SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

भाजप एकनाथ शिंदेंना धक्का देणार हे नक्की:रवींद्र चव्हाण यांचे सूचक विधान; कल्याण - डोंबिवली महापालिकेत भाजप - शिंदे विभक्त होणार?

एकमेकांचे पदाधिकारी फोडण्याच्या मुद्यावरून भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव निर्माण झाला असताना आता कल्याण - डोंबवली महापालिकेत शिवसेना - भाजपची युती तुटणार हे जवळपास निश्चित झाल्याची बाब समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्याचे स्पष्ट संकेत दिलेत. तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीत विश्वासाने मतदान करता. पण यावेळी कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा एवढीच विनंती आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांची कथित नाराजी अधिकच वाढण्याची शक्यता आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवलीत एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील विधान करत कल्याण - डोंबिवली महापालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला फारकत देऊन स्वतंत्रपणे लढू असे उघडपणे सांगितले नाही. पण त्यांचा बोलण्याचा रोख त्याकडेच होता. नेमके काय म्हणाले रवींद्र चव्हाण? ते म्हणाले, तुम्ही मला प्रत्येक निवडणुकीत विश्वासाने मतदान करता. फक्त यावेळी एवढीच विनंती आहे की, जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा. आपली कामे मार्गी लावण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. केंद्र व राज्यासारखे महापालिकेत भाजपचे प्रशासन आले तर अनेक गोष्टी सहजपणे मार्गी लावता येतील. आपल्याला 100 टक्के एका विचाराचे म्हणजेच भाजपचे सरकार जे केंद्र व राज्यात आहे तेच येथे आणायचे आहे. भाजपच्या फोडाफोडीला एकनाथ शिंदे कंटाळल्याची चर्चा असतानाच रवींद्र चव्हाण यांनी महायुतीऐवजी कमळाच्या चिन्हावर उभे राहणाऱ्यांना निवडून देण्याचे आवाहन केल्यामुळे त्यांचे हे विधान राज्यातील राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. नगरसेवकाचे काम नगरसेवकांनी करावे ही भावना आपली नेहमी राहिली आहे. विकास निधी देणे माझे काम, पण बाकीचे काम नगरसेवकांनी करावे हे अपेक्षिति होते. काही नगरसेवकांकडून हे काम झाले नाही. पण त्यांच्या काही अडचणी होत्या हे आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही एवढे काही दुधखूळे नाही, असेही रवींद्र चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले. भाजप मनसेलाही धक्का देणार उल्लेखनीय बाब म्हणजे कल्याण डोंबिवलीचे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर हे भाजपात जाणार असल्याची चर्चाही स्थानिक राजकारणात रंगली आहे. ते रवींद्र चव्हाण यांच्यासोबत या कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे त्यांच्या रुपात येथे मनसेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ते याविषयी बोलताना म्हणाले, मी आतापर्यंत जे काही निर्णय घेतले ते कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतले आहेत. यापुढील निर्णयही मी त्यांच्याशी चर्चा करूनच घेईन. हे ही वाचा... मंत्री पंकजा मुंडे यांच्या PA ला अटक:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका, मध्यरात्री 1 वाजता आला वरळी पोलिसांना शरण मुंबई - राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे PA अर्थात स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना स्वतःच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्वतःहून पोलिसांना शरण आले होते. आज त्यांना कोठडीसाठी पोलिस कोर्टात उभे करणार आहेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:53 am

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसावर रिक्षा चढवली:20 फूट फरफटत नेले, अंमलदार गंभीर जखमी, पाठलागात दुचाकीला धडक, अखेर अटक

भगवान महावीर चौकात एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालून 20 फूट फरफटत नेले. रविवारी (23 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजता ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात छावणी वाहतूक शाखेचे अंमलदार तुकाराम टाकसाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी (27, रा. मोमीनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. अंमलदार टाकसाळे हे पंचवटी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ड्यूटीवर होते. त्यांनी युसूफला विना-गणवेश रिक्षा (एमएच 20 ईके 4632) चालवताना पाहून थांबण्याचा संकेत दिला. मात्र, युसूफने थांबण्याऐवजी रिक्षा टाकसाळे यांच्यावरच घातली. यात अंमलदार गंभीर जखमी झाले. पाठलाग करतानाही धुमाकूळ टाकसाळे यांना जखमी करूनही युसूफ पळतच राहिला. पोलिस पाठलाग करत असताना एका दुचाकीस्वारालाही धडक दिली. एवढ्यावरही तो थांबला नाही. रिक्षातील तीन प्रवाशांपैकी एक जणही रस्त्यावर पडला, तरी चालकाने रिक्षा न थांबवता पळ काढला. पोलिसांनी रिक्षाचा नंबर ओळखून त्याला अटक केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:49 am

मंत्री पंकजा मुंडे यांच्या PA ला अटक:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका, मध्यरात्री 1 वाजता आला वरळी पोलिसांना शरण

राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे PA अर्थात स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना स्वतःच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्वतःहून पोलिसांना शरण आले होते. आज त्यांना कोठडीसाठी पोलिस कोर्टात उभे करणार आहेत. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी वरळी स्थित आपल्या राहत्या गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे व गौरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पण त्यानंतर अनंत यांचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची बाब गौरी यांच्या निदर्शनास आली होती. या अनैतिक संबंधांना कंटाळून गौरी यांनी हे पाऊल उचलले होते. या प्रकरणी गौरी यांच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण शीतल गर्जे - आंधळे व दीर अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमासह इतर प्रकरणांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अनंत हे फरार झाले होते. अखेर अनंत गर्जे रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्वतःहून वरळी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना आज कोर्टापुढे हजर करून त्यांची पोलिस कोठडी मागण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांकडून कोर्टात काय युक्तिवाद केला जाईल? व त्याला गर्जे यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या युक्तिवादातूनच या प्रकरणाची खरी माहिती समोर येणार आहे. गौरीने आत्महत्या केली तेव्हा अनंत गर्जे कुठे होता? घटना घडली त्यावेळेस मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते. घाबरुन इमारतीच्या 31व्या मजल्यावरुन खिडकीच्या माध्यमातून मी 30 व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला, तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, असे अनंत गर्जेने सांगितले आहे. मुलीला समजावून सांगा, असा फोन अन् आत्महत्या अनंत गर्जेने गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करतेय तिला समजावून सांगा असा फोन केला होता. त्यावेळी वडिलांनी गौरीकडे फोन द्या असे सांगितले. पण नंतर अनंत म्हणआला की, मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. पण लगेचच अनंत गर्जेने गौरीच्या आईला फोन करुन त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघाले. गौरीच्या आईने 50 हून अधिक फोन केले. पण अनंतने एकाही फोनचे उत्तर दिले नाही, अशी माहिती समोर आली आहे. एक कागद सापडला अन् सर्वकाही बदलले गत सप्टेंबर महिन्यात अनंत गर्जे व गौरी गर्जे यांनी राहते घर बदलले. त्यावेळी गौरीला काही कागदपत्र सापडले. त्यात एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता. ही बाब गौरीने तिच्या वडिलांना सांगितली. त्यावर तुझे आई-वडील मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेन, अशी धमकी अनंतने तिला होती, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे. अनंत गर्जे यांनी जारी केले निवेदन दुसरीकडे, अनंत गर्जे यांनी या घटनेविषयी एक निवेदन जारी करून आपण पोलिसांच्या चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी व मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर अनंत गर्जे 24 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री वरळी पोलिस ठाण्यात हजर झाले. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य रितीने पार पडावी यासाठी अनंत गर्जे यांनी स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांपुढे हजर होण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकणाचा तपास निष्पक्ष व्हावा व सत्य जनतेपुढे यावे यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती व मदत करण्यास तयार आहेत. अंजली दमानियांचे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. गौरी पालवे यांच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. गौरीने गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जे यांनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला. त्यावेळीच पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही? त्यावेळी त्यांना का सोडून देण्यात आले? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:31 am

देश सशक्त, आत्मनिर्भरसाठी एकात्मतेशिवाय पर्याय नाही:उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिला एकतेचा संदेश‎

देश सशक्त व आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येकाने आपसातील मतभेद, जात-पात विसरून मी भारतीय आहे, एवढेच लक्षात ठेवून एकात्मतेने नांदावे. देशाला सर्व स्तरावर आत्मनिर्भर बनवण्यासाठी परिश्रम करणे गरजेचे आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाला व कार्याला डोळ्यासमोर ठेऊन देशाच्या उज्वल भविष्यासाठी पदभ्रमण करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी केले. ते युनिटी मार्चच्या समारोप प्रसंगी बोलत होते. या मार्चमधून एकतेचा संदेश देण्यात आला. प्रारंभी लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन' औचित्य साधून यापूर्वी पोलिस दलातर्फे जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी पोलिस बँड पथकाचे देशभक्ती पर सादरीकरण, वॉक, शपथ असे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिस मुख्यालयात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत पोलिसांनी आयोजित केलेल्या रन फॉर युनिटी' या ३ किमी धावण्याच्या उपक्रमात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, शनिवारी मूर्तिजापूर येथे समारोप कार्यक्रम तालुका क्रीडा संकुल येथे पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच युवक, युवती, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला तहसीलदार शिल्पा बोबडे, मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेश सिंह शेखावत, प्रा. मनीषा यादव, प्रा. गोरखेडे, प्राचार्य खाडे, मुख्याध्यापक राठोड आदी उपस्थित होते. उपस्थितांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे उपस्थित हस्ते पूजन करून हरार्पण करण्यात आले. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे संचालन विलास नसले यांनी केले. पदयात्रेत मेरा युवा भारत केंद्राचे तालुका समन्वयक विलास वानखडे यांच्यासह शासकीय कर्मचारी, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, पोलिस कर्मचारी, विविध शाळेचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, एनर्जेटिक फिटनेस कल्ब, पतंजली योग समिती, फौजी फिजिकल अकॅडमी, जीके अकॅडमी, सोल्जर फिटनेस अकॅडमी इत्यादींनी सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिला. प्रास्ताविक महेश सिंह शेखावत यांनी केले. आभार ज्ञानेश टाले यांनी मानले केले. अशी निघाली पदयात्रा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शनिवारी युनिटी मार्च या पदयात्रेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उपविभागीय अधिकारी अपार यांच्या हस्ते पदयात्रेला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली होती. पदयात्रा श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, भगतसिंग चौक, आठवडे बाजार, तहसील कार्यालय मार्गाने काढण्यात आली. समारोप क्रीडा संकुलात करण्यात आला. विविध शाळांचे विद्यार्थी तसेच फौजी अकॅडमी आणि मेजर अकॅडमीचे युवा विविध संदेशाचे फलक हाती घेऊन पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:29 am

शिक्षक पात्रता परीक्षा झाली सुरळीत; 814 परीक्षार्थी राहिले अनुपस्थित:पेपर एक 5,530 तर पेपर दोनला 8,856 उमेदवार हाेते उपस्थित‎

जिल्ह्यात रविवारी ३६ केंद्रांवर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जिल्ह्यात पेपर एकसाठी ५ हजार ८६५ तर पेपर दोनसाठी ९ हजार ३६५ नोंदणी केली. यापैकी पेपर एकसाठी ५ हजार ५३० तर पेपर दोनसाठी ८ हजार ८५६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर या दोन्ही सत्रातील पेपरला ८१४ उमेदवार हे विविध कारणांनी गैरहजर राहिले. ही परीक्षा सर्व केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.सर्व परीक्षा केंद्रांवर निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.तत्पूर्वी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यामध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा, ज्ञानमाता हायस्कूल आणि होली क्रॉस शाळा आदींचा समावेश आहे. ही परीक्षा सुरळीत होण्यासाठी उर्वरित. पान ४

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:12 am

वीकेंडमुळे गजबजली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे‎:मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा व इतर पर्यटनस्थळांवर वाढली गर्दी‎

दिवाळी झाली तशी थंडीला सुरुवात झाली. काही दिवसांच्या तुलनेत यंदा थंडीही काहीशी कमी झाली, त्यामुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळे पर्यटकांनी गजबजायला लागली. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिक त्यांच्या वाहनाने कुटुंबासह शनिवार व रविवारी घराबाहेर पडताहेत. यात हिल स्टेशन चिखलदरा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सेमाडोह, अप्पर वर्धा धरण, मालखेड येथील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध सरोवर, येथील बांबू गार्डन, मुक्तागिरी, लासूरचे आनंदेश्वर मंदिर, सालबर्डी अशा पर्यटन व धार्मिक स्थळांचा समावेश आहे. थंडीला सुरुवात झाली की, चिखलदरा, मेळघाटचे सौंदर्य खुलते. धुक्याच्या चादरीने हा परिसर वेढला जातो. चिखलदऱ्यातील भीमकुंड, किचकदरी, वैराट देवी, सुर्यास्त पॉईंट, बीर धरण, पंचबोल पॉईंट येथील निसर्गाने उधळण केलेले सौंदर्य, येथील खाद्य पदार्थ, आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. सेमाडोह व्याघ्र प्रकल्प, हत्तीची सफारी, रात्री तंबूत वास्तव्य हा एक आनंद आहे. त्यामुळे येथे पर्यटक येत आहेत. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिण बाजूला असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हिवाळ्यात वाघ, अस्वल, बिबट,चंदेरी अस्वल, तृणभक्षी प्राणी, पक्षी पाहण्याची चंगळ असते. थंडीत प्राणी पाणवठ्यांजवळ येतात, त्यामुळे त्यांना पाहणे सोपे होते. चिखलदरा येथे गाविलगड किल्ला आहे. पचबोल पॉइंट दऱ्या, टेकड्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हा पॉइंट आहे. चिखलदऱ्यामध्ये मेघदूत हे उद्यान आहे. गुरुकुंज मोझरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी , मुक्तागिरी मंदिर हे धार्मिक स्थान आहे. बांबू गार्डनमध्ये विविध प्रकारचे बांबू, कॅक्टसची झाडे आहेत. वडाळी तलाव, अप्पर वर्धा धरण मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथे आहे. येथे निसर्गाची शांतता अनुभवता येते. दर्यापूर जिल्ह्यातील लासूर येथील आनंदश्वर शिव मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून ते वरच्या बाजुने उघडे असल्याने येथे ऊन, सावलीचा खेळ बघण्यासारखा असतो. त्याचप्रमाणे सालबर्डी येथेही निसर्गरमणीय ठिकाणी शिव मंदिर असून नदी, नाला, उंच सखल रस्ता, घनदाट वृक्षांमधून मार्ग काढत भुयारात असलेल्या या मंदिरापर्यंत जावे लागते. येथील निसर्ग सौंदर्यासोबतच कच्चा चिवडा, बोरकूट खाण्यासाठी पर्यटक येथे भेट देतात.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:11 am

यावली शहीद येथे महिला सभेला प्रतिसाद:महिला सक्षमीकरण, शासकीय योजनांची दिली माहिती, महिलांची माेठी उपस्थिती‎

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत यावली शहीद येथे महिला सभेचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे, त्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे. हा या सभेचा प्रमुख उद्देश होता. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिल्पा खवले या होत्या. या वेळी ग्रामपंचायत सदस्य मेश्राम, पंचायत समितीचे बी. एम. सावंत, युवा परिवर्तनच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुंडकर, सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती ठाकरे, ग्रामपंचायत अधिकारी ललित बैलमारे, मनीषा दुधंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनीषा दुधंडे यांनी या वेळी मनोगत व्यक्त करत महिला सक्षमीकरणात सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. सभेमध्ये बचत गटांना निधी उपलब्ध करून देणे, उद्योग वृद्धीसाठी प्रशिक्षण, समाज कल्याण विभागातील विविध शासकीय योजना, मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन केले . महिलांनीही या सर्व विषयांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांविषयी उत्सुकता दर्शवली. ग्रामपंचायत अधिकारी ललित बैलमारे यांनी घरपट्टी भरण्याचे आवाहन करताना शासनाच्या मागील करावर ५० टक्के सूट देणाऱ्या निर्णयाची माहिती महिलांना दिली. ‘लखपती महिला योजना’ कशी उपयुक्त असून, ती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते. याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. सरपंच शिल्पा खवले आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महिला सभा उत्तुंग यशस्वी ठरली. नीलेशा कांडलकर यांनी आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:10 am

म्हाडा वसाहतीमधील 567 गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी:गुरुकुल संस्था, शालिनीताई मेघे हॉस्पिटलने राबवला संयुक्त उपक्रम‎

शहरातील साईनगरातील म्हाडा वसाहत परिसरातील नागरिकांसाठी रविवार, २३ नोव्हेंबरला मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान महाशिबिर घेतले. गुरुकुल संस्था, शालिनीताई मेघे हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या संयुक्त सहकार्याने आयोजित शिबिराचा ५६७ गरजू नागरिकांनी लाभ घेतला. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला खा.डॉ. अनिल बोंडे, प्रा. रवींद्र खांडेकर, डॉ. अश्विन रडके, तुषार भारतीय, चेतन गावंडे, रेखा भुतडा, भाजप महिला आघाडीच्या लता देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शिबिराचे आयोजन म्हाडा वसाहतीतील रो-हाऊस, नवी म्हाडा वस्ती, अकोली रोड, साईनगर येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत केले होते. या शिबिरात १३ हून अधिक विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित होते. या शिबिराच्या आयोजनाची धुरा विजय धामोरीकर, अनिल नंदनवार, अनिल पवार, श्रीलेश खांडेकर, कल्पना विघे, प्रमोद मिसाळ, प्रमोद वानखडे, गजानन ठाकरे, महेंद्र गडेकर, पुरुषोत्तम गायकवाड, गजानन नागपुरे, गोपाल दलाल, बंडू विघे तुषार चौधरी या कार्यकर्त्यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे संचालन मंदार नानोटी यांनी केले. या उपक्रमामुळे म्हाडा वसाहत परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी आधार मिळाला मोफत तपासण्यांसह औषध वितरण ः या शिबिरादरम्यान नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत तपासण्या जसे की रक्तदाब, मधुमेहाची तपासणी केली . याव्यतिरिक्त, वजन, एचबी, सीबीसी, थायरॉईड, ईसीजीअशा रक्त तपासण्या व निदान चाचण्या मोफत केल्या . गरजू रुग्णांना तपासणीनंतर औषधी निशुल्क वितरित केली. गंभीर आजारांचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची तयारी संयोजकांनी दर्शवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:09 am

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत; कृषी विज्ञान केंद्राची महत्त्वाची भूमिका:कृषी विज्ञान केंद्र, घातखेड येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम

शेती व्यवसाय हा अन्नधान्य व खाद्य उत्पादनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. परंतु, आजच्या बदलत्या युगात शेतीही आधुनिक पद्धतीने होत आहे. अनेक जैविक व रासायनिक घटकांचा वापर वाढल्याने शेती उत्पादनातील पोषण कमी झाले आहे. परिणामी विषयुक्त अन्न -धान्य हे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरताना दिसत आहे. उत्तम आरोग्यासाठी पोषण खाद्य महत्वाचे असल्याने नैसर्गिक शेतीतून कसदार व पोषण युक्त व आरोग्यदायी खाद्य उत्पादनाची निर्मिती होणार आहे. नैसर्गिक शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांमध्ये याबाबत जाणीव -जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती येथे पी.एम. किसान सन्मान निधी योजना तसेच डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक शेती विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ डॉ. ए.पी. फुसे, प्रमोद मेंढे, विषय विशेषज्ञ अमर तायडे , डॉ. प्रणिता कडू, संजय पाचकवडे, राजेश राठोड, बीटीएम आत्मा अमरावतीचे दुबे, शुभम लहाने, शुभम कोंडे, दिगंबर सातंगे, प्रणिता भोंगे, प्रतिक घोगरे , विवेक भटकर, सुधीर भुस्कुटे यांचेसह शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अतुल कळसकर यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक शेती पद्धती आत्मसात करण्यास या प्रशिक्षणातून मोठी मदत मिळणार आहे. असेही ते म्हणाले. प्रशिक्षणादरम्यान विविध विषयावर मार्गदर्शन या दोन दिवसीय प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची मूलभूत तत्त्वे, तण नियंत्रणाच्या पद्धती, विविध नैसर्गिक फॉर्म्युलेशनची निर्मिती व वापर, नैसर्गिक कीटकनाशके, ट्रायकोडर्मा उत्पादन, जैविक खतांची तयारीवर प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. परिसरातील १४० शेतकरी सहभागी कार्यक्रमासाठी धारणी तालुक्यातील ४० शेतकरी तसेच इतर तालुक्यांतील १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांचे दोन गट तयार करून त्यांनी नैसर्गिक शेतीतील वापरात येत असलेले तंत्रज्ञान बाबत सादरीकरण सादर केले. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयक तांत्रिक पुस्तिका वाटप करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:09 am

