमवारपर्यंत युतीची घोषणा करण्यावर दोन्ही पक्षांचे नेतृत्व ठाम असल्याचे समजते. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मनोमिलन झाल्याची चर्चा काही काळापासून सुरू होती. मात्र युतीची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे शिवसैनिक आणि मनसैनिक उत्सुकतेने पाहत होते. ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनुसार, ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मोठ्या शक्तीप्रदर्शनासह युती जाहीर केल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण होईल. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत याचा थेट फायदा होईल, असा दोन्ही पक्षांचा विश्वास आहे. त्यामुळे केवळ संयुक्त पत्रकार परिषद न करता, भव्य मेळाव्याच्या माध्यमातून मराठी मतदारांना थेट संदेश देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. जाहीरनामा आणि उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याचीही शक्यता युतीच्या घोषणेसोबतच ठाकरे बंधूंकडून निवडणुकीसाठीचा संयुक्त जाहीरनामा आणि उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याचीही दाट शक्यता आहे. सध्या ठाकरे गट आणि मनसे यांच्यात जागावाटपाबाबत सखोल चर्चा सुरू असून, पुढील दोन ते तीन दिवसांत या चर्चेचा अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे. जागावाटप पूर्ण होताच उमेदवार निश्चितीला गती दिली जाणार असून, पहिली यादी युतीच्या घोषणेदिवशीच जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महायुतीसह इतर विरोधी पक्षांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा ठाकरे बंधूंचा डाव असल्याचेही बोलले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांची युद्धपातळीवर तयारी दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आधीच जाहीर झाला आहे. 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी माघार घेता येणार आहे. 3 जानेवारी रोजी अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होईल आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे वेळ अत्यंत कमी असून, सर्वच राजकीय पक्ष युद्धपातळीवर तयारी करत आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची युती ही केवळ राजकीय गणितापुरती मर्यादित नसून, मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. मुंबईवरील सत्ता राखण्यासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत असल्याने, आगामी निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरणार आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेची तारीख, स्थळ आणि स्वरूप याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल. मात्र, या युतीच्या घोषणेने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:58 am

दिव्य मराठी अपडेट्स:दिल्लीतील धुक्याचा परिणाम; पुणे-दिल्ली विमानांना 2-3 तासांचा उशीर

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:49 am

उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का:महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय भूकंप; नेत्यांची शिंदे सेनेकडे वाटचाल

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतराच्या घडामोडींनी वातावरण अधिक तापू लागले आहे. विशेषतः ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची मानली जात असताना, त्यांना सलग धक्के बसू लागले आहेत. दहिसरमधील ठाकरे गटाच्या नगरसेवकपदाच्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशानंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेतही ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे. नवी मुंबईतील ठाकरे गटाचे प्रभावी नेते मनोहर मढवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अस्वस्थता अधिकच वाढली असल्याचं चित्र आहे. मनोरहर मढवी यांनी पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना आपल्या निर्णयामागील कारण स्पष्ट केलं. मी कोणत्याही राजकीय दबावाखाली नाही, तर पूर्णपणे वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेत आहे, असं सांगत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं जाहीर केलं. कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची कामं होत नसल्याची खंत व्यक्त करत, संघटनात्मक पातळीवर निर्णयक्षमता आणि पाठबळ आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, अशी मला खात्री आहे, असं मढवी म्हणाले. मात्र, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट करत, बाळासाहेब ठाकरे, मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतचा आदर कायम राहील, असंही ठामपणे सांगितलं. शिंदे प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणार दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने संघटनात्मक तयारीला वेग दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील रंगशारदा सभागृहात अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी मुंबईतील सर्व आमदार, खासदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसाठीची रणनिती, उमेदवार निवड, प्रचार यंत्रणा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. यानंतर लोकसभा विभागनिहाय मेळावे आणि बैठकांचे सत्र सुरू होणार असून, शिंदे स्वतः या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावणार असल्याचं समजतं. संवाद साधण्यासाठी खासदार आणि आमदारांना विशेष जबाबदाऱ्या याशिवाय, ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातील निवडणुका पार पडल्या आहेत, त्या मंत्र्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय शाखा भेटी देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकांपूर्वी विविध समाजघटक, व्यापारी संघटना आणि व्यावसायिक संघटनांशी संवाद साधण्यासाठी खासदार आणि आमदारांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातही आजपासून शिंदे गटाकडून बैठकांचे सत्र सुरू होत असून, प्रत्येक महानगरपालिकेसाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यासाठी खासदार नरेश म्हस्के, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरसाठी खासदार श्रीकांत शिंदे व गोपाळ लांडगे, मीरा-भाईंदरसाठी मंत्री प्रताप सरनाईक, नवी मुंबईसाठी खासदार नरेश म्हस्के, तर वसई-विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक हे भाजपसोबत समन्वय साधणार आहेत. राज्यातील राजकीय शक्तिपरीक्षण ठरणार या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार करता, आगामी महापालिका निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न राहता, राज्यातील राजकीय शक्तिपरीक्षण ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ठाकरे गटातून एकामागोमाग एक नेत्यांचा बाहेर पडणं आणि शिंदे गटाची वाढती संघटनात्मक ताकद, यामुळे राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत आहेत. नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरात मनोहर मढवी यांचा शिंदे गटात प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी कोणते नेते पक्षांतर करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून, महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:25 am

120 शेतकरी गटांची उल्लेखनीय कामगिरी:शेतकरी गटाचा सन्मान सोहळा; उत्पादनही वाढले, ठरले गौरवाचे मानकरी‎

| अकोला १२० शेतकरी गटांनी शेतीत उल्लेखनीय कामगिरी केल्याने ते गौरवाचे मानकरी झाले आहेत. सन २०२२ पासून पाणी फाउंडेशन ज्ञान आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काम करत आहे. गेल्या ३ वर्षांत ही चळवळ ४६ तालुक्यांपर्यंत पोहोचली आहे. ‘गटशेती प्रीमियर लीग (जीपीएलन)’ आयोजित करण्यात आली होती. यात ज्यात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खर्च कमी करणे आणि नफा वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गटांचा गौरव करण्यासाठी सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी पुढील वर्षीच्या ‘संपूर्ण महाराष्ट्र फार्मर कप’ साठी नव्या जोमानं सज्ज होत आहेत. ‘गटशेती प्रीमियर लीग'च्या अनुषंगाने बार्शीटाकळी तालुक्यात ४२ शेतकरी गटांना प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोर्णा शेतकरी गटाचे निमंत्रक रामेश्वर उंडाळ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक उज्वल बोलवार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच संदीप चौधरी, कृषी मंडळ अधिकारी अविनाश मेश्राम, युवा पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर शेषराव, तुषार वानखडे, उमेद अभियानाचे नीलेश गायकवाड, अश्विनी नवघरे, रूपाली गावंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संघपाल अरुण वाहूरवाघ यांनी केले. बार्शीटाकळी तालुक्यातील पाच शेतकरी गटातील निमंत्रकांनी पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेचा प्रवासाची मांडणी केली. यात कान्हेरी सरप येथील मैत्री संघ महिला शेतकरी गटाच्या निमंत्रक रेश्मा इंगळे, राजंदा येथील भारती महिला शेतकरी गटाच्या ज्योती महल्ले, चेलका येथील मोर्णा पुरुष शेतकरी गटाचे विजय उंडाळ, बळीराजा महिला गटाच्या दीपाली उंडाळ, घोटा येथील माऊली पुरुष गटाचे पवन तवाडे यांनी फार्मर कप स्पर्धेचा प्रवास सांगितला. एकरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन : भरारी महिला शेतकरी गटाने सुद्धा गट प्रीमियर लींक स्पर्धेमध्ये कामगिरी करून उत्पादन वाढवले. एकरी १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन त्यांनी झाले. त्यांनी एसओपीची कटाक्षाने अंमलबजावणी केल्याने त्यांनी सांगितले. शेतकरी गटांचा गौरव करण्यात आला. ४२ गटांना सन्मानपत्र विभागीय समन्वयक उज्वल बोलवार यांनी शेतकरी गटाचे निमंत्रक सदस्यांना मार्गदर्शन केले. पुढील वर्षी संपूर्ण तालुक्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांची गट करून आपले उत्पादन वाढवावे असे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बार्शीटाकळी तालुक्यातील ४२ शेतकरी गटांना सन्मानपत्र देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:19 am

धान्य खरेदी केंद्र संख्या वाढवा; शेतकरी राजा ग्रुपची मागणी:पातूर- मालेगाव महामार्गावर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको‎

शासकीय धान्य खरेदी केंद्राची संख्या वाढवा, सोयाबीन खरेदी करताना नियम व अटी यात बदल करा, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी राजा ग्रुपने आंदोलन केले. पातूर- मालेगाव महामार्ग तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करीत शेतकऱ्यांनी मागण्या लावून धरल्या. यंदा आधीच खरीप हंगामात सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू होते. मात्र यंदा उशीरा खरेदी प्रक्रिया सुरू झाली. खरिपात प्रचंड नुकसान झाल्याने शासकीय खरेदी लवकर सुरू होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. शासनाने यंदा प्रती क्विंटल ५ हजार ३२८ एवढा हमीभाव निश्चित केला आहे. सध्या सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री करीत आहे. खुल्या बाजारात ४ हजार ते ४४७० एवढा भाव भाव मिळाला. परिणामी क्विंटलमागे सुमारे दीड हजारांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला. दरम्यान पातूर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात असून, सर्व खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी सहाय्यक निबंधक ज्योती मलिये तथा नायब तहसीलदार कातखेडे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात रवी सोनवणे, शिवसंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे, सामाजिक कार्यकर्ते नीलेश कापकर, गोपाल पजई, भगवंत काळदाते, श्रावण सोनवणे, गणेश टाले, प्रल्हाद नीलखन, दिनकर लाडकर, शालिग्राम राऊत, महादेव अडकणे, गजानन राखोंडे, मनीष देशमुख, पांडुरंग कुरई, संतोष देशमुख,प्रेम पजइ,मंगेश गाडेकर, गजानन झोडपे, रामकिशन ताजने,गोपाल सनोणे,दशरथ सदर,रामकृष्ण पाटील, विकास कीर्तने,बाळू ढोकणे आदींसह बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पातूरचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्यासह हिंमतराव डिगोळे तैनात होते. हमी भावाने सोयाबीन, मूग, उडीदची खरेदी प्रक्रिया राबवण्याबाबतचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोउदयोग विभागाने जारी केला होता. केंद्र शासनाने सोयबीनसाठी १८ लाख ५० हजार ७०० मेट्रिक टन, मूग ३३ हजार मेट्रिक टन व उडीत ३ लाख २५ हजार ६८० मेट्रिक टन खरेदीला मंजुरी दिली आहे. सोयाबीनची शासकीय आधारभूत किमतीत नोव्हेंबरमध्ये शासनाकडून खरेदी सुरू होणार असल्याचा दावा सत्ताधारी भाजपकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कमी भावाने सोयाबीन विक्री करू नये, असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले होते. सोयाबीनची शासकीय खरेदी आधारभूत किमतीमध्ये व्हावी, यासाठी शेतकरी पुत्रांनी २४ ऑक्टोबर पणन महासंघाच्या जिल्हा कार्यालयात झोपा काढा आंदोलन केले होते. खरेदी प्रक्रिया सुरु करण्यासाठी निद्रिस्त असलेल्या सरकारी यंत्रणांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. पातूर तालुक्यात नाफेडचे शासकीय धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र तालुक्यात फक्त एकच खरेदी केंद्र आहे. या खरेदी केंद्रावर आजपर्यंत २३०० ते २४०० शेतकऱ्यांची नोंद झालेली असून एका खरेदी केंद्रावर पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल मोजणी अशक्य दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नाफेडचे शासकीय सोयाबीन धान्य खरेदी केंद्राची संख्या वाढवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. गतवर्षी तालुक्यात शासकीय नाफेड खरेदी केंद्राची संख्या ही चार ते पाच केंद्र चालू होते. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी जून महिन्यापर्यंत सुरु होती. काही शेतकरी सोयाबीन खरेदी पासून वंचित राहिले. यावर्षी सोयाबीन खरेदी करताना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे नियम व अटी लावण्यात येऊ, नयेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:18 am

शिबिरात विद्यार्थ्यांनी दिला एकमेका साहाय्य करू अवघे सुपंथ'चा संदेश:खेंडकर विद्यालयात पार पडले शिबिर; खेळांत दाखवले काैशल्य‎

सरस्वती नगर वाशीम बायपासवरील खेंडकर विद्यालयात एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिस्तप्रियतेचा संदेश देत विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले. अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नीलेश खेंडकर होते. शिबिराचे उद्घाटन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांनी केले. शिबिरात सकाळच्या सत्रात ध्वजारोहण व गीत गायन स्पर्धेचे आयोजन पाचवी ते सातवी तसेच आठवी ते दहावीच्या वर्गापर्यंत करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत, शालेय जीवनावर आधारित गीते सादर करून विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केले. स्काऊट विद्यार्थी हा नेहमी धैर्यवान, निष्ठावान असतो. स्काऊट नेहमी आपल्या सहकार्याला मदत करतो. एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हा संदेश देऊन आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावावा, असा संदेश देण्यात आला. सूत्रसंचालन कांचन सिरसाट यांनी केले. आभार गोपाल वानखडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक आशा हिवरकर, सुरेश सुरत्ने, श्रीकांत पागृत, गोपाल वानखडे, प्रशांत काळे, उषा जगदाळे, अंजू मुंढे, मीना घाटोडे, स्वाती धोटे, अश्विनी सोळंके, सुकेशनी ओहेकर, छाया इंगळे, वर्षा मते, मेघा शर्मा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नियम सर्वांसाठी सारखेच स्काऊटच्या नियमामुळे आपल्याला शिस्त शिकायला मिळते. नियम सर्वांसाठी असतात त्याचे पालन सर्वांनी करणे म्हणजे शिस्तप्रियता होय, असे प्रतिपादन उद्घाटक मुख्याध्यापक नीलेश खेंडकर यांनी केले. स्काऊटच्या नियमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगी एक शिस्त निर्माण होते. त्यामुळे स्काऊटचे पालन विद्यार्थी, सर्वांनी हे शाळेमध्ये केलेच पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व. यमुनाबाई खेंडकर मराठी वरिष्ठ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मेणबत्ती पेटवणे, फुगे फुगवणे, बटाटा शर्यत, निंबू चमचा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. दुपारच्या सत्रात शेकोटी कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शेकोटी पेटवण्यात आली. शेकोटी कार्यक्रमानंतर विविध फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये वर्ग ५ ते ७ तसेच ८ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भाजीवाली, फळ विक्रेता, डॉक्टर, इंजिनिअर इत्यादी वेशभूषा साकारून उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:18 am

अंबरनाथ हादरलं; भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार:निवडणूक रणधुमाळीत रक्तरंजित इशारा, अज्ञातांचा जीवघेणा हल्ला

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना अंबरनाथ शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री गोळीबार केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. अंबरनाथ पश्चिमेतील शंकर मंदिर परिसरात असलेले हे कार्यालय नेहमीच नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या वर्दळीचे केंद्र असते. त्यामुळे भरवस्तीत अशा प्रकारचा गोळीबार झाल्याने सामान्य नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मध्यरात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात इसम अचानक कार्यालयासमोर थांबले आणि क्षणाचाही विलंब न करता कार्यालयाच्या दिशेने 3 ते 4 राऊंड फायर केले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कार्यालयातील सुरक्षारक्षक बाहेर आला. मात्र, त्यालाही लक्ष्य करून हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र सुरक्षारक्षक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण घटनेचे दृश्य कार्यालयाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले असून, हल्लेखोरांचा थरारक प्रकार त्यात दिसून येतो. निवडणूक प्रचार जोरात सुरू असताना उमेदवाराच्या कार्यालयावर झालेला हा हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ पोलिस ठाण्यात दाखल झाले. दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. परिसरातील इतर कॅमेरे, मोबाईल लोकेशन आणि दुचाकीचा मार्ग तपासण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गोळीबार करणाऱ्या संशयितांची नावे माहिती देऊनही त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नरेंद्र पवार यांच्यासह गुलाबराव करंजुळे आणि अनेक भाजप कार्यकर्त्यांनी अंबरनाथ पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या तोंडावर दबाव टाकून तपासात दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जर आरोपी मोकाट राहिले, तर नागरिकांचा आणि उमेदवारांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार या घटनेमुळे अंबरनाथमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. विशेष म्हणजे, आज संध्याकाळी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असून, त्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणूक प्रक्रियेत हिंसाचार किंवा दहशतीला थारा दिला जाणार नाही, असा संदेश प्रशासनाने द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. उमेदवाराच्या कार्यालयावर थेट गोळीबार होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, याचे पडसाद केवळ अंबरनाथपुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. येत्या काही तासांत पोलिस तपासात काय निष्पन्न होते आणि आरोपींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:06 am

मनपा निवडणूक तयारीसाठी महिना पुरेसा:नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांचा निर्धार; पदाची सुत्रे स्वीकारली‎

नवनियुक्त पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी (दि. १६) दुपारी पदाची सुत्रे स्विकारली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. मनपा निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पाडणे, सर्वसामान्यांवर निवडणुकीदरम्यान कोणतेही दडपण यायला नको, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहे. या सर्व कामासाठी आपल्याला एक महिना पुरेसा आहे, असे सीपी ओला यांनी सांगितले. दरम्यान मावळते पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला आहे. मनपा निवडणूकीसाठी पोलिसांच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी आहे, त्यावर बोलताना पोलिस आयुक्त ओला म्हणाले एक महिना आम्हाला पुरेसा आहे. नागरिकांमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण करणे, गुन्हेगारांमध्ये भिती निर्माण करणे यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात येणार आहे. शहर व आयुक्तालयाबाबतीत आता अधिकाऱ्यांकडून माहीती घेवून अभ्यास करण्यात येणार असल्याचे राकेश ओला यांनी सांगितले आहे. अवैध धंदे नेस्तनाबूत करणार शहराच्या हद्दीतील अवैध व्यवसाय सुरू असतील, ते पुर्णपणे नेस्तनाबूत करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देण्यात येणार आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय राहणार नाही,

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:04 am

1,64,532 मतदार वाढल्याने शहरामध्ये नव्याने 53 मतदान केंद्रांची भर:एकूण मतदान केंद्र 876, 2017 मध्ये होते 735 मतदान केंद्र

