आशिया कपमधून अफगाणिस्तान बाहेर
दुबई : वृत्तसंस्था सुपर ४ पात्रता सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. यासह रशीद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान सुपर-४ च्या शर्यतीतून बाहेर पडला. श्रीलंकेच्या विजयाने बांगलादेशलाही सुपर-४ साठी पात्र ठरविले. श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज कुसल मेंडिस सामन्याचा नायक ठरला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान मोहमद नबीच्या शानदार खेळीमुळे १६९ धावांपर्यंत मजल मारू शकला. अफगाणिस्तानच्या १७० धावांच्या लक्ष्याचा […] The post आशिया कपमधून अफगाणिस्तान बाहेर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात पावसाचा धडाका सुरूच असून, गुरुवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे रस्ते तुडुंब भरून वाहात असून, अनेक ठिकाणी सखल भागांत रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. पावसाचा जोर वाढल्याने गाव भागात अनेकांना रात्र जागून काढावी लागली. मागच्या काही दिवसांपासून राज्यात […] The post लातूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील वाशी येथे दोन सोसायट्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करण्याचे आदेश होते. मात्र, या आदेशाला उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने यावर उच्च न्यायालयाने आक्षेप घेत एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली, असे ताशेरे ओढले आहेत. वाशी सेक्टर ९ मध्ये असलेल्या नैवद्य आणि अलबेला या दोन […] The post उपमुख्यमंत्री शिंदेंवर ताशेरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकशाहीच्या हृदयावरच प्रहार झाल्याचा स्फोटक आरोप करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा थेट कटघ-यात उभे केले. मत चोरी कारखाना चालवून देशभरात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि ओबीसी मतदारांचे नाव संगणकीकृत पद्धतीने वगळले जात असल्याचे त्यांनी पुराव्यांसह उघड केले. कर्नाटकातील अलांडपासून महाराष्ट्रातील राजोरापर्यंत एकाच ‘मोडस ऑपरेंडी’ने बनावट नावे-पत्ते […] The post मतचोरीला आयोगाचे संरक्षण! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपींना नोटीस
मुंबई : प्रतिनिधी मालेगावात २००८ च्या बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सर्व आरोपींना मुंबई हायकोर्टाने आज पुन्हा एकदा नोटीस जारी केली. त्यामुळे आता या आरोपींच्या पुन्हा अडचणी वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कोर्टाने एनआयएलाही नोटीस जारी केली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने ३१ जुलैला साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश […] The post मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपींना नोटीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना किमती वाहन खरेदीस मुभा!
मुंबई : प्रतिनिधी सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्री आणि अधिका-यांच्या वाहन खरेदीसाठी रकमेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या वाहनासाठी मात्र किमतीची कोणतीही मर्यादा घालण्यात आली नाही. त्यामुळे ते त्यांना पाहिजे तेवढ्या किमतीचे वाहन खरेदी करू शकतात. त्याचवेळी सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांवर वाहन […] The post राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना किमती वाहन खरेदीस मुभा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुणीही कोणत्याही पक्षाचे असो, पण राजकारणात वावरताना सुसंकृतपणा दाखवायला हवा. प्रत्येकाने बोलत असताना कुणाला वेदना देणारे वक्तव्य करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता आमदार गोपीचंद पडळकर यांना दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना पातळी सोडल्याचे दिसून आले. यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण व्यक्त होताना समाजामध्ये सलोखा राहील, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत यासाठी प्रयत्न केला पाहिजे. गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची माहिती सध्या तरी माझ्याकडे नाही. पण मी याच विचाराचा आहे कोणी कोणत्याही राजकीय विचाराचा असो तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे, एक संस्कृती आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करु नये. अशा प्रकारचे वक्तव्य हे वेदना देणारे असते. यावर देवेंद्र फडणवीस बोलतील पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचे एकमेव धोरण आहे. महायुती तीनही पक्षातील ज्या लोकांनी ते विधान केले आहे त्या त्या पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या विधानसंदर्भात नोंद घेतली पाहिजे आणि भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे आमचे धोरण आहे. शिवसेनेसंदर्भात जर काही वादग्रस्त विधान झाले तर एकनाथ शिंदे बोलतील, आमच्या पक्षाकडून जर काही विधान झाले त्याची जबाबदारी माझी आहे आणि भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे. गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते? गोपीचंद पडळकर म्हणाले, जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिले. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, असे वादग्रस्त विधान पडळकर यांनी केले होते. बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध- रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले, ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका अत्यंत अश्लाघ्य आणि संतापजनक आहे. या माणसाला बोलताना कधीही कुठलेही तारतम्य नसते आणि भाजपाच्या वरिष्ठांच्या पाठबळाशिवाय हे शक्य नाही. कुणाच्या घरापर्यंत जाण्याचा अधिकार यांना कुणी दिला? महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गाळात घालण्याचे काम करणाऱ्या या आमदाराच्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध केला जातो का, हे आता पहावे लागेल. निषेध नाही केला तर त्यांना भाजपाचीच फूस असल्याच्या आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्ही मात्र त्यांच्या या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
नागपूर जिल्ह्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील पाच प्रमुख तीर्थक्षेत्रांना सरकारने ‘ब’ वर्गाचा दर्जा प्रदान केला आहे. यात कामठी तालुक्यातील खडगाव येथील श्री क्षेत्र हनुमान मंदिर, वडोदा येथील श्री क्षेत्र भवानी मंदिर, भुगावमधील श्री मुक्तेश्वर देवस्थान, मौदा तालुक्यातील देवमुंढरीतील श्री शक्तिमाता भवानी तीर्थक्षेत्र व निहारवाणी येथील श्री क्षेत्र बल्याची पहाडी यांचा समावेश आहे. या निर्णयानंतर संबंधित देवस्थानांना शासनाकडून […] The post नागपूर जिल्ह्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील एका व्यक्तीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनांची तोडफोड झाली. त्यानंतर गुरुवारी ता. १८ रात्री उशीरा सुमारे दिडशे पेक्षा अधिक तरुण व गावकऱ्यांनी कुरुंदा पोलिस ठाण्यात गर्दी केली आहे. तर भेंडेगावतही गावकऱ्यांचा मोठा जमाव एकत्र आला आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या प्रकरणात नागरीकांनी शांतता राखावी तसेच आफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील एका व्यक्तीचा शिवीगाळ करतांनाचा आक्षेपार्ह व्हिडीओ गुरुवारी व्हायरल झाला. त्यामुळे दुसऱ्या गटातील काही तरुणांनी भेंडेगाव येथे जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला. मात्र ती व्यक्ती घरी आढळून आली नाही. त्यामुळे तरुणांनी त्यांच्या मुलास जाब विचारला असता शाब्दीक चकमक झाली अन वादाला तोंड फुटले. या वादात जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणांना मारहाण झाली तसेच त्यांच्या दुचाकी वाहनाची तोडफोड झाली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भेंडेगाव परिसरातील गावकऱ्यांनी आज रात्री थेट कुरुंदा पोलिस ठाण्यात धाव ठेऊन ठिय्या आंदोलन सुुरु केले. आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तीवर तसेच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे भेंडेगाव गावातही जमाव एकत्र आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी तातडीने कुरुंदा येथे धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, वसमत ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, वसमतचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, उपनिरीक्षक शिवाजी बो्ंडले यांच्यासह वसमत ग्रामीण, वसमत शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना तातडीने कुरुंदा येथे बंदोबस्तासाठी बोलावले. तसेच दंगा काबू पथक, शिघ्रकृती दल देखील तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी गावकऱ्यांशी चर्चा सुरु होती. दरम्यान, नागरीकांनी शांतता राखावी तसेच कुठलाही अनुचीत प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
सोनखेड : प्रतिनिधी पोलिस ठाणे सोनखेड हद्दीतील किवळा साठवण तलावाच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये गुरूवार दि. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ५ वाजताच्या दरम्यान दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शेख बाबर शेख जफर वय १५,राहणार बळीरामपूर नांदेड आणि मोहम्मद रेहान मोहम्मद युसुफ वय १६ ,राहणार उमर कॉलनी देगलूर नाका नांदेड असे मृतांची नावे आहेत. […] The post दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रेलरवर कार आदळून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू
पिंपरी : आयशर ट्रेलरवर कार आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. गुरुवारी (दि. १८) सकाळी पावणेसहाच्या सुमारास देहूरोड-कात्रज बा वळण महामार्गावर ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. दिव्यराजसिंग राठोड (वय २२, रा. राजस्थान), सिद्धांत आनंद (२३, रा. झारखंड) […] The post ट्रेलरवर कार आदळून २ विद्यार्थ्यांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून हे अभियान १५ दिवस चालणार आहे. देशभरात चालविल्या जाणा-या या अभियानात सरकारी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून १ लाख स्वास्थ्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना या अभियानाचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधानांच्या […] The post स्वस्थ नारी, सशक्त परिवार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अतिवृष्टीने जिल्ह्यातील बंधा-यांची पडझड
लातूर : प्रतिनिधी जिल्हयास पावसाळयात अद्याप पर्यंत अनेक वेळा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्याचा फटका जिल्हयातील सहा तालुक्यातील ३४ धरणांनाही बसला आहे. तसेच धरणांच्या पाळूवर झाडे, झुडपे उगवली आसून सायळ या प्राण्याने कांही धरणांच्या पाळूला छिद्र पाडल्यामुळे अनेक धरणांच्या पाळू खचल्या आहेत. कांही बंधा-यांच्या बाजू खचून पाणी वाहून गेले आहे. तर कांही ठिकाणी धरणांची […] The post अतिवृष्टीने जिल्ह्यातील बंधा-यांची पडझड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंगा तालुक्यातील स्वस्त धान्य खुल्या बाजारात : छावा
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याची खुलेआम काळ्या बाजारात खरेदीविक्री होत आहे. यास तात्काळ आळा घालण्यात यावा अन्यथा छावा संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांकडे देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले, शासनाकडून गोरगरीब जनतेला दिला जाणारे राशनची खुलेआम काळ्या बाजारात […] The post निलंगा तालुक्यातील स्वस्त धान्य खुल्या बाजारात : छावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीलंकेसमोर १७० धावांचे आव्हान
दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेतील ११ व्या सामन्यात अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याने केलेल्या स्फोटक आणि अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने करो या मरो सामन्यात श्रीलंकेसमोर १७० धावांचे आव्हान ठेवले आहे. मोहम्मद नबी याने २० व्या ओव्हरमधील पहिल्या ५ बॉलमध्ये सलग ५ सिक्स लगावत सामन्याचा चेहरामोहरा बदलाला. नबीने सलग ५ सिक्ससह श्रीलंकेच्या बाजूने झुकलेला सामना […] The post श्रीलंकेसमोर १७० धावांचे आव्हान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले
न्यूयॉर्क : ब्लूमवर्गच्या एका रिपोर्टनुसार मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पत्नी मेलेनिया यांच्यासोबत ब्रिटनला जाण्यासाठी विमानाने उड्डान केले होते. त्याचवेळी स्पिरिट एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान त्यांच्या विमानाच्या खूपच जवळ आले होते. कोणत्याही क्षण धडक होऊ शकते अशी स्थिती होती, मात्र एअर कंट्रोलरने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा विमान अपघात टळला आहे. एअर कंट्रोलरने स्पिरिट एअरलाइन्सच्या […] The post डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूरच्या तरुणाचा लातुरात खून; मैत्रीण गंभीर
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील पीव्हीआर चौक ते छत्रपती चौकाकडे जाणा-या रिंग रोडवरील लहुजी साळवे चौकात दि. १८ सप्टेंबरच्या मध्यरात्री पावणे एक वाजता कारच्यासमोर जीप आडवी लावून कारमधील सोलापूरच्या तरुणाचा भोसकून खून करण्यात आला तर त्याच कारमधील तरुणाच्या मैत्रिणीवर अनेक वार करून गंभीर जखमी केले आहे. सोनाली भोसले रा. अंत्रोली ता. जि. सोलापूर व अनमोल […] The post सोलापूरच्या तरुणाचा लातुरात खून; मैत्रीण गंभीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील मतचोरीचा पर्दाफाश
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करून सत्ता हस्तगत केली आहे, हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करून पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी […] The post महाराष्ट्रातील मतचोरीचा पर्दाफाश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा बँकेचा नावलौकिक देश पातळीवर पोहोचला
रेणापूर : प्रतिनिधी दरवर्षीची परंपरा कायम ठेवत यावर्षी बॅक स्तरावर १०० टक्के वसुली करून या संस्थांनी जिल्ह्यात वेगळा ठसा निर्माण करून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा बँकेचा पारदर्शक कारभारास अनेक दशकाची परंपरा आहे . केवळ कर्ज पुरवठा करणे व तो वसूल करणे एवढ्या पुरतेच कार्य मर्यादित नाहीत तर जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी व सर्वसामान्या […] The post जिल्हा बँकेचा नावलौकिक देश पातळीवर पोहोचला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा
लातूर : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात आरोग्य विभागामार्फत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान गावागावांत पोहचवून महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या. स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाची जिल्हास्तरीय सुरुवात लातूर स्त्री रुग्णालयात आयोजित कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. […] The post स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नदीवर पूल उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
लातूर : प्रतिनिधी तेरणा नदीला आलेल्या पुराने उजनी येथील शेतपिके, घरांचे आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तसेच तेरणा नदीवर उजनी गावाजवळ पूल उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. औसा-रेणापूरचे उपविभागीय […] The post नदीवर पूल उभारणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुमुद भार्गव
लातूर : प्रतिनिधी देश पातळीवर महिलांच्या क्षेत्रातील अग्रगण्य संघटना असलेल्या भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लातूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कुमुद भार्गव यांची निवड झाली आहे. संघटनेची राष्ट्रीय सभा नुकतीच भुवनेश्वर येथे झाली या सभेत श्रीमती कुमुद भार्गव यांची निवड करण्यात आली. गेल्या ४० वर्षांपासुन श्रीमती कुमुद भार्गव सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. भारतीय स्त्री […] The post भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुमुद भार्गव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्ह्यातील ६० पैकी ५९ महसूल मंडळांत अतिवृष्टी
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी तब्बल ५९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार १५१ हेक्टरवरील पिकांचे नूकसान झाले असून सार्वजनिक मालमत्तेलाही मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानूसार झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ४८० कोटी रुपये लागणार आहेत. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे. यंदाच्या पावसाळ्यापुर्वीच मे […] The post जिल्ह्यातील ६० पैकी ५९ महसूल मंडळांत अतिवृष्टी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून बीड जिल्ह्यातील बर्दापूर येथील व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्ती पांडुरंग यादव असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. गावात बसून इतर लोकांशी बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षण आता संपुष्टात आल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या नातवाला भविष्यात नोकरी मिळणार नाही, या विचाराने ते खूप निराश झाले होते. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून बीड जिल्ह्यात दुसऱ्यांदा आत्महत्येची घटना घडली आहे. बार्दापूर येथील निवृत्ती पांडुरंग यादव (वय 65) यांनी आपल्या नातवाला नोकरी मिळणार नाही या चिंतेतून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती यादव हे गावात पारावर बसून नेहमी ओबीसी आरक्षणाच्या विषयावर सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होत असत. आरक्षण संपुष्टात आल्यामुळे भविष्यात आपल्या नातवाला नोकरी मिळणे कठीण होईल, अशी चिंता ते वारंवार व्यक्त करत होते. याच मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही नाथापूर येथे याच मुद्द्यावरून एका व्यक्तीने आत्महत्या केली होती, त्यामुळे बीड जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाशी संबंधित ही दुसरी आत्महत्या ठरली आहे. मुलींच्या नोकरीच्या चिंतेने आत्महत्या ओबीसी आरक्षण जाईल या चिंतेतून बीड जिल्ह्यातील नाथापूर गावात गोरख नारायण देवडकर (वय 50) या व्यक्तीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. देवडकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना पाच मुली असून त्यापैकी दोन मुली पोलिस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, आरक्षणाच्या सध्याच्या स्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाचे आणि भविष्याचे काय होईल, या विचाराने ते खूप चिंतेत होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. पीडित कुटुंबाने राज्य सरकारने त्यांच्या परिस्थितीचा विचार करून मदत करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा गावातही याच कारणावरून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माणिकराव डोईफोडे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ओबीसी आरक्षण रद्द होण्याच्या चिंतेतून त्यांनी जीवन संपवल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्येची ही दुसरी घटना ठरली आहे.