एचआयव्ही संक्रमितांना दिलासा देण्यात एनएसएस, रेड रिबन क्लबचा सहभाग:कार्यक्रम अधिकारी, रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी, सदस्यांची कार्यशाळा‎

एचआयव्ही संक्रमितांना दिलासा देण्यात अमरावतीच्या एनएसएस आणि ‘रेड रिबन क्लब’चा प्रभावी सहभाग असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) राज्य संपर्क अधिकारी तथा ओएसडी प्रा. डॉ. मिलींद काळे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी व सदस्यांची एक कार्यशाळा येथे नुकतीच पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रेड रिबन क्लबची कार्यप्रणाली व एचआयव्ही हा या कार्यशाळेचा विषय होता. येथील मोर्शी रोड स्थित ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे होते. अतिथी म्हणून रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा. विशाल गजभिये, प्रा. डॉ. मंदा नांदुरकर, वरिष्ठ बाल रोगतज्ञ डॉ. संदीप दानखडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकार हे मंचांवर उपस्थित होते. रा.से.यो. अधिकारी तथा सदस्य यांची भूमिका विषद करताना डॉ. काळे यांनी नवीन युवक तयार करण्यामध्ये प्राध्यापकांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना ही एचआयव्हीची जनजागृती करताना बरोबरीची भागीदार असणे तेवढेच महत्वाचे आहे, हेही त्यांनी पटवून दिले. डॉ. दिलीप सौंदळे यांनी कुठलीही भूमिका साकारताना त्यामध्ये जोपर्यंत आपण सर्वस्व देत नाही, तोपर्यंत यश मिळत नाही असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक अजय साखरे यांनी जिल्ह्यातील एचआयव्हीची परिस्थिती, एड्स आणि इतर आजार यावर विचार मांडले. लैंगिक समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात युवक-युवती, तसेच त्यांच्या लैंगिक समस्या आणि उपाय यावर डॉ. संदीप दानखडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात जिल्ह्यातील एचआयव्ही साठी सेवा देणाऱ्या शासकीय संस्थांविषयी प्रमोद मिसाळ यांनी तर अशासकीय संस्थांविषयी ब्रिजेश दळवी यांनी माहिती पुरविली. त्याचवेळी प्रा. विशाल गजभिये यांनी विद्यापीठाची विविध उपक्रमाबाबत असणारी भूमिका विषद केली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:08 am

अमरावतीमध्ये राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत लक्षवेधी नाटके सादर‎:टाकरखेडा संभूच्या संस्थेची महिलांची भूमिका असलेली सखी ग सखी नाट्यकृती लक्षवेधी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरी अंतर्गत आज, रविवारी ‘सखी गं सखी’ हे नाटक सादर झाले. फक्त महिलांचा समावेश असलेल्या या नाट्याद्वारे रसिकांना नोकरदार महिलांच्या वेगवेगळ्या भूमिकांची ओळख झाली. संवाद प्रधान असलेले हे नाटक आहे. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज परिसर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात नेहमीप्रमाणे सायंकाळी ७ वाजता नाटकाचा प्रारंभ झाला. नाट्य प्रयोगाच्या सुरुवातीला रंगमंचावर एक ‘टॉक शो’ सुरू असतो. तो केवळ स्त्रियांसाठी आणि स्त्रियांच्या अनुभवावर आधारित असतो. या कार्यक्रमाची सूत्र संचालिका प्रगल्भ आणि समजूतदार आहे. स्त्रीच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासातले सत्य, माध्यमांचा प्रभाव आणि स्त्रीच्या प्रतिमे वरचा परिणाम, संघर्ष, वाट बघणं, प्रामाणिकपणा आणि आकांक्षा यांचा ताळमेळ दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्य नाट्य स्पर्धा सुरु असून रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अ. भा. नाट्य परिषदेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे, नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले आणि समन्वयक विशाल फाटे त्यासाठी स्थानिक पातळीवर परिश्रम घेत आहेत. छोट्या गावातील संस्थेची नाट्य निर्मिती भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू या छोट्याशा गावातील समर्पण बहुउद्देशीय संस्था या नाटकाची निर्माती आहे. डॉ. पराग घोंगे यांनी या नाटकाचे लेखन केले असून दिग्दर्शन किशोर पाचकवडे यांचे आहे. यात आंचल गजभिये, सोनू तारपुरे, काजल देशमुख, मयुरी राणे आणि प्रियांका नवाथे यांनी अभिनय केला आहे. नेपथ्य रिंकू सरोदे, पार्श्व संगीत प्रज्वल तायडे, प्रकाशयोजना सागर उदासी, रंगभूषा रवीना भुरभुरे आणि वेशभूषा कुंदाताई वंजारी यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:07 am

हॅपी स्ट्रीट्स; फिटनेस, सामाजिक जागरूकतेचा संगम:‘सनडे बनवा फनडे,’ आबालवृद्धांचा माेठा सहभाग, वाहनमुक्त रस्त्यावर गर्दी‎

मोर्शी रोडवरील वेलकम पॉइंट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या हॅपी स्ट्रीट्स अमरावती या उपक्रमाने शहरात उत्साह, आनंद आणि आरोग्याचा नवा संमिश्र अनुभव दिला. ‘सनडे बनवा फनडे’ या संकल्पनेला नागरिकांनी प्रतिसाद देत रविवारी २३ नोव्हेंबरला पहाटे ६ वाजतापासूनच वाहनमुक्त रस्त्यांवर गर्दी केली. हॅपी स्ट्रीट्स अंतर्गत फिटनेस, मनोरंजन आणि कुटुंबासाठी उपयुक्त असे अनेक उपक्रम आयोजित केले. वेगवेगळ्या झोनमध्ये रनिंग, अॅरोबिक्स, योगासने आणि इतर फिटनेस सत्रांचे आयोजन केले गेले. प्रशिक्षित झुंबा प्रशिक्षक कविता शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या झुंबा सत्रांनी सर्व वयोगटातील नागरिकांना संगीताच्या तालावर थिरकवत सकाळी नवचैतन्य दिले.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहभागी करणारे विविध खेळ, मनोरंजन उपक्रम, इंटरअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले. शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलच्या मेरा भारत स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांनी स्वच्छता कशी बाळगावी,आत्मरक्षा, मर्दानी खेळ, मुलींनी आपले सरक्षण स्वतः कसे करावे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या प्रेरनेने प्रात्यक्षिक करून दाखवले. नागरिकांनी या दोन्ही प्रात्यक्षिकांचे कौतुक करून मुलांना शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलचे नाव विचारत शाळेमध्ये हे छान उपक्रम घेतात व पुढील रविवारलाही यावे, अशी विनंती केली. यामध्ये सहभागी विद्यार्थी आराध्या सगणे, जान्हवी उकिणकर, दृष्टी ठाकूर, दाक्षणी काळे, ईश्वरी ढोणे, सिद्धी नवघरे, प्राजक्ता राऊत, आरोही धोटे, मधुरा म्हसाळ, अक्षदा अत्तरकर , श्रुती खंडारे, लावण्या भेले, राधिका काकळे ,कृष्णाली आगळे, देवराज जगताप, स्वरीत मेहरे, साहिल लुल्ला, अरीन संदीप यावलकर, तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक अमर खंडारे ,मंदार मडावी, शाळेच्या मुख्याध्यपिका वैशाली ठाकरे, पर्यवेक्षिका शारदा फुले यांच्या मार्गर्शनाखाली तयार झाले. अशा उपक्रमांमुळे शहरात आरोग्यदायी व सकारात्मक सकाळीचा नवा संस्कार निर्माण होत, असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. रविवार सकाळचा मोर्शी रोड पूर्णपणे उत्सवमय, कुटुंबप्रधान दिसत होता. पालक, मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिक—सर्वांनी मिळून चालणे, सायकलिंग, नृत्य, खेळ व विविध उपक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला. अनेक कुटुंबांनी सांगितले की,अशा उपक्रमांनी ताणतणावमुक्त जीवनशैलीला चालना मिळते आणि कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतात.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:06 am

शिंदेंची ‘बहिणीं’ना साद तर भाजपबाबत मौन:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अक्कलकोटला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्याची ग्वाही‎

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.२३) जाहीर सभा घेतली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजना सुरू केली. तुमचा भाऊ आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. मुख्यमंत्री होतो त्यावेळी आमदार राजू खरे यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा योजनेला पैसे दिले. दरम्यान, शिंदेच्या सभेत व्यासपीठावर महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार राजू खरे यांच्या उपस्थितीमुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. याप्रसंगी आमदार राजू खरे, राष्ट्रवादीचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, रमेश बारसकर, ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख आदी उपस्थित होते. प्रतिनिधी | अक्कलकोट ‘माझ्यासाठी सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा भाऊ हे पद सर्वात मोठे आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची पाण्यासाठीची वणवण थांबवणार. मी मुख्यमंत्री असताना अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला व पाणीपुरवठ्यासाठी निधी दिला आहे. येथे १५ दिवसांनी नाही तर दररोज पाणी मिळायला पाहिजे. तो नागरिकांचा अधिकार आहे. त्यामुळे नगरविकास विभाग, नगरोत्थान, पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी आमची, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीत लाखो भक्त येतात. हे तीर्थक्षेत्र जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करणार, असेही ते म्हणाले. येथील जुना राजवाड्यासमोर रविवारी (दि.२३) दुपारी १२.१५ वाजता तालुक्यातील तीन नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना राज्य सचिव संजय मोरे, राज्य प्रवक्ता प्रा. ज्योती वाघमारे, सोलापूर संपर्कप्रमुख संजय कदम, शिवसेना नेते व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रथमेश म्हेत्रे, अक्कलकोटचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रईस टिनवाला व सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार आणि त्यांचे सहकारी उमेदवार उपस्थित होते. २० मिनिटांच्या भाषणात ते दोन मिनिटे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अप्रत्यक्ष बोलले परंतु त्यांनी भाजपबाबत बोलणे कटाक्षाने टाळले. अक्कलकोटमध्ये मिळते मन:शांती: एकनाथ शिंदे म्हणाले की, अक्कलकोटमध्ये आनंद व समाधान आहे. येथे आल्यावर मनाला शांती मिळते. एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वामी समर्थ म्हणायचे की, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. त्यामुळे तुम्हीही ज्यांना घरात बसून तोंड पाटीलकी करायची, त्यांचे तोंड बघू नका. अक्कलकोट या स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. मी मुख्यमंत्री असताना मुलींना मोफत उच्चशिक्षण, ज्येष्ठांना मोफत प्रवास सुरू केला. अक्कलकोटमध्ये उद्यानासाठी एक कोटी मंजूर केले. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो. तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करा. म्हेत्रे साहेबांसारखी टीम आपल्या सोबत आहे. अक्कलकोट व दुधनीच्या प्रगतीची शपथ घ्या. आपण सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा. अडीच वर्षात केलेले काम लोकांना सांगा. का एकनाथ शिंदे म्हणाले की, स्वामी समर्थ ‘उतावळस्वो बावळो, धीर सो गंभीर’ म्हणायचे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांसाठी हा संदेश आहे. स्वामी समर्थांचा हा संदेश सर्वांनी आचरणात आणावा. आपली धडपड ही खुर्चीसाठी नव्हे खुर्चीवर ज्या लोकांनी बसवलं त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली धडपड असली पाहिजे. बाळासाहेब म्हणायचे की, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. आपणही तसेच काम करावे. कारण समाजसेवा, समाजकारण हाच शिवसेनेचा पिंड आहे. शिंदे म्हणाले की, आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करता येईल तेच बोलतो. शिंदे फेस टू फेस काम करतो. मीडिया लाइव्ह करत नाही, असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. आपली धडपड खुर्चीसाठी नाही. या खुर्चीवर ज्यांनी बसवलं त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आपला अजेंडा आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, कार्यकर्ता घरात नाही दारात शोभतो. नेते उबाठा सोडून का जातात, याचे आत्मचिंतन करा. शिंदेसेनेने विधानसभेत ८० पैकी ६० जागा जिंकल्या तर उबाठाला ११० पैकी २० मिळाल्या. यातून बोध घ्यावा असा टोला त्यांनी लगावला. महायुतीच्या व्यासपीठावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार राजू खरे उपस्थित होते. राष्ट्रवादी स्वतःच्या चिन्हावर मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक लढवत आहे. परंतु त्यांच्या पक्षातील आमदार विरोधकांच्या व्यासपीठावर जात आहेत. वर्तमानपत्रांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छापर जाहिरातीत सुद्धा आमदार राजू खरे यांचा फोटो झळकला आहे. जे बोलतो ते करतो, फेस टू फेस काम

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:49 am

वर्दळीच्या संगम शेवरे रोडची दुरवस्था:काँक्रिटीकरणासाठी केला रास्ता रोको, संगम येथे रविवारी शिवसेनेने आंदोलन करत वेधले समस्येकडे लक्ष‎

भीमा नदी काठावरील संगम शेवरे रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने रविवारी (दि.२३) संगम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माळशिरस तालुक्यातील संगम व शेवरे (ता. माढा) येथील भीमा नदीच्या काठावरील असलेल्या या प्रमुख रस्त्याचे काँक्रिटीकरण मेघा कंपनीने करुन द्यावे, या मागणीसाठी युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवासेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे, महादेव लोखंडे, शहरप्रमुख शेखर खिलारे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख ताई टोणपे उपस्थित होत्या. संगम शेवरे हा अकलूज टेंभुर्णी या प्रमुख रस्त्यावरील दळणवळणाचा रस्ता आहे. या रोडवर दररोज मोठ्या प्रमाणात ये-जा, तसेच मालवाहतूक केली जाते. आपत्कालीन रुग्णवाहतूक केली जाते. अनेक साखर कारखान्यांची ऊस वाहतूक याच रस्त्याने केली जाते. रस्त्याचे नुकसान झाल्यामुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. या रोडवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे सामान्य नागरिकांना मणक्यांचे आजार जडत आहेत. तसेच धुळीमुळे श्वसनाचे आजार होत आहेत. हा प्रश्न मेघा कंपनीला लक्षात आणून सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत. येत्या एका महिन्यात काम केले नाही तर मेघा कंपनीचे कार्यालयाला लक्ष्य केले जाईल, असा इशारा युवासेनेने दिला आहे. याप्रसंगी सागर इंगळे. नरा इंगळे, प्रशांत पराडे, धनाजी मस्के, आबा गोसावी, पप्पू जमदाडे, आप्पा महाडिक आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:46 am

पंढरपूरमध्ये निवडणुकीचा धुरळा अन् नागरिकांच्या नाराजीवर सिंचन:नगरपरिषद निवडणूक प्रचारात धुळीचा मुद्दा ठरतोय कळीचा‎

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात धुळीचा मुद्दा कळीचा ठरतो आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी इसबावी ते सरगम चौक या दरम्यान रस्त्यावर चक्क दिवसातून दोन वेळा पाणी मारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, निवडणूक होताच हे पाणी मारणे चालू राहणार की बंद होणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत धूळ आणि शहरातील खड्डे केंद्रस्थानी येत आहेत. धूळ आणि रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या विरोधकांनी प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. सर्वसामान्य नागरिकांतून याबाबत नाराजी बोलून दाखवली जात आहे. गत वर्षभर पालखी मार्गाचे काम सुरू आहे. इसाबावीपासून सरगम चौकादरम्यान धुळीचे लोट उठत आहेत. यामुळे या रोडच्या बाजूच्या लोकांनी अनेकदा तक्रारी करुनही संबंधित ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही. परंतु निवडणुकीत धुळीचा मुद्दा उपस्थित केला जाताच प्रशासनाने त्या ठेकेदाराला सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता, असे दिवसातून दोन वेळा पाणी मारण्याचे फर्मान काढण्यात आले आहे आणि ठेकेदार कंपनी पाणी मारत आहे. पाणी मारण्यामुळे सध्या धुळीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. परंतु मतदान होताच पाणी मारण्याचे टँकर बंद होतील, की २०११ मध्ये नगरपालिका निवडणुकीत धुळीच्या मुद्यावरून सत्तापरिवर्तन की चालू राहतील, याकडे लक्ष लागले आहे. शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मार्गाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. २०११ मधील नगरपालिका निवडणुकीत धुळीचा मुद्दा असाच गाजला होता. धुळीमुळे छातीत चिखल झालाय, हे दिवंगत आमदार भारत भालके यांचे वक्तव्य आजही चर्चेत आहे. १४ वर्षानंतर पुन्हा एकदा पालिका निवडणुकीत धुळीचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. या धुळीचा फटका बसू नये, यासाठी टँकरने पाणी मारून नागरिकांच्या नाराजीवर सिंचन केले जात असल्याचे दिसते.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:45 am

बागवाडीत शेतकऱ्यांना फार्मर कप' प्रशिक्षण:कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा‎

बाभुळगाव. तालुक्यातील बागवाडी येथे फार्मर कप शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.तालुका कृषी विभाग बाभुळगाव व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम दि. १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी ऋतिका डेरे, पाणी फाउंडेशनचे सिद्धेश उंबरकर, रवींद्र गाजरे,गजानन घाटे व उमेश बांगडकर उपस्थित होते. बाभुळगाव तालुक्यात गटशेतीची चळवळ रुजवण्यासाठी व खरीप हंगाम २०२६ करिता गट निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण घेण्यात आले. आर्थिक व सामाजिक लाभ याबद्दल शेतकऱ्यांशी संवाद साधला. यापूर्वी झालेल्या फार्मर कप स्पर्धेने शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावले, या विषयीच्या चित्रफिती दाखवली. संचालन गजानन घाटे यांनी केले व आभार उमेश बांगडकर यांनी मानले. फार्मर कपप्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेले शेतकरी व इतर.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:44 am

सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात भाविकांची गर्दी, भाविकांची गर्दी वाढली:अक्कलकोटमधील भक्तनिवास, हाॅटेल, निवासस्थाने भक्तांनी फुल्ल‎‎