महानगर पालिकेची अंतिम मतदार यादी १५ रोजी उशिरा रात्री घोषित करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. प्रारूप मतदार यादीत एका प्रभागातून १ ते ४ हजार मतदारांची नावे अन्य प्रभागांमध्ये गेली होती. ती मूळ प्रभागात आणण्याचा प्रयत्न झाला असला तरी काही मोजकी नावे अजुनही मूळ प्रभागात आली नसल्याने या मतदार यादीबाबत मतदारांमध्ये नाराजी आहे. अंतिम मतदार यादीचा विचार करता २०१७ च्या मनपा निवडणुकीच्या तुलनेत यंदा १ लाख ६४ हजार ५३२ मतदार वाढले आहेत. २०१७ मध्ये ५ लाख १२ हजार ६४८ मतदार होते. यंदा ६ लाख ७७ हजार १८८ मतदार आहेत. मतदार वाढल्याने एकूण ५३ मतदान केंद्रही वाढले आहेत. २०१७ मध्ये पालिका निवडणुकीत ७३५ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. यंदा ८७६ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून यात १० टक्के वाढीव आहेत. अर्थात एखादवेळी एखाद्या मतदान केंद्रावर जर सुविधा नसतील, मतदारांची गैरसोय होणार असे दिसत असेल तर ते वेळेवर बदलता यावे यासाठी ही सोय आहे. अनेक प्रभागाच्या सीमा निश्चित करताना मतदार यादीत एकाच कुटुंबात अंतिम स्थानावर असलेल्या मतदारांची नावे किंवा त्याच कुटुंबात नव्याने सून म्हणून आलेल्या मतदाराचे नाव नोंदणी करण्यात आले. विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकाच मतदान केंद्रावर मतदान केले. परंतु, यंदा एकाच कुटुंबातील मतदारांचे मतदान केंद्र बदलले आहे. कुटुंबातील तीन सदस्य एका मतदान केंद्रावर तर चौथा सदस्य अन्य मतदान केंद्रावर मतदान करणार आहे. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी आहे. निवडणूक यंत्रणेच्या चुकीमुळे एकाच सारंग राऊत यांच्या पत्त्यांवर २०० मतदारांचे नाव आले आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्राधिकृत पत्ता आवश्यक असतो. अनेकांकडे तो नसल्यामुळे एकाच प्राधिकृत पत्त्यावर २०० जणांचे नाव येण्याची चूक मतदार यादीत झाली आहे. ही चूक ज्यांनी मतदारांची नावे घेतली त्यांची आहे. या चुकीमुळे एकाच घरात अर्थात सारंग राऊत यांच्या घरात २०० मतदार वास्तव्यास आहेत, असे दिसून येते. त्याचप्रमाणे आडनावही सारंग राऊत यांच्या पुढे लावण्यात आले आहे. उदा. घोटेकर सारंग राऊत, भयाणी सारंग राऊत, भूतडा सारंग राऊत, देशमुख सारंग राऊत याप्रमाणे चूक करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील मतदारांचे मतदान केंद्र बदलले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मतमोजणी, तयारी पूर्ण महानगर पालिकेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये एकाच ठिकाणी यावेळी प्रथमच मतमोजणी होणार आहे. २०१७ च्या निवडणुकीत विविध प्रभागासाठी वेगवेगळे मतमोजणी केंद्र होते. परंतु, यावेळी सर्व २२ ही प्रभागामधील मतदानाची मतमोजणी ही नवसारी प्रभागातील महानगर पालिकेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्येच होणार आहे. महानगर पालिका आयुक्तांनी मंगळवार १६ रोजी या मतमोजणी केंद्राची पाहणी केली. मतमोजणी टेबलची मांडणी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी असलेली बसण्याची व्यवस्था, माध्यम प्रतिनिधींसाठी राखीव कक्ष, स्ट्राँगरूम, ऑब्जर्व्हर रूम, वाहनतळ, मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या मुलभूत सुविधांची त्यांनी माहिती घेतली. अशाप्रकारे शोधता येणार नाव, मतदार केंद्र, पत्ता गुगल प्ले स्टोअरवर जाऊन मताधिकार मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागेल. व्होटल लिस्ट सर्च हा पर्याय येतो. त्यावर क्लिक केल्यानंतर नावानुसार किंवा ईपिक क्रमांकानुसार असे दोन पर्याय दिले आहेत. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे असे विचारणारा पर्याय असून त्यात म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडायचा. नंतर जिल्ह्याची निवड करायची, त्यानंतर अमरावती हा पर्याय निवडून पूर्ण नाव किंवा ईपिक क्रमांक टाकायचा. नंतर सर्चवर क्लिक करायचे. त्यानंतर मतदान केंद्र क्रमांक, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता मिळेल. मात्र, सध्या या तिन्ही पर्यायांची माहितीच भरली नसल्याने ती अॅपवर नाही. २२ डिसेंबरपर्यंत येणार.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:03 am

अमरावतीतील रेंजवर एकाच वेळी 36 धनुर्धर भेदणार लक्ष्य:485 खेळाडू, संघ व्यवस्थापक, निवड समिती सदस्यांसह विभागाचे खेळाडू सहभागी

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा २०२५-२६ चे आयोजन १८ ते २० डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गुरूवार १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या खेलो इंडिया आर्चरी आंतरराष्ट्रीय रेंजवर स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्चरी रेंजवर होणार असून येथे एकाचवेळी ३६ धनुर्धर लक्ष्याच्या दिशेने तीर सोडू शकतात, अशी सोय आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी धनुर्धरांसाठी सर्वच सुविधाही उपलब्ध आहेत. त्यामुळे येथे सातत्याने राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन होत असते. त्याचप्रमाणे राज्यातील ८ महसूल विभाग आणि १ क्रीडा प्रबोधिनी, पुणे अशा एकूण ९ विभागांतील १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी सुमारे ४८५ खेळाडू, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. उद््घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित राहतील. जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा होणार सत्कार उद्घाटन समारंभात आर्चरी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार शेळके, मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदिप भोगे, मधुरा धामणगांवकर, पुर्वशा शेंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तुषार शेळकेने रिकर्व्ह प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सांघिक रौप्य पदक जिंकून दिले आहे. त्याचप्रमाणे मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदीप भोगे, मधुरा धामणगांवकर व पुर्वशा शेंडे यांनीही सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धा, विश्वचषकात पदकांची कमाई केली आहे. झारखंड, मणिपूर येथील स्पर्धेसाठी संघ निवड निवड समिती निरीक्षण करून महाराष्ट्र राज्याच्या १७ व १९ वर्ष मुले व मुलींच्या संघाची निवड करतील. महाराष्ट्र राज्याचा संघ २० डिसेंबर रोजी सायंकाळी घोषित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या संघातील खेळाडू झारखंड व मणिपूर येथे होणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे. सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:01 am

खऱ्या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ:पुण्यतिथी महोत्सवादरम्यान पंकज महाराज पोहोकार यांचे निरुपण

कोणतेही अवडंबर न करता एक गाडगं, एक काठी, कानात कवडी व अंगावर चिंध्या पांघरुण या समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून काढून ख-या भक्तीचा मार्ग दाखविणारे श्री संत गाडगेबाबा हे चालते-बोलते विद्यापीठ होते, अशी माहिती हभप पंकज महाराज पोहोकार यांनी त्यांच्या किर्तनातून मांडली. श्री संत गाडगेबाबा यांचा ६९ वा पुण्यतिथी महोत्सव बाबांच्या समाधीस्थळी सुरु आहे. यावेळी सादर झालेल्या प्रथम कीर्तनसेवेत हभप पंकज महाराज पोहोकार यांनी गाडगेबाबांबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांच्या मते आज देवाला सुद्धा आदर्श माणसाची गरज आहे. डॉक्टर, वकील, इंजिनिअर होणे सोपे झाले, पण माणूस होणे कठीण झाले आहे. यावेळी त्यांनी कविश्रेष्ठ सुरेश भट यांची एक कविताही सादर केली. ती अशी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी.. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी, ही देव देवळे सारी फिरून आलो.. भिंतीपल्याड त्यांच्यात माणूस शोधतो मी. महाराजांच्या सांगण्यानुसार गाडगेबाबांचे किर्तन हे उत्तम, आदर्श, सुसंस्कृत माणूस बनवण्याचा कारखाना आहे. स्वछता, देव ,धर्म, अंधश्रद्धा, रूढी आणि माणूस हे विषय त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. देवधर्म व देवधर्म सांभाळा हा काळाचा इशारा आहे. म्हणून गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे ईश्वर स्मरणच आजच्या तरुण पिढीला व समाजाला वाचवू शकते, असेही पोहोकार महाराज यांनी सांगितले. दरम्यान गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा दुसरा दिवसदेखील पुरणपोळीने साजरा झाला. अंध, अपंग, निराश्रित वृद्धांना जेवन वितरित करण्यात आले. आश्रयदाते कुऱ्हे आप्पाजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे अन्नदान करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त तथा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्यासह संस्थेचे सागर देशमुख, भरतभाऊ रेडे, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, किशोर चौधरी, सुधीर धोंगडे, विठ्ठल तेलमोरे, अतुल रेडे, गजानन देशमुख आदींनी परिश्रम घेतले. काळमेघ यांनी दिली भेट श्री संत गाडगे महाराज पुण्यतिथी उत्सवाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंतराव काळमेघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गाडगे बाबांच्या समाधिस्थळी भेट दिली. यावेळी सर्वांनी समाधीचे दर्शन घेतले. सर्वप्रथम हेमंतराव काळमेघ यांच्या हस्ते गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी चंद्रशेखर खेडकर, प्रकाश गवळी, डॉ. ए टी देशमुख, संदीप पुंडकर, प्रभजीतसिंह बछेर, प्रा. डॉ. स्वप्निल देशमुख आदी मान्यवरही उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:00 am

परिक्षेला 1,198 विद्यार्थी; 145 जणांची दांडी:दर्यापूर शहरातील 3 केंद्रांवर सुरळीतपणे करण्यात आले आयाेजन‎

केंद्र सरकार संचालित पीएमश्री नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात सहावी साठीची प्रवेश परीक्षा नुकतीच दर्यापूर शहरातील ३ परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी १ हजार ३३८ विद्याथ्यर्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३ केंद्रांवर १ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर दिला. तर परीक्षेसाठी ३ केंद्रांवरील जवळपास १४५ विद्यार्थ्यांची गैरहजेरी दिसून आली. दर्यापूर शहरातील ३ केंद्रांवरील परीक्षेसाठी तब्बल १ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याने अर्जाची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत जास्त अर्ज आले होते. त्यामुळे अमरावतीच्या नवोदय विद्यालयात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता सहावीसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीनी प्रवेशपत्र, परीक्षा लेखन साहित्य व ओळखपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता पासूनच अनेक पालक आपल्या पाल्यांसह शहरात येताना दिसत होते. सकाळी १० वाजता विविध केंद्रावर पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. सकाळी १० वाजता पासूनच पालकांनी पाल्यांना सोडण्यासाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती. थंडीतही केंद्रावर गर्दी थंडीमय वातावरणामुळे आपल्या वाहनातून अनेकजण आल्याने परीक्षा केंद्रासमोर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किमान एक तास आधी येण्याच्या सूचना दिल्याने ग्रामीण भागांसह शहरी भागातील पालकांनी सकाळी ९ वाजता पासूनच हजेरी लावली. शंभर गुणांची परीक्षा शंभर गुणांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत एकूण ८० प्रश्न विचारण्यात आले होते. अर्थात एका प्रश्नासाठी १.२५ गुण होते. तसेच नवोदय परीक्षेचा पेपर सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकांची दुचाकी, चारचाकीसह गर्दी दिसून आली.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 9:00 am

प्राथमिक विभागाच्या जिल्हास्तरीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत महीम:चिंचोली शाळा विजयी, स्पर्धेत जिल्ह्यातील लहान व प्रत्येकी 11 संघातील 264 खेळाडू सहभागी‎

या स्पर्धेत चांगल्या प्रकारे कौशल्य दाखवल्याबद्दल विजयी शाळेचे अभिनंदन करतो, खेळामध्ये हार जीत महत्वाची नसून खिलाडू वृत्तीने आपले क्रीडा कौशल्य दाखवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन, जिल्हा कबड्डी समन्वयक सुहास गुरव यांनी व्यक्त केले. ते जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभाग, सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग, मंगळवेढा आयोजित प्राथमिक विभागाच्या जिल्हास्तरीय कबड्डी (मुली) स्पर्धेत पारितोषक वितरण प्रसंगी बोलत होते. या स्पर्धेचे उद्घाटन मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यास्मिन शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी गटशिक्षणाधिकारी दर्शन मेहता, विस्तार अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, पुरुषोत्तम राठोड, समन्वयक श्याम सरगर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील लहान गटातील ११ संघ व मोठ्या गटातील ११ संघ या पद्धतीने एकूण २६४ खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आर.एस वराडे, व्ही. पी. बिले, बी.टी बाबर, अमित जावळे, शिवकुमार स्वामी, पंडित पाटील, गुलाब मासाळ, समाधान बंडगर, शिवाजी बेलभंडारे यांनी उत्तमरीत्या पंच म्हणून काम पाहिले आहे. तसेच गुणलेखक व वेळाधिकारी हे काम काम सर्जेराव रुपनर, गंगाराम चव्हाण, सतीश रणदिवे, तानाजी सूर्यवंशी, सतीश लेंडवे यांनी गुणलेखक व वेळा अधिकाऱ्याचे काम यशस्वीरित्या बजावले. या सर्व खेळाडूंना अतिशय उत्तमरित्या भोजन व्यवस्था सागर कोळेकर यांनी केली होती. या स्पर्धा पार पाडण्यासाठी राजू रायबान,अमित भोरकडे ,रवींद्र लोकरे जवाहरलाल प्रशालेतील स्वयंसेवक व कर्मचारी खंडू कोकरे व सोमा माळी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पारितोषिक विजेते दत्तात्रय येडवे गुरुजी यांनी केले, आभार एम.डी.काळुंगे यांनी मानले. मोठ्या गटाचा अंतिम निकाल जि.प.प्राथ.शाळा महिम (ता.सांगोला) - विजेता जि.प.प्राथ. शाळा पापरी (ता.मोहोळ) - उपविजेता जि.प. शाळा, मारोळी (ता. मंगळवेढा)- तृतीय Share with facebook

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:53 am

कासेगावच्या यल्लम्मा देवी यात्रेला सुरुवात:राज्यभरातून 2 लाख भाविक तर देशभरातून हजारो तृतीयपंथी जोगतिणी दाखल‎

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यातील जग जोगत्यांचे आणि भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कासेगावच्या यल्लम्मा देवीच्या यात्रेस सुरुवात झाली. कासेगाव (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत असलेल्या श्री यल्लमा देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून दोन ते अडीच लाख भाविक दाखल झाले आहेत. देशभरातून हजारो तृतीयपंथी जगजोगतीणी या यात्रेसाठी दाखल झाले आहेत. आज यात्रेचा पहिला दिवस असून श्री यल्लमा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले. सर्व चारचाकी व तसेच दुचाकी वाहनांना मंदिराकडे प्रवेश बंद करण्यात आला. त्या सर्व वाहनांची पार्किंगमध्ये व्यवस्था करण्यात आली. आज बुधवारी यात्रेचा अखेरचा दिवस असून यादिवशी किचेचा पारंपरिक कार्यक्रम झाल्यानंतर यात्रा समाप्त होत आहे. यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या मनोरंजनासाठी पाळणे व खेळण्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच हॉटेल आणि दुकानदारांनी आपले दुकाने थाटली आहेत. यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात आले आहेत. पंढरपूर तालुक्याचे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्याकडूनही यात्रेतील भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेच्या पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवण्याचा पारंपरिक उत्सव असतो. यामध्ये कासेगावचे मानकरी भाऊसाहेब देशमुख यांचा मानाचा नैवेद्य देवीला दाखवून आल्यानंतर मानाचा लिंब, गंध हा विधी सुरु करण्यात आला. लिंबगंध कासेगावचे मानकरी वसंतराव देशमुख यांचे सुपुत्र संग्रामसिंह देशमुख याचा असतो. श्री यल्लमा देवीचे यात्रेत मानाचा लिंबगंध आणि नैवेद्य का कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:53 am

सांस्कृतिक:जगन्नाथ रथयात्रा, रासलीला, बिहू नृत्य, गरबा,भांगडा, घुमर, झुमर नृत्यातून दिसली विविध राज्यांची संस्कृती

या स्नेहसंमेलनात ओरिसाची जगन्नाथ रथयात्रा, कश्मीरचे ऑपरेशन सिंदूर, गोव्याचे फॉगडी, पश्चिम बंगालचे नृत्य, उत्तर प्रदेश मधील रासलीला, आसामचे बिहू नृत्य, गुजरातचा गरबा, दक्षिण भारतातील बोनालू नृत्य, पंजाबचा भांगडा, महाराष्ट्रातील गोंधळ, वारी. राजस्थानचे घुमर, हरियाणाचे झुमर नृत्य इत्यादी विविध राज्यांची विशेषता व संस्कृती विद्यार्थ्यांनी नृत्यातून दाखवली. निमित्त होते श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे सेठ नंदलाल धूत इंग्लिश मीडियम स्कूल आणि मोहनलाल रामअवतार मानधना या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे. श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनचे वार्षिक स्नेहसंमेलन विविधतेत एकता आणि एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित होते. हा कार्यक्रम केवळ मनोरंजक न राहता सांस्कृतिक समन्वयाचे केंद्र बनला. विद्यार्थ्यांनी विविध राज्यांच्या कला,वेशभूषा आणि परंपरांचे दर्शन घडवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षस्थानी श्रीगोपाल धूत हे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.वसंत बंग उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे चेअरमन नंदकुमार झंवर यांनी केले. अध्यक्ष धूत यांचा सत्कार संस्थेचे सचिव डॉ.शरद कोलते यांनी केला. डॉ.वसंत बंग म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या मनात असलेले प्रश्न विचारू द्या त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. मुले पालकांच्या अनुकरणातूनच शिक्षण घेत असतात. पालकांच्या वागण्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या वागणुकीवर होत असतो. या विद्यालयातील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रातही अग्रेसर आहेत . याचे त्यांनी विशेष कौतुक केले. श्रीगोपाल धूत यांनी पारितोषिके मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या राधिका जेऊरकर यांनी वर्षभरात झालेल्या उपक्रमांचे आणि शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे वार्षिक अहवाल वाचन केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे होते की विद्यालयातील विद्यार्थिनींनीच गाणी म्हणून त्यावर नृत्य सादर केली, त्यात गणेश वंदना, पंढरीची वारी, बालगीते, नाट्यगीत, कोळीगीत इत्यादी प्रकार सादर करण्यात आले. या कार्यक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षिका पुष्पा औटी व शेखर दरवडे यांनी मार्गदर्शन केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्या गगन वाधवा यांनी करून दिला. अध्यक्ष धूत यांचा परिचय कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संपदा देशपांडे यांनी करून दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. हिंदी भाषेतील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या हिंदी शिक्षिका सौ रोथेल लोंढे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सहसचिव बजरंग दरक, संस्थेचे विश्वस्त पुरुषोत्तम पटेल, श्रीगोपाल जाखोटिया, रामसुख मंत्री, अरुण झंवर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यालयाच्या समन्वयक सुषमा उजागरे, श्रेयकुमार गुंडू, मौश्युमी लोंढे यांनी, तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष राजेश झंवर यांनी मानले. छावा नाटकाचे प्रभावी अन् यशस्वी सादरीकरण इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या ऐतिहासिक नाटकाचे अत्यंत प्रभावी आणि यशस्वी सादरीकरण केले. छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य त्यांचा त्याग आणि धर्मनिष्ठेचा संदेश देणारे हे नाटक पाहताना प्रेक्षक भारावून गेले. या स्नेहसंमेलनात विद्यालयातील ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:43 am

चायना मांजाचा वापर मानव, पशु-पक्ष्यांसाठी धोक्याचा:कृषी अधिकारी बोराळे यांचे आवाहन, चायना मांजा बंदीसाठी ‘स्नेहबंध’चा पुढाकार‎

चायना मांजा धारदार व घातक आहे. त्याचा वापर मानवी जीवन, पशु-पक्षी तसेच सार्वजनिक सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरतो. पतंग उडवताना हाताला गंभीर इजा होण्यासह तुटलेला मांजा रस्त्यावर पडल्यास दुचाकीस्वार, पादचारी व लहान मुले अडकून अपघात होतात. मानवी जीवन, पशु-पक्षी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी चायना मांजा पूर्णतः टाळणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर चायना मांजामुळे होणारे संभाव्य अपघात, जीवितहानी व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने चायना मांजा बंदी जनजागृती पोस्टरचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे बोलत होते. यावेळी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे उपस्थित होते.बोराळे म्हणाले, चायना हा मांजा वीज तारांवर अडकल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या व मालमत्तेच्या नुकसानीच्या घटनाही घडतात. चायना मांजा हा केवळ बेकायदेशीरच नाही तर जीवघेणाही आहे. मानवी जीवन, पशु-पक्षी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी चायना मांजा पूर्णतः टाळणे आवश्यक आहे, असे बोराळे म्हणाले. स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. शिंदे म्हणाले, चायना मांजामुळे पशु-पक्ष्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असून पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चायना मांजा बंदीच्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करावे व सुरक्षित व पर्यावरणपूरक सण साजरा करावा.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:41 am

संगमनेरातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे वनमंत्र्यांचे आदेश:बिबट्याच्या हल्ल्यात मृत सिद्धेश कडलग कुटुंबाला 10 लाखांची मदत‎

संगमनेर तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात बाधित कुटुंबीयांना मदत व भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दूरध्वनीवरुन दिले. संगमनेर तालुक्यात बिबट्यांचे हल्ले सातत्याने वाढत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी माजी मंत्री थोरात यांनी वनमंत्री नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. दरम्यान, जवळे कडलग येथील बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या सिद्धेश सुरज कडलग यांच्या कुटुंबीयांना वन विभागामार्फत १० लाखांची मदत देण्यात आली. १३ डिसेंबर रोजी जवळेकडलग येथे सिद्धेश याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. केवळ सहानुभूती न दाखवता कडलग कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार तांबे यांनी केली. त्यांनी वनमंत्री नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत कुटुंबाला २५ लाखांची मदत मिळावी, अशी मागणी केली. यानुसार वनमंत्री नाईक यांनी १५ डिसेंबर २०२५ रोजीच्या पत्रानुसार उपवनसंरक्षक, अहिल्यानगर यांच्या कार्यालयामार्फत १० लाख रुपयांची मदत मंजूर करून वितरित केली. दरम्यान, आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते उप वनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांचे प्राप्त झालेले २५ लाख रुपये मदतीचे पत्र सिद्धेशचे वडील सुरज कडलग यांना देण्यात आले. दहा लाख रुपये रक्कम पाच वर्षासाठी व उर्वरित पाच लाख रुपये रक्कम दहा वर्षा करिता कडलग यांच्या राष्ट्रीयकृत बँकखात्यावर फिक्स डिपॉझिट करण्यात येणार असल्याचे लेखीपत्र कडलग यांना सुपूर्द केले. यावेळी संगमनेर उपविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार, सागर केदार, संतोष कडलग, सुनील देशमुख, सचिन कडलग, अमोल देशमुख, किरण वामन उपस्थित होते. बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवा : आ. खताळ आमदार अमोल खताळ यांनी जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या सिद्धेश सुरज कडलग या सहा वर्षाच्या बालकाच्या घरी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. वनविभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या २५ लाख रुपये मदतीचे पत्र आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सिद्धेशचे वडील सुरज कडलग यांच्याकडे सुपूर्द केले. जवळे कडलग आणि परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतचे निर्देश आ. खताळ यांनी वनविभाग अधिकाऱ्यांना दिले. या परिसरामध्ये जास्तीत जास्त पिंजरे लावावेत तसेच बिबट्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच ठेवावे, अशा सूचना आ. खताळ यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:41 am

व्यवसाय मार्गदर्शन, समुपदेशन स्पर्धेत शिक्षक जगतापांची राज्यस्तरावर निवड:संगमनेरात झाली विभागीय स्पर्धा, मुंबईत होणार राज्य स्पर्धा‎

संगमनेर येथे झालेल्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेतून शेवगाव तालुक्यातील बेलगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक युवराज जगताप यांची राज्यस्तरावर निवड झाली. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थाच्या वतीने विभागीय स्तरीय स्पर्धा संगमनेर येथे झाली. या स्पर्धेत शिक्षक युवराज जगताप यांनी व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन यात भाग घेतला. त्यात त्यांनी सुमारे २००० शब्दांचा अहवाल, १२ पानांचे प्रेझेंटेशन सादर केले, तसेच करिअर निवडताना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरावर निवड झाली. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डायटमधील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यात शैक्षणिक प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे त्यांच्यात समन्वय सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात येत आहे.या स्पर्धेच्या आयोजनासाठी निकष आणि नियमावली तयार करण्यात आली आहे. ही स्पर्धा ४३ विषयांवर आधारित असते. प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळे विषय दिले जातात. या निवडीबद्दल शिक्षक जगताप यांचे शेवगाव तालुका गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ व बालानंद परिवारातर्फे अभिनंदन करून आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:40 am

आता बदलत्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या वाणांची निर्मिती करण्याची गरज:कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे प्रतिपादन, विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत‎

हवामान बदलाचा विपरीत परिणाम विविध पिकांवर होत आहे. यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अजुनही काही भागात जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत विविध पिकातील उशिरा तयार होणाऱ्या वाणांची गरज निर्माण झाली आहे. यासाठी बदलत्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या वाणांची निर्मिती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक रब्बी व उन्हाळी-,२०२५ चे आयोजन हायब्रीड मोडमध्ये करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर, पुणे विभागीय कृषि सहसंचालक यांचे प्रतिनिधी म्हणुन कृषि अधिकारी राऊत व श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गोसावी उपस्थित होते. कुलगुरु डॉ. खर्चे म्हणाले, विद्यापीठात होणाऱ्या खरीप दिन, रब्बी दिन अशा कार्यक्रमामध्ये कृषि विभागाने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आणून विद्यापीठाचे संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन या बैठकीतील प्रत्याभरणाच्या प्रश्नांवर विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरता येईल. विद्यापीठात कृषि विभागाच्या मदतीने वर्षभर एकत्र येवून काम करु व शेतकरी बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया. डॉ. गोरक्ष ससाणे प्रास्ताविक करतांना म्हणाले, कृषि विभागाच्या अधिकाऱ्यानी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जवळच्या कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधन अहवालाचे सादरीकरण केले. डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले, पाऊस लांबल्यामुळे पेरण्यासुध्दा लांबल्या. जमिनीतील ओलाव्यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भात वाढेल. यावेळी शेतकऱ्यांनी विद्यापीठ प्रसारित करत असलेल्या सल्ला व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन रोग व किडींचे निर्मुलन करावे. विद्यापीठातील शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरेल पारंपरिक पध्दतीने शेती करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. हवामानाचा विपरित परिणाम जमिनीवर होत आहे. अशा जमिनीत निविष्ठा वापरण्यासाठीचे पोषक वातावरण नसते. परिणामी पिकांची उत्पादकता कमी होते. यासाठी विद्यापीठातील हवामान अद्ययावत काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरेल. हे तंत्रज्ञान गाव, तालुका व जिल्हा पातळीवर विस्तार यंत्रणांच्या माध्यमातून पोहोचायला हवे. काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान वापरले तर निविष्ठा कमी लागतील व परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल,असे कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:39 am

रब्बीची 75% पेरणी; शेतकऱ्यांचा मका, गहू, हरभऱ्यांकडे अधिक कल:थंडी ठरतेय पिकांसाठी वरदान, मात्र योग्य काळजी आवश्यक‎

रब्बी हंगामात पडणारी थंडी ही पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरते. थंड हवामानामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, बाष्पीभवन कमी होते आणि पिकांची मुळांची वाढ मजबूत होते. यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. मात्र, हीच थंडी अती झाली किंवा व्यवस्थापनात त्रुटी राहिल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. तालुक्यात रब्बी हंगामासाठी एकूण २६ हजार ९०२ हेक्टर क्षेत्र आहे.पैकी आतापर्यंत सुमारे १६ हजार ७५७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत जवळपास ७५ टक्के रब्बीच्या पेरणीचे काम झालेले असून, एखाद्या आठवड्या पर्यंत उर्वरित क्षेत्रावरील पेरण्याही पूर्ण होऊन १०० टक्के होतील. थंडीचा सर्वाधिक फायदा गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा या पिकांना होतो. या पिकांमध्ये थंड वातावरणात फुटवे चांगले येतात. पाणी शिवारापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा यावर्षी अंजनी धरण व गिरणा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले असून या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गिरणेचे आवर्तन शेत शिवारापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तर अंजनीचे पाणी सिंचनासाठी या दोन्हींचा उपयोग रब्बी क्षेत्रासाठी केला जाऊ शकतो, परिणामी रब्बी हंगामातील उत्पन्नात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. ज्वारी १ हजार ५६९ हेक्टर, गहू २ हजार ५८० हेक्टर, मका ६ हजार ९४५ हेक्टर, हरभरा २ हजार ४६३ हेक्टर, रब्बी कांदा ३ हजार २०० हेक्टर याप्रमाणे आतापर्यंत रब्बी पेरण्या झालेल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:17 am

लासलगावमध्ये नायलॉन मांजाविरोधात कारवाई:पतंग उडविणाऱ्यांकडून ‎नायलाॅन मांजा जप्त‎

शहरात दोन दिवसापूर्वी नायलॉन मांजामुळे युवक गंभीर जखमी झाल्यानंतर ग्रामपंचायत व पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. मांजा विक्रेत्यांकडे नायलॉन मांजा आढळून आला नसला तरी अनेक पतंग उडविणारे युवकांकडे नायलॉन मांजा सापडल्याने तो जप्त करून समज देण्याची कारवाई करण्यात आली. मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या युवकाची सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी संजय बावीस्कर यांनी हॉस्पीटलमध्ये भेट घेवून प्रकृतीची विचारणा केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व पोलिसांनी लासलगाव हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणारे व वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. लासलगाव व विंचूर परिसरात जवळपास ३५ विक्रेत्यांवर छापे टाकण्यात आले. जवळपास आठ ते नऊ युवकांना नायलॉन मांजा वापर करत पतंग उडवीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडील नायलॉन मांजा जप्त करत त्यांना येथून पुढे मांजा वापर करणार नसल्याबाबत समज देण्यात आली. दरम्यान, पोलिस कर्मचारी व ग्रामपंचायतीचे कर्मचारी शहरात नायलॉन मांजा विक्री करणारे तसेच बाहेरून आणून वापर करणाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:14 am

138 व्या पुण्यतिथीमित्त 138 किमी सायकल राईड:बागलाण सायकल फाऊंडेशनचा सटाणा-आर्वी सायकल राईड‎

देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या १३८ व्या पुण्यतिथीनिमित्त बागलाण सायकल फाउंडेशनच्या वतीने सटाणा ते अर्वी १३८ किलोमीटरची सायकल राईड आयोजित करण्यात आली. यात सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडे लावा–झाडे जगवा, असा संदेश देत फाऊंडेशनने या उपक्रमातून व्यापक जनजागृती करीत अनोखा उपक्रम राबवला. देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सटाणा येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. यानिमित्ताने शहरात मोठा रथोत्सव साजरा होतो यामध्ये शहरासह तालुक्यातील विविध शाळा, भजनी मंडळे बँड पथक सहभागी होतात देव मामलेदारांच्या १३८ व्या पुण्यतिथीनिमित्ताने बागलाण सायकल फाऊंडेशनचाही सहभाग असावा, यासाठी १३८ व्या पुण्यतिथीनिमित्त १३८ किमी सायकल राईड करीत पर्यावरणाचा संदेश देण्याचा संकल्प फाउंडेशनने केला. शनिवार दि. १४ रोजी पहाटे साडेचार वाजता यशवंतराव महाराज मंदिर ते आर्वी (धुळे) पर्यंत आठ तासात आर्वी पर्यंत १३८ किमी सायकल राईड केली. या सायकल राईडमध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक सोनवणे,मोहन सोनवणे, योगेश सोनवणे, अनिल सोनवणे, प्रा. चंद्रशेखर देवरे यांनी सहभाग घेतला. सटाण्यापासून धुळ्यापर्यंतच्या मार्गावर सायकलस्वारांनी नागरिकांशी संवाद साधत पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त वाहतूक, नियमित व्यायामाचे महत्त्व आणि वृक्षसंवर्धनाचे आवाहन केले. दीर्घ अंतराची ही सायकल राईड समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा प्रेरणादायी उपक्रम ठरली.बागलाण सायकल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, युवकांनी अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:11 am

भिंतबारी–ठाणापाडा परिसरात रस्त्याच्या कामामुळे शेतीसह पिकांचे मोठे नुकसान:बाेरगाव परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी‎

सुरगाणा तालुक्यातील भिंतबारी ते ठाणापाडा मार्गे गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून, या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बोरगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १५)नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना लेखी निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रस्त्याच्या कामामुळे अनेक शेतकरी विस्थापित होत असून त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला अद्याप मिळालेला नाही. शेजारील दिंडोरी तालुक्यातील काही शेतकऱ्यांना याबाबत न्याय देण्यात आला असून, त्याच धर्तीवर सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही तात्काळ मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीचा थर शेतातील पिकांवर साचत असून स्ट्रॉबेरी, टोमॅटो, घेवडा, हरभरा, मसूर, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून, सर्व बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेवाळे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून यावर तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निवेदन देताना माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये, इंद्रजित गावित, इरफान शेख, प्रशांत भोये, केशव भोये, दिनकर गायकवाड, भागवत गायकवाड आदींसह शेतकरी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:01 am

जलसंधारणातून शेती व पर्यावरण संवर्धनास चालना:कृषी विभाग, जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज सेवेकऱ्यांकडून पाडळी येथे वनराई बंधाऱ्यांची निर्मिती‎

सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे कृषी विभाग आणि जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या सत्संग सेवेकरी भक्तांच्या संयुक्त विद्यमाने श्रमदानातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून परिसरातील शेती, पशुधन आणि पर्यावरणाला दीर्घकालीन लाभ होणार आहे. सहायक कृषी अधिकारी अर्चना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सेवेकरी महिला भगिनींच्या सक्रिय सहभागातून हे वनराई बंधारे बांधण्यात आले. कमी खर्चात, स्थानिक साहित्याच्या मदतीने आणि लोकसहभागातून जलसंधारण साध्य करता येते, याचे प्रभावी उदाहरण या उपक्रमातून समोर आले आहे. वनराई बंधाऱ्यांची साखळी उभारल्याने जमिनीत पावसाचे पाणी अडवले जाते. त्यामुळे भूजल पातळी वाढते, कार्यक्षम जलस्रोत निर्माण होतात आणि कमी पावसाच्या भागातही पावसाळी पाण्याचा योग्य वापर शक्य होतो. या बंधाऱ्यांसाठी विशेष तांत्रिक ज्ञानाची गरज नसून दोन ते चार शेतकरी मिळूनही ते उभारू शकतात. देखभाल-दुरुस्तीचा खर्च अत्यल्प असल्याने ग्रामीण भागात हे बंधारे अधिक उपयुक्त ठरत आहेत. या उपक्रमात सत्संग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सानप यांच्यासह सेवेकरी महिला भगिनी सुरेखा जाधव, अनिता जाधव, अलका रेवगडे, सोनाली रेवगडे, कृष्णा जाधव, निलम रेवगडे, रेखा जाधव, लता जाधव, सिंधुबाई रेवगडे, नंदा रेवगडे, शारदा रेवगडे, शांताबाई रेवगडे आणि सरला रेवगडे यांनी मोलाचे सहकार्य केले. वनराई बंधाऱ्यासाठी नाला अरुंद आणि खोल असावा, तळाचा उतार सुमारे तीन टक्क्यांपर्यंत असावा, बंधाऱ्यांची उंची साधारण १.२० मीटरपर्यंत ठेवावी आणि हे बंधारे गावाजवळ असावेत, अशी माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अर्चना चौधरी यांनी दिली. तसेच गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींच्या खाली बंधाऱ्यांची साखळी बांधल्यास विहिरींमध्ये पाणी अधिक काळ टिकून राहते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांचे तालुका समन्वयक प्रकाश सानप यांनी सांगितले की, तालुक्यातील सेवेकऱ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ४० वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. शाश्वत शेतीला चालना सिन्नर तालुक्यात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक वनराई बंधारे कृषी विभागाच्या पुढाकारातून उभारण्यात आले असून त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी साठवण क्षमता वाढली आहे. शेतीसाठी पूरक ओलावा उपलब्ध झाल्याने उत्पादनात वाढ होत असून शाश्वत शेतीला चालना मिळत आहे. - ज्ञानेश्वर नाठे, कृषि अधिकारी, सिन्नर

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:01 am

कळवणला संत भवन उभारण्याची बारा बलुतेदार समाजाची मागणी:नगराध्यक्ष कौतिक पगार यांचेकडे निवेदन सादर

शहरात विविध जाती-धर्मातील संत-महात्म्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजऱ्या करण्यासाठी नगरपंचायतीमार्फत योग्य जागा उपलब्ध करून संत भवनाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी बारा बलुतेदार समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन नगराध्यक्ष कौतिक पगार यांना सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात विविध जाती-धर्मांत जन्मलेल्या संत-महात्म्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी जात, धर्म व पंथांच्या बंधनांना छेद देत मानवता, समता, बंधुता व प्रेमाचा संदेश समाजात रुजवला. अंधश्रद्धा, जातिभेद व अन्यायाविरुद्ध आवाज उठवत भजन, अभंग, कीर्तन व प्रवचनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. ‘सर्व धर्म समान असून माणुसकी सर्वोच्च आहे’ हा विचार त्यांनी जनमानसात रुजवला. तसेच गरीब, शोषित व वंचित घटकांना न्याय व आत्मसन्मानाची जाणीव करून देत श्रमाची प्रतिष्ठा आणि साधे जीवन जगण्याचा आदर्श घालून दिला. आजही या संतांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध समाजांकडून सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र बारा बलुतेदार समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने अशा कार्यक्रमांसाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध करताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन कळवण शहरातील नगरपंचायत हद्दीतील मोकळ्या जागेत संत भवन उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष कौतिक पगार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उमेश सोनवणे, नगरसेवक चेतन मैंद, हरीश जाधव आदींसह बारा बलुतेदार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. संत भवनसाठी प्रयत्नशील कळवण शहरातील विविध समाजांना स्वतंत्र ओपन स्पेस देणे शक्य नसल्याने सर्व समाजांनी एकत्र येत संत भवन उभारण्याची एकमुखी मागणी केली आहे. शासनाच्या नियमावलीनुसार लवकरच योग्य जागा उपलब्ध करून आमदार नितीन पवार यांच्या सहकार्याने निधी मिळवून संत भवन उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. - कौतिक पगार, नगराध्यक्ष, कळवण

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 8:00 am

खमताने बलात्कार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करावी:निफाडला तालुक्यातील नाभिक समाजाने दुकाने बंद ठेवत नोंदवला निषेध‎

बागलाण तालुक्यातील खमताणे येथील अल्पवयीन मुलीवर ७० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत निफाड तालुका सकल नाभिक समाजाने संपूर्ण तालुक्यातील सलून दुकाने बंद ठेवून या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. सई सोनवणे या लहान मुलीच्या हस्ते निफाड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षकांना निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करावी व नाभिक समाजातील व्यक्तीस गावगुंडांकडून त्रास होऊ नये तसेच त्यांच्याविरुद्ध वाळीत टाकणे वगैरे प्रकार होऊ नयेत, यासाठी नाभिक समाजातील कुटुंबास संरक्षण मिळणे आवश्यक असल्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी येथील सकल नाभिक समाजाने केली आहे. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक सोमनाथ सोनवणे, जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, राजेंद्र सस्कर, दत्तात्रय वाघ, तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ, तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:58 am

शिंदवडला शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी:मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदाेलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा‎

दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे शेतीसाठी दिवसा मिळणारा थ्री-फेज वीजपुरवठा अचानक बंद करून पुन्हा दिवस-रात्र वेळापत्रक लागू केल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मागील पंधरा दिवसांपासून दिवसा वीज मिळत असल्याने शेतीची कामे सुरळीत सुरू होती. मात्र अचानक बदल केल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी थेट पिंपळगाव बसवंत येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पाटील यांना निवेदन देत दिवसा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनासह उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. शिंदवड गावाच्या उत्तर बाजूस डोंगररांगा असून या भागात बिबट्यांचा वावर वारंवार दिसून आला आहे. रात्री शेतात बिबट्यांचा धोका असल्याने शेतीसाठी घराबाहेर पडणे जीवावर बेतू शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी वनविभागाने पकडलेल्या बिबट्याने कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना याचे उदाहरण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. राज्य शासनानेही शेतीसाठी दिवसा वीजपुरवठ्याबाबत भूमिका घेतली असताना महावितरणने येणाऱ्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिंदवड गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भार जास्त होत असल्याने वीज पुरवठ्यात अडचण आपण दिवसा थ्री फेज वीज देण्याचा प्रयत्न करत होतो, पण भार जास्त होत असल्यामुळे विद्युत प्रवाह ट्रीप होत आहे. आपल्या सबस्टेशनला सौर प्लांटचे काम न झाल्याने या अडचणी येत आहे. सबस्टेशनला सौर प्लांट आल्यानंतर या अडचणी दूर होतील व सर्व शेतकऱ्यांनी कँपसिटर बसवावा पंपासाठी ते फायदेशीर आहे. - उमेश पाटील, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:57 am

अधिकारी गायब, रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन‎:खुलताबादला लघुसिंचन, सा. बां. व सा. वनीकरण विभागात सर्व आलबेल‎

खुलताबाद शहरात शासकीय प्रशासन बेवारस झाल्याचे‎चित्र मंगळवारी समोर आले. ‘नोकरी आमची,‎पगार शासनाचा आणि जबाबदारी कुणाचीच‎नाही’, अशा थाटात अनेक विभागांचे‎अधिकारी सर्रास कार्यालयात दांडी मारत‎असल्याचे उघड झाले आहे. या दांडीबहाद्दर‎अधिकाऱ्यांना ना वरिष्ठांचा धाक उरला आहे,‎ना जनतेची भीती. परिणामी, सर्वसामान्य‎नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावे लागत‎आहेत. मंगळवारी सकाळी ११ ते १२ः३० या‎वेळेत लघु सिंचन विभाग, सार्वजनिक‎बांधकाम विभाग व समाजिक वनीकरण‎विभाग कार्यालयाची पाहणी केली. या वेळी‎वरील बाबी समोर आल्या.‎ खुलताबाद तालुक्यात शहरासह ७३ ते ७४ ‎‎गावे असून संपूर्ण तालुक्याचा प्रशासकीय ‎‎कारभार काही मोजक्या शासकीय‎कार्यालयांवर अवलंबून आहे. दररोज शेकडो ‎‎शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला व नागरिक ‎‎विविध कामांसाठी शहरात येतात. मात्र ‎‎‘कार्यालय उघडे, पण अधिकारी गायब’ हेच ‎‎रोजचे वास्तव बनले आहे.‎ अधिकारीच नव्हे, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंतेही गायब‎ फक्त वरिष्ठ अधिकारीच नव्हे, तर अनेक‎शाखा अभियंते व कनिष्ठ अभियंतेही‎विविध बहाण्यांखाली कार्यालयात गैरहजर‎राहत असल्याची खुलेआम चर्चा आहे.‎त्यांना जाब विचारणारा कुणी नसल्याने‎मनमानी कारभार बिनधास्त सुरू आहे.‎शासनाच्या पगारावर ऐषाराम आणि‎जनतेच्या कामांची उघडपणे थट्टा सुरू‎असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत‎आहेत. मंगळवारी सामाजिक वनीकरण‎विभागात कुणीच हजर नव्हते. तर,‎सार्वजनिक बांधकाम व लघुसिंचन‎विभागात प्रत्येकी एक कर्मचारी आढळून‎आला.‎ नेहमी ठरलेली उत्तरे‎ सार्वजनिक बांधकाम व‎लघुसिंचन विभागाचे उपअभियंते‎अधूनमधून कार्यालयाला धावती‎भेट देतात आणि साइटवर आहे‎किंवा छत्रपती संभाजीनगरला‎बैठकीत आहे, असे ठरलेले उत्तर‎नेहमीच नागरिकांना दिले जाते.‎ दांडीबहाद्दरांना वरिष्ठांचाही धाक नाही, नागरिकांच्या कामासाठी फेऱ्या‎ अनेक शासकीय कार्यालयांमध्ये‎अद्याप बायोमेट्रिक (थम) हजेरी‎प्रणाली नसल्याने‎अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोकळे‎रान मिळाले आहे. सर्व‎कार्यालयांत तातडीने थम सिस्टीम‎बसवून दररोज हजेरी बंधनकारक‎करावी, अशी जोरदार मागणी‎शेतकरी व नागरिकांकडून होत‎आहे. Q-अनेक कार्यालयांतील अधिकारी वेळेत येत नाही? A. याबाबत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. Q-अधिकारी, कर्मचारी वेळेत यावे, यासाठी काय करणार? A. सर्वांना वेळेवर येणे व उपस्थित राहण्याबाबत सूचना देऊन पाळन करण्याबाबत आदेश दिले जातील. Q- सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होण्याबाबत काय करणार? A. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या जातील. तसेच ज्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, अशांवर कारवाई केली जाईल. बायोमेट्रिक हजेरी आता बंधनकारक करावी

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:28 am

सिल्लोडला महसूल कर्मचाऱ्यांचा ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार

तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि. १५) ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे. जीर्ण लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर बदलून नवी अद्ययावत उपकरणं द्यावीत, या मागणीसाठी हा निर्णय घेतला आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता सर्व महसूल अधिकाऱ्यांनी आपापली डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट तहसीलदार संजय देवराये यांच्याकडे जमा केली. ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे असलेली आयटी उपकरणं पूर्णपणे निकामी झाली आहेत. त्यामुळे ई-पीक पाहणी मंजुरी वगळता इतर कोणतीही जबाबदारी देऊ नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील ५५ ग्राम महसूल अधिकारी आणि ११ मंडळ अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे. शासन स्तरावर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितले. या वेळी तलाठी संघाचे अध्यक्ष रविंद्र कुलकर्णी, सरचिटणीस काशिनाथ ताठे, मंडळ अधिकारी व्ही. डी. सोनुने, बी. पी. पाटील, महसूल अधिकारी व्ही. ए. दुनगहू, गिरीश पाटील, अनिल साबळे, विजय वानखेडे, कापसे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:26 am

परीक्षेला जाताना दुचाकी अपघातात बाभुळगावमधील विद्यार्थ्याचा मृत्यू:नियंत्रण सुटल्याने दे. रंगारीमधील नदी पुलावर संरक्षण कठड्याला धडक‎

देवगाव रंगारी येथील नदी पुलावर मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता दुचाकी अपघातात अठरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ओम कडुनाथ तुपे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो बाभुळगाव (बुद्रुक, ता. वैजापूर) येथील रहिवासी होता. सध्या तो पंढरपूर (छत्रपती संभाजीनगर) येथे खासगी कंपनीत काम करत शिक्षण घेत होता. गारज, शिवुर भागातील शाळेत त्याचे शिक्षण सुरू होते. शालांत परीक्षेसाठी तो दुचाकीवरून ये-जा करत होता. मंगळवारी सकाळी वाळूज येथील घरातून दुचाकीने (महा. २० जी डब्ल्यू ६८३४) तो गारज, शिवुरकडे निघाला होता. देवगाव रंगारी मार्गे जात असताना नदी पुलाजवळील वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी पुलावरील संरक्षक कठड्याला धडकली. डोक्याला गंभीर मार लागल्याने तो रक्तबंबाळ झाला होता.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:26 am

पैठणच्या राहुलनगर, संजयनगर येथील अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती:ग्रामसेवकांना देण्यात आल्या तत्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना‎

जायकवाडी उत्तर,दक्षिण या शासकीय वसाहतींचे अतिक्रमण काढल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने राहुलनगर परिसरातील बाजारतळ या ठिकाणी अतिक्रमणे हटवण्यास सोमवारी सुरुवात केली होती. या संतप्त अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले होते. त्यावर आज आमदार विलास भुमरे यांनी या भागातील राहुलनगर, संजयनगर या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना सांगितले की, एकही घर पडू देणार नाही. तत्काळ ग्रामपंचायतीने नियमानुकूल प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या आहेत. यावेळी माजी सभापती पुष्षा केदारे, लक्ष्मण आप्पा सूर्यनारायण, सदानंद खडसन, गंगाधर म्हस्के, एस.डी जाधव, मोहन जानकर, किरण सूर्यनारायण, विनोद त्रिभुवन, बाळू त्रिभुवन, सरपंच मोरे, दीपक मोरे आदी उपस्थित होते. पाटबंधारे विभागाने जायकवाडी उत्तर व दक्षिण येथील अतिक्रमणे मोठ्या पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले. या पथकाने राहुलनगर बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यास सुरू केले तेव्हा येथे अतिक्रमणधारक आक्रमक झाले. कारवाई थांबवावी, या मागणीसाठी आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. दरम्यान, काही आंदोलकांनी कारवाईसाठी आणलेल्या जेसीबीवर दगडफेक केल्याने यंत्राच्या काचा फुटल्या, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे आज या गावात आमदार विलास भुमरे यांनी भेट देऊन ग्रामस्थांना धीर देत एकही घर पडणार नाही, यासाठी तत्काळ ग्रामपंचायतने प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना ग्रामसेवक यांना दिल्या. यावेळी स. पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे उपस्थित होते. यावेळी राहुलनगर येथील महिलांनी प्रशासनाला ‘‘साहेब आता आमची घरे पडणार नाही ना?’’ अशी विनंती केली. राहुलनगर आणि संजयनगर परिसरातील या अतीक्रमण मोहिमेला मिळालेल्या स्थगितीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आमदार विलास भुमरे यांनी दिला महिलांना धीर यावेळी राहुलनगर येथील महिलांनी आमदार विलास भुमरे यांच्याकडे आमचे घर वाचवा ही विनंती केली. यावेळी आमदार यांनी ताई एकही घर पडू देणार नाही, असे सांगितले. तुमच्या बरोबर आम्ही कायम आहोत, असे यावेळी आमदारांनी सांगितले. या संदर्भात प्रशासनाबरोबर आमदार भुमरे यांनी बैठक घेतली.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:24 am

पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप:सेवा फाउंडेशनकडून पैठणजवळील राहुलनगरमध्ये उपक्रम‎

राहुलनगर परिसरात अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पाणी शिरले होते. घरातील साहित्य आणि अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. या संकटात छत्रपती संभाजीनगरच्या सेवा फाऊंडेशनने पुढाकार घेतला. रविवारी साई मंगल कार्यालयात पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि किराणा किट वाटण्यात आले. या वेळी सुमित खांबेकर, शुभम लोहाडे, आशिष पावडे, श्रीनिवास लिगदे, अभय देशपांडे, माजी सरपंच साईनाथ सोलाट, सपोनि ईश्वर जगदाळे, माजी सभापती पुष्पा केदारे उपस्थित होते. सेवा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पूरग्रस्तांची स्थिती पाहिली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मदतीबरोबर मानसिक आधारही दिला. सेवा फाऊंडेशनचे सुमित खांबेकर म्हणाले, “समाजात माणुसकी जिवंत ठेवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आपत्तीच्या काळात गरजूंना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे.” फाऊंडेशन आपत्तीग्रस्तांसोबतच शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि गरिबांच्या मदतीसाठीही कार्यरत आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही फाऊंडेशन घेत आहे. या मदतकार्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला. सामाजिक संस्थांनी संकटाच्या काळात पुढे येऊन केलेली मदत प्रेरणादायी ठरली. या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी गणेश बोंबले, अनिल नरवडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:23 am

अंधानेरला 23 वर्षांनी शाळकरी मित्र मैत्रिणी एकत्र:जीवन प्रवासातील आठवणी सांगत प्रत्येकाने बालपणाचा क्षण अनुभवला‎

अंधानेर येथील जि. प. प्रशालेमधील २००१-०२ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल २३ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. शाळेच्या प्रांगणात स्नेहमेळावा साजरा करत बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. जुन्या वर्गखोल्या, मैदान, आणि त्या काळातील खोडकर क्षणांनी सर्वांना भूतकाळात नेले. हास्य, उत्साह आणि मैत्रीने वातावरण भारावले होते. कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांच्या सत्काराने झाली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेला भेटवस्तू दिली. यावेळी विद्यमान शिक्षक संजय केवट, तसेच तत्कालीन शिक्षक अशोक शिरसाठ, देवराव परकाळे, त्र्यंबक वाघ, तुकाराम बारगळ, मीना बिराडे, शोभा शिरसाठ आणि टी. पी. वासनिक यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी आपापला परिचय करून दिला. व्यापारी, अधिकारी, शिक्षक, राजकीय पदाधिकारी, शेतकरी, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या मित्रमैत्रिणींनी एकमेकांची विचारपूस केली. जीवनप्रवासातील आठवणी सांगत पुन्हा बालपणाचा क्षण अनुभवला. प्रशांत नवले यांच्या सूत्रसंचलनाने कार्यक्रमात रंगत आली. परिपाठ, खेळाचा तास, शिक्षकांचे मार, संगीत खुर्ची, खो-खो अशा अनेक आठवणी प्रत्यक्षात अनुभवल्या. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. शेवटी पुन्हा भेटू या निर्धाराने आणि मनात आठवणींचा खजिना घेऊन सर्वांनी निरोप घेतला. कार्यक्रमासाठी स्थानिक मित्रांनी विशेष मेहनत घेतली.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:22 am

तीन वर्षांनंतर निवडणूक, नागपूरमध्ये भाजप पूर्ण जोमात:आघाडीचा अस्तित्वासाठी लढा, 24 लाख मतदार ठरवणार निकाल

नागपूर महापालिकेवर ५ मार्च २०२२ पासून प्रशासक राज आहे. जवळपास तीन वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार कामाला लागले आहे. २०१७ मध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती होती. ४ नगर सेवकांचा मिळून एक प्रभाग होता. तिच प्रभाग पद्धती कायम आहे. भाजपा निवडणुका जिंकण्यात आत्मविश्वास ओसंडून वाहत आहे. महापालिका निवडणूक जाहीर होऊनही महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर झालेली नाही. तर जिल्हा परिषद अध्यक्षांची आरक्षण सोडत कधीचीच जाहीर झाली, हे विशेष. भाजपाच्या मुलाखती मंगळवार, १६ पासून सुरू झाल्या. इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने भाजपाने उमेदवारांच्या मुलाखतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. तर महाविकास आघाडीचे डळमळीत आहे. काँग्रेसच्या दोन ते तीन दिवसांत सुरू होईल असे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले. शेवटपर्यत “घुमवत’ न्यावे लागते ही काँग्रेसची टँगलाईन आहे.... निवडणुकीत हे असतील कळीचे मुद्दे सिमेंटचे रस्ते, अतिक्रमणाचा न सुटलेला प्रश्न, अर्ध्या भागाला न मिळणारे पाणी, ठिकठिकाणी असलेला अपूर्ण विकासकामांचा अडथळा या समस्या कायम आहे. सिमेंट रस्ते उंच झाल्यामुळे बहुतांश भागात दुकाने, घरे व प्रितष्ठाने खाली गेली आहे. विकासकामाच्या नावाखाली शहरभर सुरू असलेल्या अपूर्ण खोदकामांमुळे लोकांचा त्रास वाढला. आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान २०१७ मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी तुटली होती. राष्ट्रवादीने ४० जागांवर दावा केला होता. वाटाघाटीत राष्ट्रवादी २५ जागांवर आली होती. काँग्रेस १२ ते १५ च्यावर देण्यास तयार नव्हती. या निवडणुकीत काँग्रेसने २९ जागा जिंकल्या. तर १२ जागांवर फटका बसला. भाजपा जोरात धावत असताना महाआघाडीच्या काहीच हालचाली नाहीत. हे प्रभाग राहतील चर्चेत नागपूर महापालिकेत एकुण प्रभाग ३८ आहे. यापैकी ३७ मध्ये प्रत्येकी ४ आणि ३८ मध्ये ३ असे १५१ सदस्य राहिल. यापैकी प्रभाग ३१, २२, ३८, १३, ०१, ३५, १०, ११, ०९ असे संदीप जोशी, प्रफुल्ल गुडधे, दुनेश्वर पेठे आदी नेत्यांचे वार्ड चर्चेत आहेत. शिवसेनेची ताकद नाही, मनसेचे अस्तित्व नाही १५१ सदस्यीय महापालिकेत एकीकृत शिवसेनेचे केवळ दोन सदस्य होते. २००७ मध्ये एकीकृत शिवसेनेचे ९ नगरसेवक होते. २०१२ मध्ये ही संख्या ६ वर आली, २०१७ मध्ये फक्त दोनच नगरसेवक निवडून आले. शहरात पक्षाचा एकही आमदार नाही, विधान परिषद सदस्यही नाही. एकीकृत असतानाही शिवसेना आणि राष्ट्रवादीची नागपुरात ताकद नव्हती. आणि शकले झाल्या नंतर ती आणखी क्षीण झाल्याचे चित्र आहे. शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत असल्याने त्यांचे अस्तित्व भाजपामुळे राहु शकते. सध्या दुनेश्वर पेठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकमेव नगर सेवक आहे. मनसेचे अस्तित्व नाही. पक्षीय बलाबल असेपक्ष २०१७ २०१२भाजप १०८ ६२काँग्रेस २९ ४१बसपा १० १२शिवसेना ०२ ०६राष्ट्रवादी ०१ ०६अपक्ष ०१ १०इतर ०० ०६एकूण १५१ १४५

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:19 am

‘शिवतीर्थ’वर प्रचारसभेसाठी शिवसेना-ठाकरेंत रस्सीखेच:प्रचाराआधी मैदानासाठी रंगला राजकीय सामना

मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच मुंबईचे ऐतिहासिक ‘शिवाजी पार्क’ अर्थात शिवतीर्थ मैदान प्रचारसभेसाठी मिळावे, म्हणून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांनी या जागेसाठी अर्ज केला आहे. मतदानापूर्वीचा अखेरचा रविवार गाजवण्यासाठी तिनही पक्षांनी १३ जानेवारीलाच मैदान मिळवण्याचा आग्रह धरल्याने पालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यातील पालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १३ जानेवारी संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आपली ताकद दाखवण्यासाठी शिवाजी पार्कवर भव्य सभा घेण्याचे नियोजन सर्वच पक्षांनी केले आहे. यासाठी पालिका प्रशासनाकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तीन अर्ज आले आहेत. या तिन्ही पक्षांनी ११, १२ आणि १३ जानेवारी या तीन तारखांपैकी कोणताही एक दिवस सभेसाठी मिळावा, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे ११ जानेवारी रोजी प्रचाराचा अखेरचा रविवार असल्याने ही तारीख मिळावी अशी तिनही पक्ष आग्रही आहेत. शिवाजी पार्क : राजकारणाचे शक्तिस्थान, म्हणून सर्वांचे लक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि शिवसेनेच्या स्थापनेचा साक्षीदार असलेले ‘शिवतीर्थ’ ही राजकीय अस्मितेची रणभूमी आहे. शिवसेनेची स्थापना (१९६६) याच मैदानातून झाली. बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा असो किंवा दरवर्षीचा दसरा मेळावा, हे मैदान शिवसेनेच्या अस्मितेशी जोडले गेले आहे. आता शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर, “खरी शिवसेना कुणाची?’ हा संघर्ष सिद्ध करण्यासाठी या मैदानावर हक्क सांगणे दोन्ही गटांसाठी अनिवार्य झाले आहे. संपूर्ण मुंबई व लगतच्या शहरांतून कार्यकर्त्यांना येणे सोयीचे ठरते. बदललेली समीकरणे व प्रतिष्ठेची लढाई