राज्यात घटस्फोटांचे प्रमाण होणार कमी
नागपूर : प्रतिनिधी कुटुंबातील विवाहित जीवन अधिक सुदृढ आणि समजूतदार बनवण्यासाठी राज्य महिला आयोगाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आयोगाच्या पुढाकाराने राज्यात १० ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ‘प्री-मॅरेज कॉन्सिलिंग सेंटर’ सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी येथे दिली. राज्य महिला आयोगाच्या सुनावणीसाठी त्या नागपुरात आल्या असता नियोजन भवन येथे आयोजित […] The post राज्यात घटस्फोटांचे प्रमाण होणार कमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली जिल्ह्यांतर्गत ऑनलाईन बदली झालेल्या ११३१ शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी गुरुवारी ता. १८ काढले आहेत.या शिक्षकांना तातडीने नवीन शाळेवर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ८७० प्राथमिक शाळा असून या ठिकाणी सुमारे तीन हजारपेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी शासनाने विन्सींस या खाजगी कंपनीला कंत्राट दिले होते. त्यानुसार शिक्षकांच्या बदलीसाठी संवर्ग निश्चित करण्यात आले होते. यामध्ये संवर्ग एक, संवर्ग दोन, संवर्ग तीन, संवर्ग चार व विस्थापित शिक्षकांचा समावेश होता. त्यानुसार त्या त्या संवर्गातून बदली पात्र शिक्षकांनी ऑनलाईन बदलीचे प्रस्ताव दाखल करून त्यामध्ये शाळेचा पसंती क्रमांक देखील दिला होता. त्यानुसार मागील महिन्यात या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या होत्या. मात्र या बदलीमध्ये काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यानंतर शिक्षकांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर आमदार बांगर यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर यांना शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दरम्यान, आज मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी ११३१ शिक्षकांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढले आहेत. या शिवाय २८ विस्थापित शिक्षकांनाही कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले असून त्यांना शुक्रवारी ता. १९ बदली झालेल्या शाळेवर रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यमुक्तीचे आदेश मिळाल्यामुळे शिक्षकांतून समाधान व्यक्त होत असून आता जिल्हयातील बहुतांश शाळांना नवीन गुरुजी मिळणार आहेत.
देशातील ‘जेन झी’, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर […] The post देशातील ‘जेन झी’, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला असून, गोंडेगाव येथे एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील चार वर्षांचा स्वराज अशोक खिल्लारे घराबाहेर खेळत असताना पावसाच्या पाण्याने भरलेल्या सिमेंटच्या नाल्यात पडला आणि तो वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि बचाव पथकाने त्याचा शोध सुरू केला. तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर जेसीबीच्या मदतीने त्याचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला. आपल्या लेकाचा मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. नेमकी घटना काय? जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या नाल्यात पडून एका चार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वराज अशोक खिल्लारे (वय 4) असे मृत मुलाचे नाव असून, तो हिंगोली जिल्ह्यातील जामठी येथील रहिवासी होता. स्वराजची आई त्याला घेऊन वाशिम जिल्ह्यातील गोंडेगाव येथे माहेरी आली असताना हा अपघात घडला. मृतदेह नाल्यात अडकलेल्या अवस्थेत आढळला शनिवारी सकाळी स्वराज घराबाहेर खेळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या सिमेंटच्या नाल्यात पडला. नाल्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने असल्यामुळे तो वाहून गेला. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याने कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. सुमारे एक तासानंतरही तो न सापडल्याने जेसीबीच्या मदतीने नालीचा काही भाग खोदण्यात आला. त्यावेळी स्वराजचा मृतदेह नाल्यात अडकलेल्या अवस्थेत आढळला. जेव्हा स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तेव्हा त्याच्या आईने केलेला आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. एका क्षणात खेळता-बोलता मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गोंडेगावमध्ये शोककळा पसरली असून, लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
फ्रान्स संपावर; ८ लाख सामान्य लोक रस्त्यावर
पॅरिस : वृत्तसंस्था फ्रान्समध्ये आज (गुरूवार) गेल्या अनेक वर्षांमधील सर्वात मोठा देशव्यापी सामुदायिक संप पुकारण्यात आला. कामगार संघटनांनी एकजूट दाखवत रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी जाहीर केलेल्या कठोर अर्थसंकल्पीय कपातीचा निषेध करण्यासाठी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. कामगार, पेन्शनधारक आणि सामान्य नागरिकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे, हा या […] The post फ्रान्स संपावर; ८ लाख सामान्य लोक रस्त्यावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाडक्या बहिणीची ई-केवायसीतून आधार पडताळणी होणार
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी आता ई केवायसीच्या माध्यमातून आधारकार्डची पडताळणी करण्यात येणार आहे. राज्याच्या महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत. पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात १८ सप्टेंबरपासून दोन महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक केले. दोन […] The post लाडक्या बहिणीची ई-केवायसीतून आधार पडताळणी होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीवर लाखोंचा खर्च
मुंबई : प्रतिनिधी राज्यातला शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला असताना या शेतक-यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला आहे. पण दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानात नवीन फर्निचरसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. डबल बेड मैट्रेस, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये, तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख रुपये खर्च […] The post मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीवर लाखोंचा खर्च appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राहुल गांधी हे सिरियल लायर आजची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार
मुंबई : प्रतिनिधी राहुल गांधी काहीतरी मोठा धमाका करणार असे वातावरण होते. मात्र साधा लवंगी फटाका देखील ते फोडू शकले नाहीत. सगळाच फुसका बार निघाला. राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. रोज खोटे बोलण्याचे गोबेल्स तंत्र ते वापरतात असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले. राहुल गांधी यांचा एकच गुण वाखाणण्यासारखा आहे तो म्हणजे, ते […] The post राहुल गांधी हे सिरियल लायर आजची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ग्रीन कार्ड धारक भारतीय अटकेत; कुटूंबिय हताश
शिकागो : वृत्तसंस्था गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेत व्यवसाय करत असलेल्या एका भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने अचानक ताब्यात घेतले आहे. दीड महिन्याहून अधिक काळ तुरुंगात असलेल्या परमजीत सिंग यांच्या अटकेमुळे त्यांचे कुटुंब हताश झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ते कायदेशीर ग्रीन कार्ड धारक आहेत आणि अनेक वर्षांपासून ते अमेरिकेत शांततापूर्वक राहत आहेत. ३० जुलै […] The post ग्रीन कार्ड धारक भारतीय अटकेत; कुटूंबिय हताश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मेंदू खाणा-या अमिबाचे दोन रुग्ण नागपूरमध्ये! ८ जणांची नोंद; केरळमध्ये १९ बळी
नागपूर : प्रतिनिधी ‘अॅक्युट एन्सेफलायटिस सिंड्रोम’ (एईएस) या मेंदूज्वराच्या आजाराचा शहरात शिरकाव झाला आहे. या आजाराच्या आठ रुग्णांची नोंद झाली असून, यातील पाच रुग्ण हे मध्यप्रदेशातील, दोन रुग्ण नागपूर शहर व एक नागपूर ग्रामीणमधील आहेत. मेंदूशी संबंधित या आजाराविषयी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, केरळमध्ये या आजाराने आतापर्यंत १९ जण मृत्युमुखी पडले आहेत. […] The post मेंदू खाणा-या अमिबाचे दोन रुग्ण नागपूरमध्ये! ८ जणांची नोंद; केरळमध्ये १९ बळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकच्या अबोटाबादमधून ३२ हजार पासपोर्ट गायब
अबोटाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर पासपोर्ट चोरीचे प्रकरण समोर आले आहे. अतिरेकी गड असलेल्या अबोटाबाद येथून ३२ हजार पासपोर्ट गायब झाले आहेत. पाकिस्तानच्या लोक लेखा समितीच्या अहवालातून ही बाब निदर्शनास आली. या अहवालानुसार पाकिस्तान सरकारची काही कारवाई करण्याची इच्छाही दिसत नाही. पाकिस्तानात सध्या तहरीक-ए-तालिबान, लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, एचएम, इसिसचे अतिरेकी गट सक्रीय आहेत. एकट्या टीटीपीजवळ […] The post पाकच्या अबोटाबादमधून ३२ हजार पासपोर्ट गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतविरोधी कट : बांगलादेशात अमेरिकी सैन्याचे १०० जवान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नसल्याने डोनाल्ड ट्रम्प हे आता भारतावर दबाव टाकण्यासाठी हद्द पार करताना दिसत आहेत. बांगलादेशच्या चटगांवमध्ये अमेरिकी सैन्याचे १०० जवान पोहोचले आहेत. दुसरीकडे यादरम्यानच भारताने देखील म्यानमारमध्ये तिन्ही लष्कराचे मिळून १२० जवान पाठवले आहेत. बांगलादेश आणि चटगांव शहरात बंगालची खाडी रणनीतीवर आहे. मात्र, मागील आठवड्यापासून येथे अमेरिकेच्या लष्कराच्या […] The post भारतविरोधी कट : बांगलादेशात अमेरिकी सैन्याचे १०० जवान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टॅरिफचा तुघलकी निर्णय अंगलट; डॉलर घसरला!
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेने जसा भारतावर टॅरिफ लावला तसाच तो चीन आणि इतर देशांवर देखील लावला आहे. या टॅरिफचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. याचा मोठा फटका आता अमेरिकेला बसला असून, ट्रम्प यांचे टेन्शन वाढले आहे. डॉलर ही जगातील सर्वात मजबूत करन्सी म्हणून ओळखली जाते, मात्र टॅरिफनंतर सातत्यानं डॉलरमध्ये घसरण सुरू असल्याचं पहायला मिळत […] The post टॅरिफचा तुघलकी निर्णय अंगलट; डॉलर घसरला! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली महिला अर्बन पतसंस्था घोटाळा:पतसंस्थेच्या महिला अध्यक्षाला अटक, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
हिंगोली येथील महिला अर्बन पतसंस्थेच्या १२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा व पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने महिला अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा रोहिणी खर्जुले यांना अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची सोमवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. हिंगोली येथील महिला अर्बन पतसंस्थेच्या १२ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात ५२ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत आहेत. या पथकाला मदत करण्यासाठी पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी आणखी एक विशेष पथक नियुक्त केला असून या पथकाला आर्थिक गुन्हे शाखेस तपास करणे व आरोपी अटक करण्याबाबत मदत करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,या प्रकरणात या पथकाने यापुर्वी न्यू अर्बन पतसंस्थेचा अध्यक्ष जयेश खर्जुले यास अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या शिवाय काही दिवसांपुर्वी पाच जणांना तर त्यानंतर एकास अटक केली होता. त्या सहा जणांना सोमवारपर्यंत (ता. २२) पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, महिला अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा रोहिणी खर्जुले ह्या हिंगोली शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेकडे, उपनिरीक्षक वाघमारे, सतीष ठेंगे, रामराव पोटे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास सोनवणे, अनिल भुक्तर, विठ्ठल काळे, महिला पोलिस कर्मचारी वग्गेवार यांच्यापथकाने रोहिणी खर्जुले यांना अटक केली असून आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची सोमवारपर्यंत ता. २२ पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. या फसवणुक प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या आठ झाली असून उर्वरीत आरोपींचा शोध सुरु आहे.
कोलकाता : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५०% टॅरिफमध्ये मोठी कपात केली जाऊ शकते. तसेच, रशियन तेल खरेदीमुळे लावलेला अतिरिक्त २५% टॅरिफही हटवला जाऊ शकतो, अशी शक्यता मुख्य आर्थिक सल्लागार वी. अनंथा नागेश्वरन यांनी वर्तवली आहे. यासोबतच त्यांनी भारत-अमेरिका व्यापार करार पुढे सरकत असल्याचेही संकेत दिले आहेत. आज कोलकाता येथील एका कार्यक्रमात बोलताना […] The post लवकरच भारतावरील शुल्क हटवणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे गृहकर्ज घेऊन आयसीआयसीआय बँकेची ५.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अर्जुन अथोली (वय ३९) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद युनुस शरीफ शेख आणि दरिऊस सोलोमन राफत या दोन आरोपींविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४६७, ४६८ (खोटे दस्तऐवज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तऐवजांचा वापर करणे) आणि १२० (ब) (गुन्हेगारी कट रचणे) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत घडला. आरोपी मोहम्मद शेख आणि दरिऊस राफत यांनी आयसीआयसीआय बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून ती खरी असल्याचे भासवले आणि बँक अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. मोहम्मद शेखने मागील तीन वर्षांचे आयकर विवरणपत्र आणि जमीन खरेदीबाबतची बनावट कागदपत्रे बँकेला दिली होती. या आधारे बँकेने त्याला १४ जुलै २०२३ रोजी पाच कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले. ३० सप्टेंबर २०२३ रोजी ही रक्कम पुण्यातील सोपानबाग येथील मालमत्तेचे मालक दरिऊस राफत यांच्या नावाने चेकद्वारे देण्यात आली. मात्र, नंतर ही मालमत्ता प्रेम फतेचंद वजरानी यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. सुरुवातीला काही महिने युनुस शेखने कर्जाचे हप्ते भरले, परंतु मार्च २०२४ पासून त्याने हप्ते भरणे बंद केले. बँकेचे वसुली अधिकारी तपासणीसाठी गेले असता, त्यांना संबंधित मालमत्ता दुसऱ्याच्याच नावावर असल्याचे आढळले. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचे भासवून कर्ज घेतल्याचे समोर आले. सदर मालमत्तेची मालकी प्रेम फतेचंद वजरानी यांची असून, त्यात दोन्ही आरोपींचा कोणताही हक्क नाही. चौकशीदरम्यान, शेखने १९८७ सालातील एका डीडच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून हा आर्थिक व्यवहार केल्याचे उघड झाले आहे. फरासखाना पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
भारत फाेर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना पी.डी.पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२५ने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. राज्यातील महत्वपूर्ण हा एक पुरस्कार असून जागतिक स्तरावर महाराष्ट्राला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाताे. कराड (सातारा) येथील पी.डी.पाटील गाैरव प्रतिष्ठान यांनी २०११ मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. बाबा कल्याणी यांचे ओैद्याेगिक क्षेत्रातील काम आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय याेगदाना बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. देशाच्या प्रगतीसाठी उद्याेगांची शिक्षण, ज्ञान आणि तंत्रज्ञानाशी सांगड घालणे अत्यंत महत्वाचे आहे.भारतातील तरुणाांनी केवळ तयार उपायांवरच अवलंबून न राहता नवाेपक्रमावर लक्ष्य केंद्रित करावे असे मत यावेळी बाबा कल्याणी यांनी व्यक्त केले. केवळ नफ्यासाठीच नव्हे तर गाव, समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी देखील काम केले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. आपल्या मातृभूमीशी जाेडलेला सन्मान मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नुकतेच अमेरिकन साेसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स तर्फे भारत फाेर्ज लिमिडेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना ‘हाॅली मेडलने’ सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कल्याणी यांच्या अभियांत्रिकी, प्रगत उत्पादन, पर्यावरणवाद, दूरदर्शी नेतृत्व तसेच जागतिक उद्याेग क्षेत्रात भरीव याेगदान याअनुषंगाने प्रदान करण्यात आला. भारत फाेर्जने जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनाला स्थान देत आंतरराष्ट्रीय मानकांशी जुळणारे बेंचमार्क स्थापित केले आहे.