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शनिवार, रविवार सलग सुट्यांमुळे भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. भाविकांनी अक्कलकोट शहरात दर्शनासाठी गर्दी केली. भाविकांनी एकत्रित कुंटुंबियासह स्वामींचे दर्शन घेतले. सुट्यांमुळे वटवृक्ष मंदिरात गर्दी, ५० हजार भाविकांनी प्रसाद घेतला. रात्री अक्कलकोट मुक्कामी येऊन भाविक सकाळी स्वामींच्या दर्शन करून दुसऱ्या दिवशी गाणगापूर आदी ठिकाणी दर्शन करून धार्मिक पर्यटनांचा कुंटुंबियासह लाभ घेतला. अक्कलकोट तीर्थक्षेत्र भाविकांनी फ़ुलुन गेले. अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील दर्शनानंतर भाविक अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी करत आहेत. अन्नछत्र मंडळ परिसरात महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच दर्शनरांग लांबपर्यंत गेली होती. अवधूत चिंतन ‘श्री गुरुदेव दत्त सद्गुरू, श्री स्वामी समर्थ महाराज की जय...’ या जयघोषाने वटवृक्ष मंदिर परिसर व अन्नछत्र मंडळ परिसर व अक्कलकोट नगरी दुमदुमली. अक्कलकोट शहरातील समाधी मठ, राजेराय मठ आदींसह सर्व ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवस्थान व अन्नछत्र भक्तनिवास तसेच शहरातील सर्व निवासस्थाने भक्तांनी भरून गेली. अक्कलकोट हे मध्यवर्ती निवासाचे ठिकाण करून भाविक गाणगापूर, तुळजापूर व पंढरपूर या ठिकाणी भेट देत आहेत. तसेच येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात शनिवार, रविवार व दिवाळी सलग सुट्यांमुळे भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता शनिवारी अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी भाविकांची दर्शन रांग फत्तेसिंह चौकापर्यंत गेली होती. शनिवार, रविवार सुट्टीमुळे भाविकांची गर्दी वाढली श्री स्वामी मंदिरात वाढती गर्दी लक्षात घेऊन भाविकांना स्त्री व पुरूष अशा दोन रांगात मंदिरात दर्शनासाठी सोडले जात आहे. तसेच शनिवार, रविवार सुट्टीमुळे गर्दी वाढत आहे. येथील श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात उन्हाळी सलग सुट्यांमुळे भाविकांनी स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केली. शाळांना सलग सुट्यांमुळे भाविकांची अक्कलकोट तीर्थक्षेत्री मोठी गर्दी झाली. रात्री अक्कलकोट मुक्कामी येऊन भाविक सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी निघत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:43 am

बायोमेट्रिक प्रमाणिकरणासाठी विद्यार्थी दीड तास आधी कक्षात:21 हजार 431 जणांनी दिली शिक्षक पात्रता परीक्षा‎

शहरात रविवारी २१ हजार ४३१ जणांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. परीक्षा कक्षात जाण्यापूर्वी परीक्षार्थींची बायोमेट्रिक प्रणाली मार्फत पडताळणी करण्यासाठी दीड तास अगोदर प्रवेश देण्यात आला. परीक्षा कालावधीत कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवून गैरप्रकार टाळण्याचे नियोजन आखले होते. अहिल्यानगर जिल्ह्यात पेपर क्रमांक एकसाठी ९ हजालर ६०९ तर पेपर क्रमांक दोनसाठी १३ हजार २४१ परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी दोन्ही पेपरला एकूण २१ हजार ४३१ परीक्षार्थी हजर राहिले. शहर व शहरालगत पेपर क्रमांक एकसाठी २५ तर पेपर क्रमांक दोनसाठी ४४ परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने विद्यार्थी उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवण्यात आली. पेपर एकची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत होती. या पेपरसाठी परीक्षार्थींना ९ वाजताच प्रवेश देण्यात आला. तर पेपर दोनसाठीची वेळ दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. या पेपरसाठी एक वाजता कक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केला आहे.परीक्षा केंद्रांना शिक्षण सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे डॉ. राजेश बनकर, भास्कर पाटील, माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, संजयकुमार सरोदे यांच्या पथकांनी भेटी देऊन पाहणी केली. बायोमेट्रिकमुळे परीक्षार्थींची खात्री ^सर्व केंद्रांवर शांततेत व सुरळीत परीक्षा पार पडली. प्रत्येक वर्गात सिसिटीव्ही होते. बायोमेट्रिकसह आवश्यक पडताळणीसाठी साठीच दीड तास अगोदर कक्षात प्रवेश देण्यात आला होता. - रमाकांत पाठमोरे , सहसंचालक, शिक्षण.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:35 am

लघुउद्योजक देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा- कोटस्थाने:सुपा एमआयडीसीत उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा मेळावा, उद्योजकांना कर्ज मंजुरीपत्रांचे वाटप‎

महाराष्ट्र राज्य उद्योग व्यवसायात आघाडीवर आहे. लघु उद्योजक व उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी तसेच सोप्या आणि कमी व्याजदराच्या योजनेतील त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने देशभरात उद्योजकता उद्यम कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजक हा देशाचा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे. त्याला आर्थिक मजबुती देण्यासाठी सेंट्रल बँक कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी झोनल हेड आशा कोटस्थाने यांनी केले. सुपा एमआयडीसी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने आयोजित एमएसएमइ व उद्योजकता मेळाव्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आशिष नवले, उद्योजक सचिन औटी, संग्राम सारडा, कौस्तुभ काकडे आदी उपस्थित होते. प्रत्येक उद्योजकाने बँकेकडे यायला पाहिजे त्यांचा तो हक्क आहे. लघु उद्योजकांसाठी मोठी संधी आहे. या माध्यमातून तळागाळातील उद्योजकापर्यंत बँक पोहोचेल. उद्योग व्यवसाय वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. महिला उद्योजकांनी यामध्ये पुढे यायला हवे. शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम बँकेने केल्याचे कोटस्थाने यांनी सांगितले. प्रास्ताविकात जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आशिष नवले म्हणाले, बँकेच्या माध्यमातून देशभरात एकाच वेळी उद्योजकता विकास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उद्योजकांसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी संमती दिली आहे. बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र चिपळूणकर म्हणाले, उद्योजकता विकास मेळाव्यामध्ये उद्योग वाढीसाठी उद्योजकांना व नवउद्योजकांना एकूण १८ कोटी १६ लाख रुपयांचे मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश काळे यांनी केले तर आभार चीफ मॅनेजर रवींद्र चिपळूणकर यांनी मानले. यावेळी उद्योजक उपस्थित होते. एमआयडीसीत अनेकांना मिळाला रोजगार एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड म्हणाले, उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून लघुउद्योजक व उद्योजक यांच्यासाठी काम होत आहे. महाराष्ट्र हा उद्योग व्यवसाय वाढीमध्ये आघाडीवर आहे. सुपा एमआयडीसीत मोठे उद्योग सुरू झाले आहेत त्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाले आहेत. कामरगाव येथे लॉजिस्टिक पार्क सुरू करण्याचे नियोजन आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:34 am

सावेडी उपनगरात रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचीच दहशत:घरी जाणेही अवघड, मनपाकडून कारवाई थांबल्याने कुत्र्यांचा पुन्हा सुळसुळाट‎

शहरासह उपनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेने मोकाट कुत्री पकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी संस्थेची नियुक्ती केली आहे. मात्र, ठोस उपाययोजना होत नसल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मनपाच्या उपाययोजना कागदावरच असल्याचे चित्र आहे. प्रोफेसर चौक, सिव्हिल हडको, तारकपूर व सावेडी उपनगरात मोकाट कुत्री रस्ता अडवून बसत असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी घरी जातानाही जीव मुठीत धरून जावे लागत आहे. शहरातील चितळे रस्ता, दिल्लीगेट, माळीवाडा, नालेगाव, सर्जेपूरा, झेंडीगेट, मुकुंदनगर, बोल्हेगाव, केडगाव, कल्याण रस्ता व सावेडी उपनगरात पाइपलाइन रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक, तारकपूर परिसरात सध्या मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळच्या वेळी शाळेत जाण्यासाठी बस, रिक्षाची वाट पाहत थांबणाऱ्या लहान मुलांवर मोकाट कुत्री धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकीवरून जाणाऱ्यांच्या मागे कुत्री धावल्याने दुचाकीस्वारांची धांदल उडते. यातून अपघात होण्याचे प्रकार घडत आहेत. प्रोफेसर चौक परिसरात रात्री व पहाटेच्या वेळी सुमारे २० ते २५ कुत्री रस्त्यावर ठिय्या देतात. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत. मुलांचे खेळणेही अवघड प्रोफेसर चौक, सिव्हिल हडको परिसरात रात्री व दिवसा मोकाट कुत्र्यांचा मोठा वावर असतो. वसाहतीत दिवसभर मोकाट कुत्री उच्छाद घालतात. त्यामुळे लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्यांचे घराबाहेर खेळणेही अवघड झाले आहे. मोकाट कुत्र्यांमुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:33 am

जिल्ह्यात खेळाच्या माध्यमातून जीवनकौशल्य शिक्षणाची मोहीम:मुख्यमंत्र्यांचे पाठबळ; 5,300 शाळांमध्ये ‘टॉय बँक’योजना‎

कमी उत्पन्न गटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हे प्रभावी माध्यम असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओपन ट्री फाऊंडेशनच्या ‘टॉय बँक’ उपक्रमाचे कौतुक केले. हा प्रकल्प पुढील ३ ते ४ वर्षांत जिल्ह्यातील सर्व ५,३०० शाळांमध्ये राबवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सध्या अहिल्यानगर तालुक्यातील १५ शाळा आणि ९ कम्युनिटी (अंगणवाडी) केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू असून, मुलांच्या सामाजिक, बौद्धिक व भावनिक विकासात खेळाधारित शिक्षणाची उपयुक्तता लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पाच्या जिल्हाव्यापी विस्ताराची आवश्यकता अधोरेखित केली. जिल्हा प्रशासनाने उपक्रमासाठी पूर्ण प्रशासकीय सहकार्य द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानग्या, प्रशिक्षणाच्या जागा, समन्वय आदी सर्व बाबतीत जिल्हा परिषदेचे पूर्ण पाठबळ मिळत असल्याचे फाउंडेशनने सांगितले. प्रकल्पाचे मुख्य समन्वय जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागामार्फत केले जात आहे. अहिल्यानगर तालुक्यातील अनेक वर्षांच्या प्रायोगिक कामानंतर उपक्रमाचा प्रभाव दिसून आल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाचा जिल्हाव्यापी विस्तार करण्याची सुचना केली. याअनुसार पुढील ३–४ वर्षांत सरकारी आणि खासगी मिळून ५,३00 शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने टॉय बँक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती द ओपन ट्री फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेता चारी यांनी दिली.त्यांनी सांगितले की “मुलांचा खेळ हा केवळ विरंगुळा नसून जीवनकौशल्य निर्माण करणारे प्रभावी साधन आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. डिसेंबर महिन्यात २५ नवीन शाळा उपक्रमाचा आवाका वाढवत डिसेंबर महिन्यात २५ नवीन शाळांना प्रकल्पात समाविष्ट करण्यात येणार आहे.यामुळे आणखी ५,००० विद्यार्थ्यांना खेळाधारित आणि अनुभवाधारित शिक्षणाचा लाभ मिळेल. काही नवीन कम्युनिटी सेंटर जोडण्यात येणार आहे

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:33 am

लंडनमध्ये जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा‎:संस्थापक स्व. कोल्हे यांचे बाबत कृतज्ञता, मेळाव्यास 43 विद्यार्थ्यांची उपस्थिती

कोपरगाव संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित इंजिनिअरींग कॉलेज, एमबीए, पॉलीटेक्निक, फार्मसी अशा विविध संस्थांमधुन शिक्षण घेवुन बाहेर पडलेले व सध्या युनायटेड किंग्डम मध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा इंडियन जिमखाना क्लब, लंडन (युके) येथे पार पडला. या मेळाव्यात संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे व अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण संस्था सुरू केल्यामुळे आम्हाला आज जागतिक पातळीवर संधी मिळाली, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली तर युके मध्ये येथून पुढे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मदत करण्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली. या मेळाव्यास संजीवनीच्या वतीने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी व संनजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रसिडेंट अमित कोल्हे, डीन डॉ. ए. बी. पवार,डॉ. आर. ए. कापगते,डॉ. आर. एस. शेंडगे यांनी हजेरी लावली, अशी माहिती संजीवनीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. पत्रकात म्हटले आहे की, संजीवनीचे माजी विद्यार्थी श्रीधर बीरावेल्ली (सिनिअर एंटरप्राईज आर्किटेक्ट, सायटिव्हा), विनित मोरे (मॅनेजर, अर्दाघ गु्रप), प्रकाश आदमाने (डायरेक्टर, युस्साह लिमिटेड) व अनिल गोल्हार (सोल्युशन्स आर्किटेक्ट) यांनी पुढाकार घेऊन आयोजकाची भूमिका खंबीरपणे पेलली. सध्या युकेत सुमारे ८१ माजी विद्यार्थी कार्यरत आहे. त्यातील ४३ माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते. यातील संजीवनीच्या वतीने काही विद्यार्थ्यांना त्यांच्या योगदानबाध्दल गौरविण्यात आले. यात प्राईड ऑॅफ संजीवनी इन युके या पुरस्कारने मागील ३० वर्षांपासून युकेत वास्तव्यास असणारे परितोष घडियाली, संजीवनी शक्ती पुरस्काराने प्रीथी अय्यर या १८ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या व वोहरा मोहम्मेदी हे २२ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या संजीवनी युके स्टार पुरस्कारने गौरविण्यात आले. या मेळाव्यादरम्यान अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून संजीवनी प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडनमध्ये झाला. यावेळी अमित कोल्हे, डॉ. कापगते, डॉ. शेंडगे व डॉ. पवार उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:32 am

लहान मुलांना धर्ममंडपात‎आणा- भरत गिरी महाराज‎:पिशोरच्या कसबा गल्लीत हरिनाम सप्ताह सुरू

पिशोरच्या कसबा गल्लीतील श्री गणेश मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी रात्री भरत गिरी महाराज धामणगावकर यांनी कीर्तनातून भाविकांना लहान मुलांना धर्ममंडपात आणण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, लहान वयातच अध्यात्माची बीजं पेरली गेली पाहिजेत. त्यामुळे पुढच्या पिढीत धर्माची जाणीव निर्माण होईल. गिरी महाराज म्हणाले, संतांनी आयुष्यभर समाजप्रबोधनासाठी ग्रंथ व अभंगांची अमूल्य देणगी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी संघर्षमय जीवन जगूनही ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ दिला. अज्ञानी समाजासाठी हरिपाठाचा सोपा मार्ग दाखवला. संत तुकाराम महाराजांनी समाजाच्या टीका झेलूनही अभंगगाथा दिली. या संतांच्या कार्यामुळे वारकरी संप्रदायाचा विस्तार झाला. गिरी महाराज पुढे म्हणाले, महाराष्ट्रात जन्म होणे हे पूर्वजन्माचे पुण्य. संतांनी संस्कृत भाषेतील गूढता दूर करून मराठीत ग्रंथ लिहिले. त्यामुळे सामान्य माणसालाही ईश्वरभक्तीचा मार्ग सुलभ झाला. या कीर्तनाचे प्रायोजक समाजसेवक येडोबा जाधव यांनी गिरी महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमात भानुदास महाराज तोडकर, मंगेश महाराज मोकासे, राजू महाराज मोकासे, कीर्तनकार कृष्णा महाराज मोकासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहात धार्मिक वातावरणात उत्साह आहे. भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गिरी महाराजांचे विचार आणि संतांचे कार्य भाविकांना एकत्र आणत आहेत. धर्माधारित जीवन जगण्याची प्रेरणा मिळत आहे. आज दिव्याताईंचे कीर्तन ः या सप्ताहामुळे गावात धार्मिक एकतेचा संदेश पोहोचत आहे. भाविकांची आस्था वाढत आहे. सोमवारी (दि. २४) रात्री दिव्याताई गणेश मोरे यांचे कीर्तन होणार आहे. या कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंच कमिटी व युवा मंडळाने केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:37 am

मूलभूत सुविधा द्या:दहा हजार महिला कामगार काढणार थेट मंत्रालयावर पायी मोर्चा, आडम यांची घोषणा

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) चे १७ वे सोलापूर जिल्हा अधिवेशन दत्त नगर येथील लाल बावटा कार्यालय येथे पार पडले. अधिवेशनाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. ध्वजारोहणाचे मानस्थान माजी आमदार नरसय्या आडम यांना मिळाले. विडी कामगारांना किमान वेतन ४०२ रुपये, १० हजार रुपये पेन्शन, रोख मजुरी, तसेच कॉ. गोदूताई परुळेकर वसाहतीतील मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी १४ एप्रिल रोजी सोलापूर ते मुंबई असा १० हजार महिला कामगारांचा पायी मोर्चा काढणार असल्याचे आडम यांनी समारोपीय भाषणात सांगितले. अधिवेशनाचे उद्घाटन राज्य सिटू नेते व जिल्हा प्रभारी वसंत पवार यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केला. ते म्हणाले, केंद्र सरकारने २९ विविध कामगार कायद्यांचे चार श्रम संहितांमध्ये केलेले रूपांतर हे कामगार-विरोधी पाऊल आहे. नवीन श्रम संहितांत लेबर कोर्ट व लेबर ऑफिसची संकल्पनाच संपवण्यात आली आहे. ६० टक्क्यांहून अधिक असंघटित कामगारांवर या कायद्यांचा गंभीर परिणाम होणार आहे. सिटूचे जिल्हा सचिव अ‍ॅड. एम.एच. शेख यांनी मागील तीन वर्षांचा राजकीय व संघटनात्मक अहवाल सादर केला. जिल्हा कोषाध्यक्ष दीपक निकंबे यांनी आर्थिक अहवाल मांडला. अहवाल सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वृत्तांत लेखन समितीत दत्ता चव्हाण आणि किशोर मेहता यांनी काम पाहिले. निवृत्त कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन देण्याची मागणी विडी कामगारांचे सुधारित किमान वेतन रु. ४०२ फरकासहित अदा करा व निवृत्त कामगारांना दहा हजार रुपये पेन्शन द्या. यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा. असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा. जन सुरक्षा कायदा रद्द करा. शहराला दररोज पाणीपुरवठा करा. योजना कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या व किमान वेतन लागू करा. २१ पदाधिकारी कमिटी व ६१ सदस्यीय कार्यकारिणीची निवड जिल्हाध्यक्ष- नरसय्या आडम, जिल्हा सचिव- अ‍ॅड. एम.एच. शेख, जिल्हा कोषाध्यक्ष- दीपक निकंबे, उपाध्यक्ष- नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, कामिनी आडम, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग, बापू साबळे, दाऊद शेख. सहसचिव- युसूफ शेख, किशोर मेहता, विल्यम ससाणे, नरेश दुगाणे, विरेंद्र पद्मा, वसीम मुल्ला, पुष्पा पाटील, विक्रम कलबुर्गी, मुरलीधर सुंचू.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:29 am