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:15 am

पुणे निवडणुकीत भाजप विरुद्ध सगळे?:अजित गटाची भूमिका निर्णायक ठरणार, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या चर्चा रंगल्या

पुणे महापालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शहरातील राजकारण तापले आहे. साडेतीन वर्षांहून अधिक काळ प्रशासक राजवट सुरू असलेल्या महापालिकेची निवडणूक जानेवारीत होणार असून, या निवडणुकीत भाजप विरुद्ध सर्व विरोधक असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या साऱ्या समीकरणांत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती राहणार असल्याचेही सूचित केले आहे. त्यामुळे युतीतील भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुणे महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे शहरातील मध्यवर्ती पाच विधानसभा मतदारसंघांत प्राबल्य असताना, वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या उपनगरांत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास फायदा भाजपला होईल, अशी भावना दोन्ही गटांतील पदाधिकाऱ्यांची आहे. विरोधकांना एकत्र येणे ही अपरिहार्यता बनली पुणे मनपासाठी भाजपने १६५ पैकी तब्बल १२५ जागांचे लक्ष्य ठेवले. शिवाय भाजप आणि शिंदेसेनेने यापूर्वीच युती करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विरोधकांसाठी एकत्र येणे अपरिहार्य बनले आहे. अशावेळी अजित पवार गटाची भूमिका निकालाची दिशा ठरवू शकते. त्यामुळे आघाडीतील पक्षही अजित पवारांच्या साथीला जातील, असे चित्र आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:11 am

संभाजीनगरात युतीतील मतभेद टोकाला:तनवाणी-जैस्वाल वाद पालकमंत्र्यांकडे, युतीमधील चर्चेच्या बैठकीतून डावलल्याचा तनवाणींचा आरोप

केवळ आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ व जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल हे तीन जणच सध्या पक्ष चालवत आहेत. मध्य मतदारसंघात प्रचार कार्यालय असले म्हणजे निवडणूक मध्य मतदारसंघात नाही. त्यामुळे आम्हाला मान-सन्मान देत नसाल तर पदमुक्त करा, असे सांगत माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे तक्रारींचा पाढाच वाचला. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना व भाजप युतीमध्ये चर्चेला कोण जाणार यावरून हा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामध्ये तनवाणी यांना बैठकीसाठी डावलण्यात आले. प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल व राजेंद्र जंजाळ हेच बैठकीसाठी गेले . प्रकरण उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, मग तोडगा तनवाणी यांनी शिरसाट यांना सांगितले की, पक्षात इतर पदाधिकाऱ्यांना मान दिला जात नाही. मी लोकसभेचा संपर्कप्रमुख असतानाही मला डावलले आहे. मी देखील जिल्हाप्रमुख म्हणून काम केले आहे. त्यामुळे आमच्या अनुभवाचा फायदा करून घेणार की नाही, असे त्यांनी शिरसाट यांना सांगितले. तुमची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगणार असल्याचे सांगत शिरसाट मुंबईला रवाना झाले. त्यांच्याकडूनच यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. तनवाणींनी त्यांची जबाबदारी पार पाडावी याबाबत जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्य समन्वय समितीत ५ लोक नेमले आहेत. यांच्याकडेच भाजपसोबत चर्चा करण्याची जबाबदारी आहे. तनवाणी यांना भाजपच्या बैठकीसाठी चर्चेला यायचे होते. मात्र, तनवाणी यांच्याकडे नियोजन समितीची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी जी जबाबदारी त्यांना दिली आहे ती पार पाडावी. आमच्याकडे जी जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडणार आहोत.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:09 am

जिथे शक्य असेल, तिथे युती करा...शहांचा अजित पवार गटाला सल्ला:बैठकीत चर्चा, शहा-पटेल-तटकरे 15 मिनिटांच्या भेटीत निवडणुकीची रणनीती

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुनील तटकरे यांनी दिल्लीत जाऊन भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. १५ मिनिटांच्या चर्चेत निवडणुकांचे रणनीती ठरवण्यात आली असून, अमित शाह यांनी स्थानिक पातळ्यांवर लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याचे समजते. पटेल, तटकरे आणि अमित शाह यांच्या बैठकीत अमित शाह यांनी अजित पवार गटाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. “राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेल, तिथे युती करून निवडणुका लढा,” असा सल्ला शाहांनी दिला आहे. भाजप आणि मित्रपक्षांनी एकत्र येऊन जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर द्यावा, अशी रणनीती आखली आहे. शरद पवारांच्या पक्षासोबत जाण्याची मोकळीक? स्थानिक राजकीय गणिते जुळवण्यासाठी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जावे लागले किंवा काही ठिकाणी जुळवून घ्यावे लागले, तर त्याला अमित शाह यांची काहीही हरकत नसल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली. भाजपच्या या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 7:07 am

मुंबईत ठाकरेंची युती फिक्स, मविआ फिसकटण्याची चिन्हे:युतीसाठी 19 ‌वर्षांनंतर संजय राऊत राज ठाकरेंच्या घरी

सुमारे ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प आणि देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई मनपासह ठाणे, पुणे, नाशिक, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर आदी मनपात ठाकरे बंधू युती करणार हे फिक्स झाले आहे. त्यांच्यासोबत शरद पवार गटही असेल. ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत बोलणी करण्यासाठी १६ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत १९ वर्षानंतर राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत आमदार अनिल परबही होते. आठवडाभरात युती, जागा वाटपाची घोषणा होईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईत उद्धवसेनेने १२५, मनसे ८० ते ८५, तर शरद पवार गट २० ते २५ जागांचा फॉर्म्युला तयार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मविआत मनसेच्या प्रवेशाला कडाडून विरोध करत काँग्रेसने स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी तसेच संकेत दिले. त्यामुळे मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर मनपात फिस्कटण्याची चिन्हे आहेत. इतर मनपात काँग्रेस मनसेला सोबत घेऊ शकते. दुसरीकडे भाजप, शिंदेसेनेत जागा वाटपाची पहिली फेरी झाली. त्यात त्यांनी १५० पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी रणनिती आखत असल्याचे सांगितले. मुंबईत अजित पवारांचा पक्ष स्वतंत्र लढू शकतो. उद्धव ठाकरेंसाठी इकडे आड तिकडे विहीर, काँग्रेस स्वतंत्रचा फटका अधिक बसू शकतो मुंबईत उद्धव ठाकरेंची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. लोकसभेला काँग्रेसमुळे त्यांना दलित, मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळाली. विधानसभेतही काही प्रमाणात फायदा झाला. मुंबईत काँग्रेसचा किमान ४० वॉर्डात प्रभाव आहे. दुसरीकडे ६० मराठीबहुल वॉर्डात राज ठाकरे सोबत हवे, असेही त्यांना वाटते. म्हणून काँग्रेस आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण बिहार विधानसभेनंतर काँग्रेसने मनसेला विरोध सुरू केला. म्हणून उद्धवांचे गणित बिघडण्यास सुरूवात झाली आहे. काँग्रेसच्या तुलनेत मनसेची शक्ती कमीच आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा अधिक फटका बसेल, हेही त्यांना ठावूक आहे. पण ५ जुलैपासून सुरू केलेल्या बंधुप्रेमाच्या प्रयोगावर ते पडदाही पाडू शकत नाहीत. २० वर्षांनंतर बाळासाहेबांची हाक चिमण्यांनी ऐकली उद्धवांच्या राजकारणाला कंटाळून २००५मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ अशी आर्त हाक दिली होती. ती २० वर्षानंतर चिमण्यांनी ऐकल्याचे दिसत आहे. शरद पवार गट ठाकरेंसोबतच तरकाँग्रेस स्वतंत्रपणे लढण्यावर ठाम २०१९ मध्ये शरद पवारांनी शिवसेना आणि काँग्रेसला मविआच्या छताखाली आणले होते. तो एक राजकीय चमत्कार मानला गेला. आताही उद्धव-राज युती पवारांच्या आदेशावरूनच झाली आहे. उद्धव यांना पवारांकडून पुन्हा चमत्काराची आशा आहे. सूत्रांनी सांगितले की, किमान मुंबईत मनसेला सोबत घेण्यासाठी पवार राहुल गांधी यांच्याशी वाटाघाटी करत आहेत. युतीच्या पहिल्या बैठकीत ठोस निर्णय नाही छत्रपती संभाजीनगर | मंगळवारी भाजप-शिंदेसेना युतीसाठी पहिली बैठक झाली. त्यात फक्त मागील निकालाचा आढावा घेण्यात आला. २९ प्रभागांत गणिते कशी बदलली आहेत. ११५ पैकी ६५ हिंदुबहुल वॉर्डातच युतीला संधी आहे. त्यात शिवसेना भाजपला कुठे परिस्थिती अनुकूल ठरू शकते याची चर्चा करण्यात आली. कोणताही ठोस निर्णय झाला नाही. मनसे पहिल्यांदाच उद्धवसेनेसोबत लढणार ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी २००७, २०१२ आणि २०१७ मध्ये मुंबई मनपाची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. त्यात २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये २७ तर २०१७ मध्ये ७ नगरसेवक निवडून आले होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 6:57 am

कर्जफेडीसाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी:चंद्रपूरच्या तरुणाचे सावकारावर आरोप, 6 जणांविरोधात गुन्हा

सावकाराने पैशांसाठी शेतकऱ्याला कंबोडियात जाऊन किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात उघड झाला. रोशन सदाशिव कुडे या तरुण शेतकऱ्याच्या तक्रारीवरून सावकार मनीष पुरुषोत्तम भाटबांधे, रा. पटेलनगर ब्रह्मपुरी याच्यासह ६ जणांवर सावकारी आणि खंडणीचा गुन्हा मंगळवारी दाखल करण्यात आला. काही वर्षांपूर्वी रोशन कुडेने दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी मनीष पुरुषोत्तम भाटबांधे व इतरांकडून व्याजाने एक लाख रुपये उसने घेतले होते. पण दुर्दैवाने त्याची जनावरे मेल्याने तो कर्ज फेडू शकला नाही. एक लाख रुपये कर्जाऊ रकमेवरील व्याजामुळे कर्ज वाढत जाऊन ते सुमारे ७४ लाखांवर पोहोचले. त्यामुळे सवकाराने पैशांसाठी तगादा लावला. त्यामुळे रोशनने कंबोडिया देशात जाऊन ८ लाखांत किडनी विकली व सावकाराच्या खात्यावर पैसे जमा केले. कंबोडियामध्ये किडनी विकून पैसे देण्याचा सावकारानेच दिला सल्ला तिकडे किडनी विक, पण माझे पैसे दे, असा तगादा सावकाराने लावल्यामुळे आपल्याला किडनी विकण्याची कल्पना सुचल्याचे रोशनने सांगितले. त्याने ऑनलाईन शोध घेत चेन्नईमधील डॉ. क्रिष्णाशी संपर्क साधला. त्यावर डॉक्टरांनी कंबोडियाचा रेफरन्स देऊन त्याला कोलकाता व तेथून विमानाने कंबोडियात पाठवले. कंबोडियामधील नानपेन शहरातील हॉस्पिटलमध्ये १४ ऑक्टोबर २०२४ रोजी किडनी प्रत्यारोपण शस्रक्रिया करण्यात आली. किडनी विकून आलेले ८ लाख रुपये रोशनने सावकाराला दिल्यानंतरही पैशासाठी तगादा सुरू राहिला. त्यामुळे पोलिसात तक्रार दिल्याचे रोशनने म्हटले आहे. सावकारामुळेच माझ्यावर ही भयंकर वेळ आली आहे, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तसेच सावकाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करते. तर दुसरीकडे शेतकऱ्याला किडनी विकावी लागते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती वाईट आहे, हे यातून स्पष्ट होते. सावकारासह ६ जणांवर गुन्हे दाखल... २०२१ मध्ये रोशनने १ लाख रुपये घेतले होते. व्यासह आज रोजी ही रक्कम ७४ लाख झाली होती. किडनी विकून रोशनने सावकाराच्या खात्यावर ऑनलाइन ८ लाख रुपये जमा केले. मात्र सावकाराने व्याजासह ७४ लाख रुपयांची मागणी करत तगादा सुरूच ठेवला. त्यामुळे शेतकऱ्याने १० नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून तपास करत पोलिसांनी मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ६ जणांवर गुन्हा दाखल केला. तर किडनी विकण्यास भाग पाडल्याबद्दल अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 6:47 am

लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांना दिलासा मिळण्याची शक्यता:चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल राखीव

पुण्याच्या लवासा सिटी प्रकल्पाला दिलेल्या कथित अवैध परवानग्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुटुंबीयांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवरील निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला. त्याच वेळी, ही याचिका फेटाळली जाण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखाड यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. दिवाणी अधिकार क्षेत्राचा वापर करताना न्यायालय पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचे निर्देश देऊ शकते, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद याचिकाकर्ते वकील नानासाहेब जाधव यांना दाखवता आलेली नाही, अशी स्पष्टोक्ती या वेळी खंडपीठाने दिली. लवासा येथे हिल स्टेशन उभारण्यासाठी दिलेल्या कथित बेकायदा परवानग्यांबाबत शरद पवार, त्यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, तसेच त्यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी जाधव यांच्या याचिकेत करण्यात आली होती. २०२३ मध्ये सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या या नव्या जनहित याचिकेत जाधव यांनी म्हटले आहे की, त्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये पुणे पोलिस आयुक्तांकडे पवार आणि इतरांच्या चौकशीची मागणी करणारी तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. लवासा सिटी प्रकल्प का अडकला वादाच्या भोवऱ्यात याबाबत अधिक माहिती अशी की, लवासा सिटी वाद मुख्यत्वे पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन (डोंगरतोड, जंगलतोड), स्थानिकांच्या जमिनीच्या हक्कांचे प्रश्न, आवश्यक परवानग्यांशिवाय बांधकाम आणि राजकीय हस्तक्षेप (पवार यांच्या कुटुंबीयांचा संबंध) यावरून निर्माण झाला आहे. याच कारणामुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यानंतर कर्जात बुडाला आणि आता हा प्रकल्पच अर्धवट अवस्थेत एक दिवाळखोरीतील ‘पडीक प्रकल्प’ बनल्याचे दिसून येते. याचिका अमान्य, तरीही युक्तिवादाची संधी सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी ही जनहित याचिका फेटाळून लावणार असल्याचे सांगितले, परंतु याचिकाकर्ते आणि शरद पवारांच्या वकिलांना आपापल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ न्यायालयीन निकालाचे दाखले सादर करता यावेत, यासाठी अखेर न्यायालयाने निकाल राखून ठेवला. हा निकाल कधी सुनावला जाईल, हे खंडपीठाने स्पष्ट केलेले नाही. पवारांनी ‘पॉवर’ वापरल्याचे न्यायालयाचे निरीक्षण यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये, जेव्हा जाधव यांनी लवासाला दिलेल्या विशेष परवानग्या बेकायदा घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली होती, तेव्हा उच्च न्यायालयाने हस्तक्षेपास नकार दिला होता. परंतु, त्या वेळी न्यायालयाने निरीक्षण नोंदवले होते की, शरद पवार आणि त्यांच्या मुलीने आपला प्रभाव आणि वर्चस्व वापरल्याचे दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 6:44 am

पोर्शे कार अपघात:यापूर्वी पुणे कोर्टानेही फेटाळला जामीन, विशाल अगरवालसह आठ जणांचा जामीन फेटाळला

कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालसह आठ आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. आरोपी विशाल अगरवाल याचा यापूर्वी पुणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयानेही त्याचा अर्ज फेटाळला आहे. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, अरुणकुमार सिंग, अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल, ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे, ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांचा जामीन फेटाळण्यात आला आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलल्याचा गुन्हा कल्याणीनगर अपघात प्रकरणात दाखल आहे. या गुन्ह्यात पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींविरोधात आरोप निश्‍चिती झाली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे या खटल्याचे कामकाज पाहात आहेत. रक्ताचे नमुने बदलून आरोपींनी केला गंभीर गुन्हा आरोपींकडून साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याबरोबरच पुराव्यामध्ये छेडछाडीची शक्यता आहे, ही बाब विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी निदर्शनास आणून दिली. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला महिला असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आधीच अंतरिम जामीन दिला आहे. दरम्यान, विशाल अगरवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरत्या जामीनसाठीचा अर्जही पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे विशाल अगरवाल याच्यासह उर्वरित नऊ जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र, ॲड. शिशिर हिरे व ॲड. शुभम जोशी यांनी उच्च न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 6:38 am

पार्थ पवारांचा जमीन घोटाळा:सहदुय्यम निबंधकांमुळे बुडाला शासनाचा 21 कोटींचा महसूल, अमेडियाला 1800 कोटीची जमीन विकली केवळ 300 कोटी रुपयांत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीला मुंढवा येथील १८०० कोटी रुपयांची ४० एकर सरकारी जमीन ३०० कोटीत विकण्यात आली. जमीन विकणारी शीतल तेजवानी तसेच सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना अटक केली आहे. तारूंमुळे व्यवहारात शासनाचा २१ कोटींचा महसूल बुडाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तेजवानी व कंपनीचा संचालक, पार्थ यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांनी सहदुय्यम उपनिबंधक रवींद्र तारूशी संगनमत केले. जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमाणपत्र न घेता मुद्रांक शुल्कात माफी दिल्याचे भासवून जमीन विक्रीची दस्त नोंदणी केली. आरोपींनी २१ कोटींचे मुद्रांक शुल्क बुडवून आर्थिक फायदा घेतला. या रकमेसह आरोपींच्या आर्थिक हितसंबंधांच्या तपाससाठी तेजवानी आणि तारू यांची एकत्रित चौकशी करायची असल्याचे बावधन पोलिसांनी न्यायालयात पोलिस कोठडी मागितली. ती मान्य झाली.. अर्जासोबत खोटी माहिती तेजवानीने बनावट कागदपत्रे तयार करणे आणि बेकायदा व्यवहारांसाठी डिजिटल उपकरणांचा वापर केल्याची दाट शक्यता आहे. मुद्रांक शुल्क माफीसाठी तिने आणि दिग्विजय पाटीलने उद्योग विभागाकडे इरादा पत्रासाठी अर्ज केला. त्यात तिने खोटी माहिती दिली. अशा प्रकारे सरकारी जमिनी बळकावून खासगी व्यक्तींना विकण्याचे आरोपींचे मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता आहे, असे तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक अनिल विभुते आणि सरकारी वकील नितीन अडागळे यांनी न्यायालयासमोर सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 6:35 am

गडचिरोली जिल्ह्यात 25 हजार एकल महिलांची नोंद:महिलांचे पुनर्वसन, रोजगारनिर्मितीसाठी राबवला उपक्रम

