SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

33    C
... ...View News by News Source

नागपुरात लक्ष्मीपूजनाला फटाक्यांमुळे 7 ठिकाणी आग:रिलायन्स मॉलसह कोट्यवधींचे नुकसान, 3 तासांनी विझविली आग

नागपुरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अग्नि तांडव झाल्याचा अनुभव आला. फटाक्यांमुळे शहरात सात ठिकाणी आगी लागल्या. यात लक्ष्मी नगर स्थित रिलायन्स माॅल भस्मसात झाला. माॅलमधील वाण सामानासह इतरही सामान जळुन खाक झाल्याने कोट्यवधीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. स्थानिक रहिवासी फटाके फोडत असताना एक फटाका माॅलच्या आतमध्ये जाऊन पडल्याने आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त हा माॅल सायंकाळी लवकर बंद करण्यात आला. शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आग लागल्याचे एकूण 17 काॅल आले. त्यातील 7 आगी फटाक्यांमुळे लागल्याची माहिती मनपाने दिली आहे. आठ रस्ता चौकातली माॅलला मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास आग लागली. लोक जात येत असताना अचानक इमारतीत आगीने पेट घेतला. काहींनी फायर ब्रिगेडला फोन केला. पण ते येईपर्यंन्त चौथ्या मजल्यापर्यंत आग पोहोचली होती. सगळी इमारत धडधडून पेटलेली होती, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अगोदर खाली दुकानापाशी मोठी आग लागलेली दिसली. काहींनी फायरब्रीगेडला फोन लावला. पण ते येई पर्यंत डोळ्यांसमोर काही सेकंदात उभी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी जातांना बघितली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुरूवातीला दोन मजले पेटले होते. नंतर पाहाता पाहाता चौथा, पाचव्या मजल्यांनी पेट घेतला. इमारतीच्या आतूनही जाळ निघायला लागला होता.या शिवाय शहरात गणेशपेठ परिसरातील बाजार समिती कार्यालय, गणेश पेठ पोलिस ठाण्यासमोर एक कार, ओंकार नगर ते बेसा रोड नाल्या समाेरील एक नर्सरी, जरी पटक्यात कचऱ्याचा ढीग, अयोध्या नगर, राम मंदिर रोड येथील डाॅ. बोनरा यांचे घर, तथागत चौकातील झोपड्यांमध्ये, जरीपटका चौक येथे राॅकेटमुळे एका झाडाला दक्षिणा मूर्ती चौक, महाल येथील एका घरात आग लागल्याची माहिती विविध नागरिकांनी दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने गाड्या पाठवून आगी नियंत्रणात आणल्या.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 12:25 pm

राज ठाकरेंच्या दीपोत्सवाचे श्रेय सरकारने लाटले:मनसेचा संताप; छोटेसे श्रेय दिले असते तर सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता - MNS

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सुरू केलेला दीपोत्सव कार्यक्रम अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. मनसेकडून येथे करण्यात येणारी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासाठी दूरवरून लोक येतात. पण आता महायुतीच्या पर्यटन खात्याने राज ठाकरे किंवा मनसेचा उल्लेख टाळून दीपोत्सवाची जाहिरातबाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी मनसेला अगदी छोटेसे श्रेय दिले असते, तर सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता, असे मनसेने या प्रकरणी म्हटले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की, तुम्ही अजून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील फटाक्यांची आतषबाजी पाहिली नसेल, तर तुम्ही दिवाळीत मुंबईतील उत्कृष्ट जागेला मुकत आहात. मनसेने एका पोस्टद्वारे दीपोत्सवाचे श्रेय लाटणाऱ्या या पोस्टवरून सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे. खाली वाचा मनसेची पोस्ट जशास तशी मनसेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे... दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे... हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील... पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेंव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता... नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली.. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो . . . आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं, असे मनसेने सरकारला खडेबोल सुनावताना म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 12:16 pm

संजय राऊत गँग ऑफ ठग्ज चालवताय, लायकी नसताना शहांवर टीका:ते मेंटल; त्यांच्या ताफ्यात रुग्णवाहिका ठेवा, नवनाथ बन यांचा टोला

संजय राऊत हे रोज सकाळी बेडूक उड्या मारतात. खेकड्यासारखे मराठी माणसांचे पाय ओढण्याचे काम राऊतांकडून केले जाते. ठग कोण आहेत त्यांची गँग कुणाकडे आहे त्यांचे सरदार कोण आहे. खंडणीखोर कोण आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीवेळी ओळखले आहे, तुम्ही गँग ऑफ ठग्ज चालवतात. त्यामुळे मित्रांच्या पाठीत खंजीर खूपसण्याबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, जय शहा यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. खरतर भारतील खेळाडूंनी स्पर्धा जिंकत ही ट्रॉफी जिंकलेली आहे. खेळाचे मैदान असो की युद्धाचे भारतीयांचे मान उंचावते. युद्धावेळी देखील आपण त्यांना घरात घुसून मारले आहे. आताही ही ट्रॉफी त्यांच्याकडून घेऊन येऊ. पाकिस्तान हरल्यामुळे राऊतांना दुख झाले. तुम्ही पाकिस्तानची चिंता करा असा टोला बन यांनी लगावला आहे. मविआचे सरकार लोकशाही विरोधी होते नवनाथ बन म्हणाले की, निधीवाटपावरुन भाजपवर आरोप करण्यापूर्वी पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरश्यात पाहिले पाहिजे. मविआचे सरकार असताना मस्तवाल पणा करत भाजपच्या 12 आमदारांना दीड वर्षांसाठी निलंबित केले त्यांना मानधन ने देत लोकशाहीची हत्या केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपच्या 105 आमदारांना निधी वाटप करण्यात आले नाही. निधीमध्ये असमान वाटपाची परंपरा तुम्हीच सुरू केली हे तुम्ही विसरले का? मविआचे सरकार असताना भाजपच्या आमदारांना निधी द्यायचा नाही आणि आता निधीवाटपावर तुम्ही बोलायचे? तुम्ही लोकशाही विरोधी होतात, महायुतीवर टीका करण्यापूर्वी मविआचे काळे कारनामे एकदा उबाठाने आठवले पाहिजे, असा टोला बन यांनी लगावला आहे. मतदारांनी जागा दाखवली नवनाथ बन म्हणाले की, लाच खोरी आणि कमिशन खोरीची परंपरा ही उद्धव ठाकरे यांच्या गटाची आहे. लोकसभेला 48 पैकी 30 जागा जिंकल्या तेव्हा तुम्ही मतचोरी केली होती का? तुमचा भाऊ सुनील राऊत हा विक्रोळी मधून निवडून आले तेव्हा तुम्ही मतचोरी केली का? तेव्हा मतदारांना तुम्ही विकत घेतले होते का? लोकसभेला मतचोरी झाली असेल तेव्हा तुम्ही चकार शब्द काढला नाही. विधानसभा निवडणूकीत जनतेने देवाभाऊंना निवडून दिले आणि तुमचा पोटशूळ उठला. मतदारांनी देवाभाऊ आणि महायुतीला साथ देत मविआला नाकारले आहे. आगामी निवडणूकीत मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असा इशारा बन यांनी मविआला दिला आहे. संजय राऊत मेंटल नवनाथ बन म्हणाले की, कोणाच्या ताफ्यात रुग्णवाहिका आहे आणि कुणाच्या ताफ्यात नाही यावरुन संजय राऊत यांचे पोट दुखत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, राऊतांच्या ताफ्यातही एक रुग्णवाहिका देऊन ठेवा. कारण त्यांना वारंवार मानसिक झटका येत असतो. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी एक रुग्णवाहिका त्यांच्या ताफ्यात देण्यात यावी अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मी करतो असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 11:39 am

अमरावतीत दिवाळीत आरोप अन् टीकेची लड:याची बायकोच याच्या संघटनेत, बच्चू कडू यांचा नवनीत अन् रवी राणा यांच्यावर घणाघात

नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याएढी नाटकी दाम्पत्य या देशात कुठेही दिसणार नाही. बायको भाजपत आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. राणाची बायकोच त्याच्या संघटनेत राहू शकत नसेल, तर मी काय बोलणार, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेमुळे अमरावतीत भर दिवाळीतच आरोप अन् टीकेची लड फुटली आहे. माजी खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. सध्या बरेच लोक नाटक करत आहेत. बाहेर फिरूरन आमदारांना मारून टाकण्यास सांगत आहेत. अचलपूरच्या माजी आमदाराकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. पण त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. त्यांच्याकडे फक्त इनकमिंग आहे, आऊटगोइंग नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. यावेळी त्यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीवरही निशाणा साधला होता. मजबुरीचे दुसरे नाव ठाकरे बनल्याची टीका त्यांनी केली होती. बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? बच्चू कडू यांनी बुधवारी त्यांच्या या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्हीच गटार गंगेत उभे आहेत. त्यानंतरही तुम्ही राज व उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात. तत्पूर्वी, तुम्ही बायको भाजपमध्ये व नवरा युवा स्वाभिमानमध्ये का? याचे उत्तर द्या. याला कसला स्वाभिमान म्हणायचे? ना मान ना स्वाभिमान. राणा एढे नौटंकी जोडपे देशात कुठेही दिसून येणार नाही. बायको भाजपत व नवरा स्वाभिमानत संघटनेत असे कुठे असते का? याची बायकोही याच्या संघटनेत राहू शकत नाही. याच्यावर एवढी नाचक्की येत असेल तर आम्ही काय बोलावे. फडणवीसांकडून बोलण्याचा कार्यक्रम मिळाला दिवाळीच्या दिवशीही राणांना बच्चू कडूंची आठवणे येते. त्यांना देवधर्म आठवत नाहीत. माझी आठवण येते. हा किती जिव्हाळा आहे. किती प्रेम आहे. मी विधान परिषदेसाठी आंदोलन करत असल्याचा त्यांचा दावा आहे. पण हे माझे नव्हे तर तुमचे धंदे आहेत. सगळ्या पक्षांचे पाठिंबे घेऊन तुम्ही निवडणुका लढता. कधी मशिदीत तर कधी मंदिरात जाता. कधी नमाज पढायचा, तर कधी प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करता. पण मी मरेपर्यंत कुणाच्याही ओंजळीने पाणी पिणार नाही. कुण्या पक्षाचा पाठिंबा घेऊन आम्ही आमदार होणार नाही. आम्ही स्वतःच्या ताकदीवर लढू. ती तुमची लायकी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कार्यक्रम मिळाल्यानंतर तुम्ही दोघे बोलू लागलात, असेही बच्चू कडू यावेळी राणा दाम्पत्यावर निशाणा साधताना म्हणाले. राणा दाम्पत्य अत्यंत लाचार ते पुढे म्हणाले, भाजप व मोदींना शिव्या देणाऱ्या आता भाजपच्या नेत्या झाल्यात. हे राणा दाम्पत्य शेतकरी विरोधी आहे. शेतमजुरांविरोधात आहे. एकेक थैली किराणा दिला म्हणजे दिव्यांगांच्या समस्या संपल्या का? तो आयुष्य कसा काढतो? कसा जगतो? हे पाहणे महत्त्वाचे आहे. एकदा पूर्ण हिशोब करावाच लागेल. आंदोलन झाल्यावर पाहू. मी विधानसभेत किती बोलतो हे त्या मायमाऊलीला माहिती नाही. त्यांना माझ्या भाषणांची कॅसेट पाठवावी लागेल. मी आमदार मंत्री असताना दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेलो होतो. याऊलट हे राणा अत्यंत लाचार दाम्पत्य आहे. त्यांना वरून कार्यक्रम मिळाल्यानंतर बोलावेच लागते, असेही बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 11:29 am

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय:ठाकरे बंधूंशी युती नाही; महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की, काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत जगताप यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा आवाज मांडला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरू शकते, अशी शक्यता अधिक बळावली आहे. भाई जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची असते, नेत्यांची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा असते की, त्यांनी देखील कधीतरी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, त्यांना निर्णय घेऊ द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक आहोत, त्यामुळे आम्ही स्वबळावर लढूया, हीच आमची भूमिका आहे. त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही त्यांनी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच भूमिका स्पष्ट मांडली आहे. राज ठाकरे तर दूरच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, असे वक्तव्य त्यांनी करून काँग्रेसच्या रणनीतीवर नवीन चित्र निर्माण केले आहे. दरम्यान, भाई जगताप यांनी उद्धव ठाकरेंसोबतची परिस्थिती स्पष्ट करताना म्हटले की, महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नव्हती. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा त्यांची शिवसेना होती, पण आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनी घ्यावा. त्यांनी आणखी स्पष्ट केले की, काँग्रेसने आजवर कधीही राज ठाकरेंसोबत जाण्याचा विचार केलेला नाही. उद्धव ठाकरेंसोबत देखील स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे. भाई जगताप यांच्या या विधानाने काँग्रेसच्या भविष्यातील धोरणाबाबत नवी दिशा सुचवली आहे. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद - सचिन सावंत या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनीदेखील पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत आणि त्याबाबत कोणतीही शंका नाही. आमची बैठक चेन्निथला यांच्यासोबत झाली, त्यावेळी आम्ही आमची मते स्पष्टपणे मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घेतले जातात. काँग्रेस हायकमांड सर्व नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेईल, असे सावंत यांनी सांगितले. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, काँग्रेस सध्या कोणत्याही युतीच्या दबावाखाली न येता, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार पुढे जाण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता राज्याच्या राजकीय पटलावर मुंबई महानगरपालिका निवडणूक हा प्रतिष्ठेचा मुद्दा मानला जातो. मुंबईवर सत्ता प्रस्थापित करणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात बळ मिळवणे, असा समज आहे. अशा वेळी भाई जगताप यांचे वक्तव्य काँग्रेसच्या स्वतंत्र लढाईच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते. काँग्रेसने जर स्वबळावर निवडणूक लढवायचा निर्णय कायम ठेवला, तर महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिंदे गट यांच्या जोरदार तयारीमुळे स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 11:15 am

भाजप मित्रांवरच वार करतो:राज्यात प्रोटोकॉलची स्पर्धा सुरू; सत्ताधारी आमदारांना विकासनिधी नाही निवडणूक निधी दिला, संजय राऊतांचा सरकारवर घणाघात

भाजप सर्वात पाहिले आपल्या मित्रांवर वार करतो. व्यक्ती केंद्रीत राजकारण सुरू झाल्याने हे सर्व सुरू झाले आहे. सोलापुरातील सुभाष देशमुख हे फडणवीस यांच्या गटातील नसतील म्हणून त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले जात असेल. राज्याच्या अनेक जिल्ह्यात असेच सुरू आहे, पण हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांचे माजी आमदार फोडले जात असतील तर त्यांच्याशी बोलले पाहिजे. यावर आम्ही का बोलावे. भाजपच्या सुभाष देसाई यांनी सोलापुरातील नेत्याच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. फडणवीस यांची या प्रवेशामागे काय योजना आहे. त्यांना बेडकासारखा आपला पक्ष नेमका किती फुगवायचा आहे, असा सवाल राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो निवडून आल्यावर तो कोणत्या पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचे नसते. गेल्या काही काळापासून देवेंद्र फडणवीस आणि मिंदेंच्या हाती सत्ता आल्यापासून त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना निधी आणि विरोधी पक्षातील आमदारांचे मतदारसंघ कोरडे ठेवले जात आहे. हे कृत्य घटनाबाह्य आहे. बेकादेशीर आणि लोकशाही विरोधातील कारस्थान आहे. तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या असे सांगितले जाते हे गंभीर आहे. राष्ट्रपती यांनी यांची दखल घेतली पाहिजे. इतर कोणत्याही राज्यात असे घडलेले नाही तिथे भाजपची सत्ता असली तरी हे उद्योग केवळ महाराष्ट्रात सुरू आहे. राज्याला राज्यपाल नाही, असले तरी काही फरक पडत नाही कारण ते भाजपचे हस्तक असतात असे म्हणत राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. निधीचे असमान वाटपाचे प्रकरण न्यायालयात सुद्धा गेले होते. अनेक ठिकाणी विरोधी पक्षातील आमदार हे प्रथम निवडून आले आहेत. अनेक जण पहिल्यांदा निवडून आले आहे. पण यांच्याकडे सत्तेची मग्रुरी आहे. विकास निधी नाही तर लाच संजय राऊत म्हणाले की, सत्ताधारी आमदारांना दिलेले 5 कोटी हे विकास कामांसाठी नाही तर लाच म्हणून देण्यात आले आहेत. यातून किती विकासकामे होतील हे माहिती नाही पण कमिशनबाजी नक्की होईल. या सरकारमधील प्रमुखांनी पैशाच्या जीवावर मतदान विकत घेण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत, पैसे द्यायचे आणि लोक विकत घ्यायची असे यांचे सुरू आहे. कंत्राटदाराला पैसे द्यायचे आणि फिरून ते आमदारांना जाणार आहेत. मग ती कॅश मतदार विकत घेण्यासाठी वापरली जाईल गेली काही दिवस हेच सुरू आहे. या विषयावर एकत्रित आवाज उठवला गेला पाहिजे. राज्यात प्रोटोकॉलची स्पर्धा संजय राऊत म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णवाहिकेसाठी 800 कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. त्यांचे पैसे हजम झाले पण रुग्णवाहिका काही रस्त्यावर आल्या नाहीत, या रुग्णवाहिका गेल्या कुठे असा सवाल राऊत यांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयातील यंत्रणा वापरायची आणि गरीबांना ठार मारायचे असा आरोप राऊतांनी शिंदेंच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेच्या वापरानंतर केला आहे. ताफ्यामध्ये रुग्णवाहिका ठेवण्याइतकी यांना काय धाड भरली आहे. प्रोटोकॉल नुसार परराष्ट्राचे प्रमुख आपले राष्ट्रपती, पंतप्रधान, यांच्या ताफ्यात रुग्णवाहिका असतात पण यांच्या ताफ्यात असण्याची काय गरज. केवळ प्रोटोकॉलची स्पर्धा राज्यात सुरू झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 11:09 am

भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे संघर्ष टोकाला:फडणवीस यांच्या विरोधात मूळ भाजपवासियांच्या मनात असंतोषाचा वणवा - सुषमा अंधारे

सत्ताधारी भाजपमध्ये जुने विरुद्ध नवे संघर्ष टोकाला पोहोचला आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असूरी सत्ताकांक्षेच्या विरोधातला मूळ भाजपवासियांच्या असंतोष हळूहळू वणव्याचे रूप घेत आहे, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. भाजपने सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांना आपल्या गळाला लावला आहे. यात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचाही समावेश आहे. पण त्यांच्या पक्षप्रवेशावरून दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपचे विद्यमान आमदार तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी कडाडून विरोध केला आहे. या विरोधात त्यांनी मंगळवारी सोलापुरात आंदोलनही केले. शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भाजपतच हे आंदोलन झाल्यामुळे त्याची राज्यभर चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपरोक्त दावा केला आहे. मुंग्या वारूळ बांधतात अन् मग त्यात विषारी नाग येऊन राहतात सुषमा अंधारे म्हणाल्या की, वारूळ मुंग्या बांधतात पण एकदा का वारूळ पूर्ण झालं की; त्यात राहायला मात्र विषारी नाग येतात...! भाजपच्या सत्तेचे वारूळ RSS आणि भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी मोठ्या निगुती ने बांधलं. मात्र वारूळ पूर्ण होताच मूळ भाजपाइना बाजूला करत या सत्तेच्या वारुळात सगळे भ्रष्टाचारी, गुन्हेगार, बलात्कारी, इडीग्रस्त यांनी घुसायला सुरुवात केली. त्यामुळे जुने विरुद्ध नवे हा संघर्ष शिगेला पोचला आहे. सोलापूर मधलं आंदोलन ही फक्त सुरुवात आहे...! फडणवीसांच्या असूरी सत्ताकांक्षेच्या विरोधातला मूळ भाजपवासियांचा असंतोष हळहळू वणव्याचं रूप घेत आहे, असे अंधारे यांनी म्हटले आहे. पक्षाने विचार करूनच निर्णय घेतला दुसरीकडे, दिलीप माने यांच्या पक्ष प्रवेशावर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पण काही पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समवेत चर्चा होऊनच असे निर्णय होत असतात. असे मोठे प्रवेश होतात त्यावेळी पक्षाने काहीतरी हिताचा विचार केला असेल. भाजप प्रदेशाध्यक्ष या प्रकरणी आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतली. स्वतः आमदार सुभाष देशमुखही या प्रक्रियेत सहभागी आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही, असे मत भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी यासंबंधी व्यक्त केली आहे. आमदार सुभाष देशमुख काय म्हणाले? उल्लेखनीय बाब म्हणजे आमदार सुभाष देशमुख यांनीही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले जात आहे. पण या सर्व प्रक्रिया होताना सर्वांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पक्षात नव्याने येणाऱ्या लोकांनी किमान 3-4 वर्षे तरी पक्षासाठी काम केले पाहिजे. कारण, हे सर्वजण जिल्हा परिषद व पंचायत समितीवर नजर ठेवून पक्षात येत आहेत. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आल्या तर त्यात एक मोठा गट तयार होईल. हे सर्वजण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होऊ देतील किंवा नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांत बसून नंतर हे सर्वजण निघून गेले तर आपण काय करणार? 6 आमदार आमच्याकडे येत असतील आणि उद्या काही गडबड झाली तर आम्हाला धोका आहे. तालुक्यातील नेते व कार्यकर्ते माझ्याशी भांडत आहेत. पण मी त्यांना हा पक्षाचा निर्णय असल्याचे सांगितले आहे. कदाचित आपली जिल्ह्यात काही किंमत नसेल, कुणी मला ओळखत नसेल, डिस्कार्ड झालेली माणसे असतात तसा मी असेल. आत्ता मी या प्रकरणी मध्यस्थी करू शकत नाही. मी कार्यकर्त्यांच्या बाबतीत हतबल झालो आहे, असेही देशमुख यावेळी म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 10:52 am

जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 1.96 लाखांचा मुद्देमाल जप्त:9 म्हैसवर्गीय प्राण्यांचा समावेश, एकाविरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वसमत शहरातील मोंढा भागात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 1.96 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये नऊ म्हैसवर्गीय प्राण्यांचा समावेश आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 21 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील एक टाटाएस वाहनातून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार नितीन रामदिनवार, काशीनाथ भोपे, मात्रे, शेख समी यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी पासूनच वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी वसमत तेथील मोंढा भागातील कमानीजवळ एक वाहन उभे होते. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन वाहन चालका शेख मुजीब याची चौकशी केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी केली. यामध्ये वाहनामध्ये म्हैसवर्गीय नऊ जनावरे वाहनात निर्दयतेने कोंबलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी नऊ जनावरे व वाहन असा 1.96 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार रामदिनवार यांच्या तक्रारीवरून शेख मुबीज (रा. गडी मोहल्ला, वसमत) याच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार मात्रे पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणात जप्त केलेली जनावरे कोणाच्या मालकीची होती, जनावरे कोठे नेली जात होती याची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे. दरम्यान ऐन दिवाळीमध्ये पोलीस यंत्रणा बंदोबस्तावर व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन जनावरांच्या वाहतुकीचा प्रयत्न केला जात असल्याचे यावरून स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र वस्तू पोलिसांनी सतर्कता दाखवत जनावरे सोडून घेतली आहेत सदर जनावरांचे दाखले सादर करण्याबाबत सूचना देण्यात आले आहे