टीईटी इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींना मराठी पेपर:पंचवटीतील सीडीओ मेरी हायस्कूल येथील परीक्षा केंद्रांत गाेंधळ, परीक्षार्थींकडून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) रविवारी (दि. २३ ) गाेंधळ उडाला. पंचवटीतील सिडिओ मेरी हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींना मराठीची प्रश्नपत्र दिले गेले. दोन तास त्यांना बसून ठेवले. नंतर तोच पेपर अर्धा तासात सोडवण्यास सांगितले. त्यामुळे परीक्षार्थींनी आक्रमक हाेत पुन्हा हा पेपर घ्या, अशी मागणी केली. दरम्यान इतर केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे‎एकूण ८६ केंद्रांवर रविवार टीईटी पार‎पडली. पेपर क्र. १ साठी ३२ तर पेपर‎दोनसाठी ५४ केंद्रे निश्चित केली‎होती. सकाळी १०.३० वाजता पेपर‎सुरु होणार असल्याने ९‎वाजेपासूनच परीक्षार्थी केंद्रांवर‎पोहचण्यास सुरुवात झाली होती.‎सीडीओ मेरी हायस्कूल केंद्रात‎परीक्षा सुरू झाल्यानंतर इंग्रजी‎माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी‎माध्यमाची प्रश्नपत्रिका देण्यात‎आली. काही वेळातच‎प्रश्नपत्रिकेतील भिन्नतेचा गोंधळ‎लक्षात आला. परीक्षार्थींनी तत्काळ‎शाळा प्रशासनाशी संपर्क साधून ही‎गंभीर चूक संबंधिताच्या निदर्शनास‎आणून दिली. मात्र, प्रशासनाकडून‎उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.‎दुपारी १.१० वाजता त्याच चुकीच्या‎प्रश्नपत्रिकेवर बळजबरीने इंग्रजीत‎उत्तरे लिहायला भाग पाडण्यात‎आले, असा गंभीर आरोप‎परीक्षार्थींनी केला आहे.‎ प्रश्न मराठीतून उत्तरे दिली इंग्रजीत, तयारी गेली वाया टीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत झालेली ही गंभीर चूक म्हणजे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा उत्तम नमुना आहे. इंग्रजी माध्यमाच्या परीक्षार्थींना मराठीतील प्रश्नांची इंग्रजीत उत्तरे लिहिण्यास भाग पाडले. परिश्रम वाया गेले. - नीलेश भांगडे, परीक्षार्थी गाेंधळाबाबत तक्रार नाही कुठेही गोंधळ झाला नाही. सीडीओ मेरी शाळा परीक्षा केंद्रावर इंग्रजीच्या परीक्षार्थीना मराठीची प्रश्न पत्रिका दिल्याची तक्रार मला मिळाली नाही.- भास्कर कनोज, प्रभारी प्राथ. शिक्षणाधिकारी, जिप गोंधळाची चौकशी करावीआमची मेहनत वाया गेली. शासनाने या गलथान नियोजनाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. फेरपरीक्षा घेण्यात यावी. - दीपाली अहिरे, परीक्षार्थी

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:26 am

टीईटी परीक्षेत शिक्षकांची दमछाक:गुणवंत घडवणाऱ्या ‘गुरुजीं’नाच मानसशास्त्र, गणित अवघड, संभ्रमित करणाऱ्या पर्यायांमुळे लागला शिक्षकांचा कस

“संवेदनाला अर्थ लावला की त्याचे रूपांतर कोणत्या घटकात होते?’ किंवा “मानवी भावना सहजप्रवृत्तीतून निर्माण होतात, हे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने व्यक्त केले?’ अशा एकाहून एक गहन बालमानसशास्त्रातील प्रश्नांनी रविवारच्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) ‘गुरुजीं’नाच भंडावून सोडले. तसेच गणितात आकडेमोड न करता वयातील अंतर किंवा ‘या तारखेला जन्मला असता तर आज कोणत्या वर्गात असता?’ अशा प्रश्नांनी शिक्षकांची चांगलीच दमछाक केली. संभ्रमित करणाऱ्या पर्यायांमुळे कार्यरत शिक्षकांनादेखील गणित आणि बालमानसशास्त्रावर आधारित प्रश्न अवघड गेल्याचे चित्र होते. न्यायालयाने टीईटी अनिवार्य केल्यामुळे यंदा नव्याने परीक्षा देणाऱ्यांसह ज्यांना पंधरा-वीस वर्षे सेवेत झाली आहेत अशा कार्यरत शिक्षकांनीही ही परीक्षा दिली. रविवारी (२३ नोव्हेंबर) शहरातील ३५ केंद्रांवर परीक्षा परिषदेच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली. गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह फोटो व्ह्यू, कनेक्ट व्ह्यू, एआयचा वापर करण्यात आला होता. ट्यूशन लावून तयारी, पण पेपर हुकला पोद्दार हायस्कूलमध्ये केंद्रावर २० ते २५ उमेदवारांना १० मिनिटे उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला. टीईटीची २ वर्षांपासून तयारी करतो आहे. थोडक्यात, मागील वेळी संधी हुकल्याने यंदा क्लासही लावला. परंतु केंद्रावर येण्यास १० मिनिटांचा उशीर झाल्याने उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. दोन वेळा होणार टीईटीराज्य परीक्षा परिषदेतर्फे आता वर्षातून दोन वेळा शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. पुढील दोन वर्षी प्रत्येकी दोन याप्रमाणे चार परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे. सामान्य पण बालमानस कठीण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षेला नवीन पेक्षा कार्यरत असलेल्या शिक्षकांची संख्या अधिक होती. पेपर सामान्य होता. फक्त बालमानसशास्त्रावर आधारित प्रश्न थोडे कठीण होते. -मनीषा सहाने, परीक्षार्थी शहरातील दोन केंद्रांवर १५ मिनिटे उशिरा पेपर शहरातील धर्मवीर संभाजी विद्यालय आणि स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालय केंद्रावर अंतर्गत प्रश्नपत्रिकेनुसार वर्ग बदल झाल्याने प्रश्नपत्रिका उमेदवारांना सकाळच्या पेपरमध्ये १५ मिनिटे उशीरा देण्यात आला. सर्व ऑनलाइन दिसत असल्याने संनियंत्रण कक्षातून पेपर का दिला नाही? अशी विचारणा झाली. त्यानंतर वर्ग बदल झाल्याचे समोर आले. उमेदवारांना १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले. ठराविक प्रश्न-उत्तराने अवघड बहुतांश उमेदवारांना टीईटीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही बालमानसशास्त्र, गणित, इंग्रजी व्याकरण अवघड गेले आहे. याचे कारण ठरावीक प्रश्नाचे ठरावीक उत्तर. या पद्धतीनेच आजही उमेदवार अभ्यास करतात. शिक्षक पात्रतेत पेपर हा यूपीएससी आणि एमपीएससीच्या धर्तीवर असतो. त्यामुळे चांगले वाचन आणि संकल्पना समजून अभ्यास हवा. पदवी स्तरावर सर्वांचेच मानसशास्त्र नसते. त्यामुळे अध्ययन-अध्यापन पद्धतीमुळे मानसशास्त्र अवघड जाते. -डॉ. सुशील बोर्डे, प्राचार्य, महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय. पोद्दार हायस्कूल परीक्षा केंद्रावर २० ते २५ उमेदवारांना १० मिनिटे उशीर झाल्याने प्रवेश नाकारला छत्रपती संभाजीनगर | शिक्षक पात्रता परीक्षा असली, तरी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाबाहेरचे चित्र नेहमीपेक्षा वेगळे होते. एरवी मुलांना परीक्षेसाठी ‘ऑल द बेस्ट’ देणारे शिक्षक आई-बाबाच रविवारी परीक्षेला होते आणिैै त्यांच्यासोबत त्यांची चिमुकली केंद्रावर आली होती. पात्रतेसाठी परीक्षा आवश्यक असल्याने, घरी सांभाळायला कुणी नसल्याने, अनेकजण आजी, पतीसोबत मुलांना केंद्रावर घेऊन आले होते. यावेळी आईच्या कुशीतून आलेल्या छोट्या भावाला खेळवत चिमुकली अनु यांनी आपल्या आईला भावनिक ‘ऑल द बेस्ट’ केले. “तू पेपरला जा, मी आजीसोबत भैय्याला सांभाळते,’ असे निरागस शब्द केंद्राबाहेर ऐकायला मिळाले. शहरातील ३५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेसाठी नव्याने परीक्षा देणारे आणि कार्यरत शिक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, लहान बाळांना सोबत घेऊन आलेल्या या शिक्षक पालकांची ‘आई म्हणून परीक्षा’ आणि ‘शिक्षकांची परीक्षा’यांचा सुंदर संगम केंद्राबाहेर पाहायला मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:22 am

प्रियकरासाठी आधी मुलीने 11 लाख पळवले, तेव्हा माफ केले:पुन्हा 2 तोळे सोने घेऊन भुर्र, संभाजीनगरात आई-वडिलांनी संतापून मुलीविरुद्धच केली पोलिसात तक्रार दाखल

कॉलनीतील एका मुलाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या १९ वर्षांच्या मुलीने आपल्या प्रेमसंबंधांना घरच्यांनी विरोध केल्यामुळे थेट स्वतःच्या घरातच दोनदा चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पहिल्या वेळी मुलीने घरातील ११ लाख रुपयांची रोकड पळवली होती. तेव्हा मुलगी लहान आहे, चूक झाली म्हणून आई-वडिलांनी तिला माफ करून परत आणले होते. मात्र काही महिने व्यवस्थित राहिल्यानंतर तिने पुन्हा घरातील सुमारे २ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आणि प्रियकरासोबत पळ काढला. मुलीच्या या सततच्या वागण्यामुळे संतापलेल्या आईने तिच्याविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात तक्रार दिली. हर्सूल परिसरातील होनाजीनगर परिसरात ही घटना घडली. १९ वर्षांच्या मुलीचे कॉलनीतीलच एका मुलाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. हे प्रकरण दोघांच्याही घरी गेल्यानंतर घरच्या मंडळींनी या प्रेमाला तीव्र विरोध केला. विरोधामुळे प्रेमीयुगुलांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. बाहेर पडण्यासाठी पैसा लागणार म्हणून मुलीने पहिल्या वेळी थेट घरातील ११ लाख रुपयांची रोकड सोबत घेऊन पळ काढला. मात्र, एवढा पैसा हातात असूनही बाहेरील परिस्थिती दोघांनाही अनुकूल झाली नाही. तोपर्यंत दोघांच्याही पालकांनी त्यांचा शोध सुरू केला होता. त्यामुळे चूक झाल्याचे कबूल करून दोघे घरी परतले. मुले लहान आहेत, माफ करू पळून गेलेले जोडपे परत आल्यानंतर पालकांनी ‘मुले लहान आहेत,’ असे म्हणत त्यांना माफ केले आणि यापुढे असे वागणार नाही, या अटीवर घरी राहू दिले होते. रोकड ठेवणे बंद, सोने लंपास मुलगा आणि मुलीने पुन्हा एकदा पळून जाण्याचा निर्णय घेतला. या वेळीही पैशांची गरज होती, परंतु घरच्या मंडळींनी घरात रोकड ठेवणे बंद केले होते. त्यामुळे मुलीने थेट घरातील २ तोळ्यांचे सोने पळवले. चोरी गेलेल्या मुद्देमालात १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १ ग्रॅमची बाळी आणि ५ ग्रॅमचा सोन्याचा कॉइन यांचा समावेश आहे.यावरून गुन्हा दाखल केला.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:18 am

मुले शाळेत जावी म्हणून ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला रस्ता अन् पूल:अहिल्यानगरात पुरानंतर गावचा संपर्क तुटला होता

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मांडवे गावातील लोकांनी एकत्र येऊन तुटलेला पूल आणि अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला. सप्टेंबरच्या पुरामुळे गावातील रस्ता वाहून गेला होता. वृद्धा नदीवरील सद्गुरूवाडी येथील पूल तुटला होता. तेव्हापासून गावातील मुलांची शाळा सुटली होती. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने रस्ता आणि नदीवरील पुन्हा पूल बांधला नाही. मग ग्रामपंचायतीने १.७५ लाख रुपये जमा केले. गावकऱ्यांनी श्रमदान करुन अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता तयार केला. आता मुले शाळेत जात आहेत. गावाचे सरपंच राजेंद्र रतन लवांडे सांगतात- ६० हजार वर्गणीतून जमा केले व उर्वरित रक्कम ग्रामपंचायतीने दिली. दरम्यान, येथील कामाच्या प्रस्तावाचे आदेश दिले होते. त्याचे काय झाले बघावे लागेल, असे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले. एकजूट... गावचा संपर्क पूर्णपणे तुटल्याने महिला-मुले गावातच झाली हाेती कैद मांडवे गावातील विक्रम सांगतात- गावातून बाहेर पडणे कठीण झाले होते. मुले आणि महिला तर गावातच कैद झाले होते. शाळा सुरू झाल्यानंतरही मुले घरीच राहिली तेव्हा वाटले की आपणच आपली मदत केली पाहिजे. सातवीत शिकणारा गावातील राजवीर म्हणतो- आम्ही १५ दिवस शाळेत जाऊ शकलो नाही. शाळेतील मित्रांनाही भेटू शकलो नाही. गावकऱ्यांनी एकत्र येऊन आमची समस्या दूर केली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:10 am

रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी संभाजीनगर जिल्ह्यातील 2925 मालमत्तांचे अधिग्रहण:केंद्र सरकारचे भूसंपादनाचे गॅझेट 21 ऑक्टोबरलाच प्रकाशित केले

छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दुहेरीकरणासाठी शहरातील सातारा, शहानूरवाडी, मुस्तफाबाद, चिकलठाणा, मुकुंदवाडीसह जिल्ह्यातील एकूण १४४ सर्व्हे /गट नंबरमधील २९२५ जागा अधिगृहीत केल्या जातील. एकट्या शहरात रेल्वेस्टेशन ते मुकुंदवाडीदरम्यान १२३ हून अधिक सोसायट्या बाधित होतील. याबाबत रेल्वे मंत्रालयाने २१ ऑक्टोबर रोजी राजपत्र (गॅझेट) जारी केले असून ते ‘दिव्य मराठी’ला प्राप्त झाले आहे. त्यानुसार सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.रेल्वे अधिनियम, १९८९ (२४) च्या कलम २० अ-१ अंतर्गत केंद्र शासनाने १४९ पानांचे गॅझेट जारी केले. दुहेरीकरणासाठी जमिनीची आवश्यकता असल्याने गॅझेटद्वारे भूसंपादनाची घोषणा करत असल्याचे दमरेचे मुख्य अभियंता एच.के.भगाेरियांनी म्हटले. गॅझेट प्रकाशनाच्या ३० दिवसापर्यंत हरकती नोंदवता येतील. हरकती जिल्हा प्रशासन, उपजिल्हाधिकारी(भूसंपादन) आणि जायकवाडी प्रकल्प कार्यालयाकडे पाठवल्या जातील. त्यांची तपासणी होऊन सुनावणी घेतली जाईल, असे यात नमूद आहे. १५-२० मीटर जागा लागेल सध्याचा ट्रॅक १५ मीटर रुंद आहे. रुंदीकरणात वळणांना काढून ट्रॅक सरळ करावा लागतो. उतार २:१ या मानकानुसार करावा लागल्याने १५ ते २० मीटर जागा लागेल. त्यानंतर पालिकेचा रस्ता येईल. दुहेरीकरणामुळे डीएमआयसी ऑरिकचा माल जेएनपीटीपर्यंत पोहोचवणे सोपे होईल. रोष टाळण्याचा प्रयत्न थेट सवाल श्री प्रजापत, उपमुख्य अभियंता, दमरे दुहेरीकरणाचा काय फायदा होईल?- अप आणि डाऊन रेल्वेसाठी स्वतंत्र रूळ असेल. क्रॉसिंग कमी होऊन वेळेत बचत होईल. नवीन रेल्वे सुरू होतील. यासाठी २१०० कोटींचे बजेट आहे.आक्षेप नोंदवण्याची मुदत संपली?- नाही. वृत्तपत्रात जाहिरात दिल्यानंतर एक महिन्याची मुदत मिळेल.ही प्रक्रिया किती दिवस चालेल?- भूसंपादन अधिकारी संयुक्त मोजणीची तारीख देतील. रेल्वे कायदा कलम २० बी नुसार सर्वेक्षण, २० सी नुसार मालमत्तेचे मूल्यांकन, तर २० डी नुसार हरकतींवर सुनावणी होईल. या दरम्यान मोबदला देऊ.प्रत्यक्ष काम कधी सुरू होईल?- दोन महिन्यांत मोजणी पूर्ण होईल. ९०% जमीन आमच्या ताब्यात आहे. लवकरच टेंडर काढू. ६ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल. प्रा. डॉ. प्रशांत अवसरमल, स्थापत्य अभियंता२१ ऑक्टोबरच्या अधिसूचनेत ३० दिवसापर्यंत हरकती मागवण्याचा उल्लेख आहे. त्यापूर्वी गॅझेट वृत्तपत्रात प्रकाशित करणे बंधनकारक आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जनतेचा रोष टाळण्यासाठी जाहिरात जाणीवपूर्वक रोखल्याचे सूत्र सांगतात. रेल्वेस्टेशन ते मुकुंदवाडीदरम्यान १२३ वर सोसायट्या बाधित सातारा ११९, १२८, १४१४००कुंभेफळ ३७, ३९, ४४, २१९, २२१३२३लाडगाव ७,१६६,१६९,२,१७०,१७१,१७२६७शहानूरवाडी २१, २६,२९,३०,४६,३१८मुस्तफाबाद २८ गट आणि सर्वे१७१शेकटा ६,८,१२,३६,४४,३३,३७,४१५४०शेंद्रा जहांगीर १०६,१०५,१०३,१४६,१४७,१४९,१५१,१५९,१६०,१६१ ४८७हसनाबादवाडी १३५,१३९,१४०,१४१,१४२,१९३,१९४,१९५,२०१,२०२,२०३,१६४, १६५६४चिकलठाणा द. ५७९, ५८००८मुर्तूजापूर १३,१४,१२,११७६करमाड ५,७,५८,८१,८२,१२२,१३१,२३८,१२१८१फत्तेपूर १७,२१,६०गाव गट/सर्व्हे नं.बाधितमालमत्तामुकुंदवाडी ५७१०गारखेडा ३०,३१,३८,३९,१२करंजगाव १४८,१४९११गाढेजळगाव २९५,२९६,३०४,३०५,३०६,३०७६५३०८,३४९,३५२,३५५,३७८चिकलठाणा ४२८, ४२९,४३९,४४१,४४२,४४३,४४४,४५०,४५९,४६३,४६२,४६४,४८२,४८६,४९५, ४९६,५१९,५२०,५२१, ५३३, ५३४ ८९वरूड काझी २३८९देवणी ३६,३७,४४,४५,४६,४७,६०३४६३,४३एकूण १४४२९२५

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 7:01 am

महाराष्ट्र, गुजरातला 5 वर्षांत उमर्टीमधून 800 शस्त्रे पुरवली:मोहोळसह पुण्यातील गुन्ह्यात पिस्तुलाचा वापर

गुंड शरद मोहोळ, माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणात मागील ५ वर्षांत झालेल्या कारवायांमध्ये मध्य प्रदेशमधील उमर्टी गावात बनवण्यात येणाऱ्या गावठी पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता. पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड भागात ७०० ते ८०० शस्त्रे पुरवण्यात आले होती. गरज पडल्यास परत त्या गावात घुसून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. केवळ कारवाई करून थांबणार नाही तर त्यांची पुरवठा साखळीसुद्धा मोडून काढणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. यावेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, निखिल पिंगळे आदी उपस्थित होते. या वेळी या कारवाईत सहभागी असणाऱ्या १५० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.. पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमर्टी गावातील कारखान्यांवर पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तब्बल ५० भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत ४७ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तुले, जिवंत काडतुसे तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे शहरात येणारे सगळी शस्त्रे याच उमर्टी गावातून येत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. मध्य प्रदेश पोलिसांचे सहकार्य : अमितेशकुमार या कारवाईसाठी मध्य प्रदेश पोलिसांची काय भूमिका राहील याबद्दल शंका होती. मात्र येथील स्थानिक पोलिस आणि मध्य प्रदेश दहशतवादविरोधी पथकाची मोठी मदत झाली. त्यांनी दिलेली शस्त्रे ज्या गुन्ह्यात वापरली गेली आहेत त्यात त्यांना आरोपी करणार. यातील अनेकांवर मोक्कानुसारसुद्धा कारवाई केली जाणार असल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 6:48 am

प्रगतिशील शेतकरी:कांदा, ऊस परवडेना म्हणून केळीकडे वळले अन् इराणला निर्यात, नाशिक जिल्ह्यातील डांगसौंदानेच्या 12 शेतकऱ्यांचा 60 एकरांत यशस्वी प्रयोग

