SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत 350 नवीन मतदान केंद्रे:800 ते 900 मतदारांमागे एकच बूथ

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत यंदा मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून शहरात एकूण 1,408 मतदान केंद्रे (बूथ) तयार केली जातील. मागील निवडणुकीत 1,058 बूथ होते. वाढलेली मतदारसंख्या, प्रभागांनुसार मतदारांचे नव्याने केलेले विभाजन आणि बॅलेट मशीनच्या मोठ्या संख्येची आवश्यकता यामुळे यावर्षी तब्बल 350 नवीन बूथ वाढवण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण मतदार संख्या 11 लाख 18 हजार 118 आहे. मागच्या निवडणुकीत एका बूथसाठी साधारण 1400 मतदारांचा नियम होता; पण यावर्षी 800 ते 900 मतदारांमागे एकच बूथ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे बूथसंख्या नैसर्गिकरीत्या वाढली आहे. तसेच प्रभागनिहाय निवडणूक असल्याने प्रत्येक प्रभागासाठी वेगवेगळी बॅलेट मशीन लागणार असून बुथांचे प्रमाण अधिक ठेवणे आवश्यक ठरले आहे.मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी मनपाच्या अभियंत्यांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत वापरलेली मतदान केंद्रे प्रथम प्राधान्याने विचारात घेतली जाणार असून एका कुटुंबातील सर्व मतदारांचे नाव एकाच मतदान केंद्रावर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व मनपा शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा आणि मनपाच्या इमारती मतदान केंद्रांसाठी वापरण्यात येणार आहेत. गरज पडल्यास संस्थांच्या आणि खासगी शाळांचाही पर्याय स्वीकारला जाणार आहे. मतदान केंद्र निवडण्याची नियमावली

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 10:08 am

संभाजीनगरला वाढीव 200 एमएलडी पाणी मिळण्यासाठी दिलेली डिसेंबरची डेडलाइन हुकणार:मोटारसाठी स्ट्रक्चरल डिझाइन बदलले; 30 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरला 2 महिने लागणार

शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातून मिळणाऱ्या 200 एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली डिसेंबरची डेडलाइन आता हुकणार आहे. दुसऱ्या मोटारसाठी स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये बदल करणे आणि 30 एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागणार असल्याने कामाची गती मंदावली आहे. शेवटच्या टप्प्यातील या तांत्रिक अडचणींमुळे शहरवासीयांना वाढीव पाणी मिळायला आणखी तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. अमृत-2 योजनेतून 2740 कोटींच्या खर्चाने ही योजना मंजूर झाली आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत काम सुरू आहे. हैदराबादच्या जीव्हीपीआर कंपनीकडे मुख्य काम तर अकोल्याच्या महावीर इलेक्ट्रिक कंपनीकडे विद्युत काम सोपवले आहे. जॅकवेलमध्ये 3700 हॉर्सपॉवर क्षमतेचे दोन पंप बसवायचे आहेत. शनिवारी एका पंपावर विद्युत मोटार बसवण्यात आली. मात्र, दुसऱ्या मोटारसाठी स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये बदल आवश्यक आहे. त्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. तसेच, पत्र्याचे शेड उभारण्यासाठी 15 दिवस लागतील. विद्युत उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून 30 एमव्हीए क्षमतेचे तीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. शटडाऊनमुळे पाणीपुरवठा सातव्या दिवशीही विस्कळीत पाणीपुरवठा व्यवस्था मागील काही महिन्यांपासून विस्कळीत झाली असताना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नवीन पाइपलाइन जोडणीच्या कामासाठी घेतलेल्या सहा दिवसांच्या शटडाऊनमुळे शहरातील पाणीपुरवठा सातव्या दिवशीही पूर्णपणे पूर्ववत झालेला नाही. यामुळे अनेक भागांत पाण्याची समस्या वाढली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शटडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:55 am

छत्रपती संभाजीनगर शहरात भूकंपाची अफवा; प्रशासनाकडून दुजोरा नाही:गूढ आवाज अन् हादरे, भूकंपाची मात्र नोंद नाही

छत्रपती संभाजीनगर शहरातील गणेश कॉलनी, रशीदपुरा, टीव्ही सेंटर रोड परिसरात शनिवारी (22 नोव्हेंबर) दुपारी भूकंपाचे धक्के बसल्याची अफवा पसरली. गूढ आवाज आणि हादरे बसल्याची चर्चा सुरू झाली. जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून माहिती घेतली असता भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारच्या भूकंप मापक ॲपवरही कोणतीही नोंद दिसून आली नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा प्रशासनाने नाशिकच्या मेरी कार्यालयाशी संपर्क साधला. तेथूनही भूकंपाची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संभाजीनगरात भूकंप झाल्याची शक्यता फेटाळण्यात आली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात भूकंप नाही भूकंपाचे धक्के जाणवल्याची चर्चा आमच्यापर्यंत आली होती. त्याबाबत माहिती घेतली, परंतु जिल्ह्यात कुठेही भूकंप झाल्याचे वृत्त नाही. ती निव्वळ अफवा होती. - जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:52 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:विस्तारित पालखी महामार्गाचे दोन वर्षांत केवळ 48 % काम

वाखरी बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या विस्तारित पालखी महामार्गाचे काम पूर्ण करण्याची ठेकेदाराची मुदत आठ दिवसात संपत आहे. दोन वर्षांत केवळ ४८ टक्के काम पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदाराला आणखी वर्षभराची मुदतवाढ देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या आषाढीपूर्वी किमान सरगम चौक उड्डाणपुलाचे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे नागरिकांसह नेतेही हतबल झाले आहेत. देहू -आळंदी - वाखरी ते मोहोळ या पालखी महामार्गाला जोडणारा वाखरी बायपास ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (पंढरपूर) या साडेसात किमीच्या विस्तारित पालखी महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. १ नोव्हेंबर २०२३ रोजी गोयल इन्फ्रा प्रा. लिमिटेड या कंपनीला हे काम दिले होते. १८ नोव्हेंबर २०२३ पासून या कामास सुरुवात झाली असून या मार्गावर एक मोठा पूल, एक उड्डाणपूल, दोन छोटे पूल, एक अंडरपास आदी कामे आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असून ती ३१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत आहे. अनेकांनी विविध पातळीवर तक्रारी केल्या तरीही ठेकेदारांची कार्यपद्धती सुधारली नाही. यामुळे वाखरी ते सरगम चौकापर्यंतचे शेकडो व्यापारी, दुकानधारक, व्यावसायिक धूळ व वाहतूक कोंडीने त्रस्त झाले आहेत. अनेकांनी या मार्गावरील व्यवसाय बंद केले. राजकीय नेत्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणापासून पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते थेट केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यापर्यंत तक्रारी केल्या, तरीही ठेकेदारांची कार्यपद्धती सुधारली नाही. आतापर्यंत केवळ ४८ टक्के काम पूर्ण झाले असून यात पुलाची महत्वाची कामे अपूर्ण आहेत. यात वाखरी येथील ओढ्यावरील पुलाचे ५० टक्क्यांहून अधिक काम अपूर्ण आहे. मलपे ओढ्यातील पुलाचे ७० टक्के काम अपूर्ण आहे. सरगम चौकातील रेल्वे लाइन उड्डाणपुलाचे काम १० टक्केही झाले नाही. याशिवाय उड्डाणपूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान रस्त्याचे संपूर्ण काम सुरूच झाले नाही. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार, नागरिकांचे किती दिवस हाल होणार, अशी चिंता व्यक्त होत आहे. ^वाखरी ते पंढरपूर या ७. ५ किमीच्या महामार्ग कामाची दोन वर्षांची मुदत ३१ नोव्हेंबरला संपत आहे. यंदा अतिवृष्टी, दिवाळी व छठ पूजेमुळे मजूर बिहारमध्ये आपापल्या गावी केले होते. त्यामुळे काम संथगतीने चालू आहे. येत्या पाडव्यापर्यंत चंद्रभागा बसस्थानकापर्यंत काम पूर्ण होईल. जून २०२६ पर्यंत सरगम चौक रेल्वे लाइन उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले आहे. - केशव घोडके , प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण. तक्रारी, तरी सुधारणा नाही जून २६ पर्यंत काम पूर्णतेचे लक्ष्य

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:21 am

कल्याणी बनली वैमानिक, वडिलांचे स्वप्न पूर्ण:बारामती केंद्रातून कमर्शियल पायलट लायसन्स, 200 तासांचे प्रशिक्षण पूर्ण‎

मोठी स्वप्न पाहणे आणि ती प्रत्यक्षात साकार करणे, हे सर्वानाच साध्य होत नाही. परंतु शिंदेवाडी येथील कल्याणी शिंदे हिने वैमानिक होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. ती माळशिरस तालुक्यातील पहिली मुलगी वैमानिक ठरली आहे. कल्याणी हिचे वडील नानासाहेब शिंदे यांचे कल्याणी लहान असल्यापासूनच आपली मुलगी वैमानिक व्हावी, असे स्वप्न होते. कल्याणीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिंदेवाडी येथील हनुमान विद्यालयात झाले. बारावीचे शिक्षण (विज्ञान शाखा) तिने शारदानगर येथून पूर्ण केले. त्यानंतर बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्रातून तिने विमान चालवण्याचे कमर्शियल पायलट लायसेंस (सीपीएल) पूर्ण केले. तिने दोन वर्षांत २०० तासांचे ट्रेनिंग व सहा पेपर पूर्ण करून पायलट होण्याची स्वप्नपूर्ती केली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत कल्याणी शिंदे हिने व्यावसायिक पायलट होण्याचा बहुमान पटकावला आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बारामती येथून तिचे शिंदेवाडीत आगमन झाले. त्यावेळी गाव व परिसरातील पुरुष महिला तरुणांनी हलगीच्या निनादात व आतषबाजी करत आणि पुष्पवृष्टी करून तिचे शिंदेवाडीत जोरदार स्वागत केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणीला पाहताच आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता कल्याणीचे बारामती येथून शिंदेवाडीत आगमन झाले. ग्रामीण भागातील मुलगी पायलट झाल्याने तिच्या स्वागतासाठी संपूर्ण शिंदेवाडीतील नागरिक उपस्थित होते. मुलाला पाहताच वडिल नानासाहेब शिंदे व आई रेखा शिंदे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. गावासाठी अभिमानाचा क्षण, डोळ्यांत आनंदाश्रू आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद ^माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांचे स्वप्न पूर्ण होताना पाहून मला खूप आनंद होत आहे. माझ्या प्रवासातून गावातील तरुण-तरुणींना यशाची प्रेरणा मिळाली आहे. - कल्याणी शिंदे, व्यावसायिक पायलट.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:20 am

केंद्र उभारून प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन:उंदरगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायतीचा पुढाकार, प्रकल्प उभारणी सुरू

वाढत्या प्लास्टिक प्रदूषणामुळे ग्रामीण भागातील पर्यावरण धोक्यात आले आहे. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि पुनर्वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उंदरगाव (ता. करमाळा) ग्रामपंचायतीचे सरपंच युवराज मगर यांनी केले. उंदरगाव येथे तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन केंद्राच्या बांधकामाचे उद्घाटन नुकतेच त्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कोकरे, जिल्हा कक्षाचे सचिन सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी यशवंत कुदळे, सी. आर. सी. उमेश येळवणे, पवन पतंगे, कैलास भिसे, तुकाराम पाटील, मोनिका लठ्ठे, कमल लठ्ठे, गिरिजा कांबळे, अनिता कांबळे, मिना लठ्ठे, रत्नमाला लठ्ठे, सागर कुंभार आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.)- २ अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सहकार्याने हे प्लास्टिक व्यवस्थापन केंद्र उभारण्यात आले आहे. गावातील शाश्वत स्वच्छतेकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असून, या केंद्राच्या माध्यमातून प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. हे केंद्र आदर्श स्वरूपाचे करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी कुदळे यांनी दिली. ^ प्लास्टिकचा वाढता वापर आणि चुकीच्या विल्हेवाटीमुळे ग्रामीण भागातील पर्यावरण धोक्यात आले आहे. शेती, ओढे, नद्या आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचत असल्याने गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)-२ अंतर्गत प्लास्टिक व्यवस्थापन केंद्र उभारली जात आहेत. योग्य व्यवस्थापनाद्वारे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर किंवा सुरक्षित विल्हेवाट लावल्यास ग्रामीण भागातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जि. प. सोलापूर. पर्यावरण धोक्यात

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:19 am

बोगस ठराव करत त्या' कंपनीस गायरान जमीन दिल्याचा आरोप:ग्रा.पं. पदाधिकाऱ्याकडून सत्तेचा गैरवापर, जवळा ग्रामस्थ आक्रमक‎

जवळा ग्रामपंचायत सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता सत्तेचा गैरवापर करत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी बोगस ग्रामसभा व बोगस ठराव करत एका कंपनीला कागदपत्रे पुरवून गावची गायरान जमीन कंपनीच्या घशात घातली, असा आरोप गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर जवळा ग्रामस्थांनी भर ग्रामसभेत करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी हात वर करून केली. तालुक्यातील जवळा येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प व जवळे गावातील कचरा डेपो या विषयावर पोलिस बंदोबस्तात विशेष ग्रामसभा पार पडली. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभागृहात सरपंच गैरहजर राहिल्याने आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अनिता राजाराम लोखंडे या होत्या. जवळे येथील गायरान जमिनीवर सुमारे ८० एकरात मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम आवादा कंपनीमार्फत सुरू आहे. सौर प्रकल्पापासूनच काही अंतरावर जवळे ग्रामपंचायतचा कचरा डेपो प्रकल्प आहे. त्या प्रकल्पावरही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून हा डेपो इतरत्र हलवण्यात यावी, अशी मागणी कंपनी मार्फत होते. परंतु ग्रामस्थांनी त्या मागणीला विरोध दर्शवला आहे. ग्रामसभेत कचराकुंडी आहे. त्याच ठिकाणी ठेवणे किंवा इतरत्र हलवणे याबाबत निर्णय झालेला नाही. ग्रामस्थांनी काही ग्रामपंचायत सदस्यांबाबत अपशब्द वापरले. तुम्ही काही बोलू नका, असे म्हटल्यानंतर ग्रामसभेत गदारोळ झाला. त्यावेळी काही ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य एकवटले. परंतु काही ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला म्हटले की तुम्ही ग्रामसेवक आहात आमचे सेवक आहात. त्याबाबत कोणीही ग्रामसेवकाची बाजू घेतली नाही. भविष्यात इतर सदस्यांना ही अडचणीची समस्या ठरू शकते. कारण आज त्यांना इतरांबाबत अपशब्द वापरण्याची सवय झाली तर ती भविष्यात निश्चितच स्थानिकांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. म्हणून ज्येष्ठांनी ग्रामसभेतील काही ग्रामस्थ व तरुणांना समज देणे ही गरजेचे आहे, असे चर्चा उपस्थित ग्रामस्थांमध्ये सुरू होती. प्रकल्पात मोठी आर्थिक तडजोड : सालके माजी सरपंच शिवाजीराव सालके यांनी या प्रकल्पात मोठी आर्थिक तडजोड झाली. एक तर चुकीच्या पद्धतीने जागा दिली व जी दिली ती वेगळी अन् प्रकल्प वेगळ्या जागेवर उभा केला आहे. त्यामुळे भविष्यात गावची मोठी हानी होणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत सदस्य किसनराव रासकर, प्रभाकर अलभर, नवनाथ सालके यांनी सदस्यांना ग्रामस्थांना विचारात न घेता कंपनीने जास्त जागेवर अतिक्रमण करत आपला हक्क गाजवायला सुरुवात केली आहे. तेथील अधिकारी ग्रामस्थांशी उद्धटपणे बोलतात.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:41 am

कोपरगावात टाळांचा निनाद अन् जय अंबे'चा जयघोष:शहरात ठिकठिकाणी उत्साह, नागरिकांकडूनही उत्स्फूर्त स्वागत

तालुक्यात दरवर्षी न चुकता टाळांच्या घणाणाने देवीचे भोपे अगदी पंढरीच्या वारकऱ्यांप्रमाणे भक्तिभावात गावभर फिरतात आणि त्यांच्या टाळांच्या कडकडाटात, दिवट्यांच्या लखलखाटात व जय अंबे, जय भवानीच्या अखंड गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. कदम घराण्यातील तिसऱ्या पिढीतील गावोगावी भटकंती करणारे बोरीबोटी (परभणी) येथील सूर्यकांत कदम हातात दिवट्या मशाल, गळ्यात कवड्यांच्या माळा, डोक्यावर टोप, अंगावर परंपरागत कपडे.. हे दृश्य दिसताच गावकरी घराघरांतून बाहेर येतात. घराघरांत देवीचा जयघोष करत भोपे यांचे ओवाळून स्वागत करतात. भोप्यांचा जयघोष, टाळांचा ठेका आणि मशालीचे तेज यांमुळे जुन्या कोपरगाव परिसरात सगळीकडे भक्तीभावाचा दरवळ दिसला. सूर्यकांत सिताराम कदम, वडील सिताराम व आजोबा पुंजाजी कदम. हे बोरीबोटी तालुका परभणी येथील रहिवासी. नवरात्रामध्ये सर्वत्र भटकंती करता ते निघतात. डिसेंबरपर्यंत त्यांची भटकंती असते, त्यात प्रामुख्याने कोपरगाव, येवला, अंदरसुल, संवत्सर परिसरात त्यांची भटकंती असते. तरीही ते व्यवसाय म्हणून नव्हे, तर निष्ठेने, श्रद्धेने ही सेवा करतात. या घराण्यातील मुलं आज शिकलेली, नोकरी-उद्योग करणारी आहेत. पण आईची सेवा ही रक्तात आहे. म्हणून दिवाळीनंतरचा काळ ते न चुकता कोपरगावात उपस्थित राहतात. कोपरगावातील धर्मपरंपरांचा हा जिवंत वारसा आजही पिढ्यानपिढ्या जपला जातोय, हेच या परंपरेचं मोठेपण म्हणावे लागेल. कोपरगावच्या धार्मिक परंपरेचा अविभाज्य ठेवा प्रकाशाचे दिवे लागण्याआधीच कोपरगावात मशाल चमकतात, टाळ निनादतात आणि देवीचे भोपे काकडा फेरीतून गावाला संस्कार, श्रद्धा आणि भक्तिभावाचा प्रकाश देऊन जातात. कोपरगावच्या सांस्कृतिक वारशातील हा एक तेजस्वी, जिवंत, अभिमानास्पद अध्याय आणि या देवीभक्तांची सेवा म्हणजे भक्तीचा अखंड दीप म्हणावा लागेल. कोपरगावातील धर्मपरंपरांचा हा जिवंत वारसा आजही पिढ्यानपिढ्या जपला जातोय, हेच या परंपरेचं मोठेपण म्हणावे लागेल. नागरिकांकडूनही या ठेव्याचं जतन केले जात आहे. कोपरगावच्या सांस्कृतिक वारशातील हा एक अध्याय म्हणावा लागेल. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर, नाशिक जिल्ह्यातील येवला यांसह अन्य गावांत या मंडळींची भटकंती असते. दिवाळीनंतर ते अगदी नेमाने कोपरगावात हजर राहत असल्याचे नागरिक सांगतात. आताही कोपरगावात होते. त्यांच्या आगमनाने वातावरण भक्तीमय बनले. दिवाळीनंतर काकडा फेरी दिवाळी संपताच या भोप्यांची काकडा फेरी सुरू होते. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर जुन्या कोपरगावच्या गल्लीबोळांतून ते फिरू लागले की वातावरण भक्तिमय होते. ही काकडा फेरी त्यांच्या घराण्याची शतकोन्मुख परंपरा असल्याचे सांगितले जाते.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:39 am

सिव्हील'मध्ये नवीन वर्षांत सुरू होणार ‘एमबीबीएस’चे प्रवेश:राज्य सरकारकडून झाली अधिष्ठाता पदाची नियुक्ती‎

वैद्यकीय क्षेत्रासाठी नवीन वर्ष हे महत्त्वाचे ठरणार आहे. अहिल्यानगरमध्ये प्रथमच होत असलेल्या नवीन वैद्यकीय महाविद्यालयात नव्या वर्षांत ‘एमबीबीएस’ची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय ७ वर्षांच्या करारावर नव्या वैद्यकीय महाविद्यालयाला दिले जाणार आहे. नवीन मेडिकल कॉलेजसाठी वैद्यकीय, महसूल विभागाकडून ३ जागांची पाहणी केली होती, त्याचा अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी जागेअभावी मात्र मेडिकल कॉलेजचे काम मात्र थांबणार नाही. चौंडीत मेमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू केला होता. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या आदेशानंतर महसूलकडून या मैडिकल कॉलेजसाठी ३ जागा सूचवल्या होत्या, त्यापैकी शहरातील नालेगाव, शहराजवळील अरणगाव व कापूरवाडी येथील जागांची पाहणीही करण्यात आली. नव्या वर्षांत जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहे. या नव्या मेडिकल कॉलेजसाठी छत्रपती संभाजीनगर येथील अधिष्ठाता (डीन) म्हणून डॉ. अविनाश लांब यांची राज्य सरकारकडून नियुक्ती करण्यात आली. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दैनदिंन ओपीडी ४८० ते ५०० रुग्णांची आहे. सध्या २८२ बेड सिव्हिलमध्ये असून, बीड जिल्ह्यातील शिरुर भालगाव,आष्टी, कडा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, पैठण तसेच पुणे जिल्ह्यातील शिरुर येथून रुग्ण सिव्हिलमध्ये उपचारासाठी येतात. नवे मेडिकल कॉलेज सुरु झाल्यानंतर रुग्णांना २४ तास सेवा मिळेल. या नव्या कॉलेजसाठी ‘सिव्हिल’ ७ वर्षांच्या करारावर हस्तांतरित केले जाणार आहे. डॉ. संजय घोगरे, सीएस,नगर अतिगंभीर रुग्णांवर होतील उपचार नव्या मेडिकल कॉलेजमध्ये अतिगंभीर रुग्णावर देखील उपचार करणे शक्य होणार आहे. यापूर्वी अतिगंभीर रुग्णांना अधिक उपचासाठी शासकीय रुग्णालयातून घाटी (छत्रपती संभाजीनगर) किंवा ससून (पुणे) येथे पाठवले जायचे. Q : मेडिकल कॉलेज कधी सुरु होईल ? A : ’सिव्हिल’मध्येच मेडिकल कॉलेज सुरु होईल Q : पुढची प्रक्रिया काय असेल ? A : नवीन वर्षांत ‘एमबीबीएस’ ची प्रवेश प्रक्रिया होईल Q : जागे अभावी काम थांबेल का ? A : नाही, जागा नसली तरी महाविद्यालय सुरु करता येईल.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:38 am

शिर्डी हे जगभरातील भक्तांसाठी श्रद्धा, शांतता अन् समाधानाचे केंद्र:मध्यान्ह आरतीला उपस्थित 42 विदेशी साईभक्तांची प्रतिक्रिया, साई संस्थानच्या वतीने सन्मान‎

शिर्डी हे केवळ आध्यात्मिक स्थळ नसून जगभरातील लाखो भक्तांसाठी श्रद्धा, शांतता आणि समाधानाचे केंद्र आहे, अशी प्रतिक्रिया विदेशी भाविकांनी व्यक्त केली. श्री साईबाबा समाधी मंदिरात शनिवारी मध्यान्ह आरतीच्या वेळी परदेशातून आलेल्या ४२ साईभक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा आणि आरतीचा लाभ घेत साईचरणी लीन झाले. साईदर्शनानंतर त्यांचा साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी सर्व विदेशी भाविकांना शाल, साईंची विभुती, स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. त्यावेळी ते बोलत होते. या विदेशी भक्तांमध्ये जर्मनीतील ४०, कॅनडातील १ आणि फ्रान्समधील १ साईभक्तांचा समावेश होता. शिर्डीत प्रथमच आल्याचा आनंद, साई समाधीचे दर्शनामुळे मोठे समाधान मिळाले असल्याचे सांगत भारतीय आध्यात्मिक संस्कृतीबद्दलचे आकर्षण त्यांनी व्यक्त केले. दररोज देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दर्शनासाठी येतात. शिर्डीतील स्वच्छता, दर्शनाची सोय आणि भक्तांप्रती आदरयुक्त वागणूक यामुळे आम्ही भारावून गेलो. साईंचा सर्व धर्म समभाव व श्रध्दा आणी सबुरी हे दोन्ही संदेशाचे विदेशात कुतूहल आहे. साईबाबांच्या संदेशाने धर्म, भाषा आणि भौगोलिक सीमा ओलांडून मानवतेला जोडणारा पूल तयार केला आहे. साईसंस्थानकडून करण्यात आलेल्या भाविकासाठी पायाभुत सुविधांचेही या विदेशी भाविकांनी कौतुक केले.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:37 am

शेंदुर्णीत प्रचार थांबला, सकल हिंदू समाजाचा बंद:आरोपीचा तत्काळ शोध घेण्याची केली मागणी‎

पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या भगवान त्रिविक्रम मंदिरात नंदीची मूर्ती आहे. शुक्रवारी वा कोणीतरी अज्ञात इसमाने तिची तोडफोड केली. त्याचा निषेध व आरोपीला त्वरित अटक व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने शनिवारी शेंदुर्णीत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळे सर्व पक्ष व अपक्ष उमेदवारांनी आज प्रचार थांबवला. सकाळी सकल हिंदू समाजाची मंदिरात बैठक झाली. त्याच भजन करण्यात आले. त्यावेळी विहीपचे सहमंत्री भिका इंदरकर यांनी सांगितले की, पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घ्यावा. नगरपंचायत व मंदिर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक अशा उपाययोजना येथे कराव्यात. याबाबतीत दुर्लक्ष झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल. प्रसिद्ध कीर्तनकार हभप कन्हैया महाराज परदेशी यांनीही उपस्थितांना संबोधित केले. पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यावा. त्यांना अटक करावी असेही आवाहन केले. यावेळी शेंदुर्णी परिसरातील असंख्य भाविक भक्त हिंदू समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:21 am