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 10:34 am

शिवाजी महाराजांनी मुस्लीम समाजाचा विरोध केला नाही, मग हे कोण?:शनिवारवाडा प्रकरणावरून इम्तियाज जलील यांची टीका

ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याच्या घटनेवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून एआयएमआयएम पक्षाचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीव्र टीका केली आहे. मुस्लीम महिलांनी नमाज वेळ झाल्याने प्रार्थना केली, यात काय गुन्हा झाला? त्यांनी शनिवारवाड्यावर आपला दावा केला नाही. मात्र, मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांच्या जमीन घोटाळ्याचे लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण उकरण्यात आले आहे, असा गंभीर आरोप जलील यांनी केला. या संदर्भात जलील म्हणाले की, शनिवारवाड्यात आमच्या बहिणींनी नमाज पडली म्हणून एवढं मोठं वादंग निर्माण केलं जात आहे. नमाज ही श्रद्धेची गोष्ट आहे, राजकारणाची नाही. नमाज वेळ झाली म्हणून त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी कोणत्याही दगडाला रंग मारून तो आमचा आहे असं म्हटलं नाही. शिवाजी महाराजांनी कधी मुस्लीम समाजाचा विरोध केला नाही. मग हे कोण चिंधीचोर आहेत जे आता हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात भेदभावाचं विष पेरत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे आरोप केला की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पॉलिसीच आहे की, जेव्हा स्वतःवर संकट येतं तेव्हा मुद्दा दुसरीकडे वळवायचा. भाजपच्या दबावाखाली पोलिसांनी निरपराध महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. चिंकू-पिंकू हिंदुत्ववादी झालेत, असे म्हणत जलील यांनी भाजपच्या नेत्यांना टोलाही लगावला. नमाज पडली म्हणजे वाडा ताब्यात घेतला असा हास्यास्पद दावा करणारे लोक हे समाजात विष पसरवत आहेत. मस्तानीने सुद्धा कधी तिथे नमाज पडली असेल, तेव्हा कुणी वाद घातला नव्हता. पण आज हेतुपुरस्सर धार्मिक द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू आहे. मुस्लीम समाजाला चिथावणी देऊन राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही या राजकारणाला बळी पडणार नाही, असे जलील म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, मुस्लीम समाजाने हे समजून घ्यायला हवे. आमच्या बहिणींनी अजान ऐकली आणि नमाज अदा केली, यात काही चूक नाही. तुम्ही सभा घेता, शिव्या देता, मग आमचीही सभा होऊ द्या. आम्हीही बोलू, आमची जीभही चालेल, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आलो आहोत का? दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत इम्तियाज जलील यांनी मोठा दावा केला. बिहार निवडणुकीत एमआयएम सर्वांना आश्चर्याचा धक्का देईल, असं ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत आम्ही सहा जागांची मागणी केली होती. भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र यावे, असे आम्ही म्हटले होते. पण तेजस्वी यादव म्हणाले की एमआयएमने लढू नये. आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आलो आहोत का? या वेळी आम्ही बिहारमध्ये उतरणार आहोत आणि एमआयएमची ताकद दाखवून देऊ, असा दावा त्यांनी केला. त्यांनी काँग्रेस आणि आरजेडीवरही टीका करत म्हटलं की, भाजप, काँग्रेस आणि आरजेडी हे सगळे आमच्यासाठी सारखेच आहेत. जनता पाहील की खरे विरोधक कोण आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. माझा मुलगा कधीही निवडणुकीत उतरणार नाही मुंबई वगळता राज्यातील एमआयएम पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडल्याचेही जलील यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केलं की, आम्ही आगामी सर्व निवडणुका लढवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला असून स्थानिक स्तरावर युतीबाबतचा निर्णय तेथील पदाधिकारी घेतील. आम्ही उमेदवारांसाठी कडक नियम तयार करत आहोत. जर कुठे दारुण पराभव झाला, तर जबाबदार नेत्याला घरचा रस्ता दाखवला जाईल. वैयक्तिक भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं, माझा मुलगा कधीही नगरसेवक, आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुकीत उतरणार नाही. हे घाणेरडं राजकारण आहे आणि मी माझ्या मुलाला यात ढकलणार नाही. काही पित्यांना वाटत असेल की त्यांचा मुलगा या दलदलीत जावा, तर तो त्यांचा निर्णय आहे, पण माझा नाही.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 10:32 am

अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा; बाधित क्षेत्राची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढवली:648 कोटींच्या निधी वितरणाला मान्यता– मदत-पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून 648 कोटी 15 लाख 41 हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे 8139 कोटी रुपये इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री जाधव पाटील यांनी यावेळी दिली. अतिरिक्त एक हेक्टरसाठी वाढीव मदत मंत्री पाटील म्हणाले की, राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सहा लाख 56 हजार 310.83 हेक्टर क्षेत्रातील बाधित पिकांच्या नुकसानीपोटी सहा लाख 12 हजार 177 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यापूर्वी या शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत मंजूर करण्यात आली होती, तर आता अतिरिक्त एक हेक्टरसाठी ही वाढीव मदत देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा आधार दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी व्यक्त केला. 6.12 लाख शेतकऱ्यांना लाभ छत्रपती संभाजीनगर विभाग- बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील तीन लाख 58 हजार 612 शेतकऱ्यांच्या तीन लाख 88 हजार 101.13 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपये. नागपूर विभाग- नागपूर, चंद्रपूर , वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तीन हजार 931 शेतकऱ्यांच्या सात हजार 698.25 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी सात कोटी 51 लाख 75 हजार रुपये. नाशिक विभाग – नाशिक, जळगाव आणि अहिल्या नगर जिल्ह्यातील 53 हजार 865 शेतकऱ्यांच्या 50 हजार 629 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 59 कोटी 36 लाख 13 हजार रुपये. अमरावती विभाग – अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील एक लाख 7 हजार 615 शेतकऱ्यांच्या एक लाख 39 हजार 438.23 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 131 कोटी 56 लाख 47 हजार रुपये. पुणे विभाग – सोलापूर व सांगली जिल्ह्यातील 88 हजार 143 शेतकऱ्यांच्या 70 हजार 418.89 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी 103 कोटी 37 लाख 20 हजार रुपये. कोकण विभाग – ठाणे व पालघर जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांच्या 25.33 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानीपोटी दोन लाख 16 हजार रुपये.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 10:25 am

डबल इंजिनचे सरकार शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर धनदांडग्यांसाठी नेहमीच तत्पर:नाना पटोले यांची देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका

महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाची तीव्रता वाढत असताना राज्य सरकारने अद्याप अधिकृतरीत्या ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर आणि केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. डबल इंजिनचं सरकार हे शेतकऱ्यांचं, बेरोजगारांचं आणि गरिबांचं फेल सरकार आहे, पण धनदांडग्यांसाठी मात्र हे सरकार नेहमीच तत्पर असतं, असा आरोप पटोले यांनी केला. त्यांनी राज्य सरकारवर महाराष्ट्राची अवदसा निर्माण केली, असा आरोप केला. नाना पटोले म्हणाले की, आज राज्यात पिकं वाळून चालली आहेत, शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत, पण सरकार नियमांच्या नावाखाली त्यांना मदत देण्यास टाळाटाळ करत आहे. विरोधी पक्षात असताना याच देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र, आज सत्तेत येऊन तेच फडणवीस नियम सांगत बसले आहेत. राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे, पण हे सरकार ती पाळत नाही. पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरवले. केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचं सरकार असूनही मदत का मिळत नाही? शेतकरी, मजूर, बेरोजगार, आणि सामान्य लोकांसाठी हे सरकार नेहमी फेल ठरतं, पण धनदांडग्यांसाठी मात्र हे सरकार धावतं. मग हे सरकार नक्की कुणाचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेत्यांनी या पार्श्वभूमीवर सरकारच्या कारभारातील भ्रष्टाचार, निवडणूक प्रक्रिया आणि पैशाच्या राजकारणावरही निशाणा साधला. महाराष्ट्रात त्रिकूट सरकार चाललं आहे आणि यात लूटपाट सुरू आहे. कुणाच्या हातात किती भेटते, कोण किती लुटतं, हेच या सरकारचं काम झालं आहे. गेल्या साडेचार वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याची तंबी दिली म्हणून आता त्या निवडणुका घेण्याची तयारी दिसतेय, असा दावाही त्यांनी केला. जनतेचं देणंघेणं या सरकारला नाही. पैशाने मतं विकत घेणं, खोट्या आश्वासनांनी मतदारांना फसवणं, हीच या सरकारची पद्धत झाली आहे, असा आरोप पटोले यांनी केला. त्यांनी जनतेला साद घालत म्हटले की, या सरकारचे वस्त्रहरण आता महाराष्ट्राच्या जनतेने करायला हवं. ज्यांच्याकडे पैशाचा माज आहे, त्यांना मतांनी उत्तर देण्याची वेळ आली आहे. क्रिकेट आता खेळ नाही, तर राजकारणाचं नवं रणांगण नाना पटोले यांनी माझगाव क्रिकेट क्लब प्रकरणावरही भाष्य करत सरकारवर सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला. माझगाव क्रिकेट क्लबने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) चे सर्व नियम पाळले आहेत. आमचं नाव नियमानुसार आहे, त्यामुळे ते कटू शकत नाही. परंतु सत्तेतील लोकांनी क्रिकेटलाही राजकीय केलं आहे. सत्तेचा दंडा वापरून आमचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही कोर्टात जाऊ. न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल, याचा आम्हाला विश्वास आहे, असे पटोले म्हणाले. त्यांनी पुढे म्हटलं की, क्रिकेट आता खेळ राहिला नाही, तर सत्तेच्या राजकारणाचं नवं रणांगण झालं आहे. पण आम्ही घाबरणारे नाही. सरकारनं काहीही दडपशाही केली तरी आम्ही त्याला सामोरं जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला. फडणवीस सरकारवर तीव्र नाराजी या सर्व विधानांमधून नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली असताना राज्य सरकारकडून मदत न मिळाल्याने जनतेत नाराजी वाढत आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष आता या विषयावर सरकारला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, भाजपकडून मात्र या आरोपांना राजकीय नौटंकी म्हटले जात आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता, सरकारविरोधी भावना वाढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 10:17 am

दिवाळीच्या रात्री अकोल्यात भीषण अपघात:कार थांबवून खाली उतरलेल्या पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

दिवाळीच्या रात्री अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर एका भीषण अपघाताची दुःखद घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ते पैलपाडा गावादरम्यान एका अज्ञात वाहनाने चारचाकी वाहनाच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन जणांना चिरडले. या अपघातात पती-पत्नीसह तीन जण जागीच ठार झाले असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे बोरगाव मंजू गावावर दिवाळीच्या दिवशी शोककळा पसरली आहे. बोरगाव मंजू येथील धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे दांपत्य खेर्डी येथील आपला व्यवसाय आटोपून एका प्रवासी कारने बोरगावमंजूकडे घरी निघाले होते. मात्र, रस्त्यात त्यांची कार बिघडल्यामुळे एका मालवाहू वाहनाद्वारे गाडी टो करून नेत होते. यावेळी हे चौघेही कारच्या खाली उतरलेले होते. अमरावतीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने खाली उतरलेल्या या चारही जणांना जोरदार धडक दिली. तिघांचा जागीच मृत्यू या भीषण धडकेत दोन पुरुष आणि एका महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये धीरज सिरसाट, अश्विनी सिरसाट (पती-पत्नी) आणि आरिफ खान (चालक) यांचा समावेश आहे. हे तिघेही बोरगावमंजूचे रहिवासी होते. कारचा वाहक मात्र गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अकोला पोलीस धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात झालेल्या या अपघातामुळे बोरगावमंजू आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लोणीकंदमध्ये कंटेनर-ट्रॅक्टर अपघातात दुचाकीस्वार ठार दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. फुलगाव ते आळंदी रस्त्यावर भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडले आणि त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर आणि ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव राजेंद्र चंद्रकांत चव्हाण (वय 53, रा. चव्हाणनगर, देहूगाव, ता. हवेली) असे आहे. त्यांचे भाऊ संजय चव्हाण (वय 51) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 10:11 am

मुंबईत मोठ्या घातपाताच्या कटाची शक्यता:बनावट शास्त्रज्ञच्या ताब्यातून संवेदनशील अणुबॉम्बचे नकाशे जप्त; राष्ट्रीय सुरक्षेला धोका

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शाखेने राष्ट्रीय तपास संस्था आणि गुप्तचर विभाग यांच्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. प्राथमिक तपासात या व्यक्तीने स्वतःला BARC मधील वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ असल्याचे भासवून विविध ठिकाणी दिशाभूल करणारी कागदपत्रे आणि बनावट ओळखपत्रांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, तपास यंत्रणांना त्याच्या निवासस्थानातून अणुबॉम्ब डिझाइनशी संबंधित 14 अत्यंत संवेदनशील नकाशे आणि अनेक गुप्त कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेनंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर प्रचंड खळबळ माजली असून, अख्तर हुसेनचा उद्देश नेमका काय होता, हे उलगडण्यासाठी केंद्र आणि राज्य यंत्रणा उच्चस्तरीय तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेला काही काळापासून एका संशयास्पद व्यक्तीच्या हालचालींबाबत माहिती मिळत होती, जो स्वतःला BARC मधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत होता. त्याच्या हालचालींवर नजर ठेवून कारवाई करताना पोलिसांनी अख्तर हुसेनला अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर चौकशीतून मिळालेल्या माहितीने तपास यंत्रणेला धक्काच बसला. घरातून सापडलेल्या कागदपत्रांमध्ये अणुबॉम्ब तयार करण्याच्या आराखड्याशी साधर्म्य असलेले नकाशे, तांत्रिक टिपा आणि इतर दस्तऐवज होते. प्राथमिक तपासात हे नकाशे देशांतर्गत तयार केलेले नाहीत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा धागा परदेशी गुप्तचर नेटवर्कशी जोडला गेला असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. अख्तर हुसेनकडे हे नकाशे कसे आले, त्यामागे कोणाचा हात आहे आणि या माध्यमातून घातपाताचा कट तर रचला नव्हता ना, याची चौकशी सध्या केंद्रस्थानी आहे. संगणक, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA आणि गुप्तचर विभाग म्हणजेच IB यांनी आपल्या हाती घेतला असून, अनेक दिशांनी चौकशी सुरू आहे. अख्तर हुसेनने मागील काही वर्षांपासून भाभा अणु संशोधन केंद्राच्या नावाचा वापर करून अनेकांना फसवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्याच्या सोशल मीडियावरील काही संपर्कांचा तपास घेतला असता काही परदेशी नागरिकांशी त्याचे संवाद असल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर पैलू दडलेले असावेत, अशी शंका वर्तवली जात आहे. तपास यंत्रणांनी अख्तर हुसेनकडून मिळालेल्या संगणक, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू केली असून, या उपकरणांतून अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाशी संबंधित आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यात येईल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. देशद्रोहाच्या तरतुदींनुसार कठोर शिक्षा होऊ शकते दरम्यान, या घटनेनंतर भाभा अणु संशोधन केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांमध्येही हालचाल सुरू झाली आहे. देशातील सर्व अणु संशोधन केंद्रे आणि संवेदनशील प्रयोगशाळांमध्ये सुरक्षेची पातळी वाढवण्यात आली आहे. भारताच्या अणु कार्यक्रमाच्या सुरक्षिततेबाबत देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच सजगता बाळगली जाते. भाभा अणु संशोधन केंद्र हे भारताच्या अणु ऊर्जा आणि संशोधन क्षेत्राचे केंद्रबिंदू मानले जाते. मुंबईतील ट्रॉम्बे येथे असलेले हे केंद्र अणुशक्ती निर्मिती, अणु भौतिकशास्त्र, रेडिओआयसोटोप्स उत्पादन, वैद्यकीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात उपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कामात अग्रस्थानी आहे. त्यामुळे या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून बनावट ओळख निर्माण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला देशद्रोहाच्या तरतुदींनुसार कठोर शिक्षा होऊ शकते. भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर भाभा अणु संशोधन केंद्राचा इतिहासही या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आला आहे. प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी 1954 मध्ये अॅटॉमिक एनर्जी इस्टॅब्लिशमेंट, ट्रॉम्बे या नावाने या संस्थेची स्थापना केली. भारताच्या अणु संशोधनाला स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या निधनानंतर 1967 मध्ये या संस्थेचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र करण्यात आले. आज या संस्थेमुळे भारत अणुऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनला आहे. अशा संस्थेच्या नावाशी जोडलेला हा बनावटपणा केवळ गुन्हा नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला धक्का देणारा गंभीर कट असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात असून, पुढील काही दिवसांत देश हादरवणारी नवी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 10:04 am

फडणवीस माझे राजकीय वडील आहेत; महायुतीबाहेर जाणे शक्य नाही:आमदार गुट्टे यांची राजकीय भूमिका स्पष्ट, गुट्टे-जानकर संबंधात तणाव?

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना मोठे विधान केले आहे. रासपचे नेते महादेव जानकर यांच्याबद्दल आदर व्यक्त करत, त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच आपले 'राजकीय पिता' मानत, महा युतीसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आमदार गुट्टे म्हणाले की, महादेव जानकर हे माझे नेते आहेत, पण जर ते समजा युतीसोबत नाही आले तर मी निश्चित युतीसोबत राहीन. मी हे अनेकदा म्हणतो की माझ्या आई-वडिलांनी जन्म दिला असला तरी, राजकारणात जन्म देणारे देवेंद्र फडणवीस हे माझे बाप आहेत. त्यामुळे, फडणवीस जो काही निर्णय देतील, तो मान्य करावा लागेल आणि तो मी मान्य करेन, असे एका मराठी वृत्तवाहिनिशी बोलताना त्यांनी म्हटले आहे. 'विकास' हेच ध्येय, युती बाहेर जाता येणार नाही विकासाचे राजकारण करायचे असल्याने युतीच्या विरोधात जाता येणार नाही, असे गुट्टे यांनी नमूद केले. मला सत्तेच्या विरोधात जाता येणार नाही. मला विकासाचे राजकारण करायचे आहे. मला जनतेसाठी राजकारण करायचे आहे. मला युतीच्या बाहेर जाता येणार नाही. मला युतीत राहावे लागेल. कारण मला जनतेने निवडून दिले आहे. मी जनतेला काहीतरी घेणे देणे लागतो. मला त्यांचा विकास करायचा आहे, असे ते म्हणाले. रासपसोबत एकत्र लढण्याची तयारी आगामी निवडणुकांबद्दल बोलताना आमदार गुट्टे म्हणाले की, रासप जर युतीसोबत आले, तर एकत्र लढू. त्यांनी जर मला एबी फॉर्म दिला तर मी लढेन. जर तो नाही दिला तर लढणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. धनंजय मुंडेंसोबतच्या कथित बैठकीबद्दलच खुलासा दरम्यान, आपली आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाली आणि त्यात आपण जागा सोडत असल्याची अफवा पसरली होती, यावर गुट्टे यांनी स्पष्टीकरण दिले. अशीच अफवा 2014 मध्ये उठवून धनंजय मुंडे निवडून आले होते. मला या अफवेचे खंडन करायचे होते. कारण ते सत्तेत असले तरी विधानसभेला माझ्या विरोधात होते, असे त्यांनी सांगितले. मी आघाडीकडून लढणार' या आपल्या पूर्वीच्या व्हिडिओ मधील विधानाचा अर्थ असा आहे की, जे आघाडीकडून (महायुतीकडून) येतील त्यांना सोबत घेणार. जे आघाडीसोबत येणार नाही त्यांच्या विना लढणार, असा खुलासा त्यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 9:53 am

टेंभुर्णी ठाण्याकडून पारधी बांधवांना गृहपयोगी वस्तूंसह दिवाळी फराळ

पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या ‘पहाट’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचवण्याचे कार्य सुरू आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने बेंबळे येथील बिरसा मुंडा वसाहतीतील पारधी समाजातील बांधवांची दिवाळी गोड करण्यात आली. या उपक्रमांतर्गत पारधी समाजातील कुटुंबांना गृह उपयोगी साहित्य आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमास पोलिस उपनिरीक्षक चौधरी, आदिवासी विकास प्रकल्पाचे अधिकारी विशाल सरतापे, बीट अंमलदार बिरुदेव हजारे, पोलिस पाटील बिभीषण कीर्ते, पारधी समाज जिल्हाध्यक्ष बापूराव काळे, तसेच महिला आघाडीच्या अध्यक्षा सविता भोसले यांची उपस्थिती लाभली. पहाट उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांशी आत्मीयतेचे बंध मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस दलाच्या या सामाजिक उपक्रमामुळे पारधी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दिवाळी सणाचा खरा आनंद चेहऱ्यावर दिसून आला.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:57 am

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वामी समर्थ सेवा केंद्राचा पुढाकार, तालुक्यात किट वाटप

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र यांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा एक हात या उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील विविध पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तू व औषधांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरचे महाव्यवस्थापक चंद्रकांत मोरे यांनी स्वतः ग्रामीण भागांना भेट देत पूरग्रस्तांना स्वामींच्या प्रसादरूपी शिधा किटचे वाटप केले. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी धीर दिला. तसेच पूरग्रस्तांशी हितगुज साधून त्यांना आधार देत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या आध्यात्मिक सेवा, बालसंस्कार, विवाह संस्कार, कृषी सल्ला, तसेच असाध्य व्याधींवरील सोपे उपचार याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वर्तमानपत्र व टीव्हीवरील विदारक दृश्ये पाहून मन व्यथित झालेल्या विसापुरे दांपत्याने स्वतः पूरग्रस्त भागाला भेट देत तेथील विद्यार्थी व पालकांची विचारपूस केली. दिवाळीचा खरा अर्थ केवळ दिव्यांचा उजेड नसून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करण्याचे आहे, असे शब्द यावेळी विसापुरे यांनी काढले. त्यांच्याकडून पूरग्रस्त कुटुंबांना शैक्षणिक साहित्य, चादरी, रग, पुरुषांसाठी नवीन कपडे, स्त्रियांसाठी साड्या आणि मुला-मुलींसाठी नवीन कपडे भेट दिले. मंगळवार दि. १४ रोजी झालेल्या या वाटप कार्यक्रमात चंद्रकांत मोरे, सतीश मोटे, करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, खरेदी-विक्री केंद्राचे चेअरमन शंभुराजे जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड या किटचे वितरण केले. या सेवा कार्यात करमाळा शहरातील गणेशनगर, श्री खोलेश्वर महादेव मंदिर, रंभापुरा, तेली गल्ली येथील सेवा केंद्रांचे सेवेकरी तसेच करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, वांगी नं.२, वीट, केतुर नं.२, खडकी, रायगाव, पांडे जेऊर, पांगरे व तालुक्यांबाहेरील टेंभुर्णी, वेळापूर, माळशिरस, करकंब येथील सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:57 am