गोंधळी कलाकारांसाठी अपघाती विमा, कागदपत्रे मिळण्यातील अडचणींचे निराकरण आणि मुलांचे शिक्षण व महिला सक्षमीकरण असा त्रिसूत्री कार्यक्रम राबवला जाणार आहे. गोंधळी व भटक्या विमुक्त जाती जमाती विकास संघाचे अध्यक्ष परेश गरुड यांनी ही माहिती दिली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गोंधळी कलाकारांच्या मेळाव्यात त्यांनी हे जाहीर केले. या कार्यक्रमांतर्गत गोंधळी, डवरी आणि जागरण गोंधळाशी संबंधित अन्य भटक्या विमुक्तांसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि कलाकारांच्या मानधनावरही काम केले जाईल. कलाकारांचे आरोग्य, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते, रहिवासी दाखला, उत्पन्नाचे दाखले आणि कलाकार पेन्शन या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. नवी पेठेतील पत्रकारसंघाच्या सभागृहात हा मेळावा पार पडला. या मेळाव्याला भटके विमुक्त विकास परिषदेचे स्वामी धनगर, सद्भाव गती विधी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे रवी ननावरे, आयुर्विमा प्रतिनिधी विद्या गुगळे आणि राज्याच्या सांस्कृतिक मंत्रालयातील लोककला अनुदान विभागाचे सदस्य खोडे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ४५ हून अधिक कलाकारांनी हजेरी लावली.गरुड यांनी सांगितले की, २२ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवात संस्थेमार्फत गोंधळी कलावंतांचा एक लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवण्यात येणार आहे. कलाकारांच्या मुलांच्या शिक्षणातील अडचणी दूर करून त्यांना किमान पदवीपर्यंतचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी नमूद केले. डिसेंबर २०२५ पर्यंत पुणे शहर व जिल्ह्यातील ५०० कलाकारांची नोंदणी करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न केले जातील, असे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन झाले. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी १ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे भाचे सत्येन वेलणकर यांनी त्यांना मंत्राग्नी दिला.तत्पूर्वी, मेहेंदळे यांचे पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, साहित्यिक आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पांडुरंग बलकवडे, बी. डी. कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, मंदार लवाटे, राहुल सोलापूरकर, मनोज पोचट, माधव भांडारी, अविनाश धर्माधिकारी, विक्रमसिंह मोहिते, भूपाल पटवर्धन, लीनाताई मेहेंदळे, केदार फाळके, श्रीनिवास कुलकर्णी, राजेंद्र जोग, सुधीर थोरात, अरविंद जामखेडकर, गो. बं. देगलूरकर, राजा दीक्षित, मोहन शेटे, यशोवर्धन वाळिंबे, जगन्नाथ लडकत, आमदार भीमराव तापकीर, कर्नल पराग मोडक, विंग कमांडर शशिकांत ओक, मिलिंद एकबोटे आणि सदानंद फडके यांनी अंत्यदर्शन घेतले. वैकुंठ स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्कारावेळी पांडुरंग बलकवडे (भारत इतिहास संशोधक मंडळ), सुधीर थोरात (श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ), माधव देशपांडे (रा. स्व. संघ), ॲड. सदानंद फडके (शिक्षण प्रसारक मंडळी) आणि मोहन शेटे (इतिहास प्रेमी मंडळ) यांनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली.शनिवार, २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात सर्व संस्थांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गेली ५० वर्षे मेहेंदळे यांनी इतिहासाच्या संशोधन कार्याला वाहून घेतले होते. ते शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत, जे इतिहास क्षेत्रात जगप्रसिद्ध आहेत. ते क्रियाशील संशोधक होते आणि फारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांसाठी वाहन खरेदीच्या नियमांमध्ये महाराष्ट्र सरकारने मोठे बदल केले आहेत. अर्थ विभागाने 17 सप्टेंबर 2025 पासून लागू होणारा एक नवीन शासन निर्णय जारी केला आहे, ज्यानुसार आता मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहन खरेदीसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीचे सर्व संबंधित आदेश रद्द करण्यात आले आहेत. मात्र, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या खरेदीवर कोणतीही किंमत मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. वाहन उत्पादन खर्च, वाढती महागाई आणि बीएस-6 (BS-VI) मानकांची नवीन वाहने यांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. या नवीन नियमांमुळे सरकारी खर्चावर नियंत्रण आणण्यास मदत होणार असून, वाहनांच्या खरेदी प्रक्रियेत अधिक स्पष्टता येणार आहे. या निर्णयामुळे प्रशासनात आर्थिक शिस्त आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. कोणत्या पदाला किंमतीची मर्यादा किती? राज्य सरकारच्या नवीन नियमानुसार, सरकारी अधिकारी आणि मंत्र्यांच्या वाहन खरेदीसाठी खर्चाची मर्यादा ठरवण्यात आली आहे. या मर्यादेमध्ये जीएसटी, वाहन कर आणि नोंदणी शुल्क यांचा समावेश नाही. या नियमानुसार, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या वाहनांसाठी कोणतीही किंमत मर्यादा नाही, तर मंत्री आणि मुख्य सचिवांना 30 लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार आहे. त्याचप्रमाणे, अपर मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना 25 लाख, तर राज्य माहिती आयुक्त आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना 20 लाखांपर्यंतच्या गाड्या घेता येतील. राज्यस्तरीय विभागप्रमुख, आयुक्त, महानिदेशक आणि विभागीय आयुक्त यांच्यासाठी 17 लाखांची मर्यादा असून, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना 15 लाखांपर्यंतचे वाहन घेता येणार आहे. इतर अधिकाऱ्यांसाठी ही मर्यादा 12 लाख निश्चित करण्यात आली आहे, पण यासाठी राज्य वाहन पुनरावलोकन समितीची मंजुरी आवश्यक असेल. इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्राधान्य महाराष्ट्र शासनाच्या ईव्ही पॉलिसी-2025 नुसार, सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 20 टक्के अधिक किमतीचे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना 12 लाख रुपयांपर्यंतचे मल्टी-युटिलिटी व्हेईकल (MUV) खरेदी करण्याची परवानगी असेल, असेही या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. जुन्या वाहनाला स्क्रॅप घोषित करणे अनिवार्य सरकारी वाहने खरेदी करण्यापूर्वी जुन्या वाहनाला 'महावाहन' प्रणालीत अधिकृतपणे स्क्रॅप घोषित करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. हा नवीन नियम केवळ शासकीय विभागांपुरता मर्यादित नसून, सर्व स्वायत्त संस्था, सरकारी कंपन्या, मंडळे आणि महामंडळांनाही लागू असेल. सर्व विभागप्रमुखांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जेणेकरून वाहन खरेदी आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता येईल. नवीन धोरणानुसार, राज्यपाल यांच्यासारख्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी त्यांच्या ताफ्यात लक्झरी गाड्यांचा समावेश कायम ठेवण्यात आला आहे. तर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी त्यांच्या रँकनुसार एसयूव्ही किंवा मध्यम आकाराची वाहने वापरतील, ही आधीपासून असलेली पद्धत नव्या नियमावलीतही कायम ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी यंत्रणेतील वाहन खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल आणि वाढत्या तांत्रिक व पर्यावरणीय निकषांशी सुसंगत वाहनांची खरेदी करणे शक्य होईल.
घरात दादागिरी करा आणि या दिवाळी आणि नवरात्रीत जास्त खरेदी करा
नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन जीएसटीच्या दरात बदल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसातच जीएसटीच्या दरात मोठे बदल करण्यात आले आणि अनेक वस्तूंवरील कर कमी करण्यात आला. त्यामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक गोष्टींवरील कर शून्यावर आल्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह […] The post घरात दादागिरी करा आणि या दिवाळी आणि नवरात्रीत जास्त खरेदी करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोन्ही मराठा आरक्षणविरोधी याचिका कोर्टाने फेटाळल्या
मुंबई : मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर व सातारा गॅझेटियरच्या आधारे २ सप्टेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणा-या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. याचिका प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये व […] The post दोन्ही मराठा आरक्षणविरोधी याचिका कोर्टाने फेटाळल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीने तसेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदानात घोळ झाल्याचा आरोप केला होता. तसेच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान झाल्याचा आकडा देखील जाहीर केला होता. आता याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी लवंगी फटका सुद्धा फोडू शकले नाहीत, फुसका बार त्यांनी लावला होता, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब सांगितला तर संपूर्ण भारत घाबरला होता की आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार. पण लवंगी फटाका सुद्धा ते फोडू शकलेले नाहीत. फुसका बार त्यांनी लावलेला आहे. मी मागच्याही काळात सांगितले होते की राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. रोज खोटे बोलायचे आणि गोबेल्सचे तत्त्व हे त्याठिकाणी मांडायचा प्रयत्न असतो. इतके वेळा इलेक्शन कमिशनने त्यांना नोटीस दिली, आत्तापर्यंत एकही पुरावा ते देऊ शकले नाहीत. कितीही खोटे बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधी यांचे एका गोष्टीसाठी मी कौतुक करतो की प्रत्येक वेळी येऊन माध्यमांसमोर येऊन खोटे बोलण्याची जी त्यांची हिंमत आहे हे खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. अशा प्रकारचा नेता यापूर्वी मी कधीच पाहिलेला नाही. ते कितीही खोटे बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना जनतेतच जावे लागेल. जनतेत जातील तर कदाचित निवडणुकीचे निकाल कधीतरी त्यांच्या बाजूने येतील. पण, अशाच प्रकारे खोटे बोलत राहिले आणि आपल्या मनाचे आणि आपल्या कार्यकर्त्यांचे समाधान करत राहिले तर कधीच त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी वक्तव्य खोटी निघाली महाराष्ट्रातला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांना महाराष्ट्रातून फार अपेक्षा होती. तुम्हाला माहीत आहे की त्यांनी हॉटेल देखील बूक करून ठेवले होते. त्यांनी मंत्रिमंडळाची रचना देखील केली होती. कॉंग्रेसमध्ये अनेक मुख्यमंत्री सुद्धा तयार होऊन गेले होते आणि अशातच जनतेने त्यांना जो झटका दिला होता, त्यातून ते वर येऊ शकत नाही. हा झटका एवढा मोठा होता. पण, त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी वक्तव्य खोटी निघाली. सगळी वक्तव्य ही पुराव्याविना केलेली होती आणि याचे पुरावे इलेक्शन कमिशनने दिल्यामुळे ते तोंडावर आपटले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यात कामगारांचे कायदे आता कमकुवत झाले आहेत. कामगारांनी आता अधिक संघटित झाले पाहिजे. खासगी असो किंवा सहकारी कारखान्यातील कामगार असो सर्वांनी मिळून एकत्र आले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला शरद पवार हा आपला आधार वाटतो, असे विधान जयंत पाटलांनी केले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळाचा उल्लेख करत म्हटले की, शेती, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात सरकारपेक्षा मोठा आधार शरद पवार यांचा लोकांना वाटतो. जिद्द काय असते हे शरद पवारांकडून महाराष्ट्रातील तरुण पिढी शिकेल, असा विश्वास जयंत पाटलांनी बोलून दाखवला आहे. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी 7 वर्षात एक दिवसही सुट्टी घेतली नसल्याचे सांगितले. मी 2633 दिवस पक्षाचा अध्यक्ष आहे. 7 वर्षात एकही सुट्टी न घेता आपण काम केले, असे सांगताना जयंत पाटील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, बंद पडलेल्या खासगी कारखान्यांचे सहकारी करण्याचा एक काळ शरद पवार यांच्या काळात झाला. आज परिस्थिती बदलली आहे. सहकार ऐवजी खासगी कारखानदार राज्यात वाढले आहेत. आज सहकारी साखर कारखान्याएवढेच खासगी कारखाने झाले आहेत. कारखानदारांचे प्रश्न समजून घेऊन साखर कामगारांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात, असा सल्लाही जयंत पाटलांनी दिला. आता मोठ्या प्रमाणावर कायदे बदलण्यात आले आहेत. आज राज्यात आणि देशात कामगारांची आंदोलने सुरू आहेत, त्यांचे प्रश्न सुटत आहेत, असे चित्र नाही. राज्यकर्त्यांची मानसिकता आणि आंदोलकांची मानसिकता देखील याला कारणीभूत आहे. कामगार कायद्यात बदल झाल्यामुळे अनेक मुभा मिळाल्या आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. या कामगार कायद्यांमध्ये अनेक पळवाटा आले आहेत. कामगारांच्या हक्कांचे संरक्षण कारणे मोठी जबाबदारी संघटनांवर आहे. देशात मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे. लोकांचा सुखवस्तू राहण्याकडे कल वाढला आहे आणि या लोकांचा कामगार वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोण फारसा चांगला नाही. शहरात राहणाऱ्यांचा एक स्टेटस निर्माण झाला आहे, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
एन्काऊंटरनंतर गोल्डी ब्रार टोळी संतप्त
गाझीयाबाद : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलोपार्जित घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गाझियाबादच्या टेक्नो सिटी परिसरात दोन्ही गोळीबार करणा-यांना एन्काऊंटरमध्ये ठार केले आहे. दोघेही रोहित गोदरा-गोल्डी ब्रार टोळीचे सदस्य होते. मात्र यानंतरही रोहित गोदराकडून धमक्या येणे सुरुच आहे. या एन्काऊंटरनंतर गोदराने पुन्हा एकदा माफी मिळणार नाही म्हणत इशारा दिला आहे. बरेली येथे अभिनेत्री […] The post एन्काऊंटरनंतर गोल्डी ब्रार टोळी संतप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसी समाज नाराज झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवली आहे. अनेकवेळा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच राज्य सरकारने काढलेल्या जीआरवर देखील त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. हा जीआर मागे घ्या, नाहीतर आवश्यक ते बदल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आज देखील भाषणात बोलताना छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. छगन भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचा मोठा विजय झाला अशा बातम्या येत आहेत. मीडिया मंडळींनी नीट ऐकून घ्यावे हा जीआर निघाल्यानंतर अनेकांनी आपापल्या पद्धतीने हायकोर्टाकडे धाव घेतली. त्यातल्या काही लोकांनी पीआयएल केले, आम्ही त्यांना सांगितले हे चुकीचे होईल. अनेक वकील जे आहेत त्यांच्याशी आम्ही रात्रंदिवस चर्चा करत आहोत. त्यांनी सांगितले की आपल्याला पीआयएल नाही करायचे रिट करायचे. मग ज्यांनी पीआयएल केले होते त्यांनी विनंती केली की आम्हाला रिट करण्यासाठी मुभा द्यावी. तिथे त्यांचा पीआयएल नाकारला गेला त्यामुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरला. हा जीआर मागे घ्या नाहीतर आवश्यक त्या सुधारणा करा पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आतापर्यंत आम्ही चार ते पाच रिट अर्ज केले आहेत. एक केले आहे कुणबी सेनेच्या वतीने, दुसरे केले आहे नाभीक समाजाच्या वतीने, तिसरे माळी समाजाच्या वतीने, चौथे जे आहे समता परिषदेचे आमचे एक अधिकारी आहेत त्यांच्या वतीने केले आहे. असे आमचे 5-6 रिट केलेले आहे. आता त्याची सुनावणी सुरू होईल आणि अतिशय काळजीपूर्वक वकील नेमले आहेत. मला खात्री आहे की निश्चितपणे आपली मागणी आहे एकतर हा जीआर मागे घ्या नाहीतर आवश्यक त्या सुधारणा करा, अशी आपली मागणी आहे. त्यात निश्चितपणे आपल्याला यश मिळणार, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेबांनी सांगून सुद्धा गरिबांसाठी आयोग नेमला नाही एक इतिहास म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की मंडल आयोगाच्या पूर्वी वेगवेगळ्या राज्यांनी आपापल्या परीने वेगवेगळ्या समाजाला आरक्षण दिले. देशमुख समिती फार नंतर स्थापन करण्यात आली. त्यांनी सांगितले होते की मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले आहे की हा ओबीसी समाज त्यात आज देशात हजारो जाती आहेत, आपल्याकडे 374 जाती आहेत. हा अतिशय गरीब आहे, अडचणीतला आहे. यांची माहिती गोळा करा, आयोग निर्माण करा आणि यांना आरक्षण द्यायला पाहिजे. कळम 341 मध्ये त्यांनी दलितांना आरक्षण देण्याचे सांगितले आहे, 342 मध्ये आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे सांगितले आहे. परंतु, भारत सरकारने आयोग नेमला नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी भारत सरकारचा राजीनामा दिला त्यात त्यांनी जी कारणे लिहिली होती त्यात एक कारण हे देखील होते की मी सांगून सुद्धा या गरिबांसाठी आयोग नेमला नाही. मग कालेलकर आयोग नेमण्यात आला आणि त्यांनी सांगितले की आयोग नेमला पाहिजे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही छगन भुजबळ म्हणाले, हा लढा बाबासाहेबांनी सुरू केला आहे. नंतर मंडल आयोग आला, तो आयोग सुद्धा दाबून ठेवला होता. नंतर व्ही.पी. सिंह आले आणि त्यांनी सांगितले की हा आयोग मला मान्य आहे आणि ओबीसींना आरक्षण देत आहे. त्यावेळी मी त्यांचे स्वागत केले. त्या दिवशी पेपरमध्ये आले होते की भुजबळ यांनी स्वागत केले. त्यावेळी मी शिवसेनेचा महापौर होतो. तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि आमचे मतभेद व्हायला सुरू झाले. नंतर मी ठरवले की एकाच ठिकाणी बाळासाहेब बोलणार आणि मी बोलणार हे योग्य नाही. त्यांचे म्हणणे होते की आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे. आर्थिक निकषावर आरक्षण आपण एकवेळ मान्य जर केले, तर मला सांगा की हे मुंडे आहेत, सध्या ते गरीब आहेत आणि नंतर ते चांगले श्रीमंत झाले, तर काय करणार? अजून तसेच कोणीतरी श्रीमंत आहेत पण त्यांच्या धंद्यात खोट आली आणि ते गरीब झाले माग तेव्हा ते म्हणणार आता मला आरक्षण द्या. किती वेळा आरक्षण देणार आणि काढणार? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. तुमची लेकरं बाळं, आमची काय कुत्री मांजरं का रे? छगन भुजबळ म्हणाले, आज झोपडपट्टीमध्ये गेलो तर तिथे राहणारे कोणते लोक दिसतात? दलित लोक दिसतात, झाले का ते श्रीमंत? आरक्षण मिळाले की लगेच नोकऱ्या लागल्या असा समज करून देण्यात आला आहे. आमचे लेकरं बाळं म्हणतात, अरे बाबा जशी तुमची लेकरं बाळं आहेत, तशी या गोरगरीब जनतेची सुद्धा लेकरं बाळं आहेत, त्यांची काय कुत्री मांजरं आहेत का रे? असे म्हणत भुजबळ यांनी अप्रत्यक्ष मनोज जरांगे यांना सवाल केला आहे. गरीबी सगळीकडे आहे. पण गरीबी हटवण्यासाठी भारत सरकार वेगवेगळे कार्यक्रम देत आहे. ओबीसी म्हणजे जात नाही. अनेक जातींचा समूह आहे. मराठा एक जात आहे. आमची मागणी आहे जात जनगणना करा.
