शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत आजारपणानंतर आज पुन्हा पत्रकारांना सामोरे गेले. त्यात त्यांनी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच एकेदिवशी शिंदे गटाचा कोथळा बाहेर काढतील असा दावा केला. यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीवरही भाष्य केले. माझी तब्येत सुधारत आहे. उपचार कठोर असतात. आजापेक्षा उपचार भयंकर असतात, असे ते म्हणालेत. संजय राऊत आजारपणामुळे गत काही दिवसांपासून सार्वजनिक जिवनापासून दूर होते. बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सत्ताधारी महायुतीवर चौफेर हल्ला चढवला. मी एकनाथ शिंदेंची शिवसेना असे म्हणण्यास तयार नाही. एकदिवस अमित शहाच शिंदेसेनेचा कोथळा बाहेर काढतील, असे ते म्हणाले. ठाकरे बंधूंचे अतिशय उत्तम सुरू आहे संजय राऊत यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या भेटीवरही भाष्य केले. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसलाही धारेवर धरले. ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची एक भेट झाली. त्यात राज यांनी उद्धव यांना एक प्रेझेंटेशन दाखवले. त्यांचे जे काही चालले आहे ते अतिशय उत्तम चालले आहे. राज ठाकरे सोबत आल्यामुळे भाजपचा पराभव होईल. भाजप हा मुंबईचा एक नंबरचा शत्रू आहे. मुंबई अदानींच्या घशात घातली जात आहे. हे थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांना सोबत घेणे आवश्यक आहे. या प्रकरणी एकनाथ शिंदे काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही. काँग्रेसने आमच्यासोबत असणे ही आमची भूमिका आहे. पण बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल, तर त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात आमची हरकत नाही, असे राऊत म्हणाले. महिन्याभरापासून कैदखान्यात कैद संजय राऊत यांनी यावेळी आपल्या तब्येतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी एका महिन्याहूनही अधिक काळापासून कैदखान्यात आहे. घरच्या व रुग्णालयाच्या. उद्धव ठाकरे यांचेही माझ्यावर बारीक लक्ष आहे. मी कुठे बाहेर पडतोय का? हे ते पाहतात. आत्ताही त्यांची परवानगी नाही. पण माझ्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत आहे. अजूनही सुधारणा होईल. उपचार कठोर असतात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बराई होऊन येईन. ते निश्चितच होईल. रेडिएशनचा भाग संपला आहे. डॉक्टरांची टीम चांगले काम करत आहे. प्रकृती हळूहळू सुधारत आहे. तुरुंगात असतानाच हा आजार सुरू झाला. मी बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरलो असतो. शिंदे गटाची गुलाबो म्हणत हेटाळणी संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवडणुकीत होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाच्या विधानाचाही समाचार घेतला. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख गुलाबो गँग म्हणून केला. ते म्हणाले, शिंदे गटाच्या गुलाबो गँगने 1 डिसेंबरला लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे. काही ठिकाणी एका मतासाठी 10 ते 15 हजार असे लक्ष्मीदर्शन होत आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत पैशांचा एवढा खेळी कधीही झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार या निवडणुका लढवतच नव्हते. स्थानिक पातळीवर या निवडणुका होत होत्या. पण आता 5-6 हेलिकॉप्टर्स, खासगी विमाने हे सर्वकाही पहावयास मिळत आहे. आम्ही या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत. तसे मुळीच नाही. या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. मागच्या 405 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे घडले आहे. सध्याच्या घडीला तू मोठा की मी मोठा अशी स्पर्धा तीन सत्ताधारी पक्षांत सुरू झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले. मोदी, शिंदे, फडणवीसांकडून तब्येतीची चौकशी संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आदी सर्वांनी आपल्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहितीही यावेळी दिली. मी आजारी असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझी चौकशी केली. मदतीचे आश्वासन दिले. नरेंद्र मोदींनीही माझी चौकशी केली. मला फोन आला होता. एकनाथ शिंदेंनीही फोन केला होता. कारण, राजकारणापलिकडे नाती जपायची असतात, असे ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत होणाऱ्या सुधारणेवर आनंद व्यक्त केला आहे. संजय राऊत बरे झाले याचा मला आनंद आहे. त्यांनी त्यांचे काम करावे. आम्ही आमचे काम करतो. संजय राऊत रोज काय बोलतात त्याला उत्तर देणे मी महत्त्वाचे समजत नाही, असे ते म्हणाले.
राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी सरकार सातत्याने विविध रस्ते प्रकल्प राबवत आहे. त्यातच चंदगड तालुक्यातील शक्तिपीठ महामार्ग हा प्रकल्प सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या चंदगड येथील सभेत जनतेच्या मागणीनुसार महामार्गाचा मार्ग चंदगडमधून वळवण्यात आल्याचे सांगितले. या महामार्गामुळे परिसराचा विकास होईल, रोजगारनिर्मिती होईल आणि उद्योग येतील, असा दावा त्यांनी केला. स्थानिक पातळीवर अनेक वर्षांपासून रस्ते विकासाची मागणी होत असल्याने फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत मार्गी लागेल, असा ठाम विश्वासही व्यक्त केला. सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की रस्ते ही विकासाची मुख्य किल्ली आहे. रस्ता झाला की व्यापार, उद्योग आणि पर्यटन वाढते. त्यामुळे लॉजिस्टिक पार्क, नवे उद्योग, एमआयडीसी आणि आमदार शिवाजी पाटील यांच्या संकल्पनेनुसार पर्यटन हब उभारण्याचाही मनोदय त्यांनी व्यक्त केला. चंदगड तालुक्यासाठी हा महामार्ग टर्निंग पॉइंट ठरेल, रोजगाराला नवे दरवाजे उघडतील, उद्योगधंदा आणि तरुणांसाठी संधी वाढतील, असेही ते म्हणाले. मात्र या घोषणेनंतर लगेचच शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीने निषेध नोंदवला. समितीचे राज्य समन्वयक गिरीश फोंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट इशारा दिला की सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा हट्ट सोडला नाही, तर शेतकरी पुन्हा तीव्र आंदोलन छेडतील. गेल्या काही महिन्यांत 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी महामार्गाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. अधिकाऱ्यांना जमीन मोजणीसाठी गावात येऊ दिले नाही, शेतकऱ्यांनी छातीचा कोट करून जमीन न देण्याची भूमिका घेतली आहे, असे त्यांनी सांगितले. हा महामार्ग कोणाच्या विकासासाठी? संघर्ष समितीचा प्रश्न कायम आहे, हा महामार्ग कोणाच्या विकासासाठी? शेतकऱ्यांचे म्हणणे असे की शेतजमिनी संपवून सरकार केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मोठे रस्ते प्रकल्प पुढे ढकलत आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक पर्याय, योग्य भरपाई किंवा स्पष्ट माहिती या तीनही गोष्टी उपलब्ध नसताना सरकारने महामार्गाचा निर्णय कसा घेतला? असे प्रश्न समितीकडून उपस्थित केले गेले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून एकाही गावात संयुक्त मोजणी झालेली नाही. तरीही सरकारने हा प्रकल्प रेटून द्यायचा ठाम निर्णय घेतल्याचे समितीचे म्हणणे आहे. या प्रश्नावर काय निर्णय येतो याकडे राज्याचे लक्ष आपल्या मतांमध्ये सरकार आणि संघर्ष समिती दोन्हीही ठाम दिसतात. एकीकडे सरकार विकासाची भाषा बोलत आहे, तर दुसरीकडे शेतकरी आपली जमीन व हक्क वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रश्नाचे उत्तर दोन्ही पक्षांना चर्चेतूनच शोधावे लागेल. विकास आणि जमीन दोन्ही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे योग्य समन्वय, संवाद आणि पारदर्शक प्रक्रिया याशिवाय हा वाद सुटणे अवघड आहे. चंदगडचं भविष्य या महामार्गाशी जोडलेलं असल्याचं सरकार मानतंय; तर शेतकरी मात्र आपले आयुष्यभर जपलेले शेत, त्यांचा संसार, कोणत्याही परिस्थितीत देणार नाहीत, अशी भूमिका घेत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रश्नावर काय निर्णय येतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक अचानक गाजू लागली आहे. अध्यक्षपदासाठी झालेली निवडणूक बिनविरोध घोषित झाल्यानंतर राज्यभर ही घटना चर्चेत आली होती. आता या बिनविरोध निवडीवर तात्पुरती स्थगिती लावण्यात आली असून संपूर्ण निवड प्रक्रिया नव्याने केली जाणार असल्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत. त्यामुळे अनगरमधील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. अनगर नगरपंचायतीत अध्यक्षपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे हे उमेदवार रिंगणात होते. मात्र तपासणीदरम्यान उज्वला थिटे यांच्या नावाच्या अर्जात सूचकाची सही नसल्याचे आढळले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना थेट अपात्र ठरवले. त्यानंतर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनीही आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे उरलेली एकमेव उमेदवार प्राजक्ता पाटील या बिनविरोध विजयी घोषित करण्यात आल्या. पण हा निर्णय जाहीर होताच राज्यात चर्चा सुरू झाली आणि निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रियेवर स्थगिती आणली. आता निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. कायद्याच्या दृष्टीने काही तांत्रिक बाबी राहून गेल्याने ही पायरी उचलली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाला प्रत्येक पदासाठी फक्त एक अर्ज असल्याची माहिती दिल्यानंतरच बिनविरोध घोषणा अधिकृत होते. त्यामुळे परत एकदा सर्व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करून नवा कार्यक्रम आखला जाणार आहे. या निर्णयावर राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनगरची निवडणूक पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. कोणत्या प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे हे आम्ही तपासत आहोत. कोर्टाच्या आदेशांची माहिती मिळाल्यानंतर सरकार आपली बाजू मांडेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आदेश अद्याप पाहिले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकरणाचा पुढचा टप्पा काय असेल? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. उमेदवार व कार्यकर्त्यांच्या उत्साहावरही ब्रेक लागला अनगरच नव्हे तर राज्यातील जवळपास 20 नगर परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. जिथे–जिथे निवडणूक पुढे ढकलली आहे, तिथे नवीन मतदान दिनांक 20 डिसेंबर असा जाहीर करण्यात आला असून 21 डिसेंबरला मतमोजणी होईल. अन्य सर्व ठिकाणी मतदान पूर्वीसारखेच 2 डिसेंबरलाच होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रचाराचा वेग अचानक कमी झाला असून उमेदवार व कार्यकर्त्यांच्या उत्साहावरही ब्रेक लागला आहे. लोकप्रतिनिधी निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि कायदेशीरता राखण्यासाठी घेतलेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे. वेळ लागला तरी न्याय मिळावा हे प्रशासनाचे धोरण अनगर नगरपंचायतीतील घडामोडीवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, स्थानिक निवडणुका जरी छोट्या वाटल्या तरी त्यांचा राजकीय परिणाम मोठा असतो. एका वॉर्डातील उमेदवार बिनविरोध ठरल्यावरही संपूर्ण राज्यात चर्चा सुरू होते. न्यायालयीन आणि प्रशासनिक प्रक्रिया किती गुंतागुंतीची असते याचाही अंदाज येतो. आता सुधारित निवड कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच अनगरच्या नागरिकांना त्यांचा नवा नगराध्यक्ष अधिकृतपणे कोण असेल हे कळणार आहे. ग्रामीण भागातील मतदारही या निर्णयाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. निवडणूक आयोग लोकशाहीची प्रक्रिया व्यवस्थित चालावी यासाठी कटिबद्ध आहे, आणि त्यासाठी वेळ लागला तरी न्याय मिळावा हे प्रशासनाचे धोरण असल्याचे अधिकारी सांगतात.
राज्य निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट टाळली. तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर झालेल्या छापेमारीवरही भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रचारसभेला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येकवेळी कुणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणुका पोस्टपाँड होतील. असे आजवर कधीच झाले नाही. आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची कल्पना नाही फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोग कुठला कायदा काढतंय किंवा आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा पाहिला, जेवढा माझा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशीही बोललो, या सर्वांचे मत आहे की, अशा पद्धतीने या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. पण निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. पण माझे मत आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर झालेला हा अन्याय आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही ती लांबणीवर टाकता, यामुळे त्यांचे श्रम व मेहनत वाया गेली. आता 15 - 20 दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा. सरकार या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सादरीकरण करून हा निर्णय चुकीचा आहे हे सांगेन, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या भेटीवर काय म्हणाले? मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दोघेही छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. पण तिथेही या दोन्ही नेत्यांची भेट झाली नाही. पत्रकारांनी याविषयी फडणवीसांना छेडले असता मी रात्री लवकर आलो व सकाळी लवकर जात असल्यामुळे आमची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांना आता दिवसभरासाठी खाद्य मिळाले आहे. पण मी रात्री उशिरा आलो. आज सकाळी 1 तास लवकर जात आहे. कारण, मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या सभेनंतर 1 तास नंतर आहे. त्यामुळे भेट झाली नाही. उद्या होईल, त्याला काय? शेवटी आम्ही दोघेही प्रचारात मग्न आहोत. आमचे फोनवर रोजच बोलणे होते. त्यामुळे आता भेट झाली किंवा न झाली हा विषय नाही. ते अजून तयार व्हायचेत. मला लवकर निघायचे आहेत. कारण माझ्या सभा लवकर ठेवल्यात. यात कोणती मोठी गोष्ट आहे. तुम्ही चालवा दिवसभर झाली नाही भेट म्हणून, असे फडणवीस हसत म्हणाले. शहाजीबापू पाटील यांच्यावरील छापेमारीवरही भाष्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर टाकण्यात आलेल्या छापेमारीवरही भाष्य केले. मला याची कल्पना नाही. पण कुणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे यावरून रेड ठरत नाही. आमच्याही एखाद्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार आली तर त्याही प्रकरणात चौकशी होते. माझीही गाडी तपासली जाते. त्यामुळे या प्रकरणी सत्ताधारी किंवा विरोधक अशा कोणत्याही गोष्टी नसतात, असे ते म्हणाले.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार लगबग सुरू आहे. गावोगावी उमेदवारांचा प्रचार, पक्षांतील अंतर्गत चर्चा आणि निवडणूक रणनीती या सगळ्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. ही लढत स्थानिक पातळीवरील असली, तरी मोठमोठे नेतेही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र, या निवडणुकांवर अंधार टाकणारा एक मुद्दा मोठ्या प्रमाणावर डोकावत आहे. तो म्हणजे प्रारूप मतदार याद्यांतील गोंधळ, मतदारांच्या नावांतून झालेली कपात, चुकीचे विभागणी, आपला मतदानाचा हक्क हिरावला जाईल याची भीती अशा अनेक तक्रारी वाढू लागल्याने मतदार ते विरोधक सर्वत्र अस्वस्थता आहे. मुंबईतील मतदार यादीत गंभीर चुका झाल्याचा आरटीआयमधून उघड झालेला प्रकार तर विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. कुर्ला परिसरातील 6,834 मतदारांना चुकीच्या वॉर्डात दाखविण्यात आले आहे. वास्तविक ते वॉर्ड क्रमांक 162 मध्ये असताना त्यांना 163 मध्ये वर्गीकृत केल्याचे समोर आले आहे. मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. त्यातच हजारो मतदार चुकीच्या ठिकाणी दाखवले गेले तर त्यांच्या मतदानावर परिणाम होणारच. त्यामुळे आरटीआय कार्यकर्त्यांनी तातडीने ही चूक दुरुस्त करण्याची मागणी केली आहे आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. मुंबईतच नव्हे, तर नाशिकमध्येही मतदार याद्यांवरून वाद पेटला आहे. महापालिकेच्या मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर हजारो तक्रारी समोर आल्या. अनेक समाजघटकांचा मतदानाचा हक्क हिरावला गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. काँग्रेसचा तर थेट आरोप आहे की, हे घोळ नाहीत, हा भाजपने केलेला राजकीय भ्रष्टाचार आहे. महापालिका निवडणूक जवळ असताना हजारो मतदार अचानक यादीतून गायब किंवा दुसरीकडे वर्गीकृत होत असल्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार यादी अचूक असणे आवश्यक स्थानिक नागरिक, तसेच सर्व विरोधी पक्षांनी ही मतदार यादी रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर ही चूक सुधारली नाही तर लोकशाहीची पायाभरणी असलेला मतदानाचा अधिकार धोक्यात येईल. मतदारांनी दिलेल्या विश्वासाला धक्का बसेल आणि चुकीच्या याद्यांवर आधारित झालेली निवडणूक ही अन्यायकारक ठरेल. निवडणुका योग्य आणि पारदर्शक हव्या असतील, तर प्रथम मतदार यादी अचूक असणे आवश्यक आहे, असे विरोधकांचे मत आहे. दुरुस्ती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी लागणार निवडणूक आयोग व स्थानिक प्रशासनावर आता मोठी जबाबदारी आहे. नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी त्यांना दुरुस्ती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी लागणार आहे. कारण लोकशाहीची खरी ताकद ही मतदारांच्या बोटावरील शाईत असते. मतदारच नसतील तर सत्ता कोणासाठी? त्यामुळे अचूक मतदार याद्या, पारदर्शक प्रक्रिया आणि नागरिकांना योग्य माहिती, हे सर्व करूनच आगामी निवडणुका खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सण ठरतील, अशी जनतेची अपेक्षा आहे.
राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या संपूर्ण प्रचार मोहिमेत भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मोठी कटुता आणि संघर्ष पाहायला मिळाला. महायुतीतील हे दोन्ही मुख्य घटक असूनही प्रचारसभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा भडीमार करण्यात आला. स्थानिक पातळीवर तर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यामुळे या संघर्षाचा थेट परिणाम आगामी महापालिका निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आता दिल्लीतील शीर्ष नेतृत्व पुढे येत आहे आणि महायुतीला फटका बसू नये या उद्देशाने मध्यस्थीची हालचाल सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे दोन्ही प्रमुख घटक एकमेकांना लक्ष्य करण्याची स्पर्धाच जणू सुरू झाली होती. कोण मोठा?, कोणाचा तळागाळात प्रभाव? यावरून वाद तीव्र झाला. प्रचारसभांमध्ये कठोर शब्द, टोले, आरोप यामुळे महायुतीची एकी कागदावरच असल्याचे चित्र तयार झाले. मतदारांमध्येही जर हेच साथीदार, तर विरोधक काय असतील? अशा चर्चा सुरू झाल्या. महापालिका निवडणुका जवळ आल्याने ही प्रतिमा महायुतीसाठी धोकादायक आहे. म्हणूनच राष्ट्रीय स्तरावरून आता पुरे, अशी भूमिका घेत मध्यस्थी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय पातळीवरून काही महत्त्वाचे नेते मुंबईकडे लक्ष देत असून, दोन्ही बाजूंना समज देण्यासाठी संपर्क सुरू केला आहे. अनेकदा असा अनुभव आला आहे की, स्थानिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्तेच एकमेकांशी अधिक राडा करतात. या निवडणुकीतही तेच चित्र दिसले. कार्यकर्त्यांची गुंतवणूक, गटबाजी, तिकीटाचे राजकारण, यामुळे महायुतीपेक्षा एकमेकांवर त्यांनीच हल्ला चढवला. एका बाजूला भाजपचे नेते कार्यकर्त्यांची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटालाही आपलं अस्तित्व दाखवण्याची घाई होती. यामुळे दोन्ही बाजूंनी स्वतःलाच राजकीय नुकसान होण्याची भीती निर्माण झाली. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सत्ताधारी असताना घरातील भांडणं लपवली पाहिजेत. उघड झाली, तर विरोधकांनाच फायदा होतो. हेच आता महायुतीत घडत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. अगदी शेवटच्या क्षणी, मध्यस्थीची आठवण दरम्यान काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हा देखील चर्चा झाली होती की, दिल्लीतील नेतृत्व या वादाचा तोडगा काढेल. परंतु त्या भेटीत विशेष मध्यस्थी न झाल्यामुळे दोन्ही बाजू पुन्हा मैदानात उतरल्या आणि संघर्ष आणखी तीव्र झाला. आता मात्र प्रचार संपण्याच्या आधीच्या रात्रीच, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी, मध्यस्थीची आठवण काढण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रश्नांची चर्चा चहाच्या टपऱ्यांपासून सोशल मीडियापर्यंत जोरात आहे. वाद जशास तसे राहिले, तर विरोधकांना निश्चितच संधी दिल्लीतील नेते हा प्रश्न कसा सोडवतात, हे महापालिका निवडणुकीचे गणित बदलणारे ठरणार आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर या महत्त्वाच्या महानगरपालिकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिका म्हणजे मोठ्या निधीचे, शहरी विकासाचे केंद्र. त्यामुळे महायुतीला या निवडणुकांत एकत्र राहूनच लढणे गरजेचे आहे. जर अंतर्गत वाद जशास तसे राहिले, तर विरोधकांना निश्चितच संधी मिळू शकते. त्यामुळे आता मध्यस्थीचे प्रयत्न कितपत यशस्वी होतात आणि दोन्ही पक्षांची मनं एकत्र आणली जातात का? हेच आगामी राजकारणात निर्णायक ठरेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने छापेमारी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी सांगोल्यात प्रचारसभा झाली. त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्यामुळे यामागे कथितपणे भाजपचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप व शिवसेनेत सध्या आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच ही घटना घडल्यामुळे या दोन्ही पक्षांतील वाद एका नव्या उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजप व शेकापचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी हातमिळवणी करत शिंदे गटाला आव्हान दिले होते. या प्रकरणी शहाजीबापू पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपवर कडाडून हल्ला चढवला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सांगोला स्थित कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेत सहभागी भरारी पथकाने छापेमारी केली आहे. फडणवीसांच्या सभेनंतर लगेचच छापेमारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी दुपारी सांगोल्यात प्रचारसभा झाली. त्यांनी यावेळी मतदारांना भाजपच्या हातात नगरपालिकेची सूत्रे देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शहाजी पाटलांवर कोणतीही टीका केली नाही. त्यानंतर शहाजीबापू पाटील यांचीही एक सभा झाली. त्यांनी मात्र आपल्या विरोधकांवर विशेषतः भाजपवर सडकून टीका केली. ही सभा संपल्यानंतर काही तासांतच सोलापूरहून आलेल्या एलसीबी पथकासह निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रात्री 10.30 वा. अचानक शहाजी बापू यांच्या कार्यालयात छापेमारी केली. या छापेमारीत भरारी पथकाने शहाजी बापू यांच्या कार्यालयातील सर्वच दस्तऐवजांची बारकाईने तपासणी केली. हे भरारी पथक जवळपास तासभर याठिकाणी होते. यावेळी पाटील कार्यालयात नव्हते. पण त्यांचे कार्यकर्ते होते. या अनपेक्षित घटनाक्रमामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत संतापाची लाट उसळली आहे. खाल्लेला ऊस गोड आता पेकाटात बसतोय -अंबादास दानवे दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. गुवाहाटीला जाताना 'झाडी डोंगर हॉटेल' गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चारला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. 'ओके मध्ये आहे', असं म्हणावंच लागेल आता बापू, असे दानवेंनी शहाजी पाटलांना उद्देशून म्हटले आहे. 4 दिवसांपूर्वी संतोष बांगर यांच्या कार्यालयावर छापेमारी उल्लेखनीय बाब म्हणजे मागील 4 दिवसांपूर्वी हिंगोलीतील शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या घरावर 100 पोलिसांनी छापा टाकल्याचा आरोप केला आहे. याच पक्षाचे दुसरे आमदार हेमंत पाटील यांनीही या प्रकरणी थेट विधानसभा अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. यापाठोपाठ आता थेट एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयावर छापेमारी केल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
प्रतिनिधी | अमरावती अमरावतीत निवडणुकीआधीच आज, रविवारी एक निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या माध्यमातून शहराचा पक्षी निवडण्यात आला. एकूण सहा पक्षी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी सर्वाधिक मते घेणारा ‘तांबट’ अमरावतीचा पक्षी ठरला. शास्त्रीय भाषेत याला कॉपरस्मीथ बारबेट म्हटले जाते. तांबटच्या विजयाची घोषणा रविवारी सकाळी हॅपी स्ट्रीट कार्यक्रमादरम्यान वेलकम प्वाइंट चौकात करण्यात आली. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष तथा वेक्स संघटनेचे सचिव डॉ. जयंत वडतकर, महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी ही घोषणा केली. अमरावतीचा शहरपक्षी घोषित करण्यासाठी अनेक दिवसांपासून ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. अशी प्रक्रिया राबवून शहर पक्षाची निवड करणारी अमरावती ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे. हा उपक्रम ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत राबवण्यात आला. शहरपक्षी निवडीसाठी अमरावती महानगरपालिका आणि वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्था (वेक्स) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. नागरिकांच्या सहभागातून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्यात आली. त्यासाठी महापालिकेने विशेष ऑनलाइन पोर्टल तयार केले होते. निवड प्रक्रिया १८ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान अमरावतीकरांसाठी खुली ठेवण्यात आली होती. त्यानंतर आज, रविवार, ३० नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ५ हजार ४४५ नागरिकांनी भाग घेतला. पर्यावरणीय अभिमानाचे प्रतीक म्हणून तांबट पक्ष्याची एक भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. अमरावती महानगरपालिका व वेक्स संस्थेचे हे संयुक्त पाऊल शहराच्या हरित भविष्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. असे झाले मतदान - तांबट (कॉपरस्मीथ बारबेट) - १४१४, मोठा कोतवाल (ग्रेटर काऊकल) - १०३२ मते, भारतीय राखी शहामृग (इंडियन ग्रे हॉर्नबील) - ९९८, हुडहुडी (इंडियन हुपोइ) - ७९६, छोटे घुबड (स्पॉटेड ओवलेट) - ६५५, शिकरा (शिकरा) - ५५१
प्रतिनिधी | अमरावती पात्र नागरिकांना आरोग्याची सुविधा देण्यासाठी गोल्डन कार्ड देण्यात येत आहे. हे कार्ड काढण्याची जबाबदारी आशा सेविकांवर देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड महत्वाचे असल्याने डिसेंबर महिन्यात गोल्डन कार्डसाठी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात गोल्डन कार्ड नोंदणी संबंधी बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, आयुष्मानच्या जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले यांच्यासह आशा सेविका उपस्थित होत्या. गोल्डन कार्ड असलेल्या रुग्णांना नि:शुल्क उपचार घेणे शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या जिल्हयातील ५१ रुग्णालयांमध्ये सहज शक्य होणार आहे. उपचार घेण्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. त्याचप्रमाणे जवळ कोणतेही फाइलही बाळगावे लागणार नाही. गोल्डन कार्डमध्ये जो क्रमांक असेल तो क्रमांक टाकल्यानंतर तत्काळ त्या रुग्णाबाबत संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णावर उपचार करणे सोपे जाईल. रुग्णाची संपूर्ण हिस्ट्री ऑनलाईन फाईलमध्ये राहणार असल्यामुळे त्याला मधुमेह आहे, बीपी आहे की, अन्य काही आजार आहेत, याबाबत माहिती मिळेल. तसेच रुग्णालाही विविध कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही. आशा सेविकांना आता नवीन कार्ड नोंदणीसाठी २० रुपये तर वितरणासाठी १० रुपये मानधन मिळणार आहे. त्यामुळे आशा सेविकांनी यात सक्रीय सहभाग नोंदवावा. यासाठी येत्या दोन दिवसांत आशा सेविकांचे लॉगिन, आयडी सक्रीय करावे. कार्डची नोंदणी होण्यासाठी मोहिम राबवावी लागणार आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात या नोंदणीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नोंदणीचे काम गतीने होण्यासाठी आशांना लाभार्थींच्या याद्या पुरवण्यात येणार आहे. यावेळी नोंदणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविका निता खंदेझोड, वर्षा आडोळे, मुक्ता वानखेडे, गुंफा खडसे, वनिता पंचाळे, जयश्री देवळे, पंची दहिकर, काजल साम्बरकर, सीमा सोनोने, गीता गावंडे, इंदिरा मोहोड, कल्पना मेश्राम, शेषकन्या थोरात, सुनीता चौरकर यांचा जिल्हाधिकारी येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी इतरही मान्यवर उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याबद्दल आशा सेविकांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर व इतर मान्यवर.
प्रतिनिधी | अमरावती महाराष्ट्राचे हास्य सम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या काव्य प्रतिभेच्या ५० वर्षाच्या सिंचनातून निर्माण केलेल्या सामाजिक सौहार्दाला समाजात आणखीन घट्ट करण्यासाठी वचनबद्ध असू, असा सूर त्यांच्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी रविवारी (दि. २९) व्यक्त केला. रविवारी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. हास्य सम्राट', मिर्झा एक्सप्रेस' डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे २८ नोव्हेंबरला निधन झाले. रविवारी त्यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील अभियंता भवन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्यासोबत आयुष्य वेचलेल्या सामान्यातील सामान्य नागरिक या श्रद्धांजली सभेला आवर्जून उपस्थित होते. शासकीय अधिकारी, शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांपासून मंदिरांच्या ट्रस्टीपर्यंत आणि वारकरी संप्रदायाच्या अनुयायांपासून ते मुस्लिम समुदायातील मान्यवरांपर्यंत सर्वांनी आज त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. आपल्या लेखणीतून व्यंगात्मक टिपणी करून समाज प्रबोधन करण्याची खुमासदार शैली डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांना प्राप्त होती. त्यांच्या सिद्धहस्त लेखनीतून, विनोदी शैलीतून मनोरंजन तर व्हायचे मात्र प्रबोधनही व्हायचे. डॉ. मिर्झा हे माणुसकीचे डॉक्टर होते. धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रांवर त्यांनी शब्दांचे मनोरे रचले. ते राष्ट्रभक्त होते आणि त्यांच्या काव्यातून समाजातील आंतरिक दुही दूर करण्यात मदत झाली. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या चाहत्यांनी याच मार्गक्रमणावर साहित्याचा कित्ता गिरवावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. उपजिल्हाधिकारी शामकांत मस्के यांच्या मार्गदर्शनात डॉ. मिर्झा रफी अहमद बेग मित्र मंडळाने आजच्या या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. यावेळी विचार मंचावर नागपूर उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा, चंद्रपूरचे कवी किशोर मुगल, कोल्हापूरचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके हे प्रतिनिधिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्थानापन्न झाले होते. डॉ. मिर्झा रफी यांचे कुटुंबीय, त्यांचे निकटवर्तीय यांच्याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर व त्यांचे बालमित्र या श्रध्दांजलीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ‘चला हवा येऊ द्या’ फेम विनोदी कवी प्रवीण तिखे, इतिहास संशोधक अनिरुद्ध पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. हेमंत खडके, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, गझलकार रुपेश कावलकर, ज्येष्ठ पत्रकार सनत अहाळे, संतोष अरसोड, रमीझ मिर्झा, हुमा खान, जी. बी. देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्याच लोकप्रिय कविता ऐकवून व त्यावर भाष्य करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या. लोकांना जोडण्यासाठी सतत कविता करत राहिले उपस्थितांनी डॉ. बैग यांचे कवी आणि माणूस म्हणून असलेले विविध गुणविशेष अधोरेखित केले. त्यांची धर्मनिरपेक्ष दृष्टी, नम्र स्वभाव, नवोदित कवींना दिलेले प्रोत्साहन आणि मराठी साहित्य क्षेत्रात व्यावसायिकता आणणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची प्रशंसा केली. ते लोकांना जोडण्यासाठी सतत कविता करत राहिले. गंभीर राहणे त्यांना आवडत नसायचे. लोकांना हसवणे, आनंद देणे हेच त्यांचे ध्येय होते. असेही उपस्थितांनी सांगितले.
श्री गजानन विजय ग्रथं महापारायणाने दुमदुमले दर्यापूर:भाविकांची मांदियाळी
प्रतिनिधी | दर्यापूर गतवर्षी प्रमाणे स्थानिक श्री महापारायण सेवा समितीच्या वतीने (पर्वं सातवे ) शनी गजानन महाराज विजयग्रंथ महापारायण सोहळा दर्यापूर - अकोट रोडस्थित प्रागंणात भक्तीमय वातावरणात पार पडला. दरम्यान भगवंताच्या सानिध्यात जाण्यासाठी आतुर झालेल्या भक्तांचे दर्यापुरात उधाण आले होते. या ऐतिहासिक सोहळ्यात २ हजार १०० गजानन भक्तांनी मनोभावे सहभाग घेत पारायण वाचन केले. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीकरिता मागील पधंरा दिवसापासून महापरायण आयोजन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्तगणांनी परिश्रम घेतले. रविवारी सकाळी ७ वाजता सुरू झालेल्या महापारायणात महिलांचा हिरहिरीने लक्षणीय सहभाग होता. पंचक्रोशीतून हजारो भक्त एकत्र आले होते. गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत म्हणणाऱ्या ठाणे येथील विद्या पडवळ यांनी व्यासपीठावरून सलग ७ तास विजय ग्रंथाचे वाचन केले. याप्रसंगी विविध गजानन महाराज सेवकरींचा शाल श्नीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जय गजानन श्री गजानन या नामाचा जयघोष करत हजारो भाविक संत गजानन महाराज श्री विजयग्रंथ महापारायण सोहळयात तल्लीन झाले होते. दुपारी सामुहिक महाआरती झाली. पारायण समितीचे पदाधिकारी, सदस्य व शेकडो सेवाधारी यांनी निस्वार्थी सेवा दिली. त्यांचे संत शिरोमणी गजानन महाराज भक्त परिवार दर्यापूर यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. महापारायणाकरिता आकर्षक पेंडॉल शहरातील व्यावसायीक, नोकरवर्ग, सामान्य नागरिक व भक्तंगणांनी महापारायण आयोजनात उत्साहात विनामूल्य सेवा देत सहभाग नोंदवला. महापारायणाकरिता आकर्षक पेंडॉल उभारण्यात आला होता. तसेच येणाऱ्या भक्तांकरिता बसण्याची व्यवस्था व विजयग्रंथ उपलब्ध केले होते. त्याच बरोबर हजारो पारायणकर्त्यांना केळी, पाण्याची बॉटल, चहा आयोजकांनी उपलब्ध करून दिल्या.
प्रतिनिधी | नांदगाव पेठ वैद्यकीय क्षेत्रात निस्वार्थ सेवा देणारे व समाजकार्यातही सक्रिय भूमिका पार पाडणारे डॉ. शंकर राजपालराव ठाकरे यांना अमेरिका इंटरनॅशनल विद्यापीठ, हॉलीवूड यांच्या वतीने वैद्यकीय, विज्ञान आणि समाज कार्यातील मानद डॉक्टरेट हा बहुमान प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या सेवा, कर्तृत्व आणि समाजहिताच्या निष्ठेची आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतलेली दखल मानली जात आहे. विद्यापीठाच्या शिक्षण विभागाच्या अधिनियमांनुसार प्रदत्त या सन्मान पत्रावर उपकुलगुरू आणि नोंदणी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने अंकित असलेले प्रमाणपत्र सन्मानपूर्वक नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, मराठी चित्रपट अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या बहुमानामुळे डॉ. ठाकरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले. स्थानिक समाजात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी | अमरावती दैनिक भास्कर समुहाचे अध्यक्ष स्व. रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या ८१ व्या जन्म दिनानिमित्त आयोजित प्रेरणा उत्सवादरम्यान शनिवारी (दि. २९) शहरात ‘दिव्य मराठी’च्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कौन्सिल हॉल तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी शहरात ५१ दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला आहे. या वेळी हनुव्याम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागाचे प्रमुख विदर्भ केसरी प्रा. डॉ. संजय तिरथकर, साठव्यांदा रक्तदान करणारे दाते स्वप्नील अरसड व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. एचव्हीपीएमद्वारा संचालित विविध महाविद्यालये, शहर पोलिस तसेच शहरातील विविध संस्था, संघटनांनी या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदवला. स्व. रमेशचंद्रजी अग्रवाल यांनी आयुष्यभर समाजसेवेचे व्रत जपले. तोच वारसा कायम राखण्याच्या दृष्टीने दिव्य मराठी'तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिर व इतर उपक्रम राबवले जातात. शनिवारी आयोजित रक्तदान शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी डॉ. अविनाश उकंडे, जनसंपर्क अधिकारी मिलींद तायडे, अधिपरिचारिका संगीता गायधने, वैज्ञानिक अधिकारी राखी ढाबरे, कक्ष सेवक मंगेश उमप, प्रवीण कळस्कर, यांनी रक्त संकलनाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. उद्घाटनानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दिलीप सौंदळे, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे, एचव्हीपीएमच्या सचिव प्रा. डॉ. माधुरी चेंडके, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड, सुनील खराटे, डीसीपीचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, प्रा. संजय हिरोडे, एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, भारतीय धनुर्धर तुषार शेळके तसेच स्वप्निल भुयार, गिरीश, धीरज कुमार, भुषण फरतोडे, डॉ. गाविंद कासट, प्रविण वासनिक यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. विशेष म्हणजे स्वप्निल अरसड यांनी केलेले हे त्यांचे ६० वे तसेच दिव्य मराठी'च्या वतीने आयोजित शिबिरात केलेले सलग आठवे रक्तदान होते. त्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. या दात्यांनी केले रक्तदान स्वप्नील अरसड, धिरज गावंडे, अतुल पाटील, अक्षय नागापूरे, पंकज बोळे, अक्षय गडलींग, यशकुमार, काजल बनसोड, देविका पवार, अभिलाष कोल्हे, विवेक लहाड, ऋषभ भाकरे, तन्वी पोळकट, शताक्षी भिसे, क्षितीज अरसड, अजय जाधव, ऋषिकेश धावडे, पराग गावंडे, अक्षय गुप्ता, राजीव इंगळे, रोहीत, पोफळे, प्रणव हिंगणकर, गोपाल नाकाडे, संघपाल अढाऊ, आदित्य गायके, अश्विन कडू, ऋषिकेश पवार, संकेत राऊत, अनिकेत हिवसे, मंगेश जामोदकर, शरद डकाहे, फुलसिंग राठोड, मिलिंद तायडे यांच्यासह अन्य दात्यांनी स्वंयस्फुर्तीने दिव्य मराठीच्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला होता.