मालेगावात मोसम नदीपाठोपाठ गटारीचे पाणी सोडले गिरणामध्ये:कचरा, सांडपाण्याने शहरातील नैसर्गिक संसाधनेआले धोक्यात‎

मालेगाव शहरात मोसम व गिरणा या दोन प्रमुख नद्या आहेत. मोसम नदी गेल्या दोन अडीच दशकापासून प्रदूषित आहेच. गेल्या दोन अडीच वर्षांपासून गिरणा नदीत कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करता भूमिगत गटाराचे पाणी सोडण्यात आल्याने मोसम पाठोपाठ गिरणा नदी देखील प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.यामुळे शहरातील नैसर्गिक संसाधने धोक्यात आली आहेत,ही शहरासाठी चिंतेची बाब आहे. शहरातील मोसम नदीत किनाऱ्याच्या वसाहतीतील सांडपाणी, कचरा, विविध उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडल्याने गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.मोसम नदीच्या स्वच्छतेसाठी सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलने केली आहेत आणि अजूनही चालू आहेत.मात्र मोसमला तिचे पावित्र्य प्राप्त होऊ शकले नाही ही शोकांतिका आहे. प्रदूषणापासून वाचलेली गिरणा देखील सोयगाव नदी किनारी, गणेश मूर्ती विसर्जन कुंडाजवळच भूमिगत गटाराचे सांडपाणी सोडण्यात आल्याने मरणाच्या दारी पोहचत आहे.दररोज हजारो लिटर दूषित पाणी नदीत पडत असल्याने नदीच्या परिसंस्थेला इजा पोहचत आहे. मोसम व गिरणातील पाणी पावसाळ्यात गिरणा धरणात जात असते.त्यामुळे शहराचे हे सांडपाणी देखील तेथे जाताच आहे हे वास्तव आहे. घरगुती आणि औद्योगिक सांडपाण्यातून शिसे, क्रोमियम, पारा आणि आर्सेनिक यांसारखी विषारी रसायने नदीत मिसळतात# जी अन्नसाखळीत प्रवेश करून दीर्घकालीन हानी पोहोचवतात. प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यात ई. कोलाय सारखे हानिकारक जीवाणू आणि इतर रोगकारक सूक्ष्मजीव असतात.असे दूषित पाणी मानवी वापरासाठी धोकादायक असते.ही बाब लक्षात घेत मालेगाव प्रशासनाने लवकरात लवकर नदीत सोडलेल्या या सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे. सोयगाव, टेहरे गावातील अनेकांची शेते ही गिरणा किनारी आहेत.त्यामुळे त्यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्याची देखील गुणवत्ता जाऊन ते पाणी दूषित होण्याची दाट शक्यता आहे. सोयगाव, गिरणा काठी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेले भूमिगत गटाराचे सांडपाणी नद्या लोकांच्या जीवनासाठी आवश्यक असल्याने त्यांना लोकमाता, जीवनदायिनी मानले जाते. कारण त्या लोकांच्या जीवनासाठी आवश्यक आहेत.तसेच हिंदू धर्मात नद्यांना देवी मानले जाते आणि त्यांची मोठ्या मनोभावे पूजादेखील केली जाते.अनेक पवित्र स्थळे आणि आध्यात्मिक महत्त्वाची ठिकाणे नद्यांच्या काठावर वसलेली आहेत. मात्र आजच्या आधुनिक युगात प्रदूषणामुळे नद्यांचे अस्तिवतच धोक्यात आले आहे. नद्यांची आजची झालेली वाताहत भविष्यातील पिढीसाठी जीवघेणी ठरणारी झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:15 am

ओझर नगरपरिषदेची लढत पंचरंगी, निवडणूकीत पाणी प्रश्न, कचरा डेपो, उपनगरातील रस्त्यांचेशहरात मुद्दे गाजणार‎

गेल्या चार वर्षापासून बहुप्रतीक्षित असलेल्या ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीला माघारी नंतर प्रचाराची सुरुवात झाली असून तेरा प्रभागांमधील २७ नगरसेवकांसाठी ११८ उमेदवार रिंगणात असून नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. ओझरकारांना अपेक्षित असलेल्या पाणी प्रश्नावर व बाणगंगाच्या नदीकाठी असलेल्या कचरा डेपो तसेच उपनगरातील रस्ते या निवडणुकीत प्रामुख्याने प्रचाराचे मुद्दे गाजणार आहेत. नगर परिषद निवडणूक मध्ये नगराध्यक्षपदासाठी जयश्री धमेंद्र जाधव (उबाठा) अनिता भिका घेगडमल (भाजप) प्रज्ञा हेमराज जाधव (राष्ट्रवादी) श्वेता प्रदिप अहिरे (शिवसेना शिंदे पक्ष) मंगल संजय कुन्हाडे (अपक्ष) मनिषा अरुण लोहकरे (अपक्ष) मालती अनिल बंदरे (काँग्रेस) या सात महिला रिंगणात आहेत. ओझर ग्रामपंचायतीनंतर होत असलेल्या नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत आघाडी- महायुतीची सांगड न बसल्याने आहेत. काँग्रेसनेही तीन पाच सात तेरा या प्रभागातून सहा उमेदवार दिले आहेत. खरी लढत शिवसेना संपूर्ण पॅनल तयार केले आहे. प्रभाग तेरा हा भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम आणि भाजप व राष्ट्रवादी मध्येच होत आहे. शिवसेना (उबाठा), भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे चुलत बंधू माजी आमदार अनिल कदम यांचा असून यतीन कदमांनी त्यांची पत्नी दिवंगत जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांच्या पत्नी रत्नाताई कदम यांना म्हणजे माजी सरपंच जान्हवी कदम तर माजी आमदार अनिल कदम यांनी त्यांच्या विरोधात सख्या चुलतसासू सुना एकमेकांसमोर निवडणूक रिंगणात ठाकल्या आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात काटे की टक्कर होणार आहे. मूळ शिवसेनेतून फुटून शिवसेनेत गेलेले माजी सरपंच प्रदीप अहिरे यांनी प्रभाग सात वगळता २२ उमेदवार दिले

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 8:10 am

डाव्या कालव्याची दुरुस्ती वेगात, हिवाळ्यात 3 पाळ्या सिंचनासाठी:3 जिल्ह्यांतील 1 लाख 41 हजार 640 हेक्टरला होणार फायदा‎

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची दयनीय अवस्था झाली असून यंदा झालेल्या अतिवृष्टीने हा कालवा अनेक ठिकाणी खचला गेला आहे. यामुळे कालव्याला पाणी सोडल्यास काही अनुचित प्रकार घडू शकतो, या पार्श्वभूमीवर सध्या या कालव्याची अनेक ठिकाणी दुरुस्ती करण्यात येत असून, पुढील महिन्यात रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. मराठवाड्यातील सिंचन क्षेत्र डोळ्यासमोर ठेवून जायकवाडी धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. धरणावर डावा व उजवा कालवा आहे. आता या दोन्ही कालव्यांची दयनीय अवस्था झाली आहे. वहन क्षमता निम्म्यावर आली आहे, डावा कालवा २०८ किमीचा असून, हा कालवा अनेक ठिकाणी खचला असल्याने यातून पाणी सोडले जाणे शक्य नव्हते. दयनीय अवस्था झालेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. हे काम पुढील महिन्यात पूर्ण करुन सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संत यांनी सांगितले. जायकवाडी धरणावर मराठवाड्यातील सिंचन अवलंबून आहे. दोन्ही कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे. कालवा दुरुस्त करण्यात यावा, जेणेकरून सिंचन वाढेल, मात्र कालवा दुरुस्ती कागदावर होता कामा नये, सिंचन वाढेल असे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री अनिल पटेल यांनी केली आहे. डाव्या कालव्याचे मूळ बांधकाम १९७६ ला पूर्ण झाले. कालव्याची लांबी २०८ किमी आहे. परभणीला यातून पाणीपुरवठा होतो. कालव्याची वहन क्षमता १००.०८ घनमीटर प्रतिसेकंद आहे. या कालव्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७,६२० हेक्टर, जालना- ३६,५८० तर परभणीत ९७,४४० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. डावा कालवा दुरुस्तीचा ७३५ कोटींचा प्रस्ताव मागील दोन वर्षांपासून पाटबंधारे विभागाने दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर पूर्ण कालवा दुरुस्ती होईल. सध्या तरी सिंचन मिळावे, यासाठी स्थानिक पाणी पट्टी वसुलीच्या माध्यमातून कालव्याची दुरुस्ती करण्यात येत आहे. कागदावर दुरूस्ती नको २०८ किमीची लांबी

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:55 am

सार्वजनिक शौचालयात पाणी‎नसल्याने महिलांची कुचंबणा‎:कन्नडमधील महिलांकडून तक्रार, निवडणुकीमुळे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

पांढरी मोहल्ला, राजवाडा, बडा बंगला या भागात सार्वजनिक शौचालये बांधली. पण या ठिकाणी पाण्याची सोयच नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत असल्याने या भागातील महिलांनी तक्रार केली आहे. ब्राह्मणी नदीच्या काठावर नगर परिषदेने ही शौचालये उभारली. पण पाणी नसल्याने सर्व शौचालये तुंबली आहेत. सहा महिन्यांपासून स्वच्छता कर्मचारी या भागात फिरकले नाहीत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे राजवाडा परिसरातील अनेकांनी स्थलांतर केले. सामाजिक कार्यकर्ते शरद वाघ, अनिल सिरसाठ यांनी ही माहिती दिली. सोमवारी महिलांनी एकत्र येऊन नाराजी व्यक्त केली. पण नगर परिषदेचे अधिकारी निवडणूक कामात व्यग्र असल्याने कोणीही आले नाही. सुरय्या युसूफ शेख यांनी सांगितले की, स्वच्छता कर्मचारी फिरकत नाहीत. महिलांना नैसर्गिक विधीसाठी जागा नाही. शौचालयात कचरा आणि अस्वच्छता आहे. शीला विनोद नरवडे म्हणाल्या, आम्ही कन्नडचे नागरिकच नाही असे वाटते. घरे जवळ असल्याने दाराशीच नाल्या तुंबल्या आहेत. मुलींना अभ्यासही करता येत नाही. नसिमबीह अय्युब खान यांनी सांगितले, आम्ही घर झाडतो. पण कचरा टाकायला जागा नाही. नाइलाजाने रस्त्यावर टाकतो. तो पुन्हा नाल्यात जातो. कचरा उचलणारे येत नाहीत. माझी अँजिओप्लास्टी झाली आहे. दम लागतो. त्यातच दुर्गंधी आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:54 am

जरंडीचा ग्रीन पॅटर्न; 1 लाख झाडांचा संकल्प‎:आतापर्यंत 35 हजार 215 वृक्षांची लागवड, परिसर हिरवागार

सोयगाव तालुक्यातील जरंडीत वाढत चाललेले तापमान थांबवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतीने आपला खारीचा वाटा उचलला आहे. गेल्या तीन वर्षात जरंडी परिसरात तब्बल ३५ हजार २१५ झाडे लावून त्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले. आता हे उद्दिष्ट १ लाखांवर नेले आहे. गेल्या दहा दिवसांत हुतात्मा स्मारक, स्मशानभूमी परिसरात ५००० झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा उपक्रम ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आला. याच अनुषंगाने ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे, सरपंच स्वाती पाटील यांनी एक लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य कार्यात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांचेही महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत आहे. हा पर्यावरणपूरक उपक्रम जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरल्याचे म्हणाले. या दहा दिवसांच्या वृक्षलागवड महोत्सवामध्ये जरंडी येथे वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. यात शाळेचे शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला बचत गटातील सदस्य इत्यादींचा सहभाग होता. जरंडी ग्रामपंचायतीतर्फे हुतात्मा स्मारक, स्मशानभूमी परिसरात झाडे लावून संवर्धन करण्यात आल्याने परिसर हिरवागार झाला आहे. वृक्षलागवड करणे आहे काळाची गरज ^पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी, समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड, संवर्धन ही आजच्या काळाची निकडीची गरज आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत लागणारा ऑक्सिजन आपण स्वतः निर्माण केला पाहिजे. आम्ही राबवित असलेल्या या उपक्रमास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. - सुनील मंगरुळे , ग्रामपंचायत अधिकारी जरंडी

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:53 am

गव्हाली येथील वस्तींच्या रस्त्याची दुर्दशा; पाण्यातून काढली अंत्ययात्रा:आसामी वस्ती, किसन बाबा वस्तीत मूलभूत सुविधाच नाही‎

सिल्लोड तालुक्यातील गव्हाली गावाजवळील आसामी वस्ती आणि किसन बाबा वस्तीतील नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधा मिळत नाहीत. २१ नोव्हेंबर रोजी या भागातील दयनीय रस्त्यांची स्थिती पुन्हा एकदा समोर आली. २० नोव्हेंबर रोजी रामा भक्ताबा शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी जाणारा मुख्य रस्ता गुडघाभर पाण्यात होता. त्यामुळे चार खांदेकऱ्यांनी आणि पाचव्या व्यक्तीने पानोड्या घेऊन मृतदेह खांद्यावर वाहत पाण्यातूनच अंत्ययात्रा काढली. या प्रसंगाने गावकऱ्यांच्या मनातील संताप उफाळून आला. हा रस्ता २०००–२००१ मध्ये तयार झाला. त्यानंतर दोन वेळा खडीकरण झाले. तरीही सुमारे ५०० फूट रस्ता पूर्णपणे बंद आहे. पावसाचे पाणी साचते. निचऱ्याची सोय नाही. दुरुस्तीचे काम अपूर्ण राहते. त्यामुळे हा रस्ता वापरात नसल्यासारखा झाला आहे. नागरिकांना रोजच्या प्रवासात अडचणी येतात. विद्यार्थ्यांना शाळेत जायला त्रास होतो. महिलांना दवाखान्यात पोहोचणे कठीण होते. अंत्ययात्रेसारख्या प्रसंगीही पाण्यातून वाट काढावी लागणे, हे विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. प्रशासनाने ही स्थिती लक्षात घेऊन तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. या रस्त्यावरच गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन, विद्यार्थ्यांचे शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि शेतीसाठीची वाहतूक अवलंबून आहे. त्यामुळे या मार्गाची पुनर्बांधणी ही आता वेळेची गरज बनली आहे. नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागण्या केल्या. निवेदने दिली. तोंडी तक्रारी केल्या. तरीही रस्ता दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. अडचणी वाढत आहेत. प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:51 am

निवडणुकीमुळे दारूसह रोख रक्कम वाहतुकीवर कडक नजर:फुलंब्रीमध्ये सहा पथकांची स्थापना, वाहनांची कसून तपासणी‎

फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक स्वच्छ, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी निवडणूक विभागाने सहा विशेष पथकांची स्थापना केली आहे. या पथकांमार्फत दारू आणि रोख रक्कम वाहतुकीवर कडक नजर ठेवली जात आहे. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार योगिता खटावकर आणि उपनिवडणूक अधिकारी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपाययोजना राबवली जात आहे. फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ पारदर्शकपणे पार पडावी यासाठी व्हिडिओग्राफी सर्व्हेलियन्स पथक, व्हिडिओग्राफी व्हिविंग पथक, भरारी पथक, चेक पोस्ट पथक, तक्रार निवारण व आचारसंहिता कक्ष, एक खिडकी कक्ष, मीडिया व पेड न्यूज कक्ष यांची स्थापना करण्यात आली आहे. फुलंब्री शहरात येणाऱ्या तीन प्रमुख रस्त्यांवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री येथील बिल्डर फाटा, खुलताबाद-फुलंब्री येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना आणि जालना-सिल्लोड मार्गावरील पाल फाटा येथे ही चेक पोस्ट कार्यरत आहेत. या पथकांकडून वाहनांची रात्रंदिवस तपासणी सुरू आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई केली जात आहे. रक्कम बाळगताना पुरावे ठेवा पथकांकडून अवैध दारू वाहतूक आणि रोख रक्कम वाहतुकीवर विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांनी रोख रक्कम बाळगताना त्याचे पुरावे सोबत ठेवावेत, असा सल्ला निवडणूक विभागाने दिला आहे. आचारसंहिता कालावधीत रोख रक्कम वाहतुकीवर आयोगाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक नसल्यास रोख रक्कम घेऊन प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:51 am

शिंदेसेना, राष्ट्रवादीतही तीन हजारांना उमेदवारी अर्ज:मनसेत माेफत, उद्धवसेनेचा अर्ज महाग, भाजपच्या अर्जाला मागणी

उमेदवारी अर्जांसाठीही पक्षांमध्ये खरेदी-विक्री चांगलीच सुरू झाली आहे. यात सर्वात महाग अर्ज उद्धवसेनेचा असून ताे तब्बल 4000 रुपयांना विकला जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. तर भाजपकडून इच्छुकांना अर्ज माेफत दिले जात आहेत. त्यामुळे आठवडाभरात भाजपकडून इच्छुकांनी 1500 अर्ज नेले आहेत. शहरात भाजपची सदस्यसंख्या दाेन लाख 75 हजारांपर्यंत आहे. तुलनेत इतर पक्षांची सदस्य संख्या कमी आहे. असे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून 150 अर्जांची विक्री झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही 290 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मनसेने उमेदवारी अर्जासाठी काेणत्याही प्रकारची शुल्क आकारणी केलेली नसून आत्तापर्यंत 165 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाकडेही इच्छुकांची संख्या माेठी आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून शिफारस आलेल्या याेग्य इच्छुक उमेदवारांनाच अर्ज दिले जात आहेत. आत्तापर्यंत 97 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून एका अर्जासाठी तीन हजार रुपये आकारणी करण्यात आल्याचे एका इच्छुकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मात्र शुल्क आकारणीबाबत कानावर हात ठेवले. पक्षांमधील उमेदवारी अर्जांचा रेट असा पक्ष अर्जाचा रेट आतापर्यंत विक्रीउद्धवसेना 4000 ~ माहिती दिली नाहीराष्ट्रवादी (अप) 2000 ते 3000 ~ 150शिंदेसेना 2000 ते 3000 ~ 97राष्ट्रवादी (शप) 2500 ~ 290भाजप माेफत 1500मनसे माेफत 165काँग्रेस -- माहिती दिली नाहीमाकप -- माहिती दिली नाही आधी सदस्यता व्हा, मग निवडणूक लढवा पक्ष सक्रिय सदस्य प्राथमिकभाजप 100 रु. माेफतकाँग्रेस 175 रु, 5 रुपयेमनसे 5 रु. पद्धत नाहीराष्ट्रवादी (शप) 50 रु. 10 रुपयेराष्ट्रवादी (अप) 10 रु., 10 सदस्य केल्यास क्रियाशीलउद्धवसेना 1000 रु पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली नाहीशिंदेसेना - पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली नाहीमाकप 5 रु. सहायक सदस्य 25 रुपये यांच्या राष्ट्रवादीकडूनही 290 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मनसेने उमेदवारी अर्जासाठी काेणत्याही प्रकारची शुल्क आकारणी केलेली नसून आत्तापर्यंत 165 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाकडेही इच्छुकांची संख्या माेठी आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांकडून शिफारस आलेल्या याेग्य इच्छुक उमेदवारांनाच अर्ज दिले जात आहेत. आत्तापर्यंत 97 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले असून एका अर्जासाठी तीन हजार रुपये आकारणी करण्यात आल्याचे एका इच्छुकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी मात्र शुल्क आकारणीबाबत कानावर हात ठेवले.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:40 am

संभाजीनगर एमआयडीसीत नव्या उद्योगांना ‘नो स्पेस’, प्लॉटची कमतरता:आणखी 30 उद्योजकांना हवी 2 हजार एकर जागा

शहराचा औद्योगिक विकास झपाट्याने सुरू आहे. मात्र, आता औद्योगिक वसाहतीमध्ये इंडस्ट्रियल प्लॉट नसल्याने नव्या उद्योगांसाठी जागेची तीव्र कमतरता भासत आहे. शेंद्रा, चिकलठाणा, वाळूज, रेल्वेस्टेशन, पैठण एमआयडीसीमध्ये प्लॉटच शिल्लक नाहीत. जयपूर, आरापूर आणि सटाणा येथे नवीन एमआयडीसी तयार होणार आहेत. असे असले तरी भूसंपादन, भौगोलिक मर्यादा आणि स्थानिक विरोध यामुळे प्रक्रियेत अडथळे येत आहेत. ऑरिक सिटीतदेखील इंडस्ट्रियल प्लाॅट उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठ्या उद्योगांसह एमएसएमई उद्योगांना जागा मिळत नाहीत. दरम्यान, टाटा, हुंदाई, व्हिएतनामची ईव्ही कंपनी विनफास्ट आणि दक्षिण कोरियाची स्टील बॉडी बनवणारी पॉस्को या कंपन्यांकडून जागेची पाहणी करण्यात आली आहे, परंतु जागाच नसल्याने या कंपन्या संभाजीनगरात येणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. एथर, टोयोटा, जेएसडब्ल्यूनंतर ॲन्सिलरी उत्सुक दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत 10 हजार एकरांत ऑरिक सिटी विकसित होत आहे. यामध्ये शेंद्रा 2 हजार आणि बिडकीन 8 हजार एकर अशा दोन इंडस्ट्रियल नोडचा समावेश आहे. यातील 50 टक्के क्षेत्रावर इंडस्ट्रियल लेआऊट आणि उर्वरित जागेवर व्यावसायिक, ओपन स्पेस, अ‍ॅमिनिटीज, निवासी, रस्त्याचे प्रयोजन आहे. ऑरिक सिटीत जागेसाठी उद्योजकांकडून विचारणा केली जाते. एथर, टोयोटा, जेएसडब्ल्यूसारख्या मोठ्या कंपन्यांनंतर ॲन्सिलरी कंपन्या देखील जागेसाठी उत्सुक आहेत. 10 हजार एकर भूसंपादनाची तयारी ऑरिकमधील इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये 90-95 टक्के गुंतवणूक झालेली आहे. आता नव्या उद्योजकांसाठी आम्ही बिडकीनमध्ये 8-10 हजार एकर जागेच्या भूसंपादनाची आमची तयारी सुरू आहे. त्यामुळे उद्योजकांना जागा मिळाल्याने गुंतवणूक होईल. - पी. डी. मलिकनेर, संचालक, ऑरिक उद्योजकांसाठी जयपूर एमआयडीसी सज्ज वाळूजलगत आरापूर, शेंद्र्यालगत जयपूर आणि ऑरिक परिसरात सटाणा एमआयडीसी उभारली जात आहे. जयपूर एमआयडीसी पूर्णपणे तयार आहे. उद्योजकांना या ठिकाणी प्लॉट उपलब्ध आहेत. एमआयडीसी लेआउट उभारत आहे. - अमित भामरे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी प्रस्तावित एमआयडीसींची सद्य:स्थिती जशीच्या तशी 1) जयपूरशेंद्रालगत जयपूर शिवारात 181.92 हेक्टरवर औद्योगिक वसाहत साकारत आहे. येथे प्लॉटचे वाटप आहे. मात्र, डोंगराळ भाग, रस्ते आणि कनेक्टिव्हिटी यामुळे जयपूर उद्योजकांच्या पसंतीस उतरत नाही. 2) आरापूरवाळूजपासून 22 किमी अंतरावर 1,905 एकरवर (762 हेक्टर) आरापूर औद्योगिक वसाहत तयार होत आहे. या वसाहतीसाठीचे नोटिफिकेशन आल्यानंतर एमआयडीसीकडून संयुक्त मोजणी सुरू आहे. 3) सटाणाकरमाड परिसरात 138 हेक्टरवर सटाणा ही नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. त्यासाठी मार्च महिन्यापासून भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. या एमआयडीसीमध्ये 208 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येईल. 4) सिल्लोड700 हेक्टरवर औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात 300 हेक्टरचे क्षेत्र विकसित केले जाईल. मात्र, या एमआयडीसीला शेतकऱ्यांकडून विरोध केला आहे. त्यामुळे या एमआयडीसीचे भविष्य अधांतरी आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:23 am

‘ऐक्यम’ 2025:वेरूळचे कैलास लेणे जपणे ही संपूर्ण जगाची जबाबदारी- डॉ. टिमोथी कर्टिस