दिवाळीचा पहिला दिवा शंभूराजेंच्या चरणी अर्पण:योद्धा ग्रुपचा उपक्रम, प्रा. विशाल गरड यांचे मार्गदर्शन‎

बार्शी तालुक्यातील तडवळे येथील योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने सात वर्षांपासून दिवाळीचा पहिला दिवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पण केला जातो. यानिमित्त तडवळ्याचे ग्रामदैवत भगवती देवी मंदिरात पणत्यांची आरास मांडून नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली. रोषणाईसारखाच विचारांचा प्रकाश चमकावा, यासाठी दरवर्षी प्रा. विशाल गरड यांचे व्याख्यान ठेवले जाते. यावेळी त्यांनी लहान थोरांसह तरुणांना विशेष मार्गदर्शन केले. इतिहास व भविष्याचा वेध यांची सांगड घालून वर्तमान सुदृढ करू, असे आवाहन केले. या व्याख्यानासोबत पूरग्रस्त ४० बाधित कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी भगवती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राम पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. सरपंच रामकृष्ण लोखंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आवारे, सुरेश लोखंडे, बाळासाहेब शेंडगे आदी उपस्थित होते. सूर्या चेन इंडस्ट्रीजचे प्रमुख अतुल लोखंडे यांच्या वतीने तडवळे गावात पूरग्रस्तांना किराणा साहित्य देण्यात आले. छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्याचे पूजन शिवव्याख्याते विशाल गरड यांच्या हस्ते झाले. त्यांनी सांगितले की, महापुरुषांच्या नुसत्या मिरवणुका काढून चालणार नाहीत तर त्यांचे विचार व कार्याचे आचरण केले पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:56 am

अशीही दिवाळी:पुराने उद्ध्वस्त संसाराला पुन्हा उभारी, संकटांवर मात करत दिवाळी साजरी, जनाबाई देशमुख फराळ बनवण्यात व्यस्त

पुराने सगळे उद्ध्वस्त केल्यानंतर जनजीवन सुरळीत होत आहे. लाइट नाही, शुद्ध पाणी मिळेना, सगळीकडे वाहून गेलेली शेती, पाला पाचोळा, दुर्गंधी, जनावरांना चारा नाही. घर एकीकडे, जनावरे दुसरीकडे, एकीकडे पूरस्थितीने विस्कळीत जनजीवन, आदी सर्व समस्यांवर मात करत जनाबाई देशमुख कुटुंबासाठी दीपावली फराळाचे साहित्य बनवण्यास तल्लीन झाल्या आहेत. आष्टे कोळेगाव बंधारा येथील पुरामुळे पुनर्वसन झालेल्या दहापैकी केवळ दोनच कुटुंब आपल्या घरी परतली आहेत. संकटांवर मात करत ही कुटुंब दिवाळी साजरी करत आहेत. मोहोळ तालुक्यात सीना नदीपात्रात चांदणी, खासापुरी, सीना कोळेगाव, भोगावती नदी पात्रातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. शेती व घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अद्याप पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही. लाइटही सुरू झाली नाही. मात्र, ८० टक्के कुटुंबांनी मोहोळ, रेल्वे स्टेशन येथे स्थलांतर केले आहे. जनाबाई देशमुख गावी परतल्या असून उत्साहात दिवाळी साजरी करत आहेत. अनेक कुटुंबांची घरे ओसाड पडली आहेत. यंदा विद्युत रोषणाईशिवाय दिवाळी साजरी करण्याची वेळ कुटुंबावर आली आहे. अनेक ठिकाणांहून जीवनावश्यक वस्तूंसह किराणा मालाची किट देण्यात आली. मात्र घरासह शेतांची भग्नावस्था पाहून फराळाची गोळी जाणवत नसल्याचे शेतकरी यशवंत देशमुख यांनी सांगितले. पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली. गजबजलेली ठिकाणे ओसाड पडली. दहापैकी दोनच कुटुंब रहायला आली. सुविधांअभावी कोणी पाहुण्यांकडे तर कोणी मोहोळ शहरासह रेल्वे स्टेशनवर राहण्यासाठी गेले आहेत. एरव्ही ऑक्टोबरमध्ये हिरवीगार शेती ओसाड पडली आहे. सर्वत्र पालापाचोळा असून झाडे पडलेली आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी नाही, यंदा रोषणाईशिवाय दिवाळी ^दुसरीकडे राहण्याची व्यवस्था झाली नाही. साफसफाई करून पूर्वीच्या ठिकाणी रहायला आलो. लाइटसह शुद्ध पिण्याचे पाणी नाही. नदीत दोन फुटांचे खड्डे घेत पिण्याचे पाणी वापरावे लागत आहे. यंदा दिवाळी ही विद्युत रोषणाविना व फराळाशिवाय करण्याची वेळ आली आहे. - पांडुरंग देशमुख, देशमुख वस्ती बंधारा आष्टे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:56 am

पाडवा; ट्रॅक्टर, दुचाकींची होणार दणक्यात खरेदी

दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरीच्या बाजारपेठेत करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे. विशेषतः शेती उपयोगी अवजारे, मोबाइल्स ,ट्रॅक्टर, चारचाकी, दुचाकी वाहने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची अपेक्षा आहे. यंदा दीपावली सणाच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभला आहे. मागील आठ दिवसांपासून पंढरीच्या बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. सव्वा लाखांवर प्रति दहा ग्रॅमचा भाव गेल्याने सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली असली तरी शेतकरी वर्गातून उत्साहात खरेदी होताना दिसत आहे. दीपावली पाडवा हा वर्षातील साडेतीन मुहूर्ता पैकी एक असल्याने या दिवशी काही ना काही खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. ट्रॅक्टर, शेती उपयोगी वाहने खरेदीला प्राधान्य आहे. यंदा पेट्रोलच्या दुचाकीसह इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. दिवाळीच्या चार दिवसात सर्व ई-बाईक विक्रेत्यांकडून ८० ई-बाईक विकल्या गेल्या आहेत. पाडव्याला शंभराहून अधिक इलेक्ट्रिक बाईक विकले. ५० ट्रॅक्टर, ५०० दुचाकी, ५० कारची विक्री विविध कंपनीच्या पन्नासहून अधिक ट्रॅक्टरचे बुकिंग झाले आहे, तर पाचशेहून अधिक दुचाकी, पन्नासहून अधिक चारचाकी विकल्या जातील, असा अंदाज वाहन विक्रेत्यांनी वर्तवला आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:55 am

2 लाखांच्या लोकवर्गणीतून केले रस्त्याचे काम:लऊळ-होळे रस्त्यासाठी लागला 59 टिप्पर मुरूम, नेत्यांना नाही जमले ते युवकांनी करुन दाखवले‎

लऊळ - होळे जिल्हा मार्ग १५ वर्षांपासून खराब होता. ३३ फूट रुंदीचा रस्ता शेजारील शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे रहदारीसाठी केवळ पाच फूट राहिला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रोडवर प्रचंड खड्डे पडले होते. परंतु गावातील युवकांनी लोकवर्गणीतून दोन लाखांचा निधी गोळा करत तीन दिवसातच ५९ टिप्पर मुरूम टाकून हा रस्ता दुरुस्त केला आहे. सदरील लऊळ -होळे रस्ता अरुंद असल्यामुळे विद्यार्थी, महिला वृद्धांसाठी धोकादायक बनला होता. तर दुचाकीचालक जीव धरून घेऊन वाहन चालवत होते. तसेच आसपासच्या गावांमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांकरिता हा रस्ता दळणवळणासाठी त्रासदायक ठरत होता. या रस्त्याबाबत गावातील युवक अमोल गणगे यांच्या मित्र परिवाराने पुढाकार घेतला. दीड किलोमीटर रोडच्या मुरमीकरणासाठी ११ ऑक्टोबरला बैठक घेत कामासाठी दोन लाख रुपयांची लोकवर्गणी केली. या उपक्रमाला लोकरे वस्ती, गणगे वस्ती, पन्हाळकर वस्ती, मोहिते वस्तीसह रामोशी खोऱ्यातील ९६ ग्रामस्थ, दूध उत्पादक शेतकरी, दुकानदार, बागायतदारांनी जमेल तसे अर्थसहाय्यत केले. प्रत्यक्षात काम सुरू करुन तीनच दिवसात रस्ता दुरुस्त करत रहदारीसाठी खुला केला. या कामासाठी टिप्पर, जेसीबी, मजुरांची मदत घेतली. दरम्यान, या रोडच्या कडेचे अतिक्रमण गावातील नेतेमंडळींसह आमदारांना १० वर्षे अपयश आले होते. परंतु लऊळ गावातील युवाशक्ती रस्ता रुंद करण्यासाठी एकवटली. आसपासच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेत युवकांनी अरुंद असलेला रस्ता ३३ फूट रुंद केला. दीड किलोमीटरचा हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी तब्बल ५९ टिप्पर मुरूम टाकण्यात आला. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार मागणी करुन थकलेल्या नागरिकांनी लऊळ -होळे जिल्हा मार्गासाठी युवकांना साथ दिली. पूर्वीचा खराब अरुंद रस्ता अपघाताला आमंत्रण देत होता. यावर मार्ग काढण्यासाठी तरुणांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतले. ग्रुपवर लोकवर्गणीतून रस्ता करण्याचा कामाच्या मेसेजला अल्पवधीतच प्रतिसाद मिळाला. यासाठी बाबाराजे जगताप, प्रभाकर भोंग, राजेंद्र भोंग, सतीश भोंग, अमोल गणगे यांनी परिश्रम घेतले. लोकवर्गणीतून रस्त्याचे काम झाले असले तरी प्रशासनाने हा रस्ता पक्का करावा.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:55 am

पालखी मार्ग - लातूर, सातारा महामार्गाचे संगमस्थळ धोकादायक:वारंवार अपघात, एक किलोमीटर अंतरावर असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष‎

येथून जवळच असणारा संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग व त्याला जोडणारा अकलूज येथून येणाऱ्या लातूर ते सातारा महामार्गावर सतत वर्दळ असते. परंतु या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग किवा महामार्ग विभागाने गतीरोधकही टाकले नाही. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघात घडत आहेत. पुणे येथून येणारा संत तुकाराम महाराज पालखी मार्ग सध्या पूर्ण झाला आहे. नीरा नदी पलीकडे पुणे जिल्ह्यातील सराटी येथे या मार्गावर टोलनाका असून तेथे गतीरोधक आहे. तेथून पुढे या महामार्गावर गतीरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जातात. याच मार्गाला अकलूजनजीक पूर्वेला पश्चिमेकडून येणारा सातारा लातूर हा महामार्ग मिळतो. या मार्गांच्या संगमाठिकाणी तीव्र चढ आहे. तसेच गतीरोधकही नाही. त्यामुळे अकलूजकडून येणारी वाहने वेगात येतात. मात्र, त्याला पूर्वेकडून पालखी महामार्गावरून वेगात येणारी वाहने दिसत नाहीत. दोन्ही वाहने आपापल्या बाजूने असली तरी ज्या ठिकाणी हे मार्ग मिळतात, त्याठिकाणी ती अचानक एकमेकांसमोर येतात व अपघात होतात. अकलूज येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन विभागीय कार्यालये आहेत. अपघात स्थळापासून बांधकाम विभागाचे कार्यालय केवळ एका किलोमीटरवर असूनही गतीरोधक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी अद्याप गतीरोधक उभारले नाही. या ठिकाणी नुकताच दुचाकीत अपघात होऊन कुर्डुवाडी येथील एक कीर्तनकार ठार झाले आहेत. तर त्यांच्या पत्नींना ^लातूर-सातारा व पालखी महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. मालवाहतूक वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु येथे गतीरोधक नसल्याने लहान-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे येथे गतीरोधक व अंडरपासची गरज आहे. गतीरोधक केले नाही तर जनसेवा संघटना आंदोलन उभारणार. अण्णासाहेब शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष, जनसेवा संघटना. पत्नींना कायमचे दिव्यांगत्व आले. त्याला अद्याप एक महिनाही झाला नसताना पुन्हा रविवारी मालट्रक व चारचाकी वाहनाचा अपघात झाला. परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु सततचा हा प्रकार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाकीमुळे वैतागलेल्या नागरिकांनी रोडवरच ठिय्या मांडून दोन्ही महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी रोखली होती. त्यानंतर अकलूज पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी समजूत काढली होती. परंतु तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या अपघातस्थळी गतीरोधक उभारले नाही. गतीरोधक न उभारल्यास आंदोलन करणार

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:54 am

राष्ट्रवादीला सुरुंग लावत माढ्यात कमळ फुलवण्याचा प्रयत्न:माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह रणजितसिंह भाजपात आल्यास पक्षाचा विस्तार

हिम्मत जाधव | माढा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपने जिल्ह्यात कमळ फुलवण्याचा चंग बांधला आहे. राष्ट्रवादीचा अभेद गड असलेल्या माढ्यात भाजपने सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे वारसदार सध्या भाजपच्या वाटेवर असण्याचे संकेत मिळत आहेत. शिंदे यांचा भाजप प्रवेश झाल्यास माढा तालुक्यात भाजपचा पक्ष विस्तार वाढेल. शिवाजी सावंत पक्षांतर्गत मतभेदातून शिवसेनेतून बाहेर पडले, परंतु त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे. सोलापूर जिल्ह्यात पुरोगामी विचारसरणीचा प्रभाव राहिला आहे. ग्रामीण भागात हिंदूत्ववादी विचारसरणी रुजवण्यासाठी इतर पक्षातील बलवान नेत्यांना आपलेसे करुन पक्ष विस्तार करण्यात भाजप यशस्वी होत आहे. मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, बार्शी या तालुक्यात इतर पक्षातील बलदंड नेत्यांच्या माध्यमातून पक्ष विस्ताराचे गणित जसे जुळवले. तसाच प्रयत्न उत्तर, दक्षिण तालुक्यासह माढा तालुक्यात भाजप करु पाहत आहे. नेत्यांच्या व्यक्तीगत संपर्कावरच सत्ता मिळवण्याचे धोरण अलिकडे राहिल्याने तीस वर्षे सत्तेचा राष्ट्रवादीचा अभेद गड भेदणे अवघड जाणार नाही. बबनराव शिंदे यांनी आपले पुत्र जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष उमेदवारी देत माढा विधानसभेच्या निवडणुकीत उतरविले. परंतू या निवडणुकीत शिंदे कुटुंबाला पराभव पत्करावा लागला. शिंदे बंधूंचे राजकीय पुनर्वसन करणे शक्य नसल्याची अजित पवार यांची क्लिप व्हायरल झाल्याने शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागला. याचा फायदा घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिंदे पुत्र रणजितसिंह शिंदे व विक्रमसिंह शिंदे यांना भाजपच्या गळाला लावले. मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत बैठकीत चर्चा केली आहे. शिवसेनेचे (शिंदे) माजी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी पक्षांतर्गत कुरघोड्यांना कंटाळून काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. भाजपचे कमळ हातात घेण्याचे सूतोवाच केले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली. सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पक्ष प्रवेश रखडली आहे. सावंत यांनी जाहीरपणे याबद्दल नाराजी व्यक्त केली नसली तरी इतर पक्षाचे पर्याय खुले असण्याचा इशारा दिला आहे. माढा तालुक्याबरोबरच जिल्ह्यामध्ये सावंत यांचा प्रभाव आहे. सावंत यांच्या राजकीय प्रभावाचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यांना डावलण्याचा विचार तूर्ततरी भाजप करणार नसल्याचे सांगितले जाते. पालकमंत्री यांचा पक्ष विस्ताराचा शिंदे यांच्याकडून नाही दुजोरा लोकसभा निवडणुकीत भाजपला माढ्यातून लाभ उठवता आला नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीने महायुतीमध्ये भाजपशी सलगी केली तरी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा भाजपला उठवता आला नाही. माढा तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात भाजपला मित्र पक्षाच्या मदतीने पाय रोवता आलेले नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजीपाला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षातील राजकीय प्रभाव असलेल्या नेत्यांना पक्षात घेऊन त्यांच्या माध्यमातून मत पेरणी करण्याचा पर्याय आहे. तोच प्रयत्न म्हणून माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर भाजपचे लक्ष आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:53 am

महालिंगराया- विरोबा गुरू-शिष्य भेट सोहळ्याला 5 लाख भाविक उपस्थित:मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे भाविकांकडून लोकर व भंडाऱ्याची उधळण

धनगर समाजाचे आराध्य दैवत महालिंगराया व बिरोबा या गुरू-शिष्य भेटीचा सोहळा पाच लाख भाविकांच्या जयघोषात लोकर व भंडाऱ्याची उधळण करत मंगळवारी (दि.२१) दुपारी चारच्या सुमारास मंदिरालगत ओढ्यात हुलजंती येथे उत्साहात पार पडला. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, दामाजी कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, उद्योगपती हनुमंत सेठ दुधाळ, स्वेरी कॉलेजचे संस्थापक बीपी रोंगे, माजी सभापती सुधाकर मासाळ आदी उपस्थित होते. कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून भाविक लाखोंच्या संख्येने आले होते. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अमावसेच्या रात्री स्वतः शंकर पार्वती हे महालिंगराया मंदिराच्या कळसाला मुंडास गुंडाळून जातात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्याला ध्वज असे म्हटले जाते. सोमवारी (दि.२०) रात्री १२ वाजेच्या सुमारास ध्वज लागली. या वर्षी मुंडास १० शिखरांपैकी गर्भ शिखर व सहा अशा एकूण शिखराच्या सातही कळसांच्या चारी बाजूला समान सोडले आहे. त्यामुळे देशभरात पीक पाणी चांगले राहणार, अशी अपेक्षा पुजाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाऊस चांगला झाल्यामुळे व मंदिराच्या परिसरातील ओढ्यात पालखी भेटीच्या ठिकाणी बंधाऱ्यामुळे पाणी उपलब्ध होते. परंतु ओढ्यालगत दलदलीने भाविकांची गैरसोय झाली. परिसरातील जमीन अधिग्रहण करत विकास व घाट बांधण्याची गरज आहे. हुन्नूरचा बिरोबा व हुलजंतीचा महालिंगराया यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी पाच लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. भेटीदरम्यान भाविकांनी भंडारा व लोकराची उधळण केली. चडचण, सोड्डी, मंगळवेढा मार्गावर वाहने व भाविकांची गर्दी होती. यात्रेच्या तीन कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार. राजकारणात उलथापालथ होईल, राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातील. येत्या पौर्णिमेच्या आसपास व येत्या वर्षात पाऊस चांगला पडेल. देशी जनावरे महाग होणार, खिलार गाई -बैल प्रचंड महागणार तर शेळ्या मेंढ्यांना चांगले दिवस येणार. बैलांची चांदी होईल मात्र संख्या कमी होणार, असल्याची भाकणूक झाल्याचे महालिंगरायाचे पुजारी मारुती पेटर्गे यांनी सांगितले. १. हुन्नुरचा बिरोबा २. सोन्याळचा विठोबा. ३ उटगीचा ब्रम्हदेव. ४ जिरंकलगीचा बिराप्पा. ५. शिराढोणची शिलवंती. ६. हुलजंतीचा महालिंगराया. ७. शिराढोणचा बिरोबा. ८. महालिंगरायाचा नातू कसगी येथील बरगालसिद्ध स्थानिक पालखी हुलजंतीचा महालिंगराया. १. हुन्नुरचा बिरोबा: अंतर ३० किमी, भाविकसंख्या २० हजार. २. सोन्याळचा विठोबा अंतर २० किमी, भाविकसंख्या ५ हजार. ३. उटगीचा ब्रम्हदेव अंतर २५ किमी भाविकसंख्या १० हजार. ४. जिरंकलगीचा बिराप्पा अंतर २५ किमी अंकांची संख्या ५ हजार. ५. शिराढोणची शिलवंती अंतर ७ किमी, भाविकसंख्या २० हजार. ६. शिराढोणचा बिरोबा अंतर ७ किमी. भाविकसंख्या १० हजार. ७. महालिंगरायाचा नातू कसगी येथील बरगालसिद्ध अंतर १२५ किमी. दिवसांत जवळपास सात लाख भाविकांनी दर्शन घेतले. बुधवारी सकाळी नऊ वाजता जतचे राजे डफळे सरकार यांच्या मानाच्या ताटाचा नैवेद्य महालिंगरायास दाखवण्यात येणार आहे, त्यानंतर या भागातील नागरिक आपला नैवेद्य दाखवतात. कर्नाटकातील जीप वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहतूक कोंडी झाली. यावर्षी चोरीचे प्रमाण कमी झाले. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे यांनी बंदोबस्त ठेवला होता. कोरोनापेक्षा भयंकर महामारी येणार या पालख्यांची एकत्र झाली भेट

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:52 am

लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास:पारंपरिक दागिन्यांनी नटले विठू रखुमाई, सजावटीसाठी दोन हजार किलो शेवंती, गुलाब, ऑर्किड, अँथोनियम, गुलछडी फुलांचा वापर‎

दीपावलीच्या पर्वानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून श्री विठ्ठल मंदिर गाभाऱ्यासह मंदिर परिसरात लक्ष्मीपूजनानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. दरम्यान, लक्ष्मी- कुबेर पूजन करून विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांनी सजवण्यात आले. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बीड येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे भक्त अर्जुन हनुमान पिंगळे यांच्याकडून मंदिराच्या गाभाऱ्यासह परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली. यासाठी सुमारे दोन हजार किलो विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली. यात कोंडा, शेवंती, ॲस्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनियम, सायकस, गुलछडी आदी फुलांचा समावेश आहे. या सर्व फुलांद्वारे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा परिसर रंग, सुगंध व भक्तिभावाने भारावून निघाला आहे. मंदिरातील श्री. विठ्ठल चौखांबी, सोळ खांबी परिसर, रुक्मिणी मातेचे मंदिर, तसेच प्रवेशद्वाराच्या भागात कलात्मक डेकोरेशन करण्यात आले. सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक फुलांचा कुशलतेने करण्यात आला.रंगसंगतीतील समतोल, तसेच विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या अध्यात्मिकतेला साजेशी वातावरणनिर्मिती झाली आहे, अशी माहिती प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली आहे. श्री विठ्ठलास हिरा-मोत्याचा तुरा: श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम हिऱ्याचा, मोत्याचा तुरा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, शिरपेच लहान, शिरपेच १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तुळशीची माळ तीन पदरी, मोहन माळ पाच पदरी, हायकोल, सूर्यकाळ्यांचा हार, तांद्ळया हार ७ पदरी, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, पदकासह लॉकेट, तुळशीची माळ एक पदरी, लक्ष्मी पदक लॉकेट, तोडे जोड, झनक झनक हार, सोन्याचे पैंजण जोड, नवरत्नाचा हार, सोन्याचे पितांबर आदी अलंकार परिधान करण्यात आले. रुक्मिणी मातेला मोत्याचा कंठा: श्री रुक्मिणी मातेला सोन्याचा मुकुट, मोठी नथ, कर्णफुले जोड, जडावाचा तानवड जोड, चंद्र, सूर्य, खड्यांची वेणी, मोत्याचा कंठा, मोत्याचे मंगळसूत्र, मोत्याचा तुरा, खड्याची बिंदी, मण्या मोत्याच्या पाटल्या जोड, बाजीराव गरसोळी, चिंचपेटी हिरवी, जडावाचे बाजूबंद जोड, नवरत्नाचा हार, तन्मणी मोठा, शिंदे हार तीन पदरी, ठुशी, वाक्या जोड, रूळ जोड, पैंजण जोड, मस्त्य जोड, सोन्याचा करंडा, मासपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले. लक्ष्मीपूजन व कुबेर पूजन करण्यात आले. यानिमित्त पोशाखावेळी परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल व माता रुक्मिणी मातेला अलंकारांनी सजवण्यात आले. लक्ष्मीपूजना निमित्त परंपरेप्रमाणे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या खजिन्यातील सुवर्णालंकाराची लक्ष्मीपूजन प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. विठ्ठल व रुक्मिणी मातेची सुवर्णालंकारांनी पूजा बांधण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:51 am