नवी दिल्ली : खजुराहो येथील प्रसिद्ध जावरी मंदिरातील भगवान विष्णू यांच्या खंडित मूर्तीची दुरुस्ती करण्यासंदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना, सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी एक टिप्पणी केली होती. यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ निर्माण झाला. एवढेच नाही, तर विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनेनेही सरन्यायाधीशांना वाणीवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला होता. आता यासंपूर्ण प्रकरणावर खुद्द सरन्यायाधीश बी.आर. गवई […] The post बोलण्यात संयम राखायला हवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने हल्ला करत तिचा निर्दयीपणे खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खटाव तालुक्यातील कटगुण गावातील गोसावी वस्तीवर ही घटना घडली आहे. घटनेची अधिक माहिती अशी की, विनोद विजय जाधव (26) या तरुणाने पिंकी विनोद जाधव (21) हिच्यावर लोखंडी गजाने डोक्यावर वार करून खून केला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती स्वतः पुसेगाव पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबत आरोपी विनोदने म्हटले की, मी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी गजाने खून केला असून तिचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण व पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घरात पोहोचल्यावर पिंकी जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. नातेवाईकांच्या मदतीने पिंकी जाधव यांना पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पिंकी आणि विनोद जाधव यांना तीन लहान मुळे आहेत. आईच्या मृत्यूने या तिन्ही मुलांच्या डोक्यावरील आईचे छत्र हरपले आहे. यामुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे गोसावी वस्ती आणि संपूर्ण कटगुण परिसर सुन्न झाले होते. या प्रकरणी पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी विनोद जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मुलांच्या डोळ्यासमोरच केली हत्या विनोद जाधव शेतीकाम करतो, त्याला तीन लहान मुले आहेत. ही घटना मुलांच्या डोळ्यासमोरच घडली असल्याची चर्चा गावात आहे. पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत असले तरी, हा वाद एवढ्या मोठ्या गुन्ह्याला कारणीभूत ठरेल, असा विचार कोणीच केला नव्हता, असे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमागील अधिक तपशील पोलिसांच्या तपासानंतरच समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, माण आणि खटाव तालुक्यांमध्ये गेल्या आठ दिवसांत महिलांच्या हत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत. माण तालुक्यातील एका हत्येचा तपास पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या हत्येचा तपास अजूनही सुरू असून पोलिसांना कोणतेही महत्त्वपूर्ण पुरावे मिळालेले नाहीत. आता खटाव तालुक्यातील ही तिसरी घटना घडली आहे, ज्यात पतीनेच पत्नीची हत्या केली आहे. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मेंदू खाणा-या अमिबाचे आतापर्यंत १९ बळी
कोच्ची : केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि प्राणघातक आजाराने संक्रमित झालेल्या रुग्णांच्या मृत्युंची संख्या वाढत आहे. राज्यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामधून अनेक मृत्यू गेल्या काही आठवड्यात झाले असून आरोग्य विभागाने नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. या वर्षी केरळमध्ये अमीबिक इंसेफेलायटिसचे ६१ रुग्ण आढळले आहेत, ज्यामध्ये १९ […] The post मेंदू खाणा-या अमिबाचे आतापर्यंत १९ बळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
७५ वर्षांत पहिल्यांदाच मुस्लिम महिला उपसरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण
सुधीर गो. बोर्डे परभणी : प्रतिनिधी तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी ग्रामपंचायतची स्थापना १९५१ साली झाली. या ग्रामपंचायत स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवार, दि.१७ सप्टेंबर रोजी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम विशेष लक्षणीय ठरला. अमृत महोत्सव साजरा करणा-या या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विराजमान असलेल्या गावातील मुस्लिम समाजाच्या राईन डी. के. इनामदार यांना […] The post ७५ वर्षांत पहिल्यांदाच मुस्लिम महिला उपसरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे दिसून येत आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एकावर बुधवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कोथरूड येथील मुठेश्वर परिसरात एका 36 वर्षीय प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यानंतर काही अंतरावरच सागर साठे या तरूणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या दोन्ही घटनेनंतर घायवळ टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच यात नीलेश घायवळ यांचा काही हात आहे का? याचा तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. कोण आहे नीलेश घायवळ? नीलेश बन्सीलाल घायवळ पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. मूळचा जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील असून तो उच्चशिक्षित देखील आहे. पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर त्याने मास्टर इन कॉमर्सची डिग्री पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या ऐवजी त्याने गुन्हेगारीचा रस्ता पकडला. नीलेश घायवळची पुण्यातील आणखी एक कुख्यात गुंड गजानन मारणे उर्फ गजा मारणेशी 2000 ते 2003 या काळात भेट झाली व ओळख वाढली. त्यानंतर दोघांनी मिळून एका खुनाची घटना घडवली आणि त्यासाठी 7 वर्षांची शिक्षा भोगली. जेलमध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर नीलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्यात आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या कारणावरून वाद निर्माण झाले आणि मैत्रीचे नाते वैरात बदलले. नीलेश घायवळची पुण्यात दहशत नीलेश घायवळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणी वसुली मारामारी आणि परिसरात दहशत निर्माण करणे असे जवळपास 23 ते 24 गुन्हे पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. कोथरूडच्या सुतारवाडीत तर नीलेश घायवळची चांगलीच दहशत होती. गजा मारणेच्या टोळीने नीलेशवर दोन वेळा जीवघेणे हल्ले केले होते. त्याला घायवळ टोळीने देखील चोख प्रत्युत्तर दिले होते. यात सर्वात चर्चेत असलेला गुन्हा म्हणजे दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची हत्या. कुडलेचा रस्त्यात पाठलाग करत फिल्मी स्टाइलने खून करण्यात आला होता. या घटनेनंतर नीलेश घायवळसह 26 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. सचिन कुडले हत्येनंतर नीलेश घायवळ तुरुंगात होता. 2019 साली तुरुंगातून सुटला तसेच इतर खटल्यांमधूनही हळूहळू जामीन मिळवत 2023 मध्ये अखेर नीलेश पूर्णपणे तुरुंगातून बाहेर आला. त्यानंतर त्याने पुन्हा खंडणी, टोळीयुद्ध आणि विविध हिंसक गुन्हे करणे सुरू केल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या गल्लीबोळात नीलेश घायवळची बॉस म्हणून ओळख आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले मतचोरीचे आरोप जोरकसपणे फेटाळून लावला. निवडणूक आयोगाने राहुल गांधी व इतर लोकांना मतचोरीचे पुरावे व प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. पण ते न करता ते केवळ आरोप करण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणालेत. ईव्हीएमवर मतदान काँग्रेसच्याच काळात सुरू झाले. मग आता ईव्हीएमवर संशय घेऊन राहुल यांना आपल्याच सरकारची प्रक्रिया चुकीची आहे असे म्हणायचे आहे काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. राहुल गांधी यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्याला हात घातला. त्यांनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मते वगळण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्याचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, निवडणूक आयोगाने राहुल गांधी व इतर लोकांना पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले होते. प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. परंतु ते न करता ते केवळ आरोप करण्याचे काम करत आहेत. कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तिथे मतचोरी झाली असती किंवा मतांचा फेरफार झाला असता तर त्यांचा उमेदवारनिवडून आला असता का? मग मतचोरी कुणी केली? भाजपने केली की काँग्रेसने केली? हा विषय येतो. ईव्हीएम काँग्रेसच्याच सरकारने आणले एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेस फक्त फेक नरेटिव्ह पसरवण्याचे, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे व लोकांची दिशाभूल करण्याचे काम करते. त्यांच्याकडे ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते निवडणूक आयोगाकडे द्यावेत. आयोगाने ऐकले नाही, तर कोर्टाचा दरवाजा ठोठावला पाहिजे. पण ते जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत. हरतात तेव्हाच आरोप करतात. त्यांनी ईव्हीएमवरही आरोप केले. विशेष म्हणजे हे मशीन आले तेव्हा देशात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीएचे सरकार होते. त्यांनीच ईव्हीएमवर मतदान सुरू केले. मग त्यांनी केलेली प्रक्रिया चुकीची आहे असे राहुल गांधी यांना म्हणायचे आहे का? आरोप नाही, पुरावेही दिले पाहिजे एकनाथ शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग हायजॅक करण्याचे काम 10-15 वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप केला. पण 10-15 वर्षांपूर्वी देशात यूपीएचेच सरकार होते. मग त्यांना आपल्याच सरकारवर आरोप करायचा आहे काय? हे ही याठिकाणी पहावे लागणार आहे. त्यामुळे फक्त आरोप करून चालणार नाही. त्याचे पुरावेही दिले पाहिजेत. काँग्रेसचा कर्नाटक व तेलंगणात विजय झाला. तेव्हा त्यांनी आरोप केले नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत त्यांना चांगल्या जागा मिळाल्या. तेव्हाही ते बोलले नाही. त्यांनी फेक नरेटिव्ह पसरवून विजय मिळवला. पण विधानसभा निवडणुकीत मतदार सतर्क झाला. सरकारनेही पुढे नेलेले प्रक्रिया, लोकाभिमुख योजना, लाडकी बहीण योजनेसारख्या योजना राबवल्या. त्याची पोचपावती म्हणून राज्यात आमचे सरकार आले. तेव्हापासून त्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. त्यांना विजय मिळतो तेव्हा ते आरोप करत नाहीत, पण त्यांचा पराभव होतो तेव्हा मात्र ते ईव्हीएम, मतदार यादी, निवडणूक आयोगावर व अगदी कोर्टावरही आरोप करतात, असे शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांना टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचाही दावा केला. या प्रकरणी त्यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधकांची महाविकास आघाडी तुटल्याचे चित्र आहे. आता त्यांचे जे काही सुरू आहे (ठाकरे बंधूंची युती) ते ही तुटले वाटते. मी अतिशयोक्ती करणार नाही. पण त्यांना त्यांची जागा बीएसटीतल्या छोट्याशा निवडणुकीने दाखवून दिली. याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे. मी खात्रीने सांगतो. विश्वासाने सांगतो. आम्ही मुंबई शहरासाठी महत्वाचे असणारे अनेक प्रकल्प मार्गी लावलेत. याशिवाय मुंबईबाहेर फेकल्या गेलेल्या मुंबईकरांनाही पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विकासाच्या ताकदीवर महायुती पुन्हा मुंबईच्या सत्तेत येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकेल. आम्ही लोकसभा व विधानसभा जिंकली. स्थानिक स्वराज्य संस्थांतही आमचाच विजय होईल, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला जागतिक पातळीवरील प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करून देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना अद्ययावत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, असे ते म्हणाले. तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या नियामक मंडळाच्या बुधवारी (१७) झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, संस्थेचे संचालक मिलिंद आकरे, पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, संस्थेचे व्यवस्थापक रवींद्र देशमुख आणि विश्वास जाधव उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या अनुषंगाने नेदरलँड, इस्रायल, जपान आणि तांझानिया या देशांतील विद्यापीठांशी सहकार्य करून संस्थेत प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, असे रावल यांनी सुचवले. संस्थेत नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यासाठी एक सल्लागार समिती स्थापन करावी. या समितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय कृषी विपणन संस्था, तसेच बी-बियाणे, खत उत्पादक आणि अन्न प्रक्रिया उद्योगांतील तज्ज्ञांचा समावेश असावा, असेही त्यांनी नमूद केले. संस्थेची सभासद संख्या वाढवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देशही रावल यांनी दिले. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी फेडरेशन, साखर कारखाने, विविध कार्यकारी सोसायट्या, कापूस फेडरेशन आणि मार्केटिंग फेडरेशन या संस्थांना संस्थेचे सभासद करावे. प्रत्येक बाजार समितीने त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात प्रशिक्षणासाठी तरतूद करावी आणि कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना याची माहिती द्यावी, असेही ते म्हणाले. तळेगाव दाभाडे येथील संस्थेत त्रिभुवन सहकारी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करावे. जागतिक पातळीवरील सुगी पश्चात तंत्रज्ञान राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शन केंद्र सुरू करावे. बदलत्या काळानुसार संस्थेमध्ये ड्रोन चालक प्रशिक्षण आणि कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासही मान्यता देण्यात आली. या माध्यमातून शेतकऱ्यांना सुगी पश्चात तंत्रज्ञानाची माहिती मिळेल, असे रावल यांनी स्पष्ट केले.