जगाला तत्त्वज्ञान, धार्मिकता आणि कलेचा वारसा देणारे कैलास लेणे जपणे ही आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे. बेसॉल्ट खडकात उभारलेले हे शिल्प जगासाठी शिल्पकलेचा अद्वितीय नमुना आहे, असे मत भारतातील युनेस्को कार्यालयाचे संचालक डॉ. टिमोथी कर्टीस यांनी व्यक्त केले. शनिवारी (२२ नोव्हेंबर) कैलास लेण्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, ही जगातील पहिली युनेस्को साइट आहे. १९८३ साली ती घोषित केली. या लेण्यामुळे भारताचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जगाला कळला आहे. वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये एखाद्या वास्तूचा समावेश करणे म्हणजे त्या वास्तूची जबाबदारी घेणे. १९६ देशांचा हा वारसा आहे. त्यामुळे त्याला जपणे ही जागतिक जबाबदारी आहे. अजिंठा आणि वेरूळ हे त्याचेच उदाहरण आहे. हिंदू, बौद्ध, जैन धर्माचे एकत्रीकरण दाखवणारे हे शिल्प असल्याचे डॉ. टिमोथी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन सी.एस.एन., सोपान, महानगरपालिका, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनने केले होते. नटराजासमोर भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसीची अविस्मरणीय जुगलबंदी; शिवस्तुतीने वेधले लक्ष दगडात कोरलेल्या नटराजाच्या भव्य शिल्पाच्या साक्षीने शिवत्वाचे विविध पैलू सांगणारे भरतनाट्यम पदन्यास, शास्त्रीय नृत्य आणि नाद यांचा परिपूर्ण संगम अंगावर रोमांच उभा करणारा होता. महाराणी रासेश्वरी राज्यलक्ष्मी आणि निक बुकर यांच्या शिव-स्तुतीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय कलाकारांनी ‘ईश्वेश्वरा तरसो ना...’ आणि ‘चलो काशी...’ या गाण्यांवर कथ्थक, भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्यातून सृष्टी आणि लयाचा सुंदर संदेश दिला. गौरी शर्मा त्रिपाठी यांच्या कोरिओग्राफीमध्ये ‘ओंकारा’ भरतनाट्यम शैलीत सादर झाले, लेण्यांची शांतता आणि प्रकाशयोजनेमुळे वातावरण मोहून गेले. वेरूळच्या कैलास लेण्यासमोर शिवचरित्राचा दिव्य आविष्कार; ‘नटराज’ साक्षीने अविस्मरणीय मैफल वेरूळ लेणी | जगप्रसिद्ध वेरूळच्या कैलास लेण्याचा भव्य परिसर शनिवारी संध्याकाळी कला आणि संस्कृतीच्या दिव्य प्रकाशात उजळून निघाला. विशेष कार्यक्रमात, नटराजाच्या अद्वितीय शिल्पासमोर शिवचरित्र सांगणारे शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांचा अविस्मरणीय संगम उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. कार्यक्रमाची सुरुवात वीणा शुभेंद्र राव यांनी भगवान शिवाच्या स्तुतीने केली. पंडित रविशंकर यांच्या ‘मिश्र पिलू’ रचनेवर वीणा, व्हायोलिन आणि तबल्याची जुगलबंदी सादर झाली. विशेष म्हणजे, १९७० मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या ऐतिहासिक सादरीकरणाचे पुनर्निमाण पंडित शुभेंद्र राव आणि डच सेलिस्ट सास्किया राव-दे हास यांनी केले. जेव्हा स्कॉटलंडचे इतिहासकार भारताचा इतिहास सांगतात ... स्कॉटलंडचे इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल यांनी कैलास आणि अजिंठा लेण्यांचे सुंदर वर्णन केले. जगाच्या प्रगतीत भारताचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी या वेळी सांगितले. आर्यभट्टांनी जगाला शून्य दिले आणि ब्रह्मगुप्ताने भारताला १ ते ९ पर्यंतचे अंक दिले. हे जगाला दिशा देणारे ठरले. त्याचबरोबर नालंदा हे जगातील पहिले विद्यापीठ आहे. या ठिकाणी घडलेल्या विद्यार्थ्यांनी जगाला दिशा दिली. या वेळी भारताने दिलेली बौद्ध आणि हिंदू संस्कृती जगावर प्रभावी ठरली. त्यांचे हे ज्ञान आणि ओघवती शैली पाहून उपस्थित अवाक् झाले.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:15 am

बिबट्याच्या हल्ला नियंत्रणासाठी आता वन विभागाचे इमर्जन्सी रॅपिड युनिट्स:बिबट्या दिसताच विशेष पथक घटनास्थळावर पोहोचून बचावकार्य करणार

बिबट्या-मानव संघर्षावर फक्त बैठका, प्रस्ताव आणि आश्वासने हे जुने चित्र आता बदलणार आहे. जुन्नर वन विभागाने राज्यात प्रथमच ‘बिबट्या कमांडो फोर्स’ उभी करून थेट संकटावर तातडीने झेप घेणारी यंत्रणा तयार केली आहे. या अत्याधुनिक इमर्जन्सी रॅपिड युनिट्समुळे (ईआरयू) बिबट्या दिसला किंवा माहिती मिळाली की कमांडो कारवाईला सुरुवात होणार आहे. देशात कुठल्याही भागात नैसर्गिक आपत्ती आली की जसे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स) ज्याप्रमाणे धावते, तशीच आता गावात बिबट्या शिरला तरी “ईआरयू’ तत्काळ गावात दाखल होणार. जुन्नर वनविभागाने १३ रेस्क्यू पथकांपैकी ६ सशक्त युनिट्सना कमांडो दर्जा दिला आहे. या युनिटमधील फोर्स जुन्नर उपविभागाअंतर्गत प्राधान्य ठेऊन काम करणार आहे. या उपविभागात जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेडचा भाग येतो. याच तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या जास्त घटना घडत आहेत. ग्रामस्थांचा रोषही वाढत असल्याने वन विभागाकडून हा प्रयोग केला जात आहे. युनिट कसे काम करणार प्रत्येक इमर्जन्सी रॅपिड युनिट्समध्ये प्रत्येक ईआरयूमध्ये ५ विशेष कमांडो असतील, त्यात बिबट्याला बेशुद्ध करणारा तज्ज्ञ, जंगलात पावलांच्या ठशांनी शोध घेणारा ॲनिमल ट्रॅकर, बेशुद्ध करण्यासाठी औषधाची योग्य मात्रा देणारा भूलतज्ज्ञ, हवाई शोध मोहिमेसाठी ड्रोनतज्ज्ञ, तांत्रिक नकाशे व हालचालींचा वेध घेण्यासाठी जीआयएस तज्ञ यांचा पथकात समावेश आहे. याशिवाय पोलिस, महसूल, आरोग्य पथके, स्वयंसेवकांची मदतही मिळणार. राज्यात बिबट्याच्या हल्ल्यांना ‘राज्य आपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव तातडीने मांडण्याचे आदेश नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार करण्याचा प्रस्तावही आहे. नसबंदी संदर्भात राज्याला परवानगी असावी यासाठी राज्याकडून लवकरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. नसबंदीची पूर्ण परवानगी हवीराज्यात 2285 बिबटे वन विभागाच्या अहवालानुसार २०२२ मध्ये झालेल्या जनगणनेत राज्यात २,२८५ बिबटे असल्याचे समोर आले होते. २०२६ च्या नव्या जनगणनेनंतर नवा आकडा येईल. बिबट्यांचे मानवी वस्त्यांमध्ये वाढते हल्ले लक्षात घेता राज्याने केंद्राला अधिक मोठ्या प्रमाणावर नसबंदीची परवानगी देण्याचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. केंद्र म्हणाले : ११५ नव्हे, फक्त पाच बिबट्यांची नसबंदी करा राज्यातील नाशिक, जुन्नर, अहिल्यानगर, पुणे ते पालघरपर्यंत बिबट्यांचा मुक्त संचार आणि मानवी वस्त्यांवरील सततचे हल्ले धोक्याची घंटा ठरत आहेत. जंगलातून बाहेर पडून बिबटे गावोगाव फिरू लागल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बिबट्यांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी ११५ बिबट्यांची नसबंदी करण्याची तातडीची परवानगी केंद्राकडे मागितली होती. मात्र, केंद्राने केवळ पाच बिबट्यांच्या नसबंदीला अटी-शर्तींसह हिरवा कंदील दिल्याचे वन विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आता राज्याच्या वन विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यात बिबट्या मानव संघर्ष वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी बिबट्याची नसबंदी करण्याची मागणी वाढत होती. मानवी वस्तीत बिबट्या शिरकाव करत असतील तर काही विशिष्ट उपाययोजना केल्या पाहिजेत अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनीही राज्य सरकारला एक पत्राद्वारे केली होती. विधीमंडळ अधिवेशनाही अनेकवेळा हा प्रश्न चर्चिला गेला. त्याच अनुषंगाने राज्य सरकारने ११५ बिबट्यांच्या नसबंदीचा केंद्राकडे प्रस्ताव पाठवून परवानगीची मागणी केली होती. असे काम करणार ‘ईआरयू’ सातत्याने प्रशिक्षण ‘ईआरयू’ सदस्यांना प्राथमिक प्रशिक्षण, त्यानंतर दोन दिवसीय अत्याधुनिक पद्धतीचे क्षेत्रीय प्रशिक्षण, पोलिस कार्यकृती प्रशिक्षण आणि दर सहा महिन्यांनी पुन्हा अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आधुनिक प्रणालींचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टीने यावर सातत्यपूर्ण काम होणार आहे. - प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर विभाग.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:11 am

कडेठाण येथे मुलाने वडिलांचा ‎खून करून घरात पुरला मृतदेह‎:वडील मद्य प्राशन करून वाद घालत असल्याचा होता राग‎

वडील मद्य प्राशन करून येत असल्याने वाद‎हाेत हाेते. त्यामुळे मुलाने वडिलांचा खून करून‎मृतदेह घरातच पुरल्याची घटना पैठण‎तालुक्यातील कडेठाण येथे घडली. घरातून‎येणाऱ्या दुर्गंधीमुळे ही घटना १० दिवसांनंतर‎शनिवारी उघडकीस आली. कल्याण काळे‎असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला‎ताब्यात घेतले.‎ कडेठाण येथील कल्याण बापूराव काळे‎(५८) हे आपल्या पत्नी सुमन आणि धाकटा‎मुलगा राम काळे यांच्यासोबत राहत होते. ते मद्य‎प्राशन करत असल्यामुळे घरात नेहमी वाद हाेत‎हाेते. मोठा मुलगा ऊसतोडीवर गेलेला होता.‎दहा दिवसांपूर्वी बाप- लेकांमध्ये वाद झाला. या‎झटापटीत वडील कल्याण काळे यांचा मृत्यू‎झाला. या घटनेचा कोणालाही पत्ता लागू नये‎म्हणून रामने घरातच खड्डा खोदून वडिलांचा‎मृतदेह पुरला. कल्याण काळे यांच्या पत्नीचा‎मानसिक तोल ढासळल्याने तिच्याकडूनही ही‎माहिती बाहेर आली नाही. दरम्यान, मृतदेह‎कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. ग्रामस्थांनी‎दिलेल्या माहितीवरून पाचोड पोलिस ठाण्याचे‎सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांनी‎पथकासह घटनास्थळी धाव घेतली.‎ महसूल विभाग आणि फॉरेन्सिक पथकाच्या‎उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून‎पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी राम‎काळे (२८) याला ताब्यात घेतले.‎पाेलिसांनी चाैकशी केली असता वडील मद्य‎प्राशन करून आले व वाद घालीत हाेते.‎त्यामुळे लाथाबुक्क्यांनी मारहाणा केली,‎यातच वडिलांचा मृत्यू झाला, अशी कबुली‎त्याने पाचोड पाेलिसांना दिली.‎ नातवाच्या मारहाणीत आजीचा मृत्यू‎ केज ‎| नातवाने काठीने केलेल्या‎‎मारहाणीत गंभीर‎‎जखमी झालेल्या‎‎६८ वर्षीय‎‎आजीचा‎‎उपचारादरम्यान‎‎मृत्यू झाला. ही‎घटना सोनीजवळा (ता. केज) येथे‎घडली. युसूफवडगाव पोलिसांनी‎नातवाला ताब्यात घेतले आहे.‎सोनीजवळा (ता. केज) येथे‎रामदास पांडुरंग गवळी (२८) याने‎त्याची आजी पंचफुला रामकिसन‎गवळी (६८) यांना १५ नोव्हेंबर रोजी‎काठीने मारहाण केली. त्यात‎पंचफुला गवळी गंभीर जखमी‎झाल्या होत्या.२१ नोव्हेंबर रोजी‎उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎ मृताने भोगली शिक्षा‎ कल्याण काळे यांना पंधरा वर्षांपूर्वी‎महिलेवरील अत्याचार प्रकरणात‎शिक्षा झाली होती. ते तुरुंगवास‎भोगून बाहेर आलेले होते.‎

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:02 am

मतदार यादीच्या घोळावर एकत्र येता, मग निवडणुकीत मनसे का नको?:शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस नेत्यांना थेट सवाल

मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीतून अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली. मतदार यादीच्या घोळावर एकत्र येता, मग निवडणुकीत मनसे का नको, असा सवालही राष्ट्रवादीने काँग्रेससमोर उपस्थित केला आहे. पक्षनेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांनी केवळ काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) इतकेच नव्हे, तर डावे पक्ष तसेच आंबेडकर, खरात व जानकरांसारख्या आंबेडकरवादी पक्षांसोबत आघाडीचा आग्रह केला. मनसेसोबत आघाडीवरून काँग्रेसमध्ये दुफळी महापालिका निवडणुकीत मनसेशी युती करण्यावरून काँग्रेसमध्ये दुफळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील नेते विजय वडेट्टीवार यांनी एकत्र निवडणूक लढण्याला अनुकूलता दर्शविली. दुसरीकडे, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई काँग्रेसने आधीच स्पष्ट केले आहे की काँग्रेस कधीही कायदा हातात घेणाऱ्या आणि इतरांना धमकावणाऱ्या लोकांशी हातमिळवणी करणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 6:56 am

ज्यांचा मृत्यू, तेच आरोपी; काँट्रॅक्टरला अभय:सिडको, नक्षत्रवाडी, देवळाई, बिडकीनमधील जलवाहिनीच्या खड्ड्यात 2 वर्षांत चौघांचे गेले बळी

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २७०० कोटी रुपयांतून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या नाल्या, खड्ड्यांमध्ये पडून दोन वर्षांत चार जणांचे मृत्यू झाले. ठेकेदाराने कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे हे मृत्यू झाले. मात्र, असे असले तरी यापैकी दोन घटनांत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावरच निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. एका घटनेत सबकाँट्रॅक्टर तर दुसऱ्या घटनेत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या चारही घटनांमध्ये ठेकेदार कंपनीला अलगदपणे वाचवले आहे. घटना १ : खोल नाली, त्यात होते पाणी २६ सप्टेंबर २०२३ : बिडकीनजवळ नालीत पडून हबीब तय्यब हबीब कादर यांचा मृत्यू झाला. नालीत पाणी होते. नालीला बॅरिकेडिंग केलेले नव्हते. तरीही याप्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात मृत व्यक्तीवरच निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके म्हणाले, मी इथे रुजू होण्यापूर्वीचा हा गुन्हा आहे. त्याबद्दल अधिक सांगता येणार नाही. घटना २ : दुचाकीचालक भावावर गुन्हा २६ जानेवारी २०२३ : शेख मेहराज शेख इसाक हे भावासोबत दुचाकीवरून जात असताना नक्षत्रवाडीजवळ नालीत पडले. यात मोबीन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ शेख मेहराज याच्याविरुद्ध चिकलठाणा ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल झाला. याबाबत चिकलठाणा ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनीही सांगितले, हा गुन्हा मी इथे रुजू होण्यापूर्वीचा आहे, मला माहिती नाही. घटना ३ : मूळ ठेकेदाराला वगळले ३१ ऑगस्ट २०२४ : सिडकोत ६० फूट खोल खड्ड्यात पडून राजू गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी एम.सिडको ठाण्यात सबकाँट्रॅक्टर पब्बा उपेंद्र गुप्ता व विशाल प्रकाश एडके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मूळ ठकेकेदार कंपनी जीव्हीपीआरला आरोपींच्या यादीतून वगळण्यात आले. याबाबत तपास अधिकारी जगन्नाथ मेनकुदळे म्हणाले, प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तींवरच गुन्हा दाखल केला आहे. घटना ४ : खड्ड्याभोवती बॅरिकेडिंग नव्हते ६ सप्टेंबर २०२५ : देवळाईत तीनवर्षीय ईश्वर संदीप भास्कर याचा खड्ड्यात पडून मृत्यू. चिकलठाणा पोलिस ठाण्यात एमजेपीचे अधिकारी, कंत्राटदार जीव्हीपीआरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांना अजूनही आरोपींचे नाव, गाव माहिती नाही. याबाबत पीआय रविकिरण दरवडे म्हणाले, तपास सुरू आहे. तपासात आरोपी निष्पन्न होतील. ही सामूहिक जबाबदारी कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे सामान्य नागरिकांचे मृत्यू झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. काम देणारी आणि काम करणाऱ्या एजन्सीच्या व्यवस्थापनातील व्यक्तींचा आरोपींमध्ये समावेश असावा. कारण ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्यावर बीएनएसमधील कलम १०५ नुसार गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते. ॲड. अभयसिंह भोसले, हायकोर्ट,​​​​​​​ दुर्घटनेपूर्वीच कल्पना दिली देवळाईतील जलवाहिनीच्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्या घटनेच्या आधीच आम्ही जीव्हीपीआरसह एमजेपीलाही संबंधित खड्ड्याला बॅरिकेडिंग नसल्याचे कळवले होते. ठेकेदारांनी काळजी घेतली नाही. - किरण चौधरी, चॉइस कन्सल्टन्सी

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 6:52 am

संभाजीनगर परिसरातमादी बिबट्याचा वावर:शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न, थाेडक्यात बचावला

तांदुळवाडी मांडवा (ता. गंगापूर) परिसरात शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने बिबट्या पळाला. वाळूज गावाजवळील तांदुळवाडी मांडवा येथील शिंदे वस्ती भागातील संदीप पुरुषोत्तम विधाते (३८) हे शुक्रवारी शेतात पाणी देण्यासाठी गेले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप मारली. बिबट्याची झडप हुकल्याने विधातेंना पळ काढता आला. या परिसरात गेल्या २ महिन्यांपासून मादी बिबट्या आणि तिच्या दोन बछड्यांचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याने २ महिन्यांत दोघांवर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. मांडवा गावात काळे वस्ती परिसरात २ महिन्यांपूर्वी प्रशांत इंगळे व सुदाम घाटे हे दुचाकीवरून जात असताना बिबट्याने त्यांचा पाठलाग केला होता. बिबट्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी प्रशांत इंगळे, रमेश बारे व ग्रामस्थांनी केली. पालघरला बिबट्याशी दप्तराची ढाल करून लढला ११ वर्षीय मयंक मुंबई | बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र, ११ वर्षीय मयंकसाठी शाळेचे दप्तरच ढाल बनले. त्याने दप्तराने बिबट्याचा प्रतिकार केला, तर त्याच्या मित्रानेही धैर्याने बिबट्यावर दगडांचा मारा केला. त्यामुळे दप्तराचे ‘ओझे’ अर्थात मार बिबट्याला सहन झाला नाही आणि त्याने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा किरकोळ जखमी झाला. पालघर जिल्हयातील विक्रमगड तालुक्यातील माळा पाडवीपाडा येथील ११ वर्षीय मयंक विष्णु कुवरा हा गावापासून ४ किमीवरील उटावली आदर्श विद्यालयात पाचवी इयत्तेत शिकतो. शाळेचा रस्ता जंगलाचा आहे. शुक्रवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर तो आणि त्याचा मित्र पाडवीपाडा येथे पायी जात असताना अचानक बिबट्याने मयंकवर झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्याने मयंकने जिवाच्या अंकाताने आरडाओरड सुरू केली. बिबट्याच्या पंजाचा पहिला वार दप्तरावर झाल्याने मयंकला सावरण्यास वेळ मिळाला. त्याने दप्तराने बिबट्याचा प्रतिकार सुरू केला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रानेही हिंमतीने बिबट्यावर दगड भिरकावले. दोन्ही मुलांचा आवाज ऐकून काही नागरिक धावत आले. त्यामुळे बिबट्या क्षणार्धात जंगलात पसार झाला. बिबट्याची झडप थेट त्याच्या दप्तरावर बसल्याने त्याचा जीव थोडक्यात वाचला. मात्र पंजांचे दुसरे वार हातावर बसल्याने मयंकच्या हाताला खोल जखमा झाल्या. त्यावर टाके घातले. जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुलांच्या धाडसाचे कौतुक दोन चिमुरड्यांच्या धाडसी प्रतिकारामुळे मोठी दुर्घटना टळली. मयंकचे शाळेचे दप्तरच त्याच्यासाठी ‘कवच’ ठरले. सध्या राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांची मालिका सुरू असून अनेक ठिकाणी मृत्यूच्या व जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत दोन मुलांनी दाखवलेल्या शौर्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. शाळांच्या वेळा बदलण्यासाठी पत्रव्यवहार कांचदचे वनक्षेत्रपाल स्वप्निल मोहिते यांनी सांगितले की, गावकऱ्यांना सावध करण्यासाठी लाऊड स्पीकरद्वारे आवाहन केले जात आहे. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी AI सक्षम कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. बिबट्या-प्रवण भागातील शाळा संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवाव्यात, या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 6:47 am

उमर्टी गावात गावठी पिस्तुलांचे 50 अवैध कारखाने उद्ध्वस्त:पुणे- मध्य प्रदेशातील 205 पोलिसांचा संयुक्त छापा

पुणे पोलिसांनी शनिवारी मध्य प्रदेशातील उमर्टी गावात छापे मारत आंतरराज्यीय अवैध शस्त्र पुरवठा करणारे ५० कारखाने उद्ध्वस्त केले. गत काही दिवसांत गुन्हेगारांकडे सापडलेल्या शस्त्रांवर ‘यूएसए’ असा शिक्का होता. याचा खोलवर तपास केला असता उमर्टी येथील अवैध शस्त्र कारखान्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी ‘ऑपरेशन उमर्टी’ राबवले. या गावातूनच महाराष्ट्र व इतर राज्यात दलालांमार्फत बेकायदा शस्त्र पुरवठा होतो. ही शस्त्रे जळगाव, धुळेमार्गे महाराष्ट्रात दुचाकी किंवा चारचाकीतून आणली जातात. पुणे शहरात गत २ वर्षांत गुन्हेगारीसाठी वापरलेली बहुतांश शस्त्रे (गावठी कट्टे) ‘मेक इन यूएसए’ म्हणजेच ‘उमर्टी शिकलगार आर्म्स’ येथे तयार झालेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी तब्बल तीन आठवडे तयारी करुन या गावात छापा टाकला. छाप्यावेळी गावाने एकत्र येऊन पोलीस पथकाला विरोध केला होता. मात्र शीघ्र कृती दल, अश्रुधुर पथक आणि मध्य प्रदेश एटीएसचे पथक असल्याने कारवाई पूर्ण करता आली. कारवाईत ३६ संशयितांना ताब्यात घेतले. जवळपास ५० कारखाने नष्ट करण्यात आले. शिवाय २१ पिस्तुलांसह शस्त्र निर्मितीसाठीचा साहित्यही जप्त केले. उमरठी गाव गेल्या दोन तीन दशकांपासून अवैध शस्त्रनिर्मितीसाठी चर्चेत आहे. येथे विशिष्ट प्रकारचे बॅरल, पाईप, मँगझीन स्प्रींग आदी साहित्य विविध ठिकाणावरुन गाेळा करुन मागणीनुसार शस्त्र निर्मिती केली जाते. लेथ मशीनवर तसेच हाताने घासून परंपरागत शस्त्र बनवली जातात. ऑर्डर मिळताच ५ ते ६ तासात शस्त्र तयार होऊन १५ ते २० हजार रुपयांत ती केवळ ओळखीच्या व्यक्तींला दिले जात होते. मोहोळ ते आंदेकर खून प्रकरणांचा आढावा घेणार पुण्यात मागील दोन ते तीन वर्षातील खूनाच्या गुन्हयांचा तसेच गोळीबाराच्या घटनांचा आढावा घेण्यात येणार आहे. यासाठी वापरलेली शस्त्रे ‘मेड इन यूएसए’ असतील तर त्याची चौकशी होईल. नक्षलविरोधी मोहिमेप्रमाणे राबवले ‘ऑपरेशन उमर्टी’ मंगेश फल्ले. पुणे | विमानतळ पाेलिस ठाणे हद्दीत पुणे पाेलीसांनी काेम्बिग ऑपरेशनदरम्यान एका शस्त्रविक्रेत्या आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून एकूण ११ शस्त्रे जप्त केली. यादरम्यान विविध कारवायांत आणखी २१ पिस्तुले जप्त केली गेली. या गुन्ह्यांचे धागेदोरे उमर्टीमधील आंतरराज्यीय तस्करीशी जुळल्याचे निष्पन्न होताच पाेलिसांनी ‘ऑपरेशन उमर्टी’ हाती घेतले. नक्षलग्रस्त भागातील अनुभवी परिमंडळ चारचे पाेलिस उपायुक्त साेमय मुंडे यांच्या नेतृत्वात पोलिस पथक कारवाईसाठी तीन दिवसांपूर्वी रवाना झाले. ड्राेनने सुरुवातीला गावाची पाहणी केली. साेबत वायरलेस युनिटने माेबाइल जॅमर लावले. एकाच वेळी गावाला वेढा घालत छापा मारला. नक्षलविरोधी मोहिमांच्या धर्तीवर ही कारवाई केली. कारवाईत माेबाइल सर्व्हेलन्स व्हेइकल्स, तात्पुरते वायरलेस नेटवर्क, बुलेटप्रूफ जॅकेट, बाॅडी वाॅर्न कॅमेरे, ड्राेन, बीडीडीएस पथक, श्वानपथकही सोबत होते. इन्स्टा व मेसेंजरने शस्त्रांची ऑर्डर गुन्हेगारांना कारागृहातील इतर कैद्यांकडून उमर्टीतील शस्त्रनिर्मितीची माहिती मिळते. ओळखीतून एक दोनदा व्यवहार होतो.खात्री पटली तरच गुन्हेगारांना उमर्टी गावात प्रवेश मिळतो. इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक मेसेंजर, इंटरनेट कॉलिंगद्वारे शस्त्रांच्या ऑर्डर घेतात. दुचाकीवरून शस्त्रांची तस्करी होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 6:45 am

अणदूरजवळ अपघात, ३ ठार, १२ जखमी

देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला सोलापूर/अणदूर : प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ६५ वर नॅशनल ढाब्याशेजारी शनिवारी (दि. २२) दुपारी १२ च्या सुमारास क्रुझरचे (एमएच २४ व्ही ४९४८) टायर फुटून झालेल्या अपघातात ३ महिला ठार तर १२ जण जखमी झाले आहेत. ही क्रुझर गाडी उळे कासेगाव येथून बोरामणी मार्गे अणदूर व नळदुर्ग […] The post अणदूरजवळ अपघात, ३ ठार, १२ जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:49 am

वॉर्ड क्रमांक १, ३ व ९ मध्ये काँग्रेस उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या भेटी

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगरअध्यक्ष पदासह सर्व वॉर्डातून चारिर्त्य संपन्न व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार दिले आहेत. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी वार्ड क्रमांक १ मधील उमेदवार काळे प्रदीप सुधाकर, वॉर्ड क्रमांक ३ मधील उमेदवार अकनगिरे पूजा प्रशांत, वॉर्ड क्रमांक ९ मधील उमेदवार पठाण यास्मिन रहीमखॉ […] The post वॉर्ड क्रमांक १, ३ व ९ मध्ये काँग्रेस उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या भेटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:48 am

सर्वांना सोबत घेऊन जाणा-यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी

औसा : प्रतिनिधी सर्व जातीधर्माना सोबत घेऊन चालणा-या नेतृत्वास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी असते. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष असून सर्वानी येणा-या निवडणूकीत विकासाला साथ द्यावी असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या सभेस राज्याचे सहकार मंत्री […] The post सर्वांना सोबत घेऊन जाणा-यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:47 am

जगातील टॉप १०० शहरांत लंडन अव्वल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील टॉप १०० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत यावेळी लंडन शहराने पहिले स्थान पटकावले. शहरामध्ये राहणा-या नागरिकांचे रहाणीमान, तेथील पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी या आधारावर ही यादी तयार करण्यात आली. विशेष म्हणजे सलग ११ व्या वेळी या यादीत लंडन शहराने पहिले स्थान पटकावले. लंडन हे शहर जगभरातील […] The post जगातील टॉप १०० शहरांत लंडन अव्वल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:45 am

न्या. सूर्यकांत ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार

सात देशांचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था न्यायमूर्ती सूर्यकांत २४ नोव्हेंबर रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात होणा-या या शपथविधी समारंभात ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. न्या. सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरन्यायाधीशाच्या […] The post न्या. सूर्यकांत ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:43 am

पवारांचा ठाकरे गटाशी चर्चेचा निर्णय

आघाडीबाबत हालचाली, मनसेला सोबत घेण्याची तयारी मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आजच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीत युतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा मनसे सोबतदेखील युती करण्यास हरकत नाही, अशी एकंदर भूमिका राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत मांडण्यात आली. एकीकडे कॉंग्रेसने […] The post पवारांचा ठाकरे गटाशी चर्चेचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:40 am

पाकमधून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र तस्करी!