कार अपघातामध्ये दोघा जणांचा मृत्यू:मृत झालेले दोन्ही व्यक्ती जुन्या अमरावतीमधील कुंभारवाडा परिसरातील
प्रतिनिधी | अमरावती बडनेराकडून अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २९) मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात बडनेरा-अमरावती मार्गावरील साईनगर परिसरात घडली आहे. अपघातात मृत झालेले दोन्ही व्यक्ती जुन्या अमरावतीमधील कुंभारवाडा परिसरातील आहेत. एकाचवेळी दोघांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नितीन नारायणराव व्यास (५२) आणि रोशन वसंताआप्पा गणथडे (३८, दोघेही रा. कुंभारवाडा, अमरावती) अशी अपघातात मुत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. नितीन व्यास व रोशन गणथडे हे शनिवारी रात्री कारने काही कामानिमित्त बडनेरा परिसरात गेले होते. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ते दोघे बडनेरा-अमरावती मार्गाने कारने घरी येत होते. त्यावेळी मार्गातील जायका मोटर्ससमोर त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी मृत नितीन व्यास यांचे नातेवाईक धीरज नामदेव भारती (४० रा. अमरावती) यांनी बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. नितीन व्यास हे हिंदू महासेनेचे प्रदेशाचे पदाधिकारी होते. तसेच रोषण गणथडे हे व्यावसायिक होते. या दोन्ही व्यक्तींच्या आकस्मिक निधनामुळे व्यास आणि गणथडे कुटूंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
प्रतिनिधी | बार्शीटाकळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे खूप नुकसान झाल्याने संकटातील चेलका येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे पाठ फिरवली.यावर्षी तालुक्यात कांदा सिडस् ,चिया सिडस् ची पेरणी भरपूर प्रमाणात आहे परंतु बार्शीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू नाही ही योजना या तालुक्यासाठी सुरु करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. मॉडेल व्हिलेज चेलका येथे दरवर्षी रब्बी हरभरा,गहू या पिकावर अवलंबून न राहता कांदा बीजोत्पादन पिकांची येथील शेतकऱ्यांनी सुरुवात केली.येथील शेतकरी सोयाबीन,तूर, उन्हाळी तीळ अशी तीन पिकं घेतात. काही शेतकरी सोयाबीन, हरभरा, उन्हाळी मूग अशी पिकं घेतात.कपाशी काढून गहू घेतला जातो त्यामुळे पिकांची फेरपालट होते.नाशिक येथील नंदकिशोर अहिरे यांनी चेलका येथील १३ शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादनासाठी चांगल्या प्रतीचा कांदा उपलब्ध करून दिला. या पिकासाठी शेवटपर्यंत एका एकरसाठी अंदाजे साठ हजार खर्च येतो.यावर्षी खरीप कापूस, सोयाबीन,तूर पिकाचे नुकसान झाल्याने त्याची तूट कशी भरुन काढता येईल, यासाठी येथील शेतकऱ्यांचे प्रयत्न असतात. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चेलका हे गाव दत्तक घेतल्याने कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.प्रकाश घाटोळ यांनी येथील शेतकऱ्यांना मसाला पिकं,कांदा सिडस् ,चिया सिडस्, केळी, हळद, उन्हाळी तीळ अशी पिकं घेण्यासाठी सल्ला दिला. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता आधुनिक पिकांकडे वळले पाहिजे, त्यामध्ये चिया सिडस्, कांदा सिडस्, कमी खर्चामध्ये उन्हाळी तीळ अशी पिकं घेतली पाहिजे. जिल्ह्यातील बाळापूर, पातूर आणि अकोट तालुक्यात कांदा पिकासाठी पिक विमा लागू आहे, यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांनी बार्शीटाकळी तालुक्याचा समावेश करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- रामेश्वर पाटील, मॉडेल व्हिलेज चेलका.
जिल्हा परिषद शाळेची ‘आर्यना' झेपावली अंतराळात:इस्रोच्या 'युवीका'साठी निवड
प्रतिनिधी | मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम पारद येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आर्यना वाकोडेची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या ''युवा वैज्ञानिक कार्यक्रम'' साठी स्पर्धा परीक्षेतून निवड झाली. आर्यनाच्या या यशाने जिल्हा परिषद शाळेचा गौरव वाढवला असून, मूर्तिजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तालुका पातळीवरील शाळेत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असते हे सिद्ध झाले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम व शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे. युविका हा कार्यक्रम इस्त्रोमार्फत शालेय विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपाययोजनांबद्दल प्राथमिक ज्ञान देण्यासाठी आयोजित केला जातो. या निवड प्रक्रियेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मापदंड, स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी आणि विज्ञान विषयातील विशेष रुची विचारात घेतली जाते. आर्यनाने या सर्व कसोट्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत, अवकाशाच्या गूढ आणि रोमांचक जगात एक पाऊल ठेवले आहे.आर्यना वाकोडे जिज्ञासू,विज्ञान-तंत ्रज्ञानात रुची असलेली विद्यार्थिनी आहे. वैज्ञानिक संकल्पनांची उपयोजन क्षमता, तार्किक विचारशक्ती, समस्या सोडवण्याची तिची क्षमता तपासणारी होती.आर्यनाने आत्मविश्वास आणि अंतराळ विज्ञानाबद्दलची तळमळ प्रभावीपणे व्यक्त केली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, आई-वडिलांचे प्रोत्साहन यामुळे तिची निवड ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्रोत ठरेल, असे मत मुख्याध्यापक उमेश सराळे यांनी व्यक्त केले. शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मीना तायडे, सरपंच अनुराधा भदे, उपसरपंच चेतन धर्माळे, ग्रामपंचायत अधिकारी सुनिल मानकर, सदस्य विकी गवई, चंदा खंडारे, रुपाली इंगळे, प्रांजली तायडे, विनोद मानकर नाजूक खंडारे व सर्व समिती सदस्य यांनी अभिनंदन केले.
उपक्रम:जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयात रेड रिबन क्लबचे झाले उद्घाटन
प्रतिनिधी | अकोला श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला आणि नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या संयुक्त सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक एड्स दिनानिमित्त ‘रेड रिबन क्लब’चे उद्घाटन उत्साहात झाले. समाजात एचआयव्ही–एड्सविषयी जनजागृती वाढवणे हा या क्लब स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा मीना, पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाह, जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दर्शन जनईकर, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी अमरावती विद्यापीठ ब्रँड अँबेसेडर, सहकार्यक्रम अधिकारी रोहन बुंदेले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना रेड रिबन क्लबच्या अध्यक्षा सायली गोतमारे, अध्यक्ष रोशन चव्हाण, सचिव सनी पवार, सदस्य अभिषेक चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सलग्नित श्री शिवाजी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना रेड रिबन क्लबचे अध्यक्ष गुंजन हिवरे, उपाध्यक्ष चैताली टवरे, रोशन पानेरकर, सचिव गौरी कुकडे उपस्थित होत्या. सायकल रॅली जागतिक एड्स दिनानिमित्त सायकल रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण ४० स्वयंसेवक सहभागी झाले होते. त्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले. या दोन्ही क्लबला डॉ. संजय तिडके, प्रा. शुभम राठोड आणि प्रा. मयुरी गुडदे यांनी मार्गदर्शन केले. जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला.
महिलांच्या आरोग्य व समानतेसाठी जागर:लोककला व पथनाट्याव्दारे जनजागृती
प्रतिनिधी | अकोला महिलांच्या आरोग्य व सामाजिक समानतेसाठी जागार करण्यात आला. लोककला व पथनाट्याव्दारे जनजागृती होत आहे. महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन अंगीकृत माहिला आर्थिक विकास महामंडळ,अकोला अंतर्गत लोक संचालित साधन केंद्र बाळापूर, तेल्हारा, अकोट, अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी येथे महिलांचे आरोग्य व सामाजिक समता या विषयावर लोककला व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यामधील ३५ गावांमध्ये सादरीकरण करण्यात आले. जनजागृती उपक्रम नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत राबवण्यात आला. कार्यक्रम जिल्हा समन्वयक अधिकारी वर्षा खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नीता अंभोरे यांच्या नेतृत्वामध्ये सादर झाले. जिल्ह्यामधील ९ लोक संचालित साधन केंद्रा अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये लोककला व पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमात सी.एम.आर.सी चे व्यवस्थापक व लेखापाल आणि गावातील सरपंच, पोलीस पाटील, मित्र मंडळाचे प्रतिनिधी व गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सी.आर.पी व सहयोगिनी ताई आणि गावातील बचत गटांचे योगदान मोठ्या प्रमाणावर होते. घरोघरी परसबाग तयार करा, सेंद्रिय फळबाग लागवड करा सर्वांनी आपल्या घरोघरी परसबाग तयार करून सेंद्रिय फळबाग लागवड करून सेंद्रिय भाजीपाला खाल्ला पाहिजे आणि घरातील मुलगा मुलगी मध्ये समान हक्क अधिकार आणि मतभेद नष्ट करणे तसेच मुलीला शिक्षणाकरिता व नोकरीसाठी बाहेरगावी पाठवणे व महिला सक्षमीकरण व बचत गटाच्या माध्यमातून शेतीला जोड व्यवसायातून सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध लघु उद्योग चालू करणे व हवामान बदला बाबत महत्वपूर्ण माहिती व सत्ता, संपत्ती व समान अधिकारा करीता महिलांचा पुढाकार या विषयी लोककला व पथनाट्यातून आणि लोकगीताच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. लोककला व पथनाट्यातून महिलांचे आरोग्य व सामाजिक समानतेबाबत माहिती देण्यात आली. महिला सशक्तिकरण व हवामान लवचिकता व पोषणबाबत संवेदनशील दृष्टिकोनाबद्दल तसेच महिलांचे हक्क कर्तव्य अधिकार व महिलांचे शेतीच्या सात बारात व घराच्या नमुना आठमध्ये महिलांचे नाव समाविष्ट व चढवणे आणि घराच्या नावाच्या पाठीवर महिलांचे नाव समाविष्ट करून त्याच्या सुद्धा नावाची पाटी लावणे आदींबाबत जनजागृती करण्यात आली.
सीताबाई महाविद्यालयात संविधान दिनी प्रश्नमंजूषा:१२७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
प्रतिनिधी | अकोला दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित सीताबाई कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाद्वारे संविधान दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता, मानद सचिव डॉ. पवन माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांच्या उपस्थितीत जनजागृती पर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रसन्नजीत गवई यांच्या पुढाकाराने संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. यात १२७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक शेख अयान शेख अहमद यांनी व जयंत वानखेडे यांनी प्राप्त केला. द्वितीय क्रमांक सय्यद साहिल सय्यद नजीर, परेश फुलंबरकर व मोहम्मद अफजल मोहम्मद इजाज यांनी प्राप्त केला. तृतीय क्रमांक अक्षरा बागडे, हर्षल जाधव, राजदीप वाघमारे, सुयोग देशमुख, यश फुर्सुले, सुरज सोळंके, तन्वी सिरसाट, रत्नदीप सिरसाट, हर्षल गदादे यांनी संयुक्तरित्या प्राप्त केले. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र व राज्यघटना देऊन गौरवण्यात आले. विशेष पारितोषिक म्हणून समीक्षा प्रवीण हिला देऊन सन्मानित करण्यात आले. ६७ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले.
प्रतिनिधी | अकोला स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिकारक घडवणारी उमरी येथील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर अर्थात टिळक राष्ट्रीय शाळेत शाळेचे संस्थापक स्व. पुरुषोत्तम उर्फ आबासाहेब धोंडू कुलकर्णी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार माजी विद्यार्थी संघाने केला. पुण्यतिथीनिमित्त आबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. शासकीय तथा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करावेत, या शासकीय परिपत्रकानुसार टिळक राष्ट्रीय शाळेतही माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली आहे. या माजी विद्यार्थी संघाने शनिवारच्या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. जवळपास ३०० माजी विद्यार्थी या समारंभात सहभागी झाले. यात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिगंबर वनारे, उमेश मसने, प्रकाश मालगन, किरण सावके, संतोष गावंडे, नितीन वर्गे, तुषार काळमेघ, शिलरत्न वानखडे, सुनील मातुलकर, संजय पळसपगार, विठ्ठल थोटे यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका, माजी विद्यार्थी यांच्यासह विद्यार्थ्यांची, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. संजय मोटे यांनी केले तर आभार उमेश मसने यांनी मानले. यासाठी घेणार पुढाकार टिळक राष्ट्रीय शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार या समारंभाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, व्यायामशाळा, स्वच्छ परिसर असावा व त्यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले. सर्वांनी सहकार्य केले तर ही बाब कठीण नसल्याचे मत याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
प्रतिनिधी | अकोला शाश्वत ज्ञान हे ग्रंथादी व सत्संगाच्या सानिध्यात प्राप्त होते. साधुकडे तीन प्रकारचे ज्ञान असते. हे ज्ञान अमर व शाश्वत स्वरूपाचे असते. त्यामुळे खऱ्या ज्ञानासाठी सत्संग व आध्यात्मिक ग्रंथांची कास धरण्याचा हितोपदेश गोपाल महाराज कारखेडकर यांनी केला. ते जवाहरनगर येथील छत्रपती राजे संभाजी पार्क येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत पाचवे पुष्प गुंफताना मार्गदर्शन करत होते. कथेचे आयोजन आशिष पवित्रकार मित्र परिवार व भागवत सेवा समितीच्या वतीने गुरुवर्य संत वासुदेव महाराजांच्या स्मरणार्थ व स्व. बाबुराव पवित्रकार यांच्या स्मृतीत करण्यात आले आहे. पू. गोपाल महाराज यांनी मनुष्याबाबत विवेचन केले. मनुष्य हा घाणीचा संगम आहे. तो नाशवंत आहे. असे असूनही तो अमर असल्याचा तोऱ्यात वावरतो. स्वतःला सर्वकाही समजतो. मात्र संतत्व प्राप्त झाले की आपली किंमत कळते. कारण आपणास विद्वत्ता प्राप्त होऊन नीती निर्माण होते, असेही महाराज म्हणाले. सत्रात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यात रमाकांत खेतान, डॉ. पराग डोईफोडे, डॉ. रवींद्र जैन, प्रा. प्रकाश डवले, प्रा. सुभाष गादीया, विजय शर्मा, अशोक कोठारी, कृष्णा बोदडे, प्रफुल्ल बोदडे, श्याम सारभुकन, ज्ञानेश्वर रायपुरे, नीरज शाह, संजय देशमुख, शेखर देशमुख, वाकोडे आदींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन जीवन देशमुख यांनी केले. पद्मश्री डॉ विजय भटकर यांचा सत्कार : या कथा उत्सवात पद्मश्री डॉ विजय भटकर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पद्मश्री डॉ. भटकर यांची माहिती डॉ. कल्याणी पवित्रकार यांनी दिली. प्रारंभी पू. गोपाल महाराज यांचे स्वागत डॉ. गजानन नारे, रवी गोयनका, डॉ. अशोक ओळंबे, निखिलेश दिवेकर, डॉ. पल्लवी दिवेकर, दीप्ती अग्रवाल, माधवी तायडे, मुकुंद बोडे, प्रा. गणेश बोरकर, प्रा. मुकुंद भारसाकळे, अपर्णा धोत्रे, बाळासाहेब गड्डम, रत्नाकर गुरुजी, रक्षण देशमुख, तन्मय तरोळे आदींनी सहभाग घेतला. कथेत कृष्ण जन्माचा जल्लोष : पू. गोपाल महाराज यांच्या कथेत कृष्ण जन्माचा जल्लोष साजरा करण्यात आला. या भागवत कथेत सुंदर कृष्ण देखावा साकार करण्यात आला होता. परिसरात झोपाळे साकार करण्यात येऊन त्याला फुगे लावण्यात आले होते. यावेळी छप्पन भोग या देखाव्याच्या पुढ्यात मांडण्यात आला होता.अनेक भक्तांनी या देखाव्याचे दर्शन घेतले. त्यामुळे भक्ती आवश्यक भगवंतांची माया फार कठीण आहे. ही माया ज्याने ओळखली त्यांची गिनती संतात होत असल्याचे सांगत त्यांनी कृष्ण कथा सांगितली. भागवतमधील कृष्ण कथा या जीवनाला आत्मिक उन्नतीकडे नेत असतात.म्हणून कृष्ण भक्ती ही अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी गोपाल महाराज म्हणाले.
प्रतिनिधी | अकोला रक्तदान हे सामाजिक, राष्ट्रीय कर्तव्य आहे, त्यात प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे विचार कालुराम फुडस््चे संचालक, उद्योजक सिद्धार्थ रुहाटीया आणि समर्थ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी व्यक्त केले. ‘दैनिक भास्कर’ समूहाचे संस्थापक स्व. श्री रमेशचंद्रजी अग्रवाल यांचा ८१ वा जन्मदिवस शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी प्रेरणा उत्सव म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी स्व. श्री रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिबिरात १३५ दात्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्व. श्री रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या जनसेवेचे व्रत पुढे नेण्याच्या अनुषंगाने भास्कर समूह, दिव्य मराठी परिवाराच्या वतीने शनिवारी अकोल्यात चार ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. आपत्कालीन स्थितीत गरजू रुग्णांना त्वरित रक्त मिळावे, यासाठी या शिबिरात संकलित होणारे रक्त स्थानिक शासकीय रक्तपेढीकडे देण्यात आले. एक युनिट रक्त तीन जिवांना जीवदान देते, असे म्हटले जाते. हीच या रक्तदान शिबिराची प्रेरणा आहे. या रक्तदान शिबिराच्यावेळी इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रा. लि. अकोला शाखेचे प्रमुख अंकितकुमार, प्रा. किशोर रत्नपारखी, वृत्तपत्र विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष बी. संतोष कुमार, प्रसिद्धी प्रमुख धरम मोयल, कार्यकारी अध्यक्ष हरीश येळणे, संघटक महेश सावरकर आदी उपस्थित होते. पवित्र कर्तव्य: अंकितकुमार रक्तदान हे समाजासाठी आपण करू शकणाऱ्या सर्वांत पवित्र आणि मानवी कर्तव्यांपैकी एक आहे. एका वेळेस केलेले रक्तदान अनेकांचे प्राण वाचवू शकते. यासाठी केवळ धैर्यच नाही तर समाजाप्रतीची जबाबदारी देखील आवश्यक असते. नियमित रक्तदानामुळे गरजू रुग्णांना नवी आशा मिळते, असे मत इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रा. लि. अकोला शाखा प्रमुख अंकितकुमार यांनी व्यक्त केले.