पं. राजेंद्र कुलकर्णी यांना भारतरत्न भीमसेन जोशी पुरस्कार:औंध येथील संगीत महोत्सवात सन्मानित
जागतिक कीर्तीचे बासरीवादक पं. राजेंद्र कुलकर्णी यांना नुकताच भारतरत्न पं. भीमसेन जोशी पुरस्कार प्रदान करण्यात आला. औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी रंगमंदिर येथे आयोजित १२ व्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत महोत्सवात हा सन्मान करण्यात आला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. माजी महापौर दत्तात्रय गायकवाड आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाचे समन्वयक रामराव नायक यांच्या हस्ते पं. कुलकर्णी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण आणि द औंध सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वास्तुविशारद अभिजित सुभाष गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार रुपये, मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे होते.पुरस्कार स्वीकारल्यानंतर पं. राजेंद्र कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि सवाई गंधर्व यांचे नातू, प्रसिद्ध गायक पं. श्रीकांत देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “पं. भीमसेन जोशी यांचे नाव एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून खूप मोठे आहे. त्यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”कुलकर्णी यांनी सांगितले की, त्यांचे वडील पं. भीमसेन जोशींपेक्षा एका वर्षाने लहान होते आणि जोशी लोकप्रिय नसतानाही त्यांच्या ४० ते ४५ खाजगी मैफली वडिलांनी आयोजित केल्या होत्या. त्यावेळी लहान असल्याने त्यांना संतवाणीमधील भजनांचे संस्कार बालपणीच मिळाले. पुढे पं. श्रीकांत देशपांडे यांच्याशी त्यांची गहरी मैत्री झाली, ज्यामुळे ते संगीतात अधिक समृद्ध झाले.पं. श्रीकांत देशपांडे यांचे शिष्य असलेल्या पं. सुधाकर चव्हाण यांच्या संस्थेकडून हा पुरस्कार मिळत असल्याने तो अधिक खास असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळ आणि द औंध सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित हा संगीत महोत्सव या भागातील रसिकांची सांस्कृतिक भूक शमवत असल्याचे पाहून आनंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी भंडारा येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने केली आहे. दहशतवाद विरोधी शाखेला एका गुप्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तुमसर येथील वैभव अनिरुद्ध बोरकर (४०, रा. आंबेडकर वार्ड, तुमसर जि. भंडारा) आणि भारत सुखदेव कोल्हाडकर (३६, रा. शिवाजी वार्ड, तुमसर जि. भंडारा) हे दोघे मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा चालवत होते. हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते. माहितीची खात्री पटल्यानंतर, तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या आदेशानुसार ही कारवाईची योजना आखण्यात आली. या कारवाईसाठी गोबरवाही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. एका महिलेची सुटका पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते. पुराव्यांची खात्री झाल्यानंतर, पोलिस पथकाने पंचांसमक्ष त्या घरात छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच, या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती भारत कोल्हाडकर याच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांतील काही भाग त्याला देत होती. या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कलम ३, ४, ५, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : प्रतिनिधी गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजारांपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातून एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसेच आपापल्या गावी, वाड्या-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी आणि मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक-अधिकारी अभिनंदनास […] The post गणेशोत्सवात एसटी मालामाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर मुनाफ पठाणला अटक; आयुष कोमकर हत्या प्रकरण
पुणे : प्रतिनिधी नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली होती. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर हा अखेर पोलिसांना शरण आला. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे. […] The post कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर मुनाफ पठाणला अटक; आयुष कोमकर हत्या प्रकरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भंडाऱ्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश:दोघांना अटक, पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने तुमसर शहरात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी भंडारा येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने केली आहे. दहशतवाद विरोधी शाखेला एका गुप्त सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तुमसर येथील वैभव अनिरुद्ध बोरकर (४०, रा. आंबेडकर वार्ड, तुमसर जि. भंडारा) आणि भारत सुखदेव कोल्हाडकर (३६, रा. शिवाजी वार्ड, तुमसर जि. भंडारा) हे दोघे मिळून मेहेगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये वेश्याव्यवसायाचा अड्डा चालवत होते. हे दोघे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात ढकलत होते. माहितीची खात्री पटल्यानंतर, तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या आदेशानुसार ही कारवाईची योजना आखण्यात आली. या कारवाईसाठी गोबरवाही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शरद शेवाळे यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पथकाने बनावट ग्राहक पाठवून या माहितीची पडताळणी केली. बनावट ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव बोरकर आणि भारत कोल्हाडकर हे दोघे महिला पुरवत होते आणि ग्राहकांकडून पैसे घेत होते. पुराव्यांची खात्री झाल्यानंतर, पोलिस पथकाने पंचांसमक्ष त्या घरात छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी वेश्याव्यवसायासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली. तसेच, या अड्ड्यामध्ये सापडलेल्या एका महिलेची सुटका करण्यात आली. त्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती भारत कोल्हाडकर याच्या सांगण्यावरून येथे येत होती आणि ग्राहकांकडून मिळणाया पैशांतील काही भाग त्याला देत होती. या कारवाईनंतर आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर कलम ३, ४, ५, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या गावाशी नाळ जोडलेली ठेवा : गायकवाड
पुणे : प्रतिनिधी – विकसित देशासोबत विकसित मराठवाड्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या गावाची नाळ जोडलेली ठेवा. नव्या स्टार्टअपची एक शाखा मराठवाड्यात सुरू करा, ज्यामुळे समाजोपयोगी कार्य घडेल, असे राज्याच्या जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड यांनी सांगितले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा सेवक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय मराठवाडा रत्न पुरस्कार प्रदान समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत […] The post आपल्या गावाशी नाळ जोडलेली ठेवा : गायकवाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील बालाघाटात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे उत्तर भागातून वाहणा-या चांदनी नदीला महापूर आला आहे. चांदनी नदीला महापूर आल्याने मांडेगाव, कांदलगाव, देवगावसह जवळपास आठ गावातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. तसेच या परिसरातील अनेक लघु प्रकल्प हे भरले आहेत. कळंब […] The post सोलापुरात पावसाने हाहाकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट संदर्भात काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. वकील विनित धोत्रे यांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या अध्यादेशामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अध्यादेशावर आक्षेप घेत दोन जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी वकील विनीत धोत्रे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टात काय घडले? आजची सुनावणी ही दोन सत्रांमध्ये झाली. सकाळच्या सत्रातील सुनावणीच्या सुरुवातीलाच ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसते का? असा सवाल कोर्टाने केला. तर दुपारच्या सत्रात सुनावणीत सरकारच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. या गॅझेटमुळे कुठल्याही समाजातील लोकांचे नुकसान झालेले नाही. इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणावर त्याचा परिणाम झालेला नाही, असे सांगितले. यानंतर हायकोर्टाने देखील ही याचिका जनहित याचिकेच्या कक्षेत बसत नसल्याचे म्हणत, वेगळी आणि स्वतंत्र याचिका सक्षम न्यायालयासमोर सादर करावी, असे सांगितले. तसेच जनहित याचिकेच्या नावाखाली कुठल्याही गोष्टीला आव्हान दिले जाऊ शकत नाही. ही याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही, असे सांगत हायकोर्टाने वकील विनीत धोत्रे यांची हैदराबाद गॅझेटविरोधातील याचिका फेटाळून लावली.
धमाल हास्याची पर्वणी असलेली सकस संहिता, विनोदाच्या उत्तम जागा, साजेसे नेपथ्य आणि या सगळ्याला नैसर्गिक अभिनयाची जोड देत यंदाच्या विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत मएसो सिनिअर कॉलेजच्या 'यथा प्रजा तथा राजा' या एकांकिकेने मनोहर कोलते पुरस्कृत दादा कोंडके स्मृती स्मरणार्थ करंडक, प्रशस्तीपत्र आणि रूपये पंधरा हजाराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावत विनोदोत्तम करंडकावर आपले नाव कोरले. हास्य जल्लोषाची पर्वणी ठरलेली आणि विनोद या विषयाला वाहिलेली महाराष्ट्रातील एकमेव अशी विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा गेले तीन दिवस भरत नाट्य मंदिरात जल्लोशात पार पडली. यंदा स्पर्धेचे १८ वे वर्ष असून यंदा या स्पर्धेत राज्यभरातून एकूण २३ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज प्रसिध्द लेखक, वक्ते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. भरत नाट्य मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर विनोदोत्तमचे अध्यक्ष हेमंत नगरकर, उपाध्यक्ष मनोहर कोलते, अमर राजपूत, शैलेंद्र भालेराव, अमित काळे, स्पर्धेचे परिक्षक मंजूषा जोशी, दिलीप वीर आणि प्रदीप रत्नपारखे उपस्थित होते. यावेळी प्रसिध्द अभिनेता ‘तुकाराम’ आणि ‘किल्ला’ फेम पार्थ भालेराव यास विनोदवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक अमर राजपूत पुरस्कृत करंडक, प्रशस्तीपत्र आणि रूपये बारा हजार चिंचवड येथील ऱ्हस्व-दीर्घच्या 'मृत्यूमोनी डॉट कॉम' या एकांकिकेने पटकावले. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अजय नागनूर पुरस्कृत श्रीरंग नागनूर स्मरणार्थ करंडक, प्रशस्तीपत्र आणि रूपये दहा हजार आकुर्डी येथील विहंग कला मंडळाच्या 'ऑपेराची सुपारी' या एकांकिकेने पटकावले. यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, जन्म आणि मृत्यू या गोष्टी सृष्टीतील प्रत्येक घटकाच्या वाट्याला येणारच आहेत. यामधले जगणे सुंदर करणे माणसाच्या हातात आहे. भूक ,निद्रा आणि मैथुन हे सर्व प्राण्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. पण हास्य आणि विनोद बुद्धी यांचे वरदान केवळ माणसांनाच लाभले आहे. त्याचे विस्मरण आज माणसांना होत आहे. विनोदबुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. जीवनात शेअर बाजाराच्या निर्देशांकाइतकाच आनंदाचा निर्देशांकही महत्त्वाचा आहे. त्याच्याकडे आज आपले दुर्लक्ष होत आहे. हास्य हे जीवनाचे संगीत आहे आणि जीवन सुरेल करण्याची मोठी ताकद हास्यात आहे. विनोद बुद्धीची ढाल हातात असली आणि अंगात रसिकतेचे चिलखत घातले की जीवनातल्या सगळ्या संकटांना हसत सामोरे जाता येते, हे संतांनी देखील ओळखले होते. त्यामुळेच संतांनी आपल्या साहित्यात विनोद आणि हास्याला स्थान दिले. सध्या उत्तम विनोद निर्माण होत असला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती क्षीण झाली आहे, असे दिसून येते.
हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे. विशेषतः याच नोंदीच्या आधारावर मराठा समाजालाही ओबीसी आरक्षणाचा लाभ दिला जात आहे. पण आता उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानेच हैदराबाद गॅझेट महाराष्ट्रात लागू होत नसल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. यामुळे या मुद्यावरून पुन्हा एकदा सरकारची अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी अर्थात ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले. त्यानंतर सरकारने मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला. पण या गॅझेटियरमध्ये बंजारा समाज हा आदिवासी असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे बंजारा समाजाने आपल्याला आदिवासींच्या कोट्यातून अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे निघत आहेत. विशेषतः एका तरुणाने या प्रकरणी आपले बलिदानही दिले आहे. यामुळे वातावरण तंग झाले असताना सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू होत नसल्याचा दावा केला आहे. बंजारा समाजाने हैदराबादला जावे - आत्राम धर्मराव बाबा आत्राम गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आदिवासी हा शेड्यूल्ड ट्राईब आहे. बाकीचे लोक व बंजारा समाज त्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. ते साफ चुकीचे आहे. एसटी व व्हीजेएनटी हे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यांना आदिवासींमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. हैदराबाद गॅझेटियर महाराष्ट्रात लागू होत नाही. त्यांना (बंजारा समाज) आरक्षण हवे असेल तर त्यांनी हैदराबादला जावे हैदराबादशी आमचे काही देणेघेणे नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर गॅझेटियर आहे. आमची भरपूर लोकसंख्या आहे. संपूर्ण राज्यात आदिवासींच्या जवळपास 25 जागा निवडून येऊ शकतात. या प्रकरणी गरज पडली तर रस्त्यावर उतरण्यात येईल. शेड्यूल्ड ट्राईब व नोमेडिक ट्राईब हे वेगवेगले आहेत. त्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे आत्राम म्हणाले. धनंजय मुंडे बंजारा समाजाच्या बाजूने दुसरीकडे, राष्ट्रवादीचेच अन्य एक आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उघडपणे बंजारा समाजाची बाजू घेतली आहे. त्यांनी बीड येथील बंजारा समाजाच्या मोर्चात बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यास पाठिंबा दर्शवला आहे. इतर जातींना हैदराबाद गॅझेटनुसार न्याय मिळत असेल तर आमच्या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचे आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारला विचार करावा लागेल. काहीही करा, समिती स्थापन करा. समिती निर्माण करून या मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे आरक्षण देण्यासाठी सरकारही प्रयत्न करेल, हा विश्वास मी आपल्याला देतो. आज या बंजारा समाजाला तेलंगण व राजस्थानात एसटी आरक्षण आहे. आम्हीही तिकडे एसटीतच आहोत. बंजारा व वंजारा एकच आहे ना? असे धनंजय मुंडे म्हणाले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर विरोधाभासी भूमिका घेतल्यामुळे या प्रकरणी आगामी दिवसांत प्रचंड राजकारण होण्याची शक्यता आहे.