दिल्ली पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानचा आणखी एक कट उधळून लावला आहे. दिल्लीच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित एक मोठ्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी टोळीचा पर्दाफाश केला असून, पाकिस्तानातून भारतात पाठविण्यात आलेला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला. पाकिस्तानमधून अत्याधुनिक शस्त्रे ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठविण्यात आली होती. कुख्यात गुंडांना शस्त्रे पुरविणा-या […] The post पाकमधून ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र तस्करी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:38 am

ड्रग्ज-अतिरेकी साखळीशी लढ्याचा मोदींचा प्रस्ताव

जी-२० परिषदेत जागतिक मापदंडाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या द. आफ्रिका दौ-यावर असून, द. आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात आजपासून जी-२० शिखर परिषद सुरू झाली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. दोन दिवस ही परिषद चालणार आहे. या परिषदेला अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांनी हजेरी लावली असून, आज पंतप्रधान मोदी यांनी […] The post ड्रग्ज-अतिरेकी साखळीशी लढ्याचा मोदींचा प्रस्ताव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 12:31 am

रेणापूर नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची जोरदार चर्चा

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारांमुळे मतदारांतून कॉंग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जात आहे. मागील काळात सत्तेवर असूनही रेणापूरचा कसलाही विकास झालेला नाही, त्यांच्या कार्यकाळात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने यावेळी स्वच्छ प्रतिमा असलेला […] The post रेणापूर नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या प्रचाराची जोरदार चर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 10:47 pm

बाभळगावचे ग्रामसेवक भोसले यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार बाभळगाव येथील ग्रामसेवक शंकर उद्धवराव भोसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल बाभळगाव निवासस्थानी भोसले यांचे माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बाभळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांसह लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उमेश बेद्रे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे […] The post बाभळगावचे ग्रामसेवक भोसले यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 10:32 pm

इंडियन डेंटल असोसिएशन लातूर शाखेचा ‘उत्कृष्ट दंत शाखा’ गौरव

लातूर : प्रतिनिधी इंडियन डेंटल असोसिएशन लातूर शाखेने २०२४-२५ मध्ये अनेक उत्कृष्ट उपक्रम राबविले होते. त्याची दखल घेत या शाखेला ‘उत्कृष्ट दंत शाखा’ म्हणून गौरविण्यात आले. इंडियन डेंटल असोसिएशन लातूर शाखेने व्हीसीडीई कार्यक्रम, १९ सामाजिक दंत आरोग्य उपक्रम ज्यामध्ये विशेष उल्लेख १० हजार स्माईल जेथे एकाच दिवसात तब्बल १० हजार विद्यार्थ्यांची दंत तपासणी व मार्गदर्शन […] The post इंडियन डेंटल असोसिएशन लातूर शाखेचा ‘उत्कृष्ट दंत शाखा’ गौरव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 10:31 pm

खोटा गुन्हा नोंद करणा-या पोलिस अधिका-यांसह इतरांवर गुन्हे दाखल करा

लातूर : प्रतिनिधी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणा-या महावितरणच्या मुख्य अभियंत्यासह पोलीस निरीक्षक समाधान चावरे, पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक श्रीकर त्र्यंबकराव फड यांनी शनिवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केली. आपल्या स्वत:च्या कमर्शियल जागेतील कालबा झालेली कमकुवत विद्युत […] The post खोटा गुन्हा नोंद करणा-या पोलिस अधिका-यांसह इतरांवर गुन्हे दाखल करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 10:27 pm

आमदार अमित देशमुख यांचा नागरिकांशी संवाद

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहर व जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आलेल्या नागरिकांच्या अडीअडचणी […] The post आमदार अमित देशमुख यांचा नागरिकांशी संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 10:25 pm

शिरूर अनंतपाळच्या लौकिकाला साजेसे संमेलन व्हावे

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ येथील रसिकता व सांस्कृतिक वैभवात भर पडत असून जिल्हा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या लौकिकात भर पडेल असा आशावाद चौथ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केला. श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या वतीने घेण्यात येणा-या जिल्हा साहित्य संमेलनाच्या संदर्भाने आयोजित बैठकीत ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एल.बी.आवाळे […] The post शिरूर अनंतपाळच्या लौकिकाला साजेसे संमेलन व्हावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 10:24 pm

भाजपच्या दुटप्पी हिंदुत्वाचा मुखवटा फाडण्यासाठी शिवसेना आक्रमक:पालघर हत्याकांड, ड्रग्ज तस्कर उमेदवारीवरून पुणे शहरात आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) दुटप्पी हिंदुत्वाचा मुखवटा फाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराच्या वतीने शनिवारी सारसबाग सिग्नल चौकातील स्वा. सावरकर स्मारकाजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. पालघर साधू हत्याकांडातील आरोपी काशिनाथ चौधरी याला भाजपने पक्षात प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या विनोद गंगणे याला तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून उमेदवारी दिल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीपुरती मुस्लिम टोपी घालणाऱ्या आशिष शेलार यांच्या 'खोट्या आणि बेगडी हिंदुत्वाचा' बुरखा आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी फाडला. हे आंदोलन भाजपच्या प्रायोजित पाखंडी हिंदुत्वाला दिलेले सडेतोड प्रत्युत्तर असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. आंदोलनादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, सारसबाग सिग्नल चौक येथील बिकट स्थिती समोर आली. गेल्या अनेक दिवसांपासून पुतळ्याची दुरवस्था असून, प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. शिवसैनिकांनी पुढाकार घेत पुतळ्याची स्वच्छता केली, पाण्याने अभिषेक केला आणि सावरकरांच्या चरणी दुग्धाभिषेक करून हिंदुत्वनिष्ठ भावना व्यक्त केली. राज्यातील सत्ताधारी भाजप-शिंदे सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा केवळ अहवाल देणारे असून, त्यांच्या हिंदुत्वाला केवळ राजकारणासाठी वापरते, असे मत शिवसैनिकांनी व्यक्त केले. हिंदुत्वाचा वारसा जपण्याऐवजी समाजात फूट पाडण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप करत, आंदोलनातून 'स्वा. सावरकर आम्हाला माफ करा' अशी भावनिक गर्जना करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात माजी नगरसेवक अशोक हरणावळ, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, संघटक राजेंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव मकरंद पेटकर, महिला आघाडीच्या उपशहर संघटिका अमृत पठारे, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, संदीप गायकवाड, विलास सोनावणे, शशिकांत पापळ, संतोष भुतकर, दीलीप पोमण, रोहीत गलांडे, गणेश घोलप, राहुल आलमखाने, रोहित लगाडे, नागेश खडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 9:14 pm

मतदार यादीतील त्रुटी 27 नोव्हेंबरपर्यंत कळवा; ऑनलाईन नाव शोधण्याची सुविधा:राज्य निवडणूक आयोगाची सूचना; चुका दुरुस्त करण्यासाठी आवाहन

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार यादीची प्रक्रिया वेगाने सुरू असून, संबंधित मतदारांनी आपल्या नावाविषयी काही हरकती किंवा तक्रारी असल्यास त्या 27 नोव्हेंबर 2025 पर्यंत महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, त्यामध्ये होऊ शकणाऱ्या चुका त्वरित दुरुस्त करण्यासाठी आयोगाने जनजागृती सुरू केली आहे. या प्रक्रियेचा थेट संबंध निवडणूक व्यवस्थेच्या पारदर्शकतेशी असल्याने नागरिकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. महानगरपालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार याद्याच महानगरपालिका निवडणुकांसाठी मूळ आधार मानल्या जाणार आहेत. या याद्या भारत निवडणूक आयोगाने तयार केल्या असून, त्यांचे प्रभागनिहाय विभाजन स्थानिक महानगरपालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वजनिक करण्यात आल्या असून, प्रत्येक प्रभागातील मतदार आपले नाव ऑनलाईन तपासू शकतात. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecvoterlist.in/ObjectionOnClick/SearchName ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे किंवा मतदारांचे पत्ते दुरुस्त करणे यासारखी कार्यवाही या टप्प्यात केली जात नाही. हे काम केवळ भारत निवडणूक आयोगाच्या नियमित अद्ययावत प्रक्रियेतच केले जाते. महानगरपालिका स्तरावर केवळ विधानसभेच्या याद्यांवर आधारित प्रभागनिहाय विभागणी केली जाते. त्यामुळे नागरिकांनी या प्रक्रियेतील मर्यादा समजून घेत हरकती केवळ प्रभागनिहाय विभागणीतील चुका किंवा चुकीच्या नावांच्या स्थानांतरांसंदर्भातच कराव्यात, असे आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. महानगरपालिकेत स्वतंत्र काऊंटर व अधिकारी नेमण्याचे निर्देश अनेकदा लेखनिकांकडून झालेल्या तांत्रिक किंवा टायपिंगच्या चुकांमुळे मतदाराचे नाव चुकीच्या प्रभागात दिसणे, विधानसभेच्या यादीत असूनही प्रभागात न दिसणे किंवा घर क्रमांकाच्या आधारे प्रभाग बदलण्यात गफलत होणे असे प्रकार आढळून येतात. अशा स्वरूपाच्या चुकांबाबत संबंधित महानगरपालिकेत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. आयोगाने यासाठी स्वतंत्र काऊंटर व अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी वेळेत तक्रार केल्यास निवडणूकपूर्व काळात याबाबत आवश्यक दुरुस्ती केली जाईल. 27 नोव्हेंबरपूर्वी महानगरपालिकेत हरकत दाखल करावी मतदार यादी ही निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची कडी मानली जाते आणि त्यात नाव नसल्यास नागरिकांना मतदानाचा हक्क बजावणे अशक्य होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव, पत्ता आणि प्रभाग तपासावा. काही विसंगती आढळल्यास 27 नोव्हेंबरपूर्वी महानगरपालिकेत हरकत दाखल करावी. आयोगाने माहिती मिळवण्यासाठी ऑनलाईन सेवा, हेल्पलाइन तसेच संबंधित कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, मतदारांनी सक्रियपणे सहभाग घेणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक बाब असल्याचा संदेशही आयोगाने दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 7:35 pm

खोलमारा शिवारातील विहिरीत पडलेल्या बिबट्याची थरारक सुटका:वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; नैसर्गिक अधिवासात मुक्त

वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मौजा खोलमारा येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढले. शनिवारी (दि. २२ नोव्हेंबर) सकाळी ही घटना उघडकीस आली. वनविभागाच्या तत्परतेमुळे बिबट्याला जीवदान मिळाले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार नियतक्षेत्र दांडेगाव अंतर्गत येणाऱ्या मौजा खोलमारा येथील शेतकरी ईश्वर भिवाजी डोये यांचे खासगी गट क्रमांक १५ व १६ मध्ये शेत आहे. आज (दि. २२) सकाळी डोये हे आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटारपंप सुरू करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना आतमध्ये बिबट्या पडलेला असल्याचे दिसून आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ या घटनेची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. कोणताही मानवी-वन्यप्राणी संघर्ष उद्भवू नये, यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जमावाला नियंत्रित करत सुरक्षिततेच्या सूचना दिल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक (भंडारा) आणि सहाय्यक वनसंरक्षक (साकोली) यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी वन्यप्राणी बचाव दल (शीघ्र कृती दल), भंडारा आणि च्या चमुला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने घटनास्थळाची पाहणी करून विहिरीत जाळी सोडून बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याला बाहेर काढल्यानंतर साकोलीचे पशुधन विकास अधिकारी मेघराज तुलावी यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली. बिबट्या शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचा अहवाल मिळताच, त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभागाच्या यांच्या प्रयत्नांना आले यश हे संपूर्ण बचाव कार्य उपवनसंरक्षक (भंडारा) योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत सहाय्यक वनसंरक्षक (साकोली) संजय मेंढे, सहाय्यक वनसंरक्षक (भंडारा) सचिन निलख, गडेगाव आगारचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी रितेश भोंगाडे, लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. चन्ने, अड्याळचे वनपरिक्षेत्र अधिकारी महाजन, जीवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर तसेच वाहन चालक व प्रमुख वन्यप्राणी बचाव दल (भंडारा) अनिल शेळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच क्षेत्र सहाय्यक आय. एम. सैय्यद (दिघोरी), घोडेकर (लाखांदूर), मनोज चौधरी (पिंपळगाव को.), लाखांदूर वनक्षेत्रातील सर्व वनरक्षक, वनकर्मचारी, गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 7:25 pm

महारेराचे विकासकाला आदेश:सदनिकेतील गळती, अन्य दोष 30 दिवसांत दुरुस्त करा; भविष्यात तक्रार येणार नाही, याचीही काळजी घेण्याचे निर्देश

सदनिकेतील गळती आणि इतर दोषांबाबत दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करताना 'महारेरा'ने विकासकाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 'महारेरा'ने व्ही. आर. कुलकर्णी असोसिएट्स आणि एस. आर. कुलकर्णी डेव्हलपर्स या बांधकाम कंपनीला ३० दिवसांच्या आत सदनिकेतील सर्व दोष दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात यासंदर्भात कोणतीही तक्रार येणार नाही, याची काळजी घेण्यासही 'महारेरा'ने सांगितले आहे. पुण्यातील तळजाई परिसरातील 'मेघदूत टॉवर कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी'चे माजी अध्यक्ष आणि वकील ॲड. अमित शहा यांनी ही तक्रार 'महारेरा'कडे दाखल केली होती. ॲड. शहा यांच्या सदनिकेत दोन वर्षांपूर्वीच खरेदी केल्यानंतर गळती आणि बांधकामाचा दर्जा दुय्यम असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी विकासकाकडे दुरुस्तीची मागणी केली होती, मात्र विकासकाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे ॲड शहा यांनी 'महारेरा'कडे धाव घेतली. त्यांनी दुय्यम बांधकाम, गळती, अर्धवट सुविधा (अमेनिटीज) यांचे फोटो पुरावा म्हणून सादर केले. लिफ्ट, त्यासाठी आवश्यक बॅकअप, ट्रान्सफॉर्मर्स, लिफ्टमधील कॅमेरे, क्लब हाऊस, जिम आणि स्विमिंग पूल यांसारख्या अनेक सदोष गोष्टी त्यांनी 'महारेरा'च्या निदर्शनास आणून दिल्या. 'महारेरा'ने ॲड शहा यांनी अधोरेखित केलेल्या सर्व गोष्टींची दखल घेतली. त्यानुसार, विकासकाला येत्या ३० दिवसांत सदनिकेतील सर्व अडचणी सोडवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. ॲड. अमित शहा यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, दोन्ही विकासकांना तोंडी आणि लेखी स्वरूपात अनेकदा विनंतीपत्र दिले होते, पण त्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे न्यायासाठी 'महारेरा' प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली. 'महारेरा'ने माझे म्हणणे ऐकून घेत माझ्या सदनिकेतील गळती आणि दोष दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. मला काही प्रमाणात न्याय मिळाल्याचे समाधान आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 7:16 pm

पुण्याच्या तीन नवसंशोधनांना इन्फोसिस आरोहण पुरस्कार:'बोरचार्जर'ला 50 लाखांचे पारितोषिक, एकूण सव्वातीन कोटींचे बक्षीस वितरण

इन्फोसिस फाउंडेशनने आपल्या 'आरोहण सोशल इनोव्हेशन अवॉर्ड्स'च्या चौथ्या आवृत्तीचे विजेते जाहीर केले आहेत. शिक्षण, आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय शाश्वतता या तीन क्षेत्रांतील उल्लेखनीय नवसंशोधनांना प्रत्येकी ५० लाख रुपये, तर पाच विशेष ज्युरी पुरस्कारांना प्रत्येकी १० लाख रुपये असे एकूण सव्वातीन कोटी रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यंदा २ हजार हून अधिक अर्जांमधून विजेते निवडले गेले. पर्यावरणीय शाश्वतता श्रेणीतील ५० लाखांचा मुख्य पुरस्कार पुण्यातील राहुल सुरेश बाकरे आणि विनित मोरेश्वर फडणीस यांनी विकसित केलेल्या 'बोरचार्जर' या जगातील पहिल्या रोबोटिक बोअरवेल-रिचार्ज तंत्रज्ञानाला मिळाला. हे यंत्र विद्यमान बोअरवेलमध्ये दरवर्षी ४ ते ८० लाख लिटर पावसाचे पाणी स्वच्छ करून साठवते. यामुळे शेतकऱ्यांचे सिंचन, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आणि उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. शिक्षण श्रेणीचा ५० लाखांचा पुरस्कार बंगळुरूच्या राजेश ए राव, रवींद्र एस राव आणि दीपा एल बी राजीव यांच्या 'कनेक्टिंग द डॉट्स' या कार्यक्रमाला मिळाला. हा कार्यक्रम सरकारी शाळांतील ६वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह क्लास, लॅब किट आणि शिक्षक प्रशिक्षण देतो. आरोग्यसेवा श्रेणीचा पुरस्कार दिल्लीच्या चितरंजन सिंह आणि रॉबिन सिंह यांच्या 'क्लुइक्स सीओ१२' या पोर्टेबल एआय-आयओटी आधारित पाणी-गुणवत्ता विश्लेषकाला मिळाला, जो ३० मिनिटांत १४ महत्त्वाच्या पॅरामीटर्सची चाचणी करून पाण्याजन्य रोग ओळखतो. ज्युरी विशेष पुरस्कारांमध्ये (प्रत्येकी १० लाख रुपये) पुण्यातील तीन नवसंशोधनांचा समावेश आहे. यात फाल्गुन मुकेश व्यास यांचा 'सुकून' स्मार्ट जॅकेट (प्रचंड उष्णतेत थंडावा देऊन आरोग्य व उत्पादकता वाढवणारे), नेहा पंचमिया व नचिकेत उत्पात यांचा 'व्यापक वन्यजीव व्यवस्थापन प्लॅटफॉर्म' (वन हेल्थ फ्रेमवर्कवर आधारित बचाव-उपचार डेटा व्यवस्थापन) आणि सौम्या एस व पल्लवी कुलकर्णी यांचा 'प्रोजेक्ट बिंदू' (अपंगांसाठी दूरस्थ रोजगार व आर्थिक स्वातंत्र्य देणारा उपक्रम) यांचा समावेश आहे. इतर दोन विशेष पुरस्कार वडोदरा येथील 'सर्व्हिचेक' (घरगुती एचपीव्ही स्क्रीनिंग किट) आणि बंगळुरू येथील 'हेक्सिस आणि आयरिस' (दृष्टिहीनांसाठी एकात्मिक ब्रेल शिक्षण परिसंस्था) यांना प्रदान करण्यात आले. इन्फोसिस फाउंडेशनचे अध्यक्ष सलील पारेख म्हणाले, “उद्देशपूर्ण नवसंशोधनात जीवन बदलण्याची ताकद आहे. या पुरस्कारांमधून आम्ही तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि करुणा यांच्याशी समाजाला जोडणाऱ्या संशोधकांना प्रेरणा व पाठबळ देत आहोत.”

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 7:12 pm

अप्पा महाराजांना भाविकांचा अखेरचा निरोप:रेणुका माता मंदिर परिसरात भाविकांचा ओघ; आध्यात्मिक जगतात दुःखाची छाया

शहरातील बीड बायपासवरील श्री हरिहर सद्गुरू शक्तिपीठ, रेणुका माता मंदिराचे शक्तिपीठाधीश सद्गुरू अप्पा महाराज यांचे वयाच्या 68 व्या वर्षी निधन झाले. यांच्या निधनाने सातारा परिसरात आणि राज्यभरातील त्यांच्या अनुयायांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी दुपारी प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. महाराजांच्या निधनाची बातमी समजताच मोठ्या प्रमाणावर भाविकांनी साताऱ्याकडे धाव घेतली. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात अपार ओढ घेऊन भाविक अंतिम दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचे दृश्य दिवसभर पाहायला मिळाले. अप्पा महाराजांचे पार्थिव रेणुका माता मंदिर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सकाळपासूनच अंतिम दर्शनासाठी लोकांची गर्दी उसळली होती. सातारा, नगर, पुणे, सोलापूर, मराठवाडा तसेच कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथूनही मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. मंदिर परिसरात अप्पा महाराज अमर रहो, जय रेणुका माताच्या जयघोषात महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. खासदार, आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराजांच्या मोठ्या शिष्य परिवारानेही उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले. अध्यात्मिक वारशाचा प्रसार केला सद्गुरू अप्पा महाराज हे मूळचे सोनाई हंसतीर्थ येथील पूजनीय स्वामी अण्णा महाराज यांचे पुत्र होते. अण्णा महाराजांच्या निधनानंतर अप्पा महाराजांनी गादीची धुरा हाती घेत त्यांच्या अध्यात्मिक वारशाचा प्रसार केला. त्यांनी हरिहर सद्गुरू शक्तिपीठाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवले. दरवर्षी गुरुपौर्णिमेला आयोजित होणारा उत्सव हा हजारो भक्तांचा श्रद्धेचा सोहळा मानला जात असे. महाराजांच्या प्रवचनांना आणि मार्गदर्शनासाठी देश-विदेशातून भक्त मंडळी येत असत. त्यांच्या शांत, संयमी आणि ममत्वपूर्ण स्वभावामुळे ते सर्वांच्या जवळचे गुरु म्हणून ओळखले जात. स्वयंसेवकांच्या नियोजनामुळे अंतिम दर्शनाची व्यवस्था सुरळीत महाराजांच्या निधनानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, भाविकांचे दुःख शब्दात मावणारे नाही. अनेकांनी महाराजांनी दिलेल्या आशीर्वादाच्या, मार्गदर्शनाच्या आणि जीवनात बदल घडवून आणणाऱ्या प्रसंगांच्या आठवणी शेअर केल्या. मंदिर परिसरातील व्यापारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वत्र भावनिक वातावरण दिसून आले. प्रशासनाने मोठ्या गर्दीचा अंदाज घेत सुरक्षेची विशेष व्यवस्था केली आहे. वाहतूक नियंत्रण, पिण्याचे पाणी, प्राथमिक उपचार केंद्र, स्वयंसेवकांचे नियोजन यामुळे अंतिम दर्शनाची व्यवस्था सुरळीत पार पडत आहे. अध्यात्मिक क्षेत्रासाठी मोठी पोकळी महाराजांच्या पश्चात त्यांची पत्नी, अंबरीश महाराज, अनिरुद्ध महाराज ही दोन मुले, सुना, मुलगी मीनाक्षी, जावई, नातवंडे आणि मोठा शिष्यवर्ग असा परिवार आहे. संध्याकाळी अंत्ययात्रा निघाली आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराजांचे निधन हे अध्यात्मिक क्षेत्रासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे असल्याची भावना अनेक भक्तांनी व्यक्त केली आहे. मंदिरासमोरील प्रांगणात शांतीपाठानंतर त्यांच्या पार्थीवावर अंत्यविधी करण्यात आला. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाठ, खासदार डॉ. भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 6:31 pm

सिद्धोबाच्या जयघोषात म्हसवड रथोत्सव उत्साहात संपन्न:गुलाल आणि भक्तीच्या दरवळात म्हसवड नगरी रथोत्सवात रंगली

सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या रथोत्सवाचा महापर्व यंदाही अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरभर गुलालाचा वर्षाव, ढोल-ताशांचा गजर आणि सिद्धोबाच्या नावाने चांगभलं, या जयघोषाने संपूर्ण नगरी भक्तिरंगात न्हाऊन निघाली. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक रथोत्सवाला भव्यता प्रदान केली. दिवाळी पाडव्यानंतर सुरू झालेला एक महिन्याचा विवाह सोहळा रथोत्सवाच्या रूपाने संपन्न झाला आणि यानिमित्त भाविकांनी दर्शन घेतलं. ठरलेल्या मुहूर्तावर सालकरी परिवाराच्या घरातून वाजतगाजत उत्सवमूर्ती रथावर विराजमान करण्यात आल्या. मानाच्या सासन काठ्यांच्या भेटीनंतर रथाची मिरवणूक सुरुवात झाली. रथ ओढण्याचा आणि रथावर बसण्याचा मान परंपरेनुसार राजेमाने घराण्याचा असल्याने या कुटुंबातील सदस्यांनी उपस्थित राहून श्रींचे आशीर्वाद घेतले. प्रशासनातील अधिकारी, मान्यवर, तसेच पोलिस यंत्रणा यावेळी उपस्थित होती. रथ सुरू होताच गुलाल आणि खोबऱ्याची उधळण, निशाणे आणि नारळाच्या तोरणांची अर्पणे, तसेच पैशांच्या तोरणांनी भक्तांनी आपली श्रद्धा व्यक्त केली. रथ नगरप्रदक्षिणेला निघाल्यानंतर शहरातील मुख्य मार्ग भक्तांनी गजबजले, तर गुलालाच्या झोतात सारा परिसर लालेलाल झाला. यंदा माण नदीपात्रात पाणी असल्यामुळे रथोत्सवाचा मार्ग थोड्या बदलांसह पारंपरिक पद्धतीने पार पडला. बायपास रस्त्यातून नगरपरिषद, महात्मा फुले चौक, बसस्थानक असा प्रवास करत रथ सातारा–पंढरपूर रस्त्यावर पोहोचला. येथे श्री सिद्धनाथ यांच्या बहिणीस साडी-चोळीचा मानाचा आहेर देण्यात आला. याच ठिकाणी नवस फेडण्यासाठी अनेक भाविकांनी रथावरून मुलांना खाली टाकण्याची पारंपरिक प्रथा पार पाडली. पुढे वाघजाई ओढा आणि कन्या विद्यालय मार्गाने रथ मिरवणूक पुढे सरकत अखेरीस नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. भक्तांच्या जयघोषाने आणि भजनी-कीर्तनाच्या सूरांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. पर्यायी पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याने वाहतूक कोंडी कमी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने केलेल्या योजनांची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा झाली. शहराबाहेर पर्यायी पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. नगरपरिषदेने पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था केली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवत सुरक्षा लक्षात घेत गर्दीचे नियोजन केले. एस.टी. महामंडळाने कराड, वडूज, सोलापूर, आटपाडी, सातारा, विटा, अकलूज आदी आगारांतून जादा बसेस चालवल्यामुळे भाविकांना प्रवासात मोठी सोय झाली. यात्रेतील गर्दी असूनही सर्व व्यवहार सुरळीत पार पडल्याचे समाधान भाविकांनी व्यक्त केले. म्हसवडचा पारंपरिक रथोत्सव यशस्वीरीत्या संपन्न रिंगावण पेठ मैदानात यावेळी मोठी यात्रा भरली होती. यात मिठाई विक्रेते, महिलांसाठी हळदी-कुंकू, बांगड्या, लाखी दागिने, खेळणी, सौंदर्य प्रसाधने, तसेच अनेक वस्तूंची दुकाने फुलून गेली होती. फिरते सिनेमागृह, गोल फिरणारी पाळणे, नाना-नानी पार्क, मौत का कुआ अशा खेळांच्या साधनांकडे लहानग्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. यात्रेच्या ठिकाणी गावोगावच्या मानाच्या काठ्या आणि सासणे मुक्कामासाठी विशेष जागा उपलब्ध करून दिली होती. दिवसभर दाखल होणाऱ्या भाविकांमुळे बाजारपेठा गजबजलेल्या राहिल्या आणि सर्वत्र उत्सवाचेच वातावरण कायम राहिले. अखेर भक्ती, परंपरा आणि आनंद यांचा मिलाफ घडवत म्हसवडचा पारंपरिक रथोत्सव यशस्वीरीत्या संपन्न झाला.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 6:10 pm

महाबळेश्वरात नाट्यमय घडामोडी, ज्याच्यावर जबाबदारी दिली तोच फिरला:एकनाथ शिंदेंच्या लाडक्या बहिणीनं हाती बांधले घड्याळ

नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (शुक्रवारी) महाबळेश्वरात नाट्यमय घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बहिण मानलेल्या माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी प्रभाग ४ मधून उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्याचबरोबर आपल्याच समर्थकाने नगराध्यक्षपदासाठी केलेली बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसने मोडून काढली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी सातारा दौऱ्यावर आले असताना त्यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी महाबळेश्वरमधील मानलेली बहीण विमल ओंबळे यांची राजकीय जबाबदारी कुमार शिंदे यांच्यावर सोपवली होती. मात्र, ऐन निवडणुकीत कुमार शिंदेंनी ओंबळे यांचा पाठिंबा काढून त्यांच्या विरोधातील उमेदवार विमल बिरामणे यांना पाठिंबा जाहीर केला. ही बाब ओंबळे यांनी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली. मात्र, त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विमल ओंबळेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवाय शिवसेनेचा त्याग करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मानलेल्या बहिणीनेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. विमल ओंबळे या महाबळेश्वर पालिकेच्या नगरसेविका होत्या. मागील निवडणुकीत त्या निवडून आल्या होत्या. एकनाथ शिंदेंनी त्यांची राजकीय जबाबदारी शिवसेना पदाधिकारी कुमार शिंदेंवर सोपवली होती, मात्र, ऐनवेळी त्यांनीच जबाबदारी झटकून विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे नाराज झालेल्या विमल ओंबळेंनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेत शिवसेनेचाच त्याग करून थेट राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. महाबळेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारांनी एकूण ९ अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी सुनील शिंदे यांचे नाव निश्चित केले. त्यामुळे नाराज होऊन नासीर मुलाणी यांनी बंडखोरी केली होती. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी महाबळेश्वरात येऊन मुलाणींची समजूत काढल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. आता नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शिंदे, लोकमित्र जनसेवा आघाडीचे डी. एम. बावळेकर, कुमार शिंदे, सतीश साळुंखे आणि संजय पाटील यांच्यात होणार आहे. भाजपचे केवळ तीन उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात राज्यात सध्याच्या घडीला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीत पूर्ण पॅनेल देखील करता आलेलं नाही. भाजपचे केवळ तीन उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. इच्छुकांनी अपक्ष म्हणूनच अर्ज दाखल केले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 5:56 pm

शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच एसटीची हेल्पलाईन:मंत्री सरनाईक यांची घोषणा; शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनावर कडक कारवाई

राज्यातील शालेय विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सुरक्षित आणि वेळेवर एसटी प्रवासाचा प्रश्न गंभीर होत चालला असताना, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एसटीची विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. ही हेल्पलाईन विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्याच्या प्रवासात कोणतीही अडचण आल्यास तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने तयार करण्यात येणार आहे. धाराशिव बसस्थानकाला दिलेल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बस उशिराने येणे, अचानक रद्द होणे आणि थांब्यावर न थांबण्याच्या तक्रारी थेट मंत्र्यांसमोर मांडल्या. या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही सरनाईक यांनी यावेळी दिली. राज्यातील अनेक दुर्गम आणि आदिवासीबहुल भागांत सरकारने मानव विकास बसेस विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, या बसेसचा वापर काही ठिकाणी इतर प्रवासी वाहतुकीसाठी केला जात असल्याच्या तक्रारीही मंत्र्यांच्या निदर्शनास आल्या. विद्यार्थीनींना सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा यासाठी या बसेसचा केवळ शालेय वापरच व्हावा, अशा सक्त सूचना आधीच दिल्या आहेत. तरीही काही आगारांत या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीत बस वेळेवर न सुटल्याने किंवा रद्द झाल्याने शाळेत उशीर होतो, तास बुडतात, तर कधी संध्याकाळी घरी पोहोचायलाच खूप उशीर होतो. त्यामुळे पालकांच्या ओरडालाही त्यांना सामोरे जावे लागते. गैरसमजातून काही विद्यार्थिनींनी आत्महत्याही केल्याची गंभीर उदाहरणे समोर आल्याने मंत्री सरनाईक यांनी या विषयाला अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. लवकरच सुरू होणाऱ्या या हेल्पलाईनद्वारे विद्यार्थ्यांना अचानक बस रद्द झाल्यास, तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडल्यास किंवा बस वेळेत न आल्यास थेट मदत मिळणार आहे. राज्यातील सर्व 31 विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत. अशा वेळी शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य किंवा थेट विद्यार्थीही विभाग नियंत्रकांशी संपर्क साधून तातडीचा तोडगा मागू शकतील. ही सेवा उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवासातील असुरक्षितता आणि दिरंगाईचा त्रास कमी होईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी आता थेट प्रशासनावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी आता थेट एसटीच्या स्थानिक प्रशासनावर टाकण्यात आली आहे. बसेस उशिरा सुटल्याने किंवा रद्द झाल्याने जर विद्यार्थ्यांचे तास चुकले, ते परीक्षेला उशीर झाला किंवा एखादी परीक्षा बुडाली, तर त्यासाठी संबंधित आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक जबाबदार धरले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचे जितके दिवस, तितके दिवस संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणे किंवा सक्तीची रजा देणे, अशा कठोर कारवाईचे आदेशही सरनाईक यांनी दिले आहेत. त्यामुळे एसटी प्रशासनावर शालेय बस फेऱ्या वेळेत आणि नियमितपणे चालवण्याची जबाबदारी आणखी कडक झाली आहे. जाण्या–येण्याचा प्रवास अधिक सुरक्षित एसटी सेवा ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागांत विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनीच ठरते. त्यामुळे प्रवासात येणाऱ्या समस्या दूर करणे अत्यावश्यक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत एसटी व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध व जबाबदार होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हेल्पलाईन सेवेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना तातडीची मदत मिळणे अधिक सुलभ होईल, तसेच शाळेत जाण्या–येण्याचा प्रवास अधिक सुरक्षित आणि विश्वसनीय बनवणे हेच उद्दिष्ट असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 5:46 pm

प्रशासकीय काळात वाढला समस्यांचा गुंता, जिंदगी गेली धुराळ्यात; रस्ता होत नाही

लातूर (प्रतिनिधी ) :लोकनियुक्त लोकप्रतिनिधी गेल्या सात वर्षांपासून लातूर शहर महानगरपालिकेत नाहीत़ प्रशासकीय कारभार असल्यामुळे नागरी समस्यांचा गुंता वाढत गेला़ नागरी समस्यांकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाइी ‘एकमत’ने ग्राऊंड रिपोर्ट हा विशेष कार्यक्रम सुरु केला आहे़ शनिवारी शहरातील प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांशी भेट घेऊन त्यांना बोलते केले असता त्यांनी गाहाण्यांचा पाढा वाचला़ लता राऊत नामक […] The post प्रशासकीय काळात वाढला समस्यांचा गुंता, जिंदगी गेली धुराळ्यात; रस्ता होत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 5:29 pm

‘कमी मूळ वेतन’असलेल्या कर्मचा-यांनाच ओव्हरटाईमसाठी प्राधान्य

पुणे : प्रतिनिधी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दैनंदिन उत्पन्नाचा ताळमेळ साधण्यासाठी ओव्हरटाईम (अतिकालीन) ड्युटीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चालक आणि वाहकांच्या ‘ओव्हरटाईम भत्त्या’च्या नियमावलीत मोठे बदल केले आहेत. यापुढे ओव्हरटाईम देताना ‘कमी मूळ वेतन’ असलेल्या कर्मचा-यांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत; तसेच ठराविक कर्मचा-यांनाच जास्त ओव्हरटाईम दिला जात […] The post ‘कमी मूळ वेतन’असलेल्या कर्मचा-यांनाच ओव्हरटाईमसाठी प्राधान्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 5:16 pm

डीपीसीच्या निधी वाटपावरून महायुतीत तणाव

मुंबई : महायुती सरकारमध्ये निधी वाटपावरून सातत्याने खटके उडत आहेत. अजित पवार यांना महायुतीत घेण्यास शिंदेसेनेने याच कारणासाठी विरोध केला होता. आता निधी वाटपाची भांडणे जिल्हा पातळीवर पोहोचू लागली आहेत. त्यावरून महायुतीत खटके उडायला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यात महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (शिंदे) पक्षाला जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटपात डच्चू देण्यात आला […] The post डीपीसीच्या निधी वाटपावरून महायुतीत तणाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 5:13 pm

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात चेंगराचेंगरीनंतर सद्बुद्धी द्या आंदोलन का झाले नाही?:अर्णव प्रकरणावरून राज्यात राजकारण तापले; मनसेचे भाजपवर गंभीर आरोप

मुंबई लोकलमध्ये झालेल्या कथित हिंदी–मराठी वादानंतर अर्णव खैरे या तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटावर टीका केली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत सद्बुद्धी द्या आंदोलन करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेवर निशाणा साधला. मात्र, या आंदोलनावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रतिक्रिया देत भाजपवर नीच राजकारण केल्याचा आरोप केला. अद्याप संपूर्ण तपास झाला नसताना अर्णवच्या मृत्यूचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जात असल्याची टीका त्यांनी केली. संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. अर्णव खैरेच्या मृत्यूविषयी त्याच्या कुटुंबीयांनी भाषिक वाद कारणीभूत असल्याचे सांगितले, हे मी नाकारत नाही, असे देशपांडे म्हणाले. परंतु या प्रकरणातील संशयित मुलांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. त्यांनी भाषिक वादावरून मारहाण केली, याची कबुलीही त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे आत्महत्या खरोखरच भाषिक वादामुळे झाली की इतर काही कारण होते, यावर अजूनही स्पष्टता आलेली नाही. अशा परिस्थितीत भाजपने आंदोलन करण्याची एवढी घाई का केली, असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला. तपास पूर्ण न होता मृत्यूचे राजकारण करणे हा नीचपणा आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला. याशिवाय देशपांडे यांनी भाजपच्या भूमिकेवरही टिका केली. पालघर साधू हत्याकांडातील आरोपीचा ज्या पक्षात प्रवेश देण्याची तयारी भाजप करत होती, त्या पक्षाला हिंदू प्रेम कशामुळे सुचले, असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला. त्यांनी गुजरात दंगलींचाही उल्लेख केला आणि त्या घटनेनंतर नरेंद्र मोदी यांनी सद्भावना यात्रा काढली होती, याची आठवण करून दिली. सरकारे कोणत्याही पक्षाची असोत, लोकांचे मृत्यू झालेच आहेत. लोकलमधून पडून दरवर्षी मृत्यू होतात, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. तेव्हा सद्बुद्धी द्या आंदोलन का झाले नाही? असा प्रश्नही देशपांडे यांनी उपस्थित केला. काँग्रेसची देखील उडवली खिल्ली मनसे नेते काँग्रेसवरही तितक्याच आक्रमकपणे बोलले. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने मनसेसोबत हात न मिळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मुद्द्यावर देशपांडे यांनी काँग्रेसला अमिबासारखा पक्ष म्हटले. काँग्रेस पक्षात वेगवेगळ्या गटांची वेगवेगळी मते असून एका नेत्याचा निर्णय दुसऱ्याशी जुळत नाही, असा टोला त्यांनी हाणला. अमिबाच्या पायांसारखे हे पक्षाचे गट आहेत. एक पाय एका दिशेने, दुसरा पाय दुसऱ्या दिशेने जातो. पण निर्णय कोण घेतो—पाय की मेंदू? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड आणि भाई जगताप यांच्या परस्परविरोधी भूमिकांकडेही त्यांनी लक्ष वेधले. अमिबाच्या पायांना उत्तर देण्यात अर्थ नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. राजकीय वातावरण सध्या तापलेले राज्यातील राजकीय वातावरण सध्या अतिशय तापलेले आहे. मुंबई महापालिका निवडणूक जवळ आल्याने आरोप–प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. अर्णव खैरेच्या मृत्यूच्या प्रकरणाने ही राजकीय लढाई आणखी तीव्र झाली आहे. एका बाजूला भाजप अर्णवच्या प्रकरणाचा मुद्दा पुढे करत आहे, तर दुसऱ्या बाजूला मनसे आणि महाविकास आघाडीतले नेते भाजपवर स्वार्थी राजकारण आणि संवेदनशील घटनेचा गैरवापर केल्याचा आरोप करत आहेत. काँग्रेस–मनसे–उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या संभाव्य युतीबाबतही विरोधाभासी विधानांमुळे नवीन समीकरणांची चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी हे राजकीय वाद कुठे स्थिरावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 5:06 pm

परिवारवादाची आरोळी देणारा भाजपच परिवारवादात:​​​​​​​नाना पटोले यांचा आरोप; भाजप नितिमत्ता, लोकशाही मूल्यांपासून दूर गेल्याचा टोला

परिवारवादाची आरोळी देणारा भाजपच स्वतः परिवारवादात अडकल्याची टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला आहे. काँग्रेस हा सामान्य नागरिकांचा पक्ष असून लोकांच्या समस्या, हक्क आणि विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची लाट जनतेत उमटू लागली असून या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येईल, असे ते म्हणाले. भंडारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगत चालली आहे. या प्रकरणी दररोज नवे राजकीय समीकरण, नवे वाद आणि आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. साकोली विधानसभा मतदारसंघ देखील याला अपवाद नाही. या मतदारसंघातील साकोली नगर परिषद निवडणूक विशेष चर्चेत आहे. भाजपची गेल्या काही वर्षांपासून साकोलीत एकहाती सत्ता होती. मात्र या कार्यकाळात विकास झाला नाही, अशी टीका आता भाजपच्या मित्रपक्षांकडूनच होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, भाजपने काँग्रेसवर कायम परिवारवाद चालविल्याचा आरोप केला असताना भाजपने या निवडणुकीत माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांच्या सुनेला उमेदवारी देऊन स्वतःच परिवारवादात अडकण्याचा पराक्रम केल्याचा दावा केला जात आहे. नाना पटोले यांचा भाजपावर हल्लाबोल साकोलीचे आमदार नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, भाजपा असा पक्ष आहे की दुसऱ्यावर आरोप करतो, पण त्यांना माहिती नाही की एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोटं स्वतःकडेच असतात. नीतिमत्ता आणि लोकशाही मूल्यांपासून भाजपा खूप दूर गेलेला आहे. सत्ता, सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचार हेच भाजपचे राजकारण झाले आहे. पटोले यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस हा सामान्य नागरिकांचा पक्ष असून लोकांच्या समस्या, हक्क आणि विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे आता परिवर्तनाची लाट जनतेत उमटू लागली असून या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येईल. विर्शी येथील बँक स्थलांतर प्रश्न निकाली निवडणुकीच्या वातावरणातच साकोली तालुक्यातील विर्शी येथे 40 वर्षांपासून कार्यरत महाराष्ट्र बँकेच्या अचानक स्थलांतराच्या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी व नागरिक अस्वस्थ झाले होते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते. ही बाब कळताच आमदार नाना पटोले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नागरिकांची मागणी मान्य केली. त्यानंतर पटोले यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी पिऊन आंदोलन मागे घेतले. आगामी निवडणुकांचा सूर स्पष्ट या संपूर्ण घडामोडींवरून साकोली नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्ष “विकास” आणि “स्थानिक प्रश्न” या मुद्यांवर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता नाना पटोले यांच्या आरोपांना भाजप काय उत्तर देते, आणि निवडणुकीत मतदार कोणावर विश्वास ठेवतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 3:18 pm

सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ५ ठार

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी क्रुझर गाडी सोलापूर-हैदराबाद महामार्गावरून जात होती. या गाडीतील प्रवासी सोलापूरवरून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी धाराशिवमधील अणदूर परिसरात त्यांच्या जीपचे टायर अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे […] The post सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ५ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 3:17 pm

लोकशाही पायदळी तुडवून निवडणुका बिनविरोध

नागपूर : प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी सत्ताधा-यांचे नातेवाईक त्यात बायको, वहिनी, मामे भाऊ, दीर, बहीण, मुलगा बिनविरोध निवडणूक जिंकून आले आहेत, अनेक ठिकाणी गुलाल उधळला. येथे लोकशाही पायदळी तुडवण्यात आली आहे. सत्तेच्या बळावर दबाव टाकून निवडणुका बिनविरोध करून सत्ताधारी पाठ थोपटून घेत आहेत, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना […] The post लोकशाही पायदळी तुडवून निवडणुका बिनविरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 3:14 pm

धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून मतदारसंघात विरोध; राजकीय चर्चांना उधाण

बीड : प्रतिनिधी बीडमधील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘स्टार प्रचारक’ म्हणून आमदार धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका, असा थेट निरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवला आहे. त्यांनी केलेल्या मागणीमुळे आता विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या अनुषंगाने स्टार प्रचारकांची […] The post धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून मतदारसंघात विरोध; राजकीय चर्चांना उधाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 3:12 pm

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा संपन्न:सातारा जिल्ह्याने पटकावले विजेतेपद; ९०० पुरुष, २५० महिला खेळाडू सहभागी

५१ वी कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. पुणे ग्रामीण पोलिस दलाला या वर्षी २०२५ साठी या पाच दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला होता. बारामती येथील पोलिस उपमुख्यालयात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला राज्याचे पोलिस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक दीपक पाण्डेय, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपकसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपअधीक्षक दिलीप शिंदे आणि पोलिस उपअधीक्षक मधुकर भटे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी सोलापूरचे पोलिस आयुक्त एम. राजकुमार, सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी, सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, कोल्हापूर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि सांगली पोलिस अधीक्षक संदीप घुगे हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पुरुष व महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेने झाली. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी आपल्या प्रास्ताविकात खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, खेळामुळे शारीरिक तंदुरुस्ती, उत्साह, संघ भावना आणि मानसिक स्थैर्य निर्माण होऊन विविध गुणांचा विकास होतो. यामुळे पोलिस दलात ऐक्य निर्माण होण्यासही मदत होते. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. आगामी महाराष्ट्र पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करण्याकरिता आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे नाव मोठे करण्याकरिता त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत पुणे ग्रामीण, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर येथील एकूण ९०० पुरुष आणि २५० महिला पोलिस खेळाडू सहभागी झाले होते. पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशाने विविध शाळांनाही निमंत्रण देऊन स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. या स्पर्धेत सातारा जिल्ह्याने २०७ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगली हे पोलिस विभाग अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 3:10 pm

एमआयटीत ३० वी ज्ञानेश्वर - तुकाराम स्मृती व्याख्यानमाला:देशातील ख्यातनाम वक्ते विचार मांडणार, २४ नोव्हेंबरपासून सुरुवात

विश्वशांती केंद्र (आळंदी), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. युनेस्को अध्यासनांतर्गत ही व्याख्यानमाला २४ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड येथील संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होईल. इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक डॉ. प्रमोद काळे आणि आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी. के. भारद्वाज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड विशेष उपस्थित राहतील. व्याख्यानमालेचा समारोप रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील, तर एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत अध्यक्षस्थानी असतील. या सात दिवसांच्या व्याख्यानमालेत देशातील ख्यातनाम वक्ते आपले विचार मांडणार आहेत. यात किमया आश्रमचे स्वामी कृष्णा चैतन्य (आधुनिक जीवन पद्धती आणि अध्यात्म), आयआयएसईआरचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स अध्यक्ष डॉ. अरविंद नातू (पारंपारिक ज्ञानातील मुळे आणि शांतता) आणि डीआरडीओचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर (संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता: विश्वगुरू भारताकडे एक पाऊल) यांचा समावेश आहे. याशिवाय, ओरिजिनोट वेलनेसचे सीईओ केशव वेल्हाळ (ओम टू क्वांटम कॉम्प्युटिंग: विश्वशांतीचा मार्ग) आणि महाराष्ट्राचे उपलोकायुक्त डॉ. संजय भाटिया (जनसेवेत विश्वशांती) यांचीही व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेदरम्यान दररोज सकाळी ८.४५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विविध कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. यात डॉ. संजय उपाध्ये, किंकर विठ्ठल रामानूज, किंकर विश्वेश्वरै आनंदा, डॉ. बी. एस. नागोबा, यशदा संचालक रंगनाथ नाईकडे, अभिनेते मुकेश खन्ना, सुनील-दीपाली लोढा, अभियंता विष्णू भिसे, गीतकार समिर अंजान, डॉ. ताहेर एच. पठाण, स्वामी सवितानंद, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ आणि माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. तसेच, संपूर्ण आठवडाभर सकाळी ७ ते ८ या वेळेत एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी विशेष योगासन वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 3:08 pm

पुणे पोलिसांची मोठी कारवाई:शस्त्रास्त्रांच्या ५० अड्ड्यांवर बुलडोझर, २१ पिस्तुले जप्त, ३६ संशयित ताब्यात; आंतरराज्य रॅकेट उघड

पुणे शहर पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत आंतरराज्यीय अवैध शस्त्र उद्योगाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पुणे शहरातून २१ पिस्तुले आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. त्यानंतर पुढील तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारावर मध्य प्रदेशात छापेमारी करून ३६ संशयितांना ताब्यात घेतले. या तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य प्रदेशातील उमराटी गावात पहाटे छापा टाकण्यात आला. येथे पोलिसांनी अवैध शस्त्रनिर्मितीचा मोठा अड्डा उघडकीस आणला. या कारवाईत ३६ संशयितांना जेरबंद करण्यात आले. छापेमारीत मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि त्यांचे सुटे भाग जप्त करण्यात आले. पोलिसांनी शस्त्रे बनवणारे ५० अड्डे बुलडोझरने उद्ध्वस्त केले. तसेच, शस्त्रांवर नावे उमटवण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले. मागील तीन आठवड्यांपासून विमानतळ, काळेपडळ, गुन्हे शाखा आणि एईसी पथकांनी केलेल्या धडक कारवाईत एकूण २१ शस्त्रे जप्त झाली होती. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या धाडीसाठी शीघ्र कृती दल, गॅस गन सेक्शन, वायरलेस आणि सीसीटीव्ही टीम यांसह मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला होता. मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन, बुलेटप्रूफ जॅकेट्स आणि बॉडी वॉर्न कॅमेरे यांचाही वापर करण्यात आला. तपासातील प्राथमिक निष्कर्षानुसार, जप्त केलेली अवैध शस्त्रे उमराटी शिकलगार आर्म्स (USA) या नावाने तयार करून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत पुरवली जात असल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांवर कायदेशीर कारवाई केली जात असून, अवैध शस्त्र पुरवठा साखळीचा पूर्ण उलगडा करण्यासाठी तपास वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 3:07 pm

यशवंत कारखाना जमीन विक्री प्रकरण:अजित पवार जबाबदार, विकास लवांडे यांचा आरोप; कृती समिती कायदेशीर कारवाई करणार

यशवंत सहकारी साखर कारखान्याची १०० एकर जमीन विक्री करण्याच्या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे आणि ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला आहे. या व्यवहाराला कारखान्याचे संचालक मंडळ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत. कृती समिती या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले. थेऊर येथील यशवंत साखर कारखान्याची ही जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला २९९ कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. बाजारभावानुसार या जमिनीची किंमत ५१२ कोटी रुपये असताना, ती कमी दरात विकून कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप आहे. या व्यवहारात बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आली, अस विकास लवांडे यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. लवांडे यांच्या म्हणण्यानुसार, जमीन विक्रीसाठी सभासद शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. २६ फेब्रुवारी रोजी कारखान्याची बैठक झाल्याचे दाखवून, जे सभासद हजर नव्हते त्यांच्या नावाने सह्या घेण्यात आल्या. बिगर-सभासद आणि मृत व्यक्तींच्या नावानेही सह्या केल्याचे समोर आले आहे. काही सभासदांची नावे टाकून सह्या घेतल्या नाहीत, तर संचालकांच्या नातेवाईकांच्या सह्या घेण्यात आल्या. साखर आयुक्तांनी नेमलेल्या चौकशीला बगल या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवांडे म्हणाले, पुणे बाजार समितीने बेकायदेशीरपणे ३६ कोटी रुपये कारखान्याला हस्तांतरित करण्यात आले. खोटे प्रोसिडिंग तयार करून शासनाची दिशाभूल करत जमीन विक्रीचा घाट घालण्यात आला. साखर आयुक्तांनी नेमलेल्या चौकशीला बगल देत, हा व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून करण्यात आला. यामुळे मुद्रांक शुल्क बुडवण्यात आले आणि सभासदांची दिशाभूल झाली. पुणे बाजार समिती आणि कारखान्याचे संचालक या दोन्ही संस्थांचे प्रमुख सख्खे भाऊ असल्याने, त्यांनी संगनमताने हा व्यवहार केला. कारखान्याचे २०० कोटींचे नुकसान या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल असून, सुनावणी सुरू आहे. असे असतानाही दोन्ही संस्थांनी न्यायालयाचा अवमान करत मनमानी कारभार सुरू ठेवला. याला राज्य शासन पाठबळ देत असल्याचे आश्चर्य वाटत आहे. मंत्रिमंडळानेही ही जमीन विक्री न्यायालयाच्या अधीन राहून करावी असे सांगितले. त्यानंतरही परस्पर हा व्यवहार करण्यात आला. हा संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर असून साखर कारखान्याचे सुमारे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत दोन्ही संस्थेचे प्रमुख आणि संचालक मंडळ यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावी अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असेही विकास लवांडे या प्रकरणी बोलताना म्हाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 3:02 pm

‘बिनविरोध’साठी एवढा अट्टाहास का?