‘भारत का भविष्य’वर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान:सोलापूरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सोलापूर । महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान होणार आहे. ‘ भारत का भविष्य’ या विषयावर व्याख्यान आहे. ता. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी हुतात्मा स्मृती मंदिरात कार्यक्रम आहे. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर देवगिरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या ओघवत्या भाषणाचा लाभ सर्वांनी घ्यावा. परिषदेचे अध्यक्ष रेणुका महागावकर व अन्य सदस्य, पदाधिकारी यांनी सोलापूरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रतिनिधी | सोलापूर बाळे येथील खंडोबा मंदिरात रविवार असल्यामुळे भाविकांची रिघ होती. काकडा आरती झाली, अभिषेक, वस्त्र अलंकार महापूजा झाल्यानंतर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत होते. पाचशेहून अधिक किलो फुलांची सजावट मंदिर व गाभाऱ्यात करण्यात आली होती. विविध फुलांनी मंदिर सजवल्यामुळे प्रसन्न दिसत होते. दर्शनासाठी बॅरिकेडिंगची सोय होती. कोटंबा भरणे, तळीभंडारा उचलणे, जावळ काढणे, जागरण गोंधळ धार्मिक विधी सुरूच होते. सोलापूरसह अन्य शहारातून सुमारे ५५ ते ६० हजार भाविक आले होते. रात्री नऊला पालखी, अश्व, नंदीध्वजाची मिरवणूक निघाली. जिल्हा परिषद शाळेजवळ आल्यानंतर लंगर तोडण्याचा कार्यक्रम झाला. पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाली. भंडारा, खोबर, खारीक उधळण करीत मनोभावे दर्शन घेत होते. दिवटी पेटवून मंदिराभोवती पाच प्रदिक्षणा घालण्याची प्रथा आहे. मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष विनय ढेपे यांनी सांगितली. १- डिसेंबर महिन्यातील सात व चौदा डिसेंबर या दिवशी भाविकांची गर्दी राहणार आहे. या दोन रविवारसह ता. ३० ऑक्टोबर असे तीन रविवारी यात्रा २- बाजरी भाकरी, वांगी भाजी, कांदापात, भरीत रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य. काही जण कोटंबा भरतात ३- वाघ्या (वारू) यांची सेवा मंदिरात असते, वाघ्याची पूजा करतात ४-पहाटे पाच ते रात्री अकरा यावेळेत मंदिरात दर्शनासाठी िरघ ५- रात्री नऊला पालखी, अश्व, नंदीध्वजाची मिरवणूक, -६- जिल्हा परिषद शाळेजवळ लंगर तोडण्याचा विधी ७-. ग्राम प्रदक्षिणानंतर मंदिरात पालखी आल्यानंतर आरती ८-वाहतूक नियोजन, पोलिस बंदोबस्त
हिरज फाटा दत्त मंदिरात गुलाल पाळणा, महाप्रसाद:२००७ मध्ये दत्त मंदिराची स्थापना
प्रतिनिधी | सोलापूर मंगळवेढा रोडवरील हिरज फाटा येथील श्री दत्त मंदिर, अप्पा महाराज माऊली ट्रस्ट यांच्या वतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. ता. ४ डिसेंबर रोजी सकाळी रूद्राभिषेक, नित्य आरती, दहाला दत्त याग, होमहवन, साडेअकराला जन्माध्यायाचे वाचन, दुपारी बाराला पाळणा गीत, गुलाल कार्यक्रम. दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाचपर्यंत महाप्रसाद आहे. विश्वनाथ गुजरे तथा अप्पा महाराज (देगाव) यांनी ४८ वर्षांपासून दर महिन्याला गाणगापूरची वारी करतात. हिरज फाटा येथे २००७ मध्ये दत्त मंदिराची स्थापना झाली. या मंदिरात पौर्णिमा , दत्त जयंती, गुरू पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, अशी माहिती मंदिराचे नियोजक संतोष गुजरे यांनी दिली.
प्रतिनिधी |सात्रळ आपल्या घरी पिकवलेला भाजीपाला व फळे, तयार केलेले खाद्यपदार्थ, खेळण्यांची विक्री करुन विद्यार्थ्यांनी व्यवहारज्ञानाचा अनुभव घेतला. निमित्त होते. येथील नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालयात झालेल्या बाल आनंद मेळाव्याचे प्राचार्य सीताराम गरुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे आयोजन व नियोजन विद्यालयात करण्यात आले होते. आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉ. अनिता गागरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील म्हणाले, आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी हा आनंद बाजार आयोजित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांनी उत्साहाने यामध्ये भाग घेतला व ज्यांनी भाग घेतला नाही त्यांनीही मोठ्या उत्साहाने खरेदी केली. क्वालिटी, क्वांटिटी व वास्तूचे भाव यानुसार ग्राहक प्रतिसाद, नफा तोटा यावर कसा परिणाम होतो हे यामुळे समजते ,विद्यार्थ्यांना शाळेतच भावी काळामध्ये व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावेत हा उद्देश सफल झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाने केलेल्या नियोजनानुसार व सुचनेनुसार नेमून दिलेल्या जागेवर विद्यार्थ्यांनी आपली दुकाने मैदानावर लावली. आपल्या घरून आणलेला भाजीपाला फळे , खाद्यपदार्थ, खेळणी घेऊन विद्यार्थी विक्रीसाठी बसली. त्याचबरोबर अल्पोपहाराची दुकानेही लावण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी उत्साहात खरेदी केली तसेच पालक, शिक्षक बंधू भगिनींनीही खरेदी केली यावेळी प्रसंगी स्कूल कमिटी सदस्य पंकज कडू, सचिन दिघे, प्रशांत अत्रे रामा वाघचौरे, मनिषा शिंदे, प्रमोद कुलकर्णी, मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे,सर्व विद्यार्थी , सर्व शिक्षक बंधू भगिनी, पालक उपस्थित होते आनंद बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रामदास तांबे, त्रिंबक राशीनकर तसेच शिक्षक यांनी सहकार्य केले. या मेळाव्याचे संचलन स्काऊट विभाग प्रमुख बाबासाहेब बर्डे यांनी, तर आभार पर्यवेक्षिका हेमलता साबळे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी |निघोज महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वधर्मीय समाजाला संघटित करुन समाजाला एकसंध करण्याचे काम केले. मात्र आजचे राज्यकर्ते जातीजातीत भांडणे लावून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम करीत असल्याची टीका समता परिषदेचे जिल्हा पदाधिकारी व माजी उपसभापती खंडू भुकन यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निघोज येथील एसटी बस स्थानक परिसरात साजरी करण्यात आली. यावेळी भुकन तसेच निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे संचालक भाऊ रसाळ, शिवाजीराव वरखडे, विनायक सोनवणे, रमेश भुकन, बाबाजी साळवे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुन्नाभाई वाकळे, शहाजी लामखडे, प्रविण व्यवहारे, दादाभाऊ रसाळ आदी उपस्थित होते. भुकन म्हणाले, समाज संघटीत करून समाजाबरोबर परिसराचा विकास झाला पाहिजे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरक होते. फुले, आंबेडकर चळवळीने इतिहास घडवला म्हणून आजच्या समाजाची संवेदनशीलता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निघोज येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. छाया अनिल चौधरी.
प्रतिनिधी | चांदवड नगरपरिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) मतदान होत असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद कुलकर्णी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली. निवडणुकीसाठी दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. १० इमारतींमधील एकूण २२ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात प्रभाग क्र. १ ते ७ व १० साठी प्रत्येकी २ केंद्र तर प्रभाग ८ व ९ साठी प्रत्येकी ३ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर ५ याप्रमाणे एकूण ११० व राखीव २० अशा एकूण १३० कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यात १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी व १ कर्मचार्याचा समावेश राहणार आहे. याशिवाय नगरपरिषदेचे कर्मचारी निवडणूककामी सहाय्य करणार आहेत. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर १ याप्रमाणे २२ इव्हीएम मशीन व राखीव १० अशा एकूण ३२ इव्हीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान स्लिपा मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी १६ बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. तर शिल्लक मतदान स्लिपा संबंधीत मतदान केंद्रांवर बीएलओंमार्फत देण्यात येणार आहेत. मतदानादरम्यान सर्व मतदान केंद्रांवर मतदानाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारास तीन मते देण्याचा अधिकार असून नगराध्यक्षपदासाठी फिकी गुलाबी मतपत्रिका, सदस्य अ साठी सफेद व सदस्य ब साठी फिकी निळ्या रंगाची मतपत्रिका राहणार आहे.
कार्यकर्त्यांना धमकावणार असेल तर खपवून घेणार नाही:चित्रा वाघ
प्रतिनिधी | वैजापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणी भाजपच्या कार्यकर्त्यांना धमकावणार असेल तर खपवून घेणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी विरोधकांना इशारा दिला. तसेच लाडकी बहीण योजना चालू ठेवायची की बंद करायची हे कोणाच्या बापाच्या निर्णयावर नाही, तर देवाभाऊंच्या नेतृत्वाखालीच ठरते, असेही त्यांनी सांगितले. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चित्रा वाघ यांची सभा झाली. या वेळी त्यांनी नाव न घेता शिंदे गटालाही अनेक टोले लगावले. या वेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, उमेदवार डॉ. दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, अकिल शेख, पंकज ठोंबरे, कैलास पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी चित्रा वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसह सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. मित्रपक्षावर टीका न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दत्तात्रय करपे यांची तिसऱ्यांदा विरामगाव चेअरमनपदी निवड:दोघांची बिनविरोध निवड जाहीर
प्रतिनिधी | फुलंब्री फुलंब्री तालुक्यातील विरामगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीत दत्तात्रय करपे यांची सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. व्हाइस चेअरमनपदी कैलास करपे यांची निवड झाली. ही निवड शुक्रवारी सहायक निबंधक कार्यालयात झाली. निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक एस. एम. राजपूत यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. दत्तात्रय करपे हे फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून त्यांनी विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून ग्रामस्थांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रत्येक कुटुंबाला रेशन मिळावे, जे कुटुंब रेशनपासून वंचित आहेत त्यांना शासनाकडून पैसे मिळावेत, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या कामामुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत सलग तिसऱ्यांदा चेअरमनपदी निवड केली. चेअरमन आणि व्हाइस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. निवडीनंतर ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला. दत्तात्रय करपे यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी संचालक सोमीनाथ करपे, गणेश कापसे, आनंदा करपे, विठ्ठल कापसे, काशिनाथ कापसे, बाबासाहेब कापसे, सुनीता गायकवाड, गंगाबाई दिगंबर कापसे उपस्थित होते.
कर्जबाजारी शेतकऱ्याची खामगावला आत्महत्या:अतिवृष्टीमुळे मका, अद्रक पिकाचे नुकसान
प्रतिनिधी | खामगाव कर्जबाजारीपणाला कंटाळून खामगाव गोरक्ष (ता. फुलंब्री) येथील शेतकरी दत्तू किसनराव राकडे (४६) यांनी रविवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे गट क्रमांक २२५ मध्ये तीन एकर शेती होती. यंदा त्यांनी अद्रक आणि मका पिके घेतली होती. मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ते तणावात होते. दत्तू राकडे यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे दीड लाख, सोसायटीचे २६ हजार २०० रुपये, एका फायनान्सचे १० लाख व इतर खासगी कर्ज होते. तीन वर्षांपासून दुष्काळ, यंदा अतिवृष्टी यामुळे उत्पन्न घटले. त्यामुळे घरखर्च चालवणे कठीण झाल्याने ते चिंतेत राहात होते. रविवारी सकाळी त्यांच्या भावाने शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यांना फुलंब्री येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. वडोदबाजार ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
पैठण शहरामध्ये विकासकामांचे कागदावरच आकडे:खासदार हंडोरे
प्रतिनिधी|पैठण पैठण शहरात विकास कामांचे नुसते कागदावरच आकडे दिसून येत वास्तविक शहराचा कुठलाच विकास झालेला नसून जिकडे-तिकडे भकास परिस्थिती असल्याचे चित्र असल्याची टीका माजी समाज कल्याण मंत्री, भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केली आहे. काँग्रेस नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुदैवी योगेश जोशी यांच्या प्रचारार्थ यशवंतनगर येथे झालेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सरकारने अनेक जाती-धर्मांचे राजकारण करून लोकांची दिशाभूल करीत आहे. पैठण शहरात विकास कामांचे नुसते कागदावरच आकडे असून वास्तविक शहराचा कुठलाच विकास दिसत नाही. शहरात फिरत असताना संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांना ते भेटले. यावेळी कार्यकर्त्यांनी शहराचा विकास झालेला नसल्याची भावना व्यक्त केली तसेच शहराच्या विकासासाठी आलेला निधी फक्त ठेकेदारांचे घर भरण्यासाठी वापरला गेल्याचा आरोप माजी मंत्री हंडोरे यांनी केला. याप्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद तांबे, शहर प्रमुख निमेश पटेल, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुदैवी योगेश जोशी व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. खासदार हंडोरे यांनी पैठण शहरात उपस्थितांशी संवाद साधला.
सावंगी येथील श्री भैरवनाथ बाबांच्या मंदिरात रविवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. मंदिराचा जिर्णोद्धार ग्रामस्थांनी दोन कोटी रुपयांच्या लोकवर्गणीतून केला. मंदिरात सकाळी सात वाजता अभयानंदगिरी महाराज यांच्या हस्ते मूर्ती पूजन व शिखर कलश स्थापना झाली. त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत रामेश्वरनंद महाराज, वैसपूर यांनी काल्याच्या कीर्तनात अभंगांचे निरूपण केले. महाराज म्हणाले, भगवंताचे चिंतन माणसाला मन:शांती देते. त्यातून आचरण सुधारते. सत्संग हा मानवी जीवनाचा आधार आहे. त्यांनी ‘ये दशे चरित्र केले नारायणे’, ‘हे सोंग सारिले या रूपे अनंते’, ‘आहे तुका म्हणे धर्म संस्थापणे’ या अभंगांवर कीर्तन केले. भैरवनाथ बाबांवरील श्रद्धेमुळेच कोट्यवधी रुपयांचे मंदिर उभारता आले, असेही त्यांनी सांगितले. प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने झाली. सावंगीतील हे जागृत देवस्थान १९१० ते १९१३ दरम्यान नाथपंथीय भराडी समाजातील धोंडिबा पांडुरंग इंगळे यांनी आपल्या शेतात स्थापन केले होते. शतकी वर्षपूर्तीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एकत्र येऊन भव्य मंदिर उभारले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मंदिर परिसरात गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेवण न देताच ताटासोबत फोटो काढून पोर्टलवर करतात अपलोड शिवभोजन थाळी वाटपात केंद्रचालकांनी घोटाळा करू नये यासाठी राज्य सरकारने ऑनलाइन फोटो अपलोड करण्याचा पर्याय दिला आहे. याच मुख्य नियमाला हरताळ फासण्याचे काम सध्या शहरातील शिवभोजन केंद्रावर होत असल्याचे दिसून येत आहे. केंद्राच्या बाहेरच एका प्लेटमध्ये संपूर्ण जेवण वाढलेले असते. केंद्राच्या बाजूने जाणाऱ्या नागरिकांना ‘फक्त एक फोटो काढू द्या,’ अशी विनंती करून त्यांचे फोटो अपलोड केले जात आहेत. त्यामुळे ताट एकच मात्र लाभार्थी शंभर अशी योजनेची गत झाली आहे. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने स्वतः जेवण न करता फोटो अपलोड करून या गैरप्रकाराची पडताळणी केली गरजूंची भूक भागवण्यासाठी शहरात ७४ शिवभोजन केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी ४ या यावेळेत १० रुपयांत जेवण दिले जाते. यामध्ये पोळी, वरण, भात आणि भाजीचा असते. शासनाकडून शहरी केंद्रासाठी प्रतिथाळी ४० रुपये आणि ग्रामीण भागासाठी २५ रुपये दिले जातात. मात्र, बहुतांश ठिकाणी शिवभोजन केंद्राला प्रतिसाद नाही. मुलेही शिवभोजन केंद्रात खुर्चीवर बसून जेवण न करताच देतात फोटोसाठी ‘पोज’ काय आहे शिवभोजन योजना? कोरोनाकाळात गरजूंना तत्कालीन सरकारने शिवभोजन केंद्रामार्फत विनामूल्य जेवण दिले. त्यानंतर दहा रुपयांत शिवभोजन योजना लागू केली. या योजनेचा कोरोनाकाळात लाखो गरजूंनी लाभ घेतला. मात्र, कोरोनानंतर शिवभोजन केंद्राला प्रतिसाद कमी झाला. केंद्र बंद करण्याची धास्ती? सकाळी ११ वाजता लाभार्थींची नोंद पोर्टलवर सुरू होते. ते दुपारी चारपर्यंत सुरू असते. बहुतांश केंद्रांवर जेवणासाठी कुणीही येत नाही. त्यामुळे कोटा पूर्ण होत नाही. केंद्र बंद होण्याची धास्ती असल्याने केंद्रचालक खोटे लाभार्थी उभे करून फोटो अपलोड करून अनुदान मिळवतात. दर्जासह सुविधांचा अभाव शिवभोजनातून केंद्रचालक जास्त नफ्यासाठी अगदी छोटी पोळी, चमचाभर वरण, भात, भाजी वाढतात. यामध्ये पोट भरणे अशक्य आहे. वॉश बेसिनची व्यवस्था आणि साबण, निर्जंतुकीकरणाचे द्रावण केंद्रांवर ठेवले नसल्याचे दिसले. इनसाइड स्टोरी - व्हायरल क्लिपवरून बनवेगिरी एका थाळीमागे शासनाकडून शहरी केंद्रचालकाला ४० रुपये आणि ग्रामीण भागासाठी २५ रुपये दिले जाते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा निधी केंद्रचालकांना मिळालेला नाही. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील असाच व्हिडिओ समोर आला होता. आता तोच पॅटर्न शहरात राबवला जात असल्याचे समोर आले आहे. थेट सवाल - डॉ. प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी शिवभोजन केंद्रावर बनावट लाभार्थी दाखवतात, त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत? आम्ही नियमित तपासणी करत आहोत. यात कोणीही दोषी आढळले तर त्यांचा केंद्र परवाना रद्द करण्यात येईल. केंद्रचालक निधी मिळत नसल्याने हा प्रकार करत आहेत. यावर काय उपाय करणार? शासनाकडे निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. निधी आला नाही म्हणून बनावट लाभार्थी तयार करणे चुकीचे आहे. त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. जेवणाचा दर्जा निकृष्ट व केंद्रात सुविधा अपुऱ्या आहेत...? अधिकारी स्वतः तपासणी करतात. हा प्रकार सुरू असल्यास आमच्याकडे तक्रारी कराव्यात.
नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिंदेसेनेत टोकाचा तणाव निर्माण झाला आहे. यातूनच चार दिवसांपूर्वी हिंगोलीतील शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या घरावर १०० पोलिसांनी छापा टाकला, असा खळबळजनक आरोप केला होता. याच पक्षाचे दुसरे आमदार हेमंत पाटील यांनीही या प्रकरणाची थेट विधानसभा अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली होती. यापाठोपाठ आता शिंदेसेनेचे निकटवर्तीय नेते, सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयावरही स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी छापे टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारीच सांगोल्यात प्रचार सभा झाली. त्यानंतर लगेचच ही कारवाई झाल्याने त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. सांगोल्यात नगर पालिका निवडणुकीत शेकापचे आमदार बाबासाहेब पाटील व भाजपने हातमिळवणी करत शिंदेसेनेला आव्हान दिले आहे. त्यावरून शहाजीबापूंनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपवर कठोर टीका केली होती. रविवारी शहाजी बापूंची प्रचाराची सांगता झाली. यानंतर काही वेळातच सोलापूरहून आलेल्या एलसीबी पथकासह निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी रात्री १०.३० वाजता अचानक शहाजी बापूंच्या कार्यालयात जाऊन सुमारे एक तास झाडाझडती घेतली. कार्यालयातील काही दस्तएेवज, विविध कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. या वेळी पाटील मात्र कार्यालयात नव्हते.
४ डिसेंबरला जाहीर होणार कार्यक्रम मराठवाड्यात ८ जिल्ह्यांमधील १७पालिकांच्या कार्यक्षेत्रातील ३८प्रभागांची निवडणूक लांबणीवरपडली. निवडणूक निर्णयअधिकाऱ्यांकडे संबंधिकउमेदवारांनी अर्ज छाननीत आक्षेपघेतले होते. अधिकाऱ्यांचा निर्णयसंबंधितांना मान्य नव्हता. त्यामुळेउमेदवारांनी कार्टात धाव घेतलीहोती. न्यायालयात या हरकतींचानिकाल २३ नोव्हेंबरनंतर लागला. तोपर्यंत अर्ज माघारीची मुदत निघूनगेली होती. तसेच चिन्ह वाटपाच्याप्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळेसंबंधितांना प्रचाराल वेळ कमीमिळाला. म्हणून राज्य निवडणूकआयोगाने अशा प्रभागांच्यानिवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देशदिले आहे. आता सुधारीतआदेशानुसार २० डिसेंबला मतदानहोणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीची संपूर्ण निवडणूकस्थगित केल्याचा निर्णय प्रशासनानेरात्री उशिरा जाहीर केला. पुढे काय : ११ रोजी चिन्ह वाटप पुढे ढकलण्यात आलेल्या प्रभागांचानिवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी ४डिसेंबरला घोषित करतील. ११ डिसेंबरलारोजी निवडणूक चिन्हे वाटप केली जातील.२० डिसेंबरला मतदान प्रक्रिया होईल.मतमोजणी आणि निकाल हा २१ डिसेंबरलाघोषित केला जाईल. इच्छुकांचा खर्चाचा आकडा वाढणार आताच्या निवडणूक कार्यक्रमानुसार पालिकानिवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या इच्छुकांनीमतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार केला. तसेचकार्यकर्त्यांना खूश ठेवण्यासाठी जोमाने खर्च केला.त्यानंतर आता निवडणुका लांबणीवर पडल्यामुळेइच्छुकांना पुन्हा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळेत्याचा निवडणूक खर्चाचा आकडा वाढणार आहे.
भाजपचे इच्छुक उमेदवारहीआहेर करण्यात मागे नाहीत.त्यांचाही आहेर बुके, फोटोफ्रेम किंवा पाकिटातून रोखरक्कम असा आहे.शिंदेसेनेच्या बरोबरीनंभाजपच्या इच्छुकांचामांडवात वावर दिसतो.उद्धवसेना व काँग्रेसच्याइच्छुकांचीही विवाहसोहळ्यास उपस्थिती आहे.मात्र, त्यांची संख्या तुलनेतकमी आहे. लग्नसराई सुरू झाली आहे. पाहुण्यांचीलगबग सुरू आहे. मांडवात गटागटानेउभ्या असलेल्या वऱ्हाड्यांमध्ये चर्चेचाविषय महापालिकेचं इलेक्शन आहे.त्याला कारणही तसंच आहे. १० वर्षांनंतरमनपा निवडणूक होत आहे. इच्छुकतयारीला लागले आहेत. मतदारांशीसंपर्काचा सर्वात चांगला कार्यक्रम म्हणजेलग्नसोहळा. तिथं वधू-वरांना शुभेच्छादेता येतात आणि प्रभागातीलमतदारांशीही संपर्क साधता येतो. यासंपर्क मोहिमेत रविवारी (३० नोव्हेंबर)चर्चा होती ती इच्छुकांनी दिलेल्याआहेराची. काहींनी नवदाम्पत्याला बुकेदिले. कुणी आकर्षक फोटो फ्रेम भेटम्हणून दिल्या. काहींनी तर चक्क ५१हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाकिटातून दिली. महापालिकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. युती-आघाडीचं काय होणार हे ठरलेलं नाही. एकत्रलढायचं की स्वबळावर, हे अजून ठरलेलं नाही. पण २०२० पासून निवडणुकीचीवाट पाहणाऱ्यांनी थेट जनसंपर्कालासुरुवात केली आहे. त्यासाठी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या घरच्या विवाह सोहळ्याला इच्छुक मंडळी हजेरी लावत आहेत. रविवारी लग्नाची तिथी होती.प्रत्येक उमेदवाराची एका दिवसात १० ते१५ लग्नात हजेरी; आहेर आले चर्चेत एका प्रभागात तब्बल २४ ते ३० इच्छुक आहेत. त्यामुळेप्रत्येक उमेदवाराला एकाच दिवसात १० ते १५ लग्नातहजेरी लावावी लागते. प्रत्येक ठिकाणी किमान बुके तरीद्यावा लागतो. पण हे फक्त एन्ट्री लेव्हल आहे. खरी स्पर्धाआहे आहेरात. या आहेरात आघाडी घेतली आहे तीशिंदेसेनेनं. माजी नगरसेवक, माजी पदाधिकाऱ्यांची संख्याजास्त असल्याने त्यांचा परफॉर्मन्सही धडाकेबाज आहे.अनेक लग्नांत ११,००० ते ५१,००० रुपयांपर्यंतचे आहेर दिलेजात आहेत. काही ठिकाणी तर स्वतः मंगल कार्यालय बुककरून देणं, किराणा पुरवणं किंवा डेकोरेशनची जबाबदारीअसे खर्च इच्छुकांनी केले आहेत. इच्छुकांच्या याभरभक्कम आहेराची चर्चा रंगली आहे.प्रभाग पद्धतीमुळे लग्नाचे आमंत्रण जास्त; अर्धे वऱ्हाडी कार्यकर्तेच यापूर्वी वॉर्ड पद्धत होती. एका वॉर्डात तीन ते चारलग्नांची निमंत्रणं असायची. आता मात्र चारवॉर्डांचा प्रभाग झाल्याने निमंत्रणांची संख्यातिपटीने वाढली आहे. विवाह सोहळ्यातीलइच्छुकांच्या हजेरीमुळे मतदारही ‘आधीनातेवाईक येत, आता उमेदवार आधी येतात,’असे म्हणत आहेत. ३० नोव्हेंबरला शहरात ५००पेक्षा जास्त लग्नगाठी बांधल्या गेल्या.उमेदवारांची गर्दी एवढी होती की कुठल्याहीलग्नात ‘वऱ्हाडी कमी, इच्छुक जास्त’ अशीस्थिती होती. त्यामुळे लग्नात सूत्रसंचालकाचीहीइच्छुकांची नावे पुकारताना दमछाक होत होती.
‘मला कुणी समजून घेत नाही. मी व माझा परिवार आम्ही सगळे या दुनियेतून दूर चाललो आहे,’ अशी लहान भावाच्या नावे सुसाइड नोट लिहिली. तसेच सोशल मीडियावर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे स्टेटस ठेवत तरुणाने आपल्या दोन चिमुकल्यांसह पत्नीचा गळा दाबून खून करत स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. देवळा तालुक्यातील फुलेमाळवाडी येथे रविवारी (दि.३०) सकाळी ही धक्कादायक घटना घडली. गोविंद बाळकृष्ण शेवाळे (४०) असे गळफास घेणाऱ्याचे नाव अाहे, तर पत्नी कोमल (३५) , मुलगी खुशी (८), मुलगा श्याम (दीड वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. गोविंदने कुटुंबाला संपवण्यापूर्वी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी नातेवाइकांना फोन करून त्यांची विचारपूस केली. मी उद्या मुंबईला कामासाठी जाणार आहे. तुम्ही दोन- तीन दिवसांत माळवाडीला चक्कार मारून जा असे सांगितले. त्यानंतर सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी सोशल मीडियावर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असे स्टेट्स ठेवले. हे स्टेट्स लहान भावाने पाहिले व त्याने तत्काळ नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. गोविंदने शनिवारी गावातील ३ किराणा दुकादारांची २ हजार रुपयांची उधारीही दिली. त्यानंतर सायंकाळी घरी येताना ७ अंडे व २ किलो तांदूळ घरी आणले होते. पॅरेलल इन्व्हेस्टिगेशन : नऊ महिन्यांपासून अडीच एकर जमिनीवरून वाद गोविंदकडे अडीच एकर बागायती शेती होती. परंतु, त्यावर आई, दोन बहिणी व लहान भावाचे वारस म्हणून नाव होते. लहान भाऊ तुषार हा घरजावई म्हणून दातत्री शेवाळी (ता.साक्री) येथे गेला होता. त्यामुळे घरची पूर्ण जमीन ही गोविंदलाच मिळावी असा त्याच्या पत्नीचा आग्रह होता. वडिलांचे नऊ महिन्यापूर्वी निधन झाल्यानंतर मालमत्तेवरून कौटुंबिक वाद चिघळला होता. सुसाइड नोट शब्दश: माझे अकाउंट एसबीआय, एचडीएफसी, पोस्ट, ॲक्सिस बँक. तुझ्या वहिनीचे अकाउंट एचडीएफसी, महाराष्ट्र बँकत. येथे आमचे दोघांचे अकाउंट आहेत. त्या पैशाने आमचे कार्य पूर्ण कर. तू आईची व बाकी सगळ्यांची काळजी घे. मी व माझा परिवार आम्ही सगळे या दुनियेतून दूर चाललो आहे. कारण की मला कोणी समजून घेत नव्हते. - तुझा लाडका व नालायक भाऊ... गोविंद
खरीप, रब्बी हंगामासोबत आता वेगळा विचार केल्यास त्याचा उत्तम फायदा होऊ शकतो हे नांदेड जिल्ह्यातील डोंगरगाव (ता.मुदखेड) येथील शेतकरी बालाजी दत्तराव महदवाड सिद्ध करून दाखवले आहे. मागील तीन वर्षांपासून आपल्या १४ पैकी ११ एकरवर चिया, कलोंजी, अश्वगंधा, इटालियन तुळस अशा औषधी वनस्पतींची लागवड करत वर्षाकाठी २१ लाखांचे उत्पन्न मिळवत आहे. विशेष म्हणजे औषधी वनस्पतींच्या जागेवर पारंपारिक पीक घेतल्यानंतर त्यावर कुठल्याही प्रकारचा रोग पडत नसून उत्पादन वाढीसाठीही ती जमीन पोषक ठरते. शेतकरी बालाजी महदवाड यांच्यावर सुरूवातीला बॅंकेचे ४ लाखांचे कर्ज होते. त्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपरिक पिकांना बसत असलेला फटका यामुळे घरगाडा चालवणे व एकंदरीत सर्वच अवघड झाले होते. यातून मार्ग काढण्यासाठी महदवाड यांनी मध्य प्रदेशातील निमज गावाला भेट देऊन २०२२ पासून औषधी वनस्पतींची शेती सुरू केली. शेतीवरील देखभाल खर्च झाला शून्य शेतकरी महदवाड यांनी ११ एकरमध्ये ३ लाख ४० हजारांचा खर्च लागला. चिया, कलोंजी, अश्वगंधा, इटालियन तुळशीचे बियाणे सहज टाकले तरी लागते. फारसे मनुष्यबळ लागत नाही. सुरूवातीला तुषारच्या सहाय्याने रान भिजवायचे व वेळोवेळी पाणी देत राहायचे. या वनस्पतींना फवारणीची ही आवश्यकता नसते. कापणीला मात्र मजूर लागतात. वन्य प्राणी पिक खाण्याचा धोका नसतो. असे आहे खर्च उत्पन्नाचे गणित औषधी वनस्पतींचे साडेतीन महिन्यांचे पीक आहे. हे पिक संपल्यावर शेत तसेच ठेवून नंतर हंगामी पिक घेता येते. विशेष या जमिनीवर पारंपरिक पिक लावल्यास त्याच्यावर कोणताही रोग पडत नाही. त्यामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक आलाच नसल्याचे महदवाड म्हणाले. मध्यप्रदेशातील निमज व वाशिम येथे चिया पिकाला बाजारपेठ आहे. सध्या क्विंटलला २५ हजारचा भाव मिळत आहे. तर, अश्वगंधा, कलोंजी, इटालियन तुळस ५०० रूपये किलोप्रमाणे विक्री हाेते. सर्व वनस्पतीचे मिळून त्यांचे ५२ क्विंटल उत्पादन निघाले. ४ लाख रुपये खर्च वगळता त्यांना १७ लाख निव्वळ नफा झाल्याचे महदवाड यांनी सांगितले.
अपघातात बार्शी तालुक्यात ५ ठार
कुटुंबीयांसह नवदाम्पत्य जात होते तुळजापूरला सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातांत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. लग्नानंतर देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या नवदाम्पत्याच्या कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि […] The post अपघातात बार्शी तालुक्यात ५ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकले चक्रीवादळ
चेन्नई : वृत्तसंस्था श्रीलंकेत कहर केल्यानंतर चक्रीवादळ दितवा आज तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किना-यावर धडकले. हवामान खात्याने कुड्डालोर, नागापट्टिनम, मयिलादुथुराई, विल्लुपुरम आणि चेंगलपट्टूसह अनेक भागात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले आहे. चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशजवळ येताच वा-याचा वेग ताशी ९० किमीपर्यंत आहे. यानंतर त्याचा वेग कमी होऊन तो ताशी ६०-७० किमीपर्यंत कमी होऊ […] The post तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकले चक्रीवादळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरमालक, भाडेकरू यांच्यात आता ऑनलाईन भाडेकरार
मनमानी पद्धतीने घरभाडे वाढविता येणार नाही नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने घरभाडे नियम २०२५ लागू केला आहे. ज्याद्वारे देशातील रेंटल हाऊसिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यामुळे भाडेतत्त्वावर घर घेणे सोपे होईल आणि मनमानी पद्धतीने घरभाडे वाढवणे, अधिक डिपॉझिट मागणे यासारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागणार नाही. नव्या आणि औपचारिक रचनेनुसार […] The post घरमालक, भाडेकरू यांच्यात आता ऑनलाईन भाडेकरार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरपालिका मतदानासाठी पोलीस सज्ज
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका २०२५ निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लातूर पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत, सुरक्षिततेत आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी, तसेच कोणतीही अनुचित प्रकार अथवा कायदा व व्यवस्था धोक्यात आणणारी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हाभरात रूट मार्च, बंदोबस्त, निगराणी व […] The post नगरपालिका मतदानासाठी पोलीस सज्ज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एड्स दिनानिमित्त आज सायकल रॅली
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था व जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यावतीने आज १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक […] The post एड्स दिनानिमित्त आज सायकल रॅली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातुरात दुसरे अभिजात इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल
लातूर : प्रतिनिधी अभिजात फिल्म सोसायटी व दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा अभिजात आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव दि. १६, १७ व १८ डिसेंबर रोजी लातूर येथील दयानंद सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नावाने या महोत्सवातील विजेत्या लघुपटास प्रथम पारितोषिक देण्यात येणार असून लघुपट निर्मितीच्या इतर […] The post लातुरात दुसरे अभिजात इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महानगरपालिका शेजारी अन् समस्येने ग्रस्त जनता बिचारी
लातूर : प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक ९ हा मनपा कार्यालया शेजारी येतो परंतु मनपा शेजारी असून ही या प्रभागामध्ये समस्याच समस्या आहेत. या प्रभागात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. सर्वत्र घाण, नाल्या तुंबलेल्या, डासांची फलटण यामुळे रोगराई पसरली असून महानगरपालिका प्रशासनावर या प्रभागातील नागरिकांनी ‘एकमत’च्या विशेष कार्यक्रमात रोष व्यक्त केला आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये महानगरपालिकेला […] The post महानगरपालिका शेजारी अन् समस्येने ग्रस्त जनता बिचारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रब्बीच्या कर्ज वाटपासाठी बँका उदासीन
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयात या वर्षी अतिवृष्टीच्या पावसाने खरीप हंगामात शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे खरीप हंगामात बेजार झालेला शेत-यांसाठी रब्बी हंगामातील पिकांसाठी सध्या पोषक वातावरण आहे. रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी शेतक-यांना लागणारे खत, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी व पिकांच्या वाढीसाठी येणारा खर्च भागवण्यासाठी पिक कर्जाची नितात गरज आहे. मात्र रब्बी हंगामातील पिक कर्ज वाटपासाठी बँकांची […] The post रब्बीच्या कर्ज वाटपासाठी बँका उदासीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी २ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक आणि दर्यापूरमधील नगरसेवकाच्या एका जागेसाठीचे मतदान स्थगित करण्यात आले आहे. अपीलात जिंकलेल्या उमेदवारांना माघारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान, अंजनगाव सुर्जी येथील नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज सूचकांची संख्या अपुरी असल्याने रद्द झाले होते. तर दर्यापूरमधील नगरसेवक पदाचा एक अर्ज दोन उमेदवारांनी एकाच पक्षाचा एबी फॉर्म जोडल्यामुळे रद्दबातल ठरवण्यात आला होता. या तिन्ही उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायालयाने अपील स्वीकारत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय रद्द केला आणि तिघांचीही उमेदवारी कायम ठेवली. मात्र, निकालाच्या दुसऱ्याच दिवशी चिन्ह वाटप असल्याने, संबंधित उमेदवारांना माघारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. मूळात या उमेदवारांनी स्वतः कोणतीही तक्रार केली नसली तरी, राज्यभरातील इतर पालिकांमध्येही असेच प्रकार घडले होते. काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतल्याने आयोगाने राज्यभरासाठी नवीन निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार, ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी स्थगितीनंतरच्या पुढील कार्यक्रमाची अधिसूचना जारी करतील. १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत संबंधित उमेदवारांना माघारीसाठी मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर ११ डिसेंबरला निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी घोषित करून आवश्यकतेनुसार चिन्ह वाटप केले जाईल. त्यानंतर २० डिसेंबरला मतदान आणि २१ डिसेंबरला मतमोजणी केली जाईल. यामुळे अंजनगाव सुर्जीतील नगराध्यक्षासह नगरसेवकांच्या २८ जागांसाठीची निवडणूक आता २० डिसेंबरपर्यंत स्थगित झाली आहे. दर्यापूर येथील प्रभाग क्रमांक दोनमधील 'अ' जागेसाठीही हाच नियम लागू करण्यात आला आहे.