गडचिरोली जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एकल महिलांचे सविस्तर सर्वेक्षण केले असून या सर्वेक्षणात तब्बल एकूण २५ हजार ७३२ एकल महिलांची नोंद झाली आहे. या महिलांसाठी पुनर्वसन, रोजगारनिर्मिती आणि स्वयंपूर्णतेचे प्रभावी कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षणाचा उपक्रम हाती घेण्यात आला. ६० वर्षांखालील एकूण १४ हजार ३११ महिलांच्या रोजगारासाठी बचत गटांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या पुढाकारातून उमेद अभियानाच्या माध्यमातून या महिलांचे अधिक सूक्ष्म सर्वेक्षण करून त्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीबाबत तसेच व्यवसायाच्या शक्यतांबाबत सविस्तर माहिती संकलित करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे एकल महिलांसाठी लक्ष केंद्रीत रोजगार व उद्यमशीलतेचे कार्यक्रम आखण्यात येणार आहेत. सर्वेक्षणानुसार, एकल महिलांपैकी २२ हजार ६४६ महिला विधवा, १ हजार १४९ घटस्फोटीत, ४०७ परित्यक्ता तर १ हजार ७४ महिला प्रौढ अविवाहित आहेत. सामाजिक प्रवर्गानुसार पाहता, यामध्ये ७ हजार ७१६ अनुसूचित जमातीच्या, २ हजार ८६३ अनुसूचित जातीच्या महिला असून उर्वरित महिला इतर प्रवर्गातील आहेत. उमेद अभियानाच्या अभ्यासानुसार, व्यवसाय करू शकणाऱ्या एकल महिलांच्या वयोगटात २० ते ४० वयोगटातील ३ हजार ७७१, ४१ ते ५० वयोगटातील ४ हजार ९११, तर ५१ ते ६० वयोगटातील ५ हजार ६२९ महिला तर उर्वरित महिला ६० वर्षांवरील वयोगटातील आहेत. आर्थिक सक्षमतेसाठी आतापर्यंत खेळत्या भांडवलातून ११ हजार ५८४ महिलांना कर्ज, तर समुदाय गुंतवणूक निधीतून ६ हजार ३१८ महिलांना कर्ज देण्यात आले आहे. याशिवाय बँकांच्या माध्यमातून ७२१ महिलांना, तर वंचितता प्रवण निधीतून १ हजार ७२१ महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी हातभार लावण्यात येत आहे. सध्या ५६९ एकल महिला उत्पादक गटांमध्ये सहभागी असून त्या सामुदायिक पद्धतीने व्यवसाय करत आहेत. एकल महिलांच्या व्यवसायांना गती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एकल महिलांसाठी रोजगार प्रेरणा कार्यशाळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहेत. सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प या महिलांना त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार त्या पात्र असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात एकल महिलांच्या रोजगारनिर्मितीतून स्वयंपूर्णता साधणारे अभिनव मॉडेल उभे करण्याची भावना प्रशासनाने व्यक्त केली असून, या उपक्रमातून एकल महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे. एकल महिलांना मिळाला विविध योजनांचा लाभ -या सर्वेक्षणात एकल महिलांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहितीही घेण्यात आली. त्यानुसार श्रावण बाळ योजना १ हजार ७८० महिलांना, संजय गांधी निराधार योजना १२ हजार २५२ महिलांना, लाडकी बहीण योजना ५ हजार २१६ महिलांना, अपंग कल्याण योजना ४८ महिलांना, तर इतर योजनांचा लाभ ४२६ महिलांना मिळत आहे. मात्र २ हजार ७४८ महिलांना कोणतीही योजना मिळत नाही.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 6:32 am

परवा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होणार का?:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यात किती तथ्य? अमेरिकेतील एपस्टाइन फाईल प्रकरणाने उडवली खळबळ

अमेरिकेच्या संसदेत 19 डिसेंबर रोजी उघड होणाऱ्या बहुचर्चित 'एपस्टाइन फाईल्स'मुळे जगभरात खळबळ उडणार असून, याचा मोठा परिणाम भारताच्या राजकारणावरही होणार आहे. या फाईल्समधील माहिती इतकी स्फोटक असेल की त्यामुळे देशाचा पंतप्रधान बदलला जाण्याची शक्यता असल्याचे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला की, जेफ्री एपस्टाइन या व्यक्तीने जगातील अनेक बड्या असामींना अल्पवयीन मुली पुरवल्या होत्या. या प्रकरणाच्या फाईल्स आता अमेरिकन संसदेत खुल्या होणार आहेत. या यादीमध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांचा आणि बड्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा आहे. ही माहिती समोर आल्यानंतर भारतीय राजकारणात भूकंप होईल आणि त्यामुळेच देशाचा पंतप्रधान बदलला जाईल, असा तर्क चव्हाण यांनी मांडला आहे. आपण बोलत असलेली माहिती अमेरिकेच्या संसदेच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागपूर कनेक्शन पंतप्रधान बदलल्यानंतर नागपूरशी संबंधित व्यक्ती या पदावर बसेल, या आपल्या जुन्या दाव्यावर चव्हाण आजही ठाम आहेत. मोदींचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, जेफ्री एपस्टाइनने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशयही चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. तसेच भारतातील काही राजकारण्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला अशी चर्चा अमेरिकेत सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामध्ये काही आजी माजी खासदार आहेत, यापेक्षा जास्त काही मी बोलणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. व्हीप आणि अणुऊर्जा विधेयकाचा संबंध भाजप खासदारांना 19 डिसेंबर रोजी उपस्थित राहण्याबाबत बजावण्यात आलेला 'व्हीप' आणि या आंतरराष्ट्रीय प्रकरणाचा काही संबंध आहे का, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण म्हणाले की, 19 तारखेला सरकार काही महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्याच्या तयारीत आहे. यामध्ये अणुऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाशी संबंधित विधेयकाचाही समावेश आहे. त्यामुळे या व्हीपचा केवळ विधेयकांशी संबंध आहे की त्यामागे आणखी काही कारणे आहेत, याबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या खळबळजनक दाव्यांचे समर्थन करताना चव्हाण यांनी पुन्हा एकदा अमेरिकन संसदेच्या नोंदींचा हवाला दिला. मी जो काही तर्क मांडत आहे किंवा बोलत आहे, ती सर्व माहिती आणि कागदपत्रे अमेरिकेच्या संसदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एकंदरीतच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे याचा आपण थोडक्यात वेध घेण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी एपस्टाइन फाईल प्रकरण काय आहे, हे समजून घेऊयात.. एपस्टाइन फाईल प्रकरण काय आहे? जगभरात गाजलेले 'एपस्टाइन प्रकरण' हे हाय-प्रोफाइल गुन्हेगारी, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे एक अत्यंत गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणाची सुरुवात 2005 मध्ये फ्लोरिडामध्ये झाली, जेव्हा एका 14 वर्षांच्या मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेतली. मसाजच्या बहाण्याने मुलीला जेफ्री एपस्टाइनच्या आलिशान बंगल्यावर बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा हा गंभीर आरोप होता. या तक्रारीनंतर हळूहळू 50 हून अधिक पीडित मुलींनी धर्य करून पुढे येत आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली आणि एपस्टाइनचे प्रकरणाचे पितळ उघडे पडू लागले. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, एपस्टाइनच्या मॅनहॅटन, पाम बीच व्हिला आणि 'लिटल सेंट जेम्स' या खासगी बेटावर हाय-प्रोफाइल पार्ट्यांचे आयोजन केले जात असे, ज्यात अनेक बड्या सेलिब्रिटींची उपस्थिती असे. अल्पवयीन मुलींना या बेटावर आणण्यासाठी एपस्टाइनचे खासगी विमान 'लोलिता एक्सप्रेस' वापरले जाई. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनीही या विमानाने प्रवास केल्याचे म्हटले आहे. पैसे आणि दागिन्यांचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात ओढण्यात एपस्टाइनची मैत्रीण घिसलेन मॅक्सवेल हिने मोठी भूमिका बजावली. विशेष म्हणजे, एपस्टाइनचा राजकीय आणि सामाजिक प्रभाव इतका होता की, 2008 मध्ये दोषी ठरूनही त्याला अवघ्या 13 महिन्यांची शिक्षा झाली आणि 2009 मध्ये त्याची सुटकाही झाली. मात्र, 2019 मध्ये या प्रकरणाला पुन्हा वाचा फुटली, जेव्हा व्हर्जिनिया ग्रिफी हिने एपस्टाइनवर अत्याचाराचे गंभीर आरोप केले. त्यानंतर सुमारे 80 महिलांनी तक्रारी दाखल केल्याने 6 जुलै 2019 रोजी एपस्टाइनला पुन्हा अटक करण्यात आली. परंतु, खटला सुरू होण्यापूर्वीच 10 ऑगस्ट 2019 रोजी तुरुंगात त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. अधिकृत अहवालानुसार ही आत्महत्या असल्याचे म्हटले असले, तरी अनेक तज्ज्ञांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि एपस्टाइनची साथीदार घिसलेन मॅक्सवेल हिला मात्र 2020 मध्ये अटक करण्यात आली असून, तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारत आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का? 'द हिंदू' मधील एका वृत्तानुसार, नोव्हेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एपस्टाइनच्या जुन्या ईमेल आणि कॅलेंडरमध्ये केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव देखील समोर आले होते. या वृत्तानुसार, एपस्टाइन यांनी 19 सप्टेंबर 2014 रोजी व्हाईट हाऊसच्या कायदेशीर सल्लागार कॅथरीन रुमलर यांना एक ईमेल पाठवला. त्यावेळी पुरी संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि हवामान परिषदेसाठी न्यू यॉर्कमध्ये राजदूत होते. एपस्टाइनने ईमेलमध्ये लिहिले, 'या आठवड्यात न्यू यॉर्कला कोण येत आहे? मी त्यांना भेटण्याचा किंवा एखादा कार्यक्रम करण्याचा विचार करत आहे.' हरदीप पुरी यांचेही नाव यादीत होते. ईमेलच्या शेवटी लिहिले होते, 'मुलींनो? सावधान, मी माझी जुनी वाईट सवय पुन्हा करणार आहे.' अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने पुरी यांच्याकडून प्रतिक्रिया मागितली. यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, 'एपस्टाइन फक्त असे म्हणत होते की जगभरातील मोठे लोक न्यू यॉर्कमध्ये आहेत. त्यांचा पुरीशी थेट संबंध नव्हता.' दरम्यान, जगातील सर्वात हाय-प्रोफाइल सेक्स स्कँडल 'एपस्टाइन केस'शी संबंधित 92 फोटो प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी 3 फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आहेत. एका फोटोमध्ये ते अनेक मुलींनी वेढलेले दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ते कंडोमच्या पॅकेटवर दिसत आहेत. असे म्हटले जात आहे की 19 डिसेंबर रोजी एपस्टाइन केसशी संबंधित सर्व कागदपत्रे, ईमेल आणि फोटो प्रसिद्ध होऊ शकतात. त्यामुळे आता 19 तारखेला काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले दावे खरे ठरतात का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Dec 2025 6:00 am

कॅमेरून ग्रीन ठरला सर्वांत महागडा परदेशी खेळाडू

अबु धाबी : आयपीएल २०२६ साठी मंगळवारी अबू धाबी येथे मिनी लिलाव झाला. १५६ खेळाडूंवर बोली लावण्यात आली. दहा संघांनी २१५.४५ कोटी रुपये खर्च करून ७७ खेळाडू घेतले, ज्यात २९ परदेशी आणि ४८ भारतीय खेळाडूंचा समावेश होता. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने […] The post कॅमेरून ग्रीन ठरला सर्वांत महागडा परदेशी खेळाडू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Dec 2025 12:05 am

‘महासंग्रामाचे बिगुल वाजले’

सुमारे पावणेचार वर्षांनंतर राज्यातील बहुतेक महानगरपालिकांच्या निवडणुकांना मुहूर्त सापडला आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये पार पडणा-या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता राज्यातील २९ महापालिकांचा महासंग्राम १५ जानेवारीला रंगणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्यात सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या […] The post ‘महासंग्रामाचे बिगुल वाजले’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 11:39 pm

आम्ही कामाचे प्रेझेंटेशन दिले, आता तुम्ही दाखवा:आदित्य ठाकरेंचे भाजपला थेट आव्हान; मुंबईसाठी केलेल्या कामांचा मांडला लेखाजोखा

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच मुंबईत राजकीय वातावरण तापले असून, मंगळवारी वरळी डोम येथे पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले? असा प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकासकामांचे प्रेझेंटेशन सादर करून सडेतोड उत्तर दिले. आम्ही केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे, आता भाजपच्या नेत्यांनीही हिंमत दाखवून त्यांनी केलेल्या कामांचे असेच सादरीकरण करावे, असे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर श्रेयवादावरून आणि पालिकेच्या तिजोरीवरून जोरदार हल्लाबोल केला. बीडीडी चाळ पुनर्विकास आणि कोस्टल रोड हे प्रकल्प आपल्याच काळात मार्गी लागले, मात्र त्याचे श्रेय भाजपने लाटल्याची टीका त्यांनी केली. तसेच पालिकेच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवताना ते म्हणाले, 2022 पर्यंत आम्ही मुंबई महापालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी सुरक्षित ठेवल्या होत्या. मात्र, गेल्या तीन वर्षांत सत्तेत असलेल्यांनी या ठेवी साफ केल्या असून, मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी केली आहे. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या वेळी वरळीमध्येच आपण व्होट चोरीवर बोललो होतो. त्यानंतर प्रत्येक शाखेत चांगल काम झाले आणि दुबार मतदार समोर आले. ⁠निवडणुक कधी जाहीर होणार याकडे आपण 4 वर्षे वाट पाहत होतो. आता 25 वर्षात आपण जे काम केले ते आपल्याला घरोघरी घेऊन जायचे आहे. ⁠वरळी डोम देशातील सर्वात मोठे आणि पहिले कोव्हीड सेंटर होते. त्यावेळी ⁠आपण होर्डिंग्ज लावले नाहीत तर जीव वाचवले. ⁠बीकेसीत आपण फिल्ड हॉस्पिटल सुरु केले. ⁠फेसबुक लाईव्ह होते, कारण लोकांनी प्रश्न उपस्थित केला की कोरोना काळात तुम्ही कोणाला भेटत नाही, मग पत्रकार परिषदेला पत्रकारांना कशाला बोलवता? त्यामुळे फेसबुक लाईव्ह सुरु केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही फेसबुकवरून संवाद सुरू केला. इतर राज्यांपेक्षा आपल्या ठेवी चांगल्या होत्या. ⁠मुंबईचे काम थांबले नव्हते. आम्ही मुंबईकरांवर ⁠कोणताही टॅक्स लावला नाही. 2022 साली ज्यांनी आपले सरकार पाडले आणि अॅनाकोंडाला सोबत घेतले, त्यांनी मुंबईची तिजोरी साफ केली. त्यांच्या काळात काहीही काम झाले नाही. मुंबईवरील कर्ज आता अडीच लाख कोटी रुपये इतके आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरेंनी शिक्षणात डिजिटलची नवी भाषा आणली आदित्य ठाकरे म्हणाले, आपल्या सत्तेच्या काळात मुंबईत शिक्षणाचा नवा अध्याय लिहिला गेला. मुंबईत 1000 हून अधिक शाळा सुरू झाल्या. त्यामध्ये 3 लाख विद्यार्थी शिकतात. एकून 2500 डिजिटल क्लासरुम सुरू झाले. ⁠उद्धव ठाकरे यांनी शिक्षणात डिजिटलची नवी भाषा आणली. मुंबई महापालिकेत आयसीसी आणि इतर महत्वाचे बोर्ड आणले. ⁠भाजप विचारते की तुम्ही काय केले, आता त्यांना सांगा आम्ही काय केले ते. ⁠भाजप आणि शिक्षणाचा काहीही संबंध नाही. महापालिकेच्या माध्यमातून ⁠मेडिकल सेंटर आणि नर्सिंग होम सुरू केले. त्या माध्यमातून ⁠देशभरातील लोकांना आपण आरोग्याच्या सुविधा देतो. बेस्टचे सध्याचे दर किती वाढले आहेत. ⁠सर्वात स्वस्त पाणी मुंबई महानगरपालिका देते. ⁠स्वत:ची धरण व्यवस्था असणारी मुंबई ही एकमेव महापालिका आहे. या ठिकाणी ⁠आपला महापौर बसेल त्यावेळी समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करणार. ⁠सरकार पडले नसते तर हा प्रकल्प पूर्ण झाला असता. मुंबईची ब्रँड अम्बेसेडर पेंग्विनला केले पाहिज. त्यांना आपण जिवंत ठेवले. त्या माध्यमातून 2023 मध्ये 123 कोटी रुपये महापालिकेला मिळवून दिले आहेत. ⁠हजारो हेक्टरवरील मॅग्रुव्हजला आपल्या सरकारच्या काळात संरक्षण दिल्याचे आदित्य ठाकरेंनी म्हटले. कचऱ्याच्या टेंडरमधील घोटाळा समोर आणणार आदित्य ठाकरे म्हणाले, पावसाळा आला की मिडियाचे कॅमेरे मुंबईकडे जायचे. ⁠हिंदमाता आणि मिलन सबवे या ठिकाणी टँक बनवले त्याचा फायदा होतोय. ⁠या ठिकाणचे पंप चालू ठेवावे लागतात. ⁠मात्र मागच्या वेळी मी पाहिले की सिस्टम आहे, पण डिझेल नाही म्हणून पंप बंद आहे आणि त्यामुळे पाणी साचले. एसटीपीसाठी केंद्राचा निधी आला नाही तर आपल्या महानगरपालिकांचा निधी होता. कचऱ्याच्या टेंडरमध्येही घोटाळा आहे आणि तोही लवकरच समोर आणणार आहोत. मुंबई हवामान बदल कृती आराखडा झाला असता तर आज मुंबई प्रदूषण मुक्त झाली असती. कोस्टल रोडची पहिली घोषणा उद्धव ठाकरेंनी केली मुंबई महापालिकेत 500 स्क्वेअर फुटांपर्यंत आपण टॅक्स माफ केला. आता 700 स्क्वेअर फुटपर्यंत माफ करण्याची वेळ आली. ⁠बीडीडी चाळ पुनर्विकास आपण केले होते. 2016 साली फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी घाईत उद्घाटन केले. ⁠मात्र पुढे काहीच झाले नाही. ⁠आपण काम सुरु केले आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. वरळी शिवडी कनेक्टरचे काम आपल्या काळात 48 टक्के पूर्ण केले. आता अडीच वर्षात फक्त 9 टक्के काम झाले. ⁠अटल सेतूचे काम आपल्याच काळात 82 टक्के काम पूर्ण झाले. कोस्टल रोडचे क्रेडिट मुख्यमंत्री यांनी घेतले. पण 2013 मध्ये कोस्टल रोडची पहिली घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. ⁠काल मिंधेने प्रेझेंटेशन दिले, तेही आपलेच चोरले. ⁠खोटे बोलायचे कसे ते भाजपकडून शिकावे. ⁠ही सगळी कामे आम्ही केली, त्याचे केड्रिट घेऊ नका. ⁠नोटबंदी, रुपया पडण्याचे क्रेडिट तुम्ही घेतले नाही, आता आमच्या कामाचे क्रेडिट घेऊ नका, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. मी जसे कामाचे प्रेझेंटेशन दिले आहे तसे भाजपच्या नेत्यांनी येऊन काय केले ते सांगावे. त्यांनी सर्व विकास कामांच्या परवानग्या रोखून ठेवल्या होत्या.⁠फडणवीस साहेब कुठे दिसतात का? भाजपचे नशीब चांगले आहे, फक्त फित कापण्याचे काम त्यांनी केले, अशी टोलेबाजी आदित्य ठाकरेंनी यावेळी केली.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 11:38 pm

मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध

रेणापूर : प्रतिनिधी नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबध्द असल्याचे प्रतिपादन, माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी नगर पंचायत निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ संवाद बैठकीत बोलताना केले. रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील उमेदवार हे चारित्र्यसंपन्न व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार दिले […] The post मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 11:37 pm

जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर काँग्रेस परिवर्तन घडवणार

रेणापूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असून जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर परिवर्तन घडवून जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेस पक्षाच्या विजयाचा निर्धार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. […] The post जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर काँग्रेस परिवर्तन घडवणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 11:36 pm

महानगरपालिका निवडणुकीसाठी ६ निवडणूक निर्णय अधिका-यांची निवड

लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अनुषंगाने लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या. मंगळवारी या अधिका-यांची आढावा बैठक झाली. यावेळी सहा निवडणुक निर्णय अधिका-यांची निवडही करण्यात आली. ‘ लातूर शहर महानगरपालिका लातूर सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती […] The post महानगरपालिका निवडणुकीसाठी ६ निवडणूक निर्णय अधिका-यांची निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 11:35 pm