आपुलकीच्या दिव्यांनी उजळली मातोश्री वृद्धाश्रमातील दिवाळी:युवा एकसाथ फाउंडेशनतर्फे आजी-आजोबांना अनोखी दिवाळी भेट‎

युवा एकसाथ फाउंडेशनने विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसह दिवाळी साजरी केली. वृध्दाश्रमात युवक-युवतींनी आनंदाचा दिवा पेटवून संपूर्ण वातावरण आनंदाने भारावून टाकले. दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना आपुलकीने दिवाळी भेट देऊन, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. दिवाळीच्या दिवशी आपल्या कुटुंबासह सण साजरा करण्याची सवय असलेल्या अनेक ज्येष्ठांना आज काही कारणांमुळे वृद्धाश्रमात राहावे लागते. पण या दिवशी जेव्हा हे तरुण त्यांच्याशी प्रेमाने बोलले, गप्पा मारल्या, भेटवस्तू दिल्या, तेव्हा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आपल्या कुटुंबातीलच कोणी दिवाळीला भेटायला आले, अशी भावना त्यांच्या मनात दाटून आली. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहित काळोखे, सचिव सुमित भिंगारदिवे, कार्याध्यक्ष प्रिती क्षेत्रे, उपाध्यक्ष संदेश कानडे, राज जाधव, महेश साठे, प्रितेश मोहिते, टेरी वाघमारे, हर्ष शिरसाठ, श्रावणी घोडके, ऋग्वेद घोडके, शार्दुल लोखंडे, वैभव गारुडकर, प्रशांत कनगरे, वैभव गुढेकर आदी उपस्थित होते. रोहित काळोखे म्हणाले, दिवाळी म्हणजे फक्त प्रकाशाचा नाही, तर मनामनांतील आपुलकीचा सण आहे. समाजात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत जे आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक तरुणाने अशा कार्यात सहभाग घ्यावा, कारण वृद्धांचे आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे. आजच्या तरुणांनी सोशल मीडियावर साजरे होणारे सण थोडे बाजूला ठेवून प्रत्यक्षात कोणाच्या जीवनात प्रकाश नेण्याचे काम करावे, हाच दिवाळीचा खरा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. अनोख्या भेटीमुळे वृद्धाश्रमातील वातावरणात निर्माण झाले नवचैतन्य या उपक्रमादरम्यान युवा एकसाथ फाउंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना दैनंदिन वापराच्या वस्तू, फळे, मिठाई वाटण्यात आली. सर्वांनी एकत्र येऊन दिवे लावले, गाणी गायली, आठवणींना उजाळा दिला आणि काही हलकेफुलके खेळही खेळले. या क्षणांनी वृद्धाश्रमातील वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. दिवाळीचा सण त्यांच्या मनात पुन्हा एकदा उजळला.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:21 am

कीटकनाशके, बियाण्यातील भेसळी विरोधात कठोर कारवाई करावी'

कृषी क्षेत्र हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही आज भेसळीच्या विळख्यात सापडला आहे. शेतीसाठी आवश्यक असणारी बियाणे, कीटकनाशके, खते आणि औषधे यामध्ये वाढलेल्या भेसळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गुलाब पठाण यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कृषी विभागाने विशेष भरारी पथक स्थापन करावे, अशी मागणी केली आहे. पठाण यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनेक कृषी सेवा केंद्रांवर कालबाह्य औषधे, खोटी बियाणे आणि मिश्रित खते विक्रीस ठेवली जात आहेत. काही ठिकाणी उत्पादनाच्या तारखा बदलून नवी लेबले चिकटवली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचा पैसा आणि पिकांचे नुकसान दोन्ही होत असून, या फसव्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई आवश्यक आहे. भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरावर कृषी विभागाचे विशेष भरारी पथक स्थापन करून औषधे व खतांची वैधता, बियाण्यांच्या पॅकिंग तारखा आणि लेबले तपासणे, तसेच खोट्या ब्रँडविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य केळी बागायतदार संघ तर्फे राज्यव्यापी स्तरावर या संदर्भात मोहीम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत अनेक कृषी सेवा केंद्रांवर छापे टाकून परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता ही मोहीम अहिल्यानगर जिल्ह्यातही सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी लवकरच बैठक आयोजित करणार असल्याची माहिती प्रचार प्रमुख नरेंद्र काळे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:20 am

जवळ्यात तीनशे एकरवर वृक्ष लागवडीचा राह'चा संकल्प:अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला गवताळ आणि उजाड जमिनीचे पुनरुज्जीवन करणारा प्रकल्प‎

सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राह फाउंडेशन या संस्थे ने जिल्ह्यातील पहिला पर्यावरण पुनरुज्जीवनातून हरित क्रांतीचा प्रकल्प हाती घेतला आहे. जवळा येथील तीनशे एकरवर वृक्ष लागवडीचा संकल्प या फाउंडेशनने केला आहे. या प्रकल्पास प्रारंभही केला आहे. हा प्रकल्प कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत राबवण्यात येत आहे. त्याची अंमलबजावणी राह फाउंडेशन या सामाजिक संस्थेद्वारे करण्यात येत आहे. या उपक्रमाला जवळे ग्रामपंचायतव ग्रामस्थ यांचे सक्रीय सहकार्य लाभणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील पहिला पर्यावरण पुनरुज्जीवन प्रकल्प आहे. एकूण १०० हेक्टर क्षेत्रावर पर्यावरण पुनरुज्जीवन आणि गवताळ व उजाड जमिनीचे संवर्धन हे कार्य हाती घेण्यात येणार आहे. प्रकल्पाचा मुख्य हेतू म्हणजे गवताळ आणि उजाड जमिनीचे पुनरुज्जीवन,करून मातीची गुणवत्ता, पाणी साठवण क्षमता आणि जैवविविधता वाढवणे आहे. तसेच स्थानिक लोकांसाठी दीर्घकालीन उपजीविकेच्या संधी निर्माण करणे.व विविध जातींच्या वृक्षांचे लागवड करून जतन करणे होय कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणीय शाश्वततेसाठी गावपातळीवरील सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. कमिन्स इंडिया फाउंडेशन यांनी या निमित्ताने त्यांच्या शाश्वत विकास व समुदाय कल्याणासाठीच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला. राह फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले की, या प्रकल्पात स्थानिक समुदायाचा सहभाग, वॉटरशेड विकास, आणि स्थानिक जातींच्या वृक्षारोपणावर भर देऊन पर्यावरणीय संतुलन साधले जाईल. जवळे ग्रामपंचायत यांनी या उपक्रमासाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. पर्यावरण पुनरुज्जीवन आणि गवताळ व उजाड जमिनीचे संवर्धन असे या प्रकल्पाचे नाव आहे. हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलाच जैव विविधता व पर्यावरणीय लवचिकता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. कॉर्पोरेट संस्था, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक समुदाय यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाश्वत आणि हरित भविष्य घडविण्याचा हा एक आदर्श उपक्रम ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:20 am

संगमनेर तालुक्यात साडेनऊ हजार मतदारांच्या नावांत दोष- थोरात

संगमनेर तालुक्यात मतदार यादीतील साडेनऊ हजार नावांत दोष आढळले आहेत. तहसीलदार म्हणतात, आम्हाला मतदार यादीतील नावे वगळण्याचा अथवा दुरुस्त करण्याचा अधिकार नाही.निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बनवाबनवी चा कार्यक्रम करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन इमारतीत लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ॲड. माधवराव कानवडे, व्हा.चेअरमन पांडुरंग घुले, कांचनताई थोरात,रणजितसिंह देशमुख, राजवर्धन थोरात, डॉ.जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, सावी पारीख, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुधाकर जोशी, उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, संगमनेर विधानसभा मतदार संघामध्ये साडेनऊ हजार मतदार यादीतील दोष आम्ही दाखवून दिले आहे. अनेक नावे दुबार व अनेकांची राहण्याची ठिकाणी वेगळी व इतर अनेक बदल दिसून आले आहेत. मात्र निवडणूक आयोग म्हणते आम्ही चुका दुरुस्त करण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे अधिकारी म्हणतात यात कोणताही बदल करण्याचा अधिकार नाही. निवडणूक आयोग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बनवाबनवी करत आहे ही संपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रात आहे, असा आरोपही थोरात यांनी केला. माजी मंत्री थोरात म्हणाले, महाराष्ट्रात कठीण प्रसंग असताना सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. कर्जमाफीचे तुम्ही आश्वासन दिले आहे. आज वेळ आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना पुन्हा उभे करण्याची. याबाबतीत हलगर्जीपणा सरकारने करू नये. म्हणाले दीपावली निमित्ताने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्यावर लक्ष्मीपूजन कार्यक्रमप्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात .

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:19 am

नैसर्गिक संकटावर मात करून शेतकरी नव्या उमेदीने उभा राहील-मंत्री विखे:केंद्र-राज्य सरकार संकटामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम

यंदाच्या दीपावली सणावर नैसर्गिक संकटाच सावट असले तरी,या मंगलमय पर्वात नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे राहिले आहे. महायुती सरकार प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे समाधान व्यक्त करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सर्वाना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंत्री विखे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के,आण्णासाहेब भोसले, डॉ. भास्करराव खर्डे, कैलास तांबे, शिवाजीराव जोंधळे, पोपटराव वाणी, किशोर नावंदर, भास्कर संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे उपस्थित होते. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यांच्या मुख्य कार्यालयात चेअरमन डॉ.सुजय विखे आणि धनश्री विखे यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. मंत्री विखे, शालिनी विखे, कारखान्याचे व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठउपस्थित होते. मंत्री विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी वस्तू सेवाकर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय करून देशातील जनतेला दिलासा दिला. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिवाळी सणात अर्थव्यवस्थेवर झाला. सण उत्सवानिमित्त स्थानिक विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्याच्या त्यांच्या आवाहनाला समाजघटकांनी चांगला प्रतिसाद दिला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही महायुती सरकारने नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेवून ३ हजार २०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली नाही तर, त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या निर्णयाचा लाभ झाला आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनाने अधिकाऱ्यांनी सतर्कपणे केलेल्या कार्यवाहीबद्दल मंत्री विखे यांनी समाधान व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:18 am

शहरात अमृत मुहूर्तावर लक्ष्मीपूजन, पावसाने तारांबळ:पण उत्साह कायम, बाजारपेठेत विद्युत रोषणाई, दिव्यांची सजावट; घरासमोर आकर्षक रांगोळ्यांमुळे शहरात उत्साह‎

दीपावलीनिमित्त सोमवारी व मंगळवारी शहरात नागरिकांनी अमृत मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन केले. व्यापारी बांधवांनीदेखील दुकाने, कार्यालये आणि कंपन्यांमध्ये विधिवत लक्ष्मीपूजन करून धनदायिनी लक्ष्मीचे स्वागत केले. व्यापारात भरभराट आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळावेत, या भावनेने व्यापाऱ्यांनी वहीपूजन केले. विद्युत रोषणाई, दिव्यांची सजावट, आकर्षक रांगोळ्यांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण होते. दुपारी काही वेळ पाऊस झाल्याने तारांबळ उडाली, पण उत्साह मात्र कायम होता. सोमवारपासूनच बाजारपेठेत पूजा साहित्य, हार व फुलांच्या खरेदीची लगबग सुरू होती. यंदा अमावस्या सोमवारी दुपारनंतर व मंगळवारी सायंकाळपर्यंत असल्याने नागरिकांनी दोन दिवस शुभ, लाभ व अमृत मुहूर्त साधून लक्ष्मीपूजन व वहीपूजन केले. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून घरासमोर, दुकानांसमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या. दिव्यांच्या मंद प्रकाशात सजवलेली प्रवेशद्वारे, विद्युत रोषणाईने उजळलेले रस्ते आणि रंगीत कंदिलांनी संपूर्ण शहर सणासुदीच्या झगमगाटात न्हाऊन निघाले. पावसामुळे नागरिकांची धावपळ पूजा साहित्य विक्रीसाठी शहर व उपनगरात अनेक ठिकाणी विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. सोमवारपासूनच या स्टॉलवर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. माळीवाडा, चितळे रस्ता, झोपडी कॅन्टीन परिसर, प्रोफेसर चौक, भिस्ताबाग व एकविरा चौक परिसरात मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. मिठाईच्या दुकानांमध्येही गर्दी होती. मात्र, मंगळवारी अचानक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह विक्रेत्यांची धावपळ उडाली.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:18 am

नवीन कपडे साड्या, मिठाई मिळाल्याने निराधारांची दिवाळी गोड:अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशनवर कामरगावचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांचा उपक्रम‎

उठा ...उठा सकाळ झाली दिवाळीच्या सणाच्या आंघोळीची वेळ झाली. आई, दादा, भावांनो, लवकर उठा असे आपुलकीचे व प्रेमळ शब्द कानावर पडताच लहान मुले,वृद्ध, दिव्यांग, महिला, पुरुष उठून बसले. निमित्त होते, दिवाळीच्या सणाचे आज भल्या सकाळीच अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे मित्र मंडळाचे कार्यकर्ते एकत्र आले तेथे आभाळ पांघरून व जमीन अंथरून शेकडो बालके, वृद्ध दिव्यांग हात डोक्याखाली घेऊन पाय दुमडून झोपलेले होते. त्यातील काहींना काम धंदा होत नाही म्हणून माधुकरी मागतात. रेल्वे स्टेशन हेच त्यांचे आश्रयस्थान ऊन वारा पाऊस याप्रसंगी तोच त्यांना निवारा वाटतो. दिवाळी कधी येते व जाते हे त्यांना माहिती नसते त्यांना दिवाळीच्या सणाचा आनंद मिळावा या सामाजिक बांधिलकीतून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना एकत्र केले नाभिक बबनराव साळुंखे यांनी त्यांचे केस, दाढी कमी केल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने सुहासिक साबण लावून त्यांना आंघोळी घातल्या. सर्वांना नवीन कपडे महिलांना साड्या व बालकांना कपडे मिठाईचे बॉक्स दिले मंडळाच्या सदस्य शीला गुगळे यांनी ब्लॅंकेट, सतरंजी भेट दिल्या. उद्योजक अजित पवार यांनी मिठाईची व्यवस्था केली. या अनोख्या पाहुणचाराने वंचितांची चेहरे आनंदाने उजळून निघाले. यावेळी मित्र मंडळाचे कार्यकर्ते ग्रंथालय चळवळीचे सुखदेव वेताळ, माजी केंद्रप्रमुख अशोकराव धसाळ, नंदकुमार लोणकर, उद्योजक अजित पवार, शीला गुगळे, सोन्याबापु ठोकळ, अंबादास रोहोकले, जयसिंग कातोरे, वैभव लाळगे आदी उपस्थित होते. कातोरे व त्यांचा मित्रपरिवार १८ वर्षापासून दरवर्षी दिवाळीच्या दिवशी रेल्वे स्टेशनवर वंचितांची अनोखी दिवाळी साजरी करतात. यावेळी शंभर वंचितांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन ग्रंथालय चळवळीचे सुखदेव वेताळ यांनी केले. मी रेल्वेस्टेशन वरच राहतो. आज दिवाळी असूनही मला घरी जाता आले नाही. पण इथे मला नवीन कपडे अंथरून पांघरून मिठाई भेटली माझे मन आनंदाने भरून आले. घरातील लोक भेटल्यासारखे वाटले व मला दिवाळी सणाची उणीव भासली नाही, असे खलाटवाडी येथील अंबादास खलाटे यांनी सांगितले. ^ समाजात आधार नसलेले असंख्य निराधार उपाशीपोटी व आश्रयाशिवाय जीवन जगत असतात. आपल्या ताटातील एक घास त्यांना भरवला तर निश्चितच आनंद मिळेल. तुकाराम कातोरे, सामाजिक कार्यकर्ते कामरगाव.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:16 am

सोनईत शेतमजुरांच्या मुलांची दिवाळी आनंदाची- गडाख

सोनई-लोहोगाव रोड चौकातील आदिवासी व इतर समाजातील २० मजूर कुटुंबातील ५१ मुला-मुलींना कपडे देऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे कार्य माजी सभापती सुनिल गडाख यांच्या वतीने पार पडले. गडाख यांनी सामाजिक उत्तरदायित्व जपत दिवाळीनिमित्त शेतमजुरांच्या मुलांसाठी नवीन कपड्यांचे वाटप केले. ते म्हणाले, सध्याच्या कठीण परिस्थितीत घरची आर्थिक अवस्था बेताची असल्याने अनेक मुले देखील आई-वडिलांसोबत कापूस वेचण्याच्या कामावर जात आहेत. दिवाळीला कपड्यांसाठी थोडे पैसे मिळतील या अपेक्षेने ही मुले काम करत असल्याची बाब समोर आली आणि त्यातूनच ही सामाजिक भावना आकारास आली. या कार्यक्रमास गोरक्षनाथ महाराज गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र बोरुडे, सखाराम राशिनकर, प्रभाकर गडाख, सुभाष राख, आप्पा महाराज निमसे, गणेशराव गडाख,दत्तात्रय भुसारी, संदीप लोंढे, गोविंद भुसारी तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. सोनई येथे शेतमजुरांच्या मुलांना कपडे वाटप करतांना माजी सभापती सुनीलराव गडाख.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:15 am

पोलिस अधीक्षकांनी पारधी समाजाच्या पालावर साजरा केला दिवाळीचा सण

पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी कामरगाव जवळील पारधी समाजाच्या पालावर भेट देत साजरी केली. पारधी वस्तीत त्यांनी मिठाई व साडीचोळींचे वाटप केली. या कार्यक्रमाला पोलिस उपाधीक्षक शिरीष वामने, पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते, सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते. भोसले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. भोसले हे राज्यभरातील पारधी वस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम करत आहेत. पारधी समाजातील लोकांवर अन्यायाने होणारे आरोप टाळण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. कामरगाव वस्तीत एक वर्षांपूर्वी बसवलेले सीसीटीव्ही पाहून पोलिस अधीक्षक घार्गे यांनी समाधान व्यक्त केले व या उपक्रमाचे कौतुक केले. पोलिस अधीक्षक घार्गे म्हणाले, पारधी समाजातील मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे. भोसले म्हणाले, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्याला सामाजिक प्रतिष्ठा आणि शासन योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:15 am

कर्तव्यावर असताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानांचे स्मरण

देशासाठी आपले कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिस हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी ‘पोलिस स्मृतिदिन’ साजरा केला जातो. या निमित्त अहिल्यानगर पोलिस मुख्यालय येथे हुतात्मा जवानांना स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी आदरांजली वाहिली. डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, पोलिस दल हे राष्ट्राचे खरे रक्षणकर्ते आहेत. त्यांच्या त्याग, शौर्य आणि सेवेमुळेच समाजात सुरक्षितता टिकून आहे. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांशी झालेल्या संघर्षात केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी शौर्याने लढत प्राणाची आहुती दिली होती. त्यानंतरपासून हा दिवस ‘पोलिस स्मृतिदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात आणि राज्यभरात शहीद झालेल्या सर्व पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. या प्रसंगी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक (गृह) जगदीश भांबळ, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, राखीव दलाचे पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अन्वरअली सय्यद आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:15 am

उपेक्षितांना सामावून घेतल्यास येणारा काळ सामाजिक आरोग्यासाठी उत्तम:शंकर बाबा मठाचे मठाधिपती माधव बाबा यांचे मत‎

जाती-धर्माच्या भिंती तोडून आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण अधिक पवित्र व प्रभावी करण्यासाठी वंचित, कष्टकरी व पिढ्यानपिढ्या उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या लोकांना सामावून घेत वाटचाल केल्यास येणारा काळ सामाजिक आरोग्यासाठी उत्तम आहे, असे मत शंकर बाबा मठाचे मठाधिपती माधव बाबा यांनी व्यक्त केले. दिवाळी सणानिमित्त दलित वस्तीतील ५१ कुटुंबातील गोरगरिबांना कपडे, दिवाळी फराळ व प्रसाद वाटप मठातर्फे करण्यात आले. यावेळी शहरातील साधक परिवारातील सदस्यांसह रवी पाथरकर, सचिन नागापुरे, ईश्वर जावळे, आशिष कुलकर्णी आदी उपस्थित होते. शहरातील दलित वस्तीत हलाखीचे जीवन जगणाऱ्या कुटुंबीयांची संख्या अधिक आहे. सध्या महागाई व बेरोजगारीमुळे हाताला काम नाही. त्यामुळे उत्पन्न मिळत नाही. अशा परिस्थितीत सणावाचून कोणी वंचित राहू नये, नैराश्याचे व दुःखाचे क्षण घटकाभर बाजूला ठेवत सर्वच जणांनी आनंदी वातावरणात सण साजरा करावा. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील विविध भाविकांकडून मठासाठी आलेल्या देणगी रकमेतून कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे सर्व दलित बांधवांनी शंकर महाराजांचा प्रसाद समजून याचा भक्ती भावाने स्वीकार केला. माधव महाराज म्हणाले, चित्त स्थिर असेल तर जीवनात आनंद मिळेल. सुख आणि दुःख या दोन्ही भावना चित्ताच्या स्थैर्यावर अवलंबून आहेत. समाजात पैसा भरपूर असलेली माणसे मोठ्या प्रमाणावर भेटतील, आरोग्य संपन्न असलेली माणसे त्यापेक्षा कमी भेटतील, परंतु चित्त स्थिर असून लोकसेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेली माणसे अभावाने भेटतील. शंकर महाराजांनी चारित्र्य, शुद्ध कर्म व सेवाभाव याला खूप महत्त्व दिले. शहरातील अनेक भाविकांकडून मठाच्या माध्यमातून असा भाव जपला जातो. सार्वत्रिक स्वरूपात समानता व एका सामाजिक पातळीवर येण्याचा प्रयत्न हाच दिवाळीचा सण ठरेल. असे माधव बाबा म्हणाले. आजपर्यंत अशा माझ्या पितृत्वाच्या भावनेने आमच्याकडे कोणीही आले नाही. आम्हाला जवळ घेत सुखदुःखाची विचारणा केली नाही. शंकर महाराज मठाने मात्र जातिभेदाच्या भिंती बाजूला सारत महाराजांची सेवा म्हणून दिवाळी सणाचा आमचा आनंद द्विगुणित केला. माधव बाबांच्या रूपाने आम्हाला शंकर महाराज भेटल्याचे समाधान वाटले, अशा शब्दात उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या. ईश्वराने सर्वांना माणूस म्हणून जन्माला घातले ईश्वराने माणूस म्हणून सर्वांना जन्माला घातले. जात आपण ठरवली. धर्म आपण ठरवला. या भिंती दिवसागणिक अधिक घट्ट केल्या जाऊन माणूस माणसापासून भावनेने व विचाराने दूर जात आहे. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. सामाजिक समता केवळ भाषणे देऊन अथवा फलक लावून होणार नसून परस्परांच्या सुखदुःखांत सहभागी होत आपलेपणाची जाणीव माणसांमधील भेद दूर करणारी ठरणार आहे, असे माधव बाबा म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:14 am