खान्देश, नांदेड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली केळी आता नाशिक जिल्ह्यातील बागलाणमध्येही घेतली जात आहे. स्थानिक बाजारात केळीला कमी दर मिळत असला तरी केळीची निर्यात करून नफा कमावता येऊ शकताे हे शेतकरी अंबादास साेनवणे व राजेंद्र परदेशी यांच्यासह १२ शेतकऱ्यांनी शक्य करून दाखवले आहे. पारंपरिक कांदा, ऊस, टाेमॅटाेतून उत्पादन खर्चही निघणे अवघड झाल्यानंतर सर्वांनी पर्यायी पिक म्हणून केळीची निवड केली व खर्च वजा जाता एकरी ३ लाखांचा नफा मिळवला. सर्व १२ शेतकऱ्यांनी एकत्र येत केळी पिकाचा अभ्यास केला व थेट हैदराबादेतून १६ रुपये प्रति दराने जी-९ या प्रजातीचे रोपे आणली. एका एकरात साधारण १२५० रोपांची ठिबक सिंचन प्रणालीवर लागवड केली. ११ महिन्यांनी पिक काढणी याेग्य झाले. अनेक निर्यातदार कंपनींनी या क्षेत्रांची पाहणी करत या मालाची मागणी केली. त्यातील एका कंपनीने अंबादास सोनवणे, राजेंद्र परदेशी, लोकेश जाधव, महेश सोनवणे, जगदीश बोरसे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा माल जागेवर १५ रुपये प्रति किलोने खरेदी केला व थेट इराणला पाठवला. निर्यातीसाठीची प्रक्रिया बाॅक्स पॅकिंग करत पिंपळगाव येथे कंपनीच्या कोल्ड स्टोरेजवर पाठवली. तेथून मुंबईच्या जेएनपीटी बंदरावरून जहाजाच्या कंटेनरद्वारे केळी इराणला पाेहाेचवली जात आहे. ग्राहकापर्यंत हा माल २५ ते २८ दिवसांत पाेहाेचेल. निर्यातदार कंपनीने मालाच्या काढणीसाठी स्वतःचे अनुभवी कामगार पाठवले. केळीचे एकरी ३० ते ३५ टन उत्पादन जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत बागलाणमध्ये थंड हवामान आहे. अशा ठिकाणी केळीचे उत्पादन घेणे म्हणजे धाेका ठरू शकताे. पण शेतकऱ्यांनी थंडी सुरू हाेण्याच्या आधी काढणी करता येईल असे नियोजन केले व उत्पादन घेतले. निर्यातक्षम माल पिकविल्यामुळे शेतकऱ्याला एकरी ३० ते ३५ टन उत्पादन मिळाले. एकरी दीड लाख खर्च वजा जाता तीन लाखांचा नफा झाला. ११ महिन्यात चांगला नफापारंपरिक शेतीत कांदा, ऊस, टोमॅटो अशी पिके बागलाणमध्ये घेतली जातात. मात्र या पिकांत उत्पादन खर्चही निघत नाही. शिवाय १८ महिने शेती क्षेत्र अडकून राहते. त्याऐवजी पर्यायी पीक म्हणून ११ महिन्यात खर्च जाऊन ३ लाखांपर्यंत नफा मिळत असल्याचे शेतकरी अंबादास साेनवणे यांनी सांगितले. या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती. मोबाइल नंबर : 9423484030

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 5:30 am

पाकिस्तानातील सिंध प्रांत भारताचा भाग बनू शकतो

नकाशा कधीही बदलू शकतो : राजनाथ सिंह नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत-पाकिस्तानची १९४७ मध्ये फाळणी झाली होती. त्यावेळी भारतीय संस्कृतीशी निगडीत असलेली अनेक ठिकाणे पाकिस्तानात गेली होती. यात सिंध प्रांताचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सिंधची भूमी कदाचित भारताचा भाग नसेल. परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून सिंध नेहमीच भारताचा भाग राहील, असे […] The post पाकिस्तानातील सिंध प्रांत भारताचा भाग बनू शकतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 2:00 am

संविधानाने तुम्हाला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिला?

कॉंग्रेस नेते पटोले यांचा अजित पवारांना संतप्त सवाल मुंबई : प्रतिनिधी माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. त्यामुळे माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभा राहिलात तर बारामतीसारखे काम तुमच्याकडे करू, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत केले. यावर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी संविधानाने तुम्हाला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिलाय का, असा संतप्त सवाल […] The post संविधानाने तुम्हाला तिजोरी लुटण्याचा अधिकार दिला? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:59 am

संजय कपूरच्या मृत्यूपत्रावरून वाद पेटला

मुंबई : प्रतिनिधी दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या मालमत्तेवरून सध्या मोठा वाद रंगला आहे. करिष्मा कपूरची मुलगी समायरा कपूर आणि तिच्या भावाने प्रिया सचदेव यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. संजय कपूर यांचे मृत्युपत्र चुकीचे असल्याचा दावा केला होता. या प्रकरणाची न्यायालयात नुकतीच सुनावणी झाली. मागील सुनावणीत समयरा कपूरने आरोप केला होता की, तिची दोन महिन्यांची […] The post संजय कपूरच्या मृत्यूपत्रावरून वाद पेटला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:57 am

टीईटी पेपर लिक रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापुरात आरोपी ताब्यात, प्रिंटरसह साहित्यही जप्त कोल्हापूर : प्रतिनिधी टीईटी परीक्षेतील पेपर देतो म्हणून काही जणांना आरोपींनी बोलावले आणि उमेदवारांकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रे आणि पैशांची मागणी केली. या प्रकरणाचा सुगावा लागताच पोलिसांनी धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रिंटर, मोबाईल, चारचाकी वाहन आणि इतर वस्तूंसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कोल्हापूर […] The post टीईटी पेपर लिक रॅकेटचा पर्दाफाश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:56 am

शरद पवार आता कॉंग्रेस नेत्यांशी संवाद साधणार

कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्याचा प्रयत्न मुंबई : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र येत असताना महाविकास आघाडी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून महत्त्वाची भूमिका घेण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुंबई काँग्रेसच्या भूमिकेबाबत चर्चा […] The post शरद पवार आता कॉंग्रेस नेत्यांशी संवाद साधणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:55 am

एसआयआरच्या नावाने देशात गोंधळाची स्थिती

राहुल गांधींचा आरोप, दबावामुळे १६ बीएलओंचा बळी नवी दिल्ली : वृत्तसंस्था एसआयआरच्या नावाने देशभरात गोंधळ निर्माण झाला आहे आणि ३ आठवड्यांत १६ बीएलओंना आपले प्राण गमवावे लागले. एसआयआर ही सुधारणा नसून लोकांवर लादलेला विषय आहे. या माध्यमातून सत्तेचे रक्षण करण्यासाठी लोकशाहीचा बळी दिला जात आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. […] The post एसआयआरच्या नावाने देशात गोंधळाची स्थिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:54 am

केंद्राने पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविली

जंगली प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार अतिवृष्टी, पुराने झालेल्या पिकहानीची मिळणार भरपाई नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने शेतक-यांना मोठा दिलासा देत पंतप्रधान पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवली आहे. नैसर्गिक संकटाने पिकांचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी ही योजना सुरू केली होती. यामध्ये आणखी दोन नुकसानाची भरपाई मिळणार असून, यापुढे जंगली जनावरांद्वारे पिकांचे झालेले नुकसान आणि […] The post केंद्राने पंतप्रधान पीक विमा योजनेची व्याप्ती वाढविली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:53 am

मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक - राज ठाकरे:म्हणाले- रात्र वैऱ्याची... गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. मतदार याद्या तपासून पाहा. मतदार खरा की खोटा? हे तपासून पाहा. रात्र वैऱ्याची आहे... त्यामुळे गाफील राहू नका, आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष असू द्या. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांकडून सातत्याने निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताध्याऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईमध्ये आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. रात्र वैऱ्याची... गाफील राहू नका ठाकरे म्हणाले- थोडे दिवस थांबा भाषण सुरूच होतील. 11 वर्ष हा कोकण महोत्सव साजरा होत आहे. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, रात्र वैऱ्याची आहे गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्यांमध्यो जो काही घोळ होतोय, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने करडी नजर ठेवा. मतदार खरा आहे की खोटा आहे, याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी मुंबई मनपा शेवटची निवडणूक ठाकरे पुढे म्हणाले की, मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल, असंही ते म्हणाले. जर आपण गाफील राहिलो, तर निवडणूक हातातून गेली समजा. थोडे दिवस थांबा भाषणं सुरूच होतील, असेही राज ठाकरे म्हणाले. मनसे, शिवसेना ठाकरे गट युती दरम्यान, मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात देखील दोन्ही पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने मनसेसोबत युती करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 10:52 pm

अपक्ष उमेदवारांना चिन्हाविना प्रचार करावा लागतोय:निवडणूक चिन्हासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा

अमरावती जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांना सध्या निवडणूक चिन्हाविनाच प्रचार करावा लागत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, त्यांना २६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप केले जाईल. मात्र, त्यानंतर केवळ चारच दिवसांनी म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी जाहीर प्रचार थांबवावा लागणार असल्याने अपक्षांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये नगराध्यक्षांच्या १२ जागांसाठी १२७ उमेदवार, तर नगरसेवकांच्या २७८ जागांसाठी १ हजार ३२९ उमेदवार रिंगणात आहेत. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणीअंती निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर होती. परंतु, ज्या आठ उमेदवारांनी आपल्या अर्जांबाबत अपील दाखल केले आहे, त्यांना माघार घेण्यासाठी किंवा रिंगणात कायम राहण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मैदानातील एकूण उमेदवारांची नेमकी संख्याही त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे. राजकीय जाणकारांच्या मते, आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये असा प्रकार घडला नव्हता. एरवी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच चिन्हांचे वाटप केले जाते, ज्यामुळे उमेदवारांना चिन्हासह प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळतो. मात्र, यावेळी पहिल्यांदाच एवढा मोठा कालावधी चिन्हाविना प्रचारात जात आहे. आठ उमेदवारांच्या अपीलमुळे सर्वांना वेठीस धरणे योग्य नाही, असेही जाणकारांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने अपीलार्थींच्या अर्जांवरील निकाल २५ नोव्हेंबरपर्यंत लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी सर्व उमेदवारांना त्यांची निवडणूक चिन्हे मिळतील. चिन्हासह प्रचारासाठी त्यांना केवळ चार दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:59 pm

नगरसेवकांना 3.50 लाख रुपये खर्चाची मर्यादा:नगराध्यक्षपदाच्या प्रचारासाठी 11.25 लाख रुपये खर्च करता येणार

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ करण्यात आली आहे. वाढलेली महागाई आणि प्रचार खर्चाचे वास्तव लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सुधारित दर लागू केले आहेत. त्यानुसार, आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला आपल्या प्रचारावर ११ लाख २५ हजार रुपये खर्च करता येणार असून, नगरसेवक पदासाठी ३ लाख ५० हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खंडारे यांनी दिली. दर्यापूर शहरातील 'क' दर्जा पालिकेच्या निवडणुकीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी करत आहेत. थंडीच्या लाटेसोबतच शहरात निवडणुकीचा ज्वर वाढत असल्याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसार सर्वच पक्षांना नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला आपला रोजचा निवडणूक खर्च संबंधित यंत्रणेकडे लेखी स्वरूपात सादर करणे बंधनकारक आहे. वाढलेल्या खर्चाच्या मर्यादेमुळे प्रचार साहित्याच्या खर्चिक बाबी सांभाळणे उमेदवारांना शक्य झाले आहे. तरीदेखील, उमेदवारांनी आपले आर्थिक व्यवहार कायदेशीर चौकटीत ठेवून निवडणुकीतील खर्चाचे नियमन करावे, अशा निवडणूक यंत्रणेच्या सूचना आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराने सव्वा अकरा लाखांपेक्षा अधिक आणि सदस्य पदाच्या उमेदवाराने साडेतीन लाखांपेक्षा अधिक खर्च होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे कळविण्यात आले आहे. या निवडणुकीत काही सामाजिक कार्याची आवड असणारे नवीन चेहरे, तर काही अनुभवी नेते नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात तीन स्थिर पथके, एक फिरते पथक आणि एका व्हिडिओ चित्रीकरण पथकाचा समावेश आहे. प्रत्येक पथकात एक पोलिस कॉन्स्टेबल आणि व्हिडिओ चित्रीकरण करणारा कर्मचारी आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:56 pm

मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रंग जसजसा रंगत चालला आहे तसतसे राजकीय नेत्यांचे वक्तव्यही बेताल होत चालल्याचे दिसते. कुणी काय बोलून समोरच्या उमेदवारावर टीका करेल याचा काही नेम राहिला नाही. तसाच काहीसा प्रकार लोणावळ्यात घडल्याचे दिसून आले. भाजपच्या एका स्थानिक महिला नेत्याने अजित पवारांच्या आमदारावर टीका करताना त्याचा बाप काढला. माळवचा आमदार आपला नसला […] The post मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 9:52 pm

सातारा-लातूर महामार्गावर दुचाकी-कारचा अपघात:दुचाकीस्वार जागीच ठार, तर एक गंभीर

सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गा दरम्यान मुगाव फाट्याजवळ (ता. कोरेगाव) स्विफ्ट कार व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार युवक जागेवर ठार झाला, तर पाठीमागच्या सीटवर बसलेला युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैष्णव शंकर काटकर (वय २५ रा. ललगुण ता. खटाव) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटाच्या सुमारास सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गादरम्यान मुगाव फाट्याच्या पुढे सातारा बाजूकडे एका काळ्या रंगाच्या हिरो होंडा मोटरसायकलवरून (क्र.एम. एच. ११- बी.सी. ४४५०) वैष्णव शंकर काटकर (वय २५, रा. ललगूण, ता. खटाव) व गौरव सुनिल यादव (वय २१, रा. शिरंबे, ता. कोरेगाव) हे दोघे कोरेगाव बाजूकडून साताऱ्याकडे निघाले होते, तर साताऱ्याकडून स्विफ्ट कार (क्र.एम. एच.०२ सी. पी.८७९०) येत असताना या दोन्ही वाहनांत झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार वैष्णव काटकर हा जागीच ठार झाला, तर मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला गौरव यादव हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे समजले. अपघातस्थळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत होते, दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाल्याचे दिसत होते. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:51 pm

हिवरा पाटी येथे भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक:पती ठार, तर पत्नी गंभीर जखमी

आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर हिवरा पाटी येथे भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पती ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ता. 23 दुपारी घडली आहे. जखमी महिलेला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथील ज्ञानेश्वर डाखोरे (३४) हे त्यांच्या पत्नी शालिनी डाखोरे यांच्यासह दुचाकी वाहनावर चुंचा येथून गणपुर कामठा (जि नांदेड) येथे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन आखाडा बाळापुर ते नांदेड मार्गावर हिवरा पाटी येथे आले असताना रॉंग साईडने येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच आखाडाबाळापुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, जमादार संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर यांच्या पत्नी शालिनी यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविले. तर मयत ज्ञानेश्वर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मयत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेमुळे चुंचा गावावर शोककळा पसरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 9:46 pm

रेणापूर येथे काँग्रेस उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या भेटी

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातून चारित्र्यसंपन्न व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार दिले आहेत. निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास रेणापूरकर व्यक्त करीत आहेत. २३ […] The post रेणापूर येथे काँग्रेस उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या भेटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 9:45 pm

लातूर शहर काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी

लातूर : प्रतिनिधी आगामी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छूक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. काँग्रेस पक्षाकडे इच्छूक उमेदवारांनी मोठी गर्दी केली आहे. केवळ आठ दिवसांत तब्बल ४०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागणी करीता पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. दि. २३ नोव्हेंबर हा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता. परंतु, कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार […] The post लातूर शहर काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी गर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 9:43 pm

उदगीर नगरपालिका निवडणुक, काँग्रेसला बळकटी

लातूर : प्रतिनिधी राज्यासह लातूर जिल्ह्यात चार नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणूकीची धामधूम सुरु आहे. उदगीर नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काँग्रेस पक्षाला बळकटी देणारी मोठी घडामोड घडली असून बाभळगाव निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, उदगीर शहर युवक अध्यक्ष अजय शेटकर, उदगीर तालुका युवक अध्यक्ष कृष्णा घोगरे यांच्यासह […] The post उदगीर नगरपालिका निवडणुक, काँग्रेसला बळकटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 9:41 pm

मत आणि निधीबाबत विधानावर फडणवीसांकडून अजित पवारांची पाठराखण

मुंबई : माळेगाव नगरपंचायतीत आमच्या विचारांचे १८ उमेदवार निवडून द्या. मी सांगितलेले सगळे करीन; पण, तुम्ही जर काट मारली, तर मीही काट मारणार. तुमच्या हातात मताचा अधिकार आहे, तर माझ्या हातात निधीचा अधिकार आहे, आता बघा काय करायचं ते, असा थेट आणि सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. यावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका […] The post मत आणि निधीबाबत विधानावर फडणवीसांकडून अजित पवारांची पाठराखण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 9:38 pm

टीम इंडिया ४८० धावांनी पिछाडीवर

गुवाहाटी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुस-या कसोटी सामन्यातील दुस-या दिवसाचा खेळ संपला आहे. दक्षिण आफ्रिकेने दुुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ऑलआऊट ४८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने दुस-या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद ९ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल आणि केएल […] The post टीम इंडिया ४८० धावांनी पिछाडीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 9:10 pm

चक्क ‘आयसीयू’त लावले लग्न

कोच्ची : केरळात एका अनोख्या विवाहाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओत लग्नाची घटीका एका भावूक क्षणात बदलली जेव्हा लग्न होण्याची अवघ्या काही तास आधी वधूचा अपघात झाला. त्यामुळे हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डात वराने अत्यंत हृदय हेलावणा-या क्षणी वधूच्या भांगेत कुंकू भरले. कोच्चीच्या अलप्पुझा येथील शालेय शिक्षिका अवनी हिचा विवाहाची तयारी सुरु होती. त्याच […] The post चक्क ‘आयसीयू’त लावले लग्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 8:52 pm

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो

मुंबई : काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश […] The post काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 8:28 pm