अहिल्यानगर : प्रतिनिधी जामनेर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे आणखी ९ उमेदवारही बिनविरोध निवडून आले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (दि. २१) जामनेर नगर परिषद क्षेत्रातील ९ जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेत भाजपकडून मोठ्या प्रमाणात […] The post ‘बिनविरोध’साठी एवढा अट्टाहास का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 2:54 pm

मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट:वडेट्टीवारांच्या भूमिकेला मुंबई काँग्रेसचा विरोध; आघाडीचा चेंडू उद्धव ठाकरेंकडे

मुंबई काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्ये चालू घडामोडींना नवीन वळण मिळाले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने आपली भूमिका ठामपणे निश्चित केली असून हिंसक राजकारण करणाऱ्या कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही. अलीकडेच विजय वडेट्टीवार यांनी मांडलेली भूमिका ही प्रदेश काँग्रेसची असू शकते, परंतु मुंबई काँग्रेसचा स्वतंत्र निर्णय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही मुंबई काँग्रेसने ठरवले आहे की मारझोड आणि हाणामारी करणाऱ्या पक्षांसोबत कोणताही राजकीय संबंध ठेवायचा नाही. आमची जोडण्याची भूमिका आहे, तोडण्याची नाही. त्यांनी सांगितले की आगामी निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी चर्चा सुरू आहे आणि तेच पुढे सहकार्याचे पर्याय असतील. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले. गायकवाड म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचा निर्णय स्वबुद्धीने घ्यावा. आमची भूमिका स्पष्ट आहे, ज्यांचे राजकारण भांडणे, धाक-दपटशाही किंवा हिंसेवर आधारित आहे अशांसोबत काँग्रेस जाणार नाही. मुंबईतील विरोधी पक्षांच्या समीकरणांवर परिणाम मुंबई काँग्रेसने मागील काही दिवसांपासून शहरातील विविध विभागात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता, स्वच्छ आणि सकारात्मक राजकारणाची गरज असल्याचे वर्षा गायकवाड यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. त्यांच्या या विधानानंतर मुंबईतील विरोधी पक्षांच्या समीकरणांवर पुढील काही दिवसांत परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटप, निवडणूक रणनीती आणि स्थानिक पातळीवरील सहकार्याबाबत नव्याने चर्चा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेमके काय म्हणाले विजय वडेट्टीवार मनसे आणि काँग्रेसची विचारधारा सारखी नाही. आमची विचारधारा वेगळी असल्याने मविआमध्ये त्यांना घ्यावे का नाही हा विषय आला असावा पण शरद पवारांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीमध्ये लढलो पाहिजे त्या संदर्भात सर्वांनी एकत्र येत भाजपला संपवण्यासाठी काम केले पाहिजे, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल, परवा जो मुंबईमध्ये मतदान कार्ड मिळाले त्यावर भाजपचा विश्वास असेल म्हणून ते मविआचा पराभव होईल आम्ही इतके टक्के मतदान घेऊ असे सांगत असतील. जे बिहारमध्ये केले ते उद्या ही लोक मुंबईमध्ये करतील. त्यांना लोकशाही ठेवायची नाही त्यामुळे ते पारदर्शक निवडणूक होऊ देणार नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपचे 100 हून अधिक नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले हे दादागिरी आणि पैसा, दबाव, यंत्रणेचा वापर, यामुळे शक्य झाले आहे. पैशाचे प्रलोभन आणि यंत्रणेचा दबाव टाकत निवडणूक होत असतील तर हे सर्व होऊ शकते. सत्ता तुमची असल्याने तुम्ही लोकशाही पायदळी तुडवण्याचे काम करत आहात, तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 2:53 pm

साकोलीत काँग्रेसच्या १३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे:ठेकेदारीवरून उमेदवारी दिल्याने पक्षात खळबळ, शहराध्यक्षांकडे पत्र

साकोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. ठेकेदारांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत काँग्रेसच्या १३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. हे राजीनामे शहर अध्यक्ष दिलीप मासुरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे साकोली शहरातील काँग्रेस पक्षात ठेकेदारीच्या मुद्द्यावरून तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डावलून ठेकेदारांना उमेदवारी दिल्याने आम्ही सर्वजण एकमताने राजीनामे देत असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे. एकीकडे काँग्रेसमध्ये हा वाद सुरू असताना, दुसरीकडे साकोलीत 'ठेकेदारी बंद' शपथपत्राची मोहीम जोरात सुरू आहे. नगरपरिषदेत ठेकेदारी आणि कमिशनखोरी कायमची बंद होऊन पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त विकास व्हावा, यासाठी जनतेकडून स्टॅम्प पेपरवर शपथपत्र करारनामा करून घेतला जात आहे. 'मी नगरसेवक झाल्यास कोणतीही ठेकेदारी किंवा कमिशनखोरी करणार नाही, आढळल्यास माझ्या पदाचा राजीनामा देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा,' असे या शपथपत्रात म्हटले आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे शहर महासचिव अमोल टेंभूर्णे, कार्यालय महासचिव विजय साखरे, शहर उपाध्यक्ष दिलीप निनावे, शहर उपाध्यक्ष कृष्णा हुकरे, संघटक सचिव विशाल गजभिये, इंटक शहराध्यक्ष सचिन राऊत, शहर उपाध्यक्ष सतीश रंगारी, सेवादल अध्यक्ष मनोहर भिवगडे, अनु. जाती. शहरचे पराग कोटांगले, बुथ कमेटी क्र. ५ अध्यक्ष दिनेश राऊत, शहर उपाध्यक्ष प्रकाश रोकडे, शहर काँग्रेसचे राजू जुगनाके आणि काँग्रेस संघटिका प्रभाग क्र. ७ च्या वैशाली गजभिये यांचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 2:52 pm

पुणे पोलिसांनी १७१ गहाळ मोबाइल परत केले:तांत्रिक तपासानंतर नागरिकांना मिळाले त्यांचे हरवलेले फोन

पुणे पोलिसांनी हरवलेले किंवा चोरीला गेलेले १७१ मोबाइल फोन त्यांच्या मालकांना परत केले आहेत. शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाइल चोरीला जाणे किंवा गहाळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना, पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परिमंडळ पाचच्या हद्दीतील नऊ पोलीस ठाण्यांमध्ये मोबाइल चोरी किंवा गहाळ झाल्याच्या तक्रारी 'लॉस्ट अँड फाउंड' पोर्टलवर नोंदवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, हे मोबाइल दुसऱ्या सिमकार्डसह वापरले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी मोबाइल वापरणाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मोबाइल परत करण्याच्या सूचना दिल्या. चोरीचे मोबाइल वापरणे हा गुन्हा असून, ते परत न केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, अशी माहितीही पोलिसांनी दिली. यानंतर १७१ मोबाइल पोलिसांकडे जमा करण्यात आले. हे मोबाइल तक्रारदारांना परत करण्यासाठी हडपसर येथील एका मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते हे मोबाइल त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे यांनी मोबाइल शोधण्यासाठी वापरलेल्या तांत्रिक तपासाची माहिती दिली. ते म्हणाले की, मोबाइल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाइल हरवल्याने व्यक्ती अस्वस्थ होते, कारण त्यात महत्त्वाची माहिती आणि भावनिक आठवणी असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी पोलीस नेहमीच तत्पर असतात. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अनुराधा उदमले, नम्रता देसाई, पोलीस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अल्ताफ शेख, पोलीस कर्मचारी संदीप राठोड, समीर पांडुळे, बापू लोणकर, माधुरी डोके, सोनाली कुंभार आणि विक्रम भोर यांनी ही कामगिरी यशस्वी केली. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांनी प्रास्ताविक केले, तर उपनिरीक्षक शंभूराज जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मोबाइल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. हरवलेला मोबाइल परत मिळेल अशी खात्री नसताना, पोलिसांनी केलेल्या या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 2:51 pm

मी पण निधीत काट मारेन; अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोधकांनी घेतला समाचार

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी त्यांच्या रोखठोक विधानांमुळे अडचणीत सापडतात. त्यांनी केलेली विधानांची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात होत असते. आता पुन्हा एकदा अजित पवार हे एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या विधानाचा समाचार विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ बारामतीमधील माळेगावातून शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) झाला. बारामतीमधील […] The post मी पण निधीत काट मारेन; अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोधकांनी घेतला समाचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 2:49 pm

भाजप नेत्यांचे नातेवाईकच कसे बिनविरोध निवडून येतात?

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी भाजपला सत्तेचा माज चढला आहे, प्रचंड दबावतंत्र आणि प्रशासनाचा गैरवापर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुरू आहे. शंभर उमेदवार अन् अनेक नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याचा दावा त्यांचे नेते, प्रवक्ते करत आहेत. मुळात हा विजय नाही तर भाजप नेत्यांचा आणि या पक्षाचा माज आहे. सगळ्या नेत्यांचे नातेवाईकच बिनविरोध कसे निवडून येतात? एखादा सामान्य […] The post भाजप नेत्यांचे नातेवाईकच कसे बिनविरोध निवडून येतात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 2:48 pm

‘यळकोट जय मल्हार’ घटस्थापनेने सुरू झाला खंडोबा नवरात्रोत्सव:पारंपरिक नैवेद्याने बाळे येथील मंदिरात भक्तीचा जल्लोष

महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाच्या ‎नवात्रोत्सवाला ‘यळकोट यळकोट जय‎ मल्हार’च्या जयघोषात शुक्रवारी घटस्थापनेने ‎सुरुवात झाली. सोलापूर परिसरातील बाळे‎येथील तीर्थक्षेत्र खंडोबा मंदिरातही हा उत्सव‎सुरू झाला. या कालावधीत यात्राही भरते. ती‎षष्ठीपर्यंत असते. पाच दिवस धार्मिक‎कार्यक्रम असतात. ज्यांचे कुलदैवत खंडोबा‎अाहे त्या सर्वच घरांमध्ये घटस्थापना करण्यात‎येते. हा उत्सव सहा दिवस असतो.‎कुटुंबप्रमुख उत्सवात उपवास धरतात. रोज‎घटावर फुलांची माळ वाहिली जाते.‎चंपाषष्ठीस घटाचे उद्यापन करून कुलधर्म‎कुलाचार केले जातात. शुक्रवारी बाळे येथील‎मंदिरात भक्तांची गर्दी होती. काही भक्त‎वसारीने आसूड उगारत अडचणीतून बाहेर‎पडण्यासाठी खंडोबाचरणी नतमस्तक झाले.‎ मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला देवघरातील सर्व देवांना‎पंचामृताने अभिषेक करतात. चाफ्याची फुले‎देवाला अर्पण करतात. घटावर फुलांची माळ‎लावतात. दिवटी प्रज्वलित करून देवाला ‎ओवाळतात.‎ पुरणाचा नैवेद्य त्यासोबत बाजरीची भाकरी,‎वांग्याचे भरीत, नवा कांदा, दहीभात, लिंबू,‎गाजर इत्यादी नैवेद्य दाखवून ५ मुले बोलावून‎घट उचलतात व ‘ येळकोट येळकोट’ असे ३‎वेळा म्हणतात. त्यानंतर न तळीभंडारा करतात‎व दिवटी बुधले प्रज्वलित करतात.‎ तळीभंडार उचलणे म्हणजे नेमके काय?‎ताम्हणामध्ये भंडारा पसरून त्यावर पाच विड्याची पाने‎ठेवतात. त्यावर सुपारी, खोबऱ्याचे तुकडे व मधोमध भंडारा,‎खोबऱ्याची वाटी ठेवतात. पाच मुलांना पुरुषांना बोलवून ३‎वेळा ‘ येळकोट येळकोट’ म्हणून तळी उचलतात, अशी‎माहिती मंदिराचे पुजारी गणेश पुजारी यांनी दिली.वसारी‎आसूड उगरतात त्यातून अडचणी बाहेर पडण्यासाठी‎शुक्रवारी मंदिरात काही भक्त वसारीने आसूड उगारत‎आपली भक्ती खंडोबांच्या चरी अर्पण करत होते.‎अडचणीतून बाहेर पडण्यासाठी वसारीचा आसूड उगारला‎जातो. ज्यांच्या अंगात देव संचारतो ते वसारीने आसूड ‎उगारतात.‎ - गणेश पुजारी , मंदिराचे पुजारी‎ विधिवत पूजेची चार दिवस मांडणी अशा प्रकारे असते‎घरातील देवघर स्वच्छ करून घेतात. घराची स्वच्छता केली जाते. देवघरातील मूर्तींना‎पंचामृताने अभिषेक करतात. नवीन वस्त्रावर विड्याच्या पानावर देवाचे आसन केले‎जाते. नंदादीप स्वच्छ करून ६ दिवस सतत तेवत ठेवतात. ताम्हणामध्ये तांदूळ घेऊन‎त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडणी करून त्यामध्ये पाणी, नाणी, सुपारी घालतात.‎तांब्याच्या बाहेरील बाजूस सूत गुंडाळून कलशाची विधिवत पूजा करतात. घटासमोर ५‎विड्याची मांडणी करून त्यावर खारीक, खोबरे, बदाम, सुपारी, हळकुंड ठेवतात.‎देवांच्या शिपायाचे २ वेडे मांडतात. त्यावर सुपारी व लिंबू ठेवून भंडारा, गुलाल लावला‎जातो. देव्हाऱ्यातील मूर्तींच्या बाजूस विडे ठेवतात. त्यानंतर २ खोबऱ्याच्या वाट्या‎हळद-कुंकू भरून देवासमोर ठेवतात. ५ फळे, १ डझन केळी व काळ्या खारका, बाजूला‎मांडून ठेवतात. घटावर विषम संख्येत ५ किंवा ७ आशा पद्धतीने खाऊच्या पानांची माळ‎लावतात. दररोज संध्याकाळी बाहेर दिवे लावून रांगोळी काढली जाते.‎ पूजेचे साहित्य‎५ काळ्या खारका, ५ फळे, १‎डझन केळी, सव्वा किलो हळद,‎थोडे तांदूळ, ताम्हण, तांब्या,‎उदबत्ती, कापूर, हळदी, कुंकू,‎कापसाचे वस्त्र, नवीन कापड,५‎लिंबू, हळद-कुंकू, खोबरे इत्यादी.‎ ६ दिवस अखंड दिवा असतो.‎ पाचवा दिवस‎मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला तिन्ही‎सांजेला घरातील व्यक्तींच्या‎दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे‎नागदिवे व देव मुटके, पुरणाचे ५‎दिवे करून देवाला ओवळतात.‎

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 2:35 pm

मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार साकार:58 आणि 85 मजली टॉवर्समधील घरांसाठी लॉटरी; वरळीमध्ये म्हाडाची नवी संधी

मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे घर असणे हे अनेकांचे आयुष्यभराचे स्वप्न असते. वाढत्या घरांच्या किमती, कमी उपलब्ध जागा आणि आर्थिक ताण यामुळे घर खरेदी करणे अनेकांसाठी आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा (MHADA) गेल्या अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. बाजारभावापेक्षा कमी किमतीत घरांची उपलब्धता आणि पारदर्शक लॉटरी प्रणालीमुळे म्हाडाच्या घरांना मोठी मागणी असते. आता म्हाडाकडून दक्षिण मुंबईतील वरळी या उच्चभ्रू भागात घरांची मोठी योजना आखली जात असून त्यामुळे मुंबईकरांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. बीडीडी चाळीच्या मोठ्या पुनर्विकासाचा हा भाग असेल. प्राथमिक माहितीनुसार, वरळीतील बीडीडी चाळी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे आणि जुन्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण करण्यात येत आहे. या प्रकल्पात म्हाडाला स्वतः विकसित करता येईल असा स्वतंत्र भूखंड उपलब्ध झाला आहे. या जागेवर म्हाडाकडून 58 मजली आणि 85 मजली असे दोन उंच टॉवर्स उभारण्याची योजना आहे. याशिवाय, विक्रीसाठी स्वतंत्र तीन टॉवर्स बांधण्याचाही प्रस्ताव आहे. या इमारतींमध्ये आधुनिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट्स, सामुदायिक जागा, व्यायामशाळा आणि मुलांसाठी खेळाची मैदाने असतील. उंच इमारतीमुळे समुद्राकाठच्या परिसराचा नजारा या घरांमधून दिसण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्याने हे काम आता गतीने होण्याची शक्यता आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर म्हाडा लॉटरीद्वारे या घरांचे वाटप केले जाईल. ज्या नागरिकांना दक्षिण मुंबईतील या प्रतिष्ठेच्या भागात राहण्याची संधी आजवर मिळाली नाही, त्यांच्यासाठी ही लॉटरी खऱ्या अर्थाने जीवन बदलणारी ठरू शकते. कमी दरात आणि सरकारी देखरेखीखाली मिळणारी ही घरे सुरक्षित, दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारी असतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींच्या तुलनेत या प्रकल्पातील घरांचा दर सामान्यांना परवडणारा राहील, अशी अपेक्षा आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्त्वावर घरांची विक्री दरम्यान, नवी मुंबईतील सिडकोनेदेखील 4,508 घरांची योजना जाहीर करून गृहनिर्माण क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण केली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, या तत्त्वावर ही घरांची विक्री केली जाणार आहे. तळोजा, घणसोली, खारघर, द्रोणागिरी आणि कळंबोली या भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (EWS) आणि एलआयजी (LIG) गटांसाठी ही घरे उपलब्ध होणार आहेत. अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची मुभा देण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना अधिक पर्याय मिळणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढत असल्याने सर्वसामान्यांसाठी गृहप्रश्न सुटण्याची शक्यता अधिक मजबूत होत आहे. सामान्य नागरिकांनाही स्वप्नातले घर मिळणे अधिक सुलभ याचबरोबर, धारावी भागातील मोठ्या सर्वेक्षण मोहिमेत 18 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. धारावीच्या पुनर्विकास प्रक्रियेत हे सर्वेक्षण महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. घरांची कागदपत्रे तपासणे, घरांना क्रमांक देणे, घराघरांत जाऊन पडताळणी करणे या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जात आहेत. पुनर्विकासामुळे धारावीकरांचे आयुष्य बदलण्याची शक्यता असून, या भागातील नागरिकांना दर्जेदार घरे, स्वच्छ परिसर, चांगली पायाभूत सुविधा आणि सुरक्षित वातावरण मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. मुंबईतील गृहप्रश्न सोडवण्यासाठी विविध सरकारी संस्थांकडून होत असलेल्या या प्रयत्नांमुळे भविष्यात सामान्य नागरिकांनाही स्वप्नातले घर मिळणे अधिक सुलभ होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 2:30 pm

भाजपकडून भाषिक प्रांतवाद पेटवण्याचा प्रयत्न:उद्धव ठाकरेंचा अर्णव खैरे प्रकरणावर भाष्य करत आरोप; म्हणाले - भाजपचा ढोंगीपणा उघड

भाजपकडून मुंबई व महाराष्ट्रात भाषिक प्रांतवाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी कल्याण येथील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना केला. भाजप व संघ मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष पसरवत आहेत. पण त्याचे खापर आपल्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. काल-परवा एक दुर्दैवी घटना घडली. ती घडायला नको होती. भाषेवरून कुणाचे खून करा, कुणाला मारा अशी आपली मागणी नाही, असे ते म्हणालेत. मुंबई व उपनगरांतील भाजप व शिंदे गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा आज शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेत दररोज प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जात आहे. पण ही केवळ गर्दी नाही, तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना व हे सैन्य आहे. आज शिवसेनेत अनेकजण परत आलेत. भाजप व गद्दार गट किती ढोंगी आहे हे हळूहळू सर्वांच्या लक्षात येत आहे. पण ही लढाई सोपी नाही. तुम्ही एका जोशात आहात, जोश तर पाहिजे, पण त्याच बरोबरीने डोळे उघडे ठेवून सगळीकडे पाहा. पालघर साधू हत्याकांडावरून भाजपवर निशाणा ते पुढे म्हणाले, भाजप हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले, त्याच पद्धतीने ते आता घरेही फोडत आहेत. त्यांचा हिंदुत्त्वाचा फुगाही आता फुटला आहे. पालघरमध्ये आपण सत्तेत असताना जे साधूंचे हत्याकांड झाले, त्यातील आरोपींना भाजपने दोन दिवसांपूर्वी आपल्या पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर बोभाटा झाला. भाजपला वाटले होते की, आपले हे पाप लपून जाईल. पण त्यांचे पाप लपले नाही. चव्हाट्यावर आले. त्यानंतर त्यांनी घाईगडबडीने त्या आरोपीच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. म्हणजेच काय की त्यांचे हिंदुत्त्वाचे ढोंग फुटले आहे. भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून? उद्धव ठाकरे यावेळी अर्णव खैरे प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले, आता भाजप व संघ भाषिक प्रांतवाद पेटवत आहेत. काल-परवा एक दुर्दैवी घटना घडली. ती घडायला नको होती. भाषेवरून कुणाचे खून करा, कुणाला मारा अशी आपली मागणी नाही. पण कुणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये. हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून? मागाठाणे येथील एकाने (शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे) मराठी माझी आई आहे आणि माझी आई मेली तरी चालेल असे विधान केले होते. हे लोक अशा पद्धतीने जनतेत राग पसरवत आहेत. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करायची. संघाचे एक पदाधिकारी भय्याजी जोशी यांनी घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की, तेथील मातृभाषा गुजराती आहे. मग हे विष जे आहे ते भाजप व संघ पसरवत असून, त्याचे खापर आपल्यावर फोडले जात आहे. तोडा, फोडा व राज्य करा हे त्यांचे धोरण आहे. त्यापासून आपल्याला सावध राहायचे आहे. आपल्याला आपल्या भूमिपूत्रांना सांभाळायचे आहे. हे काम केवळ आपली शिवसेनाच करू शकते याचे मला समाधान वाटते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्याला संघर्ष करायचाच आहे. आपण हिंमतीने लढणार. मनगटात हिंमत असते तेव्हा विजय दूर नसतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. मुंबई महापालिका असो, कल्याण डोंबवली महापालिका असो त्यावर आपण आपला भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 2:00 pm

ठाकरे बंधूंविरोधात बाळासाहेबांच्या स्मृति स्थळावर भाजपचे आंदोलन:भाषा वादामुळे तरुणाचे आयुष्य हिरावले गेले, याबद्दल संताप व्यक्त