मुहूर्त लक्ष्मीपूजनाचा:सुवर्ण बाजारात 10 कोटींची उलाढाल; 300 ट्रॅक्टरसह 600 दुचाकींची खरेदी, सिन्नरला चांदीची नाणी, मूर्तीसह सोन्याचे दागिने खरेदीला पसंती

सिन्नर लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत सिन्नरमध्ये सोने खरेदीत तब्बल दहा कोटींच्या वर उलाढाल झाली असून वाहन खरेदीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. मंगळवारी एकाच दिवसात ६०० हून अधिक दुचाकी व ३०० ट्रॅक्टर विक्री झाल्याचे सांगण्यात आले. तर २०० पेक्षा अधिक कार चारचाकी वाहने आली. उद्योग क्षेत्रातील कामगारांना व सरकारी, निमसरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळालेले भरघोस बोनस, जीएसटीच्या कपातीनंतर वाहनांचे कमी झालेले दर, सोन्यात गुंतवणूक केल्यानंतर मोठ्या परताव्याची असलेली हमी यामुळे साहजिकच सिन्नरच्या बाजारात दसऱ्याप्रमाणेच लक्ष्मीपूजनाला देखील तेजी बघायला मिळाली. वाहन खरेदी मध्ये मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी दसऱ्याच्या आधीपासूनच बुकिंग केले होते. तालुक्यात यंदा ट्रॅक्टरसाठी शोरूमच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये साडेतीन हजार शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसाठी प्रतिनिधी | पिंपळगाव बसवंत सध्या सोने - चांदीची खरेदी वाढल्याने या धातूच्या वस्तूमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून पिंपळगाव शहरात पाडव्याच्या मुहूर्तावर सुमारे १ किलो सोन्याची आगाऊ बुकिंग झाली तर २५ चारचाकी वाहनांची आगाऊ बुकिंग करण्यात आली आहे. या वर्षी सोने व चांदीच्या दरात गत वर्षीच्या तुलनेत १२० टक्के वाढ झाली आहे. या सोन्यामध्ये ग्राहक गुंतवणूक करताना दिसत असून नाशिक जिल्ह्यात व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण झालेल्या पिंपळगाव शहरात सोन्याची मोठी मागणी वाढत आहे. निवड झाली आहे. यापैकी ५०० शेतकऱ्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ट्रॅक्टर मिळावा या दृष्टीने नियोजन केले होते. मात्र प्रत्यक्षात साडेतीनशे ट्रॅक्टर्सचे बुकिंग शक्य झाले. संध्याकाळपर्यंत ३०० ट्रॅक्टरची डिलिव्हरी झाली. दुचाकीच्या बाबतीत देखील मागणी आणि पुरवठ्याची तफावत जाणून आली. त्यामुळे अनेकांना आवडती बाइक घेण्याचा निर्णय पुढे ढकलावा लागला. चांदी आणि सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या तरी त्यातून आश्वासक परतावा मिळण्याची खात्री असल्याने व पुढची लग्नसराई लक्षात घेऊन दिवाळीला सोने खरेदीवर ग्राहकांचा कल दिसून आला. बाजारात सोन्याच्या खरेदीमध्ये १५ कोटींची उलाढाल होईल असे अंदाज असला तरी केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र दहा कोटींपेक्षा अधिक रकमेची सोने खरेदी ग्राहकांनी केली. त्याशिवाय चांदीची नाणी देवी देवतांच्या मूर्ती अशी पारंपारिक खरेदी देखील करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:13 am

मनमाड बाजार समिती आवारात धरणे आंदोलन:मनमाड कृउबा कर्मचाऱ्यांची वेतनअभावी काळी दिवाळी

मनमाड बाजार समिती कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीत एक महिन्याचे वेतन थकवले व सानुग्रह अनुदान, महागाई भत्ता, वेतनवाढ फरक रक्कम दिली नाही, आर्थिक तरतूद असतांनाही आडवणूक करत आहेत, असा आरोप करीत कर्मचाऱ्यांनी बाजार समिती आवारात धरणे आंदोलन करत काळी दिवाळी साजरी केली. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही हेतुपुरस्कर कर्मचाऱ्यांना त्रास देण्यासाठी रोखून धरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागाने महागाई भत्याचे दर वाढविले आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याची वेळोवेळी मागणी करुन देखिल अद्याप कर्मचाऱ्यांचे पगारात वाढविण्यात आलेले नाही व त्याबाबतचा कोणताही फरकदेखील अद्याप कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. मंजूर सानुग्रह अनुदान, वेतनवाढ फरक व महागाई फरकाची रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे, यासाठी सिटू संलग्न युनियनद्वारे बाजार समितीमध्ये काळी दिवाळी साजरी करून दोन तास धरणे आंदोलन करण्यात आले. सिटू संघटनेचे राज्य कौन्सिल सदस्य विजय दराडे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन करण्यात आले. यावेळी बळीराम गायकवाड, संजय पवार, एम. जी. बाविस्कर, बी. डी. पवार, एच. जी. पोटिंदे आदींसह कर्मचाऱ्यांनी काळी दिवाळी आंदोलन करून निषेध व्यक्त केला. थकीत वेतन अदा करीत शब्द पूर्ण केला ^मनमाड बाजार समितीतील विरोधी संचालकांनी केलेल्या नियमबाह्य व बेकायदा तक्रारींमुळे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते ते दिवाळीपूर्वी होतील, असा शब्द मी दिला होता. जिल्हा उपनिबंधकांनी बँकांना सूचना दिल्याने दिवाळीपूर्वी थकीत वेतन अदा करीत शब्द पूर्ण केला. - दीपक गोगड, सभापती

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:12 am

चांदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कायदेविषयक प्रबोधन

नाशिक जिल्हा विधिसेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली चांदवड तालुका विधिसेवा समिती व चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात कायदेविषयक प्रबोधन पार पडले. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित शिबिराच्या अध्यक्षस्थानी चांदवड तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश सुमित छल्लाणी होते. याप्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश वृषाली सुंगारे या उपस्थित होत्या. चांदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिनकर ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी शिबीराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच तालुका विधिसेवा समितीच्या विविध कार्याविषयी माहिती दिली. तालुका विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अ‍ॅड. विकास जाधव यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिन या निमित्ताने मानसिक आरोग्य काळजी अधिनियम २०१७ मधील तरतुदी व त्या अंमलबजावणीसाठी असणारी मंडळे याविषयी माहिती दिली. तसेच त्यांनी या कायद्यांतर्गत मनोरुग्ण यांचे असलेले अधिकार व सदर मनोरुग्ण हे समाजास घातक कृत्य करीत असल्यास त्या संबंधाने न्यायालयाची व प्राधिकृत इसमाची काय भूमिका असेल याविषयी सविस्तर विवेचन केले. यानंतर अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश सुमित छल्लाणी यांनी मानसिक आरोग्याचे महत्व अधोरेखित केले. मानसिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असून आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीने वाढत्या चढाओढीला यशस्वीपणे तोंड देवून मानसिक आरोग्याचे योग्य ते संतुलन राखावे असे आवाहन केले. तसेच वैल्कपिक वाद निवारण पद्धती व त्याचे फायदे, मध्यस्थी केंद्रामार्फत समजुतीने वाद मिटविण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन व आभार अ‍ॅड. पंकज काळे यांनी मानले. शिबिरास चांदवड वकील संघाचे सदस्य, वकील, महिला व पुरुष पक्षकार उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 8:10 am

पिंपळदरीत पावसाच्या हजेरीने मका, सोयाबीनचे झाले नुकसान:ऐन दिवाळीत पावसाचा शेतकऱ्यांना बसला फटका, शेतकरी चिंतेत‎

पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सोंगणी करून टाकलेल्या मका व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दिवाळीचा सण असतानाच सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरीसह परिसरात मंगळवारी ५ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सोंगणी करून टाकलेल्या मका व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात अतिवृष्टी जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली होती. या अचानक आलेल्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातुर आहे. राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून काल अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातून मान्सून गेला असला तरीही पुढील काही दिवस राज्यात पावसाचे ढग कायमच राहणार आहेत. १९ ऑक्टोबरपर्यंत पाऊस असणार आहे, असे हवामान अंदाजानुसार वर्तविण्यात येत आहे. पुन्हा पाऊसशेतकऱ्यांच्या शेतीपिकांसह नुकसान झाले होते. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकटात असताना आता पुन्हा एकदा पावसाने अडचणीत आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आवकाळी पावसामुळे ढगाळ वातावरण मध्येच होणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहेत. यासाठी जमा केलेल्या मकाची गंजी झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला होता. तसेच रात्रभर पासून ते दिवसभर ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला होता.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:50 am

जरंडी गावाचा प्लास्टिकमुक्ती निर्णय; कचरा संकलनासाठी सरसावले गाव:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू‎

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने २० ऑक्टोबर रोजी प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली. गावात दिवाळीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्लास्टिक पत्रावळ्या ऐवजी स्टीलच्या ताटाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. जरंडी गावात विविध सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्त जेवणाकरिता प्लास्टिकच्या पत्रावाळ्या, प्लास्टिक द्रोण आणि प्लास्टिक ग्लासचा सर्रास वापर होत होता. कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा तयार होऊन तो गटारीमध्ये जाऊन पर्यावरणाचे नुकसान होत असे. ही बाब ग्रामस्थांनी लक्षात घेत गाव प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी तर प्लास्टिकमुक्तीची घोषणा करत अंमलबजावणी सुरू केली. दरम्यान, ग्रामपंचायतीने प्लास्टिक मुक्त जरंडी स्वच्छ जरंडी हा नारा दिला आहे. शाळांमध्ये विद्यार्थी वर्गाला प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गावात नियमित प्रबोधन फलक आणि भित्तीचित्रे लावून जनजागृती केली जाणार आहे.दिवाळी सणाच्या जेवणासाठी ग्रामस्थांना स्टीलच्या ताटाचा वापर करण्याचा निर्णय केला. स्वच्छता अभियानाशी जोडलेला उपक्रम दिवाळी सणाचा दिवशी (दि.२०) गावभर स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. ग्रामपंचायतीने जाहीर केले की, पुढील काळात गावात प्लास्टिकचा वापर आढळल्यास दंड आकारण्याचा कठोर निर्णयही ग्रामस्थांनी घेतला आहे. भविष्यातील योजना ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे की, आगामी सर्व धार्मिक, सामाजिक, आणि शासकीय कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद राहील. तसेच गावात घनकचरा व्यवस्थापन केंद्र, कंपोस्ट खड्डे, आणि हरित ग्राम योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जरंडी ग्रामपंचायत केवळ प्लास्टिकमुक्त बनली नाही, तर इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:49 am

सोयगाव शिंदोळ‎मध्ये ग्रामस्वच्छता अभियान‎:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबविणार

महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात’ अनेक गावे हिरीरीने सहभागी होत आहेत. याच धर्तीवर मौजे-शिंदोळ येथील ग्रामपंचायत कार्यालय, शिंदोळ देखील विविध प्रकारचे उपक्रम राबवत अभियानाच्या मार्गदर्शीकेच्या माध्यमातून आदर्श गावाची कास धरत आहे. याचाचं एक भाग म्हणून गावातील सर्व तरूणांचे विविध विषयांवर समित्यांचे गठण करण्यात आले आहे. त्यातीलच ग्राम स्वच्छता व आरोग्य समितीच्या माध्यमातून एक दिवस गावासाठी या संकल्पनेतून दर सोमवारी राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याचे ठरविले होते. त्या अनुषंगाने काल गावातील जवळपास ४५-५० तरूणांच्या एकत्रित प्रयत्नाने गावात स्वच्छता अभियान राबवून ग्रामपंचायत कार्यालय परिसर, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, सार्वजनिक परिसर, रस्ते यांची स्वच्छता करण्यात आली. चौकाचौकात कचरा गोळा करण्यासाठी कचरा पेटींची व्यवस्था करण्यात आली व जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गावात एक घंटागाडी व सुसज्ज असे कचरा संकलन व व्यवस्थापन केंद्राची सोय देखील करण्यात आली. त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिकांना व व्यावसायिक दुकानदारांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर हळूहळू कमी करत प्लास्टिक बंदीसाठी आवाहनही केले आहे. त्याचप्रमाणे दररोज जी महिला आपल्या घराचे अंगण व परिसर स्वच्छ ठेवेल अशा घरांचे परिक्षण करुन साप्ताहिक निकाल जाहीर करून घरातील महिलेला बक्षीस देखील जाहीर करणार असल्याचे अभियानाचे समन्वयक सामाजिक कार्यकर्ते जगदीश सोनवणे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात वनराई बंधारे बांधण्याचे ''ग्राम वन व कृषी विकास'' समितीने ठरविले आहे. स्वच्छतेसाठी मिळेल बक्षीस

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:49 am

कवडीमोल भाव, शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकला झेंडू:फुलंब्री तालुक्यात 5 रुपये किलोंचा भाव , प्लास्टिकच्या चायनीज फुलांना मागणी

फुलंब्री तालुक्यातील अनेक शेतकरी फुल शेतीकडे वळले असून, दसरा व दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड करण्यात आली होती. परिणामी, दिवाळीत झेंडूची आवक वाढल्याने भाव घसरले. ५ रुपये किलोचा मिळाल्याने शेतकऱ्यांवर झेंडूची फुले रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. फुलंब्री तालुक्यातील शेतकरी हे पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग करत आहे. फुल शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यावर्षी झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. दसरा व दिवाळी या सणांमध्ये झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, यावर्षी झंेडू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा साधा खर्चही निघाला नसून, दिवाळीच्या सणामध्ये झेंडू विकले नाही. त्यामुळे झेंडू रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. यंदा शेतकऱ्यांनी दसरा-दिवाळीच्या भरवशावर मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली. यासाठी प्रतिरोप ५ रुपये प्रमाणे खरेदी केले. खत, आैषधांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला. परंतु, भाव नसल्याने खर्च देखील निघाला नाही. बाजारात प्लास्टिकची चायनीज फुले ही आकर्षक दिसत असल्याने नागरिक या फुलांच्या माळी घराला किंवा गाडीला बांधतात. यामुळे फुलांची मागणी घटली आहे. सिल्लोड | शहरात झेंडूच्या फुलांना भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी झेंडूची फुले अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली. दसरा सणाच्या वेळी ५० ते १०० रुपये किलो विक्री झालेल्या झेंडूच्या फुलांना दिवाळीच्या सणात कवडीमोल भाव मिळाला. शेतकऱ्यांनी दुपारी शहरात विक्रीसाठी झेंडूच्या फुलांनी भरून आणलेल्या पिशव्या तेथेच फेकून दिल्या. भाव नसल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. भाव न मिळाल्याने रस्त्यावर फेकावी लागली फुले मी मागील २ वर्षांपासून पारंपरिक पिकाला फाटा देत दसरा व दिवाळीसाठी झेंडूच्या फुलांची लागवड करत आहे. दिवाळीसाठी दोन दिवसांअगोदरच झेंडूची फुले तोडून त्याच्या माळी तयार केल्या. परंतु यावर्षी झेंडूचा साधा खर्चही निघाला नाही. छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीसाठी नेलेली झेंडूची फुले रस्त्यावर फेकून द्यावी लागली. - भगवान काळे, शेतकरी

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:48 am

घाटनांद्रा येथे घरासमोर रांगोळी काढून लक्ष्मीचे पूजन:बाजारात खरेदीला गर्दी, महिलांनी सडा टाकून सजवले अंगण, पावसामुळे बळीराजा संकटात‎

दिवाळीचा सण मंगळवारी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला. घरोघरी महिलांनी सडा टाकून अंगण सजवलं. रांगोळ्या काढून सोनपावलांनी येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत केलं. लक्ष्मीपूजन करून दिवाळी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठेत सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी होती. पणत्या, बोळके, लाह्या, बत्ताशे, लक्ष्मीच्या मूर्ती, आंब्याच्या पानांचं तोरण, झेंडूची फुलं, आकाशकंदील, फटाके, रंगीबेरंगी रांगोळी नागरिकांनी खरेदी केल्या. केरसुणीला लक्ष्मी मानल्यामुळे महिलांनी केरसुण्यांसाठीही गर्दी केली. संध्याकाळी जान्हवी जोशी, प्रियंका चौधरी, रेणुका सनान्से, स्नेहल सोनवणे, कोमल बारस्कर, पूजा गुळवे, संध्या मोरे या मुलींनी अंगणात मोठ्या रांगोळ्या काढून लक्ष्मीचं स्वागत केलं. या रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिक थांबत होते. सायंकाळी व्यापाऱ्यांनी संजय शास्त्री गुरुजींच्या मंत्रोच्चारात प्रतिष्ठानांमध्ये व घरोघरी सपत्निक लक्ष्मी व कुबेर पूजन केलं. सुख, समृद्धी, शांती व धनधान्य मिळावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. बच्चेकंपनीने नवीन कपडे घालून फटाक्यांची आतषबाजी केली. फुलबाज्या, फुलझडी, झाड, चक्री फोडण्यात लहान मुलं मग्न होती . रात्री उशिरापर्यंत आकाशात फटाक्यांची सप्तरंगी उधळण सुरू होती. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे अनेकांनी उधार उसनवारी करून दिवाळी साजरी केली. वर्षातील मोठा सण असल्यामुळे नागरिकांनी कर्ज काढूनही सण साजरा केला. यावेळी कुटुंब उपस्थित होते. झेंडूच्या फुलांची मोठी आवक यावर्षी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी झेंडुची फुले मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आली होती. फुलाला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. ३० ते ४० रुपये प्रमाणे विक्री होणारी फुले १५ ते २० रुपये किलोने विकावी लागली.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:47 am

अनुदानासाठी टेंभापुरीला काळी दिवाळी साजरी:काळ्या टोप्या घालून शासनाचा केला निषेध‎

शासनाने अतिवृष्टी अनुदान, पीकविमा, कर्जमाफीसह इतर दिलेली आश्वासने न पाळल्याच्या निषेधार्थ गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी येथील शेतकऱ्यांनी मंगळवारी काळी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी डोक्यावर काळ्या रंगाच्या काळ्या टोप्या घालून शासनाचा जाहीर निषेध केला. “लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने वारंवार दिलेली आश्वासने हवेतच राहिल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी अनुदान जमा करून पीक विमा आणि कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना ओळखून त्वरीत निर्णय घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी राहुल ढोले, सरपंच धनंजय ढोले, बद्रीनाथ ढोले, संतोष खवले, बद्रीनाथ गुंजाळ, रखमाजी ढोले, रमेश खवले, अनिल खवले, कृष्णा ढोले, दिनकर ढोले, बंडू ढोले, सुनील ढोले, अक्षय ढोले, रामकिसन ढोले, सतीश मोहरे, बाबासाहेब इंगळे, उद्धव ढोले, ज्ञानेश्वर इंगळे, संतोष ढोले, सुनील ढोले, रवींद्र गुंजाळ, ज्ञानेश्वर ढोले, बाळू ढोले, दादासाहेब ढोले यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:47 am

वासडी मंडळातील शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा:शेतकऱ्यांना उसनवारी करून साजरी करावी लागली दिवाळी, मदत मिळण्याची अपेक्षा‎

अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. ही मदत दिवाळीअगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाईल, असे सांगण्यात आले होते, परंतु कन्नड, वासडी, खातखेडा महसूल मंडळांसह इतर सर्वच मंडळांतील शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना उसनवारी करूनच दिवाळी साजरी करावी लागली. शासन अनुदानाची रक्कम खात्यावर कधी टाकते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. यंदा ऐन पिके काढणीला आली आणि तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कपाशी, सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी जमिनी देखील खरडून गेल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून लागवडीवर केलेला खर्च देखील निघाला नाही. शासनाने मदतीची घोषणा केली. ही मदत जाहीर करताना एनडीआरएफचे नियम डावलून अनुदान जाहीर केल्याचे शासनाकडून सांगण्यात आले, परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात हेक्टरी १३,५०० रुपये असलेली अनुदानाची मर्यादा कमी करून ती हेक्टरी ८५०० रुपयांवर आणली. त्यातच प्रतिगुंठा ८५ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर अनुदान मिळणे अपेक्षित होते, परंतु ते अद्यापही मिळाले नाही. शेतकऱ्यांना उसनवारी करून दिवाळी साजरी करावी लागली. दरम्यान, तातडीने शेतकऱ्यांना अनुदान देऊन दिलासा द्यावा. लवकरच शेतकऱ्यांना अनुदान मिळेल सुट्टी असतानाही आम्ही रात्रंदिवस ३ वाजेपर्यंत काम करून यादी तयार केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे तलाठी नीलेश गवळी यांनी सांगितले. दरम्यान, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना विमा द्यावा.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:46 am

50 लाखांच्या चोपड्यांची विक्री; पूजनासाठी 3 मुहूर्त:डिजिटल युगातही परंपरेचा मान, पाडव्याच्या मुहूर्तावर झाली विक्री