नवीन गूळ मार्केटमध्ये कांदा, बटाटा सौदा ५ दिवस निघणार

लातूर : प्रतिनिधी राज्यात नावलौकिक असलेल्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरच्या वतीने २२ डिसेंबरपासून कांदा, बटाटा, आद्रक, लसूण या मालाचा सौदा रिंग रोड नवीन गूळ मार्केटमध्ये निघणार असून सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सौदा निघणार आहे. याचा शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीश बावणे यांनी केले आहे. […] The post नवीन गूळ मार्केटमध्ये कांदा, बटाटा सौदा ५ दिवस निघणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 11:34 pm

मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारासाठी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांची निवड

लातूर : प्रतिनिधी पुरोगामी व क्रांतीकारी समाजवादी नेते अ‍ॅड. मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कार यंदा नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना प्रदान केला जाणार आहे. माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने काल ही घोषणा केली. पुरस्कार वितरण समारंभ लातूर येथे रविवार, २१ डिसेंबर रोजी होणार आहे. तसेच या समारंभात प्रशांत […] The post मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कारासाठी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांची निवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 11:33 pm

लघुपटासारख्या कलाकृतींमधून होणारे समाज प्रबोधन अतिशय महत्त्वाचे

लातूर : प्रतिनिधी लघुपटासारख्या कलाकृतींमधून होणारे समाज प्रबोधन अतिशय महत्वाचे असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले. दयानंद शिक्षण संस्था व अभिजात फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमास दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष […] The post लघुपटासारख्या कलाकृतींमधून होणारे समाज प्रबोधन अतिशय महत्त्वाचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 11:32 pm

ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून एक ठार, एक जखमी

भूम : भूम-अहिल्यानगर रोडवर अंतरवली फाट्यानजीक तलावाच्या खालच्या बाजूला पुला जवळ खर्डा जवळील मोहरी गाव येथून भूमकडे जात असणारे दुचाकीस्वार उसाच्या ट्रॅक्टर ट्रोलीला धडकल्याने एक मयत तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वार भूम तालुक्यातील वंजारवाडीकडे जात असताना दुचाकी स्वराचा उसाच्या ट्रॉलीला धडकून अपघात झाला. जखमींला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी […] The post ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून एक ठार, एक जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 10:35 pm

संत गाडगेबाबा चालते-बोलते विद्यापीठ:हभप पंकज महाराज पोहोकार यांच्या कीर्तनात प्रतिपादन

श्री संत गाडगेबाबा हे कोणतेही अवडंबर न करता, केवळ एक गाडगे, काठी, कवडी आणि चिंध्या पांघरून समाजाला अंधश्रद्धेच्या खाईतून बाहेर काढून खऱ्या भक्तीचा मार्ग दाखवणारे चालते-बोलते विद्यापीठ होते, असे प्रतिपादन हभप पंकज महाराज पोहोकार यांनी त्यांच्या कीर्तनातून केले. अमरावती येथील गाडगेबाबांच्या समाधीस्थळी सुरू असलेल्या ६९ व्या पुण्यतिथी महोत्सवात त्यांनी हे विचार मांडले. यावेळी सादर झालेल्या प्रथम कीर्तनसेवेत हभप पंकज महाराज पोहोकार यांनी गाडगेबाबांबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांच्या मते, आज देवालाही आदर्श माणसाची गरज आहे. डॉक्टर, वकील, इंजिनियर होणे सोपे झाले आहे, पण माणूस होणे कठीण झाले आहे. त्यांनी कविश्रेष्ठ सुरेश भट यांची 'गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी.. कोलाहलात माणसाच्या माणूस शोधतो मी, ही देव देवळे सारी फिरून आलो.. भिंतीपल्याड त्यांच्यात माणूस शोधतो मी' ही कविताही सादर केली. महाराजांच्या सांगण्यानुसार, गाडगेबाबांचे कीर्तन हे उत्तम, आदर्श आणि सुसंस्कृत माणूस घडवण्याचा कारखाना आहे. स्वच्छता, देव, धर्म, अंधश्रद्धा, रूढी आणि माणूस हे विषय त्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक होते. देवधर्म व देशधर्म सांभाळा हा काळाचा इशारा आहे. त्यामुळे 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' हे ईश्वर स्मरणच आजच्या तरुण पिढीला आणि समाजाला वाचवू शकते, असेही पोहोकार महाराज यांनी सांगितले. दरम्यान, गाडगे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा दुसरा दिवस पुरणपोळीने साजरा झाला. अंध, अपंग आणि निराश्रित वृद्धांना जेवण वितरित करण्यात आले. आश्रयदाते कुऱ्हे आप्पाजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे अन्नदान करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त तथा गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्यासह सागर देशमुख, भरतभाऊ रेडे, व्यवस्थापक प्रकाश महात्मे, किशोर चौधरी, सुधीर धोंगडे, विठ्ठल तेलमोरे, अतुल रेडे, गजानन देशमुख आदींनी यासाठी परिश्रम घेतले. पुण्यतिथी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य हेमंतराव काळमेघ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गाडगेबाबांच्या समाधीस्थळी भेट दिली. यावेळी सर्वांनी समाधीचे दर्शन घेतले. सर्वप्रथम हेमंतराव काळमेघ यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन तथा पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी चंद्रशेखर खेडकर, प्रकाश गवळी, डॉ. ए. टी. देशमुख, संदीप पुंडकर, प्रभजीतसिंह बछेर, प्रा. डॉ. स्वप्निल देशमुख आदी मान्यवरही उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:22 pm

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे ढकलल्या:सर्वात आधी होणारी निवडणूक आता सर्वात शेवटी, इच्छुकांचा हिरमोड

जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समिती (पं.स.) निवडणुका सर्वात आधी होतील अशी अपेक्षा असताना, त्या आता सर्वात शेवटी ढकलण्यात आल्या आहेत. अध्यक्षपदाचे रोस्टर, मतदार यादीची अंतिम घोषणा आणि राखीव मतदारसंघ निश्चित झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका लवकर होतील असे गृहीत धरले होते. निवडणूक आयोगानेही तशी तयारी केली होती, मात्र आता इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात दिलेल्या निर्देशानुसार, नगरपालिका-नगरपंचायती, महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करायच्या आहेत. यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोग या दोन्ही यंत्रणांनी ऑक्टोबरपासूनच तयारी सुरू केली होती. महापौर, जिल्हा परिषद व नगरपालिकांचे अध्यक्षपद, मतदारसंघांची रचना आणि आरक्षण निश्चित करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती, तर मतदार यादी, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी निवडणूक आयोगाला पूर्ण करायची होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या मतदान आणि मतमोजणीआधीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. मतदारसंख्येनुसार आवश्यक असलेली मतदान यंत्रे (बॅलेट व कंट्रोल युनिट्स) देखील संबंधित तालुक्यांमध्ये पाठवण्यात आली आहेत. असे असूनही, या निवडणुकांची तारीख अद्याप घोषित झालेली नाही. याउलट, महापौरपदाचे आरक्षण निश्चित व्हायचे असतानाही महापालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत, तर आयोगाने यापूर्वीच नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे पुढे ढकललेल्या जि.प., पं.स. निवडणुका कधी होणार, असा प्रश्न इच्छुकांकडून विचारला जात आहे. राजकीय तज्ज्ञांनुसार, या विलंबामागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा मतदार हा ग्रामीण भागातील असतो. दीड-दोन महिन्यांपूर्वी राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. दिवाळी तोंडावर आली असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची मदत पोहोचली नव्हती. या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू नये, यासाठी जि.प. पं.स. निवडणुकांकडे काहीसे दुर्लक्ष केले गेले असावे. दुसरे कारण असे की, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित करतानाच कदाचित जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकाही घोषित केल्या जातील असे वाटले होते. परंतु, आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक झाल्याचे कारण पुढे करून ही निवडणूक पुन्हा थांबवण्यात आली. मात्र, त्याचवेळी न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून नगरपालिका व पंचायतींच्या निवडणुका घेण्याची मुभा देण्यात आली होती, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:22 pm

पिंपरीत भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?:शरद पवार गटाच्या शहाराध्यक्षांनी घेतली अजित पवारांची भेट, काय म्हणाले तुषार कामठे?

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. एकीकडे मुंबईत महायुतीत तणाव असतानाच, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला रोखण्यासाठी अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवार यांची बंद दाराआड भेट घेऊन, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना तुषार कामठे यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर भाजपविरोधात लढू शकणाऱ्या शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या पक्षांना सोबत घेण्याचे अधिकार आम्हाला वरिष्ठांनी दिले आहेत. भ्रष्टाचारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढणे गरजेचे आहे. हाच प्रस्ताव घेऊन मी दादांकडे गेलो होतो. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत लढणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर, कामठे यांच्या या प्रस्तावाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेतही अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूक निर्णय समितीच्या बैठकीत मुंबईतील किमान 50 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि भाजप युतीत लढणार असल्याचे जाहीर केले असले, तरी अजित पवारांचा गट महायुतीत राहणार की नाही, याचा अंतिम निर्णय खुद्द अजित पवारच घेणार आहेत. पुण्यातील तब्बल 12 तासांच्या मॅरेथॉन बैठकांनंतर अजित पवार मुंबईकडे रवाना झाले असून, ते पिंपरी-चिंचवडबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:08 pm

मेळघाटातील मका खरेदीसाठी दोन नवीन केंद्रे:शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नांवरही आदिवासी शेतकऱ्यांशी समेट

मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मका खरेदीसाठी सेमाडोह आणि राहू येथे दोन नवीन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, मेळघाटातील शिक्षण, आरोग्य आणि वन विभागाशी संबंधित समस्यांवरही तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावर्षी मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर पायी मोर्चा काढला होता. त्यावेळी आदिवासी आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकारी आयुषी सिंह यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेऊन अमरावती येथील आदिवासी विकास अपर आयुक्त (एटीसी) कार्यालयात बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, मंगळवारी अमरावती येथे ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आदिवासी विकास, महिला व बाल विकास, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, महसूल, वने, महावितरण, सहकार, पुरवठा आणि एकात्मिक बालविकास यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावर्षी मेळघाटात मक्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे. मात्र, किमान आधारभूत किंमत २४०० रुपये प्रति क्विंटल असतानाही, मका कमी भावात खरेदी केला जात होता. शासनाने यापूर्वी ८ केंद्रे उघडली होती, परंतु ती अनेक आदिवासी शेतकऱ्यांसाठी गैरसोयीची ठरली होती. त्यामुळे राहू आणि सेमाडोह येथे नवीन केंद्रे सुरू करण्याची मागणी करण्यात आली, जी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी तात्काळ मान्य केली. ही केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील, असे त्यांनी सांगितले. मका खरेदीच्या मुद्द्याव्यतिरिक्त, मेळघाट आणि अचलपूर परिसरातील आदिवासी व इतर समाज बांधवांच्या शिक्षण आणि आरोग्याच्या दयनीय स्थितीवरही चर्चा झाली. शालेय पोषण आहार आणि अंगणवाडीतील मुलांना पुरविल्या जाणाऱ्या आहारातील अडचणी सोडवण्याचेही यावेळी मान्य करण्यात आले. या संवाद बैठकीला एटीसी जितेंद्र चौधरी, मेळघाटचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, सहकार विभागाचे सुधीर मानकर, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, आदिवासी विकास राज्य सहकारी विभागाचे आमटे, वनखात्याचे अधिकारी तापस, महिला व बालविकास विभागाचे डेप्युटी सीईओ विलास मरसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आणि 'खोज' संस्थेचे प्रमुख ॲड. बंड्या साने यांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 10:06 pm

कवी डॉ. मिर्झा बेग एकात्मतेचे प्रतीक:पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांनी वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध वऱ्हाडी विनोदी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना अमरावती येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद आणि मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित या सभेत पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापडकर यांनी डॉ. बेग यांना हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हटले. डॉ. पापडकर म्हणाले की, डॉ. मिर्झा बेग यांनी दुःखाने भरलेल्या जगात आनंद वाटला. त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली नाही, याचे मला दुःख आहे, असेही त्यांनी नमूद केले. ही श्रद्धांजली सभा विमलाबाई देशमुख महाविद्यालयात पार पडली. याप्रसंगी साहित्यिक डॉ. सुभाष सावरकर, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, परफॉर्मिंग आर्टस विभागाचे प्रमुख भोजराज चौधरी, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश तराळ आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राज यावलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सभेत प्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. राजा धर्माधिकारी, गौतम गुडधे, राजेश महल्ले, डॉ. राज यावलीकर, राजीव शिंदे, गझलकार खलिश अनंत नांदुरकर आणि नितीन भट यांनी आपल्या कविता सादर करून डॉ. मिर्झा यांना श्रद्धांजली वाहिली. डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, डॉ. शोभा रोकडे, प्राचार्य दिलीपसिंह खांबरे, रंजना मामर्डे, पुरुषोत्तमराव गावंडे, संजय महल्ले, वर्षा धाबे, प्रा. डॉ. राजेश मिरगे, सुनिता तायडे, शोभना देशमुख, सय्यद मुजीब, छाया पाथरे, अरविंद उतखेडे, गणेश खडके, असलम अहमद खान, चंद्रभूषण किल्लेदार, मोहम्मद अफसर, दिवाकर देशमुख, कल्पना विघे, योगिता पिंजरकर, शरद गावंडे, अश्विन चौधरी, मयूर देशमुख, प्रा. संजय खडसे, डॉ. कुमार बोबडे, माधव पांडे, रेषा अकोटकर आदींनीही श्रद्धांजली अर्पण केली. विविध मान्यवरांनी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या कवितेचे आणि त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी लोककवी विठ्ठल वाघ आणि लोकनेते उल्हास दादा पवार यांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या. श्रद्धांजली सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. सतीश तराळ यांनी केले, तर मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मंदा नांदुरकर यांनी आभार मानले. या भावपूर्ण सभेला अमरावतीकर नागरिक, कवी आणि लेखकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 9:56 pm

शीतल तेजवानीला ७ दिवसांची पोलिस कोठडी

पिंपरी : मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणातील संशयित शीतल किशनचंद तेजवानी(४५) हिला मंगळवार दि. १६ डिसेंबर रोजी बावधन पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले. पौड न्यायालयाने तेजवानी हिला ७ दिवस म्हणजेच मंगळवार दि. २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया […] The post शीतल तेजवानीला ७ दिवसांची पोलिस कोठडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 9:31 pm

काँग्रेस पक्षाला वंचितचे बळ?

मुंबई : प्रतिनिधी मनसेसोबत आघाडी करण्यास नकार देत काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असून, त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केलेली असताना काँग्रेसला नवा भिडू मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याने काँग्रेस व वंचितची आघाडी तिसरा मजबूत पर्याय म्हणून […] The post काँग्रेस पक्षाला वंचितचे बळ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 9:28 pm

जिल्हा बँकेच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन 

लातूर : प्रतिनिधी राज्यात सहकारी बँकात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने काढण्यात आलेल्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते जिल्हा बँकेच्या मुख्यालयात मंगळवारी करण्यात आले. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, संचालक एन. […] The post जिल्हा बँकेच्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 9:21 pm

प्रियांका सुरवसे यांना ‘सह्याद्रीरत्न, उद्योजक प्रेरणा’ पुरस्कार प्रदान 

लातूर : प्रतिनिधी आर्थिक साक्षरता आणि आरोग्य जनजागृती या मूलभूत क्षेत्रांत सातत्याने कार्य करणा-या प्रियांका सुरवसे यांना राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न, उद्योजक प्रेरणा पुरस्कार २०२५’ प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ‘टॅलेंट कथा महाराष्ट्र राज्य’ आयोजित पुरस्कार सोहळा पुण्यातील पत्रकार भवन, नवीपेठ येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून भरत (बाळासाहेब) शिंदे, डॉ. नीता जोशी, प्रा. […] The post प्रियांका सुरवसे यांना ‘सह्याद्रीरत्न, उद्योजक प्रेरणा’ पुरस्कार प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 9:20 pm

जिल्ह्यात आणखी काही दिवस कडाक्याची थंडी राहणार

लातूर : प्रतिनिधी राज्यात सध्या दिवसेंदिवस तापमानाचा पारा चांगलाच खाली येताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर थंडी वाढल्याचे चित्र आहे. उत्तरेकडे थंड वा-याचा जोर वाढल्याने राज्यात कडाक्याची थंडी पडली असून लातूर जिल्ह्यातदेखील कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. उत्तरेकडील वाढत्या शीत लहरींमुळे राज्यात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, […] The post जिल्ह्यात आणखी काही दिवस कडाक्याची थंडी राहणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 9:15 pm

ठाकरे बंधूंच्या युतीची दोन दिवसांत घोषणा

मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विकलांग झालेली उद्धव ठाकरेंची शिवसेना व अस्तित्वाची लढाई लढणारी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे ब्रँड जपण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई महापालिकेत कोण किती जागा लढवायच्या याबाबत मात्र अजूनही एकमत झालेले नाही. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता वाटाघाटींना वेग आला असून, शिवसेना खा. संजय राऊत, अनिल […] The post ठाकरे बंधूंच्या युतीची दोन दिवसांत घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 9:04 pm

‘मनरेगा’चे नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी लोकसभेत आक्रमक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मनरेगा’ ही योजना डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात कमालीची यशस्वी ठरली होती. तसेच ग्रामीण भागातील गरीबांना वर्षातील काही दिवस रोजगार मिळवून देणारी ही योजना कांग्रेसच्या यशात महत्त्वपूर्ण ठरली होती. मात्र आता केंद्रातील मोदी सरकारने या योजनेचे नाव बदलण्याच्या दिशेने पावले उचलली असून, त्या संदर्भातील एक विधेयक लोकसभेत सादर […] The post ‘मनरेगा’चे नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी लोकसभेत आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 8:28 pm

मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची चौकशी; क्रिडा मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : वृत्तसंस्था अर्जेंटिनाचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या ‘जीओएटी टूर’ कार्यक्रमादरम्यान साल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या गोंधळाच्या चौकशीचे आदेश सरकारने दिल्यानंतर, पश्चिम बंगालचे क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांनी आज (दि.१६) आपल्या पदाचा राजीनामा दिला. ममता बॅनर्जी यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, पश्िचम बंगाल विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर आल्या आहेत. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी तृणमूल […] The post मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळाची चौकशी; क्रिडा मंत्र्याचा राजीनामा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 8:27 pm

कागदावर टिकणारा विवाह न्यायालयांनी कायम ठेवू नये! सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रदीर्घ न्यायालयीन लढाईमुळे केवळ कागदावर टिकून राहिलेला विवाह पुढे चालू ठेवू नये, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने २४ वर्षांपासून वेगळे राहत असलेल्या एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला. पतीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने राकेश रमण विरुद्ध कविता (२०२३) यासह […] The post कागदावर टिकणारा विवाह न्यायालयांनी कायम ठेवू नये! सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा सल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 8:25 pm

महायुतीत नवाब मलिक ठरतायत कळीचा मुद्दा:मुंबईत भाजप-शिंदेसेना विरुद्ध अजित पवार गट? मलिकांच्या नेतृत्वाला भाजप-शिंदेंचा रेड सिग्नल