१३५ कारखान्यांनी कामगारांचे ६०० कोटी रुपये थकविले
कोल्हापूर : प्रतिनिधी साखर कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक कारखान्यामध्ये कामगार युनियन सक्रिय आहेत. पण, राजकीय दबावापोटी अनेक ठिकाणी युनियनचे हात बांधल्यानेच कामगारांचे शोषण सुरू आहे. राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे सुमारे ६०० कोटी रुपये अडकले आहेत. कामगार युनियन, कारखाना आणि राज्य शासन यांच्यातील त्रिस्तरीय करारालाच हरताळ फासला जातो. कारखान्यात आयुष्य जाळूनही घामाचे पैसे मिळत नाहीत, […] The post १३५ कारखान्यांनी कामगारांचे ६०० कोटी रुपये थकविले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांच्या नोटिशींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्थगितीवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे. महापालिका कायद्यानुसार कारवाई करत असताना, नगरविकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी नोटिशींना स्थगिती कोणत्या अधिकारात दिली, असा थेट सवाल न्यायालयाने विचारला आहे. तसेच, या प्रकरणावर 20 सप्टेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. नेमके प्रकरण काय? वाशीमधील अपार्टमेंट ओनर्स असोसिएशन कंडोमिनियम नंबर-14 आणि नैवेद्य को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कंडोमिनियम नंबर-3 या सिडकोच्या इमारतींचे बांधकाम 2003 मध्ये विनापरवानगी पाडण्यात आले. असोसिएशनने स्थानिक नगरसेवक व शिवसेनेचे बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्याशी हातमिळवणी करून हा प्रकार केला. सिडकोने याची गंभीर दखल घेत असोसिएशन व संबंधितांना नोटिसा बजावल्या. त्यानंतर हे क्षेत्र नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारित गेले. महापालिकेने नवीन इमारतींच्या बांधकामाला तात्पुरती परवानगी दिली, परंतु बांधकाम आराखड्यानुसार झाले नाही. त्यामुळे पालिकेने इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचे व निवासी प्रमाणपत्र (OC) दिले नाही. यानंतरही, असोसिएशनने नियमांचे पालन केले नाही, म्हणून महापालिकेने 3 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र प्रदेश शहर नियोजन (MRTP) कायद्याच्या कलम 53-अ अंतर्गत बेकायदा बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली. शिंदेंच्या स्थगितीनंतर एनजीओची कोर्टात धाव महापालिकेने नोटीस पाठवल्यानंतर, त्याविरोधात सोसायट्यांनी थेट नगरविकास खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली. शिंदे यांनी लगेचच या नोटिशींना स्थगिती दिली. उपमुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला 'कॉन्शस सिटीझन्स फोरम' या स्वयंसेवी संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आदेश बेकायदेशीर असून, तो रद्द करावा आणि महापालिकेने बजावलेल्या नोटिशीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी संस्थेने केली. शिंदेंनी कोणते अधिकार वापरले? कोर्टाची विचारणा न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने सुनावणीवेळी प्रकरणाच्या सर्व बाबी तपासल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेतली. नवी मुंबई महापालिकेने या संदर्भात नोटीस बजावलेली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? याची विचारणा उच्च न्यायालयाने केली. जर महापालिकेकडून ही इमारत पाडण्याची नोटीस दिली आहे तर मग उपमुख्यमंत्र्यांनी कोणते अधिकार स्थगितीसाठी वापरले? असा प्रश्न विचारत न्यायालयाने सरकारी वकिलांना यावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणावर आता 20 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी नुकतेच मुंबईत आंदोलन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. आता मनोज जरांगे दिल्लीत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. ऐन गणपती उत्सवाच्या सुरुवातीला मनोज जरांगे मुंबईत येऊन धडकले आणि पाच दिवस त्यांनी राज्याच्या राजधानीत आंदोलन केले. त्यांच्या विविध […] The post मनोज जरांगे दिल्लीला धडकणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पत्नीच्या प्रेम प्रकरणामुळे एका तरुणाच्या जिवावर आलेला प्रसंग थोडक्यात टळल्याची घटना नाशिक येथे घडली आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपींनी सदर तरुणाचे कारमध्ये कोंबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने वेळीच स्वतःची सुटका करून पोलिसांपुढे आपबीती कथन केली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. त्यात आरोपी पीडित तरुणाला कारमध्ये जबरदस्तीने कोंबून नेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर पपया नर्सरी परिसरात बुधवारी दुपारी ही अपहरणाची घटना घडली. तेजस ज्ञानदेव घाडगे असे 24 वर्षीय पीडित तरुणाचे नाव आहे. तो आपल्या पत्नीसह नाशिकच्या सिडको परिसरात राहतो. त्याचे गत 24 मे रोजी एका तरुणीशी लग्न झाले. त्या तरुणीचे लग्नापूर्वी गिरीश शिंगोटे नामक तरुणाशी प्रेमसंबंध होते. पण अचानक तिचे लग्न तेजसशी झाले. त्यामुळे गिरीश हा सातत्याने तेजसला ठार मारण्याची धमकी देत होता. बुधवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 च्या सुमारास तेजस आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी त्र्यंबक रोडवरील एका चहाच्या टपरीवर गेला होता. मित्राशी संवाद साधताना उचलण्याचा प्रयत्न तिथे गिरीश, त्याचा मित्र व त्याच्या वडिलांसोबत नाष्ट्याचे हॉटेल टाकण्याची चर्चा करत होते. तेव्हा गिरीश शिंगोटे तिथे आपल्या मित्रांसोबत येऊन धडकला. त्यांच्यासोबत एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार होती. त्यांनी तेजसला टपरीतून ओढत बाहेर नेले आणि बळजबरीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी गाडी तशीच सातपूर कॉलनी परिसरात नेली. त्यानंतर त्यांनी कार पुन्हा त्र्यंबक रोड परिसरातून जात असताना तेजसने शिव हॉस्पिटलगत कारमधून उडी मारली. त्यानंतर त्यातच स्थितीत जिवाच्या आकांताने ऑटो पकडून पपया नर्सरी येथील ट्रॅफिक पोलिस चौकी गाठली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल तेजस पोलिस चौकीत पोहोचल्याचे पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्याने आपल्यावरील बेतलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यानुसार सातपूर पोलिस ठाण्यात अपहरण व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात आरोपी पीडित तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये कोंबण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ कारपासून काही अंतरावर उभ्या असणाऱ्या एका दुचाकीवरील तरुणांनी चित्रित केल्याचे दिसते. विशेष म्हणजे आरोपींच्या भीतीपोटी हे तरुणही घाबरल्याचे दिसून येत आहे. हे ही वाचा... भाजप नेत्याच्या मुलाचे मोठे कांड उघड:कर्जातून सुटकेसाठी अपघाती मृत्युचा रचला बनाव, कॉल डिटेल्सवरून लागला छडा छत्रपती संभाजीनगर - भाजप नेत्याच्या मुलाने कर्जातून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सोनी, असे या आरोपी मुलाचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील राजगढचे भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा आहे. त्याने आपली कार नदीत ढकलून देत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र, तब्बल 10 दिवस शोध घेऊनही त्याचा मृतदेह न सापडल्याने पोलिसांना संशय आला आणि तांत्रिक तपासानंतर महाराष्ट्रातून त्याला ताब्यात घेण्यात आले. वाचा सविस्तर
ओबीसी आणि मराठा उपसमितीवर भाष्य करताना, ऐक्य घडवायचे तर समित्यांत एकाच जातीचे लोक का? सरकारने इथे सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती, असे मत शरद पवारांनी मांडले होते. शरद पवारांच्या या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. शरद पवारांचा महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, यासाठी शरद पवारांनी काळजीपूर्वक बोलले पाहिजे, असेही ते म्हणालेत. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेज लागू केल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याशिवाय बंजारा आणि धनगर समाजही हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यावर महाराष्ट्रातील समाजिक वीण उसवत असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती. नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? शरद पवार हे महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने नेण्याचे काम करत असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. समाजात तेढ निर्माण होणार नाही, यासाठी पवार साहेबांनी काळजीपूर्वक बोलले पाहिजे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या उपसमित्या समाजामध्ये एकरुपता आणण्यासाठी, समाज एकसंघ करण्यासाठी तसेच महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी आणि समाजातील तेढ कमी करण्यासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. शरद पवार काय म्हणाले होते? शरद पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर प्रश्न विचारण्यात आला असता, सामंजस्य राहावे, एकीची वीण कायम रहावी हे सगळ्यांनाच वाटते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे आणि हे घातक नक्कीच आहे. विखेंची समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत. दुसरीकडे, बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. कटुता इतकी निर्माण झाली आहे की, एकमेकांच्या व्यवसायाकडे लोक जात नाहीत. हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हते, असेही शरद पवार म्हणाले होते. हे ही वाचा... OBC वर दुहेरी भूमिका चालणार नाही:सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे म्हणणारे शरद पवार सर्वपक्षीय बैठकीला का आले नाही? -भुजबळ मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीला शरद पवार तसेच विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत. आणि आता सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे असे पवार म्हणतात. ते सर्व पक्षीय बैठकीला का आले नाही?, असा रोखठोक सवाल ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी येथे माध्यमांशी बोलताना केला. सविस्तर वाचा...
ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त नाहीत. जल जीवन मिशनकडून खोदकाम केले, पण त्यांची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे वाहनातून जातांना खड्डा लागला की जनता आम्हाला शिव्या घालते, आता रस्ते कधी दुरुस्त करणार असा सवाल करीत आमदार राजेश नवघरे, आमदार संतोष बांगर यांनी गुरुवारी ता. १८ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे वाभाडे काढले. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण काकाटे, अप्पर जिल्हाधिकारी महेद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. त्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी माहिती दिली. सर्वठिकाणी योग्य पंचनामे झाले पाहिजेत अशा सूचना पालकमंत्री झिरवाळ यांनी दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिवृष्टीमुळे ५६ पुलमोऱ्या नादुरुस्त झाल्याचे सांगत दुरुस्तीसाठी ५५ कोटींचा निधी लागणार आहे. तसेच १० किलो मिटर अंतराच्या रस्त्याची किरकोळ दुरुस्ती तर ५६ किलो मिटर अंतरामध्ये नव्याने रस्ते बांधकाम करणे आवश्यक असून त्यासाठी ३३ कोटींचा निधी लागणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार नवघरे व आमदार बांगर यांनी रस्त्यावरील खड्डे कधी दुरुस्त करणार असा सवाल उपस्थित केला. नागरीक वाहनांद्वारे वाहतूक करीत असतांना खड्डा लागल्यानंतर लोकप्रतिनिधींना शिव्या घालत आहेत. हयातनगर ते जोडजवळा या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. आताच रस्ता उखडत असून केवळ कंत्राटदार जोपासायचे काम करू नका अन्यथा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. गांगलवाडी येथील पुलाची दुरुस्ती झाल्याचे सांगणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आमदार बांगर यांनी पितळ उघडे पाडले. पुलच झाला नाही तर दुरुस्ती कशी केली असा सवाल उपस्थित केला. मात्र या प्रश्नावर बांधकाम विभागाचे अधिकारी निरुत्तर झाले. जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत २१६ कामे पूर्ण झाली त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती देणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना तातडीने यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर आरोग्य विभागाने कळमनुरी , वसमत येथे डायलेसीस युनीट सुरु करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी विज कंपनी, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पोलिस विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
विधिमंडळात कथितपणे ऑनलाईन रमी खेळल्याप्रकरणी वादात सापडलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर मानहानी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कोर्टात खेचले आहे. या प्रकरणी कोर्टात झालेल्या सुनावणीत कोकाटेंनी रोहित पवार यांना मी नेमका रमीच खेळत होतो हे कशावरून? असा सवाल केला आहे. रोहित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तत्कालीन कृषिमंत्री माणिकरावर कोकाटे कथितपणे ऑनलाईन रमी खेळताना दिसून येत होते. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महायुती सरकारवर टीकेची झोड उठली होती. अखेर सरकारने कोकाटेंकडील कृषि मंत्रालय काढून ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिले होते. तसेच कोकाटे यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्याविरोधात वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या दाव्यावर बुधवारी नाशिक न्यायालयात कोर्टात सुनावणी झाली. त्यात कोकाटे यांच्या वकिलांनी माझे अशील रमीच खेळत होते हे कशावरून? व व्हायरल व्हिडिो मॉर्फ केला नसेल हे कशावरून? असे विविध प्रश्न रोहित पवार यांना केले. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने संबंधितांना नोटीस बजावत सुनावणी पुढील तारखेपर्यंत तहकूब केली. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? उल्लेखनीय बाब म्हणजे कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी यापूर्वी रोहित पवार यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर रोहित यांनी संतप्त सुरात मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असा सवाल केला होता. माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही. तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असे ते म्हणाले होते.
भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कंटेनरवर आदळून 2 विद्यार्थी ठार झाल्याची घटना गुरूवारी पहाटे 5.30 वा. जुन्या मुंबई - पुणे महामार्गावर घडली. या घटनेत इतर 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर लगतच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील देहूरोड परिसरातील मामुर्डी येथील गणपती मंदिराजवळ हा अपघात घडला. येथे एक कंटेनर ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता. या ट्रकवर भरधाव वेगातील एक कार येऊन आदळली. त्यात सिध्दांत आनंद (वय- २३,रा. झारखंड) आणि दिव्यराज राठोड (वय- २२, रा.राजस्थान) यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत हाेते. त्यांच्यासोबत त्यांचे आणखी दोन मित्र होते. हे दोघेही अपघातात जखमी झाले आहेत. मयत सिध्दांत आनंद आणि दिव्यराज राठोड हे त्यांच्या जवळील मारुती स्विफ्ट कारमध्ये (एमएच १४ ईएच ७५०३) आपल्या दोन मित्रांसोबत लोणावळा हिल स्टेशन येथून पुण्याच्या दिशेने जात होते. पहाटे साडेपाच वाजता त्यांची कार मामुर्डी परिसरात आली असताना चालकाचे अचानक तिच्यावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी वेगातच रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या कंटेनरला जाऊन आदळली. त्यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. गाडीची डावी बाजू, समोरील इंजिन व वरचा भाग देखील नुकसानग्रस्त झाला. यावेळी गाडीत असलेले सिध्दांत व दिव्यराज यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीतील आणखी एका प्रवाशाला बाहेर काढून रुग्णालयात नेले. या अपघाताचे घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पाेलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन ते रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर सदर परिसरातील वाहतूक सुरळित करण्याचा प्रयत्न केला.