डोंबिवली–ठाणे लोकलमधील किरकोळ वादातून 19 वर्षीय विद्यार्थी अर्णव खैरेच्या आत्महत्येपर्यंत पोहोचलेल्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. लोकल ट्रेनमध्ये चढताना अर्णवने हिंदीत संवाद साधल्यावर काही प्रवाशांनी त्याच्यावर मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते का? असे प्रश्न वारंवार विचारले. त्यानंतर त्याला शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकारानंतर मानसिक तणावाखाली गेलेल्या अर्णवने घरी परतल्यानंतर अत्यंत धक्कादायक पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, भाषावादामुळे तरुणाचे आयुष्य हिरावले गेले, याबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण आणखी तापले असून, भाजपने ठाकरे गटावर थेट निशाणा साधत मुंबईत सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन आयोजित केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाजवळ हे आंदोलन पार पडले. भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून निःशब्द आंदोलन करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. भाषा ही संपर्काचे साधन आहे, संघर्षाचे नाही, अशा आशयाचे फलक घेऊन या आंदोलनात उपस्थितांनी भाषावादाच्या विरोधात भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आमदार अतुल भातखळकर आणि अनेक स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले. अमित साटम यांनी आंदोलनात बोलताना काही राजकीय पक्षांवर थेट आरोप केले. संपलेले राजकारण सुरू ठेवण्यासाठी भाषावाद आणि प्रांतवाद पेटवण्याचा उद्योग काही नेत्यांकडून करण्यात येतो. अर्णवसारख्या निरपराध मराठी तरुणाला मुद्दाम निर्माण केलेल्या तणावाचा फटका बसला. ही केवळ राजकीय स्वार्थाची परिणती आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांना सुबुद्धी मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना केली. प्रत्येक माणसाने दुसऱ्या माणसाला समानतेने वागवणे हेच मानवतेचे खरे तत्त्व आहे, असेही ते म्हणाले. साटम यांच्या या भाषणाने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. सीसीटीव्ही, वैद्यकीय माहितीच्या आधारे तपासाचा वेग वाढवला दरम्यान, अर्णवच्या मृत्यूबाबत कोळशेवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचे वडील जितेंद्र खैरे यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून, ट्रेनमधील मारहाणीला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास, सीसीटीव्ही शोध, साक्षीदारांचे जबाब आणि मृतदेहाची प्राथमिक वैद्यकीय माहिती यांच्या आधारे तपासाचा वेग वाढवला आहे. अर्णवच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आमच्या मुलाचे प्राण भाषेच्या वादामुळे गेले आहेत. दोषींना गंभीर शिक्षा मिळालीच पाहिजे. समाजमाध्यमांवरही या घटनेविरोधात मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भाषिक सहजीवनावर केलेला मोठे प्रश्नचिन्ह या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही सक्रीय भूमिका घेतली असून, त्यांनी भाषावादाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्या गटांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. ही घटना कोणत्याही भाषिक गटाविरुद्ध नाही, तर हिंसक वर्तन करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी आहे. आरोपी मराठी आहेत की नाही, हेही तपासून स्पष्ट केले पाहिजे, असे मनसेने म्हटले आहे. अर्णव खैरेचा मृत्यू हा केवळ एका कुटुंबावर आलेला आघात नसून, भाषिक सहजीवनावर केलेला मोठे प्रश्नचिन्ह आहे, अशी भावना सामाजिक संस्थांकडून व्यक्त होत आहे. वाढता भाषावाद, लोकलमधील असुरक्षितता आणि राजकीय आरोप–प्रत्यारोप या सगळ्यांमुळे या प्रकरणाचा तपास आता राज्यभराचे लक्ष वेधून घेत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 1:50 pm

ठाण्यात कारची 4-5 दुचाकींना धडक:4 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी; चालकाला हृदयविकाराचा झटका, अपघातात मृत्यू

शुक्रवारी संध्याकाळी ६:४२ वाजता, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे कार चालवणाऱ्या एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. नियंत्रणाबाहेर गेलेली कार समोरून येणाऱ्या वाहनांना धडकली आणि उलटली. शहरातील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण जखमी झाले. ही संपूर्ण घटना उड्डाणपुलाजवळील एका इमारतीवर बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यात उड्डाणपुलावर मोठी गर्दी दिसत आहे, दोन्ही बाजूंनी वाहने जात आहेत. त्यानंतर, संध्याकाळी ६:४२ वाजता, एका वेगाने येणाऱ्या कारने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींसह चार ते पाच दुचाकींना धडक दिली आणि ती उलटली. व्हिडिओमध्ये कार दुचाकींना धडकताना दिसत आहे, ज्यामुळे एक दुचाकीस्वार हवेत काही फूट उडाला आणि उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला पडला. रस्त्यावरून लोकही जात होते, परंतु सुदैवाने रस्त्यावरील कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर उड्डाणपूल आणि रस्त्यावर लोकांची गर्दी जमली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. इतर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे वृत्त आहे. घटनेचे ४ फोटो... कार चालकाला हृदयविकाराचा झटका आला मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि ती वाहनांना धडकली. या घटनेत चालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि ते घटनेचे कारण तपासत आहेत. बस आणि कारमध्ये हृदयविकाराच्या इतर घटना मध्य प्रदेश: इंदूर-जोधपूर बसमध्ये चालकाचा मृत्यू सप्टेंबरमध्ये, इंदूरहून जोधपूरला जाणाऱ्या बसच्या चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मात्र, त्यावेळी तो बस चालवत नव्हता. ही संपूर्ण घटना बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ३६ वर्षीय चालक सतीश राव घाबरला तेव्हा त्याने त्याच्या सहकारी क्लीनरला गाडी चालवायला दिली. तो केबिनच्या हुडवर बसला होता आणि बस चालवणाऱ्या क्लीनरवर पडला.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 1:31 pm

शिंदेंचे ३५ आमदार भाजपात जाणार

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरू आहे. भाजपाकडून शिंदे गटाचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी फोडण्याचे काम सुरू आहे. पण आता लवकरच शिंदेंचे ३५ आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काहीच आलबेस नसल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक […] The post शिंदेंचे ३५ आमदार भाजपात जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 12:59 pm

थकबाकीसाठी कंत्राटदार आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी नागपूरमध्ये येत्या ८ डिसेंबरपासून सुरू होणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर संकट घोंगवू लागलंय. मागील वर्षीच्या कामांचे सुमारे १५० कोटी रुपये थकीत असल्याने नाराज झालेल्या कंत्राटदारांनी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला. थकबाकीचा बहुतांश भाग गेल्याच वर्षी दिला असल्याचं सरकार सांगत आहे. त्यामुळं हा संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. ‘नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन’चे […] The post थकबाकीसाठी कंत्राटदार आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Nov 2025 12:58 pm

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही:ही काळ्या दगडावरची भगवी रेष; एकनाथ शिंदेंचे आश्वासन, म्हणाले - एकदा कमिटमेंट केली की स्वतःचीही ऐकत नाही

डहाणू नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून, प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. ही योजना म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे. मी एकदा कमिटमेंट केली तर स्वतःचीही ऐकत नाही, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या योजना आणि नेतृत्वावर जनतेचा विश्वास टिकून असल्याचा दावा केला. डहाणूतील प्रचारसभेत त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले. डहाणू नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रितपणे शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी भरत सिंह राजपूत यांना पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाने राजेंद्र माछी यांना उमेदवारी दिली असून, या दोन्ही उमेदवारांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संजय पाटील आणि हाफिजूर रहमान खान यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने या लढतीला आणखी स्पष्टता आली. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजप आणि शिंदे गट एकीकडे, तर महाविकास आघाडी दुसरीकडे अशा सरळ-साध्या लढतीचे चित्र उभे राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत डहाणूतील अनेक प्रभागांमध्ये थेट एक–एक उमेदवारांमधील लढतीची स्थिती निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 2, 3, 5, 7, 11 आणि 12 या प्रभागांमध्ये उमेदवारांची संख्या फक्त दोन इतकीच असल्याने मतदारांकडून कोणत्या बाजूला कल झुकतो यावरच निकाल अवलंबून असेल. इतर प्रभागांमध्येही तीन ते चारपेक्षा जास्त उमेदवार मैदानात नसल्याने संपूर्ण निवडणूक सरळ, स्पष्ट लढतीची बनली आहे. स्थानिक राजकारणात ही स्थिती विशेष मानली जात असून, यामुळे प्रभागनिहाय प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलताना महाविकास आघाडीवरही टीका केली. जनतेच्या हिताच्या योजना थांबवणे, अडथळे निर्माण करणे आणि विकासाला ब्रेक लावणे ही त्यांची पद्धत आहे. आम्ही केला तो विकास आणि त्यांनी केलेली राजकारणाची नकारात्मक शैली, यातला फरक डहाणूची जनता ओळखते, असे ते म्हणाले. त्यांनी 'लाडकी बहीण' योजनेचा विशेष उल्लेख करत ही योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची असून ती दडपण्याचा प्रयत्नही काही राजकीय शक्ती करणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला. डहाणूची निवडणूकही आता प्रतिष्ठेची बनली डहाणू नगर परिषद निवडणूक स्थानिक विकासाच्या तक्रारी, सत्तांतराचे राजकारण, नवीन प्रभाग रचना आणि दोन गटांमधील चुरशीची लढत यामुळे विशेष महत्त्वाची ठरत आहे. दोन्ही बाजू आपापल्या मतदारांना आवाहन करत असून, आगामी काही दिवसांत प्रचाराला अधिक वेग येणार आहे. राज्यातील इतर नगरपरिषदांसारखीच डहाणूची निवडणूकही आता प्रतिष्ठेची बनली असून कुणाचा विजय होणार, कोणाचा पराभव होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालानंतर स्थानिक राजकारणात मोठे बदल दिसण्याची शक्यता असून, ही निवडणूक येथील राजकीय भावी चित्र ठरवणारी ठरेल, असे निरीक्षकांचे मत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 12:51 pm

भाजप नेत्यांचेच नातेवाईक बिनविरोध कसे?:ठाकरे गटाच्या नेत्याचा सवाल; एकनाथ शिंदेंचे मंत्रीच त्यांचे ऐकत नसल्याचाही केला दावा

भाजपच्याच नेत्यांचे नातेवाईक का बिनविरोध निवडून येतात? भाजपचे सामान्य कार्यकर्ते का बिनविरोध निवडून आले नाहीत? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर नगरपालिका, नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपने प्रचंड दबावतंत्राचा वापर केला असून प्रशासनाचा सुद्धा गैरवापर केला आहे. सत्तेचा माज आणि मस्ती भाजपला चढली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे मंत्री त्यांचे ऐकत नाहीत, त्यांचे नेतृत्व उदय सामंत करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑपरेट करत आहेत. ही लोकं आज ना उद्या भाजपमध्ये जाणार आहेत, गद्दारांना आमच्याकडे थारा नाही, असेही दानवेंनी म्हटले आहे. अजित पवार सौदा करता की धमकी देताय? अजित पवार यांनी निधी देण्यावरून जे वक्तव्य केले आहे त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, अजित पवार जे बोलत आहेत ते सौदेबाजी करत आहेत की धमकी देत आहेत.अजित पवारांच्या घरचा निधी नसून तो त्यांच्या घरातून येत नाही, अजित पवार मतांसाठी धमकी देत असेल तर निवडणूक आयोग काय करत आहे? निवडणूक आयोग पवारांच्या घरी पाणी भरण्यासाठी जाणार आहे का? असा सवाल दानवेंनी केला आहे. मनपाच्या मतदार यादीत मोठा घोळ अंबादास दानवे म्हणाले की, मतदार याद्या चुकल्या आहेत, महानगरपालिका यादीत अधिक चुका आहेत. वॉर्ड बाहेरील लोकांची नाव आहेत. सीमारेषा बाहेरील नावं आहेत. निवडणूक आयोग झोपले आहे का? नावापुढे एक स्टार नाही, दोन स्टार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतदार यादी जाहीर झाल्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ आहे. हजारो ठिकाणी वॉर्ड रचना गोंधळामध्ये आहे. वॉर्ड रचना केल्यानंतरही बाहेरील मतदार येतात कसे. मुंबई, पुण्यासह सर्वच ठिकाणी असेच घडले आहे.मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असल्याने आम्ही तक्रार करणार आहोत.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 12:51 pm

मनपा निवडणूक गेम सेट मॅच करण्‍याचा प्रयत्न:आदित्य ठाकरे यांची टीका; मतदानाचा हक्क हिरावला जातोय; देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी

महानगरपालिका निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवरून मोठा वाद निर्माण झाला असून ही यादी अत्यंत गोंधळलेली आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत म्हटले की, प्रारूप यादी पाहताना असे वाटते की आयोगाने स्वतःचे स्वतंत्र कामकाज न करता सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयात बसून दस्तऐवज तयार केले आहेत. यादीत मतदारांची नावे कुठे आहेत, कुठे गायब झाली आहेत, काही नावांची पुनरावृत्ती झाली आहे, तर काही संपूर्ण कुटुंबे एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थानांतरित झाल्याचे दिसून येत आहे. या सगळ्या गोंधळामुळे निवडणूक गेम सेट मॅच करण्‍याचा प्रयत्न सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की प्रारूप मतदार यादी 7 नोव्हेंबरला जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र ती 13 दिवस उशिरा म्हणजे 20 नोव्हेंबरला प्रकाशित करण्यात आली. इतका वेळ का घेतला? इतक्या विलंबानंतरही यादी त्रुटीपूर्ण कशी? हा मोठा प्रश्न आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. या यादीची तपशीलवार पाहणी केल्यानंतर असंख्य चुका आढळल्या असून त्या लवकरच जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. मतदारांनी स्वतःही आपले नाव यादीत आहे की, नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी जनतेला आवाहन केले. यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण आणि विभागप्रमुख संतोष शिंदे उपस्थित होते. गोंधळाचे पुरावे जनतेसमोर मांडणार ठाकरे पुढे म्हणाले की, सर्व महापालिका निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी आधारभूत म्हणून स्वीकारण्यात आली आहे. याविरोधात आम्ही मोठा मोर्चा काढला होता. या काळात 18 वर्षे पूर्ण केलेल्या हजारो तरुणांना मतदानाचा अधिकारच मिळत नाही. ज्यांच्याकडे लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी आहे, त्याच लोकांनी तरुणांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला. यादी वाचण्यासदेखील अवघड असून सलग एकापेक्षा एक चुकांची मालिका असल्याने तिच्यावर जनतेचा विश्वास बसू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात या साऱ्या गोंधळाचे पुरावे जनतेसमोर मांडणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली. 10 बाय 10 च्या छोट्या खोलीत 50 पर्यंत मतदार प्रारूप यादीत मोठ्या प्रमाणावर बोगस, पुनरावृत्ती व संशयित नावे आढळत असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी बिहार आणि हरयाणा निवडणुकांचा मुद्दाही उपस्थित केला. काही ठिकाणी 10 बाय 10 च्या छोट्या खोलीत 50 पर्यंत मतदार दाखवलेले दिसतात. एका दुकानावरही 20-25 मतदार नोंदवले आहेत. ही सरळसरळ व्होटचोरी आहे. बिहारमध्ये जितके मतदार आहेत त्यापेक्षा जास्त मतदान झाले, असे तथ्य आता समोर येत आहे. हरयाणातही अशाच चुका झाल्याचे विरोधी पक्षांनी दाखवून दिले. हे सर्व पद्धतशीरपणे घडत आहे, अशी टीका त्यांनी केली. शिवसेना ठाकरेंच्या पक्षाने तसेच इतर विरोधी पक्षांनीही या विषयावर सातत्याने आवाज उठवल्याचे त्यांनी स्मरण करून दिले. सत्ताधाऱ्यांना फायदा व्हावा यासाठीच हा खेळ शेवटी, मतदानाचा हक्क हिरावून घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. मतदारांचे नाव जिथे आहे तिथून हलवून ते दुसऱ्या बुथमध्ये टाकण्यात आले आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार कमजोर पडावेत आणि सत्ताधाऱ्यांना फायदा व्हावा यासाठीच हा खेळ रचला गेला आहे. जर हे सर्व जाणूनबुजून करण्यात आले असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. महापालिका निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य व्हाव्यात यासाठी आगामी काळात आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 12:33 pm

नीलेश राणे यांचा विरोधकांच्या सूरात सूर:भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरात मुस्लिम मते कशी? निवडणूक आयोगाला सवाल

भाजपच्या कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घरात बोगस मुस्लिम मते आढळल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार तथा माजी मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा सत्ताधारी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी केला आहे. नीलेश राणे यांनी ही बोगस मते कुठून आली? असा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला आहे. यामुळे त्यांनी विरोधकांच्या सूरात सूर मिळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यात सध्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक सुरू आहे. या प्रकरणी 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या प्रकरणी राज्यात सर्वत्र आरोप - प्रत्यारोपांचा धुरळा उडाला असताना सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्ष असणाऱ्या शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी उपरोक्त सवाल केला आहे. त्यांच्या मते, भाजपने कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या राहत्या घरात (घर क्रमांक 389) शेख साजिदा दाऊद, मुल्ला रेहबत तैबा यासिन, शेख दाऊद कादर हे 3 मुस्लिम मतदार राहत आहेत. विशेषतः त्यांच्या प्रभागात 169 मतदार आढळल्याचा आरोपही नीलेश राणे यांनी केला आहे. भाजपला मुस्लिम नाही, पण त्यांची मते चालतात नीलेश राणे शनिवारी या प्रकरणी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, भाजपचे कणकवली येथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्या घराच्या पत्त्यावर आम्हाला मुस्लिम मतदार आढळले. ते बोगस आहेत. ते तिथे कसे आले? हे सर्व प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेत. त्यांनी काय केले की, निवडणुकीच्या अगोदर इथून, तेथून, बाहेरून जवळपास 150 ते 200 मतदार एकत्र केले. भाजप पक्ष राज्यात कुठेही मुस्लिम समाजाला कधी उमेदवारी देत नाही. पण मते चालतात. ती सुद्धा बोगस मते चालतात. ही आढळलेली मते खरी आहेत अशातला भाग नाही. आम्ही या प्रकरणी गरज पडली तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आंदोलनाला बसणार. त्यानंतरही काही झाले नाही तर आम्ही बूथवर ही 169 लोकं कशी पोहोचतात हे आम्हालाही पहायचे आहे, असे नीलेश राणे म्हणाले. कणकवलीत राणे विरुद्ध राणे असा सामना उल्लेखनीय बाब म्हणजे कणकवली नगरपरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राणे विरुद्ध राणे अशी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी भाजप आमदार नीतेश राणे व त्यांचे मोठे बंधू शिवसेना आमदार नीलेश राणे एकमेकांपुढे उभे टाकलेत. याठिकाणी भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. तर भाजपला रोखण्यासाठी शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अनोखी युती झाली आहे. या पक्षांनी भाजपविरोधात शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नारायण राणे यांची दोन्ही मुले एकमेकांपुढे उभी टाकली आहेत. हे ही वाचा... महाराष्ट्रात 'नाराजी' नाट्य कोसळणार:भाजपच्या ऑपरेशन लोट्समध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्यात खळबळ मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे तब्बल 35 आमदार भाजपत जाणार असल्याचा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले. भाजपला ते आता नकोसे झालेत. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोट्स कार्यक्रम सुरू झाला आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. भाजपच्या कथित फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेले शिंदे सध्या नाराज असताना ठाकरे गटाने हा दावा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 12:28 pm

70 हजार लोकसंख्या असलेली निवडणूक पूर्ण बिनविरोध कशी?:40 वर्षांचा संघर्ष मिटला, देशमुख गट भाजपमध्ये; रावलांचा दमदार डाव

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषद निवडणुकीत यंदा अभूतपूर्व घडामोड घडली असून संपूर्ण निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. जवळपास 70 हजार लोकसंख्या असलेल्या या नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदापासून ते सर्व 13 प्रभागांतील 26 जागांपर्यंत सर्वत्र भाजपचे उमेदवार विजयी ठरले आहेत. स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून सुरू असलेली राजकीय चुरस, संघर्ष आणि गटबाजी या वेळी पूर्णपणे शांत पडताना दिसली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केलेल्या राजकीय रणनीतीमुळे विरोधकांनी माघार घेतल्याचे दिसून आले. परिणामी, 1952 पासून अस्तित्वात असलेल्या या नगरपरिषदेत प्रथमच एकमताने निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याचा ऐतिहासिक क्षण घडला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), एमआयएम, समाजवादी पार्टी तसेच अनेक अपक्ष या सर्व पक्षांकडून उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र माघारीचा शेवटचा दिवस येईपर्यंत एकेक करत सर्व विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे प्रभागनिहाय असलेली सर्व 26 पदे तसेच नगराध्यक्ष पदावर भाजपने सहज किल्ला सर केला. प्रशासन आणि स्थानिक स्तरावरही या बिनविरोध प्रक्रियेचे कौतुक करण्यात येत असून, विरोधकांच्या माघारीमागील राजकीय समीकरणांवर चर्चा रंगत आहे. अनेकांना हा निर्णय कसा झाला? याचे आश्चर्य वाटत असून यापूर्वी कधीही न घडलेली ही निवडणूक प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे. दोंडाईच्यातील भाजपच्या विजयामागे सर्वात मोठी भूमिका मंत्री जयकुमार रावल यांची असल्याचे मानले जाते. गेल्या 40 वर्षांपासून भाजपच्या कट्टर विरोधात उभा असलेला डॉ. हेमंत देशमुख गट यापूर्वी कधीही भाजप सोबत आलेला नव्हता. परंतु या निवडणुकीत प्रथमच रावल यांनी हा गट आपल्या बाजूला ओढण्यात यश मिळविले. पक्ष नेतृत्वासोबत झालेल्या उच्चस्तरीय चर्चेनंतर देशमुख गटाने भाजपत प्रवेश केला आणि अनेक दशकांचा राजकीय तिढा मिटला. रावल यांनी सुरुवातीला नगराध्यक्ष पदासह 7 जागा बिनविरोध करण्याची रणनीती आखली होती. परंतु निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी उर्वरित 19 प्रभागांतही सर्व प्रतिस्पर्ध्यांना माघार घेण्यास भाग पाडले गेले. परिणामी, दोंडाईचा नगरपरिषद संपूर्णपणे एकपक्षीय झाली. बिनविरोध निवडून आलेल्या 26 सदस्यांमध्ये विविध प्रभागांतील नव्या चेहऱ्यांचा आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर रावल यांची निवड झाली आहे. प्रभाग क्र.1 ते 13 पर्यंत भाजपचे सर्व उमेदवार एकमुखाने निवडले गेले असून यामध्ये मुकेश देवरे, रविना कुकरेजा, सरलाबाई सोनवणे, अक्षय चव्हाण, सुपौयाबी बागवान, कल्पनाबाई नगराळे, शेख नबु, विजय पाटील, भारती मराठे, वैशाली कागणे, देवयानी रामोळे, नरेंद्र गिरासे, राणी अग्रवाल, सिराजू भिल, भरतरी ठाकुर अशा अनेक नावांचा समावेश आहे. संपूर्ण नगरपरिषद भाजपच्या अखत्यारीत गेल्यामुळे पुढील पाच वर्षांत दोंडाईच्यातील विकास प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सर्व विरोधकांनी स्पर्धेतून माघार का घेतली? या संपूर्ण प्रक्रियेत महाविकास आघाडीतील पक्षांचा माघार घेण्याचा निर्णय हा मोठा राजकीय मुद्दा ठरला आहे. रावल यांनी अशी कोणती राजकीय किमया केली की सर्व विरोधकांनी स्पर्धेतून माघार का घेतली? हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. विरोधकांनी निवडणुकीत उतरल्यास पराभव निश्चित होता का, की इतर काही कारणांमुळे त्यांनी उमेदवारी परत घेतली, याबाबत विविध अटकळांना उधाण आले आहे. मात्र दोंडाईच्यातील नागरिक मात्र निवडणूक बिनविरोध पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त करत असून, शहराच्या विकासाच्या दृष्टीने स्थिर नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त करत आहेत. आता नव्या नगरपरिषदेकडून विकासकामांना गती देण्याची अपेक्षा आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 12:15 pm

जामनेर नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांची दडपशाही:रोहित पवारांचा आरोप; विरोधी उमेदवारांना गैरमार्गे अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप

भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास लावण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांनी या प्रकरणी काही व्हिडिओ पोस्ट केलेत. त्यात भाजप कार्यकर्त्यांची कथित शिरजोरी दिसून येत आहे. राज्यात सध्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक सुरू आहे. या प्रकरणी 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती ठरवली आहे. जामनेर नगरपरिषदेतही 17 जागांसाठी एकूण 59 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच भाजपचे इतर 9 नगरसेवकही बिनविरोध निवडून आलेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी भाजपवर विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला आहे. लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? रोहित पवार म्हणाले की, भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती. बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा! दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. फडणवीस, महाजन, रावल यांना टोला तत्पूर्वी, अन्य एका ट्विटद्वारे रोहित पवारांनी भाजपच्याच जागा बिनविरोध निवडून येण्याविषयी प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. ते या प्रकरणी बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा देत म्हणाले होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, गिरीश महाजन यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, जयकुमार रावल यांच्या मातोश्री सौ. नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. केशव उपाध्ये, माधव भंडारींच्या दुःखात सहभागी बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा. घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कुटुंब कल्याण योजना’ राबवत पक्षाच्या ‘तळागाळातल्या कार्यकर्त्यांना’ ‘न्याय’ देऊन पक्षांतर्गत ‘लोकशाही’ ‘मजबूत’ करत आपला पक्ष कसा पार्टी विथ डिफरन्स आहे हे दाखवून दिलं. असो, वर्षानुवर्षे भाजपासाठी काम करणाऱ्या केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंतांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे रोहित पवारांनी म्हटले आहे. हे ही वाचा... शरद पवारांचे 6 उमेदवार अज्ञातवासातून बाहेर:अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आले समोर; भाजपवर दबाव टाकल्याचा केला आरोप जळगाव -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जामनेर येथील 6 मुस्लिम उमेदवार अज्ञातवासातून बाहेर आलेत. भाजपच्या कथित दबावाला घाबरून या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अज्ञातवासात जाणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 11:59 am

धक्का लागल्याच्या कारणावरून वाद आणि दुर्दैवी घटना:ठाकरेंच्या निष्ठावान शिवसैनिकाने गमावले प्राण; महाराज म्हणूनही ओळखले जाई