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरून जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. नवाब मलिक यांना सोबत घेण्यास भाजपने कडाडून विरोध केला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही भाजपचीच 'री' ओढली आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीत मिठाचा खडा पडला असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 'एकला चलो रे'ची भूमिका घ्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप आणि शिंदेंचा ठाम विरोध मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक हेच राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार असतील, तर भाजप राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते आशिष शेलार, अमित साठम आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी मांडली आहे. यावर आता शिंदे गटानेही शिक्कामोर्तब केले आहे. मलिकांबाबत जी भाजपची भूमिका, तीच आमची भूमिका, असे शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत केवळ भाजप आणि शिंदेसेना युती करून मैदानात उतरण्याचे चित्र जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीची 50 जागांची तयारी एकीकडे मित्रपक्ष विरोध करत असताना, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईची पूर्ण जबाबदारी नवाब मलिक यांच्या खांद्यावरच टाकली आहे. या विरोधाला न जुमानता मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने तातडीची बैठक घेतली, ज्याला झिशान सिद्दीकी आणि सना मलिक उपस्थित होते. महायुतीतून विरोध झाल्यास किंवा युती तुटल्यास राष्ट्रवादीने मुंबईत किमान ५० जागा स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू केली आहे. महायुतीत राहायचे की नाही, याचा अंतिम निर्णय आता अजित पवार घेणार आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची बैठक नवाब मलिक यांच्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवत, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पहिली संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई महापालिकेत 150 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, येत्या एक ते दोन दिवसांत जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात गुरुवारी पुन्हा एकदा दोन्ही पक्षांची मॅरेथॉन बैठक होणार असून, जागावाटपाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. जागावाटपाचे सूत्र निश्चित करताना, ज्या जागेवर ज्या पक्षाचा विद्यमान नगरसेवक आहे, ती जागा त्याच पक्षाला सोडली जाईल, यावर बैठकीत एकमत झाल्याचे समजते. गरजेनुसार काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान कोणताही अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये आणि महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी दोन्ही पक्षांनी अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याचा व विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 8:24 pm

पेट्रोलियम भ्रष्टाचार प्रकरणी अर्जुन रणतुंगास अटक शक्य

कोलंबो : वृत्तसंस्था श्रीलंकेचा विश्वचषक विजेता क्रिकेट कर्णधार अर्जुन रणतुंगा यांना पेट्रोलियम मंत्री असताना झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिका-यांनी कोलंबो कोर्टात माहिती दिली. रणतुंगा यांच्यावर ‘पेट्रोलियम घोटाळा’ प्रकरणी आरोप आहेत. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करणा-या आयोगाने कोर्टाला सांगितले की, रणतुंगा यांनी आणि त्यांच्या भावाने तेल खरेदीचे करार बदलले. […] The post पेट्रोलियम भ्रष्टाचार प्रकरणी अर्जुन रणतुंगास अटक शक्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 8:22 pm

एलन मस्क यांचा नवा विक्रम; ५० लाख कोटीचे ठरले मालक

न्यू यॉर्क : वृत्तसंस्था तंत्रज्ञान, वाहन आणि अंतराळ क्षेत्रातील दिग्गज उद्योजक एलन मस्क यांनी सोमवारी नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्यांची एकूण संपत्ती ६०० अब्ज डॉलर्सचा (सुमारे ५० लाख कोटी रुपये) टप्पा ओलांडून $६७७ अब्जपर्यंत पोहोचली आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार, इतकी प्रचंड संपत्ती जमा करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. या अभूतपूर्व वाढीमागे मुख्यत्वे त्यांची […] The post एलन मस्क यांचा नवा विक्रम; ५० लाख कोटीचे ठरले मालक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 8:20 pm

‘एआय’च्या शर्यतीत भारत तिस-या क्रमांकावर!

नवी दिल्ली : प्रतिनिधी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (‘एआय’) क्षेत्रात भारताने अभूतपूर्व कामगिरी करत जागतिक स्तरावर मोठी झेप घेतली आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ‘२०२५ ग्लोबल एआय व्हायब्रन्सी टूल’ रिपोर्टमध्ये (२०२४ च्या डेटावर आधारित) भारताने थेट तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी भारत या यादीत सातव्या स्थानावर होता. या रँकिंगमध्ये भारताचा २१.५९ स्कोअर असून, भारतापेक्षा पुढे केवळ […] The post ‘एआय’च्या शर्यतीत भारत तिस-या क्रमांकावर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 8:17 pm

५८ लाख मतदारांची पश्चिम बंगालमध्ये नावे वगळली!

कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालमध्ये २०२६ च्या प्रारूप मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने अधिकृत वेबसाइटवर यादी जाहीर केली. २०२५ च्या मतदार यादीत त्यांचा समावेश होता पण २०२६ च्या प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने या यादीचे कारण देखील स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५८ लाखांहून अधिक ‘असंकलन न करता […] The post ५८ लाख मतदारांची पश्चिम बंगालमध्ये नावे वगळली! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 8:14 pm

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाचा 125 जागांचा आग्रह:भाजपकडून केवळ 52 जागांचा प्रस्ताव; महायुतीत ठिणगी? शिंदे गट नाराज असल्याची चर्चा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत 125 जागा लढवण्याचा आग्रह धरला असतानाच, भाजपने त्यांना केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. भाजपने थेट 52 जागांची यादीच शिंदेसेनेकडे सोपवल्याने जागावाटपाच्या चर्चेत सुरुवातीलाच तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. 2017 मध्ये एकसंध शिवसेनेने 84 जागा जिंकल्या होत्या, पुढे ही संख्या 99 वर पोहोचली. पक्षात फूट पडल्यानंतर यातील 47 नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली. तसेच 2007 आणि 2012 मधील माजी नगरसेवकांचा विचार करता आपल्याकडे 100 हून अधिक माजी नगरसेवकांची फौज असल्याचा दावा शिंदे गट करत आहे. याच बळावर त्यांनी 125 जागांवर दावा केला आहे. मात्र, भाजपने केवळ 52 जागांचा प्रस्ताव देऊन शिंदेसेनेची कोंडी केली आहे. परवा दोन्ही पक्षात प्रभागनिहाय चर्चा होणार असली, तरी या प्रस्तावामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. ठाकरे बंधूंचे आव्हान आणि भाजपची रणनीती एकीकडे महायुतीत जागावाटपाचा तिढा असतानाच, दुसरीकडे महाविकास आघाडीत मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मुंबईत आजही ताकद असलेल्या उद्धव ठाकरेंना (10 आमदार, 3 खासदार) साथ देण्यासाठी राज ठाकरे यांची मनसे पुढे येण्याची चिन्हे आहेत. दोन्ही पक्षांत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, जर ही युती आकाराला आली, तर मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा अभूतपूर्व सामना रंगणार आहे. तसेच 2012 आणि 2007 मध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांचा विचार केल्यास शिंदेसेनेकडे जवळपास 100 माजी नगरसेवकांची फौज आहे. या सगळ्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी शिंदेसेनेला 125 जागा हव्या आहेत. पण भाजपने थेट 52 जागांची यादी देत शिंदेसेनेची कोंडी केली आहे. विद्यमान नगरसेवकाची जागा संबंधित पक्षच लढणार राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक तिढा सुटल्याचे चित्र आहे. या बैठकीत ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान नगरसेवक, ती जागा त्या पक्षाला, या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर काही जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. हेही वाचा

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:26 pm

वस्त्रदालनातून दीड लाखांच्या साड्यांची चोरी:कामगार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल, पुणे पोलिसांकडून तपास सुरू

पुणे शहरातील ओैंध परिसरातील एका वस्त्रदालनातून साड्या, तसेच अन्य साहित्य असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका कामगार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालेवाडी भागातील हायस्ट्रीट परिसरात असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेतून घरकाम करणाऱ्या महिलांनी एक लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका कामगार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे आशिष रेसीडन्सी सोसायटीत तळमजल्यावर वस्त्रदालन (बुटीक) आहे. या दालनात काम करणाऱ्या महिलेने गेल्या काही महिन्यात साड्या, तसेच अन्य साहित्य चोरून नेले. तक्रारदार महिलेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी एन शिर्के पुढील तपास करत आहेत. बालेवाडीतील सदनिकेत चोरी बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील एका सदनिकेत काम करणाऱ्या महिलांनी एका लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला तक्रारदार महिलेकडे घरकामाला होत्या. तक्रारदार महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून शयनगृहातील कपाटातून एक लाख ८० हजारांचे दागिने चोरून नेले. सहायक पोलीस निरीक्षक एस रायकर तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 7:12 pm

पार्थ पवारांचा मुंढवा जमीन गैरव्यवहारात सहभाग उघड:पत्रावर त्यांचीच स्वाक्षरी, चार वर्षे केला पाठपुरावा; विजय कुंभार यांचा दावा

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीच ही जमीन मिळवण्यासाठी चार वर्षांपासून स्वतः पाठपुरावा केल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले. कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल तेजवानी यांनी १० नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जात मुंढवा येथील सर्व्हे क्रमांक ८८ च्या मिळकतीचा ताबा मूळ वतनदारांना योग्य सारा स्वीकारून सातबारा उताऱ्यावर त्यांची नावे लावण्याची मागणी केली होती. १५ डिसेंबर २०२० रोजी हा अर्ज हवेली तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आणि मिळकतीबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश दिले गेले. मात्र, त्यानंतर या अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, २८ डिसेंबर २०२० रोजी अमेडिया कंपनीची स्थापना झाली. या कंपनीने १ जून २०२१ रोजी जिल्हाधिकारी कुळकायदा शाखेकडे अर्ज करत, तेजवानी यांच्या अर्जावर तात्काळ सुनावणी घेऊन सार्‍याची रक्कम भरून मूळ वतनदारांची नावे लावण्याची मागणी केली. कुळकायदा शाखेने ११ जून २०२१ रोजी तेजवानी यांना खुलासा सादर करण्यास सांगितले. तेजवानी यांनी २३ जून २०२१ रोजी खुलासापत्र देऊन सारा भरवून नोंदणी करण्याची मागणी केली. २०२१ नंतर थेट ३० डिसेंबर २०२४ रोजी कब्जा हक्काची रक्कम भरण्यात आली. त्यानंतर २०२५ मध्ये या मिळकतीचे खरेदीखत करण्यात आले आणि अमेडिया कंपनीने मिळकतीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती कुंभार यांनी दिली. पार्थ पवार यांनीच अमेडिया कंपनीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता, असेही कुंभार यांनी स्पष्ट केले. ४ ते ५ नोव्हेंबर २०२५ रोजी या जमिनीचा गैरव्यवहार उजेडात आला. या सर्व प्रकारानंतरही ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमेडिया कंपनीने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. या पत्रात कंपनीने कायदेशीर पैसे भरून जमीन घेतल्याचे नमूद केले होते, मात्र वृत्तपत्रांतील बातम्यांमुळे कंपनी व्यथित झाली असून, बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. या पत्रावरही पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे, त्यामुळे या प्रकरणात त्यांचा थेट सहभाग उघड होत असल्याचा आरोप कुंभार यांनी केला. प्रकरणाशी संबंधित सर्वांची चौकशी करावी, तसेच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी धोरण आखावे, अशी मागणीही कुंभार यांनी केली. हे प्रकरण गुंडाळण्याची प्रशासनाची भूमिका मुंढवा येथील शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी हिला अटक झाली. काल तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेजवानी तपासाला सहकार्य करत नसल्याचे सांगून पोलीसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तेजवानी हिला अटक झाल्यानंतर मोठ काही तरी निष्पन्न होईल असं वाटलं होतं. हे प्रकरण कितीही मोठ असलं तरी या प्रकरणात पार्थ पवार यांच नाव पुढे येऊ न देन, राजकीय नेते, त्यांच्या मुलांचा या प्रकरणाशी संबंध असल्याने फारसा तपास न करता हे प्रकरण गुंडाळण्याची भूमिका पोलीस आणि प्रशासनाची होती. त्यामुळे संशय बळावतोय.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:56 pm

महायुतीत जागावाटपाचा प्राथमिक तिढा सुटला:विद्यमान नगरसेवकाची जागा संबंधित पक्षच लढणार, काही जागांची अदलाबदल होणार

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपाच्या हालचालींना वेग आला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपाचा प्राथमिक तिढा सुटल्याचे चित्र आहे. या बैठकीत ज्या ठिकाणी पक्षाचा विद्यमान नगरसेवक, ती जागा त्या पक्षाला, या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर काही जागांची अदलाबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई आणि प्रमुख शहरांमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्रितपणे महानगपालिकांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आजच्या बैठकीत 'विद्यमान तिथेच' या तत्त्वावर सहमती झाली असली तरी, काही विशिष्ट जागांवर विजयाची गणिते जुळवण्यासाठी जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष लावून काही जागांवर फेरबदल केले जातील, असे समजते. महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी 'मॅरेथॉन' बैठक जागावाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आणि सूक्ष्म नियोजन करण्यासाठी येत्या गुरुवारी पुन्हा एकदा महायुतीची 'मॅरेथॉन बैठक' पार पडणार आहे. दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत प्रभागनिहाय चर्चा करून उमेदवारांची चाचपणी केली जाईल. ज्या जागांवर पेच निर्माण होईल किंवा एकमत होणार नाही, त्या जागांचा निर्णय स्थानिक पातळीवर न घेता, तो थेट भाजप आणि शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडे सोपवला जाईल, असेही या बैठकीत ठरले आहे. प्रतिमा मलिन होऊ देऊ नका जागावाटपावरून होणारे वाद चव्हाट्यावर आल्यास त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो, याची जाणीव महायुतीतील दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आहे. त्यामुळे जागावाटपाच्या प्रक्रियेत कोणताही अंतर्गत वाद बाहेर जाऊ देऊ नका आणि महायुतीची प्रतिमा मलिन होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्या, अशा सक्त सूचना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे यंदाची चर्चा अत्यंत गोपनीय आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसून येत आहे. भाजपचा राष्ट्रवादीसोबत जाण्यास नकार दरम्यान, या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आशिष शेलार यांनी शिवसेना व भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, होय आमचे ठरले. आमचा फॉर्म्युलाही ठरला. आमचा आकडाही ठरला. महायुतीच्या मुंबईत 150 प्लस जागा निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आहे. शिवसेना, भाजप व रिपाइंसह कुणी कुठे लढल्यावर 150 प्लस जागा निवडून येतील, तो आकडा ठरवण्याच्या अभ्यासासाठी आज बैठक झाली. या प्रकरणी 1-2 दिवसांत पुन्हा एकत्र बसून दोन्ही पक्ष किती जागा लढवतील हे ठरवले जाईल. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आले आहेत. त्यामुळे आम्ही अशा राष्ट्रवादीसोबत युती करू शकत नाही. शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष आम्हाला भेटले. त्यांनाही आम्ही हेच सांगितले आहे, असेही शेलार यांनी यावेळी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:37 pm

24 वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव:15 ते 22 जानेवारी दरम्यान होणार, ऑनलाइन नोंदणी सुरू

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) २०२६ यंदा १५ ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा २४ वा महोत्सव पार पडणार आहे. पिफचे संचालक, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महोत्सवासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली असून, जागतिक चित्रपट स्पर्धेची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. मोहन आगाशे, सतीश आळेकर, सबिना संघवी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक व चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते, चित्रपट निवड समितीचे सदस्य अभिजीत रणदिवे, उपसंचालक विशाल शिंदे (प्रोग्रॅम व फिल्म) आणि उपसंचालक अदिती अक्कलकोटकर (आंतरराष्ट्रीय संपर्क व समन्वय) उपस्थित होते. हा महोत्सव पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल (६ स्क्रीन), ई-स्क्वेअर– युनिव्हर्सिटी रोड (३ स्क्रीन) आणि एनएफडीसी-एनएफआय- लॉ कॉलेज रोड (१ स्क्रीन) अशा एकूण १० स्क्रीनमध्ये होणार आहे. महोत्सवासाठी कॅटलॉग शुल्क ८०० रुपये असून, ऑनलाइन नोंदणी www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. स्पॉट नोंदणी ५ जानेवारीपासून सर्व थिएटर्समध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत उपलब्ध असेल. यावर्षीच्या चित्रपट महोत्सवाची थीम ‘महान दिग्दर्शक, अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरुदत्त यांची जन्म शताब्दी’ ही आहे. जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि ग्लोबल सिनेमा अशा विविध विभागांमध्ये सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार आहेत. महोत्सवाची सुरुवात (ओपनिंग फिल्म) पावलो सोरेंटीनो दिग्दर्शित ‘ला ग्राझिया’ (इटली) या चित्रपटाने होणार आहे. तर महोत्सवाचा शेवट (क्लोजिंग फिल्म) जीम जारमुश दिग्दर्शित ‘फादर मदर सिस्टर ब्रदर’ (अमेरिका, आर्यलंड, फ्रान्स) या चित्रपटाने होईल, असे डॉ. पटेल यांनी सांगितले. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात १०३ देशांमधून ९०० हून अधिक चित्रपट आले होते. त्यापैकी १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत या चित्रपटांचे परीक्षण केले जाईल आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाला ‘महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ (१० लाख रुपये) प्रदान करण्यात येईल.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:37 pm

Ganesh Chavhan Latur: इन्शुरन्सच्या पैशांसाठी मृत्यूचा बनाव, गणेश पोलिसांना कसा सापडला ?

The post Ganesh Chavhan Latur: इन्शुरन्सच्या पैशांसाठी मृत्यूचा बनाव, गणेश पोलिसांना कसा सापडला ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 6:37 pm

उद्योगमंत्री उदय सामंत रुग्णालयात दाखल:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तब्येतीची विचारपूस, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन सामंत यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. नागपूर येथे पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत सक्रिय सहभागी झाले होते. मात्र, शनिवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. यामुळे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजात त्यांना सहभागी होता आले नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे. सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून, उद्या (बुधवारी) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. एकनाथ शिंदे यांनी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून उपचारांचा आढावा घेतला, तसेच सामंत यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, उदय सामंत हे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री आहेत. त्यांच्या तब्येतीत होणारी सुधारणा ही दिलासादायक बाब आहे. सामंत लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू व्हावेत, यासाठी राज्यभरातून आणि विशेषतः रत्नागिरीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुंबईत साकारणार 295 एकरचे जागतिक दर्जाचे 'सेंट्रल पार्क' मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी असून, महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोड लगतच्या मोकळ्या जागेवर तब्बल 295 एकर विस्तीर्ण क्षेत्रावर जागतिक दर्जाचे 'सेंट्रल पार्क' उभारण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, या पार्कमध्ये कोणत्याही प्रकारचे काँक्रीटचे बांधकाम केले जाणार नाही. रेसकोर्सचा ऐतिहासिक वारसा जपत संपूर्ण परिसर हा केवळ हरित उद्यान म्हणूनच विकसित केला जाईल. या भव्य सेंट्रल पार्कच्या संपूर्ण आराखड्याचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीला मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि सुप्रसिद्ध वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. महालक्ष्मी रेसकोर्सवरील 125 एकर आणि कोस्टल रोड लगतची 170 एकर जागा एकत्रित करून हा प्रकल्प साकारला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात या प्रकल्पामुळे सुमारे 300 एकरचे एक विशाल 'ऑक्सिजन पार्क' तयार होणार आहे. यामुळे मुंबईतील हवेचे प्रदूषण कमी होण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि शहराच्या सौंदर्यीकरणासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 16 Dec 2025 6:35 pm

गेवराई राडाप्रकरणी भाजप नेते बाळराजे पवारांसह ५ जणांना अटक

बीड (गेवराई) : गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी भाजप आणि राष्ट्रवादी(अजित पवार गट) समर्थकांमध्ये झालेल्या राजकीय राड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या राड्यात थेट माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई निवासस्थानात घुसून त्यांच्या स्वीय सहायक अमृत डावकर यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह पाच जणांना […] The post गेवराई राडाप्रकरणी भाजप नेते बाळराजे पवारांसह ५ जणांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Dec 2025 6:18 pm