बिनविरोध निवडीचा ट्रेंड लोकशाहीसाठी घातक:खासदार सुप्रिया सुळे यांची भाजपावर टीका; अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील वादाच्या बातम्यांवरही भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकशाही टिकवण्यासाठी बिनविरोध निवडून देण्याचा नवीन ट्रेंड थांबायला हवा, असे स्पष्ट मत व्यक्त केले. निवडणूक आयोगाबद्दल अविश्वास निर्माण होणे ही अत्यंत घातक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. एका वृत्तपत्राने या मुद्द्यावर विचार मांडला असून, त्यावर गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. लोकशाहीवर विश्वास असेल आणि ती जिवंत राहावी अशी इच्छा असेल, तर बिनविरोध निवडीचा हा नवीन ट्रेंड थांबवणे गरजेचे आहे, असे सुळे म्हणाल्या. आपल्या अनेक पिढ्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, त्यामुळे आज त्या स्वातंत्र्यावर गदा येते आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो, असेही त्यांनी सांगितले. अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील वादाच्या बातम्यांवरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, काही लोक नेहमीच आमच्या विरोधात बोलत असतात. अनिल देशमुख असोत किंवा इतर कोणी, त्यांच्या घरात काय घडले यावर चर्चा करण्याचा आम्हाला अधिकार नाही. अनिल देशमुख यांनी चार-पाच दशके जनतेची सेवा केली आहे. देशमुख कुटुंबात काही वाद आहेत, ही बातमी त्यांना खोटी आणि तथ्यहीन वाटते. राजकारणात आपण सेवेसाठी आलो आहोत. सलिल देशमुख यांच्या मनात 'पहिले देश, मग पक्ष आणि नंतर घर' हेच समीकरण आहे. त्यामुळे सूत्रांच्या आधारे येणाऱ्या बातम्यांना काही आधार नाही, असे सुळे यांनी स्पष्ट केले. सलिल देशमुख यांच्या दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. कौटुंबिक संबंध आणि राजकारण यांचा संबंध जोडता कामा नये, असे सुळे यांनी अधोरेखित केले. छगन भुजबळ आजारी असताना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण अनेकदा रुग्णालयात गेल्याचे उदाहरण त्यांनी दिले. महाराष्ट्रातील राजकारण खूपच खालच्या पातळीवर गेले असून, जनसेवा करण्याऐवजी आपला बराचसा वेळ कोर्ट केसेसमध्ये जात असल्याचे त्यांनी खेदाने सांगितले. पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. काशिनाथ चौधरी यांना आपण कालही गुन्हेगार मानत नव्हते आणि आजही मानत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पालघर साधू हत्याकांडात त्यांच्यावर आरोप झाले तेव्हाही आपण ते आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले होते आणि आपला ठाम विश्वास आहे की ते निर्दोष आहेत, असे सुळे म्हणाल्या. मात्र, आता ते भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुळे यांनी केली. भाजपमधील जुन्या नेत्यांबद्दल आपला आदर कायम असल्याचेही त्यांनी शेवटी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:30 pm

ओझरचा पाणी, कचरा डेपो प्रश्न सहा महिन्यांत सुटणार:मंत्री दादा भुसे यांची शिंदे गटाच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ग्वाही

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ओझरच्या पाणी प्रश्न, कचरा डेपो आणि इतर विकासकामांवर आगामी सहा महिन्यांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या प्रचार शुभारंभावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. शनिवारी सायंकाळी हनुमान मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात भुसे यांनी ओझरमधील पाणी प्रश्न, कचरा डेपो, ड्रेनेज व्यवस्था, उपनगरातील रस्ते आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधांसह विविध प्रलंबित विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. ते म्हणाले की, या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्यांचे सरकार कटिबद्ध आहे. भुसे यांनी उमेदवारांना विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन केले. नगरविकास विभागामार्फत आवश्यक सर्व सहकार्य मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आगामी काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी ओझरचा संपूर्ण विकास आराखडा त्यांना सादर केला जाईल आणि आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी दादा भुसे यांनी शिंदे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्वाधिक उच्चशिक्षित असल्याचे सांगत, सुशिक्षित उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन नागरिकांना केले. या प्रसंगी नाशिक जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, माजी सरपंच प्रदीप अहिरे, युवासेना पोलीस जिल्हा प्रमुख सिद्धांत अहिरे, यश रासकर आणि भूपेश वाघ उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:26 pm

नागपूर गोवारी हत्याकांड; ३१ वर्षांनंतरही न्याय नाही:स्मृतिस्थळावर गर्दी ओसरली, नेत्यांकडून उपेक्षा कायम

नागपूर येथे २३ नोव्हेंबर १९९४ रोजी झालेल्या गोवारी हत्याकांड घटनेला आज ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. गोवारी समाजाला आदिवासी दर्जा मिळावा आणि जातप्रमाणपत्रे मिळावीत या मागणीसाठी काढलेल्या मोर्चादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधवांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अनेक वर्षांनीही गोवारी समाजाची दुर्दशा कायम आहे. एकेकाळी शहीद गोवारी स्मृति स्थळावर पाय ठेवायलाही जागा नसायची, इतकी गर्दी असायची. मात्र, आता हे स्मृतिस्थळ उपेक्षित असून, मोकळे रस्ते दिसतात. दरवर्षी येणारी गर्दीही आता ओसरत चालली आहे. नागपूरच्या झीरो माईल जवळील शहीद गोवारी स्मारक आजही उपेक्षित आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर मुक्कामी होते. दोघांनीही विविध कार्यक्रमांना हजेरी लावली, परंतु एकाही नेत्याला गोवारी शहीद स्मारकाला भेट देण्याची गरज वाटली नाही. २३ नोव्हेंबर १९९४ रोजी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना, आदिवासीत्वाबाबतच्या अडचणी दूर करण्याच्या मागणीसाठी विदर्भातून आदिवासी गोवारी जमातीचे लोक आपल्या कुटुंबासह विधान भवनावर मोर्चा घेऊन आले होते. दिवसभर विनवण्या करूनही एकाही मंत्र्याने मोर्चाला सामोरे येण्यास नकार दिला. या निराशेमुळे जमावात चलबिचल सुरू झाली. याचवेळी, नेतृत्त्व हीन समाज बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यामुळे जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. यात ११४ निरपराध गोवारी शहीद झाले, ज्यात पुरुष, स्त्रिया आणि बालकांचा समावेश होता.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:24 pm

ताडोबातील ८०० एकर जागेचे होणार पुनरुज्जीवन:‘रीवाइल्डिंग’ उपक्रमासाठी झिरोधा देणार १०० कोटी रुपयांचा निधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात ८०० एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या ‘रीवाइल्डिंग’ उपक्रमासाठी झिरोधा कंपनी आणि रेन मॅटर फाऊंडेशन १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहेत. ‘रीवाइल्डिंग’ म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग, वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ताडोबा येथे राबवण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या सहकार्याने झिरोधा आणि रेनमॅटर फाउंडेशन ही संस्था काम करणार आहे. यासाठी ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ या नावाने सुमारे १०० कोटी रुपयांचा विशेष निधी तयार करण्यात आला आहे. झिरोधा आणि ‘रेनमॅटर फाउंडेशन’ या संस्था पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम राबवतात. झिरोधा कंपनी आपल्या नफ्यातील १० टक्के निधी सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरणीय कामांसाठी राखीव ठेवते. संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त या राखीव निधीतून १०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यामध्ये मोनोकल्चर वृक्षलागवड ऐवजी जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीने निसर्गाचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट आहे. विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकरचा प्रकल्प याच मोठ्या उपक्रमाचा भाग आहे. या प्रकल्पा संदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:20 pm

मतदार यादीत मोठा गोंधळ:मुंबईत 11 लाख दुबार मतदार असल्याचा काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांचा गंभीर आरोप

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मुंबईची प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी या यादीत 11 लाख दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रचंड संख्येतील पुनरावृत्ती मुळे निवडणूक प्रक्रियेचा पारदर्शकपणा धोक्यात येऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एवढ्या प्रमाणात दुबार नावे नक्की कोणासाठी ठेवली गेली, याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ज्योती गायकवाड यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या पश्चिम उपनगरात सर्वाधिक दुबार मतदार आढळून आले असून त्यांची संख्या 4 लाख 98 हजार 597 इतकी आहे. पूर्व उपनगरात 3 लाख 29 हजार 216 मतदारांची पुनर्नोंदणी तर शहर विभागात 2 लाख 73 हजार मतदारांची दुबार नोंद झाली आहे. काही ठिकाणी तर एका मतदाराचे नाव दोनपेक्षा जास्त वेळा दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक निवडणुकांमध्ये काही मतांचे अंतर निर्णायक ठरू शकते. अशा परिस्थितीत लाखो दुबार मतदार असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस या मुद्यावर लढण्यासाठी तयार असून न्याय्य निवडणुका व्हाव्यात यावर त्यांनी भर दिला. दुसरीकडे, विरोधी पक्षांनीही याच मुद्द्यावर प्रशासन आणि निवडणूक आयोगावर दबाव वाढवला आहे. त्यांनी मागणी केली आहे की, दुबार नावे पूर्णपणे हटवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी जाहीर व्हायचे आहे. अनेक महापालिका आणि नगरपालिका सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहेत. कोरोनामुळे आणि आरक्षणाच्या वादामुळे निवडणुका बराच काळ रखडल्या. त्यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, अशी मागणी विरोधकांनी अधिक तीव्र केली आहे. नाव तपासण्यासाठी नवीन मोबाईल ॲपही उपलब्ध दरम्यान, नगर पंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची मतदार यादी यासाठी लागू असणार आहे. या निवडणुकीत राज्यातील 1 कोटी 7 लाख मतदार भाग घेणार असून 13 हजार 355 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मतदारांना मतदान केंद्र आणि स्वतःचे नाव तपासण्यासाठी नवीन मोबाईल ॲपही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मतदारांना स्वतःची नोंद पडताळता यावी आणि गोंधळ कमी व्हावा, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ही आधुनिक सुविधा उपलब्ध केली आहे. अधिकाऱ्यांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येक बूथवर विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडे दुबार नाव हटवण्याचा अधिकार नसला तरी दुबार मतदान होऊ नये यासाठी कठोर खबरदारी घेण्याचा निर्देश देण्यात आला आहे. ज्या मतदारांची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी आहेत, त्यांनी फक्त एका ठिकाणी मतदान करावे, याची खातरजमा करण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात दुबार नावे आढळून आल्याने निवडणूक व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आगामी दिवसांमध्ये या प्रकरणावर काय निर्णय आणि कृती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 7:03 pm

एसआयआरमुळे १४ बीएलओंची आत्महत्या

नवी दिल्ली : निवडणूक आयोगासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत मदत व्हावी म्हणून सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींची ब्लॉक लेव्हल ऑफिसर म्हणून नेमणूक केली जाते. पण गेल्या काही दिवसांत तब्बल १४ बीएलओंनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत. निवडणुकीच्या कामकाजाचा प्रचंड तणाव असल्याने तसेच आता हे सहनशिलतेच्या बाहेरचे असल्यानं आपण जीवन संपवत आहोत, अशा सुसाईड नोट लिहीत काही बीएलओंनी […] The post एसआयआरमुळे १४ बीएलओंची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 7:02 pm

नायजेरियात ३१५ विद्यार्थ्यांचे अपहरण

मैदुगुरी : नायजेरियातील एका कॅथोलिक शाळेतून ३०० हून अधिक मुलांसह कर्मचा-यांचे अपहरण करण्यात आले आहे. सुरुवातीला ही संख्या २२७ इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र आता हे देशातील आजवरचे सर्वात मोठे सामूहिक अपहरण असल्याचे म्हटले जात असल्याचे वृत्त आहे. ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने या घटनेची माहिती देताना सांगितले की, राज्यातील सेंट मेरी स्कूलमधून अपहरण केलेल्यांचा अंदाज […] The post नायजेरियात ३१५ विद्यार्थ्यांचे अपहरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 7:00 pm

‘आयएसआय’पुरस्कृत शस्त्रपुरवठा नेटवर्कचा पर्दाफाश

नवी दिल्ली : दिल्ली पोलिस गुन्हे शाखेने शनिवारी एका मोठ्या कारवाईत ‘आयएसआय’पुरस्कृत आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र पुरवणा-या नेटवर्कचा पर्र्दाफाश केला आणि याप्रकरणी चार तस्करांना अटक केली. या नेटवर्कचा उद्देश दिल्ली-एनसीआरमधील टोळ्यांना तुर्कि आणि चीनमध्ये बनवलेल्या अत्याधुनिक पिस्तूलचा पुरवठा करणे हा होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून १० अत्याधुनिक पिस्तुले आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. जप्त करण्यात […] The post ‘आयएसआय’पुरस्कृत शस्त्रपुरवठा नेटवर्कचा पर्दाफाश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 6:57 pm

2047 पर्यंत काँग्रेसला सत्ता नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार टीका:म्हणाले- काँग्रेस नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी, व्हिजनही नाही

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचारयात्रा, सभा आणि शक्तीप्रदर्शनाला वेग दिला आहे. अशातच आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिममध्ये काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. निवडणूक प्रचारासाठी मालेगाव शहरात आलेल्या बावनकुळे यांनी काँग्रेसचे नेतृत्व, अंतर्गत भांडणं आणि विकासाच्या अजेंड्यावर प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडीवरही टीकेची झोड उठवली. आपल्या भाषणात बावनकुळे यांनी असा दावा केला की, 2047 पर्यंतही काँग्रेसला केंद्रात किंवा राज्यात सत्ता मिळणार नाही. कारण काँग्रेसकडे विकासाबाबत स्पष्ट योजना नाही आणि जनतेकडून मिळणारा प्रतिसादही खूप कमी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप- महायुतीला मिळवून दिलेला पाठिंबा याचे स्पष्ट उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार महायुतीला 3 कोटी 18 लाख मतं मिळाली तर महाविकास आघाडीला 2 कोटी 18 लाख मतांवर समाधान मानावे लागले. पुढील 2029 मध्येही महायुतीच सरकार येणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसमधील अंतर्गत भांडणांवरही त्यांनी जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये कुणाचा पाय कुणाच्या पायात बसत नाही, अशी टीका करत त्यांनी अनेक नेत्यांची उदाहरणे दिली. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि हर्षवर्धन सपकाळ या नेत्यांमध्ये परस्पर संवाद कमी असून निर्णयप्रक्रियेत समन्वयाचा पूर्ण अभाव आहे, असे ते म्हणाले. या विसंवादामुळेच काँग्रेस कमजोर होत चालली आहे आणि भविष्यात ही पार्टी किंचित पार्टी म्हणूनच ओळखली जाईल, असा दावा त्यांनी केला. विकासकामांच्या जोरावर लोकांचा विश्वास भाजपवर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्याचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसमध्ये रोज भांडणं, गटबाजी आणि फूट दिसते. त्यामुळे कार्यकर्ते नाराज होऊन पक्ष सोडत आहेत. तर दुसरीकडे महायुती सरकार राज्याच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. विकासकामांच्या जोरावर लोकांचा विश्वास भाजपवर वाढत असून येत्या काळात हा विश्वास अजून दृढ होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप महायुती सरकार आगामी काळात अनेक मोठी प्रकल्प, उद्योग आणि सुविधा राज्यात आणणार आहे. त्यामुळे 2029 पर्यंत काँग्रेसचं अस्तित्व आणखी लहान होईल, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव बवानकुळे यांच्या या वक्तव्यामुळे निवडणूक वातावरणात नवी चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव अजून वाढण्याची शक्यता असून आगामी काही दिवसांमध्ये वातावरण आणखी तापेल यात शंका नाही. बवानकुळे यांनी केलेल्या विधानांची पुढील राजकीय प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 6:53 pm

भाजप-शिवसेना नात्यात तणाव:शिवसेनेपुढे कोणाची दहशत चालत नाही; मंत्री शंभूराज देसाईंचा मित्र पक्षांना कडक इशारा

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तणाव निर्माण करणारे विधान पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी फलटण येथे केले. शिवसेनेपुढे कोणतीही दहशत उभी राहत नाही, उलट आमचीच दहशत राज्यात टिकून आहे, असे ते म्हणाले. मंत्री झाल्यानंतर शिंदे गटाने शांततेत काम करण्याची सूचना दिली असली, तरी याला मर्यादा असते आणि कोणत्याही पक्षाने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी पंगा घेतल्यास त्याचे परिणाम गंभीर असतील, असा सूचक इशारा त्यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील नातेसंबंधांवर अनेक चर्चा सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर देसाईंचे वक्तव्य अधिकच लक्षवेधी ठरले. भाजपकडून शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आकर्षित केले जात असल्याच्या चर्चा सुरू असताना हे विधान अधिक अर्थपूर्ण ठरते. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरही शंभूराज देसाई यांनी कठोर भूमिका स्पष्ट केली. या घटनेला त्यांनी दुर्दैवी म्हटले असून, सध्या प्रकरणाची SIT चौकशी सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, असा ठाम दावा करत त्यांनी सांगितले की, शिवसेना हा अन्याय सहन करणारा पक्ष नाही. मृत डॉक्टरला दबाव आणणारा कोणत्याही सत्ताधारी गटाचा असो वा कुणाचाही असो, त्याला गाठून दाखवू, असा कडक इशारा त्यांनी दिला. आचारसंहिता सुरू असल्यामुळे कारवाई मर्यादित असली, तरी ती संपताच आरोपींवर कठोर पाऊल उचलले जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले नातेही अधोरेखित केले दरम्यान, त्यांच्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्याशी असलेले नातेही त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. मंत्रीपदाचा मोह न बाळगता आम्ही शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो आणि गुवाहाटीपर्यंत साथ दिली, हे देसाई यांनी सांगितले. मंत्रीपदासाठी लोक पक्ष बदलतात, पण आम्ही मिळालेले पद सोडून शिंदे साहेबांसोबत उभे राहिलो, कारण ते जीवाला जीव देणारे नेतृत्व आहे, असे ते म्हणाले. शिंदे यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आजही तितकाच दृढ असल्याचे ते म्हणाले. फलटण तालुक्याच्या विकासाचा रोडमॅप निश्चित केला जाईल एकनाथ शिंदे 28 नोव्हेंबर रोजी फलटणमध्ये येणार असल्याचेही देसाई यांनी जाहीर केले. या भेटीदरम्यान येत्या पाच वर्षांत फलटण तालुक्याच्या विकासाचा रोडमॅप निश्चित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. अनिकेतराजे यांच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या अपेक्षा आणि गरजा मांडाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. तालुक्याच्या बदलासाठी आणि विकासासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप-शिवसेना नात्यातील सूक्ष्म तणाव राज्यात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना नात्यातील सूक्ष्म तणाव, बैठका, चर्चा, आणि आरोप यामुळे वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याने शिवसेनेने स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. शिवसेना ही तडजोड करणारा पक्ष नाही, आणि मित्र पक्षांनीही मर्यादा ओळखून वागावे, असा संदेश त्यांनी दिला. फलटण प्रकरण, शिंदे गटातील निष्ठा, आणि विकासाचा रोडमॅप, या सर्व मुद्द्यांमुळे देसाईंचे विधान राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 6:35 pm

१ डिसेंबरपासून देशात नवीन केस लिस्टिंग सिस्टम

नवी दिल्ली : २४ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेणार असून त्याआधी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत १ डिसेंबर रोजी देशाला आश्चर्यचकित करण्याचे संकेत दिले आहेत. देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी, भारताचे नियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचे मुख्य लक्ष देशातील न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांची प्रचंड संख्या कमी […] The post १ डिसेंबरपासून देशात नवीन केस लिस्टिंग सिस्टम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 6:21 pm

आईच्या दुधात आढळले युरेनियम

नवी दिल्ली : नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन रिसर्चमध्ये धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. अभ्यासानुसार, ४० स्तनपान देणा-या मातांच्या ब्रेस्ट मिल्क सँपलमध्ये युरेनियमचे प्रमाण अत्यंत उच्च आढळले. हा रिसर्च पाटणा येथील महावीर कॅन्सर संस्थेतील डॉ. अरुण कुमार आणि प्रो. अशोक घोष यांनी एम्स, नवी दिल्ली येथील बायोकेमिस्ट्री विभागातील डॉ. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमसह […] The post आईच्या दुधात आढळले युरेनियम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 6:11 pm

थंडीत महागली अंडी, ग्राहकांच्या खिशाला कात्री

मुंबई : प्रतिनिधी ऐन थंडीच्या दिवसांमध्ये राज्यात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, अंड्यांची किंमत प्रतिनग वधारली आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये कोंबड्यांना संसर्ग झाल्याने राज्यात दैनंदिन मागणीच्या तुलनेत अंड्यांचा पुरवठा निम्म्यावर आल्याचे व्यापा-यांनी सांगितले. जिममध्ये जाणारे युवक आणि खवैय्ये सगळेच अंड्यांना प्राधान्य देतात. अशात हिवाळ्याची चाहूल लागताच अंड्यांचे दर वाढले आहेत. दरवर्षी थंडीत अंड्यांची मागणी […] The post थंडीत महागली अंडी, ग्राहकांच्या खिशाला कात्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 6:06 pm