मुंबईतील घाटकोपर परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्रोळी पार्कसाईटमध्ये राहणारे आणि परिसरात कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेले सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर यांना गुरुवारी सीजीएस कॉलनीत निर्घृणपणे ठार मारण्यात आले. केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून सुरुवात झालेल्या वादाचे रुपांतर काही क्षणांतच भांडणात झाले आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात संताप व हळहळ व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, पाचाडकर हे नियमितपणे घाटकोपर स्टेशन परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असत आणि त्या वेळीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेत आरोपी अमन श्रीराम वर्मा (वय 19) याला घाटकोपर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाचाडकर सीजीएस कॉलनीत पायी चालत असताना आरोपी अमन याचा त्यांना धक्का लागला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद तीव्र होताच त्याचे रूप झटापटीत बदलले. अचानक अमनने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलला आणि तो थेट पाचाडकर यांच्या डोक्यात घातला. जबर मार बसल्याने पाचाडकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हत्येनंतर अमन वर्मा फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे व त्यांच्या पथकाने मोठे अभियान राबवले. जवळपास 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज हाती घेऊन त्याचा पाठलाग करण्यात आला. अनेक ठिकाणचे व्हिडिओ तपासल्यानंतर पोलिसांना अमनच्या हालचालींचा माग मिळाला. शेवटी रमाबाई कॉलनी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. पुढे या प्रकरणात कोणती कारवाई होते, याकडे आता स्थानिकांचे व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यांना महाराज म्हणूनही ओळखले जाई सुरेंद्र पाचाडकर यांच्या मृत्यूने विक्रोळी पार्कसाईट परिसरात शोककळा पसरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेशी निष्ठा असलेले आणि शाखेतील कामात सदैव सक्रीय असलेले पाचाडकर हे कार्यकर्त्यांमध्ये आदराने ओळखले जात. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा पुढाकार असे. शिवजयंतीच्या कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत ते चित्ररथावर उभे राहत असत, त्यामुळे त्यांना महाराज म्हणूनही ओळखले जाई. त्यांच्या निधनाने कार्यकर्त्यांसह रहिवासीही हळहळ व्यक्त करत आहेत. प्रतिबंधक उपाययोजना यावर भर देण्याची गरज या प्रकरणामुळे पुन्हा एकदा किरकोळ वादातून वाढणाऱ्या हिंसक घटनांचा प्रश्न पुढे आला आहे. केवळ धक्का लागल्यासारख्या क्षुल्लक कारणावरून जीव घेण्याइतका राग, आक्रमकता आणि बेफिकीरपणा समाजात वाढतो आहे का? असा सवाल नागरिक करत आहेत. स्थानिकांच्या मते, सुरेंद्र पाचाडकर हे शांत आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व होते. अशा व्यक्तीचा जीव केवळ क्षणिक भांडणामुळे गमवावा लागला, ही मोठी शोकांतिका असल्याचे अनेकांचे मत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी अशा घटना टाळण्यासाठी परिसरातील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही आणि प्रतिबंधक उपाययोजना यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 11:53 am

भाजप मतांसाठी काहीही करू शकते:मशिदीमध्ये जाणारे शेलार हिंदू महापौर बसणार म्हणतात,.. तर मुंबईत नक्कीच खान महापौर होईल- महेश सावंत

शब्द फिरवण्यात भाजप हुशार आहे. आशिष शेलार हे काही दिवसांपूर्वी मशिदीमध्ये गेले होते, त्यांनी सांगायला हवे की कोण महापौर होणार आहे? मुंबई मनपामध्ये जर भाजपची सत्ता आली तर खान महापौर नक्की होणार. हे लोकं मतांसाठी काहीही करु शकतात, कुठल्याही थराला जाऊ शकतात, असे ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी म्हटले आहे. महेश सावंत म्हणाले की, राजकारणामध्ये प्रत्येक नेता वल्गना करत असतो की आम्ही यांना संपवू त्यांना संपवू. पण येणारा काळच सांगू शकतो की मुंबई मनपावर कोणाची सत्ता असेल. यावर निवडणुकीनंतर बोलू यात आता बोलून काहीच फायदा नाही. मुंबई मनपावर ठाकरे बंधूंची सत्ता येणार आमचाच महापौर बसणार असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे. सदा सरवणकर यांचे जावई हे पनवेलमध्ये राहतात त्यांचे नाव आमच्या प्रभादेवीमध्ये आले आहे. समाधान उभा राहणार म्हणून हे नाव इथे नोंदवले आहे का? नेते लोक अशी मत चोरी करत आहेत तर सामान्य माणसाने कुणाकडे बघावे. हा प्रकार लोकशाहीचा खून महेश सावंत म्हणाले की, देशातील जनतेचा लोकशाहीमध्ये जो मतदानाचा हक्क आहे तो भाजप हिरावून घेत आहे. माहिममधील 8 ते 10 हजार मतदारांचे नाव गाळण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. त्यांना चांगली बुद्धी मिळावी. हे करत असलेल्या कृत्यामुळे थोड्याच दिवसामध्ये देशभरात आंदोलन सुरू होणार आहे. आमच्यावर आरोप करणे चुकीचे महेश सावंत म्हणाले की, कुणीतरी आत्महत्या केली म्हणून त्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जबाबदार आहेत हा भाजपचा आरोप चुकीचा आहे. भाजपला देशातील अनेक राज्यात सत्ता मिळालेली आहे आणि ते असे आंदोलन करतात ते चुकीचे आहे. त्यांना चर्चेत राहण्यासाठी ठाकरेंवर आरोप करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. प्रांतीय वाद करत नाही महेश सावंत म्हणाले की, रेल्वेमध्ये कुणाची मक्तेदारी जास्त आहे हे पाहण्यासाठी भाजपच्या लोकांना पाठवले पाहिजे. विरार-मीरा रोडवरून आले तर बसायला जागा दिली जात नाही. आम्ही प्रांतीय वाद करत नाही पण भाजपने रेल्वेत कुणाची मक्तेदारी आहे हे पाहावे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 11:48 am

ना संचिका, ना नोंदवही, ना सुनावणी, तरी 73 कोटी काढले:मावेजा घोटाळ्याचा पर्दाफाश; 2 अधिकारी निलंबित, 3 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त, पाच वकिलांवरही गुन्हे

बीड जिल्ह्यातील मावेजा गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करत प्रशासनाने दोन शासकीय अधिकाऱ्यांना निलंबित केले असून तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. धुळे–सोलापूर महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून 241 कोटींच्या वाढीव मावेज्याचे आदेश तयार केले असल्याचा आरोप आहे. या बनावट आदेशांवर आधारलेली 73 कोटी रुपयांची रक्कमही मिळवून अपहार केल्याचे उघड झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर अखेर कडक कारवाई झाली आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे आणि पांडुरंग पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच भूसंपादन कार्यालयात कार्यरत असलेल्या तीन कंत्राटी कर्मचारी अविनाश चव्हाण, अजहर शेख आणि त्र्यंबक पिंगळे यांची तात्काळ सेवा समाप्त केली. या गैरव्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप पाच वकिलांवरही असून त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत. मात्र प्रकरण उघड होताच हे पाचही जण अद्याप फरार आहेत. संपूर्ण तपासणी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीमार्फत केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मावेजा प्रकरणातील आरोपींनी संगनमत करून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी बनावट तयार केली. त्यानंतर या बनावट कागदपत्रांचा आधार घेत जवळपास 154 प्रकरणांमध्ये 241 कोटी 62 लाख रुपयांचे आदेश तयार करून ते लवाद आदेश म्हणून निर्गमित केले. आश्चर्य म्हणजे या आदेशांसाठी आवश्यक असलेल्या संचिका, नोंदवही, सुनावणीची माहिती किंवा अधिकृत दस्तऐवज कार्यालयात उपलब्ध नव्हते. तरीही सरकारी कागदपत्रं बनावट पद्धतीने तयार करून त्यावरूनच राष्ट्रीय महामार्ग विभागातून 73 कोटी रुपयांची रक्कम काढण्यात आली. विभागातील कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह या प्रकारामुळे महसूल विभागामध्ये मोठा धक्का बसला असून प्रकरण किती खोलवर गेले आहे, याचा तपास सुरू आहे. लवाद आदेश, सुनावणी तसेच सरकारी दस्तऐवजांचा गैरवापर करून एवढी मोठी रक्कम काढण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित विभागातील कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी संपूर्ण घोटाळ्याचा खरा मास्टरमाईंड कोण आहे, हे शोधण्याचे आव्हान एसआयटीसमोर आहे. तपासाचा वेग वाढवण्यात आला असून पुढील काही दिवसांत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त नुकसानभरपाई मावेजा म्हणून दिली जाते दरम्यान, मावेजा म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मावेजा म्हणजे जमीन संपादन होताना जमीनमालकांना मिळणारी अतिरिक्त भरपाई किंवा वाढीव मोबदला होय. एखादी संस्था, जसे सिडको किंवा शासन, जेव्हा जमीन संपादित करते, तेव्हा मूळ मोबदल्याबरोबरच न्यायालयात झालेल्या निर्णयांच्या आधारे मिळणारी अतिरिक्त नुकसानभरपाई ही मावेजा म्हणून दिली जाते. या रकमेतील वाढीचा गैरवापर करून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अशी प्रकरणे रोखण्यासाठी मजबूत प्रणाली उभारण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 11:35 am

मुंबई-पुण्यातही गारठा वाढला:काही भागांत हलक्या पावसाची शक्यता; काही भागात किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पुन्हा एकदा जाणवू लागली आहे. उत्तरेकडील थंड वारे आणि ढगाळ वातावरणामुळे बहुतांश भागात तापमानात लक्षणीय घट होत आहे. सकाळी धुक्याची चादर आणि रात्रीची गार हवा यामुळे नागरिकांना जानेवारीसारख्या थंडीचा अनुभव येत आहे. विशेषतः ग्रामीण भागात सकाळच्या वेळी शेतांमध्ये दाट धुके दिसत असून, तापमानातील चढ-उतारामुळे आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मुंबई, पुणे, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या सर्व भागांत थंडी वाढलेली दिसत आहे. मुंबईसारख्या शहरातही सकाळच्या वेळी तापमान खाली घसरत असून, नागरिकांना हलकी उब घ्यावी लागत आहे. पुणे आणि नाशिकमध्ये तर पहाटेच्या वेळी रस्त्यांवर थंडी स्पष्टपणे जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 ते 15 अंशांच्या दरम्यान नोंदवले जात असून, विशेषतः जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातल्या काही भागात तापमान सलग खाली येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या राज्यभर थंडीची लाट कायम राहणार आहे. तथापि, पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये येत्या तीन दिवसांत 2 ते 3 अंशांनी तापमान वाढू शकते. तरीही त्यानंतर वातावरणात विशेष बदल होणार नाही, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. विदर्भातील अनेक भागांत पुढील पाच दिवसांत किमान तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तरीही सकाळ-संध्याकाळची गारठा परिस्थिती तशीच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकणात पावसाची शक्यता राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि तळ कोकण या भागांत पुढील तीन दिवसांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या शक्यतेमुळे किनारपट्टी भागांत तापमानात काहीशी वाढ होऊ शकते. मात्र उर्वरित महाराष्ट्रात कोरडे आणि गारठ्याचे वातावरण कायम राहील. झपाट्याने घटणाऱ्या तापमानामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक आणि शेतकऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. राज्यभर हिवाळ्याचा जोर स्पष्टपणे राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमानही लक्षणीय पद्धतीने खाली आले आहे. मुंबईत (CLB) 23.2C, तर (SCZ) विभागात 19.6C नोंदवले गेले. रत्नागिरीत तापमान 21.2C, तर अहमदनगर 13.4C, जळगाव 11.0C, जेऊर 12.0C, नाशिक 13.8C, पुणे 14.4C अशी नोंद झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागांत 16 ते 19 अंश तापमान नोंदले गेले. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर 14.4C, नांदेड 14.0C, परभणी 14.5C, धाराशिव 16.0C असे तापमान राहिले. विदर्भातील नागपूर 13.5C, अमरावती 13.1C, यवतमाळ 12.5C, अकोला 13.5C, चंद्रपूर 15.6C अशी नोंद झाली. या सर्व तापमानांवरून सध्या राज्यभर हिवाळ्याचा जोर स्पष्टपणे जाणवत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 11:21 am

शरद पवारांचे 6 उमेदवार अज्ञातवासातून बाहेर:अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आले समोर; भाजपवर दबाव टाकल्याचा केला आरोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जामनेर येथील 6 मुस्लिम उमेदवार अज्ञातवासातून बाहेर आलेत. भाजपच्या कथित दबावाला घाबरून या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत अज्ञातवासात जाणे पसंत केल्याचे सांगितले जात आहे. जामनेर नगरपरिषदेसाठी सध्या निवडणूक होत आहे. या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 6 मुस्लिम उमेदवार अचानक अज्ञात स्थळी रवाना झाले होते. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती. ते अज्ञात स्थळी का गेले? याविषयी वेगवेगळ्या अटकळी व्यक्त केल्या जात होत्या. विशेष शरद पवार गटाने भाजपवर आपल्या पक्षाच्या उमेदवारांना विविध प्रलोभने दाखवून व त्यांच्यावर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप केला होता. यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली असताना आता अज्ञातस्थळी गेलेले सर्व उमेदवार समोर आलेत. भाजपचा एकहाती विजय होऊ देणार नाही शरद पवार गटाचे उमेदवार जावेद मुल्ला यांनी याविषयी सांगितले की, जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांना प्रलोभने दाखवली जात होती. त्यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आम्ही खबरदार म्हणून आमच्या उमेदवारांना सुरक्षित ठिकाणी नेले होते. आमच्यावर दबाव कोण टाकत आहे? हे सर्वश्रूत आहे. पण आम्ही त्याचे नाव आज सांगणार नाही. निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर संबंधितांचे नाव आम्ही जाहीर करू. भाजपकडून जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवण्यासाठी हे केले जात आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही. विकास कामे केली तर विरोधी उमेदवारांवर दबाव का? भाजपने मागील 5 वर्षांत विकासकामे केली असतील तर त्यांना आता इतर पक्षाच्या उमेदवारांवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव का टाकावा लागत आहे? असा सवालही जावेद मुल्ला यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी साधना महाजन यांचे नाव न घेता त्यांचा झालेला बिनविरोध विजय हा लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप केला. तसेच आपल्या पक्षासह काँग्रेसचे उमेदवार बहुमताने निवडून येतील, असा विश्वासही व्यक्त केला. आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अज्ञातस्थळी जात असताना आम्हाला भाजपच्या अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे फोन आले होते. वेळ आली तर आम्ही त्यांची नावेही जाहीर करू, असेही मुल्ला यावेळी बोलताना म्हणाले. जामनेरमध्ये 17 जागांसाठी 59 उमेदवार मैदानात उल्लेखनीय बाब म्हणजे अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता जामनेर नगरपरिषदेतील उमेदवारांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात नगराध्यक्षपदासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी एकूण 59 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात प्रभाग 1 मधून भाजपचे दत्तात्रय जोहरे यांना आपल्या विरोधातील 3 उमेदवारांशी दोनहात करावे लागणार आहेत. तर प्रभाग 3 मध्ये भाजपच्या बाबूराव हिवराळे व शरद पवार गटाच्या उमेदवारात सामना रंगणार आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये विद्यमान नगरसेवक आतिष झाल्टे यांचा सामना त्यांचे सख्खे चुलत बंधू संतोष झाल्टे यांच्याशी होणार आहे. भाजपचे 9 नगरसेवकही येथे बिनविरोध निवडून आलेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 11:04 am

बुरखाधारी महिलांकडून पाच लाखांचे दागिने लंपास:पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील सराफी पेढीत चोरी

पुणे शहरात खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढ्यांमध्ये शिरून दागिने चोरणाऱ्या बुरखाधारी महिलांकडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. बंडगार्डन रस्ता आणि कोंढवा परिसरात या घटना घडल्या असून, कोरेगाव पार्क आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बंडगार्डन रस्त्यावरील एका प्रसिद्ध सराफी पेढीत 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही पहिली घटना घडली. दोन बुरखाधारी महिलांनी दुकानात प्रवेश केला आणि कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून दागिने दाखवण्यास सांगितले. या संधीचा फायदा घेत त्यांनी 4 लाख 74 हजार रुपयांचे सोन्याचे कडे चोरून नेले. या चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सराफी पेढीतील रोखपालाने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या महिलांचा शोध पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. दुसरी घटना कोंढवा खुर्द भागातील विठ्ठल मंदिराजवळील एका सराफी पेढीत 21 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. येथेही दोन बुरखाधारी महिलांनी खरेदीच्या बहाण्याने सराफ व्यावसायिकाला बोलण्यात गुंतवले. त्यांचे लक्ष नसताना 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी सराफ व्यावसायिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. जाधव या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दोन्ही घटनांमधील महिलांनी बुरखा परिधान केला होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून पोलिसांनी संशयित आरोपींचा तपास सुरू केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 11:01 am

तुमसर नगरपरिषद निवडणूक:भाजपला आता माणसांची नाही, तर पैशांची गरज, निवडणूक धोरणावर माजी खासदार मधुकर कुकडेंची टीका

भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषद निवडणुकीत मोठा हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा बघायला मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये बंडखोरी झाली असून, भाजपचे तीन वेळा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार राहिलेले मधुकर कुकडे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत आपल्या पुतण्याच्या बंडखोरीला उघडपणे समर्थन दिले आहे. मधुकर कुकडे म्हणाले की, भाजपला आता निवडणूक लढवण्यासाठी माणसांची नाही, तर पैशाची गरज आहे. आणि पक्षात माझ्या शब्दाला मान राहिला नाही. राजकारणातील इमानदारी टिकवून ठेवण्यासाठी आपण पुतण्या आशिषच्या बंडखोरीला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी खासदार मधुकर कुकडे यांचे पुतणे आशिष कुकडे यांना भाजपने शेवटच्या क्षणी डावलून प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली. यानंतर संतप्त मधुकर कुकडे यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना भाजपवर खळबळजनक आरोप केले. 'घाबरून' पडोळेंना तिकीट मधुकर कुकडे म्हणाले की, आशिष कुकडे यांनी भाजपचे तिकीट मागितले होते आणि कार्यकर्त्यांचाही त्यांना 100 टक्के पाठिंबा होता. भाजप तिकीट देईल, असा पूर्ण विश्वास होता. मात्र, प्रदीप पडोळे यांनी राजीनामा देण्याची घोषणा करताच भाजपने 'घाबरून' त्यांना तिकीट दिली, असा आरोप कुकडे यांनी केला. मी तीन वेळेस आमदार आणि एकदा खासदार असूनही माझ्या शब्दाला पक्षात मान राहिला नाही. भाजप नेते परिणय फुके यांना मी आशिषसाठी तिकीट मागितली होती. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर आशिषला निवडणुकीच्या तयारीला लावले होते. आशिषला तिकीट न मिळणे म्हणजे माझी पक्षात किंमत शून्य आहे, असे त्यांनी संतापून म्हटले आहे. शिस्तभंगाच्या कारवाईला घाबरत नाही कुकडे म्हणाले की, फुके साहेब म्हणतात की, निवडणुकीला पैसे लागतात. मी म्हणालो, जेवढी प्राथमिक गरज आहे, तेवढा मी खर्च करायला तयार होतो. पण दारूवर मी पैसे खर्च करायला तयार नव्हतो. मी 15 वर्षे भाजपचा आमदार राहिलो, पण कधीही पैसे पाहून तिकीट दिले नाही. जात बघून नाही तर, माणसे बघून तिकीट दिल्या जात होते. आता पुतण्या आशिषच्या बंडखोरीमुळे भाजपने आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, मी त्याला घाबरत नाही. या बंडखोरीमुळे तुमसरमधील राजकारण तापले असून, निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 10:48 am

मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे:मध्य रेल्वेचा आजपासून 12 दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक; वाचा केव्हा अन् कुठे घेणार ब्लॉक

मध्य रेल्वेने 2 डिसेंबरपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्याची घोषणा केली आहे. या ब्लॉक दरम्यान पनवेल ते कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स बांधकामात येणारे यांत्रिक अडथळे दूर केले जाणार आहेत. यामुळे काही रेल्वे व लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान ब्लॉक नसेल. बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्रीनंतर 2 ते 3.30 पर्यंत ब्लॉक राहील. बदलापूर स्थानकावर पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम बदलापूर स्थानक परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. पादचारी पुलासाठी 37.2 मीटर लांबीचे 18 स्टील गर्डर उभारण्यात येणार आहे. यासाठी 350 मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन वापरण्यात येणार आहे. गर्डर उभारणीसाठी शनिवार, 22 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. शेवटची कर्जत रात्री 11.30 वाजता ब्लॉक कालावधीत 12.12 ची कर्जत-सीएसएमटी अंबरनाथपर्यंत धावेल. कर्जतहून 2.30 वाजेला सुटणारी लोकल अंबरनाथ येथून 3.10 वाजता सीएसएमटीसाठी रवाना होईल. दोन्ही दिशेला ही लोकल अंबरनाथ ते कर्जतदरम्यान रद्द राहील. यामुळे सीएसएमटीतून कर्जतपर्यंत 11.30 वा.ची कर्जतपर्यंत जाणारी शेवटची लोकल असणार आहे. विशेष रात्रकालीन ब्लॉक केव्हा व कुठे घेणार? 2 डिसेंबरपर्यंत घेणार पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स बांधकामात येणारे यांत्रिक अडथळे हटविण्यासाठी मध्य रेल्वेने 21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक रात्री 1:30 ते 3:30 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. पनवेल आणि कळंबोलीदरम्यान प्लॅटफॉर्म अप आणि डाऊन मार्गिका, ट्रेन उभ्या करण्यासाठी अप आणि डाऊन मार्गिका तसेच इंजिन वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्गिकांवरील वापर पूर्णपणे बंद असेल. 20 मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावतील. हे ही वाचा... महाराष्ट्रात 'नाराजी' नाट्य कोसळणार:भाजपच्या ऑपरेशन लोट्समध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार, ठाकरे गटाच्या दाव्याने राज्यात खळबळ मुंबई - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे तब्बल 35 आमदार भाजपत जाणार असल्याचा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जे पेरले तेच उगवले. भाजपला ते आता नकोसे झालेत. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोट्स कार्यक्रम सुरू झाला आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. भाजपच्या कथित फोडाफोडीच्या राजकारणाला कंटाळलेले शिंदे सध्या नाराज असताना ठाकरे गटाने हा दावा केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 10:34 am

ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही:ठाकरे बंधूंना अर्णव खैरेच्या मृत्यूच्या पापातून सुटता येणार नाही - भाजप

ठाकरे बंधूंना अर्णव खैरे नामक तरुणाच्या मृत्यूच्या पापातून सुटता येणार नाही, असा घणाघात भाजपने मराठीच्या आग्रहासाठी रान पेटवणाऱ्या राज व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केला आहे. अर्णव खैरे नामक विद्यार्थ्याने कल्याण येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने हिंदी, मराठी भाषिक वादामुळे लोकलमध्ये झालेल्या मारहाणीमुळे टोकाचे पाऊल उचलले होते. भाजपने आता या मुद्यावरून मराठीचा आग्रह धरणाऱ्या ठाकरे बंधूंना धारेवर धरले आहे. तसेच अर्णव खैरेच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही, असा दावाही केला आहे. भाषिक द्वेषाच्या कारखान्यामुळे अर्णवचा मृत्यू भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, मराठी माणसाने ठाकरे बंधूंना भरभरून प्रेम दिले. सत्ता दिली, सन्मान दिला... पण परत काय मिळाले? भकास मुंबई, आणि त्यांच्या स्वार्थी भावनिक राजकारणापायी निर्माण झालेला द्वेष. अर्णव खैरे या तरुणाच्या मृत्यूच्या पापातून ठाकरे बंधूंना सुटता येणार नाही. भाषिक द्वेषाचे जे कारखाने त्यांनी चालवले त्यातूनच हा मृत्यू घडला आहे. ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाही! आशिष शेलारांच्या भूमिकेचेही केले समर्थन उपाध्ये यांनी अन्य एका ट्विटद्वारे मुंबईच्या महापौरांविषयी भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानाचे जोरदार समर्थनही केले आहे. मुंबईचा महापौर हिंदु होणार असा दावा भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला, आणि हिंदुत्वाची ॲलर्जी असलेल्या तमाम लांगूलचानवाद्यांच्या पोटात मळमळ सुटली. हिंदू, मराठी असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न मविआ कडून सुरू झाला. मराठी माणूस हिंदू नाही? मराठी माणसाला हिंदुत्वाबद्दल आस्था नाही? काँग्रेसला तर हिंदुत्वाचं वावडंच आहे, पण उद्धव ठाकरेंनाही शेलार यांचा विचार झोंबला? मुंबईचा महापौर हिंदू हवा की नको हे उध्दव ठाकरे यांनी जाहिर करायलाच हवे! मुंबईकर जनतेची भावना शेलार यांनी बोलून दाखवली आहे, असे ते म्हणालेत. काय आहे अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण? अर्णव खैरे हा कल्याण पूर्व येथील सहजीवन रेसिडेन्सीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो मुलुंड येथील केळकर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. तो नेहमीप्रमाणे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी कल्याणहून कॉलेजला जाण्यासाठी लोकलने निघाला. ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. या गर्दीत थोडी जागा मिळावी म्हणून त्याने हिंदीत केवळ 'थोडा आगे हो' एवढेच शब्द उच्चारले होते. त्याचवेळी आजूबाजूला उभ्या असलेल्या 4-5 तरुणांनी त्याला वेढले व तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलायला लाज वाटते का? असे प्रश्न करत मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अर्णव घाबरला. ठाणे स्टेशनला पोहोचताच तो लोकलमधून उतरला व पुढील लोकल पकडून मुलुंड स्थित आपल्या कॉलेजला पोहोचला. त्याने त्या दिवशी प्रॅक्टिकलला उपस्थिती लावली. पण मनातल्या भीतीमुळे व तणावामुळे तो कॉलेज अर्धवट सोडून घरी परतला. घरी जाताना त्याने वडिलांना फोन करून लोकलमध्ये घडलेला प्रसंग सांगितला. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे तो मानसिकदृष्ट्या खूपच खचल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यानंतर सायंकाळी 7 च्या सुमारास त्याचे वडील घरी परतले, तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता अर्णवने आपल्या बेडरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने त्याला रुख्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी रात्री 9.05 वाजता त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर वडील जितेंद्र खैरे यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, पोलिसांनी वडिलांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू केला आहे.------------------------------

दिव्यमराठी भास्कर 22 Nov 2025 10:07 am