आज प्रत्येक क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. जलजीवन मिशनमध्येही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्यांपर्यंत पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे पोहोचवून त्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन इंडियन वाटर वर्क्स असोसिएशनच्या (आयवा) अध्यक्षा इंजि. वैशाली आवटे यांनी केले. पुणे कॅंटोन्मेंट येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित 'अभियंता दिवस' कार्यक्रमावेळी व्हाईटलेन्ड इंजीनियरिंग टेक्नोलाॅजीचे धवल ठक्कर, प्रकाश राव, हरेश पिल्ले, शहर अभियंता इंजि. नंदकिशोर जगताप, 'आयवा' पुणेचे सचिव दयानंद पानसे, सहसचिव भांडेकर, खजिनदार अनिल पाटील यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अभियंते आदी उपस्थित होते. इंजि. वैशाली आवटे म्हणाल्या, पाण्याशी संबंधीत शासकीय योजना राबवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, त्याबद्दल अद्ययावत मार्गदर्शन मिळावे, तांत्रिक बाबींची माहिती मिळावी या उद्देशाने असे कार्यक्रम व्हावेत. धवल ठक्कर यांचे 'मायक्रो टनलिंग बाय बोअरींग मेथड' यावर सादरीकरण व मार्गदर्शन केले. खड्डेविरहित जमिनीवर काम करता यावे, यासाठी गायडेड बोअरींग मेथडचा वापर केला जातो. हॅमरच्या सहाय्याने खडकाळ जमिनीवर पाण्याच्या योजना राबवताना पाईपलाईन टाकण्यासाठी, कमी जागेत लोकांना त्रास न होता या तंत्रज्ञानाचा वापर उपयोगी आहे, असेही त्यांनी नमूद केले. इंजि. प्रकाश राव व ईंजि हरेश पिललेई यांनी ओपीव्हीसी पाईपच्या वापराबाबत माहिती देत त्याचे होणारे फायदे याबद्दल माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता मोहीम कार्यक्रमातील पारितोषिक विजेत्यांचा, नवनिर्वाचित व पदोन्नती मिळालेल्या अभियंत्याचा सत्कार करण्यात आला.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या सर्व पक्षीय बैठकीला शरद पवार तसेच विरोधी पक्षाचे लोक आले नाहीत. आणि आता सामंजस्याने प्रश्न सुटला पाहिजे असे पवार म्हणतात. ते सर्व पक्षीय बैठकीला का आले नाही?, असा रोखठोक सवाल ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी गुरूवारी येथे माध्यमांशी बोलताना केला. मराठा आरक्षण या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्या बैठकीला मराठा समाजाचे मनोज जरांगे, ओबीसी समाजाचे छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांनाही बोलवावे, त्या संयुक्त बैठकीत चर्चा करून या विषयावर मार्ग काढावा अशी सूचना शरद पवार यांनी केली होती. त्याला प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली. पण, त्या बैठकीला शरद पवारच अनुपस्थित राहिले. सामंजस्याने तोडगा काढण्याची भाषा करणारे शरद पवार तेव्हा बैठकीला का आले नाही? असे भुजबळ म्हणाले. तेव्हा शरद पवारच मार्गदर्शक होते उद्धव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हापासून मराठा समिती अस्तित्वात होती. त्यावेळी त्यांचे मार्गदर्शक शरद पवारच होते. त्या समितीत राष्ट्रवादीच्या बाजूने अजित दादा आणि जयंत पाटील, शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई, काँग्रेसच्या बाजूने बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण होते. त्यावेळी मराठा समाजासाठी समिती नेमण्याची गरज होती काय, असे पवार बोलले नाही. शरद पवार यांच्या विषयी आदर राखूनही तेव्हा ते का बोलले नाहीत? असा सवाल भुजबळ यांनी केला. भुजबळांची शरद पवारांवर थेट टीका दोन उप समिती स्थापन करण्याची गरज होती का? असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आहे. दोन समाजात कारण नसताना संघर्ष पहायला मिळत आहे. राज्य सरकारने दोन समाजासाठी दोन उपसमिती नेमल्या आहेत. या दोन वेगवेगळ्या जातीच्या समिती आहेत. एका जातीची समिती असेल तर तिथे दुसऱ्या जातीच्या समितीचा विचार होणार का? सरकारनं इथे सामंजस्य निर्माण करून दोघात एकता करायला पाहिजे होती. आपल्याला शेवटी एकत्र बसावे लागेल. तसेच रास्त मागण्यांची पूर्तता कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सर्वांनी पाऊल टाकले पाहिजे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले होते. त्यावर बोलताना छगन भुजबळ यांनी दुहेरी भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केले.आमच्यामध्ये आणखी मंत्री टाका. आम्ही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी झगडत आहो. आणि मराठ्यांना इथे ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण असतानाही त्यांना ओबीसीमध्ये वेगळे पाहिजे. यावरही पवारांनी बोलले पाहिजे. त्यावेळी एक भूमिका आणि यावेळी वेगळी भूमिका असे चालायचे नाही. मराठा समाजाला खुल्या प्रवर्गातून संधी होती. त्यावेळी पवारांनी नाही म्हटले. मोदींनी ईडब्ल्यूएसचे आरक्षण आणले. त्यात मराठा समाज आठ टक्के आहे. आता तरीसुद्धा तुम्ही म्हणता की ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे. मी म्हटले की, तुम्ही सांगा आम्हाला मराठा आरक्षण वेगळे नको. आम्हाला फक्त ओबीसी मध्ये पाहिजे म्हणून. आता एमपीएससीचे व मेडिकलचे निकाल लागले. त्यात ओबीसींचा कट ऑफ वर आहे. बाकीचे खाली आहे. तुम्हाला राजकारणात, आरक्षण हवे आहे की शिक्षणात हे ठरवा. आणि आर्थिकदृष्ट्या फायदाही हवा आहे. ओबीसींना मिळत असलेले सर्व फायदे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळत आहेत. मंत्रिमंडळात मी अनेक वेळा बोललो, जे मराठा समाजाला देत आहेत तेच ओबीसींनाही द्या.आम्ही आमचे आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचे नाही का? पवार साहेबांना माझं सांगणं आहे, शिवसेना सोडून मी तुमच्यासोबत आलो ते मंडल कमिशनसाठी आणि तुम्ही मंडल कमिशन लागू केलं. त्यासाठी तुमचे आभार मानले. पण मग आमचे आरक्षण जात असेल तर पवारांनी बोलायला नको? असा सवाल भुजबळ यांनी केला. मंडल आयोग आल्यानंतर तोपर्यंत सरकार मराठा एक जात असेल. पण ओबीसींच्या ३७४ जाती आहेत. म्हणून त्या प्रत्येक जातीचे नुकसान होत आहे, म्हणून आम्ही कुणबी, माळी, वंजारी समाजाच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे. दोन-चार दिवसात त्याच्यावर सुनावणी होईल, असे ते म्हणाले.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत मतचोरीच्या मुद्यावरून निवडणूक आयोगाला पुन्हा धारेवर धरले. राहुल गांधी म्हणाले की, ते पुराव्यांसह बोलतील. त्यांनी दावा केला की पुरावे सर्वकाही स्पष्टपणे सिद्ध करतात. अलंद हा कर्नाटकातील एक मतदारसंघ आहे. कोणीतरी ६,०१८ मते वगळण्याचा प्रयत्न केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते […] The post कर्नाटकमध्ये ६०१८ मतदार वगळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील सर्व शासकीय डॉक्टर संपावर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व शासकीय डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज १८ सप्टेंबर रोजी संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल यांनी होमिओपॅथी पदवीधरांना ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यकीय पद्धतीत नोंदणीची परवानगी दिल्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सेंट्रल […] The post राज्यातील सर्व शासकीय डॉक्टर संपावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचोरीचे आरोप केले. त्यानंतर सत्ताधारी भाजपने पुढे येत राहुल गांधींवर जोरदार पलटवार केला. राहुल गांधी जे आरोप करतात, त्याचे समर्थन करण्यासाठी नक्षलवादी 11 पानी पत्र जारी करतात. ही दुर्दैवी गोष्ट आहे. चोरांच्या वाटा फक्त चोरांनाच माहिती असतात. त्यामुळेच राहुल गांधी मतचोरीचे आरोप करत आहेत, असे भाजपने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्याला हात घातला. त्यांनी कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काँग्रेसची मते वगळण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी चोरांच्या वाटा फक्त चोरांनाच माहिती असतात असा दावा करत त्यांचा आरोप जोरकसपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, 2023 मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यात मालूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. नंतर या ठिकाणी वोटचोरीचा आरोप तिथे सिद्ध झाला. त्यामुळे तेथील निवडणूक रद्द झाली. या प्रकरणी भाजपच्या उमेदवाराने कायदेशीर लढा दिला. केवळ आरोप करून सिद्ध होत नाही, तर संविधानानुसार न्यायालयीन लढाई लढायची असते. कायदेशीर लढाई लढायची असते. आपल्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावे द्यावे लागतात. पण राहुल गांधी यांना यातले काहीच करायचे नाही. केवळ आरोप करायचेत. आणि दुर्दैवाने त्यांच्या मतचोरीच्या आरोपांची री नक्षलवादी 11 पानी पत्र काढून ओढतात. चोरांच्या वाटा फक्त चोरांनाच ठावूक असतात. म्हणून राहुल व्होटचोरीचा आरोप करत आहेत का? हा खरा प्रश्न आहे, असे उपाध्ये म्हणाले. आत्ता पाहू काय घडले होते कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात? राहुल गांधींनी आज कर्नाटकच्या आलंद मतदारसंघात काय घडले? याचे पुरावे सादर केले. ते म्हणाले, आलंद हा कर्नाटकमधला एक मतदारसंघ आहे. कुणीतरी तिथल्या 6018 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला. 2023 मध्ये तिथे किती मते रद्द करण्यात आली? हे आपल्याला माहिती नाही. पण ही मते वगळताना कुणीतरी रंगेहाथ सापडले. एका मतदान केंद्रातील अधिकाऱ्याला कुणीतरी आपल्या चुलत्याचे नाव वगळल्याची बाब लक्षात आली. त्याने तपास केला असता ते नाव त्यांच्या शेजाऱ्याने वगळल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याची चौकशी केली. शेजारी म्हणाला मी असे काहीही केले नाही. त्यानंतर हे नाव एका वेगळ्याच प्रक्रियेतून वगळण्यात आल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. आलंदमध्ये मतदारांची नावे वगळण्यासाठी 6018 अर्ज त्यांच्याच नावाने भरण्यात आले. ज्या लोकांच्या नावांनी हे अर्ज आले, त्यांनी ते कधी केलेच नव्हते. हे अर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक भरण्यात आले. त्यासाठीचे मोबाईल क्रमांक कर्नाटकबाहेर वेगवेगळ्या राज्यांमधले होते. आलंदमधील नावे वगळण्यासाठी हे क्रमांक वापरण्यात आले. काँग्रेसची मते कमी करण्यासाठी हे करण्यात आले. जिथे काँग्रेस पक्ष जिंकत होता, तिथे हे करण्यात आले, असे राहुल गांधी म्हणाले. हे ही वाचा... चंद्रपूरच्या राजुरा विधानसभेत 6,850 मतदार वाढवले:राहुल गांधी यांचा EC वर आरोप; काँग्रेस उमेदवाराचा 3,054 मतांनी झाला होता पराभव मुंबई - काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'मत चोरी' होत असल्याचा दावा करत, यामागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कर्नाटकातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांतील उदाहरणे देताना, त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचाही उल्लेख केला. राजुरा मतदारसंघात 6 हजार 850 मतदार वाढवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. वाचा सविस्तर
पुण्यात बेछूट गोळीबार; कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे
पुणे : प्रतिनिधी विद्येचे माहेरघर असे बिरूद मिरवणारे पुणे शहर सुप्रसिद्धकडून कुप्रसिद्ध शहराच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. कोयता गँगचा उच्छाद सुरू असताना आणि आयुष कोमकर हत्येचे प्रकरण ताजे असताना आता आणखी एका प्रकरणाने पोलिस खडबडून जागे झाले आहेत. निलेश घायवळ टोळीकडून मध्यरात्रीच्या सुमारास भररस्त्यात गोळीबार करण्याची घटना घडली. यामुळे पुण्यात दहशतीचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेची […] The post पुण्यात बेछूट गोळीबार; कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फॉरेन्सिक टीमने गोळा केले रंगाचे नमुने
मुंबई : प्रतिनिधी दादरच्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर बुधवारी (१७ सप्टेंबर) सकाळी ६ नंतर रंग फेकून विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी उपेंद्र गुणाजी पावसकर याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास करत आहेत. यानंतर आता फॉरेन्सिक टीमने देखील रंगाचे नमुने गोळा केले आहेत. दादरच्या शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर […] The post फॉरेन्सिक टीमने गोळा केले रंगाचे नमुने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोल्हापूर : प्रतिनिधी राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावर घमासान सुरू आहे. मराठा आणि ओबीसी समाजातील लोकांच्या सध्याच्या मानसिकतेवर त्यांनी बोट ठेवले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून दोन्ही समाजात तेढ निर्माण झाले असून सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र एकसंध असावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. […] The post समाजात कटुता वाढली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यात तब्बल 20.47 लाख रुपयांचा सोफा खरेदी करण्यात येणार असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे हा दावा केला आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा 9.5 लाख कोटींवर गेला असताना सरकार अशी उधळपट्टी करत आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांना हे माहिती नसेल, पण हे असेच सुरू राहिले तर 'रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता' असाच याचा अर्थ निघेल, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी शिफ्ट झाले. त्यानंतर आता या बंगल्यात काही डागडुजी केली जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलाखा शहर विभागाने एक ई-निविदा काढली आहे. त्यात मलबार हील मुंबई येथील वर्षा बंगला येथे डबल बेड मॅटर्स, सोफा व इतर कामे करण्यासाठी 20.47 लाख रुपयांची अंदाजित रक्कम ठरवण्यात आली आहे. याशिवाय इतरही काही ठिकाणच्या कामांचा उल्लेख निविदेवर आहे. रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे आमदार रोहित पवार यांनी एका सोफ्यासारख्या तत्सम गोष्टीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत असल्यावर आक्षेप घेतला आहे. ते या प्रकरणी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, आज संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा 9.5 लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी 20.47 लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी 19.53 लाख असा एकूण 40 लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई? मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल... मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना, असे ते म्हणाले. पुण्यातील गुंडगिरीवरून राम शिंदेंवर निशाणा रोहित पवार यांनी अन्य एका ट्विटद्वारे पुण्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरही निशाणा साधला आहे. या घटनेतील एक व्यक्ती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा खास माणूस असल्याचा आरोप केला आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात (कोथरुड) भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केलं. आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात की हा गुंड विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे म्हणून त्याला हमखास पाठीशी घालतात, हेच पहायचंय..! या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसाचं आहे की गुंडांचं हे कळणार आहे, असे ते म्हणाले.
निजामाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी मराठवाड्यातील जनतेने लढा लढला होता. कालच मुक्तिसंग्राम दिन साजरा केला.याच निजामांच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातील ओबीसीचे आरक्षण संपणार आहे. त्या गॅझेट विरोधात ओबीसींचा लढा सुरू झाला आहे. नांदेडमध्ये माध्यमांशी बोलताना ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, निजामाच्या नोंदी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आहेत.ओबीसी, भटके आणि बलुतेदारांचे हक्क आणि अधिकार संपवणारे आहेत हे मराठवाड्यातील जनतेने मनावर घेतले आहे. त्यामुळे जसा निजामांना घालवला तसाच आम्ही आता निजामाच्या नोंदींना घालवणार आहोत, ज्या ओबीसीचे आंदोलन संपवणार आहेत. जरांगे पाटील इतिहासात जायला भाग पाडू नका लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला नाही तर अमेरिका आणि अरब देशात जावे. कारण जरांगे पाटील दिल्लीला कधी गेला नव्हता. इतिहासात जायला भाग पाडू नका. नर्मदा नदीच्या तिराच्या पलीकडे मराठी साम्राज्य कोण घेऊन गेले हे आता नव्याने महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. तुम्ही खरं तर भारताबाहेर जायला हवे होते पण तुम्ही बसलात मागासवर्गीयांच्या अन्नात माती कालवत. मागासवर्गीयांच्या ताटात उदक सोडत बसलात तुम्ही. चौथी नापास दिल्लीत जाऊन काय करणार? लक्ष्मण हाके म्हणाले की, पंगतीला बसलेला डोंगराच्या कुशीतला भटका असो किंवा गाव गाड्यातला रोज आपली सेवा देणारा अलुताबलुता असो त्याला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये थोडसं प्रतिनिधित्व मिळायला लागलं होते आणि त्यांची ताट उधळून लावणारा तू चौथी नापास, दिल्लीमध्ये जाऊन काय करणार? असा सवाल करत त्यांनी जरांगेंचे नाव न घेता टोला लगावला आहे. देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती? लक्ष्मण हाके म्हणाले की, देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती आहे, आणि ओबीसींची संख्या किती त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करेन अमुक करेन तमुक करेन. आरक्षणाचे स्पेलिंग लिहता येते का बघ आगोदर असे म्हणत जरांगे पाटलांना टोला लगावला आहे. त्यानंतर मोठ्या मोठ्या बाता माराव्या. आम्ही गावोगाव फिरत आहोत मग मुंबई कशी जाम करायची याचे आमचे नियोजन ठरले आहे. आरक्षण टिकवण्यासाठी लक्ष द्या लक्ष्मण हाके म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागणीला आमच्या शुभेच्छा आहेत. पण आज रोजी एकीने लढण्याची गरज आहे. बंजारा आणि धनगर समाजाची एसटीच्या आरक्षणाची 4 पिढ्यांची लढाई आहे. आपल्या ताटातील आरक्षण वाचवण्यासाठी आपण ओबीसींची वज्रमूठ बांधून आपले आहे ते आरक्षण टिकवणे याकडे आपले लक्ष असले पाहिजे, अशी माझी ओबीसी आंदोलक म्हणून सर्वांना विनंती आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'मत चोरी' होत असल्याचा दावा करत, यामागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कर्नाटकातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांतील उदाहरणे देताना, त्यांनी महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाचाही उल्लेख केला. राजुरा मतदारसंघात 6 हजार 850 मतदार वाढवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. मत चोरी ही कार्यकर्त्यांच्या हातून झाली नाही, तर यासाठी खास मॉडेल तयार करण्यात आले आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून हा प्रकार राबवण्यात आला. या प्रकाराला स्वतः केंद्रीय निवडणूक आयोगाचे समर्थन मिळत असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधींनी राजुरा मतदारसंघाचा दिला दाखल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्रातील राजुरा विधानसभा मतदारसंघाचाही उल्लेख केला. चंद्रपूर जिल्ह्यातील या मतदारसंघात देखील मतदानात गडबड झाल्याचे सांगत, सुमारे 6 हजार 850 मतदार वाढवल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. हे मतदार वाढवण्यासाठी देखील कर्नाटकमध्ये वापरण्यात आलेले मॉडेल वापरल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. राजुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल राजुरा विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने भाजपचे देवराव विठोबा भोंगले यांना उमेदवारी दिली होती, तर महाविकास आघाडीने काँग्रेसचे धोटे सुभाष रामचंद्रराव यांना निवडणुकीत उतरवले होते. या निवडणुकीत भाजपचे देवराव भोंगले यांनी काँग्रेसचे रामचंद्र धोटे यांचा 3054 मतांनी पराभव केला होता. देवराव भोंगले यांना 72 हजार 882 मत मिळाली होती. तर रामचंद्र धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली होती. यापूर्वी केला 40 लाख मतदार वाढल्याचा दावा दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी महाराष्ट्रात 40 लाख मतदार वाढल्याचा दावा केला होता. महाराष्ट्रात काही महिन्यांतच लाखो मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली, जी खूप चिंताजनक आहे. हे 40 लाख मतदार गूढ आहेत. पाच महिन्यांत येथे अनेक मतदार जोडले गेले. निवडणूक आयोगाने मतदार यादीची उत्तरे द्यावीत. मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती. सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतदानात झालेली वाढ देखील आश्चर्यकारक आहे. सायंकाळी 5 वाजल्यानंतर मतदान का वाढले? निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे. काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला मतदानाच्या धांदलीबाबत प्रश्न विचारले आहेत, परंतु आयोगाने एकही उत्तर दिलेले नाही. मत चोरी शोधण्यासाठी आम्हाला सहा महिने लागलेत, असेही तेव्हा राहुल गांधी यांनी सांगितले होते.