हेल्मेट न वापरणा-या अधिका-यांवर होणार कारवाई

पुणे : प्रतिनिधी दुचाकीवरून प्रवास करताना अपघातांमुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आरटीओ विभागाने दिला आहे. रस्ता सुरक्षा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे पीएमपीएमएल आणि एसटी महामंडळाच्या बसचालकांसाठीही स्वतंत्र मार्गदर्शन […] The post हेल्मेट न वापरणा-या अधिका-यांवर होणार कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 6:03 pm

राज्यातील २५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी थंडच

कोल्हापूर : परतीच्या पावसामुळे यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम उशिरा सुरू झाला. गेल्या २० दिवसांत राज्यातील १५० साखर कारखान्यांनी १ कोटी २५ लाख ६७ हजार टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ४९ कारखान्यांची धुराडी अद्याप थंडच असून, कारखान्याच्या विस्तारीकरणासह आर्थिक अडचणीमुळे हंगाम सुरू झालेला नाही. मागील हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यांनी […] The post राज्यातील २५ टक्के साखर कारखान्यांची धुराडी थंडच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 6:01 pm

मुलगी दिविजाचे अँकरिंग; मुख्यमंत्री फडणवीस कौतुकाने ऐकत राहिले

मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांच्या मुलीने म्हणजेच दिविजाने दिव्यज फाऊंडेशनच्या २६/११ च्या शहिदांसाठी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सूत्रसंचालन केले. हे पाहून देवेंद्र फडणवीस यांनाही तिचं कौतुक वाटलं. ते आपल्या मुलीकडे कौतुकाने पाहात होते. कॅमे-यात हे क्षण कैद झाले आहेत. शनिवारी मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. शनिवारी मुंबईतील गेट […] The post मुलगी दिविजाचे अँकरिंग; मुख्यमंत्री फडणवीस कौतुकाने ऐकत राहिले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 5:59 pm

शिंदेंशी दुरावा नाही ,माध्यमे तोंडावर पडतील : मुख्यमंत्री

नागपूर : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे व माझ्यात कुठलाही दुरावा निर्माण झाला नाही, तो माध्यमांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र काही दिवसांपासून राज्यात निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन […] The post शिंदेंशी दुरावा नाही ,माध्यमे तोंडावर पडतील : मुख्यमंत्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 5:56 pm

संभाजीनगरमध्ये ३-४ वाहने एकमेकांना धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी पुण्यातील नवले पुलावरील अपघाताची बातमी ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलावर कारचालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात एका ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलावर शनिवारी दुपारी एक कारचालक हायकोर्टाकडून […] The post संभाजीनगरमध्ये ३-४ वाहने एकमेकांना धडकली, ५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 5:55 pm

एचआयव्हीवर उत्तम उपचारात महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

मुंबई : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेद्वारे (नाको) घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील आढाव्यात काळजी आधार आणि उपचार सेवा प्रदान करण्यासाठी देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून महाराष्ट्र राज्यास सन्मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला(एमसॅक) विजयवाडा येथे आयोजित केलेल्या केंद्रीय समारंभात हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या काळजी […] The post एचआयव्हीवर उत्तम उपचारात महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 5:52 pm

अपमानामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणात वाढ

नवी दिल्ली : शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगभरात ओळख असलेला महाराष्ट्र विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती पुढे आली आहे. शाळा, शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे देशात विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दिल्लीतील दहावीचा विद्यार्थी शौर्य पाटील आणि जालन्यातील आरोही बिटलानसह कितीतरी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनांमुळे देश ढवळून निघाला आहे. राष्ट्रीय […] The post अपमानामुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत मोठ्या प्रमाणात वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 5:47 pm

गौरी पालवे-गर्जे प्रकरणात बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले:भगिनीचा मृत्यू राजकारणाचा विषय नाही; पण न्याय हवा, सत्य समोर यायला हवे

मुंबईतील वरळी परिसरात राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. राहत्या घरी गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती असून तिच्या मृत्यूला संशयास्पद मानत गौरीच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. घटनेनंतर वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला. गौरी पालवे या केईएम रुग्णालयाच्या डेंटल विभागात कार्यरत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जे आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केल्याने तपासाचे स्वरूप आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. गौरीच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, लग्नानंतर सातत्याने गौरीला मानसिक छळ सहन करावा लागत होता. अनंत गर्जे आणि एका महिलेमधील कथित अफेअरबाबत गौरीला कळल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद वाढू लागले होते. तसेच अनंतची बहीण गौरीला धमक्या देत असे, अशीही तक्रार करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गौरीच्या शरीरावर जखमांचे व्रण दिसल्याचे तिच्या पालकांनी सांगितले. यामुळे तिच्या मृत्यूमागील कारणांबद्दल नातेवाईकांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. घटनेनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी यावर माध्यमांशी बोलताना अत्यंत संतुलित भूमिका घेतली. ते म्हणाले की, एका भगिनीचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायक प्रकार आहे. तिला न्याय मिळायला हवा. पण ही घटना एका राजकीय व्यक्तीच्या पीएशी जोडली गेली म्हणून मी राजकारण करणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, आत्महत्येची खरी कारणे समजून घेणे आवश्यक असून, तत्पर तपास झाल्यास सत्य समोर येईल. त्यांच्या भूमिकेमुळे या प्रकरणावर राजकीय वर्तुळातही संयमाची भाषा ऐकू आली. नातेवाईकांनी मृत्यूला आत्महत्या नव्हे तर हत्या म्हटले दरम्यान, 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अनंत गर्जे यांनी गौरीचे वडीलांना फोन करून, गौरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहे असे सांगितले, मात्र त्यानंतर त्यांनी गौरीशी बोलू दिले नाही, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला. काही वेळातच अनंतने पुन्हा फोन करून गौरीचा मृतदेह समोर असल्याचे सांगितले, अशी माहिती कुटुंबाने दिली. नंतर केलेले कॉल अनंतने उचलले नसल्याचे गौरीच्या वडिलांनी नमूद केले. या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण घटना संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत असून नातेवाईकांनी या मृत्यूला आत्महत्या नव्हे तर हत्या म्हटले आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांमागील सत्य उघड होण्याची अपेक्षा तत्पूर्वी, पंकजा मुंडे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत योग्य तपास व्हावा अशी मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच अनंत गर्जे भावूक अवस्थेत फोनवर रडत असल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना मनाला सुन्न करणारी आहे. पोलिसांनी कसूर न करता तपास करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपासात गौरीच्या मृत्यूचे नेमके कारण आणि आरोपांमागील सत्य उघड होण्याची अपेक्षा आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 5:30 pm

स्मृती मानधनाचा विवाहसोहळा रद्द

सांगली : प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नसोहळ्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आला असून त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. स्मृतीचे लग्न लागण्यापूर्वीच ही घटना घडली. त्यामुळे तिचा लग्नसोहळा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […] The post स्मृती मानधनाचा विवाहसोहळा रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 5:22 pm

गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मंत्री पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया:अनंत गर्जे फोनवर रडत होता; घटनेने मन सुन्न झाले, पोलिसांनी कसूर करू नये

मुंबईतील वरळी परिसरात घडलेल्या डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यूने राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक गंभीर आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आले आहेत. यामुळे प्रकरण अधिकच चिघळले असून पोलिस तपासावरही सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वतः पंकजा मुंडे यांनी निवेदन जारी करत या घटनेबाबत दुख: व्यक्त केले असून, कोणतीही कसूर न करता सखोल तपास व्हावा अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. मुंडे म्हणाल्या की, घटनादिवशी संध्याकाळी त्यांचे पीए अनंत गर्जे अत्यंत आक्रोशाने फोनवर बोलले आणि पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. हा धक्का स्वतःलाही बसल्याचे त्या म्हणाल्या. गौरी गर्जे यांच्या वडिलांनी मुलीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक कोनातून तपास करावा, असे आवाहन करताना ही घटना मन सुन्न करणारी आणि अतिशय वेदनादायक असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या वरळी परिसरात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शनिवारी संध्याकाळी गौरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र गौरी यांच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू आत्महत्या नसून संशयास्पद असल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळाले आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर वरळी पोलिसांनी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे आणि भाऊ अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही संपूर्ण घटना राजकीय स्तरावरही चांगलीच गाजत असून या मृत्यूमागील सत्य काय, याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. घटनेनंतर पोलिसांनी गौरी पालवे गर्जे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र त्यावेळी कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या गौरी यांच्या नातेवाईकांनी शनिवारी रात्रीपासूनच वरळी पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसून कडक कारवाईची मागणी केली. कुटुंबीयांचा आरोप असा की, गौरीची वाढती मानसिक घालमेल, तणाव आणि विवाहित जीवनातील समस्या यांमुळे त्या त्रस्त होत्या. त्यांच्या मते, ही साधी आत्महत्या नाही तर संशयास्पद मृत्यू असून यामागे घरातील छळ आणि वादांचे धागेदोरे आहेत. अखेर रविवारी सकाळी पोलिसांनी अनंत गर्जे व त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. अनंत गर्जे घटनेच्या वेळी घरी नव्हते, असा दावा या प्रकरणात राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. अनंत गर्जे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने ही घटना थेट राजकीय वर्तुळात पोहोचली. विविध पक्षांकडून आणि सामाजिक संस्थांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी होत आहे. गौरी आणि अनंत गर्जे यांचे लग्न अवघ्या काही महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात झाले होते. लग्नाचा कालावधी कमी असूनही गौरी यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले असावे? यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस कुटुंबीयांची चौकशी करून दोन्ही बाजूंचे निवेदन घेत आहेत. अनंत गर्जे घटनेच्या वेळी घरी नव्हते, असा दावा करीत आहेत; परंतु पोलिसांच्या तपासात या दाव्याची पडताळणी केली जाणार आहे. अशा घटना कोणालाही अस्वस्थ करून जातात दरम्यान, या प्रकरणावर स्वतः पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली असून त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, शनिवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास अनंत गर्जे यांनी रडत फोन करून पत्नीच्या आत्महत्येची माहिती दिली. ही घटना मला धक्का देणारी होती. पोलिसांनी कोणतीही कसूर न करता योग्य तपास करावा, अशी माझी विनंती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाले की, गौरीचे वडील अतिशय दुःखात आहेत, त्यांची वेदना मला समजू शकते. अशा घटना कोणालाही अस्वस्थ करून जातात. एखाद्या कुटुंबाच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडत असते, हे बाहेरच्या लोकांना कधीच पूर्णपणे कळत नाही. अचानक घडलेल्या या प्रकाराने मी स्वतःही हादरून गेले आहे. सखोल तपास करून योग्य न्याय मिळावा, अशी मागणी या प्रकरणावरील पुढील कार्यवाही आता पोलिसांच्या तपासावर अवलंबून आहे. शवविच्छेदन अहवाल, कॉल रेकॉर्ड्स, घरातील परिस्थिती आणि दोन्ही कुटुंबीयांच्या विधानांच्या आधारे तपास पुढे नेला जाणार आहे. तिन्ही आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला असून आवश्यकता भासल्यास अटकही केली जाऊ शकते, असे पोलिसांनी सूचित केले आहे. दरम्यान, गौरी यांच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी आणि नातेवाईकांनीही या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरलेल्या या घटनेचा अंतिम निकाल तपासात काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 5:11 pm

लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-३ – चांगले रस्ते, गटारी, आरोग्याची सुविधा हवी

झोपेतून उठण्याअधीच घंटागाडीवाला स्कॅनिंग करुन जातो; कचरा घरातच लातूर (प्रतिनिधी ) : स्वच्छतेच्या दृष्टीने आणि एकंदरच आरोग्याचा विषय महत्वाचा असल्याने लातूर शहरातील प्रत्येक प्रभागातील नागरीक आपापल्या घरात ओला, सुका कचयाचे संकलन करीत आहेत़ शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील नागरीकही कचयाचे संकलन करीत आहेत़ परंतू, नागरीक साखर झोपेत असतानाचा घन कचरा व्यवस्थापनांतर्गत घंटागाडीवाले प्रभागात येऊन दारावर […] The post लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-३ – चांगले रस्ते, गटारी, आरोग्याची सुविधा हवी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 5:09 pm

मालकासारखे बोलू नका; नाना पटोलेंची टीका:अजित पवारांच्या वक्तव्यावर आक्रमक; म्हणाले- तिजोरी तुमची नाही, जनतेची

नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी, राज्याची तिजोरी माझ्या हातात आहे, घड्याळाच्या पाठीशी उभं राहिलात तर बारामती सारखा विकास तुमच्याकडे करील, असे विधान केले होते. या विधानाने विरोधकांनी सरकारवर थेट पक्ष निष्ठेच्या आधारे विकासाचे आश्वासन देत असल्याचा आरोप केला आहे. अजित पवारांच्या वक्तव्याची चर्चा संपूर्ण राज्यात होत असतानाच, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वक्तव्यावर कडक शब्दांत टीका केली. नाना पटोले म्हणाले की, राज्याची तिजोरी एखाद्या व्यक्तीची संपत्ती नसून संपूर्ण जनतेचा निधी आहे. संविधानाने कोणत्याही मंत्र्याला तिजोरी लुटण्याचा किंवा तिजोरीचा वापर पक्षीय स्वार्थासाठी करण्याचा अधिकार दिलेला नाही. विकासाच्या नावाने मतं मागण्याऐवजी सत्ता आणि पैशांची भाषा करणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याचे पटोले म्हणाले. ते पुढे म्हणाले की, एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्वतःच्या अधिकारांची मिरवणूक करत फिरतात आणि दुसरीकडे सत्ताधारी पक्ष आपली ताकद दाखवत जनतेसमोर गर्विष्ठपणे बोलतो. महाराष्ट्राच्या तिजोरीचे तुकडे करून टाकले आहेत का? अशीच भाषा या लोकांकडून ऐकायला येते, असा कडवा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, लोकांनी निवडून दिल्याचा अर्थ नेता मालक झाला असा होत नाही. सत्तेत बसलेले लोक हे पाच वर्षांसाठी जनतेचे सेवक आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे. पटोले यांचा आरोप असा की, सत्तेचा माज आणि गर्व इतका वाढला आहे की सत्ताधारी जनता सर्व सहन करेल, हे त्यांना गृहित धरलं आहे. जनता तुम्हाला सत्तेत बसवते, तशीच ती तुम्हाला खालीही खेचू शकते. मालकाची भाषा आणि धमकीची भाषा लोकशाहीत चालत नाही. जनता हा गर्व चूर करून टाकेल, असा थेट इशारा पटोले यांनी अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना दिला. नगरपालिका निवडणुकीत जनता त्यांचा माज उतरवेल दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनही पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. बावनकुळे यांनी, मी भाजपचा स्टार प्रचारक आहे, कितीही खर्च होऊ द्या, निवडणूक आयोगाला उत्तर देऊ, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने भाजपच्या नेत्यांना सत्ता आणि पैशांचा माज चढल्याचे पटोले यांनी म्हटले. त्यांच्या मते, सत्तेच्या जोरावर पैसा जमा करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी धोकादायक आहे. भाजपला सत्ता मिळाल्यावर एक प्रकारची सर्वशक्तिमानता वाटायला लागली आहे. मात्र नगरपालिका निवडणुकीत जनता त्यांचा हा माज उतरवेल, असा दावा पटोले यांनी केला. सत्ताधारी व विरोधकांत संघर्ष वाढला नळदुर्ग निवडणूक प्रचारात सुरू असलेली ही शब्दयुद्धे आता राज्यातील मोठ्या राजकीय चर्चेचे केंद्र ठरली आहेत. अजित पवारांच्या विधानापासून सुरू झालेला वाद काँग्रेस-भाजप-एनसीपी यांच्यातील तिखट आरोपांपर्यंत पोहोचला आहे. विकास, सत्ता, पैशांचा वापर आणि राजकीय गर्व या सर्व मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांत संघर्ष वाढला आहे. आगामी नगरपालिका आणि स्थानिक निवडणुकांमध्ये मतदार या चर्चांना कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 4:32 pm

शिंदे-फडणवीस यांच्यात दुरावा?; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या दिव्याज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस परस्परांपासून अंतर राखून बसल्याने या चर्चांना आणखीनच बळ मिळाले होते. शनिवारी मुंबईतील कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस […] The post शिंदे-फडणवीस यांच्यात दुरावा?; राजकीय वर्तुळात चर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 4:28 pm

गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार

मुंबई : प्रतिनिधी मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्या केली. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्येप्रकरणी आता विविध आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गौरीच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नाही तर हत्याच असल्याचा दावा केला आहे. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी आत्महत्येनंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी गौरीच्या […] The post गौरीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 4:25 pm

कवडी परिसरात वाळू माफियांना अटकाव:महसूल पथकाची निर्णायक गस्त; वाळू माफियांना धक्का; महसूल विभागाने टिप्पर केला जप्त

कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवार परिसरात सुरू असलेल्या वाळूच्या अवैध वाहतुकीवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत एक टिप्पर जप्त केला आहे. रविवारी, दिनांक 23 रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. अनेक दिवसांपासून या भागात वाळूची अनधिकृत हालचाल वाढली असल्याच्या तक्रारी महसूल कार्यालयाकडे येत होत्या. विशेषत: रात्रीच्या काळोखात आणि पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळू चोरीने वाहतूक होत असल्याची माहिती प्रशासनाला पुष्कळवेळा मिळाली होती. या सर्व गोष्टींचा आढावा घेत महसूल विभागाने विशेष पथके तयार केली आणि अखेर कवडी परिसरात ही पहिली मोठी कारवाई केली. तालुक्यातील काही वाळूघाटांवरून वाळूचा खुलेआम अनधिकृत उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी गेल्या काही आठवड्यांपासून वाढू लागल्या होत्या. प्रशासनाने अनेकदा निरीक्षण करूनही आरोपी वाहतूकदार वेगवेगळ्या मार्गांचा वापर करून चुकवत होते. यामुळे उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते आणि तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी वेगळी रणनीती आखली. त्यांनी प्रत्येक वाळूघाटानुसार मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची स्वतंत्र पथके तयार केली. या पथकांना रात्री व पहाटे घडणाऱ्या वाहतूक मार्गांवर गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे वाहतूक करणाऱ्यांना चुकवण्यासाठी असलेले गुप्त मार्गही प्रशासनाच्या नजरेत आले. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटे संयुक्त पथकाने कवडी शिवार परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरून वेगाने जाणारा एक टिप्पर संशयास्पद वाटला. पथकातील मंडळ अधिकारी आनंद काकडे, एकनाथ कदम, विशाल पतंगे, महेश गळाकाटू, कमलकुमार यादव आणि सुनील भुक्तर यांनी तत्काळ वाहन अडवले. तपासणी केली असता टिप्परमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू भरलेली असल्याचे स्पष्ट झाले. वाहनचालकाला चौकशी केली असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्याने नेमके कोणत्या घाटावरून वाळू आणली हेही सांगितले नाही. त्याच्या उत्तरांमध्ये उडवाउडवी असल्याचे पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात अशी मागणी महसूल पथकाने परिस्थिती पाहून तात्काळ टिप्पर जप्त करण्याचा निर्णय घेतला. संबंधित वाहनाला अखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणून ताब्यात ठेवण्यात आले. या कारवाईनंतर परिसरातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल विभागाने या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून टिप्परमधील वाळूचा स्रोत, या मागील व्यक्ती, वाळू उपसा करणारे गट, तसेच रात्रीच्या वेळी नेमकी कोणत्या घाटावरून वाहतूक होत होती याची सखोल चौकशी होणार आहे. अनेक दिवसांपासून तक्रारी करत असलेल्या ग्रामस्थांनीही या कारवाईचं स्वागत केले असून, अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात अशी मागणी व्यक्त केली आहे. आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता या प्रकरणानंतर महसूल विभाग आणखी कठोर पावले उचलण्याच्या तयारीत असून, अनधिकृत वाळू उपसा रोखण्यासाठी अधिक पथके तयार करण्याबाबत चर्चा सुरु आहे. अधिकारी स्वतः काही भागात अचानक पाहणी करतील, तसेच वाळूघाटांवर ड्रोन सर्वेक्षणाचाही प्रस्ताव विचारात घेतल्याचे माहिती मिळते. वाळूची चोरी रोखण्यात येणे अत्यंत आवश्यक असून, यामुळे महसूलाला होणारे मोठे नुकसान व नदीपात्रांचे नुकसान टाळण्यास मदत होईल. रविवारी झालेली कारवाई ही फक्त सुरुवात असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या कारवाया होण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 4:13 pm