ऑनलाइन व्यवहारांचा वाढता काळ असूनही, शहरात आजही पारंपरिक वहीपूजन आणि नव्या चोपड्यांना महत्त्व दिले जात आहे. आज (२२ ऑक्टोबर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर व्यापारी वर्गाकडून पारंपरिक पद्धतीने ‘वहीपूजन' होणार आहे. यासाठी पहाटे ३ ते सकाळी ६, सकाळी ६.३० ते ९.३० आणि सकाळी ११ ते दुपारी १२.३० असे तीन शुभ मुहूर्त असल्याचे पं. अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या पारंपरिक खरेदीमुळे शहरात तब्बल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चोपड्यांची आणि रोजमेळाच्या वह्यांची विक्री झाली आहे, ज्यामुळे या डिजिटल युगातही परंपरेचा वारसा मोठ्या उत्साहाने जपला जात आहे. इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो’ एका सणातील लोकाश्रयाची भावना पाडव्याच्या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला पाताळात गाडल्याची आख्यायिका आहे. बळीराजाला पाताळ राज्य दिले गेले आणि विष्णूंनी त्यांच्या दरवाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली. बळी राजा हा शेतकरी राजा होता, जो प्रजेची काळजी घेत असे. त्यामुळे आजही पाडव्याच्या दिवशी इडापिडा टळो, बळीचे राज्य येवो’ ही म्हण म्हणण्यात येते. या दिवशी महिला पतीला किंवा वडिलांना ओवाळतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. रोख व्यवहाराची नोंद केली: डिजिटलच्या युगातही व्यापारी वही पूजनाला विशेष महत्व देतात. शहरात याची १०० दुकाने आहेत. याठिकाणी लक्ष्मीचे फोटो असलेले एप्रिल ते मार्च वर्षाची वही, दिवाळी ते दिवाळी अशाप्रकारच्या चोपड्यांची विक्री होत आहे. २०० ते ४०० रुपयांपर्यंत वहीची खरेदी होत आहे. यात रोख व्यवहाराची नोंद केली जाते. शिवलेली व पुठ्याचा वापर केलेल्या वह्या असतात. सदरील चोपड्यामध्ये तारखा नसतात. घरोघरी वही पूजनासाठी ३० रुपयांपासून १२५ रुपयांपर्यंत वह्या आहेत. उधारी नोंदणी इंग्रजी आणि मराठीतील खाता बुक वही १०० ते १२०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. रोजमेळ वहीला मागणी दिवाळी पाडव्यापासून व्यापारी वर्गाची हिशेबाचे वर्षाची सुरुवात होते. या दिवशी खाते वहीचे पूजन केले जाते. यंदाही शहरात ५० लाखांहून अधिक रुपयांच्या चोपड्यांची विक्री झाली. यातही रोजमेळ वहीची मागणी जास्त होती. आर. एल. दौलताबादकर, विक्रेता पूजनासाठी लागणारे खाते वही. या वहिला दिवाळीत खूप महत्त्व असते.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:39 am

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:महाराष्ट्रातील कपड्यांच्या बाजारात 25 टक्के वाढ, दिवाळीचा हंगाम लाभदायी

दिवाळी हंगामात महाराष्ट्रातील कपड्यांच्या बाजारात सुमारे २५% वाढ नोंदवली गेली आहे. कॉटन फॅब्रिकची मागणी विशेषतः वाढली असून, प्लेन, चेक्स आणि लायनिंग पॅटर्नला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वाढीनंतरही लहान व्यापाऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. भारत मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष विनोद गुप्ता यांनी सांगितले की, मोठे व्यापारी हजारो डिझाईन्ससह ग्राहकांना आकर्षित करत आहेत, तर लहान व्यापारी मर्यादित डिझाइन्समुळे स्पर्धेत मागे पडत आहेत. १९६० सालापासून सक्रिय असलेली ही संघटना सध्या ११०० व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करते.क्लोदिंग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय) चे चीफ मेंटर राहुल मेहता यांच्या मते, यंदाच्या सणासुदीच्या हंगामात कपड्यांच्या बाजाराची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिली. इंडियन एथनिक आणि फेस्टिव्ह वेअर सेगमेंट मध्ये विक्रीत घट झाली असून त्यामागचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले दर आणि जीएसटीमध्ये झालेली वाढ आहे. मेहता सांगतात की, २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कॅज्युअल वेअर मध्ये ५-७% वाढ दिसली, तर त्यापेक्षा जास्त किंमतीच्या उत्पादनांमध्ये १०-१५% घट झाली. याचा परिणाम विशेषतः ४ हजार ते ७ हजारांच्या रेंजमध्ये काम करणाऱ्या ब्रँड्सवर झाला, जसे की किलर, बीबा, डब्ल्यू आणि स्पायकर. त्यांनी स्पष्ट केले की, जीएसटी आणि खर्चात झालेल्या वाढीमुळे या ब्रँड्ससाठी ६-७% वाढही आव्हानात्मक ठरत आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे विक्रीवर अधिक दबाव आला, तर पश्चिम आणि मध्य भारतात परिस्थिती तुलनेने स्थिर राहिली. मेहता यांच्या मते, लोअर प्राइस सेगमेंट सध्या स्थिर आहे, परंतु हाय-एंड सेगमेंटला पुनरुज्जीवित करण्यासाठी किंमत धोरण आणि कर संरचनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. जीएसटी बदलांचे परिणाम पॉलिस्टर मिक्स धाग्यांवरील जीएसटी १२% वरून ५% केल्याने खर्च घटला आणि विक्रीत वाढ झाली. मात्र, २५०० रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कपड्यांवर जीएसटी १२% वरून १८% केल्याने महागड्या कपड्यांची मागणी घटली. अशी मागणी आहे की संपूर्ण वस्त्रोद्योगाला ५% स्लॅबमध्ये आणावे. ऑनलाइन डिस्काउंट्सचा दबाव... फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरन शाह यांनी सांगितले की, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि मोठ्या ब्रँड्सकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींमुळे पारंपरिक बाजारावर दबाव वाढला आहे. विक्री आता अनेक चॅनेल्समध्ये विभागली गेली आहे. शाह यांच्या मते, ज्वेलरी, सोने-चांदीची मागणी वाढली असून, शेअर बाजारातील सुधारणा खरेदीच्या मूडला चालना देत आहे. मात्र, पारंपरिक रिटेलर्सनी बदलत्या ट्रेंड्सशी जुळवून घ्यावे लागेल. २५०० रुपयांखालील कॅज्युअल वेअरमध्ये ५-७% वाढ- राहुल मेहता मेहता सांगतात की, २५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या कॅज्युअल वेअर मध्ये ५-७% वाढ दिसली, तर त्यापेक्षा जास्त किंमतीच्या उत्पादनांमध्ये १०-१५% घट झाली. याचा परिणाम विशेषतः ४ हजार ते ७ हजारांच्या रेंजमध्ये काम करणाऱ्या ब्रँड्सवर झाला, जसे की किलर, बीबा, डब्ल्यू आणि स्पायकर. त्यांनी स्पष्ट केले की, जीएसटी आणि खर्चात झालेल्या वाढीमुळे या ब्रँड्ससाठी ६-७% वाढही आव्हानात्मक ठरत आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे विक्रीवर अधिक दबाव आला, तर पश्चिम आणि मध्य भारतात परिस्थिती तुलनेने स्थिर राहिली. मेहता यांच्या मते, लोअर प्राइस सेगमेंट सध्या स्थिर आहे, परंतु हाय-एंड सेगमेंटला पुनरुज्जीवित करण्यासाठी किंमत धोरण आणि कर संरचनेत सुधारणा करणे आवश्यक आहे. बाजारातील बदलता ट्रेंड ग्राहकांची पसंती आता फॅन्सी पॅटर्नऐवजी बेसिक आणि क्वालिटी फॅब्रिककडे वळली आहे. १००% कॉटन आणि लिनन ब्लेंड्सची विक्री वाढली आहे. दुकानांना भेट देणारे ग्राहक कमी झाल्याने व्यापाऱ्यांना डायरेक्ट मार्केटिंगवर भर द्यावा लागत आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:10 am

टाटा ट्रस्टमध्ये सुधारणा... विश्वस्त इच्छा असेपर्यंत राहू शकतात:श्रीनिवासन बनले तहहयात सदस्य, नव्या समितीत नोएल, मिस्त्री, विजय सिंह यांचा समावेश

प्रतिष्ठित टाटा समूहाची दिशा ठरवणाऱ्या टाटा ट्रस्टच्या प्रशासनात एक ऐतिहासिक बदल झाला आहे. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पारित झालेल्या एका ऐतिहासिक ठरावानंतर, विश्वस्तांसाठीची मुदत मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. परिणामी, वेणू श्रीनिवासन यांची या ट्रस्टचे तहहयात विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वेणू श्रीनिवासन यांचा कार्यकाळ २३ ऑक्टोबर रोजी संपणार होता. ऐतिहासिक ठरावातून ही मुदत काढण्यात आल्यामुळे ते या मुदतीनंतरही तहहयात विश्वस्त बनून राहतील. श्रीनिवासन यांच्यासोबतच मेहली मिस्त्री यांचाही तहहयात विश्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मिस्त्री यांचा कार्यकाळ २८ ऑक्टोबर रोजी संपणार होता. टाटा ट्रस्टमधील मतभेदांबाबतच्या चर्चा जोर धरत असताना हा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे, जिथे एक गट नोएल टाटा यांच्याशी जुळलेला आहे. टीव्हीएस ग्रुपच्या एमेरिट्स चेअरमन म्हणून श्रीनिवासन यांची नियुक्ती एकमताने झाली, असे एका सूत्राने सांगितले. उल्लेखनीय बाब म्हणजे, १५६ वर्षे जुन्या टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा ६६% हिस्सा आहे. नव्या समितीत नोएल, मिस्त्री, विजय सिंह यांचा समावेश १७ ऑक्टोबर २०२४ रोजी ट्रस्टने नवीन नियम लागू केला ज्याअंतर्गत विश्वस्तांना विशिष्ट कालावधीनंतर पद सोडण्याची आवश्यकता नसेल. ते ७५ वर्षांचे होईपर्यंत किंवा त्यांना पाहिजे तोपर्यंत ते पदावर राहू शकतात. रतन टाटा यांनी ट्रस्टच्या नेतृत्वातून पायउतार झाल्यानंतर ट्रस्टची सातत्य आणि स्थिरता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ट्रस्ट आणि टाटा सन्स यांना जोडणारी एक केंद्रीकृत रचना तयार करण्यात आली आहे. नोएल टाटा, मेहली मिस्त्री, वेणू श्रीनिवासन, विजय सिंह यांचा समावेश असलेली ही समिती टाटा सन्सच्या शेअरहोल्डिंग व ऑपरेशनल बाबींवर निर्णय घेईल.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 7:04 am

लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावरअवकाळी पावसाने पाणी:संभाजीनगरसह जालना, धाराशिव, बीड, नाशिक, धुळे जिल्ह्यात हजेरी; नांदेडात वीज पडून तरुण ठार

नैऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४ दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अवकळी पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एक ठार झाला. छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात सायंकाळी सरी कोसळल्या. पैठण, कन्नड, सिल्लोड या तालुक्यांत पावसामुळे कपाशी व मका या पिकांना फटका बसण्याची भीती आहे. तसेच नाशिकच्या निफाड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरात मात्र अंशत: ढगाळ वातावरण होते. खान्देशात धुळे व एरंडोल येथे तुरळक पाऊस झाला. वादळी वाऱ्याची शक्यता बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील ४ दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विशेषतः मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई, कोल्हापूरमध्येही पावसाने लोकांचा खोळंबा मुंबई, नवी मुंबई, कल्याण, बदलापूर, पनवेलसह ठाणे, रायगड, कोल्हापूर यांसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. कोल्हापूरमध्ये पावसामुळे पूजा साहित्य, फुलांच्या विक्रीवर परिणाम झाला. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नांदेड : वीज पडून १ मृत्यू नांदेडच्या वाजेगाव येथे मंगळवारी सायंकाळी शेख अल्ताफ शेख खय्युम (३०, रा. मिल्लतनगर) याचा मृत्यू झाला. तो वाजेगाव येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्या वेळी वीज पडून त्याचा मृत्यू झाला. बीडमध्ये हलका पाऊस बीड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. आष्टी, शिरुर, गेवराई तालुक्यात पावसाची नोंद झाली. धाराशिवला रस्त्यांवर पाणी धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मंगळवारी धाराशिव, उमरगा, तुळजापूर, कळंब तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस झाला. धाराशिव शहरात दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. झेंडूची फुले व दीपावलीचे अन्य साहित्य विक्रेते व ग्राहकांची तारांबळ उडाली. जालन्यात तुरळक सरी... जालना शहरात काही भागात तुरळक सरी कोसळल्या. दुपारपर्यंत शहरात कडक ऊन होते. दुपारी २ वाजेनंतर ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ ते ५ या वेळेत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 6:59 am

सरकारने दोषी शोधून जनतेची माफी मागावी- सिद्दिकी:11 जुलै 2006 रोजी मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 24 वर्षीय सिद्दिकी यांना झाली होती अटक

मुंबईत ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोटात १७९ नागरिकांचे बळी गेले. त्यात २४ वर्षांच्या एहतेश्याम सिद्दिकी यांना अटक करण्यात आली. २०१५ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांच्यासह सर्व १२ जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यांनी तुरुंगातील अनुभवांविषयी लिहिलेल्या ‘हॉरर सागा’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यांची ही विशेष प्रश्न : मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात १७९ नागरिकांचा बळी गेला. त्यातून तुमची निर्दोष सुटका झाली. मग खरे आरोपी कोण? उत्तर : हे सरकारचे काम आहे. त्यांनी त्यांनी व तपास यंत्रणा यांनी मिळून हे काम केले आहे. आमच्या १२ जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, पण १७९ जीव गेलेल्या कुटुंबाचा विचार सरकारने केला नाही. पहिल्या दिवशीपासूनच ही केस भरकटलेली होती. यात गुन्हा सिद्ध होण्याची कुठलीही संधी नव्हती हे स्पष्ट असताना तपास पुढे गेला. त्यामुळे सरकार व तपास यंत्रणा यांनी देशाची माफी मागायला हवी. आम्हाला अटक करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. कोणताही पुरावा नसल्याचे मला निश्चितपणे माहिती होते. मृतांच्या कुटुंबीयांनी न्यायासाठी शासनाचे दार ठोठावले पाहिजे. प्रश्न : केमिकल इंजिनिअर होण्याचे स्वप्न तुम्हाला दहशतवादी ठरवण्यापर्यंत घेऊन गेले का? उत्तर : केमिकल इंजिनिअर होत असतानाच मी एका प्रकाशनाचेदेखील काम सुरू केले होते. नुकतेच माझे लग्न झाले होते. कदाचित सहाच महिने झाले असावेत. २००६ बॉम्बस्फोटात अटक झाल्यावर पहिल्यांदा पोलिस अधिकाऱ्याने कस्टडीमध्ये पहिल्यांदा दहशतवादी म्हणून संबोधले. त्या वेळीच मी त्यांना ‘ही तुम्ही शिवी देत आहात. मी दहशतवादी नाही,’ हे सांगितले होते. सरकारी यंत्रणेत हाच मोठा दोष आहे. त्यांनी कामाला ठेवलेले अधिकारी जे काही म्हणतात तेच शासन ऐकते. त्यामुळे दुसरी बाजू समोर येण्यास अडचणी येतात. प्रश्न : बॉम्ब बनवण्याचे, हाताळण्याचे आरोप तुम्ही फेटाळले, त्याचे काय पुरावे होते? उत्तर : माझ्यावरील आरोप अगदीच हास्यास्पद होते. मी कधी बॉम्ब पाहिलाही नव्हता, बॉम्बच न बघितलेला माणूस बॉम्ब कसा बनवू शकेल? एवढेच नव्हे तर कधी बंदूकदेखील हाताळली नाही. केवळ महाविद्यालयीन वयात प्रशिक्षण म्हणून ७ दिवसांसाठी एका प्रशिक्षण शिबिरात गेलो होतो. त्या वेळी एअरगन चालवायला शिकलो होतो. पण तो कॉलेजच्या शिबिराचा भाग होता. हे आरोप पुढे करण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे सेशन कोर्टामध्ये पोलिस अधिकाऱ्यांचा थेट न्यायाधीशांसोबत संपर्क येतो. आमच्या केसमधील एक अधिकारी सतत कोर्टात असायचा. तो केवळ न्यायाधीशांच्या सोबत ओळख वाढवण्यासाठीच येत होता. त्यांच्याशी ओळख वाढवून आम्हीच कसे बरोबर आहोत हे सिद्ध करतात. अनेक न्यायाधीश या ‘चक्कर’मध्ये अडकतात. हीच गोष्ट उच्च न्यायालयात घडत नाही. तिथे न्यायाधीश कोणासाठी फारसे उपलब्ध नसतात. जे आहे ते खुल्या न्यायालयात होते. त्यामुळे निःपक्ष निकाल समोर येतो. प्रश्न : २००१ मध्ये सिमी संघटनेच्या संपर्कात आल्याने हे सर्व घडले असावे का? उत्तर : पोलिसांना खरे आरोपी सापडत नाहीत तेव्हा ते निर्दोष लोकांना अटक करतात. सिमीचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता. मात्र, त्यानंतर अनेक वेळा वेगवेगळ्या गुन्ह्यांत सुरुवातीच्या काळात आम्हाला ताब्यात घेतले जायचे आणि दोन ते तीन दिवसांत सोडून दिले जायचे. या वेळी तसे घडले नाही आणि तब्बल १९ वर्षे लागली. काही अधिकारी हे मुद्दामहून अनेकांना खोट्या केसेसमध्ये अडकवत असतात. घाटकोपर हल्ला, मुलुंड हल्ला या घटनांतदेखील आरोपी निर्दोष सुटले आहेत. प्रश्न : १७९ पीडितांच्या कुटुंबाला आणि देशाला काही सांगायचे आहे का? उत्तर : मृतांच्या कुटुंबाने सरकारकडे, न्यायालयाकडे न्यायाची मागणी करायला हवी. न्यायव्यवस्थेनुसार कुठल्याही प्रकरणात संशयित आरोपी पकडल्यावर त्याच्यावर गुन्हा सिद्ध होईपर्यंत तुरुंगात खितपत पडण्याची वेळ येऊ नये. ट्रायल सुरू असताना त्याला संशयित म्हणून अनेक संधी उपलब्ध करून द्याव्यात. आता मी निर्दोष आहे, पण माझ्या हातात फार कमी संधी उपलब्ध आहेत. तुरुंग व्यवस्था या भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 6:50 am

सायबर चोरटे चक्क एआय चॅटबाॅटचाही वापर करून लोकांना गंडा घालताय:पुणे येथील क्विक हिल टेक्नाॅलाॅजीने केले महत्त्वपूर्ण संशाेधन

सायबर चोरटे दरराेज शेकडो नागरिकांचे कोट्यवधी रुपये लुटत आहेत. त्यांच्या मोड्स ऑपरेंडीविषयी पुण्यातील क्विक हील टेक्नाॅलाॅजीने सर्व्हेक्षण केले. तेव्हा असे समोर आले की, सायबर गुन्हेगार बँका, सरकारी एजन्सी, डिलिव्हरी सर्व्हिसेस अशा विश्वासार्ह एजन्सीचा वापर करुन त्यांची अचूकपणे नक्कल करत आहेत. एकाचवेळी हजाराे नागरिकांना गंडा घालण्यासाठी पूर्व प्रशिक्षित स्वयंचलित लँगवेज माॅडेल्सचा गैरवापर करु लागले आहेत. अर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित चॅटबाॅटचाही वापर करत आहेत. सायबर सुरक्षा करणाऱ्या प्रयाेगशाळांमध्ये माेठ्या प्रमाणात दर महिन्याला एआय फसवणुकीच्या तक्रारींचा आेघ वाढू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. पारंपरिक पद्धतीने फसवणुकीपेक्षा आता चोरटे स्वयंचलित यंत्रणा या ठराविक वेळेतील संवादाशी जुळवून घेणाऱ्या नागरिकांना शोधत आहेत. त्यात फसल्या जाणाऱ्यांना प्रतिसादांच्या आधारे खाेट्या डिलिव्हरी फी पासून ते खाेटा दंड लागू करण्यापर्यंतचे मार्ग वापरत आहेत. सर्वेक्षणात समोर आलेल्या बाबी अशा }औैद्याेगिक स्तरावरील स्वयंचलित यंत्रणा एकाच सर्व्हरवरुन एकावेळी हजाराे फसवे संवाद घडवून आणू शकते. } बँका खात्यामध्ये काेणीतरी शिरकाव केल्याचे भासवून बनावट कस्टमर केअर निर्माण करुन आर्थिक व्यवहाराची गाेपनीय माहिती घेत घाेटाळे केले जात आहेत. }आप्तकालीन परिस्थिती असल्याचे देखील भासवून कुटुंबीय किंवा ओळखीच्या व्यक्तीचा आवाज नक्कल करण्यासाठी व्हाॅइस क्लाेनिंग तंत्रज्ञानाचा वापर करुन फसवणूक होत आहे. } विविध ब्रॅण्डशी साधर्म्य असलेल्या डाेमेन्सचा, ई-मेलची अल्पावधीत निर्मिती करुन फसवणूक केली जात आहे. } फ्राॅड जीपीटी सारखी एआय साधने सफाईदार फिशिंग किटस निर्माण करुन बँकिंगमध्ये फसवणुकीचे लक्ष्य करण्यासाठी वेगवेगळया सायबर हल्ल्यांची रचना निर्माण करु लागले आहे. } वैयक्तिक माहिती व पेमेंट पध्दतीची माहिती चाेरणारे फसवे काॅल करुन खाेटी विश्वासार्हता निर्माण करुन लक्ष्य करत आहे. फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय }ओटीपी, बँकिंग माहिती, पासवर्ड मागणाऱ्या काेणत्याही चॅटला उत्तरे देऊ नये. } वैध फर्म्स या संवेदनशील डेटा चॅट इंटरफेसच्या माध्यमातून गाेळा करणे टाळतात. हे लक्षात ठेवावे. } विचित्र व्याकरणाची पध्दत, विचारपूर्वक चर्चा हाेणे टाळण्यासाठी तयार केलेली तातडीची भाषा वापरणे व चुकीच्या स्पेलिंग असलेल्या संशयास्पद युआरएलकडे वळविणे या संभाव्य फसवणुकीची सूचना देणाऱ्या खुणा आहे. } शंका असलेले काेणतेही व्यवहार करु नये. आर्थिक व्यवहारांपूर्वी संबंधितांची खातरजमा करावी.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 6:42 am

भाजप अध्यक्षपद सोडूनही मंत्री शेलार मनपात सक्रिय:जिथे ताकद तो वॉर्ड सोडणार नसल्याचा केला दावा

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी आता आभार प्रदर्शन अभियानाच्या नावाखाली थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणनीती हाती घेतली आहे. वरकरणी माजी मंडळ अध्यक्षांचे आभार मानले जात असले तरी पडद्याआड शेलार यांनी मुंबईतील सर्व २२७ वॉर्डांमधील भाजपचा खरा ‘ग्राउंड रिपोर्ट’ आणि ‘पॉलिटिकल स्कोरकार्ड’ जमा करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांचा जनाधार मर्यादित असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे असलेले शेलार यांच्या खांद्यावरच मुंबईतील वॉर्ड वाटप आणि निवडणुकीची धुरा सोपवण्यात आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सोमवारी शेलार यांनी या अभियानाचा श्रीगणेशा उत्तर मुंबईतून केला. माजी मंडळ अध्यक्षांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले की, माझ्या अध्यक्षपदाच्या काळात या कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले, त्यांचे आभार मानणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. शिंदेसेनेवर दबाव आणणारया भेटींमध्ये अनेक वॉर्डांमधील भाजप कार्यकर्ते शेलार यांच्यासमोर एकच मागणी करत आहेत की, ज्या वॉर्डात भाजपची ताकद आहे तो वॉर्ड कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटासाठी सोडू नये. कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे दिवाळीनंतर वॉर्ड वाटपाच्या वेळी भाजप शिंदेसेनेवर दबाव आणणार हे स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 22 Oct 2025 6:38 am