जाहीर प्रचाराच्या वेळेत बदल:नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी 36 तासांची वाढीव मुदत
राज्य निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी जाहीर प्रचाराच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नेहमीप्रमाणे मतदान संपण्याच्या ४८ तास आधी प्रचार थांबवण्याऐवजी, यावेळी उमेदवारांना तब्बल दीड दिवस म्हणजेच ३६ तासांची वाढीव मुदत मिळाली आहे. यामुळे आता मतदान सुरू होण्याच्या केवळ साडेनऊ तास आधीच जाहीर प्रचार थांबणार आहे. यापूर्वी निवडणुकीचा जाहीर प्रचार मतदानाची प्रक्रिया संपण्याच्या ४८ तास आधी थांबवला जात असे. मात्र, आयोगाच्या ताज्या निर्णयानुसार, नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. यामुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. या वाढीव वेळेचा फायदा घेत, राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर सभा, पदयात्रा आणि मिरवणुकांचे नियोजन केले आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांसारख्या प्रमुख पक्षांचे मोठे नेते १ डिसेंबर रोजीही जाहीर सभा घेणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांसाठी १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रचारासाठी ही वाढीव वेळ देण्यामागे एक विशिष्ट कारण आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना २६ डिसेंबर रोजी चिन्ह वाटप करण्यात आले होते. यामुळे त्यांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला होता. मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, या उद्देशाने आयोगाने ही मुदतवाढ दिली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमरावती शहराचा 'सिटी बर्ड' म्हणून 'तांबट' पक्ष्याची निवड करण्यात आली आहे. ऑनलाइन मतदान प्रक्रियेद्वारे ही निवड झाली असून, एकूण सहा पक्षी या शर्यतीत होते. शास्त्रीय भाषेत याला कॉपरस्मीथ बारबेट असे म्हटले जाते. या विजयाची घोषणा रविवारी सकाळी हॅपी स्ट्रीट कार्यक्रमादरम्यान वेलकम पॉइंट चौकात करण्यात आली. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष तथा वेक्स संघटनेचे सचिव डॉ. जयंत वडतकर आणि महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी ही घोषणा केली. यावेळी विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते. अमरावती शहराचा पक्षी घोषित करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाइन निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. अशी प्रक्रिया राबवून शहर पक्षाची निवड करणारी अमरावती ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. 'माझी वसुंधरा अभियान ६.०' अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. शहरपक्षी निवडीसाठी अमरावती महानगरपालिका आणि वन्यजीव पर्यावरण व संरक्षण संस्था (वेक्स) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. नागरिकांच्या सहभागातून ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवण्यात आली. त्यासाठी महापालिकेने विशेष ऑनलाइन पोर्टल तयार केले होते. निवड प्रक्रिया १८ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान अमरावतीकरांसाठी खुली ठेवण्यात आली होती. त्यानंतर रविवार, ३० नोव्हेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत ५ हजार ४४५ अमरावतीकरांनी भाग घेतला. या घोषणेसोबतच, शहरातील पर्यावरणीय अभिमानाचे प्रतीक म्हणून तांबट पक्ष्याची एक भव्य मूर्ती लवकरच उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे या उपक्रमाची कायमस्वरूपी आठवण शहरात जपली जाईल. अमरावती शहराने जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरण संरक्षणात अग्रणी भूमिका बजावली आहे. अमरावती महानगरपालिका व वेक्स संस्थेचे हे संयुक्त पाऊल शहराच्या हरित भविष्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. या निवडणुकीत तांबट (कॉपरस्मीथ बारबेट) याला सर्वाधिक १४१४ मते मिळाली. इतर पक्ष्यांना मिळालेली मते अशी: मोठा कोतवाल (ग्रेटर काऊकल) - १०३२ मते, भारतीय राखी शहामृग (इंडियन ग्रे हॉर्नबील) - ९९८ मते, हुडहुडी (इंडियन हुपोइ) - ७९६ मते, छोटे घुबड (स्पॉटेड ओवलेट) - ६५५ मते आणि शिकरा (शिकरा) - ५५१ मते.
अमरावती विभागातील ४१ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी ३२० उमेदवार, तर नगरसेवकपदासाठी ५,६०७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत अध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी मतदान घेण्यात येईल. त्यानंतर, ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल. जिल्हानिहाय तपशिलानुसार, अमरावती जिल्ह्यातील १२ नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये (चांदूरबाजार, दर्यापूर, चांदूररेल्वे, नांदगाव-खंडेश्वर (न.पं.), धारणी (न.पं.), धामणगाव रेल्वे, वरुड, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, शेंदूरजना घाट, मोर्शी, चिखलदरा) एकूण ७१ उमेदवार अध्यक्षपदासाठी, तर १,२५५ उमेदवार सदस्यपदासाठी निवडणूक लढवत आहेत. चिखलदरा नगरपरिषदेत एक सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. अकोला जिल्ह्यातील ६ नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये (अकोट, बाळापूर, मुर्तीजापूर, तेल्हारा, हिवरखेड, बार्शीटाकळी) अध्यक्षपदासाठी ३९ उमेदवार आणि सदस्यपदासाठी ७०७ उमेदवार रिंगणात आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ११ नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये (यवतमाळ, आर्णी, दारव्हा, ढाणकी (न.पं.), दिग्रस, घाटंजी, नेर-नबाबपूर, पांढरकवडा, पुसद, उमरखेड, वणी) अध्यक्षपदासाठी ८८ उमेदवार, तर सदस्यपदासाठी १,३८७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील ११ नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये (बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, जळगाव-जामोद, खामगाव, लोणार, मलकापूर, मेहकर, नांदुरा, शेगाव, सिंदखेडराजा) अध्यक्षपदासाठी ८७ उमेदवार आणि सदस्यपदासाठी १,१७० उमेदवार आहेत. मलकापूर नगरपरिषदेत दोन सदस्य आणि खामगाव नगरपरिषदेत एक सदस्य बिनविरोध विजयी झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातील ५ नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये (वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मालेगाव (न.पं.)) अध्यक्षपदासाठी ३५ उमेदवार, तर सदस्यपदासाठी ५४८ उमेदवार रिंगणात आहेत.
मोर्शी येथील पत्रकार आणि श्री आर. आर. लाहोटी महाविद्यालयाचे ग्रंथालय कर्मचारी चंद्रशेखर जनार्दनराव चौधरी यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळत असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. चौधरी हे दररोज सकाळी येथील क्रीडा संकुलात बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असत. आज सकाळी सातच्या सुमारास तेथे उपस्थित असताना, एक राऊंड खेळल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांच्यासोबत खेळत असलेल्या दोन डॉक्टरांनी तातडीने प्रथमोपचार (सीपीआर) दिला. मात्र, हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मरणोपरांत त्यांचे नेत्रदान करण्यात आले. चंद्रशेखर चौधरी हे वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष आणि हरिना नेत्रदान समितीचे सदस्य होते. त्यांचा विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध होता आणि ते सामाजिक कार्यातही सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे. मोर्शीकर नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
'विरोधकांचा चक्रव्यूह भेदणार, आम्ही आधुनिक अभिमन्यू':देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादांना थेट इशारा
कराड पालिका निवडणुकीत आपलेही आणि विरोधकही एक झाले आहेत. त्यांनी भाजपाला चारही बाजूने घेरलंय. महाभारतातल्या अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरणं माहीत होतं. बाहेर पडणं माहीत नव्हतं. परंतु, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला ते माहिती आहे. विरोधकांचा चक्रव्यूह भेदून आम्ही कराड पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं थेट चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा आणि एकनाथ शिंदेंना दिलं. कराड नगरपालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती भाषण केले. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र येत भाजपासमोर आव्हान उभे केले आहे. त्यांचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांना विरोधकांनी घेरलंय. त्यात आमचेही आहेत. आम्ही विरोधकांचा चक्रव्यूह भेदून दाखवू. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मी प्रत्येक शहरात जातोय. रोज पाच-सहा सभा घेतो. परंतु, कुठल्याही सभेत मी कुणावर टीका करत नाही. कुठल्या पक्षाला उणंदुणं बोलत नाही. कारण, आपल्याकडे विकासाचा कार्यक्रम आहे. आम्ही काय केलंय आणि काय करणार आहोत, याच्या आधारावर मी मत मांडण्यासाठी आलोय, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी आपली भूमिका मतदारांसमोर मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. देशाच्या संविधानाने लोकशाहीत आपल्याला काही अधिकार दिले असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांना आणि तुम्हाला, मला सुद्धा एकच मत देता येतं. ते एक मत देताना योग्य उमेदवार निवडण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपण देशाचा पंतप्रधान ठरवतो, विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ठरवतो आणि शहरात मतदान करून आपल्या शहराचं प्रशासन पाच वर्ष कोण चांगलं चालवेल, याचा निर्णय आपण करत असतो. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवात आपण विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही कमळाची चिंता करा, पुढची पाच वर्षे आम्ही तुमची काळजी घेऊ, असं भावनिक आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी कराडकरांना केलं. प्रीतिसंगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाच्या पुनर्विकासाचा विचार आमदार अतुल भोसले यांनी मांडला आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्या यशवंतरावांच्या समाधीचा विचार इतक्या वर्षात पुन्हा कुणी केला नाही. एकदा जे काम झालं, त्यानंतर परत त्याच्याकडे कुणी पाहिलं नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लगावला.
टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
रांची : विराट कोहलीचे वनडेतील विक्रमी शतक रोहित शर्मा आणि कार्यवाहू कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजीत कुलदीप यावदसह हर्षित राणाने दाखवली धमक याच्या जोरावर भारतीय संघाने रांचीचं मैदान मारलं आहे. पहिल्या वनडेतील दिमाखदार विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रांचीच्या मैदानात टॉस महत्त्वपूर्ण होता. हा कौल दक्षिण आफ्रिकेच्या […] The post टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
क्वेट्टा : बलुचिस्तान प्रांतामध्ये गेल्या २४ तासांत सात बॉम्बस्फोटांच्या घटनांनी दहशतवाद्यांचा देश पाकिस्तानला हादरवून सोडले आहे. येथील रेल्वे ट्रॅक, पोलिस चेकपोस्ट्स आणि एका खासगी कंपनीच्या साइटला लक्ष्य करण्यात आले असून या हल्ल्यांमुळे राजधानी क्वेट्टामध्ये तणाव वाढला आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा आणि डेरा मुराद जमाली या ठिकाणी संशयित बंडखोरांनी एकापाठोपाठ एक ७ स्फोट घडवले. या स्फोटांचे […] The post ७ स्फोटांनी बलुचिस्तान हादरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांची देशभरात कारवाई सुरू आहे. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तान प्रायोजित एका आंतरराष्ट्रीय आणि अंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड करत तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संपूर्ण नेटवर्कचे संचालन पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शाहजाद भट्टी करत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भट्टी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या निर्देशानुसार काम करतो, […] The post आणखी ३ दहशतवाद्यांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाक गाझामध्ये सैन्य पाठविण्यास सशर्त तयार
इस्लामाबाद : पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पाकिस्तान आपले लष्कर गाझा पट्टीत पाठवण्यास तयार असल्याचे सांगितलं. त्यांनी पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय शांती मोहिमेच्या अंतर्गत गाझामध्ये सैनिक तैनात करण्यास तयार आहे. मात्र पाकिस्तानची यासाठी एक अट आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री म्हणाले आम्ही तयार आहोत मात्र पाकिस्तानचे सैनिक पॅलेस्टाईनच्या दहशतवादी हमासला शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडणार […] The post पाक गाझामध्ये सैन्य पाठविण्यास सशर्त तयार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर ड्रोन हल्ला
कीव/ मॉस्को : रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर (टँकर) शनिवारी रात्री उशिरा ब्लॅक सीमध्ये पाण्याखालील ड्रोन (सी बेबी) ने हल्ला केला. युक्रेनने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन्ही जहाजे रशियाच्या शॅडो फ्लीटचा भाग मानली जातात. ही जहाजे निर्बंधांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे झेंडे लावून रशियन तेल वाहतूक करत होती. पहिल्यांदा विराट जहाजावर शुक्रवारी स्फोट झाला होता. शनिवारी […] The post रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर ड्रोन हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशभरात चीन-तुर्कस्तानची अवैध शस्त्रे
जयपूर : भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेले श्रीगंगानगर परदेशी शस्त्रास्त्रांचे लॉजिस्टिक हब बनत चालले आहे. पाकिस्तानात बसलेले आयएसआय समर्थित तस्कर दारूगोळापासून ते चीन-तुर्कस्तानमध्ये बनवलेली शस्त्रे ड्रोनद्वारे टाकत आहेत. येथून ही शस्त्रे देशाच्या इतर भागांमध्ये पोहोचवली जात आहेत. पूर्वी या मार्गातून अंमली पदार्थांचा पुरवठा केला जात होता. अलीकडेच लुधियाना (पंजाब) पोलिसांच्या चकमकीत सापडलेला श्रीगंगानगर (राजस्थान) येथील […] The post देशभरात चीन-तुर्कस्तानची अवैध शस्त्रे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नववर्ष खरेदीत ‘व्होकल फॉर लोकल’ स्वीकारा
नवी दिल्ली : सण आणि नवीन वर्षाच्या खरेदीमध्येही भारतीयांनी व्होकल फॉर लोकल स्वीकारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी मन की बातमधून रविवार दि. ३० नोव्हेंबर रोजी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या १२८ व्या भागात रविवारी भारतात खेळांची प्रगती, विंटर टुरिझम, व्होकल फॉर लोकल यासोबतच वाराणसीमध्ये होणा-या काशी-तमिळ संगममचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितले […] The post नववर्ष खरेदीत ‘व्होकल फॉर लोकल’ स्वीकारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकने सीमेवरील लाँचपॅड मागे घेतले
इस्लामाबाद : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानात एवढी दहशत माजली आहे की, तो प्रत्येक पाऊल जपून उचलत आहे. याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानने भारतीय सीमेत दहशतवाद्यांना पाठवण्यासाठी तयार केलेले ७२ पेक्षा जास्त लॉन्चपॅड आतील भागात हलवले आहेत. पाकिस्तानचा हा निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. […] The post पाकने सीमेवरील लाँचपॅड मागे घेतले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोफत योजनेने निवडणुका जिंकाल पण देश उभा राहणार नाही
नवी दिल्ली : देशातील वाढत्या रेवडी संस्कृतीला आणि प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांकडून केल्या जाणा-या मोफत योजनांच्या घोषणांवर भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी कठोर टीका केली आहे. मोफत योजना तुम्हाला निवडणुका जिंकून देऊ शकतील, पण त्यातून देश उभा राहू शकणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. कर्ज काढून मोफत वाटप या लेखात सुब्बाराव […] The post मोफत योजनेने निवडणुका जिंकाल पण देश उभा राहणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शंकराचार्य आणि साधू-संतही उतरले तपोवनात!
नाशिक : प्रतिनिधी साधूग्राम येथील झाडे तोडण्यास राजकीय पक्ष आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना वृक्षतोडीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह विविध राजकीय पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. राजकीय नेते आणि त्यांचे आंदोलन जोरात आहे. आता त्यात शंकराचार्य आणि […] The post शंकराचार्य आणि साधू-संतही उतरले तपोवनात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तपोवनातील वृक्षतोडीविरुद्ध ठाकरे गट, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
नाशिक : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वृक्षतोडीविरोधात आक्रमक होत ३० नोव्हेंबर रोजी तपोवनात जोरदार आंदोलन करून सरकारचा निषेध केला आणि वृक्षतोडीला विरोध केला. तसेच वृक्षतोडीविरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केला. तर हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झालेल्या दिसल्या. त्यांनीही तपोवनातील वृक्षतोड होऊ देणार नाही, असे सरकारला खडसावून सांगितले तसेच येत्या निवडणुकीत नाशिककर धडा शिकवतील, असा […] The post तपोवनातील वृक्षतोडीविरुद्ध ठाकरे गट, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिंदे गट-भाजपचे कार्यकर्ते भिडले; रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच मोठा राडा
डोंबिवली : प्रतिनिधी पूर्वेकडील कुंभारखाणा पाडा परिसरात गणेश घाट आणि रागाई मंदिर प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरण कामाच्या उद्घाटनावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रविवारी तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. महायुतीमधील हे दोन घटकपक्ष एकाच कार्यक्रमात एकमेकांसमोर आल्याने येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. कुंभारखाणा पाडा येथील गणेश घाट आणि देवीचा पाडा विसर्जन घाटाच्या सुशोभीकरणाचे […] The post शिंदे गट-भाजपचे कार्यकर्ते भिडले; रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच मोठा राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष; माणिकराव कोकाटेंची टीका
सिन्नर : प्रतिनिधी भाजपा पूर्ण बाटलेली आहे. इकडून फोड तिकडून फोड अशी परिस्थिती आहे. बीजेपीचे आयुष्य फोडाफोडीमध्ये चालले आहे, असा हल्लाबोल कोकाटे यांनी भाजपावर करत मित्रपक्षाकडून नवा वाद ओढावून घेतला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. राज्यभरात प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांविरोधात असल्याचे दिसत आहे. विधानसभेत एकत्र असलेले पक्ष […] The post भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष; माणिकराव कोकाटेंची टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एसआयआर’ मतदार यादी अद्ययावत करण्याची मुदत वाढवली
नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली मतदार यादी स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगाने(एसआयआर) मुदतवाढ दिली आहे. मतदारांना आपली नावे नोंदवण्यासाठी किंवा दुरुस्त्या करण्यासाठी आता एक आठवड्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. मतदारांना यादीतील नाव जोडणे, वगळणे किंवा दुरुस्ती करणे यासाठी आता अधिक वेळ मिळणार आहे, तसेच मतदान […] The post ‘एसआयआर’ मतदार यादी अद्ययावत करण्याची मुदत वाढवली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आता सक्रीय सिम कार्डनेच मॅसेजिंग अॅप्स चालणार
नवी दिल्ली : सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्स वापरणा-या लाखो वापरकर्त्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने व्हॉट्सअप, टेलिग्राम, सिग्नल, स्रॅपचॅट इत्यादींसह सर्व लोकप्रिय मेसेजिंग आणि सोशल अॅप्ससाठी नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. दूरसंचार विभागच्या दूरसंचार सायबरसुरक्षा सुधारणा नियम, २०२५ अंतर्गत हे निर्देश जारी करण्यात आले आहेत, ज्यामुळे कोणताही वापरकर्ता सक्रिय सिम […] The post आता सक्रीय सिम कार्डनेच मॅसेजिंग अॅप्स चालणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात एनडीए रस्त्यावरील दोन सराफी दुकानांवर दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. सराफ व्यावसायिकांनी केलेल्या प्रतिकारामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला. या झटापटीत एका व्यावसायिकाला किरकोळ दुखापत झाली असून, उत्तमनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला प्रयत्न उत्तमनगरमधील एनडीए रस्त्यावर धावडे पेट्रोल पंपासमोरील मोरया ज्वेलर्समध्ये झाला. तक्रारदार सराफ व्यावसायिक दुकानात असताना दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी खरेदीचा बहाणा करत दुकानात प्रवेश केला आणि नंतर शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सराफ व्यावसायिकाने प्रसंगावधान राखत चोरट्यांना प्रतिकार केला. त्यांनी दुकानातील सेल्फी स्टिकने चोरट्यांवर हल्ला चढवला. या झटापटीत दुकानातील काऊंटरची काच फुटून व्यावसायिकाच्या हाताला दुखापत झाली. चोरट्यांनी शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यावसायिकाच्या प्रतिकारामुळे ते घाबरले आणि पकडले जाण्याच्या भीतीने दुचाकीवरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, चोरटे दुचाकीवरून खडकवासला धरणाच्या दिशेने पळाल्याचे दिसून आले. त्यांनी दुचाकीची नंबर प्लेट काढून ठेवली होती. सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका गायकवाड या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, एनडीए-वारजे रस्त्यावरील शिवणे परिसरातही एका सराफी पेढीवर दरोड्याचा प्रयत्न झाला. या ठिकाणीही सराफ व्यावसायिकाने आरडाओरडा केल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. या घटनेबाबतही उत्तमनगर पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, ते सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रियांका गायकवाड यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे परिसरात विजयलक्ष्मी ज्वेलर्स ही सराफी पेढी आहे. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुुचाकीवरुन आलेले तीन ते चार चोरटे खरेदीच्या बहाण्याने पेढीत शिरले. चोरट्यांनी शस्त्रे होती. एका चोरट्याने शस्त्र पेढीतील काचेवर आपटले. सराफ व्यावसायिकाने आरडाओरडा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोके, कपाळाला दुखापत झाले. सराफ व्यावसायिकाचा आरडाओरडा ऐकून शेजारी असलेले दुकानदार तेथे जमा झाले. पकडले जाण्याची भीती वाटल्याने चोरटे सराफी पेढीसमोर लावलेल्या दुचाकीवरुन पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट तपास करत आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर ठरले आहे. नुकतेच विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स तर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स च्या चेअरमन मिस इंडिया डॉ. ईशा अगरवाल व १८४ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे अध्यक्ष सुनील रासने आणि कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जगभरातील भक्तांचे लाडके आराध्य दैवत आहे. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुणे शहराच्या गौरवाभिमानाचा सर्वोच्च कळस म्हणता येईल. दरवर्षी भारतभरातले आणि देशोविदेशीचे असंख्य भक्त ह्या गणेशाच्या दर्शनाला येतात. यंदा संपूर्ण वर्षभरात सर्वाधिक भाविक भेट देणारे गणपती मंदिर म्हणून हे विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले. वंचित बहुजन पर्यावरण आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी राकेश धोत्रे यांची नियुक्ती वंचित बहुजन पर्यावरण आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी राकेश धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे गुन्हे शाखेने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी १ ऑक्टोबरपासून फरार होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ प्रभाकर केंगार (वय २४, रा. हेल्थ कॅम्प, महापालिका वसाहत, पांडवनगर, शिवाजीनगर) असे आहे. केंगारने १ ऑक्टोबर रोजी कर्जत परिसरात जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केंगारविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर तो फरार झाला होता आणि कर्जत पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस हवालदार शंकर कुंभार, उज्ज्वल मोकाशी आणि विजयकुमार पवार यांना केंगार वडारवाडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. केंगारला पुढील तपासासाठी कर्जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार काळात आरोपी नेमका कुठे कुठे गेला होता, त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का ,त्याला आर्थिक पाठबळ कोणी दिली आहे याबाबत पोलीस पथक अधिक तपास करत आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, कुंभार, मोकाशी, पवार, संजय जाधव, सर्जेराव सरगर, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी आणि गणेश आबनावे यांनी केली.