भाजप नेत्याच्या मुलाने कर्जातून सुटका मिळवण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल सोनी, असे या आरोपी मुलाचे नाव असून, तो मध्यप्रदेशातील राजगढचे भाजप नेते महेश सोनी यांचा मुलगा आहे. त्याने आपली कार नदीत ढकलून देत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र, तब्बल 10 दिवस शोध घेऊनही त्याचा मृतदेह न सापडल्याने पोलिसांना संशय आला आणि तांत्रिक तपासानंतर महाराष्ट्रातून त्याला ताब्यात घेण्यात आले. नेमके काय घडले? 5 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांना मध्य प्रदेशातील कालीसिंध नदीत एक कार बुडाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार बाहेर काढली, पण आत कोणीही नव्हते. ती कार विशाल सोनीची असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर, 10 दिवस त्याचा मृतदेह शोधण्यासाठी व्यापक मोहीम राबवण्यात आली. या शोधमोहिमेत अनेक पथकांनी 20 किलोमीटरच्या परिसरात शोध घेतला. कॉल डिटेल्सवरून लावला छडा अनेक दिवस शोध घेऊनही विशालचा थांगपत्ता न लागल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी विशालच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता, त्याचे लोकेशन महाराष्ट्रात असल्याचे उघड झाले. तातडीने महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथे त्याला अटक करण्यात आली. कर्ज फेडण्यासाठी रचला कट पोलिसांनी चौकशी केली असता विशालने धक्कादायक खुलासा केला. त्याच्यावर 1 कोटी 40 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे कर्ज होते. कर्ज फेडता येत नसल्यामुळे कुटुंबाच्या सल्ल्यानुसार, त्याने स्वतःच्या अपघाती मृत्यूचा बनाव रचला. मृत्यूपश्चात मिळणाऱ्या प्रमाणपत्रामुळे बँकेचे कर्ज माफ होईल, असा त्याच्या कुटुंबीयांचा समज होता. विशालची पोलिस चौकशीत कबुली याबाबत विशालने पोलिसांना सांगितले की, 5 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता, मी इंदूर रोडवरील गोपाळपुरा जवळील एका ढाब्यावर उभ्या असलेल्या माझ्या ट्रकमधून भाडे घेतले आणि नदीकाठी परतलो. मी चालत्या गाडीचे हेडलाइट बंद केले. मी गाडीतून उतरलो आणि गाडी नदीत ढकलली. पूल पॅरापेटशिवाय असल्याने गाडी नदीत पडली. मी माझ्या एका ड्रायव्हरच्या बाईकवरून ढाब्यावर परतलो आणि इंदूरला जाणाऱ्या बसमध्ये चढलो. दुसऱ्या दिवशी, वर्तमानपत्रात मृत्युची बातमी वाचल्यानंतर, महाराष्ट्रात पळून गेला. तेथे शिर्डी आणि शनी शिंगणापूरमध्ये फिरत राहिला. जेव्हा त्याला कळले की, आपला कट उघडकीस आला आहे, तेव्हा स्वत:च्या अंगावरील कपडे फाडले, धुळीत लोळला आणि अपहरणाची कहाणी रचली आणि फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.'' कोणताही गुन्हा दाखल नाही याबाबत अधिक माहिती देताना पोलिस अधिकारी आकांक्षा हाडा यांनी सांगितले की, स्वतःच्या मृत्यूचा कट रचणे आणि 10 दिवस शोध घेऊन पोलिस प्रशासनाला त्रास देणे, यासाठी शिक्षेची कोणतीही घटनात्मक तरतूद नाही. म्हणून, त्या तरुणाला त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आले.
काल स्वर्गीय मासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला त्यांचा आम्ही निषेध करतो.पण केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून तर अशी घटना घडली नाही ना असा सवाल आमच्या मनात आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे मी खंडन करतो. राऊत यांना माझा सवाल आहे की विधानसभा निवडणुकीत तुमची अवस्था काय झाली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. संजय राऊत यांना पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे. मध्य प्रदेशातून नाही तर पाकिस्तानमधून EVM आणायचे का? असा खोचक सवाल नवनाथ बन यांनी केला आहे. तातडीने चौकशी व्हावी नवनाथ बन म्हणाले की, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांला अटक झाली. त्यामुळे यामागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. भाजपने संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रम आयोजित केले होते ते जनतेपर्यंत पोहचू नये म्हणून असे षड्यंत्र रचले होते का अशी आम्हाला शंका आहे, त्याची तातडीने चौकशी झाली पाहिजे. पाकिस्तानमधून EVM आणायचे का? नवनाथ बन म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला चांगल्या जागा मिळाल्या तेव्हा मत चोरी झाली नाही तेव्हा सर्व काही चांगले होते. आणि विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला चांगल्या जागा मिळाल्या आणि तुमचा पराभव झाला तेव्हा तुम्ही शंका उपस्थित करत आहात. EVM मध्य प्रदेशमधून आले म्हणून शंका येत आहे. मध्य प्रदेश नाही तर पाकिस्तानमधून EVM आणायचे का? संजय राऊत यांना पाकिस्तानवर विश्वास आहे का? असा टोला ही बन यांनी लगावला आहे. उबाठाकडून जनतेचा अपमान नवनाथ बन म्हणाले की, उबाठाला जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. EVM आणि लोकांनी दिलेल्या मतांवर शंका घेणे म्हणजे जनतेचा अपमान करणे आहे, तुम्ही जनतेचा अपमान करत आहात. तुम्ही जर असे करत असाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असेही बन यांनी म्हटले आहे. संदीप देशपांडेंवर पलटवार भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, संदीप जी देशपांडे, मुंबईचा महापौर मराठीच होणार हे आम्हाला कुणा कडून शिकायची गरज नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी भाजपने नेहमीच लढा दिला आहे, ते मुंबईतील मराठी माणसाला ठाऊक आहे. जनतेले सर्व काही माहिती नवनाथ बन म्हणाले की, आज मुंबईकर मराठी माणूस आत्मविश्वासाने उभा आहे. त्याला भीती दाखवायची गरज नाही, साथ द्यायची गरज आहे. आणि ती साथ फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊ आणि भाजप देऊ शकते हे मुंबईकरांना ठाऊक आहे.पतपेढीच्या निवडणुकीत कोण जिंकलं? कोण हळकूंडाने पिवळं झालं? आणि कुणाचा बँड वाजला? हे मुंबईकरांनी बघितले आहे. मराठी माणूस बळी पडणार नाही नवनाथ बन म्हणाले की, महापालिका निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही, तर विकासाच्या राजकारणाला मत देणार आहे. आणि त्यामुळेच महापौर मराठीच होईल पण तो मराठी माणूस भाजप-महा-युतीचा असेल, असे त्यांनी म्हटले आहे. संदीप देशपांडेंची पोस्ट काय? मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी x वर पोस्ट करत म्हटलंय की, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार ,खानाची भीती दाखवून भैय्या आणि गुज्जु महापौर करण्याचा कट उधळून लावणार.पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार.
एकनाथ शिंदे यांनी जर काही बेकायदेशीर कामे केली असतील मुळातच ते स्वत:च बेकायदेशीर आहेत. सध्याच्या सरकारमधील त्यांचे उपमुख्यमंत्रिपद त्यांचा पक्ष आणि चिन्ह हे सर्व बेकायदेशीर आहे. असा बेकायदेशीर व्यक्ती कायदेशीर काम करेल यांची अपेक्षा महाराष्ट्राने ठेवू नये, असा टोला उबाठाचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. तर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. ते बेकायदेशीर व्यक्तीला मांडीवर घेऊन बसले आहेत. संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शहा, फडणवीस यांनी शिंदेंवर कारवाई केली पाहिजे. कोर्टाने सांगण्याची गरज नाही. असेही हे सरकार कोर्टाचे ऐकत नाही. ते त्यांच्या खिशात आहे. कोर्टाने आदेश दिले पाहिजे नगरविकास खात्याच्या मंत्र्यांवर कारवाई करा असे, उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. काल घडलेला प्रकार दुर्दैवी खासदार संजय राऊत म्हणाले की, काल जो प्रकार झाला तो दुर्दैवी होता. त्यांचे आम्ही कुठेही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला नाही. समाजामध्ये काही माथेफिरु लोक असतात. देशभरात ते अशा स्मारकावर चुकीचे काम करत असतात. शिवसैनिकांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले आहे. पोलिसांनी त्यासंदर्भात तपास करत एका व्यक्तीला अटक केली आहे. समाजात असेही माथेफिरू लोक असतात. ते कोणताही राग कुठेही काढतात. यावर राजकीय भांडवल न करता कारवाई केली पाहिजे. हिंमत असेल तर कारवाई करा संजय राऊत म्हणाले की, नगरविकास खाते हे पैसे खाण्याचे सर्वांत मोठे कुरण झाले आहे. एकनाथ शिंदे यांना जी आर्थिक सूज आली आहे ती नगरविकास खात्यामुळे आली आहे. हे कोर्ट आणि देवेंद्र फडणवीस यांना माहिती नाही का? हिंमत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, नुसती निरीक्षणे नोंदवू नका. फडणवीसांनी अभ्यास करावा संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरेच काही बोलत होते. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष बोलले की शिवसेनेला मुंबईचा महापौर म्हणून खान बसवायचा आहे. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कुणी केले? आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल कुणी केले, असे अनेक उदाहरण मला देता येतील. देशाच्या राजकीय-सामाजिक जडण- घडणीत आणि स्वातंत्र्य लढ्यात भाजप आणि आरएसएस नव्हता. पण मुस्लीम समाज सामाजिक चळवळ आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होता. त्यांनी हमीद दलवाई यांच्यासारख्या नेत्याचा देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा. ..तर मुश्रीफांना बाजूला करावे संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. त्यांना इतिहास आणि सामाजिक ज्ञान नाही. ते महाराष्ट्रात मोदी यांनी चिकटवलेले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना इतिहास माहिती नाही. त्यांना जर खानांचा तिटकारा असेल तर त्यांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावे. मुंबईचा महापौर हा मराठी आणि शिवसेनेचाच होईल. फडणवीसांना ठाकरेंची भीती संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे ब्रँडची चिंता नाही तर भीती आहे.बेस्टच्या निवडणुकीत काय झाले हे मी आधीच सांगितले आहे. मुंबईतील बेस्ट डेपोसह संपूर्ण मुंबई फडणवीसांच्या पंखा खालील बिल्डरांनी ताब्यात घेतली आहे. मुंबईचे लोढा आणि कंबोजीकरण कसे झाले आहे हे मीडियाने समोर आणले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, मग मोदींना बोलू शकत नाही, असे ते म्हणालेत. तसेच त्यांनी हैदराबाद गॅझेटसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, यावरही त्यांनी भाष्य केले. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राजकारणात कटुता नसावी, असे सांगत आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारानुसार वागणारी माणसे आहोत, असे ते म्हणाले. माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणले नाही, आम्हीही आणत नाही. देशासाठी काय करायचं असेल तर त्यांनी करावे एवढीच अपेक्षा, असे शरद पवार म्हणालेत. तसेच पंचाहत्तरीनंतर मी थांबलो नाही, त्यामुळे नरेंद्र मोदींना पंचाहत्तरीनंतर थांबा, असे म्हणू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत झालेल्या नुकसानीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, शिवरायांबद्दल आपण सगळेच आदर व्यक्त करतो. एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर वापरुन शिवरायांनी एक संदेश दिला.सध्या शेतीचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात अनेक जागी अतिवृष्टी झाली, शेतीचे नुकसान झाले. जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन उद्ध्वस्त झाले. सरकार पंचनामे कधी करते आणि मदत कधी पोहोचवते, हे पाहूया, असे म्हणत त्यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तसेच देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी महाविकास आघाडी एकत्र लढेल का? याबाबत शरद पवार यांना पत्रकारांनी विचारले असता, स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सर्वत्र एकत्र लढेलच असे नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलेच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद,शक्ती आहे. मुंबई,ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही आपल्यातली एकीची वीण उसवू नये राज्य सरकारने हैदराबाद गॅझेज लागू केल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याशिवाय बंजारा आणि धनगर समाजही हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारे आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती. आपल्यातली एकीची वीण उसवू नये. कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा, असे शरद पवार म्हणाले. मराठा-ओबीसींमध्ये कटूता वाढलीये ते पुढे म्हणाले, सरकारने मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली. दोन्ही समित्यांत एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचे तर समित्यांत एकाच जातीचे लोक का? असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला. परभणी, बीड, धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचे नाही अशी कटुता वाढलीय. कटुता टाळण्याला हातभार लावायचाय 1994 साली हा आरक्षणाचा प्रश्नच नव्हता. विविध समाजाला लाभ व्हावा म्हणून मंडल अहवालावर निर्णय घेतले. मंडल आयोगाच्या अहवालावर सर्वांनी मिळून निर्णय घेतले. कटुता टाळण्याला मला हातभार लावायचा आहे. देशात आरक्षणाचा विचार कोल्हापुरातून निर्माण झाला. माझ्या मते शाहू महाराजांचा व्यापक हेतू आजही ठेवायला हवा, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगावर टीका आणि राहुल गांधींच्या आरोपांचे समर्थन निवडणूक आयोगाच्या काही निर्णयावर देशात नाराजी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. 300 खासदारांनी प्रथमच निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. ही दुर्लक्ष करणारी बाब नाही. निवडणूक आयोगाने आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. तसेच खासदारांसोबत बैठकीलाही अटी तटी घालणे योग्य नाही. राहुल गांधी मतदारसंघनिहाय काय गडबड झाली ते सांगत आहेत. राहुल गांधींच्या आरोपानंतर आयोगाने आपली विश्वासार्हता वाढवावी. मात्र, आयोग खबरदारी घेताना दिसत नाही. निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास आयोगाने वाढवावा. राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय, असेही शरद पवार म्हणालेत.