भारताला अद्याप आशियाई चषकाची प्रतीक्षाच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील टीम इंडियाने पीसीबी अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. यानंतर मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन दुबईच्या हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर पाकिस्तानला जाण्यापूर्वी नक्वी यांनी ती ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या कार्यालयात […] The post भारताला अद्याप आशियाई चषकाची प्रतीक्षाच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Oct 2025 1:53 am

लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरीत मंदिराची आकर्षक सजावट

बीडच्या कलाकाराने रंगीबेरंगी फुलांनी सजविले मंदिर पंढरपूर : प्रतिनिधी दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. बीड येथील भाविक अर्जुन हनुमान पिंगळे यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फूल सजावटीची सेवा अर्पण केली. या सजावटीसाठी सुमारे दोन टन विविध प्रकारची ताजी फुले वापरण्यात आली. या फुलांमध्ये कोंडा, शेवंती, अष्टर, गुलाब, ऑर्किड, अँथोनियम, जिप्स, सायकस, गुलछडी […] The post लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरीत मंदिराची आकर्षक सजावट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Oct 2025 1:50 am

भीषण अपघातात ४ भाविक ठार

उमरगा तालुक्यात अपघात, आणखी २ अपघातांत चौघांचा मृत्यू उमरगा : प्रतिनिधी देवदर्शन करून कारने आपल्या गावी बिदरकडे परत निघालेल्या चौघांवर काळाने घाला घातला. दाट धुक्यामुळे दुस-या बाजूने भरधाव येणा-या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही कार गावी जाणा-या भाविकांच्या कारला धडकली. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दाळिंब (ता. उमरगा) शिवारात ही दुर्घटना घडली. […] The post भीषण अपघातात ४ भाविक ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Oct 2025 1:47 am

ऐन दिवाळीत राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग

नागरिकांची तारांबळ, दिवाळीच्या उत्साहावर विरजण मुंबई : प्रतिनिधी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच राज्यात पावसाने उत्साहावर पाणी फेरले. राज्यात मुंबई, ठाणे, कोल्हापूर, जालना, नांदेड, रायगडसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडले. मराठवाड्यात ब-याच भागांत आणि मुंबई, कोकणसह विदर्भातही काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे आकाशदिवे भिजले, रांगोळी मोडली. त्यातच नागरिकांची […] The post ऐन दिवाळीत राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Oct 2025 1:44 am

मराठवाड्यासाठी आणखी ३४६ कोटींचा निधी मंजूर

दिवाळीनंतर मिळणार मदत, शेतक-यांच्या नशिबी प्रतीक्षाच मुंबई : प्रतिनिधी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांसाठी राज्य सरकारने ३४६.३१ कोटी रुपयांच्या मदत निधीला मंजुरी दिली. या निर्णयामुळे सुमारे ३ लाख ५८ हजार शेतक-यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, दिवाळीनंतरच शेतक-यांच्या खात्यात हे पैसे येतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांची प्रतीक्षा आणखी लांबणार आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी […] The post मराठवाड्यासाठी आणखी ३४६ कोटींचा निधी मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Oct 2025 1:43 am

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जर्मनीच्या मानद नागरिकत्वाचा तिढा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जर्मनीतील उजव्या विचारसरणीचा पक्ष अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) ने ट्रम्प यांना जर्मन जिल्ह्याच्या बॅड डर्कहेमचे मानद नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यावर २९ ऑक्टोबर रोजी निर्णय होणार आहे.एएफडीचे स्थानिक नेते थॉमस स्टेफेन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे या सन्मानास पात्र आहेत. कारण त्यांनी इस्रायल-गाझा संघर्ष संपवण्यास मदत केली आणि आठ इस्रायली आणि […] The post डोनाल्ड ट्रम्प यांच्या जर्मनीच्या मानद नागरिकत्वाचा तिढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 9:25 pm

‘आयएएफ’च्या रॅँकिंगमध्ये वाढ; घसरणीमुळे चीनचा जळफळाट!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या हवाई दलाने चीनवर मात केली आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एअरक्राफ्टची नुकतीच रँकिंग जाहीर झाली. त्यात इंडियन एअर फोर्स जगातील तिसरं शक्तीशाली हवाई दल ठरलं आहे. चीन भारताच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. टॉप पोजिशनवर अजूनही अमेरिकेचा दबदबा कायम आहे. त्यानंतर दुस-या नंबरवर रशियन एअरफोर्स आहे. चीनची घसरण चौथ्या […] The post ‘आयएएफ’च्या रॅँकिंगमध्ये वाढ; घसरणीमुळे चीनचा जळफळाट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 9:22 pm

सनाई ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान

टोकियो : वृत्तसंस्था जपानच्या राजकारणात एक ऐतिहासिक दिवस उजाडला आहे. जपानच्या संसदेने अल्ट्राकंजरवेटिव्ह नेत्या सनाई ताकाईची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या वर्षभराच्या कार्यकाळानंतर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ताकाईची यांची निवड झाली आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने जुलै २०२५ च्या निवडणुकीत पराभवानंतर सत्ता परत मिळवण्यासाठी ओसाका-स्थित जपान इनोव्हेशन पार्टीसोबत […] The post सनाई ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 9:21 pm

८ कोटीचा बनावट डाक तिकिट घोटाळा

मुंबई : वृत्तसंस्था देशभर पसरलेल्या एका हाय-प्रोफाइल बनावट डाक तिकिटांच्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. दिल्ली आणि बिहारमधून आपले नेटवर्क चालवणा-या या टोळीतील तीन आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली असून, त्यांच्या बँक खात्यातून सुमारे ८ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले आहेत. जनरल पोस्ट ऑफिसने दाखल केलेल्या तक्रारीनंतर एमआरए मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. […] The post ८ कोटीचा बनावट डाक तिकिट घोटाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 9:19 pm

‘आयएमएफ’ने बांगलादेशचे ८०० दशलक्ष डॉलर्स रोखले

ढाका : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का दिला. ‘आयएमएफ’ने घोषणा केली आहे की, बांगलादेशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पॅकेजचा सहावा हप्ता दिला जाणार नाही. ही रक्कम सुमारे ८०० मिलियन डॉलर्स इतकी आहे. गेल्या वर्षीच्या सत्तापालटानंतर, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. पुढील वर्षी देशात निवडणुका होणार आहेत. याचदरम्यान, ‘आयएमएफ’ने ही महत्त्वाची घोषणा […] The post ‘आयएमएफ’ने बांगलादेशचे ८०० दशलक्ष डॉलर्स रोखले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 9:18 pm

दिवाळीमध्ये रु. ६ लाख कोटींची उलाढाल; मेड इन इंडियाला पसंती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्री २५% जास्त होती. भारतीयांनी चिनी वस्तूंऐवजी मेड इन इंडिया वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली. द कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या अहवालानुसार, तब्बल रु. ५.४० लाख कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या, तर सेवांमुळे रु. ६५०० कोटींची उलाढाल झाली. […] The post दिवाळीमध्ये रु. ६ लाख कोटींची उलाढाल; मेड इन इंडियाला पसंती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 9:15 pm

एच-१बी व्हिसा प्रकरणी भारतीयांना मोठा दिलासा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था एच-वनबी व्हिसाचे शुल्क तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजेच ८८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. त्यामुळे भारताला या निर्णयाचा मोठा फटका बसला होता. दरम्यान, आता ट्रम्प सरकारने याच एच-१बी व्हिसासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या सिटिझनशीप अँड इमिग्रशन सर्व्हिस विभागाने एच-१बी होल्डर्सना मोठा दिलासा दिला आहे. आता ज्या लोकांकडे एच-१बी व्हिसा […] The post एच-१बी व्हिसा प्रकरणी भारतीयांना मोठा दिलासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 9:13 pm

साताऱ्यात कामगारांची 'काळी दिवाळी':माण तालुक्यामधील टाटा पावर पळसावडे प्रकल्पात कामगारांचा संताप

टाटा पावर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या माण तालुक्यातील पळसावडे प्रकल्पातील भूमिपुत्र कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे कंपनी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक अनोखे आंदोलन केले. पारंपरिक आनंदाऐवजी ‘काळी दिवाळी’ साजरी करून कामगारांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. काळी रांगोळी, काळे फडके, काळा फराळ आणि कपाळावर काळा नाम लावून कामगारांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर आपली एकजूट दाखवली. “कामगार एकजुटीचा विजय असो” आणि “टाटा पावर प्रशासन जागे व्हा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. त्यांनी सांगितले की, कामगारांच्या घामावर कंपनी नफा कमावते, पण त्यांच्या हक्कांकडे मात्र वारंवार दुर्लक्ष करते. आजची काळी दिवाळी म्हणजे अन्यायाविरोधात उभारलेला आवाज आहे. कामगारांना त्यांच्या घामाचा आणि हक्काचा सन्मानजनक दाम न मिळाल्यास यापुढील आंदोलन आणखी तीव्र करू. परंतु कामगारांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही. कामगारांनी या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक ‘काळा फराळ’ भेट दिला आणि मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. या आधी 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते, तर 18 ऑगस्ट रोजी ‘दंडवत आंदोलन’ करूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने टाटा पावर प्रशासनाने 29 ऑगस्ट 2025 पर्यंत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळेच कामगारांचा रोष पुन्हा उफाळला आहे. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पगारवाढ, आरोग्य विमा सुविधा, आणि कल्याणकारी योजना तातडीने लागू करणे यांचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, परिसरात कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा सुरू झाली आहे. टाटा पावर पळसावडे प्रकल्पातील ‘काळी दिवाळी’ने कंपनी प्रशासनाच्या दाव्यांना आणि आश्वासनांना प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, पुढील काही दिवसांत या संघर्षाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 7:02 pm

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शहीद पोलिसांना आदरांजली:पोलीस स्मृतीदिनानिमित्त पाषाण येथील केंद्रात शोक कवायत

पोलीस स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी (२१ ऑक्टोबर) पुणे पोलिसांनी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात शोक कवायतीचे आयोजन केले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशभरात दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतीदिन पाळला जातो. १९५९ मध्ये याच दिवशी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १० पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. शोक कवायतीदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून फैऱ्या झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली. या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान, परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मद्य विक्री दुकानातून दीड लाखांची रोकड लंपास पुण्यातील कोंढव्यात मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि मद्याच्या दोन बाटल्या असा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली.याबाबत मद्य विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील पिसोळी रस्त्यावर एअरकिंग वाईन शाॅप आहे. चोरट्यांनी मध्यरात्री मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेली एक लाख ५७ हजारांची रोकड आणि बिअरच्या दोन बाटल्या असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मद्य विक्री दुकान उघडले. तेव्हा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी मद्य विक्री दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 6:54 pm

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात!:अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, विवाहित महिलेवर अडीच वर्षे अत्याचार

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या एका 38 वर्षीय तरुणाने एका विवाहित महिलेशी जवळीक वाढवून तिला ब्लॅकमेल केले आणि गेल्या अडीच वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील मैत्रीतून सुरू झालेले हे संबंध नंतर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणात बदलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची आणि आरोपीची ओळख फेसबुकवर झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य करत शारीरिक संबंधांचे व्हिडीओ आणि खाजगी फोटो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने आरोपीचा अडीच वर्षे चाललेला शारीरिक आणि मानसिक छळ निमूटपणे सहन केला. या अडीच वर्षांच्या काळात आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरात तसेच मुंबईतील विक्रोळीतील स्वतःच्या निवासस्थानी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सततच्या त्रासाला कंटाळून पीडिता तीव्र तणावाखाली होती. दीर्घकाळ चाललेल्या या छळानंतर अखेर पीडित महिलेने धैर्य एकवटत महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 38 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे महाड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. महाड शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 6:52 pm

वंचित बहुजन आघाडीचा संघाच्या कार्यालयावर मोर्चा:छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी जनआक्रोश आंदोलन, अमित भुईगळ यांची माहिती

वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा शुक्रवारी क्रांतीचौकातून निघून बाबा पेट्रोलपंपाजवळील संघाच्या कार्यालयावर जाईल. संघाच्या मनुवादी विचारसरणीच्या विरोधात आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीच्या समर्थनार्थ हा शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून निघणाऱ्या या मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीने सर्व फुले, शाहू आणि आंबेडकरी संघटना, राजकीय पक्ष तसेच विचारसरणीच्या लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम येथील वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल मकासरे यांनी सरकारी तांत्रिक महाविद्यालयासमोर परवानगीशिवाय उभारलेल्या संघाच्या स्टॉलचा निषेध केला होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या निषेधानंतर, राहुल मकासरे आणि इतर आठ आंबेडकरी लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८९ (२), १९०, २९९, २९६, ३५२, ३५१ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. भुईगळ यांनी सांगितले की, राहुल मकासरे यांच्यावर कोणताही हिंसाचार, सामाजिक अशांतता किंवा सार्वजनिक हानी केली नसतानाही अजामीनपात्र आरोप लावण्यात आले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. या घटनेच्या विरोधात आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ हे जनआक्रोश आंदोलन असल्याचे अमित भुईगळ यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 6:34 pm

लोणीकंदमध्ये कंटेनर-ट्रॅक्टर अपघातात दुचाकीस्वार ठार:दोन्ही वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल, देहूगाव येथील व्यक्तीचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. फुलगाव ते आळंदी रस्त्यावर भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडले आणि त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर आणि ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव राजेंद्र चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. चव्हाणनगर, देहूगाव, ता. हवेली) असे आहे. त्यांचे भाऊ संजय चव्हाण (वय ५१) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र चव्हाण हे लोणीकंद फाटा परिसरातून आळंदी रस्त्याकडे जात असताना फुलगावनजीक हा अपघात घडला. कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर ते रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली ते सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक आणि ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाले. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे तपास अधिकारी आहेत. मुंढवा भागात रिक्षा चोरी पुणे शहरात मुंढव्यातील केशवनगर भागातून एकाची रिक्षा चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका रिक्षाचालकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मुंढव्यातील केशवनगर भागात राहायला आहेत. १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी केशवननगरमधील जय महाराष्ट्र चौकात रात्री रिक्षा लावली होती. चोरट्यांनी रिक्षाचे लाॅक तोडून रिक्षा चोरून नेली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत अडीच लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस कर्मचारी साळुंके तपास करत आहेत. शहर परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 6:30 pm

दिवाळीत नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री:पुण्यात तीन विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल, 1.10 लाखांचा माल जप्त

पुण्यात दिवाळीच्या काळात एका नामवंत पादत्राणे कंपनीच्या नावाने बनावट उत्पादनांची विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रास्ता पेठेतील तीन पादत्राणे विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांची बनावट पादत्राणे जप्त करण्यात आली आहेत. पादत्राणे निर्मिती करणाऱ्या संबंधित कंपनीच्या स्वामित्व हक्क विभागाचे अधिकारी निखिल पाटील यांनी समर्थ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पाटील यांना माहिती मिळाली होती की, रास्ता पेठेतील काही दुकाने नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन दुकानांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एक लाख दहा हजार रुपयांची बनावट पादत्राणे जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, तर सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे पुढील तपास करत आहेत. सणासुदीच्या काळात नामवंत कपडे आणि पादत्राणे उत्पादकांच्या नावे बनावट उत्पादनांची विक्री करण्याच्या अनेक तक्रारी समोर येतात. अशा बनावट मालाची स्वस्त दरात विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. बनावट टी-शर्ट, जीन्स आणि पादत्राणे परराज्यातून पुणे व मुंबईतील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. यापूर्वीही पोलिसांनी शहरातील विविध भागांतील दुकानदारांवर कारवाई करून लाखो रुपयांची बनावट उत्पादने जप्त केली आहेत. पीएमपी प्रवासी महिलेकडील अडीच लाखांचे दागिने लंपास पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख ५७ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ४५ वर्षीय महिला वारजे माळवाडी भागात राहायला आहेत. त्या वारजे माळवाडी ते खडकी बाजार या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दोन लाख ५७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. खडकी बाजार परिसरातील थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 6:28 pm

ऐन दिवाळीत पावसाची रिपरिप!:कोकणासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

नैऋत्य मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी, आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढील पाच दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये पावसाने आज दुपारी अचानक हजेरी लावली. यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 21 ऑक्टोबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विशेषतः मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या दोन महिन्यांत मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राने पूरपरिस्थितीचा सामना केला होता. या काळात मोठी जनावरे दगावली, घरे पाण्याखाली गेली आणि मोठी पडझड झाली होती. या नुकसानीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा आलेल्या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकरी आणि नागरिक यांच्या चिंतेत भर पडली आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 6:16 pm

राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज:मी जरी पक्ष सोडून गेलो तरी पक्षाला फरक पडणार नाही, दत्तात्रय भरणे स्पष्टच बोलले

भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाचे संपर्क मंत्री व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ग्रामीणची बैठक सकाळी पार पडली आता ही दुसरी बैठक शहराची पार पडली आहे. या बैठकीत आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तसेच आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात सर्वांच्या सूचनेनुसार अजित पवार यांच्याकडे अहवाल देऊन याबाबत ते निर्णय घेतील. आमचे हेच म्हणणे आहे की महायुतीमध्ये येणारी निवडणूक एकत्र लढवायची. परंतु, काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भावना आहे. काही लोकांची महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका आहे. परंतु, पक्षाच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार सगळ्या प्रभागांवर आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण टीम निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जे निर्णय घेतील ते आम्ही मान्य करणार असल्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी पक्षात अनेक तरुणांना आपल्याला जबाबदारी मिळावी अशी इच्छा आहे. सगळ्यांना वाटत आहे की पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकावी. अनेकांनी पक्षात आज प्रवेश केला आहे. मागे सुद्धा बऱ्याच जणांनी पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अनेक मोठे मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत, मी त्यांचे नाव सांगत नाही. पण अनेकांना पक्षात येण्याची इच्छा आहे. अजितदादांच्या कानावर घालून त्यांचा पक्षप्रवेश निश्चित केला जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण टीम निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाला फरक पडणार नाही राजकारणात काही गोष्टी असतात की ज्यावेळेस जो प्रवेश होईल त्यावेळी ते सांगितले जाते. खूप चांगले नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येणार आहेत. अजून तरी आमच्या कानावर नाही आले की आमच्या पक्षातून कोणी जात आहे. दत्तात्रय भरणे जर पक्ष सोडून गेला तर पक्षाला आणि अजित दादांना त्याचा फरक पडणार नाही. राष्ट्रवादीची टीम सगळीकडे सज्ज आहे. अनेक नेते आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तसेच आजच्या बैठकीला अनेक पदाधिकारी नसल्याचे पत्रकारांनी विचारले, त्यावर बोलताना भरणे म्हणाले, काही लोकांना अडचणी असतात त्यामुळे कदाचित ते आले नसतील. पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकसंघ आहे. या निवडणुकीत मागच्या वेळेस पेक्षा राष्ट्रवादी पक्षाचे आकडे जास्त दिसतील. महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत, पण यासंदर्भातील निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत. एका-एका वॉर्डात 10-10 कार्यकर्ते इच्छुक असतील तर त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. आज तरी आम्ही महायुतीमधून निवडणूक लढवणार आहोत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात, असेही दत्तात्रय भरणे म्हणाले. पाऊस उशिरा पडल्याने पंचनाम्याला उशीर राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, आपल्याकडे सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला. शेवटी शेवटी पाऊस पडल्याने पंचनाम्याला उशीर झाला आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत शासन मदत करते, आता ते 3 हेक्टर करण्यात आले आहे. त्यामुळे एक हेक्टर वाढल्याने पुन्हा पंचनाम्याला सुरू करत असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 5:45 pm

टेम्पोची दुचाकीला धडक, बहीण-भावासह तिघे ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. कोल्हापूर-राधानगरी रोडवर कौलव येथे आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ऐन दिवाळीतच अपघातात तिघे ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीकांत बाबासो कांबळे (तरसबळे, ता राधानगरी), दिपाली गुरुनाथ कांबळे (शेडुर ता. कागल) अशी मृत दोघांची नावे आहेत. तर अथर्व गुरुनाथ […] The post टेम्पोची दुचाकीला धडक, बहीण-भावासह तिघे ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 5:09 pm

‘लाडकी’योजनेत १२,४३१ लाडक्या भावांची घुसखोरी

मुंबई : प्रतिनिधी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. १२ हजारांपेक्षा जास्त पुरूषांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचे १२ हजार पुरूषांनी प्रत्येक महिन्याला १५०० रूपये लाटले आहे. ही माहिती समोर आल्यानंततर ही तर लाडके भाऊ योजना असल्याची […] The post ‘लाडकी’योजनेत १२,४३१ लाडक्या भावांची घुसखोरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 5:07 pm

पुणे स्टेशन परिसरात मोबाइल चोरणारे आरोपी गजाआड:पोलिसांनी 19 मोबाइल आणि दुचाकीसह 3.23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाइल हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून १९ मोबाइल संच आणि एक दुचाकी असा एकूण ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोहेल बादशहा खान (वय २०), आयान झाकीर शाह (वय २१) आणि फरहान वसीम शेख (वय २०, तिघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी चौकातून या आरोपींनी एका प्रवाशाचा मोबाइल हिसकावून नेला होता. या घटनेनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप शितोळे, सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोबाइल हिसकावणारे चोरटे कोंढवा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी बंडगार्डन, मार्केट यार्ड, वानवडी, कोंढवा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल हिसकावण्याचे एकूण आठ गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू केला आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीळकंठ जगताप, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, सागर घोरपडे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बढे, मनीष संकपाळ आणि मनोज भोकरे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 4:50 pm

पुण्यात स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक:दोन महिला आरोपींना आंबेगाव पोलिसांनी अटक केली

पुण्यात स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५०) आणि सोनूबेन आकाश सरवय्या (वय ३०, दोघी रा. जुना कोडीत रस्ता, सासवड, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला १५ ऑक्टोबर रोजी दुपारी कात्रजमधील संतोषनगर भागातून जात असताना, आरोपी सरवय्या यांनी त्यांना एका किराणा दुकानासमोर अडवले. आरोपींनी महिलेला सांगितले की, त्यांच्याकडे सोन्याचे मणी आहेत, जे तिच्या मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे आहेत. 'तुमचे मंगळसूत्र दिल्यास त्या बदल्यात जास्त वजनाचे सोन्याचे मणी देतो, सोने महाग झाले आहे, तुम्हाला स्वस्तात सोने देतो,' असे आमिष दाखवून आरोपींनी महिलेकडील एक लाख दोन हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र घेतले आणि त्या पसार झाल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तक्रारदार महिलेने आरोपी महिलांनी दिलेले मणी तपासले असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी महिला कात्रजहून सासवडकडे गेल्याचे दिसून आले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिला सासवडमधील जुन्या कोडित गाव रस्त्यावरील एका पत्र्याच्या खोलीत राहत होत्या. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कोडित रस्त्यावरील खोलीतून आरोपी सरवय्या यांना ताब्यात घेतले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले आणि उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 4:49 pm

जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन:चटणी-भाकर खाऊन दारातच नोंदवला सरकारचा निषेध

छत्रपती संभाजीनगर येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले असतानाही ती प्रत्यक्षात न मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. या वेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात चटणी-भाकर खाऊन निषेध नोंदवला आणि सरकार जागे व्हा अशा घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही ठिकाणी किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी सुमारे 20 ते 25 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून नंतर त्यांना सोडण्यात आले. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, ज्वारीसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने नुकतेच विशेष पॅकेज जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत रक्कम जमा होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मदत मिळण्यास झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आले असल्याचा दावा या वेळी करण्यात आला. शासन केवळ घोषणाच करत असल्याचा आरोप या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे म्हणाले की, सरकारने आश्वासन दिले, पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घरी अंधार आहे, जनावरांना चारा नाही, आणि शासन केवळ घोषणाच करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इतर जिल्ह्यांतील आंदोलनाचा इशारा या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, ज्ञानेश्वर मुळे, दिनकर पवार, प्रकाश बोरसे, राजू बोंगाणे, शिवाजी धरफळे, यादवराव कांबळे, गणपत खरे, पुरण सनान्से यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या अर्धनग्न आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून सरकारने तातडीने मदत वितरित करावी, अशी मागणी होत आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी देखील अशा प्रकारच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 4:22 pm

काली पूजा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष:पुणे शहरात बंगाली बांधवांकडून उत्साहात सुरुवात

पुण्यात बंगाली बांधवांच्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या उत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी या उत्सवात सहभागी होत काली मातेकडे पुणे शहर भयमुक्त, स्वच्छ आणि सुंदर व्हावे अशी प्रार्थना केली. यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार, खजिनदार विनोद संतरा, उपसेक्रेटरी अमर माझी, सदस्य अनुप माईती, महादेव माझी, पूनचंद्र दास, संकेत मजुमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रवींद्र धंगेकर यांनी यावेळी नमूद केले की, हा उत्सव मागील पंचवीस वर्षांपासून साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होतात. महाराष्ट्रात, विशेषतः पुणे शहरात, बंगाली बांधव गेल्या ४५ वर्षांपासून सोन्याचे कारागीर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्याशी आपले घरगुती संबंध आहेत.काली मातेवर श्रद्धा असलेल्या बंगाली नागरिकांना आवश्यक त्या सुविधा मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून, त्यांच्या भावनांचा आपण आदर करतो, असेही धंगेकर यांनी यावेळी सांगितले. 'लक्ष्य'... एकल नृत्य रचनांचा कार्यक्रम भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लक्ष्य’ हा शास्त्रीय नृत्यप्रकारांवरील विशेष कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक प्रसार उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्यसंवर्धन संस्था(पुणे) यांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे.हा कार्यक्रम रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता भारतीय विद्या भवन, सरदार महादेव बळवंत नातू सभागृह( शिवाजीनगर) पुणे येथे होणार आहे. ‘लक्ष्य’ या कार्यक्रमात तीन शास्त्रीय नृत्यशैलींची वैयक्तिक सादरीकरणे होणार असून प्रेक्षकांना भारतीय नृत्यपरंपरेचा अप्रतिम अनुभव घेता येणार आहे. या कार्यक्रमात स्वराली भोपे (कुचिपुडी), स्वरदा भावे (भरतनाट्यम) आणि नृत्यगुरू उमा डोगरा (कथक) या तीन कलाकारांच्या एकल नृत्यसादरीकरणांचा समावेश आहे. तीन भिन्न शैलींतील नृत्य, भावाभिव्यक्ती आणि ताल यांचा संगम या सायंकाळी अनुभवता येणार आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम उपक्रमांतर्गत होणारा हा २६० वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 4:12 pm

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आळंदीत:बळीराजाला धीर देण्याचे आवाहन, तीर्थक्षेत्र विकासाची ग्वाही दिली

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आळंदी येथील दिवाळी पहाट संगीत महोत्सवात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आळंदीकरांना बळीराजाला धीर देण्याचे आवाहन केले. तसेच, आळंदी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात डॉ. गोऱ्हे यांनी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायन सेवेचा आस्वाद घेतला. भाऊबीजेला पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्याचा मानस असताना, माऊलींच्या कृपेने आळंदी येथेच विठ्ठल दर्शन घडल्याचे त्यांनी सांगितले. आजचा दिवस अत्यंत आनंददायी असून, आळंदीकरांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याचे त्या म्हणाल्या. संगीताच्या माध्यमातून अनेक तरुण मुले-मुली आध्यात्म आणि वारकरी संप्रदायाशी जोडली जात आहेत. दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. गुरुकुल परंपरेतून वारकरी संप्रदायाची सेवा सुरू असून, माऊलींचे आशीर्वाद आपल्यावर आणि सरकारवरही असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विधानपरिषदेचे माजी सभापती कै. ना. स. फरांदे यांनी आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मीदेखील वैयक्तिक आणि शासनस्तरावर या कार्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आपली बांधिलकी बळीराजाशी आहे. अलीकडील पूर, अतिवृष्टी आणि पीक नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. आळंदीच्या या आध्यात्मिक केंद्रातून त्याला सहकार्य, वात्सल्य आणि आपुलकीचा आधार मिळावा, यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. आजचे दर्शन माऊलींनी दिले असून, आपण त्यांच्या चरणी सदैव नतमस्तक आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यास त्या सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करीन, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमास आळंदी संस्थान समितीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, श्री. कबीरबाबा, अॅडव्होकेट रोहिणी पवार, श्री. प्रकाश वाडेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवर नागरिक आणि भक्तगण उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 4:08 pm

भुजबळ म्हणजे फुसका फटाका

बीड : दरवर्षी दिवाळीत चिवड्यासोबत राजकीय फटाकेबाजी होते अशातच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना दीपावलीच्या मनापासून त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच भुजबळांना कोणत्याच फटाक्याची उपास चालत नाही ते फुसकी आहेत. छगन भुजबळ हे घुरट आणि ठुसका फटाका आहेत, असा टोला जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. सरकारने जाहीर केलेल्या […] The post भुजबळ म्हणजे फुसका फटाका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 3:57 pm

मराठी संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करणार

मुंबई : प्रतिनिधी ग. दि. माडगूळकर, जगदिश खेबुडकर आणि मंगेश पाडगांवकर या शब्दप्रभूंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मराठी संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, […] The post मराठी संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 3:49 pm

भाजपने महायुतीत मिठाचा खडा टाकला:शिंदे गटाच्या खासदाराचा थेट आरोप; मित्र पक्षांचे कार्यकर्ते अन् पदाधिकारी फोडण्यावर नाराजी

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या रणनीती व मोर्चे ठरवण्याच्या तयारीला लागलेत. पण आता सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यावरून राजकीय फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या खासदाराने थेट भाजपवर महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा आरोप केला आहे. यामुळे भाजप व शिवसेनेत राजकीय बेबनाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी भाजपवर महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, महायुती ही विरोधकांना संपवण्यासाठी अस्तित्वात आली. ज्यांनी हिंदुत्त्वाचे विचार सोडले त्यांचा पराभव करण्यासाठी अस्तित्वात आली. पण आता काही ठिकाणी असे होत आहे की, महाविकास आघाडीमधील लोकांना विरोध न करता महायुतीमधीलच घटकपक्षांचे नगरसेवक फोडले जात आहेत. अंबरनाथ येथील आमचा नगरसेवक असेल, पालघर येथील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, या सर्वांना फोडून आपल्या पक्षात घेतले जात आहे. हे साफ चुकीचे आहे. भाजप आमच्या महायुतीमधील मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला समजून घेतले पाहिजे. पण तेच आमच्या पक्षातील नगरसेवकांना गळाला लावून त्यांना पक्षात घेत असतील, तर हे काही योग्य नाही. हा महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे. एकमेकांचे माणसे फोडण्याची प्रथा चुकीची नरेश म्हस्के पुढे म्हणाले, राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर नेत्यांनी गल्लीबोळातल्या राजकारणात पडू नये. त्यांनी आपली महायुती भक्कम ठेवण्यावर भर दिला पाहिजे. आपण मिळून विरोधकांशी दोनहात करूया. पण ते करताना आपल्याच महायुतीमधील मित्रपक्षांचे नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रकार सुरू झालेत. आपण महायुती म्हणून दुसऱ्यांशी लढण्याचे ठरवले आहे. आपण विरोधकांशी लढूया. महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची जी प्रथा सध्या सुरू झाली आहे, ती पूर्णतः चुकीची आहे. एकमेकांसोबत लढायचे तर लढूया. आपण स्वबळावर लढलो तरी आपल्या मित्रपक्षांवर टीका करायची नाही. एकमेकांचे माणसे फोडणे योग्य नाही, असेही नरेश म्हस्के या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणालेत. हे ही वाचा... एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य:ठाकरेंची बाजू घटनात्मक पातळीवर अत्यंत मजबूत; विधिज्ञ असीम सरोदे यांचा दावा मुंबई - शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 3:44 pm

‘शुद्धीकरणा’मुळे महायुतीत फूट?

पुणे : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर, पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या ‘शुद्धीकरण’ प्रकरणावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. शनिवारवाड्यात काही महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक होत तिथे जाऊन शुद्धीकरण केले होते. यावेळी त्यांनी शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्याची मागणी केली. यावरून एकनाथ […] The post ‘शुद्धीकरणा’मुळे महायुतीत फूट? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 3:30 pm

३१ उप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस:पोषण माह अंतर्गत २२३७ अंगणवाड्यांमधून उपक्रम राबविले नसल्याचे कारण

राज्यात राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध उपक्रम राबवून त्याच्या नोंदी घेण्याच्या सूूचना असतानाही २२३७ अंगणवाड्यांमधून उपक्रम न राबणविणाऱ्या हिंगोलीसह ३१ जिल्ह्यांतील महिला बाल कल्याण विभागाच्या उप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना तातडीने खुलासा करण्याचे आदेश बालविकास सेवा योजना आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. राज्यात बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या वतीने सुमारे १.१० लाख अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांमधुन येणाऱ्या बालकांना पुरक पोषण आहार देेणे, पुर्व प्राथमिक अभ्यासक्रम शिकविणे, गरोदर व स्तनदा मातांना आहार पुरवठा करण्याचे काम अंगणवाड्यांमार्फत केले जाते. दरवर्षी ता. १७ सप्टेंबर ते ता. १६ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जातो. यामध्ये पोषण आहाराचे महत्व यासह इतर माहिती दिली जाते. या शिवाय खाद्यपदार्थांची माहितीही दिली जाते. या शिवाय गरोदर, स्तनदा मातांसाठी विविध धान्यांपासून पदार्थ तयार करून दाखविले जातात. अंगणवाडीनिहाय उपक्रमांची ऑनलाईन नोंदणी करणे अपेक्षीत आहे. मात्र राज्यातील २२३७ अंगणवाड्यांमधून कुठलयाही प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले नाही या प्रकारामुळे केंद्र शासनाने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीन अंगणवाड्यांचा समावेश आहे. या शिवाय ठाणे ३०१, छत्रपती संभाजीनगर २२४, बीड १७०, सोलापूर १३५, चंद्रपूर १२९, कोल्हापूर १२६, नंदूबरबार १२४, पुणे १००, अकोला ९८, जालना ९८, नांदेड ८५, धाराशिव ८३, गडचिरोली ७९, नाशीक ७६, बुलढाणा ६८, पभणी ६१, यवतमाळ ५६, पालघर ३१, गोंदिया २९, मुंबई २८, अहिल्यानगर २६, सिंधुदुर्ग १६, मुंबई शहर १४, अमरावती १३, जळगाव १२, लातूर १२, सांगली ९, वाशीम ९, रत्नागिरी जिल्हयातील १ अंगणाडीचा समावेश आहे. या जिल्हयातील उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 3:26 pm

मजबुरी का दुसरा नाम ठाकरे!:माजी खासदार नवनीत राणा यांची जहरी टीका; ठाकरे बंधू पैसा अन् तोड्या करण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता व खुर्चीसाठीच एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधू बऱ्याच वर्षांच्या अबोल्यानंतर आता एकत्र आलेत. त्यांच्या युतीची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. पण त्यावर टीकाही होत आहे. भाजपने यापूर्वीच ठाकरे बंधूंच्या युतीचा राज्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम पडणार नसल्याचा दावा करत त्यांच्या युतीची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राज व उद्धव ठाकरे हे पैसा अन् तोड्या करण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा केला आहे. पैसा व तोड्या करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र नवनीत राणा यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी अंध, अपंग व कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राणा दाम्पत्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी नवनीत राणा यांनी ठाकरे बंधू तथा प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, कुटुंब एकत्र येणे ही आपली संस्कृती आहे. आपण ती जपली पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्र दोन भाऊ एकत्र आल्याचे पाहत आहे. पण ते कुटुंबासाठी नाही तर फक्त सत्ता व खुर्चीसाठी एकत्र आलेत. फक्त पैसा व तोड्या करण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे. बच्चू कडूंनी आपल्या खिशात हात टाकलाच नाही नवनीत राणा यावेळी बच्चू कडूंवर निशाणा साधताना म्हणाल्या, सध्या बरेच लोक नौटंकी करत आहेत. बाहेर फिरून आमदारांना मारून टाका असे सांगत आहेत. पण तुम्ही चारवेळा आमदार होता. दोनवेळा मंत्री राहिला. तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर आली नाही. आज अनेक लोक आजीचे माजी झालेत. कारण, त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. फक्त इनकमिंग. आऊटगोइंग नाही. अचलपूरच्या माजी आमदारांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मी त्यांना दहावेळा म्हणाले की, तुमची संपत्ती मला द्या, माझी संपत्ती तु्म्ही घ्या. आता त्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पाडले आहे, असे त्या म्हणाल्या. हे ही वाचा... एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य:ठाकरेंची बाजू घटनात्मक पातळीवर अत्यंत मजबूत; विधिज्ञ असीम सरोदे यांचा दावा मुंबई - शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 3:22 pm

भाजपच्या नेत्यांनी स्वतःची पातळी घालवली:ठाकरे गटाचा घणाघात; पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्याला पाठिंबा

पुण्यातील जैन बोर्डिग हाऊसच्या कथित जमीन विक्री घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाने आपल्या प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या नेत्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी या प्रकरणी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांची बाजू घेत या प्रकरणात त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. भाजप नेत्यांनी या प्रकरणी खालच्या पातळीवरील टीका करून स्वतःची पातळी घालवली आहे. त्यामुळे एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी आहे, असे ते म्हणालेत. सत्ताधारी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री व्यवहाराला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या लढ्याला सोमवारी पहिले यश मिळाले. मुंबई येथील धर्मादाय आयुक्तालयाने या प्रकरणी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. यामुळे या प्रकरणी वादात सापडलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जबर झटका बसला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या लढ्याला एक पुणेकर म्हणून पाठिंबा दर्शवला आहे. भाजपच्या लोकांनी स्वतःची पातळी घालवली वसंत मोरे या प्रकरणी बोलताना म्हणाले, मी एक पुणेकर म्हणून रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी आहे. ते सत्तेत असूनही एखादा विषय लावून धरत आहेत. यासंबंधी त्यांचे कौतुक करायलाच हवे. त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे भाजपचे नेते त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. त्यांचा उल्लेख भटकी कुत्री असा केला जात आहे. हा संतापजनक प्रकार आहे. भाजपच्या नेत्यांनी स्वतःची पातळी घालवली आहे. अशी टीका करून ते स्वतःची पातळी काय आहे हे दाखवून देत आहेत. रवींद्र धंगेकर एखादी खरी बाजू मांडत असतील, तर तुम्ही ती स्वीकारायला हवी. भटकी कुत्री व अन्य कुठलीही खालच्या पातळीवरील टीका भाजपचे लोक करत असतील तर ते स्वतःची पात्रताच दाखवत आहेत. खऱ्याचे समर्थन केले पाहिजे वसंत मोरे पुढे म्हणाले, एखादा व्यक्ती खरे बोलत असेल तर ते तुम्ही ऐकले पाहिजे. रवींद्र धंगेकर खोटे बोलत असते तर धर्मादाय आयुक्तांनी त्या व्यवहाराला स्थगिती दिली नसतसी. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. धंगेकर खरे बोलत असावेत. मी स्वतः त्यांना ओळखतो. ते अभ्यासपूर्ण काम करतात. मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. एखादा विषय हाती घेतला तर ते लावून धरतात. पुण्यातील एखादी व्यक्ती, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी या शहराचा नागरीक म्हणून शहरात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असेल, शहरातील जमिनी कुणी बळकावू नये यासाठी प्रयत्न करत असेल तर आपण त्या व्यक्तीचे समर्थन केले पाहिजे. जैन धर्मीय रस्त्यावर उतरत असतील तर त्यात काही चुकीचे नाही प्रस्तुत व्यवहारातील जमीन जैन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या जागेवर कुणीतरी गोखले नामक बांधकाम व्यावसायिक येतो. तिथे मॉल बांधण्याचा प्रयत्न करतो. तेथील जैन समुदायाला हटवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याविरोधात जैन धर्मीय रस्त्यावर उतरत असतील, तर त्यात काहीही चुकीचे नाही. एक पुणेकर म्हणून मी धंगेकर यांच्या पाठिशी आहे, असेही वसंत मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 3:01 pm

 वाशीसह कामोठे येथे लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू

नवी मुंबई : कामोठे परिसरातील एका इमारतीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत जळून माय-लेकीचा मृत्यू झाला आहे. रेखा शिसोदिया आणि मुलगी पायल शिसोदिया अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईतील वाशी येथे लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबईत लागलेल्या वाशी आणि कामोठे येथील आगीत एकूण सहा […] The post वाशीसह कामोठे येथे लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 2:59 pm

 सेहवागचा होणार घटस्फोट ? 

मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघात आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे प्रसिद्ध असलेला, शानदार फलंदाज वीरेंद्र सेहवाग हा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी आरती व सेहवाग यांच्यात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या घटस्फोटाबद्दलही अफवा उडाल्या होत्या. त्यानंतर अशीही बातमी समोर आली की सेहवागच्या मित्राशी आरतीचं अफेर आहे. यावर […] The post सेहवागचा होणार घटस्फोट ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 2:54 pm

मेथीच्या जुडीला ८० रुपये भाव

नाशिक : प्रतिनिधी ऐन दिवाळीत कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ढोबळी मिरचीला शंभर रुपये भाव मिळाला. तर गावरान मेथीला तर संपूर्ण वर्षभरात प्रथमच ८० रुपये भाव रविवारी मिळाला. तर मंगळवारी आवक वाढल्याने भावात २० रुपयांची घसरण झाली. कोथिंबिरीने मात्र वर्षभरात दोनदा शंभरी पार केली. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची झळ अजूनही भाजीबाजाराला बसत आहे. दिवाळीत मागणी वाढताच […] The post मेथीच्या जुडीला ८० रुपये भाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Oct 2025 2:52 pm

सरकारने दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी:ओमराजे निंबाळकर संतापले; महिना उलटला तरी वीज नाही; शेतकऱ्यांचा आनंद फिकाच

सीना नदीला आलेला पूर ओसरून तब्बल एक महिना उलटला असला, तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. पूरानंतरच्या पुनर्वसनाच्या कामात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार आहे. दिवाळीसारखा सण जनरेटरच्या उजेडात साजरा करावा लागत आहे, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. पूर गेल्यानंतर सरकारने तातडीची मदत म्हणून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली, तरी त्या रकमेने फक्त जनरेटर भाडे आणि डिझेलचा खर्च भागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. या गावातील एका शेतकऱ्याने सांगितले की, पूर गेल्यावर आम्ही वाट पाहत होतो की सरकारकडून काही मदत येईल आणि वीज पुन्हा सुरू होईल. पण अजूनही आमच्या घरात अंधार आहे. जनरेटर लावून दिवे लावावे लागत आहेत. दिवाळीत आकाशकंदील लावायचा तर तोही डिझेलवर लावावा लागत आहे. काही कुटुंबांनी शासनाच्या दिवाळी किट मधील वस्तूंनीच सण साजरा केला, तर काहींना चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी ऊस कापून खाऊ घालण्याची वेळ आली आहे. पूरानंतर शेतातील पिके वाहून गेल्याने जनावरांसाठी खाद्य मिळवणेही आव्हान ठरत आहे. पूरग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर थेट टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, अशी घोषणा केली होती. पण अजूनही अनेक गावांमध्ये ती मदत पोहोचलेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण बँकांनी ती रक्कम होल्ड केली आहे. हे सरकारच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे. ओमराजे म्हणाले की, सरकारने दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे सांगितले, पण आज गावोगावी पाहा, लोक अंधारात आहेत, दिवे नाहीत, वीज नाही, सण नाही. त्यामुळे सरकारने जरा वास्तव बघावे आणि शक्य असेल तर दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. वीजपुरवठा विस्कळीत, पुनर्बांधणीला विलंब स्थानिक प्रशासनाच्या मते, पूराच्या पाण्यामुळे वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु ग्रामीण भागात उपकरणे आणि तंत्रज्ञांची कमतरता असल्याने प्रक्रिया धीमी आहे. दरम्यान, पूरग्रस्तांनी सांगितले की, आम्हाला सांगितलं जातंय की दोन दिवसात वीज येईल, पण तो दोन दिवसांचा शब्द मागच्या महिन्यापासूनच ऐकत आहोत. आता दिवाळी आली, तरी घरात अंधारच आहे. मदत तत्काळ वितरित करावी पूरामुळे नुकसान झालेली घरे, नष्ट झालेली शेती आणि आता विजेचा अभाव, या सर्वांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत केला आहे. आमचे सगळे गेले, आता फक्त थोडे आयुष्य उरलंय तेही जनरेटरच्या आवाजात जगतोय, असं एका वयोवृद्ध शेतकऱ्याने म्हटले आहे. पूर ओसरला, पण सोलापूरच्या तिऱ्हे-पाथरी परिसरात अंधार कायम आहे. सरकारच्या घोषणा आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी दरी आहे. जनरेटरच्या उजेडात साजरी होणारी दिवाळी ही त्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची जिवंत साक्ष देते. आता सरकारने वीजपुरवठा सुरळीत करण्यासोबतच पूरग्रस्तांना दिलेली मदत तत्काळ वितरित करावी, अशी मागणी केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Oct 2025 2:27 pm