चाकणमध्ये भीषण आग; कंटेनरमधील ई-स्कूटर जळून खाक
पुणे : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात पहाटेच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली आहे. तळेगाव-चाकण रस्त्यावरील खराबवाडी गावात असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ डिझेल भरण्यासाठी आलेल्या एका मोठ्या कंटेनरला अचानक आग लागल्याची घटना घडली. कंटेनर डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला होता. कंटेनर चालकाने त्यासाठी आपल्या मालकाला फोन केला होता. मात्र मालकाने फोन न उचलल्याने चालकाने […] The post चाकणमध्ये भीषण आग; कंटेनरमधील ई-स्कूटर जळून खाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र राज्याचा विकास आणि गौरव वाढीसाठी सातत्याने काम करत राहणार, असे प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले आहे. राज्याचे मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून नवनियुक्त मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी रविवारी पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (अ.व.सु) राधिका रस्तोगी, मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद-सिंगल, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्यासह मुख्य सचिव कार्यालय व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोण आहेत राजेश अग्रवाल? राजेश अग्रवाल हे 1989 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असून तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे विशेष कौशल्य ओळखले जाते. आयआयटी दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीतील बी.टेक. पदवी मिळविल्यानंतर ते प्रशासनात दाखल झाले. राज्यात त्यांनी अकोला व जळगावचे जिल्हाधिकारी, तसेच मुंबई महापालिकेत उपआयुक्त म्हणून काम पाहिले आहे. राज्याच्या अर्थ व आयटी विभागात त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा राबवल्या. याच अनुभवाच्या जोरावर केंद्रातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय योजनांमध्ये योगदान दिले आहे. केंद्रात तैनात असताना अग्रवाल यांनी आधार, जनधन योजना, डिजिलॉकर, सामाजिक न्याय विषयक डिजिटल उपक्रम अशा प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामामुळे देशातील डिजिटल प्रशासनाला गती मिळाली. सध्या ते सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अपंग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांचे राज्यात पुनरागमन होताच ते मुख्य सचिवपदाचे स्वाभाविक दावेदार ठरले. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सेवेत राहणार महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत मुख्य सचिवपदावर अल्पकाळासाठी नियुक्त्या होत असल्याचे चित्र दिसले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्ती मुदती आणि प्रशासनातील वरिष्ठतेचे समीकरण यामुळे हे पद वारंवार बदलत गेले. पण राजेश अग्रवाल 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सेवेत राहणार असल्याने त्यांना जवळपास एक वर्षाहून अधिक कार्यकाल मिळेल. त्यामुळे दीर्घकालीन योजना राबविण्यास आणि राज्य प्रशासनाला स्थैर्य देण्यास त्यांचा कार्यकाळ उपयुक्त ठरेल, असे सूत्रांचे मत आहे.
रामदास आठवलेंचे स्वबळाचे संकेत; महायुतीत तणाव?
पुणे : प्रतिनिधी इतर पक्ष निवडणुका आल्या की सर्व जागा लढण्याचा निर्धार करतात. पण आमच्या पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जागांसाठी विनंती, विनवण्या कराव्या लागतात. आम्हीही या देशाच्या राजकारणात आहोत, आम्हालाही लढायचंय, पण आमच्या पक्षाला मिळणा-या जागांची अवस्था दयनीय आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या भाषणाने एकच खळबळ उडाली असून आरपीआय आता स्वबळावर उतरणार […] The post रामदास आठवलेंचे स्वबळाचे संकेत; महायुतीत तणाव? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत, या विधानावरून महायुतीत नाराजीचे सूर उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता सारवासारव केली आहे. ते विधान मी ओघात बोललो होतो. तिजोरी माझ्या किंवा कुणाच्या बापाची नाही, ती जनतेची आहे. तसेच माझ्यापेक्षा जास्त अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच आहेत, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. अनेक ठिकाणी महायुतीमधील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत बोलताना “तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करा, तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे.” असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही “अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मतदान केल्यास निधी मिळेल,” असे म्हटले होते. यावरून भाजप नेत्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. आता अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. नेमके काय म्हणाले अजित पवार? भोर नगरपालिका निवडणूक प्रचारानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच जाहीर सभा पडली. या सभेत बोलताना त्यांनी तिजोरीच्या चाव्यावरील विधानावर स्पष्टीकरण दिले. मी परवा बोलताना म्हणालो होतो की चाव्या माझ्याकडे आहेत, पण तो केवळ बोलण्याचा एक भाग होता. लगेच काहींनी (भाजप नेत्यांनी) आठवण करून दिली की चावी तुमच्याकडे असली तरी तिजोरी आमच्या खोलीत आहे. अरे, पण कोणाच्याही खोलीत तिजोरी असू द्या, तिजोरी ही जनतेची आहे. ती माझ्या किंवा इतर कुणाच्या बापाची नाही, हे सत्य आहे, असे अजित पवार म्हणाले. माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे महायुतीमध्ये तिजोरीच्या अधिकारांवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना अजित पवार म्हणाले, माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून अधिकार आहेतच, त्याआधारे विकासाला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. पण, माझ्यापेक्षा जास्त अधिकार नक्कीच मुख्यमंत्र्यांकडे आहेत, हे मी मान्य करतो. गुंडांना किंवा दोन नंबरवाल्यांना तिकीट दिले नाही यावेळी अजित पवारांनी आपल्या उमेदवारांच्या चारित्र्यावर भर देत विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि स्थानिक विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझ्या पक्षाच्या उमेदवारांवर नजर टाका. रामचंद्र आवारे यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. मी 'दोन नंबर'चे धंदे करणाऱ्यांना उमेदवार केलेले नाही. इतर पक्षांनी कुणाला उमेदवारी दिली आहे, ते तुम्हीच तपासा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. संग्राम थोपटेंवर टीका पुणे जिल्हा बँकेच्या कारभारावरून त्यांनी संग्राम थोपटे यांना लक्ष्य केले. मी बेरजेचे राजकारण करतो, कामात मोकळीक देतो. पण तुम्ही ज्यांना जिल्हा बँकेवर निवडून दिले, ते संचालक मंडळाच्या मिटिंगला किती वेळा हजर असतात? अशी विचारणा अजित पवारांनी उपस्थितांना केली.
हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, तात्काळ हॉटेल रिकामे करा, शुक्रवारी दुपारी हॉटेलच्या लँडलाईनवर खणखणलेल्या या एका फोनमुळे कोरेगाव पार्कमधील एका प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. या धमकीमुळे पोलिस यंत्रणा आणि बॉम्ब शोधक पथकाची चांगलीच धावपळ झाली. मात्र, हॉटेलची कसून तपासणी केल्यानंतर हा फोन बनावट असल्याचे स्पष्ट झाले आणि हॉटेल प्रशासन व ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला. नेमके काय घडले? यासंबंधीच्या वृत्तानुसार, शुक्रवारी (ता. 29) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कोरेगाव पार्क भागातील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलच्या लँडलाईनवर एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत हॉटेल रिकामे करण्यास सांगितले. या प्रकारामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. व्यक्तीने धमकी देताच, हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने तत्काळ पुणे पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कोरेगाव पार्क पोलिस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पथकाने संपूर्ण हॉटेल परिसर पिंजून काढला, प्रत्येक कोपरा तपासला. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळून आली नाहीत. अखेर हा खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू या प्रकरणी हॉटेलच्या सिक्युरिटी मॅनेजरने दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देण्यासाठी 9832252517 या मोबाइल क्रमांकाचा वापर करण्यात आला होता. पोलिस आता सायबर सेलच्या मदतीने संबंधित कॉलरचे लोकेशन ट्रेस करत असून लवकरच त्याला अटक करण्यात येण्यात असल्याची माहिती मिळत आहे. पुणेकरांची सुरक्षा आणि पोलिसांवरील ताण राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार मोठी गंभीर समस्या बनली असून पुणे शहरातील गुन्हेगारीही पोलिसांपुढे मोठे आव्हान बनले आहे. त्यामुळे, पुणे पोलिसांकडूनही सातत्याने सतर्कता बाळगली जाते. त्यातच अशा बनावट फोन कॉल्समुळे पोलिस यंत्रणेवर नाहक ताण येत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, मात्र सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हे ही वाचा... दिल्लीसारखा बॉम्बस्फोट अमरावतीत घडवून आणू:पोलिस कंट्रोल रूमला फोनकॉलवरून धमकी, आरोपीला परराज्यातून ठोकल्या बेड्या मी कन्व्हर्टेड मुस्लिम आहे, अमरावती पोलिस आयुक्तालयात दिल्लीसारखा बॉम्बस्फोट घडवून आणू, अशी धमकी देणाऱ्या माथेफिरूच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अमरावती आणि इंदूर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत या आरोपीला मध्य प्रदेशातील इंदूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी रात्री आलेल्या या धमकीच्या फोनमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती. सविस्तर वाचा...
‘विराट’ शतकांचा ‘कोहली’ बादशहा
रांची : रनमशिन विराट कोहलीने रांचीच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या वनडे सामन्यात विक्रमी शतक झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील ५२ वे शतक झळकावले. या खेळीसह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. सचिन तेंडुलकरनं आपल्या वनडे कारकिर्दीतील ४६३ सामन्यात ५१ शतके झळकाल्याचा रेकॉर्ड आहे. हा विक्रम मागे टाकत विराट कोहली वनडेतील […] The post ‘विराट’ शतकांचा ‘कोहली’ बादशहा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचार तोफा थंडावण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाच भाजपने आपल्या अंतर्गत सर्वेक्षणाचे आकडे समोर आणत विरोधकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, राज्यात पक्षाचे तब्बल 175 नगराध्यक्ष विजयी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात भाजपच ‘मोठा भाऊ’ ठरणार, असा विश्वास पक्षश्रेष्ठींकडून व्यक्त केला जात आहे. येत्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी राज्यभरात झंझावाती प्रचार दौरे केले आहेत. राज्यात नगराध्यक्षपदासाठी 242 ठिकाणी भाजपचे उमेदवार थेट ‘कमळ’ चिन्हावर लढत आहेत, तर 46 ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक जागांवर उमेदवार असल्याने आणि प्रचारातील प्रतिसादावरून भाजपला 175 हून अधिक नगराध्यक्षपदे मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. भाजपचा विकासाच्या मुद्द्यावर भर भाजपने या निवडणुकीत विकासाचा अजेंडा राबवला आहे. मतदारांना केंद्रातील आणि राज्यातील योजना, तसेच शहरांसाठी वाढीव निधीचे आश्वासन दिले जात आहे. भाजपच्या या आक्रमक प्रचारनीतीमुळे आणि अंतर्गत सर्व्हेच्या आकडेवारीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुप्पट झाला आहे. आता 3 डिसेंबरला मतपेटीतून येणारा कौल हा भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार लागतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. बिहारसारखा रिझल्ट लागेल, आम्ही 200 जागा जिंकू दरम्यान, भाजपचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाच अंतर्गत सर्व्हे येण्याआधीच आम्ही 200 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. महाराष्ट्रात भाजपने 256 ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यापैकी आम्ही किमान 200 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका जिंकू. आमच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हा उत्स्फूर्त आहे, ही धरून आणलेली गर्दी नाही. बिहार विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निकालासारखेच यश भाजपला या निवडणुकीत मिळेल, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा... स्थानिक निवडणुकांपूर्वी शेवटचा झंझावात:शेवटच्या रविवारी राज्यभर सभा आणि शक्तीप्रदर्शन; कोकण ते मराठवाड्यापर्यंत जनसभांची रेलचेल महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून आजचा रविवार हा प्रचाराचा शेवटचा मोठा दिवस ठरणार आहे. राज्यात सर्वत्रच राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांचे नेते जिल्ह्याजिल्ह्यांत सभा, पदयात्रा, रॅली आणि घरोघरी संपर्क मोहिमा राबवत आहेत. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी प्रचाराचा वेग वाढला असून प्रत्येक पक्षाने शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराची कास धरली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तुफान धावपळ सुरू असून, एकाच दिवशी अनेक ठिकाणी सभा घेऊन वातावरण तापवण्याची रणनीती राबवली जात आहे. सविस्तर वाचा...
‘तेरे इश्क में’चा बॉक्स ऑफिसवर जलवा
मुंबई : प्रतिनिधी धनुष आणि क्रिति सेनन यांच्या ‘तेरे इश्क में’ या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार धमाका करत दुस-याच दिवशी इतिहास रचला आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटाने प्रदर्शित होताच २०२५ मधील टॉप ओपनर्समध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या या कमाईच्या रेकॉर्डने आता १० वर्षांपूर्वीचे धनुषचेच रेकॉर्ड मोडले आहे. […] The post ‘तेरे इश्क में’चा बॉक्स ऑफिसवर जलवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१३ नगर परिषदांची निवडणूक लांबणीवर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४१नगरपंचायतींची निवडणूक २ डिसेंबर रोजी होत आहे. त्यानंतर दुस-याच दिवशी म्हणजे ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना आणि प्रचाराला एक दिवस (१ डिसेंबर, रात्री १० वाजेपर्यंत) शिल्लक असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल १३ नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर […] The post १३ नगर परिषदांची निवडणूक लांबणीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आई-वडिलांसह चौघांची आत्महत्या; नाशिक हादरले
नाशिक : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा धुरळा उडाला असतानाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकमध्ये अख्ख्या कुटुंबाने मृत्यूला कवटाळले आहे. नाशिकमधील देवळा तालुक्यातील फुले माळावाडी येथे चार जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण काय? याचा तपास पोलिसांकडून करण्यात […] The post आई-वडिलांसह चौघांची आत्महत्या; नाशिक हादरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अध्यात्म आणि मनाचा जवळचा संबंध असून, मनाची सामर्थ्यशीलता विचारांनी तयार होते. विचार ऊर्जा, प्रेरणा आणि दिशा देतात. विचारांची स्पष्टता आणि सकारात्मक विचारच चांगले भविष्य घडवतात, असे मत प्रसिद्ध वक्ते आणि इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे येथे आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या सहाव्या पुष्पप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी केशव वेल्हाळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण आणि व्याख्याते डॉ. संजय उपाध्ये हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, ॲड. रियाज पडवीकर, एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस आणि डॉ. मिलिंद पात्रे यांचीही उपस्थिती होती. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. केशव वेल्हाळ यांनी 'ओम' हे सृष्टीचे मूळ आणि संपूर्ण विश्वाचे प्रतीक असल्याचे सांगितले. ओंकार हे भारतीय तत्त्वज्ञानाचे सार मानले जाते, तर 'ओम क्वांटम कम्प्युटिंग' हा तंत्रज्ञानातील जागतिक शांततेचा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. संजय उपाध्ये म्हणाले की, संतांच्या साहित्यामुळे सर्वांकडे समदृष्टीने पाहण्याची भूमिका तयार होते. समता, समानता आणि मानवतेचे वैश्विक स्तरावरील आदर्श प्रतीक म्हणून 'मानवतातीर्थ भवन'ची आज ओळख झाली आहे. डॉ. एस. एन. पठाण यांनी समाजात सांप्रदायिक सद्भावाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. हिंदू-मुस्लिम ऐक्यातून अनेक प्रश्न सुटतील आणि मानवता हाच मुख्य धागा ठेवून सर्वांनी एकत्र राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्माच्या सीमा ओलांडून स्वराज्य निर्माण केले. त्यांची 'वसुधैव कुटुंबकम्' या वैश्विक विचाराला पूरक भूमिका होती. रयतेच्या राज्याच्या याच विचारांनी विश्वमानवता साधता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वयंदीप अपंग विकास संस्थेच्या संस्थापक मीनाक्षी निकम यांना यंदाचा 'बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल देण्यात आला. कर्वे दांपत्याने उभारलेल्या मंदिराच्या पायरीचा दगड होता आले, हे मी माझे भाग्य समजते, असे मनोगत निकम यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केले. हा पुरस्कार प्रसिद्ध कान, नाक, घसा तज्ज्ञ आणि कॉक्लीअर इम्प्लांट विशेषज्ज्ञ डॉ. अविनाश वाचासुंदर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कर्वे नगर येथील रमा पुरूषोत्तम विद्या संकुल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्ष विद्या कुलकर्णी, उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री आणि विश्वस्त पुरूषोत्तम लेले उपस्थित होते. पुरस्कार निवड समितीचे सदस्य डेक्कन अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रसाद जोशी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य भाग्यश्री मंठाळकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. मीनाक्षी निकम यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले की, स्वतः दिव्यांग असल्याने त्यांना दिव्यांगांच्या रोजच्या जगण्यातील आव्हानांचा अनुभव होता. यामुळे दिव्यांगांसाठी रचनात्मक काम करण्याची इच्छा बळावली. वयाच्या ३२ व्या वर्षी आईला आलेल्या वैधव्यामुळे समाजातून नाकारलेपणाला सामोरे जावे लागले. हा नाकारलेपणा झुगारून आज त्यांची संस्था दिव्यांग आणि विधवा यांच्यासाठी काम करत आहे. त्या म्हणाल्या की, दिव्यांगांच्या बाबतीत आजही शहरी आणि ग्रामीण स्तरावर स्वीकारार्हता दिसून येत नाही. त्यांना सहानुभूती नव्हे, तर संधी आणि हातांना काम पाहिजे आहे. दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्यासाठी संस्थेतर्फे प्रशिक्षण आणि रोजगाराचा मेळ घातला जातो. कोणताही पुरस्कार हा सन्मानाबरोबरच जबाबदारी आणि विश्वास वाढवणारा असतो, असेही त्यांनी नमूद केले.