हिंगोलीत भल्या पहाटे पोलिसांचे सरप्राइज सर्च ऑपरेशन:50 पेक्षा अधिक ठिकाणी घरांसह वाहनांची तपासणी, पोलिसांचे पथक पाहून अनेकांचे धाबे दणाणले

हिंगोली शहरात पोलिसांच्या पथकाने रविवारी ता. २३ पहाटे पाच वाजल्या पासून सरप्राईज सर्च ऑपेरशन सुरु केले. यामध्ये तब्बल ५० पेक्षा अधिक ठिकाणी घर झडती सोबतच वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये दोन ठिकाणी खंजर आढळून आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली पालिकेसह वसमत व कळमनुरी पालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून आता प्रत्यक्ष मतदारांच्या गाठभेटीवर जोर दिला जात आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच समर्थकांकडून प्रचाराला वेग दिला जात आहे. त्यामुळे तीनही पालिकांमधून राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, या निवडणुकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून आचारसंहितेचे पालन व्हावे तसेच कोणत्याही दबावाशिवाय खुल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी पोलिस विभागाकडून आक्रमकपणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके कार्यरत आहेत. हिंगोली शहरात आज सकाळी पाच वाजल्या पासून पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक मोहन भोसले, संदीप मोदे, श्यामकुमार डोंगरे यांच्यासह २५ अधिकारी व १५० कर्मचाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार व सराईत गुन्हे असलेल्या इसमांच्या घरी झाडाझडती सुरु केली. यामध्ये अवैध शस्त्र किंवा निवडणूक संदर्भाने अवैधरीत्या जमा केलेले पैसे, निवडणुकीत बाधा आणण्यासाठी काही साहित्य ठेवले आहे का? याबाबत तपासणी करण्यात आली. तसेच संशयित इसमांच्या वाहनाची सुद्धा तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण रेकॉर्डवरील ५० इसमांच्या घराची व वाहनांची व कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये राजू कोठुळे (रा. बासंबा), महेश गीते (रा. चांदापूर) यांच्याकडून दोन शस्त्र जप्त केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर सुद्धा आवश्यकता वाटेल तेव्हा पोलिसामार्फत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची व निवडणुकीत बाधा आणणाऱ्या संशयित इसमांची झाडाझडती घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 4:02 pm

मोठी बातमी:लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षा देत असताना कोल्हापुरात पेपरफोडीचा प्रयत्न उघड; गुन्हे अन्वेषण पथकाने केला पर्दाफाश

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मोठी धक्कादायक घटना उघड झाली आहे. पेपरफोडीचा मोठा कट रचणाऱ्या टोळीचा मुरगुड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून महत्त्वाच्या सुचना व पुरावे मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यभरात लाखो विद्यार्थी टीईटी परीक्षा देत असताना कोल्हापुरात पेपरफोडीचा प्रयत्न उघड झाल्याने शिक्षण विभागातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या कटात काही शिक्षक परीक्षार्थीही सामील असल्याचे तपासात समोर आले आहे. ताब्यात घेतलेले आरोपी कागल तालुक्यातील सोनगे परिसरातून पकडण्यात आले. त्यात कागल आणि राधानगरी तालुक्यातील तरुणांचा समावेश असून त्यांचे आपापसांत विस्तृत जाळे असल्याचा संशय वर्तवला जात आहे. पोलिसांनी काल रात्रीपासून सलग कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून संशयितांची संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकारामुळे आज घेतली जाणारी टीईटी परीक्षा सुरक्षेच्या दृष्टीने आणखी महत्त्वाची बनली आहे. सध्या तपास पथक आरोपींचे मोबाईल, चॅट, संपर्क आणि आर्थिक व्यवहार तपासत असून हे रॅकेट राज्यभर पसरले आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, टीईटी परीक्षेसाठी यंदा मराठी माध्यमातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. मराठी माध्यमातून तीन लाख 27 हजार 135 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे. इंग्लिश माध्यमातून 28 हजार 437, उर्दू माध्यमातून 25 हजार 935 आणि हिंदी माध्यमातून 92 हजार 420 उमेदवार परीक्षा देत आहेत. बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराथी आणि सिंधी माध्यमातूनही काही प्रमाणात नोंदणी करण्यात आली आहे. राज्यभरातून 5283 दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला सामील होण्यासाठी अर्ज केला असून 411 दिव्यांगांना लेखनिक पुरवण्यात आला आहे. तसेच 45 माजी सैनिकही परीक्षा देत आहेत. राज्यभरातून एकूण चार लाख 75 हजार 668 उमेदवारांचा अर्ज यंदा टीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण चार लाख 75 हजार 668 उमेदवारांनी अर्ज केला आहे. पुणे, नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यांतून सर्वाधिक नोंदणी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने यंदा उमेदवारांची संख्या मोठी वाढलेली दिसून आली. परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने राज्यभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. कोल्हापुरातील घटनेनंतर अनेक केंद्रांवर तपासणी आणखी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी वेळेवर कारवाई करून हा कट हाणून पाडला टीईटीचा निकाल परीक्षेनंतर 45 दिवसांत जाहीर करण्याची तयारी आहे. पण कोल्हापुरातील पेपरफोडीचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असते. सुदैवाने पोलिसांनी वेळेवर कारवाई करून हा कट हाणून पाडला आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून शिक्षण विभाग व पोलिस विभाग या संपूर्ण घटनाक्रमाकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहेत. राज्यातील युवकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेला धक्का पोहोचू नये, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 3:07 pm

पहिली केस अंगावर घेण्याचं बळ मनसैनिकांनी दिले:अमित ठाकरे नेरूळ पोलिस स्टेशनमध्ये; शिवस्मारक अनावरण प्रकरण तापले

नवी मुंबईत नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या अनावरण प्रकरणामुळे निर्माण झालेल्या गदारोळानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी सोमवारी स्वतः पोलिस स्टेशनात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात स्मारकाचे अनावरण त्यांनी स्वतः केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या चर्चेला आज नवी मुंबईत पुन्हा उधाण येणार असून मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शनाचे संकेत मिळत आहेत. या सर्व घडामोडींमध्ये अमित ठाकरे यांनी मनसैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, पहिली केस अंगावर घेण्याचं बळ तुम्ही दिले, असे भावनिक वक्तव्य केले आहे. नेरूळ शिवस्मारकाचे अनावरण न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी होती. हा विषय अमित ठाकरे यांच्या नजरेस पडताच त्यांनी तातडीने पुतळ्यावरचे कापड दूर केले. या कृतीदरम्यान काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिस व मनसे कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ धक्काबुककी झाल्याची माहिती पुढे आली. या कृत्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्‍यात आला. यानंतर रविवारी नवी मुंबई पोलिस त्यांना नोटीस देण्यासाठी शिवतीर्थ येथे पोहोचले होते. मात्र, मी स्वतः पोलिस स्टेशनात आलो असतो, तुम्ही उगाच त्रास घेतला, असे म्हणत अमित यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. आज ते स्वतः नेरूळ पोलिस स्टेशनात उपस्थित राहणार आहेत. अमित ठाकरे यांच्या या उपस्थिती दरम्यान मनसेकडून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमणार आहेत. यात मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि मुंबईतील विभागप्रमुखही सहभागी होणार असल्याची माहिती आहे. सकाळी अकराच्या सुमारास ते शिवतीर्थ येथून निघाले आणि वाशी टोल नाक्यावर मनसैनिक त्यांचे स्वागत केले. त्यानंतर रॅलीच्या माध्यमातून त्यांनी नेरूळ पोलिस स्थानकाकडे प्रस्थान केले. शिवस्मारकाचे अनावरण अनेक महिन्यांपासून प्रलंबित या प्रकरणाची सुरुवात 16 नोव्हेंबर रोजी झाली, जेव्हा अमित ठाकरे नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी आले होते. तेव्हा नेरूळ येथील शिवस्मारकाचे अनावरण अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे त्यांना समजले. शिवरायांची मूर्ती कापडाने झाकून ठेवलेली पाहून त्यांनी तातडीने ती उघडली. त्यांच्या या कृतीला मनसे कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला, तर अधिकाऱ्यांकडून या कृतीला नियमबाह्य म्हणून पाहिले गेले. महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेऊ, असे ठाम विधान करून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. कायदेशीर नव्हे, तर भावनिक मुद्दा आज अमित ठाकरे पोलिस स्टेशनात जाणार असल्याने या प्रकरणाचा पुढचा टप्पा काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेकडून हे प्रकरण केवळ कायदेशीर नव्हे, तर भावनिक आणि ऐतिहासिक मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. कार्यकर्त्यांचा वाढता उत्साह, अपेक्षित गर्दी आणि होऊ शकणारे राजकीय संकेत लक्षात घेता, नवी मुंबईतील ही घटना आज राज्याच्या राजकीय वातावरणात आणखी रंग भरू शकते. अमित ठाकरे यांची भूमिका ठाम असून, जे योग्य तेच केले, हा संदेश त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 2:54 pm

दहावी पास वित्तमंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कंत्राटदार खत्री याने सिंचन घोटाळ्यातून पैसा कमावला आहे. त्यातून त्याने वांद्रे येथे स्वत:च्या मुलाच्या नावाने प्रॉपर्टी बनविल्या आहेत. या लोकांमुळेच राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. ज्या दिवशी अशा लोकांना शिक्षा होईल, तेव्हा महाराष्ट्र कर्जातून मोकळा होईल. परंतु, दहावी पास वित्तमंत्र्यांच्या डोक्यामुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली आहे, अशी थेट टीका […] The post दहावी पास वित्तमंत्र्यांमुळेच महाराष्ट्राची विल्हेवाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 2:50 pm

बांगलादेशींविरोधातील कारवाई होणार तीव्र

पिंपरी : चिखली, कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर भंगार दुकाने, अनधिकृत बांधकामे आणि बांगलादेशी नागरिकांच्या हालचालींवर राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन आणखी कठोर भूमिकेत आले असून, सर्व यंत्रणांना ‘नो-टॉलरन्स’ मोडमध्ये कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. गृह विभागाने कुदळवाडी परिसरातील बेकायदेशीर भंगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करण्याची सक्त सूचना दिली आहे, तर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही बांगलादेशी नागरिक आढळून आल्यामुळे पुढील आणखी […] The post बांगलादेशींविरोधातील कारवाई होणार तीव्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 2:50 pm

नियमबाहय पद्धतीने पैसे घेणा-यांवर होणार कारवाई

मुंबई : प्रतिनिधी महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’त सरकारी कर्मचा-यांनीही डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे. यात दोषी आढळलेल्या संबंधितावर कारवाई होणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध […] The post नियमबाहय पद्धतीने पैसे घेणा-यांवर होणार कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 2:48 pm

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अनियंत्रित ट्रकची कारला धडक; दोघांचा मृत्यू, ४ जण गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघाताची घटना रविवारी पहाटे घडली. अनियंत्रित ट्रकने विरुद्ध दिशेने येणा-या कारला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना सोमाटणे फाट्याजवळील पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दीड तास वाहतूक ठप्प झाली होती. अपघातप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. अपघातग्रस्त ट्रक पुण्याहून मुंबईकडे […] The post मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अनियंत्रित ट्रकची कारला धडक; दोघांचा मृत्यू, ४ जण गंभीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 2:38 pm

गौरीच्या मृत्यूवर पती अनंत गर्जेंचे वक्तव्य समोर:मृत्यूवेळी मी घरी नव्हतो, असे अनंत गर्जेंच्या वक्तव्याने तपासाला नवी दिशा

डॉ. गौरी गर्जे यांच्या मृत्यूबाबत पती अनंत गर्जे यांनी पहिल्यांदा भूमिका मांडत सांगितले की, घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. परतल्यावर दरवाजा आतून बंद होता आणि घरात प्रवेश केल्यावर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. घरी आलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता, खिडकीतून घरात शिरलो तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, असे अनंत गर्जे यांनी सांगितल्यानंतर डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू आत्महत्या की संशयास्पद, यावर नवे चर्चेचे वादळ उठले आहे. कुटुंबीय मात्र या कथनावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. मुंबईतील वरळी परिसरात भाजप नेत्या आणि पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उशिरा समोर आली. डॉक्टर गौरी पालवे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. 7 फेब्रुवारी रोजी अनंत गर्जे आणि गौरी यांचा मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. लग्नाला पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहिणी प्रीतम मुंडे देखील उपस्थित होत्या. अवघे दहा महिनेच संसार झाले असताना इतक्या गंभीर निर्णयामागे नेमकं काय घडलं याबाबत अनेक तर्क-वितर्क सुरु आहेत. वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. घटनेनंतर पहिल्यांदाच अनंत गर्जे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा मी घरी नव्हतो. घरी आलो तेव्हा दरवाजा आतून बंद होता. परिस्थिती समजत नसल्याने मी वरच्या 31 व्या मजल्यावरून खिडकीच्या साहाय्याने खाली उतरून आमच्या 30 व्या मजल्यावरील घरात प्रवेश केला. तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. मी तिला खाली उतरवून तत्काळ रुग्णालयात नेले. त्यांच्या या वक्तव्यावर कुटुंबीयांनी शंका व्यक्त केली असून, घटनेत अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे ते सांगत आहेत. कुटुंबीयांचा आरोप आहे की, गौरी ही मानसिकदृष्ट्या स्थिर आणि धाडसी मुलगी होती. ती कोणत्याही समस्येला सामोरी जाणारी होती, आत्महत्येकडे वळणारी नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूमागे इतर कारणांचा तपास केला जावा, अशी त्यांची मागणी आहे. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनंत गर्जे यांचे एका महिलेबरोबर अनैतिक संबंध असल्याची माहिती गौरीला काही महिन्यांपासून मिळत होती. तिने हे चॅटिंग आणि संभाषणाचे पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते. एक-दोन वेळा वाद होऊनही गौरीने नवऱ्याला माफ केले होते. मात्र नंतर पुन्हा नवीन चॅटिंग पाहिल्यानंतर दाम्पत्यामध्ये तीव्र वाद सुरू झाले. कुटुंबीयांचा दावा आहे की गौरीच्या सासरकडून देखील छळ होत होता. या सर्व कारणांमुळे ती तणावात होती, परंतु त्यातून बाहेर पडण्यासाठी ती प्रयत्नशील होती. त्यामुळे आत्महत्येसारखा निर्णय तिने सहज घेतला असे त्यांना वाटत नाही. मानसिक त्रासामुळे आमची मुलगी त्रस्त झाली होती या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत आलेले विधान म्हणजे गौरीचे मामा शिवदास गर्जे यांनी केलेले वक्तव्य. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पंकजा मुंडे यांना अनंत गर्जेच्या वर्तनाबद्दल काहीही माहिती नव्हती आणि त्यांना यात ओढणे चुकीचे आहे. ताईंचा यात काहीही संबंध नाही. त्यांनी कधीच अशा नालायक माणसाला सहन केले नसते. त्याच्या चुकीच्या कृत्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलीच नव्हती, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, अनंत गर्जेने स्वतःच्या हातावर वार केले होते आणि गौरीला धमकी द्यायचा की, मी स्वतः मरेल आणि तुला यात ओढेन. अशा मानसिक त्रासामुळे आमची मुलगी त्रस्त झाली होती. त्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, कुटुंब गेल्या दोन दिवसांपासून सतत चौकशीसाठी फिरत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार घटनेनंतर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडाली असून, पंकजा मुंडे यांनी बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांचा आरोप आणि अनंत गर्जेचे स्पष्टीकरण या दोन्ही गोष्टींमुळे प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी हे आत्महत्या नसून संशयास्पद मृत्यू असल्याचा ठाम दावा केला आहे. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला असून, इलेक्ट्रॉनिक पुरावे, चॅटिंग, कॉल रेकॉर्ड्स आणि शेजाऱ्यांचे जबाब यांचा अभ्यास केला जात आहे. या घटनेमुळे दहा महिन्यांच्या संसारात नेमकं काय घडले? याचा शोध घेण्याची मागणी वाढली असून, मृत्यूचे गूढ अधिकच गडद होत चालले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 2:35 pm

शेतात कामाला जाताना कारने चिरडले; २ महिला ठार

नागपूर : प्रतिनिधी शेतामध्ये कामाला निघालेल्या दोन महिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. रामटेकजवळ एका भरधाव कारने दोन महिलांना उडवले. कारचा वेग अतिशय जोरात होता, त्यामुळे महिलांना जबर मार लागला अन् रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिकांचा उद्रेक झाला. संतापलेल्या लोकांनी कार पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून अपघाताची नोंद केली. अपघातग्रस्त वाहन […] The post शेतात कामाला जाताना कारने चिरडले; २ महिला ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 2:32 pm

राज्यातून गुलाबी थंडी गायब?

मुंबई : प्रतिनिधी उत्तरेकडून वाहणा-या थंड वा-यांचा प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. ऐन हिवाळ्यात राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात आकाश ढगाळ होत आहे. २३ नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे, तसेच गारठा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काल […] The post राज्यातून गुलाबी थंडी गायब? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Nov 2025 2:17 pm

नागपूरमध्ये हळहळ:मोबाईल न मिळाल्याच्या रागातून 13 वर्षीय शाळकरी मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, चणकापूर येथील घटना

मोबाईल वापरण्यास मनाई केल्याने एका 13 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील चणकापूर येथील जय भोले नगर परिसरात घडली आहे. दिव्या सुरेश कोठारे (वय 13) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती आठवीत शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या कोठारे ही चणकापूर येथील महात्मा फुले शाळेत आठवीत शिकत होती. ती नियमितपणे इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया ॲप्सचा अति वापर करत होती, ज्यामुळे तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिला मोबाईल कमी वापर, अभ्यासाला प्राधान्य दे असे सतत समजावत होते. शुक्रवारी (दि. 21) तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने दिव्याचे कुटुंबीय लग्नाच्या कार्यक्रमासाठी आत्याच्या घरी गेले होते. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास दिव्याने नेहमीप्रमाणे मोबाईल मागितला, मात्र कुटुंबीयांनी तिला मोबाईल देण्यास नकार दिला. मोबाईल न मिळाल्याने दिव्या नाराज झाली आणि रागाच्या भरात ती आत्याच्या घरातून निघून थेट स्वतःच्या घरी आली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. घरात कोणी नसताना, दिव्याने घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने तिची मोठी बहीण तिला शोधत घरी आली असता, हा प्रकार उघडकीस आला. तिने धावत जाऊन आई-वडिलांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. मोबाइलच्या अति वापरावरून झालेल्या वादातून एका चिमुकलीने टोकाचे पाऊल उचलल्याने या घटनेने सर्व पालकांना हादरवून सोडले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Nov 2025 2:11 pm