शिक्षण हे परिवर्तनाचे मोठे साधन आहे. शिक्षणामुळे केवळ व्यक्तीमध्येच नव्हे, तर समाज आणि देशातही बदल घडून येतात. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास समाज परिवर्तन होणार नाही, असे मत सर्जनशील शिक्षणतज्ज्ञ आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले. दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘आबासाहेब अत्रे पुरस्कार’ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांना प्रदान करण्यात आला. तसेच, ‘इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार’ क्रीडा क्षेत्रातील निवृत्त शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते संजय भैलुमे आणि कर्णबधिर मुलांच्या शिक्षिका, निवेदक, लेखिका विनया देसाई यांना डॉ. एकबोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. देशमुख यांना प्रदान केलेल्या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे होते. संजय भैलुमे आणि विनया देसाई यांना प्रत्येकी १० हजार रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव प्रफुल्ल निकम आणि डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे मानद अध्यक्ष अशोक वळसंगकर उपस्थित होते. डॉ. एकबोटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आबासाहेब अत्रे हे त्यांच्या वडिलांचे जवळचे मित्र होते. प्रतिकूल परिस्थितीत आबासाहेबांनी शाळा उभारण्यासाठी आणि वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट त्यांनी जवळून पाहिले आहेत. अशा व्यक्तींमुळेच शिक्षणाचे महत्त्व टिकून आहे. आपला देश केवळ राजकारण्यांमुळे चालत नाही, तर समाजात विविध क्षेत्रात मनापासून काम करणाऱ्या व्यक्तींमुळे तो प्रगती करत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी आपल्या भाषणात शिक्षणाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली. पूर्वीच्या आणि आताच्या शिक्षण पद्धतीत मोठी दरी निर्माण झाली आहे. शिक्षणाशिवाय कोणताही देश किंवा समाज मोठा होऊ शकत नाही, त्यामुळे शिक्षणावर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. डॉ. देशमुख यांनी पुढे सांगितले की, भारताने जगाला शिक्षणाची परंपरा दिली आहे आणि आजही भारतीय शिक्षण पद्धतीमुळे देश अनेक क्षेत्रात उंचीवर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’प्रमाणेच सरकारने ‘लाडका शिक्षक योजना’ राबवावी, अशी मागणी केली. तसेच, राजकारण्यांनी शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मराठी भाषा, साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाला नव्या काळाची आव्हाने स्वीकारत उत्थानाची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आयोजित उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती, दिवाळी अंक निर्मिती पुरस्कार, जीवनगौरव आणि साहित्यसेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या समारंभात डिंपल पब्लिकेशनचे संचालक अशोक मुळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, ज्येष्ठ बालसाहित्यकार ल. म. कडू यांना साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक योगेश सोमण यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि पराग लोणकर व्यासपीठावर उपस्थित होते. आपली प्राचीन ज्ञानपरंपरा पोहोचवणारे ऋषी हे प्रकाशन व साहित्याचे आद्य रूप म्हटले पाहिजे, असे सासणे म्हणाले. लेखकाचे शब्द वाचकांपर्यंत पोहोचवणारा दुवा प्रकाशक असतो. सध्या वाचक कमी होणे, मराठी वाचन घटणे अशी आव्हाने आहेत. यासाठी मराठीमधील अभिजात साहित्य पुन्हा प्रकाशित करण्याची आवश्यकता आहे. मराठी साहित्य आणि प्रकाशन व्यवसायाने कात टाकून उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यात योगेश सोमण यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. अमृता कुलकर्णी आणि पराग लोणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सोमण यांनी त्यांच्या लेखन, दिग्दर्शन, प्रशिक्षण आणि अभिनय क्षेत्रातील कामांबद्दल माहिती दिली. यापैकी लेखकाची आणि प्रशिक्षकाची भूमिका मला सर्वांत जवळची वाटते, असे सोमण म्हणाले. पं. सत्यदेव दुबे, वासुदेव पाळंदे, प्रकाश पारखी यांच्यामुळे अभिनयाचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक साहित्यप्रकार हाताळले असले तरी एकांकिका लेखनात मी मनापासून रमतो, कारण एकांकिका लेखन हा साहित्याचा स्वतंत्र प्रकार आहे, असे मत सोमण यांनी व्यक्त केले. हिंदी चित्रपटसृष्टीत काम करताना, तेथील व्यावसायिकतेचे कौतुक वाटते आणि मराठी रंगभूमीवरील कलावंतांना तेथील मंडळी अतिशय मान देतात, असेही त्यांनी नमूद केले. बालसाहित्यकार ल. म. कडू यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी गेल्या ४० वर्षांपासून मुलांत मूल होऊन रमत आलो आहे. मूल समजून घेणे अवघड असते. बालसाहित्यिकांनी मुलांचे मूलपण समजून, त्यांच्या वृत्ती आणि भावनांचा वेध घेतला पाहिजे. वयोगट लक्षात घेऊन मुलांशी संवाद साधून, त्यांना पुनरावृत्ती आवडते, हे जाणून लेखकांनी लिहावे. तसेच, मनोरंजनाला प्राधान्य आणि प्रबोधन नंतर, हा क्रम लक्षात घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
मी निवडून आल्यापासून भाजप नेत्यांकडून मला वारंवार पक्षात येऊन निवडणूक लढवण्याच्या ऑफर मिळत होत्या. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर केलेले उपकार मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. त्यामुळे मी त्यांना सोडून भाजपमध्ये जाणार नाही, असा मोठा राजकीय गौप्यस्फोट शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी केला आहे. दुसरीकडे, मालवणमधील 'स्टिंग ऑपरेशन' प्रकरणी गुन्हा दाखल होताच राणे यांनी पोलिसांना हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असे उघड आव्हान दिल्याने कोकणातील वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच नुकतेच शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले. तेव्हा संबंधित भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आली होती. तसेच हे पैसे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना वाटायला दिल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता या प्रकरणात आमदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर बोलताना नीलेश राणे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. फडणवीसांच्या पाया पडून बाहेर पडलो होतो आमदार नीलेश राणे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केलाय. तिकीट वाटपाच्या वेळी घडलेला किस्सा सांगताना मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिकीट मागत होतो. तेव्हा त्यांनी 'एका घरात तीन तिकिटे कशी देणार?' असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मी त्यांच्या पायाला हात लावून तिथून निघालो, असे नीलेश राणे म्हणाले. आता निवडून आल्यावर भाजपचे नेते मला पक्षात येण्याचा आग्रह करत आहेत. 'तू लोकसभा किंवा विधानसभा भाजपमधूनच लढव', अशा ऑफर दिल्या जात आहेत. पण मी शिंदेंशी गद्दारी करणार नाही. मला मंत्रिपदाची किंवा मोठ्या पदाची लालसा नाही असे त्यांना स्पष्ट सांगितले, असा गौप्यस्फोट नीलेश राणे यांनी केला. शिंदेंना सोडल्यास देव माफ करणार नाही नीलेश राणे यांनी यावेळी काही भाजप नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. मी प्रामाणिकपणे काम करतोय. शिवसेना ठाकरे गटातील लोकांना सहभागी करून घेतोय. भाजप नेत्यांना त्याचा त्रास होतोय. तू यांना का घेतोय? तुला तर भाजपमध्ये यायचे आहे. तर त्यांनी तू का घेतोय असे विचारले. मी ‘येणार नाही, घरी बसेन,’ असे सांगितले. जर मी एकनाथ शिंदेंना सोडले, तर मला देव माफ करणार नाही. मग मला राजकारणात काही नाही मिळालेमला कोणत्याही मंत्रिपदासाठी, मोठ्या पदात अजिबात रस नाही,” असे नीलेश राणे म्हणाले. स्टिंग ऑपरेशन प्रकरणी पोलिसांना थेट आव्हान स्टिंग ऑपरेशन प्रकरणात नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत बोलताना नीलेश राणे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, देशात हे पहिल्यांदाच घडत असेल की, ज्याने चोरी पकडून दिली, त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. समोरच्या व्यक्तीला (भाजप पदाधिकारी) साधी नोटीस नाही, आणि माझ्यावर थेट एफआयआर? मी व्हिडिओत कुठेही तोडफोड केली नाही, हे लाईव्ह दिसले आहे. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल झालाय. आता मला फक्त नोटीस नको, पोलिसांनी मला अटकच केली पाहिजे. मी पोलीस ठाण्याच्या बाजूलाच बसलो आहे, पाहूया पोलीस काय करतात, असे थेट आव्हान त्यांनी दिले.
मुखेड, धर्माबाद नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार
नांदेड : प्रतिनिधी न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला. यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड व धमार्बाद येथील निवडणुकीला बे्रक लागला आहे. सोबतच भोकर, लोहा आणि कुंडलवाडी या ३ नगरपालिकेतील ३ प्रभागांतील निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयोगाच्या या नव्या कार्यक्रमानुसार येथे २० डिसेंबर रोजी मतदान […] The post मुखेड, धर्माबाद नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया नव्याने होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिल्लीमध्ये हिवाळी अधिवेशनापूर्वी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत महाराष्ट्रातील महायुतीला मोठा राजकीय धक्का बसल्याची स्थिती दिसून आली. या बैठकीला अपेक्षित असलेले अजित पवार गटाचे प्रमुख तसेच शिंदे गटातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहिले नाहीत. साधारणपणे अशा स्तरावरील बैठकीत राष्ट्रवादीच्या वतीने प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे हे नामांकित नेते सहभागी होत असतात, तर शिवसेनेच्या वतीने लोकसभेतील गटनेते श्रीकांत शिंदे उपस्थित राहतात. मात्र यावेळी राष्ट्रवादीचा एकही खासदार हजर नव्हता आणि शिवसेनेतूनही श्रीकांत शिंदे याऐवजी नरेश म्हस्के सहभागी झाले. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढत असल्याचेच या गैरहजेरीतून स्पष्ट होत असल्याची चर्चा सुरू आहे. दिल्लीतील या घडामोडींमुळे महायुतीची एकजूट पुन्हा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. राज्यात सत्तेत बसलेल्या महायुतीच्या तीन घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र अस्वस्थता आणि अंतर्गत फूट उफाळून येत आहे. अजित पवार गट, शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता मिळवली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील अविश्वास आणि राजकीय कुरघोडी आणखी वाढताना दिसतेय. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनापूर्वी आयोजित सर्वपक्षीय बैठकीने तर हा संघर्ष लोकांसमोर उघडपणे आणला. महत्त्वाची ही बैठक असतानाही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या प्रमुख चेहऱ्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. सर्वसाधारणपणे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उपस्थित राहतात, तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे. मात्र यंदा हे दोघेही न येता त्यांची जागा इतरांनी भरली. त्यामुळे ही नुसती अनुपस्थिती नसून महायुतीतील तणावाची मोठी घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाढली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळीही या अस्वस्थतेला खतपाणी घालत आहे. मंगळवारी मतदान तर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार. पण या निवडणुका महायुतीने एकजुटीत लढवण्याऐवजी तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मैदान गाजवण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे अनेक शहरांमध्ये आणि नगरांमध्ये महायुतीचेच उमेदवार थेट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कार्यकर्त्यांना पळवून नेणे, गटबाजी, बदनामी, पोस्टरयुद्ध अशा प्रकारांनी स्थानिक राजकारण तापले आहे. राज्याची तिजोरी कोणाच्या हातात? खरी ताकद कोणाची? वर्चस्व कुणाचे? या प्रश्नांवरून नेते खुलेआम शब्दयुद्ध करताना दिसतात. सत्ताधाऱ्यांपैकीच प्रत्येकजण स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी एकमेकांना अडचणीत आणताना दिसत आहे. महायुतीत एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर डोळा अलीकडेच भाजप आणि शिंदे गटातील कडवटपणा सर्वात टोकाला गेला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. हा शिंदे गटासाठी मोठा आघात ठरला. यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने मुंबईतील मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही. त्यानंतर शिवसेना खासदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, आपल्या लोकांना फोडले जात असल्याची तक्रार जोरदार मांडली. फडणवीसांनीही कमी न पडता, फोडाफोडीत पहिले तुम्हीच पुढाकार घेतला होता, अशी टोलेबाजी केली. हे सर्व घडत असताना महायुतीतून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर डोळा ठेवू नये, असा तात्पुरता तह करण्यात आला. मात्र राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे की हा तह जास्त काळ टिकणे अवघड आहे. महायुतीत समन्वयाची पूर्णपणे कमतरता असल्याचे स्पष्ट याच दरम्यान अजित पवार गटही स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारी निर्णय, निधी वाटप, पक्ष संघटन या मुद्द्यांवर त्यांची नाराजी असल्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या चर्चांना अनुपस्थिती दाखवणे हेही त्याचाच भाग असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे महायुतीत समन्वयाची पूर्णपणे कमतरता असल्याचे स्पष्ट दिसते. प्रत्येक पक्ष स्वतःचा अजेंडा पुढे रेटताना दिसत आहे.
पुणे : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समिती होलसेल भाजी बाजारपेठेत रताळ्यांची शनिवारी (दि. २९) विक्रमी आवक झाली. तब्बल ६५ हजार पिशव्यांची आवक झाल्याने दर ५०० ते ८०० रुपयांनी उतरला आहे. हा दर प्रति क्विंटल ७,००ते १,००० रुपयांवर पोहोचला आहे. ढगाळ वातावरणामुळे शेतक-यांनी भात मळणी लांबणीवर टाकली असून, ते रताळी काढणीत मग्न आहेत. त्यामुळे रताळ्याची आवक […] The post रताळी झाली स्वस्त! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रंग चांगलाच चढलेला असताना, महायुतीतीलच मित्र पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. नुकतंच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख रामदास आठवले यांनी केलेल्या विधानानंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीत आरपीआयला जागा मिळवण्यासाठी अक्षरशः भीक मागावी लागते, अशी खंत व्यक्त केली. इतर पक्ष निवडणुका आल्या की सर्व जागा लढण्याचा निर्धार करतात. पण आमच्या पक्षाची परिस्थिती वेगळी आहे. आम्हाला जागांसाठी विनंती, विनवण्या कराव्या लागतात. आम्हीही या देशाच्या राजकारणात आहोत, आम्हालाही लढायचंय, पण आमच्या पक्षाला मिळणाऱ्या जागांची अवस्था दयनीय आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या भाषणाने एकच खळबळ उडाली असून आरपीआय आता स्वबळावर उतरणार का? असा प्रश्न सामन्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जात आहे. युती टिकवण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांनी विरोधी पथकांसारख्या विधानांचा सूर लावला. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपसोबत युती व्हावी असा त्यांचा स्पष्ट प्रयत्न आहे. त्यांनी युतीसाठी 8 ते 9 जागांचा दावा केल्याचेही यावेळी नमूद केले. मात्र, जर भाजपने त्यांची मागणी मान्य केली नाही तर शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासोबतही हात मिळवण्यास ते मागे-पुढे पाहणार नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते उघडपणे पर्याय शोधू लागले आहेत, हेच त्यांच्या विधानातून समोर आले. राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रचाराची मुदत आता केवळ काही तासांवर आली आहे. संपूर्ण राज्यात 280 ठिकाणी निवडणुका होत आहेत. त्यापैकी 256 ठिकाणी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे कमळ चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मात्र, उर्वरित ठिकाणी महायुतीतील घटकच परस्परांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. त्यामुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता रामदास आठवले यांची नाराजी बाहेर आली आहे. गेल्या काही वर्षात महायुती टिकवण्यासाठी त्यांनी सातत्याने साथ दिली असतानाही त्यांच्या पक्षाला मिळणाऱ्या जागांचे गणित हितकारक नसल्याची नाराजी त्यांनी उघडपणे व्यक्त केली. भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरनांचा संदेश आरपीआयला महायुतीत नैसर्गिक स्थान असले तरी अनेक वेळा तडजोड करावी लागते, ही त्यांच्या भाषणातून दिसणारी वेदना आहे. जेव्हा मतांची गरज असते, तेव्हा आमचे महत्त्व आठवते. पण जागा देताना आम्हाला महत्त्व दिले जात नाही. ही परिस्थिति बदलायला हवी, असे आठवले म्हणाले. त्यांचा सूर केवळ निवडणुकीपुरता नव्हता, तर भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांना संदेश देणारा होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर निर्माण झाला आहे, पण महायुतीत मात्र दबावाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक वर्षे सत्ता वापरात सहभागी असलेल्या पक्षाला अवलंबून राहणारा पक्ष, अशी प्रतिमा नकोय, हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे.

28 C